येल्लगिरीच्या टेकडीवरचा नरभक्षक बिबट्या - १
दक्षिण भारतातलं घनदाट अरण्यं होतं ते. दुपार कललेली होती. सकाळभर खाण्याच्या शोधात भटकणारे पक्षी आणि जनावरं सावलीला विसावली होती. असह्य उन्हाच्या तलखी मुळे डेरेदार वृक्षाच्या सावलीतही जीव नकोसा होत होता. वाराही साफ पडला होता. गवताची काडी देखील हलत नव्हती. जंगल अगदी शांत होतं.
या शांततेचा भंग होत होता तो जंगलात चरण्यासाठी सोडण्यात आलेल्या गुरांच्या गळ्यात बांधलेल्या घंटांच्या आवाजाने. गुरांच्या गळ्यात घंटा बांधण्यामागे दोन उद्देश होते. एक म्हणजे आपली गुरं कुठे आहेत हे गुराख्याला कळावं आणि दुसरं म्हणजे वाघ-चित्त्यांसारख्या शिकारी प्राण्यांपासून गुरांचं संरक्षण व्हावं.
लेखनविषय:
याद्या
9263
मिसळपाव