मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला आवडलेली पुस्तके: आत्मचरित्र/चरित्र

पुस्तकमित्र ·

प्रचेतस 15/10/2014 - 13:34
धन्यवाद पुस्तकमित्रा. आत्मचरित्रांची आवड अजिबातच नाही. एकमेव आहे माझ्याकडे ते म्हणजे मारुती चितमपल्लींचे 'चकवाचांदण' जे अजूनही वाचले नाही. चरित्रे मात्र कमल गोखलेकृत 'शिवपुत्र संभाजी', बाळ भागवतांनी लिहिलेले रिचर्ड बर्टनचे चरित्र ' शापित यक्ष' आणि अजून काही आहेत. पैकी कमल गोखल्यांचे 'शिवपुत्र संभाजी' हे सर्वोत्तम आहे. बर्‍याच दस्तऐवजांचा वापर करून लिहिलेले हे चरित्र अत्यंत अभ्यासपूर्ण आहे.

In reply to by प्रचेतस

पैसा 15/10/2014 - 14:02
चकवाचांदण मीही घेतलंय. अजून वाचायला मुहूर्त लागला नाहीये. पण त्यात आत्मचरित्रात्मक भागाइतकाच इतर जंगलाबद्दलचा भागही आहे ना?

In reply to by प्रचेतस

स्पा 15/10/2014 - 23:18
त्या चारोळ्यांमधुन लेखकाचे चरीत्रच उलगडत जाते .. मांडी घातलेले. त्यांचे भाऊ गुरुकांत चोखले लग्नानंतर गायबच झाले , त्यांच्या काही चारोळ्या अजरामर झाल्यात पण,

In reply to by प्रचेतस

विलासराव 16/10/2014 - 00:23
मारुती चितमपल्लींचे 'चकवाचांदण' हे आजच अंबरनाथला एका नातेवाईकांच्या घरी पाहीले. त्यांनी वाचाच म्हनुन सुचवले.

In reply to by प्रचेतस

जिन्क्स 16/10/2014 - 13:48
वल्ली तुम्ही चकवाचांदण वाचाचं. तुम्हाला नक्किचं आवडेल. कोणत्याही पानापसुन कधिही सुरु करावे असे हे पुस्तक. नवेगावबांध-अंधारी, कर्णाळा, महाबळेश्वर, ढेबेवाडी व इतर जंगलाचे आणि अनुभवांचे सुरेख वर्णन. पुलं, चित्रकार आमलेकर, जी ए यांच्यासोबतचे अनुभव ही सुरेख टिपलेले आहेत. मला चितमपल्लींचे लिखाण प्रचंड आवडते. त्यांनी निसर्ग सोडुन इतर ही ललीत लिखाण करावे असे वाटते. अवांतरः पुण्यातील युवाशक्ती ही संस्था पुर्वी चितमपल्लींसोबत महाबळेश्वर येथे जंगलवाचन कम ट्रेक आयोजीत करायचे.

पैसा 15/10/2014 - 13:57
सगळ्यात पहिला नंबर अर्थातच लक्षुंबाई टिळकांच्या स्मृतिचित्रांचा! त्याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांचे माझी जन्मठेप, ही पटकन आठवलेली आत्मचरित्रे. स्मृतिचित्रे इतकी निरागस आणि प्रांजळ की काय सांगावे, इतक्या साध्या भाषेत लिहिलेलं आहे की एकदा वाचायला सुरुवात केली की खाली ठेवता येत नाही. माझी जन्मठेप सुद्धा विलक्षण अनुभव देतं. पु.लं. नी रवीन्द्रनाथ टागोरांच्या लहानपणच्या आठवणींचं भाषांतर केलं आहे. तेही आठवतं आहे. चरित्रांमधे अर्थातच बाबासाहेब पुरंदर्‍यांचं राजा शिवछत्रपती आहे, वीणा गवाणकर यांचं एक होता कार्व्हर आहे. अजून आठवेल तशी लिहीनच!

In reply to by पैसा

विजुभाऊ 15/10/2014 - 15:40
एक होता कार्व्हर. झालेच तर मंगला गोडबोलेंचे चीपर बाय डझन , मंगला निगुडकरांचे पॅव्हीलीयन ऑफ अ वूमन चेतना गोसावींचे तोत्तोचान. या पुस्तकांची पारायणे झालीत

अजया 15/10/2014 - 14:36
अाशक मस्त फकिर हे वीणा देवांनी त्यांच्या वडिलांवर अर्थात गोनिदांवर लिहिलेलं छोटेखानी पुस्तक आहे.वडिलांच्या निरनिराळ्या छंदांविषयी.त्यांचं लेखन यावर लिहिलंय.आवडतं ते पुस्तक मला.चार्ली चॅपलीनच्या आयुष्यावरचं भा.द. खेरांचं हसरे दुःख पण छान चरित्र आहे.चकवाचांदण तर अप्रतिम,नावासकट! अनिल अवचटांचं आत्मचरित्र नाही म्हणता येणार पण स्वतःविषयी हे पुस्तक आणि छंदांविषयी सुध्दा.माझे आवडते लेखक असल्याने त्यांच्या आयुष्याबद्दल वाचायला अावडलं. माझ्या अावडत्या आत्मचरित्रांतलं एक ,विंदाच्या पत्नी सुमा करंदीकरांचं रास.साध्यासुध्या गृहिणीने अापली संसारगाथा सांगावी तसं सोप्या शब्दात.एवढा महान कवि नवरा म्हणून असण्याची सुखदुःखं,त्यांच्या स्वभावाशी जुळवुन घेताना उडालेली तारांबळ,तरीही त्यांच्याबद्दलचा सार्थ अभिमान .मला त्यांचं ते सरल लिखाण भावुन गेलं.आहे मनोहर तरी ,सुनिता बाई देशपांड्यांचं आणि रास लागोपाठ वाचल्यावरही सशक्त लिखाण करणार्या सुनिता बाईंच्या आत्मचरित्रापेक्षाही हे अभिनिवेशरहित लिखाण आवडुन गेलं! अजून लिहिते नंतर,किती आवडता विषय काढला हो पुस्तकमित्र!!

मित्रहो 15/10/2014 - 14:40
एपीजे कलाम. मी इंग्रजीत वाचले. तसेच रश्मी बंसलचे "Stay Hungry Stay Foolish" कुरीयनचे "I too had a dream". आदर्श आणि नफ्यातली सहकार चळवळ म्हणजे काय आणि कशी राबवायला हवी हे समाजायला कुरीयनचे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे. भयंकर आवडले.

Gayatri Muley 15/10/2014 - 15:25
वरील प्रतिसादापैकी भरपूर आवडीचे आहेत, पण वरील प्रतिसादात उल्लेख न झालेल एक चरित्र सांगते, बी. डी. खेर यांचे "हसरे दुख"

'मेळघाटावरील मोहर' हे डॉ. रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे ह्यांच्या विलक्षण कामाची ओळख करून देणारं पुस्तक उत्तम. ह्या दांपत्याचं चरित्र मृणालिनी चितळे ह्यांनी सुंदर लिहिलंय. 'तें दिवस' हे तेंडुलकरांचं आत्मचरित्र म्हणजे त्यांच्या नजरेतून तो आरंभीचा काळ बघणं. दुर्दैवाने हे आत्मचरित्र पूर्ण झालं नाही.

In reply to by विशाखा पाटील

विलासराव 16/10/2014 - 00:49
'मेळघाटावरील मोहर' हे डॉ. रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे ह्यांच्या विलक्षण कामाची ओळख करून देणारं पुस्तक उत्तम. ह्या दांपत्याचं चरित्र मृणालिनी चितळे ह्यांनी सुंदर लिहिलंय. मी वाचले आहे. माझा त्यांच्या़कडे प्रत्यक्ष जाण्याचा विचार आहे. ज्यांच्याबरोबर माझी आज चकवाचांदण बद्द्ल चर्चा झाली त्यांना मी हेच पुस्तक सुचवले. त्यात ज्या डॉ. आशीष सातवांचा उल्लेख आहे त्यांची संस्था आहे "महान". त्यांची माझी प्रत्यक्ष भेट आणी चर्चा झालीये मे २०१२ मधे बाबांच्या(आमटे) सोमनाथ येथील श्रमसंस्कार शिबीरात. त्यांच्याकडेही जायचे आहे. डॉ. विकास आमटेंबरोबर मनसोक्त गप्पाही तेथेच झाल्याच. त्यांना मी माझी ब्राझीलवारी सांगीतल्यावर त्यांनी मला त्यांच्या अशाच आठवणीही सांगीतल्या. येत्या वर्षात हेमलकसा आनी मेळघाट दौरा नक्की करणार आहे. परत येईल तेंव्हा त्यावर लिहीलच. पण तोवर मेळघाटावरील मोहर नक्की वाचा. मी खुप आत्मचरीत्र वाचले आहेत.पण आता नावे आठवत नाहीत. त्यातली काही नावे बाकी मिपाकरांनी लिहीलेली आहेत. परंतु व्हाय नॉट आय? हे एक मुलगी डॉक्टरच्या चुकीने कायमचे अंधत्व आल्यावर त्यामुलीने आनी तिच्या आईने त्याचा कसा सामना केला. त्याचे व्रुत्तांकन त्यांच्याच शब्दात वाचताना आनी त्यामुलीने तरीही अर्थशास्त्र हा विषय घेउन पदवी मिळवली तेही पहील्या नंबराने. अर्थशास्रावरील संशोधनात तिने काही रिसर्च पेपर लिहीले आनी आता बहुतेक ती आता परदेशात करियर/रिसर्च करत आहे. अवश्या वाचा. तसंच "जगायचंय प्रत्येक सेकंद" हेही वाचनेबल. मेळघाटावरील मोहर हे कोणी प्रकाशीत केलंय ते सांगु शकाल काय? मी विसरलो.

In reply to by विलासराव

श्रमसंस्कार शिबिराबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे. त्यावर एक लेख लिहाल का? 'मेळघाटावरील मोहर' हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. १ ऑक्टोबर पासून त्यांनी एक उपक्रम सुरू केलाय. प्रत्येक विकल्या गेलेल्या प्रतीमागे ५० रुपये हे डॉ. कोल्हेच्या सामाजिक कार्यासाठी दिले जाणार आहेत. त्यात प्रकाशक आणि लेखक भर घालणार आहेत. राजहंसच्या websiteवर त्याची अधिक माहिती आहे. सर्वानीच जरूर बघावी. http://www.rajhansprakashan.com/

In reply to by विशाखा पाटील

विलासराव 16/10/2014 - 14:49
श्रमसंस्कार शिबिराबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे. त्यावर एक लेख लिहाल का? लिहीन्याचा प्रचंड कंटाळा आहे. थोडक्यात सांगतो. बाबांनी ४५-४६ वर्शांपुर्वी हे शिबीर भरवायला सुरवात केली. उद्देश नवीन लोकांना समजासेवेत हातभार लावता यावा आनी त्यापेक्षा महत्वाचे एखाद्याला जर नवीन कार्यालाच हात घालायचा असेल तर त्याला पायाभुत माहीती बरोबरच सहकार्य मिळवुन देणे. बाबांपासुन प्रेरना घेउन अनेक लोकांनी जागोजागी सामाजीक काम सुरु केले आहेत. त्यातल्याच काही लोकांना तिकडे शिबीरात मार्गदरशनासाठी बोलावले जाते.ते त्यावर सर्व विवेचन करतात .मग आपण त्यांना प्रश्न विचारु शकतो. त्याशिवायही सेशन संपल्यावर त्या वक्त्याशी गप्पा मारु शकतो. दरवर्षी १५-२२ मे या वेळेत हे शिबीर असते. ५००-१००० लोक येतात. काही सहकुटूण्ब येणारे लोकही आहेत. पण ईन जनरल युवा लोकांचा भरणा जास्त असतो. ति़कडे सोमनाथला त्यावेळेस ४४-४९ या दरम्यान तापमान असते. झोपण्यासाठी मोठमोठे हॉल आहेत.सतरंज्या टाकलेल्या असतात बाकी चादर वगैरे आपण घेउन जायचे असते. पण उन्हाळा असल्याने थंडी नसते.सकाळी ४ ला ऊठायचे, पहील्या दिवशी ५-८ साधारण ग्रुप बनवले जातात. शेवटपर्यंत आपण आपल्याच ग्रुपमधे काम करायचे असते. प्रकल्पातील कार्यकर्ते ग्रुप लिडर असतात. सकाली चहा झाल्यावर प्रार्थना आनी लगेच साईअटवर प्रत्यक्ष काम करावे लागते साधारण २-३ तास. आम्हाला तळ्यातील माती उचलुन बाजुला टाकण्याचे काम मिळाले होते. त्यामुळे पाण्याचा साठा वाढावा हा उद्देश. मधेच साईटवरच नाष्टा मिळतो. ९ वाजता परत. आंघोळ आटपुन मग थोडा आराम. एका ग्रुपला रोज जेवनात मदतीसाटी कामातुन सुट्टी असते. मग त्यांनी जेवन बनवण्याबरोबरच सदा टाकणे , रांगोळ्या काढणे असे आपापले कौशल्य दाखवायचे असते. शेवटी एका ग्रुपला आपल्या कामाबद्दल छोटेसे बक्षीस दिले जाते. जेवनानंतर आराम झाल्यावर आलेले वक्ते त्यांच्या कार्याची माहीती देतात. मग एखादा विषय देउन त्यावर कुणीही दिलेल्या वेळेत त्यावर आपले विचार मांडू शकतो. कोणी उरलेल्या वेळेत योगा क्लासेश घेतो. कोणी भेंड्या खेळत बसतात. प्रत्येक ग्रूपला स्वतःचे नाटक बसवावे लागते. अशी एकंदरीत धमाल असते. आमच्या वेळेस शिबीरात नशा हा विषय दिला होता. जेवढे लोक बोलले ते सगळे आमुक नशा कशी वाईट वगैरेवर बोलले. चांगलच बोलले. मग मला रहावले नाही. मी नशामुक्तीवर बोललो आनी त्यावर विपश्यना कशी प्रभावी मदत करु शकते त्यावर बोललो. त्यात मी परीक्रमेमुळे दाढी वाढवलेली होती व सफेद लुंगी आनी शर्ट असल्याने लोक मला महाराजच म्हणत होते. अन मी तेथे सांगीतले की मी १५-१६ वर्श रोज दारु प्यायचो मग विपश्यनेला गेलो आनी नशेतुन मुक्त झालो. मग जवळजवळ प्रत्येक शिबीरार्थी म्ला भेटायला येउ लागला. हे पाहुन मग डॉ. विकास आमटेंनी मला बोलावुन घेतले आनी आमची छानच मैत्री झाली.बाबा स्वतः नर्मदाकिनारी मेघाताइंना पाठींबा द्यायला तब्बल दहा वर्श राहीले त्याकाळात विकारभाउंनी स्वतः आनंदवन सांभाळले. आज आनंदवन स्वयंपुर्ण असुन ते जवळपास २७ प्रोजे़क्ट चालवतात. विकासभाउंना इंजीनीयर व्हायचे होते पण त्यांना डॉ. व्हावे लागले. पण त्यांनी तिथले तळे आनी घरे बांधतानाकत्यांच्या ईंजीनियरींगच्या कौशल्याचा उपयोग केलाय. त्यांना तशी घरे बांधण्यासाठी लातुर भुकंपानंतर ति़कडे बोलावण्यात आले होते. एकंदरीत हरहुन्नरी व्यक्तीमत्व आहे. तिथुनच प्रेरणा घेउन स्नेहालय चालु करनार्यांचॉ मोठी टीम शिबीरात दरवर्षी येत असते. असो. अवांतरः डोंबोली २-९ नोव्हेंबरला एक ग्रुप आनंदवन/ सोमनाथ / हेमलकसा आनी अभय बंगाची सर्च संस्था येथे जाणार आहे. रेल्वे आरक्षनापासुन(३ एसी कारण आता स्लीपर आरक्षण मिळणार नाही. कोणी स्वतः आरक्षण करत असेल तरी चालु शकते.) जेवनखाण्यासह ९००० रुपये प्रतिव्यक्ती भरायचे आहेत. ति़कडे बसने प्रवास. ६ जागा शिल्लक आहेत.

In reply to by विशाखा पाटील

सखी 16/10/2014 - 01:08
वा छान आणि जास्त न ऐकलेल्या पुस्तकांची नावं (अजया, विशाखा, विलासराव) कळत आहेत. मला आहे मनोहर तरी, झिम्मा, अग्निपंख आवडले - मुख्य म्हणजे त्यातला प्रामाणिकपणा आवडला. सध्या मंगला गोडबोले यांच सुनिताबाई वाचतेय. एक होता कार्व्हर ह्याचं मराठी रुपांतर इतकं भावलं नाही.

अजया 15/10/2014 - 22:03
लंडनच्या आजीबाई हे ताराबाई वनारस्यांचं सरोजिनी बाबर यांनी लिहिलेलं चरित्र पण मनोरंजक आहे.लिहिता वाचता न येणारी खेडेगावातली मुलगी स्वकतृत्वावर कसे साम्राज्य निर्माण करते,घरादाराचा उध्दार करते,वाचायला छान आहे. नाच गं घुमा हे रणजित देसाईंच्या पत्नी आणि लेखिका माधवी देसाई यांचं आत्मचरित्र अस्वस्थ करुन सोडणारं. नाथ हा माझा हे कांचन घाणेकरांचं अतिशय प्रामाणिकपणे घडलं तसं अायुष्य सांगणारं चरित्र आहे. श्री ना पेंडश्यांचं अात्मचरित्र त्यांनी त्यांचा मित्र लिहितोय असं दाखवुन लिहिलंय!पण श्रीनांची शैली कुठे लपतीये!!

In reply to by अजया

आदूबाळ 16/10/2014 - 02:17
श्री ना पेंडश्यांचं अात्मचरित्र त्यांनी त्यांचा मित्र लिहितोय असं दाखवुन लिहिलंय!पण श्रीनांची शैली कुठे लपतीये!!
याचीच आठवण काढायला आलो होतो. एकच नंबर आत्मचरित्र.

अर्धवटराव 15/10/2014 - 23:00
विश्वास पाटलांचं महानायक (सुभाषबाबु) आणि संभाजी बरं वाटलं (छावा पेक्षा तर बरच उजवं). गंगाधर गाडगीळांचं दुर्दम्य अप्रतीम आहे. लोकमान्यांच्या गुणावगुणांचं रेखाटन उत्तम केलय गाडगीळांनी.

भृशुंडी 16/10/2014 - 00:45
स्मरणगाथा - गो.नी दांडेकर : खरंच वेगळं आणि वाचनीय असं जगलेली थोडकी माणसं असतात, त्यापैकी एक. अनुभव अस्स्ल आहेतच पण निव्वळ शब्दांमध्येही नाद आहे. दळवींचं "आत्मचरित्राऐवजी" हेसुद्धा आवडलं. बाकी ऐतिहासिक चरित्रं झेपली नाहीत.

विलासराव 16/10/2014 - 01:02
कोल्हाट्याचं पोर. बलुतं. पाथरवाटा. सुरेंद्रनाथ कांबळीचं पुस्तक त्याचं नाव आठवत नाही आता.ह्या कांबळींनी अंधत्व असताना केलेले अनेक मोठमोठे उद्यागधांदे. एक असतो बिल्डर. ही श्रींची ईच्छा- श्रीनिवास ठाणेदार. ईडली ऑर्कीड आनी मी- विट्ठ्ल कामत.

गांधी हत्या आणि मी.. ले.नथुराम गोडसे. राजा शिव छत्रपती श्रीमन योगी माझी जन्मठेप चीपर बाय द डझन आयडा स्कॅडर चार्ली चॅप्लीन (हसरे दु:ख) शांतारामा प्रथम पुरषी एक वचनी कर्‍हेचे पाणी एक होता कार्व्हर नाझी भस्मासुराचा उदय आणि अस्त विन्सटन चर्चील नशायात्रा (ले. तुषार नातू... वाचले नसेल तर नक्की वाचा....) क्लोरोफॉर्म हेलन केलर आहे मनोहर तरी स्म्रुतीचित्रे आमचा बाप अन आम्ही द रूट (चार पिढ्यांची कहाणी... अप्रतिम पुस्तक जरूर वाचा... फार येडे करून सोडते हे पुस्तक) आणि प्राण देव आनंद मधुबाला इडली,आर्किड आणि मी (विठ्ठल कामत) जगाच्या पाठीवर शोभना समर्थ (ह्यांच्या पुस्तकाचे नांव विसरलो) माझंही एक स्वप्न होते (वर्गीस... अमूल) कॉलनी (लेखकाचे नांव विसरलो... बरे आहे पुस्तक... चार घटका करमणूक) राऊ त्रिंबक डेंगळे पाटील (जमल्यास नक्की वाचा....) संघर्ष एका आईचा - नौदलाशी (आमच्या डोंबोलीतल्याच एका सुपुत्राची कथा आणि व्यथा) स्टीव्ह जॉब्ज एका चीनी वेश्येचे आत्मचरित्र वाचलेले आठवत आहे... (नेहमी प्रमाणे नांव विसरलो. माओच्या राजवटीच्या काळातले आहे. सरदार कन्या असून पण लहान-पणी केलेल्या एका चूकीची शिक्षा म्हणून तिची रवानगी जपानला केली जाते.पुढे ती जपानसाठीच हेर म्हणून चीनच्या विरिधात काम करते. एक खिळवून ठेवणारे पुस्तक.) तसेच एका बार बार-बालेचे आत्मचरित्र वाचले होते. (हळदणकर असे नांव असावे...आमच्या मेंदूतली हार्ड-डिस्क बरीच कमकुवत झाली आहे...) ही श्रींची इच्छा (श्रीनिवास ठाणेकर ह्यांचे सुंदर आत्मचरित्र...कर्नाटकातला एक मध्यम्वर्गीय मुलगा अमेरिकीत जातो काय आणि १००० एकर शेतीचा मालक होतो काय... प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे... ह्याचा अर्थ शिकवणारे आत्मचरित्र...आम्हाला नावांपेक्षा , त्या पुस्तकातून काय शिकलो? हेच शिकायला मिळेते... शेवटी नावांत काय आहे?) आणि असाच एक टाइमपास म्हणून ऑन लाइन चरित्र आहे. फसवेच आहे पण चार घटका निव्वळ करमणूक म्हणून एकदम योग्य... गरजूंनी व्य.नि. करावा.

पैसा 16/10/2014 - 09:40
लंडनच्या आजीबाई, सांगत्ये ऐका, ईडली ऑर्किड आणि मी, तसंच स्मरणगाथा ही सुद्धा खूप आवडलेली पुस्तकं.

In reply to by जेपी

पैसा 16/10/2014 - 09:53
जेप्या, श्रीमान योगी आणि स्वामी यांना चरित्र म्हणता येणार नाही. त्या कादंबर्‍या आहेत. सुभाषचंद्र बोसांवरील 'महानायक' सुद्धा याच कॅटॅगरीत येते.

जेपी 16/10/2014 - 09:56
जेप्या, श्रीमान योगी आणि स्वामी यांना चरित्र म्हणता येणार नाही. त्या कादंबर्‍या आहेत. सुभाषचंद्र बोसांवरील 'महानायक' सुद्धा याच कॅटॅगरीत येते. मान्य आहे. आपल्याला चरित्र आणी कादंबर्यात फरक कळत / जाणवत नाही.

In reply to by जेपी

पैसा 16/10/2014 - 10:01
चरित्र असते ना, ते ऐतिहासिक संदर्भ तसेच्या तसे घेऊन लिहिले जाते. त्यात लेखक स्वतःच्या कल्पनेने काही लिहीत नाही. मात्र कादंबर्‍यांमधे लेखक भरपूर स्वातंत्र्य घेऊन लिहितो. खर्‍या प्रसंगांबरोबर काही काल्पनिक प्रसंग लिहितो, तसेच काल्पनिक व्यक्तिरेखाही अ‍ॅड करतो.

विटेकर 16/10/2014 - 09:57
एक झाड दोन पक्षी .... अजिबात आवडले नाही ! उगाच आपल्या अविवेकी वागण्याचे लंगडे समर्थन वाटले. कसे-बसे पूर्ण केले.

माझ्या विशेष आवडीचा धागा. १. पु.ल. देशपांडे (सगळी पुस्तकं) २. माझी जन्मठेप (विनायक दामोदर सावरकर) सिडने शेल्डन (सगळी पुस्तकं) गांधीहत्या आणि मी (नथुराम गोडसे) वारस (मला हे पुस्तक हवयं विकतं पण मिळत नाहिये) (वासंती वाळिंबे) श्यामची आई (पुर्वी आवडायचं आता त्यामधला फोलपणा लक्षात आलाय) (साने गुरुजी) शिवचरित्र (बाबासाहेब पुरंदरे) मृत्युंजय (शिवाजी सावंत) बाजार (लेखकाचं नाव लक्षात नाही पण कादंबरी फार सुंदर आहे, मिळत नाहीये ही पण आता) श्रीमानयोगी (रणजित देसाई) शाळा (मिलिंद बोकील) गारंबीचा बापु (श्री.ना.पेंडसे) शितु (गो.नी.दांडेकर) पानिपत (विश्वास पाटील) आहे मनोहर तरी (सुनिता देशपांडे) झोंबी (आनंद यादव) पडघवली (बहुतेक श्री.ना.पेंडसे) द.मा.मिरासदार (सगळी पुस्तकं) प्लेजर बॉक्स (व.पु. काळे) ऐक सखे (व.पु. काळे) वपुर्झा (व.पु. काळे) पार्टनर (व.पु.काळे) कथाकथन मधल्या बहुतेक गोष्टी (व.पु.काळे) सुहास शिरवळकर (सगळी पुस्तकं) गॉडफादर (मारिओ पुझो) सिसिलिअन (मरिओ पुझो) ओमेर्ता (मारिओ पुझो) फुल्स डाय (मारिओ पुझो) द पेट सिमेटरी (स्टिफन किंग) द तालिस्मान (स्तिफन किंग) रेझ द टायटॅनिक (क्लाईव्ह कसलर) पोसायडॉन्स अ‍ॅरो (अनुवादित) (क्लाईव्ह कसलर) डीप सिक्स (क्लाईव्ह कसलर) मे डे (अनुवादित) (क्लाईव्ह कसलर) व्हाईट डेथ (क्लाईव्ह कसलर) ट्रोजन डेथ ( सद्ध्या वाचतोय, कालचं चालु केलय) (क्लाईव्ह कसलर) पोलर शिफ्ट (क्लाईव्ह कसलर आणि पॉल केंप्रेकोस संयुक्तपणे) द टाईम मशिन (एच.जी.वेल्स) जंपर्स (स्टिव्हन गौल्ड) पॅपिलॉन (ईंग्लिश अनुवादित)(हेन्री शॅरिअर) बँको (ईंग्लिश अनुवादित)(हेन्री शॅरिअर) ट्वेंटी थाउसंड लिग्स अंडर द सी (ज्युल व्हर्न्स) जर्नी टु द सेंटर ऑफ अर्थ (ज्युल व्हर्न्स) अराऊड द वर्ल्ड ईन एटी डेज (ज्युल व्हर्न्स) तुन्त्सा (लेखक आठवत नाही, अमेरिकेमधल्या रेड ईंडियन्स चा उगम शोधायसाठी बालसा लाकडाच्या तराफ्यावरुन एक गट समुद्रातुन प्रवास करतो अशी गोष्ट आहे) अजुन बरीच आहेत. वेळ मिळाला की टंकीन नावं.

स्नेहल महेश 16/10/2014 - 13:45
खूप छान आत्मचरीत्र आहे १९५०-६० च्या शतकात हॉर्स रेसिंग सारखं क्षेत्र निवडून त्यात यशस्वी होऊन दाखवणे, कठीण काळात आलेले अनुभव खूप छान प्रकारे लिहिले आहेत नि:पक्षपाती लिखान

माझी जन्मठेप - वि. दा. सावरकर ढोर - भगवान इंगळे बलुतं - दया पवार हसरे दु:ख - भा.द.खेर आमच्या आयुष्यातील काही आठवणी - रमाबाई रानडे इडली ऑर्किड आणि मी - विठ्ठल कामत साम्राज्य बुरख्यामागचे द व्हेल्ड किंगडम - कारमेन बिन लादेन दी ग्लास कॅसल - जेनेट वॉल्स दी डायरी ऑफ अ यंग गर्ल - अ‍ॅनी फ्रँक सोल सर्फर - बेथनी हॅमिल्टन वार्ड नं ५ - डॉ. रवी बापट एका खेळियाने- दिलिप प्रभावळकर एका मारवाड्याची गोष्ट - गिरेश जाखोटिया केतकर वहिनी- उमा कुलकर्णी

In reply to by काळा पहाड

पैसा 16/10/2014 - 17:22
काही ठिकाणी जरा अतिरंजित वाटलं, पण एकूण वाचायला छान. वर सानिकाने लिहिलेलं कारमेन बिन लादेनचंही खूप छान आहे पुस्तक.

सौंदाळा 16/10/2014 - 16:47
'माझंही एक स्वप्न होते' - वर्गीस कुरियन (मोदकाचा लेख वाचुन हे आत्मचरित्र वाचनालयातुन मिळवुन वाचले होते आणि आवडले)

अजया 17/10/2014 - 08:06
कारमेनचं पुस्तक घेतलं पाहिजे! डाॅ.अानंदीबाई जोशींचं अंजली किर्तनेंनी लिहिलेलं चरित्रही छान आहे.कमल पाध्येंचं बंध अनुबंध ही अावडुन गेलेलं. बेस्टेस्ट आत्मचरित्र नानु सरंजामेंचंच!!

मी पहिलं आत्मकथन वाचलं ते बीएला शिकत असतांना ऐच्छिक मराठी घेतलं तेव्हा दलित स्त्री आत्मकथन 'जिणं आमुचं' बेबीताई कांबळे यांच. धर्मांतरापूर्वीच्या महार समाजाचं चित्रण. महारा समाज मी पाहिलेला पण इतके बारीक तपशील त्यात वाचण्यात आले की अरेच्चा आत्मकथनात असं चित्रण असतं तर..सामाजिक उतरंड, ते अंगाण येणे, जातीव्यवस्थेचा संघर्ष ती भूक ती वर्णनं. मग पुढे काही दिवस आणि पुढच्या शिक्षणानिमित्त अशी अनेक आत्मकथनं मला आवडली. माझ्या जल्माची चित्तर कथा- शांताबाई कांबळे, आठवणींचे पक्षी- प्र.ई.सोनकांबळे, (प्र.ई सर, आमचे औरंगाबादचे आणि यांना अनेकदा भेटण्याचा योगही अनेकदा आला होता. यांची एक सवय होती. कोणताही कार्यक्रम असला की प्रास्ताविकापासून ते आभारापर्यंत सर्व लिहुन काढायची.) मला बरीच वाचायला मिळाली ती दलित आत्मकथनं मला हे सर्व समजुन घ्यायला खुप आवडलं. बलुतं- दया पवार, मला उध्वस्त व्हायचंय- मलिका अमर शेख, आहे मनोहर तरी- सुनिता देशपांडे, उपरा-लक्ष्मन माने, उचल्या लक्ष्मन गायकवाड. मिटलेली कवाडे-मुक्ता सर्वगौड, मरणकळा-जनाबाई गिर्‍हे, उर्मिला पवारांचं आयदान, जगले जशी-लालन सारंग, सर्वात आवडलेलं आता हे का आवडलं माहिती नाही पण मला भिडणारं पुस्तक 'सर आणि मी' जोत्सना संभाजी कदम, चित्रकार असलेले ते प्राध्यापक आणि त्यांच्यावर प्रेम करणारी त्यांची विद्यार्थीनी. वयात दोघांच्या पंचवीस वर्षाचं अंतर. विद्यार्थी, प्रेयसी आणि पत्नी या तीनही अवस्थेचं चित्रण अतिशय सुंदर पद्धतीने आलं आहे, मिळालं तर नक्की वाचा. असो, हल्ली वाचन कमी झालंय. पुस्तक उघडलं की कंटाळा येतो. आयुष्यातल्या एका नव्या वळणावर जरा गुंतलोय. नै तर आत्मचरित्र, आत्मकथनं वाचने ही माझी स्पेशालिटी होती. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुंबा 06/03/2017 - 15:09
हे अफाट पुस्तक आहे. प्रांजळ, निर्विश आणि कुठलाही अभिनिवेश न ठेवता लिहिलंय. मला आवडलेल्या आत्मचरित्रात हे वरच्या नंबरला असेल. चिपर बाय द डझन हे आणखी एक सर्वांगसुंदर पुस्तक.

In reply to by पुंबा

मोदक 06/03/2017 - 16:05
हे अफाट पुस्तक आहे. प्रांजळ, निर्विश आणि कुठलाही अभिनिवेश न ठेवता लिहिलंय. मला आवडलेल्या आत्मचरित्रात हे वरच्या नंबरला असेल. नक्की कोणते पुस्तक..?

मनिष 17/10/2014 - 12:33
खूप आहेत अशी चरित्र. आणि बर्‍याच वेळा केवल स्वतःच्या दृष्टीकोनातून लिहिली असली तरी काहितरी वेगळे काम केलेल्यांचे, वेगळे जीवन जगलेल्यांचे आयुष्य कसे होते - त्यांच्या अडचणी, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी निवडेलेले काम - ह्यात मला खूप रस वाटतो. आणि ती लोकंही माणंसच होती हे मनात असले असले की मग फारसे मुर्तिभंजन होत नाही, कारण त्यांच्या मुळी मुर्ती बनवतच नाही. शिवाय, अशी चरित्र वाचतांना लेखकाला स्वतःविषयी किती इनसाईट आहे ते जाणवतेच की - जसे दादा कोंडक्यांच्या आत्मचरित्रात ते स्वतःच्या एकटेपणाविषयी देवाला/नशिबाला दोष देताता, तेंव्हा ह्या माणसाला स्वतःच्या स्वभावाविषयी काहीच इन्साईट नाही का ह्याचे आश्चर्य वाटते, तसेच लता मंगेशकरांच्या पुस्तकांतही होते (नाव आठवत नाही - कित्येक बाबतीत त्यांची मते त्यांच्या पिढीच्या अल्पशिक्षित सामान्य व्यक्तिंसारखीच वाटतात. अर्थात त्या त्य व्यक्तिंचे त्यांच्या क्षेत्रातले असामान्यत्व सोडले तर तीही आपल्यासारखी सामान्य माणसेच असतात की, आणि चरित्रांतून तर हे फारच प्रकर्षाने जाणवते. तसेच काही व्यक्ति सर्वच बाबतीत (किवा का विशिष्ट गोष्टींचा) किती खोलवर अणी समग्रपणे विचार करतात (जसे अभय बंग), हेही जाणवते आणि मलातरी ते अतिशय स्फुर्तीदायी आणी प्रेरणादायी वाटते. आता मी तशीही ऐतिहासिक किंवा बॉलिवूड्/क्रिकेटर ह्यांची अतमचरित्र वाचत नाही - पण समकालीन किंवा थोडे आधिचे लेखक/नाटककार्/कलाकार, उद्योजक, प्रभावी/मुलखावेगळ्या व्यक्ती ह्यांची आत्मचरित्र आजही वाचायला आवडतात. असो. ही माझी आवडती काही चरित्र/आत्मचरित्र. माही विशेष क्रम नाही, पण जशी आठवतील तशी लिहितो - (१) मी अल्बर्ट एलिस (अंजली जोशी) - मानसशास्त्रात रस असलेल्यांनी तर वाचावेच, पण इतरांनीही आवर्जुन वाचावे असे पुस्तक. REBT च्या जनकाची ही गोष्ट मुळातुनच वाचण्यासारखी आहे. आणि त्याच्या अत्मचरित्रावर आधारीत असली तरी अनुवाद नसल्यामुळे भाषा आणि संगत दोन्हीही छान नैसर्गिक आहे. बरेचसे आपल्याला धक्कादायक वाटावेत अशे तपशील असले तरी त्यातून सतत जाणवणारी अल्बर्ट एलिस ह्याची सकारात्मक विवेकवादाची जाणीव ही कित्येक REBT च्या पुस्तकांपेक्षा जास्त परिणामकारक आहे. (२) स्वतःविषयी (अनिल अवचट) - आत्मचरित्र नसले तरीही बरेचसे आत्मपर लिखाण. मी ह्यावर माझ्या ब्लॉगवर एक मोठा लेखही लिहिला होता. स्वतःविषयी हे पुस्तक म्हणून खूप परिणामकारक आहे. केवळ आत्मपर साहित्यलेखन यापलीकडे ते खूप काही आहे आणि हे यश केवळ अनिल अवचट यांच्या साध्या, सरळ आणि चित्रमय शैलीचं नाही. हे पुस्तक त्यांना वेगळ्या वाटेने जगतांना आलेल्या अनुभवांच्या नोंदींचे (memoirs ) आहे. त्यात कुठेही बडेजाव, आढ्यता नाही. हे अनुभव रोजच्या जगण्यातील आहेत – कुठल्याही क्रांतीच्या रोमहर्षक कथा नाही. कित्येक वेळा असे वाटते, अरे इतक्या साधेपणे आणि सहजपणे आपल्यालाही जगता आले तर? अर्थातच ते साधं आणि सहज असलं तरी सोपं नाही. (३) कैफी आणि मी (शौकत आझमी अनुवादः जयश्री देसाई )- हे असेच पुस्तक प्रदर्शनात अचानक सापडलेले एक रत्न. 'कैफी आझमी' ह्यांच्या पत्नी आणि शबाना आझमी ह्यांची आई शौकत आझमी ह्यांनी लिहिलेले. उदारमतवादी, साम्यवादी/समाजवादी, शायर कैफी ह्यांच्याविषयी - त्यांच्या विचारांविषयी, लिखाणाविषयी आणि कुटूंबाविषयी उत्सुकता होतीच म्हणून हातात घेतले आणि खूपच आवडले. तेंव्हाच्या समाजवादाचा, आदर्शवादाचा आणि जीवनाचा एक छानसा तुकडा आपण प्रत्यक्ष अनुभवतो ह्या पुस्तकात. त्यांच्या आयुष्यात मनस्वी निर्णयांतुनही जपलेले व्यक्तिस्वातंत्र्य, प्रेम आणि त्यांचा अगदी शायराना/फिल्मी रोमांस हे फार लोभसपणे येते ह्या पुस्तकात. शबानाची वैचारीक बैठक कशी निर्माण झाली असेल ह्याचाही अंदाज येतो. खुपच छान आहे पुस्तक हे. नक्की वाचा. मुस्लिम समाजातील रजिया पटेल, हमीद दलवाई, कैफी आझमी अशा उदारमतवादी विचारधारा नंतर फारशी प्रबळ का झाली नसावी ह्याची खंत वाटते! असो. हे पुस्तक आता कित्येक अमेरिकन विद्यापीठात संदर्भ ग्रंथ म्हणून वापरतात! : P अजूनही आहे बरीच अनवट चरित्रे, लिहितो जमेल तसा नंतर!

१.नाझी भास्मासुराचा उदयास्त २.एक होता कार्व्हर ३.वोल्गा जेव्हा लाल होते ४.अब्राहम लिंकन फ़ाळणी टाळणारा महापुरुष ५.ओपेन्हायमर ६.हसरे दुःख ७.महानायक ८.मृत्युंजय ९.दुर्दम्य १०.इये सयाजीचिये नगरी ११.अकियो मोरिता एंड सोनी स्टोरी १२. ली आयकोका अजुन ही खुप आहेत आता आठवेनात , मुख्य आवड चरित्रे वाचन आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आदूबाळ 22/10/2014 - 01:44
नाझी भस्मासुराचा ... आणि व्होल्गा जेव्हा .... हे चरित्र म्हणता येईल का याबद्दल शंका आहे.

In reply to by आदूबाळ

आदूबाळ, सहमत आहे भाऊ साहेब! पण त्या बुक्स चं जे एक लेखाजोखा टाइप स्वरुप आहे त्याच्यामुळे मी बेंबट्या झालोय!!!

वेल्लाभट 20/10/2014 - 12:52
मला वाचनाची आवड फार उशीरा म्हणजे चोविशीत वगरे लागलेली आहे. त्यामुळे अर्थातच वाचलेली पुस्तके मोजकी. पण आत्मचरित्र विशेष आवडतात. त्या व्यक्तीशी जवळून बोलता येतं. मोजक्या वाचलेल्या पुस्तकातून आवडलेली आत्मचरित्रः ओपन - आंद्रे आगासी - हे खूप आवडलं. इम्पल्सिव्ह परचेस. दिसलं, उचललं. पण इथूनच सुरुवात झाली खरी वाचनाची आवड जागृत व्हायला. द लास्ट लेक्चर - रँडी पौश - हे ही छान आहे. बरं आहे म्हणजे. कार्व्हर आणि इतर वर दिलेली नावं नोंद करून घेतोय. पुढे वाचायला.

सिरुसेरि 10/11/2014 - 13:48
करुणाष्टक हे व्यंकटेश माडगुळकर लिखित पुस्तकही खुप छान आहे . त्यामध्ये त्यांनी आपल्या आईच्या आठवणी , जुने औन्ध संस्थान , तिथले कर्मचारी , त्यांचे कौटुंबिक जीवन , बदल्या व त्यामुळे होणारी ओढाताण या मनाला हलवुन सोडणारया घटना सांगितल्या आहेत .

श्रीगुरुजी 10/11/2014 - 20:52
'ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी' हे श्री श्री परमहंस योगानंदाचे इंग्लिशमधील आत्मचरीत्र मराठीत 'योगीकथामृत' या नावाने भाषांतरीत झालेले आहे. हे आत्मचरीत्र अतिशय आवडले. हे अनेकवेळा वाचलेले आहे. डॉ. हिम्मतराव बावस्करांचं 'बॅरीस्टरचं कार्टं', डॉ. नरेंद्र जाधवांचं 'आमचा बाप आणि आम्ही', रमेश देवांचं 'या सुखांनो या', गोपाळ गोडसेंचं 'गांधीहत्या आणि मी' ही चरित्रे/आत्मचरित्र चांगली आहेत.

श्रीगुरुजी 10/11/2014 - 21:02
अजून 'ही श्रींची इच्छा' (श्रीनिवास ठाणेदार), 'आहे मनोहर तरी' (सुनीता देशपांडे), 'अग्निपंख' (डॉ. अब्दुल कलाम), 'जिहाद' (अस्लम जमादार), 'इन्फिडेल' (या सुदानी लेखिकेचे नाव विसरलो) इराण, इराक, पाकिस्तान, सुदान, सौदी अरेबिया इ. कर्मठ मुस्लिम देशातील महिलांनी लिहिलेली स्वतःची चरित्रे अत्यंत हृदयद्रावक आहेत. या अनेक पुस्तकांचे मराठी अनुवाद उपलब्ध आहेत.

वडगावकर 07/03/2017 - 09:28
अगदी खरंय.... कितीही वेळा वाचलं तरी कंटाळा येत नाही गम्मत म्हणजे हे पुस्तक म्हणजे अध्यात्माचं प्रवेश द्वार आहे.... अजून थोडी..... माय विकेड विकेड वेज-एरॉन फ्लीन (मराठी ) दिव्य स्पर्श -डॉ भोसले प्रकाशाच्या वाटेवर- श्री.कृष्णानंद सांगत्ये ऐका-हंसा वाडकर एकटा जीव -दादा कोंडके शांतारामा- व्ही शांताराम माझा लढा-हिटलर (मराठी ) पॅपिलॉन-हेन्री शॅरीयर

प्रचेतस 15/10/2014 - 13:34
धन्यवाद पुस्तकमित्रा. आत्मचरित्रांची आवड अजिबातच नाही. एकमेव आहे माझ्याकडे ते म्हणजे मारुती चितमपल्लींचे 'चकवाचांदण' जे अजूनही वाचले नाही. चरित्रे मात्र कमल गोखलेकृत 'शिवपुत्र संभाजी', बाळ भागवतांनी लिहिलेले रिचर्ड बर्टनचे चरित्र ' शापित यक्ष' आणि अजून काही आहेत. पैकी कमल गोखल्यांचे 'शिवपुत्र संभाजी' हे सर्वोत्तम आहे. बर्‍याच दस्तऐवजांचा वापर करून लिहिलेले हे चरित्र अत्यंत अभ्यासपूर्ण आहे.

In reply to by प्रचेतस

पैसा 15/10/2014 - 14:02
चकवाचांदण मीही घेतलंय. अजून वाचायला मुहूर्त लागला नाहीये. पण त्यात आत्मचरित्रात्मक भागाइतकाच इतर जंगलाबद्दलचा भागही आहे ना?

In reply to by प्रचेतस

स्पा 15/10/2014 - 23:18
त्या चारोळ्यांमधुन लेखकाचे चरीत्रच उलगडत जाते .. मांडी घातलेले. त्यांचे भाऊ गुरुकांत चोखले लग्नानंतर गायबच झाले , त्यांच्या काही चारोळ्या अजरामर झाल्यात पण,

In reply to by प्रचेतस

विलासराव 16/10/2014 - 00:23
मारुती चितमपल्लींचे 'चकवाचांदण' हे आजच अंबरनाथला एका नातेवाईकांच्या घरी पाहीले. त्यांनी वाचाच म्हनुन सुचवले.

In reply to by प्रचेतस

जिन्क्स 16/10/2014 - 13:48
वल्ली तुम्ही चकवाचांदण वाचाचं. तुम्हाला नक्किचं आवडेल. कोणत्याही पानापसुन कधिही सुरु करावे असे हे पुस्तक. नवेगावबांध-अंधारी, कर्णाळा, महाबळेश्वर, ढेबेवाडी व इतर जंगलाचे आणि अनुभवांचे सुरेख वर्णन. पुलं, चित्रकार आमलेकर, जी ए यांच्यासोबतचे अनुभव ही सुरेख टिपलेले आहेत. मला चितमपल्लींचे लिखाण प्रचंड आवडते. त्यांनी निसर्ग सोडुन इतर ही ललीत लिखाण करावे असे वाटते. अवांतरः पुण्यातील युवाशक्ती ही संस्था पुर्वी चितमपल्लींसोबत महाबळेश्वर येथे जंगलवाचन कम ट्रेक आयोजीत करायचे.

पैसा 15/10/2014 - 13:57
सगळ्यात पहिला नंबर अर्थातच लक्षुंबाई टिळकांच्या स्मृतिचित्रांचा! त्याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांचे माझी जन्मठेप, ही पटकन आठवलेली आत्मचरित्रे. स्मृतिचित्रे इतकी निरागस आणि प्रांजळ की काय सांगावे, इतक्या साध्या भाषेत लिहिलेलं आहे की एकदा वाचायला सुरुवात केली की खाली ठेवता येत नाही. माझी जन्मठेप सुद्धा विलक्षण अनुभव देतं. पु.लं. नी रवीन्द्रनाथ टागोरांच्या लहानपणच्या आठवणींचं भाषांतर केलं आहे. तेही आठवतं आहे. चरित्रांमधे अर्थातच बाबासाहेब पुरंदर्‍यांचं राजा शिवछत्रपती आहे, वीणा गवाणकर यांचं एक होता कार्व्हर आहे. अजून आठवेल तशी लिहीनच!

In reply to by पैसा

विजुभाऊ 15/10/2014 - 15:40
एक होता कार्व्हर. झालेच तर मंगला गोडबोलेंचे चीपर बाय डझन , मंगला निगुडकरांचे पॅव्हीलीयन ऑफ अ वूमन चेतना गोसावींचे तोत्तोचान. या पुस्तकांची पारायणे झालीत

अजया 15/10/2014 - 14:36
अाशक मस्त फकिर हे वीणा देवांनी त्यांच्या वडिलांवर अर्थात गोनिदांवर लिहिलेलं छोटेखानी पुस्तक आहे.वडिलांच्या निरनिराळ्या छंदांविषयी.त्यांचं लेखन यावर लिहिलंय.आवडतं ते पुस्तक मला.चार्ली चॅपलीनच्या आयुष्यावरचं भा.द. खेरांचं हसरे दुःख पण छान चरित्र आहे.चकवाचांदण तर अप्रतिम,नावासकट! अनिल अवचटांचं आत्मचरित्र नाही म्हणता येणार पण स्वतःविषयी हे पुस्तक आणि छंदांविषयी सुध्दा.माझे आवडते लेखक असल्याने त्यांच्या आयुष्याबद्दल वाचायला अावडलं. माझ्या अावडत्या आत्मचरित्रांतलं एक ,विंदाच्या पत्नी सुमा करंदीकरांचं रास.साध्यासुध्या गृहिणीने अापली संसारगाथा सांगावी तसं सोप्या शब्दात.एवढा महान कवि नवरा म्हणून असण्याची सुखदुःखं,त्यांच्या स्वभावाशी जुळवुन घेताना उडालेली तारांबळ,तरीही त्यांच्याबद्दलचा सार्थ अभिमान .मला त्यांचं ते सरल लिखाण भावुन गेलं.आहे मनोहर तरी ,सुनिता बाई देशपांड्यांचं आणि रास लागोपाठ वाचल्यावरही सशक्त लिखाण करणार्या सुनिता बाईंच्या आत्मचरित्रापेक्षाही हे अभिनिवेशरहित लिखाण आवडुन गेलं! अजून लिहिते नंतर,किती आवडता विषय काढला हो पुस्तकमित्र!!

मित्रहो 15/10/2014 - 14:40
एपीजे कलाम. मी इंग्रजीत वाचले. तसेच रश्मी बंसलचे "Stay Hungry Stay Foolish" कुरीयनचे "I too had a dream". आदर्श आणि नफ्यातली सहकार चळवळ म्हणजे काय आणि कशी राबवायला हवी हे समाजायला कुरीयनचे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे. भयंकर आवडले.

Gayatri Muley 15/10/2014 - 15:25
वरील प्रतिसादापैकी भरपूर आवडीचे आहेत, पण वरील प्रतिसादात उल्लेख न झालेल एक चरित्र सांगते, बी. डी. खेर यांचे "हसरे दुख"

'मेळघाटावरील मोहर' हे डॉ. रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे ह्यांच्या विलक्षण कामाची ओळख करून देणारं पुस्तक उत्तम. ह्या दांपत्याचं चरित्र मृणालिनी चितळे ह्यांनी सुंदर लिहिलंय. 'तें दिवस' हे तेंडुलकरांचं आत्मचरित्र म्हणजे त्यांच्या नजरेतून तो आरंभीचा काळ बघणं. दुर्दैवाने हे आत्मचरित्र पूर्ण झालं नाही.

In reply to by विशाखा पाटील

विलासराव 16/10/2014 - 00:49
'मेळघाटावरील मोहर' हे डॉ. रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे ह्यांच्या विलक्षण कामाची ओळख करून देणारं पुस्तक उत्तम. ह्या दांपत्याचं चरित्र मृणालिनी चितळे ह्यांनी सुंदर लिहिलंय. मी वाचले आहे. माझा त्यांच्या़कडे प्रत्यक्ष जाण्याचा विचार आहे. ज्यांच्याबरोबर माझी आज चकवाचांदण बद्द्ल चर्चा झाली त्यांना मी हेच पुस्तक सुचवले. त्यात ज्या डॉ. आशीष सातवांचा उल्लेख आहे त्यांची संस्था आहे "महान". त्यांची माझी प्रत्यक्ष भेट आणी चर्चा झालीये मे २०१२ मधे बाबांच्या(आमटे) सोमनाथ येथील श्रमसंस्कार शिबीरात. त्यांच्याकडेही जायचे आहे. डॉ. विकास आमटेंबरोबर मनसोक्त गप्पाही तेथेच झाल्याच. त्यांना मी माझी ब्राझीलवारी सांगीतल्यावर त्यांनी मला त्यांच्या अशाच आठवणीही सांगीतल्या. येत्या वर्षात हेमलकसा आनी मेळघाट दौरा नक्की करणार आहे. परत येईल तेंव्हा त्यावर लिहीलच. पण तोवर मेळघाटावरील मोहर नक्की वाचा. मी खुप आत्मचरीत्र वाचले आहेत.पण आता नावे आठवत नाहीत. त्यातली काही नावे बाकी मिपाकरांनी लिहीलेली आहेत. परंतु व्हाय नॉट आय? हे एक मुलगी डॉक्टरच्या चुकीने कायमचे अंधत्व आल्यावर त्यामुलीने आनी तिच्या आईने त्याचा कसा सामना केला. त्याचे व्रुत्तांकन त्यांच्याच शब्दात वाचताना आनी त्यामुलीने तरीही अर्थशास्त्र हा विषय घेउन पदवी मिळवली तेही पहील्या नंबराने. अर्थशास्रावरील संशोधनात तिने काही रिसर्च पेपर लिहीले आनी आता बहुतेक ती आता परदेशात करियर/रिसर्च करत आहे. अवश्या वाचा. तसंच "जगायचंय प्रत्येक सेकंद" हेही वाचनेबल. मेळघाटावरील मोहर हे कोणी प्रकाशीत केलंय ते सांगु शकाल काय? मी विसरलो.

In reply to by विलासराव

श्रमसंस्कार शिबिराबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे. त्यावर एक लेख लिहाल का? 'मेळघाटावरील मोहर' हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. १ ऑक्टोबर पासून त्यांनी एक उपक्रम सुरू केलाय. प्रत्येक विकल्या गेलेल्या प्रतीमागे ५० रुपये हे डॉ. कोल्हेच्या सामाजिक कार्यासाठी दिले जाणार आहेत. त्यात प्रकाशक आणि लेखक भर घालणार आहेत. राजहंसच्या websiteवर त्याची अधिक माहिती आहे. सर्वानीच जरूर बघावी. http://www.rajhansprakashan.com/

In reply to by विशाखा पाटील

विलासराव 16/10/2014 - 14:49
श्रमसंस्कार शिबिराबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे. त्यावर एक लेख लिहाल का? लिहीन्याचा प्रचंड कंटाळा आहे. थोडक्यात सांगतो. बाबांनी ४५-४६ वर्शांपुर्वी हे शिबीर भरवायला सुरवात केली. उद्देश नवीन लोकांना समजासेवेत हातभार लावता यावा आनी त्यापेक्षा महत्वाचे एखाद्याला जर नवीन कार्यालाच हात घालायचा असेल तर त्याला पायाभुत माहीती बरोबरच सहकार्य मिळवुन देणे. बाबांपासुन प्रेरना घेउन अनेक लोकांनी जागोजागी सामाजीक काम सुरु केले आहेत. त्यातल्याच काही लोकांना तिकडे शिबीरात मार्गदरशनासाठी बोलावले जाते.ते त्यावर सर्व विवेचन करतात .मग आपण त्यांना प्रश्न विचारु शकतो. त्याशिवायही सेशन संपल्यावर त्या वक्त्याशी गप्पा मारु शकतो. दरवर्षी १५-२२ मे या वेळेत हे शिबीर असते. ५००-१००० लोक येतात. काही सहकुटूण्ब येणारे लोकही आहेत. पण ईन जनरल युवा लोकांचा भरणा जास्त असतो. ति़कडे सोमनाथला त्यावेळेस ४४-४९ या दरम्यान तापमान असते. झोपण्यासाठी मोठमोठे हॉल आहेत.सतरंज्या टाकलेल्या असतात बाकी चादर वगैरे आपण घेउन जायचे असते. पण उन्हाळा असल्याने थंडी नसते.सकाळी ४ ला ऊठायचे, पहील्या दिवशी ५-८ साधारण ग्रुप बनवले जातात. शेवटपर्यंत आपण आपल्याच ग्रुपमधे काम करायचे असते. प्रकल्पातील कार्यकर्ते ग्रुप लिडर असतात. सकाली चहा झाल्यावर प्रार्थना आनी लगेच साईअटवर प्रत्यक्ष काम करावे लागते साधारण २-३ तास. आम्हाला तळ्यातील माती उचलुन बाजुला टाकण्याचे काम मिळाले होते. त्यामुळे पाण्याचा साठा वाढावा हा उद्देश. मधेच साईटवरच नाष्टा मिळतो. ९ वाजता परत. आंघोळ आटपुन मग थोडा आराम. एका ग्रुपला रोज जेवनात मदतीसाटी कामातुन सुट्टी असते. मग त्यांनी जेवन बनवण्याबरोबरच सदा टाकणे , रांगोळ्या काढणे असे आपापले कौशल्य दाखवायचे असते. शेवटी एका ग्रुपला आपल्या कामाबद्दल छोटेसे बक्षीस दिले जाते. जेवनानंतर आराम झाल्यावर आलेले वक्ते त्यांच्या कार्याची माहीती देतात. मग एखादा विषय देउन त्यावर कुणीही दिलेल्या वेळेत त्यावर आपले विचार मांडू शकतो. कोणी उरलेल्या वेळेत योगा क्लासेश घेतो. कोणी भेंड्या खेळत बसतात. प्रत्येक ग्रूपला स्वतःचे नाटक बसवावे लागते. अशी एकंदरीत धमाल असते. आमच्या वेळेस शिबीरात नशा हा विषय दिला होता. जेवढे लोक बोलले ते सगळे आमुक नशा कशी वाईट वगैरेवर बोलले. चांगलच बोलले. मग मला रहावले नाही. मी नशामुक्तीवर बोललो आनी त्यावर विपश्यना कशी प्रभावी मदत करु शकते त्यावर बोललो. त्यात मी परीक्रमेमुळे दाढी वाढवलेली होती व सफेद लुंगी आनी शर्ट असल्याने लोक मला महाराजच म्हणत होते. अन मी तेथे सांगीतले की मी १५-१६ वर्श रोज दारु प्यायचो मग विपश्यनेला गेलो आनी नशेतुन मुक्त झालो. मग जवळजवळ प्रत्येक शिबीरार्थी म्ला भेटायला येउ लागला. हे पाहुन मग डॉ. विकास आमटेंनी मला बोलावुन घेतले आनी आमची छानच मैत्री झाली.बाबा स्वतः नर्मदाकिनारी मेघाताइंना पाठींबा द्यायला तब्बल दहा वर्श राहीले त्याकाळात विकारभाउंनी स्वतः आनंदवन सांभाळले. आज आनंदवन स्वयंपुर्ण असुन ते जवळपास २७ प्रोजे़क्ट चालवतात. विकासभाउंना इंजीनीयर व्हायचे होते पण त्यांना डॉ. व्हावे लागले. पण त्यांनी तिथले तळे आनी घरे बांधतानाकत्यांच्या ईंजीनियरींगच्या कौशल्याचा उपयोग केलाय. त्यांना तशी घरे बांधण्यासाठी लातुर भुकंपानंतर ति़कडे बोलावण्यात आले होते. एकंदरीत हरहुन्नरी व्यक्तीमत्व आहे. तिथुनच प्रेरणा घेउन स्नेहालय चालु करनार्यांचॉ मोठी टीम शिबीरात दरवर्षी येत असते. असो. अवांतरः डोंबोली २-९ नोव्हेंबरला एक ग्रुप आनंदवन/ सोमनाथ / हेमलकसा आनी अभय बंगाची सर्च संस्था येथे जाणार आहे. रेल्वे आरक्षनापासुन(३ एसी कारण आता स्लीपर आरक्षण मिळणार नाही. कोणी स्वतः आरक्षण करत असेल तरी चालु शकते.) जेवनखाण्यासह ९००० रुपये प्रतिव्यक्ती भरायचे आहेत. ति़कडे बसने प्रवास. ६ जागा शिल्लक आहेत.

In reply to by विशाखा पाटील

सखी 16/10/2014 - 01:08
वा छान आणि जास्त न ऐकलेल्या पुस्तकांची नावं (अजया, विशाखा, विलासराव) कळत आहेत. मला आहे मनोहर तरी, झिम्मा, अग्निपंख आवडले - मुख्य म्हणजे त्यातला प्रामाणिकपणा आवडला. सध्या मंगला गोडबोले यांच सुनिताबाई वाचतेय. एक होता कार्व्हर ह्याचं मराठी रुपांतर इतकं भावलं नाही.

अजया 15/10/2014 - 22:03
लंडनच्या आजीबाई हे ताराबाई वनारस्यांचं सरोजिनी बाबर यांनी लिहिलेलं चरित्र पण मनोरंजक आहे.लिहिता वाचता न येणारी खेडेगावातली मुलगी स्वकतृत्वावर कसे साम्राज्य निर्माण करते,घरादाराचा उध्दार करते,वाचायला छान आहे. नाच गं घुमा हे रणजित देसाईंच्या पत्नी आणि लेखिका माधवी देसाई यांचं आत्मचरित्र अस्वस्थ करुन सोडणारं. नाथ हा माझा हे कांचन घाणेकरांचं अतिशय प्रामाणिकपणे घडलं तसं अायुष्य सांगणारं चरित्र आहे. श्री ना पेंडश्यांचं अात्मचरित्र त्यांनी त्यांचा मित्र लिहितोय असं दाखवुन लिहिलंय!पण श्रीनांची शैली कुठे लपतीये!!

In reply to by अजया

आदूबाळ 16/10/2014 - 02:17
श्री ना पेंडश्यांचं अात्मचरित्र त्यांनी त्यांचा मित्र लिहितोय असं दाखवुन लिहिलंय!पण श्रीनांची शैली कुठे लपतीये!!
याचीच आठवण काढायला आलो होतो. एकच नंबर आत्मचरित्र.

अर्धवटराव 15/10/2014 - 23:00
विश्वास पाटलांचं महानायक (सुभाषबाबु) आणि संभाजी बरं वाटलं (छावा पेक्षा तर बरच उजवं). गंगाधर गाडगीळांचं दुर्दम्य अप्रतीम आहे. लोकमान्यांच्या गुणावगुणांचं रेखाटन उत्तम केलय गाडगीळांनी.

भृशुंडी 16/10/2014 - 00:45
स्मरणगाथा - गो.नी दांडेकर : खरंच वेगळं आणि वाचनीय असं जगलेली थोडकी माणसं असतात, त्यापैकी एक. अनुभव अस्स्ल आहेतच पण निव्वळ शब्दांमध्येही नाद आहे. दळवींचं "आत्मचरित्राऐवजी" हेसुद्धा आवडलं. बाकी ऐतिहासिक चरित्रं झेपली नाहीत.

विलासराव 16/10/2014 - 01:02
कोल्हाट्याचं पोर. बलुतं. पाथरवाटा. सुरेंद्रनाथ कांबळीचं पुस्तक त्याचं नाव आठवत नाही आता.ह्या कांबळींनी अंधत्व असताना केलेले अनेक मोठमोठे उद्यागधांदे. एक असतो बिल्डर. ही श्रींची ईच्छा- श्रीनिवास ठाणेदार. ईडली ऑर्कीड आनी मी- विट्ठ्ल कामत.

गांधी हत्या आणि मी.. ले.नथुराम गोडसे. राजा शिव छत्रपती श्रीमन योगी माझी जन्मठेप चीपर बाय द डझन आयडा स्कॅडर चार्ली चॅप्लीन (हसरे दु:ख) शांतारामा प्रथम पुरषी एक वचनी कर्‍हेचे पाणी एक होता कार्व्हर नाझी भस्मासुराचा उदय आणि अस्त विन्सटन चर्चील नशायात्रा (ले. तुषार नातू... वाचले नसेल तर नक्की वाचा....) क्लोरोफॉर्म हेलन केलर आहे मनोहर तरी स्म्रुतीचित्रे आमचा बाप अन आम्ही द रूट (चार पिढ्यांची कहाणी... अप्रतिम पुस्तक जरूर वाचा... फार येडे करून सोडते हे पुस्तक) आणि प्राण देव आनंद मधुबाला इडली,आर्किड आणि मी (विठ्ठल कामत) जगाच्या पाठीवर शोभना समर्थ (ह्यांच्या पुस्तकाचे नांव विसरलो) माझंही एक स्वप्न होते (वर्गीस... अमूल) कॉलनी (लेखकाचे नांव विसरलो... बरे आहे पुस्तक... चार घटका करमणूक) राऊ त्रिंबक डेंगळे पाटील (जमल्यास नक्की वाचा....) संघर्ष एका आईचा - नौदलाशी (आमच्या डोंबोलीतल्याच एका सुपुत्राची कथा आणि व्यथा) स्टीव्ह जॉब्ज एका चीनी वेश्येचे आत्मचरित्र वाचलेले आठवत आहे... (नेहमी प्रमाणे नांव विसरलो. माओच्या राजवटीच्या काळातले आहे. सरदार कन्या असून पण लहान-पणी केलेल्या एका चूकीची शिक्षा म्हणून तिची रवानगी जपानला केली जाते.पुढे ती जपानसाठीच हेर म्हणून चीनच्या विरिधात काम करते. एक खिळवून ठेवणारे पुस्तक.) तसेच एका बार बार-बालेचे आत्मचरित्र वाचले होते. (हळदणकर असे नांव असावे...आमच्या मेंदूतली हार्ड-डिस्क बरीच कमकुवत झाली आहे...) ही श्रींची इच्छा (श्रीनिवास ठाणेकर ह्यांचे सुंदर आत्मचरित्र...कर्नाटकातला एक मध्यम्वर्गीय मुलगा अमेरिकीत जातो काय आणि १००० एकर शेतीचा मालक होतो काय... प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे... ह्याचा अर्थ शिकवणारे आत्मचरित्र...आम्हाला नावांपेक्षा , त्या पुस्तकातून काय शिकलो? हेच शिकायला मिळेते... शेवटी नावांत काय आहे?) आणि असाच एक टाइमपास म्हणून ऑन लाइन चरित्र आहे. फसवेच आहे पण चार घटका निव्वळ करमणूक म्हणून एकदम योग्य... गरजूंनी व्य.नि. करावा.

पैसा 16/10/2014 - 09:40
लंडनच्या आजीबाई, सांगत्ये ऐका, ईडली ऑर्किड आणि मी, तसंच स्मरणगाथा ही सुद्धा खूप आवडलेली पुस्तकं.

In reply to by जेपी

पैसा 16/10/2014 - 09:53
जेप्या, श्रीमान योगी आणि स्वामी यांना चरित्र म्हणता येणार नाही. त्या कादंबर्‍या आहेत. सुभाषचंद्र बोसांवरील 'महानायक' सुद्धा याच कॅटॅगरीत येते.

जेपी 16/10/2014 - 09:56
जेप्या, श्रीमान योगी आणि स्वामी यांना चरित्र म्हणता येणार नाही. त्या कादंबर्‍या आहेत. सुभाषचंद्र बोसांवरील 'महानायक' सुद्धा याच कॅटॅगरीत येते. मान्य आहे. आपल्याला चरित्र आणी कादंबर्यात फरक कळत / जाणवत नाही.

In reply to by जेपी

पैसा 16/10/2014 - 10:01
चरित्र असते ना, ते ऐतिहासिक संदर्भ तसेच्या तसे घेऊन लिहिले जाते. त्यात लेखक स्वतःच्या कल्पनेने काही लिहीत नाही. मात्र कादंबर्‍यांमधे लेखक भरपूर स्वातंत्र्य घेऊन लिहितो. खर्‍या प्रसंगांबरोबर काही काल्पनिक प्रसंग लिहितो, तसेच काल्पनिक व्यक्तिरेखाही अ‍ॅड करतो.

विटेकर 16/10/2014 - 09:57
एक झाड दोन पक्षी .... अजिबात आवडले नाही ! उगाच आपल्या अविवेकी वागण्याचे लंगडे समर्थन वाटले. कसे-बसे पूर्ण केले.

माझ्या विशेष आवडीचा धागा. १. पु.ल. देशपांडे (सगळी पुस्तकं) २. माझी जन्मठेप (विनायक दामोदर सावरकर) सिडने शेल्डन (सगळी पुस्तकं) गांधीहत्या आणि मी (नथुराम गोडसे) वारस (मला हे पुस्तक हवयं विकतं पण मिळत नाहिये) (वासंती वाळिंबे) श्यामची आई (पुर्वी आवडायचं आता त्यामधला फोलपणा लक्षात आलाय) (साने गुरुजी) शिवचरित्र (बाबासाहेब पुरंदरे) मृत्युंजय (शिवाजी सावंत) बाजार (लेखकाचं नाव लक्षात नाही पण कादंबरी फार सुंदर आहे, मिळत नाहीये ही पण आता) श्रीमानयोगी (रणजित देसाई) शाळा (मिलिंद बोकील) गारंबीचा बापु (श्री.ना.पेंडसे) शितु (गो.नी.दांडेकर) पानिपत (विश्वास पाटील) आहे मनोहर तरी (सुनिता देशपांडे) झोंबी (आनंद यादव) पडघवली (बहुतेक श्री.ना.पेंडसे) द.मा.मिरासदार (सगळी पुस्तकं) प्लेजर बॉक्स (व.पु. काळे) ऐक सखे (व.पु. काळे) वपुर्झा (व.पु. काळे) पार्टनर (व.पु.काळे) कथाकथन मधल्या बहुतेक गोष्टी (व.पु.काळे) सुहास शिरवळकर (सगळी पुस्तकं) गॉडफादर (मारिओ पुझो) सिसिलिअन (मरिओ पुझो) ओमेर्ता (मारिओ पुझो) फुल्स डाय (मारिओ पुझो) द पेट सिमेटरी (स्टिफन किंग) द तालिस्मान (स्तिफन किंग) रेझ द टायटॅनिक (क्लाईव्ह कसलर) पोसायडॉन्स अ‍ॅरो (अनुवादित) (क्लाईव्ह कसलर) डीप सिक्स (क्लाईव्ह कसलर) मे डे (अनुवादित) (क्लाईव्ह कसलर) व्हाईट डेथ (क्लाईव्ह कसलर) ट्रोजन डेथ ( सद्ध्या वाचतोय, कालचं चालु केलय) (क्लाईव्ह कसलर) पोलर शिफ्ट (क्लाईव्ह कसलर आणि पॉल केंप्रेकोस संयुक्तपणे) द टाईम मशिन (एच.जी.वेल्स) जंपर्स (स्टिव्हन गौल्ड) पॅपिलॉन (ईंग्लिश अनुवादित)(हेन्री शॅरिअर) बँको (ईंग्लिश अनुवादित)(हेन्री शॅरिअर) ट्वेंटी थाउसंड लिग्स अंडर द सी (ज्युल व्हर्न्स) जर्नी टु द सेंटर ऑफ अर्थ (ज्युल व्हर्न्स) अराऊड द वर्ल्ड ईन एटी डेज (ज्युल व्हर्न्स) तुन्त्सा (लेखक आठवत नाही, अमेरिकेमधल्या रेड ईंडियन्स चा उगम शोधायसाठी बालसा लाकडाच्या तराफ्यावरुन एक गट समुद्रातुन प्रवास करतो अशी गोष्ट आहे) अजुन बरीच आहेत. वेळ मिळाला की टंकीन नावं.

स्नेहल महेश 16/10/2014 - 13:45
खूप छान आत्मचरीत्र आहे १९५०-६० च्या शतकात हॉर्स रेसिंग सारखं क्षेत्र निवडून त्यात यशस्वी होऊन दाखवणे, कठीण काळात आलेले अनुभव खूप छान प्रकारे लिहिले आहेत नि:पक्षपाती लिखान

माझी जन्मठेप - वि. दा. सावरकर ढोर - भगवान इंगळे बलुतं - दया पवार हसरे दु:ख - भा.द.खेर आमच्या आयुष्यातील काही आठवणी - रमाबाई रानडे इडली ऑर्किड आणि मी - विठ्ठल कामत साम्राज्य बुरख्यामागचे द व्हेल्ड किंगडम - कारमेन बिन लादेन दी ग्लास कॅसल - जेनेट वॉल्स दी डायरी ऑफ अ यंग गर्ल - अ‍ॅनी फ्रँक सोल सर्फर - बेथनी हॅमिल्टन वार्ड नं ५ - डॉ. रवी बापट एका खेळियाने- दिलिप प्रभावळकर एका मारवाड्याची गोष्ट - गिरेश जाखोटिया केतकर वहिनी- उमा कुलकर्णी

In reply to by काळा पहाड

पैसा 16/10/2014 - 17:22
काही ठिकाणी जरा अतिरंजित वाटलं, पण एकूण वाचायला छान. वर सानिकाने लिहिलेलं कारमेन बिन लादेनचंही खूप छान आहे पुस्तक.

सौंदाळा 16/10/2014 - 16:47
'माझंही एक स्वप्न होते' - वर्गीस कुरियन (मोदकाचा लेख वाचुन हे आत्मचरित्र वाचनालयातुन मिळवुन वाचले होते आणि आवडले)

अजया 17/10/2014 - 08:06
कारमेनचं पुस्तक घेतलं पाहिजे! डाॅ.अानंदीबाई जोशींचं अंजली किर्तनेंनी लिहिलेलं चरित्रही छान आहे.कमल पाध्येंचं बंध अनुबंध ही अावडुन गेलेलं. बेस्टेस्ट आत्मचरित्र नानु सरंजामेंचंच!!

मी पहिलं आत्मकथन वाचलं ते बीएला शिकत असतांना ऐच्छिक मराठी घेतलं तेव्हा दलित स्त्री आत्मकथन 'जिणं आमुचं' बेबीताई कांबळे यांच. धर्मांतरापूर्वीच्या महार समाजाचं चित्रण. महारा समाज मी पाहिलेला पण इतके बारीक तपशील त्यात वाचण्यात आले की अरेच्चा आत्मकथनात असं चित्रण असतं तर..सामाजिक उतरंड, ते अंगाण येणे, जातीव्यवस्थेचा संघर्ष ती भूक ती वर्णनं. मग पुढे काही दिवस आणि पुढच्या शिक्षणानिमित्त अशी अनेक आत्मकथनं मला आवडली. माझ्या जल्माची चित्तर कथा- शांताबाई कांबळे, आठवणींचे पक्षी- प्र.ई.सोनकांबळे, (प्र.ई सर, आमचे औरंगाबादचे आणि यांना अनेकदा भेटण्याचा योगही अनेकदा आला होता. यांची एक सवय होती. कोणताही कार्यक्रम असला की प्रास्ताविकापासून ते आभारापर्यंत सर्व लिहुन काढायची.) मला बरीच वाचायला मिळाली ती दलित आत्मकथनं मला हे सर्व समजुन घ्यायला खुप आवडलं. बलुतं- दया पवार, मला उध्वस्त व्हायचंय- मलिका अमर शेख, आहे मनोहर तरी- सुनिता देशपांडे, उपरा-लक्ष्मन माने, उचल्या लक्ष्मन गायकवाड. मिटलेली कवाडे-मुक्ता सर्वगौड, मरणकळा-जनाबाई गिर्‍हे, उर्मिला पवारांचं आयदान, जगले जशी-लालन सारंग, सर्वात आवडलेलं आता हे का आवडलं माहिती नाही पण मला भिडणारं पुस्तक 'सर आणि मी' जोत्सना संभाजी कदम, चित्रकार असलेले ते प्राध्यापक आणि त्यांच्यावर प्रेम करणारी त्यांची विद्यार्थीनी. वयात दोघांच्या पंचवीस वर्षाचं अंतर. विद्यार्थी, प्रेयसी आणि पत्नी या तीनही अवस्थेचं चित्रण अतिशय सुंदर पद्धतीने आलं आहे, मिळालं तर नक्की वाचा. असो, हल्ली वाचन कमी झालंय. पुस्तक उघडलं की कंटाळा येतो. आयुष्यातल्या एका नव्या वळणावर जरा गुंतलोय. नै तर आत्मचरित्र, आत्मकथनं वाचने ही माझी स्पेशालिटी होती. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुंबा 06/03/2017 - 15:09
हे अफाट पुस्तक आहे. प्रांजळ, निर्विश आणि कुठलाही अभिनिवेश न ठेवता लिहिलंय. मला आवडलेल्या आत्मचरित्रात हे वरच्या नंबरला असेल. चिपर बाय द डझन हे आणखी एक सर्वांगसुंदर पुस्तक.

In reply to by पुंबा

मोदक 06/03/2017 - 16:05
हे अफाट पुस्तक आहे. प्रांजळ, निर्विश आणि कुठलाही अभिनिवेश न ठेवता लिहिलंय. मला आवडलेल्या आत्मचरित्रात हे वरच्या नंबरला असेल. नक्की कोणते पुस्तक..?

मनिष 17/10/2014 - 12:33
खूप आहेत अशी चरित्र. आणि बर्‍याच वेळा केवल स्वतःच्या दृष्टीकोनातून लिहिली असली तरी काहितरी वेगळे काम केलेल्यांचे, वेगळे जीवन जगलेल्यांचे आयुष्य कसे होते - त्यांच्या अडचणी, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी निवडेलेले काम - ह्यात मला खूप रस वाटतो. आणि ती लोकंही माणंसच होती हे मनात असले असले की मग फारसे मुर्तिभंजन होत नाही, कारण त्यांच्या मुळी मुर्ती बनवतच नाही. शिवाय, अशी चरित्र वाचतांना लेखकाला स्वतःविषयी किती इनसाईट आहे ते जाणवतेच की - जसे दादा कोंडक्यांच्या आत्मचरित्रात ते स्वतःच्या एकटेपणाविषयी देवाला/नशिबाला दोष देताता, तेंव्हा ह्या माणसाला स्वतःच्या स्वभावाविषयी काहीच इन्साईट नाही का ह्याचे आश्चर्य वाटते, तसेच लता मंगेशकरांच्या पुस्तकांतही होते (नाव आठवत नाही - कित्येक बाबतीत त्यांची मते त्यांच्या पिढीच्या अल्पशिक्षित सामान्य व्यक्तिंसारखीच वाटतात. अर्थात त्या त्य व्यक्तिंचे त्यांच्या क्षेत्रातले असामान्यत्व सोडले तर तीही आपल्यासारखी सामान्य माणसेच असतात की, आणि चरित्रांतून तर हे फारच प्रकर्षाने जाणवते. तसेच काही व्यक्ति सर्वच बाबतीत (किवा का विशिष्ट गोष्टींचा) किती खोलवर अणी समग्रपणे विचार करतात (जसे अभय बंग), हेही जाणवते आणि मलातरी ते अतिशय स्फुर्तीदायी आणी प्रेरणादायी वाटते. आता मी तशीही ऐतिहासिक किंवा बॉलिवूड्/क्रिकेटर ह्यांची अतमचरित्र वाचत नाही - पण समकालीन किंवा थोडे आधिचे लेखक/नाटककार्/कलाकार, उद्योजक, प्रभावी/मुलखावेगळ्या व्यक्ती ह्यांची आत्मचरित्र आजही वाचायला आवडतात. असो. ही माझी आवडती काही चरित्र/आत्मचरित्र. माही विशेष क्रम नाही, पण जशी आठवतील तशी लिहितो - (१) मी अल्बर्ट एलिस (अंजली जोशी) - मानसशास्त्रात रस असलेल्यांनी तर वाचावेच, पण इतरांनीही आवर्जुन वाचावे असे पुस्तक. REBT च्या जनकाची ही गोष्ट मुळातुनच वाचण्यासारखी आहे. आणि त्याच्या अत्मचरित्रावर आधारीत असली तरी अनुवाद नसल्यामुळे भाषा आणि संगत दोन्हीही छान नैसर्गिक आहे. बरेचसे आपल्याला धक्कादायक वाटावेत अशे तपशील असले तरी त्यातून सतत जाणवणारी अल्बर्ट एलिस ह्याची सकारात्मक विवेकवादाची जाणीव ही कित्येक REBT च्या पुस्तकांपेक्षा जास्त परिणामकारक आहे. (२) स्वतःविषयी (अनिल अवचट) - आत्मचरित्र नसले तरीही बरेचसे आत्मपर लिखाण. मी ह्यावर माझ्या ब्लॉगवर एक मोठा लेखही लिहिला होता. स्वतःविषयी हे पुस्तक म्हणून खूप परिणामकारक आहे. केवळ आत्मपर साहित्यलेखन यापलीकडे ते खूप काही आहे आणि हे यश केवळ अनिल अवचट यांच्या साध्या, सरळ आणि चित्रमय शैलीचं नाही. हे पुस्तक त्यांना वेगळ्या वाटेने जगतांना आलेल्या अनुभवांच्या नोंदींचे (memoirs ) आहे. त्यात कुठेही बडेजाव, आढ्यता नाही. हे अनुभव रोजच्या जगण्यातील आहेत – कुठल्याही क्रांतीच्या रोमहर्षक कथा नाही. कित्येक वेळा असे वाटते, अरे इतक्या साधेपणे आणि सहजपणे आपल्यालाही जगता आले तर? अर्थातच ते साधं आणि सहज असलं तरी सोपं नाही. (३) कैफी आणि मी (शौकत आझमी अनुवादः जयश्री देसाई )- हे असेच पुस्तक प्रदर्शनात अचानक सापडलेले एक रत्न. 'कैफी आझमी' ह्यांच्या पत्नी आणि शबाना आझमी ह्यांची आई शौकत आझमी ह्यांनी लिहिलेले. उदारमतवादी, साम्यवादी/समाजवादी, शायर कैफी ह्यांच्याविषयी - त्यांच्या विचारांविषयी, लिखाणाविषयी आणि कुटूंबाविषयी उत्सुकता होतीच म्हणून हातात घेतले आणि खूपच आवडले. तेंव्हाच्या समाजवादाचा, आदर्शवादाचा आणि जीवनाचा एक छानसा तुकडा आपण प्रत्यक्ष अनुभवतो ह्या पुस्तकात. त्यांच्या आयुष्यात मनस्वी निर्णयांतुनही जपलेले व्यक्तिस्वातंत्र्य, प्रेम आणि त्यांचा अगदी शायराना/फिल्मी रोमांस हे फार लोभसपणे येते ह्या पुस्तकात. शबानाची वैचारीक बैठक कशी निर्माण झाली असेल ह्याचाही अंदाज येतो. खुपच छान आहे पुस्तक हे. नक्की वाचा. मुस्लिम समाजातील रजिया पटेल, हमीद दलवाई, कैफी आझमी अशा उदारमतवादी विचारधारा नंतर फारशी प्रबळ का झाली नसावी ह्याची खंत वाटते! असो. हे पुस्तक आता कित्येक अमेरिकन विद्यापीठात संदर्भ ग्रंथ म्हणून वापरतात! : P अजूनही आहे बरीच अनवट चरित्रे, लिहितो जमेल तसा नंतर!

१.नाझी भास्मासुराचा उदयास्त २.एक होता कार्व्हर ३.वोल्गा जेव्हा लाल होते ४.अब्राहम लिंकन फ़ाळणी टाळणारा महापुरुष ५.ओपेन्हायमर ६.हसरे दुःख ७.महानायक ८.मृत्युंजय ९.दुर्दम्य १०.इये सयाजीचिये नगरी ११.अकियो मोरिता एंड सोनी स्टोरी १२. ली आयकोका अजुन ही खुप आहेत आता आठवेनात , मुख्य आवड चरित्रे वाचन आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आदूबाळ 22/10/2014 - 01:44
नाझी भस्मासुराचा ... आणि व्होल्गा जेव्हा .... हे चरित्र म्हणता येईल का याबद्दल शंका आहे.

In reply to by आदूबाळ

आदूबाळ, सहमत आहे भाऊ साहेब! पण त्या बुक्स चं जे एक लेखाजोखा टाइप स्वरुप आहे त्याच्यामुळे मी बेंबट्या झालोय!!!

वेल्लाभट 20/10/2014 - 12:52
मला वाचनाची आवड फार उशीरा म्हणजे चोविशीत वगरे लागलेली आहे. त्यामुळे अर्थातच वाचलेली पुस्तके मोजकी. पण आत्मचरित्र विशेष आवडतात. त्या व्यक्तीशी जवळून बोलता येतं. मोजक्या वाचलेल्या पुस्तकातून आवडलेली आत्मचरित्रः ओपन - आंद्रे आगासी - हे खूप आवडलं. इम्पल्सिव्ह परचेस. दिसलं, उचललं. पण इथूनच सुरुवात झाली खरी वाचनाची आवड जागृत व्हायला. द लास्ट लेक्चर - रँडी पौश - हे ही छान आहे. बरं आहे म्हणजे. कार्व्हर आणि इतर वर दिलेली नावं नोंद करून घेतोय. पुढे वाचायला.

सिरुसेरि 10/11/2014 - 13:48
करुणाष्टक हे व्यंकटेश माडगुळकर लिखित पुस्तकही खुप छान आहे . त्यामध्ये त्यांनी आपल्या आईच्या आठवणी , जुने औन्ध संस्थान , तिथले कर्मचारी , त्यांचे कौटुंबिक जीवन , बदल्या व त्यामुळे होणारी ओढाताण या मनाला हलवुन सोडणारया घटना सांगितल्या आहेत .

श्रीगुरुजी 10/11/2014 - 20:52
'ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी' हे श्री श्री परमहंस योगानंदाचे इंग्लिशमधील आत्मचरीत्र मराठीत 'योगीकथामृत' या नावाने भाषांतरीत झालेले आहे. हे आत्मचरीत्र अतिशय आवडले. हे अनेकवेळा वाचलेले आहे. डॉ. हिम्मतराव बावस्करांचं 'बॅरीस्टरचं कार्टं', डॉ. नरेंद्र जाधवांचं 'आमचा बाप आणि आम्ही', रमेश देवांचं 'या सुखांनो या', गोपाळ गोडसेंचं 'गांधीहत्या आणि मी' ही चरित्रे/आत्मचरित्र चांगली आहेत.

श्रीगुरुजी 10/11/2014 - 21:02
अजून 'ही श्रींची इच्छा' (श्रीनिवास ठाणेदार), 'आहे मनोहर तरी' (सुनीता देशपांडे), 'अग्निपंख' (डॉ. अब्दुल कलाम), 'जिहाद' (अस्लम जमादार), 'इन्फिडेल' (या सुदानी लेखिकेचे नाव विसरलो) इराण, इराक, पाकिस्तान, सुदान, सौदी अरेबिया इ. कर्मठ मुस्लिम देशातील महिलांनी लिहिलेली स्वतःची चरित्रे अत्यंत हृदयद्रावक आहेत. या अनेक पुस्तकांचे मराठी अनुवाद उपलब्ध आहेत.

वडगावकर 07/03/2017 - 09:28
अगदी खरंय.... कितीही वेळा वाचलं तरी कंटाळा येत नाही गम्मत म्हणजे हे पुस्तक म्हणजे अध्यात्माचं प्रवेश द्वार आहे.... अजून थोडी..... माय विकेड विकेड वेज-एरॉन फ्लीन (मराठी ) दिव्य स्पर्श -डॉ भोसले प्रकाशाच्या वाटेवर- श्री.कृष्णानंद सांगत्ये ऐका-हंसा वाडकर एकटा जीव -दादा कोंडके शांतारामा- व्ही शांताराम माझा लढा-हिटलर (मराठी ) पॅपिलॉन-हेन्री शॅरीयर
http://www.misalpav.com/node/28198 http://www.misalpav.com/node/28241 ________________________________________________________ नमस्कार मंडळी. काही अपरिहार्य अडचणींमुळे हा पुढचा भाग टाकायला उशीर झाला आहे, त्यासाठी क्षमस्व. याआधीच्या भागात आपण आपल्याला आवडलेल्या कादंबर्‍यांबद्दल लिहिले होते. या वेळी आपल्या आवडत्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल थोडक्यात लिहूया! आधीच्या यशस्वी भागांप्रमाणेच तुमच्या उत्स्फूर्त सहभागाची अपेक्षा आहे! चला तर लिहूया आपल्या आवडत्या आत्मचरित्र किंवा चरित्रांबद्दल! आधीच्या भागाप्रमाणेच मला न आवडलेली चरित्रे/आत्मचरित्रे याबद्दल दुसर्‍या एका भागात लिहूया!

अमेरिकन चिकन

रवीराज ·
आंतरराष्ट्रीय राजकारणात रशिया - युक्रेन वादामधे अमेरिका आणि यूरोपने रशियावर आर्थिक निर्बंध लादले त्याला प्रत्युत्तर म्हणुन रशियानेही अमेरिका आणि यूरोपमधुन आयात होणाऱ्या पोल्ट्री आणि डेअरी उत्पादनावर निर्बंध लादले.

आप्पा परब यांच्यासोबत राजगड फिरण्याच्या संधी

वेल्लाभट ·

कधीही ट्रेक न केलेल्या माणसासाठी हे ट्रेक कितपत कठीण असू शकतील? तसेच मी आजपर्यंत फक्त लोहगड आणि प्रतापगड पाहिलेले आहेत...माझ्यासाठी राजगड कसा राहील? जायची इच्छा प्रबळ आहे..

In reply to by माम्लेदारचा पन्खा

वेल्लाभट 15/10/2014 - 20:56
कधीच ट्रेक न केल्याने जरा कठीण वाटेलच. चोरदरवाज्याने जायचं म्हणजे अडीच तीन तासाची चढाई आहे. पण बरीच मंडळी असतील तर होतं शक्य, एकमेकाना उभारी देत देत. बघा, म्हणजे, मिपावरच्या मुरलेल्या ट्रेकर्स चं मत घ्या म्हणजे अजून बरं पडेल तुम्हाला ठरवायला.

In reply to by वेल्लाभट

किसन शिंदे 16/10/2014 - 01:02
चोर दरवाजाने जाताच का? सरळ भोसलेवाडीत जाऊन पाल दरवाज्यातून वर जा की, राजगड चढण्याचा सर्वात सोप्पा मार्ग आहे तो. मानाने गुंजवण्याकडची वाट फारच दमछाक करणारी आहे.

In reply to by वेल्लाभट

विलासराव 16/10/2014 - 02:33
चोरदरवाज्याने जायचं म्हणजे अडीच तीन तासाची चढाई आहे. मी मिपावरच्या जिप्सींबरोबर याच मार्गाने गेलो होतो. तरी आम्ही संध्याकाळीच गुंजवणे गावातुन चढाई करुन मधे एका टप्यावर एक कुटूंब रहाते त्यांच्या घरी गोनीदा रहायचे बर्याचदा. तेथे राहीलो होतो. सकाळी लवकर निघुन बाकी चढाई केली तरी बर्यापैकी दमछाक झाली होती. अर्थात मी काही नेहमीचा ट्रेकर नाही.

In reply to by विलासराव

वेल्लाभट 16/10/2014 - 07:03
त्यात मी कसा बदल करणार? मी आधी चोर दरवाज्यानेच गेलोय. मी ठरवत असतो तर पाली दरवाजा केला असता. पण ठीक आहे.... हरकत नाही......

कधीही ट्रेक न केलेल्या माणसासाठी हे ट्रेक कितपत कठीण असू शकतील? तसेच मी आजपर्यंत फक्त लोहगड आणि प्रतापगड पाहिलेले आहेत...माझ्यासाठी राजगड कसा राहील? जायची इच्छा प्रबळ आहे..

In reply to by माम्लेदारचा पन्खा

वेल्लाभट 15/10/2014 - 20:56
कधीच ट्रेक न केल्याने जरा कठीण वाटेलच. चोरदरवाज्याने जायचं म्हणजे अडीच तीन तासाची चढाई आहे. पण बरीच मंडळी असतील तर होतं शक्य, एकमेकाना उभारी देत देत. बघा, म्हणजे, मिपावरच्या मुरलेल्या ट्रेकर्स चं मत घ्या म्हणजे अजून बरं पडेल तुम्हाला ठरवायला.

In reply to by वेल्लाभट

किसन शिंदे 16/10/2014 - 01:02
चोर दरवाजाने जाताच का? सरळ भोसलेवाडीत जाऊन पाल दरवाज्यातून वर जा की, राजगड चढण्याचा सर्वात सोप्पा मार्ग आहे तो. मानाने गुंजवण्याकडची वाट फारच दमछाक करणारी आहे.

In reply to by वेल्लाभट

विलासराव 16/10/2014 - 02:33
चोरदरवाज्याने जायचं म्हणजे अडीच तीन तासाची चढाई आहे. मी मिपावरच्या जिप्सींबरोबर याच मार्गाने गेलो होतो. तरी आम्ही संध्याकाळीच गुंजवणे गावातुन चढाई करुन मधे एका टप्यावर एक कुटूंब रहाते त्यांच्या घरी गोनीदा रहायचे बर्याचदा. तेथे राहीलो होतो. सकाळी लवकर निघुन बाकी चढाई केली तरी बर्यापैकी दमछाक झाली होती. अर्थात मी काही नेहमीचा ट्रेकर नाही.

In reply to by विलासराव

वेल्लाभट 16/10/2014 - 07:03
त्यात मी कसा बदल करणार? मी आधी चोर दरवाज्यानेच गेलोय. मी ठरवत असतो तर पाली दरवाजा केला असता. पण ठीक आहे.... हरकत नाही......
नमस्कार, मागे एकदा एका संस्थेने आयोजिलेल्या ट्रेकबद्दल माहिती देण्यासाठी धागा उघडला होता. तसेच दोन आकर्षक ट्रेक आयोजिल्याचे समजले आहे. अनेक मिपाकरांकडून ट्रेकबद्दल विचारणा आल्या, 'आम्हाला घेऊन न गेल्याने निषेध' :) असे प्रतिसाद आले. म्हणून म्हटलं की मला कळलेली ही माहिती इथे शेअर करावी म्हणजे इच्चुकांना लाभ घेता येईल. आयोजक संस्थांशी/ग्रूप्सशी माझा काहीही संबंध नसून ही केवळ माहिती म्हणून इथे टाकत आहे; जाहिरात करायचा हेतू नाही.

बयो !! - भाग २

खटपट्या ·

अनंत छंदी 15/10/2014 - 11:59
खटपटराव शादी होना मंगता हां. ये जुदाई पसंद नही अपुनको..

हम्म्म! फारच हळुवार आहे कथा. नायक-नायिकेचे अव्यक्त आणि भावनिक प्रेमसंबंध वाचकाला, कथेला बांधून ठेवत आहेत. सर्वांनाच, 'पुढे काय?' ही उत्सुकता लागली आहे. आशा करूया की कथेचा पुढचा भाग शेवटचा असेल आणि सर्वांच्याच उत्सुकते समोर एक गोड शेवट येऊन, उत्सुकतेचा सुखद शेवट होईल.

In reply to by अनुप ढेरे

हाडक्या 16/10/2014 - 15:43
हॅ हॅ हॅ .. ती गोष्ट चांगली होती असे कोण म्हणालेय.. हे सगळे वातावरण आणि इथवरचा हा कथाभाग गोष्टीचा प्री-क्वेल असावा अशीच एक (चावट) कल्पना मनात येवून गेली. ;) (बघा कल्पनाशक्ती लढवून !! ) [अवांतर : कथा चांगली रंगतेय हो, ती चालू द्या. उगीच ती गोष्ट वाचून तुमचा मनस्ताप व्हायचा म्हणून लिंक देत नाही तुम्हे पण शोधू नये अशी विनंती..]

In reply to by हाडक्या

प्यारे१ 16/10/2014 - 02:59
हे हाडक्या काय बि काय बोलते. ते सायबर कॅफेचा आनि बयोचा काय पन समंध हाय काय रे? ते खटपट्या भो एकदम गुलाबचा फूल सार्का काय तर ल्हिवतो आनि तू तेला केक्ट्स बनवते काय रे ? तू तर एकदम मॅडच हायेस हाडक्या भो. ए पन ते दिल पर नको घेऊ हा तू. मॅडसारकं.

In reply to by प्यारे१

हाडक्या 16/10/2014 - 15:48
आमी हल्लूच केक्टस सारते हिते तिथे.. ;)
ते सायबर कॅफेचा आनि बयोचा काय पन समंध हाय काय रे?
संमंध सांगितलंय बग वरती प्यारेभौ.. आक्षी प्रीक्वेल शोबेल हा.. जर्रा इम्याजिन तर करून बग नी.

सौंदाळा 16/10/2014 - 14:37
सहीच क्रमशः एकदम रंगतदार वळणावर टाकलय. पुभाप्र

आसिफ 16/10/2014 - 21:21
कथा पकड घेत आहे, पुढचा भाग लवकर येऊदे. मला वाटतयं की कोमल आणि बयो सावत्र बहिणी आहेत, वडिलांना वाटत असेल की कोमल चे लग्न व्हावे पण सावत्र आई मुळे कोमल मोठी असुन देखील बयो चे स्थळ सुचवले जात आहे. ~आसिफ.

अनंत छंदी 15/10/2014 - 11:59
खटपटराव शादी होना मंगता हां. ये जुदाई पसंद नही अपुनको..

हम्म्म! फारच हळुवार आहे कथा. नायक-नायिकेचे अव्यक्त आणि भावनिक प्रेमसंबंध वाचकाला, कथेला बांधून ठेवत आहेत. सर्वांनाच, 'पुढे काय?' ही उत्सुकता लागली आहे. आशा करूया की कथेचा पुढचा भाग शेवटचा असेल आणि सर्वांच्याच उत्सुकते समोर एक गोड शेवट येऊन, उत्सुकतेचा सुखद शेवट होईल.

In reply to by अनुप ढेरे

हाडक्या 16/10/2014 - 15:43
हॅ हॅ हॅ .. ती गोष्ट चांगली होती असे कोण म्हणालेय.. हे सगळे वातावरण आणि इथवरचा हा कथाभाग गोष्टीचा प्री-क्वेल असावा अशीच एक (चावट) कल्पना मनात येवून गेली. ;) (बघा कल्पनाशक्ती लढवून !! ) [अवांतर : कथा चांगली रंगतेय हो, ती चालू द्या. उगीच ती गोष्ट वाचून तुमचा मनस्ताप व्हायचा म्हणून लिंक देत नाही तुम्हे पण शोधू नये अशी विनंती..]

In reply to by हाडक्या

प्यारे१ 16/10/2014 - 02:59
हे हाडक्या काय बि काय बोलते. ते सायबर कॅफेचा आनि बयोचा काय पन समंध हाय काय रे? ते खटपट्या भो एकदम गुलाबचा फूल सार्का काय तर ल्हिवतो आनि तू तेला केक्ट्स बनवते काय रे ? तू तर एकदम मॅडच हायेस हाडक्या भो. ए पन ते दिल पर नको घेऊ हा तू. मॅडसारकं.

In reply to by प्यारे१

हाडक्या 16/10/2014 - 15:48
आमी हल्लूच केक्टस सारते हिते तिथे.. ;)
ते सायबर कॅफेचा आनि बयोचा काय पन समंध हाय काय रे?
संमंध सांगितलंय बग वरती प्यारेभौ.. आक्षी प्रीक्वेल शोबेल हा.. जर्रा इम्याजिन तर करून बग नी.

सौंदाळा 16/10/2014 - 14:37
सहीच क्रमशः एकदम रंगतदार वळणावर टाकलय. पुभाप्र

आसिफ 16/10/2014 - 21:21
कथा पकड घेत आहे, पुढचा भाग लवकर येऊदे. मला वाटतयं की कोमल आणि बयो सावत्र बहिणी आहेत, वडिलांना वाटत असेल की कोमल चे लग्न व्हावे पण सावत्र आई मुळे कोमल मोठी असुन देखील बयो चे स्थळ सुचवले जात आहे. ~आसिफ.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बयो !! - भाग 1 एकदा नेहमीप्रमाणे कोमल ऑफिस मध्ये नसताना तिचे बाबा आले. मी म्हणालो, "काय काका?" "काही नाही सहजच. मी काय म्हणत होतो…" "काय?" "आमची बयो ग्रजुएट झालेली आहे" (बहुतेक कोमलला घरी बयो म्हणत असावेत) "हो माहित आहे मला" "दिसायला हि सुंदर आहे" "…………" (आता हे नवीन काहीतरी सान्गीतल्यासारखे काय सान्गताय? काय ते विचारा) "तर मी म्हणत होतो कि…… " "काय?" (मला आता धडकी भरली. एखाद्या गोष्ट बऱ्याच दिवसापासून मनात असेल आणि आता ती मिळण्याची वेळ जवळ आल्यावर जसा माणूस नर्वस होतो तसे झाले.

विधानसभा मतदान: १५ ऑक्टोबर २०१४ - आपले अनुभव

प्रचेतस ·

अर्धवटराव 15/10/2014 - 08:36
पण...
आज ऑफिसला मतदानाची सुट्टी असली तरीही मला आज ऑफिसमध्ये दिवसभर काम असल्यामुळे जावे लागणारच होते.
तुम्ही स्वतः ऑफीसला जायला तयार असाल तर ठीक... अन्यथा (जर परप्रांतीय मॅनेजर असेल तर) मराठी बाणा दाखवायचा चान्स सोडल्याबद्दल तीव्र निषेध :P

सतिश गावडे 15/10/2014 - 08:42
अरे वाह... माझे नांव गावी कोकणात (महाड मतदार संघ) आहे. कार्यालयास सुट्टी नसल्यामुळे तसेच सुट्टी घेणे शक्य नसल्यामुळे मतदान करता येणार नाही याबद्दल खेद वाटतो. लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी कार्यालयास सुट्टी होती तेव्हा गावी जाऊन मतदान केले होते. :)

नाखु 15/10/2014 - 08:53
सत्रात मतदान करणार आहे.(कंपनी ने अर्धी सुट्टी दिलेली आहे).घरच्याच "भावी" मतदाराचे शाळेत मतदान असल्याने काहीच अडचण नाही.

चौकटराजा 15/10/2014 - 09:03
मला आज सकाळ पर्यंत कोण उमेदवार आहेत हेच माहीत नव्हते. मी समजत होतो मी चिंचवड मतदार संघात आहे. पण सकाळी स्लीप पहातो तर पिंपरी मतदार संघ ! नोटा ला द्यावे की मोदी .....द एंटरटेनर ला ... ?

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे 15/10/2014 - 09:28
काका जरी जागरुक नागरिक असले तरी त्यांचं आता वय झालंय हे विसरु नका. पळा आता. चिंचवडला गेलो की म्हातारा खरडपट्टी काढणार. ;)

पैसा 15/10/2014 - 09:28
सर्व महाराष्ट्रीय मतदाराना मद्दानासाठी शुभेच्छा! मला वाटले होते, एवढे रंगीत सामने बघून लोक कंटाळतील पण सकाळी ७ वाजता १५-२० लोक म्हणजे बराच उत्साह दिसतो आहे! जास्त मतदान म्हणजे काँग्रेसला धोका हा आतापर्यंतचा समज आहे. १९ ला कळेलच काय ते!

In reply to by पैसा

प्रचेतस 15/10/2014 - 09:43
आमच्या पिंपरी मतदारसंघात मात्र मतदारांची थोडीशी गडबड झाली आहे. आमचा विभाग हा भाजपबहुल मतदारांचा. हा मतदारसंघ युतीच्या वाटपात भाजपाकडून आठवलेप्रणित रिपब्लिकन पक्षाच्या वाटेला गेलाय त्यामुळे येथे कमळ चिन्ह नाही. त्यामुळे बहुसंख्य मतदार कमळ कुठे दिसत नाही याची चर्चा करत होते.

भाते 15/10/2014 - 09:40
मतदान केंद्रावर बोटावर शाई लावायला बहुदा कॉलेजमधली (किमान तशी दिसणारी) मुलगी होती. इथे आपल्याला दुसऱ्यांच्या बोटावर नेलपॉलिश लावायला बसवले आहे अशी कदाचित तिने आपली समजूत करून घेतली असावी. बोटाचा अर्धा आणि संपुर्ण नख मिळुन किमान इंचभर मोठी रेघा तिने माझ्या बोटावर उमटवली. :)

In reply to by भाते

बॅटमॅन 15/10/2014 - 16:04
तर्जनीवरच का शाई लावायची, मधल्या बोटावर लावा म्हटल्यावर मद्दानवाले लोक जे उखडले म्हणता!! डोळे वटारून काहीतरी महापाप केल्यागत पाहू लागले. तेहाची...गाढवे...जे. असो.

विजुभाऊ 15/10/2014 - 10:18
आमच्या क्लायन्टचा म्यानेजर मराठीच आहे पण तो इतक्या रेम्याडोक्याचा आहे की विचारायची सोय नाही. त्याने कोण कोणत्या गावी मतदान करणार आहे या नोंदी अगोदरच घेतल्या आहेत. त्या नुसार एकतर पूर्न सुट्टी किंवा स्थानीक लोकाना दोन तास सुट्टी घ्यावी आणि डोंबिवली किंवा अंबरनाथ / वसई येथे जाउन मतदन करावे अशा मताचा आहे.

अजया 15/10/2014 - 11:08
माझ्या इथले मतदान केंद्र गावाच्या टोकाला,वस्ती संपते तिथे शेताडीत एक उध्वस्त धर्मशाळेसारखी दिसणारी शाळा आहे ,त्यात होते.गवतात मोठ्ठी बीळं,सर्वत्र सांडपाणी.रस्त्याचा पत्ता नाही. तिथल्या विद्यार्थ्यांची,आज तिथे काम करावे लागणार्या कर्मचार्यांची,पोलिसांची दयाच आली.आणि हो मद्दानाला मीच पयली होते!

श्रीगुरुजी 15/10/2014 - 11:45
सकाळीच जाऊन मतदान करून आलो. मतदान अधिकार्‍यांना दर २ तासांनी मतदानाचे आकडे पाठवावे लागतात. त्यामुळे ९ वाजता ८-१० मिनिटे मतदान थांबले होते. त्या दरम्यान १५-२० जणांची रांग लागली. मतदान पुन्हा सुरू होतानाच ६० च्या आसपास वय असलेले व चांगली ठणठणीत प्रकृती असलेले मागून येऊन पुढे घुसू लागले. घुसताना त्यांनी मागच्या अजून एका माणसाला खुणेने पुढे बोलाविले. तो माणूसही ५५ च्या आसपास वय असलेला व तब्येतीने चांगला धडधाकट होता. मी त्या तिघांनाही आक्षेप घेतल्यावर पुढील माणसाने आपण ज्येष्ठ नागरीक असल्याचा दावा केला. ६० च्या आसपास वय व तब्येतीने धडधाकट असूनसुद्धा वयाचा फायदा घेऊन रांगेत घुसण्याचा प्रयत्न संतापजनक होता. त्या दोघांना चांगला झापडला. मागच्या माणसाला घुसखोरीबद्दल विचारल्यावर आपला मणका फ्रॅक्चर असल्याची थाप मारली. मणका फ्रॅक्चर असणारा माणूस अंथरूणातून उठू सुद्धा शकणार नाही आणि तुम्ही तर निवांत फिरताय असे सांगितल्यावर ३ वर्षांपूर्वी मणक्याचे ऑपरेशन झाल्याचे त्याने सांगितले. त्यालाही चार शब्द सुनावल्यानंतर सुद्धा निर्लज्जपणे तिघेही इतरांच्या पुढे आत घुसून मतदान करून आले. स्वतःची तब्येत धडधाकट असताना सुद्धा वयाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी तिघांनाही योग्य त्या शब्दात सुनावले. याचा चांगला परीणाम असा झाला का त्यांनी खूण करून पुढे बोलाविलेल्या अजून १-२ जणांना दारातल्या पोलिसांनी परत पाठवून रांगेतून येण्यास सांगितले. मतदान संपल्यावर बाहेर आल्यावर आपण ज्येष्ठ नागरीक असण्याचा दावा करून मध्ये घुसलेला तोच "ज्येष्ठ" नागरीक अक्षरशः पळत पळत रस्ता ओलांडताना दिसला!

पहाटे पहाटे ७.११ वाजता प्राधिकरणाच्या म्हाळसाकांत विद्यालयात कर्तव्य पार पाडलेलं आहे. जेमतेक २ मिनिटात काम झाल. फार गर्दी नव्हती.

सुनील 15/10/2014 - 12:20
काही वर्षांपूर्वी राहते घर बदलले परंतु मतदारयादींतून नावे बदलून घेतली नाहीत. त्यामुळे एकाच घरात दोन मतदान केंद्रांत (खरे म्हणजे दोन विधानसभा क्षेत्रांत) नावे असणार्‍या व्यक्ती! एक केंद्र घरापसून ६ किमींवर तर दुसरे विरुद्ध दिशेला २ किमींवर. पावणे सातला घरून निघालो. दोन्ही मतदान केंद्रे आटोपून पावणे नवाला हपिसात हजर! कुठेही गर्दी नव्हती.

असंका 15/10/2014 - 12:49
मतदारसंघ पुढच्या एक दोन आठवड्यात सोडणार आहे. तरी चाललोय अधिकार बजावायला. यस्टीत आहे. बहुतेक पोचेन वेळेत. पाच वाजता शेवट आहे ना? रांगेत असणार्यांना पाच वाजून गेल्यावरसुद्धा मतदान करु देतील अशी आशा आहे...

In reply to by असंका

प्रचेतस 15/10/2014 - 13:29
आपले अभिनंदन. पाच वाजता रांगेत असूनही ज्यांचे मतदान झाले नाही त्यांच्यासाठी रांग संपेपर्यंत मतदान चालूच ठेवणार येणार आहे.

कंजूस 15/10/2014 - 13:24
वल्लीने लेन बदलली आज. शाई लावण्याची पध्दत त्यांना शिकवली आहे तसेच ते करत आहेत चूक नाही. आता जो कोणी निवडून येईल त्याच्याकडून आपण हक्काने काम करून घ्यायचे शाई उगाच नाही लावून घेतली आम्ही.

In reply to by कंजूस

चौकटराजा 15/10/2014 - 14:32
वल्ली मतदानाला गेला याचे कारण सातवाहन कालीन निवडणुका - आजच्या निवडणुकांचा मूलस्त्रीत असा लेख तो लिहिणार आहे. लेन बिन काही नाही बदलली.

राही 15/10/2014 - 14:43
मुंबईत शुकशुकाट आहे. सेना कार्यकर्त्यांची नेहमीची लगबग आज दिसत नाहीय. त्यांना माणसे बाहेर काढता आलेली दिसत नाहीत. फ्लॅटवाले/टॉवरवाले मात्र सकाळीच मतदान करून आले आहेत. संध्याकाळपर्यंत झोपडपट्टीवाल्यांना बाहेर आणता आले नाही तर मुंबईतले निकाल उघड आहेत.

In reply to by राही

पैसा 15/10/2014 - 16:14
३ वाजता मुंबईत ३७% आणि बाकी महाराष्ट्रात ४६% मतदान झाले अशा बातम्या दिसत आहेत.

सकाळी ९:३०-१०:०० ला मतदान केले. यावेळेला मागच्या निवडणूकीच्या मानाने कमी गर्दी दिसली. आता १९ तारखेपर्यंत वाट पाहणे आणि तोपर्यंत दूरचित्रवाणीवर चर्चाचर्वण पाहणे हेच नशीबी आहे :)

सुहास.. 15/10/2014 - 14:53
आज आमचा सेल्फि काढुन चेपुवर बोट दाखविण्याचा हक्क हिरावला गेलाय ! पहाटे चार वाजेपासुन काम करत होतो, गावात एकुण तीनच मतदान केंद्रे आहेत, पुण्यात सर्वात जास्त मतदार संख्या असलेला वार्ड हा आपला आहे, मतदान कर्मचार्‍यांची मदत, अगदी ,खुर्च्या लावण्यापासुन ते बाहेर गर्डर लावणे, महिला पोलीस व स्त्री कर्मचार्‍यांसाठी सुविधा ची गाडी मागविणे ( जिप च्या शाळेत आहे मतदान ), बाहेर गर्डर लावणे, म्हणजे सीमा सुरक्षा करणे, मग बाहेर टेबल लावण्यापर्यंत सगळ काही करून दिले मंडळाने, अर्थात हे दरवेळचचं आहे काम !! सव्वासहाच्या सुमारास निवडणुक अधिकार्‍याबरोबर नाष्टा करताना मस्त गप्पा हाणल्या , त्यांना स्वतः ला पोस्टाने मत पाठवावे लागणार होते " या वर्षी मतदानाचा टक्का घसरणार बघा " !! साडे सहाच्या सुमारास सर्व मशीन च्या टेस्ट घेतल्या, एक बंद होती , लगेच दुसरी आली !! सात वाजता आपलीच काही मंडळी लायनीत मत देवुन गेली ....मग मी निघालो ..माझ व्होटिंग नागपुरचाळीत आहे , साडेसात ला सगळ्यांच्या झोपा उडवायला पोहोचलो ...सात लिस्टा उलट्या-पालट्या घातल्या ..आमचं नाव नाही ...च्यायला माझाच पत्ता कट !! घरातल्या बाकी पाच ही जणांच नाव ......... हाय रे किस्मत !! मायच्या भोपळा त्या निवडणुक आयोगाच्या :(

अनन्न्या 15/10/2014 - 16:34
आमचे मतदानकेंद्र आमच्या घ्रराशेजारीच असल्याने दोन मिनीटांचा पायी प्रवास! घरासमोर सेना भाजपचे कार्यकर्ते मिळून मिसळून वडपाव खात होते, कसे फसवले असे म्हणत!

यसवायजी 15/10/2014 - 16:49
माझं नाव कर्नाटकातल्या मतदार यादीत आहे त्यामुळे 'पास'. 'पॉवर' सायबानं लोकसबेच्या टायमाला दोनीकडं मत द्याया सांगितलं हुतं. पण ह्या वेळेला तसं काय इशेश आवाहन (पक्षी- प्रलोभन) न मिळाल्याने - नॉट मतदान्ड इन पुणे टूडे. ;)

आमी ठाण्यात रवतयं पण मतदान असल्फा, साकीनाका भागात (जुन्या घरी) आहे. घाटकोपर ते असल्फा असा मेट्रोचा वातानुकुलीत प्रवास करुन मतदान केंद्रावर पोहोचलो. उमेदवारांची यादी बघून डोके भंजाळले. जी शिवसेना मराठी मराठी करते त्यांचा उमेदवार युपीवाला सिंह होता. कदाचित मराठी शेर संपले असावेत. ईश्वर तायडे नावाचे साहेब जे मागच्या निवडणूकीत रा.कॉं. मधे होते ते चक्क मनसेच्या इंजिनावर आरुढ होते. काही वर्षांपूर्वी नगरसेवकाच्या निवडणूका झाल्या ( तेव्हा मनसेला इंजिन हे अधिकृत चिन्ह मिळाले नव्हते) तेव्हा मनसेची निशाणी "शिट्टी" होती ती एक अपक्ष उमेदवार वाजवत होता. मायाबाईंचा हत्ती होता. शरद पवार नेहमीप्रमाणे घड्याळ या चिन्हावर लढत आहेत. फक्त आरिफ नसीम खान हे ओळखीचे उमेदवार आणी त्यांचा हाताचा पंजा हे कॉम्बीनेशन वर्षानुवर्षे कायम आहे ते ह्या ही वेळेस कायम होते.

एक गोष्ट सांगायची राहिलीच ती म्हणजे मी जातपात किंवा धर्म पाहून माझे मत देत नाही. आजच व्हाटसअप वर एक मेसेज फिरत होता. " आपल्या जातीच्याच उमेदवारास मत देईन असा हटट बाळगू नका. तुम्ही तुमचा आमदार निवडत आहात. तुमच्या मुलीसाठी नवरा नाही." अवांतर : यातून स्त्रीयांचा उप(मर्द) करायचा माझा कोणताही हेतू नाहीये. मी फक्त सोशल मिडीयात फिरत असलेला मेसेज उदाहरणादाखल वापरला आहे.

In reply to by धर्मराजमुटके

हाडक्या 15/10/2014 - 19:55
अच्छा म्हणजे तो मेसेज पाठवणार्‍यास म्हणायचे आहे की तुम्ही(च) तुमच्या मुलीसाठी नवरा निवडायचा आहे आणि तो पण तुमच्याच जातीतील..!! बाकी असे(च) असेल तर मग निवडणुकीत उमेदवार जात बघून निवडला तर काय झालं मग ? भंकस दांभिकता साली सगळीकडे.. (तुमच्याबद्दल हा प्रतिसाद नाहीये हो, तो मेसेज ज्याने तयार केला आणि ज्यांनी पुढे पाठवला त्यांच्याबद्दल आहे.)

In reply to by धर्मराजमुटके

टवाळ कार्टा 15/10/2014 - 20:06
एक गोष्ट सांगायची राहिलीच ती म्हणजे मी जातपात किंवा धर्म पाहून माझे मत देत नाही. आजच व्हाटसअप वर एक मेसेज फिरत होता. " आपल्या जातीच्याच उमेदवारास मत देईन असा हटट बाळगू नका. तुम्ही तुमचा आमदार निवडत आहात. तुमच्या मुलीसाठी नवरा नाही." अवांतर : यातून स्त्रीयांचा उप(मर्द) करायचा माझा कोणताही हेतू नाहीये. मी फक्त सोशल मिडीयात फिरत असलेला मेसेज उदाहरणादाखल वापरला आहे.
याच्यातून स्त्रीयांचा उपमर्द कसा होईल???

In reply to by टवाळ कार्टा

मी एक गरीब मध्यमवर्गीय विवाहीत पुरुष आहे हो. स्त्रियांचा विषय हा अतिशय संवेदनाशील आहे. त्याच्या चुकूनही कोठे उल्लेख आला की मी शक्यतो त्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळतो. चुकून प्रतिक्रिया दिलीच तर फारच तोलून मापून देतो. प्रतिक्रिया दिलीच तर अगोदरच माफी मागून मोकळा होतो किंवा माझा हेतू प्रामाणिक आहे असे जाहिर करतो. काये ना की आपला उगाच आरारा बाबा होऊ नये. म्हणजे वागणे चांगले पण बोलण्यात मार खायचा.

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन 16/10/2014 - 15:35
स्त्रियांचा उप'मर्द' करायचा तर ते तूर्तास फक्त वैद्यकशास्त्र आणि तेही अंशतःच करू शकते असे वाटते. चूभूद्याघ्या.

विलासराव 16/10/2014 - 01:44
आमचे नाव अंबरनाथला आहे. मतदान करायचेच होते. पण आता अंबरनाथला जायचे आहेच तर कोणी मिपाकर आहेत कालच तपासल.आपले भटक्या खेडवाले आहेत तिथे. त्यांचा नंबर कट्टासम्राट मुवींना मागीतला. त्याच्याकडे नंबर नव्हता मग त्यांनी ४-५ मध्यस्थांचे नंबर दिले , त्यांच्याकडुन भटक्यांचा नंबर मिळवला. तर मुवींचा रात्रीच डायरे़क्ट फोनच आला. त्यांनी शनिवारच्या डोंबोली कट्ट्याच आमंत्रणच दिलं. मग आज सकाळीच लवकर उठुन अंबरनाथला. भटक्यांना फोन केला तर ते १० मिनीटात घ्यायला स्टेशनला हजर. मग त्यांच्याघरी त्यांच्या आईअवडीलांची भेट झाली. योगा आनी विपश्यनेवर एक सेशन झाले. नाष्टा करुन एका मित्राकडे त्यांनी मला सोडले. तिथे आनी इतर ३-४ जुन्या दोस्तांच्या घरी चहापानी घेत २ ला बहीणीच्या घरी पोहोचलो. तीथे मेनु होता डोसे चटणीसहीत आनी मिसळपाव. मग चापुन हाणल्यावर तासभर आडवाच झालो. ४-३० ला चहापानी घेउन केंद्रावर हजर. नेटवरुन स्लीप प्रिंट मारली होती पण त्यात फक्त यादी नंबर होता. नाव सापडेना. मग मी अंदाजे १०६४ नंबर पहायला सांगीतले. तिथे दुसर्याचे नाव. मग मी १६४ पहा म्हणालो तर तो संशयानेच पाहु लागला. पण विनंती केल्यावर त्याने पाहीले तर हा मटका बरोबर लागला होता. पॅनकार्ड दाखवले तर त्यांना नावच वाचता येईना जुने असल्याने. ते म्हनाले की दुसरा आडी आहे का काही. मी म्हणालो आहे पण लालबागला. मग त्यांनी परवानगी दिली. खरतर होता माझ्याकडे वाहन चालवायचा परवाना पण म्हणलं बघु काय म्हणतात ते. पण झालं एकदाचं मतदान. ४-५ लोक माझ्यापुढे होते २-३ मागे. नंतर परत २-३ स्नेह्यांच्या भेटीगाठी घेउन लालबागला परत. येताना ठाण्याच्या मिपा संपादकांना फोनवले पण त्यांनी आमचा फोनच घेतला नाही. एका मिपा सदस्याने सकाळी घरी नेउन केलेला पाहुनचार आनी संध्याकाळी मिपा संपादकाने न घेतलेला फोन यातुन ज्याने-त्याने जो घ्यायचा तो बोध घ्यावा आपापल्या जबाबदारीवर.

In reply to by विलासराव

किसन शिंदे 16/10/2014 - 16:32
येताना ठाण्याच्या मिपा संपादकांना फोनवले पण त्यांनी आमचा फोनच घेतला नाही. एका मिपा सदस्याने सकाळी घरी नेउन केलेला पाहुनचार आनी संध्याकाळी मिपा संपादकाने न घेतलेला फोन यातुन ज्याने-त्याने जो घ्यायचा तो बोध घ्यावा आपापल्या जबाबदारीवर
मालक, ९:१० ला तुमचा फोन आला तेव्हा मी कार्यालयात जाण्यासाठी आवराआवर करत होतो, आणि फोन सायलेंट असल्यामुळे कॉल येऊन गेल्यानंतर पाह्यला. गडबडीत असल्यामुळे परत फोन केला नाही इतकेच. बाकी गैरसमज नसावा इतुकीच अपेक्षा!

In reply to by किसन शिंदे

विलासराव 16/10/2014 - 18:10
मालक, ९:१० ला तुमचा फोन आला तेव्हा मी कार्यालयात जाण्यासाठी आवराआवर करत होतो, आणि फोन सायलेंट असल्यामुळे कॉल येऊन गेल्यानंतर पाह्यला. गडबडीत असल्यामुळे परत फोन केला नाही इतकेच. बाकी गैरसमज नसावा इतुकीच अपेक्षा! अर्थातच.बेशर्त सहमती!!!!!!

नाखु 16/10/2014 - 09:04
कंपनीतून दुपारी घरी पोहोचल्याबरोबर म्हटलं आधी मतदान करू जेवण नंतर्.गेलो केंद्रावर.
  1. मनपाच्या निवडणूकी ईतका राजकीय गोतवळा दिसला नाही (२०० मीटर अलिकडे) गर्दी पाहून दुपारची वेळ निवडल्याचे थोडे वाईट वाटले पण ईतके आले आहेत तर निकाल चांगलाच लागेल म्हणून मनाची समजूत घातली. यादी-क्रमांक शोधण्यासाठी "मांडी-सगणक" महोदय तयार होतेच पण त्यांच्या भवती गराडा पडला होता (तुळशीबाग्+आठवडी बाजार्+देवस्थान जत्रा) असे काहीसे स्वरूप होते. काही वेचक संवाद झाले:
  • "माझ नाव ईथे आहे तर मग बहिणीचे का नाहे एक "जागरूक" काकु".
  • माझे आणि माझ्या मिस्टरांचे नाव वेग्वेगळ्या यादीत का? माझ्या मय्रत्र्णीचे नाव शोधायचे ईलेक्शण कार्ड नसलं तर चालतय का? लाईनीत या म्हटल्याबरोबर प्रत्येक मतदाराला आपलीच रांग अधीकृत आहे असा साक्षात्कार झाला आणि एक्मेकांची "आस्थेवाईक विचारपूस" करणार्या लोकशाहीचे प्रत्यंतर आले.
यथावकाश दालन क्रमांक समज्ल्यावर आमची वरात दालनाच्या दाराशी पोहोचली. तिथेही काही शंकासूरांनी दालन क्रमांकवरून परस्पर विरोधी माहीती देवून पहिल्यांदाच मतदानाला आलेल्या "नवमतदारांना" सजग्-संभ्रम्-निरकारण्-पुन्हा संभ्रम" अशा दिव्य अवथेत पोहोच्वण्यास हात भार लावला. दालनात पोहोचल्या-पोहोचल्या पडताळणी अधिकारी आणि जागरूक मतदार यांच्यातील संवादः "माझ नाव आहे का बघा ना जरा!" "अहो नाव-दालन क्र्मांक बाहेर बघा!" "अहो तिथे फार गर्दी आहे ना म्हणून डायरेक तुमच्याकडं आलोय" "बाबा कुनाचही नाव नंबर अस्ल्याबिगर नाही शोधता येणार" "असं काय करताय मला बाहेर लाईनित उभं र्हाव लागेल. ईथे पण लाईनीतून्च आलोयना" "नाही अगदी माझ्या पोराचे असले तरी नंबर शिवाय नाही नाव शोधता येणार !!!" "छ्या तुम्ही सरकारी लोक अजिबात कोप्रेट करीत न्हाई" ===================================== त्यानंतर एका आजीबाईंनी मशिनचा आवाज झाला का माझे मत झाले याची मतदान मदतनीसाकडून दोन्-तीन्दा खात्री करून घेतली.आणि मगच पुढच्या माणसाला मतदान "आडोसा खोक्यात" जावू दिले. बाकी आमच्या भागात ही एकाच नावाचे २-३ उमेदवार उभे करून गंमत आणली आहे.

कलंत्री 16/10/2014 - 11:29
माझ्या मागील दोघांना आपण अगोदर मत द्या असे सांगितले आणि विचारासाठी थोडा वेळ घेतला. कोणाला मत द्यावे हेच समजत नव्हते. क्षणोक्षणी मनात विचार येत होता, सगळ्यात कोण बरे कमी वाईट असेल बरे?

सौंदाळा 16/10/2014 - 15:59
काल मतदान करुन आलो. या धाग्याच्या निमित्ताने १० वर्षापुर्वीचा किस्सा आठवला. विधानसभेच्या मतदानाला गेलो होतो. कॉलनीतलीच एक परिचित सुशिक्षित (?) महिला पुढे उभी होती. नावपडताळणी, सही वगैरे झाल्यावर ती गेली वोटींग मशिनकडे आणि तिकडुनच ओरडुन निवडणुक कर्मचार्‍याला अंगठा दाखवुन विचारु लागली डावा की उजवा? कर्मचारी मुळचा पुणेकर नसावा त्याने सांगितले तुम्हाला पाहिजे ते कोणतेही बटण दाबा. तर परत हिचे तेच डावा की उजवा? लोक हसायला लागले. शेवटी मत दिल्याचा बीप आला. डाव्या अंगठ्याने बटण दाबले का उजव्या देव जाणे पण परत जाताना त्या निवड्णुक कर्मचार्‍याला ती रागाने काहीतरी बोलली. त्यानंतर मात्र तो पिसाळला आणि निवडणुकिच्या प्रचारात उडाला नसेल एवढा धुरळा १० मिनिटात उडाला. अजुनही प्रत्येक मतदानाच्या दिवशी हा किस्सा आठवतोच. (आणि त्यावेळी माझ्या मागेच उभ्या असणर्‍या मित्राने हलक्याच आवाजात केलेली चावट कॉमेंट्सुद्धा)

मदनबाण 16/10/2014 - 16:16
अर्धा दिवस काम करुन घरी आलो... बॅग ठेवली. बायडीला तय्रार रहा म्हणुन हापिसातुन निघण्या आधीच सुचना केलेली होती. मग बाईकवर बसुन दोघो मतदान केंद्रात गेलो. १५ मिनीटात मतदानाचा हक्क बजावुन बाहेर आलो. आल्यावर शाई लावलेल्या बोटोचा फोटु मिपा व्हॉट्सअप ग्रुपवर शेउर केला... बाकीचा वेळ पिल्ला बरोबर दंगा-मस्ती करण्यात घालवला. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

अर्धवटराव 15/10/2014 - 08:36
पण...
आज ऑफिसला मतदानाची सुट्टी असली तरीही मला आज ऑफिसमध्ये दिवसभर काम असल्यामुळे जावे लागणारच होते.
तुम्ही स्वतः ऑफीसला जायला तयार असाल तर ठीक... अन्यथा (जर परप्रांतीय मॅनेजर असेल तर) मराठी बाणा दाखवायचा चान्स सोडल्याबद्दल तीव्र निषेध :P

सतिश गावडे 15/10/2014 - 08:42
अरे वाह... माझे नांव गावी कोकणात (महाड मतदार संघ) आहे. कार्यालयास सुट्टी नसल्यामुळे तसेच सुट्टी घेणे शक्य नसल्यामुळे मतदान करता येणार नाही याबद्दल खेद वाटतो. लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी कार्यालयास सुट्टी होती तेव्हा गावी जाऊन मतदान केले होते. :)

नाखु 15/10/2014 - 08:53
सत्रात मतदान करणार आहे.(कंपनी ने अर्धी सुट्टी दिलेली आहे).घरच्याच "भावी" मतदाराचे शाळेत मतदान असल्याने काहीच अडचण नाही.

चौकटराजा 15/10/2014 - 09:03
मला आज सकाळ पर्यंत कोण उमेदवार आहेत हेच माहीत नव्हते. मी समजत होतो मी चिंचवड मतदार संघात आहे. पण सकाळी स्लीप पहातो तर पिंपरी मतदार संघ ! नोटा ला द्यावे की मोदी .....द एंटरटेनर ला ... ?

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे 15/10/2014 - 09:28
काका जरी जागरुक नागरिक असले तरी त्यांचं आता वय झालंय हे विसरु नका. पळा आता. चिंचवडला गेलो की म्हातारा खरडपट्टी काढणार. ;)

पैसा 15/10/2014 - 09:28
सर्व महाराष्ट्रीय मतदाराना मद्दानासाठी शुभेच्छा! मला वाटले होते, एवढे रंगीत सामने बघून लोक कंटाळतील पण सकाळी ७ वाजता १५-२० लोक म्हणजे बराच उत्साह दिसतो आहे! जास्त मतदान म्हणजे काँग्रेसला धोका हा आतापर्यंतचा समज आहे. १९ ला कळेलच काय ते!

In reply to by पैसा

प्रचेतस 15/10/2014 - 09:43
आमच्या पिंपरी मतदारसंघात मात्र मतदारांची थोडीशी गडबड झाली आहे. आमचा विभाग हा भाजपबहुल मतदारांचा. हा मतदारसंघ युतीच्या वाटपात भाजपाकडून आठवलेप्रणित रिपब्लिकन पक्षाच्या वाटेला गेलाय त्यामुळे येथे कमळ चिन्ह नाही. त्यामुळे बहुसंख्य मतदार कमळ कुठे दिसत नाही याची चर्चा करत होते.

भाते 15/10/2014 - 09:40
मतदान केंद्रावर बोटावर शाई लावायला बहुदा कॉलेजमधली (किमान तशी दिसणारी) मुलगी होती. इथे आपल्याला दुसऱ्यांच्या बोटावर नेलपॉलिश लावायला बसवले आहे अशी कदाचित तिने आपली समजूत करून घेतली असावी. बोटाचा अर्धा आणि संपुर्ण नख मिळुन किमान इंचभर मोठी रेघा तिने माझ्या बोटावर उमटवली. :)

In reply to by भाते

बॅटमॅन 15/10/2014 - 16:04
तर्जनीवरच का शाई लावायची, मधल्या बोटावर लावा म्हटल्यावर मद्दानवाले लोक जे उखडले म्हणता!! डोळे वटारून काहीतरी महापाप केल्यागत पाहू लागले. तेहाची...गाढवे...जे. असो.

विजुभाऊ 15/10/2014 - 10:18
आमच्या क्लायन्टचा म्यानेजर मराठीच आहे पण तो इतक्या रेम्याडोक्याचा आहे की विचारायची सोय नाही. त्याने कोण कोणत्या गावी मतदान करणार आहे या नोंदी अगोदरच घेतल्या आहेत. त्या नुसार एकतर पूर्न सुट्टी किंवा स्थानीक लोकाना दोन तास सुट्टी घ्यावी आणि डोंबिवली किंवा अंबरनाथ / वसई येथे जाउन मतदन करावे अशा मताचा आहे.

अजया 15/10/2014 - 11:08
माझ्या इथले मतदान केंद्र गावाच्या टोकाला,वस्ती संपते तिथे शेताडीत एक उध्वस्त धर्मशाळेसारखी दिसणारी शाळा आहे ,त्यात होते.गवतात मोठ्ठी बीळं,सर्वत्र सांडपाणी.रस्त्याचा पत्ता नाही. तिथल्या विद्यार्थ्यांची,आज तिथे काम करावे लागणार्या कर्मचार्यांची,पोलिसांची दयाच आली.आणि हो मद्दानाला मीच पयली होते!

श्रीगुरुजी 15/10/2014 - 11:45
सकाळीच जाऊन मतदान करून आलो. मतदान अधिकार्‍यांना दर २ तासांनी मतदानाचे आकडे पाठवावे लागतात. त्यामुळे ९ वाजता ८-१० मिनिटे मतदान थांबले होते. त्या दरम्यान १५-२० जणांची रांग लागली. मतदान पुन्हा सुरू होतानाच ६० च्या आसपास वय असलेले व चांगली ठणठणीत प्रकृती असलेले मागून येऊन पुढे घुसू लागले. घुसताना त्यांनी मागच्या अजून एका माणसाला खुणेने पुढे बोलाविले. तो माणूसही ५५ च्या आसपास वय असलेला व तब्येतीने चांगला धडधाकट होता. मी त्या तिघांनाही आक्षेप घेतल्यावर पुढील माणसाने आपण ज्येष्ठ नागरीक असल्याचा दावा केला. ६० च्या आसपास वय व तब्येतीने धडधाकट असूनसुद्धा वयाचा फायदा घेऊन रांगेत घुसण्याचा प्रयत्न संतापजनक होता. त्या दोघांना चांगला झापडला. मागच्या माणसाला घुसखोरीबद्दल विचारल्यावर आपला मणका फ्रॅक्चर असल्याची थाप मारली. मणका फ्रॅक्चर असणारा माणूस अंथरूणातून उठू सुद्धा शकणार नाही आणि तुम्ही तर निवांत फिरताय असे सांगितल्यावर ३ वर्षांपूर्वी मणक्याचे ऑपरेशन झाल्याचे त्याने सांगितले. त्यालाही चार शब्द सुनावल्यानंतर सुद्धा निर्लज्जपणे तिघेही इतरांच्या पुढे आत घुसून मतदान करून आले. स्वतःची तब्येत धडधाकट असताना सुद्धा वयाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी तिघांनाही योग्य त्या शब्दात सुनावले. याचा चांगला परीणाम असा झाला का त्यांनी खूण करून पुढे बोलाविलेल्या अजून १-२ जणांना दारातल्या पोलिसांनी परत पाठवून रांगेतून येण्यास सांगितले. मतदान संपल्यावर बाहेर आल्यावर आपण ज्येष्ठ नागरीक असण्याचा दावा करून मध्ये घुसलेला तोच "ज्येष्ठ" नागरीक अक्षरशः पळत पळत रस्ता ओलांडताना दिसला!

पहाटे पहाटे ७.११ वाजता प्राधिकरणाच्या म्हाळसाकांत विद्यालयात कर्तव्य पार पाडलेलं आहे. जेमतेक २ मिनिटात काम झाल. फार गर्दी नव्हती.

सुनील 15/10/2014 - 12:20
काही वर्षांपूर्वी राहते घर बदलले परंतु मतदारयादींतून नावे बदलून घेतली नाहीत. त्यामुळे एकाच घरात दोन मतदान केंद्रांत (खरे म्हणजे दोन विधानसभा क्षेत्रांत) नावे असणार्‍या व्यक्ती! एक केंद्र घरापसून ६ किमींवर तर दुसरे विरुद्ध दिशेला २ किमींवर. पावणे सातला घरून निघालो. दोन्ही मतदान केंद्रे आटोपून पावणे नवाला हपिसात हजर! कुठेही गर्दी नव्हती.

असंका 15/10/2014 - 12:49
मतदारसंघ पुढच्या एक दोन आठवड्यात सोडणार आहे. तरी चाललोय अधिकार बजावायला. यस्टीत आहे. बहुतेक पोचेन वेळेत. पाच वाजता शेवट आहे ना? रांगेत असणार्यांना पाच वाजून गेल्यावरसुद्धा मतदान करु देतील अशी आशा आहे...

In reply to by असंका

प्रचेतस 15/10/2014 - 13:29
आपले अभिनंदन. पाच वाजता रांगेत असूनही ज्यांचे मतदान झाले नाही त्यांच्यासाठी रांग संपेपर्यंत मतदान चालूच ठेवणार येणार आहे.

कंजूस 15/10/2014 - 13:24
वल्लीने लेन बदलली आज. शाई लावण्याची पध्दत त्यांना शिकवली आहे तसेच ते करत आहेत चूक नाही. आता जो कोणी निवडून येईल त्याच्याकडून आपण हक्काने काम करून घ्यायचे शाई उगाच नाही लावून घेतली आम्ही.

In reply to by कंजूस

चौकटराजा 15/10/2014 - 14:32
वल्ली मतदानाला गेला याचे कारण सातवाहन कालीन निवडणुका - आजच्या निवडणुकांचा मूलस्त्रीत असा लेख तो लिहिणार आहे. लेन बिन काही नाही बदलली.

राही 15/10/2014 - 14:43
मुंबईत शुकशुकाट आहे. सेना कार्यकर्त्यांची नेहमीची लगबग आज दिसत नाहीय. त्यांना माणसे बाहेर काढता आलेली दिसत नाहीत. फ्लॅटवाले/टॉवरवाले मात्र सकाळीच मतदान करून आले आहेत. संध्याकाळपर्यंत झोपडपट्टीवाल्यांना बाहेर आणता आले नाही तर मुंबईतले निकाल उघड आहेत.

In reply to by राही

पैसा 15/10/2014 - 16:14
३ वाजता मुंबईत ३७% आणि बाकी महाराष्ट्रात ४६% मतदान झाले अशा बातम्या दिसत आहेत.

सकाळी ९:३०-१०:०० ला मतदान केले. यावेळेला मागच्या निवडणूकीच्या मानाने कमी गर्दी दिसली. आता १९ तारखेपर्यंत वाट पाहणे आणि तोपर्यंत दूरचित्रवाणीवर चर्चाचर्वण पाहणे हेच नशीबी आहे :)

सुहास.. 15/10/2014 - 14:53
आज आमचा सेल्फि काढुन चेपुवर बोट दाखविण्याचा हक्क हिरावला गेलाय ! पहाटे चार वाजेपासुन काम करत होतो, गावात एकुण तीनच मतदान केंद्रे आहेत, पुण्यात सर्वात जास्त मतदार संख्या असलेला वार्ड हा आपला आहे, मतदान कर्मचार्‍यांची मदत, अगदी ,खुर्च्या लावण्यापासुन ते बाहेर गर्डर लावणे, महिला पोलीस व स्त्री कर्मचार्‍यांसाठी सुविधा ची गाडी मागविणे ( जिप च्या शाळेत आहे मतदान ), बाहेर गर्डर लावणे, म्हणजे सीमा सुरक्षा करणे, मग बाहेर टेबल लावण्यापर्यंत सगळ काही करून दिले मंडळाने, अर्थात हे दरवेळचचं आहे काम !! सव्वासहाच्या सुमारास निवडणुक अधिकार्‍याबरोबर नाष्टा करताना मस्त गप्पा हाणल्या , त्यांना स्वतः ला पोस्टाने मत पाठवावे लागणार होते " या वर्षी मतदानाचा टक्का घसरणार बघा " !! साडे सहाच्या सुमारास सर्व मशीन च्या टेस्ट घेतल्या, एक बंद होती , लगेच दुसरी आली !! सात वाजता आपलीच काही मंडळी लायनीत मत देवुन गेली ....मग मी निघालो ..माझ व्होटिंग नागपुरचाळीत आहे , साडेसात ला सगळ्यांच्या झोपा उडवायला पोहोचलो ...सात लिस्टा उलट्या-पालट्या घातल्या ..आमचं नाव नाही ...च्यायला माझाच पत्ता कट !! घरातल्या बाकी पाच ही जणांच नाव ......... हाय रे किस्मत !! मायच्या भोपळा त्या निवडणुक आयोगाच्या :(

अनन्न्या 15/10/2014 - 16:34
आमचे मतदानकेंद्र आमच्या घ्रराशेजारीच असल्याने दोन मिनीटांचा पायी प्रवास! घरासमोर सेना भाजपचे कार्यकर्ते मिळून मिसळून वडपाव खात होते, कसे फसवले असे म्हणत!

यसवायजी 15/10/2014 - 16:49
माझं नाव कर्नाटकातल्या मतदार यादीत आहे त्यामुळे 'पास'. 'पॉवर' सायबानं लोकसबेच्या टायमाला दोनीकडं मत द्याया सांगितलं हुतं. पण ह्या वेळेला तसं काय इशेश आवाहन (पक्षी- प्रलोभन) न मिळाल्याने - नॉट मतदान्ड इन पुणे टूडे. ;)

आमी ठाण्यात रवतयं पण मतदान असल्फा, साकीनाका भागात (जुन्या घरी) आहे. घाटकोपर ते असल्फा असा मेट्रोचा वातानुकुलीत प्रवास करुन मतदान केंद्रावर पोहोचलो. उमेदवारांची यादी बघून डोके भंजाळले. जी शिवसेना मराठी मराठी करते त्यांचा उमेदवार युपीवाला सिंह होता. कदाचित मराठी शेर संपले असावेत. ईश्वर तायडे नावाचे साहेब जे मागच्या निवडणूकीत रा.कॉं. मधे होते ते चक्क मनसेच्या इंजिनावर आरुढ होते. काही वर्षांपूर्वी नगरसेवकाच्या निवडणूका झाल्या ( तेव्हा मनसेला इंजिन हे अधिकृत चिन्ह मिळाले नव्हते) तेव्हा मनसेची निशाणी "शिट्टी" होती ती एक अपक्ष उमेदवार वाजवत होता. मायाबाईंचा हत्ती होता. शरद पवार नेहमीप्रमाणे घड्याळ या चिन्हावर लढत आहेत. फक्त आरिफ नसीम खान हे ओळखीचे उमेदवार आणी त्यांचा हाताचा पंजा हे कॉम्बीनेशन वर्षानुवर्षे कायम आहे ते ह्या ही वेळेस कायम होते.

एक गोष्ट सांगायची राहिलीच ती म्हणजे मी जातपात किंवा धर्म पाहून माझे मत देत नाही. आजच व्हाटसअप वर एक मेसेज फिरत होता. " आपल्या जातीच्याच उमेदवारास मत देईन असा हटट बाळगू नका. तुम्ही तुमचा आमदार निवडत आहात. तुमच्या मुलीसाठी नवरा नाही." अवांतर : यातून स्त्रीयांचा उप(मर्द) करायचा माझा कोणताही हेतू नाहीये. मी फक्त सोशल मिडीयात फिरत असलेला मेसेज उदाहरणादाखल वापरला आहे.

In reply to by धर्मराजमुटके

हाडक्या 15/10/2014 - 19:55
अच्छा म्हणजे तो मेसेज पाठवणार्‍यास म्हणायचे आहे की तुम्ही(च) तुमच्या मुलीसाठी नवरा निवडायचा आहे आणि तो पण तुमच्याच जातीतील..!! बाकी असे(च) असेल तर मग निवडणुकीत उमेदवार जात बघून निवडला तर काय झालं मग ? भंकस दांभिकता साली सगळीकडे.. (तुमच्याबद्दल हा प्रतिसाद नाहीये हो, तो मेसेज ज्याने तयार केला आणि ज्यांनी पुढे पाठवला त्यांच्याबद्दल आहे.)

In reply to by धर्मराजमुटके

टवाळ कार्टा 15/10/2014 - 20:06
एक गोष्ट सांगायची राहिलीच ती म्हणजे मी जातपात किंवा धर्म पाहून माझे मत देत नाही. आजच व्हाटसअप वर एक मेसेज फिरत होता. " आपल्या जातीच्याच उमेदवारास मत देईन असा हटट बाळगू नका. तुम्ही तुमचा आमदार निवडत आहात. तुमच्या मुलीसाठी नवरा नाही." अवांतर : यातून स्त्रीयांचा उप(मर्द) करायचा माझा कोणताही हेतू नाहीये. मी फक्त सोशल मिडीयात फिरत असलेला मेसेज उदाहरणादाखल वापरला आहे.
याच्यातून स्त्रीयांचा उपमर्द कसा होईल???

In reply to by टवाळ कार्टा

मी एक गरीब मध्यमवर्गीय विवाहीत पुरुष आहे हो. स्त्रियांचा विषय हा अतिशय संवेदनाशील आहे. त्याच्या चुकूनही कोठे उल्लेख आला की मी शक्यतो त्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळतो. चुकून प्रतिक्रिया दिलीच तर फारच तोलून मापून देतो. प्रतिक्रिया दिलीच तर अगोदरच माफी मागून मोकळा होतो किंवा माझा हेतू प्रामाणिक आहे असे जाहिर करतो. काये ना की आपला उगाच आरारा बाबा होऊ नये. म्हणजे वागणे चांगले पण बोलण्यात मार खायचा.

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन 16/10/2014 - 15:35
स्त्रियांचा उप'मर्द' करायचा तर ते तूर्तास फक्त वैद्यकशास्त्र आणि तेही अंशतःच करू शकते असे वाटते. चूभूद्याघ्या.

विलासराव 16/10/2014 - 01:44
आमचे नाव अंबरनाथला आहे. मतदान करायचेच होते. पण आता अंबरनाथला जायचे आहेच तर कोणी मिपाकर आहेत कालच तपासल.आपले भटक्या खेडवाले आहेत तिथे. त्यांचा नंबर कट्टासम्राट मुवींना मागीतला. त्याच्याकडे नंबर नव्हता मग त्यांनी ४-५ मध्यस्थांचे नंबर दिले , त्यांच्याकडुन भटक्यांचा नंबर मिळवला. तर मुवींचा रात्रीच डायरे़क्ट फोनच आला. त्यांनी शनिवारच्या डोंबोली कट्ट्याच आमंत्रणच दिलं. मग आज सकाळीच लवकर उठुन अंबरनाथला. भटक्यांना फोन केला तर ते १० मिनीटात घ्यायला स्टेशनला हजर. मग त्यांच्याघरी त्यांच्या आईअवडीलांची भेट झाली. योगा आनी विपश्यनेवर एक सेशन झाले. नाष्टा करुन एका मित्राकडे त्यांनी मला सोडले. तिथे आनी इतर ३-४ जुन्या दोस्तांच्या घरी चहापानी घेत २ ला बहीणीच्या घरी पोहोचलो. तीथे मेनु होता डोसे चटणीसहीत आनी मिसळपाव. मग चापुन हाणल्यावर तासभर आडवाच झालो. ४-३० ला चहापानी घेउन केंद्रावर हजर. नेटवरुन स्लीप प्रिंट मारली होती पण त्यात फक्त यादी नंबर होता. नाव सापडेना. मग मी अंदाजे १०६४ नंबर पहायला सांगीतले. तिथे दुसर्याचे नाव. मग मी १६४ पहा म्हणालो तर तो संशयानेच पाहु लागला. पण विनंती केल्यावर त्याने पाहीले तर हा मटका बरोबर लागला होता. पॅनकार्ड दाखवले तर त्यांना नावच वाचता येईना जुने असल्याने. ते म्हनाले की दुसरा आडी आहे का काही. मी म्हणालो आहे पण लालबागला. मग त्यांनी परवानगी दिली. खरतर होता माझ्याकडे वाहन चालवायचा परवाना पण म्हणलं बघु काय म्हणतात ते. पण झालं एकदाचं मतदान. ४-५ लोक माझ्यापुढे होते २-३ मागे. नंतर परत २-३ स्नेह्यांच्या भेटीगाठी घेउन लालबागला परत. येताना ठाण्याच्या मिपा संपादकांना फोनवले पण त्यांनी आमचा फोनच घेतला नाही. एका मिपा सदस्याने सकाळी घरी नेउन केलेला पाहुनचार आनी संध्याकाळी मिपा संपादकाने न घेतलेला फोन यातुन ज्याने-त्याने जो घ्यायचा तो बोध घ्यावा आपापल्या जबाबदारीवर.

In reply to by विलासराव

किसन शिंदे 16/10/2014 - 16:32
येताना ठाण्याच्या मिपा संपादकांना फोनवले पण त्यांनी आमचा फोनच घेतला नाही. एका मिपा सदस्याने सकाळी घरी नेउन केलेला पाहुनचार आनी संध्याकाळी मिपा संपादकाने न घेतलेला फोन यातुन ज्याने-त्याने जो घ्यायचा तो बोध घ्यावा आपापल्या जबाबदारीवर
मालक, ९:१० ला तुमचा फोन आला तेव्हा मी कार्यालयात जाण्यासाठी आवराआवर करत होतो, आणि फोन सायलेंट असल्यामुळे कॉल येऊन गेल्यानंतर पाह्यला. गडबडीत असल्यामुळे परत फोन केला नाही इतकेच. बाकी गैरसमज नसावा इतुकीच अपेक्षा!

In reply to by किसन शिंदे

विलासराव 16/10/2014 - 18:10
मालक, ९:१० ला तुमचा फोन आला तेव्हा मी कार्यालयात जाण्यासाठी आवराआवर करत होतो, आणि फोन सायलेंट असल्यामुळे कॉल येऊन गेल्यानंतर पाह्यला. गडबडीत असल्यामुळे परत फोन केला नाही इतकेच. बाकी गैरसमज नसावा इतुकीच अपेक्षा! अर्थातच.बेशर्त सहमती!!!!!!

नाखु 16/10/2014 - 09:04
कंपनीतून दुपारी घरी पोहोचल्याबरोबर म्हटलं आधी मतदान करू जेवण नंतर्.गेलो केंद्रावर.
  1. मनपाच्या निवडणूकी ईतका राजकीय गोतवळा दिसला नाही (२०० मीटर अलिकडे) गर्दी पाहून दुपारची वेळ निवडल्याचे थोडे वाईट वाटले पण ईतके आले आहेत तर निकाल चांगलाच लागेल म्हणून मनाची समजूत घातली. यादी-क्रमांक शोधण्यासाठी "मांडी-सगणक" महोदय तयार होतेच पण त्यांच्या भवती गराडा पडला होता (तुळशीबाग्+आठवडी बाजार्+देवस्थान जत्रा) असे काहीसे स्वरूप होते. काही वेचक संवाद झाले:
  • "माझ नाव ईथे आहे तर मग बहिणीचे का नाहे एक "जागरूक" काकु".
  • माझे आणि माझ्या मिस्टरांचे नाव वेग्वेगळ्या यादीत का? माझ्या मय्रत्र्णीचे नाव शोधायचे ईलेक्शण कार्ड नसलं तर चालतय का? लाईनीत या म्हटल्याबरोबर प्रत्येक मतदाराला आपलीच रांग अधीकृत आहे असा साक्षात्कार झाला आणि एक्मेकांची "आस्थेवाईक विचारपूस" करणार्या लोकशाहीचे प्रत्यंतर आले.
यथावकाश दालन क्रमांक समज्ल्यावर आमची वरात दालनाच्या दाराशी पोहोचली. तिथेही काही शंकासूरांनी दालन क्रमांकवरून परस्पर विरोधी माहीती देवून पहिल्यांदाच मतदानाला आलेल्या "नवमतदारांना" सजग्-संभ्रम्-निरकारण्-पुन्हा संभ्रम" अशा दिव्य अवथेत पोहोच्वण्यास हात भार लावला. दालनात पोहोचल्या-पोहोचल्या पडताळणी अधिकारी आणि जागरूक मतदार यांच्यातील संवादः "माझ नाव आहे का बघा ना जरा!" "अहो नाव-दालन क्र्मांक बाहेर बघा!" "अहो तिथे फार गर्दी आहे ना म्हणून डायरेक तुमच्याकडं आलोय" "बाबा कुनाचही नाव नंबर अस्ल्याबिगर नाही शोधता येणार" "असं काय करताय मला बाहेर लाईनित उभं र्हाव लागेल. ईथे पण लाईनीतून्च आलोयना" "नाही अगदी माझ्या पोराचे असले तरी नंबर शिवाय नाही नाव शोधता येणार !!!" "छ्या तुम्ही सरकारी लोक अजिबात कोप्रेट करीत न्हाई" ===================================== त्यानंतर एका आजीबाईंनी मशिनचा आवाज झाला का माझे मत झाले याची मतदान मदतनीसाकडून दोन्-तीन्दा खात्री करून घेतली.आणि मगच पुढच्या माणसाला मतदान "आडोसा खोक्यात" जावू दिले. बाकी आमच्या भागात ही एकाच नावाचे २-३ उमेदवार उभे करून गंमत आणली आहे.

कलंत्री 16/10/2014 - 11:29
माझ्या मागील दोघांना आपण अगोदर मत द्या असे सांगितले आणि विचारासाठी थोडा वेळ घेतला. कोणाला मत द्यावे हेच समजत नव्हते. क्षणोक्षणी मनात विचार येत होता, सगळ्यात कोण बरे कमी वाईट असेल बरे?

सौंदाळा 16/10/2014 - 15:59
काल मतदान करुन आलो. या धाग्याच्या निमित्ताने १० वर्षापुर्वीचा किस्सा आठवला. विधानसभेच्या मतदानाला गेलो होतो. कॉलनीतलीच एक परिचित सुशिक्षित (?) महिला पुढे उभी होती. नावपडताळणी, सही वगैरे झाल्यावर ती गेली वोटींग मशिनकडे आणि तिकडुनच ओरडुन निवडणुक कर्मचार्‍याला अंगठा दाखवुन विचारु लागली डावा की उजवा? कर्मचारी मुळचा पुणेकर नसावा त्याने सांगितले तुम्हाला पाहिजे ते कोणतेही बटण दाबा. तर परत हिचे तेच डावा की उजवा? लोक हसायला लागले. शेवटी मत दिल्याचा बीप आला. डाव्या अंगठ्याने बटण दाबले का उजव्या देव जाणे पण परत जाताना त्या निवड्णुक कर्मचार्‍याला ती रागाने काहीतरी बोलली. त्यानंतर मात्र तो पिसाळला आणि निवडणुकिच्या प्रचारात उडाला नसेल एवढा धुरळा १० मिनिटात उडाला. अजुनही प्रत्येक मतदानाच्या दिवशी हा किस्सा आठवतोच. (आणि त्यावेळी माझ्या मागेच उभ्या असणर्‍या मित्राने हलक्याच आवाजात केलेली चावट कॉमेंट्सुद्धा)

मदनबाण 16/10/2014 - 16:16
अर्धा दिवस काम करुन घरी आलो... बॅग ठेवली. बायडीला तय्रार रहा म्हणुन हापिसातुन निघण्या आधीच सुचना केलेली होती. मग बाईकवर बसुन दोघो मतदान केंद्रात गेलो. १५ मिनीटात मतदानाचा हक्क बजावुन बाहेर आलो. आल्यावर शाई लावलेल्या बोटोचा फोटु मिपा व्हॉट्सअप ग्रुपवर शेउर केला... बाकीचा वेळ पिल्ला बरोबर दंगा-मस्ती करण्यात घालवला. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज १५ ऑक्टोबर २०१४, विधानसभा निवडणूकीच्या मतदानाचा दिवस. आज ऑफिसला मतदानाची सुट्टी असली तरीही मला आज ऑफिसमध्ये दिवसभर काम असल्यामुळे जावे लागणारच होते. तेव्हा सकाळी लवकर उठून ६.५०लाच मतदान केंद्रावर गेलो. चिंचवडच्या माटे शाळेत माझे मतदान केंद्र होते. वोटर्स स्लिप मिळाली नव्हतीच मात्र निवडणूक आयोगाच्या संस्थळावरुन अगोदरच माहिती घेतल्यामुळे मतदान केंद्र, विभाग क्रमांक, अनुक्रमांक इत्यादी तपशील घेऊन ठेवला होताच. इतक्या लवकर जाऊनही केंद्रावर माझ्याहीआधी २/३ लोक उभे होते. लगेचच माझ्यामागे १५/२० जणांची रांग उभी राहिली. एकंदरीत मतदान सुरु व्हायच्या आधीपासूनच उत्साह दिसत होता.

<पतंग>

राजेश घासकडवी ·

In reply to by प्रभाकर पेठकर

नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ 16/10/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 16/10/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा 16/10/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

In reply to by असंका

बॅटमॅन 16/10/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth

In reply to by प्रभाकर पेठकर

नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ 16/10/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 16/10/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा 16/10/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

In reply to by असंका

बॅटमॅन 16/10/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth
लेखनविषय:
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी

आल्प्सच्या वळणांवर - भाग ४ - शिल्थोर्न, बिर्ग आणि परिसर

मधुरा देशपांडे ·

प्यारे१ 15/10/2014 - 01:51
घाई, किती घाई???? ह्या भागात उगाच हायलाईट्स बघतोय असं वाटलं. बाकी ते 'चायनीज फोटो काढणं प्रकरण' आवडलं.

पहाटवारा 15/10/2014 - 04:42
तो गावबाहेरच्या रस्त्याचा फोटो क्लास आलाय एकदम .. अन फुलांच्या बागेचा .. अन आइगर चा .. अन सर्वच :) आणी ती दिशादर्शनाची आय्ड्याहि मस्तच.. -पहाटवारा

दिपक.कुवेत 15/10/2014 - 11:25
निव्वळ सुरेख. एक शंका युंगफ्राऊ (Jungfrau) ह्या शब्दातला जे सायलंट आहे ना कारण बहुतांश जाहिरातीत जुंगफ्राउ असं असतं

In reply to by दिपक.कुवेत

जर्मन मध्ये "j" या अक्षराला "योट्" असे संबोधतात आणि त्याचा उच्चार इंग्लिश "y" सारखा करतात. त्यामुळे Jungfrau चा "जुंगफ्राउ" हा चुकीचा उच्चार आहे. उदाहरणार्थ (मराठीत लिहीलेला उच्चार = जर्मन भाषेतील शब्द = त्या अर्थाचा इंग्लिश शब्द) : या = Ja = Yes. याकं = Jacke = jacket. युंग = jung = young. याsर = Jahr = year. मायोन्येज = Majonäse = mayonnaise.

चौकटराजा 15/10/2014 - 14:27
म्य्रुरेन गावातून भटकायला मिळाल्या बद्द्ल अभिनंदन. एक कल्पना करा तिथे मिळालीच जागा सपाट व क्रिकेट खेळले गेले तर सिक्सर खाली लॉटरब्रूनेनच्या व्हॅलीत पडाणार !!

एस 15/10/2014 - 20:10
टीचभर तो निसर्ग, किती टुकीने जपलाय! नाहीतर आपण करंटे. Nordwand हा चित्रपट पाहिल्यानंतर तो आयगर चांगलाच लक्षात राहिलाय! त्यातला तो Hinterstoisser Traverse ओलांडण्याचा निष्फळ प्रयत्न पाहता अंगावर काटा येतो! लेखमाला मस्त सुरू आहे. पुभाप्र.

सौंदाळा 16/10/2014 - 15:42
मस्तच ही अशा ठिकाणी असलेली घरे बघुन तिथल्या लोकांचा हेवा वाटतो. त्यांचा दिनक्रम कसा असेल, बागकाम, निसर्ग, पाळीव प्राणी वगैरेशी ते किती एकरुप झाले असतील असे विचार येतात. हे लोक नोकरी/धंद्याच्या निमित्ताने लांब शहरी वातावरणात स्थायिक व्हायची स्वप्न बघत असतील का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

हे लोक नोकरी/धंद्याच्या निमित्ताने लांब शहरी वातावरणात स्थायिक व्हायची स्वप्न बघत असतील का? आम्ही जिथे राहिलो त्या आजीशी बोलताना जे जाणवले ते असे की त्यांना शहरी वातावरण अजिबातच आवडत नाही. आम्ही निसर्गाच्या सान्निध्यातच रमतो. मोठ्या इमारती, घरं, अंगण नाही असे आम्हाला नाही आवडत असे तिचे म्हणणे होते.

In reply to by मधुरा देशपांडे

चौकटराजा 16/10/2014 - 18:40
आम्ही जिथे राहिलो त्या आजीशी बोलताना जे जाणवले ते असे की ..... मला आवडणार्‍या पर्यटन शैलीत हे असे असते.स्थानिक लोकांशी गप्पा मारायच्या ! यासाठी युरोप केसरी वगैरे बरोबर पहायचा नाही हे नक्की केले आहे.

फोटो आणि वर्णन मस्त.. कितीही पाहिले तरी मन भरतच नाही असं ठिकाण आहे स्वित्झर्लंड..मनाने परत एकदा (कितव्यांदा? )तिथे पोहोचले. (स्मरणरंजनात दंग) स्वाती

सखी 17/10/2014 - 01:00
आज सवड मिळताच २,३,४ भाग वाचुन काढले. छान प्रवासवर्णन, फोटो तर अफलातुनच आहेत. किती मस्त वाटत असेल तिथे असा निसर्ग, फुलझाडं आणि गायीगुरं बघुन असचं वाटल.

प्यारे१ 15/10/2014 - 01:51
घाई, किती घाई???? ह्या भागात उगाच हायलाईट्स बघतोय असं वाटलं. बाकी ते 'चायनीज फोटो काढणं प्रकरण' आवडलं.

पहाटवारा 15/10/2014 - 04:42
तो गावबाहेरच्या रस्त्याचा फोटो क्लास आलाय एकदम .. अन फुलांच्या बागेचा .. अन आइगर चा .. अन सर्वच :) आणी ती दिशादर्शनाची आय्ड्याहि मस्तच.. -पहाटवारा

दिपक.कुवेत 15/10/2014 - 11:25
निव्वळ सुरेख. एक शंका युंगफ्राऊ (Jungfrau) ह्या शब्दातला जे सायलंट आहे ना कारण बहुतांश जाहिरातीत जुंगफ्राउ असं असतं

In reply to by दिपक.कुवेत

जर्मन मध्ये "j" या अक्षराला "योट्" असे संबोधतात आणि त्याचा उच्चार इंग्लिश "y" सारखा करतात. त्यामुळे Jungfrau चा "जुंगफ्राउ" हा चुकीचा उच्चार आहे. उदाहरणार्थ (मराठीत लिहीलेला उच्चार = जर्मन भाषेतील शब्द = त्या अर्थाचा इंग्लिश शब्द) : या = Ja = Yes. याकं = Jacke = jacket. युंग = jung = young. याsर = Jahr = year. मायोन्येज = Majonäse = mayonnaise.

चौकटराजा 15/10/2014 - 14:27
म्य्रुरेन गावातून भटकायला मिळाल्या बद्द्ल अभिनंदन. एक कल्पना करा तिथे मिळालीच जागा सपाट व क्रिकेट खेळले गेले तर सिक्सर खाली लॉटरब्रूनेनच्या व्हॅलीत पडाणार !!

एस 15/10/2014 - 20:10
टीचभर तो निसर्ग, किती टुकीने जपलाय! नाहीतर आपण करंटे. Nordwand हा चित्रपट पाहिल्यानंतर तो आयगर चांगलाच लक्षात राहिलाय! त्यातला तो Hinterstoisser Traverse ओलांडण्याचा निष्फळ प्रयत्न पाहता अंगावर काटा येतो! लेखमाला मस्त सुरू आहे. पुभाप्र.

सौंदाळा 16/10/2014 - 15:42
मस्तच ही अशा ठिकाणी असलेली घरे बघुन तिथल्या लोकांचा हेवा वाटतो. त्यांचा दिनक्रम कसा असेल, बागकाम, निसर्ग, पाळीव प्राणी वगैरेशी ते किती एकरुप झाले असतील असे विचार येतात. हे लोक नोकरी/धंद्याच्या निमित्ताने लांब शहरी वातावरणात स्थायिक व्हायची स्वप्न बघत असतील का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

हे लोक नोकरी/धंद्याच्या निमित्ताने लांब शहरी वातावरणात स्थायिक व्हायची स्वप्न बघत असतील का? आम्ही जिथे राहिलो त्या आजीशी बोलताना जे जाणवले ते असे की त्यांना शहरी वातावरण अजिबातच आवडत नाही. आम्ही निसर्गाच्या सान्निध्यातच रमतो. मोठ्या इमारती, घरं, अंगण नाही असे आम्हाला नाही आवडत असे तिचे म्हणणे होते.

In reply to by मधुरा देशपांडे

चौकटराजा 16/10/2014 - 18:40
आम्ही जिथे राहिलो त्या आजीशी बोलताना जे जाणवले ते असे की ..... मला आवडणार्‍या पर्यटन शैलीत हे असे असते.स्थानिक लोकांशी गप्पा मारायच्या ! यासाठी युरोप केसरी वगैरे बरोबर पहायचा नाही हे नक्की केले आहे.

फोटो आणि वर्णन मस्त.. कितीही पाहिले तरी मन भरतच नाही असं ठिकाण आहे स्वित्झर्लंड..मनाने परत एकदा (कितव्यांदा? )तिथे पोहोचले. (स्मरणरंजनात दंग) स्वाती

सखी 17/10/2014 - 01:00
आज सवड मिळताच २,३,४ भाग वाचुन काढले. छान प्रवासवर्णन, फोटो तर अफलातुनच आहेत. किती मस्त वाटत असेल तिथे असा निसर्ग, फुलझाडं आणि गायीगुरं बघुन असचं वाटल.
आल्प्सच्या वळणांवर - भाग १, भाग २, भाग ३ सततच्या प्रवासानंतर आता पुढचे सहा दिवस एकाच ठिकाणी मुक्काम होता त्यामुळे रोजची सामान आवराआवरी हा प्रकार नव्हता. हवामानाचा अंदाज बघायचा आणि त्याप्रमाणे त्या दिवसाचा बेत करायचा असे ठरले होते. पर्वतशिखरे बघण्यासाठी सूर्यप्रकाश नसेल आणि नुसतेच ढग असतील तर काहीच मजा नाही.

कदाचित चित्रपट परिचय : अभय (कमल हासनचा नव्हे)

प्यारे१ ·

विजय१९८१ 15/10/2014 - 08:47
अणि अजुन एक बाल चित्रपट आठ्वला त्यात एका मुलिला एक गोड्स कुत्र्याच पिलु रस्त्यावर सापड्ते ति आणि तिचे मित्र मालकाचा शोध घेते. शेवटि मालक न सपड्ल्यामुळे ठरते कि पिलु तिच्याकडे ठेवावे आणि तिचा त्या पिलावर जिव जड्तो सगळ मस्त चालु अस्ते. एक दिवशि अचानक एक mentaly handicap मुलाचे आई वडिल ते पिलु मगायला येतात.........काय मस्त सिनेमा आहे. मुलिचे खोट बोलने कि कुत्रा तिच्याकडे नाहिये मग असा विचार करुन कि आपल्याल खेळायला मित्र-मैत्रिणि आहेत पण त्या मुलाला फक्त ते पिलु आणि ते पिलु परत करणे...एकदा बघावाच असा सिनेमा.

In reply to by हाडक्या

चिगो 15/10/2014 - 15:44
"हॅलो"च.. मला आठवत असेल बरोबर, तर ती छोटी जाता जाता त्या मुलाला सांगते, "उसका नाम हॅलो हैं".. लै म्हंजे लैच हृद्यस्पर्शी आहे क्लायमॅक्स..

In reply to by चिगो

हाडक्या 15/10/2014 - 15:55
आमच्या बालपणाच्या मस्त आठवणी आहेत हे चित्रपट.. बर्‍याच लोकाना लक्षात असलेले पाहून छान वाटले. आज काल असे बाल-चित्रपट बनतात की नाही काय माहीत.

सतिश गावडे 15/10/2014 - 09:13
छोटेखानी चित्रपट परिचय आवडला. चित्रपट शोधून नक्की पाहीन. मात्र ज्या हेतूने चित्रपटाची ओळख करुन दिली आहे त्या हेतूशी असहमत. ज्यांना अशी दोन ओळींची सुवचने भानावर आणतील ते मुळात असे बेभान वर्तन करणारच नाहीत. काही वेळा होतं काय, माणसाच्या काही अंतर्गत (उदा. जनुके, मेंदूतील रासायनिक स्त्रावांचा असमतोल किंवा इतर रचनीय बिघाड) अथवा बाह्य (उदा. घरातील किंवा घराबाहेरील एकंदर परिस्थीती) यामुळे त्या माणसाच्या विचारांची तसेच वर्तनाची एक ठराविक अशी चाकोरी ठरुन जाते. भले मग ही चाकोरी तत्कालिन समाजमान्य संकेतांविरुद्ध असली तरी त्या व्यक्तीला आपली चाकोरीच एकमेव योग्य मार्ग वाटते. अशा व्यक्तींना काही समजावून सांगणे हे दगडावर डोके आपटण्यासारखे असते. आपले डोके फुटून आपण रक्तबंबाळ होतो. दगडाला काहीच होत नाही. अशा व्यक्तींशी वागायचं कसं? १. कुटुंबात अशी व्यक्ती असल्या तज्ञांचा सल्ला घ्यावा. या कौटुंबिक समस्येला जनरिक सोल्युशन नाही. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंबाची गोष्ट वेगळी असते. त्यामुळे तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन यावर मार्ग शोधावा. इथे मला तज्ञ म्हणजे अशा मानसिक समस्या या क्षेत्रात काम करणारे लोक अपेक्षित आहेत. उदा. समुपदेशक, मानसोपचारतज्ञ. २. अशी व्यक्ती नोकरीच्या ठीकाणी आपल्यापेक्षा वरच्या अधिकार पदावर असल्यास शक्यतो नोकरी बदलावी. लढा वगैरे देण्यात आपला वेळ आणि शक्ती वाया घालवू नये. अशी व्यक्ती तुम्हाला पुरुन उरेल. ३. समाजात इतरत्र वावरतानाही आपली अशा व्यक्तींशी गाठ पडण्याची शक्यता असते. मात्र जोपर्यंत अशा व्यक्तीकडून कुठल्याही प्रकारची शारिरीक इजा होण्याचा धोका नाही तोपर्यंत अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करणे हा सर्वोत्तम उपाय असतो. शारिरीक इजा होण्याचा धोका जाणवल्यास योग्य ती पावले उचलावीच. जाता जाता, उपदेशांचे डोस पाजून अशा प्रवृतींना निर्बंध घालता येत नाहीत. अशा व्यक्ती उपदेश स्विकारण्याच्या अवस्थेच्या पलिकडे असतात. किंबहूना अशा उपदेशाचा नकारात्मक परिणाम होतो. लोकांनी केलेल्या टिकेमुळे अशा व्यक्तींचा "हे सारे माझ्या ज्ञानावर, माझ्या प्रतिभेवर, माझ्या प्रज्ञेवर जळतात. या टिका करणार्‍या लोकांकडे माझ्याईतके ज्ञान, प्रतिभा, प्रज्ञा नसल्यामुळे ते मला खाली त्यांच्या पातळीवर खेचण्याचा प्रयत्न करत आहेत." हा समज अधिकाधिक दृढ होत जातो. अधिक काय लिहिणे. तुम्ही सुज्ञ आहात. :)

In reply to by सतिश गावडे

पैसा 15/10/2014 - 09:44
प्रतिसाद आवडला. तुझ्या पूर्वावतारात तुझ्या रूममेटबद्दल लिहिलं होतंस त्याची आठवण झाली. पण तेव्हाही त्या लेखाचे विपरित अर्थ काढले गेले होतेच. चलता है!

अजया 15/10/2014 - 09:36
एकदा मी मळ्यात गेले होते .तिथे एका बोगद्यात जाऊन अडकले.बोगद्यात बालचित्रपट चालु होता.दिग्दर्शक प्यारेकाका होते.त्यांनी त्यात बोध सांगीतला.मी तो ऐकला .तेव्हापासुन मी कोणाला कमी लेखत नाही,नावे ठेवत नाही,दुसर्यांचे न्युनगंड,अल्पबुध्दी काढत नाही.धन्याकाकांचे वाचुन मानसोपचारतज्ञाकडे जाईन.नोकरी सोडीन. आणि हो,मी पण सुज्ञ होणार!!!!

In reply to by अजया

पैसा 15/10/2014 - 09:41
आमच्यासारख्या अतिकोमल मनाच्या माणसांनी काय करावे मग! संन्यासच घ्यायला पाहिजे आता. (ए, कोण रे तो म्हणतोय? तुम्ही माणसं आहात का म्हणून?)

In reply to by अजया

+D पण काही असो, नुकत्याच येउन गेलेल्या अनेक सकस धाग्यांवरील तितक्याच सुपीक विचारमंथनामुळे मिपाकरांचा कल्पनाविलास आणि त्याला शब्दांत उतरावण्याचे लेखनकौशल्य प्रचंड प्रगल्भ झालेले आहे, इतके बोलून मी आपली रजा घेतो ! ;) :)

विजय१९८१ 15/10/2014 - 08:47
अणि अजुन एक बाल चित्रपट आठ्वला त्यात एका मुलिला एक गोड्स कुत्र्याच पिलु रस्त्यावर सापड्ते ति आणि तिचे मित्र मालकाचा शोध घेते. शेवटि मालक न सपड्ल्यामुळे ठरते कि पिलु तिच्याकडे ठेवावे आणि तिचा त्या पिलावर जिव जड्तो सगळ मस्त चालु अस्ते. एक दिवशि अचानक एक mentaly handicap मुलाचे आई वडिल ते पिलु मगायला येतात.........काय मस्त सिनेमा आहे. मुलिचे खोट बोलने कि कुत्रा तिच्याकडे नाहिये मग असा विचार करुन कि आपल्याल खेळायला मित्र-मैत्रिणि आहेत पण त्या मुलाला फक्त ते पिलु आणि ते पिलु परत करणे...एकदा बघावाच असा सिनेमा.

In reply to by हाडक्या

चिगो 15/10/2014 - 15:44
"हॅलो"च.. मला आठवत असेल बरोबर, तर ती छोटी जाता जाता त्या मुलाला सांगते, "उसका नाम हॅलो हैं".. लै म्हंजे लैच हृद्यस्पर्शी आहे क्लायमॅक्स..

In reply to by चिगो

हाडक्या 15/10/2014 - 15:55
आमच्या बालपणाच्या मस्त आठवणी आहेत हे चित्रपट.. बर्‍याच लोकाना लक्षात असलेले पाहून छान वाटले. आज काल असे बाल-चित्रपट बनतात की नाही काय माहीत.

सतिश गावडे 15/10/2014 - 09:13
छोटेखानी चित्रपट परिचय आवडला. चित्रपट शोधून नक्की पाहीन. मात्र ज्या हेतूने चित्रपटाची ओळख करुन दिली आहे त्या हेतूशी असहमत. ज्यांना अशी दोन ओळींची सुवचने भानावर आणतील ते मुळात असे बेभान वर्तन करणारच नाहीत. काही वेळा होतं काय, माणसाच्या काही अंतर्गत (उदा. जनुके, मेंदूतील रासायनिक स्त्रावांचा असमतोल किंवा इतर रचनीय बिघाड) अथवा बाह्य (उदा. घरातील किंवा घराबाहेरील एकंदर परिस्थीती) यामुळे त्या माणसाच्या विचारांची तसेच वर्तनाची एक ठराविक अशी चाकोरी ठरुन जाते. भले मग ही चाकोरी तत्कालिन समाजमान्य संकेतांविरुद्ध असली तरी त्या व्यक्तीला आपली चाकोरीच एकमेव योग्य मार्ग वाटते. अशा व्यक्तींना काही समजावून सांगणे हे दगडावर डोके आपटण्यासारखे असते. आपले डोके फुटून आपण रक्तबंबाळ होतो. दगडाला काहीच होत नाही. अशा व्यक्तींशी वागायचं कसं? १. कुटुंबात अशी व्यक्ती असल्या तज्ञांचा सल्ला घ्यावा. या कौटुंबिक समस्येला जनरिक सोल्युशन नाही. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंबाची गोष्ट वेगळी असते. त्यामुळे तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन यावर मार्ग शोधावा. इथे मला तज्ञ म्हणजे अशा मानसिक समस्या या क्षेत्रात काम करणारे लोक अपेक्षित आहेत. उदा. समुपदेशक, मानसोपचारतज्ञ. २. अशी व्यक्ती नोकरीच्या ठीकाणी आपल्यापेक्षा वरच्या अधिकार पदावर असल्यास शक्यतो नोकरी बदलावी. लढा वगैरे देण्यात आपला वेळ आणि शक्ती वाया घालवू नये. अशी व्यक्ती तुम्हाला पुरुन उरेल. ३. समाजात इतरत्र वावरतानाही आपली अशा व्यक्तींशी गाठ पडण्याची शक्यता असते. मात्र जोपर्यंत अशा व्यक्तीकडून कुठल्याही प्रकारची शारिरीक इजा होण्याचा धोका नाही तोपर्यंत अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करणे हा सर्वोत्तम उपाय असतो. शारिरीक इजा होण्याचा धोका जाणवल्यास योग्य ती पावले उचलावीच. जाता जाता, उपदेशांचे डोस पाजून अशा प्रवृतींना निर्बंध घालता येत नाहीत. अशा व्यक्ती उपदेश स्विकारण्याच्या अवस्थेच्या पलिकडे असतात. किंबहूना अशा उपदेशाचा नकारात्मक परिणाम होतो. लोकांनी केलेल्या टिकेमुळे अशा व्यक्तींचा "हे सारे माझ्या ज्ञानावर, माझ्या प्रतिभेवर, माझ्या प्रज्ञेवर जळतात. या टिका करणार्‍या लोकांकडे माझ्याईतके ज्ञान, प्रतिभा, प्रज्ञा नसल्यामुळे ते मला खाली त्यांच्या पातळीवर खेचण्याचा प्रयत्न करत आहेत." हा समज अधिकाधिक दृढ होत जातो. अधिक काय लिहिणे. तुम्ही सुज्ञ आहात. :)

In reply to by सतिश गावडे

पैसा 15/10/2014 - 09:44
प्रतिसाद आवडला. तुझ्या पूर्वावतारात तुझ्या रूममेटबद्दल लिहिलं होतंस त्याची आठवण झाली. पण तेव्हाही त्या लेखाचे विपरित अर्थ काढले गेले होतेच. चलता है!

अजया 15/10/2014 - 09:36
एकदा मी मळ्यात गेले होते .तिथे एका बोगद्यात जाऊन अडकले.बोगद्यात बालचित्रपट चालु होता.दिग्दर्शक प्यारेकाका होते.त्यांनी त्यात बोध सांगीतला.मी तो ऐकला .तेव्हापासुन मी कोणाला कमी लेखत नाही,नावे ठेवत नाही,दुसर्यांचे न्युनगंड,अल्पबुध्दी काढत नाही.धन्याकाकांचे वाचुन मानसोपचारतज्ञाकडे जाईन.नोकरी सोडीन. आणि हो,मी पण सुज्ञ होणार!!!!

In reply to by अजया

पैसा 15/10/2014 - 09:41
आमच्यासारख्या अतिकोमल मनाच्या माणसांनी काय करावे मग! संन्यासच घ्यायला पाहिजे आता. (ए, कोण रे तो म्हणतोय? तुम्ही माणसं आहात का म्हणून?)

In reply to by अजया

+D पण काही असो, नुकत्याच येउन गेलेल्या अनेक सकस धाग्यांवरील तितक्याच सुपीक विचारमंथनामुळे मिपाकरांचा कल्पनाविलास आणि त्याला शब्दांत उतरावण्याचे लेखनकौशल्य प्रचंड प्रगल्भ झालेले आहे, इतके बोलून मी आपली रजा घेतो ! ;) :)
लेखनविषय:
मला नाना पाटेकरचा एक जुना हिंदी चित्रपट आठवतो दूरदर्शनवर बघितलेला. रविवारी दुपारी चुकून हिंदीच लावला होता. नाना एका हवेलीमध्ये रहात असतो. जुना संस्थानिक वगैरे काही. वैतागलेला, चिडलेला असा नेहमीचाच. मरतो काही कारणानं. मेल्यानंतर त्याचा आत्मा तिथं राहून येणारांना पळवून लावत असतो. भंडावून सोडून, घाबरवून, चिडचिड करुन. एक कुटुंब येतं तिथं. मुलं आणि आईवडील. नाना सातत्यानं चिरडीला येऊन ह्यांना पळवून लावण्याच्या प्रयत्नात. कधी नुसतं शरीर तर कधी नुसतं डोकं दाखवून वगैरे. पण त्या कुटूंबातली एक चिमुरडी धीट असते, अजिबात न घाबरणारी. ती त्याला महाराज वगैरे म्हणायला लागते. का चिडचिड करतोस म्हणे.

चांगले गुण आणि वाईट गुण

अबोली. ·

बहुगुणी 14/10/2014 - 21:23
अबोली: 'काथ्याकूटा'त धागा टाकलाय तर, नावं न घेता पण काही उदाहरणं वगैरे देऊन, आणखी थोडं विस्ताराने लिहायचं होतंत, म्हणजे तुम्हाला अपेक्षित असलेली चर्चा घडेल (नाहीतर नाहक चेष्टा होईल). असं विस्ताराने तुम्ही प्रतिसादातही लिहू शकता (आणि ते लवकर करा, नाहीतर 'धाग्याचं काश्मीर' होईल ;-) ). असो, बाकी दोन सद्गुण वरती दिसले असतीलचः स्पा-भाऊ --> नव्या लेखकांना प्रोत्साहन देणं सुहास-भाऊ--> स्पष्टवक्तेपणा :-)

माझ्या द्रुष्टीने माझे चांगले गूण (जे उधळायचेच असतात ते...) चांगले गूण : बियर पिणे आणि पाजणे . भरपूर सिग्रेटी फुंकणे. सण-वार वगैरेची चिंता न करता बिंधास्त नॉन-व्हे़ज खाणे.हातात एखादे उत्तम पुस्तक आले की, बायको बरोबर संध्याकाळी फिरायला न जाणे. वाईट गूण : हिंदी सिनेमे न बघणे...चुकुनही टी.व्ही. वरच्या मालिका न बघणे.

जेपी 15/10/2014 - 06:09
चांगले गुण.- नविन लेखकाच्या धाग्यावर मी पयला प्रतिसाद देऊन त्यांचे कौतुक करणे वाईट गुण-नविन लेखकाच्या धाग्यावर मी पयला प्रतिसाद देऊन त्यांचे कौतुक करणे. आणी मी पयला.

सतिश गावडे 15/10/2014 - 08:30
चांगले गुणः प्रतिसादाची पिंक टाकण्याची प्रबळ उबळ दाबून टाकणे वाईट गुणः चांगल्या धाग्यांवर लेखन आवडले असूनही प्रतिसाद द्यायला आळस करणे.

मुळात लेखिकेनी बनवलेली चांगल्या आणि वाईट गुणांची यादीच गंडलेली आहे. लेखिकाबाईं कडून चांगले कशाला म्हणायचे आणि वाईट कशाला म्हणायचे याची चौकट फिक्स करुन मिळाली तर बरे होईल. म्हणजे कोणत्या कप्यात काय टाकायचे ते जरातरी स्पष्ट होईल. पैजारबुवा,

पैसा 16/10/2014 - 17:50
सूड मोड ऑन>>> या माहितीचा नक्की उपयोग कसा करणार ते आधी सांगा मग विचार करेन. >>>> सूड मोड ऑफ्फ.

सूड 16/10/2014 - 19:38
माझ्या मनातला प्रश्न आधीच आला असल्यामुळे पास!! नुसत्या चर्चा करुन काय उपयोग? बदल त्याचं काय? मला माझे वाईट (मला स्वत:ला खटकणारे, दुसर्‍यांच्या सूचना मी कोण सांगतंय त्यावर त्या किती लक्ष देण्यालायक हे ठरतं.) गुण बदलणं प्रचंड अवघड जातं. पूर्वी दुसर्‍यांकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा असायची आता बर्‍याच प्रमाणात ती नसते. अपेक्षाच ठेवली नाही की पुढले सगळे प्रश्न चटाचट सुटतात. आणखी एक म्हणजे समोरची व्यक्ती ही 'माणूस/मानव' आहे, ती ती व्यक्ती तिच्या तिच्या तत्कालीन विचार मनस्थितीनुसार कशीही रिअ‍ॅक्ट होऊ शकते. राग/आपुलकी दोन्ही तात्कालिक असू शकतं. त्यामुळे एकदा रागावलेली व्यक्ती मैत्री खात्यात येणार नाही असंही नाही आणि आपुलकी दाखवणारी व्यक्ती मैत्री खात्यात कायमचीच राहील असंही नाही. असो...आता टंकाळा आलाय. उर्वरित तुम्ही ह्या विद्याचं (विदा या शब्दाचे षष्ठी एकवचन उगा गैरसमज नको)नक्की काय करणार आहात ते कळलं की टंकणार.

एस 16/10/2014 - 20:06
मिपावरील तुमच्या पहिल्याच लेखावर धुळवड खेळणे हा वाईट गुण. खूप छान प्रयत्न, लिहीत रहा असे म्हणून नवलेखकांना उत्तेजन देणे हा चांगला गुण. असोत. मनापासून शुभेच्छा.

बहुगुणी 14/10/2014 - 21:23
अबोली: 'काथ्याकूटा'त धागा टाकलाय तर, नावं न घेता पण काही उदाहरणं वगैरे देऊन, आणखी थोडं विस्ताराने लिहायचं होतंत, म्हणजे तुम्हाला अपेक्षित असलेली चर्चा घडेल (नाहीतर नाहक चेष्टा होईल). असं विस्ताराने तुम्ही प्रतिसादातही लिहू शकता (आणि ते लवकर करा, नाहीतर 'धाग्याचं काश्मीर' होईल ;-) ). असो, बाकी दोन सद्गुण वरती दिसले असतीलचः स्पा-भाऊ --> नव्या लेखकांना प्रोत्साहन देणं सुहास-भाऊ--> स्पष्टवक्तेपणा :-)

माझ्या द्रुष्टीने माझे चांगले गूण (जे उधळायचेच असतात ते...) चांगले गूण : बियर पिणे आणि पाजणे . भरपूर सिग्रेटी फुंकणे. सण-वार वगैरेची चिंता न करता बिंधास्त नॉन-व्हे़ज खाणे.हातात एखादे उत्तम पुस्तक आले की, बायको बरोबर संध्याकाळी फिरायला न जाणे. वाईट गूण : हिंदी सिनेमे न बघणे...चुकुनही टी.व्ही. वरच्या मालिका न बघणे.

जेपी 15/10/2014 - 06:09
चांगले गुण.- नविन लेखकाच्या धाग्यावर मी पयला प्रतिसाद देऊन त्यांचे कौतुक करणे वाईट गुण-नविन लेखकाच्या धाग्यावर मी पयला प्रतिसाद देऊन त्यांचे कौतुक करणे. आणी मी पयला.

सतिश गावडे 15/10/2014 - 08:30
चांगले गुणः प्रतिसादाची पिंक टाकण्याची प्रबळ उबळ दाबून टाकणे वाईट गुणः चांगल्या धाग्यांवर लेखन आवडले असूनही प्रतिसाद द्यायला आळस करणे.

मुळात लेखिकेनी बनवलेली चांगल्या आणि वाईट गुणांची यादीच गंडलेली आहे. लेखिकाबाईं कडून चांगले कशाला म्हणायचे आणि वाईट कशाला म्हणायचे याची चौकट फिक्स करुन मिळाली तर बरे होईल. म्हणजे कोणत्या कप्यात काय टाकायचे ते जरातरी स्पष्ट होईल. पैजारबुवा,

पैसा 16/10/2014 - 17:50
सूड मोड ऑन>>> या माहितीचा नक्की उपयोग कसा करणार ते आधी सांगा मग विचार करेन. >>>> सूड मोड ऑफ्फ.

सूड 16/10/2014 - 19:38
माझ्या मनातला प्रश्न आधीच आला असल्यामुळे पास!! नुसत्या चर्चा करुन काय उपयोग? बदल त्याचं काय? मला माझे वाईट (मला स्वत:ला खटकणारे, दुसर्‍यांच्या सूचना मी कोण सांगतंय त्यावर त्या किती लक्ष देण्यालायक हे ठरतं.) गुण बदलणं प्रचंड अवघड जातं. पूर्वी दुसर्‍यांकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा असायची आता बर्‍याच प्रमाणात ती नसते. अपेक्षाच ठेवली नाही की पुढले सगळे प्रश्न चटाचट सुटतात. आणखी एक म्हणजे समोरची व्यक्ती ही 'माणूस/मानव' आहे, ती ती व्यक्ती तिच्या तिच्या तत्कालीन विचार मनस्थितीनुसार कशीही रिअ‍ॅक्ट होऊ शकते. राग/आपुलकी दोन्ही तात्कालिक असू शकतं. त्यामुळे एकदा रागावलेली व्यक्ती मैत्री खात्यात येणार नाही असंही नाही आणि आपुलकी दाखवणारी व्यक्ती मैत्री खात्यात कायमचीच राहील असंही नाही. असो...आता टंकाळा आलाय. उर्वरित तुम्ही ह्या विद्याचं (विदा या शब्दाचे षष्ठी एकवचन उगा गैरसमज नको)नक्की काय करणार आहात ते कळलं की टंकणार.

एस 16/10/2014 - 20:06
मिपावरील तुमच्या पहिल्याच लेखावर धुळवड खेळणे हा वाईट गुण. खूप छान प्रयत्न, लिहीत रहा असे म्हणून नवलेखकांना उत्तेजन देणे हा चांगला गुण. असोत. मनापासून शुभेच्छा.
माझा हा मिसळपाव वरचा पहिलाच लेख. आपल्या भोवती अनेक माणसे असतात जसे नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, सहकारी वगैरे. प्रत्येक माणसाचे काही चांगले गुण आणि काही वाईट गुण असतात. इथे आपण एखाद्या माणसाचे चांगले गुण आणि वाईट गुण यांची यादी करू. त्यातून कदाचित नवीन चांगले गुण कळतील. आणि एखाद्याकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन मिळेल. आणि वाईट गुण टाळता येतील. माणसाचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही. नुसत्या गुण दोष चर्चा करूया. उदाहरणार्थ- चांगले गुण- टापटीप पणा, शिस्त, साधेपणा वाईट गुण - विचार न करता एकदम बोलणे, टोमणे मारणे वगैरे वगैरे.

छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्रः३ ऋतु (Seasons) निकाल

संपादक मंडळ ·

विजेत्यांचे हार्दिक हबिणंदण बाकीची छायाचित्रे सुध्दा सुंदरच होती. त्या धाग्याची वाखु साठवलेली आहे. चला विलासरावांची तक्रार पण आता दुर झाली असेल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

विलासराव 14/10/2014 - 22:01
चला विलासरावांची तक्रार पण आता दुर झाली असेल. पैजारबुवा खरं सांगायचं तर हा फोटो मीच काढलाय पण आपलं एक स्पेशल तंत्र आहे. ३-४ फोटो काढायचे आन जो चांगला वाटला तो ठेवायचा. त्यामूळे माझा नंबर बघुन तर मी चक्रावलोच. मी कुठलाही अँगल वगैरे घेउन फोटो काढलेला नाही. जो आलाय तो सहजपणे आलाय एवढेच. तरीही सर्वांचे आभार. धन्यवाद.

सौंदाळा 14/10/2014 - 16:39
विजेत्यांचे अभिन्ंदन. पुढच्या स्पर्धेसाठी पुढील विषय सुचवु इच्छितो : १. प्राणी, पक्षी २. जलाशय (तळे, नदी, विहीर, ओढा, समुद्र..)

In reply to by अजया

सौंदाळा 14/10/2014 - 17:13
अनाहिता जोरात दिसतायत सगळीकडे. जयंत कुलकर्णीनी पण 'नथ' (भाग ४) मध्ये मानाचे स्थान दिले आहे अनाहिताना
अफगाणिस्तानमधील नाव होते ‘‘अनाहिताबेगम‘‘
:)

तिन्ही विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. छाया-प्रकाश उत्सव हा विषय (तोच असेल तर) चांगला आहे. छायाचित्रकारांना कौशल्य वापर करण्यास भरपूर वाव आहे. नविन स्पर्धेस शुभेच्छा...!

संदीप डांगे 14/10/2014 - 18:47
हि छायाचित्रे जणू छायाचित्रकाराने फोटोसेन्सर वर रंगवली आहेत असा भास होतो. हा प्रकार किती कठीण आहे हे ज्यांनी ज्यांनी क्लिक केले असेल त्यांना चांगलेच माहिती आहे. अभिनंदन!

समर्पक 16/10/2014 - 08:53
सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन.. सणासुदीमुळे माझी स्पर्धा चुकली, पण फोटोची मजा उशीरा का होइना, पुरेपुर घेतली

विजेत्यांचे हार्दिक हबिणंदण बाकीची छायाचित्रे सुध्दा सुंदरच होती. त्या धाग्याची वाखु साठवलेली आहे. चला विलासरावांची तक्रार पण आता दुर झाली असेल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

विलासराव 14/10/2014 - 22:01
चला विलासरावांची तक्रार पण आता दुर झाली असेल. पैजारबुवा खरं सांगायचं तर हा फोटो मीच काढलाय पण आपलं एक स्पेशल तंत्र आहे. ३-४ फोटो काढायचे आन जो चांगला वाटला तो ठेवायचा. त्यामूळे माझा नंबर बघुन तर मी चक्रावलोच. मी कुठलाही अँगल वगैरे घेउन फोटो काढलेला नाही. जो आलाय तो सहजपणे आलाय एवढेच. तरीही सर्वांचे आभार. धन्यवाद.

सौंदाळा 14/10/2014 - 16:39
विजेत्यांचे अभिन्ंदन. पुढच्या स्पर्धेसाठी पुढील विषय सुचवु इच्छितो : १. प्राणी, पक्षी २. जलाशय (तळे, नदी, विहीर, ओढा, समुद्र..)

In reply to by अजया

सौंदाळा 14/10/2014 - 17:13
अनाहिता जोरात दिसतायत सगळीकडे. जयंत कुलकर्णीनी पण 'नथ' (भाग ४) मध्ये मानाचे स्थान दिले आहे अनाहिताना
अफगाणिस्तानमधील नाव होते ‘‘अनाहिताबेगम‘‘
:)

तिन्ही विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. छाया-प्रकाश उत्सव हा विषय (तोच असेल तर) चांगला आहे. छायाचित्रकारांना कौशल्य वापर करण्यास भरपूर वाव आहे. नविन स्पर्धेस शुभेच्छा...!

संदीप डांगे 14/10/2014 - 18:47
हि छायाचित्रे जणू छायाचित्रकाराने फोटोसेन्सर वर रंगवली आहेत असा भास होतो. हा प्रकार किती कठीण आहे हे ज्यांनी ज्यांनी क्लिक केले असेल त्यांना चांगलेच माहिती आहे. अभिनंदन!

समर्पक 16/10/2014 - 08:53
सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन.. सणासुदीमुळे माझी स्पर्धा चुकली, पण फोटोची मजा उशीरा का होइना, पुरेपुर घेतली
नमस्कार मंडळी! नेहमीप्रमाणेच तिसर्‍या स्पर्धेचा निकाल जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेला आधीच्या २ स्पर्धांपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळाला आहे. तसेच आधीपेक्षा जास्त म्हणजे एकूण ४५ जणांनी आपली मते नोंदवली आहेत. यावेळीही एकाहून एक सरस चित्रे स्पर्धेत होती. आणि जवळपास सर्वांनाच कोणा ना कोणाची पसंती मिळाली आहे. तरीही आतापर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल की प्रथम क्रमांकाचे चित्र कोणते असावे. बहुमताने क्र.