मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी बाणा/ मोडेल पण वाकणार नाही ?????

विवेकपटाईत ·

अर्धवटराव 12/10/2014 - 09:11
छत्रपतींनी बादशहाला मुजरा केला नसावा हा पहिला भ्रम. ते शक्यच नव्हतं. फर्मानबाडी स्थापुन बादशाही खलित्याला अगदी जमीनीवर डोकं टेकवुन नमस्कार करणारे महाराज त्याच बादशहाच्या दरबारात मुजरा करत नाहि असं कसं होईल. आणि त्या भ्रामक समजुतीवरुन आपला उद्धट, उर्मट, अव्यवहारी बोगसपणा जनतेच्या माथी मारण्याचा जो खटाटोप महाराष्ट्रात चालतो ते तर केवळ हास्यास्पद आहे. असो.

श्रीगुरुजी 12/10/2014 - 22:21
मोडेन पण वाकणार नाही असा बाणा अव्यवहारी आहे. त्याऐवजी "मोडणार नाही व वाकणारही नाही. जर मोडण्याचीच वेळ आली तर नाईलाजाने वाकण्याचे नाटक करीन व वेळ येताच पुन्हा ताठ उभा राहून परत मोडण्याची वेळ येणार नाही अशी कामगिरी करून दा़खवेन" असा बाणा हवा. व्यवहारात अनेकवेळ वाकण्याची वेळ येते. तिथे ताठ राहून उपयोग नसतो. सरकारी कार्यातयातले कागद अडविणारे कर्मचारी, चौकातला वाहतूक पोलिस, दुचाक्या उचलून नेणारा बकासुराचा गाडा इ. ठिकाणी तुमच्या ताठ बाण्याचा काहीही उपयोग नसतो. अशा ठिकाणी नाईलाजाने वाकावेच लागते.

In reply to by श्रीगुरुजी

'महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती' असे एक संतवचन आहे. सिंह चार पाऊले मागे गेला म्हणजे तो घाबरला असे समजू नये तो पुढे मोठी झेप घेण्यासाठी चार पाऊले मागे जातो.

पैसा 14/10/2014 - 23:56
माणसं इथून तिथून सारखीच! त्यातून आताचे राजकारनी तर काय विचारता! मात्र शिवाजी महाराज प्रचंड धोरणी होते. त्यांनी औरंगझेबाला मुजरा करतो असं दाखवून मनात माँसाहेबांना मुजरा केला असेल अशी शक्यता वाटते!

In reply to by पैसा

काळा पहाड 15/10/2014 - 11:09
शिवाजी महाराजांची एकूणच प्रतिमा आपल्यासमोर चुकीची उभी करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांचं धोरण मोडेन पण वाकणार नाही असं नव्हतंच. ते गनिमी काव्याचं होतं. गनिमी कावा हा फक्त लढाईचा प्रकार नसून एक प्रकारच्या धोरणात्मक डावपेचांचा भाग आहे. औरंगजेबाबरोबर सलोखा रहावा ही महाराजांची मनापासून इच्छा होती. कारण त्यामुळे राज्य स्थिर आणि बळकट व्हायला मदत झाली असती. त्यासाठी औरंगजेबाची मनसबदारी पत्करणे त्यांना भाग होते. औरंगजेबाच्या दरबारात जे झालं ते अर्थातच एक प्रकारच्या गैरसमजुतीचा प्रकार होता ज्यात औरंगजेबाचा आणि राजांचा काहीच सहभाग नव्हता. ज्या प्रकारे आपण हा भाग समजतो तसा तो झाला नसण्याचीच शक्यता आहे.

In reply to by काळा पहाड

क्लिंटन 15/10/2014 - 11:34
मोडेन पण वाकणार नाही हा बाणा शिवाजी महाराजांचा होता हे म्हणणे चुकीचे आहे. पुरंदरचा तह म्हणजे काय होते? त्यावेळची परिस्थिती अशी होती की महाराजांना तात्पुरती माघार घ्यावी लागली. महाराजांना काही प्रसंगी रणांगणातूनही माघार घ्यावी लागली होती. आग्र्याला जाण्यापूर्वी पन्हाळ्यावर हल्ला केला होता तेव्हा आपल्या सैन्याचा पराभवच झाला होता आणि महाराजांना माघार घ्यावी लागली होती.तेव्हा मोडेन पण वाकणार नाही हा महाराजांचा बाणा होता असे म्हणणे मला तरी पटत नाही. माझ्या मते त्यांचा बाणा होता--वेळ पडली तर वाकेन पण योग्य वेळ येताच वाकायला लावणार्‍याचा चांगलाच वचपा काढेन.
औरंगजेबाच्या दरबारात जे झालं ते अर्थातच एक प्रकारच्या गैरसमजुतीचा प्रकार होता
मला वाटते की आग्र्याच्या दरबारात झाले ते महाराजांच्या पूर्ण कारिकिर्दीत भावनेच्या भरात जाऊन चुकीचे पाऊल उचलायची महाराजांची एकमेव वेळ होती.आपल्या मुलखापासून इतक्या लांब शत्रूच्या राजधानीत जाऊन, त्याच्याच दरबारात जाऊन आपले केवळ पाच-सहाशे लोक बरोबर असताना शत्रूलाच (आणि ते सुध्दा औरंगजेबासारख्या खुनशी शत्रूला) आव्हान देणे हा भावनेच्या भरात झालेला अविचारच होता.भारताचे भाग्य बलवत्तर म्हणून महाराज त्या प्रसंगातून सहिसलामत निसटले.इतर प्रत्येक वेळी आपले हात दगडाखाली असताना भावनेच्या भरात जाऊन कोणतेही चुकीचे पाऊल कधीच न उचलणार्‍या महाराजांनी आग्र्यात असे कसे केले असावे हे मात्र मोठे कोडेच आहे.

विजुभाऊ 15/10/2014 - 12:01
शिवाजी महाराजानी त्याम्च्या हयातीत किमान तीन वेळा तरी संभाजी महाराजाना औरम्गजेबाकडे चाकरीसाठी ठेवले होते. त्यामुळे त्यानी औरम्गजेबाला कुर्निसात केला नसेल हे संभवत नाही. मोडेन पण वाकणार नाही हा बाणा व्यवहारात चालेल नाही. ज्या मराठीत "मोडेन पण वाकणार नाही" अशी उक्ती आहे त्याच मराठीत तुकारामानी "महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती" असेही म्हंटले आहे.

दुश्यन्त 15/10/2014 - 13:42
शिवाजी महाराजानी त्याम्च्या हयातीत किमान तीन वेळा तरी संभाजी महाराजाना औरम्गजेबाकडे चाकरीसाठी ठेवले होते. त्यामुळे त्यानी औरम्गजेबाला कुर्निसात केला नसेल हे संभवत नाही. +१ . संभाजी राजे दोन वेळेस मोगलांचे मनसबदार झाले होते ( एकदा महाराजांनी सांगितल्यावर आणि दुसर्यांदा ते दिलेरखानाला जावून मिळाले तेव्हा) तेव्हा बादशाह समोर असताना मनसबदार त्यांना मुजरा करणारच. शहाजी राजांना तर मनात राज्य स्थापण्याचे असूनही कधी मोंगल, कधी आदिलशाह तर कधी निजाम अश्या ठिकाणी चाकरी करावी लागली. महाराज मनसबदार नव्हते तरी पण दरबारात औरंगजेबाला मुजरा केला होता तसेच वर बादशाही खलीत्याला डोक वाकवून नमस्कार करण्याचा उल्लेख आहे हे पण खरे आहे. प्राप्त परिस्थिती नुसार ते करणे भागच होते. मात्र नंतर दरबारात झालेल्या अपमानामुळे महाराज रागावले होते आणि बाणेदारपणा दाखवला होता. शिवाजी महाराज व्यवहारी आणि चतुर होते परिस्थिती पाहून योग्य निर्णय घायचे कसब त्यांच्याकडे होते.

प्यारे१ 15/10/2014 - 14:16
वरील प्रतिसादांशी सहमत. महाराज अत्यंत त्या बरोबरच मागेही एका लेखात मांडलेल्या विचारानुसार महाराजांना त्यांच्या 'व्हिजनचे' लोक मिळालेले नव्हते असं वाटतंय. प्रचंड शूर, जीवाला जीव देणारी पण राजकारणात साधी असावीत माणसं. महाराजांवर तुटून प्रेम करणारी असली तरी महाराज त्यांच्यावर चिडले की उलटून रागावणारी ही माणसं. महाराजांच्या दोन सेनापतींची उदाहरणं प्रकर्षानं जाणवतात अशा वेळी. नेताजी पालकर आणि कुडतोजी (प्रतापराव) गुजर. एक जण महाराजांना सोडून गेला आणि दुसरा चिडून शत्रूवर चढाई करुन गेला तो गेलाच.

विवेकपटाईत 18/10/2014 - 19:42
दिल्ली दरबारात साक्षात् दंडवत प्रणाम करणाऱ्या नेतांबाबत हा लेख आहे, शिवाजी राजांच्या बाबतीत नाही. ह्या दृष्टीकोणातून या लेखाला पाहावे.

अर्धवटराव 12/10/2014 - 09:11
छत्रपतींनी बादशहाला मुजरा केला नसावा हा पहिला भ्रम. ते शक्यच नव्हतं. फर्मानबाडी स्थापुन बादशाही खलित्याला अगदी जमीनीवर डोकं टेकवुन नमस्कार करणारे महाराज त्याच बादशहाच्या दरबारात मुजरा करत नाहि असं कसं होईल. आणि त्या भ्रामक समजुतीवरुन आपला उद्धट, उर्मट, अव्यवहारी बोगसपणा जनतेच्या माथी मारण्याचा जो खटाटोप महाराष्ट्रात चालतो ते तर केवळ हास्यास्पद आहे. असो.

श्रीगुरुजी 12/10/2014 - 22:21
मोडेन पण वाकणार नाही असा बाणा अव्यवहारी आहे. त्याऐवजी "मोडणार नाही व वाकणारही नाही. जर मोडण्याचीच वेळ आली तर नाईलाजाने वाकण्याचे नाटक करीन व वेळ येताच पुन्हा ताठ उभा राहून परत मोडण्याची वेळ येणार नाही अशी कामगिरी करून दा़खवेन" असा बाणा हवा. व्यवहारात अनेकवेळ वाकण्याची वेळ येते. तिथे ताठ राहून उपयोग नसतो. सरकारी कार्यातयातले कागद अडविणारे कर्मचारी, चौकातला वाहतूक पोलिस, दुचाक्या उचलून नेणारा बकासुराचा गाडा इ. ठिकाणी तुमच्या ताठ बाण्याचा काहीही उपयोग नसतो. अशा ठिकाणी नाईलाजाने वाकावेच लागते.

In reply to by श्रीगुरुजी

'महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती' असे एक संतवचन आहे. सिंह चार पाऊले मागे गेला म्हणजे तो घाबरला असे समजू नये तो पुढे मोठी झेप घेण्यासाठी चार पाऊले मागे जातो.

पैसा 14/10/2014 - 23:56
माणसं इथून तिथून सारखीच! त्यातून आताचे राजकारनी तर काय विचारता! मात्र शिवाजी महाराज प्रचंड धोरणी होते. त्यांनी औरंगझेबाला मुजरा करतो असं दाखवून मनात माँसाहेबांना मुजरा केला असेल अशी शक्यता वाटते!

In reply to by पैसा

काळा पहाड 15/10/2014 - 11:09
शिवाजी महाराजांची एकूणच प्रतिमा आपल्यासमोर चुकीची उभी करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांचं धोरण मोडेन पण वाकणार नाही असं नव्हतंच. ते गनिमी काव्याचं होतं. गनिमी कावा हा फक्त लढाईचा प्रकार नसून एक प्रकारच्या धोरणात्मक डावपेचांचा भाग आहे. औरंगजेबाबरोबर सलोखा रहावा ही महाराजांची मनापासून इच्छा होती. कारण त्यामुळे राज्य स्थिर आणि बळकट व्हायला मदत झाली असती. त्यासाठी औरंगजेबाची मनसबदारी पत्करणे त्यांना भाग होते. औरंगजेबाच्या दरबारात जे झालं ते अर्थातच एक प्रकारच्या गैरसमजुतीचा प्रकार होता ज्यात औरंगजेबाचा आणि राजांचा काहीच सहभाग नव्हता. ज्या प्रकारे आपण हा भाग समजतो तसा तो झाला नसण्याचीच शक्यता आहे.

In reply to by काळा पहाड

क्लिंटन 15/10/2014 - 11:34
मोडेन पण वाकणार नाही हा बाणा शिवाजी महाराजांचा होता हे म्हणणे चुकीचे आहे. पुरंदरचा तह म्हणजे काय होते? त्यावेळची परिस्थिती अशी होती की महाराजांना तात्पुरती माघार घ्यावी लागली. महाराजांना काही प्रसंगी रणांगणातूनही माघार घ्यावी लागली होती. आग्र्याला जाण्यापूर्वी पन्हाळ्यावर हल्ला केला होता तेव्हा आपल्या सैन्याचा पराभवच झाला होता आणि महाराजांना माघार घ्यावी लागली होती.तेव्हा मोडेन पण वाकणार नाही हा महाराजांचा बाणा होता असे म्हणणे मला तरी पटत नाही. माझ्या मते त्यांचा बाणा होता--वेळ पडली तर वाकेन पण योग्य वेळ येताच वाकायला लावणार्‍याचा चांगलाच वचपा काढेन.
औरंगजेबाच्या दरबारात जे झालं ते अर्थातच एक प्रकारच्या गैरसमजुतीचा प्रकार होता
मला वाटते की आग्र्याच्या दरबारात झाले ते महाराजांच्या पूर्ण कारिकिर्दीत भावनेच्या भरात जाऊन चुकीचे पाऊल उचलायची महाराजांची एकमेव वेळ होती.आपल्या मुलखापासून इतक्या लांब शत्रूच्या राजधानीत जाऊन, त्याच्याच दरबारात जाऊन आपले केवळ पाच-सहाशे लोक बरोबर असताना शत्रूलाच (आणि ते सुध्दा औरंगजेबासारख्या खुनशी शत्रूला) आव्हान देणे हा भावनेच्या भरात झालेला अविचारच होता.भारताचे भाग्य बलवत्तर म्हणून महाराज त्या प्रसंगातून सहिसलामत निसटले.इतर प्रत्येक वेळी आपले हात दगडाखाली असताना भावनेच्या भरात जाऊन कोणतेही चुकीचे पाऊल कधीच न उचलणार्‍या महाराजांनी आग्र्यात असे कसे केले असावे हे मात्र मोठे कोडेच आहे.

विजुभाऊ 15/10/2014 - 12:01
शिवाजी महाराजानी त्याम्च्या हयातीत किमान तीन वेळा तरी संभाजी महाराजाना औरम्गजेबाकडे चाकरीसाठी ठेवले होते. त्यामुळे त्यानी औरम्गजेबाला कुर्निसात केला नसेल हे संभवत नाही. मोडेन पण वाकणार नाही हा बाणा व्यवहारात चालेल नाही. ज्या मराठीत "मोडेन पण वाकणार नाही" अशी उक्ती आहे त्याच मराठीत तुकारामानी "महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती" असेही म्हंटले आहे.

दुश्यन्त 15/10/2014 - 13:42
शिवाजी महाराजानी त्याम्च्या हयातीत किमान तीन वेळा तरी संभाजी महाराजाना औरम्गजेबाकडे चाकरीसाठी ठेवले होते. त्यामुळे त्यानी औरम्गजेबाला कुर्निसात केला नसेल हे संभवत नाही. +१ . संभाजी राजे दोन वेळेस मोगलांचे मनसबदार झाले होते ( एकदा महाराजांनी सांगितल्यावर आणि दुसर्यांदा ते दिलेरखानाला जावून मिळाले तेव्हा) तेव्हा बादशाह समोर असताना मनसबदार त्यांना मुजरा करणारच. शहाजी राजांना तर मनात राज्य स्थापण्याचे असूनही कधी मोंगल, कधी आदिलशाह तर कधी निजाम अश्या ठिकाणी चाकरी करावी लागली. महाराज मनसबदार नव्हते तरी पण दरबारात औरंगजेबाला मुजरा केला होता तसेच वर बादशाही खलीत्याला डोक वाकवून नमस्कार करण्याचा उल्लेख आहे हे पण खरे आहे. प्राप्त परिस्थिती नुसार ते करणे भागच होते. मात्र नंतर दरबारात झालेल्या अपमानामुळे महाराज रागावले होते आणि बाणेदारपणा दाखवला होता. शिवाजी महाराज व्यवहारी आणि चतुर होते परिस्थिती पाहून योग्य निर्णय घायचे कसब त्यांच्याकडे होते.

प्यारे१ 15/10/2014 - 14:16
वरील प्रतिसादांशी सहमत. महाराज अत्यंत त्या बरोबरच मागेही एका लेखात मांडलेल्या विचारानुसार महाराजांना त्यांच्या 'व्हिजनचे' लोक मिळालेले नव्हते असं वाटतंय. प्रचंड शूर, जीवाला जीव देणारी पण राजकारणात साधी असावीत माणसं. महाराजांवर तुटून प्रेम करणारी असली तरी महाराज त्यांच्यावर चिडले की उलटून रागावणारी ही माणसं. महाराजांच्या दोन सेनापतींची उदाहरणं प्रकर्षानं जाणवतात अशा वेळी. नेताजी पालकर आणि कुडतोजी (प्रतापराव) गुजर. एक जण महाराजांना सोडून गेला आणि दुसरा चिडून शत्रूवर चढाई करुन गेला तो गेलाच.

विवेकपटाईत 18/10/2014 - 19:42
दिल्ली दरबारात साक्षात् दंडवत प्रणाम करणाऱ्या नेतांबाबत हा लेख आहे, शिवाजी राजांच्या बाबतीत नाही. ह्या दृष्टीकोणातून या लेखाला पाहावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
(तीन पूर्वी ब्लॉग वर लिहलेला लेख, त्या वेळच्या संदर्भात,कुणाची ही भावना दुःखविण्याचा हेतु नाही) ते देवतेचे दर्शनास दिल्ली दरबारात आले. सहज विषय निघाला. दरबारात मुजरा करावा लागतो ही रीत. पण मुजरा करण्या साठी पाठीचा कणा मोडावा लागतो व मान ही झुकवावी लागते, हे आलंच. शिवाजी महाराज मुग़ल दरबारात आले होते. त्यानी बादशाहास मुजरा केला नाही. बादशाह समोर ही त्यांची मान ताठ होती व पाठीचा कणा सरळ होता. मान झुकवण्या एवजी त्यानी कारावास पत्करला. ते म्हणाले, आम्ही ही मराठा, एका अर्थी त्यांचेच वंशज! स्वाभिमानी! खरे मराठा! मोडेन पण वाकणार नाही हाच आमचा बाणा??? आम्ही ही मुजरा करत नाही.

नथ...............भाग-५

जयंत कुलकर्णी ·

सविता००१ 12/10/2014 - 11:34
काका, अफाट लिहिताय. गप्पा मारण्यासाठी सगळ्यांचे आवडीचे विषय समान असले म्हणजे गप्पा कशा रंगतात नाहीतर त्या गप्पा म्हणजे पाण्यावर पसरट दगडाने पाडलेल्या भाकऱ्या. नुसतेच सटासट पाण्याला स्पर्ष करुन जायचे व पडायचे एकदा कुठेतरी.....हॅ त्यात गंमत नाही. गप्पात कसे आकंठ बुडता यायला पाहिजे. हे खूप आवडले.

हरकाम्या 12/10/2014 - 11:49
पुढचा भाग लवकर टाका राव. आता जास्त उत्सुकता ताणु नका राव.

सौंदाळा 13/10/2014 - 13:47
वाचतोय. मधले काही कार्लेकर आणि भानुंच्या गप्पांचे परिच्छेदही खासच

सविता००१ 12/10/2014 - 11:34
काका, अफाट लिहिताय. गप्पा मारण्यासाठी सगळ्यांचे आवडीचे विषय समान असले म्हणजे गप्पा कशा रंगतात नाहीतर त्या गप्पा म्हणजे पाण्यावर पसरट दगडाने पाडलेल्या भाकऱ्या. नुसतेच सटासट पाण्याला स्पर्ष करुन जायचे व पडायचे एकदा कुठेतरी.....हॅ त्यात गंमत नाही. गप्पात कसे आकंठ बुडता यायला पाहिजे. हे खूप आवडले.

हरकाम्या 12/10/2014 - 11:49
पुढचा भाग लवकर टाका राव. आता जास्त उत्सुकता ताणु नका राव.

सौंदाळा 13/10/2014 - 13:47
वाचतोय. मधले काही कार्लेकर आणि भानुंच्या गप्पांचे परिच्छेदही खासच
लेखनविषय:
लेखनप्रकार
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ.......भाग-२ नथ.........भाग-३ नथ........भाग-४ नथ.........भाग-५ आईजान बाम्झाई...........(इस्माईलची आजी) तो सगळा प्रकार बघून माझ्या

कैलाश, मलाला, बाल (कामगार/शिक्षण) , पारितोषिकांचे रंग - १

माहितगार ·

शिक्षणाचं महत्त्व अजूनही भारतात रुजलेले नाही असे म्हणावे लागेल. महानगरपालिकेने मोफत शिक्षणाची व्यवस्था केली आहे पण पालक अनुस्तुक आहेत. शिक्षण घेणं आणि अर्थार्जन करणं ह्यात कितीतरी वर्षांचा कालावधी जातो. शिवाय त्यात बौद्धीक श्रम आणि सातत्याची, तसेच चिकाटीची गरज असते. अभ्यासासाठी निदान एक शांत कोपरा आणि प्रबळ इच्छाशक्ती ह्या सर्व गोष्टींची आवश्यकता असते. गरीबांना ह्या सर्वाची उपलब्धता नसते आणि महत्त्व कळत नसतं. अशिक्षित कुटुंबप्रमुखामुळे गरीबी आणि कुटुंब पोसण्यातील असमर्थता (पण निसर्ग आपले काम करीतच असतो) आणि अगतिकता मुलांना दीर्घकाळ 'अनुत्पादित' ठेवण्याच्या मार्गातील मोठा अडसर असतो. मुलं जरा शारीरिक दृष्ट्या सक्षम झाली (असं त्यांना वाटतं) की त्यांनी अर्थार्जन करून घरखर्चात हातभार लावावा अशी सर्वसाधारण धारणा असते. अशी मुलं मिळेल ते श्रमाचे काम करून चार पैसे मिळवितात नाहीतर भीक मागतात अथवा गुन्हेगारीकडे वळतात. अशा मुलांना शाळेकडे वळविण्यासाठी, त्यांच्या पालकांना, मुलांना शिकविण्यासाठी, कांहीतरी भत्ता चालू करावा लागेल. तसे झाल्यास वीसेक वर्षात चित्र बदलू शकेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

अर्धवटराव 13/10/2014 - 09:54
शिक्षणाची इच्छा, पोषक वातावरण, शिक्षणाचे जगण्याला उपयोगी असे फायदे, भारतासारख्या देशात या समस्येचं मॅग्नीट्युड... सर्वच खुप कॉम्प्लेक्स आहे. समस्येचं मुळ शोधावं म्हटलं तर आपण हरवुन जाऊ इतकं ते अस्ताव्यस्त आहे.

कंजूस 12/10/2014 - 10:09
बाल कामगारविषयक चर्चा होईलच पण मी आणखी दोन उदा०देतो. १)2008.मित्राच्या घरी एक गावाहून आणलेली पंधराएक वर्षांची मुलगी त्याच्या लहान मुलांना संभाळत असे. एक दिवशी सरकारी खात्याच्या अंमलबजावणी अधिकाऱ्यांची टीम अधिक चानेलवाले आले. सर्व सोपस्कार पंचनामे करून फौजदारी खटला दाखल झाला. प्रकरण वरपर्यंत गेल्यामुळे पुढे काय झाले हे सांगत नाही. २)यातून धडा घेऊन मी (सेक्रेटरी या पदामुळे)आमच्या सोसायटीत कचरा गोळा करणाऱ्या बाईला सांगितले की तुझ्या मुलांना पाठवत जाऊ नको नाहीतर आमची वरात निघेल पोलिस स्टेशनला एक दिवशी बाल कामगार ठेवतात म्हणून. त्यावर ती बाई म्हणाली "काय करणार महागाई किती झालीय पाच मुलांना कसे पोसणार?"

In reply to by कंजूस

माहितगार 12/10/2014 - 10:44
कामकरी महीलांच्या मुलांसाठी पाळणाघरांचा अभावच असतो. समजा घरात लहानग्यास सांभाळणारे मोठे भावंड असेलही पण एखादा लहानगा एखाद दिवस आईसोबतच राहण्याचा हट्टही करू शकतो ही सुद्धा समस्या असू शकते. किंवा अगदी तुम्ही म्हणता तसे मुलांचे पालन पोषण त्यांच्या बजेटमध्ये बसतं नाही. "काय करणार महागाई किती झालीय पाच मुलांना कसे पोसणार?" (पाळणाघर बजेट मध्ये न बसणे अथवा मुलांच्या हट्टामुळे असेल, पण ही समस्या निम्न आर्थीकस्तरातील अमेरीकनांकरताही व्यवस्थीत सुटलेली नसावी) . (पाळणाघरातून पसरणार्‍या इन्फेक्शन्सच्या समस्यांमूळेही मुले अगदी मध्यमवर्गीयांनाही सोबत ठेवावी लागतात हा वेगळाच प्रश्न आहे.) कार्यालयीन क्षेत्रात अफोर्डेबल पाळणाघरांची उपलब्धता आणि आपण म्हणता त्या केसमध्ये सोसायटीने नजीकच्या पाळणाघरात कामकरी महिलेच्या मुलांची व्यवस्था करण्यात साहाय्य सामाजीक जबाबदारी म्हणून केले पाहीजे असे वाटते. यातला महत्वाचा पैलू लोकसंख्या शिक्षणाच अपयश अधोरेखीत होतं राहत आणि समाज या समस्येकडे दुर्लक्ष करत राहतो. एकत्रकुटूंबांच्या विभाजनांमुळे घरातील ज्येष्ठांचे हरवत चाललेले पाठबळ हा सुद्धा मध्यमवर्गीय प्रश्नही आहेच.

बाबा पाटील 12/10/2014 - 11:25
टिव्ही आणी शाळांमधुन जनजागृती देखिल होत आहे,परवाच पाण्याचा ग्लास दे म्हटल्यावर आमच साडेसहा वर्षाच कन्यारत्न म्हटल " पपल्या,तु मला काय बालकामगार समजतोस काय ?" च्यामारी शाळावाले अजुन काय काय शिकुन ठेवणार आहेत काय माहिती ?

In reply to by बाबा पाटील

डॉ साहेब, घरात जीभेवर ताबा ठेवा आणि हो, घरातली बंदुक बाहेर ठेवू नका. दिवस झरझर बदलू लागलेत..    (हघ्याहेवेसांन)

एस 12/10/2014 - 12:22
काय गंमत आहे, आजपर्यंत सरकारी विभागाला एकही बालकामगार सापडलेला नाहीये. उत्तम धागा. मला एक सुचवावेसे वाटते की आर्थिक-सामाजिक अडचणींच्या कारणाने बालकामगार प्रथा संपूर्णपणे नष्ट करणे तसे अवघड आहे. मग किमान दहा वर्षांवरच्या मुलांना अर्धवेळ काम करण्याची कायदेशीर परवानगी तरी द्यावी. दोन अटी मात्र असाव्यात. एक म्हणजे अशा मुलांसाठी रात्रशाळा किंवा तत्सम शालेय शिक्षणाची सोय बंधनकारक असावी, आणि दुसरे म्हणजे वर्कप्लेस सेफ्टी किंवा ते जे काम करताहेत त्याचे सेफ्टी ऑडिट वेळोवेळी झाले पाहिजे. त्याचबरोबर बालकामगारांचा विमा उतरवणे, त्यांच्या पगाराची रक्कम बॅंक खात्यातच जमा होणे वगैरे गोष्टी करता येणे शक्य आहे. संवेदनशीलतेबरोबरच अशा प्रश्नांकडे व्यावहारिकतेनेही पाहिले गेले पाहिजे असे वाटते.

जेपी 12/10/2014 - 12:58
रात्रशाळेची वेगळीच कथा आहे.सरकारी अनुदान मिळते म्हणुन रात्रशाळा काढायची आणी बोगस विद्यार्थी दाखवुन अनुदान लाटायचे.शाळा चालवायचा खर्च शुन्य अनुदान संस्थाचालकाच्या खिशात.

पैसा 15/10/2014 - 00:12
एन जी ओ बद्दल बरेच काही ऐकले वाचले आहे खरेच. पण बाहेर जे काही दिसतं त्याकडे एकतर दुर्लक्ष करावं लागतं, किंवा मग नसत्या भानगडींना तोंड द्यावं लागतं. प्रत्यक्ष काम करणारी मुलं हा एक प्रकार झाला. याहून भयानक प्रकार ऐकला आहे. रोजंदारीवर काम करणार्‍या मजुरांची लहान बाळं भिकारी बाया ५० रुपये रोजाने भाड्याने आणतात. त्याना अफू घालून झोपवतात आणि मग ते मलूल पोरगं खांद्यावर टाकून भीक मागत फिरतात, अशा एक दोन बायांना "किसका बच्च है?" म्हणून दरडावून विचारल्यावर त्यांनी सरळ सूंबाल्या केलेला पाहिला आहे. असल्या गरीबांवर दया दाखवूनही काही फायदा नाही असं वाटायला लागलं आहे. :(

In reply to by पैसा

रोजंदारीवर काम करणार्‍या मजुरांची लहान बाळं भिकारी बाया ५० रुपये रोजाने भाड्याने आणतात. घरी मोलकरणीच्या अंगावर घर आणि आपलं बाळ सोडून कामावर गेलेल्या एका मध्यमवर्गिय बाईस एक दिवस अचानक बाळाची तिव्रतेने आठवण यायला लागली, म्हणून ती अर्धादिवस रजा घेऊन अचानक घरी आली तर मोलकरीण टिव्ही बघत बसली होती आणि बाळ गायब होतं. मालकिणीला अचानक आलेलं पाहून मोलकरणीची बोबडीच वळली. बाळ कुठे आहे ह्याचं ती काही केल्या उत्तर देईना. त्या बाईने आपल्या नवर्‍याला फोन करून बोलावले. नंतर दोघांनीही पोलीसात जायची तयारी केल्यावर त्या बाईने ते बाळ एका भिकारणीला भाड्याने दिल्याचे सांगितले. ती भिकारीण ५ वाजता येईल म्हणाली. त्या प्रमाणे बाळ घेऊन ती भिकारीण ५ वाजता आली तेंव्हा त्या घरात त्या बाळाच्या आई-वडिलांबरोबर पोलीसही वाट पाहात होते. सकाळी मालकिण घराबाहेर पडली की ती भिकारीण ते बाळ घेऊन जायची, त्याला अफू खाऊ घालून झोपवून ठेवायची, अंगावर जुनेपुराणे घाणेरडे कपडे घालून गोणपाटावर त्याला झोपवून भिक मागायची. ही घटना मालाड मधली आहे. मोठे रॅकेट पकडण्यात आले होते.

ह्या प्रकारावर मधुरच्या ट्राफिक सिग्नल ह्या सिनेमात प्रकाश टाकला आहे , दुर्दैवाने बारबाला व पेज ३ तसेस कोर्पोरेट जगताचे अंतरंग दाखवणारे सिनेमे हिट झाले मात्र तुरुंग व सिग्नल अवती भवती फिरणाऱ्या लोकांचे अंतरंग दाखवणारे टायचे सिनेमे यशस्वी झाले नाही. लोकांना त्यात तडका दिसला नसावा, माझी बायको पहिल्यांदा भारतात आली तेव्हा एका मित्राच्या घरी १३ वर्षाच्या मुलाकडून मित्राची आई घरातून सर्व कामे खुर्चीवर बसून फर्मान सोडत सांगत होती व मधल्या काळात त्याला चहा व अल्पोपहार सुद्धा घेऊन येण्यास सांगितले , माझ्या बायकोस घशाखाली अन्न उतरले नाही , लाजिरवाणी गोष्ट म्हणजे जिन्यातून खाली उतरताना तू काहीच कसे खाल्ले नाही , असे विचारल्यावर तिच्या डोळ्यातील अश्रूंना वाट फुटली. माझ्या मित्राकडे कॉलेज जीवनात मी अनेकदा गेलो असेल , कितीतरी वेळा रात्री मित्रांच्या सिगरेटी संपल्या की त्याला बाहेर पिटाळून आणायला सांगायचो , मी सिगारेट ओढत नाही पण त्याने आणलेल्या बियरच्या बाटल्या ढोसायचो. वर एखाद्या बादशहाने गळ्यातील कंठ हार काढून आपल्या सेवकाला द्यावा तशी खिशातून चिल्लर काढून त्याला द्यायचो, तो येथे राबून आपले गावाकडे कुटुंब पोसत होता , व आम्ही कुटुंबाच्या पैशावर मौज मजा करत होतो , आणि ह्यात त्यावेळी खटकले सुद्धा नव्हते, चहाची टपरी ते अनेक मोक्याची ठिकाणी लहान मुलांना काम करताना पाहून त्यात वावगे अस एकही आहे हा विचार सुद्धा मनाला शिवला नव्हता , एका मित्राची नर्तन मधुशाळा होती, तेथे एक लहानगा १ओ वर्षाचा छोकरा त्या मधुशालेच्या नर्तकींच्या सोबत नाचायचा , त्यांच्यावर दौलतजादा व्हायची. आपण खूप कमावतो , पण का ह्याचे उत्तर त्याला महिती नव्हते , तो दिवसा एका चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत शिकतो हे ऐकून व त्याचे फर्डे दार विंग्रजी ऐकून मला वाटलेली असूया आठवली. आपल्या भोवती अनेक गोष्टी एवढ्या सर्रास घडतात कि आपली दृष्टी , मानसिकता बोथट होते. हेच खरे हा पुरस्कार विभागून द्यायची काहीच गरज नव्हती तो खर्या अर्थाने कैलास ह्यांचा आहे , त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात जगाला संदेश , उपदेश एक स्टेटमेंट म्हणून केली नव्हती.

शिक्षणाचं महत्त्व अजूनही भारतात रुजलेले नाही असे म्हणावे लागेल. महानगरपालिकेने मोफत शिक्षणाची व्यवस्था केली आहे पण पालक अनुस्तुक आहेत. शिक्षण घेणं आणि अर्थार्जन करणं ह्यात कितीतरी वर्षांचा कालावधी जातो. शिवाय त्यात बौद्धीक श्रम आणि सातत्याची, तसेच चिकाटीची गरज असते. अभ्यासासाठी निदान एक शांत कोपरा आणि प्रबळ इच्छाशक्ती ह्या सर्व गोष्टींची आवश्यकता असते. गरीबांना ह्या सर्वाची उपलब्धता नसते आणि महत्त्व कळत नसतं. अशिक्षित कुटुंबप्रमुखामुळे गरीबी आणि कुटुंब पोसण्यातील असमर्थता (पण निसर्ग आपले काम करीतच असतो) आणि अगतिकता मुलांना दीर्घकाळ 'अनुत्पादित' ठेवण्याच्या मार्गातील मोठा अडसर असतो. मुलं जरा शारीरिक दृष्ट्या सक्षम झाली (असं त्यांना वाटतं) की त्यांनी अर्थार्जन करून घरखर्चात हातभार लावावा अशी सर्वसाधारण धारणा असते. अशी मुलं मिळेल ते श्रमाचे काम करून चार पैसे मिळवितात नाहीतर भीक मागतात अथवा गुन्हेगारीकडे वळतात. अशा मुलांना शाळेकडे वळविण्यासाठी, त्यांच्या पालकांना, मुलांना शिकविण्यासाठी, कांहीतरी भत्ता चालू करावा लागेल. तसे झाल्यास वीसेक वर्षात चित्र बदलू शकेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

अर्धवटराव 13/10/2014 - 09:54
शिक्षणाची इच्छा, पोषक वातावरण, शिक्षणाचे जगण्याला उपयोगी असे फायदे, भारतासारख्या देशात या समस्येचं मॅग्नीट्युड... सर्वच खुप कॉम्प्लेक्स आहे. समस्येचं मुळ शोधावं म्हटलं तर आपण हरवुन जाऊ इतकं ते अस्ताव्यस्त आहे.

कंजूस 12/10/2014 - 10:09
बाल कामगारविषयक चर्चा होईलच पण मी आणखी दोन उदा०देतो. १)2008.मित्राच्या घरी एक गावाहून आणलेली पंधराएक वर्षांची मुलगी त्याच्या लहान मुलांना संभाळत असे. एक दिवशी सरकारी खात्याच्या अंमलबजावणी अधिकाऱ्यांची टीम अधिक चानेलवाले आले. सर्व सोपस्कार पंचनामे करून फौजदारी खटला दाखल झाला. प्रकरण वरपर्यंत गेल्यामुळे पुढे काय झाले हे सांगत नाही. २)यातून धडा घेऊन मी (सेक्रेटरी या पदामुळे)आमच्या सोसायटीत कचरा गोळा करणाऱ्या बाईला सांगितले की तुझ्या मुलांना पाठवत जाऊ नको नाहीतर आमची वरात निघेल पोलिस स्टेशनला एक दिवशी बाल कामगार ठेवतात म्हणून. त्यावर ती बाई म्हणाली "काय करणार महागाई किती झालीय पाच मुलांना कसे पोसणार?"

In reply to by कंजूस

माहितगार 12/10/2014 - 10:44
कामकरी महीलांच्या मुलांसाठी पाळणाघरांचा अभावच असतो. समजा घरात लहानग्यास सांभाळणारे मोठे भावंड असेलही पण एखादा लहानगा एखाद दिवस आईसोबतच राहण्याचा हट्टही करू शकतो ही सुद्धा समस्या असू शकते. किंवा अगदी तुम्ही म्हणता तसे मुलांचे पालन पोषण त्यांच्या बजेटमध्ये बसतं नाही. "काय करणार महागाई किती झालीय पाच मुलांना कसे पोसणार?" (पाळणाघर बजेट मध्ये न बसणे अथवा मुलांच्या हट्टामुळे असेल, पण ही समस्या निम्न आर्थीकस्तरातील अमेरीकनांकरताही व्यवस्थीत सुटलेली नसावी) . (पाळणाघरातून पसरणार्‍या इन्फेक्शन्सच्या समस्यांमूळेही मुले अगदी मध्यमवर्गीयांनाही सोबत ठेवावी लागतात हा वेगळाच प्रश्न आहे.) कार्यालयीन क्षेत्रात अफोर्डेबल पाळणाघरांची उपलब्धता आणि आपण म्हणता त्या केसमध्ये सोसायटीने नजीकच्या पाळणाघरात कामकरी महिलेच्या मुलांची व्यवस्था करण्यात साहाय्य सामाजीक जबाबदारी म्हणून केले पाहीजे असे वाटते. यातला महत्वाचा पैलू लोकसंख्या शिक्षणाच अपयश अधोरेखीत होतं राहत आणि समाज या समस्येकडे दुर्लक्ष करत राहतो. एकत्रकुटूंबांच्या विभाजनांमुळे घरातील ज्येष्ठांचे हरवत चाललेले पाठबळ हा सुद्धा मध्यमवर्गीय प्रश्नही आहेच.

बाबा पाटील 12/10/2014 - 11:25
टिव्ही आणी शाळांमधुन जनजागृती देखिल होत आहे,परवाच पाण्याचा ग्लास दे म्हटल्यावर आमच साडेसहा वर्षाच कन्यारत्न म्हटल " पपल्या,तु मला काय बालकामगार समजतोस काय ?" च्यामारी शाळावाले अजुन काय काय शिकुन ठेवणार आहेत काय माहिती ?

In reply to by बाबा पाटील

डॉ साहेब, घरात जीभेवर ताबा ठेवा आणि हो, घरातली बंदुक बाहेर ठेवू नका. दिवस झरझर बदलू लागलेत..    (हघ्याहेवेसांन)

एस 12/10/2014 - 12:22
काय गंमत आहे, आजपर्यंत सरकारी विभागाला एकही बालकामगार सापडलेला नाहीये. उत्तम धागा. मला एक सुचवावेसे वाटते की आर्थिक-सामाजिक अडचणींच्या कारणाने बालकामगार प्रथा संपूर्णपणे नष्ट करणे तसे अवघड आहे. मग किमान दहा वर्षांवरच्या मुलांना अर्धवेळ काम करण्याची कायदेशीर परवानगी तरी द्यावी. दोन अटी मात्र असाव्यात. एक म्हणजे अशा मुलांसाठी रात्रशाळा किंवा तत्सम शालेय शिक्षणाची सोय बंधनकारक असावी, आणि दुसरे म्हणजे वर्कप्लेस सेफ्टी किंवा ते जे काम करताहेत त्याचे सेफ्टी ऑडिट वेळोवेळी झाले पाहिजे. त्याचबरोबर बालकामगारांचा विमा उतरवणे, त्यांच्या पगाराची रक्कम बॅंक खात्यातच जमा होणे वगैरे गोष्टी करता येणे शक्य आहे. संवेदनशीलतेबरोबरच अशा प्रश्नांकडे व्यावहारिकतेनेही पाहिले गेले पाहिजे असे वाटते.

जेपी 12/10/2014 - 12:58
रात्रशाळेची वेगळीच कथा आहे.सरकारी अनुदान मिळते म्हणुन रात्रशाळा काढायची आणी बोगस विद्यार्थी दाखवुन अनुदान लाटायचे.शाळा चालवायचा खर्च शुन्य अनुदान संस्थाचालकाच्या खिशात.

पैसा 15/10/2014 - 00:12
एन जी ओ बद्दल बरेच काही ऐकले वाचले आहे खरेच. पण बाहेर जे काही दिसतं त्याकडे एकतर दुर्लक्ष करावं लागतं, किंवा मग नसत्या भानगडींना तोंड द्यावं लागतं. प्रत्यक्ष काम करणारी मुलं हा एक प्रकार झाला. याहून भयानक प्रकार ऐकला आहे. रोजंदारीवर काम करणार्‍या मजुरांची लहान बाळं भिकारी बाया ५० रुपये रोजाने भाड्याने आणतात. त्याना अफू घालून झोपवतात आणि मग ते मलूल पोरगं खांद्यावर टाकून भीक मागत फिरतात, अशा एक दोन बायांना "किसका बच्च है?" म्हणून दरडावून विचारल्यावर त्यांनी सरळ सूंबाल्या केलेला पाहिला आहे. असल्या गरीबांवर दया दाखवूनही काही फायदा नाही असं वाटायला लागलं आहे. :(

In reply to by पैसा

रोजंदारीवर काम करणार्‍या मजुरांची लहान बाळं भिकारी बाया ५० रुपये रोजाने भाड्याने आणतात. घरी मोलकरणीच्या अंगावर घर आणि आपलं बाळ सोडून कामावर गेलेल्या एका मध्यमवर्गिय बाईस एक दिवस अचानक बाळाची तिव्रतेने आठवण यायला लागली, म्हणून ती अर्धादिवस रजा घेऊन अचानक घरी आली तर मोलकरीण टिव्ही बघत बसली होती आणि बाळ गायब होतं. मालकिणीला अचानक आलेलं पाहून मोलकरणीची बोबडीच वळली. बाळ कुठे आहे ह्याचं ती काही केल्या उत्तर देईना. त्या बाईने आपल्या नवर्‍याला फोन करून बोलावले. नंतर दोघांनीही पोलीसात जायची तयारी केल्यावर त्या बाईने ते बाळ एका भिकारणीला भाड्याने दिल्याचे सांगितले. ती भिकारीण ५ वाजता येईल म्हणाली. त्या प्रमाणे बाळ घेऊन ती भिकारीण ५ वाजता आली तेंव्हा त्या घरात त्या बाळाच्या आई-वडिलांबरोबर पोलीसही वाट पाहात होते. सकाळी मालकिण घराबाहेर पडली की ती भिकारीण ते बाळ घेऊन जायची, त्याला अफू खाऊ घालून झोपवून ठेवायची, अंगावर जुनेपुराणे घाणेरडे कपडे घालून गोणपाटावर त्याला झोपवून भिक मागायची. ही घटना मालाड मधली आहे. मोठे रॅकेट पकडण्यात आले होते.

ह्या प्रकारावर मधुरच्या ट्राफिक सिग्नल ह्या सिनेमात प्रकाश टाकला आहे , दुर्दैवाने बारबाला व पेज ३ तसेस कोर्पोरेट जगताचे अंतरंग दाखवणारे सिनेमे हिट झाले मात्र तुरुंग व सिग्नल अवती भवती फिरणाऱ्या लोकांचे अंतरंग दाखवणारे टायचे सिनेमे यशस्वी झाले नाही. लोकांना त्यात तडका दिसला नसावा, माझी बायको पहिल्यांदा भारतात आली तेव्हा एका मित्राच्या घरी १३ वर्षाच्या मुलाकडून मित्राची आई घरातून सर्व कामे खुर्चीवर बसून फर्मान सोडत सांगत होती व मधल्या काळात त्याला चहा व अल्पोपहार सुद्धा घेऊन येण्यास सांगितले , माझ्या बायकोस घशाखाली अन्न उतरले नाही , लाजिरवाणी गोष्ट म्हणजे जिन्यातून खाली उतरताना तू काहीच कसे खाल्ले नाही , असे विचारल्यावर तिच्या डोळ्यातील अश्रूंना वाट फुटली. माझ्या मित्राकडे कॉलेज जीवनात मी अनेकदा गेलो असेल , कितीतरी वेळा रात्री मित्रांच्या सिगरेटी संपल्या की त्याला बाहेर पिटाळून आणायला सांगायचो , मी सिगारेट ओढत नाही पण त्याने आणलेल्या बियरच्या बाटल्या ढोसायचो. वर एखाद्या बादशहाने गळ्यातील कंठ हार काढून आपल्या सेवकाला द्यावा तशी खिशातून चिल्लर काढून त्याला द्यायचो, तो येथे राबून आपले गावाकडे कुटुंब पोसत होता , व आम्ही कुटुंबाच्या पैशावर मौज मजा करत होतो , आणि ह्यात त्यावेळी खटकले सुद्धा नव्हते, चहाची टपरी ते अनेक मोक्याची ठिकाणी लहान मुलांना काम करताना पाहून त्यात वावगे अस एकही आहे हा विचार सुद्धा मनाला शिवला नव्हता , एका मित्राची नर्तन मधुशाळा होती, तेथे एक लहानगा १ओ वर्षाचा छोकरा त्या मधुशालेच्या नर्तकींच्या सोबत नाचायचा , त्यांच्यावर दौलतजादा व्हायची. आपण खूप कमावतो , पण का ह्याचे उत्तर त्याला महिती नव्हते , तो दिवसा एका चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत शिकतो हे ऐकून व त्याचे फर्डे दार विंग्रजी ऐकून मला वाटलेली असूया आठवली. आपल्या भोवती अनेक गोष्टी एवढ्या सर्रास घडतात कि आपली दृष्टी , मानसिकता बोथट होते. हेच खरे हा पुरस्कार विभागून द्यायची काहीच गरज नव्हती तो खर्या अर्थाने कैलास ह्यांचा आहे , त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात जगाला संदेश , उपदेश एक स्टेटमेंट म्हणून केली नव्हती.
लेखनविषय:
पुण्यातील छावणी(कँप) भागात महाराष्ट्र राज्य सरकारची उपायूक्त आणि संचालक स्तरीय बरीच शासकीय कार्यालय असलेली सेंट्रल बिल्डींग इ.स. १९९३-९४ असेल मी एक नियमीत व्हिजीटर होतो. तिथे मला वाटते दोन कँटीन होती. या कँटीनला सकाळी भेट द्या अथवा दुपारी बाल कामगार दिवसभर काम करत, सांगण्याचा उद्देश हा कि शाळा उरकली आणि मग कामाला लागले असेही नसावे. जाणवलं तरी इतरांवर टिका करण्याचा मला अधिकार आहे का ? समस्या जाणवली आणि त्याच्या सोडवणूकीसाठी मी काही केले नसेल तर माझा इतरांवर टिका करण्याचा हक्क बनतो का कदाचीत नाही. एनीवे या सेंट्रल बिल्डींग कँटीन्स मधील मुल केवळ कँटीन मध्ये काम करत होती का ?

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१५

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by जेपी

आदूबाळ 11/10/2014 - 20:08
अगदी अगदी. झालीचे दिवे पार मालवेपर्यंत लोकांची रांग संपतच नाही. यातले किती नंतर खरोखरच वधूचं योगक्षेम पहातात हां संशोधनाचा विषय आहे.

In reply to by आदूबाळ

@यातले किती नंतर खरोखरच वधूचं योगक्षेम पहातात हां संशोधनाचा विषय आहे.>>> क्या बोल्या रे.....! वाह!!! दिल की बात छीन ली! समांतरः- पण हे सगळं तुम्ही ऑनस्टेज बोल्लात की मेलात! ;)

रेवती 11/10/2014 - 19:38
कारण देशस्थेतरात ही मंडळी किती असावी? हा प्रश्न निखालसपणे स्वाभिमानाचा आणि देशस्थात मात्र तोच प्रश्न अभिमानाचा!!! हा हा हा. अगदी! लेखन आवडले.

अजया 13/10/2014 - 09:49
आवडला हाही भाग बुवा!! हल्ली झाल धरतात तसलं लग्न पाहाण्यातच नाही आलं.वैदिक पध्दतीत नसतो वाटतं हा भाग. आमच्या देशस्थांचे निरिक्षण भारीच!!

In reply to by अजया

@वैदिक पध्दतीत नसतो वाटतं हा भाग.>>> हम्म्म.. बरोबर. वैदिक पद्धतीत झाल/सुनमुख नसतं. नामलक्ष्मीपुजन असतं पण ते ही आधी न होता बर्‍याचदा नंतरच होतं. @आमच्या देशस्थांचे निरिक्षण भारीच!!>>> धन्यवाद. :)

इशा१२३ 13/10/2014 - 21:54
मस्त वर्णन.देशस्थांचे वर्णन नेमके.आमच्या नातातल्या बाईंनी लेकाच्या लग्नात झालीला फक्त सासरचेच का? माझ्या माहेरचेहि हवेत अस म्हणून भरपुर वर्‍हाड बोलावले मग सासरची मंडळी;ती ही सख्खी,चुलत सगळी जमा.स्टेज वर कशीबशी मावली सगळी.पूढे अर्धा तास झालीचा कार्यक्रम संपेना. तो प्रसंग डोळ्यापुढे आला आणि हसु आवरेना वाचताना.

In reply to by इशा१२३

@तो प्रसंग डोळ्यापुढे आला आणि हसु आवरेना वाचताना.>>> =)) (काल्पनिक..हां :D ) नातातल्या बाईं :- ए आक्के...येऊ दे की तुज्याकडची सगळी..या रे या वरती..नाय त थांबा..ओ नोकर(स्टेजचे..) लावा की अजुन धा खुर्च्या..बसले आपले बगत! .. ओ गुर्जी तुमी का थांबले? .. सुरु-रहा.. शांतीपा .. सपला का म्हणून.. रामरक्षा म्हना..चलतय..! .. ओ नोकर त्ये झालीच्या दिव्यांना त्येल आना.. गंगे...,तू का प्येंगुळली??? .. हां,बस अशी ता .. झाल आली डोक्याला,की हसायच फोटुत-आलं पायजे-सगळं..! =)) आंम्ही मंत्र फेकुन फेकुन ख....लास! आणि वधुचे माता/पितु: झाल---धरुन..धरुन! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

रेवती 14/10/2014 - 02:31
कोणत्या गावचे देशस्थ आहेत त्यावर अवलंबून आहे हो गुर्जी! आमच्या लग्नात तर माझ्याकडचे पुणेरी देशस्थ आणि नवर्‍याकडचे कोकणस्थ यांच्यात पाहुण्यांच्या संख्येपासून मदतीच्या ओघापर्यंत, आहेरापासून देण्याघेण्यापर्यंत काहीही एकसारखे नव्हते. नंतर कितीतरी दिवस आम्ही हसत होतो. अजूनही आठवले तर हसू येते.

In reply to by रेवती

रेवती 14/10/2014 - 02:35
नंतर एकदा कोल्लापूरला ;) लग्नाला गेलो होतो आणि त्यांची भाषा ऐकून आम्ही खुसुखुसू हसत होतो. त्या लग्नाच्या आदल्या दिवशी दुपारी पोहे मात्र मस्त केले होते. आज अकुंचे पोहेगान वाचून मला तीच आठवण आलीवती.

In reply to by जेपी

आदूबाळ 11/10/2014 - 20:08
अगदी अगदी. झालीचे दिवे पार मालवेपर्यंत लोकांची रांग संपतच नाही. यातले किती नंतर खरोखरच वधूचं योगक्षेम पहातात हां संशोधनाचा विषय आहे.

In reply to by आदूबाळ

@यातले किती नंतर खरोखरच वधूचं योगक्षेम पहातात हां संशोधनाचा विषय आहे.>>> क्या बोल्या रे.....! वाह!!! दिल की बात छीन ली! समांतरः- पण हे सगळं तुम्ही ऑनस्टेज बोल्लात की मेलात! ;)

रेवती 11/10/2014 - 19:38
कारण देशस्थेतरात ही मंडळी किती असावी? हा प्रश्न निखालसपणे स्वाभिमानाचा आणि देशस्थात मात्र तोच प्रश्न अभिमानाचा!!! हा हा हा. अगदी! लेखन आवडले.

अजया 13/10/2014 - 09:49
आवडला हाही भाग बुवा!! हल्ली झाल धरतात तसलं लग्न पाहाण्यातच नाही आलं.वैदिक पध्दतीत नसतो वाटतं हा भाग. आमच्या देशस्थांचे निरिक्षण भारीच!!

In reply to by अजया

@वैदिक पध्दतीत नसतो वाटतं हा भाग.>>> हम्म्म.. बरोबर. वैदिक पद्धतीत झाल/सुनमुख नसतं. नामलक्ष्मीपुजन असतं पण ते ही आधी न होता बर्‍याचदा नंतरच होतं. @आमच्या देशस्थांचे निरिक्षण भारीच!!>>> धन्यवाद. :)

इशा१२३ 13/10/2014 - 21:54
मस्त वर्णन.देशस्थांचे वर्णन नेमके.आमच्या नातातल्या बाईंनी लेकाच्या लग्नात झालीला फक्त सासरचेच का? माझ्या माहेरचेहि हवेत अस म्हणून भरपुर वर्‍हाड बोलावले मग सासरची मंडळी;ती ही सख्खी,चुलत सगळी जमा.स्टेज वर कशीबशी मावली सगळी.पूढे अर्धा तास झालीचा कार्यक्रम संपेना. तो प्रसंग डोळ्यापुढे आला आणि हसु आवरेना वाचताना.

In reply to by इशा१२३

@तो प्रसंग डोळ्यापुढे आला आणि हसु आवरेना वाचताना.>>> =)) (काल्पनिक..हां :D ) नातातल्या बाईं :- ए आक्के...येऊ दे की तुज्याकडची सगळी..या रे या वरती..नाय त थांबा..ओ नोकर(स्टेजचे..) लावा की अजुन धा खुर्च्या..बसले आपले बगत! .. ओ गुर्जी तुमी का थांबले? .. सुरु-रहा.. शांतीपा .. सपला का म्हणून.. रामरक्षा म्हना..चलतय..! .. ओ नोकर त्ये झालीच्या दिव्यांना त्येल आना.. गंगे...,तू का प्येंगुळली??? .. हां,बस अशी ता .. झाल आली डोक्याला,की हसायच फोटुत-आलं पायजे-सगळं..! =)) आंम्ही मंत्र फेकुन फेकुन ख....लास! आणि वधुचे माता/पितु: झाल---धरुन..धरुन! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

रेवती 14/10/2014 - 02:31
कोणत्या गावचे देशस्थ आहेत त्यावर अवलंबून आहे हो गुर्जी! आमच्या लग्नात तर माझ्याकडचे पुणेरी देशस्थ आणि नवर्‍याकडचे कोकणस्थ यांच्यात पाहुण्यांच्या संख्येपासून मदतीच्या ओघापर्यंत, आहेरापासून देण्याघेण्यापर्यंत काहीही एकसारखे नव्हते. नंतर कितीतरी दिवस आम्ही हसत होतो. अजूनही आठवले तर हसू येते.

In reply to by रेवती

रेवती 14/10/2014 - 02:35
नंतर एकदा कोल्लापूरला ;) लग्नाला गेलो होतो आणि त्यांची भाषा ऐकून आम्ही खुसुखुसू हसत होतो. त्या लग्नाच्या आदल्या दिवशी दुपारी पोहे मात्र मस्त केले होते. आज अकुंचे पोहेगान वाचून मला तीच आठवण आलीवती.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग-१४ हे वरती सर्व आलं. ते माझ्या भावविश्वातला गुरुजी आज बाहेर-आला म्हणून! पण एरवी आमची ही सप्तपदी म्हणजे ..विचारू नका...!!! ... पुढे चालू... =============== अगदी एक,दोन,तीन असे सावकाश गतीनी आकडे उच्चारले तरी सगळे मिळून एका मिनिटात पूर्ण होतात. तशी वधुला वराकडून झरं..झरं..झरं..झरं..चालवून एका मिनिटात शेवटच्या पावलाला आणावी लागते.

कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफझाई.

बाबा पाटील ·

रवीराज 11/10/2014 - 13:23
दोघांचे अभिनंदन, परंतु मलालास विशेषण लावताना सावधान, अहो तुम्ही तिला देवी बनवले, कट्टरपंथी मुस्लिमांच्या पचनी पडणार नाही ते,उगिचच निषेध करतील,मोर्चे निघतील. आपल्या सारखा मानवतावादी विचार नाही मानत हे लोक.

रवीराज 11/10/2014 - 13:23
दोघांचे अभिनंदन, परंतु मलालास विशेषण लावताना सावधान, अहो तुम्ही तिला देवी बनवले, कट्टरपंथी मुस्लिमांच्या पचनी पडणार नाही ते,उगिचच निषेध करतील,मोर्चे निघतील. आपल्या सारखा मानवतावादी विचार नाही मानत हे लोक.
लेखनविषय:
लेखनप्रकार
कैलाश आणी मलाला,तुमचा अभिमान आहे, नव्हे त्यापेक्षाही वेगळ काही वाटत तुमच्याविषयी, कुठे तरी आशेचा किरण जाणवतोय्,की जगात सगळेच प्रश्न काही तलवारीच्या धारेवर आणी बंदुकीच्या गोळीने सुटत नाहीत्,तुमच्याकडे पाहुन पटतय मला की प्रेमानेही आणी अहिंसेने बरच काही शक्य होते,ज्या सिद्धार्थ गौतमाचे,महात्म्याचे,आणी दिनदुबळ्यांची आई मदर तेरेसाच्या तुम्ही प्रतिनिधित्व करताय त्या माझ्या भारतभुमीचा उर आज आनंदाने भरुन आला असेल.

गंडलेल्या वाघाची कहाणी

पगला गजोधर ·

In reply to by होबासराव

पगला गजोधर 18/10/2014 - 09:01
हो बरोबरच, जसे कि विकास आला कि बेगडी अस्मिता दूर होते, नोकरी व्यवसायाच्या संधी आल्या प्रादेशिक संकुचितपणा बाजूला पडते, दगडं मारायला हात मिळत नाही. अरे नुसत्या वडापावच्या गाड्या लावून, महाराष्ट्र गुजरातच्या पुढे नेणार का ? का हफ्ते मागून राज्याचे उत्पन्न वाढवणार सेनापती ?

In reply to by होबासराव

पगला गजोधर 18/10/2014 - 09:01
हो बरोबरच, जसे कि विकास आला कि बेगडी अस्मिता दूर होते, नोकरी व्यवसायाच्या संधी आल्या प्रादेशिक संकुचितपणा बाजूला पडते, दगडं मारायला हात मिळत नाही. अरे नुसत्या वडापावच्या गाड्या लावून, महाराष्ट्र गुजरातच्या पुढे नेणार का ? का हफ्ते मागून राज्याचे उत्पन्न वाढवणार सेनापती ?
कोमेजून थकलेल्या वाघा येते ग्लानी, मरमर मरे रोज, कोण विचारींना पाणी, रोजचेच आहे सारे काही आज नवे नाही, अफझलखानात रमले सम्राट, वाघा स्कोपच नाही सांगायाचे आहे, या कवितेतून मला, गंडलेल्या वाघाची कहाणी तुला, आटपाट बम्बैजंगली गर्दी झाली भारी, बाहेरच्या जनावरांनी केली घुसखोरी, रोजरोज सम्राट तेंव्हा त्वेषानिया बोले, पण कृतीतून दाखवायचे राहूनीया गेले, जमलेचं नाही त्यावेळी त्यांना जरी, म्हणे यावेळी न्याय ते देणारच खरी, ओरबाडलेल्या रस्त्यांवरून मारू मग फेरी, डेंगूवाल्या मच्छरांच्या त्यात सरीवर सरी विकेन तो सारे जंगल, लाडक्या कॉनट्राक्टरला गंडलेल्या वाघाची कहाणी तुला, असा कसा कागदी सेनाप

नथ..................भाग-४

जयंत कुलकर्णी ·

इतकीच दाद या भागाला देऊ शकतो!! पुढला भाग टाका म्हणजे अजून दाद देईन! :) (या क्रमशः वाल्यांना कोणीतरी हाणा रे!!!!) ;)

हरकाम्या 11/10/2014 - 17:41
श्री.पिवळा डाम्बिस यान्च्या मताशी मी सहमत आहे. असे क्रमशः लिखाण करुन उगीच उत्सुकता ताणुन ठेवतात लेकाचे.

आदूबाळ 11/10/2014 - 20:03
ये बात! आवडतंय. आता याचा धागा अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीशी जोडला की तेही वर्तुळ पूर्ण होईल.

इतकीच दाद या भागाला देऊ शकतो!! पुढला भाग टाका म्हणजे अजून दाद देईन! :) (या क्रमशः वाल्यांना कोणीतरी हाणा रे!!!!) ;)

हरकाम्या 11/10/2014 - 17:41
श्री.पिवळा डाम्बिस यान्च्या मताशी मी सहमत आहे. असे क्रमशः लिखाण करुन उगीच उत्सुकता ताणुन ठेवतात लेकाचे.

आदूबाळ 11/10/2014 - 20:03
ये बात! आवडतंय. आता याचा धागा अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीशी जोडला की तेही वर्तुळ पूर्ण होईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ.......भाग-२ नथ.........भा-३ नथ............भाग-४ वलिखान बाम्झाई....... ‘आमच्या धमन्यातून या स्त्रीचे रक्त वाहतेय’ हे वाक्य इस्माईलने म्हटले मात्र तेथे एकच गडबड माजली.

आल्प्सच्या वळणांवर - भाग २ - लिंडरहॉफ पॅलेस आणि रेशन पास

मधुरा देशपांडे ·

प्यारे१ 10/10/2014 - 01:32
जळ जळ जळालो प्रत्येक फोटो बघून.... जायलाच हवं अशी ठिकाणं. अफाट निसर्ग सौंदर्य. खल्लास्स्स्स! मानवनिर्मित कलाकृतींना (इमारती, बागा, बगीचे, गाड्या काहीही) जपणं खरंच युरोपियनांकडून शिकावं. तुमची सहल छानच सुरु आहे.

In reply to by प्यारे१

वेल्लाभट 10/10/2014 - 17:04
मानवनिर्मित कलाकृतींना (इमारती, बागा, बगीचे, गाड्या काहीही) जपणं खरंच युरोपियनांकडून शिकावं.
हे बाकी एक नंबर म्हणालात. निसर्गनिर्मित कलाकृतींचही तेच आहे मी म्हणतो. हो की नाही ! स्विसचंच उदाहरण पुरेसं आहे.

काय ते फोटोज काय ती निसर्गरम्य ठिकाणं. अन त्यांच्या जोडीला मानवनिर्मित स्थापत्य-सौंदर्य. छायाचित्रणातली अन या लेखनामागची सौंदर्यदृष्टी खूप भावली.

अजया 10/10/2014 - 07:34
सुंदर ठिकाणांना सुंदर फोटोंनी अगदी न्याय दिलाय.रोड ट्रिपची मजा अशा अनवट ठिकाणांच्या दर्शनाचा अचानक होणारा लाभ घेण्यात असते खरं! पुभाप्र.

साती 10/10/2014 - 11:50
फोटो आणि वर्णन दोन्ही खूप आवडले. स्वित्झर्लंड तर पहायचेच आहे आयुष्यात एकदा.

In reply to by इरसाल

मिपावरचा गणेशा होणे चा अर्थ माहित आहे हो. ;) अंदाज होताच माझाही तो. पण नक्की कळेना. म्हणुन विचारले. :) पण बाकी सगळ्यांना दिसताहेत फोटु. इथे दिसताहेत का बघा.

पैसा 10/10/2014 - 16:46
सुरेख लिहिलंय आणि फोटो मस्तच! आपल्याकडे एकही असे ठिकाण आठवत नाही की जिथे गर्दी आणि कलकलाट नसतो. कलात्मक वस्तू वगैरे छान वाटतात पण हस्तिदंताच्या वस्तू बघताना यासाठी किती हत्ती बळी गेले असतील हा त्रासदायक विचार मनात येतोच.

In reply to by पैसा

विलासराव 10/10/2014 - 23:17
सुरेख लिहिलंय आणि फोटो मस्तच! आपल्याकडे एकही असे ठिकाण आठवत नाही की जिथे गर्दी आणि कलकलाट नसतो विपश्यनेला जा मग.

In reply to by पैसा

एस 11/10/2014 - 11:04
कलात्मक वस्तू वगैरे छान वाटतात पण हस्तिदंताच्या वस्तू बघताना यासाठी किती हत्ती बळी गेले असतील हा त्रासदायक विचार मनात येतोच.
फारच वेदनादायक आहे ते. असो. मधुराताई, लेखमाला मस्त होणार यात शंकाच नाही. आधी माझाही गणेशा झाला होता, पण आता फोटो दिसताहेत. पुभाप्र.

वेल्लाभट 10/10/2014 - 17:01
भग एक भाग दोन क्रमशः.... वाव! स्वित्झर्लंड याची देही याची डोळा बघितलेला असल्याने तुमच्या प्रवासाबद्दल वाचायची फार उत्सुकता आहे. म्हणजे; माझं काही बघायचं राहिलं असल्यास पुन्हा त्या कमाल प्रदेशी जायला हवं; नाही का :) या वेळेस मात्र नक्की कार हायर करणार. पहिल्या वेळी उगाच कचरलो. असो. तुम्ही मस्त लिहीत आहात... पुढचे भाग येउद्यात. फोटोही सुरेख!

सर्व प्रतिसादकांचे मनापासुन आभार. :) @पैसाताई, हस्तिदंताच्या बाबतीत तु म्हणतेस तो मुद्दाही आहे खरा. :(

गणेशा 30/04/2015 - 14:15
प्रत्येक फोटो तर सुंदर आहेच आहे.. परंतु प्रत्येक ओळ न ओळ वाचनीय आहे.. आपण स्वताच तेथे फिरतो आहोत असे वाटत होते, इतके समरस होउन जाते आहे मन ... रिप्लाय शेवटी देणार होतो .. पण मनापासुन येतेह रिप्लाय द्यावा वाटला अवांतर : उद्यापासुन सुट्टी आहे, परंतु तुमच्या या धाग्यांमुळे काम मात्र आज संपणार नाही असे वाटत आहे... त्यामुळे लेट काम झाल्यास तुमची ट्रीप जबाबदार

प्यारे१ 10/10/2014 - 01:32
जळ जळ जळालो प्रत्येक फोटो बघून.... जायलाच हवं अशी ठिकाणं. अफाट निसर्ग सौंदर्य. खल्लास्स्स्स! मानवनिर्मित कलाकृतींना (इमारती, बागा, बगीचे, गाड्या काहीही) जपणं खरंच युरोपियनांकडून शिकावं. तुमची सहल छानच सुरु आहे.

In reply to by प्यारे१

वेल्लाभट 10/10/2014 - 17:04
मानवनिर्मित कलाकृतींना (इमारती, बागा, बगीचे, गाड्या काहीही) जपणं खरंच युरोपियनांकडून शिकावं.
हे बाकी एक नंबर म्हणालात. निसर्गनिर्मित कलाकृतींचही तेच आहे मी म्हणतो. हो की नाही ! स्विसचंच उदाहरण पुरेसं आहे.

काय ते फोटोज काय ती निसर्गरम्य ठिकाणं. अन त्यांच्या जोडीला मानवनिर्मित स्थापत्य-सौंदर्य. छायाचित्रणातली अन या लेखनामागची सौंदर्यदृष्टी खूप भावली.

अजया 10/10/2014 - 07:34
सुंदर ठिकाणांना सुंदर फोटोंनी अगदी न्याय दिलाय.रोड ट्रिपची मजा अशा अनवट ठिकाणांच्या दर्शनाचा अचानक होणारा लाभ घेण्यात असते खरं! पुभाप्र.

साती 10/10/2014 - 11:50
फोटो आणि वर्णन दोन्ही खूप आवडले. स्वित्झर्लंड तर पहायचेच आहे आयुष्यात एकदा.

In reply to by इरसाल

मिपावरचा गणेशा होणे चा अर्थ माहित आहे हो. ;) अंदाज होताच माझाही तो. पण नक्की कळेना. म्हणुन विचारले. :) पण बाकी सगळ्यांना दिसताहेत फोटु. इथे दिसताहेत का बघा.

पैसा 10/10/2014 - 16:46
सुरेख लिहिलंय आणि फोटो मस्तच! आपल्याकडे एकही असे ठिकाण आठवत नाही की जिथे गर्दी आणि कलकलाट नसतो. कलात्मक वस्तू वगैरे छान वाटतात पण हस्तिदंताच्या वस्तू बघताना यासाठी किती हत्ती बळी गेले असतील हा त्रासदायक विचार मनात येतोच.

In reply to by पैसा

विलासराव 10/10/2014 - 23:17
सुरेख लिहिलंय आणि फोटो मस्तच! आपल्याकडे एकही असे ठिकाण आठवत नाही की जिथे गर्दी आणि कलकलाट नसतो विपश्यनेला जा मग.

In reply to by पैसा

एस 11/10/2014 - 11:04
कलात्मक वस्तू वगैरे छान वाटतात पण हस्तिदंताच्या वस्तू बघताना यासाठी किती हत्ती बळी गेले असतील हा त्रासदायक विचार मनात येतोच.
फारच वेदनादायक आहे ते. असो. मधुराताई, लेखमाला मस्त होणार यात शंकाच नाही. आधी माझाही गणेशा झाला होता, पण आता फोटो दिसताहेत. पुभाप्र.

वेल्लाभट 10/10/2014 - 17:01
भग एक भाग दोन क्रमशः.... वाव! स्वित्झर्लंड याची देही याची डोळा बघितलेला असल्याने तुमच्या प्रवासाबद्दल वाचायची फार उत्सुकता आहे. म्हणजे; माझं काही बघायचं राहिलं असल्यास पुन्हा त्या कमाल प्रदेशी जायला हवं; नाही का :) या वेळेस मात्र नक्की कार हायर करणार. पहिल्या वेळी उगाच कचरलो. असो. तुम्ही मस्त लिहीत आहात... पुढचे भाग येउद्यात. फोटोही सुरेख!

सर्व प्रतिसादकांचे मनापासुन आभार. :) @पैसाताई, हस्तिदंताच्या बाबतीत तु म्हणतेस तो मुद्दाही आहे खरा. :(

गणेशा 30/04/2015 - 14:15
प्रत्येक फोटो तर सुंदर आहेच आहे.. परंतु प्रत्येक ओळ न ओळ वाचनीय आहे.. आपण स्वताच तेथे फिरतो आहोत असे वाटत होते, इतके समरस होउन जाते आहे मन ... रिप्लाय शेवटी देणार होतो .. पण मनापासुन येतेह रिप्लाय द्यावा वाटला अवांतर : उद्यापासुन सुट्टी आहे, परंतु तुमच्या या धाग्यांमुळे काम मात्र आज संपणार नाही असे वाटत आहे... त्यामुळे लेट काम झाल्यास तुमची ट्रीप जबाबदार
आल्प्सच्या वळणांवर - भाग १ - नियोजन, पूर्वतयारी आणि प्रयाण दुसरा दिवस उजाडला. तसा पहिलाच. कारण मुख्य प्रवासाला सुरुवात होत होती. संध्याकाळपर्यंत नियोजित हॉटेलला पोचायचं एवढंच या दिवसाचं ध्येय होतं. त्यामुळे निवांत आवरून निघालो. सूर्यदेवाने सकाळीच एकदा दर्शन दिलेले दिसले आणि एक ओझे उतरले. जर्मनीतून बाहेर पडण्यापुर्वी पेट्रोल भरणे आवश्यक होते म्हणून ते काम केले.

नथ..........भाग-३

जयंत कुलकर्णी ·

In reply to by बॅटमॅन

हा ! हा ! क्या फसाया.......आरं बाबा यहा सब वर्जिनल हाय........:-) पण तुम्हाला तसे वाटावे अशी दोन चार वाक्ये टाकावीत हे मातर तुम्च्या प्रतिक्रियेवरुन सुचल बरका.........

आदूबाळ 09/10/2014 - 18:38
जबरदस्त! असंच काहीसं असणार असं वाटत होतं. अवांतरः पानिपतानंतरच्या वाताहतीत काही मराठे हरियाणातच राहिले/स्थायिक झाले. त्यांना "रोड मराठे" म्हणतात. प्रीती झिंटा ही त्या रोड मराठ्यांच्या खानदानातली आहे.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 09/10/2014 - 18:44
या रोड मराठा लोकांचे एक संमेलन होते १४ जानेवारीस दरवर्षी- अलीकडचाच प्रकार आहे हा. मी २०१३ साली पानपतास गेलो असता याच्या कमानीचा फटू काढला होता. संमेलनाआधी २ दिवस म्ह. १२ जानेवारीस गेल्यामुळे लोकांचा फटू काढता नै आला.

In reply to by आदूबाळ

प्रसाद१९७१ 09/10/2014 - 18:59
काय सांगता काय. नक्की चित्पावन असणार हे रोड मराठे. भारतात असे फक्त मराठे वगैरे म्हणुन चालत नाही. मराठी-ब्राह्मण्-चित्पावन - ही खरी ओळख झाली.

प्यारे१ 10/10/2014 - 01:47
वाचावं ते नवलच. बाकी हे अगदी शक्य आहे. बरेच आफ्रिकन, अफगाणी, इराणी लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन स्थायिक झालेले होते ना महाराजांच्या काळात, आधी, नंतर? तसं आपल्याकडचं कुणी गेलं असेल की तिकडं. छान सुरु आहे कथा.

आणि विविध पात्रांच्या कथनातून कथानक पुढे सरकवण्याची सफाईही आवडली... फार कठीण असतं असं करायला...

पैसा 10/10/2014 - 11:58
‘आमच्या जमातीत एक पेक्षा जास्त लग्न करण्यास परवानगी नाही. २४० वर्षे झाली असतील’ ‘We Baamzais are descendents of this woman. Her blood flows in our veins'... आणि गावातले सतीचे वृंदावन यातून काही संगती लागते आहे. पण माझा अंदाज आधी बोलत नाही! कथा अप्रतिम जमली आहे! दुसर्‍या भागाच्या शेवट अनेक शक्यता वाटत होत्या, मात्र आता कथेला एक दिशा मिळाली आहे. पुढचा भाग लवकर येऊ द्या!

आनंद 10/10/2014 - 18:35
मस्त कथा. विविध पात्रांच्या कथनातून कथानक पुढे सरकताना मला थोड कनफ्युज होतय. सौ. इंदिरा गोंविद भानु हव कि सौ. इंदिरा माधव भानु हव.( नात्यांचा जरा घोळ्च होतो माझा.)

सौंदाळा 10/10/2014 - 19:11
आईशप्पथ, उत्तुंग प्रतिभेचा अविष्कार पुढच्या भागाची वाट बघतोय.

In reply to by बॅटमॅन

हा ! हा ! क्या फसाया.......आरं बाबा यहा सब वर्जिनल हाय........:-) पण तुम्हाला तसे वाटावे अशी दोन चार वाक्ये टाकावीत हे मातर तुम्च्या प्रतिक्रियेवरुन सुचल बरका.........

आदूबाळ 09/10/2014 - 18:38
जबरदस्त! असंच काहीसं असणार असं वाटत होतं. अवांतरः पानिपतानंतरच्या वाताहतीत काही मराठे हरियाणातच राहिले/स्थायिक झाले. त्यांना "रोड मराठे" म्हणतात. प्रीती झिंटा ही त्या रोड मराठ्यांच्या खानदानातली आहे.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 09/10/2014 - 18:44
या रोड मराठा लोकांचे एक संमेलन होते १४ जानेवारीस दरवर्षी- अलीकडचाच प्रकार आहे हा. मी २०१३ साली पानपतास गेलो असता याच्या कमानीचा फटू काढला होता. संमेलनाआधी २ दिवस म्ह. १२ जानेवारीस गेल्यामुळे लोकांचा फटू काढता नै आला.

In reply to by आदूबाळ

प्रसाद१९७१ 09/10/2014 - 18:59
काय सांगता काय. नक्की चित्पावन असणार हे रोड मराठे. भारतात असे फक्त मराठे वगैरे म्हणुन चालत नाही. मराठी-ब्राह्मण्-चित्पावन - ही खरी ओळख झाली.

प्यारे१ 10/10/2014 - 01:47
वाचावं ते नवलच. बाकी हे अगदी शक्य आहे. बरेच आफ्रिकन, अफगाणी, इराणी लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन स्थायिक झालेले होते ना महाराजांच्या काळात, आधी, नंतर? तसं आपल्याकडचं कुणी गेलं असेल की तिकडं. छान सुरु आहे कथा.

आणि विविध पात्रांच्या कथनातून कथानक पुढे सरकवण्याची सफाईही आवडली... फार कठीण असतं असं करायला...

पैसा 10/10/2014 - 11:58
‘आमच्या जमातीत एक पेक्षा जास्त लग्न करण्यास परवानगी नाही. २४० वर्षे झाली असतील’ ‘We Baamzais are descendents of this woman. Her blood flows in our veins'... आणि गावातले सतीचे वृंदावन यातून काही संगती लागते आहे. पण माझा अंदाज आधी बोलत नाही! कथा अप्रतिम जमली आहे! दुसर्‍या भागाच्या शेवट अनेक शक्यता वाटत होत्या, मात्र आता कथेला एक दिशा मिळाली आहे. पुढचा भाग लवकर येऊ द्या!

आनंद 10/10/2014 - 18:35
मस्त कथा. विविध पात्रांच्या कथनातून कथानक पुढे सरकताना मला थोड कनफ्युज होतय. सौ. इंदिरा गोंविद भानु हव कि सौ. इंदिरा माधव भानु हव.( नात्यांचा जरा घोळ्च होतो माझा.)

सौंदाळा 10/10/2014 - 19:11
आईशप्पथ, उत्तुंग प्रतिभेचा अविष्कार पुढच्या भागाची वाट बघतोय.
लेखनविषय:
लेखनप्रकार
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ.......भाग-२ नथ..........भाग-३ सौ. इंदिरा माधव भानू (खाजगीवाले) दिवाळी काबूलला साजरी काढायची हे ऐकल्यावर मला थोडे दचकायलाच झाले कारण नुकतेच आर्य व ह्यांच्यात झालेल्या संभाषणात मी तेथे काय झाले ते ऐकले होते.

"काही नाही… "

योगी_१९८५ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मनात गोंधळ घालणाऱ्या बहुतेक भावनांना आपल्या जवळील स्त्री-वर्ग, मग तो कोणत्या पण नात्याने जोडलेला असो "काही नाही " या दोन शब्दात सगळी भावना गुंडाळून टाकतो… त्या पैकी काही खालीलप्रमाणे… कधी कधी… इशश्य… कधी कधी… काही तरीच काय हो… कधी कधी… आता शांत बसा… कधी कधी…खाऊ कि मारू आता… कधी कधी…अरे बापरे!!!