मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टि टाईम स्नॅक्स प्रकार ४ - कॉर्न पकोडे

दिपक.कुवेत ·

भाते 13/10/2014 - 19:48
तुझ्या पाकृने सोमवार सार्थकी लागला. कुवेतमध्ये दिपक शिवाय आणखी कोणी मिपाकर आहे का? दिपकला अनेक वेळा प्रेमाने समजावुन सुध्दा हा काही सोमवारी पाकृ टाकायचे सोडत नाही! यावर एकच ऊपाय! दर रविवारी त्याला कट्टयामध्ये गुंतवून ठेवायचे. नविन पाकृ करून बघायला वेळच मिळाला नाही पाहिजे त्याला. तरच आपली या त्रासातुन सुटका होऊ शकेल. :)

In reply to by दिपक.कुवेत

भाते 14/10/2014 - 16:48
सोमवारी सकाळी हिपासात पाकृ आणि फोटो बघितल्यावर त्रास होतो. विकांताला (शनिवार/रविवार) पाकृ आली तर ती करून बघण्याचा किंवा बाहेर जाऊन खाण्याचा पर्याय ऊपलब्ध असतो. :)

आवडेश प्रकार आहे हा. कॉर्न कुठल्याही फॉर्ममध्ये आवडतेच. अगदी चिकन कॉर्न कॉम्बिनेशनवाले स्टार्टरही विशेष आवडीचे. बायको माहेरी असल्याने तुर्तास हे वाचनखूण :)

पैसा 14/10/2014 - 16:53
मस्त रे दिप्या! मक्याचे दाणे घरात आहेत पण कांदापात नाहीये त्यामुळे आजचा बेत क्यान्सल!

दिपक.कुवेत 15/10/2014 - 10:55
एकदा ट्राय करा आणि कळवा कसं होतेयं ते. पाकॄत एक सांगायचं राहिलं कि ४ ते ५ चमचे बाजूला काढलेले कॉर्न नंतर भरडसर वाटणात मिसळायचे जेणेकरुन खाताना मधे मधे दाणा लागेल. संमं हे वाक्य वरील पाकृत अ‍ॅड केलं तर पुढे वाचणार्‍यांना सोपं जाईल. धन्यवाद.

भाते 13/10/2014 - 19:48
तुझ्या पाकृने सोमवार सार्थकी लागला. कुवेतमध्ये दिपक शिवाय आणखी कोणी मिपाकर आहे का? दिपकला अनेक वेळा प्रेमाने समजावुन सुध्दा हा काही सोमवारी पाकृ टाकायचे सोडत नाही! यावर एकच ऊपाय! दर रविवारी त्याला कट्टयामध्ये गुंतवून ठेवायचे. नविन पाकृ करून बघायला वेळच मिळाला नाही पाहिजे त्याला. तरच आपली या त्रासातुन सुटका होऊ शकेल. :)

In reply to by दिपक.कुवेत

भाते 14/10/2014 - 16:48
सोमवारी सकाळी हिपासात पाकृ आणि फोटो बघितल्यावर त्रास होतो. विकांताला (शनिवार/रविवार) पाकृ आली तर ती करून बघण्याचा किंवा बाहेर जाऊन खाण्याचा पर्याय ऊपलब्ध असतो. :)

आवडेश प्रकार आहे हा. कॉर्न कुठल्याही फॉर्ममध्ये आवडतेच. अगदी चिकन कॉर्न कॉम्बिनेशनवाले स्टार्टरही विशेष आवडीचे. बायको माहेरी असल्याने तुर्तास हे वाचनखूण :)

पैसा 14/10/2014 - 16:53
मस्त रे दिप्या! मक्याचे दाणे घरात आहेत पण कांदापात नाहीये त्यामुळे आजचा बेत क्यान्सल!

दिपक.कुवेत 15/10/2014 - 10:55
एकदा ट्राय करा आणि कळवा कसं होतेयं ते. पाकॄत एक सांगायचं राहिलं कि ४ ते ५ चमचे बाजूला काढलेले कॉर्न नंतर भरडसर वाटणात मिसळायचे जेणेकरुन खाताना मधे मधे दाणा लागेल. संमं हे वाक्य वरील पाकृत अ‍ॅड केलं तर पुढे वाचणार्‍यांना सोपं जाईल. धन्यवाद.
pakode 1 साहित्यः १. स्वीट कॉर्न / मक्याचे दाणे - १ बाउल २. बारीक चीरलेली हिरव्या कांद्याची पात - १ बाउल (नसेल तर पालक + बारीक चीरलेला कांदा घ्या) ३. गरजेप्रमाणे बेसन ४. तांदूळाचं पीठ - २ चमचे ५. मक्याचं पीठ - ४ चमचे (नसेल तर बेसनाचं प्रमाण वाढवा) ६. पेस्ट - ३ ते ४ चमचे (मुठभरं कोथींबीर, हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरं आणि पेरभर आलं) ७. चवीप्रमाणे मीठ ८. तळण्यासाठि तेल ९.

नथ...........भाग-६

जयंत कुलकर्णी ·

मृत्युन्जय 13/10/2014 - 15:37
आर्य अँगस कँपबेलचा आर्य माधव भानू कसा झाला म्हणे? की मी काही संगती चुकतो आहे? बाकी हाही भाग नाट्यपुर्ण आणि उत्सुकता वाढवणारा. पुभाप्र

आधी मी ठरवलं होतं की सगळे भाग येऊन "समाप्त" दिसलं की मगच वाचायची ही कथा... पण गेले २-३ दिवस वेड्यासारखी मोबाईल वर मिपा चेक करतेय.. बॅटरी संपली तर हॉटेलात चार्जिंगला लावुन "नथ - भाग ६" वाचतेय.. छे.. उगाच वाचलं मी... थांबायला हवं होतं... आणि काका तर निवांत एक एक भाग टाकताएत.. इकडे पब्लिक खुळ्यासारखी वाट बघत बसलीये..!!

इनिगोय 13/10/2014 - 16:26
वाचतेय. ते हंड्यात तूप, आणि संत्र्याच्या साली कशासाठी वापरत असत?

In reply to by इनिगोय

कुजलेले तूप हे अत्यंत प्रभावी अन्तीसेप्तिक असते (असे वाचले आहे)... लढाईत होणार्या घावांवर अत्यंत उपयुक्त.. त्याकाळी प्रत्येक किल्ला गढी वाड्यावर असे साठे करून ठेवत असत ...किंबहुना कुजलेल्या तुपाच्या 'विहिरी' असत असे उल्लेख वाचलेले आहेत.... संत्र्याची साल कशाला वापरायचे म्हाईत नै ...पण जखमेवर कुजलेले तूप लावल्यास मूळ जखमेपेक्षा कित्येकपट दाह होत असे ...

In reply to by सूड

पैसा 13/10/2014 - 22:16
खूप जुन्या तुपाला अगदे विचित्र वास येतो बघ, तसे असावे. आपोआपच शिळे होऊन वास येणारे जुने तूप आयुर्वेदात जखमांसाठी वापरतात बहुतेक.

In reply to by सूड

संत्र्याच्या सालाला लगेच बुरशी येते. ही बुरशी मग तुपावर चढते. मग तुपाचा पूर्ण थर काढून एखाद्या बरणीत ठेवत व जखमा चिघळू नयेत म्हणून ते तूप त्यावर लावीत. एक थर काढून झाला की उरलेल्या तुपात ती बुरशी परत परत वाढते. कदाचित त्या तुपाला ते कुजलेले तूप म्हणत असावेत. Antibiotic....दुसरे काय असणार ? हे अर्थातच वाचलेले...

In reply to by जयंत कुलकर्णी

पैसा 14/10/2014 - 20:25
कारण तूप कुजेल अशी शक्यता वाटत नाही. ते त्या बुरशीला प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून काम करत असावे. बुरशी बद्दल बोलायचं तर, पेनिसिलिन पण मुळात बुरशीपासून मिळवलेले होते ना?

In reply to by जयंत कुलकर्णी

या प्रक्रियेला रॅन्सिडिफिकेशन (Rancidification) म्हणतात... Rancidification is the hydrolysis and/or autoxidation of fats into short-chain aldehydes and ketones which are objectionable in taste and odor. रॅन्सिड तुपाला कुजकट वास येतो त्यामुळे त्याला कुजलेले तूप म्हणत असत. असे तूप पूर्वीच्या काळी जखमांवर लावत असत.

प्यारे१ 13/10/2014 - 16:30
फारच वळणावळणाची कथा पण एकदम भारी आहे. वेगवेगळ्या पात्रांच्या तोंडून कथन ऐकणं जरा अवघड जातंय. पुन्हा सुशेगात सलगपणं वाचणार आहे कथा संपली की.

इशा१२३ 13/10/2014 - 20:45
सध्या या कथेने वेड लावलय.पुढचा भाग आला का हेच सारखे चेक करतीये.प्रचंड उत्सुकता लावलीये कथेन.लवकर टाका पुढचा भाग.

सर्वांना धन्यवाद ! सगळ्यांना पुढे काय याची उत्सुकता वाटणे स्वाभाविक आहे. पण प्रामाणिकपणे सांगतो या कथेचा फक्त शेवट आणि त्याची वाट मला माहिती आहे...म्हणजे तो मी ठरवलाय. बाकी सगळे मी सुचेल तसे रोज लिहितोय आणि चार्/पाच पाने झाली की अपलोड करतोय.....:-) परत एकदा धन्यवाद !

विनोद१८ 13/10/2014 - 22:54
Eka Kalpnik Kathela Ekaa Unchivar neun ti Vastvik Itihasaat Ghadleli aahe ase tiche Vachan kartanaa vatate. To khara Itihas naahi yacha Visar padato. Ya Kathamalikeche Mipala Khul lavalyabaddal Dhanyavad ani Tumchya Jabardast Pratibhela va Shaileela Daad dyavi thevadhi thodich.......!!

मृत्युन्जय 13/10/2014 - 15:37
आर्य अँगस कँपबेलचा आर्य माधव भानू कसा झाला म्हणे? की मी काही संगती चुकतो आहे? बाकी हाही भाग नाट्यपुर्ण आणि उत्सुकता वाढवणारा. पुभाप्र

आधी मी ठरवलं होतं की सगळे भाग येऊन "समाप्त" दिसलं की मगच वाचायची ही कथा... पण गेले २-३ दिवस वेड्यासारखी मोबाईल वर मिपा चेक करतेय.. बॅटरी संपली तर हॉटेलात चार्जिंगला लावुन "नथ - भाग ६" वाचतेय.. छे.. उगाच वाचलं मी... थांबायला हवं होतं... आणि काका तर निवांत एक एक भाग टाकताएत.. इकडे पब्लिक खुळ्यासारखी वाट बघत बसलीये..!!

इनिगोय 13/10/2014 - 16:26
वाचतेय. ते हंड्यात तूप, आणि संत्र्याच्या साली कशासाठी वापरत असत?

In reply to by इनिगोय

कुजलेले तूप हे अत्यंत प्रभावी अन्तीसेप्तिक असते (असे वाचले आहे)... लढाईत होणार्या घावांवर अत्यंत उपयुक्त.. त्याकाळी प्रत्येक किल्ला गढी वाड्यावर असे साठे करून ठेवत असत ...किंबहुना कुजलेल्या तुपाच्या 'विहिरी' असत असे उल्लेख वाचलेले आहेत.... संत्र्याची साल कशाला वापरायचे म्हाईत नै ...पण जखमेवर कुजलेले तूप लावल्यास मूळ जखमेपेक्षा कित्येकपट दाह होत असे ...

In reply to by सूड

पैसा 13/10/2014 - 22:16
खूप जुन्या तुपाला अगदे विचित्र वास येतो बघ, तसे असावे. आपोआपच शिळे होऊन वास येणारे जुने तूप आयुर्वेदात जखमांसाठी वापरतात बहुतेक.

In reply to by सूड

संत्र्याच्या सालाला लगेच बुरशी येते. ही बुरशी मग तुपावर चढते. मग तुपाचा पूर्ण थर काढून एखाद्या बरणीत ठेवत व जखमा चिघळू नयेत म्हणून ते तूप त्यावर लावीत. एक थर काढून झाला की उरलेल्या तुपात ती बुरशी परत परत वाढते. कदाचित त्या तुपाला ते कुजलेले तूप म्हणत असावेत. Antibiotic....दुसरे काय असणार ? हे अर्थातच वाचलेले...

In reply to by जयंत कुलकर्णी

पैसा 14/10/2014 - 20:25
कारण तूप कुजेल अशी शक्यता वाटत नाही. ते त्या बुरशीला प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून काम करत असावे. बुरशी बद्दल बोलायचं तर, पेनिसिलिन पण मुळात बुरशीपासून मिळवलेले होते ना?

In reply to by जयंत कुलकर्णी

या प्रक्रियेला रॅन्सिडिफिकेशन (Rancidification) म्हणतात... Rancidification is the hydrolysis and/or autoxidation of fats into short-chain aldehydes and ketones which are objectionable in taste and odor. रॅन्सिड तुपाला कुजकट वास येतो त्यामुळे त्याला कुजलेले तूप म्हणत असत. असे तूप पूर्वीच्या काळी जखमांवर लावत असत.

प्यारे१ 13/10/2014 - 16:30
फारच वळणावळणाची कथा पण एकदम भारी आहे. वेगवेगळ्या पात्रांच्या तोंडून कथन ऐकणं जरा अवघड जातंय. पुन्हा सुशेगात सलगपणं वाचणार आहे कथा संपली की.

इशा१२३ 13/10/2014 - 20:45
सध्या या कथेने वेड लावलय.पुढचा भाग आला का हेच सारखे चेक करतीये.प्रचंड उत्सुकता लावलीये कथेन.लवकर टाका पुढचा भाग.

सर्वांना धन्यवाद ! सगळ्यांना पुढे काय याची उत्सुकता वाटणे स्वाभाविक आहे. पण प्रामाणिकपणे सांगतो या कथेचा फक्त शेवट आणि त्याची वाट मला माहिती आहे...म्हणजे तो मी ठरवलाय. बाकी सगळे मी सुचेल तसे रोज लिहितोय आणि चार्/पाच पाने झाली की अपलोड करतोय.....:-) परत एकदा धन्यवाद !

विनोद१८ 13/10/2014 - 22:54
Eka Kalpnik Kathela Ekaa Unchivar neun ti Vastvik Itihasaat Ghadleli aahe ase tiche Vachan kartanaa vatate. To khara Itihas naahi yacha Visar padato. Ya Kathamalikeche Mipala Khul lavalyabaddal Dhanyavad ani Tumchya Jabardast Pratibhela va Shaileela Daad dyavi thevadhi thodich.......!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

पंक, पाकळी, पाखी, पाखरु, आणि ऋग्वेदातील पाकः

माहितगार ·

माहितगार 13/10/2014 - 13:47
पाक / पाख आणि पाखी या शब्दांचे बोली भाषेतील अथवा कन्नड , तेलुगू , तमील साहित्यातील उल्लेख/ वापरही (असल्यास) जाणकारांकडून मिळाल्यास हवा आहे.

राही 13/10/2014 - 15:18
कृ. पां. कुलकरणीलिखित आणि श्रीपद जोशी यांजकडून सुधारित मराठी व्युत्पत्तीकोशात बहुतेक सर्व मराठी शब्दांच्या व्युत्पत्ती आढळतात. पक्ष म्हणजे पंख, त्यावरून पक्षिन् म्हणजे पंख असलेला; पक्ष म्हणजे बाजू, त्यावरून हा पक्ष, तो पक्ष, (महिन्याचा) काळा पक्ष-शुक्ल पक्ष, वगैरे. किंवा पूर्वपक्ष-उत्तरपक्ष; छपराच्या दोन बाजू म्हणजे दोन पक्ष,पाख इ. पॉकेट हा उघड उघड परकीय शब्द आहे. त्याचे मूळ 'पक्ष'पर्यंत पोचेल असे वाटत नाही. स्वयंपाक मधला पाक हा पच् धातूवरून आलेला आहे. त्याचे कर्मणि भू.धा.वि. पक्व असे होते. मूळ अर्थ शिजवणे,हिंदीत पकाना. अनुषंगाने आलेला म्हणजे जठराग्नीने शिजवणे, मऊ करणे, पचवणे. त्यावरून पुढे दु:ख पचवणे, विष पचवणे वगैरे.

In reply to by राही

माहितगार 13/10/2014 - 15:36
पॉकेट हा उघड उघड परकीय शब्द आहे. त्याचे मूळ 'पक्ष'पर्यंत पोचेल असे वाटत नाही.
हम्म.. :) धागा पोस्ट केल्या नंतर पाकीटाची आपली व्युत्पत्ती गंडलीय हे माझ मलाही लक्षात आल होत. मग स्वत:ची चूक सावरण्यासाठी इंग्रजी शोध घेत होतो बराच वेळचा, सावरलं जाणार असं काय सापडल नै तरीपण बुडत्याला काडीचा आधार :) शोधण्याचा प्रयत्नात जे सापडलं ते खालील प्रमाणे : Meaning "small bag worn on the person, especially one sewn into a garment" is from early 15c. Sense in billiards is from 1754. Mining sense is attested from 1850; military sense of "area held by troops surrounded by the enemy" is from 1918; the general sense of "small area different than its surroundings" (1926) apparently was extended from the military use. Figuratively, "one's money" (conceived as being kept in a pocket) is from 1717. Pope Pokett (late 15c.) was figurative of the greedy and corrupt Church आणि अर्थातच आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद. अवांतरः कृ. पां. कुलकर्णींच पुस्तकं पुण्या मुंबईत मार्केटात शोधत काही वर्षांपुर्वी फिरलो होतो तेव्हा ते मिळाल नव्हतं श्रीपद जोशी यांजकडून सुधारित आवृत्ती कोणत्या वर्षीची आहे काही कल्पना असल्यास कळावे.

In reply to by राही

राही 13/10/2014 - 17:51
ते श्रीपाद जोशी आहेत, श्रीपद नव्हेत. टंकनात माझी चूक झाली. यांना जाऊनही अनेक वर्षे झाली. म्हणजे कोशसुधारणा ३५-४० वर्षांपूर्वीची असावी. मला ही जुनी प्रतच उपलब्ध असते. त्यामुळे या बाबतीत नव्याने कुणी काही केले आहे की काय याविषयी माहिती नाही. हा ग्रंथ प्रत्येक चांगल्या वाचनालयात असतोच असतो. याशिवाय यादवकालीन मराठीवर शं. गो. तुळपुळे आणि अ‍ॅन् फेल्ड्हाउस यांचा कोश अतिउत्तम आहे. या व्यतिरिक्तही ज्ञानेश्वरीची भाषा वगैरे अनेक कोश आहेत. सुदैवाने मराठीला अतिशय समृद्ध असे कोशवाङ्मय लाभलेले आहे. (ही सर्व माहिती धागाकर्त्यासाठी नाही. त्यांना हे माहीत असणारच.) जाता जाता : मोल्स्वर्थ प्रमाणे व्युत्पत्तीकोशही विकीवर यावा असे मनोमन वाटते.

In reply to by राही

माहितगार 13/10/2014 - 20:02
मराठी विकिपीडियावर कोशकारांच्या पुढील प्रमाणे नोंदी आढळल्या *कृ.पां. ऊर्फ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी (जन्म : इस्लामपूर-सांगली जिल्हा, जानेवारी ५, १८९२ - मृत्यू : मुंबई, जून १२, १९६४) *श्रीपाद रघुनाथ जोशी (जन्मदिनांक अज्ञात - सप्टेंबर २४ इ.स. २००२) यांचा जन्म दिनांक कुणास ठाऊक असल्यास हवा आहे. बुकगंगा डॉट कॉमच्या या दुव्यावर ग्रंथाची आवृत्ती विक्रीस उपलब्ध दिसते आहे. प्रत्यक्ष प्रती आहेत का ते त्यांना प्रत्यक्षच विचारावे लागेल असे वाटते. * पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन वर्ष १९४६ दुसरी १९६३, आणि तिसरी त्यानंतर केव्हातरी ( त्यावर प्रकाशन वर्ष मुद्रीत नाही १९७८?) प्रकाशित झाली असावी. या नंतरही विवीध विद्यापीठातून संशोधन झाले असणार त्यानुसार अद्ययावत माहिती आंतरजालावर यावयास हवी. असो.
मोल्स्वर्थ प्रमाणे व्युत्पत्तीकोशही विकीवर यावा असे मनोमन वाटते.
+१ सहमत, हे खरयं खास करून ज्ञानकोशांवर काम करणार्‍यांना हे साहाय्यभूत होऊ शकत. दोन्ही लेखन करण्यासाठी कोणत्याही गोष्टीची ऐतिहासीक पार्श्वभूमीची दखल घेण्यासाठी, दुसरे चपखल पारिभाषिक शब्द योजनेसाठीही मला शब्द व्युत्पत्ती समानार्थी शब्दांएवढ्याच उपयूक्त वाटतात. आणि भाषा अभ्यासकांना संशोधनासाठी खर म्हणजे विक्शनरीवरील वर्गीकरणांच्या सोईसारखी सोय नाही अर्थात हे सर्व पाझर तलाव बांधण्यास कुणी पुढे आलेतर चे आहे.

कंजूस 13/10/2014 - 15:49
एका गृहिणिच्या पाककौशल्याबद्दल विनोद आठवला "अहो अन्नपुर्णाबाई पाक किती तुमचा बरवा ,आतुनी तो कसा हिरवा ."

माहितगार 13/10/2014 - 16:40
http://www.ancientvedas.com/chapter/1/book/164/ या वेबसाईटवर पर्छामि असं रुप दिलय
पाकः पर्छामि मनसाविजानन देवानामेना निहिता पदानि
पाकः चा अर्थ त्यांनी Unripe असा केलेला दिसतो आहे Unripe in mind, in spirit undiscerning, I ask of these the Gods established places; - See more at: http://www.ancientvedas.com/chapter/1/book/164/#sthash.ahpti1dy.dpuf

माहितगार 13/10/2014 - 16:51
सवयं यजस्व दिवि देव देवान किं ते पाकः कर्णवदप्रचेताः | Worship, thyself, O God, the Gods in heaven: what, void of knowledge, shall the fool avail thee? - संदर्भ: http://www.ancientvedas.com/chapter/10/book/7/#sthash.oPKPMJeu.dpuf :येथे पाकः शब्दाचा अर्थ मला स्पष्ट होत नाहीए ! -अनभिज्ञ माहितगार

माहितगार 17/10/2014 - 16:01
युजानो हरिता रथे भूरि त्वष्टेह राजति । को विश्वाहा द्विषतः पक्ष आसत उतासीनेषु सूरिषु ॥१९॥ - ऋग्वेद: सूक्तं ६.४७
http://www.aryabharati.org/rugved/englrugved.asp?ln=en&bk=06&pt=a&pg=047 या अनुवादात पक्षचा अर्थ 'बाजू' side असा घेतला असे दिसते. यात महिन्यातील एक पक्ष असा अर्थ नसावा तरीही एकुण महत्वाचे म्हणजे 'पक्ष' शब्द ऋग्वेदात नाही असे धरून चाललो होतो ते चुकीचे होते असे दिसते.

माहितगार 13/10/2014 - 13:47
पाक / पाख आणि पाखी या शब्दांचे बोली भाषेतील अथवा कन्नड , तेलुगू , तमील साहित्यातील उल्लेख/ वापरही (असल्यास) जाणकारांकडून मिळाल्यास हवा आहे.

राही 13/10/2014 - 15:18
कृ. पां. कुलकरणीलिखित आणि श्रीपद जोशी यांजकडून सुधारित मराठी व्युत्पत्तीकोशात बहुतेक सर्व मराठी शब्दांच्या व्युत्पत्ती आढळतात. पक्ष म्हणजे पंख, त्यावरून पक्षिन् म्हणजे पंख असलेला; पक्ष म्हणजे बाजू, त्यावरून हा पक्ष, तो पक्ष, (महिन्याचा) काळा पक्ष-शुक्ल पक्ष, वगैरे. किंवा पूर्वपक्ष-उत्तरपक्ष; छपराच्या दोन बाजू म्हणजे दोन पक्ष,पाख इ. पॉकेट हा उघड उघड परकीय शब्द आहे. त्याचे मूळ 'पक्ष'पर्यंत पोचेल असे वाटत नाही. स्वयंपाक मधला पाक हा पच् धातूवरून आलेला आहे. त्याचे कर्मणि भू.धा.वि. पक्व असे होते. मूळ अर्थ शिजवणे,हिंदीत पकाना. अनुषंगाने आलेला म्हणजे जठराग्नीने शिजवणे, मऊ करणे, पचवणे. त्यावरून पुढे दु:ख पचवणे, विष पचवणे वगैरे.

In reply to by राही

माहितगार 13/10/2014 - 15:36
पॉकेट हा उघड उघड परकीय शब्द आहे. त्याचे मूळ 'पक्ष'पर्यंत पोचेल असे वाटत नाही.
हम्म.. :) धागा पोस्ट केल्या नंतर पाकीटाची आपली व्युत्पत्ती गंडलीय हे माझ मलाही लक्षात आल होत. मग स्वत:ची चूक सावरण्यासाठी इंग्रजी शोध घेत होतो बराच वेळचा, सावरलं जाणार असं काय सापडल नै तरीपण बुडत्याला काडीचा आधार :) शोधण्याचा प्रयत्नात जे सापडलं ते खालील प्रमाणे : Meaning "small bag worn on the person, especially one sewn into a garment" is from early 15c. Sense in billiards is from 1754. Mining sense is attested from 1850; military sense of "area held by troops surrounded by the enemy" is from 1918; the general sense of "small area different than its surroundings" (1926) apparently was extended from the military use. Figuratively, "one's money" (conceived as being kept in a pocket) is from 1717. Pope Pokett (late 15c.) was figurative of the greedy and corrupt Church आणि अर्थातच आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद. अवांतरः कृ. पां. कुलकर्णींच पुस्तकं पुण्या मुंबईत मार्केटात शोधत काही वर्षांपुर्वी फिरलो होतो तेव्हा ते मिळाल नव्हतं श्रीपद जोशी यांजकडून सुधारित आवृत्ती कोणत्या वर्षीची आहे काही कल्पना असल्यास कळावे.

In reply to by राही

राही 13/10/2014 - 17:51
ते श्रीपाद जोशी आहेत, श्रीपद नव्हेत. टंकनात माझी चूक झाली. यांना जाऊनही अनेक वर्षे झाली. म्हणजे कोशसुधारणा ३५-४० वर्षांपूर्वीची असावी. मला ही जुनी प्रतच उपलब्ध असते. त्यामुळे या बाबतीत नव्याने कुणी काही केले आहे की काय याविषयी माहिती नाही. हा ग्रंथ प्रत्येक चांगल्या वाचनालयात असतोच असतो. याशिवाय यादवकालीन मराठीवर शं. गो. तुळपुळे आणि अ‍ॅन् फेल्ड्हाउस यांचा कोश अतिउत्तम आहे. या व्यतिरिक्तही ज्ञानेश्वरीची भाषा वगैरे अनेक कोश आहेत. सुदैवाने मराठीला अतिशय समृद्ध असे कोशवाङ्मय लाभलेले आहे. (ही सर्व माहिती धागाकर्त्यासाठी नाही. त्यांना हे माहीत असणारच.) जाता जाता : मोल्स्वर्थ प्रमाणे व्युत्पत्तीकोशही विकीवर यावा असे मनोमन वाटते.

In reply to by राही

माहितगार 13/10/2014 - 20:02
मराठी विकिपीडियावर कोशकारांच्या पुढील प्रमाणे नोंदी आढळल्या *कृ.पां. ऊर्फ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी (जन्म : इस्लामपूर-सांगली जिल्हा, जानेवारी ५, १८९२ - मृत्यू : मुंबई, जून १२, १९६४) *श्रीपाद रघुनाथ जोशी (जन्मदिनांक अज्ञात - सप्टेंबर २४ इ.स. २००२) यांचा जन्म दिनांक कुणास ठाऊक असल्यास हवा आहे. बुकगंगा डॉट कॉमच्या या दुव्यावर ग्रंथाची आवृत्ती विक्रीस उपलब्ध दिसते आहे. प्रत्यक्ष प्रती आहेत का ते त्यांना प्रत्यक्षच विचारावे लागेल असे वाटते. * पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन वर्ष १९४६ दुसरी १९६३, आणि तिसरी त्यानंतर केव्हातरी ( त्यावर प्रकाशन वर्ष मुद्रीत नाही १९७८?) प्रकाशित झाली असावी. या नंतरही विवीध विद्यापीठातून संशोधन झाले असणार त्यानुसार अद्ययावत माहिती आंतरजालावर यावयास हवी. असो.
मोल्स्वर्थ प्रमाणे व्युत्पत्तीकोशही विकीवर यावा असे मनोमन वाटते.
+१ सहमत, हे खरयं खास करून ज्ञानकोशांवर काम करणार्‍यांना हे साहाय्यभूत होऊ शकत. दोन्ही लेखन करण्यासाठी कोणत्याही गोष्टीची ऐतिहासीक पार्श्वभूमीची दखल घेण्यासाठी, दुसरे चपखल पारिभाषिक शब्द योजनेसाठीही मला शब्द व्युत्पत्ती समानार्थी शब्दांएवढ्याच उपयूक्त वाटतात. आणि भाषा अभ्यासकांना संशोधनासाठी खर म्हणजे विक्शनरीवरील वर्गीकरणांच्या सोईसारखी सोय नाही अर्थात हे सर्व पाझर तलाव बांधण्यास कुणी पुढे आलेतर चे आहे.

कंजूस 13/10/2014 - 15:49
एका गृहिणिच्या पाककौशल्याबद्दल विनोद आठवला "अहो अन्नपुर्णाबाई पाक किती तुमचा बरवा ,आतुनी तो कसा हिरवा ."

माहितगार 13/10/2014 - 16:40
http://www.ancientvedas.com/chapter/1/book/164/ या वेबसाईटवर पर्छामि असं रुप दिलय
पाकः पर्छामि मनसाविजानन देवानामेना निहिता पदानि
पाकः चा अर्थ त्यांनी Unripe असा केलेला दिसतो आहे Unripe in mind, in spirit undiscerning, I ask of these the Gods established places; - See more at: http://www.ancientvedas.com/chapter/1/book/164/#sthash.ahpti1dy.dpuf

माहितगार 13/10/2014 - 16:51
सवयं यजस्व दिवि देव देवान किं ते पाकः कर्णवदप्रचेताः | Worship, thyself, O God, the Gods in heaven: what, void of knowledge, shall the fool avail thee? - संदर्भ: http://www.ancientvedas.com/chapter/10/book/7/#sthash.oPKPMJeu.dpuf :येथे पाकः शब्दाचा अर्थ मला स्पष्ट होत नाहीए ! -अनभिज्ञ माहितगार

माहितगार 17/10/2014 - 16:01
युजानो हरिता रथे भूरि त्वष्टेह राजति । को विश्वाहा द्विषतः पक्ष आसत उतासीनेषु सूरिषु ॥१९॥ - ऋग्वेद: सूक्तं ६.४७
http://www.aryabharati.org/rugved/englrugved.asp?ln=en&bk=06&pt=a&pg=047 या अनुवादात पक्षचा अर्थ 'बाजू' side असा घेतला असे दिसते. यात महिन्यातील एक पक्ष असा अर्थ नसावा तरीही एकुण महत्वाचे म्हणजे 'पक्ष' शब्द ऋग्वेदात नाही असे धरून चाललो होतो ते चुकीचे होते असे दिसते.
अवयावांना अंग असा उल्लेख येतो. बसलेल्या व्यक्तीच्या मांडीचा वरचा भागास अंक म्हणतात संदर्भ. पंखड़ी असा शब्द हिंदीत फुलाच्या पाकळी साठी वापरला जातो पंकज हा शब्द विशीष्ट फुलासाठी वापरला जातो. पंकज हे फुल चिखलात/दलदलीत उगवत म्हणून पंक म्हणजे चिखल अथवा दलदल अशास्वरूपाची व्युत्पत्ती वाचण्यात येते पण पंख, पंखा आणि पंखडी हे शब्द पाहीले कि पंक म्हणजे चिख्खल हे स्विकारणे मला व्यक्तीशः जरा जड जाते.

पुणे ट्रॅफिक पोलिस .

किशोरअहिरे ·

रवीराज 13/10/2014 - 13:32
मला माहित आहे साधरणपणे १९९८ पासुन हा अंडरपास फक्त दुचाकी वाहनांसाठीच आहे. तसे फलक सुध्दा आहेत हा माझा रोजचा येण्या-जाण्याचा रस्ता आहे. तुमच्या बरोबर रिक्शावाल्यांनापण पकडले का?

काळा पहाड 13/10/2014 - 13:37
अहो तिथं बोल्ड मध्ये लिहिलंय की तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना प्रवेश नाही म्हणून. पेपरमध्ये पण बातम्या येत असतात सारख्या की इथले राजकारणी या बाबतीत सतत ढवळाढवळ करतात आणि पोलिसांना कामं करू देत नाहीत म्हणून. आता तुम्ही ते सकाळ नावाचं वृत्तपत्र वाचत असलात तर माहीत नाही. पण बहुतांशी सगळ्यांना माहीत आहे की हा अंडर ब्रिज फक्त दुचाकीसाठी आहे. तेव्हा पोलिसांनी जे केलं ते बरोबरच आहे.

In reply to by काळा पहाड

पोलिसांनी योग्य केले पण बोल्ण्यात नम्रता हवी की नको?. माजोरडेपणा उपयोगाचा नाही. अंडर ब्रिजवरून एखादा राष्ट्रवादीचा धटिंगण तुझी ती स्कॉर्पियो चालवत गेला तर तो पोलिस अडवेल काय?

सौंदाळा 13/10/2014 - 15:29
तो रस्ता फक्त दोन चाकीसाठी आहे.
येस्स तिकडुन हल्ली फार वेळा गेलो नाही तरी जेव्हा गेलो होतो तेव्हा तरी व्यवस्थित फलक होता. तिथुन सर्रास चार चाकी जात असतात. कधी तरी धाड पडतच असते. भाषेबाबत मात्र सहमत. आपल्याला उद्दामपणे कोणी अरे-तुरे केले तर मी सुध्दा समोरच्याचे वय वगैरे न बघता अरे-तुरे वर येतो.

मृत्युन्जय 13/10/2014 - 15:48
वाकडेवाडीचा पुलाखालील रस्ता दुचाकींसाठीच आहे. चारचाकी वाहनचालक वेळ वाचवण्यासाठी दामटुन तिथुन गाडी नेतात. पोलिस बर्‍याचवेळा दुर्लक्ष करतात. सध्या बहुधा टार्गेट पुर्ण करायचे असावे. बाकी पोलिसांच्या उर्मट भाषेबद्दल सहमत. सौजन्य फक्त दोने वर्षातुन एकदा जाहीर होणार्‍या सप्ताहातच जमले तर दाखवायचे असते अशी त्यांची समजूत असावी. त्यांचेही बरोबरच आहे म्हणा. खास असे सप्ताह आयोजित केल्यावर इतर दिवशी सौजन्या नाही दाखवले तरी चालेल अशी समजूत होणारच.

In reply to by मृत्युन्जय

आनन्दा 13/10/2014 - 16:04
थोडे करेक्शन - मधल्या काळात काही कारणाने तो चारचा़ईंसाठी चालू केलेला होता. बहुधा शिवाजीनगरच्या ग्रेड-सेपरटरच्या वेळेस. त्यामुळे तेव्हा लोआंना त्या पुलाखालून जायची सवय झाली आहे. बाकी त्या रस्त्याचा आकर पाहता मी थोडा वेळ लागला तरी बाहेरूनच जाणे पसंत करतो.

In reply to by आनन्दा

बबन ताम्बे 14/10/2014 - 18:09
तो भुयारी मार्ग तेथील एका मानानीयांच्या इच्छेमुळे चार चाकींसाठी चालू झाला होता. पण खुपच ट्राफीक जाम व्हायला लागल्यामुळे पोलिसांनी चार चाकींसाठी तो पुन्हा बंद केला.

जिन्क्स 13/10/2014 - 16:21
काळा पहाड यांच्याशी सहमत. पुण्यात जगजाहीर आहे की हा रस्ता फक्त फक्त दुचाकी वाहनांसाठीच आहे. तसे फलक सुध्दा आहेत. तसही चारचाकी अरामात बसेल एवढा रस्ताही नाही.

पण असाच आहे. दुचाकीला बंदी असल्याचा फलक इतर ४-८ फलकांबरोबर आहे, त्यामुळे गाडी चालवताना त्याकडे लक्ष जात नाही. शिवाय त्याचा आकार अंदाजे २*३ फूट आहे. तो काही नजरेत भरण्यासारखा नाही. एकदा पावती फाडल्याशिवाय तो नियम कळतसुद्धा नाही. (वाकडेवाडीचा फलक मात्र सहज दिसण्यासारखा आहे.)

बाबा पाटील 13/10/2014 - 20:24
तुम्ही पेपर वाचत नाही का हो ? अधुन मधुन वाचत जा ? कस आहे बाकी काही कळो न कळो पण आमच्या पुण्यातल्या रस्त्यांच्या वाहतुकीची माहिती तर मिळेल.

रामपुरी 14/10/2014 - 04:07
स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्या रस्त्यावरून चारचाकीला बंदी आहे. आणि लक्ष्यपूर्तीसाठी असे एकगठ्ठा पोलीस दिसणंही दुर्मिळ नाही. किंबहुना फक्त याच दिवसात प्रत्येक दंडाची पावती मिळते.

विटेकर 14/10/2014 - 16:15
तुमचे अभिनन्दन ! या भागात तुम्हाला ट्रयाफिक पोलिस दिसले ! रोज इतकी गर्दी असते त्या भागात , कुठे कडमडतात कोणास ठाऊक ? काल सयाजी समोर एक कंटेनर उलथला होता.. तीन तास जाम ! अशी चीड येते ...... उद्या सन्धी आहे ती चीड बाहेर काढण्याची !!

रवीराज 13/10/2014 - 13:32
मला माहित आहे साधरणपणे १९९८ पासुन हा अंडरपास फक्त दुचाकी वाहनांसाठीच आहे. तसे फलक सुध्दा आहेत हा माझा रोजचा येण्या-जाण्याचा रस्ता आहे. तुमच्या बरोबर रिक्शावाल्यांनापण पकडले का?

काळा पहाड 13/10/2014 - 13:37
अहो तिथं बोल्ड मध्ये लिहिलंय की तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना प्रवेश नाही म्हणून. पेपरमध्ये पण बातम्या येत असतात सारख्या की इथले राजकारणी या बाबतीत सतत ढवळाढवळ करतात आणि पोलिसांना कामं करू देत नाहीत म्हणून. आता तुम्ही ते सकाळ नावाचं वृत्तपत्र वाचत असलात तर माहीत नाही. पण बहुतांशी सगळ्यांना माहीत आहे की हा अंडर ब्रिज फक्त दुचाकीसाठी आहे. तेव्हा पोलिसांनी जे केलं ते बरोबरच आहे.

In reply to by काळा पहाड

पोलिसांनी योग्य केले पण बोल्ण्यात नम्रता हवी की नको?. माजोरडेपणा उपयोगाचा नाही. अंडर ब्रिजवरून एखादा राष्ट्रवादीचा धटिंगण तुझी ती स्कॉर्पियो चालवत गेला तर तो पोलिस अडवेल काय?

सौंदाळा 13/10/2014 - 15:29
तो रस्ता फक्त दोन चाकीसाठी आहे.
येस्स तिकडुन हल्ली फार वेळा गेलो नाही तरी जेव्हा गेलो होतो तेव्हा तरी व्यवस्थित फलक होता. तिथुन सर्रास चार चाकी जात असतात. कधी तरी धाड पडतच असते. भाषेबाबत मात्र सहमत. आपल्याला उद्दामपणे कोणी अरे-तुरे केले तर मी सुध्दा समोरच्याचे वय वगैरे न बघता अरे-तुरे वर येतो.

मृत्युन्जय 13/10/2014 - 15:48
वाकडेवाडीचा पुलाखालील रस्ता दुचाकींसाठीच आहे. चारचाकी वाहनचालक वेळ वाचवण्यासाठी दामटुन तिथुन गाडी नेतात. पोलिस बर्‍याचवेळा दुर्लक्ष करतात. सध्या बहुधा टार्गेट पुर्ण करायचे असावे. बाकी पोलिसांच्या उर्मट भाषेबद्दल सहमत. सौजन्य फक्त दोने वर्षातुन एकदा जाहीर होणार्‍या सप्ताहातच जमले तर दाखवायचे असते अशी त्यांची समजूत असावी. त्यांचेही बरोबरच आहे म्हणा. खास असे सप्ताह आयोजित केल्यावर इतर दिवशी सौजन्या नाही दाखवले तरी चालेल अशी समजूत होणारच.

In reply to by मृत्युन्जय

आनन्दा 13/10/2014 - 16:04
थोडे करेक्शन - मधल्या काळात काही कारणाने तो चारचा़ईंसाठी चालू केलेला होता. बहुधा शिवाजीनगरच्या ग्रेड-सेपरटरच्या वेळेस. त्यामुळे तेव्हा लोआंना त्या पुलाखालून जायची सवय झाली आहे. बाकी त्या रस्त्याचा आकर पाहता मी थोडा वेळ लागला तरी बाहेरूनच जाणे पसंत करतो.

In reply to by आनन्दा

बबन ताम्बे 14/10/2014 - 18:09
तो भुयारी मार्ग तेथील एका मानानीयांच्या इच्छेमुळे चार चाकींसाठी चालू झाला होता. पण खुपच ट्राफीक जाम व्हायला लागल्यामुळे पोलिसांनी चार चाकींसाठी तो पुन्हा बंद केला.

जिन्क्स 13/10/2014 - 16:21
काळा पहाड यांच्याशी सहमत. पुण्यात जगजाहीर आहे की हा रस्ता फक्त फक्त दुचाकी वाहनांसाठीच आहे. तसे फलक सुध्दा आहेत. तसही चारचाकी अरामात बसेल एवढा रस्ताही नाही.

पण असाच आहे. दुचाकीला बंदी असल्याचा फलक इतर ४-८ फलकांबरोबर आहे, त्यामुळे गाडी चालवताना त्याकडे लक्ष जात नाही. शिवाय त्याचा आकार अंदाजे २*३ फूट आहे. तो काही नजरेत भरण्यासारखा नाही. एकदा पावती फाडल्याशिवाय तो नियम कळतसुद्धा नाही. (वाकडेवाडीचा फलक मात्र सहज दिसण्यासारखा आहे.)

बाबा पाटील 13/10/2014 - 20:24
तुम्ही पेपर वाचत नाही का हो ? अधुन मधुन वाचत जा ? कस आहे बाकी काही कळो न कळो पण आमच्या पुण्यातल्या रस्त्यांच्या वाहतुकीची माहिती तर मिळेल.

रामपुरी 14/10/2014 - 04:07
स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्या रस्त्यावरून चारचाकीला बंदी आहे. आणि लक्ष्यपूर्तीसाठी असे एकगठ्ठा पोलीस दिसणंही दुर्मिळ नाही. किंबहुना फक्त याच दिवसात प्रत्येक दंडाची पावती मिळते.

विटेकर 14/10/2014 - 16:15
तुमचे अभिनन्दन ! या भागात तुम्हाला ट्रयाफिक पोलिस दिसले ! रोज इतकी गर्दी असते त्या भागात , कुठे कडमडतात कोणास ठाऊक ? काल सयाजी समोर एक कंटेनर उलथला होता.. तीन तास जाम ! अशी चीड येते ...... उद्या सन्धी आहे ती चीड बाहेर काढण्याची !!
लेखनविषय:
लेखनप्रकार
कालचा अनुभव .. अत्यंत लाजिरवाना/संतापजनक आणी जनतेला कसे लिगली लुटावे ह्याचा घेतलेला हा अनुभव आभार पुणे ट्रॅफिक पोलिस . काल दिवाळी शॉपींग साठी म्हनुन कार घेऊन निघालो .. नेहमी प्रमाणे जुन्या मुंबई - पूणे हायवे ला वाकडेवाडि कडुन एक अंडर ब्रिज आहे .. तिकडुन कार काढली तर समोर साक्षात १०-१५ ट्रॅफिक पोलिस ऊभे कमीत कमी २० कार / ४ चाकी आडवुन ऊभे .. पावत्या फाडायला.. (ईतके पोलिस सोडा एक पोलिस सुध्दा कधी संध्याकाळि भव्य ट्रॅफिक जाम असतो तेंव्हा तर दिसत सुध्दा नाही ) मला पण आडवुन .. पोलिसः "ए चल लायसन काढ (अरेराविपनाने बोलत..) " (ह्याना नीट का बोलता येत नाही) मी: "लायसन हातात दिले..

मोझाम्बिकची निवडणूक: २

आतिवास ·

एस 13/10/2014 - 14:09
कोणताही एक जाहीरनामा वाचला तर या देशाचे एकतर्फी चित्र समोर येते. पण दोन्ही वाचले की या देशाने आजवर काय कमावले आहे याचा अंदाज येतो आणि पुढची वाटचाल किती कठीण आहे- याचाही अंदाज येतो. प्रत्यक्ष मतदानाला आता फक्त तीन दिवस बाकी आहेत. बघू किती मतदान होते आणि काय निकाल लागतो ते!
अचूक विश्लेषण. या देशाच्या लोकशाहीला शुभेच्छा!

बहुगुणी 14/10/2014 - 23:55
उत्सुकता वाढलीये, अजून दोन दिवसांनी पुन्हा फॉलो अप घेणार (महाराष्ट्राच्या निवडणुकांबरोबरच!). श्रीरंग्_जोशींनी म्हंटल्याप्रमाणे 'नेहमीच्या माध्यमांमध्ये फारशी दखल घेतली जात नसलेल्या देशाबद्दल वाचायला मिळत आहे' त्याबद्दल धन्यवाद!

एस 13/10/2014 - 14:09
कोणताही एक जाहीरनामा वाचला तर या देशाचे एकतर्फी चित्र समोर येते. पण दोन्ही वाचले की या देशाने आजवर काय कमावले आहे याचा अंदाज येतो आणि पुढची वाटचाल किती कठीण आहे- याचाही अंदाज येतो. प्रत्यक्ष मतदानाला आता फक्त तीन दिवस बाकी आहेत. बघू किती मतदान होते आणि काय निकाल लागतो ते!
अचूक विश्लेषण. या देशाच्या लोकशाहीला शुभेच्छा!

बहुगुणी 14/10/2014 - 23:55
उत्सुकता वाढलीये, अजून दोन दिवसांनी पुन्हा फॉलो अप घेणार (महाराष्ट्राच्या निवडणुकांबरोबरच!). श्रीरंग्_जोशींनी म्हंटल्याप्रमाणे 'नेहमीच्या माध्यमांमध्ये फारशी दखल घेतली जात नसलेल्या देशाबद्दल वाचायला मिळत आहे' त्याबद्दल धन्यवाद!
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग १ 5 सप्टेंबर रोजी झालेल्या 'शांती करारा'बद्दल लिहायचं होतं खरं; पण काही कारणांनी ते जमलं नाही. आता त्याबद्दल लिहायचं तर बराच उशिर झालाय. आता निवडणूक झाल्यावर त्याबद्दल कदाचित लिहिता येईल - म्हणजे या कराराचा निवडणुकीवर नेमका काय परिणाम झाला हा माझ्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे; आणि दुसरं म्हणजे निवडणूक झाल्यावर हा 'शांती करार' टिकेल की पुन्हा एका नव्या संघर्षाची सुरुवात होईल ते पाहायला हवं. मी आधीच्या लेखात लिहिल्यानुसार इथं लोक 'पक्षाला' किती मतं मिळतात ते महत्त्वाचं आहे.

वो नही जानते की वफ़ा क्या है

मारवा ·

प्रसाद१९७१ 13/10/2014 - 12:10
राजकीय निष्ठा- राजकीय नेता वा पक्ष या प्रति असलेल्या निष्ठा बघा. औरंगाबाद च्या सभेत कुमारवयीन नेते आदित्य ठाकरेंचे चरणस्पर्श करुन ठाकरे घराण्याप्रति आपली निष्ठा व्यक्त करणारे ज्येष्ठ नेते खासदार खैरे
ह्याला "निष्ठा" म्हणत नाही हो. हा फक्त उघडा नागडा "स्वार्थ" आहे.

असंका 13/10/2014 - 16:16
मागे आपण राष्ट्रवाद यावर लिहिलं होतंत. आज निष्ठा. मला आश्चर्य वाटतं की ह्याच दोन शब्दांनी मलाही कायम कोड्यात टाकलेलं आहे. माझ्याप्रमाणेच कोड्यात पडलेले कुणी आहे-(किंवा नाही- आपण आपल्यापुरतं कोडं सोडवलेलं दिसतंय) हे कळल्यावर नाही म्हणलं तरी जरा बरं वाटलं. निष्ठा हा शब्द विचार करण्यासारखा आहे, यात आपले आणि माझे एकमत. शिवाय प्रत्येक गोष्ट विचार करून पारखून घ्यावी यावर आपल्याप्रमाणेच माझीही निष्ठा आहे. पण आपले निष्कर्श मी मान्य करू शकत नाही. निदान ज्या पद्धतीने आपण मांडला आहे, त्या पद्धतीने तरी! अति सर्वत्र वर्जयेत. अतिरेक हा नेहेमीच वाइट. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती नकोशी होते, म्हणजे मुळात ती गोष्टच नकोशी होते असे आपले म्हणणे आहे का? कारण आपण जी उदाहरणे दिली आहेत ती सर्व अतिरेकी पद्धतीची आहेत. आपण स्वतःही अतिरेकी निष्ठा असे शब्द वर वापरलेले आहेत. बंधनाबद्द्लही तेच. अतिरेकी बंधनं वाइट. आता एखादा म्हणेल की रस्त्याच्या डाव्याच बाजुने गाडी चालवायचं तरी बंधन कशाला हवं, मग? मुळात बंधनं पाळणारे हे जनसामान्य असतात. असामान्य क्षमतेचे लोक वेळीच सर्व बंधनं ओळखून त्यांना पार करायला बघतात, त्यामुळेच तर ती असामान्य होतात. आपले सर्व आक्षेप हे ह्या गोष्टींच्या अतिरेकाविरुद्धचे दिसताहेत. त्यामुळे आपला लेख मुलभूत होऊ शकलेला नाही. मुळात आपण निष्कर्श सुरुवातीस मांडल्यामुळे असं वाटत रहातं की आपण हे सर्व गृहित धरून त्याला साजेशी उदाहरणे शोधत आहात, किंवा पूर्वग्रहदुषित आहात. तसे आपण आहात की नाहीत हे आपणच चांगले ठरवू शकता, पण असं वाटतं हे मात्र खरं.

In reply to by असंका

आनन्दा 13/10/2014 - 18:59
आपले सर्व आक्षेप हे ह्या गोष्टींच्या अतिरेकाविरुद्धचे दिसताहेत. त्यामुळे आपला लेख मुलभूत होऊ शकलेला नाही. मुळात आपण निष्कर्श सुरुवातीस मांडल्यामुळे असं वाटत रहातं की आपण हे सर्व गृहित धरून त्याला साजेशी उदाहरणे शोधत आहात, किंवा पूर्वग्रहदुषित आहात. तसे आपण आहात की नाहीत हे आपणच चांगले ठरवू शकता, पण असं वाटतं हे मात्र खरं.
त्यांनी आपली निष्ठा निष्ठेच्या विरुद्ध वाहिली आहे असे दिसतेय..

In reply to by असंका

मारवा 13/10/2014 - 20:01
मी निष्कर्श अगोदर मांडले व नंतर उदाहरणे दिली म्हणुन माझ्या विचारांचा आरंभ हा पुर्वनिश्चीत निष्कर्शांपासुन होत आहे अस जर आपल्याला वाटत असेल तर ते तसे वाटण्यात गैर नाही. कारण मी लेखाची एक गरज एक रीत म्हणुन असे ठरवले की अगोदर सुत्र मांडतो मग उदाहरण. पण मी आपल्यास खात्रीने सांगु शकतो की जरी असे लेखात असले तरी प्रत्यक्षात तसा क्रम नाही. तुमच्या मांडणीत एक व्याकुळता जाणवते की कशातच निष्ठा नाही ठेवायची तर मग कसे चालेल? पण मला त्या अगोदर त्याची त्या मुल्याची तपासणी होणे अगत्याचे वाटते. आणि व्याकुळता वाईट च का मानावी नेहमी. उलट आत्मसंतुष्टी ची भिती वाटावयास हवी. अस आहे बघा अकाउंट चा एक नियम सांगतो नॉमिनल अकाउंटचा की डेबीट द एक्सपेन्सेस अ‍ॅंड लॉसेस क्रेडीट द इनकम अ‍ॅन्ड गेन्स. पण जीवनावर हा नियम लाउन बघितला तर काय दिसते ? डेबीट प्रत्येक डेबीट प्रत्येक केलेला खर्च आपल्याला आनंद च देत नाही का ? सिनेमा बघण्यासाठी , कार घेण्यासाठी, हॉटॅल मध्ये खाण्यासाठी केलेला प्रत्येक डेबीट हा आपला खर पाहता गेन च नसतो का आनंदाचा गेन नाही होत का ? मग हट्टाने आपण अकाउंटचाच नियम जिवनाला लाउ लागलो तर तो वर्क करत नाही त्यात एरर येते. तसे आपल्या प्रोग्र्मिंग मधील एरर काढणे शोधणे आपले कर्तव्य नाही का ? आपली मुल्ये आपली विचारसरणी तपासणे हे व्याकुळतेच्या च प्रेरणेने घडुन येत असते ना ? त्यात काय कचरायचे भिडायला हव आपण जे काय संचित ताकत आहे आपल्या कडे त्याच्या सहाय्याने मी असा विचार करतो आपल्याला काय वाटते ?

In reply to by मारवा

असंका 16/10/2014 - 11:58
आपण वर जे काही लिहिले आहे ते आणि माझा प्रतिसाद याचा एकमेकांशी काय संबंध आहे? लिहिण्यातला 'नेमकेपणा' या मुल्याविषयी आपले काय मत आहे? तेही बंधनकारक आणि सर्जनशीलतेला जखडणारे नकारात्मक मुल्य आहे का? माझे असे म्हणणे आहे, की निष्ठा योग्य की अयोग्य हा विचार करण्यासारखा विषय आहेच! पण त्यासाठी केवळ अतिरेकी उदाहरणे देऊन या विषयाचा निकाल लावता येणार नाही. सर्व प्रकारची उदाहरणे घ्यावी लागतील. खाली संक्षी सर म्हणतात तसे, जर बंधन नसेल तर कुणाचा पायपोस कुणाच्या पायात रहाणार नाही. त्यामुळे बंधन आवश्यक तर आहेच. तसेच निष्ठाही आवश्यक आहे. प्रगतीसाठी संस्था जर आवश्यक असतील, आणि जर संस्थेतल्या प्रत्येकामध्ये संस्थेबद्द्ल निष्ठेचा अभाव असेल, तर अशी संस्था कुठल्या दिशेने जात असेल? एकंदरीत समाजाची अशा वेळी प्रगती होत असेल की अधोगती? आपली उदाहरणे अतिरेकी नसून सर्वसमावेशक आहेत असे आपल्याला वाटते का? वर आपल्या प्रतिसादात एक वाक्य आहे-
तुमच्या मांडणीत एक व्याकुळता जाणवते की कशातच निष्ठा नाही ठेवायची तर मग कसे चालेल? पण मला त्या अगोदर त्याची त्या मुल्याची तपासणी होणे अगत्याचे वाटते.
(ते व्याकुळता वगैरे जाऊ दे. तो मुद्दा नाहीये.) माझ्या प्रतिसादात मी पण हेच तर म्हणतोय.-
निष्ठा हा शब्द विचार करण्यासारखा आहे, यात आपले आणि माझे एकमत. शिवाय प्रत्येक गोष्ट विचार करून पारखून घ्यावी यावर आपल्याप्रमाणेच माझीही निष्ठा आहे.
म्हणजे इथे खरं तर आपले एकमत होत आहे, पण आपला सूर असा आहे की आपण मला विरोध करत आहात. तसे नको साहेब. मी या विषयावर विचार करायला तयार आहे. फक्त आपण थोडे मुद्देसूपणे पुढे या.

निष्ठा चा साधा अर्थ कमीटमंट असा आहे. कमीटमंट हे एका अर्थानं बंधन आहे आणि त्यामुळे विकल्पावर बंधनं येतात हे नक्की. पण निष्ठेशिवाय (प्रथम चरणात), `मानसिक एकसंधता' असंभव आहे आणि हे प्रत्येक क्षेत्रात लागू आहे. उदाहरणार्थ, कोणत्याही कलेत किंवा आध्यात्मात सुरुवात एकाच गुरु पासून करावी लागते, लग्नात एका व्यक्तीशी एकनिष्ठ राहिले नाही, तर त्या नात्याला अर्थच उरत नाही. जसजशी प्रगल्भता वाढते तशी निष्ठा (पत्नीचा अपवाद वगळता) १८० अंशाचं वळण घेते. व्यक्ती स्वतःशी एकनिष्ठ होते. याचा अर्थ ती एककल्ली होते असा नाही, तर `स्वतःच्या विचाराप्रती प्रामाणिक राहून' इतर विकल्पांच्या संभावनांचा वेध घेते. उदाहरणार्थ, एकदा गाणं आत्मसात झाल्यावर(च) व्यक्ती, इतर घराणी किंवा दिग्गजांच्या गायकीचा वेध घेऊ शकते आणि जेजे भावेल ते स्वतःच्या गायकीत समाविष्ट करुन घेऊ शकते. याचा अर्थ ती स्वत:च्या गुरुला डावलते असा नाही तर, व्यक्तीपेक्षा सुद्धा `गायकी' महत्त्वाची होते. आणि अशी व्यक्तीच संगीताला नवं परिमाण देऊ शकते. आध्यात्मात तर याही पेक्षा अलौकिक प्रकार घडतो. एकदा सत्य गवसल्यावर मूळ गुरुप्रती कृतज्ञता तर दृढ होतेच (कारण गुरुमुळेच तर उलगडा झालेला असतो), पण इतर ज्ञानीपुरुष देखिल तेच सत्य किती विविधांगांनी मांडतायंत याची प्रचिती येते. ओशो म्हणतात, `ग्रंथ पढनेका असली मजा तो, सत्य समझनेके बाद ही आता है! जैसे की एक दिया हो और उसे रंगबिरंगे कागज़ोंमे लिपटा हो. उजाला तो एक ही है, लेकिन हर ग्यानीका उसे जतानेका अंदाज़ अलग अलग है'| थोडक्यात, सुरुवात निष्ठेनं होते (कारण निष्ठेशिवाय दिशा नाही) आणि मग तिचं रुपांतर सर्वसमावशकतेत होतं. मात्र निष्ठा हा जर प्रेस्टीज पॉइंट झाला तर (तुम्ही म्हटल्याप्रमाणे) ती, व्यक्तीच्या संभावना संपवते. _____________________________ तुमच्या मांडणीच्या बाबतीत एक गोष्ट सांगाविशी वाटते. `बेअर फॅक्ट्स' प्रती निष्ठेला दुसरा पर्याय नाही. उदाहरणार्थ, अकौंटींगचे तीन नियम. हे नियम लावल्याशिवाय अकौंटींग होणंच असंभव आहे. ते नियम रोजच्या जगण्याला जसेच्यातसे लावता येत नाहीत कारण ते जगण्याचे नियम नाहीत, `अकौंटींग' या शास्त्राचे आहेत. ग़ालिबच्या या ओळी : हमको उनसे वफ़ाकी है उम्मीद, जो नही जानते वफा़ क्या है, प्रेयसीच्या संदर्भात आहेत. आणि प्रेयसी, प्रियकराला `हो' म्हणत नाही, त्याला (इतरांबरोबर) झुलवत ठेवते हाच तर उर्दू शायरीचा प्राण आहे. जर ती एकाच प्रियकराशी राजी झाली तर त्यांचं लग्न होईल आणि शायरी संपेल! या उलट पती-पत्नी एकमेकांशी एकनिष्ठ नसले तर विवाहच टिकणार नाही. आपत्य नक्की कुणाची? हा बेसिक प्रश्न निर्माण होउन आणि कुटुंबसंस्थेचा बाजा वाजेल. जगात अनौरस आपत्यांचं काहूर माजेल. थोडक्यात, निष्ठेला निश्चित मूल्य आहे. जीवनाच्या विविध डायमेन्शन्समधे ते कसं वापरायचं हा व्यक्तीगत प्रगल्भतेचा भाग आहे.

मारवा 15/10/2014 - 00:36
उदाहरणार्थ, कोणत्याही कलेत किंवा आध्यात्मात सुरुवात एकाच गुरु पासून करावी लागते, अध्यात्मात किंवा कलेत गुरु ची गरज का लागावी. किंवा कोणत्याही गोष्टी त ? समजा एक नविन वाद्य आहे जसे मोहनवीणा जिचा शोध विश्वमोहन भट्ट यांनी लावला किंवा सितार जिचा शोध वा निर्मीती अमिर खुसरो ने केली.. कींवा नोएटीक्स ही नवी कोरी शास्त्र शाखा. असे असेल तर अमिर खुसरो ला गुरु ची गरज लागेल का ? कुठे ना कुठे प्रत्येक शाखेची शास्त्राची कधी ना कधी कोणी ना कोणी इंडीव्हीज्युअल च सुरुवात करत असतो. त्यातील एक एक माइलस्टोन्स ही एक एक च माणुस ठेवत असतो. म्हणजे थोडा व्यावहारीक फायदा आहे. एक एक शाखा विकसीत होत होत अनेक वर्षांचा शतकाचा कालावधी जाउ शकतो मग मोठा डेटा मोठ स्कील प्रोसिजर्स विकसीत होतात. एक एक्सपर्ट असेल गुरु असेल तर तो गाईड तुमची बरीच एनर्जी वेळ वाचवुन तुम्हाला नेमक काय हव देउ शकतो. मात्र हा व्यावहारीक भाग झाला, गुरु असावाच अशी गरज मुलभुत आहे का? जे जे नविन निर्माण वा शोध केला जातो त्यात जिथे प्युअर निर्मीती असते तिथे गुरु काय शिकविणार ? त़्ंत्र फार तर. हा एक भाग दुसरा मुद्दा असा की ठीक आहे व्यावहारीक बाबींसाठी गुरु केला तर मात्र जिथे स्टेक्स अधिक मोठे आहेत अशा जिवनाच्या आकलनासाठी तात्विक शोधासाठी श्रेयस शोधण्यासाठी गुरु करण योग्य आहे का ? नाही इथे तुम्हाला स्वतःच शोध घेण आवश्यक आहे. ठेचकाळत पडत धडत का होइना तुम्हाला इथे उधार कस काय कामात येईल तुमचा क्रुस तुम्हाला वाहण भाग आहे. रेडीमेड उत्तरे मिळतील पण ती तुमची आंतरीक तहान कशी शमवणार ? अजुन एक जर तुम्ही अगोदरच कनफ्युज्ड आहात अगोदरच विचलीत आहात तर तुम्ही योग्य गुरु कसा शोधु शकणार ? तुमचि निवड ही चुकीची च असणार नाही का ? तुम्ही तुम्हाला हवा असलेला दिलासा च नाही का शोधणार ? आणि ते संबंध तुमच्यात कसे असतील सहज संबध असु शकतात ? म्हणजे असे की उदा. तुम्ही एका नविन शहरात गेलात एखाद्या रस्त्याने जात असलेल्या स्थानिक माणसाला तुम्ही रस्ता विचारला अगदी सहज त्याने ही तुम्हाला अगदी सहज पटकन उत्तर दिले की असे असे जा. तुम्ही त्याला धन्यवाद देता तो हसुन मागे न बघता पुढे निघुन जातो. यात त्याने तुम्हाला मार्गदर्शन केलेले असते. तुम्हाला माहीत नसलेला रस्ता दाखवुन तो निघुन जातो. तुम्ही त्याच्या विषयी व तो तुमच्याविषयी कुठलाही विचार तरंग ही माग न ठेवता आपापल्या रस्त्याला लागतात. आता इथे गोष्ट साधी होती शिकण्याची पण जर स्टेक्स मोठे आले आता तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अतिशय महत्वपुर्ण बाब शिकायची आहे इ. इ. मग वरील प्रमाणे सर्व घडेल का ? घडु शकते का इतका सहज गुरु आणि शिष्य (गंडा आदि काही च न बांधता एकमेकाशी रीलेट होउ शकतात का ?)] स्व-शोधा त गैर काय ? तुम्ही ज्या ओशों ना कोट केल त्यांनी तर कोणताही प्रचलित गुरु केला नाही. प्रत्येक बाब स्वतः तपासुन बघितली कुठलीही श्रद्दा ब्लाइंडली स्वीकारली नाही. आयुष्यभर एक्सपेरीमेंटल असे ते राहीले. बुद्ध स्वतः ६ वर्षे शोध घेत होते. जे जे महान पुरुष होउन गेले त्यांनी स्व-शोध स्व्-संघर्ष स्व्-अनुभवाने सत्य शोधले किंव नवनिर्मीती केली. खरच कोणी कोणाला काहीही शिकवु शकतो का ? सर्व च प्रश्नांची उत्तरे अंतिम मिळालीच पाहीजे असा अट्टहास ही का असावा ?

In reply to by मारवा

पैसा 15/10/2014 - 09:38
गेल्या काही दिवसांत तुमचे प्रतिसाद वाचते आहे. ग्रेस, कविता, दुर्बोधता या निमिताने आणि इथेही आलेले. चांगलं लिहिताय. अनेक गोष्टीत मूलभूत विचार करताय हे जाणवलं. छान! मात्र शक्य झालं तर लिखाणात जरा सोपेपणा आणि सुसूत्रता आणता आली तर बघा. म्हणजे तुम्ही काय म्हणताय त्याचा विपर्यास होणार नाही. पूर्वीच्या काही धाग्यांवर असं झालं असावं असं आता विचार केल्यावर वाटतंय.

In reply to by पैसा

मारवा 15/10/2014 - 11:31
आपल्या सुचना पुर्णपणे पटल्या मला असेच आणखी काही जणांकडुन सुचवण्यात आले. सुसुत्रता साधण्याचा प्रयत्न करतो. मार्मिक सुचनेसाठी मनापासुन धन्यवाद !

In reply to by मारवा

प्रसाद१९७१ 15/10/2014 - 10:03
सर्व च प्रश्नांची उत्तरे अंतिम मिळालीच पाहीजे असा अट्टहास ही का असावा ?
अंतिम उत्तर वगैरे भंपक पणा आहे. मिळालेले उत्त्तर अंतिम आहे का नाही हे कोण ठरवणार? @ मारवा - तुम्ही भारंभार लिहीत आहात पण एक तर त्यात नुस्ताच पसारा आणि शब्दांचा फुलोरा आहे. नक्की काय म्हणायचे आहे ते कळतच नाही. पुन्हा इतके मोठे लिहुन त्यात प्रश्नच आहेत, तुमचे मत काय ते सांगा.
जे महान पुरुष होउन गेले त्यांनी स्व-शोध स्व्-संघर्ष स्व्-अनुभवाने सत्य शोधले
सत्य शोधले म्हणजे काय? का त्यांना जे पटले त्याला त्यांनी सत्य म्हणले? तेच सत्य होते कशावरुन? फारच सरधोपट विचार करत आहात.

In reply to by प्रसाद१९७१

मारवा 15/10/2014 - 11:38
प्रसाद भाउ तुझ म्हणण शंभर टक्के मान्य आहे बाबा. ते स्टेटमेंटच आहे यात शंकाच नाही. माझा मुद्दा ठसवण्यासाठी सहज थोड मॅनिप्युलेट करुन तो शेर वापरला इतकच. ( मला थोड टायटल भडक करायची खोड च आहे रे काय करु पण याने मी नेहमीच अडचणीत येतो तरी जित्याची खोड काही जात नाही ) तु म्हणतोस तस ते खुपतय हे ही खरय पण मिसळ पाव वर एकदा लिहीलेल संपादीत कस कराव मला खरच माही नाही. तरी संपादकांना नम्र विनंती करतो की तो प्रश्नचिन्ह काढुन टाकावा म्हणजे माझ्या ही डोक्यावरच ओझ उतरेल प्रसाद भाउ आता तुम्ही आणि संपादक काय ते बघुन घ्या बर तु

In reply to by मारवा

अध्यात्मात किंवा कलेत गुरु ची गरज का लागावी. किंवा कोणत्याही गोष्टी त ?
याचं साधं कारण असं की कुणी तरी आधीच बेसिक गोष्टी शोधून ठेवल्यात आणि त्या वर्षानुवर्ष वेरिफाय झाल्यात. तस्मात, पुन्हा त्याच गोष्टी शोधण्यात साधकाचा (किंवा कलाकाराचे) वेळ आणि श्रम वाया जात नाहीत. उदाहरणार्थ, स्वर आणि त्यांचं माधुर्य, त्यांचे एकमेकांशी मेळ यावर आधीच मेहेनत घेतली आहे. शरीरशास्त्राचा आधीच प्रगाढ आभ्यास झालायं, आता पुन्हा नव्यानं बेसिक्स करण्यात अर्थ नाही. तस्मात, प्रथम चरणात गुरु आणि त्याप्रती निष्ठा अनिवार्य आहेत. _________________________ दुसरी गोष्ट, गुरुची निवड जो तो त्याच्या कुवतीनुसार करणार हे उघड आहे. पण मुळातच समज कमी असेल (तुम्ही म्हणता तशी कन्फ्युज्ड व्यक्ती असेल) तर अदरवाइज सुद्धा तिच्याकडून काही अलौकिक होण्याची शक्यता नाही. सो स्टेबिलिटी इज प्रायमरी. तिचा आणि `गुरु न करण्याचा' संबंध नाही. ____________________________
जर स्टेक्स मोठे आले आता तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अतिशय महत्वपुर्ण बाब शिकायची आहे इ. इ. मग वरील प्रमाणे सर्व घडेल का ?
अर्थात. सर्वात ज्यास्त स्टेक्स आध्यात्मात आहेत आणि तिथे गुरुची निवड निर्णायक ठरते. ओशोंनी रुढार्थानं गुरु केला नाही असं जरी असलं तरी त्यांचं वाचन अफाट होतं. आज सुद्धा आश्रमात त्यांनी वाचलेली सुमारे एक-दीड लाख पुस्तकं, त्यांच्या समाधीच्या पूर्वकक्षात जतन करुन ठेवली आहेत. ते ग्रंथच त्यांचे गुरु ठरले आहेत. ओशोंचा (आणि त्यांच्या साधनांचा) तर मी इतका सखोल आभ्यास केलायं (जवळजवळ सलग सहा वर्ष) की त्यांचं एकही पुस्तक वाचायचं राहिलेलं नाही. शिवाय खुद्द कम्युनची माझ्याकडे लाईफ मेंमबरशिप आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती इतक्या व्यासंगानं आणि अनेकविध विषयांवर भाष्य `स्वतःच्या प्रयत्नांनी' करणं अशक्य आहे हे सिद्ध झालंय. _____________________________
स्व-शोधा त गैर काय ?.....खरच कोणी कोणाला काहीही शिकवु शकतो का ?
तुम्हाला म्हणायचंय, सगळं (पहिल्यापासनं) स्वतःच शोधण्यात काय गैर आहे? याविषयी सुरुवातीला सांगितलंय. __________________________________
सर्व च प्रश्नांची उत्तरे अंतिम मिळालीच पाहीजे असा अट्टहास ही का असावा ?
हा प्रश्न कुठे आहे? आवडीच्या विषयाचा व्यासंग करता यावा, त्यासाठी गुरु असावा, आणि गुरुप्रती निष्ठा असावी. एकदा विषयात पारंगत झालो की नवनिर्मितीची संभावना निर्माण होते,

मारवा 15/10/2014 - 00:50
He who is in the grip of doubt and meaninglessness can not liberate himself from this grip; But he asks for an answer which is valid within it and not outside the situation of his despair. He asks for an ultimate foundation. of what we have called the "Courage of Despair "

प्रसाद१९७१ 13/10/2014 - 12:10
राजकीय निष्ठा- राजकीय नेता वा पक्ष या प्रति असलेल्या निष्ठा बघा. औरंगाबाद च्या सभेत कुमारवयीन नेते आदित्य ठाकरेंचे चरणस्पर्श करुन ठाकरे घराण्याप्रति आपली निष्ठा व्यक्त करणारे ज्येष्ठ नेते खासदार खैरे
ह्याला "निष्ठा" म्हणत नाही हो. हा फक्त उघडा नागडा "स्वार्थ" आहे.

असंका 13/10/2014 - 16:16
मागे आपण राष्ट्रवाद यावर लिहिलं होतंत. आज निष्ठा. मला आश्चर्य वाटतं की ह्याच दोन शब्दांनी मलाही कायम कोड्यात टाकलेलं आहे. माझ्याप्रमाणेच कोड्यात पडलेले कुणी आहे-(किंवा नाही- आपण आपल्यापुरतं कोडं सोडवलेलं दिसतंय) हे कळल्यावर नाही म्हणलं तरी जरा बरं वाटलं. निष्ठा हा शब्द विचार करण्यासारखा आहे, यात आपले आणि माझे एकमत. शिवाय प्रत्येक गोष्ट विचार करून पारखून घ्यावी यावर आपल्याप्रमाणेच माझीही निष्ठा आहे. पण आपले निष्कर्श मी मान्य करू शकत नाही. निदान ज्या पद्धतीने आपण मांडला आहे, त्या पद्धतीने तरी! अति सर्वत्र वर्जयेत. अतिरेक हा नेहेमीच वाइट. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती नकोशी होते, म्हणजे मुळात ती गोष्टच नकोशी होते असे आपले म्हणणे आहे का? कारण आपण जी उदाहरणे दिली आहेत ती सर्व अतिरेकी पद्धतीची आहेत. आपण स्वतःही अतिरेकी निष्ठा असे शब्द वर वापरलेले आहेत. बंधनाबद्द्लही तेच. अतिरेकी बंधनं वाइट. आता एखादा म्हणेल की रस्त्याच्या डाव्याच बाजुने गाडी चालवायचं तरी बंधन कशाला हवं, मग? मुळात बंधनं पाळणारे हे जनसामान्य असतात. असामान्य क्षमतेचे लोक वेळीच सर्व बंधनं ओळखून त्यांना पार करायला बघतात, त्यामुळेच तर ती असामान्य होतात. आपले सर्व आक्षेप हे ह्या गोष्टींच्या अतिरेकाविरुद्धचे दिसताहेत. त्यामुळे आपला लेख मुलभूत होऊ शकलेला नाही. मुळात आपण निष्कर्श सुरुवातीस मांडल्यामुळे असं वाटत रहातं की आपण हे सर्व गृहित धरून त्याला साजेशी उदाहरणे शोधत आहात, किंवा पूर्वग्रहदुषित आहात. तसे आपण आहात की नाहीत हे आपणच चांगले ठरवू शकता, पण असं वाटतं हे मात्र खरं.

In reply to by असंका

आनन्दा 13/10/2014 - 18:59
आपले सर्व आक्षेप हे ह्या गोष्टींच्या अतिरेकाविरुद्धचे दिसताहेत. त्यामुळे आपला लेख मुलभूत होऊ शकलेला नाही. मुळात आपण निष्कर्श सुरुवातीस मांडल्यामुळे असं वाटत रहातं की आपण हे सर्व गृहित धरून त्याला साजेशी उदाहरणे शोधत आहात, किंवा पूर्वग्रहदुषित आहात. तसे आपण आहात की नाहीत हे आपणच चांगले ठरवू शकता, पण असं वाटतं हे मात्र खरं.
त्यांनी आपली निष्ठा निष्ठेच्या विरुद्ध वाहिली आहे असे दिसतेय..

In reply to by असंका

मारवा 13/10/2014 - 20:01
मी निष्कर्श अगोदर मांडले व नंतर उदाहरणे दिली म्हणुन माझ्या विचारांचा आरंभ हा पुर्वनिश्चीत निष्कर्शांपासुन होत आहे अस जर आपल्याला वाटत असेल तर ते तसे वाटण्यात गैर नाही. कारण मी लेखाची एक गरज एक रीत म्हणुन असे ठरवले की अगोदर सुत्र मांडतो मग उदाहरण. पण मी आपल्यास खात्रीने सांगु शकतो की जरी असे लेखात असले तरी प्रत्यक्षात तसा क्रम नाही. तुमच्या मांडणीत एक व्याकुळता जाणवते की कशातच निष्ठा नाही ठेवायची तर मग कसे चालेल? पण मला त्या अगोदर त्याची त्या मुल्याची तपासणी होणे अगत्याचे वाटते. आणि व्याकुळता वाईट च का मानावी नेहमी. उलट आत्मसंतुष्टी ची भिती वाटावयास हवी. अस आहे बघा अकाउंट चा एक नियम सांगतो नॉमिनल अकाउंटचा की डेबीट द एक्सपेन्सेस अ‍ॅंड लॉसेस क्रेडीट द इनकम अ‍ॅन्ड गेन्स. पण जीवनावर हा नियम लाउन बघितला तर काय दिसते ? डेबीट प्रत्येक डेबीट प्रत्येक केलेला खर्च आपल्याला आनंद च देत नाही का ? सिनेमा बघण्यासाठी , कार घेण्यासाठी, हॉटॅल मध्ये खाण्यासाठी केलेला प्रत्येक डेबीट हा आपला खर पाहता गेन च नसतो का आनंदाचा गेन नाही होत का ? मग हट्टाने आपण अकाउंटचाच नियम जिवनाला लाउ लागलो तर तो वर्क करत नाही त्यात एरर येते. तसे आपल्या प्रोग्र्मिंग मधील एरर काढणे शोधणे आपले कर्तव्य नाही का ? आपली मुल्ये आपली विचारसरणी तपासणे हे व्याकुळतेच्या च प्रेरणेने घडुन येत असते ना ? त्यात काय कचरायचे भिडायला हव आपण जे काय संचित ताकत आहे आपल्या कडे त्याच्या सहाय्याने मी असा विचार करतो आपल्याला काय वाटते ?

In reply to by मारवा

असंका 16/10/2014 - 11:58
आपण वर जे काही लिहिले आहे ते आणि माझा प्रतिसाद याचा एकमेकांशी काय संबंध आहे? लिहिण्यातला 'नेमकेपणा' या मुल्याविषयी आपले काय मत आहे? तेही बंधनकारक आणि सर्जनशीलतेला जखडणारे नकारात्मक मुल्य आहे का? माझे असे म्हणणे आहे, की निष्ठा योग्य की अयोग्य हा विचार करण्यासारखा विषय आहेच! पण त्यासाठी केवळ अतिरेकी उदाहरणे देऊन या विषयाचा निकाल लावता येणार नाही. सर्व प्रकारची उदाहरणे घ्यावी लागतील. खाली संक्षी सर म्हणतात तसे, जर बंधन नसेल तर कुणाचा पायपोस कुणाच्या पायात रहाणार नाही. त्यामुळे बंधन आवश्यक तर आहेच. तसेच निष्ठाही आवश्यक आहे. प्रगतीसाठी संस्था जर आवश्यक असतील, आणि जर संस्थेतल्या प्रत्येकामध्ये संस्थेबद्द्ल निष्ठेचा अभाव असेल, तर अशी संस्था कुठल्या दिशेने जात असेल? एकंदरीत समाजाची अशा वेळी प्रगती होत असेल की अधोगती? आपली उदाहरणे अतिरेकी नसून सर्वसमावेशक आहेत असे आपल्याला वाटते का? वर आपल्या प्रतिसादात एक वाक्य आहे-
तुमच्या मांडणीत एक व्याकुळता जाणवते की कशातच निष्ठा नाही ठेवायची तर मग कसे चालेल? पण मला त्या अगोदर त्याची त्या मुल्याची तपासणी होणे अगत्याचे वाटते.
(ते व्याकुळता वगैरे जाऊ दे. तो मुद्दा नाहीये.) माझ्या प्रतिसादात मी पण हेच तर म्हणतोय.-
निष्ठा हा शब्द विचार करण्यासारखा आहे, यात आपले आणि माझे एकमत. शिवाय प्रत्येक गोष्ट विचार करून पारखून घ्यावी यावर आपल्याप्रमाणेच माझीही निष्ठा आहे.
म्हणजे इथे खरं तर आपले एकमत होत आहे, पण आपला सूर असा आहे की आपण मला विरोध करत आहात. तसे नको साहेब. मी या विषयावर विचार करायला तयार आहे. फक्त आपण थोडे मुद्देसूपणे पुढे या.

निष्ठा चा साधा अर्थ कमीटमंट असा आहे. कमीटमंट हे एका अर्थानं बंधन आहे आणि त्यामुळे विकल्पावर बंधनं येतात हे नक्की. पण निष्ठेशिवाय (प्रथम चरणात), `मानसिक एकसंधता' असंभव आहे आणि हे प्रत्येक क्षेत्रात लागू आहे. उदाहरणार्थ, कोणत्याही कलेत किंवा आध्यात्मात सुरुवात एकाच गुरु पासून करावी लागते, लग्नात एका व्यक्तीशी एकनिष्ठ राहिले नाही, तर त्या नात्याला अर्थच उरत नाही. जसजशी प्रगल्भता वाढते तशी निष्ठा (पत्नीचा अपवाद वगळता) १८० अंशाचं वळण घेते. व्यक्ती स्वतःशी एकनिष्ठ होते. याचा अर्थ ती एककल्ली होते असा नाही, तर `स्वतःच्या विचाराप्रती प्रामाणिक राहून' इतर विकल्पांच्या संभावनांचा वेध घेते. उदाहरणार्थ, एकदा गाणं आत्मसात झाल्यावर(च) व्यक्ती, इतर घराणी किंवा दिग्गजांच्या गायकीचा वेध घेऊ शकते आणि जेजे भावेल ते स्वतःच्या गायकीत समाविष्ट करुन घेऊ शकते. याचा अर्थ ती स्वत:च्या गुरुला डावलते असा नाही तर, व्यक्तीपेक्षा सुद्धा `गायकी' महत्त्वाची होते. आणि अशी व्यक्तीच संगीताला नवं परिमाण देऊ शकते. आध्यात्मात तर याही पेक्षा अलौकिक प्रकार घडतो. एकदा सत्य गवसल्यावर मूळ गुरुप्रती कृतज्ञता तर दृढ होतेच (कारण गुरुमुळेच तर उलगडा झालेला असतो), पण इतर ज्ञानीपुरुष देखिल तेच सत्य किती विविधांगांनी मांडतायंत याची प्रचिती येते. ओशो म्हणतात, `ग्रंथ पढनेका असली मजा तो, सत्य समझनेके बाद ही आता है! जैसे की एक दिया हो और उसे रंगबिरंगे कागज़ोंमे लिपटा हो. उजाला तो एक ही है, लेकिन हर ग्यानीका उसे जतानेका अंदाज़ अलग अलग है'| थोडक्यात, सुरुवात निष्ठेनं होते (कारण निष्ठेशिवाय दिशा नाही) आणि मग तिचं रुपांतर सर्वसमावशकतेत होतं. मात्र निष्ठा हा जर प्रेस्टीज पॉइंट झाला तर (तुम्ही म्हटल्याप्रमाणे) ती, व्यक्तीच्या संभावना संपवते. _____________________________ तुमच्या मांडणीच्या बाबतीत एक गोष्ट सांगाविशी वाटते. `बेअर फॅक्ट्स' प्रती निष्ठेला दुसरा पर्याय नाही. उदाहरणार्थ, अकौंटींगचे तीन नियम. हे नियम लावल्याशिवाय अकौंटींग होणंच असंभव आहे. ते नियम रोजच्या जगण्याला जसेच्यातसे लावता येत नाहीत कारण ते जगण्याचे नियम नाहीत, `अकौंटींग' या शास्त्राचे आहेत. ग़ालिबच्या या ओळी : हमको उनसे वफ़ाकी है उम्मीद, जो नही जानते वफा़ क्या है, प्रेयसीच्या संदर्भात आहेत. आणि प्रेयसी, प्रियकराला `हो' म्हणत नाही, त्याला (इतरांबरोबर) झुलवत ठेवते हाच तर उर्दू शायरीचा प्राण आहे. जर ती एकाच प्रियकराशी राजी झाली तर त्यांचं लग्न होईल आणि शायरी संपेल! या उलट पती-पत्नी एकमेकांशी एकनिष्ठ नसले तर विवाहच टिकणार नाही. आपत्य नक्की कुणाची? हा बेसिक प्रश्न निर्माण होउन आणि कुटुंबसंस्थेचा बाजा वाजेल. जगात अनौरस आपत्यांचं काहूर माजेल. थोडक्यात, निष्ठेला निश्चित मूल्य आहे. जीवनाच्या विविध डायमेन्शन्समधे ते कसं वापरायचं हा व्यक्तीगत प्रगल्भतेचा भाग आहे.

मारवा 15/10/2014 - 00:36
उदाहरणार्थ, कोणत्याही कलेत किंवा आध्यात्मात सुरुवात एकाच गुरु पासून करावी लागते, अध्यात्मात किंवा कलेत गुरु ची गरज का लागावी. किंवा कोणत्याही गोष्टी त ? समजा एक नविन वाद्य आहे जसे मोहनवीणा जिचा शोध विश्वमोहन भट्ट यांनी लावला किंवा सितार जिचा शोध वा निर्मीती अमिर खुसरो ने केली.. कींवा नोएटीक्स ही नवी कोरी शास्त्र शाखा. असे असेल तर अमिर खुसरो ला गुरु ची गरज लागेल का ? कुठे ना कुठे प्रत्येक शाखेची शास्त्राची कधी ना कधी कोणी ना कोणी इंडीव्हीज्युअल च सुरुवात करत असतो. त्यातील एक एक माइलस्टोन्स ही एक एक च माणुस ठेवत असतो. म्हणजे थोडा व्यावहारीक फायदा आहे. एक एक शाखा विकसीत होत होत अनेक वर्षांचा शतकाचा कालावधी जाउ शकतो मग मोठा डेटा मोठ स्कील प्रोसिजर्स विकसीत होतात. एक एक्सपर्ट असेल गुरु असेल तर तो गाईड तुमची बरीच एनर्जी वेळ वाचवुन तुम्हाला नेमक काय हव देउ शकतो. मात्र हा व्यावहारीक भाग झाला, गुरु असावाच अशी गरज मुलभुत आहे का? जे जे नविन निर्माण वा शोध केला जातो त्यात जिथे प्युअर निर्मीती असते तिथे गुरु काय शिकविणार ? त़्ंत्र फार तर. हा एक भाग दुसरा मुद्दा असा की ठीक आहे व्यावहारीक बाबींसाठी गुरु केला तर मात्र जिथे स्टेक्स अधिक मोठे आहेत अशा जिवनाच्या आकलनासाठी तात्विक शोधासाठी श्रेयस शोधण्यासाठी गुरु करण योग्य आहे का ? नाही इथे तुम्हाला स्वतःच शोध घेण आवश्यक आहे. ठेचकाळत पडत धडत का होइना तुम्हाला इथे उधार कस काय कामात येईल तुमचा क्रुस तुम्हाला वाहण भाग आहे. रेडीमेड उत्तरे मिळतील पण ती तुमची आंतरीक तहान कशी शमवणार ? अजुन एक जर तुम्ही अगोदरच कनफ्युज्ड आहात अगोदरच विचलीत आहात तर तुम्ही योग्य गुरु कसा शोधु शकणार ? तुमचि निवड ही चुकीची च असणार नाही का ? तुम्ही तुम्हाला हवा असलेला दिलासा च नाही का शोधणार ? आणि ते संबंध तुमच्यात कसे असतील सहज संबध असु शकतात ? म्हणजे असे की उदा. तुम्ही एका नविन शहरात गेलात एखाद्या रस्त्याने जात असलेल्या स्थानिक माणसाला तुम्ही रस्ता विचारला अगदी सहज त्याने ही तुम्हाला अगदी सहज पटकन उत्तर दिले की असे असे जा. तुम्ही त्याला धन्यवाद देता तो हसुन मागे न बघता पुढे निघुन जातो. यात त्याने तुम्हाला मार्गदर्शन केलेले असते. तुम्हाला माहीत नसलेला रस्ता दाखवुन तो निघुन जातो. तुम्ही त्याच्या विषयी व तो तुमच्याविषयी कुठलाही विचार तरंग ही माग न ठेवता आपापल्या रस्त्याला लागतात. आता इथे गोष्ट साधी होती शिकण्याची पण जर स्टेक्स मोठे आले आता तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अतिशय महत्वपुर्ण बाब शिकायची आहे इ. इ. मग वरील प्रमाणे सर्व घडेल का ? घडु शकते का इतका सहज गुरु आणि शिष्य (गंडा आदि काही च न बांधता एकमेकाशी रीलेट होउ शकतात का ?)] स्व-शोधा त गैर काय ? तुम्ही ज्या ओशों ना कोट केल त्यांनी तर कोणताही प्रचलित गुरु केला नाही. प्रत्येक बाब स्वतः तपासुन बघितली कुठलीही श्रद्दा ब्लाइंडली स्वीकारली नाही. आयुष्यभर एक्सपेरीमेंटल असे ते राहीले. बुद्ध स्वतः ६ वर्षे शोध घेत होते. जे जे महान पुरुष होउन गेले त्यांनी स्व-शोध स्व्-संघर्ष स्व्-अनुभवाने सत्य शोधले किंव नवनिर्मीती केली. खरच कोणी कोणाला काहीही शिकवु शकतो का ? सर्व च प्रश्नांची उत्तरे अंतिम मिळालीच पाहीजे असा अट्टहास ही का असावा ?

In reply to by मारवा

पैसा 15/10/2014 - 09:38
गेल्या काही दिवसांत तुमचे प्रतिसाद वाचते आहे. ग्रेस, कविता, दुर्बोधता या निमिताने आणि इथेही आलेले. चांगलं लिहिताय. अनेक गोष्टीत मूलभूत विचार करताय हे जाणवलं. छान! मात्र शक्य झालं तर लिखाणात जरा सोपेपणा आणि सुसूत्रता आणता आली तर बघा. म्हणजे तुम्ही काय म्हणताय त्याचा विपर्यास होणार नाही. पूर्वीच्या काही धाग्यांवर असं झालं असावं असं आता विचार केल्यावर वाटतंय.

In reply to by पैसा

मारवा 15/10/2014 - 11:31
आपल्या सुचना पुर्णपणे पटल्या मला असेच आणखी काही जणांकडुन सुचवण्यात आले. सुसुत्रता साधण्याचा प्रयत्न करतो. मार्मिक सुचनेसाठी मनापासुन धन्यवाद !

In reply to by मारवा

प्रसाद१९७१ 15/10/2014 - 10:03
सर्व च प्रश्नांची उत्तरे अंतिम मिळालीच पाहीजे असा अट्टहास ही का असावा ?
अंतिम उत्तर वगैरे भंपक पणा आहे. मिळालेले उत्त्तर अंतिम आहे का नाही हे कोण ठरवणार? @ मारवा - तुम्ही भारंभार लिहीत आहात पण एक तर त्यात नुस्ताच पसारा आणि शब्दांचा फुलोरा आहे. नक्की काय म्हणायचे आहे ते कळतच नाही. पुन्हा इतके मोठे लिहुन त्यात प्रश्नच आहेत, तुमचे मत काय ते सांगा.
जे महान पुरुष होउन गेले त्यांनी स्व-शोध स्व्-संघर्ष स्व्-अनुभवाने सत्य शोधले
सत्य शोधले म्हणजे काय? का त्यांना जे पटले त्याला त्यांनी सत्य म्हणले? तेच सत्य होते कशावरुन? फारच सरधोपट विचार करत आहात.

In reply to by प्रसाद१९७१

मारवा 15/10/2014 - 11:38
प्रसाद भाउ तुझ म्हणण शंभर टक्के मान्य आहे बाबा. ते स्टेटमेंटच आहे यात शंकाच नाही. माझा मुद्दा ठसवण्यासाठी सहज थोड मॅनिप्युलेट करुन तो शेर वापरला इतकच. ( मला थोड टायटल भडक करायची खोड च आहे रे काय करु पण याने मी नेहमीच अडचणीत येतो तरी जित्याची खोड काही जात नाही ) तु म्हणतोस तस ते खुपतय हे ही खरय पण मिसळ पाव वर एकदा लिहीलेल संपादीत कस कराव मला खरच माही नाही. तरी संपादकांना नम्र विनंती करतो की तो प्रश्नचिन्ह काढुन टाकावा म्हणजे माझ्या ही डोक्यावरच ओझ उतरेल प्रसाद भाउ आता तुम्ही आणि संपादक काय ते बघुन घ्या बर तु

In reply to by मारवा

अध्यात्मात किंवा कलेत गुरु ची गरज का लागावी. किंवा कोणत्याही गोष्टी त ?
याचं साधं कारण असं की कुणी तरी आधीच बेसिक गोष्टी शोधून ठेवल्यात आणि त्या वर्षानुवर्ष वेरिफाय झाल्यात. तस्मात, पुन्हा त्याच गोष्टी शोधण्यात साधकाचा (किंवा कलाकाराचे) वेळ आणि श्रम वाया जात नाहीत. उदाहरणार्थ, स्वर आणि त्यांचं माधुर्य, त्यांचे एकमेकांशी मेळ यावर आधीच मेहेनत घेतली आहे. शरीरशास्त्राचा आधीच प्रगाढ आभ्यास झालायं, आता पुन्हा नव्यानं बेसिक्स करण्यात अर्थ नाही. तस्मात, प्रथम चरणात गुरु आणि त्याप्रती निष्ठा अनिवार्य आहेत. _________________________ दुसरी गोष्ट, गुरुची निवड जो तो त्याच्या कुवतीनुसार करणार हे उघड आहे. पण मुळातच समज कमी असेल (तुम्ही म्हणता तशी कन्फ्युज्ड व्यक्ती असेल) तर अदरवाइज सुद्धा तिच्याकडून काही अलौकिक होण्याची शक्यता नाही. सो स्टेबिलिटी इज प्रायमरी. तिचा आणि `गुरु न करण्याचा' संबंध नाही. ____________________________
जर स्टेक्स मोठे आले आता तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अतिशय महत्वपुर्ण बाब शिकायची आहे इ. इ. मग वरील प्रमाणे सर्व घडेल का ?
अर्थात. सर्वात ज्यास्त स्टेक्स आध्यात्मात आहेत आणि तिथे गुरुची निवड निर्णायक ठरते. ओशोंनी रुढार्थानं गुरु केला नाही असं जरी असलं तरी त्यांचं वाचन अफाट होतं. आज सुद्धा आश्रमात त्यांनी वाचलेली सुमारे एक-दीड लाख पुस्तकं, त्यांच्या समाधीच्या पूर्वकक्षात जतन करुन ठेवली आहेत. ते ग्रंथच त्यांचे गुरु ठरले आहेत. ओशोंचा (आणि त्यांच्या साधनांचा) तर मी इतका सखोल आभ्यास केलायं (जवळजवळ सलग सहा वर्ष) की त्यांचं एकही पुस्तक वाचायचं राहिलेलं नाही. शिवाय खुद्द कम्युनची माझ्याकडे लाईफ मेंमबरशिप आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती इतक्या व्यासंगानं आणि अनेकविध विषयांवर भाष्य `स्वतःच्या प्रयत्नांनी' करणं अशक्य आहे हे सिद्ध झालंय. _____________________________
स्व-शोधा त गैर काय ?.....खरच कोणी कोणाला काहीही शिकवु शकतो का ?
तुम्हाला म्हणायचंय, सगळं (पहिल्यापासनं) स्वतःच शोधण्यात काय गैर आहे? याविषयी सुरुवातीला सांगितलंय. __________________________________
सर्व च प्रश्नांची उत्तरे अंतिम मिळालीच पाहीजे असा अट्टहास ही का असावा ?
हा प्रश्न कुठे आहे? आवडीच्या विषयाचा व्यासंग करता यावा, त्यासाठी गुरु असावा, आणि गुरुप्रती निष्ठा असावी. एकदा विषयात पारंगत झालो की नवनिर्मितीची संभावना निर्माण होते,

मारवा 15/10/2014 - 00:50
He who is in the grip of doubt and meaninglessness can not liberate himself from this grip; But he asks for an answer which is valid within it and not outside the situation of his despair. He asks for an ultimate foundation. of what we have called the "Courage of Despair "
हमको है जिनसे वफ़ा की उम्मीद वो नही जानते की वफ़ा क्या है ? ( गालिब ) निष्ठा हे एक प्राचीन मानवी मुल्य आहे म्हणजे मानवाने निर्माण केलेले मुल्य या अर्थाने. निष्ठा या मुल्याला सर्वसाधारणपणे उदात्त श्रेष्ठ असे मानवी मुल्य समजले जाते.. सध्या सर्व समाजात मुल्यांची घसरण होत आहे अशा नेहमीच्या तक्रारी त जी काय मुल्ये अपेक्षीत असतात त्यात निष्ठा हे एक प्रमुख मुल्य असते. या मुल्याची तटस्थ अभिनिवेशरहीत चिकीत्सा केल्यास आपल्याला या मुल्याचा अर्थ अधिक व्यापकतेने लक्षात येतो तर निष्ठा म्हणजे नेमके काय ?

पुनःप्रकाशितः गुणामामा

पिवळा डांबिस ·

इरसाल 13/10/2014 - 12:11
कमीत कमी जुने का होईना पण वाचायला मिळाले हे कमी नाही. बरं ते मागच्या विनंत्यांचे काय झाले.

सौंदाळा 13/10/2014 - 12:12
मस्तच. तुम्ही लिहीलेल्या सगळ्या गावातुन बर्‍याचदा गेलो आहे. सुरुवातीला वाटल पिलारला जाउन पार्सल देताना गुणामामा काहीतरी मज्जा करकरणार. एकंदरीत खुप धमाल आली गुणामामाची करामत वाचुन. मासळीमधे माझे सदस्यनाम आल्यामुळे तुम्हाला पेश्शल धन्यवाद. देव करो आणि लवकरच तुम्हाला कोकणचा सौंदाळा, मुडदुशे, शतकं खायला मिळो ;)

एस 13/10/2014 - 12:14
परवाच पुन्हा एकदा वाचले होते. मस्त. आता नवे काहीतरी लिहा इथे. प्रतिसाद देण्यासाठी आवर्जून लॉगइन करावे असे लेख कमी असतात. हा त्यातला एक.

जेपी 13/10/2014 - 12:30
असच बोलतो. दोन दिसापुर्वी खव उचकत फिरत असताना मनतंरग सापडल आन आज पुर्नवाचनाचा आनंद मिळाला. ह्यो लेख आवडला.

रसाळ कोंकणी (गोव्याची) भाषा, मायेने ओतप्रोत गणगोत आणि वाक्यावाक्याला उत्कंठा वाढवणारे, माशांच्या कालवणाच्या वर्णानाने तोंडास पाणी आणणारे धावते कथानक (काजू फेणी आवडत नाही). लेखकाबरोबर प्रत्यक्ष त्यांच्या आजोळात फिरुन आल्याचा अप्रतिम आनंद झाला. अभिनंदन.

शिद 13/10/2014 - 14:01
मस्तच लेख. आवडला.
"रोज आमी गाववाले तांबडो विडो बनवतोंव, आज तुमचो मुंबईकरांचो पिवळो विडो!!! जा, तुझ्या आजोबाक नेऊन दी!!!"
=)) कृपया लेखणी आता थांबवू नका. और आने दो.

मदनबाण 13/10/2014 - 14:13
सुरेख ! फार आवडले ! :) आपले राज्यकर्ते सुक्काळिचे दिल्लीवाले!! तेंका समुद्राचा महत्त्व काय माहिती?" जबराट ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण

आदूबाळ 13/10/2014 - 21:27
जबरीच की हो! एक खऊट सूचना करू का? उद्गारचिह्नांचा अतिवापर खटकला. टाळलं तर चार चांद आणखी लागतील.

In reply to by बहुगुणी

नंदन 14/10/2014 - 23:17
आधी वाचलं होतंच, पुन्हा वाचून तितकाच आनंद मिळाला, धन्यवाद!
तंतोतंत! बाकी गोव्यातून महाराष्ट्रात येताना सीमेवर, मुंबयला जाणार्‍या लक्झरी गाड्या थांबवून दारूतपासणी होत असे ते आठवलं.

प्यारे१ 14/10/2014 - 01:54
मालवणी की कोंकणी काय असेल ती समजत नसली तरी प्रत्यक्ष चित्र उभं राहीलं. खूपच छान लिहीलंय. आरामात -सुशेगात वाचायचं म्हणून येगलं ठेवलेलं. सार्थ ठरलं. नवं नवं लिहा की पिडां मालक.

किसन शिंदे 14/10/2014 - 03:04
अप्रतिम उतरलंय व्यक्तिचित्र, पहिल्यांदाच वाचलं. गुणामामासोबत, ते गाव, तो मासळी बाजार सगळं अगदी डोळ्यासमोर उभं राह्यलं. भाषाही फार रसाळ!!

पहाटवारा 14/10/2014 - 05:45
आधीहि वाचले होते .. आता परत फुरसतीने वाचले, चाखत चाखत ! पिडांकाकां, येत र्‍हावा बाबानू बोर्डांवरं.. -पहाटवारा

In reply to by पिलीयन रायडर

दिपक.कुवेत 14/10/2014 - 14:32
हो अगदि बरोब्बर...शीव्या घातल्या तरी त्या कानांना गोड वाटतात. ईनफॅक्ट शीव्यांमधे पण एक आपूलकि जाणवते.

In reply to by दिपक.कुवेत

सूड 14/10/2014 - 14:48
तात्पुरती कोकणी शिकायला हे, हे आणि हे वाचा...आणि क्लासेस पुन्हा सुरु करायचा जोरदार आग्रह करा. ;)

In reply to by सूड

बॅटमॅन 14/10/2014 - 15:02
अन त्याचबरोबर मालवणी आणि कोकणी यातला फरक सोदाहरण स्पष्ट करा किंवा तसे करणारा एखादा धागा काढा असे सुचवतो. कोकणी ही मराठीची बोलीभाषा नसून स्वतंत्र भाषा आहे हे माहितीये. पण मालवणी ही बोली की भाषा? बरे ते एक असो, किमान मालवणी अन कोकणी या दोन व्हर्जनमधला फरक नक्की कसा ते सांगा अशी रिक्वेष्ट हाय.

In reply to by पैसा

नंदन 14/10/2014 - 23:14
इलियडचा पुढचे भाग लवकरात लवकर लिहिण्याचे कबूल केल्याशिवाय बॅटमॅन यांना कोणतेही भाषाविषयक लेखन वाचायला देऊ नये, अशी मी संपादक मंडळाला विनंती करतो! :)

चिगो 15/10/2014 - 16:54
पिडांकाका, खुप सुंदर व्यक्तिचित्रण.. अगदी पुलंच्या "पिकल्या फणसासारखी माणसं ही.."चे प्रत्यय देणारं..

इरसाल 13/10/2014 - 12:11
कमीत कमी जुने का होईना पण वाचायला मिळाले हे कमी नाही. बरं ते मागच्या विनंत्यांचे काय झाले.

सौंदाळा 13/10/2014 - 12:12
मस्तच. तुम्ही लिहीलेल्या सगळ्या गावातुन बर्‍याचदा गेलो आहे. सुरुवातीला वाटल पिलारला जाउन पार्सल देताना गुणामामा काहीतरी मज्जा करकरणार. एकंदरीत खुप धमाल आली गुणामामाची करामत वाचुन. मासळीमधे माझे सदस्यनाम आल्यामुळे तुम्हाला पेश्शल धन्यवाद. देव करो आणि लवकरच तुम्हाला कोकणचा सौंदाळा, मुडदुशे, शतकं खायला मिळो ;)

एस 13/10/2014 - 12:14
परवाच पुन्हा एकदा वाचले होते. मस्त. आता नवे काहीतरी लिहा इथे. प्रतिसाद देण्यासाठी आवर्जून लॉगइन करावे असे लेख कमी असतात. हा त्यातला एक.

जेपी 13/10/2014 - 12:30
असच बोलतो. दोन दिसापुर्वी खव उचकत फिरत असताना मनतंरग सापडल आन आज पुर्नवाचनाचा आनंद मिळाला. ह्यो लेख आवडला.

रसाळ कोंकणी (गोव्याची) भाषा, मायेने ओतप्रोत गणगोत आणि वाक्यावाक्याला उत्कंठा वाढवणारे, माशांच्या कालवणाच्या वर्णानाने तोंडास पाणी आणणारे धावते कथानक (काजू फेणी आवडत नाही). लेखकाबरोबर प्रत्यक्ष त्यांच्या आजोळात फिरुन आल्याचा अप्रतिम आनंद झाला. अभिनंदन.

शिद 13/10/2014 - 14:01
मस्तच लेख. आवडला.
"रोज आमी गाववाले तांबडो विडो बनवतोंव, आज तुमचो मुंबईकरांचो पिवळो विडो!!! जा, तुझ्या आजोबाक नेऊन दी!!!"
=)) कृपया लेखणी आता थांबवू नका. और आने दो.

मदनबाण 13/10/2014 - 14:13
सुरेख ! फार आवडले ! :) आपले राज्यकर्ते सुक्काळिचे दिल्लीवाले!! तेंका समुद्राचा महत्त्व काय माहिती?" जबराट ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण

आदूबाळ 13/10/2014 - 21:27
जबरीच की हो! एक खऊट सूचना करू का? उद्गारचिह्नांचा अतिवापर खटकला. टाळलं तर चार चांद आणखी लागतील.

In reply to by बहुगुणी

नंदन 14/10/2014 - 23:17
आधी वाचलं होतंच, पुन्हा वाचून तितकाच आनंद मिळाला, धन्यवाद!
तंतोतंत! बाकी गोव्यातून महाराष्ट्रात येताना सीमेवर, मुंबयला जाणार्‍या लक्झरी गाड्या थांबवून दारूतपासणी होत असे ते आठवलं.

प्यारे१ 14/10/2014 - 01:54
मालवणी की कोंकणी काय असेल ती समजत नसली तरी प्रत्यक्ष चित्र उभं राहीलं. खूपच छान लिहीलंय. आरामात -सुशेगात वाचायचं म्हणून येगलं ठेवलेलं. सार्थ ठरलं. नवं नवं लिहा की पिडां मालक.

किसन शिंदे 14/10/2014 - 03:04
अप्रतिम उतरलंय व्यक्तिचित्र, पहिल्यांदाच वाचलं. गुणामामासोबत, ते गाव, तो मासळी बाजार सगळं अगदी डोळ्यासमोर उभं राह्यलं. भाषाही फार रसाळ!!

पहाटवारा 14/10/2014 - 05:45
आधीहि वाचले होते .. आता परत फुरसतीने वाचले, चाखत चाखत ! पिडांकाकां, येत र्‍हावा बाबानू बोर्डांवरं.. -पहाटवारा

In reply to by पिलीयन रायडर

दिपक.कुवेत 14/10/2014 - 14:32
हो अगदि बरोब्बर...शीव्या घातल्या तरी त्या कानांना गोड वाटतात. ईनफॅक्ट शीव्यांमधे पण एक आपूलकि जाणवते.

In reply to by दिपक.कुवेत

सूड 14/10/2014 - 14:48
तात्पुरती कोकणी शिकायला हे, हे आणि हे वाचा...आणि क्लासेस पुन्हा सुरु करायचा जोरदार आग्रह करा. ;)

In reply to by सूड

बॅटमॅन 14/10/2014 - 15:02
अन त्याचबरोबर मालवणी आणि कोकणी यातला फरक सोदाहरण स्पष्ट करा किंवा तसे करणारा एखादा धागा काढा असे सुचवतो. कोकणी ही मराठीची बोलीभाषा नसून स्वतंत्र भाषा आहे हे माहितीये. पण मालवणी ही बोली की भाषा? बरे ते एक असो, किमान मालवणी अन कोकणी या दोन व्हर्जनमधला फरक नक्की कसा ते सांगा अशी रिक्वेष्ट हाय.

In reply to by पैसा

नंदन 14/10/2014 - 23:14
इलियडचा पुढचे भाग लवकरात लवकर लिहिण्याचे कबूल केल्याशिवाय बॅटमॅन यांना कोणतेही भाषाविषयक लेखन वाचायला देऊ नये, अशी मी संपादक मंडळाला विनंती करतो! :)

चिगो 15/10/2014 - 16:54
पिडांकाका, खुप सुंदर व्यक्तिचित्रण.. अगदी पुलंच्या "पिकल्या फणसासारखी माणसं ही.."चे प्रत्यय देणारं..
लेखनविषय:
लेखनप्रकार
(डिस्क्लेमर: काही काळापूर्वी अन्य एक संकेतस्थळ नवीनच जन्माला आलं असतांना त्या स्थळाला शुभेच्छा म्हणून हे व्यक्तिचित्र तिथे प्रसिद्ध केलं होतं. पण त्या स्थळाला दुर्दैवाने म्ह्णावी तितकी लोकप्रियता लाभली नाही. मध्ये बराच काळ ते स्थळ बंदच होतं, आता सुरू झालंय. पण मला तिथे जुन्या पानांत हे व्यक्तिचित्र आढळलं नाही, कदाचित डीलीट केलं गेलं असावं. त्यावर कडी म्हणजे मला आता त्या स्थळावर लॉग-इन देखील करता येत नाही. दुर्दैव! मुद्दा असा की हे व्यक्तिचित्र तिथे प्रकाशित केलं होतं.

मतदान करा...

डॉ सुहास म्हात्रे ·

एस 13/10/2014 - 14:12
'नोटा' वापरल्यास वरील 'दोष' येईल काय हो? ;-)

In reply to by एस

मराठीतल्या (पैश्याच्या) 'नोटा' असल्यास दोष येईलच, पण तो कायदेशीर गुन्हाही आहे !!! :) 'नोटा' (NOTA) हा इंग्लिशमधला पर्याय उपलब्ध असल्यास आणि तो वापरल्यास ते वैध मतदान होईल... आणि अर्थातच दोषरहीत असेल !  8)

हाडक्या 13/10/2014 - 16:04
आम्ही दर निवडणुकीत मतदान करतो. आमचे आई-वडिल पण करतात. तरीपण आमच्या सातार्‍यात राजेशाही आहे. ती काही जात नाही आणि ती आमच्या हयातीतपण जाईल असे वाटतही नाही. तरी आम्ही मतदान करुच आणि कुचकामी अशा राजांच्या राजेशाहीविरुद्ध (त्यातल्या त्यात) चांगल्या वाटणार्‍या उमेदवारास करु.

In reply to by हाडक्या

उत्तम विचार ! मतदान न करण्यापेक्षा 'वाईट' आणि 'अतीवाईट' उमेदवारापैकी नाईलाज म्हणून का होईना 'वाईट' उमेदवाराला मतदान केले तर कालांतराने सुधार होत 'वाईट' आणि "चांगला' असे आणि नंतर 'चांगला' आणि 'अधिक चांगला' असे उमेदवारांचे पर्याय शक्य होतील... अन्यथा चांगले उमेदवार निवडणुकीपासून दूर राहणेच पसंत करतील (जे आता होत आहे.)

हाडक्या 13/10/2014 - 16:04
आम्ही दर निवडणुकीत मतदान करतो. आमचे आई-वडिल पण करतात. तरीपण आमच्या सातार्‍यात राजेशाही आहे. ती काही जात नाही आणि ती आमच्या हयातीतपण जाईल असे वाटतही नाही. तरी आम्ही मतदान करुच आणि कुचकामी अशा राजांच्या राजेशाहीविरुद्ध (त्यातल्या त्यात) चांगल्या वाटणार्‍या उमेदवारास करु.

मदनबाण 13/10/2014 - 16:33
मोबाइल घेताना सुद्धा आपण १० पर्याय आणि त्यांचे पर्फॉरमन्स बघुन चांगला पर्याय निवडतो ! ;) योग्य पर्यायालाच मत द्या. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण

अजया 13/10/2014 - 16:53
करणारच आहे मतदान परंतु कोणालाही मत देणे म्हणजे ते वायाच जाणार अाहे.कमी वाईट कोणी दिसेना झालंय!!आजवर निवडुन आलेल्या सर्वांनी आमच्या भागातल्या बंद पडलेल्या कारखान्यांना ऊर्जीतावस्था आणू,या भागाची दळणवळण यंत्रणा सुधारु अशी आमिषं दाखवुन मतं पदरात पाडुन घेतली आहेत.पुन्हा एकदा जातीआधारित मतदान होणार,माझे खरोखरचे अ मूल्य! मत वाया जाणार पण मी कोणत्यातरी अाडवाटेच्या मतदान केंद्रावर माझे नाव आले आहे तिथे जाऊन कर्तव्य पार पाडणार! लोकसभेच्या मतदानाला जाताना रस्ताच नसलेल्या मतदान केंद्रावर गाडी नेऊन धडपडलेली(अजया)!!

काँग्रेस्/राष्ट्रवादीला या जन्मात तरी मत देणार नाही. आमचं घर माझ्या जन्माच्या आधीपासून जनसंघ-भाजपा-शिवसेना-युतीचं समर्थक (मराठा असूनसुद्धा :) ) दसर्‍याच्या आदल्या दिवशी घरी जाताना मुंढव्याच्या चौकात शिवसेनेची रॅली होती. नदीच्या पलिकडे ट्रॅफिक जाम चालू झालं(खराडीच्या बाजूने). ३५ मिनिटात पुलावर पण बस पोचली नव्ह्ती. उतरलो, चालत चालत मुंढव्याच्या सिग्नलला पोचलो, तर रॅलीमुळे रिक्षा बंद होत्या. तसाच चालत चालत अ‍ॅमनोरापर्यंत पोचलो अन् रिक्षाने हडपसरला घरी गेलो. घरी गेल्यावर फोन केला, बस अजून नदीवरच्या पुलावरच होती. शिवसेना बाद! काल भाजपची रॅली होती. अ‍ॅमनोरा ते मगरपट्टा साऊथगेट पोचायला २५ मिनिटे लागली. भाजपा बाद! काल रात्री परत मनसेची रॅली. १००+ दुचाकींवर ३००+ मुले हॉर्न वाजवत, ओरडत, सायलेन्सर काढलेल्या मोटारसायकलीवरून चालली होती. मनसे बाद! शी!!! हा काय प्रचार आहे. हे करून मते मिळतील?

In reply to by तुषार काळभोर

प्रसाद१९७१ 13/10/2014 - 19:36
खरे आहे, एक सुद्धा उमेदवार आपले मत देण्याच्या लायकीचा नाही. आप नी मूर्ख पणा केला, नाहीतर यावेळेला बरीच मरे मिळाली असती.

In reply to by तुषार काळभोर

भाते 13/10/2014 - 19:43
गेले दोन दिवस वैताग आणला होता या प्रचाराने. समस्त महिला मंडळासाठी पायी प्रचार फेऱ्या आणि पुरूषांसाठी बाइक रॅली. डोंबिवलीत तर पेट्रोलपंपांवर पेट्रोल सुध्दा संपले होते. अर्थात माझी ११ नंबरची बस असल्याने मला त्याने काही फरक पडला नाही. त्यामुळे यावेळी नोटा (यापैकी कोणीही नाही) हाच पर्याय.

वोट फॉर महाराष्ट्र ! कालच मी मेंबर असलेल्या सर्व व्हॉट्सपग्रूपचे नाव असे बदलून टाकलेय. यंदा माझे मत महाराष्ट्राला ..... आणि माझे नाव ....... गुप्त मतदान :)

नाखु 14/10/2014 - 09:27
मतदान करण्याबाबत सगळ्यांचे "एकमत" आहे जर आहे प्रगतीची अपे़क्षा तर नको मतदानाची उपेक्षा आवर्जून मतदान करणारा.

NiluMP 14/10/2014 - 16:28
म्ही मतदान का करता असा जर सर्वे केला तर देशातील 50% मतदारांना यांच समाधानकारक उत्तर देता येणार नाही. एका नगरसेवकापासून ते खासदारापर्यतच्या नेत्यांनाचा पगार किती, त्यांना कोणकोणत्या इतर सवलती मिळतात याची किती मतदारांना माहिती असेल. का हे नेते लोक निवडूणकीदरम्यान जीवाचा आटापिटा करतात. भारतासारख्या भाषावर प्रांतरचना झालेल्या, धर्म आणि जातीपाती जोखडलेल्या देशात मतदान करुन नेता निवडून देणे खरंच योग्य आहे. याच मतदान पध्दतीचे दुषपरिणाम आपण गेले 60 वर्षे पाहतो आहोत ते म्हणजे व्होटबक, घराणशाही, झोपडपटटया, भष्टचार अर्थात काही चांगल्या गोष्टी घडल्या पण त्याच प्रमाण कमी आहे. मला नेता निवडूण देण्याचा अधिकार आहे पण तो काम करत नसेल त्याला त्याचा पदावरून काढण्याचा अधिकार नाही. नाहीतर ज्याला जनतेचा आंदोलनामुळे गहखात सोडव लागल तोच पुन्हा गहमंत्री झाला नसता. पण त्यांचा विरोधी केलेली आंदोलन चिरडली जातात याच उदा म्हणजे आण्णा हजारे यांच आंदोलन. दिल्ली आजही नेत्याशिवाय चालतेच आहे की. मोदी सरकारामुळे राजकारण सकारात्माक वाटू लागेल आहे पण त्यावर 5 वर्षानंतर बोलू.

पैसा 14/10/2014 - 16:35
यावेळी महाराष्ट्रातल्या विचार करू शकणार्‍या मतदारांना खरंच मोठं अवघड कोडं आहे. मतदान कोणाला करावे ठरवणे कठीण आहे. मतदान नाही केलं तुम्ही इडियट ठरता. सर्व मतदारांना शुभेच्छा! आम्हाला जसं चालणारं सरकार गोव्यात मिळालं तसं तुम्हालाही मिळू दे! आणि हा बदल सामान्य मतदारांनीच घडवून आणला आहे, त्याची कोणत्याही पक्षाला सुतराम कल्पना नव्हती!

अनन्न्या 14/10/2014 - 16:59
आम्हाला जसं चालणारं सरकार गोव्यात मिळालं तसं तुम्हालाही मिळू दे! पण आमच्याकडे पर्रीकर नाहीत *smile* तरीही मतदान करणारच!

एस 13/10/2014 - 14:12
'नोटा' वापरल्यास वरील 'दोष' येईल काय हो? ;-)

In reply to by एस

मराठीतल्या (पैश्याच्या) 'नोटा' असल्यास दोष येईलच, पण तो कायदेशीर गुन्हाही आहे !!! :) 'नोटा' (NOTA) हा इंग्लिशमधला पर्याय उपलब्ध असल्यास आणि तो वापरल्यास ते वैध मतदान होईल... आणि अर्थातच दोषरहीत असेल !  8)

हाडक्या 13/10/2014 - 16:04
आम्ही दर निवडणुकीत मतदान करतो. आमचे आई-वडिल पण करतात. तरीपण आमच्या सातार्‍यात राजेशाही आहे. ती काही जात नाही आणि ती आमच्या हयातीतपण जाईल असे वाटतही नाही. तरी आम्ही मतदान करुच आणि कुचकामी अशा राजांच्या राजेशाहीविरुद्ध (त्यातल्या त्यात) चांगल्या वाटणार्‍या उमेदवारास करु.

In reply to by हाडक्या

उत्तम विचार ! मतदान न करण्यापेक्षा 'वाईट' आणि 'अतीवाईट' उमेदवारापैकी नाईलाज म्हणून का होईना 'वाईट' उमेदवाराला मतदान केले तर कालांतराने सुधार होत 'वाईट' आणि "चांगला' असे आणि नंतर 'चांगला' आणि 'अधिक चांगला' असे उमेदवारांचे पर्याय शक्य होतील... अन्यथा चांगले उमेदवार निवडणुकीपासून दूर राहणेच पसंत करतील (जे आता होत आहे.)

हाडक्या 13/10/2014 - 16:04
आम्ही दर निवडणुकीत मतदान करतो. आमचे आई-वडिल पण करतात. तरीपण आमच्या सातार्‍यात राजेशाही आहे. ती काही जात नाही आणि ती आमच्या हयातीतपण जाईल असे वाटतही नाही. तरी आम्ही मतदान करुच आणि कुचकामी अशा राजांच्या राजेशाहीविरुद्ध (त्यातल्या त्यात) चांगल्या वाटणार्‍या उमेदवारास करु.

मदनबाण 13/10/2014 - 16:33
मोबाइल घेताना सुद्धा आपण १० पर्याय आणि त्यांचे पर्फॉरमन्स बघुन चांगला पर्याय निवडतो ! ;) योग्य पर्यायालाच मत द्या. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण

अजया 13/10/2014 - 16:53
करणारच आहे मतदान परंतु कोणालाही मत देणे म्हणजे ते वायाच जाणार अाहे.कमी वाईट कोणी दिसेना झालंय!!आजवर निवडुन आलेल्या सर्वांनी आमच्या भागातल्या बंद पडलेल्या कारखान्यांना ऊर्जीतावस्था आणू,या भागाची दळणवळण यंत्रणा सुधारु अशी आमिषं दाखवुन मतं पदरात पाडुन घेतली आहेत.पुन्हा एकदा जातीआधारित मतदान होणार,माझे खरोखरचे अ मूल्य! मत वाया जाणार पण मी कोणत्यातरी अाडवाटेच्या मतदान केंद्रावर माझे नाव आले आहे तिथे जाऊन कर्तव्य पार पाडणार! लोकसभेच्या मतदानाला जाताना रस्ताच नसलेल्या मतदान केंद्रावर गाडी नेऊन धडपडलेली(अजया)!!

काँग्रेस्/राष्ट्रवादीला या जन्मात तरी मत देणार नाही. आमचं घर माझ्या जन्माच्या आधीपासून जनसंघ-भाजपा-शिवसेना-युतीचं समर्थक (मराठा असूनसुद्धा :) ) दसर्‍याच्या आदल्या दिवशी घरी जाताना मुंढव्याच्या चौकात शिवसेनेची रॅली होती. नदीच्या पलिकडे ट्रॅफिक जाम चालू झालं(खराडीच्या बाजूने). ३५ मिनिटात पुलावर पण बस पोचली नव्ह्ती. उतरलो, चालत चालत मुंढव्याच्या सिग्नलला पोचलो, तर रॅलीमुळे रिक्षा बंद होत्या. तसाच चालत चालत अ‍ॅमनोरापर्यंत पोचलो अन् रिक्षाने हडपसरला घरी गेलो. घरी गेल्यावर फोन केला, बस अजून नदीवरच्या पुलावरच होती. शिवसेना बाद! काल भाजपची रॅली होती. अ‍ॅमनोरा ते मगरपट्टा साऊथगेट पोचायला २५ मिनिटे लागली. भाजपा बाद! काल रात्री परत मनसेची रॅली. १००+ दुचाकींवर ३००+ मुले हॉर्न वाजवत, ओरडत, सायलेन्सर काढलेल्या मोटारसायकलीवरून चालली होती. मनसे बाद! शी!!! हा काय प्रचार आहे. हे करून मते मिळतील?

In reply to by तुषार काळभोर

प्रसाद१९७१ 13/10/2014 - 19:36
खरे आहे, एक सुद्धा उमेदवार आपले मत देण्याच्या लायकीचा नाही. आप नी मूर्ख पणा केला, नाहीतर यावेळेला बरीच मरे मिळाली असती.

In reply to by तुषार काळभोर

भाते 13/10/2014 - 19:43
गेले दोन दिवस वैताग आणला होता या प्रचाराने. समस्त महिला मंडळासाठी पायी प्रचार फेऱ्या आणि पुरूषांसाठी बाइक रॅली. डोंबिवलीत तर पेट्रोलपंपांवर पेट्रोल सुध्दा संपले होते. अर्थात माझी ११ नंबरची बस असल्याने मला त्याने काही फरक पडला नाही. त्यामुळे यावेळी नोटा (यापैकी कोणीही नाही) हाच पर्याय.

वोट फॉर महाराष्ट्र ! कालच मी मेंबर असलेल्या सर्व व्हॉट्सपग्रूपचे नाव असे बदलून टाकलेय. यंदा माझे मत महाराष्ट्राला ..... आणि माझे नाव ....... गुप्त मतदान :)

नाखु 14/10/2014 - 09:27
मतदान करण्याबाबत सगळ्यांचे "एकमत" आहे जर आहे प्रगतीची अपे़क्षा तर नको मतदानाची उपेक्षा आवर्जून मतदान करणारा.

NiluMP 14/10/2014 - 16:28
म्ही मतदान का करता असा जर सर्वे केला तर देशातील 50% मतदारांना यांच समाधानकारक उत्तर देता येणार नाही. एका नगरसेवकापासून ते खासदारापर्यतच्या नेत्यांनाचा पगार किती, त्यांना कोणकोणत्या इतर सवलती मिळतात याची किती मतदारांना माहिती असेल. का हे नेते लोक निवडूणकीदरम्यान जीवाचा आटापिटा करतात. भारतासारख्या भाषावर प्रांतरचना झालेल्या, धर्म आणि जातीपाती जोखडलेल्या देशात मतदान करुन नेता निवडून देणे खरंच योग्य आहे. याच मतदान पध्दतीचे दुषपरिणाम आपण गेले 60 वर्षे पाहतो आहोत ते म्हणजे व्होटबक, घराणशाही, झोपडपटटया, भष्टचार अर्थात काही चांगल्या गोष्टी घडल्या पण त्याच प्रमाण कमी आहे. मला नेता निवडूण देण्याचा अधिकार आहे पण तो काम करत नसेल त्याला त्याचा पदावरून काढण्याचा अधिकार नाही. नाहीतर ज्याला जनतेचा आंदोलनामुळे गहखात सोडव लागल तोच पुन्हा गहमंत्री झाला नसता. पण त्यांचा विरोधी केलेली आंदोलन चिरडली जातात याच उदा म्हणजे आण्णा हजारे यांच आंदोलन. दिल्ली आजही नेत्याशिवाय चालतेच आहे की. मोदी सरकारामुळे राजकारण सकारात्माक वाटू लागेल आहे पण त्यावर 5 वर्षानंतर बोलू.

पैसा 14/10/2014 - 16:35
यावेळी महाराष्ट्रातल्या विचार करू शकणार्‍या मतदारांना खरंच मोठं अवघड कोडं आहे. मतदान कोणाला करावे ठरवणे कठीण आहे. मतदान नाही केलं तुम्ही इडियट ठरता. सर्व मतदारांना शुभेच्छा! आम्हाला जसं चालणारं सरकार गोव्यात मिळालं तसं तुम्हालाही मिळू दे! आणि हा बदल सामान्य मतदारांनीच घडवून आणला आहे, त्याची कोणत्याही पक्षाला सुतराम कल्पना नव्हती!

अनन्न्या 14/10/2014 - 16:59
आम्हाला जसं चालणारं सरकार गोव्यात मिळालं तसं तुम्हालाही मिळू दे! पण आमच्याकडे पर्रीकर नाहीत *smile* तरीही मतदान करणारच!
लेखनविषय:
.

मतदान करणे प्रत्येक सुजाण नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे.

.

निवडणुकीत मतदान करू की नको असा विचार मनात आल्यास खालच्या चित्रातील संदेश डोळ्यापुढे आणा...

(कोणताही राजकारणी जन्मतः वाईट नसतो. मतदान न करणारे नागरीक वाईट राजकारणी घडवतात.)

त्या गेंड्याची दोन पावले - (विडंबन)

विदेश ·
लेखनविषय:
काव्यरस
' (चाल - या डोळयांची दोन पाखरे ..) त्या गेंड्याची दोन पावले, फिरतील तुमच्या भवती - पाठलाग ती सदैव करतील, फक्त मताच्यासाठी ..... वर्तन तुमचे, हात असे हो त्या गेंड्याचा थारा सहवासातून हवाच त्याला, नित्यच तुमचा नारा तुमचा परिचय त्यास हो आंदण, बिलकुल मताचसाठी .. भाव देतही असतील काही, पैसा अडक्यातुनी एका मताचसाठी तुमचे धरतील कर दोन्ही आहेत डोळे, क्षणैक प्रीती, ते तर खुर्चीवरती .. .

माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

पैसा 13/10/2014 - 10:48
काय मस्त रसग्रहण केलंत सर! दादा कोंडकेंच्या साध्या सुध्या जुन्या गाण्यांबद्दल काय बोलावं! जरासा चावटपणा, गावरान ठसका! आणि त्याचं अगदी तरल भावविभोर वर्णन. ओहोहो! मजा आला! हाऊर आन्दो!

पैसा 13/10/2014 - 11:01
आगामी आकर्षण म्हणून हे पुढचं गाणं ऐका, आणि मग रसग्रहण वाचा ही आयड्या कल्पनेच्याबाहेर आवल्डी आहे.

सतिश गावडे 13/10/2014 - 11:20
शाहिर दादा कोंडके या अवलियाने एकापेक्षा एक अशी सरस गाणी लिहीली. बर्याचदा द्व्यर्थी असल्यामुळे श्लील-अश्लीलतेच्या सीमारेषेवर घुटमळणार्या या गाण्यांनी मनाला भुरळ घातली हे बाकी खरे. सर, रसग्रहण मस्त जमले आहे. आता तुम्ही प्रा. डॉ. शोभता. :)

दादा कोंडके ह्यांचा सेन्सॉर बोर्डाबरोबर चालणारा वाद त्यांच्या मराठी भाषेविषयी असलेल्या ज्ञानाची ग्वाहीच देतो. त्यांचं सोंगाड्या हे आत्मचरीत्र वाचण्यासारखं आहे. त्यात असे अनेक किस्से आहेत.

एस 13/10/2014 - 13:44
माळ्याच्या मळ्यामधी ह्ये रसगिर्हान कराय्चं गानं नसून त्येच्या रसामंदी डूबूक्ककन बुडून जायाचं गानं हाय ह्ये आमचं पर्मानिक मत हाय. तरीबी तुमचं लेखन आक्शी ब्येस झालंया आसं नमूद कर्तो वो प्रा. डॉ. सायेब!

प्यारे१ 13/10/2014 - 13:59
म हा न! प्रा डॉ न्ना प्यार्टी लागू. आणि ही आमची जाहिरात. http://misalpav.com/node/17636 रसग्रहण आम्ही पण केलं आहे म्हटलं. ;)

हमने ये परिक्शान..बहुत जब्बरदस्त वेंजॉय किया है। http://www.sherv.net/cm/emo/happy/dancing-happy-star-smiley-emoticon.gif तथा...हम आप से बिनती करते है की अगले गाने का भी ऐसाइच परिक्शान लवकरात लवकर करे। :) समांतरः- ''चुडा लकाकित जडाव अगदी कोंदण केले मधी रवा तंग चोळीवर रंग कुसुंबी गोरे गाल जसा नरम खवा >> http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif मार डाला.....हल्ला मार डाला! पन सदर काव्याच्या चारच वळी मंजी ताटाला लावल्याल्या निव्दाच्या खिरीवानी वाटत्यात.तेच्यामुळं याची पन फुल्लडिश पायजेन! :D

प्रा. डॉ. परीक्षण अतिशय आवडले हेवेसांन मला व्यक्तीशः वांगी तोडणे ही उपमा म्हणजे दादांच्या उच्च प्रतिभेचा एक आविश्र्कार वाटला. इतक्या सार्‍या भाज्या असताना दादांनी वांगेच का बरं निवडले असेल असा प्रश्र्ण मला पडला होता. त्याचे उत्तर शोधताना मला भारतिय ग्राम्य जीवनाचे एक अनोखे दर्शन झाले. संदिप खरेंनी जेव्हा "रानी माझ्या मळ्या मंदी हे" गाणे लिहिले होते तेव्हा टमाटे, भेंडी अशा भाज्या निवडल्या. पण वांगे निवडण्याचे धाडस केवळ दादांकडेच होते. वांगे हे महाराष्ट्राच्या मर्दानी बाण्याच प्रतिक म्हणून दादांनी वापरले आहे. महाराष्ट्रात जशी विविधता आहे तशीच विविधता वांग्या मधे पण आढळते. म्हणजे बघा छोट वांग, मोठं वांग, त्याहून मोठं भरताच वांग, हिरवी वांगी, लांबट वांगे, त्यातही पुण्यात मिळणारी वांगी वेगळी, सांगलीची वेगळी, विदर्भातली वेगळी आणि मराठवाड्यातली त्याहून वेगळी. जसे कोकणातला मर्द हा कोल्लापुरी मर्दापेक्षा, वेगळा असतो. किंवा मराठवाडी गडी आणखीच निराळा असतो. पण या अशा महाराष्ट्रातल्या मर्दानी बाण्या मधे असलेल्या विविधतेला एकाच प्रतिकाने घट्ट बांधायचे अवघड काम दादांसारख्या प्रतिभावंताने चुटकी सरशी सोपे करुन टाकले आहे. वांगे म्हटल्यावर पहिल्यांदा डोळ्यासमोर काय येते?..... वांगे. मग आता डोळे बंद करुन डोळ्यासमोर एक चांगले भरलेले ताजे ताजे रसरशीत वांगे आण. बघ तोंडाला पाणी सुटते की नाही ते. मग मुंगळ्या सारखे लहान होउन त्या वांग्याच्या आजुबाजुने फिरुन त्याचे निरिक्षण कर. त्या वांग्यावर हात फिरव. त्याचा स्पर्श अनुभव. मग त्या वांग्यावर चढ आणि त्याच्या देठावरुन टुणकन खाली उडी मार. .......... बघ माझी आठवण येते का? वांगे किंवा वांग्याच्या आकाराची इतर कोणतीही वस्तु आपल्या समोर आली तरी आपल्याला असाच आनंदच होतो ना? वांग्याच आणि आपल नातं असे वेगळेच आहे. आपला प्रियकर जास्तिजास्त काळ आपल्या जवळ रहावा अशी नायिकेची तीव्र इच्छा आहे. म्हणून ती सूचक पणे नायकाला सांगते आहे की "बघ आता मी वांगी तोडते आहे. मग मी त्या वांग्यांची तूला आवडते तशी चमचमीत भाजी करणार आहे. तेव्हा हे माझ्या दिलबरा, प्राणसख्या तो पर्यंत तू इकडेच थांब." असे एक लाडिक अर्जव दादांना "वांगी तोडते मी रावजी" या शब्दातुन सूचीत करायचे आहे. आपण वर पाहिलेच आहे की वांगे हे मर्दानी बाण्याचे प्रतिक म्हणुन दादांनी वापरले आहे. यालाच जरा दुसर्‍या एका बाजूने पाहा. प्रियकराला प्रेयसी श्रीकृष्णाच्या रुपात पहाते आहे. तो कान्हा जसा निळा जांभळा होता तसेच वांगेही जांभळे असते. कान्ह्या सारखा प्रियकर मला लाभला याचा प्रेयसीला जो अहंकार झाला आहे त्या अहंकाराचे प्रतिक म्हणजे वांगे. तो अहंकार झटकून साक्षीभावाने समर्पण करायला तयार असलेल्या प्रेयसीची भावविभोर अवस्था दादांनी "वांगी तोडते मी रावजी" या शब्दांमधे मोठ्या खुबीने सांगीतली आहे. दादांच्या या अफाट प्रतिभेला माझ्या कडुन एक कडक सलाम. पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

योगी९०० 13/10/2014 - 15:13
रसग्रहण सुरेख आणि या प्रतिसादाने तर या रसग्रहणाला चार चांदच लावलेत... बाकी शिवशाहीर दादा कोंडकेच्या अफाट प्रतिभेचा जबरदस्त प्रभाव पैजारबुवांवर पडलाय हे या प्रतिसादामुळे दिसून येतेच...

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रियकराला प्रेयसी श्रीकृष्णाच्या रुपात पहाते आहे. तो कान्हा जसा निळा जांभळा होता तसेच वांगेही जांभळे असते. कान्ह्या सारखा प्रियकर मला लाभला याचा प्रेयसीला जो अहंकार झाला आहे त्या अहंकाराचे प्रतिक म्हणजे वांगे. तो अहंकार झटकून साक्षीभावाने समर्पण करायला तयार असलेल्या प्रेयसीची भावविभोर अवस्था दादांनी "वांगी तोडते मी रावजी" या शब्दांमधे मोठ्या खुबीने सांगीतली आहे. आपल्या पायांचा फोटो प्लीज पाठवा मोबाइल वर वालपेपर म्हणून लावतो. पण वांगीफोड़ सॉरी वांगीतोड़ प्रतिमा आपण चांगली विस्कटून दाखवली ते प्रचंड आवडले आहे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

साती 13/10/2014 - 16:01
वांगे म्हटल्यावर पहिल्यांदा डोळ्यासमोर काय येते?..... वांगे. अहाहा, इतकं आशयगर्भ वाक्यं दुसरं कुठलं नसेल. मराठी साहित्यातले 'वांगे' असा छोटेखानी प्रबंधच लिहा ना!

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा आपल्या कल्पकतेला मी दाद देतो. पण... शेतकर्‍यांची गाणी त्यांच्याच सभोवतालचा बाज घेऊन आली पाहिजेत म्हणुन वांगी तोडण्याचा संबंध या गाण्यात आला आहे असे मला वाटते. बहुजन समाज हा निरक्षर आहे पण तो उत्तम श्रोता असतो तेव्हा त्याच्या भावनांशी समरस होणारे शब्द आले की तो त्याच्याशी एकरुप होतो ही नाडी दादा कोंडकेंनी ओळखली होती. शेतीजीवनाचं वर्णन करतोय तर त्यात पटकन समरस होणारं उदाहरण आलं पाहिजे म्हणुन ते आलं आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या बोलीत टीकणारे शब्द कोणते तेव्हा ग्रामीण भाषेतल्या शब्दांनी त्यात एक परिणामकारकता येईल हाच शुद्ध हेतु वाटतो. खेड्यातला बहुजनसमाज नगरभाषेशी किती समरस होईल असे वाटल्यामुळे जितके खेड्याशी एकरुप होऊ तितके चांगले असा तो भाग मला वाटतो. म्हणजे वांगीच नव्हे तर 'ऊस तोडते' मी रावजी हेही चाललं असतं. पण आपला प्रतिसाद आवडला म्हणुन ही नसती उठाठेव. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एस 13/10/2014 - 17:18
हेच म्हणायला आलो होतो. बाकी पैजारबुवांचाही प्रतिसाद स्वतंत्र अर्थाने भन्नाट आहे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शरद 14/10/2014 - 07:14
सुर्रेख रसग्रहण आणि प्रतिसाद. दोघाही रसिकांनी वांगे आणि सोळाव वरस यांतील एका साम्याकडे का बरे दुर्लक्ष केले? शरद

@मग आता डोळे बंद करुन डोळ्यासमोर एक चांगले भरलेले ताजे ताजे रसरशीत वांगे आण. बघ तोंडाला पाणी सुटते की नाही ते. मग मुंगळ्या सारखे लहान होउन त्या वांग्याच्या आजुबाजुने फिरुन त्याचे निरिक्षण कर. त्या वांग्यावर हात फिरव. त्याचा स्पर्श अनुभव. मग त्या वांग्यावर चढ आणि त्याच्या देठावरुन टुणकन खाली उडी मार. .......... बघ माझी आठवण येते का?>>> =)) __/\__ गारव्याचा पार पारवा झाला कि वो! =))

योगी९०० 13/10/2014 - 15:42
रसग्रहण सुरेखच...बर्‍याच दिवसांनी शिवशाहीर दादा कोंडके यांची आठवण झाली. एक किस्सा आठवला : या गाण्याचा आमच्यावर एवढा प्रभाव होता की लहानपणी शेत किंवा बुजगावणे दिसले की हमखास हे गाणे तोंडात यायचे. एकदा शाळेत गॅदरींगला एक सुरेख गोरीगोमटी मुलगी "माळ्याच्या मळयामंदी" हे गाणे म्हणणार आहे असे कळल्याने खूप उत्सुकतेने मुलांनी तिच्या गाण्याची वाट पाहीली. पण तिने "माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचे पाणी वाहतं....गुलाब जाई जुई मोगरा फुलवीतं" हे साधी माणसे या चित्रपटाचे गाणे सुरू केल्याने असला काही गोंधळ झाला की बस.. नंतर ती मुलगी गॅदरींगला कदाचित कोठलेच गाणे म्हणायच्या फंदात पडली नसावी.

पैसा 13/10/2014 - 15:51
दादांची किंमत करणारे, त्यांच्या सिनेमांची नावे ऐकून भोवळ येणारे, निरर्थक लिहिण्याला हिंमत लागते म्हणणारे, रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी चर्चा न्यूनगंडाकडे नेणारे, दादांना गावठी म्हणणारे आणि दादांचे सिनेमे बघणं थांबवणारे, सगळ्यांना सलाम! एखादी गोष्ट न समजणं सहाजिक आहे, तसं म्हणणं आणि सोडून देणं यात सुद्धा काही वावगं नाही पण अर्थाचा अनर्थ करुन तिचा उपहास करणं, (विशेषतः ती गौरवप्राप्त असतांना); स्वतःची अनुभव कक्षा सिमित करतं. जर हे रसग्रहण प्रकाशित झालं नसतं तर दादांच्या प्रतिभेला समजावून घेण्याची अनेकांची संधी हुकली असती. खरं तर या निमित्तानं मला दादा कोंडके आणखी थोडे उलगडले आणि त्याबद्दल प्रा.डॉ. यांची अत्यंत आभारी आहे.

मदनबाण 13/10/2014 - 16:01
मस्त "रस ग्रहण " आणि जबदस्त प्रतिसाद ! ;) जाता जाता :- ढगाला लागली कळं पाणी थेंब थेंब गळं{ रिमिक्स } ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण

दादा कोंडके नंतर नंतर चावटपणाला चटावले !नाहेीतरअजुनहेी त्यांना मान कायम मिळाला असता.आणि सोंगाड्या तर उत्कृष्टच होता यात शंकानाहेी. जुन्अआटठवणेी जाग्या केल्याबद्दलदधन्यवाद !

कंजूस 13/10/2014 - 19:11
वावावा .इकडे तिकडे गोफणीतून तणाणा हाणलेले धोंडे अजून एक दिवस चुकवतोय इतक्यात हे छान पाखरू अवतरले.येऊ द्यात आणखी.मनात कणसे डोलताहेत .एक माळीदादा भरलेले वांगे काटे न बोचता कसे काढायचे ते दाखवताहेत.

अर्धवटराव 14/10/2014 - 09:09
आमच्या 'कॅटॅगरीच्या' लोकांना समजेल आणि आवडेल असं भन्नाट रसग्रहण. आता ऊसाला लागलेल्या कोल्ह्यावर एक र.ग्र. येऊ देत.

सुहास.. 14/10/2014 - 20:37
सर, आप भी ...मान गये आपकी गाणे की चॉईस और आपको ....भन्नाट !! प्रियकराला प्रेयसी श्रीकृष्णाच्या रुपात पहाते आहे. तो कान्हा जसा निळा जांभळा होता तसेच वांगेही जांभळे असते. कान्ह्या सारखा प्रियकर मला लाभला याचा प्रेयसीला जो अहंकार झाला आहे त्या अहंकाराचे प्रतिक म्हणजे वांगे. तो अहंकार झटकून साक्षीभावाने समर्पण करायला तयार असलेल्या प्रेयसीची भावविभोर अवस्था दादांनी "वांगी तोडते मी रावजी" या शब्दांमधे मोठ्या खुबीने सांगीतली आहे. >>> बुवांच्या प्रतिसादांचा फॅन उगाच नाही, हा तर नेहले पे दहेला ! वरचढ नव्हे , एकापेक्षा एक सरस अश्या अर्थाने, की बडे मास्तर तर बडे मास्तर , छोटे बुवा भी सुभान अल्ला !!

पैसा 13/10/2014 - 10:48
काय मस्त रसग्रहण केलंत सर! दादा कोंडकेंच्या साध्या सुध्या जुन्या गाण्यांबद्दल काय बोलावं! जरासा चावटपणा, गावरान ठसका! आणि त्याचं अगदी तरल भावविभोर वर्णन. ओहोहो! मजा आला! हाऊर आन्दो!

पैसा 13/10/2014 - 11:01
आगामी आकर्षण म्हणून हे पुढचं गाणं ऐका, आणि मग रसग्रहण वाचा ही आयड्या कल्पनेच्याबाहेर आवल्डी आहे.

सतिश गावडे 13/10/2014 - 11:20
शाहिर दादा कोंडके या अवलियाने एकापेक्षा एक अशी सरस गाणी लिहीली. बर्याचदा द्व्यर्थी असल्यामुळे श्लील-अश्लीलतेच्या सीमारेषेवर घुटमळणार्या या गाण्यांनी मनाला भुरळ घातली हे बाकी खरे. सर, रसग्रहण मस्त जमले आहे. आता तुम्ही प्रा. डॉ. शोभता. :)

दादा कोंडके ह्यांचा सेन्सॉर बोर्डाबरोबर चालणारा वाद त्यांच्या मराठी भाषेविषयी असलेल्या ज्ञानाची ग्वाहीच देतो. त्यांचं सोंगाड्या हे आत्मचरीत्र वाचण्यासारखं आहे. त्यात असे अनेक किस्से आहेत.

एस 13/10/2014 - 13:44
माळ्याच्या मळ्यामधी ह्ये रसगिर्हान कराय्चं गानं नसून त्येच्या रसामंदी डूबूक्ककन बुडून जायाचं गानं हाय ह्ये आमचं पर्मानिक मत हाय. तरीबी तुमचं लेखन आक्शी ब्येस झालंया आसं नमूद कर्तो वो प्रा. डॉ. सायेब!

प्यारे१ 13/10/2014 - 13:59
म हा न! प्रा डॉ न्ना प्यार्टी लागू. आणि ही आमची जाहिरात. http://misalpav.com/node/17636 रसग्रहण आम्ही पण केलं आहे म्हटलं. ;)

हमने ये परिक्शान..बहुत जब्बरदस्त वेंजॉय किया है। http://www.sherv.net/cm/emo/happy/dancing-happy-star-smiley-emoticon.gif तथा...हम आप से बिनती करते है की अगले गाने का भी ऐसाइच परिक्शान लवकरात लवकर करे। :) समांतरः- ''चुडा लकाकित जडाव अगदी कोंदण केले मधी रवा तंग चोळीवर रंग कुसुंबी गोरे गाल जसा नरम खवा >> http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif मार डाला.....हल्ला मार डाला! पन सदर काव्याच्या चारच वळी मंजी ताटाला लावल्याल्या निव्दाच्या खिरीवानी वाटत्यात.तेच्यामुळं याची पन फुल्लडिश पायजेन! :D

प्रा. डॉ. परीक्षण अतिशय आवडले हेवेसांन मला व्यक्तीशः वांगी तोडणे ही उपमा म्हणजे दादांच्या उच्च प्रतिभेचा एक आविश्र्कार वाटला. इतक्या सार्‍या भाज्या असताना दादांनी वांगेच का बरं निवडले असेल असा प्रश्र्ण मला पडला होता. त्याचे उत्तर शोधताना मला भारतिय ग्राम्य जीवनाचे एक अनोखे दर्शन झाले. संदिप खरेंनी जेव्हा "रानी माझ्या मळ्या मंदी हे" गाणे लिहिले होते तेव्हा टमाटे, भेंडी अशा भाज्या निवडल्या. पण वांगे निवडण्याचे धाडस केवळ दादांकडेच होते. वांगे हे महाराष्ट्राच्या मर्दानी बाण्याच प्रतिक म्हणून दादांनी वापरले आहे. महाराष्ट्रात जशी विविधता आहे तशीच विविधता वांग्या मधे पण आढळते. म्हणजे बघा छोट वांग, मोठं वांग, त्याहून मोठं भरताच वांग, हिरवी वांगी, लांबट वांगे, त्यातही पुण्यात मिळणारी वांगी वेगळी, सांगलीची वेगळी, विदर्भातली वेगळी आणि मराठवाड्यातली त्याहून वेगळी. जसे कोकणातला मर्द हा कोल्लापुरी मर्दापेक्षा, वेगळा असतो. किंवा मराठवाडी गडी आणखीच निराळा असतो. पण या अशा महाराष्ट्रातल्या मर्दानी बाण्या मधे असलेल्या विविधतेला एकाच प्रतिकाने घट्ट बांधायचे अवघड काम दादांसारख्या प्रतिभावंताने चुटकी सरशी सोपे करुन टाकले आहे. वांगे म्हटल्यावर पहिल्यांदा डोळ्यासमोर काय येते?..... वांगे. मग आता डोळे बंद करुन डोळ्यासमोर एक चांगले भरलेले ताजे ताजे रसरशीत वांगे आण. बघ तोंडाला पाणी सुटते की नाही ते. मग मुंगळ्या सारखे लहान होउन त्या वांग्याच्या आजुबाजुने फिरुन त्याचे निरिक्षण कर. त्या वांग्यावर हात फिरव. त्याचा स्पर्श अनुभव. मग त्या वांग्यावर चढ आणि त्याच्या देठावरुन टुणकन खाली उडी मार. .......... बघ माझी आठवण येते का? वांगे किंवा वांग्याच्या आकाराची इतर कोणतीही वस्तु आपल्या समोर आली तरी आपल्याला असाच आनंदच होतो ना? वांग्याच आणि आपल नातं असे वेगळेच आहे. आपला प्रियकर जास्तिजास्त काळ आपल्या जवळ रहावा अशी नायिकेची तीव्र इच्छा आहे. म्हणून ती सूचक पणे नायकाला सांगते आहे की "बघ आता मी वांगी तोडते आहे. मग मी त्या वांग्यांची तूला आवडते तशी चमचमीत भाजी करणार आहे. तेव्हा हे माझ्या दिलबरा, प्राणसख्या तो पर्यंत तू इकडेच थांब." असे एक लाडिक अर्जव दादांना "वांगी तोडते मी रावजी" या शब्दातुन सूचीत करायचे आहे. आपण वर पाहिलेच आहे की वांगे हे मर्दानी बाण्याचे प्रतिक म्हणुन दादांनी वापरले आहे. यालाच जरा दुसर्‍या एका बाजूने पाहा. प्रियकराला प्रेयसी श्रीकृष्णाच्या रुपात पहाते आहे. तो कान्हा जसा निळा जांभळा होता तसेच वांगेही जांभळे असते. कान्ह्या सारखा प्रियकर मला लाभला याचा प्रेयसीला जो अहंकार झाला आहे त्या अहंकाराचे प्रतिक म्हणजे वांगे. तो अहंकार झटकून साक्षीभावाने समर्पण करायला तयार असलेल्या प्रेयसीची भावविभोर अवस्था दादांनी "वांगी तोडते मी रावजी" या शब्दांमधे मोठ्या खुबीने सांगीतली आहे. दादांच्या या अफाट प्रतिभेला माझ्या कडुन एक कडक सलाम. पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

योगी९०० 13/10/2014 - 15:13
रसग्रहण सुरेख आणि या प्रतिसादाने तर या रसग्रहणाला चार चांदच लावलेत... बाकी शिवशाहीर दादा कोंडकेच्या अफाट प्रतिभेचा जबरदस्त प्रभाव पैजारबुवांवर पडलाय हे या प्रतिसादामुळे दिसून येतेच...

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रियकराला प्रेयसी श्रीकृष्णाच्या रुपात पहाते आहे. तो कान्हा जसा निळा जांभळा होता तसेच वांगेही जांभळे असते. कान्ह्या सारखा प्रियकर मला लाभला याचा प्रेयसीला जो अहंकार झाला आहे त्या अहंकाराचे प्रतिक म्हणजे वांगे. तो अहंकार झटकून साक्षीभावाने समर्पण करायला तयार असलेल्या प्रेयसीची भावविभोर अवस्था दादांनी "वांगी तोडते मी रावजी" या शब्दांमधे मोठ्या खुबीने सांगीतली आहे. आपल्या पायांचा फोटो प्लीज पाठवा मोबाइल वर वालपेपर म्हणून लावतो. पण वांगीफोड़ सॉरी वांगीतोड़ प्रतिमा आपण चांगली विस्कटून दाखवली ते प्रचंड आवडले आहे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

साती 13/10/2014 - 16:01
वांगे म्हटल्यावर पहिल्यांदा डोळ्यासमोर काय येते?..... वांगे. अहाहा, इतकं आशयगर्भ वाक्यं दुसरं कुठलं नसेल. मराठी साहित्यातले 'वांगे' असा छोटेखानी प्रबंधच लिहा ना!

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा आपल्या कल्पकतेला मी दाद देतो. पण... शेतकर्‍यांची गाणी त्यांच्याच सभोवतालचा बाज घेऊन आली पाहिजेत म्हणुन वांगी तोडण्याचा संबंध या गाण्यात आला आहे असे मला वाटते. बहुजन समाज हा निरक्षर आहे पण तो उत्तम श्रोता असतो तेव्हा त्याच्या भावनांशी समरस होणारे शब्द आले की तो त्याच्याशी एकरुप होतो ही नाडी दादा कोंडकेंनी ओळखली होती. शेतीजीवनाचं वर्णन करतोय तर त्यात पटकन समरस होणारं उदाहरण आलं पाहिजे म्हणुन ते आलं आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या बोलीत टीकणारे शब्द कोणते तेव्हा ग्रामीण भाषेतल्या शब्दांनी त्यात एक परिणामकारकता येईल हाच शुद्ध हेतु वाटतो. खेड्यातला बहुजनसमाज नगरभाषेशी किती समरस होईल असे वाटल्यामुळे जितके खेड्याशी एकरुप होऊ तितके चांगले असा तो भाग मला वाटतो. म्हणजे वांगीच नव्हे तर 'ऊस तोडते' मी रावजी हेही चाललं असतं. पण आपला प्रतिसाद आवडला म्हणुन ही नसती उठाठेव. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एस 13/10/2014 - 17:18
हेच म्हणायला आलो होतो. बाकी पैजारबुवांचाही प्रतिसाद स्वतंत्र अर्थाने भन्नाट आहे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शरद 14/10/2014 - 07:14
सुर्रेख रसग्रहण आणि प्रतिसाद. दोघाही रसिकांनी वांगे आणि सोळाव वरस यांतील एका साम्याकडे का बरे दुर्लक्ष केले? शरद

@मग आता डोळे बंद करुन डोळ्यासमोर एक चांगले भरलेले ताजे ताजे रसरशीत वांगे आण. बघ तोंडाला पाणी सुटते की नाही ते. मग मुंगळ्या सारखे लहान होउन त्या वांग्याच्या आजुबाजुने फिरुन त्याचे निरिक्षण कर. त्या वांग्यावर हात फिरव. त्याचा स्पर्श अनुभव. मग त्या वांग्यावर चढ आणि त्याच्या देठावरुन टुणकन खाली उडी मार. .......... बघ माझी आठवण येते का?>>> =)) __/\__ गारव्याचा पार पारवा झाला कि वो! =))

योगी९०० 13/10/2014 - 15:42
रसग्रहण सुरेखच...बर्‍याच दिवसांनी शिवशाहीर दादा कोंडके यांची आठवण झाली. एक किस्सा आठवला : या गाण्याचा आमच्यावर एवढा प्रभाव होता की लहानपणी शेत किंवा बुजगावणे दिसले की हमखास हे गाणे तोंडात यायचे. एकदा शाळेत गॅदरींगला एक सुरेख गोरीगोमटी मुलगी "माळ्याच्या मळयामंदी" हे गाणे म्हणणार आहे असे कळल्याने खूप उत्सुकतेने मुलांनी तिच्या गाण्याची वाट पाहीली. पण तिने "माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचे पाणी वाहतं....गुलाब जाई जुई मोगरा फुलवीतं" हे साधी माणसे या चित्रपटाचे गाणे सुरू केल्याने असला काही गोंधळ झाला की बस.. नंतर ती मुलगी गॅदरींगला कदाचित कोठलेच गाणे म्हणायच्या फंदात पडली नसावी.

पैसा 13/10/2014 - 15:51
दादांची किंमत करणारे, त्यांच्या सिनेमांची नावे ऐकून भोवळ येणारे, निरर्थक लिहिण्याला हिंमत लागते म्हणणारे, रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी चर्चा न्यूनगंडाकडे नेणारे, दादांना गावठी म्हणणारे आणि दादांचे सिनेमे बघणं थांबवणारे, सगळ्यांना सलाम! एखादी गोष्ट न समजणं सहाजिक आहे, तसं म्हणणं आणि सोडून देणं यात सुद्धा काही वावगं नाही पण अर्थाचा अनर्थ करुन तिचा उपहास करणं, (विशेषतः ती गौरवप्राप्त असतांना); स्वतःची अनुभव कक्षा सिमित करतं. जर हे रसग्रहण प्रकाशित झालं नसतं तर दादांच्या प्रतिभेला समजावून घेण्याची अनेकांची संधी हुकली असती. खरं तर या निमित्तानं मला दादा कोंडके आणखी थोडे उलगडले आणि त्याबद्दल प्रा.डॉ. यांची अत्यंत आभारी आहे.

मदनबाण 13/10/2014 - 16:01
मस्त "रस ग्रहण " आणि जबदस्त प्रतिसाद ! ;) जाता जाता :- ढगाला लागली कळं पाणी थेंब थेंब गळं{ रिमिक्स } ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण

दादा कोंडके नंतर नंतर चावटपणाला चटावले !नाहेीतरअजुनहेी त्यांना मान कायम मिळाला असता.आणि सोंगाड्या तर उत्कृष्टच होता यात शंकानाहेी. जुन्अआटठवणेी जाग्या केल्याबद्दलदधन्यवाद !

कंजूस 13/10/2014 - 19:11
वावावा .इकडे तिकडे गोफणीतून तणाणा हाणलेले धोंडे अजून एक दिवस चुकवतोय इतक्यात हे छान पाखरू अवतरले.येऊ द्यात आणखी.मनात कणसे डोलताहेत .एक माळीदादा भरलेले वांगे काटे न बोचता कसे काढायचे ते दाखवताहेत.

अर्धवटराव 14/10/2014 - 09:09
आमच्या 'कॅटॅगरीच्या' लोकांना समजेल आणि आवडेल असं भन्नाट रसग्रहण. आता ऊसाला लागलेल्या कोल्ह्यावर एक र.ग्र. येऊ देत.

सुहास.. 14/10/2014 - 20:37
सर, आप भी ...मान गये आपकी गाणे की चॉईस और आपको ....भन्नाट !! प्रियकराला प्रेयसी श्रीकृष्णाच्या रुपात पहाते आहे. तो कान्हा जसा निळा जांभळा होता तसेच वांगेही जांभळे असते. कान्ह्या सारखा प्रियकर मला लाभला याचा प्रेयसीला जो अहंकार झाला आहे त्या अहंकाराचे प्रतिक म्हणजे वांगे. तो अहंकार झटकून साक्षीभावाने समर्पण करायला तयार असलेल्या प्रेयसीची भावविभोर अवस्था दादांनी "वांगी तोडते मी रावजी" या शब्दांमधे मोठ्या खुबीने सांगीतली आहे. >>> बुवांच्या प्रतिसादांचा फॅन उगाच नाही, हा तर नेहले पे दहेला ! वरचढ नव्हे , एकापेक्षा एक सरस अश्या अर्थाने, की बडे मास्तर तर बडे मास्तर , छोटे बुवा भी सुभान अल्ला !!
लेखनविषय:
लेखनप्रकार
मराठी गाणी म्हटली की कुठून सुरुवात करावी असा प्रश्न पड्तो. ढोबळमानाने ’पैल तो गे काऊ पासून सुरुवात करुन.. अंगनी माझ्या मनीच्या मोर नाचु लागला इथपर्यंत अनेक मराठी गाण्यांनी आपल्याला भरभरुन आनंद दिला आहे. संत,पंत आणि तंत (शाहिरी) काव्यात मराठी ओवी,अभंग, लावण्या आणि कवितांची गाणी कधी झाली हे आपल्या लक्षातही आलं नाही. मराठीतील ही सर्व गाणी अतिशय सुंदर अशी फुलली आहेत. कोणतं गाणं सुरेख असं म्हणायला गेलो की बोटाच्या चुटकीतून प्रत्येक सुंदर असं गाणं निसटून जातं. एकच एक गाणं आपल्याला आवडतं असं कधी म्हणता येत नाही.