मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंधार क्षण भाग १ - अाॅस्कर ग्रोएनिंग (लेख ४)

बोका-ए-आझम ·

अस्वस्थ करणारे आहे हे सगळे. डाखाऊचा काँसंट्रेशन कँप किंवा बर्लिन येथील काही संग्रहालये अशा ठिकाणांची अंगावर शहारे आणणारी भेट आठ्वते असे काही वाचले की. स्वॅप्स यांच्याप्रमाणेच म्हणते - वाचनीय आणि विचार करण्याजोगा लेख.

अस्वस्थ करणारे आहे हे सगळे. डाखाऊचा काँसंट्रेशन कँप किंवा बर्लिन येथील काही संग्रहालये अशा ठिकाणांची अंगावर शहारे आणणारी भेट आठ्वते असे काही वाचले की. स्वॅप्स यांच्याप्रमाणेच म्हणते - वाचनीय आणि विचार करण्याजोगा लेख.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अंधार क्षण - आॅस्कर ग्रोएनिंग (लेख ४) माझ्या कामामुळे मी अनेक प्रकारच्या लोकांना भेटलो, अजूनही भेटतो. एक गोष्ट मी अगदी खात्रीलायक रीत्या सांगू शकतो की लोकांविषयी तुमच्या मनात असलेले विचार आणि प्रत्यक्ष तुम्हाला भेटणारा माणूस यांच्यात फार क्वचित काही साधर्म्य असतं. उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला अशी पार्श्वभूमी दिली की - ह्या माणसाने नाझींची कुप्रसिद्ध मृत्युछावणी आॅशविट्झमध्ये काम केलेलं आहे, लहानपणापासून तो नाझींचा समर्थक होता, युद्ध चालू झाल्यावर तो एस्.एस्.

हायकू

शरद ·

बोका-ए-आझम 16/10/2014 - 12:06
पुलंनीही काही विडंबनात्मक हायकू लिहिले आहेत, उदाहरणार्थ हायकूसान हायकूसान काय तुझी जादू धावू लागले तुझ्यामागे बंडू, पांडू, म्हादू!

दाट गवतात केव्हापासून घुसलेल्या फुलपाखराची चिमुकल्या काळजी वाटते बाई मला. उडता उडता फुलपाखरू उंच उडत गेले निळ्या नभात कुठं हरवलं. शिरीष पै. सरळसपाट माळावर सूर्यकिरण चमकले बिचार्‍या निराधार धुक्याने हात डोंगराच्या गळ्यात घातले. ऋचा गोडबोले.

एस 16/10/2014 - 12:55
आवडता प्रकार. या विषयावर आधी काही धागे येऊन गेले आहेत. त्यामुळेच हायकू आणि साकुरा यामधील फरक कळाला. तुम्हीही फार छान भर घालाल याची खात्री आहे! पुभाप्र!

अतिशय सुंदर हायकू ओळख. :) या निमित्ताने लोकरंग मधे आलेली एक हायकू-विडंबना आठवली . दोन कवियत्रींनी समोरील श्रोत्यांना वीट आणलेला असतो.. बराच वेळ त्यांच "संपतच" नसतं! तेव्हढ्यात खालून एक जण आवाज टाकतो. डावीकड़े एक बाई उजवीकडे एक बाई मधे कुणीच नाही!

इरसाल 16/10/2014 - 14:37
अगणित अविरत भसाभसा पडताहेत मिपावर जिलब्या तांब्या पाहिलाय कुणी ? (हे सध्या असलेल्या मिपाच्या वाता-वरणावर आमचे ताजे भाष्य)

हायकुची ओळख आवडली. आणि- असे म्हणतात की बरेच कवी आपल्या प्रेयसीची आळवणी लांबलचक काव्यात करतात आणि ती जांभया देतादेता चुकून होकार देते व कवीचे लग्नही होऊन जाते ! हे तर लैच आवडलं. :) -दिलीप बिरुटे

मितान 16/10/2014 - 19:54
खूप चांगली ओळख करून दिलीत या काव्यप्रकाराची. मराठीत शिरीष पै यांची हायकू आणि पुन्हा हायकू नावाची दोन पुस्तकं आहेत. बर्‍याच वर्षांपूर्वी वाचली होती. एकेक हायकू वाचून थरारून गेले होते एवढंच आठवतंय. ते अनुवाद होते की त्यांच्या स्वतःच्या हायकू ते ही आठवत नाही. गेली ४ वर्षं प्रत्येक पुस्तकप्रदर्शनात ती पुस्तकं शोधतेय. पण सापडत नाहीत :(

पैसा 16/10/2014 - 20:02
छान ओळख करून दिलीत. तीन ओळीचं संपूर्ण काव्य इतकंच आतापर्यंत माहीत होतं.

अजया 16/10/2014 - 20:03
शिरीष पैंची पुस्तकं वाचल्यानंतर फार दिवसांनी हायकुबाबत वाचण्यात आलं.तांत्रिक अंगाबद्दल मात्र आत्ताच वाचते आहे.छान लिहिलंय तुम्ही सोपं करुन! इतकं की एखादी हायकु पाडुन पहाविशी वाटायला लागलं आहे!

अजया 17/10/2014 - 08:17
एक कळी मुकी खुडलेली पायाखाली चिरडलेली.. लाट विरलेली उधाण सरलेलं रितं आभाळ उरलेलं..

In reply to by अजया

हायकुत सुरुवातीच्या दोन ओळीत प्रास्ताविक तर तिसर्‍या ओळीत अनपेक्षित कलाटणी मिळाली पाहिजे असे वाटते. म्हणजे मग त्या हायकुत मजा येते. तसं काहीच झालं नाही आठवणींचा पांढरा ढग आला. सरकत सरकत निघून गेला. किंवा. झाडाखालच्या आठवणींनी मनात प्रवेश केला अन झाडावरचा कावळा घान करुन गेला. असं या टाईपचं असं वाटतं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवितानागेश 17/10/2014 - 16:29
असा त्रिवेणी हा काव्यप्रकार आहे. पहिल्या २ ओळीना तिसरी ऑळ पूर्ण वेगळे परिमाण देते. शरद सराना विनन्ती की याही काव्यप्रकारावर लिहावे

In reply to by सतिश गावडे

आवडेश. धन्यासेठ असं पाहिजे होतं ते.. माझ्या डोळ्यात आसवे तुझे डोळे मात्र कोरडे रोज मरे त्याला कोण रडे. :) -दिलीप बिरुटे

कॉलेज जिवनात असताना मी केलेल्या काही हायकु किंवा चारोळ्या म्हाणा त्यापैकी एक.. "काडी काडी करुन तिनं घरटं बांधलं वाराही वाहायचा थांबला, त्यानेही ते जाणलं" अजुन आठवतील तशा लिहिन.

क्रेझी 17/10/2014 - 10:26
शांताबाई शेळके यांनी काही हायकूंची भाषांतरे केली आहेत असा उल्लेख त्यांच्या लेखात वाचल्याचं आठवलं पण विशेष शोध घेतला नाही.कोणाला माहिती असल्यास इथे डकवा.

बोका-ए-आझम 16/10/2014 - 12:06
पुलंनीही काही विडंबनात्मक हायकू लिहिले आहेत, उदाहरणार्थ हायकूसान हायकूसान काय तुझी जादू धावू लागले तुझ्यामागे बंडू, पांडू, म्हादू!

दाट गवतात केव्हापासून घुसलेल्या फुलपाखराची चिमुकल्या काळजी वाटते बाई मला. उडता उडता फुलपाखरू उंच उडत गेले निळ्या नभात कुठं हरवलं. शिरीष पै. सरळसपाट माळावर सूर्यकिरण चमकले बिचार्‍या निराधार धुक्याने हात डोंगराच्या गळ्यात घातले. ऋचा गोडबोले.

एस 16/10/2014 - 12:55
आवडता प्रकार. या विषयावर आधी काही धागे येऊन गेले आहेत. त्यामुळेच हायकू आणि साकुरा यामधील फरक कळाला. तुम्हीही फार छान भर घालाल याची खात्री आहे! पुभाप्र!

अतिशय सुंदर हायकू ओळख. :) या निमित्ताने लोकरंग मधे आलेली एक हायकू-विडंबना आठवली . दोन कवियत्रींनी समोरील श्रोत्यांना वीट आणलेला असतो.. बराच वेळ त्यांच "संपतच" नसतं! तेव्हढ्यात खालून एक जण आवाज टाकतो. डावीकड़े एक बाई उजवीकडे एक बाई मधे कुणीच नाही!

इरसाल 16/10/2014 - 14:37
अगणित अविरत भसाभसा पडताहेत मिपावर जिलब्या तांब्या पाहिलाय कुणी ? (हे सध्या असलेल्या मिपाच्या वाता-वरणावर आमचे ताजे भाष्य)

हायकुची ओळख आवडली. आणि- असे म्हणतात की बरेच कवी आपल्या प्रेयसीची आळवणी लांबलचक काव्यात करतात आणि ती जांभया देतादेता चुकून होकार देते व कवीचे लग्नही होऊन जाते ! हे तर लैच आवडलं. :) -दिलीप बिरुटे

मितान 16/10/2014 - 19:54
खूप चांगली ओळख करून दिलीत या काव्यप्रकाराची. मराठीत शिरीष पै यांची हायकू आणि पुन्हा हायकू नावाची दोन पुस्तकं आहेत. बर्‍याच वर्षांपूर्वी वाचली होती. एकेक हायकू वाचून थरारून गेले होते एवढंच आठवतंय. ते अनुवाद होते की त्यांच्या स्वतःच्या हायकू ते ही आठवत नाही. गेली ४ वर्षं प्रत्येक पुस्तकप्रदर्शनात ती पुस्तकं शोधतेय. पण सापडत नाहीत :(

पैसा 16/10/2014 - 20:02
छान ओळख करून दिलीत. तीन ओळीचं संपूर्ण काव्य इतकंच आतापर्यंत माहीत होतं.

अजया 16/10/2014 - 20:03
शिरीष पैंची पुस्तकं वाचल्यानंतर फार दिवसांनी हायकुबाबत वाचण्यात आलं.तांत्रिक अंगाबद्दल मात्र आत्ताच वाचते आहे.छान लिहिलंय तुम्ही सोपं करुन! इतकं की एखादी हायकु पाडुन पहाविशी वाटायला लागलं आहे!

अजया 17/10/2014 - 08:17
एक कळी मुकी खुडलेली पायाखाली चिरडलेली.. लाट विरलेली उधाण सरलेलं रितं आभाळ उरलेलं..

In reply to by अजया

हायकुत सुरुवातीच्या दोन ओळीत प्रास्ताविक तर तिसर्‍या ओळीत अनपेक्षित कलाटणी मिळाली पाहिजे असे वाटते. म्हणजे मग त्या हायकुत मजा येते. तसं काहीच झालं नाही आठवणींचा पांढरा ढग आला. सरकत सरकत निघून गेला. किंवा. झाडाखालच्या आठवणींनी मनात प्रवेश केला अन झाडावरचा कावळा घान करुन गेला. असं या टाईपचं असं वाटतं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवितानागेश 17/10/2014 - 16:29
असा त्रिवेणी हा काव्यप्रकार आहे. पहिल्या २ ओळीना तिसरी ऑळ पूर्ण वेगळे परिमाण देते. शरद सराना विनन्ती की याही काव्यप्रकारावर लिहावे

In reply to by सतिश गावडे

आवडेश. धन्यासेठ असं पाहिजे होतं ते.. माझ्या डोळ्यात आसवे तुझे डोळे मात्र कोरडे रोज मरे त्याला कोण रडे. :) -दिलीप बिरुटे

कॉलेज जिवनात असताना मी केलेल्या काही हायकु किंवा चारोळ्या म्हाणा त्यापैकी एक.. "काडी काडी करुन तिनं घरटं बांधलं वाराही वाहायचा थांबला, त्यानेही ते जाणलं" अजुन आठवतील तशा लिहिन.

क्रेझी 17/10/2014 - 10:26
शांताबाई शेळके यांनी काही हायकूंची भाषांतरे केली आहेत असा उल्लेख त्यांच्या लेखात वाचल्याचं आठवलं पण विशेष शोध घेतला नाही.कोणाला माहिती असल्यास इथे डकवा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हायकू : मराठीत न रुजलेला एवढी आवडते जपानी हायकू, तर कशाला केलीत मराठी बायकू ? महाराष्ट्राबाहेरचे दोन काव्यप्रकार म्हणजे गझल व हायकू. हे काही आपल्या भूमीतील, संस्कृतीतील नव्हेत. पण कलाप्रेमी महाराष्ट्राने जसे कथक, भरतनाट्य बाहेरून आल्यावरही प्रेमाने आपले म्हटले, उत्तर हिंदुस्थानातील शास्त्रीय संगीत आवडीने जोपासले तसे गझलला गळ्यात गोवले. पण हायकू मात्र दुर्लक्षीला गेला. एक श्री. शिरीष पै सोडल्या तर इतरांनी हा प्रकार आवडीने हाताळलाच नाही. असे का झाले ? मला वाटते याला दोन गोष्टी कारणीभूत असाव्यात. पहिली म्हणजे हायकूची जन्मभूमी जपान. जपानी भाषा आपल्याला पूर्णपणे अपरिचित.

वेगळा विदर्भ

सतिश गावडे ·

कपिलमुनी 16/10/2014 - 11:25
राज्ये , भौगोलिक रचना, क्षेत्रफळ आणि लोकसंख्या यांनुसार ठरवली पहिजेत. यासाठी काहीतरी एककं हवे जसे की २ कोटी - ३ कोटी लोकसंह्येचे एक राज्य ,

In reply to by प्रभाकर पेठकर

कपिलमुनी 16/10/2014 - 14:36
काका , लोकसंख्या हे एक सहज सुचलेले उदहरण होते . लोकसंख्या , तिची घनता, भाषा , सामाजिक आर्थिक जीवनमान , भौगोलिक स्थान .. अशा इतर अनेक बाबी यामधे अंर्तभूत होतील. पण तज्ज्ञ ( हेच बरोबर ना ? ) लोकांनी यावर अहवाल दिला तर राज्य निर्मितीसाठी एक सूत्र ठरवता येइल

In reply to by कपिलमुनी

मोदक 16/10/2014 - 14:58
१९९६ साली सेना भाजपचे सरकार बर्‍यापैकी स्थिरावल्यानंतर हा मुद्दा काँग्रेसने पुन्हा चर्चेत आणला होता. या अनुषंगाने अनेक बैठका आणि पत्रकार परिषदांनंतर दत्ता मेघेंनी यावर एक अहवाल तयार करण्यास सुरूवात केली. दरडोई उत्पन्न, शालेय शिक्षण, स्त्री साक्षरता, रस्ते, रेल्वे, (दळणवळण), वैद्यकीय सुविधा, पिकाखालील जमीन, शेतकामगार, सिंचन अशा २४ "विकासनिकषांवर" मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ यांचा तुलनात्मक अहवाल. असे सर्वसाधारण स्वरूप होते. या २४ निकषांपैकी जवळजवळ सर्व निकषांवर मराठवाडा विदर्भापेक्षा मागासलेला होता. २४ पैकी ८ निकषांवर विदर्भ पहिल्या / दुसर्‍या, ६ निकषांवर तिसर्‍या आणि २ निकषांवर चौथ्या स्थानावर होता. मराठवाडा कोठेही पहिल्या स्थानावर नव्हता. धक्कादायक म्हणजे कोकण २४ पैकी १४ निकषांवर चौथ्या स्थानावर होता. हा अहवाल कधीही प्रकाशीत झाला नाही. अचानकपणे एकदा प्रवीण बर्दापूरकर (पत्रकार) यांच्या हाती हा अहवाल पडला व त्याचा गोषवारा प्रसिद्ध झाला.

In reply to by कपिलमुनी

अरे, माझा प्रतिसादही सहज सुचला म्हणून टाकला. नथिंग सिरियस. विषय गंभीर आहे आणि त्यावर गंभीर प्रतिसाद देण्याइतका माझा अभ्यास नाही.

विटेकर 16/10/2014 - 11:40
केवळ प्रशासनाच्या सोयीसाठी असेल तर जरूर करावा. त्यातून राजकारण पेटवू नये . नाहीतर नागपूरकर, पुण्या- मुंबईत परप्रांतीय ठरतील आणि राज ठाकरेना आणखी एक मुद्दा मिळेल. किंवा सरळ सार्वमत घ्यावे ! जो निर्णय येईल तो येईल. लोकशाहीत लोकांची इच्छाच निर्णायक असली पाहिजे.

नाखु 16/10/2014 - 11:44
२.विदर्भाला विकासासाठी पुरेसा निधी मिळत नाही. निधीचा खुप मोठा भाग इतर प्रबळ विभाग (उदा. पश्चिम महाराष्ट्र) नेतात. ज्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान (जास्तीत जास्त) ज्या राज्यातून आले (काही वेळा पूर्ण बहुमतात) तरी त्या राज्यांचा मागासलेपणा (विकास अभाव) निव्वळ स्थानीक नेत्यांच्या "कपाळकरंटेपणा/कूपमंडूक व्रुत्ती" आणि राज्यातील उदासीन जनता यामुळे झाला आहे . तोच परिमाण विदर्भ नेत्यांना देखील लागू आहे (जाणकार यावर प्रकाश टाकतील्च) पण विदर्भातील नेते देखील राज्यात मुख्यमंत्री/केंन्द्रात वजनदार मंत्री होते वास्तव नजरेआड करून चालणार नाही बाकी मुद्यांबाबत फार अभ्यास नाही म्हणून पास.

In reply to by नाखु

सतिश गावडे 16/10/2014 - 11:50
>> पण विदर्भातील नेते देखील राज्यात मुख्यमंत्री/केंन्द्रात वजनदार मंत्री होते वास्तव नजरेआड करून चालणार नाही. याचं उत्तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोन दिवसांपूर्वीच्या मुलाखतीत मिळू शकेल.

विदर्भाला कोणी वाली उरला नाहीये...लोकांची इच्छा असेल तर होऊ दे वेगळा राज्य...कोणीही काहीही आश्वासने द्यावीत आणि लोकांनी भुलावे असे चालू आहे...केंद्रात सरकार असताना ते विदर्भाचा पाहिजे तेवढा विकास करू शकतात...प्रशासनाच्या सोयीचा भाग सोडला तर वेगळे काढून करायची तेवढी गरज नाही...कारण चांगली कॉलेजेस महाराष्ट्रात, नोकर्या इकडेच. महाराष्ट्राला विजेची गरज आहे विदर्भ कडून...असे असताना दोघा एक-मेक शिवाय कसे चालतील. ...अथवा असे कोणते मोठे व्हिजन आहे जे हे मुलभुत प्रश्न सोडून केवळ वेगळा विदर्भ करून सोडवू शकते ? महाराष्ट्रात कोणी थोड्या काळात १०-२०००० मेगावेत वीज निर्माण करू शकत नाही...अथवा चांगली कोलेज आणि नोकर्या तिकडे आणू शकत नाही. मग वेगळे होऊन विदर्भा सकट महाराष्ट्र पण गाळात जाईल...मागे आंध्र मध्ये जशी गुंतवणूक थांबली तसे महाराष्ट्र आणि विदर्भात होईल अशी भीती वाटते... असे असताना यात राजकारण आणि अभिमान आणू नये.

विदर्भात विकासाच्या नावानी बोंबाबोंब आहे. आमच्या सुदैवानी पश्चिम महाराष्ट्रामधे बर्‍यापैकी सोयीसुविधा आहेत. राज्य छोटं झालं तर जास्त चांगला विकास करता येईल अशी आशा आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ करावा. विदर्भामधे वेगेवेगळे प्रकल्प उभारावेत आणि तिकडच्या लोकांनाही चांगलं आयुष्य जगायची संधी मिळावी हिचं सदिच्छा.

असंका 16/10/2014 - 12:50
वेगळा विदर्भ झाल्यावर जे उरेल त्याला काय म्हणायचं? "लघुमहाराष्ट्र"? की 'लघु' आणि 'महा' हे एकमेकांना नलीफाय करतील म्हणून नुसतेच "राष्ट्र"? की कितीही कमी झाला तरी आपला तो नेहमीच महाराष्ट्र? आणि जर विदर्भातले लोक पण म्हणाले की आमचा तोच "महाराष्ट्र"? बाकी जे राहिल त्याने दुसरे नाव शोधावे, तर मग?

वेल्लाभट 16/10/2014 - 12:57
मला नाही वाटत. प्रशासन सोपं वगरे म्हणता.... मग त्यासाठीच जिल्हे, तालुके असतात नाही का? एक मुद्दा आपला उगाचच घ्यायचा लोकांना भरकटवायचं. लोक पण भरकटतात. वेगळा हवा वेगळा हवा. मग मला नाई का, ठाणे ! हे एक वेगळं राज्य असावं वाटतं. मुंबईमुळे ठाण्याचा विकास होत नाही. सगळ्या बाबतीत ठाण्याला उप-यासारखं वागवलं जातं. मुंबईत पाऊल जरी ठेवायचं असेल तरी ठाणेकराला टोल लागतो. किती किती अन्याय होतो म्हणून सांगू.

In reply to by वेल्लाभट

सतिश गावडे 16/10/2014 - 13:12
हे पुणे किंवा मुंबईत बसून लिहिणं खुप सोपं आहे.
मग त्यासाठीच जिल्हे, तालुके असतात नाही का? एक मुद्दा आपला उगाचच घ्यायचा लोकांना भरकटवायचं. लोक पण भरकटतात. वेगळा हवा वेगळा हवा.
या न्यायाने ते ठाण्याचे विभाजनही व्हायला नको होते. छत्तीसगड, उत्तरांचल, तेलंगना, झारखंड अशी राज्येही निर्माण व्हायला नको होती. त्यांचाही विकास होत असणार आधी. त्यांचेही प्रशासन सोयीने चालत असणार आधी. नाही का?

लोकांमध्ये तशी भावना आल्याशिवाय वेगळ्या विदर्भाची मागणी होणार नाही. राज्य सरकारची औद्योगिक धोरणे ही बहुतंशी मुंबई-पुण्यापुरती मर्यादित होती. नव्या सरकारने पाच वर्षाचे टार्गेट ठरवून मागास जिल्ह्यांचा विकास करावा असे सुचवते.

आदिजोशी 16/10/2014 - 13:32
इतकी वर्ष विदर्भावर अन्याय झाला तो करंट्या राजकारणामुळे. भाजपा सत्तेवर आला की सर्वांगीण आणि समतोल विकास होईल आणि विदर्भ वेगळा करायची गरजच पडणार नाही.

शिद 16/10/2014 - 14:25
वेगळा विदर्भ झालाच पाहिजे !!! - बबन फ्रॉम इ-सकाळ

In reply to by शिद

बॅटमॅन 16/10/2014 - 14:50
वेगळा बबन झालाच पाहिजे!!!! - विदर्भ.

In reply to by बॅटमॅन

नाखु 16/10/2014 - 14:59
वेगळ्या बबनसाठी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हॅ!

१. गडचिरोली, चंद्रपूर सारख्या दुरस्थ जिल्ह्यातील लोकांना प्रशासकीय कामासाठी तीन दिवस प्रवास करुन मुंबईत यावे लागते. मुंबईत येऊन काम न झाल्यास कुठे राहायचे हा प्रश्न भेडसावतो. - असे जरी असले तरीही हा प्रश्न वेगळे राज्य करण्याईतपत मोठा वाटत नाही. असे रोजच्या रोज किती लोकांना मुंबईला जावे लागते. आणि जर असेल, तर हे सगळेच आपल्या महाराष्ट्राचे लोक आहेत म्हणून चांगले रस्ते, रेल्वे या सुविधा सरकारने द्याव्यात. आणि वेळेत काम होईल अशी सरकारी व्यवस्था असेल तर मग काम न झाल्यास हा मुद्दा कमी प्रमाणत येईल. आता त्यातही, बुलढाणा जिल्हा अजूनच एका टोकाला आहे. त्यातले काही लोणार सारखे तालुके अजूनच लांब. तिथून नागपूर काय आणि मुंबई काय, कुठेही जायला गैरसोय आहेच. २. विदर्भाला विकासासाठी पुरेसा निधी मिळत नाही. निधीचा खुप मोठा भाग इतर प्रबळ विभाग (उदा. पश्चिम महाराष्ट्र) नेतात. फारसा अभ्यास नसल्याने जास्त काही न बोलणे उत्तम. तरिही ज्या विदर्भातील नेत्यांना आपल्या प्रदेशाचा विकास करता आला नाही ते खापर फोडायला उर्वरीत महाराष्ट्राचा मुद्दा घेणार आणि इतर नेत्यांपैकी ज्यांनी विदर्भाला खरच डावलले असेल आणि यातून स्वतःचा फायदा केला असेल तर ते विरुद्ध बाजूने बोलणार असे होऊ शकतेच. ३. काही राजकीय पक्षांना हा फक्त राजकीय मुद्दा म्हणून हवा आहे. निवडणूकांच्या वेळी हा मुद्दा उकरुन काढून लोकांच्या भावनांना हात घालता येतो. तसेच वेगळा विदर्भ झाल्यास आपली सत्ता कमी प्रदेशावर असेल ही भीती वाटते. हा राजकीय मुद्दाच आहे. विदर्भ होणे किंवा न होणे दोन्हीतही ज्यांना जसे फायदे वाटतात तसे ते ते राजकीय पक्ष बोलणार. या सगळ्यातून खरंच चांगला बदल झाला तर उत्तम पण इथे देशाला स्वातंत्र्य मिळून इतक्या वर्षात आपला असा काय विकास झालाय जो अचानक वेगळ्या राज्याने होईल. केवळ वेगळा झाला की विकास होईल हा केवळ निवडणुकीत दखवायचा मुद्दा आहे. बहुतांशी सामान्य जनतेला काय वाटते ते पुढे लिहिते. ४. वेगळा विदर्भ झाल्यास विदर्भात ज्या राजकीय पक्षाचे प्राबल्य आहे त्यांचा तो बालेकिल्ला होईल आणि इतरांना तिकडे शिरकाव करता येणार नाही. बालेकिल्ला होऊन काही प्रमाणात तरी त्या पक्षाने बदल करून दाखवले तर उत्तम. सामान्य जनतेबाबत - सामान्य जनतेला वेगळा विदर्भ नकोच आहे. आणि समजा झालाच, तरीही कुणी फारसे आंदोलनकारी नाहीत, झाला तर आपला म्हणून मान्य करतील पण उर्वरित महाराष्ट्र देखील तेवढाच आपला वाटेल. काहीना, विशेषतः शिक्षणासाठी पुण्या मुंबईला जाण्याची इच्छा असणार्यांना कदाचित यात गैरसोय वाटेल. कारण राज्य दुसरे झाले की जागा मर्यादित होतील वगैरे वगैरे. बुलढाणा किंवा जवळच्या परिसरात जवळचे त्यातल्या त्यात मोठे शहर म्हणजे औरंगाबाद. त्यामुळे अनेक लोक वैद्यकीय सुविधांसाठी तिथेच जातात. राज्य बदलले तरीही यात काही बदल होणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचे, ही सगळी माझी वैयक्तिक मते. मला काय वाटते ते. एवढे करूनही काय होईल त्यावर माझे नियंत्रण काहीच नाही. विदर्भ काय आणि महाराष्ट्र काय, माझ्या भावना दोन्हीबाबत सारख्याच असतील. जसे आपल्याला आपल्या गावाबद्दल जास्त प्रेम असते तसेच महाराष्टात राहूनही विदर्भ म्हणजे थोडा जवळचा वाटतो एवढेच.

In reply to by मधुरा देशपांडे

संजय कथले 16/10/2014 - 16:09
मिहान प्रकल्पामुळे नागपुरातील आम्हा लोकांना विकासाचे वारे डोक्यात वाहत होते …पण काय झाल ???? ते भिजत घोंगड तसाच रखडलय… आणि पुण्या आधी नागपूर मध्ये मेट्रो च्या कोनशीला माननीय मुख्यमंत्री नाराज होतांना पाहिले …

In reply to by संजय कथले

सुहासभाऊ 16/10/2014 - 16:16
जय विदर्भ .............. हे मुखमंत्री काय फक्त पुण्याचे का...? नागपूर आधी झाल तर त्याचं पोट दुखलं........... मन मोठ करून आले असते तर काय बिघडलं असत ............ ते काय पुण्याचे महापौर होते पुण्या ची बाजू घ्यायला ......... या राज्याचे प्रधान होते ना ते.......... मग नागपूर ला आधी झाल तर काय बिघडलं .................

In reply to by मधुरा देशपांडे

सुहास.. 16/10/2014 - 16:24
१. गडचिरोली, चंद्रपूर सारख्या दुरस्थ जिल्ह्यातील लोकांना प्रशासकीय कामासाठी तीन दिवस प्रवास करुन मुंबईत यावे लागते. मुंबईत येऊन काम न झाल्यास कुठे राहायचे हा प्रश्न भेडसावतो. +१ , ते बच्चु कडुंनी मंत्रालयात एकाच्या " आश्रमशाळेच्या बिलावरुन कर्मचार्‍याच्या कानामागां ठेवुन दिल्याचे प्रकरण आठवले !! २. विदर्भाला विकासासाठी पुरेसा निधी मिळत नाही. निधीचा खुप मोठा भाग इतर प्रबळ विभाग (उदा. पश्चिम महाराष्ट्र) नेतात. ? निधी , आमदार-खासदार-नगरसेवक यांना सपुर्ण देशात समान मिळतो....( यादी देतो थोड्या वेळात, ज्याने १००% निधी वापरलाय तो , राका चा आहे हे आश्चर्य आहे !! अरे हो , तुम्ही म्हणाल पैसै खाल्ले असतील ...नाही करु शकत टेक्नीकली , ऑडिट च खर्च देते डायरेक्ट नाहीतर त्यांच्या मानगुटीवर ( नेते नाही ) बसतो .. ..आणि प.म. ला आजवर कधी पॅकेज दिल्याच आठवत नाहीये !! :)

मदनबाण 16/10/2014 - 14:29
संपूर्ण राज्याचा विकास करण्याची क्षमता महाराष्ट्रातील राजकारण्यां मधे नाही हा निष्कर्ष वेगळा विदर्भची मागणी करताना काढता येउ शकतो का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

सुहासभाऊ 16/10/2014 - 16:28
वीज उत्पादन विदर्भात , वीज जाते मुंबईला ........... विदर्भातले लोक खातात धूळ ( फ्लाय अश ) ............ विदर्भ राहतो लोडशेडींग मध्ये........... शेतकरी करतो आत्महत्या ...... पिण्याला नाही पाणी , शेतीला नाही पाणी ...... नोकरी नाही ............. जय महाराष्ट्र ...........

In reply to by संजय कथले

काळा पहाड 16/10/2014 - 16:45
कथले साहेब, अती करू नका. तुमच्या भावना कळल्या. पश्चिम महाराष्ट्रातील असून सुद्धा आम्हाला विदर्भ वेगळा व्हावा हे पटते. तेव्हा उगीच जाहीरात केल्यासारख्या पोस्ट टाकायची गरज नाही.

सुहास.. 16/10/2014 - 16:33
स्वतंत्र विदर्भाची मागणी हा महाराष्ट्रद्रोहच! लहान राज्ये असली की त्यांचा विकास होतो ही कल्पनाच चुकीची आहे. नवीन राज्य निर्माण केल्यामुळे बराचसा निधी अनुत्पादक आणि प्रशासकीय बाबींवर फुकट जातो. सुमारे ४० वर्षांपूर्वी प्रादेशिक वाद मिटविण्यासाठी आसामचे तुकडे पाडून त्यातून अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय ही वेगळी राज्ये निर्माण करण्यात आली. त्यांचा विकास झाला असे म्हणता येत नाही. उलट त्यामुळे फुटीरतेच्या चळवळीला मात्र प्रोत्साहन मिळाले. ‘विदर्भ वेगळा करणारच!’ ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची दर्पोक्ती दुर्दैवी आहे. मुळात राज्याच्या जनतेचा विरोध असताना स्वतंत्र विदर्भाला भाजपने मान्यता देणे गैरच आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून ५४ वर्षांपूर्वी निर्माण झाला. त्या ‘महा’राष्ट्रातून विदर्भाचा लचका कोणी तोडू नये. विदर्भाच्या किंवा देशाच्या कोणत्याही भागाच्या विकासाला कोणाचाच विरोध असायचे कारण नाही, पण विकासाच्या नावाने आपला राजकीय स्वार्थ साधण्याला जनतेचा विरोध आहे. विकास म्हणून विदर्भवासीयांना जे हवे असेल ते महाराष्ट्रात राहूनही ते मिळवू शकतात. विकासाचा बॅकलॉग भरून काढायला स्वतंत्र राज्यच कशाला हवे? ज्या गोष्टींचा अंतर्भाव विकास या संकल्पनेत होतो, त्या सर्व गोष्टी वेगळे राज्य निर्माण न करताही मिळविता येतील. महाराष्ट्राचे तीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, मारोतराव कन्नमवार आणि सुधाकरराव नाईक हे विदर्भातीलच होते. त्यांच्यापुढे विदर्भ विकासाच्या योजना स्वतंत्र विदर्भाच्या पुरस्कर्त्यांनी माडल्या होत्या का? या मुख्यमंत्र्यांनी त्या नक्कीच धुडकावून लावल्या नसत्या. याचा अर्थच असा की, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीमागे विकासाचा उद्देश नसून राजकीय स्वार्थ आहे. लहान राज्ये असली की त्यांचा विकास होतो ही कल्पनाच चुकीची आहे. अनेक बाबतीत विकासाचे घटक जिल्हा, तालुका आणि गाव असते. त्यामुळे या प्रत्येक घटकाने आपल्या विकासासाठी जे आवश्यक आहे ते केले की, पुरेसे आहे. कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी खरोखरच आवश्यकता असेल तर ती म्हणजे निधीची आणि नवीन राज्य निर्माण केल्यामुळे बराचसा निधी अनुत्पादक आणि प्रशासकीय बाबींवर फुकट जातो. हा पैसा रस्ते, उद्योगधंदे, विद्यालये, महाविद्यालये, मैदाने, क्रीडांगणे, बगिचे, सार्वजनिक दवाखाने, सार्वजनिक वाचनालये, पाणी, वीज यांची अधिक निर्मिती इत्यादी सोयीसवलती यांच्यासाठी खर्च केला तर जनतेची अधिक सोय होईल. वेगळे राज्य करून प्रशासकीय खर्च वाढवण्यापेक्षा तो पैसा ग्रामीण भाग आणि शहरे यातील फरक कमी करण्यासाठी, प्रत्येक गाव शहरांना पक्क्या रस्त्यांनी आणि दळणवळणाच्या मुबलक साधनांनी जोडण्यासाठी खर्च केला तर विदर्भ अधिक विकसित होईल; तो पैसा सिंचन योजनांसाठी वापरला आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर केले तर शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील. अनुत्पादक खर्च वाढवून नेत्यांचा विकास होईल, विदर्भाचा नाही. स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचनेचे तत्त्व देशाने स्वीकारले,त्यानुसार १४ राज्ये आपल्या देशात निर्माण झाली. त्यानंतर स्वायत्तता, वांशिक भेद, असमतोल विकास अथवा अन्य काही कारणांमुळे सतत नवीन राज्याच्या मागण्या करण्यात आल्या, त्या मान्य करण्यात आल्या आणि त्यामुळे आता देशातील राज्यांची संख्या २९ झाली आहे. सुमारे ४० वर्षांपूर्वी प्रादेशिक वाद मिटविण्यासाठी आसामचे तुकडे पाडून त्यातून अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय ही वेगळी राज्ये निर्माण करण्यात आली. ही सर्व राज्ये अत्यंत छोटी आहेत तरीही त्या राज्यांचा त्यामुळे विकास झाला असे म्हणता येत नाही. उलट त्यामुळे फुटीरतेच्या चळवळीला मात्र प्रोत्साहन मिळाले. अजूनही देशाच्या या ईशान्येकडील भागात स्वतंत्र बोडोलँडवादी आणि उल्फावादी अतिरेकी संघटनांकडून हिंसाचार सतत चालू असतो. त्यात निरपराध नागरिकांचे बळी जातात आणि शासकीय मालमत्तेचे म्हणजेच आपले सर्वांचे नुकसान होत आहे. राज्ये लहान असली तरी तेथील शासनकर्ते आपल्या राज्यात शांतता आणि कायदा राबवू शकत नाहीत. मध्य प्रदेश, बिहार यांच्या आदिवासी विभागाचे तुकडे काढून वेगळे छत्तीसगढ आणि झारखंड राज्य निर्माण करण्यात आले. वेगळ्या झारखंडमुळे मधू कोडा यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. त्यांनी कोळसा खाणवाटपात भ्रष्टाचार करून स्वत:चा विकास केला. झारखंड तसेच राहिले. उत्तर प्रदेशचा एक तुकडा काढून उत्तराखंड राज्य करण्यात आले. तेथे गतवर्षी पावसाळ्यात केदारनाथ, बद्रीनाथ इत्यादी धार्मिक स्थानी यात्रा करणारे हजारो यात्रेकरू मृत्युमुखी पडले. त्या भागाचा शास्त्रीय पद्धतीने विकास न झाल्यामुळे आणि भ्रष्टाचारामुळे हे झाले. विकासाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे भ्रष्टाचार आणि स्वार्थ. राज्यांची संख्या वाढवून विकास होत नसतो. अधिक राज्ये निर्माण केल्याने केवळ अनुत्पादक व प्रशासनिक खर्च वाढतो आणि विकास खुंटतो. स्वतंत्र विदर्भ निर्मितीस विरोधाची जी कारणे आहेत तीच अन्य राज्यनिर्मितीच्या विरोधाच्या बाबतीतही लागू पडतात, परंतु तरीही तेलंगणा राज्य निर्माण झाले. त्यामुळे संकुचितपणा मात्र वाढू लागला. तेलंगणा सरकारने एक सर्व्हे घ्यायला सुरुवात केली. त्यानुसार कोण स्थानिक आणि कोण बाहेरचा ही शिरगणती सुरू झाली. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या खासदार कविता हिने तेलंगणा आणि जम्मू-कश्मीर हे हिंदुस्थानचे भाग नाहीतच असे विधान केले. आज जी छोटी राज्ये आहेत त्यांच्या काही भागाच्या विकासासाठी राजकारणी लोक उद्या आणखी छोट्या राज्यांची मागणी करतील. उद्या नागपूर, अमरावती, अकोला यांचा विकास करण्याच्या नावाखाली विदर्भाचेही आणखी तुकडे पाडण्याचा अट्टहास होईल. खरे म्हणजे राज्यांची संख्या कमी कशी करता येईल याचा विचार जनतेने आणि राज्य पुनर्रचना आयोग निर्माण झाल्यास त्याने करावा. गोवा महाराष्ट्राला जोडावा. दीव-दमण, दादरा-नगरहवेली गुजरातला जोडावीत. पुद्दुचेरी, पोर्ट ब्लेअर तामीळनाडूला जोडावे. पूर्वीप्रमाणेच आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश ही राज्ये करावीत. दिल्ली ही देशाची राजधानी असल्यामुळे ती फक्त केंद्रशासित असावी. यामुळे कोट्यवधी रुपयांचा अनुत्पादक प्रशासकीय खर्च वाचेल आणि त्याचा उपयोग संबंधित प्रदेशांच्या विकासासाठी करता येईल. हिंदुस्थानच्या घटनेप्रमाणे स्वतंत्र राज्यांच्या निर्मितीचा अधिकार,त्याचप्रमाणे राज्यांच्या सीमा निश्चित करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे हे चांगले आहे. राज्य सरकारे याबाबत केवळ ठराव संमत करू शकतात. मात्र स्वतंत्र राज्यनिर्मितीसाठी कोणते निकष असावेत याबद्दल घटनेत मार्गदर्शन नाही.त्यामुळे स्वतंत्र राज्यनिर्मितीचे निर्णय केवळ राजकीय असतात. - केशव आचार्य

मदनबाण 16/10/2014 - 16:41
ज्यांनी ही बातमी वाचली नाही त्यांच्यासाठी :- भांडवली दलालांची मुंबईकडे पाठ बाकी चालु ध्या...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

संजय कथले 16/10/2014 - 17:14
संयुक्त महाराष्ट्र आंदोलन : सर्व मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वाच्या आधारावर एक राज्य स्थापन करण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला संयुक्त महाराष्ट्र आंदोलन किंवा चळवळ असे म्हणतात. ही चळवळ स्वातंत्र्यपूर्व काळात सुरु झाली आणि १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर ती समाप्त झाली. १९५० ते १९६० या काळामधील महाराष्ट्रातील हे सर्वांत व्यापक असे जनआंदोलन होते आणि त्यात एकूण १०५ लोकांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. इ. स. बाराव्या शतकात मराठी भाषिक लोकांच्यात राजकीय व सांस्कृतिक अस्मितेची जाणीव वाढीस लागली; पण राजकीय दृष्ट्या मराठी भाषिक लोक विखुरलेले राहिले. इंग्रजांच्या काळात मराठी भाषिक लोक मुंबई राज्य, हैदराबाद संस्थान आणि मध्य प्रांतात विभागलेले होते. प. महाराष्ट्राचा भाग मुंबई राज्यात मोडत होता. गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता, तर मराठवाड्याचे पाच जिल्हे हैदराबाद संस्थानात होते. विदर्भाचे आठ जिल्हे मध्य प्रांताचा भाग होते. या सर्व भागांना एकत्र आणून त्यांचे भाषेच्या आधारे एक राज्य बनविण्यात यावे, असा विचार त्या काळात बळावत होता. काँग्रेस पक्षाने भाषावार प्रांतरचनेचे तत्त्व मान्य केले. नंतरच्या काळात काँग्रेस पक्षाने भाषेच्या आधारावर प्रदेश काँग्रेस समित्यांची स्थापना केली. मुंबई राज्यात गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक या प्रदेश समित्या स्थापन झाल्या. भारताला स्वातंत्र्य मिळाले; परंतु भारतीय संविधानात भाषिक प्रदेश राज्यांची स्थापना करण्यासंबंधी नियमावली अंतर्भूत केली नव्हती. तथापि इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अहमदाबाद अधिवेशनात (१९२१) भाषिक राज्य होणे आवश्यक आहे, असा ठराव संमत झाला होता. तरीसुद्घा तत्कालीन नेहरु सरकारने भाषावार प्रांताबाबत नकारात्मक भूमिका स्वीकारली. सरकारने स्थापन केलेल्या दर समितीने भाषावार प्रांतरचना करण्यास नकार दिला. यावर विचार करण्यासाठी काँग्रेसने ‘ जेव्हीपी ’ समिती नेमली. या समितीत जवाहरलाल नेहरु, वल्ल्भभाई पटेल व पट्टाभि सीतारामय्या यांचा समावेश होता. या समितीने भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न अग्रक्रमाने हाती घेतला जाऊ नये, अशी शिफारस केली. याबाबतीत केंद्र सरकार व पं. नेहरु यांच्या मते चार महत्त्वाच्या अडचणी होत्या : (१) भाषावार प्रांतरचनेचा निर्णय घाईघाईने घेतला जाऊ नये; कारण शेकडो वर्षे एकसाथ राहणाऱ्या लोकांच्या जीवनपद्घतीत एकदम मोठा बदल घडवून आणणे इष्ट नसते. (२) प्रत्येक भाषिक गटात अल्पसंख्याक भाषिक घटक आहेत. त्यांचा या मागण्यांना विरोध आहे. त्यांच्या आक्षेपांचा योग्य असा विचार झाला पाहिजे. (३) देशापुढे विकासाचे व ऐक्याचे इतर महत्त्वाचे प्रश्न असताना भाषावार प्रांतरचनेसारखा लोकांचे विभाजन करणारा विषय अग्रक्रमाने रेटू नये. त्यामुळे हिंसक चळवळी व प्रतिचळवळी निर्माण होतील. (४) भारतातील सांस्कृतिक विविधता हे देशाच्या राष्ट्रीयत्वाचे वैभव आहे. हैदराबादसारखे चार भाषा बोलणारे, सामायिक भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करणारे राज्य आपण कायम टिकविले पाहिजे. महाराष्ट्रात मराठी भाषिक राज्याची म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे आंदोलन दिनांक १२ मे १९४६ रोजी बेळगाव येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीच्या स्थापनेपासून विशेष आकारास येऊ लागले. संमेलनाचे अध्यक्ष ग. त्र्यं. माडखोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा पुरस्कार केला. मुंबई राज्यातील प. महाराष्ट्र हा भाग संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी उत्सुक होता. गोवा अजून पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. हैदराबाद राज्यातील मराठवाडा भागातील लोकांची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा होती. मुख्य प्रश्न मध्यप्रांताचा भाग असलेल्या विदर्भाचा होता. नागपूर ही मध्यप्रांताची राजधानी होती आणि राष्ट्रीय चळवळीत विदर्भातील नेत्यांनी मोठी भूमिका बजावलेली होती. शेकडो वर्षांपासून मराठी भाषिक असूनही विदर्भाची वेगळी अशी अस्मिता विकसित झालेली होती. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करणाऱ्या नेत्यांनी विदर्भातील नेत्यांशी चर्चा करुन त्यांच्याबरोबर ‘ अकोला करार ’ केला. या करारात तीन मुद्दे महत्त्वाचे होते : (१) मध्यप्रांतात हिंदी भाषिक विभागाच्या वर्चस्वाखाली विदर्भ राहणार नाही. (२) संयुक्त महाराष्ट्राची मागणी काही कारणांमुळे जर अमान्य झाली, तर स्वतंत्र महाविदर्भाच्या स्थापनेस महाराष्ट्राच्या नेत्यांनी पाठिंबा द्यावा. (३) विदर्भाने मध्यप्रांताचा वा संयुक्त महाराष्ट्राचा उपप्रांत म्हणून राहावे असा पर्याय जर दिला असेल, तर विदर्भाने संयुक्त महाराष्ट्राचा पर्याय निवडावा. १५ ऑगस्ट १९४७ नंतर भारतीय संघराज्यात अनेक संस्थानांचे विलीनीकरण झाले होते. त्यामुळे नव्याने घटकराज्यांची पुनर्रचना करणे गरजेचे होते; पण भारतीय घटनाकारांनी घटकराज्यांत उपप्रांत तयार करण्याचे तत्त्व अमान्य केले. त्यामुळे अकोला करार कालबाह्य झाला. संयुक्त महाराष्ट्राची मागणी पुढे रेटण्यासाठी काँग्रेसांतर्गत १९४८ मध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव देव या परिषदेचे अध्यक्ष झाले. १९५२ मध्ये सर्व राज्यांत नवी सरकारे स्थापन झाली. आंध-प्रांताच्या स्थापनेसाठी पोट्टू श्रीरामलू यांचा उपोषणात मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या दंगलीमुळे १९५३ मध्ये सरकारला आंध-प्रांत मद्रास प्रांतातून वेगळा करावा लागला. याच काळात भाषिक राज्य स्थापन करण्यासाठी अनेक प्रांतांत चळवळी सुरु झाल्या. संयुक्त महाराष्ट्राला विदर्भाचा पाठिंबा मिळविण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या नेत्यांनी विदर्भाच्या नेत्यांशी चर्चा केली आणि २८ सप्टेंबर १९५३ रोजी त्यांच्याशी ‘नागपूर करार’ केला. या करारावर बॅ. रामराव देशमुख, गोपाळराव खेडकर, शेषराव वानखेडे, रा. कृ. पाटील, पी. के. देशमुख, भाऊसाहेब हिरे, नाना कुंटे, देवकीनंदन व यशवंतराव चव्हाण यांच्या सह्या होत्या. त्यात खालील तरतुदी होत्या : (१) मुंबई राजधानी असलेला सर्व मराठी भाषिक लोकांचा महाराष्ट्र प्रांत तयार करण्यात यावा. (२) नागपूरला उच्च न्यायालयाचे एक खंडपीठ असावे. त्याचप्रमाणे विधानसभेचे वर्षातून एक अधिवेशन तेथे घेण्यात यावे. (३) मंत्रिमंडळात व सर्व शासकीय खात्यात लोकसंख्येच्या प्रमाणात राज्याच्या घटकप्रदेशांना प्रतिनिधित्व मिळावे. (४) नागपूरला राजधानीचे शहर म्हणून जे फायदे पूर्वी मिळत आहेत, ते तसेच यापुढे मिळत राहावेत. या करारामुळे विदर्भातील मुख्य नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्रास मान्यता दिली; पण बिजलाल बियाणी व बापूसाहेब अणे यांनी स्वतंत्र नागविदर्भास पाठिंबा दिला आणि त्यासाठी त्यांनी चळवळही सुरु केली. राज्यांच्या पुनर्रचनेचा विचार करण्यासाठी केंद्र शासनाने एस्. फाझल अली यांच्या अध्यक्षतेखाली २९ डिसेंबर १९५३ रोजी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. पं. हृदयनाथ कुंझरु व सरदार पणिक्कर हे या आयोगाचे सभासद होते. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने व इतरांनी आयोगासमोर संयुक्त महाराष्ट्राच्या राज्याची मागणी केली. या आयोगाने आपला अहवाल १० ऑक्टोबर १९५५ रोजी प्रसिद्घ केला. आयोगाने पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि कर्नाटक या राज्यांच्या निर्मितींची शिफारस केली. हैदराबाद राज्य कायम ठेवावे व विदर्भाचे स्वतंत्र राज्य करावे, अशाही आयोगाच्या शिफारशी होत्या; पण हैदराबाद राज्यातील मराठी भाषिकांची त्या राज्यात राहण्याची इच्छा नव्हती. आयोगाने संयुक्त महाराष्ट्राची मागणी अमान्य केली आणि कन्नड भाषिक जिल्हे वगळून, मराठवाडा धरुन, गुजराती प्रदेशासह मुंबईच्या द्वैभाषिक राज्याची शिफारस केली. सौराष्ट्राचा गुजरातेत समावेश करावा व मुंबईस राजधानी करुन गुजरात व महाराष्ट्र यांचे द्वैभाषिक राज्य करावे, असे आयोगाचे म्हणणे होते. आयोगाच्या शिफारशींच्या विरोधात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. या अवधीमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीची चळवळ अधिक आक्रमक बनली. मुख्य प्रश्न मुंबईच्या भवितव्याचा होता व ते शहर महाराष्ट्रास देण्यास गुजराती भाषिकांचा विरोध होता. मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेला बेळगाव-कारवारचा भाग आयोगाने कर्नाटकास दिला. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी या द्वैभाषिकास नकार दिला. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने आयोजित केलेल्या सभेत देवांनी तशी घोषणादेखील केली. केंद्र सरकारने मुंबईच्या प्रश्नाचा तिढा सोडविण्यासाठी ‘त्रिराज्य योजना ’ जाहीर केली. या योजनेत सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भ व मराठवाड्यासह महाराष्ट्र आणि मुंबई हे शहरराज्य अशा प्रकारची तीन राज्ये स्थापन करण्याचा विचार मांडला. महाराष्ट्रास मुंबई द्यावयास केंद्र सरकार तयार नव्हते. महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईत लोकांचा असंतोष वाढू लागला. या घटना ऑक्टोबर १९५५ नंतर घडल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने त्रिराज्य योजनेस पाठिंबा दिला व शंकरराव देव यांनी संयुक्त महाराष्ट्र परिषद बरखास्त केली. ते सर्वांना सबुरीचा सल्ल देत होते. १८ नोव्हेंबर १९५५ रोजी मुंबई विधानसभेसमोर या निर्णयाचा निषेध करण्यासाठी बंद पुकारण्यात आला व सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला. सेनापती बापट यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. त्यानंतर संप, बंद व मोर्चे यांचे सत्र सुरु झाले. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केला. या गोळीबारात १५ माणसे ठार झाली. संयुक्त महाराष्ट्रासाठीची चळवळ या गोळीबारानंतर उग्र झाली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढविण्यासाठी काँग्रेस पक्षीय पुढाऱ्यांना दूर सारुन महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची ६ फेबुवारी १९५६ रोजी स्थापना केली. प्रजा समाजवादी पक्षाचे नेते एस्. एम्. जोशी त्याचे प्रमुख होते. यांत प्रजा समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, हिंदु महासभा, सोशॅलिस्ट पार्टी व जनसंघ हे पक्ष सामील झाले. नंतरच्या काळात डॉ. आंबेडकरांच्या संमतीने शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन व नंतरचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांत सामील झाला. एस्. एम्. जोशी, भाई श्रीपाद अमृत डांगे, ना. ग. गोरे, आचार्य प्र. के. अत्रे, उद्घवराव पाटील, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, जयंतराव टिळक प्रभृती हे या चळवळीचे नेते होते. त्रिराज्य योजनेत मुंबईचे शहरराज्य अनुस्यूत होते; पण त्याचे स्वरुप स्पष्ट झालेले नव्हते. १६ जानेवारी १९५६ रोजी पं. नेहरुंनी असे घोषित केले, की मुंबई केंद्रशासित केली जाईल. १७ जानेवारीस विरोधकांनी सार्वत्रिक संपाची घोषणा केली. १७ जानेवारी ते २२ जानेवारी या काळात मुंबईत मोठा हिंसाचार झाला. पोलिसांनी गोळीबार केला. त्या गोळीबारात ७६ लोकांचा बळी गेला. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी २३ जानेवारी रोजी आपला राजीनामा पंतप्रधानांना दिला; पण त्यांनी तो स्वीकारला नाही. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत संप व चळवळी सुरु झाल्या. मुंबई महानगरपालिकेने संयुक्त महाराष्ट्रास पाठिंबा देणारा ठराव संमत केला. मधील काळात विनोबा भावे व जयप्रकाश नारायण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी झाला. तोपर्यंत राज्य पुनर्रचना विधेयक मुंबई विधानसभेमध्ये चर्चेसाठी आले होते. काँग्रेसने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन बोलावले. नेहरु व इतर नेत्यांच्या विरोधात निदर्शने करण्याचा निर्णय समितीने घेतला व हजारो लोकांनी त्यात भाग घेतला. ३ जून १९५६ रोजी चौपाटीवरील सभेत नेहरुंनी अशी घोषणा केली, की मुंबई पाच वर्षांसाठी केंद्रशासित प्रदेश राहील. पाच वर्षांनंतर तिच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाईल. या तिन्ही राज्यांसाठी मुंबई राज्याचे एकच उच्च न्यायालय (हायकोर्ट) व लोकसेवा आयोग असेल. नेहरुंच्या या घोषणेनंतर वातावरण जास्त तापले. देशमुख यांच्या विनंतीवरुन पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपतींनी सी. डी. देशमुख यांचा राजीनामा स्वीकारला. आपल्या भाषणात त्यांनी नेहरुंवर मंत्रिमंडळास महत्त्वाच्या निर्णयांबाबत विश्वासात न घेतल्याबद्दल व मुंबईच्या गोळीबाराची न्यायालयीन चौकशी न केल्याबद्दल दोष दिला. याच काळात महागुजरात परिषदेच्या आंदोलनामुळे गुजरात भाषिक प्रदेशाची मागणी वाढू लागली व तीही चळवळ उग्र बनत गेली. गुजरातेत हिंसाचारात वाढ झाली व तेथे पोलीस गोळीबारात ३० लोक ठार झाले. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन दडपण्याकरिता तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असलेल्या मोरारजी देसाईंच्या शासनाने (१९५२-५६) कठोर उपाय योजले. या चळवळीत एकूण ३१,०९२ इसमांना अटक करण्यात आली, १९,४४५ लोकांवर खटले गुदरले व त्यांतील १८,४१९ लोकांना कैदेची शिक्षा झाली. मुंबई आणि अन्य नागरी व ग्रामीण भागात दंगली उसळल्या. त्यात ५३७ वेळा गोळीबार करण्यात आला. सुमारे ५०० दुकाने लुटली; ८० ट्रामगाड्यांची आणि २०० बसगाड्यांची मोडतोड करण्यात आली. त्या वेळी झालेल्या गोळीबारामध्ये १०५ माणसे बळी गेली. त्यांचे स्मारक पुढे हुतात्मा स्मारक म्हणून मुंबईत फ्लोरा फाउंटनजवळ उभारण्यात आले. विदर्भ वगळून द्वैभाषिकाची वा त्रिराज्याची योजना मान्य होत नाही, हे लक्षात आल्यानंतर महागुजरात व संयुक्त महाराष्ट्र या महाद्वैभाषिक राज्यांचा पर्याय पुढे आणण्यात आला. महाराष्ट्रातील काही नेत्यांचा त्यास आशीर्वाद होता. मुंबईवर पाणी सोडण्यापेक्षा द्वैभाषिकाचा पर्याय बरा, असा विचार करुन या नेत्यांनी त्यास पाठिंबा दिला. महाराष्ट्र काँग्रेसनेही त्यास पाठिंबा दिला. महाद्वैभाषिक मुंबई राज्य १ नोव्हेंबर १९५६ रोजी अस्तित्वात आले. या द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्रिपद तरुण काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांना देण्यात आले. मुंबई कायमची आपल्या हातातून जाऊ नये, म्हणून महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी हा पर्याय स्वीकारला. काँग्रेसच्या विरोधात १९५७ मध्ये होणाऱ्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय संयुक्त महाराष्ट्र समितीने घेतला आणि समितीच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने झंझावाती प्रचार केला. या निवडणुकीत संपूर्ण मुंबई राज्यात काँग्रेसने ३९५ पैकी २२२ जागा जिंकून बहुमत मिळविले; पण प. महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झाला. प. महाराष्ट्रातील १३५ पैकी फक्त ३५ जागा काँग्रेसला मिळाल्या. समितीला ९६ जागा मिळाल्या. सर्व विधानसभेत समितीला १२४ जागा मिळाल्या. या निवडणुकीत न. वि. गाडगीळ, देवकीनंदन, मालोजीराजे नाईक-निंबाळकर, पाटसकर आणि इतर अनेक महत्त्वाचे काँग्रेस उमेदवार पराभूत झाले आणि समितीला अभूतपूर्व यश मिळाले. समितीचे उमेदवार भाई एस्. ए. डांगे मुंबईमधून विकमी बहुमताने विजयी झाले. गुजरात, विदर्भ व मराठवाड्यातून काँग्रेसचे उमेदवार चांगल्या संख्येने निवडून आले. प. महाराष्ट्रातील लोकमत समितीच्या बाजूने आहे, हे सिद्घ झाले. प्रजा समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व रिपब्लिकन पक्ष हे समितीतील चार मोठे पक्ष होते. यशवंतराव चव्हाण हे मुंबई राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले. संयुक्त महाराष्ट्र समितीची संयुक्त महाराष्ट्रासाठी चळवळ चालूच राहिली. समितीने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळविला आणि मुंबईचे महापौरपद समितीस मिळाले. ३० नोव्हेंबर १९५७ रोजी पं. जवाहरलाल नेहरु प्रतापगडावर छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यासाठी येणार होते. द्विभाषकाविरुद्घ मत व्यक्त करुन संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने मोठ्या प्रमाणात प्रतापगडाच्या पायथ्याशी निदर्शने आयोजित केली. हजारोंच्या संख्येने समितीचे निदर्शक नेहरु जाणाऱ्या मार्गावर हजर राहिले आणि त्यांनी निदर्शने केली. पुन्हा १९ डिसेंबर १९५८ रोजी समितीने दिल्ली येथे सत्याग्रह केला. त्यात बेळगावचा व इतर सीमाभागांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या काळात महाराष्ट्रात झालेल्या बहुतेक पोटनिवडणुका समितीच्या उमेदवारांनी जिंकल्या. नगरपालिकांच्या निवडणुकांतही समितीचे उमेदवार विजयी होत होते. १९५८-५९ मध्ये मराठवाड्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकांत समितीच्या उमेदवारांचा विजय झाला. त्यामुळे समितीची लोकप्रियता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत वाढत आहे हे स्पष्ट झाले. महाद्वैभाषिक स्थापन झाल्यानंतर गुजरातेत महागुजरातसाठी महागुजरात परिषदेची चळवळ सुरु झाली. त्या चळवळीला गुजरातच्या शहरी भागात पाठिंबा मिळू लागला. दोन्ही राज्यांत लोकमत विरोधात जात आहे, हे पाहून गुजरात व महाराष्ट्र ही दोन राज्ये वेगळी केली पाहिजेत, अशी भावना काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वात निर्माण होऊ लागली. द्वैभाषिक चालवताना आर्थिक साधनांच्या वाटपाबाबत मतभेद होत होते. त्यामुळे त्यावेळच्या काँग्रेस अध्यक्षा श्रीमती इंदिरा गांधी, गृहमंत्री गोविंद वल्ल्भ पंत आणि इतरांनी शेवटी याबाबतचा निर्णय घेतला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य करण्यात आली; पण सीमेवरचा डांग हा आदिवासी बहुसंख्य लोकसंख्या असणारा जिल्हा, खानदेश आणि उंबरगाव नजिकची अनेक गावे गुजरातला देण्यात आली. त्याचप्रमाणे नवी राजधानी बांधण्यासाठी व इतर खर्चासाठी गुजरातला ५० कोटी रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. १ मे १९६० रोजी गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन स्वतंत्र राज्ये जन्मास आली. गुजरात राज्याचे उद्घाटन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले, तर महाराष्ट्र राज्याचे उद्घाटन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते करण्यात आले. गुजरात आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रदेशांचा समावेश करण्यात आला होता. कच्छ व सौराष्ट्र हे भाग गुजरातेत प्रथमच सामील होत होते. मराठवाड्याचा भाग शेकडो वर्षांनंतर संयुक्त महाराष्ट्राचा भाग बनत होता. नंतरच्या काळात विकासाच्या प्रश्नाबाबत विविध उपभागांत संघर्ष होऊ नये; म्हणून या राज्यांच्या स्थापनेच्या वेळी घटनादुरुस्ती करुन घटनेच्या ३७१ कलमामध्ये विदर्भ, सौराष्ट्र व इतर भागांसाठी विकास परिषदांची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली. या दोन्ही राज्यांची वाटचाल १९६० नंतर सुरु असून सध्या ती भारतातील सर्वांत विकसित अशी राज्ये आहेत. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन ही स्वातंत्र्य चळवळीनंतरची महाराष्ट्रातील व्यापक लोकसमर्थन असणारी चळवळ होती. हे राज्यातील पुरोगामी चळवळीचे सर्वांत मोठे व व्यापक आंदोलन होते. या चळवळीत महाराष्ट्रातील मध्यमवर्ग, कामगार, शेतकरी, विचारवंत आदी समाजातील सर्व स्तर एकत्र आले होते. याशिवाय शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर साबळे, पिराजीराव सरनाईक, आत्माराम पाटील वगैरे शाहिरांनी उभा-आडवा महाराष्ट्र पिंजून काढला व हे आंदोलन गावोगावी पोहोचविले. या चळवळीच्या निमित्ताने काही काळ महाराष्ट्रातील डाव्या पक्षांची राजकीय ताकदही वाढली. या चळवळीच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तत्त्वमंथन झाले व अपूर्व अशी राजकीय जागृती निर्माण झाली. हा प्रश्न बळाचा वापर न करता सामंजस्याने सोडविला असता, तर पुढील प्राणहानी झाली नसती, असे काही तज्ञांचे मत आहे. गुजरात व महाराष्ट्र ही राज्ये स्थापन झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती बरखास्त करण्यात आली. ही समिती विसर्जित करु नये, असा काही नेत्यांनी - विशेषत: आचार्य अत्रे, उद्घवराव पाटील, जयंतराव टिळक - आग्रह धरला; कारण बेळगाव-कारवारचा प्रश्न त्यावेळी निकालात निघाला नव्हता. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषिक बेळगाव-कारवार इ. भूप्रदेश कर्नाटक राज्यात समाविष्ट झाले. ते भाग महाराष्ट्रात समाविष्ट करुन घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती स्थापन झाली. या समितीच्या मागणीप्रमाणे बेळगावबाबत महाजन आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाचा निवाडा उभयपक्षी मान्य होईल, अशी हमी घेण्यात आली होती. तो निवाडा १९६७ मध्ये बाहेर आला; पण त्यात प्रत्यक्ष बेळगाव शहर व कारवार जिल्ह्यातील मराठी भाषिक भागही कर्नाटकातच ठेवावा, अशी शिफारस करण्यात आली; पण ती गोष्ट महाराष्ट्रास मान्य झाली नाही. त्यामुळे वाद कायम आहे.

काही अटींवर वेगळा विदर्भ करावा. जे स्वतंत्र विदर्भवादी आहेत त्यांना १०-१५ वर्ष किंवा त्यांना जो अपेक्षीत कालावधी आहे तो द्यावा विकास करण्यासाठी. त्यांना महाराष्ट्राने काही रक्कम द्यावी. नाही जमले तर त्यांना जाहिररित्या नाक घासायला लावून पुन्हा पुन्हा महाराष्ट्राला जोडून घ्यावे. दिलेली रक्कम व्याजासहीत वसूल करुन घ्यावी. नंतर स्वतंत्र विदर्भवादी नेत्यांनी लाजलज्जा बाळगून राजकीय संन्यास घ्यावा. हे सर्व कागदोपत्री लिखीत करार करुन घ्यावे. नंतर त्याचा आरक्षणासारखा तमाशा करु नये.

टिल्लू 17/10/2014 - 03:12
मुंबईला व्यापारी केन्द्र कायम ठेउन औ.बादला राजधानी करावे. याचे अनेक फायदे आहेत. मुंबईतली गर्दी काही प्रमाणात कमी होइल. औ.बाद महाराष्ट्राच्या जवळ्पास मध्यभागी असलेले ४ क्रमांकाचे मोठे शहर आहे.त्यामूळे राज्याच्याा कानाकोपर्‍यातून येणार्‍या लोकानां जवळ पडेल. विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल. बुलढाणा, अकोला, वाशिम खुपच जवळ येइल राजधानीच्या. मराठवाड्याच्या विकासाला बळ मिळेल. खरतर मराठवाड्याला विकासाची नितांत गरज आहे. आणखी बरेच मुद्दे नमुद करता येईल.

पाषाणभेद 17/10/2014 - 04:35
मागे मी असल्याच एका धाग्यावर उपाय सांगितला होता. आता लिंक सापडत नाही. परत डोक्यात असलेले लिहीतो. नवराज्य (नवजिल्हा, नवतालूका, नवगाव आदी) निर्माण करण्यासाठीचे सल्ले: सल्ला क्रमांक १) एक मोठा नकाशा घ्यावा. (भारत विभाजीत करायचा असेल तर भारताचा घ्यावा, महाराष्ट्र विभाजीत करायचा असेल तर महाराष्टाचा नकाशा घ्यावा, विदर्भ विभाजीत करायचा असेल तर विदर्भाचा मोठा नकाशा घ्यावा. आपले गाव विभाजीत करायचे असेल तर आपल्या गावाचा नकाशा घ्यावा.) तर एक मोठा नकाशा घ्यावा. तो टेबलावर अंथरावा. त्यानंतर त्या नकाशाच्या गुणोत्तरीय प्रमाणात (म्हणजे १: ०.१०, १:०.००१० असे) गोल वाटी, ताटली, बशी, कप, पेला, बांगडी, गुण्या आदी. घ्यावा. त्या गोलाने त्या नकाशावर वरपासून खालपर्यंत, व डावीबाजूकडून उजवीकडे सगळीकडे गोल काढावे. त्याचे केंद्रबिंदू ठळक करावा. उदा. खालील प्रतीमा पहा: hub and spoke model of state division. Hub and Spoke model of Future Indian States Division (Patent Pending with पाषाणभेद) आता नकाशातील लहानलहान वर्तूळे म्हणजे नवीन निर्माण केलेले राज्ये मानावीत. त्यांचा केंद्रबिंदू म्हणजे त्या नवनिर्माण केलेल्या राज्याची राजधानी होय. असल्याच प्रकारे नवजिल्हानिर्मीती, नवतालूकानिर्मीती, नवगावनिर्मीती, नवगल्लीनिर्मीती होवू शकते. या प्रकारच्या तयार होणार्‍या नवराज्याच्या आजूबाजूला चार गोलांमध्ये काही भाग स्वायत्त असू द्यावा की नको याबाबत समीती नेमावी. (मी अध्यक्ष व्ह्यायला तयार आहे.) याने काय साध्य होईल? : १) प्रत्येक नवराज्य, नवजिल्हा, नवतालूका, नवगाव यांचे क्षेत्रफळ समान असेल. २) प्रत्येक नवराज्य, नवजिल्हा, नवतालूका, नवगाव यांची राजधानी राज्याच्या परीसीमेपासून समान अंतरावर असेल. ३) समान अंतरावरील राजधानीकडे जाण्यासाठी सर्वांना सोईचे होईल. ४) राजधानीकडे जाण्यासाठी "हब अँन्ड स्पोक" मॉडेलप्रमाणे रस्तेनिर्मीतीचे नवनिर्माण करावे. ५) याने रोजगारात वाढ होईल. ६) एखाद्या राज्याकडे पुरेसे नैसर्गीक संसाधने नसतील (नदी, पाणी, कोळसा, मँगेनीज, निकेल, उर्जा आदी.) तर ती शेजारच्या राज्याने उधार किंवा व्याजाने द्यावीत, विकावीत. विकत घेणार्‍या राज्याने आपले काही रिसोर्सेस द्यावेत. (मानवी श्रम, कापड चोपड, बाजरी गहू धान्य, डोंगराळ भाग असेल तर दगड माती आदी.) असला रोटीबेटीचा व्यवहार करावा. सल्ला क्रमांक २) (हा सल्ला दुसर्‍या एका मोठे राज्य असलेलेल्या मराठी संस्थळावर आधीच दिला होता. (यावरून नवनिर्मीतीची गरज किती मोठ्या प्रमाणात आहे हे दिसून येते.)) जमीन खोदून प्रत्येक राज्याला समांतर राज्ये निर्मीण्याचे नवनिर्माण केले पाहिजे. असली समांतर राज्ये साधारणपणे प्रूथ्वीच्या गाभ्यापर्यंत निर्माण केली जावू शकतात. गाभा वितळवून त्याचा उपयोग उर्जा निर्मीतीसाठी केला जावू शकतो. त्यानंतर तेथून एक लांब टनेल टाकून दुसर्‍या देशातील आपापल्या राज्यांत आंतरराज्यराष्ट्रीय रेल्वे चालू केली जावू शकते. अजूनही काही सल्ले आहेत पण ते घेण्यासाठी आमची व्यावसायीक सेवा सवलतीच्या दरात घ्यावी. - माननिय पाभे (दफोराव) यांचे नवराज्य, नवजिल्हा, नवतालूका, नवगाव आदी. नवनिर्माण सल्ला केंद (आमचे येथे श्रीकृपेकरून देश, राज्य, विभाग, जिल्हा, प्रांत, तालूका गाव, गल्ली विभाजून मिळेल. राज्य विभागून देण्यात आमचा हातखंडा आहे.) (संस्थेचे ध्येय्यवाक्य: एकीकरण गेले खड्यात, तोडून नवनिर्मीती हाच खरा आधार) पुढील ध्येय्यवाक्य: आधी घाला राडा, मग फोडा त्यानंतरच हादडा त्यापुढील ध्येय्यवाक्य: भाषावार प्रांतरचना: बिन्डोकपणाचा कळस त्यापुढील ध्येय्यवाक्य: काय तुम्हाला मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री बनता येत नाही, मग कमीतकमी छोट्या राज्याचे तरी मुख्यमंत्री बना! (संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेप्रश्नी अंगावर लाठी झेलणारे व संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील नेते: एस्. एम्. जोशी, आचार्य प्र. के. अत्रे, भाई श्रीपाद अमृत डांगे, ना. ग. गोरे, उद्घवराव पाटील, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, जयंतराव टिळक व इतर हुतात्म्यांना वंदून करून मागणी करतो की महाराष्ट्राची शकले करणार्‍या करंट्यांना क्षमा करा.)

कपिलमुनी 17/10/2014 - 07:08
जसे आंजावर नवीन संंस्थळे निर्माण होतात त्या नियमानुसार नवीन राज्यांची गरज आहे ;)

प्रसाद१९७१ 17/10/2014 - 10:53
विदर्भ तर नक्कीच वेगळा करावा. कीती वर्ष पुणे, मुंबई ची लोक त्या लोकांचा भार वाहतायत. पण तो मराठवाडा पण वेगळा करावा उरलेल्या महाराष्ट्रा पासुन. हा भाग तर सर्वांना खाली ओढतोय.

सुनील 17/10/2014 - 11:09
मी काय म्हंतो, आता विदर्भ वेगळा करून र्‍हायलाच आहात तर हातासरशी आमचा सुबाभूळगाव बुद्रुक पण वेगळा करून टाका की! मंजे काय की मुख्यमंत्री व्हायचं आमचं सात जन्मापासून उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण होईल! आपला, सरपंच (आणि अर्थातच भावी मुख्यमंत्री) सुबाभूळगाव बुद्रुक

हेमंत लाटकर 26/03/2016 - 13:35
भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.कि.मी आहे याला भागून २० राज्ये बनवावीत. प्रत्येक भाषिकांनी दिलेल्या राज्यातच राहावे व आपला आणि राज्याचा विकास करावा.

कपिलमुनी 16/10/2014 - 11:25
राज्ये , भौगोलिक रचना, क्षेत्रफळ आणि लोकसंख्या यांनुसार ठरवली पहिजेत. यासाठी काहीतरी एककं हवे जसे की २ कोटी - ३ कोटी लोकसंह्येचे एक राज्य ,

In reply to by प्रभाकर पेठकर

कपिलमुनी 16/10/2014 - 14:36
काका , लोकसंख्या हे एक सहज सुचलेले उदहरण होते . लोकसंख्या , तिची घनता, भाषा , सामाजिक आर्थिक जीवनमान , भौगोलिक स्थान .. अशा इतर अनेक बाबी यामधे अंर्तभूत होतील. पण तज्ज्ञ ( हेच बरोबर ना ? ) लोकांनी यावर अहवाल दिला तर राज्य निर्मितीसाठी एक सूत्र ठरवता येइल

In reply to by कपिलमुनी

मोदक 16/10/2014 - 14:58
१९९६ साली सेना भाजपचे सरकार बर्‍यापैकी स्थिरावल्यानंतर हा मुद्दा काँग्रेसने पुन्हा चर्चेत आणला होता. या अनुषंगाने अनेक बैठका आणि पत्रकार परिषदांनंतर दत्ता मेघेंनी यावर एक अहवाल तयार करण्यास सुरूवात केली. दरडोई उत्पन्न, शालेय शिक्षण, स्त्री साक्षरता, रस्ते, रेल्वे, (दळणवळण), वैद्यकीय सुविधा, पिकाखालील जमीन, शेतकामगार, सिंचन अशा २४ "विकासनिकषांवर" मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ यांचा तुलनात्मक अहवाल. असे सर्वसाधारण स्वरूप होते. या २४ निकषांपैकी जवळजवळ सर्व निकषांवर मराठवाडा विदर्भापेक्षा मागासलेला होता. २४ पैकी ८ निकषांवर विदर्भ पहिल्या / दुसर्‍या, ६ निकषांवर तिसर्‍या आणि २ निकषांवर चौथ्या स्थानावर होता. मराठवाडा कोठेही पहिल्या स्थानावर नव्हता. धक्कादायक म्हणजे कोकण २४ पैकी १४ निकषांवर चौथ्या स्थानावर होता. हा अहवाल कधीही प्रकाशीत झाला नाही. अचानकपणे एकदा प्रवीण बर्दापूरकर (पत्रकार) यांच्या हाती हा अहवाल पडला व त्याचा गोषवारा प्रसिद्ध झाला.

In reply to by कपिलमुनी

अरे, माझा प्रतिसादही सहज सुचला म्हणून टाकला. नथिंग सिरियस. विषय गंभीर आहे आणि त्यावर गंभीर प्रतिसाद देण्याइतका माझा अभ्यास नाही.

विटेकर 16/10/2014 - 11:40
केवळ प्रशासनाच्या सोयीसाठी असेल तर जरूर करावा. त्यातून राजकारण पेटवू नये . नाहीतर नागपूरकर, पुण्या- मुंबईत परप्रांतीय ठरतील आणि राज ठाकरेना आणखी एक मुद्दा मिळेल. किंवा सरळ सार्वमत घ्यावे ! जो निर्णय येईल तो येईल. लोकशाहीत लोकांची इच्छाच निर्णायक असली पाहिजे.

नाखु 16/10/2014 - 11:44
२.विदर्भाला विकासासाठी पुरेसा निधी मिळत नाही. निधीचा खुप मोठा भाग इतर प्रबळ विभाग (उदा. पश्चिम महाराष्ट्र) नेतात. ज्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान (जास्तीत जास्त) ज्या राज्यातून आले (काही वेळा पूर्ण बहुमतात) तरी त्या राज्यांचा मागासलेपणा (विकास अभाव) निव्वळ स्थानीक नेत्यांच्या "कपाळकरंटेपणा/कूपमंडूक व्रुत्ती" आणि राज्यातील उदासीन जनता यामुळे झाला आहे . तोच परिमाण विदर्भ नेत्यांना देखील लागू आहे (जाणकार यावर प्रकाश टाकतील्च) पण विदर्भातील नेते देखील राज्यात मुख्यमंत्री/केंन्द्रात वजनदार मंत्री होते वास्तव नजरेआड करून चालणार नाही बाकी मुद्यांबाबत फार अभ्यास नाही म्हणून पास.

In reply to by नाखु

सतिश गावडे 16/10/2014 - 11:50
>> पण विदर्भातील नेते देखील राज्यात मुख्यमंत्री/केंन्द्रात वजनदार मंत्री होते वास्तव नजरेआड करून चालणार नाही. याचं उत्तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोन दिवसांपूर्वीच्या मुलाखतीत मिळू शकेल.

विदर्भाला कोणी वाली उरला नाहीये...लोकांची इच्छा असेल तर होऊ दे वेगळा राज्य...कोणीही काहीही आश्वासने द्यावीत आणि लोकांनी भुलावे असे चालू आहे...केंद्रात सरकार असताना ते विदर्भाचा पाहिजे तेवढा विकास करू शकतात...प्रशासनाच्या सोयीचा भाग सोडला तर वेगळे काढून करायची तेवढी गरज नाही...कारण चांगली कॉलेजेस महाराष्ट्रात, नोकर्या इकडेच. महाराष्ट्राला विजेची गरज आहे विदर्भ कडून...असे असताना दोघा एक-मेक शिवाय कसे चालतील. ...अथवा असे कोणते मोठे व्हिजन आहे जे हे मुलभुत प्रश्न सोडून केवळ वेगळा विदर्भ करून सोडवू शकते ? महाराष्ट्रात कोणी थोड्या काळात १०-२०००० मेगावेत वीज निर्माण करू शकत नाही...अथवा चांगली कोलेज आणि नोकर्या तिकडे आणू शकत नाही. मग वेगळे होऊन विदर्भा सकट महाराष्ट्र पण गाळात जाईल...मागे आंध्र मध्ये जशी गुंतवणूक थांबली तसे महाराष्ट्र आणि विदर्भात होईल अशी भीती वाटते... असे असताना यात राजकारण आणि अभिमान आणू नये.

विदर्भात विकासाच्या नावानी बोंबाबोंब आहे. आमच्या सुदैवानी पश्चिम महाराष्ट्रामधे बर्‍यापैकी सोयीसुविधा आहेत. राज्य छोटं झालं तर जास्त चांगला विकास करता येईल अशी आशा आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ करावा. विदर्भामधे वेगेवेगळे प्रकल्प उभारावेत आणि तिकडच्या लोकांनाही चांगलं आयुष्य जगायची संधी मिळावी हिचं सदिच्छा.

असंका 16/10/2014 - 12:50
वेगळा विदर्भ झाल्यावर जे उरेल त्याला काय म्हणायचं? "लघुमहाराष्ट्र"? की 'लघु' आणि 'महा' हे एकमेकांना नलीफाय करतील म्हणून नुसतेच "राष्ट्र"? की कितीही कमी झाला तरी आपला तो नेहमीच महाराष्ट्र? आणि जर विदर्भातले लोक पण म्हणाले की आमचा तोच "महाराष्ट्र"? बाकी जे राहिल त्याने दुसरे नाव शोधावे, तर मग?

वेल्लाभट 16/10/2014 - 12:57
मला नाही वाटत. प्रशासन सोपं वगरे म्हणता.... मग त्यासाठीच जिल्हे, तालुके असतात नाही का? एक मुद्दा आपला उगाचच घ्यायचा लोकांना भरकटवायचं. लोक पण भरकटतात. वेगळा हवा वेगळा हवा. मग मला नाई का, ठाणे ! हे एक वेगळं राज्य असावं वाटतं. मुंबईमुळे ठाण्याचा विकास होत नाही. सगळ्या बाबतीत ठाण्याला उप-यासारखं वागवलं जातं. मुंबईत पाऊल जरी ठेवायचं असेल तरी ठाणेकराला टोल लागतो. किती किती अन्याय होतो म्हणून सांगू.

In reply to by वेल्लाभट

सतिश गावडे 16/10/2014 - 13:12
हे पुणे किंवा मुंबईत बसून लिहिणं खुप सोपं आहे.
मग त्यासाठीच जिल्हे, तालुके असतात नाही का? एक मुद्दा आपला उगाचच घ्यायचा लोकांना भरकटवायचं. लोक पण भरकटतात. वेगळा हवा वेगळा हवा.
या न्यायाने ते ठाण्याचे विभाजनही व्हायला नको होते. छत्तीसगड, उत्तरांचल, तेलंगना, झारखंड अशी राज्येही निर्माण व्हायला नको होती. त्यांचाही विकास होत असणार आधी. त्यांचेही प्रशासन सोयीने चालत असणार आधी. नाही का?

लोकांमध्ये तशी भावना आल्याशिवाय वेगळ्या विदर्भाची मागणी होणार नाही. राज्य सरकारची औद्योगिक धोरणे ही बहुतंशी मुंबई-पुण्यापुरती मर्यादित होती. नव्या सरकारने पाच वर्षाचे टार्गेट ठरवून मागास जिल्ह्यांचा विकास करावा असे सुचवते.

आदिजोशी 16/10/2014 - 13:32
इतकी वर्ष विदर्भावर अन्याय झाला तो करंट्या राजकारणामुळे. भाजपा सत्तेवर आला की सर्वांगीण आणि समतोल विकास होईल आणि विदर्भ वेगळा करायची गरजच पडणार नाही.

शिद 16/10/2014 - 14:25
वेगळा विदर्भ झालाच पाहिजे !!! - बबन फ्रॉम इ-सकाळ

In reply to by शिद

बॅटमॅन 16/10/2014 - 14:50
वेगळा बबन झालाच पाहिजे!!!! - विदर्भ.

In reply to by बॅटमॅन

नाखु 16/10/2014 - 14:59
वेगळ्या बबनसाठी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हॅ!

१. गडचिरोली, चंद्रपूर सारख्या दुरस्थ जिल्ह्यातील लोकांना प्रशासकीय कामासाठी तीन दिवस प्रवास करुन मुंबईत यावे लागते. मुंबईत येऊन काम न झाल्यास कुठे राहायचे हा प्रश्न भेडसावतो. - असे जरी असले तरीही हा प्रश्न वेगळे राज्य करण्याईतपत मोठा वाटत नाही. असे रोजच्या रोज किती लोकांना मुंबईला जावे लागते. आणि जर असेल, तर हे सगळेच आपल्या महाराष्ट्राचे लोक आहेत म्हणून चांगले रस्ते, रेल्वे या सुविधा सरकारने द्याव्यात. आणि वेळेत काम होईल अशी सरकारी व्यवस्था असेल तर मग काम न झाल्यास हा मुद्दा कमी प्रमाणत येईल. आता त्यातही, बुलढाणा जिल्हा अजूनच एका टोकाला आहे. त्यातले काही लोणार सारखे तालुके अजूनच लांब. तिथून नागपूर काय आणि मुंबई काय, कुठेही जायला गैरसोय आहेच. २. विदर्भाला विकासासाठी पुरेसा निधी मिळत नाही. निधीचा खुप मोठा भाग इतर प्रबळ विभाग (उदा. पश्चिम महाराष्ट्र) नेतात. फारसा अभ्यास नसल्याने जास्त काही न बोलणे उत्तम. तरिही ज्या विदर्भातील नेत्यांना आपल्या प्रदेशाचा विकास करता आला नाही ते खापर फोडायला उर्वरीत महाराष्ट्राचा मुद्दा घेणार आणि इतर नेत्यांपैकी ज्यांनी विदर्भाला खरच डावलले असेल आणि यातून स्वतःचा फायदा केला असेल तर ते विरुद्ध बाजूने बोलणार असे होऊ शकतेच. ३. काही राजकीय पक्षांना हा फक्त राजकीय मुद्दा म्हणून हवा आहे. निवडणूकांच्या वेळी हा मुद्दा उकरुन काढून लोकांच्या भावनांना हात घालता येतो. तसेच वेगळा विदर्भ झाल्यास आपली सत्ता कमी प्रदेशावर असेल ही भीती वाटते. हा राजकीय मुद्दाच आहे. विदर्भ होणे किंवा न होणे दोन्हीतही ज्यांना जसे फायदे वाटतात तसे ते ते राजकीय पक्ष बोलणार. या सगळ्यातून खरंच चांगला बदल झाला तर उत्तम पण इथे देशाला स्वातंत्र्य मिळून इतक्या वर्षात आपला असा काय विकास झालाय जो अचानक वेगळ्या राज्याने होईल. केवळ वेगळा झाला की विकास होईल हा केवळ निवडणुकीत दखवायचा मुद्दा आहे. बहुतांशी सामान्य जनतेला काय वाटते ते पुढे लिहिते. ४. वेगळा विदर्भ झाल्यास विदर्भात ज्या राजकीय पक्षाचे प्राबल्य आहे त्यांचा तो बालेकिल्ला होईल आणि इतरांना तिकडे शिरकाव करता येणार नाही. बालेकिल्ला होऊन काही प्रमाणात तरी त्या पक्षाने बदल करून दाखवले तर उत्तम. सामान्य जनतेबाबत - सामान्य जनतेला वेगळा विदर्भ नकोच आहे. आणि समजा झालाच, तरीही कुणी फारसे आंदोलनकारी नाहीत, झाला तर आपला म्हणून मान्य करतील पण उर्वरित महाराष्ट्र देखील तेवढाच आपला वाटेल. काहीना, विशेषतः शिक्षणासाठी पुण्या मुंबईला जाण्याची इच्छा असणार्यांना कदाचित यात गैरसोय वाटेल. कारण राज्य दुसरे झाले की जागा मर्यादित होतील वगैरे वगैरे. बुलढाणा किंवा जवळच्या परिसरात जवळचे त्यातल्या त्यात मोठे शहर म्हणजे औरंगाबाद. त्यामुळे अनेक लोक वैद्यकीय सुविधांसाठी तिथेच जातात. राज्य बदलले तरीही यात काही बदल होणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचे, ही सगळी माझी वैयक्तिक मते. मला काय वाटते ते. एवढे करूनही काय होईल त्यावर माझे नियंत्रण काहीच नाही. विदर्भ काय आणि महाराष्ट्र काय, माझ्या भावना दोन्हीबाबत सारख्याच असतील. जसे आपल्याला आपल्या गावाबद्दल जास्त प्रेम असते तसेच महाराष्टात राहूनही विदर्भ म्हणजे थोडा जवळचा वाटतो एवढेच.

In reply to by मधुरा देशपांडे

संजय कथले 16/10/2014 - 16:09
मिहान प्रकल्पामुळे नागपुरातील आम्हा लोकांना विकासाचे वारे डोक्यात वाहत होते …पण काय झाल ???? ते भिजत घोंगड तसाच रखडलय… आणि पुण्या आधी नागपूर मध्ये मेट्रो च्या कोनशीला माननीय मुख्यमंत्री नाराज होतांना पाहिले …

In reply to by संजय कथले

सुहासभाऊ 16/10/2014 - 16:16
जय विदर्भ .............. हे मुखमंत्री काय फक्त पुण्याचे का...? नागपूर आधी झाल तर त्याचं पोट दुखलं........... मन मोठ करून आले असते तर काय बिघडलं असत ............ ते काय पुण्याचे महापौर होते पुण्या ची बाजू घ्यायला ......... या राज्याचे प्रधान होते ना ते.......... मग नागपूर ला आधी झाल तर काय बिघडलं .................

In reply to by मधुरा देशपांडे

सुहास.. 16/10/2014 - 16:24
१. गडचिरोली, चंद्रपूर सारख्या दुरस्थ जिल्ह्यातील लोकांना प्रशासकीय कामासाठी तीन दिवस प्रवास करुन मुंबईत यावे लागते. मुंबईत येऊन काम न झाल्यास कुठे राहायचे हा प्रश्न भेडसावतो. +१ , ते बच्चु कडुंनी मंत्रालयात एकाच्या " आश्रमशाळेच्या बिलावरुन कर्मचार्‍याच्या कानामागां ठेवुन दिल्याचे प्रकरण आठवले !! २. विदर्भाला विकासासाठी पुरेसा निधी मिळत नाही. निधीचा खुप मोठा भाग इतर प्रबळ विभाग (उदा. पश्चिम महाराष्ट्र) नेतात. ? निधी , आमदार-खासदार-नगरसेवक यांना सपुर्ण देशात समान मिळतो....( यादी देतो थोड्या वेळात, ज्याने १००% निधी वापरलाय तो , राका चा आहे हे आश्चर्य आहे !! अरे हो , तुम्ही म्हणाल पैसै खाल्ले असतील ...नाही करु शकत टेक्नीकली , ऑडिट च खर्च देते डायरेक्ट नाहीतर त्यांच्या मानगुटीवर ( नेते नाही ) बसतो .. ..आणि प.म. ला आजवर कधी पॅकेज दिल्याच आठवत नाहीये !! :)

मदनबाण 16/10/2014 - 14:29
संपूर्ण राज्याचा विकास करण्याची क्षमता महाराष्ट्रातील राजकारण्यां मधे नाही हा निष्कर्ष वेगळा विदर्भची मागणी करताना काढता येउ शकतो का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

सुहासभाऊ 16/10/2014 - 16:28
वीज उत्पादन विदर्भात , वीज जाते मुंबईला ........... विदर्भातले लोक खातात धूळ ( फ्लाय अश ) ............ विदर्भ राहतो लोडशेडींग मध्ये........... शेतकरी करतो आत्महत्या ...... पिण्याला नाही पाणी , शेतीला नाही पाणी ...... नोकरी नाही ............. जय महाराष्ट्र ...........

In reply to by संजय कथले

काळा पहाड 16/10/2014 - 16:45
कथले साहेब, अती करू नका. तुमच्या भावना कळल्या. पश्चिम महाराष्ट्रातील असून सुद्धा आम्हाला विदर्भ वेगळा व्हावा हे पटते. तेव्हा उगीच जाहीरात केल्यासारख्या पोस्ट टाकायची गरज नाही.

सुहास.. 16/10/2014 - 16:33
स्वतंत्र विदर्भाची मागणी हा महाराष्ट्रद्रोहच! लहान राज्ये असली की त्यांचा विकास होतो ही कल्पनाच चुकीची आहे. नवीन राज्य निर्माण केल्यामुळे बराचसा निधी अनुत्पादक आणि प्रशासकीय बाबींवर फुकट जातो. सुमारे ४० वर्षांपूर्वी प्रादेशिक वाद मिटविण्यासाठी आसामचे तुकडे पाडून त्यातून अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय ही वेगळी राज्ये निर्माण करण्यात आली. त्यांचा विकास झाला असे म्हणता येत नाही. उलट त्यामुळे फुटीरतेच्या चळवळीला मात्र प्रोत्साहन मिळाले. ‘विदर्भ वेगळा करणारच!’ ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची दर्पोक्ती दुर्दैवी आहे. मुळात राज्याच्या जनतेचा विरोध असताना स्वतंत्र विदर्भाला भाजपने मान्यता देणे गैरच आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून ५४ वर्षांपूर्वी निर्माण झाला. त्या ‘महा’राष्ट्रातून विदर्भाचा लचका कोणी तोडू नये. विदर्भाच्या किंवा देशाच्या कोणत्याही भागाच्या विकासाला कोणाचाच विरोध असायचे कारण नाही, पण विकासाच्या नावाने आपला राजकीय स्वार्थ साधण्याला जनतेचा विरोध आहे. विकास म्हणून विदर्भवासीयांना जे हवे असेल ते महाराष्ट्रात राहूनही ते मिळवू शकतात. विकासाचा बॅकलॉग भरून काढायला स्वतंत्र राज्यच कशाला हवे? ज्या गोष्टींचा अंतर्भाव विकास या संकल्पनेत होतो, त्या सर्व गोष्टी वेगळे राज्य निर्माण न करताही मिळविता येतील. महाराष्ट्राचे तीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, मारोतराव कन्नमवार आणि सुधाकरराव नाईक हे विदर्भातीलच होते. त्यांच्यापुढे विदर्भ विकासाच्या योजना स्वतंत्र विदर्भाच्या पुरस्कर्त्यांनी माडल्या होत्या का? या मुख्यमंत्र्यांनी त्या नक्कीच धुडकावून लावल्या नसत्या. याचा अर्थच असा की, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीमागे विकासाचा उद्देश नसून राजकीय स्वार्थ आहे. लहान राज्ये असली की त्यांचा विकास होतो ही कल्पनाच चुकीची आहे. अनेक बाबतीत विकासाचे घटक जिल्हा, तालुका आणि गाव असते. त्यामुळे या प्रत्येक घटकाने आपल्या विकासासाठी जे आवश्यक आहे ते केले की, पुरेसे आहे. कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी खरोखरच आवश्यकता असेल तर ती म्हणजे निधीची आणि नवीन राज्य निर्माण केल्यामुळे बराचसा निधी अनुत्पादक आणि प्रशासकीय बाबींवर फुकट जातो. हा पैसा रस्ते, उद्योगधंदे, विद्यालये, महाविद्यालये, मैदाने, क्रीडांगणे, बगिचे, सार्वजनिक दवाखाने, सार्वजनिक वाचनालये, पाणी, वीज यांची अधिक निर्मिती इत्यादी सोयीसवलती यांच्यासाठी खर्च केला तर जनतेची अधिक सोय होईल. वेगळे राज्य करून प्रशासकीय खर्च वाढवण्यापेक्षा तो पैसा ग्रामीण भाग आणि शहरे यातील फरक कमी करण्यासाठी, प्रत्येक गाव शहरांना पक्क्या रस्त्यांनी आणि दळणवळणाच्या मुबलक साधनांनी जोडण्यासाठी खर्च केला तर विदर्भ अधिक विकसित होईल; तो पैसा सिंचन योजनांसाठी वापरला आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर केले तर शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील. अनुत्पादक खर्च वाढवून नेत्यांचा विकास होईल, विदर्भाचा नाही. स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचनेचे तत्त्व देशाने स्वीकारले,त्यानुसार १४ राज्ये आपल्या देशात निर्माण झाली. त्यानंतर स्वायत्तता, वांशिक भेद, असमतोल विकास अथवा अन्य काही कारणांमुळे सतत नवीन राज्याच्या मागण्या करण्यात आल्या, त्या मान्य करण्यात आल्या आणि त्यामुळे आता देशातील राज्यांची संख्या २९ झाली आहे. सुमारे ४० वर्षांपूर्वी प्रादेशिक वाद मिटविण्यासाठी आसामचे तुकडे पाडून त्यातून अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय ही वेगळी राज्ये निर्माण करण्यात आली. ही सर्व राज्ये अत्यंत छोटी आहेत तरीही त्या राज्यांचा त्यामुळे विकास झाला असे म्हणता येत नाही. उलट त्यामुळे फुटीरतेच्या चळवळीला मात्र प्रोत्साहन मिळाले. अजूनही देशाच्या या ईशान्येकडील भागात स्वतंत्र बोडोलँडवादी आणि उल्फावादी अतिरेकी संघटनांकडून हिंसाचार सतत चालू असतो. त्यात निरपराध नागरिकांचे बळी जातात आणि शासकीय मालमत्तेचे म्हणजेच आपले सर्वांचे नुकसान होत आहे. राज्ये लहान असली तरी तेथील शासनकर्ते आपल्या राज्यात शांतता आणि कायदा राबवू शकत नाहीत. मध्य प्रदेश, बिहार यांच्या आदिवासी विभागाचे तुकडे काढून वेगळे छत्तीसगढ आणि झारखंड राज्य निर्माण करण्यात आले. वेगळ्या झारखंडमुळे मधू कोडा यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. त्यांनी कोळसा खाणवाटपात भ्रष्टाचार करून स्वत:चा विकास केला. झारखंड तसेच राहिले. उत्तर प्रदेशचा एक तुकडा काढून उत्तराखंड राज्य करण्यात आले. तेथे गतवर्षी पावसाळ्यात केदारनाथ, बद्रीनाथ इत्यादी धार्मिक स्थानी यात्रा करणारे हजारो यात्रेकरू मृत्युमुखी पडले. त्या भागाचा शास्त्रीय पद्धतीने विकास न झाल्यामुळे आणि भ्रष्टाचारामुळे हे झाले. विकासाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे भ्रष्टाचार आणि स्वार्थ. राज्यांची संख्या वाढवून विकास होत नसतो. अधिक राज्ये निर्माण केल्याने केवळ अनुत्पादक व प्रशासनिक खर्च वाढतो आणि विकास खुंटतो. स्वतंत्र विदर्भ निर्मितीस विरोधाची जी कारणे आहेत तीच अन्य राज्यनिर्मितीच्या विरोधाच्या बाबतीतही लागू पडतात, परंतु तरीही तेलंगणा राज्य निर्माण झाले. त्यामुळे संकुचितपणा मात्र वाढू लागला. तेलंगणा सरकारने एक सर्व्हे घ्यायला सुरुवात केली. त्यानुसार कोण स्थानिक आणि कोण बाहेरचा ही शिरगणती सुरू झाली. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या खासदार कविता हिने तेलंगणा आणि जम्मू-कश्मीर हे हिंदुस्थानचे भाग नाहीतच असे विधान केले. आज जी छोटी राज्ये आहेत त्यांच्या काही भागाच्या विकासासाठी राजकारणी लोक उद्या आणखी छोट्या राज्यांची मागणी करतील. उद्या नागपूर, अमरावती, अकोला यांचा विकास करण्याच्या नावाखाली विदर्भाचेही आणखी तुकडे पाडण्याचा अट्टहास होईल. खरे म्हणजे राज्यांची संख्या कमी कशी करता येईल याचा विचार जनतेने आणि राज्य पुनर्रचना आयोग निर्माण झाल्यास त्याने करावा. गोवा महाराष्ट्राला जोडावा. दीव-दमण, दादरा-नगरहवेली गुजरातला जोडावीत. पुद्दुचेरी, पोर्ट ब्लेअर तामीळनाडूला जोडावे. पूर्वीप्रमाणेच आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश ही राज्ये करावीत. दिल्ली ही देशाची राजधानी असल्यामुळे ती फक्त केंद्रशासित असावी. यामुळे कोट्यवधी रुपयांचा अनुत्पादक प्रशासकीय खर्च वाचेल आणि त्याचा उपयोग संबंधित प्रदेशांच्या विकासासाठी करता येईल. हिंदुस्थानच्या घटनेप्रमाणे स्वतंत्र राज्यांच्या निर्मितीचा अधिकार,त्याचप्रमाणे राज्यांच्या सीमा निश्चित करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे हे चांगले आहे. राज्य सरकारे याबाबत केवळ ठराव संमत करू शकतात. मात्र स्वतंत्र राज्यनिर्मितीसाठी कोणते निकष असावेत याबद्दल घटनेत मार्गदर्शन नाही.त्यामुळे स्वतंत्र राज्यनिर्मितीचे निर्णय केवळ राजकीय असतात. - केशव आचार्य

मदनबाण 16/10/2014 - 16:41
ज्यांनी ही बातमी वाचली नाही त्यांच्यासाठी :- भांडवली दलालांची मुंबईकडे पाठ बाकी चालु ध्या...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

संजय कथले 16/10/2014 - 17:14
संयुक्त महाराष्ट्र आंदोलन : सर्व मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वाच्या आधारावर एक राज्य स्थापन करण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला संयुक्त महाराष्ट्र आंदोलन किंवा चळवळ असे म्हणतात. ही चळवळ स्वातंत्र्यपूर्व काळात सुरु झाली आणि १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर ती समाप्त झाली. १९५० ते १९६० या काळामधील महाराष्ट्रातील हे सर्वांत व्यापक असे जनआंदोलन होते आणि त्यात एकूण १०५ लोकांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. इ. स. बाराव्या शतकात मराठी भाषिक लोकांच्यात राजकीय व सांस्कृतिक अस्मितेची जाणीव वाढीस लागली; पण राजकीय दृष्ट्या मराठी भाषिक लोक विखुरलेले राहिले. इंग्रजांच्या काळात मराठी भाषिक लोक मुंबई राज्य, हैदराबाद संस्थान आणि मध्य प्रांतात विभागलेले होते. प. महाराष्ट्राचा भाग मुंबई राज्यात मोडत होता. गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता, तर मराठवाड्याचे पाच जिल्हे हैदराबाद संस्थानात होते. विदर्भाचे आठ जिल्हे मध्य प्रांताचा भाग होते. या सर्व भागांना एकत्र आणून त्यांचे भाषेच्या आधारे एक राज्य बनविण्यात यावे, असा विचार त्या काळात बळावत होता. काँग्रेस पक्षाने भाषावार प्रांतरचनेचे तत्त्व मान्य केले. नंतरच्या काळात काँग्रेस पक्षाने भाषेच्या आधारावर प्रदेश काँग्रेस समित्यांची स्थापना केली. मुंबई राज्यात गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक या प्रदेश समित्या स्थापन झाल्या. भारताला स्वातंत्र्य मिळाले; परंतु भारतीय संविधानात भाषिक प्रदेश राज्यांची स्थापना करण्यासंबंधी नियमावली अंतर्भूत केली नव्हती. तथापि इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अहमदाबाद अधिवेशनात (१९२१) भाषिक राज्य होणे आवश्यक आहे, असा ठराव संमत झाला होता. तरीसुद्घा तत्कालीन नेहरु सरकारने भाषावार प्रांताबाबत नकारात्मक भूमिका स्वीकारली. सरकारने स्थापन केलेल्या दर समितीने भाषावार प्रांतरचना करण्यास नकार दिला. यावर विचार करण्यासाठी काँग्रेसने ‘ जेव्हीपी ’ समिती नेमली. या समितीत जवाहरलाल नेहरु, वल्ल्भभाई पटेल व पट्टाभि सीतारामय्या यांचा समावेश होता. या समितीने भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न अग्रक्रमाने हाती घेतला जाऊ नये, अशी शिफारस केली. याबाबतीत केंद्र सरकार व पं. नेहरु यांच्या मते चार महत्त्वाच्या अडचणी होत्या : (१) भाषावार प्रांतरचनेचा निर्णय घाईघाईने घेतला जाऊ नये; कारण शेकडो वर्षे एकसाथ राहणाऱ्या लोकांच्या जीवनपद्घतीत एकदम मोठा बदल घडवून आणणे इष्ट नसते. (२) प्रत्येक भाषिक गटात अल्पसंख्याक भाषिक घटक आहेत. त्यांचा या मागण्यांना विरोध आहे. त्यांच्या आक्षेपांचा योग्य असा विचार झाला पाहिजे. (३) देशापुढे विकासाचे व ऐक्याचे इतर महत्त्वाचे प्रश्न असताना भाषावार प्रांतरचनेसारखा लोकांचे विभाजन करणारा विषय अग्रक्रमाने रेटू नये. त्यामुळे हिंसक चळवळी व प्रतिचळवळी निर्माण होतील. (४) भारतातील सांस्कृतिक विविधता हे देशाच्या राष्ट्रीयत्वाचे वैभव आहे. हैदराबादसारखे चार भाषा बोलणारे, सामायिक भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करणारे राज्य आपण कायम टिकविले पाहिजे. महाराष्ट्रात मराठी भाषिक राज्याची म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे आंदोलन दिनांक १२ मे १९४६ रोजी बेळगाव येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीच्या स्थापनेपासून विशेष आकारास येऊ लागले. संमेलनाचे अध्यक्ष ग. त्र्यं. माडखोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा पुरस्कार केला. मुंबई राज्यातील प. महाराष्ट्र हा भाग संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी उत्सुक होता. गोवा अजून पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. हैदराबाद राज्यातील मराठवाडा भागातील लोकांची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा होती. मुख्य प्रश्न मध्यप्रांताचा भाग असलेल्या विदर्भाचा होता. नागपूर ही मध्यप्रांताची राजधानी होती आणि राष्ट्रीय चळवळीत विदर्भातील नेत्यांनी मोठी भूमिका बजावलेली होती. शेकडो वर्षांपासून मराठी भाषिक असूनही विदर्भाची वेगळी अशी अस्मिता विकसित झालेली होती. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करणाऱ्या नेत्यांनी विदर्भातील नेत्यांशी चर्चा करुन त्यांच्याबरोबर ‘ अकोला करार ’ केला. या करारात तीन मुद्दे महत्त्वाचे होते : (१) मध्यप्रांतात हिंदी भाषिक विभागाच्या वर्चस्वाखाली विदर्भ राहणार नाही. (२) संयुक्त महाराष्ट्राची मागणी काही कारणांमुळे जर अमान्य झाली, तर स्वतंत्र महाविदर्भाच्या स्थापनेस महाराष्ट्राच्या नेत्यांनी पाठिंबा द्यावा. (३) विदर्भाने मध्यप्रांताचा वा संयुक्त महाराष्ट्राचा उपप्रांत म्हणून राहावे असा पर्याय जर दिला असेल, तर विदर्भाने संयुक्त महाराष्ट्राचा पर्याय निवडावा. १५ ऑगस्ट १९४७ नंतर भारतीय संघराज्यात अनेक संस्थानांचे विलीनीकरण झाले होते. त्यामुळे नव्याने घटकराज्यांची पुनर्रचना करणे गरजेचे होते; पण भारतीय घटनाकारांनी घटकराज्यांत उपप्रांत तयार करण्याचे तत्त्व अमान्य केले. त्यामुळे अकोला करार कालबाह्य झाला. संयुक्त महाराष्ट्राची मागणी पुढे रेटण्यासाठी काँग्रेसांतर्गत १९४८ मध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव देव या परिषदेचे अध्यक्ष झाले. १९५२ मध्ये सर्व राज्यांत नवी सरकारे स्थापन झाली. आंध-प्रांताच्या स्थापनेसाठी पोट्टू श्रीरामलू यांचा उपोषणात मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या दंगलीमुळे १९५३ मध्ये सरकारला आंध-प्रांत मद्रास प्रांतातून वेगळा करावा लागला. याच काळात भाषिक राज्य स्थापन करण्यासाठी अनेक प्रांतांत चळवळी सुरु झाल्या. संयुक्त महाराष्ट्राला विदर्भाचा पाठिंबा मिळविण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या नेत्यांनी विदर्भाच्या नेत्यांशी चर्चा केली आणि २८ सप्टेंबर १९५३ रोजी त्यांच्याशी ‘नागपूर करार’ केला. या करारावर बॅ. रामराव देशमुख, गोपाळराव खेडकर, शेषराव वानखेडे, रा. कृ. पाटील, पी. के. देशमुख, भाऊसाहेब हिरे, नाना कुंटे, देवकीनंदन व यशवंतराव चव्हाण यांच्या सह्या होत्या. त्यात खालील तरतुदी होत्या : (१) मुंबई राजधानी असलेला सर्व मराठी भाषिक लोकांचा महाराष्ट्र प्रांत तयार करण्यात यावा. (२) नागपूरला उच्च न्यायालयाचे एक खंडपीठ असावे. त्याचप्रमाणे विधानसभेचे वर्षातून एक अधिवेशन तेथे घेण्यात यावे. (३) मंत्रिमंडळात व सर्व शासकीय खात्यात लोकसंख्येच्या प्रमाणात राज्याच्या घटकप्रदेशांना प्रतिनिधित्व मिळावे. (४) नागपूरला राजधानीचे शहर म्हणून जे फायदे पूर्वी मिळत आहेत, ते तसेच यापुढे मिळत राहावेत. या करारामुळे विदर्भातील मुख्य नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्रास मान्यता दिली; पण बिजलाल बियाणी व बापूसाहेब अणे यांनी स्वतंत्र नागविदर्भास पाठिंबा दिला आणि त्यासाठी त्यांनी चळवळही सुरु केली. राज्यांच्या पुनर्रचनेचा विचार करण्यासाठी केंद्र शासनाने एस्. फाझल अली यांच्या अध्यक्षतेखाली २९ डिसेंबर १९५३ रोजी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. पं. हृदयनाथ कुंझरु व सरदार पणिक्कर हे या आयोगाचे सभासद होते. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने व इतरांनी आयोगासमोर संयुक्त महाराष्ट्राच्या राज्याची मागणी केली. या आयोगाने आपला अहवाल १० ऑक्टोबर १९५५ रोजी प्रसिद्घ केला. आयोगाने पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि कर्नाटक या राज्यांच्या निर्मितींची शिफारस केली. हैदराबाद राज्य कायम ठेवावे व विदर्भाचे स्वतंत्र राज्य करावे, अशाही आयोगाच्या शिफारशी होत्या; पण हैदराबाद राज्यातील मराठी भाषिकांची त्या राज्यात राहण्याची इच्छा नव्हती. आयोगाने संयुक्त महाराष्ट्राची मागणी अमान्य केली आणि कन्नड भाषिक जिल्हे वगळून, मराठवाडा धरुन, गुजराती प्रदेशासह मुंबईच्या द्वैभाषिक राज्याची शिफारस केली. सौराष्ट्राचा गुजरातेत समावेश करावा व मुंबईस राजधानी करुन गुजरात व महाराष्ट्र यांचे द्वैभाषिक राज्य करावे, असे आयोगाचे म्हणणे होते. आयोगाच्या शिफारशींच्या विरोधात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. या अवधीमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीची चळवळ अधिक आक्रमक बनली. मुख्य प्रश्न मुंबईच्या भवितव्याचा होता व ते शहर महाराष्ट्रास देण्यास गुजराती भाषिकांचा विरोध होता. मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेला बेळगाव-कारवारचा भाग आयोगाने कर्नाटकास दिला. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी या द्वैभाषिकास नकार दिला. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने आयोजित केलेल्या सभेत देवांनी तशी घोषणादेखील केली. केंद्र सरकारने मुंबईच्या प्रश्नाचा तिढा सोडविण्यासाठी ‘त्रिराज्य योजना ’ जाहीर केली. या योजनेत सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भ व मराठवाड्यासह महाराष्ट्र आणि मुंबई हे शहरराज्य अशा प्रकारची तीन राज्ये स्थापन करण्याचा विचार मांडला. महाराष्ट्रास मुंबई द्यावयास केंद्र सरकार तयार नव्हते. महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईत लोकांचा असंतोष वाढू लागला. या घटना ऑक्टोबर १९५५ नंतर घडल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने त्रिराज्य योजनेस पाठिंबा दिला व शंकरराव देव यांनी संयुक्त महाराष्ट्र परिषद बरखास्त केली. ते सर्वांना सबुरीचा सल्ल देत होते. १८ नोव्हेंबर १९५५ रोजी मुंबई विधानसभेसमोर या निर्णयाचा निषेध करण्यासाठी बंद पुकारण्यात आला व सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला. सेनापती बापट यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. त्यानंतर संप, बंद व मोर्चे यांचे सत्र सुरु झाले. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केला. या गोळीबारात १५ माणसे ठार झाली. संयुक्त महाराष्ट्रासाठीची चळवळ या गोळीबारानंतर उग्र झाली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढविण्यासाठी काँग्रेस पक्षीय पुढाऱ्यांना दूर सारुन महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची ६ फेबुवारी १९५६ रोजी स्थापना केली. प्रजा समाजवादी पक्षाचे नेते एस्. एम्. जोशी त्याचे प्रमुख होते. यांत प्रजा समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, हिंदु महासभा, सोशॅलिस्ट पार्टी व जनसंघ हे पक्ष सामील झाले. नंतरच्या काळात डॉ. आंबेडकरांच्या संमतीने शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन व नंतरचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांत सामील झाला. एस्. एम्. जोशी, भाई श्रीपाद अमृत डांगे, ना. ग. गोरे, आचार्य प्र. के. अत्रे, उद्घवराव पाटील, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, जयंतराव टिळक प्रभृती हे या चळवळीचे नेते होते. त्रिराज्य योजनेत मुंबईचे शहरराज्य अनुस्यूत होते; पण त्याचे स्वरुप स्पष्ट झालेले नव्हते. १६ जानेवारी १९५६ रोजी पं. नेहरुंनी असे घोषित केले, की मुंबई केंद्रशासित केली जाईल. १७ जानेवारीस विरोधकांनी सार्वत्रिक संपाची घोषणा केली. १७ जानेवारी ते २२ जानेवारी या काळात मुंबईत मोठा हिंसाचार झाला. पोलिसांनी गोळीबार केला. त्या गोळीबारात ७६ लोकांचा बळी गेला. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी २३ जानेवारी रोजी आपला राजीनामा पंतप्रधानांना दिला; पण त्यांनी तो स्वीकारला नाही. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत संप व चळवळी सुरु झाल्या. मुंबई महानगरपालिकेने संयुक्त महाराष्ट्रास पाठिंबा देणारा ठराव संमत केला. मधील काळात विनोबा भावे व जयप्रकाश नारायण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी झाला. तोपर्यंत राज्य पुनर्रचना विधेयक मुंबई विधानसभेमध्ये चर्चेसाठी आले होते. काँग्रेसने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन बोलावले. नेहरु व इतर नेत्यांच्या विरोधात निदर्शने करण्याचा निर्णय समितीने घेतला व हजारो लोकांनी त्यात भाग घेतला. ३ जून १९५६ रोजी चौपाटीवरील सभेत नेहरुंनी अशी घोषणा केली, की मुंबई पाच वर्षांसाठी केंद्रशासित प्रदेश राहील. पाच वर्षांनंतर तिच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाईल. या तिन्ही राज्यांसाठी मुंबई राज्याचे एकच उच्च न्यायालय (हायकोर्ट) व लोकसेवा आयोग असेल. नेहरुंच्या या घोषणेनंतर वातावरण जास्त तापले. देशमुख यांच्या विनंतीवरुन पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपतींनी सी. डी. देशमुख यांचा राजीनामा स्वीकारला. आपल्या भाषणात त्यांनी नेहरुंवर मंत्रिमंडळास महत्त्वाच्या निर्णयांबाबत विश्वासात न घेतल्याबद्दल व मुंबईच्या गोळीबाराची न्यायालयीन चौकशी न केल्याबद्दल दोष दिला. याच काळात महागुजरात परिषदेच्या आंदोलनामुळे गुजरात भाषिक प्रदेशाची मागणी वाढू लागली व तीही चळवळ उग्र बनत गेली. गुजरातेत हिंसाचारात वाढ झाली व तेथे पोलीस गोळीबारात ३० लोक ठार झाले. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन दडपण्याकरिता तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असलेल्या मोरारजी देसाईंच्या शासनाने (१९५२-५६) कठोर उपाय योजले. या चळवळीत एकूण ३१,०९२ इसमांना अटक करण्यात आली, १९,४४५ लोकांवर खटले गुदरले व त्यांतील १८,४१९ लोकांना कैदेची शिक्षा झाली. मुंबई आणि अन्य नागरी व ग्रामीण भागात दंगली उसळल्या. त्यात ५३७ वेळा गोळीबार करण्यात आला. सुमारे ५०० दुकाने लुटली; ८० ट्रामगाड्यांची आणि २०० बसगाड्यांची मोडतोड करण्यात आली. त्या वेळी झालेल्या गोळीबारामध्ये १०५ माणसे बळी गेली. त्यांचे स्मारक पुढे हुतात्मा स्मारक म्हणून मुंबईत फ्लोरा फाउंटनजवळ उभारण्यात आले. विदर्भ वगळून द्वैभाषिकाची वा त्रिराज्याची योजना मान्य होत नाही, हे लक्षात आल्यानंतर महागुजरात व संयुक्त महाराष्ट्र या महाद्वैभाषिक राज्यांचा पर्याय पुढे आणण्यात आला. महाराष्ट्रातील काही नेत्यांचा त्यास आशीर्वाद होता. मुंबईवर पाणी सोडण्यापेक्षा द्वैभाषिकाचा पर्याय बरा, असा विचार करुन या नेत्यांनी त्यास पाठिंबा दिला. महाराष्ट्र काँग्रेसनेही त्यास पाठिंबा दिला. महाद्वैभाषिक मुंबई राज्य १ नोव्हेंबर १९५६ रोजी अस्तित्वात आले. या द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्रिपद तरुण काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांना देण्यात आले. मुंबई कायमची आपल्या हातातून जाऊ नये, म्हणून महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी हा पर्याय स्वीकारला. काँग्रेसच्या विरोधात १९५७ मध्ये होणाऱ्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय संयुक्त महाराष्ट्र समितीने घेतला आणि समितीच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने झंझावाती प्रचार केला. या निवडणुकीत संपूर्ण मुंबई राज्यात काँग्रेसने ३९५ पैकी २२२ जागा जिंकून बहुमत मिळविले; पण प. महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झाला. प. महाराष्ट्रातील १३५ पैकी फक्त ३५ जागा काँग्रेसला मिळाल्या. समितीला ९६ जागा मिळाल्या. सर्व विधानसभेत समितीला १२४ जागा मिळाल्या. या निवडणुकीत न. वि. गाडगीळ, देवकीनंदन, मालोजीराजे नाईक-निंबाळकर, पाटसकर आणि इतर अनेक महत्त्वाचे काँग्रेस उमेदवार पराभूत झाले आणि समितीला अभूतपूर्व यश मिळाले. समितीचे उमेदवार भाई एस्. ए. डांगे मुंबईमधून विकमी बहुमताने विजयी झाले. गुजरात, विदर्भ व मराठवाड्यातून काँग्रेसचे उमेदवार चांगल्या संख्येने निवडून आले. प. महाराष्ट्रातील लोकमत समितीच्या बाजूने आहे, हे सिद्घ झाले. प्रजा समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व रिपब्लिकन पक्ष हे समितीतील चार मोठे पक्ष होते. यशवंतराव चव्हाण हे मुंबई राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले. संयुक्त महाराष्ट्र समितीची संयुक्त महाराष्ट्रासाठी चळवळ चालूच राहिली. समितीने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळविला आणि मुंबईचे महापौरपद समितीस मिळाले. ३० नोव्हेंबर १९५७ रोजी पं. जवाहरलाल नेहरु प्रतापगडावर छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यासाठी येणार होते. द्विभाषकाविरुद्घ मत व्यक्त करुन संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने मोठ्या प्रमाणात प्रतापगडाच्या पायथ्याशी निदर्शने आयोजित केली. हजारोंच्या संख्येने समितीचे निदर्शक नेहरु जाणाऱ्या मार्गावर हजर राहिले आणि त्यांनी निदर्शने केली. पुन्हा १९ डिसेंबर १९५८ रोजी समितीने दिल्ली येथे सत्याग्रह केला. त्यात बेळगावचा व इतर सीमाभागांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या काळात महाराष्ट्रात झालेल्या बहुतेक पोटनिवडणुका समितीच्या उमेदवारांनी जिंकल्या. नगरपालिकांच्या निवडणुकांतही समितीचे उमेदवार विजयी होत होते. १९५८-५९ मध्ये मराठवाड्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकांत समितीच्या उमेदवारांचा विजय झाला. त्यामुळे समितीची लोकप्रियता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत वाढत आहे हे स्पष्ट झाले. महाद्वैभाषिक स्थापन झाल्यानंतर गुजरातेत महागुजरातसाठी महागुजरात परिषदेची चळवळ सुरु झाली. त्या चळवळीला गुजरातच्या शहरी भागात पाठिंबा मिळू लागला. दोन्ही राज्यांत लोकमत विरोधात जात आहे, हे पाहून गुजरात व महाराष्ट्र ही दोन राज्ये वेगळी केली पाहिजेत, अशी भावना काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वात निर्माण होऊ लागली. द्वैभाषिक चालवताना आर्थिक साधनांच्या वाटपाबाबत मतभेद होत होते. त्यामुळे त्यावेळच्या काँग्रेस अध्यक्षा श्रीमती इंदिरा गांधी, गृहमंत्री गोविंद वल्ल्भ पंत आणि इतरांनी शेवटी याबाबतचा निर्णय घेतला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य करण्यात आली; पण सीमेवरचा डांग हा आदिवासी बहुसंख्य लोकसंख्या असणारा जिल्हा, खानदेश आणि उंबरगाव नजिकची अनेक गावे गुजरातला देण्यात आली. त्याचप्रमाणे नवी राजधानी बांधण्यासाठी व इतर खर्चासाठी गुजरातला ५० कोटी रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. १ मे १९६० रोजी गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन स्वतंत्र राज्ये जन्मास आली. गुजरात राज्याचे उद्घाटन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले, तर महाराष्ट्र राज्याचे उद्घाटन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते करण्यात आले. गुजरात आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रदेशांचा समावेश करण्यात आला होता. कच्छ व सौराष्ट्र हे भाग गुजरातेत प्रथमच सामील होत होते. मराठवाड्याचा भाग शेकडो वर्षांनंतर संयुक्त महाराष्ट्राचा भाग बनत होता. नंतरच्या काळात विकासाच्या प्रश्नाबाबत विविध उपभागांत संघर्ष होऊ नये; म्हणून या राज्यांच्या स्थापनेच्या वेळी घटनादुरुस्ती करुन घटनेच्या ३७१ कलमामध्ये विदर्भ, सौराष्ट्र व इतर भागांसाठी विकास परिषदांची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली. या दोन्ही राज्यांची वाटचाल १९६० नंतर सुरु असून सध्या ती भारतातील सर्वांत विकसित अशी राज्ये आहेत. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन ही स्वातंत्र्य चळवळीनंतरची महाराष्ट्रातील व्यापक लोकसमर्थन असणारी चळवळ होती. हे राज्यातील पुरोगामी चळवळीचे सर्वांत मोठे व व्यापक आंदोलन होते. या चळवळीत महाराष्ट्रातील मध्यमवर्ग, कामगार, शेतकरी, विचारवंत आदी समाजातील सर्व स्तर एकत्र आले होते. याशिवाय शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर साबळे, पिराजीराव सरनाईक, आत्माराम पाटील वगैरे शाहिरांनी उभा-आडवा महाराष्ट्र पिंजून काढला व हे आंदोलन गावोगावी पोहोचविले. या चळवळीच्या निमित्ताने काही काळ महाराष्ट्रातील डाव्या पक्षांची राजकीय ताकदही वाढली. या चळवळीच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तत्त्वमंथन झाले व अपूर्व अशी राजकीय जागृती निर्माण झाली. हा प्रश्न बळाचा वापर न करता सामंजस्याने सोडविला असता, तर पुढील प्राणहानी झाली नसती, असे काही तज्ञांचे मत आहे. गुजरात व महाराष्ट्र ही राज्ये स्थापन झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती बरखास्त करण्यात आली. ही समिती विसर्जित करु नये, असा काही नेत्यांनी - विशेषत: आचार्य अत्रे, उद्घवराव पाटील, जयंतराव टिळक - आग्रह धरला; कारण बेळगाव-कारवारचा प्रश्न त्यावेळी निकालात निघाला नव्हता. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषिक बेळगाव-कारवार इ. भूप्रदेश कर्नाटक राज्यात समाविष्ट झाले. ते भाग महाराष्ट्रात समाविष्ट करुन घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती स्थापन झाली. या समितीच्या मागणीप्रमाणे बेळगावबाबत महाजन आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाचा निवाडा उभयपक्षी मान्य होईल, अशी हमी घेण्यात आली होती. तो निवाडा १९६७ मध्ये बाहेर आला; पण त्यात प्रत्यक्ष बेळगाव शहर व कारवार जिल्ह्यातील मराठी भाषिक भागही कर्नाटकातच ठेवावा, अशी शिफारस करण्यात आली; पण ती गोष्ट महाराष्ट्रास मान्य झाली नाही. त्यामुळे वाद कायम आहे.

काही अटींवर वेगळा विदर्भ करावा. जे स्वतंत्र विदर्भवादी आहेत त्यांना १०-१५ वर्ष किंवा त्यांना जो अपेक्षीत कालावधी आहे तो द्यावा विकास करण्यासाठी. त्यांना महाराष्ट्राने काही रक्कम द्यावी. नाही जमले तर त्यांना जाहिररित्या नाक घासायला लावून पुन्हा पुन्हा महाराष्ट्राला जोडून घ्यावे. दिलेली रक्कम व्याजासहीत वसूल करुन घ्यावी. नंतर स्वतंत्र विदर्भवादी नेत्यांनी लाजलज्जा बाळगून राजकीय संन्यास घ्यावा. हे सर्व कागदोपत्री लिखीत करार करुन घ्यावे. नंतर त्याचा आरक्षणासारखा तमाशा करु नये.

टिल्लू 17/10/2014 - 03:12
मुंबईला व्यापारी केन्द्र कायम ठेउन औ.बादला राजधानी करावे. याचे अनेक फायदे आहेत. मुंबईतली गर्दी काही प्रमाणात कमी होइल. औ.बाद महाराष्ट्राच्या जवळ्पास मध्यभागी असलेले ४ क्रमांकाचे मोठे शहर आहे.त्यामूळे राज्याच्याा कानाकोपर्‍यातून येणार्‍या लोकानां जवळ पडेल. विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल. बुलढाणा, अकोला, वाशिम खुपच जवळ येइल राजधानीच्या. मराठवाड्याच्या विकासाला बळ मिळेल. खरतर मराठवाड्याला विकासाची नितांत गरज आहे. आणखी बरेच मुद्दे नमुद करता येईल.

पाषाणभेद 17/10/2014 - 04:35
मागे मी असल्याच एका धाग्यावर उपाय सांगितला होता. आता लिंक सापडत नाही. परत डोक्यात असलेले लिहीतो. नवराज्य (नवजिल्हा, नवतालूका, नवगाव आदी) निर्माण करण्यासाठीचे सल्ले: सल्ला क्रमांक १) एक मोठा नकाशा घ्यावा. (भारत विभाजीत करायचा असेल तर भारताचा घ्यावा, महाराष्ट्र विभाजीत करायचा असेल तर महाराष्टाचा नकाशा घ्यावा, विदर्भ विभाजीत करायचा असेल तर विदर्भाचा मोठा नकाशा घ्यावा. आपले गाव विभाजीत करायचे असेल तर आपल्या गावाचा नकाशा घ्यावा.) तर एक मोठा नकाशा घ्यावा. तो टेबलावर अंथरावा. त्यानंतर त्या नकाशाच्या गुणोत्तरीय प्रमाणात (म्हणजे १: ०.१०, १:०.००१० असे) गोल वाटी, ताटली, बशी, कप, पेला, बांगडी, गुण्या आदी. घ्यावा. त्या गोलाने त्या नकाशावर वरपासून खालपर्यंत, व डावीबाजूकडून उजवीकडे सगळीकडे गोल काढावे. त्याचे केंद्रबिंदू ठळक करावा. उदा. खालील प्रतीमा पहा: hub and spoke model of state division. Hub and Spoke model of Future Indian States Division (Patent Pending with पाषाणभेद) आता नकाशातील लहानलहान वर्तूळे म्हणजे नवीन निर्माण केलेले राज्ये मानावीत. त्यांचा केंद्रबिंदू म्हणजे त्या नवनिर्माण केलेल्या राज्याची राजधानी होय. असल्याच प्रकारे नवजिल्हानिर्मीती, नवतालूकानिर्मीती, नवगावनिर्मीती, नवगल्लीनिर्मीती होवू शकते. या प्रकारच्या तयार होणार्‍या नवराज्याच्या आजूबाजूला चार गोलांमध्ये काही भाग स्वायत्त असू द्यावा की नको याबाबत समीती नेमावी. (मी अध्यक्ष व्ह्यायला तयार आहे.) याने काय साध्य होईल? : १) प्रत्येक नवराज्य, नवजिल्हा, नवतालूका, नवगाव यांचे क्षेत्रफळ समान असेल. २) प्रत्येक नवराज्य, नवजिल्हा, नवतालूका, नवगाव यांची राजधानी राज्याच्या परीसीमेपासून समान अंतरावर असेल. ३) समान अंतरावरील राजधानीकडे जाण्यासाठी सर्वांना सोईचे होईल. ४) राजधानीकडे जाण्यासाठी "हब अँन्ड स्पोक" मॉडेलप्रमाणे रस्तेनिर्मीतीचे नवनिर्माण करावे. ५) याने रोजगारात वाढ होईल. ६) एखाद्या राज्याकडे पुरेसे नैसर्गीक संसाधने नसतील (नदी, पाणी, कोळसा, मँगेनीज, निकेल, उर्जा आदी.) तर ती शेजारच्या राज्याने उधार किंवा व्याजाने द्यावीत, विकावीत. विकत घेणार्‍या राज्याने आपले काही रिसोर्सेस द्यावेत. (मानवी श्रम, कापड चोपड, बाजरी गहू धान्य, डोंगराळ भाग असेल तर दगड माती आदी.) असला रोटीबेटीचा व्यवहार करावा. सल्ला क्रमांक २) (हा सल्ला दुसर्‍या एका मोठे राज्य असलेलेल्या मराठी संस्थळावर आधीच दिला होता. (यावरून नवनिर्मीतीची गरज किती मोठ्या प्रमाणात आहे हे दिसून येते.)) जमीन खोदून प्रत्येक राज्याला समांतर राज्ये निर्मीण्याचे नवनिर्माण केले पाहिजे. असली समांतर राज्ये साधारणपणे प्रूथ्वीच्या गाभ्यापर्यंत निर्माण केली जावू शकतात. गाभा वितळवून त्याचा उपयोग उर्जा निर्मीतीसाठी केला जावू शकतो. त्यानंतर तेथून एक लांब टनेल टाकून दुसर्‍या देशातील आपापल्या राज्यांत आंतरराज्यराष्ट्रीय रेल्वे चालू केली जावू शकते. अजूनही काही सल्ले आहेत पण ते घेण्यासाठी आमची व्यावसायीक सेवा सवलतीच्या दरात घ्यावी. - माननिय पाभे (दफोराव) यांचे नवराज्य, नवजिल्हा, नवतालूका, नवगाव आदी. नवनिर्माण सल्ला केंद (आमचे येथे श्रीकृपेकरून देश, राज्य, विभाग, जिल्हा, प्रांत, तालूका गाव, गल्ली विभाजून मिळेल. राज्य विभागून देण्यात आमचा हातखंडा आहे.) (संस्थेचे ध्येय्यवाक्य: एकीकरण गेले खड्यात, तोडून नवनिर्मीती हाच खरा आधार) पुढील ध्येय्यवाक्य: आधी घाला राडा, मग फोडा त्यानंतरच हादडा त्यापुढील ध्येय्यवाक्य: भाषावार प्रांतरचना: बिन्डोकपणाचा कळस त्यापुढील ध्येय्यवाक्य: काय तुम्हाला मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री बनता येत नाही, मग कमीतकमी छोट्या राज्याचे तरी मुख्यमंत्री बना! (संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेप्रश्नी अंगावर लाठी झेलणारे व संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील नेते: एस्. एम्. जोशी, आचार्य प्र. के. अत्रे, भाई श्रीपाद अमृत डांगे, ना. ग. गोरे, उद्घवराव पाटील, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, जयंतराव टिळक व इतर हुतात्म्यांना वंदून करून मागणी करतो की महाराष्ट्राची शकले करणार्‍या करंट्यांना क्षमा करा.)

कपिलमुनी 17/10/2014 - 07:08
जसे आंजावर नवीन संंस्थळे निर्माण होतात त्या नियमानुसार नवीन राज्यांची गरज आहे ;)

प्रसाद१९७१ 17/10/2014 - 10:53
विदर्भ तर नक्कीच वेगळा करावा. कीती वर्ष पुणे, मुंबई ची लोक त्या लोकांचा भार वाहतायत. पण तो मराठवाडा पण वेगळा करावा उरलेल्या महाराष्ट्रा पासुन. हा भाग तर सर्वांना खाली ओढतोय.

सुनील 17/10/2014 - 11:09
मी काय म्हंतो, आता विदर्भ वेगळा करून र्‍हायलाच आहात तर हातासरशी आमचा सुबाभूळगाव बुद्रुक पण वेगळा करून टाका की! मंजे काय की मुख्यमंत्री व्हायचं आमचं सात जन्मापासून उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण होईल! आपला, सरपंच (आणि अर्थातच भावी मुख्यमंत्री) सुबाभूळगाव बुद्रुक

हेमंत लाटकर 26/03/2016 - 13:35
भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.कि.मी आहे याला भागून २० राज्ये बनवावीत. प्रत्येक भाषिकांनी दिलेल्या राज्यातच राहावे व आपला आणि राज्याचा विकास करावा.
काही वर्षांपूर्वी आमचा माणगांव तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यातील बर्‍यापैकी मोठा तालुका होता. मात्र प्रशासकीय तसेच लोकांच्या सोयीसाठी या तालुक्याचे विभाजन करुन तालुक्याच्या पश्चिम भागाचा वेगळा तळा तालुका बनवण्यात आला. तेव्हा कुणीही मांणगांव तालुका तोडत आहेत असे कधी कानावर पडले नाही. गेले दोनेक वर्ष रायगड जिल्ह्याचे विभाजन करुन माणगांवपासून दक्षिणेकडील तालुक्यांच्या दक्षिण रायगड जिल्हा बनणार आहे असे कानावर येत आहे. या नविन जिल्ह्याचे मुख्यालय माणगांव असेल असेही ऐकायला येते.

कोवळीक

पाषाणभेद ·

मदनबाण 16/10/2014 - 10:03
कितीदिवस म्हणते मी ही वाट पहायची कधी भ्रमही होतात तू पुन्हा आल्याची आहाहा... दफोराव लयं भारी ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

मदनबाण 16/10/2014 - 10:03
कितीदिवस म्हणते मी ही वाट पहायची कधी भ्रमही होतात तू पुन्हा आल्याची आहाहा... दफोराव लयं भारी ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
लेखनविषय:
कोवळीक आताशा आयुष्यात माझ्या येवून जा आलास कधीतरी तेव्हा चांगला राहून जा तुझीच वाट पाहते कधीची आर्त पाण्यासाठी तगमगलेली कितीदिवस म्हणते मी ही वाट पहायची कधी भ्रमही होतात तू पुन्हा आल्याची फुले तर तर भरपुर निघाली पण अजूनही आस आहे फुलायची - पाभे

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका - अंदाज अपना अपना

आनन्दा ·

प्यारे१ 16/10/2014 - 02:11
भाजपा बद्दलचा अंदाज खोटा ठरेल रादर खोटा ठरावा अशी इच्छा आहे. स्पष्ट बहुमत अजिबात मिळू नये. सिंगल लार्जेस्ट पार्टी असली तरी १००-१२० मध्ये रहावी. अशुभाची शंका मनात घोळत आहे. ते टाळण्यासाठी काही पाय जमिनीला टेकणं आवश्यक आहे. अन्यथा येत्या १०-१५ वर्षात भारताचं वेगळं चित्र उभं राहण्याची शक्यता आहे. असो!

In reply to by प्यारे१

आनन्दा 16/10/2014 - 06:58
माझ्यादृष्टीने भाजपा आता ११०-१२० मधे अडकणे अधिक धोकादायक आहे. एक तर त्यांना पूर्ण बहुमत मिळाले पाहिजे, किंवा मग ~९०, म्हणजे शिवसेनेची स्पष्ट गरज पडेल अश्या सीट्स. १२०-१३० हा आकडा फारच विचित्र आहे. तिथे भाजपा पोचणे फारच घातक आहे राज्याच्या दृष्टीने..

In reply to by प्यारे१

मिश्टर प्यारे१ यांच्याशी (बर्‍याच दिवसांनंतर!!) सहमत आहे!!! (च्यायला, काय दिवस आणलेत या राजकीय पक्षांनी! "कुठे नेऊन ठेवलाय मिसळपाव माझा?") :)

चौकटराजा 16/10/2014 - 07:07
भाजपा चा आलेख सुधारेल. राज ठाकरेना " उशीर" या शब्दाचा अर्थ कळेल. शिवसेनेला मोदींमुळे लोकसभेत जीवदान मिळाल्याचा साक्षात्कार होईल. आपल्याला अजूनही मुस्लीम व अ.जा अ.ज यांची व्होट ब्यांक आहे याची खात्री काँग्रेसला होईल. राकाला माज" या शब्दाचा अर्थ कळेल. मोदी यातून बरेच काही शिकतील .' सामान्य लोकांच्या साठी असे काहीतरी केले पाहिजे ज्यात गरीब श्रीमंत मध्यमर्गीय या सार्‍यानाच हायसे वाटेल.' हे ते शिकतील. ( मनमोहन यांच्या काळात घरगुती गॅसची बोगस नोंदणी 'चुन चुनके' सापडवून रद्द करण्यात आली व आता पुरवठा उत्तम आहे.. याला म्हणतात गव्हर्नन्स ! ) तहसीलदार, आरटीओ,बांधकाम परवाना अधिकारी ई ना "सरळ" करण्याचे काम राज ठाकरे यानी केले असते तर त्यांच्या मी महाराष्ट्र सुतासारखा सरळ करून दाखवितो याला अर्थ होता.

भाजपा सर्वात जास्त जागा जिंकणार असे दिसते आहे.सत्ता एकहाती मिळावी अशी अपेक्शा. मनसे,शिवसेना,राष्ट्रवादीचे राजकिय मूल्य जेवढे घसरेल तेवढे राज्यास्,देशास हितावह.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माझा अंदाज आहे की भाजप १००च्या वर जाणार नाही.एक्झिट पोलची डेमोग्राफीक सँपलींग चूकीची असण्याची शक्यता आहे. भाजप ९५ सेना ८० काँग्रेस ५० ते ६० राकाँ ४० ते ४५ मनसे १५ इतर १५

In reply to by नानासाहेब नेफळे

काळा पहाड 16/10/2014 - 09:58
नाना, तुम्च्या सगळ्या लहान संख्या जरी घेतल्या, तरी ९५+८०+५०+४०+१५+१५=२९५ होतात. तेवढ्या शीटा तरी नकोत का? निदान पोस्ट करण्या पूर्वी बेरीज तरी करून बघायची! (संपादित)

In reply to by नानासाहेब नेफळे

सुहास.. 16/10/2014 - 17:14
अगदीच अमान्य करता येत नाही , सगळेच किमान अंदाज १५ दिवसापुर्वींचा आहे, तो प्रचार संपल्याशिवाय जाहीर करता येत नसल्यामुळे तसेच बसावे लागते !! सहसा नसते फिरत पण या पंधरा दिवसांमध्ये 'मी जे राजकारण ' फिरताना पाहिलय की डोळे अक्षरशः विस्फारलेत !!अदांज बांधायच तर राहुच द्या :( राजकारणात आंजापेक्षा पडीक असलेला

In reply to by सुहास..

ऋषिकेश 17/10/2014 - 09:18
सहसा नसते फिरत पण या पंधरा दिवसांमध्ये 'मी जे राजकारण ' फिरताना पाहिलय की डोळे अक्षरशः विस्फारलेत !!अदांज बांधायच तर राहुच द्या
याबद्दल थेट वा किमान सुचकपणे काही लिहिता येईल का? वाचायला खूप आवडेल. मला अशा पडद्यामागच्या कथा म्हणा, गॉसिप म्हणा (काय म्हणायचे ते म्हणा) खूप रस असतो ;) लिहितोस का? जाहिर लिहिता नसेल येणार तर किमान या गोष्टी ऐकण्यासाठी तुला एकदा भेटावेच लागेल! :)

सध्या स्पष्ट बहुमत कुणालाही मिळण्याची शक्यता नाही आणि कोणतीही युती आघाडी आता नको...त्यामुळे उत्तम प्रतीचे कडबोळे व्हावे व फेरनिवडणुकांची वेळ यावी... मग तेव्हा मात्र सर्व पक्षांना पुन्हा एकदा आत्ता हरलेल्या जागांवर ..नवीन चांगले उमेदवार द्यावेच लागतील ..पुन्हा एकदा आपला अजेंडा जाहीरनामा सादर करावाच लागेल आणि माग बघू .. आर्थिक दृष्ट्या महागडा प्रकार आहे पण एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लागेल ....

In reply to by अत्रन्गि पाउस

आनन्दा 16/10/2014 - 11:43
कडबोळे तसेही येणार नाहीये.. जर भाजपा १००/११०च्या आत रोखला गेली तर आणि तरच कडबोळे येऊ शकते. ती शक्यता मला फारच कमी वाटते. आणि विशेष म्हणजे मतदानाचे ४ टक्के वाढलेत, त्यामुळे मला भाजपा एकहाती येईल असेच वाटते.

सुधीर 16/10/2014 - 09:25
भाजपाला सर्वाधिक जागा मिळण्याच्या शक्यता आहेत हे Arithmetic, not ‘love jihad’ हा लेख वाचला तेव्हाच ताडलं होतं. मुंबई-पुण्यासारखी शहरे वगळता, महाराष्ट्राच्या इतर भागात असलेले खास करून तरुणांचे मोदींबद्धलचे आकर्षण भाजपाला सर्वाधिक जागा मिळवायला मदत करेलसे वाटते. तळ कोकणातही, भाजपाचीच चर्चा जास्त होती असं स्थानिकांशी बोलताना जाणवत होतं. मराठी अस्मितेचा (भावनिक) प्रश्न मुंबई-ठाणे पुरता मर्यादीत असल्याने, ही शहरं वगळता शिवसेना जास्त प्रभाव टाकू शकेल असे वाटत नाही. त्यातही, मुंबईत काही विभागातून काँग्रेस येण्याचे मुख्य कारण, अमराठी मतदारांचा "अँटी शिवसेना/मनसे" फॅक्टर असावा असं मला वाटतं. लोकशाही निवडणूकीच्या निकालावरून हा मतदार भाजपाकडे वळण्याची शक्यता जास्त आहे असे वाटते. खरी गंमत जर भाजपाला सत्ता स्थापन करण्याइतपत जागा नाही मिळाल्या तर येईल. मग अजून कुठली "नवीन युती" हे राज्य पाहिल या चर्चाना जोर येईल.

मदनबाण 16/10/2014 - 09:41
सध्या " टूडेज चाणक्य'चाणक्य" च्या पोलवर विचार करतोय ! टूडेज चाणक्य' (इमेज सोर्स :- लोकसत्ता}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by मदनबाण

अनुप ढेरे 16/10/2014 - 10:06
याच चाणक्यवाल्यांनी लोकसभेच्या वेळेला एन्डीएला >३३० जागा मिळणार आणि भाजपाला बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवला होता. तेव्हा लय लोकांनी यड्यात काढलं होतं त्यांना.

In reply to by अनुप ढेरे

पैसा 16/10/2014 - 10:10
तिथे जातवार मतदानाचा अंदाज दिला आहे. आपल्याला ही गोष्ट पटत नाही, आवडत नाही. पण भारतातलं ते अप्रिय सत्य आहे. निवडणूक निकालाच्या अंदाजासाठीचा तोच सगळ्यात विश्वासार्ह पाया आहे.

काळा पहाड 16/10/2014 - 10:00
एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष असेल, पण सिंगल लार्जेस्ट पार्टी नसेल असे म्हटले जातेय. असं का? बरं बरं. दोन्हीतला फरक कळला तर आम्हालाही कळवा बरं का!

काळा पहाड 16/10/2014 - 10:02
एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष असेल, पण सिंगल लार्जेस्ट पार्टी नसेल असे म्हटले जातेय.
असं का? बरं बरं. याच्यातला फरक कळला तर आम्हालाही कळवा बरं का..

In reply to by अर्धवटराव

कलंत्री 16/10/2014 - 11:19
पूर्वीच्या निवडणूका कार्यकर्ते, नेते, सभा , मिरवणूका इत्यादी भौवती फिरत होत्या. आता माध्यमे, अनर्गळ टिका, दोषारोप आणि मी म्हणेल तेच खरे या भौवती आहे. "उन्का टैम भोत अच्छा चल रहा है".

दुश्यन्त 16/10/2014 - 12:55
मागे एका धाग्यावर लिहिले तसेच हे एक्झिट पोलचे सर्व्हे पाहिल्यावर वाटते. भाजपा सर्वात मोठा पक्ष बनेल किंवा काही जणांच्या मते बहुमतपर्यंत पोहचेल असे अंदाज आहेत मात्र विभागवार अंदाजात मोठी तफावत आहे. एबीपी वाले भाजपला विदर्भात ६२ पैकी ५०-५० तर कोकणात शून्य दाखवत आहेत हे दोन्हीही मला टोकाचे अंदाज वाटतात. झी वाले आधी आणि आताही विदर्भात भाजपला २५-३० हि रेंज देतात विदर्भात भाजपा जास्त जागा जिंकेल मात्र बाकींना एकदम चिल्लरमध्ये काढण्यात अर्थ नाहि. असे अनेक झोल विभागवार पाहिले तर लक्षात येतात. असो १९ तारीख लांब नाही काय ते कळेलच.

दुश्यन्त 16/10/2014 - 13:01
शिवसेनेला जे काही यश मिळेल ते स्वतःचे असेल. पंतप्रधान मोदी आणि केंद्रातला त्यांचा बाकी फौज फाटा (राजनाथ, सुषमा, उमा, गडकरी वगैरे) तसेच आजूबाजूचे भाजपचे मुख्यमंत्री, मंत्री , आमदार वगैरे हे सगळे राज्य भाजपसाठी प्रचारात होते. सेनेकडे तसे मुख्यकरुन उद्धव, आदित्य आणि बाकी राज्यातले नेते होते. तरीही सेना जर ७५-८०च्या घरात खेळत असेल तर सेनेसाठी लक्षणीय यश मानायला हवे. या आधीचा त्यांचा उच्चांक ७३ आहे ते पण बाळासाहेब आणि युती असताना. शिवसेनेला पुढे राज्यात अजून विस्तारायची संधी आहे. खरा फटका एनसीपीला आहे. कॉंग्रेस तरुन जाइल त्यांचा खास मतदार अजूनही त्यांच्याकडे आहे.

In reply to by दुश्यन्त

प्रदीप 16/10/2014 - 13:38
आतापासूनच पांढरे निशाण फडकावू नका, हो! एखाद्या पक्षास यश मिळाले आणि तो स्वतःचे समर्थन नसलेला पक्ष असला, तरी त्याचे ह्या निवडणूकीपुरते कर्तृत्व कबूल करण्यात हरकत नसावी. इथे भाजपाने राज्याबाहेरून नेते त्यांच्या प्रचारासाठी आणले, ह्यात नक्की आक्षेपार्ह काय आहे? का महाराष्ट्र इतर भारताहून वेगळा असा स्वायत्त देश आहे?

In reply to by दुश्यन्त

ऋषिकेश 17/10/2014 - 09:23
तरीही सेना जर ७५-८०च्या घरात खेळत असेल तर सेनेसाठी लक्षणीय यश मानायला हवे. या आधीचा त्यांचा उच्चांक ७३ आहे ते पण बाळासाहेब आणि युती असताना. शिवसेनेला पुढे राज्यात अजून विस्तारायची संधी आहे.
सहमत आहे. शिवसेना बाळासाहेबांबरोबर संपेल असे विश्लेषण करणारे अनेक विश्लेषक तोंडघशी पडतील हे असे झाले तर! शिवाय पुढे मागे मनसे, शिवसेना एकत्र आले (ते येतीलच बहुदा आता) तर ते पुन्हा एक मोठा फोर्स म्हणून उभे रहातील. भाजपा, आपल्या नव्या "आयात" केलेल्या लोकांसह राज्य कसे करते ते बघायला हवे. हा "कर्नाटक" फॉर्म्युला (तिथेही भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या रेड्डींना आयात केले होते) अंगाशी येऊ शकतो हे त्यांनी लक्षात घ्यावे. आयात व्यक्ती किती स्वच्छ आहेत, त्यांचे किती घोटाळे बाहेर येतात यावरही बरेच अवलंबून असेल!

दुश्यन्त 16/10/2014 - 13:49
तेच म्हणतोय मी सेनेचे कर्तुत्व कमी समजायला नको.आणखी एक सेना एकट्याच्या बळावर लढली ( आर पी आय, स्वाभिमानी, रासप, मेटे हे भाजप बरोबर होते). हे सगळे एक्झिट पोल बद्दल आहे खरे काय ते १९ लाच समजेल असे सुरुवातीलाच लिहिलय.

मदनबाण 16/10/2014 - 14:24
निवडणुकीच्या नंतर घोडे-बाजाराला फार जोर येइल असे सध्याच्या आकाड्यांवरुन तरी वाटते. पैश्याचा पुर येणार ! कमळाबाईने जर बहुमत मिळवले { ते मिळावेच} तर ढाण्या वाघाची तथाकथित डरकाळी ही फक्त वॄत्तपत्रा पुरती सिमीत होउन जाइल.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

कंजूस 16/10/2014 - 19:47
जो जे वांछिल -- कॉँग्रेस आणि इतर पक्षांना आपला अगदीच धोबिपछाड होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. सेना :भाजपाला आपली मनधरणी करावी लागेल अशी त्यांची इच्छा आहे परंतू-- भाजप: त्यांनी युतीचा गांभिऱ्याने विचार केला आहे त्यांना युती नकोच आहे मिळाली सरळ सत्ता तरच हवी आहे नाहीतर राष्ट्रपती राजवट आणतील. थोडक्यात मतदारराजाच घाबरलेला आहे, पक्ष नाहीत.

स्वप्नज 17/10/2014 - 07:03
माझा अंदाज - भाजप ९५-१०० सेना जवळपास ८० कॉंग्रेस ६० रा.कॉं. ४० ..

In reply to by स्वप्नज

अर्धवटराव 17/10/2014 - 07:24
एक नवीन आआप तयार होईल महाराष्ट्रात... शिव आआप सेना... व दिल्ली सारखा प्रयोग महाराष्ट्रात पण होईल :)

भाजप राष्टवादी युती व्हायची भिती वाटते मला.भाजपा स्पष्ट बहुमत का कुणास ठाउक अशकय वाटतेय.बहुदा जनतेच्या पैशाचा अपव्यय मध्यवर्ती निवडणुक भविष्यात होइल असे झाले तर..आणि एवढ्या चिखलफेकीनंतर भाजप सेना एकत्र आली तर.खरच राजकारण आहे हे ,याची किमान मला जाणीव होइल..छ्या ह्या फोनवर टायपायला लयी येळ लागतो ब्वा.म्हणुन मी वाचनमात्र असतेय भो.

प्यारे१ 16/10/2014 - 02:11
भाजपा बद्दलचा अंदाज खोटा ठरेल रादर खोटा ठरावा अशी इच्छा आहे. स्पष्ट बहुमत अजिबात मिळू नये. सिंगल लार्जेस्ट पार्टी असली तरी १००-१२० मध्ये रहावी. अशुभाची शंका मनात घोळत आहे. ते टाळण्यासाठी काही पाय जमिनीला टेकणं आवश्यक आहे. अन्यथा येत्या १०-१५ वर्षात भारताचं वेगळं चित्र उभं राहण्याची शक्यता आहे. असो!

In reply to by प्यारे१

आनन्दा 16/10/2014 - 06:58
माझ्यादृष्टीने भाजपा आता ११०-१२० मधे अडकणे अधिक धोकादायक आहे. एक तर त्यांना पूर्ण बहुमत मिळाले पाहिजे, किंवा मग ~९०, म्हणजे शिवसेनेची स्पष्ट गरज पडेल अश्या सीट्स. १२०-१३० हा आकडा फारच विचित्र आहे. तिथे भाजपा पोचणे फारच घातक आहे राज्याच्या दृष्टीने..

In reply to by प्यारे१

मिश्टर प्यारे१ यांच्याशी (बर्‍याच दिवसांनंतर!!) सहमत आहे!!! (च्यायला, काय दिवस आणलेत या राजकीय पक्षांनी! "कुठे नेऊन ठेवलाय मिसळपाव माझा?") :)

चौकटराजा 16/10/2014 - 07:07
भाजपा चा आलेख सुधारेल. राज ठाकरेना " उशीर" या शब्दाचा अर्थ कळेल. शिवसेनेला मोदींमुळे लोकसभेत जीवदान मिळाल्याचा साक्षात्कार होईल. आपल्याला अजूनही मुस्लीम व अ.जा अ.ज यांची व्होट ब्यांक आहे याची खात्री काँग्रेसला होईल. राकाला माज" या शब्दाचा अर्थ कळेल. मोदी यातून बरेच काही शिकतील .' सामान्य लोकांच्या साठी असे काहीतरी केले पाहिजे ज्यात गरीब श्रीमंत मध्यमर्गीय या सार्‍यानाच हायसे वाटेल.' हे ते शिकतील. ( मनमोहन यांच्या काळात घरगुती गॅसची बोगस नोंदणी 'चुन चुनके' सापडवून रद्द करण्यात आली व आता पुरवठा उत्तम आहे.. याला म्हणतात गव्हर्नन्स ! ) तहसीलदार, आरटीओ,बांधकाम परवाना अधिकारी ई ना "सरळ" करण्याचे काम राज ठाकरे यानी केले असते तर त्यांच्या मी महाराष्ट्र सुतासारखा सरळ करून दाखवितो याला अर्थ होता.

भाजपा सर्वात जास्त जागा जिंकणार असे दिसते आहे.सत्ता एकहाती मिळावी अशी अपेक्शा. मनसे,शिवसेना,राष्ट्रवादीचे राजकिय मूल्य जेवढे घसरेल तेवढे राज्यास्,देशास हितावह.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माझा अंदाज आहे की भाजप १००च्या वर जाणार नाही.एक्झिट पोलची डेमोग्राफीक सँपलींग चूकीची असण्याची शक्यता आहे. भाजप ९५ सेना ८० काँग्रेस ५० ते ६० राकाँ ४० ते ४५ मनसे १५ इतर १५

In reply to by नानासाहेब नेफळे

काळा पहाड 16/10/2014 - 09:58
नाना, तुम्च्या सगळ्या लहान संख्या जरी घेतल्या, तरी ९५+८०+५०+४०+१५+१५=२९५ होतात. तेवढ्या शीटा तरी नकोत का? निदान पोस्ट करण्या पूर्वी बेरीज तरी करून बघायची! (संपादित)

In reply to by नानासाहेब नेफळे

सुहास.. 16/10/2014 - 17:14
अगदीच अमान्य करता येत नाही , सगळेच किमान अंदाज १५ दिवसापुर्वींचा आहे, तो प्रचार संपल्याशिवाय जाहीर करता येत नसल्यामुळे तसेच बसावे लागते !! सहसा नसते फिरत पण या पंधरा दिवसांमध्ये 'मी जे राजकारण ' फिरताना पाहिलय की डोळे अक्षरशः विस्फारलेत !!अदांज बांधायच तर राहुच द्या :( राजकारणात आंजापेक्षा पडीक असलेला

In reply to by सुहास..

ऋषिकेश 17/10/2014 - 09:18
सहसा नसते फिरत पण या पंधरा दिवसांमध्ये 'मी जे राजकारण ' फिरताना पाहिलय की डोळे अक्षरशः विस्फारलेत !!अदांज बांधायच तर राहुच द्या
याबद्दल थेट वा किमान सुचकपणे काही लिहिता येईल का? वाचायला खूप आवडेल. मला अशा पडद्यामागच्या कथा म्हणा, गॉसिप म्हणा (काय म्हणायचे ते म्हणा) खूप रस असतो ;) लिहितोस का? जाहिर लिहिता नसेल येणार तर किमान या गोष्टी ऐकण्यासाठी तुला एकदा भेटावेच लागेल! :)

सध्या स्पष्ट बहुमत कुणालाही मिळण्याची शक्यता नाही आणि कोणतीही युती आघाडी आता नको...त्यामुळे उत्तम प्रतीचे कडबोळे व्हावे व फेरनिवडणुकांची वेळ यावी... मग तेव्हा मात्र सर्व पक्षांना पुन्हा एकदा आत्ता हरलेल्या जागांवर ..नवीन चांगले उमेदवार द्यावेच लागतील ..पुन्हा एकदा आपला अजेंडा जाहीरनामा सादर करावाच लागेल आणि माग बघू .. आर्थिक दृष्ट्या महागडा प्रकार आहे पण एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लागेल ....

In reply to by अत्रन्गि पाउस

आनन्दा 16/10/2014 - 11:43
कडबोळे तसेही येणार नाहीये.. जर भाजपा १००/११०च्या आत रोखला गेली तर आणि तरच कडबोळे येऊ शकते. ती शक्यता मला फारच कमी वाटते. आणि विशेष म्हणजे मतदानाचे ४ टक्के वाढलेत, त्यामुळे मला भाजपा एकहाती येईल असेच वाटते.

सुधीर 16/10/2014 - 09:25
भाजपाला सर्वाधिक जागा मिळण्याच्या शक्यता आहेत हे Arithmetic, not ‘love jihad’ हा लेख वाचला तेव्हाच ताडलं होतं. मुंबई-पुण्यासारखी शहरे वगळता, महाराष्ट्राच्या इतर भागात असलेले खास करून तरुणांचे मोदींबद्धलचे आकर्षण भाजपाला सर्वाधिक जागा मिळवायला मदत करेलसे वाटते. तळ कोकणातही, भाजपाचीच चर्चा जास्त होती असं स्थानिकांशी बोलताना जाणवत होतं. मराठी अस्मितेचा (भावनिक) प्रश्न मुंबई-ठाणे पुरता मर्यादीत असल्याने, ही शहरं वगळता शिवसेना जास्त प्रभाव टाकू शकेल असे वाटत नाही. त्यातही, मुंबईत काही विभागातून काँग्रेस येण्याचे मुख्य कारण, अमराठी मतदारांचा "अँटी शिवसेना/मनसे" फॅक्टर असावा असं मला वाटतं. लोकशाही निवडणूकीच्या निकालावरून हा मतदार भाजपाकडे वळण्याची शक्यता जास्त आहे असे वाटते. खरी गंमत जर भाजपाला सत्ता स्थापन करण्याइतपत जागा नाही मिळाल्या तर येईल. मग अजून कुठली "नवीन युती" हे राज्य पाहिल या चर्चाना जोर येईल.

मदनबाण 16/10/2014 - 09:41
सध्या " टूडेज चाणक्य'चाणक्य" च्या पोलवर विचार करतोय ! टूडेज चाणक्य' (इमेज सोर्स :- लोकसत्ता}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by मदनबाण

अनुप ढेरे 16/10/2014 - 10:06
याच चाणक्यवाल्यांनी लोकसभेच्या वेळेला एन्डीएला >३३० जागा मिळणार आणि भाजपाला बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवला होता. तेव्हा लय लोकांनी यड्यात काढलं होतं त्यांना.

In reply to by अनुप ढेरे

पैसा 16/10/2014 - 10:10
तिथे जातवार मतदानाचा अंदाज दिला आहे. आपल्याला ही गोष्ट पटत नाही, आवडत नाही. पण भारतातलं ते अप्रिय सत्य आहे. निवडणूक निकालाच्या अंदाजासाठीचा तोच सगळ्यात विश्वासार्ह पाया आहे.

काळा पहाड 16/10/2014 - 10:00
एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष असेल, पण सिंगल लार्जेस्ट पार्टी नसेल असे म्हटले जातेय. असं का? बरं बरं. दोन्हीतला फरक कळला तर आम्हालाही कळवा बरं का!

काळा पहाड 16/10/2014 - 10:02
एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष असेल, पण सिंगल लार्जेस्ट पार्टी नसेल असे म्हटले जातेय.
असं का? बरं बरं. याच्यातला फरक कळला तर आम्हालाही कळवा बरं का..

In reply to by अर्धवटराव

कलंत्री 16/10/2014 - 11:19
पूर्वीच्या निवडणूका कार्यकर्ते, नेते, सभा , मिरवणूका इत्यादी भौवती फिरत होत्या. आता माध्यमे, अनर्गळ टिका, दोषारोप आणि मी म्हणेल तेच खरे या भौवती आहे. "उन्का टैम भोत अच्छा चल रहा है".

दुश्यन्त 16/10/2014 - 12:55
मागे एका धाग्यावर लिहिले तसेच हे एक्झिट पोलचे सर्व्हे पाहिल्यावर वाटते. भाजपा सर्वात मोठा पक्ष बनेल किंवा काही जणांच्या मते बहुमतपर्यंत पोहचेल असे अंदाज आहेत मात्र विभागवार अंदाजात मोठी तफावत आहे. एबीपी वाले भाजपला विदर्भात ६२ पैकी ५०-५० तर कोकणात शून्य दाखवत आहेत हे दोन्हीही मला टोकाचे अंदाज वाटतात. झी वाले आधी आणि आताही विदर्भात भाजपला २५-३० हि रेंज देतात विदर्भात भाजपा जास्त जागा जिंकेल मात्र बाकींना एकदम चिल्लरमध्ये काढण्यात अर्थ नाहि. असे अनेक झोल विभागवार पाहिले तर लक्षात येतात. असो १९ तारीख लांब नाही काय ते कळेलच.

दुश्यन्त 16/10/2014 - 13:01
शिवसेनेला जे काही यश मिळेल ते स्वतःचे असेल. पंतप्रधान मोदी आणि केंद्रातला त्यांचा बाकी फौज फाटा (राजनाथ, सुषमा, उमा, गडकरी वगैरे) तसेच आजूबाजूचे भाजपचे मुख्यमंत्री, मंत्री , आमदार वगैरे हे सगळे राज्य भाजपसाठी प्रचारात होते. सेनेकडे तसे मुख्यकरुन उद्धव, आदित्य आणि बाकी राज्यातले नेते होते. तरीही सेना जर ७५-८०च्या घरात खेळत असेल तर सेनेसाठी लक्षणीय यश मानायला हवे. या आधीचा त्यांचा उच्चांक ७३ आहे ते पण बाळासाहेब आणि युती असताना. शिवसेनेला पुढे राज्यात अजून विस्तारायची संधी आहे. खरा फटका एनसीपीला आहे. कॉंग्रेस तरुन जाइल त्यांचा खास मतदार अजूनही त्यांच्याकडे आहे.

In reply to by दुश्यन्त

प्रदीप 16/10/2014 - 13:38
आतापासूनच पांढरे निशाण फडकावू नका, हो! एखाद्या पक्षास यश मिळाले आणि तो स्वतःचे समर्थन नसलेला पक्ष असला, तरी त्याचे ह्या निवडणूकीपुरते कर्तृत्व कबूल करण्यात हरकत नसावी. इथे भाजपाने राज्याबाहेरून नेते त्यांच्या प्रचारासाठी आणले, ह्यात नक्की आक्षेपार्ह काय आहे? का महाराष्ट्र इतर भारताहून वेगळा असा स्वायत्त देश आहे?

In reply to by दुश्यन्त

ऋषिकेश 17/10/2014 - 09:23
तरीही सेना जर ७५-८०च्या घरात खेळत असेल तर सेनेसाठी लक्षणीय यश मानायला हवे. या आधीचा त्यांचा उच्चांक ७३ आहे ते पण बाळासाहेब आणि युती असताना. शिवसेनेला पुढे राज्यात अजून विस्तारायची संधी आहे.
सहमत आहे. शिवसेना बाळासाहेबांबरोबर संपेल असे विश्लेषण करणारे अनेक विश्लेषक तोंडघशी पडतील हे असे झाले तर! शिवाय पुढे मागे मनसे, शिवसेना एकत्र आले (ते येतीलच बहुदा आता) तर ते पुन्हा एक मोठा फोर्स म्हणून उभे रहातील. भाजपा, आपल्या नव्या "आयात" केलेल्या लोकांसह राज्य कसे करते ते बघायला हवे. हा "कर्नाटक" फॉर्म्युला (तिथेही भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या रेड्डींना आयात केले होते) अंगाशी येऊ शकतो हे त्यांनी लक्षात घ्यावे. आयात व्यक्ती किती स्वच्छ आहेत, त्यांचे किती घोटाळे बाहेर येतात यावरही बरेच अवलंबून असेल!

दुश्यन्त 16/10/2014 - 13:49
तेच म्हणतोय मी सेनेचे कर्तुत्व कमी समजायला नको.आणखी एक सेना एकट्याच्या बळावर लढली ( आर पी आय, स्वाभिमानी, रासप, मेटे हे भाजप बरोबर होते). हे सगळे एक्झिट पोल बद्दल आहे खरे काय ते १९ लाच समजेल असे सुरुवातीलाच लिहिलय.

मदनबाण 16/10/2014 - 14:24
निवडणुकीच्या नंतर घोडे-बाजाराला फार जोर येइल असे सध्याच्या आकाड्यांवरुन तरी वाटते. पैश्याचा पुर येणार ! कमळाबाईने जर बहुमत मिळवले { ते मिळावेच} तर ढाण्या वाघाची तथाकथित डरकाळी ही फक्त वॄत्तपत्रा पुरती सिमीत होउन जाइल.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

कंजूस 16/10/2014 - 19:47
जो जे वांछिल -- कॉँग्रेस आणि इतर पक्षांना आपला अगदीच धोबिपछाड होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. सेना :भाजपाला आपली मनधरणी करावी लागेल अशी त्यांची इच्छा आहे परंतू-- भाजप: त्यांनी युतीचा गांभिऱ्याने विचार केला आहे त्यांना युती नकोच आहे मिळाली सरळ सत्ता तरच हवी आहे नाहीतर राष्ट्रपती राजवट आणतील. थोडक्यात मतदारराजाच घाबरलेला आहे, पक्ष नाहीत.

स्वप्नज 17/10/2014 - 07:03
माझा अंदाज - भाजप ९५-१०० सेना जवळपास ८० कॉंग्रेस ६० रा.कॉं. ४० ..

In reply to by स्वप्नज

अर्धवटराव 17/10/2014 - 07:24
एक नवीन आआप तयार होईल महाराष्ट्रात... शिव आआप सेना... व दिल्ली सारखा प्रयोग महाराष्ट्रात पण होईल :)

भाजप राष्टवादी युती व्हायची भिती वाटते मला.भाजपा स्पष्ट बहुमत का कुणास ठाउक अशकय वाटतेय.बहुदा जनतेच्या पैशाचा अपव्यय मध्यवर्ती निवडणुक भविष्यात होइल असे झाले तर..आणि एवढ्या चिखलफेकीनंतर भाजप सेना एकत्र आली तर.खरच राजकारण आहे हे ,याची किमान मला जाणीव होइल..छ्या ह्या फोनवर टायपायला लयी येळ लागतो ब्वा.म्हणुन मी वाचनमात्र असतेय भो.
यावेळेस मिपावर कोणीच निवडणूकींच्या अंदाजाचा धागा काढला नाही. म्हणून आता मी काढत आहे. (आन्यथा क्लिंटन, श्रीगुरुजी, ऋषिकेश इत्यादी नेहमी धागे काढतातच. आसो, आपल्या महाराष्ट्रात आज निवडणूका पार पडल्या. यावेळच्या निवडणूका खर्‍या अर्थाने उत्कंठावर्धक ठरणार आहेत. पंचरगी लढतीतुन कोणाला काय मिळते याचा अंदाज बांधणे कठीण होतेय. एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष असेल, पण सिंगल लार्जेस्ट पार्टी नसेल असे म्हटले जातेय. चाणक्य वगळता इतर सर्वांनी भाजपा ला १२५-१३० च्या आसपास जागा सांगतल्या आहेत. व्यक्तिशः मला चाणक्यवर जास्त विश्वास आहे.

नथ.............भाग-८-शेवटचा

जयंत कुलकर्णी ·

पण मनांत फारच सावळा-गोंधळ निर्माण झाल्याने.... इतकेच नोंदवतो की, मस्त लिहीले आहे. ओघवती शैली आणि कहाणीत गुंतून बसलो होतो. लेखणीत दम आहे हो तुमच्या...

In reply to by भिंगरी

बहुगुणी 16/10/2014 - 00:41
असंच वाटलं, अपेक्षेहून लवकर संपली कथा. (पण कदाचित आणखी लांबवून 'च्युइंग गम' झाली असती...). आवडली हे पुन्हा एकदा म्हणतो.

बोका-ए-आझम 16/10/2014 - 00:40
लवकर संपली. शेवट थोडा गुंडाळल्यासारखा वाटला. पण त्याचं कारण कदाचित आधीच्या भागांनी निर्माण केलेली उत्कंठा असू शकेल. मला ' नथ ' हे नाव एकदम समर्पक वाटले. जर याचे हक्क कोणाला चित्रपटासाठी विकलेत तर एक विनंती प्लीज मान्य करा - नाव 'नथ' च ठेवा!

कथा खूsssप आवडली हे सांगण्याची गरज नाही ! मात्र शेवट अजून जरासा खुलवला असता तर अजून मजा आली असती. संपूर्ण लेखमालेने उत्सुकता ताणून धरली होती. पुढच्या लेखनास शुभेच्छा !

प्यारे१ 16/10/2014 - 02:06
संपली? एवढ्यात संपली? छान वाटली पण मालिका. सिताबाईंचा रोल करु शकेल अशी कोण अभिनेत्री आहे? मराठी? स्पृहा जोशी कदाचित. श्रद्धा कपूर हिंदीमध्ये?

जुइ 16/10/2014 - 02:38
भाग वाचुन झाल्यावर प्रतिक्रिया देत अहे. खुप उत्कंठावर्धक कथा आहे!

चतुरंग 16/10/2014 - 05:14
खूपच आवडली कथा. चांगल्या चित्रपटाचे पोटेंशियल आहे या कथेत. वेगवेगळ्या कालखंडात आणि भूभागावर घडणार्‍या प्रसंगांना अशाप्रकारे कथेत गुंफण्यामागच्या तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम! __/\__ चतुरंग

सुंदर कथा!! मलाही शेवट गुंडाळल्या सारखा वाटला.. आधीचे भाग वाचुन सिताबाईंमुळे खुपच लक्षणीय बदल घडले, त्यांच्या नावाचा तिथे खुप दबदबा होता असे वाटत होते त्यामुळे तसेच त्यांचे कर्तुत्व असणार... त्याविषयी वाचायला मिळेल असे वाटले... शिवाय नक्की त्या भारतात कशा आल्या? इथे आल्यावर लोकांची प्रतिक्रिया काय होती? आधीच्या भागात सविस्तर वर्णनं आल्यामुळे सिताबाईंचे वर्णन अजुन जास्त अपेक्षित होते... तरीही मालिका अत्यंत सुंदर झाली ह्यात शंकाच नाही...!

In reply to by पिलीयन रायडर

एस 16/10/2014 - 11:49
पिरा यांच्याशी सहमत. बाकी मालिका छान झाली!

In reply to by एस

शिद 16/10/2014 - 14:28
असेच म्हणतो. कथा जबराच होती. एखादा सिनेमा वैगरे तर नक्कीच बनू शकतो या कथेवर.

अमित खोजे 16/10/2014 - 20:34
अहो पण ते पुस्तकाचे नाव द्यायचे राहिले की! कि अगोदर तुम्ही कुठे नमूद केले आहे आणि माझे वाचायचे राहिले?

संपूर्ण लेखमाला वाचली. अत्यंत चांगला चित्रपट बनण्यासाठी योग्य कथा आहे. तुमची लेखनशैलीही आवडली काका. एकदा असं वाटलं की अजून काही भाग असते तरी आवडलं असतं पण ही आटोपशीर लेखमालाही आवडली.

पण मनांत फारच सावळा-गोंधळ निर्माण झाल्याने.... इतकेच नोंदवतो की, मस्त लिहीले आहे. ओघवती शैली आणि कहाणीत गुंतून बसलो होतो. लेखणीत दम आहे हो तुमच्या...

In reply to by भिंगरी

बहुगुणी 16/10/2014 - 00:41
असंच वाटलं, अपेक्षेहून लवकर संपली कथा. (पण कदाचित आणखी लांबवून 'च्युइंग गम' झाली असती...). आवडली हे पुन्हा एकदा म्हणतो.

बोका-ए-आझम 16/10/2014 - 00:40
लवकर संपली. शेवट थोडा गुंडाळल्यासारखा वाटला. पण त्याचं कारण कदाचित आधीच्या भागांनी निर्माण केलेली उत्कंठा असू शकेल. मला ' नथ ' हे नाव एकदम समर्पक वाटले. जर याचे हक्क कोणाला चित्रपटासाठी विकलेत तर एक विनंती प्लीज मान्य करा - नाव 'नथ' च ठेवा!

कथा खूsssप आवडली हे सांगण्याची गरज नाही ! मात्र शेवट अजून जरासा खुलवला असता तर अजून मजा आली असती. संपूर्ण लेखमालेने उत्सुकता ताणून धरली होती. पुढच्या लेखनास शुभेच्छा !

प्यारे१ 16/10/2014 - 02:06
संपली? एवढ्यात संपली? छान वाटली पण मालिका. सिताबाईंचा रोल करु शकेल अशी कोण अभिनेत्री आहे? मराठी? स्पृहा जोशी कदाचित. श्रद्धा कपूर हिंदीमध्ये?

जुइ 16/10/2014 - 02:38
भाग वाचुन झाल्यावर प्रतिक्रिया देत अहे. खुप उत्कंठावर्धक कथा आहे!

चतुरंग 16/10/2014 - 05:14
खूपच आवडली कथा. चांगल्या चित्रपटाचे पोटेंशियल आहे या कथेत. वेगवेगळ्या कालखंडात आणि भूभागावर घडणार्‍या प्रसंगांना अशाप्रकारे कथेत गुंफण्यामागच्या तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम! __/\__ चतुरंग

सुंदर कथा!! मलाही शेवट गुंडाळल्या सारखा वाटला.. आधीचे भाग वाचुन सिताबाईंमुळे खुपच लक्षणीय बदल घडले, त्यांच्या नावाचा तिथे खुप दबदबा होता असे वाटत होते त्यामुळे तसेच त्यांचे कर्तुत्व असणार... त्याविषयी वाचायला मिळेल असे वाटले... शिवाय नक्की त्या भारतात कशा आल्या? इथे आल्यावर लोकांची प्रतिक्रिया काय होती? आधीच्या भागात सविस्तर वर्णनं आल्यामुळे सिताबाईंचे वर्णन अजुन जास्त अपेक्षित होते... तरीही मालिका अत्यंत सुंदर झाली ह्यात शंकाच नाही...!

In reply to by पिलीयन रायडर

एस 16/10/2014 - 11:49
पिरा यांच्याशी सहमत. बाकी मालिका छान झाली!

In reply to by एस

शिद 16/10/2014 - 14:28
असेच म्हणतो. कथा जबराच होती. एखादा सिनेमा वैगरे तर नक्कीच बनू शकतो या कथेवर.

अमित खोजे 16/10/2014 - 20:34
अहो पण ते पुस्तकाचे नाव द्यायचे राहिले की! कि अगोदर तुम्ही कुठे नमूद केले आहे आणि माझे वाचायचे राहिले?

संपूर्ण लेखमाला वाचली. अत्यंत चांगला चित्रपट बनण्यासाठी योग्य कथा आहे. तुमची लेखनशैलीही आवडली काका. एकदा असं वाटलं की अजून काही भाग असते तरी आवडलं असतं पण ही आटोपशीर लेखमालाही आवडली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

कळकट कंदील जीवनावरील महाभाष्य

शरद ·

कवितानागेश 15/10/2014 - 19:01
आहाहा!! वाचनखूण साठवली आहे. ( वात्रटपणाचा एखादा व्हायरस फिरतोय की काय सध्या? :) )

In reply to by रामपुरी

तिमा 15/10/2014 - 21:18
एकही मारा पर क्या सॉलिड मारा बुवांनी मारली ऐशी तान की श्रोते ओरडले बुवा, ऐसी ना मारो!

स्वप्नज 15/10/2014 - 22:14
'शीत'युद्धांमुळे वातावरण चांगलेच 'तापलेय'....रोज नवीन मित्रराष्ट्रे येताहेत..... तिसर्या महायुद्धाची नांदी तर नव्हे ना ही.....

त्या खुद्द समीरसूरचा तिथला हा प्रतिसाद वाचण्याजोगा आहे ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
आता थोडी कळली ही कविता. लिहिले सुरेखच आहे. पण जे काही आहे ते बरेच क्लिष्ट आहे. म्हणजे असे असेल का, तसे असेल का, बरेच खोलात जावे लागेल वगैरे असे...पण लेख खूप सुंदर झाला आहे. त्यानिमित्ताने कवितेचा आस्वाद घेता आला.
याला म्हणतात दिलदारी! अर्थात, तिथला प्रतिसाद (बहुदा सोईस्करपणे) वाचला नसेल, त्यामुळे डोलारा साफ कोसळलायं (हे वेगळं लिहायची गरज नाही)

स्पंदना 16/10/2014 - 05:04
राहू दे शरद सर!! टाळा अन जीभ यात अंतरच नसेल तर काय अपेक्षा करणार तुम्ही. मी स्वतः कधीही आंधळी पूजा मांडत नाही याचा अनुभव आहे तुम्हाला, कोणतीही गोष्ट व्यक्तीसापेक्ष नसते यावर माझा गाढ विश्वास आहे. त्यामुळे जर चांगल लिहीलं असेल तर दाद नक्कीच निघुन जाते, अन ती देताना मी कधीच या माणसाने मला दुखावले होते, वा जनामनात याची अशी ख्याती आहे, याचा विचार करत नाही. जोवर कोणालाही टारगेट न करता लिखाण केलं जातं तोवर त्याला काही क्वालीटी उरते, जो काही विचार मनात उमटतो, तो स्वच्छ, आपला स्वतःचा असतो. कोणाच्या तरी तिरस्काराचं ग्रहण लागलेले लिखाण कस स्वच्छ असेल? कसा उतरेल त्यात मनातला भाव?

In reply to by स्पंदना

इथेच नाही तर माझ्या इतर पोस्टसवर सुद्धा. ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता हे रसग्रहण ग्रेसची बाजू मांडण्यासाठी लिहिलं होतं. स्कोर सेटलींग कसलं आलंय त्यात? त्यावर आलेल्या ६१ प्रतिसादांपैकी कमितकमी ३०/३५ तरी `कविता समजली आणि रसग्रहण आवडलं' असे आहेत. त्या बॅकग्राउंडवर हि पोस्ट म्हणजेच `स्कोर सेटलींगचा' (अर्थात, पूर्णपणे फसलेला) प्रयत्न आहे. तुम्ही उगीच स्वतःची आणि इतरांची, माझ्याबद्दलची मतं कलुषित करता आहात. पुन्हा तुम्हाला तिच गोष्ट सांगतो, मला कुणाचीही काहीही खोडी काढण्यात कणमात्र रस नाही. माझं इथलं विविध विषयांवरचं आणि बहुरंगी लेखन आणि प्रतिसाद त्याची साक्ष आहेत. पण कुणी उगीच उद्योग केला तर मला उत्तर देणं भाग पडतं. तुम्ही स्वतःची आणि इतरांची दिशाभूल करत आहात.

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश 25/10/2014 - 16:14
एकंदरीत विडम्बने आणि खोडकरपणा याबद्दल माझी मतं इतरत्र आहेतच. ती इथे उगाळत नाही. @ संजय क्षीरसागर, तुमच्याच आभ्यासासाठी हे देत आहे. त्यावर पुन्हा पुन्हा भांडायला यायची गरज नाही. शक्य असेल तर स्वतःच्या वागण्याचा एकदा सविस्तर विचार करा. तुमच्याशी काही बोलण्यात अर्थ नाही हे माहितच आहे... पण एकम्दरीत कान्गावखोरपणा जिथला तिथेच खोडला जावा यासाठी इथेच काही लिन्का देत आहे. सरळ कवितेचं, आणि कथेचं केवळ स्वतःला समजत नाही, म्हणून तुम्हीच उगाचच क्षवैताग परीक्षण लिहिणं, हे http://www.misalpav.com/node/21377, http://www.misalpav.com/node/21341, http://www.misalpav.com/node/21861, इथे आहेच. ही फक्त छोटीशी उदाहरणे आहेत. सरळ चांगल्या परीक्षणावरती आपणच विनाकारण गोंधळ घालणं ही प्रक्रिया सदर सदस्याकडून इथे http://www.misalpav.com/node/24813 झालेली दिसेलच.शिवाय अनेक विडंबने स्वतःच उगीच कुणीही खोडी न काढता लिहिलेली दिसतीलच. काही इथे, http://www.misalpav.com/node/26136, http://www.misalpav.com/node/22325, http://www.misalpav.com/node/28156. हे सगळं फार तर ५% झालं. पण इतका एमाराय पुरे! मी तुम्हाला घाब्रवणार नाही!! पण तुम्हाला यावरुन काय ते कळत नसेल तर अजून अनेक प्रतिसादांच्या स्लाईद्स देउनतुमच्या वागणूकीचा डीटेल रीपोर्ट देता येइल याशिवाय प्रत्येक धाग्यावर कुणाची ना कुणाचीतरी अक्कल काढून सरळ सदस्यांना उचकवण्याचा तुमचा उद्योग इथल्या सदस्यांना कळत नाही अशा भ्रमात तुम्ही राहू नये अशी सदिच्छा. त्यावर पुन्हा तुमची थट्टा केल्यावर तुम्हीच 'मला टार्गेट करतात हो...' असं ओरडत सुटता तेही हास्यास्पदच आहे. पण तरीही संस्थळावर सुव्यवस्था राखण्याचा एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी हा प्रतिसाद लिहित आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इथे जे सगळे सदस्य वाचक, लेखक, या नात्यानी येतात ते 'आपण मित्रांमध्ये जात आहोत' या आपलेपणाच्या भावनेनी येतात. त्यामुळे कुणामध्येही कितीही वैचारिक मतभेद असले तरी ते वाद तेवढ्यापुरतेच असतात. पण तुम्ही मात्र सदैव निर्बुद्ध लोकांना 'तुम्ही स्वत" कसे अत्यंत शहाणे आहात' हे पटवोन देण्यासाठी येत असल्यानी आपोआपच थट्टेचं कारण ठरता हे तुम्हाला समजत नसेल असं वाटत नाही. तुमचं नावदेखिल न घेता लिहिलेल्या गोष्टी, तुमच्याबद्दलच आहेत हे कळण्याइतके आणि त्याबद्दल वर तक्रारही करण्याइतके तुम्ही हुशार असता, पण लोक उगीचच वाहव्वा करतायत, हे न कळण्याइतके निरागस होउन, ती वाहव्वा इतरांशी भांडण्यासाठी गंभीरपणे वापरण्याइतके हुशारही असता, हे मात्र काही केल्या कळत नाही! सगळ्यात वाईट म्हणजे तुमची कुणीही खोडी काढलेली नसताना तुम्ही खुशी, कवित१९७८, मराठी कथालेखक आणि माहितगार यांना अतिशय वैयक्तिक पातळीवर विनाकारळ टार्गेट केल्याची अगदी ताजी उदाहरणं आहेत. (लिन्का जरा शोधून देते.)त्यात खुशीताईम्साठी तर तुम्ही अत्यंत माणुसकीहीन रितीनी 'खुदकुशी' हा शब्द वापरलात, जो नंतर संपादित केला गेला. तरीही तुम्ही सातत्यानी या वरच्या प्रतिसादाप्रमाने जिथे तिथे कान्गावखोरपणा करत हिम्डत आहात, म्हणून हे लिहितेय. शिवाय तुम्ही कायम थट्टेचे निमित्त का होत आहात हेही तुमच्या लक्षात यावं ही अपेक्षा. आता त्याहून महत्त्वाचं एक,... केवळ एक सदस्य संस्थळाच्या मुक्त अभिव्यक्ती धोरणाचा गैरफायदा घेतोय, म्हणून एकंदरीतच मुस्कटदाबीचं धोरण निर्माण करणं हे मिसळपावच्या स्वभावाविरुद्ध आहे. म्हणूनच हे सर्व वाद सम्पादित न करता तसेच ठेवले जातात. (तरीदेखिल तुमच्या अनेक प्रतिक्रिया सतत सम्पादित करण्याची वेळ येते ही गोष्ट वेगळी.) पण या मुक्त धोरणामुळे तुम्ही सतत भांडखोरपणा करणं बंद करुन 'आम्हा सर्वसामान्य सदस्यांचं मित्रत्त्वाचं अंगण' स्वच्छ ठेवण्यास हातभार लावलात, तर उपकार होतील, ही विनंतीवजा सूचना करण्यासाठी हे टम्कन्श्रम मी घेत आहे. पुन्हा एकदा, यावर उत्तर लिहून पुन्हा डोकं खाउ नका. त्यापेक्षा विचार करा. शिवाय हे सगळं काही संपादक आणि मालक वाचतच आहेत, तेंव्हा पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे तक्रारी घेउन जाण्यापेक्षा एकदा विचार करा.

विटेकर 16/10/2014 - 09:42
अश्लाघ्य वट्वट, वेळ जातो फुकट मीपणाची झटापट, किती कराल ? लेख चवचाल, प्रतिसाद बेताल, अवघेची कंगाल, कितीक म्हणून? अडखळा हात, माजलेत साथ- साथ दुर्लक्षाने मात, कशी कराल ? मारली बोंब, उसळला आगडोंब, मिपावर झोंब, का म्हणून ? मोडली अक्कल, काढले बक्कल , पट्ट्याने बुकल, तोंड दाबून ? संमं ची झोप, वाचकांची होप माजुर्ड्यांचा थोप, किती काळ ? घसरला दर्जा , मीपणाचा मर्जा लावणार मी खर्जा, घाबरतो कोण ? उठी बा नीलकाण्ता, थांबवी आकान्ता तोडणार अंहता, तुजवीण कोण ?

मदनबाण 16/10/2014 - 09:47
हॅहॅहॅ... :) बाकी गुंडोबुवा हल्लकल्लोळकर. या वरुन गुंडोपंतांची आठवण आली ! काय गुंडोपंत केम छो ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

समीरसूर 16/10/2014 - 10:39
माझ्या कवितेचे रसग्रहण उत्तम उतरले आहे. मला अगदी हाच अर्थ अभिप्रेत होता. अजून एक दुसरा अर्थ आहे या काव्यात. तो जरा जास्त गुंतागुंतीचा आहे. आणि एक अजून तिसरा अतितरल, मलमली अर्थ इतका आत लपला आहे की तो उलगडून सांगण्यासाठी एखादे चर्चासत्र फॉलोड बाय डिनर आयोजित करावेच लागेल. खरं तर एखादी डॉक्युमेंटरीच होऊ शकेल या गूढगर्भ, निळसर, अभिजात, मर्मभेदी काव्यावर. पटकथा लिहिण्याचं काम मी (माझ्या काव्यसाधनेतून वेळ काढून) आनंदाने स्वीकारायला तयार आहे. साधारण २०-२५ मिनीटांची असली तरी हरकत नाही. माझे जुने फोटो, हस्ताक्षर, वगैरे लगेच उपलब्ध करून देऊ शकेल. एवढं करा हो कुणीतरी, आजकाल कुणालाही प्रसिद्धी मिळते. माझ्यासाठी एवढंदेखील करणार नाही का मिपा आणि मिपाकर्स? ;-) चर्चांसाठी माझी दैनंदिनी बघून जानेवारी २०१५ मधल्या तारखा काढून देऊ शकतो मी. लवकर ठरवा. जास्त वेळ नका घालवू. ;-)

कवितानागेश 15/10/2014 - 19:01
आहाहा!! वाचनखूण साठवली आहे. ( वात्रटपणाचा एखादा व्हायरस फिरतोय की काय सध्या? :) )

In reply to by रामपुरी

तिमा 15/10/2014 - 21:18
एकही मारा पर क्या सॉलिड मारा बुवांनी मारली ऐशी तान की श्रोते ओरडले बुवा, ऐसी ना मारो!

स्वप्नज 15/10/2014 - 22:14
'शीत'युद्धांमुळे वातावरण चांगलेच 'तापलेय'....रोज नवीन मित्रराष्ट्रे येताहेत..... तिसर्या महायुद्धाची नांदी तर नव्हे ना ही.....

त्या खुद्द समीरसूरचा तिथला हा प्रतिसाद वाचण्याजोगा आहे ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
आता थोडी कळली ही कविता. लिहिले सुरेखच आहे. पण जे काही आहे ते बरेच क्लिष्ट आहे. म्हणजे असे असेल का, तसे असेल का, बरेच खोलात जावे लागेल वगैरे असे...पण लेख खूप सुंदर झाला आहे. त्यानिमित्ताने कवितेचा आस्वाद घेता आला.
याला म्हणतात दिलदारी! अर्थात, तिथला प्रतिसाद (बहुदा सोईस्करपणे) वाचला नसेल, त्यामुळे डोलारा साफ कोसळलायं (हे वेगळं लिहायची गरज नाही)

स्पंदना 16/10/2014 - 05:04
राहू दे शरद सर!! टाळा अन जीभ यात अंतरच नसेल तर काय अपेक्षा करणार तुम्ही. मी स्वतः कधीही आंधळी पूजा मांडत नाही याचा अनुभव आहे तुम्हाला, कोणतीही गोष्ट व्यक्तीसापेक्ष नसते यावर माझा गाढ विश्वास आहे. त्यामुळे जर चांगल लिहीलं असेल तर दाद नक्कीच निघुन जाते, अन ती देताना मी कधीच या माणसाने मला दुखावले होते, वा जनामनात याची अशी ख्याती आहे, याचा विचार करत नाही. जोवर कोणालाही टारगेट न करता लिखाण केलं जातं तोवर त्याला काही क्वालीटी उरते, जो काही विचार मनात उमटतो, तो स्वच्छ, आपला स्वतःचा असतो. कोणाच्या तरी तिरस्काराचं ग्रहण लागलेले लिखाण कस स्वच्छ असेल? कसा उतरेल त्यात मनातला भाव?

In reply to by स्पंदना

इथेच नाही तर माझ्या इतर पोस्टसवर सुद्धा. ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता हे रसग्रहण ग्रेसची बाजू मांडण्यासाठी लिहिलं होतं. स्कोर सेटलींग कसलं आलंय त्यात? त्यावर आलेल्या ६१ प्रतिसादांपैकी कमितकमी ३०/३५ तरी `कविता समजली आणि रसग्रहण आवडलं' असे आहेत. त्या बॅकग्राउंडवर हि पोस्ट म्हणजेच `स्कोर सेटलींगचा' (अर्थात, पूर्णपणे फसलेला) प्रयत्न आहे. तुम्ही उगीच स्वतःची आणि इतरांची, माझ्याबद्दलची मतं कलुषित करता आहात. पुन्हा तुम्हाला तिच गोष्ट सांगतो, मला कुणाचीही काहीही खोडी काढण्यात कणमात्र रस नाही. माझं इथलं विविध विषयांवरचं आणि बहुरंगी लेखन आणि प्रतिसाद त्याची साक्ष आहेत. पण कुणी उगीच उद्योग केला तर मला उत्तर देणं भाग पडतं. तुम्ही स्वतःची आणि इतरांची दिशाभूल करत आहात.

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश 25/10/2014 - 16:14
एकंदरीत विडम्बने आणि खोडकरपणा याबद्दल माझी मतं इतरत्र आहेतच. ती इथे उगाळत नाही. @ संजय क्षीरसागर, तुमच्याच आभ्यासासाठी हे देत आहे. त्यावर पुन्हा पुन्हा भांडायला यायची गरज नाही. शक्य असेल तर स्वतःच्या वागण्याचा एकदा सविस्तर विचार करा. तुमच्याशी काही बोलण्यात अर्थ नाही हे माहितच आहे... पण एकम्दरीत कान्गावखोरपणा जिथला तिथेच खोडला जावा यासाठी इथेच काही लिन्का देत आहे. सरळ कवितेचं, आणि कथेचं केवळ स्वतःला समजत नाही, म्हणून तुम्हीच उगाचच क्षवैताग परीक्षण लिहिणं, हे http://www.misalpav.com/node/21377, http://www.misalpav.com/node/21341, http://www.misalpav.com/node/21861, इथे आहेच. ही फक्त छोटीशी उदाहरणे आहेत. सरळ चांगल्या परीक्षणावरती आपणच विनाकारण गोंधळ घालणं ही प्रक्रिया सदर सदस्याकडून इथे http://www.misalpav.com/node/24813 झालेली दिसेलच.शिवाय अनेक विडंबने स्वतःच उगीच कुणीही खोडी न काढता लिहिलेली दिसतीलच. काही इथे, http://www.misalpav.com/node/26136, http://www.misalpav.com/node/22325, http://www.misalpav.com/node/28156. हे सगळं फार तर ५% झालं. पण इतका एमाराय पुरे! मी तुम्हाला घाब्रवणार नाही!! पण तुम्हाला यावरुन काय ते कळत नसेल तर अजून अनेक प्रतिसादांच्या स्लाईद्स देउनतुमच्या वागणूकीचा डीटेल रीपोर्ट देता येइल याशिवाय प्रत्येक धाग्यावर कुणाची ना कुणाचीतरी अक्कल काढून सरळ सदस्यांना उचकवण्याचा तुमचा उद्योग इथल्या सदस्यांना कळत नाही अशा भ्रमात तुम्ही राहू नये अशी सदिच्छा. त्यावर पुन्हा तुमची थट्टा केल्यावर तुम्हीच 'मला टार्गेट करतात हो...' असं ओरडत सुटता तेही हास्यास्पदच आहे. पण तरीही संस्थळावर सुव्यवस्था राखण्याचा एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी हा प्रतिसाद लिहित आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इथे जे सगळे सदस्य वाचक, लेखक, या नात्यानी येतात ते 'आपण मित्रांमध्ये जात आहोत' या आपलेपणाच्या भावनेनी येतात. त्यामुळे कुणामध्येही कितीही वैचारिक मतभेद असले तरी ते वाद तेवढ्यापुरतेच असतात. पण तुम्ही मात्र सदैव निर्बुद्ध लोकांना 'तुम्ही स्वत" कसे अत्यंत शहाणे आहात' हे पटवोन देण्यासाठी येत असल्यानी आपोआपच थट्टेचं कारण ठरता हे तुम्हाला समजत नसेल असं वाटत नाही. तुमचं नावदेखिल न घेता लिहिलेल्या गोष्टी, तुमच्याबद्दलच आहेत हे कळण्याइतके आणि त्याबद्दल वर तक्रारही करण्याइतके तुम्ही हुशार असता, पण लोक उगीचच वाहव्वा करतायत, हे न कळण्याइतके निरागस होउन, ती वाहव्वा इतरांशी भांडण्यासाठी गंभीरपणे वापरण्याइतके हुशारही असता, हे मात्र काही केल्या कळत नाही! सगळ्यात वाईट म्हणजे तुमची कुणीही खोडी काढलेली नसताना तुम्ही खुशी, कवित१९७८, मराठी कथालेखक आणि माहितगार यांना अतिशय वैयक्तिक पातळीवर विनाकारळ टार्गेट केल्याची अगदी ताजी उदाहरणं आहेत. (लिन्का जरा शोधून देते.)त्यात खुशीताईम्साठी तर तुम्ही अत्यंत माणुसकीहीन रितीनी 'खुदकुशी' हा शब्द वापरलात, जो नंतर संपादित केला गेला. तरीही तुम्ही सातत्यानी या वरच्या प्रतिसादाप्रमाने जिथे तिथे कान्गावखोरपणा करत हिम्डत आहात, म्हणून हे लिहितेय. शिवाय तुम्ही कायम थट्टेचे निमित्त का होत आहात हेही तुमच्या लक्षात यावं ही अपेक्षा. आता त्याहून महत्त्वाचं एक,... केवळ एक सदस्य संस्थळाच्या मुक्त अभिव्यक्ती धोरणाचा गैरफायदा घेतोय, म्हणून एकंदरीतच मुस्कटदाबीचं धोरण निर्माण करणं हे मिसळपावच्या स्वभावाविरुद्ध आहे. म्हणूनच हे सर्व वाद सम्पादित न करता तसेच ठेवले जातात. (तरीदेखिल तुमच्या अनेक प्रतिक्रिया सतत सम्पादित करण्याची वेळ येते ही गोष्ट वेगळी.) पण या मुक्त धोरणामुळे तुम्ही सतत भांडखोरपणा करणं बंद करुन 'आम्हा सर्वसामान्य सदस्यांचं मित्रत्त्वाचं अंगण' स्वच्छ ठेवण्यास हातभार लावलात, तर उपकार होतील, ही विनंतीवजा सूचना करण्यासाठी हे टम्कन्श्रम मी घेत आहे. पुन्हा एकदा, यावर उत्तर लिहून पुन्हा डोकं खाउ नका. त्यापेक्षा विचार करा. शिवाय हे सगळं काही संपादक आणि मालक वाचतच आहेत, तेंव्हा पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे तक्रारी घेउन जाण्यापेक्षा एकदा विचार करा.

विटेकर 16/10/2014 - 09:42
अश्लाघ्य वट्वट, वेळ जातो फुकट मीपणाची झटापट, किती कराल ? लेख चवचाल, प्रतिसाद बेताल, अवघेची कंगाल, कितीक म्हणून? अडखळा हात, माजलेत साथ- साथ दुर्लक्षाने मात, कशी कराल ? मारली बोंब, उसळला आगडोंब, मिपावर झोंब, का म्हणून ? मोडली अक्कल, काढले बक्कल , पट्ट्याने बुकल, तोंड दाबून ? संमं ची झोप, वाचकांची होप माजुर्ड्यांचा थोप, किती काळ ? घसरला दर्जा , मीपणाचा मर्जा लावणार मी खर्जा, घाबरतो कोण ? उठी बा नीलकाण्ता, थांबवी आकान्ता तोडणार अंहता, तुजवीण कोण ?

मदनबाण 16/10/2014 - 09:47
हॅहॅहॅ... :) बाकी गुंडोबुवा हल्लकल्लोळकर. या वरुन गुंडोपंतांची आठवण आली ! काय गुंडोपंत केम छो ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

समीरसूर 16/10/2014 - 10:39
माझ्या कवितेचे रसग्रहण उत्तम उतरले आहे. मला अगदी हाच अर्थ अभिप्रेत होता. अजून एक दुसरा अर्थ आहे या काव्यात. तो जरा जास्त गुंतागुंतीचा आहे. आणि एक अजून तिसरा अतितरल, मलमली अर्थ इतका आत लपला आहे की तो उलगडून सांगण्यासाठी एखादे चर्चासत्र फॉलोड बाय डिनर आयोजित करावेच लागेल. खरं तर एखादी डॉक्युमेंटरीच होऊ शकेल या गूढगर्भ, निळसर, अभिजात, मर्मभेदी काव्यावर. पटकथा लिहिण्याचं काम मी (माझ्या काव्यसाधनेतून वेळ काढून) आनंदाने स्वीकारायला तयार आहे. साधारण २०-२५ मिनीटांची असली तरी हरकत नाही. माझे जुने फोटो, हस्ताक्षर, वगैरे लगेच उपलब्ध करून देऊ शकेल. एवढं करा हो कुणीतरी, आजकाल कुणालाही प्रसिद्धी मिळते. माझ्यासाठी एवढंदेखील करणार नाही का मिपा आणि मिपाकर्स? ;-) चर्चांसाठी माझी दैनंदिनी बघून जानेवारी २०१५ मधल्या तारखा काढून देऊ शकतो मी. लवकर ठरवा. जास्त वेळ नका घालवू. ;-)
लेखनविषय:
लेखनप्रकार
कंदील कळकट ..जीवनावरील महाभाष्य कवीवर्य समीरसूर यांच्या या महान कवितेवर लिहावयाचे भाग्य मला लाभले, धन्य, धन्य झालो मी ! ज्यांचे नावच इतके काव्यमय, त्यांचे काव्य महान असणारच. समीरसूर म्हणजे वेळूच्या बनातून वारा वहातो तेव्हा येणारा मधूर आवाज, वाह वाह. वेळू हा शब्द वेणूपासून आला असे म्हटले म्हणजे यमुनाकाठच्या कुंजवनातील बासरीचे मधुर स्वर व त्यावर जीव ओवाळणार्‍या गोजिर्‍या गोपी आठवतात.

हुकुमी शतकी धाग्यांचे घटक पदार्थ....

माम्लेदारचा पन्खा ·

In reply to by माम्लेदारचा पन्खा

यसवायजी 15/10/2014 - 21:08
हे बघा.. हा अजुन १ प्रतिसाद. विषय कशाला पाहिजे तुमाला? (तसा या धाग्यात काय इशय हाय का? तरीबी आले नव्हं ७ पर्तिसाद? आँ? ) (काड्यासारू) SYG :D

पैसा 15/10/2014 - 20:44
एखादा तडकता फडकता विषय, शाकाहारी-मांसाहारी, पुरोगामी-प्रतिगामी, भाजप-काँग्रेस, ब्राह्मण-इतर, श्रद्धा-अंधश्रद्धा, आयटी-इतर, पुणेकर-इतर वगैरे घ्यावा. त्यात एखाद्याला झोडपून काढावे, नाहीतर आपला कंपू करून एखाद्यावर हल्ला चढवावा नाहीतर तीव्र रागाने विडंबने पाडावीत आणि प्रतिसादातून वैयक्तिक हल्ले करावेत (हे स्वतःच्या जबाबदारीवर करा. तुमचे आधीचे अपराध असल्यास आयडी बळी जाऊ शकतो.) नाहीतर ..... बरेच घटक आहेत हो! इथले सगळेच यक्षपर्ट आहेत. म्या पामराने काय सांगावे!

In reply to by पैसा

गांधीबाबांना विसरल्याबद्द्ल अतितीव्र णिषेध आणि जेवायची वेळ होईपर्यंत १८ मिनिटाचे निर्जळी उपोषण =))!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सुहास.. 15/10/2014 - 21:17
होईपर्यंत १८ मिनिटाचे निर्जळी उपोषण >> धन्यवाद , पण १८ हाच आकडा का निवडलात ;) , काय निकष आहेत त्या मागे , काही विदा उपलब्ध आहेत का , काही ऐतिहासिक पुरावे आहेत का, काही लिंका आहेत का , तिकडे परदेशात ही १८ हाच आकडा निवडला जातो का , काही एकावर आठ च्या ऐवजी आठावर एक केल्यास काय शक्यता निर्माण होवु शकते, अशी एखादी नवी पाकृ ही आहे का, माझ्या मामाच्या , तिसर्‍या मावशीची पुतणीची काकुंनी सांगीतल्या प्रमाणे १८ च १९ व्हायच्या आधी उरकुन टाकाव, तसेच काही आपल्या उपोषणाबाबत आहे का ;) ;) ;) ( कोण म्हणत १८ वरून शंभर नाय करता येत ;) )

In reply to by सुहास..

कारण माझी जेवायची वेळ अंदाजे १८ मिनिटांनी होती ;)...परदेशातलंं काय माहीत नाही बॉ. बाहेर गेलो नाही अजुन. (प्रतिसादामधे आयटी ऑनसाईट विरुद्ध देशी मेकॅनिकल विंजिनिअर चं पोटेन्शिअल लक्षात आलेलं आहे आणि कदाचित हा एक प्रतिसाद सुद्धा १०० मारु शकतो).
माझ्या मामाच्या , तिसर्‍या मावशीची पुतणीची काकुंनी सांगीतल्या प्रमाणे १८ च १९ व्हायच्या आधी उरकुन टाकाव, तसेच काही आपल्या उपोषणाबाबत आहे का
तुमच्या मामाच्या , तिसर्‍या मावशीच्या पुतणीच्या काकुंनी सांगीतल्या प्रमाणे १८ च १९ व्हायच्या आधी उरकुन टाकाव असं आहे का नाही माहित नाही. पण माझ्या शेजारच्यांच्या सासुबाईंच्या नणंदेच्या मावसबहिणीच्या सुनेच्या मोठ्या दिराच्या मावशीचे मिस्टर असंचं करतात म्हणे ;) =))

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 15/10/2014 - 21:37
कित्ती पण काड्या टाका. जाने देव, बच्चा हय म्हणून सोडून देतात. (बास का? बॅट्या, ये आता. तो आला की एकटाच ५० प्रतिसाद देईल.)

In reply to by सतिश गावडे

पैसा 16/10/2014 - 11:55
सोदाहरण प्रात्यक्षिक म्हणतात याला. योग्य व्यक्तीला डिवचणे आणि योग्य जागी काड्या टाकणे अत्यंत महत्त्वाचे असते! ;)

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पैसा 15/10/2014 - 22:09
पूर्वी एक लै फ्येमस कंपू होता म्हणे. हल्ली कोण आहेत का काय म्हैत नै. पण तुम्ही स्वतःचा सुरू करा ना! हाकानाका! मी कित्ती दिवस प्रयत्न करतेय, पण संपादक म्हणून लोक वाळीत टाकतात! :P

In reply to by पैसा

इन्स्पेक्टरनंच टोळीबाजीला प्रोत्साहन दिल्यासारखं वाटतंय.. रच्याक ने....एकदम अपक्ष म्हणून उभं राहण्यापेक्षा कुठ्ला कंपू तिकीट देतोय का ते बघू.....

In reply to by माम्लेदारचा पन्खा

जेपी 16/10/2014 - 06:02
सध्या पुणे पिंचीं वाल्यांचा कंपु आहे त्याला काही गोवेकरांचा पाठिंबा आहे.*wink* मी स्वत:चा कंपु तयार करत आहे. तुम्हाला यायचे असेल तर येलकम. *wink* एकदा कंपु झाला की शतक काय द्विशक पण होईल. (लावली काडी)

In reply to by टवाळ कार्टा

जेपी 16/10/2014 - 07:48
'मी पयला' हि संघटना आहे चळवळ आहे. त्याचे सदस्य कधिच कंपुबाजी करत नाहित.उलट कंपुबाजीला बळी पडतात. *wink*

सुहास.. 15/10/2014 - 20:59
पण कशाला ? चार चांगली वाक्ये लिहुन चारच प्रतिसाद घेतले तर काही वाईट होणार आहात का ? की दोन चपात्या कमी जाणारेत ;)

In reply to by सुहास..

प्यारे१ 15/10/2014 - 21:32
मी सामान्य : गल्लीच्या बाहेर गेला का हो कधी? म्हणे मला पहा आणि फुले वहा. आतापर्यंत तेच तर करा म्हणताय की तुम्ही. आँ? मला सांगताय. :-/ मी समीक्षक : आपल्या सीमित समाजजीवनाच्या अनुभव परिपेक्षामध्ये वावरताना स्वअनुभवा पलिकडं असलेलं एक अपरोक्ष अवकाश आहे आणि ह्या अवकाशामध्ये असलेल्या अनेकविध सामाजिक घटकांच्या मुखी असलेलं भाषेचं वेगळं अलंकृत रुप आपण नाकारत असू तर त्याबद्द्ल स्वतःलाच दोष देऊन, स्वतःच्या ज्ञानाच्या मर्यादा कबूल करुन स्वतःचा उमपर्द करणं ईष्ट. अर्थात तेवढंच करुन ते थांबायला हरकत नाही स्वतःच्या अल्पानुभवाच्या कूपामध्ये . पुन्हा एकदा असा परोक्ष अनुभव शवण होईपर्यंत. अन्यथा स्व मर्यादांच्या कुंपणाला धैर्या च्या कणखर बाहूंनी झुगारुन देऊन पंखांमध्ये बळ भरुन समाजविश्वामध्ये उत्तुंग भरारी घेण्याची तयारी करावी. असो! जरा घाई मध्ये आहे. (ओव्हर टु वाश्या)

In reply to by प्यारे१

खटपट्या 16/10/2014 - 01:35
वरील "मी समीक्षक" म्हनून जे काय लिवलय, त्येचं इश्लेशण का काय म्हनत्येत त्ये करायची सुपारी घ्या कोनीतरी...

स्वप्नज 15/10/2014 - 21:58
धाग्याचे शतक व्हावे असे वाटत असेल तर "हुकुमी शतकी धाग्यांचे घटक पदार्थ...." असा एखादा धागा काढावा ..... ह.घ्या.

रामपुरी 16/10/2014 - 00:14
बायकांना स्वयंपाक आला(च) पाहिजे(च) का? हा विषय घ्या. माझ्यामते तो मिपावरचा पहिला द्वि की त्रि शतकी धागा आहे. बरेच दिवस झाले. जरा फुंकर घातली कि पेटायला वेळ लागणार नाही. बायकांचे कपडे कसे असावेत हा विषय घेतलात तरी हरकत नाही. हे अतिशय ज्वालाग्राही विषय आहेत. सबब प्रयोग स्वतःच्या जबाबदारीवर करावा...

मदनबाण 16/10/2014 - 09:43
स्त्रीयांचे ड्रायव्हिंग { अत्यंत ज्वालाग्रही विषय :) }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

vikramaditya 16/10/2014 - 14:33
पत्रिका, मुहुर्त... वगैरे... आणि हो, मला अध्यात्मातील काही कळते असे फक्त कोणी म्हणुन तर बघा...मग काय मौजा ही मौजा!

इरसाल 16/10/2014 - 14:43
ख र ड फ ळा. पब्लिक हल्ली जाम चेकाळायला लागलेय. माझं डुआयडी पासवर्ड असलेलं एक्सेल शीट हरवलय रिकव्हर कस करायच ? बर ते रिकव्हर करताना आजच्या युगातील स्रीयांना स्वयंपाक करता येतो काय ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

यसवायजी 15/10/2014 - 21:08
हे बघा.. हा अजुन १ प्रतिसाद. विषय कशाला पाहिजे तुमाला? (तसा या धाग्यात काय इशय हाय का? तरीबी आले नव्हं ७ पर्तिसाद? आँ? ) (काड्यासारू) SYG :D

पैसा 15/10/2014 - 20:44
एखादा तडकता फडकता विषय, शाकाहारी-मांसाहारी, पुरोगामी-प्रतिगामी, भाजप-काँग्रेस, ब्राह्मण-इतर, श्रद्धा-अंधश्रद्धा, आयटी-इतर, पुणेकर-इतर वगैरे घ्यावा. त्यात एखाद्याला झोडपून काढावे, नाहीतर आपला कंपू करून एखाद्यावर हल्ला चढवावा नाहीतर तीव्र रागाने विडंबने पाडावीत आणि प्रतिसादातून वैयक्तिक हल्ले करावेत (हे स्वतःच्या जबाबदारीवर करा. तुमचे आधीचे अपराध असल्यास आयडी बळी जाऊ शकतो.) नाहीतर ..... बरेच घटक आहेत हो! इथले सगळेच यक्षपर्ट आहेत. म्या पामराने काय सांगावे!

In reply to by पैसा

गांधीबाबांना विसरल्याबद्द्ल अतितीव्र णिषेध आणि जेवायची वेळ होईपर्यंत १८ मिनिटाचे निर्जळी उपोषण =))!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सुहास.. 15/10/2014 - 21:17
होईपर्यंत १८ मिनिटाचे निर्जळी उपोषण >> धन्यवाद , पण १८ हाच आकडा का निवडलात ;) , काय निकष आहेत त्या मागे , काही विदा उपलब्ध आहेत का , काही ऐतिहासिक पुरावे आहेत का, काही लिंका आहेत का , तिकडे परदेशात ही १८ हाच आकडा निवडला जातो का , काही एकावर आठ च्या ऐवजी आठावर एक केल्यास काय शक्यता निर्माण होवु शकते, अशी एखादी नवी पाकृ ही आहे का, माझ्या मामाच्या , तिसर्‍या मावशीची पुतणीची काकुंनी सांगीतल्या प्रमाणे १८ च १९ व्हायच्या आधी उरकुन टाकाव, तसेच काही आपल्या उपोषणाबाबत आहे का ;) ;) ;) ( कोण म्हणत १८ वरून शंभर नाय करता येत ;) )

In reply to by सुहास..

कारण माझी जेवायची वेळ अंदाजे १८ मिनिटांनी होती ;)...परदेशातलंं काय माहीत नाही बॉ. बाहेर गेलो नाही अजुन. (प्रतिसादामधे आयटी ऑनसाईट विरुद्ध देशी मेकॅनिकल विंजिनिअर चं पोटेन्शिअल लक्षात आलेलं आहे आणि कदाचित हा एक प्रतिसाद सुद्धा १०० मारु शकतो).
माझ्या मामाच्या , तिसर्‍या मावशीची पुतणीची काकुंनी सांगीतल्या प्रमाणे १८ च १९ व्हायच्या आधी उरकुन टाकाव, तसेच काही आपल्या उपोषणाबाबत आहे का
तुमच्या मामाच्या , तिसर्‍या मावशीच्या पुतणीच्या काकुंनी सांगीतल्या प्रमाणे १८ च १९ व्हायच्या आधी उरकुन टाकाव असं आहे का नाही माहित नाही. पण माझ्या शेजारच्यांच्या सासुबाईंच्या नणंदेच्या मावसबहिणीच्या सुनेच्या मोठ्या दिराच्या मावशीचे मिस्टर असंचं करतात म्हणे ;) =))

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 15/10/2014 - 21:37
कित्ती पण काड्या टाका. जाने देव, बच्चा हय म्हणून सोडून देतात. (बास का? बॅट्या, ये आता. तो आला की एकटाच ५० प्रतिसाद देईल.)

In reply to by सतिश गावडे

पैसा 16/10/2014 - 11:55
सोदाहरण प्रात्यक्षिक म्हणतात याला. योग्य व्यक्तीला डिवचणे आणि योग्य जागी काड्या टाकणे अत्यंत महत्त्वाचे असते! ;)

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पैसा 15/10/2014 - 22:09
पूर्वी एक लै फ्येमस कंपू होता म्हणे. हल्ली कोण आहेत का काय म्हैत नै. पण तुम्ही स्वतःचा सुरू करा ना! हाकानाका! मी कित्ती दिवस प्रयत्न करतेय, पण संपादक म्हणून लोक वाळीत टाकतात! :P

In reply to by पैसा

इन्स्पेक्टरनंच टोळीबाजीला प्रोत्साहन दिल्यासारखं वाटतंय.. रच्याक ने....एकदम अपक्ष म्हणून उभं राहण्यापेक्षा कुठ्ला कंपू तिकीट देतोय का ते बघू.....

In reply to by माम्लेदारचा पन्खा

जेपी 16/10/2014 - 06:02
सध्या पुणे पिंचीं वाल्यांचा कंपु आहे त्याला काही गोवेकरांचा पाठिंबा आहे.*wink* मी स्वत:चा कंपु तयार करत आहे. तुम्हाला यायचे असेल तर येलकम. *wink* एकदा कंपु झाला की शतक काय द्विशक पण होईल. (लावली काडी)

In reply to by टवाळ कार्टा

जेपी 16/10/2014 - 07:48
'मी पयला' हि संघटना आहे चळवळ आहे. त्याचे सदस्य कधिच कंपुबाजी करत नाहित.उलट कंपुबाजीला बळी पडतात. *wink*

सुहास.. 15/10/2014 - 20:59
पण कशाला ? चार चांगली वाक्ये लिहुन चारच प्रतिसाद घेतले तर काही वाईट होणार आहात का ? की दोन चपात्या कमी जाणारेत ;)

In reply to by सुहास..

प्यारे१ 15/10/2014 - 21:32
मी सामान्य : गल्लीच्या बाहेर गेला का हो कधी? म्हणे मला पहा आणि फुले वहा. आतापर्यंत तेच तर करा म्हणताय की तुम्ही. आँ? मला सांगताय. :-/ मी समीक्षक : आपल्या सीमित समाजजीवनाच्या अनुभव परिपेक्षामध्ये वावरताना स्वअनुभवा पलिकडं असलेलं एक अपरोक्ष अवकाश आहे आणि ह्या अवकाशामध्ये असलेल्या अनेकविध सामाजिक घटकांच्या मुखी असलेलं भाषेचं वेगळं अलंकृत रुप आपण नाकारत असू तर त्याबद्द्ल स्वतःलाच दोष देऊन, स्वतःच्या ज्ञानाच्या मर्यादा कबूल करुन स्वतःचा उमपर्द करणं ईष्ट. अर्थात तेवढंच करुन ते थांबायला हरकत नाही स्वतःच्या अल्पानुभवाच्या कूपामध्ये . पुन्हा एकदा असा परोक्ष अनुभव शवण होईपर्यंत. अन्यथा स्व मर्यादांच्या कुंपणाला धैर्या च्या कणखर बाहूंनी झुगारुन देऊन पंखांमध्ये बळ भरुन समाजविश्वामध्ये उत्तुंग भरारी घेण्याची तयारी करावी. असो! जरा घाई मध्ये आहे. (ओव्हर टु वाश्या)

In reply to by प्यारे१

खटपट्या 16/10/2014 - 01:35
वरील "मी समीक्षक" म्हनून जे काय लिवलय, त्येचं इश्लेशण का काय म्हनत्येत त्ये करायची सुपारी घ्या कोनीतरी...

स्वप्नज 15/10/2014 - 21:58
धाग्याचे शतक व्हावे असे वाटत असेल तर "हुकुमी शतकी धाग्यांचे घटक पदार्थ...." असा एखादा धागा काढावा ..... ह.घ्या.

रामपुरी 16/10/2014 - 00:14
बायकांना स्वयंपाक आला(च) पाहिजे(च) का? हा विषय घ्या. माझ्यामते तो मिपावरचा पहिला द्वि की त्रि शतकी धागा आहे. बरेच दिवस झाले. जरा फुंकर घातली कि पेटायला वेळ लागणार नाही. बायकांचे कपडे कसे असावेत हा विषय घेतलात तरी हरकत नाही. हे अतिशय ज्वालाग्राही विषय आहेत. सबब प्रयोग स्वतःच्या जबाबदारीवर करावा...

मदनबाण 16/10/2014 - 09:43
स्त्रीयांचे ड्रायव्हिंग { अत्यंत ज्वालाग्रही विषय :) }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

vikramaditya 16/10/2014 - 14:33
पत्रिका, मुहुर्त... वगैरे... आणि हो, मला अध्यात्मातील काही कळते असे फक्त कोणी म्हणुन तर बघा...मग काय मौजा ही मौजा!

इरसाल 16/10/2014 - 14:43
ख र ड फ ळा. पब्लिक हल्ली जाम चेकाळायला लागलेय. माझं डुआयडी पासवर्ड असलेलं एक्सेल शीट हरवलय रिकव्हर कस करायच ? बर ते रिकव्हर करताना आजच्या युगातील स्रीयांना स्वयंपाक करता येतो काय ?
आजपर्यंत मिपावर हजारो धागे येऊन गेलेत... त्यातले काही मोजकेच ध्रुवासारखे अढ्ळ झाले....बाकी यथेच्छ पेटवले, उसवले आणि तुडवले गेले. तर त्यामुळे असा प्रश्न निर्माण झाला की नेमकं काय लागतं धागा शतकी करायला? असे शतकोत्सुक प्रचंड प्रमाणात हल्ली ठिकठिकाणी दिसत असल्यामुळे हा धागा त्यांना समर्पित आहे. दुसरा फायदा असा की निदान ह्या निमित्ताने अशा घटकांची एक यादी तयार करून ते विषय थोडे बाजूला ठेवून नवीन विषयांवरही साधक बाधक चर्चा करता येईल कारण बरेच विषय परत येत आहेत आणि त्यामुळे चर्चेला मर्यादा येऊ लागली आहे असे कुठेतरी वाटतयं. आपल्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत......

नथ..........भाग-७

जयंत कुलकर्णी ·

झक्कास.. (आयला ह्या ईंटरनेटच्या धड व्यवस्थित प्रतिसाद पण देता येत नाही. वाचायला गेलो तर प्रतिसाद बोंबलतो आणि प्रतिसाद देत बसलो तर वाचायला वेळ मिळत नाही.... असो...ज्याचे त्याचे भोग...)

इतके प्रत्ययकारी गेल्या अनेक वर्षात वाचलेले नाही... हे काल्पनिक निश्चित नाही...कशावरतरी आधारित तरी नक्की आहे ...खरंय नं ... जे काय असेल ते ...अप्रतिम ...केवळ अप्रतिम ....

एस 15/10/2014 - 19:52
अप्रतीम! असे काही पूर्वी क्वचितच वाचले असेल!

झक्कास.. (आयला ह्या ईंटरनेटच्या धड व्यवस्थित प्रतिसाद पण देता येत नाही. वाचायला गेलो तर प्रतिसाद बोंबलतो आणि प्रतिसाद देत बसलो तर वाचायला वेळ मिळत नाही.... असो...ज्याचे त्याचे भोग...)

इतके प्रत्ययकारी गेल्या अनेक वर्षात वाचलेले नाही... हे काल्पनिक निश्चित नाही...कशावरतरी आधारित तरी नक्की आहे ...खरंय नं ... जे काय असेल ते ...अप्रतिम ...केवळ अप्रतिम ....

एस 15/10/2014 - 19:52
अप्रतीम! असे काही पूर्वी क्वचितच वाचले असेल!
लेखनविषय:
लेखनप्रकार

मला न आवडलेली पुस्तके: आत्मचरित्रे/चरित्रे

पुस्तकमित्र ·

आदूबाळ 16/10/2014 - 02:12
विजया मेहतांचं आत्मचरित्र. त्यात सुरुवातीला स्वता:चा त्रयस्थ उल्लेख लय डोक्यात गेला. बेबीने हे केलं आन बेबीने पाणी प्यायलं आन बेबीने साडी नेसली. वैतागलो.

बोका-ए-आझम 16/10/2014 - 07:45
आत्मचरित्र हाच प्रकार मुळात आवडत नाही. एकतर ते नि:पक्षपाती असणं अशक्य. दुसरं म्हणजे आपल्याकडे लोक उपदेश आणि स्वत:चं उदात्तीकरण फार करतात आत्मचरित्रं लिहिणारे. एखादंच हंसा वाडकरांच्या ' सांगत्ये ऐका ' सारखं साधंसरळ आत्मचरित्र सापडतं. चरित्रांमध्ये पण ती जर जवळच्या एखाद्या व्यक्तीने लिहिली असतील, उदाहरणार्थ. 'चीपर बाय द डझन' हे मुलांनी लिहिलेलं आईवडिलांचं चरित्र आहे, तरच वाचनीय असतात.

In reply to by आदूबाळ

जेपी 16/10/2014 - 17:07
यावेळेसपण राईट्ट आदुदादु.हे बहुतेक पुणे विद्यापीठाचे कुलगुरु पण होते. आणखीन एक पुस्तक आहे त्याचे नाव ,लेखक, किंवा मजकुर पण आठवत नाय *wink*

In reply to by जेपी

'मी आणि माझा बाप' मधली श्री. नरेन्द्र आणि इतर ज्युनियर जाधवांचं लिखाण पुष्कळसं आत्मस्तुतीपर वाटतं. ते तसं असणं सहाजिक असावं जर त्यांनी मिळवलेल्या लौकिक यशाचा विचार केला तर. ते पटलं नाही तरी समजण्यासारखं आहे. पण तो सगळा फापटपसारा वगळून जर फक्त त्यांच्या वडिलांनी आत्मचरित्रपर लिहिलेली काही पानं वाचली तर खूप ती प्रभावित करणारी वाटली. एका वेगळ्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थीतीत जीवन घालवलेल्या व्यक्तिचे अनुभवाचे बोल, विचार वाचायला खूप आनंद वाटला.

In reply to by पिवळा डांबिस

दशानन 16/10/2014 - 23:18
ज्या परिस्थितीतून ते आले आहेत, आणि त्यांनी ज्या ज्या परिस्थिती आपले आयुष्य निर्माण होण्यासाठी वेचले आहे, ते पाहता थोडाफार दोष आपण नजरेआड करणे देखील मानवतेला धरून आहे.

In reply to by प्यारे१

होय, चेक करून बघतां तुम्ही म्हणताय ते टायटल आहे हे खरं. पण त्यामुळे विशेष काय फरक पडावा ते समजलं नाही! पुस्तक वाचलं असल्याशी कारण! तुमचं पुस्तकाबद्दलचं मत अधिक वाचनीय असेल, ते मांडा ना...

In reply to by पिवळा डांबिस

प्रसाद१९७१ 17/10/2014 - 17:11
त्यांनी मिळवलेल्या लौकिक यशाचा
न.जा चे सो कॉल्ड यश हे मोठे प्रश्न चिन्ह आहे पण ते का मिळाले आहे ह्याचे उत्तर सोप्पे आहे. त्यांचे कतृत्व काय आहे हा तर मोठा गहन प्रश्न आहे. पदव्या मिळवळे हे जर कतृत्व असेल तर मग बोलायलाच नको.

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ 18/10/2014 - 13:31
"आम्ही आणि आमचा बाप " या पुस्तकाचे वैषिष्ठ्य म्हणजे तीनही पात्रांची भाषा. खरोखरच शिक्षणामुळे भाषेवर पडणारा फरक अनुभवण्याजोगा आहे.

स्नेहल महेश 16/10/2014 - 12:50
खूप छान आत्मचरीत्र आहे १९५०-६० च्या शतकात हॉर्स रेसिंग सारखं क्षेत्र निवडून त्यात यशस्वी होऊन दाखवणे, कठीण काळात आलेले अनुभव खूप छान प्रकारे लिहिले आहेत नि:पक्षपाती लिखान

In reply to by स्वामी संकेतानंद

संचित 16/10/2014 - 17:13
मित्रानी तारीफ केली म्हणून वाचायला घेतले होते. पण कंटाळलो. कर्हेचे पाणी संपता संपत नाही.

In reply to by इनिगोय

दशानन 16/10/2014 - 22:02
लेखिकेने पुस्तक लिहितानाच ठरवले असावे की "खोटेच सांगेन" रेटून पुस्तक वाचले होते.. पण हाती काहीच लागले नाही. तसे ही मी आत्मचरित्रपर पुस्तकांचा धसका घेतला आहे.. !

In reply to by कवितानागेश

दशानन 16/10/2014 - 23:22
माझा मेंदू त्यावेळी खराब झाला होता, असे स्वत:ला उत्तर देऊन मी गप्प झालो.. तुम्ही काय दिवे लावले, स्वारी.. काय दिवे पेरले :D

In reply to by कवितानागेश

अर्धवटराव 17/10/2014 - 21:49
बिहैण्ड एव्हरी फॉर्चुन देअर इज अ क्राईम म्हणतात ना... एका दशकात बांधकाम व्यवसायात मिळालेल्या "फॉर्च्युन" कडे डोळेझाक व्हावी म्हणुन एव्हढा बटबटीतपणा आणला असावा काय चरित्राला??

In reply to by पिवळा डांबिस

दशानन 16/10/2014 - 23:20
पिडा, मी तुमच्या घरापर्यंत हे पुस्तक फ्रीमध्ये पाठवेन, पण आधी तुम्ही शपथ घ्या, माझा जीव घेणार नाहीत म्हणून... =))

In reply to by दशानन

विचार करून सांगतो!!! ;) (स्वगतः बाकी ह्याचं तंगडं मोडायला इतकी इतर कारणं आहेत की ह्या पुस्तकानेच नेमका काय फरक पडणार आहे?) :)

In reply to by पिवळा डांबिस

दशानन 16/10/2014 - 23:31
आधीच एक तंगडे स्टीलचे आहे, दुसरे काय तोडणार? सोबत.. अजून एक पुस्तक देखील देतो.. पण त्याबद्दल तुम्ही एकतर माझा पाठलाग... अगदी पुढील जन्मी देखील कराल याची मला खात्री आहे, किंवा तुम्ही मला शेवटी मला गिनिपिग म्हणून वापराला.... =))

In reply to by दशानन

कवितानागेश 16/10/2014 - 23:28
मी लहान होते. दवणेन्चे नाव वाचून वाचायला घेतले. कुणीतरी फुकट घरी पाठवले होते. .. सध्या तरी इतकीच कारणे आठवतायत.

In reply to by कवितानागेश

दशानन 16/10/2014 - 23:32
>>>कुणीतरी फुकट घरी पाठवले होते. .. काय योगायोग... सगळ्यांनाच ते पुस्तक फुकटमध्ये मिळाले होते कि काय ;)

In reply to by सखी

प्यारे१ 17/10/2014 - 03:07
>>> नंदनचा हा प्रतिसाद वाचनीय आहे असणारच. :-/ माणूस कोट्याधीश आहे ना? गैरसमज होण्याच्या शक्यतेमुळं.... नंदन 'कोट्या'धीश आहे ना!

आदूबाळ 17/10/2014 - 00:03
सूर्य पेरणारा माणूस वरून आठवलं - आमच्या अण्णा झावर्‍यांचं आत्मचरित्र त्याच वाटेने जाणारं आहे. पण अण्णांना स्वतः लेखनाची लय हाऊस असल्याने ते घोस्टरायटरकडे आपलं आयुष्य सोपवायची सुतराम शक्यता नाही.

अजया 17/10/2014 - 08:01
महादेव शास्त्री जोशींचं अात्मपुराण कंटाळवाणं वाटलेलं आत्मचरित्र.स्नेहांकिता हे जुन्या अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचं अात्मचरित्र वाचताना हे खोटं लिहिलंय बरंच काही झाकुन असं वाटत राहातं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रसाद१९७१ 17/10/2014 - 17:49
वाईट दिवस काढले हे कबूल आहे पण ते ज्या प्रकारे लिहीले आहे ते त्यांना केविलवाणे करुन टाकतय. मी कसा बापुडा आणि दुसरे माझ्याशी कसे वाईट वागले हेच पुन्हा पुन्हा आहे.

आदूबाळ 16/10/2014 - 02:12
विजया मेहतांचं आत्मचरित्र. त्यात सुरुवातीला स्वता:चा त्रयस्थ उल्लेख लय डोक्यात गेला. बेबीने हे केलं आन बेबीने पाणी प्यायलं आन बेबीने साडी नेसली. वैतागलो.

बोका-ए-आझम 16/10/2014 - 07:45
आत्मचरित्र हाच प्रकार मुळात आवडत नाही. एकतर ते नि:पक्षपाती असणं अशक्य. दुसरं म्हणजे आपल्याकडे लोक उपदेश आणि स्वत:चं उदात्तीकरण फार करतात आत्मचरित्रं लिहिणारे. एखादंच हंसा वाडकरांच्या ' सांगत्ये ऐका ' सारखं साधंसरळ आत्मचरित्र सापडतं. चरित्रांमध्ये पण ती जर जवळच्या एखाद्या व्यक्तीने लिहिली असतील, उदाहरणार्थ. 'चीपर बाय द डझन' हे मुलांनी लिहिलेलं आईवडिलांचं चरित्र आहे, तरच वाचनीय असतात.

In reply to by आदूबाळ

जेपी 16/10/2014 - 17:07
यावेळेसपण राईट्ट आदुदादु.हे बहुतेक पुणे विद्यापीठाचे कुलगुरु पण होते. आणखीन एक पुस्तक आहे त्याचे नाव ,लेखक, किंवा मजकुर पण आठवत नाय *wink*

In reply to by जेपी

'मी आणि माझा बाप' मधली श्री. नरेन्द्र आणि इतर ज्युनियर जाधवांचं लिखाण पुष्कळसं आत्मस्तुतीपर वाटतं. ते तसं असणं सहाजिक असावं जर त्यांनी मिळवलेल्या लौकिक यशाचा विचार केला तर. ते पटलं नाही तरी समजण्यासारखं आहे. पण तो सगळा फापटपसारा वगळून जर फक्त त्यांच्या वडिलांनी आत्मचरित्रपर लिहिलेली काही पानं वाचली तर खूप ती प्रभावित करणारी वाटली. एका वेगळ्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थीतीत जीवन घालवलेल्या व्यक्तिचे अनुभवाचे बोल, विचार वाचायला खूप आनंद वाटला.

In reply to by पिवळा डांबिस

दशानन 16/10/2014 - 23:18
ज्या परिस्थितीतून ते आले आहेत, आणि त्यांनी ज्या ज्या परिस्थिती आपले आयुष्य निर्माण होण्यासाठी वेचले आहे, ते पाहता थोडाफार दोष आपण नजरेआड करणे देखील मानवतेला धरून आहे.

In reply to by प्यारे१

होय, चेक करून बघतां तुम्ही म्हणताय ते टायटल आहे हे खरं. पण त्यामुळे विशेष काय फरक पडावा ते समजलं नाही! पुस्तक वाचलं असल्याशी कारण! तुमचं पुस्तकाबद्दलचं मत अधिक वाचनीय असेल, ते मांडा ना...

In reply to by पिवळा डांबिस

प्रसाद१९७१ 17/10/2014 - 17:11
त्यांनी मिळवलेल्या लौकिक यशाचा
न.जा चे सो कॉल्ड यश हे मोठे प्रश्न चिन्ह आहे पण ते का मिळाले आहे ह्याचे उत्तर सोप्पे आहे. त्यांचे कतृत्व काय आहे हा तर मोठा गहन प्रश्न आहे. पदव्या मिळवळे हे जर कतृत्व असेल तर मग बोलायलाच नको.

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ 18/10/2014 - 13:31
"आम्ही आणि आमचा बाप " या पुस्तकाचे वैषिष्ठ्य म्हणजे तीनही पात्रांची भाषा. खरोखरच शिक्षणामुळे भाषेवर पडणारा फरक अनुभवण्याजोगा आहे.

स्नेहल महेश 16/10/2014 - 12:50
खूप छान आत्मचरीत्र आहे १९५०-६० च्या शतकात हॉर्स रेसिंग सारखं क्षेत्र निवडून त्यात यशस्वी होऊन दाखवणे, कठीण काळात आलेले अनुभव खूप छान प्रकारे लिहिले आहेत नि:पक्षपाती लिखान

In reply to by स्वामी संकेतानंद

संचित 16/10/2014 - 17:13
मित्रानी तारीफ केली म्हणून वाचायला घेतले होते. पण कंटाळलो. कर्हेचे पाणी संपता संपत नाही.

In reply to by इनिगोय

दशानन 16/10/2014 - 22:02
लेखिकेने पुस्तक लिहितानाच ठरवले असावे की "खोटेच सांगेन" रेटून पुस्तक वाचले होते.. पण हाती काहीच लागले नाही. तसे ही मी आत्मचरित्रपर पुस्तकांचा धसका घेतला आहे.. !

In reply to by कवितानागेश

दशानन 16/10/2014 - 23:22
माझा मेंदू त्यावेळी खराब झाला होता, असे स्वत:ला उत्तर देऊन मी गप्प झालो.. तुम्ही काय दिवे लावले, स्वारी.. काय दिवे पेरले :D

In reply to by कवितानागेश

अर्धवटराव 17/10/2014 - 21:49
बिहैण्ड एव्हरी फॉर्चुन देअर इज अ क्राईम म्हणतात ना... एका दशकात बांधकाम व्यवसायात मिळालेल्या "फॉर्च्युन" कडे डोळेझाक व्हावी म्हणुन एव्हढा बटबटीतपणा आणला असावा काय चरित्राला??

In reply to by पिवळा डांबिस

दशानन 16/10/2014 - 23:20
पिडा, मी तुमच्या घरापर्यंत हे पुस्तक फ्रीमध्ये पाठवेन, पण आधी तुम्ही शपथ घ्या, माझा जीव घेणार नाहीत म्हणून... =))

In reply to by दशानन

विचार करून सांगतो!!! ;) (स्वगतः बाकी ह्याचं तंगडं मोडायला इतकी इतर कारणं आहेत की ह्या पुस्तकानेच नेमका काय फरक पडणार आहे?) :)

In reply to by पिवळा डांबिस

दशानन 16/10/2014 - 23:31
आधीच एक तंगडे स्टीलचे आहे, दुसरे काय तोडणार? सोबत.. अजून एक पुस्तक देखील देतो.. पण त्याबद्दल तुम्ही एकतर माझा पाठलाग... अगदी पुढील जन्मी देखील कराल याची मला खात्री आहे, किंवा तुम्ही मला शेवटी मला गिनिपिग म्हणून वापराला.... =))

In reply to by दशानन

कवितानागेश 16/10/2014 - 23:28
मी लहान होते. दवणेन्चे नाव वाचून वाचायला घेतले. कुणीतरी फुकट घरी पाठवले होते. .. सध्या तरी इतकीच कारणे आठवतायत.

In reply to by कवितानागेश

दशानन 16/10/2014 - 23:32
>>>कुणीतरी फुकट घरी पाठवले होते. .. काय योगायोग... सगळ्यांनाच ते पुस्तक फुकटमध्ये मिळाले होते कि काय ;)

In reply to by सखी

प्यारे१ 17/10/2014 - 03:07
>>> नंदनचा हा प्रतिसाद वाचनीय आहे असणारच. :-/ माणूस कोट्याधीश आहे ना? गैरसमज होण्याच्या शक्यतेमुळं.... नंदन 'कोट्या'धीश आहे ना!

आदूबाळ 17/10/2014 - 00:03
सूर्य पेरणारा माणूस वरून आठवलं - आमच्या अण्णा झावर्‍यांचं आत्मचरित्र त्याच वाटेने जाणारं आहे. पण अण्णांना स्वतः लेखनाची लय हाऊस असल्याने ते घोस्टरायटरकडे आपलं आयुष्य सोपवायची सुतराम शक्यता नाही.

अजया 17/10/2014 - 08:01
महादेव शास्त्री जोशींचं अात्मपुराण कंटाळवाणं वाटलेलं आत्मचरित्र.स्नेहांकिता हे जुन्या अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचं अात्मचरित्र वाचताना हे खोटं लिहिलंय बरंच काही झाकुन असं वाटत राहातं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रसाद१९७१ 17/10/2014 - 17:49
वाईट दिवस काढले हे कबूल आहे पण ते ज्या प्रकारे लिहीले आहे ते त्यांना केविलवाणे करुन टाकतय. मी कसा बापुडा आणि दुसरे माझ्याशी कसे वाईट वागले हेच पुन्हा पुन्हा आहे.
http://www.misalpav.com/node/28198 http://www.misalpav.com/node/28241 http://www.misalpav.com/node/29133 ------------------------------------------------------------------------------- या आधीच्या ३ धाग्यांप्रमाणेच या धाग्यात लिहूया मला न आवडलेल्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल. चरित्रे/आत्मचरित्रे न आवडण्याची कारणे काही अशी सांगता येतील की त्या पुस्तकात सत्याचा विपर्यास झालेला कधी कधी दिसतो. तर कधी आत्मप्रौढीचा वास येतो. कधी कधी लेखकाच्या रटाळ भाषेमुळे ही पुस्तके कंटाळवाणी वाटू शकतात. लिहूया तर तुम्हाला एखादे चरित्र्/आत्मचरित्र का आवडले नाही याबद्दल!