मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हम्मामा म्हणे किंवा हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा...

माहितगार ·

In reply to by बॅटमॅन

माहितगार 10/09/2015 - 15:58
बाकी "कवितेवरचे प्रतिसाद प्रताधिकारमुक्त धरले जातील" हे अ‍ॅड करायचं राहिलं काय? =))
:) नाही म्हटल तरी विडंबनांच्या कत्तल खान्यास कायद्याची जराशी साथ असतेच म्हणा अथवा एनीवे विंडंबन पाडताना हमामी प्रताधिकाराला खिंडार पाडणारे वस्ताद असतात म्हणून विंडंबन करताना 'प्रताधिकारमुक्त धरले जातील' ची जरूर भासत नाही. :)

In reply to by बॅटमॅन

माहितगार 10/09/2015 - 15:58
बाकी "कवितेवरचे प्रतिसाद प्रताधिकारमुक्त धरले जातील" हे अ‍ॅड करायचं राहिलं काय? =))
:) नाही म्हटल तरी विडंबनांच्या कत्तल खान्यास कायद्याची जराशी साथ असतेच म्हणा अथवा एनीवे विंडंबन पाडताना हमामी प्रताधिकाराला खिंडार पाडणारे वस्ताद असतात म्हणून विंडंबन करताना 'प्रताधिकारमुक्त धरले जातील' ची जरूर भासत नाही. :)
पेरणा वक्रमाप म्हणा हवे तर , बाजार हा आरसा खुपणे वा सुरस काय, पारख असो माणसा... निवडीचे स्वांतत्र्य इथे , तूप असोवा डालडा सृजन नाही सर्जन नाही , निंदला अतिसारसा.. टिकाभैरवांचे असो नृत्य तांडव मुक्तसे जिंकतो पडलेला जैसा वाढे अभ्याससा.. दोष नाही राऊळी शोध विठू राहे अंतरी हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा... मिसळ असते रोज नवी नवे वादळ रोज उठे ओलांडता सीमा आपुल्या मिळतील मित्र रोज नवे... हम्माऽऽऽ ...

हरल्या आशांनी बघतो, तू मंत्री आगळा नाही

माहितगार ·

पैसा 07/09/2015 - 22:31
जरा मात्रांची ओढाताण झालीय. नाहीतर कमीत कमी शब्द बदलून प्रयत्न चांगला आहे!

पैसा 07/09/2015 - 22:31
जरा मात्रांची ओढाताण झालीय. नाहीतर कमीत कमी शब्द बदलून प्रयत्न चांगला आहे!
पेरणा आणि प्रेरणा जणू खिशांत नागर मर्जी, जग माझिया वाणीवरती पण अवखळ नागरवासी, मज संत म्हणाले नाही ....... किती काळ उलटला मंत्र्या, नित नवीन म्हणशी तूही ....... जरी रूप पालटले तुही, तू मंत्री आगळा नाही मी परतून आलो तरीही, माझे ना सरले काही दमलो मी घेऊन माला, मज संत म्हटले नाही ....... समजता मोल खातीचे आलेला परतून जाई .......

मैत्र झुलवून बघ

गंगाधर मुटे ·

खेडूत 05/08/2015 - 09:20
मस्तच! कविता आवडली . प्रयत्नांची शर्थ असते . इथे अटी ता अर्थाने शर्ती हवे !

गंगाधर मुटे 07/08/2016 - 13:14
ज्यांना-ज्यांना मी मित्रासारखा दिसतो व जे-जे मला जीवाभावाने मित्र समजतात..... त्या सर्व माझ्या मित्र-मैत्रिणींना...... ऋणानुबंधाच्या मुसळधार पावसासारख्या ओल्यागच्च हिरव्यागार शुभेच्छा ......!! - गंगाधर मुटे ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आवडली कविता. थोडे प्रवचन - 'ज्यांना-ज्यांना मी मित्रासारखा दिसतो व जे-जे मला जीवाभावाने मित्र समजतात.....' - कितीही होऊ नये असे म्हटले तरी मिपावर थोडेफार वाद होतात लोकांचे. जरी वाद झाला तरी ते लगेच विसरून जावे हे उत्तम. जर जुन्या वादांच्या स्मृती सतत मनात ठेवलात तर विनाकारण मानसिक शांतता निघून जाईल आणी सतत स्कोर सेटलिंग ची संधी शोधत बसाल. कोणतीही व्यक्ती (स्वतःस धरून )100% 'सद्गुणी' नसते हे मान्य केले की एकूणच जीवन सुसह्य होते. प्रवचन समाप्त.

पेशवा भट 08/08/2016 - 12:21
छान आहे. मोजत बसू नकोस मित्रा स्पंदनाची धग डोळे मिटून खांद्यावरती मान ठेवून बघ हे जास्त आवडले.

खेडूत 05/08/2015 - 09:20
मस्तच! कविता आवडली . प्रयत्नांची शर्थ असते . इथे अटी ता अर्थाने शर्ती हवे !

गंगाधर मुटे 07/08/2016 - 13:14
ज्यांना-ज्यांना मी मित्रासारखा दिसतो व जे-जे मला जीवाभावाने मित्र समजतात..... त्या सर्व माझ्या मित्र-मैत्रिणींना...... ऋणानुबंधाच्या मुसळधार पावसासारख्या ओल्यागच्च हिरव्यागार शुभेच्छा ......!! - गंगाधर मुटे ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आवडली कविता. थोडे प्रवचन - 'ज्यांना-ज्यांना मी मित्रासारखा दिसतो व जे-जे मला जीवाभावाने मित्र समजतात.....' - कितीही होऊ नये असे म्हटले तरी मिपावर थोडेफार वाद होतात लोकांचे. जरी वाद झाला तरी ते लगेच विसरून जावे हे उत्तम. जर जुन्या वादांच्या स्मृती सतत मनात ठेवलात तर विनाकारण मानसिक शांतता निघून जाईल आणी सतत स्कोर सेटलिंग ची संधी शोधत बसाल. कोणतीही व्यक्ती (स्वतःस धरून )100% 'सद्गुणी' नसते हे मान्य केले की एकूणच जीवन सुसह्य होते. प्रवचन समाप्त.

पेशवा भट 08/08/2016 - 12:21
छान आहे. मोजत बसू नकोस मित्रा स्पंदनाची धग डोळे मिटून खांद्यावरती मान ठेवून बघ हे जास्त आवडले.
मैत्र झुलवून बघ

चेहऱ्यावरती खिळू नकोस
आत उतरून बघ
अंतरीच्या झोपाळ्यावर
मैत्र झुलवून बघ

नितळलेल्या तळावरती
विश्वासाचे घर
हाय, हॅलो जाऊ देत
हात घट्ट धर

शर्थ, अटी काही नकोत
खुले-खुले सांग
तेव्हा तुला कळेल माझ्या
हृदयाचा थांग

दिसतो तसा नाही मी
कठोर आणि क्रूर
काळिजाच्या सप्तकाला
अवरोहाचे सूर

देत बसत नाही मित्रा
पुन्हा पुन्हा ग्वाही
पण तू जसा समजतोस
मी तसा नाही

मोजत बसू नकोस मित्रा
स्पंदनाची धग
डोळे मिटून खांद्यावरती

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

एस ·

In reply to by नाखु

एस 05/08/2015 - 23:49
पण मिपा बंद असल्याचा एक तोटाही आहे. जेवताना मग त्या रटाळ मालिका झक मारून पहाव्या लागतात. एरवी मोबाईलमध्ये डोके खुपसून बसता येते ;-) अर्थात हा तोटा फक्त नवरे ह्या कॅटेगरीत मोडणार्‍या मिपाकरांनाच आहे! :-)

In reply to by अजया

एस 05/08/2015 - 12:01
नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! पुणेकर नवर्‍यांची छळछावणी आहे ती. एकदा 'चला, तुमच्यासाठी एक टायपिन घेऊ' असे म्हणून ही मला घेऊन त्या जंजाळात शिरली. टायपिन का काय ते नाहीच मिळालं, पण दोनेक तासांनी हाश्शहुश्शः करत बाहेर पडलो तेव्हा माझ्या दोन्ही हातांत जड पिशव्या होत्या आणि टायपिनच काय, आख्खा थ्रीपीस सूट बुटांसकट आला असता इतका माझा खिसा हलका झाला होता.

In reply to by एस

@नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif मागे माझ्या येका कोकणातल्या भटजी मित्राला "बायकोला घेऊन कुठे जाऊ?" असं विचारल्यावर मी त्याला सदर अभद्र जागी नाव न सांगता पाठवला. त्यांनतर पुण्याला तो एकटाच येऊ लागला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

पैसा 05/08/2015 - 09:34
लै भारी! मिपा बंद असलं की माझी पण बरीच कामे हातावेगळी होतात! =))

प्यारे१ 05/08/2015 - 12:42
अवांतर: तुळशीबाग चा नेमका काय इतिहास आहे? पूर्वी कधीतरी खरंच तुळस असायच्या काय? राममंदीर आहे त्या आजूबाजुला खरंच तशी बाग़ असण्याची शक्यता आहे. पुणं जेव्हा वाटीभर होतं तेव्हा तशी परिस्थिती असेल कदाचित. आजचं हे दरिद्री(ही जळजळ नाही. उगा 20 रुपयांची वस्तू घ्यायला 50 रुपये खर्चून जायचं आणि 500 च्या टाकाऊ वस्तू घेऊन यायचं यात काय लॉजिक आहे) रूप कधीपासून आलं तिथं? इतिहास अभ्यासकांनी ज़रा आमाला माहिती देऊन उपकृत करावे. बाकी लोक सुरूर फाट्यावर!

In reply to by नाखु

एस 05/08/2015 - 23:49
पण मिपा बंद असल्याचा एक तोटाही आहे. जेवताना मग त्या रटाळ मालिका झक मारून पहाव्या लागतात. एरवी मोबाईलमध्ये डोके खुपसून बसता येते ;-) अर्थात हा तोटा फक्त नवरे ह्या कॅटेगरीत मोडणार्‍या मिपाकरांनाच आहे! :-)

In reply to by अजया

एस 05/08/2015 - 12:01
नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! पुणेकर नवर्‍यांची छळछावणी आहे ती. एकदा 'चला, तुमच्यासाठी एक टायपिन घेऊ' असे म्हणून ही मला घेऊन त्या जंजाळात शिरली. टायपिन का काय ते नाहीच मिळालं, पण दोनेक तासांनी हाश्शहुश्शः करत बाहेर पडलो तेव्हा माझ्या दोन्ही हातांत जड पिशव्या होत्या आणि टायपिनच काय, आख्खा थ्रीपीस सूट बुटांसकट आला असता इतका माझा खिसा हलका झाला होता.

In reply to by एस

@नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif मागे माझ्या येका कोकणातल्या भटजी मित्राला "बायकोला घेऊन कुठे जाऊ?" असं विचारल्यावर मी त्याला सदर अभद्र जागी नाव न सांगता पाठवला. त्यांनतर पुण्याला तो एकटाच येऊ लागला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

पैसा 05/08/2015 - 09:34
लै भारी! मिपा बंद असलं की माझी पण बरीच कामे हातावेगळी होतात! =))

प्यारे१ 05/08/2015 - 12:42
अवांतर: तुळशीबाग चा नेमका काय इतिहास आहे? पूर्वी कधीतरी खरंच तुळस असायच्या काय? राममंदीर आहे त्या आजूबाजुला खरंच तशी बाग़ असण्याची शक्यता आहे. पुणं जेव्हा वाटीभर होतं तेव्हा तशी परिस्थिती असेल कदाचित. आजचं हे दरिद्री(ही जळजळ नाही. उगा 20 रुपयांची वस्तू घ्यायला 50 रुपये खर्चून जायचं आणि 500 च्या टाकाऊ वस्तू घेऊन यायचं यात काय लॉजिक आहे) रूप कधीपासून आलं तिथं? इतिहास अभ्यासकांनी ज़रा आमाला माहिती देऊन उपकृत करावे. बाकी लोक सुरूर फाट्यावर!
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

पायाखालची वीट दे....!

गंगाधर मुटे ·

सौंदाळा 13/07/2015 - 17:36
मुटेसाहेब, कविता आवडली. परिणामकारक आहे.

सतिश गावडे 13/07/2015 - 20:48
देवा मला चारदोन सवंगडी धीट दे हरामींना कुटण्यासाठी पायाखालची वीट दे
विठ्ठल ही वारकरी पंथाची देवता. ज्ञानदेव हे या पंथाचे संस्थापक. वारकरी पंथास पूजनीय असलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाची सांगता करताना ज्ञानदेव म्हणतात,
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो || भूता परस्परे जडो | मैत्र जीवांचे ||
मुटेसाहेब, तुमचं मागणं या पंथाच्या शिकवणीच्या विपरीत आहे.

In reply to by शैलेन्द्र

जडभरत 13/07/2015 - 23:49
भले तरी सोडू कासेची लंगोटी परी नाठाळाचे माथी हाणू काठी!!! असा आहे अभंग आणि तो बरोबर पण आहे. जो दुष्ट आहे त्याला फटका हा पाहिजेच!

जडभरत 14/07/2015 - 00:00
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् असे खुद्द भगवंताने म्हटले नाही का? आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण हा श्लोक ज्ञानेश्वरीत गाळलेला नाहीये.

जडभरत 14/07/2015 - 00:00
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् असे खुद्द भगवंताने म्हटले नाही का? आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण हा श्लोक ज्ञानेश्वरीत गाळलेला नाहीये.

सौंदाळा 13/07/2015 - 17:36
मुटेसाहेब, कविता आवडली. परिणामकारक आहे.

सतिश गावडे 13/07/2015 - 20:48
देवा मला चारदोन सवंगडी धीट दे हरामींना कुटण्यासाठी पायाखालची वीट दे
विठ्ठल ही वारकरी पंथाची देवता. ज्ञानदेव हे या पंथाचे संस्थापक. वारकरी पंथास पूजनीय असलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाची सांगता करताना ज्ञानदेव म्हणतात,
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो || भूता परस्परे जडो | मैत्र जीवांचे ||
मुटेसाहेब, तुमचं मागणं या पंथाच्या शिकवणीच्या विपरीत आहे.

In reply to by शैलेन्द्र

जडभरत 13/07/2015 - 23:49
भले तरी सोडू कासेची लंगोटी परी नाठाळाचे माथी हाणू काठी!!! असा आहे अभंग आणि तो बरोबर पण आहे. जो दुष्ट आहे त्याला फटका हा पाहिजेच!

जडभरत 14/07/2015 - 00:00
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् असे खुद्द भगवंताने म्हटले नाही का? आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण हा श्लोक ज्ञानेश्वरीत गाळलेला नाहीये.

जडभरत 14/07/2015 - 00:00
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् असे खुद्द भगवंताने म्हटले नाही का? आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण हा श्लोक ज्ञानेश्वरीत गाळलेला नाहीये.
पायाखालची वीट दे....!

पंढ़रीच्या पांडुरंगा
तुझ्या चरणी ठाव दे
तीर्थप्रसाद काही नको
शेतमालास भाव दे

दुर्दशेने फस्त केल्या
रानाकडे ध्यान दे
शहरावाणी खेडे होईल
असे थोडे ज्ञान दे

हृदयामध्ये राम आणि
मुखामध्ये नाम दे
सूट-माफी-सवलत नको
घामासाठी दाम दे

पाऊस पाणी येऊ दे
शेत माझे न्हाऊ दे
चोच फुटल्या अंकुरांना
दोन घास खाऊ दे

संपत्तीच्या वृद्धीसाठी
लालसेचा रोग दे
शेतीमधल्या कष्टालाही

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

गंगाधर मुटे ·

मुटे साहेब , कविता आवडली (खरं तर असे म्हणायला मन धजावत नाही.) वास्तव आहे हे ही मान्य ! पण एक विचारायचं धाडस करतोय... शेतकऱ्यांच्या अशा परिस्थितीला सरकारपेक्षा कुठेतरी स्वतः शेतकरी चुकतोय असं नाही का वाटत तुम्हाला ? आत्ता भाजपा च्या काळात शेतकरी नाखुश, यापुर्वी कॉंग्रेसच्या काळात पण नाखूश . सरकारने नेमकं करावे तरी काय ? आणि का ? शेती हे एक उपजीविकेचे साधन धरले तर बाकी व्यावसायिक पण वेगवेगळ्या समस्यातुन जात आसतातचकी. मी चुकत पण असेल पण शेतीत फायदा नसेल तर विकून का नाही टाकत शेती ? शेतीचा भाव तर दिवसेंदिवस वाढतच जातो आहे . ज्यांना शेती नाहीच असेही भांडवलहीन लोक कष्ट करून वा शिकून पोट भरतातच की!

विवेकपटाईत 24/06/2015 - 19:36
मुटे साहेब, सरकार बदलली तरी व्यवस्था बदलत नाही. आई ए एस नावाची व्यवस्था ब्रिटीश काळापासून देशात राज्य करते आहे. तेच धोरण अजून ही राबवत आहे. जो पर्यंत या व्यवस्थेत बदल होत नाही, राजनेता जास्त काही करू शकणार नाही. ही व्यवस्था सर्वाना आपल्या तालावर नाचवते. (अनेक आई ए एस अधिकाऱ्यांच्या कामाचा अनुभव आहे, टाकलेल्या रुळावरून कुणीच उतरायला तैयार नाही). त्याच चौकटीत कार्य करतात, कुणीच आपली स्वतंत्र बुद्धी वापरून निर्णय घेत नाही. त्याच फाईली आणि तेच निर्णय..... असंच चालू राहणार आणि साहेबांच्या कविताही....

मुटे साहेब , कविता आवडली (खरं तर असे म्हणायला मन धजावत नाही.) वास्तव आहे हे ही मान्य ! पण एक विचारायचं धाडस करतोय... शेतकऱ्यांच्या अशा परिस्थितीला सरकारपेक्षा कुठेतरी स्वतः शेतकरी चुकतोय असं नाही का वाटत तुम्हाला ? आत्ता भाजपा च्या काळात शेतकरी नाखुश, यापुर्वी कॉंग्रेसच्या काळात पण नाखूश . सरकारने नेमकं करावे तरी काय ? आणि का ? शेती हे एक उपजीविकेचे साधन धरले तर बाकी व्यावसायिक पण वेगवेगळ्या समस्यातुन जात आसतातचकी. मी चुकत पण असेल पण शेतीत फायदा नसेल तर विकून का नाही टाकत शेती ? शेतीचा भाव तर दिवसेंदिवस वाढतच जातो आहे . ज्यांना शेती नाहीच असेही भांडवलहीन लोक कष्ट करून वा शिकून पोट भरतातच की!

विवेकपटाईत 24/06/2015 - 19:36
मुटे साहेब, सरकार बदलली तरी व्यवस्था बदलत नाही. आई ए एस नावाची व्यवस्था ब्रिटीश काळापासून देशात राज्य करते आहे. तेच धोरण अजून ही राबवत आहे. जो पर्यंत या व्यवस्थेत बदल होत नाही, राजनेता जास्त काही करू शकणार नाही. ही व्यवस्था सर्वाना आपल्या तालावर नाचवते. (अनेक आई ए एस अधिकाऱ्यांच्या कामाचा अनुभव आहे, टाकलेल्या रुळावरून कुणीच उतरायला तैयार नाही). त्याच चौकटीत कार्य करतात, कुणीच आपली स्वतंत्र बुद्धी वापरून निर्णय घेत नाही. त्याच फाईली आणि तेच निर्णय..... असंच चालू राहणार आणि साहेबांच्या कविताही....

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?


गरिबावरती गरजते, धनिकावरी बरसते
एक सांगा भाऊसाहेब
सरकार म्हंजे यापेक्षा वेगळं काय असते?

हिरवं गेलं, निळसर गेलं, भगवं आलं
अस्काऱ्याच्या म्हशीले टोणगं झालं
टोणग्याच्या पाठीवर मलमली झूल
म्हशीच्या वेणीले धोतऱ्याचं फूल
साल बदललं तरीबी हाल बदलत नसते?

सातव्या आयोगाचा तिजोरीवर डल्ला
सामूहिक लग्नाचा शेतकऱ्याले सल्ला
अकलेचे कांदे बदबद पिकले
नाकाचे नकटे प्रवचन शिकले

<<<<< सुगी >>>>>>

गोल्या ·

किसन शिंदे 14/06/2015 - 13:09
प्रत्येक कडवं आवडलं.
दूर कर दुष्काळाला वैरी तुझा अन माझा तुझ्या ओल्या गं मायेनं सुगी लुटू दे गं बाई .....!!!!!
हे झक्कासच

किसन शिंदे 14/06/2015 - 13:09
प्रत्येक कडवं आवडलं.
दूर कर दुष्काळाला वैरी तुझा अन माझा तुझ्या ओल्या गं मायेनं सुगी लुटू दे गं बाई .....!!!!!
हे झक्कासच
वारा सुटू दे गं बाई ढग फुटू दे गं बाई माझ इवलुसं गावं चिंब नटु दे गं बाई....!! घसा कोरडा पडला ओढा नाला विहिरींचा तुझ्या पहिल्या सरी नं तहान मिटू दे गं बाई ....!! असा कसा आळसला कष्टकरी बळी राजा तुझ्या न्यार्या चैतन्यानं कामा झटू दे गं बाई....!! माती मधी निजलेलं माझ हिरवं सपान थेंब थेंब पावसानं पुरं उठू दे गं बाई ....!! दूर कर दुष्काळाला वैरी तुझा अन माझा तुझ्या ओल्या गं मायेनं सुगी लुटू दे गं बाई .....!!!!!

करार

ज्ञानोबाचे पैजार ·

नाखु 20/05/2015 - 08:59
कराराची (द)मदार प्रेमांकीत प्रत स्वीकारली आहे. एकतर्फी कराराचा शिलेदार नाखु

नाखु 20/05/2015 - 08:59
कराराची (द)मदार प्रेमांकीत प्रत स्वीकारली आहे. एकतर्फी कराराचा शिलेदार नाखु
तिला पहिल्यांदा पाहिल तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो तिचे टपोरे डोळे, लांबसडक केस आणि त्यात माळलेला तो मोगर्‍याचा गजरा पण मला ह्यातले काहिच दिसले नव्हते कारण ती माझ्या कडे बघुन जेव्हा हसली तेव्हा तिच्या गालावर पडलेल्या खळीने मी घायाळ झालो होतो. जळी स्थळी, काष्ठी पाषाणी मला तिच दिसत होती प्रेम ही माझी गरज होती लग्न ही तिची मी तिची अडचण समजाउन घेतली आणि मग मी तिच्याशी एक करार केला परत भेटण्याचा. जस प्रेम एकतर्फि होत तसाच हा करार पण होता पण शेवटी करार हा करारच असतो मग मी प्रेम करतच राहिलो आणि ती लग्न करुन निघून गेली पण माझा स्वतःवर विश्र्वास होता आणि तिच्यावरही मी तिची वाट बघत थांबलो

(सई)

ज्ञानोबाचे पैजार ·

नाखु 12/05/2015 - 15:10
सई रे सई कवीता.. पैजारबुवा शीघ्रविड्म्बन मस्त. खुशाल वाचक नाखु

पैसा 12/05/2015 - 15:56
बाकी बालकविता वगैरे ठीके. पण माझी सई? पैजारवहिनी मिपावर येण्याची शक्यता किती आहे?

तिमा 16/05/2015 - 11:59
एखाद्या "सई" नेच लीलाधराची वहिनी व्हावे. म्हणजे आणखी "साय" युक्त कविता वाचायला मिळतील.

नाखु 12/05/2015 - 15:10
सई रे सई कवीता.. पैजारबुवा शीघ्रविड्म्बन मस्त. खुशाल वाचक नाखु

पैसा 12/05/2015 - 15:56
बाकी बालकविता वगैरे ठीके. पण माझी सई? पैजारवहिनी मिपावर येण्याची शक्यता किती आहे?

तिमा 16/05/2015 - 11:59
एखाद्या "सई" नेच लीलाधराची वहिनी व्हावे. म्हणजे आणखी "साय" युक्त कविता वाचायला मिळतील.
जशी मिकाची सई मिकाची लाडकी आहे तशी आमची सई सुध्दा आम्हाला बेहद्द आवडते. मिकाची कविता वाचल्यावर आम्हाला आमच्या सईची आठवण आली अणि मग तिच्या बद्दल चार ओळी खरडल्याशिवाय रहावले नाही. माझी सई तशी बोल्ड आहे सीन आणि सिनेमाची गरज पाहून काय आणि कसं करायचे ते निट ठरवता येतं तिला --- माझी सई तशी शहाणी हातात काही काम नसेल तर रीअ‍ॅलीटी शोची अँकर बनणेही जमतं तिला --- माझी सई तशी डँबिस दिग्दर्शक रोल देत नसेल तर त्याची सासू होणंही जमतं तिला --- माझी सई तशी लब्बाड किती अन् कोणाला लोणी लावल तर किती अन् काय मिळेल हे पक्क ठावूक तिला --- माझी सई त

विश्वास वासावरचा

ज्ञानोबाचे पैजार ·

In reply to by शब्दानुज

अजुन विशीपण नाय गाठली हो मी..
मी पण, मला तर अजुन मिसरुडही फुटलेले नाही. नुकताच अवाज फुटायला सुरुवात झाली आहे. पैजारबुवा,

In reply to by शब्दानुज

गणेशा 06/05/2015 - 12:53
पण दाखला देवु नका हो , नाहितर ज्ञानोबाच्या पैजारबुवांना त्यांचा मिसरुड न फुटलेला चेहरा येथे द्यावा लागेल की.. असो ११-६ म्हणजे जवळ आला की वाढदिवस ... आमचा पण १०-०६ आहे. वर्षे मात्र ९५ असते तर कीती बरे झाले असते..

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सूड 06/05/2015 - 18:50
मला तर अजुन मिसरुडही फुटलेले नाही. नुकताच अवाज फुटायला सुरुवात झाली आहे.
असं असेल तर मग मी आत्ता कुठे रांगायला लागलो आहे.

तिमा 06/05/2015 - 11:21
पायोरिया मैंने दाँतोंमें मेरे क्यूँ पायो बदबू अनोखी मसूडोंकी हालत सबजन मुँहफेर करायो

In reply to by शब्दानुज

अजुन विशीपण नाय गाठली हो मी..
मी पण, मला तर अजुन मिसरुडही फुटलेले नाही. नुकताच अवाज फुटायला सुरुवात झाली आहे. पैजारबुवा,

In reply to by शब्दानुज

गणेशा 06/05/2015 - 12:53
पण दाखला देवु नका हो , नाहितर ज्ञानोबाच्या पैजारबुवांना त्यांचा मिसरुड न फुटलेला चेहरा येथे द्यावा लागेल की.. असो ११-६ म्हणजे जवळ आला की वाढदिवस ... आमचा पण १०-०६ आहे. वर्षे मात्र ९५ असते तर कीती बरे झाले असते..

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सूड 06/05/2015 - 18:50
मला तर अजुन मिसरुडही फुटलेले नाही. नुकताच अवाज फुटायला सुरुवात झाली आहे.
असं असेल तर मग मी आत्ता कुठे रांगायला लागलो आहे.

तिमा 06/05/2015 - 11:21
पायोरिया मैंने दाँतोंमें मेरे क्यूँ पायो बदबू अनोखी मसूडोंकी हालत सबजन मुँहफेर करायो
आमची पेरणा अर्थात शब्दानुज यांची क्षमा मागुन.... रोज पुन्हापुन्हा तो ढुसक्या सोडतो समोरचा नाईलाजाने नाकावर हात दाबतो हजारो वर्षांपासुन तो त्या सोडतो आणि दिवसभर पोट दाबून कळा सोसतो खरेतर प्रत्येकाच्या शरीरातून ती बाहेर पडत असते पण काहिंचे अस्तित्व नुसत्या वासावरुन ओळखता येते पवनाच्या रुपातुन तो बाहेर पडतो पोटाबरचे प्रेशर थोडेसे हलके करुन जातो प्रत्येक श्वासातुन तो नाकात घुसू पहातो श्वासाशिवाय थोड्या वेळानंतर जीव घुसमटतो काहीजण उगाचच लाजुन कायमचुर्ण घेतात वासहिन श्वासाची कामना करतात तो आला की चहुकडे वास दरवळात राहतो सेंटच्या