मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बघ तुला जमतं का ...

चामुंडराय ·
बघ तुला जमतं का ... तू साबुदाण्याच्या खिचडीसाठी उपवास कर किंवा बटाट्याच्या चिप्स साठी मर्जी तुझी... उपवासाचे पुण्य नाही मिळाले तरी चालेल पण एकादशी दुप्पट खाशी हे नेहमी लक्षात ठेव..... तू जिम मध्ये रोज जा किंवा नको जाऊस इच्छा तुझी... तिथे वाकला, पळाला नाहीस तरी चालेल पण वजन उचलतानाचे फोटो शेअर करायला मात्र विसरू नकोस..... तू मित्र, नातेवाईक यांच्या बरोबर फेस-टू-फेस संवाद कर किंवा नको करूस युअर विश... पण फेसबुकवर स्टेटस अपडेट करायला मात्र विसरू नकोस..... तू सोशल गॅदरिंग्ज मध्ये सहभागी हो किंवा नको होऊस हक्क तुझा... पण सोशल मीडियावर लॉग-इन करायला मात्र विसरू नकोस.....

कास्तकारी :(

अॅस्ट्रोनाट विनय ·
आज पाऊस येईन रोजच वाटतं वाट पाह्यता पाह्यता डोळ्यात पाणी दाटतं मळ्यातल्या विहरीपरी मनबीन आटतं जमिनीतल्या भेगांसंगं उर महं फाटतं चिंबओल्या वावराचं स्वप्न पहा वाटतं कुटका गिळून पडल्यावर झोपाच कुठं वाटतं कर्जाच्या ओझ्यानं सम्दं गणित हुकतं घरगुती चिंतायनं स्मशानगाव पेटतं कास्तकारी करणं आता पाप केल्यावानी वाटतं बैलावानी मलेबी मरून जा वाटतं

( वरपरीक्षा )

रातराणी ·

नीलमोहर 01/04/2017 - 15:30
आली गो बाय माझी ती, किती छान विडंबन लिहिलेय ( पाडलेय) ते,

नीलमोहर 01/04/2017 - 15:30
आली गो बाय माझी ती, किती छान विडंबन लिहिलेय ( पाडलेय) ते,
आमची प्रेरणा वरपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो * होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो * अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो * बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त * आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे * नव्हते मनात माझ्या,मग का असे

(काळी असे कुणाची)

ज्ञानोबाचे पैजार ·

वेल्लाभट 19/11/2016 - 11:49
परीर्वतन
हे मीटर मधे बसवण्यासाठी घेतलेलं कवीचं स्वातंत्र्य आहे की व्याकरणाची चूक समजावी?

In reply to by वेल्लाभट

अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया । दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व वाचकेश्वर:|| रच्याकने:- (माझ्या घरा समोर रहाणार्‍या कवितेला दोन लांबसडक वेण्या आहेत) पैजारबुवा,

एस 20/11/2016 - 00:44
कविता असे कुणाची, विडंबतात कोणी मज प्रतिसादही न मिळावा, हा मिपायोग आहे. सांगू कसे कुणाला, मी व्यनि केला नाही ही सोय खरडवहीची, मी वापरू न पाहे जिल्बि टाकू पहातो, वाचतात लोक एथे धागा शोधू जाता, तो संपादित आहे रागे करिता दंगा, मी लिहितो काहीबाही सकाळी येता जाग, आयडी बॅन्ड् आहे!

In reply to by एस

हा दर्द तर मूळ गाण्यातही नाहीये... मनापासून लिहिलेल्या या ओळींना अनेक जण मनापासून दाद देतील... इसका अंजाम भी कुछ सोच लिया है हसरत? तूने रब्त उन से इस दर्जा बढा रक्खा है... पैजारबुवा,

वेल्लाभट 19/11/2016 - 11:49
परीर्वतन
हे मीटर मधे बसवण्यासाठी घेतलेलं कवीचं स्वातंत्र्य आहे की व्याकरणाची चूक समजावी?

In reply to by वेल्लाभट

अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया । दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व वाचकेश्वर:|| रच्याकने:- (माझ्या घरा समोर रहाणार्‍या कवितेला दोन लांबसडक वेण्या आहेत) पैजारबुवा,

एस 20/11/2016 - 00:44
कविता असे कुणाची, विडंबतात कोणी मज प्रतिसादही न मिळावा, हा मिपायोग आहे. सांगू कसे कुणाला, मी व्यनि केला नाही ही सोय खरडवहीची, मी वापरू न पाहे जिल्बि टाकू पहातो, वाचतात लोक एथे धागा शोधू जाता, तो संपादित आहे रागे करिता दंगा, मी लिहितो काहीबाही सकाळी येता जाग, आयडी बॅन्ड् आहे!

In reply to by एस

हा दर्द तर मूळ गाण्यातही नाहीये... मनापासून लिहिलेल्या या ओळींना अनेक जण मनापासून दाद देतील... इसका अंजाम भी कुछ सोच लिया है हसरत? तूने रब्त उन से इस दर्जा बढा रक्खा है... पैजारबुवा,
लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले.... काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची, मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे, सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही, ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे, काही करु पहातो, नसतात लोक तेथे, पूसता कळे असे की, तो लायनीत आहे, परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे, की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे, -(पैजारबुवा) आनंदीआनंद

ये तू मैदानात : शेतकरी गीत

गंगाधर मुटे ·
ये तू मैदानात : शेतकरी गीत

ये तू मैदानात, ये तू मैदानात
ये तू मैदानात, पाईका ये तू मैदानात
काळ्या आईचा एल्गार
बिगूल फुंकण्या हो तय्यार
उलवून फेकू गुलाम बेड्या
जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, पाईका ये तू मैदानात ||धृ||

गोरे गेले, काळे आले
शस्त्राचे रंगांतर झाले
काळी आई खितपत पडली
विझल्या अंधारात
विझल्या अंधारात, विझल्या अंधारात
विझल्या अंधारात तेवण्या, ये तू मैदानात

झाडावर पाखरू बसलं : लावणी

गंगाधर मुटे ·

नाखु 29/08/2016 - 15:30
लिखाण, एखादा चाल लावणारा सापडला तर ताल-लयीत घुमवील या लावणीला. जुने जाणते प्रमोदकाकांनी लावली असती चाल.

नाखु 29/08/2016 - 15:30
लिखाण, एखादा चाल लावणारा सापडला तर ताल-लयीत घुमवील या लावणीला. जुने जाणते प्रमोदकाकांनी लावली असती चाल.
झाडावर पाखरू बसलं : लावणी

पाडाशी आला आंबा बघुनी
आभाळ खुदू खुदू हसलं
चोच टोचण्यास पोपट बघतंय
टक लावून एकतार टपलं
कुणी तरी याssss गं
पोपट धराssss गं
माझ्या धीराचं अवसान खचलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं ...||धृ||

आडून येती, झाडून येती
चहुबाजूला थवेच दिसती
लगट करुनी झोंबाझोंबी
पानाच्या आडोशाला धसती
चोचटोचुनी चोची चरती
माझ्या फळांची खादल करती
कुणी तरी याssss गं
अलग कराssss गं
माझं काळीज चोळीत थिजलं

परतून ये तू घरी

गंगाधर मुटे ·

चतुरंग 01/08/2016 - 00:03
अगदी नादमय झाली आहे! :) कविता इतकी सुंदर आहे की अधिक चांगली व्हावी असे वाटल्याने छिद्रान्वेष - नाग, चिचुंद्री बिळात घुसले पक्षी पिंपळावरती बसले इथे दुसर्‍या ओळीत मात्रा १६ असल्या तरी लय जाते आहे, विहग पिंपळावरती बसले असा किंचित बदल केलात तर कसे राहील? शिवार भिजले, तरूवर निजले अश्रू पिऊनी बुबुळं थिजले तसेच इथेही किंचित लय जाते आहे अश्रू पिऊनी लोचन थिजले असा बद्ल कसा वाटेल? (किंचितकवी)रंगा

पैसा 01/08/2016 - 11:11
कविता आवडली. पण सगळ्या रोमँटिक वातावरणात बुरुज, चिचुंद्री, बुबुळ या शब्दांनी जरा रसभंग होतो आहे.

चतुरंग 01/08/2016 - 00:03
अगदी नादमय झाली आहे! :) कविता इतकी सुंदर आहे की अधिक चांगली व्हावी असे वाटल्याने छिद्रान्वेष - नाग, चिचुंद्री बिळात घुसले पक्षी पिंपळावरती बसले इथे दुसर्‍या ओळीत मात्रा १६ असल्या तरी लय जाते आहे, विहग पिंपळावरती बसले असा किंचित बदल केलात तर कसे राहील? शिवार भिजले, तरूवर निजले अश्रू पिऊनी बुबुळं थिजले तसेच इथेही किंचित लय जाते आहे अश्रू पिऊनी लोचन थिजले असा बद्ल कसा वाटेल? (किंचितकवी)रंगा

पैसा 01/08/2016 - 11:11
कविता आवडली. पण सगळ्या रोमँटिक वातावरणात बुरुज, चिचुंद्री, बुबुळ या शब्दांनी जरा रसभंग होतो आहे.
परतून ये तू घरी

मेघ गुंजले, पवन रुंजले
आतूर झाल्या सरी
राजसा! परतून ये तू घरी॥

सूर्य, तारका, क्षितिज झाकले
किर्र ढगांनी गगन वाकले
गडगड होता बुरुजाभवती
धडधड भरली उरी
राजसा! परतून ये तू घरी॥

नाग, चिचुंद्री बिळात घुसले
पक्षी पिंपळावरती बसले
कडकडता बघ वीज नभाला
थरथरले गिरी-दरी
राजसा! परतून ये तू घरी॥

शिवार भिजले, तरूवर निजले
अश्रू पिऊनी बुबुळं थिजले
हिरमुसले बघ गायवासरू
अन् गहिवरली ओसरी

रे गझलाकारा, आवर तुझे दुकान...

मोदक ·

तुकारामांचे अभंग हे आता तलवारीसारखे फिरू लागलेत! होऊन जाऊदेत तलवारबाजीचा एक मुकाबला मिपासमक्ष! प्रतिवाराच्या प्रतीक्षेत! Sandy

कविता१९७८ 19/07/2016 - 06:02
शेतकरी नेता बनण्यासाठी आवश्यक असेल, सतत अन्याय होतोय असे सान्गितले नाही तर शेतकरी गझलकाराना मसीहा मानणार कसे आणि यान्चे मन्त्री बनण्याचे स्वप्न साकार होणार कसे?

नाखु 19/07/2016 - 09:12
काही परिक्षणे या काव्याची... पुरते वस्त्रहरण : दैनिक टका भारत शेतकरी आडत्यांनाखोडता : दैनिक मिपा जागरण बोलवित्या धन्याची भांडाफोड : दैनिक मिपा सामना. अता याही आडत्यांचा बाजार उठू दे :दैनिक नाखु समाचार. बाकी काव्य फर्मास पण अजून काही जोडणी आणि तोडणी शिल्लक ठेवली हे जाणवते. पुलेशु+पुभाप्र नाखु

आदिजोशी 19/07/2016 - 12:03
मस्त ठासली आहे. फुकट वांझोट्या चर्चा आणि जगाला नावे ठेवण्या शिवाय दुसरे उद्योग नसणारे फारच डोक्यात जातात. अपेक्षेप्रमाणे ह्याही तडक्यावर वन अँड ओन्ली मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.

In reply to by आदिजोशी

सूड 19/07/2016 - 14:46
मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.
एखाद्या ओळीची गरळ ओकून जातात ते कधी कधी. शहरातली माणसं किती असंवेदनशील आहेत आणि नेहमी शेतकर्‍यावरच कसा अन्याय होतो याबद्दलची त्यांची कळकळ लोकांना कळणार कशी?

झेन 19/07/2016 - 22:28
जिओ मोदकजी, लैच झाला होता धुरळा स्वय्मघोषित एकमेव कवी आणि उपेक्षितांचे अंतरंग जाणणा-या गुर्जींचा.

चंपाबाई 19/07/2016 - 23:35
शेतकर्‍याला सबसिडी नको , वीज फुकट का देताय असे रडणारे शहरी लोक हुशार म्हणायचे की काय ? सबसिडी व वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होउन ते सर्वानाच फायद्याचे होते हे हुशार लोकांच्या बत्थड डोक्यात का शिरत नाही ?

In reply to by सुबोध खरे

चंपाबाई 20/07/2016 - 02:42
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल. ( हे शेकडो वेळा चर्चिले आहे... मग हे फक्त शेतीमालालाच का ? काम्प्युटर मोबैल वाल्या कंपन्यानाही सबसिडी द्या म्हणजे याही वस्तु स्वस्त होतील असे इथले लोक बोलल्याचे अंधुकसे आठवते. ) बाकी डिटेल्स तज्ञाकडुन घेणे.

In reply to by चंपाबाई

खटपट्या 20/07/2016 - 02:46
शेतीचा उत्पादन खर्च कमी झाल्यावर त्याचा थेट फायदा ग्राहकाला होइलच याची शाश्वती नाही. काहीही कीतीही माफ करा...

In reply to by चंपाबाई

बेकार तरुण 20/07/2016 - 12:18
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल.>>> हा अर्थशास्त्रीय दृष्ट्या अतिषय महान प्रतिसाद आहे !!!! सब्सिडीची रक्कम बहुतेक आकाषातला देव सरकारला देत असावा. त्याचा टॅक्स देणार्‍या लोकांशी आणि एकुणच त्यांच्या खीषाला पडडार्‍या भुर्दंडाशी काहीच संबंध नसतो का?? माझ्या अल्पमतीप्रमाणे जगभर सब्सिडी देण यशस्वी ठरलेलं नाहीये, कारण स्वस्तात वस्तु मिळालीतर जबाबदारीने वापर करणे ही प्रवृत्ती बर्‍याचदा नसते. (कृपया खुलासा करावा)

In reply to by चंपाबाई

विवेकपटाईत 20/07/2016 - 19:56
कुठल्या जगात वावरता चंपा बाई सबसिडी खत कंपन्यांच्या खिश्यात जाते. अधिकांश शेती पावसावर अवलंबून आहे. वीज सबसिडीचा फायदा होत नाही. आणखीन एक गेल्या ३० वर्षांत शेतमालाचा भाव किमान ५०% कमी झाला आहे. जास्तीही असू शकतो. उदा: कांदा १९९८ - फेब. ३ रुपये आणि सेप्ट ४०-६० , २०१६ फेब. ३-७ आणि सेप्ट. २०१५ ४०-८० रुपये. (गेल्या १८ वर्षांत बाकी वस्तूंचे भाव किती वाढले). साखर १९९० -२० रुपये आणि २०१६ ४० रुपये (बाकी वस्तूंचे भाव किमान ५-१० पटीने वाढले आहे). तसेच तेल,डाळी आणि इतर शेतमालाचे आहे. शेत माज्डूराची मजदूरी मात्र ५-७ पटीने वाढली आहे. आज तेल अर्थात पाम ओईल विदेशातून मातीच्या भावात येते त्या मुळे देश्यात खाद्य तेलाचे उत्पादन वाढत नाही आहे. शेतमालासाठी आपण विदेशांवर निर्भर होतो आहे आणि आपल्या देश्यात शेतकरी शेत रिकामे ठेवतो आहे. याचे भयंकर परिणाम निकट भविष्यात होणार आहे शहरी लोकांना याची झळ हि भोगावी लागणार आहे. पण काय करणार उच्च शिक्षित मूर्ख (IAS) देशावर राज्य करीत आहे. (हे माझे मत नाही खालच्या स्तरावर कार्य करणाऱ्या अधिकांश अधिकाऱ्यांचे आहे).

In reply to by विवेकपटाईत

चंपाबाई 21/07/2016 - 11:16
काय कळेचना बै ! सबसिडी देऊन देशी शेती वाचवायची तरी विरोध ... तिकडे एका धाग्यावर आफ्रिकेतुन अन्न आयात करण्याचे कौतुक सुरु आहे.. इथे हेच मोदीप्रेमी लोक याचे भयंकर परिणाम होतील असेही म्हणताहेत. .... सबसिडीचा मुख्य फायदा बड्या लोकाना होतो , म्हणुन ती कुचकामी आहे ! पी पी एफ चे व्याज कमी करताना सरकारने हेच कारण दिल्व होते. बड्या लोकाना व्याज जास्त मिळते. गरीबाना व्याज कमीच मिळते . मग दर कमी केला तर बिघडले कुठे ?

In reply to by चंपाबाई

बोका-ए-आझम 20/07/2016 - 17:02
सबसिडी आणि वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होतो? >>> पण त्या सबसिडीचे पैसे सरकार अप्रत्यक्ष करांच्या against offset करतं आणि हे कर सगळ्यांना द्यावे लागतात, शेतकऱ्यांनाही. म्हणजे सरकार एका हाताने देतं आणि दुस-या हाताने घेतं. शेतकऱ्यांना सबसिडी नको असं म्हणणं नाहीच आहे पण सबसिडीचा फायदा हा मोठ्या शेतकऱ्यांना मिळतो कारण जेवढं शेताचं क्षेत्र जास्त तेवढी बियाण्यांची आणि खताची गरज जास्त आणि तेवढीच सबसिडी जास्त. त्यामुळे गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. वीजमाफीचंही तसंच. एकीकडे दिलेली वीजमाफी सरकार औद्योगिक दर वाढवून वसूल करतं. त्याचाही फायदा मोठ्या शेतकऱ्यांना होतो, अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत नाही.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 20/07/2016 - 21:40
पण मोठ्या शेतकऱ्यांसाठी वीजबिल/उत्पन्न हे गुणोत्तर नक्कीच छोट्या शेतकऱ्यांपेक्षा अनुकूल असतं. अप्रत्यक्ष कर जसे गरिबांना जास्त जाचक असतात तशातलाच प्रकार.

भन्नाट कविता , सातत्याने शेतकर्याचा कळवला अस दाखवून नुसत्या टुकार कवितांचे रतीब घालणे आणि धमकी देऊन पत्ते गणांगाणा चांगलाच हाणलय की , कडक कविता __/\__

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पण इतके धागे काढून पण ठाकूर-आळी वाले येतच नाहीत. नवी मुंबईच्या कट्ट्याला बोईसर-दहिसर पासून मिपाकर येतात, पण बोरीवली वाले येत नाहीत. असो, हे देवा, असे कट्टे मिस करणार्‍यांना माफ कर, त्यांनी किती आनंदाचे क्षण हुकवले आहेत, ते त्यांना कळत नाही.

शहरात फ्लॅटमध्ये ब्लॉक होणार्या आणि ब्लॉकमध्ये फ्लॅट होणार्या लोकांना शेतकर्यांविशयी कीती उद्दाम भावना आहेत त्याचे प्रतिकात्मक उदाहरण म्हणजे ही कविता मुटेजी तुम्ही शेतकर्यांचे प्रश्न मांडत चला ,आम्ही शेतकरी आहित तुमच्या बाजूने.

In reply to by मुक्त विहारि

तात्यांनी मिपाची स्थापना केली तेव्हा व्याकरणाला फाट्यावर मारले हे विसरलात का इतक्यात,आणि तुम्ही हेल्मेट वापरताना !मग ठीक आहे.

तुकारामांचे अभंग हे आता तलवारीसारखे फिरू लागलेत! होऊन जाऊदेत तलवारबाजीचा एक मुकाबला मिपासमक्ष! प्रतिवाराच्या प्रतीक्षेत! Sandy

कविता१९७८ 19/07/2016 - 06:02
शेतकरी नेता बनण्यासाठी आवश्यक असेल, सतत अन्याय होतोय असे सान्गितले नाही तर शेतकरी गझलकाराना मसीहा मानणार कसे आणि यान्चे मन्त्री बनण्याचे स्वप्न साकार होणार कसे?

नाखु 19/07/2016 - 09:12
काही परिक्षणे या काव्याची... पुरते वस्त्रहरण : दैनिक टका भारत शेतकरी आडत्यांनाखोडता : दैनिक मिपा जागरण बोलवित्या धन्याची भांडाफोड : दैनिक मिपा सामना. अता याही आडत्यांचा बाजार उठू दे :दैनिक नाखु समाचार. बाकी काव्य फर्मास पण अजून काही जोडणी आणि तोडणी शिल्लक ठेवली हे जाणवते. पुलेशु+पुभाप्र नाखु

आदिजोशी 19/07/2016 - 12:03
मस्त ठासली आहे. फुकट वांझोट्या चर्चा आणि जगाला नावे ठेवण्या शिवाय दुसरे उद्योग नसणारे फारच डोक्यात जातात. अपेक्षेप्रमाणे ह्याही तडक्यावर वन अँड ओन्ली मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.

In reply to by आदिजोशी

सूड 19/07/2016 - 14:46
मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.
एखाद्या ओळीची गरळ ओकून जातात ते कधी कधी. शहरातली माणसं किती असंवेदनशील आहेत आणि नेहमी शेतकर्‍यावरच कसा अन्याय होतो याबद्दलची त्यांची कळकळ लोकांना कळणार कशी?

झेन 19/07/2016 - 22:28
जिओ मोदकजी, लैच झाला होता धुरळा स्वय्मघोषित एकमेव कवी आणि उपेक्षितांचे अंतरंग जाणणा-या गुर्जींचा.

चंपाबाई 19/07/2016 - 23:35
शेतकर्‍याला सबसिडी नको , वीज फुकट का देताय असे रडणारे शहरी लोक हुशार म्हणायचे की काय ? सबसिडी व वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होउन ते सर्वानाच फायद्याचे होते हे हुशार लोकांच्या बत्थड डोक्यात का शिरत नाही ?

In reply to by सुबोध खरे

चंपाबाई 20/07/2016 - 02:42
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल. ( हे शेकडो वेळा चर्चिले आहे... मग हे फक्त शेतीमालालाच का ? काम्प्युटर मोबैल वाल्या कंपन्यानाही सबसिडी द्या म्हणजे याही वस्तु स्वस्त होतील असे इथले लोक बोलल्याचे अंधुकसे आठवते. ) बाकी डिटेल्स तज्ञाकडुन घेणे.

In reply to by चंपाबाई

खटपट्या 20/07/2016 - 02:46
शेतीचा उत्पादन खर्च कमी झाल्यावर त्याचा थेट फायदा ग्राहकाला होइलच याची शाश्वती नाही. काहीही कीतीही माफ करा...

In reply to by चंपाबाई

बेकार तरुण 20/07/2016 - 12:18
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल.>>> हा अर्थशास्त्रीय दृष्ट्या अतिषय महान प्रतिसाद आहे !!!! सब्सिडीची रक्कम बहुतेक आकाषातला देव सरकारला देत असावा. त्याचा टॅक्स देणार्‍या लोकांशी आणि एकुणच त्यांच्या खीषाला पडडार्‍या भुर्दंडाशी काहीच संबंध नसतो का?? माझ्या अल्पमतीप्रमाणे जगभर सब्सिडी देण यशस्वी ठरलेलं नाहीये, कारण स्वस्तात वस्तु मिळालीतर जबाबदारीने वापर करणे ही प्रवृत्ती बर्‍याचदा नसते. (कृपया खुलासा करावा)

In reply to by चंपाबाई

विवेकपटाईत 20/07/2016 - 19:56
कुठल्या जगात वावरता चंपा बाई सबसिडी खत कंपन्यांच्या खिश्यात जाते. अधिकांश शेती पावसावर अवलंबून आहे. वीज सबसिडीचा फायदा होत नाही. आणखीन एक गेल्या ३० वर्षांत शेतमालाचा भाव किमान ५०% कमी झाला आहे. जास्तीही असू शकतो. उदा: कांदा १९९८ - फेब. ३ रुपये आणि सेप्ट ४०-६० , २०१६ फेब. ३-७ आणि सेप्ट. २०१५ ४०-८० रुपये. (गेल्या १८ वर्षांत बाकी वस्तूंचे भाव किती वाढले). साखर १९९० -२० रुपये आणि २०१६ ४० रुपये (बाकी वस्तूंचे भाव किमान ५-१० पटीने वाढले आहे). तसेच तेल,डाळी आणि इतर शेतमालाचे आहे. शेत माज्डूराची मजदूरी मात्र ५-७ पटीने वाढली आहे. आज तेल अर्थात पाम ओईल विदेशातून मातीच्या भावात येते त्या मुळे देश्यात खाद्य तेलाचे उत्पादन वाढत नाही आहे. शेतमालासाठी आपण विदेशांवर निर्भर होतो आहे आणि आपल्या देश्यात शेतकरी शेत रिकामे ठेवतो आहे. याचे भयंकर परिणाम निकट भविष्यात होणार आहे शहरी लोकांना याची झळ हि भोगावी लागणार आहे. पण काय करणार उच्च शिक्षित मूर्ख (IAS) देशावर राज्य करीत आहे. (हे माझे मत नाही खालच्या स्तरावर कार्य करणाऱ्या अधिकांश अधिकाऱ्यांचे आहे).

In reply to by विवेकपटाईत

चंपाबाई 21/07/2016 - 11:16
काय कळेचना बै ! सबसिडी देऊन देशी शेती वाचवायची तरी विरोध ... तिकडे एका धाग्यावर आफ्रिकेतुन अन्न आयात करण्याचे कौतुक सुरु आहे.. इथे हेच मोदीप्रेमी लोक याचे भयंकर परिणाम होतील असेही म्हणताहेत. .... सबसिडीचा मुख्य फायदा बड्या लोकाना होतो , म्हणुन ती कुचकामी आहे ! पी पी एफ चे व्याज कमी करताना सरकारने हेच कारण दिल्व होते. बड्या लोकाना व्याज जास्त मिळते. गरीबाना व्याज कमीच मिळते . मग दर कमी केला तर बिघडले कुठे ?

In reply to by चंपाबाई

बोका-ए-आझम 20/07/2016 - 17:02
सबसिडी आणि वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होतो? >>> पण त्या सबसिडीचे पैसे सरकार अप्रत्यक्ष करांच्या against offset करतं आणि हे कर सगळ्यांना द्यावे लागतात, शेतकऱ्यांनाही. म्हणजे सरकार एका हाताने देतं आणि दुस-या हाताने घेतं. शेतकऱ्यांना सबसिडी नको असं म्हणणं नाहीच आहे पण सबसिडीचा फायदा हा मोठ्या शेतकऱ्यांना मिळतो कारण जेवढं शेताचं क्षेत्र जास्त तेवढी बियाण्यांची आणि खताची गरज जास्त आणि तेवढीच सबसिडी जास्त. त्यामुळे गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. वीजमाफीचंही तसंच. एकीकडे दिलेली वीजमाफी सरकार औद्योगिक दर वाढवून वसूल करतं. त्याचाही फायदा मोठ्या शेतकऱ्यांना होतो, अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत नाही.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 20/07/2016 - 21:40
पण मोठ्या शेतकऱ्यांसाठी वीजबिल/उत्पन्न हे गुणोत्तर नक्कीच छोट्या शेतकऱ्यांपेक्षा अनुकूल असतं. अप्रत्यक्ष कर जसे गरिबांना जास्त जाचक असतात तशातलाच प्रकार.

भन्नाट कविता , सातत्याने शेतकर्याचा कळवला अस दाखवून नुसत्या टुकार कवितांचे रतीब घालणे आणि धमकी देऊन पत्ते गणांगाणा चांगलाच हाणलय की , कडक कविता __/\__

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पण इतके धागे काढून पण ठाकूर-आळी वाले येतच नाहीत. नवी मुंबईच्या कट्ट्याला बोईसर-दहिसर पासून मिपाकर येतात, पण बोरीवली वाले येत नाहीत. असो, हे देवा, असे कट्टे मिस करणार्‍यांना माफ कर, त्यांनी किती आनंदाचे क्षण हुकवले आहेत, ते त्यांना कळत नाही.

शहरात फ्लॅटमध्ये ब्लॉक होणार्या आणि ब्लॉकमध्ये फ्लॅट होणार्या लोकांना शेतकर्यांविशयी कीती उद्दाम भावना आहेत त्याचे प्रतिकात्मक उदाहरण म्हणजे ही कविता मुटेजी तुम्ही शेतकर्यांचे प्रश्न मांडत चला ,आम्ही शेतकरी आहित तुमच्या बाजूने.

In reply to by मुक्त विहारि

तात्यांनी मिपाची स्थापना केली तेव्हा व्याकरणाला फाट्यावर मारले हे विसरलात का इतक्यात,आणि तुम्ही हेल्मेट वापरताना !मग ठीक आहे.
गेले काही दिवस सरसकटीकरणाचा तडका आणि अभंग वाचून आमच्या शहरी असंवेदनशील मेंदूच्या झुडुपाला एक कवितेची डहाळी उगवली. ती डहाळी त्याच्यासोबतच्या पालापाचोळ्यासकट येथे चिकटवत आहे...

॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

गंगाधर मुटे ·

पण मूळ अभंगप्रकाराची पाऊलवाट सोडून हे काव्य आधुनिक काव्यरस्त्यावर चालू लागल्यासारखे वाटते! जित्रुप = जित्राब?? बाकी देवाऐवजी सर्व अभंगात तुकारामांना केंद्रात बसवलय ते खूपच आवडल्या गेले आहे! Sandy

पण मूळ अभंगप्रकाराची पाऊलवाट सोडून हे काव्य आधुनिक काव्यरस्त्यावर चालू लागल्यासारखे वाटते! जित्रुप = जित्राब?? बाकी देवाऐवजी सर्व अभंगात तुकारामांना केंद्रात बसवलय ते खूपच आवडल्या गेले आहे! Sandy
॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

सांग तुकोराया तुझा । विठू कुठे मेला? ।
कर्जापायी भक्त त्याचा । स्मशानात गेला ॥धृo॥

पुजा, अर्चा, भक्तिभाव । आरतीचे ताट ॥
सर्वकाळ सत्संगाची । सोडली ना वाट ॥
तरी का रे अल्पायुषी । श्वास बंद केला ॥१॥

जित्रुपाचा दोर हाती । ओठी विठू नाम ॥
रात्रंदिन पाण्यावाणी । गाळलाय घाम ॥
तरी का रे चोपडला । कुंकवाने शेला ॥२॥

तुझा देव, धर्म तुझा । शोषकांचा साथी ॥
घोर, दु:ख, हीनता, गरिबी । पोशिंद्याचे माथी ॥