क्षितिजाचे कुंपण

लेखनविषय:
बालपण...... साखर झोपेच्या वळणावर अंदोलत स्वप्न हिंदोळ्यावर बांग कुणाची येता कानी विरून गेली सारी कहाणी तरूणपण...... विझल्या साऱ्या चांदणठिणग्या बघा बघा ती पहाटफुटणी छोट्या टीचभर खळगीसाठी धरावी आता वाट ही कुठली दगड मातीच्या रस्त्यामधूनी दिसेल काही अमोघ अद्भूत धावत होतो उर फुटोस्तर हाती आले मृगजळ सुंदर म्हातारपण...... झाली आता चांदणसंध्या चक्क कळाले भ्रमनिरास होणे ओलांडून क्षितिजाचे कुंपण उरले फक्त मार्गस्थ होणे

योद्धा

लेखनविषय:
दुःख माझे मी कसे,सांभाळीले ठाऊक नाही, घाव जे शिरी सोसले,उरलो कसा ठाऊक नाही. . वेदना झाल्या तरीही,मूक मी का राहिलो, जखमा उरी घेऊनी,फिरलो कसा ठाऊक नाही. . हाक ना आली कुठूनी,साद ही ना पोचली, अंधारलेल्या वाटेवरी,शिरलो कसा ठाऊक नाही. . सुख झाले पाहुणा अन दुःख झाले सोबती, जिंकतानाच नेमके,हरलो कसा ठाऊक नाही. . सावलीतही जाणवे ते,ऊन तापलेले किती, श्वासातल्या धाग्यातूनी,विरलो कसा ठाऊक नाही. . कटिबद्ध होती ती,विपुल शस्त्रसंभार होता नि:शस्त्र मी,अगतीक मी,कसा पुरलो ठाऊक नाही - कवी योगेश

आयुष्य

लेखनविषय:
निर्णय चुकतात, चुकू द्यावे श्रेय हुकतात, हुकू द्यावे जगता जगता आयुष्याकडून जुगारातले दान घ्यावे. बंध सुटतात,सुटू द्यावे माणसं तुटतात, तुटू द्यावे जगता जगता नात्याकडून आपुलकीचे फुल घ्यावे. मार्ग चुकतात, चुकू द्यावे रस्ते सरतात, सरु द्यावे चालता चालता रस्त्याकडून सावलीचे दान घ्यावे. प्रश्न पडतात, पडू द्यावे उत्तरं चुकतात,चुकू द्यावे सोडवता सोडवता उत्तराकडून ज्ञानाचे कण घ्यावे. ध्येय हुकतात, हुकू द्यावे अनुभव मुकतात, मुकू द्यावे जगता जगता अनुभवाकडून स्वत्वाचे भान घ्यावे. ------ अभय बापट ०५/०८/२०२३

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

लेखनविषय:
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

(का या गळ्याच्या तळाशी...)

लेखनविषय:
प्रेरर्णा काळजाच्या या तळाशी दिपक पवार साहेब याची कविता या वेळेस जरा हटके आहे. नेहमीच प्रेमरंगी रगंणारे, साजणी आता इथे तू एकदा येऊन जा सांजवाती सांजवेळी तू इथे लावून जा. बहरली ही बाग सारी, बघ फुले फुलली किती फुललेली ही फुले केसात तू माळून जा शब्द तू,संगीत तू, म्हणणारे दिपक भौ आज वेगळ्याच मुड मधे आहेत का? पण काही असो छान लिहीतात. त्यांच्या आभासी रचनेत वास्तवाची झलक दिसते.

अशीच एक धुंद, सोनेरी सायंकाळ - (आणि अंतिम वगैरे सत्य)

अशाच एका धुंद, सोनेरी संध्याकाळी सहज फिरायला निघालो होतो सहज मंजे मुद्दामच … – मला स्वतःशीच मोठ्याने बोलण्याची खोड आहे – घरात उगाच तमाशा नको म्हणून बाहेर पडलो. नकळत पाय तळ्याकाठच्या शांत रस्त्यावर वळले – मनात तात्त्विक वगैरे विचार घोळत होते. कोs हं ? … मी कोण आहे ? मै कौन हूँ ? व्हू आयाम ? सोs हं ! … मी तो आहे. तो मी आहे. या साडेचार फुटी कुडीत अडकलेला - अविनाशी,अमर, स्वयंप्रकाशी आत्मा आहे मी निर्विकार चेतना आहे मी ब्रम्ह, मी सत्य, मी कैवल्य आहे मी कर्ता, मी भोक्ता, मी ज्ञाता आहे मी साक्षी, मी सर्वसाक्षी, मी निर्लिप्त- निखळ जाणीव आहे.

मावळतीची दिशा....

लेखनविषय:
कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे निसटल्या क्षणांना पुन्हा धरावे पारंब्या वरती झुलता झुलता पदराखाली पुन्हा लपावे कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे भोगल्या क्षणांना पुन्हा जगावे आठवणीतले विस्मृत चेहरे पुन्हा एकदा तरी दिसावे डोळ्या मधले दवबिंदू अन् चेहर्‍यावरले धुके पुसावे हुरहुरत्या त्या कातरवेळी ,कधी कुणाची वाट बघावी दुरून बघता ओंजळीतली, प्राजक्ताची फुले दिसावी किती मिळाली किती गळाली, मनात आता खंत नसावी मात्र मागणे एकच ,मावळतीची दिशा पूर्व असावी!! कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे भोगल्या क्षणांना पुन्हा जगावे

वळण नसलेल्या वाटेवर

लेखनविषय:
*वळण नसलेल्या सरळ वाटेवर* जेंव्हा कोणीतरी खास भेटतं मग सरळ रेषेतलं आयुष्य नागमोडी होऊन जातं वादळ आणी पाऊस मग नित्याच होतं पण वादळा पूर्वीची शांतता सोसण मात्र असह्य होतं सोसाट्याचा वारा ,गारांचा मारा संतत श्रावणधार, रस्ता चिबं होतो आणी हवाहवासा गारवा वाटेवर पसरतो भिजलेला रस्ता,दाटलेली हिरवळ पुन्हा एकदा कुशीत येते अन वाटेवरली मरगळ त्वरीत निघून जाते आसेच कुणीतरी खास भेटावे प्रत्येकाला वाटते मग नागमोडी वाट सुद्धा सरळ भासते २७-६-२०२२

रोज किती पाणी प्यावे?

रोज किती पाणी प्यावे? शरीराची गरज असेल एवढे आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य डॉक्टर सुचवतील तेवढे रोज किती पाणी प्यावे? अन्न पिकविण्यासाठी शेतीसाठी शिल्लक राहील एवढे रोज किती पाणी प्यावे? शेती आणि शरीरांची गरज यांचे गणित नाही जुळली तर इतर अपव्यय टाळून लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व ईतर चार जणांना पटवून शरीराची गरज भागेल तेवढे

आङळे वाङळें साहित्य संमेलन

आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?
Subscribe to आयुष्याच्या वाटेवर