मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

न बदलणारं 'पंगतीतलं पान'

महासंग्राम ·

आपल्या गावगाड्यात जात नावाची व्यवस्था अगदी पाचर मारल्यासारखी फिट्ट बसली आहे. कितीही हाकला म्हंटलं तर जात नाही ती जात असं तिचं वर्णन केलं जातं. आपण सगळे जण कळत नकळतपणे का होईना या जातिव्यवस्थाचे पाईक आहोत. भारताच्या कुठल्याही खेड्यात गेलं तर हे वास्तव सहजपणे दिसून येतं. शहरात थेट नसला तर वेगवेगळ्या पद्धतीने जातीभेद दिसतोच. कधी तो रहाण्याच्या बाबतीत असतो, तर कधी खाण्यापिण्याच्या बाबतीत.

Once in a lifetime....!

डॉ श्रीहास ·

महासंग्राम 12/09/2020 - 13:48
डॉक्टर सलाम तुम्हांला आणि तुमच्यासारख्या असंख्य अनाम देवदूतांना जे तहान,भूक,स्थळ,काळ,जीव,वेळ यांची पर्वा न करता लोकांना बरे करण्यासाठी झटता आहात . तुम्ही जे करताय त्याचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही तुमचे आयुष्य भर ऋणी असू आणि स्वतःची काळजी घ्या ! सलाम

डॉक तुम्ही व तुमच्या सर्व टीम चे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. काय परिस्थितीतुन एक एक क्षण जात असाल तुम्ही . जशा महायुद्धाच्या कथा आपण वाचतो तसे हे अनुभवकथन पूढच्या पिढ्या नक्कीच वाचतील.

डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय.
शीर्षक, कथन आणि तुमचा अनुभव सगळंच कौतुकास्पद आहे.

चौथा कोनाडा 12/09/2020 - 17:02
तिथं काम करणारा नर्सिंग स्टाफ , मामा , मावश्या सगळ्यांसमोर नतमस्तक व्हावं असं रोज वाटलेलं .... मी त्यांना थांबवून म्हटलं “अहो मला सॅल्यूट नका हो करू.” तर तो हलकसं हसला. त्यांच्यातला एकजण अगदी सहज बोलला “डाॅक्टर बाॅडी न्यायची आहे हो.” मृत्यू हा विषय निरूत्तर करून टाकायचा.... मृत्यूला दरवळतांना पाहीलंय ... थकलेले डाॅक्टर आणि स्टाफ , हताश नातेवाईक आणि घाबरलेले पेशंट असं सतत डोळ्यासमोरचं चित्र .. ICU चं ऑक्सीजन संपलंय असं स्वप्न पडलं हो, नंतर झोपच लागली नाही.” ३५ पेक्षा जास्त पोस्टग्रॅज्यूऐशन करणारे डाॅक्टर्स कोव्हिड ची बाधा झाले आणि बरं झाल्यावर परत ड्युटीवर रुजू झाले. इतकी शक्ती ह्या पोरांमधे येते कोठून ? मला हा प्रश्न रोज पडतोय. काही जण तर सिरियस होते १० दिवस ऑक्सीजन वरही होते हे ऐकून तर मी मनोमन नमस्कार करून टाकला. आपल्या देशाला अतीउत्तम डाॅक्टर्स लाभणार ह्या मला तिळभरही शंका नाहीये. मी करोना योद्धा आहे का ? नाही मी करोना योद्ध्यांचा साक्षीदार आहे एका दिव्यत्वाची प्रचिती आलेला डाॅक्टर आहे .माझा खारीचा का होईना पण वाटा आहे हे आयुष्यभरासाठी पुरेल समाधान दोन आठवड्यात मिळवलंय. डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय. वाचून डोळ्यात पाणी उभं राहिलं ! सलाम दंडवत _/\_

चौकटराजा 12/09/2020 - 18:58
पी पी ई किट सारखाच माझा रेनकोट आहे त्यात मी जस्तीत जास्त अर्धा तास राहू शकतो . त्यावरून तुम्ही लोक किती व कोणत्या अवस्थांमधून जाउ शकता याची कल्पना मला आहे. १९१८ ते २०१९ या काळात डॉक पेशन्टला विचारीत " तुम्ही कसे आहात ?" एबोला, स्वाईन फ्लू सार्स ई साथी येउन गेल्या पण गेल्या काही वर्षात जगात अर्थिक असमतोल इतका आहे व लोकान्ची हाव इतकी वाढली आहे त्यामूळे प्रत्येक सुशिक्शित घरातला एक तरी व्यक्ती परदेशी आहे अतः कोणतीही साथ आली तरी ती पॅन्डेमिकच असणार आहे ! आता " डॉक तुम्ही कसे आहात ? " अशी विचारणा सामान्य लोक करीत आहेत. करोना हा वृद्धाना गाठून मारतो ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट आहे.हे माझे वाक्य फारच विचित्र वाटेल पण ते वास्तवाला धरून आहे. ( मी ६७ वर्षाचा आहे ! ). विषाणू व मानव यान्च्या आर अन्ड डी ची लढाई सनातन आहे पण लहान झालेल्या जगाने तिचे स्वरूप कधी नव्हे इतके भेसूर करून टाकले आहे.

रातराणी 13/09/2020 - 04:38
_/\_ फार कठीण परिस्थितीत काम करीत आहात डॉक! थ्री चियर्स अँड अ बिग हग =))

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

एकीकडे खाजगी रुग्णालयातून व्हिटॅमिन च्या गोळ्या अन वाफ घेण्यासाठी लाखो रुपये आकारले जात असण्याच्या कथा कानावर येतात. अन् दुसरीकडे ' रुग्णांना तपासताना आपल्याला सुद्धा आज ना उद्या विषाणू ची लागण होणार आहे ' हे गृहीत धरून तपासणी चालू ठेवणारे डॉक्टर खरे आणि तुमचे अनुभव वाचनात येतात. खाजगी रुग्णालयांची माणुसकी अन विवेक जागृत होवो, अन सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणाऱ्या तुम्हा डॉक्टरांना आरोग्य अन दीर्घायु लाभो, ही प्रार्थना...

चामुंडराय 14/09/2020 - 00:09
तुमच्या कर्तव्य तत्परतेला सलाम _/\_ हा खरंच एकमेवाद्वितीय अनुभव आहे. रच्याकने - आजकाल बाष्प शोषून घेणारे जॅकेट्स मिळतात (Thin polyester mesh liner wicks moisture to keep you comfortable) असे काही ह्या PPE किट्स बद्दल करता येणार नाही का?

निनाद 14/09/2020 - 06:10
तुमचा अनुभव आणि तुमचे विचार हे फार कौतुकास्पद आहेत.

तुमच्या सारख्या प्रामाणिक आणि सामान्य लोकांविषयी तळमळ असलेल्या डॉक्टरांची समाजाला नेहमीच गरज असते सध्याच्या काळात तर ती फारच जास्त आहे. नेहमी प्रमाणेच प्रेरणादायी आणि प्रांजळ अनुभव कथन मनःपूर्वक धन्यवाद पैजारबुवा,

डॉ श्रीहास 16/09/2020 - 08:02
मी जे काही अनुभवलं आहे ते कधीही शब्दात मांडू शकणार नाहीये. हे सगळं थोडं थोडं करत लिहीत गेलो होतो कारण रोजच असं काही घडतांना दिसायचं की मती गुंग होईल पण त्याचवेळेस एक माणूस म्हणून , एक डाॅक्टर म्हणून खूप काही अनुभवत होतो. तुमच्या शुभेच्छा मी त्या सर्व लढवय्यांतर्फे स्विकारतो.एक सैनिक सिमेवर जे करतो तेच आम्ही सर्व frontline workers करत आहोत हे अतिशय अभिमानानी सांगतोय. तुम्हासर्वांचा लोभ असाच राहू द्या, ही गोष्ट खूप शक्ती देऊन जाते. पुनश्च धन्यवाद.

MipaPremiYogesh 16/09/2020 - 11:58
कौतुक करावे तितके कमी आहे डॉक. पर्वा आम्ही झाड वाटप करायला गेलो होतो तेंव्हा एक मित्र म्हणाला कि आम्ही संघाचे लोकं एका स्लम वस्ती मध्ये पाहणी करण्यासाठी गेलो होतो. ppe किट घालून आणि २ तासांनी जेंव्हा बाहेर आलो तेंव्हा शरीरातला सगळं घाम निघाला अक्षरशः अंघोळ झाली. खरंच तुम्हाला सलाम डॉ . हॅट्स ऑफ

महासंग्राम 12/09/2020 - 13:48
डॉक्टर सलाम तुम्हांला आणि तुमच्यासारख्या असंख्य अनाम देवदूतांना जे तहान,भूक,स्थळ,काळ,जीव,वेळ यांची पर्वा न करता लोकांना बरे करण्यासाठी झटता आहात . तुम्ही जे करताय त्याचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही तुमचे आयुष्य भर ऋणी असू आणि स्वतःची काळजी घ्या ! सलाम

डॉक तुम्ही व तुमच्या सर्व टीम चे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. काय परिस्थितीतुन एक एक क्षण जात असाल तुम्ही . जशा महायुद्धाच्या कथा आपण वाचतो तसे हे अनुभवकथन पूढच्या पिढ्या नक्कीच वाचतील.

डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय.
शीर्षक, कथन आणि तुमचा अनुभव सगळंच कौतुकास्पद आहे.

चौथा कोनाडा 12/09/2020 - 17:02
तिथं काम करणारा नर्सिंग स्टाफ , मामा , मावश्या सगळ्यांसमोर नतमस्तक व्हावं असं रोज वाटलेलं .... मी त्यांना थांबवून म्हटलं “अहो मला सॅल्यूट नका हो करू.” तर तो हलकसं हसला. त्यांच्यातला एकजण अगदी सहज बोलला “डाॅक्टर बाॅडी न्यायची आहे हो.” मृत्यू हा विषय निरूत्तर करून टाकायचा.... मृत्यूला दरवळतांना पाहीलंय ... थकलेले डाॅक्टर आणि स्टाफ , हताश नातेवाईक आणि घाबरलेले पेशंट असं सतत डोळ्यासमोरचं चित्र .. ICU चं ऑक्सीजन संपलंय असं स्वप्न पडलं हो, नंतर झोपच लागली नाही.” ३५ पेक्षा जास्त पोस्टग्रॅज्यूऐशन करणारे डाॅक्टर्स कोव्हिड ची बाधा झाले आणि बरं झाल्यावर परत ड्युटीवर रुजू झाले. इतकी शक्ती ह्या पोरांमधे येते कोठून ? मला हा प्रश्न रोज पडतोय. काही जण तर सिरियस होते १० दिवस ऑक्सीजन वरही होते हे ऐकून तर मी मनोमन नमस्कार करून टाकला. आपल्या देशाला अतीउत्तम डाॅक्टर्स लाभणार ह्या मला तिळभरही शंका नाहीये. मी करोना योद्धा आहे का ? नाही मी करोना योद्ध्यांचा साक्षीदार आहे एका दिव्यत्वाची प्रचिती आलेला डाॅक्टर आहे .माझा खारीचा का होईना पण वाटा आहे हे आयुष्यभरासाठी पुरेल समाधान दोन आठवड्यात मिळवलंय. डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय. वाचून डोळ्यात पाणी उभं राहिलं ! सलाम दंडवत _/\_

चौकटराजा 12/09/2020 - 18:58
पी पी ई किट सारखाच माझा रेनकोट आहे त्यात मी जस्तीत जास्त अर्धा तास राहू शकतो . त्यावरून तुम्ही लोक किती व कोणत्या अवस्थांमधून जाउ शकता याची कल्पना मला आहे. १९१८ ते २०१९ या काळात डॉक पेशन्टला विचारीत " तुम्ही कसे आहात ?" एबोला, स्वाईन फ्लू सार्स ई साथी येउन गेल्या पण गेल्या काही वर्षात जगात अर्थिक असमतोल इतका आहे व लोकान्ची हाव इतकी वाढली आहे त्यामूळे प्रत्येक सुशिक्शित घरातला एक तरी व्यक्ती परदेशी आहे अतः कोणतीही साथ आली तरी ती पॅन्डेमिकच असणार आहे ! आता " डॉक तुम्ही कसे आहात ? " अशी विचारणा सामान्य लोक करीत आहेत. करोना हा वृद्धाना गाठून मारतो ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट आहे.हे माझे वाक्य फारच विचित्र वाटेल पण ते वास्तवाला धरून आहे. ( मी ६७ वर्षाचा आहे ! ). विषाणू व मानव यान्च्या आर अन्ड डी ची लढाई सनातन आहे पण लहान झालेल्या जगाने तिचे स्वरूप कधी नव्हे इतके भेसूर करून टाकले आहे.

रातराणी 13/09/2020 - 04:38
_/\_ फार कठीण परिस्थितीत काम करीत आहात डॉक! थ्री चियर्स अँड अ बिग हग =))

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

एकीकडे खाजगी रुग्णालयातून व्हिटॅमिन च्या गोळ्या अन वाफ घेण्यासाठी लाखो रुपये आकारले जात असण्याच्या कथा कानावर येतात. अन् दुसरीकडे ' रुग्णांना तपासताना आपल्याला सुद्धा आज ना उद्या विषाणू ची लागण होणार आहे ' हे गृहीत धरून तपासणी चालू ठेवणारे डॉक्टर खरे आणि तुमचे अनुभव वाचनात येतात. खाजगी रुग्णालयांची माणुसकी अन विवेक जागृत होवो, अन सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणाऱ्या तुम्हा डॉक्टरांना आरोग्य अन दीर्घायु लाभो, ही प्रार्थना...

चामुंडराय 14/09/2020 - 00:09
तुमच्या कर्तव्य तत्परतेला सलाम _/\_ हा खरंच एकमेवाद्वितीय अनुभव आहे. रच्याकने - आजकाल बाष्प शोषून घेणारे जॅकेट्स मिळतात (Thin polyester mesh liner wicks moisture to keep you comfortable) असे काही ह्या PPE किट्स बद्दल करता येणार नाही का?

निनाद 14/09/2020 - 06:10
तुमचा अनुभव आणि तुमचे विचार हे फार कौतुकास्पद आहेत.

तुमच्या सारख्या प्रामाणिक आणि सामान्य लोकांविषयी तळमळ असलेल्या डॉक्टरांची समाजाला नेहमीच गरज असते सध्याच्या काळात तर ती फारच जास्त आहे. नेहमी प्रमाणेच प्रेरणादायी आणि प्रांजळ अनुभव कथन मनःपूर्वक धन्यवाद पैजारबुवा,

डॉ श्रीहास 16/09/2020 - 08:02
मी जे काही अनुभवलं आहे ते कधीही शब्दात मांडू शकणार नाहीये. हे सगळं थोडं थोडं करत लिहीत गेलो होतो कारण रोजच असं काही घडतांना दिसायचं की मती गुंग होईल पण त्याचवेळेस एक माणूस म्हणून , एक डाॅक्टर म्हणून खूप काही अनुभवत होतो. तुमच्या शुभेच्छा मी त्या सर्व लढवय्यांतर्फे स्विकारतो.एक सैनिक सिमेवर जे करतो तेच आम्ही सर्व frontline workers करत आहोत हे अतिशय अभिमानानी सांगतोय. तुम्हासर्वांचा लोभ असाच राहू द्या, ही गोष्ट खूप शक्ती देऊन जाते. पुनश्च धन्यवाद.

MipaPremiYogesh 16/09/2020 - 11:58
कौतुक करावे तितके कमी आहे डॉक. पर्वा आम्ही झाड वाटप करायला गेलो होतो तेंव्हा एक मित्र म्हणाला कि आम्ही संघाचे लोकं एका स्लम वस्ती मध्ये पाहणी करण्यासाठी गेलो होतो. ppe किट घालून आणि २ तासांनी जेंव्हा बाहेर आलो तेंव्हा शरीरातला सगळं घाम निघाला अक्षरशः अंघोळ झाली. खरंच तुम्हाला सलाम डॉ . हॅट्स ऑफ
२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर Govt. Medical college ला कोव्हीड ड्यूटी केली. पण ड्युटीची नोटीस हातात पडल्यावर पहिली प्रतिक्रिया ... मला का जावं लागतंय , बाकी लोकं जातीलच! माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना ? मलाच infection झालं तर सरकार जबाबदारी घेणार का ? मग जवळच्या मित्रांनी जाणीव करून दिली की ही संधी आहे काहीतरी भव्यदिव्य घडतांना साक्षीदार होण्याची आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोच ना मग जाऊन ये ड्युटीला... आई बाबांना काळजी होती पण मी जावं ही इच्छा देखील होतीच. भुतो न भविष्यती अशी परिस्थिती ...

अचुम् आणि समुद्र (भाग १)

डॅनी ओशन ·

भीमराव 06/09/2020 - 20:53
मिसळपावचा इतिहास लिहायला बसा कोणी तरी. किती आले, किती टिकले, किती परत परत येत राहिले, त्यामुळे किती दर्जेदार निघून गेले, किती स्वयंघोषित दर्जेदारांनी घालवले किती अनंतात विलीन झाले आणि शेवटी इथे काय राहिलं. ता. क. जेधे शकावली सारखी मिपा शकावली करता येईलच की वर्षातल्या प्रमुख लेख व घटनांची.

आनन्दा 06/09/2020 - 21:58
आयडीचं वय बघितलं तर 2 महिने. हा नक्कीच दुआयडी आहे. एव्हढं परफेक्ट टायमिंग आणि जजमेंट येण्यासाठी मिपाचा किमान 8 -9 वर्षाचा सहवास पाहिजे. बाकी छान लिहीत आहात, सगळं जरी डोक्यात शिरत नसलं तरी संदर्भ लागत आहेत. पुभाप्र.

In reply to by आनन्दा

प्रचेतस 06/09/2020 - 22:02
आणि तो आयडी नेमका कुणाचा आहे हे तुम्ही अचूक ओळखलंत तर तुम्ही मुरलेले मिपाकर आहात हे सिद्ध होईल. :)

In reply to by प्रचेतस

मला समजले आहे, म्हणजे ८८.१२ % मी लेखकाला ओळखले आहे. पार्टी द्याल का ? बरोबर सांगितलं तर ? -दिलीप बिरुटे

सतिश गावडे 06/09/2020 - 22:52
स्वतः वात आणलाच आहे. आणि आता सोंग घेऊन हे धंदेही चालू केले :) ज्याने कुणी ही हाकलून लावलेली पीडा परत आणली त्याच्या बंदुकीच्या डबल ब्यारलमधून ऐन शिकारीच्या वेळी गोळ्याचं सुटणार नाहीत असा मी त्याला शाप देतो. ;)

टर्मीनेटर 06/09/2020 - 23:23
हत्तीच्या तिसऱ्या पायावर बेदाणा ठेऊन चंद्रप्रकाशात दाढी केल्यानंतर अचुम् आणि समुद्राच्या पहिल्या अध्यायाचे वाचन केले! “मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब” स्थळी तपश्चर्यापूर्ती न घडल्याने संपूर्ण भावार्थाचे आकलन अन चर्मचक्षुंना ग्रंथातील प्रतिमांचे दर्शन झाले नाही. परंतु जे अर्धेमुर्धे सार हाती लागले त्यानेही छान करमणूक जाहली! अगाध ज्ञानाची अविरत बरसात करणाऱ्या ११८ भगवंताची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहो हीच प्रभो चरणी प्रार्थना!!! 😜

इतकं भारी निरिक्षण दाद देण्याजोगं आहे ! बरेच ज्योक्स भारी जमलेत आणि काही तर खासच आहेत : १. नावेतल्या कपिला ह्या चर्चान्मध्ये आजिबात रस वाटत नसे. त्यामुळे पहीला त्याने नाकातून रक्त काढले, पण काय उपयोग झाला नाही. शेवटी त्याने शिडावर जाउन विष्ठा केली आणि सर्वान्ना पळवून लावले. मग त्याचे मित्र आणि ते त्यांच्या आवड्त्या विषयावर (केळी) चर्चा करु लागले. २. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, ३. यामध्ये कोम्यासोम्यागोम्या (कोसोगो) नावाची स्मृती पुढाकारात होती. कोसोगो या सगळ्या कलरवापैकी निम्मा आवाज एकटा काढत होता. कोसोगो आपल्या आवडणार्या तेजाच्या पुजार्यांविरोधात एक सुद्धा गोष्ट ऐकली तरी रागाने काळानिळा होत असे. अशा वेळेस “पैसे दिले आहेत, द्राक्षासव जास्त पिले आहे” असे तो काहीही बोलत सूटे. अशा वेळेस विटू सुध्धा त्याच्या सोबत असे. विटूला कोसोगो इतका उत्साह नसायचा. तो फक्त मधूनच कप्तानाकडे याला नावेतून टाका आणि त्याला नावेतून टाका म्हणण्यापूरता येई. ४. कोसोगो सोबत एक दुभंगलेला बाहुलामनुष्य (बाम) होता. त्याच्या खिशात एक कात्री असे. बाम दुभंगलेला का ? तर त्याला मनातून पटायचे कोसोगोचेच विचार. पण त्याला सतत आपण कोसोगो सारखे तर नाही दिसणार ना ? याची काळजी वाटत असे. त्यामुळे तो सुध्धा शावकासारखाच आपली प्रतिमा साम्भाळायचा प्रयत्न करे. या प्रयत्नात त्याची कात्री बहुमोल ठरे. कात्री सूक्ष्म कणांच्या विश्वातून आली असल्याचा दावा करे. कात्री इतकी वाक्चतुर होती की कोणतीही गोष्ट सूक्ष्म कणान्नी ती सिद्ध करु शकत असे. शेवट मात्र निश्चित चटका लावून गेला.

In reply to by संजय क्षीरसागर

२. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, वरच्या स्वभाव दर्शनाला जोडलेल्या या काव्यपंक्ती ही सुरेख आहेत ! सूक्ष्म कण असो, अतिनील किरण असो, हे तर आमचे अस्त्र असे, शब्दांच्या गर्तेत खोलवर, पाहाता काहीही दडले नसे ! सूक्ष्म कणांचे ज्ञान तसेही, मिपालोकी वसत नसे, आपण दाबूनी करूया दावा, प्रतिसाद सहजची खपत असे !

In reply to by डॅनी ओशन

एवढ्यातच आभार? या अभ्यासपूर्ण लेखाचे अजून बरेच पदर उलगडायचे बाकी आहेत. त्यामुळे शेवटी एकदाच आभारप्रदर्शन करुन टाका पैजारबुवा,

भीमराव 06/09/2020 - 20:53
मिसळपावचा इतिहास लिहायला बसा कोणी तरी. किती आले, किती टिकले, किती परत परत येत राहिले, त्यामुळे किती दर्जेदार निघून गेले, किती स्वयंघोषित दर्जेदारांनी घालवले किती अनंतात विलीन झाले आणि शेवटी इथे काय राहिलं. ता. क. जेधे शकावली सारखी मिपा शकावली करता येईलच की वर्षातल्या प्रमुख लेख व घटनांची.

आनन्दा 06/09/2020 - 21:58
आयडीचं वय बघितलं तर 2 महिने. हा नक्कीच दुआयडी आहे. एव्हढं परफेक्ट टायमिंग आणि जजमेंट येण्यासाठी मिपाचा किमान 8 -9 वर्षाचा सहवास पाहिजे. बाकी छान लिहीत आहात, सगळं जरी डोक्यात शिरत नसलं तरी संदर्भ लागत आहेत. पुभाप्र.

In reply to by आनन्दा

प्रचेतस 06/09/2020 - 22:02
आणि तो आयडी नेमका कुणाचा आहे हे तुम्ही अचूक ओळखलंत तर तुम्ही मुरलेले मिपाकर आहात हे सिद्ध होईल. :)

In reply to by प्रचेतस

मला समजले आहे, म्हणजे ८८.१२ % मी लेखकाला ओळखले आहे. पार्टी द्याल का ? बरोबर सांगितलं तर ? -दिलीप बिरुटे

सतिश गावडे 06/09/2020 - 22:52
स्वतः वात आणलाच आहे. आणि आता सोंग घेऊन हे धंदेही चालू केले :) ज्याने कुणी ही हाकलून लावलेली पीडा परत आणली त्याच्या बंदुकीच्या डबल ब्यारलमधून ऐन शिकारीच्या वेळी गोळ्याचं सुटणार नाहीत असा मी त्याला शाप देतो. ;)

टर्मीनेटर 06/09/2020 - 23:23
हत्तीच्या तिसऱ्या पायावर बेदाणा ठेऊन चंद्रप्रकाशात दाढी केल्यानंतर अचुम् आणि समुद्राच्या पहिल्या अध्यायाचे वाचन केले! “मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब” स्थळी तपश्चर्यापूर्ती न घडल्याने संपूर्ण भावार्थाचे आकलन अन चर्मचक्षुंना ग्रंथातील प्रतिमांचे दर्शन झाले नाही. परंतु जे अर्धेमुर्धे सार हाती लागले त्यानेही छान करमणूक जाहली! अगाध ज्ञानाची अविरत बरसात करणाऱ्या ११८ भगवंताची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहो हीच प्रभो चरणी प्रार्थना!!! 😜

इतकं भारी निरिक्षण दाद देण्याजोगं आहे ! बरेच ज्योक्स भारी जमलेत आणि काही तर खासच आहेत : १. नावेतल्या कपिला ह्या चर्चान्मध्ये आजिबात रस वाटत नसे. त्यामुळे पहीला त्याने नाकातून रक्त काढले, पण काय उपयोग झाला नाही. शेवटी त्याने शिडावर जाउन विष्ठा केली आणि सर्वान्ना पळवून लावले. मग त्याचे मित्र आणि ते त्यांच्या आवड्त्या विषयावर (केळी) चर्चा करु लागले. २. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, ३. यामध्ये कोम्यासोम्यागोम्या (कोसोगो) नावाची स्मृती पुढाकारात होती. कोसोगो या सगळ्या कलरवापैकी निम्मा आवाज एकटा काढत होता. कोसोगो आपल्या आवडणार्या तेजाच्या पुजार्यांविरोधात एक सुद्धा गोष्ट ऐकली तरी रागाने काळानिळा होत असे. अशा वेळेस “पैसे दिले आहेत, द्राक्षासव जास्त पिले आहे” असे तो काहीही बोलत सूटे. अशा वेळेस विटू सुध्धा त्याच्या सोबत असे. विटूला कोसोगो इतका उत्साह नसायचा. तो फक्त मधूनच कप्तानाकडे याला नावेतून टाका आणि त्याला नावेतून टाका म्हणण्यापूरता येई. ४. कोसोगो सोबत एक दुभंगलेला बाहुलामनुष्य (बाम) होता. त्याच्या खिशात एक कात्री असे. बाम दुभंगलेला का ? तर त्याला मनातून पटायचे कोसोगोचेच विचार. पण त्याला सतत आपण कोसोगो सारखे तर नाही दिसणार ना ? याची काळजी वाटत असे. त्यामुळे तो सुध्धा शावकासारखाच आपली प्रतिमा साम्भाळायचा प्रयत्न करे. या प्रयत्नात त्याची कात्री बहुमोल ठरे. कात्री सूक्ष्म कणांच्या विश्वातून आली असल्याचा दावा करे. कात्री इतकी वाक्चतुर होती की कोणतीही गोष्ट सूक्ष्म कणान्नी ती सिद्ध करु शकत असे. शेवट मात्र निश्चित चटका लावून गेला.

In reply to by संजय क्षीरसागर

२. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, वरच्या स्वभाव दर्शनाला जोडलेल्या या काव्यपंक्ती ही सुरेख आहेत ! सूक्ष्म कण असो, अतिनील किरण असो, हे तर आमचे अस्त्र असे, शब्दांच्या गर्तेत खोलवर, पाहाता काहीही दडले नसे ! सूक्ष्म कणांचे ज्ञान तसेही, मिपालोकी वसत नसे, आपण दाबूनी करूया दावा, प्रतिसाद सहजची खपत असे !

In reply to by डॅनी ओशन

एवढ्यातच आभार? या अभ्यासपूर्ण लेखाचे अजून बरेच पदर उलगडायचे बाकी आहेत. त्यामुळे शेवटी एकदाच आभारप्रदर्शन करुन टाका पैजारबुवा,

कै. मुरलीधर शिंगोटे आणि नाडी ग्रंथ भविष्य

शशिकांत ओक ·

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:15
शिंगोटे यांचेबद्दल भाऊंचा हा लेख –——————————————— सोमवार, ३० जुलै, २०१२ नशा जरूर असावी पण कशी असावी? खरे सांगायचे तर गुटखाबंदीच्या निमित्ताने व्यसन या विषयावर मी इतके लेख सलग लिहू शकेन की नाही; याची मला शंका होती. कारण तो विषय सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. पण गुटखाबंदीची घोषणा झाली आणि ‘पुण्यनगरी’चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचा मला फ़ोन आला. त्यांनी आग्रहच धरला, की मी व्यसनासंबंधाने लिहावे. मी आधी त्यांचा आग्रह फ़ेटाळून लावला होता. कारण मलाच त्या विषयाचे फ़ारसे आकर्षण नव्हते. मी त्याबद्दल मुद्दाम असा विचार केला नव्हता, की त्याचा अगत्याने अभ्यासही केला नव्हता. पण मुरलीशेठ हा भयंकर हट्टी माणुस आहे. त्यांच्या डोक्यात एक विषय घुसला, मग ते त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळेच त्यांनी व्यसन विषयासाठी माझीही पाठ सोडली नाही. शेवटी मी दोनतीन लेख लिहायचे मान्य केले. पण त्याचा इतका विस्तार होईल व तेही लेख वाचकांना इतके आवडतील याची मी तरी अपेक्षा अजिबात केली नव्हती. पण पहिल्या लेखानंतरच जे फ़ोन आले तेव्हा मीही थक्क झालो. मला मुरलीधर शिंगोटे या प्राण्याचे खरेच कौतुक वाटले. स्वत: लेख किंवा बातमी लिहू न शकणार्‍या या माणसाला वाचकाची भूक कशी कळते, हे गेल्या अठरा वर्षात मला न उलगडलेले कोडेच आहे. कारण त्यांच्या वृत्तपत्र व्यवसायाची सुरूवात झाली, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आम्ही सोबतच तो प्रयोग सुरू केला होता. १९९४ सालात मुरलीशेठ हा फ़क्त वृत्तपत्र विक्रेता होता. त्यापुर्वी त्यांनी तीन दशके वृत्तपत्र विक्रीत घालवली होती. ‘नवाकाळ’ लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय जेवढे निळूभाऊ खाडीलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीला आहे, तेवढेच मुरलीशेठ शिंगोटे या वाचकभक्त विक्रेत्याला सुद्धा आहे. कारण नवाकाळचे दिवस वाईट होते तेव्हापासून शिंगोटे यांनी त्याच्या विक्रीची जबाबदारी पत्करली होती. जेवढा निळूभाऊंचा आपल्या लेखणीवर विश्वास होता, तेवढाच मुरली शिंगोटे यांचा आपल्या विक्री-वितरण क्षमतेवर विश्वास होता. त्यातूनच नवाकाळ लाखाच्या आकड्यात जाऊन पोहोचला. नुसता लाखच नव्हेतर पाचसात लाखाचा पल्लाही ओलांडू शकला. मात्र त्या्मागची शिंगोटे यांची तपस्या वृत्तपत्र विक्रेते व व्यावसायिक; यांच्यापलिकडे कोणालाच फ़ारशी कल्पना नव्हती. मग एके दिवशी कालनिर्णय पंचांगकर्ते जयंतराव साळगावकर यांनी मराठी दैनिक काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्याही वितरणाचे काम शिंगोटे यांनी मित्राच्या मदतीने स्विकारले. पण ते निळूभाऊंना पचले नाही. त्यांनी अचानक शिंगोटे यांच्याकडून नवाकाळच्या वितरणाचे काम काढून घेतले. त्यामुळे शिंगोटे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्याकडे दरम्यान वितरणाचे काम करणारी सव्वा दोनशे कामगाराची फ़ौज तयार झाली होती. एकेदिवशी अचानक त्या सर्वांसाठी काम उरले नाही. मग करायचे काय? त्यांना कामावरून काढून टाकायचे काय? मुरलीशेठ शिंगोटे यांना ते पटत नव्हते. पण करायचे काय? एका दिवसात तेवढ्या मोठ्या वितरणाचे काम अन्यत्र मिळणार नव्हते. तर या माणसाने चक्क स्वत:च नवे वृत्तपत्र काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याला स्वत:ला लिहिता येत नव्हते, की विश्वासातला कोणी सहकारी नव्हता. पण आपल्याला ज्यांनी वितरणाचा बादशहा बनवले त्या सव्वा दोनशे कामगारांना वार्‍यावर सोडून द्यायची त्याची तयारी नव्हती. म्हणुन त्यांनी स्वत:च नवे वृत्तपत्र काढून ते लाखाच्या संख्येने चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला. व्यवहारी भाषेत सांगायचे तर तो शुद्ध मुर्खपणा होता. कारण असे नवे वृत्तपत्र काढून कित्येक लाख व को्टी रुपये बु्डवणारे अनेक दिवाळखोर लोकांनी बघितले होते. पण या माणसाला समजावणार कोण? १ मे १९९४ रोजी नवाकाळचे वितरण हातून गेले आणि त्याच दिवसापासून शिंगोटे यांनी ‘मुंबई चौफ़ेर’ नावाचे छोटेखानी सांजदैनिक मुंबईत सुरू केले. तेव्हा त्या माणसाच्या मुर्खपणाला हसणार्‍यात मीसुद्धा एक होतो. तसा त्यांचा आणि माझा परिचय नव्हता. पण आमचा एक समान मित्र होता अशोक शिंदे. त्यानेच मला आग्रह केला, की मुरलीला मदत कर. मीही गंमत म्हणुन त्यांच्या मदतीला गेलो. मात्र नवाकाळशी टक्कर घेण्याची किंवा लाखात वृत्तपत्र खपवण्याची शिंगोटे यांची स्वप्ने, मलाही पोरकट वाटत होती. कारण वृत्तपत्र म्हणजे लाखो रुपयाचा चुराडा करणारा जुगार असेच त्याचे अर्थशास्त्र आहे व होते. पण विक्रीवर अगाध श्रद्धा आणि वृत्तपत्र विक्रीची झिंग चढलेल्या मुरलीशेठला कोणी समजावू शकत नव्हता. त्यातून पैसे किती मिळणार किंवा कमाई किती होणार, यापेक्षा पेपर खपला पाहिजे आणि विकला गेला पाहिजे; याचीच या माणसाला भयंकर नशा होती. आणि आरंभीच्या काळात मुंबई चौफ़ेर खपू सुद्धा लागला. पण वृत्तपत्र हा असा धंदा आहे ,की खप वाढतो तसा तोटा वाढत जातो. उत्पादन खर्च आणि विक्रीतुन मिळणारा पैसा यांचे गणित न जमणारे असते. त्यातली दरी जाहिरातीच्या कमाईतून भरून काढावी लागते. पण तेव्हा तरी शिंगोटे नामक नशाबाजाला त्याची फ़िकीर नव्हती. आपणही लाखो खपाचे दैनिक काढले व चालवले. हे दाखवण्याची झिंग त्यांना चढलेली होती. मुंबई चौफ़ेरच्या यशाने ती नशा थोडी कमी होईल, अशी माझी अपेक्षा होती. पण हा माणूस कुठे थांबायला तयार होता? त्यांनी अवघ्या सहा महिन्यात सकाळचे मोठे चार पानी दैनिक काढायचा पवित्रा घेतला. त्याच वर्षी म्हणजे १९९४ च्या विजयादशमीपासून ‘आपला वार्ताहर’ नावाचे दैनिक त्यांनी सुरू केले. वृत्तपत्र काढणे हे आजवर भांडवलदार किंवा तत्पुर्वी यशस्वी लेखक संपादकांनी केलेले धाडस होते. पण एका विक्रेत्याने वृत्तपत्र काढून यशस्वी करणे, हा खरेच चमत्कार होता. आज त्या माणसाने कुठलीही भांडवली ताकद पाठीशी नसताना सहा दैनिकांचा पसारा उभा केलेला आहे. मराठीप्रमाणेच हिंदी व तामी्ळ व कानडी भाषेतील दैनिकेही त्यांच्या ताफ़्यात आहेत. हे सर्व त्यांनी का करावे? पैसा मिळवण्यासाठी, पैसा कमावून चैन-ऐष करण्यासाठी, असे मी तरी नक्कीच म्हणू शकत नाही. कारण मी त्या माणसाला अठरा वर्षे ओळखतो. जेवढा पैसा मिळवला तो पुन्हा त्याच वृत्तपत्राच्या व्यवसायात त्याने गुंतवला आणि त्याच व्यवसायाचा व्याप वाढवत नेला आहे. पण त्या माणसाची नशा काही आटोक्यात येताना दिसत नाही. मी त्याला भूक म्हणत नाही. ती शिंगोटे नामक मा्णसाची नशाच आहे. जसा नशाबाज माणुस कितीही नशा झाली म्हणुन समाधानी होत नाही, तर पुढले पल्ले गाठायला आसुसलेला असतो, तसाच हा मुरलीशेठ शिंगोटे नामक माणूस वृत्तपत्र नावाच्या व्यसनाने पछाडलेला आहे. कोणाला माझ्या या भाषेचे वा उपमेचे आश्चर्य वाटेल. व्यवसाय किंवा धंद्याला व्यसन का म्हणावे? तर शिंगोटे तसाच झिंग चढलेला माणुस आहे. पण त्याच्या या नशेने किती चांगले काम केले आहे बघा. त्याच्या या नशेने किमान तीनचार हजार लोकांना थेट रोजगार मिळवून दिला आहे. त्याशिवाय त्याच्याशी संबंधीत आणखी काही लोकांना उदरनिर्वाहाचे साधन दिले आहे. या माणसाला अशी नशा नसती किंवा वृत्तपत्र विकण्याची इतकी उत्कट झिंग नसती, तर या लोकांचे कल्याण झाले असते काय? गेल्या वर्षभरात हे दैनंदिन सदर लिहितांना मला ज्यांचे फ़ोन आले व ज्यांनी माझ्या सडेतोड लिखाणाबद्दल माझे कौतुक केले, त्यांना मी स्पष्टच सांगत आलो, की कौतुक करायचे तर मुरलीशेठ शिंगोटे यांचे करा. कारण मी आयुष्यभर असेच लिहित आलो. पण जेवढे लेखन स्वातंत्र्य किंवा अविष्कार स्वातंत्र्य मी शिंगोटे यांच्या वृत्तपत्रातून उपभोगू शकलो, तेवढे क्वचितच अन्यत्र मला मिळू शकले असेल. आज एकूणच माध्यमांवर भांडवलदारी विळखा घट्ट झाला असताना खर्‍या अर्थाने स्वतंत्र वृत्तीने स्वयंभू पत्रकारिता चालवण्याचे श्रेय एकट्या शिंगोटे यांना द्यावे लागेल. कारण आज स्वयंभू वृत्तपत्रे संपली आहेत आणि खरेच वाचक वा जनतेच्या हिताची जपणूक करणारी पत्रकारिता लयास चालली आहे. अशावेळी भांडवलदारीला शरण न गेलेले माध्यम म्हणुन शिंगोटे हा बुरूज बनून ठामपणे उभा राहिला आहे. त्याचे कारण वृत्तपत्र खपवायची त्याची नशा हेच आहे. या माणसाला वृत्तपत्र खपवण्याची नशा नसती तर आज एवढेही स्व्यंभू वृत्तपत्र शिल्लक राहिले नसते. म्हणुनच मी त्याच्या या नशेचे स्वागत करतो. नशा असावी तर अशी. झिंग जरूर असावी, पण अशी. ज्या नशेने किंवा झिंग असण्याने लोकांचे नुकसान होत नाही तर भलेच होते. शेवटी नशा किंवा झिंग म्हणजे तरी काय असते? जगापेक्षा वेगळे काही करून दाखवण्याची अनिवार इच्छा हीच नशा असते. ज्यातून आपले वेगळेपण दिसेल, असे काही करण्याची ओढ म्हणजे झिंग असते. कर्तृत्व, पुरूषार्थ म्हणुन जगाचे लक्ष वेधले जाण्याची इच्छा म्हणजेच नशा असते. मित्रांनो नशा जरूर करा, पण कर्तृत्व गाजवण्याची नशा असावी, नशा शिंगो्टेसारखी असावी. जी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा चमत्कार घडवून दाखवते. ( क्रमश:) भाग ( ३४१ ) ३०/७/१२ द्वारा पोस्ट केलेले bhau torsekar येथे ८:३३ म.उ.

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:23
आणखी हे थोडेसे. ———————— आजकालच्या बहुतांश माध्यमांनी तथाकथित पुरोगामी मुखवटे चढवले असल्याने आणि त्यातूनच खोटेपणा चालला असल्याने, तिथेच त्याविषयी प्रतिवाद शक्यच नाही. किंबहूना मी तसेच लिहीतो वा बोलतो, म्हणून या प्रस्थापित माध्यमातला मी एकमेव बहिष्कृत पत्रकार आहे. सहाजिकच जो कोणी माझी मते व लिखाण छापायला तयार असेल, तिथे मी लिहीतो. मात्र मला जे मांडायचे आहे, त्याबाबतीत मी अजिबात तडजोड करत नाही. म्हणून मग भाऊला बहिष्कृत केला, की त्याच्या भूमिका जगापुढे जाण्याचीच शक्यता संपून जाते. तेवढी सज्जता अशा सेक्युलर लोकांनी केली असल्याने, त्यांना माझ्या लिखाणाची कधी दखल घेण्य़ाची गरज भासली नाही. किंवा त्याचा प्रतिवादही करायचे प्रयोजन उरलेले नव्हते. महाराष्ट्रात जी मराठी माध्यमे आहेत, त्याचाच लाचार असलेल्या वाचकाला मग दुसरी बाजू समजण्याचा धोकाच उरलेला नव्हता. सहाजिकच भाऊने कितीही आटापिटा करून वेगळे मुद्दे उपस्थित केल्याने, कोणा सेक्युलर पत्रकार बुद्धीमंताला त्याची फ़िकीर नव्हती. हे जे कोणी सेक्युलर शहाणे आहेत, त्यांचाच सर्वत्र बोलबाला होता. कारण माध्यमे त्यांच्या कब्जात होती आणि माझ्यापाशी असलेल्या दुर्बळ छपाई साधनांनी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणे मलाही अशक्य होते. मग अशा खोटारड्यांनी मारलेल्या थापाच विद्वत्ता म्हणून लोकांच्या गळी मारल्या जात असल्यास नवल नव्हते. अर्थात हाती पडणारे वर्तमानपत्र किंवा पुस्तकासहीत वाहिन्यांवरील पोपटपंची, लोकांना मान्य होती किंवा पटत होती, असे अजिबात नाही. सामान्य माणुस कितीही अडाणी असला तरी त्याच्यापाशी सारासार बुद्धी असते आणि सूर्याला चंद्र म्हणून त्याच्या गळी मारता येत नाही. म्हणूनच वाचकाच्याही मनात शेकडो शंका होत्या. पण त्याचे उत्तर वा खुलासे त्याला मिळत नव्हते. अशा खोटारडेपणाची लक्तरे मी भले काढत असलो, तरी खेड्यापाड्यापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यापर्यंत जाऊन पोहोचण्याचे कुठलेही साधन माझ्यापाशी नव्हते. पण तशी दुसरी बाजू ऐकायला मिळाली वा कोणी दाखवली, तर सामान्य वाचकाला ती हवीच होती. पण प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातील अशा ढुढ्ढाचार्यांच्या विरोधात काही छापायची हिंमत कोणी करायची? कुठलाही छोटा संपादक वा व्यावसायिक संपादक तेवढी हिंमत करूच शकत नव्हता. ज्याला एकाचवेळी अशा मठाधीशांच्या मक्तेदारीला आव्हान देऊन त्यांच्यातच नांदायचे आहे, त्याच्यासाठी भाऊच्या बंडखोरीला प्रसिद्धी देणे अशक्यप्राय होते. २००९ च्या सुमारास तशी हिंमत एका माणसाने दाखवली आणि सुदैवाने तो बुद्धीमान संपादक-मालक नव्हता. मात्र वॄत्तपत्र खपले पाहिजे आणि वाचकाने विकत घेतले पहिजे, अशी ज्याची अढळ श्रद्धा आहे, असा तो माणुस होता मुरलीधर शिंगोटे. दिर्घकाळ अथक मेहनत घेऊन त्यांनी ‘पुण्यनगरी’ हे दैनिक महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात नेलेले होते. पैशाच्या थैल्या व काळापैसा ओतून पुरोगामी थोतांड रद्दीच्या भावात लोकांना विकून लाखोचे खप मिरवणार्‍यांना या एका विक्रेता संपादकाने खरे आव्हान उभे केले. काही कारणास्तव जिथे ‘पुण्यनगरी’ची पहिली आवृत्ती काढली, त्या पुण्यात तिचा जम बसवता आलेला नव्हता. म्हणून त्यांनी माझ्या मदतीची मागणी केली. अर्थात शिंगोटे माझा स्वभाव ओळखून असल्याने त्यांना माझ्या अटी मान्य कराव्या लागल्या. मला हवे ते आणि माझ्या भूमिकेनुसारच मी लिहीणार असल्याचे, त्यांना आधीच बजावून सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले. पेपर खपला पाहिजे इतकीच त्यांची अट होती. अर्थात त्यांच्या चालू असलेल्या वृत्तपत्राचे कुठलेही स्वरूप मी बदलाणार नव्हतो, की त्यात ढवळाढवळ करणार नव्हतो. माझा दैनंदिन लेख ‘पुण्यनगरी’ छापायचा इतकेच ठरले होते. त्यात कुठला विषय असेल वा कसा मांडलेला असेल, त्याविषयी हस्तक्षेप होणार नव्हता. त्यामुळे मी २००९ सालात पुण्याच्या आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ असे दैनंदिन सदर सुरू केले. माझ्या स्वभाव व भूमिकेनुसार त्यात परखड सडेतोड लिखाण करताना आपोआप प्रस्थापित माध्यमे व नावाजलेल्या संपादकांचे वाभडे मी काढू लागलो. पहिले काही दिवस पुण्याच्या आवृत्तीत प्रसिद्ध होणारा माझा दैनंदिन लेख हळुहळू ‘पुण्यनगरी’च्या अन्य जिल्हा आवृत्तीमध्येही प्रकाशित होऊ लागला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळू लागला. त्यात माझा मोबाईल नंबर छापलेला असल्याने प्रतिसाद थेट फ़ोनवरूनच मिळू लागला. पण त्याचे एक खास वैशिष्ट्य होते. ह्या खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठी वाचकासाठी ‘उलटतपासणी’ हा सुखद धक्का होता. ज्यांच्या विद्वत्तेविषयी वाचकाच्या मनात शेकडो शंका होत्या आणि त्या सेक्युलर खोटेपणावर राग होता, त्याला ‘उलटतपासणी’तून दिलासा मिळू लागला होता. आमच्या मनातले लिहीता, खुपच सडेतोड, अशा प्रतिक्रिया होत्याच. पण हा कोण भाऊ तोरसेकर अकस्मात उपटला आणि सगळ्या संपादकांना थेट भादरू लागला; असा अचंबाही वाचकांच्या प्रतिक्रियेमध्ये होता. मी मागली चार दशके पत्रकार असल्याचे या नव्याने भेटणार्‍या वाचकाला अजिबात नव्हते. आणि असा कोणी अकस्मात भंपक बुद्धीवाद्यांना झोडपू लागल्याचा आनंद त्या वाचकाला लपवता येत नव्हता. बघता बघता ‘पुण्यनगरी’च्या प्रत्येक जिल्हा आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ अपरिहार्य होऊन गेली आणि त्यातून भाऊ तोरसेकरला प्रथमच महाराष्ट्रातला वाचक ओळखू लागला. त्यामुळे प्रथमच मोकाट सेक्युलर माध्यमांच्या भंपकपणा व खोटारडेपणाला जाहिर सवाल केले जाऊ लागले. त्यात जे कोणी वागळे, केतकर वा अन्य संपादक लोकांची दिशाभूल करत होते, त्याला खुलेआम आव्हान मिळत असल्याने वाचक कमालीचा सुखावला होता. मजेची गोष्ट म्हणजे सुखवस्तु व उच्चभ्रू वर्गामध्ये शिंगोटे यांच्या ‘पुण्यनगरी’ दैनिकाला फ़ारशी मान्यता नव्हती. पण ‘उलटतपासणी’ने तसाही वाचक त्याकडे ओढला जाऊ लागला. अगदी काही कॉलेज विद्यार्थीही वाचक म्हणून मला फ़ोन करून बोलायचे. त्यातल्याच काहींनी मला इंटरनेटवर लिहीण्याचा आग्रह अनेकदा केला. पण दोन इंजिनियरींगचे विद्यार्थी कमालीचे हट्टी निघाले. त्यांनी पत्ता घेऊन थेट घरी येऊन मला हे तंत्रच शिकवले. गेल्या साडेचार दशकात नेहमी शाईच्या पेनने लिहायची सवय आणि तेही एकहाती विषय लिहून पुर्ण करण्याचा स्वभाव. त्यामुळे संगणाकवर टाईप करताना जो संथपणा अनुभवाला येईल, तितक्या गतीने आपण लिहू शकणार नाही, असा माझा विपरीत आत्मविश्वास होता. म्हणून त्या मुलांना मी नकार देत होतो. पण त्यांचा आग्रहही मला तितकाच महत्वाचा वाटला. त्यांचे मत असे होते, की छापलेला लेख स्कॅन करून मित्रांना पाठवायला खुप कटकटी आहेत, उलट इंटरनेटवर ब्लॉग स्वरूपात लेख टाकला तर जगात कुठूनही वाचला जाईल आणि लाखो लोकांना ते वाचायची संधी मिळू शकेल. तेवढेच नाही, ज्याला आवडला, तो आणखी आपल्या मित्रांपर्यंत पुढे पाठवू शकेल. म्हणून थोडे कष्ट व सराव करून मी इंटरनेटचे माध्यम वापरलेच पाहिजे. दोन दिवस त्या मुलांनी ठाण मांडून मला या गोष्टी शिकवल्या. तसा मी संगणक आधीपासून वापरत होतो आणि हाताशी लॅपटॉपही होता. पण मराठीत थेट टाईप करण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. या मुलांनी ब्लॉग व फ़ेसबुकशी ओळख करून दिली आणि बरहा पॅड डाऊनलोड करून सोप्या मराठी टायपींगचे प्रशिक्षण दिले. पुढले सहासात दिवस मोकळा वेळ मिळाला, मग टायपींगचा सराव केला. तोपर्यंत थेट लेख टाईप करायचे धाडस काही मला झाले नाही. कारण जितक्या गतीने डोक्यात विचार चालू असतो, तितक्या गतीने लेखनाचा स्वभाव. चारदोन ओळी वा वाक्ये खरडून कुथत बसणे मला जमत नाही. म्हणूनच वेगाने टाईप करणे साधण्यापर्यंत हातानेच लेख लिहायचे आणि सहासात तास अखंड टायपींगचा सराव करत राहिलो. पंधरा दिवसांनी मला नेहमीच्या दीडपट वेळात लेख लिहू शकतो, असा आत्मविश्वास आला. तोपर्यंत त्या मुलांनी सुचवले तसे चारसात ओळींचे-वाक्यांचे काहीबाही लिहून फ़ेसबुकवर टाकत होतो. मात्र ब्लॉग म्हणजे संपुर्ण लांबीचा लेख लिहून ब्लॉग चालवणे शक्य झालेले नव्हते. रोजचे लेखनाचे काम संपले, मग हा सराव चालू राहिला. त्यानंतरच ‘पुण्यनगरी’ची उलटतपासणी व अन्य वृत्तपत्रिय लिखाणासाठी टायपींग सुरू केले. एकदा ते साधले, तेव्हाच ‘उलटतपासणी’ हा ब्लॉग रितसर सुरू झाला. २०१२ च्या पुर्वार्धात फ़ेब्रुवारी अखेरीस ‘पुण्यनगरी’चा लेख ‘उलटतपासणी’ या ब्लॉगवर नित्यनेमाने टाकू लागलो. फ़ेसबुकमार्फ़त त्याचा प्रसारही सुरू झाला. एका बाजूला फ़ेसबुक मित्रयादी वाढत होती आणि त्यावर लेखाचा दुवा टाकल्याने ब्लॉगची लोकप्रियता वाढत गेली. (क्रमश:) Posted by bhau torsekar at 8:41 AM यातून काॅपी पेस्ट Sunday, September 27, 2015 कोण कुठला भाऊ तोरसेकर? (पुर्वार्ध)

सतिश गावडे 08/08/2020 - 11:35
आमच्याकडे पेपर म्हटले की नवाकाळ असा तो काळ होता. पेपर स्टॉलवर गेलो की एक रुपया पुढे करुन "एक नवाकाळ द्या" म्हणणे सवयीचे झाले होते. मटा आणि लोकसत्ता लोकांच्या गावीही नसायचे. आणि एक दिवस स्टॉलवर "वार्ताहर" नावाचा एक नवाच पेपर दिसू लागला. कागदाचा दर्जा नवाकाळच्या तुलनेत एकदम सो सो होता. तरीही लोक तो पेपर चाळू लागले, नवाकाळपेक्षा काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. आणि हळूहळू नवाकाळची जागा वार्ताहरने घेतली. पुढे रत्नागिरी टाईम्स आणि त्याची रायगड आवृत्ती रायगड टाईम्स स्टॉलवर लागेपर्यंत वार्ताहर अखंड वाचत होतो. रायगड टाईम्स आला आणि वार्ताहरचे वाचन बंद झाले.

शशिकांत ओक 09/08/2020 - 18:10
मित्रांनो, वरील धाग्यातील भाऊ तोरसेकरांचे प्रवचन असलेली लिंक कोणी बहुतेक उघडून पाहिलेली दिसत नाही! कारण मी आज सहज उघडली तर भलताच पुर्वीचा माझ्या लेखनाचा धागा उघडला! 'काय होतास तू काय झालास तू!' असो. आपणापैकी कोणी तोरसेकरांची ती क्लिप पाहिली नसेल तर मग ती सादर करेन.

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:15
शिंगोटे यांचेबद्दल भाऊंचा हा लेख –——————————————— सोमवार, ३० जुलै, २०१२ नशा जरूर असावी पण कशी असावी? खरे सांगायचे तर गुटखाबंदीच्या निमित्ताने व्यसन या विषयावर मी इतके लेख सलग लिहू शकेन की नाही; याची मला शंका होती. कारण तो विषय सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. पण गुटखाबंदीची घोषणा झाली आणि ‘पुण्यनगरी’चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचा मला फ़ोन आला. त्यांनी आग्रहच धरला, की मी व्यसनासंबंधाने लिहावे. मी आधी त्यांचा आग्रह फ़ेटाळून लावला होता. कारण मलाच त्या विषयाचे फ़ारसे आकर्षण नव्हते. मी त्याबद्दल मुद्दाम असा विचार केला नव्हता, की त्याचा अगत्याने अभ्यासही केला नव्हता. पण मुरलीशेठ हा भयंकर हट्टी माणुस आहे. त्यांच्या डोक्यात एक विषय घुसला, मग ते त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळेच त्यांनी व्यसन विषयासाठी माझीही पाठ सोडली नाही. शेवटी मी दोनतीन लेख लिहायचे मान्य केले. पण त्याचा इतका विस्तार होईल व तेही लेख वाचकांना इतके आवडतील याची मी तरी अपेक्षा अजिबात केली नव्हती. पण पहिल्या लेखानंतरच जे फ़ोन आले तेव्हा मीही थक्क झालो. मला मुरलीधर शिंगोटे या प्राण्याचे खरेच कौतुक वाटले. स्वत: लेख किंवा बातमी लिहू न शकणार्‍या या माणसाला वाचकाची भूक कशी कळते, हे गेल्या अठरा वर्षात मला न उलगडलेले कोडेच आहे. कारण त्यांच्या वृत्तपत्र व्यवसायाची सुरूवात झाली, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आम्ही सोबतच तो प्रयोग सुरू केला होता. १९९४ सालात मुरलीशेठ हा फ़क्त वृत्तपत्र विक्रेता होता. त्यापुर्वी त्यांनी तीन दशके वृत्तपत्र विक्रीत घालवली होती. ‘नवाकाळ’ लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय जेवढे निळूभाऊ खाडीलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीला आहे, तेवढेच मुरलीशेठ शिंगोटे या वाचकभक्त विक्रेत्याला सुद्धा आहे. कारण नवाकाळचे दिवस वाईट होते तेव्हापासून शिंगोटे यांनी त्याच्या विक्रीची जबाबदारी पत्करली होती. जेवढा निळूभाऊंचा आपल्या लेखणीवर विश्वास होता, तेवढाच मुरली शिंगोटे यांचा आपल्या विक्री-वितरण क्षमतेवर विश्वास होता. त्यातूनच नवाकाळ लाखाच्या आकड्यात जाऊन पोहोचला. नुसता लाखच नव्हेतर पाचसात लाखाचा पल्लाही ओलांडू शकला. मात्र त्या्मागची शिंगोटे यांची तपस्या वृत्तपत्र विक्रेते व व्यावसायिक; यांच्यापलिकडे कोणालाच फ़ारशी कल्पना नव्हती. मग एके दिवशी कालनिर्णय पंचांगकर्ते जयंतराव साळगावकर यांनी मराठी दैनिक काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्याही वितरणाचे काम शिंगोटे यांनी मित्राच्या मदतीने स्विकारले. पण ते निळूभाऊंना पचले नाही. त्यांनी अचानक शिंगोटे यांच्याकडून नवाकाळच्या वितरणाचे काम काढून घेतले. त्यामुळे शिंगोटे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्याकडे दरम्यान वितरणाचे काम करणारी सव्वा दोनशे कामगाराची फ़ौज तयार झाली होती. एकेदिवशी अचानक त्या सर्वांसाठी काम उरले नाही. मग करायचे काय? त्यांना कामावरून काढून टाकायचे काय? मुरलीशेठ शिंगोटे यांना ते पटत नव्हते. पण करायचे काय? एका दिवसात तेवढ्या मोठ्या वितरणाचे काम अन्यत्र मिळणार नव्हते. तर या माणसाने चक्क स्वत:च नवे वृत्तपत्र काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याला स्वत:ला लिहिता येत नव्हते, की विश्वासातला कोणी सहकारी नव्हता. पण आपल्याला ज्यांनी वितरणाचा बादशहा बनवले त्या सव्वा दोनशे कामगारांना वार्‍यावर सोडून द्यायची त्याची तयारी नव्हती. म्हणुन त्यांनी स्वत:च नवे वृत्तपत्र काढून ते लाखाच्या संख्येने चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला. व्यवहारी भाषेत सांगायचे तर तो शुद्ध मुर्खपणा होता. कारण असे नवे वृत्तपत्र काढून कित्येक लाख व को्टी रुपये बु्डवणारे अनेक दिवाळखोर लोकांनी बघितले होते. पण या माणसाला समजावणार कोण? १ मे १९९४ रोजी नवाकाळचे वितरण हातून गेले आणि त्याच दिवसापासून शिंगोटे यांनी ‘मुंबई चौफ़ेर’ नावाचे छोटेखानी सांजदैनिक मुंबईत सुरू केले. तेव्हा त्या माणसाच्या मुर्खपणाला हसणार्‍यात मीसुद्धा एक होतो. तसा त्यांचा आणि माझा परिचय नव्हता. पण आमचा एक समान मित्र होता अशोक शिंदे. त्यानेच मला आग्रह केला, की मुरलीला मदत कर. मीही गंमत म्हणुन त्यांच्या मदतीला गेलो. मात्र नवाकाळशी टक्कर घेण्याची किंवा लाखात वृत्तपत्र खपवण्याची शिंगोटे यांची स्वप्ने, मलाही पोरकट वाटत होती. कारण वृत्तपत्र म्हणजे लाखो रुपयाचा चुराडा करणारा जुगार असेच त्याचे अर्थशास्त्र आहे व होते. पण विक्रीवर अगाध श्रद्धा आणि वृत्तपत्र विक्रीची झिंग चढलेल्या मुरलीशेठला कोणी समजावू शकत नव्हता. त्यातून पैसे किती मिळणार किंवा कमाई किती होणार, यापेक्षा पेपर खपला पाहिजे आणि विकला गेला पाहिजे; याचीच या माणसाला भयंकर नशा होती. आणि आरंभीच्या काळात मुंबई चौफ़ेर खपू सुद्धा लागला. पण वृत्तपत्र हा असा धंदा आहे ,की खप वाढतो तसा तोटा वाढत जातो. उत्पादन खर्च आणि विक्रीतुन मिळणारा पैसा यांचे गणित न जमणारे असते. त्यातली दरी जाहिरातीच्या कमाईतून भरून काढावी लागते. पण तेव्हा तरी शिंगोटे नामक नशाबाजाला त्याची फ़िकीर नव्हती. आपणही लाखो खपाचे दैनिक काढले व चालवले. हे दाखवण्याची झिंग त्यांना चढलेली होती. मुंबई चौफ़ेरच्या यशाने ती नशा थोडी कमी होईल, अशी माझी अपेक्षा होती. पण हा माणूस कुठे थांबायला तयार होता? त्यांनी अवघ्या सहा महिन्यात सकाळचे मोठे चार पानी दैनिक काढायचा पवित्रा घेतला. त्याच वर्षी म्हणजे १९९४ च्या विजयादशमीपासून ‘आपला वार्ताहर’ नावाचे दैनिक त्यांनी सुरू केले. वृत्तपत्र काढणे हे आजवर भांडवलदार किंवा तत्पुर्वी यशस्वी लेखक संपादकांनी केलेले धाडस होते. पण एका विक्रेत्याने वृत्तपत्र काढून यशस्वी करणे, हा खरेच चमत्कार होता. आज त्या माणसाने कुठलीही भांडवली ताकद पाठीशी नसताना सहा दैनिकांचा पसारा उभा केलेला आहे. मराठीप्रमाणेच हिंदी व तामी्ळ व कानडी भाषेतील दैनिकेही त्यांच्या ताफ़्यात आहेत. हे सर्व त्यांनी का करावे? पैसा मिळवण्यासाठी, पैसा कमावून चैन-ऐष करण्यासाठी, असे मी तरी नक्कीच म्हणू शकत नाही. कारण मी त्या माणसाला अठरा वर्षे ओळखतो. जेवढा पैसा मिळवला तो पुन्हा त्याच वृत्तपत्राच्या व्यवसायात त्याने गुंतवला आणि त्याच व्यवसायाचा व्याप वाढवत नेला आहे. पण त्या माणसाची नशा काही आटोक्यात येताना दिसत नाही. मी त्याला भूक म्हणत नाही. ती शिंगोटे नामक मा्णसाची नशाच आहे. जसा नशाबाज माणुस कितीही नशा झाली म्हणुन समाधानी होत नाही, तर पुढले पल्ले गाठायला आसुसलेला असतो, तसाच हा मुरलीशेठ शिंगोटे नामक माणूस वृत्तपत्र नावाच्या व्यसनाने पछाडलेला आहे. कोणाला माझ्या या भाषेचे वा उपमेचे आश्चर्य वाटेल. व्यवसाय किंवा धंद्याला व्यसन का म्हणावे? तर शिंगोटे तसाच झिंग चढलेला माणुस आहे. पण त्याच्या या नशेने किती चांगले काम केले आहे बघा. त्याच्या या नशेने किमान तीनचार हजार लोकांना थेट रोजगार मिळवून दिला आहे. त्याशिवाय त्याच्याशी संबंधीत आणखी काही लोकांना उदरनिर्वाहाचे साधन दिले आहे. या माणसाला अशी नशा नसती किंवा वृत्तपत्र विकण्याची इतकी उत्कट झिंग नसती, तर या लोकांचे कल्याण झाले असते काय? गेल्या वर्षभरात हे दैनंदिन सदर लिहितांना मला ज्यांचे फ़ोन आले व ज्यांनी माझ्या सडेतोड लिखाणाबद्दल माझे कौतुक केले, त्यांना मी स्पष्टच सांगत आलो, की कौतुक करायचे तर मुरलीशेठ शिंगोटे यांचे करा. कारण मी आयुष्यभर असेच लिहित आलो. पण जेवढे लेखन स्वातंत्र्य किंवा अविष्कार स्वातंत्र्य मी शिंगोटे यांच्या वृत्तपत्रातून उपभोगू शकलो, तेवढे क्वचितच अन्यत्र मला मिळू शकले असेल. आज एकूणच माध्यमांवर भांडवलदारी विळखा घट्ट झाला असताना खर्‍या अर्थाने स्वतंत्र वृत्तीने स्वयंभू पत्रकारिता चालवण्याचे श्रेय एकट्या शिंगोटे यांना द्यावे लागेल. कारण आज स्वयंभू वृत्तपत्रे संपली आहेत आणि खरेच वाचक वा जनतेच्या हिताची जपणूक करणारी पत्रकारिता लयास चालली आहे. अशावेळी भांडवलदारीला शरण न गेलेले माध्यम म्हणुन शिंगोटे हा बुरूज बनून ठामपणे उभा राहिला आहे. त्याचे कारण वृत्तपत्र खपवायची त्याची नशा हेच आहे. या माणसाला वृत्तपत्र खपवण्याची नशा नसती तर आज एवढेही स्व्यंभू वृत्तपत्र शिल्लक राहिले नसते. म्हणुनच मी त्याच्या या नशेचे स्वागत करतो. नशा असावी तर अशी. झिंग जरूर असावी, पण अशी. ज्या नशेने किंवा झिंग असण्याने लोकांचे नुकसान होत नाही तर भलेच होते. शेवटी नशा किंवा झिंग म्हणजे तरी काय असते? जगापेक्षा वेगळे काही करून दाखवण्याची अनिवार इच्छा हीच नशा असते. ज्यातून आपले वेगळेपण दिसेल, असे काही करण्याची ओढ म्हणजे झिंग असते. कर्तृत्व, पुरूषार्थ म्हणुन जगाचे लक्ष वेधले जाण्याची इच्छा म्हणजेच नशा असते. मित्रांनो नशा जरूर करा, पण कर्तृत्व गाजवण्याची नशा असावी, नशा शिंगो्टेसारखी असावी. जी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा चमत्कार घडवून दाखवते. ( क्रमश:) भाग ( ३४१ ) ३०/७/१२ द्वारा पोस्ट केलेले bhau torsekar येथे ८:३३ म.उ.

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:23
आणखी हे थोडेसे. ———————— आजकालच्या बहुतांश माध्यमांनी तथाकथित पुरोगामी मुखवटे चढवले असल्याने आणि त्यातूनच खोटेपणा चालला असल्याने, तिथेच त्याविषयी प्रतिवाद शक्यच नाही. किंबहूना मी तसेच लिहीतो वा बोलतो, म्हणून या प्रस्थापित माध्यमातला मी एकमेव बहिष्कृत पत्रकार आहे. सहाजिकच जो कोणी माझी मते व लिखाण छापायला तयार असेल, तिथे मी लिहीतो. मात्र मला जे मांडायचे आहे, त्याबाबतीत मी अजिबात तडजोड करत नाही. म्हणून मग भाऊला बहिष्कृत केला, की त्याच्या भूमिका जगापुढे जाण्याचीच शक्यता संपून जाते. तेवढी सज्जता अशा सेक्युलर लोकांनी केली असल्याने, त्यांना माझ्या लिखाणाची कधी दखल घेण्य़ाची गरज भासली नाही. किंवा त्याचा प्रतिवादही करायचे प्रयोजन उरलेले नव्हते. महाराष्ट्रात जी मराठी माध्यमे आहेत, त्याचाच लाचार असलेल्या वाचकाला मग दुसरी बाजू समजण्याचा धोकाच उरलेला नव्हता. सहाजिकच भाऊने कितीही आटापिटा करून वेगळे मुद्दे उपस्थित केल्याने, कोणा सेक्युलर पत्रकार बुद्धीमंताला त्याची फ़िकीर नव्हती. हे जे कोणी सेक्युलर शहाणे आहेत, त्यांचाच सर्वत्र बोलबाला होता. कारण माध्यमे त्यांच्या कब्जात होती आणि माझ्यापाशी असलेल्या दुर्बळ छपाई साधनांनी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणे मलाही अशक्य होते. मग अशा खोटारड्यांनी मारलेल्या थापाच विद्वत्ता म्हणून लोकांच्या गळी मारल्या जात असल्यास नवल नव्हते. अर्थात हाती पडणारे वर्तमानपत्र किंवा पुस्तकासहीत वाहिन्यांवरील पोपटपंची, लोकांना मान्य होती किंवा पटत होती, असे अजिबात नाही. सामान्य माणुस कितीही अडाणी असला तरी त्याच्यापाशी सारासार बुद्धी असते आणि सूर्याला चंद्र म्हणून त्याच्या गळी मारता येत नाही. म्हणूनच वाचकाच्याही मनात शेकडो शंका होत्या. पण त्याचे उत्तर वा खुलासे त्याला मिळत नव्हते. अशा खोटारडेपणाची लक्तरे मी भले काढत असलो, तरी खेड्यापाड्यापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यापर्यंत जाऊन पोहोचण्याचे कुठलेही साधन माझ्यापाशी नव्हते. पण तशी दुसरी बाजू ऐकायला मिळाली वा कोणी दाखवली, तर सामान्य वाचकाला ती हवीच होती. पण प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातील अशा ढुढ्ढाचार्यांच्या विरोधात काही छापायची हिंमत कोणी करायची? कुठलाही छोटा संपादक वा व्यावसायिक संपादक तेवढी हिंमत करूच शकत नव्हता. ज्याला एकाचवेळी अशा मठाधीशांच्या मक्तेदारीला आव्हान देऊन त्यांच्यातच नांदायचे आहे, त्याच्यासाठी भाऊच्या बंडखोरीला प्रसिद्धी देणे अशक्यप्राय होते. २००९ च्या सुमारास तशी हिंमत एका माणसाने दाखवली आणि सुदैवाने तो बुद्धीमान संपादक-मालक नव्हता. मात्र वॄत्तपत्र खपले पाहिजे आणि वाचकाने विकत घेतले पहिजे, अशी ज्याची अढळ श्रद्धा आहे, असा तो माणुस होता मुरलीधर शिंगोटे. दिर्घकाळ अथक मेहनत घेऊन त्यांनी ‘पुण्यनगरी’ हे दैनिक महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात नेलेले होते. पैशाच्या थैल्या व काळापैसा ओतून पुरोगामी थोतांड रद्दीच्या भावात लोकांना विकून लाखोचे खप मिरवणार्‍यांना या एका विक्रेता संपादकाने खरे आव्हान उभे केले. काही कारणास्तव जिथे ‘पुण्यनगरी’ची पहिली आवृत्ती काढली, त्या पुण्यात तिचा जम बसवता आलेला नव्हता. म्हणून त्यांनी माझ्या मदतीची मागणी केली. अर्थात शिंगोटे माझा स्वभाव ओळखून असल्याने त्यांना माझ्या अटी मान्य कराव्या लागल्या. मला हवे ते आणि माझ्या भूमिकेनुसारच मी लिहीणार असल्याचे, त्यांना आधीच बजावून सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले. पेपर खपला पाहिजे इतकीच त्यांची अट होती. अर्थात त्यांच्या चालू असलेल्या वृत्तपत्राचे कुठलेही स्वरूप मी बदलाणार नव्हतो, की त्यात ढवळाढवळ करणार नव्हतो. माझा दैनंदिन लेख ‘पुण्यनगरी’ छापायचा इतकेच ठरले होते. त्यात कुठला विषय असेल वा कसा मांडलेला असेल, त्याविषयी हस्तक्षेप होणार नव्हता. त्यामुळे मी २००९ सालात पुण्याच्या आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ असे दैनंदिन सदर सुरू केले. माझ्या स्वभाव व भूमिकेनुसार त्यात परखड सडेतोड लिखाण करताना आपोआप प्रस्थापित माध्यमे व नावाजलेल्या संपादकांचे वाभडे मी काढू लागलो. पहिले काही दिवस पुण्याच्या आवृत्तीत प्रसिद्ध होणारा माझा दैनंदिन लेख हळुहळू ‘पुण्यनगरी’च्या अन्य जिल्हा आवृत्तीमध्येही प्रकाशित होऊ लागला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळू लागला. त्यात माझा मोबाईल नंबर छापलेला असल्याने प्रतिसाद थेट फ़ोनवरूनच मिळू लागला. पण त्याचे एक खास वैशिष्ट्य होते. ह्या खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठी वाचकासाठी ‘उलटतपासणी’ हा सुखद धक्का होता. ज्यांच्या विद्वत्तेविषयी वाचकाच्या मनात शेकडो शंका होत्या आणि त्या सेक्युलर खोटेपणावर राग होता, त्याला ‘उलटतपासणी’तून दिलासा मिळू लागला होता. आमच्या मनातले लिहीता, खुपच सडेतोड, अशा प्रतिक्रिया होत्याच. पण हा कोण भाऊ तोरसेकर अकस्मात उपटला आणि सगळ्या संपादकांना थेट भादरू लागला; असा अचंबाही वाचकांच्या प्रतिक्रियेमध्ये होता. मी मागली चार दशके पत्रकार असल्याचे या नव्याने भेटणार्‍या वाचकाला अजिबात नव्हते. आणि असा कोणी अकस्मात भंपक बुद्धीवाद्यांना झोडपू लागल्याचा आनंद त्या वाचकाला लपवता येत नव्हता. बघता बघता ‘पुण्यनगरी’च्या प्रत्येक जिल्हा आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ अपरिहार्य होऊन गेली आणि त्यातून भाऊ तोरसेकरला प्रथमच महाराष्ट्रातला वाचक ओळखू लागला. त्यामुळे प्रथमच मोकाट सेक्युलर माध्यमांच्या भंपकपणा व खोटारडेपणाला जाहिर सवाल केले जाऊ लागले. त्यात जे कोणी वागळे, केतकर वा अन्य संपादक लोकांची दिशाभूल करत होते, त्याला खुलेआम आव्हान मिळत असल्याने वाचक कमालीचा सुखावला होता. मजेची गोष्ट म्हणजे सुखवस्तु व उच्चभ्रू वर्गामध्ये शिंगोटे यांच्या ‘पुण्यनगरी’ दैनिकाला फ़ारशी मान्यता नव्हती. पण ‘उलटतपासणी’ने तसाही वाचक त्याकडे ओढला जाऊ लागला. अगदी काही कॉलेज विद्यार्थीही वाचक म्हणून मला फ़ोन करून बोलायचे. त्यातल्याच काहींनी मला इंटरनेटवर लिहीण्याचा आग्रह अनेकदा केला. पण दोन इंजिनियरींगचे विद्यार्थी कमालीचे हट्टी निघाले. त्यांनी पत्ता घेऊन थेट घरी येऊन मला हे तंत्रच शिकवले. गेल्या साडेचार दशकात नेहमी शाईच्या पेनने लिहायची सवय आणि तेही एकहाती विषय लिहून पुर्ण करण्याचा स्वभाव. त्यामुळे संगणाकवर टाईप करताना जो संथपणा अनुभवाला येईल, तितक्या गतीने आपण लिहू शकणार नाही, असा माझा विपरीत आत्मविश्वास होता. म्हणून त्या मुलांना मी नकार देत होतो. पण त्यांचा आग्रहही मला तितकाच महत्वाचा वाटला. त्यांचे मत असे होते, की छापलेला लेख स्कॅन करून मित्रांना पाठवायला खुप कटकटी आहेत, उलट इंटरनेटवर ब्लॉग स्वरूपात लेख टाकला तर जगात कुठूनही वाचला जाईल आणि लाखो लोकांना ते वाचायची संधी मिळू शकेल. तेवढेच नाही, ज्याला आवडला, तो आणखी आपल्या मित्रांपर्यंत पुढे पाठवू शकेल. म्हणून थोडे कष्ट व सराव करून मी इंटरनेटचे माध्यम वापरलेच पाहिजे. दोन दिवस त्या मुलांनी ठाण मांडून मला या गोष्टी शिकवल्या. तसा मी संगणक आधीपासून वापरत होतो आणि हाताशी लॅपटॉपही होता. पण मराठीत थेट टाईप करण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. या मुलांनी ब्लॉग व फ़ेसबुकशी ओळख करून दिली आणि बरहा पॅड डाऊनलोड करून सोप्या मराठी टायपींगचे प्रशिक्षण दिले. पुढले सहासात दिवस मोकळा वेळ मिळाला, मग टायपींगचा सराव केला. तोपर्यंत थेट लेख टाईप करायचे धाडस काही मला झाले नाही. कारण जितक्या गतीने डोक्यात विचार चालू असतो, तितक्या गतीने लेखनाचा स्वभाव. चारदोन ओळी वा वाक्ये खरडून कुथत बसणे मला जमत नाही. म्हणूनच वेगाने टाईप करणे साधण्यापर्यंत हातानेच लेख लिहायचे आणि सहासात तास अखंड टायपींगचा सराव करत राहिलो. पंधरा दिवसांनी मला नेहमीच्या दीडपट वेळात लेख लिहू शकतो, असा आत्मविश्वास आला. तोपर्यंत त्या मुलांनी सुचवले तसे चारसात ओळींचे-वाक्यांचे काहीबाही लिहून फ़ेसबुकवर टाकत होतो. मात्र ब्लॉग म्हणजे संपुर्ण लांबीचा लेख लिहून ब्लॉग चालवणे शक्य झालेले नव्हते. रोजचे लेखनाचे काम संपले, मग हा सराव चालू राहिला. त्यानंतरच ‘पुण्यनगरी’ची उलटतपासणी व अन्य वृत्तपत्रिय लिखाणासाठी टायपींग सुरू केले. एकदा ते साधले, तेव्हाच ‘उलटतपासणी’ हा ब्लॉग रितसर सुरू झाला. २०१२ च्या पुर्वार्धात फ़ेब्रुवारी अखेरीस ‘पुण्यनगरी’चा लेख ‘उलटतपासणी’ या ब्लॉगवर नित्यनेमाने टाकू लागलो. फ़ेसबुकमार्फ़त त्याचा प्रसारही सुरू झाला. एका बाजूला फ़ेसबुक मित्रयादी वाढत होती आणि त्यावर लेखाचा दुवा टाकल्याने ब्लॉगची लोकप्रियता वाढत गेली. (क्रमश:) Posted by bhau torsekar at 8:41 AM यातून काॅपी पेस्ट Sunday, September 27, 2015 कोण कुठला भाऊ तोरसेकर? (पुर्वार्ध)

सतिश गावडे 08/08/2020 - 11:35
आमच्याकडे पेपर म्हटले की नवाकाळ असा तो काळ होता. पेपर स्टॉलवर गेलो की एक रुपया पुढे करुन "एक नवाकाळ द्या" म्हणणे सवयीचे झाले होते. मटा आणि लोकसत्ता लोकांच्या गावीही नसायचे. आणि एक दिवस स्टॉलवर "वार्ताहर" नावाचा एक नवाच पेपर दिसू लागला. कागदाचा दर्जा नवाकाळच्या तुलनेत एकदम सो सो होता. तरीही लोक तो पेपर चाळू लागले, नवाकाळपेक्षा काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. आणि हळूहळू नवाकाळची जागा वार्ताहरने घेतली. पुढे रत्नागिरी टाईम्स आणि त्याची रायगड आवृत्ती रायगड टाईम्स स्टॉलवर लागेपर्यंत वार्ताहर अखंड वाचत होतो. रायगड टाईम्स आला आणि वार्ताहरचे वाचन बंद झाले.

शशिकांत ओक 09/08/2020 - 18:10
मित्रांनो, वरील धाग्यातील भाऊ तोरसेकरांचे प्रवचन असलेली लिंक कोणी बहुतेक उघडून पाहिलेली दिसत नाही! कारण मी आज सहज उघडली तर भलताच पुर्वीचा माझ्या लेखनाचा धागा उघडला! 'काय होतास तू काय झालास तू!' असो. आपणापैकी कोणी तोरसेकरांची ती क्लिप पाहिली नसेल तर मग ती सादर करेन.
लेखनविषय:

फॉरेस्ट गम्प- एका मुलाची कथा

भीमराव ·

गणेशा 25/07/2020 - 09:06
या lockdown मध्ये पाहिलेल्या सिनेमा मध्ये हा सर्वात आवडीचा picture माझा.. अप्रतिम. मला वाटते या सिनेमाला best picture चे ऑस्कर पण मिळाले होते 1994 ला. सर्वांनी पाहावा असा सिनेमा..

राघव 25/07/2020 - 10:20
नितांत सुंदर चित्रपट. तुम्ही लिहिलेली ओळख सुद्धा खूप छान. तसंही टॉम हॅँक्स आपला फेवरिट. त्याचे असेच काही अप्रतिम चित्रपट आहेत - The Terminal Sully Bridge of spies Cast Away You have got mail Catch me if you can Catch me खरंतर लिओनार्दोचा. पण टॉम हॅँक्स सुद्धा तेवढाच खास त्यात. आठवण करून दिल्याबद्दल खूप खूप आभार. आता परत एकदा बघणे आले! :)

मी सुद्धा खूप वर्षे या पिक्चर विषयी फक्त ऐकून होतो. जानेवारी फेब्रुवारी मध्ये कधीतरी डाऊनलोड करून बसमध्ये येताना जाताना पाहिला. आणि मग लॉक डाऊन मध्ये अजून दोन वेळा पाहिला. अजिबात कंटाळा येत नाही. सुंदर चित्रपट.

डॅनी ओशन 25/07/2020 - 13:30
लुटेनंट डॅन, कायम श्रिम्प बद्दल बोलणारा मित्र, गम्पची आई अगदी सरस पात्रं आहेत. बऱ्याच ऐतिहासिक व्यक्ती/ घडामोडींचा गम्प साक्षीदार असतो हे पण एकदम भारी घेतलंय. प्रायव्हेट रायन, कास्ट अवे, द पोस्ट पण आवडतात हॅंक्सचे. अशाच प्रकारची एक व्यक्तिरेखा "व्हॉट्स इटिंग गिल्बर्ट ग्रेप ?" नावाच्या सिनेमात लिओनार्डोने केली आहे. त्यात त्याचे आणि जॉनी डेपचे काम अगदी सुंदर आहे.

मजा अशी आहे कि इतक्या सगळ्या गोष्टी जर तो अचीव करायच्या म्हणुन गेला असता तर झाल्या असत्या कि नाही माहीत नाही. या गोष्टी त्याच्याबरोबर चक्क आणि चक्क को-इन्सिडेंन्स म्हणून घडत जातात. मला तरी त्यातून काही मेसेज दिलेला वाटला नाही. इट्स अ प्लेन सिंपल आयरॉनीक स्टोरी.. धिस मुव्ही इज अ‍ॅन आयरनी उ. दा. त्याला सैन्यात शौर्यपदक मिळतं, पण त्याच्या बॉस चे दोन्ही पाय तुटलेले असतात आणि तो कितीही ओरडून सांगत असतो कि मला न घेता निघून जा कारण आता त्याला जगायचं नसतं, तर तो त्याला खांद्यावरुन घेउन हॉस्पिटल मधे नेऊन ठेवतो आणि त्याला पदक मिळतं पण बॉस लाआयुष्य तसंच काढावं लागतं, आणि हा मात्र नंतर मिलिटरी सोडून त्याच्या मित्राला दिलेलं वचन पुर्ण करण्यासाठी बुबा गंप श्रिंप काढतो. आणि नंतर ते ही सोडून देतो. त्याचा बॉस नंतर जेव्हा त्याला भेटतो तेव्हा काय ऐकवतो ते बघा, आणि तरीही याला त्याचा काही रिमोर्स नसतो कारण त्याला ते फील च होत नाही. हा पिक्चर पहिल्यांदा बघून नेमका पॉईट काय आहे ते न कळल्यानं मी लगेच दुसर्यांदा पुन्हा बघितला होता. मला वाटतं माय नेम इज खान चं कॅरॅक्टर यवरून घेतलंय, पण शाहरुख खान इंटेलिजंट दाखवलाय.

In reply to by उन्मेष दिक्षीत

राघव 25/07/2020 - 18:24
जर त्रयस्थपणे बघीतलं तर त्याच्या अचीवमेंट्स भारी वाटतात. पण एक अलिप्तपणा सुद्धा जाणवतो. फॉरेस्ट गम्प कॅरॅक्टर च्या अनुषंगानं बघीतलं, तर त्याला स्वतःला आपण काही खूप मोठं काम केलंय असं वाटत नसतं. तो सगळ्या ठिकाणी आपला, लहान मुलासारखं जगत, काम करत असतो. आपण सिनेमा बघतो तेव्हा त्याचा इनोसन्स जाणवतो आणि तोच अपील होतो. अर्थात् हे सगळं माझं मत! :-)

गणेशा 25/07/2020 - 09:06
या lockdown मध्ये पाहिलेल्या सिनेमा मध्ये हा सर्वात आवडीचा picture माझा.. अप्रतिम. मला वाटते या सिनेमाला best picture चे ऑस्कर पण मिळाले होते 1994 ला. सर्वांनी पाहावा असा सिनेमा..

राघव 25/07/2020 - 10:20
नितांत सुंदर चित्रपट. तुम्ही लिहिलेली ओळख सुद्धा खूप छान. तसंही टॉम हॅँक्स आपला फेवरिट. त्याचे असेच काही अप्रतिम चित्रपट आहेत - The Terminal Sully Bridge of spies Cast Away You have got mail Catch me if you can Catch me खरंतर लिओनार्दोचा. पण टॉम हॅँक्स सुद्धा तेवढाच खास त्यात. आठवण करून दिल्याबद्दल खूप खूप आभार. आता परत एकदा बघणे आले! :)

मी सुद्धा खूप वर्षे या पिक्चर विषयी फक्त ऐकून होतो. जानेवारी फेब्रुवारी मध्ये कधीतरी डाऊनलोड करून बसमध्ये येताना जाताना पाहिला. आणि मग लॉक डाऊन मध्ये अजून दोन वेळा पाहिला. अजिबात कंटाळा येत नाही. सुंदर चित्रपट.

डॅनी ओशन 25/07/2020 - 13:30
लुटेनंट डॅन, कायम श्रिम्प बद्दल बोलणारा मित्र, गम्पची आई अगदी सरस पात्रं आहेत. बऱ्याच ऐतिहासिक व्यक्ती/ घडामोडींचा गम्प साक्षीदार असतो हे पण एकदम भारी घेतलंय. प्रायव्हेट रायन, कास्ट अवे, द पोस्ट पण आवडतात हॅंक्सचे. अशाच प्रकारची एक व्यक्तिरेखा "व्हॉट्स इटिंग गिल्बर्ट ग्रेप ?" नावाच्या सिनेमात लिओनार्डोने केली आहे. त्यात त्याचे आणि जॉनी डेपचे काम अगदी सुंदर आहे.

मजा अशी आहे कि इतक्या सगळ्या गोष्टी जर तो अचीव करायच्या म्हणुन गेला असता तर झाल्या असत्या कि नाही माहीत नाही. या गोष्टी त्याच्याबरोबर चक्क आणि चक्क को-इन्सिडेंन्स म्हणून घडत जातात. मला तरी त्यातून काही मेसेज दिलेला वाटला नाही. इट्स अ प्लेन सिंपल आयरॉनीक स्टोरी.. धिस मुव्ही इज अ‍ॅन आयरनी उ. दा. त्याला सैन्यात शौर्यपदक मिळतं, पण त्याच्या बॉस चे दोन्ही पाय तुटलेले असतात आणि तो कितीही ओरडून सांगत असतो कि मला न घेता निघून जा कारण आता त्याला जगायचं नसतं, तर तो त्याला खांद्यावरुन घेउन हॉस्पिटल मधे नेऊन ठेवतो आणि त्याला पदक मिळतं पण बॉस लाआयुष्य तसंच काढावं लागतं, आणि हा मात्र नंतर मिलिटरी सोडून त्याच्या मित्राला दिलेलं वचन पुर्ण करण्यासाठी बुबा गंप श्रिंप काढतो. आणि नंतर ते ही सोडून देतो. त्याचा बॉस नंतर जेव्हा त्याला भेटतो तेव्हा काय ऐकवतो ते बघा, आणि तरीही याला त्याचा काही रिमोर्स नसतो कारण त्याला ते फील च होत नाही. हा पिक्चर पहिल्यांदा बघून नेमका पॉईट काय आहे ते न कळल्यानं मी लगेच दुसर्यांदा पुन्हा बघितला होता. मला वाटतं माय नेम इज खान चं कॅरॅक्टर यवरून घेतलंय, पण शाहरुख खान इंटेलिजंट दाखवलाय.

In reply to by उन्मेष दिक्षीत

राघव 25/07/2020 - 18:24
जर त्रयस्थपणे बघीतलं तर त्याच्या अचीवमेंट्स भारी वाटतात. पण एक अलिप्तपणा सुद्धा जाणवतो. फॉरेस्ट गम्प कॅरॅक्टर च्या अनुषंगानं बघीतलं, तर त्याला स्वतःला आपण काही खूप मोठं काम केलंय असं वाटत नसतं. तो सगळ्या ठिकाणी आपला, लहान मुलासारखं जगत, काम करत असतो. आपण सिनेमा बघतो तेव्हा त्याचा इनोसन्स जाणवतो आणि तोच अपील होतो. अर्थात् हे सगळं माझं मत! :-)
काल पर्यंत मला हा चित्रपट काय आहे खरच माहित नव्हतं. अगदी सहजच मिळाला आणि वेळ घालवायला दुसरं काही नाही म्हणून पाहिला. आणि काही तरी वेगळं पाहिलंय याची जाणीव झाली. एका अनोळखी गावात बस स्टॉपवर बसलेला एक तरुण. शेजारीच ठेवलेली आटोपशीर बॅग. लोकं येतायत आणि जात आहेत. त्यालाही कुठे तरी जायचं आहे, पत्ता विचारावा तर कसा आणि कोणाला? शेजारीच बसची वाट पाहत बसलेल्या एका बाई बरोबर तो बोलायला सुरुवात करतो. तसं बघायला गेलं तर त्याला फक्त नऊ नंबर च्या बस शी देणं घेणं असतं, पण तो अगदी सुरूवातीपासूनची गोष्ट चालू करतो. आणि एक एक करत आपल्या समोर उलगडत जाते त्याच्या आयुष्याची कथा.

नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात?

किसन शिंदे ·

Gk 23/07/2020 - 15:10
वाफ जन्तु मारायला वापरतात त्याला मोईस्ट हिट म्हणतात त्यासाठी गरम वाफयुक्त हवा दीर्घकाळ वापरावी लागते नुसती वाफ घेऊन फायदा होत नाही सायनस च्या आजारात वाफ घेण्याने फायदा होतो , आतला रक्त प्रवाह सुधारतो , सायनस चे भोक मोकळे होते या आतला स्त्राव ड्रेन होतो, सूज , डोकेदुखी कमी होते पण म्हणून जन्तु मरावे हा फायदा मिळत नाही.

In reply to by Rajesh188

भुजंग पाटील 23/07/2020 - 20:34
१०० डिग्री से. हे तापमान पाण्याची वाफ होण्यासाठी गरजेचे असते. पण पाण्यापासून विलग होताच वाफेचे ते तपमान झपाट्याने कमी होत जाते, आणी वाफेचे साध्या एरोसोल मध्ये रुपान्तर व्ह्यायला सुरुवात होते. ( उदा. कुकरची शिट्टी काढून तिथे बोट ठेवले तर खुप पोळायला होते, पण हात थोडा वर नेला तर तितका चटका बसत नाही)

Rajesh188 23/07/2020 - 18:45
Covid19 वर कोणतेच औषध नाही जे काही उपचार होतात ते लक्षणं वर उपचार होतात. ताप असेल तर तो ते कमी करण्याचे औषध देतात किंवा बाकी लक्षण आणि संबंधित औषध दिली जातात. व्हायरस शरीरातून नष्ट करण्याचे औषध नाही. Covid19 चा रोगी बरा होती ते कशा मुळे.

मला वाटतंय वाफेचे तापमान ६०-७० डिग्री नाही नक्कीच बरेच जास्त असायला हवे. पाणी जवळपास उकळत असताना (म्हणजे १०० डिग्रीच्या आसपास) असताना वाफ घेतली जाते. वाफेचे तापमान ८०-९० डिग्री तरी असावे. त्यामुळे विषाणू नष्ट होत असावेत. किंवा तशी शक्यता बर्‍यापैकी वाढते असे मानण्यास हरकत नाही. दुसरे असे की वाफेने चेहरा भाजतो हे काही पटत नाही. आपल्यातल्या अनेकांनी अनेकदा वाफ घेतली असेलच. उलट वाफेने चेहर्‍याची त्वचाही स्वच्च्छ होते. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट , म्हणून उगाच रोज अर्धा एक तास वाफ घेणे चुकीचे ठरेल पण पाच ते दहा मिनटे वाफ घेतल्याने फायदा नक्की मिळत असेल.

Rajesh188 23/07/2020 - 19:22
हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे. जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो. असे का समजले जावू नये.

Rajesh188 23/07/2020 - 19:22
हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे. जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो. असे का समजले जावू नये.

सुबोध खरे 23/07/2020 - 19:47
पाणी उकळून त्याची वाफ होण्यासाठी पाण्याचे तापमान १०० अंश सेल्सियस असणे आवश्यक आहे. पाण्यातून वाफ उकळत असताना तिचे तापमान १०० अंश सेल्सियस असते. समुद्रसपाटीला १ बार किंवा १ ऍटमॉस्फेअर दाबाला पाणी १०० अंश सेल्सियस ला उकळते आणि त्याची वाफ होते. एक ग्राम पाणी उकळून वाफ करण्यासाठी ५४२ कॅलरी उष्णता द्यावी लागते( LATENT HEAT) .म्हणजेच आपण उकळत्या पाण्याच्या पृष्ठभागाशी चेहरा नेलात तर चेहरा १०० % भाजला जाईल. जसे आपल्या चेहऱ्याचे अंतर वाढेल तसे ति वाफ थंड होत जाऊन त्या वाफेचे पाण्याच्या सूक्ष्म बिंदूत रूपांतर होते. यामुळे वाफ थेट चेहऱ्यावर घेतली तर एक ग्राम वाफेतून हि उष्णता (५४२ कॅलरी) आपल्या चेहऱ्यात शोषली जाऊ शकते आणि चेहरा भाजतो. जितके अंतर जास्त तितके वाफेचे हवेने विरळीकरण होऊन पाण्यात रूपांतर होण्याचं प्रमाण जास्त. यामुळे हे पाण्याचे सूक्ष्म बिंदू आपल्याला सोसवेल इतक्या तापमानाचेच आपण श्वासाद्वारे आत घेणे आवश्यक आहे. मला लोकांनी प्रेशर कुकरची शिट्टी काढून तेथून वाफ नळीने घातली तर काय होईल असे विचारले. त्याचे उत्तर असे आहे कि एकदा नळी गरम झाली कि येणारी वाफ थंड न होता सरळ नाकात जाईल( हवेने होणारे विरळीकरण होणार नाही) आणि आपल्या नाकाची नाजूक त्वचा भाजेल. तेंव्हा असा "जुगाड" करण्यापूर्वी तीन वेळा विचार करा घशाला जसे गुळण्या करतो तसेच नाकासाठी वाफ घेणे आहे. कारण तोंडावाटे घेतलेले पाणी नाकात जाऊ शकत नाही. ( कोमट/ गरम पाण्याने जलनेती केली तर हाच वाफ घेतल्याचा परिणाम मिळू शकेल. तसे करतात का/ ते सुरक्षित आहे का ते मला माहिती नाही). वाफेचे तापमान ४५-५५ च्या मध्ये असेल असा माझा अंदाज आहे. (कुणी हे तापमान नाकाजवळ थर्मामीटर नेऊन मोजले तर नक्की उत्तर देता येईल.) यामुळे विषाणू मरत नाहीत परंतु नाकात असलेल्या चिकट पदार्थात हे पाणी मिसळून तो प्रवाही होतो यामुळे,विषाणूना नाकाच्या त्वचेत प्रवेश करण्यास वेळ कमी मिळतो. याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो. याच कारणासाठी थंड पाणी कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम घेतल्यामुळे किंवा पावसात भिजल्यामुळे नाक आणि घसा थंड होऊन तेथील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे आपल्याला जिवाणू किंवा विषाणू यांचा प्रादुर्भाव ( सर्दी खोकला ) होण्याची शक्यता वाढते. गरम पाण्याच्या गुळण्या केल्या तर असाच सुपरिणाम आपल्या घशाला मिळू शकतो.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, उष्णतेने म्हणजे असे काही गरम करुन वगैरे करोना विषाणु नष्ट होतो का ? इतकंच सांगा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सार्‍या जगापुढे एकमेव प्रश्न आहे ! तो सुटला तर सगळंच काम झालं ! त्यामुळे त्यांनी सेफ उत्तर दिलं आहे :
याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो.

In reply to by संजय क्षीरसागर

आम्ही गरम पानी रूम मधेच करून पीत होतो. वाफ घेत होतो.
माझा कोविड अनुभव थोडक्यात, वाफ घेणं उपयोगी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

mrcoolguynice 24/07/2020 - 09:43
सर, फायदा होतो न होतो , तो भाग वेगळा. पण "नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात? " ह्याविषयी, ऍनेकडोटल मत नको, तर डेटा मिळायला हवा, असे वाटते.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 10:03
आपल्या भांड्यावर कोरोनाचे विषाणू असतील अन त्यावर वाफ ( १०० अंश सेल्सियस) सोडली तर ते नक्कीच मरतील( निष्प्रभ होतील). https://www.medrxiv.org/content/10.1101/2020.05.13.20100651v1.full.pdf Heat at 56°C kills the SARS coronavirus at around 10000 units per 15 min (quick reduction) https://www.who.int/csr/sars/survival_2003_05_04/en/# पण अशी वाफ आपल्या घशात सोडणे शक्य आहे का?

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 24/07/2020 - 10:22
माझेही हेच मत आहे, विषाणू मारण्याइतकी प्रभावी वाफ मनुष्यावर सोडली, तर विषाणू ऐवजी तो वाफेने मरेल. त्यामुळे, नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात, हा दावा भ्रामक आहे, अश्यामुळे काही लोकांचं फावत, कोरोनावर औषध नसताना, काही लोकांनी, औषध काढून त्याची विक्री करण्याचा चावटपणा केला, ह्या अश्या लोकांचं फावत, ईल- इन्फॉर्मड गरीब जनता , स्वतःच्या व्हाट्सअप रुपी विद्यापीठातून असे ज्ञान घेऊन आणखी धोकादायक परिस्थिती निर्माण करतील अशी भीती वाटते.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 10:40
आजचा सुविचार --व्हॉट्स ऍप्प विद्यापीठातील ज्ञान /पी एच डी पदवी हि (मृगपुच्छ) हरणाच्या शेपटासारखी असते. केवळ अस्तित्व ना लज्जा रक्षणासाठी उपयोग ना माशा वारण्यासाठी

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 24/07/2020 - 10:44
सेमपिंच , मलाही हाच सुविचार एकदा व्हॉट्स ऍप्पवर चाणक्य विचार म्हणून चाणक्याच्या फोटोसहित आलेला .....

In reply to by mrcoolguynice

Rajesh188 24/07/2020 - 11:28
खूप वर्षा पासून वाफ घेणे ही पद्धत चालू आहे ती काही आत्ताच सुरू झाली नाही. Steamer khup varsha पासून बाजारात आहेत आणि शास्त्रीय पद्धतीने त्याची रचना आहे जेणे करून हानी होवू नये. वाफ घेतल्या मुळे धोका निर्माण होईल हे मत अयोग्य आहे . झाला तर फायदाच होईल.

In reply to by Rajesh188

mrcoolguynice 24/07/2020 - 12:05
वाफ घेण्या न घेण्याला काही विरोध नाही. कोणाचा विरोध असु शकत नाही. एरंडेल तेल पिऊन हलका जुलाब घेणे हि पद्धतसुद्धा खूप वर्ष्या पासूनची आहे, त्याचा फायदाही काही जणांना झाला असेल. इथे मूळ मुद्दा हा आहे, की "वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही , "एरंडेल प्याल्याने करोनाचे विषाणू मरतात" ? तर तेही नाही , वाफ घेतल्याने किंवा एरंडेल प्याल्याने, करोना बरा होतो का ? अजिबात नाही ... त्यामुळे आधीच ईल इन्फॉर्मड जनतेला ह्या अस्थानी माहितीचा काय उपयोग, उलट गैरसमज समाजात पसरल्याने, गर्दी करणे मास्क वापर टाळणे अश्या विघातक गोष्टी डिड शहाणे करू लागतात व स्वतः बरोबर इतरांचे आरोग्य धोक्यात आणतात. करोनावर औषध नाही नाही नाही, प्रतिबंध हाच सध्याला चांगला मार्ग आहे.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 12:33
वाफ घेतल्याने करोना बरा होत नाही हे वास्तव आहे. परंतु वाफ घेतल्याने करोनाच काय पण इतर कोणताही जिवाणू किंवा विषाणू चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता थोडीफार कमी होते हि पण वस्तुस्थिती आहे. (किती प्रमाण हे अजून सिद्ध झालेले नाही) . वाफेचा फायदा होतो म्हणून त्याच्याबद्दल अवास्तव अपेक्षा ठेवणे चूक आहे तसेच ते पूर्णपणे निरुपयोगी आहे हे पण सत्य नाही. टोकाची भूमिका नसावी त्याचबरोबर वाफ घेताना तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 24/07/2020 - 12:36
"वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही होय करोना विषाणू मरतात. पण १०० अंश सेल्सियसची वाफ तोंडात किंवा घशात घेणे शक्य आहे का? नाही. त्यामुळे घसा नाक जबरदस्त भाजेल.

In reply to by सुबोध खरे

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
मग हे ज्ञान कुठून आलं होतं ?

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/07/2020 - 09:45
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. आपल्यालाच सगळं ज्ञान आहे असा दंभ असेल कि असं होतं. त्या बद्दलचे दुवे दिलेले आहेत हवं तर वाचा. पण मीच बरोबर आहे मी बरोबरच आहे आणि मी बरोबर आहेच असा स्वतुष्टीचा दर्प असल्याने आपण ते वाचणार नाहीच हि खात्री आहे विषाणू ३५ अंशाला २-४ मिनिटे टिकू शकतो हे शरीराच्या बाहेर आहे. शरीराचे तापमान ३७ अंश असते हे आपल्याला माहिती नाही का? बाकी त्या लेखाच्या खाली काय लिहिलं आहे हे आपल्याला वाचता येत नाही का?

In reply to by सुबोध खरे

शरीराच्या तापमानाचा प्रश्न नाही हो. आपण घेत असलेल्या वाफेच्या तापमानाचा विषय चालू आहे. (नेहेमी प्रमाणे) विषय भरकटवू नका.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/07/2020 - 19:32
आपल्याला शरीराच्या पोकळीत आणि पेशींच्या आत विषाणूंची स्थिती काय हि माहिती नसल्यामुळे असे भंपक बोलता आहात. आपल्याशी वाद घालण्यात अर्थ नाही धन्यवाद

In reply to by संजय क्षीरसागर

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही
अहो अगदीच चुकीचं आहे हे ... अशी चुकीची माहिती कुणी पसरवू नये. तुम्ही कुठे वाचलंत ?

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 27/07/2020 - 19:33
संक्षी यांनी डोंगर पोखरून उंदीर काढला आहे तेथेच मी याचा दुवा दिला आहे. हवा तर शोधा नाही तर आनंदात रहा

In reply to by सुबोध खरे

तुमच्या लेखानंतरच्या तारखेच्या आहेत; लेख लिहितांना त्या तुम्हाला उपलब्ध नव्हत्या हे तिथेच सांगितलं आहे. याचा अर्थ तुम्ही फॉरवर्डेड माहितीच्या आधारे ठोकाठोकी करता आणि गोष्टी उघड झाल्यावर दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी विषय भरकटवता.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 28/07/2020 - 10:49
शिक्षण करत असताना आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. प्रत्येक गोष्ट हि केवळ दुव्यावर आधारित नसते. करोना विषाणू बद्दल मी सूक्ष्मजीव शास्त्रात १९८५ साली शिकलो आहे.तेंव्हा सुद्धा माझ्या कॉलेजात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता.( कदाचित त्यावेळेस तो भारतातील वैद्यकीय महाविद्यालयातील एकमेव इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता). तेंव्हा "कोव्हिडची महामारी" येईल असे सर्वोच्च शास्त्रज्ञांच्या स्वप्नातही आले नसते. क्लोरीनने जंतू मरतात हे प्रत्येक डॉक्टरलाच काय सामान्य माणसालाहि माहिती असते. तेथे दुवे मागणे हे मूर्खपणा ठरेल. कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे. काही तरी करून मीच सर्वात शहाणा हे सिद्ध करायचे सोडून द्या. ते हास्यास्पद च्याही पलीकडे गेलेले आहे.

In reply to by सुबोध खरे

कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे.
लिंक मी मागितल्यावर तुम्ही दिली आणि तारखेचा घोळ दाखवल्यावर चिखलफेकीचा कांगावा केला ! थोडक्यात, तुम्ही सोयिस्करपणे वाट्टेल त्या लिंक्स देता > जिएसटीनी किंमती कमी झाल्या हे दाखवायला २ जुलै २०१७ ची लिंक दिलीत ! तुमच्या लेखनात विश्वासार्हता कमी आणि मुद्दा भरकटवणे, व्यक्तिगत होणे, निष्कारण अकांडतांडव करणे हेच प्रकार चालू आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 28/07/2020 - 20:02
दुसरं काही सापडलं नाही म्हणून बाहेरचा धुणं आणून धुवायला निघालात? बाकी ते प्यूबिक रिंग किंवा सर्व संतांना अध्यात्म वगैरे काहीही कळत नाही मलाच कसं कळलंय हे सर्व नाही आणलंत धुवायला. तेही धुवून घ्या रिकामेच आहात तर

In reply to by सुबोध खरे

सध्या या चुकीच्या विधानाबद्दल :
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
दिलगिरी व्यक्त केलीत तरी उचित होईल

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 29/07/2020 - 18:27
तें विधान मुळीच चुकीचे नाही. स्वीकार करा नाही तर करू नका त्यात बदल होणे नाही. तुमच्या डोक्यातला आत्म प्रौढीचा विषाणू कोणत्याही वाफेने मरत नाही. त्याला तापमान कितीही असो. ))=((

In reply to by सुबोध खरे

मग तुमच्या छातीठोक विधानाचा हा चमत्कार का घडला नाही ?
यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 30/07/2020 - 09:49
हे त्या वेळच्या जागतिक आरोग्य संघटनेचे वक्तव्य होते. तुम्ही तेवढेच पकडून बसला आहात त्याला कोणी काही करू शकत नाही. हवं तर जागतिक आरोग्य संघटनेचे तेंव्हाचे अहवाल पहा ते तुम्ही करणार नाही हि माझी खात्रीच आहे कारण

मी म्हणजे मी म्हणजे मीच बरोबर

हे काहीही करून सिद्ध केलेच पाहिजे हा अट्टाहास आहे आणि हा मनोविकार आहे (delusion of grandeur) त्याला उपाय नाही

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 30/07/2020 - 12:48
श्री मोदींच्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण करावे इतकी माझी लायकी नाही. ज्याला आपली तेवढी लायकी आहे असे वाटते त्याने ते करावे.

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 30/07/2020 - 13:49
आधी मोदींजींच्या व्यक्तिमत्वाची लायकी... विश्लेषणकेल्या विना कशी ठरवली गेली, की तिचे विश्लेषण करण्याची लायकी असणे नसणे हे त्यानंतर प्रस्थापित करण्याच्या सेकंड स्टेप डायग्नोसिसला डायरेकट्ट उडी मारली.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 31/07/2020 - 11:37
हो ना आपण पवार मास्तरांच्या गायन क्लास मध्ये दुसऱ्या वर्षाला शिकतो आहोत पण भारत रत्न पंडित भीमसेन जोशींना मारू बिहाग राग कसा गाता येत नाही याचे विश्लेषण अगोदर करायचे. बाकी महापालिकेत उंदीर मारायचा विभाग सध्या कोव्हीडमुळे बंद आहे का?

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 31/07/2020 - 13:54
बाकी संक्षी म्हणतात, त्याप्रमाणे.. "विषय भरकटवणे, वैयक्तिक होणे, त्याच त्याच भक्तीच्या चिपळ्या वाजवणे", यांतच काही जणांनी त्यांची डॉक्टरेट मिळवलीये....

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 01/08/2020 - 06:50
माझ्यामते मूळ विषय "आपण" कोणाचीही मानसिक आरोग्य, मूल्यांकन करू शकत नाही, ठराविक व्यक्तींना वैयक्तिक होऊन, आपण प्रश्नाचे उत्तर न देता, वैयक्तिक कॉमेंट करत होता (मानसिक आरोग्य हा आपला विषय नसतानाही )

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 01/08/2020 - 12:45
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही. जिथे तिथे आपला पूर्वग्रह राजकारण आणलेच पाहिजे का? केवळ विरोधासाठी विरोध करायचा आणि हसं झालं तरी शाब्दिक कोलांट्या मारत आपलंच घोडं पुढे दामटायचं. दांभिक आणि भंपक पणा आहे.

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 01/08/2020 - 13:26
मूळ मुद्दा जर महामारीचा होता, तर संक्षी यांना मानसिक आरोग्य विषयक कॉमेंट अस्थानी होत्या, त्या तुम्ही केल्यात. त्यामुळे, वैयक्तिक कॉमेंट करणे, विषय भरकटत नेणे, मीच काय तो सर्व ज्ञानी असा अहंगंड ठेवून, एकंदरीत प्रतिसाद देणे, यातच आपली डॉक्टरेट आहे की काय, हा संशय लोकांना येणे स्वाभाविकच आहे.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 01/08/2020 - 19:23
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 03/08/2020 - 09:47
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही. तसेच मी आणि संक्षी यातील वादाचा श्री मोदी यांच्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही खाजवून खरूज कशाला निर्माण करता आहात

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 03/08/2020 - 11:46
जर मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. तर त्याचा तुमच्या आणि संक्षी यातील वादाचा या धाग्याशीही काहीही संबंध नाही. तुम्हीच खाजवून खरूज कशाला निर्माण करीत आहात.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 03/08/2020 - 11:58
आमच्या वादात तुम्हाला नाक खुपसायला (आमचा वाद करोना बद्दलच आहे) आणि जिकडे तिकडे श्री मोदी याना आणायला तुम्हाला कोणी सांगितलंय? नसती लूडबूड

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 03/08/2020 - 13:37
मग तुमचा वाद तुम्ही व्यनीतुन घाला, जाहीर वाद तुमची वैयक्तिक मालमत्ता नाहीये. नस्ता शहाजोगपणा...

In reply to by सुबोध खरे

राजाभाउ 28/07/2020 - 11:22
पण म्हणजे डॉक जर एखाद्याला सर्दी झाली नसेल किंवा नाक चोंदल नसेल तर त्याला वाफेचा तितका उपयोग होणार नाही का?

In reply to by राजाभाउ

सुबोध खरे 28/07/2020 - 11:30
नाक चोंदलेले असणे किंवा सर्दी हे "लक्षण" आहे. "आजार" नव्हे. बऱ्याच वेळेस आपल्या नाकात जिवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग झालेला असतो पण त्याची लक्षणे दिसण्यास वेळ लागतो. सद्य स्थितीत करोनाच नव्हे तर (पावसाळ्यात होणारे) इतर विषाणूजन्य आजार सुद्धा आहेत. शिवाय पावसाळ्यामुळे जिकडे तिकडे बुरशीचे प्रमाण वाढलेले असते. या बुरशी मुळे ऍलर्जी होऊन सर्दी होते आपण वाफ घेतलीत तर करोनाच नव्हे तर या इतर विषाणूंचा बुरशीचा संसर्ग सुद्धा कमी होईल.

भीमराव 23/07/2020 - 21:17
फार वर्षांपूर्वी घडलेली घटना आहे, पाणी तापवायच्या बंबाच फॅड होतं तेव्हा. गावातील एका माणसानं बंब घेतलेला, गरम तापलेलं पाणी काढायला कष्ट कमी म्हणून पाईप टाकाला आणि तोंडानं पाणी ओढलं. नळीमधुन ओढलेलं गरमागरम पाणी थेट घशात. बीचारा अन्ननलिका होरपळल्याने तडफडून मेला. वर सांगितल्याप्रमाणे वाफ घेताना सोसेल अशीच घ्या, उगाच स्वतः स्वतःचा डॉक्टर बनताना जीवाशी खेळ व्हायचा.

In reply to by भीमराव

Rajesh188 23/07/2020 - 21:27
बंबातून पाणी काढण्या साठी पाइप टाकून ओढायची काय गरज आहे. बंबा च्या तळाशी नळ असतो त्याला पाइप लावला की नळ चालू केला की पाणी येणार. उदाहरणे तरी नीट ध्या.

In reply to by Rajesh188

बाप्पू 23/07/2020 - 22:06
बंबाला नळ असतो पण एका ठरावीक लेवल नंतर बंबात पाणी असून सुद्धा नळातून पाणी येत नाही त्यावेळी बंबाला थोडे तिरके करून पाणी नळातून काढावे लागते.. कधी कधी बंबाचे वरचे झाकण उघडून मग किंवा तांब्याने पाणी उपसावे लागते.. कदाचित त्या व्यक्तीने हा त्रास कमी करण्यासाठी डायरेक्ट पाईप टाकून तोंडाने पाणी ओढण्याचा प्रयत्न केला असेल..

Gk 24/07/2020 - 12:50
वाफेने करोना मरतो ह्याचे लॉजिक तेच आहे जे नोटांबंदीने अतिरेकी मरतात , ह्यात होते

Rajesh188 24/07/2020 - 13:22
Covid19 च्या व्हायरस का ठार मारण्याचे कोणतेच औषध नाही जे काही प्रयत्न आहेत ते आपल्या शरीराच्या प्रतिकार शक्ती ला जागृत करून,तिला ताकत देवून तिलाच लढाई करायला पाठवायचे काम चालू आहे. त्या मधील च वाफ ही एक आयडिया. जसे खरे sir ni सांगितले गरम बाफ मुळे रक्त वाहिन्या प्रसारण पावतात आणि आपले सैनिक लवकर जंतू वर हल्ला चढवतात. आणि सीमेवर (नाकात किंवा घश्यात)च त्यांना रोखून धरतात

मराठी_माणूस 24/07/2020 - 14:26
करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते. मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. अपवाद व्हेंटीलेटर आणि ऑक्सीजन, अर्थात त्यातही एव्हढी आकारणी योग्य का अयोग्य ते माहीत नाही.

In reply to by मराठी_माणूस

स्वच्छंद 26/07/2020 - 02:36
समजा, एखाद्या खाजगी हॉस्पिटल ने कोविड पेशंट ट्रीट करायचं ठरवलं तर इतर आजार असलेले लोक तिकडे फिरकतील का? नाही.. त्यांचा बाकीचा धंदा तर बुडेलच ना. त्याचबरोबर पेशंटची काळजी घेणे, कर्मचाऱ्यांची काळजी या गोष्टी आल्याच. अव्वाच्या सव्वा बिल या हिशेबाने होत असावे.

In reply to by मराठी_माणूस

माहितगार 26/07/2020 - 11:09
खर्चाचा प्रश्न वेगळा आहे त्याची वेगळी चर्चा करावी. हॉस्पीटलांची गरज असते का? एक समांतर तुलना शिक्षणासाठी शाळा कॉलेज युनिव्हर्सिटीपेक्षा हॉस्पिटलांची गरज अधिक असावी असे माझे मत आहे. प्रयोगशाळेच्या सुविधेशिवाय सर्व अभ्यास घरच्या घरी करता येतो पण तरीही प्रशिक्षीत अध्यापकाच्या मार्गदर्शनाचा फायदा आणि अशा मार्गदर्शकांची एका ठिकाणी उपलब्धता तसेच शैक्षणिक वाचनालय सुविधा हा शाळा कॉलेज युनिव्हर्सिटींचा मुख्य फायदा. आता विशीष्ट प्रश्नाकडे येऊ. "....मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो..." १) आरोग्य प्रतिकारशक्तीचे प्रकार असतात प्रत्येक व्यक्तीनुरुप प्राप्त क्षमता ही दिवसांपरत कमी जास्त होत असू शकते आणि मुख्य म्हणजे कोणती प्रतिकारशक्ती किती सक्षम आहे आणि यशस्वी होते आहे की नाही हे घरच्या घरी आपले आपल्याला मोजण्याची कोणतीही जादू आपल्याकडे नसते. त्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेल्या परिक्षण चाचण्या आणि कमतरता असल्यास दूर करण्यासाठी प्रशिक्षीत डॉक्टरांचे मार्गदर्शन ऊपयूक्त ठरते २) एका पेक्षा अधिक आजार असतील तर एका आजारामुळे दुसरा आजार काँप्लिकेशन्स होऊन बळावू शकतो. निरीक्षण आणि उपचाराने काँप्लिकेशन्सवर मर्यादा आणण्यात हॉस्पिटल सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळ प्रभावी ठरू शकते ३) औषधोपचार पद्धती माहिती असून सुद्धा गरजे प्रमाणे डॉक्टर लोक स्वतः वरील उपचारासाठी सुद्धा हॉस्पीटल मध्ये भरती होत असतात. हॉस्पीटलमध्ये घरच्यापेक्षा अनुषंगिक सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळाची उपलब्धता कितीतरी पटींनी अधिक चांगली असते.
....करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते....
वाक्य पुरेसे अचुक नाही, खालील प्रमाणे लिहीले तर अधिक सयुक्तीक होईल कदाचित
....कोविड-१९च्या वीषाणूवर तुर्तास औषध नाही, व्यक्तिगत आणि सामाजिक व्यवहारात प्रतिबंधांचे पालन करणे आणि व्यक्तिगत प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच प्राथमिकता (priority) आहे असे म्हटले जाते....
(अवांतरः priority शब्दा साठी 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' हे मराठी शब्द आहेत, का कुणास ठाऊक 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' असे लिहूनही ज्या प्रमाणात दुर्लक्ष होते ते पहाता 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' या शब्दांचा प्रभाव कमी होत आहे का? तसे असेल तर अधिक प्रभावी शब्द योजना काय असू शकेल असा प्रश्न पडतो.)

Rajesh188 26/07/2020 - 08:52
मला वाटतं मोबाईल मध्ये आयफोन हा ब्रँड आहे तो सामान्य लोकांसाठी नाही तो श्रीमंत लोकांसाठीच आहे. बाकी लोकांपेक्षा वेगळे स्वतः ला ते समजतात त्या मुळे त्यांच्या साठी असलेले ब्रँड महाग असतात. तोच आयफोन दर्जा तसाच ठेवून 7000 ला विकायला लागले तर श्रीमंत लोक तो घेणार नाही. तसेच हॉस्पिटल चे आहे corporate hospital madhye jast kharch येतो म्हणजे तिथले डॉक्टर हुशार असतात असे काही नाही. कमी बिल असलेल्या दवाखान्यात सामान्य लोकांनी उपचार करावेत.

तिमा 26/07/2020 - 11:36
या विषयावर बोलणे म्हणजे सुद्धा तोंडची वाफ दवडण्यासारखे आहे. अंघोळीचे सहन होईल एवढ्या गरम पाण्याचे तापमान ४०-४२ सेंटिग्रेड असते. त्याहून जास्त तापमानाने त्वचा भाजते. नाकाच्या आतील त्वचा किंवा म्युकस मेंब्रेन हे बाहेरच्या त्वचेपेक्षाही नाजुक असते. सर्दी झाल्यावर व्हिक्स वगैरे मिसळून जी सो कॉल्ड वाफ घेतली जाते ती ही वरील तापमानाच्या आसपासचीच घेतली जाते. कारण ती बाष्पमिश्रित आणि सुरक्षित अंतरावरुन घेतली जाते. वाफ तयार झाल्याक्षणी तापमान १०० सेंटिग्रेड असले तरी, बाहेरच्या ३० सें. च्या वातावरणात, ते नाकाशी येईपर्यंत अत्यंत वेगाने कमी होते. तेंव्हा कायप्पाला कधी सिरियसली घेऊ नका कारण विज्ञान न येणारे या जगांत बहुसंख्य आहेत.

सुबोध खरे 26/07/2020 - 12:39
हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. हम्म हॉस्पिटलच्या अति दक्षता विभागात २४ तास डॉक्टर आणि सिस्टर असतात. त्यांचा पगार कुणी द्यायचा? २४ तास वातानुकूलित( केवळ थंड नव्हे) वातावरण ठेवावे लागते. त्या वातानुकूलन यंत्रणेत हवा जेथून आत घेतली जाते तेथे अतिसूक्ष्म अशी गाळणी (०.३ मायक्रॉन) https://en.wikipedia.org/wiki/HEPA लावली जाते. हि गाळणी दर सहा महिन्यांनी बदलावी लागते जिची किंमत आकाराप्रमाणे १५ लाखांपासून ४० लाखापर्यंत असते आणि ती लवकर खराब होऊ नये म्हणून असलेला प्री फिल्टरच ३५ हजाराचा असतो. जेंव्हा साथ नसते तेंव्हा रुग्णालयातील खाटा रिकाम्या असल्या तरी डॉक्टर सिस्टर वैद्यकीय कर्मचारी याना पगार पूर्णच द्यावा लागतो. प्रत्येक यंत्रांची आपली किंमत असते आणि ते नीट चालत राहावे यासाठी त्याचे वार्षिक देखभालीचे कंत्राट असते. या कंत्राटाची किंमत काही कोटी रुपये असते. असो. आपल्याला त्याच्याशी काय घेणे देणे आहे. आम्हाला अमेरिकेच्या दर्जाची वैद्यकीय सेवा बांगला देशाच्या दारात मिळालीच पाहिजे. आम्ही दर पाच वर्षांनी मत देतो तेंव्हा हा आमचा हक्कच आहे मेरा भारत महान. जाता जाता --मुंबई दिल्ली भाडे अनारक्षित दुसऱ्या वर्गाचे ३६३ रुपये आहे आणि राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाचे भाडे ४७२६ रुपये आहे. सामान्य जनतेला राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाने ३६३ रुपये देऊन प्रवास करायला मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे. सरकार हे केवळ श्रीमंतांचे लाड करते आहे ते आम्ही चालवुन घेणार नाही. राजधानीचे सर्व डबे वातानुकूलित पहिल्या वर्गाचे झाले पाहिजेत आणि सर्व गाड्या राजधानी एक्सप्रेस मध्ये रूपांतरित कराव्या अशी आमची मागणी आहे

In reply to by मराठी_माणूस

सुबोध खरे 26/07/2020 - 14:28
रेमडेसीव्हिर या औषधाची जास्तीती जास्त किरकोळ किंमत ४८०० असताना काही लोक ती काळ्याबाजारात २५-३० हजारात का विकत आहेत ? आणि त्यावर सरकारने कार्यवाही करायची नाही का? सरकारने क्वारंटाईन साठी असलेल्या हॉटेलांचे सुद्धा दर ठरवून दिलेले आहेत. उदा. ताज लँड्स एन्ड चा दर रोज रुपये ३५०० आहे तर सरकारी कोव्हीड केंद्रात आपल्याला फुकट ठेवले आणि खायला प्यायला घातले जाते. मग या हॉटेलात एवढे दर का असा प्रश्न आपल्याला पडत नाही? ताज ने जर रोजचा दर ६०००/- लावला तर सरकारने कार्यवाही करू नये? आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय. सरसकटीकरण टाळावे इतकीच विनंती जाता जाता --खाजगी रुग्णालये हि समाजसेवा करण्यासाठी स्थापन झालेली नाहीत तर ( हॉटेलसारखी ) नफा कमावण्यासाठी आहेत. ज्याला परवडत नाही त्याने तेथे जाऊ नये. उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे. ती जबाबदारी ७० वर्षे कोणत्याही सरकारने पुरवलेली नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. पण त्यासाठी खाजगी क्षेत्राला जबाबदार धरणे चूक ठरेल

In reply to by सुबोध खरे

आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय.
खरंय, सरसकटीकरण करु नये. खासगी रुग्णालयांकडून अपेक्षा करणे चूकच आहे. डॉक्टर्स शिकली तो खर्च. रुग्णालयासाठी महागडी जागा घेतली तो खर्च, बांधकाम तो खर्च, अद्ययावत सुविधा तो खर्च. स्टाफ ठेवला त्यांचे वेतन, लग्न करुन वधू डॉक्टरच आणली तिचंही प्रॅक्टीसचं जुगाड रुग्णालयातच करावं लागतं, त्याचा खर्च. सरकार जर डॉक्टर्स आणि खासगी रुग्णालयांना कोणतीही आर्थिक मदत करीत नसतील तर डॉक्टर्सना आपले रेट्स ठरवायचे अधिकार असलेच पाहिजेत. डॉक्टर्सलाही कुटूंब आहे, खर्च आहे. डॉक्टर्सनाही बॅलेन्स वाढवायचा असतोच. रुग्णांना परवडत असेल तर खासगी रुग्णालयात उपचार घ्यावेत, नसता सरकारी रुग्णालयात जावे. उगाचच सरसकट खासगी रुग्णालयांना आणि त्यात काम करणार्‍यांना अप्रामाणिक म्हणू नये याच्याशी सहमत.
उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे.
अच्छा सरकारची जवाबदारी सुद्धा असते, हे माहिती झालं. आभार. नाहीतर, मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 27/07/2020 - 19:36
मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. तसेच रहा कि कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय? त्या पैशात केवढी ऐश करता येईल याचा हिशेब करा

In reply to by सुबोध खरे

कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय?
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून... दुसरं काय. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 29/07/2020 - 18:30
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून. हायला मग पानवाल्याची उपासमार होऊ नये म्हणून सिगरेट पिणार का? आणि बारबालांची उपासमार होऊ नये म्हणून बेवडे होणार काय/ उगाच काहींच्या काही?

Gk 23/07/2020 - 15:10
वाफ जन्तु मारायला वापरतात त्याला मोईस्ट हिट म्हणतात त्यासाठी गरम वाफयुक्त हवा दीर्घकाळ वापरावी लागते नुसती वाफ घेऊन फायदा होत नाही सायनस च्या आजारात वाफ घेण्याने फायदा होतो , आतला रक्त प्रवाह सुधारतो , सायनस चे भोक मोकळे होते या आतला स्त्राव ड्रेन होतो, सूज , डोकेदुखी कमी होते पण म्हणून जन्तु मरावे हा फायदा मिळत नाही.

In reply to by Rajesh188

भुजंग पाटील 23/07/2020 - 20:34
१०० डिग्री से. हे तापमान पाण्याची वाफ होण्यासाठी गरजेचे असते. पण पाण्यापासून विलग होताच वाफेचे ते तपमान झपाट्याने कमी होत जाते, आणी वाफेचे साध्या एरोसोल मध्ये रुपान्तर व्ह्यायला सुरुवात होते. ( उदा. कुकरची शिट्टी काढून तिथे बोट ठेवले तर खुप पोळायला होते, पण हात थोडा वर नेला तर तितका चटका बसत नाही)

Rajesh188 23/07/2020 - 18:45
Covid19 वर कोणतेच औषध नाही जे काही उपचार होतात ते लक्षणं वर उपचार होतात. ताप असेल तर तो ते कमी करण्याचे औषध देतात किंवा बाकी लक्षण आणि संबंधित औषध दिली जातात. व्हायरस शरीरातून नष्ट करण्याचे औषध नाही. Covid19 चा रोगी बरा होती ते कशा मुळे.

मला वाटतंय वाफेचे तापमान ६०-७० डिग्री नाही नक्कीच बरेच जास्त असायला हवे. पाणी जवळपास उकळत असताना (म्हणजे १०० डिग्रीच्या आसपास) असताना वाफ घेतली जाते. वाफेचे तापमान ८०-९० डिग्री तरी असावे. त्यामुळे विषाणू नष्ट होत असावेत. किंवा तशी शक्यता बर्‍यापैकी वाढते असे मानण्यास हरकत नाही. दुसरे असे की वाफेने चेहरा भाजतो हे काही पटत नाही. आपल्यातल्या अनेकांनी अनेकदा वाफ घेतली असेलच. उलट वाफेने चेहर्‍याची त्वचाही स्वच्च्छ होते. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट , म्हणून उगाच रोज अर्धा एक तास वाफ घेणे चुकीचे ठरेल पण पाच ते दहा मिनटे वाफ घेतल्याने फायदा नक्की मिळत असेल.

Rajesh188 23/07/2020 - 19:22
हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे. जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो. असे का समजले जावू नये.

Rajesh188 23/07/2020 - 19:22
हा दावा खरा असेल तर.गरम बाफे नी व्हायरस नष्ट झालाच पाहिजे. जो पर्यंत व्हायरस मानवी पेशीला चिकटून स्वतः la tya पेशिशी jodun घेत नाही तो पर्यंत तो शरीरा बाहेर ज्या स्थितीत असतो त्याच स्थिती मध्ये तो आत मध्ये पण असतो. असे का समजले जावू नये.

सुबोध खरे 23/07/2020 - 19:47
पाणी उकळून त्याची वाफ होण्यासाठी पाण्याचे तापमान १०० अंश सेल्सियस असणे आवश्यक आहे. पाण्यातून वाफ उकळत असताना तिचे तापमान १०० अंश सेल्सियस असते. समुद्रसपाटीला १ बार किंवा १ ऍटमॉस्फेअर दाबाला पाणी १०० अंश सेल्सियस ला उकळते आणि त्याची वाफ होते. एक ग्राम पाणी उकळून वाफ करण्यासाठी ५४२ कॅलरी उष्णता द्यावी लागते( LATENT HEAT) .म्हणजेच आपण उकळत्या पाण्याच्या पृष्ठभागाशी चेहरा नेलात तर चेहरा १०० % भाजला जाईल. जसे आपल्या चेहऱ्याचे अंतर वाढेल तसे ति वाफ थंड होत जाऊन त्या वाफेचे पाण्याच्या सूक्ष्म बिंदूत रूपांतर होते. यामुळे वाफ थेट चेहऱ्यावर घेतली तर एक ग्राम वाफेतून हि उष्णता (५४२ कॅलरी) आपल्या चेहऱ्यात शोषली जाऊ शकते आणि चेहरा भाजतो. जितके अंतर जास्त तितके वाफेचे हवेने विरळीकरण होऊन पाण्यात रूपांतर होण्याचं प्रमाण जास्त. यामुळे हे पाण्याचे सूक्ष्म बिंदू आपल्याला सोसवेल इतक्या तापमानाचेच आपण श्वासाद्वारे आत घेणे आवश्यक आहे. मला लोकांनी प्रेशर कुकरची शिट्टी काढून तेथून वाफ नळीने घातली तर काय होईल असे विचारले. त्याचे उत्तर असे आहे कि एकदा नळी गरम झाली कि येणारी वाफ थंड न होता सरळ नाकात जाईल( हवेने होणारे विरळीकरण होणार नाही) आणि आपल्या नाकाची नाजूक त्वचा भाजेल. तेंव्हा असा "जुगाड" करण्यापूर्वी तीन वेळा विचार करा घशाला जसे गुळण्या करतो तसेच नाकासाठी वाफ घेणे आहे. कारण तोंडावाटे घेतलेले पाणी नाकात जाऊ शकत नाही. ( कोमट/ गरम पाण्याने जलनेती केली तर हाच वाफ घेतल्याचा परिणाम मिळू शकेल. तसे करतात का/ ते सुरक्षित आहे का ते मला माहिती नाही). वाफेचे तापमान ४५-५५ च्या मध्ये असेल असा माझा अंदाज आहे. (कुणी हे तापमान नाकाजवळ थर्मामीटर नेऊन मोजले तर नक्की उत्तर देता येईल.) यामुळे विषाणू मरत नाहीत परंतु नाकात असलेल्या चिकट पदार्थात हे पाणी मिसळून तो प्रवाही होतो यामुळे,विषाणूना नाकाच्या त्वचेत प्रवेश करण्यास वेळ कमी मिळतो. याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो. याच कारणासाठी थंड पाणी कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम घेतल्यामुळे किंवा पावसात भिजल्यामुळे नाक आणि घसा थंड होऊन तेथील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे आपल्याला जिवाणू किंवा विषाणू यांचा प्रादुर्भाव ( सर्दी खोकला ) होण्याची शक्यता वाढते. गरम पाण्याच्या गुळण्या केल्या तर असाच सुपरिणाम आपल्या घशाला मिळू शकतो.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, उष्णतेने म्हणजे असे काही गरम करुन वगैरे करोना विषाणु नष्ट होतो का ? इतकंच सांगा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सार्‍या जगापुढे एकमेव प्रश्न आहे ! तो सुटला तर सगळंच काम झालं ! त्यामुळे त्यांनी सेफ उत्तर दिलं आहे :
याशिवाय गरम वाफ/ पाणी यामुळे तेथील रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि तेथला रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी तेथे जास्त सुलभपणे पोचल्यामुळे जिवाणू विषाणू यांच्याविरुध्द्व प्रतिकार शक्तीला काम करण्यासाठी जास्त वाव मिळतो.

In reply to by संजय क्षीरसागर

आम्ही गरम पानी रूम मधेच करून पीत होतो. वाफ घेत होतो.
माझा कोविड अनुभव थोडक्यात, वाफ घेणं उपयोगी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

mrcoolguynice 24/07/2020 - 09:43
सर, फायदा होतो न होतो , तो भाग वेगळा. पण "नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात? " ह्याविषयी, ऍनेकडोटल मत नको, तर डेटा मिळायला हवा, असे वाटते.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 10:03
आपल्या भांड्यावर कोरोनाचे विषाणू असतील अन त्यावर वाफ ( १०० अंश सेल्सियस) सोडली तर ते नक्कीच मरतील( निष्प्रभ होतील). https://www.medrxiv.org/content/10.1101/2020.05.13.20100651v1.full.pdf Heat at 56°C kills the SARS coronavirus at around 10000 units per 15 min (quick reduction) https://www.who.int/csr/sars/survival_2003_05_04/en/# पण अशी वाफ आपल्या घशात सोडणे शक्य आहे का?

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 24/07/2020 - 10:22
माझेही हेच मत आहे, विषाणू मारण्याइतकी प्रभावी वाफ मनुष्यावर सोडली, तर विषाणू ऐवजी तो वाफेने मरेल. त्यामुळे, नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात, हा दावा भ्रामक आहे, अश्यामुळे काही लोकांचं फावत, कोरोनावर औषध नसताना, काही लोकांनी, औषध काढून त्याची विक्री करण्याचा चावटपणा केला, ह्या अश्या लोकांचं फावत, ईल- इन्फॉर्मड गरीब जनता , स्वतःच्या व्हाट्सअप रुपी विद्यापीठातून असे ज्ञान घेऊन आणखी धोकादायक परिस्थिती निर्माण करतील अशी भीती वाटते.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 10:40
आजचा सुविचार --व्हॉट्स ऍप्प विद्यापीठातील ज्ञान /पी एच डी पदवी हि (मृगपुच्छ) हरणाच्या शेपटासारखी असते. केवळ अस्तित्व ना लज्जा रक्षणासाठी उपयोग ना माशा वारण्यासाठी

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 24/07/2020 - 10:44
सेमपिंच , मलाही हाच सुविचार एकदा व्हॉट्स ऍप्पवर चाणक्य विचार म्हणून चाणक्याच्या फोटोसहित आलेला .....

In reply to by mrcoolguynice

Rajesh188 24/07/2020 - 11:28
खूप वर्षा पासून वाफ घेणे ही पद्धत चालू आहे ती काही आत्ताच सुरू झाली नाही. Steamer khup varsha पासून बाजारात आहेत आणि शास्त्रीय पद्धतीने त्याची रचना आहे जेणे करून हानी होवू नये. वाफ घेतल्या मुळे धोका निर्माण होईल हे मत अयोग्य आहे . झाला तर फायदाच होईल.

In reply to by Rajesh188

mrcoolguynice 24/07/2020 - 12:05
वाफ घेण्या न घेण्याला काही विरोध नाही. कोणाचा विरोध असु शकत नाही. एरंडेल तेल पिऊन हलका जुलाब घेणे हि पद्धतसुद्धा खूप वर्ष्या पासूनची आहे, त्याचा फायदाही काही जणांना झाला असेल. इथे मूळ मुद्दा हा आहे, की "वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही , "एरंडेल प्याल्याने करोनाचे विषाणू मरतात" ? तर तेही नाही , वाफ घेतल्याने किंवा एरंडेल प्याल्याने, करोना बरा होतो का ? अजिबात नाही ... त्यामुळे आधीच ईल इन्फॉर्मड जनतेला ह्या अस्थानी माहितीचा काय उपयोग, उलट गैरसमज समाजात पसरल्याने, गर्दी करणे मास्क वापर टाळणे अश्या विघातक गोष्टी डिड शहाणे करू लागतात व स्वतः बरोबर इतरांचे आरोग्य धोक्यात आणतात. करोनावर औषध नाही नाही नाही, प्रतिबंध हाच सध्याला चांगला मार्ग आहे.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 24/07/2020 - 12:33
वाफ घेतल्याने करोना बरा होत नाही हे वास्तव आहे. परंतु वाफ घेतल्याने करोनाच काय पण इतर कोणताही जिवाणू किंवा विषाणू चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता थोडीफार कमी होते हि पण वस्तुस्थिती आहे. (किती प्रमाण हे अजून सिद्ध झालेले नाही) . वाफेचा फायदा होतो म्हणून त्याच्याबद्दल अवास्तव अपेक्षा ठेवणे चूक आहे तसेच ते पूर्णपणे निरुपयोगी आहे हे पण सत्य नाही. टोकाची भूमिका नसावी त्याचबरोबर वाफ घेताना तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 24/07/2020 - 12:36
"वाफेने करोनाचे विषाणू मरतात" ? तर नाही होय करोना विषाणू मरतात. पण १०० अंश सेल्सियसची वाफ तोंडात किंवा घशात घेणे शक्य आहे का? नाही. त्यामुळे घसा नाक जबरदस्त भाजेल.

In reply to by सुबोध खरे

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
मग हे ज्ञान कुठून आलं होतं ?

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/07/2020 - 09:45
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. आपल्यालाच सगळं ज्ञान आहे असा दंभ असेल कि असं होतं. त्या बद्दलचे दुवे दिलेले आहेत हवं तर वाचा. पण मीच बरोबर आहे मी बरोबरच आहे आणि मी बरोबर आहेच असा स्वतुष्टीचा दर्प असल्याने आपण ते वाचणार नाहीच हि खात्री आहे विषाणू ३५ अंशाला २-४ मिनिटे टिकू शकतो हे शरीराच्या बाहेर आहे. शरीराचे तापमान ३७ अंश असते हे आपल्याला माहिती नाही का? बाकी त्या लेखाच्या खाली काय लिहिलं आहे हे आपल्याला वाचता येत नाही का?

In reply to by सुबोध खरे

शरीराच्या तापमानाचा प्रश्न नाही हो. आपण घेत असलेल्या वाफेच्या तापमानाचा विषय चालू आहे. (नेहेमी प्रमाणे) विषय भरकटवू नका.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/07/2020 - 19:32
आपल्याला शरीराच्या पोकळीत आणि पेशींच्या आत विषाणूंची स्थिती काय हि माहिती नसल्यामुळे असे भंपक बोलता आहात. आपल्याशी वाद घालण्यात अर्थ नाही धन्यवाद

In reply to by संजय क्षीरसागर

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही
अहो अगदीच चुकीचं आहे हे ... अशी चुकीची माहिती कुणी पसरवू नये. तुम्ही कुठे वाचलंत ?

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 27/07/2020 - 19:33
संक्षी यांनी डोंगर पोखरून उंदीर काढला आहे तेथेच मी याचा दुवा दिला आहे. हवा तर शोधा नाही तर आनंदात रहा

In reply to by सुबोध खरे

तुमच्या लेखानंतरच्या तारखेच्या आहेत; लेख लिहितांना त्या तुम्हाला उपलब्ध नव्हत्या हे तिथेच सांगितलं आहे. याचा अर्थ तुम्ही फॉरवर्डेड माहितीच्या आधारे ठोकाठोकी करता आणि गोष्टी उघड झाल्यावर दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी विषय भरकटवता.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 28/07/2020 - 10:49
शिक्षण करत असताना आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. प्रत्येक गोष्ट हि केवळ दुव्यावर आधारित नसते. करोना विषाणू बद्दल मी सूक्ष्मजीव शास्त्रात १९८५ साली शिकलो आहे.तेंव्हा सुद्धा माझ्या कॉलेजात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता.( कदाचित त्यावेळेस तो भारतातील वैद्यकीय महाविद्यालयातील एकमेव इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप होता). तेंव्हा "कोव्हिडची महामारी" येईल असे सर्वोच्च शास्त्रज्ञांच्या स्वप्नातही आले नसते. क्लोरीनने जंतू मरतात हे प्रत्येक डॉक्टरलाच काय सामान्य माणसालाहि माहिती असते. तेथे दुवे मागणे हे मूर्खपणा ठरेल. कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे. काही तरी करून मीच सर्वात शहाणा हे सिद्ध करायचे सोडून द्या. ते हास्यास्पद च्याही पलीकडे गेलेले आहे.

In reply to by सुबोध खरे

कुणीतरी दुवा मागितल्यामुळे मी तो दिला म्हणून तारीख नंतरची आली आहे.
लिंक मी मागितल्यावर तुम्ही दिली आणि तारखेचा घोळ दाखवल्यावर चिखलफेकीचा कांगावा केला ! थोडक्यात, तुम्ही सोयिस्करपणे वाट्टेल त्या लिंक्स देता > जिएसटीनी किंमती कमी झाल्या हे दाखवायला २ जुलै २०१७ ची लिंक दिलीत ! तुमच्या लेखनात विश्वासार्हता कमी आणि मुद्दा भरकटवणे, व्यक्तिगत होणे, निष्कारण अकांडतांडव करणे हेच प्रकार चालू आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 28/07/2020 - 20:02
दुसरं काही सापडलं नाही म्हणून बाहेरचा धुणं आणून धुवायला निघालात? बाकी ते प्यूबिक रिंग किंवा सर्व संतांना अध्यात्म वगैरे काहीही कळत नाही मलाच कसं कळलंय हे सर्व नाही आणलंत धुवायला. तेही धुवून घ्या रिकामेच आहात तर

In reply to by सुबोध खरे

सध्या या चुकीच्या विधानाबद्दल :
हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
दिलगिरी व्यक्त केलीत तरी उचित होईल

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 29/07/2020 - 18:27
तें विधान मुळीच चुकीचे नाही. स्वीकार करा नाही तर करू नका त्यात बदल होणे नाही. तुमच्या डोक्यातला आत्म प्रौढीचा विषाणू कोणत्याही वाफेने मरत नाही. त्याला तापमान कितीही असो. ))=((

In reply to by सुबोध खरे

मग तुमच्या छातीठोक विधानाचा हा चमत्कार का घडला नाही ?
यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 30/07/2020 - 09:49
हे त्या वेळच्या जागतिक आरोग्य संघटनेचे वक्तव्य होते. तुम्ही तेवढेच पकडून बसला आहात त्याला कोणी काही करू शकत नाही. हवं तर जागतिक आरोग्य संघटनेचे तेंव्हाचे अहवाल पहा ते तुम्ही करणार नाही हि माझी खात्रीच आहे कारण

मी म्हणजे मी म्हणजे मीच बरोबर

हे काहीही करून सिद्ध केलेच पाहिजे हा अट्टाहास आहे आणि हा मनोविकार आहे (delusion of grandeur) त्याला उपाय नाही

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 30/07/2020 - 12:48
श्री मोदींच्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण करावे इतकी माझी लायकी नाही. ज्याला आपली तेवढी लायकी आहे असे वाटते त्याने ते करावे.

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 30/07/2020 - 13:49
आधी मोदींजींच्या व्यक्तिमत्वाची लायकी... विश्लेषणकेल्या विना कशी ठरवली गेली, की तिचे विश्लेषण करण्याची लायकी असणे नसणे हे त्यानंतर प्रस्थापित करण्याच्या सेकंड स्टेप डायग्नोसिसला डायरेकट्ट उडी मारली.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 31/07/2020 - 11:37
हो ना आपण पवार मास्तरांच्या गायन क्लास मध्ये दुसऱ्या वर्षाला शिकतो आहोत पण भारत रत्न पंडित भीमसेन जोशींना मारू बिहाग राग कसा गाता येत नाही याचे विश्लेषण अगोदर करायचे. बाकी महापालिकेत उंदीर मारायचा विभाग सध्या कोव्हीडमुळे बंद आहे का?

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 31/07/2020 - 13:54
बाकी संक्षी म्हणतात, त्याप्रमाणे.. "विषय भरकटवणे, वैयक्तिक होणे, त्याच त्याच भक्तीच्या चिपळ्या वाजवणे", यांतच काही जणांनी त्यांची डॉक्टरेट मिळवलीये....

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 01/08/2020 - 06:50
माझ्यामते मूळ विषय "आपण" कोणाचीही मानसिक आरोग्य, मूल्यांकन करू शकत नाही, ठराविक व्यक्तींना वैयक्तिक होऊन, आपण प्रश्नाचे उत्तर न देता, वैयक्तिक कॉमेंट करत होता (मानसिक आरोग्य हा आपला विषय नसतानाही )

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 01/08/2020 - 12:45
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही. जिथे तिथे आपला पूर्वग्रह राजकारण आणलेच पाहिजे का? केवळ विरोधासाठी विरोध करायचा आणि हसं झालं तरी शाब्दिक कोलांट्या मारत आपलंच घोडं पुढे दामटायचं. दांभिक आणि भंपक पणा आहे.

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 01/08/2020 - 13:26
मूळ मुद्दा जर महामारीचा होता, तर संक्षी यांना मानसिक आरोग्य विषयक कॉमेंट अस्थानी होत्या, त्या तुम्ही केल्यात. त्यामुळे, वैयक्तिक कॉमेंट करणे, विषय भरकटत नेणे, मीच काय तो सर्व ज्ञानी असा अहंगंड ठेवून, एकंदरीत प्रतिसाद देणे, यातच आपली डॉक्टरेट आहे की काय, हा संशय लोकांना येणे स्वाभाविकच आहे.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 01/08/2020 - 19:23
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 03/08/2020 - 09:47
मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. त्याचा तुमच्या श्री मोदींविरुद्ध गरळ ओकण्याच्या पूर्वग्रहाशी संबंध नाही. तसेच मी आणि संक्षी यातील वादाचा श्री मोदी यांच्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही खाजवून खरूज कशाला निर्माण करता आहात

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 03/08/2020 - 11:46
जर मूळ विषय हा सध्या असलेल्या महामारीचा म्हणजेच वैद्यकीय आहे. तर त्याचा तुमच्या आणि संक्षी यातील वादाचा या धाग्याशीही काहीही संबंध नाही. तुम्हीच खाजवून खरूज कशाला निर्माण करीत आहात.

In reply to by mrcoolguynice

सुबोध खरे 03/08/2020 - 11:58
आमच्या वादात तुम्हाला नाक खुपसायला (आमचा वाद करोना बद्दलच आहे) आणि जिकडे तिकडे श्री मोदी याना आणायला तुम्हाला कोणी सांगितलंय? नसती लूडबूड

In reply to by सुबोध खरे

mrcoolguynice 03/08/2020 - 13:37
मग तुमचा वाद तुम्ही व्यनीतुन घाला, जाहीर वाद तुमची वैयक्तिक मालमत्ता नाहीये. नस्ता शहाजोगपणा...

In reply to by सुबोध खरे

राजाभाउ 28/07/2020 - 11:22
पण म्हणजे डॉक जर एखाद्याला सर्दी झाली नसेल किंवा नाक चोंदल नसेल तर त्याला वाफेचा तितका उपयोग होणार नाही का?

In reply to by राजाभाउ

सुबोध खरे 28/07/2020 - 11:30
नाक चोंदलेले असणे किंवा सर्दी हे "लक्षण" आहे. "आजार" नव्हे. बऱ्याच वेळेस आपल्या नाकात जिवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग झालेला असतो पण त्याची लक्षणे दिसण्यास वेळ लागतो. सद्य स्थितीत करोनाच नव्हे तर (पावसाळ्यात होणारे) इतर विषाणूजन्य आजार सुद्धा आहेत. शिवाय पावसाळ्यामुळे जिकडे तिकडे बुरशीचे प्रमाण वाढलेले असते. या बुरशी मुळे ऍलर्जी होऊन सर्दी होते आपण वाफ घेतलीत तर करोनाच नव्हे तर या इतर विषाणूंचा बुरशीचा संसर्ग सुद्धा कमी होईल.

भीमराव 23/07/2020 - 21:17
फार वर्षांपूर्वी घडलेली घटना आहे, पाणी तापवायच्या बंबाच फॅड होतं तेव्हा. गावातील एका माणसानं बंब घेतलेला, गरम तापलेलं पाणी काढायला कष्ट कमी म्हणून पाईप टाकाला आणि तोंडानं पाणी ओढलं. नळीमधुन ओढलेलं गरमागरम पाणी थेट घशात. बीचारा अन्ननलिका होरपळल्याने तडफडून मेला. वर सांगितल्याप्रमाणे वाफ घेताना सोसेल अशीच घ्या, उगाच स्वतः स्वतःचा डॉक्टर बनताना जीवाशी खेळ व्हायचा.

In reply to by भीमराव

Rajesh188 23/07/2020 - 21:27
बंबातून पाणी काढण्या साठी पाइप टाकून ओढायची काय गरज आहे. बंबा च्या तळाशी नळ असतो त्याला पाइप लावला की नळ चालू केला की पाणी येणार. उदाहरणे तरी नीट ध्या.

In reply to by Rajesh188

बाप्पू 23/07/2020 - 22:06
बंबाला नळ असतो पण एका ठरावीक लेवल नंतर बंबात पाणी असून सुद्धा नळातून पाणी येत नाही त्यावेळी बंबाला थोडे तिरके करून पाणी नळातून काढावे लागते.. कधी कधी बंबाचे वरचे झाकण उघडून मग किंवा तांब्याने पाणी उपसावे लागते.. कदाचित त्या व्यक्तीने हा त्रास कमी करण्यासाठी डायरेक्ट पाईप टाकून तोंडाने पाणी ओढण्याचा प्रयत्न केला असेल..

Gk 24/07/2020 - 12:50
वाफेने करोना मरतो ह्याचे लॉजिक तेच आहे जे नोटांबंदीने अतिरेकी मरतात , ह्यात होते

Rajesh188 24/07/2020 - 13:22
Covid19 च्या व्हायरस का ठार मारण्याचे कोणतेच औषध नाही जे काही प्रयत्न आहेत ते आपल्या शरीराच्या प्रतिकार शक्ती ला जागृत करून,तिला ताकत देवून तिलाच लढाई करायला पाठवायचे काम चालू आहे. त्या मधील च वाफ ही एक आयडिया. जसे खरे sir ni सांगितले गरम बाफ मुळे रक्त वाहिन्या प्रसारण पावतात आणि आपले सैनिक लवकर जंतू वर हल्ला चढवतात. आणि सीमेवर (नाकात किंवा घश्यात)च त्यांना रोखून धरतात

मराठी_माणूस 24/07/2020 - 14:26
करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते. मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. अपवाद व्हेंटीलेटर आणि ऑक्सीजन, अर्थात त्यातही एव्हढी आकारणी योग्य का अयोग्य ते माहीत नाही.

In reply to by मराठी_माणूस

स्वच्छंद 26/07/2020 - 02:36
समजा, एखाद्या खाजगी हॉस्पिटल ने कोविड पेशंट ट्रीट करायचं ठरवलं तर इतर आजार असलेले लोक तिकडे फिरकतील का? नाही.. त्यांचा बाकीचा धंदा तर बुडेलच ना. त्याचबरोबर पेशंटची काळजी घेणे, कर्मचाऱ्यांची काळजी या गोष्टी आल्याच. अव्वाच्या सव्वा बिल या हिशेबाने होत असावे.

In reply to by मराठी_माणूस

माहितगार 26/07/2020 - 11:09
खर्चाचा प्रश्न वेगळा आहे त्याची वेगळी चर्चा करावी. हॉस्पीटलांची गरज असते का? एक समांतर तुलना शिक्षणासाठी शाळा कॉलेज युनिव्हर्सिटीपेक्षा हॉस्पिटलांची गरज अधिक असावी असे माझे मत आहे. प्रयोगशाळेच्या सुविधेशिवाय सर्व अभ्यास घरच्या घरी करता येतो पण तरीही प्रशिक्षीत अध्यापकाच्या मार्गदर्शनाचा फायदा आणि अशा मार्गदर्शकांची एका ठिकाणी उपलब्धता तसेच शैक्षणिक वाचनालय सुविधा हा शाळा कॉलेज युनिव्हर्सिटींचा मुख्य फायदा. आता विशीष्ट प्रश्नाकडे येऊ. "....मग एक प्रश्न असा पडतो की, हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो..." १) आरोग्य प्रतिकारशक्तीचे प्रकार असतात प्रत्येक व्यक्तीनुरुप प्राप्त क्षमता ही दिवसांपरत कमी जास्त होत असू शकते आणि मुख्य म्हणजे कोणती प्रतिकारशक्ती किती सक्षम आहे आणि यशस्वी होते आहे की नाही हे घरच्या घरी आपले आपल्याला मोजण्याची कोणतीही जादू आपल्याकडे नसते. त्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेल्या परिक्षण चाचण्या आणि कमतरता असल्यास दूर करण्यासाठी प्रशिक्षीत डॉक्टरांचे मार्गदर्शन ऊपयूक्त ठरते २) एका पेक्षा अधिक आजार असतील तर एका आजारामुळे दुसरा आजार काँप्लिकेशन्स होऊन बळावू शकतो. निरीक्षण आणि उपचाराने काँप्लिकेशन्सवर मर्यादा आणण्यात हॉस्पिटल सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळ प्रभावी ठरू शकते ३) औषधोपचार पद्धती माहिती असून सुद्धा गरजे प्रमाणे डॉक्टर लोक स्वतः वरील उपचारासाठी सुद्धा हॉस्पीटल मध्ये भरती होत असतात. हॉस्पीटलमध्ये घरच्यापेक्षा अनुषंगिक सुविधा आणि प्रशिक्षीत मनुष्यबळाची उपलब्धता कितीतरी पटींनी अधिक चांगली असते.
....करोना वर औषध नाही, प्रतिबंध करणे आणि प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच गरज आहे असे म्हटले जाते....
वाक्य पुरेसे अचुक नाही, खालील प्रमाणे लिहीले तर अधिक सयुक्तीक होईल कदाचित
....कोविड-१९च्या वीषाणूवर तुर्तास औषध नाही, व्यक्तिगत आणि सामाजिक व्यवहारात प्रतिबंधांचे पालन करणे आणि व्यक्तिगत प्रतिकार शक्ती वाढवणे ह्याचीच प्राथमिकता (priority) आहे असे म्हटले जाते....
(अवांतरः priority शब्दा साठी 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' हे मराठी शब्द आहेत, का कुणास ठाऊक 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' असे लिहूनही ज्या प्रमाणात दुर्लक्ष होते ते पहाता 'प्राधान्य' आणि 'प्राथमिकता' या शब्दांचा प्रभाव कमी होत आहे का? तसे असेल तर अधिक प्रभावी शब्द योजना काय असू शकेल असा प्रश्न पडतो.)

Rajesh188 26/07/2020 - 08:52
मला वाटतं मोबाईल मध्ये आयफोन हा ब्रँड आहे तो सामान्य लोकांसाठी नाही तो श्रीमंत लोकांसाठीच आहे. बाकी लोकांपेक्षा वेगळे स्वतः ला ते समजतात त्या मुळे त्यांच्या साठी असलेले ब्रँड महाग असतात. तोच आयफोन दर्जा तसाच ठेवून 7000 ला विकायला लागले तर श्रीमंत लोक तो घेणार नाही. तसेच हॉस्पिटल चे आहे corporate hospital madhye jast kharch येतो म्हणजे तिथले डॉक्टर हुशार असतात असे काही नाही. कमी बिल असलेल्या दवाखान्यात सामान्य लोकांनी उपचार करावेत.

तिमा 26/07/2020 - 11:36
या विषयावर बोलणे म्हणजे सुद्धा तोंडची वाफ दवडण्यासारखे आहे. अंघोळीचे सहन होईल एवढ्या गरम पाण्याचे तापमान ४०-४२ सेंटिग्रेड असते. त्याहून जास्त तापमानाने त्वचा भाजते. नाकाच्या आतील त्वचा किंवा म्युकस मेंब्रेन हे बाहेरच्या त्वचेपेक्षाही नाजुक असते. सर्दी झाल्यावर व्हिक्स वगैरे मिसळून जी सो कॉल्ड वाफ घेतली जाते ती ही वरील तापमानाच्या आसपासचीच घेतली जाते. कारण ती बाष्पमिश्रित आणि सुरक्षित अंतरावरुन घेतली जाते. वाफ तयार झाल्याक्षणी तापमान १०० सेंटिग्रेड असले तरी, बाहेरच्या ३० सें. च्या वातावरणात, ते नाकाशी येईपर्यंत अत्यंत वेगाने कमी होते. तेंव्हा कायप्पाला कधी सिरियसली घेऊ नका कारण विज्ञान न येणारे या जगांत बहुसंख्य आहेत.

सुबोध खरे 26/07/2020 - 12:39
हॉस्पीट्ल मधे दाखल करुन कसला उपचार केला जातो आणि लाखो रुपयांची बीले आकारली जातात. हम्म हॉस्पिटलच्या अति दक्षता विभागात २४ तास डॉक्टर आणि सिस्टर असतात. त्यांचा पगार कुणी द्यायचा? २४ तास वातानुकूलित( केवळ थंड नव्हे) वातावरण ठेवावे लागते. त्या वातानुकूलन यंत्रणेत हवा जेथून आत घेतली जाते तेथे अतिसूक्ष्म अशी गाळणी (०.३ मायक्रॉन) https://en.wikipedia.org/wiki/HEPA लावली जाते. हि गाळणी दर सहा महिन्यांनी बदलावी लागते जिची किंमत आकाराप्रमाणे १५ लाखांपासून ४० लाखापर्यंत असते आणि ती लवकर खराब होऊ नये म्हणून असलेला प्री फिल्टरच ३५ हजाराचा असतो. जेंव्हा साथ नसते तेंव्हा रुग्णालयातील खाटा रिकाम्या असल्या तरी डॉक्टर सिस्टर वैद्यकीय कर्मचारी याना पगार पूर्णच द्यावा लागतो. प्रत्येक यंत्रांची आपली किंमत असते आणि ते नीट चालत राहावे यासाठी त्याचे वार्षिक देखभालीचे कंत्राट असते. या कंत्राटाची किंमत काही कोटी रुपये असते. असो. आपल्याला त्याच्याशी काय घेणे देणे आहे. आम्हाला अमेरिकेच्या दर्जाची वैद्यकीय सेवा बांगला देशाच्या दारात मिळालीच पाहिजे. आम्ही दर पाच वर्षांनी मत देतो तेंव्हा हा आमचा हक्कच आहे मेरा भारत महान. जाता जाता --मुंबई दिल्ली भाडे अनारक्षित दुसऱ्या वर्गाचे ३६३ रुपये आहे आणि राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाचे भाडे ४७२६ रुपये आहे. सामान्य जनतेला राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाने ३६३ रुपये देऊन प्रवास करायला मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे. सरकार हे केवळ श्रीमंतांचे लाड करते आहे ते आम्ही चालवुन घेणार नाही. राजधानीचे सर्व डबे वातानुकूलित पहिल्या वर्गाचे झाले पाहिजेत आणि सर्व गाड्या राजधानी एक्सप्रेस मध्ये रूपांतरित कराव्या अशी आमची मागणी आहे

In reply to by मराठी_माणूस

सुबोध खरे 26/07/2020 - 14:28
रेमडेसीव्हिर या औषधाची जास्तीती जास्त किरकोळ किंमत ४८०० असताना काही लोक ती काळ्याबाजारात २५-३० हजारात का विकत आहेत ? आणि त्यावर सरकारने कार्यवाही करायची नाही का? सरकारने क्वारंटाईन साठी असलेल्या हॉटेलांचे सुद्धा दर ठरवून दिलेले आहेत. उदा. ताज लँड्स एन्ड चा दर रोज रुपये ३५०० आहे तर सरकारी कोव्हीड केंद्रात आपल्याला फुकट ठेवले आणि खायला प्यायला घातले जाते. मग या हॉटेलात एवढे दर का असा प्रश्न आपल्याला पडत नाही? ताज ने जर रोजचा दर ६०००/- लावला तर सरकारने कार्यवाही करू नये? आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय. सरसकटीकरण टाळावे इतकीच विनंती जाता जाता --खाजगी रुग्णालये हि समाजसेवा करण्यासाठी स्थापन झालेली नाहीत तर ( हॉटेलसारखी ) नफा कमावण्यासाठी आहेत. ज्याला परवडत नाही त्याने तेथे जाऊ नये. उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे. ती जबाबदारी ७० वर्षे कोणत्याही सरकारने पुरवलेली नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. पण त्यासाठी खाजगी क्षेत्राला जबाबदार धरणे चूक ठरेल

In reply to by सुबोध खरे

आपण सरसकट सर्व खाजगी रुग्णालयांना अप्रामाणिक जाहीर करताय.
खरंय, सरसकटीकरण करु नये. खासगी रुग्णालयांकडून अपेक्षा करणे चूकच आहे. डॉक्टर्स शिकली तो खर्च. रुग्णालयासाठी महागडी जागा घेतली तो खर्च, बांधकाम तो खर्च, अद्ययावत सुविधा तो खर्च. स्टाफ ठेवला त्यांचे वेतन, लग्न करुन वधू डॉक्टरच आणली तिचंही प्रॅक्टीसचं जुगाड रुग्णालयातच करावं लागतं, त्याचा खर्च. सरकार जर डॉक्टर्स आणि खासगी रुग्णालयांना कोणतीही आर्थिक मदत करीत नसतील तर डॉक्टर्सना आपले रेट्स ठरवायचे अधिकार असलेच पाहिजेत. डॉक्टर्सलाही कुटूंब आहे, खर्च आहे. डॉक्टर्सनाही बॅलेन्स वाढवायचा असतोच. रुग्णांना परवडत असेल तर खासगी रुग्णालयात उपचार घ्यावेत, नसता सरकारी रुग्णालयात जावे. उगाचच सरसकट खासगी रुग्णालयांना आणि त्यात काम करणार्‍यांना अप्रामाणिक म्हणू नये याच्याशी सहमत.
उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा सरकारने जनतेला वाजवी दरात पुरवली पाहिजे.
अच्छा सरकारची जवाबदारी सुद्धा असते, हे माहिती झालं. आभार. नाहीतर, मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 27/07/2020 - 19:36
मी आपलं दिवा-पणतीच्या भरवशावरच होतो. तसेच रहा कि कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय? त्या पैशात केवढी ऐश करता येईल याचा हिशेब करा

In reply to by सुबोध खरे

कशाला आरोग्यावर पैसे खर्च करताय?
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून... दुसरं काय. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 29/07/2020 - 18:30
डॉक्टर लोकांच्या कुटूंबाची काळजी वाटते, त्यांची उपासमार होऊ नये म्हणून. हायला मग पानवाल्याची उपासमार होऊ नये म्हणून सिगरेट पिणार का? आणि बारबालांची उपासमार होऊ नये म्हणून बेवडे होणार काय/ उगाच काहींच्या काही?
लेखनविषय:
गेल्या महिन्यात फेसबूकवर पोस्ट वाचली होती. गरम पाणी पिऊन अन्ननलिकेतला वायरस तुम्ही माराल, पण श्वसननलिकेतला वायरस मारायचा असेल तर वाफ घेणे किती गरजेचे आहे. त्यासाठी मग पॅरानेझल सायनस काय, लाॅकिंग मेकॅनिझम काय अशा शब्दांची पेरणी त्या पोस्टमध्ये केली होती. दिवसातून किती वेळा बाहेर बोंबलत हिंडताय, त्यावर किती वेळा आणि कोणत्या तापमानाची वाफ घेतली म्हणजे तुम्हाला करोना होणार नाही आणि झाला तरी त्याचे विषाणू फुप्पुसात जाण्याआधीच मरून जातील वैगेरे थोर(?) ज्ञानामृत लोकांना वाटण्याचे काम त्या लेखकांना करायचे होते बहुधा. हीच पोस्ट काही दिवसांनी व्हाॅट्सअपवरही तुफान वायरल झाली होती.

मला भेटलेले रुग्ण - २२

डॉ श्रीहास ·

शलभ 28/06/2020 - 21:13
नेहमीप्रमाणेच छान लिहिलंय. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पेशंट बघताय म्हणजे खरंच मोठी गोष्ट आहे. आमच्या इथे बरीच क्लिनिक बंद आहेत. जे क्लिनिक चालू आहेत त्यांना स्पेशल धन्यवाद दिले आहेत. आमच्या इथला Dr. तर ट्रेन ने अपडाऊन करायचा. ट्रेन बंद झाल्यापासून क्लिनिक जवळच रेंट वर राहतोय.

दिगोचि 29/06/2020 - 07:11
जमेल तेव्हा तुमच्या डाॅक्टरांना एक फोन करा आणि तुमची त्यांच्याबद्दल भावना सांगा किंवा त्यांना स्वत:ची काळजी घ्या एवढंच म्हणा. >>> डॉक्टरानाच काय इतर जेजे या कोरोना विषाणु दिवसात मदत करत आहेत त्यासर्वना आभार प्रदर्शक म्हणून मोदिजीनी सर्वाना ताळ्या वाजवायला सन्गितले होते तर त्यावर झालेल्या प्रतिक्रियावरुण लोकांची मनोवृत्ती समजली असे लोक धन्यवाद देणार नाहीत.

In reply to by प्रमोद देर्देकर

रातराणी 29/06/2020 - 12:43
+1 आरोग्यसेवा खंड न पडू देता पुरवणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद! केवढा मोठा भार उचलता आहात तुमच्या खांद्यावर!! _/\_

अरिंजय 29/06/2020 - 12:04
नेहमीप्रमाणेच हा लेख देखील छान. तुमचे अनुभव हे आम्हाला वेगळाच दृष्टीकोन देऊन जातात. तुमच्या सहीत सर्व डॉक्टर लोकांचे खरंच कौतुक आहे. सध्या आमचा एक जवळचा डॉक्टर मित्र औबाद मधे अत्यंत धोकादायक परिस्थितीत, सरकारकडून अतिशय मर्यादित साधनांचा पुरवठा होत असताना बाहेरून व्यवस्था करून कोरोनाशी लढत आहे. अशा गोष्टी लोकांच्या नजरेआड असतात. दुसरा एक जवळचा डॉक्टर मित्र कुडाळ मधे लढत आहे. त्यांचे अनुभव अतिशय भयानक आहेत. पेशंटचे नातेवाईक सुद्धा ज्याला टाकून जातात अशांना हे डॉक्टर लोकं सांभाळत आहेत. लोकांच्या मनोवृत्तीची खरंच कीव येते.

वीणा३ 30/06/2020 - 01:50
तुमचे अनुभव वाचायला खरंच आवडतात. मुळात हा तुमच्यासाठी फक्त व्यवसाय नाहीये, तुम्ही रुग्णाला मनापासून वेळ देता हे कळतं. तुम्ही करत असलेल्या कामासाठी मनपुर्वक धन्यवाद!!! असेच अनुभव लिहीत रहा.

जेम्स वांड 30/06/2020 - 15:23
तुमच्या ह्या सिरीजवर प्रतिसाद दिला होता की नाही ते आठवत नाही म्हणून परत एकदा म्हणतो ब्रदर अँड अदर डॉक्टर्स, यु आर गॉड

सविता००१ 11/07/2020 - 15:50
खरंच फार सुंदर लिहिलय. आणि हे नक्कीच म्हणायला हवं की ज्या परिस्थितीत तुम्ही लोक काम करताय, ते शब्दांत सांगण्याच्या पलिकडचं आहे. ज्यांच्याबद्द्ल अतिशय कृतज्ञता वाटावी असे सध्याच्या परिस्थितीत फक्त तुम्ही लोक. _________/\__________

शलभ 28/06/2020 - 21:13
नेहमीप्रमाणेच छान लिहिलंय. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पेशंट बघताय म्हणजे खरंच मोठी गोष्ट आहे. आमच्या इथे बरीच क्लिनिक बंद आहेत. जे क्लिनिक चालू आहेत त्यांना स्पेशल धन्यवाद दिले आहेत. आमच्या इथला Dr. तर ट्रेन ने अपडाऊन करायचा. ट्रेन बंद झाल्यापासून क्लिनिक जवळच रेंट वर राहतोय.

दिगोचि 29/06/2020 - 07:11
जमेल तेव्हा तुमच्या डाॅक्टरांना एक फोन करा आणि तुमची त्यांच्याबद्दल भावना सांगा किंवा त्यांना स्वत:ची काळजी घ्या एवढंच म्हणा. >>> डॉक्टरानाच काय इतर जेजे या कोरोना विषाणु दिवसात मदत करत आहेत त्यासर्वना आभार प्रदर्शक म्हणून मोदिजीनी सर्वाना ताळ्या वाजवायला सन्गितले होते तर त्यावर झालेल्या प्रतिक्रियावरुण लोकांची मनोवृत्ती समजली असे लोक धन्यवाद देणार नाहीत.

In reply to by प्रमोद देर्देकर

रातराणी 29/06/2020 - 12:43
+1 आरोग्यसेवा खंड न पडू देता पुरवणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद! केवढा मोठा भार उचलता आहात तुमच्या खांद्यावर!! _/\_

अरिंजय 29/06/2020 - 12:04
नेहमीप्रमाणेच हा लेख देखील छान. तुमचे अनुभव हे आम्हाला वेगळाच दृष्टीकोन देऊन जातात. तुमच्या सहीत सर्व डॉक्टर लोकांचे खरंच कौतुक आहे. सध्या आमचा एक जवळचा डॉक्टर मित्र औबाद मधे अत्यंत धोकादायक परिस्थितीत, सरकारकडून अतिशय मर्यादित साधनांचा पुरवठा होत असताना बाहेरून व्यवस्था करून कोरोनाशी लढत आहे. अशा गोष्टी लोकांच्या नजरेआड असतात. दुसरा एक जवळचा डॉक्टर मित्र कुडाळ मधे लढत आहे. त्यांचे अनुभव अतिशय भयानक आहेत. पेशंटचे नातेवाईक सुद्धा ज्याला टाकून जातात अशांना हे डॉक्टर लोकं सांभाळत आहेत. लोकांच्या मनोवृत्तीची खरंच कीव येते.

वीणा३ 30/06/2020 - 01:50
तुमचे अनुभव वाचायला खरंच आवडतात. मुळात हा तुमच्यासाठी फक्त व्यवसाय नाहीये, तुम्ही रुग्णाला मनापासून वेळ देता हे कळतं. तुम्ही करत असलेल्या कामासाठी मनपुर्वक धन्यवाद!!! असेच अनुभव लिहीत रहा.

जेम्स वांड 30/06/2020 - 15:23
तुमच्या ह्या सिरीजवर प्रतिसाद दिला होता की नाही ते आठवत नाही म्हणून परत एकदा म्हणतो ब्रदर अँड अदर डॉक्टर्स, यु आर गॉड

सविता००१ 11/07/2020 - 15:50
खरंच फार सुंदर लिहिलय. आणि हे नक्कीच म्हणायला हवं की ज्या परिस्थितीत तुम्ही लोक काम करताय, ते शब्दांत सांगण्याच्या पलिकडचं आहे. ज्यांच्याबद्द्ल अतिशय कृतज्ञता वाटावी असे सध्याच्या परिस्थितीत फक्त तुम्ही लोक. _________/\__________
http://www.misalpav.com/node/46054 १.हि पेशंट गेल्या ४ वर्षांपासून नियमित येते , ह्यावेळेस तिच्या मुलीला दाखवायला आली होती. श्वासाची तपासणी केली आणि सौम्य स्वरूपाचा दमा आहे हे निदान सांगून औषधं लिहून दिली आणि सांगीतलं तुझ्या आईला दमा आहे म्हणून अनुवांशीकतेमुळे तुला आलेला दिसतोय, पण काळजी करू नको छान फरक पडेल असं सांगून पुढची तारीख दिली. पेशंट केबिन च्या बाहेर गेल्यावर तिची आई हळूच म्हणाली की डाॅक्टर हीला ४ महीन्यांची असतांना दत्तक घेतलं होतं ........ ———————॰———— २.बऱ्याच दिवसांनी हे काका परत आले होते , तपासलं आणि फाईल बघीतल्यावर औषधांसंबधी बोललो, पुढे हे विचारलं की बीडी बंद केली की नाही ?

गुलाबी कागद निळी शाई....3 मायना

प्राची अश्विनी ·

In reply to by शा वि कु

खूप खूप धन्यवाद प्रतिसादाबद्दल. कारण असा पत्र प्रकार पहिल्यांंदाच करतो य त्यामुळे जमतंय का, आवडतंय का ही मनात धाकधूक आहे

In reply to by शा वि कु

खूप खूप धन्यवाद प्रतिसादाबद्दल. कारण असा पत्र प्रकार पहिल्यांंदाच करतो य त्यामुळे जमतंय का, आवडतंय का ही मनात धाकधूक आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार
गुलाबी कागद निळी शाई..2 काहूर Hi.. कसला स्मार्ट आहेस तू. ओळखशील आणि तेही इतक्या पटकन, असं वाटलंच नव्हतं. अर्थात खूप आत कुठेतरी तू ओळखावं असंही वाटत होतंच म्हणा! U know? माझ्या आयुष्यातील हे पहिलं पत्र, तू पाठवलेलं. आणि तेसुद्धा प्रिय न all असं सगळं लिहिलेलं. (मायना म्हणतात नं त्याला??) So cute! तुझी presentations सुद्धा इतकी मस्त असतात ना. इमेल सुद्धा( btw आत्ता सुचलं म्हणून सांगतेय, आपण एकमेकांना पत्रच लिहायची, email ping WhatsApp वगैरे काही नाही. चालेल?? सॉल्लिड मज्जा येईल ना?) तर काय सांगत होते?

व्हिडिओ अभिवाचन:-गुरुजींचे भावविश्व-प्रस्तावना व भाग १

अत्रुप्त आत्मा ·

निओ 18/06/2020 - 14:59
आज आपले दर्शन झाले. तुमची लेखमाला भारीच होती. अभिवाचन उत्तरोत्तर रंगतच जाणार. खूप शुभेच्छा !! तंतूंवर देवता जंतुंसारख्या बसलेल्या असतात... भारी पंच :))

मस्त हो आत्मुगुर्जी, दोन्ही भाग छान झाले आहेत. ऐकताना अगदी पुलंची आठवण येत होती. तो मोबाईल आडवा ठेउन शुटींग करता येईल का? म्हणजे आम्हाला मोठ्ठे गुरुजी दिसतील. पैजारबुवा,

मनो 19/06/2020 - 22:15
गुर्जी, तुमच्या चष्म्यावर समोरच्या लॅपटॉपचे प्रतिबिंब हलताना दिसतंय त्यामुळे तिकडे लक्ष वेधले जाते. शक्य असेल तर चष्मा काढून किंवा प्रिंट करून कागद समोर ठेऊन करता येईल का? दुसरा उपाय म्हणजे स्क्रीनचा ब्राईटनेस कमीत कमी ठेऊन चेहेऱ्यावर येईल असा अजून एक दिवा लावणे. कॅमेऱ्याबरोबर आय कॉन्टॅक्ट असला की मग व्हिडिओ चांगला विश्वासार्ह वाटतो.

In reply to by बोलघेवडा

अरे व्वा! फेसबुक आणि व्हॉट्सपच्या सारखे मळमळजन्य प्रतिसाद इथेही मिळू लागले!? http://www.sherv.net/cm/emoticons/sick/barfing.gifवांतीच झाली म्हणायची!

In reply to by अत्रुप्त आत्मा

बोलघेवडा 20/06/2020 - 08:58
ही तुमचीच मळमळ तुम्हाला तुमच्याच शब्दात परत केली आहे, जी तुम्ही माझ्या लेखावर ओकली होती. हा तुमचाच प्रतिसाद तुमच्याच शब्दात तुम्हाला परत. संदर्भ: 2 मे 2020, 6.37 pm, लेखाचे नाव फाट्टकन.

सौंदाळा 19/06/2020 - 22:26
छानच झालेत व्हिडीओ. व्हिडिओसाठी लेखात केलेले बदल समयोचित. आवाजातील चढ उतार सुद्धा मस्त. एक छोटी विनंती : मोबाईल किंवा संगणक जे काही रेकॉर्डिंगसाठी वापरलं आहे त्याच्या मागे लिखाणाचा कागद ठेवता येईल का? म्हणजे दर्शकांशी थेट संवाद आहे असे वाटेल.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

@जव्हेरगंज निव्वळ अप्रतिम वाचन आहे!!! क्या बात!! >>> मनःपूर्वक धन्यवाद . http://www.sherv.net/cm/emoticons/smile/free-happy-smile-smiley-emoticon.gif @पैलवान डिजिटल आत्मा >> http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif डिजिटल गुरुजी डिजिटल मिपा >>> डिजिटल धन्यवाद . http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd.png @ मनो,सौंदाळा >>> मनःपूर्वक धन्यवाद. तुम्ही सुचवलेले बदल आवश्यक आहेत. ते मी नक्कीच करेन http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/thumbs-up-smiley-emoticon.gif

बोलघेवडा 20/06/2020 - 08:59
ही तुमचीच मळमळ तुम्हाला तुमच्याच शब्दात परत केली आहे, जी तुम्ही माझ्या लेखावर ओकली होती. हा तुमचाच प्रतिसाद तुमच्याच शब्दात तुम्हाला परत. संदर्भ: 2 मे 2020, 6.37 pm, लेखाचे नाव फाट्टकन.

अभ्या.. 20/06/2020 - 09:12
एकच लंबर गुरुजी. तुमचे प्रसन्न आविर्भावात दर्शन झाले. छान वाटले.

निओ 18/06/2020 - 14:59
आज आपले दर्शन झाले. तुमची लेखमाला भारीच होती. अभिवाचन उत्तरोत्तर रंगतच जाणार. खूप शुभेच्छा !! तंतूंवर देवता जंतुंसारख्या बसलेल्या असतात... भारी पंच :))

मस्त हो आत्मुगुर्जी, दोन्ही भाग छान झाले आहेत. ऐकताना अगदी पुलंची आठवण येत होती. तो मोबाईल आडवा ठेउन शुटींग करता येईल का? म्हणजे आम्हाला मोठ्ठे गुरुजी दिसतील. पैजारबुवा,

मनो 19/06/2020 - 22:15
गुर्जी, तुमच्या चष्म्यावर समोरच्या लॅपटॉपचे प्रतिबिंब हलताना दिसतंय त्यामुळे तिकडे लक्ष वेधले जाते. शक्य असेल तर चष्मा काढून किंवा प्रिंट करून कागद समोर ठेऊन करता येईल का? दुसरा उपाय म्हणजे स्क्रीनचा ब्राईटनेस कमीत कमी ठेऊन चेहेऱ्यावर येईल असा अजून एक दिवा लावणे. कॅमेऱ्याबरोबर आय कॉन्टॅक्ट असला की मग व्हिडिओ चांगला विश्वासार्ह वाटतो.

In reply to by बोलघेवडा

अरे व्वा! फेसबुक आणि व्हॉट्सपच्या सारखे मळमळजन्य प्रतिसाद इथेही मिळू लागले!? http://www.sherv.net/cm/emoticons/sick/barfing.gifवांतीच झाली म्हणायची!

In reply to by अत्रुप्त आत्मा

बोलघेवडा 20/06/2020 - 08:58
ही तुमचीच मळमळ तुम्हाला तुमच्याच शब्दात परत केली आहे, जी तुम्ही माझ्या लेखावर ओकली होती. हा तुमचाच प्रतिसाद तुमच्याच शब्दात तुम्हाला परत. संदर्भ: 2 मे 2020, 6.37 pm, लेखाचे नाव फाट्टकन.

सौंदाळा 19/06/2020 - 22:26
छानच झालेत व्हिडीओ. व्हिडिओसाठी लेखात केलेले बदल समयोचित. आवाजातील चढ उतार सुद्धा मस्त. एक छोटी विनंती : मोबाईल किंवा संगणक जे काही रेकॉर्डिंगसाठी वापरलं आहे त्याच्या मागे लिखाणाचा कागद ठेवता येईल का? म्हणजे दर्शकांशी थेट संवाद आहे असे वाटेल.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

@जव्हेरगंज निव्वळ अप्रतिम वाचन आहे!!! क्या बात!! >>> मनःपूर्वक धन्यवाद . http://www.sherv.net/cm/emoticons/smile/free-happy-smile-smiley-emoticon.gif @पैलवान डिजिटल आत्मा >> http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif डिजिटल गुरुजी डिजिटल मिपा >>> डिजिटल धन्यवाद . http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd.png @ मनो,सौंदाळा >>> मनःपूर्वक धन्यवाद. तुम्ही सुचवलेले बदल आवश्यक आहेत. ते मी नक्कीच करेन http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/thumbs-up-smiley-emoticon.gif

बोलघेवडा 20/06/2020 - 08:59
ही तुमचीच मळमळ तुम्हाला तुमच्याच शब्दात परत केली आहे, जी तुम्ही माझ्या लेखावर ओकली होती. हा तुमचाच प्रतिसाद तुमच्याच शब्दात तुम्हाला परत. संदर्भ: 2 मे 2020, 6.37 pm, लेखाचे नाव फाट्टकन.

अभ्या.. 20/06/2020 - 09:12
एकच लंबर गुरुजी. तुमचे प्रसन्न आविर्भावात दर्शन झाले. छान वाटले.
खुला-सा:- हे व्हिडिओ अभिवाचन फेसबुक वर सुरू केलेले आहे.ते इथे देत आहे. फेसबुक वर केलेले असल्यामुळे त्या हिशोबानी मनातून आलेली ही प्रस्तावना आहे. आपण मिपाकरांनी माझ्या गुरुजींचे भावविश्वला अलोट प्रतिसाद दिलात. आता या वरील प्रस्तावनेसह केलेल्या पहिल्या भागाच्या अभिवाचनासाठी आपल्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत आहे.

सह्याद्रीचा सिंह गर्जतो...

आपला अनिकेत ·
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. आज 1 मे, हा दिवस दरवर्षीप्रमाणे आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो हल्ली किमान WhatsApp वरती Status तरी ठेवून. काही वर्षांपूर्वी मराठी TV channels वरती महाराष्ट्राची एक tagline असायची...