मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट

प्रसाद गोडबोले ·

युयुत्सु Mon, 02/10/2025 - 08:27
न्युरल नेटची अध्यात्माशी सांगड वाचून गंमत वाटली. पण यातला तथ्याचा भाग थोडा वेगळा आहे. "राम" ऐवजी कोणत्याही संकल्पनेवर मन एकाग्र करण्याने चेताशास्त्रीय फायदे मिळू शकतात - उदा० उपाग्रखंडाचा विकास, करूणा आणि मनःशांति इ० ची प्राप्ती तेव्हा राम, ओंकार, मेणबत्तीची ज्योत किंवा कोणतीही "पवित्र" वस्तू किंवा "संवेदना" अशा आध्यात्मिक अनुभूतीसाठी उपयोगी पडू शकते. आपले मन स्थिर राहणे निसर्गाला अभिप्रेत नाही. मन जर स्थिर राहीले तर आजूबाजूच्या परिसरात निर्माण होणारे धोक्यांची जाणीव अमिग्डाला पर्यंत पोचणार नाही आणि त्या जीवाचे अस्तित्व धोक्यात येईल ( वाल्या मुंग्यांच्या वारूळात गाडला गेला तसेच) . शेवटी तारतम्य महत्त्वाचे...

In reply to by युयुत्सु

असेलही , पण मला माहीती नाही !
"राम" ऐवजी कोणत्याही संकल्पनेवर मन एकाग्र करण्याने चेताशास्त्रीय फायदे मिळू शकतात - उदा० उपाग्रखंडाचा विकास, करूणा आणि मनःशांति इ० ची प्राप्ती तेव्हा राम, ओंकार, मेणबत्तीची ज्योत किंवा कोणतीही "पवित्र" वस्तू किंवा "संवेदना" अशा आध्यात्मिक अनुभूतीसाठी उपयोगी पडू शकते.
असुही शकेल , पण मला माहीती नाही. आणि त्या अर्थाचे काही श्लोक , ओव्या अभंग किमान मला तरी माच्या आजवरच्या वाचनात आढळले नाहीत . उलट असलं दुसरं काहीही करु नका ह्या अर्थाचे मात्र बरेच काही आढळले आहे : योगांचेनि बळे । अधिक काही मिळे । ऐसे नाही आगळे | कष्टचि तया ॥ ५९ ॥ म्हणोनि योगाचियां वाटा । जे निगाले गा सुभटा । तयां दुःखाचाचि शेलवांटा । भागा आला ॥ ६९ ॥ न वेचें कदा ग्रंथिचे अर्थ काही । मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ॥ महाघोर संसारशत्रू जिणावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥ नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐसा लाभ बांधा गांठी विठ्ठल पायी मिठी || १ || नामापरते साधन नाही जें तू करिसी आणिक कांही || २ || हाकरोनी सांगे तुका नाम घेता राहो नका || ३ || अन्य उपाय, मार्ग असतीलही , पण मला माहीती नाही . बस इतकेच ! ज्याचा त्याचा मार्ग वेगळा !! माझे वाचन , आकलन, अनुकरण आणि अनुभव मर्यादित आहे हे मान्य करुन थांबतो ! इत्यलम राम

माहितीपूर्ण. आणखी येऊ द्या. नविन ओ.सी.आर(ऑप्टिकल कॅरॅक्टर रिकग्निशन्)मध्येही ह्या पद्धतीचा वापर केला आहे का ? किंवा Long Short-Term Memory (LSTM) ह्या रिकरंट न्युरल नेटवर्कचा वापर केलेला असतो.

Bhakti Mon, 02/10/2025 - 10:54
सहज गुगल केलं...बाकी काही नाही :)
समान इनपुट आणि आउटपुट असलेल्या न्यूरॉनचे एक साधे उदाहरण म्हणजे "ओळख कार्य" करण्यासाठी सेट केलेला एकच न्यूरॉन, जिथे आउटपुट नेहमीच इनपुट मूल्यासारखेच असते ; मूलतः, ते कोणत्याही बदलाशिवाय इनपुट सिग्नलमधून जाते. स्पष्टीकरण: इनपुट: समजा न्यूरॉनला मिळणारे इनपुट हे एकच मूल्य आहे, "x". गणना: न्यूरॉन एक साधी गणना करतो: आउटपुट = x (या प्रकरणात कोणतेही अतिरिक्त वजन किंवा बायस लागू केले जात नाही). आउटपुट: न्यूरॉनचे आउटपुट देखील "x" आहे, म्हणजेच मूल्य अपरिवर्तित राहते. महत्त्वाचे मुद्दे: कोणतेही रूपांतर नाही: हे उदाहरण एक अतिशय मूलभूत कार्य दर्शवते जिथे न्यूरॉन इनपुटवर कोणतेही रूपांतर किंवा गणना लागू करत नाही, ज्यामुळे इनपुट आणि आउटपुट एकसारखे होतात. मर्यादित वापर: हे "ओळख" फंक्शन सोपे असले तरी, न्यूरल नेटवर्क्सच्या बहुतेक व्यावहारिक अनुप्रयोगांमध्ये ते विशेषतः उपयुक्त ठरू शकत नाही, कारण वजन समायोजनाद्वारे इनपुट आणि आउटपुटमधील जटिल संबंध शिकणे हे उद्दिष्ट असते.

In reply to by Bhakti

बहुतेक व्यावहारिक अनुप्रयोगांमध्ये ते विशेषतः उपयुक्त ठरू शकत नाही
एक्झॅक्टली भक्ती ताई ! एक्झॅक्टली ! व्यवहार हा मुळातच प्रवृत्तीप्रधान अर्थात "गोष्टी , धन , पुत्र , कलत्र आदींचा संचय करा " ह्या विचारावर आधारित आहे ! तिथे ह्या सगळ्याचा अल्मोस्ट काहीच उपयोग नाही. सध्या जे विनाकारण अध्यात्माचे पेव फुटले आहे , ते लवकरच नष्ट होणार आहे . कारण लवकरच लोकांचा भ्रमनिरास होणार आहे . लोकांना अध्यात्म म्हणजे काहीतरी जादुची छडी आहे अन तिचा वापर करुन मी प्रपंचात संसारात यशस्वी होईन अशी काहीतरी बाळबोध भोळीभाबडी आशा आहे. ती भंगली त्यांना लवकरच वीट येईल ह्या सगळ्याचा ! एक संपुर्ण प्रापंचिक विषयासक्त माणुस आणि एक जीवनमुक्त पण तरीही कर्मरत गृहस्थाश्रमी माणुस ह्यांच्यात व्यावहारिक दृष्ट्या काहीच फरक नसतो. फरक असतो मनाच्या लेव्हल वर ! राम दास्स त्याच्या एका प्रवचनात अप्रतीम बोलला होता की - "अध्यात्मिक प्रवास म्हणुन तुमचे जे जे काही पुर्वग्रह आहेत की मी असेन करेन मी तसे करेन , मग असे होईल अन तसे होईल , हे सगळं व्यर्थ आहे. रादर ह्या सगळ्याची व्यर्थता लक्षात आल्यावरच तुमचा खरा अध्यात्मिक प्रवास सुरु होईल !" टृंङ्पा रिन्पोचे https://en.wikipedia.org/wiki/Ch%C3%B6gyam_Trungpa नावाचा एक विवादास्पद पण खुप प्रसिध्द असा बुध्दीस्ट स्कॉलर गुरु होऊन गेला तो त्याच्या प्रवचनात एकदा म्हणाला होता -
Enlightenment is the ultimate disappointment of the ego.
तात्पर्य इतकेच की - ह्या सार्‍याचा अध्यात्मिक गोष्टींचा व्यावहारिक असा काही उपयोग नाही हे उघडच आहे ! जे व्यावहारिक उपयोगितेच्या पलीकडचे काही शोधत आहेत , त्यांनाच ह्याचा खरा फायदा होईल ! अर्थात ही बुध्दी देणाराही रामच ! राम

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु Tue, 02/11/2025 - 11:45
Enlightenment ही कल्पना वैज्ञानिक पातळीवर समजाऊन घेता येईल का असे बरेच दिवस मनात घोळत होते. वरील विधानाने याला परत एकदा चालना मिळाली म्हणून ए०आय्०लाच साकडे घातले - प्रश्न० "How the concept of enlightenment can be explained from the perspective of neuroscience?" उत्तर - १. Enlightenment, often described as a profound spiritual awakening or a deep sense of interconnectedness, has been a subject of interest in neuroscience, particularly in the field of neurotheology. Researchers aim to understand the neural correlates of such transformative experiences. Studies involving advanced meditators have utilized neuroimaging techniques to observe brain activity during deep meditative states. Findings suggest that these individuals often exhibit decreased activity in the brain's default mode network (DMN), which is associated with self-referential thoughts and mind-wandering. This reduction in DMN activity correlates with a diminished sense of self, a common characteristic reported during enlightenment experiences. citeturn0search4 Additionally, research indicates that long-term meditation can lead to structural changes in the brain. For instance, increased connectivity between different brain regions has been observed, potentially reflecting enhanced integration during meditative states. These neural adaptations may facilitate the mental states and skills associated with meditation and enlightenment. citeturn0search6 Neuroscientist Dr. Andrew Newberg has extensively studied the relationship between spiritual experiences and brain activity. His work suggests that enlightenment experiences can lead to permanent changes in brain function, particularly in areas related to self-perception and emotion regulation. citeturn0search4 While these findings provide insights into the neural mechanisms underlying enlightenment experiences, it's important to note that the subjective nature of such states presents challenges in scientific study. The field of neurophenomenology attempts to bridge this gap by combining first-person experiential reports with third-person neuroscientific data to gain a more comprehensive understanding. citeturn0search13 In summary, neuroscience approaches enlightenment by examining how certain practices, like meditation, influence brain activity and structure, leading to transformative experiences. Ongoing research continues to explore these complex interactions between the brain and profound states of consciousness. For a more in-depth exploration of this topic, you might find the following discussion by Dr. Andrew Newberg insightful: videoThe Neuroscience of Enlightenment, with Dr. Andrew Newbergturn0search1 २. From a neuroscientific perspective, enlightenment can be viewed as a unique state of consciousness characterized by changes in brain activity, connectivity, and information processing. Here's a simplified explanation: Neural Correlates of Enlightenment 1. Default Mode Network (DMN) deactivation: The DMN, responsible for self-referential thinking, ego-boundaries, and mind-wandering, is often deactivated during enlightenment experiences. This deactivation can lead to a sense of self-transcendence and reduced ego-identification. 2. Increased global neural coherence: Enlightenment experiences often involve a sense of unity, interconnectedness, and holistic awareness. This can be reflected in increased global neural coherence, where different brain regions exhibit synchronized activity, fostering a sense of integration and wholeness. 3. Neuroplasticity and rewiring: Enlightenment experiences can lead to changes in brain structure and function, particularly in regions involved in attention, emotion regulation, and memory. This neuroplasticity can result in a reorganization of neural connections, potentially leading to more adaptive and efficient information processing. Brain Regions Involved 1. Prefrontal cortex (PFC): Involved in attention, emotion regulation, and decision-making. 2. Default mode network (DMN): Involved in self-referential thinking, ego-boundaries, and mind-wandering. 3. Ventral tegmental area (VTA): Involved in reward processing and dopamine release. 4. Nucleus accumbens (NAcc): Involved in reward processing and pleasure. 5. Amygdala: Involved in stress and anxiety processing. 6. Hippocampus: Involved in memory formation and emotion regulation. Neurotransmitters and Hormones 1. Dopamine: Involved in reward processing, pleasure, and motivation. 2. Serotonin: Involved in mood regulation, emotional processing, and social behavior. 3. Endorphins: Involved in pain modulation, stress reduction, and feelings of well-being. 4. Oxytocin: Involved in social bonding, trust, and emotional connection. Theories and Models 1. Integrated Information Theory (IIT): Suggests that consciousness arises from the integrated processing of information within the brain. 2. Global Workspace Theory (GWT): Proposes that consciousness involves the global workspace of the brain, where information from various sensory and cognitive systems is integrated. 3. Neural Darwinism: Suggests that neuronal connections are strengthened or weakened based on experience, leading to changes in brain function and behavior. While neuroscience can provide insights into the neural correlates of enlightenment, it is essential to acknowledge that the experience of enlightenment is complex, multifaceted, and may not be fully captured by neuroscientific explanations.

In reply to by प्रसाद गोडबोले

धर्मराजमुटके Tue, 02/11/2025 - 12:27
रादर ह्या सगळ्याची व्यर्थता लक्षात आल्यावरच तुमचा खरा अध्यात्मिक प्रवास सुरु होईल !"
ह्या लेखाबद्द्ल आणि त्यावर होणार्‍या चर्चेबद्द्ल पण हे वाक्य लागू होईल काय ?

In reply to by धर्मराजमुटके

स्वधर्म Tue, 02/11/2025 - 13:16
तुंम्हाला गट क्र. २ मध्ये टाकण्यात येईल. प्रश्न बाकी एकदम मार्मिक आहे, बघूया काय उत्तर येते.

In reply to by धर्मराजमुटके

ह्या लेखाबद्द्ल आणि त्यावर होणार्‍या चर्चेबद्द्ल पण हे वाक्य लागू होईल काय ?
होय होय . अगदी 100%. पण ते केवळ त्याच लोकांना कळू शकेल जे त्या लेव्हल पर्यंत पोहचले आहेत. समर्थांनी काय लिहून ठेवलं आहे पहा : जाले साधनाचे फळ। संसार जाला सफळ॥ निगुर्ण ब्रह्म ते निश्चळ। अंतरी बिंबले॥ (२०.१०.२६) हिशेब जाला मायेचा। जाला निवाडा तत्त्वांचा॥ साध्य होता साधनाचा। ठाव नाही॥ (२०.१०.२७) साध्य होता साधनांचा ठाव नाही !! मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळल्यावर हा लेख व्यर्थच आहे . त्यानंतर फक्त नामस्मरण करा ! राम राम राम आणि ह्याच्या पुढची अवस्था आहे जिथे हा जप करायचीही आवश्यकता नाही !! ही अवस्था कबीराने त्याच्या दोहा मध्ये उत्तम वर्णन करून ठेवली आहे माला जपूं न कर जपूं और मुख से कहूँ न राम । राम हमारा हमे जपे और हम पायो विश्राम ।। राम

Bhakti Mon, 02/10/2025 - 19:27
Enlightenment is the ultimate disappointment of the ego.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्यानिमित्ताने का होईना पण तुमच्या मनीं राम येत आहे, तुम्ही "हे राम" असे लिहित आहात , ह्यातच ह्या लेखाचे सार्थक झाले ! अजामेळ पापी वदे पुत्रकामे। तया मुक्ति नारायणाचेनि नामें शुकाकारणे कुंटणी राम वाणी। मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं॥९५॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

संत चोखोबा : गणिका अजामेळे काय साधन केलें । नामचि उच्चारिलें स्वभावता ॥१॥ नवले हें पाहा नवल हें पाहा । अनुभवें अनुभवा देहामाजी ॥२॥ उच्चारितां नाम वैकुंठींचें घेणें । ऐसें दुजें पेणें आहे कोठें ॥३॥ ब्रह्महत्या जयासी घडल्या अपार । वाल्हा तो साचार उद्धरिला ॥४॥ उफराटें नाम न येचि मुखासी । मारा मारा ध्यासीं स्मरतां झाला ॥५॥ चोखा म्हणे ऐसा नामाचा महिमा । उद्धारा अधमा स्‍त्री शुद्रा ॥६॥ संत बंका : पांडुरंगावाचोनी दुजा कोण सखा । निर्वाणीचा देखा मायबाप ॥१॥ तारीतासे एका नावासाठी जगा । ऐसा हा पै वा श्रेष्ठाचार ॥२॥ गणिका गजेंद्र यासी उध्दरिलें । प्रत्यक्ष तारिलें अजामेळा ॥३॥ बंका म्हणे ऐसा आहे हा भरवंसा । मज तंव सर्वेशा विठोबाचा ॥४॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

>>>>ह्यानिमित्ताने का होईना पण तुमच्या मनीं राम येत आहे, तुम्ही "हे राम" असे लिहित आहात , ह्यातच ह्या लेखाचे सार्थक झाले ! रामाचं पेटेंट आहे का आपल्याकडे. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कसलं डोंबलाच आलंय पेटंट. =)))) मी म्हणतोय की तुम्ही नामस्मरण करताय हे पाहून मला आनंद होतोय ! तुम्हीच भलता सलता अर्थ काढता तुमच्या पूर्वग्रहदूषित विचारातून. ऐक रे जना । तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा । मनामाजी स्मरावा ॥१॥ मग कैचें रे बंधन । वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण । येचि तीरी सरेल ॥ध्रु.॥ दास्य करील कळिकाळ । बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ । रिद्धीसिद्धी म्हणियाऱ्या ॥२॥ सकळशास्त्रांचें सार । हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार । हाचि करिती पुराणें ॥३॥ ब्राम्हण क्षत्रिय वैश्य । शूद्र चांडाळांहि अधिकार । बाळें नारीनर । आदि करोनि वेश्या ही ॥४॥ तुका म्हणे अनुभवें । आह्मीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें । सुख घेती भाविकें ॥५॥ इथे सर्वांना अधिकार आहे - ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ आणि वेश्याही! कोणाचे कसलेही पेटंट नाही . आनंदाने नामाचा गजर करा ! नामाचा गजर ! गर्जे भीमातीर ! असं नामदेव महाराज ह्यांनी म्हणाले आहे तसे काहीसे होऊ द्या ! त्या तिथे कोनाड्यात लावलेल्या फोटोतल्या ज्ञानोबा तुकोबांनाही आनंदच होईल ! बोला - राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ

गवि Tue, 02/11/2025 - 11:32
अतिशय ओव्हर फिटिंग, निरर्थक वेटेजेस असलेले, निरुपयोगी न्युरल नेटवर्क बनवणे हा उद्देश असल्यास एकच इनपुट ट्रेनिंग डेटा पॉइंट आणि तोच डेटा पॉइंट आऊटपुट लेबल म्हणून देणे हा उत्तम उपाय आहे. अर्थात उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष असते. तुम्हाला तुमच्या न्युरल नेटवर्कचे काय करायचे आहे हा तुमचा तुमचा चॉईस. जाता जाता.. मनुष्याचा मेंदू हा असा सहज सरळ सोपा नाही. न्युरल नेटवर्क हे ओव्हर सिंपलिफिकेशन आहे. साधारण रिकरंट न्युरल नेटवर्क किंवा तत्सम उदाहरण अधिक चपखल ठरेल. काळानुसार राम मध्येही बदल होतील. आधी सूक्ष्म वाटतील. मग variation सापडतील. रामराम अशी जोडी होईल. रा गुरू आणि म लघु असे भेद होतील. अगदी जन्मतः आंधळा मुका बहिरा असला तरी लर्निंग थांबत नाही. म्हणून तर आपण टिकलो आहोत ना. शिवाय जरा थांबल्यास शेवटी ती अवस्था कम्पल्सरी प्राप्त व्हायचीच आहे उसकी घाई कायकू? असेही वाटते. अर्थात वेगळे विचार मांडणारा लेख आवडला हे आहेच.

In reply to by गवि

युयुत्सु Tue, 02/11/2025 - 11:51
अतिशय ओव्हर फिटिंग, निरर्थक वेटेजेस असलेले, निरुपयोगी न्युरल नेटवर्क बनवणे हा उद्देश असल्यास एकच इनपुट ट्रेनिंग डेटा पॉइंट आणि तोच डेटा पॉइंट आऊटपुट लेबल म्हणून देणे हा उत्तम उपाय आहे. अर्थात उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष असते.
ठार मेलो...हसून!

In reply to by गवि

उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष असते.
एक्झॅक्टली गवि सर ! उपयुक्ततेच्या विचाराच्या , स्वार्थाच्या , ह्यात माझा काय फायदा ह्या विचाराच्या पलीकडे जाणे ही सुरुवात आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेन करण्याची. म्हणूनच तर तुम्ही सूक्ष्म आणि चिकित्सक दृष्टीने पाहिले तर तुमच्या हेच लक्षात येईल की ह्या सर्व साधू संतानी अन्नदानाचा उपदेश केला आहे. "ह्यातून माझा काहीही फायदा नाही" हा विचार फाट्यावर मारून अन्नदान करा, सेवा करा ! राम दास ने महाराज जी ना विचारले की मी enlightened कसा होऊ, तर महाराज म्हणाले "लोकांना अन्नदान करून." मग त्याने विचारले - मी कुंडलिनी जागृत कशी करू - त्यावर महाराज म्हणाले - "लोकांची सेवा करून !!" हेच समर्थांनी सांगितलं आहे , नाथांनी सांगितलं आहे, गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं आहे ! ( पण आम्हाला ही अक्कल यायला हिमालयात जावे लागले!) इतकं सोप्प आहे हे ! एकदा उपयुक्ततेच्या विचाराच्या पलीकडं येऊन पहा , इकडं , ह्या बाजूला ! It's really mind boggling beautiful ! राम

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु Tue, 02/11/2025 - 15:33
ह्यात माझा काय फायदा ह्या विचाराच्या पलीकडे जाणे ही सुरुवात आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेन करण्याची.
अशाने देशाचा जीडीपी वाढणार कसा, हे तर उत्पादकता कमी करण्याचे उद्द्योग! फायदा-तोट्याचे गणित मांडल्याशिवाय कोणतेही न्यु०ने० ट्रेन करता येत नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त Tue, 02/11/2025 - 23:28
एकदा उपयुक्ततेच्या विचाराच्या पलीकडं येऊन पहा , इकडं , ह्या बाजूला !
-- बस, एवढेही (किंवा एवढेच) पुरेसे आहे -- आणि ते आभाळाएवढेही आहे. परी मकरंद | सेवावा भ्रमरे | बेडकासी उरे | चिखलचि ||

In reply to by आंद्रे वडापाव

युयुत्सु Tue, 02/11/2025 - 15:51
मालक, ओव्हरफिटींगला काही अपवाद आहेत, त्याबद्दल कुणी बोलत नाही. जनरलायझेशन जेव्हा आवश्यक नसते तेव्हा, नजिकच्या भविष्याकाळासाठी म्ह० शॉर्ट टर्म प्रेडीकशन, एकदाच वापर केला जाणारे मॉडेल, तसेच कॉस्ट ऑफ ट्रेनिंग हा मुद्दा फार मह्त्त्वाचा नसेल तर... लोक आंधळेपणाने "ओव्हरफिटींग-ओव्हरफिटींग" म्हणून गळा काढतात.

In reply to by युयुत्सु

गवि Tue, 02/11/2025 - 18:47
अगदी. ओव्हर फिटींग नेहमी वाईट असे नसते. जर ट्रेनिंग डेटापैकीच सबसेट म्हणजे तोच तोच डेटा परत परत समोर येणार असेल तर क्लासिफिकेशनसाठी उलट ओव्हर फिटिंग एक स्ट्राटेजी म्हणून वापरावी. जिथे मानवी श्रम कमी करायचे आहेत आणि जनरलायझेशन फार मोठे नकोय तिथे.

In reply to by आंद्रे वडापाव

Lol पण टेक्निकली स्पीकिंग, ह्या न्यूरल नेटवर्क मॉडेल ची accuracy अल्मोस्ट 0% आहे कारण ते प्रत्येकालाच राम म्हणत आहे, राम असे प्रेडिक्ट करत आहे . मला आनंद ह्यासाठी आहे की ज्याने हे मॉडेल बनवले त्याने स्वतःच हा स्टँडर्ड सेट केला आहे "मॉडेल व्यवस्थित ट्रेन झाले" असे म्हणायला !! हे पहा - यावन्न पश्येदखिलं मदात्मकं तावन्मदाराधनतत्परो भवेत् । श्रद्धालुरत्यूर्जितभक्तिलक्षणो यस्तस्य दृश्योऽहमहर्निशं हृदि ॥ ५८॥ इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे पञ्चमः सर्गः ॥

कर्नलतपस्वी Tue, 02/11/2025 - 11:57
अध्यात्म व तत्सम जडव्यागळ विषय माझ्या अल्प मतीला समजत नाही. संतांनी प्रापंचिकाना जे मार्गदर्शन केले आहे ते मात्र भावते.पुढे काय होणार हे पण माहित नाही पण नामस्मरणाने प्राप्त परिस्थितीत कठीण काळात आत्मबळ वाढते यावर विश्वास जरूर आहे. यात आत्मबळावर आलेल्या प्रसंगी ठामपणे उभे रहाता येते मग परिणाम काहिही होओ त्याने काही फरक पडत नाही. अर्थात हा माझा अनुभव, मत आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

सुबोध खरे Tue, 02/11/2025 - 19:22
अध्यात्म व तत्सम जडव्यागळ विषय माझ्या अल्प मतीला समजत नाही. बाडीस मी म्हणजे शरद तळवलकर ( काना मात्रा नसलेला सरळ माणूस) . अध्यात्म काय न्यूरल नेटवर्क काय सारखे गहन विषय समजत नाहीत आणि मेंदूला पेलतही नाहीत. अशा विषयाची गहन चर्चा करणार्यांना साष्टांग नमस्कार

आंद्रे वडापाव Tue, 02/11/2025 - 12:04
"इमिटेशन गेम्स" या चित्रपटात ... "हाईल हिटलर" असे केवळ २ शब्दांच्या पोझिशनवर ... संपूर्ण मेसेज डिक्रीप्ट करण्याचे असाध्य काम केले गेले त्याची आठवण आली ... सुंदर लेख ...

मुक्त विहारि Tue, 02/11/2025 - 13:46
हातात हात तरी गवसत आहे असे म्हणता म्हणता परत मनातून काही तरी निसटून जात आहे... गम्य अगम्य.... तुमची विचारसरणी वेगळी आहे... आम्ही आपले, टीचर्स, ओल्ड मंक, जॉनी वॉकर ह्यांच्या साथीने, कधी व्हाईट हॉर्स पकडणार तर कधी किंग फिशर तर कधी गोल्डन ईगल तर कधी ब्लॅक डॉग पकडणार... पसंद अपनी अपनी... खयाल अपना अपना ..

वामन देशमुख Tue, 02/11/2025 - 14:40
नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही। नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं ॥ म्हणे दास विश्वास नामी धरावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७६।। असे सध्या सोप्या शब्दांत विचार मांडणारे तत्व विवेचन आवडले. पहाटे रामनाम स्मरण करणे हा पारंपारिक हिंदू संस्कृतीचा किती अविभाज्य भाग आहे हे "रामप्रहर" या शब्दातून दिसून येते. त्या नामस्मरणातून मिळणारी शक्ती किती अजिंक्य आहे हे "रामबाण" या शब्दातून दिसते! रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे । रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: । रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहम्‌ । रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥ --- अर्थात या (आणि तुमच्या इतरही अश्या) लेखांतील गहन आशय समजण्याइतकी माझी तेवढी अध्यात्मिक उंची नाही तरीही वाचायला आवडते. खवचट प्रतिसादांकडे यथोचित दुर्लक्ष करत लिहीत राहावे.

राघव Wed, 02/12/2025 - 01:31
मायला ह्या ऑरेलियस बाबाच्या... अरं कुठल्या कुठल्या संकल्पना कुठच्या कुठं आणून ताडून पाहत बसतंय..! हे बघ बाबा, तुझं ते जड विज्ञान आणि ते अध्यात्म मला बुवा काही म्हणजे काहीही आकळत नाही. अरे, ज्यानं केवळ जप केला.. कारण न समजता केला.. जपानं नक्की काय फरक पडतो स्थूल/सूक्ष्म शरीरात, ते जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही.. किंबहुना त्याची तेवढी पात्रता, ईच्छा, गरजच नव्हती.. पण भाव मनीचा केवळ एवढाच होता की "ब्वॉ गुरुंनी सांगितलंय, त्यांना आवडतं" म्हणून केला.. तर त्याची आत्मोन्नती होईल की नाही? जर उत्तर हो असेल तर, बाकी सर्व जाऊं देत ना चुलीत..! कशाला ते विज्ञान आणि अध्यात्म वगैरेची सांगड घालण्याचा प्रयत्नही करायला जायचं.. अरे जे मुळातच स्वयंसिद्ध आहे ते उगाच कशाला सिद्ध करायला घ्यायचं? विवेकानंद म्हणतात तसं "माणसाचा तर्क जिथे संपतो, तिथे खरं अध्यात्मिक साधन सुरु होतं". आता आपण आपला तर्क किती वेळ उगाळत बसतो यावर आपलं साधन कधी सुरू होणार ते अवलंबून आहे. ज्याला करायची बुद्धी होईल, त्याचं काम सुरू होईल. बाबा रे, एकदा सांगतो.. बघ पटलं तर.. एखादा आपल्या म्हणण्यानुसार साधनांत लागला तर त्याचं गुरुपण आपल्याकडे येतं. ते घेण्याची पात्रता आपली असते का? कारण त्या पदासोबत येणारी जबाबदारी किती मोठी आहे ते मी तुला सांगण्याची गरज नाही. त्यामुळे माझी तुला मनःपूर्वक विनंती आहे की, तू साधनांत मस्त आहेस.. तेच कर. उगाच या फाफटपसार्‍यात कशाला कुणाला शिकवायच्या, सांगायच्या फंदात पडायचंस. तुझ्या साधनेत ज्यानं आणिक मज़ा येईल अशी संगत बघ! ते जास्त संयुक्तिक ठरेल!

In reply to by राघव

नमस्कार राघव. आपला प्रतिसाद मनापासून आवडला. कोठेतरी लिहिले आहे म्हणून किंवा कोणीतरी सांगतंय म्हणून एखादी गोष्ट मान्य करावी, आचरणात आणावी हे मला कधी जमलेच नाही. प्रत्येक गोष्ट सतसत्विवेक बुद्धीच्या कसोटीवर तावून सुलाखून पाहिल्याशिवाय माझे मन माझी बुद्धी मान्य करायला तयारच होत नाही. कदाचित हे माझे पूर्वजन्मीचे कर्म आहे ! गुरू प्रचिती , ग्रंथ प्रचिती ह्यापेक्षाही आत्मप्रचिती ही कैक पटीने श्रेष्ठ मानतो मी. हां अर्थात ह्या मुळे गोष्टी कळायला वेळ लागतो, कष्ट पडतात , पण जेव्हा कळतं तेव्हा वळतं देखील !! त्यात साधार असे समर्थांचे श्लोक आठवून थोडं हायसे वाटते ! घालोनी अकलेचा पवाड! व्हावे ब्रह्मांडाहोनी जाड ! तेथे कैचे आणिले द्वाड ! करंट पण !! मी आधी म्हणालो तसे हा बुद्धीच्या सामर्थ्यावरील अतोनात विश्वास नसता तर कदाचित हे सारे 30 वर्षांपूर्वी च कळले असते ! नामसाधना विषयी फार पूर्वी पासून माहिती आहे पण त्यातील तर्क माहीत नसल्याने कधी त्या मार्गाला गेलोच नव्हतो, आता कुठं उमजायला लागलं आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेनिंग ! मी लिहितो तेही केवळ माझ्या आकलनातील गॅप्स मला कळाव्यात म्हणून. सर्वावस्थांमध्ये रामाचे स्मरण ठेवणे हीच एक साधना. आता इथे कोणाचा प्रतिसाद पाहून मन उद्विग्न होत असेल तर तिथेच रामाला आणून बसवलं पाहिजे, त्या माणसामध्ये राम पाहता आला पाहिजे, त्याच्या विक्षिप्त वागण्यात, वाकड्या प्रतिसादात, ही रामाची इच्छा असे पाहता आले पाहिजे, रादर हाही राम आहे असे पाहता आला पाहिजे. हीच साधना ! आणि एकदा ही अवस्था प्राप्त झाल्यावर काही लिहूच नये, बोलूच नये असे तरी कुठे ! आता बस आपण आपणच आहे , मग ते ते पुनः पुनः उपभोगू की !! आतां मी तूं या उपाधी । ग्रासूनि भेटी नुसधी । ते भोगिली अनुवादीं । घोळघोळू ॥

प्रचेतस Wed, 02/12/2025 - 19:03
नामस्मरण केव्हा तर सर्व मार्ग खुंटले असता किंवा आयुष्याच्या संध्याकाळी. साक्षात भगवंतच सांख्य, कर्म, ध्यान, ज्ञान, आत्मसंयमाचा उपदेश करून अक्षरब्रह्माचा उपदेश करताना म्हणतो अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् । यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥ यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् । तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥ तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयः ॥ खुद्द तुकोबांनीही केवळ नामस्मरण न करता प्रपंच करून परमार्थ जोडला नामा घेता लाभ कयाचा । नेले बैल बैलाचा ॥ करितो तो न मिळे काही । मग फुकाचे नामा कांही ॥ उभा काठेवरी नाम घेई । पडे पाण्यामधी तरी मरे ॥ तुका म्हणे नेणे वेड । आता कैसा देईल बुड ॥ तर समर्थ इये देशी जनजागृती करत फिरले. नेणे नामस्मरण । म्हणोनी सोडू नये साधन । करिता सकळ कारण । तोचि सिध्द होय ॥ जोडोनिया धनु। धन्य धन्य म्हणो। तयाचे लवलेशु। न लाभे ॥ काय करील नाम । जो न चालवी पाय । सिद्धीचा उपाय । करा जे ॥ म्हणे फुकाचे नाम। हाचि खरा धर्म। अशाने पाविजे ब्रह्म। ते बुडाले॥

In reply to by प्रचेतस

प्रसाद गोडबोले गुरुवार, 02/13/2025 - 09:21
वाह वल्ली सर , मनःपुर्वक धन्यवाद ! ह्यासाठी मला मिसळपाववर यायला, लिहायला आवडतं ! तुमचा प्रतिसाद पाहुन मी माझा लेख परत एकदा वाचला ! मी कुठेच म्हणालेलो नाहीये की हाती असलेले वर्णाश्रम धर्माने नेमुन दिलेले कर्म त्यागुन नामस्मरण करा !! विहित कर्म करत असताना नामस्मरण करा , सर्वांभुती, सर्वावस्थां मध्ये सर्व कर्मात रत असताना नामस्मरण करा , तुमच्या न्युरल नेटवर्क ला सर्वावस्थेत राम पहायला ट्रेन करा असेच मला म्हणायचे आहे ! इये विषयी वामन पंडीतांचा सुश्लोक आहे - अहो येता जाता उठत बसता कार्य करता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळीता । घरी दारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी समस्ताची लज्जा त्यजून भगवत् चिंतन करी ।। तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । भगवंतालाही हेच अभिप्रेत आहे - माझे नाव घेऊन माझे स्मरण करुन युध्द कर ! प्रपंच सोडुन नुस्तं हरि हरि करा असा मी कोठेच म्हणालेलो नाही , तसा कोठे अर्थ निघत असेल तर चुकीचाच आहे. नामस्मरण हे वर्णाश्रम धर्माला ओव्हरराईड करत नाही , उलट सह्हाय्यच करते ! बाकी तुम्ही म्हणालात ह्या "नामस्मरण केव्हा तर सर्व मार्ग खुंटले असता किंवा आयुष्याच्या संध्याकाळी." ह्या विधानाला मला तरी काही आधार सापडाला नाही. तुमच्या पाहण्यात असेल तर जरुर इथे उध्दृत करावा अशी विनंती करतो ! नामस्मरण सर्व मार्गांवर चालत असताना , सर्व कर्मे करत असताना, सर्व उपभोग घेत असताना , आयुष्याच्या पहाट सकाळ माध्यान्ह दुपार अशा सर्व काळी , जेणेकरुन संध्याकाळ होई पर्यंत नाम हीच वृत्ती बनुन गेलेली असेल , अजपाजप झालेली असेल ! तेव्हा, आयुष्याच्या संध्याकाळी काहीच करायची गरज नाही , तेव्हा बस एन्जोय करायचे आहे !
तुका म्हणे आता खेळतो कौतुके । झाळे तुज सुख अंतर्बाही ॥

In reply to by कॉमी

आंद्रे वडापाव Fri, 02/14/2025 - 14:57
पण असे का करायचे? इनपुट हेच आउटपुट देणाऱ्या न्यूरल नेटवर्कचा उपयोग काय?
नाही आजकाल हे असंच असतं. न्यूरल-नेटवर्क वैगरे शब्दांची चलती आहे न मग् बस्स ! पाडला लेख.. आपल्या लेखात ए आय , न्यूरल-नेटवर्क... वैगरे शब्द बरोब्बर ओव्हर फिटिंग करून घुसवले ना कि लगेच अधिनुकता ची अधिनुकता , शिवाय सनातन च सनातनपणा सुद्धा ... तो फिर "न्यूरल-नेटवर्क" कि चमक, सनातन के दाम मिले , तो कोई वो क्यू ले , ये ना ले ! मान गये, लेखककि ओव्हर फिटिंग कि स्किल और सनातन सुपर दोनो को ...

In reply to by आंद्रे वडापाव

ख्या ख्या ख्या. रामा, I won't get caught in this trap anymore. तुला माहिती आहे की वरच काही प्रतिसादात उपयोगिता ह्या विषयावर चर्चा झालीय , उत्तर ही दिलं गेलं आहे. तस्मात् तू माझी परीक्षा पहायचा प्रयत्न केलास तरी मी फसणार नाहीये . ख्या ख्या ख्या. Nkb राम

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी Fri, 02/14/2025 - 19:30
"व्यवहारिक" उपयोग नाही हे तुमचे म्हणणे समजले. पण इतर उपयोग काय आहे? न्यूरल नेटवर्कला "तू युनिकॉर्न आहेस" असे सांगितल्यावर ते पण तेच आउटपुट देईल. पण ते युनिकॉर्न होणार आहे का? फार तर ते स्वतःला पटवेल की ते युनिकॉर्न आहे. मग आपण अमुक काहीतरी आहोत असे स्वतःला पटवून देणे आणि एक फँटसी तयार करणे हा पॉईंट आहे का?

In reply to by कॉमी

आधीच्या लेखनावर एका प्रतिसादात तुम्हाला ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा पहा म्हणालो होतो , पाहिलात का ? ह्या प्रश्नाचं उत्तर हवं असल्यास बारावा अध्याय, विशेष करुन त्यातील उत्तरार्ध अन त्यावरील ज्ञानेश्वर माऊलींचे विवेचन वाचा ! तुम्हाला "उपयोग" काय ते कळेल !

कंजूस Fri, 02/14/2025 - 17:51
लांबच्या रेल्वे प्रवासात आपल्या समोरच्या बाकड्यावर हे लोक बसले असतील तर काय मजा येईल. .. .. गप्पांच्या नादात स्टेशन आले तरी विसरून जाऊ. सर्वांना वडापाव माझ्याकडून.

युयुत्सु Mon, 02/10/2025 - 08:27
न्युरल नेटची अध्यात्माशी सांगड वाचून गंमत वाटली. पण यातला तथ्याचा भाग थोडा वेगळा आहे. "राम" ऐवजी कोणत्याही संकल्पनेवर मन एकाग्र करण्याने चेताशास्त्रीय फायदे मिळू शकतात - उदा० उपाग्रखंडाचा विकास, करूणा आणि मनःशांति इ० ची प्राप्ती तेव्हा राम, ओंकार, मेणबत्तीची ज्योत किंवा कोणतीही "पवित्र" वस्तू किंवा "संवेदना" अशा आध्यात्मिक अनुभूतीसाठी उपयोगी पडू शकते. आपले मन स्थिर राहणे निसर्गाला अभिप्रेत नाही. मन जर स्थिर राहीले तर आजूबाजूच्या परिसरात निर्माण होणारे धोक्यांची जाणीव अमिग्डाला पर्यंत पोचणार नाही आणि त्या जीवाचे अस्तित्व धोक्यात येईल ( वाल्या मुंग्यांच्या वारूळात गाडला गेला तसेच) . शेवटी तारतम्य महत्त्वाचे...

In reply to by युयुत्सु

असेलही , पण मला माहीती नाही !
"राम" ऐवजी कोणत्याही संकल्पनेवर मन एकाग्र करण्याने चेताशास्त्रीय फायदे मिळू शकतात - उदा० उपाग्रखंडाचा विकास, करूणा आणि मनःशांति इ० ची प्राप्ती तेव्हा राम, ओंकार, मेणबत्तीची ज्योत किंवा कोणतीही "पवित्र" वस्तू किंवा "संवेदना" अशा आध्यात्मिक अनुभूतीसाठी उपयोगी पडू शकते.
असुही शकेल , पण मला माहीती नाही. आणि त्या अर्थाचे काही श्लोक , ओव्या अभंग किमान मला तरी माच्या आजवरच्या वाचनात आढळले नाहीत . उलट असलं दुसरं काहीही करु नका ह्या अर्थाचे मात्र बरेच काही आढळले आहे : योगांचेनि बळे । अधिक काही मिळे । ऐसे नाही आगळे | कष्टचि तया ॥ ५९ ॥ म्हणोनि योगाचियां वाटा । जे निगाले गा सुभटा । तयां दुःखाचाचि शेलवांटा । भागा आला ॥ ६९ ॥ न वेचें कदा ग्रंथिचे अर्थ काही । मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ॥ महाघोर संसारशत्रू जिणावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥ नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐसा लाभ बांधा गांठी विठ्ठल पायी मिठी || १ || नामापरते साधन नाही जें तू करिसी आणिक कांही || २ || हाकरोनी सांगे तुका नाम घेता राहो नका || ३ || अन्य उपाय, मार्ग असतीलही , पण मला माहीती नाही . बस इतकेच ! ज्याचा त्याचा मार्ग वेगळा !! माझे वाचन , आकलन, अनुकरण आणि अनुभव मर्यादित आहे हे मान्य करुन थांबतो ! इत्यलम राम

माहितीपूर्ण. आणखी येऊ द्या. नविन ओ.सी.आर(ऑप्टिकल कॅरॅक्टर रिकग्निशन्)मध्येही ह्या पद्धतीचा वापर केला आहे का ? किंवा Long Short-Term Memory (LSTM) ह्या रिकरंट न्युरल नेटवर्कचा वापर केलेला असतो.

Bhakti Mon, 02/10/2025 - 10:54
सहज गुगल केलं...बाकी काही नाही :)
समान इनपुट आणि आउटपुट असलेल्या न्यूरॉनचे एक साधे उदाहरण म्हणजे "ओळख कार्य" करण्यासाठी सेट केलेला एकच न्यूरॉन, जिथे आउटपुट नेहमीच इनपुट मूल्यासारखेच असते ; मूलतः, ते कोणत्याही बदलाशिवाय इनपुट सिग्नलमधून जाते. स्पष्टीकरण: इनपुट: समजा न्यूरॉनला मिळणारे इनपुट हे एकच मूल्य आहे, "x". गणना: न्यूरॉन एक साधी गणना करतो: आउटपुट = x (या प्रकरणात कोणतेही अतिरिक्त वजन किंवा बायस लागू केले जात नाही). आउटपुट: न्यूरॉनचे आउटपुट देखील "x" आहे, म्हणजेच मूल्य अपरिवर्तित राहते. महत्त्वाचे मुद्दे: कोणतेही रूपांतर नाही: हे उदाहरण एक अतिशय मूलभूत कार्य दर्शवते जिथे न्यूरॉन इनपुटवर कोणतेही रूपांतर किंवा गणना लागू करत नाही, ज्यामुळे इनपुट आणि आउटपुट एकसारखे होतात. मर्यादित वापर: हे "ओळख" फंक्शन सोपे असले तरी, न्यूरल नेटवर्क्सच्या बहुतेक व्यावहारिक अनुप्रयोगांमध्ये ते विशेषतः उपयुक्त ठरू शकत नाही, कारण वजन समायोजनाद्वारे इनपुट आणि आउटपुटमधील जटिल संबंध शिकणे हे उद्दिष्ट असते.

In reply to by Bhakti

बहुतेक व्यावहारिक अनुप्रयोगांमध्ये ते विशेषतः उपयुक्त ठरू शकत नाही
एक्झॅक्टली भक्ती ताई ! एक्झॅक्टली ! व्यवहार हा मुळातच प्रवृत्तीप्रधान अर्थात "गोष्टी , धन , पुत्र , कलत्र आदींचा संचय करा " ह्या विचारावर आधारित आहे ! तिथे ह्या सगळ्याचा अल्मोस्ट काहीच उपयोग नाही. सध्या जे विनाकारण अध्यात्माचे पेव फुटले आहे , ते लवकरच नष्ट होणार आहे . कारण लवकरच लोकांचा भ्रमनिरास होणार आहे . लोकांना अध्यात्म म्हणजे काहीतरी जादुची छडी आहे अन तिचा वापर करुन मी प्रपंचात संसारात यशस्वी होईन अशी काहीतरी बाळबोध भोळीभाबडी आशा आहे. ती भंगली त्यांना लवकरच वीट येईल ह्या सगळ्याचा ! एक संपुर्ण प्रापंचिक विषयासक्त माणुस आणि एक जीवनमुक्त पण तरीही कर्मरत गृहस्थाश्रमी माणुस ह्यांच्यात व्यावहारिक दृष्ट्या काहीच फरक नसतो. फरक असतो मनाच्या लेव्हल वर ! राम दास्स त्याच्या एका प्रवचनात अप्रतीम बोलला होता की - "अध्यात्मिक प्रवास म्हणुन तुमचे जे जे काही पुर्वग्रह आहेत की मी असेन करेन मी तसे करेन , मग असे होईल अन तसे होईल , हे सगळं व्यर्थ आहे. रादर ह्या सगळ्याची व्यर्थता लक्षात आल्यावरच तुमचा खरा अध्यात्मिक प्रवास सुरु होईल !" टृंङ्पा रिन्पोचे https://en.wikipedia.org/wiki/Ch%C3%B6gyam_Trungpa नावाचा एक विवादास्पद पण खुप प्रसिध्द असा बुध्दीस्ट स्कॉलर गुरु होऊन गेला तो त्याच्या प्रवचनात एकदा म्हणाला होता -
Enlightenment is the ultimate disappointment of the ego.
तात्पर्य इतकेच की - ह्या सार्‍याचा अध्यात्मिक गोष्टींचा व्यावहारिक असा काही उपयोग नाही हे उघडच आहे ! जे व्यावहारिक उपयोगितेच्या पलीकडचे काही शोधत आहेत , त्यांनाच ह्याचा खरा फायदा होईल ! अर्थात ही बुध्दी देणाराही रामच ! राम

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु Tue, 02/11/2025 - 11:45
Enlightenment ही कल्पना वैज्ञानिक पातळीवर समजाऊन घेता येईल का असे बरेच दिवस मनात घोळत होते. वरील विधानाने याला परत एकदा चालना मिळाली म्हणून ए०आय्०लाच साकडे घातले - प्रश्न० "How the concept of enlightenment can be explained from the perspective of neuroscience?" उत्तर - १. Enlightenment, often described as a profound spiritual awakening or a deep sense of interconnectedness, has been a subject of interest in neuroscience, particularly in the field of neurotheology. Researchers aim to understand the neural correlates of such transformative experiences. Studies involving advanced meditators have utilized neuroimaging techniques to observe brain activity during deep meditative states. Findings suggest that these individuals often exhibit decreased activity in the brain's default mode network (DMN), which is associated with self-referential thoughts and mind-wandering. This reduction in DMN activity correlates with a diminished sense of self, a common characteristic reported during enlightenment experiences. citeturn0search4 Additionally, research indicates that long-term meditation can lead to structural changes in the brain. For instance, increased connectivity between different brain regions has been observed, potentially reflecting enhanced integration during meditative states. These neural adaptations may facilitate the mental states and skills associated with meditation and enlightenment. citeturn0search6 Neuroscientist Dr. Andrew Newberg has extensively studied the relationship between spiritual experiences and brain activity. His work suggests that enlightenment experiences can lead to permanent changes in brain function, particularly in areas related to self-perception and emotion regulation. citeturn0search4 While these findings provide insights into the neural mechanisms underlying enlightenment experiences, it's important to note that the subjective nature of such states presents challenges in scientific study. The field of neurophenomenology attempts to bridge this gap by combining first-person experiential reports with third-person neuroscientific data to gain a more comprehensive understanding. citeturn0search13 In summary, neuroscience approaches enlightenment by examining how certain practices, like meditation, influence brain activity and structure, leading to transformative experiences. Ongoing research continues to explore these complex interactions between the brain and profound states of consciousness. For a more in-depth exploration of this topic, you might find the following discussion by Dr. Andrew Newberg insightful: videoThe Neuroscience of Enlightenment, with Dr. Andrew Newbergturn0search1 २. From a neuroscientific perspective, enlightenment can be viewed as a unique state of consciousness characterized by changes in brain activity, connectivity, and information processing. Here's a simplified explanation: Neural Correlates of Enlightenment 1. Default Mode Network (DMN) deactivation: The DMN, responsible for self-referential thinking, ego-boundaries, and mind-wandering, is often deactivated during enlightenment experiences. This deactivation can lead to a sense of self-transcendence and reduced ego-identification. 2. Increased global neural coherence: Enlightenment experiences often involve a sense of unity, interconnectedness, and holistic awareness. This can be reflected in increased global neural coherence, where different brain regions exhibit synchronized activity, fostering a sense of integration and wholeness. 3. Neuroplasticity and rewiring: Enlightenment experiences can lead to changes in brain structure and function, particularly in regions involved in attention, emotion regulation, and memory. This neuroplasticity can result in a reorganization of neural connections, potentially leading to more adaptive and efficient information processing. Brain Regions Involved 1. Prefrontal cortex (PFC): Involved in attention, emotion regulation, and decision-making. 2. Default mode network (DMN): Involved in self-referential thinking, ego-boundaries, and mind-wandering. 3. Ventral tegmental area (VTA): Involved in reward processing and dopamine release. 4. Nucleus accumbens (NAcc): Involved in reward processing and pleasure. 5. Amygdala: Involved in stress and anxiety processing. 6. Hippocampus: Involved in memory formation and emotion regulation. Neurotransmitters and Hormones 1. Dopamine: Involved in reward processing, pleasure, and motivation. 2. Serotonin: Involved in mood regulation, emotional processing, and social behavior. 3. Endorphins: Involved in pain modulation, stress reduction, and feelings of well-being. 4. Oxytocin: Involved in social bonding, trust, and emotional connection. Theories and Models 1. Integrated Information Theory (IIT): Suggests that consciousness arises from the integrated processing of information within the brain. 2. Global Workspace Theory (GWT): Proposes that consciousness involves the global workspace of the brain, where information from various sensory and cognitive systems is integrated. 3. Neural Darwinism: Suggests that neuronal connections are strengthened or weakened based on experience, leading to changes in brain function and behavior. While neuroscience can provide insights into the neural correlates of enlightenment, it is essential to acknowledge that the experience of enlightenment is complex, multifaceted, and may not be fully captured by neuroscientific explanations.

In reply to by प्रसाद गोडबोले

धर्मराजमुटके Tue, 02/11/2025 - 12:27
रादर ह्या सगळ्याची व्यर्थता लक्षात आल्यावरच तुमचा खरा अध्यात्मिक प्रवास सुरु होईल !"
ह्या लेखाबद्द्ल आणि त्यावर होणार्‍या चर्चेबद्द्ल पण हे वाक्य लागू होईल काय ?

In reply to by धर्मराजमुटके

स्वधर्म Tue, 02/11/2025 - 13:16
तुंम्हाला गट क्र. २ मध्ये टाकण्यात येईल. प्रश्न बाकी एकदम मार्मिक आहे, बघूया काय उत्तर येते.

In reply to by धर्मराजमुटके

ह्या लेखाबद्द्ल आणि त्यावर होणार्‍या चर्चेबद्द्ल पण हे वाक्य लागू होईल काय ?
होय होय . अगदी 100%. पण ते केवळ त्याच लोकांना कळू शकेल जे त्या लेव्हल पर्यंत पोहचले आहेत. समर्थांनी काय लिहून ठेवलं आहे पहा : जाले साधनाचे फळ। संसार जाला सफळ॥ निगुर्ण ब्रह्म ते निश्चळ। अंतरी बिंबले॥ (२०.१०.२६) हिशेब जाला मायेचा। जाला निवाडा तत्त्वांचा॥ साध्य होता साधनाचा। ठाव नाही॥ (२०.१०.२७) साध्य होता साधनांचा ठाव नाही !! मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळल्यावर हा लेख व्यर्थच आहे . त्यानंतर फक्त नामस्मरण करा ! राम राम राम आणि ह्याच्या पुढची अवस्था आहे जिथे हा जप करायचीही आवश्यकता नाही !! ही अवस्था कबीराने त्याच्या दोहा मध्ये उत्तम वर्णन करून ठेवली आहे माला जपूं न कर जपूं और मुख से कहूँ न राम । राम हमारा हमे जपे और हम पायो विश्राम ।। राम

Bhakti Mon, 02/10/2025 - 19:27
Enlightenment is the ultimate disappointment of the ego.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्यानिमित्ताने का होईना पण तुमच्या मनीं राम येत आहे, तुम्ही "हे राम" असे लिहित आहात , ह्यातच ह्या लेखाचे सार्थक झाले ! अजामेळ पापी वदे पुत्रकामे। तया मुक्ति नारायणाचेनि नामें शुकाकारणे कुंटणी राम वाणी। मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं॥९५॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

संत चोखोबा : गणिका अजामेळे काय साधन केलें । नामचि उच्चारिलें स्वभावता ॥१॥ नवले हें पाहा नवल हें पाहा । अनुभवें अनुभवा देहामाजी ॥२॥ उच्चारितां नाम वैकुंठींचें घेणें । ऐसें दुजें पेणें आहे कोठें ॥३॥ ब्रह्महत्या जयासी घडल्या अपार । वाल्हा तो साचार उद्धरिला ॥४॥ उफराटें नाम न येचि मुखासी । मारा मारा ध्यासीं स्मरतां झाला ॥५॥ चोखा म्हणे ऐसा नामाचा महिमा । उद्धारा अधमा स्‍त्री शुद्रा ॥६॥ संत बंका : पांडुरंगावाचोनी दुजा कोण सखा । निर्वाणीचा देखा मायबाप ॥१॥ तारीतासे एका नावासाठी जगा । ऐसा हा पै वा श्रेष्ठाचार ॥२॥ गणिका गजेंद्र यासी उध्दरिलें । प्रत्यक्ष तारिलें अजामेळा ॥३॥ बंका म्हणे ऐसा आहे हा भरवंसा । मज तंव सर्वेशा विठोबाचा ॥४॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

>>>>ह्यानिमित्ताने का होईना पण तुमच्या मनीं राम येत आहे, तुम्ही "हे राम" असे लिहित आहात , ह्यातच ह्या लेखाचे सार्थक झाले ! रामाचं पेटेंट आहे का आपल्याकडे. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कसलं डोंबलाच आलंय पेटंट. =)))) मी म्हणतोय की तुम्ही नामस्मरण करताय हे पाहून मला आनंद होतोय ! तुम्हीच भलता सलता अर्थ काढता तुमच्या पूर्वग्रहदूषित विचारातून. ऐक रे जना । तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा । मनामाजी स्मरावा ॥१॥ मग कैचें रे बंधन । वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण । येचि तीरी सरेल ॥ध्रु.॥ दास्य करील कळिकाळ । बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ । रिद्धीसिद्धी म्हणियाऱ्या ॥२॥ सकळशास्त्रांचें सार । हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार । हाचि करिती पुराणें ॥३॥ ब्राम्हण क्षत्रिय वैश्य । शूद्र चांडाळांहि अधिकार । बाळें नारीनर । आदि करोनि वेश्या ही ॥४॥ तुका म्हणे अनुभवें । आह्मीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें । सुख घेती भाविकें ॥५॥ इथे सर्वांना अधिकार आहे - ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ आणि वेश्याही! कोणाचे कसलेही पेटंट नाही . आनंदाने नामाचा गजर करा ! नामाचा गजर ! गर्जे भीमातीर ! असं नामदेव महाराज ह्यांनी म्हणाले आहे तसे काहीसे होऊ द्या ! त्या तिथे कोनाड्यात लावलेल्या फोटोतल्या ज्ञानोबा तुकोबांनाही आनंदच होईल ! बोला - राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ

गवि Tue, 02/11/2025 - 11:32
अतिशय ओव्हर फिटिंग, निरर्थक वेटेजेस असलेले, निरुपयोगी न्युरल नेटवर्क बनवणे हा उद्देश असल्यास एकच इनपुट ट्रेनिंग डेटा पॉइंट आणि तोच डेटा पॉइंट आऊटपुट लेबल म्हणून देणे हा उत्तम उपाय आहे. अर्थात उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष असते. तुम्हाला तुमच्या न्युरल नेटवर्कचे काय करायचे आहे हा तुमचा तुमचा चॉईस. जाता जाता.. मनुष्याचा मेंदू हा असा सहज सरळ सोपा नाही. न्युरल नेटवर्क हे ओव्हर सिंपलिफिकेशन आहे. साधारण रिकरंट न्युरल नेटवर्क किंवा तत्सम उदाहरण अधिक चपखल ठरेल. काळानुसार राम मध्येही बदल होतील. आधी सूक्ष्म वाटतील. मग variation सापडतील. रामराम अशी जोडी होईल. रा गुरू आणि म लघु असे भेद होतील. अगदी जन्मतः आंधळा मुका बहिरा असला तरी लर्निंग थांबत नाही. म्हणून तर आपण टिकलो आहोत ना. शिवाय जरा थांबल्यास शेवटी ती अवस्था कम्पल्सरी प्राप्त व्हायचीच आहे उसकी घाई कायकू? असेही वाटते. अर्थात वेगळे विचार मांडणारा लेख आवडला हे आहेच.

In reply to by गवि

युयुत्सु Tue, 02/11/2025 - 11:51
अतिशय ओव्हर फिटिंग, निरर्थक वेटेजेस असलेले, निरुपयोगी न्युरल नेटवर्क बनवणे हा उद्देश असल्यास एकच इनपुट ट्रेनिंग डेटा पॉइंट आणि तोच डेटा पॉइंट आऊटपुट लेबल म्हणून देणे हा उत्तम उपाय आहे. अर्थात उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष असते.
ठार मेलो...हसून!

In reply to by गवि

उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष असते.
एक्झॅक्टली गवि सर ! उपयुक्ततेच्या विचाराच्या , स्वार्थाच्या , ह्यात माझा काय फायदा ह्या विचाराच्या पलीकडे जाणे ही सुरुवात आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेन करण्याची. म्हणूनच तर तुम्ही सूक्ष्म आणि चिकित्सक दृष्टीने पाहिले तर तुमच्या हेच लक्षात येईल की ह्या सर्व साधू संतानी अन्नदानाचा उपदेश केला आहे. "ह्यातून माझा काहीही फायदा नाही" हा विचार फाट्यावर मारून अन्नदान करा, सेवा करा ! राम दास ने महाराज जी ना विचारले की मी enlightened कसा होऊ, तर महाराज म्हणाले "लोकांना अन्नदान करून." मग त्याने विचारले - मी कुंडलिनी जागृत कशी करू - त्यावर महाराज म्हणाले - "लोकांची सेवा करून !!" हेच समर्थांनी सांगितलं आहे , नाथांनी सांगितलं आहे, गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं आहे ! ( पण आम्हाला ही अक्कल यायला हिमालयात जावे लागले!) इतकं सोप्प आहे हे ! एकदा उपयुक्ततेच्या विचाराच्या पलीकडं येऊन पहा , इकडं , ह्या बाजूला ! It's really mind boggling beautiful ! राम

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु Tue, 02/11/2025 - 15:33
ह्यात माझा काय फायदा ह्या विचाराच्या पलीकडे जाणे ही सुरुवात आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेन करण्याची.
अशाने देशाचा जीडीपी वाढणार कसा, हे तर उत्पादकता कमी करण्याचे उद्द्योग! फायदा-तोट्याचे गणित मांडल्याशिवाय कोणतेही न्यु०ने० ट्रेन करता येत नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त Tue, 02/11/2025 - 23:28
एकदा उपयुक्ततेच्या विचाराच्या पलीकडं येऊन पहा , इकडं , ह्या बाजूला !
-- बस, एवढेही (किंवा एवढेच) पुरेसे आहे -- आणि ते आभाळाएवढेही आहे. परी मकरंद | सेवावा भ्रमरे | बेडकासी उरे | चिखलचि ||

In reply to by आंद्रे वडापाव

युयुत्सु Tue, 02/11/2025 - 15:51
मालक, ओव्हरफिटींगला काही अपवाद आहेत, त्याबद्दल कुणी बोलत नाही. जनरलायझेशन जेव्हा आवश्यक नसते तेव्हा, नजिकच्या भविष्याकाळासाठी म्ह० शॉर्ट टर्म प्रेडीकशन, एकदाच वापर केला जाणारे मॉडेल, तसेच कॉस्ट ऑफ ट्रेनिंग हा मुद्दा फार मह्त्त्वाचा नसेल तर... लोक आंधळेपणाने "ओव्हरफिटींग-ओव्हरफिटींग" म्हणून गळा काढतात.

In reply to by युयुत्सु

गवि Tue, 02/11/2025 - 18:47
अगदी. ओव्हर फिटींग नेहमी वाईट असे नसते. जर ट्रेनिंग डेटापैकीच सबसेट म्हणजे तोच तोच डेटा परत परत समोर येणार असेल तर क्लासिफिकेशनसाठी उलट ओव्हर फिटिंग एक स्ट्राटेजी म्हणून वापरावी. जिथे मानवी श्रम कमी करायचे आहेत आणि जनरलायझेशन फार मोठे नकोय तिथे.

In reply to by आंद्रे वडापाव

Lol पण टेक्निकली स्पीकिंग, ह्या न्यूरल नेटवर्क मॉडेल ची accuracy अल्मोस्ट 0% आहे कारण ते प्रत्येकालाच राम म्हणत आहे, राम असे प्रेडिक्ट करत आहे . मला आनंद ह्यासाठी आहे की ज्याने हे मॉडेल बनवले त्याने स्वतःच हा स्टँडर्ड सेट केला आहे "मॉडेल व्यवस्थित ट्रेन झाले" असे म्हणायला !! हे पहा - यावन्न पश्येदखिलं मदात्मकं तावन्मदाराधनतत्परो भवेत् । श्रद्धालुरत्यूर्जितभक्तिलक्षणो यस्तस्य दृश्योऽहमहर्निशं हृदि ॥ ५८॥ इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे पञ्चमः सर्गः ॥

कर्नलतपस्वी Tue, 02/11/2025 - 11:57
अध्यात्म व तत्सम जडव्यागळ विषय माझ्या अल्प मतीला समजत नाही. संतांनी प्रापंचिकाना जे मार्गदर्शन केले आहे ते मात्र भावते.पुढे काय होणार हे पण माहित नाही पण नामस्मरणाने प्राप्त परिस्थितीत कठीण काळात आत्मबळ वाढते यावर विश्वास जरूर आहे. यात आत्मबळावर आलेल्या प्रसंगी ठामपणे उभे रहाता येते मग परिणाम काहिही होओ त्याने काही फरक पडत नाही. अर्थात हा माझा अनुभव, मत आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

सुबोध खरे Tue, 02/11/2025 - 19:22
अध्यात्म व तत्सम जडव्यागळ विषय माझ्या अल्प मतीला समजत नाही. बाडीस मी म्हणजे शरद तळवलकर ( काना मात्रा नसलेला सरळ माणूस) . अध्यात्म काय न्यूरल नेटवर्क काय सारखे गहन विषय समजत नाहीत आणि मेंदूला पेलतही नाहीत. अशा विषयाची गहन चर्चा करणार्यांना साष्टांग नमस्कार

आंद्रे वडापाव Tue, 02/11/2025 - 12:04
"इमिटेशन गेम्स" या चित्रपटात ... "हाईल हिटलर" असे केवळ २ शब्दांच्या पोझिशनवर ... संपूर्ण मेसेज डिक्रीप्ट करण्याचे असाध्य काम केले गेले त्याची आठवण आली ... सुंदर लेख ...

मुक्त विहारि Tue, 02/11/2025 - 13:46
हातात हात तरी गवसत आहे असे म्हणता म्हणता परत मनातून काही तरी निसटून जात आहे... गम्य अगम्य.... तुमची विचारसरणी वेगळी आहे... आम्ही आपले, टीचर्स, ओल्ड मंक, जॉनी वॉकर ह्यांच्या साथीने, कधी व्हाईट हॉर्स पकडणार तर कधी किंग फिशर तर कधी गोल्डन ईगल तर कधी ब्लॅक डॉग पकडणार... पसंद अपनी अपनी... खयाल अपना अपना ..

वामन देशमुख Tue, 02/11/2025 - 14:40
नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही। नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं ॥ म्हणे दास विश्वास नामी धरावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७६।। असे सध्या सोप्या शब्दांत विचार मांडणारे तत्व विवेचन आवडले. पहाटे रामनाम स्मरण करणे हा पारंपारिक हिंदू संस्कृतीचा किती अविभाज्य भाग आहे हे "रामप्रहर" या शब्दातून दिसून येते. त्या नामस्मरणातून मिळणारी शक्ती किती अजिंक्य आहे हे "रामबाण" या शब्दातून दिसते! रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे । रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: । रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहम्‌ । रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥ --- अर्थात या (आणि तुमच्या इतरही अश्या) लेखांतील गहन आशय समजण्याइतकी माझी तेवढी अध्यात्मिक उंची नाही तरीही वाचायला आवडते. खवचट प्रतिसादांकडे यथोचित दुर्लक्ष करत लिहीत राहावे.

राघव Wed, 02/12/2025 - 01:31
मायला ह्या ऑरेलियस बाबाच्या... अरं कुठल्या कुठल्या संकल्पना कुठच्या कुठं आणून ताडून पाहत बसतंय..! हे बघ बाबा, तुझं ते जड विज्ञान आणि ते अध्यात्म मला बुवा काही म्हणजे काहीही आकळत नाही. अरे, ज्यानं केवळ जप केला.. कारण न समजता केला.. जपानं नक्की काय फरक पडतो स्थूल/सूक्ष्म शरीरात, ते जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही.. किंबहुना त्याची तेवढी पात्रता, ईच्छा, गरजच नव्हती.. पण भाव मनीचा केवळ एवढाच होता की "ब्वॉ गुरुंनी सांगितलंय, त्यांना आवडतं" म्हणून केला.. तर त्याची आत्मोन्नती होईल की नाही? जर उत्तर हो असेल तर, बाकी सर्व जाऊं देत ना चुलीत..! कशाला ते विज्ञान आणि अध्यात्म वगैरेची सांगड घालण्याचा प्रयत्नही करायला जायचं.. अरे जे मुळातच स्वयंसिद्ध आहे ते उगाच कशाला सिद्ध करायला घ्यायचं? विवेकानंद म्हणतात तसं "माणसाचा तर्क जिथे संपतो, तिथे खरं अध्यात्मिक साधन सुरु होतं". आता आपण आपला तर्क किती वेळ उगाळत बसतो यावर आपलं साधन कधी सुरू होणार ते अवलंबून आहे. ज्याला करायची बुद्धी होईल, त्याचं काम सुरू होईल. बाबा रे, एकदा सांगतो.. बघ पटलं तर.. एखादा आपल्या म्हणण्यानुसार साधनांत लागला तर त्याचं गुरुपण आपल्याकडे येतं. ते घेण्याची पात्रता आपली असते का? कारण त्या पदासोबत येणारी जबाबदारी किती मोठी आहे ते मी तुला सांगण्याची गरज नाही. त्यामुळे माझी तुला मनःपूर्वक विनंती आहे की, तू साधनांत मस्त आहेस.. तेच कर. उगाच या फाफटपसार्‍यात कशाला कुणाला शिकवायच्या, सांगायच्या फंदात पडायचंस. तुझ्या साधनेत ज्यानं आणिक मज़ा येईल अशी संगत बघ! ते जास्त संयुक्तिक ठरेल!

In reply to by राघव

नमस्कार राघव. आपला प्रतिसाद मनापासून आवडला. कोठेतरी लिहिले आहे म्हणून किंवा कोणीतरी सांगतंय म्हणून एखादी गोष्ट मान्य करावी, आचरणात आणावी हे मला कधी जमलेच नाही. प्रत्येक गोष्ट सतसत्विवेक बुद्धीच्या कसोटीवर तावून सुलाखून पाहिल्याशिवाय माझे मन माझी बुद्धी मान्य करायला तयारच होत नाही. कदाचित हे माझे पूर्वजन्मीचे कर्म आहे ! गुरू प्रचिती , ग्रंथ प्रचिती ह्यापेक्षाही आत्मप्रचिती ही कैक पटीने श्रेष्ठ मानतो मी. हां अर्थात ह्या मुळे गोष्टी कळायला वेळ लागतो, कष्ट पडतात , पण जेव्हा कळतं तेव्हा वळतं देखील !! त्यात साधार असे समर्थांचे श्लोक आठवून थोडं हायसे वाटते ! घालोनी अकलेचा पवाड! व्हावे ब्रह्मांडाहोनी जाड ! तेथे कैचे आणिले द्वाड ! करंट पण !! मी आधी म्हणालो तसे हा बुद्धीच्या सामर्थ्यावरील अतोनात विश्वास नसता तर कदाचित हे सारे 30 वर्षांपूर्वी च कळले असते ! नामसाधना विषयी फार पूर्वी पासून माहिती आहे पण त्यातील तर्क माहीत नसल्याने कधी त्या मार्गाला गेलोच नव्हतो, आता कुठं उमजायला लागलं आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेनिंग ! मी लिहितो तेही केवळ माझ्या आकलनातील गॅप्स मला कळाव्यात म्हणून. सर्वावस्थांमध्ये रामाचे स्मरण ठेवणे हीच एक साधना. आता इथे कोणाचा प्रतिसाद पाहून मन उद्विग्न होत असेल तर तिथेच रामाला आणून बसवलं पाहिजे, त्या माणसामध्ये राम पाहता आला पाहिजे, त्याच्या विक्षिप्त वागण्यात, वाकड्या प्रतिसादात, ही रामाची इच्छा असे पाहता आले पाहिजे, रादर हाही राम आहे असे पाहता आला पाहिजे. हीच साधना ! आणि एकदा ही अवस्था प्राप्त झाल्यावर काही लिहूच नये, बोलूच नये असे तरी कुठे ! आता बस आपण आपणच आहे , मग ते ते पुनः पुनः उपभोगू की !! आतां मी तूं या उपाधी । ग्रासूनि भेटी नुसधी । ते भोगिली अनुवादीं । घोळघोळू ॥

प्रचेतस Wed, 02/12/2025 - 19:03
नामस्मरण केव्हा तर सर्व मार्ग खुंटले असता किंवा आयुष्याच्या संध्याकाळी. साक्षात भगवंतच सांख्य, कर्म, ध्यान, ज्ञान, आत्मसंयमाचा उपदेश करून अक्षरब्रह्माचा उपदेश करताना म्हणतो अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् । यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥ यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् । तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥ तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयः ॥ खुद्द तुकोबांनीही केवळ नामस्मरण न करता प्रपंच करून परमार्थ जोडला नामा घेता लाभ कयाचा । नेले बैल बैलाचा ॥ करितो तो न मिळे काही । मग फुकाचे नामा कांही ॥ उभा काठेवरी नाम घेई । पडे पाण्यामधी तरी मरे ॥ तुका म्हणे नेणे वेड । आता कैसा देईल बुड ॥ तर समर्थ इये देशी जनजागृती करत फिरले. नेणे नामस्मरण । म्हणोनी सोडू नये साधन । करिता सकळ कारण । तोचि सिध्द होय ॥ जोडोनिया धनु। धन्य धन्य म्हणो। तयाचे लवलेशु। न लाभे ॥ काय करील नाम । जो न चालवी पाय । सिद्धीचा उपाय । करा जे ॥ म्हणे फुकाचे नाम। हाचि खरा धर्म। अशाने पाविजे ब्रह्म। ते बुडाले॥

In reply to by प्रचेतस

प्रसाद गोडबोले गुरुवार, 02/13/2025 - 09:21
वाह वल्ली सर , मनःपुर्वक धन्यवाद ! ह्यासाठी मला मिसळपाववर यायला, लिहायला आवडतं ! तुमचा प्रतिसाद पाहुन मी माझा लेख परत एकदा वाचला ! मी कुठेच म्हणालेलो नाहीये की हाती असलेले वर्णाश्रम धर्माने नेमुन दिलेले कर्म त्यागुन नामस्मरण करा !! विहित कर्म करत असताना नामस्मरण करा , सर्वांभुती, सर्वावस्थां मध्ये सर्व कर्मात रत असताना नामस्मरण करा , तुमच्या न्युरल नेटवर्क ला सर्वावस्थेत राम पहायला ट्रेन करा असेच मला म्हणायचे आहे ! इये विषयी वामन पंडीतांचा सुश्लोक आहे - अहो येता जाता उठत बसता कार्य करता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळीता । घरी दारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी समस्ताची लज्जा त्यजून भगवत् चिंतन करी ।। तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । भगवंतालाही हेच अभिप्रेत आहे - माझे नाव घेऊन माझे स्मरण करुन युध्द कर ! प्रपंच सोडुन नुस्तं हरि हरि करा असा मी कोठेच म्हणालेलो नाही , तसा कोठे अर्थ निघत असेल तर चुकीचाच आहे. नामस्मरण हे वर्णाश्रम धर्माला ओव्हरराईड करत नाही , उलट सह्हाय्यच करते ! बाकी तुम्ही म्हणालात ह्या "नामस्मरण केव्हा तर सर्व मार्ग खुंटले असता किंवा आयुष्याच्या संध्याकाळी." ह्या विधानाला मला तरी काही आधार सापडाला नाही. तुमच्या पाहण्यात असेल तर जरुर इथे उध्दृत करावा अशी विनंती करतो ! नामस्मरण सर्व मार्गांवर चालत असताना , सर्व कर्मे करत असताना, सर्व उपभोग घेत असताना , आयुष्याच्या पहाट सकाळ माध्यान्ह दुपार अशा सर्व काळी , जेणेकरुन संध्याकाळ होई पर्यंत नाम हीच वृत्ती बनुन गेलेली असेल , अजपाजप झालेली असेल ! तेव्हा, आयुष्याच्या संध्याकाळी काहीच करायची गरज नाही , तेव्हा बस एन्जोय करायचे आहे !
तुका म्हणे आता खेळतो कौतुके । झाळे तुज सुख अंतर्बाही ॥

In reply to by कॉमी

आंद्रे वडापाव Fri, 02/14/2025 - 14:57
पण असे का करायचे? इनपुट हेच आउटपुट देणाऱ्या न्यूरल नेटवर्कचा उपयोग काय?
नाही आजकाल हे असंच असतं. न्यूरल-नेटवर्क वैगरे शब्दांची चलती आहे न मग् बस्स ! पाडला लेख.. आपल्या लेखात ए आय , न्यूरल-नेटवर्क... वैगरे शब्द बरोब्बर ओव्हर फिटिंग करून घुसवले ना कि लगेच अधिनुकता ची अधिनुकता , शिवाय सनातन च सनातनपणा सुद्धा ... तो फिर "न्यूरल-नेटवर्क" कि चमक, सनातन के दाम मिले , तो कोई वो क्यू ले , ये ना ले ! मान गये, लेखककि ओव्हर फिटिंग कि स्किल और सनातन सुपर दोनो को ...

In reply to by आंद्रे वडापाव

ख्या ख्या ख्या. रामा, I won't get caught in this trap anymore. तुला माहिती आहे की वरच काही प्रतिसादात उपयोगिता ह्या विषयावर चर्चा झालीय , उत्तर ही दिलं गेलं आहे. तस्मात् तू माझी परीक्षा पहायचा प्रयत्न केलास तरी मी फसणार नाहीये . ख्या ख्या ख्या. Nkb राम

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी Fri, 02/14/2025 - 19:30
"व्यवहारिक" उपयोग नाही हे तुमचे म्हणणे समजले. पण इतर उपयोग काय आहे? न्यूरल नेटवर्कला "तू युनिकॉर्न आहेस" असे सांगितल्यावर ते पण तेच आउटपुट देईल. पण ते युनिकॉर्न होणार आहे का? फार तर ते स्वतःला पटवेल की ते युनिकॉर्न आहे. मग आपण अमुक काहीतरी आहोत असे स्वतःला पटवून देणे आणि एक फँटसी तयार करणे हा पॉईंट आहे का?

In reply to by कॉमी

आधीच्या लेखनावर एका प्रतिसादात तुम्हाला ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा पहा म्हणालो होतो , पाहिलात का ? ह्या प्रश्नाचं उत्तर हवं असल्यास बारावा अध्याय, विशेष करुन त्यातील उत्तरार्ध अन त्यावरील ज्ञानेश्वर माऊलींचे विवेचन वाचा ! तुम्हाला "उपयोग" काय ते कळेल !

कंजूस Fri, 02/14/2025 - 17:51
लांबच्या रेल्वे प्रवासात आपल्या समोरच्या बाकड्यावर हे लोक बसले असतील तर काय मजा येईल. .. .. गप्पांच्या नादात स्टेशन आले तरी विसरून जाऊ. सर्वांना वडापाव माझ्याकडून.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"तुम्हाला आर्टिफिशियल न्युरल नेटवर्क्स विषयी माहीत आहे का पंत ?" "माहीती आहे पण खुप डिटेल्स्ड असं नाही" "बेसिक कन्सेप्ट्स माहीत आहेत ना , हां तेवढं पुरेसे आहे , हा एक इन्टरेस्टिंग प्रश्न ऐका :"
समजा एखाद्या न्युरल नेटवर्कला वेगवेगळा डेटा न देता , केवळ एकच डेटा पॉईंट वारंवार दिला , तर ते न्युरल नेटवर्क काय लर्न करेल ?

प्रभास पाटण अर्थात सोरटी सोमनाथ महत्व

kool.amol ·

चित्रगुप्त Mon, 02/10/2025 - 04:15
पुढील भाग लवकरच प्रसिद्ध करा आणि तुम्ही काढलेल्या फोटोंबरोबरच त्यात भरपूर जुनी चित्रे/फोटो येऊ द्यात. उदाहरणार्थ भारतीय लघुचित्र शैलीतली चित्रे, इंग्रज प्रवासी चित्रकारांनी रंगवलेली आणि इंग्लंडात प्रकाशित केलेली छापाचित्रे, पुरातत्व विभागाने केलेले संशोधन आणि नकाशे, तत्संबंधी पोस्टाची तिकीटे आणि अन्य प्रकारची चित्रे. . .

In reply to by चित्रगुप्त

kool.amol Mon, 02/10/2025 - 08:45
हे आवडलं, छान कल्पना आहे! वरील फोटोसाठी धन्यवाद. मी नक्की टाकेन लेखामध्ये जे जे उपलब्ध होईल

In reply to by प्रचेतस

kool.amol Mon, 02/10/2025 - 08:47
धन्यवाद! आधी पौराणिक मग ऐतिहासिक ते सुद्धा क्रमवार आणि मग सध्या जे मंदिर आहे त्याची निर्मिती असा काहीसा क्रम डोक्यात आहे.

विजुभाऊ Tue, 02/11/2025 - 10:29
कंदहार, गझनी पासून थेट सोमनाथ पर्यंत आक्रमक आले. त्याना येताना आणि परत जातानाही मधे कोणीच कसा विरोध केला नाही याचे नवल वाटते? भारतीय समाज इतका कसा काय थिजलेला होता? पृथ्वीराज चौहानाने महंमद घोरीला सोडून दिल्यानंतरही तो इतक्या वेळेस परत आक्रमण करू शकला हे कसे शक्य आहे? तात्कालीन समाज आणि राज्ये अशी कशी होती की आक्रमकांना कुठेच रोखत नव्हती?

In reply to by विजुभाऊ

मुक्त विहारि Tue, 02/11/2025 - 13:24
संभल , हे त्याचे उत्तम उदाहरण.... एका तीर्थस्थानचे , पाकधार्जिण्या स्थानात, कसे रुपांतर झाले, हा इतिहास नाकारता येत नाही. हिंदू कधीच एकत्र येत नाहीत.

In reply to by विजुभाऊ

kool.amol Tue, 02/11/2025 - 23:25
मुळात असं नाहीय, गजनीच्या हल्ल्यावेळी आणि नंतर काय झाले ह्यावर एक भाग लिहिणार आहे. वाचायच्या आधी मलाही असंच वाटायचं.

चित्रगुप्त Mon, 02/10/2025 - 04:15
पुढील भाग लवकरच प्रसिद्ध करा आणि तुम्ही काढलेल्या फोटोंबरोबरच त्यात भरपूर जुनी चित्रे/फोटो येऊ द्यात. उदाहरणार्थ भारतीय लघुचित्र शैलीतली चित्रे, इंग्रज प्रवासी चित्रकारांनी रंगवलेली आणि इंग्लंडात प्रकाशित केलेली छापाचित्रे, पुरातत्व विभागाने केलेले संशोधन आणि नकाशे, तत्संबंधी पोस्टाची तिकीटे आणि अन्य प्रकारची चित्रे. . .

In reply to by चित्रगुप्त

kool.amol Mon, 02/10/2025 - 08:45
हे आवडलं, छान कल्पना आहे! वरील फोटोसाठी धन्यवाद. मी नक्की टाकेन लेखामध्ये जे जे उपलब्ध होईल

In reply to by प्रचेतस

kool.amol Mon, 02/10/2025 - 08:47
धन्यवाद! आधी पौराणिक मग ऐतिहासिक ते सुद्धा क्रमवार आणि मग सध्या जे मंदिर आहे त्याची निर्मिती असा काहीसा क्रम डोक्यात आहे.

विजुभाऊ Tue, 02/11/2025 - 10:29
कंदहार, गझनी पासून थेट सोमनाथ पर्यंत आक्रमक आले. त्याना येताना आणि परत जातानाही मधे कोणीच कसा विरोध केला नाही याचे नवल वाटते? भारतीय समाज इतका कसा काय थिजलेला होता? पृथ्वीराज चौहानाने महंमद घोरीला सोडून दिल्यानंतरही तो इतक्या वेळेस परत आक्रमण करू शकला हे कसे शक्य आहे? तात्कालीन समाज आणि राज्ये अशी कशी होती की आक्रमकांना कुठेच रोखत नव्हती?

In reply to by विजुभाऊ

मुक्त विहारि Tue, 02/11/2025 - 13:24
संभल , हे त्याचे उत्तम उदाहरण.... एका तीर्थस्थानचे , पाकधार्जिण्या स्थानात, कसे रुपांतर झाले, हा इतिहास नाकारता येत नाही. हिंदू कधीच एकत्र येत नाहीत.

In reply to by विजुभाऊ

kool.amol Tue, 02/11/2025 - 23:25
मुळात असं नाहीय, गजनीच्या हल्ल्यावेळी आणि नंतर काय झाले ह्यावर एक भाग लिहिणार आहे. वाचायच्या आधी मलाही असंच वाटायचं.
लेखनविषय:
आपल्याकडे 12 ज्योर्तीलिंगांचे महत्व आहे. आसेतूहिमाचल विस्तार असलेल्या ह्या प्रचंड देशात ही बाराही ज्योतिर्लिंगे विखूरलेली आहेत. काही पोचायला सोप्या अशा ठिकाणी, काही घोर जंगलात, केदारनाथ सारखे ठिकाण तर अत्यंत दुर्गम अशा हिमालयात तर सोमनाथ हे समुद्र किनारी! त्यापैकी सोरटी सोमनाथ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या मंदिरात जाण्याचा योग नुकताच आला. धार्मिक मान्यतेनुसार ह्या मंदिराचा क्रमांक पहिला येतो. बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा इथून सुरु करण्याची पद्धत आहे. माझा असा काही मानस नव्हता. पण त्यानिमित्ताने ह्या मंदिराविषयी थोडं वाचन केलं आणि लक्षात आलं की ह्या मंदिराचा इतिहास अत्यंत रोमांचक आहे.

शेअर बाजाराचे भाकीत

युयुत्सु ·

युयुत्सु Sat, 02/08/2025 - 19:18
माझा मॉडेलच्या ओव्हर फिटिंग बद्दल कोणाची काही तक्रार असेल तर अगोदरच खुलासा करून ठेवतो. Overfitting is generally considered undesirable in machine learning because it means the model has learned the training data too well, capturing noise and details that do not generalize to new, unseen data. However, there are specific scenarios where overfitting might not be a bad choice: 1. **When the Training Data is Perfectly Representative**: If the training data is an exact and complete representation of the real-world data the model will encounter, overfitting might not be a problem. In this case, the model's ability to capture every detail of the training data could actually be beneficial. 2. **In Deterministic Environments**: In some cases, the environment or the data-generating process is deterministic. For example, in some physical systems or well-defined mathematical functions, overfitting might not be harmful because there is no noise or variability in the data. 3. **When Interpretability is Not a Concern**: If the primary goal is to achieve the highest possible accuracy on the training data and interpretability or generalization is not a concern, overfitting might be acceptable. This could be the case in some competitions or specific research scenarios where the focus is solely on performance metrics. 4. **In Certain Types of Ensembles**: In ensemble methods, sometimes overfitting individual models can be beneficial if the ensemble as a whole generalizes well. For example, in boosting algorithms, individual weak learners might overfit to some extent, but the combined model can still perform well on unseen data. 5. **When Data is Abundant and Static**: If you have an extremely large dataset that is static and unlikely to change, overfitting might not be as problematic because the model's performance on the training data is likely to be very close to its performance on any future data. 6. **In Specific Applications Like Memorization Tasks**: In some applications, such as creating a model that needs to memorize specific patterns or data points (e.g., certain types of lookup tables or caches), overfitting is actually the goal. 7. **When the Cost of Overfitting is Low**: In some scenarios, the cost of overfitting (e.g., slightly reduced performance on unseen data) might be negligible compared to the benefits (e.g., significantly improved performance on the training data). This might be the case in applications where the training data is very similar to the test data, and the cost of errors is low. However, it's important to note that these scenarios are exceptions rather than the rule. In most practical applications, overfitting is something to be avoided, and techniques like cross-validation, regularization, and early stopping are used to prevent it.

शानबा५१२ Sun, 02/09/2025 - 12:13
माझ्यासाठी हा फार उत्स्तुकतापुर्ण लेख आहे, माझा ही हा विषय जिव्हाळ्याचा आहे(खुप दीवसांने हा शब्द वाचक्ला, थॅण्क्स). पण आता खुप घाईत आहे, जास्त लिहु शकत नाही,पण भाकीत बाबत, म्हणजे स्टॉक मार्केत संबंधी, हे व्यक्ती मला खुप आवडतात, त्यांनी खुपश मेथ्ड्स शोधले आहेत, भाकीत साठी, आपलाला ही खुप आवडेल, आपले न्युरलनेट काही पचले नाही, मला समजले नाही व समजुन ग्घेतले नाही. https://www.youtube.com/@RKArora/videos तुम्ही ह्यांचे ह्या चॅनेल वरचे खुप व्हिडीओ पहा, भाकीत संबंधीत, तुम्हाला आवड्ले का ते सांगा. धन्यवाद व शुभेच्छा , आभारी आहे.

युयुत्सु Mon, 02/10/2025 - 12:48
आणखी थोडी गंमत : अचूकता आणण्यासाठी वर वर्तवलेले भाकीत हे एका मॉडेलचे आहे. पण हे गंडू शकते. मग भाकीत अधिक विश्वासार्ह कसे होईल? त्यासाठी मी अशी १० मॉडेल्स चालू आठवड्यासाठी तयार केली आणि त्यांचा कल (स्क्युनेस) तपासला. एकंदर १० पैकी ७ मॉडेल्स या आठवड्यात बाजाराची घसरगुंडी दाखवतात.

युयुत्सु Tue, 02/11/2025 - 12:45
५० % कॅश इन्व्हेस्ट केलीये या लेव्हलला .. २१३५० जवळ उरलेली सगळी करून टाकावी म्हणतोय ...
हरकत नाही, पण स्वतःच्या जबाबदारीवर! तुमची ती स्ट्रॅटेजी काय सांगते?

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Tue, 02/11/2025 - 13:14
तुमची ती स्ट्रॅटेजी काय सांगते?
२१३५० ला असेल नसेल ती झाडून कानाकोपऱ्यातून लॉन्ग-टर्म साठी बाजूला ठेवलेली सर्व कॅश लावणार मी .. (कर्ज काढणार नाही, कॅश डिलिव्हरी फक्त )

युयुत्सु Tue, 02/11/2025 - 15:53
ओव्हरफिटींगला काही अपवाद आहेत, त्याबद्दल कुणी बोलत नाही. जनरलायझेशन जेव्हा आवश्यक नसते तेव्हा, नजिकच्या भविष्याकाळासाठी म्ह० शॉर्ट टर्म प्रेडीकशन, एकदाच वापर केला जाणारे मॉडेल, तसेच कॉस्ट ऑफ ट्रेनिंग हा मुद्दा फार मह्त्त्वाचा नसेल तर... लोक आंधळेपणाने "ओव्हरफिटींग-ओव्हरफिटींग" म्हणून गळा काढतात.

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Wed, 02/12/2025 - 10:17
जानेवालोंको कौन रोक सकता हैं ? (२१५०० - २१२५० झोन मध्ये ) एखादा दारुड्या झिंगत रस्त्याच्या मधून कडेला परत मधे असं लेझीम खेळत चालला असला तरी त्याला शेवटी गटारात ((२१५०० - २१२५०) एकदा पडायचाच असतं ... :) माझ्या वरील वाक्याचा आणि जगातील इतर कशाचा काहीही संबंध नाही ... तुम्हाला तास वाटल्यास तो योगायोग समजावा .. उत्तरदायित्वास नकार लागू (विश्वामित्राप्रमाणे ...) v

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Wed, 02/12/2025 - 10:17
जानेवालोंको कौन रोक सकता हैं ? (२१५०० - २१२५० झोन मध्ये ) एखादा दारुड्या झिंगत रस्त्याच्या मधून कडेला परत मधे असं लेझीम खेळत चालला असला तरी त्याला शेवटी गटारात ((२१५०० - २१२५०) एकदा पडायचाच असतं ... :) माझ्या वरील वाक्याचा आणि जगातील इतर कशाचा काहीही संबंध नाही ... तुम्हाला तास वाटल्यास तो योगायोग समजावा .. उत्तरदायित्वास नकार लागू (विश्वामित्राप्रमाणे ...) v

वामन देशमुख Wed, 02/12/2025 - 10:30
#BearBanoBewakoofNahi काही घाबरायची गरज नाही. शॉर्ट पोझिशन्स घ्या. अशा मंदीच्या बाजारात जितका नफा आहे तितका तेजीच्या बाजारात नाही. संधीचे सोने करून घ्या.

युयुत्सु Wed, 02/12/2025 - 10:39
त्याला शेवटी गटारात ((२१५०० - २१२५०) एकदा पडायचाच असतं ...
हा हा हा ...तुम्ही फारच विनोदी! मागे मीच केलेल्या अभ्यासात असं लक्षात आलं की अस्वले बैलांपेक्षा जास्त पैसा कमावतात. तो लेख आता शोधावा लागेल.

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Wed, 02/12/2025 - 11:38
नाही हो ..मी अस्वल नाही .. मी फक्त आळशी आहे ... अस्वलांची धुमाकूळ घातलाय ... ते थकले तो पर्यंत निवांत बिडी पीत पडून राहू .... as

In reply to by अमरेंद्र बाहुबली

युयुत्सु Wed, 02/12/2025 - 12:37
मागच्या महिन्यात एचएमपएमपीव्ही ची बातमी आल्याबरोबर मी सगळे शेअर्स , mf विकून टाकले. मी अस्वल की बैल?
फायद्यात असाल तर अस्वल नसाल तर "बैल"! स्वगतः बैल या शब्दाचा लक्षणेने अर्थ काय घ्यायचा हे लोकांना समजेल काय?

In reply to by युयुत्सु

फायद्यात आहे! आता टॅक्स वाचवा म्हणून काही शेअर्स लॉस मधे विकतोय! :- अस्वल अमरेंद्र बाहुबली! :)

युयुत्सु Wed, 02/12/2025 - 15:39
मंडळी आजसाठी वर्तवलेल्या भाकीताप्रमाणे घसगुंडी आज थांबली दोजी नाही पण दोजीचा भाऊ डॅगर तयार झालेला आहे. "युयुत्सु-नेट" रॉक्स!

युयुत्सु गुरुवार, 02/13/2025 - 15:22
आज सकाळी बाजार उघडण्यापूर्वी बाजाराचा कल काय असेल म्हणून युयुत्सु-नेट्वर तपासले तेव्हा पुढील शक्यता दिसली. कालची रिकव्हरी बघून आज तोंडावर आपटायला नको म्हणुन आज भाकीत पोस्ट केले नाही. पण आता तोंडात बोटं घालण्याशिवाय पर्याय नाही.

युयुत्सु Sat, 02/08/2025 - 19:18
माझा मॉडेलच्या ओव्हर फिटिंग बद्दल कोणाची काही तक्रार असेल तर अगोदरच खुलासा करून ठेवतो. Overfitting is generally considered undesirable in machine learning because it means the model has learned the training data too well, capturing noise and details that do not generalize to new, unseen data. However, there are specific scenarios where overfitting might not be a bad choice: 1. **When the Training Data is Perfectly Representative**: If the training data is an exact and complete representation of the real-world data the model will encounter, overfitting might not be a problem. In this case, the model's ability to capture every detail of the training data could actually be beneficial. 2. **In Deterministic Environments**: In some cases, the environment or the data-generating process is deterministic. For example, in some physical systems or well-defined mathematical functions, overfitting might not be harmful because there is no noise or variability in the data. 3. **When Interpretability is Not a Concern**: If the primary goal is to achieve the highest possible accuracy on the training data and interpretability or generalization is not a concern, overfitting might be acceptable. This could be the case in some competitions or specific research scenarios where the focus is solely on performance metrics. 4. **In Certain Types of Ensembles**: In ensemble methods, sometimes overfitting individual models can be beneficial if the ensemble as a whole generalizes well. For example, in boosting algorithms, individual weak learners might overfit to some extent, but the combined model can still perform well on unseen data. 5. **When Data is Abundant and Static**: If you have an extremely large dataset that is static and unlikely to change, overfitting might not be as problematic because the model's performance on the training data is likely to be very close to its performance on any future data. 6. **In Specific Applications Like Memorization Tasks**: In some applications, such as creating a model that needs to memorize specific patterns or data points (e.g., certain types of lookup tables or caches), overfitting is actually the goal. 7. **When the Cost of Overfitting is Low**: In some scenarios, the cost of overfitting (e.g., slightly reduced performance on unseen data) might be negligible compared to the benefits (e.g., significantly improved performance on the training data). This might be the case in applications where the training data is very similar to the test data, and the cost of errors is low. However, it's important to note that these scenarios are exceptions rather than the rule. In most practical applications, overfitting is something to be avoided, and techniques like cross-validation, regularization, and early stopping are used to prevent it.

शानबा५१२ Sun, 02/09/2025 - 12:13
माझ्यासाठी हा फार उत्स्तुकतापुर्ण लेख आहे, माझा ही हा विषय जिव्हाळ्याचा आहे(खुप दीवसांने हा शब्द वाचक्ला, थॅण्क्स). पण आता खुप घाईत आहे, जास्त लिहु शकत नाही,पण भाकीत बाबत, म्हणजे स्टॉक मार्केत संबंधी, हे व्यक्ती मला खुप आवडतात, त्यांनी खुपश मेथ्ड्स शोधले आहेत, भाकीत साठी, आपलाला ही खुप आवडेल, आपले न्युरलनेट काही पचले नाही, मला समजले नाही व समजुन ग्घेतले नाही. https://www.youtube.com/@RKArora/videos तुम्ही ह्यांचे ह्या चॅनेल वरचे खुप व्हिडीओ पहा, भाकीत संबंधीत, तुम्हाला आवड्ले का ते सांगा. धन्यवाद व शुभेच्छा , आभारी आहे.

युयुत्सु Mon, 02/10/2025 - 12:48
आणखी थोडी गंमत : अचूकता आणण्यासाठी वर वर्तवलेले भाकीत हे एका मॉडेलचे आहे. पण हे गंडू शकते. मग भाकीत अधिक विश्वासार्ह कसे होईल? त्यासाठी मी अशी १० मॉडेल्स चालू आठवड्यासाठी तयार केली आणि त्यांचा कल (स्क्युनेस) तपासला. एकंदर १० पैकी ७ मॉडेल्स या आठवड्यात बाजाराची घसरगुंडी दाखवतात.

युयुत्सु Tue, 02/11/2025 - 12:45
५० % कॅश इन्व्हेस्ट केलीये या लेव्हलला .. २१३५० जवळ उरलेली सगळी करून टाकावी म्हणतोय ...
हरकत नाही, पण स्वतःच्या जबाबदारीवर! तुमची ती स्ट्रॅटेजी काय सांगते?

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Tue, 02/11/2025 - 13:14
तुमची ती स्ट्रॅटेजी काय सांगते?
२१३५० ला असेल नसेल ती झाडून कानाकोपऱ्यातून लॉन्ग-टर्म साठी बाजूला ठेवलेली सर्व कॅश लावणार मी .. (कर्ज काढणार नाही, कॅश डिलिव्हरी फक्त )

युयुत्सु Tue, 02/11/2025 - 15:53
ओव्हरफिटींगला काही अपवाद आहेत, त्याबद्दल कुणी बोलत नाही. जनरलायझेशन जेव्हा आवश्यक नसते तेव्हा, नजिकच्या भविष्याकाळासाठी म्ह० शॉर्ट टर्म प्रेडीकशन, एकदाच वापर केला जाणारे मॉडेल, तसेच कॉस्ट ऑफ ट्रेनिंग हा मुद्दा फार मह्त्त्वाचा नसेल तर... लोक आंधळेपणाने "ओव्हरफिटींग-ओव्हरफिटींग" म्हणून गळा काढतात.

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Wed, 02/12/2025 - 10:17
जानेवालोंको कौन रोक सकता हैं ? (२१५०० - २१२५० झोन मध्ये ) एखादा दारुड्या झिंगत रस्त्याच्या मधून कडेला परत मधे असं लेझीम खेळत चालला असला तरी त्याला शेवटी गटारात ((२१५०० - २१२५०) एकदा पडायचाच असतं ... :) माझ्या वरील वाक्याचा आणि जगातील इतर कशाचा काहीही संबंध नाही ... तुम्हाला तास वाटल्यास तो योगायोग समजावा .. उत्तरदायित्वास नकार लागू (विश्वामित्राप्रमाणे ...) v

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Wed, 02/12/2025 - 10:17
जानेवालोंको कौन रोक सकता हैं ? (२१५०० - २१२५० झोन मध्ये ) एखादा दारुड्या झिंगत रस्त्याच्या मधून कडेला परत मधे असं लेझीम खेळत चालला असला तरी त्याला शेवटी गटारात ((२१५०० - २१२५०) एकदा पडायचाच असतं ... :) माझ्या वरील वाक्याचा आणि जगातील इतर कशाचा काहीही संबंध नाही ... तुम्हाला तास वाटल्यास तो योगायोग समजावा .. उत्तरदायित्वास नकार लागू (विश्वामित्राप्रमाणे ...) v

वामन देशमुख Wed, 02/12/2025 - 10:30
#BearBanoBewakoofNahi काही घाबरायची गरज नाही. शॉर्ट पोझिशन्स घ्या. अशा मंदीच्या बाजारात जितका नफा आहे तितका तेजीच्या बाजारात नाही. संधीचे सोने करून घ्या.

युयुत्सु Wed, 02/12/2025 - 10:39
त्याला शेवटी गटारात ((२१५०० - २१२५०) एकदा पडायचाच असतं ...
हा हा हा ...तुम्ही फारच विनोदी! मागे मीच केलेल्या अभ्यासात असं लक्षात आलं की अस्वले बैलांपेक्षा जास्त पैसा कमावतात. तो लेख आता शोधावा लागेल.

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Wed, 02/12/2025 - 11:38
नाही हो ..मी अस्वल नाही .. मी फक्त आळशी आहे ... अस्वलांची धुमाकूळ घातलाय ... ते थकले तो पर्यंत निवांत बिडी पीत पडून राहू .... as

In reply to by अमरेंद्र बाहुबली

युयुत्सु Wed, 02/12/2025 - 12:37
मागच्या महिन्यात एचएमपएमपीव्ही ची बातमी आल्याबरोबर मी सगळे शेअर्स , mf विकून टाकले. मी अस्वल की बैल?
फायद्यात असाल तर अस्वल नसाल तर "बैल"! स्वगतः बैल या शब्दाचा लक्षणेने अर्थ काय घ्यायचा हे लोकांना समजेल काय?

In reply to by युयुत्सु

फायद्यात आहे! आता टॅक्स वाचवा म्हणून काही शेअर्स लॉस मधे विकतोय! :- अस्वल अमरेंद्र बाहुबली! :)

युयुत्सु Wed, 02/12/2025 - 15:39
मंडळी आजसाठी वर्तवलेल्या भाकीताप्रमाणे घसगुंडी आज थांबली दोजी नाही पण दोजीचा भाऊ डॅगर तयार झालेला आहे. "युयुत्सु-नेट" रॉक्स!

युयुत्सु गुरुवार, 02/13/2025 - 15:22
आज सकाळी बाजार उघडण्यापूर्वी बाजाराचा कल काय असेल म्हणून युयुत्सु-नेट्वर तपासले तेव्हा पुढील शक्यता दिसली. कालची रिकव्हरी बघून आज तोंडावर आपटायला नको म्हणुन आज भाकीत पोस्ट केले नाही. पण आता तोंडात बोटं घालण्याशिवाय पर्याय नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
शेअर बाजाराचे भाकीत मंडळी, शेअर बाजार आणि त्याचे भाकीत हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. मी त्यासाठी बरेच दिवस न्युरलनेट वापरून मल्टीव्हेरीएट टाइम-सिरीजची भाकीते करायचा प्रयत्न केला आहे. बर्‍याच प्रयत्ना नंतर हैब्रिड न्युरलनेट आर्कीटेक्चर वापरून मी पुढील आठवड्याचे भाकीत करण्यात थोडे फार यश मिळवले आहे. दर विकांताला मी माझे मार्केटचे भाकीत या धाग्यावर पोस्ट करीन. मी keras वापरून तयार केलेले न्युरलनेट असे आहे. ते असेच का असे विचारू नये. न्युरलनेट मध्ये जे चालेल ते आर्कीटेक्चर स्वीकारायचा प्रघात आहे.

गीतारहस्य चिंतन-२

Bhakti ·

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Sun, 02/09/2025 - 20:54
प्रगोदादा,ठीक आहे.अजून सुटसुटीत मांडण्याचा प्रयत्न करीत राहते. हा भाग पहिल्या भागाचा कर्मजिज्ञासाचा दुसरा भाग आहे.सत्य, अहिंसा,अस्तेय या सारखी कर्म मनुष्य अनेकदा धर्म -अधर्म अशा द्वंद्वात टाकतात.तेव्हा याबाबत सूक्ष्म अभ्यास केला तर अनेकदा योग्य मार्ग जो इतरांचेही नुकसान करणार नाही आणि स्वतः चेही रक्षण करेल असा सापडतो.
या प्रकरणात टिळकांनी कर्म करतांना अनेक नीती शास्त्रानुसार कशा करायच्या,पाळायच्या यांचा संभ्रम पडत असतो‌ तेव्हा अपवाद कसा ओळखावा हे सांगितले आहे.तेव्हा काळानुसार धर्म बदलतो.नीतीस अनेक अपवाद असतात.अर्थात ते समजण्यासाठी सूक्ष्म अभ्यास असावा अथवा कृष्ण साथीला हवा.

चामुंडराय Sun, 02/09/2025 - 21:03
भक्ती ताई तुमची ही गीतारहस्य चिंतन लेखमाला वाचून घरी असलेला गीतारहस्य ग्रंथ वाचायला सुरुवात केली आहे परंतु शंभर वर्षांपेक्षा जुनी मराठी वाचायला क्लिष्ट वाटते आहे आणि वर त्यातील तत्वज्ञान समजून घेणे जिकरीचे वाटते आहे तरीही नेटाने प्रयत्न करतो आहे. ह्या ग्रंथावर एखादे सहज समजण्यासारखे भाष्य उपलब्ध आहे का?

In reply to by चामुंडराय

Bhakti Sun, 02/09/2025 - 21:10
परंतु शंभर वर्षांपेक्षा जुनी मराठी वाचायला क्लिष्ट वाटते आहे आणि वर त्यातील तत्वज्ञान समजून घेणे जिकरीचे वाटते आहे तरीही नेटाने प्रयत्न करतो आहे.
पण मला का इतकं सोप्पा वाटतोय बरे ;) अतिशयोक्ती नाही.पण मी जवळपास २०२० पासून वैदिक संस्कृती समजून घेण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे मी युट्यूबवर अगणित चित्रफिती पाहिल्या.एका विषयातून दुसरा, त्यातून तिसरा अशी ही मालिका सुरूच आहे.म्हणजे इतर कमी असं मी म्हणतं नाही.असं म्हणतात, ज्ञानाचा सगळ्यांत उपयोगी मार्ग पुस्तक आहे.मला तर खुप मज्जा येतेय ;) :)

स्वधर्म Mon, 02/10/2025 - 18:26
टिळकांना गीता आपल्या आयुष्यातील कोणते निर्णय घेताना कशी उपयोगी पडली, अशी काही उदाहरणे या ग्रंथात तुमच्या वाचनात आली, तर वाचायला आवडेल. ज्ञानाइतकेच आचरण महत्वाचे, म्हणून विचारत आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Sun, 02/09/2025 - 20:54
प्रगोदादा,ठीक आहे.अजून सुटसुटीत मांडण्याचा प्रयत्न करीत राहते. हा भाग पहिल्या भागाचा कर्मजिज्ञासाचा दुसरा भाग आहे.सत्य, अहिंसा,अस्तेय या सारखी कर्म मनुष्य अनेकदा धर्म -अधर्म अशा द्वंद्वात टाकतात.तेव्हा याबाबत सूक्ष्म अभ्यास केला तर अनेकदा योग्य मार्ग जो इतरांचेही नुकसान करणार नाही आणि स्वतः चेही रक्षण करेल असा सापडतो.
या प्रकरणात टिळकांनी कर्म करतांना अनेक नीती शास्त्रानुसार कशा करायच्या,पाळायच्या यांचा संभ्रम पडत असतो‌ तेव्हा अपवाद कसा ओळखावा हे सांगितले आहे.तेव्हा काळानुसार धर्म बदलतो.नीतीस अनेक अपवाद असतात.अर्थात ते समजण्यासाठी सूक्ष्म अभ्यास असावा अथवा कृष्ण साथीला हवा.

चामुंडराय Sun, 02/09/2025 - 21:03
भक्ती ताई तुमची ही गीतारहस्य चिंतन लेखमाला वाचून घरी असलेला गीतारहस्य ग्रंथ वाचायला सुरुवात केली आहे परंतु शंभर वर्षांपेक्षा जुनी मराठी वाचायला क्लिष्ट वाटते आहे आणि वर त्यातील तत्वज्ञान समजून घेणे जिकरीचे वाटते आहे तरीही नेटाने प्रयत्न करतो आहे. ह्या ग्रंथावर एखादे सहज समजण्यासारखे भाष्य उपलब्ध आहे का?

In reply to by चामुंडराय

Bhakti Sun, 02/09/2025 - 21:10
परंतु शंभर वर्षांपेक्षा जुनी मराठी वाचायला क्लिष्ट वाटते आहे आणि वर त्यातील तत्वज्ञान समजून घेणे जिकरीचे वाटते आहे तरीही नेटाने प्रयत्न करतो आहे.
पण मला का इतकं सोप्पा वाटतोय बरे ;) अतिशयोक्ती नाही.पण मी जवळपास २०२० पासून वैदिक संस्कृती समजून घेण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे मी युट्यूबवर अगणित चित्रफिती पाहिल्या.एका विषयातून दुसरा, त्यातून तिसरा अशी ही मालिका सुरूच आहे.म्हणजे इतर कमी असं मी म्हणतं नाही.असं म्हणतात, ज्ञानाचा सगळ्यांत उपयोगी मार्ग पुस्तक आहे.मला तर खुप मज्जा येतेय ;) :)

स्वधर्म Mon, 02/10/2025 - 18:26
टिळकांना गीता आपल्या आयुष्यातील कोणते निर्णय घेताना कशी उपयोगी पडली, अशी काही उदाहरणे या ग्रंथात तुमच्या वाचनात आली, तर वाचायला आवडेल. ज्ञानाइतकेच आचरण महत्वाचे, म्हणून विचारत आहे.
लेखनविषय:
गीतारहस्य चिंतन -१ #कर्मजिज्ञासा२ * अस्तेय (चोरी) एकाने यथान्याय मिळवलेली संपत्ती चोरून किंवा लुटून नेण्याची इतरांना मोकळीक मिळेल तर द्रव्यसंचय करण्याचे बंद पडून सर्वांचेच नुकसान होईल, समाजाची घडी विस्कळून सर्वत्र अनवस्था होईल हे निर्विवाद आहे.

घर पाहावे बांधून: २

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·

गावाची लोकसंख्या ५०० पर्यंत असावी. तीही आजूबाजूच्या वस्त्या मिळून. जिथे ग्रामपंचायत आहे तिथे मोजून २० घरे सुद्धा नाहीत.

आग्या१९९० Sat, 02/08/2025 - 09:01
शिवाय सगळ्या स्लॅबवर सोलर पॅनेल + सोलर हीटर + पाण्याची टाकी बसवले जातील त्यामुळे उन्हाळ्यात घर फार तापणार नाही. ह्यातील सोलर हिटर लावण्याऐवजी ते पैसे वाचवून गरज असेल तर अधिक क्षमतेचे सोलर पॅनल लावून वीजनिर्मिती करा. ही अतिरिक्त वीज घरात इलेक्ट्रिक गिझर लावून गरम पाणी मिळवण्याकरिता वापरात येईल. ह्याचा फायदा म्हणजे टेरेसवरची जागा अडवली जाणार नाही आणि तुलनेने खर्चही कमी होईल.

In reply to by आग्या१९९०

त्यामुळे सोलर पॅनेल आणि त्यांचा मेंटेनंस + अपग्रेड यांच्यासाठी स्पेशल स्वतंत्र आर्थिक तरतूद करत आहे. त्यामुळे ज्या गोष्टीची वारंटी जास्त ते बसवणे सयुक्तिक ठरेल.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घर पूर्ण व्हायला किती काळ जाईल काही सांगता येत नाही. २०३० पर्यंत होईल अशी अपेक्षा आहे.

Bhakti Sat, 02/08/2025 - 10:32
अय्यो तुमचं वय केवळ ३५ आणि इतकं सुंदर प्लॅनिंग! मस्तच!मला पण आवडलं असतं असं फार्म हाऊस बांधायला ,पण..जाऊ द्या.बाकी शेजारीच फार्म हाऊस की नुसतीच हौस नावाचा धागा अगदी याच विषयावरचा नैराश्य आणतो.पण तुम्ही फार्म हाऊस एकदम आयडियल.मी मध्यंतरी संपदा कुलकर्णीचे फार्मचे व्हिडिओ पाहायचे.त्यांनंतर फेबुवर वृंदावन नावाचं एक फार्म हाऊसचे पेज आहे, खुपच प्रसन्न वाटतं.मृण्मयी देशपांडेने तर हाताने मातीचे घर बांधले आहे आणि जोडीला स्ट्रॉबेरीची शेती,एकदम झकास! तुमच्या घराला शुभेच्छा!

In reply to by Bhakti

आहे भक्तीजी. हौस म्हणून बांधतोय पण तिथेच उर्वरित आयुष्य काढावे असे ठरवतोय. उन्हाळ्यात आमच्या इकडे प्रचंड ऊन असते, पाणी नसते त्यामुळे त्या काळात तिथे राहणे चॅलेंजिंग आहे. मला यातून कोणताही आर्थिक फायदा मिळवायचा नाही.

In reply to by Bhakti

मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 16:54
आणि शेतघर, हा वेगळा विषय आहे. वार्षिक ६० ग्रॅम सोने नफा स्वरूपात देणारे शेत असेल तर, त्या शेतातच राहून पूर्ण वेळ शेती हाच व्यवसाय करणे, हा उत्तम निर्णय आहे.

In reply to by मुक्त विहारि

शेतातून मला काडीचाही नफा अपेक्षित नाही मुक्त विहारी. खरेतर शेतसाठी वार्षिक खर्च धरलेला आहे. तो एक खर्चिक छंद म्हणून केला जाईल. नुकसान कमीत कमी करणे इतकेच ध्येय आहे.

In reply to by मुक्त विहारि

परंतु असली गुंठ्यांमधे केलेली विखंडित शेती कधिसुद्धा फायद्यात येत नाही. विखंडित शेती + ७५ च्या वर पीके घेतल्यावर त्या शेतीतून काय आर्थिक फायदा मिळणार सांगा. प्रचंड प्रमाणात शेती आणि मोनोकल्चर याशिवाय आधुनिक शेती आर्थिक फायद्यात येऊ शकत नाही. मोनोकल्चर आले की पुन्हा रोगराया आणि रिस्कसुद्धा येतेच. त्यामुळे शेती हा एक खर्चिक छंद म्हणूनच पाहावे. मला मोनोकल्चरचा तिटकारा आहे त्यामुळे हे एक पाच एकराचे गार्डन समजा. एखाद्या वर्षी चांगला भाव मिळणे वेगळे आणि दरवर्षी कन्सिस्टंटली डबल डिजिट आरओआय मिळणे वेगळे. शेती हा व्यवसाय करणे म्हणजे पायावर धोंडा.

मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 17:06
कमी खर्चात आणि नैसर्गिक रित्या घर बांधायचे असेल तर, लॉरी बेकर, यांच्या पद्धतीने घर बांधणे हा एक पर्याय आहे. https://www.google.com/search?client=ms-android-oppo-rvo2&sca_esv=aac09e88d3bc5d88&sxsrf=AHTn8zrOMJXQcnAAzzD6gG-R-Q0IlCK1rA:1739014068972&q=Laurie+baker+famous+buildings+near+Dombivli,+Maharashtra&udm=2&fbs=ABzOT_CpGl4iTifXrR0wiRhoFvN4KC3CZFw4eZw55Dhid0WPwh0pbdXXPcCe9TjVbzqvWIqhP3EnI625VoKzCtGFu_zXErxo2grtsK7dIjOnaueeuzZup9MJiSO16XHvTmwUNRBusuq8RVPnnqcg7TimoH_GaEE6vnE59rjBQMr6h6oqzVNCDgB9PJz9LN6xL7d1pQIpsvPFIzzAKtjqpVjLqYZv9kVAF88KfawEpfpiHLCUk-bU54M&sa=X&ved=2ahUKEwjYpdye_LOLAxVPyDgGHZmAHyIQtKgLegQIFhAB&biw=360&bih=668&dpr=2 वैयक्तिक पातळीवर सांगायचे तर , मी कंटेनर घर बांधीन. स्वस्त आणि टिकाऊ. मी स्वतः कंटेनर घरात राहिलो असल्याने, मला तरी शेतघरासाठी हा पर्याय उत्तम वाटतो.

In reply to by मुक्त विहारि

आग्या१९९० Sat, 02/08/2025 - 20:31
मी येत्या तीन वर्षात शेतात cold storage कंटेनरमध्ये करणार आहे. पंधरा वर्षापूर्वी बंगला बांधण्याऐवजी कंटेनर घर बांधले असते तर खूप फायदेशीर आणि देखभाल करणे कमी खर्चिक झाले असते असे आता वाटू लागले आहे. बंगल्यावर सोलर पॅनल तेव्हा लावायचा विचार केला होता,परंतु नंतर दुसरे स्वस्त पर्याय उपलब्ध झाल्याने कॅन्सल केला.

In reply to by आग्या१९९०

मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 20:47
कंटेनर घर, हा सर्वोत्तम पर्याय आहे. कमी वेळ, कमी खर्च, कमी देखभाल आणि किती पण उंच किंवा पसरट बांधता येते. शिवाय, थंड प्रदेशातील शेती करता येते. उदा. पुण्यात केशर शेती.

In reply to by आग्या१९९०

कंटेनर घर हे शेतघर म्हणून ठिक आहे पण हे माझे शेतघर नाही. हेच मुख्य घर असणार आहे आणि त्यामुळे मला घरा सारखे घर हवे आहे. मला कंटेनर घराची आईडियाच पटत नाही कारण एकतर आमच्या भागात उन्हाळ्यात तापमान ४०+ असते. दुसरे म्हणजे मला घराच्या मटेरियलचे नैसर्गिक टेक्स्चर हवे आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

मुक्त विहारि Sun, 02/09/2025 - 01:01
मी ५०-५५ डिग्री तापमान असताना देखील, ह्या घरात राहिलो आहे. AC असेल तरच इतक्या गरम तापमानात राहता येते आणि आखाती देशांत AC असतोच. इत्यलम....

In reply to by मुक्त विहारि

माझ्या जमिनीला नॅचरल स्लोप आहेत त्यामुळे मी खरेतर अर्धे अंडरग्राऊंड घर बांधू शकतो. पूर्ण अंडरग्राऊंड घरांमधे वर्षभर नैसर्गिकरित्या २०-२२ च्या रेंजमधे तापमान राहते हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे (बाहेर -५ तापमान असताना देखिल) त्यामुळे एसी आणि त्याचा मेंटेनन्स हे मला खरेतर फारशी भावणारी गोष्ट नाही. शिवाय कंटेनर घरांचे अस्थेटिक्स मला भावत नाही. तसेही सामान्य लोक जिथे अनाठायी खर्च करतात तिथे मी करणार नाही. (उदा. महागातल्या टाइल्स, पीओपी, अत्यंत भंगार टेस्टचे गॉडी इंटेरियर इत्यादी इत्यादी )

In reply to by मुक्त विहारि

मी त्यांचा अभ्यास केलेला आहे. मला नॉइज़ कॅन्सलिंग विंडो किंवा तश्या आधुनिक व्यवस्थांशिवाय राहणे अशक्य आहे. त्यामुळे खर्च वाढणार आहे हे नक्कीच आहे. हा खरेतर साधा प्लान आहे परंतु खर्च सुविधेवर जास्त आहे.

चित्रगुप्त Mon, 02/10/2025 - 08:25
तुम्ही दिलेल्या नकाशात attached toilet दोन्हीपैकी एकाही खोलीला नाही. म्हातारपणी आणि आजारपणात ते खूपच गरजेचे ठरते. त्या दृष्टीने एक खोली पुढे, दुसरी मागे कीचनजवळ, आणि दोन्हीच्या मधे टॉयलेट, असे करता येईल. जिन्याच्या पायर्‍या फार तर साडेसात इंच उंचीच्या, आणि single flight जिन्याऐवजी मधे सपाट लँडिंग असावे. .

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्तजी, सर्व खोल्यांना attached टॉयलेट आहे. जिन्याला लागून असेलेल्या रूमला जिन्या खाली attached टॉयलेट आहे, दुसऱ्या बेडरूमला देखील attached टॉयलेट आहे. आपण ले आऊट पुन्हा पहावा ही नम्र विनंती. जिन्याचा उपयोग जरूरीपूर्ता असणार आहे कारण माझा हॉल जवळ जवळ मोकळाच असणार आहे.

स्वधर्म Mon, 02/10/2025 - 13:02
आण्णा, तुमचा विचार खूप चांगला आहे, पण जरा धाडसाचा वाटतोय. माझ्याही मनात आमच्या शेतावर जाऊन राहण्याचा विचार आहे. तुमच्याप्रमाणेच आमच्या शेताच्या शेजाऱ्यांनी द्राक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. मी कटाक्षाने आमचे शेत करणाऱ्या नातेवाईकास द्राक्षे लाऊ नये, असे सांगितले आहे. द्राक्ष हे पीक एखाद्या आय सी यू मधल्या पेशंटसारखे जपावे लागते खते व बेसुमार औषधे मारावीच लागतात. परिणामी आमच्या सर्व शेजाऱ्यांच्या विहिरीचे पाणी सवळ झाले आहे. सर्वच शेतकरी 30 लीटरचे पिण्याच्या पाण्याचे कॅन वापरत आहेत पण रासायनिक खते व औषधे कमी करण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत गावी जाऊन रहायचे, तर तयारी ठेवावी लागेल. तुंम्ही घरासाठी 30 लाख रु. एकदम गुंतवण्यापेक्षा काही दिवस तिथेच आजूबाजूल राहून या प्रयोगाची चाचणी करून बघा. सोयीसुविधा, लोक, आपल्याला तिथे करमेल का याची खात्री झाल्यावरच घराचा खर्च करावा असे सुचवतो. बाकी पक्कं ठरलं असेल, तर शुभेच्छा.

In reply to by स्वधर्म

माझा द्राक्ष लावण्याचा अजिबात विचार नाही. मी ते करून पाहिले आहे मला त्या शेतीची प्रचंड चीड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जागा निवडण्यामागे दोन्ही टोकाला पाण्याची तळी आहेत. वरचे तळे बरेच मोठे आहे आणि सध्या ते अजून मोठे करण्याचे काम सुरू आहे,

In reply to by हणमंतअण्णा शंक…

स्वधर्म Mon, 02/10/2025 - 13:31
शेजार्यांच्या द्राक्ष या पिकामुळे होणारी पर्यावरणाची अवस्था हा होता. त्यांना औषधांची फवारणी जवळजवळ रोजच करावी लागते. त्यामुळे हवाही आरोग्यदायक रहात नाही.

In reply to by स्वधर्म

तुमचा मुद्दा अतिशय रास्त आहे. हा विचार नीट करावा लागेल. हवा प्रदूषित होत असेल तर नक्कीच गंभीर मामला आहे.

In reply to by स्वधर्म

खूप चांगल्या आहेत आणि तसे करण्यासाठी मी आमच्या जुन्या शेतात काही दिवस राहून पाहिले आहे. सोयीसुविधा म्हणजे काहीही नाहीत. लोक मात्र खूप चांगले आहेत कारण तो आमचाच भाग आहे करमेल का ते कुणास ठाऊक. मला तर साक्षात न्यू यॉर्क मधे पण करमले नव्हते. त्यामुळे आता ते देवाजीच्या हातातच आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद!!

गावाची लोकसंख्या ५०० पर्यंत असावी. तीही आजूबाजूच्या वस्त्या मिळून. जिथे ग्रामपंचायत आहे तिथे मोजून २० घरे सुद्धा नाहीत.

आग्या१९९० Sat, 02/08/2025 - 09:01
शिवाय सगळ्या स्लॅबवर सोलर पॅनेल + सोलर हीटर + पाण्याची टाकी बसवले जातील त्यामुळे उन्हाळ्यात घर फार तापणार नाही. ह्यातील सोलर हिटर लावण्याऐवजी ते पैसे वाचवून गरज असेल तर अधिक क्षमतेचे सोलर पॅनल लावून वीजनिर्मिती करा. ही अतिरिक्त वीज घरात इलेक्ट्रिक गिझर लावून गरम पाणी मिळवण्याकरिता वापरात येईल. ह्याचा फायदा म्हणजे टेरेसवरची जागा अडवली जाणार नाही आणि तुलनेने खर्चही कमी होईल.

In reply to by आग्या१९९०

त्यामुळे सोलर पॅनेल आणि त्यांचा मेंटेनंस + अपग्रेड यांच्यासाठी स्पेशल स्वतंत्र आर्थिक तरतूद करत आहे. त्यामुळे ज्या गोष्टीची वारंटी जास्त ते बसवणे सयुक्तिक ठरेल.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घर पूर्ण व्हायला किती काळ जाईल काही सांगता येत नाही. २०३० पर्यंत होईल अशी अपेक्षा आहे.

Bhakti Sat, 02/08/2025 - 10:32
अय्यो तुमचं वय केवळ ३५ आणि इतकं सुंदर प्लॅनिंग! मस्तच!मला पण आवडलं असतं असं फार्म हाऊस बांधायला ,पण..जाऊ द्या.बाकी शेजारीच फार्म हाऊस की नुसतीच हौस नावाचा धागा अगदी याच विषयावरचा नैराश्य आणतो.पण तुम्ही फार्म हाऊस एकदम आयडियल.मी मध्यंतरी संपदा कुलकर्णीचे फार्मचे व्हिडिओ पाहायचे.त्यांनंतर फेबुवर वृंदावन नावाचं एक फार्म हाऊसचे पेज आहे, खुपच प्रसन्न वाटतं.मृण्मयी देशपांडेने तर हाताने मातीचे घर बांधले आहे आणि जोडीला स्ट्रॉबेरीची शेती,एकदम झकास! तुमच्या घराला शुभेच्छा!

In reply to by Bhakti

आहे भक्तीजी. हौस म्हणून बांधतोय पण तिथेच उर्वरित आयुष्य काढावे असे ठरवतोय. उन्हाळ्यात आमच्या इकडे प्रचंड ऊन असते, पाणी नसते त्यामुळे त्या काळात तिथे राहणे चॅलेंजिंग आहे. मला यातून कोणताही आर्थिक फायदा मिळवायचा नाही.

In reply to by Bhakti

मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 16:54
आणि शेतघर, हा वेगळा विषय आहे. वार्षिक ६० ग्रॅम सोने नफा स्वरूपात देणारे शेत असेल तर, त्या शेतातच राहून पूर्ण वेळ शेती हाच व्यवसाय करणे, हा उत्तम निर्णय आहे.

In reply to by मुक्त विहारि

शेतातून मला काडीचाही नफा अपेक्षित नाही मुक्त विहारी. खरेतर शेतसाठी वार्षिक खर्च धरलेला आहे. तो एक खर्चिक छंद म्हणून केला जाईल. नुकसान कमीत कमी करणे इतकेच ध्येय आहे.

In reply to by मुक्त विहारि

परंतु असली गुंठ्यांमधे केलेली विखंडित शेती कधिसुद्धा फायद्यात येत नाही. विखंडित शेती + ७५ च्या वर पीके घेतल्यावर त्या शेतीतून काय आर्थिक फायदा मिळणार सांगा. प्रचंड प्रमाणात शेती आणि मोनोकल्चर याशिवाय आधुनिक शेती आर्थिक फायद्यात येऊ शकत नाही. मोनोकल्चर आले की पुन्हा रोगराया आणि रिस्कसुद्धा येतेच. त्यामुळे शेती हा एक खर्चिक छंद म्हणूनच पाहावे. मला मोनोकल्चरचा तिटकारा आहे त्यामुळे हे एक पाच एकराचे गार्डन समजा. एखाद्या वर्षी चांगला भाव मिळणे वेगळे आणि दरवर्षी कन्सिस्टंटली डबल डिजिट आरओआय मिळणे वेगळे. शेती हा व्यवसाय करणे म्हणजे पायावर धोंडा.

मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 17:06
कमी खर्चात आणि नैसर्गिक रित्या घर बांधायचे असेल तर, लॉरी बेकर, यांच्या पद्धतीने घर बांधणे हा एक पर्याय आहे. https://www.google.com/search?client=ms-android-oppo-rvo2&sca_esv=aac09e88d3bc5d88&sxsrf=AHTn8zrOMJXQcnAAzzD6gG-R-Q0IlCK1rA:1739014068972&q=Laurie+baker+famous+buildings+near+Dombivli,+Maharashtra&udm=2&fbs=ABzOT_CpGl4iTifXrR0wiRhoFvN4KC3CZFw4eZw55Dhid0WPwh0pbdXXPcCe9TjVbzqvWIqhP3EnI625VoKzCtGFu_zXErxo2grtsK7dIjOnaueeuzZup9MJiSO16XHvTmwUNRBusuq8RVPnnqcg7TimoH_GaEE6vnE59rjBQMr6h6oqzVNCDgB9PJz9LN6xL7d1pQIpsvPFIzzAKtjqpVjLqYZv9kVAF88KfawEpfpiHLCUk-bU54M&sa=X&ved=2ahUKEwjYpdye_LOLAxVPyDgGHZmAHyIQtKgLegQIFhAB&biw=360&bih=668&dpr=2 वैयक्तिक पातळीवर सांगायचे तर , मी कंटेनर घर बांधीन. स्वस्त आणि टिकाऊ. मी स्वतः कंटेनर घरात राहिलो असल्याने, मला तरी शेतघरासाठी हा पर्याय उत्तम वाटतो.

In reply to by मुक्त विहारि

आग्या१९९० Sat, 02/08/2025 - 20:31
मी येत्या तीन वर्षात शेतात cold storage कंटेनरमध्ये करणार आहे. पंधरा वर्षापूर्वी बंगला बांधण्याऐवजी कंटेनर घर बांधले असते तर खूप फायदेशीर आणि देखभाल करणे कमी खर्चिक झाले असते असे आता वाटू लागले आहे. बंगल्यावर सोलर पॅनल तेव्हा लावायचा विचार केला होता,परंतु नंतर दुसरे स्वस्त पर्याय उपलब्ध झाल्याने कॅन्सल केला.

In reply to by आग्या१९९०

मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 20:47
कंटेनर घर, हा सर्वोत्तम पर्याय आहे. कमी वेळ, कमी खर्च, कमी देखभाल आणि किती पण उंच किंवा पसरट बांधता येते. शिवाय, थंड प्रदेशातील शेती करता येते. उदा. पुण्यात केशर शेती.

In reply to by आग्या१९९०

कंटेनर घर हे शेतघर म्हणून ठिक आहे पण हे माझे शेतघर नाही. हेच मुख्य घर असणार आहे आणि त्यामुळे मला घरा सारखे घर हवे आहे. मला कंटेनर घराची आईडियाच पटत नाही कारण एकतर आमच्या भागात उन्हाळ्यात तापमान ४०+ असते. दुसरे म्हणजे मला घराच्या मटेरियलचे नैसर्गिक टेक्स्चर हवे आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

मुक्त विहारि Sun, 02/09/2025 - 01:01
मी ५०-५५ डिग्री तापमान असताना देखील, ह्या घरात राहिलो आहे. AC असेल तरच इतक्या गरम तापमानात राहता येते आणि आखाती देशांत AC असतोच. इत्यलम....

In reply to by मुक्त विहारि

माझ्या जमिनीला नॅचरल स्लोप आहेत त्यामुळे मी खरेतर अर्धे अंडरग्राऊंड घर बांधू शकतो. पूर्ण अंडरग्राऊंड घरांमधे वर्षभर नैसर्गिकरित्या २०-२२ च्या रेंजमधे तापमान राहते हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे (बाहेर -५ तापमान असताना देखिल) त्यामुळे एसी आणि त्याचा मेंटेनन्स हे मला खरेतर फारशी भावणारी गोष्ट नाही. शिवाय कंटेनर घरांचे अस्थेटिक्स मला भावत नाही. तसेही सामान्य लोक जिथे अनाठायी खर्च करतात तिथे मी करणार नाही. (उदा. महागातल्या टाइल्स, पीओपी, अत्यंत भंगार टेस्टचे गॉडी इंटेरियर इत्यादी इत्यादी )

In reply to by मुक्त विहारि

मी त्यांचा अभ्यास केलेला आहे. मला नॉइज़ कॅन्सलिंग विंडो किंवा तश्या आधुनिक व्यवस्थांशिवाय राहणे अशक्य आहे. त्यामुळे खर्च वाढणार आहे हे नक्कीच आहे. हा खरेतर साधा प्लान आहे परंतु खर्च सुविधेवर जास्त आहे.

चित्रगुप्त Mon, 02/10/2025 - 08:25
तुम्ही दिलेल्या नकाशात attached toilet दोन्हीपैकी एकाही खोलीला नाही. म्हातारपणी आणि आजारपणात ते खूपच गरजेचे ठरते. त्या दृष्टीने एक खोली पुढे, दुसरी मागे कीचनजवळ, आणि दोन्हीच्या मधे टॉयलेट, असे करता येईल. जिन्याच्या पायर्‍या फार तर साडेसात इंच उंचीच्या, आणि single flight जिन्याऐवजी मधे सपाट लँडिंग असावे. .

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्तजी, सर्व खोल्यांना attached टॉयलेट आहे. जिन्याला लागून असेलेल्या रूमला जिन्या खाली attached टॉयलेट आहे, दुसऱ्या बेडरूमला देखील attached टॉयलेट आहे. आपण ले आऊट पुन्हा पहावा ही नम्र विनंती. जिन्याचा उपयोग जरूरीपूर्ता असणार आहे कारण माझा हॉल जवळ जवळ मोकळाच असणार आहे.

स्वधर्म Mon, 02/10/2025 - 13:02
आण्णा, तुमचा विचार खूप चांगला आहे, पण जरा धाडसाचा वाटतोय. माझ्याही मनात आमच्या शेतावर जाऊन राहण्याचा विचार आहे. तुमच्याप्रमाणेच आमच्या शेताच्या शेजाऱ्यांनी द्राक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. मी कटाक्षाने आमचे शेत करणाऱ्या नातेवाईकास द्राक्षे लाऊ नये, असे सांगितले आहे. द्राक्ष हे पीक एखाद्या आय सी यू मधल्या पेशंटसारखे जपावे लागते खते व बेसुमार औषधे मारावीच लागतात. परिणामी आमच्या सर्व शेजाऱ्यांच्या विहिरीचे पाणी सवळ झाले आहे. सर्वच शेतकरी 30 लीटरचे पिण्याच्या पाण्याचे कॅन वापरत आहेत पण रासायनिक खते व औषधे कमी करण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत गावी जाऊन रहायचे, तर तयारी ठेवावी लागेल. तुंम्ही घरासाठी 30 लाख रु. एकदम गुंतवण्यापेक्षा काही दिवस तिथेच आजूबाजूल राहून या प्रयोगाची चाचणी करून बघा. सोयीसुविधा, लोक, आपल्याला तिथे करमेल का याची खात्री झाल्यावरच घराचा खर्च करावा असे सुचवतो. बाकी पक्कं ठरलं असेल, तर शुभेच्छा.

In reply to by स्वधर्म

माझा द्राक्ष लावण्याचा अजिबात विचार नाही. मी ते करून पाहिले आहे मला त्या शेतीची प्रचंड चीड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जागा निवडण्यामागे दोन्ही टोकाला पाण्याची तळी आहेत. वरचे तळे बरेच मोठे आहे आणि सध्या ते अजून मोठे करण्याचे काम सुरू आहे,

In reply to by हणमंतअण्णा शंक…

स्वधर्म Mon, 02/10/2025 - 13:31
शेजार्यांच्या द्राक्ष या पिकामुळे होणारी पर्यावरणाची अवस्था हा होता. त्यांना औषधांची फवारणी जवळजवळ रोजच करावी लागते. त्यामुळे हवाही आरोग्यदायक रहात नाही.

In reply to by स्वधर्म

तुमचा मुद्दा अतिशय रास्त आहे. हा विचार नीट करावा लागेल. हवा प्रदूषित होत असेल तर नक्कीच गंभीर मामला आहे.

In reply to by स्वधर्म

खूप चांगल्या आहेत आणि तसे करण्यासाठी मी आमच्या जुन्या शेतात काही दिवस राहून पाहिले आहे. सोयीसुविधा म्हणजे काहीही नाहीत. लोक मात्र खूप चांगले आहेत कारण तो आमचाच भाग आहे करमेल का ते कुणास ठाऊक. मला तर साक्षात न्यू यॉर्क मधे पण करमले नव्हते. त्यामुळे आता ते देवाजीच्या हातातच आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
तर बऱ्याच दिवसांनी अपडेट देण्याइतपत प्रगती झाली असल्याने हा पुढचा भाग. जोवर घर बांधून पूर्ण होत नाही तोवर संयम बाळगणे इतकेच आपल्या हातात आहे. १. कुठे? आधी घर कुठे बांधावे हा एक यक्षप्रश्न छळत होता. त्या प्रश्नाचे नीट उत्तर सापडत नव्हते. आधी ठरवले होते की तालुक्याच्या ठिकाणी बांधावे. त्यासाठी एक दोन गुंठे जागाही घेतली १० लाखांना. पण तो विचार गळू लागला. २००० नंतर भारत झपाट्याने बदलला आहे. एकिकडे पुणे हे एक जबरदस्त मोठे खेडेगाव झाले आहे आणि गावं सुद्धा बरीच बदलली आहेत. तालुक्याच्या गावाच्या जत्रेला मी ५ वर्षांनी गेलो होतो.

घरगुती हिंसा व पोटगी

बाजीगर ·

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा Fri, 02/07/2025 - 19:26
हर तरफ़ हर जगह बेशुमार आदमी। फिर भी तनहाइयों का शिकार आदमी।। ज़िन्दगी का मुकद्दर सफर दर सफर आख़िरी सांस तक बेक़रार आदमी।। हर आदमी में होते हैं, दस बीस आदमी। जिसको भी देखना हो कई बार देखना।।

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा Fri, 02/07/2025 - 19:26
हर तरफ़ हर जगह बेशुमार आदमी। फिर भी तनहाइयों का शिकार आदमी।। ज़िन्दगी का मुकद्दर सफर दर सफर आख़िरी सांस तक बेक़रार आदमी।। हर आदमी में होते हैं, दस बीस आदमी। जिसको भी देखना हो कई बार देखना।।
लेखनविषय:
https://marathi.freepressjournal.in/maharashtra/court-slaps-dhananjay-munde-order-to-pay-alimony-to-karuna-munde घ्या कविता faster than instant coffee कुणाची घ्यावी बाजू, confuse झाला तराजू ।। महीना 15 लाख मागणा-या पीडीतेची, कि बीडच्या दलाल, अडत्याची !! सामाजिक न्याय मंत्री, घरगुती हिंसाचाराची जंत्री ।। एकीकडे पैसा आणि सत्ता धन अन् जय, दूसरीकडे कोर्टाने दिला, करुणामय विजय ।। द्विभार्या कायद्याचा सविनय भंग, बीडमधे सामाजिक कार्य दबंग ।। तिकडे त्रासले दादा, मित्राला वाचवायचा वादा ।। जनता पहातेय तमाशा, डेमोक्रेझी चा ढोलताशा ।।

क्रिकेटचा इसाप हरपला

जे.पी.मॉर्गन ·

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/06/2025 - 17:14
क्रिकेट म्हणजे केवळ अकरा खेळाडूंचा एक संघ वि. तसाच संघ इतकाच क्रिकेटचा सामना नसतो. खेळाडु त्याची फलंदाजी, शैली, स्वभाव, मैदान, अद्भूत गोष्टी, कथा, आख्यायिका, पराभव विजय, हे आणि असं सगळं त्या क्रिकेट मधे असतं. क्रिकेटला, गाणी, इतिहास, कलाकार, शहर, निसर्ग, मनुष्य, प्राणी यांना जोडून क्रिकेट सामन्याचं वर्णन लेख वाचनाचा आनंद द्वारकानाथ संझगिरी यांनी लाखो क्रिडा रसिकांना दिला. दै. सामनामधून लेखन ओळख झाली. शेवटच्या पानावर सामना संपला त्याच्या दुसया दिवशी वृत्तांत वाचायला मजा यायची. पावसाळी ढग, पाऊस आणि मग खेळपट्टीचा दमटपणा. सामन्याने कुस बदलली. जेव्हा लज्जाही लज्जेने लाजते असे लेखाचे शीर्षक, असे ललित लेख, कलाकारी असे काय काय. फेसबूकवर फॉलो करायचो. लेखन वाचायचो. काही महिन्यांपूर्वी त्यांना लेखन होत नव्हतं, वाचण्यात आलं होतं. आजारी होते हेही वाचण्यात आलं. आणि आज ही बातमी. कायम आठवण राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

जुइ गुरुवार, 02/06/2025 - 20:55
किक्रेट बरोबरच त्यांचे भटकंतीवरचे असंख्य लेख ,पुस्तके तसेच देव आनंद, लता मंगेशकर आणि सिने सृष्टीतील अनेक इतर कलावंत यांच्यावरचे त्यांचे लेख अनेकदा वाचले आहेत. ९ वर्षांपूर्वी त्यांचा आम्ही राहत असलेल्या शहरात कार्यक्रम झाला होता. त्यावेळी त्यांबरोबर अनेक विषयांवर दिलखुल्लास गप्पा झाल्याच्या आठवत आहेत. त्यांनी गप्पां दरम्यान अळणी जेवण केल्याचे चांगले समरणात आहे.गप्पा रंगवण्यात त्यांचा हातखंड होता. त्यांची उणीव कायमच भासेल.

राघव Sun, 02/09/2025 - 23:00
अत्यंत आवडणारं, गहिरं लेखन होतं संझगिरींचं! हृदयस्पर्शी! भावपूर्ण श्रद्धांजली!!

सौंदाळा Mon, 02/10/2025 - 13:11
संझगिरी माझे आवडते लेखक, क्रीडा वार्ताहर. एकदा गोव्यातील एका देवळात त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचादेखील योग आला होता. देवळातील पुजार्‍यांच्या कर्मठपणावर ते पुजार्‍यांसमोरच कठोर टीका करत होते. काही दिवस आधीच त्यांचा मधुबालाच्या चित्रपट्गीतांचा कार्यक्रम टीव्हीवर पाहिला होता, तो विषय काढताच ते खूष झाले. त्यांची पुस्तके, पाकीस्तानमधील आदरातिथ्याचा अनुभव वगैरे वाचले आहेत हे सांगितल्यावर लहान मुलासारखे हसू त्यांच्या चेहर्‍यावर आले होते. त्यांचे युट्युबवरील वासू परांजपे यांच्याबरोबरचे क्रिकेटचे व्हिडिओज, सीओईपी मधील भाषण अजूनही अधून मधून ऐकत असतो. त्याच्या गळ्यातील 'पप्पू' असे मराठीत लिहिलेले जगावेगळे सोन्याचे लॉकेट तर विसरणे शक्यच नाही. नेहमीप्रमाणेच समायोचित लेख. द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रध्दांजली

MipaPremiYogesh Tue, 02/18/2025 - 05:27
द्वारकानाथ सर माझे एकदम आवडते लेखक होते.. समायोचित लेख.. साधारणतः  2007-08 सालची गोष्ट आहे. द्वारकानाथ संझगिरी ह्यांनी एक गाण्याचा कार्यक्रम केला होता बालगंधर्व ला. मी त्यांच्या लिखाणाचा चाहता होतो त्यामुळे त्यांना भेटायचे होतेच. कार्यक्रम झाल्यावर त्यांना भेटलो , छान गप्पा मारल्या आणि खाली वाकून नमस्कार केला. ते म्हणाले अरे कशाला नमस्कार वगैरे..मी म्हणालो सर तुम्ही वयाने आणि अधिकाराने मोठे आहात म्हणून नमस्कार आणि दुसरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जेंव्हा वारकरी वारी ला जाऊन येतो तेंव्हा जे वारी ला गेले नाहीये ते त्याला नमस्कार करतात का तर त्याने विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे..मी म्हणालो तसेच तुम्ही आमचा विठ्ठल सचिन  ह्याला लहान पणापासून पाहिले आहे त्यामुळे हा नमस्कार त्याला पण आहे..हे वाक्य ऐकल्यावर एकदम खुश झाले. असे आपले सिद्धहस्त आणि चतुरस्त्र लाडके लेखक आपल्यातून गेले ह्या बद्दल भावपूर्ण श्रद्धांजली..

क्रिकेट सारख्या वाह्याद खेळाशी नित्यावरील लेखांशी कमी संबंध आला, पण तरीही द्वारकानाथ संझगिरी हे नाव ऐकून होतो. भावपूर्ण श्रद्धांजली!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Tue, 02/18/2025 - 11:51
टंकला नसता तरी चालला' असता असा अनुचित प्रतिसाद. केवळ हाताशी कळफलक आहे म्हणजे तो बडवलाच पाहिजे अशा विचारसरणी असल्यावर काय करणार

In reply to by सुबोध खरे

का? क्रिकेट मध्ये ० इंटरेस्ट असूनही द्वारकानाथ संझगिरी ह्यांचे नाव ऐकून होतो हे सांगायचे आहे. तसेच त्याना श्रद्धांजली वाहण्यात काय चूक?

कपिलमुनी Tue, 02/18/2025 - 13:03
षटकार संझगिरि यांची पहिली ओळख झाली , पुढे वर्तमन पत्रे , पुस्तके आणि नंतर सोशल मिडिया यावर त्यंचे लिखाण वाचण्यास मिळाले. फेसबुक वर ते मेसेज ना नेहमी रीप्लाय करायचे . काही दिवसांपूर्वी त्यांनी लीहायल जमत नसल्याने कोणी लेखनिक आहे का असे विचारले होते .. एवढ्या आजारातही लिहिण्याची उर्मी असणे किति विलक्ष्ण आहे. ओघवती लेखन शैली असलेला माणूस हरपला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/06/2025 - 17:14
क्रिकेट म्हणजे केवळ अकरा खेळाडूंचा एक संघ वि. तसाच संघ इतकाच क्रिकेटचा सामना नसतो. खेळाडु त्याची फलंदाजी, शैली, स्वभाव, मैदान, अद्भूत गोष्टी, कथा, आख्यायिका, पराभव विजय, हे आणि असं सगळं त्या क्रिकेट मधे असतं. क्रिकेटला, गाणी, इतिहास, कलाकार, शहर, निसर्ग, मनुष्य, प्राणी यांना जोडून क्रिकेट सामन्याचं वर्णन लेख वाचनाचा आनंद द्वारकानाथ संझगिरी यांनी लाखो क्रिडा रसिकांना दिला. दै. सामनामधून लेखन ओळख झाली. शेवटच्या पानावर सामना संपला त्याच्या दुसया दिवशी वृत्तांत वाचायला मजा यायची. पावसाळी ढग, पाऊस आणि मग खेळपट्टीचा दमटपणा. सामन्याने कुस बदलली. जेव्हा लज्जाही लज्जेने लाजते असे लेखाचे शीर्षक, असे ललित लेख, कलाकारी असे काय काय. फेसबूकवर फॉलो करायचो. लेखन वाचायचो. काही महिन्यांपूर्वी त्यांना लेखन होत नव्हतं, वाचण्यात आलं होतं. आजारी होते हेही वाचण्यात आलं. आणि आज ही बातमी. कायम आठवण राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

जुइ गुरुवार, 02/06/2025 - 20:55
किक्रेट बरोबरच त्यांचे भटकंतीवरचे असंख्य लेख ,पुस्तके तसेच देव आनंद, लता मंगेशकर आणि सिने सृष्टीतील अनेक इतर कलावंत यांच्यावरचे त्यांचे लेख अनेकदा वाचले आहेत. ९ वर्षांपूर्वी त्यांचा आम्ही राहत असलेल्या शहरात कार्यक्रम झाला होता. त्यावेळी त्यांबरोबर अनेक विषयांवर दिलखुल्लास गप्पा झाल्याच्या आठवत आहेत. त्यांनी गप्पां दरम्यान अळणी जेवण केल्याचे चांगले समरणात आहे.गप्पा रंगवण्यात त्यांचा हातखंड होता. त्यांची उणीव कायमच भासेल.

राघव Sun, 02/09/2025 - 23:00
अत्यंत आवडणारं, गहिरं लेखन होतं संझगिरींचं! हृदयस्पर्शी! भावपूर्ण श्रद्धांजली!!

सौंदाळा Mon, 02/10/2025 - 13:11
संझगिरी माझे आवडते लेखक, क्रीडा वार्ताहर. एकदा गोव्यातील एका देवळात त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचादेखील योग आला होता. देवळातील पुजार्‍यांच्या कर्मठपणावर ते पुजार्‍यांसमोरच कठोर टीका करत होते. काही दिवस आधीच त्यांचा मधुबालाच्या चित्रपट्गीतांचा कार्यक्रम टीव्हीवर पाहिला होता, तो विषय काढताच ते खूष झाले. त्यांची पुस्तके, पाकीस्तानमधील आदरातिथ्याचा अनुभव वगैरे वाचले आहेत हे सांगितल्यावर लहान मुलासारखे हसू त्यांच्या चेहर्‍यावर आले होते. त्यांचे युट्युबवरील वासू परांजपे यांच्याबरोबरचे क्रिकेटचे व्हिडिओज, सीओईपी मधील भाषण अजूनही अधून मधून ऐकत असतो. त्याच्या गळ्यातील 'पप्पू' असे मराठीत लिहिलेले जगावेगळे सोन्याचे लॉकेट तर विसरणे शक्यच नाही. नेहमीप्रमाणेच समायोचित लेख. द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रध्दांजली

MipaPremiYogesh Tue, 02/18/2025 - 05:27
द्वारकानाथ सर माझे एकदम आवडते लेखक होते.. समायोचित लेख.. साधारणतः  2007-08 सालची गोष्ट आहे. द्वारकानाथ संझगिरी ह्यांनी एक गाण्याचा कार्यक्रम केला होता बालगंधर्व ला. मी त्यांच्या लिखाणाचा चाहता होतो त्यामुळे त्यांना भेटायचे होतेच. कार्यक्रम झाल्यावर त्यांना भेटलो , छान गप्पा मारल्या आणि खाली वाकून नमस्कार केला. ते म्हणाले अरे कशाला नमस्कार वगैरे..मी म्हणालो सर तुम्ही वयाने आणि अधिकाराने मोठे आहात म्हणून नमस्कार आणि दुसरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जेंव्हा वारकरी वारी ला जाऊन येतो तेंव्हा जे वारी ला गेले नाहीये ते त्याला नमस्कार करतात का तर त्याने विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे..मी म्हणालो तसेच तुम्ही आमचा विठ्ठल सचिन  ह्याला लहान पणापासून पाहिले आहे त्यामुळे हा नमस्कार त्याला पण आहे..हे वाक्य ऐकल्यावर एकदम खुश झाले. असे आपले सिद्धहस्त आणि चतुरस्त्र लाडके लेखक आपल्यातून गेले ह्या बद्दल भावपूर्ण श्रद्धांजली..

क्रिकेट सारख्या वाह्याद खेळाशी नित्यावरील लेखांशी कमी संबंध आला, पण तरीही द्वारकानाथ संझगिरी हे नाव ऐकून होतो. भावपूर्ण श्रद्धांजली!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Tue, 02/18/2025 - 11:51
टंकला नसता तरी चालला' असता असा अनुचित प्रतिसाद. केवळ हाताशी कळफलक आहे म्हणजे तो बडवलाच पाहिजे अशा विचारसरणी असल्यावर काय करणार

In reply to by सुबोध खरे

का? क्रिकेट मध्ये ० इंटरेस्ट असूनही द्वारकानाथ संझगिरी ह्यांचे नाव ऐकून होतो हे सांगायचे आहे. तसेच त्याना श्रद्धांजली वाहण्यात काय चूक?

कपिलमुनी Tue, 02/18/2025 - 13:03
षटकार संझगिरि यांची पहिली ओळख झाली , पुढे वर्तमन पत्रे , पुस्तके आणि नंतर सोशल मिडिया यावर त्यंचे लिखाण वाचण्यास मिळाले. फेसबुक वर ते मेसेज ना नेहमी रीप्लाय करायचे . काही दिवसांपूर्वी त्यांनी लीहायल जमत नसल्याने कोणी लेखनिक आहे का असे विचारले होते .. एवढ्या आजारातही लिहिण्याची उर्मी असणे किति विलक्ष्ण आहे. ओघवती लेखन शैली असलेला माणूस हरपला.
लेखनप्रकार
"एकदा काय झालं.... तर विराटाने आदेशच दिला की रे बल्लवाला - "तू माझा दास आहेस. काहीही करून तुला मल्लयुद्धात त्या जीमूताला हरवावंच लागेल!" आता आली का पंचाईत? पांडव तर होते अज्ञातवासात! आता भीमाला आलं टेन्शन!" आजोबा अगदी 'हरीतात्या' स्टाईलमध्ये आम्हाला गोष्ट सांगायचे आणि आम्ही डोळे विस्फारून ती ऐकायचो! आज लक्षात येतं की आयुष्य ह्याच गोष्टींनी घडलं. रामायण महाभारत, भक्त प्रह्लाद, छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज, संताजी-धनाजी, भगतसिंह-राजगुरु-सुखदेव, सावित्रीबाई, गाडगेबाबा...ह्यांच्याच कणा कणानी बनलेलं आहे.