मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये

गंगाधर मुटे ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 13/04/2014 - 10:45
कविवर्य काहीतरी सांगू पहात आहेत एवढ लक्षात आलं, पण नेमक काय ते नीटस उमगल नाही. ==या प्रतिसादासाठी सही== (-स्वतःस काय माहित नाही ते माहित असलेला माहितगार)

In reply to by माहितगार

कवी अवकाळी पावसावर नाराज आहे, वरुणदेवाने केव्हाही पाऊस पाडू नये, त्याने त्याच्यावर फालतू जातीवर येऊ नये असे कवीला म्हणायचे असावे. गरीबी इथे जोपासली जाते म्हणन्यापेक्षा इथे लोक गरीब राहावेत अशीच व्यवस्था सरकार राबवते,आणि ती एक महान परंपरा म्हणजे व्यवस्थेचे प्रमुखांची ती तक्रार असावी. एकूण तक्रारीची ही रचना आहे. पण मला आवडल्या होत्या त्या खाली लिहिलेल्या ओळी पण यातली दुसरी ओळ अपेक्षापूर्ण करु शकली नाही असे वाटले. काही तरी अजून खास लिहिता आलं असतं असं वाटलं. अर्थात कवीच्या आणि सरकारच्या मनात केव्हा काय असेल सांगता येत नाही. :) तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरुणदेवाने केव्हाही पाऊस पाडू नये, त्याने त्याच्यावर फालतू जातीवर येऊ नये
इथे फालतु हा शब्द नकक्की कोणाला उद्देशुन वापरलाय हे नीटसे उमगले नाही . वरुणाला उद्देशुन वापरला असेल तर एक वेळ ठीक आहे ....पण जातीला फालतु हा शब्द वापरला असेल तर अ‍ॅट्रॉसिटी खाली हा गुन्हा ठरेल ना ? बाकी कविता सो सो . असो .

In reply to by प्रसाद गोडबोले

नगरीनिरंजन 14/04/2014 - 17:11
आणि तुम्ही लावलेला अर्थ घेतला तरी अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार करायची की नाही ते वरुणदेव बघून घेईल. आजच्या जगात वरुणदेवाची (किंवा कोणत्याही देवाची) आणि आपली जात एकच आहे असा भ्रम होऊ शकण्याइतका भ्रमिष्ट कोणत्याही जातीत असेल असे वाटत नाही. देव ही एक कल्पना आहे आणी तिच्याशी कोणत्याही प्रकारे थेट संबंध असल्याचा समज असणारे लोक वास्तवापासून भरकटलेले असतात हे सगळ्यांना माहित असेल अशी आशा. (वरुणदेव म्हणजे वरुण नाव आणि देव आडनाव असलेला माणूस नव्हे हेही इथे स्पष्ट करुन ठेवलेले बरे).

In reply to by धन्या

तुम्ही त्यांच्या कवी म्हणून असलेल्या "पोएटीक लिबर्टी"च्या हक्कावरच घाला घालत आहात.
"पोएटीक लिबर्टी" लय भारी शब्द .... ह्यावरुन काही महिन्यांन पुर्वी बाबासाहेबांचे घटना निर्मितीच्या काळातील व्यंग चित्र आणि "आर्टिस्टिक लिबर्टी" ह्यावुन निर्माण झालेला वाद आठवला ! ती लिबर्टी खपवुन घेतली गेली नव्हती ...लय राडा झाला होता ! (बायदवे , धन्या ,केवळ आपल्यात गैरसमज नको म्हणुन ....... माझा मुद्दा इतकाच होता की इथे आपण जातिनिर्मुलनाच्या दिशेने प्रयत्न करीत आहोत तेव्हा कोणाचीही जात काढणे काही योग्य नाही , आता उद्या कोणी जर बळीराजाने त्याची जात दाखवु नये असे कडवे टाकले तरीही मी त्याचा निषेध्दच करेन !! )

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 15/04/2014 - 00:56
@प्रसाद गोडबोले,
जातिनिर्मुलनाच्या दिशेने प्रयत्न करीत आहोत
तुम्हाला बहुधा मनुष्यजातीतील अंतर्गत जातीव्यवस्थेविषयी बोलायचे असावे. तसे असेल तर ठीक अन्यथा - मनुष्यजात आणि जनावरांची जात यातील जातीचे निर्मूलन करायचे म्हटले तर माणूस आणि जनावर यांना एकाच वर्गवारीत आणावे लागेल. - देव आणि दानव यांनाही एकाच पारड्यात मोजावे लागेल. - जर्शी ही त्या गाईची जात असूनही सारेच तिला "जर्सी गाय" असेच म्हणतात. जास्त दूध देते म्हणून जात काढण्याची मुभा असते की काय?
कोणाचीही जात काढणे काही योग्य नाही
या विधानाने मला अजिर्ण झाल्यासारखे वाटत आहे. पचणे फारच कठीण चाललेय. अहो गोडबोले साहेब, सोईचे असेल तर जातीचे समर्थन आणि जेथे गैरसोय होते तेथे निर्मुलनाची भाषा हा विचित्र पण नवा प्रघातच पडला आहे आता आपल्या देशात. जात (Caste) या विषयावर काही अपवाद वगळता प्रत्येक मनुष्य दुतोंडी झाला आहे. हे विधान मी खात्रीने आणि पुराव्यानिशी करू शकतो. --------------------- जाता जाता पुन्हा एक जात काढून जातो. महेंद्रकपूर - माझ्या पासून दूर नको जाऊ गंगूबाई तुझ्याविना मला करमत नाय उषा मंगेशकर - नेऊ नका आडोशाला येणार मी नाय पुरुषांच्या जातीचा भर्‍होसा काय? ---------------------- प्रसादराव, मला असे वाटते की पुरुषांची जात काढली म्हणून महिलांवर 'अ‍ॅट्रासिटी' लावण्यापेक्षा पुरुषांच्या जातीवर भरवसा ठेवण्याइतपत त्यांच्यात विश्वासाहार्य बदल घडवून आणायला हवेत. नाहीतर महिला पुरुषांची 'जात' काढतच राहतील. कारण ..... :)

In reply to by नगरीनिरंजन

तुम्ही लावलेला अर्थ घेतला तरी अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार करायची की नाही ते वरुणदेव बघून घेईल.
हो ना . आंबेडकर जयंतीला आपण अजुनही एखाद्याची जात काढण्याचे समर्थन करत आहात हे पाहुन आनंद वाटला !!
आजच्या जगात वरुणदेवाची (किंवा कोणत्याही देवाची) आणि आपली जात एकच आहे असा भ्रम होऊ शकण्याइतका भ्रमिष्ट कोणत्याही जातीत असेल असे वाटत नाही.
नेहमीचा गोंधळ ... मायथॉलॉजी एक तर संपुर्ण स्विकारा किंव्वा पुर्ण नाकारा .... म्हणजे जर वरुणदेव मानत असाल तर त्याला जात होती हेही माना , आणि मानत नसाल तर मग कोणत्याही का जातीचा असेना , त्याची जात काढु नका .... जातिनिर्मुलनाच्या साठी प्रयत्न करा !
देव ही एक कल्पना आहे आणी तिच्याशी कोणत्याही प्रकारे थेट संबंध असल्याचा समज असणारे लोक वास्तवापासून भरकटलेले असतात
हे तुमचे वैयक्तिक मत आहे . त्यामुळे त्या बद्दल पास . खुष राव्हा !!

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 15/04/2014 - 01:49
जर वरुणदेव मानत असाल तर त्याला जात होती हेही माना
माझ्यासारख्याला वरुणदेवाचे देव म्हणून किंवा व्यक्ती म्हणून अस्तित्व मानायचे किंवा नाकारायचे, या दोनपैकी कोणताच प्रश्न कधीच न पडल्याने त्याविशयी कधी सखोल विचार केलाच नाही. पुरातन ग्रंथात त्याची caste काय लिहिली आहे, हे माहीत करून घ्यायची तर आजही गरज वाटत नाही. पण मला असे वाटते की वरुणदेवाच्या नामकरणाच्या पुरातन ग्रंथांच्या तत्कालीन जमान्यात जातीव्यवस्था अस्तित्वात नसेल. तेव्हा वर्णव्यवस्था अस्तित्वात असावी. कुणी याविषयी लिहिले तर वाचायला आवडेल आणि माझ्या ज्ञानात भरसुद्धा पडेल. शिवाय प्रुथ्वीची निर्मीती झाली तेव्हापासून वरुणदेवाचे (देव म्हणून नव्हे तर पाऊस पाडणारी शक्ती/यंत्रणा) अस्तित्व आहे. पुरातन ग्रंथ कितीही पुरातन असले तरी पृथ्वीच्या निर्मितीच्या काळाचा हिशेब करता सर्व पुरातन ग्रंथ हे काही वर्षातलेच ठरतात. त्यामुळे त्याला जात होतीच हेही मानने माझ्यासारख्या आवश्यक अथवा अनावश्यक वाटत नाही कारण आता प्रयोजन उरलेले नाही. --------------------------------- मी काव्यात वापरलेल्या जात या शब्दाचे caste या अर्थाशी काहीही देणे घेणे नाही. केवळ "वृती" असाच अर्थ घ्यावा. वाक्यरचना आणि आशय लक्षात घेतला तर तोच अर्थ निघतो. casteवाचक अर्थ कोणत्याही अंगाने निघत नाही. आशय व्यक्त करतांना अत्यंत परफेक्ट अर्थ वाचकांपर्यत पोचवायला नेमके शब्द वापरावेच लागतात. उदा. मला ज्योतीबा फुले, डॉ. आंबेडकर आणि शरद जोशी हे एकाच जातीचे वाटतात. संघर्षाच्या बाबतीत तर या तिघांचीही जातकुळी निसंशय एकच आहे.

In reply to by गंगाधर मुटे

विवेकपटाईत 18/04/2014 - 21:31
वैदिक काळात जाती व्यवस्था नव्हती. देवांची कुठलीही जाती नव्हती. जेंव्हा मनुष्य स्थिरावला अर्थात शेती, व्यापार इत्यादी करू लागला आणि त्या साठी स्वत:ची वेगळी ओळख असणे गरजेचे भासू लागले अशाप्रकारे हळू हळू जात व्यवस्था समाजात पसरली.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे 13/04/2014 - 19:23
धन्यवाद बिरुटे सर. जे लिहिले त्याचा तंतोतंत अर्थ काव्यातून पोचत असेल तर त्याचा आनंद आणि समाधान काही औरच असते. __________________ तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही ही ओळ तुम्हाला आवडली त्याबद्दल धन्यवाद. मात्र दुसरी ओळ अपेक्षा पूर्ण करू शकली नाही तेवढ्याने बरे झाले. नाही तर गझलेचा त्या एकाच शेराने नूर पालटला असता आणि अन्य शेरातून जे पोचवायचे आहे (ज्यासाठी ही गझल लिहिली गेली आहे) ते बाजूला पडून मूख्य आशयाकडेच वाचकाचे दुर्लक्ष झाले असते. मग लेखकाने/कवीने तेवढी काळजी घ्यायला नको का? आपल्याला जे लिहायचे असते, ते लिहून झाल्यानंतर ते किती हलके वा जड आहे, हे लक्षात येऊनच जाते. वाचकांची पसंती/नापसंती हा वेगळा भाग आहे. त्यामूळे नाईलाजाने पहिल्या ओळीचा समारोप करतांना दुसर्‍या ओळीत मीठ वापरायचे टाळले व फोडणी बिघडू दिली. क्षमस्व. ------ कधी तरी त्या ओळीला साजेशी दुसरी ओळ लिहून मी नक्कीच स्वतंत्र गझल लिहेन. ये वादा रहा! दोस्ती के खातीर इतना तो करही सकता हू| :)

गंगाधर मुटे 13/04/2014 - 19:28
@ नगरीनिरंजनजी धन्यवाद| @ प्रसाद गोडबोले, वरूणदेवाला पण 'जात' असते? मला वाटते की बहुतेक नसावीच. आणि असलीच तर माझी आणि माझ्या देवाची 'जात' वेगवेगळी कशी असणार?

In reply to by प्रसाद१९७१

गंगाधर मुटे 14/04/2014 - 15:02
लेखकाला काही जाती चांगल्या आणि काही वाईट असे सुचवायचे आहे. खरे तर लेखकाचे तसे च गृहीतक आहे.>>> हे खरे आहे हो. कापसामध्ये L.R.A 5166 ही जात फारच रोगट आहे. रसशोषणार्‍या किडीला बळी पडत असल्याने उत्पादन पण कमी देते. त्यापेक्षा L.R.A-516 ही जात बरी आहे पण खुजी आहे. Ak-84635 या दोन्ही जातीपेक्षा चांगली जात आहे. खुजी नाही आणि रोगटपण नाही पण उत्पादन कमी देते. या जातींपेक्षा अमेरिकन नर आणि भारतीय मादी यांचा संकर घडवून आणला तर त्यातून चांगले वाण तयार होतात आणि उत्पादनदेखील चौपट देतात. उदा एच-४, एनएचएच-४४ वगैरे. निदान कापसामध्ये तरी मूळ जातीपेक्षा संकरित वाण अधिक जोमदार असतात हे सिद्ध झालेले आहे.

In reply to by प्रसाद१९७१

गंगाधर मुटे 14/04/2014 - 15:08
वरिल प्रतिसाद खालीलप्रमाणे वाचावा. मला संपादनाची सोय नसल्याने संपादन करता आले नाही.
लेखकाला काही जाती चांगल्या आणि काही वाईट असे सुचवायचे आहे. खरे तर लेखकाचे तसे च गृहीतक आहे.
हे खरे आहे हो. कापसामध्ये L.R.A 5166 ही जात फारच रोगट आहे. रसशोषणार्‍या किडीला बळी पडत असल्याने उत्पादन पण कमी देते. त्यापेक्षा L.R.A-516 ही जात बरी आहे पण खुजी आहे. Ak-84635 या दोन्ही जातीपेक्षा चांगली जात आहे. खुजी नाही आणि रोगटपण नाही पण उत्पादन कमी देते. या जातींपेक्षा अमेरिकन नर आणि भारतीय मादी यांचा संकर घडवून आणला तर त्यातून चांगले वाण तयार होतात आणि उत्पादनदेखील चौपट देतात. उदा एच-४, एनएचएच-४४ वगैरे. निदान कापसामध्ये तरी मूळ जातीपेक्षा संकरित वाण अधिक जोमदार असतात हे सिद्ध झालेले आहे.

In reply to by drsunilahirrao

गंगाधर मुटे 16/04/2014 - 12:04
शेराचा विचार करता 'विनाकारण' या शब्दापेक्षा 'फालतू' हा शब्दच जास्त संयुक्तिक आणि अर्थप्रवाही ठरायला हवा. कारण नसताना केलेले कृत्य - विनाकारण गरज संपल्यानंतर/भागल्यानंतर सुद्धा वरकड/गरजेपेक्षा जास्तीचे "वरकड" कृत्य करत राहणे म्हणजे 'फालतू' असा अर्थ वाचकांनी घ्यावा, असे अभिप्रेत आहे. जेव्हा गरजेपेक्षा जास्त पाऊस होतो तेव्हा "ओला दुष्काळ" आणि जेव्हा पावसाची अजिबात गरज नसते तेव्हा पाऊस आला तर आपण त्याला अवकाळी पाऊस म्हणतो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by मदनबाण

मृगनयनी 18/04/2014 - 18:16
जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी? की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?
शेती करणारे असाल... तर कर्माने नक्कीच तुम्ही "शूद्र" नसाल!!.. आणि जन्माने असाल.. तर मग.. "संत- चोखामेळा" यांचा आदर्श का नाही डोळ्यासमोर ठेवत? तत्कालीन उच्चवर्णीयांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून त्यांनी कातडी देव्हार्‍यामध्ये विठ्ठल-रुक्मिणीची स्थापना केली होती. आपल्याकडे खरा- म्हणजे चोखामेळ्यासारखा भक्तिभाव असेल.. तर वरूणदेवच काय.. सगळेच देव पावतील तुम्हाला!!!!! फक्त त्यासाठी देवाची करूणा भाकली पाहिजे.. देवापुढे नम्र झाले पाहिजे. कविता ही कवीच्या मनाचे प्रतिबिम्ब असते.. असे म्हणतात..... तुमच्या कवितेतून वरूणदेव आणि ओव्हरऑल सगळ्याच देवांबद्दलचा द्वेष जाणवतोये. "देव" ही संकल्पना खरोखर अस्तित्वात आहे.. असे जर मानत असाल.. तर देवाला शिव्या देणं थांबवा.. आणि केवळ कवितेपुरतं "देवा"ला मध्ये आणायचं असेल.. तर बाकीच्या देव मानणार्‍यांच्या धार्मिक भावनांचा अपमान होऊ नये.. याची काळजी घ्या......... :) पाऊस पडावा, असे वाटत असेल तर "पर्जन्यसूक्ता"चे पठण करून यज्ञ करावा.. पूर्वीच्या काळी पर्जन्यदेवतेला आवाहन करण्यासाठी महान ऋषी-मुनी हीच पद्धत अवलंबत असत.... :) :)

In reply to by मृगनयनी

गंगाधर मुटे 18/04/2014 - 20:16
मी देव मानतो की नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचे सार्वजनीक प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नसतेच. मी माझ्या देवाशी कसे वागावे, हा सुद्धा माझा स्वतःचा प्रश्न आहे. देव जर कुणाची खाजगी मालमत्ता नसेल तर देवाला दोन खडे बोल सुनावल्याने कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचेच असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या. वरुणदेवाने तर गारपीठ वगैरे पाडून शेत नेस्तनाबूत करण्याचे सारे प्रयोग त्याच्या चाहत्यांच्या अथवा भक्तांच्या शेतातच करावे. इतरांच्या कशाला? :) मृगनयनी, तुम्ही तरी वरुणदेवाच्या या कृत्याचे कशाला समर्थन करत आहात? :)

In reply to by गंगाधर मुटे

मृगनयनी 18/04/2014 - 23:05
मी देव मानतो की नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचे सार्वजनीक प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नसतेच.
गंगाधर मुटे, ऑलरेडी तुम्ही त्याचे सार्वजनिक प्रकटीकरण केलेले आहे.- तुमच्या या ओळींमधून वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी? की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये? कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये या सगळ्या ओळींमध्ये आपण देवाचे नाव तीनदा घेऊन त्याचे सार्वजनिकीकरण केलेलेच आहे की!!!!
मी माझ्या देवाशी कसे वागावे, हा सुद्धा माझा स्वतःचा प्रश्न आहे. देव जर कुणाची खाजगी मालमत्ता नसेल तर देवाला दोन खडे बोल सुनावल्याने कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.
इथे तुम्ही म्हणताय, की तुमच्या देवाशी कसे वागावे.. हा डेफिनेटली हा तुमचा प्रश्न आहे. पण सार्वजनिक साईटवरती आपण देवाची नसलेली जात काढून त्याला "जातीच्या चौकटीत" बसवण्याचा प्रयत्न करत आहात!!! आणि देव सगळ्यांचा आहे. आणि कुणाचीही खाजगी मालमत्ता नाहीच्चे!!.. अहो.. जी मालमत्ता सगळ्यांना प्राप्त होत असते.. ती देवाच्याच कृपेने की!!! आणि देवाला खडे बोल सुनावणारे तुम्ही-आम्ही कोण? आणि इथले किमान ५० % मिपाकर आणि बाकीचे मिपावाचन करणारे पाहुणे यांपैकी अनेक जणांच्या मनात देवाची प्रतिमा अत्यंत उच्चस्थानी आहे. देव हे आमचे श्रद्धास्थान आहे. तुमच्या लेखी नक्की देवाचे काय स्थान आहे.. हे मला माहित नाही. पण एकंदर तुमच्या भाषेवरून आणि त्राग्यावरून देव म्हणजे तुमचा नोकर आहे आणि त्याने काम नीट केले नाही म्हणून तुम्ही त्याला शिव्या देत त्याची जात काढत आहात.. असे वाटते. अर्थात हे सगळं.. आमच्या दृष्टीने खूप निरर्थक आणि आक्षेपार्ह आहे. पण तरीही तुमची भडास काढायला तुम्हाला ज्या काही शिव्या द्यायच्या असतील.. त्या तुमच्या प्रायव्हेट ब्लॉगवर देऊ शकता.. जो की तुमच्या मालकीचा असेल.. तिथे तुमच्याच विचारसरणीची माणसे येत असतील.. अर्थात जिथे आमच्यासारख्या लोकांना यायची इच्छाही नसेल...
याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचेच असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या.
इथे तुमच्या या वक्तव्यावर हसावे, की रडावे.. ह्च कळत नाही. देवाचे वकीलपत्र!!!.. ओह माय गॉड॥!!.. तुमची केस खरंच हाताबाहेरची आहे.. असं वाटतंय!!!.. विश्वाचा अफाट पसारा चालवणारी जी एक दिव्य आणि दैवी शक्ती आहे.. तिला परमात्मा, परमेश किंवा सोप्या भाशेत- "देव" असे म्हणतात.... संपूर्ण विश्वाचे पालनपोषण करणार्‍या देवाचे वकीलपत्र घेणे.. ही कल्पनासुद्धा खूप हास्यास्पद आहे. संत एकनाथांच्या घरी देवाने "श्रीखंड्या"च्या रूपाने पाणी भरले. संत सखूबाईंना पंढरपुरास पाठवुन स्वतः तिच्या सासूचा छळ सहन केला, सन्त ज्ञानेश्वरांसाठी रेड्याच्या तोंडून वेद वदवले, सन्त तुकारामांच्या गाथा १३ दिवसांनंतर जश्याच्या तश्या पाण्यातून वर आणल्या... या सगळ्या कथा ऐकून कदाचित तुम्हाला वाटले असेल.. की देव सहज उपलद्ब्ध असतो...हो खरं आहे.. देव सहज उपलद्ब्ध असतो..सगुण रुपातही आणि निर्गुण रुपातही!!!.... पण तो त्याच्या भोळ्या भक्तांसाठी..!!!.. त्याच्या ठिकाणी नम्र होऊन त्याची करूणा भाकणार्‍यांसाठी!!!!... उठसूट देवाला आपल्या मनाला येइल त्या चौकटीत किन्वा जातीत स्वार्थीपणाने बसवून त्याला उद्धटपणे जाब विचारणार्‍यांसाठी नाही!!!
वरुणदेवाने तर गारपीठ वगैरे पाडून शेत नेस्तनाबूत करण्याचे सारे प्रयोग त्याच्या चाहत्यांच्या अथवा भक्तांच्या शेतातच करावे. इतरांच्या कशाला? Smile
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अहो भक्तांना कश्यासाठी तो अशी दु;खे देइल?..उलट आणि अगदी एखाद्या भक्ताच्या पूर्वकर्मानुसार भक्तांना पीडाच भोगायचे नशिबात असेल.. तर देव कोहळ्याएवढा भोग आवळ्याएवढा करू शकेल!!!... ज्यांना देव म्हणजे काय आहे, कोण आहे.. त्याची शक्ती किती व्यापक आहे.. हेच्च कळले नाही.. जे लोक मनमानी वागून करंट्या सरकारच्या चुका, शेतकर्‍याच्या व्यथा यांचे खापर देवाच्या माथी फोडतात.. त्यांना देव का मदत करेल??? कुणी देव मानो अथवा न मानो.. किन्वा त्याची खिल्ली उडवो.. निसर्गाच्या नियमांनुसार घटना घडत असतात... फक्त देव त्याच्या खर्‍या भक्तांच्या पाठी मात्र मजबूतपणे उभा असतो आणि असतोच्च!!!! गारपीट खर्‍या भक्ताच्याही शेतात पडते.... पण तुलनेने त्याचे नुक्सान कमी होते. किन्वा अनाहुतपणे त्याला कुणाची तरी मदत मिळते.. किन्वा सरकारी मदत तरी मिळते. काही मिपाकरांचेही असे काही चांगले अनुभव आहेतच की!!!
मृगनयनी, तुम्ही तरी वरुणदेवाच्या या कृत्याचे कशाला समर्थन करत आहात? Smile
मी वरूणदेवाचे समर्थन बिल्कूल करत नाही. गारपीटीने शेतकर्‍यांचे, शेतीचे किती भयानक नुक्सान झाले.. हे मी पाहिलेय. खरोखर त्या बद्दल अत्यंत दु:खही होत आहे. परन्तु वरुणदेवाला जातीच्या चौकटीत का बसवायचे? आणि शिव्या घालायच्या?.. तुम्हाला जात काढायचीच असेल.. तर ज्यांच्या मुळे ही परिस्थिती ओढवलीये.. त्यांची काढा ना!.. सरकारची जात काढा.. कृषीमंत्र्यांची काढा... वेळीअवेळी पावसाला- गारपीटीला कारणीभूत ठरलेल्या लाकूड-तोडीला- वृक्षतोडीला संमती देणार्‍यांची काढा ना..... वरूण-देवता ही निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे. त्याला शिव्या दिल्याने त्याला काहीच फरक पडणार नाही.. पण देवावर श्रद्धा आणि विश्वास असणार्‍या असंख्य लोकांच्या मात्र भावना दुखावू शकतात. आणि तसेही मिसळपाव'च्या नियमानुसार इथे "जातीयवादी" कोणतेच लिखाण अलाऊड नाहीये. हे तुम्हाला माहित असेलच.. मग उगीच कोणत्या देवाची नसलेली जात काढून त्याला जातीच्या चौकटीत बसवून जातीय तेढ निर्माण करण्यात काय अर्थ आहे?

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 11:57
"जात" या शब्दाला सर्वसामान्य माणूस एवढा विटलेला आहे, की जीवशास्त्रीय वर्गीकरणांना केवळ जीवशास्त्रीय वर्गीकरण म्हणावे. जाती, प्रजाती हे शब्द जीवशास्त्रातही वापरू नयेत एवढा 'जात' हा शब्द आताशा डोळ्या (किमान मलातरी) खूपु लागला आहे. ( 'अमुक तमुकची जात काढणे आणि अमुकतमुकच्या जातीवर येणे' हेही वृत्ती या शब्दाचे नकारात्मक भाव दाखवतात किंवा कसे? आणि म्हणून 'जात' हा वृत्ती या अर्थानेही नकोसा होतो. -खासकरून प्रा. बिरूटे सरांनी आमची ही भावना लक्षात घ्यावी असे वाटते). कदाचित मानवी इतिहासाची ज्ञानकोशीय दखल घेताना ज्ञानकोशात 'जात' हा शब्द इतिहास होऊन राहणे एवढे ठिक. या पुढील साहित्यात 'जात' हा शब्द 'जातीयतेचा निषेध करण्यापुरताच येईल हे संवेदनशील साहित्यिक आणि कवींनी पाहील्यास आमचा त्यांच्या साहित्याप्रती आदर निश्चीत दुणावेल अर्थात मी (भक्त अथवा भक्तेतर) माझ्या (आपल्या अभिप्रेत) प्रीय/अप्रीय देवावरही कोपू शकतो हे स्वातंत्र्य सर्वसाधारण भारतीय साहित्यातच नव्हे तर विवीध धार्मिक आणि संत साहित्यात सुद्धा आहे. देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू नये असा दळभद्रीपणा भारता बाहेरून आलेल्या काही संस्कृतीत आहे. आपन त्यांच्या चुकीच्या धर्मांधतेची नक्कल करून साहित्यिकाचे आपल्या देवाप्रती सात्विक कोपण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित असलेल्या मृतैंच्या मतांशी मी सहमत नाही. उपरोक्त कवीतेत कवीने जात हा शब्द वापरणे तो वृत्ती अर्थाने येऊनही, मलाही खटकले कारण अताशा जात हा शब्दच खटकू लागला आहे पण एरवी कवीची भाषा उद्धट अथवा शिव्या देणारी वगैरे असलेले मृतैंचे आक्षेप चुकीचेच नसून संबंधीत आक्षेपच आक्षेपार्ह वाटतो किंवा कसे ?

In reply to by माहितगार

मृगनयनी 19/04/2014 - 17:33
देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू नये असा दळभद्रीपणा भारता बाहेरून आलेल्या काही संस्कृतीत आहे. आपन त्यांच्या चुकीच्या धर्मांधतेची नक्कल करून साहित्यिकाचे आपल्या देवाप्रती सात्विक कोपण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित असलेल्या मृतैंच्या मतांशी मी सहमत नाही.
माहितगार... मुळात आपल्या "देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू नये असा दळभद्रीपणा भारता बाहेरून आलेल्या काही संस्कृतीत आहे. आपन त्यांच्या चुकीच्या धर्मांधतेची नक्कल करून साहित्यिकाचे आपल्या देवाप्रती सात्विक कोपण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित असलेल्या मृतैंच्या मतांशी मी सहमत नाही." या वाक्याचा काहीही संदर्भ लागत नाही... :) "देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपणे".. म्हणजे नक्की काय ?.. आणि ती संकल्पना भारताबाहेरून कशी आली..याचे विश्लेषण कृपया देऊ शकता का? .. माझा विरोध "मुटे" यांच्या देवावर रागावण्याला नसून देवाची अत्यंत अरेरावी भाषेत वल्गना करून त्यास "जाती"च्या चौकटीत बसवण्याला आहे. "वरूणदेवाने फालतू त्याची जात दाखवू नये" या वाक्याला आहे. बाकी त्यांचे त्यांच्या देवावर रागावणे वगैरे.. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त वापरलेली भाषा आणि शब्द चुकीचे आहेत. ते स्वतः कवी आहेत.. म्हणून त्यांना आवडतील.. ते चुकीचे शब्द चुकीच्या ठिकाणी वापरणे.. हे चुकीचे आहे. माझ्या वरच्या प्रतिसादात नमूद केल्याप्रमाणे.. त्यांना पाहिजे ते देवावरचे रागावणे, कोपणे.. वगैरे गोष्टी ते आपल्या स्वतःच्या ब्लॉगवर करू शकता. इथे मिसळपाववर "जातीयवादी", लोकांच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या कविता कृपया टंकू नये. उपरोक्त कवीतेत कवीने जात हा शब्द वापरणे तो वृत्ती अर्थाने येऊनही, मलाही खटकले कारण अताशा जात हा शब्दच खटकू लागला आहे पण एरवी कवीची भाषा उद्धट अथवा शिव्या देणारी वगैरे असलेले मृतैंचे आक्षेप चुकीचेच नसून संबंधीत आक्षेपच आक्षेपार्ह वाटतो किंवा कसे ? बहुतेक तुम्हाला स्वतःलाच नक्की कश्याबद्दल आक्षेप आहे... याबद्दल तुम्ही स्वतःच साशंक आहात!!!.... जाऊ देत.. वेळ मिळाला, की माझा वरचा प्रतिसाद नीट कळेपर्यंत वाचत रहा... माझा आक्षेप नक्की कशाला आहे...हे नक्की कळेल!!! :) :) =)) .. =))

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 18:47
वेळ मिळाला, की माझा वरचा प्रतिसाद नीट कळेपर्यंत वाचत रहा... माझा आक्षेप नक्की कशाला आहे...हे नक्की कळेल!!!
मी जेवढ्यांदा वाचण्याचे आपण स्वप्न पहात आहात त्याला गुणीले ५६ वेळा, "तुमच्या आक्षेपालाच आक्षेप आहे" हे नीट कळून सवरून लिहिले आहे हे पुन्हा पुन्हा कळे पर्यंत वाचत रहावे (ह.घ्या). जात हा शब्द वृत्ती या अर्थाने आजही मराठीत येतो (आणि वर एका प्राध्यापकांनी त्यास सर्टीफाय पण केले आहे) त्यावर कोनतीही बंदी नाही आणि वृत्ती/प्रवृत्ती "वरूणदेवाने फालतू त्याची प्रवृत्ती दाखवू नये" यात एक वरूणदेवाला नव्हे तर वरूणदेवाच्या दुर्दैवी विघ्नकर्त्या प्रवृत्तीला फालतू हा अनावश्यक या अर्थाने शब्द आला आहे. आणि तो पंचमहाभूता पैकी एका महाभूत असलेल्या वरूणराजाने आणलेल्या अवकाळी संकटे आणण्याच्या प्रवृत्तीस उद्देशून वापरलेला दिसतो आहे. पंचमहाभूते कितीही ग्रेट असली तरी भूते ती भूतेच उद्या तुम्ही पंचमहाभूत या शब्दात महाभूत हा शब्द वापरला आमच्या भावना दुखावल्या म्हणाल ! या कवितेत "जातीयवादी", लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारे काहिही नाही. उलट संकटाने ग्रस्त शेतकर्‍याची वेदना मांडणार्‍या कवितेचे सुयोग्य संवेदनशील रसग्रहण करण्याचा अभावग्रस्तता आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या दृष्टीकोणात दिसते. आपल्या आक्षेपात इतर लोक भावना दुखावल्या म्हणतात तसे आम्हीही म्हणून पाहतो या वृत्ती पलिकडे तथ्य नाही असे माझे स्पष्ट मत आहे. कवी महोदयांनी या पुर्वीच्या धाग्यातून भक्तीरसपूर्ण काव्य रचले आहे आणि या उलट यापुर्वीच्या एका धागा प्रतिसाद (http://www.misalpav.com/comment/572691#comment-572691 येथे) इतरांच्या जात, रंग, भाषा यावरून अहंकार आणि असंवेदनशीलपणे लोकांना दुखावताना पाहिले आहे. अशा प्रवृत्तीचा मी प्रांजळपणे निषेध नोंदवतो. एनी वे प्रतिसादासाठी धन्यवाद. @ गंगाधर मुटेंजी सगळ्यात चांगली गोष्ट कोणती ते आपण शेवटी सांगीतलेच आहे. आपल्या कवितेतील मतितार्थ हळू हळू उलगडतात. आपल्या आवडीचे लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

In reply to by माहितगार

माहितगार 19/04/2014 - 18:51
आणि या उलट यापुर्वीच्या एका धागा प्रतिसादात सदस्य मृगनयनी यांना (http://www.misalpav.com/comment/572691#comment-572691 येथे) इतरांच्या जात, रंग, भाषा यावरून अहंकार आणि असंवेदनशीलपणे लोकांना दुखावताना पाहिले आहे. अशा प्रवृत्तीचा मी प्रांजळपणे निषेध नोंदवतो. एनी वे प्रतिसादासाठी धन्यवाद.

In reply to by माहितगार

मृगनयनी 19/04/2014 - 19:11
माझा "तो" प्रतिसाद हा खूप वेगळ्या स्वरूपाचा आहे. आणि तो योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोचलाही गेलेला आहे. किम्बहुना तो त्या भाषेत आणि शब्दांमध्ये मुद्दाम लिहिला गेलेला आहे. ज्यांना कुणाला त्याचा अर्थ आणि मागचा हेतू समजला नाही.. किंवा ज्यांना "स्कोअर सेटल" करावयाचा होता....त्यांनी आपापल्या मतीनुसार तेथे प्रतिक्रिया देऊन माझे आणि संबंधित व्यक्तींचेही मनो'रंजन केले आहे. त्यामुळे आपल्याला जो काही निषेध दर्शवायचा असेल.. तो त्या पर्टीक्युलर धाग्यावर नोन्दवला गेला तर बरे होईल. इथे या धाग्याशी आणि प्रतिक्रियांशी संबंधित डेटा जर आपल्याकडचा संपला असेल.. तर कृपया मिपावरच्या इतर चर्चांचा आनन्द घेऊ शकता... :) असो..... इथे या धाग्यावर आपला जो काही देवाच्या आणि जातीच्या सन्दर्भातला संभ्रम आहे.. तो दूर झाला का? अर्थात दूर झाला असेल किंवा नसेल.. तरी मला "प्रांजळ" आनन्दच आहे... :)

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 19:39
माझा "तो" प्रतिसाद हा खूप वेगळ्या स्वरूपाचा आहे. आणि तो योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोचलाही गेलेला आहे. किम्बहुना तो त्या भाषेत आणि शब्दांमध्ये मुद्दाम लिहिला गेलेला आहे. ज्यांना कुणाला त्याचा अर्थ आणि मागचा हेतू समजला नाही..
मृ. तै तुमच्या त्या प्रतिसादावर इतरांनी स्कोअर सेटलींग केलं नाही केलं त्याची कल्पना नाही, पण आपला हा प्रतिसादच आपण स्वतः आपला 'तो' प्रतिसाद स्कोअर सेटलींग करता होता याची अप्रत्यक्ष कबूली देतो आहे. म्हणजे तुम्ही तुमची व्यक्तीगत स्कोअर सेटलींग करताना सार्वजनिक व्यासपीठ वापरून फक्त ज्याच्याशी स्कोअर सेटल करतोय त्या पलिकडे जाऊन आसपासच्या समाजाच्या भावना दुखावणार लेखन आपल्या हातून घडल होत याचं भान अद्यापही आपणास दिसत नाही. ज्यांनी आपणास भानावर आणण्यासाठी प्रतिसाद देण्याचे प्रयत्न केले त्यांच्या वरच स्कोअर सेटलिंगचे आरोप लावणे हास्यास्पद वाटते. किमानपक्षी माझा तर आपल्याशी कोणता पूर्व परिचय नसताना मी आपल्याशी स्कोअर सेटल करण्याचा प्रश्न येत नाही. तेव्हा एक त्रयस्थ म्हणून पुन्हा एकदा नमूद करतो की आपला तो प्रतिसाद (विचार प्रणाली) सार्वजनिक व्यासपिठावर कळत नकळत आपली स्वतःचीच नकारात्मक प्रतिमा उभी करत आहे. 'संवेदना' नावाच्या गोष्टीचा आपला परिचय संपला नसेल तर आपल्या 'त्या विचारप्रणाली' आपण पुन्हा एकदा अभ्यासाव्यात अथवा सार्वजनिक व्यासपिठावर तसे लिहिण्याचे टाळावे असे वाटते. आपल्या त्या प्रतिसादाचा संबंध या धाग्यात तर आता अधिक लागतो आहे हे ही आपण लक्षात घेतले असे दिसत नाही. सार्वजनिक व्यासपिठावर माझ्यामुळे (आपल्यामुळे असे वाचावे) आसपासचे दुसरे दुखावले गेले तर चालतात, आणि मी (इथे आपण असे वाचावे) मात्र ज्यात नाही त्याचे अर्थ काढून दुसर्‍यांना सार्वजनिक व्यासपिठ वापरण्याबद्दल हकनाक आक्षेप घेतो, हे माझे (आपले असे वाचावे) वागणे दुटप्पी आणि विरोधाभासाचे नाही किंवा कसे याचा मीच माझा (येथे आपणच आपला असे वाचावे) विचार केला पाहीजे. (आपल्या विचारधारांमुळे हे स्पष्ट करू इच्छितो की गंगाधर मुटेंची बाजू घेण्यास ते माझे कोणी लागत नाहीत) गंगाधर मुटे यांच्या शब्द योजने बद्दल मलाही सुरवातीस साशंकता वाटली म्हणून या कवितेच्या एकदम सुरवातीच्या प्रतिसादात माझा प्रतिसाद आहे. पण कविता पुन्हा पुन्हा अभ्यासली ती एक शेतकर्‍यांच्या दुख्खाबद्दलची निखळ संवेदनशील कविता आहे. कविते वर अनभिज्ञतेतून अथवा गंमतीतून आलेले आक्षेपांनी शेतकर्‍यांच्या वेदना जी कवी मांडू पाहतो आहे ती दुर्लक्षीत होते आहे म्हणून मी कवीने या कवीतेत मांडलेल्या वेदनांची मी अभ्यासपूर्ण आणि संवेदनशीलपणे बाजू घेतो आहे.

In reply to by मृगनयनी

गंगाधर मुटे 20/04/2014 - 20:16
माझा विरोध "मुटे" यांच्या देवावर रागावण्याला नसून देवाची अत्यंत अरेरावी भाषेत वल्गना करून त्यास "जाती"च्या चौकटीत बसवण्याला आहे.
मी वरूणदेवाला जातीच्या चौकटीत कसा काय बसवू शकेल ब्वॉ? एखाद्या जातीच्या चौकटीत एखाद्याला बसवायचे असेल तर समान गुणधर्मिय जातीचे अनेक असायला हवेत ना? माझ्या माहितीप्रमाणे पाऊस पाडण्याचा गुणधर्म फक्त आणि एकमेव वरुणदेवातच आहे. आणखी कोणाकोणाला व्यक्तिगत अथवा सामुहिक/सामुदायीकरित्या पाऊस पाडता येतो, हेच मला माहित नसल्याने मी वरुणदेवाला जातीच्या चौकटीत बसवायला असमर्थ आहे. मात्र या पृथ्वितलावर "पाऊस पाडण्याची शक्ती" असलेली जात कुणी माझ्या निदर्शनास आणून दिली तर, त्या जातीच्या चौकटीत वरुणदेवाला बसवायचा विचार करता येईल.

In reply to by गंगाधर मुटे

मागे काही वर्षांपुर्वी बारामतीकरांनी प्रायोगिक तत्त्वावर सिल्वर आयोडिन का काय ते त्याचा फवारा करुन कृत्रिम पाऊस पाडला होता म्हणे ... त्यामुळे वरुणदेवाला बारामतीकरांच्या जातीत बसवता येईल :D

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 21/04/2014 - 08:12
त्यामुळे वरुणदेवाला बारामतीकरांच्या जातीत बसवता येईल
वरुणदेव आकाशातून पाऊस पाडतो........ बारामतीचा बारामतीकर थेट शेतकर्‍यांच्या डोळ्यातूनच पाऊस पाडतो....... धरणामध्ये पाऊस पाडण्यासाठी बारामतीकरांकडे खास बनावटीचे औजार आहे म्हणे....... एकाच श्रेणीत नाही आणता येणार यांना. ;)

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 12:01
भारतीय संस्कृतीत देवावर कोपलेला भक्त अगदी आपल्या प्रीय देवतेला पाण्यात वगैरे सुद्धा बुडवून ठेवत असे. (हे पुर्वीच्या आज्जी आजोबा पुर्व पिढीत बरेच होते नवीन पिढ्यांना ठाऊक नाही एवढेच)

In reply to by धन्या

अरे ते निव्वळ ब्लॅकमेक्लिंग असे. माझी मागणी मान्य कर, तोवर पाण्यातून काढणार नाही असे… नवस म्हणजे देवाला दिलेली लाच, तशी ही देवाकडे केलेली दादागिरी !!!

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 13:00
कवी गंगाधर मुटे यांच्या मागच्या कविता शोधल्यातर, त्यांनी लिहिलेल्या चक्क गणेशाच्या दोन आरत्या सापडल्या श्री गणराया आणि गणपतीची आरती कवी गंगाधर मुटेकृत आरत्या मिळाल्यानंतर, मृ. तैंचा देव ही संकल्पना केवळ मृ. तैंनाच माहिती आहे असा भासवणारा प्रतिसाद मनो'रंजक' वाटला.

In reply to by माहितगार

मृगनयनी 19/04/2014 - 17:36
कवी गंगाधर मुटे यांच्या मागच्या कविता शोधल्यातर, त्यांनी लिहिलेल्या चक्क गणेशाच्या दोन आरत्या सापडल्या श्री गणराया आणि गणपतीची आरती कवी गंगाधर मुटेकृत आरत्या मिळाल्यानंतर, मृ. तैंचा देव ही संकल्पना केवळ मृ. तैंनाच माहिती आहे असा भासवणारा प्रतिसाद मनो'रंजक' वाटला.
तु'मची ही क'मेंट दे'खील म'ला तित'कीच मनो'रंजक वाट'ली.... असो...अर्थ कळेपर्यंत प्रतिसाद वाचत रहा..... =)) .. =)) ... अजून काय!!!??!!!

In reply to by माहितगार

वरील लिन्क्स दिल्याबद्दल माहीतगार ह्यांचे आभार ! आता , मुटेजींनी वरील कवितेत वापरलेला 'जात' हा शब्द बीग्रेडी मनोजातीतुन (जात येथेही वृत्ती ह्याच अर्थाने) आला नसल्याची खात्री झाली आहे ! पुनश्च एकवार आभार !!

In reply to by माहितगार

गंगाधर मुटे 20/04/2014 - 08:01
माहितगार - धन्यवाद. तुमच्यासाठी आणखी काही लिंक्स. - जा रे कान्हा नटखट - चोरटा मुरारी - चेंडू मारियेला - वेणी सोडुनिया आणि मृगनयनी यांच्यासाठी काही खास लिंक : - पंढरीचा राया : अभंग-१ - शुभहस्ते पुजा : अभंग-२ - आत्महत्या बळीच्या तू रोख वामना

पोटे 18/04/2014 - 09:06
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये" वाक्य खूप आवडले. मुटेसाहेब, गोडबोलेंच्या मागे तुम्ही जे प्रतिसाद देत धावता आहात, तेही आवडले.

आयुर्हित 18/04/2014 - 20:53
पार्डी ताड: संसारामध्ये जिवन जगत असताना जिवाला सुख पाहीजे असेल तर देव आपलासा करुन घ्यावा असे प्रतिपादन हभप किशोरीताई सांगुले यांनी हरिकिर्तनात यांनी म्हटले. येथे हनुमान जयंती निमित्त आयोजित अखंड हरिनाम व o्रीमद भागवत साप्ताहातील हरिकिर्तनामध्ये संबोधन करताना किशोरीताई म्हणाल्या की, भागवत कथा ही o्रवण करावी त्यामुळे माणव जिवणाचा उद्धार होतो भागवत कथा ही सुखकारी व दुखहारी आहे प्रत्येक जिवाला मरणाचे भेव आहे आज मात्र मानव सुख मिळण्यासाठी रात्रदिवस कामकरतो मात्र त्याच्या जिवणात पदरी सुख मिळत नाही पैसा म्हणजे सर्व काही सुख नाही o्रीमंत लोक सर्वात दुखी असतात पैसा काहीही सुख देत नाही. पैशाने अन्न विकत घेता येते पण भुक मात्र विकत मिळत नाही .संसारामध्ये सुख मिळविण्याकरिता देवाला आपलस करावे लागते ‘माया’ ही संसारातील सुख लपविते संसारात काही सेाबत येत नाही.परमार्थ केल्याने सर्वकाही सोबत येते.असे प्रतिपादन किशोरीताई यांनी केले या कार्यक्रमाला साथसंगत मुदंगाचार्य हभप रामेश्‍वर महाराज गायणाचार्य हभप भारत महाराज बोरकर साप्रदाईक भजनी मंडळ माळशेलू यांची होती. देव आपलासा करून घ्यावा- किशोरीताई सांगुले

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे 19/04/2014 - 20:15
श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताह

       आमच्या ग्रामविकास भागवत कमेटीच्या वतिने श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताहाच्या आयोजनाचं हे १२ वे वर्ष.

दिनांक : १७ एप्रिल ते २४ एप्रिल २०१४

Bhagwat
* * * *
Bhagwat
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई
* * * *
भागवत
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई
* * * *
Bhagwat
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई. या निमित्ताने बालगोपालही आपापल्यापरिने सहभाग नोंदवतात.
* * * *

In reply to by मृगनयनी

मृगनयनी 19/04/2014 - 20:28
अर्थात या फोटोंचा या धाग्याशी काहीही संबंध नाही... हे आपल्यालाही माहित आहे. आणि हे फोटो इथे कश्यासाठी टाकलेत.. हे सूज्ञांना सांगायला नको!!!!!!! :) :) हरे राम हरे कृष्ण !!!!!

In reply to by मृगनयनी

गंगाधर मुटे 20/04/2014 - 20:56
मृगनयनी, गेली १२ वर्षे मी "श्रीमद भागवत ज्ञानयज्ञाचे" आयोजन करत आहे, हा माझा ढोंगीपणा आहे, असे तुम्हाला म्हणायचे असेल तर http://www.misalpav.com/node/24663 या लिंकवरील गझलेतील माझाच एक शेर माझ्याच विरोधात माझा कबुलीजबाब म्हणून वापरू शकता. :) सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला माझी मलाच ओळख पटणे कठीण झाले

विवेकपटाईत 18/04/2014 - 21:42
अवकाळी पावसासाठी वरुण देवाला दोष देण्यात अर्थ नाही. यात माणसाची शुद्र आणि स्वार्थ बुद्धीचा दोष अधिक आहे. आपण (माणसे) स्वत: देव बनून परमेश्वराने निर्मित केलेल्या सृष्टीत वाजवी पेक्षा जास्त ढळवा-ढवळ करत आहोत आणि त्याचे परिणाम ही आपण भोगतो आहे. वर विना कारण देवाला दोष देत आहोत. मुटे साहेब निराशा सोडून या मागचे वास्तविक कारणे काय आहेत याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे आणि त्या वर उपाय शोधणे ही.

शुचि 18/04/2014 - 23:54
मुटे साहेब आपल्या कविता विशेषकरुन नागपुरी तडके फार आवडतात. या कवितेबद्दल, उगाच वितंडवादात उर्जेचा अपव्यय करण्यापेक्षा, एक मस्त तडका लिहून टाका. जे झालं ते झालं त्यावर चर्वितचर्वण अन आरोप-खंडण-प्रत्यारोप-खंडण मध्ये कशाला उर्जेचा व्यय करता? बघा मला तरी असे वाटते. बाकी आपण सूज्ञ आहातच.

In reply to by शुचि

मृगनयनी 19/04/2014 - 19:16
नाही नाही माझी सही आहे बस! Live in the Fear of God अच्छा!!!... पण या धाग्याच्या पार्श्वभूमीवर ती सही फारच "रोचक" आणि धागालेखकासाठी संवेदनशील आणि उचित संदेशकारक वाटते. :)

पैसा 19/04/2014 - 19:38
कविता आणि बिरुटे सरांनी केलेले रसग्रहण आवडले. आपल्याकडे संतांनीही देवाला भरपूर शिव्याशाप दिले आहेत. जनाबाईचा अभंग पटकन आठवला. त्याचा अर्थ भले वेगळा आहे पण वरकरणी शिव्याच आहेत. "अरे विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली । जन्मसावित्री चुडा ल्याली तुझें गेलें मढें । तुला पाहून काळ रडे उभी राहूनि आंगणीं । शिव्या देत दासी जनी" त्यामुळे इथे वरूणदेवाला शिव्या देण्यात काही आक्षेपार्ह वाटले नाही. आई आपल्याला लेकराला कधी रागाने "मर मेल्या" म्हणते, तेव्हा तिला तो मरावा असे खरेच वाटते का? कधीच नाही! तसाच हा कवीचा त्रागा आहे!

In reply to by पैसा

मृगनयनी 19/04/2014 - 20:21
पैसाताई... कृपया इथे जनाबाईंची तुलना गंगाधर मुटेंशी करण्याचा मोह टाळला, तर बरे होईल.... कारण दोघांच्या मतांमध्ये आणि देवाविषयी वाटणार्‍या भावांमध्ये प्रचंड तफावत आहे. शब्दार्थांमध्ये जरी वर वर साधर्म्य दिसत असले, तरी दोघांचा देवाविषयीचा भाव खूप वेगळा आहे. जनांबाईंच्या ओव्यांमधून भक्तीरस ओथंबून वाहतो आहे.. तिच्या विठुरायावर तिचा स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे...आणि तिच्या शिव्यांमध्येही तिने विठुरायाची गुणगानच गाईले आहे.- तिचा विठ्ठल हा मूळ-महामायेचाच एक अंश आहे...आपण दिलेल्या जनाबाईंच्या ओव्यांमधल्या दोन ओळींमधल्या विरोधाभासातलाही अर्थ खूप गहन आणि विठ्ठलभक्तीने ओथंबलेला आहे.. जनाबाईच्या विठुरायामुळे रांडही जन्मसावित्रीचा पवित्र चुडा घालू शकते. आणि काळानेही विठुरायापुढे हात टेकले आहेत..... ही ओवी खरंच खूपच भावपूर्ण आहे... आणि जनाबाई काय कुणीही संतानी काय देवाला शिव्या घातल्या म्हणून आपणही घालायच्या.. वरकरणी शिव्या भासवून जातीयवादा'ची आपली भडास पुरी करून घ्यायची... खरंच खूप हास्यास्पद आहे हे!!!.. मुटेंसाठी "देव" हा कुणीतरी वेगळा माणूस आहे. आणि त्याच्यावर श्रद्धा नसलेल्यांच्या शेतात तो गारपीट करतो.. असे काहीसे त्यांचे म्हणणे आहे...... वर मला दिलेल्या एका प्रतिसादात गंगाधर मुटेंनी हे सुस्प्ष्टपणे लिहिले आहे.. की देवाला गारपीट करायची असेल तर "त्याच्या भक्तांच्या शेतात करावी.. आम्हला कश्याला त्रास देतोय" ...
गंगाधर मुटे - Fri, 18/04/2014 - 18:46 मी देव मानतो की नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचे सार्वजनीक प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नसतेच. मी माझ्या देवाशी कसे वागावे, हा सुद्धा माझा स्वतःचा प्रश्न आहे. देव जर कुणाची खाजगी मालमत्ता नसेल तर देवाला दोन खडे बोल सुनावल्याने कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचेच असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या. वरुणदेवाने तर गारपीठ वगैरे पाडून शेत नेस्तनाबूत करण्याचे सारे प्रयोग त्याच्या चाहत्यांच्या अथवा भक्तांच्या शेतातच करावे. इतरांच्या कशाला? Smile मृगनयनी, तुम्ही तरी वरुणदेवाच्या या कृत्याचे कशाला समर्थन करत आहात? Smile माझी वाङ्मयशेती - Facebook Page बळीराजा डॉट कॉम उत्तर द्या
इथे एखादी आई जरी आपल्या मुलाला शिव्या देत असली.. तरी तिच्या मनात.. त्याच्याबद्दल मनातून प्रेम असते.. जे, की जनाबाईंच्या ओव्यांमधून विठ्ठलाबद्दल जाणवते. पण मुट्यांच्या प्रतिसादातून मात्र देवाविषयी प्रेम कमी आणि तिरस्कार जास्त जाणवतोय. स्पेशली त्यांचा भर हा "जाती"वर आहे. याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचे"च असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या. या त्यांच्या वाक्यातून "देवा" बद्दल त्यांना "अ‍ॅक्चुली" काय वाटतेय.. हे एखाद्या शेंबड्या पोरालाही कळेल.. असो!!!!... मुटेंना पाठीशीच घालायचे ठरवले असेल... तर कोण काय बोलणार ? प्रत्येक जण शेवटी आपापल्या "जाती"वरच जातो... नाही का!!!!!!!!

In reply to by मृगनयनी

पैसा 19/04/2014 - 22:01
मुटेंना पाठीशीच घालायचे ठरवले असेल... तर कोण काय बोलणार ? प्रत्येक जण शेवटी आपापल्या "जाती"वरच जातो... नाही का!!!!!!!!
हे फारच झालं हो! मी कोण कोणाला पाठीशी वगैरे घालणारी! गंगाधर मुटे या व्यक्तीबद्दल मी बोलत नाही. कवितेत दिसणार्‍या कवी/निवेदकाबद्दल बोलते आहे. कवितेत आहे ते मुटेसाहेब म्हणताहेत असं म्हटलं तर खुनाच्या कथा लिहिणारा माणूस स्वतः खुनी असायला हवा नाही का! कोणतीही कलाकृती ही कलाकारापासून स्वतंत्र असते. तिचा कलाकाराने सांगितलेला अर्थ आणि एखाद्या वाचकाने लावलेला अर्थ संपूर्ण वेगळा आणि त्या व्यक्तीपुरता खरा असू शकतो ना! आणि इथे मी मुटेसाहेबांची जनाबाईशी तुलना केली नाही तर या भावनांची तुलना केली आहे. आपणही काही मनासारखं झालं नाही की देवाला शिव्या घालतो. त्यात काही विशेष नाही. जनाबाईचा अभंग पटकन आठवला म्हणून त्याचा दाखला दिला. एवढंच.

In reply to by पैसा

पैसाताई, देव हा तुमचा विषय आहे का ? नाही. तुम्ही केवळ बँकेबद्दल आणि गोव्याबद्दल बोला. अध्यात्माबद्दल, देवाबद्दल, संतांबद्दल तुम्हाला काय कळते ? तो त्यांचा एरिया आहे. आल्या, जनाबाईचे संदर्भ देत. हभप, इतर देव भप, बेढबमैत्रीणमदतकर्त्या, निस्पृह समाजसुधारक, मुर्गनैनीबै प्रवचन देत असताना तुम्हाला मध्ये पडायचे कारणच काय, तुम्ही फार फार तर कापूस घेऊन या, वाती वळू.

गंगाधर मुटे 20/04/2014 - 12:55
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, काळजी नसावी. नियतीच्या घावांनी मला एवढे 'टणक" (कणखर) बनविले आणि त्यासोबतच वास्तवशास्त्राची जोड यामुळे मी पाकिस्थान, अमेरिका, मानव, दानव आणि देवाच्या बापालाही पुरून उरेल. :) बिघडल्याच तर इतरांच्याच तब्बेती बिघडतील. :) जाळल्या कोंबड्याला कुठे अग्नीची भिती असते? :D (हा अहं नाहीये आणि रावणी दर्पोक्ती पण नाहीये.)

In reply to by गंगाधर मुटे

बालगंधर्व 20/04/2014 - 14:21
मुटे सहेब, अता उन एत्का वदहला अहे के, सुरय्य देवने पन तेची जात दावु नये असे महनावे लगेल.[ थनदेइ कुनामुले पदते ते महित नहे. नायतर तयचए पन कदलि असते थन्दिमधये. अहो जात कदलि मह्नुन अन्गनाआवर भुनकाअयाल तो कय बओस अहे क? शिवया घलतना बओसच चेरा समोर अनयचाअ. :) कुनचह्य भव्नाआ दुक्ल्यया असतेल तर्सओरे. (संपादित)

In reply to by बालगंधर्व

काय लिहिलंय..................मेलो ना मी =)) >>>>>>>> कुनचह्य भव्नाआ दुक्ल्यया असतेल तर्सओरे. नै नै तुम्ही लिहित राहा. कोणाच्याही भावनांचा विचार करू नका. -दिलीप बिरुटे

In reply to by अत्रुप्त आत्मा

बालगंधर्व 20/04/2014 - 17:58
नै नै तुम्ही लिहित राहा. कोणाच्याही भावनांचा विचार करू नका. -दिलीप बिरुटे
बिरुते सर, मि अप्ला अबहरि अहे. नय्तर इक्दे बहव्नचा कुहुप इसुह्यु होतो.

In reply to by बालगंधर्व

किसन शिंदे 20/04/2014 - 22:58
तब्बल पंधरा मिनिटे लागली प्रतिसाद वाचून समजायला. :) रच्याकने खूप कष्ट पडले असतील नै, जाणून बुजून अशुध्द टंकलेखन करायला. ;)

In reply to by पैसा

किसन शिंदे 20/04/2014 - 23:38
ओह! धन्यवाद पै नविन व्याख्या समजावून सांगितल्याबद्दल. पण बालगंधर्व अचानक कसे काय अवतरले ब्वॉ? अन् ते ही मुंटेंच्या धाग्यावरच??

प्यारे१ 20/04/2014 - 20:04
काय ठरलं मग? जात पडताळणी / वैधता कागदपत्रांची पूर्तता झाली का? शेवटची मुदत कधीपर्यंत? मेन ऑफिस पुण्यालाच आहे ना अजून? मुळात हे 'देव'लोक जातीचं प्रमाणपत्र घ्यायला लायक आहेत का? आर टी आय खाली माहिती मिळेल काय?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 13/04/2014 - 10:45
कविवर्य काहीतरी सांगू पहात आहेत एवढ लक्षात आलं, पण नेमक काय ते नीटस उमगल नाही. ==या प्रतिसादासाठी सही== (-स्वतःस काय माहित नाही ते माहित असलेला माहितगार)

In reply to by माहितगार

कवी अवकाळी पावसावर नाराज आहे, वरुणदेवाने केव्हाही पाऊस पाडू नये, त्याने त्याच्यावर फालतू जातीवर येऊ नये असे कवीला म्हणायचे असावे. गरीबी इथे जोपासली जाते म्हणन्यापेक्षा इथे लोक गरीब राहावेत अशीच व्यवस्था सरकार राबवते,आणि ती एक महान परंपरा म्हणजे व्यवस्थेचे प्रमुखांची ती तक्रार असावी. एकूण तक्रारीची ही रचना आहे. पण मला आवडल्या होत्या त्या खाली लिहिलेल्या ओळी पण यातली दुसरी ओळ अपेक्षापूर्ण करु शकली नाही असे वाटले. काही तरी अजून खास लिहिता आलं असतं असं वाटलं. अर्थात कवीच्या आणि सरकारच्या मनात केव्हा काय असेल सांगता येत नाही. :) तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरुणदेवाने केव्हाही पाऊस पाडू नये, त्याने त्याच्यावर फालतू जातीवर येऊ नये
इथे फालतु हा शब्द नकक्की कोणाला उद्देशुन वापरलाय हे नीटसे उमगले नाही . वरुणाला उद्देशुन वापरला असेल तर एक वेळ ठीक आहे ....पण जातीला फालतु हा शब्द वापरला असेल तर अ‍ॅट्रॉसिटी खाली हा गुन्हा ठरेल ना ? बाकी कविता सो सो . असो .

In reply to by प्रसाद गोडबोले

नगरीनिरंजन 14/04/2014 - 17:11
आणि तुम्ही लावलेला अर्थ घेतला तरी अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार करायची की नाही ते वरुणदेव बघून घेईल. आजच्या जगात वरुणदेवाची (किंवा कोणत्याही देवाची) आणि आपली जात एकच आहे असा भ्रम होऊ शकण्याइतका भ्रमिष्ट कोणत्याही जातीत असेल असे वाटत नाही. देव ही एक कल्पना आहे आणी तिच्याशी कोणत्याही प्रकारे थेट संबंध असल्याचा समज असणारे लोक वास्तवापासून भरकटलेले असतात हे सगळ्यांना माहित असेल अशी आशा. (वरुणदेव म्हणजे वरुण नाव आणि देव आडनाव असलेला माणूस नव्हे हेही इथे स्पष्ट करुन ठेवलेले बरे).

In reply to by धन्या

तुम्ही त्यांच्या कवी म्हणून असलेल्या "पोएटीक लिबर्टी"च्या हक्कावरच घाला घालत आहात.
"पोएटीक लिबर्टी" लय भारी शब्द .... ह्यावरुन काही महिन्यांन पुर्वी बाबासाहेबांचे घटना निर्मितीच्या काळातील व्यंग चित्र आणि "आर्टिस्टिक लिबर्टी" ह्यावुन निर्माण झालेला वाद आठवला ! ती लिबर्टी खपवुन घेतली गेली नव्हती ...लय राडा झाला होता ! (बायदवे , धन्या ,केवळ आपल्यात गैरसमज नको म्हणुन ....... माझा मुद्दा इतकाच होता की इथे आपण जातिनिर्मुलनाच्या दिशेने प्रयत्न करीत आहोत तेव्हा कोणाचीही जात काढणे काही योग्य नाही , आता उद्या कोणी जर बळीराजाने त्याची जात दाखवु नये असे कडवे टाकले तरीही मी त्याचा निषेध्दच करेन !! )

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 15/04/2014 - 00:56
@प्रसाद गोडबोले,
जातिनिर्मुलनाच्या दिशेने प्रयत्न करीत आहोत
तुम्हाला बहुधा मनुष्यजातीतील अंतर्गत जातीव्यवस्थेविषयी बोलायचे असावे. तसे असेल तर ठीक अन्यथा - मनुष्यजात आणि जनावरांची जात यातील जातीचे निर्मूलन करायचे म्हटले तर माणूस आणि जनावर यांना एकाच वर्गवारीत आणावे लागेल. - देव आणि दानव यांनाही एकाच पारड्यात मोजावे लागेल. - जर्शी ही त्या गाईची जात असूनही सारेच तिला "जर्सी गाय" असेच म्हणतात. जास्त दूध देते म्हणून जात काढण्याची मुभा असते की काय?
कोणाचीही जात काढणे काही योग्य नाही
या विधानाने मला अजिर्ण झाल्यासारखे वाटत आहे. पचणे फारच कठीण चाललेय. अहो गोडबोले साहेब, सोईचे असेल तर जातीचे समर्थन आणि जेथे गैरसोय होते तेथे निर्मुलनाची भाषा हा विचित्र पण नवा प्रघातच पडला आहे आता आपल्या देशात. जात (Caste) या विषयावर काही अपवाद वगळता प्रत्येक मनुष्य दुतोंडी झाला आहे. हे विधान मी खात्रीने आणि पुराव्यानिशी करू शकतो. --------------------- जाता जाता पुन्हा एक जात काढून जातो. महेंद्रकपूर - माझ्या पासून दूर नको जाऊ गंगूबाई तुझ्याविना मला करमत नाय उषा मंगेशकर - नेऊ नका आडोशाला येणार मी नाय पुरुषांच्या जातीचा भर्‍होसा काय? ---------------------- प्रसादराव, मला असे वाटते की पुरुषांची जात काढली म्हणून महिलांवर 'अ‍ॅट्रासिटी' लावण्यापेक्षा पुरुषांच्या जातीवर भरवसा ठेवण्याइतपत त्यांच्यात विश्वासाहार्य बदल घडवून आणायला हवेत. नाहीतर महिला पुरुषांची 'जात' काढतच राहतील. कारण ..... :)

In reply to by नगरीनिरंजन

तुम्ही लावलेला अर्थ घेतला तरी अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार करायची की नाही ते वरुणदेव बघून घेईल.
हो ना . आंबेडकर जयंतीला आपण अजुनही एखाद्याची जात काढण्याचे समर्थन करत आहात हे पाहुन आनंद वाटला !!
आजच्या जगात वरुणदेवाची (किंवा कोणत्याही देवाची) आणि आपली जात एकच आहे असा भ्रम होऊ शकण्याइतका भ्रमिष्ट कोणत्याही जातीत असेल असे वाटत नाही.
नेहमीचा गोंधळ ... मायथॉलॉजी एक तर संपुर्ण स्विकारा किंव्वा पुर्ण नाकारा .... म्हणजे जर वरुणदेव मानत असाल तर त्याला जात होती हेही माना , आणि मानत नसाल तर मग कोणत्याही का जातीचा असेना , त्याची जात काढु नका .... जातिनिर्मुलनाच्या साठी प्रयत्न करा !
देव ही एक कल्पना आहे आणी तिच्याशी कोणत्याही प्रकारे थेट संबंध असल्याचा समज असणारे लोक वास्तवापासून भरकटलेले असतात
हे तुमचे वैयक्तिक मत आहे . त्यामुळे त्या बद्दल पास . खुष राव्हा !!

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 15/04/2014 - 01:49
जर वरुणदेव मानत असाल तर त्याला जात होती हेही माना
माझ्यासारख्याला वरुणदेवाचे देव म्हणून किंवा व्यक्ती म्हणून अस्तित्व मानायचे किंवा नाकारायचे, या दोनपैकी कोणताच प्रश्न कधीच न पडल्याने त्याविशयी कधी सखोल विचार केलाच नाही. पुरातन ग्रंथात त्याची caste काय लिहिली आहे, हे माहीत करून घ्यायची तर आजही गरज वाटत नाही. पण मला असे वाटते की वरुणदेवाच्या नामकरणाच्या पुरातन ग्रंथांच्या तत्कालीन जमान्यात जातीव्यवस्था अस्तित्वात नसेल. तेव्हा वर्णव्यवस्था अस्तित्वात असावी. कुणी याविषयी लिहिले तर वाचायला आवडेल आणि माझ्या ज्ञानात भरसुद्धा पडेल. शिवाय प्रुथ्वीची निर्मीती झाली तेव्हापासून वरुणदेवाचे (देव म्हणून नव्हे तर पाऊस पाडणारी शक्ती/यंत्रणा) अस्तित्व आहे. पुरातन ग्रंथ कितीही पुरातन असले तरी पृथ्वीच्या निर्मितीच्या काळाचा हिशेब करता सर्व पुरातन ग्रंथ हे काही वर्षातलेच ठरतात. त्यामुळे त्याला जात होतीच हेही मानने माझ्यासारख्या आवश्यक अथवा अनावश्यक वाटत नाही कारण आता प्रयोजन उरलेले नाही. --------------------------------- मी काव्यात वापरलेल्या जात या शब्दाचे caste या अर्थाशी काहीही देणे घेणे नाही. केवळ "वृती" असाच अर्थ घ्यावा. वाक्यरचना आणि आशय लक्षात घेतला तर तोच अर्थ निघतो. casteवाचक अर्थ कोणत्याही अंगाने निघत नाही. आशय व्यक्त करतांना अत्यंत परफेक्ट अर्थ वाचकांपर्यत पोचवायला नेमके शब्द वापरावेच लागतात. उदा. मला ज्योतीबा फुले, डॉ. आंबेडकर आणि शरद जोशी हे एकाच जातीचे वाटतात. संघर्षाच्या बाबतीत तर या तिघांचीही जातकुळी निसंशय एकच आहे.

In reply to by गंगाधर मुटे

विवेकपटाईत 18/04/2014 - 21:31
वैदिक काळात जाती व्यवस्था नव्हती. देवांची कुठलीही जाती नव्हती. जेंव्हा मनुष्य स्थिरावला अर्थात शेती, व्यापार इत्यादी करू लागला आणि त्या साठी स्वत:ची वेगळी ओळख असणे गरजेचे भासू लागले अशाप्रकारे हळू हळू जात व्यवस्था समाजात पसरली.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे 13/04/2014 - 19:23
धन्यवाद बिरुटे सर. जे लिहिले त्याचा तंतोतंत अर्थ काव्यातून पोचत असेल तर त्याचा आनंद आणि समाधान काही औरच असते. __________________ तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही ही ओळ तुम्हाला आवडली त्याबद्दल धन्यवाद. मात्र दुसरी ओळ अपेक्षा पूर्ण करू शकली नाही तेवढ्याने बरे झाले. नाही तर गझलेचा त्या एकाच शेराने नूर पालटला असता आणि अन्य शेरातून जे पोचवायचे आहे (ज्यासाठी ही गझल लिहिली गेली आहे) ते बाजूला पडून मूख्य आशयाकडेच वाचकाचे दुर्लक्ष झाले असते. मग लेखकाने/कवीने तेवढी काळजी घ्यायला नको का? आपल्याला जे लिहायचे असते, ते लिहून झाल्यानंतर ते किती हलके वा जड आहे, हे लक्षात येऊनच जाते. वाचकांची पसंती/नापसंती हा वेगळा भाग आहे. त्यामूळे नाईलाजाने पहिल्या ओळीचा समारोप करतांना दुसर्‍या ओळीत मीठ वापरायचे टाळले व फोडणी बिघडू दिली. क्षमस्व. ------ कधी तरी त्या ओळीला साजेशी दुसरी ओळ लिहून मी नक्कीच स्वतंत्र गझल लिहेन. ये वादा रहा! दोस्ती के खातीर इतना तो करही सकता हू| :)

गंगाधर मुटे 13/04/2014 - 19:28
@ नगरीनिरंजनजी धन्यवाद| @ प्रसाद गोडबोले, वरूणदेवाला पण 'जात' असते? मला वाटते की बहुतेक नसावीच. आणि असलीच तर माझी आणि माझ्या देवाची 'जात' वेगवेगळी कशी असणार?

In reply to by प्रसाद१९७१

गंगाधर मुटे 14/04/2014 - 15:02
लेखकाला काही जाती चांगल्या आणि काही वाईट असे सुचवायचे आहे. खरे तर लेखकाचे तसे च गृहीतक आहे.>>> हे खरे आहे हो. कापसामध्ये L.R.A 5166 ही जात फारच रोगट आहे. रसशोषणार्‍या किडीला बळी पडत असल्याने उत्पादन पण कमी देते. त्यापेक्षा L.R.A-516 ही जात बरी आहे पण खुजी आहे. Ak-84635 या दोन्ही जातीपेक्षा चांगली जात आहे. खुजी नाही आणि रोगटपण नाही पण उत्पादन कमी देते. या जातींपेक्षा अमेरिकन नर आणि भारतीय मादी यांचा संकर घडवून आणला तर त्यातून चांगले वाण तयार होतात आणि उत्पादनदेखील चौपट देतात. उदा एच-४, एनएचएच-४४ वगैरे. निदान कापसामध्ये तरी मूळ जातीपेक्षा संकरित वाण अधिक जोमदार असतात हे सिद्ध झालेले आहे.

In reply to by प्रसाद१९७१

गंगाधर मुटे 14/04/2014 - 15:08
वरिल प्रतिसाद खालीलप्रमाणे वाचावा. मला संपादनाची सोय नसल्याने संपादन करता आले नाही.
लेखकाला काही जाती चांगल्या आणि काही वाईट असे सुचवायचे आहे. खरे तर लेखकाचे तसे च गृहीतक आहे.
हे खरे आहे हो. कापसामध्ये L.R.A 5166 ही जात फारच रोगट आहे. रसशोषणार्‍या किडीला बळी पडत असल्याने उत्पादन पण कमी देते. त्यापेक्षा L.R.A-516 ही जात बरी आहे पण खुजी आहे. Ak-84635 या दोन्ही जातीपेक्षा चांगली जात आहे. खुजी नाही आणि रोगटपण नाही पण उत्पादन कमी देते. या जातींपेक्षा अमेरिकन नर आणि भारतीय मादी यांचा संकर घडवून आणला तर त्यातून चांगले वाण तयार होतात आणि उत्पादनदेखील चौपट देतात. उदा एच-४, एनएचएच-४४ वगैरे. निदान कापसामध्ये तरी मूळ जातीपेक्षा संकरित वाण अधिक जोमदार असतात हे सिद्ध झालेले आहे.

In reply to by drsunilahirrao

गंगाधर मुटे 16/04/2014 - 12:04
शेराचा विचार करता 'विनाकारण' या शब्दापेक्षा 'फालतू' हा शब्दच जास्त संयुक्तिक आणि अर्थप्रवाही ठरायला हवा. कारण नसताना केलेले कृत्य - विनाकारण गरज संपल्यानंतर/भागल्यानंतर सुद्धा वरकड/गरजेपेक्षा जास्तीचे "वरकड" कृत्य करत राहणे म्हणजे 'फालतू' असा अर्थ वाचकांनी घ्यावा, असे अभिप्रेत आहे. जेव्हा गरजेपेक्षा जास्त पाऊस होतो तेव्हा "ओला दुष्काळ" आणि जेव्हा पावसाची अजिबात गरज नसते तेव्हा पाऊस आला तर आपण त्याला अवकाळी पाऊस म्हणतो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by मदनबाण

मृगनयनी 18/04/2014 - 18:16
जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी? की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?
शेती करणारे असाल... तर कर्माने नक्कीच तुम्ही "शूद्र" नसाल!!.. आणि जन्माने असाल.. तर मग.. "संत- चोखामेळा" यांचा आदर्श का नाही डोळ्यासमोर ठेवत? तत्कालीन उच्चवर्णीयांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून त्यांनी कातडी देव्हार्‍यामध्ये विठ्ठल-रुक्मिणीची स्थापना केली होती. आपल्याकडे खरा- म्हणजे चोखामेळ्यासारखा भक्तिभाव असेल.. तर वरूणदेवच काय.. सगळेच देव पावतील तुम्हाला!!!!! फक्त त्यासाठी देवाची करूणा भाकली पाहिजे.. देवापुढे नम्र झाले पाहिजे. कविता ही कवीच्या मनाचे प्रतिबिम्ब असते.. असे म्हणतात..... तुमच्या कवितेतून वरूणदेव आणि ओव्हरऑल सगळ्याच देवांबद्दलचा द्वेष जाणवतोये. "देव" ही संकल्पना खरोखर अस्तित्वात आहे.. असे जर मानत असाल.. तर देवाला शिव्या देणं थांबवा.. आणि केवळ कवितेपुरतं "देवा"ला मध्ये आणायचं असेल.. तर बाकीच्या देव मानणार्‍यांच्या धार्मिक भावनांचा अपमान होऊ नये.. याची काळजी घ्या......... :) पाऊस पडावा, असे वाटत असेल तर "पर्जन्यसूक्ता"चे पठण करून यज्ञ करावा.. पूर्वीच्या काळी पर्जन्यदेवतेला आवाहन करण्यासाठी महान ऋषी-मुनी हीच पद्धत अवलंबत असत.... :) :)

In reply to by मृगनयनी

गंगाधर मुटे 18/04/2014 - 20:16
मी देव मानतो की नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचे सार्वजनीक प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नसतेच. मी माझ्या देवाशी कसे वागावे, हा सुद्धा माझा स्वतःचा प्रश्न आहे. देव जर कुणाची खाजगी मालमत्ता नसेल तर देवाला दोन खडे बोल सुनावल्याने कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचेच असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या. वरुणदेवाने तर गारपीठ वगैरे पाडून शेत नेस्तनाबूत करण्याचे सारे प्रयोग त्याच्या चाहत्यांच्या अथवा भक्तांच्या शेतातच करावे. इतरांच्या कशाला? :) मृगनयनी, तुम्ही तरी वरुणदेवाच्या या कृत्याचे कशाला समर्थन करत आहात? :)

In reply to by गंगाधर मुटे

मृगनयनी 18/04/2014 - 23:05
मी देव मानतो की नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचे सार्वजनीक प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नसतेच.
गंगाधर मुटे, ऑलरेडी तुम्ही त्याचे सार्वजनिक प्रकटीकरण केलेले आहे.- तुमच्या या ओळींमधून वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी? की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये? कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये या सगळ्या ओळींमध्ये आपण देवाचे नाव तीनदा घेऊन त्याचे सार्वजनिकीकरण केलेलेच आहे की!!!!
मी माझ्या देवाशी कसे वागावे, हा सुद्धा माझा स्वतःचा प्रश्न आहे. देव जर कुणाची खाजगी मालमत्ता नसेल तर देवाला दोन खडे बोल सुनावल्याने कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.
इथे तुम्ही म्हणताय, की तुमच्या देवाशी कसे वागावे.. हा डेफिनेटली हा तुमचा प्रश्न आहे. पण सार्वजनिक साईटवरती आपण देवाची नसलेली जात काढून त्याला "जातीच्या चौकटीत" बसवण्याचा प्रयत्न करत आहात!!! आणि देव सगळ्यांचा आहे. आणि कुणाचीही खाजगी मालमत्ता नाहीच्चे!!.. अहो.. जी मालमत्ता सगळ्यांना प्राप्त होत असते.. ती देवाच्याच कृपेने की!!! आणि देवाला खडे बोल सुनावणारे तुम्ही-आम्ही कोण? आणि इथले किमान ५० % मिपाकर आणि बाकीचे मिपावाचन करणारे पाहुणे यांपैकी अनेक जणांच्या मनात देवाची प्रतिमा अत्यंत उच्चस्थानी आहे. देव हे आमचे श्रद्धास्थान आहे. तुमच्या लेखी नक्की देवाचे काय स्थान आहे.. हे मला माहित नाही. पण एकंदर तुमच्या भाषेवरून आणि त्राग्यावरून देव म्हणजे तुमचा नोकर आहे आणि त्याने काम नीट केले नाही म्हणून तुम्ही त्याला शिव्या देत त्याची जात काढत आहात.. असे वाटते. अर्थात हे सगळं.. आमच्या दृष्टीने खूप निरर्थक आणि आक्षेपार्ह आहे. पण तरीही तुमची भडास काढायला तुम्हाला ज्या काही शिव्या द्यायच्या असतील.. त्या तुमच्या प्रायव्हेट ब्लॉगवर देऊ शकता.. जो की तुमच्या मालकीचा असेल.. तिथे तुमच्याच विचारसरणीची माणसे येत असतील.. अर्थात जिथे आमच्यासारख्या लोकांना यायची इच्छाही नसेल...
याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचेच असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या.
इथे तुमच्या या वक्तव्यावर हसावे, की रडावे.. ह्च कळत नाही. देवाचे वकीलपत्र!!!.. ओह माय गॉड॥!!.. तुमची केस खरंच हाताबाहेरची आहे.. असं वाटतंय!!!.. विश्वाचा अफाट पसारा चालवणारी जी एक दिव्य आणि दैवी शक्ती आहे.. तिला परमात्मा, परमेश किंवा सोप्या भाशेत- "देव" असे म्हणतात.... संपूर्ण विश्वाचे पालनपोषण करणार्‍या देवाचे वकीलपत्र घेणे.. ही कल्पनासुद्धा खूप हास्यास्पद आहे. संत एकनाथांच्या घरी देवाने "श्रीखंड्या"च्या रूपाने पाणी भरले. संत सखूबाईंना पंढरपुरास पाठवुन स्वतः तिच्या सासूचा छळ सहन केला, सन्त ज्ञानेश्वरांसाठी रेड्याच्या तोंडून वेद वदवले, सन्त तुकारामांच्या गाथा १३ दिवसांनंतर जश्याच्या तश्या पाण्यातून वर आणल्या... या सगळ्या कथा ऐकून कदाचित तुम्हाला वाटले असेल.. की देव सहज उपलद्ब्ध असतो...हो खरं आहे.. देव सहज उपलद्ब्ध असतो..सगुण रुपातही आणि निर्गुण रुपातही!!!.... पण तो त्याच्या भोळ्या भक्तांसाठी..!!!.. त्याच्या ठिकाणी नम्र होऊन त्याची करूणा भाकणार्‍यांसाठी!!!!... उठसूट देवाला आपल्या मनाला येइल त्या चौकटीत किन्वा जातीत स्वार्थीपणाने बसवून त्याला उद्धटपणे जाब विचारणार्‍यांसाठी नाही!!!
वरुणदेवाने तर गारपीठ वगैरे पाडून शेत नेस्तनाबूत करण्याचे सारे प्रयोग त्याच्या चाहत्यांच्या अथवा भक्तांच्या शेतातच करावे. इतरांच्या कशाला? Smile
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अहो भक्तांना कश्यासाठी तो अशी दु;खे देइल?..उलट आणि अगदी एखाद्या भक्ताच्या पूर्वकर्मानुसार भक्तांना पीडाच भोगायचे नशिबात असेल.. तर देव कोहळ्याएवढा भोग आवळ्याएवढा करू शकेल!!!... ज्यांना देव म्हणजे काय आहे, कोण आहे.. त्याची शक्ती किती व्यापक आहे.. हेच्च कळले नाही.. जे लोक मनमानी वागून करंट्या सरकारच्या चुका, शेतकर्‍याच्या व्यथा यांचे खापर देवाच्या माथी फोडतात.. त्यांना देव का मदत करेल??? कुणी देव मानो अथवा न मानो.. किन्वा त्याची खिल्ली उडवो.. निसर्गाच्या नियमांनुसार घटना घडत असतात... फक्त देव त्याच्या खर्‍या भक्तांच्या पाठी मात्र मजबूतपणे उभा असतो आणि असतोच्च!!!! गारपीट खर्‍या भक्ताच्याही शेतात पडते.... पण तुलनेने त्याचे नुक्सान कमी होते. किन्वा अनाहुतपणे त्याला कुणाची तरी मदत मिळते.. किन्वा सरकारी मदत तरी मिळते. काही मिपाकरांचेही असे काही चांगले अनुभव आहेतच की!!!
मृगनयनी, तुम्ही तरी वरुणदेवाच्या या कृत्याचे कशाला समर्थन करत आहात? Smile
मी वरूणदेवाचे समर्थन बिल्कूल करत नाही. गारपीटीने शेतकर्‍यांचे, शेतीचे किती भयानक नुक्सान झाले.. हे मी पाहिलेय. खरोखर त्या बद्दल अत्यंत दु:खही होत आहे. परन्तु वरुणदेवाला जातीच्या चौकटीत का बसवायचे? आणि शिव्या घालायच्या?.. तुम्हाला जात काढायचीच असेल.. तर ज्यांच्या मुळे ही परिस्थिती ओढवलीये.. त्यांची काढा ना!.. सरकारची जात काढा.. कृषीमंत्र्यांची काढा... वेळीअवेळी पावसाला- गारपीटीला कारणीभूत ठरलेल्या लाकूड-तोडीला- वृक्षतोडीला संमती देणार्‍यांची काढा ना..... वरूण-देवता ही निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे. त्याला शिव्या दिल्याने त्याला काहीच फरक पडणार नाही.. पण देवावर श्रद्धा आणि विश्वास असणार्‍या असंख्य लोकांच्या मात्र भावना दुखावू शकतात. आणि तसेही मिसळपाव'च्या नियमानुसार इथे "जातीयवादी" कोणतेच लिखाण अलाऊड नाहीये. हे तुम्हाला माहित असेलच.. मग उगीच कोणत्या देवाची नसलेली जात काढून त्याला जातीच्या चौकटीत बसवून जातीय तेढ निर्माण करण्यात काय अर्थ आहे?

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 11:57
"जात" या शब्दाला सर्वसामान्य माणूस एवढा विटलेला आहे, की जीवशास्त्रीय वर्गीकरणांना केवळ जीवशास्त्रीय वर्गीकरण म्हणावे. जाती, प्रजाती हे शब्द जीवशास्त्रातही वापरू नयेत एवढा 'जात' हा शब्द आताशा डोळ्या (किमान मलातरी) खूपु लागला आहे. ( 'अमुक तमुकची जात काढणे आणि अमुकतमुकच्या जातीवर येणे' हेही वृत्ती या शब्दाचे नकारात्मक भाव दाखवतात किंवा कसे? आणि म्हणून 'जात' हा वृत्ती या अर्थानेही नकोसा होतो. -खासकरून प्रा. बिरूटे सरांनी आमची ही भावना लक्षात घ्यावी असे वाटते). कदाचित मानवी इतिहासाची ज्ञानकोशीय दखल घेताना ज्ञानकोशात 'जात' हा शब्द इतिहास होऊन राहणे एवढे ठिक. या पुढील साहित्यात 'जात' हा शब्द 'जातीयतेचा निषेध करण्यापुरताच येईल हे संवेदनशील साहित्यिक आणि कवींनी पाहील्यास आमचा त्यांच्या साहित्याप्रती आदर निश्चीत दुणावेल अर्थात मी (भक्त अथवा भक्तेतर) माझ्या (आपल्या अभिप्रेत) प्रीय/अप्रीय देवावरही कोपू शकतो हे स्वातंत्र्य सर्वसाधारण भारतीय साहित्यातच नव्हे तर विवीध धार्मिक आणि संत साहित्यात सुद्धा आहे. देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू नये असा दळभद्रीपणा भारता बाहेरून आलेल्या काही संस्कृतीत आहे. आपन त्यांच्या चुकीच्या धर्मांधतेची नक्कल करून साहित्यिकाचे आपल्या देवाप्रती सात्विक कोपण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित असलेल्या मृतैंच्या मतांशी मी सहमत नाही. उपरोक्त कवीतेत कवीने जात हा शब्द वापरणे तो वृत्ती अर्थाने येऊनही, मलाही खटकले कारण अताशा जात हा शब्दच खटकू लागला आहे पण एरवी कवीची भाषा उद्धट अथवा शिव्या देणारी वगैरे असलेले मृतैंचे आक्षेप चुकीचेच नसून संबंधीत आक्षेपच आक्षेपार्ह वाटतो किंवा कसे ?

In reply to by माहितगार

मृगनयनी 19/04/2014 - 17:33
देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू नये असा दळभद्रीपणा भारता बाहेरून आलेल्या काही संस्कृतीत आहे. आपन त्यांच्या चुकीच्या धर्मांधतेची नक्कल करून साहित्यिकाचे आपल्या देवाप्रती सात्विक कोपण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित असलेल्या मृतैंच्या मतांशी मी सहमत नाही.
माहितगार... मुळात आपल्या "देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू नये असा दळभद्रीपणा भारता बाहेरून आलेल्या काही संस्कृतीत आहे. आपन त्यांच्या चुकीच्या धर्मांधतेची नक्कल करून साहित्यिकाचे आपल्या देवाप्रती सात्विक कोपण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित असलेल्या मृतैंच्या मतांशी मी सहमत नाही." या वाक्याचा काहीही संदर्भ लागत नाही... :) "देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपणे".. म्हणजे नक्की काय ?.. आणि ती संकल्पना भारताबाहेरून कशी आली..याचे विश्लेषण कृपया देऊ शकता का? .. माझा विरोध "मुटे" यांच्या देवावर रागावण्याला नसून देवाची अत्यंत अरेरावी भाषेत वल्गना करून त्यास "जाती"च्या चौकटीत बसवण्याला आहे. "वरूणदेवाने फालतू त्याची जात दाखवू नये" या वाक्याला आहे. बाकी त्यांचे त्यांच्या देवावर रागावणे वगैरे.. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त वापरलेली भाषा आणि शब्द चुकीचे आहेत. ते स्वतः कवी आहेत.. म्हणून त्यांना आवडतील.. ते चुकीचे शब्द चुकीच्या ठिकाणी वापरणे.. हे चुकीचे आहे. माझ्या वरच्या प्रतिसादात नमूद केल्याप्रमाणे.. त्यांना पाहिजे ते देवावरचे रागावणे, कोपणे.. वगैरे गोष्टी ते आपल्या स्वतःच्या ब्लॉगवर करू शकता. इथे मिसळपाववर "जातीयवादी", लोकांच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या कविता कृपया टंकू नये. उपरोक्त कवीतेत कवीने जात हा शब्द वापरणे तो वृत्ती अर्थाने येऊनही, मलाही खटकले कारण अताशा जात हा शब्दच खटकू लागला आहे पण एरवी कवीची भाषा उद्धट अथवा शिव्या देणारी वगैरे असलेले मृतैंचे आक्षेप चुकीचेच नसून संबंधीत आक्षेपच आक्षेपार्ह वाटतो किंवा कसे ? बहुतेक तुम्हाला स्वतःलाच नक्की कश्याबद्दल आक्षेप आहे... याबद्दल तुम्ही स्वतःच साशंक आहात!!!.... जाऊ देत.. वेळ मिळाला, की माझा वरचा प्रतिसाद नीट कळेपर्यंत वाचत रहा... माझा आक्षेप नक्की कशाला आहे...हे नक्की कळेल!!! :) :) =)) .. =))

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 18:47
वेळ मिळाला, की माझा वरचा प्रतिसाद नीट कळेपर्यंत वाचत रहा... माझा आक्षेप नक्की कशाला आहे...हे नक्की कळेल!!!
मी जेवढ्यांदा वाचण्याचे आपण स्वप्न पहात आहात त्याला गुणीले ५६ वेळा, "तुमच्या आक्षेपालाच आक्षेप आहे" हे नीट कळून सवरून लिहिले आहे हे पुन्हा पुन्हा कळे पर्यंत वाचत रहावे (ह.घ्या). जात हा शब्द वृत्ती या अर्थाने आजही मराठीत येतो (आणि वर एका प्राध्यापकांनी त्यास सर्टीफाय पण केले आहे) त्यावर कोनतीही बंदी नाही आणि वृत्ती/प्रवृत्ती "वरूणदेवाने फालतू त्याची प्रवृत्ती दाखवू नये" यात एक वरूणदेवाला नव्हे तर वरूणदेवाच्या दुर्दैवी विघ्नकर्त्या प्रवृत्तीला फालतू हा अनावश्यक या अर्थाने शब्द आला आहे. आणि तो पंचमहाभूता पैकी एका महाभूत असलेल्या वरूणराजाने आणलेल्या अवकाळी संकटे आणण्याच्या प्रवृत्तीस उद्देशून वापरलेला दिसतो आहे. पंचमहाभूते कितीही ग्रेट असली तरी भूते ती भूतेच उद्या तुम्ही पंचमहाभूत या शब्दात महाभूत हा शब्द वापरला आमच्या भावना दुखावल्या म्हणाल ! या कवितेत "जातीयवादी", लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारे काहिही नाही. उलट संकटाने ग्रस्त शेतकर्‍याची वेदना मांडणार्‍या कवितेचे सुयोग्य संवेदनशील रसग्रहण करण्याचा अभावग्रस्तता आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या दृष्टीकोणात दिसते. आपल्या आक्षेपात इतर लोक भावना दुखावल्या म्हणतात तसे आम्हीही म्हणून पाहतो या वृत्ती पलिकडे तथ्य नाही असे माझे स्पष्ट मत आहे. कवी महोदयांनी या पुर्वीच्या धाग्यातून भक्तीरसपूर्ण काव्य रचले आहे आणि या उलट यापुर्वीच्या एका धागा प्रतिसाद (http://www.misalpav.com/comment/572691#comment-572691 येथे) इतरांच्या जात, रंग, भाषा यावरून अहंकार आणि असंवेदनशीलपणे लोकांना दुखावताना पाहिले आहे. अशा प्रवृत्तीचा मी प्रांजळपणे निषेध नोंदवतो. एनी वे प्रतिसादासाठी धन्यवाद. @ गंगाधर मुटेंजी सगळ्यात चांगली गोष्ट कोणती ते आपण शेवटी सांगीतलेच आहे. आपल्या कवितेतील मतितार्थ हळू हळू उलगडतात. आपल्या आवडीचे लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

In reply to by माहितगार

माहितगार 19/04/2014 - 18:51
आणि या उलट यापुर्वीच्या एका धागा प्रतिसादात सदस्य मृगनयनी यांना (http://www.misalpav.com/comment/572691#comment-572691 येथे) इतरांच्या जात, रंग, भाषा यावरून अहंकार आणि असंवेदनशीलपणे लोकांना दुखावताना पाहिले आहे. अशा प्रवृत्तीचा मी प्रांजळपणे निषेध नोंदवतो. एनी वे प्रतिसादासाठी धन्यवाद.

In reply to by माहितगार

मृगनयनी 19/04/2014 - 19:11
माझा "तो" प्रतिसाद हा खूप वेगळ्या स्वरूपाचा आहे. आणि तो योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोचलाही गेलेला आहे. किम्बहुना तो त्या भाषेत आणि शब्दांमध्ये मुद्दाम लिहिला गेलेला आहे. ज्यांना कुणाला त्याचा अर्थ आणि मागचा हेतू समजला नाही.. किंवा ज्यांना "स्कोअर सेटल" करावयाचा होता....त्यांनी आपापल्या मतीनुसार तेथे प्रतिक्रिया देऊन माझे आणि संबंधित व्यक्तींचेही मनो'रंजन केले आहे. त्यामुळे आपल्याला जो काही निषेध दर्शवायचा असेल.. तो त्या पर्टीक्युलर धाग्यावर नोन्दवला गेला तर बरे होईल. इथे या धाग्याशी आणि प्रतिक्रियांशी संबंधित डेटा जर आपल्याकडचा संपला असेल.. तर कृपया मिपावरच्या इतर चर्चांचा आनन्द घेऊ शकता... :) असो..... इथे या धाग्यावर आपला जो काही देवाच्या आणि जातीच्या सन्दर्भातला संभ्रम आहे.. तो दूर झाला का? अर्थात दूर झाला असेल किंवा नसेल.. तरी मला "प्रांजळ" आनन्दच आहे... :)

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 19:39
माझा "तो" प्रतिसाद हा खूप वेगळ्या स्वरूपाचा आहे. आणि तो योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोचलाही गेलेला आहे. किम्बहुना तो त्या भाषेत आणि शब्दांमध्ये मुद्दाम लिहिला गेलेला आहे. ज्यांना कुणाला त्याचा अर्थ आणि मागचा हेतू समजला नाही..
मृ. तै तुमच्या त्या प्रतिसादावर इतरांनी स्कोअर सेटलींग केलं नाही केलं त्याची कल्पना नाही, पण आपला हा प्रतिसादच आपण स्वतः आपला 'तो' प्रतिसाद स्कोअर सेटलींग करता होता याची अप्रत्यक्ष कबूली देतो आहे. म्हणजे तुम्ही तुमची व्यक्तीगत स्कोअर सेटलींग करताना सार्वजनिक व्यासपीठ वापरून फक्त ज्याच्याशी स्कोअर सेटल करतोय त्या पलिकडे जाऊन आसपासच्या समाजाच्या भावना दुखावणार लेखन आपल्या हातून घडल होत याचं भान अद्यापही आपणास दिसत नाही. ज्यांनी आपणास भानावर आणण्यासाठी प्रतिसाद देण्याचे प्रयत्न केले त्यांच्या वरच स्कोअर सेटलिंगचे आरोप लावणे हास्यास्पद वाटते. किमानपक्षी माझा तर आपल्याशी कोणता पूर्व परिचय नसताना मी आपल्याशी स्कोअर सेटल करण्याचा प्रश्न येत नाही. तेव्हा एक त्रयस्थ म्हणून पुन्हा एकदा नमूद करतो की आपला तो प्रतिसाद (विचार प्रणाली) सार्वजनिक व्यासपिठावर कळत नकळत आपली स्वतःचीच नकारात्मक प्रतिमा उभी करत आहे. 'संवेदना' नावाच्या गोष्टीचा आपला परिचय संपला नसेल तर आपल्या 'त्या विचारप्रणाली' आपण पुन्हा एकदा अभ्यासाव्यात अथवा सार्वजनिक व्यासपिठावर तसे लिहिण्याचे टाळावे असे वाटते. आपल्या त्या प्रतिसादाचा संबंध या धाग्यात तर आता अधिक लागतो आहे हे ही आपण लक्षात घेतले असे दिसत नाही. सार्वजनिक व्यासपिठावर माझ्यामुळे (आपल्यामुळे असे वाचावे) आसपासचे दुसरे दुखावले गेले तर चालतात, आणि मी (इथे आपण असे वाचावे) मात्र ज्यात नाही त्याचे अर्थ काढून दुसर्‍यांना सार्वजनिक व्यासपिठ वापरण्याबद्दल हकनाक आक्षेप घेतो, हे माझे (आपले असे वाचावे) वागणे दुटप्पी आणि विरोधाभासाचे नाही किंवा कसे याचा मीच माझा (येथे आपणच आपला असे वाचावे) विचार केला पाहीजे. (आपल्या विचारधारांमुळे हे स्पष्ट करू इच्छितो की गंगाधर मुटेंची बाजू घेण्यास ते माझे कोणी लागत नाहीत) गंगाधर मुटे यांच्या शब्द योजने बद्दल मलाही सुरवातीस साशंकता वाटली म्हणून या कवितेच्या एकदम सुरवातीच्या प्रतिसादात माझा प्रतिसाद आहे. पण कविता पुन्हा पुन्हा अभ्यासली ती एक शेतकर्‍यांच्या दुख्खाबद्दलची निखळ संवेदनशील कविता आहे. कविते वर अनभिज्ञतेतून अथवा गंमतीतून आलेले आक्षेपांनी शेतकर्‍यांच्या वेदना जी कवी मांडू पाहतो आहे ती दुर्लक्षीत होते आहे म्हणून मी कवीने या कवीतेत मांडलेल्या वेदनांची मी अभ्यासपूर्ण आणि संवेदनशीलपणे बाजू घेतो आहे.

In reply to by मृगनयनी

गंगाधर मुटे 20/04/2014 - 20:16
माझा विरोध "मुटे" यांच्या देवावर रागावण्याला नसून देवाची अत्यंत अरेरावी भाषेत वल्गना करून त्यास "जाती"च्या चौकटीत बसवण्याला आहे.
मी वरूणदेवाला जातीच्या चौकटीत कसा काय बसवू शकेल ब्वॉ? एखाद्या जातीच्या चौकटीत एखाद्याला बसवायचे असेल तर समान गुणधर्मिय जातीचे अनेक असायला हवेत ना? माझ्या माहितीप्रमाणे पाऊस पाडण्याचा गुणधर्म फक्त आणि एकमेव वरुणदेवातच आहे. आणखी कोणाकोणाला व्यक्तिगत अथवा सामुहिक/सामुदायीकरित्या पाऊस पाडता येतो, हेच मला माहित नसल्याने मी वरुणदेवाला जातीच्या चौकटीत बसवायला असमर्थ आहे. मात्र या पृथ्वितलावर "पाऊस पाडण्याची शक्ती" असलेली जात कुणी माझ्या निदर्शनास आणून दिली तर, त्या जातीच्या चौकटीत वरुणदेवाला बसवायचा विचार करता येईल.

In reply to by गंगाधर मुटे

मागे काही वर्षांपुर्वी बारामतीकरांनी प्रायोगिक तत्त्वावर सिल्वर आयोडिन का काय ते त्याचा फवारा करुन कृत्रिम पाऊस पाडला होता म्हणे ... त्यामुळे वरुणदेवाला बारामतीकरांच्या जातीत बसवता येईल :D

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 21/04/2014 - 08:12
त्यामुळे वरुणदेवाला बारामतीकरांच्या जातीत बसवता येईल
वरुणदेव आकाशातून पाऊस पाडतो........ बारामतीचा बारामतीकर थेट शेतकर्‍यांच्या डोळ्यातूनच पाऊस पाडतो....... धरणामध्ये पाऊस पाडण्यासाठी बारामतीकरांकडे खास बनावटीचे औजार आहे म्हणे....... एकाच श्रेणीत नाही आणता येणार यांना. ;)

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 12:01
भारतीय संस्कृतीत देवावर कोपलेला भक्त अगदी आपल्या प्रीय देवतेला पाण्यात वगैरे सुद्धा बुडवून ठेवत असे. (हे पुर्वीच्या आज्जी आजोबा पुर्व पिढीत बरेच होते नवीन पिढ्यांना ठाऊक नाही एवढेच)

In reply to by धन्या

अरे ते निव्वळ ब्लॅकमेक्लिंग असे. माझी मागणी मान्य कर, तोवर पाण्यातून काढणार नाही असे… नवस म्हणजे देवाला दिलेली लाच, तशी ही देवाकडे केलेली दादागिरी !!!

In reply to by मृगनयनी

माहितगार 19/04/2014 - 13:00
कवी गंगाधर मुटे यांच्या मागच्या कविता शोधल्यातर, त्यांनी लिहिलेल्या चक्क गणेशाच्या दोन आरत्या सापडल्या श्री गणराया आणि गणपतीची आरती कवी गंगाधर मुटेकृत आरत्या मिळाल्यानंतर, मृ. तैंचा देव ही संकल्पना केवळ मृ. तैंनाच माहिती आहे असा भासवणारा प्रतिसाद मनो'रंजक' वाटला.

In reply to by माहितगार

मृगनयनी 19/04/2014 - 17:36
कवी गंगाधर मुटे यांच्या मागच्या कविता शोधल्यातर, त्यांनी लिहिलेल्या चक्क गणेशाच्या दोन आरत्या सापडल्या श्री गणराया आणि गणपतीची आरती कवी गंगाधर मुटेकृत आरत्या मिळाल्यानंतर, मृ. तैंचा देव ही संकल्पना केवळ मृ. तैंनाच माहिती आहे असा भासवणारा प्रतिसाद मनो'रंजक' वाटला.
तु'मची ही क'मेंट दे'खील म'ला तित'कीच मनो'रंजक वाट'ली.... असो...अर्थ कळेपर्यंत प्रतिसाद वाचत रहा..... =)) .. =)) ... अजून काय!!!??!!!

In reply to by माहितगार

वरील लिन्क्स दिल्याबद्दल माहीतगार ह्यांचे आभार ! आता , मुटेजींनी वरील कवितेत वापरलेला 'जात' हा शब्द बीग्रेडी मनोजातीतुन (जात येथेही वृत्ती ह्याच अर्थाने) आला नसल्याची खात्री झाली आहे ! पुनश्च एकवार आभार !!

In reply to by माहितगार

गंगाधर मुटे 20/04/2014 - 08:01
माहितगार - धन्यवाद. तुमच्यासाठी आणखी काही लिंक्स. - जा रे कान्हा नटखट - चोरटा मुरारी - चेंडू मारियेला - वेणी सोडुनिया आणि मृगनयनी यांच्यासाठी काही खास लिंक : - पंढरीचा राया : अभंग-१ - शुभहस्ते पुजा : अभंग-२ - आत्महत्या बळीच्या तू रोख वामना

पोटे 18/04/2014 - 09:06
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये" वाक्य खूप आवडले. मुटेसाहेब, गोडबोलेंच्या मागे तुम्ही जे प्रतिसाद देत धावता आहात, तेही आवडले.

आयुर्हित 18/04/2014 - 20:53
पार्डी ताड: संसारामध्ये जिवन जगत असताना जिवाला सुख पाहीजे असेल तर देव आपलासा करुन घ्यावा असे प्रतिपादन हभप किशोरीताई सांगुले यांनी हरिकिर्तनात यांनी म्हटले. येथे हनुमान जयंती निमित्त आयोजित अखंड हरिनाम व o्रीमद भागवत साप्ताहातील हरिकिर्तनामध्ये संबोधन करताना किशोरीताई म्हणाल्या की, भागवत कथा ही o्रवण करावी त्यामुळे माणव जिवणाचा उद्धार होतो भागवत कथा ही सुखकारी व दुखहारी आहे प्रत्येक जिवाला मरणाचे भेव आहे आज मात्र मानव सुख मिळण्यासाठी रात्रदिवस कामकरतो मात्र त्याच्या जिवणात पदरी सुख मिळत नाही पैसा म्हणजे सर्व काही सुख नाही o्रीमंत लोक सर्वात दुखी असतात पैसा काहीही सुख देत नाही. पैशाने अन्न विकत घेता येते पण भुक मात्र विकत मिळत नाही .संसारामध्ये सुख मिळविण्याकरिता देवाला आपलस करावे लागते ‘माया’ ही संसारातील सुख लपविते संसारात काही सेाबत येत नाही.परमार्थ केल्याने सर्वकाही सोबत येते.असे प्रतिपादन किशोरीताई यांनी केले या कार्यक्रमाला साथसंगत मुदंगाचार्य हभप रामेश्‍वर महाराज गायणाचार्य हभप भारत महाराज बोरकर साप्रदाईक भजनी मंडळ माळशेलू यांची होती. देव आपलासा करून घ्यावा- किशोरीताई सांगुले

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे 19/04/2014 - 20:15
श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताह

       आमच्या ग्रामविकास भागवत कमेटीच्या वतिने श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताहाच्या आयोजनाचं हे १२ वे वर्ष.

दिनांक : १७ एप्रिल ते २४ एप्रिल २०१४

Bhagwat
* * * *
Bhagwat
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई
* * * *
भागवत
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई
* * * *
Bhagwat
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई. या निमित्ताने बालगोपालही आपापल्यापरिने सहभाग नोंदवतात.
* * * *

In reply to by मृगनयनी

मृगनयनी 19/04/2014 - 20:28
अर्थात या फोटोंचा या धाग्याशी काहीही संबंध नाही... हे आपल्यालाही माहित आहे. आणि हे फोटो इथे कश्यासाठी टाकलेत.. हे सूज्ञांना सांगायला नको!!!!!!! :) :) हरे राम हरे कृष्ण !!!!!

In reply to by मृगनयनी

गंगाधर मुटे 20/04/2014 - 20:56
मृगनयनी, गेली १२ वर्षे मी "श्रीमद भागवत ज्ञानयज्ञाचे" आयोजन करत आहे, हा माझा ढोंगीपणा आहे, असे तुम्हाला म्हणायचे असेल तर http://www.misalpav.com/node/24663 या लिंकवरील गझलेतील माझाच एक शेर माझ्याच विरोधात माझा कबुलीजबाब म्हणून वापरू शकता. :) सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला माझी मलाच ओळख पटणे कठीण झाले

विवेकपटाईत 18/04/2014 - 21:42
अवकाळी पावसासाठी वरुण देवाला दोष देण्यात अर्थ नाही. यात माणसाची शुद्र आणि स्वार्थ बुद्धीचा दोष अधिक आहे. आपण (माणसे) स्वत: देव बनून परमेश्वराने निर्मित केलेल्या सृष्टीत वाजवी पेक्षा जास्त ढळवा-ढवळ करत आहोत आणि त्याचे परिणाम ही आपण भोगतो आहे. वर विना कारण देवाला दोष देत आहोत. मुटे साहेब निराशा सोडून या मागचे वास्तविक कारणे काय आहेत याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे आणि त्या वर उपाय शोधणे ही.

शुचि 18/04/2014 - 23:54
मुटे साहेब आपल्या कविता विशेषकरुन नागपुरी तडके फार आवडतात. या कवितेबद्दल, उगाच वितंडवादात उर्जेचा अपव्यय करण्यापेक्षा, एक मस्त तडका लिहून टाका. जे झालं ते झालं त्यावर चर्वितचर्वण अन आरोप-खंडण-प्रत्यारोप-खंडण मध्ये कशाला उर्जेचा व्यय करता? बघा मला तरी असे वाटते. बाकी आपण सूज्ञ आहातच.

In reply to by शुचि

मृगनयनी 19/04/2014 - 19:16
नाही नाही माझी सही आहे बस! Live in the Fear of God अच्छा!!!... पण या धाग्याच्या पार्श्वभूमीवर ती सही फारच "रोचक" आणि धागालेखकासाठी संवेदनशील आणि उचित संदेशकारक वाटते. :)

पैसा 19/04/2014 - 19:38
कविता आणि बिरुटे सरांनी केलेले रसग्रहण आवडले. आपल्याकडे संतांनीही देवाला भरपूर शिव्याशाप दिले आहेत. जनाबाईचा अभंग पटकन आठवला. त्याचा अर्थ भले वेगळा आहे पण वरकरणी शिव्याच आहेत. "अरे विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली । जन्मसावित्री चुडा ल्याली तुझें गेलें मढें । तुला पाहून काळ रडे उभी राहूनि आंगणीं । शिव्या देत दासी जनी" त्यामुळे इथे वरूणदेवाला शिव्या देण्यात काही आक्षेपार्ह वाटले नाही. आई आपल्याला लेकराला कधी रागाने "मर मेल्या" म्हणते, तेव्हा तिला तो मरावा असे खरेच वाटते का? कधीच नाही! तसाच हा कवीचा त्रागा आहे!

In reply to by पैसा

मृगनयनी 19/04/2014 - 20:21
पैसाताई... कृपया इथे जनाबाईंची तुलना गंगाधर मुटेंशी करण्याचा मोह टाळला, तर बरे होईल.... कारण दोघांच्या मतांमध्ये आणि देवाविषयी वाटणार्‍या भावांमध्ये प्रचंड तफावत आहे. शब्दार्थांमध्ये जरी वर वर साधर्म्य दिसत असले, तरी दोघांचा देवाविषयीचा भाव खूप वेगळा आहे. जनांबाईंच्या ओव्यांमधून भक्तीरस ओथंबून वाहतो आहे.. तिच्या विठुरायावर तिचा स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे...आणि तिच्या शिव्यांमध्येही तिने विठुरायाची गुणगानच गाईले आहे.- तिचा विठ्ठल हा मूळ-महामायेचाच एक अंश आहे...आपण दिलेल्या जनाबाईंच्या ओव्यांमधल्या दोन ओळींमधल्या विरोधाभासातलाही अर्थ खूप गहन आणि विठ्ठलभक्तीने ओथंबलेला आहे.. जनाबाईच्या विठुरायामुळे रांडही जन्मसावित्रीचा पवित्र चुडा घालू शकते. आणि काळानेही विठुरायापुढे हात टेकले आहेत..... ही ओवी खरंच खूपच भावपूर्ण आहे... आणि जनाबाई काय कुणीही संतानी काय देवाला शिव्या घातल्या म्हणून आपणही घालायच्या.. वरकरणी शिव्या भासवून जातीयवादा'ची आपली भडास पुरी करून घ्यायची... खरंच खूप हास्यास्पद आहे हे!!!.. मुटेंसाठी "देव" हा कुणीतरी वेगळा माणूस आहे. आणि त्याच्यावर श्रद्धा नसलेल्यांच्या शेतात तो गारपीट करतो.. असे काहीसे त्यांचे म्हणणे आहे...... वर मला दिलेल्या एका प्रतिसादात गंगाधर मुटेंनी हे सुस्प्ष्टपणे लिहिले आहे.. की देवाला गारपीट करायची असेल तर "त्याच्या भक्तांच्या शेतात करावी.. आम्हला कश्याला त्रास देतोय" ...
गंगाधर मुटे - Fri, 18/04/2014 - 18:46 मी देव मानतो की नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचे सार्वजनीक प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नसतेच. मी माझ्या देवाशी कसे वागावे, हा सुद्धा माझा स्वतःचा प्रश्न आहे. देव जर कुणाची खाजगी मालमत्ता नसेल तर देवाला दोन खडे बोल सुनावल्याने कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचेच असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या. वरुणदेवाने तर गारपीठ वगैरे पाडून शेत नेस्तनाबूत करण्याचे सारे प्रयोग त्याच्या चाहत्यांच्या अथवा भक्तांच्या शेतातच करावे. इतरांच्या कशाला? Smile मृगनयनी, तुम्ही तरी वरुणदेवाच्या या कृत्याचे कशाला समर्थन करत आहात? Smile माझी वाङ्मयशेती - Facebook Page बळीराजा डॉट कॉम उत्तर द्या
इथे एखादी आई जरी आपल्या मुलाला शिव्या देत असली.. तरी तिच्या मनात.. त्याच्याबद्दल मनातून प्रेम असते.. जे, की जनाबाईंच्या ओव्यांमधून विठ्ठलाबद्दल जाणवते. पण मुट्यांच्या प्रतिसादातून मात्र देवाविषयी प्रेम कमी आणि तिरस्कार जास्त जाणवतोय. स्पेशली त्यांचा भर हा "जाती"वर आहे. याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचे"च असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या. या त्यांच्या वाक्यातून "देवा" बद्दल त्यांना "अ‍ॅक्चुली" काय वाटतेय.. हे एखाद्या शेंबड्या पोरालाही कळेल.. असो!!!!... मुटेंना पाठीशीच घालायचे ठरवले असेल... तर कोण काय बोलणार ? प्रत्येक जण शेवटी आपापल्या "जाती"वरच जातो... नाही का!!!!!!!!

In reply to by मृगनयनी

पैसा 19/04/2014 - 22:01
मुटेंना पाठीशीच घालायचे ठरवले असेल... तर कोण काय बोलणार ? प्रत्येक जण शेवटी आपापल्या "जाती"वरच जातो... नाही का!!!!!!!!
हे फारच झालं हो! मी कोण कोणाला पाठीशी वगैरे घालणारी! गंगाधर मुटे या व्यक्तीबद्दल मी बोलत नाही. कवितेत दिसणार्‍या कवी/निवेदकाबद्दल बोलते आहे. कवितेत आहे ते मुटेसाहेब म्हणताहेत असं म्हटलं तर खुनाच्या कथा लिहिणारा माणूस स्वतः खुनी असायला हवा नाही का! कोणतीही कलाकृती ही कलाकारापासून स्वतंत्र असते. तिचा कलाकाराने सांगितलेला अर्थ आणि एखाद्या वाचकाने लावलेला अर्थ संपूर्ण वेगळा आणि त्या व्यक्तीपुरता खरा असू शकतो ना! आणि इथे मी मुटेसाहेबांची जनाबाईशी तुलना केली नाही तर या भावनांची तुलना केली आहे. आपणही काही मनासारखं झालं नाही की देवाला शिव्या घालतो. त्यात काही विशेष नाही. जनाबाईचा अभंग पटकन आठवला म्हणून त्याचा दाखला दिला. एवढंच.

In reply to by पैसा

पैसाताई, देव हा तुमचा विषय आहे का ? नाही. तुम्ही केवळ बँकेबद्दल आणि गोव्याबद्दल बोला. अध्यात्माबद्दल, देवाबद्दल, संतांबद्दल तुम्हाला काय कळते ? तो त्यांचा एरिया आहे. आल्या, जनाबाईचे संदर्भ देत. हभप, इतर देव भप, बेढबमैत्रीणमदतकर्त्या, निस्पृह समाजसुधारक, मुर्गनैनीबै प्रवचन देत असताना तुम्हाला मध्ये पडायचे कारणच काय, तुम्ही फार फार तर कापूस घेऊन या, वाती वळू.

गंगाधर मुटे 20/04/2014 - 12:55
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, काळजी नसावी. नियतीच्या घावांनी मला एवढे 'टणक" (कणखर) बनविले आणि त्यासोबतच वास्तवशास्त्राची जोड यामुळे मी पाकिस्थान, अमेरिका, मानव, दानव आणि देवाच्या बापालाही पुरून उरेल. :) बिघडल्याच तर इतरांच्याच तब्बेती बिघडतील. :) जाळल्या कोंबड्याला कुठे अग्नीची भिती असते? :D (हा अहं नाहीये आणि रावणी दर्पोक्ती पण नाहीये.)

In reply to by गंगाधर मुटे

बालगंधर्व 20/04/2014 - 14:21
मुटे सहेब, अता उन एत्का वदहला अहे के, सुरय्य देवने पन तेची जात दावु नये असे महनावे लगेल.[ थनदेइ कुनामुले पदते ते महित नहे. नायतर तयचए पन कदलि असते थन्दिमधये. अहो जात कदलि मह्नुन अन्गनाआवर भुनकाअयाल तो कय बओस अहे क? शिवया घलतना बओसच चेरा समोर अनयचाअ. :) कुनचह्य भव्नाआ दुक्ल्यया असतेल तर्सओरे. (संपादित)

In reply to by बालगंधर्व

काय लिहिलंय..................मेलो ना मी =)) >>>>>>>> कुनचह्य भव्नाआ दुक्ल्यया असतेल तर्सओरे. नै नै तुम्ही लिहित राहा. कोणाच्याही भावनांचा विचार करू नका. -दिलीप बिरुटे

In reply to by अत्रुप्त आत्मा

बालगंधर्व 20/04/2014 - 17:58
नै नै तुम्ही लिहित राहा. कोणाच्याही भावनांचा विचार करू नका. -दिलीप बिरुटे
बिरुते सर, मि अप्ला अबहरि अहे. नय्तर इक्दे बहव्नचा कुहुप इसुह्यु होतो.

In reply to by बालगंधर्व

किसन शिंदे 20/04/2014 - 22:58
तब्बल पंधरा मिनिटे लागली प्रतिसाद वाचून समजायला. :) रच्याकने खूप कष्ट पडले असतील नै, जाणून बुजून अशुध्द टंकलेखन करायला. ;)

In reply to by पैसा

किसन शिंदे 20/04/2014 - 23:38
ओह! धन्यवाद पै नविन व्याख्या समजावून सांगितल्याबद्दल. पण बालगंधर्व अचानक कसे काय अवतरले ब्वॉ? अन् ते ही मुंटेंच्या धाग्यावरच??

प्यारे१ 20/04/2014 - 20:04
काय ठरलं मग? जात पडताळणी / वैधता कागदपत्रांची पूर्तता झाली का? शेवटची मुदत कधीपर्यंत? मेन ऑफिस पुण्यालाच आहे ना अजून? मुळात हे 'देव'लोक जातीचं प्रमाणपत्र घ्यायला लायक आहेत का? आर टी आय खाली माहिती मिळेल काय?
वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये

वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये

एवढ्यासाठीच जोपासतात, ’ते’ येथे गरिबी
की महान परंपरेला त्यांच्या, तडा जाऊ नये

कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये

जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?

कुणी आणली असेल अशी वेळ, या सारस्वतांवर

थोडं समजून घ्या ना... भाग ३

वडापाव ·

In reply to by प्यारे१

हवालदार 12/04/2014 - 23:47
मजा येते आहे वाचताना :-) अती अवांतरः आज काल कॉलेजमध्ये अतिशय छोट्या चड्ड्या घालून जायची फॅशन आली आहे काय? कारन भोकवाली आतली रूपा दिसणे एवढे सहज शक्य असेल असे वाटणे जरा अवघड जात आहे

In reply to by प्यारे१

आत्मशून्य 13/04/2014 - 00:33
हल्ली कॉलेजमध्ये अशा प्रकारचे ग्रुप्स नि अशा भाषा असतात काय?
कॉलेज म्हणजे मिपा आहे काय फक्त भाउ बहीण टाइप संवाद म्यानर्स पाळायला... असले उपदेश जरी केले कोणी तर फुल्टु... जाउदे विषय हा असा आहे की आता वातावरण थोडं लिबरल आहे म्हणजे मुलीच्या (मुक्/अमुक्) संमतीशिवाय कोण असे शक्यतो बदडणार नाही. करण पुर्वी सगळी भांडणे स्त्रियांमुळे होत, तसे आता होत नाही कारण आता फक्त एकाच मुलीवर कोणी संपुर्ण प्रेमही कोणी करत नाही... चुकांपासुन माणुस शिकतो ते असं बघा.

In reply to by संजय क्षीरसागर

आत्मशून्य 14/04/2014 - 04:32
लास्ट पार्ट कल्पनारंजनच आहे... अथवा एखाद्या (पॉटेनशीअल) बाचाबाचीचे एक्सागरेशन....

In reply to by प्यारे१

हवालदार 12/04/2014 - 23:47
मजा येते आहे वाचताना :-) अती अवांतरः आज काल कॉलेजमध्ये अतिशय छोट्या चड्ड्या घालून जायची फॅशन आली आहे काय? कारन भोकवाली आतली रूपा दिसणे एवढे सहज शक्य असेल असे वाटणे जरा अवघड जात आहे

In reply to by प्यारे१

आत्मशून्य 13/04/2014 - 00:33
हल्ली कॉलेजमध्ये अशा प्रकारचे ग्रुप्स नि अशा भाषा असतात काय?
कॉलेज म्हणजे मिपा आहे काय फक्त भाउ बहीण टाइप संवाद म्यानर्स पाळायला... असले उपदेश जरी केले कोणी तर फुल्टु... जाउदे विषय हा असा आहे की आता वातावरण थोडं लिबरल आहे म्हणजे मुलीच्या (मुक्/अमुक्) संमतीशिवाय कोण असे शक्यतो बदडणार नाही. करण पुर्वी सगळी भांडणे स्त्रियांमुळे होत, तसे आता होत नाही कारण आता फक्त एकाच मुलीवर कोणी संपुर्ण प्रेमही कोणी करत नाही... चुकांपासुन माणुस शिकतो ते असं बघा.

In reply to by संजय क्षीरसागर

आत्मशून्य 14/04/2014 - 04:32
लास्ट पार्ट कल्पनारंजनच आहे... अथवा एखाद्या (पॉटेनशीअल) बाचाबाचीचे एक्सागरेशन....
थोडं समजून घ्या ना... भाग १ थोडं समजून घ्या ना... भाग २ 'आयला धमाल!! मग?' 'मग काय!! फाटली ना माझी...' कट्ट्यावर माझं कथाकथनसत्र चालू होतं. चार दिवस कॉलेजला बुट्टी मारल्यानंतर आणि त्यापाठोपाठ आलेल्या वीकांतात सुखाचा अत्यानंद मिळवल्यानंतर मी एकदाचा सोमवारी कॉलेजला गेलो. कट्ट्यावर ग्रुप आधीच जमा झालेला दिसला. मी तिथे पोचल्यावर मैत्रीणींकडून प्रश्नांची आणि मित्रांकडून शिव्यांची सरबत्ती सुरू झाली.

पडघम २०१४- भाग ६: बॅटलग्राऊंड स्टेट- केरळ

क्लिंटन ·
यापूर्वीचे लेखन भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक भाग २: क्रिटिकल मास भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान सुरवातीला केरळात २००६ च्या विधानसभा आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय झाले हे बघू. तक्ता क्रमांक १ table.tableizer-table { border:

पैसा 12/04/2014 - 21:33
असेच. कर्नाटकच्या दक्षिणेला भाजपाला स्थान नाही. त्यामुळे निव्वळ बहुमत मिळवणे फार कठीण आहे.

ऋषिकेश 13/04/2014 - 18:03
इतका फरक असेल हे प्रिडिक्शन बर्‍यापैकी रिस्की वाटते. अगदी १०-१० नसले तरी काँग्रेस ८-९ आणि डावी आघाडी ११-१२ जागा जिंकेल असे वाटते. केरळात काँग्रेस विरोधी लाट असल्याचे चित्र स्थानिक पातळीवर एवढ्यात दिसलेले नाही.

In reply to by ऋषिकेश

क्लिंटन 13/04/2014 - 22:37
केरळात काँग्रेस विरोधी लाट असल्याचे चित्र स्थानिक पातळीवर एवढ्यात दिसलेले नाही.
केरळात कधी कुठच्या पक्षाची किंवा पक्षाविरूध्द लाट नसते.मुळात दुरंगी लढत आणि दोन आघाड्यांच्या मतांमध्ये फार फरक नसणे यामुळे पुढच्या वेळी थोडीशी मते इकडची तिकडे झाली तरी निकाल बदलतात.नक्की किती मते इकडची तिकडे होतील या अंदाजात थोडीशी जरी गल्लत झाली तर अंदाज पूर्णपणे चुकतात.मी लोकसभा निवडणुकांचे अंदाज १९९६ पासून व्यक्त करत आहे.पण केरळमधील अंदाज पूर्णपणे बरोबर एकदाच--२००९ मध्ये आले होते.सुदैवाने ते त्यावेळीही मिपावर पोस्ट केले होते. या अंदाजांमागे गृहितके पुढीलप्रमाणे: १. केंद्रातील युपीए सरकारविरोधी वातावरणाचा काँग्रेसला नक्कीच फटका बसेल. तसेच राज्यातील सरकारही तीन वर्षे जुने असल्यामुळे राज्यसरकारविरोधी मतांचाही फटका बसेल. राज्यसरकारसाठी अशा मध्यावधी लोकसभा निवडणुका झाल्यास सत्ताधारी पक्षाला राज्यात फटका बसतो हे १९८९, २००४ आणि २००९ मध्ये बघायला मिळाले आहे. २. केरळ काँग्रेसमध्ये ए.के.अँटनी आणि मुख्यमंत्री ओमेन चंडी यांच्यात फारसे सख्य नाही हे तर स्पष्टच आहे. काँग्रेसवाले असे मतभेद पक्षापुढे कठिण काळ आला असता चव्हाट्यावर आणत नाहीत पण तरीही ग्राऊंड लेव्हलवर त्याचा परिणाम अगदीच दुर्लक्ष करण्याजोगा असेल असे वाटत नाही. ३. डाव्या आघाडीने २००९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर आपली परिस्थिती बरीच सुधारली. २०११ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये डाव्या आघाडीचा अगदी थोडक्यात पराभव झाला.तीच प्रक्रिया पुढे चालू राहिल हे आणखी एक गृहितक. तेव्हा गृहितक हे केरळमध्येही काँग्रेससाठी फार चांगली परिस्थिती नाही.पण यावेळी भाजप या तिसर्‍या पक्षाचा शिरकाव झाल्यामुळे प्रस्थापितविरोधी मतांमध्ये फूट पडेल. भाजपने डाव्या पक्षांची मते खाण्याऐवजी काँग्रेसचीच मते जास्त खाल्ली तर मात्र काँग्रेसचा आणखी मोठा पराभव होईल.

प्रस्थापितविरोधी मत किंवा अॅंटीइन्कंबंसी हा शब्दप्रयोग गेली काही वर्षं ऐकतो आहे. बऱ्याच वेळा हे गुरुत्वाकर्षणासारखं सिद्ध झालेलं सर्वमान्य बल असल्याप्रमाणे हा शब्दप्रयोग वापरला जातो. मला प्रश्न पडतो की असलं काही असतं का? म्हणजे एखादं सरकार वाईट असल्याचा अनुभव लोकांना आला म्हणून त्यांनी त्याविरुद्ध मत देणं ठीक आहे. पण केवळ सरकार आहे म्हणून त्याच्या विरोधात द्यायचं बुवा मत असं लोक करतात का? थोडक्यात प्रस्थापितविरोधी मतदान हमखास होतं असा विदा आहे का?

In reply to by राजेश घासकडवी

क्लिंटन 13/04/2014 - 22:40
याविषयी आपली मागच्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकांनंतरही चर्चा झाली होती आणि त्यावेळी हा विदा दिला होता. आणि त्यावरील तुमचाच प्रतिसाद

In reply to by राजेश घासकडवी

प्रसाद१९७१ 14/04/2014 - 11:34
ह्याचे कारण बरेसचे मानसिक आहे. मानवी मनाला एक च व्यक्ती सत्तेत ( मग ते सरकार असु दे किंवा व्ययक्तीक नातेसंबंधात ) असणे खुपायला लागते. मग दुसर्‍या ऑप्शन चा शोध चालु होतो.

विटेकर 21/04/2014 - 11:45
संघाचे संपूर्ण भारतात सर्वात चांगले काम केरल मध्ये आहे, नागपूर पेक्षाही जास्त ! पण तरीही राजकीय दृष्ट्या मात्र अन्य पक्श जिंकतात , याचे कारण काय असावे ? संघ आंओ भाजप असा सरळ ग्राफ नाही ? बाकी मालीका छानच आहे , मी तुमचे सगळे लेख आव डीने वाचत असतो, अभ्यासपूर्ण असतात .

In reply to by विटेकर

क्लिंटन 24/04/2014 - 17:31
संघाचे संपूर्ण भारतात सर्वात चांगले काम केरल मध्ये आहे, नागपूर पेक्षाही जास्त ! पण तरीही राजकीय दृष्ट्या मात्र अन्य पक्श जिंकतात , याचे कारण काय असावे ?
याची माझ्या मते काही महत्वाची कारणे पुढीलप्रमाणे: १. निवडून यायला (विशेषत: लोकसभा निवडणुकीत जागा जिंकायला) पक्ष संघटना मजबूत लागते आणि पक्षाचा चेहरा म्हणून नेताही गरजेचा असतो.भाजप पूर्वी कमजोर असलेल्या अनेक राज्यांमध्ये संघ कार्यकर्त्यांमुळे संघटना होतीच पण पक्षाला चांगले नेते मिळाले आणि त्यातून पक्ष त्या राज्यांमध्ये पुढे आला (उदाहरणार्थ कर्नाटकात येडियुराप्पा आणि काही प्रमाणात जगदीश शेट्टर, गुजरातमध्ये शंकरसिंग वाघेला आणि केशुभाई पटेल, गोव्यात मनोहर पर्रिकर आणि श्रीपाद नाईक, महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे आणि काही प्रमाणात प्रमोद महाजन). केरळमध्ये मात्र ओ.राजगोपाल हेच एक नाव घेण्याजोगे नेते. ते सुध्दा येडियुराप्पांप्रमाणे पूर्ण राज्यात मते मिळवून देतील इतक्या ताकदीचे नक्कीच नाहीत. २. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याकांची (मुस्लिम आणि ख्रिश्चन) यांची संख्या खूप जास्त आहे. मलापुरम, कोझीकोडे, कोट्टायम यासारख्या जिल्ह्यात त्यांची संख्या ५०% पेक्षा जास्त आहे. भाजप हा अल्पसंख्यांकांच्या विरोधातला पक्ष असा चेहरा असल्यामुळे त्याचा फटका पक्षाला केरळमध्ये नक्कीच बसतो. ३. केरळमध्ये साक्षरता आणि राजकीय अवेअरनेस बराच जास्त आहे.त्यामुळे ज्या भागात भाजप थोडाफार प्रबळ आहे (कासारगोड आणि मंजेश्वर) तिथे भाजपला पराभूत करायला कम्युनिस्ट समर्थक आणि अल्पसंख्याकांकडून टॅक्टिकल व्होटिंग होते असे म्हणायला नक्कीच जागा आहे.
बाकी मालीका छानच आहे , मी तुमचे सगळे लेख आव डीने वाचत असतो, अभ्यासपूर्ण असतात .
धन्यवाद विटेकर.

पैसा 12/04/2014 - 21:33
असेच. कर्नाटकच्या दक्षिणेला भाजपाला स्थान नाही. त्यामुळे निव्वळ बहुमत मिळवणे फार कठीण आहे.

ऋषिकेश 13/04/2014 - 18:03
इतका फरक असेल हे प्रिडिक्शन बर्‍यापैकी रिस्की वाटते. अगदी १०-१० नसले तरी काँग्रेस ८-९ आणि डावी आघाडी ११-१२ जागा जिंकेल असे वाटते. केरळात काँग्रेस विरोधी लाट असल्याचे चित्र स्थानिक पातळीवर एवढ्यात दिसलेले नाही.

In reply to by ऋषिकेश

क्लिंटन 13/04/2014 - 22:37
केरळात काँग्रेस विरोधी लाट असल्याचे चित्र स्थानिक पातळीवर एवढ्यात दिसलेले नाही.
केरळात कधी कुठच्या पक्षाची किंवा पक्षाविरूध्द लाट नसते.मुळात दुरंगी लढत आणि दोन आघाड्यांच्या मतांमध्ये फार फरक नसणे यामुळे पुढच्या वेळी थोडीशी मते इकडची तिकडे झाली तरी निकाल बदलतात.नक्की किती मते इकडची तिकडे होतील या अंदाजात थोडीशी जरी गल्लत झाली तर अंदाज पूर्णपणे चुकतात.मी लोकसभा निवडणुकांचे अंदाज १९९६ पासून व्यक्त करत आहे.पण केरळमधील अंदाज पूर्णपणे बरोबर एकदाच--२००९ मध्ये आले होते.सुदैवाने ते त्यावेळीही मिपावर पोस्ट केले होते. या अंदाजांमागे गृहितके पुढीलप्रमाणे: १. केंद्रातील युपीए सरकारविरोधी वातावरणाचा काँग्रेसला नक्कीच फटका बसेल. तसेच राज्यातील सरकारही तीन वर्षे जुने असल्यामुळे राज्यसरकारविरोधी मतांचाही फटका बसेल. राज्यसरकारसाठी अशा मध्यावधी लोकसभा निवडणुका झाल्यास सत्ताधारी पक्षाला राज्यात फटका बसतो हे १९८९, २००४ आणि २००९ मध्ये बघायला मिळाले आहे. २. केरळ काँग्रेसमध्ये ए.के.अँटनी आणि मुख्यमंत्री ओमेन चंडी यांच्यात फारसे सख्य नाही हे तर स्पष्टच आहे. काँग्रेसवाले असे मतभेद पक्षापुढे कठिण काळ आला असता चव्हाट्यावर आणत नाहीत पण तरीही ग्राऊंड लेव्हलवर त्याचा परिणाम अगदीच दुर्लक्ष करण्याजोगा असेल असे वाटत नाही. ३. डाव्या आघाडीने २००९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर आपली परिस्थिती बरीच सुधारली. २०११ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये डाव्या आघाडीचा अगदी थोडक्यात पराभव झाला.तीच प्रक्रिया पुढे चालू राहिल हे आणखी एक गृहितक. तेव्हा गृहितक हे केरळमध्येही काँग्रेससाठी फार चांगली परिस्थिती नाही.पण यावेळी भाजप या तिसर्‍या पक्षाचा शिरकाव झाल्यामुळे प्रस्थापितविरोधी मतांमध्ये फूट पडेल. भाजपने डाव्या पक्षांची मते खाण्याऐवजी काँग्रेसचीच मते जास्त खाल्ली तर मात्र काँग्रेसचा आणखी मोठा पराभव होईल.

प्रस्थापितविरोधी मत किंवा अॅंटीइन्कंबंसी हा शब्दप्रयोग गेली काही वर्षं ऐकतो आहे. बऱ्याच वेळा हे गुरुत्वाकर्षणासारखं सिद्ध झालेलं सर्वमान्य बल असल्याप्रमाणे हा शब्दप्रयोग वापरला जातो. मला प्रश्न पडतो की असलं काही असतं का? म्हणजे एखादं सरकार वाईट असल्याचा अनुभव लोकांना आला म्हणून त्यांनी त्याविरुद्ध मत देणं ठीक आहे. पण केवळ सरकार आहे म्हणून त्याच्या विरोधात द्यायचं बुवा मत असं लोक करतात का? थोडक्यात प्रस्थापितविरोधी मतदान हमखास होतं असा विदा आहे का?

In reply to by राजेश घासकडवी

क्लिंटन 13/04/2014 - 22:40
याविषयी आपली मागच्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकांनंतरही चर्चा झाली होती आणि त्यावेळी हा विदा दिला होता. आणि त्यावरील तुमचाच प्रतिसाद

In reply to by राजेश घासकडवी

प्रसाद१९७१ 14/04/2014 - 11:34
ह्याचे कारण बरेसचे मानसिक आहे. मानवी मनाला एक च व्यक्ती सत्तेत ( मग ते सरकार असु दे किंवा व्ययक्तीक नातेसंबंधात ) असणे खुपायला लागते. मग दुसर्‍या ऑप्शन चा शोध चालु होतो.

विटेकर 21/04/2014 - 11:45
संघाचे संपूर्ण भारतात सर्वात चांगले काम केरल मध्ये आहे, नागपूर पेक्षाही जास्त ! पण तरीही राजकीय दृष्ट्या मात्र अन्य पक्श जिंकतात , याचे कारण काय असावे ? संघ आंओ भाजप असा सरळ ग्राफ नाही ? बाकी मालीका छानच आहे , मी तुमचे सगळे लेख आव डीने वाचत असतो, अभ्यासपूर्ण असतात .

In reply to by विटेकर

क्लिंटन 24/04/2014 - 17:31
संघाचे संपूर्ण भारतात सर्वात चांगले काम केरल मध्ये आहे, नागपूर पेक्षाही जास्त ! पण तरीही राजकीय दृष्ट्या मात्र अन्य पक्श जिंकतात , याचे कारण काय असावे ?
याची माझ्या मते काही महत्वाची कारणे पुढीलप्रमाणे: १. निवडून यायला (विशेषत: लोकसभा निवडणुकीत जागा जिंकायला) पक्ष संघटना मजबूत लागते आणि पक्षाचा चेहरा म्हणून नेताही गरजेचा असतो.भाजप पूर्वी कमजोर असलेल्या अनेक राज्यांमध्ये संघ कार्यकर्त्यांमुळे संघटना होतीच पण पक्षाला चांगले नेते मिळाले आणि त्यातून पक्ष त्या राज्यांमध्ये पुढे आला (उदाहरणार्थ कर्नाटकात येडियुराप्पा आणि काही प्रमाणात जगदीश शेट्टर, गुजरातमध्ये शंकरसिंग वाघेला आणि केशुभाई पटेल, गोव्यात मनोहर पर्रिकर आणि श्रीपाद नाईक, महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे आणि काही प्रमाणात प्रमोद महाजन). केरळमध्ये मात्र ओ.राजगोपाल हेच एक नाव घेण्याजोगे नेते. ते सुध्दा येडियुराप्पांप्रमाणे पूर्ण राज्यात मते मिळवून देतील इतक्या ताकदीचे नक्कीच नाहीत. २. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याकांची (मुस्लिम आणि ख्रिश्चन) यांची संख्या खूप जास्त आहे. मलापुरम, कोझीकोडे, कोट्टायम यासारख्या जिल्ह्यात त्यांची संख्या ५०% पेक्षा जास्त आहे. भाजप हा अल्पसंख्यांकांच्या विरोधातला पक्ष असा चेहरा असल्यामुळे त्याचा फटका पक्षाला केरळमध्ये नक्कीच बसतो. ३. केरळमध्ये साक्षरता आणि राजकीय अवेअरनेस बराच जास्त आहे.त्यामुळे ज्या भागात भाजप थोडाफार प्रबळ आहे (कासारगोड आणि मंजेश्वर) तिथे भाजपला पराभूत करायला कम्युनिस्ट समर्थक आणि अल्पसंख्याकांकडून टॅक्टिकल व्होटिंग होते असे म्हणायला नक्कीच जागा आहे.
बाकी मालीका छानच आहे , मी तुमचे सगळे लेख आव डीने वाचत असतो, अभ्यासपूर्ण असतात .
धन्यवाद विटेकर.

किंग, क्वीन नि आणखी काही.

प्यारे१ ·

आपसुकच संवादाची सूत्रं एका आतापर्यंत दुर्लक्षित विद्यार्थ्याच्या हाती येतात तेव्हा त्याला 'किंग' सापडत असेल काय? हे असे होते खरे, मी स्वताही अनुभवलेय बरेचदा. इतरांचेही अनुभव पाहिलेत. अगदी गली क्रिकेटमध्येही असला अनुभव घेतलाय.

बालगंधर्व 12/04/2014 - 15:02
मत्स! परशात्न अव्ले.. तुमचे महनने पतले. पर्ति एक मन्सच्य्ह मनाअत एक किनग किनव ॑उईन लपलेलीई असते जेवह केवह तुमे अयुय्श्याआची एकदी लदाअई पहिल्यद्नाअ केहेलुन जिनकता ते पन अति अनत अनपेअकशिअत पने, तेह्वा तुमे तय कशनाचे रजा किनव रानीए बनलेले असतात. इत इस थे मोतिवाशनल पार्त ओफ लैफ. यु केरि ओन परशनत. यु मके अ गूद जोब.

इरसाल 12/04/2014 - 15:11
कमीत कमी बालगंधर्व धाग्यावर प्रतिक्रिया देवुन गेलेत याने तुमचे समधान व्हावे. (मोकलाया दाही दिश्या)इरसाल.

शुचि 12/04/2014 - 17:53
मीही अनुभवलंय ..... १० वी ला डाके क्लासच्या रोहिणी डाके बाईंचे शिकवणे त्यातून मला आलेला आत्मविश्वास अन मग पुढे आय आय टी मध्ये Maths karataa मिळालेली admission यात कमालीचे कनेक्शन आहे, १००% कनेक्शन आहे. _____________________ "ओटोबायोग्राफ़ॆ ऑफ अ योगी" पुस्तकात एक खूप छान वाक्य आहे - लहान बाळाला पहिली वाहिली पावले टाकत असताना जे कौतुक आजूबाजूचे (विशेषता: आई) करतात, त्यातच त्याच्या मोठेपणीच्या आत्मविश्वासाची बीजे पेरलेली असतात - अशा अर्थाचे ते आहे.

In reply to by पैसा

कवितानागेश 12/04/2014 - 18:32
अवांतरः आपल्यातल्या किंग किंवा क्वीनसोबत कधीकधी आपल्यातल्याच जोकरपण सापडतो! ;) आपण स्वतः किती गमतीदार( पक्षी:मुर्खासारखे! ) वागू शकतो हे कळल्यावर. अर्थात ते किस्से इथे लिहिण्यासारखे नाहीत. :)

नुकताच दहावीला चांगले मार्क मिळवून कॉलेजला आलेला तो. आतापर्यंत मराठी माध्यमात शिकलाय. अकरावी च्या पहिल्या युनिट टेस्टला फारच कमी गुण.
डिप्लोमा पहिल्या वर्षाला न्युमरेटर, डिनॉमिनेटरचं टेरर आणि ग्राफिक्स ला पॅराबोला, हायपरबोला बरोबरची हाणामारी आठवली. आणि दुसर्‍या वर्षीपासुन डिप्लोमा आणि ईंजिनिअरींग पुर्ण होईपर्यंत किंग मधलं रुपांतर आठवलं. नाही म्हणायला एम-३ नी सिंहाची शेळी केलेली. क्रिटिकल ला जाउन एकदा वाय.डी. होऊन रडवलं पण सुटला एकदाचा ;).

राही 12/04/2014 - 22:18
सूंदर लिहिले आहे. "प्रत्यक्ष यशापेक्षा यशापर्यंतचा प्रवास अधिक रोमहर्षक असतो."

In reply to by प्यारे१

@आत्मशून्य ह्यांचे खास तर सूड ह्यांचे विशेष आभार.>>> =)) आत्म-शून्यातून घेतलेला सूड अवडला! ;)

आवडले. सगळी उदाहरणे अगदी मनाला भावणारी.
मात्र नंतर सापडलेल्या क्वीनला अथवा किंगला वारंवार 'चेक' करत रहावंच.
+१. सहमत

आपसुकच संवादाची सूत्रं एका आतापर्यंत दुर्लक्षित विद्यार्थ्याच्या हाती येतात तेव्हा त्याला 'किंग' सापडत असेल काय? हे असे होते खरे, मी स्वताही अनुभवलेय बरेचदा. इतरांचेही अनुभव पाहिलेत. अगदी गली क्रिकेटमध्येही असला अनुभव घेतलाय.

बालगंधर्व 12/04/2014 - 15:02
मत्स! परशात्न अव्ले.. तुमचे महनने पतले. पर्ति एक मन्सच्य्ह मनाअत एक किनग किनव ॑उईन लपलेलीई असते जेवह केवह तुमे अयुय्श्याआची एकदी लदाअई पहिल्यद्नाअ केहेलुन जिनकता ते पन अति अनत अनपेअकशिअत पने, तेह्वा तुमे तय कशनाचे रजा किनव रानीए बनलेले असतात. इत इस थे मोतिवाशनल पार्त ओफ लैफ. यु केरि ओन परशनत. यु मके अ गूद जोब.

इरसाल 12/04/2014 - 15:11
कमीत कमी बालगंधर्व धाग्यावर प्रतिक्रिया देवुन गेलेत याने तुमचे समधान व्हावे. (मोकलाया दाही दिश्या)इरसाल.

शुचि 12/04/2014 - 17:53
मीही अनुभवलंय ..... १० वी ला डाके क्लासच्या रोहिणी डाके बाईंचे शिकवणे त्यातून मला आलेला आत्मविश्वास अन मग पुढे आय आय टी मध्ये Maths karataa मिळालेली admission यात कमालीचे कनेक्शन आहे, १००% कनेक्शन आहे. _____________________ "ओटोबायोग्राफ़ॆ ऑफ अ योगी" पुस्तकात एक खूप छान वाक्य आहे - लहान बाळाला पहिली वाहिली पावले टाकत असताना जे कौतुक आजूबाजूचे (विशेषता: आई) करतात, त्यातच त्याच्या मोठेपणीच्या आत्मविश्वासाची बीजे पेरलेली असतात - अशा अर्थाचे ते आहे.

In reply to by पैसा

कवितानागेश 12/04/2014 - 18:32
अवांतरः आपल्यातल्या किंग किंवा क्वीनसोबत कधीकधी आपल्यातल्याच जोकरपण सापडतो! ;) आपण स्वतः किती गमतीदार( पक्षी:मुर्खासारखे! ) वागू शकतो हे कळल्यावर. अर्थात ते किस्से इथे लिहिण्यासारखे नाहीत. :)

नुकताच दहावीला चांगले मार्क मिळवून कॉलेजला आलेला तो. आतापर्यंत मराठी माध्यमात शिकलाय. अकरावी च्या पहिल्या युनिट टेस्टला फारच कमी गुण.
डिप्लोमा पहिल्या वर्षाला न्युमरेटर, डिनॉमिनेटरचं टेरर आणि ग्राफिक्स ला पॅराबोला, हायपरबोला बरोबरची हाणामारी आठवली. आणि दुसर्‍या वर्षीपासुन डिप्लोमा आणि ईंजिनिअरींग पुर्ण होईपर्यंत किंग मधलं रुपांतर आठवलं. नाही म्हणायला एम-३ नी सिंहाची शेळी केलेली. क्रिटिकल ला जाउन एकदा वाय.डी. होऊन रडवलं पण सुटला एकदाचा ;).

राही 12/04/2014 - 22:18
सूंदर लिहिले आहे. "प्रत्यक्ष यशापेक्षा यशापर्यंतचा प्रवास अधिक रोमहर्षक असतो."

In reply to by प्यारे१

@आत्मशून्य ह्यांचे खास तर सूड ह्यांचे विशेष आभार.>>> =)) आत्म-शून्यातून घेतलेला सूड अवडला! ;)

आवडले. सगळी उदाहरणे अगदी मनाला भावणारी.
मात्र नंतर सापडलेल्या क्वीनला अथवा किंगला वारंवार 'चेक' करत रहावंच.
+१. सहमत
प्रत्येक स्त्रीच्या मनात एक क्वीन असते म्हणे. ती सापडण्याचा क्षण टिपणं आवश्यक असतं. पुरुष तरी का अपवाद असावेत? क्वीन सापडणं हा स्वत्व गवसण्याचा क्षण असावा असं तो चित्रपट पाहिलेल्या लोकांची मतं वाचताना जाणवलं. तसंच असेल! .................. सातवीच्या वर्गात असलेला पण वर्गात कधीच न बोलणारा मुलगा शिक्षकांच्या आग्रहामुळं एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतो. स्पर्धेवेळी सगळ्यांची भाषणं ऐकून हातपाय गळपटलेला, काय बोलायचं ते न आठवता जसं सुचेल तसं धाडकन बोलून खाली बसतो. नंतर स्पर्धेत तिसरा मिळालेला क्रमांक. इथं 'किंग' सापडत असेल का? ----------------- नुकताच दहावीला चांगले मार्क मिळवून कॉलेजला आलेला तो.

मल्हार महुडे

शरद ·

In reply to by कवितानागेश

बालगंधर्व 12/04/2014 - 15:20
सुनदर मनदनी अहे शरदराव्व, नामयाचे खापर विथुनमाय्चा चईतनियात पुरनपने पकके झले. यपुरवे एकआ पिकचराआत दोके पोहोदने पहिले होते. पन हा परसग्न कुह्प बहावपुर्ना अहे.

पैसा 12/04/2014 - 18:30
काय सुंदर लिहिलं आहे! नामदेवाचा हा अभंग फार सुंदर वाटला!

In reply to by कवितानागेश

बालगंधर्व 12/04/2014 - 15:20
सुनदर मनदनी अहे शरदराव्व, नामयाचे खापर विथुनमाय्चा चईतनियात पुरनपने पकके झले. यपुरवे एकआ पिकचराआत दोके पोहोदने पहिले होते. पन हा परसग्न कुह्प बहावपुर्ना अहे.

पैसा 12/04/2014 - 18:30
काय सुंदर लिहिलं आहे! नामदेवाचा हा अभंग फार सुंदर वाटला!
नाम्या आज निवांत बसला होता. काही दिवसांपूर्वी त्याची उठल्यापासूनच धावपळ चालू व्हावयाची. केव्हा सर्व आवरतो व देवळात विठूला भेटावयास जातो असे व्हावयाचे. त्याला डोळे भरून पहात बसावयाचे, त्याच्याशी घटकाघटका गुज बोलत बसावयाचे, वेळ कसा जायचा, कळतच नसे. घरची थोडी चरफड करावयाची, पण त्याची आता सवय झाली होती. देवळांत येणार्‍या लहानथोर भक्त मंडळीत वट वाढला होता. हा तर "देवाशी प्रत्यक्ष बोलणारा," मग येणारा जाणारा पायी लागत होता. मनातून सुखावत नाम्या त्यांना आशिर्वाद देत होता. एक दिवस आळंदीहून चार भावंडे आली. भावांनी चरणस्पर्श करून नमस्कार केला.

पुणे रनिंग

बाळ सप्रे ·

In reply to by यशोधरा

बालगंधर्व 12/04/2014 - 13:23
बल स्प्रे, तुम्हे ग्रेत अहत. चन महिति. पुने च्याआ वेतिरिख्त देहुरोद्ला अशाआ रनिनग होतत क? मल म्हित नहे. मि नविन अहे. ययेरियआत. एक तेक्दि अहे. पन तिथे फिरन्यपेक्श्क रोमन्तिक कप्ल्स फल्र्त कर्त अस् तात.

In reply to by बालगंधर्व

स्पंदना 12/04/2014 - 13:36
बाळ सप्रे. तुम्ही ग्रेट आहात. छान माहिती. पुणेच्या व्यतिरिक्त देहुरोडला अशा रनिंग होतात का? मला माहित नाही. मी नविन आहे या एरियात. एक टेकडी आहे. पण तेथे फिरण्यापेक्षा रोमँटिक कपल्स फ्लर्ट करत असतात.

In reply to by बालगंधर्व

वैभव जाधव 12/04/2014 - 13:40
बालगंधर्व तुमि पण ग्रेट आहात लैच. ल्याहा की एखादी मोकलाया वगैरे. लै अथवन येति राव. बल्स्प्रे वेतिरिख्त वगैरे पाहून तर जर्मन वाचतो की काय असे वाटते. ह्ल्केघेनेबर्का ;-)

चालणे आणि धावणे मधील फरक उलगडला हे खूप छान. आता धावायचे मनावर घ्यायला हवे. मुंबई मेरेथोनला हजेरी लावायची इच्छा दरवेळी त्या लायक नसल्याने राहून जाते.

दादा कोंडके 12/04/2014 - 14:56
पण वयाच्या पस्तीशी नंतर चालावं पण धावू नये असा सल्ला अनेक डॉक्टर देत असतात. तितक्याच क्यालरी जाळण्यासाठी खूप चालावं लागतं हे जरी खरं असलं तरी चालल्या मुळे स्नायुंवरती हळू-हळू दाब पडत जातो तर धावल्या मुळे सांध्यावरती एकदम (शॉक स्ट्रेस) दाब पडतो (गुढगे आणी घोटा वगैरे) आणि ते दुखावले जातात.

ब़जरबट्टू 12/04/2014 - 16:32
पण ते आमचे काय आहे.. मनस्थिती आहे, पण परिस्थिती नाही हो शरीराची... :( पण आवडेल, बरेच मित्र पाहण्यात आहे, याची आवड लागलेले,,,,

राघवेंद्र 12/04/2014 - 16:35
धन्यवाद सप्रे साहेब, मोजक्या शब्दात 'पुणे रनिंग' ग्रुप बद्ल, कसे धावावे, कशी सुरुवात करावी, आरोग्यबद्दल तुम्ही सुंदर माहिती दिली आहे. तुमचा लेख खुपच प्रेरणादयी आहे. धन्यवाद !!! राघवेंद्र

आत्मशून्य 12/04/2014 - 16:36
अप्पा जोगळेकरांच्या स्वाक्षरीप्रमाणे एकमेकांशी स्पर्धा नाही तर स्वतःची कामगिरी सुधारणे हे ध्येय.
जे ब्बात. धावल्याने मेंदुचे आरोग्य सुधारते असे वाटते. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

बाळ सप्रे 12/04/2014 - 18:27
दर रविवारी सकाळी ६:३० ला पुणे विद्यापीठ, मगरपट्टा येथे एकत्र धावतात. बाकी वीक डेजमध्येही कोथरुड, प्रभात रोड, वाकड, पिंपळे सौदागर, NIBM कोंढवा अशा बर्‍याच ठिकाणी छोटे छोटे ग्रुप्स जमतात. महिन्याच्या शेवटच्या रविवारी शहरातील एखादे ठिकाण निवडुन मोठ्या प्रमाणावर इव्हेंट होतो. तेथे आजकाल ५००-१००० जण जमतात. वार्षिक एक मोठी मॅरॅथॉन भरवण्याचा संकल्प आहे. गेल्या वर्षी ६ ऑक्टोबरला 'Pune running beyond myself' हा सुरुवातीचा एक प्रयत्न खूपच यशस्वी झाला. ४५०० स्पर्धकांचा प्रतिसाद लाभला. बाहेरच्या शहरातील मॅरॅथॉनना म्हणजे गोवा, हैदराबाद, सातारा, दिल्ली अगदी लेह लडाख पर्यंत आवर्जून मोठ्या संख्येने हजेरी लावतात. मुंबई मॅरॅथॉनचे एक खास स्थान आहे. ते एक रिच्युअल आहे.. अ‍ॅन्युअल फिटनेस सर्टिफिकेट असेही म्हटले जाते !!

एका सुरेख उपक्रमाची तितकीच छान ओळख. धन्यवाद! योगासनं + खेळ हा फिटनेससाठी एक रंगतदार पर्याय आहे असा स्वानुभव आहे.

सुबोध खरे 12/04/2014 - 19:18
उत्तम माहिती. काही गोष्टी मी यात नमूद करू इच्छितो. कारण १) मी व्यवसायाने डॉक्टर आहे २) मी एशियन हार्ट इन्स्टीटयूट मध्ये २ वर्षे कामाला होतो आणि हि संस्था मुंबई मैरेथोनची एक प्रायोजक आहे आणि सर्व धावपटूना स्पर्धेत वैद्यकीय मदत पुरवते आणि त्या वैद्यकीय पथकात मी एक डॉक्टर म्हणून भाग घेतला आहे ३) २०१४ च्या अर्ध मैरेथोन मध्ये माझ्या बायकोने भाग घेऊन तीन तासात २१ किमी पूर्ण केले. (वेळाचे प्रमाणपत्र मिळाले) वरील काही गोष्टींच्या अनुभवाने मी थोडे फार शिकलो ते असे आहे. १) कोणत्याही वयात आपण पळायला सुरुवात करू शकता. २) न पळण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आळशीपणा ( मीहि त्यात येतो) ३) आपण पहिल्या दिवशी एकदम पळू नये. पहिल्या दिवशी आपल्याला धाप लागेल तेवढे पळून पहा. हे अंतर किती आहे ते तुमच्या दुचाकीच्या मितार्वरून साधारण कळेल. ४) हे अंतर पुढचे पाच ते सहा दिवस पळत राहा आणि त्या नंतर ते अंतर रोज साधारण दहा ते पंधरा टक्के वाढवत जा. ५) एकटे पळणे फार कंटाळवाणे आहे. जर समविचारी समूहात पळालात तर जास्त उत्साह येतो आणि लोक एकमेकांना प्रोत्साहन देतात. ६) पाय लचकला तर तो बरा होई पर्यंत थांबा. चार पाच दिवस विश्रांतीने काहीही होणार नाही. पण तसेच पळत राहिलात तर पायाला गंभीर इजा होण्याची शक्यता असते आणि मग आपल्याला मैरेथोन सोडण्याचा विचार करावा लागेल. ( पळणे सोडण्याचे हे दुसरे महत्त्वाचे कारण आहे). ७)पहिल्या दिवसापासून मी किती पळू शकतो हे लोकांना दाखविण्याचा मोह टाळा. ( विरुद्धलिंगी व्यक्ती असतील तर विशेषतः) आपले पळणे हे स्वतः साठी असावे लोकांना सिद्ध करण्यासाठी नव्हे. गंभीर इज होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. ८) रोजच आहार तसाच ठेवा. उगीच प्रथिनांनि भरलेली पेये घेण्याच्या नादाला लागू नका. जेंव्हा आपण १० किमी पेक्षा जास्त एक तासात पळू लागल तेंव्हाच अशा गोष्टींची गरज पडेल. व्यायाम शिक्षक केवळ एखाद्या जिम मध्ये शिकवतो म्हणून त्याला ज्ञान आहे असे नाही. त्यात त्यला सखोल ज्ञान किती आहे हे फार महत्त्वाचे आहे हा एक वादाचा मुद्दा आहे पण दहातील पाच असे शिक्षक अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले असतात. शिक्षक आणि गुरु यातील हा फरक आहे सध्या इतकेच. बाकी क्रमशः

दिपक.कुवेत 13/04/2014 - 12:52
खुप छान आणि अतिशय माहितीपुर्ण लेख. शीवाय डॉ. च्या टिप्स हि अतीशय उपयुक्त. विषय निघालाच आहे तर एक विचारायच कि नियमीत धावण्याने/चालण्याने पोट कमी होतं का? आय मीन हि लाँग पण ट्रस्टेड मेथड आहे का? ह्याशीवाय भात, चीज सारखे पदार्थ जेवणातुन वगळावे का?

In reply to by दिपक.कुवेत

बाळ सप्रे 13/04/2014 - 17:15
धावण्याने वजन/ पोट कमी होते.. पण ६ पॅक्स वगैरे अपेक्षा असेल तर ते केवळ धावण्याने होणार नाही हे निश्चित. धावण्यासारख्या खेळप्रकारात (एंडुरन्स स्पोर्ट्स) कर्बोदकांची जास्त गरज असते. तर याउलट शरीर सौष्ठवासारख्या प्रकारात ज्यात स्नायूंचा आकार (शेप) आणि आकारमान (साइज) यावर भर असतो त्यात जास्तीत जास्त प्रथिने व कमीत कमी कर्बोदके व स्निग्ध पदार्थ सेवन केले जाते. म्हणूनच लांब पल्ल्याच्या धावपटूपेक्षा वेगवान धावपटूंचे स्नायू नेहेमीच जास्त पीळ्दार व आकाराने मोठे आढळतील. त्यांना कमी वेळात जास्त शक्तीची गरज असते याउलट जास्त अंतरासाठी मर्यादित शक्ती जास्त वेळ वापरण्याची गरज असते. कुठलेही पदार्थ आहारातून पूर्ण वगळण्याची गरज नाही, पण अतिरेकही टाळावा. चीज हे बी१२ जीवनसत्वाचा उत्तम स्त्रोत आहे जे बाकी शाकाहारी पदार्थात फार विरळ आहे. बी१२ च्या कमीमुळे कुठलेही श्रमाचे काम करताना डोळ्यासमोर अंधेरी / चक्कर येणे असे प्रकार घडतात.

सुबोध खरे 13/04/2014 - 22:14
१)मैरथोन जर व्यवस्थित पळालात तर पोट नक्कीच कमी होईल. एक महत्वाचा मुद्दा-- कैलरिज ची आवक आणि जावक यात जर खाल्लेल्या कैलरीज जाळलेल्या कैलरिज पेक्षा जास्त असतील तर आपले वजन किंवा पोट कधीच कमी होणार नाही. मग आपण दिवस भर पळत रहा. उदाहरणार्थ एक सत्तर किलो वजनाचा पाच फुट सात इंचाचा पस्तीस वर्षाचा संगणक तज्ञ (बैठे काम करणारा) घेतला तर त्याला दिवसभराच्या चयापचयासाठी १३५० कैलरीज ची गरज आहे. जर तो एक तास तशी आठ किमी वेगाने पाळला तर त्याच्या ७०० कैलरिज जळतील. मग जर त्याने रोज २१०० कैलरिजचा आहार घेतला तर आयुष्भर पाळूनही त्याचे पोट/ वजन कमी होणार नाही. त्याने रोज १६०० कैलरीज चा आहार घेतला तर रोज ४५० ची तुट येते. म्हणजे ५० ग्रॅम वजन कमी होईल. रोज पन्नास ग्रॅम कमी झाले तर एक महिन्यात दीड किलो या वेगाने सहा ते सात महिन्यात १० किलो वजन कमी होईल. आहारात एक ग्रॅम चरबी म्हणजे ९ कैलरिज आणि १ ग्रॅम प्रथिने किंवा कर्बोदके म्हणजे ४ कैलरिज असा साधा हिशेब आहे. मग तूम्ही पूर्ण प्रथिनांचा आहार खा नाहीतर चरबीचा. तुम्हाला ६ पैक पोट हवे असेल तर (सप्रे साहेबांनी म्हणल्याप्रमाणे) पोटाचा व्यायाम करणे आवश्यक आहे. पण पोट सपाट करून हवे असेल तर पळणे उपयुक्त आहे. तुम्ही पळायला सुरुवात कराल तेंव्हा आपले वजन, उंची आणि पोटाचा घेर मोजून लिहून ठेवा. मधल्या काळात आपण पार्ट्या पूर्ण टाळा(खासकरून ओल्या) कारण दारूने आपल्या संवेदना बोथट होतात आणि लोक आपल्या कुवतीपेक्षा/ क्षमतेपेक्षा बरेच जास्त जेवतात. साधारण एक पार्टी म्हणजे आपली एक आठवडा पळण्याची मेहनत पाण्यात गेली असे समजा. २) धावण्यास सुरुवात करण्याअगोदर चांगले धावण्याचे नवीन बूट विकत घ्या. जुने चार वर्षे वापरलेले बूट घालून पळण्याचा प्रयत्न करून लोकांनी आपल्या पायाला इज करून घेतलेली मी पाहिली आहे. जुने बूट वापरलेले नसले तरी त्याच्या रबराची इलास्टी सीटी(लवचिकपणा) कमी झालेला असतो. त्याने आपल्या पायाला धक्के बसू शकतात. बिन बुटाचे सुद्धा लोक व्यवस्थितपणे पळू शकतात. पण ज्यांना सवय असते तेच. पंधरा वर्षे आपण बिन चपलेचे घराबाहेर पडत नाही आणि एकदम जुने बूट घेऊन पाळायला निघालात तर आपले पाय त्याला जुळवून घेईपर्यंत वेळ लागतोच.

पैसा 13/04/2014 - 22:41
लेखातील माहिती छान आणि डॉ. खरे यांचे प्रतिसाद नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण!

In reply to by बॅटमॅन

शुचि 14/04/2014 - 18:42
+१
लेख अन प्रतिसाद दोन्ही आवडले.
आळसापोटी धावणे टाळले जाते
संकोचही वाटतो म्हणजे जाडे असून धावण्याचा :( इतर लीन (सडपातळ अन अ‍ॅथलेटीक) लोकं धावत असतात अन आपण काय अवजड शरीर घेऊन फास्-फुस करत जेमतेम पाव मैल धावायचं असं वाटतं. अर्थात एक १६ मज्ली इमारत आहे ती रोज पायर्‍या घेत चढते कारण तिथे विशेष कोणी म्हणजे कोणीच जीना चढत नसतं म्हणून. पण हा संकोच त्याजून, धावलं पाहीजे :(

In reply to by शुचि

बॅटमॅन 14/04/2014 - 18:48
भेंडी १६ मजली इमारत रोज चढता?????? बाप रे. इतका पेशन्स आपल्यात तरी नै बॉ. मजा म्हणून काही दिवस रोज ५ मजली इमारत चढायचो पण तेही सुटलं नंतर.

सुबोध खरे 14/04/2014 - 19:35
सायकलिंग आवडतं तर ते करा कि. शिवाय बरेच क्षेत्र आणि त्यावरील हिरवळ न्याहाळता येते हा मोठा फायदा. (पुण्यात शिकायला होतो तेंव्हा रोज क्याम्पातून डेक्कन पर्यंत सायकलने जात होतो त्याची आठवण झाली). पेट्रोलचा खर्च नाही वर व्यायामाचे फायदे. http://www.nutristrategy.com/fitness/cycling.htm

In reply to by सुबोध खरे

बॅटमॅन 15/04/2014 - 16:35
येस्सार. ठीकठाक सैकलिंग (१५-२० किमी येऊनजाऊन) तसे महिन्यातून २-३ दा होते, नै असे नै. पण फ्रीक्वेन्सी वाढवली पाहिजे अजून. लागतो कामाला.

बाळ सप्रे 24/04/2014 - 21:58
एप्रिलच्या शेवटच्या रविवारची मॅरॅथॉन डेकॅथलॉन, वाघोली येथुन सुरु होइल. १० किमी, १५ किमी, २१.१ किमी - सकाळी ६:०० आणि ३ व ५ किमी - सकाळी ७:०० वाजता. https://www.facebook.com/events/240977532772353/ Decathlon is giving all participants coupon for Rs.200 off on Rs.1000 spent

डॉ श्रीहास 12/01/2017 - 22:31
कुठेतरी ऐकलंय....Cycling will make your heart stronger but Running will make your brain stronger!! सध्या तरी heart वर काम चालू आहे... छान लेख आणि डॉ.खरेंचे पण उत्तम प्रतिसाद आहेत_/\_.

In reply to by यशोधरा

बालगंधर्व 12/04/2014 - 13:23
बल स्प्रे, तुम्हे ग्रेत अहत. चन महिति. पुने च्याआ वेतिरिख्त देहुरोद्ला अशाआ रनिनग होतत क? मल म्हित नहे. मि नविन अहे. ययेरियआत. एक तेक्दि अहे. पन तिथे फिरन्यपेक्श्क रोमन्तिक कप्ल्स फल्र्त कर्त अस् तात.

In reply to by बालगंधर्व

स्पंदना 12/04/2014 - 13:36
बाळ सप्रे. तुम्ही ग्रेट आहात. छान माहिती. पुणेच्या व्यतिरिक्त देहुरोडला अशा रनिंग होतात का? मला माहित नाही. मी नविन आहे या एरियात. एक टेकडी आहे. पण तेथे फिरण्यापेक्षा रोमँटिक कपल्स फ्लर्ट करत असतात.

In reply to by बालगंधर्व

वैभव जाधव 12/04/2014 - 13:40
बालगंधर्व तुमि पण ग्रेट आहात लैच. ल्याहा की एखादी मोकलाया वगैरे. लै अथवन येति राव. बल्स्प्रे वेतिरिख्त वगैरे पाहून तर जर्मन वाचतो की काय असे वाटते. ह्ल्केघेनेबर्का ;-)

चालणे आणि धावणे मधील फरक उलगडला हे खूप छान. आता धावायचे मनावर घ्यायला हवे. मुंबई मेरेथोनला हजेरी लावायची इच्छा दरवेळी त्या लायक नसल्याने राहून जाते.

दादा कोंडके 12/04/2014 - 14:56
पण वयाच्या पस्तीशी नंतर चालावं पण धावू नये असा सल्ला अनेक डॉक्टर देत असतात. तितक्याच क्यालरी जाळण्यासाठी खूप चालावं लागतं हे जरी खरं असलं तरी चालल्या मुळे स्नायुंवरती हळू-हळू दाब पडत जातो तर धावल्या मुळे सांध्यावरती एकदम (शॉक स्ट्रेस) दाब पडतो (गुढगे आणी घोटा वगैरे) आणि ते दुखावले जातात.

ब़जरबट्टू 12/04/2014 - 16:32
पण ते आमचे काय आहे.. मनस्थिती आहे, पण परिस्थिती नाही हो शरीराची... :( पण आवडेल, बरेच मित्र पाहण्यात आहे, याची आवड लागलेले,,,,

राघवेंद्र 12/04/2014 - 16:35
धन्यवाद सप्रे साहेब, मोजक्या शब्दात 'पुणे रनिंग' ग्रुप बद्ल, कसे धावावे, कशी सुरुवात करावी, आरोग्यबद्दल तुम्ही सुंदर माहिती दिली आहे. तुमचा लेख खुपच प्रेरणादयी आहे. धन्यवाद !!! राघवेंद्र

आत्मशून्य 12/04/2014 - 16:36
अप्पा जोगळेकरांच्या स्वाक्षरीप्रमाणे एकमेकांशी स्पर्धा नाही तर स्वतःची कामगिरी सुधारणे हे ध्येय.
जे ब्बात. धावल्याने मेंदुचे आरोग्य सुधारते असे वाटते. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

बाळ सप्रे 12/04/2014 - 18:27
दर रविवारी सकाळी ६:३० ला पुणे विद्यापीठ, मगरपट्टा येथे एकत्र धावतात. बाकी वीक डेजमध्येही कोथरुड, प्रभात रोड, वाकड, पिंपळे सौदागर, NIBM कोंढवा अशा बर्‍याच ठिकाणी छोटे छोटे ग्रुप्स जमतात. महिन्याच्या शेवटच्या रविवारी शहरातील एखादे ठिकाण निवडुन मोठ्या प्रमाणावर इव्हेंट होतो. तेथे आजकाल ५००-१००० जण जमतात. वार्षिक एक मोठी मॅरॅथॉन भरवण्याचा संकल्प आहे. गेल्या वर्षी ६ ऑक्टोबरला 'Pune running beyond myself' हा सुरुवातीचा एक प्रयत्न खूपच यशस्वी झाला. ४५०० स्पर्धकांचा प्रतिसाद लाभला. बाहेरच्या शहरातील मॅरॅथॉनना म्हणजे गोवा, हैदराबाद, सातारा, दिल्ली अगदी लेह लडाख पर्यंत आवर्जून मोठ्या संख्येने हजेरी लावतात. मुंबई मॅरॅथॉनचे एक खास स्थान आहे. ते एक रिच्युअल आहे.. अ‍ॅन्युअल फिटनेस सर्टिफिकेट असेही म्हटले जाते !!

एका सुरेख उपक्रमाची तितकीच छान ओळख. धन्यवाद! योगासनं + खेळ हा फिटनेससाठी एक रंगतदार पर्याय आहे असा स्वानुभव आहे.

सुबोध खरे 12/04/2014 - 19:18
उत्तम माहिती. काही गोष्टी मी यात नमूद करू इच्छितो. कारण १) मी व्यवसायाने डॉक्टर आहे २) मी एशियन हार्ट इन्स्टीटयूट मध्ये २ वर्षे कामाला होतो आणि हि संस्था मुंबई मैरेथोनची एक प्रायोजक आहे आणि सर्व धावपटूना स्पर्धेत वैद्यकीय मदत पुरवते आणि त्या वैद्यकीय पथकात मी एक डॉक्टर म्हणून भाग घेतला आहे ३) २०१४ च्या अर्ध मैरेथोन मध्ये माझ्या बायकोने भाग घेऊन तीन तासात २१ किमी पूर्ण केले. (वेळाचे प्रमाणपत्र मिळाले) वरील काही गोष्टींच्या अनुभवाने मी थोडे फार शिकलो ते असे आहे. १) कोणत्याही वयात आपण पळायला सुरुवात करू शकता. २) न पळण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आळशीपणा ( मीहि त्यात येतो) ३) आपण पहिल्या दिवशी एकदम पळू नये. पहिल्या दिवशी आपल्याला धाप लागेल तेवढे पळून पहा. हे अंतर किती आहे ते तुमच्या दुचाकीच्या मितार्वरून साधारण कळेल. ४) हे अंतर पुढचे पाच ते सहा दिवस पळत राहा आणि त्या नंतर ते अंतर रोज साधारण दहा ते पंधरा टक्के वाढवत जा. ५) एकटे पळणे फार कंटाळवाणे आहे. जर समविचारी समूहात पळालात तर जास्त उत्साह येतो आणि लोक एकमेकांना प्रोत्साहन देतात. ६) पाय लचकला तर तो बरा होई पर्यंत थांबा. चार पाच दिवस विश्रांतीने काहीही होणार नाही. पण तसेच पळत राहिलात तर पायाला गंभीर इजा होण्याची शक्यता असते आणि मग आपल्याला मैरेथोन सोडण्याचा विचार करावा लागेल. ( पळणे सोडण्याचे हे दुसरे महत्त्वाचे कारण आहे). ७)पहिल्या दिवसापासून मी किती पळू शकतो हे लोकांना दाखविण्याचा मोह टाळा. ( विरुद्धलिंगी व्यक्ती असतील तर विशेषतः) आपले पळणे हे स्वतः साठी असावे लोकांना सिद्ध करण्यासाठी नव्हे. गंभीर इज होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. ८) रोजच आहार तसाच ठेवा. उगीच प्रथिनांनि भरलेली पेये घेण्याच्या नादाला लागू नका. जेंव्हा आपण १० किमी पेक्षा जास्त एक तासात पळू लागल तेंव्हाच अशा गोष्टींची गरज पडेल. व्यायाम शिक्षक केवळ एखाद्या जिम मध्ये शिकवतो म्हणून त्याला ज्ञान आहे असे नाही. त्यात त्यला सखोल ज्ञान किती आहे हे फार महत्त्वाचे आहे हा एक वादाचा मुद्दा आहे पण दहातील पाच असे शिक्षक अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले असतात. शिक्षक आणि गुरु यातील हा फरक आहे सध्या इतकेच. बाकी क्रमशः

दिपक.कुवेत 13/04/2014 - 12:52
खुप छान आणि अतिशय माहितीपुर्ण लेख. शीवाय डॉ. च्या टिप्स हि अतीशय उपयुक्त. विषय निघालाच आहे तर एक विचारायच कि नियमीत धावण्याने/चालण्याने पोट कमी होतं का? आय मीन हि लाँग पण ट्रस्टेड मेथड आहे का? ह्याशीवाय भात, चीज सारखे पदार्थ जेवणातुन वगळावे का?

In reply to by दिपक.कुवेत

बाळ सप्रे 13/04/2014 - 17:15
धावण्याने वजन/ पोट कमी होते.. पण ६ पॅक्स वगैरे अपेक्षा असेल तर ते केवळ धावण्याने होणार नाही हे निश्चित. धावण्यासारख्या खेळप्रकारात (एंडुरन्स स्पोर्ट्स) कर्बोदकांची जास्त गरज असते. तर याउलट शरीर सौष्ठवासारख्या प्रकारात ज्यात स्नायूंचा आकार (शेप) आणि आकारमान (साइज) यावर भर असतो त्यात जास्तीत जास्त प्रथिने व कमीत कमी कर्बोदके व स्निग्ध पदार्थ सेवन केले जाते. म्हणूनच लांब पल्ल्याच्या धावपटूपेक्षा वेगवान धावपटूंचे स्नायू नेहेमीच जास्त पीळ्दार व आकाराने मोठे आढळतील. त्यांना कमी वेळात जास्त शक्तीची गरज असते याउलट जास्त अंतरासाठी मर्यादित शक्ती जास्त वेळ वापरण्याची गरज असते. कुठलेही पदार्थ आहारातून पूर्ण वगळण्याची गरज नाही, पण अतिरेकही टाळावा. चीज हे बी१२ जीवनसत्वाचा उत्तम स्त्रोत आहे जे बाकी शाकाहारी पदार्थात फार विरळ आहे. बी१२ च्या कमीमुळे कुठलेही श्रमाचे काम करताना डोळ्यासमोर अंधेरी / चक्कर येणे असे प्रकार घडतात.

सुबोध खरे 13/04/2014 - 22:14
१)मैरथोन जर व्यवस्थित पळालात तर पोट नक्कीच कमी होईल. एक महत्वाचा मुद्दा-- कैलरिज ची आवक आणि जावक यात जर खाल्लेल्या कैलरीज जाळलेल्या कैलरिज पेक्षा जास्त असतील तर आपले वजन किंवा पोट कधीच कमी होणार नाही. मग आपण दिवस भर पळत रहा. उदाहरणार्थ एक सत्तर किलो वजनाचा पाच फुट सात इंचाचा पस्तीस वर्षाचा संगणक तज्ञ (बैठे काम करणारा) घेतला तर त्याला दिवसभराच्या चयापचयासाठी १३५० कैलरीज ची गरज आहे. जर तो एक तास तशी आठ किमी वेगाने पाळला तर त्याच्या ७०० कैलरिज जळतील. मग जर त्याने रोज २१०० कैलरिजचा आहार घेतला तर आयुष्भर पाळूनही त्याचे पोट/ वजन कमी होणार नाही. त्याने रोज १६०० कैलरीज चा आहार घेतला तर रोज ४५० ची तुट येते. म्हणजे ५० ग्रॅम वजन कमी होईल. रोज पन्नास ग्रॅम कमी झाले तर एक महिन्यात दीड किलो या वेगाने सहा ते सात महिन्यात १० किलो वजन कमी होईल. आहारात एक ग्रॅम चरबी म्हणजे ९ कैलरिज आणि १ ग्रॅम प्रथिने किंवा कर्बोदके म्हणजे ४ कैलरिज असा साधा हिशेब आहे. मग तूम्ही पूर्ण प्रथिनांचा आहार खा नाहीतर चरबीचा. तुम्हाला ६ पैक पोट हवे असेल तर (सप्रे साहेबांनी म्हणल्याप्रमाणे) पोटाचा व्यायाम करणे आवश्यक आहे. पण पोट सपाट करून हवे असेल तर पळणे उपयुक्त आहे. तुम्ही पळायला सुरुवात कराल तेंव्हा आपले वजन, उंची आणि पोटाचा घेर मोजून लिहून ठेवा. मधल्या काळात आपण पार्ट्या पूर्ण टाळा(खासकरून ओल्या) कारण दारूने आपल्या संवेदना बोथट होतात आणि लोक आपल्या कुवतीपेक्षा/ क्षमतेपेक्षा बरेच जास्त जेवतात. साधारण एक पार्टी म्हणजे आपली एक आठवडा पळण्याची मेहनत पाण्यात गेली असे समजा. २) धावण्यास सुरुवात करण्याअगोदर चांगले धावण्याचे नवीन बूट विकत घ्या. जुने चार वर्षे वापरलेले बूट घालून पळण्याचा प्रयत्न करून लोकांनी आपल्या पायाला इज करून घेतलेली मी पाहिली आहे. जुने बूट वापरलेले नसले तरी त्याच्या रबराची इलास्टी सीटी(लवचिकपणा) कमी झालेला असतो. त्याने आपल्या पायाला धक्के बसू शकतात. बिन बुटाचे सुद्धा लोक व्यवस्थितपणे पळू शकतात. पण ज्यांना सवय असते तेच. पंधरा वर्षे आपण बिन चपलेचे घराबाहेर पडत नाही आणि एकदम जुने बूट घेऊन पाळायला निघालात तर आपले पाय त्याला जुळवून घेईपर्यंत वेळ लागतोच.

पैसा 13/04/2014 - 22:41
लेखातील माहिती छान आणि डॉ. खरे यांचे प्रतिसाद नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण!

In reply to by बॅटमॅन

शुचि 14/04/2014 - 18:42
+१
लेख अन प्रतिसाद दोन्ही आवडले.
आळसापोटी धावणे टाळले जाते
संकोचही वाटतो म्हणजे जाडे असून धावण्याचा :( इतर लीन (सडपातळ अन अ‍ॅथलेटीक) लोकं धावत असतात अन आपण काय अवजड शरीर घेऊन फास्-फुस करत जेमतेम पाव मैल धावायचं असं वाटतं. अर्थात एक १६ मज्ली इमारत आहे ती रोज पायर्‍या घेत चढते कारण तिथे विशेष कोणी म्हणजे कोणीच जीना चढत नसतं म्हणून. पण हा संकोच त्याजून, धावलं पाहीजे :(

In reply to by शुचि

बॅटमॅन 14/04/2014 - 18:48
भेंडी १६ मजली इमारत रोज चढता?????? बाप रे. इतका पेशन्स आपल्यात तरी नै बॉ. मजा म्हणून काही दिवस रोज ५ मजली इमारत चढायचो पण तेही सुटलं नंतर.

सुबोध खरे 14/04/2014 - 19:35
सायकलिंग आवडतं तर ते करा कि. शिवाय बरेच क्षेत्र आणि त्यावरील हिरवळ न्याहाळता येते हा मोठा फायदा. (पुण्यात शिकायला होतो तेंव्हा रोज क्याम्पातून डेक्कन पर्यंत सायकलने जात होतो त्याची आठवण झाली). पेट्रोलचा खर्च नाही वर व्यायामाचे फायदे. http://www.nutristrategy.com/fitness/cycling.htm

In reply to by सुबोध खरे

बॅटमॅन 15/04/2014 - 16:35
येस्सार. ठीकठाक सैकलिंग (१५-२० किमी येऊनजाऊन) तसे महिन्यातून २-३ दा होते, नै असे नै. पण फ्रीक्वेन्सी वाढवली पाहिजे अजून. लागतो कामाला.

बाळ सप्रे 24/04/2014 - 21:58
एप्रिलच्या शेवटच्या रविवारची मॅरॅथॉन डेकॅथलॉन, वाघोली येथुन सुरु होइल. १० किमी, १५ किमी, २१.१ किमी - सकाळी ६:०० आणि ३ व ५ किमी - सकाळी ७:०० वाजता. https://www.facebook.com/events/240977532772353/ Decathlon is giving all participants coupon for Rs.200 off on Rs.1000 spent

डॉ श्रीहास 12/01/2017 - 22:31
कुठेतरी ऐकलंय....Cycling will make your heart stronger but Running will make your brain stronger!! सध्या तरी heart वर काम चालू आहे... छान लेख आणि डॉ.खरेंचे पण उत्तम प्रतिसाद आहेत_/\_.
पुणे रनिंग धावण्याचं एवढं वेड लागु शकतं हे मला पुणे रनिंगशी संबंध येईपर्यंत कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पुणे रनिंग (https://www.facebook.com/PuneRunning) हा एक धावण्याची आवड असलेल्या पुण्यातील लोकांचा ग्रुप आहे. धावपटू घडवून भारताला ऑलिंपिक पदक मिळवून देणे वगैरे मोठी स्वप्न नाहीत, घटना नाही, पदाधिकारी नाहित, राजकीय पाठींबा नाही पण सामान्य लोकांना धावण्यासारखी आरोग्यदायी सवय लावणे हा साधा स्वच्छ हेतु. एकट्याने खूप वेळ धावणे बहुदा कंटाळवाणे होते म्हणून ग्रुपमधे धावले जाते. या एका पॅशनसाठी पुण्याच्या कानाकोपर्‍यात लोकं धावतात, नवीन लोकांना धावायला उद्युक्त करतात, मॅरॅथॉन इव्हेंट भरवतात.

पाप आणि पुण्य

sunrise ·

काका आणि पुतण्या दोघे, सारखे मजेशीर बोलतात काका दोनदा मत टाकायला, तर पुतण्या धरणात XXXX सांगतात समाधिजवळ आत्मक्लेश करुन मन "प्युरीफाय" कसं होईल आणि "मजेत बोललो" असे सांगुन सत्य "नलिफाय" कसं होईल

काका आणि पुतण्या दोघे, सारखे मजेशीर बोलतात काका दोनदा मत टाकायला, तर पुतण्या धरणात XXXX सांगतात समाधिजवळ आत्मक्लेश करुन मन "प्युरीफाय" कसं होईल आणि "मजेत बोललो" असे सांगुन सत्य "नलिफाय" कसं होईल
पाप-पुण्याचा अर्थ, काही लोक मजेशीर लावतात पाप धुऊन टाकायला, पुण्याला ओलीस ठेवतात पापाच्या पैशाचे दान करून, मन "प्युरीफाय" कसं होईल अरे, पाप आणि पुण्य कधी "नलिफाय" कसं होईल

फैसला

drsunilahirrao ·

शुचि 14/04/2014 - 19:58
मांडतो प्रस्ताव आता एकतेचा कालचा तो हाच दंगेखोर आहे
हा आवडला.

शुचि 14/04/2014 - 19:58
मांडतो प्रस्ताव आता एकतेचा कालचा तो हाच दंगेखोर आहे
हा आवडला.
फैसला जीवनाचा हाच साला घोर आहे येथला प्रत्येक मुर्दा थोर आहे भामटा असणार हा नक्कीच नेता ऐकतो, सर्वत्र त्याचा जोर आहे खेळतो पैसा भल्यामोठ्यांत आता हे कुणाचे माजलेले पोर आहे मांडतो प्रस्ताव आता एकतेचा कालचा तो हाच दंगेखोर आहे मी निघालो आणि तू आलीस राणी फैसला हा छान काटेकोर आहे डॉ.सुनील अहिरराव

एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - १

स्पार्टाकस ·

इरसाल 12/04/2014 - 10:59
यापुर्वीही वाचलेले.पुन्हा वाचुन तीच उत्सुकता चाळवली गेलीय. पुभाप्र. लेखनाला शुभेच्छा !

काही संज्ञा सुरुवातीला अज्ञानामुळे समजत नव्हत्या पण वाचत गेलो, एकरूप होत गेलो तसे समजू लागले. पुढील भागाच्या प्रतीक्षेत

अजया 12/04/2014 - 13:37
भारी! हिमशिखरवरुन थेट समुद्रतळ गाठलास की!! पु.भा.प्र.

इरसाल 12/04/2014 - 10:59
यापुर्वीही वाचलेले.पुन्हा वाचुन तीच उत्सुकता चाळवली गेलीय. पुभाप्र. लेखनाला शुभेच्छा !

काही संज्ञा सुरुवातीला अज्ञानामुळे समजत नव्हत्या पण वाचत गेलो, एकरूप होत गेलो तसे समजू लागले. पुढील भागाच्या प्रतीक्षेत

अजया 12/04/2014 - 13:37
भारी! हिमशिखरवरुन थेट समुद्रतळ गाठलास की!! पु.भा.प्र.
दूर अंतरावर दिसणा-या जपानी फ्राईटर्स पाहून टँगचा कमांडर रिचर्ड 'डिक' ओ'केन समाधानाने हसला. शिकार ! ओ'केनने आपल्यासमोरचा लाऊडस्पीकर ऑन केला. पाणबुडीत सर्वत्र पसरलेल्या त्याच्या सैनीकांना त्याच्या सूचना स्पष्टपणे ऐकू जाणार होत्या. ओ'केन पासून काही अंतरावरच एकवीस वर्षांचा फ्लॉईड 'फ्रायर ट्रक' कॅव्हर्ली कानाला हेडसेट लावून जहाजांचे येणारे आवाज टिपत होता. आपल्या इतर अधिका-यांसह ओ'केन कोनींग टॉवरच्या छोट्याशा जागेत उभा होता. " वेगात कोणताही बदल नाही कॅप्टन !" कॅव्हर्लीने ओ'केनला सांगीतलं. " पुढच्या बाजूची बाहेरील दारे उघडा. स्टँड बाय् फॉर फायनल बेअरींग.

हार्टब्लीड (Heartbleed) बग; आंतरजालावरील संस्थळावरील पासवर्ड बदलणे; काही शंका

माहितगार ·

भाते 12/04/2014 - 12:22
आत्ताच मटामध्ये हार्टब्लीड संबंधित बातमी ही वाचली. तज्ज्ञाशी संपर्क साधून 'ओपन एसएसएल'ची व्हर्जन '१.०.१जी' अशी अपग्रेड करून घ्यावी. यावर कोणी जास्त माहिती देऊ / मदत करू शकेल का?

मी नाशिककर 12/04/2014 - 13:49
हा अ‍ॅटॅक फक्त सर्व्हर एन्ड वर आहे. जरी एखाद्या सर्व्हर वर अ‍ॅटॅक झाला नसेल तरी तुमचे सगळे पासवर्ड्स रीसेट करावे. http://filippo.io/Heartbleed ही लींक वापरुन तुम्ही तुमचा सर्व्हर/वेबसाईट चेक करु शकतात. जर रिझल्ट पॉझीटीव आला तर OpenSSL अपग्रेड करणे हा एकच उपाय आहे. टिपः मिपा, माबो, मनोगत सेफ आहेत. ================================================================= १००+ सर्व्हर्स वर OpenSSL अपग्रेड करुन प्रतिसाद टंकनारा !!!

आत्मशून्य 12/04/2014 - 16:01
१) तंत्रज्ञानाच्या एवढ्या प्रगत काळात अस काही होऊ कस शकत ? सॉफ्टवेअर प्रोग्रामींगच तंत्र विकसीत होण्यात अजूनही कच्चे दुवे कशामुळे आहेत ?
शेवटी संगणक हे एक यंत्र आहे म्हणून. विमाने कोसळतात, गाड्यांचे अपघात होता, संगणक हॅ़क होउ शकतात.
सॉफ्टवेअर प्रॉग्रामींग योग्य पद्धतीने सुरक्षीत आहे हे तपासण्याचे मार्ग कोणते ?
रिगरस टेस्टींग, पुन्हा पुन्हा पुन्हा.
२) सर्व सामान्यव्यक्ती अँटीव्हायरस फायरवॉल्सवर खर्च करतात या अँटीव्हायरस फायरवॉल्स विकणार्‍या कंपन्यांची कायदेशीर जबाबदारी लागू होते का नाही माहीत नाही पण नैतीक जबाबदारी म्हणून त्यांनी प्रयत्न करावयास नकोत का ?
व्यावसायीक हित सांभाळत, प्रयत्न चालु असतात.
३) या इश्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय संस्थांची (शैक्षणिक, शासकीय आणि खाजगी) सद्य स्थिती क्षमता काय आहेत सुधारणांना वाव आहे का ? असेल तर नेमका कोणता ?
न बोललेले बरे.
३) मराठी संस्थळांची काय स्थिती आहे, खासकरून मायबोली मिपा मनोगत इत्यादी
अजिबातच न बोललेले बरे.
४) सामान्य उपयोगकर्त्यांनी त्यांचे पासवर्ड केव्हा बदलावेत ?
मी सांगेन तेंव्हा ;)

मदनबाण 13/04/2014 - 08:49
जवळपास दोन तृतीयांश (२/३) वेबसाईट्सवर त्यात अगदी विश्वासार्ह समजल्या जाणार्‍या असंख्य वेबसाईट्स सहित अनेक ठिकाणी नोंदवलेले सदस्य नाव आणि पासवर्ड इतर व्यक्तीगत माहितीची गोपनीयता राखली न गेल्याची हादरवून टाकणारी शक्यता समोर आली आहे की ज्याबाबत सामान्य आंतरजाल उपयोगकर्ता काही म्हणजे काही करू शकत नाही. म्हणजे पाणि शीरलेल्या नौकेत आपण सगळ्यांसोबत होतो एवढेच समाधान. आतंरजाल किती असुरक्षित आहे याची निदान कल्पना तरी या घटनेने सामान्य वापरकर्त्यास यावी ! खरं तर "पासवर्ड" हा अकाउंट शी संबंधीत आहे,आणि अकाउंटचा चा तुमच्या माहितीशी.आता स्वतःला एक प्रश्न विचारुन पहा,तुमचे किती / कोणते / कोठे / कशासाठी / अकाउंट्स आहेत ? आणि यासाठी किती पासवर्ड्स आहेत ? यात तुमच्या मेल अकाउंट पासुन बँक अकाउंट आणि सोशल साईट अकाउंट पासुन सॉफ्टवेअर डाउनलोड अकाउंटस इं.इं येतात. या वरुन तुम्हाला याची व्याप्ती किती आहे हे लगेच कळेल. असे अनेक अकाउंटस असतात जे तात्पुरते बनवले जातात आणि नंतर कधीही त्याचा वापर केला जात नाही किंवा झालाच तर तो क्वचित असतो.अश्या सर्व अकाउंट्स चे पासवर्ड लक्षात ठेवणे ही या डिजीटल युगातली सर्वात कठीण आणि तापदायक गोष्ट आहे आणि असे पासवर्ड विसरणे /गहाळ होणे ही त्याहुन अधिक तापदायक गोष्ट आहे आणि यातुन निर्माण होणार्‍या अनेक शक्यता आहेत आणि त्याने होउ शकणारी हानी हा चिंतेचा विषय ठरावा. जाता जाता :- आपण या डिजीटल विचासरणीत मागे आहोत का ?"डिजीटल विचासरणी" म्हणजे डिजीटल युगात वावरताना आणि डिजीटल उत्पादन वापरताना त्यासंबंधी केला जाणारा विचार...{ही मी माझ्या पुरती आणि माझ्यासाठी केलेली छोटीशी व्याख्या आहे } म्हणजे एक उदा. देतो... समजा उद्या बाईक अपघातात माझा मॄत्यू झाला तर माझ्या पश्चात माझ्या डिजीटल डेटा चे काय ? त्यावर कोणाचा अधिकार राहिल ? समजा, माझे एखाद्या मेल अकाउंट मधे महत्वाचे दस्तावेज असतील तर त्याचे काय ? कारण त्या अकाउंटची सगळी माहिती आणि अर्थातच पासवर्ड { जर हॅक झाला नसेल तर...} माझ्या बरोबरच ढगात जाइल ! ;) तर मग त्या महत्वाच्या डेटाचे हस्तातंरण कसे होइल ? इं विषयां संबंधी आपल्या देशात विचार केला जातो आहे का ? तुम्ही कधी केला आहे का ?

मदनबाण 15/04/2014 - 10:20
हार्टब्लीड चा फटका अ‍ॅन्ड्रॉइड फोनला सुद्धा बसला आहे आणि यांचे इन्फेक्शन चेक करण्यासाठी गुगल स्टोअर अ‍ॅप्स उपलब्ध झाले आहेत. या संबंधी माहिती आणि दुवे खाली देतो आहे, तसेच हा प्रतिसाद तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी... या धाग्यात सुद्धा देतो आहे,म्हंणजे अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅपसाठी तो धागा उघडणार्‍यांना याची माहिती मिळेल. दुवे :- Android devices and apps affected by Heartbleed: Check if your smartphone is vulnerable Heartbleed Bug Impacts Mobile Devices अ‍ॅप्स :- Heartbleed Detector Bluebox Heartbleed Scanner

माहितगार 15/04/2014 - 11:17
श्री.: भाते, मी नाशिककर, आत्मशून्य, मदनबाण आपणा सर्वांना चर्चा सहभाग घेऊन मार्गदर्शना बद्दल धन्यवाद. धागा विषयाचे महत्व लक्षात घेता धाग्यास ६५०० पेक्षा अधिक हिट्स म्हणजे वाचक बर्‍या पैकी दिसताहेत तरी पण मिपावरील सर्वांपर्यंत विषय पोहोचण्या साठी अधिक वाचकांच्या वाचनांची गरज आहे असे वाटते. वाचकांच्या शंकाही नाहीत या अर्थाने वाचक अनुपस्थित आहेत.

सुहास झेले 15/04/2014 - 11:55
McAfee ने यासाठी एक फ्री टूल उपलब्ध करून दिलेले आहे... त्याचा दुवा देतोय खाली आणि Heartbleed Vulnerability चे जे काही अपडेट्स असतील, ते नॉर्टनच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. दोन्ही दुवे देतोय. १. McAfee True Intelligence Feed (Beta) २. Heartbleed: Information from Symantec on OpenSSL Vulnerability

भाते 12/04/2014 - 12:22
आत्ताच मटामध्ये हार्टब्लीड संबंधित बातमी ही वाचली. तज्ज्ञाशी संपर्क साधून 'ओपन एसएसएल'ची व्हर्जन '१.०.१जी' अशी अपग्रेड करून घ्यावी. यावर कोणी जास्त माहिती देऊ / मदत करू शकेल का?

मी नाशिककर 12/04/2014 - 13:49
हा अ‍ॅटॅक फक्त सर्व्हर एन्ड वर आहे. जरी एखाद्या सर्व्हर वर अ‍ॅटॅक झाला नसेल तरी तुमचे सगळे पासवर्ड्स रीसेट करावे. http://filippo.io/Heartbleed ही लींक वापरुन तुम्ही तुमचा सर्व्हर/वेबसाईट चेक करु शकतात. जर रिझल्ट पॉझीटीव आला तर OpenSSL अपग्रेड करणे हा एकच उपाय आहे. टिपः मिपा, माबो, मनोगत सेफ आहेत. ================================================================= १००+ सर्व्हर्स वर OpenSSL अपग्रेड करुन प्रतिसाद टंकनारा !!!

आत्मशून्य 12/04/2014 - 16:01
१) तंत्रज्ञानाच्या एवढ्या प्रगत काळात अस काही होऊ कस शकत ? सॉफ्टवेअर प्रोग्रामींगच तंत्र विकसीत होण्यात अजूनही कच्चे दुवे कशामुळे आहेत ?
शेवटी संगणक हे एक यंत्र आहे म्हणून. विमाने कोसळतात, गाड्यांचे अपघात होता, संगणक हॅ़क होउ शकतात.
सॉफ्टवेअर प्रॉग्रामींग योग्य पद्धतीने सुरक्षीत आहे हे तपासण्याचे मार्ग कोणते ?
रिगरस टेस्टींग, पुन्हा पुन्हा पुन्हा.
२) सर्व सामान्यव्यक्ती अँटीव्हायरस फायरवॉल्सवर खर्च करतात या अँटीव्हायरस फायरवॉल्स विकणार्‍या कंपन्यांची कायदेशीर जबाबदारी लागू होते का नाही माहीत नाही पण नैतीक जबाबदारी म्हणून त्यांनी प्रयत्न करावयास नकोत का ?
व्यावसायीक हित सांभाळत, प्रयत्न चालु असतात.
३) या इश्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय संस्थांची (शैक्षणिक, शासकीय आणि खाजगी) सद्य स्थिती क्षमता काय आहेत सुधारणांना वाव आहे का ? असेल तर नेमका कोणता ?
न बोललेले बरे.
३) मराठी संस्थळांची काय स्थिती आहे, खासकरून मायबोली मिपा मनोगत इत्यादी
अजिबातच न बोललेले बरे.
४) सामान्य उपयोगकर्त्यांनी त्यांचे पासवर्ड केव्हा बदलावेत ?
मी सांगेन तेंव्हा ;)

मदनबाण 13/04/2014 - 08:49
जवळपास दोन तृतीयांश (२/३) वेबसाईट्सवर त्यात अगदी विश्वासार्ह समजल्या जाणार्‍या असंख्य वेबसाईट्स सहित अनेक ठिकाणी नोंदवलेले सदस्य नाव आणि पासवर्ड इतर व्यक्तीगत माहितीची गोपनीयता राखली न गेल्याची हादरवून टाकणारी शक्यता समोर आली आहे की ज्याबाबत सामान्य आंतरजाल उपयोगकर्ता काही म्हणजे काही करू शकत नाही. म्हणजे पाणि शीरलेल्या नौकेत आपण सगळ्यांसोबत होतो एवढेच समाधान. आतंरजाल किती असुरक्षित आहे याची निदान कल्पना तरी या घटनेने सामान्य वापरकर्त्यास यावी ! खरं तर "पासवर्ड" हा अकाउंट शी संबंधीत आहे,आणि अकाउंटचा चा तुमच्या माहितीशी.आता स्वतःला एक प्रश्न विचारुन पहा,तुमचे किती / कोणते / कोठे / कशासाठी / अकाउंट्स आहेत ? आणि यासाठी किती पासवर्ड्स आहेत ? यात तुमच्या मेल अकाउंट पासुन बँक अकाउंट आणि सोशल साईट अकाउंट पासुन सॉफ्टवेअर डाउनलोड अकाउंटस इं.इं येतात. या वरुन तुम्हाला याची व्याप्ती किती आहे हे लगेच कळेल. असे अनेक अकाउंटस असतात जे तात्पुरते बनवले जातात आणि नंतर कधीही त्याचा वापर केला जात नाही किंवा झालाच तर तो क्वचित असतो.अश्या सर्व अकाउंट्स चे पासवर्ड लक्षात ठेवणे ही या डिजीटल युगातली सर्वात कठीण आणि तापदायक गोष्ट आहे आणि असे पासवर्ड विसरणे /गहाळ होणे ही त्याहुन अधिक तापदायक गोष्ट आहे आणि यातुन निर्माण होणार्‍या अनेक शक्यता आहेत आणि त्याने होउ शकणारी हानी हा चिंतेचा विषय ठरावा. जाता जाता :- आपण या डिजीटल विचासरणीत मागे आहोत का ?"डिजीटल विचासरणी" म्हणजे डिजीटल युगात वावरताना आणि डिजीटल उत्पादन वापरताना त्यासंबंधी केला जाणारा विचार...{ही मी माझ्या पुरती आणि माझ्यासाठी केलेली छोटीशी व्याख्या आहे } म्हणजे एक उदा. देतो... समजा उद्या बाईक अपघातात माझा मॄत्यू झाला तर माझ्या पश्चात माझ्या डिजीटल डेटा चे काय ? त्यावर कोणाचा अधिकार राहिल ? समजा, माझे एखाद्या मेल अकाउंट मधे महत्वाचे दस्तावेज असतील तर त्याचे काय ? कारण त्या अकाउंटची सगळी माहिती आणि अर्थातच पासवर्ड { जर हॅक झाला नसेल तर...} माझ्या बरोबरच ढगात जाइल ! ;) तर मग त्या महत्वाच्या डेटाचे हस्तातंरण कसे होइल ? इं विषयां संबंधी आपल्या देशात विचार केला जातो आहे का ? तुम्ही कधी केला आहे का ?

मदनबाण 15/04/2014 - 10:20
हार्टब्लीड चा फटका अ‍ॅन्ड्रॉइड फोनला सुद्धा बसला आहे आणि यांचे इन्फेक्शन चेक करण्यासाठी गुगल स्टोअर अ‍ॅप्स उपलब्ध झाले आहेत. या संबंधी माहिती आणि दुवे खाली देतो आहे, तसेच हा प्रतिसाद तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी... या धाग्यात सुद्धा देतो आहे,म्हंणजे अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅपसाठी तो धागा उघडणार्‍यांना याची माहिती मिळेल. दुवे :- Android devices and apps affected by Heartbleed: Check if your smartphone is vulnerable Heartbleed Bug Impacts Mobile Devices अ‍ॅप्स :- Heartbleed Detector Bluebox Heartbleed Scanner

माहितगार 15/04/2014 - 11:17
श्री.: भाते, मी नाशिककर, आत्मशून्य, मदनबाण आपणा सर्वांना चर्चा सहभाग घेऊन मार्गदर्शना बद्दल धन्यवाद. धागा विषयाचे महत्व लक्षात घेता धाग्यास ६५०० पेक्षा अधिक हिट्स म्हणजे वाचक बर्‍या पैकी दिसताहेत तरी पण मिपावरील सर्वांपर्यंत विषय पोहोचण्या साठी अधिक वाचकांच्या वाचनांची गरज आहे असे वाटते. वाचकांच्या शंकाही नाहीत या अर्थाने वाचक अनुपस्थित आहेत.

सुहास झेले 15/04/2014 - 11:55
McAfee ने यासाठी एक फ्री टूल उपलब्ध करून दिलेले आहे... त्याचा दुवा देतोय खाली आणि Heartbleed Vulnerability चे जे काही अपडेट्स असतील, ते नॉर्टनच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. दोन्ही दुवे देतोय. १. McAfee True Intelligence Feed (Beta) २. Heartbleed: Information from Symantec on OpenSSL Vulnerability
आंतरजालाची २५ वर्षे झाली याचा आनंद साजरा होतो न होतो तोच मागोमाग फायरवॉल्स आणि अँटीव्हायरस आणि इतरही सुरक्षा वापरून निर्धास्त होऊ पहात असलेल्या सर्वांनाच हार्टब्लीड (Heartbleed) बग ही त्रुटी लक्षात येऊन मोठाच धक्का दिला आहे. जवळपास दोन तृतीयांश (२/३) वेबसाईट्सवर त्यात अगदी विश्वासार्ह समजल्या जाणार्‍या असंख्य वेबसाईट्स सहित अनेक ठिकाणी नोंदवलेले सदस्य नाव आणि पासवर्ड इतर व्यक्तीगत माहितीची गोपनीयता राखली न गेल्याची हादरवून टाकणारी शक्यता समोर आली आहे की ज्याबाबत सामान्य आंतरजाल उपयोगकर्ता काही म्हणजे काही करू शकत नाही.