मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घेई च्छन्द मकरंद -- होमिओपॅथीचा !! [भाग-१]

डॉ. दत्ता फाटक ·

चित्रगुप्त गुरुवार, 06/12/2014 - 21:25
डॉ. हनिमन, डॉ. शुस्लर किंवा जे कोणी होमियोपाथी/बायोकेमिकचे मूळ प्रवर्तक होते, त्यांनी एवढ्या तपशीलात जाऊन शेकडो औषधांचे नेमके परिणाम कसे काय शोधून काढले, याबद्दलही माहिती या धाग्यातून मिळावी, अशी अपेक्षा करतो. प्राचीन ग्रीक वैद्य (याक्षणी त्याचे नाव आठवत नाहीये) त्या त्या वनस्पतीजवळ शांतपणे ध्यान लावून बसत असे, आणि ती वनस्पतीच त्याला स्वतःचे वैद्यकीय गुण 'सांगत' असे (वा अंतःप्रज्ञेने ते कळत असे म्हणा) आणि ते तो लगेच लिहून घेत असे, असे वाचल्याचे आठवते. मला स्वतःला हे पूर्णपणे शक्य वाटते. अर्थात त्या व्यक्तीची तेवढी क्षमता असायला हवी. होमियोपाथीच्या बाबतीत असे काही झाले होते का?

In reply to by नानासाहेब नेफळे

ह्यावेळी चक्क नेफळे रावांशी सहमत आहे आजवर होमिओपॅथी हे सुडो सायन्स आहे असेच ऐकत आलोय , ह्या लेखमालेतुन काही प्रभाव झाल्यास एखाद्या होमिऑ पॅथी डॉक्टरला सदिच्छा भेट देवुन काही प्रयोग करवुन (मायनर आजारांच्या वेळेला) घ्यायला हरकत नाही . अवांतर : बाकी होमिओपॅथी चे दुष्परिणाम नसतात हे मात्र धाधांत असत्य आहे हे अनुभवाने सांगतो ... आमची मेव्हणी होमिऑपॅथी डॉक्टर आहे तिला एकदा म्हणालो होतो की " होमिऑपॅथी सुडोसायन्स आहे ... माझ्यालेखी ज्योतिषशास्त्र, फेंगशुई , वास्तुशास्त्र , रेकी आणि होमिऑपॅथी हे सारे एकाच माळेतले मणी आहेत " त्यानंतर बोलायचीच बंद झाली :( ... छ्या केवढा हा साईड इफेक्ट =))))

आयुर्हित Fri, 06/13/2014 - 00:16
ज्ञानाच्या कक्षा रुन्दावण्यास मदत करणारे अनुभवयुक्त लेखन व आपले मिपावर स्वागत असो! होमिओपॅथीवरील येवु घातलेल्या विस्त्रूत माहितीबद्दल आधिच मनापासुन धन्यवाद.

गवि Fri, 06/13/2014 - 13:00
काली फॉस ६ आणि १२ + नैट्रम मूर ३० च्या पाच ग्रेनच्या वडया अर्धा ग्लास पाण्यात टाकून १०—१० मिनिटांनी एकएक चमचा मिश्रण नंतर १५—१५ मिनिटांनी त्सेक चमचा मिश्रण सातत्याने दिले यामुळे र्हुदय विकाराचा रुग्ण हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी आलेली रुग्णवाहिका परत पाठवण्या एवढा स्वस्थ झाला, त्या मुळे काली फोसला प्राण रक्षक म्हणूनही ओळखले जाते.
उत्तम ... पाच ग्रेन म्हणजे ०.३२ ग्रॅम हे बरोबर असेल तर अर्ध्या ग्लासात एक तृतीयांश ग्रॅम द्रव्य विरघळवलेले..(विरघळत असल्यास) म्हणजे पोटात खरोखर काली फॉस आणि नॅट्रम मूर ही द्रव्ये जाणार.. फायदा होत असेल किंवा नसेल हा अनुभवाचा / केमिस्ट्रीचा / जीवशास्त्राचा भाग झाला. पण पदार्थाची डिटेक्टेबल क्वांटिटी पोटात जातेय हे पाहून आनंद झाला. पण.. मग.. ही नक्की होमिओपथीच ना? धन्यवाद.

In reply to by गवि

राजेश घासकडवी Fri, 06/13/2014 - 23:36
म्हणजे पोटात खरोखर काली फॉस आणि नॅट्रम मूर ही द्रव्ये जाणार..
कैतरीच आपलं तुमचं. होमिओपथीमध्ये असला धोका बिलकुल पत्करला जात नाही. त्या औषधाच्या नावांपुढे ६ आणि १२ लिहिलं आहे ते दिसलं नाही का? ६ म्हणजे ६ वेळा शतांशाचं डायल्युशन. म्हणजे सुमार एक टनाचं एक मायक्रोग्रॅम करायचं.... १२ वेळा डायल्यूशन म्हणजे एक रेणूही नाही. त्या पाच ग्रेनमध्ये काय असतं कोण जाणे.

मृत्युन्जय Fri, 06/13/2014 - 13:35
होमिओपॅथी म्हटल्यावर मिपाकर एकदम तुटुन पडतात. पुणेकर, मोदीसमर्थक आणि आस्तिक या तिघांइतकीच होमियोपॅथी देखील मिपासाठी टिंगलीच विषय झाली आहे असे दिसते. यापैकी जे कोण डॉक्टर्स असतील त्यांचे किमान मत तरी विचारात घेता येइल. ओकार्‍या काढणारे इतर मात्र डोक्यात जातात. असो. होमिओपॅथी ने बरे झालेले लोक मला माहिती आहेत. त्यामुळे माझा होमिओपॅथीवर राग नाही. मी स्वतः वेळ आल्यास अ‍ॅलॉपॅथी औषधे घेतो ही गोष्ट वेगळी.

आदिजोशी Fri, 06/13/2014 - 14:30
होमिओपॅथीला शिव्या घालणारे अनेक लोक मिपावर आहेत. त्यातले किती जण स्वतः डॉक्टर आहेत, किती जणांचा होमिओपॅथी आणि अ‍ॅलोपथीचा सखोल अभ्यास आहे हे त्यांनाच ठाऊक. उगाच कुठलं तरी काही तरी वाचून मत बनवायचं आणि फुकट देता येतात म्हणून सल्ले देत सुटायचं. टिका तर इतक्या खालच्या पातळीला जाऊन करतात की मिपाकर असल्याची शरम वाटते.

In reply to by आदिजोशी

श्रीगुरुजी Fri, 06/13/2014 - 20:17
होमिओपॅथी औषधांचा मला स्वतःला व सर्व कुटुंबियांना गेली अनेक वर्षे अत्यंत चांगला अनुभव आला आहे. होमिओपॅथी थोतांड आहे किंवा ते छद्मविज्ञान आहे असे पूर्वग्रहदूषित मत मांडणार्‍यांशी मी अजिबात सहमत नाही.

In reply to by आदिजोशी

प्रसाद१९७१ Mon, 06/16/2014 - 10:07
एक तर अ‍ॅलोपाथी असे काहीही नाही. MBBS ही Modern Medicine ची पदवी आहे. ह्यात जे शास्त्रियरीतीने सिद्ध करता येइल असे कुठलेही औषध चालु शकते. आयुर्वेद, युनानी, चिनी औषधे जर क्लिनिकल ट्रायलच्या मार्गाने सिद्ध केली तर ती पण Modern Medicine मधे दिली/घेतली जातील. पण बुवाबाजी पद्धतीने कोणी दावे करत असेल तर त्याकडे खरे तर दुर्लक्ष केले पाहीजे.

चित्रगुप्त Fri, 06/13/2014 - 22:01
होमियोपाथीचा अत्यंत चांगला अनुभव मला आहे, १९८४ साली अगदी भयंकर परिस्थितीत मी असता होमियोपाथीच्या दोन-तीन दिवसाच्या औषधाने मी वाचलो होतो. माझ्या पत्निलाही लहानपणी आलोपाथी डॉक्टरांनी हात टेकल्यावर होमियोपाथीमुळेच मोठ्या संकटातून बाहेर येता आले होते. माहितीतल्या आणखीही लोकांना झालेला लाभ मला ठाऊक आहे. परंतु त्याचबरोबर होमियोपाथीच्या सैद्धांतिक अंगाविषयी --- म्हणजे अमूक औषध अमूक पोटन्सीचे घेतल्याने अमूक परिणाम होतो वगैरे--- याबद्दल शंका घेण्यासारखे अनुभव पण भरपूर आहेत. पूर्वी माझ्या वडिलांचे स्वतःचे होमियोपाथीचे दुकान असून मी अनेक वर्षे ते चालवण्यात सहभागी होतो--- एक दुकानदार म्हणून जे अनुभव माझ्या गाठीशी आहेत, ते अकल्पनीय आहेत, आणि फारच कमी जणांना ठाऊक असतील, असे आहेत... ते इथे उघड करावेत की नाही, याबद्दल मी अजून ठाम होऊ शकलेलो नाही. खुद्द होमियोपाथीचे औषध निर्माते यातील अगदी खास गुपीते सांगू शकतील, पण ते तसे कधीच करणार नाहीत... या अनुभवामुळेच मी माझ्या पहिल्या प्रतिसादात धागाकर्त्यांना काही प्रश्न विचारले आहेत, त्यांची उत्तरे यावर प्रकाश टाकू शकतील.

In reply to by चित्रगुप्त

आणि त्यावर होमिओपॅथीच्या नक्की कोणत्या औषधाचा किती दिवसात परिणाम झाला हे सांगाल काय?
एक दुकानदार म्हणून जे अनुभव माझ्या गाठीशी आहेत, ते अकल्पनीय आहेत, आणि फारच कमी जणांना ठाऊक असतील, असे आहेत... ते इथे उघड करावेत की नाही, याबद्दल मी अजून ठाम होऊ शकलेलो नाही.
कशामुळे?
खुद्द होमियोपाथीचे औषध निर्माते यातील अगदी खास गुपीते सांगू शकतील, पण ते तसे कधीच करणार नाहीत...
पुन्हा उपरोक्त शंका!
या अनुभवामुळेच मी माझ्या पहिल्या प्रतिसादात धागाकर्त्यांना काही प्रश्न विचारले आहेत, त्यांची उत्तरे यावर प्रकाश टाकू शकतील.
लेखक साहित्याचे डॉक्टर असावेत (असं ब्लॉगवरुन वाटतं) त्यामुळे ते बहुदा उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉक्टर सगळं ठीक आहे ना? गायबलेत तिथे यांची काय कथा!

चित्रगुप्त Mon, 06/16/2014 - 03:12
१९८४ साली मला अमेरिकेला तीन महिन्यासाठी जायचे होते. त्याकाळी अशी संधी फार दुर्मिळ होती. परंतु 'अमीबॉयसिस' ने ग्रस्त होऊन मी अगदी दुर्बळ झालेलो होतो. चालणे-फिरणेही कठीण झालेले होते. अमेरिकेचे तिकीट एकदा काही दिवसांसाठी पोस्टपोन केले, मात्र पुन्हा तसे करता आले नसते, आलोपाथीने काहीच लाभ होत नव्हता. कुणीतरी सांगितले, त्या होमियोपाथी डॉ. कडे गेलो, त्यांनी फी न घेता औषध दिले, ते २-३ दिवस घेतल्यावर प्रवास करण्याइतपत बरे वाटले. तरी अशक्त पणा बराच काळ राहिला. तीन महिन्यांनंतर मी परत येईपावेतो ते डॉ. वारले होते. तसेच माझ्या पत्नीला वयाच्या अठरा की विसाव्या वर्षी अचानक चालता येईनासे झाले होते, पायातील शक्ती गेली होती. बरेच दिवस गावातील सर्वात मोठ्या इस्पितळात राहून सर्व प्रकारची परिक्षणे , औषधोपचार करुनही काहीही फरक पडत नव्हता. मात्र होमियोपाथीने ती व्याधी कायमची बरी झाली. औषधांविषयी अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे सिद्धांत काहीही असो, औषध निर्माते, एजंट आणि विक्रेते, यांच्या माध्यमातून आलेले औषध नेमके काय, कसे असेल, मुळात ते औषध तरी असेल की नुस्तीच मिल्कशुगर/साखरेच्या गोळ्या किंवा साधे अल्कोहोल असेल, हे कोणत्याही टेस्ट द्वारे सांगता येत नाही. याचा फायदा निर्माते, एजंट आणि विक्रेते घेत असतात, आणि बिना औषधाचे औषध विकतात. तरीही बरेचदा गुण येतो (बरेचदा येत सुद्धा नाही) याचे कारण 'प्लासिबो इफेक्ट' असावा, असे वाटते. एवढे सर्व ठाऊक असूनही अजूनही आम्ही होमियोपाथिक डॉ. कडे जातो, आणि ती घेऊन बहुतेकदा फायदाही होतो.
लाय्कोपोडियम खास करून अतिशय तल्लख बुद्धीचा, उत्कृष्ट वक्तृत्व, अमोघ वाणी असलेला शरीराने कृश, कुठल्याही विषयात पारंगत, सखोल, पण एकलांडा, त्याच्यावर प्रेम- आदर करणा-यांत बसेल,उठेल, त्याचं बोलणं एकणा-याला ज्ञानाची मेजवानी वाटेल, इतक्या सहजपणे तो अवघड विषयावर बोलेल, त्याच्या विद्वत्तेबध्दल आदर असेल अशाच लोकांच्यात तो रममाण होतो, त्याचा एक समज-गैरसमज आपल्याला समजून घेणारी, आपल्या वि-षयाची गोडी असणारी तर राहोच पण सांगोपांग अभ्यास करू इच्छिणारी व्यासंगी माणसंच नाहीत, अशा लोकांसमोर एखाद्या विषयावर बोलणंच नको, वकील, न्यायाधीश, राजकारणपटू, प्रथितयश अभ्यासक,उद्योजक,डॉक्टर, अशा लोकां-साठीच हे औषध नैराश्य कमी करून मानसिकबल- आत्मविश्वास वाढविणारं चांगल्या वक्त्यासाठींच.
मटेरिया मेडिका मधील असली वर्णने म्हणजे कल्पनेच्या भरार्‍या असाव्यात, असे मलातरी वाटते. खरे-खोटे डॉ. हनिमन जाणोत. अश्याच प्रकारचे उलट-सुलट अनुभव मला भविष्यकथनाबद्दलही आलेले आहेत, त्याविषयी पूर्वी काही धाग्यांमधून लिहिलेही आहे.

In reply to by चित्रगुप्त

ते सांगता येणार नाही कारण :
मी परत येईपावेतो ते डॉ. वारले होते.
आणि
पत्नीला वयाच्या अठरा की विसाव्या वर्षी अचानक चालता येईनासे झाले होते, पायातील शक्ती गेली होती. बरेच दिवस गावातील सर्वात मोठ्या इस्पितळात राहून सर्व प्रकारची परिक्षणे , औषधोपचार करुनही काहीही फरक पडत नव्हता. मात्र होमियोपाथीने ती व्याधी कायमची बरी झाली.
याचंही डायग्नॉसिस आणि औषध सांगणं शक्य नसावं कारण घटना जुनी आहे. तस्मात गुण आला हे खरं पण औषध कोणतं हे कळायला मार्ग नाही. पॅथी सिद्ध होण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत : औषधाच्या परिणामांची: १) कन्सिसटंसी २) व्यक्ती निरपेक्षितता आणि ३) स्थल-काल निरपेक्षितता.

In reply to by संजय क्षीरसागर

चित्रगुप्त Mon, 06/16/2014 - 11:12
पॅथी सिद्ध होणे वा न होणे, याबद्दल काही म्हणणे नाही मात्र 'व्यक्ति तितक्या प्रकृती' या न्यायाने औषधोपचार हा व्यक्तिनिरपेक्ष असू शकत नाही. अ‍ॅलोपाथीत सुद्धा अमूक औषधाची वा वस्तूची अ‍ॅलर्जी आहे का, ही व्यक्तिसापेक्ष माहिती घेतली जाते. अवांतरः माझ्या ओळखीचे एक वैद्य केवळ नाडिपरिक्षा करून जे सांगतात, ते मी बघून थक्क झालेलो आहे. शारीरिक व्याधीच नव्हे, तर मानसिक स्थिती सुद्धा त्यांना नाडिवरून कळते. नाडिपरिक्षा ही एक कठीण विद्या असून ती सर्वांनाच साध्य होत नसते, असे ते सांगतात.

In reply to by चित्रगुप्त

असे एक वैद्य अशोक भट पुण्यात पूर्वी मुंजाबाच्या बोळापाशी होते. खुन्या मुरलीधराच्या मंदीरातले खरे वैद्य कावीळवाले देखील नाडीपरिक्षेवरून उपचार करत.

In reply to by चित्रगुप्त

कवितानागेश Mon, 06/16/2014 - 19:57
नाडीपरीक्षेबद्दल माझाही अनुभव अतिशय चाम्गला आहे. पण नाडिपरिक्षा ही एक कठीण विद्या असून ती सर्वांनाच साध्य होत नसते, हे जरा जास्त झालं. ज्याची निरिक्षणशक्ती आणि चिकित्सक्बुद्धे उत्तम असेल असा कुणीही माणूस नाडीपरीक्षा व्यवस्थित करु शकेल. आणि मूळातच डॉक्टर होण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेतच. माझ्या ओळखीचे एक वैद्य अत्ता केवल ३२ वर्षाचे आहेत. त्यांची नाडीपरीक्षा देखिल अशीच उत्तम आहे. अगदी मानसिक स्थितीचेदेखिल तंतोतंत वर्णन करतात. आणि औषधाचा परीणामदेखिल ताबडतोब होतो. ...पण होमिओपॅथीबद्दल धागा असताना नेहमी तिथे आयुर्वेद का येतो बरं? लोकांना खरोखरच होमिओपॅथीबद्दल काहीही माहित नाहीये हेच खरं.

In reply to by प्रसाद१९७१

होमिओपाथी ला बुवाबाजी म्हणुन जाहिर करुन, अंधश्रद्धा निर्मुलन विधेयका नुसार कारवाई केली पाहिजे.
संपुर्ण सहमत !

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी Mon, 06/16/2014 - 12:31
>>> होमिओपाथी ला बुवाबाजी म्हणुन जाहिर करुन, अंधश्रद्धा निर्मुलन विधेयका नुसार कारवाई केली पाहिजे. करा. गो अहेड.

चित्रगुप्त Mon, 06/16/2014 - 10:16
होमिओपाथी ला बुवाबाजी म्हणुन जाहिर करुन, अंधश्रद्धा निर्मुलन विधेयका नुसार कारवाई केली पाहिजे.
होमियोपाथीने कधीच, कुणालाच फायदा झाला नसता, तर ती केंव्हाच आपोआपच नामशेष झाली असती. फायदा तर होतो, पण त्याबद्दल जो सिद्धांत सांगितला जातो, तो कितपत खरा आहे, हा प्रश्न असू शकतो. अंधश्रद्धा निर्मुलन विधेयक हे सुद्धा विवेकाने वापरले गेले पाहिजे. एकदम टोकाची भूमिका घेणे योग्य नव्हे. आम्हाला तर आलोपाथीने जेवढे नुकसान झाले, तेवढे आयुर्वेदिक वा होमियोपाथीने कधीच झालेले नाही. एकदा आरोग्य बिघडले, की तो विषय फार गुंतागुंतीचा आणि जटिल झालेला असतो. कुणाला कश्याने बरे वाटेल हे सांगणे कठीणच. आलोपाथीमुळे एक व्याधि बरी होते, तर दुसरी उद्भवते, असे बरेचदा घडत असते.

प्रसाद१९७१ Mon, 06/16/2014 - 10:38
होमियोपाथीने कधीच, कुणालाच फायदा झाला नसता, तर ती केंव्हाच आपोआपच नामशेष झाली असती.>>>>>>>>>> अहो गंडेदोरे, काळी जादू, वेगवेगळे ग्रहांचे खडे, वास्तुशास्त्र ह्यांनी पण कोणाचा कधी फायदा झाला नाही, तरी पण शतकानुशतके चालू च आहे ना. पुन्हा एक दुरुस्ती, अ‍ॅलोपाथी अशी कुठलीही पॅथी नाही.

चित्रगुप्त Mon, 06/16/2014 - 11:29
अ‍ॅलोपाथी अशी कुठलीही पॅथी नाही.
मग कोणता शब्द वपरावा म्हणता? गंडेदोरे, काळी जादू, वेगवेगळे ग्रहांचे खडे, वास्तुशास्त्र वगैरेंच्या वाटेला मी स्वतः कधी गेलेलो नाही, परंतु यांचा कधीच कुणालाच फायदा झालेला नाही, याचा कोणताही विदा वा पुरावा माझ्याकडे नाही. हा माझा एक वैयक्तिक तर्क असू शकतो, त्या आधारावर टोकाचे विधान करण्याचा, या गोष्टींना 'अंधश्रद्धा' या प्रकारात मोडण्याचा अधिकार मला नाही, एवढे मला कळते. समर्थांनी सांगितलेल्या 'सावधपण सर्वविषयी' आणि 'विवेक' यांचा उपयोग केला, तर अनेक अनिष्ट व्याधि-उपाधिं पासून आपण स्वतःला वाचवू शकतो. होमियोपाथी औषधांचा व्याधिनिवारणासाठी उपयोग होतो, याचा भरपूर अनुभव मला आहे, आणि असे अन्य अनेक लोक माझ्या परिचयात आहेत.

In reply to by चित्रगुप्त

प्रसाद१९७१ Mon, 06/16/2014 - 12:09
मग कोणता शब्द वपरावा म्हणता?
Modern Medicine हा सध्याचा प्रचलित शब्द आहे. ह्याला कुठलेही बंधन नाही, जे जे शास्त्रिय कसोट्या लावुन सिद्ध होउ शकते ते सर्व उपचार ह्यात चालतात.

In reply to by चित्रगुप्त

चौकटराजा Mon, 06/16/2014 - 21:03
या प्रतिसादासारखेच माझे काहीसे मत आहे. होमिओपाथी हे शास्त्र नसेल पण ते उपयुक्तच नाही असे म्हणणे खरे नाही. गंडे दोरे शास्त्र नाही पण ते उपयुक्तच नाही हे खरे नाही. श्रद्धा हे शास्त्र नाही पण ती उपयुक्तच नाही हे खरे नाही. शास्त्र हे नेहमीच अपुरे असते. पण त्यातील काही कसोट्यामुळे त्याबद्द्लची खात्री ही नक्कीच जास्त असते.

आदिजोशी Mon, 06/16/2014 - 11:56
ज्यांना होमिओपॅथीच्या उपयुक्ततेविषयी शंका आहे ते स्वतः औषधे घेऊन पडताळणी का करत नाहीत? संजय क्षीरसागरांच्या मुद्द्यांतले २ आणि ३ तर अत्यंत भंपक मुद्दे आहेत. व्यक्ती निरपेक्षितता आणि स्थल-काल निरपेक्षितता नसणे म्हणजे ढोबळ जनरलायझेशन आहे. दुकानात शर्टाच्यासुद्धा कैक साईझ सापडतात, हिमालयात घालायचे कपडे मुंबईत घालून फिरता येत नाही म्हणून ते ते कपडे हे कपडे म्हणण्यायोग्य नाहीत का? तसंच प्रत्येक होमिओपॅथीक डॉक्टरला औषधांचं केमिकल कंपोझेशन कसं माहिती असेल. ते प्रश्न शास्त्रज्ञांना विचारायचे. अकलेचे तारे तोडायचे ठरवली की त्याला मर्यादा नसते. अ‍ॅलोपथीचा कैवार घेणार्‍यांना १० मिली ग्लायकोडीन मधे किती मायक्रोमिली खरे औषध असते ही माहीती आहे का? अँटीबायोटीक घ्या त्यातून निर्माण होणारी हीट कमी करायला रँटॅक घ्या आणि मोशन पातळ होतील म्हणून आहार कंट्रोल करा, हे असले आचरट प्रकार होमिओपॅथी मधे होत नाहीत. इथे होमिओपॅथीक शास्त्रज्ञ नाहीत म्हणून शंकानिरसन होणार नाही हे लक्षात ठेवा. उद्या मी अणूउर्जेवर प्रश्न विचारीन आणि उत्तरं नाही मिळाली की अणूउर्जा हे थोतांड आहे असं म्हणेन, असले प्रकार चाललेत.

In reply to by आदिजोशी

मी लिहीलेले तीन नियम हे वैज्ञानिक सत्यतेचे जगनमान्य निकष आहेत. अर्थात याची तुम्हाला कल्पना नाही हे तुमच्या प्रतिसादातल्या भोंगळपणावरुन कळतं. शर्टाचे साइज आणि हिमालयातले कपडे यांचा वैज्ञानिक सत्याशी (इथल्या संदर्भात औषधाला मान्यताप्राप्त होण्याशी) काडीमात्र संबंध नाही. मी चित्रगुप्तना आजार आणि औषध यांची माहिती विचारली होती. इथे मी कैवार वगैरे घेण्याचा (तुम्हाला होमिओपॅथीचा असला तरी) प्रश्नच नाही. ते बहुदा त्तुमच्या अगाध बुद्धीमत्तेचं आकलन असावं! अर्थात तुमच्या या वाक्यानं :
तसंच प्रत्येक होमिओपॅथीक डॉक्टरला औषधांचं केमिकल कंपोझेशन कसं माहिती असेल. ते प्रश्न शास्त्रज्ञांना विचारायचे.
कमालीची हाईट गाठली आहे! म्हणजे डॉक्टरला तो काय औषध देतोयं याचीच माहिती नाही. शाब्बास!

In reply to by संजय क्षीरसागर

मी लिहीलेले तीन नियम हे वैज्ञानिक सत्यतेचे जगनमान्य निकष आहेत
ते तीन नियम तुम्ही लिहिल्यामुळे जगन्मान्य झालेत की त्यांचा कोणीच प्रतिवाद करु न शकल्याने जगन्मान्य झालेत =))

In reply to by प्रसाद गोडबोले

उदा. गुरुत्वाकर्षणाचा नियम. पृथ्वीवर कुठेही (स्थल निरपेक्षितता), कुणीही टाकली तरी (व्यक्ती निरपेक्षितता), केव्हाही (काल निरपेक्षितता) आणि नेहमी (वारंवारिता) वस्तु खालीच पडेल. हाच निकष मेडिकल सायन्समधे औषध प्रमाणित होण्यासाठी लावला जातो.

In reply to by आदिजोशी

सुबोध खरे Mon, 06/16/2014 - 14:00
अ‍ॅलोपथीचा कैवार घेणार्‍यांना १० मिली ग्लायकोडीन मधे किती मायक्रोमिली खरे औषध असते ही माहीती आहे का? जोशी साहेब आपण ग्लायकोडीनचे नाव घेतलेत म्हणून त्यात असलेली औषधे काय आहेत (ती बाटलीवर लिहिलेली असतात) पण आपल्या माहितीसाठी खाली देत आहे. अशी माहिती सर्व आधुनिक वैद्यकशास्त्राच्या औषधांबद्दल उपलब्ध http://www.alembic-india.com/cough-cold.php Glycodin Cough Syrup Each 5 ml contains Terpin Hydrate USP 10 mg, Dextromethorphan Hydrobromide IP 10 mg, Menthol IP 3.75 mg, Syrup Glycerin Base q.s. Bottle 100 ml 50 ml यातील प्रत्येक औषध काय शुद्धतेचे आहे ते USP united states pharmacoepial convention आणि IP म्हणजे indian pharmacoepia यात प्रमाणित केलेली असतात त्याप्रमाणे असतात तसे नसेल तर एफ डी ए त्यांच्यावर खटला भरते आपण USP मध्ये terpin hydrate शोध म्हणजे त्याची शुद्धता काय आहे आपल्याला कळेल. आधुनिक वैद्यकात प्रत्येक औषधाचे घटक कोणते आहेत हे त्या बाटलीवर किंवा पैक वर लिहिणे कायद्याने अनिवार्य आहे.त्यमुळे जर संशय असेल तर डॉक्टर सरळ ती बाटली पाहून खात्री करू शकतात. इतके काटेकोर नियम इतर कोणत्या पाथीला आहेत काय ते मला माहित नाही. बर्याच वेळेला होमियोपथी शास्त्रीय कसोटीवर उतरत नाही हि वस्तुस्थिति आहे. तरीही बर्याच लोकांना गुण येतो असा त्यांचा अनुभव आहे.माझे म्हणणे एवढेच आहे कि ते शास्त्र आहे असे न म्हणता ते एक तत्वज्ञान आहे. ज्याने त्याने आपल्या श्रुती स्मृती आणि बुद्धीप्रमाणे ठरवावे कि आपण काय करावे शेवटी आपण ज्या पाथीवर विश्वास आहे त्याचे औषध त्याने घ्यावे असे मला वाटते. कुणाच्या का कोम्बड्याने, उजाडल्याशी कारण

In reply to by सुबोध खरे

अनुप ढेरे Mon, 06/16/2014 - 14:03
काही आयुर्वेदिय औषधांवर यात कुठल्या कुठल्या वनस्तपी आहेत हे त्यांच्या मराठी आणि शास्त्रीय नावासकट लिहिलेले पाहिलेले आहे. आता हा नियम आहे का फक्त त्या मन्युअफॅक्चररनी केलं होतं ते नाही माहित.

In reply to by अनुप ढेरे

प्रसाद१९७१ Mon, 06/16/2014 - 14:08
वनस्पती कुठल्या आहेत हे लिहुन काय उपयोग? ते मिश्रण गरम केल्यावर, गाळल्यावर, दुसर्‍या कशाशी मिक्स केल्यावर आत काय शिल्लक रहाते आणि कीती रहाते ते महत्वाचे आहे. आणि वनस्पती म्हणजे काय? मुळ, खोड, साल, फुल , फळ नक्की काय? इतकेच काय फुल, फळ कीती पिकले आहे त्याप्रमाणे केमिकल बदलतात. तेंव्हा वनस्पती म्हणजे नक्की काय?

In reply to by प्रसाद१९७१

अनुप ढेरे Mon, 06/16/2014 - 14:13
ते मिश्रण गरम केल्यावर, गाळल्यावर, दुसर्‍या कशाशी मिक्स केल्यावर आत काय शिल्लक रहाते आणि कीती रहाते ते महत्वाचे आहे.
सहमत. त्या झाडाचं जे काही नाव असेल ते. त्याचा नक्की कुठला भाग वापरला आहे त्याचा उल्लेख शास्त्रीय नावात होता का नाही ते नाही आठवत. पण मराठीमध्ये लिहिलेल्या भागात तरी नक्की मूळ का फळ ते लिहिले होते.

In reply to by अनुप ढेरे

सुबोध खरे Mon, 06/16/2014 - 15:27
ढेरे साहेब, अडुळसाचा काढा/ रस/ कफ सिरप घेतात तेंव्हा त्यात अडुळसा अर्क असे लिहिलेले असते पण मुळ अडुळसा पानात किती टक्के रस आहे आणि आणि त्याचा अर्क कशा पद्धतीने काढलेला आहे याचे अचूक परिमाण कोणत्याही आयुर्वेदिक औषधात लिहिलेले नसते.तो भैषज रत्नावली,भाव प्रकाश किंवा रत्नाकर आयुर्वेद नीघंटू अशा मान्यता प्राप्त ग्रंथात दिल्याप्रमाणे काढलेला असतो. पण थोड्या फार प्रमाणात फरक असतोच. दुर्दैवाने आयुर्वेदिक औषधांचे मानकीकरण आणि संशोधन आधुनिक विज्ञानाच्या काटेकोर पद्धतीप्रमाणे होताना सहसा आढळत नाही त्यामुळे त्या औषधांचे परिणाम वैद्याच्या अनुभवावर जास्त अवलंबून राहतात. याच विरुद्ध अडुळसा वनस्पतीतून व्हासिसीन नावाचे द्रव्य वेगळे केले कि किती मिलीग्राम आहे ते स्पष्ट पणे मोजून तेवढाच डोस रुग्णाला नवीन डॉक्टर सुद्धा काटेकोर पणे देऊ शकतो. आमच्या सदाफुलीमध्ये कर्करोगावर परिणामकारक औषध आहे म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात काहीच हशील नाही. त्यातून व्हिनब्लास्टीन नावाचे औषध् विलग करून Vinblastine 6 mg/m2 IV on days 1 and 15 अशा काटेकोर पणे देत येत नाही असे मानकीकरण आणि संशोधन आधुनिक विज्ञानाच्या काटेकोर पद्धतीप्रमाणे आयुर्वेदिक औषधांवर होणे आवश्यक आहे तरच हे प्राचीन ज्ञान आधुनिक जगात मानवाच्या कल्याणासाठी वापरता येईल.

In reply to by सुबोध खरे

हाडक्या Mon, 06/16/2014 - 21:04
+१ डॉक..!
असे मानकीकरण आणि संशोधन आधुनिक विज्ञानाच्या काटेकोर पद्धतीप्रमाणे आयुर्वेदिक औषधांवर होणे आवश्यक आहे तरच हे प्राचीन ज्ञान आधुनिक जगात मानवाच्या कल्याणासाठी वापरता येईल.
अगदी अगदी.. हळदीच्या गोंधळानंतर खरेतर या संदर्भात आपल्याकडे काही सुरुवात देखील झाली होती सरकारी पातळीवर. ती टी के डी एल च्या या संकेत-स्थळावर पाहता येईल. पण पुढे काय झाले हे नेहमीच्या सरकारी पद्धतीने ठाऊक नाही. ही तरी वेब-साईट तरी तीन चार वर्षे अद्ययावत केलेली नाहीये. पुढे काही झाले तर पाहुयात.

In reply to by सुबोध खरे

अनुप ढेरे Mon, 06/16/2014 - 22:26
आयुर्वेदिक औषधांचे मानकीकरण
निर्मिती प्रक्रियेचं हे होणं जरूरी आहे असं वाटतं म्हणजे एखाद्याला गुण आला नाही तरी चालेल पण औषधाचा त्रास होउ नाही

In reply to by सुबोध खरे

(किंवा प्रतिसाद देत असावेत) कारण ही गोष्ट:
प्रत्येक औषधाचे घटक कोणते आहेत हे त्या बाटलीवर किंवा पैक वर लिहिणे कायद्याने अनिवार्य आहे
अगदी उघड आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

आदिजोशी Mon, 06/16/2014 - 16:45
औषधाचं नाव तर होमिओपॅथीच्या बाटल्यांवरही असतं. पण अमुक औषध घेतल्याने सर्दी बरी होते, पण ती कशी होते कुणाला ठाऊक आहे? त्या औषधाची शरीरात गेल्यावर काय केमिकल रिअ‍ॅक्शन होते हे किती जणं सांगू शकतात? अशा अर्थाने ते वाक्य होतं. उदा. काली फॉस ह्या औषधाच्या नावातच त्यातल्या क्षाराचं / औषधाचं वर्णन आहेच की.

In reply to by आदिजोशी

त्या औषधाची शरीरात गेल्यावर काय केमिकल रिअ‍ॅक्शन होते हे किती जणं सांगू शकतात?
मग मेडिकल सायन्स काय आहे? तिथे काय खोक्यावर छापलेली लक्षणं बघून मेडिसिन प्रिस्काइब करायला शिकवलं जातं का? डॉक्टरला औषधाचा शरीरावर नक्की काय परिणाम होईल हे माहिती नसतांना तो औषधं लिहून देतो आणि इंजेक्शनं ठोकतो का?
अकलेचे तारे तोडायचे ठरवली की त्याला मर्यादा नसते.
हे तुमचंच वाक्य आता तुम्हाला कसं वाटतं?

In reply to by संजय क्षीरसागर

आदिजोशी Mon, 06/16/2014 - 17:14
उगाच बोंबाबोंब नका करू. इथे किती जणं ह्याचा अर्थ आपल्यापैकी किती जणं असा आहे. किती डॉक्टरांना असा नाही. तसं वाटण्याइतपत मी बाळबोध नाही. इथे चर्चा करणार्‍यालोकांपैकी किती असा अर्थ आहे.

In reply to by आदिजोशी

इथे किती जणं ह्याचा अर्थ आपल्यापैकी किती जणं असा आहे.
वॉट अ ज्योक! मग पेशंट आणि डॉक्टरमधे फरक काय राहिला? उगीच भंकस करण्यापेक्षा पहिल्यांदाच संयमित प्रतिसाद दिला असता तर ही वेळ आली नसती.

प्रसाद१९७१ Mon, 06/16/2014 - 12:01
ज्यांना होमिओपॅथीच्या उपयुक्ततेविषयी शंका आहे ते स्वतः औषधे घेऊन पडताळणी का करत नाहीत?
मला शंका नाही तर खात्री आहे की होमिओपाथी म्हणजे भंपकपणा आहे. त्यासाठी मी कशाला खात्री करत बसु. मी माझ्या कुठल्याही आजारावर होमिओपाथी चे औषध घेणार नाही, इतकी मला त्याच्या भंपकपणाबद्दल खात्री आहे. तुम्हाला जर होमिओपाथी ची इतकी खात्री आहे तर तुम्ही modern medicine चे एक ही औषध घेउ नका ( कधीही )

In reply to by प्रसाद१९७१

आदिजोशी Mon, 06/16/2014 - 12:21
तुमच्या होमिओपाथी म्हणजे भंपकपणा आहे ह्या विधानाला काही शास्त्रीय आधार आहे का? काही विदा आहे का? तुम्ही ह्या कंक्ल्युझनला पोचण्याआधी काही चाचण्या केल्या आहेत का? केल्या असतील तर त्यांचे परिणाम काय आलेत? चाचण्यांचे आधार शासनमान्य होते का? असतील तर कोणते, नसतील तर कोणाच्या अधिकारात चाचण्या झाल्या? ज्या औषधांवर चाचण्या घेतल्या ती प्रमाणित होती का? जी काही उत्तरं मिळाली ती शासनमान्य संस्थेकडून प्रमाणित करून घेतली का?

In reply to by आदिजोशी

प्रसाद१९७१ Mon, 06/16/2014 - 12:27
अहो होमिओपाथी भंपकपणा नाहीये हे सिद्ध करण्याचे Burden of Proof माझ्यावर नाहीये. मला Modern Medicine ची औषधे शास्त्रिय कसोट्या घेउन प्रमाणित केली अशी वाटतात, त्यामुळे ती मी घेतो.

In reply to by प्रसाद१९७१

आदिजोशी Mon, 06/16/2014 - 12:42
उद्या मी म्हणालो की न्यूटनचे नियम भंपक आहेत तर ते सिद्ध करायची जबाबदारी माझीच आहे. तुम्हाला पर्यायी काय घ्यायचंय ते तुम्ही घ्या. उद्या सर्दी घालवण्यासाठी कोंबट पाण्यात रम घालून प्यायलात किंवा गोमुत्राने गुळण्या केल्यात तरी माझ्या बा चे काही जात नाही. मला बस आवडत नाही म्हणून मी ट्रेन वापरणे ठीक आहे. पण शेकडो लोकांनी अनुभव घेतल्यावरही 'बस माझ्या गंतव्य स्थानी जातच नाही आणि बस नावाची कोणती वस्तू अस्तीत्वातच नाही' असं मी म्हणाल्यावर ती तशी नाही हे मलाच सिद्ध करायला हवे. एखादी गोष्ट खोटी आहे असे ठासून सांगण्यासाठी ती तशी असल्याचे पुरावे सादर करायलाच हवेत. नाही तर तो नुसताच हवेतला गोळीबार ठरतो. जो आत्ता तुमचा आणि अनेकांचा चाललाय. आणि होमीओपॅथी हा भंपकपणा असून ती बुवाबाजी, काळी जादू इत्यादिंच्या रांगेत बसवण्यायोग्य आहे असे आपले ठासून मत असल्यास सरकार ह्या शाखेचे शिक्षण देऊन त्याच्या पदव्या का देते हे सुद्धा सांगा. माझ्या माहितीत तरी कुणाला बुवाबाजीची अथवा काळ्या जादूची पदवी मिळाल्याचे माहिती नाही.

In reply to by आदिजोशी

माझ्या माहितीत तरी कुणाला बुवाबाजीची अथवा काळ्या जादूची पदवी मिळाल्याचे माहिती नाही.
मुंबईच्या लोकल मधे फिरुन पहा एकदा ... किमान १० 'गोल्डमेडॅलिस्ट' बाबांची जाहिरात सापडेल ... वशीकरण स्पेशालिस्ट .... हॅशटॅग "मेरे किये काम को काटनेवाले को नगद इनाम" =))

In reply to by आदिजोशी

चुकीचे लॉजिक ! आमच्य अंदाजा नुसार : " होमिओपॅथी भंपक आहे " हे सिध्द करण्याची गरज नाही तर "होमिओपॅथी भंपक नाही " हे सिध्द करण्याची गरज आहे येथ H0 : होमिऑपॅथी भंपक नाही व्हर्सेस H1: होमिओपॅथी भंपक आहे. असे असले पाहिजे ... ( होमिऑपथी भंपक आहे हे म्हणण्याने आपण कोणाच्या आयुष्याशी खेळ करत नाहीये जे की होमिओपॅथी भंपक नाही असे म्हणण्याने होवु शकते जी की टाईप १ एर्रर आहे ! )

In reply to by प्रसाद गोडबोले

आदिजोशी Mon, 06/16/2014 - 12:47
जर एखादी गोष्ट अनेक वर्ष अनेक लोकांना परिणाम देत आहे, तर ती तशी नाही व भंपक आहे असं म्हणणार्‍याने ती तशी सिद्ध करायला नको का? पॄथ्वी सपाट नाही गोल आहे असं म्हणणार्‍यावर ती गोल असल्याचे पुरावे द्यायची जबाबदारी नाही का? मिपावर शास्त्रज्ञ नसल्याने विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाणार नाहीत म्हणून होमिओपॅथी भंपक ठरत नाही. इथे किती जण क्रोसिन कसं काम करते हे शेवटच्या डिटेलपर्यंत सांगू शकतात?

In reply to by आदिजोशी

बरेच दिवस हायपॉथेसिस टेस्टींगचा अभ्यास केलेला नाहीये सो खात्रीने सांगु शकत नाही ... पण "नल हायपॉथेसिस हे साधारणता नल अर्थात होमिऑपॅथीचा परिणाम = शुन्य ० व्हर्सेस अल्तरनेट : होमिऑपॅथीचा परिणाम शुन्य नाही " असाच ठेवावे लागेल . (सध्या खात्रीने सांगु नाही , बी.एस्सी ३ आणि एमे.स्सी १ ला अभ्यास केलाय आता ६ -७ वर्ष झाली )

In reply to by आदिजोशी

सुबोध खरे Mon, 06/16/2014 - 13:06
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1375230/ जोशी साहेब लान्सेट नावाचे जगविख्यात नियतकालिक यांनी होमियोपथिच्या असंख्य संशोधनपर कागदांचे विश्लेषण करून ते साबुदाण्याच्या गोळ्यांपेक्षा जास्त प्रभावी नाही असे सिद्ध केले आहे त्यातील एक विदा मी वर दिली आहे. आपण होमियोपथी आणि लान्सेट गुगल करून पहा. बाकी थोडे सावकाशीने.

In reply to by सुबोध खरे

गवि Mon, 06/16/2014 - 13:14
लॅन्सेटपर्यंत कशाला जायचे.. अहो त्यात साखरेखेरीज द्रव्य असेल तर ना परिणामकारक ठरणार. हां आता साखरेतच अनेक औषधी गुण असतील तर मग म्हणणे काही नाही. लॅन्सेट ही वैद्यकशास्त्रातली फार पुढची गोष्ट झाली. त्याने यात लक्ष घालण्याच्याही आधी निव्वळ भौतिकशास्त्राच्या आधारे क्वांटिटीविषयी केलेले साधे प्रश्न होमिओपथीला उत्तरु देत. असे प्रश्न इथे पूर्वी उपस्थित केलेले आहेत. त्यात टीका, आक्रस्ताळेपणा इ इ अजिबात नव्हता. तरीही तेवढ्या बेसिक प्रश्नांची उत्तरे अद्यापही समाधानकारक .. अगदी असमाधानकारकही... मिळालेली नाहीत. बेसिक प्रश्नही न विचारता काही स्वीकारायचे म्हणजे कठीणच. होमिओपथीच्या गोळीत औषधाचा अंश असतो इतके जरी सिद्ध झाले तरी मी ते घेऊन त्याचा उपाय होईल हे मानायला तयार आहे. पण द्रव्यच नाही तरी उपाय होईल असे मानणे म्हणजे यातुवादाचा स्पर्श होतो. असो. सदरील लेखात प्रत्यक्ष द्रव्य पोटात जातेय असे उल्लेखावरुन वाटल्याने आनंद झाला. पण लगेच ते घासकडवी आले आणि त्यांनी फाईव्ह ग्रेनचा खडा टाकला.

In reply to by सुबोध खरे

आदिजोशी Mon, 06/16/2014 - 13:23
गुगल केल्यावर होमिओपॅथीला विरोध करणारे आणि समर्थन देणारे असे दोन्ही रिझल्ट्स मिळाले. होमिओपॅथीचा उपयोग होतो हे अनुभवसिद्ध असल्याने नाकारायचे कोणत्या आधारावर? आणि हे एखाद दोन वेळा आलेले अनुभव नाहीत (उदा. गंडा ओवाळणे, विष उतरवणे, इ.) कैक वर्षांचे, वेगवेगळ्या आजारांबाबतचे अनुभव आहेत.

स्पा Mon, 06/16/2014 - 14:13
सुबोध खरे यांचे प्रतिसाद मस्तच माझ्याबाबतीत होमिओपॅथी आणि आयुर्वेद दोन्हीचे बरीच वर्ष अनुभव घेऊनही गुण शून्य आला, तेच allopathy मुळे गुण भराभर आला , आणि रिक्वरी सॉलिड झाली. त्यामुळे वरील दोन्ही प्याथ्यांवरचा विश्वास कायमचा उडालेला आहे , कारण आयुष्याची बरीच वर्षे आणि पैसे या उपचारांवर घालवली, वर आयुर्वेदिक औषधे इतकी भयंकर महाग असतात कि बस रे बस
पण तरीही वर मृत्युंजय आणि आदि जोशी यांच्याशी सहमत
इतर लोकांची जी काय लेवल ला जाऊन गरळ ओकणे आणि निंदा करणे सुरुये, धन्य वाटले :)

प्रभाकर पेठकर Mon, 06/16/2014 - 17:37
मला स्वतःला वयाच्या बाराव्या वर्षी टॉन्सिल्सचे 'ऑपरेशन करून घ्या' असा सल्ला मिळाला असताना होमिओपॅथीच्या औषधाने गुण आला. त्रास दूर झाला. आजतागायत त्रास नाही. बाकी आमचे डॉक्टर आयुर्वेदीक औषधेच द्यायचे त्यानेच नेहमी आमच्या आख्या कुटुंबाला स्वास्थ प्राप्त झाले आहे. काविळीच्या बाबतीत अनुभव जरा जास्त भयानक होता. माझा एक मित्र काविळ अंगावर काढल्याने आणि उशिरा हॉस्पिटलात दाखल केल्यामुळे ऐन तारुण्यात दगावला. त्या नंतर आठवड्याभरात मलाही काविळ झाली. अगदी मल निस्सारण खडूच्या रंगासारखे पांढरे फटक व्हायला लागले. पण अ‍ॅलोपॅथीबदल आठवड्याभरापूर्वीचा मित्राचा मृत्यू (अर्थात त्याने काविळ अंगावर काढून दवाखान्यात जायला उशिर केला होता त्यामुळे पॅथीला दोष देता येत नाही) अनुभवला असल्याने, मी कोणाच्या सांगण्यावरून एका वैद्याचे घरगुती औषध दोन आठवडे घेतले आणि तात्काळ गुण आला. माझ्या एका मित्राला डोक्यात 'चाई' नांवाचा कांही त्वचारोग होऊन केस जात होते. डोक्यात टकलाचा पॅच तयार व्हायचा. तो डोक्यावर सर्वत्र फिरायचा. अ‍ॅलोपॅथीचा कांही उपयोग झाला नाही. त्याने बोरिवलीच्या वझिरा नाका येथील एका वैद्याचे औषध केले. तो कसलासा झाडपाल्याचा लेप लावायचा. आग व्हायची. कांही प्रमाणात तिथे फोडही यायचे पण महिन्याभरात 'चाई' पूर्ण पण अदृष्य झाली. आजतागायत काही त्रास नाही. ह्यांना योगायोग म्हणा, प्लासिबो इफेक्ट म्हणा, शास्त्र म्हणा किंवा वैद्यकाचे ज्ञान म्हणा ऊपाचार परिणामकारक ठरले आहेत ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

काविळीचे घरगुती औषध पुण्यात खुन्यामुरलीधर मंदिरातले खरे वैद्य द्यायचे. मला स्वतःला ५ वर्षाचा असताना झालेली कावीळ, भावाला १२ वर्षाचा असताना झालेली कावीळ वडीलाना ४२ वर्षी झालेली कावीळ केवळ खरे वैद्यांचे औषध घेऊन बरी झाली. पुण्यातले एक मान्यताप्राप्त अ‍ॅलोपथी डॉक्टरांनी औषधे दिली होती पण खरे वैद्यांचे औषध चालू ठेवा असेच सांगितले होते. माझ्या मित्राच्या डोक्यावरील चाई शनिवार पेठेतल्या खडीकर वैद्यांनी आयुर्वेदीक औषधांनी बरी केली. ते आयुर्वेदीक औषधाचे इंजेक्षन देखील देत असत डोक्याच्या कातडीमधे. :-)

धन्या Mon, 06/16/2014 - 17:52
होमिओपथी थोतांड आहे की नाही हे माहिती नाही. मात्र काही या अनुषंगाने काही प्रश्न मला नेहमी पडतात. १. होमिओपथीला जर वैद्यकीय जगतात मान्यता नाही तर सरकारचे आरोग्यविज्ञान विद्यापीठ या विषयातील पदवी कसे काय देते? या विषयातील पदवीधरांना आपल्या व्यवसायाच्या बोर्डवर नावापुढे डॉ. कसे काय लिहू देते? २. मी माझ्या आजवरच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा मी आजारी पडलोय तेव्हा तेव्हा मी होमिओपथी डॉक्टरांकडेच गेलो आहे. त्यांच्या औषधाने मी बराही झालोय. ते कसे काय? ३. इथे होमिओपथीच्या नावाने शंख करणार्‍या किती जणांनी मटेरीया मेडिका वाचले आहे किंवा किमान चाळले आहे? ४. केवळ आपल्याला "गुण आला नाही" म्हणून तर विरोधी बाजू हिरीरीने मांडली जात नाही ना? व्यक्ती तितक्या प्रकृती* या न्यायाने "गुण आला नाही" हा प्रकार अ‍ॅलोपथी औषधांच्या बाबतीतही होऊ शकतो. * इथे प्रकृती हा शब्द शरीरप्रकृती अशा अर्थी वापरला आहे, स्वभावधर्म अशा अर्थी नाही.

In reply to by धन्या

चित्रगुप्त Mon, 06/16/2014 - 18:19
बायोकेमिक औषधांच्या नावाने निव्वळ मिल्क शुगर, आणि होमियोपाथिक औषधांच्या नावाने फक्त साख्रेच्या गोळ्यांमधे साधे आल्कोहोल घालून मी स्वतः अनेकदा दिलेले आहे (त्याचे तात्कालीन कारणही होते, ते म्हणजे मूळ औषधांची अनुलब्धता) गंमत म्हणजे त्या औषधांचाही परिणाम झालेला आहे. आमच्या दुकानावर संध्याकळच्या वेळी होमियोपॅथ मडळींची मैफल जमायची, त्यात मी अमूक रोग्याला अमूक औषधाच्या एकाच डोसाने ठीक केले, वगैरे गप्पा असत. ते ऐकून करमणूक होई.

In reply to by चित्रगुप्त

गवि Tue, 06/17/2014 - 15:50
चित्रगुप्तकाका.. अगदी राहावत नाही म्हणून या धाग्यावरची तुमची काही विधानं एकत्र करतो आहे. ती संदर्भ सोडून काढल्यासारखी वाटली तरी इथे याच पानावर ती विखुरलेली असल्याने कोणालाही ती मूळ विधानं पाहता येतील. विधानं खाली क्वोट करण्यापूर्वी मला मुख्यतः पडलेला प्रश्न असा की तुम्हाला होमिओपथीबद्दल नेमका कोणता मुद्दा किंवा बाजू मांडायचीय? तुम्ही कधी रुग्णाच्या, कधी विक्रेत्याच्या भूमिकेतून लिहिलेय. एकीकडे तुम्ही स्वतः अशी औषधे दिली आहेत असंही लिहिलंय. कधी तुम्ही तिला उपयोगी म्हणता, कधी प्लासेबो म्हणता, कधी त्यात काहीही औषध नसते हे मान्य करता, तरीही लक्षणे डीटेलवार विचारण्याचं/नोंदवण्याचं आणि तदनुसार औषध निवडण्याचं महत्व अधोरेखित करता, मधेच जादुई हद्दीत प्रवेश करता, मधेच अज्ञेयवाद स्वीकारता. होमिओपथीविषयी तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ? >>>
प्राचीन ग्रीक वैद्य (याक्षणी त्याचे नाव आठवत नाहीये) त्या त्या वनस्पतीजवळ शांतपणे ध्यान लावून बसत असे, आणि ती वनस्पतीच त्याला स्वतःचे वैद्यकीय गुण 'सांगत' असे (वा अंतःप्रज्ञेने ते कळत असे म्हणा) आणि ते तो लगेच लिहून घेत असे, असे वाचल्याचे आठवते. मला स्वतःला हे पूर्णपणे शक्य वाटते. अर्थात त्या व्यक्तीची तेवढी क्षमता असायला हवी.
गूढता, चमत्कार ?
होमियोपाथीचा अत्यंत चांगला अनुभव मला आहे
होमियोपाथीच्या सैद्धांतिक अंगाविषयी --- म्हणजे अमूक औषध अमूक पोटन्सीचे घेतल्याने अमूक परिणाम होतो वगैरे--- याबद्दल शंका घेण्यासारखे अनुभव पण भरपूर आहेत.
एक दुकानदार म्हणून जे अनुभव माझ्या गाठीशी आहेत, ते अकल्पनीय आहेत, आणि फारच कमी जणांना ठाऊक असतील, असे आहेत... ते इथे उघड करावेत की नाही, याबद्दल मी अजून ठाम होऊ शकलेलो नाही.
खुद्द होमियोपाथीचे औषध निर्माते यातील अगदी खास गुपीते सांगू शकतील, पण ते तसे कधीच करणार नाहीत...
काही संशयास्पद ? काळेबेरे ?
सिद्धांत काहीही असो, औषध निर्माते, एजंट आणि विक्रेते, यांच्या माध्यमातून आलेले औषध नेमके काय, कसे असेल, मुळात ते औषध तरी असेल की नुस्तीच मिल्कशुगर/साखरेच्या गोळ्या किंवा साधे अल्कोहोल असेल, हे कोणत्याही टेस्ट द्वारे सांगता येत नाही.
नाही ना सांगता येत टेस्टद्वारे? म्हणजे मूळ औषधाचा एक रेणूही त्या गोळ्या / द्रावणात नसतो हे स्पष्ट आहे ना?
तरीही बरेचदा गुण येतो (बरेचदा येत सुद्धा नाही) याचे कारण 'प्लासिबो इफेक्ट' असावा, असे वाटते.
मान्य.. प्लासेबोमुळे गुण येऊ शकतो. म्हणून मॉडर्न मेडिसिनमधे टेस्ट करताना औषध विरुद्ध प्लासेबो अशी करुन त्याचे निकाल प्लासेबो गुणांपेक्षा किती अधिक आले ते नोंदवलं जातं. होमिओपथीमधे प्लासेबो हा एक इफेक्ट असू शकतोच. आणि अन्यत्र सगळीकडे घेतला जाणारा आक्षेप असा की लहान बाळं, प्राणी यांना प्लासेबो हा मानसिक इफेक्ट कसा होईल.. तर तसं म्हणणं नाहीच आहे. प्रौढ मनुष्यव्यक्तीबाबत अनेक केसेसमधे प्लासेबो आणि प्राणी, लहान मुले आणि उर्वरित प्रौढांमधे काकतालीय न्याय, शरीराकडून आपोआप कालानुसार रोगनिवारण होणे अशी कारणं असू शकतात. लहान मुलांची व्हायरल सर्दी कोणत्याच औषधाने बरी होत नाही. ती व्हायरसचा कोर्स पूर्ण झाल्यावर बरी होते. मधल्या काळात साखरगोळी किंवा अ‍ॅलोपथी किंवा कारल्याचा रस किंवा अन्य काही घेतले किंवा न घेतले तरी मूळ रोगात फरक पडत नाही. सात दिवसांनी सर्दी आपापतः बरी झाल्यावर श्रेय कारल्याच्या रसाला किंवा अन्य कशालाही देता येते.
एवढे सर्व ठाऊक असूनही अजूनही आम्ही होमियोपाथिक डॉ. कडे जातो, आणि ती घेऊन बहुतेकदा फायदाही होतो.
मटेरिया मेडिका मधील असली वर्णने म्हणजे कल्पनेच्या भरार्‍या असाव्यात, असे मलातरी वाटते. खरे-खोटे डॉ. हनिमन जाणोत.
????!!!
फायदा तर होतो, पण त्याबद्दल जो सिद्धांत सांगितला जातो, तो कितपत खरा आहे, हा प्रश्न असू शकतो.
पण सर्वत्र तोच सिद्धांत प्रचलित आहे. त्याला कोणी आल्टर्नेट सुचवलेला नाही.
होमियोपाथी औषधांचा व्याधिनिवारणासाठी उपयोग होतो, याचा भरपूर अनुभव मला आहे, आणि असे अन्य अनेक लोक माझ्या परिचयात आहेत.
ओके.. आणि मग..
बायोकेमिक औषधांच्या नावाने निव्वळ मिल्क शुगर, आणि होमियोपाथिक औषधांच्या नावाने फक्त साख्रेच्या गोळ्यांमधे साधे आल्कोहोल घालून मी स्वतः अनेकदा दिलेले आहे (त्याचे तात्कालीन कारणही होते, ते म्हणजे मूळ औषधांची अनुलब्धता) गंमत म्हणजे त्या औषधांचाही परिणाम झालेला आहे.
आँ? नुसत्या साखरगोळ्याच द्यायच्या तर लक्षणांचा तपशील विचारुन नोंदवण्याचे प्रयोजन काय? पेशंटला आपली चौकशी झाली असा आनंद मिळण्यासाठी चार जुजबी प्रश्न बास असतात. किंवा नाडी पकडून बसावं घटकाभर. शेवटी रिकामी साखरगोळी देऊनही उपाय होत असेल तर मग आधीची डीटेलवारी कशाला?
होमियोपाथीची औषधे ही अमूक रोगावर अमूक औषध अशी ठोकळ नसून लक्षणांप्रमाणे औषध दिले जाते. म्हणूनच डॉक्टर आधी रोग्याला खूपसे प्रश्न विचारत असतात.
आमच्या दुकानावर संध्याकळच्या वेळी होमियोपॅथ मडळींची मैफल जमायची, त्यात मी अमूक रोग्याला अमूक औषधाच्या एकाच डोसाने ठीक केले, वगैरे गप्पा असत. ते ऐकून करमणूक होई.
का करमणूक होई ? त्यात बढाई असे का? की नुसत्या गोळ्यांनी प्लासेबो इफेक्ट होण्याइतके मर्यादित उपचार देताना डॉक्टर्स उगीच मी अमुक दिले, तमुक डोस दिला असे म्हणत असल्याने करमणूक व्हायची? गोंधळात पाडणारी विधाने दिसली म्हणून केवळ विचारले. जर होमिओपथीमधे काही गूढरम्य नसून त्यामागे औषधाची दाखवून देता येणारी क्वांटिटी असते इतकी साधी खात्री किंवा खुलासा जरी केला तरी औषधांच्या प्रत्यक्ष गुणांविषयी माझ्याकडून काहीही भाष्य नसेल आणि मी होमिओपथीची उपयुक्तता तत्वतः मान्य करीन. पण हे असे साधे शंकासमाधान होण्याऐवजी आजपर्यंत व्यक्तीसापेक्ष अनुभवांच्या अधिकाधिक नोंदीच सांगितल्या जातात. असो.

In reply to by गवि

चित्रगुप्त Tue, 06/17/2014 - 17:50
होमिओपथीविषयी तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ?
मला काय काय म्हणायचं आहे, ते मी वेगवेगळ्या प्रतिसादातून लिहिलेलं आहेच, परंतु बुद्धीमान वाचकांना त्यातून जी एक तार्किक सुसंगती अपेक्षित असते, तिच्या अभावी मला नेमकं काय म्हणायचं आहे, असा प्रश्न पडलेला असावा. माझ्या मते जीवनातील प्रत्येक गोष्टच बरीच गुंतागुंतीची असते. जसजसा आपला अनुभव वाढत जातो, तसतसे परस्पर-विरुद्ध गोष्टींच्या ताण्या-बाण्यातून ती आकार घेत असल्याचे जाणवू लागते, आणि मग अमूकच एक बाजू खरी असायला हवी, हा आग्रह क्षीण होत जातो. आपल्या मनो-शरीर रचनेत - (वाटल्यास यात 'आत्मिक' हा शब्द पण घालावा) रोगांना बळी पडण्याची, आणि त्याचबरोबर त्या रोगांवर मात करून त्यातून सुटका करून घेण्याचीही क्षमता वा यंत्रणा असतेच. या यंत्रणेला कश्यानेतरी चालना मिळाली, तर ती जोमाने कार्य करते. सकारात्मक वा नकारात्मक विचारांमुळे, उपयोगी वा हानिकारक औषधांच्या प्रभावामुळे, श्रद्धा वा ठाम समजुतीमुळे, भितीमुळे, प्रेमामुळे, प्रोत्साहन वा खच्चीकरणामुळे, संगीत वा गोंगाटामुळे, सुवास वा दुर्गंध, सुंदर स्वच्छ वातावरण वा घाणेरडे वातावरण अश्या अनेक प्रभावांमुळे आपली मनस्थिती, स्वास्थ्य, उत्साह, शक्ती घडत वा बिघडत असते. या नैसर्गिक यंत्रणेला चालना मिळण्यासाठी 'स्वयंसूचना' मिळणे हे महत्वाचे असते. ती कश्यातूनही मिळू शकेल. त्यामुळे 'औषध' नसलेले औषध, कुण्या स्वामींनी दिलेला प्रसाद वा आशिर्वाद, नुस्ते पाणी पिणे, आपण बरे होत आहोत -- वा रुग्ण होत आहोत अशी निव्वळ कल्पना, कोणत्यातरी पॅथीचे औषध, हवापालट, मित्रांचा वा प्रिय व्यक्तीचा सहवास वा विरह, अश्या अनेक गोष्टींमधून मिळणार्‍या स्वयंसूचनांमुळे ही यंत्रणा कामाला लागते. एका अर्थी ही यंत्रणा शिडीसारखी वा जिन्यासारखी असते, असे म्हणता येईल. त्या शिडीने वरही जाता येते, आणि खालीही उतरता येते. फक्त आपण कोणत्या दिशेने जात आहोत, यावर ते अवलंबून असते. समजा, डॉक्टर देत असलेले एकादे होमियोपाथी औषध हे निव्वळ साखर्/अल्कोहोल आहे. परंतु ते दिवसातून चारदा घेतले, तर तितक्यांदा यंत्रणेला स्वयंसूचना मिळते. त्यातून डॉक्टर नावाजलेला असणे, त्याच्याकडील गर्दी व लोकांचा त्याच्यावर असलेला विश्वास, डॉक्टराने "तुम्ही आता अगदी योग्य जागी आलेले आहात, आता तुम्ही बरे होणारच" असा दिलेला दिलासा, अनेक प्रश्न बारकाईने विचारून, त्यानंतर औषध दिल्याने पेशंटची पटणारी खात्री, डॉक्टराचे गोड बोलणे, तो पेशंटास देत असलेला आदर-सन्मान, अश्या अनेक गोष्टींमधून ती स्वयंसूचना अधिकाधिक प्रबळ होत जाते, आणि परिणामकारक ठरते. समजा मी ठणठणीत असताना अमूक-पाथीची खिल्ली उडवणारापैकी असलो, तरी आजारी पडल्यावर कसेही करून मला लवकरात लवकर बरे व्हायचे असते, या गरजेतून माझी मनस्थिती वा भूमिका बदलेली असते, त्यामुळे माझ्यावर वरील सर्व गोष्टींचा प्रभाव पडतो. अगदी नास्तिक असणारे सुद्धा अन्य सर्व उपाय निरुपयोगी ठरल्यावर गंडे-दोरे, मंत्र-तंत्र इ. कडे सुद्धा वळतात, असे बघण्यात येते, कारण तेंव्हा या गोष्टी खर्‍या की खोट्या, यापेक्षा संकटातून मुक्त होणे, हे महत्वाचे वाटत असते.

In reply to by चित्रगुप्त

असंका Tue, 06/17/2014 - 18:43
आपण स्वतःच वर लिहिल्याप्रमाणे आपण फार जवळून हे सर्व बघितले आहे. काही काही गैरप्रकारही आपल्याला परीचित आहेत. पण आपण असे तर म्हणत नाही ना, की होमिओपॅथिक औषध असे कुठेच मिळत नाही? एखादवेळी औषध उपलब्ध नसणे आणि त्यामुळे वेळ मारून नेणे वेगळे. वरच्या भडीमाराने आपण गोंधळून जाऊन मनाविरूद्ध असे लिहिले आहेत का? कारण आपण सरळ सरळ सर्व मानसिक असल्याचे मान्य केले आहे. त्याहून कहर म्हणजे आपण होमिओपॅथीला पार गंडे दोर्‍याच्या बरोबरीला आणून बसवले आहे. ४ ते ५ वर्षे अभ्यास करून जी डॉ.ची पदवी होमिओपॅथ मिळवतात त्यांचा आपण अशा पद्धतीने सन्मान करताय का? आपण स्वतः याचा जवळून अभ्यास केलेला आहे असं वाटतं. मग मला सांगा, हे सर्व जर स्वयंसूचनेवरच अवलंबून असेल, तर १. कधी पहिल्याच उपाययोजनेने गुण येतो, तर कधी औषध बदलून दिल्यावर हे कसे? २. एकदा तर एका डॉक्टरनी मला जास्तीत जास्त दोन प्रश्न विचारून औषध दिले होते. मग दिलासा देण्याचा प्रश्नच कुठे येतो? ३. एकदा तर लक्षणे अधिक तीव्र झाली होती. (प्रूव्हिंग). मला 'ही' सूचना कधी मिळाली नव्हती. मग औषध बदलल्यावर तत्काळ आराम मिळाला. आता 'औषधाची मात्रा पोटात जाते' असे कुठ्ल्या टेस्टमध्ये दिसत नाही, म्हणून काय मला जे बरे वाटत आहे तेच मानसिक आहे असे म्हणायचे का?

In reply to by असंका

चित्रगुप्त Tue, 06/17/2014 - 19:17
वर म्हटल्यप्रमाणे हे सर्व प्रकरण फार जटिल आहे, आणि अमूकच खरे, असे सांगणे कठीण आहे. मनो-शारीरिक यंत्रणेला चालना मिळणे गरजेचे असते. ती औषधाच्या प्रभावाने वा अन्य प्रभावांमुळेही मिळू शकते. औषध कंपनीकडून माल पाठवण्यात होणारी दिरंगाई व त्याकाळी कलकत्त्याहून सामान पोचण्यास लागणारा वेळ इ. मुळे खुद्द एजंट आम्हाला साधी मिल्कशुगर वगैरे देण्यास सांगत. यावरून मला अशी शंका यायची की मुळात कंपनी तरी खरेखुरे औषध बनवते की नाही ? ४-५ वर्षे अभ्यास करून डिग्री मिळवली, पण मुळात औषधेच जर बोगस असली, तर कोण काय करणार? अश्या औषधांचाही परिणाम जर होत असेल, तर तो स्वयंसूचनेचाच प्रभाव म्हणावा लागेल. अर्थात औषध कंपनीत काम करणारेच यावर प्रकाश टाकू शकतील. त्याबद्दल माझ्याकडे खात्रीची माहिती नाही. दुसरे म्हणजे होमियोपाथीच्या दुकानाचा माझा संबंध तुटून आता चाळीस वर्षे झालेली आहेत. त्यामुळे मला अलिकडचे काही ठाऊक नाही. मुळात एकादी व्याधि होते म्हणजे नेमके काय घडते, आणि ती बरी होणे म्हणजे काय, याबद्दलही वेगवेगळी मते/सिद्धांत आहेत. आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून बघता कफ वात पित्त यातील असंतुलनाला व्याधि म्हटले जाते, वगैरे. माझ्यापुरते बोलायचे झाले, तर मला अ‍ॅलोपाथीचा बहुतेकदा वाईटच अनुभव आलेला आहे.

In reply to by चित्रगुप्त

असंका Tue, 06/17/2014 - 19:54
अहो साहेब जे काय जटील आहे, ते वैज्ञानिक लोक बघून घेतील. आपण सांगा,की आपण ज्या गोष्टींबद्द्ल इथे लिहित आहात, ते अपवादात्मक होते की अगदी दर १० मध्ये ३, ४ वेळा इतके सर्रास चालते...! माझ्या अनुभवाने औषध घेतल्याने योग्य/अयोग्य औषधानुसार लक्षणे कमी जास्त अशी दोन्ही होतात. सर्व मानसिक असते, तर लक्षणे वाढली कशी असती, आणि मग कमी कशी झाली असती? तेही कुणीही सुचना न देता! आता अजून पर्यंत समजल्या नाहित अशा काही गोष्टी असतील, म्हणून काय आम्हाला आलेला गुणच खोटा म्हणायचा?

In reply to by असंका

चित्रगुप्त Tue, 06/17/2014 - 19:58
अपवादात्मक होते की अगदी दर १० मध्ये ३, ४ वेळा इतके सर्रास चालते
....अपवादात्मक होते.. बाकी मी स्वतः अजून होमियोपाथीचीच औषधे घेतो, हे लिहिले आहेच.

In reply to by गवि

असंका Tue, 06/17/2014 - 21:04
असं म्हणतात की विमानचालन शास्त्रानुसार (law of aviation) भुंगा उडू शकत नाही. अनेक वर्षे अनेक लोक हे सत्यच समजून चालले होते. सर्वसामान्य पद्धतीने ही गोष्ट मी पूर्वीच ऐकली होती, आणि ती खरी नाही हेही मला जाणवले होते. गणितात गृहितके चुकली की चुकीचे निष्कर्ष मिळतात तसं. ज्या शास्त्रानुसार लोक भुंग्याच्या उडण्याचा अभ्यास करत होते, ते तिथे लागू नव्हते. विमानचालन शास्त्र विमानांच्या स्थिर, गुळगुळीत आणि मोठ्या पंखांसाठी आहे. भुंग्यांचे पंख वेगळे असतात. ते खडबडीत, लवचिक, आणि सतत हलणारे असतात. पण मग त्याचे गणित तर मांडता यायला हवेच. हवे तर गृहितके बदला. साहेब मला सांगा हे गणित आता शेवटी सोडवले गेले आहे का? आणि जोपर्यंत ते सोडवले गेले नव्हते तोपर्यंत भुंगे जादूने उडत होते का?( त्या विषयातला आपला अभ्यास आणि अधिकार असावा असे आपल्या आधीच्या एका लेखावरनं माझे मत आहे. वैयक्तिक होत असल्यास क्षमस्व.) एखादी गोष्ट अगदी सर्वत्र होते तर आहे, पण का होते हे कळत नाही! फक्त का होते ते कळत नाही म्हणून "असं काही होतंच नाही आहे, फक्त आपल्याला असं वाटतंय की असं होत आहे" असं म्हणायचे झाल्यास अगदी कालपर्यंत "भुंगे उडत नाहीचेत...फक्त आपल्याला असं वाटतंय की भुंगे उडत आहेत" असं म्हणावं लागलं असतं.

In reply to by असंका

राजेश घासकडवी Tue, 06/17/2014 - 21:51
तुम्ही एक गहन महत्त्वाचा प्रश्न मांडला आहे, ज्याला उत्तर देणं आवश्यक आहे. प्रथम विमानशास्त्राबद्दल जी विधानं आहेत ती बघू. भुंगा विमानशास्त्रानुसार 'उडू शकत नाही' असं कोणीही वैज्ञानिकाने गमतीखेरीज म्हटलं नसावं.
ज्या शास्त्रानुसार लोक भुंग्याच्या उडण्याचा अभ्यास करत होते, ते तिथे लागू नव्हते.
तुम्हाला काय म्हणायचं आहे हे समजतं आहे, पण 'शास्त्र लागू नाही' हे टोकाचं, म्हणून चुकीचं विधान ठरतं. 'इतका जटील प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी यंत्रणा, मॉडेल्स अजून विकसित झाली नाहीत' हे विधान जास्त बरोबर आहे. उदाहरणार्थ, तीन तारे एकमेकांच्या गुरुत्वीय बलांमुळे कसे फिरतील हा सर्वसाधारण प्रश्न सुटलेला नाही. कारण त्याचं गणित खूप किचकट आहे. दोन तारे आणि एक छोटासा ग्रह, किंवा ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह, आणि त्याला असलेला उपग्रह अशा काही विशिष्ट बाबतीत समाधानकारक उत्तरं सापडतात. पण म्हणून तीन ताऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी 'न्यूटनचे नियम असलेलं शास्त्रच चुकीचं आहे' किंवा 'ते उत्तर सापडेपर्यंत कुठचे तीन तारे एकमेकांभोवती फिरतच नव्हते काय?' असा प्रश्न विचारणं बरोबर नाही. अर्थात हा थोडा तांत्रिक मुद्दा झाला. तुमचा रोख साधारण असा दिसतो की 'भुंग्याच्या उडण्याचं गणित आपल्याला नीट मांडता येत नाही, म्हणजे भुंगा उडतच नाही असं म्हणणं चुकीचं आहे.' हा मुद्दा स्वीकारार्ह आहे आहे. मात्र या बाबतीत त्याचं समांतर विधान असं होतं 'होमिओपथीचा फायदा होतो तो कसा होतो ते कळत नाही, म्हणून होमिओपथीमध्ये तथ्यच नाही असं म्हणणं चुकीचं आहे.' हे विधान मात्र अपुरं पडतं. कारण 'भुंग्याचं उडणं' जितकं उघड आहे तितकं 'होमिओपथीचं कार्य' सिद्ध नाही. कारण इथे कार्य होणं म्हणजे काय? असा प्रश्न येतो. आणि औषधांच्या बाबतीत - 'प्लासिबोपेक्षा अधिक परिणामकारक ते औषध' अशी व्याख्या आहे. अशी परिणामकारकतेची चाचणी जोवर एखादं द्रव्य पास करत नाही, तोपर्यंत त्याला औषध म्हणणं योग्य नाही. भुंग्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर उडणं आणि उडण्याचा भास यामध्ये फरक करायला हवा. पारदर्शक प्लास्टिकच्या दोऱ्याने टांगलेला भुंगा वाऱ्यामुळे उडल्याचा भास निर्माण करतोच. असा भास निर्माण करणारे खोटे कीटक आणि खरोखर उडणारे भुंगे यांत फरक करायला हवा. त्यासाठी काही परिणामकारक चाचण्या आहेत. त्या जर होमिओपथीच्या औषधांनी पास केल्या तर कोणीच तक्रार करणार नाही. मात्र ही औषधं बनवणारे लोक अशा परीक्षांना उतरण्याची तयारी दाखवत नाहीत. वर त्यांच्या डायल्यूशनमुळे औषधाचा एकही रेणू शिल्लक नाही, अशी द्रावणं विकतात. म्हणून तक्रार असते.

In reply to by राजेश घासकडवी

चैतन्य ईन्या Tue, 06/17/2014 - 22:01
जगात सगळीकडचे भुंगे उडतात, पण सगळ्याच होमेपदी लाभते असे नाही. अर्थात हेच तत्व मोडर्ण मेडिसिन बाबत पण आहे पण निदान ते असा म्हणतात की अह्म्ला अजून अभ्यास करायचा आहे. होमेपदी लोकांचे तसे नसते. बाकी बरेच आजार औषध नाही घेतले तरी लवकर बरे होतात पण काहीतरी घेतल्यामुळे बरे होतो असा आपला समाज असतो.

In reply to by चैतन्य ईन्या

चित्रगुप्त Tue, 06/17/2014 - 23:29
बरेच आजार औषध नाही घेतले तरी लवकर बरे होतात पण काहीतरी घेतल्यामुळे बरे होतो असा आपला समाज असतो.
अगदी खरे. खरेतर पुष्कळसे आजार आपोआपच बरे होत असतात. उपायाला श्रेय मिळते एवढेच.

In reply to by राजेश घासकडवी

असंका Wed, 06/18/2014 - 12:51
मी जे बोली भाषेत म्हणालो ते तांत्रिक भाषेत आपण मलाच परत सांगितलेत. पण एव्ढी तांत्रिक भाषा मला झेपत नाही. मी पार हरवून गेलो आप्ल्या भडीमारात. तेव्हा आधी थोडी सुसंगती लावू-(इतर उदाहरणे बाजूला ठेवू. मी काही वैज्ञानिक नाही.)
'इतका जटील प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी यंत्रणा, मॉडेल्स अजून विकसित झाली नाहीत'
....म्हणून ....असा प्रश्न विचारणं बरोबर नाही'
भुंग्याच्या उदाहरणाबाबतीत मॉडेल विकसित नसणे हे आप्ल्याला पुरेसे वाटते, पण होमिओपॅथीत मात्र बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर-
'...हे विधान मात्र अपुरं पडतं, कारण...कार्य सिद्ध नाही'
'त्यासाठी काही परिणामकारक चाचण्या आहेत.'
हे असं का बरं? कदाचित त्या चाचण्यापण तेव्ढ्या विकसित नसतील. मी जे जे औषध घेतले ते योग्य आणि अयोग्य अशा दोन्ही पद्धतींनी माझ्यावर प्रूव्ह झाले. माझ्या शरीराने, जसं कुणी तरी खूप आधी लिहून ठेवलं होतं तसे परीणाम (त्याआधी कुणी न सांगता-) अनुभवलें, जरी इतर अनेक जणांना ते अपूरं वाटलं तरी हे भास नव्हेत. माझ्यापुरतं आणि माझ्या अनुभवातल्या अनेकांच्या बाबतीतही, ते कार्य सिद्ध झाले आहे. अगदी दोन्ही पद्धतींनी. दुष्परीणाम आणि अपेक्षित परीणाम, दोन्ही.

In reply to by असंका

राजेश घासकडवी गुरुवार, 06/19/2014 - 00:23
हे असं का बरं? कदाचित त्या चाचण्यापण तेव्ढ्या विकसित नसतील.
चाचण्या म्हणजे काही रासायनिक चाचण्या नसतात. एका व्यक्तीच्या अनुभवापेक्षा अनेकांचा अनुभव मोजण्याची प्रस्थापित पद्धत असते. डबल ब्लाइंड टेस्ट विषयी वाचून पहा. होमिओपथीच्या गोळ्यांमध्ये 'औषध' किती असतं हे इथे वाचून पहा. 30C Dilution - advocated by Hahnemann for most purposes: on average, this would require giving two billion doses per second to six billion people for 4 billion years to deliver a single molecule of the original material to any patient.

In reply to by राजेश घासकडवी

गवि गुरुवार, 06/19/2014 - 12:23
"औषधी" द्रव्य टप्प्याटप्प्याने विरळ करताना ते जोराजोराने हलवण्याच्या प्रक्रियेमुळे त्या औषधातले गुण स्पिरिट लाईक इफेक्टने द्रावकात (पाणी / अल्कोहोल इ) उतरतात आणि मूळ पदार्थ नाहीसा झाला तरी टिकून राहतात, अशी स्पेसिफिक थिअरी होमिओपथीच्या प्रवर्तकाने मांडली आहे. भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र या सध्या जास्तीतजास्त परिपूर्ण कारणे देऊ शकणार्‍या शास्त्रांच्या नियमानुसार पाण्यात / अल्कोहोलमधे मूळ पदार्थ शिल्लक न राहिल्यावर असा कोणताही "गुणधर्म" अथवा "छाप", अथवा "आत्मिक तत्व" तरंगत अथवा विरघळून राहात नसते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांचेही नियम /गृहीतके बदलतात, ते कदाचित पूर्ण बदलतील किंवा नष्ट होतील. पण आजरोजी मूळ पदार्थ अस्तित्वातच नसताना त्याचे गुण जणू चैतन्याच्या किंवा आत्म्याच्या रुपात पाण्यात टिकून राहतात हे मानणे म्हणजे मानवी कक्षेपलीकडले काही मानून स्वतःवर उपचार करणे असे आहे. एखादी गोष्ट सिद्ध होईपर्यंत ती नाहीच असं म्हणता येत नाही..अगदी कबूल.. हवा दिसत नाही पण असते.. पण आपण रोजच्या जगण्यात रस्त्यात धोंडा दिसत नसतानाही तो असेलच असं म्हणून मिनिटामिनिटाला वळसे घालत जात नाही. तदनुसार आपल्या आरोग्याशी संबंधित निर्णय घेताना बेनिफिट ऑफ डाउटवर आधारित शास्त्रांकडे न वळता खणखणीत वाजवून सिद्ध होणार्‍या शास्त्राकडे जाणं हिताचं आहे. त्याउपर पुढे कधीतरी काहीतरी शोध लागेल, गृहीतकं बदलतील आणि भूत आत्मा या गोष्टीही सत्य आहेत हे सिद्ध होईल म्हणून आजच त्या खर्‍या मानणे हा प्रकार माझ्या समजुतीबाहेरचा आहे. तत्वतः उद्या काय सिद्ध होईल ते सांगता येत नसल्याने होमिओपथी ही कध्धी कध्धी सिद्ध होणारच नाही असं आचरट प्रतिपादन मी करु इच्छित नाही. पण आजरोजी ते जी थियरी ढळढळीतपणे मानताहेत ती म्हणजे : क्वांटिटी नसलेलं "औषध" घेऊन "स्पिरिट लाईक" गुणधर्म पाण्यात उतरलेले असणं- या थिअरीवर विश्वास ठेवून मग होमिओपथी जरुर घ्यावी. फक्त इन दॅट केस, त्यात पुरेसा जादूवाद आहे याची जाणीव असावी इतकंच अधोरेखित करतो. अंगारा, नजर सुरक्षा कवच इ इ हे अशा तर्कापलीकडल्या गोष्टीवर विश्वास ठेवून स्वीकारले जातात. शरीराला रोगापासून मुक्त करणारी औषधोपचार पद्धती स्वीकारताना आपण नेमके काय स्वीकारतो आहोत याची जाणीव ठेवून स्वीकारले तर कोणाचीच काहीच हरकत नसावी. माझा इनफॅक्ट अंधश्रद्धेलाही विरोध नाही. नजर सुरक्षा पेंडंट योग्य वाटल्यास जरुर घालावे पण माझी इच्छा इतकीच असते की आपण काय घालतोय ते किमान तर्कदृष्ट्या माहीत असावं. न कळलेलं बरंच काही आहे म्हणून काहीही खरं मानणं योग्य आहे का? अधिक स्पष्ट करायचं तर नजर सुरक्षा कवचाच्या मटेरियलमधे असलेल्या गुणामुळे वाईट नजरेतली "निगेटिव्ह" एनर्जी दूर लोटली जाते (रिफ्लेक्शन किंवा तत्सम प्रक्रियेने..) किंवा समोरच्या वाईट नजरवाल्यावरच उलट रोखली जाते अशी जी काही थियरी असेल ती तुम्हाला माहीत असेल आणि पटली तर जरुर वापरा. पण पेंडंटचा प्रवर्तक काय तर्काने असा दावा करतोय ते तुम्हाला माहीत पाहिजे. उगीच अमुक पेंडंट देणारे गुरुजी फार थोर आहेत किंवा तमुकला पेंडंटचा चांगला अनुभव आला.. मग त्यामागच्या थियरीला मारो गोली असं नसावं असं माझं मत आहे. होमिओपथीचं मूळ तत्व काय आहे ते ती घेणार्‍या बर्‍याच जणांना माहीत नसतं. ते नीट माहीत असेल आणि तरी घेत असतील त्यांच्याबाबतीत काही म्हणणं नाहीच. तरी, तुम्हाला होमिओपथी लागू पडते अशी तुमची खात्री आहे ना? मग तुम्ही जरुर घेत चला. माझी सर्व विधाने आणि प्रश्न तुमच्यापुरते रद्दबातल समजा (जशी होमिओपथी तुमच्यापुरती काम करतेय तसं..) :) हा प्रतिसाद राघांच्या प्रतिसादाच्या निमित्ताने मूळ प्रश्नाला आहे. राघांना नाही.

In reply to by गवि

बॅटमॅन गुरुवार, 06/19/2014 - 14:14
गविंचा प्रतिसाद उत्तम आहेच. पण धागाकर्ते डॉक्टरमहाशय का बरे गायब आहेत? त्यांची मतं काय आहेत? की फक्त मजा पाहण्यातच इंट्रेस आहे?

In reply to by गवि

हाडक्या गुरुवार, 06/19/2014 - 16:50
( ता. क. : काहीही माहिती नसल्याने आम्ही या चर्चेमध्ये कोणत्याही बाजूस नाही) गवि साहेब एक शंका.. इथे
मूळ पदार्थ अस्तित्वातच नसताना त्याचे गुण जणू चैतन्याच्या किंवा आत्म्याच्या रुपात पाण्यात टिकून राहतात
हा आक्षेप आहे का ? नाही म्हणजे माझा प्रश्न असा आहे की, जर औषधाची मात्रा वाढवली आणि असे समजू की रुग्णाच्या शरिरात हे औषध पुरेश्या प्रमाणात (हे प्रमाण किती हे बाजूला ठेवू) पोचले तर परिणाम होतो का ? अथवा परिणाम होतो हे तुम्हाला इथे मान्य आहे का ?

In reply to by हाडक्या

गवि गुरुवार, 06/19/2014 - 17:21
चोक्कस. हो. द्रव्य डिटेक्टेबल प्रमाणात शरीरात जात असेल तर परिणाम होतो की नाही हे पाहण्याची पात्रता त्यात ऑपॉप येऊन ते औषध मी जरुर घेईन. उपयोग होतो का हा नंतरचा प्रश्न झाला. त्याविषयी भाष्य करण्याचा मला अधिकार नाही म्हणून मी तो उपयोग आगोदरच मान्य केला आहे. इतरत्रही तुम्हाला हे लिहिलेलं आढळेल की औषध गुणकारी असेल हे मी गृहीतच धरतो. पण ते शरीरात जातच नाही हाच आक्षेप आहे.

चित्रगुप्त गुरुवार, 06/12/2014 - 21:25
डॉ. हनिमन, डॉ. शुस्लर किंवा जे कोणी होमियोपाथी/बायोकेमिकचे मूळ प्रवर्तक होते, त्यांनी एवढ्या तपशीलात जाऊन शेकडो औषधांचे नेमके परिणाम कसे काय शोधून काढले, याबद्दलही माहिती या धाग्यातून मिळावी, अशी अपेक्षा करतो. प्राचीन ग्रीक वैद्य (याक्षणी त्याचे नाव आठवत नाहीये) त्या त्या वनस्पतीजवळ शांतपणे ध्यान लावून बसत असे, आणि ती वनस्पतीच त्याला स्वतःचे वैद्यकीय गुण 'सांगत' असे (वा अंतःप्रज्ञेने ते कळत असे म्हणा) आणि ते तो लगेच लिहून घेत असे, असे वाचल्याचे आठवते. मला स्वतःला हे पूर्णपणे शक्य वाटते. अर्थात त्या व्यक्तीची तेवढी क्षमता असायला हवी. होमियोपाथीच्या बाबतीत असे काही झाले होते का?

In reply to by नानासाहेब नेफळे

ह्यावेळी चक्क नेफळे रावांशी सहमत आहे आजवर होमिओपॅथी हे सुडो सायन्स आहे असेच ऐकत आलोय , ह्या लेखमालेतुन काही प्रभाव झाल्यास एखाद्या होमिऑ पॅथी डॉक्टरला सदिच्छा भेट देवुन काही प्रयोग करवुन (मायनर आजारांच्या वेळेला) घ्यायला हरकत नाही . अवांतर : बाकी होमिओपॅथी चे दुष्परिणाम नसतात हे मात्र धाधांत असत्य आहे हे अनुभवाने सांगतो ... आमची मेव्हणी होमिऑपॅथी डॉक्टर आहे तिला एकदा म्हणालो होतो की " होमिऑपॅथी सुडोसायन्स आहे ... माझ्यालेखी ज्योतिषशास्त्र, फेंगशुई , वास्तुशास्त्र , रेकी आणि होमिऑपॅथी हे सारे एकाच माळेतले मणी आहेत " त्यानंतर बोलायचीच बंद झाली :( ... छ्या केवढा हा साईड इफेक्ट =))))

आयुर्हित Fri, 06/13/2014 - 00:16
ज्ञानाच्या कक्षा रुन्दावण्यास मदत करणारे अनुभवयुक्त लेखन व आपले मिपावर स्वागत असो! होमिओपॅथीवरील येवु घातलेल्या विस्त्रूत माहितीबद्दल आधिच मनापासुन धन्यवाद.

गवि Fri, 06/13/2014 - 13:00
काली फॉस ६ आणि १२ + नैट्रम मूर ३० च्या पाच ग्रेनच्या वडया अर्धा ग्लास पाण्यात टाकून १०—१० मिनिटांनी एकएक चमचा मिश्रण नंतर १५—१५ मिनिटांनी त्सेक चमचा मिश्रण सातत्याने दिले यामुळे र्हुदय विकाराचा रुग्ण हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी आलेली रुग्णवाहिका परत पाठवण्या एवढा स्वस्थ झाला, त्या मुळे काली फोसला प्राण रक्षक म्हणूनही ओळखले जाते.
उत्तम ... पाच ग्रेन म्हणजे ०.३२ ग्रॅम हे बरोबर असेल तर अर्ध्या ग्लासात एक तृतीयांश ग्रॅम द्रव्य विरघळवलेले..(विरघळत असल्यास) म्हणजे पोटात खरोखर काली फॉस आणि नॅट्रम मूर ही द्रव्ये जाणार.. फायदा होत असेल किंवा नसेल हा अनुभवाचा / केमिस्ट्रीचा / जीवशास्त्राचा भाग झाला. पण पदार्थाची डिटेक्टेबल क्वांटिटी पोटात जातेय हे पाहून आनंद झाला. पण.. मग.. ही नक्की होमिओपथीच ना? धन्यवाद.

In reply to by गवि

राजेश घासकडवी Fri, 06/13/2014 - 23:36
म्हणजे पोटात खरोखर काली फॉस आणि नॅट्रम मूर ही द्रव्ये जाणार..
कैतरीच आपलं तुमचं. होमिओपथीमध्ये असला धोका बिलकुल पत्करला जात नाही. त्या औषधाच्या नावांपुढे ६ आणि १२ लिहिलं आहे ते दिसलं नाही का? ६ म्हणजे ६ वेळा शतांशाचं डायल्युशन. म्हणजे सुमार एक टनाचं एक मायक्रोग्रॅम करायचं.... १२ वेळा डायल्यूशन म्हणजे एक रेणूही नाही. त्या पाच ग्रेनमध्ये काय असतं कोण जाणे.

मृत्युन्जय Fri, 06/13/2014 - 13:35
होमिओपॅथी म्हटल्यावर मिपाकर एकदम तुटुन पडतात. पुणेकर, मोदीसमर्थक आणि आस्तिक या तिघांइतकीच होमियोपॅथी देखील मिपासाठी टिंगलीच विषय झाली आहे असे दिसते. यापैकी जे कोण डॉक्टर्स असतील त्यांचे किमान मत तरी विचारात घेता येइल. ओकार्‍या काढणारे इतर मात्र डोक्यात जातात. असो. होमिओपॅथी ने बरे झालेले लोक मला माहिती आहेत. त्यामुळे माझा होमिओपॅथीवर राग नाही. मी स्वतः वेळ आल्यास अ‍ॅलॉपॅथी औषधे घेतो ही गोष्ट वेगळी.

आदिजोशी Fri, 06/13/2014 - 14:30
होमिओपॅथीला शिव्या घालणारे अनेक लोक मिपावर आहेत. त्यातले किती जण स्वतः डॉक्टर आहेत, किती जणांचा होमिओपॅथी आणि अ‍ॅलोपथीचा सखोल अभ्यास आहे हे त्यांनाच ठाऊक. उगाच कुठलं तरी काही तरी वाचून मत बनवायचं आणि फुकट देता येतात म्हणून सल्ले देत सुटायचं. टिका तर इतक्या खालच्या पातळीला जाऊन करतात की मिपाकर असल्याची शरम वाटते.

In reply to by आदिजोशी

श्रीगुरुजी Fri, 06/13/2014 - 20:17
होमिओपॅथी औषधांचा मला स्वतःला व सर्व कुटुंबियांना गेली अनेक वर्षे अत्यंत चांगला अनुभव आला आहे. होमिओपॅथी थोतांड आहे किंवा ते छद्मविज्ञान आहे असे पूर्वग्रहदूषित मत मांडणार्‍यांशी मी अजिबात सहमत नाही.

In reply to by आदिजोशी

प्रसाद१९७१ Mon, 06/16/2014 - 10:07
एक तर अ‍ॅलोपाथी असे काहीही नाही. MBBS ही Modern Medicine ची पदवी आहे. ह्यात जे शास्त्रियरीतीने सिद्ध करता येइल असे कुठलेही औषध चालु शकते. आयुर्वेद, युनानी, चिनी औषधे जर क्लिनिकल ट्रायलच्या मार्गाने सिद्ध केली तर ती पण Modern Medicine मधे दिली/घेतली जातील. पण बुवाबाजी पद्धतीने कोणी दावे करत असेल तर त्याकडे खरे तर दुर्लक्ष केले पाहीजे.

चित्रगुप्त Fri, 06/13/2014 - 22:01
होमियोपाथीचा अत्यंत चांगला अनुभव मला आहे, १९८४ साली अगदी भयंकर परिस्थितीत मी असता होमियोपाथीच्या दोन-तीन दिवसाच्या औषधाने मी वाचलो होतो. माझ्या पत्निलाही लहानपणी आलोपाथी डॉक्टरांनी हात टेकल्यावर होमियोपाथीमुळेच मोठ्या संकटातून बाहेर येता आले होते. माहितीतल्या आणखीही लोकांना झालेला लाभ मला ठाऊक आहे. परंतु त्याचबरोबर होमियोपाथीच्या सैद्धांतिक अंगाविषयी --- म्हणजे अमूक औषध अमूक पोटन्सीचे घेतल्याने अमूक परिणाम होतो वगैरे--- याबद्दल शंका घेण्यासारखे अनुभव पण भरपूर आहेत. पूर्वी माझ्या वडिलांचे स्वतःचे होमियोपाथीचे दुकान असून मी अनेक वर्षे ते चालवण्यात सहभागी होतो--- एक दुकानदार म्हणून जे अनुभव माझ्या गाठीशी आहेत, ते अकल्पनीय आहेत, आणि फारच कमी जणांना ठाऊक असतील, असे आहेत... ते इथे उघड करावेत की नाही, याबद्दल मी अजून ठाम होऊ शकलेलो नाही. खुद्द होमियोपाथीचे औषध निर्माते यातील अगदी खास गुपीते सांगू शकतील, पण ते तसे कधीच करणार नाहीत... या अनुभवामुळेच मी माझ्या पहिल्या प्रतिसादात धागाकर्त्यांना काही प्रश्न विचारले आहेत, त्यांची उत्तरे यावर प्रकाश टाकू शकतील.

In reply to by चित्रगुप्त

आणि त्यावर होमिओपॅथीच्या नक्की कोणत्या औषधाचा किती दिवसात परिणाम झाला हे सांगाल काय?
एक दुकानदार म्हणून जे अनुभव माझ्या गाठीशी आहेत, ते अकल्पनीय आहेत, आणि फारच कमी जणांना ठाऊक असतील, असे आहेत... ते इथे उघड करावेत की नाही, याबद्दल मी अजून ठाम होऊ शकलेलो नाही.
कशामुळे?
खुद्द होमियोपाथीचे औषध निर्माते यातील अगदी खास गुपीते सांगू शकतील, पण ते तसे कधीच करणार नाहीत...
पुन्हा उपरोक्त शंका!
या अनुभवामुळेच मी माझ्या पहिल्या प्रतिसादात धागाकर्त्यांना काही प्रश्न विचारले आहेत, त्यांची उत्तरे यावर प्रकाश टाकू शकतील.
लेखक साहित्याचे डॉक्टर असावेत (असं ब्लॉगवरुन वाटतं) त्यामुळे ते बहुदा उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉक्टर सगळं ठीक आहे ना? गायबलेत तिथे यांची काय कथा!

चित्रगुप्त Mon, 06/16/2014 - 03:12
१९८४ साली मला अमेरिकेला तीन महिन्यासाठी जायचे होते. त्याकाळी अशी संधी फार दुर्मिळ होती. परंतु 'अमीबॉयसिस' ने ग्रस्त होऊन मी अगदी दुर्बळ झालेलो होतो. चालणे-फिरणेही कठीण झालेले होते. अमेरिकेचे तिकीट एकदा काही दिवसांसाठी पोस्टपोन केले, मात्र पुन्हा तसे करता आले नसते, आलोपाथीने काहीच लाभ होत नव्हता. कुणीतरी सांगितले, त्या होमियोपाथी डॉ. कडे गेलो, त्यांनी फी न घेता औषध दिले, ते २-३ दिवस घेतल्यावर प्रवास करण्याइतपत बरे वाटले. तरी अशक्त पणा बराच काळ राहिला. तीन महिन्यांनंतर मी परत येईपावेतो ते डॉ. वारले होते. तसेच माझ्या पत्नीला वयाच्या अठरा की विसाव्या वर्षी अचानक चालता येईनासे झाले होते, पायातील शक्ती गेली होती. बरेच दिवस गावातील सर्वात मोठ्या इस्पितळात राहून सर्व प्रकारची परिक्षणे , औषधोपचार करुनही काहीही फरक पडत नव्हता. मात्र होमियोपाथीने ती व्याधी कायमची बरी झाली. औषधांविषयी अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे सिद्धांत काहीही असो, औषध निर्माते, एजंट आणि विक्रेते, यांच्या माध्यमातून आलेले औषध नेमके काय, कसे असेल, मुळात ते औषध तरी असेल की नुस्तीच मिल्कशुगर/साखरेच्या गोळ्या किंवा साधे अल्कोहोल असेल, हे कोणत्याही टेस्ट द्वारे सांगता येत नाही. याचा फायदा निर्माते, एजंट आणि विक्रेते घेत असतात, आणि बिना औषधाचे औषध विकतात. तरीही बरेचदा गुण येतो (बरेचदा येत सुद्धा नाही) याचे कारण 'प्लासिबो इफेक्ट' असावा, असे वाटते. एवढे सर्व ठाऊक असूनही अजूनही आम्ही होमियोपाथिक डॉ. कडे जातो, आणि ती घेऊन बहुतेकदा फायदाही होतो.
लाय्कोपोडियम खास करून अतिशय तल्लख बुद्धीचा, उत्कृष्ट वक्तृत्व, अमोघ वाणी असलेला शरीराने कृश, कुठल्याही विषयात पारंगत, सखोल, पण एकलांडा, त्याच्यावर प्रेम- आदर करणा-यांत बसेल,उठेल, त्याचं बोलणं एकणा-याला ज्ञानाची मेजवानी वाटेल, इतक्या सहजपणे तो अवघड विषयावर बोलेल, त्याच्या विद्वत्तेबध्दल आदर असेल अशाच लोकांच्यात तो रममाण होतो, त्याचा एक समज-गैरसमज आपल्याला समजून घेणारी, आपल्या वि-षयाची गोडी असणारी तर राहोच पण सांगोपांग अभ्यास करू इच्छिणारी व्यासंगी माणसंच नाहीत, अशा लोकांसमोर एखाद्या विषयावर बोलणंच नको, वकील, न्यायाधीश, राजकारणपटू, प्रथितयश अभ्यासक,उद्योजक,डॉक्टर, अशा लोकां-साठीच हे औषध नैराश्य कमी करून मानसिकबल- आत्मविश्वास वाढविणारं चांगल्या वक्त्यासाठींच.
मटेरिया मेडिका मधील असली वर्णने म्हणजे कल्पनेच्या भरार्‍या असाव्यात, असे मलातरी वाटते. खरे-खोटे डॉ. हनिमन जाणोत. अश्याच प्रकारचे उलट-सुलट अनुभव मला भविष्यकथनाबद्दलही आलेले आहेत, त्याविषयी पूर्वी काही धाग्यांमधून लिहिलेही आहे.

In reply to by चित्रगुप्त

ते सांगता येणार नाही कारण :
मी परत येईपावेतो ते डॉ. वारले होते.
आणि
पत्नीला वयाच्या अठरा की विसाव्या वर्षी अचानक चालता येईनासे झाले होते, पायातील शक्ती गेली होती. बरेच दिवस गावातील सर्वात मोठ्या इस्पितळात राहून सर्व प्रकारची परिक्षणे , औषधोपचार करुनही काहीही फरक पडत नव्हता. मात्र होमियोपाथीने ती व्याधी कायमची बरी झाली.
याचंही डायग्नॉसिस आणि औषध सांगणं शक्य नसावं कारण घटना जुनी आहे. तस्मात गुण आला हे खरं पण औषध कोणतं हे कळायला मार्ग नाही. पॅथी सिद्ध होण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत : औषधाच्या परिणामांची: १) कन्सिसटंसी २) व्यक्ती निरपेक्षितता आणि ३) स्थल-काल निरपेक्षितता.

In reply to by संजय क्षीरसागर

चित्रगुप्त Mon, 06/16/2014 - 11:12
पॅथी सिद्ध होणे वा न होणे, याबद्दल काही म्हणणे नाही मात्र 'व्यक्ति तितक्या प्रकृती' या न्यायाने औषधोपचार हा व्यक्तिनिरपेक्ष असू शकत नाही. अ‍ॅलोपाथीत सुद्धा अमूक औषधाची वा वस्तूची अ‍ॅलर्जी आहे का, ही व्यक्तिसापेक्ष माहिती घेतली जाते. अवांतरः माझ्या ओळखीचे एक वैद्य केवळ नाडिपरिक्षा करून जे सांगतात, ते मी बघून थक्क झालेलो आहे. शारीरिक व्याधीच नव्हे, तर मानसिक स्थिती सुद्धा त्यांना नाडिवरून कळते. नाडिपरिक्षा ही एक कठीण विद्या असून ती सर्वांनाच साध्य होत नसते, असे ते सांगतात.

In reply to by चित्रगुप्त

असे एक वैद्य अशोक भट पुण्यात पूर्वी मुंजाबाच्या बोळापाशी होते. खुन्या मुरलीधराच्या मंदीरातले खरे वैद्य कावीळवाले देखील नाडीपरिक्षेवरून उपचार करत.

In reply to by चित्रगुप्त

कवितानागेश Mon, 06/16/2014 - 19:57
नाडीपरीक्षेबद्दल माझाही अनुभव अतिशय चाम्गला आहे. पण नाडिपरिक्षा ही एक कठीण विद्या असून ती सर्वांनाच साध्य होत नसते, हे जरा जास्त झालं. ज्याची निरिक्षणशक्ती आणि चिकित्सक्बुद्धे उत्तम असेल असा कुणीही माणूस नाडीपरीक्षा व्यवस्थित करु शकेल. आणि मूळातच डॉक्टर होण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेतच. माझ्या ओळखीचे एक वैद्य अत्ता केवल ३२ वर्षाचे आहेत. त्यांची नाडीपरीक्षा देखिल अशीच उत्तम आहे. अगदी मानसिक स्थितीचेदेखिल तंतोतंत वर्णन करतात. आणि औषधाचा परीणामदेखिल ताबडतोब होतो. ...पण होमिओपॅथीबद्दल धागा असताना नेहमी तिथे आयुर्वेद का येतो बरं? लोकांना खरोखरच होमिओपॅथीबद्दल काहीही माहित नाहीये हेच खरं.

In reply to by प्रसाद१९७१

होमिओपाथी ला बुवाबाजी म्हणुन जाहिर करुन, अंधश्रद्धा निर्मुलन विधेयका नुसार कारवाई केली पाहिजे.
संपुर्ण सहमत !

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी Mon, 06/16/2014 - 12:31
>>> होमिओपाथी ला बुवाबाजी म्हणुन जाहिर करुन, अंधश्रद्धा निर्मुलन विधेयका नुसार कारवाई केली पाहिजे. करा. गो अहेड.

चित्रगुप्त Mon, 06/16/2014 - 10:16
होमिओपाथी ला बुवाबाजी म्हणुन जाहिर करुन, अंधश्रद्धा निर्मुलन विधेयका नुसार कारवाई केली पाहिजे.
होमियोपाथीने कधीच, कुणालाच फायदा झाला नसता, तर ती केंव्हाच आपोआपच नामशेष झाली असती. फायदा तर होतो, पण त्याबद्दल जो सिद्धांत सांगितला जातो, तो कितपत खरा आहे, हा प्रश्न असू शकतो. अंधश्रद्धा निर्मुलन विधेयक हे सुद्धा विवेकाने वापरले गेले पाहिजे. एकदम टोकाची भूमिका घेणे योग्य नव्हे. आम्हाला तर आलोपाथीने जेवढे नुकसान झाले, तेवढे आयुर्वेदिक वा होमियोपाथीने कधीच झालेले नाही. एकदा आरोग्य बिघडले, की तो विषय फार गुंतागुंतीचा आणि जटिल झालेला असतो. कुणाला कश्याने बरे वाटेल हे सांगणे कठीणच. आलोपाथीमुळे एक व्याधि बरी होते, तर दुसरी उद्भवते, असे बरेचदा घडत असते.

प्रसाद१९७१ Mon, 06/16/2014 - 10:38
होमियोपाथीने कधीच, कुणालाच फायदा झाला नसता, तर ती केंव्हाच आपोआपच नामशेष झाली असती.>>>>>>>>>> अहो गंडेदोरे, काळी जादू, वेगवेगळे ग्रहांचे खडे, वास्तुशास्त्र ह्यांनी पण कोणाचा कधी फायदा झाला नाही, तरी पण शतकानुशतके चालू च आहे ना. पुन्हा एक दुरुस्ती, अ‍ॅलोपाथी अशी कुठलीही पॅथी नाही.

चित्रगुप्त Mon, 06/16/2014 - 11:29
अ‍ॅलोपाथी अशी कुठलीही पॅथी नाही.
मग कोणता शब्द वपरावा म्हणता? गंडेदोरे, काळी जादू, वेगवेगळे ग्रहांचे खडे, वास्तुशास्त्र वगैरेंच्या वाटेला मी स्वतः कधी गेलेलो नाही, परंतु यांचा कधीच कुणालाच फायदा झालेला नाही, याचा कोणताही विदा वा पुरावा माझ्याकडे नाही. हा माझा एक वैयक्तिक तर्क असू शकतो, त्या आधारावर टोकाचे विधान करण्याचा, या गोष्टींना 'अंधश्रद्धा' या प्रकारात मोडण्याचा अधिकार मला नाही, एवढे मला कळते. समर्थांनी सांगितलेल्या 'सावधपण सर्वविषयी' आणि 'विवेक' यांचा उपयोग केला, तर अनेक अनिष्ट व्याधि-उपाधिं पासून आपण स्वतःला वाचवू शकतो. होमियोपाथी औषधांचा व्याधिनिवारणासाठी उपयोग होतो, याचा भरपूर अनुभव मला आहे, आणि असे अन्य अनेक लोक माझ्या परिचयात आहेत.

In reply to by चित्रगुप्त

प्रसाद१९७१ Mon, 06/16/2014 - 12:09
मग कोणता शब्द वपरावा म्हणता?
Modern Medicine हा सध्याचा प्रचलित शब्द आहे. ह्याला कुठलेही बंधन नाही, जे जे शास्त्रिय कसोट्या लावुन सिद्ध होउ शकते ते सर्व उपचार ह्यात चालतात.

In reply to by चित्रगुप्त

चौकटराजा Mon, 06/16/2014 - 21:03
या प्रतिसादासारखेच माझे काहीसे मत आहे. होमिओपाथी हे शास्त्र नसेल पण ते उपयुक्तच नाही असे म्हणणे खरे नाही. गंडे दोरे शास्त्र नाही पण ते उपयुक्तच नाही हे खरे नाही. श्रद्धा हे शास्त्र नाही पण ती उपयुक्तच नाही हे खरे नाही. शास्त्र हे नेहमीच अपुरे असते. पण त्यातील काही कसोट्यामुळे त्याबद्द्लची खात्री ही नक्कीच जास्त असते.

आदिजोशी Mon, 06/16/2014 - 11:56
ज्यांना होमिओपॅथीच्या उपयुक्ततेविषयी शंका आहे ते स्वतः औषधे घेऊन पडताळणी का करत नाहीत? संजय क्षीरसागरांच्या मुद्द्यांतले २ आणि ३ तर अत्यंत भंपक मुद्दे आहेत. व्यक्ती निरपेक्षितता आणि स्थल-काल निरपेक्षितता नसणे म्हणजे ढोबळ जनरलायझेशन आहे. दुकानात शर्टाच्यासुद्धा कैक साईझ सापडतात, हिमालयात घालायचे कपडे मुंबईत घालून फिरता येत नाही म्हणून ते ते कपडे हे कपडे म्हणण्यायोग्य नाहीत का? तसंच प्रत्येक होमिओपॅथीक डॉक्टरला औषधांचं केमिकल कंपोझेशन कसं माहिती असेल. ते प्रश्न शास्त्रज्ञांना विचारायचे. अकलेचे तारे तोडायचे ठरवली की त्याला मर्यादा नसते. अ‍ॅलोपथीचा कैवार घेणार्‍यांना १० मिली ग्लायकोडीन मधे किती मायक्रोमिली खरे औषध असते ही माहीती आहे का? अँटीबायोटीक घ्या त्यातून निर्माण होणारी हीट कमी करायला रँटॅक घ्या आणि मोशन पातळ होतील म्हणून आहार कंट्रोल करा, हे असले आचरट प्रकार होमिओपॅथी मधे होत नाहीत. इथे होमिओपॅथीक शास्त्रज्ञ नाहीत म्हणून शंकानिरसन होणार नाही हे लक्षात ठेवा. उद्या मी अणूउर्जेवर प्रश्न विचारीन आणि उत्तरं नाही मिळाली की अणूउर्जा हे थोतांड आहे असं म्हणेन, असले प्रकार चाललेत.

In reply to by आदिजोशी

मी लिहीलेले तीन नियम हे वैज्ञानिक सत्यतेचे जगनमान्य निकष आहेत. अर्थात याची तुम्हाला कल्पना नाही हे तुमच्या प्रतिसादातल्या भोंगळपणावरुन कळतं. शर्टाचे साइज आणि हिमालयातले कपडे यांचा वैज्ञानिक सत्याशी (इथल्या संदर्भात औषधाला मान्यताप्राप्त होण्याशी) काडीमात्र संबंध नाही. मी चित्रगुप्तना आजार आणि औषध यांची माहिती विचारली होती. इथे मी कैवार वगैरे घेण्याचा (तुम्हाला होमिओपॅथीचा असला तरी) प्रश्नच नाही. ते बहुदा त्तुमच्या अगाध बुद्धीमत्तेचं आकलन असावं! अर्थात तुमच्या या वाक्यानं :
तसंच प्रत्येक होमिओपॅथीक डॉक्टरला औषधांचं केमिकल कंपोझेशन कसं माहिती असेल. ते प्रश्न शास्त्रज्ञांना विचारायचे.
कमालीची हाईट गाठली आहे! म्हणजे डॉक्टरला तो काय औषध देतोयं याचीच माहिती नाही. शाब्बास!

In reply to by संजय क्षीरसागर

मी लिहीलेले तीन नियम हे वैज्ञानिक सत्यतेचे जगनमान्य निकष आहेत
ते तीन नियम तुम्ही लिहिल्यामुळे जगन्मान्य झालेत की त्यांचा कोणीच प्रतिवाद करु न शकल्याने जगन्मान्य झालेत =))

In reply to by प्रसाद गोडबोले

उदा. गुरुत्वाकर्षणाचा नियम. पृथ्वीवर कुठेही (स्थल निरपेक्षितता), कुणीही टाकली तरी (व्यक्ती निरपेक्षितता), केव्हाही (काल निरपेक्षितता) आणि नेहमी (वारंवारिता) वस्तु खालीच पडेल. हाच निकष मेडिकल सायन्समधे औषध प्रमाणित होण्यासाठी लावला जातो.

In reply to by आदिजोशी

सुबोध खरे Mon, 06/16/2014 - 14:00
अ‍ॅलोपथीचा कैवार घेणार्‍यांना १० मिली ग्लायकोडीन मधे किती मायक्रोमिली खरे औषध असते ही माहीती आहे का? जोशी साहेब आपण ग्लायकोडीनचे नाव घेतलेत म्हणून त्यात असलेली औषधे काय आहेत (ती बाटलीवर लिहिलेली असतात) पण आपल्या माहितीसाठी खाली देत आहे. अशी माहिती सर्व आधुनिक वैद्यकशास्त्राच्या औषधांबद्दल उपलब्ध http://www.alembic-india.com/cough-cold.php Glycodin Cough Syrup Each 5 ml contains Terpin Hydrate USP 10 mg, Dextromethorphan Hydrobromide IP 10 mg, Menthol IP 3.75 mg, Syrup Glycerin Base q.s. Bottle 100 ml 50 ml यातील प्रत्येक औषध काय शुद्धतेचे आहे ते USP united states pharmacoepial convention आणि IP म्हणजे indian pharmacoepia यात प्रमाणित केलेली असतात त्याप्रमाणे असतात तसे नसेल तर एफ डी ए त्यांच्यावर खटला भरते आपण USP मध्ये terpin hydrate शोध म्हणजे त्याची शुद्धता काय आहे आपल्याला कळेल. आधुनिक वैद्यकात प्रत्येक औषधाचे घटक कोणते आहेत हे त्या बाटलीवर किंवा पैक वर लिहिणे कायद्याने अनिवार्य आहे.त्यमुळे जर संशय असेल तर डॉक्टर सरळ ती बाटली पाहून खात्री करू शकतात. इतके काटेकोर नियम इतर कोणत्या पाथीला आहेत काय ते मला माहित नाही. बर्याच वेळेला होमियोपथी शास्त्रीय कसोटीवर उतरत नाही हि वस्तुस्थिति आहे. तरीही बर्याच लोकांना गुण येतो असा त्यांचा अनुभव आहे.माझे म्हणणे एवढेच आहे कि ते शास्त्र आहे असे न म्हणता ते एक तत्वज्ञान आहे. ज्याने त्याने आपल्या श्रुती स्मृती आणि बुद्धीप्रमाणे ठरवावे कि आपण काय करावे शेवटी आपण ज्या पाथीवर विश्वास आहे त्याचे औषध त्याने घ्यावे असे मला वाटते. कुणाच्या का कोम्बड्याने, उजाडल्याशी कारण

In reply to by सुबोध खरे

अनुप ढेरे Mon, 06/16/2014 - 14:03
काही आयुर्वेदिय औषधांवर यात कुठल्या कुठल्या वनस्तपी आहेत हे त्यांच्या मराठी आणि शास्त्रीय नावासकट लिहिलेले पाहिलेले आहे. आता हा नियम आहे का फक्त त्या मन्युअफॅक्चररनी केलं होतं ते नाही माहित.

In reply to by अनुप ढेरे

प्रसाद१९७१ Mon, 06/16/2014 - 14:08
वनस्पती कुठल्या आहेत हे लिहुन काय उपयोग? ते मिश्रण गरम केल्यावर, गाळल्यावर, दुसर्‍या कशाशी मिक्स केल्यावर आत काय शिल्लक रहाते आणि कीती रहाते ते महत्वाचे आहे. आणि वनस्पती म्हणजे काय? मुळ, खोड, साल, फुल , फळ नक्की काय? इतकेच काय फुल, फळ कीती पिकले आहे त्याप्रमाणे केमिकल बदलतात. तेंव्हा वनस्पती म्हणजे नक्की काय?

In reply to by प्रसाद१९७१

अनुप ढेरे Mon, 06/16/2014 - 14:13
ते मिश्रण गरम केल्यावर, गाळल्यावर, दुसर्‍या कशाशी मिक्स केल्यावर आत काय शिल्लक रहाते आणि कीती रहाते ते महत्वाचे आहे.
सहमत. त्या झाडाचं जे काही नाव असेल ते. त्याचा नक्की कुठला भाग वापरला आहे त्याचा उल्लेख शास्त्रीय नावात होता का नाही ते नाही आठवत. पण मराठीमध्ये लिहिलेल्या भागात तरी नक्की मूळ का फळ ते लिहिले होते.

In reply to by अनुप ढेरे

सुबोध खरे Mon, 06/16/2014 - 15:27
ढेरे साहेब, अडुळसाचा काढा/ रस/ कफ सिरप घेतात तेंव्हा त्यात अडुळसा अर्क असे लिहिलेले असते पण मुळ अडुळसा पानात किती टक्के रस आहे आणि आणि त्याचा अर्क कशा पद्धतीने काढलेला आहे याचे अचूक परिमाण कोणत्याही आयुर्वेदिक औषधात लिहिलेले नसते.तो भैषज रत्नावली,भाव प्रकाश किंवा रत्नाकर आयुर्वेद नीघंटू अशा मान्यता प्राप्त ग्रंथात दिल्याप्रमाणे काढलेला असतो. पण थोड्या फार प्रमाणात फरक असतोच. दुर्दैवाने आयुर्वेदिक औषधांचे मानकीकरण आणि संशोधन आधुनिक विज्ञानाच्या काटेकोर पद्धतीप्रमाणे होताना सहसा आढळत नाही त्यामुळे त्या औषधांचे परिणाम वैद्याच्या अनुभवावर जास्त अवलंबून राहतात. याच विरुद्ध अडुळसा वनस्पतीतून व्हासिसीन नावाचे द्रव्य वेगळे केले कि किती मिलीग्राम आहे ते स्पष्ट पणे मोजून तेवढाच डोस रुग्णाला नवीन डॉक्टर सुद्धा काटेकोर पणे देऊ शकतो. आमच्या सदाफुलीमध्ये कर्करोगावर परिणामकारक औषध आहे म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात काहीच हशील नाही. त्यातून व्हिनब्लास्टीन नावाचे औषध् विलग करून Vinblastine 6 mg/m2 IV on days 1 and 15 अशा काटेकोर पणे देत येत नाही असे मानकीकरण आणि संशोधन आधुनिक विज्ञानाच्या काटेकोर पद्धतीप्रमाणे आयुर्वेदिक औषधांवर होणे आवश्यक आहे तरच हे प्राचीन ज्ञान आधुनिक जगात मानवाच्या कल्याणासाठी वापरता येईल.

In reply to by सुबोध खरे

हाडक्या Mon, 06/16/2014 - 21:04
+१ डॉक..!
असे मानकीकरण आणि संशोधन आधुनिक विज्ञानाच्या काटेकोर पद्धतीप्रमाणे आयुर्वेदिक औषधांवर होणे आवश्यक आहे तरच हे प्राचीन ज्ञान आधुनिक जगात मानवाच्या कल्याणासाठी वापरता येईल.
अगदी अगदी.. हळदीच्या गोंधळानंतर खरेतर या संदर्भात आपल्याकडे काही सुरुवात देखील झाली होती सरकारी पातळीवर. ती टी के डी एल च्या या संकेत-स्थळावर पाहता येईल. पण पुढे काय झाले हे नेहमीच्या सरकारी पद्धतीने ठाऊक नाही. ही तरी वेब-साईट तरी तीन चार वर्षे अद्ययावत केलेली नाहीये. पुढे काही झाले तर पाहुयात.

In reply to by सुबोध खरे

अनुप ढेरे Mon, 06/16/2014 - 22:26
आयुर्वेदिक औषधांचे मानकीकरण
निर्मिती प्रक्रियेचं हे होणं जरूरी आहे असं वाटतं म्हणजे एखाद्याला गुण आला नाही तरी चालेल पण औषधाचा त्रास होउ नाही

In reply to by सुबोध खरे

(किंवा प्रतिसाद देत असावेत) कारण ही गोष्ट:
प्रत्येक औषधाचे घटक कोणते आहेत हे त्या बाटलीवर किंवा पैक वर लिहिणे कायद्याने अनिवार्य आहे
अगदी उघड आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

आदिजोशी Mon, 06/16/2014 - 16:45
औषधाचं नाव तर होमिओपॅथीच्या बाटल्यांवरही असतं. पण अमुक औषध घेतल्याने सर्दी बरी होते, पण ती कशी होते कुणाला ठाऊक आहे? त्या औषधाची शरीरात गेल्यावर काय केमिकल रिअ‍ॅक्शन होते हे किती जणं सांगू शकतात? अशा अर्थाने ते वाक्य होतं. उदा. काली फॉस ह्या औषधाच्या नावातच त्यातल्या क्षाराचं / औषधाचं वर्णन आहेच की.

In reply to by आदिजोशी

त्या औषधाची शरीरात गेल्यावर काय केमिकल रिअ‍ॅक्शन होते हे किती जणं सांगू शकतात?
मग मेडिकल सायन्स काय आहे? तिथे काय खोक्यावर छापलेली लक्षणं बघून मेडिसिन प्रिस्काइब करायला शिकवलं जातं का? डॉक्टरला औषधाचा शरीरावर नक्की काय परिणाम होईल हे माहिती नसतांना तो औषधं लिहून देतो आणि इंजेक्शनं ठोकतो का?
अकलेचे तारे तोडायचे ठरवली की त्याला मर्यादा नसते.
हे तुमचंच वाक्य आता तुम्हाला कसं वाटतं?

In reply to by संजय क्षीरसागर

आदिजोशी Mon, 06/16/2014 - 17:14
उगाच बोंबाबोंब नका करू. इथे किती जणं ह्याचा अर्थ आपल्यापैकी किती जणं असा आहे. किती डॉक्टरांना असा नाही. तसं वाटण्याइतपत मी बाळबोध नाही. इथे चर्चा करणार्‍यालोकांपैकी किती असा अर्थ आहे.

In reply to by आदिजोशी

इथे किती जणं ह्याचा अर्थ आपल्यापैकी किती जणं असा आहे.
वॉट अ ज्योक! मग पेशंट आणि डॉक्टरमधे फरक काय राहिला? उगीच भंकस करण्यापेक्षा पहिल्यांदाच संयमित प्रतिसाद दिला असता तर ही वेळ आली नसती.

प्रसाद१९७१ Mon, 06/16/2014 - 12:01
ज्यांना होमिओपॅथीच्या उपयुक्ततेविषयी शंका आहे ते स्वतः औषधे घेऊन पडताळणी का करत नाहीत?
मला शंका नाही तर खात्री आहे की होमिओपाथी म्हणजे भंपकपणा आहे. त्यासाठी मी कशाला खात्री करत बसु. मी माझ्या कुठल्याही आजारावर होमिओपाथी चे औषध घेणार नाही, इतकी मला त्याच्या भंपकपणाबद्दल खात्री आहे. तुम्हाला जर होमिओपाथी ची इतकी खात्री आहे तर तुम्ही modern medicine चे एक ही औषध घेउ नका ( कधीही )

In reply to by प्रसाद१९७१

आदिजोशी Mon, 06/16/2014 - 12:21
तुमच्या होमिओपाथी म्हणजे भंपकपणा आहे ह्या विधानाला काही शास्त्रीय आधार आहे का? काही विदा आहे का? तुम्ही ह्या कंक्ल्युझनला पोचण्याआधी काही चाचण्या केल्या आहेत का? केल्या असतील तर त्यांचे परिणाम काय आलेत? चाचण्यांचे आधार शासनमान्य होते का? असतील तर कोणते, नसतील तर कोणाच्या अधिकारात चाचण्या झाल्या? ज्या औषधांवर चाचण्या घेतल्या ती प्रमाणित होती का? जी काही उत्तरं मिळाली ती शासनमान्य संस्थेकडून प्रमाणित करून घेतली का?

In reply to by आदिजोशी

प्रसाद१९७१ Mon, 06/16/2014 - 12:27
अहो होमिओपाथी भंपकपणा नाहीये हे सिद्ध करण्याचे Burden of Proof माझ्यावर नाहीये. मला Modern Medicine ची औषधे शास्त्रिय कसोट्या घेउन प्रमाणित केली अशी वाटतात, त्यामुळे ती मी घेतो.

In reply to by प्रसाद१९७१

आदिजोशी Mon, 06/16/2014 - 12:42
उद्या मी म्हणालो की न्यूटनचे नियम भंपक आहेत तर ते सिद्ध करायची जबाबदारी माझीच आहे. तुम्हाला पर्यायी काय घ्यायचंय ते तुम्ही घ्या. उद्या सर्दी घालवण्यासाठी कोंबट पाण्यात रम घालून प्यायलात किंवा गोमुत्राने गुळण्या केल्यात तरी माझ्या बा चे काही जात नाही. मला बस आवडत नाही म्हणून मी ट्रेन वापरणे ठीक आहे. पण शेकडो लोकांनी अनुभव घेतल्यावरही 'बस माझ्या गंतव्य स्थानी जातच नाही आणि बस नावाची कोणती वस्तू अस्तीत्वातच नाही' असं मी म्हणाल्यावर ती तशी नाही हे मलाच सिद्ध करायला हवे. एखादी गोष्ट खोटी आहे असे ठासून सांगण्यासाठी ती तशी असल्याचे पुरावे सादर करायलाच हवेत. नाही तर तो नुसताच हवेतला गोळीबार ठरतो. जो आत्ता तुमचा आणि अनेकांचा चाललाय. आणि होमीओपॅथी हा भंपकपणा असून ती बुवाबाजी, काळी जादू इत्यादिंच्या रांगेत बसवण्यायोग्य आहे असे आपले ठासून मत असल्यास सरकार ह्या शाखेचे शिक्षण देऊन त्याच्या पदव्या का देते हे सुद्धा सांगा. माझ्या माहितीत तरी कुणाला बुवाबाजीची अथवा काळ्या जादूची पदवी मिळाल्याचे माहिती नाही.

In reply to by आदिजोशी

माझ्या माहितीत तरी कुणाला बुवाबाजीची अथवा काळ्या जादूची पदवी मिळाल्याचे माहिती नाही.
मुंबईच्या लोकल मधे फिरुन पहा एकदा ... किमान १० 'गोल्डमेडॅलिस्ट' बाबांची जाहिरात सापडेल ... वशीकरण स्पेशालिस्ट .... हॅशटॅग "मेरे किये काम को काटनेवाले को नगद इनाम" =))

In reply to by आदिजोशी

चुकीचे लॉजिक ! आमच्य अंदाजा नुसार : " होमिओपॅथी भंपक आहे " हे सिध्द करण्याची गरज नाही तर "होमिओपॅथी भंपक नाही " हे सिध्द करण्याची गरज आहे येथ H0 : होमिऑपॅथी भंपक नाही व्हर्सेस H1: होमिओपॅथी भंपक आहे. असे असले पाहिजे ... ( होमिऑपथी भंपक आहे हे म्हणण्याने आपण कोणाच्या आयुष्याशी खेळ करत नाहीये जे की होमिओपॅथी भंपक नाही असे म्हणण्याने होवु शकते जी की टाईप १ एर्रर आहे ! )

In reply to by प्रसाद गोडबोले

आदिजोशी Mon, 06/16/2014 - 12:47
जर एखादी गोष्ट अनेक वर्ष अनेक लोकांना परिणाम देत आहे, तर ती तशी नाही व भंपक आहे असं म्हणणार्‍याने ती तशी सिद्ध करायला नको का? पॄथ्वी सपाट नाही गोल आहे असं म्हणणार्‍यावर ती गोल असल्याचे पुरावे द्यायची जबाबदारी नाही का? मिपावर शास्त्रज्ञ नसल्याने विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाणार नाहीत म्हणून होमिओपॅथी भंपक ठरत नाही. इथे किती जण क्रोसिन कसं काम करते हे शेवटच्या डिटेलपर्यंत सांगू शकतात?

In reply to by आदिजोशी

बरेच दिवस हायपॉथेसिस टेस्टींगचा अभ्यास केलेला नाहीये सो खात्रीने सांगु शकत नाही ... पण "नल हायपॉथेसिस हे साधारणता नल अर्थात होमिऑपॅथीचा परिणाम = शुन्य ० व्हर्सेस अल्तरनेट : होमिऑपॅथीचा परिणाम शुन्य नाही " असाच ठेवावे लागेल . (सध्या खात्रीने सांगु नाही , बी.एस्सी ३ आणि एमे.स्सी १ ला अभ्यास केलाय आता ६ -७ वर्ष झाली )

In reply to by आदिजोशी

सुबोध खरे Mon, 06/16/2014 - 13:06
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1375230/ जोशी साहेब लान्सेट नावाचे जगविख्यात नियतकालिक यांनी होमियोपथिच्या असंख्य संशोधनपर कागदांचे विश्लेषण करून ते साबुदाण्याच्या गोळ्यांपेक्षा जास्त प्रभावी नाही असे सिद्ध केले आहे त्यातील एक विदा मी वर दिली आहे. आपण होमियोपथी आणि लान्सेट गुगल करून पहा. बाकी थोडे सावकाशीने.

In reply to by सुबोध खरे

गवि Mon, 06/16/2014 - 13:14
लॅन्सेटपर्यंत कशाला जायचे.. अहो त्यात साखरेखेरीज द्रव्य असेल तर ना परिणामकारक ठरणार. हां आता साखरेतच अनेक औषधी गुण असतील तर मग म्हणणे काही नाही. लॅन्सेट ही वैद्यकशास्त्रातली फार पुढची गोष्ट झाली. त्याने यात लक्ष घालण्याच्याही आधी निव्वळ भौतिकशास्त्राच्या आधारे क्वांटिटीविषयी केलेले साधे प्रश्न होमिओपथीला उत्तरु देत. असे प्रश्न इथे पूर्वी उपस्थित केलेले आहेत. त्यात टीका, आक्रस्ताळेपणा इ इ अजिबात नव्हता. तरीही तेवढ्या बेसिक प्रश्नांची उत्तरे अद्यापही समाधानकारक .. अगदी असमाधानकारकही... मिळालेली नाहीत. बेसिक प्रश्नही न विचारता काही स्वीकारायचे म्हणजे कठीणच. होमिओपथीच्या गोळीत औषधाचा अंश असतो इतके जरी सिद्ध झाले तरी मी ते घेऊन त्याचा उपाय होईल हे मानायला तयार आहे. पण द्रव्यच नाही तरी उपाय होईल असे मानणे म्हणजे यातुवादाचा स्पर्श होतो. असो. सदरील लेखात प्रत्यक्ष द्रव्य पोटात जातेय असे उल्लेखावरुन वाटल्याने आनंद झाला. पण लगेच ते घासकडवी आले आणि त्यांनी फाईव्ह ग्रेनचा खडा टाकला.

In reply to by सुबोध खरे

आदिजोशी Mon, 06/16/2014 - 13:23
गुगल केल्यावर होमिओपॅथीला विरोध करणारे आणि समर्थन देणारे असे दोन्ही रिझल्ट्स मिळाले. होमिओपॅथीचा उपयोग होतो हे अनुभवसिद्ध असल्याने नाकारायचे कोणत्या आधारावर? आणि हे एखाद दोन वेळा आलेले अनुभव नाहीत (उदा. गंडा ओवाळणे, विष उतरवणे, इ.) कैक वर्षांचे, वेगवेगळ्या आजारांबाबतचे अनुभव आहेत.

स्पा Mon, 06/16/2014 - 14:13
सुबोध खरे यांचे प्रतिसाद मस्तच माझ्याबाबतीत होमिओपॅथी आणि आयुर्वेद दोन्हीचे बरीच वर्ष अनुभव घेऊनही गुण शून्य आला, तेच allopathy मुळे गुण भराभर आला , आणि रिक्वरी सॉलिड झाली. त्यामुळे वरील दोन्ही प्याथ्यांवरचा विश्वास कायमचा उडालेला आहे , कारण आयुष्याची बरीच वर्षे आणि पैसे या उपचारांवर घालवली, वर आयुर्वेदिक औषधे इतकी भयंकर महाग असतात कि बस रे बस
पण तरीही वर मृत्युंजय आणि आदि जोशी यांच्याशी सहमत
इतर लोकांची जी काय लेवल ला जाऊन गरळ ओकणे आणि निंदा करणे सुरुये, धन्य वाटले :)

प्रभाकर पेठकर Mon, 06/16/2014 - 17:37
मला स्वतःला वयाच्या बाराव्या वर्षी टॉन्सिल्सचे 'ऑपरेशन करून घ्या' असा सल्ला मिळाला असताना होमिओपॅथीच्या औषधाने गुण आला. त्रास दूर झाला. आजतागायत त्रास नाही. बाकी आमचे डॉक्टर आयुर्वेदीक औषधेच द्यायचे त्यानेच नेहमी आमच्या आख्या कुटुंबाला स्वास्थ प्राप्त झाले आहे. काविळीच्या बाबतीत अनुभव जरा जास्त भयानक होता. माझा एक मित्र काविळ अंगावर काढल्याने आणि उशिरा हॉस्पिटलात दाखल केल्यामुळे ऐन तारुण्यात दगावला. त्या नंतर आठवड्याभरात मलाही काविळ झाली. अगदी मल निस्सारण खडूच्या रंगासारखे पांढरे फटक व्हायला लागले. पण अ‍ॅलोपॅथीबदल आठवड्याभरापूर्वीचा मित्राचा मृत्यू (अर्थात त्याने काविळ अंगावर काढून दवाखान्यात जायला उशिर केला होता त्यामुळे पॅथीला दोष देता येत नाही) अनुभवला असल्याने, मी कोणाच्या सांगण्यावरून एका वैद्याचे घरगुती औषध दोन आठवडे घेतले आणि तात्काळ गुण आला. माझ्या एका मित्राला डोक्यात 'चाई' नांवाचा कांही त्वचारोग होऊन केस जात होते. डोक्यात टकलाचा पॅच तयार व्हायचा. तो डोक्यावर सर्वत्र फिरायचा. अ‍ॅलोपॅथीचा कांही उपयोग झाला नाही. त्याने बोरिवलीच्या वझिरा नाका येथील एका वैद्याचे औषध केले. तो कसलासा झाडपाल्याचा लेप लावायचा. आग व्हायची. कांही प्रमाणात तिथे फोडही यायचे पण महिन्याभरात 'चाई' पूर्ण पण अदृष्य झाली. आजतागायत काही त्रास नाही. ह्यांना योगायोग म्हणा, प्लासिबो इफेक्ट म्हणा, शास्त्र म्हणा किंवा वैद्यकाचे ज्ञान म्हणा ऊपाचार परिणामकारक ठरले आहेत ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

काविळीचे घरगुती औषध पुण्यात खुन्यामुरलीधर मंदिरातले खरे वैद्य द्यायचे. मला स्वतःला ५ वर्षाचा असताना झालेली कावीळ, भावाला १२ वर्षाचा असताना झालेली कावीळ वडीलाना ४२ वर्षी झालेली कावीळ केवळ खरे वैद्यांचे औषध घेऊन बरी झाली. पुण्यातले एक मान्यताप्राप्त अ‍ॅलोपथी डॉक्टरांनी औषधे दिली होती पण खरे वैद्यांचे औषध चालू ठेवा असेच सांगितले होते. माझ्या मित्राच्या डोक्यावरील चाई शनिवार पेठेतल्या खडीकर वैद्यांनी आयुर्वेदीक औषधांनी बरी केली. ते आयुर्वेदीक औषधाचे इंजेक्षन देखील देत असत डोक्याच्या कातडीमधे. :-)

धन्या Mon, 06/16/2014 - 17:52
होमिओपथी थोतांड आहे की नाही हे माहिती नाही. मात्र काही या अनुषंगाने काही प्रश्न मला नेहमी पडतात. १. होमिओपथीला जर वैद्यकीय जगतात मान्यता नाही तर सरकारचे आरोग्यविज्ञान विद्यापीठ या विषयातील पदवी कसे काय देते? या विषयातील पदवीधरांना आपल्या व्यवसायाच्या बोर्डवर नावापुढे डॉ. कसे काय लिहू देते? २. मी माझ्या आजवरच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा मी आजारी पडलोय तेव्हा तेव्हा मी होमिओपथी डॉक्टरांकडेच गेलो आहे. त्यांच्या औषधाने मी बराही झालोय. ते कसे काय? ३. इथे होमिओपथीच्या नावाने शंख करणार्‍या किती जणांनी मटेरीया मेडिका वाचले आहे किंवा किमान चाळले आहे? ४. केवळ आपल्याला "गुण आला नाही" म्हणून तर विरोधी बाजू हिरीरीने मांडली जात नाही ना? व्यक्ती तितक्या प्रकृती* या न्यायाने "गुण आला नाही" हा प्रकार अ‍ॅलोपथी औषधांच्या बाबतीतही होऊ शकतो. * इथे प्रकृती हा शब्द शरीरप्रकृती अशा अर्थी वापरला आहे, स्वभावधर्म अशा अर्थी नाही.

In reply to by धन्या

चित्रगुप्त Mon, 06/16/2014 - 18:19
बायोकेमिक औषधांच्या नावाने निव्वळ मिल्क शुगर, आणि होमियोपाथिक औषधांच्या नावाने फक्त साख्रेच्या गोळ्यांमधे साधे आल्कोहोल घालून मी स्वतः अनेकदा दिलेले आहे (त्याचे तात्कालीन कारणही होते, ते म्हणजे मूळ औषधांची अनुलब्धता) गंमत म्हणजे त्या औषधांचाही परिणाम झालेला आहे. आमच्या दुकानावर संध्याकळच्या वेळी होमियोपॅथ मडळींची मैफल जमायची, त्यात मी अमूक रोग्याला अमूक औषधाच्या एकाच डोसाने ठीक केले, वगैरे गप्पा असत. ते ऐकून करमणूक होई.

In reply to by चित्रगुप्त

गवि Tue, 06/17/2014 - 15:50
चित्रगुप्तकाका.. अगदी राहावत नाही म्हणून या धाग्यावरची तुमची काही विधानं एकत्र करतो आहे. ती संदर्भ सोडून काढल्यासारखी वाटली तरी इथे याच पानावर ती विखुरलेली असल्याने कोणालाही ती मूळ विधानं पाहता येतील. विधानं खाली क्वोट करण्यापूर्वी मला मुख्यतः पडलेला प्रश्न असा की तुम्हाला होमिओपथीबद्दल नेमका कोणता मुद्दा किंवा बाजू मांडायचीय? तुम्ही कधी रुग्णाच्या, कधी विक्रेत्याच्या भूमिकेतून लिहिलेय. एकीकडे तुम्ही स्वतः अशी औषधे दिली आहेत असंही लिहिलंय. कधी तुम्ही तिला उपयोगी म्हणता, कधी प्लासेबो म्हणता, कधी त्यात काहीही औषध नसते हे मान्य करता, तरीही लक्षणे डीटेलवार विचारण्याचं/नोंदवण्याचं आणि तदनुसार औषध निवडण्याचं महत्व अधोरेखित करता, मधेच जादुई हद्दीत प्रवेश करता, मधेच अज्ञेयवाद स्वीकारता. होमिओपथीविषयी तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ? >>>
प्राचीन ग्रीक वैद्य (याक्षणी त्याचे नाव आठवत नाहीये) त्या त्या वनस्पतीजवळ शांतपणे ध्यान लावून बसत असे, आणि ती वनस्पतीच त्याला स्वतःचे वैद्यकीय गुण 'सांगत' असे (वा अंतःप्रज्ञेने ते कळत असे म्हणा) आणि ते तो लगेच लिहून घेत असे, असे वाचल्याचे आठवते. मला स्वतःला हे पूर्णपणे शक्य वाटते. अर्थात त्या व्यक्तीची तेवढी क्षमता असायला हवी.
गूढता, चमत्कार ?
होमियोपाथीचा अत्यंत चांगला अनुभव मला आहे
होमियोपाथीच्या सैद्धांतिक अंगाविषयी --- म्हणजे अमूक औषध अमूक पोटन्सीचे घेतल्याने अमूक परिणाम होतो वगैरे--- याबद्दल शंका घेण्यासारखे अनुभव पण भरपूर आहेत.
एक दुकानदार म्हणून जे अनुभव माझ्या गाठीशी आहेत, ते अकल्पनीय आहेत, आणि फारच कमी जणांना ठाऊक असतील, असे आहेत... ते इथे उघड करावेत की नाही, याबद्दल मी अजून ठाम होऊ शकलेलो नाही.
खुद्द होमियोपाथीचे औषध निर्माते यातील अगदी खास गुपीते सांगू शकतील, पण ते तसे कधीच करणार नाहीत...
काही संशयास्पद ? काळेबेरे ?
सिद्धांत काहीही असो, औषध निर्माते, एजंट आणि विक्रेते, यांच्या माध्यमातून आलेले औषध नेमके काय, कसे असेल, मुळात ते औषध तरी असेल की नुस्तीच मिल्कशुगर/साखरेच्या गोळ्या किंवा साधे अल्कोहोल असेल, हे कोणत्याही टेस्ट द्वारे सांगता येत नाही.
नाही ना सांगता येत टेस्टद्वारे? म्हणजे मूळ औषधाचा एक रेणूही त्या गोळ्या / द्रावणात नसतो हे स्पष्ट आहे ना?
तरीही बरेचदा गुण येतो (बरेचदा येत सुद्धा नाही) याचे कारण 'प्लासिबो इफेक्ट' असावा, असे वाटते.
मान्य.. प्लासेबोमुळे गुण येऊ शकतो. म्हणून मॉडर्न मेडिसिनमधे टेस्ट करताना औषध विरुद्ध प्लासेबो अशी करुन त्याचे निकाल प्लासेबो गुणांपेक्षा किती अधिक आले ते नोंदवलं जातं. होमिओपथीमधे प्लासेबो हा एक इफेक्ट असू शकतोच. आणि अन्यत्र सगळीकडे घेतला जाणारा आक्षेप असा की लहान बाळं, प्राणी यांना प्लासेबो हा मानसिक इफेक्ट कसा होईल.. तर तसं म्हणणं नाहीच आहे. प्रौढ मनुष्यव्यक्तीबाबत अनेक केसेसमधे प्लासेबो आणि प्राणी, लहान मुले आणि उर्वरित प्रौढांमधे काकतालीय न्याय, शरीराकडून आपोआप कालानुसार रोगनिवारण होणे अशी कारणं असू शकतात. लहान मुलांची व्हायरल सर्दी कोणत्याच औषधाने बरी होत नाही. ती व्हायरसचा कोर्स पूर्ण झाल्यावर बरी होते. मधल्या काळात साखरगोळी किंवा अ‍ॅलोपथी किंवा कारल्याचा रस किंवा अन्य काही घेतले किंवा न घेतले तरी मूळ रोगात फरक पडत नाही. सात दिवसांनी सर्दी आपापतः बरी झाल्यावर श्रेय कारल्याच्या रसाला किंवा अन्य कशालाही देता येते.
एवढे सर्व ठाऊक असूनही अजूनही आम्ही होमियोपाथिक डॉ. कडे जातो, आणि ती घेऊन बहुतेकदा फायदाही होतो.
मटेरिया मेडिका मधील असली वर्णने म्हणजे कल्पनेच्या भरार्‍या असाव्यात, असे मलातरी वाटते. खरे-खोटे डॉ. हनिमन जाणोत.
????!!!
फायदा तर होतो, पण त्याबद्दल जो सिद्धांत सांगितला जातो, तो कितपत खरा आहे, हा प्रश्न असू शकतो.
पण सर्वत्र तोच सिद्धांत प्रचलित आहे. त्याला कोणी आल्टर्नेट सुचवलेला नाही.
होमियोपाथी औषधांचा व्याधिनिवारणासाठी उपयोग होतो, याचा भरपूर अनुभव मला आहे, आणि असे अन्य अनेक लोक माझ्या परिचयात आहेत.
ओके.. आणि मग..
बायोकेमिक औषधांच्या नावाने निव्वळ मिल्क शुगर, आणि होमियोपाथिक औषधांच्या नावाने फक्त साख्रेच्या गोळ्यांमधे साधे आल्कोहोल घालून मी स्वतः अनेकदा दिलेले आहे (त्याचे तात्कालीन कारणही होते, ते म्हणजे मूळ औषधांची अनुलब्धता) गंमत म्हणजे त्या औषधांचाही परिणाम झालेला आहे.
आँ? नुसत्या साखरगोळ्याच द्यायच्या तर लक्षणांचा तपशील विचारुन नोंदवण्याचे प्रयोजन काय? पेशंटला आपली चौकशी झाली असा आनंद मिळण्यासाठी चार जुजबी प्रश्न बास असतात. किंवा नाडी पकडून बसावं घटकाभर. शेवटी रिकामी साखरगोळी देऊनही उपाय होत असेल तर मग आधीची डीटेलवारी कशाला?
होमियोपाथीची औषधे ही अमूक रोगावर अमूक औषध अशी ठोकळ नसून लक्षणांप्रमाणे औषध दिले जाते. म्हणूनच डॉक्टर आधी रोग्याला खूपसे प्रश्न विचारत असतात.
आमच्या दुकानावर संध्याकळच्या वेळी होमियोपॅथ मडळींची मैफल जमायची, त्यात मी अमूक रोग्याला अमूक औषधाच्या एकाच डोसाने ठीक केले, वगैरे गप्पा असत. ते ऐकून करमणूक होई.
का करमणूक होई ? त्यात बढाई असे का? की नुसत्या गोळ्यांनी प्लासेबो इफेक्ट होण्याइतके मर्यादित उपचार देताना डॉक्टर्स उगीच मी अमुक दिले, तमुक डोस दिला असे म्हणत असल्याने करमणूक व्हायची? गोंधळात पाडणारी विधाने दिसली म्हणून केवळ विचारले. जर होमिओपथीमधे काही गूढरम्य नसून त्यामागे औषधाची दाखवून देता येणारी क्वांटिटी असते इतकी साधी खात्री किंवा खुलासा जरी केला तरी औषधांच्या प्रत्यक्ष गुणांविषयी माझ्याकडून काहीही भाष्य नसेल आणि मी होमिओपथीची उपयुक्तता तत्वतः मान्य करीन. पण हे असे साधे शंकासमाधान होण्याऐवजी आजपर्यंत व्यक्तीसापेक्ष अनुभवांच्या अधिकाधिक नोंदीच सांगितल्या जातात. असो.

In reply to by गवि

चित्रगुप्त Tue, 06/17/2014 - 17:50
होमिओपथीविषयी तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ?
मला काय काय म्हणायचं आहे, ते मी वेगवेगळ्या प्रतिसादातून लिहिलेलं आहेच, परंतु बुद्धीमान वाचकांना त्यातून जी एक तार्किक सुसंगती अपेक्षित असते, तिच्या अभावी मला नेमकं काय म्हणायचं आहे, असा प्रश्न पडलेला असावा. माझ्या मते जीवनातील प्रत्येक गोष्टच बरीच गुंतागुंतीची असते. जसजसा आपला अनुभव वाढत जातो, तसतसे परस्पर-विरुद्ध गोष्टींच्या ताण्या-बाण्यातून ती आकार घेत असल्याचे जाणवू लागते, आणि मग अमूकच एक बाजू खरी असायला हवी, हा आग्रह क्षीण होत जातो. आपल्या मनो-शरीर रचनेत - (वाटल्यास यात 'आत्मिक' हा शब्द पण घालावा) रोगांना बळी पडण्याची, आणि त्याचबरोबर त्या रोगांवर मात करून त्यातून सुटका करून घेण्याचीही क्षमता वा यंत्रणा असतेच. या यंत्रणेला कश्यानेतरी चालना मिळाली, तर ती जोमाने कार्य करते. सकारात्मक वा नकारात्मक विचारांमुळे, उपयोगी वा हानिकारक औषधांच्या प्रभावामुळे, श्रद्धा वा ठाम समजुतीमुळे, भितीमुळे, प्रेमामुळे, प्रोत्साहन वा खच्चीकरणामुळे, संगीत वा गोंगाटामुळे, सुवास वा दुर्गंध, सुंदर स्वच्छ वातावरण वा घाणेरडे वातावरण अश्या अनेक प्रभावांमुळे आपली मनस्थिती, स्वास्थ्य, उत्साह, शक्ती घडत वा बिघडत असते. या नैसर्गिक यंत्रणेला चालना मिळण्यासाठी 'स्वयंसूचना' मिळणे हे महत्वाचे असते. ती कश्यातूनही मिळू शकेल. त्यामुळे 'औषध' नसलेले औषध, कुण्या स्वामींनी दिलेला प्रसाद वा आशिर्वाद, नुस्ते पाणी पिणे, आपण बरे होत आहोत -- वा रुग्ण होत आहोत अशी निव्वळ कल्पना, कोणत्यातरी पॅथीचे औषध, हवापालट, मित्रांचा वा प्रिय व्यक्तीचा सहवास वा विरह, अश्या अनेक गोष्टींमधून मिळणार्‍या स्वयंसूचनांमुळे ही यंत्रणा कामाला लागते. एका अर्थी ही यंत्रणा शिडीसारखी वा जिन्यासारखी असते, असे म्हणता येईल. त्या शिडीने वरही जाता येते, आणि खालीही उतरता येते. फक्त आपण कोणत्या दिशेने जात आहोत, यावर ते अवलंबून असते. समजा, डॉक्टर देत असलेले एकादे होमियोपाथी औषध हे निव्वळ साखर्/अल्कोहोल आहे. परंतु ते दिवसातून चारदा घेतले, तर तितक्यांदा यंत्रणेला स्वयंसूचना मिळते. त्यातून डॉक्टर नावाजलेला असणे, त्याच्याकडील गर्दी व लोकांचा त्याच्यावर असलेला विश्वास, डॉक्टराने "तुम्ही आता अगदी योग्य जागी आलेले आहात, आता तुम्ही बरे होणारच" असा दिलेला दिलासा, अनेक प्रश्न बारकाईने विचारून, त्यानंतर औषध दिल्याने पेशंटची पटणारी खात्री, डॉक्टराचे गोड बोलणे, तो पेशंटास देत असलेला आदर-सन्मान, अश्या अनेक गोष्टींमधून ती स्वयंसूचना अधिकाधिक प्रबळ होत जाते, आणि परिणामकारक ठरते. समजा मी ठणठणीत असताना अमूक-पाथीची खिल्ली उडवणारापैकी असलो, तरी आजारी पडल्यावर कसेही करून मला लवकरात लवकर बरे व्हायचे असते, या गरजेतून माझी मनस्थिती वा भूमिका बदलेली असते, त्यामुळे माझ्यावर वरील सर्व गोष्टींचा प्रभाव पडतो. अगदी नास्तिक असणारे सुद्धा अन्य सर्व उपाय निरुपयोगी ठरल्यावर गंडे-दोरे, मंत्र-तंत्र इ. कडे सुद्धा वळतात, असे बघण्यात येते, कारण तेंव्हा या गोष्टी खर्‍या की खोट्या, यापेक्षा संकटातून मुक्त होणे, हे महत्वाचे वाटत असते.

In reply to by चित्रगुप्त

असंका Tue, 06/17/2014 - 18:43
आपण स्वतःच वर लिहिल्याप्रमाणे आपण फार जवळून हे सर्व बघितले आहे. काही काही गैरप्रकारही आपल्याला परीचित आहेत. पण आपण असे तर म्हणत नाही ना, की होमिओपॅथिक औषध असे कुठेच मिळत नाही? एखादवेळी औषध उपलब्ध नसणे आणि त्यामुळे वेळ मारून नेणे वेगळे. वरच्या भडीमाराने आपण गोंधळून जाऊन मनाविरूद्ध असे लिहिले आहेत का? कारण आपण सरळ सरळ सर्व मानसिक असल्याचे मान्य केले आहे. त्याहून कहर म्हणजे आपण होमिओपॅथीला पार गंडे दोर्‍याच्या बरोबरीला आणून बसवले आहे. ४ ते ५ वर्षे अभ्यास करून जी डॉ.ची पदवी होमिओपॅथ मिळवतात त्यांचा आपण अशा पद्धतीने सन्मान करताय का? आपण स्वतः याचा जवळून अभ्यास केलेला आहे असं वाटतं. मग मला सांगा, हे सर्व जर स्वयंसूचनेवरच अवलंबून असेल, तर १. कधी पहिल्याच उपाययोजनेने गुण येतो, तर कधी औषध बदलून दिल्यावर हे कसे? २. एकदा तर एका डॉक्टरनी मला जास्तीत जास्त दोन प्रश्न विचारून औषध दिले होते. मग दिलासा देण्याचा प्रश्नच कुठे येतो? ३. एकदा तर लक्षणे अधिक तीव्र झाली होती. (प्रूव्हिंग). मला 'ही' सूचना कधी मिळाली नव्हती. मग औषध बदलल्यावर तत्काळ आराम मिळाला. आता 'औषधाची मात्रा पोटात जाते' असे कुठ्ल्या टेस्टमध्ये दिसत नाही, म्हणून काय मला जे बरे वाटत आहे तेच मानसिक आहे असे म्हणायचे का?

In reply to by असंका

चित्रगुप्त Tue, 06/17/2014 - 19:17
वर म्हटल्यप्रमाणे हे सर्व प्रकरण फार जटिल आहे, आणि अमूकच खरे, असे सांगणे कठीण आहे. मनो-शारीरिक यंत्रणेला चालना मिळणे गरजेचे असते. ती औषधाच्या प्रभावाने वा अन्य प्रभावांमुळेही मिळू शकते. औषध कंपनीकडून माल पाठवण्यात होणारी दिरंगाई व त्याकाळी कलकत्त्याहून सामान पोचण्यास लागणारा वेळ इ. मुळे खुद्द एजंट आम्हाला साधी मिल्कशुगर वगैरे देण्यास सांगत. यावरून मला अशी शंका यायची की मुळात कंपनी तरी खरेखुरे औषध बनवते की नाही ? ४-५ वर्षे अभ्यास करून डिग्री मिळवली, पण मुळात औषधेच जर बोगस असली, तर कोण काय करणार? अश्या औषधांचाही परिणाम जर होत असेल, तर तो स्वयंसूचनेचाच प्रभाव म्हणावा लागेल. अर्थात औषध कंपनीत काम करणारेच यावर प्रकाश टाकू शकतील. त्याबद्दल माझ्याकडे खात्रीची माहिती नाही. दुसरे म्हणजे होमियोपाथीच्या दुकानाचा माझा संबंध तुटून आता चाळीस वर्षे झालेली आहेत. त्यामुळे मला अलिकडचे काही ठाऊक नाही. मुळात एकादी व्याधि होते म्हणजे नेमके काय घडते, आणि ती बरी होणे म्हणजे काय, याबद्दलही वेगवेगळी मते/सिद्धांत आहेत. आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून बघता कफ वात पित्त यातील असंतुलनाला व्याधि म्हटले जाते, वगैरे. माझ्यापुरते बोलायचे झाले, तर मला अ‍ॅलोपाथीचा बहुतेकदा वाईटच अनुभव आलेला आहे.

In reply to by चित्रगुप्त

असंका Tue, 06/17/2014 - 19:54
अहो साहेब जे काय जटील आहे, ते वैज्ञानिक लोक बघून घेतील. आपण सांगा,की आपण ज्या गोष्टींबद्द्ल इथे लिहित आहात, ते अपवादात्मक होते की अगदी दर १० मध्ये ३, ४ वेळा इतके सर्रास चालते...! माझ्या अनुभवाने औषध घेतल्याने योग्य/अयोग्य औषधानुसार लक्षणे कमी जास्त अशी दोन्ही होतात. सर्व मानसिक असते, तर लक्षणे वाढली कशी असती, आणि मग कमी कशी झाली असती? तेही कुणीही सुचना न देता! आता अजून पर्यंत समजल्या नाहित अशा काही गोष्टी असतील, म्हणून काय आम्हाला आलेला गुणच खोटा म्हणायचा?

In reply to by असंका

चित्रगुप्त Tue, 06/17/2014 - 19:58
अपवादात्मक होते की अगदी दर १० मध्ये ३, ४ वेळा इतके सर्रास चालते
....अपवादात्मक होते.. बाकी मी स्वतः अजून होमियोपाथीचीच औषधे घेतो, हे लिहिले आहेच.

In reply to by गवि

असंका Tue, 06/17/2014 - 21:04
असं म्हणतात की विमानचालन शास्त्रानुसार (law of aviation) भुंगा उडू शकत नाही. अनेक वर्षे अनेक लोक हे सत्यच समजून चालले होते. सर्वसामान्य पद्धतीने ही गोष्ट मी पूर्वीच ऐकली होती, आणि ती खरी नाही हेही मला जाणवले होते. गणितात गृहितके चुकली की चुकीचे निष्कर्ष मिळतात तसं. ज्या शास्त्रानुसार लोक भुंग्याच्या उडण्याचा अभ्यास करत होते, ते तिथे लागू नव्हते. विमानचालन शास्त्र विमानांच्या स्थिर, गुळगुळीत आणि मोठ्या पंखांसाठी आहे. भुंग्यांचे पंख वेगळे असतात. ते खडबडीत, लवचिक, आणि सतत हलणारे असतात. पण मग त्याचे गणित तर मांडता यायला हवेच. हवे तर गृहितके बदला. साहेब मला सांगा हे गणित आता शेवटी सोडवले गेले आहे का? आणि जोपर्यंत ते सोडवले गेले नव्हते तोपर्यंत भुंगे जादूने उडत होते का?( त्या विषयातला आपला अभ्यास आणि अधिकार असावा असे आपल्या आधीच्या एका लेखावरनं माझे मत आहे. वैयक्तिक होत असल्यास क्षमस्व.) एखादी गोष्ट अगदी सर्वत्र होते तर आहे, पण का होते हे कळत नाही! फक्त का होते ते कळत नाही म्हणून "असं काही होतंच नाही आहे, फक्त आपल्याला असं वाटतंय की असं होत आहे" असं म्हणायचे झाल्यास अगदी कालपर्यंत "भुंगे उडत नाहीचेत...फक्त आपल्याला असं वाटतंय की भुंगे उडत आहेत" असं म्हणावं लागलं असतं.

In reply to by असंका

राजेश घासकडवी Tue, 06/17/2014 - 21:51
तुम्ही एक गहन महत्त्वाचा प्रश्न मांडला आहे, ज्याला उत्तर देणं आवश्यक आहे. प्रथम विमानशास्त्राबद्दल जी विधानं आहेत ती बघू. भुंगा विमानशास्त्रानुसार 'उडू शकत नाही' असं कोणीही वैज्ञानिकाने गमतीखेरीज म्हटलं नसावं.
ज्या शास्त्रानुसार लोक भुंग्याच्या उडण्याचा अभ्यास करत होते, ते तिथे लागू नव्हते.
तुम्हाला काय म्हणायचं आहे हे समजतं आहे, पण 'शास्त्र लागू नाही' हे टोकाचं, म्हणून चुकीचं विधान ठरतं. 'इतका जटील प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी यंत्रणा, मॉडेल्स अजून विकसित झाली नाहीत' हे विधान जास्त बरोबर आहे. उदाहरणार्थ, तीन तारे एकमेकांच्या गुरुत्वीय बलांमुळे कसे फिरतील हा सर्वसाधारण प्रश्न सुटलेला नाही. कारण त्याचं गणित खूप किचकट आहे. दोन तारे आणि एक छोटासा ग्रह, किंवा ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह, आणि त्याला असलेला उपग्रह अशा काही विशिष्ट बाबतीत समाधानकारक उत्तरं सापडतात. पण म्हणून तीन ताऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी 'न्यूटनचे नियम असलेलं शास्त्रच चुकीचं आहे' किंवा 'ते उत्तर सापडेपर्यंत कुठचे तीन तारे एकमेकांभोवती फिरतच नव्हते काय?' असा प्रश्न विचारणं बरोबर नाही. अर्थात हा थोडा तांत्रिक मुद्दा झाला. तुमचा रोख साधारण असा दिसतो की 'भुंग्याच्या उडण्याचं गणित आपल्याला नीट मांडता येत नाही, म्हणजे भुंगा उडतच नाही असं म्हणणं चुकीचं आहे.' हा मुद्दा स्वीकारार्ह आहे आहे. मात्र या बाबतीत त्याचं समांतर विधान असं होतं 'होमिओपथीचा फायदा होतो तो कसा होतो ते कळत नाही, म्हणून होमिओपथीमध्ये तथ्यच नाही असं म्हणणं चुकीचं आहे.' हे विधान मात्र अपुरं पडतं. कारण 'भुंग्याचं उडणं' जितकं उघड आहे तितकं 'होमिओपथीचं कार्य' सिद्ध नाही. कारण इथे कार्य होणं म्हणजे काय? असा प्रश्न येतो. आणि औषधांच्या बाबतीत - 'प्लासिबोपेक्षा अधिक परिणामकारक ते औषध' अशी व्याख्या आहे. अशी परिणामकारकतेची चाचणी जोवर एखादं द्रव्य पास करत नाही, तोपर्यंत त्याला औषध म्हणणं योग्य नाही. भुंग्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर उडणं आणि उडण्याचा भास यामध्ये फरक करायला हवा. पारदर्शक प्लास्टिकच्या दोऱ्याने टांगलेला भुंगा वाऱ्यामुळे उडल्याचा भास निर्माण करतोच. असा भास निर्माण करणारे खोटे कीटक आणि खरोखर उडणारे भुंगे यांत फरक करायला हवा. त्यासाठी काही परिणामकारक चाचण्या आहेत. त्या जर होमिओपथीच्या औषधांनी पास केल्या तर कोणीच तक्रार करणार नाही. मात्र ही औषधं बनवणारे लोक अशा परीक्षांना उतरण्याची तयारी दाखवत नाहीत. वर त्यांच्या डायल्यूशनमुळे औषधाचा एकही रेणू शिल्लक नाही, अशी द्रावणं विकतात. म्हणून तक्रार असते.

In reply to by राजेश घासकडवी

चैतन्य ईन्या Tue, 06/17/2014 - 22:01
जगात सगळीकडचे भुंगे उडतात, पण सगळ्याच होमेपदी लाभते असे नाही. अर्थात हेच तत्व मोडर्ण मेडिसिन बाबत पण आहे पण निदान ते असा म्हणतात की अह्म्ला अजून अभ्यास करायचा आहे. होमेपदी लोकांचे तसे नसते. बाकी बरेच आजार औषध नाही घेतले तरी लवकर बरे होतात पण काहीतरी घेतल्यामुळे बरे होतो असा आपला समाज असतो.

In reply to by चैतन्य ईन्या

चित्रगुप्त Tue, 06/17/2014 - 23:29
बरेच आजार औषध नाही घेतले तरी लवकर बरे होतात पण काहीतरी घेतल्यामुळे बरे होतो असा आपला समाज असतो.
अगदी खरे. खरेतर पुष्कळसे आजार आपोआपच बरे होत असतात. उपायाला श्रेय मिळते एवढेच.

In reply to by राजेश घासकडवी

असंका Wed, 06/18/2014 - 12:51
मी जे बोली भाषेत म्हणालो ते तांत्रिक भाषेत आपण मलाच परत सांगितलेत. पण एव्ढी तांत्रिक भाषा मला झेपत नाही. मी पार हरवून गेलो आप्ल्या भडीमारात. तेव्हा आधी थोडी सुसंगती लावू-(इतर उदाहरणे बाजूला ठेवू. मी काही वैज्ञानिक नाही.)
'इतका जटील प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी यंत्रणा, मॉडेल्स अजून विकसित झाली नाहीत'
....म्हणून ....असा प्रश्न विचारणं बरोबर नाही'
भुंग्याच्या उदाहरणाबाबतीत मॉडेल विकसित नसणे हे आप्ल्याला पुरेसे वाटते, पण होमिओपॅथीत मात्र बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर-
'...हे विधान मात्र अपुरं पडतं, कारण...कार्य सिद्ध नाही'
'त्यासाठी काही परिणामकारक चाचण्या आहेत.'
हे असं का बरं? कदाचित त्या चाचण्यापण तेव्ढ्या विकसित नसतील. मी जे जे औषध घेतले ते योग्य आणि अयोग्य अशा दोन्ही पद्धतींनी माझ्यावर प्रूव्ह झाले. माझ्या शरीराने, जसं कुणी तरी खूप आधी लिहून ठेवलं होतं तसे परीणाम (त्याआधी कुणी न सांगता-) अनुभवलें, जरी इतर अनेक जणांना ते अपूरं वाटलं तरी हे भास नव्हेत. माझ्यापुरतं आणि माझ्या अनुभवातल्या अनेकांच्या बाबतीतही, ते कार्य सिद्ध झाले आहे. अगदी दोन्ही पद्धतींनी. दुष्परीणाम आणि अपेक्षित परीणाम, दोन्ही.

In reply to by असंका

राजेश घासकडवी गुरुवार, 06/19/2014 - 00:23
हे असं का बरं? कदाचित त्या चाचण्यापण तेव्ढ्या विकसित नसतील.
चाचण्या म्हणजे काही रासायनिक चाचण्या नसतात. एका व्यक्तीच्या अनुभवापेक्षा अनेकांचा अनुभव मोजण्याची प्रस्थापित पद्धत असते. डबल ब्लाइंड टेस्ट विषयी वाचून पहा. होमिओपथीच्या गोळ्यांमध्ये 'औषध' किती असतं हे इथे वाचून पहा. 30C Dilution - advocated by Hahnemann for most purposes: on average, this would require giving two billion doses per second to six billion people for 4 billion years to deliver a single molecule of the original material to any patient.

In reply to by राजेश घासकडवी

गवि गुरुवार, 06/19/2014 - 12:23
"औषधी" द्रव्य टप्प्याटप्प्याने विरळ करताना ते जोराजोराने हलवण्याच्या प्रक्रियेमुळे त्या औषधातले गुण स्पिरिट लाईक इफेक्टने द्रावकात (पाणी / अल्कोहोल इ) उतरतात आणि मूळ पदार्थ नाहीसा झाला तरी टिकून राहतात, अशी स्पेसिफिक थिअरी होमिओपथीच्या प्रवर्तकाने मांडली आहे. भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र या सध्या जास्तीतजास्त परिपूर्ण कारणे देऊ शकणार्‍या शास्त्रांच्या नियमानुसार पाण्यात / अल्कोहोलमधे मूळ पदार्थ शिल्लक न राहिल्यावर असा कोणताही "गुणधर्म" अथवा "छाप", अथवा "आत्मिक तत्व" तरंगत अथवा विरघळून राहात नसते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांचेही नियम /गृहीतके बदलतात, ते कदाचित पूर्ण बदलतील किंवा नष्ट होतील. पण आजरोजी मूळ पदार्थ अस्तित्वातच नसताना त्याचे गुण जणू चैतन्याच्या किंवा आत्म्याच्या रुपात पाण्यात टिकून राहतात हे मानणे म्हणजे मानवी कक्षेपलीकडले काही मानून स्वतःवर उपचार करणे असे आहे. एखादी गोष्ट सिद्ध होईपर्यंत ती नाहीच असं म्हणता येत नाही..अगदी कबूल.. हवा दिसत नाही पण असते.. पण आपण रोजच्या जगण्यात रस्त्यात धोंडा दिसत नसतानाही तो असेलच असं म्हणून मिनिटामिनिटाला वळसे घालत जात नाही. तदनुसार आपल्या आरोग्याशी संबंधित निर्णय घेताना बेनिफिट ऑफ डाउटवर आधारित शास्त्रांकडे न वळता खणखणीत वाजवून सिद्ध होणार्‍या शास्त्राकडे जाणं हिताचं आहे. त्याउपर पुढे कधीतरी काहीतरी शोध लागेल, गृहीतकं बदलतील आणि भूत आत्मा या गोष्टीही सत्य आहेत हे सिद्ध होईल म्हणून आजच त्या खर्‍या मानणे हा प्रकार माझ्या समजुतीबाहेरचा आहे. तत्वतः उद्या काय सिद्ध होईल ते सांगता येत नसल्याने होमिओपथी ही कध्धी कध्धी सिद्ध होणारच नाही असं आचरट प्रतिपादन मी करु इच्छित नाही. पण आजरोजी ते जी थियरी ढळढळीतपणे मानताहेत ती म्हणजे : क्वांटिटी नसलेलं "औषध" घेऊन "स्पिरिट लाईक" गुणधर्म पाण्यात उतरलेले असणं- या थिअरीवर विश्वास ठेवून मग होमिओपथी जरुर घ्यावी. फक्त इन दॅट केस, त्यात पुरेसा जादूवाद आहे याची जाणीव असावी इतकंच अधोरेखित करतो. अंगारा, नजर सुरक्षा कवच इ इ हे अशा तर्कापलीकडल्या गोष्टीवर विश्वास ठेवून स्वीकारले जातात. शरीराला रोगापासून मुक्त करणारी औषधोपचार पद्धती स्वीकारताना आपण नेमके काय स्वीकारतो आहोत याची जाणीव ठेवून स्वीकारले तर कोणाचीच काहीच हरकत नसावी. माझा इनफॅक्ट अंधश्रद्धेलाही विरोध नाही. नजर सुरक्षा पेंडंट योग्य वाटल्यास जरुर घालावे पण माझी इच्छा इतकीच असते की आपण काय घालतोय ते किमान तर्कदृष्ट्या माहीत असावं. न कळलेलं बरंच काही आहे म्हणून काहीही खरं मानणं योग्य आहे का? अधिक स्पष्ट करायचं तर नजर सुरक्षा कवचाच्या मटेरियलमधे असलेल्या गुणामुळे वाईट नजरेतली "निगेटिव्ह" एनर्जी दूर लोटली जाते (रिफ्लेक्शन किंवा तत्सम प्रक्रियेने..) किंवा समोरच्या वाईट नजरवाल्यावरच उलट रोखली जाते अशी जी काही थियरी असेल ती तुम्हाला माहीत असेल आणि पटली तर जरुर वापरा. पण पेंडंटचा प्रवर्तक काय तर्काने असा दावा करतोय ते तुम्हाला माहीत पाहिजे. उगीच अमुक पेंडंट देणारे गुरुजी फार थोर आहेत किंवा तमुकला पेंडंटचा चांगला अनुभव आला.. मग त्यामागच्या थियरीला मारो गोली असं नसावं असं माझं मत आहे. होमिओपथीचं मूळ तत्व काय आहे ते ती घेणार्‍या बर्‍याच जणांना माहीत नसतं. ते नीट माहीत असेल आणि तरी घेत असतील त्यांच्याबाबतीत काही म्हणणं नाहीच. तरी, तुम्हाला होमिओपथी लागू पडते अशी तुमची खात्री आहे ना? मग तुम्ही जरुर घेत चला. माझी सर्व विधाने आणि प्रश्न तुमच्यापुरते रद्दबातल समजा (जशी होमिओपथी तुमच्यापुरती काम करतेय तसं..) :) हा प्रतिसाद राघांच्या प्रतिसादाच्या निमित्ताने मूळ प्रश्नाला आहे. राघांना नाही.

In reply to by गवि

बॅटमॅन गुरुवार, 06/19/2014 - 14:14
गविंचा प्रतिसाद उत्तम आहेच. पण धागाकर्ते डॉक्टरमहाशय का बरे गायब आहेत? त्यांची मतं काय आहेत? की फक्त मजा पाहण्यातच इंट्रेस आहे?

In reply to by गवि

हाडक्या गुरुवार, 06/19/2014 - 16:50
( ता. क. : काहीही माहिती नसल्याने आम्ही या चर्चेमध्ये कोणत्याही बाजूस नाही) गवि साहेब एक शंका.. इथे
मूळ पदार्थ अस्तित्वातच नसताना त्याचे गुण जणू चैतन्याच्या किंवा आत्म्याच्या रुपात पाण्यात टिकून राहतात
हा आक्षेप आहे का ? नाही म्हणजे माझा प्रश्न असा आहे की, जर औषधाची मात्रा वाढवली आणि असे समजू की रुग्णाच्या शरिरात हे औषध पुरेश्या प्रमाणात (हे प्रमाण किती हे बाजूला ठेवू) पोचले तर परिणाम होतो का ? अथवा परिणाम होतो हे तुम्हाला इथे मान्य आहे का ?

In reply to by हाडक्या

गवि गुरुवार, 06/19/2014 - 17:21
चोक्कस. हो. द्रव्य डिटेक्टेबल प्रमाणात शरीरात जात असेल तर परिणाम होतो की नाही हे पाहण्याची पात्रता त्यात ऑपॉप येऊन ते औषध मी जरुर घेईन. उपयोग होतो का हा नंतरचा प्रश्न झाला. त्याविषयी भाष्य करण्याचा मला अधिकार नाही म्हणून मी तो उपयोग आगोदरच मान्य केला आहे. इतरत्रही तुम्हाला हे लिहिलेलं आढळेल की औषध गुणकारी असेल हे मी गृहीतच धरतो. पण ते शरीरात जातच नाही हाच आक्षेप आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपलं शरीर हे मुख्यतः पाणी, सेंद्रीय पदार्थ तथा बारा निरींद्रीय क्षार युक्त असंख्य पिंडपेशींनी तयार झालेले आहे, निरींद्रीय क्षारांमुळे या पेशी तयार होत असतात, अन रक्ताभिसरणाने पोसल्या जातात, याशिवाय साखर, चरबी, पांडूर- Albumin, हे कर्बयुक्त सेंद्रीय पदार्थ असून चुना-Calcium, लोह-Iron, potashium, Natrum, Scical, हे ख-निज क्षार निरींद्रीय – कार्बन विरहित असतात.निरींद्रीय क्षारांचे प्रमाण अल्प असलं तरी अचेतन सेंद्रीय पदार्थापासून लक्षावधी विशिष्ठ पिंडपेशीसमुह निर्माण करत असतात. याचं कारणामुळे या बारा क्षारांना अनन्य साधारण महत्व आहे, त्याचाच अभ्यास करणें आहे.

मराठी कविता : नया दिन !

निमिष सोनार ·

आयुर्हित गुरुवार, 06/12/2014 - 15:00
प्रत्येकाला जगण्याची नवी उमेद देण्याची आणि प्रत्येकाच्या जीवनात अंधार दूर करुन प्रकाश वाटायची खरंच गरज आहे. कवितारुपी नवे चैतन्य दिल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद.

आयुर्हित गुरुवार, 06/12/2014 - 15:00
प्रत्येकाला जगण्याची नवी उमेद देण्याची आणि प्रत्येकाच्या जीवनात अंधार दूर करुन प्रकाश वाटायची खरंच गरज आहे. कवितारुपी नवे चैतन्य दिल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद.
लेखनविषय:
।। नया दिन ।। नवा दिवस उगवलाय! घेवून नवी पहाट! आलाय नवा प्रहर! टाकून जुनी कात! कालचाच मावळलेला तो सूर्य, आला आहे! नव्या आशेचा नवा सोनेरी किरणांचा शर्ट घालून! प्रत्येकाला जगण्याची नवी उमेद द्यायला! प्रत्येकाच्या जीवनात अंधार दूर करुन प्रकाश वाटायला! चला रोज स्वागत करुया त्या सूर्याचे ! जो घेवून येतो आपल्या जीवनात, रोज एक नवी पहाट! नवे चैतन्य! नवा दिवस! नया दिन !! # लेखक - निमिष सोनार

भय, निरुत्साह, साशंकता, ढळलेला आत्मविश्वास....

समीरसूर ·

पैसा गुरुवार, 06/12/2014 - 12:31
लेख आवडला. यात दिलेल्या गोष्टी नॉर्मल माणसालाही आयुष्य समृद्ध करायला निश्चित मदत करतील. ध्यान-धारणेबद्दल मी सांगू शकते. मी सिद्ध समाधी योग आणि ते ज्यावर आधारित आहे ते महर्षी महेश योगी यांचे भावातीत ध्यान शिकले आहे आणि गेली सुमारे २२ वर्षे करत आहे. महत्त्वाचा फायदा म्हणजे ताबडतोब रिलॅक्स होता येतं आणि अगदी कमी झोप पुरते. मनाला आणि शरीराला एकदम बरीच विश्रांती सहजच मिळते.

In reply to by पैसा

समीरसूर Mon, 06/16/2014 - 13:41
आपल्यासारखा अनुभव बर्‍याच लोकांना असतो. थोडक्यात काही टेक्निक्स देता येतील का? कमी वेळ लागणारी आणि लवकर रिलॅक्स करणारी टेक्निक्स असतील तर सगळ्यांनाच फायदा होईल. याचा सगळ्यांना फायदा होऊ शकतो का? का कुणास ठाऊक मला कधी या वाटेला जावेसे वाटले नाही. ध्यानधारणेचा उपयोग होण्यासाठी स्वभाव महत्वाचा असतो का? उदा. एखादा चांगला चित्रपट पाहिला की मला खूप रिलॅक्स्ड वाटते; विचारांमध्ये सुसुत्रता येते असा ढोबळ अनुभव आहे. एखादे चांगले पुस्तक वाचण्याची क्रिया जितके दिवस सुरु असते तितके दिवस मी खुश असतो. मग मला बाकी कशाचीच चिंता नसते. अगदी खाणे-पिणे देखील जसे असेल तसे चालते. बाकी कुणाचे काही विशेष अनुभव आहेत का? आपल्या प्रतिसादाबद्दल आभार!

In reply to by समीरसूर

विटेकर Mon, 06/16/2014 - 14:05
सायक्लिक मेडिटेशन नावाची एक ध्यानाची पद्धत, (प्राचीन योग शास्त्रावर आधारीतच पण जरा क्याप्सुल स्वरुपात)बन्गलोरच्या विवेकानंद योग विद्यापीठाने तयार केली आहे. त्याच्या क्लिनिकल ट्रायल झाल्या आहेत. मी पण अधिक माहीती गोळा करीत आहे. तणाव व्यवस्थापन हेच त्याचे सूत्र आहे. गुगलून पाहिल्यास अधिक माहीती मिळेल. तणाव टाळता येणार नाही पण व्यवस्थापन करता येईल असा त्यांचा दावा आहे. बाकी कुणाचे काही विशेष अनुभव आहेत का? पूर्वी पु ल चे कोणतेही पुस्तक माझा ताण हलका करत असे, हल्ली दासबोध घेऊन बसतो. वास्तविक एरवी मी रोजचा पेपेर देखील कधी चवीने वाचत नाही. पण प्रत्येकाने आप-आपले आनंद निधान स्वतः शोधणे आवश्यक आहे. एकच फॉर्म्युला सर्वाना लागू होणार नाही

In reply to by विटेकर

समीरसूर Mon, 06/16/2014 - 14:13
ताणाचे योग्य व्यवस्थापन आणि आपले आनंदाचे निधान आपण शोधणे महत्वाचे. ते जमले की मग काही कठीण राहत नसावे...

In reply to by समीरसूर

पैसा Mon, 06/16/2014 - 15:20
पण प्रत्यक्ष तंत्र हे गुरूनेच शिकवावे. ढोबळपणे त्यांची पद्धत सांगते. ते प्रत्येकाकडून एक फॉर्म भरून घेतात आणि त्यात दिसणार्‍या स्वभावानुसार गुरू एकाक्षरी मंत्र देतात. हे मंत्र ध्यानाच्या काळात सतत म्हणायचे नसतात, तर आपल्या मनात विचार येत आहेत हे जाणवले तर एखादवेळेस त्यांचा उच्चार मनात करायचा. १५/२० मिनिटे स्वस्थ बसणे. तेव्हा मनात जे विचार येतील ते येत जात रहातात आणि पाण्यातल्या लाटा जशा कमी होतात तसे हळूहळू मन शांत होत जाते अशी काहीशी ही पद्धत आहे. थोड्या वेळात विचाररहित अवस्था येते आणि अगदी शांत, रिलॅक्स वाटते. या काही क्षणात बर्‍याच वेळेच्या झोपेची गरज भागते. या ध्यानात कोणतेही धार्मिक कर्मकांड, तत्त्वज्ञान इ. चा काही संबंध नाही. हे खरे तर ध्यान नव्हेच. ध्यान म्हणजे एक विषय मनात धरून त्याचे स्मरण करणे. त्या अर्थाने ही क्रिया समाधीच्या जवळ जाणारी असावी असा माझा अंदाज. अंदाज म्हणते कारण मी या विषयात काही बोलावे असा माझा अधिकार नाही. फक्त प्रॅक्टिकल फायदे सांगू शकते. सर्वजण करू शकतात असा याच्या जवळ जाणारा प्रकार म्हणजे शवासन. किंवा प्राणायाम करून श्वासावर नियंत्रण आणूनही बराच फायदा होतो. मात्र जे तीव्र /क्रॉनिक डिप्रेशनचे शिकार आहेत त्यांना समाधी शक्यतो शिकवत नाहीत. त्यांना विचाररहित अवस्था प्राप्त होणे कठीण जाते. इतर कोणालाही, अगदी लहान मुलांपासून म्हातार्‍यांपर्यंत आणि कोणत्याही शारीरिक आजाराच्या रुग्णाला ध्यान/समाधी यांचा फायदा होतो.

In reply to by पैसा

damn Tue, 07/28/2015 - 10:21
ssy.org या संस्थळावर जाउन फिरून आलो. पण भावातीत ध्यान काही सापडले नाही. तुम्ही सांगितलेली relaxation ची पद्धत नक्की कशाचा प्रकार आहे- सिद्ध समाधी योग की भावातीत योग? अगदी कमी झोप म्हणजे साधारण किती कमी याबद्दल थोडी माहिती द्याल का? म्हणजे असे की, एखाद्या माणसाला साडे सात झोप आवश्यक असेल, तर तुम्ही सुचवलेल्या relaxation च्या पद्धतीने हा काल 3 किवा 4 तासांवर येऊ शकतो? की, त्याने/तीने केलेल्या शारीरिक कष्टांवर हे जास्त अवलंबून असेल? ssy.org या वेबसाईट वर बरेच प्रोग्राम आणि ट्रेनिंग आहेत. त्यापैकी, या झोपेच्या आणि relaxation च्या प्रश्ना साठी नक्की कोणते ट्रेनिंग किंवा प्रोग्राम सुचवाल? ssy.org ला चौकशी साठी एमैल पाठवलेला आहे. पण अजून तरी उत्तर आलेले नाहीये. शक्य झाल्यास अमेरिकेत च ट्रेनिंग करता आले तर बरे.

म्हैस गुरुवार, 06/12/2014 - 13:12
विपाश्यानेमध्ये अतिशय अतिशयोक्ती असते त्याचा खरच काही उपयोग होतो कि नाही ह्याबद्दल शंका आहे . पण रोज थोडी ध्यानधारणा आणि प्राणायामाचा हमखास उपयोग होतो. स्वतः चा नुभव आहे . म्हणजे तुमचा हजार रुपयाचं नुकसान झाला असेल तर ते तुम्हाला आपोआप मिळतील असा नाही तर डोकं शांत राहून विचार करण्यासाची , मार्ग काढण्याची शक्ती वाढेल

vrushali n गुरुवार, 06/12/2014 - 14:25
मी पण विपाश्यना साधनेचे दहा दिवसांचे बरेच कोर्सेस केलेत्,पण दैनंदिन साधना नाही करत्,जर रोज एक तास जरी केली तरिही बराच फायदा होतो आणी जर मनस्थीती नीराश असेल तर गंभीर पणे विपश्यनेचा १० दीवसांचा कोर्स करतो ,तेव्हा जास्त फायदा होतो असे मला वाटत

विटेकर गुरुवार, 06/12/2014 - 14:35
लेख उत्तम आनी मांड्णी छान आहे. फकत एका मुद्द्याबद्दल थोडासा असहमत आहे ! स्वप्ने - मोठी मोठी स्वप्ने बघणे मस्ट आहे. आज मिपावर लिहितोय, उद्या पुस्तक प्रकाशित करेनच किंवा स्वतःचा एखादा मोठा व्यवसाय उभारण्यासाठीच माझा जन्म आहे किंवा मी कुणीतरी प्रसिद्ध व्यक्ती झालो आहे आणि लोकं मला जिथे जाईन तिथे ओळखत आहेत अशी मोठी स्वप्ने, ध्येये ठेवल्याने नवीन जोम येतो. स्वतः बद्दलच्या अवास्तव कल्पना नेहमीच अधिक तणाव उत्पन्न करतात. असाध्य ध्येय घेतल्याने नैराश्य पदरी पड्ण्याचीच शक्यता अधिक असते. दिवास्वप्ने पाहणे हे देखील कमकुवत मनोवृत्तीचे निर्देशक आहे. माझ्या मते प्रत्येकाने वस्तुनिष्ठपणे अत्यंत कठोरपणे आत्मपरिक्षण करुन स्वॉट अनालिसिस करावे आणि मगच आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवावे. स्वॉट अनालिसिस करताना आपल्या जवळच्या व्यक्तीची ( आपण कसे आहोत हे आपल्या आई- वडीलांना जास्त चांगल्या प्रकारे माहीती असते , अर्थात अपवाद असू शकतात ) मदत घ्यावी , जेणेकरुन स्वॉट अधिक वस्तुनिष्ठ होईल. थोडक्यात रेटर बायस टाळावा. एकदा ध्येय ठरविल्यावर त्याचा वारंवार आढावा घेऊन परिस्थिती बदलली असेल तर ( जसे की अचानक उद्भवणारे शारिरिक आजार , अर्थिक फट्का किंवा धंदाला मिळालेला उठाव , परद्शी जाण्याची संधी )त्याप्रमाणे त्यात योग्य ते बदल करावेत. आपल्या आयुष्याकडून असणार्‍या अपेक्षा वास्तववादी असतील तर आयुष्य अधिक सुखकर होते, सुखासीन नाही झाले तरीही, असा स्वानुभव आहे.

In reply to by विटेकर

समीरसूर Mon, 06/16/2014 - 13:47
धन्यवाद, विटेकर साहेब. आपल्या या विचाराशी सहमत आहे. आपली कुवत ओळखणे महत्वाचे आहे. पण एखाद्याला जर खरोखर आपली कुवत जास्त आहे असे कळले आणि तरीदेखील ती व्यक्ती टंगळ-मंगळ करण्यात वेळ दवडत असेल तर अशा व्यक्तीसाठी अशी ध्येये समोर ठेवणे फायद्याचे ठरत असावे असे वाटते. कित्येक प्रसिद्ध लेखक आपली कुवत व्यवस्थित ओळखल्याने यशस्वी झालेले आपण पाहतो. माझ्या मित्रांपैकी एकाला चित्रे काढण्याचा छंद होता. त्याने छोट्या छोट्या गोष्टी चित्रांभोवती गुंफून स्वत:चे लहान मुलांसाठीचे एक आकर्षक पुस्तक 'स्कॉलास्टिक' तर्फे प्रकशित केले आणी त्याला प्रतिसादही उत्तम लाभला. सध्या तो दुसर्‍या पुस्तकाच्या तयारीत आहे. कुवत आणि प्रखर इच्छाशक्ती असेल तर स्वप्ने बघायाला हवीत तरच ती पूर्ण होण्याच्या शक्यता वाढतात असे वाटते.

विटेकर गुरुवार, 06/12/2014 - 14:35
लेख उत्तम आनी मांड्णी छान आहे. फकत एका मुद्द्याबद्दल थोडासा असहमत आहे ! स्वप्ने - मोठी मोठी स्वप्ने बघणे मस्ट आहे. आज मिपावर लिहितोय, उद्या पुस्तक प्रकाशित करेनच किंवा स्वतःचा एखादा मोठा व्यवसाय उभारण्यासाठीच माझा जन्म आहे किंवा मी कुणीतरी प्रसिद्ध व्यक्ती झालो आहे आणि लोकं मला जिथे जाईन तिथे ओळखत आहेत अशी मोठी स्वप्ने, ध्येये ठेवल्याने नवीन जोम येतो. स्वतः बद्दलच्या अवास्तव कल्पना नेहमीच अधिक तणाव उत्पन्न करतात. असाध्य ध्येय घेतल्याने नैराश्य पदरी पड्ण्याचीच शक्यता अधिक असते. दिवास्वप्ने पाहणे हे देखील कमकुवत मनोवृत्तीचे निर्देशक आहे. माझ्या मते प्रत्येकाने वस्तुनिष्ठपणे अत्यंत कठोरपणे आत्मपरिक्षण करुन स्वॉट अनालिसिस करावे आणि मगच आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवावे. स्वॉट अनालिसिस करताना आपल्या जवळच्या व्यक्तीची ( आपण कसे आहोत हे आपल्या आई- वडीलांना जास्त चांगल्या प्रकारे माहीती असते , अर्थात अपवाद असू शकतात ) मदत घ्यावी , जेणेकरुन स्वॉट अधिक वस्तुनिष्ठ होईल. थोडक्यात रेटर बायस टाळावा. एकदा ध्येय ठरविल्यावर त्याचा वारंवार आढावा घेऊन परिस्थिती बदलली असेल तर ( जसे की अचानक उद्भवणारे शारिरिक आजार , अर्थिक फट्का किंवा धंदाला मिळालेला उठाव , परद्शी जाण्याची संधी )त्याप्रमाणे त्यात योग्य ते बदल करावेत. आपल्या आयुष्याकडून असणार्‍या अपेक्षा वास्तववादी असतील तर आयुष्य अधिक सुखकर होते, सुखासीन नाही झाले तरीही, असा स्वानुभव आहे.

विटेकर गुरुवार, 06/12/2014 - 14:37
१४. विश्वास ठेवणे - आयुष्याच्या या मोठ्या खेळात चार-दोन चेंडू वाईड पडतात किंवा काही कॅचेस सुटतात किंवा कधी कधी खेळाडू त्रिफळाचित होतो. आयुष्याच्या या इतक्या मोठ्या प्रवासात या घटना क्षुल्लक ठरतात. दहावी-बारावीमध्ये कमी गुण मिळणे, एखादी परीक्षा अनुत्तीर्ण होणे, नोकरी गमावणे अशा घटना काही काळानंतर विसरल्या जातात. कुठल्याच घटनेने जीवन थांबून राहत नाही हा विश्वास बाळगणे महत्वाचे. काही काही प्रश्न चुटकीसरशी सुटतात. काहीतरी उपाय निघतोच आणि समस्या सुटतात ही खात्री बाळगली की समस्या खरोखर सुटायला सुरुवात होते. या अशा कमालीच्या सकारत्मक विचारांचे परिणाम चमत्काराइतकेच दिव्य असतात. त्यामुळे हा सकारात्मक विश्वास अत्यंत महत्वाचा असतो.

In reply to by pramanik

समीरसूर Mon, 06/16/2014 - 14:09
तौबा तौबा! मी सल्ला देत नाहीये. माझ्या तोकड्या अनुभवांवर आधारित असलेले उपाय सांगण्याचा प्रयत्न आहे हा. मी बापुडा काय सल्ला देणार. मी यातलं सगळंच सतत फॉलो नाही करु शकत. तेवढी मॅच्युरिटी नाही माझ्यात. जमेल तेवढं करतो. आणि एक, शेवटी काय आणि किती आणि कसं फॉलो करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. वजन कमी करण्याचे आटोकाट प्रयत्न करत असतांना ऋजुता दिवेकरची पुस्तके नुसती वाचून उपयोग नाही; ती फॉलो करावी लागतात. समोर चितळेंची आंबाबर्फी किंवा गोड-मऊ कॅडबरी डेअरी मिल्क सिल्क आल्यावर ठामपणे नाही म्हणावे लागते आणि त्यासाठी वाईट वाटण्याची स्टेज पार पाडावी लागते. आणि असं एकदाच नाही तर सतत सलग कित्येक महिने करावे लागते. सोबत योग्य तो व्यायाम करावा लागतो. अनावश्यक आराम कटाक्षाने टाळावा लागतो. टीव्हीसमोर बसणे बंद करावे लागते. मग हळूहळू वजन हलायला सुरुवात होते. :-) ही प्रखर इच्छाशक्ती आतून यावी लागते. ती बाहेर नाही मिळत. आणि अशी इच्छाशक्ती नसेल तर मग काय करणार? :-) फिर तो भगवान भी कुछ नही कर सकता...

मितान गुरुवार, 06/12/2014 - 18:31
आपण मानसोपचारत्ज्ञाची मदत घेत आहोत म्हणजे आपल्याला खूप मोठा आजार आहे असे वाटायला लागते. बहुतेक मानसोपचारतज्ञ त्यांच्या उपचारपद्धतींमधून तेच ध्वनित करत असतात. >>>> हे दुसरे वाक्य जरा गमतीशीर आहे ;)

In reply to by मितान

समीरसूर Mon, 06/16/2014 - 14:57
एखादी व्यक्ती अगदी साधा प्रॉब्लेम घेऊन मानसोपचारतज्ञाकडे गेली असे समजा. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला थोडे बेचैन वाटते आहे, थोडे टेंशन आलेले आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन व्यवस्थापन आल्याने काहीतरी नवीन उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत असल्याने ती व्यक्ती तिच्या नोकरीबाबत साशंक झालेली आहे असे धरून चलू. अशी व्यक्ती बरेच दिवस ही अस्वस्थता सहन केल्यानंतर मानसोपचारतज्ञाकडे गेली असे समजू. अशा परिस्थितीमध्येदेखील मानसोपचारतज्ञ त्या व्यक्तीला: "अरे काही नाही झाले तुला. असे होतच असते. थोडेफार टेंशन, मानसिक अस्वस्थता सगळ्यांनाच असते. काही काळजी करू नकोस. औषधांची अजिबात गरज नाही. जरा फिरायला जा, कुटुंबासोबत मजा कर, पिक्चरला जा, जरा मित्रांसोबत बस, गप्पा मार, गप्पांच्या ओघात दोघा-चौघांना, ते तिथे नाहीयेत असं बघून, सणसणीत शिव्या हासड, अगदीच वाटलं आणि झेपलं तर स्कॉचचे दोन घोट रिचव...सगळं व्यवस्थित होईल. बाकी नोकरीचे निर्णय घ्यायला आणि त्यातली आव्हाने पेलायला तू समर्थ आहेसच की. फिर कायको डरना? जा घरी. काय? आणि एक महिन्याने मला मला सांग." असं म्हणेल याची शाश्वती नाही. या उलट तो हजार प्रश्न विचारेल, त्याचा सहायक सगळं लिहून घेईल. मग गंभीर चेहरा करून तो म्हणेल, "मिस्टर आगलावे, मला तुमचा प्रॉब्लेम कळलाय. आता आपल्याला तुमच्या मनातलं हे भय टप्प्या-टप्प्याने काढावे लागेल. मग तुमचा आत्मविश्वास कसा वाढेल हे आपण नंतर बघू. सध्या तुम्हाला डिप्रेशन आहे असे वाटतेय. आपण सगळं हळू-हळू व्यवस्थित करू. काही घाबरू नका. ही मी काही औषधी लिहून देतो ती सुरु करा. आणि कौन्सेलिंगसाठी मात्र तुम्हाला आठवड्यातून एकदा यावे लागेल. एक तासाच्या या सेशन्स मध्ये तुमच्यामनातून भय काढून टाकण्यावर आमच्या सायकोलॉजिस्टचा भर असेल. साधारण तीन महिने कौन्सेलिंग करावे लागेल. औषधी आणि कौन्सेलिंगच्या मदतीने तुम्ही साधारण तीन ते साडे तीन महिन्यात बरे व्हाल ही खात्री बाळगा. आजकाल हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर आढळतो. विशेषतः तुमच्या (क्षेत्राचे नाव)मध्ये जास्त आढळतो. पण काळजी करू नका. ठीक आहे. या आता." संपलं!! आगलावे स्वतःला आग लागल्यासारखे भंजाळलेल्या अवस्थेत बाहेर पडतात. च्यायला, मला डिप्रेशन झाले आहे? सालं, कळलंच नाही. मग बाहेर पडल्यावर आगलावे डिप्रेशनचा चष्मा घालूनच फिरायला लागतात. घरी गुमसूम होऊन पडून राहणे; बायकोला, "अगं कळत नाही का तुला? मला डिप्रेशनचा त्रास आहे. शांत रहा जरा. काय जी कामं आहेत ती तू करून टाक. मला उत्साह नाही. मला डिप्रेशन आहे." असं म्हणून टीव्ही बघत राहणे असले उद्योग सुरु होतात. सुरुवातीला बायको काळजी घेते पण नंतर वैतागते. वाद होतात. अचानक आठ-दहा दिवसांनी प्रमोशनचे पत्र मिळते, किंवा पगारवाढीचे पत्र मिळते, किंवा ऑफिसात कसलेसे मानाचे बक्षीस मिळते, किंवा एखाद्या प्रोजेक्टवर किंवा कामावर अतिमहत्वाच्या व्यक्तीकडून प्रशंसा मिळते आणि आगलावे प्रसन्न होतात. औषधी मागे पडतात, कौन्सेलिंग बंद पडते आणि गाडी पुन्हा सुसाट धावू लागते. तोपर्यंत मानसोपचारतज्ञाने दोन-अडीच हजार, औषधविक्रेत्याने हजार-पाचशे कमावून घेतलेले असतात. आगलाव्यांचे डिप्रेशन वाफ होऊन उडून जाते. इथे (क्षेत्राचे नाव) काहीही असू शकते. आयटी ताणतणावांचे हक्काचे क्षेत्र! पण आगलाव्यांनी प्राणीसंग्रहालय पर्यवेक्षक असे जरी सांगीतले तरी मानसोपचारतज्ञ काहीतरी ठोकून देतातः "आजकाल झू मॅनेजमेंटच्या क्षेत्रात काम करणार्‍यांच्या मानसिक ताणतणावासंबंधीच्या तक्रारींमध्ये खूप वाढ झालेली आहे. प्राणी नीट आहेत की नाही याची काळजी वाहणे, २४ तास त्यांच्या आरोग्याची चिंता वाहणे, एखाद्या प्राण्याला काही झाले तर रात्री-अपरात्री झूमध्ये जाणे, रात्र-रात्र जागून काढणे, वरिष्ठांचे ऐकणे, त्यांची टारगेटस पूर्ण करणे, गणना करण्यासाठी भटकणे, त्यातून मग कुटुंबाला वेळ देता येत नाही; त्यातून कौटुंबिक वाद फोफावतात आणि मग मन बेचैन रहायला लागते. परवाच हिंदू मध्ये बातमी होती. युगांडामध्ये झू कर्मचार्‍यांसाठी खास मनःशक्ती वाढवण्याचे वर्ग अटेंड करणे युगांडाच्या सरकारने बंधनकारक केले आहे. मागे देनपसारच्या झू मधून एक रानमांजर एका घरगुती बोक्यासोबत पसार झाले तर तिथल्या झू सुपरवायझरने आत्महत्या केली. अशा चुकीसाठी तिकडे नोकरीवरून काढून टाकतात म्हणे!! एनीवे, बरं झालं तुम्ही लवकर आलात. आपण सगळं व्यवस्थित करू...." अतिशयोक्ती असेल कदाचित पण साधारणपणे असे होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे बारीक-सारीक गोष्टींसाठी मानसोपचारतज्ञाकडे जाणे टाळावे असे वाटते. मोठ्या आजारांसाठी मानसोपचारतज्ञांची मदत अपरिहार्य ठरते हे मात्र वास्तव आहे.

In reply to by समीरसूर

मदनबाण Fri, 06/20/2014 - 07:31
१२. अतिविचार टाळणे हा मुद्दा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे.विचारांवर नियंत्रण न-राहणे हे समस्येचे मूळ कारण ठरु शकते.भूतकाळात वारंवार रमू नये आणि भविष्याचा अती विचार करु नये,म्हणजे वर्तमान काळात जगणे सुसह्य होउ शकते. ज्या परिस्थीतीवर आपले नियंत्रण नाही अशावर विचार करुन काय फायदा ? असा प्रश्न आपणच आपल्या मनाला करावा, म्हणजे अतिविचार करण्यावर लगाम घालता येइल. आयटी ताणतणावांचे हक्काचे क्षेत्र! हे मात्र १००% खरे आहे.माझ्या ८ वर्षांच्या आयटी विश्वाच्या अनुभवातुन हे ठाम सांगु शकतो की इथे ताणाला पर्याय नाही. { आठवा एसएपी इंडिया चे सीइओ आणि एमडी रंजन दास हे वयाच्या ४२ वर्षी हार्ट अ‍ॅटॅक ने गेले. साल-२००९ } पण असे इतर कुठलेही क्षेत्र उरले आहे जिथे ताण नाही ? वर दिलेल्या १४ पर्यांय मधे अजुन एक पर्यात सुचवावा वाटतो तो म्हणजे संगीत. :) ताणात असेल तर तुम्हाला आवडणारी, आधी ऐकलेली / न-ऐकलेली गाणी ऐका. ताण कमी होण्यास नक्की मदत होइल. :) निदान मी तरी हाच उपाय माझ्या बाबतीत करतो. जाता जाता :- आपण आपल्या भ्रष्ट आणि माजलेल्या वळू सारखे वागणार्‍या राजकरणार्‍याकडुन एक गोष्ट मात्र शिकायला हवी ती म्हणजे निश्चिंत राहणे ! हजारो कोटींचे घोटाळे करुन हे सांड कसे मोकाट फिरतात बघा ! दिसतो कोणता ताण यांच्या चेहर्‍यावर ? उलट निर्लज्य हास्य मात्र नक्की दिसुन येइल. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तीर्थ विठ्ठल

In reply to by समीरसूर

नगरीनिरंजन Mon, 07/27/2015 - 12:37
लेख आणि हा प्रतिसाद आवडला. व्यावसायिक मदत घ्यायला गेलं की सगळे नाही तरी बरेचसे लोक लुबाडायला बघतात हे सत्य आहे. मुळात मानसिक विकार हे आपल्याच मनाच्या लोभ-मोहातून जन्मतात आणि इच्छा काबूत ठेवणे; इन्स्टन्ट ग्रॅटिफिकेशनची अपेक्षा न बाळगणे हाच त्यावर उपाय आहे. परंतु कॅपिटालिस्ट मार्केट इकॉनॉमीमध्ये ग्रीड इज गुड म्हणून लोकांना पढवतात आणि रॅट रेस लावून देतात. म्हणूनच अमेरिकेसारख्या देशात अनेक लोक ॲंटीडिप्रेसंट्सवर असलेले दिसतात.

In reply to by समीरसूर

द-बाहुबली Mon, 07/27/2015 - 12:56
अवो मानसशास्त्र व शास्त्रज्ञ म्हणजे जोक वाटतो काय ? मिपा(मानस)तज्ञांनी नक्किच हा प्रतिसाद वाचला नाहीये, कुठे हायेत ते ? त्यांचा प्रकाश इथे पडल्याशीवाय हे सर्व अपुर्ण आहे. मिपा(मानस)तज्ञांच्या अपेक्षित उत्तराच्या प्रतिक्षेत. त्यांचे मत म्हणजे ब्रम्हवाक्यच असते मनोविकारांबाबत. अगदी लेखकांच्या (पुस्तकाच्या) नावासहीत ते सोदाहरण देतील फेक्ट्स काय आणी तुमचे चुकीचे बोसर्वेशन काय आहे ते. असो आमचे आपले अल्पज्ञांनी लोकांचे प्रामाणीक मत आहे या जगात "असहायत्ता" ही एकमेव गोष्ट आहे जी डीप्रेशन वगैरे वगैरे स्टफची ( तेच भय, निरुत्साह, साशंकता, ढळलेला आत्मविश्वास....) जन्मदात्री आहे. जी व्यक्ती असहाय्य नाही ती कधीच डिप्रेस नाही.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 06/12/2014 - 18:56
लेखन,व्यायाम,वाचन,छंद हे सगळे म्हणायला ठीक वाटते हो पण नेहमीच सगळ्यांना जमेल असे नाही.त्यातल्या त्यात जे जमेल ते फॉलो करावे असे नोंदवतो

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

समीरसूर Mon, 06/16/2014 - 13:56
राजेंद्रजी, बर्‍याच गोष्टींसाठी वेळ मुद्दाम काढावा लागतो. व्यायामासाठी वेळ काढायलाच पाहिजे. सकाळी एक तास लवकर उठून व्यायाम केला तर दिवस खूप उत्साहात जातो असा (सध्याचा) अनुभव आहे. :-) हा शिरस्ता किती दिवस टिकतो ते माझ्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. मी कंपनीच्या बसने कंपनीमध्ये जातांना आणि परत येतांना वाचन करतो. माझी बरीच चांगली चांगली पुस्तके या दीड-पाऊणे दोन तासाच्या प्रवासात वाचून झालेली आहेत. इतकंच नव्हे तर मी सध्या करत असलेल्या एका दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाचा बहुतेक सगळा अभ्यास मी या प्रवासात केला आहे. घरी पोहोचल्यानंतर एखादा तास लेखन-वाचनाला देणे तितकेसे कठीण नसावे. अर्थात हे सगळे सगळ्यांच्याच बाबतीत शक्य होईल असे नाही. बर्‍याच लोकांच्या कामाच्या वेळा निश्चित नसतात. फिरतीचे काम असणार्‍यांना किंवा खूप मोठ्या जबाबदारीचे काम असणार्‍यांना किंवा घरात काही मोठी समस्या (वैद्यकीय, आर्थिक, इत्यादी) असलेल्यांना वेळ काढणे खरोखर अवघड असते ही जाणीव मला आहे. पण वेळेचे थोडे नियोजन केले तर थोड्या फार प्रमाणात काही वेळ सत्कारणी लावता येऊ शकेल असे वाटते.

अनन्या वर्तक Fri, 06/13/2014 - 01:01
समीर लेख अतिशय चांगला जमून आला आहे. बरेचसे विचार तुझ्या स्वतःच्या अनुभावर आधारलेले आहेत त्यामुळे वाचावयास चांगले वाटतात. आयुष्य खूप सुंदर आहे आणि येणारा प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे कारण तो पुन्हा अनुभवायला मिळणार नाही हि जाणीव जितक्या लवकर होईल तेवढे जगणे सोप्पे होते. माझा पंधरा मिनिटे आणि जास्तीत जास्त एक दिवस हा फॉरमुला आकाश आणि माझ्या साठी एकदम उपयुक्त आहे येणारा प्रत्येक दिवस आनंदात जगण्यासाठी.

In reply to by अनन्या वर्तक

समीरसूर Mon, 06/16/2014 - 13:59
अनन्या, धन्यवाद. तुमचा फॉर्म्युला इथे सांगता आला तर बरे होईल. तू दिलेली फॉर्म्युलाची ओळख तशी इंटरेस्टिंग आहे म्हणजे फॉर्म्युला हमखास असणारच. जरा हमे भी तो बताईये आपकी खुशहाली का राज. ;-)

सस्नेह Mon, 06/16/2014 - 13:10
औचित्यपूर्ण लेख. आणि वास्तववादीही. कित्येकदा समस्यांचा सामना कसा करावा हे महाखटपट करूनही समजत व जमत नाही. अशा वेळी लेखात सुचवल्याप्रमाणे वागणे श्रेयस्कर. म्हणतात, काही समस्या सोडवून सुटत नाहीत. त्या सोडून द्याव्या लागतात ..!!

विकास Mon, 06/16/2014 - 15:40
चांगला लेख आणि चर्चा! विपश्यनेबद्दल बरेच दोन्हीबाजूंनी ऐकलेले आहे. पण अनुभव नाही. मात्र असे वाटते की माणसास अनेकदा कोणीतरी, ज्याच्यावर/जिच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती संवादासाठी भेटल्यास अधिक फायदा होऊ शकेल. त्यात विवाहीत असल्यास पती-पत्नी एकमेकांशी बोलू शकतात, तरूण मुले-मुली जर आपल्या पालकांशी बोलू शकले अथवा जर कोणी, ज्याला मेंटर म्हणता येईल अशी व्यक्ती आयुष्यात असेल तिच्याशी बोलू शकली, अथवा कुठल्याही वयामध्ये असताना जर "उम्र भर दोस्त लेकीन साथ चलते है" असे मित्र असले तर फायदा होऊ शकेल असे वाटते.

ऋषिकेश Wed, 06/18/2014 - 14:37
छान. फक्त जास्त भावनाप्रधान नसणे आणि विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी विरोधाभासी आहेत. भावनाशील असल्याशिवाय पटकन विश्वास ठेवणे जमत नाही. नी माझ्यासारख्या फार भावनाप्रधान नसणार्‍याला एखाद्यावर विश्वास ठेवायला बराच विदा तरी लागतो नाहीतर काळ तरी!

In reply to by ऋषिकेश

विकास Wed, 06/18/2014 - 19:13
(अजून कोणी म्हणले असले तर माहीत नाही! पण) माझ्या मते भावनेच्या संदर्भात माणसांची वर्गवारी तीन प्रकारात करता येते: भावनाशून्य, भावनाप्रधान, भावनाविवश. अर्थातच पहीले आणि तिसरे ही दोन टोके आहेत तर मधले समतोल सांभाळणारे आहे. नी माझ्यासारख्या फार भावनाप्रधान नसणार्‍याला एखाद्यावर विश्वास ठेवायला बराच विदा तरी लागतो नाहीतर काळ तरी! योग्य माहिती मागणारी आणि नंतर गरज पडल्यास(च) विचार बदलण्यास तयार असलेली व्यक्ती भावनाप्रधानच असते. ज्या व्यक्तीचा विदा अथवा काळाशिवाय विश्वास बसतो ती व्यक्ती त्या विशिष्ठ विचार/कृतीसंदर्भात भावनाविवश असते. जी विदा मिळून अथवा काळानुरूप आलेल्या अनुभव येऊनही ते नाकारतते ती इतरांच्या संदर्भात भावनाशून्य आणि स्वतःच्या तत्वांच्या / विचारांच्या संदर्भात भावनाविवश असते. असे मला वाटते. ;)

चलत मुसाफिर Sun, 07/26/2015 - 17:08
1. वाचनामुळे मनःशांती आणि बुद्धीला चालना मिळते यात शंकाच नाही. पण माझा अनुभव असा आहे की इतिहास, प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे, युद्धकथा यांचे वाचन केल्यास, जी भीती आपण बाळगून आहोत, त्यातून (किंवा त्याहून वाईट परिस्थितीतून) अनेक लोक आधी गेलेले आहेत हे कळते आणि आपल्या समस्या तुलनेत क्षुल्लक आहेत याची जाणीव होते. 2. मर्यादित आणि निखळ स्वप्नरंजन हे तणावमुक्तीच्या दृष्टीने लाभदायक आसते असा माझा अनुभव आहे.

मुळात शब्द आहे तो ' विपश्यना ' असा. ' विपाश्यना ' नव्हे. विपश्यनेसंबंधी दोन्ही बाजु असतील , नाही असे नव्हे, पण एखादे ध्यानाचे तंत्र मुळातुनच चांगले समजले , तर त्याबाबत गैरसमज होण्याची शक्यता कमीच असते. मी स्वतः १९९५ पासून इगतपुरी येथे शिबिरासाठी जात आहे. विपश्यना एकाच शिबिरात मलाही समजली नव्हती , यासाठी किमान दोन ते तीन शिबिरास हजेरी , तीही मनापासून लावली पाहिजे. म्हणजे थोडेफार आकलन होते. त्यानंतर मी ज्यांना ज्यांना शिबिरासाठी प्रेरणा देवून पाठविले, त्या त्या सर्वांना , तेथील नियम्,वेळापत्रक, नेमके काय शिकविले जाणार आहे , याची पुर्ण कल्पना देवूनच पाठविले, त्यामुळे तेथे जाणार्‍यावर , ध्यान सोडून इतर ' दुसरीकडे ' पहाण्याची वेळ आली नव्हती. ' पैसा ' यांच्या म्हणण्यानुसार . ध्यानाच्या कुठल्याही प्रकाराने कमीत कमी वेळात रिलॅक्स होता येते व झोपही छान लागते. विपश्यनेमुळे ही गोष्ट सहज साधली जाते. शेवटी ज्याच्या त्याच्या आकलनाचा व अनुभवाचा प्रश्न आहे , तो तसाच ज्याच्या त्याच्यावर सोपविलेला बरा ! लेखातील सुचना व्यवहार्य व अमंलात आणण्याजोग्या आहेत एव्हढे मात्र स्वानुभवावरुन लिहू इछितो.

मानस् Mon, 07/27/2015 - 18:01
छानच आहे लेख, तुम्ही दिलेल्या १४ मुद्द्यांपैकि अर्धे जरी आचरणात आणले तरी मानसिक ताणतणावापासून निशितच सुटका होईल.

पैसा गुरुवार, 06/12/2014 - 12:31
लेख आवडला. यात दिलेल्या गोष्टी नॉर्मल माणसालाही आयुष्य समृद्ध करायला निश्चित मदत करतील. ध्यान-धारणेबद्दल मी सांगू शकते. मी सिद्ध समाधी योग आणि ते ज्यावर आधारित आहे ते महर्षी महेश योगी यांचे भावातीत ध्यान शिकले आहे आणि गेली सुमारे २२ वर्षे करत आहे. महत्त्वाचा फायदा म्हणजे ताबडतोब रिलॅक्स होता येतं आणि अगदी कमी झोप पुरते. मनाला आणि शरीराला एकदम बरीच विश्रांती सहजच मिळते.

In reply to by पैसा

समीरसूर Mon, 06/16/2014 - 13:41
आपल्यासारखा अनुभव बर्‍याच लोकांना असतो. थोडक्यात काही टेक्निक्स देता येतील का? कमी वेळ लागणारी आणि लवकर रिलॅक्स करणारी टेक्निक्स असतील तर सगळ्यांनाच फायदा होईल. याचा सगळ्यांना फायदा होऊ शकतो का? का कुणास ठाऊक मला कधी या वाटेला जावेसे वाटले नाही. ध्यानधारणेचा उपयोग होण्यासाठी स्वभाव महत्वाचा असतो का? उदा. एखादा चांगला चित्रपट पाहिला की मला खूप रिलॅक्स्ड वाटते; विचारांमध्ये सुसुत्रता येते असा ढोबळ अनुभव आहे. एखादे चांगले पुस्तक वाचण्याची क्रिया जितके दिवस सुरु असते तितके दिवस मी खुश असतो. मग मला बाकी कशाचीच चिंता नसते. अगदी खाणे-पिणे देखील जसे असेल तसे चालते. बाकी कुणाचे काही विशेष अनुभव आहेत का? आपल्या प्रतिसादाबद्दल आभार!

In reply to by समीरसूर

विटेकर Mon, 06/16/2014 - 14:05
सायक्लिक मेडिटेशन नावाची एक ध्यानाची पद्धत, (प्राचीन योग शास्त्रावर आधारीतच पण जरा क्याप्सुल स्वरुपात)बन्गलोरच्या विवेकानंद योग विद्यापीठाने तयार केली आहे. त्याच्या क्लिनिकल ट्रायल झाल्या आहेत. मी पण अधिक माहीती गोळा करीत आहे. तणाव व्यवस्थापन हेच त्याचे सूत्र आहे. गुगलून पाहिल्यास अधिक माहीती मिळेल. तणाव टाळता येणार नाही पण व्यवस्थापन करता येईल असा त्यांचा दावा आहे. बाकी कुणाचे काही विशेष अनुभव आहेत का? पूर्वी पु ल चे कोणतेही पुस्तक माझा ताण हलका करत असे, हल्ली दासबोध घेऊन बसतो. वास्तविक एरवी मी रोजचा पेपेर देखील कधी चवीने वाचत नाही. पण प्रत्येकाने आप-आपले आनंद निधान स्वतः शोधणे आवश्यक आहे. एकच फॉर्म्युला सर्वाना लागू होणार नाही

In reply to by विटेकर

समीरसूर Mon, 06/16/2014 - 14:13
ताणाचे योग्य व्यवस्थापन आणि आपले आनंदाचे निधान आपण शोधणे महत्वाचे. ते जमले की मग काही कठीण राहत नसावे...

In reply to by समीरसूर

पैसा Mon, 06/16/2014 - 15:20
पण प्रत्यक्ष तंत्र हे गुरूनेच शिकवावे. ढोबळपणे त्यांची पद्धत सांगते. ते प्रत्येकाकडून एक फॉर्म भरून घेतात आणि त्यात दिसणार्‍या स्वभावानुसार गुरू एकाक्षरी मंत्र देतात. हे मंत्र ध्यानाच्या काळात सतत म्हणायचे नसतात, तर आपल्या मनात विचार येत आहेत हे जाणवले तर एखादवेळेस त्यांचा उच्चार मनात करायचा. १५/२० मिनिटे स्वस्थ बसणे. तेव्हा मनात जे विचार येतील ते येत जात रहातात आणि पाण्यातल्या लाटा जशा कमी होतात तसे हळूहळू मन शांत होत जाते अशी काहीशी ही पद्धत आहे. थोड्या वेळात विचाररहित अवस्था येते आणि अगदी शांत, रिलॅक्स वाटते. या काही क्षणात बर्‍याच वेळेच्या झोपेची गरज भागते. या ध्यानात कोणतेही धार्मिक कर्मकांड, तत्त्वज्ञान इ. चा काही संबंध नाही. हे खरे तर ध्यान नव्हेच. ध्यान म्हणजे एक विषय मनात धरून त्याचे स्मरण करणे. त्या अर्थाने ही क्रिया समाधीच्या जवळ जाणारी असावी असा माझा अंदाज. अंदाज म्हणते कारण मी या विषयात काही बोलावे असा माझा अधिकार नाही. फक्त प्रॅक्टिकल फायदे सांगू शकते. सर्वजण करू शकतात असा याच्या जवळ जाणारा प्रकार म्हणजे शवासन. किंवा प्राणायाम करून श्वासावर नियंत्रण आणूनही बराच फायदा होतो. मात्र जे तीव्र /क्रॉनिक डिप्रेशनचे शिकार आहेत त्यांना समाधी शक्यतो शिकवत नाहीत. त्यांना विचाररहित अवस्था प्राप्त होणे कठीण जाते. इतर कोणालाही, अगदी लहान मुलांपासून म्हातार्‍यांपर्यंत आणि कोणत्याही शारीरिक आजाराच्या रुग्णाला ध्यान/समाधी यांचा फायदा होतो.

In reply to by पैसा

damn Tue, 07/28/2015 - 10:21
ssy.org या संस्थळावर जाउन फिरून आलो. पण भावातीत ध्यान काही सापडले नाही. तुम्ही सांगितलेली relaxation ची पद्धत नक्की कशाचा प्रकार आहे- सिद्ध समाधी योग की भावातीत योग? अगदी कमी झोप म्हणजे साधारण किती कमी याबद्दल थोडी माहिती द्याल का? म्हणजे असे की, एखाद्या माणसाला साडे सात झोप आवश्यक असेल, तर तुम्ही सुचवलेल्या relaxation च्या पद्धतीने हा काल 3 किवा 4 तासांवर येऊ शकतो? की, त्याने/तीने केलेल्या शारीरिक कष्टांवर हे जास्त अवलंबून असेल? ssy.org या वेबसाईट वर बरेच प्रोग्राम आणि ट्रेनिंग आहेत. त्यापैकी, या झोपेच्या आणि relaxation च्या प्रश्ना साठी नक्की कोणते ट्रेनिंग किंवा प्रोग्राम सुचवाल? ssy.org ला चौकशी साठी एमैल पाठवलेला आहे. पण अजून तरी उत्तर आलेले नाहीये. शक्य झाल्यास अमेरिकेत च ट्रेनिंग करता आले तर बरे.

म्हैस गुरुवार, 06/12/2014 - 13:12
विपाश्यानेमध्ये अतिशय अतिशयोक्ती असते त्याचा खरच काही उपयोग होतो कि नाही ह्याबद्दल शंका आहे . पण रोज थोडी ध्यानधारणा आणि प्राणायामाचा हमखास उपयोग होतो. स्वतः चा नुभव आहे . म्हणजे तुमचा हजार रुपयाचं नुकसान झाला असेल तर ते तुम्हाला आपोआप मिळतील असा नाही तर डोकं शांत राहून विचार करण्यासाची , मार्ग काढण्याची शक्ती वाढेल

vrushali n गुरुवार, 06/12/2014 - 14:25
मी पण विपाश्यना साधनेचे दहा दिवसांचे बरेच कोर्सेस केलेत्,पण दैनंदिन साधना नाही करत्,जर रोज एक तास जरी केली तरिही बराच फायदा होतो आणी जर मनस्थीती नीराश असेल तर गंभीर पणे विपश्यनेचा १० दीवसांचा कोर्स करतो ,तेव्हा जास्त फायदा होतो असे मला वाटत

विटेकर गुरुवार, 06/12/2014 - 14:35
लेख उत्तम आनी मांड्णी छान आहे. फकत एका मुद्द्याबद्दल थोडासा असहमत आहे ! स्वप्ने - मोठी मोठी स्वप्ने बघणे मस्ट आहे. आज मिपावर लिहितोय, उद्या पुस्तक प्रकाशित करेनच किंवा स्वतःचा एखादा मोठा व्यवसाय उभारण्यासाठीच माझा जन्म आहे किंवा मी कुणीतरी प्रसिद्ध व्यक्ती झालो आहे आणि लोकं मला जिथे जाईन तिथे ओळखत आहेत अशी मोठी स्वप्ने, ध्येये ठेवल्याने नवीन जोम येतो. स्वतः बद्दलच्या अवास्तव कल्पना नेहमीच अधिक तणाव उत्पन्न करतात. असाध्य ध्येय घेतल्याने नैराश्य पदरी पड्ण्याचीच शक्यता अधिक असते. दिवास्वप्ने पाहणे हे देखील कमकुवत मनोवृत्तीचे निर्देशक आहे. माझ्या मते प्रत्येकाने वस्तुनिष्ठपणे अत्यंत कठोरपणे आत्मपरिक्षण करुन स्वॉट अनालिसिस करावे आणि मगच आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवावे. स्वॉट अनालिसिस करताना आपल्या जवळच्या व्यक्तीची ( आपण कसे आहोत हे आपल्या आई- वडीलांना जास्त चांगल्या प्रकारे माहीती असते , अर्थात अपवाद असू शकतात ) मदत घ्यावी , जेणेकरुन स्वॉट अधिक वस्तुनिष्ठ होईल. थोडक्यात रेटर बायस टाळावा. एकदा ध्येय ठरविल्यावर त्याचा वारंवार आढावा घेऊन परिस्थिती बदलली असेल तर ( जसे की अचानक उद्भवणारे शारिरिक आजार , अर्थिक फट्का किंवा धंदाला मिळालेला उठाव , परद्शी जाण्याची संधी )त्याप्रमाणे त्यात योग्य ते बदल करावेत. आपल्या आयुष्याकडून असणार्‍या अपेक्षा वास्तववादी असतील तर आयुष्य अधिक सुखकर होते, सुखासीन नाही झाले तरीही, असा स्वानुभव आहे.

In reply to by विटेकर

समीरसूर Mon, 06/16/2014 - 13:47
धन्यवाद, विटेकर साहेब. आपल्या या विचाराशी सहमत आहे. आपली कुवत ओळखणे महत्वाचे आहे. पण एखाद्याला जर खरोखर आपली कुवत जास्त आहे असे कळले आणि तरीदेखील ती व्यक्ती टंगळ-मंगळ करण्यात वेळ दवडत असेल तर अशा व्यक्तीसाठी अशी ध्येये समोर ठेवणे फायद्याचे ठरत असावे असे वाटते. कित्येक प्रसिद्ध लेखक आपली कुवत व्यवस्थित ओळखल्याने यशस्वी झालेले आपण पाहतो. माझ्या मित्रांपैकी एकाला चित्रे काढण्याचा छंद होता. त्याने छोट्या छोट्या गोष्टी चित्रांभोवती गुंफून स्वत:चे लहान मुलांसाठीचे एक आकर्षक पुस्तक 'स्कॉलास्टिक' तर्फे प्रकशित केले आणी त्याला प्रतिसादही उत्तम लाभला. सध्या तो दुसर्‍या पुस्तकाच्या तयारीत आहे. कुवत आणि प्रखर इच्छाशक्ती असेल तर स्वप्ने बघायाला हवीत तरच ती पूर्ण होण्याच्या शक्यता वाढतात असे वाटते.

विटेकर गुरुवार, 06/12/2014 - 14:35
लेख उत्तम आनी मांड्णी छान आहे. फकत एका मुद्द्याबद्दल थोडासा असहमत आहे ! स्वप्ने - मोठी मोठी स्वप्ने बघणे मस्ट आहे. आज मिपावर लिहितोय, उद्या पुस्तक प्रकाशित करेनच किंवा स्वतःचा एखादा मोठा व्यवसाय उभारण्यासाठीच माझा जन्म आहे किंवा मी कुणीतरी प्रसिद्ध व्यक्ती झालो आहे आणि लोकं मला जिथे जाईन तिथे ओळखत आहेत अशी मोठी स्वप्ने, ध्येये ठेवल्याने नवीन जोम येतो. स्वतः बद्दलच्या अवास्तव कल्पना नेहमीच अधिक तणाव उत्पन्न करतात. असाध्य ध्येय घेतल्याने नैराश्य पदरी पड्ण्याचीच शक्यता अधिक असते. दिवास्वप्ने पाहणे हे देखील कमकुवत मनोवृत्तीचे निर्देशक आहे. माझ्या मते प्रत्येकाने वस्तुनिष्ठपणे अत्यंत कठोरपणे आत्मपरिक्षण करुन स्वॉट अनालिसिस करावे आणि मगच आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवावे. स्वॉट अनालिसिस करताना आपल्या जवळच्या व्यक्तीची ( आपण कसे आहोत हे आपल्या आई- वडीलांना जास्त चांगल्या प्रकारे माहीती असते , अर्थात अपवाद असू शकतात ) मदत घ्यावी , जेणेकरुन स्वॉट अधिक वस्तुनिष्ठ होईल. थोडक्यात रेटर बायस टाळावा. एकदा ध्येय ठरविल्यावर त्याचा वारंवार आढावा घेऊन परिस्थिती बदलली असेल तर ( जसे की अचानक उद्भवणारे शारिरिक आजार , अर्थिक फट्का किंवा धंदाला मिळालेला उठाव , परद्शी जाण्याची संधी )त्याप्रमाणे त्यात योग्य ते बदल करावेत. आपल्या आयुष्याकडून असणार्‍या अपेक्षा वास्तववादी असतील तर आयुष्य अधिक सुखकर होते, सुखासीन नाही झाले तरीही, असा स्वानुभव आहे.

विटेकर गुरुवार, 06/12/2014 - 14:37
१४. विश्वास ठेवणे - आयुष्याच्या या मोठ्या खेळात चार-दोन चेंडू वाईड पडतात किंवा काही कॅचेस सुटतात किंवा कधी कधी खेळाडू त्रिफळाचित होतो. आयुष्याच्या या इतक्या मोठ्या प्रवासात या घटना क्षुल्लक ठरतात. दहावी-बारावीमध्ये कमी गुण मिळणे, एखादी परीक्षा अनुत्तीर्ण होणे, नोकरी गमावणे अशा घटना काही काळानंतर विसरल्या जातात. कुठल्याच घटनेने जीवन थांबून राहत नाही हा विश्वास बाळगणे महत्वाचे. काही काही प्रश्न चुटकीसरशी सुटतात. काहीतरी उपाय निघतोच आणि समस्या सुटतात ही खात्री बाळगली की समस्या खरोखर सुटायला सुरुवात होते. या अशा कमालीच्या सकारत्मक विचारांचे परिणाम चमत्काराइतकेच दिव्य असतात. त्यामुळे हा सकारात्मक विश्वास अत्यंत महत्वाचा असतो.

In reply to by pramanik

समीरसूर Mon, 06/16/2014 - 14:09
तौबा तौबा! मी सल्ला देत नाहीये. माझ्या तोकड्या अनुभवांवर आधारित असलेले उपाय सांगण्याचा प्रयत्न आहे हा. मी बापुडा काय सल्ला देणार. मी यातलं सगळंच सतत फॉलो नाही करु शकत. तेवढी मॅच्युरिटी नाही माझ्यात. जमेल तेवढं करतो. आणि एक, शेवटी काय आणि किती आणि कसं फॉलो करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. वजन कमी करण्याचे आटोकाट प्रयत्न करत असतांना ऋजुता दिवेकरची पुस्तके नुसती वाचून उपयोग नाही; ती फॉलो करावी लागतात. समोर चितळेंची आंबाबर्फी किंवा गोड-मऊ कॅडबरी डेअरी मिल्क सिल्क आल्यावर ठामपणे नाही म्हणावे लागते आणि त्यासाठी वाईट वाटण्याची स्टेज पार पाडावी लागते. आणि असं एकदाच नाही तर सतत सलग कित्येक महिने करावे लागते. सोबत योग्य तो व्यायाम करावा लागतो. अनावश्यक आराम कटाक्षाने टाळावा लागतो. टीव्हीसमोर बसणे बंद करावे लागते. मग हळूहळू वजन हलायला सुरुवात होते. :-) ही प्रखर इच्छाशक्ती आतून यावी लागते. ती बाहेर नाही मिळत. आणि अशी इच्छाशक्ती नसेल तर मग काय करणार? :-) फिर तो भगवान भी कुछ नही कर सकता...

मितान गुरुवार, 06/12/2014 - 18:31
आपण मानसोपचारत्ज्ञाची मदत घेत आहोत म्हणजे आपल्याला खूप मोठा आजार आहे असे वाटायला लागते. बहुतेक मानसोपचारतज्ञ त्यांच्या उपचारपद्धतींमधून तेच ध्वनित करत असतात. >>>> हे दुसरे वाक्य जरा गमतीशीर आहे ;)

In reply to by मितान

समीरसूर Mon, 06/16/2014 - 14:57
एखादी व्यक्ती अगदी साधा प्रॉब्लेम घेऊन मानसोपचारतज्ञाकडे गेली असे समजा. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला थोडे बेचैन वाटते आहे, थोडे टेंशन आलेले आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन व्यवस्थापन आल्याने काहीतरी नवीन उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत असल्याने ती व्यक्ती तिच्या नोकरीबाबत साशंक झालेली आहे असे धरून चलू. अशी व्यक्ती बरेच दिवस ही अस्वस्थता सहन केल्यानंतर मानसोपचारतज्ञाकडे गेली असे समजू. अशा परिस्थितीमध्येदेखील मानसोपचारतज्ञ त्या व्यक्तीला: "अरे काही नाही झाले तुला. असे होतच असते. थोडेफार टेंशन, मानसिक अस्वस्थता सगळ्यांनाच असते. काही काळजी करू नकोस. औषधांची अजिबात गरज नाही. जरा फिरायला जा, कुटुंबासोबत मजा कर, पिक्चरला जा, जरा मित्रांसोबत बस, गप्पा मार, गप्पांच्या ओघात दोघा-चौघांना, ते तिथे नाहीयेत असं बघून, सणसणीत शिव्या हासड, अगदीच वाटलं आणि झेपलं तर स्कॉचचे दोन घोट रिचव...सगळं व्यवस्थित होईल. बाकी नोकरीचे निर्णय घ्यायला आणि त्यातली आव्हाने पेलायला तू समर्थ आहेसच की. फिर कायको डरना? जा घरी. काय? आणि एक महिन्याने मला मला सांग." असं म्हणेल याची शाश्वती नाही. या उलट तो हजार प्रश्न विचारेल, त्याचा सहायक सगळं लिहून घेईल. मग गंभीर चेहरा करून तो म्हणेल, "मिस्टर आगलावे, मला तुमचा प्रॉब्लेम कळलाय. आता आपल्याला तुमच्या मनातलं हे भय टप्प्या-टप्प्याने काढावे लागेल. मग तुमचा आत्मविश्वास कसा वाढेल हे आपण नंतर बघू. सध्या तुम्हाला डिप्रेशन आहे असे वाटतेय. आपण सगळं हळू-हळू व्यवस्थित करू. काही घाबरू नका. ही मी काही औषधी लिहून देतो ती सुरु करा. आणि कौन्सेलिंगसाठी मात्र तुम्हाला आठवड्यातून एकदा यावे लागेल. एक तासाच्या या सेशन्स मध्ये तुमच्यामनातून भय काढून टाकण्यावर आमच्या सायकोलॉजिस्टचा भर असेल. साधारण तीन महिने कौन्सेलिंग करावे लागेल. औषधी आणि कौन्सेलिंगच्या मदतीने तुम्ही साधारण तीन ते साडे तीन महिन्यात बरे व्हाल ही खात्री बाळगा. आजकाल हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर आढळतो. विशेषतः तुमच्या (क्षेत्राचे नाव)मध्ये जास्त आढळतो. पण काळजी करू नका. ठीक आहे. या आता." संपलं!! आगलावे स्वतःला आग लागल्यासारखे भंजाळलेल्या अवस्थेत बाहेर पडतात. च्यायला, मला डिप्रेशन झाले आहे? सालं, कळलंच नाही. मग बाहेर पडल्यावर आगलावे डिप्रेशनचा चष्मा घालूनच फिरायला लागतात. घरी गुमसूम होऊन पडून राहणे; बायकोला, "अगं कळत नाही का तुला? मला डिप्रेशनचा त्रास आहे. शांत रहा जरा. काय जी कामं आहेत ती तू करून टाक. मला उत्साह नाही. मला डिप्रेशन आहे." असं म्हणून टीव्ही बघत राहणे असले उद्योग सुरु होतात. सुरुवातीला बायको काळजी घेते पण नंतर वैतागते. वाद होतात. अचानक आठ-दहा दिवसांनी प्रमोशनचे पत्र मिळते, किंवा पगारवाढीचे पत्र मिळते, किंवा ऑफिसात कसलेसे मानाचे बक्षीस मिळते, किंवा एखाद्या प्रोजेक्टवर किंवा कामावर अतिमहत्वाच्या व्यक्तीकडून प्रशंसा मिळते आणि आगलावे प्रसन्न होतात. औषधी मागे पडतात, कौन्सेलिंग बंद पडते आणि गाडी पुन्हा सुसाट धावू लागते. तोपर्यंत मानसोपचारतज्ञाने दोन-अडीच हजार, औषधविक्रेत्याने हजार-पाचशे कमावून घेतलेले असतात. आगलाव्यांचे डिप्रेशन वाफ होऊन उडून जाते. इथे (क्षेत्राचे नाव) काहीही असू शकते. आयटी ताणतणावांचे हक्काचे क्षेत्र! पण आगलाव्यांनी प्राणीसंग्रहालय पर्यवेक्षक असे जरी सांगीतले तरी मानसोपचारतज्ञ काहीतरी ठोकून देतातः "आजकाल झू मॅनेजमेंटच्या क्षेत्रात काम करणार्‍यांच्या मानसिक ताणतणावासंबंधीच्या तक्रारींमध्ये खूप वाढ झालेली आहे. प्राणी नीट आहेत की नाही याची काळजी वाहणे, २४ तास त्यांच्या आरोग्याची चिंता वाहणे, एखाद्या प्राण्याला काही झाले तर रात्री-अपरात्री झूमध्ये जाणे, रात्र-रात्र जागून काढणे, वरिष्ठांचे ऐकणे, त्यांची टारगेटस पूर्ण करणे, गणना करण्यासाठी भटकणे, त्यातून मग कुटुंबाला वेळ देता येत नाही; त्यातून कौटुंबिक वाद फोफावतात आणि मग मन बेचैन रहायला लागते. परवाच हिंदू मध्ये बातमी होती. युगांडामध्ये झू कर्मचार्‍यांसाठी खास मनःशक्ती वाढवण्याचे वर्ग अटेंड करणे युगांडाच्या सरकारने बंधनकारक केले आहे. मागे देनपसारच्या झू मधून एक रानमांजर एका घरगुती बोक्यासोबत पसार झाले तर तिथल्या झू सुपरवायझरने आत्महत्या केली. अशा चुकीसाठी तिकडे नोकरीवरून काढून टाकतात म्हणे!! एनीवे, बरं झालं तुम्ही लवकर आलात. आपण सगळं व्यवस्थित करू...." अतिशयोक्ती असेल कदाचित पण साधारणपणे असे होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे बारीक-सारीक गोष्टींसाठी मानसोपचारतज्ञाकडे जाणे टाळावे असे वाटते. मोठ्या आजारांसाठी मानसोपचारतज्ञांची मदत अपरिहार्य ठरते हे मात्र वास्तव आहे.

In reply to by समीरसूर

मदनबाण Fri, 06/20/2014 - 07:31
१२. अतिविचार टाळणे हा मुद्दा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे.विचारांवर नियंत्रण न-राहणे हे समस्येचे मूळ कारण ठरु शकते.भूतकाळात वारंवार रमू नये आणि भविष्याचा अती विचार करु नये,म्हणजे वर्तमान काळात जगणे सुसह्य होउ शकते. ज्या परिस्थीतीवर आपले नियंत्रण नाही अशावर विचार करुन काय फायदा ? असा प्रश्न आपणच आपल्या मनाला करावा, म्हणजे अतिविचार करण्यावर लगाम घालता येइल. आयटी ताणतणावांचे हक्काचे क्षेत्र! हे मात्र १००% खरे आहे.माझ्या ८ वर्षांच्या आयटी विश्वाच्या अनुभवातुन हे ठाम सांगु शकतो की इथे ताणाला पर्याय नाही. { आठवा एसएपी इंडिया चे सीइओ आणि एमडी रंजन दास हे वयाच्या ४२ वर्षी हार्ट अ‍ॅटॅक ने गेले. साल-२००९ } पण असे इतर कुठलेही क्षेत्र उरले आहे जिथे ताण नाही ? वर दिलेल्या १४ पर्यांय मधे अजुन एक पर्यात सुचवावा वाटतो तो म्हणजे संगीत. :) ताणात असेल तर तुम्हाला आवडणारी, आधी ऐकलेली / न-ऐकलेली गाणी ऐका. ताण कमी होण्यास नक्की मदत होइल. :) निदान मी तरी हाच उपाय माझ्या बाबतीत करतो. जाता जाता :- आपण आपल्या भ्रष्ट आणि माजलेल्या वळू सारखे वागणार्‍या राजकरणार्‍याकडुन एक गोष्ट मात्र शिकायला हवी ती म्हणजे निश्चिंत राहणे ! हजारो कोटींचे घोटाळे करुन हे सांड कसे मोकाट फिरतात बघा ! दिसतो कोणता ताण यांच्या चेहर्‍यावर ? उलट निर्लज्य हास्य मात्र नक्की दिसुन येइल. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तीर्थ विठ्ठल

In reply to by समीरसूर

नगरीनिरंजन Mon, 07/27/2015 - 12:37
लेख आणि हा प्रतिसाद आवडला. व्यावसायिक मदत घ्यायला गेलं की सगळे नाही तरी बरेचसे लोक लुबाडायला बघतात हे सत्य आहे. मुळात मानसिक विकार हे आपल्याच मनाच्या लोभ-मोहातून जन्मतात आणि इच्छा काबूत ठेवणे; इन्स्टन्ट ग्रॅटिफिकेशनची अपेक्षा न बाळगणे हाच त्यावर उपाय आहे. परंतु कॅपिटालिस्ट मार्केट इकॉनॉमीमध्ये ग्रीड इज गुड म्हणून लोकांना पढवतात आणि रॅट रेस लावून देतात. म्हणूनच अमेरिकेसारख्या देशात अनेक लोक ॲंटीडिप्रेसंट्सवर असलेले दिसतात.

In reply to by समीरसूर

द-बाहुबली Mon, 07/27/2015 - 12:56
अवो मानसशास्त्र व शास्त्रज्ञ म्हणजे जोक वाटतो काय ? मिपा(मानस)तज्ञांनी नक्किच हा प्रतिसाद वाचला नाहीये, कुठे हायेत ते ? त्यांचा प्रकाश इथे पडल्याशीवाय हे सर्व अपुर्ण आहे. मिपा(मानस)तज्ञांच्या अपेक्षित उत्तराच्या प्रतिक्षेत. त्यांचे मत म्हणजे ब्रम्हवाक्यच असते मनोविकारांबाबत. अगदी लेखकांच्या (पुस्तकाच्या) नावासहीत ते सोदाहरण देतील फेक्ट्स काय आणी तुमचे चुकीचे बोसर्वेशन काय आहे ते. असो आमचे आपले अल्पज्ञांनी लोकांचे प्रामाणीक मत आहे या जगात "असहायत्ता" ही एकमेव गोष्ट आहे जी डीप्रेशन वगैरे वगैरे स्टफची ( तेच भय, निरुत्साह, साशंकता, ढळलेला आत्मविश्वास....) जन्मदात्री आहे. जी व्यक्ती असहाय्य नाही ती कधीच डिप्रेस नाही.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 06/12/2014 - 18:56
लेखन,व्यायाम,वाचन,छंद हे सगळे म्हणायला ठीक वाटते हो पण नेहमीच सगळ्यांना जमेल असे नाही.त्यातल्या त्यात जे जमेल ते फॉलो करावे असे नोंदवतो

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

समीरसूर Mon, 06/16/2014 - 13:56
राजेंद्रजी, बर्‍याच गोष्टींसाठी वेळ मुद्दाम काढावा लागतो. व्यायामासाठी वेळ काढायलाच पाहिजे. सकाळी एक तास लवकर उठून व्यायाम केला तर दिवस खूप उत्साहात जातो असा (सध्याचा) अनुभव आहे. :-) हा शिरस्ता किती दिवस टिकतो ते माझ्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. मी कंपनीच्या बसने कंपनीमध्ये जातांना आणि परत येतांना वाचन करतो. माझी बरीच चांगली चांगली पुस्तके या दीड-पाऊणे दोन तासाच्या प्रवासात वाचून झालेली आहेत. इतकंच नव्हे तर मी सध्या करत असलेल्या एका दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाचा बहुतेक सगळा अभ्यास मी या प्रवासात केला आहे. घरी पोहोचल्यानंतर एखादा तास लेखन-वाचनाला देणे तितकेसे कठीण नसावे. अर्थात हे सगळे सगळ्यांच्याच बाबतीत शक्य होईल असे नाही. बर्‍याच लोकांच्या कामाच्या वेळा निश्चित नसतात. फिरतीचे काम असणार्‍यांना किंवा खूप मोठ्या जबाबदारीचे काम असणार्‍यांना किंवा घरात काही मोठी समस्या (वैद्यकीय, आर्थिक, इत्यादी) असलेल्यांना वेळ काढणे खरोखर अवघड असते ही जाणीव मला आहे. पण वेळेचे थोडे नियोजन केले तर थोड्या फार प्रमाणात काही वेळ सत्कारणी लावता येऊ शकेल असे वाटते.

अनन्या वर्तक Fri, 06/13/2014 - 01:01
समीर लेख अतिशय चांगला जमून आला आहे. बरेचसे विचार तुझ्या स्वतःच्या अनुभावर आधारलेले आहेत त्यामुळे वाचावयास चांगले वाटतात. आयुष्य खूप सुंदर आहे आणि येणारा प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे कारण तो पुन्हा अनुभवायला मिळणार नाही हि जाणीव जितक्या लवकर होईल तेवढे जगणे सोप्पे होते. माझा पंधरा मिनिटे आणि जास्तीत जास्त एक दिवस हा फॉरमुला आकाश आणि माझ्या साठी एकदम उपयुक्त आहे येणारा प्रत्येक दिवस आनंदात जगण्यासाठी.

In reply to by अनन्या वर्तक

समीरसूर Mon, 06/16/2014 - 13:59
अनन्या, धन्यवाद. तुमचा फॉर्म्युला इथे सांगता आला तर बरे होईल. तू दिलेली फॉर्म्युलाची ओळख तशी इंटरेस्टिंग आहे म्हणजे फॉर्म्युला हमखास असणारच. जरा हमे भी तो बताईये आपकी खुशहाली का राज. ;-)

सस्नेह Mon, 06/16/2014 - 13:10
औचित्यपूर्ण लेख. आणि वास्तववादीही. कित्येकदा समस्यांचा सामना कसा करावा हे महाखटपट करूनही समजत व जमत नाही. अशा वेळी लेखात सुचवल्याप्रमाणे वागणे श्रेयस्कर. म्हणतात, काही समस्या सोडवून सुटत नाहीत. त्या सोडून द्याव्या लागतात ..!!

विकास Mon, 06/16/2014 - 15:40
चांगला लेख आणि चर्चा! विपश्यनेबद्दल बरेच दोन्हीबाजूंनी ऐकलेले आहे. पण अनुभव नाही. मात्र असे वाटते की माणसास अनेकदा कोणीतरी, ज्याच्यावर/जिच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती संवादासाठी भेटल्यास अधिक फायदा होऊ शकेल. त्यात विवाहीत असल्यास पती-पत्नी एकमेकांशी बोलू शकतात, तरूण मुले-मुली जर आपल्या पालकांशी बोलू शकले अथवा जर कोणी, ज्याला मेंटर म्हणता येईल अशी व्यक्ती आयुष्यात असेल तिच्याशी बोलू शकली, अथवा कुठल्याही वयामध्ये असताना जर "उम्र भर दोस्त लेकीन साथ चलते है" असे मित्र असले तर फायदा होऊ शकेल असे वाटते.

ऋषिकेश Wed, 06/18/2014 - 14:37
छान. फक्त जास्त भावनाप्रधान नसणे आणि विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी विरोधाभासी आहेत. भावनाशील असल्याशिवाय पटकन विश्वास ठेवणे जमत नाही. नी माझ्यासारख्या फार भावनाप्रधान नसणार्‍याला एखाद्यावर विश्वास ठेवायला बराच विदा तरी लागतो नाहीतर काळ तरी!

In reply to by ऋषिकेश

विकास Wed, 06/18/2014 - 19:13
(अजून कोणी म्हणले असले तर माहीत नाही! पण) माझ्या मते भावनेच्या संदर्भात माणसांची वर्गवारी तीन प्रकारात करता येते: भावनाशून्य, भावनाप्रधान, भावनाविवश. अर्थातच पहीले आणि तिसरे ही दोन टोके आहेत तर मधले समतोल सांभाळणारे आहे. नी माझ्यासारख्या फार भावनाप्रधान नसणार्‍याला एखाद्यावर विश्वास ठेवायला बराच विदा तरी लागतो नाहीतर काळ तरी! योग्य माहिती मागणारी आणि नंतर गरज पडल्यास(च) विचार बदलण्यास तयार असलेली व्यक्ती भावनाप्रधानच असते. ज्या व्यक्तीचा विदा अथवा काळाशिवाय विश्वास बसतो ती व्यक्ती त्या विशिष्ठ विचार/कृतीसंदर्भात भावनाविवश असते. जी विदा मिळून अथवा काळानुरूप आलेल्या अनुभव येऊनही ते नाकारतते ती इतरांच्या संदर्भात भावनाशून्य आणि स्वतःच्या तत्वांच्या / विचारांच्या संदर्भात भावनाविवश असते. असे मला वाटते. ;)

चलत मुसाफिर Sun, 07/26/2015 - 17:08
1. वाचनामुळे मनःशांती आणि बुद्धीला चालना मिळते यात शंकाच नाही. पण माझा अनुभव असा आहे की इतिहास, प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे, युद्धकथा यांचे वाचन केल्यास, जी भीती आपण बाळगून आहोत, त्यातून (किंवा त्याहून वाईट परिस्थितीतून) अनेक लोक आधी गेलेले आहेत हे कळते आणि आपल्या समस्या तुलनेत क्षुल्लक आहेत याची जाणीव होते. 2. मर्यादित आणि निखळ स्वप्नरंजन हे तणावमुक्तीच्या दृष्टीने लाभदायक आसते असा माझा अनुभव आहे.

मुळात शब्द आहे तो ' विपश्यना ' असा. ' विपाश्यना ' नव्हे. विपश्यनेसंबंधी दोन्ही बाजु असतील , नाही असे नव्हे, पण एखादे ध्यानाचे तंत्र मुळातुनच चांगले समजले , तर त्याबाबत गैरसमज होण्याची शक्यता कमीच असते. मी स्वतः १९९५ पासून इगतपुरी येथे शिबिरासाठी जात आहे. विपश्यना एकाच शिबिरात मलाही समजली नव्हती , यासाठी किमान दोन ते तीन शिबिरास हजेरी , तीही मनापासून लावली पाहिजे. म्हणजे थोडेफार आकलन होते. त्यानंतर मी ज्यांना ज्यांना शिबिरासाठी प्रेरणा देवून पाठविले, त्या त्या सर्वांना , तेथील नियम्,वेळापत्रक, नेमके काय शिकविले जाणार आहे , याची पुर्ण कल्पना देवूनच पाठविले, त्यामुळे तेथे जाणार्‍यावर , ध्यान सोडून इतर ' दुसरीकडे ' पहाण्याची वेळ आली नव्हती. ' पैसा ' यांच्या म्हणण्यानुसार . ध्यानाच्या कुठल्याही प्रकाराने कमीत कमी वेळात रिलॅक्स होता येते व झोपही छान लागते. विपश्यनेमुळे ही गोष्ट सहज साधली जाते. शेवटी ज्याच्या त्याच्या आकलनाचा व अनुभवाचा प्रश्न आहे , तो तसाच ज्याच्या त्याच्यावर सोपविलेला बरा ! लेखातील सुचना व्यवहार्य व अमंलात आणण्याजोग्या आहेत एव्हढे मात्र स्वानुभवावरुन लिहू इछितो.

मानस् Mon, 07/27/2015 - 18:01
छानच आहे लेख, तुम्ही दिलेल्या १४ मुद्द्यांपैकि अर्धे जरी आचरणात आणले तरी मानसिक ताणतणावापासून निशितच सुटका होईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एका मानसिक ताणतणावासंबधित लेखाला मी दिलेला प्रतिसाद (किंचित फेरफार करून) येथे लेख म्हणून टाकत आहे. बर्‍याच लोकांना असे छोटे-छोटे मनःस्वास्थ-विषयक त्रास होत असतात. कदाचित उपयोग होऊ शकेल हा लेख टाकण्याचा हेतू. शिवाय यातून चर्चा होऊन काही उपाय, अनुभव, निरीक्षणे शेअर करता आली तर सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल. -------------------------------------------------------------------------------- अनामिक भय हे थोड्या-फार फरकाने सगळ्यांनाच असते. ते एखाद्या झाडाच्या कुजलेल्या अजस्त्र फांदीप्रमाणे कधी कधी खळखळ वाहणार्‍या निरुंद भागात अडकते आणि आपल्या मनाच्या प्रवाहीपणाला अडथळा ठरते.

सेव्हन कप केक

लव उ ·

पैसा गुरुवार, 06/12/2014 - 14:59
मस्त आहे पाकृ! केक म्हणा, नाहीतर वड्या म्हणा! चांगलंच लागत असणार!

इरसाल गुरुवार, 06/12/2014 - 16:08
पाकृ कशी का असेना आपल्याला तुमचं नाव जाम आवडलं बघा. पुपाशु.

In reply to by रेवती

सखी गुरुवार, 06/12/2014 - 17:24
मीही हेच म्हणणार होते, तेलगु मैत्रिणीने एकदा केलेल्या या वड्या - पण तिने (खाली अनन्न्या म्हणाली तसे) साखर कमी करुन बदाम+काजुची पुड १ कप घातली होती. फार सुरेख झाल्या होत्या त्या वड्या. फक्त इथे सगळे साहित्य आधीच एकत्र केले आहे तिने बेसन तुपावर परतुन घ्यायला सांगितले होते, ते बरोबर वाटते नाहीतर डाळीचे पीठ कच्चे लागेल असे वाटते.

अनन्न्या गुरुवार, 06/12/2014 - 16:36
यात तीन कप साखर घातल्यास जास्त गोड होतात, दोन कप घालून करून बघा. बेसनाऐवजी मूगपीठ वापरले तर आणखी पौष्टीक होतील. छान लागतात चवीला! माझा लेक याला पौष्टीक वड्याच म्हणतो, त्याला खूप आवडतात.

प्रभाकर पेठकर Fri, 06/13/2014 - 10:26
एक कप साजुक तुप आणि ३ कप साखर हे दोन भयावह जीन्नस सोडता अतिशय आकर्षक पाककृती वाटते आहे. करुन पाहीनच एकदा पण वड्या/केक मित्रमंडळीत वाटावा लागेल.

पैसा गुरुवार, 06/12/2014 - 14:59
मस्त आहे पाकृ! केक म्हणा, नाहीतर वड्या म्हणा! चांगलंच लागत असणार!

इरसाल गुरुवार, 06/12/2014 - 16:08
पाकृ कशी का असेना आपल्याला तुमचं नाव जाम आवडलं बघा. पुपाशु.

In reply to by रेवती

सखी गुरुवार, 06/12/2014 - 17:24
मीही हेच म्हणणार होते, तेलगु मैत्रिणीने एकदा केलेल्या या वड्या - पण तिने (खाली अनन्न्या म्हणाली तसे) साखर कमी करुन बदाम+काजुची पुड १ कप घातली होती. फार सुरेख झाल्या होत्या त्या वड्या. फक्त इथे सगळे साहित्य आधीच एकत्र केले आहे तिने बेसन तुपावर परतुन घ्यायला सांगितले होते, ते बरोबर वाटते नाहीतर डाळीचे पीठ कच्चे लागेल असे वाटते.

अनन्न्या गुरुवार, 06/12/2014 - 16:36
यात तीन कप साखर घातल्यास जास्त गोड होतात, दोन कप घालून करून बघा. बेसनाऐवजी मूगपीठ वापरले तर आणखी पौष्टीक होतील. छान लागतात चवीला! माझा लेक याला पौष्टीक वड्याच म्हणतो, त्याला खूप आवडतात.

प्रभाकर पेठकर Fri, 06/13/2014 - 10:26
एक कप साजुक तुप आणि ३ कप साखर हे दोन भयावह जीन्नस सोडता अतिशय आकर्षक पाककृती वाटते आहे. करुन पाहीनच एकदा पण वड्या/केक मित्रमंडळीत वाटावा लागेल.
सेव्हन कप केक 7cup_cake मिपावर पाककृती द्यायचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तस म्हणायला केक पण चविला मात्र बर्फीसारखी अस काहिस आहे. 7cup_cake साहित्य: बेसन १ कप साजुक तूप १ कप दुध १ कप ओल्या नारळाची चोय १ कप साखर ३ कप कृती:
  1. वरील सर्व साहित्य कढईत एकत्र करून घ्यावे.
  2. मंद आचेवर १५ मिनिटे सतत ढवळत रहावे.
  3. कडा सुटायला लागल्यावर गस बंद करवा.

अस्थी कृषीवलांच्या

गंगाधर मुटे ·

गंगाधर मुटे गुरुवार, 06/12/2014 - 03:59
मा. पंतप्रधान मोदींचे आजचे संसदेतील भाषण ऐकले. अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला करतात आत्महत्त्या का देश पोसणारे? या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही, हे मला अपेक्षितच होते. शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून येईल एवढा भाव देण्याचे सोडून बाकी सर्वच ते बोलले. कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे. मात्र शेती सोडून अन्य बर्‍याच क्षेत्रांना ’अच्छे’ दिवस येतील, याची झलक त्यांच्या भाषणात जाणवली. विकासाचा मुद्दा आणि सामोपचाराने निर्णय घेऊन धोरण राबवायचे हा त्यांचा मुद्दा अत्यंत प्रामाणिक आणि देशहितासाठी प्रगल्भ राजकारण कसे असू शकते, हे अधोरेखित करणारा होता. आजचे त्यांचे भाषण अनेक क्षेत्रात क्रांतीकरक बदल घडवून आणणे शक्य आहे, याची ग्वाही देणारे आणि राष्ट्रासमोर सकारात्मक आशादायी चित्र निर्माण करणारे आहे. शिक्षण क्षेत्राविषयीचा त्यांचा मुद्दा ऐकताना माझ्या "वांगे अमर रहे" पुस्तकातील "प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती" या लेखाची आठवण झाली. बर्‍याच काळानंतर देशाला पंतप्रधान मिळाला आणि या देशाला पंतप्रधान आहे, असे जाणवायला लागले आहे. - गंगाधर मुटे ----------------------------------------------------------------------

In reply to by गंगाधर मुटे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/12/2014 - 15:21
नक्की काय म्हणायचे आहे तेच कळले नाही ... एकी कडे तुम्ही म्हणता की
शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून येईल एवढा भाव देण्याचे सोडून बाकी सर्वच ते बोलले. कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे.
आणि दुसरी कडे म्हणता की
बर्‍याच काळानंतर देशाला पंतप्रधान मिळाला आणि या देशाला पंतप्रधान आहे, असे जाणवायला लागले आहे.
तुम्ही मोदींचे कौतुक करताय की निशेध की दोन्ही की काहीच नाही ? जोवर शेतकरी डोकं लाऊन अक्कल हुशारीने शेती करत नाही तोवर त्यांच्या समस्या सुटण्याची तिळमात्र आशा नाही मग मोदी प्रंतप्रधान असोत की पवार ...की जोशी !

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे गुरुवार, 06/12/2014 - 23:15
मला काय म्हणायचे आहे ते मी स्पष्टपणे कोणताही आडपडदा न ठेवता नोंदवले आहे. लेखनातील कोणताच मुद्दा गुढ किंवा समजण्यास कठीण असा नाहिये. परत एकदा वाचा, सहज लक्शात येईल.
जोवर शेतकरी डोकं लाऊन अक्कल हुशारीने शेती करत नाही तोवर त्यांच्या समस्या सुटण्याची तिळमात्र आशा नाही मग मोदी प्रंतप्रधान असोत की पवार ...की जोशी !
या देशातील सत्तर अंशी कोटी शेतकरी समाज डोकं लाऊन अक्कल हुशारीने शेती करत नाही, असे तुमचे एकट्याचेच मत नाहीये, गेली ३५ वर्षे मी हेच ऐकत आलेलो आहे. परंतू याच तर्‍हेच्या मुद्द्यावर ३५ वर्षापूर्वी मी जाहिर आवाहन केले होते की, ठीक आहे.... आम्ही साठ-सत्तर टक्के शेतकरी बेअक्कल,नालायक आहोत पण तुमच्यापैकी एखाद्या बिगरशेतकर्‍याने आम्हाला शेती कशी करावी, याचे मॉडेल म्हणून फक्त १ वर्ष प्रत्यक्ष शेती करून दाखवावी. आणि त्याच शेतीतील उत्पन्नाच्या बळावर जगून दाखवावे. अजूनपर्यंत एकही माणूस हे आव्हान पेलायला समोर आलेला नाहीये. दोन वर्षापूर्वी मी विद्यापिठाच्या कुलगूरूला असेच जाहिर आव्हान दिले होते. तोही पळपुटा निघाला. ते आव्हान माझ्या "वांगे अमर रहे" या पुस्तकात लेखी दस्तावेज म्हणून उपल्ब्ध आहे. किंवा कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! येथेही वाचता येईल.

In reply to by गंगाधर मुटे

सुनील Fri, 06/13/2014 - 09:16
या देशातील सत्तर अंशी कोटी शेतकरी समाज
देशात ७०-८० कोटी लोक थेट शेतीवर (शेतीच्या उत्पन्नावर) अवलंबून आहेत, हीच खरी समस्या आहे.

In reply to by सुनील

गंगाधर मुटे Fri, 06/13/2014 - 11:08
मग शेतकर्‍यांना आत्महत्त्या करायला लावून शेतीवर अवलंबून असणार्‍यांचे प्रमाण कमी करायचे, असा शासकीय डाव आहे, असे म्हणायचे काय? ;)

In reply to by गंगाधर मुटे

सुनील Fri, 06/13/2014 - 11:35
अर्थातच नाही! पण ही अफाट लोकसंख्या अन्य क्षेत्रात (उद्योग अथवा सेवा) सामावून जाणे महत्त्वाचे. अर्थात हे कोणी करायचे, कसे करायचे, सरकारची यात भूमिका काय ह्याबाबत माझा अभ्यास नाही आणि म्हणून ठाम मतदेखिल नाही. परंतु, हे झाले पाहिजे हे उमगते आहे.

In reply to by सुनील

गंगाधर मुटे Fri, 06/13/2014 - 21:30
लोकसंख्या अन्य क्षेत्रात (उद्योग अथवा सेवा) सामावून जाणे महत्त्वाचे.
अजिबात नाही. याउलट शेतीमध्येच आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि शेतीमध्येच प्रचंड रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. वेळ मिळाला तर हे वाचा.

In reply to by गंगाधर मुटे

अजूनपर्यंत एकही माणूस हे आव्हान पेलायला समोर आलेला नाहीये.
आमच्याच मित्रांच्या मित्रांपैकी एकाने चांगली आयटी मधील इन्फोसिस मधील नोकरी सोडुन मिरजेला जाऊन घरातील शेती कसायला घेतली आहे ... किमान २ वर्ष झाली..मस्त चाललय त्याचं ... त्याच्याशी प्रत्यक्ष बोलतो एकदा आणि त्याची हरकत नसेल तर त्याचे डीटेल्स इथे शेयर करेन :)
मग शेतकर्‍यांना आत्महत्त्या करायला लावून शेतीवर अवलंबून असणार्‍यांचे प्रमाण कमी करायचे, असा शासकीय डाव आहे, असे म्हणायचे काय?
=))))

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे Fri, 06/13/2014 - 12:58
त्याचे डीटेल्स इथे नाव, गाव, पत्त्यासहीत शेयर करा. शेती व्यतिरिक्त आणखी काही व्यवसाय असल्यास त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. कारण तो बिचारा उद्या तोंडघशी पडता कामा नये. कारण आम्ही प्रत्यक्ष जाऊन बघणारच. :)

In reply to by गंगाधर मुटे

माहितगार Sun, 06/15/2014 - 21:04
कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे.
असे आपण का म्हणता आहात हे तेवढेसे नीट लक्षात नाही आले. उपरोक्त वाक्या मागाचा आपला दृष्टीकोण अधीक विस्ताराने जाणून घेणे आवडेल

गंगाधर मुटे गुरुवार, 06/12/2014 - 04:02
4 महिन्यात 559 शेतकरी आत्महत्या फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या ४ महिन्यांच्या कालावधीत ५५९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे 85 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली.. विधानपरिषदेत गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या मदतीवर चर्चा होती. त्याला उत्तर देताना पतंगराव कदम यांनी ही आकडेवारी जाहीर केली. हे सर्व शासकिय धोरणाचे बळी आहेत, म्हणून शेतकरी आत्महत्त्यांना शासकियबळीच म्हटले गेले पाहिजे. 4 महिन्यात 559 शेतक-यांनी आत्महत्या केल्या असतील तर दिवसाला जवळपास तीन शेतक-यांनी आपले प्राण गमावलेत असा त्याचा अर्थ पण ... पण ही समस्या इतकी थोडी गंभीर आहे कि,....... - देश हादरून जावा, किंवा - सभ्य आणि सुशिक्षित समाजाला लांच्छनास्पद वाटून त्यांच्या माना खाली जाव्यात, किंवा - मुख्यमंत्र्यांची झोपमोड व्हावी, किंवा - पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू यावेत...... अरे! यह करोडोका देश है. इस विशाल जनसंख्यावाले देश मे ५५९ का आकडा क्या मायने रखता है? चलो, इस बहाने आबादी तो घट रही है! . . है ना दोस्तो?????????? -----------------------------------------------------------------------------

आयुर्हित गुरुवार, 06/12/2014 - 11:57
सर्वप्रथम आपला जाहीर निषेध!!!!! नकारात्मक लेखनाचा धिक्कार असो. खरे म्हणजे मला या नकारात्मक धाग्यावर लिहावेसे वाटत नव्हते, परंतु अजुन ज्या शेतकर्‍यांच्या जीवात जीव आहे, त्यांसाठी तरी मला लिहिलेच पाहिजे असे वाटते आणि म्हणुनच आपल्या या नकारात्मक धाग्यावर शेवटचे लिहित आहे. बुड्त्याला काडीचाही आधार पुरतो, आणि आपण सर्व मिपाकारांनी तो दिलाच पाहिजे. "4 महिन्यात 559 शेतकरी आत्महत्या" हे वाचून कोणाही सुज्ञ माणसाला याचे वाईटच वाटेल.पण म्हणुन आपल्या ह्या नकारात्मक कविता त्यांना मुळीच ऐकवू नका, ही विनंति.

आयुर्हित गुरुवार, 06/12/2014 - 12:42
नरेंद्र मोदी यांनी आपल्या संसदेत केलेल्या पहिल्या भाषणात गरीब जनता व शेतकर्‍यांसाठी दिलेला निरोपः -'श्रमेव जयते' हाच मूलमंत्र: नरेंद्र मोदी - महात्मा गांधींकडून प्रेरणा घेत विकासासाठी देशव्यापी जनआंदोलन छेडले जावे - शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून गरिबी उच्चाटन आणि ग्रामविकासाला सरकारचे प्राधान्य - ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुधारायला हवे - रुरल आणि अर्बन मिळून 'रुर्बन' विकास झाला पाहिजे - महागाई घटविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू - शिक्षणामधून कौशल्यांचा विकास करायला हवा - गरिबीशी दोन हात करण्यासाठी शिक्षणाची गरज - रेल्वेच्या मालवाहू प्रक्रियेत बदलाची गरज - सर्व राज्यांनी विकासाबाबत स्पर्धा करायला हवी; आम्ही गुजरातला मागे टाकले, असे त्यांनी म्हणावे. ते ऐकण्यासाठी माझे कान आसुसले आहेत. -आपली विवेकबुद्धी कायम राहणे आवश्यक असून समाजविरोधी कृतींना आळा घालणे आवश्यक आहे -पारंपरिक पद्धतीने चालणारा शासकीय यंत्रणांचा कारभार आमूलाग्र पद्धतीने बदलणार आणि यंत्रणांना संवेदनशील बनविणार, असे सांगताना मोदींनी महागाई कमी करणार ही केवळ घोषणा नव्हे, तर ती सरकारची विचारसरणी आहे, असे सांगून महागाई कमी करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे स्पष्ट केले. मोदींनी कृषी क्षेत्र, धान्य खरेदी, साठवण आणि वितरणासाठी अन्न महामंडळाचा कारभार, रेल्वेचा कारभार सुधारणे यांवर विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले. Real-time data on agriculture products, linkages between agriculture university laboratories and farms and use of research to boost farm produce were some of the innovative ideas that poured out in an extempore speech by PM Narendra Modi in Lok Sabha on Wednesday. Responding to criticism and queries from opposition benches on how the government would accomplish the agendas set out in the President's speech, Modi put across simple solutions that would curb price rise and increase agriculture produce. Replying to the motion of thanks to President's address in Lok Sabha, Modi said his government's top priority is to provide every citizen with a house that has running water, electricity and toilet. No person should go to bed hungry, he said while stressing the government's resolve to bring food prices under check. Emphasising the importance of increasing farm productivity, Modi said there was a need for use of modern technique in the agriculture sector because farm land is shrinking with rising population. "There is a need for modernisation of farming practices. Faster we bring in technology, better it would be for productivity because the number of people is increasing but the land is shrinking," Modi said. "We have to increase the soil productivity. For this, we need to expand the research work in our universities. It has been so many years, there has been no research on pulses. Pulses (production) has become challenge before us," he added. He added that farmers should have access to as oil health card that will help them judge the crop and fertilizer use. He also highlighted the need for use information technology in the field of agriculture productivity and proper use of railway for transportation of farm products to food deficit area. The PM also said the country needs real-time data on agri products to deal with price rise. Narendra Modi promises upgrade in farm sector, house for all http://timesofindia.indiatimes.com/india/Narendra-Modi-promises-upgrade-in-farm-sector-house-for-all/articleshow/36414035.cms

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे गुरुवार, 06/12/2014 - 22:57
प्रारंभालाच धिक्कार नोंदवून मोकळे झाल्यानंतर आता मल्लीनाथी आणि चर्चेचे कारणच संपुष्ठात आलेले आहे. मी तुमचा धिक्कार स्विकारत आहे. मात्र आधि चर्चा आणि त्यानंतरही समाधान न झाल्यास धिक्कार असा मार्ग अवलंबला असता तर निदान मला माझी बाजू मांडायची संधी मिळाली असती, असे वाटत आहे.

गंगाधर मुटे Fri, 06/13/2014 - 00:00
दिनांक १९/१०/२०१२ केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने २०११ सालच्या शेतकरी आत्महत्येची अलीकडेच आकडेवारी जाहीर करताना देशभरात १४ हजार ४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक ३३३७ शेतक र्‍यांनी मृत्यूस कवटाळल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली असली तरी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र शेतकरी आत्महत्यांच्या घटनांत घट झाल्याचे विधान करून या आकडेवारीला शह दिल्याने आकडेवारीच्या नेमक्या सत्यतेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी हा आकडा ३१४१ एवढा होता. आत्महत्याग्रस्त महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतक र्‍यांची संख्या जवळजवळ ७० टक्के आहे. महाराष्ट्रात २००६ साली कृषीविषयक कारणांसाठी १०३५ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. २००८ साली ही संख्या ८०० पर्यंत घटली, २००७ साली यात आणखी घट होऊन ७०० झाली, परंतु २०१० साली हा आकडा ७४० झाला. त्यानंतर २०११ साली यात एकदम घट होऊन ही संख्या ४८० झाली. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १६८ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती शरद पवार यांनी जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशातही २००६ साली ७५७ शेतक र्‍यांनी मृत्यूला कवटाळले होते. यातही घट झाली असून २०११ साली १९६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, असेही पवार यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने संसदेच्या मागील पावसाळी अधिवेशनात १९९५ ते २०११ या कालखंडादरम्यान देशभरात २ लाख ९० हजार ७४० शेतकरी आत्महत्या झाल्याची आकडेवारी सादर केली आहे. दिवाळखोरी किंवा आर्थिक चणचण आणि दारिद्रय़ या कारणांनी या आत्महत्या झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. -------------------------------------------------------------------- आत्महत्या असो की दुर्घटना, सरकारी मृतांचा आकडा हा वास्तवापेक्षा १/३ ने तरी कमीच असतो. त्या हिशेबाने हा आकडा किमान ५ ते ६ लाखाच्या घरात असू शकतो. ---------------------------------------------------------------------

In reply to by गंगाधर मुटे

मदनबाण Fri, 06/13/2014 - 09:32
महाराष्ट्रात २००६ साली कृषीविषयक कारणांसाठी १०३५ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. २००८ साली ही संख्या ८०० पर्यंत घटली, २००७ साली यात आणखी घट होऊन ७०० झाली, परंतु २०१० साली हा आकडा ७४० झाला. त्यानंतर २०११ साली यात एकदम घट होऊन ही संख्या ४८० झाली. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १६८ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती शरद पवार यांनी जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशातही २००६ साली ७५७ शेतक र्‍यांनी मृत्यूला कवटाळले होते. यातही घट झाली असून २०११ साली १९६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, असेही पवार यांनी म्हटले आहे. शरद पवारांनी ही माहिती सांगितली असेल तरी ती तपासुन घ्यायला हवी कारण... Maharashtra since 2007, following the Prime Minister’s visit to Vidarbha. Union Minister for Agriculture Sharad Pawar has strictly avoided using NCRB farm data in Parliament since 2008 because the data are unpleasant. (The union government however quotes the NCRB for all other categories). Now, governments are deep into fiddling the data that goes from the States to the NCRB. संदर्भ :- Farm suicides rise in Maharashtra, State still leads the list { Updated: July 9, 2012 00:23 IST } जाता जाता :- Monsanto बद्धल मी अनेक वेळा ऐकले आहे आणि थोडेफार वाचले देखील आहे, आपण यावर अधिक प्रकाश टाकु शकाल काय ? एक संदर्भ :- The Seeds Of Suicide: How Monsanto Destroys Farming

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तुझ्या पीरतिचा हा विंचू:- {चित्रपट :-फँड्री}

गंगाधर मुटे Fri, 06/13/2014 - 21:11
Monsanto चे BT बियाणे आल्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या असे सांगणारा सध्या एक विद्वानांचा ग्रूप कार्यरत आहे. ते धादांत खोटे आहे. याउलट या जनुकिय बियाणामुळे उत्पादन वाढले आहे. बियानाचा एकरी १००० रुपयाने खर्च वाढला असला तरी फवारणीचा खर्च २००० रुपयाने कमी झाला आहे. उत्पादन वाढले तो बोनसचा भाग झाला. ही मंडळी शेतीविषयक अशिक्षितांसमोर किंवा मिडियासमोर आपले ज्ञान पाजळू शकते. शेतकर्‍यांसमोर जाऊन बोलायची हिंमत यांच्यात कुठे आहे?

In reply to by गंगाधर मुटे

मदनबाण Sat, 06/14/2014 - 11:56
ते धादांत खोटे आहे. याउलट या जनुकिय बियाणामुळे उत्पादन वाढले आहे. बियानाचा एकरी १००० रुपयाने खर्च वाढला असला तरी फवारणीचा खर्च २००० रुपयाने कमी झाला आहे. ओक्के... म्हणुनच तुम्हाला विचारले.विचारल्या शिवाय दुसरी बाजु असल्यास कशी समजणार ? :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Gori { A Band OF Boys }

In reply to by मदनबाण

गंगाधर मुटे Sat, 06/14/2014 - 22:50
ते धादांत खोटे बोलतात, या बद्दल माझा आक्षेप नाही. काय बोलावे-कसे बोलावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण लोकं शेतकर्‍यांच्या भल्यासाठी आम्ही बोलत आहोत असे भासवून आपापला अजेंडा राबवतात, आपापला स्वार्थ साधण्यासाठी शेतकर्‍याला आणखी गर्तेत लोटून आपापले घोडे पुढे दामटतात .... ..... तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते. आणि असे बोलणारे मग कुणीही असो, भले मग तो देशवासियांच्या मनात हिरो असो, आदरणीय असो वा पुज्यस्थानी... .... मला मात्र तो कस्पटासमान दिसायला लागतो.

In reply to by गंगाधर मुटे

मदनबाण गुरुवार, 08/28/2014 - 21:50
ह्म्म... हल्लीच जरा तू-नळीवर एक व्हिडीयो पाहण्यात आला होता, तो पाहुन या धाग्याची आठवण आली. तो व्हिडीयो इथे देतो. मध्यंतरी एचएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच्यावरची छोटीशी मुलाखत मध्यंतरी एबीपी माझावर पाहिली होती ती सुद्धा इथे देतो... दोन्ही व्हिडीयो पाहण्यासारखे आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- AIB:Alia Bhatt - Genius of the Year

माहितगार Sun, 06/15/2014 - 17:05
गंगाधर मुटेजी आपल्या मागच्या एका कवितेच्या वेळी चर्चा झाली तेव्हा पासून आपल्या कवितेच्या जगण्यातून येण्यामुळे आणि लक्षवेधकपणामुळे लक्ष जातेच. याही कवितेतील पहिल्या तीन कडव्यातील काही ओळी निश्चीत आवडल्या. जसे पाया रचून गेले कर्तव्य जागणारे. देणार साथ काया नाही मनाप्रमाणे; संगे हवे कशाला वाटेत धापणारे?; शेतीस काळ ठरती, शेतीत जन्मणारे; या ओळींचे प्रयोजन तीतकेसे उमजले नाही. मी "कले करता कला" या मताचा आहे, प्रबोधना करता कला असूच नये असेही नाही पण; कलावंताची वेदना हि स्वयमेवच प्रबोधन करत असते. पण प्रबोधन असो अथवा मनोरंजन विषय जाणीवपुर्वक जोडण्याचा प्रयासाने कलेची गाडी कधी कधी घसरल्या सारखी वाटते तसेही काही ओळीत आणि कदाचित आपण काव्याचे प्रयोजन नमुद केल्यामुळे अधीक जाणवले असेल. आपण दिलेल्या दुव्यांवरचे कृषिविषयक समस्यांविषयीचे काही लेखही या निमीत्ताने वाचले. आपल्या दुव्यावरील "हरिश्चंद्राचे उत्तर होते. “मला राज्य चालविता येते”. पण ज्यांना काम करण्यासाठी मजूर हवे होते त्यांच्याकडे ‘राज्य’ कुठे होते, याला चालवायला द्यायला? " हे रूपक आवडले. अर्थात कृषिविषयक समस्यांविषयीच्या लेखनात काही बाबतीतील तर्कसुसंगतेस आणि सर्वस्पर्षी मांडणीस अधीक वाव आहे असे वाटले अर्थात हा विषय मोठा आहे सवड मिळेल तसे मी माझे मतांतर नोंदवण्यास उत्सूक असेन. अर्थात हे सर्व विषय बाजूस ठेऊन मला आपणास एक वेगळीच विनंती करावयाची आहे. मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती नावाचा प्रकल्प आहे. वनस्पती शास्त्रातील वरीष्ठ संशोधक मंडळी मराठी विकिपीडियातून मराठीतून माहिती उपलब्ध करण्या बद्दल उत्सूक असतात. आपल्या सारखी शेती क्षेत्रातील आणि शेतकी विषयाची अभ्यासक मंडळीही या प्रकल्पास जोडली जावीत अशी मनोमन इच्छा आहे. त्या प्रकल्पास आकार येण्यासाठी फुल न फुलाची पाकळी आपल्या सारख्यांचे (लेखन) योगदान आपल्या सवडीनुसार लाभल्यास आनंद वाटेल.

गंगाधर मुटे Sun, 06/15/2014 - 17:41
माहितगारजी, तुम्ही याला नम्रपणा म्हणा की उर्मटपणा कींवा वाह्यातपणा पण; खरे सांगायचे तर कलावंत/कलाकार वगैरे या जातीचा मी नाहीच. शेतीचे वास्तव मांडण्याची संधी मिळतेय म्हणून मी लेखनी उचलली. खरे तर दुसरा उद्देशच नाही. मी एक शेतकरी आंदोलक आहे, हे सांगताना मला जसा आनंद होतो तसा मी कवी किंवा साहित्यिक आहे, असे सांगताना होत नाही. हेही खरे आहे. कदाचित त्यामुळेच माझे लेखन प्रचारकी प्रकाराकडे झुकण्याची शक्यता मला मान्य आहे. त्याची खंत देखिल नाही कारण या विचाराचा प्रसार करणे हेच माझे उद्दिष्ठ आहे. असो. विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती याबद्दल एक महिन्यानंतर मी माझ्यापरिने थोडेफार योगदान देऊ शकेल.

माहितगार Sun, 06/15/2014 - 18:32
विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती याबद्दल एक महिन्यानंतर मी माझ्यापरिने थोडेफार योगदान देऊ शकेल.
अगदी आपल्या सवडी नुसार. घाई मुळीच नाही. पण आठवणीने जरुर लिहावे. (मतांतरे चालतच असतात) बाकी आपल्या उद्दीष्टांबद्दल आदर आहेच.

आयुर्हित Sun, 06/15/2014 - 23:35
कृषी क्षेत्रात वाढ करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने पंतप्रधान ग्रामीण सिंचन योजना आखली असून, या योजनेची देशभरात लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली. कृषिमंत्री राधामोहनसिंह म्हणाले, "पंतप्रधान ग्राम सिंचन योजनेचा उद्देश देशातील प्रत्येक कृषी क्षेत्रापर्यंत पाणी पोचविणे हा आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत कृषी उत्पादनात वाढ होणार नाही. लवकरच या योजनेचे तपशील जाहीर करण्यात येतील. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार देशातील 14 हजार हेक्‍टर शेतीयोग्य जमिनीपैकी केवळ 14 टक्के जमीन सिंचनाखाली आहे. उरलेली सर्व जमीन पावसावर अवलंबून आहे. खेडी आणि शेतकऱ्यांचा विकास करण्याला माझे प्राधान्य आहे. हे दोन घटक सशक्त झाल्यास देश सशक्‍त होईल. कृषी उत्पादनात वाढ झाल्यास बेरोजगार हातांना काम मिळेल" "जमिनीच्या दर्जावर उत्पादकता अवलंबून आहे. जमीन कसदार असेल तर चांगले उत्पादन मिळू शकेल. यामुळे केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड देण्यात येणार आहे. शास्त्रज्ञ आणि कृषी विद्यार्थ्यांच्या साहाय्याने जमिनीचा पोत आणि कस तपासण्याचे हे अभियान राबविले जाणार आहे. मृदा आरोग्य कार्ड या योजनेअंतर्गत जमिनीचा दर्जा आणि उत्पादकता दर्शविणारे कार्ड वितरित केले जाणार आहे. यानुसार शेतकऱ्यांना योग्य पीक घेण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. पंतप्रधान ग्रामीण सिंचन योजना आणि मृदा आरोग्य कार्ड या दोन्ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचा भाग आहेत. देशाला सक्षम बनविण्यासाठी शेती आणि शेतकरी आधी सक्षम बनायला हवा, असे त्यांनी सांगितले साभारः ग्रामीण सिंचन योजना राबविणार

आयुर्हित गुरुवार, 07/31/2014 - 14:23
''संशोधनाचा वापर हा कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी झाला पाहिजे. प्रयोगशाळेतील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले, तर त्यांचे उत्पन्नही वाढेल आणि देशाची अन्नची गरज पूर्ण होईल,'' असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) ८६व्या स्थापन दिवसानिमित्त मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी लॅब टू लँड (प्रयोगशाळेतून शेताकडे) ही घोषणा दिली. कमी जमीन आणि कमी वेळ वापरून जास्त कृषी उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे सांगत मोदींनी हवामान बदल आणि संपत चाललेली नैसर्गिक साधने याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. सर्व देशाला अन्न कसे देता येईल आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न कसे मिळेल या दोन मुद्दय़ांचा विचार करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. मोदी म्हणाले.. *हरितक्रांती व धवलक्रांतीच्या धर्तीवर मासेमारीच्या क्षेत्रात नीलक्रांती घडवून आणा. *पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक (पर ड्रॉप मोअर क्रॉप) घेण्यासाठी भविष्यातील योजना आहे. *भारत अजून खाद्यतेले व डाळींसाठी आयातीवर अवलंबून आहे. त्यातही आपण स्वयंपूर्ण झाले पाहिजे. *शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याशिवाय कृषीवाढीचे उद्दिष्ट साध्य होणार नाही, त्यामुळे सरकारची धोरणे त्याच दिशेने आखली जावीत. *शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान शिकवावे. त्याच्या मदतीने त्यांची क्षमता वाढेल साभारः प्रयोगशाळेतील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

गंगाधर मुटे गुरुवार, 06/12/2014 - 03:59
मा. पंतप्रधान मोदींचे आजचे संसदेतील भाषण ऐकले. अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला करतात आत्महत्त्या का देश पोसणारे? या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही, हे मला अपेक्षितच होते. शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून येईल एवढा भाव देण्याचे सोडून बाकी सर्वच ते बोलले. कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे. मात्र शेती सोडून अन्य बर्‍याच क्षेत्रांना ’अच्छे’ दिवस येतील, याची झलक त्यांच्या भाषणात जाणवली. विकासाचा मुद्दा आणि सामोपचाराने निर्णय घेऊन धोरण राबवायचे हा त्यांचा मुद्दा अत्यंत प्रामाणिक आणि देशहितासाठी प्रगल्भ राजकारण कसे असू शकते, हे अधोरेखित करणारा होता. आजचे त्यांचे भाषण अनेक क्षेत्रात क्रांतीकरक बदल घडवून आणणे शक्य आहे, याची ग्वाही देणारे आणि राष्ट्रासमोर सकारात्मक आशादायी चित्र निर्माण करणारे आहे. शिक्षण क्षेत्राविषयीचा त्यांचा मुद्दा ऐकताना माझ्या "वांगे अमर रहे" पुस्तकातील "प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती" या लेखाची आठवण झाली. बर्‍याच काळानंतर देशाला पंतप्रधान मिळाला आणि या देशाला पंतप्रधान आहे, असे जाणवायला लागले आहे. - गंगाधर मुटे ----------------------------------------------------------------------

In reply to by गंगाधर मुटे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/12/2014 - 15:21
नक्की काय म्हणायचे आहे तेच कळले नाही ... एकी कडे तुम्ही म्हणता की
शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून येईल एवढा भाव देण्याचे सोडून बाकी सर्वच ते बोलले. कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे.
आणि दुसरी कडे म्हणता की
बर्‍याच काळानंतर देशाला पंतप्रधान मिळाला आणि या देशाला पंतप्रधान आहे, असे जाणवायला लागले आहे.
तुम्ही मोदींचे कौतुक करताय की निशेध की दोन्ही की काहीच नाही ? जोवर शेतकरी डोकं लाऊन अक्कल हुशारीने शेती करत नाही तोवर त्यांच्या समस्या सुटण्याची तिळमात्र आशा नाही मग मोदी प्रंतप्रधान असोत की पवार ...की जोशी !

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे गुरुवार, 06/12/2014 - 23:15
मला काय म्हणायचे आहे ते मी स्पष्टपणे कोणताही आडपडदा न ठेवता नोंदवले आहे. लेखनातील कोणताच मुद्दा गुढ किंवा समजण्यास कठीण असा नाहिये. परत एकदा वाचा, सहज लक्शात येईल.
जोवर शेतकरी डोकं लाऊन अक्कल हुशारीने शेती करत नाही तोवर त्यांच्या समस्या सुटण्याची तिळमात्र आशा नाही मग मोदी प्रंतप्रधान असोत की पवार ...की जोशी !
या देशातील सत्तर अंशी कोटी शेतकरी समाज डोकं लाऊन अक्कल हुशारीने शेती करत नाही, असे तुमचे एकट्याचेच मत नाहीये, गेली ३५ वर्षे मी हेच ऐकत आलेलो आहे. परंतू याच तर्‍हेच्या मुद्द्यावर ३५ वर्षापूर्वी मी जाहिर आवाहन केले होते की, ठीक आहे.... आम्ही साठ-सत्तर टक्के शेतकरी बेअक्कल,नालायक आहोत पण तुमच्यापैकी एखाद्या बिगरशेतकर्‍याने आम्हाला शेती कशी करावी, याचे मॉडेल म्हणून फक्त १ वर्ष प्रत्यक्ष शेती करून दाखवावी. आणि त्याच शेतीतील उत्पन्नाच्या बळावर जगून दाखवावे. अजूनपर्यंत एकही माणूस हे आव्हान पेलायला समोर आलेला नाहीये. दोन वर्षापूर्वी मी विद्यापिठाच्या कुलगूरूला असेच जाहिर आव्हान दिले होते. तोही पळपुटा निघाला. ते आव्हान माझ्या "वांगे अमर रहे" या पुस्तकात लेखी दस्तावेज म्हणून उपल्ब्ध आहे. किंवा कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! येथेही वाचता येईल.

In reply to by गंगाधर मुटे

सुनील Fri, 06/13/2014 - 09:16
या देशातील सत्तर अंशी कोटी शेतकरी समाज
देशात ७०-८० कोटी लोक थेट शेतीवर (शेतीच्या उत्पन्नावर) अवलंबून आहेत, हीच खरी समस्या आहे.

In reply to by सुनील

गंगाधर मुटे Fri, 06/13/2014 - 11:08
मग शेतकर्‍यांना आत्महत्त्या करायला लावून शेतीवर अवलंबून असणार्‍यांचे प्रमाण कमी करायचे, असा शासकीय डाव आहे, असे म्हणायचे काय? ;)

In reply to by गंगाधर मुटे

सुनील Fri, 06/13/2014 - 11:35
अर्थातच नाही! पण ही अफाट लोकसंख्या अन्य क्षेत्रात (उद्योग अथवा सेवा) सामावून जाणे महत्त्वाचे. अर्थात हे कोणी करायचे, कसे करायचे, सरकारची यात भूमिका काय ह्याबाबत माझा अभ्यास नाही आणि म्हणून ठाम मतदेखिल नाही. परंतु, हे झाले पाहिजे हे उमगते आहे.

In reply to by सुनील

गंगाधर मुटे Fri, 06/13/2014 - 21:30
लोकसंख्या अन्य क्षेत्रात (उद्योग अथवा सेवा) सामावून जाणे महत्त्वाचे.
अजिबात नाही. याउलट शेतीमध्येच आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि शेतीमध्येच प्रचंड रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. वेळ मिळाला तर हे वाचा.

In reply to by गंगाधर मुटे

अजूनपर्यंत एकही माणूस हे आव्हान पेलायला समोर आलेला नाहीये.
आमच्याच मित्रांच्या मित्रांपैकी एकाने चांगली आयटी मधील इन्फोसिस मधील नोकरी सोडुन मिरजेला जाऊन घरातील शेती कसायला घेतली आहे ... किमान २ वर्ष झाली..मस्त चाललय त्याचं ... त्याच्याशी प्रत्यक्ष बोलतो एकदा आणि त्याची हरकत नसेल तर त्याचे डीटेल्स इथे शेयर करेन :)
मग शेतकर्‍यांना आत्महत्त्या करायला लावून शेतीवर अवलंबून असणार्‍यांचे प्रमाण कमी करायचे, असा शासकीय डाव आहे, असे म्हणायचे काय?
=))))

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे Fri, 06/13/2014 - 12:58
त्याचे डीटेल्स इथे नाव, गाव, पत्त्यासहीत शेयर करा. शेती व्यतिरिक्त आणखी काही व्यवसाय असल्यास त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. कारण तो बिचारा उद्या तोंडघशी पडता कामा नये. कारण आम्ही प्रत्यक्ष जाऊन बघणारच. :)

In reply to by गंगाधर मुटे

माहितगार Sun, 06/15/2014 - 21:04
कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे.
असे आपण का म्हणता आहात हे तेवढेसे नीट लक्षात नाही आले. उपरोक्त वाक्या मागाचा आपला दृष्टीकोण अधीक विस्ताराने जाणून घेणे आवडेल

गंगाधर मुटे गुरुवार, 06/12/2014 - 04:02
4 महिन्यात 559 शेतकरी आत्महत्या फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या ४ महिन्यांच्या कालावधीत ५५९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे 85 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली.. विधानपरिषदेत गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या मदतीवर चर्चा होती. त्याला उत्तर देताना पतंगराव कदम यांनी ही आकडेवारी जाहीर केली. हे सर्व शासकिय धोरणाचे बळी आहेत, म्हणून शेतकरी आत्महत्त्यांना शासकियबळीच म्हटले गेले पाहिजे. 4 महिन्यात 559 शेतक-यांनी आत्महत्या केल्या असतील तर दिवसाला जवळपास तीन शेतक-यांनी आपले प्राण गमावलेत असा त्याचा अर्थ पण ... पण ही समस्या इतकी थोडी गंभीर आहे कि,....... - देश हादरून जावा, किंवा - सभ्य आणि सुशिक्षित समाजाला लांच्छनास्पद वाटून त्यांच्या माना खाली जाव्यात, किंवा - मुख्यमंत्र्यांची झोपमोड व्हावी, किंवा - पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू यावेत...... अरे! यह करोडोका देश है. इस विशाल जनसंख्यावाले देश मे ५५९ का आकडा क्या मायने रखता है? चलो, इस बहाने आबादी तो घट रही है! . . है ना दोस्तो?????????? -----------------------------------------------------------------------------

आयुर्हित गुरुवार, 06/12/2014 - 11:57
सर्वप्रथम आपला जाहीर निषेध!!!!! नकारात्मक लेखनाचा धिक्कार असो. खरे म्हणजे मला या नकारात्मक धाग्यावर लिहावेसे वाटत नव्हते, परंतु अजुन ज्या शेतकर्‍यांच्या जीवात जीव आहे, त्यांसाठी तरी मला लिहिलेच पाहिजे असे वाटते आणि म्हणुनच आपल्या या नकारात्मक धाग्यावर शेवटचे लिहित आहे. बुड्त्याला काडीचाही आधार पुरतो, आणि आपण सर्व मिपाकारांनी तो दिलाच पाहिजे. "4 महिन्यात 559 शेतकरी आत्महत्या" हे वाचून कोणाही सुज्ञ माणसाला याचे वाईटच वाटेल.पण म्हणुन आपल्या ह्या नकारात्मक कविता त्यांना मुळीच ऐकवू नका, ही विनंति.

आयुर्हित गुरुवार, 06/12/2014 - 12:42
नरेंद्र मोदी यांनी आपल्या संसदेत केलेल्या पहिल्या भाषणात गरीब जनता व शेतकर्‍यांसाठी दिलेला निरोपः -'श्रमेव जयते' हाच मूलमंत्र: नरेंद्र मोदी - महात्मा गांधींकडून प्रेरणा घेत विकासासाठी देशव्यापी जनआंदोलन छेडले जावे - शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून गरिबी उच्चाटन आणि ग्रामविकासाला सरकारचे प्राधान्य - ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुधारायला हवे - रुरल आणि अर्बन मिळून 'रुर्बन' विकास झाला पाहिजे - महागाई घटविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू - शिक्षणामधून कौशल्यांचा विकास करायला हवा - गरिबीशी दोन हात करण्यासाठी शिक्षणाची गरज - रेल्वेच्या मालवाहू प्रक्रियेत बदलाची गरज - सर्व राज्यांनी विकासाबाबत स्पर्धा करायला हवी; आम्ही गुजरातला मागे टाकले, असे त्यांनी म्हणावे. ते ऐकण्यासाठी माझे कान आसुसले आहेत. -आपली विवेकबुद्धी कायम राहणे आवश्यक असून समाजविरोधी कृतींना आळा घालणे आवश्यक आहे -पारंपरिक पद्धतीने चालणारा शासकीय यंत्रणांचा कारभार आमूलाग्र पद्धतीने बदलणार आणि यंत्रणांना संवेदनशील बनविणार, असे सांगताना मोदींनी महागाई कमी करणार ही केवळ घोषणा नव्हे, तर ती सरकारची विचारसरणी आहे, असे सांगून महागाई कमी करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे स्पष्ट केले. मोदींनी कृषी क्षेत्र, धान्य खरेदी, साठवण आणि वितरणासाठी अन्न महामंडळाचा कारभार, रेल्वेचा कारभार सुधारणे यांवर विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले. Real-time data on agriculture products, linkages between agriculture university laboratories and farms and use of research to boost farm produce were some of the innovative ideas that poured out in an extempore speech by PM Narendra Modi in Lok Sabha on Wednesday. Responding to criticism and queries from opposition benches on how the government would accomplish the agendas set out in the President's speech, Modi put across simple solutions that would curb price rise and increase agriculture produce. Replying to the motion of thanks to President's address in Lok Sabha, Modi said his government's top priority is to provide every citizen with a house that has running water, electricity and toilet. No person should go to bed hungry, he said while stressing the government's resolve to bring food prices under check. Emphasising the importance of increasing farm productivity, Modi said there was a need for use of modern technique in the agriculture sector because farm land is shrinking with rising population. "There is a need for modernisation of farming practices. Faster we bring in technology, better it would be for productivity because the number of people is increasing but the land is shrinking," Modi said. "We have to increase the soil productivity. For this, we need to expand the research work in our universities. It has been so many years, there has been no research on pulses. Pulses (production) has become challenge before us," he added. He added that farmers should have access to as oil health card that will help them judge the crop and fertilizer use. He also highlighted the need for use information technology in the field of agriculture productivity and proper use of railway for transportation of farm products to food deficit area. The PM also said the country needs real-time data on agri products to deal with price rise. Narendra Modi promises upgrade in farm sector, house for all http://timesofindia.indiatimes.com/india/Narendra-Modi-promises-upgrade-in-farm-sector-house-for-all/articleshow/36414035.cms

In reply to by आयुर्हित

गंगाधर मुटे गुरुवार, 06/12/2014 - 22:57
प्रारंभालाच धिक्कार नोंदवून मोकळे झाल्यानंतर आता मल्लीनाथी आणि चर्चेचे कारणच संपुष्ठात आलेले आहे. मी तुमचा धिक्कार स्विकारत आहे. मात्र आधि चर्चा आणि त्यानंतरही समाधान न झाल्यास धिक्कार असा मार्ग अवलंबला असता तर निदान मला माझी बाजू मांडायची संधी मिळाली असती, असे वाटत आहे.

गंगाधर मुटे Fri, 06/13/2014 - 00:00
दिनांक १९/१०/२०१२ केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने २०११ सालच्या शेतकरी आत्महत्येची अलीकडेच आकडेवारी जाहीर करताना देशभरात १४ हजार ४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक ३३३७ शेतक र्‍यांनी मृत्यूस कवटाळल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली असली तरी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र शेतकरी आत्महत्यांच्या घटनांत घट झाल्याचे विधान करून या आकडेवारीला शह दिल्याने आकडेवारीच्या नेमक्या सत्यतेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी हा आकडा ३१४१ एवढा होता. आत्महत्याग्रस्त महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतक र्‍यांची संख्या जवळजवळ ७० टक्के आहे. महाराष्ट्रात २००६ साली कृषीविषयक कारणांसाठी १०३५ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. २००८ साली ही संख्या ८०० पर्यंत घटली, २००७ साली यात आणखी घट होऊन ७०० झाली, परंतु २०१० साली हा आकडा ७४० झाला. त्यानंतर २०११ साली यात एकदम घट होऊन ही संख्या ४८० झाली. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १६८ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती शरद पवार यांनी जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशातही २००६ साली ७५७ शेतक र्‍यांनी मृत्यूला कवटाळले होते. यातही घट झाली असून २०११ साली १९६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, असेही पवार यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने संसदेच्या मागील पावसाळी अधिवेशनात १९९५ ते २०११ या कालखंडादरम्यान देशभरात २ लाख ९० हजार ७४० शेतकरी आत्महत्या झाल्याची आकडेवारी सादर केली आहे. दिवाळखोरी किंवा आर्थिक चणचण आणि दारिद्रय़ या कारणांनी या आत्महत्या झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. -------------------------------------------------------------------- आत्महत्या असो की दुर्घटना, सरकारी मृतांचा आकडा हा वास्तवापेक्षा १/३ ने तरी कमीच असतो. त्या हिशेबाने हा आकडा किमान ५ ते ६ लाखाच्या घरात असू शकतो. ---------------------------------------------------------------------

In reply to by गंगाधर मुटे

मदनबाण Fri, 06/13/2014 - 09:32
महाराष्ट्रात २००६ साली कृषीविषयक कारणांसाठी १०३५ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. २००८ साली ही संख्या ८०० पर्यंत घटली, २००७ साली यात आणखी घट होऊन ७०० झाली, परंतु २०१० साली हा आकडा ७४० झाला. त्यानंतर २०११ साली यात एकदम घट होऊन ही संख्या ४८० झाली. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १६८ शेतक र्‍यांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती शरद पवार यांनी जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशातही २००६ साली ७५७ शेतक र्‍यांनी मृत्यूला कवटाळले होते. यातही घट झाली असून २०११ साली १९६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, असेही पवार यांनी म्हटले आहे. शरद पवारांनी ही माहिती सांगितली असेल तरी ती तपासुन घ्यायला हवी कारण... Maharashtra since 2007, following the Prime Minister’s visit to Vidarbha. Union Minister for Agriculture Sharad Pawar has strictly avoided using NCRB farm data in Parliament since 2008 because the data are unpleasant. (The union government however quotes the NCRB for all other categories). Now, governments are deep into fiddling the data that goes from the States to the NCRB. संदर्भ :- Farm suicides rise in Maharashtra, State still leads the list { Updated: July 9, 2012 00:23 IST } जाता जाता :- Monsanto बद्धल मी अनेक वेळा ऐकले आहे आणि थोडेफार वाचले देखील आहे, आपण यावर अधिक प्रकाश टाकु शकाल काय ? एक संदर्भ :- The Seeds Of Suicide: How Monsanto Destroys Farming

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तुझ्या पीरतिचा हा विंचू:- {चित्रपट :-फँड्री}

गंगाधर मुटे Fri, 06/13/2014 - 21:11
Monsanto चे BT बियाणे आल्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या असे सांगणारा सध्या एक विद्वानांचा ग्रूप कार्यरत आहे. ते धादांत खोटे आहे. याउलट या जनुकिय बियाणामुळे उत्पादन वाढले आहे. बियानाचा एकरी १००० रुपयाने खर्च वाढला असला तरी फवारणीचा खर्च २००० रुपयाने कमी झाला आहे. उत्पादन वाढले तो बोनसचा भाग झाला. ही मंडळी शेतीविषयक अशिक्षितांसमोर किंवा मिडियासमोर आपले ज्ञान पाजळू शकते. शेतकर्‍यांसमोर जाऊन बोलायची हिंमत यांच्यात कुठे आहे?

In reply to by गंगाधर मुटे

मदनबाण Sat, 06/14/2014 - 11:56
ते धादांत खोटे आहे. याउलट या जनुकिय बियाणामुळे उत्पादन वाढले आहे. बियानाचा एकरी १००० रुपयाने खर्च वाढला असला तरी फवारणीचा खर्च २००० रुपयाने कमी झाला आहे. ओक्के... म्हणुनच तुम्हाला विचारले.विचारल्या शिवाय दुसरी बाजु असल्यास कशी समजणार ? :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Gori { A Band OF Boys }

In reply to by मदनबाण

गंगाधर मुटे Sat, 06/14/2014 - 22:50
ते धादांत खोटे बोलतात, या बद्दल माझा आक्षेप नाही. काय बोलावे-कसे बोलावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण लोकं शेतकर्‍यांच्या भल्यासाठी आम्ही बोलत आहोत असे भासवून आपापला अजेंडा राबवतात, आपापला स्वार्थ साधण्यासाठी शेतकर्‍याला आणखी गर्तेत लोटून आपापले घोडे पुढे दामटतात .... ..... तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते. आणि असे बोलणारे मग कुणीही असो, भले मग तो देशवासियांच्या मनात हिरो असो, आदरणीय असो वा पुज्यस्थानी... .... मला मात्र तो कस्पटासमान दिसायला लागतो.

In reply to by गंगाधर मुटे

मदनबाण गुरुवार, 08/28/2014 - 21:50
ह्म्म... हल्लीच जरा तू-नळीवर एक व्हिडीयो पाहण्यात आला होता, तो पाहुन या धाग्याची आठवण आली. तो व्हिडीयो इथे देतो. मध्यंतरी एचएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच्यावरची छोटीशी मुलाखत मध्यंतरी एबीपी माझावर पाहिली होती ती सुद्धा इथे देतो... दोन्ही व्हिडीयो पाहण्यासारखे आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- AIB:Alia Bhatt - Genius of the Year

माहितगार Sun, 06/15/2014 - 17:05
गंगाधर मुटेजी आपल्या मागच्या एका कवितेच्या वेळी चर्चा झाली तेव्हा पासून आपल्या कवितेच्या जगण्यातून येण्यामुळे आणि लक्षवेधकपणामुळे लक्ष जातेच. याही कवितेतील पहिल्या तीन कडव्यातील काही ओळी निश्चीत आवडल्या. जसे पाया रचून गेले कर्तव्य जागणारे. देणार साथ काया नाही मनाप्रमाणे; संगे हवे कशाला वाटेत धापणारे?; शेतीस काळ ठरती, शेतीत जन्मणारे; या ओळींचे प्रयोजन तीतकेसे उमजले नाही. मी "कले करता कला" या मताचा आहे, प्रबोधना करता कला असूच नये असेही नाही पण; कलावंताची वेदना हि स्वयमेवच प्रबोधन करत असते. पण प्रबोधन असो अथवा मनोरंजन विषय जाणीवपुर्वक जोडण्याचा प्रयासाने कलेची गाडी कधी कधी घसरल्या सारखी वाटते तसेही काही ओळीत आणि कदाचित आपण काव्याचे प्रयोजन नमुद केल्यामुळे अधीक जाणवले असेल. आपण दिलेल्या दुव्यांवरचे कृषिविषयक समस्यांविषयीचे काही लेखही या निमीत्ताने वाचले. आपल्या दुव्यावरील "हरिश्चंद्राचे उत्तर होते. “मला राज्य चालविता येते”. पण ज्यांना काम करण्यासाठी मजूर हवे होते त्यांच्याकडे ‘राज्य’ कुठे होते, याला चालवायला द्यायला? " हे रूपक आवडले. अर्थात कृषिविषयक समस्यांविषयीच्या लेखनात काही बाबतीतील तर्कसुसंगतेस आणि सर्वस्पर्षी मांडणीस अधीक वाव आहे असे वाटले अर्थात हा विषय मोठा आहे सवड मिळेल तसे मी माझे मतांतर नोंदवण्यास उत्सूक असेन. अर्थात हे सर्व विषय बाजूस ठेऊन मला आपणास एक वेगळीच विनंती करावयाची आहे. मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती नावाचा प्रकल्प आहे. वनस्पती शास्त्रातील वरीष्ठ संशोधक मंडळी मराठी विकिपीडियातून मराठीतून माहिती उपलब्ध करण्या बद्दल उत्सूक असतात. आपल्या सारखी शेती क्षेत्रातील आणि शेतकी विषयाची अभ्यासक मंडळीही या प्रकल्पास जोडली जावीत अशी मनोमन इच्छा आहे. त्या प्रकल्पास आकार येण्यासाठी फुल न फुलाची पाकळी आपल्या सारख्यांचे (लेखन) योगदान आपल्या सवडीनुसार लाभल्यास आनंद वाटेल.

गंगाधर मुटे Sun, 06/15/2014 - 17:41
माहितगारजी, तुम्ही याला नम्रपणा म्हणा की उर्मटपणा कींवा वाह्यातपणा पण; खरे सांगायचे तर कलावंत/कलाकार वगैरे या जातीचा मी नाहीच. शेतीचे वास्तव मांडण्याची संधी मिळतेय म्हणून मी लेखनी उचलली. खरे तर दुसरा उद्देशच नाही. मी एक शेतकरी आंदोलक आहे, हे सांगताना मला जसा आनंद होतो तसा मी कवी किंवा साहित्यिक आहे, असे सांगताना होत नाही. हेही खरे आहे. कदाचित त्यामुळेच माझे लेखन प्रचारकी प्रकाराकडे झुकण्याची शक्यता मला मान्य आहे. त्याची खंत देखिल नाही कारण या विचाराचा प्रसार करणे हेच माझे उद्दिष्ठ आहे. असो. विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती याबद्दल एक महिन्यानंतर मी माझ्यापरिने थोडेफार योगदान देऊ शकेल.

माहितगार Sun, 06/15/2014 - 18:32
विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती याबद्दल एक महिन्यानंतर मी माझ्यापरिने थोडेफार योगदान देऊ शकेल.
अगदी आपल्या सवडी नुसार. घाई मुळीच नाही. पण आठवणीने जरुर लिहावे. (मतांतरे चालतच असतात) बाकी आपल्या उद्दीष्टांबद्दल आदर आहेच.

आयुर्हित Sun, 06/15/2014 - 23:35
कृषी क्षेत्रात वाढ करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने पंतप्रधान ग्रामीण सिंचन योजना आखली असून, या योजनेची देशभरात लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली. कृषिमंत्री राधामोहनसिंह म्हणाले, "पंतप्रधान ग्राम सिंचन योजनेचा उद्देश देशातील प्रत्येक कृषी क्षेत्रापर्यंत पाणी पोचविणे हा आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत कृषी उत्पादनात वाढ होणार नाही. लवकरच या योजनेचे तपशील जाहीर करण्यात येतील. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार देशातील 14 हजार हेक्‍टर शेतीयोग्य जमिनीपैकी केवळ 14 टक्के जमीन सिंचनाखाली आहे. उरलेली सर्व जमीन पावसावर अवलंबून आहे. खेडी आणि शेतकऱ्यांचा विकास करण्याला माझे प्राधान्य आहे. हे दोन घटक सशक्त झाल्यास देश सशक्‍त होईल. कृषी उत्पादनात वाढ झाल्यास बेरोजगार हातांना काम मिळेल" "जमिनीच्या दर्जावर उत्पादकता अवलंबून आहे. जमीन कसदार असेल तर चांगले उत्पादन मिळू शकेल. यामुळे केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड देण्यात येणार आहे. शास्त्रज्ञ आणि कृषी विद्यार्थ्यांच्या साहाय्याने जमिनीचा पोत आणि कस तपासण्याचे हे अभियान राबविले जाणार आहे. मृदा आरोग्य कार्ड या योजनेअंतर्गत जमिनीचा दर्जा आणि उत्पादकता दर्शविणारे कार्ड वितरित केले जाणार आहे. यानुसार शेतकऱ्यांना योग्य पीक घेण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. पंतप्रधान ग्रामीण सिंचन योजना आणि मृदा आरोग्य कार्ड या दोन्ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचा भाग आहेत. देशाला सक्षम बनविण्यासाठी शेती आणि शेतकरी आधी सक्षम बनायला हवा, असे त्यांनी सांगितले साभारः ग्रामीण सिंचन योजना राबविणार

आयुर्हित गुरुवार, 07/31/2014 - 14:23
''संशोधनाचा वापर हा कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी झाला पाहिजे. प्रयोगशाळेतील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले, तर त्यांचे उत्पन्नही वाढेल आणि देशाची अन्नची गरज पूर्ण होईल,'' असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) ८६व्या स्थापन दिवसानिमित्त मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी लॅब टू लँड (प्रयोगशाळेतून शेताकडे) ही घोषणा दिली. कमी जमीन आणि कमी वेळ वापरून जास्त कृषी उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे सांगत मोदींनी हवामान बदल आणि संपत चाललेली नैसर्गिक साधने याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. सर्व देशाला अन्न कसे देता येईल आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न कसे मिळेल या दोन मुद्दय़ांचा विचार करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. मोदी म्हणाले.. *हरितक्रांती व धवलक्रांतीच्या धर्तीवर मासेमारीच्या क्षेत्रात नीलक्रांती घडवून आणा. *पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक (पर ड्रॉप मोअर क्रॉप) घेण्यासाठी भविष्यातील योजना आहे. *भारत अजून खाद्यतेले व डाळींसाठी आयातीवर अवलंबून आहे. त्यातही आपण स्वयंपूर्ण झाले पाहिजे. *शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याशिवाय कृषीवाढीचे उद्दिष्ट साध्य होणार नाही, त्यामुळे सरकारची धोरणे त्याच दिशेने आखली जावीत. *शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान शिकवावे. त्याच्या मदतीने त्यांची क्षमता वाढेल साभारः प्रयोगशाळेतील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा
लेखनविषय:
अस्थी कृषीवलांच्या

पाया रचून गेले कर्तव्य जागणारे
होते तसेच आहे नुसतेच बोलणारे

होऊ नकोस कष्टी चिंतातुराप्रमाणे
जालिम इलाज कर तू विध्वंस रोखणारे

माजून तर्र काही दिसतात कर्मचारी
प्रत्येक कागदाला पैशात घोळणारे

देणार साथ काया नाही मनाप्रमाणे
उडत्या मनास छळते हे शल्य बोचणारे

रस्ता नवीन नवखा दुर्गम-दरी-पहाडी
संगे हवे कशाला वाटेत धापणारे?

धर्मांध शोषकांच्या झुंडी तयार झाल्या
जातीत पांगलेले अन्याय सोसणारे

मेट्रो ट्रेनचा अनुभव

साधा मुलगा ·

दिपाली पाटिल गुरुवार, 06/12/2014 - 01:45
मेट्रोचा व्हिडीओ पाहील्यावर समजलं कि ही यंत्रणा बे एरियातल्या बार्टसारखी आहे फक्त सेक्युरिटीची भानगड आणि टोकन सोडले तर... छान माहीतीपुर्ण लेख आहे. सगळे statistics चांगले मांडले आहेत.

In reply to by दिपाली पाटिल

एस गुरुवार, 06/12/2014 - 19:56
छान माहीतीपुर्ण लेख आहे. सगळे statistics चांगले मांडले आहेत.
असेच म्हणतो. अभ्यासपूर्ण लेख. बाकी मुंबई मेट्रोला आमच्या पुण्याच्या मेट्रोची सर दिसत नाही म्हणा. ;-)

स्रुजा गुरुवार, 06/12/2014 - 02:07
मस्त माहीती . नवीन माणसाला हा लेख वाचून अगदी नीट आखता येईल आपला पहिला मेट्रो प्रवस. सवय झाली की मुंबईकर सराईत पणे मेट्रो चा धंदा वाढवतील यात शंका नाही . हळू हळू मेट्रो सगळ्या महत्वाच्या मार्गांवरून धावेल अशी अपेक्षा करायला ही हरकत नाही . फक्त एक च आहे की आपल्यासारख्या अस्थिर सीमा रेषा असलेल्या देशाच्या नागरिकांनी स्वतःलाच एक शिस्त लावून घेतली पाहिजे. सुरक्षा व्यवस्था धाब्यावर न बसवणे, केवळ वेळ नाही म्हणून नियम वाकवणे अशा गोष्टी प्रत्येकाने आपल्यापुरत्या टाळल्या तरी एवढे सगळे लोक सहज manage होतील . हे सगळं मनात आलं कारण साध्या mall मधल्या सुरक्षा व्यवस्थेला पण आपण वैतागतो. मुंबईकरांना सदाचीच घाई त्या मुळे असे नियम धाब्यावर बसायला वेळ लागणार नाही . तुमच्या ही लेखात उल्लेख आहेच "
अगदी विमानतळ असल्यासारखे नखर आहेत
". आपण थोडा त्रास सहन करणं भाग च आहे जर जिवंत राहायचा असेल तर.

रेवती गुरुवार, 06/12/2014 - 02:35
चांगली माहिती. सुरक्षा व्यवस्था आता पाहिजेच! बॉम्बस्फोटात जीव गेल्याच्या बातम्या पुरे झाल्या. एकंदरीत प्रकरण सोयिस्कर दिसतय. पब्लिकनेही गंमत म्हणून मेट्रोतून फिरायला जाणे टाळावे म्हणजे खर्‍या प्रवाशांची गैरसोय होणार नाही हे खरे आहे पण खोटे का बोलू? मलाही बातमी आल्यादिवशी एक राईड घ्यावीशी वाटली होती. ;)

आतिवास गुरुवार, 06/12/2014 - 10:33
माहितीपूर्ण लेख. दिल्लीतला मेट्रोचा अनुभव सुखद आहे, मुंबईतलाही नक्की असेल. थोडा चालण्याचा व्यायाम करायची तयारी असेल तर मेट्रो सोयीची आहे एकदम! पुढच्या मुंबई भेटीत मेट्रोने नक्की प्रवास करणार. दिल्लीत तरी मेट्रोचा मासिक पास नाही - स्वाईप कार्ड वापरलं तर १०% फायदा होतो. मुंबई मेट्रो 'मासिक पास' काढणार असेल तर उत्तम आहे.

पेट थेरपी गुरुवार, 06/12/2014 - 10:42
छान माहिती दिली आहे. देल्ली मेट्रो मस्त आहे. मी उभे राहून प्रवास करत होते तर अचानक माझ्या डब्यात सिक्यूरिटीचे लोक्स व त्यांच्याबरोबर एक मस्त लॅब्राडोर कुत्रे आले. हे कायम गस्त घालत असतात. कुक्कु पायाशी बसून गेले. माझ्या सवयी प्रमाणे त्याचे मला लाड करायचे होते पण सिक्यूरिटी कुत्र्यांना फार प्रेम दाखवायचे नसते असे काहीतरी वाचले होते म्हणून घाबरून गप उभी राहिले. सेंट्रल वेस्ट र्न करणार्‍यांना खरेच मस्त असणार हा ऑप्शन. सिक्युरिटी चेकप मस्ट आहे. स्मार्ट कार्ड कसे घ्यायचे. ते लिहा.

In reply to by पेट थेरपी

साधा मुलगा गुरुवार, 06/12/2014 - 21:34
स्मार्ट कार्ड मेट्रो स्टेशन वरच मिळते. त्यासाठी वेगळी लाईन असते, generally customer care च्या cubicle पाशी लाईन असते.किमान १०० रुपये त्यात टाकू शकता. नाहीतर मग १०० रुपयाच्या पटीत त्यात पैसे भरू शकता. वेब साईट वर ५० रुपये डीपोझीट आणि ५० रुपये बॅलन्स असे सांगितले आहे. परंतु मी १०० रुपयाला घेतले तर गेटवर स्वाईप करताना मात्र १०० रुपये बॅलन्स दाखवत होते. त्यामुळे या बाबतीत जरा मी confused आहे.

मदनबाण गुरुवार, 06/12/2014 - 10:46
लेख आणि त्यातली माहिती आवडली. माझ्यासारख्या मुंबईकराला एक नवीन जीवनदायिनी मिळाल्यामुळे “अच्छे दिन” आल्यासारखे वाटत आहे. :) माझ्या मते मोदी सरकारला योग्य वेळ देण्याची गरज आहे,मग फरक दिसुन येइल याची खात्री आहे. निवडणुका डोळ्या समोर ठेवुन निर्णयांचे धडाके लावले जात आहेत हे आता सामान्य माणसालाही कळते. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}

दिपक.कुवेत गुरुवार, 06/12/2014 - 11:29
आवडला. पुढल्या भारत भेटित निदान एखादितरी मेट्रोवारी नक्कि फक्त लोकल ट्रेन्स मधे जशी हाणामारी करुन आत जायची जी पराकाष्ठा करावी लागते त्याची पुनरावृत्ती ईथे होउ नये म्हणजे झालं.

In reply to by दिपक.कुवेत

साधा मुलगा गुरुवार, 06/12/2014 - 21:49
जरूर प्रवास करा, दुपारी गर्दी नसताना केलात तर आणखी उत्तम. संध्याकाळी गर्दी होते. इथे हाणामारी फक्त तिकीट आणि आत,बाहेर करण्यासाठी होते, बाकी प्रवास सुखाचा आहे.

नितिन थत्ते गुरुवार, 06/12/2014 - 11:40
फोटोवरून मेट्रो ही लोकलसारखीच ओव्हरहेड वायर मधून वीज घेते असे दिसते. इतर मेट्रोज (बंगलोर आणि कलकाता) थर्ड रेल मधून वीज घेतात. त्यामुळे नेहमीप्रमाणे प्लॅटफॉर्मवरून रुळावर उतरून पलिकडे जाण्यात काही विजेच्या धक्क्याचा धोका नसावा.... अर्थात गाडीखाली सापडण्याचा धोका आहेच. बंगलोर मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर लोकांनी पुढे (प्लॅटफॉर्मच्या कडेला) जाऊ नये म्हणून रक्षक असतात आणि ते लोकांना ओरडून मागे ठेवतात. तसे रक्षक कलकाता मेट्रोवर पाहिलेले नाहीत.

In reply to by नितिन थत्ते

बॅटमॅन गुरुवार, 06/12/2014 - 13:00
कोलकाता मेट्रो देशातली पयली असली तरी ढिसाळ आहे. एक तर फक्त उत्तरदक्षिण मार्गावरून धावते अन फ्रीक्वेन्सीही कमीच आहे जरा..२०११ पर्यंत तरी असे होते. आत्ताचं माहिती नाही. शासनाने फक्त रेंज वाढवली स्टेशनांची पण तेवढ्या गाड्या वाढवल्या नैत. त्यामुळे गर्दी वाढली. नैतर अगोदर जेव्हा ठराविकच स्टेशने होती तेव्हा पीक अवर्सलाही फारशी गर्दी नसायची. मेन गर्दी ती चित्तरंजन अर्थात सी आर अ‍ॅव्हेन्यूला. अख्खा बराकपूर ट्रंक रोड तेव्हा फुल गजबजलेला असायचा. त्यातही श्यामबझार ते एस्प्लनेडपर्यंतचा स्ट्रेच लैच्च प्याकबंद असायचा.

In reply to by नितिन थत्ते

साधा मुलगा गुरुवार, 06/12/2014 - 21:54
ट्रेनला ओवारहेड वायरच आहे. फक्त दोन रुळांमध्ये मोठ्या उंचीचे डिवायडर आहेत, ते पार करणे सामान्य माणसाला अशक्य आहे, म्हणून रूळ ओलांडून जाण्याचा प्रयत्न करू नका म्हणालो.

In reply to by प्रसाद१९७१

साधा मुलगा गुरुवार, 06/12/2014 - 21:43
दादर वरून प्रवासाचा योग पुढील आठवड्यात येईल तेव्हा बघून अनुभव कळवतो, याची मलाही उत्सुकता आहे. पण बेस्टची ३४० नंबर बसच्या प्रवाशांची संख्या दहा हजाराने कमी झाली असे मटा मध्ये आले होते. हि बस घाटकोपर ते आगरकर चौक, अंधेरी असा प्रवास करते.

झोपडपट्टीवासियांची गैरसोय झाली , आता डब्बा टाकायचा म्हटले की टमरेल घेऊन वरती चढून जावे लागणार . रेल्वे कसे घराच्या बाहेर चा मामला होता. भिकारी , विक्रेते ह्यांना प्रवेश बंद असेल ही सुखद गोष्ट महिला व पुरुषांना वेगवेगळे डबे आहेत का

In reply to by निनाद मुक्काम …

नितिन थत्ते गुरुवार, 06/12/2014 - 13:14
>>महिला व पुरुषांना वेगवेगळे डबे आहेत का मेट्रो आतून कनेक्टेड असते त्यामुळे वेगळे डबे नाहीत. मात्र काही सीट (बस सारक्या) राखीव असतात नहुधा).

In reply to by निनाद मुक्काम …

साधा मुलगा गुरुवार, 06/12/2014 - 21:37
महिलांसाठी वेगळा डबा नाहीये. पण प्रत्येक डब्यात बस प्रमाणे महिलांकरिता राखीव जागा आहेत.

In reply to by निनाद मुक्काम …

सामान्यनागरिक Fri, 06/13/2014 - 11:13
लवकरच ही सोय सुरु होईल. पाच रुपये घेऊन त्यातले काही सिक्युरिटीला देउन पंचतारांकित संडासची सेवा झोपडपट्टीसाठी सुरु करण्यात येईल.

साधा मुलगा गुरुवार, 06/12/2014 - 22:13
कुठल्याही मेट्रो स्टेशनला आत आणि बाहेर जायला दोन बाजूंना सोय आहे. जर का तुम्हाला आत जायला किंवा बाहेर पडायला गर्दी वाटली आणि वेळ जातोय असे वाटले तर दुसर्या बाजूने प्रयत्न करावा. कधी कधी दुसर्या बाजूला काळे कुत्रे देखील नसते. विशेषतः घाटकोपर मेट्रो स्टेशनला सगळे जन रेल्वेच्या बाजूने बाहेर पडायचा प्रयत्न करतात त्याऐवजी विरुद्ध दिशेने पटकन बाहेर पडता येते.

तुमचा अभिषेक गुरुवार, 06/12/2014 - 22:21
मस्त माहिती रे, नवीन इन्फो मिळाली ती पटपट शेअर करून भाव खातो आता.. तसेच काही पुणेकर काका-मामांशी या मेट्रोवरून वाद घालायला पण आता काही चांगले मुद्दे मिळतील ;) बाकी स्वताच्या नशीबात हा प्रवासयोग कसा लवकरात लवकर जुळवून आणावा हा विचार करतोय, हे वाचून तर आणखी उत्सुकता चाळवलीय, झोपडपट्टीचे विहंगम द्रुश्य एसी डब्यात बसून वा उभे राहून बघण्याची मौजच न्यारी असेल नाही ..

दर्यासारंग गुरुवार, 06/12/2014 - 23:58
फक्त पहिले ३ दिवस - ८,९,१० जुनला कार्ड काढले तर फुल्ल १०० रुपये मिळतिल, आता ५० रुपये डीपोझीट आणि ५० रुपये बॅलन्स मिळणार. लेडिजसाठि लाईन नाहि त्यामुळे त्यान्चा जास्त वेळ वाचतो ( १५ मिनिटे तरि वाचतात). सेपरेट ड्ब्बा नसला तरि पायलटजवळचा ड्ब्बात लेडिज जास्त जातात. मला चकालाहुन ठाण्याला यायला ४० मिनिटे लागली. चकाला ते ठाणे व्हाया दादर ७० मिनिटे होतात. प्रवास वेळ वाचवणारा असला तरी खर्चिक आहे. दादरची गर्दी घाटकोपरला होउ लागली आहे. त्यामुळे ट्रेन सोडावी लागते. मेट्रो मधे रिकामटेकडे लोक येउन बसतात. जर तुम्हि स्वाइप आउट केले नाहि तर तुम्हि अगदि सहज घाटकोपर-वर्सोवा-घाटकोपर प्रवास रिपीट करु शकता. कोणीहि अडवत नाहि. त्यामुळे सन्ध्याकाळि मेट्रो हाउसफुल्ल धावते. एक महिन्यानतर ३० रु टिकिट होणार, मी तरी खुश नाहि.

सामान्यनागरिक Fri, 06/13/2014 - 11:10
पूण्यात बीआर्टीयस च्या नावाने जो खेळ्खंडोबा सुरु आहे तो तरी आटपता घ्या ! उगीचच मेट्रोची स्वप्ने का पहाता ?

पेट थेरपी Fri, 06/13/2014 - 12:10
पुणे मुंबई वाद इथे कशाला आणता. मुंबईच्या गरजा वेगळ्या आहेत. अजूनही सेनापती बापट रोड वरून संध्याकाळी रमत गमत स्कूटर वरून येताना मस्त वाटते. आमच्यावेळचं पुणं वेगळं आणि खूप मस्त होतं एक एटर्नल पुणेरी काकू.

पिलीयन रायडर Fri, 06/13/2014 - 15:30
उगाच मुंबई- पुणे वाद कशाला आणताय इथे.. पुण्याची सार्वजनिक वाहतुक सेवा.. एक नाही दहा भिकार आहे.. पुणेकर सुद्धा वाद घालत बसणार नाहीत ह्यावर.. लोकल वगैरेची इथे एकतर कुणाला सवय नाही.. त्यात ती तासाला एक.. पीएम्टी बद्दल बोलायलाच नको.. हे सगळं कमी होतं म्हणुन आता सगळे मोठे रस्ते बीआरटी साठी अर्धे ब्लॉक करुन ठेवलेत. म्हणजे अर्ध्या अरुंद रस्त्यावर १ किमीचा ट्रॅफिक जॅम.. उरलेला अर्धा रिकामा... १० वर्ष अजुन ऑपरेशनल करायची नव्हती बीआरटी तर अत्तच कशाला रस्ते अर्धे करुन ठेवलेत..??? बरं समजा झालीच उद्या सुरु.. तर रस्त्यच्या मधोमध उतरलेल्या प्रवाशांनी रस्ता क्रॉस करायचा कसा? तसंही सिग्नलला बीआरटी काय किंवा साधी लेन काय.. सगळ्यांनाच थांबाव लागणारे.. आणि समजा.. बीआरटीला डावीकडे वळायचय आणि काही पब्लिकला उजवीकडे तर चौकात नक्की कसं करणार म्हणे हे? पार वाट लावुन ठेवलीये पुण्यात..

In reply to by पिलीयन रायडर

रेवती Fri, 06/13/2014 - 15:45
अगदी! बीआर्टीचा थांबा माझ्या घराच्या समोरच आहे. भयंकर वैताग आणतात ते. मधल्या पट्ट्यात धावणारी महाराणी असल्याने वेगात येतात.

दिपाली पाटिल गुरुवार, 06/12/2014 - 01:45
मेट्रोचा व्हिडीओ पाहील्यावर समजलं कि ही यंत्रणा बे एरियातल्या बार्टसारखी आहे फक्त सेक्युरिटीची भानगड आणि टोकन सोडले तर... छान माहीतीपुर्ण लेख आहे. सगळे statistics चांगले मांडले आहेत.

In reply to by दिपाली पाटिल

एस गुरुवार, 06/12/2014 - 19:56
छान माहीतीपुर्ण लेख आहे. सगळे statistics चांगले मांडले आहेत.
असेच म्हणतो. अभ्यासपूर्ण लेख. बाकी मुंबई मेट्रोला आमच्या पुण्याच्या मेट्रोची सर दिसत नाही म्हणा. ;-)

स्रुजा गुरुवार, 06/12/2014 - 02:07
मस्त माहीती . नवीन माणसाला हा लेख वाचून अगदी नीट आखता येईल आपला पहिला मेट्रो प्रवस. सवय झाली की मुंबईकर सराईत पणे मेट्रो चा धंदा वाढवतील यात शंका नाही . हळू हळू मेट्रो सगळ्या महत्वाच्या मार्गांवरून धावेल अशी अपेक्षा करायला ही हरकत नाही . फक्त एक च आहे की आपल्यासारख्या अस्थिर सीमा रेषा असलेल्या देशाच्या नागरिकांनी स्वतःलाच एक शिस्त लावून घेतली पाहिजे. सुरक्षा व्यवस्था धाब्यावर न बसवणे, केवळ वेळ नाही म्हणून नियम वाकवणे अशा गोष्टी प्रत्येकाने आपल्यापुरत्या टाळल्या तरी एवढे सगळे लोक सहज manage होतील . हे सगळं मनात आलं कारण साध्या mall मधल्या सुरक्षा व्यवस्थेला पण आपण वैतागतो. मुंबईकरांना सदाचीच घाई त्या मुळे असे नियम धाब्यावर बसायला वेळ लागणार नाही . तुमच्या ही लेखात उल्लेख आहेच "
अगदी विमानतळ असल्यासारखे नखर आहेत
". आपण थोडा त्रास सहन करणं भाग च आहे जर जिवंत राहायचा असेल तर.

रेवती गुरुवार, 06/12/2014 - 02:35
चांगली माहिती. सुरक्षा व्यवस्था आता पाहिजेच! बॉम्बस्फोटात जीव गेल्याच्या बातम्या पुरे झाल्या. एकंदरीत प्रकरण सोयिस्कर दिसतय. पब्लिकनेही गंमत म्हणून मेट्रोतून फिरायला जाणे टाळावे म्हणजे खर्‍या प्रवाशांची गैरसोय होणार नाही हे खरे आहे पण खोटे का बोलू? मलाही बातमी आल्यादिवशी एक राईड घ्यावीशी वाटली होती. ;)

आतिवास गुरुवार, 06/12/2014 - 10:33
माहितीपूर्ण लेख. दिल्लीतला मेट्रोचा अनुभव सुखद आहे, मुंबईतलाही नक्की असेल. थोडा चालण्याचा व्यायाम करायची तयारी असेल तर मेट्रो सोयीची आहे एकदम! पुढच्या मुंबई भेटीत मेट्रोने नक्की प्रवास करणार. दिल्लीत तरी मेट्रोचा मासिक पास नाही - स्वाईप कार्ड वापरलं तर १०% फायदा होतो. मुंबई मेट्रो 'मासिक पास' काढणार असेल तर उत्तम आहे.

पेट थेरपी गुरुवार, 06/12/2014 - 10:42
छान माहिती दिली आहे. देल्ली मेट्रो मस्त आहे. मी उभे राहून प्रवास करत होते तर अचानक माझ्या डब्यात सिक्यूरिटीचे लोक्स व त्यांच्याबरोबर एक मस्त लॅब्राडोर कुत्रे आले. हे कायम गस्त घालत असतात. कुक्कु पायाशी बसून गेले. माझ्या सवयी प्रमाणे त्याचे मला लाड करायचे होते पण सिक्यूरिटी कुत्र्यांना फार प्रेम दाखवायचे नसते असे काहीतरी वाचले होते म्हणून घाबरून गप उभी राहिले. सेंट्रल वेस्ट र्न करणार्‍यांना खरेच मस्त असणार हा ऑप्शन. सिक्युरिटी चेकप मस्ट आहे. स्मार्ट कार्ड कसे घ्यायचे. ते लिहा.

In reply to by पेट थेरपी

साधा मुलगा गुरुवार, 06/12/2014 - 21:34
स्मार्ट कार्ड मेट्रो स्टेशन वरच मिळते. त्यासाठी वेगळी लाईन असते, generally customer care च्या cubicle पाशी लाईन असते.किमान १०० रुपये त्यात टाकू शकता. नाहीतर मग १०० रुपयाच्या पटीत त्यात पैसे भरू शकता. वेब साईट वर ५० रुपये डीपोझीट आणि ५० रुपये बॅलन्स असे सांगितले आहे. परंतु मी १०० रुपयाला घेतले तर गेटवर स्वाईप करताना मात्र १०० रुपये बॅलन्स दाखवत होते. त्यामुळे या बाबतीत जरा मी confused आहे.

मदनबाण गुरुवार, 06/12/2014 - 10:46
लेख आणि त्यातली माहिती आवडली. माझ्यासारख्या मुंबईकराला एक नवीन जीवनदायिनी मिळाल्यामुळे “अच्छे दिन” आल्यासारखे वाटत आहे. :) माझ्या मते मोदी सरकारला योग्य वेळ देण्याची गरज आहे,मग फरक दिसुन येइल याची खात्री आहे. निवडणुका डोळ्या समोर ठेवुन निर्णयांचे धडाके लावले जात आहेत हे आता सामान्य माणसालाही कळते. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}

दिपक.कुवेत गुरुवार, 06/12/2014 - 11:29
आवडला. पुढल्या भारत भेटित निदान एखादितरी मेट्रोवारी नक्कि फक्त लोकल ट्रेन्स मधे जशी हाणामारी करुन आत जायची जी पराकाष्ठा करावी लागते त्याची पुनरावृत्ती ईथे होउ नये म्हणजे झालं.

In reply to by दिपक.कुवेत

साधा मुलगा गुरुवार, 06/12/2014 - 21:49
जरूर प्रवास करा, दुपारी गर्दी नसताना केलात तर आणखी उत्तम. संध्याकाळी गर्दी होते. इथे हाणामारी फक्त तिकीट आणि आत,बाहेर करण्यासाठी होते, बाकी प्रवास सुखाचा आहे.

नितिन थत्ते गुरुवार, 06/12/2014 - 11:40
फोटोवरून मेट्रो ही लोकलसारखीच ओव्हरहेड वायर मधून वीज घेते असे दिसते. इतर मेट्रोज (बंगलोर आणि कलकाता) थर्ड रेल मधून वीज घेतात. त्यामुळे नेहमीप्रमाणे प्लॅटफॉर्मवरून रुळावर उतरून पलिकडे जाण्यात काही विजेच्या धक्क्याचा धोका नसावा.... अर्थात गाडीखाली सापडण्याचा धोका आहेच. बंगलोर मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर लोकांनी पुढे (प्लॅटफॉर्मच्या कडेला) जाऊ नये म्हणून रक्षक असतात आणि ते लोकांना ओरडून मागे ठेवतात. तसे रक्षक कलकाता मेट्रोवर पाहिलेले नाहीत.

In reply to by नितिन थत्ते

बॅटमॅन गुरुवार, 06/12/2014 - 13:00
कोलकाता मेट्रो देशातली पयली असली तरी ढिसाळ आहे. एक तर फक्त उत्तरदक्षिण मार्गावरून धावते अन फ्रीक्वेन्सीही कमीच आहे जरा..२०११ पर्यंत तरी असे होते. आत्ताचं माहिती नाही. शासनाने फक्त रेंज वाढवली स्टेशनांची पण तेवढ्या गाड्या वाढवल्या नैत. त्यामुळे गर्दी वाढली. नैतर अगोदर जेव्हा ठराविकच स्टेशने होती तेव्हा पीक अवर्सलाही फारशी गर्दी नसायची. मेन गर्दी ती चित्तरंजन अर्थात सी आर अ‍ॅव्हेन्यूला. अख्खा बराकपूर ट्रंक रोड तेव्हा फुल गजबजलेला असायचा. त्यातही श्यामबझार ते एस्प्लनेडपर्यंतचा स्ट्रेच लैच्च प्याकबंद असायचा.

In reply to by नितिन थत्ते

साधा मुलगा गुरुवार, 06/12/2014 - 21:54
ट्रेनला ओवारहेड वायरच आहे. फक्त दोन रुळांमध्ये मोठ्या उंचीचे डिवायडर आहेत, ते पार करणे सामान्य माणसाला अशक्य आहे, म्हणून रूळ ओलांडून जाण्याचा प्रयत्न करू नका म्हणालो.

In reply to by प्रसाद१९७१

साधा मुलगा गुरुवार, 06/12/2014 - 21:43
दादर वरून प्रवासाचा योग पुढील आठवड्यात येईल तेव्हा बघून अनुभव कळवतो, याची मलाही उत्सुकता आहे. पण बेस्टची ३४० नंबर बसच्या प्रवाशांची संख्या दहा हजाराने कमी झाली असे मटा मध्ये आले होते. हि बस घाटकोपर ते आगरकर चौक, अंधेरी असा प्रवास करते.

झोपडपट्टीवासियांची गैरसोय झाली , आता डब्बा टाकायचा म्हटले की टमरेल घेऊन वरती चढून जावे लागणार . रेल्वे कसे घराच्या बाहेर चा मामला होता. भिकारी , विक्रेते ह्यांना प्रवेश बंद असेल ही सुखद गोष्ट महिला व पुरुषांना वेगवेगळे डबे आहेत का

In reply to by निनाद मुक्काम …

नितिन थत्ते गुरुवार, 06/12/2014 - 13:14
>>महिला व पुरुषांना वेगवेगळे डबे आहेत का मेट्रो आतून कनेक्टेड असते त्यामुळे वेगळे डबे नाहीत. मात्र काही सीट (बस सारक्या) राखीव असतात नहुधा).

In reply to by निनाद मुक्काम …

साधा मुलगा गुरुवार, 06/12/2014 - 21:37
महिलांसाठी वेगळा डबा नाहीये. पण प्रत्येक डब्यात बस प्रमाणे महिलांकरिता राखीव जागा आहेत.

In reply to by निनाद मुक्काम …

सामान्यनागरिक Fri, 06/13/2014 - 11:13
लवकरच ही सोय सुरु होईल. पाच रुपये घेऊन त्यातले काही सिक्युरिटीला देउन पंचतारांकित संडासची सेवा झोपडपट्टीसाठी सुरु करण्यात येईल.

साधा मुलगा गुरुवार, 06/12/2014 - 22:13
कुठल्याही मेट्रो स्टेशनला आत आणि बाहेर जायला दोन बाजूंना सोय आहे. जर का तुम्हाला आत जायला किंवा बाहेर पडायला गर्दी वाटली आणि वेळ जातोय असे वाटले तर दुसर्या बाजूने प्रयत्न करावा. कधी कधी दुसर्या बाजूला काळे कुत्रे देखील नसते. विशेषतः घाटकोपर मेट्रो स्टेशनला सगळे जन रेल्वेच्या बाजूने बाहेर पडायचा प्रयत्न करतात त्याऐवजी विरुद्ध दिशेने पटकन बाहेर पडता येते.

तुमचा अभिषेक गुरुवार, 06/12/2014 - 22:21
मस्त माहिती रे, नवीन इन्फो मिळाली ती पटपट शेअर करून भाव खातो आता.. तसेच काही पुणेकर काका-मामांशी या मेट्रोवरून वाद घालायला पण आता काही चांगले मुद्दे मिळतील ;) बाकी स्वताच्या नशीबात हा प्रवासयोग कसा लवकरात लवकर जुळवून आणावा हा विचार करतोय, हे वाचून तर आणखी उत्सुकता चाळवलीय, झोपडपट्टीचे विहंगम द्रुश्य एसी डब्यात बसून वा उभे राहून बघण्याची मौजच न्यारी असेल नाही ..

दर्यासारंग गुरुवार, 06/12/2014 - 23:58
फक्त पहिले ३ दिवस - ८,९,१० जुनला कार्ड काढले तर फुल्ल १०० रुपये मिळतिल, आता ५० रुपये डीपोझीट आणि ५० रुपये बॅलन्स मिळणार. लेडिजसाठि लाईन नाहि त्यामुळे त्यान्चा जास्त वेळ वाचतो ( १५ मिनिटे तरि वाचतात). सेपरेट ड्ब्बा नसला तरि पायलटजवळचा ड्ब्बात लेडिज जास्त जातात. मला चकालाहुन ठाण्याला यायला ४० मिनिटे लागली. चकाला ते ठाणे व्हाया दादर ७० मिनिटे होतात. प्रवास वेळ वाचवणारा असला तरी खर्चिक आहे. दादरची गर्दी घाटकोपरला होउ लागली आहे. त्यामुळे ट्रेन सोडावी लागते. मेट्रो मधे रिकामटेकडे लोक येउन बसतात. जर तुम्हि स्वाइप आउट केले नाहि तर तुम्हि अगदि सहज घाटकोपर-वर्सोवा-घाटकोपर प्रवास रिपीट करु शकता. कोणीहि अडवत नाहि. त्यामुळे सन्ध्याकाळि मेट्रो हाउसफुल्ल धावते. एक महिन्यानतर ३० रु टिकिट होणार, मी तरी खुश नाहि.

सामान्यनागरिक Fri, 06/13/2014 - 11:10
पूण्यात बीआर्टीयस च्या नावाने जो खेळ्खंडोबा सुरु आहे तो तरी आटपता घ्या ! उगीचच मेट्रोची स्वप्ने का पहाता ?

पेट थेरपी Fri, 06/13/2014 - 12:10
पुणे मुंबई वाद इथे कशाला आणता. मुंबईच्या गरजा वेगळ्या आहेत. अजूनही सेनापती बापट रोड वरून संध्याकाळी रमत गमत स्कूटर वरून येताना मस्त वाटते. आमच्यावेळचं पुणं वेगळं आणि खूप मस्त होतं एक एटर्नल पुणेरी काकू.

पिलीयन रायडर Fri, 06/13/2014 - 15:30
उगाच मुंबई- पुणे वाद कशाला आणताय इथे.. पुण्याची सार्वजनिक वाहतुक सेवा.. एक नाही दहा भिकार आहे.. पुणेकर सुद्धा वाद घालत बसणार नाहीत ह्यावर.. लोकल वगैरेची इथे एकतर कुणाला सवय नाही.. त्यात ती तासाला एक.. पीएम्टी बद्दल बोलायलाच नको.. हे सगळं कमी होतं म्हणुन आता सगळे मोठे रस्ते बीआरटी साठी अर्धे ब्लॉक करुन ठेवलेत. म्हणजे अर्ध्या अरुंद रस्त्यावर १ किमीचा ट्रॅफिक जॅम.. उरलेला अर्धा रिकामा... १० वर्ष अजुन ऑपरेशनल करायची नव्हती बीआरटी तर अत्तच कशाला रस्ते अर्धे करुन ठेवलेत..??? बरं समजा झालीच उद्या सुरु.. तर रस्त्यच्या मधोमध उतरलेल्या प्रवाशांनी रस्ता क्रॉस करायचा कसा? तसंही सिग्नलला बीआरटी काय किंवा साधी लेन काय.. सगळ्यांनाच थांबाव लागणारे.. आणि समजा.. बीआरटीला डावीकडे वळायचय आणि काही पब्लिकला उजवीकडे तर चौकात नक्की कसं करणार म्हणे हे? पार वाट लावुन ठेवलीये पुण्यात..

In reply to by पिलीयन रायडर

रेवती Fri, 06/13/2014 - 15:45
अगदी! बीआर्टीचा थांबा माझ्या घराच्या समोरच आहे. भयंकर वैताग आणतात ते. मधल्या पट्ट्यात धावणारी महाराणी असल्याने वेगात येतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अनेक दिवस प्रतीक्षेत असलेली मुंबई ची मेट्रो रेल्वे रविवार दिनांक ८ जून २०१४ ला सुरु झाली. त्याचे श्रेय कोणाला याचा वाद सुरु राहील परंतु माझासारख्या असंख्य मुंबईकरांना हि अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक घटना आहे. ज्यांना सेन्ट्रल ते वेस्टर्न प्रवास करायचा आहे, जास्तकरून जे रोज ठाणे, डोंबिवली , कल्याण आणि खाली ते अंधेरी, बोरीवली असा प्रवास करतात त्यांच्यासाठी नक्कीच वेळेची बचत करणारी आहे. मेट्रो रेल्वे चालू झाल्याच्या दोन तीन दिवस मी जो प्रवासाचा अनुभव घेतला आहे तो आपल्यासमोर मांडत आहे. सध्या मला इंटर्नशिप साठी चांदिवलीला जावे लागते.

भटकंती कर्नाटकातली

कंजूस ·

In reply to by प्रचेतस

कंजूस Fri, 09/05/2014 - 17:45
विजापूर फोटो /अ १)इब्राहिम रौजा, बिजापूर. १ २)इब्राहिम रौजा, बिजापूर २ ३)आतला भाग, गोल गुंबज. ३ ४)मलिक ए मेदान तोफ. ५ ५)लेखनकला, नक्षीदार जाळी रूपात. इ०रौजा. ६ ६)इ०रौजा. ७

In reply to by प्रचेतस

कंजूस Fri, 09/05/2014 - 17:51
बदामि फोटो/अ १)बनशंकरी तलाव. १ २)बनशंकरी रथाची चाके. २ ३)रथ बनशंकरी. ३ ४)अगस्ति तलाव. ४ ५)अगस्ति तलाव. ५ ६)शाळेची मुले, मधल्या सुटीत. ६ ७)बदामिची शाळेची सहल. ७

In reply to by प्रचेतस

कंजूस Fri, 09/05/2014 - 17:59
पट्टडकल फोटो /अ १)पौराणिक चित्रपट, विरूपाक्ष मंदिर. १ २)जड संपन्नता हार रुद्रगण उचलत आहेत. २ ३)लेख. ३ ४)उपदेवता मंदिर. ४ ५)द्वारपट्टीका. ५ ६)जैनमंदिरातील हत्ती. ६ ७)विरूपाक्षाचा वेगळा नंदी. ७

In reply to by प्रचेतस

कंजूस Fri, 09/05/2014 - 18:01
हम्पि फोटो /अ १)विठ्ठल मंदिर परिसर. १ २)रावणाचे शिल्प. २ ३)तुंगभद्रा नदी. ३ ४)विठ्ठल मंदिर प्रवेशद्वार. ४ ५)ओवऱ्या अच्युतराय मंदिराच्या, आणि मातंगी टेकडी. ५ ६)एक हॉटेल,स्टे०रोड, होस्पेट. ६ ७)कारंजा, होस्पेट. ७

In reply to by प्रचेतस

कंजूस Fri, 09/05/2014 - 18:04
लखुंडी फोटो /अ १)जैन मंदिर. १ २)जैन मंदिर. २ ३)ब्रह्मा, ब्रह्मजीनालया. ३ ४)पद्मावती. ४ ५)लखुंडी दर्शनफेरी. ५ ६)काशिविश्वेश्वरा. ६ ७)कोरीव काम. ७

कंजूस गुरुवार, 06/12/2014 - 09:36
या ठिकाणांबद्दल उत्सुकता किती आहे त्याप्रमाणे वर्णन वाढवणार आहे ।कसे कुठे जावे ,ट्रीप कशी प्लान करावी ते पण लिहीन .ऐतिहासीक संदर्भ आणि रेखानकाशे पण आहेत .फोटोखाली एकेक ओळ माहिती टाकत आहे .फोटो बघितल्यावर आपण ठरवतो की अमुक एक ठिकाणी जावे का नाही .इकडे परदेशी पर्यटक फार येतात .गोव्याहून सतत बसेस चालू असतात .

In reply to by कंजूस

प्रचेतस गुरुवार, 06/12/2014 - 09:44
प्रतिसादसंख्येकडे दुर्लक्ष करून वर्णन अवश्य येऊ द्यात. काही वाचक आवर्जून अशा मालिका वाचत असतात.

कंजूस गुरुवार, 06/12/2014 - 10:11
ठीक आहे .भटकंती सदराच्या प्रतिक्रियांनाही "संपादन"ची सोय असती तर बरं झालं असतं .छोटे छोटे लिहिलेले भाग नंतर एकत्र जोडता येतात . इकडे येणारे बरेचसे भारतीय पर्यटक(=भाविक) बनशंकरी ,आणि विरुपाक्ष देवळासाठी येतात आणि बाकीचा भाग उरकतात .इतर देवळांत मूर्ती नाहीत अथवा असल्या तरी पूजेत नाहीत ,सकाळी सहा ते संधयाकाळी सहापर्यंत उघडी असतात .

मदनबाण गुरुवार, 06/12/2014 - 10:25
काय हो कंजूस मामा लिखाणात सुंद्धा कंजूसपणा ? ;) जरा डिटेलमंदी लिवा की... फोटु पण हवेच हवे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}

चौकटराजा गुरुवार, 06/12/2014 - 10:28
अर्र लखुंडी यकदम खास आहे का ? आमचे बघायचे राहिले. बाकी हा भाग मस्त आहे. नारळाची झाडे व लोहयुक्त ताबडी माती , काळी देवळे, कातळ,धोंडे, तुंगभद्रा, घरगुती खानावळी सारेच संस्मरणीय. नव्हेंबर मधे गेल्यास उन कमी असेल. आमचा बेल्लारीचा किल्ला ही राहिला. पण आयहोळ , पत्तडकल व बदामी लाजवाबच ! कर्नाटक आपले लाडके राज्य हाय !

कंजूस गुरुवार, 06/12/2014 - 11:14
लखुंडी एकदमच खास आहे .सर्वात कठीण अशा काळ्या दगडात सुरेख मुर्ती आहेत .जी गोष्ट भव्यतेत नाही ती इकडे कलाकुसर आणि कलात्मकता आणि धार्मिक सामंजस्यात सामावली आहे .दोन जैन देवळांत हिंदू मूर्ती आहेत .सूर्यनारायणाची चार फुटी मूर्ती इतकी अखंड आणि आकर्षक आहे की चोरी होईल की काय या धास्तीने देवळातून काढून म्युझिअममध्ये ठेवली आहे .आता १९५० नंतर भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने लक्ष घातले परंतु एक हजार वर्षे या गाववाल्यांनीच संभाळले .अजून बरेच आहे .

In reply to by म्हैस

चौकटराजा गुरुवार, 06/12/2014 - 18:33
मी हैद्राबाद च्या काचीगुडा स्टेशनवरून रात्री सुटणार्‍या काचीगुडा- गोवा एक्सप्रेसने होस्पेटला उतरलो होतो.त्याअगोदर हैद्राबाद मनसोक्त पाहिले. हुसेनसागर तलावाकाठचे लुंबिनी पार्क, तेथील लेझर शो, पडका पण भव्य- किल्ला, सालारजंग म्युसीयम, बायॉलॉजेकल पार्क , टेकडीवरचे बिर्ला मंदीर असे एकसो एक ठिकाणे हैद्राबादेत आहेत.खेरीज एका दिवसात करता येणारे रामोजी फिल्म सिटी व नागार्जुन सागर धरण लय भारी.

In reply to by चौकटराजा

प्रचेतस गुरुवार, 06/12/2014 - 18:49
हैद्राबाद लय भारी ठिकाण आहे. सालारजंग मध्ये इतर काहीच पाहिले नाही तरी चालेल पण व्हेल्ड रिबेका मात्र पाहावी. पॅराडाइझ पण आहेच पण बावर्चीची मजा काही औरच.

In reply to by सूड

कंजूस गुरुवार, 06/12/2014 - 23:53
ललितलेखन वगैरे जमणे कठीण आहे .काही फोटो आणि त्रोटक लिखाणातून लोकांची या ठिकाणाबद्दल उत्सुकता चाळवली गेली तरी खूप झाले .आता वल्ली ,चौकटराजा लिहितील तेव्हा चित्र आणखी स्पष्ट होईल .

कंजूस गुरुवार, 06/12/2014 - 23:43
आणखी वर्णन लिहित आहे .बिजापूरचे पाहा .विकिपिडिआतून जी विजयनगरची ऐतिहासिक माहिती आहे ती पुन्हा इकडे देत नाही . सर्वांना धन्यवाद .

पैसा Sat, 06/14/2014 - 15:26
लखुंदीबद्दल विस्ताराने माहिती हवी आहे. अजून डिटेल लिहा. प्रतिक्रिया म्हणून लिहा किंवा नवा धागा काढा. पण ट्रिप कशी प्लॅन करावी याबद्दल सविस्तर माहिती लिहाच! फोटो अजून पाहिले नाहीत. आता सावकाश बघेन.

कंजूस Sat, 06/14/2014 - 16:50
ट्रीप प्लान करून जसे पाहात गेलो तसे लिहिणार आहे .कोणत्या ठिकाणी स्थळदर्शनास किती वेळ लागतो आणि प्रवासाला लागणारा वेळ तसेच कोणती सोयिस्कर रेल्वे मिळते हे कळले की इतरांना त्याचा पूर्ण उपयोग करता येईल .लखुंडी दर्शनाबद्दल फोटो नकाशासह येईलच .६ ते १२जानेवारी २०१४ आम्हाला तिघांसाठी संपूर्ण सहलीचा रे तिकीट ,बस प्रवास .राहणे ,खाणे धरून रुपये दहा हजार खर्च आला .सर्व सावकाश पाहिले .

कंजूस Sun, 06/15/2014 - 21:37
बदामि-१ बिजापूरहून बागलकोटला बस जातात व तिथून बदामिची बस मिळते .परंतु मी रेलवेचे तिकीट रेज० काढलेले होते .रिजवच्या दोन डब्यात दहाजणच होते परंतू टिटिई कोणाला येऊ देत नाही .वाटेत लागणारे अलमट्टी धरण पाहणे हे खास आकर्षण असते .गाडी हळू जाते आणि वळसे घेते .साडेअकराला अर्धा तास उशिरा बदामि स्टे आले . बाहेर पडून शेर रिक्षा मिळतात .दहा रु/प्र .बदामि गाव पाच किमी आहे .कधी बसपण मिळते .हॉटेलचे नाव आनंद वगैरे सांगून डेपो गाठणे .डेपोजवळच बरीच बजेट हॉटेल्स आहेत आणि रिक्षावाला उगाचच फिरवेल.वाटेत बदाम कोर्ट दिसते .कर्नाटक टुअरिजमचे गावात लेण्यांपुढे आहे . एक वाजेपर्यँत आपले सामान रुमवर पडून आणि जवळच्याच रेस्टरॉमध्ये जेवण करून फिरायला तयार झालेलो असतो .हातात पर्स अथवा झोळणा घेऊ नका .पाठीवरच्या सैकमध्ये पाण्याच्या बॉटल्स ,खाण्याचे तयार पदार्थ आणि छत्री ठेवा .इकडे माकडे बदमाश आहेत .सैक ओढत नाहीत आणि छत्रीला फार घाबरतात .म्युझिअमच्या वरती शिवालय पाहतांना छत्री उपयोगी येते .इकडच्या गाईडसनाही माकडे ओचकारतात .छत्रीपासून माकडे चार हात दूर राहतात हा माझा सह्याद्री ट्रेकिंगचा अनुभव आहे .

कंजूस Sun, 06/15/2014 - 21:40
बदामि-२ लेणी आणि अगस्ति तलाव बस डेपोपासून एक किमीवर आहे त्यामुळे स्पेशल रिक्षा करायची गरज नाही .शिवाय ते लेण्यांकडे नेतात आणि वेटिंग चार्ज घेतात .म्युझीअमकडे नेत नाहीत .म्यु०च्या वर आणि पुढे बरेच पाहणयासारखे आहे . पंधरा मिनिटे चालल्यावर म्यु०ला आलो .बाजूलाच अगस्ति तलाव आहे .रम्य जागा .समोरच्या डोंगरात लेणी आहेत . म्यु०च्या वरच्या डोंगरावर जाण्यास डावीकडून छान वाट आहे .पूर्वी इथे किल्ला होता .वर दोन शिवालये पाहून मशिदीच्या मागून मारूती मंदिराच्या दुसऱ्या वाटेने खाली आलो .येथे माकडे अंगावर येतात .खाली आल्यावर तलावाच्या मागच्या काठावर भूतनाथ मंदिरे आणि एक वेगळीच जैन गुंफा आहे त्याचे दार दोन फुटी आहे .बदामिला येऊन शंभरातले दोनच जण इकडे येतात .हा भाग अवश्य पाहा . गुंफा पाहाण्यासाठी मागे येऊन रस्त्याने अथवा पायऱ्यांवरून यल्लमाच्या देवळाजवळून जावे लागते .जवळच्या शाळेची मधली सुट्टी झाली त्या मुलांचाही फोटो घेतला .तिकीट काढून वर गेलो .बस रिक्षा पार्क केलेल्या असतात .

कंजूस Sun, 06/15/2014 - 21:42
बदामि-३ . इथे खूप गर्दी असते .गाईड लोक या गुंफा दाखवून कटवतात .शाळेच्या खूप सहली आलेल्या पण दोन दोनच्या जोड्या करून रांगेने चारही गुंफा पंधरा मिनिटांत उरकतात . मास्तर शिटी वाजवतात नी शिक्षिका छडी हलवून लवकर चला करतात .ते तरी काय करणार सहाव्या शतकातील चालुक्यांची शिल्पकला कळणे विद्यार्थ्याँच्या कुवतीबाहेर आहे .असो . याच त्या चार गुंफा ज्यासाठी परदेशांतून हजारो पर्यटक येथे येतात .बऱ्याच जणांच्या हातात 'लोनलि प्लानेट'चे पुस्तक असते .याची जी '९६ अथवा '९८ ची जुनी आवृत्ती आहे त्यात खूप विस्तृत माहिती आहे .चारांपैकी तीन गुंफा हिंदू आहेत .शंकर आणि विष्णूअवतारांची सुरेख व अखंड साडेसहाफुटी मोठी शिल्पे आहेत .त्रिविक्रम ,वराह आणि नरसिंह अवताराचा प्रभाव त्याकाळी होता असे दिसते.शंकर सोळा हातांचा आहे .चौथी गुंफा आदिनाथाची आहे . या चालुक्यांचे शत्रु दुसरे हिंदू राजे(पल्लव) होते आणि नंतर सोळाव्या शतकांतही मुसलमान सुलतानांनी देवळांची नासधूस नाही केली .शिल्पांचे सविस्तर वर्णन आणि चालुक्यांचा इतिहास न सांगता पुढे चलुया .

कंजूस Sun, 06/15/2014 - 21:45
बदामि-४ येथून दहा मिनिटांत मुख्य रस्त्यावर आलो तेव्हा साडेचार वाजले होते .नाक्यावर बनशंकरी'कडे जाणाऱ्या शेअर रिक्षा उभ्या असतात .त्याने पाच किमीवरच्या बनशंकरीला आलो .इथल्या आठव्या शतकातल्या शाकंबरी देवीच्या देवळाचा उत्सव आज सुरू होणार होता .पौष शुक्ल अष्टमी (आज)ते पौर्णिमा .एकादशीनंतर जत्रा सुरू होते .थोड्या वेळाने चौघडा ,वाजंत्री वाजली आणि पालखीतून देवीची पितळी उत्सवमूर्ति आली .नऊवारी पातळांतल्या स्त्रियांनी आरती केली आणि पालखी देवळात गेली .आतमध्ये गाभाऱ्यात अडीचफुटी आठ हातांची मूर्ती आहे .देवळासमोर जो प्रचंड तलाव आहे तो बांधीव दगडी आहे .सभोवालती प्रदक्षिणा मार्ग आहे .नारळी आहेत .एकंदर या देवस्थानाचे फार पूर्वीपासूनचे महत्त्व कायम आहे .इकडे टोपलीतून भाकऱ्या आणि दही घेऊन "ऊटा ?"(=जेवण) विकणाऱ्या बायका भाविकांना विचारत होत्या .एका दुकानात एका काळा चिक्की सारखा पदार्थ होता .याला करदान म्हटतात .गूळ आणि सुक्यामेव्याची मऊ चिक्की (फज ?)होती .जवळच्या पटांगणात जत्रेसाठी राहुट्या उभारण्याचे काम जोरात चालू होते .हल्ली जत्रा आठ दिवस चालत नाही पूर्वी फार मोठी असायची .

कंजूस Sun, 06/15/2014 - 21:47
बदामि-५ अचानक एका मोठ्या गोष्टीकडे लक्ष गेले .उत्सवाचा लाकडी रथ !२०१२ मध्ये नोव्हेँबरात आलो त्यावेळी मला दिसला नव्हता .सातफुटी दगडी चाके पाहा याची .कानडी येत असती तर विचारता आले असते .जत्रेनंतर हा रथ झाकून ठेवतात . रीक्षाने हॉटेलवर परतलो तेव्हा सहा वाजले होते .चहा नाश्ता केला .परदेशी पर्यटकांना डोसा आणि हॉट करी (=सांबार) आवडीने खातांना पाहिले .चहा ऐवजी कॉफी अथवा थंड पसंत करतात .बरेचसे बदाम कोर्ट अथवा केटीडीसीत उतरतात .आमच्या रुमशेजारी जपानी /कोरिअन असावेत . आज तसे बरेच फिरलो आणि दमलो .म्युझिअममध्ये मोठा एअरिअल नकाशा आहे .त्यातले फक्त मलगट्टी शिवालया नाही पाहिले .पोलीस स्टेशनकडून बाजारातून रस्ता आहे .आपण अगस्ति तलावाकडून गावात येतो तेव्हा सहाव्या शतकातून दहा मिनिटांत एकविसाव्या शतकात येतो .मजा अशी की बदामिऐवजी चौदाव्या शतकातले हम्पि जागतिक वारसा (वल्ड हेरटिज साइट)यादीत आहे ! आता उद्या या बदामितच मुकाम आहे पण ऐहोळे(ऐवळी) ,पट्टडकल (पट्टडकलु) ची पंचवीसेक मंदिरे पाहून यायची आहेत .सकाळी पावणे आठला एकच बस ऐहोळेला (२५)जाते .याच वाटेवरच्या पट्टडकल येथे (१३किमी) दर अर्ध्या तासाने आहे .

कंजूस Sun, 06/15/2014 - 21:53
बदामि-६(ऐहोळे -१) सकाळी लवकर उठून नाश्ता करून बस डेपोत साडेसातला हजर झालो .इकडे थोडा आतला भाग असल्यामुळे बसच्यावर पाट्या कानडीत असतात .मी त्या वाचण्यासाठी मोठ्या शहरांची नावे कानडीत लिहुन आणली होती .(पाणिनि किपैड डॉट कॉम च्या वेबसाईटवर हे करता येते) .बस वेळेवर निघाली आणि पावणे नऊ वाजता ऐहोळे गावात थांबली .वाटेत पट्टडकल लागले पण ते येताना करायचे आहे .[इथून पंधराएक किमीवर विजापूर-हॉस्पेट हायवेवरचे "इल्कल" हे शहर आहे .स्वत:चे वाहन असल्यास बदामि नंतर पटट० आणि ऐ०पाहून तसेच पुढे पाचपर्यँत हॉस्पेट गाठता येईल .] बस नाक्यापाशीच दुर्गदेवी मंदिर आणि म्युझीअमचे आवार आहे .तिकीट काढून आत गेले की आवारातली मंदिरे पाहता येतात .पाऊणेक तास लागतो .बाकीच्यांना तिकीट नाही एका फलकावर ऐहोळे गावातील मंदिरांची नावे लिहिली आहेत .बरेच जण दुर्गदेवी पाहून परत जातात .इतर मंदिरे न पाहणे अन्याय केलयासारखे होईल .पुढची परतीची बस दीड वाजता आहे तोपर्यँत आम्ही सर्व महत्त्वाची मंदिरे सावकाश पायी फिरून पाहिली .नाक्यावर इडली वडा चहाचे एकच हॉटेल आहे .तसेच पेरू ,शेंगा आणि रस मिळतो .

कंजूस Sun, 06/15/2014 - 21:57
बदामि-७(ऐहोळे २) इथे येताना मला एक गोष्ट माहित होती ती म्हणजे हे एक साधे गाव आहे परंतू असंख्य परदेशी पर्यटक येतात .शाळेत जाणारी पहिली दुसरीतली मुले 'स्कूल पेन ?'मागतात .त्यामुळे पंचवीसेक पेनस बरोबर आणली होती .खूप आनँद होतो त्यांना .पण भिकारी कर्नाटकात सापडत नाहीत .काल बनशंकरीला काही तृतियपंथी देवळाबाहेर दूर बसलेले होते पालखी आली त्यावेळी पण त्रास नाही .मान असावा त्यांचा त्यादिवशी . आता देवळाकडे वळू .सहाव्या शतकापर्यँत कोरीव गुंफा-मंदिरे होती .गुप्त काळाच्या शेवटच्या टप्प्यात बांधीव मंदिरांचे प्रयोग उत्त र भारतात सुरू झाले .इकडे दक्षिणेत हेच काम पल्लव आणि चालूक्यांनी हाती घेतले . हे चालूक्य राजे अगोदरच्या कदंब राजांकडे सरदार होते .नंतर ते स्वत:च राज्य करू लागले .यांची राजधानी याच तीन ठिकाणी होती .इथेच त्यांनी देवळे बांधण्या चे निरनिराळे नमुने करून पाहिले .देवळाचे जोते ,मंडप ,खांब आणि छत ,प्रदक्षिणा मार्ग ,गर्भगृह ,शिखर आणि कळस याबाबतीत प्रत्येक देऊळ निराळे आहे .दक्षिणेतल्या कोणत्याही देवळाचा आराखडा येथूनच उचलला आहे .

कंजूस Sun, 06/15/2014 - 21:59
बदामि-८(ऐहोळे ३) तांबड्या रंगाचा वालुकाष्म दगड वापरला आहे .कोरायला मऊ असतो पण तकतकीत करता येत नाही .शिवाय बाहेरची शिल्पे पावसाने झिजली आहेत . शंकर आणि विष्णू मुख्य हिंदू देवता आहेत .तरीही जैनधर्मियांची पूर्ण देवळे हेच दाखवते की तेही राजघराण्यांत महत्त्व राखून होते . दुर्गदेवी आवारातून बाहेर पडून आणखी दीड तासाची फेरी मारली तर सर्व मुख्य मंदिरे पाहून झाली .याच वाटेवर असलेली रावणफडी गुंफा खासच आहे .शेवटी नाक्यावर येऊन बसची वाट पाहत थांबलो . पटटडकल: दोन वाजता पोहोचलो .इथे नदीकाठी एकाच आवारात सर्व मंदिरे पटावर सोंगट्या मांडल्यासारखी आहेत .पाट्या फलकांवर माहिती लिहिली आहे .खास उल्लेख करण्यासारखे विरुपाक्ष आणि त्याच्या भल्यामोठ्या काळ्या नंदीचे अशी दोन आहेत .मूर्ती ठसठशित आणि आकर्षक आहेत .आत रामायणातील चित्रे आहेत . आवाराबाहेर येऊन चहा भजी ,नारळपाणी घेतले .इथून एक किमीवरच्या जैन मांदिरातले दोन मोठे हत्ती खास आहेत . आता या भागातले फक्त महाकुटा बघायचे राहिले परंतू त्या रस्त्याने बस जात नाहीत .एका ठिकाणी वाटेत उतरून दोन किमी जाऊन यायला हवे .नाही गेलो .रूमवर परत आणि आराम केला

कंजूस Mon, 06/16/2014 - 22:11
फोटो वाढवले आहेत .अजून हम्पि आणि लखुंडी बाकी आहे ।शिल्पे इतकी अगणित आहेत की तपशिलवार लिहिणे आणि पाहणे अशक्य आहे .या राज्याला पर्यटकांची सवय आहे आणि त्यांचा पैसा सोयी वाढवण्यासाठीच खर्च करतात .

कंजूस गुरुवार, 06/19/2014 - 18:17
काही नकाशे इथे आहेत . प्रिंटेड नकाशांचे फोटो प्रसिध्दीपत्रकांतील घेतले आहेत .रखाचित्रे माझी आहेत . http://s1366.photobucket.com/user/Wdapav/library/map1

कंजूस Fri, 06/20/2014 - 05:25
विसरलो नाही .ही दोन ठिकाणे बंगळुरु -महैसूर -हसन असे तीन ठिकाणी राहून सहज होतात .आणि कारवार ते मंगलोर अशी तिसरी सहल करणे योग्य ठरते .

कंजूस Fri, 06/20/2014 - 10:43
बरोबर .म्हैसूरला असतांना सोमनाथपूर करता येईल .बारा वर्षाँपूर्वी बं०-म्है०-उटी ला गेलो होतो पण माहिती अभावी ही तीन मंदिरे पाहिली नव्हती.

कंजूस Mon, 06/23/2014 - 00:55
हम्पि -१ बदामिला दोन दिवस राहून फिरलो तेव्हाच कळले की उद्यापासून तीन दिवसांचा हम्पि उत्सव सुरू होत आहे .थोडी धाकधूक वाढली ,होस्पेटला हॉटेल मिळेल का ? गर्दी असेल का ?बदामिला येतांनाही हीच शंका होती कारण बनशंकरीची जत्रा .परंतू एक फायदा झाला .तो रथ पाहता आला .बस डेपोत चौकशी केली होस्पेट बस कधी आहे .सात वाजता होती .नंतर इल्कल'च्या असतात त्याही उपयोगी असतात असे कळले . काल ऐहोळेला दुर्ग मंदिराजवळ एक कोल्हापूरची शाळेची सहल(बस) आलेली दिसली .गुरुजींना विचारले "मुलांची राहण्याची व्यवस्था कुठे केलीत ?" . "कोल्हापुरहून विजापूरमार्गे कुडलसंगमा'ला आलो आणि राहिलो . सकाळी हुनगुंड मार्गे इथे ऐहोळेला आलो ." परतीचा मार्ग कळला नाही .पन्नासेक पाचवी सहावीच्या मुलांना घेऊन जायचे एक मोठी जबाबदारीच असेल . १० जानेवारी ,शुक्रवार (२०१४) . आज बदामिहून होस्पेटला जाण्यास सवासहालाच हॉटेल सोडले .साडेसहाला चहा घेतला पण भूक नव्हती त्यामुळे इडली वड्यांचे पार्सलच घेतले .बस स्टैंडला बदामि ते बंगळुरू होस्पेटमार्गे बस आमचीच वाट पाहत होती .उदबत्ती लावल्यावर सहा जणांना घेऊन सवासातला बस सुटली .आम्ही तिकीटाची भोणी केली .

कंजूस Mon, 06/23/2014 - 01:04
हम्पि -२ सकाळी प्रवास छान वेटत होता .जानेवारी महिना असूनही फारशी थंडी नव्हती .इकडे रस्त्याला वाहने कमी दिसली .मोठ्या हायवेला हुनगुंड येण्याच्या अगोदर शेतात पाच मोर पाहिले .चला सुरुवात चांगली झाली .पुढे तीनपदरी हायवेवरून प्रवास सुरू झाला .इल्कल या ठिकाणी थांबून सवाअकराला होस्पेट आले .सहा किमी अगोदर तुंगभद्रा धरण आणि वसाहत येते .एकशेसत्तर किमीचा प्रवास अजिबात जाणवला नाही . होस्पेटचा डेपो नवीन केला आहे .अप्रतिम .इकडे वेळ न घालवता स्टेशनरोडकडे बैगा घेऊन निघालो .आजुबाजूला खूप हॉटेल्स आहेत .मागच्या वेळेस रोटरी हॉल आणि गार्डनच्या समोरच्या SLV यात्री निवास येथे उतरलो होतो .मालक सुरेश प्रभू यांच्याशी ओळखही झाली होती .इकडे मंगलोरी लोकांची बरीच हॉटेल्स आहेत .रूम मिळाली समोरच्या झाडावर बरेच कोकिळ होते . हंम्पि उत्सवाबद्दल कळले .दोन वर्षे झाला नव्हता .आपल्याकडे एलिफंटा अथवा वेरुळ चा असतो तसाच आहे .जत्रा लागते .नाचगाण्यांचे कार्यक्रम होणार .त्यात मोठे कलाकार कला सादर करणार .संध्याकाळी गर्दी होणार .आम्हाला काही फरक पडणार नव्हता .

कंजूस Mon, 06/23/2014 - 01:06
हम्पि -३ तयार होऊन ,उदरभरणं करून दोन वाजता बस डेपोत हजर झालो .इथून हम्पि ११/१६ किमी आहे आणि चकाचक बसेस दर दहा मिनिटांनी सुटत होत्या .आजचा अर्धा दिवस आणि उद्याचा पूर्ण दिवस हाताशी होता . हम्पितील ठिकाणं पाहण्यासाठी फार तंगडतोड करावी लागते .जेवढे तुम्ही पायी फिराल तेवढं चांगलं .काही परदेशी नागरिक हेच करतात .विठ्ठल मंदिर ,कमल महाल आणि म्युझिअम या तीन ठिकाणचे एकच तिकीट आहे आणि ते त्याच दिवशी वापरावे लागते .इतर ठिकाणांना तिकीट नाही .आज शुक्रवार म्युझिअम बंद असते .असे पण हे पाहणारच नव्हतो . बसमध्ये बसलो .आज जेवढे जमेल तेवढे पाहण्याचे ठरले .(नकाशा पाहा ) .कमलापूरचे तिकीट मागितले .पण तीन दिवस एकदिशा केला होता .कृष्ण मंदिराला आलो .या ठिकाणी समोरच्या पटांगणात जत्रा लाखत होती .मागच्या बाजूस स्टेज आणि खुर्च्या लावत होते .पोलीस खुप होते परंतू मदतीला होते ,खिसे चाचपडायला नव्हते .बसमधून हौशी लोकं सारखे येत होते .एकंदर आनंदाचे वातावरण दिसले .भाषेची अडचण त्यामुळे माहितीफलक वाचता आले नाहीत आणि विचारता आले नाही .हेलीकॉप्टर राईड होती एवढं मात्र कळलं .

कंजूस Mon, 06/23/2014 - 01:09
हम्पि -४ थोडं गोंधळल्यासारखं झालं पण नंतर लगेच सासिदुकालू आणि कलेदूकालू या दोन महागणपतीँपासून हम्पिदर्शनाचा श्रीगणेशा केला .इथून पुढे पाच मिनिटांवरच्या विरुपाक्षाकडे न जाता मागे येत कृष्ण मंदिर पाहून ,प्रवेशद्वारातून लक्ष्मीनरसिंहापुढे उभे ठाकलो .येथून बसने सरळ कमलापूर गाठले . चार वाजले होते .चहा कोलड्रीँक घेऊन ताजेतवाने झालो .इथे मोठा पोलीस ताफा होता आणि पुढे जवळच हेलिपैड होते .परंतू तिकडे गेलो नाही .पट्टाभिरामा मंदिराची वाट धरली .चालत म्युझिअमच्या पुढे वीस मिनिटांवर कनाल ओलांडल्यावर हे एक प्रशस्त आवारात देऊळ आहे .शांत भाग आणि एखाददुसऱ्या परदेशी पर्यटकाशिवाय कोणी फिरकत नाही .एक नृत्यमंडप आहे .भरपूर खांब आणि त्यांवरची शिल्पे हे हम्पिच्या देवळांचे वैशिषट्य आहे .इकडे अर्धा तास थांबून कमलापूरला स्टॉपला आलो .बस पकडून सहाला हॉटेलवर परतलो . एकेका ठिकाणासाठी ऑटोवाले यायला तयार नसतात .एक पैकेज गळ्यात मारायला बघतात .हॉस्पेटच्या चांगल्या आणि स्वस्त बसेसची सोय नसती तर ऑटोवाल्यांनी पर्यटकांची किती धुलाई केली असती ते सांगता येत नाही .

कंजूस Mon, 06/23/2014 - 01:12
हम्पि -५ संध्याकाळी रेल्वे स्टेशनकडे फेरफटका मारला .इकडे काही तीनस्टार मोठी हॉटेल्स दिसली .एक कनाल ओलांडावा लागतो .एक हायवे बनलेला दिसला तो थेट विजापूर -हंम्पि-बंगळुरू जातो . पर्यटनामुळे राज्याचे चित्र पारच पालटले आहे .परत आलो तर समोरच्या बागेत कारंजे सुरू झाले होते . आजचा अर्धा दिवस प्रवास आणि भटकणे झाल्यामुळे रात्री छान झोप लागली . दुसरे दिवशी शनिवारी उरलेली ठिकाणं पाहायची होती .आणि ही सगळी महत्त्वाची होती .सकाळी टिव्ही लावून कालच्या कार्यक्रमाच्या बातम्या पाहिल्या .बऱ्याच जागा रिकाम्या होत्या फारसे प्रेक्षक थंडीत कुडकुडत उघण्यावर गाणे ऐकायला आले नव्हते . सकाळी साडेसातलाच हम्पिबाजार गाठला . विरुपाक्ष देवळापासून समोरच्या मातंगमदिरातल्या नंदीपर्यँत रुंद रस्त्याने दोन्ही बाजूला दगडी खांबांची दुकाने आहेत .ती नँतर सुलतानांनी लढाईत बरीच पाडून टाकली . त्यांनी देवळे मात्र पाडली नाहीत .विरुपाक्षाचे ५०मी उंच गोपूर लक्षवेधक आहे . या ठिकाणी ऑटोवाले विचारायला येतात .पण फार मागे लागत नाहीत .कोणत्या ठीकाणी काय पाहण्यासारखे आहे ते माहिती असेल तरच ऑटो ठरवून फायदा आहे .

प्रचेतस Mon, 06/23/2014 - 09:25
मस्त. हंपीचे मूर्तीशास्त्र जरा सविस्तर आले तर अधिक छान होईल. एकंदरीत तिथे शैव मतापेक्षा वैष्णवांचा प्रादुर्भाव बराच जास्त दिसतोय. उदा: लक्ष्मी नरसिंह मंदिर, विरूपाक्ष, विजय विठ्ठल मंदिर, खुद्द राज्याचे राजचिह्न असलेले वराह.

कंजूस Mon, 06/23/2014 - 10:45
वल्ली ,बरोबर आहे . विजयनगराचे स्थापक हरिहर यांचे स्वामि मध्वाचार्य .यांनी प्रथम इथे तुंगभद्रेच्या उत्तर किनाऱ्यावर अनेगुंडी डोंगरावर किल्ला बांधायला सांगितला असे म्हटतात .तो सुलतानानी उध्वस्त केल्यावर दक्षिण तिरावर दुसरे विजयनगर बांधण्यात आले .विरुपाक्ष आणि गणपती तसेच हेमकुटा हे सर्व शैव स्थापत्य यांच्या अगोदरच्या हिंदू राजांचे आहे . मध्वाचार्य राम कृष्ण भक्ती मार्गातले असावेत .त्यामुळे राजांची नावेही कृष्णदेवराय ,रामदेवराय आहेत .देवळेही विष्णू अवताराचीच त्यांनी बांधली .राम कृष्ण अवताराचा इतिहास माहिती असणाऱ्याला येथील शिल्पांचे कथानक लगेच समजते .गाईड लोक एक दोन गोष्टी परदेशी पर्यटकांना समजावतांना दिसतात .फ्रेंच ,रशिअन ,जर्मन मध्ये चालू असते .दशरथाच्या राण्यांना पुत्र होण्यासाठी खिरीचा प्रसाद ,सीता आपली अंगठी मारुतीला देत आहे ,बाळकृष्ण पळू नये म्हणून पायाला दोरी बांधून उखळाला बांधली आहे .असे अनेक प्रसंग कोरलेले आहेत .अवर्णनीय आहेत .घोंगडीवाला इथेच आहे .पट्टाभिराम ,हजाररामा आणि कृष्णमंदिर खासच . (घाई करणाऱ्यांबरोबर जाऊ नका ) . नकाशे कसे वाटले ?

चौकटराजा Mon, 06/23/2014 - 11:13
नीटपणे फिरण्यासाठी नकाशे उपयुक्त आहेत. हंपीत त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता कमी राहील. हंपीला शिल्प कलेबरोबरच नुसते धोडे देखील देखणे आहेत. त्याचे ही सौंदर्य काही वेगळेच. या दगड धोंड्यातून काही शिल्पे आपल्या कल्पनेनुसार दृगोचर होतात.मला डिसेंबर मधे वल्ली ईई सोबत जायला जमेल की नाही माहीत नाही पण येथे पुन्हा जाणार हे नक्की !

कंजूस Mon, 06/23/2014 - 12:44
अजया ,हम्पिपासून ६० साठ किमी पूर्वेला बेल्लारी(येडीयुरप्पांचे) एरपॉट आहे .बंगळुरूरून हम्पि एक्सप्रेस सकाळी येते /जाते .होस्पेटहून सकाळची एक्सप्रेस दुपारी दोनला मडगावला (दूधसागर धबधबा मार्गे) पोहोचते . यावर्षी बहुधा २-३-४ जानेवारी २०१५ हम्पि उत्सव असेल .यावेळी गर्दी फार असते .मंदिरांचे वर्णन देईनच .लहान मुलांना बोरिंग आहे .न चालणाऱ्यांनी जाऊ नये . (मुलांसाठी हैदराबाद उत्तम) २९ डिसेंबर २०१४ पौष शु अष्टमी बनशंकरी जत्रा सुरुवात (रथ पाहा )आणि पौर्णिमा ५ जाने २०१५ शेवटचा दिवस .

कंजूस Mon, 06/23/2014 - 12:48
आता हिलस्टेशनांच्या हिरवळीपेक्षा रस्त्याकडचे धोंडे मलाही खुणवू लागले आहेत चौकटराजा. तुंगभद्रेच्या रक्षक धोंड्यांचे सौंदर्य साठवायला निकॉर /कैनन २८ एम एम पाहीजे HDR नको .

In reply to by कंजूस

बॅटमॅन Mon, 06/23/2014 - 17:41
माधवाचार्य असेल मग ते नाव. कारण मध्वाचार्य म्ह. द्वैतमतवादी वैष्णव संप्रदायवाले तर हे विद्यारण्य म्ह. शृंगेरी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य होते. एकवेळ काश्मीर प्रश्न सुटेल पण या दोहोंत अद्वैत होणे इंपॉसिबल ;)

कंजूस Mon, 06/23/2014 - 18:41
धन्यवाद वल्ली .या GPS च्या काळात रेखानकाशे उपयुक्त वाटतात हे ऐकून बरे वाटले .दुरुस्ती /सूचना येऊ द्या . तुमच्या बरोबर जायला मलाही आवडेल .दोनवेळा गेलो .नोव्हेंबर २०१२ ला गेलो(एकटा) होतो त्यावेळी विनाचिंता हम्पि नऊ तास फिरलो होतो तरी वीस टक्के राहिलेच .अनेगुंडी परीसर .माहितीसाठी लोनली प्लानेट पुस्तकाला (जुनी आवृत्ती) पर्याय नाही .

कंजूस Tue, 06/24/2014 - 10:03
हम्पि -६ दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विरुपाक्ष ते मातंग मंदिर नदी ते नदीकाठाने विठ्ठल मंदिरापर्यँतचा भाग पायी फिरण्याचा आहे तिकडे वाहन जात नाही .(पाणी आणि वरचे खाणे जवळ ठेवा ).मग हे ऑटोवाले कसे विठ्ठल मंदिरला जातात ?तर ते कमलापूरकडून तिकडे येतात .(नकाशा पाहा ).मधल्या ठीकाणांना दांडी . कोणत्याही पर्यटन स्थळी हीच तऱ्हा असते .पर्यटक गाडी वेटिंग ठेवून एक तास काढतील अशी ठिकाणे "तिकडे काही नाही "सांगून जात नाहीत .तास दोन तासात पाचशे रुपये मिळवायचे हा धंदा असतो .शिवाय एखाद्या दुकानातले कमिशन पदरात पडले तर उत्तमच .इथे भाडे आणि ठिकाणावरून ऑटोवाल्याशी 'बार्गेन 'करत बसू नका .असो . एरवी हम्पि बजार बस स्टैंड आणि पार्किँगपाशी बरीच चहा वड्याची दुकाने असतात .आज सर्वांना हटवले होते .वेळ न घालवता विरूपाक्ष मंदिराचे भव्य उंच गोपूर पाहत तिकडे निघालो .वाटेत एक भलेमोठे पत्र्याचे धूड दिसेल त्याच्या आत देवळाचा रथ आहे .दिसू नये याची पूर्ण काळजी घेतली आहे .महाशिवरात्रीला या रथासाठी यावे लागेल .पुजा होत असलेले हे एकमेव देऊळ आहे .हजार वर्षाँचे आहे .कृष्णदेवरायाने याची डागडुजी केली म्हटतात .

In reply to by कंजूस

चौकटराजा Tue, 06/24/2014 - 19:18
दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विरुपाक्ष ते मातंग मंदिर नदी ते नदीकाठाने विठ्ठल मंदिरापर्यँतचा भाग पायी फिरण्याचा आहे तिकडे वाहन जात नाही काही समस्या नाही. हे अंतर मी सहकुटंब पायी गेलो आहे. जाणे अगदी रंजक .जाताना राजाचे वजन तागडे ही लागते. खेरीज तुंगभद्रेत गोल होडीतून भटकता येते. विष्णु मंदिरात संगीत खांब मात्र लोकानी हाताळून निमुळते केले आहेत.

कंजूस Tue, 06/24/2014 - 10:06
हम्पि -७ गोपूरातून आत गेल्यावर उजवीकडे हत्ती असतो .पण नदीवर गेला असेल .नदी मागे उजवीकडेच आहे आणि घाटही आहे .देव दर्शना नंतर नदीवर जाऊन आलो . साडेसात झालेले .यावेळी नदीकाठाने दोन किमी चालायला त्रास होत नाही . हम्पि बाजारातून रुंद रस्त्याने जाताना गतवैभवाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही .लहान विक्रेत्यांसह हत्तीच्या अंबारीत बसून थेट खरेदी करणाऱ्यांसाठी दगडी गाळे आहेत .पुढे नंदी पाहून मागे आलो .(तशी या मातंग टेकडीवरून पलीकडे अच्युतरायाकडे वाट आहे ) . डावीकडून नदीकाठाने जाताना नदीतल्या कारकल नावाच्या गोल होड्या दिसतात .एक अलीकडे बांधलेले मंदिर दिसते . मातंग मंदिराच्या भोवती वळसा घालून गेल्यावर पाटी दिसेल .पुढे विठ्ठल मंदिराकडे ,तर पुष्करणी ,अच्युतराय उजवीकडे .या दोन ठिकाणी जाऊन पाहून परत यायला अर्धा तास लागेल . पुष्करणी बांधता बांधता अर्धवट सोडल्यासारखी वाटते .अलीकडे खांबांवर महाल योजला असावा .तलाव छान आहे मागे मातंग डोंगर .डावीकडचे मोठे पटांगण आहे तिथे बजार होता .हल्लीचे नाव सुळे बाजार आहे .

कंजूस Tue, 06/24/2014 - 10:11
हम्पि -८ अच्युतराय मंदिराची जागा फार छान आहे .आवाराला तटबंदी आहे आणि आत ओवऱ्या (=भाविकांना थांबण्यासाठी खोल्या ) आहेत .आवारातूनच उजवीकडे पायऱ्यांची वाट मातंग डोंगरावरून (२५ मी) नंदीपाशी उतरता येते .सरळ वर (५० मी) शिखरावरही जाता येते .वरून नदी आणि अनेगुंडी छान दिसते .अतिउत्साही लोकांसाठी आहे . पायगाडीला जोर मारा कारण आजचे दहा टक्केच झाले आहे .पुढच्या वाटेवर एक वराहमंदिरात प्रवेशद्वारावर वर एक वराह कोरलेला आहे .नंतर दोन एक मांदिरे उजवीकडे आहेत .आता नदीकडे खाली एक मंदिर आहे ती जागा फारच रम्य आहे .इथे एक चहाची टपरीही आहे .परत वर मोठ्या वाटेवर मागे एक दगडी नक्षीदार कमान राजाची तुला आहे .येथे तराजू टांगून राजाच्या वजनाइतके धन धान्य वाटले जायचे . येथे डावीकडे 'उत्किर्णविषणूमंदिर' आहे .बंद केले आहे परंतू बाहेरच्या सपाट दगडी भिंतीवरची पाल पाहा .(कांचीपुरम ,चैनईच्या विष्णूमंदिरातली पाल प्रसिध्द आहेच) .पालीचा पौराणिक उल्लेख काही आहे का ?इथून समोरचा अनगुंडी डोंगर छान दिसतो .आता दहा मिनिटांत विठ्ठल मंदिराच्या दक्षिण दाराशी येतो .प्रवेश पूर्वेकडून आहे .

कंजूस Tue, 06/24/2014 - 17:34
हम्पि -९ विठ्ठल मंदिर हम्पितली फार चर्चित आणि प्रसिध्दी मिळालेली वास्तु .उत्तरेला तुंगभद्रा नदी आणि पलीकडे अनेगुंडी ही पूर्वीची राजधानी .पूर्वेकडे एक रुंद मातीचा रस्ता एक किलोमीटर वरच्या पार्किँगकडे नेतो .कमलापुरातून एक रस्ता इथे येतो .याच रस्त्याने पुढे गेल्यास होडीने नदी ओलांडता येते .पार्किँग ते देवळापर्यँत येण्यासाठी इलेक्ट्रीक आठ सिटर गाड्या आहेत,ज्या मुली चालवतात .छान व्यवस्था आहे;शिस्तबध्द आयोजन असते.दहा रुपये तिकीट आहे .चालत गेल्यास अर्धा तास लागतो आणि वाटेत एक छान पुष्करणी पाहता येते . देवळाच्या पूर्व दारासमोर तिकीट (१०रु) काढल्यावर ते जपून ठेवायचे जे पुन्हा कमलमहाल आणि म्युझीयमसाठी चालते . तटबंदीला चार दिशेला चार चाळीसफुटी गोपुरे आहेत . गरुड रथ : मोठ्या आवारात प्रथम तो प्रसिध्द दगडी रथ आहे .त्याचे तोंड मंदिराकडे आहे .रथात बसायचा मान मात्र विष्णूचे वाहन गरुडाला मिळाला आहे .चार फुटी दगडी चाके खऱ्या दगडी आसांवर आहेत आणि ती फिरु शकतात .हा तांबूस दगडाचा रथ या देवळात नव्हताच .नंतर इथे आणून ठेवला .बहुतेक पट्टाभिरामा मंदिरात असावा .तिकडे शोभतो आणि दगडही जुळतो .

कंजूस Tue, 06/24/2014 - 17:38
हम्पि -१० विठ्ठलाचे देऊळ बसके आणि दोन भागात आहे .अगोदरचा किर्तनमंडप पूर्ण ढासळायच्या बेतात आहे .सर्व खांब तिरके झाले आहेत .वरचे छताचे दगड पडले आहेत .जागोजागी लोखंडी नळे लावून आधार दिलेला आहे .आत जाऊ देत नाहीत .मंडपात जे मुख्य खांबाभोवती मुसळासारखे बारीक खांब आहेत ते आघात केले की वाजतात .आतले रक्षक /मार्गदर्शक काही जणांच्या विनंतीवरून वाजवून दाखवत होते (५०रु टिप मिळत होती ) .परंतू इथले आणि पट्टाभिरामाचे (मी वाजवले) काही खास वाटले नाहीत .हा दगड वालुकाश्म आहे .याला नाद नसतो .खरे नादस्तंभम/संगीतस्तंभम केरळात पद्मनाभ मंदिरात आणि कन्याकुमारीजवळच्या सुचिंद्रम (खांब स्वत: वाजवू शकता) मंदिरात आहेत .तिकडचा दगड काळा आहे . मुखमंडप आणि गर्भगृहात जाऊ शकतो .अंधार फार आहे फोटो नाही काढता आले .परदेशी पर्यटक आणि त्यांचे गाईड फार .ते गर्भगृहात जात नाहीत .देवळाच्या मानाने गाभारा लहान आहे .आत उंच चौथरा रिकामा आहे .विठ्ठलाची मूर्ती पाहण्यासाठी पंढरपुरला चला .गाभाऱ्यातच एक अंधारी प्रदक्षिणामार्ग आहे आणि तळाला पाणी असावे ( पाय ओले ठेवणयासाठी ?) असं वाटतं .

कंजूस Tue, 06/24/2014 - 17:41
हम्पि -११ विठ्ठलमूर्तीचा वाद आणि काही पुरावे . यावर बरीच चर्चा होते .विजयनगरची सुरूवात १३४० च्या सुमारास अनेगुंडीला झाल्यावर बहामनी सुलतान आणि या राजांत लढाया होतच राहिल्या .एका जुन्या विठ्ठल मंदिरातली मूर्ती लढाईच्या वेळी पंढरपूरच्या एका (आताचे) शंकराच्या देवळात हलवली ."ज्ञानदेवाचा कानडा विठठलु करनाटकु ." मुर्तीला कानडी पध्दतीची कापडी टोपी आहे ,मुकुट नाही . मूर्तीकाराने गुराखी (=कृष्ण) रुपाचे देवाचे हात काठी खांद्यावर धरतात तसे न करता कटीवर ठेवले असतील .पण त्या विटेचे कोडे उलगडत नाही .काहींच्या मते ती मूर्ती जुन्या पंढरपुरात नदीपलीकडे लपवली आहे .कारण रुसलेली रुक्मिणीची मूर्ती तिकडे आहे . पुढे कृष्णदेवरायाच्या काळात हे मंदिर बांधून एक नवी मूर्ती बसवली .त्यासमोर भक्त पुरंदरदास बसायचा .पंढरपुरातली मूर्ती बडवे लोक देईनात . १५५६च्या तालिकोटच्या मोठ्या लढाईत ही पण काढली आणि पुरंदरदास पंढरपुरात बसू लागला . सुलतानाने या मंदिराचा किर्तनमंडप मोडला असावा .इतर मंदिरे तोडली नाहीत पण राजा राणींचे महाल मात्र ध्वस्त केले . ते आपण नंतर पाहणारच आहोत .

कंजूस Tue, 06/24/2014 - 21:30
हम्पि -१२ विठ्ठल मंदिर पाहून झाले .आता दोन पर्याय होते आल्या मार्गानेच दोन किमी चालणे अथवा इले० गाडीने पार्किँगला जाऊन रिक्षा मिळते का पाहणे .सवा अकरा झाले होते आणि दुसरा मार्ग निवडला . गाडीला नंबर लावून लगेच पार्किँगला आलो .ही गाडी फारच छान आहे .इकडे बसण्यासाठी गवताने शाकारलेला मोठा तंबू बनवला आहे .या रस्त्यावर फक्त खासगी बस ,रिक्षा येतात ,हम्पिच्या सिटि बस अथवा गंगावतीकडे जाणाऱ्या परिवहनच्याही या मार्गाने येत नाहीत .दोन रिक्षा उभ्या होत्या .कमलापूर (५ किमी)चे १२० रु सांगितले .नको सांगून परत इले०गाडीच्या रांगेत उभे राहिलो .पाचच मिनिटांनी तो रिक्षावाला बोलवायला आला .दोन आणि सिटस त्याला मिळाल्या होत्या .साठ रुपये देऊन कमलापूरला आलो .वाटेत हेलिपैड दिसले . नाक्यावरच्या हॉटेलात थंडपेय घेतले .इथून काल पट्टाभिरामाकडे गेलो होतो त्या रस्त्यावरचे म्युझिअम जवळच आहे आणि आज उघडे होते तिकिटपण हाताशी होते .पण गेलो नाही .अजून तीन तासांचा कमलमहाल परीसर बाकी होता . अजून एक पर्याय आहे .सकाळी प्रथम ऑटोरिक्षाने विठ्ठलमंदिर पार्किँगला जायचे .तिथून मंदिर-नदीकाठाने चालत विरुपाक्ष -कमलमहाल -कमलापूर .

कंजूस Tue, 06/24/2014 - 21:33
हम्पि -१३ कमलापूरवरून राणी स्नानागारकडे चालत निघालो .एक किमी आहे आणि झाडांची सावली आहे . साडेबारा झाले होते आणि उत्सवामुळे गर्दी होती .राणी स्नानागारच्या बागेत थोडा आराम केला .ही इमारत चुन्यात बांधलेली आहे .मुसलमान कारागिर हाताशी धरून राण्यांसाठी बंदिस्त महाल आणि हौद बांधून घेतलेला आहे .इथून पुढे दोन मंदिरे पाहून पंधरा मिनिटांत डावीकडच्या महानवमि डिब्बा पाशी येतो .या सर्व परीसराला रॉइल सेंटर म्हटतात तर अगोदरच्या मंदिर परीसरांस सेक्रिड सेंटर असे नामकरण केले आहे .देवालय आणि राजवाडा परीसर . महानवमि डिब्बा याच्या मागेच रस्ता आहे परंतु प्रवेश राणी स्नानागार स्टॉप अथवा कमलमहाल स्टॉपकडूनच आहे .विजयनगर साम्राज्य राजांशी बहामनी सुलतानांच्या लढाया होत होत्याच शिवाय चीड आणि द्वेषही फार होता .तालिकोटच्या लढाईत जिंकल्यावर सुलतानांनी मिळालेले महाल वापरायला ठेवले नाहीत तर ध्वस्त केले .त्यामुळे इथे जे काही राहिले आहे त्यावर समाधान मानायचे . देवळे मात्र फार तोडली नाहीत .त्यानंतर नवीन शहर अथवा राजधानी इकडे न करता अडीचशे किमी दूरवर उत्तरेला विजापूर वसवले .

कंजूस Wed, 06/25/2014 - 17:17
हम्पि -१४ एका छोट्याशा राज्याचे दोनशे वर्षात विजयनगर साम्राज्य झाले .एक मोठे व्यापाराचे केंद्र झाले .महाल बांधले गेले .देवळे आली .काही उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होऊ लागले .असाच एक उत्सव महानवमि अर्थात नवरात्र .हे बहुधा अश्विन महिन्यातले नसून पौष शु० अष्टमी ते पोर्णिमा .या वेळी रासक्रीडा होत असावी .हे राजे कृष्णावतार भक्त ना .यासाठी मोठा जो चौथरा बांधला गेला तोच हा महानवमि डिब्बा .सुलतानांनी जिंकल्यावर हा विलासाचे द्योतक डिब्बा आणि सर्व महाल तोडले .तरी खालचे जोते पाहून कल्पना करू शकतो की किती सुंदर असावे त्याकाळी . सत्तर फूट चौरस आणि पंचवीस फूट उंच चौथरा शिल्लक आहे .त्याचे कोरीव दगड हे दगड नसून इतिहासाची पाने आहेत .इतर देवळातली शिल्पे ही राम ,कृष्ण यांच्या पौराणिक कथांवर आधारलेली आहेत परंतू इथे जे लोक प्रत्यक्ष येत होते त्यांची चित्रे आहेत .गोव्यातून पोतृगीझ घोडे विकायला यायचे .ते त्यांच्या नेहमीच्या पोशाखात ,दाढी आणि टोपी घातलेले कोरले आहेत .राजस्थानातून उंट आलेले आहेत .उंटाना दोरीने चालवणाऱ्या घागरा घातलेल्या बायका आहेत .हत्तींनाही स्त्रिया चालवत आहेत .दांडियाचा खेळ चालला आहे .

कंजूस Wed, 06/25/2014 - 17:20
हम्पि -१५ परंतू चित्रे कोणीच बघत नाही .सर्वजण वरती दंगा करण्यात मग्न . याच्या मागच्या बाजूस आहे पायऱ्यांचा तलाव .राण्यांना जलक्रीडेसाठी .आत पाणी नाही त्यामुळे सर्व पायऱ्या पाहता येतात .यासाठी पाणी येथवर आणण्यासाठी दगडी पन्हाळ सहा फूट उंचीवर बसवली आहे .ती पार आवाराच्या बाहेर पूर्वेला निघते .तिथे पखालीतून पाणी ओतले जात असेल .या चा फोटो नाही जमला . अगदी टोकाला राजवाड्याचे तळघर फक्त राहिले आहे . यासर्वाला तटबंदी होती तीचे तीनफुटी अवशेष उरले आहेत .याचे प्रवेशद्वारही दगडी होते ती दोन्ही अजस्त्र कोरीव दारे त्यांच्या अडण्यासह तिथेच पडलेली आहेत .तळघर पाहून बाहेर पडलो की लगेच डावीकडे आहे एक छान मंदिर .हजाररामा . हे चुकवण्यासारखे नाही .एका तटबंदीच्या आत छोटेसे मंदिर आहे .ताशिव काळे चार खांब छान आहेत .बाहेरच्या भिंतीवर रामायण आणि कृष्णचरित्रातले प्रसंग ठसठशीत आणि उठावदार आहेत .अर्धा तास लागु शकतो .उजविकडे एक कमलमहालात वाट जाते .तिकीट हातात असल्याने इथूनही आत जाता येईल .नाहीतर थोडे पुढे जाऊन मुख्य दारातून आत जायचे .

कंजूस Wed, 06/25/2014 - 17:23
हम्पि -१६ कमलमहाल हे आपले शेवटचे ठिकाण .याची वीसफुटी दगडी तटबंदी तळाला रुंद आणि वर अरुंद बाहेर झुकल्यासारखी आहे .त्यामुळे फुललेल्या कमळासारखी वाटते .आतमध्ये मुख्यवास्तु मुस्लीम पध्दतीचा बांधकाम असलेला हत्तीखाना आणि राणी महाल .राजाकडे मुस्लीम स्थपति होते बहुतेक .अकरा लहानमोठे हत्ती उभे राहतील अशी घुमटांची इमारत आणि बाग छानच आहे .पुढे रंगामंदिरात मोठा मारूती आहे .मंदिर पडायला आलेय .अगदी शेवटी एक दुर्लक्षित जैन मंदिर पाहून तिकडूनच राणीस्नानागार मार्गे हम्पि दर्शन संपवून होस्पेटात परत आलो .हेलिकॉप्टर राईड करायचे ठरवले होते परंतू रांगेत उभे राहण्याचा त्राण राहिला नव्हता .डेपोजवळ शानभाग स्नैक कॉर्नरमध्ये पदार्थ गरमागरम छान आणि झटपट मिळायचे .बिसि बेळी अन्ना हा खास भाताचा प्रकार खायचा राहूनच गेला .ती सकाळ/दुपारची डिश आहे असे कळले . संध्याकाळी यात्री निवासचे मालक प्रभुंशी गप्पा मारल्या .तिरुपतीच्या लावलेल्या मोठ्या फोटोकडे बघून म्हणाले हे हॉटेल यांची कृपा . वडिलांनी बांधले .पूर्वीचे राजे कसे प्रजेची काळजी घ्यायचे आता काय आहे ?हा परीसर मला फार आवडला .होस्पेट राहण्यासारखे आहे .उद्या लखुंडि .

कंजूस Wed, 06/25/2014 - 18:10
धन्यवाद वल्ली .कानडी बोलणारा कोणी बरोबर असल्यास माहितीमध्ये अधीक भर पडू शकते . बहळा सुंदरवादा ,उटा ?तिंडि ? एष्टु दूरा ,कन्नडा गोत्तिल्ला ,स्वल्पा ,बेकू ,ब्याडा ,मुंदिना ,आकडे ,इत्यादीवर काम भागवले .

In reply to by कंजूस

प्रचेतस Wed, 06/25/2014 - 18:52
कानडी बोलणारा कोणी बरोबर असल्यास माहितीमध्ये अधीक भर पडू शकते .
भाषेवाचून तिथे काही अडू शकते का? म्हणजे एकवेळ माहीती कमी मिळाली तरी चालेल पण निदान तिथे साध्या साध्या गोष्टींवाचून अडू नये. उदा. ही बस कुठे जाते, ठिकाण कुठे, रिक्षावाल्याला कुठे सोडायचे ते समजणे, खाणे चांगले कुठे मिळेल असे साधे प्रश्न.

In reply to by प्रचेतस

यशोधरा Wed, 06/25/2014 - 18:59
सह्सा अडेल. बसवरची माहिती कानडीमधून असते - नव्या बसेस वर इंग्लिशमधूनही लिहिलेले असते. रिक्षावाल्यांना होंदी समजेलच असे नाही, कधीकधी समजूनही न समजल्यासारखेही करतात, असा अनुभव आहे.तगदीच अडेल असे नाही, पण बर्‍यापैकी अडू शकते कधीकधी. हिंदीपे़क्षा इंग्लिश अधिक चालून जाते. :)

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Wed, 06/25/2014 - 19:08
वल्ली, जमल्यास मी येऊ शकेन. कन्नडचं टेण्षण नको. तारखांचं बघा फक्त. मला अन्यत्रही जाणे आहे, सबब जास्त दिवस हंपीला देणे शक्य नाही- द्याटिज़ रजा मिळणे औघड.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Wed, 06/25/2014 - 19:11
बेष्ट रे. मी सहसा ऑफ सीजन मध्ये प्लान करेन म्हणजे ऑक्टोबर्/नोव्हेंबर दिवाळीच्या मागचे पुढचे १५/२० दिवस सोडून. मी ७/८ दिवस सुट्टी काढून बदामी, ऐहोळे, पट्टदकल आणि लकुंडी पण करेन तुला इतकी नसेल तर मध्ये २/३ दिवस हंपीला जॉइन हो.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Wed, 06/25/2014 - 19:15
ठीक. नोव्हेंबरात जमणे अवघड आहे, ऑक्टोबरात जमू शकेल. हंपीपुरते जॉइन होऊ शकतो नक्कीच. ऐहोळे इ. अगोदर पाहिलंय-यद्यपि आत्तासारखं डीटेलवारी नाही. त्यामुळे मेन स्ट्रेस हंपीच.

यशोधरा Wed, 06/25/2014 - 18:44
इतके दिवस वाचत अहे, आज प्रतिसाद द्यायला वेळ मिळाला आहे :) खूप सुरेख लिहित आहात तुम्ही, मी वाचन खूण साठवत आहे. एकदा फक्त हंपीला भेट द्यायची आहेच. तेह्वा ही माहिती उपयुक्त ठरेल.

In reply to by प्रचेतस

कंजूस Fri, 09/05/2014 - 17:45
विजापूर फोटो /अ १)इब्राहिम रौजा, बिजापूर. १ २)इब्राहिम रौजा, बिजापूर २ ३)आतला भाग, गोल गुंबज. ३ ४)मलिक ए मेदान तोफ. ५ ५)लेखनकला, नक्षीदार जाळी रूपात. इ०रौजा. ६ ६)इ०रौजा. ७

In reply to by प्रचेतस

कंजूस Fri, 09/05/2014 - 17:51
बदामि फोटो/अ १)बनशंकरी तलाव. १ २)बनशंकरी रथाची चाके. २ ३)रथ बनशंकरी. ३ ४)अगस्ति तलाव. ४ ५)अगस्ति तलाव. ५ ६)शाळेची मुले, मधल्या सुटीत. ६ ७)बदामिची शाळेची सहल. ७

In reply to by प्रचेतस

कंजूस Fri, 09/05/2014 - 17:59
पट्टडकल फोटो /अ १)पौराणिक चित्रपट, विरूपाक्ष मंदिर. १ २)जड संपन्नता हार रुद्रगण उचलत आहेत. २ ३)लेख. ३ ४)उपदेवता मंदिर. ४ ५)द्वारपट्टीका. ५ ६)जैनमंदिरातील हत्ती. ६ ७)विरूपाक्षाचा वेगळा नंदी. ७

In reply to by प्रचेतस

कंजूस Fri, 09/05/2014 - 18:01
हम्पि फोटो /अ १)विठ्ठल मंदिर परिसर. १ २)रावणाचे शिल्प. २ ३)तुंगभद्रा नदी. ३ ४)विठ्ठल मंदिर प्रवेशद्वार. ४ ५)ओवऱ्या अच्युतराय मंदिराच्या, आणि मातंगी टेकडी. ५ ६)एक हॉटेल,स्टे०रोड, होस्पेट. ६ ७)कारंजा, होस्पेट. ७

In reply to by प्रचेतस

कंजूस Fri, 09/05/2014 - 18:04
लखुंडी फोटो /अ १)जैन मंदिर. १ २)जैन मंदिर. २ ३)ब्रह्मा, ब्रह्मजीनालया. ३ ४)पद्मावती. ४ ५)लखुंडी दर्शनफेरी. ५ ६)काशिविश्वेश्वरा. ६ ७)कोरीव काम. ७

कंजूस गुरुवार, 06/12/2014 - 09:36
या ठिकाणांबद्दल उत्सुकता किती आहे त्याप्रमाणे वर्णन वाढवणार आहे ।कसे कुठे जावे ,ट्रीप कशी प्लान करावी ते पण लिहीन .ऐतिहासीक संदर्भ आणि रेखानकाशे पण आहेत .फोटोखाली एकेक ओळ माहिती टाकत आहे .फोटो बघितल्यावर आपण ठरवतो की अमुक एक ठिकाणी जावे का नाही .इकडे परदेशी पर्यटक फार येतात .गोव्याहून सतत बसेस चालू असतात .

In reply to by कंजूस

प्रचेतस गुरुवार, 06/12/2014 - 09:44
प्रतिसादसंख्येकडे दुर्लक्ष करून वर्णन अवश्य येऊ द्यात. काही वाचक आवर्जून अशा मालिका वाचत असतात.

कंजूस गुरुवार, 06/12/2014 - 10:11
ठीक आहे .भटकंती सदराच्या प्रतिक्रियांनाही "संपादन"ची सोय असती तर बरं झालं असतं .छोटे छोटे लिहिलेले भाग नंतर एकत्र जोडता येतात . इकडे येणारे बरेचसे भारतीय पर्यटक(=भाविक) बनशंकरी ,आणि विरुपाक्ष देवळासाठी येतात आणि बाकीचा भाग उरकतात .इतर देवळांत मूर्ती नाहीत अथवा असल्या तरी पूजेत नाहीत ,सकाळी सहा ते संधयाकाळी सहापर्यंत उघडी असतात .

मदनबाण गुरुवार, 06/12/2014 - 10:25
काय हो कंजूस मामा लिखाणात सुंद्धा कंजूसपणा ? ;) जरा डिटेलमंदी लिवा की... फोटु पण हवेच हवे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}

चौकटराजा गुरुवार, 06/12/2014 - 10:28
अर्र लखुंडी यकदम खास आहे का ? आमचे बघायचे राहिले. बाकी हा भाग मस्त आहे. नारळाची झाडे व लोहयुक्त ताबडी माती , काळी देवळे, कातळ,धोंडे, तुंगभद्रा, घरगुती खानावळी सारेच संस्मरणीय. नव्हेंबर मधे गेल्यास उन कमी असेल. आमचा बेल्लारीचा किल्ला ही राहिला. पण आयहोळ , पत्तडकल व बदामी लाजवाबच ! कर्नाटक आपले लाडके राज्य हाय !

कंजूस गुरुवार, 06/12/2014 - 11:14
लखुंडी एकदमच खास आहे .सर्वात कठीण अशा काळ्या दगडात सुरेख मुर्ती आहेत .जी गोष्ट भव्यतेत नाही ती इकडे कलाकुसर आणि कलात्मकता आणि धार्मिक सामंजस्यात सामावली आहे .दोन जैन देवळांत हिंदू मूर्ती आहेत .सूर्यनारायणाची चार फुटी मूर्ती इतकी अखंड आणि आकर्षक आहे की चोरी होईल की काय या धास्तीने देवळातून काढून म्युझिअममध्ये ठेवली आहे .आता १९५० नंतर भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने लक्ष घातले परंतु एक हजार वर्षे या गाववाल्यांनीच संभाळले .अजून बरेच आहे .

In reply to by म्हैस

चौकटराजा गुरुवार, 06/12/2014 - 18:33
मी हैद्राबाद च्या काचीगुडा स्टेशनवरून रात्री सुटणार्‍या काचीगुडा- गोवा एक्सप्रेसने होस्पेटला उतरलो होतो.त्याअगोदर हैद्राबाद मनसोक्त पाहिले. हुसेनसागर तलावाकाठचे लुंबिनी पार्क, तेथील लेझर शो, पडका पण भव्य- किल्ला, सालारजंग म्युसीयम, बायॉलॉजेकल पार्क , टेकडीवरचे बिर्ला मंदीर असे एकसो एक ठिकाणे हैद्राबादेत आहेत.खेरीज एका दिवसात करता येणारे रामोजी फिल्म सिटी व नागार्जुन सागर धरण लय भारी.

In reply to by चौकटराजा

प्रचेतस गुरुवार, 06/12/2014 - 18:49
हैद्राबाद लय भारी ठिकाण आहे. सालारजंग मध्ये इतर काहीच पाहिले नाही तरी चालेल पण व्हेल्ड रिबेका मात्र पाहावी. पॅराडाइझ पण आहेच पण बावर्चीची मजा काही औरच.

In reply to by सूड

कंजूस गुरुवार, 06/12/2014 - 23:53
ललितलेखन वगैरे जमणे कठीण आहे .काही फोटो आणि त्रोटक लिखाणातून लोकांची या ठिकाणाबद्दल उत्सुकता चाळवली गेली तरी खूप झाले .आता वल्ली ,चौकटराजा लिहितील तेव्हा चित्र आणखी स्पष्ट होईल .

कंजूस गुरुवार, 06/12/2014 - 23:43
आणखी वर्णन लिहित आहे .बिजापूरचे पाहा .विकिपिडिआतून जी विजयनगरची ऐतिहासिक माहिती आहे ती पुन्हा इकडे देत नाही . सर्वांना धन्यवाद .

पैसा Sat, 06/14/2014 - 15:26
लखुंदीबद्दल विस्ताराने माहिती हवी आहे. अजून डिटेल लिहा. प्रतिक्रिया म्हणून लिहा किंवा नवा धागा काढा. पण ट्रिप कशी प्लॅन करावी याबद्दल सविस्तर माहिती लिहाच! फोटो अजून पाहिले नाहीत. आता सावकाश बघेन.

कंजूस Sat, 06/14/2014 - 16:50
ट्रीप प्लान करून जसे पाहात गेलो तसे लिहिणार आहे .कोणत्या ठिकाणी स्थळदर्शनास किती वेळ लागतो आणि प्रवासाला लागणारा वेळ तसेच कोणती सोयिस्कर रेल्वे मिळते हे कळले की इतरांना त्याचा पूर्ण उपयोग करता येईल .लखुंडी दर्शनाबद्दल फोटो नकाशासह येईलच .६ ते १२जानेवारी २०१४ आम्हाला तिघांसाठी संपूर्ण सहलीचा रे तिकीट ,बस प्रवास .राहणे ,खाणे धरून रुपये दहा हजार खर्च आला .सर्व सावकाश पाहिले .

कंजूस Sun, 06/15/2014 - 21:37
बदामि-१ बिजापूरहून बागलकोटला बस जातात व तिथून बदामिची बस मिळते .परंतु मी रेलवेचे तिकीट रेज० काढलेले होते .रिजवच्या दोन डब्यात दहाजणच होते परंतू टिटिई कोणाला येऊ देत नाही .वाटेत लागणारे अलमट्टी धरण पाहणे हे खास आकर्षण असते .गाडी हळू जाते आणि वळसे घेते .साडेअकराला अर्धा तास उशिरा बदामि स्टे आले . बाहेर पडून शेर रिक्षा मिळतात .दहा रु/प्र .बदामि गाव पाच किमी आहे .कधी बसपण मिळते .हॉटेलचे नाव आनंद वगैरे सांगून डेपो गाठणे .डेपोजवळच बरीच बजेट हॉटेल्स आहेत आणि रिक्षावाला उगाचच फिरवेल.वाटेत बदाम कोर्ट दिसते .कर्नाटक टुअरिजमचे गावात लेण्यांपुढे आहे . एक वाजेपर्यँत आपले सामान रुमवर पडून आणि जवळच्याच रेस्टरॉमध्ये जेवण करून फिरायला तयार झालेलो असतो .हातात पर्स अथवा झोळणा घेऊ नका .पाठीवरच्या सैकमध्ये पाण्याच्या बॉटल्स ,खाण्याचे तयार पदार्थ आणि छत्री ठेवा .इकडे माकडे बदमाश आहेत .सैक ओढत नाहीत आणि छत्रीला फार घाबरतात .म्युझिअमच्या वरती शिवालय पाहतांना छत्री उपयोगी येते .इकडच्या गाईडसनाही माकडे ओचकारतात .छत्रीपासून माकडे चार हात दूर राहतात हा माझा सह्याद्री ट्रेकिंगचा अनुभव आहे .

कंजूस Sun, 06/15/2014 - 21:40
बदामि-२ लेणी आणि अगस्ति तलाव बस डेपोपासून एक किमीवर आहे त्यामुळे स्पेशल रिक्षा करायची गरज नाही .शिवाय ते लेण्यांकडे नेतात आणि वेटिंग चार्ज घेतात .म्युझीअमकडे नेत नाहीत .म्यु०च्या वर आणि पुढे बरेच पाहणयासारखे आहे . पंधरा मिनिटे चालल्यावर म्यु०ला आलो .बाजूलाच अगस्ति तलाव आहे .रम्य जागा .समोरच्या डोंगरात लेणी आहेत . म्यु०च्या वरच्या डोंगरावर जाण्यास डावीकडून छान वाट आहे .पूर्वी इथे किल्ला होता .वर दोन शिवालये पाहून मशिदीच्या मागून मारूती मंदिराच्या दुसऱ्या वाटेने खाली आलो .येथे माकडे अंगावर येतात .खाली आल्यावर तलावाच्या मागच्या काठावर भूतनाथ मंदिरे आणि एक वेगळीच जैन गुंफा आहे त्याचे दार दोन फुटी आहे .बदामिला येऊन शंभरातले दोनच जण इकडे येतात .हा भाग अवश्य पाहा . गुंफा पाहाण्यासाठी मागे येऊन रस्त्याने अथवा पायऱ्यांवरून यल्लमाच्या देवळाजवळून जावे लागते .जवळच्या शाळेची मधली सुट्टी झाली त्या मुलांचाही फोटो घेतला .तिकीट काढून वर गेलो .बस रिक्षा पार्क केलेल्या असतात .

कंजूस Sun, 06/15/2014 - 21:42
बदामि-३ . इथे खूप गर्दी असते .गाईड लोक या गुंफा दाखवून कटवतात .शाळेच्या खूप सहली आलेल्या पण दोन दोनच्या जोड्या करून रांगेने चारही गुंफा पंधरा मिनिटांत उरकतात . मास्तर शिटी वाजवतात नी शिक्षिका छडी हलवून लवकर चला करतात .ते तरी काय करणार सहाव्या शतकातील चालुक्यांची शिल्पकला कळणे विद्यार्थ्याँच्या कुवतीबाहेर आहे .असो . याच त्या चार गुंफा ज्यासाठी परदेशांतून हजारो पर्यटक येथे येतात .बऱ्याच जणांच्या हातात 'लोनलि प्लानेट'चे पुस्तक असते .याची जी '९६ अथवा '९८ ची जुनी आवृत्ती आहे त्यात खूप विस्तृत माहिती आहे .चारांपैकी तीन गुंफा हिंदू आहेत .शंकर आणि विष्णूअवतारांची सुरेख व अखंड साडेसहाफुटी मोठी शिल्पे आहेत .त्रिविक्रम ,वराह आणि नरसिंह अवताराचा प्रभाव त्याकाळी होता असे दिसते.शंकर सोळा हातांचा आहे .चौथी गुंफा आदिनाथाची आहे . या चालुक्यांचे शत्रु दुसरे हिंदू राजे(पल्लव) होते आणि नंतर सोळाव्या शतकांतही मुसलमान सुलतानांनी देवळांची नासधूस नाही केली .शिल्पांचे सविस्तर वर्णन आणि चालुक्यांचा इतिहास न सांगता पुढे चलुया .

कंजूस Sun, 06/15/2014 - 21:45
बदामि-४ येथून दहा मिनिटांत मुख्य रस्त्यावर आलो तेव्हा साडेचार वाजले होते .नाक्यावर बनशंकरी'कडे जाणाऱ्या शेअर रिक्षा उभ्या असतात .त्याने पाच किमीवरच्या बनशंकरीला आलो .इथल्या आठव्या शतकातल्या शाकंबरी देवीच्या देवळाचा उत्सव आज सुरू होणार होता .पौष शुक्ल अष्टमी (आज)ते पौर्णिमा .एकादशीनंतर जत्रा सुरू होते .थोड्या वेळाने चौघडा ,वाजंत्री वाजली आणि पालखीतून देवीची पितळी उत्सवमूर्ति आली .नऊवारी पातळांतल्या स्त्रियांनी आरती केली आणि पालखी देवळात गेली .आतमध्ये गाभाऱ्यात अडीचफुटी आठ हातांची मूर्ती आहे .देवळासमोर जो प्रचंड तलाव आहे तो बांधीव दगडी आहे .सभोवालती प्रदक्षिणा मार्ग आहे .नारळी आहेत .एकंदर या देवस्थानाचे फार पूर्वीपासूनचे महत्त्व कायम आहे .इकडे टोपलीतून भाकऱ्या आणि दही घेऊन "ऊटा ?"(=जेवण) विकणाऱ्या बायका भाविकांना विचारत होत्या .एका दुकानात एका काळा चिक्की सारखा पदार्थ होता .याला करदान म्हटतात .गूळ आणि सुक्यामेव्याची मऊ चिक्की (फज ?)होती .जवळच्या पटांगणात जत्रेसाठी राहुट्या उभारण्याचे काम जोरात चालू होते .हल्ली जत्रा आठ दिवस चालत नाही पूर्वी फार मोठी असायची .

कंजूस Sun, 06/15/2014 - 21:47
बदामि-५ अचानक एका मोठ्या गोष्टीकडे लक्ष गेले .उत्सवाचा लाकडी रथ !२०१२ मध्ये नोव्हेँबरात आलो त्यावेळी मला दिसला नव्हता .सातफुटी दगडी चाके पाहा याची .कानडी येत असती तर विचारता आले असते .जत्रेनंतर हा रथ झाकून ठेवतात . रीक्षाने हॉटेलवर परतलो तेव्हा सहा वाजले होते .चहा नाश्ता केला .परदेशी पर्यटकांना डोसा आणि हॉट करी (=सांबार) आवडीने खातांना पाहिले .चहा ऐवजी कॉफी अथवा थंड पसंत करतात .बरेचसे बदाम कोर्ट अथवा केटीडीसीत उतरतात .आमच्या रुमशेजारी जपानी /कोरिअन असावेत . आज तसे बरेच फिरलो आणि दमलो .म्युझिअममध्ये मोठा एअरिअल नकाशा आहे .त्यातले फक्त मलगट्टी शिवालया नाही पाहिले .पोलीस स्टेशनकडून बाजारातून रस्ता आहे .आपण अगस्ति तलावाकडून गावात येतो तेव्हा सहाव्या शतकातून दहा मिनिटांत एकविसाव्या शतकात येतो .मजा अशी की बदामिऐवजी चौदाव्या शतकातले हम्पि जागतिक वारसा (वल्ड हेरटिज साइट)यादीत आहे ! आता उद्या या बदामितच मुकाम आहे पण ऐहोळे(ऐवळी) ,पट्टडकल (पट्टडकलु) ची पंचवीसेक मंदिरे पाहून यायची आहेत .सकाळी पावणे आठला एकच बस ऐहोळेला (२५)जाते .याच वाटेवरच्या पट्टडकल येथे (१३किमी) दर अर्ध्या तासाने आहे .

कंजूस Sun, 06/15/2014 - 21:53
बदामि-६(ऐहोळे -१) सकाळी लवकर उठून नाश्ता करून बस डेपोत साडेसातला हजर झालो .इकडे थोडा आतला भाग असल्यामुळे बसच्यावर पाट्या कानडीत असतात .मी त्या वाचण्यासाठी मोठ्या शहरांची नावे कानडीत लिहुन आणली होती .(पाणिनि किपैड डॉट कॉम च्या वेबसाईटवर हे करता येते) .बस वेळेवर निघाली आणि पावणे नऊ वाजता ऐहोळे गावात थांबली .वाटेत पट्टडकल लागले पण ते येताना करायचे आहे .[इथून पंधराएक किमीवर विजापूर-हॉस्पेट हायवेवरचे "इल्कल" हे शहर आहे .स्वत:चे वाहन असल्यास बदामि नंतर पटट० आणि ऐ०पाहून तसेच पुढे पाचपर्यँत हॉस्पेट गाठता येईल .] बस नाक्यापाशीच दुर्गदेवी मंदिर आणि म्युझीअमचे आवार आहे .तिकीट काढून आत गेले की आवारातली मंदिरे पाहता येतात .पाऊणेक तास लागतो .बाकीच्यांना तिकीट नाही एका फलकावर ऐहोळे गावातील मंदिरांची नावे लिहिली आहेत .बरेच जण दुर्गदेवी पाहून परत जातात .इतर मंदिरे न पाहणे अन्याय केलयासारखे होईल .पुढची परतीची बस दीड वाजता आहे तोपर्यँत आम्ही सर्व महत्त्वाची मंदिरे सावकाश पायी फिरून पाहिली .नाक्यावर इडली वडा चहाचे एकच हॉटेल आहे .तसेच पेरू ,शेंगा आणि रस मिळतो .

कंजूस Sun, 06/15/2014 - 21:57
बदामि-७(ऐहोळे २) इथे येताना मला एक गोष्ट माहित होती ती म्हणजे हे एक साधे गाव आहे परंतू असंख्य परदेशी पर्यटक येतात .शाळेत जाणारी पहिली दुसरीतली मुले 'स्कूल पेन ?'मागतात .त्यामुळे पंचवीसेक पेनस बरोबर आणली होती .खूप आनँद होतो त्यांना .पण भिकारी कर्नाटकात सापडत नाहीत .काल बनशंकरीला काही तृतियपंथी देवळाबाहेर दूर बसलेले होते पालखी आली त्यावेळी पण त्रास नाही .मान असावा त्यांचा त्यादिवशी . आता देवळाकडे वळू .सहाव्या शतकापर्यँत कोरीव गुंफा-मंदिरे होती .गुप्त काळाच्या शेवटच्या टप्प्यात बांधीव मंदिरांचे प्रयोग उत्त र भारतात सुरू झाले .इकडे दक्षिणेत हेच काम पल्लव आणि चालूक्यांनी हाती घेतले . हे चालूक्य राजे अगोदरच्या कदंब राजांकडे सरदार होते .नंतर ते स्वत:च राज्य करू लागले .यांची राजधानी याच तीन ठिकाणी होती .इथेच त्यांनी देवळे बांधण्या चे निरनिराळे नमुने करून पाहिले .देवळाचे जोते ,मंडप ,खांब आणि छत ,प्रदक्षिणा मार्ग ,गर्भगृह ,शिखर आणि कळस याबाबतीत प्रत्येक देऊळ निराळे आहे .दक्षिणेतल्या कोणत्याही देवळाचा आराखडा येथूनच उचलला आहे .

कंजूस Sun, 06/15/2014 - 21:59
बदामि-८(ऐहोळे ३) तांबड्या रंगाचा वालुकाष्म दगड वापरला आहे .कोरायला मऊ असतो पण तकतकीत करता येत नाही .शिवाय बाहेरची शिल्पे पावसाने झिजली आहेत . शंकर आणि विष्णू मुख्य हिंदू देवता आहेत .तरीही जैनधर्मियांची पूर्ण देवळे हेच दाखवते की तेही राजघराण्यांत महत्त्व राखून होते . दुर्गदेवी आवारातून बाहेर पडून आणखी दीड तासाची फेरी मारली तर सर्व मुख्य मंदिरे पाहून झाली .याच वाटेवर असलेली रावणफडी गुंफा खासच आहे .शेवटी नाक्यावर येऊन बसची वाट पाहत थांबलो . पटटडकल: दोन वाजता पोहोचलो .इथे नदीकाठी एकाच आवारात सर्व मंदिरे पटावर सोंगट्या मांडल्यासारखी आहेत .पाट्या फलकांवर माहिती लिहिली आहे .खास उल्लेख करण्यासारखे विरुपाक्ष आणि त्याच्या भल्यामोठ्या काळ्या नंदीचे अशी दोन आहेत .मूर्ती ठसठशित आणि आकर्षक आहेत .आत रामायणातील चित्रे आहेत . आवाराबाहेर येऊन चहा भजी ,नारळपाणी घेतले .इथून एक किमीवरच्या जैन मांदिरातले दोन मोठे हत्ती खास आहेत . आता या भागातले फक्त महाकुटा बघायचे राहिले परंतू त्या रस्त्याने बस जात नाहीत .एका ठिकाणी वाटेत उतरून दोन किमी जाऊन यायला हवे .नाही गेलो .रूमवर परत आणि आराम केला

कंजूस Mon, 06/16/2014 - 22:11
फोटो वाढवले आहेत .अजून हम्पि आणि लखुंडी बाकी आहे ।शिल्पे इतकी अगणित आहेत की तपशिलवार लिहिणे आणि पाहणे अशक्य आहे .या राज्याला पर्यटकांची सवय आहे आणि त्यांचा पैसा सोयी वाढवण्यासाठीच खर्च करतात .

कंजूस गुरुवार, 06/19/2014 - 18:17
काही नकाशे इथे आहेत . प्रिंटेड नकाशांचे फोटो प्रसिध्दीपत्रकांतील घेतले आहेत .रखाचित्रे माझी आहेत . http://s1366.photobucket.com/user/Wdapav/library/map1

कंजूस Fri, 06/20/2014 - 05:25
विसरलो नाही .ही दोन ठिकाणे बंगळुरु -महैसूर -हसन असे तीन ठिकाणी राहून सहज होतात .आणि कारवार ते मंगलोर अशी तिसरी सहल करणे योग्य ठरते .

कंजूस Fri, 06/20/2014 - 10:43
बरोबर .म्हैसूरला असतांना सोमनाथपूर करता येईल .बारा वर्षाँपूर्वी बं०-म्है०-उटी ला गेलो होतो पण माहिती अभावी ही तीन मंदिरे पाहिली नव्हती.

कंजूस Mon, 06/23/2014 - 00:55
हम्पि -१ बदामिला दोन दिवस राहून फिरलो तेव्हाच कळले की उद्यापासून तीन दिवसांचा हम्पि उत्सव सुरू होत आहे .थोडी धाकधूक वाढली ,होस्पेटला हॉटेल मिळेल का ? गर्दी असेल का ?बदामिला येतांनाही हीच शंका होती कारण बनशंकरीची जत्रा .परंतू एक फायदा झाला .तो रथ पाहता आला .बस डेपोत चौकशी केली होस्पेट बस कधी आहे .सात वाजता होती .नंतर इल्कल'च्या असतात त्याही उपयोगी असतात असे कळले . काल ऐहोळेला दुर्ग मंदिराजवळ एक कोल्हापूरची शाळेची सहल(बस) आलेली दिसली .गुरुजींना विचारले "मुलांची राहण्याची व्यवस्था कुठे केलीत ?" . "कोल्हापुरहून विजापूरमार्गे कुडलसंगमा'ला आलो आणि राहिलो . सकाळी हुनगुंड मार्गे इथे ऐहोळेला आलो ." परतीचा मार्ग कळला नाही .पन्नासेक पाचवी सहावीच्या मुलांना घेऊन जायचे एक मोठी जबाबदारीच असेल . १० जानेवारी ,शुक्रवार (२०१४) . आज बदामिहून होस्पेटला जाण्यास सवासहालाच हॉटेल सोडले .साडेसहाला चहा घेतला पण भूक नव्हती त्यामुळे इडली वड्यांचे पार्सलच घेतले .बस स्टैंडला बदामि ते बंगळुरू होस्पेटमार्गे बस आमचीच वाट पाहत होती .उदबत्ती लावल्यावर सहा जणांना घेऊन सवासातला बस सुटली .आम्ही तिकीटाची भोणी केली .

कंजूस Mon, 06/23/2014 - 01:04
हम्पि -२ सकाळी प्रवास छान वेटत होता .जानेवारी महिना असूनही फारशी थंडी नव्हती .इकडे रस्त्याला वाहने कमी दिसली .मोठ्या हायवेला हुनगुंड येण्याच्या अगोदर शेतात पाच मोर पाहिले .चला सुरुवात चांगली झाली .पुढे तीनपदरी हायवेवरून प्रवास सुरू झाला .इल्कल या ठिकाणी थांबून सवाअकराला होस्पेट आले .सहा किमी अगोदर तुंगभद्रा धरण आणि वसाहत येते .एकशेसत्तर किमीचा प्रवास अजिबात जाणवला नाही . होस्पेटचा डेपो नवीन केला आहे .अप्रतिम .इकडे वेळ न घालवता स्टेशनरोडकडे बैगा घेऊन निघालो .आजुबाजूला खूप हॉटेल्स आहेत .मागच्या वेळेस रोटरी हॉल आणि गार्डनच्या समोरच्या SLV यात्री निवास येथे उतरलो होतो .मालक सुरेश प्रभू यांच्याशी ओळखही झाली होती .इकडे मंगलोरी लोकांची बरीच हॉटेल्स आहेत .रूम मिळाली समोरच्या झाडावर बरेच कोकिळ होते . हंम्पि उत्सवाबद्दल कळले .दोन वर्षे झाला नव्हता .आपल्याकडे एलिफंटा अथवा वेरुळ चा असतो तसाच आहे .जत्रा लागते .नाचगाण्यांचे कार्यक्रम होणार .त्यात मोठे कलाकार कला सादर करणार .संध्याकाळी गर्दी होणार .आम्हाला काही फरक पडणार नव्हता .

कंजूस Mon, 06/23/2014 - 01:06
हम्पि -३ तयार होऊन ,उदरभरणं करून दोन वाजता बस डेपोत हजर झालो .इथून हम्पि ११/१६ किमी आहे आणि चकाचक बसेस दर दहा मिनिटांनी सुटत होत्या .आजचा अर्धा दिवस आणि उद्याचा पूर्ण दिवस हाताशी होता . हम्पितील ठिकाणं पाहण्यासाठी फार तंगडतोड करावी लागते .जेवढे तुम्ही पायी फिराल तेवढं चांगलं .काही परदेशी नागरिक हेच करतात .विठ्ठल मंदिर ,कमल महाल आणि म्युझिअम या तीन ठिकाणचे एकच तिकीट आहे आणि ते त्याच दिवशी वापरावे लागते .इतर ठिकाणांना तिकीट नाही .आज शुक्रवार म्युझिअम बंद असते .असे पण हे पाहणारच नव्हतो . बसमध्ये बसलो .आज जेवढे जमेल तेवढे पाहण्याचे ठरले .(नकाशा पाहा ) .कमलापूरचे तिकीट मागितले .पण तीन दिवस एकदिशा केला होता .कृष्ण मंदिराला आलो .या ठिकाणी समोरच्या पटांगणात जत्रा लाखत होती .मागच्या बाजूस स्टेज आणि खुर्च्या लावत होते .पोलीस खुप होते परंतू मदतीला होते ,खिसे चाचपडायला नव्हते .बसमधून हौशी लोकं सारखे येत होते .एकंदर आनंदाचे वातावरण दिसले .भाषेची अडचण त्यामुळे माहितीफलक वाचता आले नाहीत आणि विचारता आले नाही .हेलीकॉप्टर राईड होती एवढं मात्र कळलं .

कंजूस Mon, 06/23/2014 - 01:09
हम्पि -४ थोडं गोंधळल्यासारखं झालं पण नंतर लगेच सासिदुकालू आणि कलेदूकालू या दोन महागणपतीँपासून हम्पिदर्शनाचा श्रीगणेशा केला .इथून पुढे पाच मिनिटांवरच्या विरुपाक्षाकडे न जाता मागे येत कृष्ण मंदिर पाहून ,प्रवेशद्वारातून लक्ष्मीनरसिंहापुढे उभे ठाकलो .येथून बसने सरळ कमलापूर गाठले . चार वाजले होते .चहा कोलड्रीँक घेऊन ताजेतवाने झालो .इथे मोठा पोलीस ताफा होता आणि पुढे जवळच हेलिपैड होते .परंतू तिकडे गेलो नाही .पट्टाभिरामा मंदिराची वाट धरली .चालत म्युझिअमच्या पुढे वीस मिनिटांवर कनाल ओलांडल्यावर हे एक प्रशस्त आवारात देऊळ आहे .शांत भाग आणि एखाददुसऱ्या परदेशी पर्यटकाशिवाय कोणी फिरकत नाही .एक नृत्यमंडप आहे .भरपूर खांब आणि त्यांवरची शिल्पे हे हम्पिच्या देवळांचे वैशिषट्य आहे .इकडे अर्धा तास थांबून कमलापूरला स्टॉपला आलो .बस पकडून सहाला हॉटेलवर परतलो . एकेका ठिकाणासाठी ऑटोवाले यायला तयार नसतात .एक पैकेज गळ्यात मारायला बघतात .हॉस्पेटच्या चांगल्या आणि स्वस्त बसेसची सोय नसती तर ऑटोवाल्यांनी पर्यटकांची किती धुलाई केली असती ते सांगता येत नाही .

कंजूस Mon, 06/23/2014 - 01:12
हम्पि -५ संध्याकाळी रेल्वे स्टेशनकडे फेरफटका मारला .इकडे काही तीनस्टार मोठी हॉटेल्स दिसली .एक कनाल ओलांडावा लागतो .एक हायवे बनलेला दिसला तो थेट विजापूर -हंम्पि-बंगळुरू जातो . पर्यटनामुळे राज्याचे चित्र पारच पालटले आहे .परत आलो तर समोरच्या बागेत कारंजे सुरू झाले होते . आजचा अर्धा दिवस प्रवास आणि भटकणे झाल्यामुळे रात्री छान झोप लागली . दुसरे दिवशी शनिवारी उरलेली ठिकाणं पाहायची होती .आणि ही सगळी महत्त्वाची होती .सकाळी टिव्ही लावून कालच्या कार्यक्रमाच्या बातम्या पाहिल्या .बऱ्याच जागा रिकाम्या होत्या फारसे प्रेक्षक थंडीत कुडकुडत उघण्यावर गाणे ऐकायला आले नव्हते . सकाळी साडेसातलाच हम्पिबाजार गाठला . विरुपाक्ष देवळापासून समोरच्या मातंगमदिरातल्या नंदीपर्यँत रुंद रस्त्याने दोन्ही बाजूला दगडी खांबांची दुकाने आहेत .ती नँतर सुलतानांनी लढाईत बरीच पाडून टाकली . त्यांनी देवळे मात्र पाडली नाहीत .विरुपाक्षाचे ५०मी उंच गोपूर लक्षवेधक आहे . या ठिकाणी ऑटोवाले विचारायला येतात .पण फार मागे लागत नाहीत .कोणत्या ठीकाणी काय पाहण्यासारखे आहे ते माहिती असेल तरच ऑटो ठरवून फायदा आहे .

प्रचेतस Mon, 06/23/2014 - 09:25
मस्त. हंपीचे मूर्तीशास्त्र जरा सविस्तर आले तर अधिक छान होईल. एकंदरीत तिथे शैव मतापेक्षा वैष्णवांचा प्रादुर्भाव बराच जास्त दिसतोय. उदा: लक्ष्मी नरसिंह मंदिर, विरूपाक्ष, विजय विठ्ठल मंदिर, खुद्द राज्याचे राजचिह्न असलेले वराह.

कंजूस Mon, 06/23/2014 - 10:45
वल्ली ,बरोबर आहे . विजयनगराचे स्थापक हरिहर यांचे स्वामि मध्वाचार्य .यांनी प्रथम इथे तुंगभद्रेच्या उत्तर किनाऱ्यावर अनेगुंडी डोंगरावर किल्ला बांधायला सांगितला असे म्हटतात .तो सुलतानानी उध्वस्त केल्यावर दक्षिण तिरावर दुसरे विजयनगर बांधण्यात आले .विरुपाक्ष आणि गणपती तसेच हेमकुटा हे सर्व शैव स्थापत्य यांच्या अगोदरच्या हिंदू राजांचे आहे . मध्वाचार्य राम कृष्ण भक्ती मार्गातले असावेत .त्यामुळे राजांची नावेही कृष्णदेवराय ,रामदेवराय आहेत .देवळेही विष्णू अवताराचीच त्यांनी बांधली .राम कृष्ण अवताराचा इतिहास माहिती असणाऱ्याला येथील शिल्पांचे कथानक लगेच समजते .गाईड लोक एक दोन गोष्टी परदेशी पर्यटकांना समजावतांना दिसतात .फ्रेंच ,रशिअन ,जर्मन मध्ये चालू असते .दशरथाच्या राण्यांना पुत्र होण्यासाठी खिरीचा प्रसाद ,सीता आपली अंगठी मारुतीला देत आहे ,बाळकृष्ण पळू नये म्हणून पायाला दोरी बांधून उखळाला बांधली आहे .असे अनेक प्रसंग कोरलेले आहेत .अवर्णनीय आहेत .घोंगडीवाला इथेच आहे .पट्टाभिराम ,हजाररामा आणि कृष्णमंदिर खासच . (घाई करणाऱ्यांबरोबर जाऊ नका ) . नकाशे कसे वाटले ?

चौकटराजा Mon, 06/23/2014 - 11:13
नीटपणे फिरण्यासाठी नकाशे उपयुक्त आहेत. हंपीत त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता कमी राहील. हंपीला शिल्प कलेबरोबरच नुसते धोडे देखील देखणे आहेत. त्याचे ही सौंदर्य काही वेगळेच. या दगड धोंड्यातून काही शिल्पे आपल्या कल्पनेनुसार दृगोचर होतात.मला डिसेंबर मधे वल्ली ईई सोबत जायला जमेल की नाही माहीत नाही पण येथे पुन्हा जाणार हे नक्की !

कंजूस Mon, 06/23/2014 - 12:44
अजया ,हम्पिपासून ६० साठ किमी पूर्वेला बेल्लारी(येडीयुरप्पांचे) एरपॉट आहे .बंगळुरूरून हम्पि एक्सप्रेस सकाळी येते /जाते .होस्पेटहून सकाळची एक्सप्रेस दुपारी दोनला मडगावला (दूधसागर धबधबा मार्गे) पोहोचते . यावर्षी बहुधा २-३-४ जानेवारी २०१५ हम्पि उत्सव असेल .यावेळी गर्दी फार असते .मंदिरांचे वर्णन देईनच .लहान मुलांना बोरिंग आहे .न चालणाऱ्यांनी जाऊ नये . (मुलांसाठी हैदराबाद उत्तम) २९ डिसेंबर २०१४ पौष शु अष्टमी बनशंकरी जत्रा सुरुवात (रथ पाहा )आणि पौर्णिमा ५ जाने २०१५ शेवटचा दिवस .

कंजूस Mon, 06/23/2014 - 12:48
आता हिलस्टेशनांच्या हिरवळीपेक्षा रस्त्याकडचे धोंडे मलाही खुणवू लागले आहेत चौकटराजा. तुंगभद्रेच्या रक्षक धोंड्यांचे सौंदर्य साठवायला निकॉर /कैनन २८ एम एम पाहीजे HDR नको .

In reply to by कंजूस

बॅटमॅन Mon, 06/23/2014 - 17:41
माधवाचार्य असेल मग ते नाव. कारण मध्वाचार्य म्ह. द्वैतमतवादी वैष्णव संप्रदायवाले तर हे विद्यारण्य म्ह. शृंगेरी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य होते. एकवेळ काश्मीर प्रश्न सुटेल पण या दोहोंत अद्वैत होणे इंपॉसिबल ;)

कंजूस Mon, 06/23/2014 - 18:41
धन्यवाद वल्ली .या GPS च्या काळात रेखानकाशे उपयुक्त वाटतात हे ऐकून बरे वाटले .दुरुस्ती /सूचना येऊ द्या . तुमच्या बरोबर जायला मलाही आवडेल .दोनवेळा गेलो .नोव्हेंबर २०१२ ला गेलो(एकटा) होतो त्यावेळी विनाचिंता हम्पि नऊ तास फिरलो होतो तरी वीस टक्के राहिलेच .अनेगुंडी परीसर .माहितीसाठी लोनली प्लानेट पुस्तकाला (जुनी आवृत्ती) पर्याय नाही .

कंजूस Tue, 06/24/2014 - 10:03
हम्पि -६ दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विरुपाक्ष ते मातंग मंदिर नदी ते नदीकाठाने विठ्ठल मंदिरापर्यँतचा भाग पायी फिरण्याचा आहे तिकडे वाहन जात नाही .(पाणी आणि वरचे खाणे जवळ ठेवा ).मग हे ऑटोवाले कसे विठ्ठल मंदिरला जातात ?तर ते कमलापूरकडून तिकडे येतात .(नकाशा पाहा ).मधल्या ठीकाणांना दांडी . कोणत्याही पर्यटन स्थळी हीच तऱ्हा असते .पर्यटक गाडी वेटिंग ठेवून एक तास काढतील अशी ठिकाणे "तिकडे काही नाही "सांगून जात नाहीत .तास दोन तासात पाचशे रुपये मिळवायचे हा धंदा असतो .शिवाय एखाद्या दुकानातले कमिशन पदरात पडले तर उत्तमच .इथे भाडे आणि ठिकाणावरून ऑटोवाल्याशी 'बार्गेन 'करत बसू नका .असो . एरवी हम्पि बजार बस स्टैंड आणि पार्किँगपाशी बरीच चहा वड्याची दुकाने असतात .आज सर्वांना हटवले होते .वेळ न घालवता विरूपाक्ष मंदिराचे भव्य उंच गोपूर पाहत तिकडे निघालो .वाटेत एक भलेमोठे पत्र्याचे धूड दिसेल त्याच्या आत देवळाचा रथ आहे .दिसू नये याची पूर्ण काळजी घेतली आहे .महाशिवरात्रीला या रथासाठी यावे लागेल .पुजा होत असलेले हे एकमेव देऊळ आहे .हजार वर्षाँचे आहे .कृष्णदेवरायाने याची डागडुजी केली म्हटतात .

In reply to by कंजूस

चौकटराजा Tue, 06/24/2014 - 19:18
दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विरुपाक्ष ते मातंग मंदिर नदी ते नदीकाठाने विठ्ठल मंदिरापर्यँतचा भाग पायी फिरण्याचा आहे तिकडे वाहन जात नाही काही समस्या नाही. हे अंतर मी सहकुटंब पायी गेलो आहे. जाणे अगदी रंजक .जाताना राजाचे वजन तागडे ही लागते. खेरीज तुंगभद्रेत गोल होडीतून भटकता येते. विष्णु मंदिरात संगीत खांब मात्र लोकानी हाताळून निमुळते केले आहेत.

कंजूस Tue, 06/24/2014 - 10:06
हम्पि -७ गोपूरातून आत गेल्यावर उजवीकडे हत्ती असतो .पण नदीवर गेला असेल .नदी मागे उजवीकडेच आहे आणि घाटही आहे .देव दर्शना नंतर नदीवर जाऊन आलो . साडेसात झालेले .यावेळी नदीकाठाने दोन किमी चालायला त्रास होत नाही . हम्पि बाजारातून रुंद रस्त्याने जाताना गतवैभवाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही .लहान विक्रेत्यांसह हत्तीच्या अंबारीत बसून थेट खरेदी करणाऱ्यांसाठी दगडी गाळे आहेत .पुढे नंदी पाहून मागे आलो .(तशी या मातंग टेकडीवरून पलीकडे अच्युतरायाकडे वाट आहे ) . डावीकडून नदीकाठाने जाताना नदीतल्या कारकल नावाच्या गोल होड्या दिसतात .एक अलीकडे बांधलेले मंदिर दिसते . मातंग मंदिराच्या भोवती वळसा घालून गेल्यावर पाटी दिसेल .पुढे विठ्ठल मंदिराकडे ,तर पुष्करणी ,अच्युतराय उजवीकडे .या दोन ठिकाणी जाऊन पाहून परत यायला अर्धा तास लागेल . पुष्करणी बांधता बांधता अर्धवट सोडल्यासारखी वाटते .अलीकडे खांबांवर महाल योजला असावा .तलाव छान आहे मागे मातंग डोंगर .डावीकडचे मोठे पटांगण आहे तिथे बजार होता .हल्लीचे नाव सुळे बाजार आहे .

कंजूस Tue, 06/24/2014 - 10:11
हम्पि -८ अच्युतराय मंदिराची जागा फार छान आहे .आवाराला तटबंदी आहे आणि आत ओवऱ्या (=भाविकांना थांबण्यासाठी खोल्या ) आहेत .आवारातूनच उजवीकडे पायऱ्यांची वाट मातंग डोंगरावरून (२५ मी) नंदीपाशी उतरता येते .सरळ वर (५० मी) शिखरावरही जाता येते .वरून नदी आणि अनेगुंडी छान दिसते .अतिउत्साही लोकांसाठी आहे . पायगाडीला जोर मारा कारण आजचे दहा टक्केच झाले आहे .पुढच्या वाटेवर एक वराहमंदिरात प्रवेशद्वारावर वर एक वराह कोरलेला आहे .नंतर दोन एक मांदिरे उजवीकडे आहेत .आता नदीकडे खाली एक मंदिर आहे ती जागा फारच रम्य आहे .इथे एक चहाची टपरीही आहे .परत वर मोठ्या वाटेवर मागे एक दगडी नक्षीदार कमान राजाची तुला आहे .येथे तराजू टांगून राजाच्या वजनाइतके धन धान्य वाटले जायचे . येथे डावीकडे 'उत्किर्णविषणूमंदिर' आहे .बंद केले आहे परंतू बाहेरच्या सपाट दगडी भिंतीवरची पाल पाहा .(कांचीपुरम ,चैनईच्या विष्णूमंदिरातली पाल प्रसिध्द आहेच) .पालीचा पौराणिक उल्लेख काही आहे का ?इथून समोरचा अनगुंडी डोंगर छान दिसतो .आता दहा मिनिटांत विठ्ठल मंदिराच्या दक्षिण दाराशी येतो .प्रवेश पूर्वेकडून आहे .

कंजूस Tue, 06/24/2014 - 17:34
हम्पि -९ विठ्ठल मंदिर हम्पितली फार चर्चित आणि प्रसिध्दी मिळालेली वास्तु .उत्तरेला तुंगभद्रा नदी आणि पलीकडे अनेगुंडी ही पूर्वीची राजधानी .पूर्वेकडे एक रुंद मातीचा रस्ता एक किलोमीटर वरच्या पार्किँगकडे नेतो .कमलापुरातून एक रस्ता इथे येतो .याच रस्त्याने पुढे गेल्यास होडीने नदी ओलांडता येते .पार्किँग ते देवळापर्यँत येण्यासाठी इलेक्ट्रीक आठ सिटर गाड्या आहेत,ज्या मुली चालवतात .छान व्यवस्था आहे;शिस्तबध्द आयोजन असते.दहा रुपये तिकीट आहे .चालत गेल्यास अर्धा तास लागतो आणि वाटेत एक छान पुष्करणी पाहता येते . देवळाच्या पूर्व दारासमोर तिकीट (१०रु) काढल्यावर ते जपून ठेवायचे जे पुन्हा कमलमहाल आणि म्युझीयमसाठी चालते . तटबंदीला चार दिशेला चार चाळीसफुटी गोपुरे आहेत . गरुड रथ : मोठ्या आवारात प्रथम तो प्रसिध्द दगडी रथ आहे .त्याचे तोंड मंदिराकडे आहे .रथात बसायचा मान मात्र विष्णूचे वाहन गरुडाला मिळाला आहे .चार फुटी दगडी चाके खऱ्या दगडी आसांवर आहेत आणि ती फिरु शकतात .हा तांबूस दगडाचा रथ या देवळात नव्हताच .नंतर इथे आणून ठेवला .बहुतेक पट्टाभिरामा मंदिरात असावा .तिकडे शोभतो आणि दगडही जुळतो .

कंजूस Tue, 06/24/2014 - 17:38
हम्पि -१० विठ्ठलाचे देऊळ बसके आणि दोन भागात आहे .अगोदरचा किर्तनमंडप पूर्ण ढासळायच्या बेतात आहे .सर्व खांब तिरके झाले आहेत .वरचे छताचे दगड पडले आहेत .जागोजागी लोखंडी नळे लावून आधार दिलेला आहे .आत जाऊ देत नाहीत .मंडपात जे मुख्य खांबाभोवती मुसळासारखे बारीक खांब आहेत ते आघात केले की वाजतात .आतले रक्षक /मार्गदर्शक काही जणांच्या विनंतीवरून वाजवून दाखवत होते (५०रु टिप मिळत होती ) .परंतू इथले आणि पट्टाभिरामाचे (मी वाजवले) काही खास वाटले नाहीत .हा दगड वालुकाश्म आहे .याला नाद नसतो .खरे नादस्तंभम/संगीतस्तंभम केरळात पद्मनाभ मंदिरात आणि कन्याकुमारीजवळच्या सुचिंद्रम (खांब स्वत: वाजवू शकता) मंदिरात आहेत .तिकडचा दगड काळा आहे . मुखमंडप आणि गर्भगृहात जाऊ शकतो .अंधार फार आहे फोटो नाही काढता आले .परदेशी पर्यटक आणि त्यांचे गाईड फार .ते गर्भगृहात जात नाहीत .देवळाच्या मानाने गाभारा लहान आहे .आत उंच चौथरा रिकामा आहे .विठ्ठलाची मूर्ती पाहण्यासाठी पंढरपुरला चला .गाभाऱ्यातच एक अंधारी प्रदक्षिणामार्ग आहे आणि तळाला पाणी असावे ( पाय ओले ठेवणयासाठी ?) असं वाटतं .

कंजूस Tue, 06/24/2014 - 17:41
हम्पि -११ विठ्ठलमूर्तीचा वाद आणि काही पुरावे . यावर बरीच चर्चा होते .विजयनगरची सुरूवात १३४० च्या सुमारास अनेगुंडीला झाल्यावर बहामनी सुलतान आणि या राजांत लढाया होतच राहिल्या .एका जुन्या विठ्ठल मंदिरातली मूर्ती लढाईच्या वेळी पंढरपूरच्या एका (आताचे) शंकराच्या देवळात हलवली ."ज्ञानदेवाचा कानडा विठठलु करनाटकु ." मुर्तीला कानडी पध्दतीची कापडी टोपी आहे ,मुकुट नाही . मूर्तीकाराने गुराखी (=कृष्ण) रुपाचे देवाचे हात काठी खांद्यावर धरतात तसे न करता कटीवर ठेवले असतील .पण त्या विटेचे कोडे उलगडत नाही .काहींच्या मते ती मूर्ती जुन्या पंढरपुरात नदीपलीकडे लपवली आहे .कारण रुसलेली रुक्मिणीची मूर्ती तिकडे आहे . पुढे कृष्णदेवरायाच्या काळात हे मंदिर बांधून एक नवी मूर्ती बसवली .त्यासमोर भक्त पुरंदरदास बसायचा .पंढरपुरातली मूर्ती बडवे लोक देईनात . १५५६च्या तालिकोटच्या मोठ्या लढाईत ही पण काढली आणि पुरंदरदास पंढरपुरात बसू लागला . सुलतानाने या मंदिराचा किर्तनमंडप मोडला असावा .इतर मंदिरे तोडली नाहीत पण राजा राणींचे महाल मात्र ध्वस्त केले . ते आपण नंतर पाहणारच आहोत .

कंजूस Tue, 06/24/2014 - 21:30
हम्पि -१२ विठ्ठल मंदिर पाहून झाले .आता दोन पर्याय होते आल्या मार्गानेच दोन किमी चालणे अथवा इले० गाडीने पार्किँगला जाऊन रिक्षा मिळते का पाहणे .सवा अकरा झाले होते आणि दुसरा मार्ग निवडला . गाडीला नंबर लावून लगेच पार्किँगला आलो .ही गाडी फारच छान आहे .इकडे बसण्यासाठी गवताने शाकारलेला मोठा तंबू बनवला आहे .या रस्त्यावर फक्त खासगी बस ,रिक्षा येतात ,हम्पिच्या सिटि बस अथवा गंगावतीकडे जाणाऱ्या परिवहनच्याही या मार्गाने येत नाहीत .दोन रिक्षा उभ्या होत्या .कमलापूर (५ किमी)चे १२० रु सांगितले .नको सांगून परत इले०गाडीच्या रांगेत उभे राहिलो .पाचच मिनिटांनी तो रिक्षावाला बोलवायला आला .दोन आणि सिटस त्याला मिळाल्या होत्या .साठ रुपये देऊन कमलापूरला आलो .वाटेत हेलिपैड दिसले . नाक्यावरच्या हॉटेलात थंडपेय घेतले .इथून काल पट्टाभिरामाकडे गेलो होतो त्या रस्त्यावरचे म्युझिअम जवळच आहे आणि आज उघडे होते तिकिटपण हाताशी होते .पण गेलो नाही .अजून तीन तासांचा कमलमहाल परीसर बाकी होता . अजून एक पर्याय आहे .सकाळी प्रथम ऑटोरिक्षाने विठ्ठलमंदिर पार्किँगला जायचे .तिथून मंदिर-नदीकाठाने चालत विरुपाक्ष -कमलमहाल -कमलापूर .

कंजूस Tue, 06/24/2014 - 21:33
हम्पि -१३ कमलापूरवरून राणी स्नानागारकडे चालत निघालो .एक किमी आहे आणि झाडांची सावली आहे . साडेबारा झाले होते आणि उत्सवामुळे गर्दी होती .राणी स्नानागारच्या बागेत थोडा आराम केला .ही इमारत चुन्यात बांधलेली आहे .मुसलमान कारागिर हाताशी धरून राण्यांसाठी बंदिस्त महाल आणि हौद बांधून घेतलेला आहे .इथून पुढे दोन मंदिरे पाहून पंधरा मिनिटांत डावीकडच्या महानवमि डिब्बा पाशी येतो .या सर्व परीसराला रॉइल सेंटर म्हटतात तर अगोदरच्या मंदिर परीसरांस सेक्रिड सेंटर असे नामकरण केले आहे .देवालय आणि राजवाडा परीसर . महानवमि डिब्बा याच्या मागेच रस्ता आहे परंतु प्रवेश राणी स्नानागार स्टॉप अथवा कमलमहाल स्टॉपकडूनच आहे .विजयनगर साम्राज्य राजांशी बहामनी सुलतानांच्या लढाया होत होत्याच शिवाय चीड आणि द्वेषही फार होता .तालिकोटच्या लढाईत जिंकल्यावर सुलतानांनी मिळालेले महाल वापरायला ठेवले नाहीत तर ध्वस्त केले .त्यामुळे इथे जे काही राहिले आहे त्यावर समाधान मानायचे . देवळे मात्र फार तोडली नाहीत .त्यानंतर नवीन शहर अथवा राजधानी इकडे न करता अडीचशे किमी दूरवर उत्तरेला विजापूर वसवले .

कंजूस Wed, 06/25/2014 - 17:17
हम्पि -१४ एका छोट्याशा राज्याचे दोनशे वर्षात विजयनगर साम्राज्य झाले .एक मोठे व्यापाराचे केंद्र झाले .महाल बांधले गेले .देवळे आली .काही उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होऊ लागले .असाच एक उत्सव महानवमि अर्थात नवरात्र .हे बहुधा अश्विन महिन्यातले नसून पौष शु० अष्टमी ते पोर्णिमा .या वेळी रासक्रीडा होत असावी .हे राजे कृष्णावतार भक्त ना .यासाठी मोठा जो चौथरा बांधला गेला तोच हा महानवमि डिब्बा .सुलतानांनी जिंकल्यावर हा विलासाचे द्योतक डिब्बा आणि सर्व महाल तोडले .तरी खालचे जोते पाहून कल्पना करू शकतो की किती सुंदर असावे त्याकाळी . सत्तर फूट चौरस आणि पंचवीस फूट उंच चौथरा शिल्लक आहे .त्याचे कोरीव दगड हे दगड नसून इतिहासाची पाने आहेत .इतर देवळातली शिल्पे ही राम ,कृष्ण यांच्या पौराणिक कथांवर आधारलेली आहेत परंतू इथे जे लोक प्रत्यक्ष येत होते त्यांची चित्रे आहेत .गोव्यातून पोतृगीझ घोडे विकायला यायचे .ते त्यांच्या नेहमीच्या पोशाखात ,दाढी आणि टोपी घातलेले कोरले आहेत .राजस्थानातून उंट आलेले आहेत .उंटाना दोरीने चालवणाऱ्या घागरा घातलेल्या बायका आहेत .हत्तींनाही स्त्रिया चालवत आहेत .दांडियाचा खेळ चालला आहे .

कंजूस Wed, 06/25/2014 - 17:20
हम्पि -१५ परंतू चित्रे कोणीच बघत नाही .सर्वजण वरती दंगा करण्यात मग्न . याच्या मागच्या बाजूस आहे पायऱ्यांचा तलाव .राण्यांना जलक्रीडेसाठी .आत पाणी नाही त्यामुळे सर्व पायऱ्या पाहता येतात .यासाठी पाणी येथवर आणण्यासाठी दगडी पन्हाळ सहा फूट उंचीवर बसवली आहे .ती पार आवाराच्या बाहेर पूर्वेला निघते .तिथे पखालीतून पाणी ओतले जात असेल .या चा फोटो नाही जमला . अगदी टोकाला राजवाड्याचे तळघर फक्त राहिले आहे . यासर्वाला तटबंदी होती तीचे तीनफुटी अवशेष उरले आहेत .याचे प्रवेशद्वारही दगडी होते ती दोन्ही अजस्त्र कोरीव दारे त्यांच्या अडण्यासह तिथेच पडलेली आहेत .तळघर पाहून बाहेर पडलो की लगेच डावीकडे आहे एक छान मंदिर .हजाररामा . हे चुकवण्यासारखे नाही .एका तटबंदीच्या आत छोटेसे मंदिर आहे .ताशिव काळे चार खांब छान आहेत .बाहेरच्या भिंतीवर रामायण आणि कृष्णचरित्रातले प्रसंग ठसठशीत आणि उठावदार आहेत .अर्धा तास लागु शकतो .उजविकडे एक कमलमहालात वाट जाते .तिकीट हातात असल्याने इथूनही आत जाता येईल .नाहीतर थोडे पुढे जाऊन मुख्य दारातून आत जायचे .

कंजूस Wed, 06/25/2014 - 17:23
हम्पि -१६ कमलमहाल हे आपले शेवटचे ठिकाण .याची वीसफुटी दगडी तटबंदी तळाला रुंद आणि वर अरुंद बाहेर झुकल्यासारखी आहे .त्यामुळे फुललेल्या कमळासारखी वाटते .आतमध्ये मुख्यवास्तु मुस्लीम पध्दतीचा बांधकाम असलेला हत्तीखाना आणि राणी महाल .राजाकडे मुस्लीम स्थपति होते बहुतेक .अकरा लहानमोठे हत्ती उभे राहतील अशी घुमटांची इमारत आणि बाग छानच आहे .पुढे रंगामंदिरात मोठा मारूती आहे .मंदिर पडायला आलेय .अगदी शेवटी एक दुर्लक्षित जैन मंदिर पाहून तिकडूनच राणीस्नानागार मार्गे हम्पि दर्शन संपवून होस्पेटात परत आलो .हेलिकॉप्टर राईड करायचे ठरवले होते परंतू रांगेत उभे राहण्याचा त्राण राहिला नव्हता .डेपोजवळ शानभाग स्नैक कॉर्नरमध्ये पदार्थ गरमागरम छान आणि झटपट मिळायचे .बिसि बेळी अन्ना हा खास भाताचा प्रकार खायचा राहूनच गेला .ती सकाळ/दुपारची डिश आहे असे कळले . संध्याकाळी यात्री निवासचे मालक प्रभुंशी गप्पा मारल्या .तिरुपतीच्या लावलेल्या मोठ्या फोटोकडे बघून म्हणाले हे हॉटेल यांची कृपा . वडिलांनी बांधले .पूर्वीचे राजे कसे प्रजेची काळजी घ्यायचे आता काय आहे ?हा परीसर मला फार आवडला .होस्पेट राहण्यासारखे आहे .उद्या लखुंडि .

कंजूस Wed, 06/25/2014 - 18:10
धन्यवाद वल्ली .कानडी बोलणारा कोणी बरोबर असल्यास माहितीमध्ये अधीक भर पडू शकते . बहळा सुंदरवादा ,उटा ?तिंडि ? एष्टु दूरा ,कन्नडा गोत्तिल्ला ,स्वल्पा ,बेकू ,ब्याडा ,मुंदिना ,आकडे ,इत्यादीवर काम भागवले .

In reply to by कंजूस

प्रचेतस Wed, 06/25/2014 - 18:52
कानडी बोलणारा कोणी बरोबर असल्यास माहितीमध्ये अधीक भर पडू शकते .
भाषेवाचून तिथे काही अडू शकते का? म्हणजे एकवेळ माहीती कमी मिळाली तरी चालेल पण निदान तिथे साध्या साध्या गोष्टींवाचून अडू नये. उदा. ही बस कुठे जाते, ठिकाण कुठे, रिक्षावाल्याला कुठे सोडायचे ते समजणे, खाणे चांगले कुठे मिळेल असे साधे प्रश्न.

In reply to by प्रचेतस

यशोधरा Wed, 06/25/2014 - 18:59
सह्सा अडेल. बसवरची माहिती कानडीमधून असते - नव्या बसेस वर इंग्लिशमधूनही लिहिलेले असते. रिक्षावाल्यांना होंदी समजेलच असे नाही, कधीकधी समजूनही न समजल्यासारखेही करतात, असा अनुभव आहे.तगदीच अडेल असे नाही, पण बर्‍यापैकी अडू शकते कधीकधी. हिंदीपे़क्षा इंग्लिश अधिक चालून जाते. :)

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Wed, 06/25/2014 - 19:08
वल्ली, जमल्यास मी येऊ शकेन. कन्नडचं टेण्षण नको. तारखांचं बघा फक्त. मला अन्यत्रही जाणे आहे, सबब जास्त दिवस हंपीला देणे शक्य नाही- द्याटिज़ रजा मिळणे औघड.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Wed, 06/25/2014 - 19:11
बेष्ट रे. मी सहसा ऑफ सीजन मध्ये प्लान करेन म्हणजे ऑक्टोबर्/नोव्हेंबर दिवाळीच्या मागचे पुढचे १५/२० दिवस सोडून. मी ७/८ दिवस सुट्टी काढून बदामी, ऐहोळे, पट्टदकल आणि लकुंडी पण करेन तुला इतकी नसेल तर मध्ये २/३ दिवस हंपीला जॉइन हो.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Wed, 06/25/2014 - 19:15
ठीक. नोव्हेंबरात जमणे अवघड आहे, ऑक्टोबरात जमू शकेल. हंपीपुरते जॉइन होऊ शकतो नक्कीच. ऐहोळे इ. अगोदर पाहिलंय-यद्यपि आत्तासारखं डीटेलवारी नाही. त्यामुळे मेन स्ट्रेस हंपीच.

यशोधरा Wed, 06/25/2014 - 18:44
इतके दिवस वाचत अहे, आज प्रतिसाद द्यायला वेळ मिळाला आहे :) खूप सुरेख लिहित आहात तुम्ही, मी वाचन खूण साठवत आहे. एकदा फक्त हंपीला भेट द्यायची आहेच. तेह्वा ही माहिती उपयुक्त ठरेल.
((अपडेट २०२१ जुलै Photobucket या साईटवरून या लेखात दिलेले फोटो ती साईट बंद ( फ्री साईटचे शेअरिंग बंद झाले) झाल्याने बदलावे लागले आहेत.

हिंदु अस्मितेचा उदय

प्रसाद गोडबोले ·

आयुर्हित Tue, 06/10/2014 - 15:21
संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असलेली 'संतसूर्य तुकाराम' व 'लोकसखा ज्ञानेश्वर' ही पुस्तके फाडून टाका,' असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. इतकंच नव्हे तर पुस्तकांचे लेखक आनंद यादव व मेहता प्रकाशनाला २० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पूर्ण माहिती द्या राव! घाबरलो ना मी.

धन्या Tue, 06/10/2014 - 15:36
माझ्याकडे "लोकसखा ज्ञानेश्वर" आहे, पण मी ते फाडणार नाही. माझ्या मनातील ज्ञानदेवांचे स्थान अढळ आहे, ते एखादया पुस्तकातील मजकुराने डळमळीत होणार नाही.

In reply to by धन्या

मी स्वतः ह्या दोनपैकी एकही पुस्तक वाचलेले नाहीये , पण तुकाराम पुस्तकावरुन जोरदार गदारोळ झालेला हे ऐकुन आहे ... आपण सदरपुस्ताकाचा रिव्हिव्यु लिहावी अशी ह्या निमित्ताने विनंती करीत आहे ...
माझ्या मनातील ज्ञानदेवांचे स्थान अढळ आहे, ते एखादया पुस्तकातील मजकुराने डळमळीत होणार नाही.
>>> धन्या , हिंदु किंग इन इस्लामिक इंडियाबाबत तुझे काय मत आहे ? किंव्वा मनुस्मृती विषयी (की ज्यामधील मोजकाच मजकुर आक्षेपार्ह आहे) काय मत आहे ? माझ्या लेखना उद्देश इतकाच होता की आता असले भावना दुखावणारे लिखाण हिंदुंकडुन खपवुन घेतले जावु नये ... हिंदु सहिष्णु आहे ह्याचा अर्थ कोणीही उठसुठ वाट्टेल ती टीका करावी असा नव्हे ... प्लीज नोट : मी आधीही म्हणालो होतो की हरकत 'टीका करण्याला' नसुन 'अधिकार नसताना टीका करणे' ह्याला आहे. आनंद यादव हे जर "कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पुजनाचे ।। किंव्वा परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम किंव्वा मना बोलणे नीच सोशीत जावे " ह्यालेव्हलच्या संत अवस्थेत पोहचले असतील आणि मग त्यांनी तुकाराम ज्ञानेश्वर ह्यांच्यावर टीका केली असेल तर मी माझा लेख विनम्रपणे मागे घेत आहे ! पण तसे काही असेल असे वाटत नाही , उलट ते वरच्या कोर्टात गेलेत असे ऐकुन आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या Tue, 06/10/2014 - 16:14
धन्या , हिंदु किंग इन इस्लामिक इंडियाबाबत तुझे काय मत आहे ? किंव्वा मनुस्मृती विषयी (की ज्यामधील मोजकाच मजकुर आक्षेपार्ह आहे) काय मत आहे ?
मी ही दोन्ही पुस्तके वाचली नाहीत. महापुरुष मान अपमानाच्या पलिकडे गेलेले असतात. किंबहूना ते त्यांच्या हयातीतही तसेच वागलेले असतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात एखाद्या पुस्तकात काही लिहिले असल्याने त्याने त्यांचा अपमान होत नसावा असे माझे मत आहे.

In reply to by धन्या

यशोधरा Tue, 06/10/2014 - 16:46
मी दोनही पुस्तके वाचली आहेत आणि दोनही मला आवडली आहेत. फाडून टाकण्याइतके आक्षेपार्ह त्यात काहीच नाही, असे माझे मत आहे.

In reply to by धन्या

राजेश घासकडवी Tue, 06/10/2014 - 20:56
माझ्या मनातील ज्ञानदेवांचे स्थान अढळ आहे, ते एखादया पुस्तकातील मजकुराने डळमळीत होणार नाही.
+१.
महापुरुष मान अपमानाच्या पलिकडे गेलेले असतात. किंबहूना ते त्यांच्या हयातीतही तसेच वागलेले असतात.
मंबाजीची गोष्ट आठवली. तुकारामाच्या म्हशीने मंबाजीच्या बागेतल्या झाडांची नासधूस केल्याबद्दल मंबाजीने त्याला बाभळीच्या फोकांनी फोडून काढलं.
किंव्वा मनुस्मृती विषयी (की ज्यामधील मोजकाच मजकुर आक्षेपार्ह आहे) काय मत आहे ?
मी मनुस्मृती वाचलेली आहे. त्यात 'मोजकाच' मजकुर आक्षेपार्ह आहे असं म्हणणं म्हणजे विनोद आहे. ते सोडा. पण मनुस्मृतीच्या सर्व प्रती नष्ट करा, असं कुठच्या कोर्टाने सांगितलेलं आहे? ती आहे तशीच राहू द्या. विरोधकांनीही मनुस्मृतीचं प्रतिकात्मक ज्वलन केलं. असा विरोध दर्शवणं वेगळं आणि कोर्टाकडून बंदी येणं वेगळं. हिंदू अस्मितेचा उदय होतोय खरा - पण तिचं रूपडं आणि वागणं मंबाजीसारखं असण्याऐवजी तुकाराम ज्ञानेश्वरासारखं असावं ही इच्छा आहे.

In reply to by राजेश घासकडवी

टवाळ कार्टा Tue, 06/10/2014 - 21:32
हिंदू अस्मितेचा उदय होतोय खरा - पण तिचं रूपडं आणि वागणं मंबाजीसारखं असण्याऐवजी तुकाराम ज्ञानेश्वरासारखं असावं ही इच्छा आहे.
प्रचंड सहमत ... पण आताचे जाणते राजेच असे आहेत की काय बोलणार... रच्याकने ... आत्ताच्या काळात कोणालाही "जाणता राजा" म्हणणे म्हणजे त्या खरोखरच्या जाणत्या राजाचा आपणच करत असलेला अपमान नाही??? या बाबतीत कशा कोणाच्या भावना दुखावत नाहित ... अगदी खर्या जाणत्या राजच्या वंशजांच्या सुध्धा... आपल्या भारतीयांच्या कु**वर छडी मारणारा कोणी असल्याशिवाय आपण सरळपणे कधीच वागत नाही

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ Tue, 06/10/2014 - 21:38
>>>>हिंदू अस्मितेचा उदय होतोय खरा - पण तिचं रूपडं आणि वागणं मंबाजीसारखं असण्याऐवजी तुकाराम ज्ञानेश्वरासारखं असावं ही इच्छा आहे. अत्यंत स्तुत्य इच्छा आहे पण दुर्दैवानं ती पूर्ण होणं अवघडच! बहुसंख्य लोक हुल्लडबाजी नि दंगा ह्यामध्येच दंग होताना आढळतील. समत्वानं विचार होणं शक्य नाही. बाकी इतरांची क्रिया आपल्या हातात नसतेच. आपल्याला शक्य असते ती प्रतिक्रिया. नि तीच कशी व्यक्त करायची ते ठरलं की जमलं. व्यक्ति पातळीवर जमतं बर्‍याचदा पण समष्टी बद्दल विचार करता हे जमणं शक्य नाही ही वस्तुस्थिती मान्य करावी लागते. कुणाला स्कोअर सेटल करायचे असतात तर कुणाला आपलं स्थान बळकट करायचं असतं. कुणाला पकड मजबूत करायची असते तर कुणाला आणखी काही!

In reply to by राजेश घासकडवी

मी मनुस्मृती वाचलेली आहे. त्यात 'मोजकाच' मजकुर आक्षेपार्ह आहे असं म्हणणं म्हणजे विनोद आहे.
मग मनुस्मृतीतील किती टक्के श्लोक जातीयतेचे समर्थन करतात ? ( हा तिरकस प्रस्न नाही , केवळ कुतुहल म्हणुन विचारतोय , मागे कोणीतरी पुरुषसुक्त जातीयतेचे समर्थन करते असे म्हणत होता त्याला मी पुराव्यानिशी सिध्द करुन दाखवले होते की त्यातील १०% पेक्षाही कमी श्लोक वर्णाश्रम व्यवस्थे विषयी बोलतात )
पण तिचं रूपडं आणि वागणं मंबाजीसारखं असण्याऐवजी तुकाराम ज्ञानेश्वरासारखं असावं ही इच्छा आहे.
ओके . माझ्या अपेक्षा काही अशा आहेत ...http://en.wikipedia.org/wiki/Reconquista http://en.wikipedia.org/wiki/Reconquista#mediaviewer/File:Spanish_reconquista.gif

In reply to by प्रसाद गोडबोले

आयला काय अफाट लॉजिक आहे! म्हणजे दहा किंवा अमुक% पेक्षा (अ‍ॅज ष्टिप्युलेटेड बाय द हानरेबल गोडबोलेसाहेब) जास्त कंटेंट आक्षेपार्ह असला तरच ते पुस्तक वाईट मानण्यात येईल. मग हेच लॉजिक संतसूर्य तुकारामला लावा की. सदर्हू पुस्तकात किती टक्के भाग आक्षेपार्ह आहे? (हा तिरकस प्रश्न नाही, केवळ कुतुहल म्हणुन विचारतोय)

In reply to by चिन्मय खंडागळे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/12/2014 - 00:13
करेक्ट ! आता तुम्ही जरा कुठे समजुन घेवु शकाल ... पहिली गोष्ट
दहा किंवा अमुक% पेक्षा (अ‍ॅज ष्टिप्युलेटेड बाय द हानरेबल गोडबोलेसाहेब) जास्त कंटेंट आक्षेपार्ह असला तरच ते पुस्तक वाईट मानण्यात येईल.
असं मी कुठेही म्हणलेले नाही , केवळ कुतुहल म्हणुन विचारले आहे . दुसरी गोष्ट % इज जस्ट वन पॅरामीटर ... आता मनुस्मृतीच काय तर पुरुषसुक्त अन गीतेही काही आक्षेपार्ह श्लोक आहेतच ... एव्हन बुध्दाच्या साहित्यातही असतील , फुलेंचा गणपतीवर टीका करणारा अखंड प्रसिध्द आहे ( बुध्दाने स्त्रीयांना बौध्द धर्मात प्रवेश देवु नये असे सुचवुन ठेवले आहे असे ही ऐकुन आहे ) दा विन्सी कोडही काही ख्रिच्यॅनिटीच्या पायाभुत विस्वासांना तडा लावणारी पहिली कादंबरी नक्कीच नसेल ... म्हणण्याचे तात्पर्य इतकेच तसं पाहिलं तर प्रत्येक लेखनात कोणाच्याना कोणाच्या भावना दुखावणारे काही भाग असतीलच ... % हा काही एकमेव पॅरामीटर नाही क्वालिटी हाही पॅरामीटर आहे , शिवाय ज्या समाजाशी ते लेखन संबंधीत आहे त्यांची बौधिक अवस्था इव्होल्युशनरी स्टेट हाही एक पॅरामीटर आहे ! आजवर हिंदु गपगुमान ऐकुन घेत आले कोणीही या वात्टेल ती टीका करा हिंदु आपले चिडीचुप ऐकुन घेत होतो आजवर हिंदुंवर अनेक टीका झाल्या पण निधर्मी सरकारने त्या विरुध्द काय केले ? आज पहिल्यांदा काही तरी केले असे दिसत आहे ... कुठे तरी हिंदुंना जाणीव होत आहे की आपण गप्प बसलो म्हणुन ही लोक गप्प बसणार नाहीत ..(ऐकीव माहीती नुसार संतसुर्य ह्या कादंबरीत तुकाराम जुगार खेळायचे असा काहीसा उल्लेख होता म्हणे , हिंदु किंग इन इस्लामिक इन्डियातील उल्लेख आपण जाणतोच ... आता ह्या गोष्टी काही सहिणु म्हणुन खपवुन घ्यायच्या नव्हेत ) ...म्हणुन ...."नाठाळाचे माथी काठी " हाणावीच लागेल ! ह्यामी वैयक्तिकली हिंदु अस्मितेचा उदय समजतो !

In reply to by प्रसाद गोडबोले

भृशुंडी गुरुवार, 06/12/2014 - 00:38
(ऐकीव माहीती नुसार संतसुर्य ह्या कादंबरीत तुकाराम जुगार खेळायचे असा काहीसा उल्लेख होता म्हणे , हिंदु किंग इन इस्लामिक इन्डियातील उल्लेख आपण जाणतोच ... आता ह्या गोष्टी काही सहिणु म्हणुन खपवुन घ्यायच्या नव्हेत )
ह्म्म्म.. म्हणजे कशाबद्दल लोकांनी आक्षेप घेतला ते तुम्हाला ठाउकच नाही, आणि तरीही तुम्ही ह्या निर्णयाचं समर्थन करताय. नक्की काय आक्षेपार्ह आहे ते समजेल का? मग आम्हालाही मोकळ्या मनाने हिंदु अस्मितेच्या उदयाचा आनंद घेता येईल, काय?

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त गुरुवार, 06/12/2014 - 01:22
महाराष्ट्र टाईम्स मधील वर दिलेल्या दुव्यात दिला आहे, तेवढाच मजकूर जर असेल, तर त्यात फारसे आक्षेप घेण्याजोगे वाटले नाही. अर्थात तसा उल्लेख तुकारामांच्या आत्मकथनपर कवनात आहे का, हेही बघणे अगत्याचे.

In reply to by प्रसाद गोडबोले

भृशुंडी गुरुवार, 06/12/2014 - 01:27
धन्यवाद. उतार्यांत काही आक्षेपार्ह दिसलं नाही. ह्यात नक्की आक्षेप घेण्यासारखं काय वाटलं, ते मुद्देसूद सांगाल का?

In reply to by प्रसाद गोडबोले

थॉर माणूस गुरुवार, 06/12/2014 - 10:28
कुठे लिहिले आहे? मलाही त्या उतार्‍यात तुकारामांना लागलेल्या व्यसनाविषयी लिहीलेले दिसले नाही. आणि माणसे संत म्हणून जन्माला येत नसतात, ती आपल्या कर्माने संतपदाला पोहोचतात. त्याआधी त्यांच्याकडूनही सामान्य माणसाकडून घडणार्‍या चुका झालेल्या असू शकतात. पण आपल्याकडे कुठल्याही 'मोठ्या' व्यक्तीमत्वाला अगदी देवत्वाच्या पातळीवर नेऊन ठेवायचे आणि मग त्याच्या पुर्वायुष्याबद्दल कुणी आवाज काढायचा नाही की काढू द्यायचा नाही असली काहीतरी विचित्र पद्धत आहे. अरे संत असले तरी माणूस होते ना? अध्यात्माचा मार्ग घेण्यापुर्वी झाल्या असतील की काही चुका त्यांच्याकडून. त्यांचा संत तुकाराम म्हणून आदर करणार्‍यांना त्यांच्या सामान्य तुकाराम म्हणून जगलेल्या आधीच्या आयुष्याशी काय देणं घेणं असावं मग? पुस्तके फाडायला निघालेल्या या लोकांना बहुदा "निंदकाचे घर असावे शेजारी" कुणी म्हटले याचा विसर पडलेला दिसतो.

In reply to by थॉर माणूस

सासवड्कर Fri, 06/13/2014 - 01:42
मी हे पुस्तक वाचले आहे . त्यात त्यांच्या व्यसन विषयी लिहिले आहे . तरुणपणी दुकानात येणाऱ्या मुलींशी लगट करायचे , त्या बदल्यात त्यांना उधार किंवा फुकट माल द्यायचे . उधारी घेण्याचे बहाण्याने मुलींचे आईवडील घरात नसताना घरात जावून बसायचे . शेवटी गावात याची चर्चा सुरु होते . असे लिहिले आहे . संत हेही माणूस होते . माणूस असला म्हणजे तो व्यसनी असलाच पाहिजे , तरुणपणी असे प्रकार केलेच पाहिजेत असे काही आहे का ? जर लेखकाला तसे आढळले असेल तर त्यांनी कोर्टात तसे पुरावे द्यायला हवे होते .

In reply to by सासवड्कर

संत हेही माणूस होते . माणूस असला म्हणजे तो व्यसनी असलाच पाहिजे , तरुणपणी असे प्रकार केलेच पाहिजेत असे काही आहे का ? जर लेखकाला तसे आढळले असेल तर त्यांनी कोर्टात तसे पुरावे द्यायला हवे होते . सहमत. अशा प्रवृत्तीचा निषेध व्हायलाच पाहीजे. लेखक झाले म्हणून काहीही लिहीतील काय? जसे दुर्योधनाला कोणी सज्जन माणूस सापडला नाही तसे कदाचित या लोकांना ते स्वतः सरळमार्गी नसल्याने कोणी अन्य सरळमार्गी असू शकेल असे वाटत नाही. असो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

टवाळ कार्टा Mon, 06/16/2014 - 18:49
जसे दुर्योधनाला कोणी सज्जन माणूस सापडला नाही
मग हे तरी कशावरुन खरे??? यालातरी पुरावा कुठेय? महाभारत लिखित स्वरुपात असले तरी ते पुराण आहे त्यात ५०% जरी खरे मानले तरीही वरचे वाक्य खरे मानता येणार नाही

In reply to by प्रसाद गोडबोले

टवाळ कार्टा Tue, 06/10/2014 - 16:32
प्लीज नोट : मी आधीही म्हणालो होतो की हरकत 'टीका करण्याला' नसुन 'अधिकार नसताना टीका करणे' ह्याला आहे.
तुम्ही कोणावर टिका करता?? (उगाच आपली १ शंका :) )

In reply to by प्रसाद गोडबोले

@माझ्या लेखना उद्देश इतकाच होता की आता असले भावना दुखावणारे लिखाण हिंदुंकडुन खपवुन घेतले जावु नये. >> या बाबतीत सावरकरांचा एक लेख इथे द्यायला पाहिजे.जो त्यांनी सनातनांन्या ठणकावण्यासाठी लिहिलेला होता. त्यात त्यांनी..ह्याच भावना का दुखवता?-वाल्यांना,-- सद्भावना दुखवू नयेत..पण असद्भावना मात्र दुखविल्याच पाहिजेत!...बुद्धिभेद करु नये,पण दुर्बुद्धिभेद केलाच पाहिजे! ...असं ठणकावलेलं आहे. कारण जी दुखावते ती सद्भावना आहे..की असद्भावना आहे...याचा निवाडा आधी झाला पाहिजे. मला गोड खायला प्रचंड अवडतं.मग उद्या डॉक्टर नसलेल्या (अधिकार नसलेल्या) जरी कुणी- "मिठाईवर बंदी घातली पाहिजे,कारण ती डायबॅटिक लोकांना मारायसाठी तयार केलेली आहे." असं म्हटलं तर माझी सद्भावना दुखावली? का असद्भावना दुखावली??? निवाडा काय द्यायचा? (हे उदाहरण सगळ्या धार्मिक/सांस्कृतीक/सामाजिक क्षेत्रातल्या "भावनादुखी" साठी आहे. @हिंदु सहिष्णु आहे ह्याचा अर्थ कोणीही उठसुठ वाट्टेल ती टीका करावी असा नव्हे.>>> हिंदू आपापसात अत्यंत असहिष्णू रहात आलेले आहेत. त्यामुळे आपण सहिष्णू आहोत..हा भ्रम लवकरात लवकर सोडून दिलेला बरा! दुसरं म्हणजे... हिंदू आपापसात असहिष्णू आहेत,,म्हणून ते अहिंदूंच्या समोर विखुरलेले आणि दुर्बल रहातात. ती दुर्बलता किंवा भ्याडपणा आहे..सहिष्णूता नव्हे! @'अधिकार नसताना टीका करणे' >>> अधिकार म्हणजे ज्याच्यावर टीका करायची तेव्हढ्या पातळी आणि लायकी पर्यंत पोहोचलेले लोक असाच ना? मग असेच बरेच लोक आहेत...जे पूर्णतः अधार्मिक क्षेत्रातले आहेत. ज्यांनी केलेलं लेखन, हाच अधिकाराचा मुद्दा लाऊन धुडकाऊन दिलं जातं. म्हणजे मग शिवाजीच्या राज्यकारभारातली एखादी चूक काढणारा माणूस राज्यशास्त्र या विषयातला प्रविण असून भागायच नाही...तुमच्या म्हणण्याप्रमाणे तो शिवाजीच्या पातळीचा हवा..नाही का? हे अत्यंत निरर्थक आणि चुकिचं आहे. शिवाय,चुक काढण्यासाठी अगर गैरगोष्टी दाखवून देण्यासाठी..., ज्या क्षेत्रातला अधिकार असायला हवा! असं तुंम्ही म्हणत असता..ती क्षेत्र अधिकार असण्याची नव्हे..तर त्यातला अभ्यास असण्याची असतात. अधिकाराचा काय संमंध???????? ज्ञानेश्वरांचा भिंत चालवण्याचा चमत्कार..या कथित घटनेवर भाष्य करण्यासाठी..कोणत्याही माणसला त्या क्षेत्रातला,म्हणजे संतपणा मधला अधिकार आवश्यक नसून,सदर घटनेच्या संदर्भातला(भैतिकशास्त्रातला-चमत्कार तपासायचा) अभ्यास आवश्यक असतो! म्हणूनच मी म्हणतो...
अधिकाराचा काय संमंध???????

In reply to by अत्रुप्त आत्मा

धन्या Tue, 06/10/2014 - 22:46
ज्ञानेश्वरांचा भिंत चालवण्याचा चमत्कार..या कथित घटनेवर भाष्य करण्यासाठी..कोणत्याही माणसला त्या क्षेत्रातला,म्हणजे संतपणा मधला अधिकार आवश्यक नसून,सदर घटनेच्या संदर्भातला(भैतिकशास्त्रातला-चमत्कार तपासायचा) अभ्यास आवश्यक असतो! म्हणूनच मी म्हणतो...
माझ्या मनात ज्ञानदेवांबद्दल नितांत आदर आहे. मी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरीपाठाचे अभंग वाचलेले आहेत. अगदी ज्ञानदेव नाथ संप्रदायाचे अनुयायी म्हणून प्र. न. जोशींचा "नाथसंप्रदाय" हा अभ्यासपुर्ण ग्रंथही वाचलेला आहे. तरीही हा भींत चालवण्याचा चमत्कार माझ्या पचनी पडत नाही. तसे झाले असेल तर न्युटनचा गतीविषयक पहिला नियम निकालात निघतो. अर्थात ते होणे नाही. आता कुणी जर म्हणत असेल की ज्ञानदेवांनी आपल्या योगसामर्थ्याने भींत चालवली तर म्हणोत बापडे. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

बाकी इतर मुद्द्यांचे खंडन करीत बसत नाही ....फक्त एक विचारतो ...
शिवाय,चुक काढण्यासाठी अगर गैरगोष्टी दाखवून देण्यासाठी..., ज्या क्षेत्रातला अधिकार असायला हवा! असं तुंम्ही म्हणत असता..ती क्षेत्र अधिकार असण्याची नव्हे..तर त्यातला अभ्यास असण्याची असतात. अधिकाराचा काय संमंध?
अधिकार आणि अभ्यास ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ! समजा तुमची गाडी बंद पडली तर तुम्ही इंजिनियर कडे जाणार की मेकॅनिक कडे ?...( इंजिनियरचा अभ्यास असेल ...अन मेकॅनिककडे नसेल पण मेकॅनिक कडे अधिकार असेल ! ) रामकृष्ण परमहंसांचा असा काय अभ्यास होता ? पण अधिकार होता ! अभ्यासाने फक्त बुध्दीची खाज भागते ...अधिकार ही त्यापेक्षा खुप मोठ्ठी गोष्ट आहे !!

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/12/2014 - 00:20
बायदवे बुवा राग मानु नका पण
अधिकाराचा काय संमंध???????
हे पाहुन मला पु.लं देशपांडेंच्या मुंबैकर पुणेकर आणि नागपुरकर मधील डायलॉग ची आठवण झाली
"तुम्हाला जर पुणे कर व्हायचं असेल तर प्रत्येक विषयावर मत व्यक्त करता आलं पाहिजे ...आता 'अमेरिकेची अर्थव्यवस्था कशी सुधारावी' ह्यावर बोलताना आपण पुणे मुन्सीपाल्तीत उंदीर मारायच्या कामावर आहोत हे विसरुन बोलता आले पाहिजे ... अमेरिकेची अर्थ व्यवस्था ..हं ...ठोका "
इकडे पिंपरी चिंचवड हिंजवडीला तशी काही अट नाही नाही ना बुवा :D

In reply to by प्रसाद गोडबोले

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/12/2014 - 01:33
@बाकी इतर मुद्द्यांचे खंडन करीत बसत नाही ..>>> का बरं??? :D करा ना..तुम्हाला करता येतं की नाही..ते कळू दे की आंम्हाला! ;) @अधिकार आणि अभ्यास ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ! >>> हो आहेत..पण तुंम्ही ज्या क्षेत्राबद्दल चर्चा करत आहात,तिथे या दोन्ही गोष्टींचे तुमचे स्विकृत अर्थ भिन्न आहेत. हे बरोबर आहे की नाही? ते सांगा..तुमचं चर्चेचं क्षेत्र पारलौकिक आध्यात्मिक अनुभवांचं आहे...तिथे अधिकार या शब्दाचा अर्थ त्याक्षेत्रातील अधिकाधिक सिद्ध अनुभव असा होतो.त्यामुळे तिथे अभ्यास, हा शब्दसुद्धा अवाजवी आणि गैरलागू होतो...पण त्याच अधिकार शब्दाचा इहलौकिक अर्थ-त्या क्षेत्रातला अभ्यास ज्याला असतो..त्यालाच त्या क्षेत्राचे अधिकारी म्हणवता येते..असा आहे. त्यामुळे या चर्चा विषयाच्या अनुषंगानी जाताना,तुम्ही म्हणता त्या दोन गोष्टी फक्त वेगवेगळ्या न रहाता..वेगवेगळ्या क्षेत्रातल्याही होऊन बसतात..नै का? @समजा तुमची गाडी बंद पडली तर तुम्ही इंजिनियर कडे जाणार की मेकॅनिक कडे ?...>>> का बरं असा गैरलागू प्रश्न विचारलात??? गाडी बंद पडली तर इंजिनियरकडे जातच नाहीत..मेकॅनिक कडे जातात गैरलागू उदाहरणः- खरतर आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रातल्या वादविवादात इहलौकिक उदाहरण लागूच पडत नाहीत. असा निष्कर्ष मी काढलेला आहे. कारण इहलोक ही वस्तुस्थिती..तर धर्म आध्यात्म हा केवळ कल्पनाविलास..किंवा सत्याभास! पहिलं सत्य आणि दुसरा भ्रम..कशी होणार तुलना??आणि कसं मिळणार लागू पडणारं उदाहरण??? ..असो! @( इंजिनियरचा अभ्यास असेल ...अन मेकॅनिककडे नसेल पण मेकॅनिक कडे अधिकार असेल ! )>>> कैच्याकै निरर्थक विधान!..मॅकॅनिकचा अभ्यास नसतो????????????? आणि फक्त अधिकार असतो???????? बाप रे बाप!!!!!!!! आणि मॅकॅनिककडे अधिकार आलेला असतो,तो त्याच्या गाड्या दुरुस्त करण्याच्या अभ्यासातूनच!हे कसं विसरलात हो???? आणि मॅकॅनिक काही--"केवळ आपण गाडी दुरुस्त करतो आहे..करतो आहे..ती ठिक होते आहे..होते आहे..झाली..ठीक झाली..." असा ध्यानधारणेसारखा... ध्यान लाऊन मनात आभास निर्माण करून,गाडी दुरुस्त केल्याची अनुभूती आल्याचं भक्तांना सांगून अधिकाराचं प्रमाणपत्र मिळवत नाही... हे तर उघड आहे ना? त्यामुळे-एकदा तुमच्या आध्यात्मिक/धार्मिक क्षेत्रात अधिकार कशाकशाला म्हणतात? ते सांगा..म्हणजे..त्याचे घटक काय काय आहेत?..ते(आंम्हालाही ;) )कळू द्या! @रामकृष्ण परमहंसांचा असा काय अभ्यास होता ? पण अधिकार होता ! >>> हेच्च ते..! हा अधिकार अधिकार म्हणजे,त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात केलेली साधना(तिचा अनुभव) आणि त्यांची व्यक्ति म्हणून असलेली शुचिता हाच ना? मग..त्यांना देवानी दर्शन दिल्याची जी काय अनुभूती होती..तीची चिकित्सा केलेली व्यक्ति (किंवा अशा सगळ्याच घटनांच्या चिकित्सा/त्यावर टीका करणार्‍या व्यक्ति) ह्या अनैतिकही नव्हत्या..नसतात.(सामाजिक चळवळींमधल्या उथळ तसेच सूडबुद्धीच्या अपवादात्मक व्यक्ति सोडून) आणि अधिकार म्हणाल,तर त्यांना(विरोधकांना) ह्या सगळ्या संत महात्म्यांच्या आध्यात्मिक धार्मिक साधना/ध्यानधारणांच्या प्रक्रीयांचं मनोवैज्ञानिक-ज्ञान त्यांच्यापेक्षा अधिक होतं आणि आहे. @अभ्यासाने फक्त बुध्दीची खाज भागते...अधिकार ही त्यापेक्षा खुप मोठ्ठी गोष्ट आहे !!>>> प्रचंड भंपक विधान. आभ्यासानी जर का फक्त बुद्धिची खाज भागते, असं असतं..तर अखिल जगतात..अंबेडकर/सावरकरांपासून ते अनेक इहलौकिक क्षेत्रातले नामवंत अभ्यासू समाज सुधारक समजाच्या उपयोगी आलेच नसते. आणि अधिकार कुणी कुणाला द्यायचा???...चिकित्सकानी/टीकाकारानी/लेखकांनी, ज्या व्यक्ति-विषयांवर टीका/अभ्यास करायचा त्यांच्याकडन,अधिकार-असल्याची प्रमाणपत्र आधी मिळवायची की काय? आणि ही प्रामाणं व त्याची पत्र कोणत्या निकषांवर मिळवायची???..त्यात..पुन्हा, धर्म/आध्यात्माच्या क्षेत्रात एकवाक्यता येणच शक्य नसतं कारण,तो प्रांत सगळाच्या..सगळा स्वसंवेद्य..म्हणजे केवळ आपापल्या(ज्याच्या/त्याच्या) अनुभवांवर आधारित..तिथे तुम्म्हाला अधिकारी असल्याची,प्रमाण किंवा किमान पातळीच ठरवता येत नाही..कारण आडातच नाही..तर पोहोर्‍यात कुठून येणार? मग कसं करणार तुंम्ही टीकाकाराच्या अधिकाराच मापन...आधी तुमच्याकडे त्याच माप असायला हवं ना..? ते आणा,आणि मग या अधिकाराचा वाद खेळायला! आता...या अधिकाराच्या बाबतीतला अजुन एक राहिलेला प्रश्न-तो म्हणजे व्यक्ति सदाचरणी म्हणजे इहलौकिक दृष्ट्या नितीमान असण्याचा*!...तर तुम्ही म्हणता त्या क्षेत्राच्या विरुद्ध बाजूचे अनेक अभ्यासक/टीकाकार/चिकित्सक ..हे नितिमान होते..सदाचरणीही होते..तरीसुद्धा मी आधी म्हटल्या प्रमाणे, हा अधिकाराचा गैरलागू आणि भंपक मुद्दा काढून त्यांची निरिक्षणं/परिक्षणं/निष्कर्ष..अशीच धुडकावून लावली जातात...त्याचं काय? याचा एकदा विचार करा. *(आध्यात्मिक धार्मिक पंथात,{वादविवादाच्या वेळी..} अधिकारा'च्या मुद्यात- हे ही एक लक्षण आवश्यक मानतात..बरोबर ना?)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस गुरुवार, 06/12/2014 - 08:46
आत्मुबुवांचे मेगाबायटी प्रतिसाद पाहायला मिळत नाहीत. आज ते मिळालेत हीच ती अनुभूती.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/12/2014 - 11:39
ह्म्म ... एकुणच आपले ह्या विषयावर एकमत होईल असे दिसत नाही ... फक्त जाता जाता एक शेवटचा प्रश्न १)निवृत्ती ज्ञानेश्वरची मुंजही झाली नव्हती सो त्यांचा सनातन धर्माचा ,,वेद ,उपनिषद वगैरेंचा,अभ्यास असण्याची शक्यता फारच कमी आहे , जे काही ज्ञान आहे ते कदाचित लहानपणी वडीलांनी गीता शिकवली असेल त्यातुन किंव्वा निवृत्तींवर जी गुरु कृपा झाली त्यातुन प्राप्त झालेले अन अनुभवातुन 'अधिकारात' रुपांतरीत झालेले ... आता तत्कालिन मंडळी म्हणजे पैठण आळंदीचे ब्राह्मण वगैरे हे नक्कीच जास्त अभ्यास केलेल्रे लोक होते , चांगदेवांचाही १४०० नाही पण किमान १४ वर्षांचा तरी सखोल योगाभ्यास नक्कीच असावा ... मग ह्यातील श्रेष्ठ कोण ? अधिकार असलेले ज्ञानेश्वर की अभ्यास असलेले इतर ? २)सेम होल्ड्स फॉर तुकाराम , तुकाराम स्वतःच्याच अभंगात म्हणतात की शुद्र याती जन्मलो सो त्यांचाही अभ्यास असण्याची धर्माचे अध्ययन असण्याची शक्यता फारच कमी आहे जास्तीत जास्त ज्ञानेश्वरी आणि कदाचित एकनाथी भागवत वाचलेले असावे ... त्यामानाने मंबाजी रामशास्त्रजी सालोमालो वगैरे लोक नक्कीच प्रकांड पंडीत असावेत ... मग ह्यातील महान कोण ? अधिकारी तुकाराम की 'अभ्यासु' इतर ? अजुन खुप उदाहरणे देता येतील ... गोंदवलेकर महाराज , गाडगे बाबा , वगैरे लोकांनीही किती अभ्यास केला होता देव जाणे अ‍ॅस्ट्रोनॉट श्रेष्ठ की अ‍ॅस्ट्रोनॉमर असा हा वाद आहे ... आणि माझ्यामते अ‍ॅस्ट्रोनॉट हेच श्रेष्ठ आहेत ..अअ‍ॅन्ड वी कॅन अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री हीयर :)

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन गुरुवार, 06/12/2014 - 12:49
मुंज झाल्यानेच किंवा ब्राह्मण असल्यानेच सनातन धर्माचा अभ्यास होतो इ. वाचून अतिशय करमणूक झाली. चालूद्या.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/12/2014 - 14:46
सनातन धर्माचा अभ्यास होतो
वेद , पुराण , स्मृती , दर्शन वगैरे वगैरे ....किमा गीता , उपनिषदे आणि ब्रह्मसुत्र ह्या तीन ग्रंथांच्या अभ्यासाला मी सनातन धर्माचा अभ्यास मानतो , ज्ञानेश्वरांचा काळाचा रेफरन्स घेवुन पाहिले तर मुंज न झालेल्याला किंव्वा ब्राह्मण नसलेल्याला ह्यांचा अभ्यास करण्याची संधी मिळत नसणार ... काळाचा संदर्भ सोडुन संतांच्या जीवनाचा अभ्यास करता येणार नाही ... असो फार बिषयांतर झाले करमणुक कराची पावती कोणत्या पत्त्यावर पाठवु *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन गुरुवार, 06/12/2014 - 15:28
तुकोबा जेव्हा म्हणतात की मला काही कळत नाही, ते म्हंजे आईन्स्टाईनने मला काही फारसे कळत नाही असे म्हटल्यापैकीच आहे. ते एक वाक्य धरून आईन्स्टाईनला काही कळत नाही असे म्हणणे जितके ग्राह्य आहे तितकेच हेही आहे. अन काळाचा संदर्भच घ्यायचा झाला तर ब्राह्मणेतर लोकांना याचा अभ्यास करायला मिळत नव्हता हेही तितकेच असत्य आहे. भक्ती चळवळ दृढमूल झाल्यापासून अशी पॅरलल व्यवस्था तयार झालेली आहेच- त्याच्याही आधीपासून असावी. अन आज वाटतो तितका तो सरळधोपट प्रकार कधीच नव्हता. पण आज त्या काळचे फारसे कै उरलेले नसल्याने एकांतिक विचार करणार्‍यांचेही फावतेच..असो. बाकी चालूद्या.

In reply to by प्रसाद गोडबोले

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/12/2014 - 15:33
@१)निवृत्ती ज्ञानेश्वरची मुंजही झाली नव्हती सो त्यांचा सनातन धर्माचा ,,वेद ,उपनिषद वगैरेंचा,अभ्यास असण्याची शक्यता फारच कमी आहे , जे काही ज्ञान आहे ते कदाचित लहानपणी वडीलांनी गीता शिकवली असेल त्यातुन किंव्वा निवृत्तींवर जी गुरु कृपा झाली त्यातुन प्राप्त झालेले अन अनुभवातुन 'अधिकारात' रुपांतरीत झालेले ... आता तत्कालिन मंडळी म्हणजे पैठण आळंदीचे ब्राह्मण वगैरे हे नक्कीच जास्त अभ्यास केलेल्रे लोक होते , चांगदेवांचाही १४०० नाही पण किमान १४ वर्षांचा तरी सखोल योगाभ्यास नक्कीच असावा ... मग ह्यातील श्रेष्ठ कोण ? अधिकार असलेले ज्ञानेश्वर की अभ्यास असलेले इतर ?>>> पलटी खाल्ल्याबद्दल हबिनंदण हो !!! :D परत परत अधिकार अधिकार करत बसा..आणि तीच तीच निरर्थक /गैरलागू उदाहरणे देत बसा! पण...मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ नका...तेंव्हा एकं-दरीत..चालू द्या...! :D @त्यामानाने मंबाजी रामशास्त्रजी सालोमालो वगैरे लोक नक्कीच प्रकांड पंडीत असावेत ... मग ह्यातील महान कोण ? अधिकारी तुकाराम की 'अभ्यासु' इतर ?>>> मंबाजी आणि इतर अभ्यासूही नाहीत..अधिकारीही नाहीत..टगे आणि दांभिक आहेत.. (मुद्दाम त्यांची पार्टी बदलू नका) आणि पहा बरं-पुन्हा एकदा तुंम्ही प्रस्तुत चर्चा विषयाच्या बाबतीत गैरलागू उदाहरण दिलत..(म्हणूनच ते अदखलपात्र आहे!) आणि तुकारामांचा अधिकारही जीवनाविषयीच्या अभ्यासातूनच आहे..तुम्म्ही म्हणता तसल्या पोकळ भंपक-अधिकारातून नाही.(हे विसरलात)त्यामुळे तुकारामांना आपल्या-बाजुला घेण्याचा प्रयत्न करू नका. आणि तुम्ही म्हणता--तसल्या--अधिकाराची व्याख्या करा/सांगा(टाळू नका) मग त्यात व्याख्येत तुमच्याकडलं कोणकोण बसतं ते आपण ठरवू! ================= आणि ही इथली चर्चा सोडून द्या..(मी हरलो...असे माना.. :) ..) फक्त..मी सांगतो ती पुस्तके वाचा आणि जमलं तर त्यांचा प्रतिवाद इथे (क्रमवार) मांडा.. १) मनुस्मृती- काही विचार...(नरहर कुरुंदकर) २)मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती..(डॉ.आ.ह.साळुंखे) ३)विद्रोही तुकाराम...(डॉ.आ.ह.साळुंखे)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/12/2014 - 18:10
मला तुमचा मुद्दाच कळाला नाही... अभ्यास आणि अधिकार ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अन एकाने दुसरा येईलच असे नाही इतकेच मी म्हणत आहे . असो. बाकी तकारामानां मी कशाला माझ्या बाजुला ओढतोय उलट मीच त्यांच्या बाजुला जायचा प्रयत्न करतोय !! आणि जीवनविषयक अभ्यासाविषयी बोलाल तर त्यांच्या पेक्षा जास्त अभ्यास त्यांच्या पत्नीचा होता असेच म्हणावे लागेल.... मस्त प्रपंचात रहावे सावकारीचा व्यवसाय पहावा पोराबाळांचे पोट भरावे चवीपुरते देव देव करावे बस्स ! ============================= मी चर्चा हार जीत साठी करत नसतो ... "अधिकार नावाची गोष्ट नसतेच अभ्यासाने माणसाला ज्या गोष्टीचा अभ्यास आहे त्यावर बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो ! " असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते काही मला पटत नाही , ( प्रचिती , अनुभव आणि योगदान नसलेला अभ्यासी माणुस माझ्या साठी अनधिकारीच आहे ) , तुमचे मत तुम्ही पटवुन दीले तर आनंदाने मान्य करेन ! आ.ह. साळुखे अत्यंत वादग्रस्त व्यक्तीमत्व आहे ... तुम्ही त्यांच्या मार्गाने जात असाल तर _/\_ :)

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/12/2014 - 18:21
लहानपणी एक गोष्ट ऐकली होती ती आठवली आता ही तुकारांची आहे की नाही की प्रक्षिप्त आहे ह्यावर आपण नंतर कधी तरी वाद घालु "एका बाईचा मुलगा सारखा गुळ खात असतो , सगळे दात किडलेले असतात , आणि कितीही सांगुन तो काही ऐकत नसतो , मग शेवटी ती बाई विचार करते की तुकाराम बुवांसारख्या आदरणीय व्यक्तीने सांगितले तर कदाचित तो ऐकेल ... ती पोराला तुकारामांकडे घेवुन येते व म्हणते की 'महाराज , सारखा गुळ खातो हा , ह्याला जरा चार शब्द सांगा तुम्ही सांगितलं तर ऐकेल'... तुकाराम महाराज म्हणतात 'बाई तुम्ही ह्याला एक आठवड्याने माझ्या कडे घेवुन या मग मी सांगतो काय सांगायचे ते ' . बाई पोराला घेवुन येते एक आठवड्या नंतर ... महाराज त्या मुलाला जवळ घेवुन कुरवाळुन सांगतात 'बाळा , सारखा सारखा गुळ खात जाऊ नकोस त्याने दात किडतील ... ऐकणार ना माझं ?' आणि मग तो मुलगा नंतर खरचं गुळ खायचे सोडुन देतो . पण ती बाई आश्चर्यचकित होवुन महाराजांना म्हणते ' तुम्हाला हे एक आठवडा आधीच नव्हतं का सांगता येत ?' महाराज म्हणतात ' आलं असतं सांगता पण मला केवळ ते माहीत होतं ... गेला आठवडाभर मी स्वतः गुळ खाणे सोडुन पाहिले मग लक्षात आले की हे किती अवघड आहे पण तरीही शक्य आहे ... मग मला तसे सांगण्याचा अधिकार प्राप्त झाला... उगाचच नुसत्या अभ्यासाने त्याला सांगितलं असतं तर त्याला ते पटलं नसतं आणि कदाचित माझं मन मला खात राहिलं असतं की जे स्वतःला जमत नाही ते दुसर्‍यांना उपदेशितो म्हणुन '!! " ||

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त गुरुवार, 06/12/2014 - 18:37
अगदी शेम हीच गोष्ट (फक्त गुळाऐवजी साखर) गांधीबाबा (राहुलबाबा नव्हेत, ते आपले नोटांवरले चिरपरिचित बाबा) बद्दलही सांगितली जाते, हे कसेकाय बुवा? अन्नू मलिक वगैरें मूजिक ढापतात, तसे त्यांनीपण तुकारामांची गोष्ट ढापली की काय?

In reply to by प्रसाद गोडबोले

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 06/12/2014 - 19:04
अ‍ॅस्ट्रोनॉट श्रेष्ठ की अ‍ॅस्ट्रोनॉमर असा हा वाद आहे
एकाही विषयातलं काहीही माहित नसताना श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवलं की असंच काही(च्या काही) वाटणार. आजचा दिवस गडबोल्यांनी सत्कारणी लावला.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>एकाही विषयातलं काहीही माहित नसताना श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवलं की असंच काही(च्या काही) वाटणार. >> विक्षिप्त बाई, अहंकार सोडा. तुम्हाला सगग्ळ्यातलं सग्गळं कळतं असा जो अहंकार आहे ना. सोडा जरा. बाकी अनेकांना अनेक गोष्टी माहित अस्तात म्हटलं.

In reply to by प्रसाद गोडबोले

बाबा पाटील Sat, 06/14/2014 - 19:49
ह्यो धर्म आणी धर्माब्यास म्हणजी काय रे भाउ,म्हणजी मुंजी वाले बामण सोडुन ती पुस्ताक कुनी वाचायचीच नाय का ? बाकी समदी आडाणी गोट का काय गुर्जी ? मंग माऴ्याचा जोतिबा आणी हरिजंनांचा बाबा पण तुह्या मते ठार आडाणी असल नार भावु. रागावु नका दादा पण मला कुणबाटाला जरा डोस्क्यात किडा वळवाळला म्हणुन इचारला. आपला- आडाणी गावचा अंगठेबहाद्दुर बाबाजी पाटील.

In reply to by धन्या

आनन्दा Tue, 06/10/2014 - 16:37
तुमच्या मनातले नाही होणार कदचित. पण एखाद्या लहान मुलाच्या हातात हे पुस्तक पडले तर? संवैधानिक मार्गाने बंदी आणणे केव्हाही योग्यच. नपेक्षा तुम्ही जे काही लिहिलेत त्याचे पुरावे द्या. बाकी एक प्रश्न आहे - या पुस्तकात जर ते "कालपनिक" चे डिस्क्लेमर टाकले तर त्यांना परत प्रकाशनाची अनुमती मिळेल का?

धर्मराजमुटके Tue, 06/10/2014 - 16:33
कसे काय बुवा तुम्ही अस्मिता बिस्मीता शोधता अशा प्रकरणांत ? अहो हा फक्त कोर्टाचा निकाल आहे. तो फक्त समोर आलेल्या पुराव्यांवर अवलंबून असतो. अवांतर : कोर्टाला मराठीत न्यायालय असा समानार्थी शब्द कोणी शोधला हो ? त्याला फार्फार तर निकालालय किंवा निवाडागृह म्हणणे ठीक.

चित्रगुप्त Tue, 06/10/2014 - 22:42
या संदर्भात भाऊ तोसरेकर यांचा लेख 'मोदी जिंकले पण हरवले कोणाला?' वाचनीय आहे: http://panchanaama.blogspot.in/2014/05/blog-post_18.html त्यातील थोडासा भागः ..........अल्पसंख्य असलेल्यांनी बहुसंख्य असलेल्यांच्या भावना, श्रद्धा, इच्छा वा आकांक्षांवर कुरघोडी करणे; असे जे चित्र मागल्या तीनचार दशकात अट्टाहासाने व आक्रमकपणे निर्माण करण्यात आले होते, त्याच्या विरोधात हिंदू समाजामध्ये मोठीच नाराजी व क्रोध खदखदत होता. जणू भारतामध्ये हिंदू असणे म्हणजेच गुन्हा आहे आणि हिंदू नसणे म्हणजेच महापुण्य आहे; असा आग्रह धरला जात होता... ... उगाच कोणाच्या अंगावर जायचे नाही, पण कोणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घ्यायला मागेपुढे पहायचे नाही, असा स्वभाव असलेल्या मोदींनी बारा वर्षात संयमाने त्यावरचे उपाय शोधले, कुठलीही हानी अपाय होऊ न देता तेच उपाय गुजरातमध्ये अंमलात आणले. त्यातून त्यांची हिंमत वाढली आणि दुसरीकडे त्यांच्या उपायांचे उर्वरीत भारतातल्या अशा दुखावलेल्या समाजाला आकर्षण वाटू लागले. त्यातूनच मग थेट देशाचे नेतृत्व करून अशा थोतांडाचे मूळ असलेल्या नेहरूवादाला खुल्या मैदानात आव्हान देऊन पराभूत करायचे मनसुबे मोदींनी रचले....

In reply to by चित्रगुप्त

@अशा थोतांडाचे मूळ असलेल्या नेहरूवादाला खुल्या मैदानात आव्हान देऊन पराभूत करायचे मनसुबे मोदींनी रचले....>>>बरोब्बर शब्दरचना..+++१११ अतिशय सहमत!

In reply to by चित्रगुप्त

हवालदार गुरुवार, 06/12/2014 - 20:52
पण एकदम चपखल. " जणू भारतामध्ये हिंदू असणे म्हणजेच गुन्हा आहे आणि हिंदू नसणे म्हणजेच महापुण्य आहे; असा आग्रह धरला जात होता..." असे झाले होते खरे.

भृशुंडी Tue, 06/10/2014 - 22:54
जबरदस्त! येऊ द्या प्रसाद साहेब, अजून असेच जाज्वल्यपूर्ण लिखाण येऊ द्यात! ही पुस्तके आपण वाचली काय न वाचली काय - त्याने काय फरक पडतो, नाही का? पुस्तक काय, मी तर म्हणतो कोणी आपल्या खाजगी वह्यांमध्ये सुद्धा असे अश्ल्याघ्य विचार लिहिता कामा नये. त्यावरही बंदी आणायलाच हवी. हिंदूंच्या महापुरुषांचा अपमान कुणीही लुंग्यासुंग्याने करावा आणि त्यांनी गप्प बसावे- ही परिस्थिती उरली नाही. आज जर कुणी असा वेडावाकडा विचारही केला, तर त्यांना त्याबद्दलही शिक्षा मिळालीच पाहिजे. असा जळजळीत लेख लिहून समस्त हिंदूंच्या भावनांना वाट फोडल्याबद्दल अभिनंदन!

भगव्यांना, खाकी हाफ पँट वाल्यांना शिव्या देणं, हिरव्यांच्या बोकड दाढ्या कुरवाळणं हिचं खरी धर्मनिरपेक्षता असते प्रसाद दादा....हिंदु मेला तरी चालेल...वोट बँक मेली तर कसं व्हायचं? नशिब खांग्रेस चं वाट्टोळं झालं आत्ता नाहीतर व्हॅट, एल.बी.टी., एजुकेशन टॅक्सेस, सेस बरोबर जिझिया पण लावला असता.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

भृशुंडी Wed, 06/11/2014 - 00:13
नाही तर काय? हिंदु मेला तरी चालेल, पण शीख,जैन,बौद्ध, मुस्लीम, ख्रिश्चन, आदिवासी, नास्तिक अशांना धक्का लागता कामा नये. हिंदू धर्मासारखा सर्वसमावेशक ( ते लोकायत वगैरे फालतू लोक सोडून द्या) धर्म दुसरा नाही, हे या देशाला कळेल तो सुदिन.

चित्रगुप्त Wed, 06/11/2014 - 23:09
फार काळानंतर 'जाज्वल्य' हा शब्द वाचायला मिळाला. असेच जाज्वल्य लिखाण येऊ द्या प्रसाद्पंत. निवडणुकांपूर्वी नेहरूशाहीत पोसली जाऊन बुजबुजलेली तथाकथित 'इंटलेक्चुअले' मोदीविरोधात एकत्र येऊन काहीतरी करणार होती म्हणे, त्याचे काय झाले, याची बतमी आलीय का कुठे? आणि त्या चमत्कारी फादर बद्दल (त्यांचे काय नाव? लिहायला डरू नका प्रसादपंत) अंनिस, दाभोलकर यांनी आवाज उठवलेला आहे का?

In reply to by धन्या

माहितगार गुरुवार, 06/12/2014 - 11:07
संजय सोनवणींनी ब्लॉगवर प्रतिक्रीया नोंदवताना त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी न्या. सौ. के. पी. जैन यांनी दिलेला संपुर्ण निकाल वाचला आहे. कविता महाजनांचीही ब्लॉगवर प्रतिक्रीया आली आहे. प्रहार मध्येही या विषयावर लेख आला आहे. एकुण काय तर तुम्ही वाल्मिकी ऋषिंच्या वंशातले असाल तर पुराव्या अभावी होत असलेली संतनिंदा थांबवण्याची आता मागणी करू शकता. उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय काय तो निकाल येत्या काळात देतीलच. पण या धागा लेखकाने काढलेला अन्वयार्थ माननिय न्यायाधिशांनाही त्यांच्या निवृत्ती नंतर सवडीने वाचण्यास जरूर मिळो, सध्या एवढीच शुभेच्छा.

म्हैस गुरुवार, 06/12/2014 - 13:07
हि दोन्ही पुस्तक मी वाचलेली नाहीयेत . पण आत्ता एवढा वाद चाललाय म्हणल्यावर वाचेन .
अध्यात्माचा मार्ग घेण्यापुर्वी झाल्या असतील की काही चुका त्यांच्याकडून
सहमत .तुकाराम महारज देशोधडीला लागायच्या आधी सामान्य माणूसच होते . त्या काळात काही चुका केलेल्या असू शकतात . जशी जशी त्यांच्यापासून १ - १ गोष्ट दूर गेली तसे तसे वैराग्य वाढू लागले आणि सत्याचा शोध घेण्याची ओढ निर्माण झाली
पुरुषसुक्त अन गीतेही काही आक्षेपार्ह श्लोक आहेतच
काही म्हणजे नक्की कोणते श्लोक आहेत ते इथे स्पष्टपणे सांगा . चर्चा करता येईल
तरीही हा भींत चालवण्याचा चमत्कार माझ्या पचनी पडत नाही. तसे झाले असेल तर न्युटनचा गतीविषयक पहिला नियम निकालात निघतो. अर्थात ते होणे नाही.
तुम्ही पुस्तकं बरीच वाचली असतील पण स्वतःचा योगशास्त्राचा अभ्यास किती आहे? न्युटनचा किवा कुठलाही भौतिक शास्त्राचा नियम लावण्याचं तात्पर्य काय ? अध्यात्मशास्त्राचा नियम भौतिक शास्त्राला लावलेला चालेल का?
रामकृष्ण परमहंसांचा असा काय अभ्यास होता ? पण अधिकार होता ! अभ्यासाने फक्त बुध्दीची खाज भागते ...अधिकार ही त्यापेक्षा खुप मोठ्ठी गोष्ट आहे !!
एकदम सहमत . खूप अभ्यासू आणि विद्वान असलेल्या विवेकानंदांना पहिल्याच भेटीत रामकृष्णांनी सत्याचा अनुभव करून दिला होता .
निवृत्ती ज्ञानेश्वरची मुंजही झाली नव्हती सो त्यांचा सनातन धर्माचा ,,वेद ,उपनिषद वगैरेंचा,अभ्यास असण्याची शक्यता फारच कमी आहे , जे काही ज्ञान आहे ते कदाचित लहानपणी वडीलांनी गीता शिकवली असेल त्यातुन किंव्वा निवृत्तींवर जी गुरु कृपा झाली त्यातुन प्राप्त झालेले अन अनुभवातुन 'अधिकारात' रुपांतरीत झालेले ... आता तत्कालिन मंडळी म्हणजे पैठण आळंदीचे ब्राह्मण वगैरे हे नक्कीच जास्त अभ्यास केलेल्रे लोक होते , चांगदेवांचाही १४०० नाही पण किमान १४ वर्षांचा तरी सखोल योगाभ्यास नक्कीच असावा ... मग ह्यातील श्रेष्ठ कोण ? अधिकार असलेले ज्ञानेश्वर की अभ्यास असलेले इतर ?
पुस्तकी ज्ञान असणं आणि सत्याचं ज्ञान असणं ह्यात फरक अहे. गुरुचरित्रात ह्याविषयी १ अध्याय अहे. धर्मशास्त्रांचा , वेदांचा नुसताच पुष्कळ अभ्यास असणारे पण काडीचीही अक्कल नसणारे मोठे पंडित श्रीगुरुंशी वेदांवर वाद घालायला येतात आणि त्यांची कशी फजिती होते ह्यावरून पुस्तकी प्रकांद्पंडीत असण्याचा आणि 'अधिकारी' असण्याचा काहीही संबंध नाही हे स्पष्ट होत. आळंदीचे ब्राह्मण वगैरे हे नक्कीच जास्त अभ्यास केलेल्रे लोक होते तर ज्ञानेश्वरांच्या पुढे लोटांगण का घातला त्यांनी ? त्यांना तशी कुणी सक्ती केली होती का? १४०० वर्षे योगाभ्यास केलेले चांगदेव एवढे अभ्यासी होते तर ज्ञानदेवांना गुरु करून घेण्यासाठी का आले? ह्यांचीही उत्तरं द्या
सेम होल्ड्स फॉर तुकाराम , तुकाराम स्वतःच्याच अभंगात म्हणतात की शुद्र याती जन्मलो सो त्यांचाही अभ्यास असण्याची धर्माचे अध्ययन असण्याची शक्यता फारच कमी आहे जास्तीत जास्त ज्ञानेश्वरी आणि कदाचित एकनाथी भागवत वाचलेले असावे ... त्यामानाने मंबाजी रामशास्त्रजी सालोमालो वगैरे लोक नक्कीच प्रकांड पंडीत असावेत ... मग ह्यातील महान कोण ? अधिकारी तुकाराम की 'अभ्यासु' इतर ?
प्रकांड पंडीत असण्याचा आणि महान असण्याचा काहीच संबंध नाही हे वर मी सांगितलाच आहे . तुमचा ज्ञानेश्वर आणि तुकारामांचा काय 'अभ्यास ' आहे ते कळू द्या . नुसत्या शक्यता वगेरे मांडू नका . ठाम काहीतरी सांगा ईश्वर भक्ती , योगसाधना ह्यातला अधिकारी असण्यासाठी प्रकांड पंडित असावं लागतं असं कुणी सांगितला तुम्हाला ?

In reply to by म्हैस

प्यारे१ गुरुवार, 06/12/2014 - 13:40
सहमत! बाकी विषय '(इतर पंथांच्या तुलनेनं) हिंदू अस्मितेचा उदय' असा काहीसा असावा का की '(स्वधर्मीयांच्या विचारांच्या खंडनाच्या स्वरुपात) हिंदू अस्मितेचा उदय' असं अपेक्षित आहे असं लेखकाला नम्रपणं विचारु इच्छितो. ;)

In reply to by प्यारे१

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/12/2014 - 15:08
हा महत्वाचा प्रश्ण विचारलात प्यारेजी ... आणि उत्तर आहे (इतर पंथांच्या तुलनेनं) हिंदू अस्मितेचा उदय' हिंदु लोक ऐकुन घेतात म्हणुन त्यांच्या संतांवर कैच्याकै टीका करा , त्यांच्या देवी देवतांची नागडी उघडी चित्रे काढा , "मंदीरांपेक्षा शौचालये महत्वाची" , "वारी बंद करा ", असली कैच्याकाइ विधाने करा , हिंदुंच्या अंधश्रधांविरुध्द कायदा करा अन इतरांना बिन्धास्त सोडुन द्या , गणपती आले की पाणी प्रदुषणाच्या गप्पा , दिवाळी आली की वायु प्रदुषण थोडक्यात काय तर येन केन प्रकारेण हिंदुंचे कसे चुकते अन हिंदु धर्म कसा बावळटांचा धर्म आहे हे ठसवत रहाणे ...सतत तेजोभंग करत रहाणे.... भले मग हिंदुंच्या भावना दुखावल्या तरी चालतील ... कारण ते अल्पसंख्य नाहीत ना !! हे आता बस्स झाले. "भले तरी देवु कासेची लंगोटी | नाठाळाची माथी काठी हाणु ||" " धटासी व्हावे धट | उध्दटासी उध्दट | खटनटासी खटनट | कैसा शोभे ||" आणि वितंडवाद्यांनी वाट्टेल तसा अर्थ काढु नये म्हणुन हे स्पष्टीकरण "हिंदु धर्मात वाईट प्रथा परंपरा आहेतच त्या निंद्यच आहेत आणि त्यांचे निर्मुलन व्हायलाच पाहेजे " पण ज्यांना हिंदु धर्माविषयी आस्था नाही , धर्माचा प्रसार प्रचार व्हावा अशी इच्छा नाही अशा लोकांनी आता बोलु नये. हिंदु लोक त्यांचे प्रॉब्लेम्स स्वतःच्या बळावर सोडवतील... सावरकरांसारख्यानी हिंदु धर्मावर टीका केली तर चालेल पण ना.वा. टिळकांसारख्यानी केली तर ती अजिबात खपवुन घेवु नये !!

In reply to by प्रसाद गोडबोले

टवाळ कार्टा गुरुवार, 06/12/2014 - 16:49
"मंदीरांपेक्षा शौचालये महत्वाची"
मंदिरांपेक्षा शौचालये जास्त महत्वाची आहेत...भारतात ५०% पेक्षा जास्त जनता उघड्यावर शौचाला जाते...आणि त्यातल्या स्त्रीयांचे प्रमाण बघता .... जौदे जोपर्यंत तुमच्या ओळखितल्यापैकी कोणी या परीस्तिथीतुन जात नाही तो पर्यंत नाही कळणार
"वारी बंद करा "
असे कोण , कोणास, कधी, कुठे, कशासंधर्भात बोलले??? काही विदा आहे का? असला तर मला बघायला आवडेल...आणि पटले तर मी सुध्धा तुमच्या बाजुला
गणपती आले की पाणी प्रदुषणाच्या गप्पा , दिवाळी आली की वायु प्रदुषण
हे खरेच आहे...८०% लोकांनी सण साजरा करताना हजारो टन प्लास्टर ओफ ऑफ प्यारिस पाण्यात सोडले जाणे...४-५ दिवस हवा धुराने भरुन जाणे हे प्रदुषणच आहे आणि उरलेल्या २०% मधे...त्यांचे कान घरच्या सोनारानेच टोचले पाहिजेत (हे वाक्य समजले नाही तर हा प्रतिसाद वाचला नाही तरी चालेल)

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/12/2014 - 18:32
१. तुम्ही कीती सार्वजनिक शौचालयं बांधुन दिलीत ? किंव्वा कितीवेळा तुमच्या नगर सेवकाकडे अर्ज केलात ? कितीवेळा ग्रामविकासमंत्री / मुख्यमंत्री / पंतप्रधान ह्यांना ह्या विषयी पत्र पाठवले ? २.पॅस्टर ऑफ पॅरीस नको म्हणुन किती वेळा समाज प्रभोधन केले ? किती मातीच्या मुर्तीकारांना समर्थन दिलेत ? दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे म्हणुन किती प्रचार केलात ? किती वेळा फटाक्याच्या स्टॉल शेजारी उभेराहुन लोकांना तुमचे मत समजावलेत ? तुम्ही खरंच काही सकारात्मक काम केले असेल तर तुम्हाला मी सावरकरांच्या कॅटेगरीत घालतो आणि तुमच्या विषयी आदर व्यक्त करतो पण तुम्हचे स्वतःचे क्लाहीच योगदान नसेल आणि तुम्ही 'हिंदुं मधील प्रथा किती फालतु आहेत , हिंदु धर्म किती बावळट अंधश्रध्दांना चिकटुन रहातो ' असला प्रचार करीत असाल तर मी तुम्हाला ना.वा.टिळक कॅटेघरीत घालतो अन तुमचा निशेध करतो !

In reply to by धन्या

प्रचेतस गुरुवार, 06/12/2014 - 18:44
रेव्हरंड टिळक. यांनी हिंदू धर्म त्यागून क्रिस्टियन धर्म स्वीकारला. यांची पत्नी लक्ष्मीबाई टिळकांचे 'स्मृतीचित्रे' हे पुस्तक अतिशय सुरेख आहे आणि ह्यात हा सर्व घटनाक्रम वर्णिला आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

एस गुरुवार, 06/12/2014 - 19:09
१. तुम्ही कीती सार्वजनिक शौचालयं बांधुन दिलीत ? किंव्वा कितीवेळा तुमच्या नगर सेवकाकडे अर्ज केलात ? कितीवेळा ग्रामविकासमंत्री / मुख्यमंत्री / पंतप्रधान ह्यांना ह्या विषयी पत्र पाठवले ? २.पॅस्टर ऑफ पॅरीस नको म्हणुन किती वेळा समाज प्रभोधन केले ? किती मातीच्या मुर्तीकारांना समर्थन दिलेत ? दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे म्हणुन किती प्रचार केलात ? किती वेळा फटाक्याच्या स्टॉल शेजारी उभेराहुन लोकांना तुमचे मत समजावलेत ?
आपण या सगळ्या गोष्टी केल्या आहेत, करत आहात आणि त्यामुळे तुम्हांला इतरांना ह्या नाही तर त्या क्याट्येगरीत घालण्याचा अधिकार आहे असे गृहीत धरू.
तुम्ही खरंच काही सकारात्मक काम केले असेल तर तुम्हाला मी सावरकरांच्या कॅटेगरीत घालतो आणि तुमच्या विषयी आदर व्यक्त करतो पण तुम्हचे स्वतःचे क्लाहीच योगदान नसेल आणि तुम्ही 'हिंदुं मधील प्रथा किती फालतु आहेत , हिंदु धर्म किती बावळट अंधश्रध्दांना चिकटुन रहातो ' असला प्रचार करीत असाल तर मी तुम्हाला ना.वा.टिळक कॅटेघरीत घालतो अन तुमचा निशेध करतो !
धर्माच्या बाबतीत सकारात्मक काम करणे किंवा योगदान देणे म्हणजे काय? आपल्याच धर्माच्या निंदनीय व माणुसकीला काळिमा फासणार्‍या रूढीपरंपरा धर्मातून हद्दपार करणे हे सकारात्मक नाही काय? आणि समजा एखाद्याने काहीच न करता स्वतःच्या धर्माबद्दल काही मत - मग ते नकारात्मक का असेना - व्यक्त केले तर त्याला तुमच्या दृष्टीने अजिबात किंमत नाही. का बरं? धर्म, जात, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी मनुष्याच्या जन्मापासून त्याला चिकटतात. कोणी असे म्हणत नाही की माझे मूल सुजाण वयाचे झाल्यावर त्याचे त्याला ठरवू दे कुठला धर्म स्वीकारायचा ते. मी आत्तापासूनच माझ्या संततीला अमुक धर्माच्या पद्धतीनुसार वाढवणार नाही. मला असे म्हणायचे आहे की, समजा माझ्या धर्माबद्दल असे काही योगदान मी दिले नसेल तर त्याचा अर्थ मला माझ्या धर्मावर टीका करण्याचा हक्क नाहीये का? आहे. जरूर आहे. कारण मला माझा धर्म आहे तसा फॉलो करायचा नसला तरी जन्मापासूनच माझा धर्म निश्चित झाल्यामुळे त्याचा बरावाईट परिणाम माझ्यावर होतो. त्यापासून सुटका केवळ धर्मांतरामुळेच काही प्रमाणात शक्य आहे. त्याचेही ना घर का ना घाटका असं होऊन बसतं. एकूणच मानवसंस्कृतीत संपूर्ण धार्मिक निरपेक्षता प्रत्यक्ष व्यवहारात शक्य होत नाही. अशी परिस्थिती असताना मी गप्प का बसायचं? केवळ स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांच्या हुल्लडबाजीला घाबरून? बादवे, ज्याला तथाकथित हिंदू धर्म म्हणलं जातं त्याबद्दल प्रबोधनकारांचे जे मत आहे तेच माझंही मत आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

टवाळ कार्टा गुरुवार, 06/12/2014 - 19:28
१. तुम्ही कीती सार्वजनिक शौचालयं बांधुन दिलीत ? किंव्वा कितीवेळा तुमच्या नगर सेवकाकडे अर्ज केलात ? कितीवेळा ग्रामविकासमंत्री / मुख्यमंत्री / पंतप्रधान ह्यांना ह्या विषयी पत्र पाठवले ?
म्हणजे शौचालयांची गरज आहे ...ते सुध्धा खुप मोठ्या जनसमुदायासाठी हे तुम्ही(सुध्धा) मानता...मग मंदिरांची गरज आणि शौचालयांची गरज यातील कोणती गरज लवकर पुर्ण झाली पाहिजे??? १. लोकांनी उघड्यावर शौचास जाणे चालेल पण सर्व सार्वजनिक ठिकाणी मंदिर असले पाहिजे २. उघड्यावर शौचास जाणार्या लोकांची संख्या झपाट्याने कमी झाली पण लोकांनी घरातल्या देवाच्या तसबीरीपुढे हात जोडले तरी चालतील शाळेत गेलेले एखादे शेंबडे पोरसुध्धा यातला २ पर्याय निवडेल
२.पॅस्टर ऑफ पॅरीस नको म्हणुन किती वेळा समाज प्रभोधन केले ? किती मातीच्या मुर्तीकारांना समर्थन दिलेत ? दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे म्हणुन किती प्रचार केलात ? किती वेळा फटाक्याच्या स्टॉल शेजारी उभेराहुन लोकांना तुमचे मत समजावलेत ?
हे सगळे शाळेत्/कॉलेजात असताना केलेले आहे...आतासुध्धा जमेल तसे करतो आणि मी हे केले तरच माझा मुद्दा बरोबर ठरतो असा जर तुमचा समज असेल तर मग मलापण विचारावेसे वाटते की तुमच्या घरात शौचालय असले पाहिजे की देवघर???
तुम्ही खरंच काही सकारात्मक काम केले असेल तर तुम्हाला मी सावरकरांच्या कॅटेगरीत घालतो आणि तुमच्या विषयी आदर व्यक्त करतो पण तुम्हचे स्वतःचे क्लाहीच योगदान नसेल आणि तुम्ही 'हिंदुं मधील प्रथा किती फालतु आहेत , हिंदु धर्म किती बावळट अंधश्रध्दांना चिकटुन रहातो ' असला प्रचार करीत असाल तर मी तुम्हाला ना.वा.टिळक कॅटेघरीत घालतो अन तुमचा निशेध करतो !
मला कोणत्याही क्याटेगरीत टाकायची गरज नाहिये ... तितका तुमचा "अभ्यास" आणि "अधिकार" दोन्ही नाहिये
'हिंदुं मधील प्रथा किती फालतु आहेत , हिंदु धर्म किती बावळट अंधश्रध्दांना चिकटुन रहातो '
अशाबाबतीत मी अजुन कुठेही आणि काहिही लिहिलेले नाही...हे तुमचे "मनचे श्लोक" आहेत
असला प्रचार करीत असाल तर मी तुम्हाला ना.वा.टिळक कॅटेघरीत घालतो अन तुमचा निशेध करतो
आधी मी कधी कुठे कोणाचा कशासाठीही "प्रचार" केला आहे त्याचा "अभ्यास" करा आणि मग जर त्यावर विचार केलाच तर आधी समोरच्याचे मतपरिवर्तन विचारानेच करता येते का ते पहा ...हे सगळे झाल्यावरच माझा निषेध करा उगाचच उंटाच्या.... (म्हण माहित नसेल तर अभ्यास करा)

In reply to by टवाळ कार्टा

१. तुम्ही कीती सार्वजनिक शौचालयं बांधुन दिलीत ? किंव्वा कितीवेळा तुमच्या नगर सेवकाकडे अर्ज केलात ? कितीवेळा ग्रामविकासमंत्री / मुख्यमंत्री / पंतप्रधान ह्यांना ह्या विषयी पत्र पाठवले ?
>>> ह्या प्रस्नाला तुम्ही व्यवस्थित बगल दिली आहेत , त्या मुळे तुम्ही ह्यातले काहीच केलेले नाहीत असा संशय येत आहे .
२.पॅस्टर ऑफ पॅरीस नको म्हणुन किती वेळा समाज प्रभोधन केले ? किती मातीच्या मुर्तीकारांना समर्थन दिलेत ? दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे म्हणुन किती प्रचार केलात ? किती वेळा फटाक्याच्या स्टॉल शेजारी उभेराहुन लोकांना तुमचे मत समजावलेत ?
>> ह्या बद्दल अभिनंदन ... हे कार्य वाढवावे , गणेशोस्तव बंद करा असे म्हनण्यापेक्षा मातीच्या मुर्ती वापरु असे जर तुम्ही समाजाला संदेश देत असाल तर तुम्हाला ह्या विषयावर बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो ...मला हेच म्हणायचे होते :)
अशाबाबतीत मी अजुन कुठेही आणि काहिही लिहिलेले नाही...हे तुमचे "मनचे श्लोक" आहेत
इथे तुम्ही प्रतइकात्मक आहात हो ... काहीच न करता उगाच नुसती भाषणे झाडणारी १०० माणसे मी तुम्हाला भेटवुन देईन ह्या येत्या गणेशोत्स्वात !!
मला कोणत्याही क्याटेगरीत टाकायची गरज नाहिये ... तितका तुमचा "अभ्यास" आणि "अधिकार" दोन्ही नाहिये
बरं ! सध्या तुम्हाला अभ्यास आणि अधिकार ह्यातील फरक समजला , मला जो मुद्दा मांडायचा होता तो कन्वे झालाय , ह्यात आनंद मानतो ... बाकी माझ्या अभ्यासावर आणि अधिकारावर भेटल्यावर निवांत चर्चा करु :)

ऋषिकेश गुरुवार, 06/12/2014 - 15:05
छे छे छे! किती तरी हिंदु व्यक्ती हिंदु धर्माबद्द्लच कस्सं कस्सं वैट्ट वैट्ट बोलताहेत. काही पोच्च राहिलेला नाही! हजारोवर्षांपूर्वीचा व जुना का असेना इतक्या पवित्र धर्माबद्दल असं बोल्लात तर नरकात जाल (ते शक्य नसेल तर जेल मध्ये जाण्याचेही दिवस दूर नाहित)

In reply to by बॅटमॅन

अनुप ढेरे गुरुवार, 06/12/2014 - 21:07
मी तर आता भारतात कॉन्संट्रेशन क्यांप कधी सुरु होतात आणि त्यासाठी जमीन अधिग्रहण कधी सुरु होतय त्याची वाट बघतोय.

In reply to by अनुप ढेरे

माहितगार Fri, 06/13/2014 - 09:00
बर्‍याच लोकांना काँटेक्स्ट आणि उपरोध समजत नाहीत, (त्यामुळे कॉमेंट टाकताना जरा जपून)

धन्या गुरुवार, 06/12/2014 - 15:09
तुम्ही पुस्तकं बरीच वाचली असतील पण स्वतःचा योगशास्त्राचा अभ्यास किती आहे? न्युटनचा किवा कुठलाही भौतिक शास्त्राचा नियम लावण्याचं तात्पर्य काय ?
मला योगशास्त्रामधलं काहीही कळत नाही. मात्र विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून एव्हढं कळतं की या विश्वात निसर्गनियमांपलिकडे जाऊन काहीही घडत नाही. निसर्गाच्या नियमांचं आकलन किंवा विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान. न्युटनचा गतिविषयक पहिला नियम हाही निसर्गाचाच नियम. न्युटनने त्याला फक्त त्याची पडताळणी करुन विधान स्वरुपात मांडणी केली. तर हा नियम असं म्हणतो की कोणतेही बल लावले नसेल तर अचल अवस्थेतील वस्तू चलमान होऊ शकत नाही. हे जगाच्या पाठीवर कुठेही शक्य नाही.
अध्यात्मशास्त्राचा नियम भौतिक शास्त्राला लावलेला चालेल का?
अतिशय हास्यास्पद विधान. मुळात अध्यात्मशास्त्र म्हणून काही नाही. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी शास्त्रामध्ये एकवाक्यता असते. भारतातला शास्त्रज्ञ एक बोलतोय, अमेरिकेतला शास्त्रज्ञ वेगळं बोलतोय असं होत नाही. अध्यात्माला फारतर विचारसरणी किंवा आयुष्याकडे, जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोण म्हणता येईल. हा दृष्टीकोण व्यक्तीगणिक बदलू शकतो. नव्हे, तो बदलतोच. एकवाक्यता अशी नसतेच. अध्यात्मामध्ये प्रत्येकाचा "अनुभव" वेगळा, प्रत्येकाची "अनुभूती" वेगळी. काय प्रमाण आणि कोण अधिकारी हे कसं ठरवणार? आणि मुळात जे समोरच्या व्यक्तीला प्रमाण वाटतंय ते मला मान्यच नसेल तर? ज्ञानदेव काहींना विष्णुचे अवतार वाटतात, मला मात्र ते एक महान तत्वज्ञ, श्रेष्ठ दर्जाचे कवी पण तरीही तुमच्याआमच्यासारखे माणुसच वाटतात. कोणाचं म्हणणं प्रमाण मानायचं?

In reply to by धन्या

यशोधरा गुरुवार, 06/12/2014 - 15:40
कोणाचं म्हणणं प्रमाण मानायचं? >> ज्यांना ज्ञानोबांमधलं विष्णुत्व दिसतं त्यांनी ते मानावं, आणि ज्यांना ते कवी, तत्वज्ञ म्हणून भावतात, त्यानी ते अंगिंकारावं. जो जे वांछिल अशी प्रार्थना खुद्द ज्ञानोबांनीच केली आहे, हे विसरु नये, म्हणजे झालं. :)

In reply to by यशोधरा

धन्या गुरुवार, 06/12/2014 - 15:53
आम्हीही केव्हाचं तेच म्हटलंय. :)
आता कुणी जर म्हणत असेल की ज्ञानदेवांनी आपल्या योगसामर्थ्याने भींत चालवली तर म्हणोत बापडे.

In reply to by धन्या

यशोधरा गुरुवार, 06/12/2014 - 15:58
फरक इतकाच असावा की ज्ञानदेवांनी जेह्वा ते म्हटलंय तेह्वा कोणाला 'बापडे' समजलेल नाही वा तसा भाव मनात बाळगलेला नाही. लै लै मोठठाल्ला फरक है बाप्पा!

In reply to by यशोधरा

धन्या गुरुवार, 06/12/2014 - 16:08
फरक इतकाच असावा की ज्ञानदेवांनी जेह्वा ते म्हटलंय तेह्वा कोणाला 'बापडे' समजलेल नाही वा तसा भाव मनात बाळगलेला नाही.
एकदम मान्य. म्हणून तर त्यांना माऊली म्हणतात. मी वापरलेला "बापडे" हा शब्द "एकविसावे शतक चालू असताना, विज्ञान ईतके प्रगत झाले असताना लोक नको त्या गोष्टींचा अभिमान बाळगून फुरफुरतात त्याबद्दल वाईट वाटते" अशा अर्थी होता.

In reply to by धन्या

प्यारे१ गुरुवार, 06/12/2014 - 17:04
>>> एकविसावे शतक चालू असताना, विज्ञान ईतके प्रगत झाले असताना लोक नको त्या गोष्टींचा अभिमान बाळगून फुरफुरतात त्याबद्दल वाईट वाटते :)

In reply to by धन्या

यशोधरा गुरुवार, 06/12/2014 - 20:16
धन्या तेच तर. प्रत्येकाला आपल्याला काय अधिक महत्वाचं वाटतं ते ठरवायचा मूलभूत हक्क आहेच की. मग जर एखाद्याला विज्ञान तुझ्याइतकं महत्वाचं वाटत नसेल तरीही त्यात काही चुकीचं नाही. आहे का? तुझी श्रद्धा विज्ञानावर, एखाद्याची अध्यात्मावर आणि कोणाची, आणि कुठे. :)

In reply to by यशोधरा

धन्या Fri, 06/13/2014 - 13:03
तुझी श्रद्धा विज्ञानावर
एव्हढं सोडून बाकीचं पटलं. श्रद्धा म्हणजे एखादया व्यक्तीचा एखादया गोष्टीवरील ठाम विश्वास. ज्या गोष्टीवर माणसांची श्रद्धा असते त्या गोष्टी वास्तवात सत्य असतातच असं नाही. उदाहरणार्थ सतराव्या शतकात गॅलिलिओने पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे ठाम प्रतिपादन करेपर्यत लोकांची पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी आहे अशी श्रद्धा होती जी खोटी होती. सध्या अतिशय प्रसिद्ध असलेला "अंधश्रद्धा" हा शब्दच मुळी चुकीचा आहे. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंध आणि डोळस श्रद्धा असं काही नसते. ज्याची श्रद्धा असते त्याला कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसते. विज्ञान हा श्रद्धेचा विषय नाही. तो पडताळून पाहण्याचा विषय आहे. जे पुराव्यांनी सिद्ध करता येत नाही ते विज्ञान नसते.

In reply to by धन्या

यशोधरा Fri, 06/13/2014 - 14:07
ओके. >>सध्या अतिशय प्रसिद्ध असलेला "अंधश्रद्धा" हा शब्दच मुळी चुकीचा आहे >> हे मला मान्यच आहे पण अवांतरः कितीश्या "विज्ञानवाद्यांना" हे मान्य असतं? जिथे धर्म आणि रुढी (ज्या चुकीच्या असू शकतात) ह्यातला फरकही न समजावून घेता, हिंदू धर्माच्या निरर्थकपणाबद्दल स्यूडो सुधारक टाहो फोडत राहतात ( ह्या धाग्यावरच उदाहरण आहे! ;) ) तिथे पुढे कशाला काही बोलायचं? (असंही वाटत.) :) असो. :)

म्हैस Fri, 06/13/2014 - 12:53
मला योगशास्त्रामधलं काहीही कळत नाही. मात्र विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून एव्हढं कळतं कि विश्वात निसर्गनियमांपलिकडे जाऊन काहीही घडत नाही. . मुळात अध्यात्मशास्त्र म्हणून काही नाही.
तुम्हीच तुमच्या मतावर ठाम नाही आहात . एकीकडे तुम्ही म्हणताय मला एका शास्त्रातल काही काळात नाही. दुसरीकडे म्हणताय दुसरीकडे म्हणताय त्यात हे नाही आणि त्यात ते नाही . काय हास्यास्पद विधान आहेत . हे म्हणजे engineering मध्ये हुशार असलेल्यांनी medical मधलं काही कळत नसताना त्यात हे नाही आणि त्यात ते नाही हे म्हणण्यासारख आहे .
जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी शास्त्रामध्ये एकवाक्यता असते. भारतातला शास्त्रज्ञ एक बोलतोय, अमेरिकेतला शास्त्रज्ञ वेगळं बोलतोय असं होत नाही.
साधकाला त्याच्या तयारीप्रमाणे आणि पुर्व कार्मान्नुसार आलेले अनुभव वेगळे असले तरी अंतिम ज्ञान एकाच असतं . जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी त्या सत्यात एकवाक्यताच असते . सत्य थोडीच बदलतं ? तुकाराम महाराज वेगळं बोलतात आणि ज्ञानेश्वर महाराज किवा कुठलाही'साधक वेगळं बोलतोय असं होत नाही
एकविसावे शतक चालू असताना, विज्ञान ईतके प्रगत झाले असताना लोक नको त्या गोष्टींचा अभिमान बाळगून फुरफुरतात त्याबद्दल वाईट वाटते
अभिमान असणं आणि अहंकारी असणं वेगळं आहे . आम्ही विज्ञानाला कधीच नावं ठेवत नाही किवा विज्ञानाच्या विरोधात अजिबात नाही . विज्ञानात हे नसतं आणि ते नसतं अशी फुकाची फुरफुर करत नाही आम्ही . विज्ञानाच्या पलीकडे काही आहे ह्याचा आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे त्यामुळे आम्ही अभिमानी अहोत. अहंकारी नाही.

In reply to by म्हैस

धन्या Fri, 06/13/2014 - 13:51
तुम्हीच तुमच्या मतावर ठाम नाही आहात . एकीकडे तुम्ही म्हणताय मला एका शास्त्रातल काही काळात नाही. दुसरीकडे म्हणताय दुसरीकडे म्हणताय त्यात हे नाही आणि त्यात ते नाही . काय हास्यास्पद विधान आहेत .
इथे विज्ञान म्हणजे भौतिकशास्त्र. न्युटनच्या नियमांचा अभ्यास भौतिकशास्त्रात होतो. आणि शाळेत गेलेला प्रत्येकजण भौतिकशास्त्र आणि न्युटनचे गतीविषयक नियम शिकलेला असतो. योगशास्त्र हा सर्वत्र शिकवला जाणारा विषय नाही. त्यामुळे त्याबद्दल एखादया व्यक्तीला त्याचे ज्ञान नसेल तर त्यात हास्यास्पद काय आहे? बाकीचे चालू दया. :)

सुहास.. Fri, 06/13/2014 - 14:27
प्लीज नोट : अधिकारावरुन , मी लोहगावातल्या आठवडी बाजारामध्ये सार्वजनीक शौचालयाचा प्रस्ताव आणला, ग्रामसभेमध्ये मंजुर झाल्यावर , निधी आणि त्याचा योग्य वापर करुन बांधुन ही घेतले, अर्थात, देखरेखी खालीच, लवकरच, अजुन पाच एक आठवड्याने ते निशुल्क ही होईल, लोहगावातच जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदीराच्या सुशोभीकरण्याचा प्रस्ताव ही तीन वर्षांपुर्वी माझ्याच तोंडुन निघाला, त्यात फक्त वर्गणीदारम्हणुनच नव्हे , वर दोन महिने उन्हातान्हाची वर्गणी मागत फिरणार्या कार्यकरणीत ही माझा सहभाग होता. धन्यवात !! वैयक्तीक मत सांगायचे तर हल्ली कुठेतरी कायतरी झाल म्हणुन अस्मितेचा उद्य कसा होतो हा प्रश्न मला पडला आहे ? अस्त झाला होता म्हणायचे की काय ? मग घाशीराम कोतवाल हे काल्पनिक आहे असे तेंडुलकरांनी डिक्लेयर केल्यावर अस्मिता झोपी गेली होती का थोडी वर्ष ( असो .. पुस्तक वाचलं नाही तरी संदर्भ समजण्याईतपत अक्कल आली आहे लोकांना म्हणजे काही ही होवु शकते ) मोरेंच्या वकीलांना विचारले तर कसली आलीये म्हणे अस्मिता ( कसला हिंदु - बांधव, भोंदु-बांधव सगळे ) !! नेमके काय आहे ? s s गेल्या २००९ पासुन हा वाद चालु आहे, आणि त्यामध्ये यादवांना अटक आणि जामीन जोस्जीशी, पेताड मोहन जोशी संमेलनाध्यक्ष चालतात, राष्ट्रीय पुरस्कार मिळालेळा लेखक मात्र चालत नाही, अस्मितेला मात्र २०१४ उजाडल ? ते ही नेमके सरकार आल्यावर असे ज्यांना वाटत असेल, तर ते तसे नाही , वकीलांनी पटवुन दिले की ज्या प्रकारे विटबनेमुळे गेली काही दिवस पुणे पेटतय त्या अनुषंगाने या पुस्तकांवर बंदी आणावी , निकाला त कुठे ही असे म्हटलेले नाही की ही पुस्तके फाडुन टाका , अश्या प्रकारची सामाजिक मानहानी ( मग ती कुठली का असेना ) सर्व च प्रकारची पुस्तके फाडुन टाका ..मला आश्चर्य याचे वाटते की दोघांना दंड कश्यासाठी ? पुस्तक खपलय आणि वर काही जणांनी लिहीलय सुध्दा की आक्षेपार्ह असे काही नाही , मी ही वाचलय ! भक्त असुनही मला आक्षेपार्ह वाटल नाही, एक सरळ साधा लेखन विस्तार.मग त्यात अस्मिता कुठुन आली ? त्या त इथे काही उगा टाळ्या घेण्यासाठी प्रतिसाद उठाठेव करताहेत त्यांची तर कीव करावी तेव्हढी थोडीच आहे .ज्यांचे डोळे उघडे आहेत त्यांनी पान क्रमांक ९३ ९४ नकी वाचावे , बाकीच्यांना अस्मिता लखलाभ होवो अस्मिताच शोधायची असेल तर मोहसिन च्या ब्रुटल मर्डर मध्ये का शोधत नाहीत ? असो ...वेळ थोडा कमी आहे.. त्यामुळे थांबतो

In reply to by सुहास..

माहितगार Fri, 06/13/2014 - 15:54
अस्मितेला मात्र २०१४ उजाडल ? ते ही नेमके सरकार आल्यावर असे ज्यांना वाटत असेल, तर ते तसे नाही , वकीलांनी पटवुन दिले की ज्या प्रकारे विटबनेमुळे गेली काही दिवस पुणे पेटतय त्या अनुषंगाने या पुस्तकांवर बंदी आणावी ,
सुहासजी आपण न्यायालयाचा निकाल वाचून हे लिहिले आहेत ? न्यायालयाच्या निकालाचा सध्याच्या घटनांशी संबंध आहे असे म्हणावयाचे आहे का ? संजय सोनवणींनी त्यांच्या ब्लॉगवर न्यायालयाचा निकाल वाचल्याचे म्हटले आहे त्यांच्या पोस्टशी आपला उपरोक्त मजकुर जुळतो असे वाटत नाही. संजय सोनवणींचे बरोबर असेल तर भादवि अंतर्गत येणार्‍या Defamation संबंधातील दोन कलमांतर्गत पुर्वज बदनामीचा खटला वंशजांनी टाकला, कादंबरीस काल्पनिक म्हणण्या एवजी संशोधनपुर्वक लिहिल्याचे लेखकाने म्हटल्यामुळे पुरावे देण्याची वेळ आली असावी, पण तेव्हा हाताशी पुरावे असणे शक्य नव्हते. आनंद यादवांचा वकील कच्चा पडला की आनंद यादव माहीत नाही,(लोक आनंद यादवांना दोष देत आहेत) पण संशोधन या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला गेला का की संशोधन शब्दास साहित्यिक अर्थछटा असु शकते हे (आनंद यादवांचा वकील आणि) माननीया न्यायालयाने लक्षात घेतले असावे का ? माझा तुकाराम गाथेचा अभ्यास नाही त्यातील सर्व शब्द समजत नाहीत पण काही गाथांकडे नंतर निर्देश करेन. पण त्यापुर्वी येथे प्रथम एक गोष्ट लक्षात घेतली जावयास हवी ती भारतीय संस्कृतीत इश्वर मानवी अवतार घेतो हे या करताही गृहीत धरले जाते की या जगातल्या सर्व अडी अडचणी तो स्वतः भोगतो आणि मग उपाय देतो. श्रीकृष्ण बालपणी लोण्यावर हात मारतो हे ठिक पण तिरूपती बालाजीची एक कथा विचारात पाडणारी आहे. ज्या देशात इश्वरी अवतार चुकू शकतात आणि नंतर मोठे होतात, वाल्मिकी सारखे ऋषि असतात साहित्यिक एका व्यक्तीत सामान्य गुण होते पण तो नंतर असामान्य झाला हे एवढ्या करता दाखवू इच्छितो की सामान्यगुणांची व्यक्तीही असामान्य पातळी गाठू शकते हे दाखवायचे असते आणि अशी साहित्यिक वर्णने भारतीय साहित्यात आणखीही असतील. तुम्ही लेखकाच्या भूमीकेचे समर्थन करा अथवा न करा, न्यायालये कायद्यांतर्गत काय तो निकाल देतील, तरीपण एका साहित्यिकाच्या लेखना मागे काही चांगलीही भूमीका असू शकते हे समजून घेण्याचा प्रयत्न न करता घेतल्या जाणार्‍या टोकाच्या भूमीका भारतीय संस्कृती समजलेल्यांच्या म्हणवता येतील का हे पाहता यामुद्यावर वारंवार साशंक व्हावयास होते. तुकारामांच्या गाथा अभंग नोंदवतो आहे चुकत असल्यास सांगावे आणि संपादकांकडून उडवावेत. गाथा क्रमांक ओळ तिसरी आणि चौथी मध्ये संत तुकाराम म्हणतात .....नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥२॥ तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥३॥ येथे संत महोदय स्वतःकडे कमीपणा घेतात (म्हणजे ते वृत्तीने तसे असतात असे नव्हे). आउट ऑफ काँटेक्स्ट असल्याचा आरोप नको म्हणून आता संपूर्ण अभंग देतो "मज दास करी त्यांचा । संतदासांच्या दासांचा ॥१॥ मग होत कल्पवरी । सुखें गर्भवास हरी ॥ध्रु.॥ नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥२॥ तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥३॥ " अठ्ठावनाव्या अभंगात संत तुकाराम म्हणतात "सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥१॥ त्याचें दर्शन न व्हावें । शव असतां तो जिवे ॥ध्रु.॥ कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥२॥ नेणे शब्द पर । तुका म्हणे परउपकार ॥३॥ " याचा अर्थ पुर्वाश्रमीचे संत तुकाराम आंनद यादव कादंबरीत दाखवतात तसे होत नाही पण माझा म्हणण्याचा उद्देश एक संत माणूस स्वतःकडे स्वतःच्या शब्दा सामान्यपण घेऊ शकतो, एक सामान्य व्यक्ती असामान्य होऊ शकते असा दाखवण्याचा साहित्यिक आनंद यादवांचा प्रमाद पुराव्यांच्या पातळीवर टिकणारा नसेल परंतु साहित्यिकाचा इथे मूळ हेतू चांगला नसण्या पेक्षा चांगला असण्याचीच शक्यता अधीक असावी. अर्थाचे अनर्थ आणि कायद्याची कैची लागण्यास एकच वेळ झाली असे दिसते. आनंद यादवांवर टिकाकरणार्‍यांनी टिका जरूर करावी पण तुम्हाला काळ्या वाटणार्‍या त्या ढगांना असलेली चांगल्या उद्देशाची चंदेरी कडा न पाहता टिका एकांगी तर नाही ना अशी शंका येते आणि संतनिंदा नेमके कोण करते आहे असा प्रश्न पडतो. यामुळे आनंद यादव आणि त्यांचे समकालीन साहित्यिकांच्या कच खाऊ भूमिके बद्दल संजय सोनवणींचा खेद समजून घेता येतो. आपण म्हणता तसा हा खटला न्यायालयात काही वर्षांपासून चालू आहे. त्याचा निकाल लागण्याची वेळ आणि वेगळ्या पक्षाचे सरकार निवडून येणे हा केवळ योगायोग त्याचा बादरायण संबंध लावून भाजपा सरकार निवडून आले नसते काँग्रेसचेच सरकार असते तर खटल्याचा निकाल काही वेगळा लागला असता का ? काँग्रेस सरकारे असतानाचे निकाल न्यायालयांनी दबून दिले होते का ? तसा इतिहास नाही उलटपक्षी सर्वसाधारणपणे भारतीय न्यायालयांची निष्पक्षतता निर्विवाद आहे. धागालेखकाने अप्रत्यक्ष असे निर्देश करणे कदाचित न्यायालयाचा अवमानाच्या कायदेशीर कचाट्यात येणार नाही, पण न कळतका होईना न्यायालयीन प्रक्रीयेस कमी लेखणे संतनिंदेपेक्षा अधीक चुकीचे नाही ना असा प्रश्न पडतो आहे.

In reply to by माहितगार

सर्वसाधारणपणे भारतीय न्यायालयांची निष्पक्षतता निर्विवाद आहे.
>>> निष्पक्षतता ? 'सॅटॅनिक' वर बॅन आणायला कितीवर्ष घेतली न्यायालयाने ? आणि संतसुर्यवर ? आणि हिंदु किंग इन इस्लामिक इन्डियावर वर ? तुर्तास फक्त वर्षंची आकडेवारी टाका , मग आपण निवांत चर्चा करु निष्पक्षतेवर !
पण न कळतका होईना न्यायालयीन प्रक्रीयेस कमी लेखणे संतनिंदेपेक्षा अधीक चुकीचे नाही ना असा प्रश्न पडतो आहे
न्यायलीन प्रक्रिया किंव्वा न्यायालयाचे निर्णय ह्यांना कमी लेखणे हे अगदी १९४७ पासुन सुरु आहे , गांधीहत्येत संघाचा हात नाही असे न्यायालयाने म्हणल्यावर्ही पटेल म्हणाले होते की 'संघाचा हात नसला तरी संघाचीच विचारसरणी आहे' , सावरकरांना निर्दोष मुक्त करुनही आजही त्यांच्यावर चिखल फेक होतेच की ! मोदींना सर्वोच्च न्यायालयाने क्लीनचीट दिली तरी माझ्या लेखी मोदी खुनीच आहेत असे लोक स्पष्टपणे मिडीयावर बोलत होते . न्शिवाय न्यायालय दरवेळी योग्य "न्याय" निर्णयच देते असे नाही , अयोधेत वादग्रस्त जागी १४ शतक्या पुर्वी मंदीर होते असा स्पष्ट निकाल आर्किऑलॉजिस्ट ने दिल्या नंतरही त्या प्रकरणातला न्यायालयाचा निर्णय आपण पाहिलाच ! शिवाय न्यायालयाच्या निर्णयाचा मान न राखण्याचे आदर्श राजीव गांधींनीच "शहाबानो" प्रकरणा पासुन घालुन दिले आहेत ! जाऊन दे ... खुप विषयांतर झाले !

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार Fri, 06/13/2014 - 20:16
या प्रतिसादाच्या सुरवातीसच माझी भूमीका स्पष्ट नमूद करतो की पुस्तकांसहीत कोणत्याही कलाकृतीस कोणत्याही समाजाच्या आग्रहास बळी पडून बंदी घालू नयेच सर्वच ग्रंथ आणि कलाकृतींना विद्यापीठ प्राध्यापकस्तरीय समीक्षण बंधनकारक करून विरोधी मुद्यांचे खंडन करणारी समीक्षा प्रस्तावनेसोबत छापणे बंधनकारक करावे, त्या खंडनास प्रतिसाद देण्याची मोकळीक कलाकृती निर्मात्यास/प्रकाशकास द्यावी. मग त्या कलाकृतीतून काय घ्यावयाचे आणि नाही घ्यायचे ते रसिक ठरवेल. शासनास वाटल्यास अपवादात्म स्थितीत कलाकृती समीक्षणासाठी अधिक विद्यापीठीय तज्ञांकडे अधिक काळा साठी पाठवावी. आता आपल्या बाकी काही मुद्यांकडे येतो. :) मान्यवर आपला धागा लेखच अंशतः विषयांतराने झालेला नाही ना, ते असू द्यात ते फार महत्वाचे नाही. या धाग्यावर अथवा इतरत्र लोक विषया वरील अधिकाराच्या गोष्टी करत असताना पाहीले आपण कायद्याच्या सर्व बाजू माहित असून लेखन करत असल्यास त्या कायद्याच्या बाजू जाणून घेणे आणि माझ्या ज्ञानात भर घालणे मला नक्कीच आवडेल. कायद्याच्या पैलूंबाबत आपली काही गल्लत होत नाहीएना अशी सध्या तरी मला अल्पशी शंका येते. संतसूर्य बद्दल सरकार न्यायालयात गेले असल्या बाबत माझी माहिती नाही, संतसूर्यचा खटला एका व्यक्तीच्या वंशजाने टाकलेला खासगी व्यक्तीने टाकलेला आणि तोही भादवि च्या वेगळ्या कलमांनी; सामाजिक अशांतता पसरू नये म्हणून सरकार वेगळ्या कलमांचा आधार घेते म्हणून आपली तुलना किमान संतसूर्यबाबत लागू होऊ शकणार नाही. सामाजिक अशांतता पसरेल हा भिती घालणारा मुद्दाही न्यायालये नेहमी ग्राह्य धरत नाहीत, उलटपक्षी तुम्हाला परिस्थिती नियंत्रणात ठेवता येत नसेल तर वेगळा विचार करावा लागेल अशी तंबी काही वेळेस न्यायालयांनी संबंधीत प्रशासनांना दिलेले आहेत. अर्थात सामाजिक अशांतता या विषयावर सरकारने विनंती करणे आणि न्यायालयांनी त्या विषयास तौलनीक प्राधान्याने वेळ देणे हे समजण्या सारखे आहे पण इथे मुलतः जबाबदारी लोकशाही सरकारांची, आणि आपले उत्पातमुल्य दाखवू इच्छित भारतातील सर्वच समाजगटातील विवीध बेजबाबदार समाज घटकांची आहे, न्यायालयांचा यात दोष नाही, सामाजिक दोषांकरता न्यायालयांच्या माथी खपार फोडणे योग्य नव्हे हे लक्षात घेतले पाहीजे. सध्या अके-निग बदनामी खटल्याच्या एका प्रसंगी अके गटा कडून सरकार बदलल्याने निकाल असा आला अशा टिके बद्दल न्यायालयात न्यायालयीन अवमानाचे आक्षेप दाखल झाले आहेत आपण आपल्या धागा लेखात "(आता हा अब की बार ... चा इफेक्ट आहे की नाही देव जाणे ) हे वाक्य मोघम स्वरूपात लिहिल्याने कायदेशीर दृष्ट्या सुखरूप ठरण्याची शक्यता आहे हे कायद्याची बाजू लक्षात यावी म्हणून लक्षात घ्यावे. संतसूर्य तूकाराम केस मध्ये काही शतकांपुर्वीच्या पुर्वजाबद्दल बदनामीचा खटला दाखल होऊ शकतो तर आपण म्हणता त्या अनेक केसेस मध्ये बदनामीचे खटले दाखल करता येण्याची शक्यता असू शकते. अर्थात त्या केसेस दाखल करणे ज्याची बदनामी झाली त्याची स्वतःची जबाबदारी आहे. चुकीची चिखलफेक आणि नकारात्मक मार्केटींग हे समोरची व्यक्ती उत्तरे देण्यात नेमकी असेल तर इफेक्टीव्ह असू शकत नाही उलट चिखलफेक आणि नकारात्मक मार्केटींग करणार्‍यांचेच नुकसान होते हे मोदींच्याच वि़जयाने सिद्ध झाले आहेच. इतर काही समाज घटक पुरोगामी नाहीत म्हणून पुरोगामी राहण्याची क्षमता असलेल्या घटकांनी स्वतःकरता पुरोगामी असू नये का हा जरा विषयांतराचा मुद्दा असल्याने नंतर कधी चर्चा करूयात. हे जरी खरे असले तरी शासनाचे निर्णय (अगदी कोणत्याही परिस्थितीत) उत्पात मुल्य वापरणार्‍या समाज घटकांना दबून होऊ नयेत याच्याशी मी सहमत आहे अर्थात हि जबाबदारी लोकशाही नेतृत्वांची आहे त्याचे खापर न्यायालयांवर फोडणे हे वड्याचे तेल वांग्यावर ठरते असे माझे व्यक्तीगत प्रांजळ मत आहे.

In reply to by माहितगार

हे जरी खरे असले तरी शासनाचे निर्णय (अगदी कोणत्याही परिस्थितीत) उत्पात मुल्य वापरणार्‍या समाज घटकांना दबून होऊ नयेत याच्याशी मी सहमत आहे अर्थात हि जबाबदारी लोकशाही नेतृत्वांची आहे त्याचे खापर न्यायालयांवर फोडणे हे वड्याचे तेल वांग्यावर ठरते असे माझे व्यक्तीगत प्रांजळ मत आहे.
आपला प्रतिसाद ३ वेळा वाचल्यावर व्यवस्थित कळाला , बहुतांश पटलाही . वरील वाक्य अत्यंत आवडले . आजवर भारतसरकारचे धर्म समाज विषयक नियम कायदे हे काही विषिष्ठ समाजांच्या उत्पात मुल्याला घाबरुन केलेले नजरेस येतात (पक्षी : सॅटीनिक ...शाहबानो...इशानेतील काही राज्यांनी स्वतःला ख्रिश्चन राज्य घोषित करणे वगैरे वगैरे ), फक्त हिंदु तसे झुंडशाहीने आजवर हम करे सो कायदा करीत नव्हते , आता लोकांना हळु हळु कळायला लागले आहे की हे फक्त आपल्यालाच चेपत आहेत अन इतरांना ठील देत आहेत (ह्याचे क्लासिक उदाहरण म्हणजे जेव्हा एक विशिष्ठ समाज फाळणी व स्वतंत्र देशाची मागणी करतो तेव्हा ती कबुल करणे अन जेव्हा दुसरा समाज करतो तेव्हा त्यांना दहशतवादी ठरवुन त्यांच्या प्रार्थनागृहात घुसुन मारणे ! एका धर्मियांची प्रार्थना स्थळे ताब्यात घेणे अन दुसर्‍यांच्या बाबत चुकार शब्दही न काढणे , वगैरे वगैरे). आपणजर आपले उत्पात मुल्य दाखवले नाही तर हे असेच चालु ठेवतील ,सो ..... तेव्हा सर्वच समाजामधे अस्मिता प्रखर झाल्याचे दिसुन येत आहे , उशीरा का होईना पण हिंदुंचीही अस्मिता जागी झाली आहे इतकाच माझा निषकर्ष आहे :)

म्हैस Fri, 06/13/2014 - 21:44
त्यामुळे त्याबद्दल एखादया व्यक्तीला त्याचे ज्ञान नसेल तर त्यात हास्यास्पद काय आहे?
एखादया व्यक्तीला त्याचे ज्ञान नसेल तर त्यात हास्यास्पद किवा चुकीचं काहीच नहिये. पण ते नसताना चुकीची विधानं करून त्या विषयाबद्दलची स्वतःची आणि इतरांचीही मतं कलुषित करण हे चुकीचं आहे . ज्ञान घ्यायला ज्ञानाचे दरवाजे सदैव उघडे आहेत . नसेल घ्यायचं तरी काही हरकत नाही . पण विनाकारण त्याबद्दल नकारात्मक विचार पसरवण्याच काहीच कारण नाही असं मला वाटतं

आयुर्हित Tue, 06/10/2014 - 15:21
संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असलेली 'संतसूर्य तुकाराम' व 'लोकसखा ज्ञानेश्वर' ही पुस्तके फाडून टाका,' असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. इतकंच नव्हे तर पुस्तकांचे लेखक आनंद यादव व मेहता प्रकाशनाला २० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पूर्ण माहिती द्या राव! घाबरलो ना मी.

धन्या Tue, 06/10/2014 - 15:36
माझ्याकडे "लोकसखा ज्ञानेश्वर" आहे, पण मी ते फाडणार नाही. माझ्या मनातील ज्ञानदेवांचे स्थान अढळ आहे, ते एखादया पुस्तकातील मजकुराने डळमळीत होणार नाही.

In reply to by धन्या

मी स्वतः ह्या दोनपैकी एकही पुस्तक वाचलेले नाहीये , पण तुकाराम पुस्तकावरुन जोरदार गदारोळ झालेला हे ऐकुन आहे ... आपण सदरपुस्ताकाचा रिव्हिव्यु लिहावी अशी ह्या निमित्ताने विनंती करीत आहे ...
माझ्या मनातील ज्ञानदेवांचे स्थान अढळ आहे, ते एखादया पुस्तकातील मजकुराने डळमळीत होणार नाही.
>>> धन्या , हिंदु किंग इन इस्लामिक इंडियाबाबत तुझे काय मत आहे ? किंव्वा मनुस्मृती विषयी (की ज्यामधील मोजकाच मजकुर आक्षेपार्ह आहे) काय मत आहे ? माझ्या लेखना उद्देश इतकाच होता की आता असले भावना दुखावणारे लिखाण हिंदुंकडुन खपवुन घेतले जावु नये ... हिंदु सहिष्णु आहे ह्याचा अर्थ कोणीही उठसुठ वाट्टेल ती टीका करावी असा नव्हे ... प्लीज नोट : मी आधीही म्हणालो होतो की हरकत 'टीका करण्याला' नसुन 'अधिकार नसताना टीका करणे' ह्याला आहे. आनंद यादव हे जर "कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पुजनाचे ।। किंव्वा परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम किंव्वा मना बोलणे नीच सोशीत जावे " ह्यालेव्हलच्या संत अवस्थेत पोहचले असतील आणि मग त्यांनी तुकाराम ज्ञानेश्वर ह्यांच्यावर टीका केली असेल तर मी माझा लेख विनम्रपणे मागे घेत आहे ! पण तसे काही असेल असे वाटत नाही , उलट ते वरच्या कोर्टात गेलेत असे ऐकुन आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या Tue, 06/10/2014 - 16:14
धन्या , हिंदु किंग इन इस्लामिक इंडियाबाबत तुझे काय मत आहे ? किंव्वा मनुस्मृती विषयी (की ज्यामधील मोजकाच मजकुर आक्षेपार्ह आहे) काय मत आहे ?
मी ही दोन्ही पुस्तके वाचली नाहीत. महापुरुष मान अपमानाच्या पलिकडे गेलेले असतात. किंबहूना ते त्यांच्या हयातीतही तसेच वागलेले असतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात एखाद्या पुस्तकात काही लिहिले असल्याने त्याने त्यांचा अपमान होत नसावा असे माझे मत आहे.

In reply to by धन्या

यशोधरा Tue, 06/10/2014 - 16:46
मी दोनही पुस्तके वाचली आहेत आणि दोनही मला आवडली आहेत. फाडून टाकण्याइतके आक्षेपार्ह त्यात काहीच नाही, असे माझे मत आहे.

In reply to by धन्या

राजेश घासकडवी Tue, 06/10/2014 - 20:56
माझ्या मनातील ज्ञानदेवांचे स्थान अढळ आहे, ते एखादया पुस्तकातील मजकुराने डळमळीत होणार नाही.
+१.
महापुरुष मान अपमानाच्या पलिकडे गेलेले असतात. किंबहूना ते त्यांच्या हयातीतही तसेच वागलेले असतात.
मंबाजीची गोष्ट आठवली. तुकारामाच्या म्हशीने मंबाजीच्या बागेतल्या झाडांची नासधूस केल्याबद्दल मंबाजीने त्याला बाभळीच्या फोकांनी फोडून काढलं.
किंव्वा मनुस्मृती विषयी (की ज्यामधील मोजकाच मजकुर आक्षेपार्ह आहे) काय मत आहे ?
मी मनुस्मृती वाचलेली आहे. त्यात 'मोजकाच' मजकुर आक्षेपार्ह आहे असं म्हणणं म्हणजे विनोद आहे. ते सोडा. पण मनुस्मृतीच्या सर्व प्रती नष्ट करा, असं कुठच्या कोर्टाने सांगितलेलं आहे? ती आहे तशीच राहू द्या. विरोधकांनीही मनुस्मृतीचं प्रतिकात्मक ज्वलन केलं. असा विरोध दर्शवणं वेगळं आणि कोर्टाकडून बंदी येणं वेगळं. हिंदू अस्मितेचा उदय होतोय खरा - पण तिचं रूपडं आणि वागणं मंबाजीसारखं असण्याऐवजी तुकाराम ज्ञानेश्वरासारखं असावं ही इच्छा आहे.

In reply to by राजेश घासकडवी

टवाळ कार्टा Tue, 06/10/2014 - 21:32
हिंदू अस्मितेचा उदय होतोय खरा - पण तिचं रूपडं आणि वागणं मंबाजीसारखं असण्याऐवजी तुकाराम ज्ञानेश्वरासारखं असावं ही इच्छा आहे.
प्रचंड सहमत ... पण आताचे जाणते राजेच असे आहेत की काय बोलणार... रच्याकने ... आत्ताच्या काळात कोणालाही "जाणता राजा" म्हणणे म्हणजे त्या खरोखरच्या जाणत्या राजाचा आपणच करत असलेला अपमान नाही??? या बाबतीत कशा कोणाच्या भावना दुखावत नाहित ... अगदी खर्या जाणत्या राजच्या वंशजांच्या सुध्धा... आपल्या भारतीयांच्या कु**वर छडी मारणारा कोणी असल्याशिवाय आपण सरळपणे कधीच वागत नाही

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ Tue, 06/10/2014 - 21:38
>>>>हिंदू अस्मितेचा उदय होतोय खरा - पण तिचं रूपडं आणि वागणं मंबाजीसारखं असण्याऐवजी तुकाराम ज्ञानेश्वरासारखं असावं ही इच्छा आहे. अत्यंत स्तुत्य इच्छा आहे पण दुर्दैवानं ती पूर्ण होणं अवघडच! बहुसंख्य लोक हुल्लडबाजी नि दंगा ह्यामध्येच दंग होताना आढळतील. समत्वानं विचार होणं शक्य नाही. बाकी इतरांची क्रिया आपल्या हातात नसतेच. आपल्याला शक्य असते ती प्रतिक्रिया. नि तीच कशी व्यक्त करायची ते ठरलं की जमलं. व्यक्ति पातळीवर जमतं बर्‍याचदा पण समष्टी बद्दल विचार करता हे जमणं शक्य नाही ही वस्तुस्थिती मान्य करावी लागते. कुणाला स्कोअर सेटल करायचे असतात तर कुणाला आपलं स्थान बळकट करायचं असतं. कुणाला पकड मजबूत करायची असते तर कुणाला आणखी काही!

In reply to by राजेश घासकडवी

मी मनुस्मृती वाचलेली आहे. त्यात 'मोजकाच' मजकुर आक्षेपार्ह आहे असं म्हणणं म्हणजे विनोद आहे.
मग मनुस्मृतीतील किती टक्के श्लोक जातीयतेचे समर्थन करतात ? ( हा तिरकस प्रस्न नाही , केवळ कुतुहल म्हणुन विचारतोय , मागे कोणीतरी पुरुषसुक्त जातीयतेचे समर्थन करते असे म्हणत होता त्याला मी पुराव्यानिशी सिध्द करुन दाखवले होते की त्यातील १०% पेक्षाही कमी श्लोक वर्णाश्रम व्यवस्थे विषयी बोलतात )
पण तिचं रूपडं आणि वागणं मंबाजीसारखं असण्याऐवजी तुकाराम ज्ञानेश्वरासारखं असावं ही इच्छा आहे.
ओके . माझ्या अपेक्षा काही अशा आहेत ...http://en.wikipedia.org/wiki/Reconquista http://en.wikipedia.org/wiki/Reconquista#mediaviewer/File:Spanish_reconquista.gif

In reply to by प्रसाद गोडबोले

आयला काय अफाट लॉजिक आहे! म्हणजे दहा किंवा अमुक% पेक्षा (अ‍ॅज ष्टिप्युलेटेड बाय द हानरेबल गोडबोलेसाहेब) जास्त कंटेंट आक्षेपार्ह असला तरच ते पुस्तक वाईट मानण्यात येईल. मग हेच लॉजिक संतसूर्य तुकारामला लावा की. सदर्हू पुस्तकात किती टक्के भाग आक्षेपार्ह आहे? (हा तिरकस प्रश्न नाही, केवळ कुतुहल म्हणुन विचारतोय)

In reply to by चिन्मय खंडागळे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/12/2014 - 00:13
करेक्ट ! आता तुम्ही जरा कुठे समजुन घेवु शकाल ... पहिली गोष्ट
दहा किंवा अमुक% पेक्षा (अ‍ॅज ष्टिप्युलेटेड बाय द हानरेबल गोडबोलेसाहेब) जास्त कंटेंट आक्षेपार्ह असला तरच ते पुस्तक वाईट मानण्यात येईल.
असं मी कुठेही म्हणलेले नाही , केवळ कुतुहल म्हणुन विचारले आहे . दुसरी गोष्ट % इज जस्ट वन पॅरामीटर ... आता मनुस्मृतीच काय तर पुरुषसुक्त अन गीतेही काही आक्षेपार्ह श्लोक आहेतच ... एव्हन बुध्दाच्या साहित्यातही असतील , फुलेंचा गणपतीवर टीका करणारा अखंड प्रसिध्द आहे ( बुध्दाने स्त्रीयांना बौध्द धर्मात प्रवेश देवु नये असे सुचवुन ठेवले आहे असे ही ऐकुन आहे ) दा विन्सी कोडही काही ख्रिच्यॅनिटीच्या पायाभुत विस्वासांना तडा लावणारी पहिली कादंबरी नक्कीच नसेल ... म्हणण्याचे तात्पर्य इतकेच तसं पाहिलं तर प्रत्येक लेखनात कोणाच्याना कोणाच्या भावना दुखावणारे काही भाग असतीलच ... % हा काही एकमेव पॅरामीटर नाही क्वालिटी हाही पॅरामीटर आहे , शिवाय ज्या समाजाशी ते लेखन संबंधीत आहे त्यांची बौधिक अवस्था इव्होल्युशनरी स्टेट हाही एक पॅरामीटर आहे ! आजवर हिंदु गपगुमान ऐकुन घेत आले कोणीही या वात्टेल ती टीका करा हिंदु आपले चिडीचुप ऐकुन घेत होतो आजवर हिंदुंवर अनेक टीका झाल्या पण निधर्मी सरकारने त्या विरुध्द काय केले ? आज पहिल्यांदा काही तरी केले असे दिसत आहे ... कुठे तरी हिंदुंना जाणीव होत आहे की आपण गप्प बसलो म्हणुन ही लोक गप्प बसणार नाहीत ..(ऐकीव माहीती नुसार संतसुर्य ह्या कादंबरीत तुकाराम जुगार खेळायचे असा काहीसा उल्लेख होता म्हणे , हिंदु किंग इन इस्लामिक इन्डियातील उल्लेख आपण जाणतोच ... आता ह्या गोष्टी काही सहिणु म्हणुन खपवुन घ्यायच्या नव्हेत ) ...म्हणुन ...."नाठाळाचे माथी काठी " हाणावीच लागेल ! ह्यामी वैयक्तिकली हिंदु अस्मितेचा उदय समजतो !

In reply to by प्रसाद गोडबोले

भृशुंडी गुरुवार, 06/12/2014 - 00:38
(ऐकीव माहीती नुसार संतसुर्य ह्या कादंबरीत तुकाराम जुगार खेळायचे असा काहीसा उल्लेख होता म्हणे , हिंदु किंग इन इस्लामिक इन्डियातील उल्लेख आपण जाणतोच ... आता ह्या गोष्टी काही सहिणु म्हणुन खपवुन घ्यायच्या नव्हेत )
ह्म्म्म.. म्हणजे कशाबद्दल लोकांनी आक्षेप घेतला ते तुम्हाला ठाउकच नाही, आणि तरीही तुम्ही ह्या निर्णयाचं समर्थन करताय. नक्की काय आक्षेपार्ह आहे ते समजेल का? मग आम्हालाही मोकळ्या मनाने हिंदु अस्मितेच्या उदयाचा आनंद घेता येईल, काय?

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त गुरुवार, 06/12/2014 - 01:22
महाराष्ट्र टाईम्स मधील वर दिलेल्या दुव्यात दिला आहे, तेवढाच मजकूर जर असेल, तर त्यात फारसे आक्षेप घेण्याजोगे वाटले नाही. अर्थात तसा उल्लेख तुकारामांच्या आत्मकथनपर कवनात आहे का, हेही बघणे अगत्याचे.

In reply to by प्रसाद गोडबोले

भृशुंडी गुरुवार, 06/12/2014 - 01:27
धन्यवाद. उतार्यांत काही आक्षेपार्ह दिसलं नाही. ह्यात नक्की आक्षेप घेण्यासारखं काय वाटलं, ते मुद्देसूद सांगाल का?

In reply to by प्रसाद गोडबोले

थॉर माणूस गुरुवार, 06/12/2014 - 10:28
कुठे लिहिले आहे? मलाही त्या उतार्‍यात तुकारामांना लागलेल्या व्यसनाविषयी लिहीलेले दिसले नाही. आणि माणसे संत म्हणून जन्माला येत नसतात, ती आपल्या कर्माने संतपदाला पोहोचतात. त्याआधी त्यांच्याकडूनही सामान्य माणसाकडून घडणार्‍या चुका झालेल्या असू शकतात. पण आपल्याकडे कुठल्याही 'मोठ्या' व्यक्तीमत्वाला अगदी देवत्वाच्या पातळीवर नेऊन ठेवायचे आणि मग त्याच्या पुर्वायुष्याबद्दल कुणी आवाज काढायचा नाही की काढू द्यायचा नाही असली काहीतरी विचित्र पद्धत आहे. अरे संत असले तरी माणूस होते ना? अध्यात्माचा मार्ग घेण्यापुर्वी झाल्या असतील की काही चुका त्यांच्याकडून. त्यांचा संत तुकाराम म्हणून आदर करणार्‍यांना त्यांच्या सामान्य तुकाराम म्हणून जगलेल्या आधीच्या आयुष्याशी काय देणं घेणं असावं मग? पुस्तके फाडायला निघालेल्या या लोकांना बहुदा "निंदकाचे घर असावे शेजारी" कुणी म्हटले याचा विसर पडलेला दिसतो.

In reply to by थॉर माणूस

सासवड्कर Fri, 06/13/2014 - 01:42
मी हे पुस्तक वाचले आहे . त्यात त्यांच्या व्यसन विषयी लिहिले आहे . तरुणपणी दुकानात येणाऱ्या मुलींशी लगट करायचे , त्या बदल्यात त्यांना उधार किंवा फुकट माल द्यायचे . उधारी घेण्याचे बहाण्याने मुलींचे आईवडील घरात नसताना घरात जावून बसायचे . शेवटी गावात याची चर्चा सुरु होते . असे लिहिले आहे . संत हेही माणूस होते . माणूस असला म्हणजे तो व्यसनी असलाच पाहिजे , तरुणपणी असे प्रकार केलेच पाहिजेत असे काही आहे का ? जर लेखकाला तसे आढळले असेल तर त्यांनी कोर्टात तसे पुरावे द्यायला हवे होते .

In reply to by सासवड्कर

संत हेही माणूस होते . माणूस असला म्हणजे तो व्यसनी असलाच पाहिजे , तरुणपणी असे प्रकार केलेच पाहिजेत असे काही आहे का ? जर लेखकाला तसे आढळले असेल तर त्यांनी कोर्टात तसे पुरावे द्यायला हवे होते . सहमत. अशा प्रवृत्तीचा निषेध व्हायलाच पाहीजे. लेखक झाले म्हणून काहीही लिहीतील काय? जसे दुर्योधनाला कोणी सज्जन माणूस सापडला नाही तसे कदाचित या लोकांना ते स्वतः सरळमार्गी नसल्याने कोणी अन्य सरळमार्गी असू शकेल असे वाटत नाही. असो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

टवाळ कार्टा Mon, 06/16/2014 - 18:49
जसे दुर्योधनाला कोणी सज्जन माणूस सापडला नाही
मग हे तरी कशावरुन खरे??? यालातरी पुरावा कुठेय? महाभारत लिखित स्वरुपात असले तरी ते पुराण आहे त्यात ५०% जरी खरे मानले तरीही वरचे वाक्य खरे मानता येणार नाही

In reply to by प्रसाद गोडबोले

टवाळ कार्टा Tue, 06/10/2014 - 16:32
प्लीज नोट : मी आधीही म्हणालो होतो की हरकत 'टीका करण्याला' नसुन 'अधिकार नसताना टीका करणे' ह्याला आहे.
तुम्ही कोणावर टिका करता?? (उगाच आपली १ शंका :) )

In reply to by प्रसाद गोडबोले

@माझ्या लेखना उद्देश इतकाच होता की आता असले भावना दुखावणारे लिखाण हिंदुंकडुन खपवुन घेतले जावु नये. >> या बाबतीत सावरकरांचा एक लेख इथे द्यायला पाहिजे.जो त्यांनी सनातनांन्या ठणकावण्यासाठी लिहिलेला होता. त्यात त्यांनी..ह्याच भावना का दुखवता?-वाल्यांना,-- सद्भावना दुखवू नयेत..पण असद्भावना मात्र दुखविल्याच पाहिजेत!...बुद्धिभेद करु नये,पण दुर्बुद्धिभेद केलाच पाहिजे! ...असं ठणकावलेलं आहे. कारण जी दुखावते ती सद्भावना आहे..की असद्भावना आहे...याचा निवाडा आधी झाला पाहिजे. मला गोड खायला प्रचंड अवडतं.मग उद्या डॉक्टर नसलेल्या (अधिकार नसलेल्या) जरी कुणी- "मिठाईवर बंदी घातली पाहिजे,कारण ती डायबॅटिक लोकांना मारायसाठी तयार केलेली आहे." असं म्हटलं तर माझी सद्भावना दुखावली? का असद्भावना दुखावली??? निवाडा काय द्यायचा? (हे उदाहरण सगळ्या धार्मिक/सांस्कृतीक/सामाजिक क्षेत्रातल्या "भावनादुखी" साठी आहे. @हिंदु सहिष्णु आहे ह्याचा अर्थ कोणीही उठसुठ वाट्टेल ती टीका करावी असा नव्हे.>>> हिंदू आपापसात अत्यंत असहिष्णू रहात आलेले आहेत. त्यामुळे आपण सहिष्णू आहोत..हा भ्रम लवकरात लवकर सोडून दिलेला बरा! दुसरं म्हणजे... हिंदू आपापसात असहिष्णू आहेत,,म्हणून ते अहिंदूंच्या समोर विखुरलेले आणि दुर्बल रहातात. ती दुर्बलता किंवा भ्याडपणा आहे..सहिष्णूता नव्हे! @'अधिकार नसताना टीका करणे' >>> अधिकार म्हणजे ज्याच्यावर टीका करायची तेव्हढ्या पातळी आणि लायकी पर्यंत पोहोचलेले लोक असाच ना? मग असेच बरेच लोक आहेत...जे पूर्णतः अधार्मिक क्षेत्रातले आहेत. ज्यांनी केलेलं लेखन, हाच अधिकाराचा मुद्दा लाऊन धुडकाऊन दिलं जातं. म्हणजे मग शिवाजीच्या राज्यकारभारातली एखादी चूक काढणारा माणूस राज्यशास्त्र या विषयातला प्रविण असून भागायच नाही...तुमच्या म्हणण्याप्रमाणे तो शिवाजीच्या पातळीचा हवा..नाही का? हे अत्यंत निरर्थक आणि चुकिचं आहे. शिवाय,चुक काढण्यासाठी अगर गैरगोष्टी दाखवून देण्यासाठी..., ज्या क्षेत्रातला अधिकार असायला हवा! असं तुंम्ही म्हणत असता..ती क्षेत्र अधिकार असण्याची नव्हे..तर त्यातला अभ्यास असण्याची असतात. अधिकाराचा काय संमंध???????? ज्ञानेश्वरांचा भिंत चालवण्याचा चमत्कार..या कथित घटनेवर भाष्य करण्यासाठी..कोणत्याही माणसला त्या क्षेत्रातला,म्हणजे संतपणा मधला अधिकार आवश्यक नसून,सदर घटनेच्या संदर्भातला(भैतिकशास्त्रातला-चमत्कार तपासायचा) अभ्यास आवश्यक असतो! म्हणूनच मी म्हणतो...
अधिकाराचा काय संमंध???????

In reply to by अत्रुप्त आत्मा

धन्या Tue, 06/10/2014 - 22:46
ज्ञानेश्वरांचा भिंत चालवण्याचा चमत्कार..या कथित घटनेवर भाष्य करण्यासाठी..कोणत्याही माणसला त्या क्षेत्रातला,म्हणजे संतपणा मधला अधिकार आवश्यक नसून,सदर घटनेच्या संदर्भातला(भैतिकशास्त्रातला-चमत्कार तपासायचा) अभ्यास आवश्यक असतो! म्हणूनच मी म्हणतो...
माझ्या मनात ज्ञानदेवांबद्दल नितांत आदर आहे. मी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरीपाठाचे अभंग वाचलेले आहेत. अगदी ज्ञानदेव नाथ संप्रदायाचे अनुयायी म्हणून प्र. न. जोशींचा "नाथसंप्रदाय" हा अभ्यासपुर्ण ग्रंथही वाचलेला आहे. तरीही हा भींत चालवण्याचा चमत्कार माझ्या पचनी पडत नाही. तसे झाले असेल तर न्युटनचा गतीविषयक पहिला नियम निकालात निघतो. अर्थात ते होणे नाही. आता कुणी जर म्हणत असेल की ज्ञानदेवांनी आपल्या योगसामर्थ्याने भींत चालवली तर म्हणोत बापडे. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

बाकी इतर मुद्द्यांचे खंडन करीत बसत नाही ....फक्त एक विचारतो ...
शिवाय,चुक काढण्यासाठी अगर गैरगोष्टी दाखवून देण्यासाठी..., ज्या क्षेत्रातला अधिकार असायला हवा! असं तुंम्ही म्हणत असता..ती क्षेत्र अधिकार असण्याची नव्हे..तर त्यातला अभ्यास असण्याची असतात. अधिकाराचा काय संमंध?
अधिकार आणि अभ्यास ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ! समजा तुमची गाडी बंद पडली तर तुम्ही इंजिनियर कडे जाणार की मेकॅनिक कडे ?...( इंजिनियरचा अभ्यास असेल ...अन मेकॅनिककडे नसेल पण मेकॅनिक कडे अधिकार असेल ! ) रामकृष्ण परमहंसांचा असा काय अभ्यास होता ? पण अधिकार होता ! अभ्यासाने फक्त बुध्दीची खाज भागते ...अधिकार ही त्यापेक्षा खुप मोठ्ठी गोष्ट आहे !!

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/12/2014 - 00:20
बायदवे बुवा राग मानु नका पण
अधिकाराचा काय संमंध???????
हे पाहुन मला पु.लं देशपांडेंच्या मुंबैकर पुणेकर आणि नागपुरकर मधील डायलॉग ची आठवण झाली
"तुम्हाला जर पुणे कर व्हायचं असेल तर प्रत्येक विषयावर मत व्यक्त करता आलं पाहिजे ...आता 'अमेरिकेची अर्थव्यवस्था कशी सुधारावी' ह्यावर बोलताना आपण पुणे मुन्सीपाल्तीत उंदीर मारायच्या कामावर आहोत हे विसरुन बोलता आले पाहिजे ... अमेरिकेची अर्थ व्यवस्था ..हं ...ठोका "
इकडे पिंपरी चिंचवड हिंजवडीला तशी काही अट नाही नाही ना बुवा :D

In reply to by प्रसाद गोडबोले

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/12/2014 - 01:33
@बाकी इतर मुद्द्यांचे खंडन करीत बसत नाही ..>>> का बरं??? :D करा ना..तुम्हाला करता येतं की नाही..ते कळू दे की आंम्हाला! ;) @अधिकार आणि अभ्यास ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ! >>> हो आहेत..पण तुंम्ही ज्या क्षेत्राबद्दल चर्चा करत आहात,तिथे या दोन्ही गोष्टींचे तुमचे स्विकृत अर्थ भिन्न आहेत. हे बरोबर आहे की नाही? ते सांगा..तुमचं चर्चेचं क्षेत्र पारलौकिक आध्यात्मिक अनुभवांचं आहे...तिथे अधिकार या शब्दाचा अर्थ त्याक्षेत्रातील अधिकाधिक सिद्ध अनुभव असा होतो.त्यामुळे तिथे अभ्यास, हा शब्दसुद्धा अवाजवी आणि गैरलागू होतो...पण त्याच अधिकार शब्दाचा इहलौकिक अर्थ-त्या क्षेत्रातला अभ्यास ज्याला असतो..त्यालाच त्या क्षेत्राचे अधिकारी म्हणवता येते..असा आहे. त्यामुळे या चर्चा विषयाच्या अनुषंगानी जाताना,तुम्ही म्हणता त्या दोन गोष्टी फक्त वेगवेगळ्या न रहाता..वेगवेगळ्या क्षेत्रातल्याही होऊन बसतात..नै का? @समजा तुमची गाडी बंद पडली तर तुम्ही इंजिनियर कडे जाणार की मेकॅनिक कडे ?...>>> का बरं असा गैरलागू प्रश्न विचारलात??? गाडी बंद पडली तर इंजिनियरकडे जातच नाहीत..मेकॅनिक कडे जातात गैरलागू उदाहरणः- खरतर आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रातल्या वादविवादात इहलौकिक उदाहरण लागूच पडत नाहीत. असा निष्कर्ष मी काढलेला आहे. कारण इहलोक ही वस्तुस्थिती..तर धर्म आध्यात्म हा केवळ कल्पनाविलास..किंवा सत्याभास! पहिलं सत्य आणि दुसरा भ्रम..कशी होणार तुलना??आणि कसं मिळणार लागू पडणारं उदाहरण??? ..असो! @( इंजिनियरचा अभ्यास असेल ...अन मेकॅनिककडे नसेल पण मेकॅनिक कडे अधिकार असेल ! )>>> कैच्याकै निरर्थक विधान!..मॅकॅनिकचा अभ्यास नसतो????????????? आणि फक्त अधिकार असतो???????? बाप रे बाप!!!!!!!! आणि मॅकॅनिककडे अधिकार आलेला असतो,तो त्याच्या गाड्या दुरुस्त करण्याच्या अभ्यासातूनच!हे कसं विसरलात हो???? आणि मॅकॅनिक काही--"केवळ आपण गाडी दुरुस्त करतो आहे..करतो आहे..ती ठिक होते आहे..होते आहे..झाली..ठीक झाली..." असा ध्यानधारणेसारखा... ध्यान लाऊन मनात आभास निर्माण करून,गाडी दुरुस्त केल्याची अनुभूती आल्याचं भक्तांना सांगून अधिकाराचं प्रमाणपत्र मिळवत नाही... हे तर उघड आहे ना? त्यामुळे-एकदा तुमच्या आध्यात्मिक/धार्मिक क्षेत्रात अधिकार कशाकशाला म्हणतात? ते सांगा..म्हणजे..त्याचे घटक काय काय आहेत?..ते(आंम्हालाही ;) )कळू द्या! @रामकृष्ण परमहंसांचा असा काय अभ्यास होता ? पण अधिकार होता ! >>> हेच्च ते..! हा अधिकार अधिकार म्हणजे,त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात केलेली साधना(तिचा अनुभव) आणि त्यांची व्यक्ति म्हणून असलेली शुचिता हाच ना? मग..त्यांना देवानी दर्शन दिल्याची जी काय अनुभूती होती..तीची चिकित्सा केलेली व्यक्ति (किंवा अशा सगळ्याच घटनांच्या चिकित्सा/त्यावर टीका करणार्‍या व्यक्ति) ह्या अनैतिकही नव्हत्या..नसतात.(सामाजिक चळवळींमधल्या उथळ तसेच सूडबुद्धीच्या अपवादात्मक व्यक्ति सोडून) आणि अधिकार म्हणाल,तर त्यांना(विरोधकांना) ह्या सगळ्या संत महात्म्यांच्या आध्यात्मिक धार्मिक साधना/ध्यानधारणांच्या प्रक्रीयांचं मनोवैज्ञानिक-ज्ञान त्यांच्यापेक्षा अधिक होतं आणि आहे. @अभ्यासाने फक्त बुध्दीची खाज भागते...अधिकार ही त्यापेक्षा खुप मोठ्ठी गोष्ट आहे !!>>> प्रचंड भंपक विधान. आभ्यासानी जर का फक्त बुद्धिची खाज भागते, असं असतं..तर अखिल जगतात..अंबेडकर/सावरकरांपासून ते अनेक इहलौकिक क्षेत्रातले नामवंत अभ्यासू समाज सुधारक समजाच्या उपयोगी आलेच नसते. आणि अधिकार कुणी कुणाला द्यायचा???...चिकित्सकानी/टीकाकारानी/लेखकांनी, ज्या व्यक्ति-विषयांवर टीका/अभ्यास करायचा त्यांच्याकडन,अधिकार-असल्याची प्रमाणपत्र आधी मिळवायची की काय? आणि ही प्रामाणं व त्याची पत्र कोणत्या निकषांवर मिळवायची???..त्यात..पुन्हा, धर्म/आध्यात्माच्या क्षेत्रात एकवाक्यता येणच शक्य नसतं कारण,तो प्रांत सगळाच्या..सगळा स्वसंवेद्य..म्हणजे केवळ आपापल्या(ज्याच्या/त्याच्या) अनुभवांवर आधारित..तिथे तुम्म्हाला अधिकारी असल्याची,प्रमाण किंवा किमान पातळीच ठरवता येत नाही..कारण आडातच नाही..तर पोहोर्‍यात कुठून येणार? मग कसं करणार तुंम्ही टीकाकाराच्या अधिकाराच मापन...आधी तुमच्याकडे त्याच माप असायला हवं ना..? ते आणा,आणि मग या अधिकाराचा वाद खेळायला! आता...या अधिकाराच्या बाबतीतला अजुन एक राहिलेला प्रश्न-तो म्हणजे व्यक्ति सदाचरणी म्हणजे इहलौकिक दृष्ट्या नितीमान असण्याचा*!...तर तुम्ही म्हणता त्या क्षेत्राच्या विरुद्ध बाजूचे अनेक अभ्यासक/टीकाकार/चिकित्सक ..हे नितिमान होते..सदाचरणीही होते..तरीसुद्धा मी आधी म्हटल्या प्रमाणे, हा अधिकाराचा गैरलागू आणि भंपक मुद्दा काढून त्यांची निरिक्षणं/परिक्षणं/निष्कर्ष..अशीच धुडकावून लावली जातात...त्याचं काय? याचा एकदा विचार करा. *(आध्यात्मिक धार्मिक पंथात,{वादविवादाच्या वेळी..} अधिकारा'च्या मुद्यात- हे ही एक लक्षण आवश्यक मानतात..बरोबर ना?)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस गुरुवार, 06/12/2014 - 08:46
आत्मुबुवांचे मेगाबायटी प्रतिसाद पाहायला मिळत नाहीत. आज ते मिळालेत हीच ती अनुभूती.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/12/2014 - 11:39
ह्म्म ... एकुणच आपले ह्या विषयावर एकमत होईल असे दिसत नाही ... फक्त जाता जाता एक शेवटचा प्रश्न १)निवृत्ती ज्ञानेश्वरची मुंजही झाली नव्हती सो त्यांचा सनातन धर्माचा ,,वेद ,उपनिषद वगैरेंचा,अभ्यास असण्याची शक्यता फारच कमी आहे , जे काही ज्ञान आहे ते कदाचित लहानपणी वडीलांनी गीता शिकवली असेल त्यातुन किंव्वा निवृत्तींवर जी गुरु कृपा झाली त्यातुन प्राप्त झालेले अन अनुभवातुन 'अधिकारात' रुपांतरीत झालेले ... आता तत्कालिन मंडळी म्हणजे पैठण आळंदीचे ब्राह्मण वगैरे हे नक्कीच जास्त अभ्यास केलेल्रे लोक होते , चांगदेवांचाही १४०० नाही पण किमान १४ वर्षांचा तरी सखोल योगाभ्यास नक्कीच असावा ... मग ह्यातील श्रेष्ठ कोण ? अधिकार असलेले ज्ञानेश्वर की अभ्यास असलेले इतर ? २)सेम होल्ड्स फॉर तुकाराम , तुकाराम स्वतःच्याच अभंगात म्हणतात की शुद्र याती जन्मलो सो त्यांचाही अभ्यास असण्याची धर्माचे अध्ययन असण्याची शक्यता फारच कमी आहे जास्तीत जास्त ज्ञानेश्वरी आणि कदाचित एकनाथी भागवत वाचलेले असावे ... त्यामानाने मंबाजी रामशास्त्रजी सालोमालो वगैरे लोक नक्कीच प्रकांड पंडीत असावेत ... मग ह्यातील महान कोण ? अधिकारी तुकाराम की 'अभ्यासु' इतर ? अजुन खुप उदाहरणे देता येतील ... गोंदवलेकर महाराज , गाडगे बाबा , वगैरे लोकांनीही किती अभ्यास केला होता देव जाणे अ‍ॅस्ट्रोनॉट श्रेष्ठ की अ‍ॅस्ट्रोनॉमर असा हा वाद आहे ... आणि माझ्यामते अ‍ॅस्ट्रोनॉट हेच श्रेष्ठ आहेत ..अअ‍ॅन्ड वी कॅन अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री हीयर :)

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन गुरुवार, 06/12/2014 - 12:49
मुंज झाल्यानेच किंवा ब्राह्मण असल्यानेच सनातन धर्माचा अभ्यास होतो इ. वाचून अतिशय करमणूक झाली. चालूद्या.

In reply to by बॅटमॅन

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/12/2014 - 14:46
सनातन धर्माचा अभ्यास होतो
वेद , पुराण , स्मृती , दर्शन वगैरे वगैरे ....किमा गीता , उपनिषदे आणि ब्रह्मसुत्र ह्या तीन ग्रंथांच्या अभ्यासाला मी सनातन धर्माचा अभ्यास मानतो , ज्ञानेश्वरांचा काळाचा रेफरन्स घेवुन पाहिले तर मुंज न झालेल्याला किंव्वा ब्राह्मण नसलेल्याला ह्यांचा अभ्यास करण्याची संधी मिळत नसणार ... काळाचा संदर्भ सोडुन संतांच्या जीवनाचा अभ्यास करता येणार नाही ... असो फार बिषयांतर झाले करमणुक कराची पावती कोणत्या पत्त्यावर पाठवु *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन गुरुवार, 06/12/2014 - 15:28
तुकोबा जेव्हा म्हणतात की मला काही कळत नाही, ते म्हंजे आईन्स्टाईनने मला काही फारसे कळत नाही असे म्हटल्यापैकीच आहे. ते एक वाक्य धरून आईन्स्टाईनला काही कळत नाही असे म्हणणे जितके ग्राह्य आहे तितकेच हेही आहे. अन काळाचा संदर्भच घ्यायचा झाला तर ब्राह्मणेतर लोकांना याचा अभ्यास करायला मिळत नव्हता हेही तितकेच असत्य आहे. भक्ती चळवळ दृढमूल झाल्यापासून अशी पॅरलल व्यवस्था तयार झालेली आहेच- त्याच्याही आधीपासून असावी. अन आज वाटतो तितका तो सरळधोपट प्रकार कधीच नव्हता. पण आज त्या काळचे फारसे कै उरलेले नसल्याने एकांतिक विचार करणार्‍यांचेही फावतेच..असो. बाकी चालूद्या.

In reply to by प्रसाद गोडबोले

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/12/2014 - 15:33
@१)निवृत्ती ज्ञानेश्वरची मुंजही झाली नव्हती सो त्यांचा सनातन धर्माचा ,,वेद ,उपनिषद वगैरेंचा,अभ्यास असण्याची शक्यता फारच कमी आहे , जे काही ज्ञान आहे ते कदाचित लहानपणी वडीलांनी गीता शिकवली असेल त्यातुन किंव्वा निवृत्तींवर जी गुरु कृपा झाली त्यातुन प्राप्त झालेले अन अनुभवातुन 'अधिकारात' रुपांतरीत झालेले ... आता तत्कालिन मंडळी म्हणजे पैठण आळंदीचे ब्राह्मण वगैरे हे नक्कीच जास्त अभ्यास केलेल्रे लोक होते , चांगदेवांचाही १४०० नाही पण किमान १४ वर्षांचा तरी सखोल योगाभ्यास नक्कीच असावा ... मग ह्यातील श्रेष्ठ कोण ? अधिकार असलेले ज्ञानेश्वर की अभ्यास असलेले इतर ?>>> पलटी खाल्ल्याबद्दल हबिनंदण हो !!! :D परत परत अधिकार अधिकार करत बसा..आणि तीच तीच निरर्थक /गैरलागू उदाहरणे देत बसा! पण...मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ नका...तेंव्हा एकं-दरीत..चालू द्या...! :D @त्यामानाने मंबाजी रामशास्त्रजी सालोमालो वगैरे लोक नक्कीच प्रकांड पंडीत असावेत ... मग ह्यातील महान कोण ? अधिकारी तुकाराम की 'अभ्यासु' इतर ?>>> मंबाजी आणि इतर अभ्यासूही नाहीत..अधिकारीही नाहीत..टगे आणि दांभिक आहेत.. (मुद्दाम त्यांची पार्टी बदलू नका) आणि पहा बरं-पुन्हा एकदा तुंम्ही प्रस्तुत चर्चा विषयाच्या बाबतीत गैरलागू उदाहरण दिलत..(म्हणूनच ते अदखलपात्र आहे!) आणि तुकारामांचा अधिकारही जीवनाविषयीच्या अभ्यासातूनच आहे..तुम्म्ही म्हणता तसल्या पोकळ भंपक-अधिकारातून नाही.(हे विसरलात)त्यामुळे तुकारामांना आपल्या-बाजुला घेण्याचा प्रयत्न करू नका. आणि तुम्ही म्हणता--तसल्या--अधिकाराची व्याख्या करा/सांगा(टाळू नका) मग त्यात व्याख्येत तुमच्याकडलं कोणकोण बसतं ते आपण ठरवू! ================= आणि ही इथली चर्चा सोडून द्या..(मी हरलो...असे माना.. :) ..) फक्त..मी सांगतो ती पुस्तके वाचा आणि जमलं तर त्यांचा प्रतिवाद इथे (क्रमवार) मांडा.. १) मनुस्मृती- काही विचार...(नरहर कुरुंदकर) २)मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती..(डॉ.आ.ह.साळुंखे) ३)विद्रोही तुकाराम...(डॉ.आ.ह.साळुंखे)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/12/2014 - 18:10
मला तुमचा मुद्दाच कळाला नाही... अभ्यास आणि अधिकार ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अन एकाने दुसरा येईलच असे नाही इतकेच मी म्हणत आहे . असो. बाकी तकारामानां मी कशाला माझ्या बाजुला ओढतोय उलट मीच त्यांच्या बाजुला जायचा प्रयत्न करतोय !! आणि जीवनविषयक अभ्यासाविषयी बोलाल तर त्यांच्या पेक्षा जास्त अभ्यास त्यांच्या पत्नीचा होता असेच म्हणावे लागेल.... मस्त प्रपंचात रहावे सावकारीचा व्यवसाय पहावा पोराबाळांचे पोट भरावे चवीपुरते देव देव करावे बस्स ! ============================= मी चर्चा हार जीत साठी करत नसतो ... "अधिकार नावाची गोष्ट नसतेच अभ्यासाने माणसाला ज्या गोष्टीचा अभ्यास आहे त्यावर बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो ! " असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते काही मला पटत नाही , ( प्रचिती , अनुभव आणि योगदान नसलेला अभ्यासी माणुस माझ्या साठी अनधिकारीच आहे ) , तुमचे मत तुम्ही पटवुन दीले तर आनंदाने मान्य करेन ! आ.ह. साळुखे अत्यंत वादग्रस्त व्यक्तीमत्व आहे ... तुम्ही त्यांच्या मार्गाने जात असाल तर _/\_ :)

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/12/2014 - 18:21
लहानपणी एक गोष्ट ऐकली होती ती आठवली आता ही तुकारांची आहे की नाही की प्रक्षिप्त आहे ह्यावर आपण नंतर कधी तरी वाद घालु "एका बाईचा मुलगा सारखा गुळ खात असतो , सगळे दात किडलेले असतात , आणि कितीही सांगुन तो काही ऐकत नसतो , मग शेवटी ती बाई विचार करते की तुकाराम बुवांसारख्या आदरणीय व्यक्तीने सांगितले तर कदाचित तो ऐकेल ... ती पोराला तुकारामांकडे घेवुन येते व म्हणते की 'महाराज , सारखा गुळ खातो हा , ह्याला जरा चार शब्द सांगा तुम्ही सांगितलं तर ऐकेल'... तुकाराम महाराज म्हणतात 'बाई तुम्ही ह्याला एक आठवड्याने माझ्या कडे घेवुन या मग मी सांगतो काय सांगायचे ते ' . बाई पोराला घेवुन येते एक आठवड्या नंतर ... महाराज त्या मुलाला जवळ घेवुन कुरवाळुन सांगतात 'बाळा , सारखा सारखा गुळ खात जाऊ नकोस त्याने दात किडतील ... ऐकणार ना माझं ?' आणि मग तो मुलगा नंतर खरचं गुळ खायचे सोडुन देतो . पण ती बाई आश्चर्यचकित होवुन महाराजांना म्हणते ' तुम्हाला हे एक आठवडा आधीच नव्हतं का सांगता येत ?' महाराज म्हणतात ' आलं असतं सांगता पण मला केवळ ते माहीत होतं ... गेला आठवडाभर मी स्वतः गुळ खाणे सोडुन पाहिले मग लक्षात आले की हे किती अवघड आहे पण तरीही शक्य आहे ... मग मला तसे सांगण्याचा अधिकार प्राप्त झाला... उगाचच नुसत्या अभ्यासाने त्याला सांगितलं असतं तर त्याला ते पटलं नसतं आणि कदाचित माझं मन मला खात राहिलं असतं की जे स्वतःला जमत नाही ते दुसर्‍यांना उपदेशितो म्हणुन '!! " ||

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त गुरुवार, 06/12/2014 - 18:37
अगदी शेम हीच गोष्ट (फक्त गुळाऐवजी साखर) गांधीबाबा (राहुलबाबा नव्हेत, ते आपले नोटांवरले चिरपरिचित बाबा) बद्दलही सांगितली जाते, हे कसेकाय बुवा? अन्नू मलिक वगैरें मूजिक ढापतात, तसे त्यांनीपण तुकारामांची गोष्ट ढापली की काय?

In reply to by प्रसाद गोडबोले

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 06/12/2014 - 19:04
अ‍ॅस्ट्रोनॉट श्रेष्ठ की अ‍ॅस्ट्रोनॉमर असा हा वाद आहे
एकाही विषयातलं काहीही माहित नसताना श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवलं की असंच काही(च्या काही) वाटणार. आजचा दिवस गडबोल्यांनी सत्कारणी लावला.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>एकाही विषयातलं काहीही माहित नसताना श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवलं की असंच काही(च्या काही) वाटणार. >> विक्षिप्त बाई, अहंकार सोडा. तुम्हाला सगग्ळ्यातलं सग्गळं कळतं असा जो अहंकार आहे ना. सोडा जरा. बाकी अनेकांना अनेक गोष्टी माहित अस्तात म्हटलं.

In reply to by प्रसाद गोडबोले

बाबा पाटील Sat, 06/14/2014 - 19:49
ह्यो धर्म आणी धर्माब्यास म्हणजी काय रे भाउ,म्हणजी मुंजी वाले बामण सोडुन ती पुस्ताक कुनी वाचायचीच नाय का ? बाकी समदी आडाणी गोट का काय गुर्जी ? मंग माऴ्याचा जोतिबा आणी हरिजंनांचा बाबा पण तुह्या मते ठार आडाणी असल नार भावु. रागावु नका दादा पण मला कुणबाटाला जरा डोस्क्यात किडा वळवाळला म्हणुन इचारला. आपला- आडाणी गावचा अंगठेबहाद्दुर बाबाजी पाटील.

In reply to by धन्या

आनन्दा Tue, 06/10/2014 - 16:37
तुमच्या मनातले नाही होणार कदचित. पण एखाद्या लहान मुलाच्या हातात हे पुस्तक पडले तर? संवैधानिक मार्गाने बंदी आणणे केव्हाही योग्यच. नपेक्षा तुम्ही जे काही लिहिलेत त्याचे पुरावे द्या. बाकी एक प्रश्न आहे - या पुस्तकात जर ते "कालपनिक" चे डिस्क्लेमर टाकले तर त्यांना परत प्रकाशनाची अनुमती मिळेल का?

धर्मराजमुटके Tue, 06/10/2014 - 16:33
कसे काय बुवा तुम्ही अस्मिता बिस्मीता शोधता अशा प्रकरणांत ? अहो हा फक्त कोर्टाचा निकाल आहे. तो फक्त समोर आलेल्या पुराव्यांवर अवलंबून असतो. अवांतर : कोर्टाला मराठीत न्यायालय असा समानार्थी शब्द कोणी शोधला हो ? त्याला फार्फार तर निकालालय किंवा निवाडागृह म्हणणे ठीक.

चित्रगुप्त Tue, 06/10/2014 - 22:42
या संदर्भात भाऊ तोसरेकर यांचा लेख 'मोदी जिंकले पण हरवले कोणाला?' वाचनीय आहे: http://panchanaama.blogspot.in/2014/05/blog-post_18.html त्यातील थोडासा भागः ..........अल्पसंख्य असलेल्यांनी बहुसंख्य असलेल्यांच्या भावना, श्रद्धा, इच्छा वा आकांक्षांवर कुरघोडी करणे; असे जे चित्र मागल्या तीनचार दशकात अट्टाहासाने व आक्रमकपणे निर्माण करण्यात आले होते, त्याच्या विरोधात हिंदू समाजामध्ये मोठीच नाराजी व क्रोध खदखदत होता. जणू भारतामध्ये हिंदू असणे म्हणजेच गुन्हा आहे आणि हिंदू नसणे म्हणजेच महापुण्य आहे; असा आग्रह धरला जात होता... ... उगाच कोणाच्या अंगावर जायचे नाही, पण कोणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घ्यायला मागेपुढे पहायचे नाही, असा स्वभाव असलेल्या मोदींनी बारा वर्षात संयमाने त्यावरचे उपाय शोधले, कुठलीही हानी अपाय होऊ न देता तेच उपाय गुजरातमध्ये अंमलात आणले. त्यातून त्यांची हिंमत वाढली आणि दुसरीकडे त्यांच्या उपायांचे उर्वरीत भारतातल्या अशा दुखावलेल्या समाजाला आकर्षण वाटू लागले. त्यातूनच मग थेट देशाचे नेतृत्व करून अशा थोतांडाचे मूळ असलेल्या नेहरूवादाला खुल्या मैदानात आव्हान देऊन पराभूत करायचे मनसुबे मोदींनी रचले....

In reply to by चित्रगुप्त

@अशा थोतांडाचे मूळ असलेल्या नेहरूवादाला खुल्या मैदानात आव्हान देऊन पराभूत करायचे मनसुबे मोदींनी रचले....>>>बरोब्बर शब्दरचना..+++१११ अतिशय सहमत!

In reply to by चित्रगुप्त

हवालदार गुरुवार, 06/12/2014 - 20:52
पण एकदम चपखल. " जणू भारतामध्ये हिंदू असणे म्हणजेच गुन्हा आहे आणि हिंदू नसणे म्हणजेच महापुण्य आहे; असा आग्रह धरला जात होता..." असे झाले होते खरे.

भृशुंडी Tue, 06/10/2014 - 22:54
जबरदस्त! येऊ द्या प्रसाद साहेब, अजून असेच जाज्वल्यपूर्ण लिखाण येऊ द्यात! ही पुस्तके आपण वाचली काय न वाचली काय - त्याने काय फरक पडतो, नाही का? पुस्तक काय, मी तर म्हणतो कोणी आपल्या खाजगी वह्यांमध्ये सुद्धा असे अश्ल्याघ्य विचार लिहिता कामा नये. त्यावरही बंदी आणायलाच हवी. हिंदूंच्या महापुरुषांचा अपमान कुणीही लुंग्यासुंग्याने करावा आणि त्यांनी गप्प बसावे- ही परिस्थिती उरली नाही. आज जर कुणी असा वेडावाकडा विचारही केला, तर त्यांना त्याबद्दलही शिक्षा मिळालीच पाहिजे. असा जळजळीत लेख लिहून समस्त हिंदूंच्या भावनांना वाट फोडल्याबद्दल अभिनंदन!

भगव्यांना, खाकी हाफ पँट वाल्यांना शिव्या देणं, हिरव्यांच्या बोकड दाढ्या कुरवाळणं हिचं खरी धर्मनिरपेक्षता असते प्रसाद दादा....हिंदु मेला तरी चालेल...वोट बँक मेली तर कसं व्हायचं? नशिब खांग्रेस चं वाट्टोळं झालं आत्ता नाहीतर व्हॅट, एल.बी.टी., एजुकेशन टॅक्सेस, सेस बरोबर जिझिया पण लावला असता.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

भृशुंडी Wed, 06/11/2014 - 00:13
नाही तर काय? हिंदु मेला तरी चालेल, पण शीख,जैन,बौद्ध, मुस्लीम, ख्रिश्चन, आदिवासी, नास्तिक अशांना धक्का लागता कामा नये. हिंदू धर्मासारखा सर्वसमावेशक ( ते लोकायत वगैरे फालतू लोक सोडून द्या) धर्म दुसरा नाही, हे या देशाला कळेल तो सुदिन.

चित्रगुप्त Wed, 06/11/2014 - 23:09
फार काळानंतर 'जाज्वल्य' हा शब्द वाचायला मिळाला. असेच जाज्वल्य लिखाण येऊ द्या प्रसाद्पंत. निवडणुकांपूर्वी नेहरूशाहीत पोसली जाऊन बुजबुजलेली तथाकथित 'इंटलेक्चुअले' मोदीविरोधात एकत्र येऊन काहीतरी करणार होती म्हणे, त्याचे काय झाले, याची बतमी आलीय का कुठे? आणि त्या चमत्कारी फादर बद्दल (त्यांचे काय नाव? लिहायला डरू नका प्रसादपंत) अंनिस, दाभोलकर यांनी आवाज उठवलेला आहे का?

In reply to by धन्या

माहितगार गुरुवार, 06/12/2014 - 11:07
संजय सोनवणींनी ब्लॉगवर प्रतिक्रीया नोंदवताना त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी न्या. सौ. के. पी. जैन यांनी दिलेला संपुर्ण निकाल वाचला आहे. कविता महाजनांचीही ब्लॉगवर प्रतिक्रीया आली आहे. प्रहार मध्येही या विषयावर लेख आला आहे. एकुण काय तर तुम्ही वाल्मिकी ऋषिंच्या वंशातले असाल तर पुराव्या अभावी होत असलेली संतनिंदा थांबवण्याची आता मागणी करू शकता. उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय काय तो निकाल येत्या काळात देतीलच. पण या धागा लेखकाने काढलेला अन्वयार्थ माननिय न्यायाधिशांनाही त्यांच्या निवृत्ती नंतर सवडीने वाचण्यास जरूर मिळो, सध्या एवढीच शुभेच्छा.

म्हैस गुरुवार, 06/12/2014 - 13:07
हि दोन्ही पुस्तक मी वाचलेली नाहीयेत . पण आत्ता एवढा वाद चाललाय म्हणल्यावर वाचेन .
अध्यात्माचा मार्ग घेण्यापुर्वी झाल्या असतील की काही चुका त्यांच्याकडून
सहमत .तुकाराम महारज देशोधडीला लागायच्या आधी सामान्य माणूसच होते . त्या काळात काही चुका केलेल्या असू शकतात . जशी जशी त्यांच्यापासून १ - १ गोष्ट दूर गेली तसे तसे वैराग्य वाढू लागले आणि सत्याचा शोध घेण्याची ओढ निर्माण झाली
पुरुषसुक्त अन गीतेही काही आक्षेपार्ह श्लोक आहेतच
काही म्हणजे नक्की कोणते श्लोक आहेत ते इथे स्पष्टपणे सांगा . चर्चा करता येईल
तरीही हा भींत चालवण्याचा चमत्कार माझ्या पचनी पडत नाही. तसे झाले असेल तर न्युटनचा गतीविषयक पहिला नियम निकालात निघतो. अर्थात ते होणे नाही.
तुम्ही पुस्तकं बरीच वाचली असतील पण स्वतःचा योगशास्त्राचा अभ्यास किती आहे? न्युटनचा किवा कुठलाही भौतिक शास्त्राचा नियम लावण्याचं तात्पर्य काय ? अध्यात्मशास्त्राचा नियम भौतिक शास्त्राला लावलेला चालेल का?
रामकृष्ण परमहंसांचा असा काय अभ्यास होता ? पण अधिकार होता ! अभ्यासाने फक्त बुध्दीची खाज भागते ...अधिकार ही त्यापेक्षा खुप मोठ्ठी गोष्ट आहे !!
एकदम सहमत . खूप अभ्यासू आणि विद्वान असलेल्या विवेकानंदांना पहिल्याच भेटीत रामकृष्णांनी सत्याचा अनुभव करून दिला होता .
निवृत्ती ज्ञानेश्वरची मुंजही झाली नव्हती सो त्यांचा सनातन धर्माचा ,,वेद ,उपनिषद वगैरेंचा,अभ्यास असण्याची शक्यता फारच कमी आहे , जे काही ज्ञान आहे ते कदाचित लहानपणी वडीलांनी गीता शिकवली असेल त्यातुन किंव्वा निवृत्तींवर जी गुरु कृपा झाली त्यातुन प्राप्त झालेले अन अनुभवातुन 'अधिकारात' रुपांतरीत झालेले ... आता तत्कालिन मंडळी म्हणजे पैठण आळंदीचे ब्राह्मण वगैरे हे नक्कीच जास्त अभ्यास केलेल्रे लोक होते , चांगदेवांचाही १४०० नाही पण किमान १४ वर्षांचा तरी सखोल योगाभ्यास नक्कीच असावा ... मग ह्यातील श्रेष्ठ कोण ? अधिकार असलेले ज्ञानेश्वर की अभ्यास असलेले इतर ?
पुस्तकी ज्ञान असणं आणि सत्याचं ज्ञान असणं ह्यात फरक अहे. गुरुचरित्रात ह्याविषयी १ अध्याय अहे. धर्मशास्त्रांचा , वेदांचा नुसताच पुष्कळ अभ्यास असणारे पण काडीचीही अक्कल नसणारे मोठे पंडित श्रीगुरुंशी वेदांवर वाद घालायला येतात आणि त्यांची कशी फजिती होते ह्यावरून पुस्तकी प्रकांद्पंडीत असण्याचा आणि 'अधिकारी' असण्याचा काहीही संबंध नाही हे स्पष्ट होत. आळंदीचे ब्राह्मण वगैरे हे नक्कीच जास्त अभ्यास केलेल्रे लोक होते तर ज्ञानेश्वरांच्या पुढे लोटांगण का घातला त्यांनी ? त्यांना तशी कुणी सक्ती केली होती का? १४०० वर्षे योगाभ्यास केलेले चांगदेव एवढे अभ्यासी होते तर ज्ञानदेवांना गुरु करून घेण्यासाठी का आले? ह्यांचीही उत्तरं द्या
सेम होल्ड्स फॉर तुकाराम , तुकाराम स्वतःच्याच अभंगात म्हणतात की शुद्र याती जन्मलो सो त्यांचाही अभ्यास असण्याची धर्माचे अध्ययन असण्याची शक्यता फारच कमी आहे जास्तीत जास्त ज्ञानेश्वरी आणि कदाचित एकनाथी भागवत वाचलेले असावे ... त्यामानाने मंबाजी रामशास्त्रजी सालोमालो वगैरे लोक नक्कीच प्रकांड पंडीत असावेत ... मग ह्यातील महान कोण ? अधिकारी तुकाराम की 'अभ्यासु' इतर ?
प्रकांड पंडीत असण्याचा आणि महान असण्याचा काहीच संबंध नाही हे वर मी सांगितलाच आहे . तुमचा ज्ञानेश्वर आणि तुकारामांचा काय 'अभ्यास ' आहे ते कळू द्या . नुसत्या शक्यता वगेरे मांडू नका . ठाम काहीतरी सांगा ईश्वर भक्ती , योगसाधना ह्यातला अधिकारी असण्यासाठी प्रकांड पंडित असावं लागतं असं कुणी सांगितला तुम्हाला ?

In reply to by म्हैस

प्यारे१ गुरुवार, 06/12/2014 - 13:40
सहमत! बाकी विषय '(इतर पंथांच्या तुलनेनं) हिंदू अस्मितेचा उदय' असा काहीसा असावा का की '(स्वधर्मीयांच्या विचारांच्या खंडनाच्या स्वरुपात) हिंदू अस्मितेचा उदय' असं अपेक्षित आहे असं लेखकाला नम्रपणं विचारु इच्छितो. ;)

In reply to by प्यारे१

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/12/2014 - 15:08
हा महत्वाचा प्रश्ण विचारलात प्यारेजी ... आणि उत्तर आहे (इतर पंथांच्या तुलनेनं) हिंदू अस्मितेचा उदय' हिंदु लोक ऐकुन घेतात म्हणुन त्यांच्या संतांवर कैच्याकै टीका करा , त्यांच्या देवी देवतांची नागडी उघडी चित्रे काढा , "मंदीरांपेक्षा शौचालये महत्वाची" , "वारी बंद करा ", असली कैच्याकाइ विधाने करा , हिंदुंच्या अंधश्रधांविरुध्द कायदा करा अन इतरांना बिन्धास्त सोडुन द्या , गणपती आले की पाणी प्रदुषणाच्या गप्पा , दिवाळी आली की वायु प्रदुषण थोडक्यात काय तर येन केन प्रकारेण हिंदुंचे कसे चुकते अन हिंदु धर्म कसा बावळटांचा धर्म आहे हे ठसवत रहाणे ...सतत तेजोभंग करत रहाणे.... भले मग हिंदुंच्या भावना दुखावल्या तरी चालतील ... कारण ते अल्पसंख्य नाहीत ना !! हे आता बस्स झाले. "भले तरी देवु कासेची लंगोटी | नाठाळाची माथी काठी हाणु ||" " धटासी व्हावे धट | उध्दटासी उध्दट | खटनटासी खटनट | कैसा शोभे ||" आणि वितंडवाद्यांनी वाट्टेल तसा अर्थ काढु नये म्हणुन हे स्पष्टीकरण "हिंदु धर्मात वाईट प्रथा परंपरा आहेतच त्या निंद्यच आहेत आणि त्यांचे निर्मुलन व्हायलाच पाहेजे " पण ज्यांना हिंदु धर्माविषयी आस्था नाही , धर्माचा प्रसार प्रचार व्हावा अशी इच्छा नाही अशा लोकांनी आता बोलु नये. हिंदु लोक त्यांचे प्रॉब्लेम्स स्वतःच्या बळावर सोडवतील... सावरकरांसारख्यानी हिंदु धर्मावर टीका केली तर चालेल पण ना.वा. टिळकांसारख्यानी केली तर ती अजिबात खपवुन घेवु नये !!

In reply to by प्रसाद गोडबोले

टवाळ कार्टा गुरुवार, 06/12/2014 - 16:49
"मंदीरांपेक्षा शौचालये महत्वाची"
मंदिरांपेक्षा शौचालये जास्त महत्वाची आहेत...भारतात ५०% पेक्षा जास्त जनता उघड्यावर शौचाला जाते...आणि त्यातल्या स्त्रीयांचे प्रमाण बघता .... जौदे जोपर्यंत तुमच्या ओळखितल्यापैकी कोणी या परीस्तिथीतुन जात नाही तो पर्यंत नाही कळणार
"वारी बंद करा "
असे कोण , कोणास, कधी, कुठे, कशासंधर्भात बोलले??? काही विदा आहे का? असला तर मला बघायला आवडेल...आणि पटले तर मी सुध्धा तुमच्या बाजुला
गणपती आले की पाणी प्रदुषणाच्या गप्पा , दिवाळी आली की वायु प्रदुषण
हे खरेच आहे...८०% लोकांनी सण साजरा करताना हजारो टन प्लास्टर ओफ ऑफ प्यारिस पाण्यात सोडले जाणे...४-५ दिवस हवा धुराने भरुन जाणे हे प्रदुषणच आहे आणि उरलेल्या २०% मधे...त्यांचे कान घरच्या सोनारानेच टोचले पाहिजेत (हे वाक्य समजले नाही तर हा प्रतिसाद वाचला नाही तरी चालेल)

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/12/2014 - 18:32
१. तुम्ही कीती सार्वजनिक शौचालयं बांधुन दिलीत ? किंव्वा कितीवेळा तुमच्या नगर सेवकाकडे अर्ज केलात ? कितीवेळा ग्रामविकासमंत्री / मुख्यमंत्री / पंतप्रधान ह्यांना ह्या विषयी पत्र पाठवले ? २.पॅस्टर ऑफ पॅरीस नको म्हणुन किती वेळा समाज प्रभोधन केले ? किती मातीच्या मुर्तीकारांना समर्थन दिलेत ? दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे म्हणुन किती प्रचार केलात ? किती वेळा फटाक्याच्या स्टॉल शेजारी उभेराहुन लोकांना तुमचे मत समजावलेत ? तुम्ही खरंच काही सकारात्मक काम केले असेल तर तुम्हाला मी सावरकरांच्या कॅटेगरीत घालतो आणि तुमच्या विषयी आदर व्यक्त करतो पण तुम्हचे स्वतःचे क्लाहीच योगदान नसेल आणि तुम्ही 'हिंदुं मधील प्रथा किती फालतु आहेत , हिंदु धर्म किती बावळट अंधश्रध्दांना चिकटुन रहातो ' असला प्रचार करीत असाल तर मी तुम्हाला ना.वा.टिळक कॅटेघरीत घालतो अन तुमचा निशेध करतो !

In reply to by धन्या

प्रचेतस गुरुवार, 06/12/2014 - 18:44
रेव्हरंड टिळक. यांनी हिंदू धर्म त्यागून क्रिस्टियन धर्म स्वीकारला. यांची पत्नी लक्ष्मीबाई टिळकांचे 'स्मृतीचित्रे' हे पुस्तक अतिशय सुरेख आहे आणि ह्यात हा सर्व घटनाक्रम वर्णिला आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

एस गुरुवार, 06/12/2014 - 19:09
१. तुम्ही कीती सार्वजनिक शौचालयं बांधुन दिलीत ? किंव्वा कितीवेळा तुमच्या नगर सेवकाकडे अर्ज केलात ? कितीवेळा ग्रामविकासमंत्री / मुख्यमंत्री / पंतप्रधान ह्यांना ह्या विषयी पत्र पाठवले ? २.पॅस्टर ऑफ पॅरीस नको म्हणुन किती वेळा समाज प्रभोधन केले ? किती मातीच्या मुर्तीकारांना समर्थन दिलेत ? दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे म्हणुन किती प्रचार केलात ? किती वेळा फटाक्याच्या स्टॉल शेजारी उभेराहुन लोकांना तुमचे मत समजावलेत ?
आपण या सगळ्या गोष्टी केल्या आहेत, करत आहात आणि त्यामुळे तुम्हांला इतरांना ह्या नाही तर त्या क्याट्येगरीत घालण्याचा अधिकार आहे असे गृहीत धरू.
तुम्ही खरंच काही सकारात्मक काम केले असेल तर तुम्हाला मी सावरकरांच्या कॅटेगरीत घालतो आणि तुमच्या विषयी आदर व्यक्त करतो पण तुम्हचे स्वतःचे क्लाहीच योगदान नसेल आणि तुम्ही 'हिंदुं मधील प्रथा किती फालतु आहेत , हिंदु धर्म किती बावळट अंधश्रध्दांना चिकटुन रहातो ' असला प्रचार करीत असाल तर मी तुम्हाला ना.वा.टिळक कॅटेघरीत घालतो अन तुमचा निशेध करतो !
धर्माच्या बाबतीत सकारात्मक काम करणे किंवा योगदान देणे म्हणजे काय? आपल्याच धर्माच्या निंदनीय व माणुसकीला काळिमा फासणार्‍या रूढीपरंपरा धर्मातून हद्दपार करणे हे सकारात्मक नाही काय? आणि समजा एखाद्याने काहीच न करता स्वतःच्या धर्माबद्दल काही मत - मग ते नकारात्मक का असेना - व्यक्त केले तर त्याला तुमच्या दृष्टीने अजिबात किंमत नाही. का बरं? धर्म, जात, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी मनुष्याच्या जन्मापासून त्याला चिकटतात. कोणी असे म्हणत नाही की माझे मूल सुजाण वयाचे झाल्यावर त्याचे त्याला ठरवू दे कुठला धर्म स्वीकारायचा ते. मी आत्तापासूनच माझ्या संततीला अमुक धर्माच्या पद्धतीनुसार वाढवणार नाही. मला असे म्हणायचे आहे की, समजा माझ्या धर्माबद्दल असे काही योगदान मी दिले नसेल तर त्याचा अर्थ मला माझ्या धर्मावर टीका करण्याचा हक्क नाहीये का? आहे. जरूर आहे. कारण मला माझा धर्म आहे तसा फॉलो करायचा नसला तरी जन्मापासूनच माझा धर्म निश्चित झाल्यामुळे त्याचा बरावाईट परिणाम माझ्यावर होतो. त्यापासून सुटका केवळ धर्मांतरामुळेच काही प्रमाणात शक्य आहे. त्याचेही ना घर का ना घाटका असं होऊन बसतं. एकूणच मानवसंस्कृतीत संपूर्ण धार्मिक निरपेक्षता प्रत्यक्ष व्यवहारात शक्य होत नाही. अशी परिस्थिती असताना मी गप्प का बसायचं? केवळ स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांच्या हुल्लडबाजीला घाबरून? बादवे, ज्याला तथाकथित हिंदू धर्म म्हणलं जातं त्याबद्दल प्रबोधनकारांचे जे मत आहे तेच माझंही मत आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

टवाळ कार्टा गुरुवार, 06/12/2014 - 19:28
१. तुम्ही कीती सार्वजनिक शौचालयं बांधुन दिलीत ? किंव्वा कितीवेळा तुमच्या नगर सेवकाकडे अर्ज केलात ? कितीवेळा ग्रामविकासमंत्री / मुख्यमंत्री / पंतप्रधान ह्यांना ह्या विषयी पत्र पाठवले ?
म्हणजे शौचालयांची गरज आहे ...ते सुध्धा खुप मोठ्या जनसमुदायासाठी हे तुम्ही(सुध्धा) मानता...मग मंदिरांची गरज आणि शौचालयांची गरज यातील कोणती गरज लवकर पुर्ण झाली पाहिजे??? १. लोकांनी उघड्यावर शौचास जाणे चालेल पण सर्व सार्वजनिक ठिकाणी मंदिर असले पाहिजे २. उघड्यावर शौचास जाणार्या लोकांची संख्या झपाट्याने कमी झाली पण लोकांनी घरातल्या देवाच्या तसबीरीपुढे हात जोडले तरी चालतील शाळेत गेलेले एखादे शेंबडे पोरसुध्धा यातला २ पर्याय निवडेल
२.पॅस्टर ऑफ पॅरीस नको म्हणुन किती वेळा समाज प्रभोधन केले ? किती मातीच्या मुर्तीकारांना समर्थन दिलेत ? दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे म्हणुन किती प्रचार केलात ? किती वेळा फटाक्याच्या स्टॉल शेजारी उभेराहुन लोकांना तुमचे मत समजावलेत ?
हे सगळे शाळेत्/कॉलेजात असताना केलेले आहे...आतासुध्धा जमेल तसे करतो आणि मी हे केले तरच माझा मुद्दा बरोबर ठरतो असा जर तुमचा समज असेल तर मग मलापण विचारावेसे वाटते की तुमच्या घरात शौचालय असले पाहिजे की देवघर???
तुम्ही खरंच काही सकारात्मक काम केले असेल तर तुम्हाला मी सावरकरांच्या कॅटेगरीत घालतो आणि तुमच्या विषयी आदर व्यक्त करतो पण तुम्हचे स्वतःचे क्लाहीच योगदान नसेल आणि तुम्ही 'हिंदुं मधील प्रथा किती फालतु आहेत , हिंदु धर्म किती बावळट अंधश्रध्दांना चिकटुन रहातो ' असला प्रचार करीत असाल तर मी तुम्हाला ना.वा.टिळक कॅटेघरीत घालतो अन तुमचा निशेध करतो !
मला कोणत्याही क्याटेगरीत टाकायची गरज नाहिये ... तितका तुमचा "अभ्यास" आणि "अधिकार" दोन्ही नाहिये
'हिंदुं मधील प्रथा किती फालतु आहेत , हिंदु धर्म किती बावळट अंधश्रध्दांना चिकटुन रहातो '
अशाबाबतीत मी अजुन कुठेही आणि काहिही लिहिलेले नाही...हे तुमचे "मनचे श्लोक" आहेत
असला प्रचार करीत असाल तर मी तुम्हाला ना.वा.टिळक कॅटेघरीत घालतो अन तुमचा निशेध करतो
आधी मी कधी कुठे कोणाचा कशासाठीही "प्रचार" केला आहे त्याचा "अभ्यास" करा आणि मग जर त्यावर विचार केलाच तर आधी समोरच्याचे मतपरिवर्तन विचारानेच करता येते का ते पहा ...हे सगळे झाल्यावरच माझा निषेध करा उगाचच उंटाच्या.... (म्हण माहित नसेल तर अभ्यास करा)

In reply to by टवाळ कार्टा

१. तुम्ही कीती सार्वजनिक शौचालयं बांधुन दिलीत ? किंव्वा कितीवेळा तुमच्या नगर सेवकाकडे अर्ज केलात ? कितीवेळा ग्रामविकासमंत्री / मुख्यमंत्री / पंतप्रधान ह्यांना ह्या विषयी पत्र पाठवले ?
>>> ह्या प्रस्नाला तुम्ही व्यवस्थित बगल दिली आहेत , त्या मुळे तुम्ही ह्यातले काहीच केलेले नाहीत असा संशय येत आहे .
२.पॅस्टर ऑफ पॅरीस नको म्हणुन किती वेळा समाज प्रभोधन केले ? किती मातीच्या मुर्तीकारांना समर्थन दिलेत ? दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे म्हणुन किती प्रचार केलात ? किती वेळा फटाक्याच्या स्टॉल शेजारी उभेराहुन लोकांना तुमचे मत समजावलेत ?
>> ह्या बद्दल अभिनंदन ... हे कार्य वाढवावे , गणेशोस्तव बंद करा असे म्हनण्यापेक्षा मातीच्या मुर्ती वापरु असे जर तुम्ही समाजाला संदेश देत असाल तर तुम्हाला ह्या विषयावर बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो ...मला हेच म्हणायचे होते :)
अशाबाबतीत मी अजुन कुठेही आणि काहिही लिहिलेले नाही...हे तुमचे "मनचे श्लोक" आहेत
इथे तुम्ही प्रतइकात्मक आहात हो ... काहीच न करता उगाच नुसती भाषणे झाडणारी १०० माणसे मी तुम्हाला भेटवुन देईन ह्या येत्या गणेशोत्स्वात !!
मला कोणत्याही क्याटेगरीत टाकायची गरज नाहिये ... तितका तुमचा "अभ्यास" आणि "अधिकार" दोन्ही नाहिये
बरं ! सध्या तुम्हाला अभ्यास आणि अधिकार ह्यातील फरक समजला , मला जो मुद्दा मांडायचा होता तो कन्वे झालाय , ह्यात आनंद मानतो ... बाकी माझ्या अभ्यासावर आणि अधिकारावर भेटल्यावर निवांत चर्चा करु :)

ऋषिकेश गुरुवार, 06/12/2014 - 15:05
छे छे छे! किती तरी हिंदु व्यक्ती हिंदु धर्माबद्द्लच कस्सं कस्सं वैट्ट वैट्ट बोलताहेत. काही पोच्च राहिलेला नाही! हजारोवर्षांपूर्वीचा व जुना का असेना इतक्या पवित्र धर्माबद्दल असं बोल्लात तर नरकात जाल (ते शक्य नसेल तर जेल मध्ये जाण्याचेही दिवस दूर नाहित)

In reply to by बॅटमॅन

अनुप ढेरे गुरुवार, 06/12/2014 - 21:07
मी तर आता भारतात कॉन्संट्रेशन क्यांप कधी सुरु होतात आणि त्यासाठी जमीन अधिग्रहण कधी सुरु होतय त्याची वाट बघतोय.

In reply to by अनुप ढेरे

माहितगार Fri, 06/13/2014 - 09:00
बर्‍याच लोकांना काँटेक्स्ट आणि उपरोध समजत नाहीत, (त्यामुळे कॉमेंट टाकताना जरा जपून)

धन्या गुरुवार, 06/12/2014 - 15:09
तुम्ही पुस्तकं बरीच वाचली असतील पण स्वतःचा योगशास्त्राचा अभ्यास किती आहे? न्युटनचा किवा कुठलाही भौतिक शास्त्राचा नियम लावण्याचं तात्पर्य काय ?
मला योगशास्त्रामधलं काहीही कळत नाही. मात्र विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून एव्हढं कळतं की या विश्वात निसर्गनियमांपलिकडे जाऊन काहीही घडत नाही. निसर्गाच्या नियमांचं आकलन किंवा विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान. न्युटनचा गतिविषयक पहिला नियम हाही निसर्गाचाच नियम. न्युटनने त्याला फक्त त्याची पडताळणी करुन विधान स्वरुपात मांडणी केली. तर हा नियम असं म्हणतो की कोणतेही बल लावले नसेल तर अचल अवस्थेतील वस्तू चलमान होऊ शकत नाही. हे जगाच्या पाठीवर कुठेही शक्य नाही.
अध्यात्मशास्त्राचा नियम भौतिक शास्त्राला लावलेला चालेल का?
अतिशय हास्यास्पद विधान. मुळात अध्यात्मशास्त्र म्हणून काही नाही. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी शास्त्रामध्ये एकवाक्यता असते. भारतातला शास्त्रज्ञ एक बोलतोय, अमेरिकेतला शास्त्रज्ञ वेगळं बोलतोय असं होत नाही. अध्यात्माला फारतर विचारसरणी किंवा आयुष्याकडे, जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोण म्हणता येईल. हा दृष्टीकोण व्यक्तीगणिक बदलू शकतो. नव्हे, तो बदलतोच. एकवाक्यता अशी नसतेच. अध्यात्मामध्ये प्रत्येकाचा "अनुभव" वेगळा, प्रत्येकाची "अनुभूती" वेगळी. काय प्रमाण आणि कोण अधिकारी हे कसं ठरवणार? आणि मुळात जे समोरच्या व्यक्तीला प्रमाण वाटतंय ते मला मान्यच नसेल तर? ज्ञानदेव काहींना विष्णुचे अवतार वाटतात, मला मात्र ते एक महान तत्वज्ञ, श्रेष्ठ दर्जाचे कवी पण तरीही तुमच्याआमच्यासारखे माणुसच वाटतात. कोणाचं म्हणणं प्रमाण मानायचं?

In reply to by धन्या

यशोधरा गुरुवार, 06/12/2014 - 15:40
कोणाचं म्हणणं प्रमाण मानायचं? >> ज्यांना ज्ञानोबांमधलं विष्णुत्व दिसतं त्यांनी ते मानावं, आणि ज्यांना ते कवी, तत्वज्ञ म्हणून भावतात, त्यानी ते अंगिंकारावं. जो जे वांछिल अशी प्रार्थना खुद्द ज्ञानोबांनीच केली आहे, हे विसरु नये, म्हणजे झालं. :)

In reply to by यशोधरा

धन्या गुरुवार, 06/12/2014 - 15:53
आम्हीही केव्हाचं तेच म्हटलंय. :)
आता कुणी जर म्हणत असेल की ज्ञानदेवांनी आपल्या योगसामर्थ्याने भींत चालवली तर म्हणोत बापडे.

In reply to by धन्या

यशोधरा गुरुवार, 06/12/2014 - 15:58
फरक इतकाच असावा की ज्ञानदेवांनी जेह्वा ते म्हटलंय तेह्वा कोणाला 'बापडे' समजलेल नाही वा तसा भाव मनात बाळगलेला नाही. लै लै मोठठाल्ला फरक है बाप्पा!

In reply to by यशोधरा

धन्या गुरुवार, 06/12/2014 - 16:08
फरक इतकाच असावा की ज्ञानदेवांनी जेह्वा ते म्हटलंय तेह्वा कोणाला 'बापडे' समजलेल नाही वा तसा भाव मनात बाळगलेला नाही.
एकदम मान्य. म्हणून तर त्यांना माऊली म्हणतात. मी वापरलेला "बापडे" हा शब्द "एकविसावे शतक चालू असताना, विज्ञान ईतके प्रगत झाले असताना लोक नको त्या गोष्टींचा अभिमान बाळगून फुरफुरतात त्याबद्दल वाईट वाटते" अशा अर्थी होता.

In reply to by धन्या

प्यारे१ गुरुवार, 06/12/2014 - 17:04
>>> एकविसावे शतक चालू असताना, विज्ञान ईतके प्रगत झाले असताना लोक नको त्या गोष्टींचा अभिमान बाळगून फुरफुरतात त्याबद्दल वाईट वाटते :)

In reply to by धन्या

यशोधरा गुरुवार, 06/12/2014 - 20:16
धन्या तेच तर. प्रत्येकाला आपल्याला काय अधिक महत्वाचं वाटतं ते ठरवायचा मूलभूत हक्क आहेच की. मग जर एखाद्याला विज्ञान तुझ्याइतकं महत्वाचं वाटत नसेल तरीही त्यात काही चुकीचं नाही. आहे का? तुझी श्रद्धा विज्ञानावर, एखाद्याची अध्यात्मावर आणि कोणाची, आणि कुठे. :)

In reply to by यशोधरा

धन्या Fri, 06/13/2014 - 13:03
तुझी श्रद्धा विज्ञानावर
एव्हढं सोडून बाकीचं पटलं. श्रद्धा म्हणजे एखादया व्यक्तीचा एखादया गोष्टीवरील ठाम विश्वास. ज्या गोष्टीवर माणसांची श्रद्धा असते त्या गोष्टी वास्तवात सत्य असतातच असं नाही. उदाहरणार्थ सतराव्या शतकात गॅलिलिओने पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे ठाम प्रतिपादन करेपर्यत लोकांची पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी आहे अशी श्रद्धा होती जी खोटी होती. सध्या अतिशय प्रसिद्ध असलेला "अंधश्रद्धा" हा शब्दच मुळी चुकीचा आहे. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंध आणि डोळस श्रद्धा असं काही नसते. ज्याची श्रद्धा असते त्याला कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसते. विज्ञान हा श्रद्धेचा विषय नाही. तो पडताळून पाहण्याचा विषय आहे. जे पुराव्यांनी सिद्ध करता येत नाही ते विज्ञान नसते.

In reply to by धन्या

यशोधरा Fri, 06/13/2014 - 14:07
ओके. >>सध्या अतिशय प्रसिद्ध असलेला "अंधश्रद्धा" हा शब्दच मुळी चुकीचा आहे >> हे मला मान्यच आहे पण अवांतरः कितीश्या "विज्ञानवाद्यांना" हे मान्य असतं? जिथे धर्म आणि रुढी (ज्या चुकीच्या असू शकतात) ह्यातला फरकही न समजावून घेता, हिंदू धर्माच्या निरर्थकपणाबद्दल स्यूडो सुधारक टाहो फोडत राहतात ( ह्या धाग्यावरच उदाहरण आहे! ;) ) तिथे पुढे कशाला काही बोलायचं? (असंही वाटत.) :) असो. :)

म्हैस Fri, 06/13/2014 - 12:53
मला योगशास्त्रामधलं काहीही कळत नाही. मात्र विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून एव्हढं कळतं कि विश्वात निसर्गनियमांपलिकडे जाऊन काहीही घडत नाही. . मुळात अध्यात्मशास्त्र म्हणून काही नाही.
तुम्हीच तुमच्या मतावर ठाम नाही आहात . एकीकडे तुम्ही म्हणताय मला एका शास्त्रातल काही काळात नाही. दुसरीकडे म्हणताय दुसरीकडे म्हणताय त्यात हे नाही आणि त्यात ते नाही . काय हास्यास्पद विधान आहेत . हे म्हणजे engineering मध्ये हुशार असलेल्यांनी medical मधलं काही कळत नसताना त्यात हे नाही आणि त्यात ते नाही हे म्हणण्यासारख आहे .
जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी शास्त्रामध्ये एकवाक्यता असते. भारतातला शास्त्रज्ञ एक बोलतोय, अमेरिकेतला शास्त्रज्ञ वेगळं बोलतोय असं होत नाही.
साधकाला त्याच्या तयारीप्रमाणे आणि पुर्व कार्मान्नुसार आलेले अनुभव वेगळे असले तरी अंतिम ज्ञान एकाच असतं . जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी त्या सत्यात एकवाक्यताच असते . सत्य थोडीच बदलतं ? तुकाराम महाराज वेगळं बोलतात आणि ज्ञानेश्वर महाराज किवा कुठलाही'साधक वेगळं बोलतोय असं होत नाही
एकविसावे शतक चालू असताना, विज्ञान ईतके प्रगत झाले असताना लोक नको त्या गोष्टींचा अभिमान बाळगून फुरफुरतात त्याबद्दल वाईट वाटते
अभिमान असणं आणि अहंकारी असणं वेगळं आहे . आम्ही विज्ञानाला कधीच नावं ठेवत नाही किवा विज्ञानाच्या विरोधात अजिबात नाही . विज्ञानात हे नसतं आणि ते नसतं अशी फुकाची फुरफुर करत नाही आम्ही . विज्ञानाच्या पलीकडे काही आहे ह्याचा आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे त्यामुळे आम्ही अभिमानी अहोत. अहंकारी नाही.

In reply to by म्हैस

धन्या Fri, 06/13/2014 - 13:51
तुम्हीच तुमच्या मतावर ठाम नाही आहात . एकीकडे तुम्ही म्हणताय मला एका शास्त्रातल काही काळात नाही. दुसरीकडे म्हणताय दुसरीकडे म्हणताय त्यात हे नाही आणि त्यात ते नाही . काय हास्यास्पद विधान आहेत .
इथे विज्ञान म्हणजे भौतिकशास्त्र. न्युटनच्या नियमांचा अभ्यास भौतिकशास्त्रात होतो. आणि शाळेत गेलेला प्रत्येकजण भौतिकशास्त्र आणि न्युटनचे गतीविषयक नियम शिकलेला असतो. योगशास्त्र हा सर्वत्र शिकवला जाणारा विषय नाही. त्यामुळे त्याबद्दल एखादया व्यक्तीला त्याचे ज्ञान नसेल तर त्यात हास्यास्पद काय आहे? बाकीचे चालू दया. :)

सुहास.. Fri, 06/13/2014 - 14:27
प्लीज नोट : अधिकारावरुन , मी लोहगावातल्या आठवडी बाजारामध्ये सार्वजनीक शौचालयाचा प्रस्ताव आणला, ग्रामसभेमध्ये मंजुर झाल्यावर , निधी आणि त्याचा योग्य वापर करुन बांधुन ही घेतले, अर्थात, देखरेखी खालीच, लवकरच, अजुन पाच एक आठवड्याने ते निशुल्क ही होईल, लोहगावातच जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदीराच्या सुशोभीकरण्याचा प्रस्ताव ही तीन वर्षांपुर्वी माझ्याच तोंडुन निघाला, त्यात फक्त वर्गणीदारम्हणुनच नव्हे , वर दोन महिने उन्हातान्हाची वर्गणी मागत फिरणार्या कार्यकरणीत ही माझा सहभाग होता. धन्यवात !! वैयक्तीक मत सांगायचे तर हल्ली कुठेतरी कायतरी झाल म्हणुन अस्मितेचा उद्य कसा होतो हा प्रश्न मला पडला आहे ? अस्त झाला होता म्हणायचे की काय ? मग घाशीराम कोतवाल हे काल्पनिक आहे असे तेंडुलकरांनी डिक्लेयर केल्यावर अस्मिता झोपी गेली होती का थोडी वर्ष ( असो .. पुस्तक वाचलं नाही तरी संदर्भ समजण्याईतपत अक्कल आली आहे लोकांना म्हणजे काही ही होवु शकते ) मोरेंच्या वकीलांना विचारले तर कसली आलीये म्हणे अस्मिता ( कसला हिंदु - बांधव, भोंदु-बांधव सगळे ) !! नेमके काय आहे ? s s गेल्या २००९ पासुन हा वाद चालु आहे, आणि त्यामध्ये यादवांना अटक आणि जामीन जोस्जीशी, पेताड मोहन जोशी संमेलनाध्यक्ष चालतात, राष्ट्रीय पुरस्कार मिळालेळा लेखक मात्र चालत नाही, अस्मितेला मात्र २०१४ उजाडल ? ते ही नेमके सरकार आल्यावर असे ज्यांना वाटत असेल, तर ते तसे नाही , वकीलांनी पटवुन दिले की ज्या प्रकारे विटबनेमुळे गेली काही दिवस पुणे पेटतय त्या अनुषंगाने या पुस्तकांवर बंदी आणावी , निकाला त कुठे ही असे म्हटलेले नाही की ही पुस्तके फाडुन टाका , अश्या प्रकारची सामाजिक मानहानी ( मग ती कुठली का असेना ) सर्व च प्रकारची पुस्तके फाडुन टाका ..मला आश्चर्य याचे वाटते की दोघांना दंड कश्यासाठी ? पुस्तक खपलय आणि वर काही जणांनी लिहीलय सुध्दा की आक्षेपार्ह असे काही नाही , मी ही वाचलय ! भक्त असुनही मला आक्षेपार्ह वाटल नाही, एक सरळ साधा लेखन विस्तार.मग त्यात अस्मिता कुठुन आली ? त्या त इथे काही उगा टाळ्या घेण्यासाठी प्रतिसाद उठाठेव करताहेत त्यांची तर कीव करावी तेव्हढी थोडीच आहे .ज्यांचे डोळे उघडे आहेत त्यांनी पान क्रमांक ९३ ९४ नकी वाचावे , बाकीच्यांना अस्मिता लखलाभ होवो अस्मिताच शोधायची असेल तर मोहसिन च्या ब्रुटल मर्डर मध्ये का शोधत नाहीत ? असो ...वेळ थोडा कमी आहे.. त्यामुळे थांबतो

In reply to by सुहास..

माहितगार Fri, 06/13/2014 - 15:54
अस्मितेला मात्र २०१४ उजाडल ? ते ही नेमके सरकार आल्यावर असे ज्यांना वाटत असेल, तर ते तसे नाही , वकीलांनी पटवुन दिले की ज्या प्रकारे विटबनेमुळे गेली काही दिवस पुणे पेटतय त्या अनुषंगाने या पुस्तकांवर बंदी आणावी ,
सुहासजी आपण न्यायालयाचा निकाल वाचून हे लिहिले आहेत ? न्यायालयाच्या निकालाचा सध्याच्या घटनांशी संबंध आहे असे म्हणावयाचे आहे का ? संजय सोनवणींनी त्यांच्या ब्लॉगवर न्यायालयाचा निकाल वाचल्याचे म्हटले आहे त्यांच्या पोस्टशी आपला उपरोक्त मजकुर जुळतो असे वाटत नाही. संजय सोनवणींचे बरोबर असेल तर भादवि अंतर्गत येणार्‍या Defamation संबंधातील दोन कलमांतर्गत पुर्वज बदनामीचा खटला वंशजांनी टाकला, कादंबरीस काल्पनिक म्हणण्या एवजी संशोधनपुर्वक लिहिल्याचे लेखकाने म्हटल्यामुळे पुरावे देण्याची वेळ आली असावी, पण तेव्हा हाताशी पुरावे असणे शक्य नव्हते. आनंद यादवांचा वकील कच्चा पडला की आनंद यादव माहीत नाही,(लोक आनंद यादवांना दोष देत आहेत) पण संशोधन या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला गेला का की संशोधन शब्दास साहित्यिक अर्थछटा असु शकते हे (आनंद यादवांचा वकील आणि) माननीया न्यायालयाने लक्षात घेतले असावे का ? माझा तुकाराम गाथेचा अभ्यास नाही त्यातील सर्व शब्द समजत नाहीत पण काही गाथांकडे नंतर निर्देश करेन. पण त्यापुर्वी येथे प्रथम एक गोष्ट लक्षात घेतली जावयास हवी ती भारतीय संस्कृतीत इश्वर मानवी अवतार घेतो हे या करताही गृहीत धरले जाते की या जगातल्या सर्व अडी अडचणी तो स्वतः भोगतो आणि मग उपाय देतो. श्रीकृष्ण बालपणी लोण्यावर हात मारतो हे ठिक पण तिरूपती बालाजीची एक कथा विचारात पाडणारी आहे. ज्या देशात इश्वरी अवतार चुकू शकतात आणि नंतर मोठे होतात, वाल्मिकी सारखे ऋषि असतात साहित्यिक एका व्यक्तीत सामान्य गुण होते पण तो नंतर असामान्य झाला हे एवढ्या करता दाखवू इच्छितो की सामान्यगुणांची व्यक्तीही असामान्य पातळी गाठू शकते हे दाखवायचे असते आणि अशी साहित्यिक वर्णने भारतीय साहित्यात आणखीही असतील. तुम्ही लेखकाच्या भूमीकेचे समर्थन करा अथवा न करा, न्यायालये कायद्यांतर्गत काय तो निकाल देतील, तरीपण एका साहित्यिकाच्या लेखना मागे काही चांगलीही भूमीका असू शकते हे समजून घेण्याचा प्रयत्न न करता घेतल्या जाणार्‍या टोकाच्या भूमीका भारतीय संस्कृती समजलेल्यांच्या म्हणवता येतील का हे पाहता यामुद्यावर वारंवार साशंक व्हावयास होते. तुकारामांच्या गाथा अभंग नोंदवतो आहे चुकत असल्यास सांगावे आणि संपादकांकडून उडवावेत. गाथा क्रमांक ओळ तिसरी आणि चौथी मध्ये संत तुकाराम म्हणतात .....नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥२॥ तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥३॥ येथे संत महोदय स्वतःकडे कमीपणा घेतात (म्हणजे ते वृत्तीने तसे असतात असे नव्हे). आउट ऑफ काँटेक्स्ट असल्याचा आरोप नको म्हणून आता संपूर्ण अभंग देतो "मज दास करी त्यांचा । संतदासांच्या दासांचा ॥१॥ मग होत कल्पवरी । सुखें गर्भवास हरी ॥ध्रु.॥ नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥२॥ तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥३॥ " अठ्ठावनाव्या अभंगात संत तुकाराम म्हणतात "सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥१॥ त्याचें दर्शन न व्हावें । शव असतां तो जिवे ॥ध्रु.॥ कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥२॥ नेणे शब्द पर । तुका म्हणे परउपकार ॥३॥ " याचा अर्थ पुर्वाश्रमीचे संत तुकाराम आंनद यादव कादंबरीत दाखवतात तसे होत नाही पण माझा म्हणण्याचा उद्देश एक संत माणूस स्वतःकडे स्वतःच्या शब्दा सामान्यपण घेऊ शकतो, एक सामान्य व्यक्ती असामान्य होऊ शकते असा दाखवण्याचा साहित्यिक आनंद यादवांचा प्रमाद पुराव्यांच्या पातळीवर टिकणारा नसेल परंतु साहित्यिकाचा इथे मूळ हेतू चांगला नसण्या पेक्षा चांगला असण्याचीच शक्यता अधीक असावी. अर्थाचे अनर्थ आणि कायद्याची कैची लागण्यास एकच वेळ झाली असे दिसते. आनंद यादवांवर टिकाकरणार्‍यांनी टिका जरूर करावी पण तुम्हाला काळ्या वाटणार्‍या त्या ढगांना असलेली चांगल्या उद्देशाची चंदेरी कडा न पाहता टिका एकांगी तर नाही ना अशी शंका येते आणि संतनिंदा नेमके कोण करते आहे असा प्रश्न पडतो. यामुळे आनंद यादव आणि त्यांचे समकालीन साहित्यिकांच्या कच खाऊ भूमिके बद्दल संजय सोनवणींचा खेद समजून घेता येतो. आपण म्हणता तसा हा खटला न्यायालयात काही वर्षांपासून चालू आहे. त्याचा निकाल लागण्याची वेळ आणि वेगळ्या पक्षाचे सरकार निवडून येणे हा केवळ योगायोग त्याचा बादरायण संबंध लावून भाजपा सरकार निवडून आले नसते काँग्रेसचेच सरकार असते तर खटल्याचा निकाल काही वेगळा लागला असता का ? काँग्रेस सरकारे असतानाचे निकाल न्यायालयांनी दबून दिले होते का ? तसा इतिहास नाही उलटपक्षी सर्वसाधारणपणे भारतीय न्यायालयांची निष्पक्षतता निर्विवाद आहे. धागालेखकाने अप्रत्यक्ष असे निर्देश करणे कदाचित न्यायालयाचा अवमानाच्या कायदेशीर कचाट्यात येणार नाही, पण न कळतका होईना न्यायालयीन प्रक्रीयेस कमी लेखणे संतनिंदेपेक्षा अधीक चुकीचे नाही ना असा प्रश्न पडतो आहे.

In reply to by माहितगार

सर्वसाधारणपणे भारतीय न्यायालयांची निष्पक्षतता निर्विवाद आहे.
>>> निष्पक्षतता ? 'सॅटॅनिक' वर बॅन आणायला कितीवर्ष घेतली न्यायालयाने ? आणि संतसुर्यवर ? आणि हिंदु किंग इन इस्लामिक इन्डियावर वर ? तुर्तास फक्त वर्षंची आकडेवारी टाका , मग आपण निवांत चर्चा करु निष्पक्षतेवर !
पण न कळतका होईना न्यायालयीन प्रक्रीयेस कमी लेखणे संतनिंदेपेक्षा अधीक चुकीचे नाही ना असा प्रश्न पडतो आहे
न्यायलीन प्रक्रिया किंव्वा न्यायालयाचे निर्णय ह्यांना कमी लेखणे हे अगदी १९४७ पासुन सुरु आहे , गांधीहत्येत संघाचा हात नाही असे न्यायालयाने म्हणल्यावर्ही पटेल म्हणाले होते की 'संघाचा हात नसला तरी संघाचीच विचारसरणी आहे' , सावरकरांना निर्दोष मुक्त करुनही आजही त्यांच्यावर चिखल फेक होतेच की ! मोदींना सर्वोच्च न्यायालयाने क्लीनचीट दिली तरी माझ्या लेखी मोदी खुनीच आहेत असे लोक स्पष्टपणे मिडीयावर बोलत होते . न्शिवाय न्यायालय दरवेळी योग्य "न्याय" निर्णयच देते असे नाही , अयोधेत वादग्रस्त जागी १४ शतक्या पुर्वी मंदीर होते असा स्पष्ट निकाल आर्किऑलॉजिस्ट ने दिल्या नंतरही त्या प्रकरणातला न्यायालयाचा निर्णय आपण पाहिलाच ! शिवाय न्यायालयाच्या निर्णयाचा मान न राखण्याचे आदर्श राजीव गांधींनीच "शहाबानो" प्रकरणा पासुन घालुन दिले आहेत ! जाऊन दे ... खुप विषयांतर झाले !

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार Fri, 06/13/2014 - 20:16
या प्रतिसादाच्या सुरवातीसच माझी भूमीका स्पष्ट नमूद करतो की पुस्तकांसहीत कोणत्याही कलाकृतीस कोणत्याही समाजाच्या आग्रहास बळी पडून बंदी घालू नयेच सर्वच ग्रंथ आणि कलाकृतींना विद्यापीठ प्राध्यापकस्तरीय समीक्षण बंधनकारक करून विरोधी मुद्यांचे खंडन करणारी समीक्षा प्रस्तावनेसोबत छापणे बंधनकारक करावे, त्या खंडनास प्रतिसाद देण्याची मोकळीक कलाकृती निर्मात्यास/प्रकाशकास द्यावी. मग त्या कलाकृतीतून काय घ्यावयाचे आणि नाही घ्यायचे ते रसिक ठरवेल. शासनास वाटल्यास अपवादात्म स्थितीत कलाकृती समीक्षणासाठी अधिक विद्यापीठीय तज्ञांकडे अधिक काळा साठी पाठवावी. आता आपल्या बाकी काही मुद्यांकडे येतो. :) मान्यवर आपला धागा लेखच अंशतः विषयांतराने झालेला नाही ना, ते असू द्यात ते फार महत्वाचे नाही. या धाग्यावर अथवा इतरत्र लोक विषया वरील अधिकाराच्या गोष्टी करत असताना पाहीले आपण कायद्याच्या सर्व बाजू माहित असून लेखन करत असल्यास त्या कायद्याच्या बाजू जाणून घेणे आणि माझ्या ज्ञानात भर घालणे मला नक्कीच आवडेल. कायद्याच्या पैलूंबाबत आपली काही गल्लत होत नाहीएना अशी सध्या तरी मला अल्पशी शंका येते. संतसूर्य बद्दल सरकार न्यायालयात गेले असल्या बाबत माझी माहिती नाही, संतसूर्यचा खटला एका व्यक्तीच्या वंशजाने टाकलेला खासगी व्यक्तीने टाकलेला आणि तोही भादवि च्या वेगळ्या कलमांनी; सामाजिक अशांतता पसरू नये म्हणून सरकार वेगळ्या कलमांचा आधार घेते म्हणून आपली तुलना किमान संतसूर्यबाबत लागू होऊ शकणार नाही. सामाजिक अशांतता पसरेल हा भिती घालणारा मुद्दाही न्यायालये नेहमी ग्राह्य धरत नाहीत, उलटपक्षी तुम्हाला परिस्थिती नियंत्रणात ठेवता येत नसेल तर वेगळा विचार करावा लागेल अशी तंबी काही वेळेस न्यायालयांनी संबंधीत प्रशासनांना दिलेले आहेत. अर्थात सामाजिक अशांतता या विषयावर सरकारने विनंती करणे आणि न्यायालयांनी त्या विषयास तौलनीक प्राधान्याने वेळ देणे हे समजण्या सारखे आहे पण इथे मुलतः जबाबदारी लोकशाही सरकारांची, आणि आपले उत्पातमुल्य दाखवू इच्छित भारतातील सर्वच समाजगटातील विवीध बेजबाबदार समाज घटकांची आहे, न्यायालयांचा यात दोष नाही, सामाजिक दोषांकरता न्यायालयांच्या माथी खपार फोडणे योग्य नव्हे हे लक्षात घेतले पाहीजे. सध्या अके-निग बदनामी खटल्याच्या एका प्रसंगी अके गटा कडून सरकार बदलल्याने निकाल असा आला अशा टिके बद्दल न्यायालयात न्यायालयीन अवमानाचे आक्षेप दाखल झाले आहेत आपण आपल्या धागा लेखात "(आता हा अब की बार ... चा इफेक्ट आहे की नाही देव जाणे ) हे वाक्य मोघम स्वरूपात लिहिल्याने कायदेशीर दृष्ट्या सुखरूप ठरण्याची शक्यता आहे हे कायद्याची बाजू लक्षात यावी म्हणून लक्षात घ्यावे. संतसूर्य तूकाराम केस मध्ये काही शतकांपुर्वीच्या पुर्वजाबद्दल बदनामीचा खटला दाखल होऊ शकतो तर आपण म्हणता त्या अनेक केसेस मध्ये बदनामीचे खटले दाखल करता येण्याची शक्यता असू शकते. अर्थात त्या केसेस दाखल करणे ज्याची बदनामी झाली त्याची स्वतःची जबाबदारी आहे. चुकीची चिखलफेक आणि नकारात्मक मार्केटींग हे समोरची व्यक्ती उत्तरे देण्यात नेमकी असेल तर इफेक्टीव्ह असू शकत नाही उलट चिखलफेक आणि नकारात्मक मार्केटींग करणार्‍यांचेच नुकसान होते हे मोदींच्याच वि़जयाने सिद्ध झाले आहेच. इतर काही समाज घटक पुरोगामी नाहीत म्हणून पुरोगामी राहण्याची क्षमता असलेल्या घटकांनी स्वतःकरता पुरोगामी असू नये का हा जरा विषयांतराचा मुद्दा असल्याने नंतर कधी चर्चा करूयात. हे जरी खरे असले तरी शासनाचे निर्णय (अगदी कोणत्याही परिस्थितीत) उत्पात मुल्य वापरणार्‍या समाज घटकांना दबून होऊ नयेत याच्याशी मी सहमत आहे अर्थात हि जबाबदारी लोकशाही नेतृत्वांची आहे त्याचे खापर न्यायालयांवर फोडणे हे वड्याचे तेल वांग्यावर ठरते असे माझे व्यक्तीगत प्रांजळ मत आहे.

In reply to by माहितगार

हे जरी खरे असले तरी शासनाचे निर्णय (अगदी कोणत्याही परिस्थितीत) उत्पात मुल्य वापरणार्‍या समाज घटकांना दबून होऊ नयेत याच्याशी मी सहमत आहे अर्थात हि जबाबदारी लोकशाही नेतृत्वांची आहे त्याचे खापर न्यायालयांवर फोडणे हे वड्याचे तेल वांग्यावर ठरते असे माझे व्यक्तीगत प्रांजळ मत आहे.
आपला प्रतिसाद ३ वेळा वाचल्यावर व्यवस्थित कळाला , बहुतांश पटलाही . वरील वाक्य अत्यंत आवडले . आजवर भारतसरकारचे धर्म समाज विषयक नियम कायदे हे काही विषिष्ठ समाजांच्या उत्पात मुल्याला घाबरुन केलेले नजरेस येतात (पक्षी : सॅटीनिक ...शाहबानो...इशानेतील काही राज्यांनी स्वतःला ख्रिश्चन राज्य घोषित करणे वगैरे वगैरे ), फक्त हिंदु तसे झुंडशाहीने आजवर हम करे सो कायदा करीत नव्हते , आता लोकांना हळु हळु कळायला लागले आहे की हे फक्त आपल्यालाच चेपत आहेत अन इतरांना ठील देत आहेत (ह्याचे क्लासिक उदाहरण म्हणजे जेव्हा एक विशिष्ठ समाज फाळणी व स्वतंत्र देशाची मागणी करतो तेव्हा ती कबुल करणे अन जेव्हा दुसरा समाज करतो तेव्हा त्यांना दहशतवादी ठरवुन त्यांच्या प्रार्थनागृहात घुसुन मारणे ! एका धर्मियांची प्रार्थना स्थळे ताब्यात घेणे अन दुसर्‍यांच्या बाबत चुकार शब्दही न काढणे , वगैरे वगैरे). आपणजर आपले उत्पात मुल्य दाखवले नाही तर हे असेच चालु ठेवतील ,सो ..... तेव्हा सर्वच समाजामधे अस्मिता प्रखर झाल्याचे दिसुन येत आहे , उशीरा का होईना पण हिंदुंचीही अस्मिता जागी झाली आहे इतकाच माझा निषकर्ष आहे :)

म्हैस Fri, 06/13/2014 - 21:44
त्यामुळे त्याबद्दल एखादया व्यक्तीला त्याचे ज्ञान नसेल तर त्यात हास्यास्पद काय आहे?
एखादया व्यक्तीला त्याचे ज्ञान नसेल तर त्यात हास्यास्पद किवा चुकीचं काहीच नहिये. पण ते नसताना चुकीची विधानं करून त्या विषयाबद्दलची स्वतःची आणि इतरांचीही मतं कलुषित करण हे चुकीचं आहे . ज्ञान घ्यायला ज्ञानाचे दरवाजे सदैव उघडे आहेत . नसेल घ्यायचं तरी काही हरकत नाही . पण विनाकारण त्याबद्दल नकारात्मक विचार पसरवण्याच काहीच कारण नाही असं मला वाटतं
लेखनविषय:
लेखनप्रकार
'संतसूर्य तुकाराम' व 'लोकसखा ज्ञानेश्वर' ही पुस्तके फाडून टाका http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Saint-Tukaram-Dnyaneshwar-Anand-Yadav-Court/articleshow/36343839.cms आत्ताच ही बातमी वाचनात आली , वाचुन अत्यंत आनंद झाला ! जरा कुठे हिंदु अस्मितेचा उदय होत आहे असे वाटले :) (आता हा अब की बार ... चा इफेक्ट आहे की नाही देव जाणे ) पण काही का असेना हिंदुंनाही , अल्पसंख्य नसले तरीही , भावना असतात आणि त्याचा आदर करायला शिकले पाहिजे हळुहळु लोकांना कळायला लागले आहे .

दुखरी नस...!

वटवट ·

हाडक्या Tue, 07/29/2014 - 15:52
सुरेख.. अतिशय सुरेख.! (धागा असा इथूनच विस्मरणात जावा हीच सदिच्छा.. या लेखावर विचित्र प्रतिक्रिया पाहण्याची इच्छा नाही. )

बहुगुणी Wed, 07/30/2014 - 02:49
इनिगोय म्हणतात तसं (या कथेतली 'नायिका' खरी असेल तर) 'तिच्या'पर्यंत अगदी असंच्या असं पोचवा, कात्रजच्या घाटातली संध्याकाळ नक्कीच दोघांना एकत्र पाहून आधिक आनंदेल :-) (आणि हो, एफ एम ची गरज नसेल!)

In reply to by बहुगुणी

'तिच्या'पर्यंत अगदी असंच्या असं पोचवा, कात्रजच्या घाटातली संध्याकाळ नक्कीच दोघांना एकत्र पाहून आधिक आनंदेल :-) सहमत्र. मिपावर बोलवा त्यांना...! सालं हे पोहचणं आणि न पोहचणं लै बेक्कार असतं. -दिलीप बिरुटे

हाडक्या Tue, 07/29/2014 - 15:52
सुरेख.. अतिशय सुरेख.! (धागा असा इथूनच विस्मरणात जावा हीच सदिच्छा.. या लेखावर विचित्र प्रतिक्रिया पाहण्याची इच्छा नाही. )

बहुगुणी Wed, 07/30/2014 - 02:49
इनिगोय म्हणतात तसं (या कथेतली 'नायिका' खरी असेल तर) 'तिच्या'पर्यंत अगदी असंच्या असं पोचवा, कात्रजच्या घाटातली संध्याकाळ नक्कीच दोघांना एकत्र पाहून आधिक आनंदेल :-) (आणि हो, एफ एम ची गरज नसेल!)

In reply to by बहुगुणी

'तिच्या'पर्यंत अगदी असंच्या असं पोचवा, कात्रजच्या घाटातली संध्याकाळ नक्कीच दोघांना एकत्र पाहून आधिक आनंदेल :-) सहमत्र. मिपावर बोलवा त्यांना...! सालं हे पोहचणं आणि न पोहचणं लै बेक्कार असतं. -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
लेखनप्रकार
संध्याकाळची वेळ... मला ही संध्याकाळची वेळ खूप आवडते... काय होतं देव जाणे पण खूप हळवं वाटतं... म्हणजे दरवेळेस मनात दुःख, वेदनाच असायला हवी असं नाही पण तरीही फार भावनिक व्हायला होतं... ज्या गोष्टींचा आपण संपूर्ण दिवसात कधीच विचार करत नाही त्या गोष्टी आठवू लागतात... काही गोष्टींचे संदर्भ बदलतात..तर काही गोष्टींचे संदर्भ अजून पक्के होतात... संध्याकाळची वेळ ही आत्म्यानं जागं व्ह्यायची वेळ असते. आपलं खरं आस्तित्व काय आहे? आपण नक्की कोण आहोत? आपले नक्की कोण आहेत? आपण नक्की कोणाचे आहोत? ह्या सगळ्या गोष्टींचा त्रयस्थ दृष्टीकोनातून विचार करायचा असेल तर संध्याकाळच्या वेळेसारखी दुसरी कुठलीही वेळ नाही...

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१२

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Tue, 06/10/2014 - 12:58
अगदी अगदी =)) (तूर्त आमची संमती पूर्वार्धालाच आहे हेवेसांनल ;) )

In reply to by सूड

इस्पीकचा एक्का @परत एकदा (तरी) लग्न करावसं वाटायला लागलंय >>> अर्र्रे... लै वेळा लावणार! =)) मृत्युन्जय @अजुन येउ द्यात>>> जी सर! सूड @ 'ठेवणीतले' उखाणे द्यायचे की बुवा !! >>>या सामन्याच्या शेवटच्या १५ ओव्हर बाकि आहेत अजून! ;)

पेट थेरपी Tue, 06/10/2014 - 17:44
मला ही सर्व मालिका कैच्याकै आवडलेली आहे. फारच मस्त आणि मिस्किल लिहिता तुम्ही. मायबोलीवरची अन्न वै प्राणा ही मालिका जेवण म्हटले तर हे चटपटीत मस्त मधल्यावेळचे खाणे आहे. परत परत वाचणार. :) माझा एक परश्न आहे. मुलीचे वडील वारलेले असल्यास हे सर्व विधी कोण करणार? मला ते लग्न समारंभात कारुण्या फारुण्य नकोय. दणक्यात लगिन झाले पाहिजे.

In reply to by पेट थेरपी

@मुलीचे वडील वारलेले असल्यास हे सर्व विधी कोण करणार? >>> मी या बाबतीत २ निर्णय यजमानां समोर ठेवतो. १) मुलिच्या आईची 'इच्छा' असल्यास ...तिच्याकडुन. २) मुलिच्या वडिलांच्या भूमिकेतुन,जो कोणी विधिंना बसायला तयार असेल..त्याच्याकडून!

In reply to by सूड

@आई नसल्यास??>>> एकट्या वडिलांकडून..किंवा त्यांची एकट्यानी विधी करायची इच्छा नसल्यास..ज्याला ह्यात सहभागी होण्याची मनापासून इच्छा आहे..अश्या दुसर्‍या कुणाकडुनही..!

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Tue, 06/10/2014 - 19:40
___/\___ मस्त हो गुरुजी! असेच विचार समाजाला पुढे नेतील. बहुतेकदा विधवा स्त्रीला तिचा नवरा नसणं हा तिचा स्वतःचा काही गुन्हा असल्यागत मागे थांबावं लागतं. आयुष्यभर राबून, कधीतरी एकटीनं खस्ता खाऊन मुलामुलीच्या कार्यात बिचारीला काहीही करता येत नाही. त्या मंगल प्रसंगी पूर्वी ह्या स्त्रीला नि मुलांना दारात उभं न केलेले काका कन्यादान करतात नि मिरवतात. अगदी सगळं केलेलं असलं तरी तो अधिकार आईपासून हिरावून घेतला का जातो हे समजत नाही. विधुरांची परिस्थिती आपल्या पुरुषप्रधान समाजाकडून तितकीशी वाईट झालेली नाही असं वाटतंय.

In reply to by अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा Tue, 06/10/2014 - 20:01
मी या बाबतीत २ निर्णय यजमानां समोर ठेवतो. १) मुलिच्या आईची 'इच्छा' असल्यास ...तिच्याकडुन. २) मुलिच्या वडिलांच्या भूमिकेतुन,जो कोणी विधिंना बसायला तयार असेल..त्याच्याकडून!
अप्रतिम :)

In reply to by टवाळ कार्टा

एस Tue, 06/10/2014 - 20:45
असेच म्हणतो. अप्रतीम लेख. आमच्या लग्नाची आठवण आली. त्यात गुरूजींना मी 'पुत्रप्राप्त्यर्थ' ऐवजी 'कन्याप्राप्त्यर्थ' असे मुद्दाम म्हणायला लावले होते. :-)

In reply to by एस

@त्यात गुरूजींना मी 'पुत्रप्राप्त्यर्थ' ऐवजी 'कन्याप्राप्त्यर्थ' असे मुद्दाम म्हणायला लावले होते. Smile>>> अतिशय कौतुकास्पद! आपण यजमान लोकांनीच आंम्हाला अश्या गोष्टी करायला सांगितल्या तर धर्म काळाबरोबर रहायला मदत होइल.
या निमित्तानी...आज..आणखि काही थोडेसे:-
मी चालू विवाह संस्कारात काहि बदल केलेले आहेत,ते मांडतो. १) मुलिचे वडील मुलाच्या वडिलांना आमची मुलगी दहा प्रकारच्या दोषांनी रहित असल्याची खात्री देणारा,अभिवचन वजा श्लोक वदवून घेण्याचा विधी, मी काढून टाकलेला आहे. अव्यंगे,अक्लीबे,अपतिते(इत्यादी प्रकारचे..) दशदोष विवर्जिते इमां कन्यां प्रदास्यामी देवाग्नि द्विज संन्निधौ २) शचीपूजनातला श्लोक मुलिला समजाऊन सांगून,बदलवून म्हणवुन घेतो. देवेंद्राणी नमस्तुभ्यं देवेंद्रप्रीय भामिनी विवाहभाग्यमारोग्यं संतती* लाभं च देही मे (हा शब्द बदल, व्याकरण दृष्ट्या बरोबर की चूक..हे मला माहित नाही..पण परिणाम-कारक आहे,हे मात्र नक्की!) *मूळ श्लोकातः- पुत्र लाभं च देही मे..असं आहे! ३)तसेच... विवाहाच्या अदल्या दिवशी संध्याकाळी केला जाणारा, वांङ्निश्चय..हा विधी निरर्र्थक असल्याचं मी सांगून पहातो.ऐकलं..तर फक्त व्याही भेट/सिमांत पूजन आणि नंतर मुलिची पूजा करवून वस्त्र/ओटी/औक्षण..इत्यादी करवून विषय संपवतो. पण याला फारसा पाठिंबा मिळत नाही. हीच गोष्ट रुखवताचे भोजन ह्या संपूर्ण दिखाऊ विधीच्या बाबतीतही घडते.तो तर गैरलागू झालेला विधी आहे.पण तो फोटोत-जाऊन बसलेला असल्यानी...उष्टावण केल्यासारखा करावाच लागतो!

In reply to by अत्रुप्त आत्मा

एस गुरुवार, 06/12/2014 - 11:06
मागे तुम्ही एका प्रतिसादात तुमच्या मित्राचे लग्न तुमच्या घरीच कसे फक्त प्रतिज्ञा म्हणायची एवढाच विधी करवून लावले होते त्याची आठवण झाली. तुम्हांला आमच्याकडून जोरदार पाठींबा. हौसेच्या नावाखाली हे सगळं करवून घेतलं जातं. लग्नात नवरा-नवरीचं कुणीच काही ऐकत नसतं. ज्यालात्याला आपला अजेंडा पुढे दामटायचा असतो. आमच्या लग्नात आमचं फक्त त्या काकांनी ऐकलं आणि 'पुत्रप्राप्त्यर्थ' ऐवजी 'कन्या तरी का? अपत्यप्राप्त्यर्थ असे म्हणूया.' असे केलं. तरी आम्ही 'कन्याप्राप्त्यर्थ' असेच म्हणायला लावले. :-) म्हणालो, कन्याच झाली पाहिजे. नाही झाली तर दत्तक घेणार. :-) रच्याकने - हे सगळं काय करायचे आहे? कशाला हवी ती औपचारिकता, गडबडगोंधळ, निरर्थक विधींचा गुंता, श्रेष्ठ-कनिष्ठपणा... मियाँबीबी राजी तो क्यूँ कुछ करे काझी? दोघांनी एकमेकांना पसंत केलं, शपथपूर्वक परस्परांचा आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकार केला की बास. झालं लग्न. बाकी दुनिया गेली खड्ड्यात. :-)

In reply to by एस

रेवती गुरुवार, 06/12/2014 - 16:14
खरच. आपल्याला सगळे नाही तरी थोडेफार आपल्या मनात आहे त्या पद्धतिने लग्न करता आले तर किती मजा येईल पण तसे होत नाही. उदा. उग्गीच तासन् तास डोळ्यातून पाणी काढत होमकुंडासमोर बसणे, नको तेवढे मानपान, शेकडो लोकांच्या जेवणावळी वगैरे. मुलीला सासरी पाठवताना गडगडाटी गर्जना करत रडायलाच पाहिजे का? मी अज्याबात रडले नव्हते म्हणून सगळ्यांची पंचाईत झाली होती. बाबा तर म्हणाले की बाई गं, निदान शास्त्रापुरते दोन अश्रू डोळ्यातून काढ! ;) नंतर बरेचजण चिडवत होते की तुझ्या लग्नात आमचा रडायचा चान्स गेला म्हणून! ;) पण काही लग्नांमध्ये लोक धाय मोकलून रडताना पाहिलेत आणि मुलगी पलिकडच्या बिल्डींगमध्ये सासरी चालली होती. एका केसमध्ये तर ती वरील मजल्यावरून खालच्या जमल्यावर रहायला जाणार होती पण (म्हणूनच की काय) सासरचेही रडत होते.

In reply to by बॅटमॅन

एस गुरुवार, 06/12/2014 - 18:37
'धायी दिशांतून' पनि व्हू ल्गलेकि. कुंतुन कुंतुन अतव्न कदता तुम्हि लोक्स. तम्बा, ब्लगंध्र्वलाच संग्तो. *ROFL*

In reply to by सूड

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/12/2014 - 23:12
@ह्याचे कॉपीराईट्स चुचू यांचेकडे आहेत.>>> नाsssssssssssही! :-/ चुचू बिचू जुनी लोकं झाली. :-/ नव्या काळात ते हक्क आहेत फक्त आमच्या किच्चू तै कडे! *biggrin* तिच्या सारखं टायपो-बोब्लं लेकन कुनीच करु शकत नै!!! *lol* . . . . पण किच्चू तै पण अता गायब झाली...येतच नै मिपावर! :-/

खटपट्या Wed, 06/11/2014 - 22:37
मस्त !!!
हल्ली विधिंचे फोटो नसून,फोटोंचेच विधी असतात!!!
हे तर जबरीच

रेवती गुरुवार, 06/12/2014 - 00:18
वाचतीये हो गुरुजी! सगळी फिल्म डोळ्यासमोरून सरकतीये. माझ्या मुलानं आपल्या पद्धतीनं लगीन करायचं ठरवलं तर तुम्हाला संपर्क करीन पण त्याला खूप वर्षे आहेत अजून. आम्ही इतर आया बायांचे ड्वायलॉग मात्र म्हणणारच! ;) तुमच्या मालिकेचा निमित्तानं सगळ्यांना आपापल्या लग्नातलं काहीबाही आठवत राहतं.

पेट थेरपी गुरुवार, 06/12/2014 - 11:02
फॅन आपण तुमचे. हा ऑप्शन लक्षात आला नव्हता. धन्यवाद. मला विधी करता आले तर छानच. आणि तुम्ही गुरुजी असणार हे नक्कीच. बघा साताठ वर्षे आधीच सांगते आहे. सध्यातरी मराठी पद्धतीने लग्न आणि मग एक मोठी पार्टी असा अंधुक प्लॅन आहे. नवरदेवही कुठेतरी दहावी बारावी करत असणार.

In reply to by प्रचेतस

एस गुरुवार, 06/12/2014 - 19:13
अच्छा असं आहे होय? S-O-R-E स्वॉरी.
आणि तुम्ही गुरुजी असणार हे नक्कीच
अहो ते गुरुजीच आहेत. हो की नाही ओ आत्मूगुर्जी? *wink*

मधुरा देशपांडे गुरुवार, 06/12/2014 - 19:06
मस्त चाललीये लेखमाला. वर आलेले काही प्रतिसाद देखील आवडले, जसे की आईने लग्नात विधी करणे आणि कन्या/अपत्य प्राप्त्यर्थम आणि इतर. या निमित्ताने अजून एक, पौरोहित्य करणाऱ्या दोन महिला देखील ओळखीच्या आहेत. माझे लग्न लावणाऱ्या त्यांच्यापैकीच एक होत्या. इतरही धार्मिक कार्यात या काकू पौरोहित्य करतात आणि त्यांच्या मते देखील स्त्रिया इच्छा असल्यास ही कार्ये करू शकतात. ह्याबाबत तुमचे मत आणि अनुभव वाचायला आवडेल. तुमच्या ओळखीत आहेत का कुणी?

१)रेवती @माझ्या मुलानं आपल्या पद्धतीनं लगीन करायचं ठरवलं तर तुम्हाला संपर्क करीन पण त्याला खूप वर्षे आहेत अजून.>>> नक्कीच! आत्मूगुर्जी हाजिर है। :) @आम्ही इतर आया बायांचे ड्वायलॉग मात्र म्हणणारच! >>> *biggrin* नाही म्हणलेत,तर मी म्हणवेन..अहो,कढीत आलं हवच हो!!! *biggrin* २)पेट थेरपी @मला विधी करता आले तर छानच. आणि तुम्ही गुरुजी असणार हे नक्कीच. बघा साताठ वर्षे आधीच सांगते आहे.>>> नोंद घेतल्या गेली आहे! :) ================= मि.पा.करां-कडची लावितो लग्ने।आत्मूगुर्जी आत्ममग्ने॥ - अशी सही घ्यायला लागणार..आता! =)) ३)स्वॅप्स @अहो ते गुरुजीच आहेत.>>> =)) हो की नाही ओ आत्मूगुर्जी?>>> व्हय..व्हय! *biggrin* ४)मधुरा देशपांडे @ह्याबाबत तुमचे मत आणि अनुभव वाचायला आवडेल.तुमच्या ओळखीत आहेत का कुणी?>>> आहेत.>>>महिला पुरोहितांच्या बाबतीत माझे मत असे,की पौरोहित्याचे काम त्या त्या धर्म समाजातल्या कुणालाही करता आलं पाहिजे..करू दिलं पाहिजे.अता फक्त,हे होतं असं,की मक्तेदारी मोडून काढताना,जुनं मोडतं आणि नवं जुन्याहून जुनं होऊन अंगावर येतं.मग मोडलं काय? आणि मांडलं काय? असा प्रश्न येतो. दुर्दैवानी सध्या महिला पुरोहितांच्या बाबतीत असच काहिसं होत आहे. त्यांना आपण नविन क्षेत्रात मुसंडी मारली,याच्या आनंद होण्यापेक्षा उन्माद येतो आहे...की काय अशी शंका येते.ज्या लग्न कार्यात त्या समोरुन/दुसर्‍या बाजूकडून येतात..त्यात काहि ठिकाणी-"तुमचं जुनं कसं चुकिचं होतं,आणि आमचं नवं(?) कसं जास्ती बरोब्बर आहे"..असा भाव असतो.ज्या संयमी असतात..त्या कामाशी काम म्हणून रहातात.त्यांच वेगळं..पण काहि महिला पुरोहित मी म्हटल्या सारखा व्यवहार करताना मला अढळल्या आहेत.पुण्यात ज्ञानप्रबोधिनी नावाची जी नवी वैदिकधर्मीय महिला पुरोहित शाखा आहे. त्यांच्यात हा प्रकार विशेष अढळतो. त्या करातात ,ते पौरोहित्य आमचं परंपरागतच आहे.फक्त त्याला लोकांना भावेल असा नवा टच दिलाय. (एखाद्या जुन्या पदार्थात थोडी फेरफार करून नविन नाव द्यावं..तसा!) (शिवाय,ज्ञानप्रबोधिनी वाल्यांनी त्यांना वेदोक्त मंत्र हे स्वर-रहित का शिकविले आहेत???-याचंही मला कोडं आहे,आणि त्याबद्दल शंकाही आहे!) त्यांच्यातली चांगली गोष्ट म्हणजे धर्मविधितल्या काही लोकपरिणामकारक गोष्टींचं त्यांनी केलेलं मराठीकरण, आणि काहि ठिकाणी ,आलेल्या आप्तेष्टांचापरिणामकारक लोकसहभाग! (ह्या दोन्ही गोष्टी मलाही अवडल्या/योग्य वाटल्यामुळे मी त्या त्यांच्याकडून उचलल्या आहेत.) मला चांगल्या वाटलेल्या गोष्टी मी वर नोंदवलेल्या आहेतच.पण आक्षेप आहे..तो समाजमनामधे, नविन पेरणी करताना काहिच नविन न आणल्याबद्द्ल!...काहि विधी/क्रीया तर जुन्याहूनी जुने म्हणावे अश्याही दिसून येतात. धर्मातल्या विषम आणि चुकिच्या मुल्यांचं गोग्गोड समर्थनही केलं जातं(हा प्रकार आमच्याकडेही होतो)... माझं म्हणणं असं आहे,की जुन्या/चुकिच्या गोष्टी सोडताना..(पुरोहित/यजमान-दोघांनिही)त्या आपल्याच चुका आहेत,अशी जाहिर कबुली देऊन सोडल्या पाहिजेत.किमान...उल्लेख तरी आला पाहिजे.आणि मग त्या जागी नवमुल्यांची/विधिंची प्रतिष्ठापना केली पाहिजे...आणि नेमकं हेच होत नाही,कारण या नव्यांनाही जुन्याचच कौतुक अधिक आहे. मी कन्यादानाचा विधी ज्यांना नको असतो,त्यांना त्या विधीची निर्मिती..त्याची योग्या.योग्यता सांगून त्या जागी वधु/वर-स्विकाराचा नविन विधी करवून घेतो...( या उप्पर..एके ठिकाणी वादविवादामधे पैज मारून,मी घट्स्फोटाचाही विधी ,,,एकांना रुपकामधे सांगितला होता..आणि करवून घेण्याची तयारीही दर्शविली होती..पण बेगडी/दिखाऊ पुरोगामित्वा-सारखे..ते ही,बरोब्बर वेळेला मागे हटले..असो!) या सगळ्या चर्वितचर्वणाचा मतितार्थ नवापंथ किंवा नवमत आणताना..ते खरच नव आणि आधुनिक असलं पाहिजे,जुन्या भांड्याला गुपचुप केलेलं पॉलिश नको...!!! :) या शिवाय,-महिलांना आमच्यातल्याच काहि गुरु-जनांनी,जसे धर्मविधी शिकवले..ती परंपरा समाजानी उचलुन धरून,पुढे चालु ठेवायला सहाय्य केलं पाहिजे,ब्राम्हण मुलं ज्या लहान वयात वेदपाठशाळेत दाखल होतात,त्याच वयात मुली दाखल करवून त्यांना संपूर्ण वेदोक्त (दशग्रंथी) शिक्षणाचा आग्रह आणि कृती केली पाहिजे.(म्हणजे खर्‍या महिला पुरोहित तयार होतील,आणि धर्मातली स्त्रीविषयक विषमता मिटायला..खरी मदत होइल)..तसेच.. हिंदुसमाजातील सगळ्यांनी,ब्राम्हणेतर-मुला/मुलिंना(ही) वेदपाठशाळांमधे वेदोक्त शिक्षणासाठी प्रवेश देण्याची इच्छा/प्रयत्न केले पाहिजेत.(यामुळे धर्मातली सगळीच विषमता मिटायला एक फार मोठ्ठी सुरवात होऊ शकते,फक्त त्या दृष्टीनी सकारात्मक आणि खरेखुरे नवे दृष्टीकोन बाळगून..योग्य कार्यक्रम आखले गेले पाहिजेत.) हे मी सगळं हिंदूसमजाच्या अंगावर ढकलून मोकळा होत नाहीये,तर.आज जसा मी,माझ्या मतिनी तयार झालेलो आहे,तसे हजार तयार व्हावे,ही इच्छा अहे म्हणून हे मत मांडतो आहे..आणि या इच्छेस्तव,प्रचलीत धर्मव्यवस्थेवर समाजाचा आवश्यक असा रेटा पडला,तरच हे घडू शकेल..असं(आज तरी) वाटतं..म्हणून!

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रतिसाद आवडला!!! ज्ञानप्रबोधिनी विषयी फारशी माहिती नाही. तुम्ही म्हणताय तसा अनुभव असेलही. असे व्हायला नको हेही खरे. मी ज्यांना ओळखते त्या ज्ञानप्रबोधिनी किंवा पुण्यातल्याही नाहीत. त्या जेव्हा पौरोहित्य करतात तेव्हा बरेच प्रश्नार्थक/आश्चर्यकारक चेहरे दिसतातच पण हळूहळू का होईना बुलढाण्यासारख्या लहानगावात त्यांच्यामुळे काही प्रमाणात तरी प्रबोधन होत आहे. लोकांचा दृष्टीकोन बदलायला हवा हेच महत्वाचे.

In reply to by मधुरा देशपांडे

@ त्या जेव्हा पौरोहित्य करतात तेव्हा बरेच प्रश्नार्थक/आश्चर्यकारक चेहरे दिसतातच>>> ते बायका स्कूलव्हॅन/रिक्षा चालवायला लागल्या,तेंव्हाही दिसले होते.पण ते केवळ आपल्या नजरेला सवय होइपर्यंतच असतं @ पण हळूहळू का होईना बुलढाण्यासारख्या लहानगावात त्यांच्यामुळे काही प्रमाणात तरी प्रबोधन होत आहे. लोकांचा दृष्टीकोन बदलायला हवा हेच महत्वाचे.>>> +१

प्रचलीत धर्मव्यवस्थेवर समाजाचा आवश्यक असा रेटा पडला,तरच हे घडू शकेल. "समाजाचा आवश्यक असा रेटा" हीच खरी लाखाची गोष्ट... मग ती धर्मव्यवस्था असो वा राजकारण !

पैसा Fri, 06/13/2014 - 22:16
लेख आणि त्या निमित्ताने आलेल्या प्रतिक्रिया फार आवडल्या.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Tue, 06/10/2014 - 12:58
अगदी अगदी =)) (तूर्त आमची संमती पूर्वार्धालाच आहे हेवेसांनल ;) )

In reply to by सूड

इस्पीकचा एक्का @परत एकदा (तरी) लग्न करावसं वाटायला लागलंय >>> अर्र्रे... लै वेळा लावणार! =)) मृत्युन्जय @अजुन येउ द्यात>>> जी सर! सूड @ 'ठेवणीतले' उखाणे द्यायचे की बुवा !! >>>या सामन्याच्या शेवटच्या १५ ओव्हर बाकि आहेत अजून! ;)

पेट थेरपी Tue, 06/10/2014 - 17:44
मला ही सर्व मालिका कैच्याकै आवडलेली आहे. फारच मस्त आणि मिस्किल लिहिता तुम्ही. मायबोलीवरची अन्न वै प्राणा ही मालिका जेवण म्हटले तर हे चटपटीत मस्त मधल्यावेळचे खाणे आहे. परत परत वाचणार. :) माझा एक परश्न आहे. मुलीचे वडील वारलेले असल्यास हे सर्व विधी कोण करणार? मला ते लग्न समारंभात कारुण्या फारुण्य नकोय. दणक्यात लगिन झाले पाहिजे.

In reply to by पेट थेरपी

@मुलीचे वडील वारलेले असल्यास हे सर्व विधी कोण करणार? >>> मी या बाबतीत २ निर्णय यजमानां समोर ठेवतो. १) मुलिच्या आईची 'इच्छा' असल्यास ...तिच्याकडुन. २) मुलिच्या वडिलांच्या भूमिकेतुन,जो कोणी विधिंना बसायला तयार असेल..त्याच्याकडून!

In reply to by सूड

@आई नसल्यास??>>> एकट्या वडिलांकडून..किंवा त्यांची एकट्यानी विधी करायची इच्छा नसल्यास..ज्याला ह्यात सहभागी होण्याची मनापासून इच्छा आहे..अश्या दुसर्‍या कुणाकडुनही..!

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Tue, 06/10/2014 - 19:40
___/\___ मस्त हो गुरुजी! असेच विचार समाजाला पुढे नेतील. बहुतेकदा विधवा स्त्रीला तिचा नवरा नसणं हा तिचा स्वतःचा काही गुन्हा असल्यागत मागे थांबावं लागतं. आयुष्यभर राबून, कधीतरी एकटीनं खस्ता खाऊन मुलामुलीच्या कार्यात बिचारीला काहीही करता येत नाही. त्या मंगल प्रसंगी पूर्वी ह्या स्त्रीला नि मुलांना दारात उभं न केलेले काका कन्यादान करतात नि मिरवतात. अगदी सगळं केलेलं असलं तरी तो अधिकार आईपासून हिरावून घेतला का जातो हे समजत नाही. विधुरांची परिस्थिती आपल्या पुरुषप्रधान समाजाकडून तितकीशी वाईट झालेली नाही असं वाटतंय.

In reply to by अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा Tue, 06/10/2014 - 20:01
मी या बाबतीत २ निर्णय यजमानां समोर ठेवतो. १) मुलिच्या आईची 'इच्छा' असल्यास ...तिच्याकडुन. २) मुलिच्या वडिलांच्या भूमिकेतुन,जो कोणी विधिंना बसायला तयार असेल..त्याच्याकडून!
अप्रतिम :)

In reply to by टवाळ कार्टा

एस Tue, 06/10/2014 - 20:45
असेच म्हणतो. अप्रतीम लेख. आमच्या लग्नाची आठवण आली. त्यात गुरूजींना मी 'पुत्रप्राप्त्यर्थ' ऐवजी 'कन्याप्राप्त्यर्थ' असे मुद्दाम म्हणायला लावले होते. :-)

In reply to by एस

@त्यात गुरूजींना मी 'पुत्रप्राप्त्यर्थ' ऐवजी 'कन्याप्राप्त्यर्थ' असे मुद्दाम म्हणायला लावले होते. Smile>>> अतिशय कौतुकास्पद! आपण यजमान लोकांनीच आंम्हाला अश्या गोष्टी करायला सांगितल्या तर धर्म काळाबरोबर रहायला मदत होइल.
या निमित्तानी...आज..आणखि काही थोडेसे:-
मी चालू विवाह संस्कारात काहि बदल केलेले आहेत,ते मांडतो. १) मुलिचे वडील मुलाच्या वडिलांना आमची मुलगी दहा प्रकारच्या दोषांनी रहित असल्याची खात्री देणारा,अभिवचन वजा श्लोक वदवून घेण्याचा विधी, मी काढून टाकलेला आहे. अव्यंगे,अक्लीबे,अपतिते(इत्यादी प्रकारचे..) दशदोष विवर्जिते इमां कन्यां प्रदास्यामी देवाग्नि द्विज संन्निधौ २) शचीपूजनातला श्लोक मुलिला समजाऊन सांगून,बदलवून म्हणवुन घेतो. देवेंद्राणी नमस्तुभ्यं देवेंद्रप्रीय भामिनी विवाहभाग्यमारोग्यं संतती* लाभं च देही मे (हा शब्द बदल, व्याकरण दृष्ट्या बरोबर की चूक..हे मला माहित नाही..पण परिणाम-कारक आहे,हे मात्र नक्की!) *मूळ श्लोकातः- पुत्र लाभं च देही मे..असं आहे! ३)तसेच... विवाहाच्या अदल्या दिवशी संध्याकाळी केला जाणारा, वांङ्निश्चय..हा विधी निरर्र्थक असल्याचं मी सांगून पहातो.ऐकलं..तर फक्त व्याही भेट/सिमांत पूजन आणि नंतर मुलिची पूजा करवून वस्त्र/ओटी/औक्षण..इत्यादी करवून विषय संपवतो. पण याला फारसा पाठिंबा मिळत नाही. हीच गोष्ट रुखवताचे भोजन ह्या संपूर्ण दिखाऊ विधीच्या बाबतीतही घडते.तो तर गैरलागू झालेला विधी आहे.पण तो फोटोत-जाऊन बसलेला असल्यानी...उष्टावण केल्यासारखा करावाच लागतो!

In reply to by अत्रुप्त आत्मा

एस गुरुवार, 06/12/2014 - 11:06
मागे तुम्ही एका प्रतिसादात तुमच्या मित्राचे लग्न तुमच्या घरीच कसे फक्त प्रतिज्ञा म्हणायची एवढाच विधी करवून लावले होते त्याची आठवण झाली. तुम्हांला आमच्याकडून जोरदार पाठींबा. हौसेच्या नावाखाली हे सगळं करवून घेतलं जातं. लग्नात नवरा-नवरीचं कुणीच काही ऐकत नसतं. ज्यालात्याला आपला अजेंडा पुढे दामटायचा असतो. आमच्या लग्नात आमचं फक्त त्या काकांनी ऐकलं आणि 'पुत्रप्राप्त्यर्थ' ऐवजी 'कन्या तरी का? अपत्यप्राप्त्यर्थ असे म्हणूया.' असे केलं. तरी आम्ही 'कन्याप्राप्त्यर्थ' असेच म्हणायला लावले. :-) म्हणालो, कन्याच झाली पाहिजे. नाही झाली तर दत्तक घेणार. :-) रच्याकने - हे सगळं काय करायचे आहे? कशाला हवी ती औपचारिकता, गडबडगोंधळ, निरर्थक विधींचा गुंता, श्रेष्ठ-कनिष्ठपणा... मियाँबीबी राजी तो क्यूँ कुछ करे काझी? दोघांनी एकमेकांना पसंत केलं, शपथपूर्वक परस्परांचा आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकार केला की बास. झालं लग्न. बाकी दुनिया गेली खड्ड्यात. :-)

In reply to by एस

रेवती गुरुवार, 06/12/2014 - 16:14
खरच. आपल्याला सगळे नाही तरी थोडेफार आपल्या मनात आहे त्या पद्धतिने लग्न करता आले तर किती मजा येईल पण तसे होत नाही. उदा. उग्गीच तासन् तास डोळ्यातून पाणी काढत होमकुंडासमोर बसणे, नको तेवढे मानपान, शेकडो लोकांच्या जेवणावळी वगैरे. मुलीला सासरी पाठवताना गडगडाटी गर्जना करत रडायलाच पाहिजे का? मी अज्याबात रडले नव्हते म्हणून सगळ्यांची पंचाईत झाली होती. बाबा तर म्हणाले की बाई गं, निदान शास्त्रापुरते दोन अश्रू डोळ्यातून काढ! ;) नंतर बरेचजण चिडवत होते की तुझ्या लग्नात आमचा रडायचा चान्स गेला म्हणून! ;) पण काही लग्नांमध्ये लोक धाय मोकलून रडताना पाहिलेत आणि मुलगी पलिकडच्या बिल्डींगमध्ये सासरी चालली होती. एका केसमध्ये तर ती वरील मजल्यावरून खालच्या जमल्यावर रहायला जाणार होती पण (म्हणूनच की काय) सासरचेही रडत होते.

In reply to by बॅटमॅन

एस गुरुवार, 06/12/2014 - 18:37
'धायी दिशांतून' पनि व्हू ल्गलेकि. कुंतुन कुंतुन अतव्न कदता तुम्हि लोक्स. तम्बा, ब्लगंध्र्वलाच संग्तो. *ROFL*

In reply to by सूड

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/12/2014 - 23:12
@ह्याचे कॉपीराईट्स चुचू यांचेकडे आहेत.>>> नाsssssssssssही! :-/ चुचू बिचू जुनी लोकं झाली. :-/ नव्या काळात ते हक्क आहेत फक्त आमच्या किच्चू तै कडे! *biggrin* तिच्या सारखं टायपो-बोब्लं लेकन कुनीच करु शकत नै!!! *lol* . . . . पण किच्चू तै पण अता गायब झाली...येतच नै मिपावर! :-/

खटपट्या Wed, 06/11/2014 - 22:37
मस्त !!!
हल्ली विधिंचे फोटो नसून,फोटोंचेच विधी असतात!!!
हे तर जबरीच

रेवती गुरुवार, 06/12/2014 - 00:18
वाचतीये हो गुरुजी! सगळी फिल्म डोळ्यासमोरून सरकतीये. माझ्या मुलानं आपल्या पद्धतीनं लगीन करायचं ठरवलं तर तुम्हाला संपर्क करीन पण त्याला खूप वर्षे आहेत अजून. आम्ही इतर आया बायांचे ड्वायलॉग मात्र म्हणणारच! ;) तुमच्या मालिकेचा निमित्तानं सगळ्यांना आपापल्या लग्नातलं काहीबाही आठवत राहतं.

पेट थेरपी गुरुवार, 06/12/2014 - 11:02
फॅन आपण तुमचे. हा ऑप्शन लक्षात आला नव्हता. धन्यवाद. मला विधी करता आले तर छानच. आणि तुम्ही गुरुजी असणार हे नक्कीच. बघा साताठ वर्षे आधीच सांगते आहे. सध्यातरी मराठी पद्धतीने लग्न आणि मग एक मोठी पार्टी असा अंधुक प्लॅन आहे. नवरदेवही कुठेतरी दहावी बारावी करत असणार.

In reply to by प्रचेतस

एस गुरुवार, 06/12/2014 - 19:13
अच्छा असं आहे होय? S-O-R-E स्वॉरी.
आणि तुम्ही गुरुजी असणार हे नक्कीच
अहो ते गुरुजीच आहेत. हो की नाही ओ आत्मूगुर्जी? *wink*

मधुरा देशपांडे गुरुवार, 06/12/2014 - 19:06
मस्त चाललीये लेखमाला. वर आलेले काही प्रतिसाद देखील आवडले, जसे की आईने लग्नात विधी करणे आणि कन्या/अपत्य प्राप्त्यर्थम आणि इतर. या निमित्ताने अजून एक, पौरोहित्य करणाऱ्या दोन महिला देखील ओळखीच्या आहेत. माझे लग्न लावणाऱ्या त्यांच्यापैकीच एक होत्या. इतरही धार्मिक कार्यात या काकू पौरोहित्य करतात आणि त्यांच्या मते देखील स्त्रिया इच्छा असल्यास ही कार्ये करू शकतात. ह्याबाबत तुमचे मत आणि अनुभव वाचायला आवडेल. तुमच्या ओळखीत आहेत का कुणी?

१)रेवती @माझ्या मुलानं आपल्या पद्धतीनं लगीन करायचं ठरवलं तर तुम्हाला संपर्क करीन पण त्याला खूप वर्षे आहेत अजून.>>> नक्कीच! आत्मूगुर्जी हाजिर है। :) @आम्ही इतर आया बायांचे ड्वायलॉग मात्र म्हणणारच! >>> *biggrin* नाही म्हणलेत,तर मी म्हणवेन..अहो,कढीत आलं हवच हो!!! *biggrin* २)पेट थेरपी @मला विधी करता आले तर छानच. आणि तुम्ही गुरुजी असणार हे नक्कीच. बघा साताठ वर्षे आधीच सांगते आहे.>>> नोंद घेतल्या गेली आहे! :) ================= मि.पा.करां-कडची लावितो लग्ने।आत्मूगुर्जी आत्ममग्ने॥ - अशी सही घ्यायला लागणार..आता! =)) ३)स्वॅप्स @अहो ते गुरुजीच आहेत.>>> =)) हो की नाही ओ आत्मूगुर्जी?>>> व्हय..व्हय! *biggrin* ४)मधुरा देशपांडे @ह्याबाबत तुमचे मत आणि अनुभव वाचायला आवडेल.तुमच्या ओळखीत आहेत का कुणी?>>> आहेत.>>>महिला पुरोहितांच्या बाबतीत माझे मत असे,की पौरोहित्याचे काम त्या त्या धर्म समाजातल्या कुणालाही करता आलं पाहिजे..करू दिलं पाहिजे.अता फक्त,हे होतं असं,की मक्तेदारी मोडून काढताना,जुनं मोडतं आणि नवं जुन्याहून जुनं होऊन अंगावर येतं.मग मोडलं काय? आणि मांडलं काय? असा प्रश्न येतो. दुर्दैवानी सध्या महिला पुरोहितांच्या बाबतीत असच काहिसं होत आहे. त्यांना आपण नविन क्षेत्रात मुसंडी मारली,याच्या आनंद होण्यापेक्षा उन्माद येतो आहे...की काय अशी शंका येते.ज्या लग्न कार्यात त्या समोरुन/दुसर्‍या बाजूकडून येतात..त्यात काहि ठिकाणी-"तुमचं जुनं कसं चुकिचं होतं,आणि आमचं नवं(?) कसं जास्ती बरोब्बर आहे"..असा भाव असतो.ज्या संयमी असतात..त्या कामाशी काम म्हणून रहातात.त्यांच वेगळं..पण काहि महिला पुरोहित मी म्हटल्या सारखा व्यवहार करताना मला अढळल्या आहेत.पुण्यात ज्ञानप्रबोधिनी नावाची जी नवी वैदिकधर्मीय महिला पुरोहित शाखा आहे. त्यांच्यात हा प्रकार विशेष अढळतो. त्या करातात ,ते पौरोहित्य आमचं परंपरागतच आहे.फक्त त्याला लोकांना भावेल असा नवा टच दिलाय. (एखाद्या जुन्या पदार्थात थोडी फेरफार करून नविन नाव द्यावं..तसा!) (शिवाय,ज्ञानप्रबोधिनी वाल्यांनी त्यांना वेदोक्त मंत्र हे स्वर-रहित का शिकविले आहेत???-याचंही मला कोडं आहे,आणि त्याबद्दल शंकाही आहे!) त्यांच्यातली चांगली गोष्ट म्हणजे धर्मविधितल्या काही लोकपरिणामकारक गोष्टींचं त्यांनी केलेलं मराठीकरण, आणि काहि ठिकाणी ,आलेल्या आप्तेष्टांचापरिणामकारक लोकसहभाग! (ह्या दोन्ही गोष्टी मलाही अवडल्या/योग्य वाटल्यामुळे मी त्या त्यांच्याकडून उचलल्या आहेत.) मला चांगल्या वाटलेल्या गोष्टी मी वर नोंदवलेल्या आहेतच.पण आक्षेप आहे..तो समाजमनामधे, नविन पेरणी करताना काहिच नविन न आणल्याबद्द्ल!...काहि विधी/क्रीया तर जुन्याहूनी जुने म्हणावे अश्याही दिसून येतात. धर्मातल्या विषम आणि चुकिच्या मुल्यांचं गोग्गोड समर्थनही केलं जातं(हा प्रकार आमच्याकडेही होतो)... माझं म्हणणं असं आहे,की जुन्या/चुकिच्या गोष्टी सोडताना..(पुरोहित/यजमान-दोघांनिही)त्या आपल्याच चुका आहेत,अशी जाहिर कबुली देऊन सोडल्या पाहिजेत.किमान...उल्लेख तरी आला पाहिजे.आणि मग त्या जागी नवमुल्यांची/विधिंची प्रतिष्ठापना केली पाहिजे...आणि नेमकं हेच होत नाही,कारण या नव्यांनाही जुन्याचच कौतुक अधिक आहे. मी कन्यादानाचा विधी ज्यांना नको असतो,त्यांना त्या विधीची निर्मिती..त्याची योग्या.योग्यता सांगून त्या जागी वधु/वर-स्विकाराचा नविन विधी करवून घेतो...( या उप्पर..एके ठिकाणी वादविवादामधे पैज मारून,मी घट्स्फोटाचाही विधी ,,,एकांना रुपकामधे सांगितला होता..आणि करवून घेण्याची तयारीही दर्शविली होती..पण बेगडी/दिखाऊ पुरोगामित्वा-सारखे..ते ही,बरोब्बर वेळेला मागे हटले..असो!) या सगळ्या चर्वितचर्वणाचा मतितार्थ नवापंथ किंवा नवमत आणताना..ते खरच नव आणि आधुनिक असलं पाहिजे,जुन्या भांड्याला गुपचुप केलेलं पॉलिश नको...!!! :) या शिवाय,-महिलांना आमच्यातल्याच काहि गुरु-जनांनी,जसे धर्मविधी शिकवले..ती परंपरा समाजानी उचलुन धरून,पुढे चालु ठेवायला सहाय्य केलं पाहिजे,ब्राम्हण मुलं ज्या लहान वयात वेदपाठशाळेत दाखल होतात,त्याच वयात मुली दाखल करवून त्यांना संपूर्ण वेदोक्त (दशग्रंथी) शिक्षणाचा आग्रह आणि कृती केली पाहिजे.(म्हणजे खर्‍या महिला पुरोहित तयार होतील,आणि धर्मातली स्त्रीविषयक विषमता मिटायला..खरी मदत होइल)..तसेच.. हिंदुसमाजातील सगळ्यांनी,ब्राम्हणेतर-मुला/मुलिंना(ही) वेदपाठशाळांमधे वेदोक्त शिक्षणासाठी प्रवेश देण्याची इच्छा/प्रयत्न केले पाहिजेत.(यामुळे धर्मातली सगळीच विषमता मिटायला एक फार मोठ्ठी सुरवात होऊ शकते,फक्त त्या दृष्टीनी सकारात्मक आणि खरेखुरे नवे दृष्टीकोन बाळगून..योग्य कार्यक्रम आखले गेले पाहिजेत.) हे मी सगळं हिंदूसमजाच्या अंगावर ढकलून मोकळा होत नाहीये,तर.आज जसा मी,माझ्या मतिनी तयार झालेलो आहे,तसे हजार तयार व्हावे,ही इच्छा अहे म्हणून हे मत मांडतो आहे..आणि या इच्छेस्तव,प्रचलीत धर्मव्यवस्थेवर समाजाचा आवश्यक असा रेटा पडला,तरच हे घडू शकेल..असं(आज तरी) वाटतं..म्हणून!

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रतिसाद आवडला!!! ज्ञानप्रबोधिनी विषयी फारशी माहिती नाही. तुम्ही म्हणताय तसा अनुभव असेलही. असे व्हायला नको हेही खरे. मी ज्यांना ओळखते त्या ज्ञानप्रबोधिनी किंवा पुण्यातल्याही नाहीत. त्या जेव्हा पौरोहित्य करतात तेव्हा बरेच प्रश्नार्थक/आश्चर्यकारक चेहरे दिसतातच पण हळूहळू का होईना बुलढाण्यासारख्या लहानगावात त्यांच्यामुळे काही प्रमाणात तरी प्रबोधन होत आहे. लोकांचा दृष्टीकोन बदलायला हवा हेच महत्वाचे.

In reply to by मधुरा देशपांडे

@ त्या जेव्हा पौरोहित्य करतात तेव्हा बरेच प्रश्नार्थक/आश्चर्यकारक चेहरे दिसतातच>>> ते बायका स्कूलव्हॅन/रिक्षा चालवायला लागल्या,तेंव्हाही दिसले होते.पण ते केवळ आपल्या नजरेला सवय होइपर्यंतच असतं @ पण हळूहळू का होईना बुलढाण्यासारख्या लहानगावात त्यांच्यामुळे काही प्रमाणात तरी प्रबोधन होत आहे. लोकांचा दृष्टीकोन बदलायला हवा हेच महत्वाचे.>>> +१

प्रचलीत धर्मव्यवस्थेवर समाजाचा आवश्यक असा रेटा पडला,तरच हे घडू शकेल. "समाजाचा आवश्यक असा रेटा" हीच खरी लाखाची गोष्ट... मग ती धर्मव्यवस्था असो वा राजकारण !

पैसा Fri, 06/13/2014 - 22:16
लेख आणि त्या निमित्ताने आलेल्या प्रतिक्रिया फार आवडल्या.
लेखनप्रकार
मागिल सर्व भागः- http://misalpav.com/node/25298 http://misalpav.com/node/25318 http://misalpav.com/node/25527 http://misalpav.com/node/25626 http://misalpav.com/node/26585 http://misalpav.com/node/26703 http://misalpav.com/node/26846 http://misalpav.com/node/26933 http://misalpav.com/node/27236 http://misalpav.com/node/27525 http://misalpav.com/node/27831 म्हणजे पुढील आयुष्याचे कंकण धाडसानी मनगटावर बांधता येइल...! :) ====================== हम्म्म्म.. मग एकदाचं ते कसंबसं कन्यादान अवरतं.आणि परत आमची आपली पुढल्या गोष्टिंकडे नजर वळते.