मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फेसबुकवरील जुन्याचर्चा कशा शोधाव्यात ?

माहितगार ·

अक्शु 22/06/2014 - 16:21
मला मिपाच्या संदर्भात हेच विचारायचं. मिसळपाव वर देखील जुने लेख कसे शोधावेत हा प्रश्नच आहे.उदाहरणार्थ मी मिपा सुरुवातीला वाचायचो पण सदस्य नव्हतो. तेंव्हा एक धमाल लेख वाचला होता ज्यात टिपिकल बोलीवूड प्रेमकथांचा विनोदी अंगाने समाचार घेण्यात आला होता आणि मिपावरील सर्व धमाल धाग्यांप्रमाणेच मूळ लेखापेक्षा प्रतिक्रिया फारच भारी होत्या. पण लेखाचे किंवा लेखकाचे नावच आठवत नसल्याने धागा शोधणे शक्य झाले नाही.

अक्शु 22/06/2014 - 16:21
मला मिपाच्या संदर्भात हेच विचारायचं. मिसळपाव वर देखील जुने लेख कसे शोधावेत हा प्रश्नच आहे.उदाहरणार्थ मी मिपा सुरुवातीला वाचायचो पण सदस्य नव्हतो. तेंव्हा एक धमाल लेख वाचला होता ज्यात टिपिकल बोलीवूड प्रेमकथांचा विनोदी अंगाने समाचार घेण्यात आला होता आणि मिपावरील सर्व धमाल धाग्यांप्रमाणेच मूळ लेखापेक्षा प्रतिक्रिया फारच भारी होत्या. पण लेखाचे किंवा लेखकाचे नावच आठवत नसल्याने धागा शोधणे शक्य झाले नाही.
फेसबुक मध्ये ग्रूप्स, पेजेस आणि टाईमलाईन अशा तीन ठिकाणी चर्चा करता येते. पण या चर्चा तशा वाढत जातात. माझ्या सारखी व्यक्ती क्वचीतच फेसबुकवर जाते. आपण आपापसात केलेली जुनी चर्चा कशी शोधावी. ? विशीष्ट ग्रूप्स, पेजेस, टाईम लाईन आणि ज्या दोन सदस्यांमध्ये चर्चा झाली त्यांची नावे देऊन जुनी चर्चा शोधता येते काय याची माहिती हवी आहे.

अ‍ॅकलेशिया कार्डिया-३ - सुटका

तिमा ·

कवितानागेश 21/06/2014 - 13:26
तिमाकाका, आत्ता तुम्हाला ऑनलाईन पाहिल्यावर हेच विचारणार होते, की आता बरे झालात का? :) आता अकलेच्याकांद्याचा काही प्रॉब्लेम नाही हे बघून बरं वाटलं.

आयुर्हित 21/06/2014 - 13:50
या सर्व त्रासातुन मुक्तता झाल्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन. आपल्याला यापूढेही चांगले आरोग्य व दिर्घायुष्य लाभो हि परमेश्वराला प्रार्थना.

चौकटराजा 21/06/2014 - 17:10
तिमाजी साहेब आपण हे सहन केलेतच पण ते मोकळेपणाने व आपली विनोदी वृत्ती न गमावता कथन केलेत हे विशेष . याचबरोबर या वेगळ्याच आजारास अधुनिक शस्त्र चिकित्सा कशी सामोरी जाते याची ही जाता जाता माहिती मिळाली. अलीकडे रीडर्स डायजेस्ट वाचनात नाही. पण आपल्या निवेदनाने त्याचे एक पान वाचल्याचे समाधान मिळाले. व आपण बरे झालात हे दुसरे समाधान ! आपण हा किल्ला लढवलात खरोखरच " तिमाजीअप्पा" असेच म्हणावयास हवे.

In reply to by चौकटराजा

असंका 22/06/2014 - 14:09
+1 अगदी खरं आहे. एवढा त्रास होत असतानाही सगळ्यांना ही महत्वपूर्ण माहिती दिलीत! आपल्या उत्साहाला सलाम!

सस्नेह 21/06/2014 - 20:20
कसलं काय काय सहन केलंत ओ तिमाभाऊ ! आता मात्र भरपूर खादाडी सुरु करा पाहू. खाण्यासाठी भरपूर आरोग्यमय आयुष्य लाभो !

तिमा 29/06/2014 - 19:24
सर्व प्रतिसादकर्त्यांना आणि वाचकांना मनःपूर्वक धन्यवाद!

कवितानागेश 21/06/2014 - 13:26
तिमाकाका, आत्ता तुम्हाला ऑनलाईन पाहिल्यावर हेच विचारणार होते, की आता बरे झालात का? :) आता अकलेच्याकांद्याचा काही प्रॉब्लेम नाही हे बघून बरं वाटलं.

आयुर्हित 21/06/2014 - 13:50
या सर्व त्रासातुन मुक्तता झाल्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन. आपल्याला यापूढेही चांगले आरोग्य व दिर्घायुष्य लाभो हि परमेश्वराला प्रार्थना.

चौकटराजा 21/06/2014 - 17:10
तिमाजी साहेब आपण हे सहन केलेतच पण ते मोकळेपणाने व आपली विनोदी वृत्ती न गमावता कथन केलेत हे विशेष . याचबरोबर या वेगळ्याच आजारास अधुनिक शस्त्र चिकित्सा कशी सामोरी जाते याची ही जाता जाता माहिती मिळाली. अलीकडे रीडर्स डायजेस्ट वाचनात नाही. पण आपल्या निवेदनाने त्याचे एक पान वाचल्याचे समाधान मिळाले. व आपण बरे झालात हे दुसरे समाधान ! आपण हा किल्ला लढवलात खरोखरच " तिमाजीअप्पा" असेच म्हणावयास हवे.

In reply to by चौकटराजा

असंका 22/06/2014 - 14:09
+1 अगदी खरं आहे. एवढा त्रास होत असतानाही सगळ्यांना ही महत्वपूर्ण माहिती दिलीत! आपल्या उत्साहाला सलाम!

सस्नेह 21/06/2014 - 20:20
कसलं काय काय सहन केलंत ओ तिमाभाऊ ! आता मात्र भरपूर खादाडी सुरु करा पाहू. खाण्यासाठी भरपूर आरोग्यमय आयुष्य लाभो !

तिमा 29/06/2014 - 19:24
सर्व प्रतिसादकर्त्यांना आणि वाचकांना मनःपूर्वक धन्यवाद!
लेखनविषय:
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/27881 http://www.misalpav.com/node/27905 लिक्विड डाएट वर घरी पाठवल्यावर आपण यावर चार आठवडे कसे काढणार असे वाटत होते. कारण खालचा अर्धवट घसरलेला स्टेंट अर्धा अन्ननलिकेत आणि अर्धा जठरात लोंबत होता. त्यामुळे जठरावरचा वॉल्व्ह कायमचा उघडाच राहिला होता. काहीही द्रव पदार्थ प्यायला की थोड्याच वेळांत गॅसेस होऊन ते वर येऊ लागत. अर्ध्या तासात ते कमी होत. त्यानंतरच पलंगावर आडवे होता येत असे. रात्रीच्या वेळी तर, दर दोन तासांनी जाग येऊन उठून बसावे लागे आणि दोन घोट पाणी प्यायल्यावर ढेकरा कमी झाल्यावर परत झोपता येत असे.

ना केले

वैभवकुमारन ·

आयुर्हित 21/06/2014 - 14:04
जरी चुकला कोणी दाही दिशांना तरी वाटाड्याचे मी काम ना केले आपली चुक मान्य केल्यामूळे आनंद झाला. परमेश्वर आपल्याला नक्किच सन्मार्ग दाखविल.

In reply to by आयुर्हित

परमेश्वर आपल्याला नक्किच सन्मार्ग दाखविल.
कुठे असतो हा परमेश्वर? आणि नेहमी पब्लिकची वाट चुकायची वाट का पाहतो?

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 21/06/2014 - 14:53
आपले कोणतेही धर्मग्रंथ वाचलेत तर आपल्याला नक्किच कळेल की कुठे असतो हा परमेश्वर. फक्त त्यावर विचारमंथन करुन आपल्या दुसर्‍या प्रश्नाचेही उत्तर मिळेल.

In reply to by आयुर्हित

म्हणजे काय? अहो, इथे मी एकटाच तो प्रश्न विचारतो. धर्मग्रंथात तुम्हाला सापडला की कळवा पत्ता, जाऊ भेटायला.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 21/06/2014 - 21:31
ईश्वर (देव) म्हणजे काय? ईश्वर कसा पाहावा? ईश्वराचे पूजन कसे करावे? याबाबत सामान्यजनांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे संत तुकोबांनी आपल्या अभंगातून अत्यंत सुंदरपणे दिलेली आहेत... जे का रंजले गांजले । त्यांसि म्हणे जो आपुले ।।१।। तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।।२।। मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ।।३।। ज्यासि अपंगिता नाही । त्यासी धरी जो -हदयी ।।४।। दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ।।५।। तुका म्हणे सांगू किती । त्याचि भगवंताच्या मूर्ति ।।६।। जे जीव दु:खाने रंजले-गांजले आहेत, त्यासी जो आपले म्हणतो, त्यांना आपल्या जवळ घेतो तोच साधू आहे असे समजावे आणि त्याच ठिकाणी देव आहे असे मानावे. ज्याप्रमाणे लोणी आंतरबाह्य मृदु असते, त्याप्रमाणे सज्जनाचे चित्त असते. ज्याला कोणाचा आश्रय नाही, ज्याला कोणी जवळ करीत नाही, त्यांना तो आपल्या हृदयात धरतो, जवळ करतो. ज्याप्रमाणे तो आपल्या पुत्रावर प्रेम करतो तसेच प्रेम तो दास आणि दासीवरही करतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याविषयी किती म्हणून सांगू, ते साक्षात भगवंताची मूर्ती आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 23/06/2014 - 01:46
धुंधला जायें जो मंझिले इक पल को तु नज़र झुका झुक जाये सर जहां वही मिलता है रब का रास्ता तेरी किस्मत तु बदल दे रख हिम्मत बस चल दे तेरे साथी मेरे कदमोंके है निशान तू ना जाने आसपास है खुदा साभार : तू ना जाने आसपास है खुदा Lyrics of Aas Pass Khuda Song

म्हैस 23/06/2014 - 16:21
जरी चुकला कोणी दाही दिशांना तरी वाटाड्याचे मी काम ना केले भावलं. चुक मान्य केल्यामूळे आनंद झाला.
कुठे असतो हा परमेश्वर? आणि नेहमी पब्लिकची वाट चुकायची वाट का पाहतो?
ह्या प्रश्नाचं उत्तर मी पा वरच हजारदा देवून झालाय . पण आपली चूक असताना ती मान्य न करता उठसुठ परमेश्वराच्या नावाने कोकाल्नार्यांना काही लोकांच्या टाळक्यात ते शिरलं नाही किवा मग येडगाव घेवून पेडगाव ला जायची भारी हौस दिसतीये

आयुर्हित 21/06/2014 - 14:04
जरी चुकला कोणी दाही दिशांना तरी वाटाड्याचे मी काम ना केले आपली चुक मान्य केल्यामूळे आनंद झाला. परमेश्वर आपल्याला नक्किच सन्मार्ग दाखविल.

In reply to by आयुर्हित

परमेश्वर आपल्याला नक्किच सन्मार्ग दाखविल.
कुठे असतो हा परमेश्वर? आणि नेहमी पब्लिकची वाट चुकायची वाट का पाहतो?

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 21/06/2014 - 14:53
आपले कोणतेही धर्मग्रंथ वाचलेत तर आपल्याला नक्किच कळेल की कुठे असतो हा परमेश्वर. फक्त त्यावर विचारमंथन करुन आपल्या दुसर्‍या प्रश्नाचेही उत्तर मिळेल.

In reply to by आयुर्हित

म्हणजे काय? अहो, इथे मी एकटाच तो प्रश्न विचारतो. धर्मग्रंथात तुम्हाला सापडला की कळवा पत्ता, जाऊ भेटायला.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 21/06/2014 - 21:31
ईश्वर (देव) म्हणजे काय? ईश्वर कसा पाहावा? ईश्वराचे पूजन कसे करावे? याबाबत सामान्यजनांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे संत तुकोबांनी आपल्या अभंगातून अत्यंत सुंदरपणे दिलेली आहेत... जे का रंजले गांजले । त्यांसि म्हणे जो आपुले ।।१।। तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।।२।। मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ।।३।। ज्यासि अपंगिता नाही । त्यासी धरी जो -हदयी ।।४।। दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ।।५।। तुका म्हणे सांगू किती । त्याचि भगवंताच्या मूर्ति ।।६।। जे जीव दु:खाने रंजले-गांजले आहेत, त्यासी जो आपले म्हणतो, त्यांना आपल्या जवळ घेतो तोच साधू आहे असे समजावे आणि त्याच ठिकाणी देव आहे असे मानावे. ज्याप्रमाणे लोणी आंतरबाह्य मृदु असते, त्याप्रमाणे सज्जनाचे चित्त असते. ज्याला कोणाचा आश्रय नाही, ज्याला कोणी जवळ करीत नाही, त्यांना तो आपल्या हृदयात धरतो, जवळ करतो. ज्याप्रमाणे तो आपल्या पुत्रावर प्रेम करतो तसेच प्रेम तो दास आणि दासीवरही करतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याविषयी किती म्हणून सांगू, ते साक्षात भगवंताची मूर्ती आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित 23/06/2014 - 01:46
धुंधला जायें जो मंझिले इक पल को तु नज़र झुका झुक जाये सर जहां वही मिलता है रब का रास्ता तेरी किस्मत तु बदल दे रख हिम्मत बस चल दे तेरे साथी मेरे कदमोंके है निशान तू ना जाने आसपास है खुदा साभार : तू ना जाने आसपास है खुदा Lyrics of Aas Pass Khuda Song

म्हैस 23/06/2014 - 16:21
जरी चुकला कोणी दाही दिशांना तरी वाटाड्याचे मी काम ना केले भावलं. चुक मान्य केल्यामूळे आनंद झाला.
कुठे असतो हा परमेश्वर? आणि नेहमी पब्लिकची वाट चुकायची वाट का पाहतो?
ह्या प्रश्नाचं उत्तर मी पा वरच हजारदा देवून झालाय . पण आपली चूक असताना ती मान्य न करता उठसुठ परमेश्वराच्या नावाने कोकाल्नार्यांना काही लोकांच्या टाळक्यात ते शिरलं नाही किवा मग येडगाव घेवून पेडगाव ला जायची भारी हौस दिसतीये
लेखनविषय:
कीती पाप केले, कीती पुण्य केले कोणा हास्य दिले , कुणा शून्य केले जरी जींकता मी हा डाव रडीचा कधी हारण्याचे मी प्रयत्न ना केले असा पोरका मी , जरी पोरका मी मी तेव्हां त्या मातेला धन्य ना केले जेव्हां सोडला तीक्ष्ण शब्दांचा मारा तेव्हां भावनांचे मी काव्य ना केले जरी चुकला कोणी दाही दिशांना तरी वाटाड्याचे मी काम ना केले दिल्या देवाने सुख सुमनांच्या माळा तरी मुखी नाम मी 'राम' ना केले

उत्तर सापडेना आज?

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
काव्यरस
(अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि त्यांची निर्घुण हत्या होते. अश्या घटना देशात घटत आहेत. मग दिल्ली असो किंवा बदायूँ. प्रश्न अनेक आहेत पण उत्तर सापडत नाही. कुठे चूक झाली आमच्या पिढीच्या हातून कि आजची तरुण पिढी वासनेच्या आहारी जात आहे) कुणी पायदळी तुटवली एक नाजूक कळी आज? मध्यान्हन उन्हाळी पसरली का स्मशान शांतता आज? ममतेचा कोखात निपजली का रक्त पिशाचे आज? माय बहिण भार्या नाती का निरर्थक झाली आज? वासनेच्या डोहात तरंगती का नव तरुणाई आज? काय जाहली चूक आमची उत्तर सापडेना आज?

मनमोहक बाली : ०३ : 'पुरा बेसाकी', अगुंग पर्वतावर वसलेली बालीतील मंदिरांची माता

डॉ सुहास म्हात्रे ·

रेवती 21/06/2014 - 00:38
अप्रतीम लेखन व छायाचित्रे! पहिल्या फोटूतील आकाशाचा रंग पाहूनच मन मोहून गेले पण पुढील प्रत्येक फोटू खिळवून ठेवणारा आहे. दुसरा फोटो कोकणात असल्यासारखा आहे. कोरी अगुंग केवळ सुंदर. पुरा बेसाकीच्या आतील चित्रेही सुंदर आलीयेत. इतकी प्रशस्त देवळे आहेत म्हटल्यावर येथील लग्नकार्ये देवळांमध्येच होत असावीत का? असा प्रश्न पडला. साहेब, आता तुम्ही एक पुस्तक छापायचे मनावर घ्याच! आम्ही ते नक्की विकत घेऊ.

In reply to by रेवती

मला बालीतले लग्न बघण्याची संधी मिळाली नाही, पण तो विधी मोठा रंगीबेरंगी आणि चित्ताकर्षक असतो असे वाचून-ऐकून आहे. त्यामुळे सद्या बालीनीज लग्नसमारंभाची काही चित्रे पाहूनच समाधान करून घेणे भाग आहे :( (सर्व चित्रे जालावरून साभार) मुख्य समारंभ...  .  रुखवत...  ... करवल्या...  वरात...  . पाश्चिमात्यही बालीत हा विधी करवून घ्यायला येतात...  . बाली लग्न करण्यासाठीचे आणि दुसर्‍यांदा लग्नाच्या आणाभाका पुन्हा घेण्यासाठीचे (रिन्युअल ऑफ वाव्ज) एक जानेमाने आंररराष्ट्रिय ठिकाण बनले आहे. हे समारंभ देऊळ, बौद्धमंदिर, रिसॉर्ट, खास व्हिला, चर्च, इ हवे तिथे करता येतात. हे काम करणार्‍या बर्‍याच कंत्राटी कंपन्या तेथे आहेत. देवळात कोणताही विधी करायला हिंदू असणे जरूरीचे असते. पुरा बेसाखी अथवा इतर मोठी मंदिरे बडेजावासह केलेल्या समारंभाना वापरता येत नाहीत.

In reply to by रेवती

मला बालीतले लग्न बघण्याची संधी मिळाली नाही, पण तो विधी मोठा रंगीबेरंगी आणि चित्ताकर्षक असतो असे वाचून-ऐकून आहे. त्यामुळे सद्या बालीनीज लग्नसमारंभाची काही चित्रे पाहूनच समाधान करून घेणे भाग आहे :( (सर्व चित्रे जालावरून साभार) मुख्य समारंभ...  .  रुखवत...  ... करवल्या...  वरात...  . पाश्चिमात्यही बालीत हा विधी करवून घ्यायला येतात...  . बाली लग्न करण्यासाठीचे आणि दुसर्‍यांदा लग्नाच्या आणाभाका पुन्हा घेण्यासाठीचे (रिन्युअल ऑफ वाव्ज) एक जानेमाने आंररराष्ट्रिय ठिकाण बनले आहे. हे समारंभ देऊळ, बौद्धमंदिर, रिसॉर्ट, खास व्हिला, चर्च, इ हवे तिथे करता येतात. हे काम करणार्‍या बर्‍याच कंत्राटी कंपन्या तेथे आहेत. देवळात कोणताही विधी करायला हिंदू असणे जरूरीचे असते. पुरा बेसाखी अथवा इतर मोठी मंदिरे बडेजावासह केलेल्या समारंभाना वापरता येत नाहीत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

रेवती 21/06/2014 - 21:21
धन्यवाद. लग्नकार्ये रंगीबेरंगी असल्याने बरे वाटले. वरात जरा विनोदी आहे तरी बाकी सगळे लग्न छान आहे. डोलारे, फुलोरे यांची रेलचेल. रुखवत भारी आहे.

In reply to by रेवती

अहो, त्या "बालीच्या समुद्रकाठची वरात" या खास आयटेमाला ईंटरनॅशनल क्लायंटांचा लै डिमांड असतो असं ऐकून आहे ! :)

यशोधरा 21/06/2014 - 08:00
हजारेक वर्षांपूर्वी भारतातून येथे स्थलांतरीत होणार्‍या आणि या भूमीत मुळे रोवून प्रतिकूल परिस्थितीत अजूनही आपला धर्म आणि संस्कृती केवळ जतन करणार्‍याच नाही तर दर दिवशी अभिमानाने साजरा करणार्‍या बालीच्या जनतेबद्दल मनात काय भावना येतात हे सांगणे कठीण आहे !
सहमत! फार सुरेख धागा. फोटो पाहताना कोकण प्रांताची आठवण झाली.

प्रचेतस 21/06/2014 - 09:01
जबरदस्त. काय प्रचंड मंदिर संकुले आहेत ही. लेखनही अगदी माहितीपूर्ण आणि तपशीलवार.

धन्या 21/06/2014 - 09:08
काका तुम्ही भाग्यवान आहात. दुचाकीस्वाराबरोबर मागे बसलेल्या व्यक्तींनीही शिरस्त्राण घातलेले पाहून भरुन आले.

In reply to by धन्या

एस 22/06/2014 - 11:17
दुचाकीस्वाराबरोबर मागे बसलेल्या व्यक्तींनीही शिरस्त्राण घातलेले पाहून भरुन आले.
हेच म्हणणार होतो. एक पुणेकर म्हणून तर खूपच हो. (हेल्मेट वापरणारा पुणेकर)

In reply to by एस

हेल्मेट वापरणे ही बालीत सहजपणे होणारी क्रिया आहे. पोलीस कोणाला हेल्मेटकरता थांबवून चौकशी करत आहे असे एकदाही दिसले नाही. याबाबतीतही (आणि एकंदरीत शिस्तीच्या बाबतीत) बालीकर पुणेकरांपेक्षा (आणि एकंदरीत भारतीयांपेक्षा) फार पुढे आहेत असे दु:खाने नमूद करावयाला लागते आहे :(

चौकटराजा 21/06/2014 - 12:27
मी भारतात पाहिलेल्या मंदिरांच्या समूहापेक्षा अगदी वेगळ्या शैलीची मंदिरे आहेत ही. त्यातील 'कोरी अगुंग' चे प्रवेशद्वार तर नजरेला गुंगून स्तब्ध करणारे आहे. ते बाली चे टिपिकल प्रवेशद्बार ही एका चित्रात दिसतेय. काही प्रमाणात नेपाळी, जपानी शैलीचा छाप दिसतो काय..... ? बाकी अंतर्भागांचे दर्शन ही सुखद आहे. धन्यवाद शेअर केल्याबद्द्ल.

In reply to by चौकटराजा

दुभंगलेल्या व्दाराची कल्पना बालीची खासियत आहे. सर्वात बाहेरच्या कूसाला तसे व्दार ठेवण्याची पद्धत असल्याने बालीच्या सफरीत ते सतत समोर येते.

इशा१२३ 21/06/2014 - 14:54
हिरवागार परिसर,सुंदर रेखीव मंदिरे आणि 'कोरी अगुंग'...सगळेच फोटो सुंदर!

कित्ती सुरेख आणि देखणी मंदिरं आहेत. प्रत्येक छायाचित्रात जाणवणारी अकृत्रिम स्वच्छताही वाखाणण्याजोगी. तुम्ही दिलेली माहितीही अभ्यासपूर्ण आहे. धन्यवाद.

पैसा 21/06/2014 - 16:59
सुंदर आणि केवळ सुंदर! इथल्या बहुरेक नावांचा कोणत्यातरी संस्कृत शब्दांशी संबंध जोडता येतो आहे. हजार वर्षांपूर्वी समुद्र पार करून तिकडे गेलेल्या लोकांनी संस्कृती जिवंत ठेवण्याचा आटापिटा करावा हे विशेषच! पायर्‍या पायर्‍यांची भातशेती पाहून कोकणातल्या डोंगरांवरच्या लहान लहान दळ्यांची आठवण झाली.

यशोधरा, खटपट्या, वल्ली, धन्या, मुकत विहारि, मृत्युन्जय, चौकटराजा, इशा१२३, माधुरी विनायक, अत्रुप्त आत्मा आणि पैसा : सर्वांचे उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद !

दिपक.कुवेत 21/06/2014 - 19:05
एक प्रश्न आहे....कुठल्याहि ठिकाणाची ईतकि तपशीलवार माहिती तुम्हि कशी जाणुन घेता? आय मीन आयटनरी मधे जी ठिकाणं पहायची आहेत त्याची आधी माहिती घेउन ती टुर गाईड बरोबर पडताळता का त्या त्या ठिकाणाचा टुर गाईड तुम्हाला हि माहिती देतो? केवळ उत्सुकता म्हणुन विचारतोय हो. राग नसावा. कारण तुमची चिकाटि, जिद्द, मेहनत त्यात दिसुन येते. फार कमी लोक ईतकि माहितिपुर्ण सहल करतात. पुढिल भागांच्या प्रतिक्षेत.

In reply to by दिपक.कुवेत

+ १ (आम्ही पण त्यातच मोडतो... लेणी बघायला म्हणून जातो, अन बियर आणि भूर्जी-पाव खावून परत येतो.)

In reply to by दिपक.कुवेत

भाते 21/06/2014 - 20:27
कुठेही सफर करायची असेल तर विकी, गुगल आधी मिपावर एक्का काकांचे धागे बघायचे. बाकी कुठेही मिळणार नाही इतकी सुरेख माहिती एक्का काकांच्या धाग्यांवर मिळते.

In reply to by दिपक.कुवेत

या सगळ्याचं मुख्य कारण म्हणजे माझ्या सहलींमागे मला असलेले नवीन जागेचे कुतुहल. मग बाकीचे आपोआप होते. वेळ आणि पैसा खर्च करून सहलीला जायचे तर ती जा खरंच तितकी आकर्षक आहे की नाही आणि असली तर कोणत्या गोष्टी बघणे आवश्यक आहे हे जाण्याअगोदर माहिती करून घेणे आपोआपच होते. कारण परतल्यावर असे हे राहीले, ते राहीले हे मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते ! परदेशातल्या (आणि अर्थातच अनोळखी) जागेवर योग्य माहिती देणारा मार्गदर्शक ही मी फार आवश्यक गोष्ट मानतो. कारण योग्य मार्गदर्शकावर होणार्‍या खर्चाच्या तुलनेत कमी / अथवा चुकीच्या पद्धतीने बधितलेल्या अकर्षणांमुळे आपण जास्त तोट्यात जातो असे मला वाटते. मार्गदर्शकांना आपण जर (अगोदर थोडीफार माहिती असल्याने) योग्य प्रश्न विचारले तर त्यांनाही हुरुप येउन त्यांचा "पाटी टाकणे" मोड बंद होऊन "आत्मियता" मोड सुरू होतो असा माझा अनुभव आहे. त्यामुळे आपल्याला खरेच जागेत रस आहे हे कळल्याने बरीच अधिक रोचक आणि अंतर्गत महिती कळते असा माझा अनुभव आहे. अर्थात मार्गदर्शक हवा की नको ते सहलीच्या जागेवर अवलंबून असते. पाश्चिमात्य देशांत उत्तम माहितीपत्रके मिळतात आणि स्वत:च्या जबाबदारीवर उत्तम प्रकारे सहल करता येते. भाषेचीही समस्या नसते. शिवाय तेथे खाजगी मार्गदर्शकाची फी भयानक महाग असते. त्यामुळे तेथे पुर्वाभ्यास (आंतरजालाचा विजय असो !) आणि जागेवरची माहितीपत्रके पुरेशी असतात. मात्र चीन, दक्षिणपूर्व आशियातील देशांमधे (सिंगापूरसारखे काही मोजके सन्माननिय अपवाद वगळता) बरोबर याविरूद्ध परिस्थिती आहे. अर्थातच एकच किंवा एका बाजूचाच उपाय सगळ्या सहलींना लागू नसतो... मग हायब्रिड उपाय बनवायचा, हाकानाका. असा प्रत्येक वेळी परिस्थितीप्रमाणे वेगवेगळा निर्णय होतो. प्रवासवर्णन लिहीताना माहिती विश्वासू असणे जरूर आहे. त्यामूळे ती परत पडताळून बधितली जातेच. तेव्हा त्यांत सनावळी इ ची अजून थोडी भर पडते (त्यांचे कोण लेकाचा पाठांतर करतो काय? ते तर मी शाळेतही करत नव्हतो ;) ). पण या सर्वात माझी जिज्ञासा अधिकच पुरी झाल्याने माझा सहलीचा आनंद व्दिगुणीत होतो !

भाते 21/06/2014 - 20:24
काका, पहिल्या प्रतिसादात रेवाक्का यांच्या म्हणण्यानुसार खरंच तुमच्या या लेखांचे पुस्तक (खंड१, २, …) काढा. पुरा बेसाकी… सुरेख, फोटो आणि माहितीसुध्दा.

एस 22/06/2014 - 11:25
वरच्या प्रत्येक प्रतिसादाला सलाम. तुमचे लेख मला एक छायाचित्रकार म्हणून किती जळवतात हे सांगू शकत नाही. मी तुम्हांला ISO4000 + f/0.95 + BULB + EC+5.0 देऊन ब्लोआउट करून टाकणार आहे. :-) बाकी हाही लेख आपल्या लौकिकास साजेसा आहे. (वाक्प्रचार वाङ्मय चौर्य श्रेय - चौरा)

In reply to by एस

तुमच्यासारख्या फोटोग्राफीतल्या जाणकाराकडून असा सुंदर प्रतिसाद म्हणजे काय म्हणावे ! असाच लोभ असु द्या. खरं तर मला फोटोग्राफितले फार काही कळत नाही. डोळ्याला काही भावले की त्याला शक्य तितके कॅमेर्‍याच्या फ्रेममध्ये पकडून ठेवणे यापलिकडे माझे तांत्रिक ज्ञान जात नाही. माझ्या मनाला भावलेले प्रेक्षक-वाचकांपर्यंत बर्‍यापैकी पोहोचले की माझा आनंद व्दिगुणीत होते, इतकेच. त्यात कॅमेर्‍याच्या तांत्रिक ताकदीचा माझ्या कलाकारीपेक्षा जास्त मोठा वाटा आहे हे नक्की.

In reply to by माझीही शॅम्पेन

बालीत सर्वच पुतळ्यांना आणि देवांच्या सिंहासनांना, इतकेच काय तर मोठ्या पवित्र समजल्या जाणार्‍या वृक्षांनाही लुंगीसारखे सरोंग हे वस्त्र नेसवतात... सणासुदीला तर नक्कीच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन 23/06/2014 - 12:04
ती तमिळ पद्धत असावी. तमिळनाडूतही कैक ठिकाणी देवळांत मूर्त्यांना कपडे नेसवले जातात-मुख्य देव नव्हे तर अन्य संरक्षक किंवा उपदेवांना म्हणतोय.

मधुरा देशपांडे, आतिवास आणि माझीही शॅम्पेन : अनेक धन्यवाद ! तुमच्या सहलितील सहभागाने पुढेचे वर्णन लिहीण्यास उत्साह मिळत आहे.

विवेकपटाईत 22/06/2014 - 18:47
लेख आणि माहिती आवडली. खर म्हणावे तर बाली म्हणजे स्वर्ग. निसर्गरम्य, स्वच्छ नितळ वातावरण. भरपूर फुले झाडे, जुने मंदिर आणि माकडे ही. भारतातच आल्या सारख वाटते. मला ही बालीच्या समुद्र किनार्यावर एक अनुभव आला होता बालीचा समुद्र किनारा आणि जलपरी/ एक अनुभव

बॅटमॅन 23/06/2014 - 12:07
निव्वळ अप्रतिम. बघूनच डोळ्यांचे पारणे फिटले _/\_ एक बाऽरीक करेक्शन: जावा बेटात हिंदू लोकांचे प्रथम आगमन इ.स. १२८४ च्या बर्‍याच अगोदर झालेले होते. जावानीज रामायणाची तारीख ८७० इ.स. आहे. http://en.wikipedia.org/wiki/Kakawin_Ramayana अवांतरः हे रामायण म्ह. भट्टिकाव्याचे भाषांतर आहे असे म्हटल्या जाते. भट्टिकाव्य म्ह. नावापुरते रामायण, पण त्यातील प्रत्येक श्लोकाद्वारे पाणिनीच्या व्याकरणाचा एकेक नियम सोदाहरण स्पष्ट केलेला आहे.

In reply to by बॅटमॅन

पुरा बेसाकीमध्ये हिंदू उपासना १२८४ साली जावातील हिंदूंच्या पहिल्या आगमनाबरोबर सुरू झाली असेही मानले जाते. हे वाक्य जावा बेटातील हिंदू धर्माच्या आगमनाबद्दल नसून बाली बेटावरील बेसाकी मंदिरामध्ये हिंदू उपासना सुरु होण्याबद्दल आहे. अर्थात त्यातही जरासा गोंधळ आहे. तिकडे लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद ! ते वाक्य खालील प्रमाणे दुरुस्त केले आहे... "पुरा बेसाकीमध्ये हिंदू उपासना १२८४ साली जावातील हिंदू साम्राज्याच्या बालीवरील यशस्वी आक्रमणांच्या सुरुवातीने सुरू झाली असेही मानले जाते." अजून थोडेसे... तेराव्या शतकापूर्वीची जावानीज साम्राज्ये मुख्यत: सुमात्रा आणि जावा बेटावरच मर्यादित होती. आधुनिक इंडोनेशियाच्या बहुतेक सर्व बेटांवर सत्ता गाजविणारे महापहित (१२९३ -१५२०) हे पहिले साम्राज्य होते. त्याने सर्व बाली बेटाला १३४३ मध्ये आपल्या अधिपत्याखाली आणले. तरीही बालीत हिंदू धर्म जोमाने वाढीस लावण्याचे आणि कायम ठेवण्याचे बरेचसे श्रेय महापहित साम्राज्याच्या र्‍हासानंतर जावातून बालीत स्थलांतरीत (आणि एकवटीत) झालेल्या राजेसरदारांना, धर्मपंडीतांना आणि कलाकारांना दिले जाते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन 23/06/2014 - 15:54
अंमळ घोळच झाला खरा. माहितीकरिता धन्यवाद! बाकी मध्ये कधीतरी तुम्ही सांगितल्याप्रमाणे जावाहून बालीला एकजण कुणी गेला तो परत येईल अशी काहीशी दंतकथा आहे त्याची या निमित्ताने आठवण झाली.

म्हैस 23/06/2014 - 15:42
१ प्रश्न तुम्ही एकूण किती लोक गेला होतात ? तोतल खर्च किती आलाय ? तुमचं तुम्ही सगळं arrange केलंत कि travel कंपनी च्या मदतीने ? आणि guide कसा मिळवायचा ?

रेवती 21/06/2014 - 00:38
अप्रतीम लेखन व छायाचित्रे! पहिल्या फोटूतील आकाशाचा रंग पाहूनच मन मोहून गेले पण पुढील प्रत्येक फोटू खिळवून ठेवणारा आहे. दुसरा फोटो कोकणात असल्यासारखा आहे. कोरी अगुंग केवळ सुंदर. पुरा बेसाकीच्या आतील चित्रेही सुंदर आलीयेत. इतकी प्रशस्त देवळे आहेत म्हटल्यावर येथील लग्नकार्ये देवळांमध्येच होत असावीत का? असा प्रश्न पडला. साहेब, आता तुम्ही एक पुस्तक छापायचे मनावर घ्याच! आम्ही ते नक्की विकत घेऊ.

In reply to by रेवती

मला बालीतले लग्न बघण्याची संधी मिळाली नाही, पण तो विधी मोठा रंगीबेरंगी आणि चित्ताकर्षक असतो असे वाचून-ऐकून आहे. त्यामुळे सद्या बालीनीज लग्नसमारंभाची काही चित्रे पाहूनच समाधान करून घेणे भाग आहे :( (सर्व चित्रे जालावरून साभार) मुख्य समारंभ...  .  रुखवत...  ... करवल्या...  वरात...  . पाश्चिमात्यही बालीत हा विधी करवून घ्यायला येतात...  . बाली लग्न करण्यासाठीचे आणि दुसर्‍यांदा लग्नाच्या आणाभाका पुन्हा घेण्यासाठीचे (रिन्युअल ऑफ वाव्ज) एक जानेमाने आंररराष्ट्रिय ठिकाण बनले आहे. हे समारंभ देऊळ, बौद्धमंदिर, रिसॉर्ट, खास व्हिला, चर्च, इ हवे तिथे करता येतात. हे काम करणार्‍या बर्‍याच कंत्राटी कंपन्या तेथे आहेत. देवळात कोणताही विधी करायला हिंदू असणे जरूरीचे असते. पुरा बेसाखी अथवा इतर मोठी मंदिरे बडेजावासह केलेल्या समारंभाना वापरता येत नाहीत.

In reply to by रेवती

मला बालीतले लग्न बघण्याची संधी मिळाली नाही, पण तो विधी मोठा रंगीबेरंगी आणि चित्ताकर्षक असतो असे वाचून-ऐकून आहे. त्यामुळे सद्या बालीनीज लग्नसमारंभाची काही चित्रे पाहूनच समाधान करून घेणे भाग आहे :( (सर्व चित्रे जालावरून साभार) मुख्य समारंभ...  .  रुखवत...  ... करवल्या...  वरात...  . पाश्चिमात्यही बालीत हा विधी करवून घ्यायला येतात...  . बाली लग्न करण्यासाठीचे आणि दुसर्‍यांदा लग्नाच्या आणाभाका पुन्हा घेण्यासाठीचे (रिन्युअल ऑफ वाव्ज) एक जानेमाने आंररराष्ट्रिय ठिकाण बनले आहे. हे समारंभ देऊळ, बौद्धमंदिर, रिसॉर्ट, खास व्हिला, चर्च, इ हवे तिथे करता येतात. हे काम करणार्‍या बर्‍याच कंत्राटी कंपन्या तेथे आहेत. देवळात कोणताही विधी करायला हिंदू असणे जरूरीचे असते. पुरा बेसाखी अथवा इतर मोठी मंदिरे बडेजावासह केलेल्या समारंभाना वापरता येत नाहीत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

रेवती 21/06/2014 - 21:21
धन्यवाद. लग्नकार्ये रंगीबेरंगी असल्याने बरे वाटले. वरात जरा विनोदी आहे तरी बाकी सगळे लग्न छान आहे. डोलारे, फुलोरे यांची रेलचेल. रुखवत भारी आहे.

In reply to by रेवती

अहो, त्या "बालीच्या समुद्रकाठची वरात" या खास आयटेमाला ईंटरनॅशनल क्लायंटांचा लै डिमांड असतो असं ऐकून आहे ! :)

यशोधरा 21/06/2014 - 08:00
हजारेक वर्षांपूर्वी भारतातून येथे स्थलांतरीत होणार्‍या आणि या भूमीत मुळे रोवून प्रतिकूल परिस्थितीत अजूनही आपला धर्म आणि संस्कृती केवळ जतन करणार्‍याच नाही तर दर दिवशी अभिमानाने साजरा करणार्‍या बालीच्या जनतेबद्दल मनात काय भावना येतात हे सांगणे कठीण आहे !
सहमत! फार सुरेख धागा. फोटो पाहताना कोकण प्रांताची आठवण झाली.

प्रचेतस 21/06/2014 - 09:01
जबरदस्त. काय प्रचंड मंदिर संकुले आहेत ही. लेखनही अगदी माहितीपूर्ण आणि तपशीलवार.

धन्या 21/06/2014 - 09:08
काका तुम्ही भाग्यवान आहात. दुचाकीस्वाराबरोबर मागे बसलेल्या व्यक्तींनीही शिरस्त्राण घातलेले पाहून भरुन आले.

In reply to by धन्या

एस 22/06/2014 - 11:17
दुचाकीस्वाराबरोबर मागे बसलेल्या व्यक्तींनीही शिरस्त्राण घातलेले पाहून भरुन आले.
हेच म्हणणार होतो. एक पुणेकर म्हणून तर खूपच हो. (हेल्मेट वापरणारा पुणेकर)

In reply to by एस

हेल्मेट वापरणे ही बालीत सहजपणे होणारी क्रिया आहे. पोलीस कोणाला हेल्मेटकरता थांबवून चौकशी करत आहे असे एकदाही दिसले नाही. याबाबतीतही (आणि एकंदरीत शिस्तीच्या बाबतीत) बालीकर पुणेकरांपेक्षा (आणि एकंदरीत भारतीयांपेक्षा) फार पुढे आहेत असे दु:खाने नमूद करावयाला लागते आहे :(

चौकटराजा 21/06/2014 - 12:27
मी भारतात पाहिलेल्या मंदिरांच्या समूहापेक्षा अगदी वेगळ्या शैलीची मंदिरे आहेत ही. त्यातील 'कोरी अगुंग' चे प्रवेशद्वार तर नजरेला गुंगून स्तब्ध करणारे आहे. ते बाली चे टिपिकल प्रवेशद्बार ही एका चित्रात दिसतेय. काही प्रमाणात नेपाळी, जपानी शैलीचा छाप दिसतो काय..... ? बाकी अंतर्भागांचे दर्शन ही सुखद आहे. धन्यवाद शेअर केल्याबद्द्ल.

In reply to by चौकटराजा

दुभंगलेल्या व्दाराची कल्पना बालीची खासियत आहे. सर्वात बाहेरच्या कूसाला तसे व्दार ठेवण्याची पद्धत असल्याने बालीच्या सफरीत ते सतत समोर येते.

इशा१२३ 21/06/2014 - 14:54
हिरवागार परिसर,सुंदर रेखीव मंदिरे आणि 'कोरी अगुंग'...सगळेच फोटो सुंदर!

कित्ती सुरेख आणि देखणी मंदिरं आहेत. प्रत्येक छायाचित्रात जाणवणारी अकृत्रिम स्वच्छताही वाखाणण्याजोगी. तुम्ही दिलेली माहितीही अभ्यासपूर्ण आहे. धन्यवाद.

पैसा 21/06/2014 - 16:59
सुंदर आणि केवळ सुंदर! इथल्या बहुरेक नावांचा कोणत्यातरी संस्कृत शब्दांशी संबंध जोडता येतो आहे. हजार वर्षांपूर्वी समुद्र पार करून तिकडे गेलेल्या लोकांनी संस्कृती जिवंत ठेवण्याचा आटापिटा करावा हे विशेषच! पायर्‍या पायर्‍यांची भातशेती पाहून कोकणातल्या डोंगरांवरच्या लहान लहान दळ्यांची आठवण झाली.

यशोधरा, खटपट्या, वल्ली, धन्या, मुकत विहारि, मृत्युन्जय, चौकटराजा, इशा१२३, माधुरी विनायक, अत्रुप्त आत्मा आणि पैसा : सर्वांचे उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद !

दिपक.कुवेत 21/06/2014 - 19:05
एक प्रश्न आहे....कुठल्याहि ठिकाणाची ईतकि तपशीलवार माहिती तुम्हि कशी जाणुन घेता? आय मीन आयटनरी मधे जी ठिकाणं पहायची आहेत त्याची आधी माहिती घेउन ती टुर गाईड बरोबर पडताळता का त्या त्या ठिकाणाचा टुर गाईड तुम्हाला हि माहिती देतो? केवळ उत्सुकता म्हणुन विचारतोय हो. राग नसावा. कारण तुमची चिकाटि, जिद्द, मेहनत त्यात दिसुन येते. फार कमी लोक ईतकि माहितिपुर्ण सहल करतात. पुढिल भागांच्या प्रतिक्षेत.

In reply to by दिपक.कुवेत

+ १ (आम्ही पण त्यातच मोडतो... लेणी बघायला म्हणून जातो, अन बियर आणि भूर्जी-पाव खावून परत येतो.)

In reply to by दिपक.कुवेत

भाते 21/06/2014 - 20:27
कुठेही सफर करायची असेल तर विकी, गुगल आधी मिपावर एक्का काकांचे धागे बघायचे. बाकी कुठेही मिळणार नाही इतकी सुरेख माहिती एक्का काकांच्या धाग्यांवर मिळते.

In reply to by दिपक.कुवेत

या सगळ्याचं मुख्य कारण म्हणजे माझ्या सहलींमागे मला असलेले नवीन जागेचे कुतुहल. मग बाकीचे आपोआप होते. वेळ आणि पैसा खर्च करून सहलीला जायचे तर ती जा खरंच तितकी आकर्षक आहे की नाही आणि असली तर कोणत्या गोष्टी बघणे आवश्यक आहे हे जाण्याअगोदर माहिती करून घेणे आपोआपच होते. कारण परतल्यावर असे हे राहीले, ते राहीले हे मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते ! परदेशातल्या (आणि अर्थातच अनोळखी) जागेवर योग्य माहिती देणारा मार्गदर्शक ही मी फार आवश्यक गोष्ट मानतो. कारण योग्य मार्गदर्शकावर होणार्‍या खर्चाच्या तुलनेत कमी / अथवा चुकीच्या पद्धतीने बधितलेल्या अकर्षणांमुळे आपण जास्त तोट्यात जातो असे मला वाटते. मार्गदर्शकांना आपण जर (अगोदर थोडीफार माहिती असल्याने) योग्य प्रश्न विचारले तर त्यांनाही हुरुप येउन त्यांचा "पाटी टाकणे" मोड बंद होऊन "आत्मियता" मोड सुरू होतो असा माझा अनुभव आहे. त्यामुळे आपल्याला खरेच जागेत रस आहे हे कळल्याने बरीच अधिक रोचक आणि अंतर्गत महिती कळते असा माझा अनुभव आहे. अर्थात मार्गदर्शक हवा की नको ते सहलीच्या जागेवर अवलंबून असते. पाश्चिमात्य देशांत उत्तम माहितीपत्रके मिळतात आणि स्वत:च्या जबाबदारीवर उत्तम प्रकारे सहल करता येते. भाषेचीही समस्या नसते. शिवाय तेथे खाजगी मार्गदर्शकाची फी भयानक महाग असते. त्यामुळे तेथे पुर्वाभ्यास (आंतरजालाचा विजय असो !) आणि जागेवरची माहितीपत्रके पुरेशी असतात. मात्र चीन, दक्षिणपूर्व आशियातील देशांमधे (सिंगापूरसारखे काही मोजके सन्माननिय अपवाद वगळता) बरोबर याविरूद्ध परिस्थिती आहे. अर्थातच एकच किंवा एका बाजूचाच उपाय सगळ्या सहलींना लागू नसतो... मग हायब्रिड उपाय बनवायचा, हाकानाका. असा प्रत्येक वेळी परिस्थितीप्रमाणे वेगवेगळा निर्णय होतो. प्रवासवर्णन लिहीताना माहिती विश्वासू असणे जरूर आहे. त्यामूळे ती परत पडताळून बधितली जातेच. तेव्हा त्यांत सनावळी इ ची अजून थोडी भर पडते (त्यांचे कोण लेकाचा पाठांतर करतो काय? ते तर मी शाळेतही करत नव्हतो ;) ). पण या सर्वात माझी जिज्ञासा अधिकच पुरी झाल्याने माझा सहलीचा आनंद व्दिगुणीत होतो !

भाते 21/06/2014 - 20:24
काका, पहिल्या प्रतिसादात रेवाक्का यांच्या म्हणण्यानुसार खरंच तुमच्या या लेखांचे पुस्तक (खंड१, २, …) काढा. पुरा बेसाकी… सुरेख, फोटो आणि माहितीसुध्दा.

एस 22/06/2014 - 11:25
वरच्या प्रत्येक प्रतिसादाला सलाम. तुमचे लेख मला एक छायाचित्रकार म्हणून किती जळवतात हे सांगू शकत नाही. मी तुम्हांला ISO4000 + f/0.95 + BULB + EC+5.0 देऊन ब्लोआउट करून टाकणार आहे. :-) बाकी हाही लेख आपल्या लौकिकास साजेसा आहे. (वाक्प्रचार वाङ्मय चौर्य श्रेय - चौरा)

In reply to by एस

तुमच्यासारख्या फोटोग्राफीतल्या जाणकाराकडून असा सुंदर प्रतिसाद म्हणजे काय म्हणावे ! असाच लोभ असु द्या. खरं तर मला फोटोग्राफितले फार काही कळत नाही. डोळ्याला काही भावले की त्याला शक्य तितके कॅमेर्‍याच्या फ्रेममध्ये पकडून ठेवणे यापलिकडे माझे तांत्रिक ज्ञान जात नाही. माझ्या मनाला भावलेले प्रेक्षक-वाचकांपर्यंत बर्‍यापैकी पोहोचले की माझा आनंद व्दिगुणीत होते, इतकेच. त्यात कॅमेर्‍याच्या तांत्रिक ताकदीचा माझ्या कलाकारीपेक्षा जास्त मोठा वाटा आहे हे नक्की.

In reply to by माझीही शॅम्पेन

बालीत सर्वच पुतळ्यांना आणि देवांच्या सिंहासनांना, इतकेच काय तर मोठ्या पवित्र समजल्या जाणार्‍या वृक्षांनाही लुंगीसारखे सरोंग हे वस्त्र नेसवतात... सणासुदीला तर नक्कीच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन 23/06/2014 - 12:04
ती तमिळ पद्धत असावी. तमिळनाडूतही कैक ठिकाणी देवळांत मूर्त्यांना कपडे नेसवले जातात-मुख्य देव नव्हे तर अन्य संरक्षक किंवा उपदेवांना म्हणतोय.

मधुरा देशपांडे, आतिवास आणि माझीही शॅम्पेन : अनेक धन्यवाद ! तुमच्या सहलितील सहभागाने पुढेचे वर्णन लिहीण्यास उत्साह मिळत आहे.

विवेकपटाईत 22/06/2014 - 18:47
लेख आणि माहिती आवडली. खर म्हणावे तर बाली म्हणजे स्वर्ग. निसर्गरम्य, स्वच्छ नितळ वातावरण. भरपूर फुले झाडे, जुने मंदिर आणि माकडे ही. भारतातच आल्या सारख वाटते. मला ही बालीच्या समुद्र किनार्यावर एक अनुभव आला होता बालीचा समुद्र किनारा आणि जलपरी/ एक अनुभव

बॅटमॅन 23/06/2014 - 12:07
निव्वळ अप्रतिम. बघूनच डोळ्यांचे पारणे फिटले _/\_ एक बाऽरीक करेक्शन: जावा बेटात हिंदू लोकांचे प्रथम आगमन इ.स. १२८४ च्या बर्‍याच अगोदर झालेले होते. जावानीज रामायणाची तारीख ८७० इ.स. आहे. http://en.wikipedia.org/wiki/Kakawin_Ramayana अवांतरः हे रामायण म्ह. भट्टिकाव्याचे भाषांतर आहे असे म्हटल्या जाते. भट्टिकाव्य म्ह. नावापुरते रामायण, पण त्यातील प्रत्येक श्लोकाद्वारे पाणिनीच्या व्याकरणाचा एकेक नियम सोदाहरण स्पष्ट केलेला आहे.

In reply to by बॅटमॅन

पुरा बेसाकीमध्ये हिंदू उपासना १२८४ साली जावातील हिंदूंच्या पहिल्या आगमनाबरोबर सुरू झाली असेही मानले जाते. हे वाक्य जावा बेटातील हिंदू धर्माच्या आगमनाबद्दल नसून बाली बेटावरील बेसाकी मंदिरामध्ये हिंदू उपासना सुरु होण्याबद्दल आहे. अर्थात त्यातही जरासा गोंधळ आहे. तिकडे लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद ! ते वाक्य खालील प्रमाणे दुरुस्त केले आहे... "पुरा बेसाकीमध्ये हिंदू उपासना १२८४ साली जावातील हिंदू साम्राज्याच्या बालीवरील यशस्वी आक्रमणांच्या सुरुवातीने सुरू झाली असेही मानले जाते." अजून थोडेसे... तेराव्या शतकापूर्वीची जावानीज साम्राज्ये मुख्यत: सुमात्रा आणि जावा बेटावरच मर्यादित होती. आधुनिक इंडोनेशियाच्या बहुतेक सर्व बेटांवर सत्ता गाजविणारे महापहित (१२९३ -१५२०) हे पहिले साम्राज्य होते. त्याने सर्व बाली बेटाला १३४३ मध्ये आपल्या अधिपत्याखाली आणले. तरीही बालीत हिंदू धर्म जोमाने वाढीस लावण्याचे आणि कायम ठेवण्याचे बरेचसे श्रेय महापहित साम्राज्याच्या र्‍हासानंतर जावातून बालीत स्थलांतरीत (आणि एकवटीत) झालेल्या राजेसरदारांना, धर्मपंडीतांना आणि कलाकारांना दिले जाते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन 23/06/2014 - 15:54
अंमळ घोळच झाला खरा. माहितीकरिता धन्यवाद! बाकी मध्ये कधीतरी तुम्ही सांगितल्याप्रमाणे जावाहून बालीला एकजण कुणी गेला तो परत येईल अशी काहीशी दंतकथा आहे त्याची या निमित्ताने आठवण झाली.

म्हैस 23/06/2014 - 15:42
१ प्रश्न तुम्ही एकूण किती लोक गेला होतात ? तोतल खर्च किती आलाय ? तुमचं तुम्ही सगळं arrange केलंत कि travel कंपनी च्या मदतीने ? आणि guide कसा मिळवायचा ?
=================================================================== मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

चांदोबाचा दिवा- (बालकविता)

विदेश ·

विदेश 21/06/2014 - 11:51
कानडाऊ योगेशु, लीमाउजेट, अत्रुप्त आत्मा, स्वॅप्स..... प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !

आतिवास 21/06/2014 - 11:56
कविता आवडली. पण हल्ली लहान मुलेही आपल्याला "सोलर सिस्टम" वगैरे माहिती सांगतात. त्यामुळे या बालकविता आजच्या बालकांसाठी नसून वयाने मोठे झालेल्या बालकांसाठी आहेत असं एक वाटत राहतं :-)

In reply to by आतिवास

दॅटस द पॉइंट! संदीप खरेचं म्हणणं असं की त्याच्या बालकविता (अग्गो बाई ढग्गो बाई) हा मोठ्यांनी `मूलं काय विचार करतील ' अशी कल्पना करुन केल्याला कविता नाहीत. तर मुलांच्या मनात शिरुन त्यांच्या नजरेतून दिसणारं जग बघायचा प्रयत्न आहे. थोडक्यात, बालकविता आणि बालिश कविता यात फरक आहे!

In reply to by विदेश

संदीपचा दृष्टीकोन तुम्हाला निश्चित उपयोगी होईल आणि तुमच्या कविता दर्जेदार होतील अशी आशा व्यक्त करतो.

विदेश 21/06/2014 - 11:51
कानडाऊ योगेशु, लीमाउजेट, अत्रुप्त आत्मा, स्वॅप्स..... प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !

आतिवास 21/06/2014 - 11:56
कविता आवडली. पण हल्ली लहान मुलेही आपल्याला "सोलर सिस्टम" वगैरे माहिती सांगतात. त्यामुळे या बालकविता आजच्या बालकांसाठी नसून वयाने मोठे झालेल्या बालकांसाठी आहेत असं एक वाटत राहतं :-)

In reply to by आतिवास

दॅटस द पॉइंट! संदीप खरेचं म्हणणं असं की त्याच्या बालकविता (अग्गो बाई ढग्गो बाई) हा मोठ्यांनी `मूलं काय विचार करतील ' अशी कल्पना करुन केल्याला कविता नाहीत. तर मुलांच्या मनात शिरुन त्यांच्या नजरेतून दिसणारं जग बघायचा प्रयत्न आहे. थोडक्यात, बालकविता आणि बालिश कविता यात फरक आहे!

In reply to by विदेश

संदीपचा दृष्टीकोन तुम्हाला निश्चित उपयोगी होईल आणि तुमच्या कविता दर्जेदार होतील अशी आशा व्यक्त करतो.
लेखनविषय:
काव्यरस
' आई ग आई , चांदोबाचा दिवा किती चांगला - उंच उंच आकाशात कुणी टांगला .. आई ग आई , चांदण्यांच्या पणत्या किती चांगल्या - उंच उंच आकाशात कुणी लावल्या .. आई ग आई , दे ग शिडी मला उंच उंच चढून - चांदोबा-चांदण्या आणीन मी काढून .. आई ग आई , चांदोबा-चांदण्या ठेऊन अंगणात - रात्री छान खेळेन त्यांच्या प्रकाशात .. .

श्रीरंग जोशी यांच्यासोबत पुणे कट्टा- रविवार दि. २२ जून

प्रचेतस ·

In reply to by अत्रुप्त आत्मा

पैसा 20/06/2014 - 23:19
वल्लीने कितीही अनाहितांना घेऊन या, चहा देतो म्हटलेलं. आणि आता विसरला सोयिस्करपणे! पुणेकरांच्या नावावर आणखी एक किस्सा जमा झाला! =))

In reply to by पैसा

प्यारे१ 20/06/2014 - 23:26
हे बघा, ते 'पीसीएम्सी' वाले आहेत... तेंची महापालिका येगळी हाय! त्यातनं पन आमच्या 'सरां'ला कुनी म्हनलं तर ते आक्की पार्टी आनि प्यार्टी पन देतेत. (असं आयकूण हाय) तेवा हे वेक्तिसापेक्श हाय स्तळसापेक्श नाय हाय हे ची किरपया णाँद घ्यावी. -नुत्काच पुनेकर ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

पैसा 20/06/2014 - 23:44
युती कसली? पिं. चिं. वाल्यांचं काय खरं नै. आता आम्ही शिंव्हगड रोडवाल्यांबरोबर महायुतीचा विचार करू.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 21/06/2014 - 08:42
कोर कमिटीत पिंचि आणि सिंहगड रोडावरची मेंब्रे समसमान आहेत त्यामुळे एकमत होणे कठीण वाटते. ;)

भाते 20/06/2014 - 22:28
सगळेजण एकत्र भेटा, जर चुकुन पुण्यात पाऊस असलाच तर, गरमागरम भजी आणि कटिंग सोबत भरपुर गप्पा मारा. सचित्र वृत्तांताची वाट पहात आहे.

पैसा 20/06/2014 - 23:51
धागा हायजॅक केल्याबद्दल सॉरी बिरी काय म्हणणार नाय. जोशीबुवांना भेटायचं आहेच्च. त्यांच्या एका गाववालीची खबरबात घ्यायची आहे.

In reply to by पैसा

एस 21/06/2014 - 15:37
पुण्याचा धागा हायजॅक व्हावा आणि तेही ज्येष्ठ संपादिकेकडून. याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. शनिवारवाड्यासमोर कट्टा चालू असे पर्यंत धरणे धरण्यात येणार आहे याची संमंने कृपया नोंद घ्यावी. कट्टा आयोजकांनी हे उपोषण नाही हे लक्षात ठेवून धरणेकर्‍यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी ही सूचना.

In reply to by एस

पैसा 21/06/2014 - 16:43
धरण्याला माझा 'बेशर्त' पाठिंबा. चहा तरी नक्की मिळेल हे ठौक आहे. बाकी काय ते प्रसंगोपात्त कळेलच. माझ्या अंदाजाप्रमाणे २ अनाहिता/धरणेकरी असतील तर चहा+भजी, ४ असल्यास फुल्ल चहा, ६ असल्यास कटिंग चहा, आणि त्याहून जास्त असल्यास "कोण आपण" इ. बोलाची कढीभात मिळण्याची शक्यता दिसते.

In reply to by पैसा

प्रचेतस 21/06/2014 - 16:48
अहो पण अनाहिताच धागा हायाज्याक करायल्यात आणि धरणे पण त्याच धरणार हे म्हणजे मुख्यंमंत्री केजरीवालने उपोषण करण्यासारखे झाले.

In reply to by टवाळ कार्टा

एस 24/06/2014 - 17:04
पैतैंनी धोका दिल्याबद्दल पुन्हा एकदा निषेध. चहापाण्याचं इतकं छान अनाहिता-नियोजन केलं होतं की त्या धसक्याने आम्ही धरणे धरण्याचा विचार कुपोषणाच्या भीतीने ऐनवेळी बदलून कट्ट्याला टांग मारली आणि ह्यांनी चक्क ओले काजू दिलेन्... असोत. पण कुण्णाच्याही वृत्तांतात पुणेरीपणा जाणवला नाही. अरेरे! शनवारवाड्या, उगी उगी. आपण दोघे मिळून कट्टा करू आणि स-छा.चि. वृत्तांत दै. स. (हे दै. सं. असे वाचू नये, त्यातील ज्या 'स' वर अनुस्वार नाही त्याचाही खरा पुणेकर सानुनासिकच उच्चार करतो म्हणा!) मध्ये छापून आणू. ओके?

In reply to by एस

पैसा 25/06/2014 - 00:55
स्वॅप्स येणार असे कळल्याने मी काजूची आणखी दोन पाकिटे नेली होती ती परत आणावी लागली. त्यामुळे स्वॅप्सच्या निषेधाचा निषेध! आता परत पार्टी बदलली आहे कारण शेवटपर्यंत आम्हाला चहा काही मिळाला नाही. शेवट चहाऐवजी जेवणाची वेळ होत आली आहे हे बघून आम्ही तिथून "टळलो."

In reply to by पैसा

एस 25/06/2014 - 11:28
मीही अनाहिता येणार म्हणून दोन काजूवाले गुड-डे बिस्किटपुडे घेतले होते. वल्लीशेटनी अनाहितांना चहा दिल्यावर त्यात बुडवून खायला द्यायला म्हणून. ते पुडे परत न्यावे लागले. यावर उतारा म्हणून रत्नांग्रीवरून चार पाकिटं मागवली आहेत आता.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

चौकटराजा 21/06/2014 - 08:27
हपिसातून अलीकडे वल्ली ला मिपा कट्यासाठी टी ए, डीए मिळायला लागलाय ! सबब नोव्हेंबर मधे कट्टा हंपी येथे आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रचेतस 21/06/2014 - 08:40
=)) जेव्हड्या मिपाकरांना भेटता येईल तेव्हढ्या मिपाकरांना भेटण्याची श्रीरंगाची इच्छा आहे अन्यथा नेहमीप्रमाणेच खाजगी कट्टा केला असता. ;)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

धन्या 21/06/2014 - 08:41
बदलला आहे तो. हल्ली तो गड/किल्ला/लेणी/गुंफा पाहायला गेल्यावर त्या जागेची माहितीही सांगतो. तुम्ही त्याच्यासोबत ट्रेकला जाणं बंद केल्याचं दु:ख सहन न झाल्यामुळेच हे अमुलाग्र परीवर्तन झाले असावे त्याच्यात.

या धाग्याबाबत वल्ली यांचे मनापासून आभार. मिपाकरांना प्रत्यक्ष भेटण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा उद्या पूर्ण होणार. :-). माझा इथला भ्रमणध्वनी क्रमांक ७०२८४६५३१६ आहे.

बाबा पाटील 21/06/2014 - 10:46
अहो पण शनिवारवाड्याजवळ आमच घोड बांधायच कुठ ? का हमालवाड्यातच बांधुन तेथुन चालत यायच ?

In reply to by बाबा पाटील

प्रचेतस 21/06/2014 - 11:32
पालख्यांचा उद्या पालखी विठोबा आणि निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्काम असेल तेव्हा रस्ते सुरळीत चालू असतील.

पिंगू 21/06/2014 - 11:59
छ्या राव.. आजकाल कट्ट्याला हजेरी लावणे काही होत नाही. आता कट्टापण कुठे तर शनिवारवाडा म्हणजे आमचाच परिसर. पण नेमका मुंबईला यावे लागल्याने कट्टा हुकला तो हुकलाच.. :(

बाबा पाटील 23/06/2014 - 12:09
माझ्या पेशंट्स नी मला टांगेत टांग टाकुन अडकवुन ठेवले बरे.नाहीतर मी कधीच कुनाला टांग देत नाही बरे.

प्रचेतस 23/06/2014 - 17:32
वृत्तांत लिहिलाच पाहिजे असं काही नाही. तरी थोडक्यात देतो. एकंदर हजर व्यक्ती श्रीरंग जोशी आणि जुई, पैसा ताई, अपर्णा अक्षय, इस्पीकचा एक्का, चौकटराजा, हुकुमी एक्का (ह्या तिघांचा हुकमी डाव होता), वल्ली, धन्या, धन्याचा भाचा, सूड, अत्रुप्त आत्मा, ५० फक्त विथ चि. १००, प्रशांत (वहिनी आणि बालके अर्णवसह), देशपांडे विनायक काका, वाचनमात्र मिपाकर अजित सावंत आणि समीर शेलार, मोदक (१५ मिनिटे उपस्थिती) अणि डॉ. भूषण काळुसकर (फक्त जेवणाला उपस्थिती) कट्ट्याची क्षणचित्रे: शनिवारवाड्यापाशी जमून नगारखान्यापाशी गप्पा छाटणे, पैसाताईने गोव्यावरून आणलेले काजू, अपर्णातैने आणलेला बेळगावचा कुंदा, श्रीरंगाने आणलेली चॉकलेट्स आणि ५० फक्त यांनी कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे आणलेली सोनपापडी मनसोक्त चापणे. देशपांडेकाका यांचा पानशेत धरणफुटीचा त्यांनी घेतलेला अनुभव ऐकणे आणि तो अनुभव ऐकण्यास इतर लोकांचे पण आमच्या कोंडाळ्याभोवती गोळा होणे. मग शनिवारवाड्यात शिरून वाडा पाहण्यापेक्षा गप्पाच जास्त मारणे, पेशवेकालीन इतिहास आणि वाड्याचे स्थापत्य यांच्या माझा घोर अज्ञानानद्दल माझ्यावर टिका होणे. वाड्यातून बाहेर येणे, पै तै, अपर्णातै, देशपांडे काका, अजित सावंत आणि मोदक ह्यांचा निरोप घेणे आणि उर्वरित सर्वांछे नव्या पेठेतील भोज थाळी गृहाकडे प्रस्थान. तिथे अमर्यादित गुजराती थाळी चापून परत भरपूर गफ्फा हाणून घरी जाणे व पुढच्या भ्रमंती कट्ट्याची आखणी करणे. एकंदरीतत कट्ट्याला जाम मजा आली. बोले तो फुल्ल्टू एन्जॉय.

In reply to by प्रचेतस

सूड 23/06/2014 - 17:51
मी तर इन मीन चार डोकी असतील असं समजून आलो होतो. येवढी मंडळी असतील असं चुकूनही वाटलं नव्हतं. बाकी सोनपापडी आणि गोयांच्या काजवांचं कवतिक करावं तेवढं कमी!! आम्ही पोचेपर्यंत कुंदा बेतास बात शिल्लक राह्यला होता. ;) भोज थाळीतली दालबाटी, ताक अप्रतिम. पुरणपोळी पण वाईट नव्हती तिथली, पण आदल्याच दिवशी तुपात निथळणार्‍या चार पुरणपोळ्या एकाहाती ओरपल्याने भोज मध्ये पुरणपोळी म्हणून जो काही प्रकार वाढत होते त्याचं अप्रूप वाटलं नाही. बाकी भोज मधले वाढपी पोळी असो, दालबाटी की खिचडी; तूप अगदी उजव्या हाताने वाढत होते. खिचडीसुद्धा नेहमीच्या चवीपेक्षा हटके होती. संध्याकाळी येवढं सगळं हादडून पोटात अंमळ कमी जागा राह्यल्यामुळे खिचडी अधिक मागवता आली नाही. भोजनानंतर भोजच्या बाहेर काही तात्त्विक चर्चा पार पाडून सगळ्यांनी एकमेकांचा नदीकाठच्या रस्त्यावर* निरोप घेतला. *पुण्यातले रस्ते आपल्याला आताशा कळू लागलेत असं दाखवायचा क्षीण प्रयत्न!!

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 23/06/2014 - 18:10
उर्वरित सर्वांछे नव्या पेठेतील भोज थाळी गृहाकडे प्रस्थान. तिथे अमर्यादित गुजराती थाळी चापून
मराठमोळ्या पुण्यात सुध्धा जेवणासाठी मात्र गुज्जु जेवण??? पुर्वीसारखं पुणं राहि राहीलं नाही आता ;)
सर्वांछे
हे पण गुजरातीतच??? :)

In reply to by टवाळ कार्टा

प्रचेतस 23/06/2014 - 18:16
मराठमोळ्या पुण्यात सुध्धा जेवणासाठी मात्र गुज्जु जेवण??
त्याचं कसं ना की बाहेर पयशे घालवून मराठमोळंच जेवण करायचं असेल तर घरीच का नको? म्हणून मग बाहेर गुज्जु/राजस्थानी जेवण.
हे पण गुजरातीतच???
आता काय अच्छे दिन आले ना. ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अछा नाही... "अच्छा" बर्का *yes3* (हा प्रतिसाद-स्वयंसुधारणा नसल्याचा इफेक्ट... त्याचा राजकारणाशी काsssहीसुद्धा संबंद्ध नाही ;) )

भाते 23/06/2014 - 19:48
सिनेमा बघायच्या अपेक्षेने आलो होतो आणि सिनेमाचे केवळ ट्रेलर बघितल्यासारखे वाटले!

MiPa Katta at Shaniwarwada सर्व चित्रे माझ्या आयुष्यातील पहिलाच मिपा कट्टा अविस्मरणीय झाला. श्री विनायक देशपांडे शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारावर सर्वप्रथम हजर होते. अपर्णा अक्षय यांची उपस्थिती सुखद धक्का देऊन गेली. पन्नासराव, पैसातै व अपर्णातै यांनी आणलेल्या खाऊमुळे कट्ट्याची सुरुवातच चवदार झाली. वल्ली व सूड यांनी लघुवृत्तांत चांगला लिहिला आहे. कट्ट्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल वल्ली व सवंगड्यांचे मनापासून आभार व सर्व कट्टेकर्‍यांना धन्यवाद.

मस्तं कट्टा. बरेच जणं ओळखिचे तरी बरेच अनोळखी. प्रत्येक नांवासहित छायाचित्रे असती तर ज्ञानात भर पडली असती.

In reply to by प्रभाकर पेठकर

१. पैसा, २. अपर्णा अक्षय, ३. प्रशांत ४. मोदक, ५. अजित सावंत ६. इस्पीकचा एक्का, ७. समीर शेलार, ८. वल्ली, ९. अत्रुप्त आत्मा, १०. देशपांडे विनायक काका, ११. हुकुमी एक्का, १२. सूड, १३. ५० फक्त, १४. हजेरी पटात उल्लेख नाही आणि १५. चौकटराजा. श्रीरंग जोशी आणि जुई (फोटो क्रमांक 8637 पाहाणे), धन्या, धन्याचा भाचा (या फोटोत नाहीत) अणि डॉ. भूषण काळुसकर (फक्त जेवणाला उपस्थिती)

या कट्ट्याला मी तसा निम्म्यातच पोहोचलो. प्रशांत वगळता बाकि सर्वांची भेट ..गप्पा झाल्याच. समीर,देशपांडे काका,रंगा,जुई सगळ्यांना प्रथम भेटलो..याचा आनंद होताच. त्यात चहाच्या गाडीवरुन,मी दिलेल्या एका इचित्र =)) उदाहरणाचा देशपांडे काकांनी खरा रंग दाखवून दिला. आणि त्यामुळे चहा न पिताच चढला. समीर आमच्यात नविन फक्त नावाला होता..एव्हढ्या आम्ही गप्पांमधे मिसळून गेलो होतो. पैसा ताई आणि आपर्णा ताईंशी मी सक्काळीच १ तासाचं गप्पाष्टक जमवून आलेलो असल्यामुळे...त्यात नविन वाढ आगोबानी पैसा ताईं समोर (माझा) :-/ छळ :-/ करण्यातच काय ती झाली. (पैसा ताईनी पण सकाळी भेटलो तेंव्हा..-साबुदाणे वडे खाल्ले..असं सांगुन मला छळलच! :-/ आपर्णा ताईंनी बेळगावी कुंदा दिला..तो मात्र मस्त मस्त होता.. *i-m_so_happy* अत्ताही खाल्ला थोडा! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-509.gif ) नंतर त्या दोघि आणि देशपांडे काका व अजुन एक(नाव विसरलो..) जण असे मार्गस्थ झाल्यावर आंम्ही सर्व भो जन... भोजनास गेलो. पण चिरंजीव शंभर आणि धन्याचा भाचा यांनी संपूर्ण कट्टाभर जो काहि धिंगाणा घातला...त्याला तोड नाही. http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-349.gif धन्याच्या भाच्यानी आगोबाला ठेवलेली ५/६ नावे ऐकून मी या पुढे किमान १ वर्ष तरी निश्चिंत झालो आहे! (धन्या ..भाचा मि.पा.वर आलाच पाहिजे! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-510.gif ) हुकमीएक्काही प्रथमच भेटला.. पण तो ४०...४५..वयाचा असावा..असा मी नावावरून बांधलेला अंदाज मात्र फसला...असो! बाकि खर्‍या गप्पा झाल्या..चालल्या होत्या,त्या हाटिलामधे रंगा ..चौरा..आणि समीर..इस्पिकएक्का..यांच्यातच.त्या गप्पांचा उत्तरार्धही जेवणे झाल्यावर बाहेर चांगला अर्धापाऊण तास रंगला. विशेषतः चौ.रा. आणि रंगा मंजे अगदी लॉनटेनिस-मॅच चाल्लीवती! अगदी ग ह न चर्चा! मस्त मजा आली. रंगाराव वारीस आले..देशीच्या मि.पा.च्या..ही दिंडी जावो तिकडे आमुची..येत राहो त्यांचीही! https://m.ak.fbcdn.net/sphotos-c.ak/hphotos-ak-xap1/t1.0-9/p296x100/10456021_656755571077399_3450782743185364314_n.jpg

मैत्र 24/06/2014 - 10:58
आमच्या पुण्यात तेही शनिवारवाडा इथे कट्टा होऊन हुकल्याची विलक्षण जळजळ झाली आहे. त्यातही इस्पिकचा एक्का यांना भेटण्याची अजून एक संधी गेल्याची हळहळ पण आहे. पण हा पायंडा पडला तर भविष्यात कधी चांगला योग येऊ शकतो अशी आशाही आहे.. एकंदरीत कट्टा मस्त झालेला दिसतोय.

समीरसूर 24/06/2014 - 21:10
मी हा धागा आणि जोशीसाहेबांचा निरोप रविवारी रात्री ११ वाजता पाहिले. मी गुरुवारपासून सुटीवर होतो. एक परीक्षा होती. थेट रविवारी रात्रीच माझे फेबु पाहिले आणि त्यात जोशीसाहेबांचा निरोप पाहिली. खूप चांगली संधी दवडली. पण तसंही मी येऊ शकलो नसतो कारण गुरुवार ते रविवार माझे रोज पेपर्स होते. पण मी जेवायला येऊ शकलो असतो नक्की. अ‍ॅट लिस्ट सगळ्यांच्या भेटी तरी झाल्या असत्या. मी एकही कट्टा अटेंण्ड केलेला नाही अजून. :-( एनीवे, पुढची संधी सोडायची नाय असे ठरवले आहे. बघू या. बाकी कट्टा छान झाल्याचे वृत्त जोशीसाहेबांकडून कळले. :-) मला खूप हळहळ वाटली. मी १००% आलो असतो. :-( फोटो टाकल्यास थोडा मजा आ जायेगा...

In reply to by अत्रुप्त आत्मा

पैसा 20/06/2014 - 23:19
वल्लीने कितीही अनाहितांना घेऊन या, चहा देतो म्हटलेलं. आणि आता विसरला सोयिस्करपणे! पुणेकरांच्या नावावर आणखी एक किस्सा जमा झाला! =))

In reply to by पैसा

प्यारे१ 20/06/2014 - 23:26
हे बघा, ते 'पीसीएम्सी' वाले आहेत... तेंची महापालिका येगळी हाय! त्यातनं पन आमच्या 'सरां'ला कुनी म्हनलं तर ते आक्की पार्टी आनि प्यार्टी पन देतेत. (असं आयकूण हाय) तेवा हे वेक्तिसापेक्श हाय स्तळसापेक्श नाय हाय हे ची किरपया णाँद घ्यावी. -नुत्काच पुनेकर ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

पैसा 20/06/2014 - 23:44
युती कसली? पिं. चिं. वाल्यांचं काय खरं नै. आता आम्ही शिंव्हगड रोडवाल्यांबरोबर महायुतीचा विचार करू.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 21/06/2014 - 08:42
कोर कमिटीत पिंचि आणि सिंहगड रोडावरची मेंब्रे समसमान आहेत त्यामुळे एकमत होणे कठीण वाटते. ;)

भाते 20/06/2014 - 22:28
सगळेजण एकत्र भेटा, जर चुकुन पुण्यात पाऊस असलाच तर, गरमागरम भजी आणि कटिंग सोबत भरपुर गप्पा मारा. सचित्र वृत्तांताची वाट पहात आहे.

पैसा 20/06/2014 - 23:51
धागा हायजॅक केल्याबद्दल सॉरी बिरी काय म्हणणार नाय. जोशीबुवांना भेटायचं आहेच्च. त्यांच्या एका गाववालीची खबरबात घ्यायची आहे.

In reply to by पैसा

एस 21/06/2014 - 15:37
पुण्याचा धागा हायजॅक व्हावा आणि तेही ज्येष्ठ संपादिकेकडून. याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. शनिवारवाड्यासमोर कट्टा चालू असे पर्यंत धरणे धरण्यात येणार आहे याची संमंने कृपया नोंद घ्यावी. कट्टा आयोजकांनी हे उपोषण नाही हे लक्षात ठेवून धरणेकर्‍यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी ही सूचना.

In reply to by एस

पैसा 21/06/2014 - 16:43
धरण्याला माझा 'बेशर्त' पाठिंबा. चहा तरी नक्की मिळेल हे ठौक आहे. बाकी काय ते प्रसंगोपात्त कळेलच. माझ्या अंदाजाप्रमाणे २ अनाहिता/धरणेकरी असतील तर चहा+भजी, ४ असल्यास फुल्ल चहा, ६ असल्यास कटिंग चहा, आणि त्याहून जास्त असल्यास "कोण आपण" इ. बोलाची कढीभात मिळण्याची शक्यता दिसते.

In reply to by पैसा

प्रचेतस 21/06/2014 - 16:48
अहो पण अनाहिताच धागा हायाज्याक करायल्यात आणि धरणे पण त्याच धरणार हे म्हणजे मुख्यंमंत्री केजरीवालने उपोषण करण्यासारखे झाले.

In reply to by टवाळ कार्टा

एस 24/06/2014 - 17:04
पैतैंनी धोका दिल्याबद्दल पुन्हा एकदा निषेध. चहापाण्याचं इतकं छान अनाहिता-नियोजन केलं होतं की त्या धसक्याने आम्ही धरणे धरण्याचा विचार कुपोषणाच्या भीतीने ऐनवेळी बदलून कट्ट्याला टांग मारली आणि ह्यांनी चक्क ओले काजू दिलेन्... असोत. पण कुण्णाच्याही वृत्तांतात पुणेरीपणा जाणवला नाही. अरेरे! शनवारवाड्या, उगी उगी. आपण दोघे मिळून कट्टा करू आणि स-छा.चि. वृत्तांत दै. स. (हे दै. सं. असे वाचू नये, त्यातील ज्या 'स' वर अनुस्वार नाही त्याचाही खरा पुणेकर सानुनासिकच उच्चार करतो म्हणा!) मध्ये छापून आणू. ओके?

In reply to by एस

पैसा 25/06/2014 - 00:55
स्वॅप्स येणार असे कळल्याने मी काजूची आणखी दोन पाकिटे नेली होती ती परत आणावी लागली. त्यामुळे स्वॅप्सच्या निषेधाचा निषेध! आता परत पार्टी बदलली आहे कारण शेवटपर्यंत आम्हाला चहा काही मिळाला नाही. शेवट चहाऐवजी जेवणाची वेळ होत आली आहे हे बघून आम्ही तिथून "टळलो."

In reply to by पैसा

एस 25/06/2014 - 11:28
मीही अनाहिता येणार म्हणून दोन काजूवाले गुड-डे बिस्किटपुडे घेतले होते. वल्लीशेटनी अनाहितांना चहा दिल्यावर त्यात बुडवून खायला द्यायला म्हणून. ते पुडे परत न्यावे लागले. यावर उतारा म्हणून रत्नांग्रीवरून चार पाकिटं मागवली आहेत आता.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

चौकटराजा 21/06/2014 - 08:27
हपिसातून अलीकडे वल्ली ला मिपा कट्यासाठी टी ए, डीए मिळायला लागलाय ! सबब नोव्हेंबर मधे कट्टा हंपी येथे आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रचेतस 21/06/2014 - 08:40
=)) जेव्हड्या मिपाकरांना भेटता येईल तेव्हढ्या मिपाकरांना भेटण्याची श्रीरंगाची इच्छा आहे अन्यथा नेहमीप्रमाणेच खाजगी कट्टा केला असता. ;)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

धन्या 21/06/2014 - 08:41
बदलला आहे तो. हल्ली तो गड/किल्ला/लेणी/गुंफा पाहायला गेल्यावर त्या जागेची माहितीही सांगतो. तुम्ही त्याच्यासोबत ट्रेकला जाणं बंद केल्याचं दु:ख सहन न झाल्यामुळेच हे अमुलाग्र परीवर्तन झाले असावे त्याच्यात.

या धाग्याबाबत वल्ली यांचे मनापासून आभार. मिपाकरांना प्रत्यक्ष भेटण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा उद्या पूर्ण होणार. :-). माझा इथला भ्रमणध्वनी क्रमांक ७०२८४६५३१६ आहे.

बाबा पाटील 21/06/2014 - 10:46
अहो पण शनिवारवाड्याजवळ आमच घोड बांधायच कुठ ? का हमालवाड्यातच बांधुन तेथुन चालत यायच ?

In reply to by बाबा पाटील

प्रचेतस 21/06/2014 - 11:32
पालख्यांचा उद्या पालखी विठोबा आणि निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्काम असेल तेव्हा रस्ते सुरळीत चालू असतील.

पिंगू 21/06/2014 - 11:59
छ्या राव.. आजकाल कट्ट्याला हजेरी लावणे काही होत नाही. आता कट्टापण कुठे तर शनिवारवाडा म्हणजे आमचाच परिसर. पण नेमका मुंबईला यावे लागल्याने कट्टा हुकला तो हुकलाच.. :(

बाबा पाटील 23/06/2014 - 12:09
माझ्या पेशंट्स नी मला टांगेत टांग टाकुन अडकवुन ठेवले बरे.नाहीतर मी कधीच कुनाला टांग देत नाही बरे.

प्रचेतस 23/06/2014 - 17:32
वृत्तांत लिहिलाच पाहिजे असं काही नाही. तरी थोडक्यात देतो. एकंदर हजर व्यक्ती श्रीरंग जोशी आणि जुई, पैसा ताई, अपर्णा अक्षय, इस्पीकचा एक्का, चौकटराजा, हुकुमी एक्का (ह्या तिघांचा हुकमी डाव होता), वल्ली, धन्या, धन्याचा भाचा, सूड, अत्रुप्त आत्मा, ५० फक्त विथ चि. १००, प्रशांत (वहिनी आणि बालके अर्णवसह), देशपांडे विनायक काका, वाचनमात्र मिपाकर अजित सावंत आणि समीर शेलार, मोदक (१५ मिनिटे उपस्थिती) अणि डॉ. भूषण काळुसकर (फक्त जेवणाला उपस्थिती) कट्ट्याची क्षणचित्रे: शनिवारवाड्यापाशी जमून नगारखान्यापाशी गप्पा छाटणे, पैसाताईने गोव्यावरून आणलेले काजू, अपर्णातैने आणलेला बेळगावचा कुंदा, श्रीरंगाने आणलेली चॉकलेट्स आणि ५० फक्त यांनी कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे आणलेली सोनपापडी मनसोक्त चापणे. देशपांडेकाका यांचा पानशेत धरणफुटीचा त्यांनी घेतलेला अनुभव ऐकणे आणि तो अनुभव ऐकण्यास इतर लोकांचे पण आमच्या कोंडाळ्याभोवती गोळा होणे. मग शनिवारवाड्यात शिरून वाडा पाहण्यापेक्षा गप्पाच जास्त मारणे, पेशवेकालीन इतिहास आणि वाड्याचे स्थापत्य यांच्या माझा घोर अज्ञानानद्दल माझ्यावर टिका होणे. वाड्यातून बाहेर येणे, पै तै, अपर्णातै, देशपांडे काका, अजित सावंत आणि मोदक ह्यांचा निरोप घेणे आणि उर्वरित सर्वांछे नव्या पेठेतील भोज थाळी गृहाकडे प्रस्थान. तिथे अमर्यादित गुजराती थाळी चापून परत भरपूर गफ्फा हाणून घरी जाणे व पुढच्या भ्रमंती कट्ट्याची आखणी करणे. एकंदरीतत कट्ट्याला जाम मजा आली. बोले तो फुल्ल्टू एन्जॉय.

In reply to by प्रचेतस

सूड 23/06/2014 - 17:51
मी तर इन मीन चार डोकी असतील असं समजून आलो होतो. येवढी मंडळी असतील असं चुकूनही वाटलं नव्हतं. बाकी सोनपापडी आणि गोयांच्या काजवांचं कवतिक करावं तेवढं कमी!! आम्ही पोचेपर्यंत कुंदा बेतास बात शिल्लक राह्यला होता. ;) भोज थाळीतली दालबाटी, ताक अप्रतिम. पुरणपोळी पण वाईट नव्हती तिथली, पण आदल्याच दिवशी तुपात निथळणार्‍या चार पुरणपोळ्या एकाहाती ओरपल्याने भोज मध्ये पुरणपोळी म्हणून जो काही प्रकार वाढत होते त्याचं अप्रूप वाटलं नाही. बाकी भोज मधले वाढपी पोळी असो, दालबाटी की खिचडी; तूप अगदी उजव्या हाताने वाढत होते. खिचडीसुद्धा नेहमीच्या चवीपेक्षा हटके होती. संध्याकाळी येवढं सगळं हादडून पोटात अंमळ कमी जागा राह्यल्यामुळे खिचडी अधिक मागवता आली नाही. भोजनानंतर भोजच्या बाहेर काही तात्त्विक चर्चा पार पाडून सगळ्यांनी एकमेकांचा नदीकाठच्या रस्त्यावर* निरोप घेतला. *पुण्यातले रस्ते आपल्याला आताशा कळू लागलेत असं दाखवायचा क्षीण प्रयत्न!!

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 23/06/2014 - 18:10
उर्वरित सर्वांछे नव्या पेठेतील भोज थाळी गृहाकडे प्रस्थान. तिथे अमर्यादित गुजराती थाळी चापून
मराठमोळ्या पुण्यात सुध्धा जेवणासाठी मात्र गुज्जु जेवण??? पुर्वीसारखं पुणं राहि राहीलं नाही आता ;)
सर्वांछे
हे पण गुजरातीतच??? :)

In reply to by टवाळ कार्टा

प्रचेतस 23/06/2014 - 18:16
मराठमोळ्या पुण्यात सुध्धा जेवणासाठी मात्र गुज्जु जेवण??
त्याचं कसं ना की बाहेर पयशे घालवून मराठमोळंच जेवण करायचं असेल तर घरीच का नको? म्हणून मग बाहेर गुज्जु/राजस्थानी जेवण.
हे पण गुजरातीतच???
आता काय अच्छे दिन आले ना. ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अछा नाही... "अच्छा" बर्का *yes3* (हा प्रतिसाद-स्वयंसुधारणा नसल्याचा इफेक्ट... त्याचा राजकारणाशी काsssहीसुद्धा संबंद्ध नाही ;) )

भाते 23/06/2014 - 19:48
सिनेमा बघायच्या अपेक्षेने आलो होतो आणि सिनेमाचे केवळ ट्रेलर बघितल्यासारखे वाटले!

MiPa Katta at Shaniwarwada सर्व चित्रे माझ्या आयुष्यातील पहिलाच मिपा कट्टा अविस्मरणीय झाला. श्री विनायक देशपांडे शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारावर सर्वप्रथम हजर होते. अपर्णा अक्षय यांची उपस्थिती सुखद धक्का देऊन गेली. पन्नासराव, पैसातै व अपर्णातै यांनी आणलेल्या खाऊमुळे कट्ट्याची सुरुवातच चवदार झाली. वल्ली व सूड यांनी लघुवृत्तांत चांगला लिहिला आहे. कट्ट्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल वल्ली व सवंगड्यांचे मनापासून आभार व सर्व कट्टेकर्‍यांना धन्यवाद.

मस्तं कट्टा. बरेच जणं ओळखिचे तरी बरेच अनोळखी. प्रत्येक नांवासहित छायाचित्रे असती तर ज्ञानात भर पडली असती.

In reply to by प्रभाकर पेठकर

१. पैसा, २. अपर्णा अक्षय, ३. प्रशांत ४. मोदक, ५. अजित सावंत ६. इस्पीकचा एक्का, ७. समीर शेलार, ८. वल्ली, ९. अत्रुप्त आत्मा, १०. देशपांडे विनायक काका, ११. हुकुमी एक्का, १२. सूड, १३. ५० फक्त, १४. हजेरी पटात उल्लेख नाही आणि १५. चौकटराजा. श्रीरंग जोशी आणि जुई (फोटो क्रमांक 8637 पाहाणे), धन्या, धन्याचा भाचा (या फोटोत नाहीत) अणि डॉ. भूषण काळुसकर (फक्त जेवणाला उपस्थिती)

या कट्ट्याला मी तसा निम्म्यातच पोहोचलो. प्रशांत वगळता बाकि सर्वांची भेट ..गप्पा झाल्याच. समीर,देशपांडे काका,रंगा,जुई सगळ्यांना प्रथम भेटलो..याचा आनंद होताच. त्यात चहाच्या गाडीवरुन,मी दिलेल्या एका इचित्र =)) उदाहरणाचा देशपांडे काकांनी खरा रंग दाखवून दिला. आणि त्यामुळे चहा न पिताच चढला. समीर आमच्यात नविन फक्त नावाला होता..एव्हढ्या आम्ही गप्पांमधे मिसळून गेलो होतो. पैसा ताई आणि आपर्णा ताईंशी मी सक्काळीच १ तासाचं गप्पाष्टक जमवून आलेलो असल्यामुळे...त्यात नविन वाढ आगोबानी पैसा ताईं समोर (माझा) :-/ छळ :-/ करण्यातच काय ती झाली. (पैसा ताईनी पण सकाळी भेटलो तेंव्हा..-साबुदाणे वडे खाल्ले..असं सांगुन मला छळलच! :-/ आपर्णा ताईंनी बेळगावी कुंदा दिला..तो मात्र मस्त मस्त होता.. *i-m_so_happy* अत्ताही खाल्ला थोडा! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-509.gif ) नंतर त्या दोघि आणि देशपांडे काका व अजुन एक(नाव विसरलो..) जण असे मार्गस्थ झाल्यावर आंम्ही सर्व भो जन... भोजनास गेलो. पण चिरंजीव शंभर आणि धन्याचा भाचा यांनी संपूर्ण कट्टाभर जो काहि धिंगाणा घातला...त्याला तोड नाही. http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-349.gif धन्याच्या भाच्यानी आगोबाला ठेवलेली ५/६ नावे ऐकून मी या पुढे किमान १ वर्ष तरी निश्चिंत झालो आहे! (धन्या ..भाचा मि.पा.वर आलाच पाहिजे! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-510.gif ) हुकमीएक्काही प्रथमच भेटला.. पण तो ४०...४५..वयाचा असावा..असा मी नावावरून बांधलेला अंदाज मात्र फसला...असो! बाकि खर्‍या गप्पा झाल्या..चालल्या होत्या,त्या हाटिलामधे रंगा ..चौरा..आणि समीर..इस्पिकएक्का..यांच्यातच.त्या गप्पांचा उत्तरार्धही जेवणे झाल्यावर बाहेर चांगला अर्धापाऊण तास रंगला. विशेषतः चौ.रा. आणि रंगा मंजे अगदी लॉनटेनिस-मॅच चाल्लीवती! अगदी ग ह न चर्चा! मस्त मजा आली. रंगाराव वारीस आले..देशीच्या मि.पा.च्या..ही दिंडी जावो तिकडे आमुची..येत राहो त्यांचीही! https://m.ak.fbcdn.net/sphotos-c.ak/hphotos-ak-xap1/t1.0-9/p296x100/10456021_656755571077399_3450782743185364314_n.jpg

मैत्र 24/06/2014 - 10:58
आमच्या पुण्यात तेही शनिवारवाडा इथे कट्टा होऊन हुकल्याची विलक्षण जळजळ झाली आहे. त्यातही इस्पिकचा एक्का यांना भेटण्याची अजून एक संधी गेल्याची हळहळ पण आहे. पण हा पायंडा पडला तर भविष्यात कधी चांगला योग येऊ शकतो अशी आशाही आहे.. एकंदरीत कट्टा मस्त झालेला दिसतोय.

समीरसूर 24/06/2014 - 21:10
मी हा धागा आणि जोशीसाहेबांचा निरोप रविवारी रात्री ११ वाजता पाहिले. मी गुरुवारपासून सुटीवर होतो. एक परीक्षा होती. थेट रविवारी रात्रीच माझे फेबु पाहिले आणि त्यात जोशीसाहेबांचा निरोप पाहिली. खूप चांगली संधी दवडली. पण तसंही मी येऊ शकलो नसतो कारण गुरुवार ते रविवार माझे रोज पेपर्स होते. पण मी जेवायला येऊ शकलो असतो नक्की. अ‍ॅट लिस्ट सगळ्यांच्या भेटी तरी झाल्या असत्या. मी एकही कट्टा अटेंण्ड केलेला नाही अजून. :-( एनीवे, पुढची संधी सोडायची नाय असे ठरवले आहे. बघू या. बाकी कट्टा छान झाल्याचे वृत्त जोशीसाहेबांकडून कळले. :-) मला खूप हळहळ वाटली. मी १००% आलो असतो. :-( फोटो टाकल्यास थोडा मजा आ जायेगा...
मिपाकर श्रीरंग जोशी नुकतेच पुण्यात आले आहेत. त्यांना आपल्या सर्वांना भेटायची इच्छा आहे. आताच त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानुसार हा जाहीर धागा टाकत आहे. कट्ट्याची ढोबळमानाने रूपरेषा पुढीलप्रमाणे राहील. कट्ट्याची वेळ: रविवार दि. २२ जून २०१४. दुपारी चार वाजता. ठिकाण: शनिवारवाडा ज्यांना शक्य होईल त्यांनी दुपारी ४ वाजता शनिवारवाड्यापाशी जमावे.

तांत्रिक मत"

अविनाशकुलकर्णी ·

ब्रिटीश व त्याआधी मोगल येण्याआधी भारतात तंत्रसाधनेला मानणारा व करणारा मोठा वर्ग असावा.पण काळाच्या ओघात व वेगवेग्ळ्या संस्कृत्यांचे आक्रमण झाल्याने तो लोप पावला असावा. बाकी लेखात उल्लेख केलेल्या त्या गोलाकार इमारतीचा फोटो मि.पा वरच कुणाच्यातरी धाग्यात पाहीला होता.तांत्रिक साधनेसाठी इतक्या मोठ्या व वैशिष्ट्यपूर्ण वास्तुची निर्मिती ज्याकाळात झाली त्याकाळात तरी ह्या विद्येला समाजमान्यता असु शकावी असे वाटते.तो इतिहास जाणुन घेणे खरेच रोचक ठरावे. त.टी :- अमिश त्रिपाठी च्या शिवाट्रायलोजीला पण अश्याच ऐकिव/वाचीव किश्श्यांचा आधार आहे.

In reply to by अविनाशकुलकर्णी

रमेश आठवले 21/06/2014 - 08:03
मलाही फोटो चढवता येत नाही. पण मला http://www.misalpav.com/node/26033 या धाग्यात याच मंदिराचे बरेच फोटो अमेय यांनी दिले असल्याचे लक्षात आले.

In reply to by प्रचेतस

इन्का आणि माया असाव्यात. बंगल्यांच्या महाभयानक भाषेतून आणि अतिसुंदर मिठायातून हे सांस्कृतिक धागे मागे कुठे जातात याचा अभ्यास करायला हवा. सातवाहन नसावेत ते असते तर तुला माहिती असले असते.

धन्या 21/06/2014 - 08:44
अकुकाका, तांत्रिक मत आणि नाथ संप्रदायाचा खुप जवळचा संबंध आहे हे तुम्हाला माहिती असेलच. त्यावरही थोडा प्रकाश टाका. (किंवा जिथून कुठून या ओळी कॉपी केल्यात तिथे काही लिहिलं आहे का ते पाहा. ;) )

In reply to by चित्रगुप्त

ओशोंचं The Book of Secrets हा त्या साधनांच्या जतनीकरणाचा एक स्तुत्य प्रयत्न आहे. ओशोंचं कौतुक म्हणजे त्यांनी सर्व साधना प्रणालीतल्या गलिच्छ भागाला (जो साधकांच्या अज्ञानामुळे नंतरच्या काळात निर्माण झाला) फाटा देत नेमकं प्रयोजन प्रस्तुत केलंय. शिवानं सखी पार्वतीला सूत्ररुपानं सांगितलेली सत्यप्राप्तीची गुह्य असं त्या प्रणालींचं स्वरुप आहे. सिद्ध पती आणि सत्योन्मुख पत्नीतला तो हृद्य संवाद आहे. महावीरानं साक्षात्काराला The ultimate unfoldment of Self म्हटलंय (Osho on Mahavir). तर अशी स्वतःला सर्वतोपरी अन्फोल्ड करायला तयार असलेली सखी आणि तिच्याशी अनिर्बंध संवाद साधू शकणारा शिवासारखा सिद्ध यांनी तंत्रसाधनेची सर्वांग खुली केलीयेत. संकेतस्थळाचं धोरणं लक्षात घेता त्यावर इथे चर्चा करता येणार नाही.

महाविद्यालय गोलाकार असुन १७० मिटर त्रीज्या असलेले आहे व त्याला ६४ खोल्या आहेत
१३० मीटर त्रिज्या? म्हणजे पाव किलोमीटरहून अधिक व्यास... तुमच्या फोटोतून तो तेवढा वाटत नाहीये हो. तुम्हाला १३० फूट व्यास म्हणायचं आहे का? कारण व्यासाला त्रिज्या म्हटलं, आणि फुटांचे मीटर केले की क्षेत्रफळ दाणकन ४० पटीने वाढतं.

म्हैस 23/06/2014 - 16:38
आधी मला वाटलं होतं तांत्रिक म्हणजे technical काहीतरी असेल . आजही ३/४ th बंगाल , मध्यप्रदेश , कोंकण , आसाम ह्या ठिकाणी हि विद्या सर्रास चालते . जिथे जिथे शक्तिपीठे आहेत tithe तर मोठ्या प्रमाणात .तंत्र साधनेत २ प्रकार असतात . त्यापेकी वाममार्ग भोग घेण्यासाठी वापरला जातो. दुष्ट शक्तींना तंत्र मार्गाने वश करून घेवून , त्यांच्याकडून सिधी मिळवून मनसोक्त भोग घेता येतात . पण कर्माचा सिद्धांत इथे पण लागू होतो महाराजा. ह्या लोकांच्या आयुष्याचा उर्वरित काळ कल्पनेपेक्षाही वाईट जातो . आयुष्य संपल्यावरही कित्येक वर्ष त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागते .

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश 23/06/2014 - 17:40
:) शिरीयेसली: मोहेंजोदरो हरप्पा आजपासून साडेपाच हजार वर्षांपूर्वी झाले मानले तर तंत्रविद्येसारखी एखादी क्लीष्ट विद्या (तीही संस्कृतात?!" रचणारे लोक भारतीय उपखंडात होते हे कितपत सत्य असु शकेल याची खरोखरच उत्सुकता आहे.

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन 23/06/2014 - 17:44
संस्कृतचं काय कौतुक आहे ओ? ते एक सोडाच... बाकी या किंवा बहुतेक विद्यांचं असं आहे की फॉर्मलायझेशन संस्कृतात नंतर झालं, प्रॅक्टिस या ना त्या रूपात अगोदर होतीच. ते मला ठीक वाटतं.

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश 24/06/2014 - 10:13
लेट मी गेट इट क्लीअरः तांत्रिक प्रॅक्टिस इथे मोहंजोदरो काळाच्याही आधी चालु होती हे ठिक वाटकाय? मुळात असं पद्धतशीर तंत्र व/वा प्रॅक्टिस सुरू असायला इथे एखादी "संस्कृती" नको का? का मोहंजोदारोच्या आधीही एखादी सुसंबद्ध संस्कृती होती? प्रश्न खोचक नाहियेत. हे उत्तर तुमच्याकडून अनपेक्षित होते त्यामुळे जरा भंजाळलोय नी गोंधळलोय

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन 24/06/2014 - 11:21
तांत्रिक प्रॅक्टिस करण्यासाठी अगदी मोहेंजोदडोच्या लेव्हलची संस्कृती लागते असे मला वाटत नाही. त्यामुळे तो प्रकार काहीएक रूपात अगोदरही चालू असणे मला अतर्क्य वाटत नाही. मोहेंजोदडोचा काळ इ.स.पू.२०००-२५००, फार तर ओढून ३००० म्हणू. त्याच्या आधीच्या संस्कृतीचे पुरावे कोट दिजी, रहमान ढेरी, मेहेरगढ, इ. ठिकाणी सापडले आहेत. आहर-बनास कल्चर इ.इ. प्रकार हडप्पापूर्वकालीन आहेत. यद्यपि हडप्पा इतके सोफिस्टिकेटेड नसले तरी संस्कृती काहीएक होती इतके तरी नक्कीच कळते. त्यामुळे ते ठीक वाटते. अन परंपरेने योगमार्गाबद्दलही सांगतात, की योगसूत्रे लिहिणार्‍या पतंजलीचे मुख्य कार्य हे की व्हॉटेव्हर इज़ गोईंग इन द फील्ड त्याचा त्याने सारांश काढला, एक सैद्धांतिक बैठक दिली. पण तितकीशी काटेकोर नसलेली काहीएक अ‍ॅमॉर्फस बैठक त्याच्याही आधी होतीच. फरक इथे डिग्रीचा आहे, गुणात्मक नाही. त्यामुळे तंत्रमार्ग तेव्हा या ना त्या स्वरूपात अस्तित्वात असणे टेक्निकली अशक्य नाही, यद्यपि त्याचा इतिहास पाहिला पाहिजे. मी फक्त असे असू शकायला आधार आहे इतकेच म्हणतोय. कन्फ्यूजन क्लीअर झाले असेलशी आशा! :)

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश 24/06/2014 - 11:43
त्यामुळे तंत्रमार्ग तेव्हा या ना त्या स्वरूपात अस्तित्वात असणे टेक्निकली अशक्य नाही, यद्यपि त्याचा इतिहास पाहिला पाहिजे. मी फक्त असे असू शकायला आधार आहे इतकेच म्हणतोय.
ओके. आभार. यात नवी माहिती समजली तर नक्की दे. तुझ्या म्हणण्याचे कन्फ्युजन संपले तरी अजुनही ६००० हा आकडा फार मोठा वाट्टोय. असो.

म्हैस 24/06/2014 - 11:20
तांत्रिक प्रॅक्टिस इथे मोहंजोदरो काळाच्याही आधी चालु होती हे ठिक वाटकाय? मुळात असं पद्धतशीर तंत्र व/वा प्रॅक्टिस सुरू असायला इथे एखादी "संस्कृती" नको का? का मोहंजोदारोच्या आधीही एखादी सुसंबद्ध संस्कृती होती?
६ हजार वर्ष म्हणजे एवढा आश्चर्य वाटण्यासारखा काय आहे ? प्रत्येक गुगामध्ये माणसाच्या आयुष्यातला १ -१ शुन्य कमी होत गेला. सत्यागुत लाखभर आयुष्यमान , पुढे त्रेता, द्वापार युगात हजार वर्ष आणि आता कलियुगात फक्त १०० वर्ष (ते हि अपवादाने ) माणसं जगात आहेत . त्यामुळे ५-६ हजार वर्ष म्हणलं कि आपल्याला फार मोठा काळ वाटतो . खरा तर हा अगदीच कमी काळ आहे . महाभारत ५ हजार वर्षांपूर्वी घडलं असेल तर मोहेंजोदडो पेक्षा अत्यंत प्रगत अश्या संस्कृती लाखो वर्षांपासून आहेत .

सुमारे सहा हजार वर्षापुर्वि एक मत भारतात उदयास आले होते..ज्याचे नाव "तांत्रिक मत" >>> सहा हजार =)) बाकी ह्यालेखावरुन मागे मी एकदा एका तंत्र साधकाच्या साधनेचा व्दिडीयो मिपावर शेयर केला होता ते आठवले ... तो व्हिडीयो लगेच डीलीट झाला होता आणि येथुन पुढे असे व्हिडीयो शेयर करण्यापुर्वी विचार करावा / तारतम्य बाळगावे असा डोस मिळाला होता :(

म्हणजे ते लोकल मध्ये आणि सकाळ पेपर मध्ये छोट्या जाहीरातींमध्ये असते ते? शंभर टक्के खात्रीशीर...वास्तुदोष,संतान,नोकरीधंदा,बरकत वगैरे???

ब्रिटीश व त्याआधी मोगल येण्याआधी भारतात तंत्रसाधनेला मानणारा व करणारा मोठा वर्ग असावा.पण काळाच्या ओघात व वेगवेग्ळ्या संस्कृत्यांचे आक्रमण झाल्याने तो लोप पावला असावा. बाकी लेखात उल्लेख केलेल्या त्या गोलाकार इमारतीचा फोटो मि.पा वरच कुणाच्यातरी धाग्यात पाहीला होता.तांत्रिक साधनेसाठी इतक्या मोठ्या व वैशिष्ट्यपूर्ण वास्तुची निर्मिती ज्याकाळात झाली त्याकाळात तरी ह्या विद्येला समाजमान्यता असु शकावी असे वाटते.तो इतिहास जाणुन घेणे खरेच रोचक ठरावे. त.टी :- अमिश त्रिपाठी च्या शिवाट्रायलोजीला पण अश्याच ऐकिव/वाचीव किश्श्यांचा आधार आहे.

In reply to by अविनाशकुलकर्णी

रमेश आठवले 21/06/2014 - 08:03
मलाही फोटो चढवता येत नाही. पण मला http://www.misalpav.com/node/26033 या धाग्यात याच मंदिराचे बरेच फोटो अमेय यांनी दिले असल्याचे लक्षात आले.

In reply to by प्रचेतस

इन्का आणि माया असाव्यात. बंगल्यांच्या महाभयानक भाषेतून आणि अतिसुंदर मिठायातून हे सांस्कृतिक धागे मागे कुठे जातात याचा अभ्यास करायला हवा. सातवाहन नसावेत ते असते तर तुला माहिती असले असते.

धन्या 21/06/2014 - 08:44
अकुकाका, तांत्रिक मत आणि नाथ संप्रदायाचा खुप जवळचा संबंध आहे हे तुम्हाला माहिती असेलच. त्यावरही थोडा प्रकाश टाका. (किंवा जिथून कुठून या ओळी कॉपी केल्यात तिथे काही लिहिलं आहे का ते पाहा. ;) )

In reply to by चित्रगुप्त

ओशोंचं The Book of Secrets हा त्या साधनांच्या जतनीकरणाचा एक स्तुत्य प्रयत्न आहे. ओशोंचं कौतुक म्हणजे त्यांनी सर्व साधना प्रणालीतल्या गलिच्छ भागाला (जो साधकांच्या अज्ञानामुळे नंतरच्या काळात निर्माण झाला) फाटा देत नेमकं प्रयोजन प्रस्तुत केलंय. शिवानं सखी पार्वतीला सूत्ररुपानं सांगितलेली सत्यप्राप्तीची गुह्य असं त्या प्रणालींचं स्वरुप आहे. सिद्ध पती आणि सत्योन्मुख पत्नीतला तो हृद्य संवाद आहे. महावीरानं साक्षात्काराला The ultimate unfoldment of Self म्हटलंय (Osho on Mahavir). तर अशी स्वतःला सर्वतोपरी अन्फोल्ड करायला तयार असलेली सखी आणि तिच्याशी अनिर्बंध संवाद साधू शकणारा शिवासारखा सिद्ध यांनी तंत्रसाधनेची सर्वांग खुली केलीयेत. संकेतस्थळाचं धोरणं लक्षात घेता त्यावर इथे चर्चा करता येणार नाही.

महाविद्यालय गोलाकार असुन १७० मिटर त्रीज्या असलेले आहे व त्याला ६४ खोल्या आहेत
१३० मीटर त्रिज्या? म्हणजे पाव किलोमीटरहून अधिक व्यास... तुमच्या फोटोतून तो तेवढा वाटत नाहीये हो. तुम्हाला १३० फूट व्यास म्हणायचं आहे का? कारण व्यासाला त्रिज्या म्हटलं, आणि फुटांचे मीटर केले की क्षेत्रफळ दाणकन ४० पटीने वाढतं.

म्हैस 23/06/2014 - 16:38
आधी मला वाटलं होतं तांत्रिक म्हणजे technical काहीतरी असेल . आजही ३/४ th बंगाल , मध्यप्रदेश , कोंकण , आसाम ह्या ठिकाणी हि विद्या सर्रास चालते . जिथे जिथे शक्तिपीठे आहेत tithe तर मोठ्या प्रमाणात .तंत्र साधनेत २ प्रकार असतात . त्यापेकी वाममार्ग भोग घेण्यासाठी वापरला जातो. दुष्ट शक्तींना तंत्र मार्गाने वश करून घेवून , त्यांच्याकडून सिधी मिळवून मनसोक्त भोग घेता येतात . पण कर्माचा सिद्धांत इथे पण लागू होतो महाराजा. ह्या लोकांच्या आयुष्याचा उर्वरित काळ कल्पनेपेक्षाही वाईट जातो . आयुष्य संपल्यावरही कित्येक वर्ष त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागते .

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश 23/06/2014 - 17:40
:) शिरीयेसली: मोहेंजोदरो हरप्पा आजपासून साडेपाच हजार वर्षांपूर्वी झाले मानले तर तंत्रविद्येसारखी एखादी क्लीष्ट विद्या (तीही संस्कृतात?!" रचणारे लोक भारतीय उपखंडात होते हे कितपत सत्य असु शकेल याची खरोखरच उत्सुकता आहे.

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन 23/06/2014 - 17:44
संस्कृतचं काय कौतुक आहे ओ? ते एक सोडाच... बाकी या किंवा बहुतेक विद्यांचं असं आहे की फॉर्मलायझेशन संस्कृतात नंतर झालं, प्रॅक्टिस या ना त्या रूपात अगोदर होतीच. ते मला ठीक वाटतं.

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश 24/06/2014 - 10:13
लेट मी गेट इट क्लीअरः तांत्रिक प्रॅक्टिस इथे मोहंजोदरो काळाच्याही आधी चालु होती हे ठिक वाटकाय? मुळात असं पद्धतशीर तंत्र व/वा प्रॅक्टिस सुरू असायला इथे एखादी "संस्कृती" नको का? का मोहंजोदारोच्या आधीही एखादी सुसंबद्ध संस्कृती होती? प्रश्न खोचक नाहियेत. हे उत्तर तुमच्याकडून अनपेक्षित होते त्यामुळे जरा भंजाळलोय नी गोंधळलोय

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन 24/06/2014 - 11:21
तांत्रिक प्रॅक्टिस करण्यासाठी अगदी मोहेंजोदडोच्या लेव्हलची संस्कृती लागते असे मला वाटत नाही. त्यामुळे तो प्रकार काहीएक रूपात अगोदरही चालू असणे मला अतर्क्य वाटत नाही. मोहेंजोदडोचा काळ इ.स.पू.२०००-२५००, फार तर ओढून ३००० म्हणू. त्याच्या आधीच्या संस्कृतीचे पुरावे कोट दिजी, रहमान ढेरी, मेहेरगढ, इ. ठिकाणी सापडले आहेत. आहर-बनास कल्चर इ.इ. प्रकार हडप्पापूर्वकालीन आहेत. यद्यपि हडप्पा इतके सोफिस्टिकेटेड नसले तरी संस्कृती काहीएक होती इतके तरी नक्कीच कळते. त्यामुळे ते ठीक वाटते. अन परंपरेने योगमार्गाबद्दलही सांगतात, की योगसूत्रे लिहिणार्‍या पतंजलीचे मुख्य कार्य हे की व्हॉटेव्हर इज़ गोईंग इन द फील्ड त्याचा त्याने सारांश काढला, एक सैद्धांतिक बैठक दिली. पण तितकीशी काटेकोर नसलेली काहीएक अ‍ॅमॉर्फस बैठक त्याच्याही आधी होतीच. फरक इथे डिग्रीचा आहे, गुणात्मक नाही. त्यामुळे तंत्रमार्ग तेव्हा या ना त्या स्वरूपात अस्तित्वात असणे टेक्निकली अशक्य नाही, यद्यपि त्याचा इतिहास पाहिला पाहिजे. मी फक्त असे असू शकायला आधार आहे इतकेच म्हणतोय. कन्फ्यूजन क्लीअर झाले असेलशी आशा! :)

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश 24/06/2014 - 11:43
त्यामुळे तंत्रमार्ग तेव्हा या ना त्या स्वरूपात अस्तित्वात असणे टेक्निकली अशक्य नाही, यद्यपि त्याचा इतिहास पाहिला पाहिजे. मी फक्त असे असू शकायला आधार आहे इतकेच म्हणतोय.
ओके. आभार. यात नवी माहिती समजली तर नक्की दे. तुझ्या म्हणण्याचे कन्फ्युजन संपले तरी अजुनही ६००० हा आकडा फार मोठा वाट्टोय. असो.

म्हैस 24/06/2014 - 11:20
तांत्रिक प्रॅक्टिस इथे मोहंजोदरो काळाच्याही आधी चालु होती हे ठिक वाटकाय? मुळात असं पद्धतशीर तंत्र व/वा प्रॅक्टिस सुरू असायला इथे एखादी "संस्कृती" नको का? का मोहंजोदारोच्या आधीही एखादी सुसंबद्ध संस्कृती होती?
६ हजार वर्ष म्हणजे एवढा आश्चर्य वाटण्यासारखा काय आहे ? प्रत्येक गुगामध्ये माणसाच्या आयुष्यातला १ -१ शुन्य कमी होत गेला. सत्यागुत लाखभर आयुष्यमान , पुढे त्रेता, द्वापार युगात हजार वर्ष आणि आता कलियुगात फक्त १०० वर्ष (ते हि अपवादाने ) माणसं जगात आहेत . त्यामुळे ५-६ हजार वर्ष म्हणलं कि आपल्याला फार मोठा काळ वाटतो . खरा तर हा अगदीच कमी काळ आहे . महाभारत ५ हजार वर्षांपूर्वी घडलं असेल तर मोहेंजोदडो पेक्षा अत्यंत प्रगत अश्या संस्कृती लाखो वर्षांपासून आहेत .

सुमारे सहा हजार वर्षापुर्वि एक मत भारतात उदयास आले होते..ज्याचे नाव "तांत्रिक मत" >>> सहा हजार =)) बाकी ह्यालेखावरुन मागे मी एकदा एका तंत्र साधकाच्या साधनेचा व्दिडीयो मिपावर शेयर केला होता ते आठवले ... तो व्हिडीयो लगेच डीलीट झाला होता आणि येथुन पुढे असे व्हिडीयो शेयर करण्यापुर्वी विचार करावा / तारतम्य बाळगावे असा डोस मिळाला होता :(

म्हणजे ते लोकल मध्ये आणि सकाळ पेपर मध्ये छोट्या जाहीरातींमध्ये असते ते? शंभर टक्के खात्रीशीर...वास्तुदोष,संतान,नोकरीधंदा,बरकत वगैरे???
लेखनविषय:
लेखनप्रकार
सुमारे सहा हजार वर्षापुर्वि एक मत भारतात उदयास आले होते..ज्याचे नाव " तांत्रिक मत" ह्या मताचा उदय बंगाल मधे झाला व त्याचा विस्तार बर्मा.तिबेट चिन पर्यंत होत गेला.. पुढे या विचाराचे अनेक ग्रुप्स झाली..व मतमतांतरे वाढत गेली समाज सुधारकानी पण या तान्त्रिंक मतावर तुफान हल्ले चढवले व आज हे मत..

अविस्मरणीय ग्रीस - भाग १ - अथेन्स

सानिकास्वप्निल ·

लवकरच तुमच्या कडून अजून काही पा.क्रु. लिहीणे आणि बनवणे (आणि मिपाकरांना जळवणे होईल ) असे वाटत आहे. बहूदा पुढील पा.क्रु. पिटा-चिकन कबाब, ग्रील्ड चिकन विथ पटेटो व्हेजेस, चिकपी सॅलॅड विथ सन ड्राईड टोमॅटो सॉस आणि ग्रीक फ्रॅपे असाव्यात.

प्यारे१ 20/06/2014 - 22:46
सुंदरच! इतिहासाचं जतन नि त्याचं मार्केटींग करणं युरोपियन लोकांना छान जमतं.

रेवती 21/06/2014 - 00:23
चांगली माहिती व चित्रे आहेत. क्र. २ व क्र. ८ची चित्रे जास्त आवडली. संग्रहालयातील बायकांचे पुतळे हे स्त्रीरुपात कोरलेले खांब वर दाखवलेत त्यातले आहेत का? म्हणजे जुने होऊन पडलेले. सगळच भव्य वाटतय.

ह भ प 21/06/2014 - 16:28
जबरा.. आयुष्यात कधी भारताबाहेर जायचं मनात आलं..तर अथेन्सला'च्च' जाईन.. . . . आता Lycabettus डोंगरचं पण येउद्या..

बॅटमॅन 23/06/2014 - 11:52
आमच्या अथेन्सचे वर्णन आवडले. ट्रॉयच्या युद्धात इकडूनही काही जहाजे भरून लोक गेल्ते पण यांचे मेन काँट्रिब्यूशन म्हणजे ग्रीकोपर्शियन युद्धे आणि अख्ख्या ग्रीसचे सांस्कृतिक केंद्र असणे. इसपू ४६० ते इसपू ४३० या काळात अथेन्सचे जे वर्चस्व होते, जो वरचष्मा होता, जो दरारा होता, त्याला तोड नाही. पेरिक्लेसच्या आधिपत्याखाली अथेन्स अख्ख्या ग्रीसमध्ये सर्वांत प्रबळ नगरराज्य बनले होते. बरं प्रबळ म्हणजे नुस्तं सैनिकीदॄष्ट्या नव्हे. त्यांचे आरमार जगातभारी होते, पेरिक्लेससारखा कुशल प्रशासक तिथे होता, युरिपायडिससारखा फेमस नाटककारही तिथेच आणि फिदिआससारखा विश्वकर्मा शिल्पीही तिथेच. काय नव्हतं तेव्हाच्या अथेन्समध्ये? वर फटू दिलेला पार्थेनॉन हाही पेरिक्लेसच्या काळातच बांधलेला आहे. ऑलराउंड ग्रेटनेस म्हणजे काय हे पहायचं झालं तर पेरिक्लीअन काळातल्या अथेन्सकडे पहावे. सानिकातै, येऊद्या अजून लेख लौकरात लौकर. आमच्या ग्रीसबद्दल कितीही वाचलं तरी थोडंच आहे.

लवकरच तुमच्या कडून अजून काही पा.क्रु. लिहीणे आणि बनवणे (आणि मिपाकरांना जळवणे होईल ) असे वाटत आहे. बहूदा पुढील पा.क्रु. पिटा-चिकन कबाब, ग्रील्ड चिकन विथ पटेटो व्हेजेस, चिकपी सॅलॅड विथ सन ड्राईड टोमॅटो सॉस आणि ग्रीक फ्रॅपे असाव्यात.

प्यारे१ 20/06/2014 - 22:46
सुंदरच! इतिहासाचं जतन नि त्याचं मार्केटींग करणं युरोपियन लोकांना छान जमतं.

रेवती 21/06/2014 - 00:23
चांगली माहिती व चित्रे आहेत. क्र. २ व क्र. ८ची चित्रे जास्त आवडली. संग्रहालयातील बायकांचे पुतळे हे स्त्रीरुपात कोरलेले खांब वर दाखवलेत त्यातले आहेत का? म्हणजे जुने होऊन पडलेले. सगळच भव्य वाटतय.

ह भ प 21/06/2014 - 16:28
जबरा.. आयुष्यात कधी भारताबाहेर जायचं मनात आलं..तर अथेन्सला'च्च' जाईन.. . . . आता Lycabettus डोंगरचं पण येउद्या..

बॅटमॅन 23/06/2014 - 11:52
आमच्या अथेन्सचे वर्णन आवडले. ट्रॉयच्या युद्धात इकडूनही काही जहाजे भरून लोक गेल्ते पण यांचे मेन काँट्रिब्यूशन म्हणजे ग्रीकोपर्शियन युद्धे आणि अख्ख्या ग्रीसचे सांस्कृतिक केंद्र असणे. इसपू ४६० ते इसपू ४३० या काळात अथेन्सचे जे वर्चस्व होते, जो वरचष्मा होता, जो दरारा होता, त्याला तोड नाही. पेरिक्लेसच्या आधिपत्याखाली अथेन्स अख्ख्या ग्रीसमध्ये सर्वांत प्रबळ नगरराज्य बनले होते. बरं प्रबळ म्हणजे नुस्तं सैनिकीदॄष्ट्या नव्हे. त्यांचे आरमार जगातभारी होते, पेरिक्लेससारखा कुशल प्रशासक तिथे होता, युरिपायडिससारखा फेमस नाटककारही तिथेच आणि फिदिआससारखा विश्वकर्मा शिल्पीही तिथेच. काय नव्हतं तेव्हाच्या अथेन्समध्ये? वर फटू दिलेला पार्थेनॉन हाही पेरिक्लेसच्या काळातच बांधलेला आहे. ऑलराउंड ग्रेटनेस म्हणजे काय हे पहायचं झालं तर पेरिक्लीअन काळातल्या अथेन्सकडे पहावे. सानिकातै, येऊद्या अजून लेख लौकरात लौकर. आमच्या ग्रीसबद्दल कितीही वाचलं तरी थोडंच आहे.
अविस्मरणीय ग्रीस प्रस्तावना सकाळी लवकर उठून , मस्तं नाश्ता करून आम्ही नऊला हॉटेलमधून बाहेर पडलो. थेट टॅक्सी करून आम्ही अ‍ॅक्रोपोलीसला गेलो. तिथे पोहोचताच आम्हाला दुरूनच Parthenonचे दर्शन झाले. भराभर थोडे वर चढून तिकिट काढायला गेलो , तिथे थोडी रांग होतीच शिवाय नऊनंतर अनेक पर्यटक बसमधून Parthenon बघायला मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे गर्दी होतेच. पटापटा तिकिटं काढून आम्ही वर चढायला सुरुवात केली, वातावरण मध्येच ऊन मध्येच ढगाळ असे होते त्यामुळे पाऊस येतो की काय असे उगाच वाटून गेले.

'कुणी घर देता का घर' - नटसम्राटाचा टाहो

जीएस ·

विकास 20/06/2014 - 20:26
केजरीवाल आणि त्यांचे समर्थक हे "हम नही सुधरेंगे" वर्गवारीत बसतात. आक्षेपार्ह आहे तो या सगळ्या प्रकरणातला अप्रामाणिकपणा आणि ढोंगीपणा. ह्याच्याशी किंचीत असहमत. ;) केजरीवाल हे माझ्यामते प्रामाणिकपणे ढोंगी आहेत. कदाचीत त्याला आपण old school of thought असे म्हणू शकू.. पण त्यांना काळ बदलला असल्याची जाणीव नसावी.. म्हणूनच त्यांना आज देखील मनापासून वाटते की जनतेत काम करण्यासाठी, काम करण्यापेक्षा अधिक ढोंग करावे लागते. अधिक काय लिहायचे? कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच!

धन्या 20/06/2014 - 20:37
डॉ. मिन्नू भोसले यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीचा मानसशास्त्रीय अंगाने घेतलेला आढावा वाचण्यासारखा आहे. दुवा: A psychotherapist’s open letter to Arvind Kejriwal

In reply to by धन्या

विकास 20/06/2014 - 23:10
लेख चांगला आहे! धन्यवाद. केजरीवालांचे जाउंदेत, त्यांना पाठींबा देणार्‍या सुशिक्षित वर्गाला पाहून, लोकमान्य टिळकांचे, "समाजाचे मानसशास्त्र हे न उलगडणारे कोडे आहे" हे वाक्यच आठवते.

In reply to by विकास

धन्या 21/06/2014 - 06:48
आमच्या हापिसात एकेचे खुप खंदे समर्थक होते. (आता होते असेच म्हणावे लागेल). बरेचसे उत्तर भारतीय. त्यांच्या दृष्टीने एकेच्या रुपाने भगवंतानेच अवतार घेतला आहे अनागोंदी दूर करण्यासाठी. आता लेकाचे एकेमधला ए पण बोलत नाहीत. :)

ह.ह.पु.वा.झाली रे. बादवे, महिलांवर अत्याचार करणार्‍या त्या भाजपाच्या निहालचंदविषयी गुजरातचा सिंह मूग गिळून गप्प का बसलाय ते कळत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विकास 20/06/2014 - 23:48
भाजपाच्या निहालचंदविषयी गुजरातचा सिंह मूग गिळून गप्प का बसलाय ते कळत नाही. जर कोणी कुणावरही अत्याचार केले असले आणि त्यातही विशेष करून स्त्रीवर शारीरीक अत्याचार केले असले तर त्याला शिक्षा झालीच पाहीजे. निलाहचंद कोण हे कोर्टाने आणि माध्यमांनी अजून कथितच असलेले पक्षि: सिद्ध न झालेले प्रकरण प्रसिद्धीस आणल्यावरच समजले. कोर्टात केस असल्याने त्यावर पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीने भाष्य करणे योग्य ठरणार नाही... पण निहालचंदने हा गुन्हा केला असेल का? शक्य आहे. पण सिद्ध होत नाही तो पर्यंत तो गुन्हेगार ठरत नाही. यात त्याचे अथवा मोदींचे नको तिथे समर्थन करण्याचा उद्देश नाही, पण ज्या पद्धतीने बातम्या दिल्या जातात त्यामुळे म्हणावेसे वाटते: विकीवर असलेल्या माहितीप्रमाणे अथवा हिंदूस्तान टाईम्स मधील बातमीप्रमाणे, मूळ तक्रार २०११ ची आहे. पोलीसांनी त्यावर आधारीत १७ जणांवर एफ आय आर दाखल केला होता. तेंव्हा अशोक गेहलोत अर्थात काँग्रेसचे सरकार होते आणि निहालचंद हे भाजपातच होते. एक वर्षाच्या चौकशी/संशोधनानंतर काँग्रेसच्या राज्यातल्या पोलीसांनीच ती केस खोट आरोप आहेत असे सांगून बंद केली. त्यावर त्या बाईने ट्रायल कोर्टात तक्रार केली. ट्रायल कोर्टाने पोलीसांची चौकशी ग्राह्य धरून त्या बाईची तक्रार रदबादल ठरवली. मग ती बाई जिल्हा कोर्टाकडे गेली. तेथे देखील २०१२ मधेच ही तक्रार नाकारण्यात आली. नंतर गेल्या महीन्यात निहालचंद मंत्री झाले आणि परत तीच तक्रार जिल्हा कोर्टात करण्यात आली आणि आता ती मान्य कोर्टाने निहालचंद आणि इतर १६ आरोपींना नोटीसा पाठवल्या आहेत. आता राजस्थानात आणि केंद्रात सत्ताभ्रष्ट झालेले काँग्रेस त्यावेळेस भाजपाकडून पराभूत उमेदवार असलेल्या निहालचंद यांचा राजीनामा मागत आहे!

विकास 20/06/2014 - 20:26
केजरीवाल आणि त्यांचे समर्थक हे "हम नही सुधरेंगे" वर्गवारीत बसतात. आक्षेपार्ह आहे तो या सगळ्या प्रकरणातला अप्रामाणिकपणा आणि ढोंगीपणा. ह्याच्याशी किंचीत असहमत. ;) केजरीवाल हे माझ्यामते प्रामाणिकपणे ढोंगी आहेत. कदाचीत त्याला आपण old school of thought असे म्हणू शकू.. पण त्यांना काळ बदलला असल्याची जाणीव नसावी.. म्हणूनच त्यांना आज देखील मनापासून वाटते की जनतेत काम करण्यासाठी, काम करण्यापेक्षा अधिक ढोंग करावे लागते. अधिक काय लिहायचे? कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच!

धन्या 20/06/2014 - 20:37
डॉ. मिन्नू भोसले यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीचा मानसशास्त्रीय अंगाने घेतलेला आढावा वाचण्यासारखा आहे. दुवा: A psychotherapist’s open letter to Arvind Kejriwal

In reply to by धन्या

विकास 20/06/2014 - 23:10
लेख चांगला आहे! धन्यवाद. केजरीवालांचे जाउंदेत, त्यांना पाठींबा देणार्‍या सुशिक्षित वर्गाला पाहून, लोकमान्य टिळकांचे, "समाजाचे मानसशास्त्र हे न उलगडणारे कोडे आहे" हे वाक्यच आठवते.

In reply to by विकास

धन्या 21/06/2014 - 06:48
आमच्या हापिसात एकेचे खुप खंदे समर्थक होते. (आता होते असेच म्हणावे लागेल). बरेचसे उत्तर भारतीय. त्यांच्या दृष्टीने एकेच्या रुपाने भगवंतानेच अवतार घेतला आहे अनागोंदी दूर करण्यासाठी. आता लेकाचे एकेमधला ए पण बोलत नाहीत. :)

ह.ह.पु.वा.झाली रे. बादवे, महिलांवर अत्याचार करणार्‍या त्या भाजपाच्या निहालचंदविषयी गुजरातचा सिंह मूग गिळून गप्प का बसलाय ते कळत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विकास 20/06/2014 - 23:48
भाजपाच्या निहालचंदविषयी गुजरातचा सिंह मूग गिळून गप्प का बसलाय ते कळत नाही. जर कोणी कुणावरही अत्याचार केले असले आणि त्यातही विशेष करून स्त्रीवर शारीरीक अत्याचार केले असले तर त्याला शिक्षा झालीच पाहीजे. निलाहचंद कोण हे कोर्टाने आणि माध्यमांनी अजून कथितच असलेले पक्षि: सिद्ध न झालेले प्रकरण प्रसिद्धीस आणल्यावरच समजले. कोर्टात केस असल्याने त्यावर पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीने भाष्य करणे योग्य ठरणार नाही... पण निहालचंदने हा गुन्हा केला असेल का? शक्य आहे. पण सिद्ध होत नाही तो पर्यंत तो गुन्हेगार ठरत नाही. यात त्याचे अथवा मोदींचे नको तिथे समर्थन करण्याचा उद्देश नाही, पण ज्या पद्धतीने बातम्या दिल्या जातात त्यामुळे म्हणावेसे वाटते: विकीवर असलेल्या माहितीप्रमाणे अथवा हिंदूस्तान टाईम्स मधील बातमीप्रमाणे, मूळ तक्रार २०११ ची आहे. पोलीसांनी त्यावर आधारीत १७ जणांवर एफ आय आर दाखल केला होता. तेंव्हा अशोक गेहलोत अर्थात काँग्रेसचे सरकार होते आणि निहालचंद हे भाजपातच होते. एक वर्षाच्या चौकशी/संशोधनानंतर काँग्रेसच्या राज्यातल्या पोलीसांनीच ती केस खोट आरोप आहेत असे सांगून बंद केली. त्यावर त्या बाईने ट्रायल कोर्टात तक्रार केली. ट्रायल कोर्टाने पोलीसांची चौकशी ग्राह्य धरून त्या बाईची तक्रार रदबादल ठरवली. मग ती बाई जिल्हा कोर्टाकडे गेली. तेथे देखील २०१२ मधेच ही तक्रार नाकारण्यात आली. नंतर गेल्या महीन्यात निहालचंद मंत्री झाले आणि परत तीच तक्रार जिल्हा कोर्टात करण्यात आली आणि आता ती मान्य कोर्टाने निहालचंद आणि इतर १६ आरोपींना नोटीसा पाठवल्या आहेत. आता राजस्थानात आणि केंद्रात सत्ताभ्रष्ट झालेले काँग्रेस त्यावेळेस भाजपाकडून पराभूत उमेदवार असलेल्या निहालचंद यांचा राजीनामा मागत आहे!
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपल्या विविधरंगी नाट्यप्रयोगांनी गेली दोन वर्षे जनतेचे अथक मनोरंजन करणार्‍या नटसम्राटाने अखेर 'कुणी घर देता का घर' असा आर्त टाहो फोडला आहे.