कसं भेटायचं, कुठे भेटायचं, वेळ काय, सर्व काही आदल्या दिवशी ठरलं. अन अखेरीस तो दिवस उजाडला. पहाटेचा गजर झाला वेळतच तय्यारी झाली. घोंगावणाऱ्या वाऱ्यासोबत अल्लड पावसाने पण हजेरी लावली. ठरलेल्या ठिकाणी अन दिलेल्या वेळेत भेटणे जरुरी होतं. नाहीतर शिव्या हमखास पडणार हे माहीत होतं.
स्टॉप वर पोचलो, रिक्शा-ऑटों-रिक्शा-ऑटों-रिक्शा ओरडत हातवारे करत होतो. समोरच्या व्यक्तीचा चेहरा पण स्पष्टपणे दिसत नव्हता एवढा पाउस. फक्त गाड्यांचे चमकणारे दिवे तेवढे दिसत होते. त्यावरून समजे की चारचाकी, तिनचाकी अन दोनचाकी वाहने कुठची आहे. इतक्यात एक रिक्शा पुढ्यात येउन थांबली. साहेब कुठं जाणार..?