मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाउली पैंजणांचा मला भार आहे

गणेशा ·

अभ्या.. Wed, 08/20/2025 - 15:43
अरे वा गणेशा. पुनरागमनाचे स्वागत. येउ दे कविता. भले मिपाकाव्यविभागात दुष्काळ आहे पण फुटतील धुमारे तुझ्या ह्या पैंजणनादाने.

कर्नलतपस्वी Wed, 08/20/2025 - 17:02
सुंदर, अनिल कांबळे यांची त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहीला मी आठवली. खुपच सुंदर. स्वागत, स्वगृही. दालन ओसाड पडलयं. कवितांनी समृद्ध करा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/21/2025 - 08:44
पाउली पैंजणांचा मला भार आहे.. रात्रीस चांदण्यांचा अबोल दाह आहे..
वरील ओळींना पैकीच्या पैकी गुण दिले आहेत. -दिलीप बिरुटे

चित्रगुप्त Fri, 08/22/2025 - 03:35
कविता उत्तम आहे. मला तर भारीच कवतिक वाटतं, ज्यांना अशा कविता सुचतात आणि लिहीता येतात त्यांचं. -- अवांतरः तुमची कविता निर्मितीची प्रक्रिया कशी असते, तसेच 'चार वर्षांनंतर पहिल्यांदा' याबद्दलही लिहावे. म्हणजे एका कवीला कश्यातून, केंव्हा प्रेरणा मिळते/मिळत रहाते, कश्याकश्याने त्यात खंड पडतो/पडू शकतो, चार वर्षांत काही सुचलेच नाही का, की सुचूनही लिहीले गेले नाही, वगैरेवर प्रकाश टाकावा. चित्रकलेच्या बाबतीत माझेही असे होत असते, पण ते का, हे कळत नाही. तुमच्या अनुभवातून काही कळेल कदाचित. अवश्य लिहावे. शुभेच्छा.

In reply to by चित्रगुप्त

गणेशा Fri, 08/22/2025 - 16:04
यावर काय लिहावे, येथेच लिहावे वेगळे लिहावे, किती लिहावे हे कळेना शेवटी म्हंटले. इथला प्रश्न इथेच थोडक्यात सांगतो.. - तुम्ही चित्रकार आहात.. आणि मला चित्रकला ही सर्वात उजवी कला वाटते. प्रत्येक रेषेत जीवनाचे रंग उमलतात, हीच खरी चित्रकलेची अनुभूती आहे. कवितेबद्दल मात्र माझा वेगळा दृष्टिकोन आहे. मला कविता ही फक्त त्या क्षणाची उमटलेली भावना वाटते. म्हणूनच मी तिला ‘कला’ मानत नाही. आणि कला मानली नाही की त्याबद्दल विशेष प्रेमही निर्माण होत नाही – निदान माझं तरी तसंच आहे. त्यामुळे माझ्या कवितांवर वा लिखाणावर मी प्रेम करत नाही. कारण जसं सहजपणे मी मित्रांशी बोलतो, संवाद साधतो, तसंच सहजतेने मी लिहितो. कदाचित म्हणूनच मित्रांना मी कुठल्याच अर्थाने ‘कवी’ वाटत नाही; आणि जसं मी लिहितो तसं कवितेसारखं प्रत्यक्ष बोलणं मला जमत नाही. खंड / प्रेरणा : मला वाटतं, कविता असो वा चित्रकला – जर त्या आपण फक्त स्वतःच्या समाधानासाठी केल्या, इतरांना इम्प्रेस करण्यासाठी नव्हे, तर जीवनाच्या प्रवाहात बदलणाऱ्या असंख्य प्राधान्यक्रमांमध्ये त्या मागे पडत जातात. घर, मित्र, जबाबदाऱ्या, नवीन आवडी अशा अनेक गोष्टी येतात. आणि मग जे आधी वाटलं ते हळूहळू मागे राहतं. सध्या मला बागकामाचा नाद लागलाय. टेरेस आणि गॅलरी झाडांनी, फुलांनी बहरल्या आहेत. असं होतं आणि मग लिखाणाला खंड पडत राहतो... तुमचे हि असेच होते काय? बहुतेक असे नसेल.

In reply to by गणेशा

कर्नलतपस्वी Tue, 08/26/2025 - 06:20
अगदी, अगदी. पोटाचा प्रश्न मार्गी लागल्यावर (सुटल्यावर म्हणत नाही,कारण तो कधीच सुटत नाही. सुटल्यावरच सुटतो) विविध छंद जोपासायला प्रयत्न केला. पण मन हे लहान मुला सारखेच, नवे खेळणे मिळाले की जुने फेकून द्यायचे. सध्या पक्षी निरीक्षण अग्रभागी आहे,बरोबर फोटोग्राफी पुरक छंद. कवितेबद्दल मात्र माझा वेगळा दृष्टिकोन आहे. मला कविता ही फक्त त्या क्षणाची उमटलेली भावना वाटते. बाकी,कवीता मात्र प्रचंड आवडतात. क्षणीक अनुभुती जरी असली तरी ठिणगी सारखी असते. कविते मागील कवीची प्रेरणा,मनस्थिती जाणू घेता आली तर आणखीनच मस्त वाटते.

In reply to by कानडाऊ योगेशु

गणेशा Tue, 08/26/2025 - 00:11
हक्कानं गण्या म्हणणारा मिपा वरती आता फक्त तूच आहेस.. आधी अविनाश काका एक होते.. पण तु खुप्पच चतुर आहेस मित्रा हाताला लागत नाहीस अविनाश काका असे नव्हते मी त्यांना नेहमी मिस करतो... आता असते तर सरळ भेटायला गेलो असतो.

प्रचेतस Sat, 08/23/2025 - 08:32
मस्त गणेशा. तुझ्याविना सारा कवीमंच झाला होता उदास त्याचमुळे काव्यविभाग पडला होता भकास - कवी आपलेच आठौले.

अभ्या.. Wed, 08/20/2025 - 15:43
अरे वा गणेशा. पुनरागमनाचे स्वागत. येउ दे कविता. भले मिपाकाव्यविभागात दुष्काळ आहे पण फुटतील धुमारे तुझ्या ह्या पैंजणनादाने.

कर्नलतपस्वी Wed, 08/20/2025 - 17:02
सुंदर, अनिल कांबळे यांची त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहीला मी आठवली. खुपच सुंदर. स्वागत, स्वगृही. दालन ओसाड पडलयं. कवितांनी समृद्ध करा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/21/2025 - 08:44
पाउली पैंजणांचा मला भार आहे.. रात्रीस चांदण्यांचा अबोल दाह आहे..
वरील ओळींना पैकीच्या पैकी गुण दिले आहेत. -दिलीप बिरुटे

चित्रगुप्त Fri, 08/22/2025 - 03:35
कविता उत्तम आहे. मला तर भारीच कवतिक वाटतं, ज्यांना अशा कविता सुचतात आणि लिहीता येतात त्यांचं. -- अवांतरः तुमची कविता निर्मितीची प्रक्रिया कशी असते, तसेच 'चार वर्षांनंतर पहिल्यांदा' याबद्दलही लिहावे. म्हणजे एका कवीला कश्यातून, केंव्हा प्रेरणा मिळते/मिळत रहाते, कश्याकश्याने त्यात खंड पडतो/पडू शकतो, चार वर्षांत काही सुचलेच नाही का, की सुचूनही लिहीले गेले नाही, वगैरेवर प्रकाश टाकावा. चित्रकलेच्या बाबतीत माझेही असे होत असते, पण ते का, हे कळत नाही. तुमच्या अनुभवातून काही कळेल कदाचित. अवश्य लिहावे. शुभेच्छा.

In reply to by चित्रगुप्त

गणेशा Fri, 08/22/2025 - 16:04
यावर काय लिहावे, येथेच लिहावे वेगळे लिहावे, किती लिहावे हे कळेना शेवटी म्हंटले. इथला प्रश्न इथेच थोडक्यात सांगतो.. - तुम्ही चित्रकार आहात.. आणि मला चित्रकला ही सर्वात उजवी कला वाटते. प्रत्येक रेषेत जीवनाचे रंग उमलतात, हीच खरी चित्रकलेची अनुभूती आहे. कवितेबद्दल मात्र माझा वेगळा दृष्टिकोन आहे. मला कविता ही फक्त त्या क्षणाची उमटलेली भावना वाटते. म्हणूनच मी तिला ‘कला’ मानत नाही. आणि कला मानली नाही की त्याबद्दल विशेष प्रेमही निर्माण होत नाही – निदान माझं तरी तसंच आहे. त्यामुळे माझ्या कवितांवर वा लिखाणावर मी प्रेम करत नाही. कारण जसं सहजपणे मी मित्रांशी बोलतो, संवाद साधतो, तसंच सहजतेने मी लिहितो. कदाचित म्हणूनच मित्रांना मी कुठल्याच अर्थाने ‘कवी’ वाटत नाही; आणि जसं मी लिहितो तसं कवितेसारखं प्रत्यक्ष बोलणं मला जमत नाही. खंड / प्रेरणा : मला वाटतं, कविता असो वा चित्रकला – जर त्या आपण फक्त स्वतःच्या समाधानासाठी केल्या, इतरांना इम्प्रेस करण्यासाठी नव्हे, तर जीवनाच्या प्रवाहात बदलणाऱ्या असंख्य प्राधान्यक्रमांमध्ये त्या मागे पडत जातात. घर, मित्र, जबाबदाऱ्या, नवीन आवडी अशा अनेक गोष्टी येतात. आणि मग जे आधी वाटलं ते हळूहळू मागे राहतं. सध्या मला बागकामाचा नाद लागलाय. टेरेस आणि गॅलरी झाडांनी, फुलांनी बहरल्या आहेत. असं होतं आणि मग लिखाणाला खंड पडत राहतो... तुमचे हि असेच होते काय? बहुतेक असे नसेल.

In reply to by गणेशा

कर्नलतपस्वी Tue, 08/26/2025 - 06:20
अगदी, अगदी. पोटाचा प्रश्न मार्गी लागल्यावर (सुटल्यावर म्हणत नाही,कारण तो कधीच सुटत नाही. सुटल्यावरच सुटतो) विविध छंद जोपासायला प्रयत्न केला. पण मन हे लहान मुला सारखेच, नवे खेळणे मिळाले की जुने फेकून द्यायचे. सध्या पक्षी निरीक्षण अग्रभागी आहे,बरोबर फोटोग्राफी पुरक छंद. कवितेबद्दल मात्र माझा वेगळा दृष्टिकोन आहे. मला कविता ही फक्त त्या क्षणाची उमटलेली भावना वाटते. बाकी,कवीता मात्र प्रचंड आवडतात. क्षणीक अनुभुती जरी असली तरी ठिणगी सारखी असते. कविते मागील कवीची प्रेरणा,मनस्थिती जाणू घेता आली तर आणखीनच मस्त वाटते.

In reply to by कानडाऊ योगेशु

गणेशा Tue, 08/26/2025 - 00:11
हक्कानं गण्या म्हणणारा मिपा वरती आता फक्त तूच आहेस.. आधी अविनाश काका एक होते.. पण तु खुप्पच चतुर आहेस मित्रा हाताला लागत नाहीस अविनाश काका असे नव्हते मी त्यांना नेहमी मिस करतो... आता असते तर सरळ भेटायला गेलो असतो.

प्रचेतस Sat, 08/23/2025 - 08:32
मस्त गणेशा. तुझ्याविना सारा कवीमंच झाला होता उदास त्याचमुळे काव्यविभाग पडला होता भकास - कवी आपलेच आठौले.
लेखनविषय:
काव्यरस
पाउली पैंजणांचा मला भार आहे.. रात्रीस चांदण्यांचा अबोल दाह आहे.. शेजावरी स्वप्नकळ्यांचा मूक शृंगार आहे कुंकवाचा चंद्रमा त्यालाही डाग आहे... नजरेत भावनांचा भरला बाजार आहे.. आरसा मनाचा त्यालाही भेग आहे.. अंतरात श्वासांचा खोल वार आहे.. सावल्यांच्या मिठीत माझा संसार आहे... पाउली पैंजणांचा मला भार आहे.. रात्रीस चांदण्यांचा अबोल दाह आहे.. -शब्दमेघ..एक मुक्त स्वैर स्वच्छंदी जीवन (१९ ऑगस्ट २०२५) (चार वर्षांनंतर पहिल्यांदा)

मानवतेचं कलेवर

कर्नलतपस्वी ·

चौथा कोनाडा Wed, 04/23/2025 - 13:34
पुनश्च पेटवा मशाली जाळून टाका विषवल्ली बनू आता विश्वगुरू , नरसंहाराने विश्व शांतीची सुरवात करू......
पहेलगाम मधे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली व परिवारातील सर्व सदस्यांना सहसंवेदना. समयोचित रचना !

छान लिहलय कर्नल साहेब, मृतांना श्रद्धांजली. फिरायला गेलेले बिचारे मृत्यू घेऊन परत आलेत. भारताने ह्या हल्ल्याचा बदला घ्यायला हवा! इस्राइलचे १५०० मेले त्याबदल्यात आता पर्यंत ७० हजार मारुन बदला घेतलाहे नी अजूनही सुरूच आहे. आम्ही मात्र “कडीनिंदा” करून शांत बसू अशी शक्यता जास्तय!

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Sun, 04/27/2025 - 12:43
त्यांचा आय. डी. उडाला होता, तरी पण ते लोचटपणे इथेच लोंबकळत बसले आहेत... कधी माईच्या पदराला धरतात तर कधी आग्याचे धोतर पकडतात.... ज्याला स्वत्व नाही, ते असेल लोकांच्या हेटाळणीला पात्र असतात. इथे कुणीच त्यांना भाव देत नाही...

In reply to by प्रसाद गोडबोले

आम्ही तर लगेच जाऊ हो, आमचाई सैन्य सक्षम आहे, पण नेते असे पडलेत देशाच्या गळ्यात की काय सांगावे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Mon, 04/28/2025 - 16:20
इतिहास न वाचल्याचा परिणाम... अर्थात, तुम्ही अजून पंचतंत्र पण वाचलेले नाही, त्यामुळं तुम्हांला फ्रान्सचे सर्वसामान्य नागरीक आणि त्यांचा दुसऱ्या महायुद्धातील सहभाग तरी कसा काय समजणार? असो, आनंद आहे....

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पण नेते असे पडलेत देशाच्या गळ्यात की काय सांगावे?
बरं मग थोडा दम धरा, 2029 मध्ये निवडणुकीत त्या नेत्यांना सत्तेतून बाहेर खेचा, मग घ्या बदला बिदला. 2029 पर्यंत थोडी तरी कळ काढाल की नाही ? की 2029 पर्यंत मिसळपाव ह्या वेबसाईटवर, कोठल्याही लेखनवर स्वतःला वैचारिक अतिसार लागल्याचे प्रदर्शन करत राहणार आहात ? राजकारण , मोदी, भाजप, ह्यापलीकडे ही आयुष्य आहे , आणि ते सुंदर आहे . एन्जॉय करा राव . नाहीतर मग काय अयोध्या काशी वगैरे तीर्थाटन देखील अतिसार लागलेल्या अवस्थेत केल्यास त्यातून आनंद, समाधान लाभणार नाहीये.

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Mon, 04/28/2025 - 18:47
तुम्ही पण त्यांना समजावून सांगायला लागलात.... पण, ते व्यक्तीद्वेष करण्यातच धन्यता मानतात. त्या रोगाला औषध नाही...

In reply to by मुक्त विहारि

व्यक्तिद्वेष करू देत, काही हरकत नाही. पण किमान पुढच्या निवडणुकी पर्यंत तरी दम धरा. पण ते 2029 पर्यंत सतत आणि अखंड मिसळपाव वरील सर्वच लेखनात, प्रतिसादात हे असे "प्रदर्शन" करत राहणार आहेत का ? इतकाच माझा त्यांना प्रश्न आहे. बघू काय म्हणतात ते.

In reply to by प्रसाद गोडबोले

तूमची इच्छा पूर्ण होणार नाही आम्ही देशातील अशिक्षित, भ्रष्ट नी सत्तालोलपू नेत्यांचे वाभाडे काढतच राहू!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Mon, 04/28/2025 - 19:32
पण ते एकांगी कशाला? राजस्थान बाबतीत, तुम्ही गप्प... पश्चिम बंगाल बाबतीत, तुम्ही गप्प.... नुह बाबतीत, तुम्ही गप्प. संदेशाखाली बाबतीत, तुम्ही गप्प. बरे ते जाऊ द्या.... नागपूर मध्ये दंगल झाली, त्या बाबतीत पण तुम्ही गप्प. आता तर, भोपाळ येथे जे स्कँडल उघडकीस आले आहे.त्या बाबतीत तरी काही बोला... व्यक्तीद्वेष केला की माणूस, सामाजिक भान विसरून जातो. ही तर मूलभूत विचारसरणी आहे. अर्थात् तुम्ही पंचतंत्र न वाचल्याने, तुमची विचारसरणी चुकत आहे. कुणीही येऊन, तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून जाईल.इतके हलके होऊ नका... इथे खूप उत्तम माणसे आहेत, तुमच्या अशा बालीश बुद्धीमुळे, तुम्ही त्या माणसांपासून ज्ञान घेऊ शकत नाही आहात... अजूनही वेळ गेलेली नाही. आत्मपरीक्षण करा. आज तुमचे शिकायचे वय आहे. असेच आत्ममग्न राहिलात तर, बौद्धिक वाटचाल मंद होत जाईल. पटत नसेल तर सोडून द्या. आमचे काय, आज आहोत तर उद्या नाही. पण, कुणी हिंदू वाट चुकत असेल तर बघवत नाही...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्पष्ट उत्तराबद्दल धन्यवाद ! 2029 पर्यंत सुखी रहा, समाधानी रहा. ईश्वर तुमच्या मनास शांती प्रदान करो. 2029 नंतर बोलू.

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी Tue, 04/29/2025 - 00:09
कोणत्याही विषयावर धागा असूदे, कविता असू दे, क्रिकेटवर लेख असूदे . . . जेथे काही माहितगार चांगल्या माहितीचे आदानप्रदान करीत असतात, त्या विषयातील आपल्याला काहीही कळत नसले तरी हा माणूस तेथे जाऊन घाण करतोच. एखादी पंगत बसलीये, आनंदाने भोजन सुरू आहे, उदबत्त्यांचा सुवास दरवळतोय, हास्यविनोद सुरू आहे, आग्रह होतोय, लाजून उखाणे घेतले जात आहेत . . . अश्या ठिकाणी एखादा टमरेल घेऊन सर्वांदेखत तेथेच बसला तर कसा रसभंग होऊन किळस येईल, तसेच हा माणूस करतो. अनेकांनी अनेकदा सांगूनही, सदस्यत्व अनेकदा स्थगित होऊनही कणभरही बदल नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पूर्ण सहमत. ज्याप्रमाणे संजय राऊतला उबाठासेनेत त्यांच्या हितशत्रूंनी पेरले आहे असे वाटते त्याप्रमाणेच या सदस्यालाही मिपाच्या हितशत्रूंनी इथे पेरले आहे की काय ही शंका नेहमी येते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ज्याप्रमाणे संजय राऊतला उबाठासेनेत त्यांच्या हितशत्रूंनी पेरले आहे असे वाटते त्याप्रमाणेच या सदस्यालाही मिपाच्या हितशत्रूंनी इथे पेरले आहे की काय ही शंका नेहमी येते. नाही मला ज्याप्रमाणे भाजपची वाट लावायला नी भ्रष्टाना अभय द्यायला मोदी शहा हितशत्रुनी पेरलेत त्याप्रमाणे हितशत्रुनी पेरलेय. :)

श्रीगुरुजी Wed, 04/23/2025 - 13:44
कालच्या हत्याकांडाचे अत्यंत वाईट वाटले. या राक्षसांना गुहेत जाऊन जाळून टाकले पाहिजे. आता लष्कराला व्यवस्थित योजना आखण्यास सांगून त्यानुसार हल्ला करून पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग, काही महत्त्वाची शिखरे जिंकून घ्यावी. समोर दिसेल त्या सैनिकाला मारून टाकावे. पाकिस्तानने सर्व अतिरेकी स्वतःहून भारताच्या हवाली करावे इतका तीव्र हल्ला असावा. मला विश्वास आहे की लष्कर हल्ल्याची योजना आखत असणार.

In reply to by श्रीगुरुजी

आता लष्कराला व्यवस्थित योजना आखण्यास सांगून त्यानुसार हल्ला करून पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग, काही महत्त्वाची शिखरे जिंकून घ्यावी.
पण त्यापूर्वी तिकडच्या सगळ्या लोकांना हाकलून द्यावे आणि मगच पाकव्याप्त काश्मीरचा काही (किंवा सगळा) भाग ताब्यात घ्यावा. बांगलादेशात झाले त्याप्रमाणे आतापुरते तिकडचे लोक पाकड्यांच्या जोखडापासून मुक्तता केली म्हणून आपले आभार मानतील पण काही काळातच परत धर्माच्या नावावर एक होऊन आपली डोकेदुखी वाढवतील. स्वतः शेख मुजीबूर रेहमान जर पाकिस्तान या मुस्लिम देशाचा अणुकार्यक्रम सुरू झाला म्हणून आनंद व्यक्त करू शकत असतील आणि ज्याला बुचर ऑफ बांगलादेश म्हणायचे त्या टिक्काखानबरोबर हातमिळवणी करू शकत असतील तर पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांची काय कथा?

हवा डोळ्याला डोळा, गोळीला गोळी
आपल्या लेखनातल्या भावना पोहचल्या. आपल्यापैकी अनेक भावनिक झालेल्या भारतीयांना वाटतं की थेट पाकिस्तानवर आक्रमण केलं पाहिजे. पाकिस्तान अतिरेक्यांना पोसतो, त्यामुळे आता धाडसी कार्यवाही झाली पाहिजे. एकीकडे भारतीय मतदारांचा दबाव आणि दुसरीकडे जागतिक राजकारण त्याचे पडसाद कसे उमटतील या सर्वांचा अभ्यास करुन सरकार हळुहळु निर्णय घेईल. घटनेचा बदला म्हणून थेट आक्रमणाची शक्यता तशी अगदीच कमी आहे. भारताने पाच जे निर्णय घेतले त्यातले बरेच भविष्यात पुन्हा बदलावे लागतील असे वाटते. सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ स्थगीत केला आहे. आपण ते सर्व पाणी कसे अडवू शकतो त्यास किती काळ लागेल हे सांगता येत नाही. उपनद्या अडवता येतील त्यालाही किती वेळ लागेल सांगता येत नाही. पण, पाकचं नाक दाबणे हाही उपाय आहेच. भविष्यातील युद्ध हे पाणीबाणीवरुन अजून वाढू शकेल पण, सामान्य भारतीयांचा उद्वेग जो आहे तो उद्वेग अडवण्याचे हे निर्णय आहेत असे सध्या वाटते. पाकिस्तानी नागरीकांना परत पाठवणे, अटारी बॉर्डर बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची सूट, तो व्हीसा रद्द करणे, उच्च आयुक्तालयातील अधिका-यांची संख्या कमी करणे वगैरे हे सर्व भारत सरकारने घेतलेले तात्पुरते उपाय आहेत असे वाटते. कारण त्या सर्व निर्णयांना पाक सरकारनेही प्रत्युत्तर दिलेले दिसते. भारताच्या विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद, व्यापार बंद, वाघा बॉर्डर बंद वगैरे. आपण सर्व घटनाक्रम पाहिले तर, भारत सरकार जपून पावलं उचलतांना दिसत आहे. अतिरेक्यांची नाकेबंदी, संशयीत आणि पाठींबा देणा-या आणि संबंधितांची घरे उद्ध्वस्त करणे आणि त्यांचा खातमा करणे हे हळुहळु सुरु आहे असे दिसते. दुसरं अशा कोणत्याही घटनांचे चित्रण, माहिती-प्रसारणावर बंदी आणली आहे, त्यामुळे दहशतवाद्यांना कोणत्याही कार्यवाहीची माहिती होऊ नये. सध्या सर्व भारतीय सीमा सुरक्षा आवळणे आणि आत घुसलेल्या अतिरेक्यांचा खात्मा करणे हे पहिलं काम प्राधान्याने सुरु आहे असे दिसते. दुसरी एक शक्यता वाटते, बलुचिस्तानला स्वतंत्र होण्यास मदत करणे. पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणे. बॉर्डरवरची सर्व अतिरेकी तळ बेचीराख करणे हाच सर्वात सोपा मार्ग दिसतो आहे. काश्मीर जनतेचं पोट ज्या पर्यटनावर आहे, त्यामुळे त्यांची सहानुभूती पहिल्यांदा दिसत आहे, ही चांगली गोष्ट वाटली. अजूनही पाकिस्तानला सपोर्ट करणारे नसतील असे म्हणायचे आणि समजायचे कारण नाही, अशांची पाठवणी होईलच. पक्षराजकारण वेगवेगळं असलं तरी राष्ट्रीय संकटाला एकजूट होणे ही भारताची खासियत आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी Wed, 04/30/2025 - 07:33
कुणीही यावे आणी टपली मारून जावे अशी परिस्थिती झालीयं. अनेक भावनिक झालेल्या भारतीयांना वाटतं की थेट पाकिस्तानवर आक्रमण केलं पाहिजे. . भावनिक नसून अनुभवांती बोलतोय. युद्धाचे होणारे दूरगामी परिणाम चांगलेच. माहित आहेत. ऑपरेशन विजय,पराक्रम, ब्लू स्टार, पवन अनेक ऑपरेशन्स बघीतली आहेत. भाग घेतला आहे. काश्मिरी स्थानिक लोकांकडून सैनिक, पर्यटकांना मिळणारी बागणूक अनुभवली आहे. जागतिक राजकारण त्याचे पडसाद कसे उमटतील पाकिस्तान डबघाईस आले आहे. सुभं जळला पण पिळ कायम आहे.थोडा धक्का दिला तर..... चिन पाकिस्तानला मदत करून जगावर तिसरे महायुद्ध लादणार नाही .होणारे परिणाम तो जाणून आहे. जागतिक वातावरण अतिशय संवेदनशील झाले आहे. सध्या सर्वत्र भारतासाठी जागतिक कम्युनिटी फेवरेबल आहे याचा फायदा घेऊन जेव्हढी सफाई करता येईल तेव्हढी करावी. कमीत कमी काही दिवस तरी सरळ राहील. संपूर्ण जग आतिरेकी आणी आतंकवाद याने ग्रस्त आहे. पाकिस्तान ला कुणी दया दाखवेल,मदत करण्याची शक्यता खुप कमी आहे. आतंकवाद वेळीच रोखला नाही तर पुर्ण जग याचा बळी ठरेल याची कल्पना सर्वच देशांना आली आहे. अतिरेक्यांकडून मरण्यापेक्षा मारता मारता मरण्याची वेळ आली आहे. देशातील नेतृत्वाला कुठे थांबायचे हे माहीत आहे. युद्ध करून हा प्राॅब्लेम संपणार नाही पण काही दिवस थांबेल याची खात्री आहे. राजकारण, वैयक्तिक मतभेद थोडावेळ बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. ऐक्काहत्तर मधे भारताच्या मेहेरबानीवर जन्माला आलेला बांगलादेश कसे पांग फेडतोय हे आपण सर्व बघतच आहोत. इंदिराजींच्या मागे पुर्ण देश उभा होता हे जाणकारांनी विसरू नये. एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे पाकिस्तान विरुद्ध कारवाई ही अतंकवाद संपवण्यासाठी आहे ना की धर्म युद्ध आहे. पाकिस्तान राजकीय व सैन्य नेतृत्व नेहमीच भारत विरोधी कारवाई आणी प्रपोगंडा यावरच टिकून आहे यात कुणालाच शंका नसावी.

चौथा कोनाडा Wed, 04/23/2025 - 13:34
पुनश्च पेटवा मशाली जाळून टाका विषवल्ली बनू आता विश्वगुरू , नरसंहाराने विश्व शांतीची सुरवात करू......
पहेलगाम मधे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली व परिवारातील सर्व सदस्यांना सहसंवेदना. समयोचित रचना !

छान लिहलय कर्नल साहेब, मृतांना श्रद्धांजली. फिरायला गेलेले बिचारे मृत्यू घेऊन परत आलेत. भारताने ह्या हल्ल्याचा बदला घ्यायला हवा! इस्राइलचे १५०० मेले त्याबदल्यात आता पर्यंत ७० हजार मारुन बदला घेतलाहे नी अजूनही सुरूच आहे. आम्ही मात्र “कडीनिंदा” करून शांत बसू अशी शक्यता जास्तय!

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Sun, 04/27/2025 - 12:43
त्यांचा आय. डी. उडाला होता, तरी पण ते लोचटपणे इथेच लोंबकळत बसले आहेत... कधी माईच्या पदराला धरतात तर कधी आग्याचे धोतर पकडतात.... ज्याला स्वत्व नाही, ते असेल लोकांच्या हेटाळणीला पात्र असतात. इथे कुणीच त्यांना भाव देत नाही...

In reply to by प्रसाद गोडबोले

आम्ही तर लगेच जाऊ हो, आमचाई सैन्य सक्षम आहे, पण नेते असे पडलेत देशाच्या गळ्यात की काय सांगावे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Mon, 04/28/2025 - 16:20
इतिहास न वाचल्याचा परिणाम... अर्थात, तुम्ही अजून पंचतंत्र पण वाचलेले नाही, त्यामुळं तुम्हांला फ्रान्सचे सर्वसामान्य नागरीक आणि त्यांचा दुसऱ्या महायुद्धातील सहभाग तरी कसा काय समजणार? असो, आनंद आहे....

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पण नेते असे पडलेत देशाच्या गळ्यात की काय सांगावे?
बरं मग थोडा दम धरा, 2029 मध्ये निवडणुकीत त्या नेत्यांना सत्तेतून बाहेर खेचा, मग घ्या बदला बिदला. 2029 पर्यंत थोडी तरी कळ काढाल की नाही ? की 2029 पर्यंत मिसळपाव ह्या वेबसाईटवर, कोठल्याही लेखनवर स्वतःला वैचारिक अतिसार लागल्याचे प्रदर्शन करत राहणार आहात ? राजकारण , मोदी, भाजप, ह्यापलीकडे ही आयुष्य आहे , आणि ते सुंदर आहे . एन्जॉय करा राव . नाहीतर मग काय अयोध्या काशी वगैरे तीर्थाटन देखील अतिसार लागलेल्या अवस्थेत केल्यास त्यातून आनंद, समाधान लाभणार नाहीये.

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Mon, 04/28/2025 - 18:47
तुम्ही पण त्यांना समजावून सांगायला लागलात.... पण, ते व्यक्तीद्वेष करण्यातच धन्यता मानतात. त्या रोगाला औषध नाही...

In reply to by मुक्त विहारि

व्यक्तिद्वेष करू देत, काही हरकत नाही. पण किमान पुढच्या निवडणुकी पर्यंत तरी दम धरा. पण ते 2029 पर्यंत सतत आणि अखंड मिसळपाव वरील सर्वच लेखनात, प्रतिसादात हे असे "प्रदर्शन" करत राहणार आहेत का ? इतकाच माझा त्यांना प्रश्न आहे. बघू काय म्हणतात ते.

In reply to by प्रसाद गोडबोले

तूमची इच्छा पूर्ण होणार नाही आम्ही देशातील अशिक्षित, भ्रष्ट नी सत्तालोलपू नेत्यांचे वाभाडे काढतच राहू!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Mon, 04/28/2025 - 19:32
पण ते एकांगी कशाला? राजस्थान बाबतीत, तुम्ही गप्प... पश्चिम बंगाल बाबतीत, तुम्ही गप्प.... नुह बाबतीत, तुम्ही गप्प. संदेशाखाली बाबतीत, तुम्ही गप्प. बरे ते जाऊ द्या.... नागपूर मध्ये दंगल झाली, त्या बाबतीत पण तुम्ही गप्प. आता तर, भोपाळ येथे जे स्कँडल उघडकीस आले आहे.त्या बाबतीत तरी काही बोला... व्यक्तीद्वेष केला की माणूस, सामाजिक भान विसरून जातो. ही तर मूलभूत विचारसरणी आहे. अर्थात् तुम्ही पंचतंत्र न वाचल्याने, तुमची विचारसरणी चुकत आहे. कुणीही येऊन, तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून जाईल.इतके हलके होऊ नका... इथे खूप उत्तम माणसे आहेत, तुमच्या अशा बालीश बुद्धीमुळे, तुम्ही त्या माणसांपासून ज्ञान घेऊ शकत नाही आहात... अजूनही वेळ गेलेली नाही. आत्मपरीक्षण करा. आज तुमचे शिकायचे वय आहे. असेच आत्ममग्न राहिलात तर, बौद्धिक वाटचाल मंद होत जाईल. पटत नसेल तर सोडून द्या. आमचे काय, आज आहोत तर उद्या नाही. पण, कुणी हिंदू वाट चुकत असेल तर बघवत नाही...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्पष्ट उत्तराबद्दल धन्यवाद ! 2029 पर्यंत सुखी रहा, समाधानी रहा. ईश्वर तुमच्या मनास शांती प्रदान करो. 2029 नंतर बोलू.

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी Tue, 04/29/2025 - 00:09
कोणत्याही विषयावर धागा असूदे, कविता असू दे, क्रिकेटवर लेख असूदे . . . जेथे काही माहितगार चांगल्या माहितीचे आदानप्रदान करीत असतात, त्या विषयातील आपल्याला काहीही कळत नसले तरी हा माणूस तेथे जाऊन घाण करतोच. एखादी पंगत बसलीये, आनंदाने भोजन सुरू आहे, उदबत्त्यांचा सुवास दरवळतोय, हास्यविनोद सुरू आहे, आग्रह होतोय, लाजून उखाणे घेतले जात आहेत . . . अश्या ठिकाणी एखादा टमरेल घेऊन सर्वांदेखत तेथेच बसला तर कसा रसभंग होऊन किळस येईल, तसेच हा माणूस करतो. अनेकांनी अनेकदा सांगूनही, सदस्यत्व अनेकदा स्थगित होऊनही कणभरही बदल नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पूर्ण सहमत. ज्याप्रमाणे संजय राऊतला उबाठासेनेत त्यांच्या हितशत्रूंनी पेरले आहे असे वाटते त्याप्रमाणेच या सदस्यालाही मिपाच्या हितशत्रूंनी इथे पेरले आहे की काय ही शंका नेहमी येते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ज्याप्रमाणे संजय राऊतला उबाठासेनेत त्यांच्या हितशत्रूंनी पेरले आहे असे वाटते त्याप्रमाणेच या सदस्यालाही मिपाच्या हितशत्रूंनी इथे पेरले आहे की काय ही शंका नेहमी येते. नाही मला ज्याप्रमाणे भाजपची वाट लावायला नी भ्रष्टाना अभय द्यायला मोदी शहा हितशत्रुनी पेरलेत त्याप्रमाणे हितशत्रुनी पेरलेय. :)

श्रीगुरुजी Wed, 04/23/2025 - 13:44
कालच्या हत्याकांडाचे अत्यंत वाईट वाटले. या राक्षसांना गुहेत जाऊन जाळून टाकले पाहिजे. आता लष्कराला व्यवस्थित योजना आखण्यास सांगून त्यानुसार हल्ला करून पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग, काही महत्त्वाची शिखरे जिंकून घ्यावी. समोर दिसेल त्या सैनिकाला मारून टाकावे. पाकिस्तानने सर्व अतिरेकी स्वतःहून भारताच्या हवाली करावे इतका तीव्र हल्ला असावा. मला विश्वास आहे की लष्कर हल्ल्याची योजना आखत असणार.

In reply to by श्रीगुरुजी

आता लष्कराला व्यवस्थित योजना आखण्यास सांगून त्यानुसार हल्ला करून पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग, काही महत्त्वाची शिखरे जिंकून घ्यावी.
पण त्यापूर्वी तिकडच्या सगळ्या लोकांना हाकलून द्यावे आणि मगच पाकव्याप्त काश्मीरचा काही (किंवा सगळा) भाग ताब्यात घ्यावा. बांगलादेशात झाले त्याप्रमाणे आतापुरते तिकडचे लोक पाकड्यांच्या जोखडापासून मुक्तता केली म्हणून आपले आभार मानतील पण काही काळातच परत धर्माच्या नावावर एक होऊन आपली डोकेदुखी वाढवतील. स्वतः शेख मुजीबूर रेहमान जर पाकिस्तान या मुस्लिम देशाचा अणुकार्यक्रम सुरू झाला म्हणून आनंद व्यक्त करू शकत असतील आणि ज्याला बुचर ऑफ बांगलादेश म्हणायचे त्या टिक्काखानबरोबर हातमिळवणी करू शकत असतील तर पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांची काय कथा?

हवा डोळ्याला डोळा, गोळीला गोळी
आपल्या लेखनातल्या भावना पोहचल्या. आपल्यापैकी अनेक भावनिक झालेल्या भारतीयांना वाटतं की थेट पाकिस्तानवर आक्रमण केलं पाहिजे. पाकिस्तान अतिरेक्यांना पोसतो, त्यामुळे आता धाडसी कार्यवाही झाली पाहिजे. एकीकडे भारतीय मतदारांचा दबाव आणि दुसरीकडे जागतिक राजकारण त्याचे पडसाद कसे उमटतील या सर्वांचा अभ्यास करुन सरकार हळुहळु निर्णय घेईल. घटनेचा बदला म्हणून थेट आक्रमणाची शक्यता तशी अगदीच कमी आहे. भारताने पाच जे निर्णय घेतले त्यातले बरेच भविष्यात पुन्हा बदलावे लागतील असे वाटते. सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ स्थगीत केला आहे. आपण ते सर्व पाणी कसे अडवू शकतो त्यास किती काळ लागेल हे सांगता येत नाही. उपनद्या अडवता येतील त्यालाही किती वेळ लागेल सांगता येत नाही. पण, पाकचं नाक दाबणे हाही उपाय आहेच. भविष्यातील युद्ध हे पाणीबाणीवरुन अजून वाढू शकेल पण, सामान्य भारतीयांचा उद्वेग जो आहे तो उद्वेग अडवण्याचे हे निर्णय आहेत असे सध्या वाटते. पाकिस्तानी नागरीकांना परत पाठवणे, अटारी बॉर्डर बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची सूट, तो व्हीसा रद्द करणे, उच्च आयुक्तालयातील अधिका-यांची संख्या कमी करणे वगैरे हे सर्व भारत सरकारने घेतलेले तात्पुरते उपाय आहेत असे वाटते. कारण त्या सर्व निर्णयांना पाक सरकारनेही प्रत्युत्तर दिलेले दिसते. भारताच्या विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद, व्यापार बंद, वाघा बॉर्डर बंद वगैरे. आपण सर्व घटनाक्रम पाहिले तर, भारत सरकार जपून पावलं उचलतांना दिसत आहे. अतिरेक्यांची नाकेबंदी, संशयीत आणि पाठींबा देणा-या आणि संबंधितांची घरे उद्ध्वस्त करणे आणि त्यांचा खातमा करणे हे हळुहळु सुरु आहे असे दिसते. दुसरं अशा कोणत्याही घटनांचे चित्रण, माहिती-प्रसारणावर बंदी आणली आहे, त्यामुळे दहशतवाद्यांना कोणत्याही कार्यवाहीची माहिती होऊ नये. सध्या सर्व भारतीय सीमा सुरक्षा आवळणे आणि आत घुसलेल्या अतिरेक्यांचा खात्मा करणे हे पहिलं काम प्राधान्याने सुरु आहे असे दिसते. दुसरी एक शक्यता वाटते, बलुचिस्तानला स्वतंत्र होण्यास मदत करणे. पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणे. बॉर्डरवरची सर्व अतिरेकी तळ बेचीराख करणे हाच सर्वात सोपा मार्ग दिसतो आहे. काश्मीर जनतेचं पोट ज्या पर्यटनावर आहे, त्यामुळे त्यांची सहानुभूती पहिल्यांदा दिसत आहे, ही चांगली गोष्ट वाटली. अजूनही पाकिस्तानला सपोर्ट करणारे नसतील असे म्हणायचे आणि समजायचे कारण नाही, अशांची पाठवणी होईलच. पक्षराजकारण वेगवेगळं असलं तरी राष्ट्रीय संकटाला एकजूट होणे ही भारताची खासियत आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी Wed, 04/30/2025 - 07:33
कुणीही यावे आणी टपली मारून जावे अशी परिस्थिती झालीयं. अनेक भावनिक झालेल्या भारतीयांना वाटतं की थेट पाकिस्तानवर आक्रमण केलं पाहिजे. . भावनिक नसून अनुभवांती बोलतोय. युद्धाचे होणारे दूरगामी परिणाम चांगलेच. माहित आहेत. ऑपरेशन विजय,पराक्रम, ब्लू स्टार, पवन अनेक ऑपरेशन्स बघीतली आहेत. भाग घेतला आहे. काश्मिरी स्थानिक लोकांकडून सैनिक, पर्यटकांना मिळणारी बागणूक अनुभवली आहे. जागतिक राजकारण त्याचे पडसाद कसे उमटतील पाकिस्तान डबघाईस आले आहे. सुभं जळला पण पिळ कायम आहे.थोडा धक्का दिला तर..... चिन पाकिस्तानला मदत करून जगावर तिसरे महायुद्ध लादणार नाही .होणारे परिणाम तो जाणून आहे. जागतिक वातावरण अतिशय संवेदनशील झाले आहे. सध्या सर्वत्र भारतासाठी जागतिक कम्युनिटी फेवरेबल आहे याचा फायदा घेऊन जेव्हढी सफाई करता येईल तेव्हढी करावी. कमीत कमी काही दिवस तरी सरळ राहील. संपूर्ण जग आतिरेकी आणी आतंकवाद याने ग्रस्त आहे. पाकिस्तान ला कुणी दया दाखवेल,मदत करण्याची शक्यता खुप कमी आहे. आतंकवाद वेळीच रोखला नाही तर पुर्ण जग याचा बळी ठरेल याची कल्पना सर्वच देशांना आली आहे. अतिरेक्यांकडून मरण्यापेक्षा मारता मारता मरण्याची वेळ आली आहे. देशातील नेतृत्वाला कुठे थांबायचे हे माहीत आहे. युद्ध करून हा प्राॅब्लेम संपणार नाही पण काही दिवस थांबेल याची खात्री आहे. राजकारण, वैयक्तिक मतभेद थोडावेळ बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. ऐक्काहत्तर मधे भारताच्या मेहेरबानीवर जन्माला आलेला बांगलादेश कसे पांग फेडतोय हे आपण सर्व बघतच आहोत. इंदिराजींच्या मागे पुर्ण देश उभा होता हे जाणकारांनी विसरू नये. एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे पाकिस्तान विरुद्ध कारवाई ही अतंकवाद संपवण्यासाठी आहे ना की धर्म युद्ध आहे. पाकिस्तान राजकीय व सैन्य नेतृत्व नेहमीच भारत विरोधी कारवाई आणी प्रपोगंडा यावरच टिकून आहे यात कुणालाच शंका नसावी.
लेखनविषय:
आतंकवादी बेलगाम पुलवामा,पहलगाम....... होतच रहाणार कुठवर मानवतेचं कलेवर ॐ शांती म्हणत ओढत रहाणार रोज रोज कुठवर मरायचं XXX की औलाद, तोंडाला लागलयं रक्त भ्याड हल्ले बघत रहायचं कुठवर आसवं गाळायची कुठवर मेणबत्ती जाळायची एकजुट होणार,का? फक्त राजकिय पोळी भाजणार भळभळतीय जखम नकोय आता रकम,हवा डोळ्याला डोळा,गोळीला गोळी आतंक्यांची होळी,मगच पुरण पोळी नको अश्वासने नको वल्गना हवी गुरूवाणी,शिवगर्जना पुरे आता दया,क्षमा,शांती मिटवा एकदाची खाज त्यांची पुनश्च पेटवा मशाली जाळून टाका विषवल्ली बनू आता विश्वगुरू , नरसंहाराने विश्व शांतीची सुरवात करू......

स्मशान

अत्रुप्त आत्मा ·

चौथा कोनाडा गुरुवार, 10/03/2024 - 22:16
मराठी भाषेचा विजय विजय असो ! Mipamarathi0234 आजच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मिपाकर लेखक, कवि, भटकंतीकार, प्रवासवर्णनकार, मिपावाचक आणि मिपा विशेषांक कार्यकर्ते, संपादक मं आणि मिपा मालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !

चौथा कोनाडा गुरुवार, 10/03/2024 - 22:16
मराठी भाषेचा विजय विजय असो ! Mipamarathi0234 आजच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मिपाकर लेखक, कवि, भटकंतीकार, प्रवासवर्णनकार, मिपावाचक आणि मिपा विशेषांक कार्यकर्ते, संपादक मं आणि मिपा मालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !
लेखनविषय:
काव्यरस
शमशान . . . मुझे खुद में दिखाई दिए वो, जिन्हें मैं पागल समझता था ! एक दिन पता चला , वह साले बड़े सयाने थे ! धरम की अंधेरी खाइयों मे सेवादार बनके जीता हू । लोग जिन्हे श्रद्धा सुमन कहेते है उन्हे शराब बनाकर पीता हूँ आप हसोगे मुझे , कहोगे , "वाह क्या सच्चाई देखते हो ! " मै कभी आपको समझा नही सकूंगा , की मुझे झूठ भी कैसे ( ?) दिखाई देता है !? जिंदगी जीने के इस झमेले मे अब खुद को कुछ भी कभी नही कहूंगा जन्मा था इन्सान बन के फिर इन्सान होकर ही मरूंगा । ------------ अतृप्त . . .

मानवंदना, अनामिक कच्च्यापक्क्या भारतीय गुप्तच'वी'रास

माहितगार ·
भारताच्या एकात्मतेसाठी सीमेवर लढणार्‍या वीरांना मानवंदना नेहमीच देत असतो त्यांचे लढणे जसे समोर दिसते कौतुकही समोरून मिळते याच भारतीय एकात्मतेच्या लढायांना कानांची गरज असतेच गुपचरांच्या सगळकाही जीवन, कुटूंब, पणावर लावून कौतुकाचे दोन शब्दही लाभतील याची शाश्वती नसतानाही कधी आप्तस्वकीयांकडूनच नादान टिका ऐकुनही निष्ठेने कर्तव्य बजावणार्‍या अनामिक कच्च्यापक्क्या भारतीय गुप्तच'वी'रांनो स्विकाराव्या आमुच्या अनेक यशस्वीभव शुभेच्छा आणि साश्रू मानवंदना त्रिवार! त्रिवार!! त्रिवार!!! प्रेर्ना अर्थातच

सुटलेला डाव !

अत्रुप्त आत्मा ·
लेखनविषय:
काव्यरस
आज भांबावला दिस काही येई ना मनात अंधार व्यापलं आकाश उजेड उरे पणतीत ठरलेल्या अवसरी रान गेलंच उठून पक्षी शोधी रानमेवा पंख जाती हो थकून .

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

रापण.....

कर्नलतपस्वी ·

गवि Mon, 03/06/2023 - 15:50
रापण हा सामूहिक मासेमारीचा प्रकार आहे. टेहेळणी करणाऱ्या व्यक्तीला किनाऱ्यानजीक माशांच्या मोठ्या थव्याची हालचाल, खळबळ, चमचम दिसली की तो सर्वांना भोंगा किंवा तत्सम आवाज करून इशारा देतो आणि लगेच गावातले अनेक लोक एकत्र येऊन पाण्यात जाळे फिरवत फिरवत त्या कळपाला वेढतात. मग जाळ्याची टोके एकत्र करून ते किनाऱ्यावर उथळ पाण्यात अडकवतात. म्हणजे मासे मरत नाहीत. हळू हळू उपसत लागतील तसे विक्रीला काढता येतात. सौदे ठरवायला उसंत मिळते. सर्वांना एकसमान वाटा मिळतो. आता अजूनही ही पद्धत चालू आहे हे माहीत नव्हते. तुम्ही हल्लीच बघितली म्हणजे अजून चालू आहे. गंमत म्हणजे लहानपणी कोंकणात आम्ही पोरे क्रिकेट खेळताना कॅच सुटला की त्या फिल्डरला राप्या, रापू असे म्हणायचो. सोपा कॅच रापला असेही म्हणायचो.

कर्नलतपस्वी Mon, 03/06/2023 - 16:19
मार्क्स भौ,गवी भौ प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. यंत्रयुगात रापण हा पारंपारिक प्रकार आजही बघायला मिळाला. वयोवृद्ध अनुभवी रापणकर केळुसकर आणी नुकतीच मिसरूड फुटलेला नवशिका रापणकर संस्कार यांच्या बरोबर मनसोक्त गप्पा मारल्या. वागळी (स्टिंग रे) ,बांगडा,सुरमई, खेकडा असे मासे पण ओळखीचे झाले. बाकी मी शाकाहारी असल्याने अंबोळी,सोल कढी वरच समाधान मानले.

उपेक्षित Mon, 04/10/2023 - 10:51
इकडे गोयं मध्ये रापणीचे मासे म्हणजे खाणारे सगळे तुटून पडतात. इकडे अजूनही पारंपरिक पद्धत टिकून आहे. बाकी शुद्ध शाकाहारामुळे कधी खायचा संबंध आला नाही. जाता जाता - ३/४ महिन्यांपूर्वी आमच्या इकडे सांखळी ला १०० ला १५/२० बांगडे मिळत होते जागोजागी ;)

गवि Mon, 03/06/2023 - 15:50
रापण हा सामूहिक मासेमारीचा प्रकार आहे. टेहेळणी करणाऱ्या व्यक्तीला किनाऱ्यानजीक माशांच्या मोठ्या थव्याची हालचाल, खळबळ, चमचम दिसली की तो सर्वांना भोंगा किंवा तत्सम आवाज करून इशारा देतो आणि लगेच गावातले अनेक लोक एकत्र येऊन पाण्यात जाळे फिरवत फिरवत त्या कळपाला वेढतात. मग जाळ्याची टोके एकत्र करून ते किनाऱ्यावर उथळ पाण्यात अडकवतात. म्हणजे मासे मरत नाहीत. हळू हळू उपसत लागतील तसे विक्रीला काढता येतात. सौदे ठरवायला उसंत मिळते. सर्वांना एकसमान वाटा मिळतो. आता अजूनही ही पद्धत चालू आहे हे माहीत नव्हते. तुम्ही हल्लीच बघितली म्हणजे अजून चालू आहे. गंमत म्हणजे लहानपणी कोंकणात आम्ही पोरे क्रिकेट खेळताना कॅच सुटला की त्या फिल्डरला राप्या, रापू असे म्हणायचो. सोपा कॅच रापला असेही म्हणायचो.

कर्नलतपस्वी Mon, 03/06/2023 - 16:19
मार्क्स भौ,गवी भौ प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. यंत्रयुगात रापण हा पारंपारिक प्रकार आजही बघायला मिळाला. वयोवृद्ध अनुभवी रापणकर केळुसकर आणी नुकतीच मिसरूड फुटलेला नवशिका रापणकर संस्कार यांच्या बरोबर मनसोक्त गप्पा मारल्या. वागळी (स्टिंग रे) ,बांगडा,सुरमई, खेकडा असे मासे पण ओळखीचे झाले. बाकी मी शाकाहारी असल्याने अंबोळी,सोल कढी वरच समाधान मानले.

उपेक्षित Mon, 04/10/2023 - 10:51
इकडे गोयं मध्ये रापणीचे मासे म्हणजे खाणारे सगळे तुटून पडतात. इकडे अजूनही पारंपरिक पद्धत टिकून आहे. बाकी शुद्ध शाकाहारामुळे कधी खायचा संबंध आला नाही. जाता जाता - ३/४ महिन्यांपूर्वी आमच्या इकडे सांखळी ला १०० ला १५/२० बांगडे मिळत होते जागोजागी ;)
लेखनविषय:
त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी -प्रसिद्ध गझलकार अनिल कांबळे. - तारर्कर्लीच्या समुद्र किनाऱ्यावर भटकंतीचा आनंद घेतला.तेव्हां एक वेगळाच अनुभव आला. रापण,कोकणात कोळ्यांचा पारंपारिक मासेमारीचा व्यवसाय. यावेळेस बघायला मिळाला.जाळ्यात अडकलेल्या जलचरांची अवस्था बघून वरील गझल आठवली.काही ओळी सुचल्या त्या पंक्तीबद्ध करायचा प्रयत्न केला.याचे श्रेय मी गझलकारांना देईन. गझलकार अंत्यत संवेदनशील,प्रतिभावान.

अशीच एक धुंद, सोनेरी सायंकाळ - (आणि अंतिम वगैरे सत्य)

चित्रगुप्त ·

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 02/02/2023 - 11:37
कै च्या कै कविता!! एकदम मनोरंजक. मिपावर हॅश टॅग# एक धुंद सोनेरी/गुलाबी ,सकाळ्/संध्याकाळ सुरु झालाय की काय असे वाटुन गेले क्षणभर. कोs हं ? … मी कोण आहे ? मै कौन हूँ ? व्हू आयाम ? यावरुन पुलंच्या "आयाम द हु इन द यु इन द यु" (असामी असामी बहुतेक) ची आठवण झाली. बाकी ते तळ्याकाठी "तशा" मुली भेटतील असे वाटत नाही.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चित्रगुप्त गुरुवार, 02/02/2023 - 12:22
तळे तळे पे डिपेंड है बॉस. आपुन ने ऐसा तळा देखेला है. वैसे ये थोडी आपुनकीबी ष्टोरी है. आर आर आबा ने बंबईसे बारबाला लोगोंको भगाया था तब आपुन के गाव मे भी वो छोरियां आ गई थी. तब तळे पे होता था ये झमेला.

कर्नलतपस्वी गुरुवार, 02/02/2023 - 12:03
अशाच एका कातरवेळी ती मी आणी तळ्याचा किनारा निरव शांतता अन सुगंधित वारा ओ शाब, काय लाज शोरम बिरोम गुरखा दणादण शिट्ट्या वाजवीत होता.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 02/02/2023 - 11:37
कै च्या कै कविता!! एकदम मनोरंजक. मिपावर हॅश टॅग# एक धुंद सोनेरी/गुलाबी ,सकाळ्/संध्याकाळ सुरु झालाय की काय असे वाटुन गेले क्षणभर. कोs हं ? … मी कोण आहे ? मै कौन हूँ ? व्हू आयाम ? यावरुन पुलंच्या "आयाम द हु इन द यु इन द यु" (असामी असामी बहुतेक) ची आठवण झाली. बाकी ते तळ्याकाठी "तशा" मुली भेटतील असे वाटत नाही.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चित्रगुप्त गुरुवार, 02/02/2023 - 12:22
तळे तळे पे डिपेंड है बॉस. आपुन ने ऐसा तळा देखेला है. वैसे ये थोडी आपुनकीबी ष्टोरी है. आर आर आबा ने बंबईसे बारबाला लोगोंको भगाया था तब आपुन के गाव मे भी वो छोरियां आ गई थी. तब तळे पे होता था ये झमेला.

कर्नलतपस्वी गुरुवार, 02/02/2023 - 12:03
अशाच एका कातरवेळी ती मी आणी तळ्याचा किनारा निरव शांतता अन सुगंधित वारा ओ शाब, काय लाज शोरम बिरोम गुरखा दणादण शिट्ट्या वाजवीत होता.
अशाच एका धुंद, सोनेरी संध्याकाळी सहज फिरायला निघालो होतो सहज मंजे मुद्दामच … – मला स्वतःशीच मोठ्याने बोलण्याची खोड आहे – घरात उगाच तमाशा नको म्हणून बाहेर पडलो. नकळत पाय तळ्याकाठच्या शांत रस्त्यावर वळले – मनात तात्त्विक वगैरे विचार घोळत होते. कोs हं ? … मी कोण आहे ? मै कौन हूँ ? व्हू आयाम ? सोs हं ! … मी तो आहे. तो मी आहे. या साडेचार फुटी कुडीत अडकलेला - अविनाशी,अमर, स्वयंप्रकाशी आत्मा आहे मी निर्विकार चेतना आहे मी ब्रम्ह, मी सत्य, मी कैवल्य आहे मी कर्ता, मी भोक्ता, मी ज्ञाता आहे मी साक्षी, मी सर्वसाक्षी, मी निर्लिप्त- निखळ जाणीव आहे.

आज्जी गेलीय सोडून

चांदणे संदीप ·

कर्नलतपस्वी Wed, 06/15/2022 - 06:11
आज्जी आजोबा सगळ्यात जवळचे नाते. पेरू पासून ते मेरू पर्यंत सर्व गोष्टी त्यांच्या बरोबर शेअर करू शकतो. कवीता आवडली.

धर्मराजमुटके Wed, 06/15/2022 - 08:47
ओह ! शीर्षक वाचून मला मिपावरील आजी या आय डी ने मिसळपाव सोडले की काय अशी शंका आली.

In reply to by सस्नेह

कविता वाचून हाच प्रश्ण पडला होता. कोणती बरं अशी मजबुरी असेल आज्जीची की लेकराला असे सोडून दिले? पैजारबुवा,

गवि Wed, 06/15/2022 - 10:02
आवडली. कवितेचा आकार म्हणावा तर फार सुंदर आहे. हुरहूर लावणारा. पण अर्थ कळाला नाहीये. अर्थात अगदी टोकदार स्पष्ट अर्थ असलाच पाहिजे हे काही कविता या प्रकाराचं सौंदर्यस्थळ नव्हे. कवीला नेहमीच्या उघड इंटरप्रिटेशनपेक्षा (आजी या नातेवाईकाची मरणोत्तर आठवण) यापेक्षा वेगळंच काहीतरी सुचवायचं आहे असं वाटतं. भावंडांच्या उल्लेखाने हे अधिकच वाटते. आजीला परलोकात आधीच गेलेली भावंडे भेटून विचारतील, किंवा सर्वजण आहेत आणि दादाच गेलाय असे काहीसे विचित्र वाटले अधेमधे. पण हे न कळल्याने विचार चालू होतो. हेच कवितेचे यश.

आंबट गोड Wed, 06/15/2022 - 11:43
तर असे वाटतेय की हा दादा च परलोकात गेला..आजी आणि लहान भावंडांना सोडून!

चित्रगुप्त Wed, 06/15/2022 - 16:53
तीन-चारदा कविता वाचली. अतिशय आवडली. वाचकांनी वेगवेगळ्या कल्पना केल्या आहेत त्याही मननीय आहेत. कविता चुटपुट लावणारी आहे, हेच तिचे सौंदर्य, असेही म्हणता येईल. ज्या आजीने आजवर काबाडकष्ट करून (ज्यांचे आई-वडील देवाघरी गेलेले आहेत अश्या -) आपल्या लहान लहान नातवंडांना पाळले -पोसलेले आहे, तिचा सर्वात मोठा नातू आता कमावण्यालायक झालेला आहे, म्हणुन त्याला शहरात नेऊन, कुठेतरी कामावर लावून , किंवा नुस्तेच गर्दीच्या गाडीत बसवून ती निघून गेलेली आहे .... अशा त्या मोठ्या नातवाचे मनोगत या कवितेत व्यक्त झालेले आहे, असे मला वाटते. "मला सांगशील का ग ?" ... आणि पुन्हा भेटशील का ग ?" या दोन ठिकाणी "ग" वापरला आहे, पण "कुठे दादा आमुचा 'गे' ? हे वाचून भलतीच कल्पना मनाला शिवून गेली, आणि कवितेचा आणखीही 'तसला' एक अर्थ लावता येईल, असे वाटून गेले.

In reply to by चित्रगुप्त

गवि Sun, 06/19/2022 - 11:41
हो की.. मान गये!! जुन्या पिढीतल्या जुन्या विचारांत वाढलेल्या आजीला नसेल पटत हे. काढलंन घरातून बाहेर..

हुरहुर लावणारी कविता!! खाणारी तोंडे आणि कमाई यांचा मेळ बसत नसल्याने आजीने नातवाला कुठेतरी सोडुन दिले असेच प्रथम वाटले. पण ईतर प्रतिक्रिया बघुन असेही वेगवेगळे अर्थ निघु शकतात हे समजले.

गणेशा Sat, 06/25/2022 - 14:18
हळवे लिखान.. ---- उसवले मायधागे फाटले आकाश माझे.. तू निघून गेल्यावर विरले सुखाचे अस्तर --- गणेशा

कर्नलतपस्वी Wed, 06/15/2022 - 06:11
आज्जी आजोबा सगळ्यात जवळचे नाते. पेरू पासून ते मेरू पर्यंत सर्व गोष्टी त्यांच्या बरोबर शेअर करू शकतो. कवीता आवडली.

धर्मराजमुटके Wed, 06/15/2022 - 08:47
ओह ! शीर्षक वाचून मला मिपावरील आजी या आय डी ने मिसळपाव सोडले की काय अशी शंका आली.

In reply to by सस्नेह

कविता वाचून हाच प्रश्ण पडला होता. कोणती बरं अशी मजबुरी असेल आज्जीची की लेकराला असे सोडून दिले? पैजारबुवा,

गवि Wed, 06/15/2022 - 10:02
आवडली. कवितेचा आकार म्हणावा तर फार सुंदर आहे. हुरहूर लावणारा. पण अर्थ कळाला नाहीये. अर्थात अगदी टोकदार स्पष्ट अर्थ असलाच पाहिजे हे काही कविता या प्रकाराचं सौंदर्यस्थळ नव्हे. कवीला नेहमीच्या उघड इंटरप्रिटेशनपेक्षा (आजी या नातेवाईकाची मरणोत्तर आठवण) यापेक्षा वेगळंच काहीतरी सुचवायचं आहे असं वाटतं. भावंडांच्या उल्लेखाने हे अधिकच वाटते. आजीला परलोकात आधीच गेलेली भावंडे भेटून विचारतील, किंवा सर्वजण आहेत आणि दादाच गेलाय असे काहीसे विचित्र वाटले अधेमधे. पण हे न कळल्याने विचार चालू होतो. हेच कवितेचे यश.

आंबट गोड Wed, 06/15/2022 - 11:43
तर असे वाटतेय की हा दादा च परलोकात गेला..आजी आणि लहान भावंडांना सोडून!

चित्रगुप्त Wed, 06/15/2022 - 16:53
तीन-चारदा कविता वाचली. अतिशय आवडली. वाचकांनी वेगवेगळ्या कल्पना केल्या आहेत त्याही मननीय आहेत. कविता चुटपुट लावणारी आहे, हेच तिचे सौंदर्य, असेही म्हणता येईल. ज्या आजीने आजवर काबाडकष्ट करून (ज्यांचे आई-वडील देवाघरी गेलेले आहेत अश्या -) आपल्या लहान लहान नातवंडांना पाळले -पोसलेले आहे, तिचा सर्वात मोठा नातू आता कमावण्यालायक झालेला आहे, म्हणुन त्याला शहरात नेऊन, कुठेतरी कामावर लावून , किंवा नुस्तेच गर्दीच्या गाडीत बसवून ती निघून गेलेली आहे .... अशा त्या मोठ्या नातवाचे मनोगत या कवितेत व्यक्त झालेले आहे, असे मला वाटते. "मला सांगशील का ग ?" ... आणि पुन्हा भेटशील का ग ?" या दोन ठिकाणी "ग" वापरला आहे, पण "कुठे दादा आमुचा 'गे' ? हे वाचून भलतीच कल्पना मनाला शिवून गेली, आणि कवितेचा आणखीही 'तसला' एक अर्थ लावता येईल, असे वाटून गेले.

In reply to by चित्रगुप्त

गवि Sun, 06/19/2022 - 11:41
हो की.. मान गये!! जुन्या पिढीतल्या जुन्या विचारांत वाढलेल्या आजीला नसेल पटत हे. काढलंन घरातून बाहेर..

हुरहुर लावणारी कविता!! खाणारी तोंडे आणि कमाई यांचा मेळ बसत नसल्याने आजीने नातवाला कुठेतरी सोडुन दिले असेच प्रथम वाटले. पण ईतर प्रतिक्रिया बघुन असेही वेगवेगळे अर्थ निघु शकतात हे समजले.

गणेशा Sat, 06/25/2022 - 14:18
हळवे लिखान.. ---- उसवले मायधागे फाटले आकाश माझे.. तू निघून गेल्यावर विरले सुखाचे अस्तर --- गणेशा
लेखनविषय:
उशीराने आले ध्यानी एकटे गर्दीत बसून मला अनोळख्या देशी आज्जी गेलीय सोडून घरातून निघताना का बोलली ती नाही? तुला लेकरा घरात जागा उरलीच नाही आई बाबा गेल्यावर आज्जी तूच उरलेली कुणाकुणा पोसशील तूही आता थकलेली माझ्या इवल्या बहिणी आणि भाऊ लहानगे तुला आज्जी, म्हणतील कुठे दादा आमुचा गे? काय सांगशील त्यांना मला सांगशील का ग? आज्जी एवढ्याचसाठी पुन्हा भेटशील का ग? - संदीप चांदणे

(किती काळ तुडवायचे)

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा किती काळ झुलवायचे http://misalpav.com/node/50291

किती काळ तुडवायचे

खरे सांग केव्हा तुझ्या बंद ओठी साथीदारांचे नाव केव्हा उमटायचे किती घालायचे तुला टायरी अन किती वेळ पाण्यात बुडवायचे तुला कोठडी लागली आवडायला आम्ही रिमांड कितीदा मागायचे मळकट घोंगडे पुन्हा पांघरोनी तू मात्र बिनघोर झोपायचे अरे प्राक्तनाचे असे काय देणे तुजभोवती दिनभर नाचायचे कोर्टातही तू अससी मुक्याने माXXXX जजनाही किती काळ झुलवायचे कोपऱ्यात ढीग तुटक्या वेत छड्यांचा अजून किती काठ्यांना तोडायचे कितीदा करावे रफू शर्टाला कितीदा पुन्हा तुला