मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मत

मुराकामी

पाटिल ·

कॉमी 04/02/2022 - 22:33
मुराकामी आवडता लेखक म्हणता येण्याइतकी त्याची पुस्तकं वाचली नाहीयेत, पण एक कथासंग्रह वाचलाय तो खूप आवडलेला- आफ्टर द क्वेक. त्यातली हनी पाय ही गोष्ट तर अत्यंत आवडलेली. मुराकामीचं एखादं सणसणीत पुस्तक नुकतंच वाचलंय आणि मुरकामीबद्दल काय लिहू आणि काय नको असं झालंय असं हा लहानसा लेख वाचून वाटलं. मस्त असतं हे असं वाटणं.

लई भारी 04/02/2022 - 22:51
सुंदर लिहिलंय! एक छोटा कथासंग्रह वाचलाय आणि मुराकामी च्या साहित्याच्या रसास्वादाचे बरेच लेख. त्यामुळे नेहमीच आकर्षण राहिले आहे. बाकी एक विचार नेहमीच येत राहिलाय; बहुधा मुराकामी मूळ लेखन जपानी भाषेत करत असेल आणि आपण वाचतो ते इंग्रजी मध्ये असून इतकं भारी वाटत. मूळ भाषेत किती जबरदस्त असेल! तो फील आपल्याला येणे अशक्य आहे ना :-) भैरप्पा वाचताना पण असच वाटत नेहमी. अर्थात या सगळ्या अनुवाद करणाऱ्यांचे पण कौतुक करावे तितके थोडे.

पाटिल 05/02/2022 - 09:48
@कॉमी, मस्त असतं हे असं वाटणं >> :-)) खरंय. आफ्टर द क्वेक कथासंग्रह वाचलाय मी. चांगलाच आहे. त्याचा मराठी अनुवादही झालेला आहे. काफ्का ऑन द शोअर जरूर वाचून पहा. जबरदस्त प्रकार आहे. बाकी मग नॉर्वेजियन वूड, The wild sheep chase या ही आहेत, ज्या उत्तमच आहेत आणि आकाराने छोट्याही आहेत. द वाईंड अप बर्ड क्रोनिकल, 1Q84 या कादंबऱ्या थोर आहेत. पण एकसलग तीन चार बैठकींत संपण्यासारख्या नाहीत. प्रत्येकी जवळपास नऊशे पानांचा मजकूर आहे. @ लई भारी, अर्थात या सगळ्या अनुवाद करणाऱ्यांचे पण कौतुक करावे तितके थोडे.>> हो. मुराकामीच्या पुस्तकांना इंग्रजी अनुवादक फार चांगले लाभले आहेत. :-) भैरप्पांच्या पुस्तकांचे उमा वि. कुलकर्णींनी केलेले अनुवाद एकेकाळी भरभरून वाचले आहेत. त्यापैकी 'पर्व' 'मंद्र' आवडली होती. मात्र त्यांची 'काठ' ही कादंबरी विशेष आठवणीत आहे. त्यातल्या त्या प्राध्यापिका अमृता आणि सोमशेखर यांच्या प्रेमसंबंधांनी, फारच भारावून टाकले होते. नंतर एकदा २००८ साली वगैरे म्हैसूरला गेलो असताना, खास चामुंडा टेकडीवरही जाऊन आलो होतो. परंतु त्या कादंबरीतल्या भैरप्पांनी लिहिलेल्या जुन्या शांत चामुंडा टेकडीच्या परिसराची प्रतिमा उगाचच विस्कटून गेल्यासारखे वाटत राहिले होते नंतर.. पण चालायचंच. हे असं होतच असतं ना म्हणजे :-)

कॉमी 04/02/2022 - 22:33
मुराकामी आवडता लेखक म्हणता येण्याइतकी त्याची पुस्तकं वाचली नाहीयेत, पण एक कथासंग्रह वाचलाय तो खूप आवडलेला- आफ्टर द क्वेक. त्यातली हनी पाय ही गोष्ट तर अत्यंत आवडलेली. मुराकामीचं एखादं सणसणीत पुस्तक नुकतंच वाचलंय आणि मुरकामीबद्दल काय लिहू आणि काय नको असं झालंय असं हा लहानसा लेख वाचून वाटलं. मस्त असतं हे असं वाटणं.

लई भारी 04/02/2022 - 22:51
सुंदर लिहिलंय! एक छोटा कथासंग्रह वाचलाय आणि मुराकामी च्या साहित्याच्या रसास्वादाचे बरेच लेख. त्यामुळे नेहमीच आकर्षण राहिले आहे. बाकी एक विचार नेहमीच येत राहिलाय; बहुधा मुराकामी मूळ लेखन जपानी भाषेत करत असेल आणि आपण वाचतो ते इंग्रजी मध्ये असून इतकं भारी वाटत. मूळ भाषेत किती जबरदस्त असेल! तो फील आपल्याला येणे अशक्य आहे ना :-) भैरप्पा वाचताना पण असच वाटत नेहमी. अर्थात या सगळ्या अनुवाद करणाऱ्यांचे पण कौतुक करावे तितके थोडे.

पाटिल 05/02/2022 - 09:48
@कॉमी, मस्त असतं हे असं वाटणं >> :-)) खरंय. आफ्टर द क्वेक कथासंग्रह वाचलाय मी. चांगलाच आहे. त्याचा मराठी अनुवादही झालेला आहे. काफ्का ऑन द शोअर जरूर वाचून पहा. जबरदस्त प्रकार आहे. बाकी मग नॉर्वेजियन वूड, The wild sheep chase या ही आहेत, ज्या उत्तमच आहेत आणि आकाराने छोट्याही आहेत. द वाईंड अप बर्ड क्रोनिकल, 1Q84 या कादंबऱ्या थोर आहेत. पण एकसलग तीन चार बैठकींत संपण्यासारख्या नाहीत. प्रत्येकी जवळपास नऊशे पानांचा मजकूर आहे. @ लई भारी, अर्थात या सगळ्या अनुवाद करणाऱ्यांचे पण कौतुक करावे तितके थोडे.>> हो. मुराकामीच्या पुस्तकांना इंग्रजी अनुवादक फार चांगले लाभले आहेत. :-) भैरप्पांच्या पुस्तकांचे उमा वि. कुलकर्णींनी केलेले अनुवाद एकेकाळी भरभरून वाचले आहेत. त्यापैकी 'पर्व' 'मंद्र' आवडली होती. मात्र त्यांची 'काठ' ही कादंबरी विशेष आठवणीत आहे. त्यातल्या त्या प्राध्यापिका अमृता आणि सोमशेखर यांच्या प्रेमसंबंधांनी, फारच भारावून टाकले होते. नंतर एकदा २००८ साली वगैरे म्हैसूरला गेलो असताना, खास चामुंडा टेकडीवरही जाऊन आलो होतो. परंतु त्या कादंबरीतल्या भैरप्पांनी लिहिलेल्या जुन्या शांत चामुंडा टेकडीच्या परिसराची प्रतिमा उगाचच विस्कटून गेल्यासारखे वाटत राहिले होते नंतर.. पण चालायचंच. हे असं होतच असतं ना म्हणजे :-)
हारुकी मुराकामी हा सांप्रतकाळातला एक जिनीयस लेखक. त्याचा वाचकवर्ग जगभर पसरलेला. म्हणजे उदाहरणार्थ मुराकामीच्या एखाद्या कादंबरीत टोक्योमधल्या कुठल्यातरी खरोखरच्या ब्रिजचं, लायब्ररीचं किंवा अशाच कुठल्याशा स्थळाचं वर्णन असतं. आणि ते एवढं प्रत्ययकारी असतं की त्याचे वाचक नेटवर त्या स्थळासंबंधी व्हिडिओ किंवा फोटोज् शोधत राहतात..! त्याच्या कादंबऱ्यातली माणसं काही हिरो-बिरो नसतात. पण अशा सिंपलशॉट माणसांनाही मुराकामी फारच ताकदीने आपल्यापुढे पेश करतो.. कल्पनेच्या भल्यामोठ्या कॅनव्हासवर तो पात्रांना मनसोक्त खेळवतो. पात्रांसोबतच आपल्यालाही खेळवतो, जोखतो..!

लिहिणं

श्रीगणेशा ·

पाषाणभेद 30/12/2021 - 12:30
लिहीलेले अगदी मनापासून लिहीले ते लिहीतांना जे काय सायास करावे लागतात ते केवळ लिहून समजत नाहीत तर ते वाचून अन मग कागदावर लिहून दुसर्‍यांपर्यंत लिहीणे कसे समजेल याचे प्रयत्न करणे अन ते मिळाल्यानंतर त्यांनी उत्तरात काय लिहीले आहे ते उलट टपाली (पक्षी प्रतिसादात) मिळणे हा लिखाण श्रेष्ठ झाल्याची पावती असते असे कुणीतरी लिहीलेले (पक्षी आम्हीच) वाचल्याचे आठवल्याने लगोलग उलट टपाली (मी पयला प्रतिसाद) लिहीले व ते तुम्हास प्राप्त होवून आपणही यावर लिहावे असे लिहून मी दोन शब्द लिहून संपवतो. खरे तर लिहील्याने माणूस जास्त प्रगल्भ होत असतो. बोलणे अन लिहीणे यात जबाबदारीचे अंतर असते. बोलून माणूस मोकळा होतो. परिणाम क्षणीक असतात. परंतु लिहीलेले कायम राहणार असल्याचे बोलणार्‍याला समजत असते. त्यामुळे आपोआप जबाबदारीने लिहावे लागते. छान मनोगत लिहीले आहे.

In reply to by प्राची अश्विनी

श्रीगणेशा 01/01/2022 - 23:25
धन्यवाद प्राची अश्विनी _/\_ प्रतिसादाला उत्तर म्हणून फक्त धन्यवाद लिहिल्याने मूळ लिखाणाची जाहिरात वाटते खरी, पण इथे प्रतिसादही वाचनीय असतात, त्यामुळे त्यावर प्रतिसाद देणं प्राप्त आहे!

दाद(प्रतीसाद) देणं खूप महत्त्वाचं असतं..... यावर ऐक छोटे मुक्तक खुप पुर्वी लिहीले होते ते वेगळे शेअर करतो.

सौन्दर्य 04/01/2022 - 00:05
२००८ साली अमेरिकेत आल्यावर जवळचे कुटुंबीय सोडल्यास मराठी ऐकायला, बोलायला मिळत नव्हती. पुस्तके त्यांच्या वजनांमुळे खूप आणणे शक्य झाली नव्हती. त्यामुळे मराठीत संवाद साधण्याच्या आत्यंतिक इच्छेमुळे मित्रांना इमेलने विचार कळवायला लागलो. भूतकाळातील घटनांविषयी लिहू लागलो त्यातूनच काल्पनिक कथा लिहू लागलो. मित्रांनी, कुटुंबाच्या इतर मंडळींना ते आवडू लागलं. 'मैफिल-ए-मैत्र' नावाच्या एका ग्रुपवर लिहू लागलो, त्यातून एका मित्राने 'मिसळपाव' सुचवलं, मग येथेही लिहू लागलो. काही दिवाळी अंकात लेख प्रसिद्ध झाले. असं करता करता लिहू लागलो.

In reply to by सौन्दर्य

श्रीगणेशा 05/01/2022 - 01:51
धन्यवाद सौंदर्य _/\_ मीही सुरुवातीला आठवणी लिहिल्या (अजूनही बऱ्याचदा लिहितो) कारणं त्या लिहिणं बऱ्यापैकी सोपं जातं. मात्र इतरही बरंच काही लिहायचा प्रयत्न आहे.

राघव 04/01/2022 - 12:50
लिहिणं अगदी आतून धक्का मारून बाहेर येतं ना.. ते खूप समाधान देऊन जातं. या अनुषंगानं काही मागे लिहिलेलं - स्फुट: रचना!

In reply to by अनन्त्_यात्री

श्रीगणेशा 05/01/2022 - 02:11
धन्यवाद अनन्त्_यात्री _/\_ आपल्या कविता वाचून मराठी भाषा परत एकदा नव्याने शिकत आहे. त्यातील वेगळेपण, खोली आणि कल्पनाशक्ती प्रशंसनीय आहे _/\_

In reply to by राघव

श्रीगणेशा 05/01/2022 - 01:57
धन्यवाद राघव _/\_ स्फुट: रचना लेख खूप आवडला. लिहिण्याचा खूप बारकाईने विचार केला आहे त्यात _/\_ खरं आहे, आतून धक्का मारून आलेलं लिखाण अगदी नावीन्यपूर्ण, आणि स्वतःला समाधान वाटेल असंच असतं!

टर्मीनेटर 04/01/2022 - 18:31
मनोगत आवडले 👍 वाचनाची आवड आधी पासूनच असली तरी लिहिण्यातही आनंद मिळतो हा अनुभव मला मिपावरच मिळाला. जमेल तसं इथे काही बाही लिहीत असतो आणि मिपाकर त्यावर प्रतिसाद देऊन पुढे लिहिण्यासाठी माझा हुरूप वाढवत असतात त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत!

In reply to by टर्मीनेटर

श्रीगणेशा 05/01/2022 - 02:33
धन्यवाद टर्मीनेटर _/\_ आपण मिपाकरांनी दिलेला प्रतिसाद वाचून हुरूप आला आहे. सर्व मिपाकरांचे आभार! आणि प्रतिसादातून खूप काही वाचायला मिळालं!

In reply to by मुक्त विहारि

श्रीगणेशा 06/01/2022 - 00:08
धन्यवाद मुवि _/\_ आणि आजच्या आभासी जगात मिपावरील बरेच लेखक/वाचक स्वतःची खरी ओळख लपवत नाहीत याचेही विशेष कौतुक वाटते!

पाषाणभेद 30/12/2021 - 12:30
लिहीलेले अगदी मनापासून लिहीले ते लिहीतांना जे काय सायास करावे लागतात ते केवळ लिहून समजत नाहीत तर ते वाचून अन मग कागदावर लिहून दुसर्‍यांपर्यंत लिहीणे कसे समजेल याचे प्रयत्न करणे अन ते मिळाल्यानंतर त्यांनी उत्तरात काय लिहीले आहे ते उलट टपाली (पक्षी प्रतिसादात) मिळणे हा लिखाण श्रेष्ठ झाल्याची पावती असते असे कुणीतरी लिहीलेले (पक्षी आम्हीच) वाचल्याचे आठवल्याने लगोलग उलट टपाली (मी पयला प्रतिसाद) लिहीले व ते तुम्हास प्राप्त होवून आपणही यावर लिहावे असे लिहून मी दोन शब्द लिहून संपवतो. खरे तर लिहील्याने माणूस जास्त प्रगल्भ होत असतो. बोलणे अन लिहीणे यात जबाबदारीचे अंतर असते. बोलून माणूस मोकळा होतो. परिणाम क्षणीक असतात. परंतु लिहीलेले कायम राहणार असल्याचे बोलणार्‍याला समजत असते. त्यामुळे आपोआप जबाबदारीने लिहावे लागते. छान मनोगत लिहीले आहे.

In reply to by प्राची अश्विनी

श्रीगणेशा 01/01/2022 - 23:25
धन्यवाद प्राची अश्विनी _/\_ प्रतिसादाला उत्तर म्हणून फक्त धन्यवाद लिहिल्याने मूळ लिखाणाची जाहिरात वाटते खरी, पण इथे प्रतिसादही वाचनीय असतात, त्यामुळे त्यावर प्रतिसाद देणं प्राप्त आहे!

दाद(प्रतीसाद) देणं खूप महत्त्वाचं असतं..... यावर ऐक छोटे मुक्तक खुप पुर्वी लिहीले होते ते वेगळे शेअर करतो.

सौन्दर्य 04/01/2022 - 00:05
२००८ साली अमेरिकेत आल्यावर जवळचे कुटुंबीय सोडल्यास मराठी ऐकायला, बोलायला मिळत नव्हती. पुस्तके त्यांच्या वजनांमुळे खूप आणणे शक्य झाली नव्हती. त्यामुळे मराठीत संवाद साधण्याच्या आत्यंतिक इच्छेमुळे मित्रांना इमेलने विचार कळवायला लागलो. भूतकाळातील घटनांविषयी लिहू लागलो त्यातूनच काल्पनिक कथा लिहू लागलो. मित्रांनी, कुटुंबाच्या इतर मंडळींना ते आवडू लागलं. 'मैफिल-ए-मैत्र' नावाच्या एका ग्रुपवर लिहू लागलो, त्यातून एका मित्राने 'मिसळपाव' सुचवलं, मग येथेही लिहू लागलो. काही दिवाळी अंकात लेख प्रसिद्ध झाले. असं करता करता लिहू लागलो.

In reply to by सौन्दर्य

श्रीगणेशा 05/01/2022 - 01:51
धन्यवाद सौंदर्य _/\_ मीही सुरुवातीला आठवणी लिहिल्या (अजूनही बऱ्याचदा लिहितो) कारणं त्या लिहिणं बऱ्यापैकी सोपं जातं. मात्र इतरही बरंच काही लिहायचा प्रयत्न आहे.

राघव 04/01/2022 - 12:50
लिहिणं अगदी आतून धक्का मारून बाहेर येतं ना.. ते खूप समाधान देऊन जातं. या अनुषंगानं काही मागे लिहिलेलं - स्फुट: रचना!

In reply to by अनन्त्_यात्री

श्रीगणेशा 05/01/2022 - 02:11
धन्यवाद अनन्त्_यात्री _/\_ आपल्या कविता वाचून मराठी भाषा परत एकदा नव्याने शिकत आहे. त्यातील वेगळेपण, खोली आणि कल्पनाशक्ती प्रशंसनीय आहे _/\_

In reply to by राघव

श्रीगणेशा 05/01/2022 - 01:57
धन्यवाद राघव _/\_ स्फुट: रचना लेख खूप आवडला. लिहिण्याचा खूप बारकाईने विचार केला आहे त्यात _/\_ खरं आहे, आतून धक्का मारून आलेलं लिखाण अगदी नावीन्यपूर्ण, आणि स्वतःला समाधान वाटेल असंच असतं!

टर्मीनेटर 04/01/2022 - 18:31
मनोगत आवडले 👍 वाचनाची आवड आधी पासूनच असली तरी लिहिण्यातही आनंद मिळतो हा अनुभव मला मिपावरच मिळाला. जमेल तसं इथे काही बाही लिहीत असतो आणि मिपाकर त्यावर प्रतिसाद देऊन पुढे लिहिण्यासाठी माझा हुरूप वाढवत असतात त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत!

In reply to by टर्मीनेटर

श्रीगणेशा 05/01/2022 - 02:33
धन्यवाद टर्मीनेटर _/\_ आपण मिपाकरांनी दिलेला प्रतिसाद वाचून हुरूप आला आहे. सर्व मिपाकरांचे आभार! आणि प्रतिसादातून खूप काही वाचायला मिळालं!

In reply to by मुक्त विहारि

श्रीगणेशा 06/01/2022 - 00:08
धन्यवाद मुवि _/\_ आणि आजच्या आभासी जगात मिपावरील बरेच लेखक/वाचक स्वतःची खरी ओळख लपवत नाहीत याचेही विशेष कौतुक वाटते!
लिहिणं म्हणजे नेमकं काय आणि मी का लिहितो या प्रश्नांचं उत्तर शोधावसं वाटतं कधी कधी, आणि मी लिहायला घेतो. खरं तर, एवढं सांगून हे लिहिणं संपू शकतं एवढं सोपं आणि सहज आहे, किंवा असायला हवं, लिहिणं! एकटेपणा ते एकांत अशा प्रवासात सोबत म्हणून असेल कदाचित, लिहिणं मला जवळचं वाटलं. आणि लिखाणाशी झालेली मैत्री व जवळीक जास्त प्रकर्षाने जाणवली. मी पाहिलेलं आणि पाहत असलेलं भोवतालचं विश्व माझ्या शब्दात मांडणं, आठवणींमध्ये रमणं, आणि त्या लिहिणं मला भावलं.

गाव

अनुस्वार ·

सौंदाळा 20/12/2021 - 11:25
मस्तच लिहिलय प्रखर वास्तव, सगळीकडेच मागच्या २५-३० वर्षात झपाट्याने बदल झाले. ११९०-९५ पासून गुटखा आणि मागच्या दशकापासून सोशल मिडीयाने गावाचे गावपण हरवायला लागले.

तर्कवादी 20/12/2021 - 16:11
छान लिहिलंय.. खेडेगावाशी माझा प्रत्यक्ष संबंध फारसा नाही पण सगळे बदल वाईटच असतील असं मला वाटत नाही. खासकरुन स्त्रीशिक्षणाबद्दलचा दृष्टीकोन बदलला आहे असे मला काही नातेवाईकांकडे बघता जाणवते.

In reply to by तर्कवादी

अनुस्वार 20/12/2021 - 20:07
तुम्ही नशीबवान आहात. माझं गाव मराठवाड्यात आहे. आर्थिक मदतीपेक्षा संपूर्ण मराठवाड्याला वैचारिक चालना देणारी एखादी मोठी चळवळ लवकर उभी राहिली नाही तर नजीकच्या भविष्यकाळात हा भाग सरसकट दारिद्र्याचे दशावतार पाहील अशी परिस्थिती आहे.

श्रीगणेशा 20/12/2021 - 17:36
हूरहूर छान व्यक्त केली आहे. नॉस्टॅल्जिक वाटणं साहजिक आहे. गावच नाही तर सर्व काही बदललं आहे. चांगला बदलही आहे, जसं की मिसळपाव संकेतस्थळ :-)

In reply to by श्रीगणेशा

अनुस्वार 20/12/2021 - 20:14
'मिपा'च्या शहरी आणि ग्रामीण भागातील प्रसाराचा अंदाज घेण्यासाठी काहीतरी क्लृप्ती निघायला पाहिजे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

Bhakti 20/12/2021 - 20:33
पहिला भाग वाचताना छान वाटत होतं,दुसरा भाग वाचताना :( मी दोन आठवड्यांपूर्वीच हिवरे बाजारला जाऊन आले,तिथे एक पोपटराव आले आणि गावाचा कायापालट केला.डिसले गुरूजींनी झेडपी शाळा बदलली, चिकाटी असणारे सद्गुणी व्यक्ती पाहिजेत.

साहना 21/12/2021 - 01:47
बहुतेक गांवात सध्या संडास निर्माण झाले आहेत, पाणी पाईप ने घरी पोचत आहे. अनेक ठिकाणी वीज उपलब्ध आहेच पण काहींनी तर सोलर पॅनेल्स सुद्धा बसवली आहेत असे दृश्य नजरेस आले. बहुतेक मुले शाळेंत जात आहेत आणि विशेषतः स्त्रिया शाळेंत जात आहेत. स्त्री आरोग्याची साधने सहजपणे उपलब्ध होते आहेत. बहुतेक मुली ग्रॅज्युएट होण्याची स्वप्ने पाहत आहेत. दारू पिऊन पत्नीला मारहाण करण्याची प्रकारणे शून्य होत आहेत. बहुतेक स्त्रिया सुद्धा आता मर खाऊन गप्प राहत नाहीत. अनेकांना फार तर ३ मुले असतात. मुलीला नवऱ्याने त्रास दिला तर सरळ जाऊन घरी घेऊन येतात. बहुतेक प्रसूती सुरक्षित होत आहेत. बहुतेक मुलांना सर्व व्हॅक्सीन्स मिळतात त्यामुळे अपंगत्वाचे प्रमाण कमी झाले आहे. पुरुषांनी "ठेवलेल्या" बाईचे प्रमाण गांवात कमी झाले आहे. स्त्री मजुरांचे लैगिक शोषण कमी झाले आहे. अंधश्रद्धेपोटी गरिबांचे शोषण कमी झाले आहे. बदल हा काळाचा नियम आहे. आपले वय वाढते तसे नॉस्टॅल्जिक होणे साहजिक आहे पण बहुतेक बदल हे चांगल्या दिशेनेच आहे. आपण चुकीच्या गोष्टीवर फोकस करतो आणि चांगल्या गोष्टी आपल्या नजरेत पडत नाहीत. एके काळी कुठल्याही नेते मंडळींच्या चमच्यावर सुद्धा विनोद करणे कठीण होते आज काल साक्षांत शिळेसैनिक प्रमुख किंवा बाळ पेंग्विन ची खिल्ली लोक बिनधास्त उडवतात. > भाड्याची खोली, तिथे दाटीवाटीने राहणारे दोन जास्तीचे मित्र, ढोर मेहनत करून हातात येणारा मोजकाच पैसा आणि जगण्यासाठी परिस्थिती कशी नसावी याची यादी केली तर स्वत:ची रोजनिशी तयार व्हावी, असं आयुष्य जगताना या पोरांना दहा रुपयांच्या पुडीत मेंदूला तंद्रीत ठेवणारं काहीतरी सापडलं त्याकाळी लोक तंबाखू दारू आणि इतर व्यसने करत नव्हते काय ? बाहेरचा राग आपल्या पत्नी किंवा पोरांवर काढत नव्हते काय ? खोलीत दाटीवाटीने राहणारे पुरुष मित्र महिलांची छेड काढणे वगैरे घाणेरड्या गोष्टी चव घेऊन करत नव्हते काय ? WHO च्या रिपोर्ट प्रमाणे भारतांतील गुटखा सेवन आणि धूम्रपान ह्या दोघांचेही प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आहे. देशाच्या एकूण प्रौढ लोकसंख्येपैकी साधारण २६% लोक तंबाखू सेवन करतात. आधी हे प्रमाण जास्त होते. जुन्या पिढी पेक्षा नवीन पिढीत तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी आहे. पण लोकसंख्या वाढल्याने आणि सेवनाचे प्रकार बदलल्याने आम्हाला जास्त लोक तंबाखूच्या आहारी गेले आहेत असे वाटते ती गोष्ट वेगळी. > संन्यास न घेताही सारा गाव सफल योग्याचं जीवन जगत होता. शांती आणि समाधान पैशांपेक्षा कैक जास्त होतं तिथे. ह्याला काहीही आधार नाही. हे उगाच आपले "माझी ९९ वर्षाची आजी अतिशय पतिव्रता आहे हो" म्हणून ओरडण्यासारखे आहे. ज्याला पर्याय आहे आणि पर्याय असताना सुद्धा ज्याने सर्वत्र त्याग केला तो संन्यासी. नाहीतर तो फक्त दरिद्री. दारिद्र्याला उगाच संन्यासाची उपमा देऊन त्याला अलंकृत करणे चुकीचे आहे. गांवात आधी ज्याच्याकडे काहीच नव्हते त्याची धडपड रेडिओ साठी होती, रिडिओ आहे तो टीव्ही मिळवण्याचा मागे लागला होता. पायी चालणार सायकलचे स्वप्न पाहत होता आणि सायकल ने जाणारा स्कुटरचे. मजुरी करणाऱ्याला नोकरी आणि खाजगी करणाऱ्याला सरकारी नोकरीचा हव्यास होता. गावांत समाधान नव्हते तर होते ते दारिद्य. नवीन संधी निर्माण होतंच गावकर्यांनी मुक्तहस्ते त्यांचा स्वीकार केला आणि आपल्या आयुष्यांत सुख शोधले. चांगलेच झाले. बाबा रामदास (मूळ नाव रिचर्ड अल्पर्ट) ह्यांनी अगदी ह्याच विषयावर समर्पक लिहिले आहे : Is the vision of simple living provided by this village in the East the answer? Is this an example of a primitive simplicity of the past or of an enlightened simplicity of the future? So it is with the village. Its ecological and peaceful way of living is unconsciously won and thus is vulnerable to the winds of change that fan the latent desires of its people. Even now there is a familiar but jarring note in this sylvan village scene. The sound of static and that impersonal professional voice of another civilization — the radio announcer — cut through the harmony of sounds as a young man of the village holding a portable radio to his ear comes around a bend. On his arm there is a silver wrist watch, which sparkles in the sun. He looks at me proudly as he passes. And a wave of understanding passes through me. Just behind that radio and wristwatch comes an army of desires that for centuries have gone untested and untasted. As material growth and technological change activate these yearnings, they will transform the heart, minds, work and daily life of this village within a generation or two. Gradually I see that the simplicity of the village has not been consciously chosen as much as it has been unconsciously derived as the product of centuries of unchanging custom and tradition. The [villages] have yet to fully encounter the impact of technological change and material growth. When the [villages] have encountered the latent desires within its people, and the cravings for material goods and social position begin to wear away at the fabric of traditional culture, then it can begin to choose its simplicity consciously. Then the simplicity of the [villages] will be consciously won — voluntarily chosen. ---- पर्याय असून सेवेचे व्रत घेतलेले ते बाबा आमटे हे संन्यासी तर आमच्या गांवातील "होमलेस" गणोबा हे संन्यासी नसून नुसतेच दरिद्री. गणोबाला आज १०० दिले तर संध्याकाळी पर्यंत ते दारू आणि मटक्यावर उधळले जातील ह्यांत शंका नाही. Virginity is often lack of opportunity ही म्हण गांवातील दारिद्र्याचे उद्दात्तीकरणाला लागू पडते.

In reply to by साहना

सुबोध खरे 21/12/2021 - 09:39
असं कसं साहना ताई शहरात राहून भरपूर पैसा कमावल्यावर आपल्याला चार दिवस त्या मोबाईल लॅपटॉप लाऊडस्पिकर पासून दूर राहायला खेडी आणि गावे पूर्वीसारखीच विकासापासून दूर असायला नकोत का? एक दिवस बैलगाडी, झुणका भाकर, हुरडा आणि चुलीवरचं मटण खायला लांबच्या चुलत्याची अशिक्षित पण अगत्यशील बायको सगळ्यांनाच हवी आहे त्यावर तुम्ही असे पाणी फ़िरवताय? तुमचा तीव्र निषेध

In reply to by सुबोध खरे

अनुस्वार 21/12/2021 - 16:20
कदाचित आपण दोघांनी माझ्या निरिक्षणांचा वेगळा अर्थ घेतलेला दिसतोय. साहनाजी म्हणताहेत तसा बदल 'वास्तवात' होत असेल तर त्यावर गळा काढणारा अव्वल दर्जाचा नकारात्मक व्यक्ती असेल यात शंका नाही. सुधारणा आणि प्रगतीची आस नेहमीच प्रशंसनीय आहे. फक्त आहे त्यात 'बदल' होतोय म्हणून ते प्रगतिशीलच असेल याची खात्री नसते. काही बदल चुकले तर ते दुरुस्त करण्यासाठी शहरांकडे आर्थिक आणि भौतिक स्त्रोत तुलनेने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. गावांकडे तशी परिस्थिती नाही. एक उदाहरण देतो. माझं गाव आहे मराठवाड्यात. आमच्या भागात पिवळ्या बसगाड्यांच्या "CBSE पॅटर्न"च्या खाजगी इंग्रजी शाळांचे प्रचंड पेव फुटले आहे. अंगणवाडी ते दहावी. अंगणवाडीचे शुल्क कमीत कमी वर्षाचे ₹१०,००० आणि दहावीचे ₹२०-२५,००० च्या पुढे + कपडे (कमीत कमी २ प्रकारचे) + पुस्तके, दप्तर शाळेचेच हवे. शिक्षक इथलीच कुडमुडे इंग्रजी बोलू शकणारे डी.एड. वाली मंडळी. पुस्तके CBSCची नाही तर खाजगी प्रकाशनाची. या शाळेने पोरं काही विशेष हुशार होत नाहीत हे कळायला पाचवी-सहावी जाऊ द्यावी लागते. तोवर कुटुंबांची पाल्यांना शहरात शिक्षणाला पाठवायची आर्थिक क्षमता नष्ट झालेली असते. परिणामी पुढे बाहेर चांगल्या शिक्षणाची जी संधी मिळायची ती ही नष्ट होत आहे. हे केवळ एक उदाहरण आहे. शोधली तर मोठी यादी होईल. उदा. आमचे गाव १००% हागणदारीमुक्त असूनही तुम्ही सकाळी गावात यायचे टाळाल! (₹१०ह/वर्ष वगैरे आपणांस कमी वाटत असल्यास माझा मुळ लेख आणि प्रतिसाद निरर्थक रडगाणे आहे हे मी मान्य करतो.) WHO किंवा सरकारी अहवालावर विसंबून राहून सर्व काही आलबेल असल्याचे स्वप्नरंजन करणे चांगले आहे. पण त्यासाठी झोपायचं म्हणजे धृतराष्ट्राची नजर हवी. आमच्या गावात व्यसनाचे प्रमाण ३००-४००% टक्के वाढले असेल तर WHO चा अहवाल मला काय कामाचा? आपण 'असर' चा ग्रामीण शिक्षणाचा अहवाल पाहा. तसेच अहवालासाठी वापरलेली पद्धती ही तपासा, म्हणजे अहवाल किती सर्वसमावेशी आहे याचा अंदाज येतो. सुबोधजी, मी शाकाहारी आहे. त्यामुळे तुम्ही वर्णन केलेल्या पाहुणचाराच्या आठवणीने मी व्यथित होण्याचे कारण नाही. साहनाजींनी वर्णिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आल्या तर त्याहून सोन्याचा दिन दुसरा नाही. बाकी, हस्तिदंती मनोऱ्यांतून मनोहर चित्र पाहायला मलाही आवडेल पण तो मनोरा गावाच्या अस्थींवर उभा नसावा‌.

In reply to by अनुस्वार

श्रीगणेशा 21/12/2021 - 18:18
अनुस्वार, आपल्या खाजगी इंग्रजी शाळेच्या निरीक्षणाशी सहमत. पोटाला चिमटा घेऊन मुलांना इंग्रजी (नावाला फक्त) शाळेत पाठवायचा हट्ट करणारी कुटुंबे मी स्वतः पाहिली आहेत. त्यापुढे जाऊन, मुलाला शाळेत शिकवलेलं समजत नाही म्हणून शिकवणी वर्गातही गर्दी होत आहे. काही पालक तर मुलगा घरी अभ्यास करत नाही म्हणून शिकवणी वर्गाला पाठवत आहेत, काहीतरी डोक्यात जाईल म्हणून. प्रगतीच प्रगती आहे!

In reply to by अनुस्वार

श्रीगणेशा 21/12/2021 - 18:25
शहरातील समाज मुळातच विखुरलेला असणे अपेक्षित आहे. तुलनेने गावातील समाज बऱ्यापैकी एकत्र राहणारा, जगणारा, आपली संस्कृती जपणारा. त्यामुळे शहर आणि गाव अशी सरसकट तुलना करणे योग्य वाटत नाही. धागा लेखकांचं म्हणणं खोडून काढण्यायोग्य निश्चितच नाही.

In reply to by अनुस्वार

साहना 22/12/2021 - 01:13
शिक्षण ह्या विषयावर तुम्ही लिहिलेले पटते. पण ह्याचा संबंध बहुतांशी भारतीय सरकारच्या चुकीच्या आणि धांदात अन्यायी कायद्याशी आहे ज्यावर मी आधी खूप लिहिले आहे. सकस शिक्षणाचे ध्येय सोडून निव्वळ बेगडी आणि "हाऊ मे आय हेल्प यू मॅडम" वाली किर्यादांची (कोंकणी/ पोतुगीज शब्द) विंग्रजी शिकण्याच्या मागे अंधपणे धावणे ह्याचा बराच वाईट परिणाम ग्रामीण भागांतील लोकांवर होणार आहे. पण सहावीला शाळा सोडून घरी बसणे ह्या पेक्षा महागडी किर्यादांची इंग्रजी शिकणे जास्त चांगले नाही का ? सरकारी आकडे सुद्धा नजरअंदाज केले तरी शाळेंतून ड्रॉप होण्याचा दर आणि विशेषतः मुलींचा ड्रॉप होण्याचा दर खूपच कमी झाला आहे हे सुद्धा पाहायला नको का ? त्याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल. येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.

In reply to by साहना

Bhakti 22/12/2021 - 08:35
ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल
बापरे!!

In reply to by साहना

अनुस्वार 22/12/2021 - 11:12
ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल.
आपल्या माणसांचा स्टाॅक एवढ्या सहजासहजी मुर्खात काढून बाजूला नाहीना करता येत साहनाजी. मानवी इतिहासात खेडी समाजजीवनाचा पाया राहिली आहेत आणि राहतील. उदा. कितीही मोठा फॅशन डिझाईनर असला तरी कापूस पिकवणारे शेतकरी आणि विणनारा कारागीर यांच्याशिवाय त्याची किंमत शून्य असते‌, नंतरच्या दोघांचे बाजार मूल्य कमी असले तरी. त्यामुळे ग्रामरुपी आत्मा नष्ट झाला की शहरांचा जीव जायला वेळ लागणार नाही. किंबहूना दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेदेकरून (simultaneously) होतील.
सरकारी आकडे सुद्धा नजरअंदाज केले तरी शाळेंतून ड्रॉप होण्याचा दर आणि विशेषतः मुलींचा ड्रॉप होण्याचा दर खूपच कमी झाला आहे हे सुद्धा पाहायला नको का?
संख्यात्मक सुधारणा मान्यच. परंतु गुणात्मक फरक पडेना हे सरकारी अहवालच सांगत आहेत.
येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.
भारतीय शहरांची (संख्येने) वाढ होणार नाही तर आहे तीच शहरे विक्राळ रूपात पसरतील. भारतातील "गरिबीचे शहरीकरण" (Urbanization of Poverty) हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. मला वाटतं मूळ लेखाकडे ग्रामीण किंवा शहरी परिप्रेक्ष्यातून पाहण्यापेक्षा समाजाच्या (कारण इच्छा असली तरी अंतिमतः तो शहरी-ग्रामीण असा वेगळा करताच येत नाही) एका सदृढ अंगाची (आपल्यावर प्रभाव पाडणारी) रोगराई असे पाहिल्यास प्रश्न समजून घेण्यास आणि उत्तरे शोधण्यास मदत होईल.

In reply to by साहना

सुबोध खरे 22/12/2021 - 11:28
त्याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील १०० टक्के चुकीचे गृहीतक आहे. हे गृहीतक बरोबर असते तर शहरातील झोपड्यात राहणारे सगळेच लोक हुशार असायला पाहिजेत. आणि मुम्बईच्या महापालिकेच्या शाळेतील मुले बोर्डात यायला पाहिजे होती. असं अजिबातच नाही. बहुसंख्य लोक गावातून केवळ "जगायला" ( पोट भरण्यासाठी) बाहेर पडतात. गावात नोकरीच्या संधी नगण्य असतात. मागच्या काही पिढ्यात एकाएकाला चार पाच पोरं झाल्यामुळे शेतीचा केवळ छोटासा तुकडा वारसाहक्काने येतो तो दोन वेळचे पोट भरायला मुळीच पुरत नाही म्हणून अनेक तरुण आपले गाव सोडून शहरात येतात. त्याचा हुशारीशी असा संबंध जोडणे साफ चूक आहे.

In reply to by साहना

तर्कवादी 22/12/2021 - 20:27
याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल. येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.
म्हणजे शहरात जाणारे हे हुशार - गावात राहणारे कमी हुशार , किंबहूना त्याहून पुढे जावून मुर्ख.. आणि मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्ख.. वा ... वा... म्हणजे आपला गाव न सोडणारे म्हणजे फारतर सामान्य बुद्धीमतेचे कुणी असेल तर त्यांची गणना मुर्खांत करायची मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्खच निपजणार असे समजायचे. हसावे की रडावे तेच कळत नाही (परदेशी न जाता भारतात राहून काम करणारा सामान्य (किंवा मुर्ख) आय टी प्रोफेशनल ) तर्कवादी

साधं टुमदार, गणपती पुळे आता पर्यटन स्थळ झाले आहे... मोबाईल, टीव्ही यांचा वापर कशासाठी करायचा? हे भान नसेल तर, घरीघरी भस्मासुरच तयार होतात ... शूद्ध हवा सोडली तर, गावांत राहणे कठीणच झाले आहे. शहरांत निदान थोडाफार तरी ध्वनी प्रदूषणावर कंट्रोल आहे, गावांत तर तेही नाही ...

चौथा कोनाडा 21/12/2021 - 17:38
सही लिहिलंय ! +१ देऊळ सिनेमा आठवला ! जगण्याच्या कल्पना दिवसागणिक बदलत गेल्या त्या १९८५-९० नंतर .... अन बदलांचा वेगही वाढत गेला. जुने मागे पडत चालले ........ शांत, स्थिर जीवनाचा पाया सैलावत गेला. व्यसने चारी अंगानी वेढू लागली, तीच लाईफ-स्टाईल म्हणून मान्यता पावली ! यातनं कसं स्वतःला जपायच, आधूनिक होता होता काही अंगानी पारंपारिक कसं रहायचं हे आपल्या वरच (वैयक्तिक) अवलंबून आहे ! कालाय तस्मै नम: _/\_

In reply to by चौथा कोनाडा

अनुस्वार 21/12/2021 - 21:30
रील बनवण्यात, नशा‌ करण्यात यांना काही आनंद मिळतोय असंही नाही. पण या गोष्टींचा भडिमार एवढा ताकदवान आहे की जो तो या दिखाऊ आनंदाला मिठी मारतोय. अगदी ताजे उदाहरण: बेळगावातल्या घटनेचा निषेध म्हणून अगदी छोट्या खेड्यापाड्यांतही राजांच्या पुतळ्याला दुधाने अंघोळ घालण्याचे कार्यक्रम चालू आहेत. तिथे जमा होणाऱ्या ९०% जनतेला बेळगाव कुठे आहे हे माहिती नसेल आणि त्यातल्याही ९०% ना पुढे आयुष्यभर ते माहित होण्याचा संभव नाही. पण 'बाकीच्यांचे स्टेटस येत आहेत मग आपण मागे का रहायचं?' एवढाच त्यामागे विचार (विचाराच्या व्याख्येत बसत असल्यास)!

जेम्स वांड 22/12/2021 - 09:39
आपण पाहत असलेलं गाव एक प्रतिमा होऊन घट्ट रुजलेलं असतं मनात, ते आपलं संचित. आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो, हळूहळू रोजीरोटीत व्यस्त होतो, पीएफ, घर बांधणी/ फ्लॅट खरेदी, पोरांची शिक्षणे ह्या रगाड्यात गावच्या चकरा कमी होतात, दरवेळी जाताना नवीन नवीन बदल दिसतात, आधीच अनोळखी शहरात स्वतःची ओळख बनवून एका कोपऱ्यात सेटल व्हायला आतुर आपल्याला इनसिक्युरिटी वाटणे साहजिक होते कारण आपल्या मनात "आपलं" असलेलं गाव बदलत असतं, साहजिक आहे ते फक्त कालाय तस्मै नमः म्हणून घडत असलेले बदल बघत राहणे हेच काय ते आपण करू शकतो.

In reply to by जेम्स वांड

अनुस्वार 22/12/2021 - 11:17
आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो, हळूहळू रोजीरोटीत व्यस्त होतो, पीएफ, घर बांधणी/ फ्लॅट खरेदी, पोरांची शिक्षणे ह्या रगाड्यात गावच्या चकरा कमी होतात, दरवेळी जाताना नवीन नवीन बदल दिसतात.
सगळं समोर घडत आहे म्हणून मन अस्वस्थ होतं.

आता मागे वळुन पहाता असे लक्षात येते की निरंतर समाज हळू हळू बदलत होता.गावात एक अलिखित नाते संबंध होते. बलुतेदारी जवळपास संपत आली होती पण तरीही दिवाळीच्या पणत्या, संक्रांतीची सुगडं , सणासुदीला पतरावळी द्रोण घरपोच होत होते .गुरविणीचा नैवेद्य नेमाने वाढला जात होता अमावस्येला आवस वाढा बाई आस ऐकताच पिठ, तेल, लाल मिरच्या लेकी, सुना वाढत होत्या. सुया घे, बिब्ब घे आशी हाक देणारी गंगू वैदिण सागरगोटे, सालम मिश्री, सफेद मिश्री पण देत होती.ह्या सगळ्या गोष्टी संपत चाललेल्या बलुतेदारी च्या पुसट खूणा आमच्या पिढीला दिसल्या. अजुनही नवरात्रात देवी चा भुत्या दिवटी बुदली घेऊन तेल मागायला येत होता. "बाजीराव नाना तुम्ही लग्नाला चला" म्हणत दिवाळी, होळीला सोंग घेऊन येणारा सोंगाड्या, देवळात रामनवमी, हनुमान जयंती, कृष्ण जन्माष्टमी निमित्त किर्तन, चातुर्मासात प्रवचन, काकडा आरती हेच समाज मनोरंजनासाठी होते. गावातील यात्रा, तमाशाचा फड, कुस्तीचा आखाडा हाच विरंगुळा असे तर आर्थिक उलाढाल होत असे. जत्रा, गाड्यांच्या शर्यती, कुस्तीच्या स्पर्धा आणी तमाशा यावेळेस गावगाड्याच्या आर्थिक उलाढाल होत असे. दिव्याची आवस खुप जोरात साजरी होत असे. बैलपोळा अजुनही आठवतो. घायपताच्या पाताचा आसूड, कावेने रंगवलेली मातीचे बैल मुलांचे खास आकर्षण असायचे. वर्षाचे सण ,परंपरा ,कुळधर्म हौसेने साजरे होत होते. सडा, रांगोळी पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर नागरमोथा व रिठ्याच्या बिया शोधून त्याचा उपयोग शिककई बरोबर केस धुण्यासाठी वापरत होते. हाच त्या काळात "सन सिल्क व पँन्टिन " होता. गावोगावी अजुनही विज पोहोचली नव्हती. चिमणी, किंवा कंदील प्रत्येक घरातून पेटायचे. चौकात दिव्याच्या खांबावर ग्रामपंचायतीचा कर्मचारी संध्याकाळी रॉकेलचा डबा व बांबू ची शिडी घेऊन दिवा पेटवत असे. दवंडी हा प्रकार पब्लिक कम्युनिकेशन करता मुख्य साधन होते.आताच्या मोबाईलच्या पिढीला सांगितले तर ते त्यांना खरे वाटत नाही. बाबा तुम्ही काहितरी सांगता आसे म्हटले जाते. असे असताना त्याचबरोबर रेडिओ, टुरींग टाकिज आणि गणपतीच्या दहा दिवसांत सिनेमा ह्या नवीन बदलाची नांदी सुरू झाली. पक्की सिनेमागृहे, मिनी थिएटर्स,टेप रेकॉर्डर, टेलिव्हिजन, संगणक ,मोबाईल माँल असे अनेक बदल होत गेले. कौलारू घरं केव्हा सिमेंटच्या जंगलात गुडूप झाली कळलेच नाही. पुजा, संध्या,शुभंकरोती,श्रावणातली व्रतवैकल्ये, सत्यनारायण, सहस्त्र आवर्तने वाडवडिलानीं सांगीतले आणी कुठलाही प्रश्न न विचारता आम्ही करत गेलो. आज मात्र नातवांच्या प्रश्नानां उत्तर देताना नाकी नऊ येते. ज्या गणेशाला वंदन करून शिक्षणाचा श्रीगणेशा केला तर त्याच गणेशाला आताची पिढी " ओ माय फ्रेंड गणेशा" नावाची मालीका बघत आहे. कीर्तन ते कार्टुन आसे आयुष्य जगलेले आम्ही गावाकडे शेत, घर ,नातेवाईक मंडळी आशी काहीही नाळ ऊरली नाही तरी आजुनही वेळ मीळाला की गावाकडं पळतो. अजून सुद्धा माणूसकीच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसून येतात. जुने शाळकरी वाट बघतात. गाव बदलतयं चांगली गोष्ट आहे. गावाकडची माणसं व्यवहार कुशल पण अधुनीकतेच्या जगात त्यानां गावंढळ समजणं चुक वाटतं. गेलो होतो गावाकडं शोधत होतो पाऊलखुणा नदीकाठी होता उभा म्हातारा वड केविलवाणा हिरवगाऱ टुमदार गाव नाव त्याच होतं खेड सय येता गावाची मन अजुनही होतं वेडं......

In reply to by कर्नलतपस्वी

अनुस्वार 22/12/2021 - 21:23
मी फक्त सागरगोटे आणि काऊने (काव) रंगवलेले मातीचे बैल पाहिले आहेत. बाकी मला गोष्टी नवीनच. धन्यवाद. ‌

गेले वर्ष दीड वर्ष एका हिलस्टेशन जवळच्या निसर्गरम्य गावी राहतोय. इथल्या वास्तव्यावर आधारित माझी निरीक्षणे: (१) आठवड्यातून किमान एकदा दिवसाचे ४-५ तास व पाऊस / वादळ असल्यास २४ -३६ तास वीज पुरवठा बंद असतो. (२) सण, समारंभ, लग्न, वाढदिवस यापैकी कोणत्याही निमित्ताने कानठळ्या बसतील अशा आवाजात मराठी/हिंदी/पंजाबी/ गाणी जवळपासचे साधेभोळे गावकरी सकाळी ६ ते रात्री १२ या वेळात कधीही लावतात. जवळच एक "डेस्टिनेशन वेडिंग रिसाॅर्ट व प्री वेडिंग फोटो शूटचा स्टुडिओ" मोठ्या झाडांची कत्तल करून मोकळ्या केलेल्या जागेत चालू झालाय. तिथे येणारी शहरी गिर्‍हाइकेही ध्वनीप्रदूषणाच्या महत्कार्याला इमाने इतबारे हातभार लावतात. शिवाय वीज नसल्यास कानठळ्या बसविण्याच्या अंगीकृत कार्यात खंड पडू नये म्हणून डीझल जनरेटर सेट्स मुक्तपणे वापरले जातात. जवळपासचे अनेक सेकंडहोम वाले मिळकत वाढावी म्हणून आपली घरे शहरातल्या पिकनिकर्सना भाड्याने देतात. हे पिकनिकर्स दारूच्या अंमलाखाली वावरताना दिवसरात्र म्युझिक सिस्टीमच्या peak performanceचा आनंद लुटतात. ध्वनीप्रदूषण ही संकल्पनाच स्थानिक पोलिसांसकट कोणालाही माहिती नसल्याने पोलीस कंप्लेंटही निरर्थक ठरते. (३) घरकामासाठी नोकर मिळणे व मिळाल्यास तो/ती नियमित कामावर येणे दुरापास्त आहे. (४) सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे लोक बर्‍याच मिनतवार्‍या केल्यावर काम करतात पण कामाचा दर्जा अतिशय खराब. (५) कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे बहुतांश गावकरी आपापला कचरा आपापल्या सवडीने स्वत:च्या घराजवळ जाळून टाकतात. "निसर्गरम्यता गेली खड्ड्यात, आपले शहरच बरे" ही भावना जेव्हा बळावते तेव्हा मग काही दिवस मुंबईतल्या घरी ४-८ दिवस राहून तिथल्या शांततेला कंटाळलो की इथल्या गदारोळात ,कमी प्रदूषित हवेसाठी, गावी परत येतो.

In reply to by अनन्त्_यात्री

Trump 22/12/2021 - 16:14
अगदी अगदी. पोरे बीए, बारावी होउन घरी बसणे पसंत करतील, पण असे काम करनार नाहीत.
सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे लोक बर्‍याच मिनतवार्‍या केल्यावर काम करतात पण कामाचा दर्जा अतिशय खराब.

तर्कवादी 22/12/2021 - 16:57
अनुस्वार जी, लेख आधी मला काहीसा एकांगी वाटला होता. पण तुमचे इतर प्रतिसाद वाचून दिसतंय की तुम्ही खेडे गावाशी जोडलेले आहात त्यामुळे तुम्हाला तिथली सामाजिक परिस्थिती अचूक माहित आहे. प्रत्यक्ष जोडलेले असल्याने आलेली समज अर्थातच कुठल्यातरी जागतिक अहवालांपेक्षा अधिक वास्तववादी असणार यात वाद नाही. आधीच्या एका प्रतिसादात लिहिले त्याप्रमाणे माझा खेडे गावाशी प्रत्यक्ष संबंध नाही पण मला ग्रामीण समाज जीवनाबद्दल कुतुहल आहे. तुम्ही विविध पैलूंवर अधिक विस्ताराने लिहावे ही विनंती.

In reply to by तर्कवादी

अनुस्वार 22/12/2021 - 21:44
काही प्रतिसादांवरून आणखी लिहण्याची निकड प्रकर्षाने जाणवली. आता एक-एक बाजू समजून घेण्याच्या दृष्टीने लिहिल. धन्यवाद.

सौंदाळा 20/12/2021 - 11:25
मस्तच लिहिलय प्रखर वास्तव, सगळीकडेच मागच्या २५-३० वर्षात झपाट्याने बदल झाले. ११९०-९५ पासून गुटखा आणि मागच्या दशकापासून सोशल मिडीयाने गावाचे गावपण हरवायला लागले.

तर्कवादी 20/12/2021 - 16:11
छान लिहिलंय.. खेडेगावाशी माझा प्रत्यक्ष संबंध फारसा नाही पण सगळे बदल वाईटच असतील असं मला वाटत नाही. खासकरुन स्त्रीशिक्षणाबद्दलचा दृष्टीकोन बदलला आहे असे मला काही नातेवाईकांकडे बघता जाणवते.

In reply to by तर्कवादी

अनुस्वार 20/12/2021 - 20:07
तुम्ही नशीबवान आहात. माझं गाव मराठवाड्यात आहे. आर्थिक मदतीपेक्षा संपूर्ण मराठवाड्याला वैचारिक चालना देणारी एखादी मोठी चळवळ लवकर उभी राहिली नाही तर नजीकच्या भविष्यकाळात हा भाग सरसकट दारिद्र्याचे दशावतार पाहील अशी परिस्थिती आहे.

श्रीगणेशा 20/12/2021 - 17:36
हूरहूर छान व्यक्त केली आहे. नॉस्टॅल्जिक वाटणं साहजिक आहे. गावच नाही तर सर्व काही बदललं आहे. चांगला बदलही आहे, जसं की मिसळपाव संकेतस्थळ :-)

In reply to by श्रीगणेशा

अनुस्वार 20/12/2021 - 20:14
'मिपा'च्या शहरी आणि ग्रामीण भागातील प्रसाराचा अंदाज घेण्यासाठी काहीतरी क्लृप्ती निघायला पाहिजे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

Bhakti 20/12/2021 - 20:33
पहिला भाग वाचताना छान वाटत होतं,दुसरा भाग वाचताना :( मी दोन आठवड्यांपूर्वीच हिवरे बाजारला जाऊन आले,तिथे एक पोपटराव आले आणि गावाचा कायापालट केला.डिसले गुरूजींनी झेडपी शाळा बदलली, चिकाटी असणारे सद्गुणी व्यक्ती पाहिजेत.

साहना 21/12/2021 - 01:47
बहुतेक गांवात सध्या संडास निर्माण झाले आहेत, पाणी पाईप ने घरी पोचत आहे. अनेक ठिकाणी वीज उपलब्ध आहेच पण काहींनी तर सोलर पॅनेल्स सुद्धा बसवली आहेत असे दृश्य नजरेस आले. बहुतेक मुले शाळेंत जात आहेत आणि विशेषतः स्त्रिया शाळेंत जात आहेत. स्त्री आरोग्याची साधने सहजपणे उपलब्ध होते आहेत. बहुतेक मुली ग्रॅज्युएट होण्याची स्वप्ने पाहत आहेत. दारू पिऊन पत्नीला मारहाण करण्याची प्रकारणे शून्य होत आहेत. बहुतेक स्त्रिया सुद्धा आता मर खाऊन गप्प राहत नाहीत. अनेकांना फार तर ३ मुले असतात. मुलीला नवऱ्याने त्रास दिला तर सरळ जाऊन घरी घेऊन येतात. बहुतेक प्रसूती सुरक्षित होत आहेत. बहुतेक मुलांना सर्व व्हॅक्सीन्स मिळतात त्यामुळे अपंगत्वाचे प्रमाण कमी झाले आहे. पुरुषांनी "ठेवलेल्या" बाईचे प्रमाण गांवात कमी झाले आहे. स्त्री मजुरांचे लैगिक शोषण कमी झाले आहे. अंधश्रद्धेपोटी गरिबांचे शोषण कमी झाले आहे. बदल हा काळाचा नियम आहे. आपले वय वाढते तसे नॉस्टॅल्जिक होणे साहजिक आहे पण बहुतेक बदल हे चांगल्या दिशेनेच आहे. आपण चुकीच्या गोष्टीवर फोकस करतो आणि चांगल्या गोष्टी आपल्या नजरेत पडत नाहीत. एके काळी कुठल्याही नेते मंडळींच्या चमच्यावर सुद्धा विनोद करणे कठीण होते आज काल साक्षांत शिळेसैनिक प्रमुख किंवा बाळ पेंग्विन ची खिल्ली लोक बिनधास्त उडवतात. > भाड्याची खोली, तिथे दाटीवाटीने राहणारे दोन जास्तीचे मित्र, ढोर मेहनत करून हातात येणारा मोजकाच पैसा आणि जगण्यासाठी परिस्थिती कशी नसावी याची यादी केली तर स्वत:ची रोजनिशी तयार व्हावी, असं आयुष्य जगताना या पोरांना दहा रुपयांच्या पुडीत मेंदूला तंद्रीत ठेवणारं काहीतरी सापडलं त्याकाळी लोक तंबाखू दारू आणि इतर व्यसने करत नव्हते काय ? बाहेरचा राग आपल्या पत्नी किंवा पोरांवर काढत नव्हते काय ? खोलीत दाटीवाटीने राहणारे पुरुष मित्र महिलांची छेड काढणे वगैरे घाणेरड्या गोष्टी चव घेऊन करत नव्हते काय ? WHO च्या रिपोर्ट प्रमाणे भारतांतील गुटखा सेवन आणि धूम्रपान ह्या दोघांचेही प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आहे. देशाच्या एकूण प्रौढ लोकसंख्येपैकी साधारण २६% लोक तंबाखू सेवन करतात. आधी हे प्रमाण जास्त होते. जुन्या पिढी पेक्षा नवीन पिढीत तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी आहे. पण लोकसंख्या वाढल्याने आणि सेवनाचे प्रकार बदलल्याने आम्हाला जास्त लोक तंबाखूच्या आहारी गेले आहेत असे वाटते ती गोष्ट वेगळी. > संन्यास न घेताही सारा गाव सफल योग्याचं जीवन जगत होता. शांती आणि समाधान पैशांपेक्षा कैक जास्त होतं तिथे. ह्याला काहीही आधार नाही. हे उगाच आपले "माझी ९९ वर्षाची आजी अतिशय पतिव्रता आहे हो" म्हणून ओरडण्यासारखे आहे. ज्याला पर्याय आहे आणि पर्याय असताना सुद्धा ज्याने सर्वत्र त्याग केला तो संन्यासी. नाहीतर तो फक्त दरिद्री. दारिद्र्याला उगाच संन्यासाची उपमा देऊन त्याला अलंकृत करणे चुकीचे आहे. गांवात आधी ज्याच्याकडे काहीच नव्हते त्याची धडपड रेडिओ साठी होती, रिडिओ आहे तो टीव्ही मिळवण्याचा मागे लागला होता. पायी चालणार सायकलचे स्वप्न पाहत होता आणि सायकल ने जाणारा स्कुटरचे. मजुरी करणाऱ्याला नोकरी आणि खाजगी करणाऱ्याला सरकारी नोकरीचा हव्यास होता. गावांत समाधान नव्हते तर होते ते दारिद्य. नवीन संधी निर्माण होतंच गावकर्यांनी मुक्तहस्ते त्यांचा स्वीकार केला आणि आपल्या आयुष्यांत सुख शोधले. चांगलेच झाले. बाबा रामदास (मूळ नाव रिचर्ड अल्पर्ट) ह्यांनी अगदी ह्याच विषयावर समर्पक लिहिले आहे : Is the vision of simple living provided by this village in the East the answer? Is this an example of a primitive simplicity of the past or of an enlightened simplicity of the future? So it is with the village. Its ecological and peaceful way of living is unconsciously won and thus is vulnerable to the winds of change that fan the latent desires of its people. Even now there is a familiar but jarring note in this sylvan village scene. The sound of static and that impersonal professional voice of another civilization — the radio announcer — cut through the harmony of sounds as a young man of the village holding a portable radio to his ear comes around a bend. On his arm there is a silver wrist watch, which sparkles in the sun. He looks at me proudly as he passes. And a wave of understanding passes through me. Just behind that radio and wristwatch comes an army of desires that for centuries have gone untested and untasted. As material growth and technological change activate these yearnings, they will transform the heart, minds, work and daily life of this village within a generation or two. Gradually I see that the simplicity of the village has not been consciously chosen as much as it has been unconsciously derived as the product of centuries of unchanging custom and tradition. The [villages] have yet to fully encounter the impact of technological change and material growth. When the [villages] have encountered the latent desires within its people, and the cravings for material goods and social position begin to wear away at the fabric of traditional culture, then it can begin to choose its simplicity consciously. Then the simplicity of the [villages] will be consciously won — voluntarily chosen. ---- पर्याय असून सेवेचे व्रत घेतलेले ते बाबा आमटे हे संन्यासी तर आमच्या गांवातील "होमलेस" गणोबा हे संन्यासी नसून नुसतेच दरिद्री. गणोबाला आज १०० दिले तर संध्याकाळी पर्यंत ते दारू आणि मटक्यावर उधळले जातील ह्यांत शंका नाही. Virginity is often lack of opportunity ही म्हण गांवातील दारिद्र्याचे उद्दात्तीकरणाला लागू पडते.

In reply to by साहना

सुबोध खरे 21/12/2021 - 09:39
असं कसं साहना ताई शहरात राहून भरपूर पैसा कमावल्यावर आपल्याला चार दिवस त्या मोबाईल लॅपटॉप लाऊडस्पिकर पासून दूर राहायला खेडी आणि गावे पूर्वीसारखीच विकासापासून दूर असायला नकोत का? एक दिवस बैलगाडी, झुणका भाकर, हुरडा आणि चुलीवरचं मटण खायला लांबच्या चुलत्याची अशिक्षित पण अगत्यशील बायको सगळ्यांनाच हवी आहे त्यावर तुम्ही असे पाणी फ़िरवताय? तुमचा तीव्र निषेध

In reply to by सुबोध खरे

अनुस्वार 21/12/2021 - 16:20
कदाचित आपण दोघांनी माझ्या निरिक्षणांचा वेगळा अर्थ घेतलेला दिसतोय. साहनाजी म्हणताहेत तसा बदल 'वास्तवात' होत असेल तर त्यावर गळा काढणारा अव्वल दर्जाचा नकारात्मक व्यक्ती असेल यात शंका नाही. सुधारणा आणि प्रगतीची आस नेहमीच प्रशंसनीय आहे. फक्त आहे त्यात 'बदल' होतोय म्हणून ते प्रगतिशीलच असेल याची खात्री नसते. काही बदल चुकले तर ते दुरुस्त करण्यासाठी शहरांकडे आर्थिक आणि भौतिक स्त्रोत तुलनेने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. गावांकडे तशी परिस्थिती नाही. एक उदाहरण देतो. माझं गाव आहे मराठवाड्यात. आमच्या भागात पिवळ्या बसगाड्यांच्या "CBSE पॅटर्न"च्या खाजगी इंग्रजी शाळांचे प्रचंड पेव फुटले आहे. अंगणवाडी ते दहावी. अंगणवाडीचे शुल्क कमीत कमी वर्षाचे ₹१०,००० आणि दहावीचे ₹२०-२५,००० च्या पुढे + कपडे (कमीत कमी २ प्रकारचे) + पुस्तके, दप्तर शाळेचेच हवे. शिक्षक इथलीच कुडमुडे इंग्रजी बोलू शकणारे डी.एड. वाली मंडळी. पुस्तके CBSCची नाही तर खाजगी प्रकाशनाची. या शाळेने पोरं काही विशेष हुशार होत नाहीत हे कळायला पाचवी-सहावी जाऊ द्यावी लागते. तोवर कुटुंबांची पाल्यांना शहरात शिक्षणाला पाठवायची आर्थिक क्षमता नष्ट झालेली असते. परिणामी पुढे बाहेर चांगल्या शिक्षणाची जी संधी मिळायची ती ही नष्ट होत आहे. हे केवळ एक उदाहरण आहे. शोधली तर मोठी यादी होईल. उदा. आमचे गाव १००% हागणदारीमुक्त असूनही तुम्ही सकाळी गावात यायचे टाळाल! (₹१०ह/वर्ष वगैरे आपणांस कमी वाटत असल्यास माझा मुळ लेख आणि प्रतिसाद निरर्थक रडगाणे आहे हे मी मान्य करतो.) WHO किंवा सरकारी अहवालावर विसंबून राहून सर्व काही आलबेल असल्याचे स्वप्नरंजन करणे चांगले आहे. पण त्यासाठी झोपायचं म्हणजे धृतराष्ट्राची नजर हवी. आमच्या गावात व्यसनाचे प्रमाण ३००-४००% टक्के वाढले असेल तर WHO चा अहवाल मला काय कामाचा? आपण 'असर' चा ग्रामीण शिक्षणाचा अहवाल पाहा. तसेच अहवालासाठी वापरलेली पद्धती ही तपासा, म्हणजे अहवाल किती सर्वसमावेशी आहे याचा अंदाज येतो. सुबोधजी, मी शाकाहारी आहे. त्यामुळे तुम्ही वर्णन केलेल्या पाहुणचाराच्या आठवणीने मी व्यथित होण्याचे कारण नाही. साहनाजींनी वर्णिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आल्या तर त्याहून सोन्याचा दिन दुसरा नाही. बाकी, हस्तिदंती मनोऱ्यांतून मनोहर चित्र पाहायला मलाही आवडेल पण तो मनोरा गावाच्या अस्थींवर उभा नसावा‌.

In reply to by अनुस्वार

श्रीगणेशा 21/12/2021 - 18:18
अनुस्वार, आपल्या खाजगी इंग्रजी शाळेच्या निरीक्षणाशी सहमत. पोटाला चिमटा घेऊन मुलांना इंग्रजी (नावाला फक्त) शाळेत पाठवायचा हट्ट करणारी कुटुंबे मी स्वतः पाहिली आहेत. त्यापुढे जाऊन, मुलाला शाळेत शिकवलेलं समजत नाही म्हणून शिकवणी वर्गातही गर्दी होत आहे. काही पालक तर मुलगा घरी अभ्यास करत नाही म्हणून शिकवणी वर्गाला पाठवत आहेत, काहीतरी डोक्यात जाईल म्हणून. प्रगतीच प्रगती आहे!

In reply to by अनुस्वार

श्रीगणेशा 21/12/2021 - 18:25
शहरातील समाज मुळातच विखुरलेला असणे अपेक्षित आहे. तुलनेने गावातील समाज बऱ्यापैकी एकत्र राहणारा, जगणारा, आपली संस्कृती जपणारा. त्यामुळे शहर आणि गाव अशी सरसकट तुलना करणे योग्य वाटत नाही. धागा लेखकांचं म्हणणं खोडून काढण्यायोग्य निश्चितच नाही.

In reply to by अनुस्वार

साहना 22/12/2021 - 01:13
शिक्षण ह्या विषयावर तुम्ही लिहिलेले पटते. पण ह्याचा संबंध बहुतांशी भारतीय सरकारच्या चुकीच्या आणि धांदात अन्यायी कायद्याशी आहे ज्यावर मी आधी खूप लिहिले आहे. सकस शिक्षणाचे ध्येय सोडून निव्वळ बेगडी आणि "हाऊ मे आय हेल्प यू मॅडम" वाली किर्यादांची (कोंकणी/ पोतुगीज शब्द) विंग्रजी शिकण्याच्या मागे अंधपणे धावणे ह्याचा बराच वाईट परिणाम ग्रामीण भागांतील लोकांवर होणार आहे. पण सहावीला शाळा सोडून घरी बसणे ह्या पेक्षा महागडी किर्यादांची इंग्रजी शिकणे जास्त चांगले नाही का ? सरकारी आकडे सुद्धा नजरअंदाज केले तरी शाळेंतून ड्रॉप होण्याचा दर आणि विशेषतः मुलींचा ड्रॉप होण्याचा दर खूपच कमी झाला आहे हे सुद्धा पाहायला नको का ? त्याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल. येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.

In reply to by साहना

Bhakti 22/12/2021 - 08:35
ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल
बापरे!!

In reply to by साहना

अनुस्वार 22/12/2021 - 11:12
ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल.
आपल्या माणसांचा स्टाॅक एवढ्या सहजासहजी मुर्खात काढून बाजूला नाहीना करता येत साहनाजी. मानवी इतिहासात खेडी समाजजीवनाचा पाया राहिली आहेत आणि राहतील. उदा. कितीही मोठा फॅशन डिझाईनर असला तरी कापूस पिकवणारे शेतकरी आणि विणनारा कारागीर यांच्याशिवाय त्याची किंमत शून्य असते‌, नंतरच्या दोघांचे बाजार मूल्य कमी असले तरी. त्यामुळे ग्रामरुपी आत्मा नष्ट झाला की शहरांचा जीव जायला वेळ लागणार नाही. किंबहूना दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेदेकरून (simultaneously) होतील.
सरकारी आकडे सुद्धा नजरअंदाज केले तरी शाळेंतून ड्रॉप होण्याचा दर आणि विशेषतः मुलींचा ड्रॉप होण्याचा दर खूपच कमी झाला आहे हे सुद्धा पाहायला नको का?
संख्यात्मक सुधारणा मान्यच. परंतु गुणात्मक फरक पडेना हे सरकारी अहवालच सांगत आहेत.
येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.
भारतीय शहरांची (संख्येने) वाढ होणार नाही तर आहे तीच शहरे विक्राळ रूपात पसरतील. भारतातील "गरिबीचे शहरीकरण" (Urbanization of Poverty) हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. मला वाटतं मूळ लेखाकडे ग्रामीण किंवा शहरी परिप्रेक्ष्यातून पाहण्यापेक्षा समाजाच्या (कारण इच्छा असली तरी अंतिमतः तो शहरी-ग्रामीण असा वेगळा करताच येत नाही) एका सदृढ अंगाची (आपल्यावर प्रभाव पाडणारी) रोगराई असे पाहिल्यास प्रश्न समजून घेण्यास आणि उत्तरे शोधण्यास मदत होईल.

In reply to by साहना

सुबोध खरे 22/12/2021 - 11:28
त्याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील १०० टक्के चुकीचे गृहीतक आहे. हे गृहीतक बरोबर असते तर शहरातील झोपड्यात राहणारे सगळेच लोक हुशार असायला पाहिजेत. आणि मुम्बईच्या महापालिकेच्या शाळेतील मुले बोर्डात यायला पाहिजे होती. असं अजिबातच नाही. बहुसंख्य लोक गावातून केवळ "जगायला" ( पोट भरण्यासाठी) बाहेर पडतात. गावात नोकरीच्या संधी नगण्य असतात. मागच्या काही पिढ्यात एकाएकाला चार पाच पोरं झाल्यामुळे शेतीचा केवळ छोटासा तुकडा वारसाहक्काने येतो तो दोन वेळचे पोट भरायला मुळीच पुरत नाही म्हणून अनेक तरुण आपले गाव सोडून शहरात येतात. त्याचा हुशारीशी असा संबंध जोडणे साफ चूक आहे.

In reply to by साहना

तर्कवादी 22/12/2021 - 20:27
याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल. येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.
म्हणजे शहरात जाणारे हे हुशार - गावात राहणारे कमी हुशार , किंबहूना त्याहून पुढे जावून मुर्ख.. आणि मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्ख.. वा ... वा... म्हणजे आपला गाव न सोडणारे म्हणजे फारतर सामान्य बुद्धीमतेचे कुणी असेल तर त्यांची गणना मुर्खांत करायची मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्खच निपजणार असे समजायचे. हसावे की रडावे तेच कळत नाही (परदेशी न जाता भारतात राहून काम करणारा सामान्य (किंवा मुर्ख) आय टी प्रोफेशनल ) तर्कवादी

साधं टुमदार, गणपती पुळे आता पर्यटन स्थळ झाले आहे... मोबाईल, टीव्ही यांचा वापर कशासाठी करायचा? हे भान नसेल तर, घरीघरी भस्मासुरच तयार होतात ... शूद्ध हवा सोडली तर, गावांत राहणे कठीणच झाले आहे. शहरांत निदान थोडाफार तरी ध्वनी प्रदूषणावर कंट्रोल आहे, गावांत तर तेही नाही ...

चौथा कोनाडा 21/12/2021 - 17:38
सही लिहिलंय ! +१ देऊळ सिनेमा आठवला ! जगण्याच्या कल्पना दिवसागणिक बदलत गेल्या त्या १९८५-९० नंतर .... अन बदलांचा वेगही वाढत गेला. जुने मागे पडत चालले ........ शांत, स्थिर जीवनाचा पाया सैलावत गेला. व्यसने चारी अंगानी वेढू लागली, तीच लाईफ-स्टाईल म्हणून मान्यता पावली ! यातनं कसं स्वतःला जपायच, आधूनिक होता होता काही अंगानी पारंपारिक कसं रहायचं हे आपल्या वरच (वैयक्तिक) अवलंबून आहे ! कालाय तस्मै नम: _/\_

In reply to by चौथा कोनाडा

अनुस्वार 21/12/2021 - 21:30
रील बनवण्यात, नशा‌ करण्यात यांना काही आनंद मिळतोय असंही नाही. पण या गोष्टींचा भडिमार एवढा ताकदवान आहे की जो तो या दिखाऊ आनंदाला मिठी मारतोय. अगदी ताजे उदाहरण: बेळगावातल्या घटनेचा निषेध म्हणून अगदी छोट्या खेड्यापाड्यांतही राजांच्या पुतळ्याला दुधाने अंघोळ घालण्याचे कार्यक्रम चालू आहेत. तिथे जमा होणाऱ्या ९०% जनतेला बेळगाव कुठे आहे हे माहिती नसेल आणि त्यातल्याही ९०% ना पुढे आयुष्यभर ते माहित होण्याचा संभव नाही. पण 'बाकीच्यांचे स्टेटस येत आहेत मग आपण मागे का रहायचं?' एवढाच त्यामागे विचार (विचाराच्या व्याख्येत बसत असल्यास)!

जेम्स वांड 22/12/2021 - 09:39
आपण पाहत असलेलं गाव एक प्रतिमा होऊन घट्ट रुजलेलं असतं मनात, ते आपलं संचित. आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो, हळूहळू रोजीरोटीत व्यस्त होतो, पीएफ, घर बांधणी/ फ्लॅट खरेदी, पोरांची शिक्षणे ह्या रगाड्यात गावच्या चकरा कमी होतात, दरवेळी जाताना नवीन नवीन बदल दिसतात, आधीच अनोळखी शहरात स्वतःची ओळख बनवून एका कोपऱ्यात सेटल व्हायला आतुर आपल्याला इनसिक्युरिटी वाटणे साहजिक होते कारण आपल्या मनात "आपलं" असलेलं गाव बदलत असतं, साहजिक आहे ते फक्त कालाय तस्मै नमः म्हणून घडत असलेले बदल बघत राहणे हेच काय ते आपण करू शकतो.

In reply to by जेम्स वांड

अनुस्वार 22/12/2021 - 11:17
आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो, हळूहळू रोजीरोटीत व्यस्त होतो, पीएफ, घर बांधणी/ फ्लॅट खरेदी, पोरांची शिक्षणे ह्या रगाड्यात गावच्या चकरा कमी होतात, दरवेळी जाताना नवीन नवीन बदल दिसतात.
सगळं समोर घडत आहे म्हणून मन अस्वस्थ होतं.

आता मागे वळुन पहाता असे लक्षात येते की निरंतर समाज हळू हळू बदलत होता.गावात एक अलिखित नाते संबंध होते. बलुतेदारी जवळपास संपत आली होती पण तरीही दिवाळीच्या पणत्या, संक्रांतीची सुगडं , सणासुदीला पतरावळी द्रोण घरपोच होत होते .गुरविणीचा नैवेद्य नेमाने वाढला जात होता अमावस्येला आवस वाढा बाई आस ऐकताच पिठ, तेल, लाल मिरच्या लेकी, सुना वाढत होत्या. सुया घे, बिब्ब घे आशी हाक देणारी गंगू वैदिण सागरगोटे, सालम मिश्री, सफेद मिश्री पण देत होती.ह्या सगळ्या गोष्टी संपत चाललेल्या बलुतेदारी च्या पुसट खूणा आमच्या पिढीला दिसल्या. अजुनही नवरात्रात देवी चा भुत्या दिवटी बुदली घेऊन तेल मागायला येत होता. "बाजीराव नाना तुम्ही लग्नाला चला" म्हणत दिवाळी, होळीला सोंग घेऊन येणारा सोंगाड्या, देवळात रामनवमी, हनुमान जयंती, कृष्ण जन्माष्टमी निमित्त किर्तन, चातुर्मासात प्रवचन, काकडा आरती हेच समाज मनोरंजनासाठी होते. गावातील यात्रा, तमाशाचा फड, कुस्तीचा आखाडा हाच विरंगुळा असे तर आर्थिक उलाढाल होत असे. जत्रा, गाड्यांच्या शर्यती, कुस्तीच्या स्पर्धा आणी तमाशा यावेळेस गावगाड्याच्या आर्थिक उलाढाल होत असे. दिव्याची आवस खुप जोरात साजरी होत असे. बैलपोळा अजुनही आठवतो. घायपताच्या पाताचा आसूड, कावेने रंगवलेली मातीचे बैल मुलांचे खास आकर्षण असायचे. वर्षाचे सण ,परंपरा ,कुळधर्म हौसेने साजरे होत होते. सडा, रांगोळी पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर नागरमोथा व रिठ्याच्या बिया शोधून त्याचा उपयोग शिककई बरोबर केस धुण्यासाठी वापरत होते. हाच त्या काळात "सन सिल्क व पँन्टिन " होता. गावोगावी अजुनही विज पोहोचली नव्हती. चिमणी, किंवा कंदील प्रत्येक घरातून पेटायचे. चौकात दिव्याच्या खांबावर ग्रामपंचायतीचा कर्मचारी संध्याकाळी रॉकेलचा डबा व बांबू ची शिडी घेऊन दिवा पेटवत असे. दवंडी हा प्रकार पब्लिक कम्युनिकेशन करता मुख्य साधन होते.आताच्या मोबाईलच्या पिढीला सांगितले तर ते त्यांना खरे वाटत नाही. बाबा तुम्ही काहितरी सांगता आसे म्हटले जाते. असे असताना त्याचबरोबर रेडिओ, टुरींग टाकिज आणि गणपतीच्या दहा दिवसांत सिनेमा ह्या नवीन बदलाची नांदी सुरू झाली. पक्की सिनेमागृहे, मिनी थिएटर्स,टेप रेकॉर्डर, टेलिव्हिजन, संगणक ,मोबाईल माँल असे अनेक बदल होत गेले. कौलारू घरं केव्हा सिमेंटच्या जंगलात गुडूप झाली कळलेच नाही. पुजा, संध्या,शुभंकरोती,श्रावणातली व्रतवैकल्ये, सत्यनारायण, सहस्त्र आवर्तने वाडवडिलानीं सांगीतले आणी कुठलाही प्रश्न न विचारता आम्ही करत गेलो. आज मात्र नातवांच्या प्रश्नानां उत्तर देताना नाकी नऊ येते. ज्या गणेशाला वंदन करून शिक्षणाचा श्रीगणेशा केला तर त्याच गणेशाला आताची पिढी " ओ माय फ्रेंड गणेशा" नावाची मालीका बघत आहे. कीर्तन ते कार्टुन आसे आयुष्य जगलेले आम्ही गावाकडे शेत, घर ,नातेवाईक मंडळी आशी काहीही नाळ ऊरली नाही तरी आजुनही वेळ मीळाला की गावाकडं पळतो. अजून सुद्धा माणूसकीच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसून येतात. जुने शाळकरी वाट बघतात. गाव बदलतयं चांगली गोष्ट आहे. गावाकडची माणसं व्यवहार कुशल पण अधुनीकतेच्या जगात त्यानां गावंढळ समजणं चुक वाटतं. गेलो होतो गावाकडं शोधत होतो पाऊलखुणा नदीकाठी होता उभा म्हातारा वड केविलवाणा हिरवगाऱ टुमदार गाव नाव त्याच होतं खेड सय येता गावाची मन अजुनही होतं वेडं......

In reply to by कर्नलतपस्वी

अनुस्वार 22/12/2021 - 21:23
मी फक्त सागरगोटे आणि काऊने (काव) रंगवलेले मातीचे बैल पाहिले आहेत. बाकी मला गोष्टी नवीनच. धन्यवाद. ‌

गेले वर्ष दीड वर्ष एका हिलस्टेशन जवळच्या निसर्गरम्य गावी राहतोय. इथल्या वास्तव्यावर आधारित माझी निरीक्षणे: (१) आठवड्यातून किमान एकदा दिवसाचे ४-५ तास व पाऊस / वादळ असल्यास २४ -३६ तास वीज पुरवठा बंद असतो. (२) सण, समारंभ, लग्न, वाढदिवस यापैकी कोणत्याही निमित्ताने कानठळ्या बसतील अशा आवाजात मराठी/हिंदी/पंजाबी/ गाणी जवळपासचे साधेभोळे गावकरी सकाळी ६ ते रात्री १२ या वेळात कधीही लावतात. जवळच एक "डेस्टिनेशन वेडिंग रिसाॅर्ट व प्री वेडिंग फोटो शूटचा स्टुडिओ" मोठ्या झाडांची कत्तल करून मोकळ्या केलेल्या जागेत चालू झालाय. तिथे येणारी शहरी गिर्‍हाइकेही ध्वनीप्रदूषणाच्या महत्कार्याला इमाने इतबारे हातभार लावतात. शिवाय वीज नसल्यास कानठळ्या बसविण्याच्या अंगीकृत कार्यात खंड पडू नये म्हणून डीझल जनरेटर सेट्स मुक्तपणे वापरले जातात. जवळपासचे अनेक सेकंडहोम वाले मिळकत वाढावी म्हणून आपली घरे शहरातल्या पिकनिकर्सना भाड्याने देतात. हे पिकनिकर्स दारूच्या अंमलाखाली वावरताना दिवसरात्र म्युझिक सिस्टीमच्या peak performanceचा आनंद लुटतात. ध्वनीप्रदूषण ही संकल्पनाच स्थानिक पोलिसांसकट कोणालाही माहिती नसल्याने पोलीस कंप्लेंटही निरर्थक ठरते. (३) घरकामासाठी नोकर मिळणे व मिळाल्यास तो/ती नियमित कामावर येणे दुरापास्त आहे. (४) सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे लोक बर्‍याच मिनतवार्‍या केल्यावर काम करतात पण कामाचा दर्जा अतिशय खराब. (५) कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे बहुतांश गावकरी आपापला कचरा आपापल्या सवडीने स्वत:च्या घराजवळ जाळून टाकतात. "निसर्गरम्यता गेली खड्ड्यात, आपले शहरच बरे" ही भावना जेव्हा बळावते तेव्हा मग काही दिवस मुंबईतल्या घरी ४-८ दिवस राहून तिथल्या शांततेला कंटाळलो की इथल्या गदारोळात ,कमी प्रदूषित हवेसाठी, गावी परत येतो.

In reply to by अनन्त्_यात्री

Trump 22/12/2021 - 16:14
अगदी अगदी. पोरे बीए, बारावी होउन घरी बसणे पसंत करतील, पण असे काम करनार नाहीत.
सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे लोक बर्‍याच मिनतवार्‍या केल्यावर काम करतात पण कामाचा दर्जा अतिशय खराब.

तर्कवादी 22/12/2021 - 16:57
अनुस्वार जी, लेख आधी मला काहीसा एकांगी वाटला होता. पण तुमचे इतर प्रतिसाद वाचून दिसतंय की तुम्ही खेडे गावाशी जोडलेले आहात त्यामुळे तुम्हाला तिथली सामाजिक परिस्थिती अचूक माहित आहे. प्रत्यक्ष जोडलेले असल्याने आलेली समज अर्थातच कुठल्यातरी जागतिक अहवालांपेक्षा अधिक वास्तववादी असणार यात वाद नाही. आधीच्या एका प्रतिसादात लिहिले त्याप्रमाणे माझा खेडे गावाशी प्रत्यक्ष संबंध नाही पण मला ग्रामीण समाज जीवनाबद्दल कुतुहल आहे. तुम्ही विविध पैलूंवर अधिक विस्ताराने लिहावे ही विनंती.

In reply to by तर्कवादी

अनुस्वार 22/12/2021 - 21:44
काही प्रतिसादांवरून आणखी लिहण्याची निकड प्रकर्षाने जाणवली. आता एक-एक बाजू समजून घेण्याच्या दृष्टीने लिहिल. धन्यवाद.
अगदी साधं गाव होतं ते. लोकसंख्या कशीबशी २०००. गावात कुणी जास्त शिकलेलं नव्हतं, साहजिकच पन्नासेक पोरं तेव्हढी जवळच्या शहरात कामगार म्हणून राहायची. बाकी बराचसा गाव मळ्यांमध्ये राहायला गेलेला. मळ्यात प्यायला विहीरीचं पाणी होतं अन् आकडे टाकायला लायटीची तार पण. गावात शंभरेक घरं अजूनही होती. झेड. पी. च्या शाळेच्या पाच खोल्या (बालवाडी + चौथी) पोरांच्या शिक्षणासाठी कमी आणि लग्नाची बुंदी ठेवायला जास्त कामी येत. पाच वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने एक नवीन खोली बांधून दिली - संगणक प्रशिक्षणासाठी. त्यात एक भारी टी.व्ही. पण आहे असं काहीजण सांगायचे. विजेची जोडणी नाही म्हणून त्या खोलीला टाळं आहे.

निराशजनक पराभव.....

सुजित जाधव ·

भागो 01/11/2021 - 11:00
दुसरं एक कारण असू शकत ते म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या खेळाडूंना जे सततचं क्रिकेट खेळायला लावत आहे त्यामुळे खेळाडूंना शारीरिक व मानसिक विश्रांती मिळतच नाहीये.>>>>>प्रत्येक सामन्याचे वाजवून पैसें घेतात. फुकट नाही खेळत. दोन सामन्यात भारताने एकूण दोन विकेट घेतल्या तर लिँअम लिविंग्स्ट्नने तीन! भारत पेट्रोलची किंमत पार करू शकला नाही!

टाॅस जिंका, बाॅलिंग निवडा आणि मॅच जिंका ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज मधले दिग्गज फलंदाज देखील, पहिल्यांदा बॅटिंग करतांना ढेपाळले...

In reply to by मुक्त विहारि

सुजित जाधव 01/11/2021 - 11:59
धीम्या आणि पहिल्या डावानंतर रंग बदलणाऱ्या खेळपट्ट्या यामुळे हा वर्ल्डकप कंटाळवाणा वाटू लागलाय आता...

श्रीगणेशा 01/11/2021 - 23:06
टॉसला खूप महत्त्व दिलं जात आहे. पण २०-२० विजेता संघ कुठल्याही परिस्थितीत चांगला खेळ करणारा असायला हवा. इंग्लंडने आज टॉस हरल्यानंतर आणि ४७/३ अवस्थेतून बाहेर पडून एक चांगलं लक्ष ठेवलं श्रीलंकेसमोर. २०-२० च्या गडबडीत फलंदाज चेंडू जमिनीलगत खेळून, गॅप शोधून धावा करण्याचं कौशल्य विसरले आहेत बहुतेक, विशेषत: भारतीय फलंदाज, आयपीएलच्या ओव्हरडोस मुळे. थोडक्यात काय तर सध्याचा भारतीय संघ २०-२० विजेता होण्यास लायक नाही. सत्य परिस्थिती स्वीकारून पुढील २०-२० वर्ल्ड कप ची तयारी सुरू करणं जास्त योग्य होईल.

In reply to by श्रीगणेशा

चांगली फलंदाजी केली होती ... थोडक्यात सांगायचे तर, टाॅस जिंका, गोलंदाजी निवडा आणि मॅच जिंका...

श्रीगुरुजी 01/11/2021 - 23:52
दुसरं एक कारण असू शकत ते म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या खेळाडूंना जे सततचं क्रिकेट खेळायला लावत आहे त्यामुळे खेळाडूंना शारीरिक व मानसिक विश्रांती मिळतच नाहीये. हेच मुख्य कारण आहे. आयपीएल असायला हरकत नाही. पण आयपीएल खेळाडू व आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे खेळाडू वेगळे असावे. आयपीएल मध्ये अत्यंत चमकदार कामगिरी करणारे व त्यात पूर्ण उर्जा संपविणारे खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यात ढेपाळतात हे अनेकदा दिसलंय. त्यामुळे आयपीएल मध्ये खेळणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघात घेऊ नये व आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघात असणाऱ्या खेळाडूंना आयपीएल मध्ये खेळण्याची परवानगी देऊ नये.

In reply to by श्रीगुरुजी

सुजित जाधव 02/11/2021 - 11:43
खरतर ह्यावर्षीची आयपीएल वर्ल्डकप झाल्यावर घ्यायला हवी होती. बीसीसआय ने खेळाडूंचा विचार न करता फक्त गल्ला भरण्यासाठी आयपीएल खेळवली...आता भोगा म्हणावं कर्माची फळं....सगळ्या बाजूंनी टीका चालू झाली आहे बीसीसआय आणि आयपीएल वर...

In reply to by श्रीगुरुजी

बेकार तरुण 02/11/2021 - 13:10
हे जरी अगदी मान्य केलं की आयपीएलमुळे हानी होत आहे.. तरी कोणता सुपरस्टार खेळाडु आयपीएल सोडुन फक्त आंतरराष्ट्रीय सामने खेळायला तयार होईल... सगळे आंतरराष्ट्रीय दर्जातुन निवृत्ती घेउन फक्त आयपीएल खेळतील.. खेळाडुची साधारण कारकीर्द १० वर्षे धरली तर त्यात तो जास्तीत जास्त पैसा कमावणे हे ध्येय ठेवेलच... बाकी देशासाठी खेळणे खूप मानाचे आहे वगैरे ठीक आहे.. पण उद्या आपण स्वतः ह्या कात्रीत सापडलो तर आपणही त्या १० वर्षे विंडो मधे आर्थिक फायदा मॅक्सिमाईज करायचा प्रयत्न करुच... हेमावैम...

In reply to by बेकार तरुण

श्रीगुरुजी 02/11/2021 - 14:05
ज्यांना फक्त पैशासाठी आयपीएल मध्येघ खेळायचंय त्यांना अडवू नये. फक्त त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघात घेऊ नये. आयपीएल मध्ये सुद्धा प्रचंड स्पर्धा आहे व तेथे टिकणे अत्यंत अवघड आहे. नुसते वेडेवाकडे फटके मारून आयपीएल मध्ये सुद्धा फार काळ टिकता येणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

बेकार तरुण 03/11/2021 - 10:39
गुरुजी तुमचं म्हणणं पटत आहे, पण ते व्यवहार्य नाही..... उदा... ९०% गुण मिळवणारा खेळाडु नक्कीच आयपीएलच खेळेल... अन उरलेला गाळ, ज्यांना आयपीएल खेळायला कोणी घेणार नाही ते राष्ट्रीय संघात अशी परिस्थीती होईल... २ - ५ कोटी २ महिन्यात मिळवायची संधी असताना त्यावर कोण पाणी सोडेल.

In reply to by बेकार तरुण

बरोबर, ह्यापेक्षा BCCI ने वेळापत्रक आखताना आणि टीम निवडताना योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे. इंग्लिश खेळाडूंनी स्वतःहुन IPL न खेळण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या खेळाडूनीही प्राधान्यक्रम ठरवायला हवा.

In reply to by बेकार तरुण

श्रीगुरुजी 03/11/2021 - 14:56
राष्ट्रीय संघात खेळूनही भरपूर संधी, पैसे, प्रसिद्धी, जाहिराती वगैरे मिळतात. निवृत्ती जाहीर केल्यानंतर आयुष्यभर घसघशीत निवृत्तीवेतन मिळते. पुढेमागे निवडसमितीत स्थान, प्रशिक्षक वगैरे होण्याची संधी मिळते. फक्त आयपीएल खेळून यातल्या बऱ्याचशा गोष्टी मिळणार नाहीत. २-४ वर्षे आयपीएल खेळून नंतर अपेक्षित कामगिरी जमली नाही तर कायमस्वरूपी गच्छंती होऊ शकते. वर्षातून दीड महिना आयपीएल खेळली की पुढील साडेदहा महिने करण्यासारखे काहीच नसते. बहुसंख्य आयपीएल खेळाडूंची कारकीर्द ३-४ वर्षांपेक्षा जास्त नाही.

भागो 01/11/2021 - 11:00
दुसरं एक कारण असू शकत ते म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या खेळाडूंना जे सततचं क्रिकेट खेळायला लावत आहे त्यामुळे खेळाडूंना शारीरिक व मानसिक विश्रांती मिळतच नाहीये.>>>>>प्रत्येक सामन्याचे वाजवून पैसें घेतात. फुकट नाही खेळत. दोन सामन्यात भारताने एकूण दोन विकेट घेतल्या तर लिँअम लिविंग्स्ट्नने तीन! भारत पेट्रोलची किंमत पार करू शकला नाही!

टाॅस जिंका, बाॅलिंग निवडा आणि मॅच जिंका ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज मधले दिग्गज फलंदाज देखील, पहिल्यांदा बॅटिंग करतांना ढेपाळले...

In reply to by मुक्त विहारि

सुजित जाधव 01/11/2021 - 11:59
धीम्या आणि पहिल्या डावानंतर रंग बदलणाऱ्या खेळपट्ट्या यामुळे हा वर्ल्डकप कंटाळवाणा वाटू लागलाय आता...

श्रीगणेशा 01/11/2021 - 23:06
टॉसला खूप महत्त्व दिलं जात आहे. पण २०-२० विजेता संघ कुठल्याही परिस्थितीत चांगला खेळ करणारा असायला हवा. इंग्लंडने आज टॉस हरल्यानंतर आणि ४७/३ अवस्थेतून बाहेर पडून एक चांगलं लक्ष ठेवलं श्रीलंकेसमोर. २०-२० च्या गडबडीत फलंदाज चेंडू जमिनीलगत खेळून, गॅप शोधून धावा करण्याचं कौशल्य विसरले आहेत बहुतेक, विशेषत: भारतीय फलंदाज, आयपीएलच्या ओव्हरडोस मुळे. थोडक्यात काय तर सध्याचा भारतीय संघ २०-२० विजेता होण्यास लायक नाही. सत्य परिस्थिती स्वीकारून पुढील २०-२० वर्ल्ड कप ची तयारी सुरू करणं जास्त योग्य होईल.

In reply to by श्रीगणेशा

चांगली फलंदाजी केली होती ... थोडक्यात सांगायचे तर, टाॅस जिंका, गोलंदाजी निवडा आणि मॅच जिंका...

श्रीगुरुजी 01/11/2021 - 23:52
दुसरं एक कारण असू शकत ते म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या खेळाडूंना जे सततचं क्रिकेट खेळायला लावत आहे त्यामुळे खेळाडूंना शारीरिक व मानसिक विश्रांती मिळतच नाहीये. हेच मुख्य कारण आहे. आयपीएल असायला हरकत नाही. पण आयपीएल खेळाडू व आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे खेळाडू वेगळे असावे. आयपीएल मध्ये अत्यंत चमकदार कामगिरी करणारे व त्यात पूर्ण उर्जा संपविणारे खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यात ढेपाळतात हे अनेकदा दिसलंय. त्यामुळे आयपीएल मध्ये खेळणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघात घेऊ नये व आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघात असणाऱ्या खेळाडूंना आयपीएल मध्ये खेळण्याची परवानगी देऊ नये.

In reply to by श्रीगुरुजी

सुजित जाधव 02/11/2021 - 11:43
खरतर ह्यावर्षीची आयपीएल वर्ल्डकप झाल्यावर घ्यायला हवी होती. बीसीसआय ने खेळाडूंचा विचार न करता फक्त गल्ला भरण्यासाठी आयपीएल खेळवली...आता भोगा म्हणावं कर्माची फळं....सगळ्या बाजूंनी टीका चालू झाली आहे बीसीसआय आणि आयपीएल वर...

In reply to by श्रीगुरुजी

बेकार तरुण 02/11/2021 - 13:10
हे जरी अगदी मान्य केलं की आयपीएलमुळे हानी होत आहे.. तरी कोणता सुपरस्टार खेळाडु आयपीएल सोडुन फक्त आंतरराष्ट्रीय सामने खेळायला तयार होईल... सगळे आंतरराष्ट्रीय दर्जातुन निवृत्ती घेउन फक्त आयपीएल खेळतील.. खेळाडुची साधारण कारकीर्द १० वर्षे धरली तर त्यात तो जास्तीत जास्त पैसा कमावणे हे ध्येय ठेवेलच... बाकी देशासाठी खेळणे खूप मानाचे आहे वगैरे ठीक आहे.. पण उद्या आपण स्वतः ह्या कात्रीत सापडलो तर आपणही त्या १० वर्षे विंडो मधे आर्थिक फायदा मॅक्सिमाईज करायचा प्रयत्न करुच... हेमावैम...

In reply to by बेकार तरुण

श्रीगुरुजी 02/11/2021 - 14:05
ज्यांना फक्त पैशासाठी आयपीएल मध्येघ खेळायचंय त्यांना अडवू नये. फक्त त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघात घेऊ नये. आयपीएल मध्ये सुद्धा प्रचंड स्पर्धा आहे व तेथे टिकणे अत्यंत अवघड आहे. नुसते वेडेवाकडे फटके मारून आयपीएल मध्ये सुद्धा फार काळ टिकता येणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

बेकार तरुण 03/11/2021 - 10:39
गुरुजी तुमचं म्हणणं पटत आहे, पण ते व्यवहार्य नाही..... उदा... ९०% गुण मिळवणारा खेळाडु नक्कीच आयपीएलच खेळेल... अन उरलेला गाळ, ज्यांना आयपीएल खेळायला कोणी घेणार नाही ते राष्ट्रीय संघात अशी परिस्थीती होईल... २ - ५ कोटी २ महिन्यात मिळवायची संधी असताना त्यावर कोण पाणी सोडेल.

In reply to by बेकार तरुण

बरोबर, ह्यापेक्षा BCCI ने वेळापत्रक आखताना आणि टीम निवडताना योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे. इंग्लिश खेळाडूंनी स्वतःहुन IPL न खेळण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या खेळाडूनीही प्राधान्यक्रम ठरवायला हवा.

In reply to by बेकार तरुण

श्रीगुरुजी 03/11/2021 - 14:56
राष्ट्रीय संघात खेळूनही भरपूर संधी, पैसे, प्रसिद्धी, जाहिराती वगैरे मिळतात. निवृत्ती जाहीर केल्यानंतर आयुष्यभर घसघशीत निवृत्तीवेतन मिळते. पुढेमागे निवडसमितीत स्थान, प्रशिक्षक वगैरे होण्याची संधी मिळते. फक्त आयपीएल खेळून यातल्या बऱ्याचशा गोष्टी मिळणार नाहीत. २-४ वर्षे आयपीएल खेळून नंतर अपेक्षित कामगिरी जमली नाही तर कायमस्वरूपी गच्छंती होऊ शकते. वर्षातून दीड महिना आयपीएल खेळली की पुढील साडेदहा महिने करण्यासारखे काहीच नसते. बहुसंख्य आयपीएल खेळाडूंची कारकीर्द ३-४ वर्षांपेक्षा जास्त नाही.
२०२१ च्या टी-२० विश्वचषकातील काल भारताचा न्यूझीलंड संघासोबत एक महत्त्वाचा सामना होता . खरतर भारत आणि न्यूजीलंड दोघेही आपला पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध हरल्यानंतर ह्या सामन्यात विजय मिळवणे पुढच्या फेरीत प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांना गरजेचं होत.            २०-२० क्रिकेट प्रकारातील जगातील सर्वोत्कृष्ट बॅटर च्या यादीतील फलंदाजांनी खचाखच भरलेल्या भारतीय संघाकडून नेहमीप्रमाणे खूप अपेक्षा होत्या पण मागच्या सामन्याप्रमाने इथेही १३३ कोटी भारतीयांच्या पदरी निरशाच पडली. सुरुवात झाली ती सलामीला आलेल्या ईशान किशन च्या विकेटने.

अनुवादित पुस्तकं

पाटिल ·

कॉमी 11/07/2021 - 23:08
विस्तृत यादी, छानच. (आफ्टर द क्वेक माझे खूप आवडते पुस्तक आहे.) काही वाढ- शेरलॉक होम्स कथा- भालबा केळकर आणि गजानन क्षीरसागर दोन्ही मस्त. (क्षीरसागर संपूर्ण आहे.) चौघीजणी- (लिटल वुमन आणि गुड वाईव्हज- लुईसा मी अल्कॉट)- शांता शेळके बर्टनचे अनुवादित अरेबियन नाईट्स- गौरी देशपांडे

In reply to by कॉमी

पाटिल 12/07/2021 - 08:08
चौघीजणी' बद्दल ऐकलं आहे बरंच.. आता बघायला पाहिजे.. अरेबियन नाईट्स चे अनुवाद पाहिले होते एकदा अक्षरधारा मध्ये, पण ते सगळे दहा-बारा खंड एकाच वेळी घ्यायला लागतील असं त्यांनी सांगितलं, म्हणून राहून गेलं ते.. तुम्ही सुचविलेली पुस्तकं विश लिस्ट मध्ये टाकतोय.. यादीत भर टाकल्याबद्दल धन्यवाद.. :-)

साहना 12/07/2021 - 03:48
मादाम बोवारी- गुस्ताव फ्लॉबेर (अनु. जयंत धुपकर) हे आवडते पुस्तके आहे. ह्यावर शाहरुख खान दीप साही ह्यांचा माया मेमसाब हा जबरदस्त चित्रपट येऊन गेलाय. हटके आहे आणि दीपा आणि शाहरुख दोघांनीही ह्यांत अनावृत्त सीन्स केले आहेत.

In reply to by साहना

गॉडजिला 12/07/2021 - 08:51
सगळेच बिचारीची मजा घेतात :( फक्त शारुक न्हवे हा चित्रपट पाहिल्यावर मी दीपा साहिचे बरेच चित्रपट बघून काढले ज्यात शारुकचा ओ डार्लिंग ये हे इंडिया, अन जॅकीचा आर या पार मस्त वाटले इतरही अनेक चित्रपटात दीपा छान दिसली आहे पण चित्रपट डावे नितंब या केटेगारीतील असल्याने मला तसे भावले न्हवते... पण दीपाने दिल जित लिया था हे नक्की

कंजूस 12/07/2021 - 05:14
पण मूळ पुस्तकंच / किंवा इंग्रजी अनुवाद वाचणार. तेच बरे नसेल तर अनुवाद काय कामाचा. ॲना कॅरेनिना-कंटाळवाणे वाटले होते. ककोल्ड चांगले आहे. रावणा आणि एडी पहिला भाग चांगला आहे. एक्सट्रा फार लांबवल्यासारखा वाटला. २१ व्या शतकासाठी २१ धडे आणि अगोदरचे पुस्तक मानवाचा इतिहास कंटाळवाणे वाटले पण इंडिका हे दुसऱ्या एका लेखकाचे चांगले वाटले. काईट रनर कुणी अनुवादले का? ते आवडलेले। ( माझी आवड)

In reply to by कंजूस

कॉमी 12/07/2021 - 08:17
काईट रनर नक्कीच अनुवादलेलं आहे. पाहिलं आहे. अनुवादकाचे नाव माहीत नाही. मी पण इंग्रजीत वाचतो बऱ्याचदा पण काही अनुवाद जास्त छान वाटतात. खास करून जुन्या वळणाची इंग्रजी फार नाटकी वाटते. ती अनुवादित असली की बरी वाटते.

कंजूस 12/07/2021 - 05:20
मूळ पुस्तकात कधीकधी उत्तम चित्रे असतात ,ती अनुवादक घेतात का?/ घेतली आहेत का? माझा आवडता लेखक विल्यम डर्लिंपल. त्याच्या व्हाईट मुघल्स, लास्ट मुघल या पुस्तकांत चित्रे आहेत. ती म्युझिअममधून मिळवली आहेत. ती रंगीत चित्रे घेतली नाहीत अनुवादांत तर गंमत जाईल.

डेझर्टर हे विजय देवधरांनी अनुवादित केलेले पुस्तक माझे आवडते पुस्तक. दुसरे आवडते म्हणजे रवींद्र गुर्जरांनी अनुवाद केलेले पॅपिलॉन (या पुस्तकात एक चूक मला नुकतीच सापडली. Splitting the money चे भाषांतर नोटांचे तुकडे करून वाटून घेतले असे केले आहे. असो.). ज्या अनुवादनात चुका असतात तो अनुवादक आणि ते पुस्तक माझ्या मनातून पूर्ण उतरते. काही काही पुस्तके घाईघाईत पाट्या टाकल्यासारखी अनुवादित केलेली आढळतात. अर्थात बरेच वाचक इंग्रजी वाचण्यासाठी असमर्थ असल्यामुळे त्यांना हे कळतच नाही, पण तरी वाचताना खडा आल्यासारखं वाटून वाचक गोंधळात पडतातच.

Bhakti 12/07/2021 - 11:19
वाह छान सांगितले. मी फक्त चारचौघी आणि पॅपिलॉन वाचलंय,तेही नीट आठवत नाही. आठवतं फक्त एकच 'द दा विंची कोड' मग Dan Brown चे. अजून एक toxin / poise वाचलं होतं..चांगल होते. मस्त यादी आहे.

प्रचेतस 12/07/2021 - 11:28
लेखाचा सुर डिटेक्टिव्ह, थ्रिलर प्रकारच्या कादंबर्‍यांना तुच्छ लेखण्याकडे दिसतोय. वास्तविक इंग्रजी साहित्यात अशा प्रकारच्या कादंबर्‍यांनी मोलाची भर घातलेली आहे. डॅन ब्राऊनचे दा विन्ची कोड, एन्जल्स अ‍ॅण्ड डिमन्स, फ्रेडरिक फोरसिथची द फिस्ट ऑफ गॉड, द निगोशियेटर. जेफ्री आर्चरची केन अ‍ॅण्ड अ‍ॅबल, द प्रिझनर ऑफ द बर्थ, सिडने शेल्डनचे द मास्टर ऑफ द गेम, ब्लडलाइन, अ‍ॅलिस्टर मॅक्लिनच्या द गन्स ऑफ नॅव्हरोन, व्हेअर इगल्स डेअर ह्यांच्या इतर आणि इतरही अनेक लेखकांच्या कादंबर्‍यांना वाचकांबरोबरच समिक्षकांची उदंड लोकप्रियता मिळालेली आहे. अगाथा ख्रिस्ती, सर आर्थर कॉनन डॉईल हे तर आज अभिजात गणले जातात. ब्रॅम स्टोकरची ड्रॅक्युला, मेरी शेलीची फ्रॅन्केनस्टाईन, एमिली ब्रॉन्टेची वुदरिंग हाईट्स ह्या थ्रिलर/हॉरर कादंबर्‍या आज अभिजात कादंबर्‍या म्हणून समजल्या जातात. डिटेक्टिव्ह/थ्रिलर कादंबर्‍यांचे सरसकटीकरण करुन त्यांना उकिरडा म्हणून हिणवणे योग्य नव्हे. काही जणांना आयर्न रॅंडचे ठोकळे रटाळ वाटू शकतील किंवा किरण नगरकरांच्या कादंबर्‍या अगम्य वाटू शकतात.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा 12/07/2021 - 12:24
+१ पुर्वी मिपावर वाचलेली सुशि आणि जीए यांची तुलना आठवली. जीए वाचणारे प्रगल्भ, दर्दी वाचक आणि सुशि वाचणारे उथळ वगैरे असा चर्चेचा सुर होता

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गॉडजिला 13/07/2021 - 00:12
जीए वाचणारे प्रगल्भ, दर्दी वाचक आणि सुशि वाचणारे उथळ वगैरे असा चर्चेचा सुर होता
तसं नाहीये... खरं तर जीए समजू शकणारे प्रगल्भ, दर्दी वाचक वगैरे असतात... सुशीना समजून घेण्याची वेळ येण्यासाठी DNAमधे समजूतदारपणा संथ करणारे बदल आवश्यक आहेत असे प्रांजळ मत आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

रंगीला रतन 13/07/2021 - 02:06
जीए वाचणारे प्रगल्भ, दर्दी वाचक त्यात चुकीचं काहीच नाही. वाचायला घेताच सरदर्दी सुरू होइल असे लेखन वाचायची प्रगल्भता दाखवतात ते दर्दी वाचक. नोबेल विजेते,गुरूदेव वगैरे वगैरे रविंद्रनाथ टागोरांच्या लेवलचे दुसरे पकाउ लेखक जीए असे माझे प्रांजळ मत. सुशि वाचणारे उथळ इथे उथळ शब्द जींदादिल अशा अर्थी अभिप्रेत असावा. क्युंकी मुर्दादिल क्या खाक सुशि पढेंगे.

In reply to by रंगीला रतन

कंजूस 13/07/2021 - 13:52
असं बंगाली लेखकच म्हणतात. पण असं बोललं तर लगेच या़ंंना पोटदुखी आहे हा शेराही मिळतो. जिएंनी किती उचललं ?

In reply to by कंजूस

गॉडजिला 13/07/2021 - 18:24
जिएंनी किती उचललं ?
माहीत नाही काही मोजके लिखाण सोडून इतर काही वाचले नाही, टागोरांबाबत विधानात थोडेफार नक्की तथ्य भासते

In reply to by प्रचेतस

पाटिल 12/07/2021 - 13:29
गन्स ऑफ नॅव्हरोन, वुदरींग हाईट्स आणि फोरसिथची पुस्तकं हे काही सन्माननीय अपवाद आहेत.. _/\_ इतर ज्या लेखकांचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, त्यांची पुस्तकं एकदा वाचून झाल्यावर पुन्हा पुन्हा वाचण्यासारखं त्यात काही आहे, असं मला वाटलं नाही.. अर्थात ही यादी माझ्या आवडी निवडींवर बेतलेली असल्यामुळे त्यात प्लस मायनस असं असणारच आहे... शिवाय डीटेक्टीव्ह/थ्रिलरच नाही तर आणखी बऱ्याच प्रकारची पुस्तकं आहेत, जी मला एकेकाळी आवडायची पण आता नाहीत आवडत... आणि ह्या आवडण्या/ न आवडण्याला काही इलाज नसतो.. :-) असं असलं तरीही, उकीरडा हा शब्द थोडा जास्तच झालेला आहे, आणि मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो.. लिहिण्याच्या ओघात ते होऊन गेलं... तसा काही उद्देश नव्हता माझा.. :-))

कंजूस 12/07/2021 - 12:16
सहमत. पण अनुवादित पुस्तकांची यादी आहे. ओके. ----------- वाचनीय पुस्तके ( थोडक्यात गाभ्यासह) यादी असा लेख कुणी सुरू करा. इंडिया टुडे, टाइम्स आणि इंडिअन एक्सप्रेस मध्ये बुक रिव्यू वाचून मला पुस्तक निवडायला सोपे जाते. मध्यंतरी ब्याटमनने रिव्यू केलेले द हॉर्स वाचायला घेतले. आवडले.

चौथा कोनाडा 12/07/2021 - 12:25
द रेल्वे मॅन ( एरीक लोमॅक्स) ही उदय बुवा अनुवादित कांदबरीबद्दल नुकतीच माहिती मिळाली. https://www.mehtapublishinghouse.com/book-details/THE-RAILWAY-MAN/3324.aspx मलाया-सियामच्या निबिड जंगलात जपान्यांनी बलाढ्य ब्रिटिश सैन्याला शह दिला. अतिशय दुष्टप्राप्य खडतर अशा रेल्वे मार्गाच्या उभारणीचा चंग जपानी सैन्याने बांधला व त्यासाठी तब्बल २,००,००० दोस्त राष्ट्रांच्या ब्रिटिश, ऑस्ट्रेलियन व कॅनेडियन सैनिकांना युद्धबंदी बनवून त्यांच्याकडून हया रेल्वेमार्गाची उभारणी केली. वैयक्तिक पातळीवर ही अमानुषता अनुभवलेल्या एका सैनिकाची ही प्रथमपुरुषी कहाणी, परंतु एका विशिष्ट कालखंडाच्या इतिहासाचे दर्शन घडविणारी अद्भुत कथा.

In reply to by टर्मीनेटर

चौथा कोनाडा 17/07/2021 - 20:29
टर्मीनेटर, त्या सिनेमा संदर्भात काही तपशील मिळाले तर जरूर पोस्टावे. मी शोधले पण सापडले नाहीत !

In reply to by चौथा कोनाडा

सुमो 18/07/2021 - 10:39
पोस्टरच मेहता पब्लिशिंगने पुस्तकाचं मुखपृष्ठ म्हणून वापरलंय. कॉलिन फर्थ आणि निकोल किडमन अभिनित हा सिनेमा इंटरनेट आर्काइव्हज वर बघण्या / डा लो करण्यासाठी उपलब्ध आहे.

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर 19/07/2021 - 15:16
युट्युबवर ट्रेलर आहे. https://youtu.be/px04904hm88 IMDB ची लिंक. https://m.imdb.com/title/tt2058107/?ref_=ext_shr_lnk टोरंटवर हिंदी डब्ड त्यावेळी मिळाला होता, आता आहे की नाही ते बघावे लागेल.

विजुभाऊ 12/07/2021 - 16:53
"थ्री कप्स ऑफ टी" हे ग्रेग मोर्टेनसन लिखीत पुस्तक मेहता प्रकाशनाचे अनुवादीत उपलब्ध केले आहे. खरोखरच वाचनीय आहे. शिक्षणामुळे काय चमत्कार घडतो हे अनुभवण्यासारखे आहे.

टर्मीनेटर 12/07/2021 - 18:18
छान आहे यादी, ह्यातली फार थोडी पुस्तके वाचली आहेत! हॅमिश मॅकडोनाल्ड यांच्या अंबानी & सन्स ह्या इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद कोणी केलाय त्यांचे नाव आता विसरलो पण उठसूट रिलायन्स आणि अंबानींना शिव्या घालणाऱ्यांनी नक्की वाचावे असे हे पुस्तक आहे. समोर वाडीयांसारखा तुलनेने महाबलाढ्य प्रस्थापित प्रतिस्पर्धी, गोएंकांसारखा माध्यमातील मातब्बर विरोधक, सरकारची विचित्र उद्योगविषयक धोरणे, लायसन्स राज आणि भ्रष्ट बाबुशाही अशा प्रतिकूल परिस्थितीवर आपल्या जिद्दीने व अक्कलहुषारीने मात करुन आपला व्यवसाय भरभराटीला आणणाऱ्या धीरूभाई अंबानींची यशोगाथा वाचण्या सारखी आहे. ambani

Nitin Palkar 12/07/2021 - 22:03
मी वाचलेले (आणि लक्षात असलेले) काही अनुवाद: चिपर बाय द डझन - फ्रँक बंकर गिलब्रेथ (ज्यू) अनु मंगला निगुडकर लव मेडिसीन अँड miracle - बरनी सिगल अनू. डॉ. शुभदा राठी (हे पुस्तक तीस वर्षांपूर्वी इंग्रजी वाचले होते अलीकडे काही वर्षांपूर्वी अनुवाद वाचला ). 'गाव', 'शिवार'- (अनु. जी ए कुलकर्णी) या आधीचे कॉनराड रिक्टरचेच 'रान' (अनु. जी ए कुलकर्णी) ही तिन्ही पुस्तके अफलातून आहेत . 'द इयरलिंग' चा राम पटवरधनांनी केलेला 'पाडस' हा अनुवाद . भा. रा. भागवतांनी केलेले ज्युल व्हर्न चे अनुवाद. 'born free ' 'लिविंग फ्री' आणि 'forever फ्री' या जॉय Adomson च्या पुस्तकांचे अनुवाद साप डले नाहीत (इंग्रजीतूनच वाचली) पण तिच्या 'पिपा द चित्ता'या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचला. जीम corbet च्या अनेक पुस्तकांचे अनुवाद पैकी एकाचा अनुवाद सुभाष bhende नी केल्याचे आठवते. टारझनचे सर्व भाग बहुतेक कृष्ण कुमारी शेरतूकडे यांनी अनुवाद केलेल. इंद्रजाल कॉमिक्स ची खूपशी कॉमिक्स (मराठी) विजय देवधरांची अनेक पुस्तके.

इंग्रजीतून भाषांतरित मराठी पुस्तके वाचायला आवडत नाही. प्रचेतस यांच्या प्रतिसादाशी सहमत. डॅन ब्राऊन आणि सिडने शेल्डन हे माझे आवडते लेखक. दोघांची झाडून सगळी पुस्तके वाचली आहेत. डिजिटल फॉर्ट्रेस, दा विंची कोड, एंजल्स अँड डेमंस तर अनेकदा. तसेच समग्र शेरलॉक होम्स सुद्धा अनेकदा वाचलंय. त्यातली व्हिक्टोरियन इंग्रजी भाषा एकदम भारी वाटते वाचायला. (तसं इंग्रजी मॅट्रिक्स रीलोडेड मधला आर्किटेक्ट बोलतो. :D) हॅरी पॉटर ची पुस्तके आणि चित्रपट तोंडपाठ होईपर्यंत पारायणे केलीत. मागच्या महिन्यात प्रचेतस यांच्याच सुचवणीवरून आधी लॉर्ड of द रिंग्ज चित्रपट पाहिले, नंतर पुस्तक वाचलं. आता हॉबिट पहायचं व वाचायचं आहे. मायकल क्रायटन यांची ज्युरासिक पार्क आणि प्रे ही पुस्तके आवडली होती. पुस्तके चांगली आहेतच. पण स्टीवन स्पीलबर्ग यांनी पिक्चर इतका भव्य बनवला आहे की हे चांगलं पुस्तक सुद्धा फिके वाटते. रॉबर्ट कुक यांची काही मेडिकल थ्रिलर वाचली आहेत. कोमा, ब्रेन, फीवर, ब्लाइंड साईट. ब्लाइंड साईट छान आहे. बरीच वाचायची राहिली आहेत. नॉन फिक्शन फारसे आवडत नाही. मात्र मित्तल यांनी आर्सेलर विकत घेतली त्याची कहाणी सांगणारे कोल्ड स्टील आवडले होते.

In reply to by तुषार काळभोर

कॉमी 13/07/2021 - 11:40
मी पण. इंग्लिश मध्येच वाचतो. पण पाडस आणि चौघीजणी वैगेरे अनुवाद फारच छान, मराठीत वाचणे पर्वणी आहे.

सौन्दर्य 12/07/2021 - 23:07
नॉट विदाउट माय डॉटर - मूळ लेखिका बेट्टी मेहमूदी, मराठी भाषान्तर लीना सोहोनी. हे देखील उत्तम पुस्तक आहे. ह्या कथेसारखीच 'काबुलीवाल्याची बायको' ही कथा आहे पण ह्या दोन्ही कथेतील महत्त्वाचा फरक म्हणजे बेट्टी मेहमूदी आपल्या जीवावर खेळून आपल्या मुलीला घेऊन इराण मधून निसटली तर काबुलीवाल्याची बायको आपल्या मुलीला अफगाणिस्तानतच ठेऊनच बांगलादेशला परतते.

गॉडजिला 13/07/2021 - 09:13
कादंबऱ्यांचा उकिरडा उपसून,
हा शब्दप्रयोग फार आवडला अन तो वास्तवही आहे... काही मोजके वाचनीय सोडले अन आपण वाहवत गेलो की मग आपण कादंबऱ्यांचा उकिरडा उपसत आहोत हे समजायला फार वेळ अन पैसा निघून गेलेला असतो

लॉर्ड ऑफ द फ्लाईज चं जीएं नी केलेलं भाषांतर फार लहानपणी वाचलं होतं. सध्या ते शोधतोय, पण कुठे मिळत नाहीये (म्हणजे फ्री ऑनलाइन मिळत नाहीये). पण विकत घ्यायचे म्हटले तरी अगदी बुकगंगा वर पण त्याचे नाव दिसत नाही.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

पाटिल 13/07/2021 - 11:07
लॉर्ड ऑफ फ्लाईजचा अनुवाद खूप जुना आहे.. बहुदा तो आऊट ऑफ प्रिंट असणार.. मला लायब्ररीमध्ये मिळाला होता..

In reply to by पाटिल

सध्या स्कॅन करून अपलोड करणारे सज्जन लोक ही आहेत, पण बहुधा हे पुस्तक सुद्धा फार जणांना ठाऊक नसावे.

अमर विश्वास 13/07/2021 - 10:44
विजय देवधर आणि लीना सोहोनी ही अनुवादित पुस्तकातील दोन महत्वाची नवे फ्रेडरिक फोरसिथ , सिडने शेल्डन, रॉबर्ट कुक यांच्या अनेक कादंबऱ्या मराठीत आणण्याचे काम यांनी केलय

In reply to by गॉडजिला

राघव 13/07/2021 - 18:02
ओह.. :-( त्याचा पुढला भागही त्यानं लिहिला होता बहुदा.. नाव आठवत नाहीये.

In reply to by राघव

गॉडजिला 13/07/2021 - 18:10
अनुवादकाची त्यात पपी बदल्याचा विचार सोडून दे फलाना फलाना तुला स्त्री खूप सुखी ठेवेल इथेच रहा अशी काही वाक्यरचना वाचल्याचे स्मरते. मला काहींच त्या वाक्याचा अर्थ समजायचा नाही... तसही बदल्यासाठी इतकी साहसे पळापळ केल्यावर पपी त्याच्या अन्यायाचा बदला न घेताच सेटल होतो हे जाणून कपाळावर हात ठेवला होता...

जागु 13/07/2021 - 12:58
वा हे खुप उपयोगी पडेल. सध्या मी स्टोरी टेल अ‌ॅप वरुन पुस्तके वाचत असते. किचनची कामे उरकताना ते बर पडत. चारचौघी मी अधी वाचल आहे. मला आवडलेल. छानच आहे.

राघव 13/07/2021 - 18:01
माझीही थोडीशी भरः "दु:ख पर्वताएवढे": भा रा भागवतांनी केलेला विक्टर ह्युगोच्या ला मिझरेबल्सचा अनुवाद. "मला निसटलंच पाहिजे!": श्रीकांत लागू यांनी केलेला स्लावोमीर राविझच्या द लाँग वॉक चा अनुवाद

अनुवादित पुस्तकांच्या यादीत एस भैरप्पा यांच्या उमा कुलकर्णी यांनी अनुवादीत केलेल्या पुस्तकांचा उल्लेख जरुर असला पाहिजे यादीत सगळ्यात पहिले आणि महत्वाचे पुस्तक म्हणजे "आवरण" त्या नंतर या यादीत त्यांच्या "पर्व", "तंतू", "मंद्र", "वंशवृक्ष ", "सार्थ" या कादंबर्‍या येतात. वर उल्लेख झालेल्या पुस्तकांशिवाय मॅक्स्झिम गॉर्की यांचे "आई" , चार्लस डिकिन्स यांचे "टेल ऑफ टू सिटीज" पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

दोन्ही एकदम भारी. विशेष म्हणजे उमा.कुलकर्णी यांनीदेखील भाषांतर असल्याचं जाणवू न देता लिहिलंय.

साबु 01/08/2021 - 19:43
वल्लि उर्फ प्रचेतसशी सहमत. मल आवडलेले अनुवाद : पपिलोन, डेझर्टेर, कोमा, सेवेन्थ सिक्रेट, फिस्ट ओफ गौड, सेकन्ड लेडि,कन्टेजन.

कॉमी 11/07/2021 - 23:08
विस्तृत यादी, छानच. (आफ्टर द क्वेक माझे खूप आवडते पुस्तक आहे.) काही वाढ- शेरलॉक होम्स कथा- भालबा केळकर आणि गजानन क्षीरसागर दोन्ही मस्त. (क्षीरसागर संपूर्ण आहे.) चौघीजणी- (लिटल वुमन आणि गुड वाईव्हज- लुईसा मी अल्कॉट)- शांता शेळके बर्टनचे अनुवादित अरेबियन नाईट्स- गौरी देशपांडे

In reply to by कॉमी

पाटिल 12/07/2021 - 08:08
चौघीजणी' बद्दल ऐकलं आहे बरंच.. आता बघायला पाहिजे.. अरेबियन नाईट्स चे अनुवाद पाहिले होते एकदा अक्षरधारा मध्ये, पण ते सगळे दहा-बारा खंड एकाच वेळी घ्यायला लागतील असं त्यांनी सांगितलं, म्हणून राहून गेलं ते.. तुम्ही सुचविलेली पुस्तकं विश लिस्ट मध्ये टाकतोय.. यादीत भर टाकल्याबद्दल धन्यवाद.. :-)

साहना 12/07/2021 - 03:48
मादाम बोवारी- गुस्ताव फ्लॉबेर (अनु. जयंत धुपकर) हे आवडते पुस्तके आहे. ह्यावर शाहरुख खान दीप साही ह्यांचा माया मेमसाब हा जबरदस्त चित्रपट येऊन गेलाय. हटके आहे आणि दीपा आणि शाहरुख दोघांनीही ह्यांत अनावृत्त सीन्स केले आहेत.

In reply to by साहना

गॉडजिला 12/07/2021 - 08:51
सगळेच बिचारीची मजा घेतात :( फक्त शारुक न्हवे हा चित्रपट पाहिल्यावर मी दीपा साहिचे बरेच चित्रपट बघून काढले ज्यात शारुकचा ओ डार्लिंग ये हे इंडिया, अन जॅकीचा आर या पार मस्त वाटले इतरही अनेक चित्रपटात दीपा छान दिसली आहे पण चित्रपट डावे नितंब या केटेगारीतील असल्याने मला तसे भावले न्हवते... पण दीपाने दिल जित लिया था हे नक्की

कंजूस 12/07/2021 - 05:14
पण मूळ पुस्तकंच / किंवा इंग्रजी अनुवाद वाचणार. तेच बरे नसेल तर अनुवाद काय कामाचा. ॲना कॅरेनिना-कंटाळवाणे वाटले होते. ककोल्ड चांगले आहे. रावणा आणि एडी पहिला भाग चांगला आहे. एक्सट्रा फार लांबवल्यासारखा वाटला. २१ व्या शतकासाठी २१ धडे आणि अगोदरचे पुस्तक मानवाचा इतिहास कंटाळवाणे वाटले पण इंडिका हे दुसऱ्या एका लेखकाचे चांगले वाटले. काईट रनर कुणी अनुवादले का? ते आवडलेले। ( माझी आवड)

In reply to by कंजूस

कॉमी 12/07/2021 - 08:17
काईट रनर नक्कीच अनुवादलेलं आहे. पाहिलं आहे. अनुवादकाचे नाव माहीत नाही. मी पण इंग्रजीत वाचतो बऱ्याचदा पण काही अनुवाद जास्त छान वाटतात. खास करून जुन्या वळणाची इंग्रजी फार नाटकी वाटते. ती अनुवादित असली की बरी वाटते.

कंजूस 12/07/2021 - 05:20
मूळ पुस्तकात कधीकधी उत्तम चित्रे असतात ,ती अनुवादक घेतात का?/ घेतली आहेत का? माझा आवडता लेखक विल्यम डर्लिंपल. त्याच्या व्हाईट मुघल्स, लास्ट मुघल या पुस्तकांत चित्रे आहेत. ती म्युझिअममधून मिळवली आहेत. ती रंगीत चित्रे घेतली नाहीत अनुवादांत तर गंमत जाईल.

डेझर्टर हे विजय देवधरांनी अनुवादित केलेले पुस्तक माझे आवडते पुस्तक. दुसरे आवडते म्हणजे रवींद्र गुर्जरांनी अनुवाद केलेले पॅपिलॉन (या पुस्तकात एक चूक मला नुकतीच सापडली. Splitting the money चे भाषांतर नोटांचे तुकडे करून वाटून घेतले असे केले आहे. असो.). ज्या अनुवादनात चुका असतात तो अनुवादक आणि ते पुस्तक माझ्या मनातून पूर्ण उतरते. काही काही पुस्तके घाईघाईत पाट्या टाकल्यासारखी अनुवादित केलेली आढळतात. अर्थात बरेच वाचक इंग्रजी वाचण्यासाठी असमर्थ असल्यामुळे त्यांना हे कळतच नाही, पण तरी वाचताना खडा आल्यासारखं वाटून वाचक गोंधळात पडतातच.

Bhakti 12/07/2021 - 11:19
वाह छान सांगितले. मी फक्त चारचौघी आणि पॅपिलॉन वाचलंय,तेही नीट आठवत नाही. आठवतं फक्त एकच 'द दा विंची कोड' मग Dan Brown चे. अजून एक toxin / poise वाचलं होतं..चांगल होते. मस्त यादी आहे.

प्रचेतस 12/07/2021 - 11:28
लेखाचा सुर डिटेक्टिव्ह, थ्रिलर प्रकारच्या कादंबर्‍यांना तुच्छ लेखण्याकडे दिसतोय. वास्तविक इंग्रजी साहित्यात अशा प्रकारच्या कादंबर्‍यांनी मोलाची भर घातलेली आहे. डॅन ब्राऊनचे दा विन्ची कोड, एन्जल्स अ‍ॅण्ड डिमन्स, फ्रेडरिक फोरसिथची द फिस्ट ऑफ गॉड, द निगोशियेटर. जेफ्री आर्चरची केन अ‍ॅण्ड अ‍ॅबल, द प्रिझनर ऑफ द बर्थ, सिडने शेल्डनचे द मास्टर ऑफ द गेम, ब्लडलाइन, अ‍ॅलिस्टर मॅक्लिनच्या द गन्स ऑफ नॅव्हरोन, व्हेअर इगल्स डेअर ह्यांच्या इतर आणि इतरही अनेक लेखकांच्या कादंबर्‍यांना वाचकांबरोबरच समिक्षकांची उदंड लोकप्रियता मिळालेली आहे. अगाथा ख्रिस्ती, सर आर्थर कॉनन डॉईल हे तर आज अभिजात गणले जातात. ब्रॅम स्टोकरची ड्रॅक्युला, मेरी शेलीची फ्रॅन्केनस्टाईन, एमिली ब्रॉन्टेची वुदरिंग हाईट्स ह्या थ्रिलर/हॉरर कादंबर्‍या आज अभिजात कादंबर्‍या म्हणून समजल्या जातात. डिटेक्टिव्ह/थ्रिलर कादंबर्‍यांचे सरसकटीकरण करुन त्यांना उकिरडा म्हणून हिणवणे योग्य नव्हे. काही जणांना आयर्न रॅंडचे ठोकळे रटाळ वाटू शकतील किंवा किरण नगरकरांच्या कादंबर्‍या अगम्य वाटू शकतात.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा 12/07/2021 - 12:24
+१ पुर्वी मिपावर वाचलेली सुशि आणि जीए यांची तुलना आठवली. जीए वाचणारे प्रगल्भ, दर्दी वाचक आणि सुशि वाचणारे उथळ वगैरे असा चर्चेचा सुर होता

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गॉडजिला 13/07/2021 - 00:12
जीए वाचणारे प्रगल्भ, दर्दी वाचक आणि सुशि वाचणारे उथळ वगैरे असा चर्चेचा सुर होता
तसं नाहीये... खरं तर जीए समजू शकणारे प्रगल्भ, दर्दी वाचक वगैरे असतात... सुशीना समजून घेण्याची वेळ येण्यासाठी DNAमधे समजूतदारपणा संथ करणारे बदल आवश्यक आहेत असे प्रांजळ मत आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

रंगीला रतन 13/07/2021 - 02:06
जीए वाचणारे प्रगल्भ, दर्दी वाचक त्यात चुकीचं काहीच नाही. वाचायला घेताच सरदर्दी सुरू होइल असे लेखन वाचायची प्रगल्भता दाखवतात ते दर्दी वाचक. नोबेल विजेते,गुरूदेव वगैरे वगैरे रविंद्रनाथ टागोरांच्या लेवलचे दुसरे पकाउ लेखक जीए असे माझे प्रांजळ मत. सुशि वाचणारे उथळ इथे उथळ शब्द जींदादिल अशा अर्थी अभिप्रेत असावा. क्युंकी मुर्दादिल क्या खाक सुशि पढेंगे.

In reply to by रंगीला रतन

कंजूस 13/07/2021 - 13:52
असं बंगाली लेखकच म्हणतात. पण असं बोललं तर लगेच या़ंंना पोटदुखी आहे हा शेराही मिळतो. जिएंनी किती उचललं ?

In reply to by कंजूस

गॉडजिला 13/07/2021 - 18:24
जिएंनी किती उचललं ?
माहीत नाही काही मोजके लिखाण सोडून इतर काही वाचले नाही, टागोरांबाबत विधानात थोडेफार नक्की तथ्य भासते

In reply to by प्रचेतस

पाटिल 12/07/2021 - 13:29
गन्स ऑफ नॅव्हरोन, वुदरींग हाईट्स आणि फोरसिथची पुस्तकं हे काही सन्माननीय अपवाद आहेत.. _/\_ इतर ज्या लेखकांचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, त्यांची पुस्तकं एकदा वाचून झाल्यावर पुन्हा पुन्हा वाचण्यासारखं त्यात काही आहे, असं मला वाटलं नाही.. अर्थात ही यादी माझ्या आवडी निवडींवर बेतलेली असल्यामुळे त्यात प्लस मायनस असं असणारच आहे... शिवाय डीटेक्टीव्ह/थ्रिलरच नाही तर आणखी बऱ्याच प्रकारची पुस्तकं आहेत, जी मला एकेकाळी आवडायची पण आता नाहीत आवडत... आणि ह्या आवडण्या/ न आवडण्याला काही इलाज नसतो.. :-) असं असलं तरीही, उकीरडा हा शब्द थोडा जास्तच झालेला आहे, आणि मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो.. लिहिण्याच्या ओघात ते होऊन गेलं... तसा काही उद्देश नव्हता माझा.. :-))

कंजूस 12/07/2021 - 12:16
सहमत. पण अनुवादित पुस्तकांची यादी आहे. ओके. ----------- वाचनीय पुस्तके ( थोडक्यात गाभ्यासह) यादी असा लेख कुणी सुरू करा. इंडिया टुडे, टाइम्स आणि इंडिअन एक्सप्रेस मध्ये बुक रिव्यू वाचून मला पुस्तक निवडायला सोपे जाते. मध्यंतरी ब्याटमनने रिव्यू केलेले द हॉर्स वाचायला घेतले. आवडले.

चौथा कोनाडा 12/07/2021 - 12:25
द रेल्वे मॅन ( एरीक लोमॅक्स) ही उदय बुवा अनुवादित कांदबरीबद्दल नुकतीच माहिती मिळाली. https://www.mehtapublishinghouse.com/book-details/THE-RAILWAY-MAN/3324.aspx मलाया-सियामच्या निबिड जंगलात जपान्यांनी बलाढ्य ब्रिटिश सैन्याला शह दिला. अतिशय दुष्टप्राप्य खडतर अशा रेल्वे मार्गाच्या उभारणीचा चंग जपानी सैन्याने बांधला व त्यासाठी तब्बल २,००,००० दोस्त राष्ट्रांच्या ब्रिटिश, ऑस्ट्रेलियन व कॅनेडियन सैनिकांना युद्धबंदी बनवून त्यांच्याकडून हया रेल्वेमार्गाची उभारणी केली. वैयक्तिक पातळीवर ही अमानुषता अनुभवलेल्या एका सैनिकाची ही प्रथमपुरुषी कहाणी, परंतु एका विशिष्ट कालखंडाच्या इतिहासाचे दर्शन घडविणारी अद्भुत कथा.

In reply to by टर्मीनेटर

चौथा कोनाडा 17/07/2021 - 20:29
टर्मीनेटर, त्या सिनेमा संदर्भात काही तपशील मिळाले तर जरूर पोस्टावे. मी शोधले पण सापडले नाहीत !

In reply to by चौथा कोनाडा

सुमो 18/07/2021 - 10:39
पोस्टरच मेहता पब्लिशिंगने पुस्तकाचं मुखपृष्ठ म्हणून वापरलंय. कॉलिन फर्थ आणि निकोल किडमन अभिनित हा सिनेमा इंटरनेट आर्काइव्हज वर बघण्या / डा लो करण्यासाठी उपलब्ध आहे.

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर 19/07/2021 - 15:16
युट्युबवर ट्रेलर आहे. https://youtu.be/px04904hm88 IMDB ची लिंक. https://m.imdb.com/title/tt2058107/?ref_=ext_shr_lnk टोरंटवर हिंदी डब्ड त्यावेळी मिळाला होता, आता आहे की नाही ते बघावे लागेल.

विजुभाऊ 12/07/2021 - 16:53
"थ्री कप्स ऑफ टी" हे ग्रेग मोर्टेनसन लिखीत पुस्तक मेहता प्रकाशनाचे अनुवादीत उपलब्ध केले आहे. खरोखरच वाचनीय आहे. शिक्षणामुळे काय चमत्कार घडतो हे अनुभवण्यासारखे आहे.

टर्मीनेटर 12/07/2021 - 18:18
छान आहे यादी, ह्यातली फार थोडी पुस्तके वाचली आहेत! हॅमिश मॅकडोनाल्ड यांच्या अंबानी & सन्स ह्या इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद कोणी केलाय त्यांचे नाव आता विसरलो पण उठसूट रिलायन्स आणि अंबानींना शिव्या घालणाऱ्यांनी नक्की वाचावे असे हे पुस्तक आहे. समोर वाडीयांसारखा तुलनेने महाबलाढ्य प्रस्थापित प्रतिस्पर्धी, गोएंकांसारखा माध्यमातील मातब्बर विरोधक, सरकारची विचित्र उद्योगविषयक धोरणे, लायसन्स राज आणि भ्रष्ट बाबुशाही अशा प्रतिकूल परिस्थितीवर आपल्या जिद्दीने व अक्कलहुषारीने मात करुन आपला व्यवसाय भरभराटीला आणणाऱ्या धीरूभाई अंबानींची यशोगाथा वाचण्या सारखी आहे. ambani

Nitin Palkar 12/07/2021 - 22:03
मी वाचलेले (आणि लक्षात असलेले) काही अनुवाद: चिपर बाय द डझन - फ्रँक बंकर गिलब्रेथ (ज्यू) अनु मंगला निगुडकर लव मेडिसीन अँड miracle - बरनी सिगल अनू. डॉ. शुभदा राठी (हे पुस्तक तीस वर्षांपूर्वी इंग्रजी वाचले होते अलीकडे काही वर्षांपूर्वी अनुवाद वाचला ). 'गाव', 'शिवार'- (अनु. जी ए कुलकर्णी) या आधीचे कॉनराड रिक्टरचेच 'रान' (अनु. जी ए कुलकर्णी) ही तिन्ही पुस्तके अफलातून आहेत . 'द इयरलिंग' चा राम पटवरधनांनी केलेला 'पाडस' हा अनुवाद . भा. रा. भागवतांनी केलेले ज्युल व्हर्न चे अनुवाद. 'born free ' 'लिविंग फ्री' आणि 'forever फ्री' या जॉय Adomson च्या पुस्तकांचे अनुवाद साप डले नाहीत (इंग्रजीतूनच वाचली) पण तिच्या 'पिपा द चित्ता'या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचला. जीम corbet च्या अनेक पुस्तकांचे अनुवाद पैकी एकाचा अनुवाद सुभाष bhende नी केल्याचे आठवते. टारझनचे सर्व भाग बहुतेक कृष्ण कुमारी शेरतूकडे यांनी अनुवाद केलेल. इंद्रजाल कॉमिक्स ची खूपशी कॉमिक्स (मराठी) विजय देवधरांची अनेक पुस्तके.

इंग्रजीतून भाषांतरित मराठी पुस्तके वाचायला आवडत नाही. प्रचेतस यांच्या प्रतिसादाशी सहमत. डॅन ब्राऊन आणि सिडने शेल्डन हे माझे आवडते लेखक. दोघांची झाडून सगळी पुस्तके वाचली आहेत. डिजिटल फॉर्ट्रेस, दा विंची कोड, एंजल्स अँड डेमंस तर अनेकदा. तसेच समग्र शेरलॉक होम्स सुद्धा अनेकदा वाचलंय. त्यातली व्हिक्टोरियन इंग्रजी भाषा एकदम भारी वाटते वाचायला. (तसं इंग्रजी मॅट्रिक्स रीलोडेड मधला आर्किटेक्ट बोलतो. :D) हॅरी पॉटर ची पुस्तके आणि चित्रपट तोंडपाठ होईपर्यंत पारायणे केलीत. मागच्या महिन्यात प्रचेतस यांच्याच सुचवणीवरून आधी लॉर्ड of द रिंग्ज चित्रपट पाहिले, नंतर पुस्तक वाचलं. आता हॉबिट पहायचं व वाचायचं आहे. मायकल क्रायटन यांची ज्युरासिक पार्क आणि प्रे ही पुस्तके आवडली होती. पुस्तके चांगली आहेतच. पण स्टीवन स्पीलबर्ग यांनी पिक्चर इतका भव्य बनवला आहे की हे चांगलं पुस्तक सुद्धा फिके वाटते. रॉबर्ट कुक यांची काही मेडिकल थ्रिलर वाचली आहेत. कोमा, ब्रेन, फीवर, ब्लाइंड साईट. ब्लाइंड साईट छान आहे. बरीच वाचायची राहिली आहेत. नॉन फिक्शन फारसे आवडत नाही. मात्र मित्तल यांनी आर्सेलर विकत घेतली त्याची कहाणी सांगणारे कोल्ड स्टील आवडले होते.

In reply to by तुषार काळभोर

कॉमी 13/07/2021 - 11:40
मी पण. इंग्लिश मध्येच वाचतो. पण पाडस आणि चौघीजणी वैगेरे अनुवाद फारच छान, मराठीत वाचणे पर्वणी आहे.

सौन्दर्य 12/07/2021 - 23:07
नॉट विदाउट माय डॉटर - मूळ लेखिका बेट्टी मेहमूदी, मराठी भाषान्तर लीना सोहोनी. हे देखील उत्तम पुस्तक आहे. ह्या कथेसारखीच 'काबुलीवाल्याची बायको' ही कथा आहे पण ह्या दोन्ही कथेतील महत्त्वाचा फरक म्हणजे बेट्टी मेहमूदी आपल्या जीवावर खेळून आपल्या मुलीला घेऊन इराण मधून निसटली तर काबुलीवाल्याची बायको आपल्या मुलीला अफगाणिस्तानतच ठेऊनच बांगलादेशला परतते.

गॉडजिला 13/07/2021 - 09:13
कादंबऱ्यांचा उकिरडा उपसून,
हा शब्दप्रयोग फार आवडला अन तो वास्तवही आहे... काही मोजके वाचनीय सोडले अन आपण वाहवत गेलो की मग आपण कादंबऱ्यांचा उकिरडा उपसत आहोत हे समजायला फार वेळ अन पैसा निघून गेलेला असतो

लॉर्ड ऑफ द फ्लाईज चं जीएं नी केलेलं भाषांतर फार लहानपणी वाचलं होतं. सध्या ते शोधतोय, पण कुठे मिळत नाहीये (म्हणजे फ्री ऑनलाइन मिळत नाहीये). पण विकत घ्यायचे म्हटले तरी अगदी बुकगंगा वर पण त्याचे नाव दिसत नाही.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

पाटिल 13/07/2021 - 11:07
लॉर्ड ऑफ फ्लाईजचा अनुवाद खूप जुना आहे.. बहुदा तो आऊट ऑफ प्रिंट असणार.. मला लायब्ररीमध्ये मिळाला होता..

In reply to by पाटिल

सध्या स्कॅन करून अपलोड करणारे सज्जन लोक ही आहेत, पण बहुधा हे पुस्तक सुद्धा फार जणांना ठाऊक नसावे.

अमर विश्वास 13/07/2021 - 10:44
विजय देवधर आणि लीना सोहोनी ही अनुवादित पुस्तकातील दोन महत्वाची नवे फ्रेडरिक फोरसिथ , सिडने शेल्डन, रॉबर्ट कुक यांच्या अनेक कादंबऱ्या मराठीत आणण्याचे काम यांनी केलय

In reply to by गॉडजिला

राघव 13/07/2021 - 18:02
ओह.. :-( त्याचा पुढला भागही त्यानं लिहिला होता बहुदा.. नाव आठवत नाहीये.

In reply to by राघव

गॉडजिला 13/07/2021 - 18:10
अनुवादकाची त्यात पपी बदल्याचा विचार सोडून दे फलाना फलाना तुला स्त्री खूप सुखी ठेवेल इथेच रहा अशी काही वाक्यरचना वाचल्याचे स्मरते. मला काहींच त्या वाक्याचा अर्थ समजायचा नाही... तसही बदल्यासाठी इतकी साहसे पळापळ केल्यावर पपी त्याच्या अन्यायाचा बदला न घेताच सेटल होतो हे जाणून कपाळावर हात ठेवला होता...

जागु 13/07/2021 - 12:58
वा हे खुप उपयोगी पडेल. सध्या मी स्टोरी टेल अ‌ॅप वरुन पुस्तके वाचत असते. किचनची कामे उरकताना ते बर पडत. चारचौघी मी अधी वाचल आहे. मला आवडलेल. छानच आहे.

राघव 13/07/2021 - 18:01
माझीही थोडीशी भरः "दु:ख पर्वताएवढे": भा रा भागवतांनी केलेला विक्टर ह्युगोच्या ला मिझरेबल्सचा अनुवाद. "मला निसटलंच पाहिजे!": श्रीकांत लागू यांनी केलेला स्लावोमीर राविझच्या द लाँग वॉक चा अनुवाद

अनुवादित पुस्तकांच्या यादीत एस भैरप्पा यांच्या उमा कुलकर्णी यांनी अनुवादीत केलेल्या पुस्तकांचा उल्लेख जरुर असला पाहिजे यादीत सगळ्यात पहिले आणि महत्वाचे पुस्तक म्हणजे "आवरण" त्या नंतर या यादीत त्यांच्या "पर्व", "तंतू", "मंद्र", "वंशवृक्ष ", "सार्थ" या कादंबर्‍या येतात. वर उल्लेख झालेल्या पुस्तकांशिवाय मॅक्स्झिम गॉर्की यांचे "आई" , चार्लस डिकिन्स यांचे "टेल ऑफ टू सिटीज" पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

दोन्ही एकदम भारी. विशेष म्हणजे उमा.कुलकर्णी यांनीदेखील भाषांतर असल्याचं जाणवू न देता लिहिलंय.

साबु 01/08/2021 - 19:43
वल्लि उर्फ प्रचेतसशी सहमत. मल आवडलेले अनुवाद : पपिलोन, डेझर्टेर, कोमा, सेवेन्थ सिक्रेट, फिस्ट ओफ गौड, सेकन्ड लेडि,कन्टेजन.
वाचनाच्या मर्यादेत, मला आवडलेल्या आणि आठवतायत तशा क्रमाने काही अनुवादित पुस्तकांची यादी करतो आहे. हा उद्योग करण्याचा हेतू असा की फार पूर्वी माझ्याबाबतीत प्रॉब्लेम असा झाला होता की मराठीतलं जे जे वाचायला पाहिजे होतं, ते आता वाचून झालेलं आहे, असं वाटण्याचा एक काळ आला होता.. आणि मग त्यातून 'अजून किती काळ तेच तेच वाचून मन रिझवून घ्यायचं', असा वैतागही..‌ पण मग डायरेक्ट इंग्रजी क्लासिक्सकडं जायचं तर त्यात एक प्रकारची 'दचक' होती की ती पल्लेदार भाषा आपल्याला झेपतेय की नाही वगैरे..

अरिस्टोफेन्सने सांगितलेलं प्रेम

एस.बी ·

चित्रगुप्त 25/06/2021 - 07:45
नवीनच माहिती दिल्याबद्दल आभार. या विषयावरही पाश्चात्य चित्रकारांनी चित्रे रंगवली असतील असे वाटते. ती गूगल वर हुडकण्यासाठी योग्य ते शब्द (इंग्रजी स्पेलिंग) कोणते ?

सौन्दर्य 25/06/2021 - 22:47
ग्रीक मायथॉलॉजिवर अनेक कथा वाचल्या पण ही कधी वाचनात आली नाही. शाळेत असताना 'इको आणि नार्सिसस', 'पँडोराज बॉक्स', वगैरे कथा शिकण्यासाठी होत्या त्याची आठवण झाली.

चित्रगुप्त 25/06/2021 - 07:45
नवीनच माहिती दिल्याबद्दल आभार. या विषयावरही पाश्चात्य चित्रकारांनी चित्रे रंगवली असतील असे वाटते. ती गूगल वर हुडकण्यासाठी योग्य ते शब्द (इंग्रजी स्पेलिंग) कोणते ?

सौन्दर्य 25/06/2021 - 22:47
ग्रीक मायथॉलॉजिवर अनेक कथा वाचल्या पण ही कधी वाचनात आली नाही. शाळेत असताना 'इको आणि नार्सिसस', 'पँडोराज बॉक्स', वगैरे कथा शिकण्यासाठी होत्या त्याची आठवण झाली.
आज वटपौर्णिमा सण,फेरे,पातिव्रत्य ,जीवनसाथी वैग्रे वैग्रे वर्ती खूपच चर्वितचर्वण सुरू असणार! आज ह्या भारतीय सणाच्या निमित्ताने मला एक कथा वाचण्यात आलेली होती ती तुम्हा सगळ्यांसमोर मांडावी असं मला वाटतं. आपली ती तुम्ही नेमी नेमी ऐकता ती सत्यवान सावित्रीची कथा नाहीये ही !

शोध आणि धागेदोरे: Research and References

लेखनवाला ·

मनो 06/04/2021 - 01:03
एखादा गोडगोड प्रतिसाद देऊन पुढे जाणार होतो, पण तुम्ही प्रामाणिक अभिप्राय मागितल्याने आता विचार करून लिहिणे आले. खरं सांगायचं तर कथा आवडली नाही. शेवटपर्यंत न वाचता मध्येच सोडून द्यावी असे अनेकदा वाटले. काही कारणे सांगतो. तुम्ही "......" चा मुक्तहस्ते वापर केलेला आहे, तो काही पटला नाही. त्याच्या अति-वापराने तुटक छोटी वाक्ये बनली आहेत, उदाहरणच द्यायचे झाले तर या एकाच परिच्छेदात तुम्ही नायकाला टीव्ही, इस्पितळ, घर अश्या तीन ठिकाणी फिरवलं आहे. हे तीन वेगळे प्रसंग आहेत. """ 'तो' टीव्हीवर झळकला, "तर आपण आता थेट जोडले गेले आहोत...... सदानंद सोहकर... यांच्याशी..... काय भावना होत्या तुमच्या जेव्हा तुम्ही धाडस दाखवत, स्वत:चा जीव धोक्यात टाकत, त्या लहान मुलाला वाचवलतं...... तुम्ही पाहत आहात एस्क्युलिझिव मुलाखत.........". कानाला एयरफोन लावत मोबाईलच्या मदतीने सुरु असलेला इंटरव्यू एकदाचा संपला, त्या मुलाला वाचवण्याच्या धडपडीत सदानंदच्या हाताला मुका मार बसला होता, त्यामुळे त्याला सरकारी इस्पितळात दाखल केलं होतं आणि तीन-चार तासाच्या सरकारी सोपस्कारानंतर आता तो घरी आला होता, त्याच्या डाव्या हाताला प्लास्टर लावण्यात आलं होतं """ दुसरे उदाहरण - """ फक्त गाठोडं डोक्याशी ऊशी म्हणून घेत साताजन्माची झोप लागल्यासारखं निद्रिस्त झालेलं एक भिकारी जोडपं तेवढं तिथं होतं, ट्रेन येणार असल्याची उद्घोषणा फक्त त्या तिथल्या शांत माहौलाला भेदून काढत होती. त्या जोरदार डोळा लागलेल्या जोडप्यावर या आवाजाचा काही एक परिणाम जाणवत नव्हता, माहित नाही पण त्यांना या आवाजासोबत झोपण्याची सवय असावी कदाचित, ते दोघंही चिरकाल निद्रा अवस्थेतेत असल्यासारखे दिसत होते, एकूण रेल्वेकडचा गोंगाट त्यांच्यासाठी रोजचाच असणार बहुतेक…. पण आजतर रोजच्यासारखी वर्दळ नव्हती, रंगपंचमीची सुटटी असल्याकारणाने असेल, कदाचित म्हणूनच त्याचमुळे त्यांना अशी काळोखी बेफाम झोप भर सकाळी लागली होती का कोण जाणे! """ इतके तपशील खरोखर आवश्यकच आहेत का? कथेचा गाभा काय, याच्याशी ते जोडले गेले आहेत का? जर ही सगळी वाक्ये काढून टाकली तर कथेत फरक पडतो का? एखादा मुरब्बी कथाकार ३-४ शब्दात त्याच्या आईवडिलांचे लक्ष नव्हते (किंवा त्याचे आई-वडीलच त्या जागी नव्हते) ते सांगून जातो. अजून एक खटकलेली गोष्ट म्हणजे कथेतील प्रसंगाची गुंफण. सरळधोपट मार्गाने घडले तसे प्रसंग न सांगता जर अशी सुरुवात केली असती की नायक आपल्या हाताचे प्लास्टर पुन्हा-पुन्हा तपासून पाहत होता, कारण त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला. अशी काही जर सुरुवात केली तर वाचकाला उत्कंठा निर्माण होते की नायकाच्या बाबतीत असे का झाले? त्यामुळे पुढचे वाचावे अशी इच्छा निर्माण होते. असो, एकंदर नाउमेद न होता तुम्ही पुन्हा लिहीत राहाल अशी आशा आहे. इतर मंडळी चांगले काय आहे ते सांगतीलच, पण न आवडलेले काय ते सांगावे म्हणून थोडे लिहितो आहे, गोड मानून घ्यावे ही विनंती.

लेखनवाला 06/04/2021 - 12:56
समजा तो प्रसंग पुढे जाऊन खूप महत्वाचा असेल तर त्याचं आतापासूनच काही तपशीलवार मुद्दे वाचकांसमोर मांडलेत तर जेणे करून पुढे कथानकात घडणाऱ्या प्रसंगाशी ते जोडून घेऊ शकतील अशी मला शक्यता वाटत असल्यामुळे मी तसं लिहलय. आणि ".... " हे असं लिहण्याला काही लिमिट असतं का? हे मी माहिती साठी विचारतोय. मला वाटत असं ".... " लिहण्याने एक फ्लो कायम राहतो, मग यांवर दुसरा कोणता उपाय आहे का ज्याने फ्लो कायम आहे हे दाखवता येईल. "तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला" मूळात तो तिकडे जाताच नव्हता, त्यासाठी तुम्हाला कथा पूर्ण वाचायला लागेल.

In reply to by लेखनवाला

मनो 07/04/2021 - 04:01
तुम्ही ... बद्दल केलेली गोष्ट माझ्या हातूनही झालेली आहे, त्यामुळं माझा अनुभव सांगतो आहे. लेखकाचा लिहिण्याचा फ्लो त्यामुळे कायम राहतो, पण वाचकाला ... ने जोडलेली वाक्यं तुटक आणि असंबद्ध वाटतात. त्यामुळे जे प्रसंग हळुवारपणे खुलवायचे असतात ते पटापट ३-४ वाक्यात उरकले जातात. अश्या वेळी प्रसंग आवश्यकच असेल तर त्याला जास्त जागा देऊन खुलवावा, किंवा काढून टाकून ते तपशीलच नाहीसे करावेत.

मनो 06/04/2021 - 01:03
एखादा गोडगोड प्रतिसाद देऊन पुढे जाणार होतो, पण तुम्ही प्रामाणिक अभिप्राय मागितल्याने आता विचार करून लिहिणे आले. खरं सांगायचं तर कथा आवडली नाही. शेवटपर्यंत न वाचता मध्येच सोडून द्यावी असे अनेकदा वाटले. काही कारणे सांगतो. तुम्ही "......" चा मुक्तहस्ते वापर केलेला आहे, तो काही पटला नाही. त्याच्या अति-वापराने तुटक छोटी वाक्ये बनली आहेत, उदाहरणच द्यायचे झाले तर या एकाच परिच्छेदात तुम्ही नायकाला टीव्ही, इस्पितळ, घर अश्या तीन ठिकाणी फिरवलं आहे. हे तीन वेगळे प्रसंग आहेत. """ 'तो' टीव्हीवर झळकला, "तर आपण आता थेट जोडले गेले आहोत...... सदानंद सोहकर... यांच्याशी..... काय भावना होत्या तुमच्या जेव्हा तुम्ही धाडस दाखवत, स्वत:चा जीव धोक्यात टाकत, त्या लहान मुलाला वाचवलतं...... तुम्ही पाहत आहात एस्क्युलिझिव मुलाखत.........". कानाला एयरफोन लावत मोबाईलच्या मदतीने सुरु असलेला इंटरव्यू एकदाचा संपला, त्या मुलाला वाचवण्याच्या धडपडीत सदानंदच्या हाताला मुका मार बसला होता, त्यामुळे त्याला सरकारी इस्पितळात दाखल केलं होतं आणि तीन-चार तासाच्या सरकारी सोपस्कारानंतर आता तो घरी आला होता, त्याच्या डाव्या हाताला प्लास्टर लावण्यात आलं होतं """ दुसरे उदाहरण - """ फक्त गाठोडं डोक्याशी ऊशी म्हणून घेत साताजन्माची झोप लागल्यासारखं निद्रिस्त झालेलं एक भिकारी जोडपं तेवढं तिथं होतं, ट्रेन येणार असल्याची उद्घोषणा फक्त त्या तिथल्या शांत माहौलाला भेदून काढत होती. त्या जोरदार डोळा लागलेल्या जोडप्यावर या आवाजाचा काही एक परिणाम जाणवत नव्हता, माहित नाही पण त्यांना या आवाजासोबत झोपण्याची सवय असावी कदाचित, ते दोघंही चिरकाल निद्रा अवस्थेतेत असल्यासारखे दिसत होते, एकूण रेल्वेकडचा गोंगाट त्यांच्यासाठी रोजचाच असणार बहुतेक…. पण आजतर रोजच्यासारखी वर्दळ नव्हती, रंगपंचमीची सुटटी असल्याकारणाने असेल, कदाचित म्हणूनच त्याचमुळे त्यांना अशी काळोखी बेफाम झोप भर सकाळी लागली होती का कोण जाणे! """ इतके तपशील खरोखर आवश्यकच आहेत का? कथेचा गाभा काय, याच्याशी ते जोडले गेले आहेत का? जर ही सगळी वाक्ये काढून टाकली तर कथेत फरक पडतो का? एखादा मुरब्बी कथाकार ३-४ शब्दात त्याच्या आईवडिलांचे लक्ष नव्हते (किंवा त्याचे आई-वडीलच त्या जागी नव्हते) ते सांगून जातो. अजून एक खटकलेली गोष्ट म्हणजे कथेतील प्रसंगाची गुंफण. सरळधोपट मार्गाने घडले तसे प्रसंग न सांगता जर अशी सुरुवात केली असती की नायक आपल्या हाताचे प्लास्टर पुन्हा-पुन्हा तपासून पाहत होता, कारण त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला. अशी काही जर सुरुवात केली तर वाचकाला उत्कंठा निर्माण होते की नायकाच्या बाबतीत असे का झाले? त्यामुळे पुढचे वाचावे अशी इच्छा निर्माण होते. असो, एकंदर नाउमेद न होता तुम्ही पुन्हा लिहीत राहाल अशी आशा आहे. इतर मंडळी चांगले काय आहे ते सांगतीलच, पण न आवडलेले काय ते सांगावे म्हणून थोडे लिहितो आहे, गोड मानून घ्यावे ही विनंती.

लेखनवाला 06/04/2021 - 12:56
समजा तो प्रसंग पुढे जाऊन खूप महत्वाचा असेल तर त्याचं आतापासूनच काही तपशीलवार मुद्दे वाचकांसमोर मांडलेत तर जेणे करून पुढे कथानकात घडणाऱ्या प्रसंगाशी ते जोडून घेऊ शकतील अशी मला शक्यता वाटत असल्यामुळे मी तसं लिहलय. आणि ".... " हे असं लिहण्याला काही लिमिट असतं का? हे मी माहिती साठी विचारतोय. मला वाटत असं ".... " लिहण्याने एक फ्लो कायम राहतो, मग यांवर दुसरा कोणता उपाय आहे का ज्याने फ्लो कायम आहे हे दाखवता येईल. "तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला" मूळात तो तिकडे जाताच नव्हता, त्यासाठी तुम्हाला कथा पूर्ण वाचायला लागेल.

In reply to by लेखनवाला

मनो 07/04/2021 - 04:01
तुम्ही ... बद्दल केलेली गोष्ट माझ्या हातूनही झालेली आहे, त्यामुळं माझा अनुभव सांगतो आहे. लेखकाचा लिहिण्याचा फ्लो त्यामुळे कायम राहतो, पण वाचकाला ... ने जोडलेली वाक्यं तुटक आणि असंबद्ध वाटतात. त्यामुळे जे प्रसंग हळुवारपणे खुलवायचे असतात ते पटापट ३-४ वाक्यात उरकले जातात. अश्या वेळी प्रसंग आवश्यकच असेल तर त्याला जास्त जागा देऊन खुलवावा, किंवा काढून टाकून ते तपशीलच नाहीसे करावेत.
********** माझी नवी कथा "शोध आणि धागेदोरे (Research and Refrence)" आता अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक स्वरूपात उपलब्ध. किंडल अनलिमिटेड सेवेत मोफत (Free with Kindle Unlimited membership). https://www.amazon.in/dp/B091FD93LS त्यांची सुरवातीची काही पान मिपाकरांच्या सल्ल्यानुसार इथे वाचायला देत आहे.

करोनाची लस : एक थोतांड

गामा पैलवान ·

चित्रगुप्त 01/03/2021 - 06:31
करोनाची लस मी घेणार नाही आहे. मागे एका लेखात (कोविडः एक इष्टापत्ती ?) लिहिल्याप्रमाणे आम्हा उभयतांना कोविडबाधा होऊन त्यातून आम्ही कोणताही औषधोपचार न करता पूर्ण बरे झालेलो आहोत. बाकी नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते फक्त आपल्याला ते ठाऊक नसल्याने आपल्याला उगाचच धास्ती वाटत रहाते याची मला स्वानुभवावरून खात्री पटलेली आहे.

In reply to by चित्रगुप्त

>>>>>>करोनाची लस मी घेणार नाही आहे. खरं म्हणजे, असे म्हणनेच मोठं धाडस आहे. बाकी आपण औषध उपचार न घेताही बरे झालात असे समजणे म्हणजे करोनाच्या असण्यावर शंका उपस्थित करणे आहे. करोनाबद्दल आपल्या मनात इतकी भिती भरवल्या गेली की आज रात्री आठ वाजेच्या नंतर खिड़कीच्या फ़टीतून तुम्ही बाहेर जरी बघितलं तरी करोनाचे विषाणु आणि तुमची नजरा-नजर झाली असे समजून करोना तुमच्या डोळ्यावाटे शरिरात प्रवेश करेल असे वाटायचे. डोळेच नव्हे तर, शरीराच्या कोणत्याही भागातून करोना आत प्रवेश करेल असे वाटायचे. इतकी ती दहशत होती. ( thanks टू मीडिया आणि सरकार) मला तर इतकी दहशत बसली की जग नष्ट होऊन फक्त झुरळच उरतील आणि मग ते जग कसे असेल असाही विचार मी करायचो. आता लस येईल, तेव्हा लस येईल म्हणून प्रेयसीची वाट पाहणा-या प्रियकरासारखे, किंवा बस थांब्यावर बसची वाट पाहतो तसे आतुर होतो. प्रयत्न सुरु होते आणि एकदाचे लशीचे वेगवेगळे व्हर्जन्स आले. कोणती लस द्यायची ते उपलब्ध साठ्यावर असेल असे सरकारने म्हटल्यापासून लशीबद्दलचा आत्मविश्वास जरा कमी झाला. तुमची लस नुसते पाणी आहे, अशी एका कंपनीची टिका दुस-या कंपनीवर होती. त्याच्या आठवणीने तर लशीची भानगड़ नको असेही वाटून गेले. आज सकाळीच जेव्हा मिपावर लशीच्या थोतांडावर लेख वाचला आणि खुप आनंद झाला. आता आनंद का झाला ते नेमकं सांगता येत नाही, पण झाला. पण आपण लस घेऊन टाकू. परिणाम होऊ की ना होऊ.....प्लासिबो इफेक्ट आता काही रिस्क नाही, असे मनाचे समाधान तरी होईल. बाकी, नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते,असे समजू आणि देव्हा-यातल्या देवासमोरची घंटी घेऊ, नसेल तर थाळी घेऊ, दिवाबत्ती करू करोना गो, करोना गो असे म्हणू, हाय काय आणि नाय काय...! -दिलीप बिरुटे

In reply to by उपयोजक

पण, इतक्यात घाई करू नका.... राजकीय नेते, थेट जनसंपर्क टाळू शकतात, आपण तसे करू शकत नाही... घरातून काम करत असाल तर, जनसंपर्क टाळणे, हा सर्वोत्तम उपाय आहे.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त 10/03/2021 - 20:47
सध्या हितं आमेरिकेत आहोत गेले आठेक महिने. गप गुमान घरीच. किंवा फारतर येकट्याने मोकळ्यात फिरायला जाणे. कोणी कुणाकडे जात नाहिये वगैरे. आता जरा लोकांनी थोडंबहुत जाणं-येणं सुरु केलय म्हणून एक-दोघांना फोन केला आणि काही मराठी मंडळी फिरायला गेलेलो असताना भेटली - मग घरी या निवांत गप्पा करायला नवीन केलेली चित्रं बघायला वगैरे म्हणालो तर त्यांचा पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही व्ह्याक्शीण घेटलाय का ? अजून नाही म्हटल्यावर लौकरात लौकर घ्या म्हणून काढता पाय घेणे. आता काही काळानंतर भारतात परतायचे आहे तेंव्हाही व्ह्याक्शीण घेतले असल्याचे दाखवावे लागणार. म्हणजे आता घ्यावीच लागणार लस्सी.

In reply to by उपयोजक

काहींना मानस पुत्र, मानस कुटुंब किंवा मानस मुलगी असते.... तसेच आमचे हे मानस बाबा महाराज आहेत... दोन चार पेगांची आहुती चढवली की, ते आत्मिक प्रगट होतात.... डोंबिवली हे जागतिक केंद्र असल्याने म्हणा किंवा आमची आराधना उत्तम असल्याने म्हणा, ते आमच्या आराधनेने कधी कधी प्रसन्न होतात... सध्या ते आम्हाला, आर्थिक षटरिपू ह्या विषयी प्रवचन देत आहेत... बाबा महाराज डोंबोलीकर, यांचे म्हणणे, जास्त मनावर घेऊ नये, ही विनंती.

लेखन आवडलं. लेखाबाबत आणि लशी बाबत अनेकांचे मतभेद होऊ शकतील, पण लेख पटणारा आहे. करोना प्रतिबंधक लस आयुष्यभर तुमचं संरक्षण करू शकणार नाही, हेही खरं आहे, पण काही काळासाठी प्रतिबंध नक्कीच होऊ शकेल असेही वाटते. -दिलीप बिरुटे (कन्फ्यूज) >>>>>आपल्याला दोन नेते जाम आवडले. मोदींनी मुखपट्टी उघडपणे नाकारली....... माझं या विषयावर आणि त्यांच्या काल कर्तुत्वावर काही दिवस मौन आहे, मुखपट्टीच लावली आहे असे समजा. -दिलीप बिरुटे (मुखपट्टीधारक)

कंजूस 01/03/2021 - 09:01
वैज्ञानिकच ठेवा म्हणतो. महाभारत त्यात आणू नका. तो एक वेगळाच करा. ---------------------- एक उदाहरण पाहा काविळीसाठी आयुर्वेदात - यकृत बिघडून पित्तरस अधिक किंवा उणे निर्माण झाल्याने होणारा रोग धरला आहे. त्रिकटू चूर्ण आणि एरंड पानांचा रस हे बरे करतात. हेच मॉडर्न मेडसन, संशोधनातून लिवरचे A,B,C, D प्रकार शोधून वेगवेगळ्या लशी केल्या. रोग होऊ नये म्हणून लस. रोग झाल्यावर फक्त बी कॉम्प्लेक्स. आयुर्वेद औषध अजूनही गुणकारी आहे!!

In reply to by कंजूस

गवि 01/03/2021 - 09:11
कारण व्हायरस ऊर्फ विषाणूची लागण एकदा झाली की थेट त्याच्यावर उपचार करुन मारणे अवघड़ पडते. Bacteria बाबत अँटीबायोटीक औषधे उपयोगी पडतात . व्हायरस मारण्याबाबत मर्यादा येतात. त्यावर केवळ बाह्य लक्षणे कमी करणारे उपायच मुख्यतः करता येतात.

चौकटराजा 01/03/2021 - 09:23
हे पुस्तक २०१३ साली लिहिलेले असल्याने २०२१ साली ते कालबाह्य झाले असण्याची शक्यता आहे ! अशक्त झालेला विषाणू शरीरात टोचल्याने प्रतिपिंडे निर्माण होऊन शरीर त्याच्या पेशीप्रवेशाला मारक अशी योजना करते असा दावा लस याबाबत आतापर्यंत करण्यात आला आहे ! आताची लस या तंत्रावर आधारित नाही अशी माझी माहिती आहे ! लस घेतल्याने प्रत्येकास भक्कम संरक्षण मिळालेच पाहिजे असा दावा निसर्गच मुळी करीत नसतो. यासाठीच तर ते शेवटचे वाक्य डॉक्टरांनी जपून ठेवलेले असते " बॉडी रिस्पॉन्स देत नाही औषधाना ! " आज देखील मला असे वाटते की नेहमीच रोग अनेकांना होत असतात ,अनेक माणसे काहीही औषध न घेता बरी होत असतात ते त्यांच्या नैसर्गिक प्रतिकार शक्तीने . पण हे सगळे अव्यक्त पातळीवर होत असल्यानं त्याचा तपशील ठेवता येत नाही ! ही केवळ तर्का ने जाणण्याची गोष्ट आहे ! तर्कट हे फायद्याचे ही ठरते वा अगदी उलट ! महाजनो गत: स: पंथः या नात्याने मी लस घेणार आहे ! लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल !

In reply to by चौकटराजा

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर हेच म्हणतात ....सध्या शांत रहा, घरात पडीक रहा, सांसर्गिक रोग असल्याने, जन संपर्क टाळा.लशीचे बरेवाईट परिणाम दिसायला वेळ लागेल.

In reply to by चौकटराजा

गोंधळी 01/03/2021 - 09:52
लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल ! चौ रा काका हे काही पटले नाही.

In reply to by गोंधळी

चौकटराजा 01/03/2021 - 10:36
कोणतेही औषध वा लस बाजारात येण्यापूर्वी त्याचे काही दुश्परिणाम माणसावर होतात की नाही हे पाहण्यासाठी काही स्वयंसेवक गरजेचे असतात ! ही लस बाजारात येण्यापूर्वी अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून त्या लसीची ७० टकके परिणामकारकता सिद्ध केली आहे ! तरी ही काही लोकांना त्यावर शंका आहे ! रसायन विज्ञानाचा विषय नसून मानस शास्त्राचा झाला आहे ! वरील स्वयंसेवकांत अनेक तरुण मंडळीही असतीलच ना ! आता धोका पत्करण्यात मी म्हातारा मग मागे का राहू ? आता राहता राहिला संशय लस निर्माते ,राजकारणी व डॉक्टर यांच्या तोडपाण्याचा ! त्यावरही संदेह लोकांना आहे ! तो ही दूर होऊन सत्य पुढे येण्याचे श्रेय संशोधकांप्रमाणेच या स्वयंसेवकांनाही आहे हे नाकारू नये !

उत्तम माहिती. सध्यातरी लस घेण्यापलिकडे पर्याय दिसत नाही. लस घेतल्याने करोना पूर्ण जाणार नाही हे माहित आहे .

Bhakti 01/03/2021 - 10:30
लसीवर चांगलाच ऊहापोह आहे.जीवानमान उंचावण हेच महत्त्वाचे आहे हे तर त्रिकाल बाधित सत्य आहे.पण म्हणून संशोधन सर्व थोडांत हे काय पटल नाही. कंजूस यांच्याप्रमाणेच मलापण​ आयुर्वेद महान आहे त्यात अजूनही शक्ती आहे हे पटल,पण मग प्रश्न पडला रामदेवबाबाच "औषध ?" करोनावर घ्यायच का? (भयानक विचार).. चौरा यांचं मत पटल लस न घेणं ही चुक ठरु शकते. बाकी महाभारतची उजाळणी आवडली :)

In reply to by आंद्रे वडापाव

Bhakti 01/03/2021 - 10:44
ते घेणारच होते. पण त्या अखिलेश बाबाला प्रोटोकॉल,नियम वगैरे काहीच कळत नाही.काहीही बरळत होता.(हा हा)

Rajesh188 01/03/2021 - 12:29
लस च नाही तर सर्वच बाबतीत अवास्तव दावे करण्याचे प्रमाण खूप आहे.सायन्स मॅगझिन मध्ये सुद्धा सर्रास खोटे दावे केले जातात.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 14:05
फक्त स्वच्छ हवा. रासायनिक खत आणि कीटक नाशक न वापरलेलं अन्न आणि पालेभाजी. शुद्ध पाणी. संकरित जनावर चे दूध पूर्ण बंद. आणि स्वच्छ आणि मोकळा परिसर . एवढे उपलब्ध झाले तर. लस,औषध ह्यांची बिलकुल गरज नाही

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:30
या सगळ्या गोष्टी कदाचित १५०/२०० वर्षांपूर्वीपर्यंत (इ.स.१८५०) नक्कीच होत्या तर तेव्हा माणसे जास्त जगायची कि आत्ता जास्त जगतात?

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 16:01
मलेरिया,अतिसार,प्लेग ह्या मुळे लोक जास्त मरायची . कारण योग्य उपचार नव्हते. पण उपचार निर्माण झाल्यावर ते प्रमाण कमी झाले. त्याला लसी कारणीभूत नाहीत. आता जे आयुष्य वाढले आहे असे वाटत आहे ते कोणाचे? ज्यांचे राहणीमान,आहार, विहार नैसर्गिक होता त्यांचेच. म्हणजे १९४५ ते १९७० पर्यंत ज्यांचा जन्म आहे त्यांचेच. त्याला कारण शुध्द आहार,शुद्ध हवा,आणि जोडीला वैधकिय सुविधा हे आहे. पण त्या पुढची पिढी अनेक रोगाने त्रस्त आहे कमी वयात मधुमेह ब्लड प्रेशर. किडनी चे प्रॉब्लेम खूप जास्त वजन आणि अशा अनेक रोगांनी आताची पिढी कमी वयात त्रस्त आहे. ह्याला एकमेव कारण आरोग्य व्यवस्थेचे बाजारीकरण आणि प्रदूषित,हवा,पाणी,अन्न,हे आहे बाजारीकरण मुळे नसलेले गुण चिकटवून केलेली औषनिर्माणशास्त्र ची होत असलेली जाहिरात लेखिका हेच सांगत आहे.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 16:12
ओके :) तुमच्यासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

आग्या१९९० 01/03/2021 - 16:24
ह्यांच्या मुलांना नव्हे तर ह्यांनाच देवीचे जिवंत विषाणू टोचून घ्यावेत. नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढली कि नाही हे ही कळेल.

गोंधळी 01/03/2021 - 14:41
सांगायचा मुद्दा काये की कर्म, भक्ती, धर्म यांमध्ये साधना हा सामायिक घटक आहे. ती साधना म्हणजे नामजप. तो करायला हवाच. चांगला सणकून करूया आणि या करोना नामे थोतांडास पार पळवून लावूया. म्हणजे तुम्ही आजारी पडल्यावर वैद्यबुवां कडे जातच नाहीत का? नामजप करुन बरे होता? बाकी अध्यात्माशी सांगड घालत जगणं खुप कठीण काम वाट्ते. ego मुळे असेल कदाचीत.

In reply to by गोंधळी

सासूला, सुनेच्या जाचापासून वाचवते सुनेला, सासू पासून वाचवते स्वतःचे षंढत्व लपवायला धंदा वाढवायला लोकांची फसवणूक करायला जागा ढापायला असे ह्या कातड्याचे विविध उपयोग आहेत आध्यात्मिक माणूस, एक नंबरचा स्वार्थी आणि खोटारडा असतो, हे मी अनुभवले आहे,

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:27
लेखकासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

पुर्वी गल्लोगल्ली, किंवा दरेक शाळेत, एक तरी पोलियोग्रस्त, व्यक्ती असायचीच, आता नाही --------------------- त्यामुळे, आपण लस टोचून घ्यायची. मी थोडे दिवस वाट बघून, मग कुणाकडून लस टोचून घ्यायची?, लस टोचून घेतल्या नंतर कुठे रहायचे? इत्यादि साधकबाधक विचार करून, मगच ठरवीन.... घाई गडबडीत, असे निर्णय न घेणेच उत्तम, असे माझे वैयक्तिक मत आहे... बाय द वे, लस टोचून घेतली की, एक जोरदार कट्टा करू...

जॉन रीज 01/03/2021 - 16:19
आपले जुने लेख आणि हा लेख अशी तुलना करता आपला i.d. कुणी चोरला असावा असे वाटते कारण आपण असे लिखाण कराल असे वाटत नाही आणि लेखाची शैलीही मागील लेखांशी जुळत नाही.

सूक्ष्मजीव 01/03/2021 - 19:36
मी एका ओळखीच्या डॉक्टर सोबत जे कोरोना काळात महानगरपालिके कडून हंगामी करोना सेवे साठी भरती केले आहेत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यांना मोफत लस दिली जात होती. या लशीचा प्रभाव किती काळ राहील हे विचारल्यावर ते म्हणाले की ही लस नसून एक प्रकारचा इम्यूनिटी बूस्टर आहे जे सर्व सर्दी, पडसे, खोकला, ताप इत्यादी आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते. याबद्दल जाणकार काय म्हणतात?

In reply to by सूक्ष्मजीव

गामा पैलवान 02/03/2021 - 03:39
सूक्ष्मजीव, पर्यायी दृष्टीकोन असलेल्या डॉक्टरांना आपल्या आस्था ( = concerns ) मांडायला वाव मिळावा हा सदर लेख लिहिण्यामागे हेतू आहे. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

निमिष ध. 01/03/2021 - 21:16
मिपावर असा लेख असणे - तो सुद्धा करोनासारख्या अवघड काळात हे एक सामाजीक आरोग्याकरता हानीकारक आहे. वेगवेगळी मते असणे वेगळे आणि त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येणे वेगळे. त्यामुळेच इथे उत्तर लिहीतो आहे. त्या ज्या कोण सुझान हम्फ्रीज आहेत त्यांना क्वॅक (ढोंगी वैद्द्य) म्हटलेले आहे - https://medika.life/dr-suzanne-humphries-on-medikas-quack-scale/ त्यांच्या पुस्तकातील मिसल्स चे दाखले कसे खोटे आहेत ते इथे नीट सांगितलेले आहे - https://medium.com/@visualvaccines/why-dr-suzanne-humphries-an-anti-vaccine-activist-is-lying-to-you-about-measles-ce446d0a7e0f अमेरिकेत ५ लाखांहून लोक मेलेली आहेत करोनामुळे आणि जगभरात जवळ जवळ २५ लाख लोकसंख्या दगावलेली आहे. असे असताना असा बेजवाबदार लेख येणे हे चांगले नाही. कृपया कोणीही या लेखाला वाचून करोना लशीबद्दल आपली मते बनवू नयेत ही माझी कळकळीची विनंती.

In reply to by निमिष ध.

पिनाक 01/03/2021 - 22:51
अगदी बरोबर. हेंच म्हणायला इथे आलो होतो. उगीच सरकारचा त्रास वाढवू नका..गप गुमान लस घ्या आणि कामावर चला. लै झालं घरी बसून.

In reply to by निमिष ध.

गामा पैलवान 02/03/2021 - 02:57
निमिष ध., पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर सुझन हम्फ्रीझ कधीही होमियोपाथ नव्हत्या. त्यांनी अलोपथी सोडून इतर कोणतीही उपचारपद्धती सुचवली नाहीये. तुम्ही दिलेल्या दोन्ही दुव्यांत डॉक्टरबाईंना होमियोपाथ व अवांतर चिकित्सक म्हंटलेलं आहे, जे साफ चुकीचं आहे. इझाबेला बाईंचा आरोप २०१५ च्या आसपासचा म्हणजे बराच जुना आहे. डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांच्या संकेतस्थळावर या आरोपांचं खंडन केलेलं आहे : http://www.dissolvingillusions.com/critiques/ वानगीदाखल एक वृथा आरोप दाखवतो :
She promotes mystical powers of Vitamin C, calling it “the basis of life,”[10] and asserts it magically “neutralizes any toxins in the blood.”[10]
प्रत्यक्षांत उपरोक्त पुस्तकात डॉक्टरबाईंनी क जीवनसत्वाच्या चाचण्या घेतल्या नाहीत म्हणून विधान केलंय. हे क जीवनसत्वाचं प्रमोटिंग नव्हे. असो. लशीच्या दुष्परिणामांवर कोणीही काहीच का बोलंत नाही? मी डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांना संशोधिका मानंत नाही. त्यांनी कुठलाही नवा शोध लावलेला नाहीये. त्यांनी फक्त जुना विदा ठळकपणे समोर मांडलाय. जो आजपर्यंत कोणीच मांडला नव्हता. या विदाप्रस्तुतीमुळे लशीविषयी आणि जंतुसिद्धांताविषयी काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. कोणाकडे उत्तरं आहेत का? आ.न., -गा.पै.

बाजीगर 02/03/2021 - 14:25
गा.पै. यांच्याविषयी मला आदर आहे. पण या लेखाला मी विरोध करतो. नाही हो. चूक गलत राँगनंबर, गल्ली चूकलात. खूप भटकलात. महाभारत संदर्भ पूर्ण अनावश्यक. माझ्या माहितीतले दक्ष जागरुक मित्र करोना ने मरण पावलेत. कृृपया स्वच्छता पाळा ( त्यावर गा,पै. आपण योग्य जोर दिलात, स्वच्छ पाणी प्या / पोषक व घरचा आहार घ्या / यथाशक्ती व्यायाम,चालणं करा, अकारण जागू नका. आणि हो ...लस घ्या...त्यावर डोकं खपवू नका. हा धागा delit करा. (एवढा research आणि टंकण्याचे श्रम, मुद्दे मांडण्याचे कसब याची मला कदर आहे)

मदनबाण 02/03/2021 - 16:13
गा.पै, हिंदुस्थानातील लसी बाबत गैर समज उत्पन्न होइल असे लेखन सध्य काळात योग्य नाही ! ती किती उपायकारक आहे हे येत्या काळात कळेलच परंतु उगाच लसी विषयी शंका घ्यावी असे सध्या कोणतेच कारण नाही. परदेशातील स्थिती मात्र वेगळी दिसते आणि त्या बद्धल अनेक बातम्या इथे वाचण्यास मिळतील :- Coronavirus COVID19 जाता जाता :- तेव्हा पांडवांना कृष्ण यादव नामे एक अत्यंत लबाड इसम भेटला. या बद्धल विशेष आक्षेप ! आपल्या लिखाणासाठी परमेश्वरास कशास बोल लावावे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

Rajesh188 02/03/2021 - 16:21
कशा साठी हा लेख delete करायला हवा,लेखात दुसरी बाजू मांडली आहे समजून घ्यायला काय हरकत आहे.प्रतेक विषयावरील दोन्ही बाजू समोर यायलाच हवी.लेख वाचून लगेच लोक लसी बद्द्ल निगेटिव्ह मत बनवतील असे इथे काही लोकांना का वाटत ह्याचेच मोठं आश्चर्य वाटत. वाचणारी माणसं आहेत प्रत्येकाला स्वतःची बुध्दी असते चांगले वाईट,योग्य,अयोग्य सर्वांना समजत .त्यांना गाढव समजू नका. मीच शहाणा मलाच योग्य अयोग्य कळत बाकी लोक बुद्धिहीन आहेत असले गैर समज काढून टाका. आणि लेख delete करायची काही गरज नाही.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 19:02
मी तरी लस टोचून घेणार नाही. आणि देवू,क्षय,पोलिओ ह्यांची लस टोचली म्हणून ते जगातून कमी झाले आहेत हे तुमचे मत आहे माझे नाही. तुम्हीच त्या प्रश्नांची उत्तरं शोधत बसा.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 02/03/2021 - 22:11
मी तरी लस टोचून घेणार नाही.
तुम्ही लस टोचून घ्या किंवा नका घेउ...कोणालाही शष्प फरक पडत नाही. मी विचारलेला प्रश्न "तुम्ही लस टोचून घेणार की नाही?" हा नाहीये तर "तुमच्या मुलांना लहान असताना पोलिओ वगैरेच्या लस टोचवल्यात का?" असा आहे. तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का? अजूनही प्रश्न समजला नसेल तर सांगा....अजून सोप्या मराठीत लिहिन :)

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 22:36
आपले विचार कधीच दुसऱ्या वर थोपवयचे नसतात हा साधा common सेन्स आहे. त्या मुळे मुलांना लस दिलेली आहे.ज्या लसी देण्याचे वेळापत्रक सरकार नी तयार केले आहे त्या प्रमाणे. पण आजच्या काळात वैधकीय व्यवसाय हा प्रामाणिक राहिला नाही ह्या वर माझे ठाम मत आहे . मग ते संशोधक असतील तर ते कोणत्या तरी व्यापारी कंपनी शी बांधील असतात आणि त्यांच्या इशर्या वरूनच त्यांचे संशोधन आणि त्याची माहिती ह्याचा प्रचार ,प्रसार ते करत असतात. मोठमोठ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यांचा वापर करून घेतात. ह्या मध्ये शेवटच्या स्तरावर डॉक्टर मंडळी असतात त्यांचे कार्य कसे चालते ह्याचे अनेक किस्से लोकांना माहीत आहेत. लुटमार करणारा व्यवसाय असे वर्णन केले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी माझ्या विषयी निर्णय घेताना मात्र त्याचा विचार करतो. एक तर आजारी पडत नाही पण कधी पडलो तर खूप पाच सहा दिवस तरी डॉक्टर कडे जात नाही औषध ही रोग बरे करत नाहीत तर रोग वाढवतात असे माझे मत आहे. अगदीच गरजेचं झाले तर च dr कडे जातो. ते पण माझ्या family dr कडेच. बाकी कोणाकडे नाही. आता सर्व उत्तर दिली आहेत परत एकच प्रश्न विचारू नका

In reply to by Rajesh188

बेंगुताई 30/04/2021 - 11:26
ठाम मत हाहाहा.पण सगळ्या डॉक्टरांचा ठेका तुम्ही म्हणून का घ्यायचा? गलत बात! आणि फॅमिली डॉक्टर पण डॉक्टरचं असतील नाही का ?

In reply to by टवाळ कार्टा

गोवर, काजण्या, गालगुंड, यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे किंवा त्यांना अटकाव करणारी, प्रतिकारक्षमता तरी वाढलेली आहे लस टोचून घेणे हे उत्तम, हे तुझे मत, मला तरी मान्य आहे

स्मिता. 02/03/2021 - 16:29
केवळ करोनाच नाही तर इतरही अनेक दुर्धर रोगांवरचे लसीकरण आवश्यकच आहे. आधीच्या अनेक महत्त्वाच्या लसींची माहिती आणि आकडेवारी एक गूगल सर्च केला की सापडेल आणि करोनाच्या लशीची माहिती समजून घ्यायची असल्यास इंग्लंडची (युके) आकडेवारी अभ्यासून बघता येते. तेथे जानेवारीच्या मध्यापासून तर अखेरपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली होती. भारताच्या तुलनेत खूप लहान आणि कमी लोकसंख्येच्या या देशात दिवसाला सरासरी ६०,००० बाधीत तर दररोज सरासरी १५०० मृत्यू होत होते. त्यात भर म्हणून हे दिवस तिथल्या कडक हिवाळ्याचे, अनेक दिवस तापमान शून्याच्या मागे-पुढे असते. पण लॉकडाऊन सोबतच लसीकरणाच्या जोरावर एका महिन्याच्या कालावधीत, आजच्या दिवसाला बाधीत आणि मृत्यूचे आकडे १० पटीने कमी झाले आहेत (सरासरी ६००० बाधीत आणि १५० मृत्यू). आलेख पाहिला तर लक्षात येतं की तिथल्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेच्या तुलनेत ही तिसरी लाट बरीच मोठी असली तरी उच्चांकानंतर बाधितांची संख्या झपाट्याने खाली आली आहे. हा एका महिन्यातला फरक केवळ लसीकरणामुळे शक्य झाला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आधीच्या लसींच्या तुलनेत ही लस नवीन आहे आणि कमी कालवधीत बनवली आहे हे खरं असलं तरी आता लस शोधण्याचं तंत्रज्ञानसुद्धा आधीपेक्षा खूप विकसीत झालं आहे हे लक्षात घ्यायला हवं. करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?

निपा 02/03/2021 - 18:13
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

निपा 02/03/2021 - 18:14
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

गामा पैलवान 02/03/2021 - 19:56
स्मिता.,
करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?
करोना हे एक थोतांड आहे. कारण की अमेरिकेत ऑगस्ट २०२० पर्यंत ( म्हणजे गेल्या सहा सात महिन्यांपर्यंत ) हा विषाणू अलग केला गेला नव्हता. हे गूगल करून पहा : "Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available," बाकी, इथे इंग्लंडात PHE ( = Public Health England ) कडे करोना विषाणू अलग केल्याची शष्प माहिती नाही : https://www.whatdotheyknow.com/request/679566/response/1625332/attach/2/872%20FOI%20All%20records%20describing%20isolation%20of%20SARS%20COV%202.pdf करोनाचा विषाणू अलग केलेला नसतांना कोणती दिव्य लस उत्पन्न केली गेलीये? थोतांड ते थोतांडच ! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 11:34
मग मानसं कशाने बर मरत असतील? बहुतेक स्वच्छ भारत अभियान कमी पडले असणार! बाकीच्या देशाचं आपल्याला काही माहीत नाही बुवा.

In reply to by बेंगुताई

रंगीला रतन 30/04/2021 - 11:55
साधा सर्दी पडसा झालेली लोकं आपल्याला करोना झालाय या गैरसमजुतीने उगाच घाबरून मेली आहेत. जगात करोनाचा विषाणु अस्तीत्वात नाही हेच सत्य आहे! तुम्ही आम्ही कीतीही ओरडुन सांगीतले तरी धागालेखक विषाणुचे अस्तीत्व मान्य करणार नाहीत. हां पण सनातन प्रभातने तसा दावा केला तर आणि तरच त्यांचे मतपरीवर्तन नक्की होइल :)

Rajesh188 02/03/2021 - 21:14
प्लेग,देवी,इत्यादी रोग निर्माण करणारे जिवाणू ,विषाणू आज सुद्धा मानवी शरीरावर हल्ला करतात पण त्या व्यक्ती नी त्या आजाराची लस घेतली असल्या मुळे लोक आता त्या आजारांना बळी पडत नाहीत .हे कस सिद्ध केले जाते शास्त्रीय पद्धती नी. कोणी असे सिद्ध करून दाखवलं आहे का? की ते रोग कारक विषाणू,जिवाणू आता अस्तित्वातच नाहीत हे त्याला कारण आहे.

Bhakti 02/03/2021 - 23:29
फायझर लसीबाबत चांगला दुवा मिळाला..कोवीशिल्ड आणि भारत बायोटेक लसीवर शोधत आहे. ् https://www.technologyreview.com/2020/12/09/1013538/what-are-the-ingredients-of-pfizers-covid-19-vaccine/

Rajesh188 03/03/2021 - 19:51
त्यांना होणारे साथी चे आजार काही महिन्यात संपुष्टात येतात ना . कसे . ना लस ना औषध . तरी मानव जेवढं आजारांनी ,रोग राई नी मृत्यू मुखी पडतो तेवढे प्राणी पडत नाहीत. ह्याची पण काही तरी कारणे असतील ना. प्लेग उंदरा पासून माणसात संक्रमित होत होता. आता उंदरांना पण प्लेग होत नाही.

चौकस२१२ 04/03/2021 - 04:43
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड ! बरं.. अमेरिकेत , इंग्लंड इटली ब्राझील मध्ये हजारो लाखो मेले हे पण एक थोडांतच का? कि त्यांना लपवून ठेवलाय मोहावी वाळवंटात कि आल्प्स मध्ये ? आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल

In reply to by मुक्त विहारि

Rajesh188 04/03/2021 - 10:49
माझ्या लहानपणी मधुमेह, लठ्पणा,लहान वयात चशमे,लहान वयात केस पांढरे झालेल्या व्यक्ती दिसत नव्हत्या पण आता मात्र सर्रास दिसत आहेत. उच्च रक्तदाब असणारे तर खूपच आहेत पाहिले तेवढे नव्हते. कमी वयातच दातांचे आणि हिरड्यांचे विकार असलेली लोक पण वाढली आहेत. 32 दात 32 वर्षापर्यंत सुद्धा टिकत नाहीत पाच दहा कमी होतातच.

Rajesh188 04/03/2021 - 11:22
माझ्या गावात मला वाटतं एकच कुष्ठ रोगाचा रोगी होता तो पण वय झालेला. बाकी मी प्लेग चा आजार बघितला नाही ना अनुभवला आहे. पण हिवताप,अतिसार ,कांजण्या हे आजार असायचे आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे .पण हिवताप आणि अतिसार आज सुद्धा जीवघेणा आहे. उपचार वेळेवर मिळाले नाहीत तर. सर्वात जास्त लोक हिवताप,अतिसार ह्या मुळेच पूर्वी लोक मृत्यू मुखी पडत असत आता तशी स्थिती नाही . औषध उपचार नी ह्या रोगावर विजय मिळवला आहे. रोग राई कमी होण्याचे स्वच्छता हे कारण नक्कीच आहे . धनुर्वात,rabies, ह्याचा रोगी मी आज पर्यंत तरी बघितला नाही. पण हे दोन्ही आजार पण घातक आहेत. आधुनिक वैद्यक शास्त्र नी लोकांचे आयुष्य वाढवले आहे ह्या विषयी शंका नाही. पण आता परत त्या शास्त्राला उतरती कळा लागली आहे असे म्हणता येईल. सेवा भावनेने संशोधन आणि उपचार मधल्या काळात होत होते आता त्याला बाजारू स्वरूप आले आहे.

गामा पैलवान 04/03/2021 - 15:24
चौकस२१२, तुमचा इथला संदेश वाचला. १.
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड !
बरोबर. करोनाचा विषाणू हे आजूनही थोतांडच आहे. जो विषाणू अद्याप विलग करता आलेला नाही, त्यावर म्हणे लस बनवली आहे. पब्लिक इतकं मूर्ख आहे का विश्वास ठेवायला? २.
यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल
सहमत आहे. निदान माहिती तरी मिळेल. जमल्यास डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांचं उपरोक्त पुस्तक वाचून पहा. निदान त्यातल्या साथीच्या रोगांचे आलेख तरी बघा म्हणून सुचवेन. ३.
आरे बापरे १००+ देश गंडले कि काय थोतांडामुळे
हो. मेकॉलेछाप राज्यपद्धती असली की हे असं होतंच. आ.न., -गा.पै.

चौकस२१२ 05/03/2021 - 04:22
१०० + अधिक देश त्यांची सरकार पूर्ण गंडली , आणि ती सुद्धा काही सरकारे पार उजव्या विचारसरणी ची आणि काही डाव्या तरी गंडली होय??? अरे बापरे म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का? बरं आपण ४थय प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळलेत .. हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय ! बरं उत्तर द्या नका देऊ... आपली "थेरी "कळली एक काम करा तो शोधलेख एवढी मेहनत घेऊन लहिलेलेला जरा मटा किंवा लोकसत्तेत छापायला पाठवा ..( कुबेर साहेब स्वागतच करतील कारण त्यात त्यांना "सरकारने लोकांनां कसे गंडवले याचे अजून एक शास्त्रीय उदाहरण मिळेल अप्लाय कृपेने ) जनताच उत्तर देईल तुम्ह्ल्ला अहो काय हे.. चाललंय तुमचा हा हे समजू शकतो कि काही गोष्टींवर आपण प्रश्न उभे करू जसे कि ( राजेश तुम्ही पण ऐका ) लस चुकीच्या पदहतीने विकसित केली असावी , त्यात आर्थिक घोटाळा असेल, इतर उपायातील त्रुटी , पण हे सगळंच खोटा आहे ! असा दावा !

Rajesh188 05/03/2021 - 14:10
Corona लसी मुळे corona होणार नाही ह्याची शाश्वती आहे का. कोणत्याच संस्थेने covid ची लस किती दिवस covid विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण करेल ह्या विषयी ठाम विधान केलेले नाही. म्हणजे हे लसी करण प्रोयागिक आहे.निष्कर्ष अजुन यायचा आहे.

In reply to by Rajesh188

लस १०० % करोनाला प्रतिबंध करेल असा विदा अजुन दिसला नाही. ९० टक्के प्रतिबंध होईल असे समजले तरी १० % रिस्क आहेच. काय नाय, सतत मास्क घालणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धूणे सॅनिटाइजरचा वापर करणे काळजी घेणे हाच सुरक्षित राहण्याचा उत्तम उपाय आहे. करोना समजा झालाच तर औषधोपचाराने तो बराही होतो. बाकी, अजुन एक करोनास प्रतिबंध करायचा थेट लशी इतकाच उपाय, जोरजोरात थाळी वाजविणे आणि गॅलरीत जाऊन दिवाबत्ती करणे त्याचंही महत्व काही कमी नव्हतं, नाही. त्याचाही विदा येणे अजुन बाकी आहे. =)) च्यायला, आयुष्यात लै गमती जमती केल्या या करोनाने. मागे वळून पाहिल्यावर हसून हसून पुरेवाट होते. -दिलीप बिरुटे

In reply to by टवाळ कार्टा

मिपा वरील चर्चा वाचूनच, केवळ भारतच न्हवे तर,चीन, अमेरिका, पाकिस्तान आपली परराष्ट्रीय धोरणे ठरवतात.... त्यात आता, नोबेल पुरस्कार पण टाकायला हरकत नाही...

गामा पैलवान 05/03/2021 - 20:54
चौकस२१२, १.
हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय !
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? करोनामुळे मृत असा छाप मारला तर अमेरिकन सरकार रोग्याचे सगळे पैसे द्यायचं. मग कोण कशाला बिनकरोनाचं प्रमाणपत्र देईल? एक लेख सापडला : https://eu.usatoday.com/story/news/factcheck/2020/04/24/fact-check-medicare-hospitals-paid-more-covid-19-patients-coronavirus/3000638001/ शितावरून भाताची परीक्षा. इथे इंग्लंडमध्ये आता फ्ल्यू चे मृत्यू अचानक नाहीसे झाले. त्यांची जागा करोनाने घेतली. घरोघरी मातीच्याच चुली म्हणावं का ? करोनचा विषाणू आजघडीला विलग ( = isolate ) झालेला नाहीये. भविष्यात तो कधी विलग होण्याची शक्यता माझ्या मते तरी ० आहे. मग नेमकी कशाची चाचणी केली जाते? आणि नेमकी कसली लस टोचली जाते? २.
म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का?
होच मुळी. निदान आजवरचा तरी हा सर्वात मोठ्ठा झोल आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 05/03/2021 - 22:23
रंगीला रतन,
तेवढीच जेवढी त्याला थोतांड म्हणायला लागते.
हे बरोबर बोललात. तुमच्याकडे करोनाविषाणू विलगीकृत म्हणजे आयसोलेटेड केलेला आहे का? थेट रोग्याकडून नमुना मिळवलेला पाहिजे. माकडाच्या मूत्रपिंडावर वसवलेली वस्ती किंवा डुकराच्या गळ्याखाली लोंबणारी मांसरुडे ओघळून पडलेल्या चरबीच्या कणांवर वाढवलेली बुरशी वगैरे नको. असा विषाणू तुमच्याकडे नसेल तर करोना हे थोतांड आहे. महत्त्वाचा. आणि हे विधान करायला मला काडीचीही अक्कल वापरावी लागली नाही. तुमच्या उपरोक्त उद्गारांना माझं पूर्ण अनुमोदन आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रंगीला रतन 05/03/2021 - 22:44
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? या वाक्याचाआणि तो करोनाविषाणू आयसोलेटेड आहे क नाही याचा काय संबंध? असल्यास तो स्पष्ट कराच. आपला उद्धट रंगीला रतन

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 06/03/2021 - 15:36
रंगीला रतन, तोच तर माझाही प्रश्न आहे. करोनाचा अस्सल नमुना अस्तित्वात नाही. तरीपण तो रोग्याच्या शरीरात मात्र सापडतो आहे. त्याचप्रमाणे तो निरोगी माणसातही असू शकतो. आणि तो पसरतोही म्हणे. याचाच अर्थ 'करोना' 'शोधण्याची' चाचणी करोनाइतकीच भंपक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 12:00
त्यासाठी तुम्हाला प्रयोगशाळेत भेट द्यावी लागेल(मास्क लाउन जा बरं का?) तिथे रुग्णांचे swab असतात तिथे कदाचित दिसतील पण.(बघा एकदा उघड्या डोळ्यांनी दिसले तर) आता नसतीलच विषाणू तर दिसतीलच कशे?काहीही करतात हे लोक दिवसरात्र ते पपई किट घालून काय तर swab घेऊन काय बघतात काय माहीत काय भेटणार त्यात शेम्बडाशिवाय?

Rajesh188 05/03/2021 - 20:59
जेव्हा पासून लस पुराण चालू आहे तेव्हा पासून मला काही प्रश्न पडतात. गूगल वर उत्तर शोधली पण सविस्तर,उत्तर मिळाले नाही. १) covid१९ व्हायरस चे इन्फेक्शन होवून बरे झालेल्या रुग्णात जी प्रतीपिंड तयार होतात ,किंवा covid व्हायरस विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण होते . ती प्रतिकार क्षमता आणि लसी मुळे निर्माण होणारी प्रतिकार क्षमता ह्या मध्ये काय फरक आहे? २) एकदा covid होवून गेल्या नंतर त्याच व्यक्ती ला परत covid झाला अशी जगात किती उदाहरणे आहेत( मी तर वाचले आहे अशी फक्त ५० उदाहरणे जगात आहेत) आणि माझ्या संपर्कात असलेल्या ज्या लोकांना covid झाला होता त्या मधील कोणालाच परत covid झालेला आहे. ना कोणा कडून तशी केस ऐकण्यात आली. इथे कोणाला reinfection झालेला covid रुग्ण माहीत आहे का?

चित्रगुप्त 01/03/2021 - 06:31
करोनाची लस मी घेणार नाही आहे. मागे एका लेखात (कोविडः एक इष्टापत्ती ?) लिहिल्याप्रमाणे आम्हा उभयतांना कोविडबाधा होऊन त्यातून आम्ही कोणताही औषधोपचार न करता पूर्ण बरे झालेलो आहोत. बाकी नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते फक्त आपल्याला ते ठाऊक नसल्याने आपल्याला उगाचच धास्ती वाटत रहाते याची मला स्वानुभवावरून खात्री पटलेली आहे.

In reply to by चित्रगुप्त

>>>>>>करोनाची लस मी घेणार नाही आहे. खरं म्हणजे, असे म्हणनेच मोठं धाडस आहे. बाकी आपण औषध उपचार न घेताही बरे झालात असे समजणे म्हणजे करोनाच्या असण्यावर शंका उपस्थित करणे आहे. करोनाबद्दल आपल्या मनात इतकी भिती भरवल्या गेली की आज रात्री आठ वाजेच्या नंतर खिड़कीच्या फ़टीतून तुम्ही बाहेर जरी बघितलं तरी करोनाचे विषाणु आणि तुमची नजरा-नजर झाली असे समजून करोना तुमच्या डोळ्यावाटे शरिरात प्रवेश करेल असे वाटायचे. डोळेच नव्हे तर, शरीराच्या कोणत्याही भागातून करोना आत प्रवेश करेल असे वाटायचे. इतकी ती दहशत होती. ( thanks टू मीडिया आणि सरकार) मला तर इतकी दहशत बसली की जग नष्ट होऊन फक्त झुरळच उरतील आणि मग ते जग कसे असेल असाही विचार मी करायचो. आता लस येईल, तेव्हा लस येईल म्हणून प्रेयसीची वाट पाहणा-या प्रियकरासारखे, किंवा बस थांब्यावर बसची वाट पाहतो तसे आतुर होतो. प्रयत्न सुरु होते आणि एकदाचे लशीचे वेगवेगळे व्हर्जन्स आले. कोणती लस द्यायची ते उपलब्ध साठ्यावर असेल असे सरकारने म्हटल्यापासून लशीबद्दलचा आत्मविश्वास जरा कमी झाला. तुमची लस नुसते पाणी आहे, अशी एका कंपनीची टिका दुस-या कंपनीवर होती. त्याच्या आठवणीने तर लशीची भानगड़ नको असेही वाटून गेले. आज सकाळीच जेव्हा मिपावर लशीच्या थोतांडावर लेख वाचला आणि खुप आनंद झाला. आता आनंद का झाला ते नेमकं सांगता येत नाही, पण झाला. पण आपण लस घेऊन टाकू. परिणाम होऊ की ना होऊ.....प्लासिबो इफेक्ट आता काही रिस्क नाही, असे मनाचे समाधान तरी होईल. बाकी, नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते,असे समजू आणि देव्हा-यातल्या देवासमोरची घंटी घेऊ, नसेल तर थाळी घेऊ, दिवाबत्ती करू करोना गो, करोना गो असे म्हणू, हाय काय आणि नाय काय...! -दिलीप बिरुटे

In reply to by उपयोजक

पण, इतक्यात घाई करू नका.... राजकीय नेते, थेट जनसंपर्क टाळू शकतात, आपण तसे करू शकत नाही... घरातून काम करत असाल तर, जनसंपर्क टाळणे, हा सर्वोत्तम उपाय आहे.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त 10/03/2021 - 20:47
सध्या हितं आमेरिकेत आहोत गेले आठेक महिने. गप गुमान घरीच. किंवा फारतर येकट्याने मोकळ्यात फिरायला जाणे. कोणी कुणाकडे जात नाहिये वगैरे. आता जरा लोकांनी थोडंबहुत जाणं-येणं सुरु केलय म्हणून एक-दोघांना फोन केला आणि काही मराठी मंडळी फिरायला गेलेलो असताना भेटली - मग घरी या निवांत गप्पा करायला नवीन केलेली चित्रं बघायला वगैरे म्हणालो तर त्यांचा पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही व्ह्याक्शीण घेटलाय का ? अजून नाही म्हटल्यावर लौकरात लौकर घ्या म्हणून काढता पाय घेणे. आता काही काळानंतर भारतात परतायचे आहे तेंव्हाही व्ह्याक्शीण घेतले असल्याचे दाखवावे लागणार. म्हणजे आता घ्यावीच लागणार लस्सी.

In reply to by उपयोजक

काहींना मानस पुत्र, मानस कुटुंब किंवा मानस मुलगी असते.... तसेच आमचे हे मानस बाबा महाराज आहेत... दोन चार पेगांची आहुती चढवली की, ते आत्मिक प्रगट होतात.... डोंबिवली हे जागतिक केंद्र असल्याने म्हणा किंवा आमची आराधना उत्तम असल्याने म्हणा, ते आमच्या आराधनेने कधी कधी प्रसन्न होतात... सध्या ते आम्हाला, आर्थिक षटरिपू ह्या विषयी प्रवचन देत आहेत... बाबा महाराज डोंबोलीकर, यांचे म्हणणे, जास्त मनावर घेऊ नये, ही विनंती.

लेखन आवडलं. लेखाबाबत आणि लशी बाबत अनेकांचे मतभेद होऊ शकतील, पण लेख पटणारा आहे. करोना प्रतिबंधक लस आयुष्यभर तुमचं संरक्षण करू शकणार नाही, हेही खरं आहे, पण काही काळासाठी प्रतिबंध नक्कीच होऊ शकेल असेही वाटते. -दिलीप बिरुटे (कन्फ्यूज) >>>>>आपल्याला दोन नेते जाम आवडले. मोदींनी मुखपट्टी उघडपणे नाकारली....... माझं या विषयावर आणि त्यांच्या काल कर्तुत्वावर काही दिवस मौन आहे, मुखपट्टीच लावली आहे असे समजा. -दिलीप बिरुटे (मुखपट्टीधारक)

कंजूस 01/03/2021 - 09:01
वैज्ञानिकच ठेवा म्हणतो. महाभारत त्यात आणू नका. तो एक वेगळाच करा. ---------------------- एक उदाहरण पाहा काविळीसाठी आयुर्वेदात - यकृत बिघडून पित्तरस अधिक किंवा उणे निर्माण झाल्याने होणारा रोग धरला आहे. त्रिकटू चूर्ण आणि एरंड पानांचा रस हे बरे करतात. हेच मॉडर्न मेडसन, संशोधनातून लिवरचे A,B,C, D प्रकार शोधून वेगवेगळ्या लशी केल्या. रोग होऊ नये म्हणून लस. रोग झाल्यावर फक्त बी कॉम्प्लेक्स. आयुर्वेद औषध अजूनही गुणकारी आहे!!

In reply to by कंजूस

गवि 01/03/2021 - 09:11
कारण व्हायरस ऊर्फ विषाणूची लागण एकदा झाली की थेट त्याच्यावर उपचार करुन मारणे अवघड़ पडते. Bacteria बाबत अँटीबायोटीक औषधे उपयोगी पडतात . व्हायरस मारण्याबाबत मर्यादा येतात. त्यावर केवळ बाह्य लक्षणे कमी करणारे उपायच मुख्यतः करता येतात.

चौकटराजा 01/03/2021 - 09:23
हे पुस्तक २०१३ साली लिहिलेले असल्याने २०२१ साली ते कालबाह्य झाले असण्याची शक्यता आहे ! अशक्त झालेला विषाणू शरीरात टोचल्याने प्रतिपिंडे निर्माण होऊन शरीर त्याच्या पेशीप्रवेशाला मारक अशी योजना करते असा दावा लस याबाबत आतापर्यंत करण्यात आला आहे ! आताची लस या तंत्रावर आधारित नाही अशी माझी माहिती आहे ! लस घेतल्याने प्रत्येकास भक्कम संरक्षण मिळालेच पाहिजे असा दावा निसर्गच मुळी करीत नसतो. यासाठीच तर ते शेवटचे वाक्य डॉक्टरांनी जपून ठेवलेले असते " बॉडी रिस्पॉन्स देत नाही औषधाना ! " आज देखील मला असे वाटते की नेहमीच रोग अनेकांना होत असतात ,अनेक माणसे काहीही औषध न घेता बरी होत असतात ते त्यांच्या नैसर्गिक प्रतिकार शक्तीने . पण हे सगळे अव्यक्त पातळीवर होत असल्यानं त्याचा तपशील ठेवता येत नाही ! ही केवळ तर्का ने जाणण्याची गोष्ट आहे ! तर्कट हे फायद्याचे ही ठरते वा अगदी उलट ! महाजनो गत: स: पंथः या नात्याने मी लस घेणार आहे ! लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल !

In reply to by चौकटराजा

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर हेच म्हणतात ....सध्या शांत रहा, घरात पडीक रहा, सांसर्गिक रोग असल्याने, जन संपर्क टाळा.लशीचे बरेवाईट परिणाम दिसायला वेळ लागेल.

In reply to by चौकटराजा

गोंधळी 01/03/2021 - 09:52
लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल ! चौ रा काका हे काही पटले नाही.

In reply to by गोंधळी

चौकटराजा 01/03/2021 - 10:36
कोणतेही औषध वा लस बाजारात येण्यापूर्वी त्याचे काही दुश्परिणाम माणसावर होतात की नाही हे पाहण्यासाठी काही स्वयंसेवक गरजेचे असतात ! ही लस बाजारात येण्यापूर्वी अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून त्या लसीची ७० टकके परिणामकारकता सिद्ध केली आहे ! तरी ही काही लोकांना त्यावर शंका आहे ! रसायन विज्ञानाचा विषय नसून मानस शास्त्राचा झाला आहे ! वरील स्वयंसेवकांत अनेक तरुण मंडळीही असतीलच ना ! आता धोका पत्करण्यात मी म्हातारा मग मागे का राहू ? आता राहता राहिला संशय लस निर्माते ,राजकारणी व डॉक्टर यांच्या तोडपाण्याचा ! त्यावरही संदेह लोकांना आहे ! तो ही दूर होऊन सत्य पुढे येण्याचे श्रेय संशोधकांप्रमाणेच या स्वयंसेवकांनाही आहे हे नाकारू नये !

उत्तम माहिती. सध्यातरी लस घेण्यापलिकडे पर्याय दिसत नाही. लस घेतल्याने करोना पूर्ण जाणार नाही हे माहित आहे .

Bhakti 01/03/2021 - 10:30
लसीवर चांगलाच ऊहापोह आहे.जीवानमान उंचावण हेच महत्त्वाचे आहे हे तर त्रिकाल बाधित सत्य आहे.पण म्हणून संशोधन सर्व थोडांत हे काय पटल नाही. कंजूस यांच्याप्रमाणेच मलापण​ आयुर्वेद महान आहे त्यात अजूनही शक्ती आहे हे पटल,पण मग प्रश्न पडला रामदेवबाबाच "औषध ?" करोनावर घ्यायच का? (भयानक विचार).. चौरा यांचं मत पटल लस न घेणं ही चुक ठरु शकते. बाकी महाभारतची उजाळणी आवडली :)

In reply to by आंद्रे वडापाव

Bhakti 01/03/2021 - 10:44
ते घेणारच होते. पण त्या अखिलेश बाबाला प्रोटोकॉल,नियम वगैरे काहीच कळत नाही.काहीही बरळत होता.(हा हा)

Rajesh188 01/03/2021 - 12:29
लस च नाही तर सर्वच बाबतीत अवास्तव दावे करण्याचे प्रमाण खूप आहे.सायन्स मॅगझिन मध्ये सुद्धा सर्रास खोटे दावे केले जातात.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 14:05
फक्त स्वच्छ हवा. रासायनिक खत आणि कीटक नाशक न वापरलेलं अन्न आणि पालेभाजी. शुद्ध पाणी. संकरित जनावर चे दूध पूर्ण बंद. आणि स्वच्छ आणि मोकळा परिसर . एवढे उपलब्ध झाले तर. लस,औषध ह्यांची बिलकुल गरज नाही

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:30
या सगळ्या गोष्टी कदाचित १५०/२०० वर्षांपूर्वीपर्यंत (इ.स.१८५०) नक्कीच होत्या तर तेव्हा माणसे जास्त जगायची कि आत्ता जास्त जगतात?

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 16:01
मलेरिया,अतिसार,प्लेग ह्या मुळे लोक जास्त मरायची . कारण योग्य उपचार नव्हते. पण उपचार निर्माण झाल्यावर ते प्रमाण कमी झाले. त्याला लसी कारणीभूत नाहीत. आता जे आयुष्य वाढले आहे असे वाटत आहे ते कोणाचे? ज्यांचे राहणीमान,आहार, विहार नैसर्गिक होता त्यांचेच. म्हणजे १९४५ ते १९७० पर्यंत ज्यांचा जन्म आहे त्यांचेच. त्याला कारण शुध्द आहार,शुद्ध हवा,आणि जोडीला वैधकिय सुविधा हे आहे. पण त्या पुढची पिढी अनेक रोगाने त्रस्त आहे कमी वयात मधुमेह ब्लड प्रेशर. किडनी चे प्रॉब्लेम खूप जास्त वजन आणि अशा अनेक रोगांनी आताची पिढी कमी वयात त्रस्त आहे. ह्याला एकमेव कारण आरोग्य व्यवस्थेचे बाजारीकरण आणि प्रदूषित,हवा,पाणी,अन्न,हे आहे बाजारीकरण मुळे नसलेले गुण चिकटवून केलेली औषनिर्माणशास्त्र ची होत असलेली जाहिरात लेखिका हेच सांगत आहे.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 16:12
ओके :) तुमच्यासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

आग्या१९९० 01/03/2021 - 16:24
ह्यांच्या मुलांना नव्हे तर ह्यांनाच देवीचे जिवंत विषाणू टोचून घ्यावेत. नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढली कि नाही हे ही कळेल.

गोंधळी 01/03/2021 - 14:41
सांगायचा मुद्दा काये की कर्म, भक्ती, धर्म यांमध्ये साधना हा सामायिक घटक आहे. ती साधना म्हणजे नामजप. तो करायला हवाच. चांगला सणकून करूया आणि या करोना नामे थोतांडास पार पळवून लावूया. म्हणजे तुम्ही आजारी पडल्यावर वैद्यबुवां कडे जातच नाहीत का? नामजप करुन बरे होता? बाकी अध्यात्माशी सांगड घालत जगणं खुप कठीण काम वाट्ते. ego मुळे असेल कदाचीत.

In reply to by गोंधळी

सासूला, सुनेच्या जाचापासून वाचवते सुनेला, सासू पासून वाचवते स्वतःचे षंढत्व लपवायला धंदा वाढवायला लोकांची फसवणूक करायला जागा ढापायला असे ह्या कातड्याचे विविध उपयोग आहेत आध्यात्मिक माणूस, एक नंबरचा स्वार्थी आणि खोटारडा असतो, हे मी अनुभवले आहे,

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:27
लेखकासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

पुर्वी गल्लोगल्ली, किंवा दरेक शाळेत, एक तरी पोलियोग्रस्त, व्यक्ती असायचीच, आता नाही --------------------- त्यामुळे, आपण लस टोचून घ्यायची. मी थोडे दिवस वाट बघून, मग कुणाकडून लस टोचून घ्यायची?, लस टोचून घेतल्या नंतर कुठे रहायचे? इत्यादि साधकबाधक विचार करून, मगच ठरवीन.... घाई गडबडीत, असे निर्णय न घेणेच उत्तम, असे माझे वैयक्तिक मत आहे... बाय द वे, लस टोचून घेतली की, एक जोरदार कट्टा करू...

जॉन रीज 01/03/2021 - 16:19
आपले जुने लेख आणि हा लेख अशी तुलना करता आपला i.d. कुणी चोरला असावा असे वाटते कारण आपण असे लिखाण कराल असे वाटत नाही आणि लेखाची शैलीही मागील लेखांशी जुळत नाही.

सूक्ष्मजीव 01/03/2021 - 19:36
मी एका ओळखीच्या डॉक्टर सोबत जे कोरोना काळात महानगरपालिके कडून हंगामी करोना सेवे साठी भरती केले आहेत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यांना मोफत लस दिली जात होती. या लशीचा प्रभाव किती काळ राहील हे विचारल्यावर ते म्हणाले की ही लस नसून एक प्रकारचा इम्यूनिटी बूस्टर आहे जे सर्व सर्दी, पडसे, खोकला, ताप इत्यादी आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते. याबद्दल जाणकार काय म्हणतात?

In reply to by सूक्ष्मजीव

गामा पैलवान 02/03/2021 - 03:39
सूक्ष्मजीव, पर्यायी दृष्टीकोन असलेल्या डॉक्टरांना आपल्या आस्था ( = concerns ) मांडायला वाव मिळावा हा सदर लेख लिहिण्यामागे हेतू आहे. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

निमिष ध. 01/03/2021 - 21:16
मिपावर असा लेख असणे - तो सुद्धा करोनासारख्या अवघड काळात हे एक सामाजीक आरोग्याकरता हानीकारक आहे. वेगवेगळी मते असणे वेगळे आणि त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येणे वेगळे. त्यामुळेच इथे उत्तर लिहीतो आहे. त्या ज्या कोण सुझान हम्फ्रीज आहेत त्यांना क्वॅक (ढोंगी वैद्द्य) म्हटलेले आहे - https://medika.life/dr-suzanne-humphries-on-medikas-quack-scale/ त्यांच्या पुस्तकातील मिसल्स चे दाखले कसे खोटे आहेत ते इथे नीट सांगितलेले आहे - https://medium.com/@visualvaccines/why-dr-suzanne-humphries-an-anti-vaccine-activist-is-lying-to-you-about-measles-ce446d0a7e0f अमेरिकेत ५ लाखांहून लोक मेलेली आहेत करोनामुळे आणि जगभरात जवळ जवळ २५ लाख लोकसंख्या दगावलेली आहे. असे असताना असा बेजवाबदार लेख येणे हे चांगले नाही. कृपया कोणीही या लेखाला वाचून करोना लशीबद्दल आपली मते बनवू नयेत ही माझी कळकळीची विनंती.

In reply to by निमिष ध.

पिनाक 01/03/2021 - 22:51
अगदी बरोबर. हेंच म्हणायला इथे आलो होतो. उगीच सरकारचा त्रास वाढवू नका..गप गुमान लस घ्या आणि कामावर चला. लै झालं घरी बसून.

In reply to by निमिष ध.

गामा पैलवान 02/03/2021 - 02:57
निमिष ध., पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर सुझन हम्फ्रीझ कधीही होमियोपाथ नव्हत्या. त्यांनी अलोपथी सोडून इतर कोणतीही उपचारपद्धती सुचवली नाहीये. तुम्ही दिलेल्या दोन्ही दुव्यांत डॉक्टरबाईंना होमियोपाथ व अवांतर चिकित्सक म्हंटलेलं आहे, जे साफ चुकीचं आहे. इझाबेला बाईंचा आरोप २०१५ च्या आसपासचा म्हणजे बराच जुना आहे. डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांच्या संकेतस्थळावर या आरोपांचं खंडन केलेलं आहे : http://www.dissolvingillusions.com/critiques/ वानगीदाखल एक वृथा आरोप दाखवतो :
She promotes mystical powers of Vitamin C, calling it “the basis of life,”[10] and asserts it magically “neutralizes any toxins in the blood.”[10]
प्रत्यक्षांत उपरोक्त पुस्तकात डॉक्टरबाईंनी क जीवनसत्वाच्या चाचण्या घेतल्या नाहीत म्हणून विधान केलंय. हे क जीवनसत्वाचं प्रमोटिंग नव्हे. असो. लशीच्या दुष्परिणामांवर कोणीही काहीच का बोलंत नाही? मी डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांना संशोधिका मानंत नाही. त्यांनी कुठलाही नवा शोध लावलेला नाहीये. त्यांनी फक्त जुना विदा ठळकपणे समोर मांडलाय. जो आजपर्यंत कोणीच मांडला नव्हता. या विदाप्रस्तुतीमुळे लशीविषयी आणि जंतुसिद्धांताविषयी काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. कोणाकडे उत्तरं आहेत का? आ.न., -गा.पै.

बाजीगर 02/03/2021 - 14:25
गा.पै. यांच्याविषयी मला आदर आहे. पण या लेखाला मी विरोध करतो. नाही हो. चूक गलत राँगनंबर, गल्ली चूकलात. खूप भटकलात. महाभारत संदर्भ पूर्ण अनावश्यक. माझ्या माहितीतले दक्ष जागरुक मित्र करोना ने मरण पावलेत. कृृपया स्वच्छता पाळा ( त्यावर गा,पै. आपण योग्य जोर दिलात, स्वच्छ पाणी प्या / पोषक व घरचा आहार घ्या / यथाशक्ती व्यायाम,चालणं करा, अकारण जागू नका. आणि हो ...लस घ्या...त्यावर डोकं खपवू नका. हा धागा delit करा. (एवढा research आणि टंकण्याचे श्रम, मुद्दे मांडण्याचे कसब याची मला कदर आहे)

मदनबाण 02/03/2021 - 16:13
गा.पै, हिंदुस्थानातील लसी बाबत गैर समज उत्पन्न होइल असे लेखन सध्य काळात योग्य नाही ! ती किती उपायकारक आहे हे येत्या काळात कळेलच परंतु उगाच लसी विषयी शंका घ्यावी असे सध्या कोणतेच कारण नाही. परदेशातील स्थिती मात्र वेगळी दिसते आणि त्या बद्धल अनेक बातम्या इथे वाचण्यास मिळतील :- Coronavirus COVID19 जाता जाता :- तेव्हा पांडवांना कृष्ण यादव नामे एक अत्यंत लबाड इसम भेटला. या बद्धल विशेष आक्षेप ! आपल्या लिखाणासाठी परमेश्वरास कशास बोल लावावे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

Rajesh188 02/03/2021 - 16:21
कशा साठी हा लेख delete करायला हवा,लेखात दुसरी बाजू मांडली आहे समजून घ्यायला काय हरकत आहे.प्रतेक विषयावरील दोन्ही बाजू समोर यायलाच हवी.लेख वाचून लगेच लोक लसी बद्द्ल निगेटिव्ह मत बनवतील असे इथे काही लोकांना का वाटत ह्याचेच मोठं आश्चर्य वाटत. वाचणारी माणसं आहेत प्रत्येकाला स्वतःची बुध्दी असते चांगले वाईट,योग्य,अयोग्य सर्वांना समजत .त्यांना गाढव समजू नका. मीच शहाणा मलाच योग्य अयोग्य कळत बाकी लोक बुद्धिहीन आहेत असले गैर समज काढून टाका. आणि लेख delete करायची काही गरज नाही.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 19:02
मी तरी लस टोचून घेणार नाही. आणि देवू,क्षय,पोलिओ ह्यांची लस टोचली म्हणून ते जगातून कमी झाले आहेत हे तुमचे मत आहे माझे नाही. तुम्हीच त्या प्रश्नांची उत्तरं शोधत बसा.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 02/03/2021 - 22:11
मी तरी लस टोचून घेणार नाही.
तुम्ही लस टोचून घ्या किंवा नका घेउ...कोणालाही शष्प फरक पडत नाही. मी विचारलेला प्रश्न "तुम्ही लस टोचून घेणार की नाही?" हा नाहीये तर "तुमच्या मुलांना लहान असताना पोलिओ वगैरेच्या लस टोचवल्यात का?" असा आहे. तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का? अजूनही प्रश्न समजला नसेल तर सांगा....अजून सोप्या मराठीत लिहिन :)

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 22:36
आपले विचार कधीच दुसऱ्या वर थोपवयचे नसतात हा साधा common सेन्स आहे. त्या मुळे मुलांना लस दिलेली आहे.ज्या लसी देण्याचे वेळापत्रक सरकार नी तयार केले आहे त्या प्रमाणे. पण आजच्या काळात वैधकीय व्यवसाय हा प्रामाणिक राहिला नाही ह्या वर माझे ठाम मत आहे . मग ते संशोधक असतील तर ते कोणत्या तरी व्यापारी कंपनी शी बांधील असतात आणि त्यांच्या इशर्या वरूनच त्यांचे संशोधन आणि त्याची माहिती ह्याचा प्रचार ,प्रसार ते करत असतात. मोठमोठ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यांचा वापर करून घेतात. ह्या मध्ये शेवटच्या स्तरावर डॉक्टर मंडळी असतात त्यांचे कार्य कसे चालते ह्याचे अनेक किस्से लोकांना माहीत आहेत. लुटमार करणारा व्यवसाय असे वर्णन केले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी माझ्या विषयी निर्णय घेताना मात्र त्याचा विचार करतो. एक तर आजारी पडत नाही पण कधी पडलो तर खूप पाच सहा दिवस तरी डॉक्टर कडे जात नाही औषध ही रोग बरे करत नाहीत तर रोग वाढवतात असे माझे मत आहे. अगदीच गरजेचं झाले तर च dr कडे जातो. ते पण माझ्या family dr कडेच. बाकी कोणाकडे नाही. आता सर्व उत्तर दिली आहेत परत एकच प्रश्न विचारू नका

In reply to by Rajesh188

बेंगुताई 30/04/2021 - 11:26
ठाम मत हाहाहा.पण सगळ्या डॉक्टरांचा ठेका तुम्ही म्हणून का घ्यायचा? गलत बात! आणि फॅमिली डॉक्टर पण डॉक्टरचं असतील नाही का ?

In reply to by टवाळ कार्टा

गोवर, काजण्या, गालगुंड, यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे किंवा त्यांना अटकाव करणारी, प्रतिकारक्षमता तरी वाढलेली आहे लस टोचून घेणे हे उत्तम, हे तुझे मत, मला तरी मान्य आहे

स्मिता. 02/03/2021 - 16:29
केवळ करोनाच नाही तर इतरही अनेक दुर्धर रोगांवरचे लसीकरण आवश्यकच आहे. आधीच्या अनेक महत्त्वाच्या लसींची माहिती आणि आकडेवारी एक गूगल सर्च केला की सापडेल आणि करोनाच्या लशीची माहिती समजून घ्यायची असल्यास इंग्लंडची (युके) आकडेवारी अभ्यासून बघता येते. तेथे जानेवारीच्या मध्यापासून तर अखेरपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली होती. भारताच्या तुलनेत खूप लहान आणि कमी लोकसंख्येच्या या देशात दिवसाला सरासरी ६०,००० बाधीत तर दररोज सरासरी १५०० मृत्यू होत होते. त्यात भर म्हणून हे दिवस तिथल्या कडक हिवाळ्याचे, अनेक दिवस तापमान शून्याच्या मागे-पुढे असते. पण लॉकडाऊन सोबतच लसीकरणाच्या जोरावर एका महिन्याच्या कालावधीत, आजच्या दिवसाला बाधीत आणि मृत्यूचे आकडे १० पटीने कमी झाले आहेत (सरासरी ६००० बाधीत आणि १५० मृत्यू). आलेख पाहिला तर लक्षात येतं की तिथल्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेच्या तुलनेत ही तिसरी लाट बरीच मोठी असली तरी उच्चांकानंतर बाधितांची संख्या झपाट्याने खाली आली आहे. हा एका महिन्यातला फरक केवळ लसीकरणामुळे शक्य झाला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आधीच्या लसींच्या तुलनेत ही लस नवीन आहे आणि कमी कालवधीत बनवली आहे हे खरं असलं तरी आता लस शोधण्याचं तंत्रज्ञानसुद्धा आधीपेक्षा खूप विकसीत झालं आहे हे लक्षात घ्यायला हवं. करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?

निपा 02/03/2021 - 18:13
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

निपा 02/03/2021 - 18:14
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

गामा पैलवान 02/03/2021 - 19:56
स्मिता.,
करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?
करोना हे एक थोतांड आहे. कारण की अमेरिकेत ऑगस्ट २०२० पर्यंत ( म्हणजे गेल्या सहा सात महिन्यांपर्यंत ) हा विषाणू अलग केला गेला नव्हता. हे गूगल करून पहा : "Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available," बाकी, इथे इंग्लंडात PHE ( = Public Health England ) कडे करोना विषाणू अलग केल्याची शष्प माहिती नाही : https://www.whatdotheyknow.com/request/679566/response/1625332/attach/2/872%20FOI%20All%20records%20describing%20isolation%20of%20SARS%20COV%202.pdf करोनाचा विषाणू अलग केलेला नसतांना कोणती दिव्य लस उत्पन्न केली गेलीये? थोतांड ते थोतांडच ! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 11:34
मग मानसं कशाने बर मरत असतील? बहुतेक स्वच्छ भारत अभियान कमी पडले असणार! बाकीच्या देशाचं आपल्याला काही माहीत नाही बुवा.

In reply to by बेंगुताई

रंगीला रतन 30/04/2021 - 11:55
साधा सर्दी पडसा झालेली लोकं आपल्याला करोना झालाय या गैरसमजुतीने उगाच घाबरून मेली आहेत. जगात करोनाचा विषाणु अस्तीत्वात नाही हेच सत्य आहे! तुम्ही आम्ही कीतीही ओरडुन सांगीतले तरी धागालेखक विषाणुचे अस्तीत्व मान्य करणार नाहीत. हां पण सनातन प्रभातने तसा दावा केला तर आणि तरच त्यांचे मतपरीवर्तन नक्की होइल :)

Rajesh188 02/03/2021 - 21:14
प्लेग,देवी,इत्यादी रोग निर्माण करणारे जिवाणू ,विषाणू आज सुद्धा मानवी शरीरावर हल्ला करतात पण त्या व्यक्ती नी त्या आजाराची लस घेतली असल्या मुळे लोक आता त्या आजारांना बळी पडत नाहीत .हे कस सिद्ध केले जाते शास्त्रीय पद्धती नी. कोणी असे सिद्ध करून दाखवलं आहे का? की ते रोग कारक विषाणू,जिवाणू आता अस्तित्वातच नाहीत हे त्याला कारण आहे.

Bhakti 02/03/2021 - 23:29
फायझर लसीबाबत चांगला दुवा मिळाला..कोवीशिल्ड आणि भारत बायोटेक लसीवर शोधत आहे. ् https://www.technologyreview.com/2020/12/09/1013538/what-are-the-ingredients-of-pfizers-covid-19-vaccine/

Rajesh188 03/03/2021 - 19:51
त्यांना होणारे साथी चे आजार काही महिन्यात संपुष्टात येतात ना . कसे . ना लस ना औषध . तरी मानव जेवढं आजारांनी ,रोग राई नी मृत्यू मुखी पडतो तेवढे प्राणी पडत नाहीत. ह्याची पण काही तरी कारणे असतील ना. प्लेग उंदरा पासून माणसात संक्रमित होत होता. आता उंदरांना पण प्लेग होत नाही.

चौकस२१२ 04/03/2021 - 04:43
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड ! बरं.. अमेरिकेत , इंग्लंड इटली ब्राझील मध्ये हजारो लाखो मेले हे पण एक थोडांतच का? कि त्यांना लपवून ठेवलाय मोहावी वाळवंटात कि आल्प्स मध्ये ? आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल

In reply to by मुक्त विहारि

Rajesh188 04/03/2021 - 10:49
माझ्या लहानपणी मधुमेह, लठ्पणा,लहान वयात चशमे,लहान वयात केस पांढरे झालेल्या व्यक्ती दिसत नव्हत्या पण आता मात्र सर्रास दिसत आहेत. उच्च रक्तदाब असणारे तर खूपच आहेत पाहिले तेवढे नव्हते. कमी वयातच दातांचे आणि हिरड्यांचे विकार असलेली लोक पण वाढली आहेत. 32 दात 32 वर्षापर्यंत सुद्धा टिकत नाहीत पाच दहा कमी होतातच.

Rajesh188 04/03/2021 - 11:22
माझ्या गावात मला वाटतं एकच कुष्ठ रोगाचा रोगी होता तो पण वय झालेला. बाकी मी प्लेग चा आजार बघितला नाही ना अनुभवला आहे. पण हिवताप,अतिसार ,कांजण्या हे आजार असायचे आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे .पण हिवताप आणि अतिसार आज सुद्धा जीवघेणा आहे. उपचार वेळेवर मिळाले नाहीत तर. सर्वात जास्त लोक हिवताप,अतिसार ह्या मुळेच पूर्वी लोक मृत्यू मुखी पडत असत आता तशी स्थिती नाही . औषध उपचार नी ह्या रोगावर विजय मिळवला आहे. रोग राई कमी होण्याचे स्वच्छता हे कारण नक्कीच आहे . धनुर्वात,rabies, ह्याचा रोगी मी आज पर्यंत तरी बघितला नाही. पण हे दोन्ही आजार पण घातक आहेत. आधुनिक वैद्यक शास्त्र नी लोकांचे आयुष्य वाढवले आहे ह्या विषयी शंका नाही. पण आता परत त्या शास्त्राला उतरती कळा लागली आहे असे म्हणता येईल. सेवा भावनेने संशोधन आणि उपचार मधल्या काळात होत होते आता त्याला बाजारू स्वरूप आले आहे.

गामा पैलवान 04/03/2021 - 15:24
चौकस२१२, तुमचा इथला संदेश वाचला. १.
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड !
बरोबर. करोनाचा विषाणू हे आजूनही थोतांडच आहे. जो विषाणू अद्याप विलग करता आलेला नाही, त्यावर म्हणे लस बनवली आहे. पब्लिक इतकं मूर्ख आहे का विश्वास ठेवायला? २.
यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल
सहमत आहे. निदान माहिती तरी मिळेल. जमल्यास डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांचं उपरोक्त पुस्तक वाचून पहा. निदान त्यातल्या साथीच्या रोगांचे आलेख तरी बघा म्हणून सुचवेन. ३.
आरे बापरे १००+ देश गंडले कि काय थोतांडामुळे
हो. मेकॉलेछाप राज्यपद्धती असली की हे असं होतंच. आ.न., -गा.पै.

चौकस२१२ 05/03/2021 - 04:22
१०० + अधिक देश त्यांची सरकार पूर्ण गंडली , आणि ती सुद्धा काही सरकारे पार उजव्या विचारसरणी ची आणि काही डाव्या तरी गंडली होय??? अरे बापरे म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का? बरं आपण ४थय प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळलेत .. हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय ! बरं उत्तर द्या नका देऊ... आपली "थेरी "कळली एक काम करा तो शोधलेख एवढी मेहनत घेऊन लहिलेलेला जरा मटा किंवा लोकसत्तेत छापायला पाठवा ..( कुबेर साहेब स्वागतच करतील कारण त्यात त्यांना "सरकारने लोकांनां कसे गंडवले याचे अजून एक शास्त्रीय उदाहरण मिळेल अप्लाय कृपेने ) जनताच उत्तर देईल तुम्ह्ल्ला अहो काय हे.. चाललंय तुमचा हा हे समजू शकतो कि काही गोष्टींवर आपण प्रश्न उभे करू जसे कि ( राजेश तुम्ही पण ऐका ) लस चुकीच्या पदहतीने विकसित केली असावी , त्यात आर्थिक घोटाळा असेल, इतर उपायातील त्रुटी , पण हे सगळंच खोटा आहे ! असा दावा !

Rajesh188 05/03/2021 - 14:10
Corona लसी मुळे corona होणार नाही ह्याची शाश्वती आहे का. कोणत्याच संस्थेने covid ची लस किती दिवस covid विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण करेल ह्या विषयी ठाम विधान केलेले नाही. म्हणजे हे लसी करण प्रोयागिक आहे.निष्कर्ष अजुन यायचा आहे.

In reply to by Rajesh188

लस १०० % करोनाला प्रतिबंध करेल असा विदा अजुन दिसला नाही. ९० टक्के प्रतिबंध होईल असे समजले तरी १० % रिस्क आहेच. काय नाय, सतत मास्क घालणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धूणे सॅनिटाइजरचा वापर करणे काळजी घेणे हाच सुरक्षित राहण्याचा उत्तम उपाय आहे. करोना समजा झालाच तर औषधोपचाराने तो बराही होतो. बाकी, अजुन एक करोनास प्रतिबंध करायचा थेट लशी इतकाच उपाय, जोरजोरात थाळी वाजविणे आणि गॅलरीत जाऊन दिवाबत्ती करणे त्याचंही महत्व काही कमी नव्हतं, नाही. त्याचाही विदा येणे अजुन बाकी आहे. =)) च्यायला, आयुष्यात लै गमती जमती केल्या या करोनाने. मागे वळून पाहिल्यावर हसून हसून पुरेवाट होते. -दिलीप बिरुटे

In reply to by टवाळ कार्टा

मिपा वरील चर्चा वाचूनच, केवळ भारतच न्हवे तर,चीन, अमेरिका, पाकिस्तान आपली परराष्ट्रीय धोरणे ठरवतात.... त्यात आता, नोबेल पुरस्कार पण टाकायला हरकत नाही...

गामा पैलवान 05/03/2021 - 20:54
चौकस२१२, १.
हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय !
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? करोनामुळे मृत असा छाप मारला तर अमेरिकन सरकार रोग्याचे सगळे पैसे द्यायचं. मग कोण कशाला बिनकरोनाचं प्रमाणपत्र देईल? एक लेख सापडला : https://eu.usatoday.com/story/news/factcheck/2020/04/24/fact-check-medicare-hospitals-paid-more-covid-19-patients-coronavirus/3000638001/ शितावरून भाताची परीक्षा. इथे इंग्लंडमध्ये आता फ्ल्यू चे मृत्यू अचानक नाहीसे झाले. त्यांची जागा करोनाने घेतली. घरोघरी मातीच्याच चुली म्हणावं का ? करोनचा विषाणू आजघडीला विलग ( = isolate ) झालेला नाहीये. भविष्यात तो कधी विलग होण्याची शक्यता माझ्या मते तरी ० आहे. मग नेमकी कशाची चाचणी केली जाते? आणि नेमकी कसली लस टोचली जाते? २.
म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का?
होच मुळी. निदान आजवरचा तरी हा सर्वात मोठ्ठा झोल आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 05/03/2021 - 22:23
रंगीला रतन,
तेवढीच जेवढी त्याला थोतांड म्हणायला लागते.
हे बरोबर बोललात. तुमच्याकडे करोनाविषाणू विलगीकृत म्हणजे आयसोलेटेड केलेला आहे का? थेट रोग्याकडून नमुना मिळवलेला पाहिजे. माकडाच्या मूत्रपिंडावर वसवलेली वस्ती किंवा डुकराच्या गळ्याखाली लोंबणारी मांसरुडे ओघळून पडलेल्या चरबीच्या कणांवर वाढवलेली बुरशी वगैरे नको. असा विषाणू तुमच्याकडे नसेल तर करोना हे थोतांड आहे. महत्त्वाचा. आणि हे विधान करायला मला काडीचीही अक्कल वापरावी लागली नाही. तुमच्या उपरोक्त उद्गारांना माझं पूर्ण अनुमोदन आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रंगीला रतन 05/03/2021 - 22:44
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? या वाक्याचाआणि तो करोनाविषाणू आयसोलेटेड आहे क नाही याचा काय संबंध? असल्यास तो स्पष्ट कराच. आपला उद्धट रंगीला रतन

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 06/03/2021 - 15:36
रंगीला रतन, तोच तर माझाही प्रश्न आहे. करोनाचा अस्सल नमुना अस्तित्वात नाही. तरीपण तो रोग्याच्या शरीरात मात्र सापडतो आहे. त्याचप्रमाणे तो निरोगी माणसातही असू शकतो. आणि तो पसरतोही म्हणे. याचाच अर्थ 'करोना' 'शोधण्याची' चाचणी करोनाइतकीच भंपक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 12:00
त्यासाठी तुम्हाला प्रयोगशाळेत भेट द्यावी लागेल(मास्क लाउन जा बरं का?) तिथे रुग्णांचे swab असतात तिथे कदाचित दिसतील पण.(बघा एकदा उघड्या डोळ्यांनी दिसले तर) आता नसतीलच विषाणू तर दिसतीलच कशे?काहीही करतात हे लोक दिवसरात्र ते पपई किट घालून काय तर swab घेऊन काय बघतात काय माहीत काय भेटणार त्यात शेम्बडाशिवाय?

Rajesh188 05/03/2021 - 20:59
जेव्हा पासून लस पुराण चालू आहे तेव्हा पासून मला काही प्रश्न पडतात. गूगल वर उत्तर शोधली पण सविस्तर,उत्तर मिळाले नाही. १) covid१९ व्हायरस चे इन्फेक्शन होवून बरे झालेल्या रुग्णात जी प्रतीपिंड तयार होतात ,किंवा covid व्हायरस विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण होते . ती प्रतिकार क्षमता आणि लसी मुळे निर्माण होणारी प्रतिकार क्षमता ह्या मध्ये काय फरक आहे? २) एकदा covid होवून गेल्या नंतर त्याच व्यक्ती ला परत covid झाला अशी जगात किती उदाहरणे आहेत( मी तर वाचले आहे अशी फक्त ५० उदाहरणे जगात आहेत) आणि माझ्या संपर्कात असलेल्या ज्या लोकांना covid झाला होता त्या मधील कोणालाच परत covid झालेला आहे. ना कोणा कडून तशी केस ऐकण्यात आली. इथे कोणाला reinfection झालेला covid रुग्ण माहीत आहे का?
नमस्कार लोकहो! करोना नामे मायावी थोतांड चालूच आहे. मायावी अशासाठी म्हंटलंय की पूर्वी एका मायावी राक्षसाच्या रूपातनं दुसरा राक्षस जन्म घ्यायचा, त्याचा धर्तीवर करोना या पहिल्या थोतांडातनं लस नावाचं दुसरं थोतांड उत्पन्न होतंय. आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये. हां, लशीमुळे रोग नाहीसा होतो असा सार्वत्रिक भ्रम प्रचलित आहे. कारण की भरपूर प्रमाणावर तसा प्रचार केला गेलाय. या बाबतीत आपल्याला दोन नेते जाम आवडले.

लोकसंख्या - शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर

उपयोजक ·

साहना 07/02/2021 - 13:14
लेखाबद्दल धन्यवाद. गोवारीकरांसारख्या विद्वान माणसाने तोंड उघडले कि आमच्या सारख्यांच्या नक्कीच ध्यान देऊन ऐकायला पाहिजे. त्यांची मते प्रगल्भ आहेतच पण वरून साधी सोपी वाटणारी त्यांची मते समजून घेण्यासाठी थोडा खोलवर विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. अर्थांत तो प्रयत्न मी इथे करणार नाही पण माझी काही मते मांडते. पाश्चात्य देशांत २-३ दशकांनी एक नवीन पोपट निर्माण होतो. मग हा विषय घेऊन तेथीतील हस्तदंती मनोऱ्यातील लोक येथेच्छ प्रोपागंडा करून लोकांची प्रचंड प्रमाणात दिशाभूल करतात. हिटलर ज्या काली ज्यू लोकांना ठार मारत होता त्याच वेळी इंग्लंड आणि अमेरिकेत सुद्धा प्रचंड ज्यू द्वेष होता. हिटलर ह्या लोकांना ठार मारत आहे त्याचा आनंदच ह्या मंडळींना होता. सर्व समस्यांचे खापर ज्यू मंडळींवर फोडणे चालू होते. मग त्याची परिणीती शेवटी द्वितीय महायुद्धांत झाली. महायुद्धानंतर निर्माण झाला तो बागुलबुवा लोकसंख्या वाढीचा आणि हा बागुलबुवा बऱ्याच काळ चालला. भारतासारख्या गरीब देश ह्या विदेशी प्रोपागंडाला जास्त डोके न चालविता बळी पडतात. (सध्या बागुलबुवा वातावरण बदलाचा आहे आणि तो सुद्धा तितकाच दांभिक पणाचा आहे). लोकसंख्या वाढीचे परिणाम समजण्यासाठी भौतिक शास्त्र किंवा जीवशास्त्र पूर्णपणे निरर्थक आहे. त्यासाठी अर्थशास्त्र समाजणे जरुरीचे आहे. ह्या संदर्भांत अमेरिकेतील १९८० मधील सायमन-एहरलीच हि पैज वाचणे मनोरंजक ठरेल. तर अर्थतज्द्न्य जुलिअन सायमन आणि जीवशास्त्री पॉल एहरलीच ह्यांच्यात एक मोठी जाहीर पैज लागली. १९६८ साली पॉल ह्यांनी पॉप्युलेशन एक्सप्लोजन नावाचे एक भयंकर प्रसिद्ध पुस्तक लिहिले. त्यांच्या मते लोकसंख्या वाढ तात्काळ थाम्बवली नाही तर जगांत प्रचंड अन्न कमतरता होऊन कोट्यवधी लोक मरणार होते. ह्या पुस्तकाने खळबळ माचवली आणि ह्यांच्या नादाला लागून गोऱ्या लोकांनी मुले निर्माण करणे कमी केले (ज्याची फळे ते आज भोगत आहेत). भारत, चीन आणि अनेक देशांनी जास्त विचार न करता विविध योजना राबवून लोकसंख्या वाढ म्हणजे जणू काही भस्मासुर आहे असा प्रोपागंडा निर्माण केला. ज्युलियन सायमन ह्यांनी त्यांची हि भविष्यवाणी साफ खोटी ठरणार आहे असे जाहीर रित्या प्रकाशित केले आणि १० हजार डॉलर्स ची जाहीर पैज लावली. पैजेच्या नुसार ज्युलियन ह्यांचे म्हणणे होते कि बहुतेक संसाधनाचा तुटवडा तर असणार नाहीच पण वर तीच संसाधने स्वस्त सुद्धा असणार आहे. १९९० साली जुलिअन सायमन हे पैज सहज, म्हणजे अगदी मोठ्या फरकाने जिंकले. त्या दहा वर्षांत जगाची लोकसंख्या सुमारे ८०० दशलक्ष वाढली पण जे ५ धातू त्यांनी निवडले होते त्यांची किंमत बऱ्यापैकी कमी झाली होती. लोकसंख्या वाढीचे काहीच वाईट परिणाम आहेत असे नाही. लोकसंख्या वाढीचे अनेक वाईट परिणाम आहेत. पण जगांत नक्की किती लोक असायला पाहिजेत हे सुद्धा कोणीही निर्धारित करू शकत नाही. बहुतेकांना लोकसंख्यावाढीचे वाईट परिणाम दिसतात पण त्याचे असंख्य चांगले फायदे दिसत नाहीत. लोकसंख्या कमी झाली तर हे अनेक फायदे गायब होतीलच पण त्या फायद्यांना आम्ही मुकलो आहोत हे सुद्धा समजणार नाही. सोपे उदाहरण घेऊया. पोलिओ ची लस हि आमच्या साठी वरदान ठरली आहे ह्यांत काहीच दुमत नाही. अक्षरशः कोट्यवधी मुलांचा जीव ह्या लसीने वाचवला आहे. पण फक्त लसच नाही तर अनेक औषधे निर्माण झाली आहेत त्यामुळे आम्हा सर्वांचेच जीवन जास्त सुखकर झाले आहे. तर हि औषधे कशी निर्माण होता ? अक्षरशः हजारो लोकांचे परिश्रम ह्यांत गुंतले असतात. जगाच्या पाठीवर जितके जास्त डॉक्टर, संशोधक आहेत तितकी जास्त औषधांचा शोध लागतो. आज देशाची लोकसंख्या ७ अब्ज ऐवजी ४ अब्ज असती तर मार्केट मधील अनेक औषधें गायब झाली असती. पण मी फक्त औषधांचे उदाहरण दिले आहे. सॉफ्टवेर पासून, टीव्ही वरील विविध चॅनेल पर्यंत अनेक गोष्टी गायब झाल्या असत्या आणि आम्हा सर्वांचा जीवनमानाचा स्तर खूपच खाली गेला असता. तुमहाला आवडत असलेली कुठलीही गोष्ट घ्या. समजा तुम्हाला तुमचा फोन आवडतो. ह्या फोनच्या निर्मितीसाठी हजारो पेटंटन्स लागली आहेत आणि अक्षरशः लक्षावधी विविध छोटे छोटे शोध अनेक लोकांनी निर्माण केले आहेत. आणि ह्यांत जो एकूण मानवी वेळ गेला आहे त्याची जर बेरीज केली तर कदाचित कोट्यवधी मनुष्य-तास त्या फोन चा शोध लावण्यासाठी खर्च झाले आहेत. समजा देशाची लोकसंख्या अर्धी असती तर तितके मनुष्यतास खर्च होण्यासाठी दुप्पट वेळ लागला असता आणि फोन आपल्या हाती येण्यासाठी २०२० ऐवजी कदाचित २०४० वर्ष लागले असते. अर्थानं त्याच तर्काने आम्ही असे म्हणू शकतो कि जगाची लोकसंख्या फक्त ७ अब्ज असल्याने आज आमच्या हातात अश्या अनेक गोष्टी नाहीत ज्या कदाचित २०५० मध्ये आमच्या हाती असतील. आज जगाची लोकसंख्या १४ अब्ज असती तर कदाचित आणखीन अजब साधने आणि तंत्रज्ञान आमच्या हाती असते. > अहो पण लोकसंख्या अशीच वाढत राहिल्यास पर्यावरणाचे काय ? हा मुद्दा अनेक लोक वर काढतात आणि काही प्रमाणात तो रास्त सुद्धा आहे. पहिली गोष्ट म्हणजे जसे जीवनमान उंचावते आणि लोक जास्त काळ जगू लागतात त्याच वेळी लोकांना मुलें नकोशी होतात. आमच्या आजोबांच्या काळी खाण्यापिण्याचे वांधे होते त्यामुळे लोक दिवसभर काबाडकष्ट करायचे आणि रात्रभर प्रजनन करायचे. महिलांची अवस्था फक्त चूल आणि मूल अशी होती. पण त्यांची चूक नव्हती. रात्री आणखी करणार काय ? मग ४०-५० वर्षांत हृदयविकाराचा झटका वगैरे येऊन मृत्यू. आता जीवनमानाचा स्तर उंचावलाय. गर्भनिरोधक आल्याने शरीरसुख घेता येते आणि प्रजनन रोखता येते. रोमान्स ची व्याख्या रुंदावलीय. आता जोडपी चित्रपट पाहतात, दिनार करतात, कुठे फिरायला वगैरे जातात. पुस्तके वाचतात आणि नेटफ्लिकस पाहतात. त्याशिवाय प्रत्येक वेळी फिरायला वगैरे जाताना लक्षांत येते कि जास्त मुले म्हणजे खूपच जास्त खर्च त्यामुले फार तर एक दोन मुले खूप होतात. ह्यामुळे आपसूकच जन्मदर खालावत जातो. ह्या दृष्टिकोनातून कर्वे हे खूपच दूरदर्शी आणि विद्वान होते. मुले जास्त जन्माला घालण्याचे एक कारण म्हणजे मुले मारण्याचे प्रमाण सुद्धा खूप होते. आता ते कमी झाल्याने वंशाला एक दिवा असला तरी पुरतो मोठी माळ लावायची गरज नाही. परंपरागत घरे आता बंद पडत आहेत. बापाने बांधलेल्या घरांत मुलें राहू इच्छित नाहीत म्हणून "वंशाचा दिवा" हि सुद्धा जास्त डिमांड नसलेली गोष्ट झालीय. मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च आणि लोकसंख्या वाढीचा दर हि दोन महत्वाची व्हेरिएबल्स अर्थतज्ञ पाहतात आणि दोन्ही मध्ये खूपच जास्त संबंध आहे. आणि ह्या संबंधाने मानवी लोकसंख्या चादर पाहून हात पसरेल ह्यांत मला तरी अजिबात शंका वाटत नाही. मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च : मार्जिनल खर्च ह्याचा अर्थ प्रत्येक ऍडिशनल मुलाच्या संगोपनासाठी खर्च किती येतो. एका मुलाचा खर्च प्रचंड असतो. कारण मूल नाही तर माता काम करू शकते. एक मूल झाले आणि तिने नोकरी सोडली तर ते पैसे येणे बंद होतात आणि त्यामुळे तो मुलाच्या संगोपनाचा खर्च ठरतो. पण एकदा नोकरी सोडल्यानंतर तिला २ मुले झाली तर त्या दुसऱ्या मुलाचा मार्जिनल खर्च खूपच कमी असतो. (एका मुलासाठी ३ लक्ष वर्षाला खर्च येतो तर दोन मुलांसाठी ३.५ लक्ष खर्च येतो इत्यादी). जुन्या खाली हा मार्जिनल खर्च खूपच कमी असायचा कारण बहुतेक खर्च हा फक्त अन्नाचा असायचा. आता तुम्ही दुबईला किंवा किमान खंडाळ्याला जाता तर सुद्धा तिकिटाचा खर्च प्रत्येक मुलांमागे होतो तो फार असतो. ४ मुले झाली तर मग तुम्हाला ५ सीटर गाडी सुद्धा चालत नाही. जसे जसे जीवन मान उंचावते तसे तसे मार्जिनल खर्च हा खूपच वेगाने वाढतो. मुलाला विदेशांत शिकायला पाठवायचे तर ५० लक्ष रुपये पाहिजेत. दोन मुले झाली तर मग १ कोटी. पण गरीबाच्या घरांत हे प्रश्न नसतात. पण खर्च वाढतो म्हणजे नक्की काय होते ? माणसाला जगांत फक्त दोनच खर्च असतात. एक खर्च असतो ऊर्जेचा दुसरा खर्च असतो दुसऱ्या माणसाच्या वेळेचा. (आयफोन पासून कांदे बटाटे पर्यंत तुम्ही काहीही विकत घेतले तर तुम्ही फक्त ऊर्जा आणि दुसऱ्या लोकांचा वेळ ह्या दोनच गोष्टींचा मोबदला देत असता. समजा ह्या दोन गोष्टी अपरंपार आणि फुकट असत्या तर आयफोन आणि कांदे बटाटे ह्यांची किंमत सुद्धा शून्य असती.). खर्च वाढतो ह्याचा अर्थ तुम्ही जास्त ऊर्जा आणि मानवी वेळ खर्च करत आहात असा होतो. आपण पर्यावरणाच्या नावाने बोंब मारतो तेंव्हा पर्यावरणाला होणारी हानी हि १००% ऊर्जा ह्या एका संसाधना द्वारे तुंबलेली जाऊ शकते. पण ऊर्जा महाग असल्याने आम्ही ती हानी अन-डू करू शकत नाही. जर पर्यावरणाची हानी वाढत गेली तर ऊर्जेचा दर सुद्धा वाढत जातो आणि आणि त्यामुळे मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च. त्यामुळे हि दोन्ही व्हेरिएबल्स एकमेकांना बॅलेन्स करतात. पण ऊर्जा हि काळाचा ओघांत स्वस्त होत गेली तर लोकसंख्या सुद्धा वाढत जाते आणि पर्यावरणाला हानी सुद्धा होत नाही. ह्या दोन्ही व्हेरिएबल्स मधील गणिती संबंध तसा स्पष्ट पणे अभ्यासाने कठीण आहे कारण लोकसंख्या वाढली कि हे लोक नवीन शोध लावून ऊर्जेचा दर आणखीन कमी करतात. टीप : युनायटेड नेशन्स किंवा विविध तद्न्य मंडळी जगाची लोकसंख्या सुमारे २०५० मध्ये स्टेबल होईल असे भाकीत करत आहेत. मला त्यांत शंका वाटते. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मते ऊर्जेचा खर्च येत्या २० वर्षांत १०० पटीने कमी होणार आहे. बहुतेक ऊर्जा फ्युजन सेल द्वारे किंवा इतर कुठल्या नवीन शोधांतून निर्माण होईल आणि त्यानंतर सर्वच जीवनावश्यक वस्तूंचा भाव कमालीचा पडणार आहे. ऊर्जा स्वस्त आणि मुबलक होताच, शेती, पिण्याचे पाणी वगैरे गोष्टींचा काहीही तुटवडा असणार नाही त्याशिवाय कार्बन एमिसशन वगैरे उलट करणे सहज शक्य होणार आहे. कदाचित IVF वगैरे प्रक्रिया खूपच सोप्या होऊन गरोदर न राहता सुद्धा मुले निर्माण करणे शक्य होईल आणि त्यामुळे कुठल्याही वयांत मुले निर्माण करणे शक्य होईल आणि कदाचित मंडळी जास्त मुले निर्माण करतील. अर्थांत मी हे भाकीत एखाद्या ज्योतिष्या प्रमाणे वर्तवत आहे. टीप २ : जगांतील सर्व नैसर्गिक संसाधने हि अक्षय म्हणजे अनलिमिटेड आहेत. एकच असे संसाधन आहे जे अक्षय नाही आणि ते म्हणजे मानवी वेळ. हि संकल्पना बहुतेक इकॉनॉमिक्स च्या पुस्तकांत मंडळी गेलेली असते पण राजकीय कारणासाठी पाश्चात्य राष्ट्रांनी "लिमिटेड रिसोर्सिस" आणि "अनलिमिटेड रिसोर्सेस" किंवा "रिन्यूएबल ऊर्जा" आणि "नॉन रिन्यूएबल ऊर्जा" असल्या श्रेणी शाळांतून आम्हा मुलांच्या डोक्यांत घातल्या. हि विचारसरणी डाव्या लोकांची असून पाश्चात्य देशांतून आपल्या देशांत आली आहेत आणि त्यांत काहीही तथ्य नाही. हि गोष्ट बहुतेक लोकांना पचणार नाही किंवा पटणार नाही कारण ह्या प्रकारच्या प्रोपागंडावर आमच्या देशांत कुणीही प्रश्न विचारला नाही. कुणाला इंटरेस्ट असेल तर वेगळ्या लेखांत विस्ताराने लिहीन. प्रतिक्रिया किंवा खरडवहीवर लिहून कळवा.

In reply to by साहना

जरूर लिहा .... विचारांची मुस्कटदाबी करू नये ... शिवाय, तुम्ही वैयक्तिक टीका टिप्पणी करत नाही.... त्यामुळेच तुमच्या बरोबर, मतभेद व्यक्त करायला आवडायला लागले आहे ...

Rajesh188 07/02/2021 - 13:31
जगाची लोकसंख्या जितकी सांगितले जाते तेवढी नाही आहे. म्हणजे आज जगाची लोकसंख्या 100 आहे असे दाखवत आहेत पण ती नक्की 100 आहे का तर नाही. तो एक अंदाज आहे. कसे. तर जन्म आणि मृत्यू ह्याची नोंद सरकारी कार्यालय करत असतात. आज जन्माला आलेल्या मुलांची नोंद आज च होत असली तरी ती ऑनलाईन सर्व जगातील देशांची होवून एकत्रित जन्म झालेल्या मुलांचा आकडा उपलब्ध नसतो. तसेच मृत्यू झालेल्या लोकांचे नोंद जरी कागदावर झाली तरी ती सर्व देशातील मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा ताबडतोप जागतिक नोंदी मध्ये मोजला जात नाही. जगाची लोकसंख्या म्हणून जे आकडे सांगितले जातात ते विविध घटकांचा विचार करून व्यक्त केलेले फक्त अंदाज असतात.

माझ्या कडे 5 एकर जागा आहे आणि माझा एक शेजारी आहे, त्याच्याकडे 3 एकर जागा आहे... आमच्या दोघांचेही वय सारखेच... मी मनुष्यजन्म ही देवाची देणगी समजतो ....वयाच्या एकवीसाव्या वर्षी माझे, 18 वर्षे वयाच्या स्त्री बरोबर लग्न करतो आणि पुढील 18 वर्षे आम्ही, संतती निर्माण करत राहतो. मी जेंव्हा पन्नाशी ओलांडतो, तेंव्हा माझ्या कुटुंबात, 5 मुले, 4 मुली, 5 सुना आणि 10-12 नातवंडे होतात .... मी आणि माझी मुले, पुर्णतः शेतीवर अवलंबून असल्याने, आता कुटुंबातील 20-22 सदस्यांना दोन वेळची मीठ-भाकरी पण मिळणे कठीण होते ....सुदैवाने, मुलींचे लग्न होऊन, मुली सासरी गेल्याने, ते दडपण नाही... माझा शेजारी मात्र, एकाच मुलाला जन्म देतो...त्याचा मुलगा पण, एकाच मुलाला जन्म देतो ...आता वयाच्या पन्नाशीत, त्याच्या कुटुंबातील सदस्य 5, आणि 3 एकर जागा, त्यांना पुरेशी पडत असते.... आता कोण बरोबर आणि कोण चुकीचे? शेजारी जर बरोबर असेल तर, लोकसंख्या नियंत्रण हा कायदा हवाच....

In reply to by मुक्त विहारि

साहना 07/02/2021 - 15:59
ह्या तर्कांत एक खूप मोठी चूक आहे. ती म्हणजे तुम्ही एक व्हेरिएबल बदलत आहात पण त्यामुळे इतर गोष्टी ज्या बदलतील त्या लक्षांत घेत नाही आहात आणि ह्या गोष्टी प्रेदिक्त करणे सुद्धा असंभव आहे. (https://www.quora.com/In-economics-what-are-secondary-effects) > शेजारी जर बरोबर असेल तर, लोकसंख्या नियंत्रण हा कायदा हवाच.... एखाद्या गोष्टीचा कुणाला तरी फायदा झाला म्हणून कायद्याचा दंडुका वापरून सर्वांवर त्याची सक्ती करावी ह्यासारखा चुकीचा निर्णय नाही. कायदा केला म्हणून पालन होत नाही. मग मध्यमवर्गीय आणि उचभ्रु पालन करणार गरीब अजिबात करणार नाहीत मग त्याचे परिणाम आणखीन गंभीर असतील. अंबानीने १० लग्ने करून २५ मुले निर्माण केली म्हणून काहीही फरक पडत नाही. आपल्या उदाहरणात खालील चुका आहेत: १. एक व्हेरिएबल बदलले म्हणून बाकीची कॉन्स्टन्ट राहत नाहीत घराची काळजी मोठा भाऊ घेत आहे म्हणून लहान भाऊ घर सोडून इतरत्र जाऊन व्यवसाय करून जास्त पैसे कमावू शकतो. जास्त नातलग असलेल्यांच्या ओळखी जास्त असून त्यातून त्यांना जास्त फायदा होतो. इत्यादी. २. भावंडांची संख्या जास्त असली कि आपोआप कुटुंबाच्या एकूण रिसोर्स वर ताण पडतो हा आपला प्राथमिक तर्क बरोबर असला तरी अगदीच रिसोर्स अर्धे होतात असेही नाही. विविध देशांत ह्या विषयावर अभ्यास झाला आहे आणि बहुतेक अभ्यासांत असे दिसून आले आहे कि जास्त भावंडे असली तर मुलांचे शिक्षण आणि उत्पन्न एकेरी मुलापेक्षा सरासरीने कमी असते पण हा फरक जास्त असत नाही. त्याशिवाय श्रीमंत आणि शक्तिशाली मुलांना जास्त भावंडे असली तर मात्र त्यांचे सरासरी शिक्षण आणि उत्पन्न दोन्ही वाढते. > मी आणि माझी मुले, पुर्णतः शेतीवर अवलंबून असल्याने, हि आपली धारणा चुकीची असू शकते. परवडत नसेल तर आपली मुले दुसरा व्यवसाय पत्करतील. आणि प्रत्यक्षांत देशांत सर्वत्र तेच होते आहे. वडिलांना बायपास करावी लागली तर चार मुले थोडे थोडे पैसे गोळा करून सहज करू शकतात. एकाच मुलगा आहे तर त्याला ते आर्थिक दृष्ट्या जाड जाऊ शकते. बहुतेक अभ्यासा प्रमाणे १ मूल असेल आणि त्याचे उत्पत्न १ असेल तर ज्या कुटुंबांत ५ मुले आहेत त्यांचे एकूण उत्पन्न साधारण ४.७ इतके असते म्हणजे सरासरी उत्पन्न ०.९४ हा फरक असला तरी विशेष मोठा नाही. पण शेतकरी आणि इतर गरीब लोकांत जास्त असू शकतो. तथाकथित लोकसंख्या वाढ ह्या कायद्याला माझा नेहमीच विरोध असणार आहे. प्रजनन हा मूलभूत अधिकार असून ह्यांत ढवळाढवळ करू नये असेच माझे मत आहे. (अर्थानं मुले वाढवायला सबसिडी सुद्धा कोणालाच देऊ नये. आरक्षण वगैरे गोष्टींना माझा आधिपासुन विरोध आहे. )

Rajesh188 08/02/2021 - 00:32
ज्या देशांची लोकसंख्या जास्त आहे ते सर्व गरीब देश आहे. देशाचा आकार आणि त्या नुसार त्या देशाची लोकसंख्या हा पॉइंट विचारात घेवून. भारताची लोकसंख्या जास्त आहे भारत अत्यंत गरीब देश आहे,एक उदाहरण. आणि ज्या देशांची लोकसंख्या कमी आहे ते श्रीमंत देश आहेत. अजुन काय प्रॅक्टिकल पुरावा हवा. उत्तर प्रदेश ची लोकसंख्या जास्त आहे खूप गरीब राज्य आहे ते. 90 हजार वर्ग किलोमीटर आकार आणि लोकसंसंख्य 11 कोटी लोकसंख्या प्रचंड असून बिहार अत्यंत गरीब राज्य आहे अगदी आफ्रिका मधील अत्यंत गरीब देश पेक्षा पण गरीब बिहार आहे. लोकसंख्या जास्त असली की प्रगती होते ह्याचे फक्त एक उदाहरण कोणाला मिळाले तर ध्या.

In reply to by साहना

लोकसंख्या कमी असेल तर देशाची प्रगती होते हे वाक्य बरोबर तर आहे. भारता समोरील खूप साऱ्या प्रश्नांचे मूळ कारण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या लोकसंख्या तर आहे. त्यांनी उदाहरणे देताना थोडी गफलत केली हे मान्य पण वस्तु्थिती नाकारून चालणार नाही. आणि साहनाताई आपण थोड्या जास्त offensive होत आहात असे नाही का वाटत आहे आपल्याला?

साहना 07/02/2021 - 13:14
लेखाबद्दल धन्यवाद. गोवारीकरांसारख्या विद्वान माणसाने तोंड उघडले कि आमच्या सारख्यांच्या नक्कीच ध्यान देऊन ऐकायला पाहिजे. त्यांची मते प्रगल्भ आहेतच पण वरून साधी सोपी वाटणारी त्यांची मते समजून घेण्यासाठी थोडा खोलवर विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. अर्थांत तो प्रयत्न मी इथे करणार नाही पण माझी काही मते मांडते. पाश्चात्य देशांत २-३ दशकांनी एक नवीन पोपट निर्माण होतो. मग हा विषय घेऊन तेथीतील हस्तदंती मनोऱ्यातील लोक येथेच्छ प्रोपागंडा करून लोकांची प्रचंड प्रमाणात दिशाभूल करतात. हिटलर ज्या काली ज्यू लोकांना ठार मारत होता त्याच वेळी इंग्लंड आणि अमेरिकेत सुद्धा प्रचंड ज्यू द्वेष होता. हिटलर ह्या लोकांना ठार मारत आहे त्याचा आनंदच ह्या मंडळींना होता. सर्व समस्यांचे खापर ज्यू मंडळींवर फोडणे चालू होते. मग त्याची परिणीती शेवटी द्वितीय महायुद्धांत झाली. महायुद्धानंतर निर्माण झाला तो बागुलबुवा लोकसंख्या वाढीचा आणि हा बागुलबुवा बऱ्याच काळ चालला. भारतासारख्या गरीब देश ह्या विदेशी प्रोपागंडाला जास्त डोके न चालविता बळी पडतात. (सध्या बागुलबुवा वातावरण बदलाचा आहे आणि तो सुद्धा तितकाच दांभिक पणाचा आहे). लोकसंख्या वाढीचे परिणाम समजण्यासाठी भौतिक शास्त्र किंवा जीवशास्त्र पूर्णपणे निरर्थक आहे. त्यासाठी अर्थशास्त्र समाजणे जरुरीचे आहे. ह्या संदर्भांत अमेरिकेतील १९८० मधील सायमन-एहरलीच हि पैज वाचणे मनोरंजक ठरेल. तर अर्थतज्द्न्य जुलिअन सायमन आणि जीवशास्त्री पॉल एहरलीच ह्यांच्यात एक मोठी जाहीर पैज लागली. १९६८ साली पॉल ह्यांनी पॉप्युलेशन एक्सप्लोजन नावाचे एक भयंकर प्रसिद्ध पुस्तक लिहिले. त्यांच्या मते लोकसंख्या वाढ तात्काळ थाम्बवली नाही तर जगांत प्रचंड अन्न कमतरता होऊन कोट्यवधी लोक मरणार होते. ह्या पुस्तकाने खळबळ माचवली आणि ह्यांच्या नादाला लागून गोऱ्या लोकांनी मुले निर्माण करणे कमी केले (ज्याची फळे ते आज भोगत आहेत). भारत, चीन आणि अनेक देशांनी जास्त विचार न करता विविध योजना राबवून लोकसंख्या वाढ म्हणजे जणू काही भस्मासुर आहे असा प्रोपागंडा निर्माण केला. ज्युलियन सायमन ह्यांनी त्यांची हि भविष्यवाणी साफ खोटी ठरणार आहे असे जाहीर रित्या प्रकाशित केले आणि १० हजार डॉलर्स ची जाहीर पैज लावली. पैजेच्या नुसार ज्युलियन ह्यांचे म्हणणे होते कि बहुतेक संसाधनाचा तुटवडा तर असणार नाहीच पण वर तीच संसाधने स्वस्त सुद्धा असणार आहे. १९९० साली जुलिअन सायमन हे पैज सहज, म्हणजे अगदी मोठ्या फरकाने जिंकले. त्या दहा वर्षांत जगाची लोकसंख्या सुमारे ८०० दशलक्ष वाढली पण जे ५ धातू त्यांनी निवडले होते त्यांची किंमत बऱ्यापैकी कमी झाली होती. लोकसंख्या वाढीचे काहीच वाईट परिणाम आहेत असे नाही. लोकसंख्या वाढीचे अनेक वाईट परिणाम आहेत. पण जगांत नक्की किती लोक असायला पाहिजेत हे सुद्धा कोणीही निर्धारित करू शकत नाही. बहुतेकांना लोकसंख्यावाढीचे वाईट परिणाम दिसतात पण त्याचे असंख्य चांगले फायदे दिसत नाहीत. लोकसंख्या कमी झाली तर हे अनेक फायदे गायब होतीलच पण त्या फायद्यांना आम्ही मुकलो आहोत हे सुद्धा समजणार नाही. सोपे उदाहरण घेऊया. पोलिओ ची लस हि आमच्या साठी वरदान ठरली आहे ह्यांत काहीच दुमत नाही. अक्षरशः कोट्यवधी मुलांचा जीव ह्या लसीने वाचवला आहे. पण फक्त लसच नाही तर अनेक औषधे निर्माण झाली आहेत त्यामुळे आम्हा सर्वांचेच जीवन जास्त सुखकर झाले आहे. तर हि औषधे कशी निर्माण होता ? अक्षरशः हजारो लोकांचे परिश्रम ह्यांत गुंतले असतात. जगाच्या पाठीवर जितके जास्त डॉक्टर, संशोधक आहेत तितकी जास्त औषधांचा शोध लागतो. आज देशाची लोकसंख्या ७ अब्ज ऐवजी ४ अब्ज असती तर मार्केट मधील अनेक औषधें गायब झाली असती. पण मी फक्त औषधांचे उदाहरण दिले आहे. सॉफ्टवेर पासून, टीव्ही वरील विविध चॅनेल पर्यंत अनेक गोष्टी गायब झाल्या असत्या आणि आम्हा सर्वांचा जीवनमानाचा स्तर खूपच खाली गेला असता. तुमहाला आवडत असलेली कुठलीही गोष्ट घ्या. समजा तुम्हाला तुमचा फोन आवडतो. ह्या फोनच्या निर्मितीसाठी हजारो पेटंटन्स लागली आहेत आणि अक्षरशः लक्षावधी विविध छोटे छोटे शोध अनेक लोकांनी निर्माण केले आहेत. आणि ह्यांत जो एकूण मानवी वेळ गेला आहे त्याची जर बेरीज केली तर कदाचित कोट्यवधी मनुष्य-तास त्या फोन चा शोध लावण्यासाठी खर्च झाले आहेत. समजा देशाची लोकसंख्या अर्धी असती तर तितके मनुष्यतास खर्च होण्यासाठी दुप्पट वेळ लागला असता आणि फोन आपल्या हाती येण्यासाठी २०२० ऐवजी कदाचित २०४० वर्ष लागले असते. अर्थानं त्याच तर्काने आम्ही असे म्हणू शकतो कि जगाची लोकसंख्या फक्त ७ अब्ज असल्याने आज आमच्या हातात अश्या अनेक गोष्टी नाहीत ज्या कदाचित २०५० मध्ये आमच्या हाती असतील. आज जगाची लोकसंख्या १४ अब्ज असती तर कदाचित आणखीन अजब साधने आणि तंत्रज्ञान आमच्या हाती असते. > अहो पण लोकसंख्या अशीच वाढत राहिल्यास पर्यावरणाचे काय ? हा मुद्दा अनेक लोक वर काढतात आणि काही प्रमाणात तो रास्त सुद्धा आहे. पहिली गोष्ट म्हणजे जसे जीवनमान उंचावते आणि लोक जास्त काळ जगू लागतात त्याच वेळी लोकांना मुलें नकोशी होतात. आमच्या आजोबांच्या काळी खाण्यापिण्याचे वांधे होते त्यामुळे लोक दिवसभर काबाडकष्ट करायचे आणि रात्रभर प्रजनन करायचे. महिलांची अवस्था फक्त चूल आणि मूल अशी होती. पण त्यांची चूक नव्हती. रात्री आणखी करणार काय ? मग ४०-५० वर्षांत हृदयविकाराचा झटका वगैरे येऊन मृत्यू. आता जीवनमानाचा स्तर उंचावलाय. गर्भनिरोधक आल्याने शरीरसुख घेता येते आणि प्रजनन रोखता येते. रोमान्स ची व्याख्या रुंदावलीय. आता जोडपी चित्रपट पाहतात, दिनार करतात, कुठे फिरायला वगैरे जातात. पुस्तके वाचतात आणि नेटफ्लिकस पाहतात. त्याशिवाय प्रत्येक वेळी फिरायला वगैरे जाताना लक्षांत येते कि जास्त मुले म्हणजे खूपच जास्त खर्च त्यामुले फार तर एक दोन मुले खूप होतात. ह्यामुळे आपसूकच जन्मदर खालावत जातो. ह्या दृष्टिकोनातून कर्वे हे खूपच दूरदर्शी आणि विद्वान होते. मुले जास्त जन्माला घालण्याचे एक कारण म्हणजे मुले मारण्याचे प्रमाण सुद्धा खूप होते. आता ते कमी झाल्याने वंशाला एक दिवा असला तरी पुरतो मोठी माळ लावायची गरज नाही. परंपरागत घरे आता बंद पडत आहेत. बापाने बांधलेल्या घरांत मुलें राहू इच्छित नाहीत म्हणून "वंशाचा दिवा" हि सुद्धा जास्त डिमांड नसलेली गोष्ट झालीय. मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च आणि लोकसंख्या वाढीचा दर हि दोन महत्वाची व्हेरिएबल्स अर्थतज्ञ पाहतात आणि दोन्ही मध्ये खूपच जास्त संबंध आहे. आणि ह्या संबंधाने मानवी लोकसंख्या चादर पाहून हात पसरेल ह्यांत मला तरी अजिबात शंका वाटत नाही. मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च : मार्जिनल खर्च ह्याचा अर्थ प्रत्येक ऍडिशनल मुलाच्या संगोपनासाठी खर्च किती येतो. एका मुलाचा खर्च प्रचंड असतो. कारण मूल नाही तर माता काम करू शकते. एक मूल झाले आणि तिने नोकरी सोडली तर ते पैसे येणे बंद होतात आणि त्यामुळे तो मुलाच्या संगोपनाचा खर्च ठरतो. पण एकदा नोकरी सोडल्यानंतर तिला २ मुले झाली तर त्या दुसऱ्या मुलाचा मार्जिनल खर्च खूपच कमी असतो. (एका मुलासाठी ३ लक्ष वर्षाला खर्च येतो तर दोन मुलांसाठी ३.५ लक्ष खर्च येतो इत्यादी). जुन्या खाली हा मार्जिनल खर्च खूपच कमी असायचा कारण बहुतेक खर्च हा फक्त अन्नाचा असायचा. आता तुम्ही दुबईला किंवा किमान खंडाळ्याला जाता तर सुद्धा तिकिटाचा खर्च प्रत्येक मुलांमागे होतो तो फार असतो. ४ मुले झाली तर मग तुम्हाला ५ सीटर गाडी सुद्धा चालत नाही. जसे जसे जीवन मान उंचावते तसे तसे मार्जिनल खर्च हा खूपच वेगाने वाढतो. मुलाला विदेशांत शिकायला पाठवायचे तर ५० लक्ष रुपये पाहिजेत. दोन मुले झाली तर मग १ कोटी. पण गरीबाच्या घरांत हे प्रश्न नसतात. पण खर्च वाढतो म्हणजे नक्की काय होते ? माणसाला जगांत फक्त दोनच खर्च असतात. एक खर्च असतो ऊर्जेचा दुसरा खर्च असतो दुसऱ्या माणसाच्या वेळेचा. (आयफोन पासून कांदे बटाटे पर्यंत तुम्ही काहीही विकत घेतले तर तुम्ही फक्त ऊर्जा आणि दुसऱ्या लोकांचा वेळ ह्या दोनच गोष्टींचा मोबदला देत असता. समजा ह्या दोन गोष्टी अपरंपार आणि फुकट असत्या तर आयफोन आणि कांदे बटाटे ह्यांची किंमत सुद्धा शून्य असती.). खर्च वाढतो ह्याचा अर्थ तुम्ही जास्त ऊर्जा आणि मानवी वेळ खर्च करत आहात असा होतो. आपण पर्यावरणाच्या नावाने बोंब मारतो तेंव्हा पर्यावरणाला होणारी हानी हि १००% ऊर्जा ह्या एका संसाधना द्वारे तुंबलेली जाऊ शकते. पण ऊर्जा महाग असल्याने आम्ही ती हानी अन-डू करू शकत नाही. जर पर्यावरणाची हानी वाढत गेली तर ऊर्जेचा दर सुद्धा वाढत जातो आणि आणि त्यामुळे मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च. त्यामुळे हि दोन्ही व्हेरिएबल्स एकमेकांना बॅलेन्स करतात. पण ऊर्जा हि काळाचा ओघांत स्वस्त होत गेली तर लोकसंख्या सुद्धा वाढत जाते आणि पर्यावरणाला हानी सुद्धा होत नाही. ह्या दोन्ही व्हेरिएबल्स मधील गणिती संबंध तसा स्पष्ट पणे अभ्यासाने कठीण आहे कारण लोकसंख्या वाढली कि हे लोक नवीन शोध लावून ऊर्जेचा दर आणखीन कमी करतात. टीप : युनायटेड नेशन्स किंवा विविध तद्न्य मंडळी जगाची लोकसंख्या सुमारे २०५० मध्ये स्टेबल होईल असे भाकीत करत आहेत. मला त्यांत शंका वाटते. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मते ऊर्जेचा खर्च येत्या २० वर्षांत १०० पटीने कमी होणार आहे. बहुतेक ऊर्जा फ्युजन सेल द्वारे किंवा इतर कुठल्या नवीन शोधांतून निर्माण होईल आणि त्यानंतर सर्वच जीवनावश्यक वस्तूंचा भाव कमालीचा पडणार आहे. ऊर्जा स्वस्त आणि मुबलक होताच, शेती, पिण्याचे पाणी वगैरे गोष्टींचा काहीही तुटवडा असणार नाही त्याशिवाय कार्बन एमिसशन वगैरे उलट करणे सहज शक्य होणार आहे. कदाचित IVF वगैरे प्रक्रिया खूपच सोप्या होऊन गरोदर न राहता सुद्धा मुले निर्माण करणे शक्य होईल आणि त्यामुळे कुठल्याही वयांत मुले निर्माण करणे शक्य होईल आणि कदाचित मंडळी जास्त मुले निर्माण करतील. अर्थांत मी हे भाकीत एखाद्या ज्योतिष्या प्रमाणे वर्तवत आहे. टीप २ : जगांतील सर्व नैसर्गिक संसाधने हि अक्षय म्हणजे अनलिमिटेड आहेत. एकच असे संसाधन आहे जे अक्षय नाही आणि ते म्हणजे मानवी वेळ. हि संकल्पना बहुतेक इकॉनॉमिक्स च्या पुस्तकांत मंडळी गेलेली असते पण राजकीय कारणासाठी पाश्चात्य राष्ट्रांनी "लिमिटेड रिसोर्सिस" आणि "अनलिमिटेड रिसोर्सेस" किंवा "रिन्यूएबल ऊर्जा" आणि "नॉन रिन्यूएबल ऊर्जा" असल्या श्रेणी शाळांतून आम्हा मुलांच्या डोक्यांत घातल्या. हि विचारसरणी डाव्या लोकांची असून पाश्चात्य देशांतून आपल्या देशांत आली आहेत आणि त्यांत काहीही तथ्य नाही. हि गोष्ट बहुतेक लोकांना पचणार नाही किंवा पटणार नाही कारण ह्या प्रकारच्या प्रोपागंडावर आमच्या देशांत कुणीही प्रश्न विचारला नाही. कुणाला इंटरेस्ट असेल तर वेगळ्या लेखांत विस्ताराने लिहीन. प्रतिक्रिया किंवा खरडवहीवर लिहून कळवा.

In reply to by साहना

जरूर लिहा .... विचारांची मुस्कटदाबी करू नये ... शिवाय, तुम्ही वैयक्तिक टीका टिप्पणी करत नाही.... त्यामुळेच तुमच्या बरोबर, मतभेद व्यक्त करायला आवडायला लागले आहे ...

Rajesh188 07/02/2021 - 13:31
जगाची लोकसंख्या जितकी सांगितले जाते तेवढी नाही आहे. म्हणजे आज जगाची लोकसंख्या 100 आहे असे दाखवत आहेत पण ती नक्की 100 आहे का तर नाही. तो एक अंदाज आहे. कसे. तर जन्म आणि मृत्यू ह्याची नोंद सरकारी कार्यालय करत असतात. आज जन्माला आलेल्या मुलांची नोंद आज च होत असली तरी ती ऑनलाईन सर्व जगातील देशांची होवून एकत्रित जन्म झालेल्या मुलांचा आकडा उपलब्ध नसतो. तसेच मृत्यू झालेल्या लोकांचे नोंद जरी कागदावर झाली तरी ती सर्व देशातील मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा ताबडतोप जागतिक नोंदी मध्ये मोजला जात नाही. जगाची लोकसंख्या म्हणून जे आकडे सांगितले जातात ते विविध घटकांचा विचार करून व्यक्त केलेले फक्त अंदाज असतात.

माझ्या कडे 5 एकर जागा आहे आणि माझा एक शेजारी आहे, त्याच्याकडे 3 एकर जागा आहे... आमच्या दोघांचेही वय सारखेच... मी मनुष्यजन्म ही देवाची देणगी समजतो ....वयाच्या एकवीसाव्या वर्षी माझे, 18 वर्षे वयाच्या स्त्री बरोबर लग्न करतो आणि पुढील 18 वर्षे आम्ही, संतती निर्माण करत राहतो. मी जेंव्हा पन्नाशी ओलांडतो, तेंव्हा माझ्या कुटुंबात, 5 मुले, 4 मुली, 5 सुना आणि 10-12 नातवंडे होतात .... मी आणि माझी मुले, पुर्णतः शेतीवर अवलंबून असल्याने, आता कुटुंबातील 20-22 सदस्यांना दोन वेळची मीठ-भाकरी पण मिळणे कठीण होते ....सुदैवाने, मुलींचे लग्न होऊन, मुली सासरी गेल्याने, ते दडपण नाही... माझा शेजारी मात्र, एकाच मुलाला जन्म देतो...त्याचा मुलगा पण, एकाच मुलाला जन्म देतो ...आता वयाच्या पन्नाशीत, त्याच्या कुटुंबातील सदस्य 5, आणि 3 एकर जागा, त्यांना पुरेशी पडत असते.... आता कोण बरोबर आणि कोण चुकीचे? शेजारी जर बरोबर असेल तर, लोकसंख्या नियंत्रण हा कायदा हवाच....

In reply to by मुक्त विहारि

साहना 07/02/2021 - 15:59
ह्या तर्कांत एक खूप मोठी चूक आहे. ती म्हणजे तुम्ही एक व्हेरिएबल बदलत आहात पण त्यामुळे इतर गोष्टी ज्या बदलतील त्या लक्षांत घेत नाही आहात आणि ह्या गोष्टी प्रेदिक्त करणे सुद्धा असंभव आहे. (https://www.quora.com/In-economics-what-are-secondary-effects) > शेजारी जर बरोबर असेल तर, लोकसंख्या नियंत्रण हा कायदा हवाच.... एखाद्या गोष्टीचा कुणाला तरी फायदा झाला म्हणून कायद्याचा दंडुका वापरून सर्वांवर त्याची सक्ती करावी ह्यासारखा चुकीचा निर्णय नाही. कायदा केला म्हणून पालन होत नाही. मग मध्यमवर्गीय आणि उचभ्रु पालन करणार गरीब अजिबात करणार नाहीत मग त्याचे परिणाम आणखीन गंभीर असतील. अंबानीने १० लग्ने करून २५ मुले निर्माण केली म्हणून काहीही फरक पडत नाही. आपल्या उदाहरणात खालील चुका आहेत: १. एक व्हेरिएबल बदलले म्हणून बाकीची कॉन्स्टन्ट राहत नाहीत घराची काळजी मोठा भाऊ घेत आहे म्हणून लहान भाऊ घर सोडून इतरत्र जाऊन व्यवसाय करून जास्त पैसे कमावू शकतो. जास्त नातलग असलेल्यांच्या ओळखी जास्त असून त्यातून त्यांना जास्त फायदा होतो. इत्यादी. २. भावंडांची संख्या जास्त असली कि आपोआप कुटुंबाच्या एकूण रिसोर्स वर ताण पडतो हा आपला प्राथमिक तर्क बरोबर असला तरी अगदीच रिसोर्स अर्धे होतात असेही नाही. विविध देशांत ह्या विषयावर अभ्यास झाला आहे आणि बहुतेक अभ्यासांत असे दिसून आले आहे कि जास्त भावंडे असली तर मुलांचे शिक्षण आणि उत्पन्न एकेरी मुलापेक्षा सरासरीने कमी असते पण हा फरक जास्त असत नाही. त्याशिवाय श्रीमंत आणि शक्तिशाली मुलांना जास्त भावंडे असली तर मात्र त्यांचे सरासरी शिक्षण आणि उत्पन्न दोन्ही वाढते. > मी आणि माझी मुले, पुर्णतः शेतीवर अवलंबून असल्याने, हि आपली धारणा चुकीची असू शकते. परवडत नसेल तर आपली मुले दुसरा व्यवसाय पत्करतील. आणि प्रत्यक्षांत देशांत सर्वत्र तेच होते आहे. वडिलांना बायपास करावी लागली तर चार मुले थोडे थोडे पैसे गोळा करून सहज करू शकतात. एकाच मुलगा आहे तर त्याला ते आर्थिक दृष्ट्या जाड जाऊ शकते. बहुतेक अभ्यासा प्रमाणे १ मूल असेल आणि त्याचे उत्पत्न १ असेल तर ज्या कुटुंबांत ५ मुले आहेत त्यांचे एकूण उत्पन्न साधारण ४.७ इतके असते म्हणजे सरासरी उत्पन्न ०.९४ हा फरक असला तरी विशेष मोठा नाही. पण शेतकरी आणि इतर गरीब लोकांत जास्त असू शकतो. तथाकथित लोकसंख्या वाढ ह्या कायद्याला माझा नेहमीच विरोध असणार आहे. प्रजनन हा मूलभूत अधिकार असून ह्यांत ढवळाढवळ करू नये असेच माझे मत आहे. (अर्थानं मुले वाढवायला सबसिडी सुद्धा कोणालाच देऊ नये. आरक्षण वगैरे गोष्टींना माझा आधिपासुन विरोध आहे. )

Rajesh188 08/02/2021 - 00:32
ज्या देशांची लोकसंख्या जास्त आहे ते सर्व गरीब देश आहे. देशाचा आकार आणि त्या नुसार त्या देशाची लोकसंख्या हा पॉइंट विचारात घेवून. भारताची लोकसंख्या जास्त आहे भारत अत्यंत गरीब देश आहे,एक उदाहरण. आणि ज्या देशांची लोकसंख्या कमी आहे ते श्रीमंत देश आहेत. अजुन काय प्रॅक्टिकल पुरावा हवा. उत्तर प्रदेश ची लोकसंख्या जास्त आहे खूप गरीब राज्य आहे ते. 90 हजार वर्ग किलोमीटर आकार आणि लोकसंसंख्य 11 कोटी लोकसंख्या प्रचंड असून बिहार अत्यंत गरीब राज्य आहे अगदी आफ्रिका मधील अत्यंत गरीब देश पेक्षा पण गरीब बिहार आहे. लोकसंख्या जास्त असली की प्रगती होते ह्याचे फक्त एक उदाहरण कोणाला मिळाले तर ध्या.

In reply to by साहना

लोकसंख्या कमी असेल तर देशाची प्रगती होते हे वाक्य बरोबर तर आहे. भारता समोरील खूप साऱ्या प्रश्नांचे मूळ कारण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या लोकसंख्या तर आहे. त्यांनी उदाहरणे देताना थोडी गफलत केली हे मान्य पण वस्तु्थिती नाकारून चालणार नाही. आणि साहनाताई आपण थोड्या जास्त offensive होत आहात असे नाही का वाटत आहे आपल्याला?
http://www.misalpav.com/node/48278 इथे लोकसंख्या वाढीबद्दल थोडे प्रतिसाद आहेत.त्या अनुषंगाने ही शास्त्रीय मुलाखत. ---------------------------------------------------- एप्रिल २००४ मधे पुणे आकाशवाणी केंद्रावर अ.पां.देशपांडे यांनी शास्त्रज्ञ श्री.वसंतराव गोवारीकर यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली होती.त्या मुलाखतीतली लोकसंख्या या मुद्द्यावर गोवारीकर सरांनी मांडलेली मते. वसंतराव , 1991 साली वडोदरा येथील इंडियन सायन्स काँग्रेसचे आपण अध्यक्ष होतात . आणि पुढं 1993 साली इस्लामपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाचे आपण अध्यक्ष होतात.

देशवासियांनो जरा जपून व्यक्त व्हा!

टर्मीनेटर ·

अर्धवटराव 16/09/2020 - 08:06
हे विदा कलेक्शन फक्त ड्रेगन करत असेल असं नाहि. अंकल सॅम, इस्रायल.. अगदी पाक सुद्धा करत असेल. डिजीटल डोळे आता आपल्यावर सदा-सर्वदा रोखलेले असणार.. वि हॅव्ह टु लिव्ह विथ इट :(

In reply to by अर्धवटराव

टर्मीनेटर 16/09/2020 - 14:59
हे विदा कलेक्शन फक्त ड्रेगन करत असेल असं नाहि. अंकल सॅम, इस्रायल.. अगदी पाक सुद्धा करत असेल. डिजीटल डोळे आता आपल्यावर सदा-सर्वदा रोखलेले असणार.. वि हॅव्ह टु लिव्ह विथ इट :(
करेक्ट 👍 डेटा कलेक्शन चे महत्व सर्वच देशांच्या सरकारने ओळखले आहेच, काहींनी आधी तर काहींनी थोडे उशिरा एवढाच काय तो फरक. इतकेच नाही तर आता त्याचे महत्व स्थानिक पातळीवरील लहान मोठ्या उद्योगांच्याही लक्षात आले आहे. स्वीगी आणि झोमॅटो हे तर प्रस्थापित ब्रँडस झाले पण गेल्याच आठवड्यात ठाणे शहर आणि परिसरात त्यांच्या प्रमाणेच फूड डिलेव्हरी सर्व्हिस देणाऱ्या व्यावसायिकाने व्यवसायवृद्धीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन त्यांची वेबसाईट आणि मोबाईल ॲप AI ready करण्याचे काम तीन वर्षांच्या करारावर आमच्या कंपनीला दिले आहे,

हेमंतकुमार 16/09/2020 - 08:06
त्याने कुठल्याही माध्यमावर व्यक्त होताना देश-हिताचे भान ठेवावे आणि भावनांच्या भरात वाहवत न जाता जरा जपून व्यक्त व्हावे.
>>> +११ बऱ्याच वर्षांपूर्वी मी अनुभव मासिकात अवधूत डोंगरे यांचा “आय डिसलाइक” हा फेसबूक माध्यमावरचा लेख वाचला होता. त्यात त्यांनी म्हटले होते, की आपण अशा माध्यमांवर जे काही व्यक्त होत असतो त्याची जागतिक हेरगिरी चालू असते. म्हणूनच त्यांनी फेसबुकला कायमचा रामराम ठोकला होता. याची आठवण झाली.

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 16/09/2020 - 15:58
बऱ्याच वर्षांपूर्वी मी अनुभव मासिकात अवधूत डोंगरे यांचा “आय डिसलाइक” हा फेसबूक माध्यमावरचा लेख वाचला होता. त्यात त्यांनी म्हटले होते, की आपण अशा माध्यमांवर जे काही व्यक्त होत असतो त्याची जागतिक हेरगिरी चालू असते. म्हणूनच त्यांनी फेसबुकला कायमचा रामराम ठोकला होता.
ते खरंच आहे, केवळ फेसबुकच नाही तर प्रत्येक समाज माध्यमांवर हा प्रकार चालतो. इतक्या प्रचंड प्रमाणावर असलेल्या वापरकर्त्यांना फुकट सेवा पुरवणाऱ्या फेसबुक, ट्विटर, गुगल ह्या कंपन्या म्हणजे चॅरिटेबल ट्रस्ट नक्कीच नाहीत. जाहिराती आणि त्यांच्याजवळ असलेल्या अफाट डेटाच्या जोरावर त्या बक्कळ पैसा कमावतात. ज्या माध्यमांकडे स्वतःची अशी हेरगिरीची यंत्रणा नसेल ते अशा बलाढ्य कंपन्यांकडून किंवा सर्वच माध्यमांवर नजर ठेऊन असलेल्या इतर कंपन्यांकडून माहिती खरेदी करतात. वापरकर्त्यांना काय, सेवा फुकट मिळाल्याशी मतलब. अर्थात त्यासाठी अशा माध्यमांना राम राम ठोकणे हा मार्ग योग्य वाटत नाही कारण शेवटी कसे व्यक्त व्हायचे व कुठली आणि किती माहिती शेअर करायची हे वापरकर्त्याच्या हातात असते. काही चलाख वापरकर्ते आपल्या कौशल्याने अशा परिस्थितीतही स्वतःचा लाभ करून घेतात.

निनाद 16/09/2020 - 09:10
तुम्ही एक माध्यम सोडले तरी काहीच फरक पडत नाही. कारण तुमच्या आजूबाजूला जे आहेत त्यांच्या वर्तनावरूनही तुमचे प्रोफाईल बनवले जाते. आज फेबु सोडले मग उद्या जीमेल पण सोडणार का? आणि सोडले तरी काहीच फरक पडत नाही... कारण त्म्ही कुणाला तरी जी मेलवर जेव्हा इमेल पाठवाल तेव्हा गुगल ला आपोआप तुमची माहिती मिळणारच आहे. सोडले तर आपणच लुझर होतो कारण असा आणि तसा विदा जाणारच आहे. पण राहिलो तर किमान त्या बदल्यात त्यांच्या सेवा तरी मिळवतात येतात!

In reply to by निनाद

आनन्दा 16/09/2020 - 09:55
सम्पूर्ण सहमत. मला असे वाटते की आपण आपला अजेंडा समाजमाध्यमांवर पुर्णपणे रेटला पाहिजे. बांग्लादेशचे युद्ध आठवा.. आपल्या युद्ध तयारीची कल्पनारम्य माहिती असली तरी ती पण खरी म्हणून प्रसारित करा.. अफवा पसरवा, धुरळा उडवा.. जितका जास्त धुरळा, तितकी दृष्यमानता कमी असते हे लक्श्यात ठेवूया.

सुबोध खरे 16/09/2020 - 09:31
टर्मिनेटर यांनी लिहिलेले बरोबर आहे. जालावर आपण काय लिहिता हे तारतम्य ठेवा. जालावरून गायब होऊन स्वतःची अडचण करून घ्या असे ते अजिबात म्हणत नाहीत. काश्मीर खोऱ्यात असलेल्या माझ्या लष्करातील वर्गमित्रांना याच कारणासाठी व्हाट्सअँप सारख्या सार्वजनिक न्यासाच्या वापराला सरकारने बंदी केली आहे. कारण अनवधानाने आपण कुठे आहोत काय करतो आहोत हे त्यातून बाहेर जाऊ शकते. ही एखादे वेळेस अतिशयोक्ती असेल सद्य स्थितीत जालावर आपणही आपले विश्लेषण टाकताना चार वेळेस विचार करा. कारण त्याचा गैरवापर करून जनमत बदलण्यासाठी उपयोग केला जातो. लक्षात ठेवा कोणत्याही देशात कम्युनिस्ट राजवट अली तर प्रथम ते तेथील प्रसार माध्यमे निष्ठुरपणे ताब्यात घेतात आणि मग त्याचा आपल्या प्रचारासाठी वापर करतात. आजही डावीकडे झुकलेली प्रसार माध्यमे भारत चीनपुढे कसा कमी पडतो हेच परत परत सांगत आहेत. आणि सैनिकांना देश तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी कालच संसदेने दोन्ही सभागृहाची एकत्रित बैठक घेतली आहे. Prime Minister Narendra Modi on Monday expressed confidence that Parliament will unitedly give this message that the country is standing solidly behind soldiers guarding India’s borders. https://theprint.in/india/as-monsoon-session-starts-modi-says-hope-parliament-gives-message-of-support-to-soldiers/502057/

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 16/09/2020 - 16:27
जालावरून गायब होऊन स्वतःची अडचण करून घ्या असे ते अजिबात म्हणत नाहीत.
करेक्ट 👍 विशेषतः संवेदनशील विषयांवर व्यक्त होताना जालावर आपण काय लिहिता हे तारतम्य ठेवा हेच सांगायचे आहे. अर्थात असे काही होतच नसेल अशी ज्यांची समजूत असेल त्यांनी खुशाल त्याकडे दुर्लक्ष करावे 😀

Rajesh188 16/09/2020 - 11:09
पण असे का घडत आहे ह्याची कारण काय आहेत ह्याची समीक्षा कधी झाली आहे का. देशाची mainstream media सर्रास जनते मध्ये एकमेका विषयी द्वेष पसरवत आहे. काही जण मुस्लिम कसे देश द्रोही आहेत हे सांगण्यात गुंतले आहेत तर काही हिंदू कसे वाईट हे सांगत आहे. Republic tv वर राज्याच्या मुख्यमंत्री चा एकेरी उल्लेख होतो तरी केंद्र सरकार त्या चॅनल ला समज देत नाही . जर सरकार आणि मीडिया च जबाबदारी नी वागत नसतील तर जनतेस दोष देवून काय फायदा. रोज सर्व न्यूज चॅनल वर 1 तास सर्व राज्यांच्या समस्या,तेथील घडणाऱ्या घटना ह्यावर वार्ता पत्र चालवणे गरजेचे आहे. अगदी जबरदस्ती नी. आणि त्या मध्ये फक्त खऱ्या च बातम्या दिल्या जाव्यात पक्षीय,राजकीय मत बाजूला ठेवून.

कंजूस 16/09/2020 - 11:13
जिओ प्लटफॉर्ममध्ये फेसबुक वगैरे भागिदार झालेत आणि ते त्यांचा अजेंडा राबवणारच. एका चाइनिज कंपनीला घेऊन स्वस्त फोर-जी फोन करण्याचे घाटत आहे. हे सरकारी धोरणाविरुद्ध नाही का? चाइनिज हटवा वगैरे? आता तत्या कंपनीच्या हार्डवेरमधून काय गाळणार हे कसे कळणार? बरं हे फोन्स स्वस्त असल्याने गावागावात पोहोचणार. शहरातीच चार हुशार लोकं काय लिहायचं नाही यावर कंट्रोल ठेवणार पण ८०%गाववाले काय करतील?

In reply to by कंजूस

सुबोध खरे 16/09/2020 - 13:25
८०%गाववाले काय करतील? चार हुशार लोक लिहितील तेच फॉरवर्ड करत राहतात. यासाठीच चार हुशार लोकांनी काय फॉरवर्ड करायचं याचा विचार करायला हवा आहे.

Rajesh188 16/09/2020 - 11:31
चीन जे केले आहे तसे अनेक देश अनेक वर्ष करत असतात . You tube, fb, twiter,google map अनेक अशी बरीच ऍप फुकट का दिली जातात आणि ही सर्व ऍप कोणत्या देशात जास्त वापरली जातात. हे ही सर्व अॅप वापरतात त्यांची सर्वांची रोजची detail माहिती गोळा होते . आणि ती माहिती साठवून ठेवली जाते हे नवीन नाही. लोकांच्या समाज मध्यामावरील प्रतिक्रिया ह्या देशात सामाजिक वातावरण कसे आहे ह्याचे निर्देशक असतात . कोणती काडी टाकली की भडका उठेल ह्याचा अंदाज शत्रू राष्ट्र ला नक्की त्या मुळे येतो. मग सामाजिक वातावरण घडुळ करण्यात राजकीय पक्ष,त्यांचे it cell वाले, media ह्यांनीच मोलाची भूमिका असते ना. देशातील नागरिकंना मध्ये देशप्रेम कसे निर्माण केले जाते हे शिकायचे असेल तर छञपती नी कसा राज्य कारभार केला ते पाहिले शिका आणि आमालात आना. कार्या विना फक्त उपदेश योग्य तो परिणाम करत नाही

डीप डाईव्हर 16/09/2020 - 11:47
टर्मिनेटर भाऊ लेख आवडला 👍 Artificial intelligence विषयी आणखीन वाचायला आवडेल. तुमचे ते क्षेत्र असल्यास किंवा त्याचं काही अभ्यास असल्यास त्याच्यावर पण लिहा अशी विनंती. अवांतर- नेहरू, काँग्रेस, भाजपे, भक्त, हिंदू, मुस्लीम असे धाग्याशी संबंध नसलेले विषय घेऊन तज्ञ लोक्स आलेले आहेत. तेव्हा आता धाग्याची वाटचाल कुठल्या दिशेने होणार त्याचा अंदाज आला आहे 😈

In reply to by डीप डाईव्हर

टर्मीनेटर 17/09/2020 - 15:15
Artificial intelligence विषयी आणखीन वाचायला आवडेल. तुमचे ते क्षेत्र असल्यास किंवा त्याचं काही अभ्यास असल्यास त्याच्यावर पण लिहा अशी विनंती.
व्यवसायनिमित्ताने AI शी माझा माफक संबंध येतो परंतु ते माझे क्षेत्र नसल्याने मला त्यातली तांत्रिक माहिती नाही. त्यावर काम करणाऱ्या टीम मेम्बर्स कडून अनेकदा त्याबद्दल थक्क करणारी माहिती मिळते. असे असले तरी त्याचा वापर आणि परिणाम ह्यावर थोडा अभ्यास करून काही लेखन करण्याचा प्रयत्न नक्की करेन. धन्यवाद 🙏

Rajesh188 16/09/2020 - 13:09
त्या मध्ये 1) ज्या लोकांमुळे चीन ला धोका आहे आणि त्या लोकांमुळे भारत बलवान राष्ट्र होवू शकेल 2) ज्या लोकांचे भारतात असणे हे भारताच्या नुकसानीचा आहे पण चीन च्या फायद्याचे आहे. 3) आणि जी लोक असल्या मुळे भारताचे नुकसान होईल आणि जी लोक नसल्या मुळे भारताचे नुकसान होईल खरं तर ही यादी भारतीय गुप्तचर यंत्रणेने शोधून काढावी . बरीच माहिती माहीत पडेल.

सुबोध खरे 16/09/2020 - 13:20
खरं तर ही यादी भारतीय गुप्तचर यंत्रणेने शोधून काढावी . आपल्याला काय वाटतं ? गुप्तहेर संघटनेने ही माहिती शोधली नसेल? माध्यमांना हिमनगाचे टोक असेल एवढीच माहिती पुरवली जाते. बाकी सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना याबद्द्ल सावध अगोदरच केले असेल यात शंकाच नाही. बाकी एकंदर प्रतिसाद पाहून असच वाटतंय कि सगळा भारताचं घाण आहे मग मी त्यात थोडीशी घाण टाकली तर वाईट काय? बाहेरचा जग घाणेरडं असलं तरी आपलं घर आपण धुवून सारवून स्वच्छ ठेवू शकतोच. सब चलता है हाच दृष्टिकोन असेल तर ठीकच आहे.

Gk 16/09/2020 - 15:41
लोक सरकारला कर देतात सरकारने रक्षण करावे राफेलवर , जीडीपीवर विचारू नका, हा छुपा उद्देश वाटत आहे

In reply to by Gk

सॅगी 16/09/2020 - 17:01
हं...थोड्क्यात, उत्तर कोरिया व्हावे...

In reply to by शा वि कु

Gk 16/09/2020 - 18:57
स्वतःचे ह्यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाले होते म्हणे हे आम्हाला आत्म नि र ब र व्हायला सांगतात वरून शत्रूने बॉम्ब टाकल्यास भाजपा जबाबदार नाही , म्हणून डोक्यावर उलटा तवा घेऊन फिरावे , असेही सांगतील

सुबोध खरे 16/09/2020 - 18:51
अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्यांना अमेरिका किंवा तत्सम देशात जायचे आहे अशानी टोकाची मते जालावर मांडू नये. कारण हेसर्व देश आपले जालावरील अस्तित्व तपासून पाहत असतात. त्यात मादक पदार्थ सेवनाचे व्यसन असेल तर किंवा अति उजवे विचार किंवा विशेषतः अति डावे / कम्युनिस्ट विचार मांडले असतील तर आपला व्हिसा कोणतेही कारण न देता नाकारला जाऊ शकतो

In reply to by सुबोध खरे

Rajesh188 16/09/2020 - 19:34
Child porn internet var बघतो म्हणून अमेरिकेत प्रवेश रोखला गेला असा प्रसंग घडला होता असे वाचण्यात आहे.. अतिशय बारीक प्रत्येकावर लक्ष असते आणि AI मुळे खूप डाटा चे काही मिनिटात विश्लेषण करता येत . दोन देशातील दुषमनी असमध्ये हा डाटा कसा वापरला जाईल .हे आपण कसे ठरवणार. सामान्य जनता जे कमेंट करतात त्यांचे विचार स्थिर नसतात कमेंट मध्ये लिहलेले विचार तो कमेंट करणाऱ्या व्यक्ती खऱ्या आयुष्यात वापरात असेल असे नाही. सामान्य लोकांचे विचार ठाम नसतात जसे 4 हुशार लोक अफवा (खरे साहेबांच्या पोस्ट मधले) पसरवतात त्याच प्रमाणे त्यांचे विचार बदलत असतात.

व्यक्त होताना भान रहात नाही हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. पण समाजमाध्यमात त्यावर अंकुश ठेवणे हा उपाय व्यवहार्य ठरेल असे वाटत नाही. एआय ला घाबरायला पाहिजे हे पटते. पण आपणही त्या क्षेत्रात भरीव काम करुन प्रतिआव्हान देण्याची क्षमता निर्माण करावी हा मुद्दा जास्त महत्वाचा नाही का?

In reply to by प्रकाश घाटपांडे

टर्मीनेटर 17/09/2020 - 15:47
पण आपणही त्या क्षेत्रात भरीव काम करुन प्रतिआव्हान देण्याची क्षमता निर्माण करावी हा मुद्दा जास्त महत्वाचा नाही का?
योग्य मुद्दा! IT तंत्रज्ञांची आपल्या देशात अजिबात कमतरता नसल्याने त्या क्षेत्रात बऱ्यापैकी काम सुरु झालेले आहे. भविष्यात AI मध्ये करिअर करण्यासाठी आता अनेक विद्यार्थी Machine Learning कडे वळत आहेत हि समाधानाची गोष्ट आहे. अर्थात ह्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ Machine Learning आणि त्यासाठी आवश्यक programming languages शिकून भागणारे नाही. कृत्रिम बुद्धीमत्ता विकसित करण्यासाठी, त्यात नवनवीन तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले लॉजिक आणि नैसर्गिक बुद्धिमत्ता ज्यांच्यापाशी असेल तेच चांगले यश मिळवू शकतील आणि उरलेले आपण IT मधे हमाली करतो असे सांगायला मोकळे 😀

बोका 16/09/2020 - 21:42
दि इंडियन एक्स्प्रेस’ने गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ ‘झेनुआ’ कंपनीच्या माहिती साठय़ातून भारतीयांबद्दलची माहिती मिळवण्यासाठी उत्खनन केले. माहिती काढण्यासाठी ‘बीग डाटा टूल्स’ चा वापर करण्यात आला.
इंडियन एक्स्प्रेस अशी बिग डेटा वगैरे वापरून पत्रकारीता पण करते ? (पुन्हा लोकसत्ता वाचणे सुरु करावे का ?)

In reply to by बोका

टर्मीनेटर 17/09/2020 - 15:53
इंडियन एक्स्प्रेस अशी बिग डेटा वगैरे वापरून पत्रकारीता पण करते ? (पुन्हा लोकसत्ता वाचणे सुरु करावे का ?)
लोकसत्ता वाचणे बंद करून मलाही काही वर्षे झाली आहेत. परंतु हि बातमी दुसऱ्या माध्यमांनी दाखवल्याने खात्री करण्यासाठी eलोकसत्ताला भेट दिली तेव्हा वरील माहिती मिळाली. अर्थात आज घडीला तो कितीही कंडम पेपर असला तरी ह्या बातमीत तथ्य असावे, कारण त्याचा हवाला अनेक माध्यमांनी दिला आहे.

In reply to by टर्मीनेटर

बोका 17/09/2020 - 21:24
बातमी बद्दल शंका नाही, तथ्य नक्कीच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हि बातमीआहे. मला इंडियन एक्स्प्रेस/ लोकसत्ता यांनी 'बिग डेटा वापरुन , उत्खनन करुन' वगैरे काही शोधले याबद्द्ल शंका आहे.

In reply to by बोका

Rajesh188 17/09/2020 - 21:45
भारतीय मीडिया मध्ये अभ्यासू पत्रकार आहेत कुठे. हा जी हा जी करणारे संपादक आणि मालकांना असे सर्व लाळघोटपणा करणारे नवीन पत्रकार आहेत सर्व प्रकारच्या भारतीय मेडियात. अभ्यासू लोकांना हे पटत नाही ते जास्त दिवस काम करत नाहीत. कोणी तरी बातमी विकली असेल ह्यांना .

In reply to by Rajesh188

डीप डाईव्हर 17/09/2020 - 23:34
>>>दि इंडियन एक्स्प्रेस, द ऑस्ट्रेलियन फायनान्शिय रिव्ह्य़ू आणि इटलीतील ‘इल् फोग्लिओ’ या वृत्तपत्रांचा समावेश आहे. >>> असे बातमीत असल्याचे वर लिहिलंय. ऑस्ट्रेलियन फायनान्शिय रिव्ह्य़ू आणि इटलीतील ‘इल् फोग्लिओ’ बरोबर इंडियन एक्स्प्रेसचा खारीचा वाटा असू शकतो.

Rajesh188 16/09/2020 - 23:23
बऱ्याच क्षेत्रात इंटरनेट चा वापर होतो. बँकिंग,संरक्षण,वाहतूक,आणि खूप सारी क्षेत्र त्यांची माहिती सुध्धा नक्कीच कोणी तरी जमा करून ठेवत असेल. समाज मध्यम वरील माहिती चा असा जास्त काही उपयोग नाही पण बाकी माहिती मिळाली तर कोणत्या ही देशातील सर्व सेवा ठप्प करता येवू शकतात. त्या साठी आपण काही तरी उपाय करतो ना की कोणी माहिती चोरू नये मग समाज मध्यम वरील माहिती रक्षित करण्यासाठी देशातील यंत्रणा काय करते. कुठे ही काही झाले की त्याला पाकिस्तान जबाबदार आहे हे उत्तर अपेक्षित नाही. स्वतः ढिसाळ कारभार करणार आणि क्षत्रू राष्ट्र ला दोषी ठरवणार हे योग्य आहे का. ते क्षत्रु च आहेत ते त्यांचे काम चोख करणारच

सामाजिक माध्यमांवर व्यकत होताना चीन अमेरिकेची भीती जाऊ द्या. गल्लीतल्या गावगुंडाकडुनच फलाणा पोस्ट फॉरवर्ड केली ढिकाणा कॉमेंट म्हणुन मारहाण होऊ शकते. अमेरिका चीनला टरकुन राहण्यापेक्षा ह्या गल्लीतल्या शेरांना वचकुन राहणेच हिताचे ठरेल.

अर्धवटराव 16/09/2020 - 08:06
हे विदा कलेक्शन फक्त ड्रेगन करत असेल असं नाहि. अंकल सॅम, इस्रायल.. अगदी पाक सुद्धा करत असेल. डिजीटल डोळे आता आपल्यावर सदा-सर्वदा रोखलेले असणार.. वि हॅव्ह टु लिव्ह विथ इट :(

In reply to by अर्धवटराव

टर्मीनेटर 16/09/2020 - 14:59
हे विदा कलेक्शन फक्त ड्रेगन करत असेल असं नाहि. अंकल सॅम, इस्रायल.. अगदी पाक सुद्धा करत असेल. डिजीटल डोळे आता आपल्यावर सदा-सर्वदा रोखलेले असणार.. वि हॅव्ह टु लिव्ह विथ इट :(
करेक्ट 👍 डेटा कलेक्शन चे महत्व सर्वच देशांच्या सरकारने ओळखले आहेच, काहींनी आधी तर काहींनी थोडे उशिरा एवढाच काय तो फरक. इतकेच नाही तर आता त्याचे महत्व स्थानिक पातळीवरील लहान मोठ्या उद्योगांच्याही लक्षात आले आहे. स्वीगी आणि झोमॅटो हे तर प्रस्थापित ब्रँडस झाले पण गेल्याच आठवड्यात ठाणे शहर आणि परिसरात त्यांच्या प्रमाणेच फूड डिलेव्हरी सर्व्हिस देणाऱ्या व्यावसायिकाने व्यवसायवृद्धीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन त्यांची वेबसाईट आणि मोबाईल ॲप AI ready करण्याचे काम तीन वर्षांच्या करारावर आमच्या कंपनीला दिले आहे,

हेमंतकुमार 16/09/2020 - 08:06
त्याने कुठल्याही माध्यमावर व्यक्त होताना देश-हिताचे भान ठेवावे आणि भावनांच्या भरात वाहवत न जाता जरा जपून व्यक्त व्हावे.
>>> +११ बऱ्याच वर्षांपूर्वी मी अनुभव मासिकात अवधूत डोंगरे यांचा “आय डिसलाइक” हा फेसबूक माध्यमावरचा लेख वाचला होता. त्यात त्यांनी म्हटले होते, की आपण अशा माध्यमांवर जे काही व्यक्त होत असतो त्याची जागतिक हेरगिरी चालू असते. म्हणूनच त्यांनी फेसबुकला कायमचा रामराम ठोकला होता. याची आठवण झाली.

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 16/09/2020 - 15:58
बऱ्याच वर्षांपूर्वी मी अनुभव मासिकात अवधूत डोंगरे यांचा “आय डिसलाइक” हा फेसबूक माध्यमावरचा लेख वाचला होता. त्यात त्यांनी म्हटले होते, की आपण अशा माध्यमांवर जे काही व्यक्त होत असतो त्याची जागतिक हेरगिरी चालू असते. म्हणूनच त्यांनी फेसबुकला कायमचा रामराम ठोकला होता.
ते खरंच आहे, केवळ फेसबुकच नाही तर प्रत्येक समाज माध्यमांवर हा प्रकार चालतो. इतक्या प्रचंड प्रमाणावर असलेल्या वापरकर्त्यांना फुकट सेवा पुरवणाऱ्या फेसबुक, ट्विटर, गुगल ह्या कंपन्या म्हणजे चॅरिटेबल ट्रस्ट नक्कीच नाहीत. जाहिराती आणि त्यांच्याजवळ असलेल्या अफाट डेटाच्या जोरावर त्या बक्कळ पैसा कमावतात. ज्या माध्यमांकडे स्वतःची अशी हेरगिरीची यंत्रणा नसेल ते अशा बलाढ्य कंपन्यांकडून किंवा सर्वच माध्यमांवर नजर ठेऊन असलेल्या इतर कंपन्यांकडून माहिती खरेदी करतात. वापरकर्त्यांना काय, सेवा फुकट मिळाल्याशी मतलब. अर्थात त्यासाठी अशा माध्यमांना राम राम ठोकणे हा मार्ग योग्य वाटत नाही कारण शेवटी कसे व्यक्त व्हायचे व कुठली आणि किती माहिती शेअर करायची हे वापरकर्त्याच्या हातात असते. काही चलाख वापरकर्ते आपल्या कौशल्याने अशा परिस्थितीतही स्वतःचा लाभ करून घेतात.

निनाद 16/09/2020 - 09:10
तुम्ही एक माध्यम सोडले तरी काहीच फरक पडत नाही. कारण तुमच्या आजूबाजूला जे आहेत त्यांच्या वर्तनावरूनही तुमचे प्रोफाईल बनवले जाते. आज फेबु सोडले मग उद्या जीमेल पण सोडणार का? आणि सोडले तरी काहीच फरक पडत नाही... कारण त्म्ही कुणाला तरी जी मेलवर जेव्हा इमेल पाठवाल तेव्हा गुगल ला आपोआप तुमची माहिती मिळणारच आहे. सोडले तर आपणच लुझर होतो कारण असा आणि तसा विदा जाणारच आहे. पण राहिलो तर किमान त्या बदल्यात त्यांच्या सेवा तरी मिळवतात येतात!

In reply to by निनाद

आनन्दा 16/09/2020 - 09:55
सम्पूर्ण सहमत. मला असे वाटते की आपण आपला अजेंडा समाजमाध्यमांवर पुर्णपणे रेटला पाहिजे. बांग्लादेशचे युद्ध आठवा.. आपल्या युद्ध तयारीची कल्पनारम्य माहिती असली तरी ती पण खरी म्हणून प्रसारित करा.. अफवा पसरवा, धुरळा उडवा.. जितका जास्त धुरळा, तितकी दृष्यमानता कमी असते हे लक्श्यात ठेवूया.

सुबोध खरे 16/09/2020 - 09:31
टर्मिनेटर यांनी लिहिलेले बरोबर आहे. जालावर आपण काय लिहिता हे तारतम्य ठेवा. जालावरून गायब होऊन स्वतःची अडचण करून घ्या असे ते अजिबात म्हणत नाहीत. काश्मीर खोऱ्यात असलेल्या माझ्या लष्करातील वर्गमित्रांना याच कारणासाठी व्हाट्सअँप सारख्या सार्वजनिक न्यासाच्या वापराला सरकारने बंदी केली आहे. कारण अनवधानाने आपण कुठे आहोत काय करतो आहोत हे त्यातून बाहेर जाऊ शकते. ही एखादे वेळेस अतिशयोक्ती असेल सद्य स्थितीत जालावर आपणही आपले विश्लेषण टाकताना चार वेळेस विचार करा. कारण त्याचा गैरवापर करून जनमत बदलण्यासाठी उपयोग केला जातो. लक्षात ठेवा कोणत्याही देशात कम्युनिस्ट राजवट अली तर प्रथम ते तेथील प्रसार माध्यमे निष्ठुरपणे ताब्यात घेतात आणि मग त्याचा आपल्या प्रचारासाठी वापर करतात. आजही डावीकडे झुकलेली प्रसार माध्यमे भारत चीनपुढे कसा कमी पडतो हेच परत परत सांगत आहेत. आणि सैनिकांना देश तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी कालच संसदेने दोन्ही सभागृहाची एकत्रित बैठक घेतली आहे. Prime Minister Narendra Modi on Monday expressed confidence that Parliament will unitedly give this message that the country is standing solidly behind soldiers guarding India’s borders. https://theprint.in/india/as-monsoon-session-starts-modi-says-hope-parliament-gives-message-of-support-to-soldiers/502057/

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 16/09/2020 - 16:27
जालावरून गायब होऊन स्वतःची अडचण करून घ्या असे ते अजिबात म्हणत नाहीत.
करेक्ट 👍 विशेषतः संवेदनशील विषयांवर व्यक्त होताना जालावर आपण काय लिहिता हे तारतम्य ठेवा हेच सांगायचे आहे. अर्थात असे काही होतच नसेल अशी ज्यांची समजूत असेल त्यांनी खुशाल त्याकडे दुर्लक्ष करावे 😀

Rajesh188 16/09/2020 - 11:09
पण असे का घडत आहे ह्याची कारण काय आहेत ह्याची समीक्षा कधी झाली आहे का. देशाची mainstream media सर्रास जनते मध्ये एकमेका विषयी द्वेष पसरवत आहे. काही जण मुस्लिम कसे देश द्रोही आहेत हे सांगण्यात गुंतले आहेत तर काही हिंदू कसे वाईट हे सांगत आहे. Republic tv वर राज्याच्या मुख्यमंत्री चा एकेरी उल्लेख होतो तरी केंद्र सरकार त्या चॅनल ला समज देत नाही . जर सरकार आणि मीडिया च जबाबदारी नी वागत नसतील तर जनतेस दोष देवून काय फायदा. रोज सर्व न्यूज चॅनल वर 1 तास सर्व राज्यांच्या समस्या,तेथील घडणाऱ्या घटना ह्यावर वार्ता पत्र चालवणे गरजेचे आहे. अगदी जबरदस्ती नी. आणि त्या मध्ये फक्त खऱ्या च बातम्या दिल्या जाव्यात पक्षीय,राजकीय मत बाजूला ठेवून.

कंजूस 16/09/2020 - 11:13
जिओ प्लटफॉर्ममध्ये फेसबुक वगैरे भागिदार झालेत आणि ते त्यांचा अजेंडा राबवणारच. एका चाइनिज कंपनीला घेऊन स्वस्त फोर-जी फोन करण्याचे घाटत आहे. हे सरकारी धोरणाविरुद्ध नाही का? चाइनिज हटवा वगैरे? आता तत्या कंपनीच्या हार्डवेरमधून काय गाळणार हे कसे कळणार? बरं हे फोन्स स्वस्त असल्याने गावागावात पोहोचणार. शहरातीच चार हुशार लोकं काय लिहायचं नाही यावर कंट्रोल ठेवणार पण ८०%गाववाले काय करतील?

In reply to by कंजूस

सुबोध खरे 16/09/2020 - 13:25
८०%गाववाले काय करतील? चार हुशार लोक लिहितील तेच फॉरवर्ड करत राहतात. यासाठीच चार हुशार लोकांनी काय फॉरवर्ड करायचं याचा विचार करायला हवा आहे.

Rajesh188 16/09/2020 - 11:31
चीन जे केले आहे तसे अनेक देश अनेक वर्ष करत असतात . You tube, fb, twiter,google map अनेक अशी बरीच ऍप फुकट का दिली जातात आणि ही सर्व ऍप कोणत्या देशात जास्त वापरली जातात. हे ही सर्व अॅप वापरतात त्यांची सर्वांची रोजची detail माहिती गोळा होते . आणि ती माहिती साठवून ठेवली जाते हे नवीन नाही. लोकांच्या समाज मध्यामावरील प्रतिक्रिया ह्या देशात सामाजिक वातावरण कसे आहे ह्याचे निर्देशक असतात . कोणती काडी टाकली की भडका उठेल ह्याचा अंदाज शत्रू राष्ट्र ला नक्की त्या मुळे येतो. मग सामाजिक वातावरण घडुळ करण्यात राजकीय पक्ष,त्यांचे it cell वाले, media ह्यांनीच मोलाची भूमिका असते ना. देशातील नागरिकंना मध्ये देशप्रेम कसे निर्माण केले जाते हे शिकायचे असेल तर छञपती नी कसा राज्य कारभार केला ते पाहिले शिका आणि आमालात आना. कार्या विना फक्त उपदेश योग्य तो परिणाम करत नाही

डीप डाईव्हर 16/09/2020 - 11:47
टर्मिनेटर भाऊ लेख आवडला 👍 Artificial intelligence विषयी आणखीन वाचायला आवडेल. तुमचे ते क्षेत्र असल्यास किंवा त्याचं काही अभ्यास असल्यास त्याच्यावर पण लिहा अशी विनंती. अवांतर- नेहरू, काँग्रेस, भाजपे, भक्त, हिंदू, मुस्लीम असे धाग्याशी संबंध नसलेले विषय घेऊन तज्ञ लोक्स आलेले आहेत. तेव्हा आता धाग्याची वाटचाल कुठल्या दिशेने होणार त्याचा अंदाज आला आहे 😈

In reply to by डीप डाईव्हर

टर्मीनेटर 17/09/2020 - 15:15
Artificial intelligence विषयी आणखीन वाचायला आवडेल. तुमचे ते क्षेत्र असल्यास किंवा त्याचं काही अभ्यास असल्यास त्याच्यावर पण लिहा अशी विनंती.
व्यवसायनिमित्ताने AI शी माझा माफक संबंध येतो परंतु ते माझे क्षेत्र नसल्याने मला त्यातली तांत्रिक माहिती नाही. त्यावर काम करणाऱ्या टीम मेम्बर्स कडून अनेकदा त्याबद्दल थक्क करणारी माहिती मिळते. असे असले तरी त्याचा वापर आणि परिणाम ह्यावर थोडा अभ्यास करून काही लेखन करण्याचा प्रयत्न नक्की करेन. धन्यवाद 🙏

Rajesh188 16/09/2020 - 13:09
त्या मध्ये 1) ज्या लोकांमुळे चीन ला धोका आहे आणि त्या लोकांमुळे भारत बलवान राष्ट्र होवू शकेल 2) ज्या लोकांचे भारतात असणे हे भारताच्या नुकसानीचा आहे पण चीन च्या फायद्याचे आहे. 3) आणि जी लोक असल्या मुळे भारताचे नुकसान होईल आणि जी लोक नसल्या मुळे भारताचे नुकसान होईल खरं तर ही यादी भारतीय गुप्तचर यंत्रणेने शोधून काढावी . बरीच माहिती माहीत पडेल.

सुबोध खरे 16/09/2020 - 13:20
खरं तर ही यादी भारतीय गुप्तचर यंत्रणेने शोधून काढावी . आपल्याला काय वाटतं ? गुप्तहेर संघटनेने ही माहिती शोधली नसेल? माध्यमांना हिमनगाचे टोक असेल एवढीच माहिती पुरवली जाते. बाकी सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना याबद्द्ल सावध अगोदरच केले असेल यात शंकाच नाही. बाकी एकंदर प्रतिसाद पाहून असच वाटतंय कि सगळा भारताचं घाण आहे मग मी त्यात थोडीशी घाण टाकली तर वाईट काय? बाहेरचा जग घाणेरडं असलं तरी आपलं घर आपण धुवून सारवून स्वच्छ ठेवू शकतोच. सब चलता है हाच दृष्टिकोन असेल तर ठीकच आहे.

Gk 16/09/2020 - 15:41
लोक सरकारला कर देतात सरकारने रक्षण करावे राफेलवर , जीडीपीवर विचारू नका, हा छुपा उद्देश वाटत आहे

In reply to by Gk

सॅगी 16/09/2020 - 17:01
हं...थोड्क्यात, उत्तर कोरिया व्हावे...

In reply to by शा वि कु

Gk 16/09/2020 - 18:57
स्वतःचे ह्यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाले होते म्हणे हे आम्हाला आत्म नि र ब र व्हायला सांगतात वरून शत्रूने बॉम्ब टाकल्यास भाजपा जबाबदार नाही , म्हणून डोक्यावर उलटा तवा घेऊन फिरावे , असेही सांगतील

सुबोध खरे 16/09/2020 - 18:51
अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्यांना अमेरिका किंवा तत्सम देशात जायचे आहे अशानी टोकाची मते जालावर मांडू नये. कारण हेसर्व देश आपले जालावरील अस्तित्व तपासून पाहत असतात. त्यात मादक पदार्थ सेवनाचे व्यसन असेल तर किंवा अति उजवे विचार किंवा विशेषतः अति डावे / कम्युनिस्ट विचार मांडले असतील तर आपला व्हिसा कोणतेही कारण न देता नाकारला जाऊ शकतो

In reply to by सुबोध खरे

Rajesh188 16/09/2020 - 19:34
Child porn internet var बघतो म्हणून अमेरिकेत प्रवेश रोखला गेला असा प्रसंग घडला होता असे वाचण्यात आहे.. अतिशय बारीक प्रत्येकावर लक्ष असते आणि AI मुळे खूप डाटा चे काही मिनिटात विश्लेषण करता येत . दोन देशातील दुषमनी असमध्ये हा डाटा कसा वापरला जाईल .हे आपण कसे ठरवणार. सामान्य जनता जे कमेंट करतात त्यांचे विचार स्थिर नसतात कमेंट मध्ये लिहलेले विचार तो कमेंट करणाऱ्या व्यक्ती खऱ्या आयुष्यात वापरात असेल असे नाही. सामान्य लोकांचे विचार ठाम नसतात जसे 4 हुशार लोक अफवा (खरे साहेबांच्या पोस्ट मधले) पसरवतात त्याच प्रमाणे त्यांचे विचार बदलत असतात.

व्यक्त होताना भान रहात नाही हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. पण समाजमाध्यमात त्यावर अंकुश ठेवणे हा उपाय व्यवहार्य ठरेल असे वाटत नाही. एआय ला घाबरायला पाहिजे हे पटते. पण आपणही त्या क्षेत्रात भरीव काम करुन प्रतिआव्हान देण्याची क्षमता निर्माण करावी हा मुद्दा जास्त महत्वाचा नाही का?

In reply to by प्रकाश घाटपांडे

टर्मीनेटर 17/09/2020 - 15:47
पण आपणही त्या क्षेत्रात भरीव काम करुन प्रतिआव्हान देण्याची क्षमता निर्माण करावी हा मुद्दा जास्त महत्वाचा नाही का?
योग्य मुद्दा! IT तंत्रज्ञांची आपल्या देशात अजिबात कमतरता नसल्याने त्या क्षेत्रात बऱ्यापैकी काम सुरु झालेले आहे. भविष्यात AI मध्ये करिअर करण्यासाठी आता अनेक विद्यार्थी Machine Learning कडे वळत आहेत हि समाधानाची गोष्ट आहे. अर्थात ह्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ Machine Learning आणि त्यासाठी आवश्यक programming languages शिकून भागणारे नाही. कृत्रिम बुद्धीमत्ता विकसित करण्यासाठी, त्यात नवनवीन तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले लॉजिक आणि नैसर्गिक बुद्धिमत्ता ज्यांच्यापाशी असेल तेच चांगले यश मिळवू शकतील आणि उरलेले आपण IT मधे हमाली करतो असे सांगायला मोकळे 😀

बोका 16/09/2020 - 21:42
दि इंडियन एक्स्प्रेस’ने गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ ‘झेनुआ’ कंपनीच्या माहिती साठय़ातून भारतीयांबद्दलची माहिती मिळवण्यासाठी उत्खनन केले. माहिती काढण्यासाठी ‘बीग डाटा टूल्स’ चा वापर करण्यात आला.
इंडियन एक्स्प्रेस अशी बिग डेटा वगैरे वापरून पत्रकारीता पण करते ? (पुन्हा लोकसत्ता वाचणे सुरु करावे का ?)

In reply to by बोका

टर्मीनेटर 17/09/2020 - 15:53
इंडियन एक्स्प्रेस अशी बिग डेटा वगैरे वापरून पत्रकारीता पण करते ? (पुन्हा लोकसत्ता वाचणे सुरु करावे का ?)
लोकसत्ता वाचणे बंद करून मलाही काही वर्षे झाली आहेत. परंतु हि बातमी दुसऱ्या माध्यमांनी दाखवल्याने खात्री करण्यासाठी eलोकसत्ताला भेट दिली तेव्हा वरील माहिती मिळाली. अर्थात आज घडीला तो कितीही कंडम पेपर असला तरी ह्या बातमीत तथ्य असावे, कारण त्याचा हवाला अनेक माध्यमांनी दिला आहे.

In reply to by टर्मीनेटर

बोका 17/09/2020 - 21:24
बातमी बद्दल शंका नाही, तथ्य नक्कीच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हि बातमीआहे. मला इंडियन एक्स्प्रेस/ लोकसत्ता यांनी 'बिग डेटा वापरुन , उत्खनन करुन' वगैरे काही शोधले याबद्द्ल शंका आहे.

In reply to by बोका

Rajesh188 17/09/2020 - 21:45
भारतीय मीडिया मध्ये अभ्यासू पत्रकार आहेत कुठे. हा जी हा जी करणारे संपादक आणि मालकांना असे सर्व लाळघोटपणा करणारे नवीन पत्रकार आहेत सर्व प्रकारच्या भारतीय मेडियात. अभ्यासू लोकांना हे पटत नाही ते जास्त दिवस काम करत नाहीत. कोणी तरी बातमी विकली असेल ह्यांना .

In reply to by Rajesh188

डीप डाईव्हर 17/09/2020 - 23:34
>>>दि इंडियन एक्स्प्रेस, द ऑस्ट्रेलियन फायनान्शिय रिव्ह्य़ू आणि इटलीतील ‘इल् फोग्लिओ’ या वृत्तपत्रांचा समावेश आहे. >>> असे बातमीत असल्याचे वर लिहिलंय. ऑस्ट्रेलियन फायनान्शिय रिव्ह्य़ू आणि इटलीतील ‘इल् फोग्लिओ’ बरोबर इंडियन एक्स्प्रेसचा खारीचा वाटा असू शकतो.

Rajesh188 16/09/2020 - 23:23
बऱ्याच क्षेत्रात इंटरनेट चा वापर होतो. बँकिंग,संरक्षण,वाहतूक,आणि खूप सारी क्षेत्र त्यांची माहिती सुध्धा नक्कीच कोणी तरी जमा करून ठेवत असेल. समाज मध्यम वरील माहिती चा असा जास्त काही उपयोग नाही पण बाकी माहिती मिळाली तर कोणत्या ही देशातील सर्व सेवा ठप्प करता येवू शकतात. त्या साठी आपण काही तरी उपाय करतो ना की कोणी माहिती चोरू नये मग समाज मध्यम वरील माहिती रक्षित करण्यासाठी देशातील यंत्रणा काय करते. कुठे ही काही झाले की त्याला पाकिस्तान जबाबदार आहे हे उत्तर अपेक्षित नाही. स्वतः ढिसाळ कारभार करणार आणि क्षत्रू राष्ट्र ला दोषी ठरवणार हे योग्य आहे का. ते क्षत्रु च आहेत ते त्यांचे काम चोख करणारच

सामाजिक माध्यमांवर व्यकत होताना चीन अमेरिकेची भीती जाऊ द्या. गल्लीतल्या गावगुंडाकडुनच फलाणा पोस्ट फॉरवर्ड केली ढिकाणा कॉमेंट म्हणुन मारहाण होऊ शकते. अमेरिका चीनला टरकुन राहण्यापेक्षा ह्या गल्लीतल्या शेरांना वचकुन राहणेच हिताचे ठरेल.
p { text-align: justify; font-size: 17px; } देशवासियांनो जरा जपून व्यक्त व्हा! ‘हजारो भारतीय चीनच्या हेरगिरीचे लक्ष्य’ , ‘भारताच्या 10 हजार व्यक्तींवर चीनची नजर’ अशा मथळ्याच्या बातम्या आपल्यापैकी बहुतेकांनी नुकत्याच वृत्तपत्रांमधून वाचल्या असतील. चीन सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित एक मोठी डेटा कंपनी कमीत कमी 10 हजार भारतीयांच्या रिअल टाईम डेटावर लक्ष ठेवून आहे. यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते सोनिया गांधी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, न्यायपालिका आणि उद्योगपतींचाही समावेश आहे.