वार्तालाप: कर्माची फळे आणि आधि भौतिक ताप

लेखनविषय:
लेखनप्रकार
श्रीमद्भगवद्गीतेत भगवंत म्हणतात" कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन". माझ्या एक जिवलग मित्र या श्लोकावर टिप्पणी करत म्हणाला, तुम्ही मनुवादी लोक ( तो नेहमीच मला प्रेमाने मनुवादी म्हणतो) श्रमिकांचे शोषण करीत आला आहात. आम्हाला म्हणतात, कर्म करा पण फळ मागू नका. का मागू नये आम्ही कर्माची फळे. मी त्याला म्हणालो, कर्म केल्यावर त्याचे फळ हे मिळतेच. पण आपल्या कर्मांवर बाह्य जगाचा प्रभाव ही पडतो. या बाह्य प्रभावांमुळे उत्तम कर्म केले तरी फळे मिळत नाही, आपण दुःखी आणि निराश होतो. ह्यालाच समर्थांनी आधिभौतिक ताप म्हटले आहे. आधिभौतिक ताप दैवीय आणि आसुरी असतात. एक शेतकरी उत्तम बियाणे शेतात पेरतो.

संगीत प्र(या)वास

लेखनविषय:
अलीकडेच एका मित्रासोबत कुठल्या तरी बुवांच्या गायनाला गेलो होतो. त्यांनी 'केदार'चा एक स्वनिर्मित प्रकार गायला. गायकाचं नाव 'खार'कर असल्यानं बहुधा त्याच्या रागाचं नाव 'झुब-केदार' असं असावं असं माझ्या उगाच मनात येऊन गेलं. पण अर्थात, मला ते मित्राला सांगायचं धारिष्ट्य झालं नाही. उगाच (त्याचं ते आडनाव नसलं तरी) तो माझ्यावर खार खायचा. माझी सांगितिक वाटचाल कशी झाली असं जर कुणी विचारलं तर त्यावर 'अगतिक' हेच उत्तर मला पटकन सुचतं. त्या प्रयासाचं 'प्रागतिक'शी (मात्रा जुळत नसल्या तरी) यमक जुळवायचा त्रास मात्र मला टाळावासा वाटतो. प्रथम, संगीत म्हटलं की सूर आले.

वार्तालाप: नेणतां वैरी जिंकती

लेखनविषय:
लेखनप्रकार
नेणतां वैरी जिंकती. नेणतां अपाई पडती. नेणतां संहारती घडती. जीवनाश. समर्थ म्हणतात नेणते पणामुळे शत्रु पराभव करतात. संकटे येतात. फडशा उडतो आणि जीवनाश होतो. या मृत्यू लोकात येताच छोट्या बाळालाही जाणण्याचा प्रयत्न करावा लागतो. बिना जाणता आईचे दूध प्राशन करणे ही त्याला जमणे शक्य नाही. शिक्षण असो, प्रपंच असो, आध्यात्मिक मार्गावर वाटचाल किंवा राजनीती असो जो जाणण्याचा प्रयत्न करत नाही तो त्याच्या क्षेत्रात असफल होतो. समर्थांनी ही ओवी बहुधा राजनेत्यांसाठी रचली आहे.

"स्वामी" तिन्ही जगाचा..... मी मात्र भिकारी

लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्या वयातल्या इतर कुणाही मुलाप्रमाणे मी सहावी किंवा सातवीत पहिल्यांदा स्वामी कादंबरी वाचली. मला हे कबुल करायला अजिबात संकोच वाटत नाही की ती कादंबरी त्यावेळी मला खुप आवडली होती. माधवरावांची एक प्रतिमा माझ्या मनात नोंदली गेली होती. कादंबरीच्या सुरवातीच्या पानावर असलेल्या इतिहासकारांच्या काही अभिप्रायामुळे शेंदराचा टीळा व्यवस्थित लागला होता. एकंदर ब्राह्मणी वातावरणात लहानपण गेल्यामुळे लावणी वगैरे अतिशय घाण प्रकार असतो त्याला टाळणे हेच उत्तम असा संस्कार असल्यामुळे कादंबरीतील माधवराव मधुन उठून जातात इत्यादी प्रसंग दाद देणारे आणि माधवराव या व्यक्तीबद्दल आदर वाढवणारे ठरले.

एकटा जीव सदाशिव

लेखनविषय:
लेखनप्रकार
अनोळखी शहरात 'एकट्याने' वास्त्यव्य करणं पण कधी कधी सुखाचं असतं. अट एकच खिसा भरलेला हवा. खर्च केलाच पाहिजे असं बंधन नाही पण चिंता नसावी. मग मन मारायची गरज उरत नाही. मन मानेल तसं निश्चिन्तपणे भटकवता येतं. मनाचा व्यायाम हा वेगळा न झेपणारा गहन विषय, आतातरी नको. तर अनोळखी शहरात 'एकट्याने' आल्यावर life कसं शांत होतं. सुपरफ़ास्ट चालणारी गाडी एकदम पॅसेंजर होते. सुट्टीचा दिवस तर रेंगाळत रेंगाळत निघून जातो. धावपळीत अडकलेल्या जीवाला उसंत मिळते. वेळ कसा Invest करावा याचा Sense असलेल्या एखाद्याला तर पर्वणीच वाटावी. काय छंद जोपासायचे ते जोपासा. कोणाचाच अडथळा नाही.

आणीबाणी : लुटमारीचे 'उद्योग' !

लेखनविषय:
लेखनप्रकार
त्या भयानक कालावधी मधली ही बाजु फारशी चर्चेमध्ये नसते... २५ जुन १९७५ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात रीतसर आणीबाणी जाहीर केली. जगाच्या इतिहासात आजवर ज्ञात असणाऱ्या चमत्कारिक आणि भयानक पाशवी राजसत्तांपैकी एक स्वतंत्र भारताच्या नशिबी आली हे या देशाचे दुर्दैव. त्या संपुर्ण कालावधीमधली इंदिरा गांधी यांची हुकुमशाही, संजय गांधींची पाशवी अरेरावी आणि पोलिसांच्या क्रौर्याची परिसीमा या विषयी अनेकवेळा अनेक ठिकाणी लिहिले गेले आहे. त्या भयंकर परिस्थितीमधून गेलेले लोक आजही अनेक किस्से सांगत असतात.

भोला चित्रपट...भोळा प्रेक्षक.....

लेखनविषय:
अविभाज्य अमेझोनचा (Amezon Prime) सन्माननीय सदस्य म्हणून कंपनीने सुचना पाठवली की भोला सिनेमा आपण चकटफू बघू शकता. हल्ली ही कंपनी सुद्धा भारी लब्बाड झालीयं.सिनेमे भाड्या ने(मुळ शब्द भाडे याचे ब.व.,घराचे भाडे,बसचे भाडे सारखे) किंवा विकतही देतात. पहिल्यांदा असे काही नव्हते.अ.प्रा वर पुर्व प्रकाशित २१ सरफरोश मी फुकट पाहीला पण आता मात्र पैसे मोजावे लागतात.(बरे झाले मी लवकर पाहीला) साX, विपणन तज्ञ (Marketing Expert) सुद्धा एक भारीच जमात आहे.आपला ढोल आणी ग्राहकाचा बॅण्ड कसा जोरात वाजवायचा यांना बरोबर समजते. खुल्या चित्रपटगृहाची सवय, बंद चित्रपटगृहांत बसवत नाही.आता अंतरजालावर सोईस्कर वाटते.

शंभर अदाणी हवे आहेत…

...आमच्या शेतकऱ्यांना सरकारचा इथला एखादा निर्णय अमान्य असेल तर आमचे शेतकरी आणि आमचे सरकार काय करायचे ते बघून घेतील. शेतकऱ्यांना अगदी एखादे सरकार पसंत नसेल तर त्यांना ते सरकार खाली खेचायचा देखील नैतिक अधिकार आहे. पण इथल्या शेतकरी आंदोलनामध्ये काड्या घालणारे, ते भडकाविणारे आपल्या देशा बाहेरचे खलनायक होते हे अलीकडे लक्षात आले :टुल किट गॅंग ! महामारी नंतर तर आर्थिक दृष्ट्या सावरलेला भारत हा जगाच्या पाठीवरचा एकमेव बडा देश आहे. केवळ सावरलेलाच नाही तर आर्थिकदृष्ट्या उत्तम स्थिती असणारा आणि प्रगती करत असणारा.

पैशाचे झाड- भाग शेवटचा

लेखनप्रकार
भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 भाग ३ https://www.misalpav.com/node/51041 भाग ४ https://www.misalpav.com/node/51045 भाग ५ https://www.misalpav.com/node/51053 दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळीच अमोलचा मेसेज आलेला पाहून अभिने कुतूहलाने तो मेसेज ऊघडला. आदल्या दिवशी बोलण्याच्या ओघात अभ्याने गरिबीचे दुष्ट्चक्र आणि संपत्तीच्या भाग्यचक्र याचा ऊल्लेख केला होता. पण त्यानंतर त्याविषयी सांगायचे विसरला होता. अमोलने त्याचीच आठवण करुन द्यायला मेसेज केला होता.

पैशाचे झाड- भाग ५

लेखनप्रकार
भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 भाग ३ https://www.misalpav.com/node/51041 भाग ४ https://www.misalpav.com/node/51045 अमोलच्या डोक्यात चाललेल्या विचारांनी त्याला चांगलंच पछाडलं होतं. त्याला जितका विचार करु तितके जास्त प्रश्न पडत होते. गुंता वाढतच चालला होता. शेवटी त्याने अभ्यालाच फोन करुन एके दिवशी निवांत गप्पा मारायच्या तयारीने ये असे म्हणून बोलवून घेतले. बराच वेळ शिळोप्याच्या जनरल गप्पा झाल्यावर अमोलने विषय काढला. " अभ्या तू मागच्या काही महिन्यात जे जे बोलला आहेस ते माझ्या डोक्यातून काही जात नाहीये.
Subscribe to मत