मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सौदी क्षणचित्रे : ०३ : महाकंपनी सौदी आराम्को आणि मरजान बेट

डॉ सुहास म्हात्रे ·

प्रचेतस 20/05/2014 - 16:56
खरोखरच महाकंपनी. मरजान बेट पण सुरेख आहे अतिशय. आराम्को आणि मरजान बघून ते इतक्या ओसाड वाळवंटी वाळवंटी प्रदेशात वसलेले आहे असे वाटतच नाही.

अरे...त्या मळसुत्राकार मनोर्‍या सारखाच एक मनोरा कतारमधे पण आहे. ती 'फनार' म्हणजे 'कतार ईस्लामिक कल्चरल सेंटर' ची बिल्डिंग आहे. बाकी, सौदि अराम्को ची महिती मस्स्स्त!!! आणि हि सगळीच लेखमाला पण खूप इन्टरेस्टींग!!! माझ्या एका एक्स-सौदि सद्य-कतार मयत्रिणीला पण दिली वाचायला तर तिला भरुन-बिरुन येतेय!!!

In reply to by स्वप्नांची राणी

फनार म्हणजे दीपगृह (लाईट हाउस). त्या पद्धतीचे बांधकाम "मार्गदर्शक प्रकाश" या अर्थाने अरबी इमारतींमध्ये वापरले जाते. उदा: फनार (कतार इस्लामिक कल्चरल सेंटर):

सुहासदवन 20/05/2014 - 19:07
Saudi Aramco Asia Co नावाच्या तिच्या एका उपकंपनीचा इंडोनेशियाच्या Pertamina या राष्ट्रीय तेलकंपनीबरोबर US$ ८ बिलियनचा करार करण्याचा मानस १९१३ मध्ये जाहीर झाला आहे.

In reply to by सुहासदवन

अशा थोड्या चुका होणारच... मनातल्या मनांत, कदाचित एक्का साहेबांनी, संपादक मंडळाला थोडे कामाला लावायचा पण विचार केला असावा.)

ह्या आमच्या यानबू विषयी काही माहीती असेल तर लिहा ना? इथे कुणालाच जास्त काही माहित नाही.सध्या आम्ही ३ मिपाकर इथेच (यानबूलाच) आहोत. काही तरी, गाडी-घोड्याची व्यवस्था करून थोडे आस-पास फिरून येवू.

In reply to by मुक्त विहारि

भाते 20/05/2014 - 20:09
करा कि एक कट्टा यांबूमध्ये आणि येऊ द्या सचित्र वृत्तांत. आम्हालासुध्दा बघु द्या कि ते यांबू फोटोतुन.

In reply to by भाते

तुम्ही त्या टवाळ कार्ट्यांना भेटायला पण जात नाही. आणि आम्हाला मात्र कट्ट्याचे फोटो पाठवायला सांगता. (भेंडी, मी नसतांना कट्टे करता काय?सध्या आम्ही रोज दुपारी मिपा कट्टा करतो.)

In reply to by मुक्त विहारि

यानबू दम्माम्हून १४०० किमी दूर आहे. तेथे जाण्याची इच्छा होती पण ते जमले नाही. त्यामुळे त्या शहराची माहिती इथे टाकण्याची जबाबदारी तुमच्यावर पडली आहे असे मी सर्व मिपाकरांतर्फे जाहीर करत आहे ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आम्ही आपले फुकटांत काही तरी आशा मनी बाळगून होतो आणि पदरांत काहीतरी वेगळे वाचायला मिळेल म्हणत होतो, तर तुम्ही आमच्याच खांद्यावर आणि त्यातून गंमत म्हणजे, आमच्या कॅमेराच्या लेन्स वर जबाबदारी टाकून मोकळे. असो, जबाबदारी घेतो...पण हा कट्टा समुद्र किनारी असल्याने..फोटो जास्त आणि व्रुत्तांत कमी, असेच होणार आहे.

भाते 20/05/2014 - 20:05
माहिती आणि फोटो आवडले. भरदिवसा रस्त्यावरचे दिवे चालु ठेवण्याची परंपरा फक्त मुंबईतच नाही तर सौदीमध्ये पाळली जाते हे बघुन हायसे वाटले. तरीही आपल्या इथे लोक ऊगाच त्याला शिव्या घालतात. :)

In reply to by भाते

पाषाणभेद 20/05/2014 - 21:15
छान सफर चालू आहे. अवांतरः दिवसा जर खांबांवरचे दिवे चालू असतील तर सहसा त्या भागातील दिव्यांची/ विजेची देखभाल चालू असते.

एक सांगा, तुम्ही इतके स्पष्ट आणि सुंदर फोटो कसे काय काढता? आमचा कॅमेरा बरा आहे, मुलं फार सुंदर फोटो काढतात.पण तोच कॅमेरा आमच्या हातात आला की लेन्स टाकतो.हे नक्की काय गौडबंगाल आहे, तेच कळत नाही.

In reply to by मुक्त विहारि

=)) आमचे फोटो बरे येतात यात आमचा कायबी दोष नाय बगा ! क्यामेरा द्येव आमाला परसन्न आसावा, तेचिच सर्वी क्रुपा. तेचि रोज पुजा करा. (मुलान्ला चांगले फोटो काडता येतात म्हंता म्हंजे) नक्की फरक पडंल ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तो प्रयोग, पहिल्यांदा जेंव्हा कॅमेरा हातात आला, तेंव्हाच करून बघीतला.कॅमेर्‍याला मस्त पाण्यातून धुवून काढला.वर हळद-कूंकू आणि चंदन पण लावले. वडीलांनी, आमच्या पाठीवर चंदनाचा मार्क काढला.(तुमचे ते वॉटर-मार्क पुसले जातील पण हे चंदन-मार्क काही पुसले जात नाहीत.)शिवाय पाहुण्यांची सरबराई करतांना अजून पण हा "कॅमेर्‍याच्या पुजेचा किस्सा" सांगीतल्या जातो. अन, तुम्ही सांगताय, परत पूजा करायला.चांगला आमचा सुखाचा संसार चालला आहे, तो चालू द्या.

एका अमेरिकन कंपनीचे सौदी कंपनीत झालेल्या रुपांतराचा इतिहास रोचक वाटला. एक्झॉन मोबिल वैगेरे याच्याशी कश्या निगडीत होत्या वैगेरे जाणुन घेण्याची उत्सुकता आहे.

In reply to by वॉल्टर व्हाईट

१९४८ मध्ये आराम्को मधिल ३०% समभाग Standard Oil of New Jersey म्हणजे नंतरची Esso ने आणि १०% समभाग Socony Vacuum म्हणजे नंतरची Mobil या दोन कंपन्यांनी खरेदी केले. या दोन्ही कंपन्या Iraq Petroleum Co. च्या भागधारक होत्या. त्यामुळे त्याकाळच्या आंतरराष्ट्रीय ताकदींमधिल कराराप्रमाणे त्यांना हे करणे शक्य नव्हते. राजकीय वजन वापरून तो करार (Red Line Agreement) बदलून घेऊन ही गुंतवणूक केली गेली. अर्थकारण आणि राजकारण हे कसे एकमेकात गुंतलेले असते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

राही 21/05/2014 - 07:19
प्रतिसाद लिहिलाच आहे असे नाही पण आपल्या इतर अनेक लेखमालांप्रमाणेच ही लेखमालासुद्धा अतिशय आवडते आहे. आरॅम्को ची माहिती रंजक होती. फोटो तर (हेही नेहमीप्रमाणेच) अप्रतिम. नुसते फोटो बघूनच डोळे निवले. प्रत्यक्ष बघणार्‍यांचे काय होत असेल! आपल्याकडे अशी सुबत्ता कधी अवतरेल असे वाटून थोडी विषण्णता येते.

मृत्युन्जय 21/05/2014 - 10:50
सौदी मध्ये बायकांना बुरख्याशिवाय कुठेही जाता येत नाही आणी चेहर्‍यावरुन बुरखा काढता येत नाही आणि इतर अनेक अशी बंधने ऐकली आहेत. त्याबद्दल वाचायला आवडेल.

सौदीमध्ये "सर्व" स्त्रियांना आबाया (म्हणजे गळ्यापासून पायापर्यंत असलेला पायघोळ झगा) घालावा लागतो. मात्र सर्व सौदी स्त्रिया केसांवरून ओढ्णी सारखे वस्त्र घट्ट बांधतात. बहुतांश सुन्नी मुस्लीम स्त्रिया बुरख्याने चेहरा झाकतात पण शिया स्त्रियांमध्ये हे प्रमाण बरेच कमी आहे. परदेशी स्त्रियांनी केस व चेहरा झाकणे आवश्यक नसते. दुसरा महत्वाचा नियम म्हणजे स्त्रिया चारचाकी चालवू शकत नाही. या नियमाबद्दल सद्या तेथे चर्चा चालू आहे. मोठ्या कंपन्या व हॉस्पीट्ल्समध्ये बर्‍याच सौदी स्त्रिया काम करतात. हॉस्पीटलमध्ये आल्यावर आबाया उतरवून नेहमीच्या बाह्य कपड्यांवर (शर्ट-पँट अथवा टॉप आणि पायघोळ ड्रेस) हॉस्पीटलचा पांढरा कोट घालून काम करणे हे नेहमीचे आहे. थोडक्यात काही इतर देशांपेक्षा वेगळे नियम आहेत पण त्या देशाची संस्कृती म्हणून थोडेसे समजून घेतले तर ते इतकेसे जाचक आहेत असे जाणवले नाही... शिवाय जशी वेळ जाते तसे या नियमांचा कडकपणा कमी होत आहे असे निरिक्षण आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आबाया (मानेपासून पायापर्यंत पायघोळ वस्त्र) आणि हेजाब (लेडिज हेडगियर)...  . निकाब (चेहरा झाकणारे वस्त्र)...  (सर्व चित्रे जालावरीन साभार)

कुसुमावती, मधुरा देशपांडे, बिपिन कार्यकर्ते, वल्ली, बॅटमॅन, आतिवास, अनन्न्या, सूड, अत्रुप्त आत्मा, स्वॅप्स, भाते, पाषाणभेद, शुचि, राही, जेपी, पैलवान : आपल्या सर्वांचे या खूप वेगळ्या देशाच्या सफरीत स्वागत आहे. पुढची सफरही अशीच रोचक वाटेल अशी आशा आहे.

मदनबाण 21/05/2014 - 14:46
आराम्को बद्धल खरं तर गेल्या वर्षी एका लेखात वाचलं होत... अर्थात कारण होत जगातल्या सगळ्यात मोठ्या या ऑइल कंपनीचे हँकिंग करुन केले गेलेले नुकसान ! १५ ऑगस्ट २०१२ ला या कंपनीचे संपूर्ण नेटवर्क हॅक झाले होते, हॅकर्सनी जवळ पास ३०,००० कॉप्युटर्सच्या हार्ड-डिस्क वाईप आउट करुन टाकल्या.हा आत्ता पर्यंतचा कॉर्पोरेट जगातील कुठल्याही कंपनीवर झालेला सर्वात घातक हल्ला होता...मेमरी {बहुधा हार्ड-डिस्क} ही ५ ते ६ वेळा री-राइट करण्यात आली, याचा अर्थ वाईप आउट मधुन डिलीट झालेली माहिती पुन्हा रिकव्हर करणे जवळपास अशक्य ! या बद्धलचा दुवा माझ्या प्रतिसादात अत्यंत वाचनिय लेख {Silent War}म्हणुन दिला होता. :) जाता जाता :- या प्रतिसादाचा योगा-योग असा की हा प्रतिसाद हॅकिंग बद्धल आहे आणि आजची बदलली सही सुद्धा हँकिंग बद्धलच आहे. ;)

In reply to by मदनबाण

खरं आहे. ती एक अत्यंत खळबळजनक घटना होती. त्यानंतर सगळ्या सौदी अरेबियामध्ये जालप्रणाली संरक्षक व्यवस्था खूप कडक करण्यात आली.

रेवती 21/05/2014 - 19:17
ग्रेट लिहिलयत. फोटू तर नेहमीप्रमाणेच सुरेख आलेत. वाळवंटात निर्माण केलेला जादुई देश पाहून आश्चर्य वाटते. तेलसाठे असल्यावर काय काय होऊ शकते याच्या बर्‍याच सुरस आणि चमत्कारिक अथा ऐकल्या आहेत. त्यांची आठवण झाली.

आराम्को कंपनीचा परिचय अत्यंत मोलाचा वाटला. लेख आवडला. नेमक्या मराठी शब्दांचा वापर सुखद वाटला. मात्र एक सूचना अशी की, आधी "प्रवेश" पूर्ण करून घ्या आणि मगच "द्वार" गाठा ना!

आत्ता सर्व लेख वाचले. मरजान बेट किती सुंदर दिसतय....वाळवंट म्हण्जे सगळं रुक्ष असं वाटत होतं , आता तिथली सुंदरता पण दिसली आणि तुमच्या फ़ोटोनी आणखी बहार आणली.. पुढील सफरनामा वाचायला तयार...

पैसा 25/05/2014 - 17:21
सगळं वर्णन आणि फोटो खासच आहेत! अरबस्तानच्या सुरस आणि चमत्कारिक कथा!

प्रचेतस 20/05/2014 - 16:56
खरोखरच महाकंपनी. मरजान बेट पण सुरेख आहे अतिशय. आराम्को आणि मरजान बघून ते इतक्या ओसाड वाळवंटी वाळवंटी प्रदेशात वसलेले आहे असे वाटतच नाही.

अरे...त्या मळसुत्राकार मनोर्‍या सारखाच एक मनोरा कतारमधे पण आहे. ती 'फनार' म्हणजे 'कतार ईस्लामिक कल्चरल सेंटर' ची बिल्डिंग आहे. बाकी, सौदि अराम्को ची महिती मस्स्स्त!!! आणि हि सगळीच लेखमाला पण खूप इन्टरेस्टींग!!! माझ्या एका एक्स-सौदि सद्य-कतार मयत्रिणीला पण दिली वाचायला तर तिला भरुन-बिरुन येतेय!!!

In reply to by स्वप्नांची राणी

फनार म्हणजे दीपगृह (लाईट हाउस). त्या पद्धतीचे बांधकाम "मार्गदर्शक प्रकाश" या अर्थाने अरबी इमारतींमध्ये वापरले जाते. उदा: फनार (कतार इस्लामिक कल्चरल सेंटर):

सुहासदवन 20/05/2014 - 19:07
Saudi Aramco Asia Co नावाच्या तिच्या एका उपकंपनीचा इंडोनेशियाच्या Pertamina या राष्ट्रीय तेलकंपनीबरोबर US$ ८ बिलियनचा करार करण्याचा मानस १९१३ मध्ये जाहीर झाला आहे.

In reply to by सुहासदवन

अशा थोड्या चुका होणारच... मनातल्या मनांत, कदाचित एक्का साहेबांनी, संपादक मंडळाला थोडे कामाला लावायचा पण विचार केला असावा.)

ह्या आमच्या यानबू विषयी काही माहीती असेल तर लिहा ना? इथे कुणालाच जास्त काही माहित नाही.सध्या आम्ही ३ मिपाकर इथेच (यानबूलाच) आहोत. काही तरी, गाडी-घोड्याची व्यवस्था करून थोडे आस-पास फिरून येवू.

In reply to by मुक्त विहारि

भाते 20/05/2014 - 20:09
करा कि एक कट्टा यांबूमध्ये आणि येऊ द्या सचित्र वृत्तांत. आम्हालासुध्दा बघु द्या कि ते यांबू फोटोतुन.

In reply to by भाते

तुम्ही त्या टवाळ कार्ट्यांना भेटायला पण जात नाही. आणि आम्हाला मात्र कट्ट्याचे फोटो पाठवायला सांगता. (भेंडी, मी नसतांना कट्टे करता काय?सध्या आम्ही रोज दुपारी मिपा कट्टा करतो.)

In reply to by मुक्त विहारि

यानबू दम्माम्हून १४०० किमी दूर आहे. तेथे जाण्याची इच्छा होती पण ते जमले नाही. त्यामुळे त्या शहराची माहिती इथे टाकण्याची जबाबदारी तुमच्यावर पडली आहे असे मी सर्व मिपाकरांतर्फे जाहीर करत आहे ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आम्ही आपले फुकटांत काही तरी आशा मनी बाळगून होतो आणि पदरांत काहीतरी वेगळे वाचायला मिळेल म्हणत होतो, तर तुम्ही आमच्याच खांद्यावर आणि त्यातून गंमत म्हणजे, आमच्या कॅमेराच्या लेन्स वर जबाबदारी टाकून मोकळे. असो, जबाबदारी घेतो...पण हा कट्टा समुद्र किनारी असल्याने..फोटो जास्त आणि व्रुत्तांत कमी, असेच होणार आहे.

भाते 20/05/2014 - 20:05
माहिती आणि फोटो आवडले. भरदिवसा रस्त्यावरचे दिवे चालु ठेवण्याची परंपरा फक्त मुंबईतच नाही तर सौदीमध्ये पाळली जाते हे बघुन हायसे वाटले. तरीही आपल्या इथे लोक ऊगाच त्याला शिव्या घालतात. :)

In reply to by भाते

पाषाणभेद 20/05/2014 - 21:15
छान सफर चालू आहे. अवांतरः दिवसा जर खांबांवरचे दिवे चालू असतील तर सहसा त्या भागातील दिव्यांची/ विजेची देखभाल चालू असते.

एक सांगा, तुम्ही इतके स्पष्ट आणि सुंदर फोटो कसे काय काढता? आमचा कॅमेरा बरा आहे, मुलं फार सुंदर फोटो काढतात.पण तोच कॅमेरा आमच्या हातात आला की लेन्स टाकतो.हे नक्की काय गौडबंगाल आहे, तेच कळत नाही.

In reply to by मुक्त विहारि

=)) आमचे फोटो बरे येतात यात आमचा कायबी दोष नाय बगा ! क्यामेरा द्येव आमाला परसन्न आसावा, तेचिच सर्वी क्रुपा. तेचि रोज पुजा करा. (मुलान्ला चांगले फोटो काडता येतात म्हंता म्हंजे) नक्की फरक पडंल ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तो प्रयोग, पहिल्यांदा जेंव्हा कॅमेरा हातात आला, तेंव्हाच करून बघीतला.कॅमेर्‍याला मस्त पाण्यातून धुवून काढला.वर हळद-कूंकू आणि चंदन पण लावले. वडीलांनी, आमच्या पाठीवर चंदनाचा मार्क काढला.(तुमचे ते वॉटर-मार्क पुसले जातील पण हे चंदन-मार्क काही पुसले जात नाहीत.)शिवाय पाहुण्यांची सरबराई करतांना अजून पण हा "कॅमेर्‍याच्या पुजेचा किस्सा" सांगीतल्या जातो. अन, तुम्ही सांगताय, परत पूजा करायला.चांगला आमचा सुखाचा संसार चालला आहे, तो चालू द्या.

एका अमेरिकन कंपनीचे सौदी कंपनीत झालेल्या रुपांतराचा इतिहास रोचक वाटला. एक्झॉन मोबिल वैगेरे याच्याशी कश्या निगडीत होत्या वैगेरे जाणुन घेण्याची उत्सुकता आहे.

In reply to by वॉल्टर व्हाईट

१९४८ मध्ये आराम्को मधिल ३०% समभाग Standard Oil of New Jersey म्हणजे नंतरची Esso ने आणि १०% समभाग Socony Vacuum म्हणजे नंतरची Mobil या दोन कंपन्यांनी खरेदी केले. या दोन्ही कंपन्या Iraq Petroleum Co. च्या भागधारक होत्या. त्यामुळे त्याकाळच्या आंतरराष्ट्रीय ताकदींमधिल कराराप्रमाणे त्यांना हे करणे शक्य नव्हते. राजकीय वजन वापरून तो करार (Red Line Agreement) बदलून घेऊन ही गुंतवणूक केली गेली. अर्थकारण आणि राजकारण हे कसे एकमेकात गुंतलेले असते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

राही 21/05/2014 - 07:19
प्रतिसाद लिहिलाच आहे असे नाही पण आपल्या इतर अनेक लेखमालांप्रमाणेच ही लेखमालासुद्धा अतिशय आवडते आहे. आरॅम्को ची माहिती रंजक होती. फोटो तर (हेही नेहमीप्रमाणेच) अप्रतिम. नुसते फोटो बघूनच डोळे निवले. प्रत्यक्ष बघणार्‍यांचे काय होत असेल! आपल्याकडे अशी सुबत्ता कधी अवतरेल असे वाटून थोडी विषण्णता येते.

मृत्युन्जय 21/05/2014 - 10:50
सौदी मध्ये बायकांना बुरख्याशिवाय कुठेही जाता येत नाही आणी चेहर्‍यावरुन बुरखा काढता येत नाही आणि इतर अनेक अशी बंधने ऐकली आहेत. त्याबद्दल वाचायला आवडेल.

सौदीमध्ये "सर्व" स्त्रियांना आबाया (म्हणजे गळ्यापासून पायापर्यंत असलेला पायघोळ झगा) घालावा लागतो. मात्र सर्व सौदी स्त्रिया केसांवरून ओढ्णी सारखे वस्त्र घट्ट बांधतात. बहुतांश सुन्नी मुस्लीम स्त्रिया बुरख्याने चेहरा झाकतात पण शिया स्त्रियांमध्ये हे प्रमाण बरेच कमी आहे. परदेशी स्त्रियांनी केस व चेहरा झाकणे आवश्यक नसते. दुसरा महत्वाचा नियम म्हणजे स्त्रिया चारचाकी चालवू शकत नाही. या नियमाबद्दल सद्या तेथे चर्चा चालू आहे. मोठ्या कंपन्या व हॉस्पीट्ल्समध्ये बर्‍याच सौदी स्त्रिया काम करतात. हॉस्पीटलमध्ये आल्यावर आबाया उतरवून नेहमीच्या बाह्य कपड्यांवर (शर्ट-पँट अथवा टॉप आणि पायघोळ ड्रेस) हॉस्पीटलचा पांढरा कोट घालून काम करणे हे नेहमीचे आहे. थोडक्यात काही इतर देशांपेक्षा वेगळे नियम आहेत पण त्या देशाची संस्कृती म्हणून थोडेसे समजून घेतले तर ते इतकेसे जाचक आहेत असे जाणवले नाही... शिवाय जशी वेळ जाते तसे या नियमांचा कडकपणा कमी होत आहे असे निरिक्षण आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आबाया (मानेपासून पायापर्यंत पायघोळ वस्त्र) आणि हेजाब (लेडिज हेडगियर)...  . निकाब (चेहरा झाकणारे वस्त्र)...  (सर्व चित्रे जालावरीन साभार)

कुसुमावती, मधुरा देशपांडे, बिपिन कार्यकर्ते, वल्ली, बॅटमॅन, आतिवास, अनन्न्या, सूड, अत्रुप्त आत्मा, स्वॅप्स, भाते, पाषाणभेद, शुचि, राही, जेपी, पैलवान : आपल्या सर्वांचे या खूप वेगळ्या देशाच्या सफरीत स्वागत आहे. पुढची सफरही अशीच रोचक वाटेल अशी आशा आहे.

मदनबाण 21/05/2014 - 14:46
आराम्को बद्धल खरं तर गेल्या वर्षी एका लेखात वाचलं होत... अर्थात कारण होत जगातल्या सगळ्यात मोठ्या या ऑइल कंपनीचे हँकिंग करुन केले गेलेले नुकसान ! १५ ऑगस्ट २०१२ ला या कंपनीचे संपूर्ण नेटवर्क हॅक झाले होते, हॅकर्सनी जवळ पास ३०,००० कॉप्युटर्सच्या हार्ड-डिस्क वाईप आउट करुन टाकल्या.हा आत्ता पर्यंतचा कॉर्पोरेट जगातील कुठल्याही कंपनीवर झालेला सर्वात घातक हल्ला होता...मेमरी {बहुधा हार्ड-डिस्क} ही ५ ते ६ वेळा री-राइट करण्यात आली, याचा अर्थ वाईप आउट मधुन डिलीट झालेली माहिती पुन्हा रिकव्हर करणे जवळपास अशक्य ! या बद्धलचा दुवा माझ्या प्रतिसादात अत्यंत वाचनिय लेख {Silent War}म्हणुन दिला होता. :) जाता जाता :- या प्रतिसादाचा योगा-योग असा की हा प्रतिसाद हॅकिंग बद्धल आहे आणि आजची बदलली सही सुद्धा हँकिंग बद्धलच आहे. ;)

In reply to by मदनबाण

खरं आहे. ती एक अत्यंत खळबळजनक घटना होती. त्यानंतर सगळ्या सौदी अरेबियामध्ये जालप्रणाली संरक्षक व्यवस्था खूप कडक करण्यात आली.

रेवती 21/05/2014 - 19:17
ग्रेट लिहिलयत. फोटू तर नेहमीप्रमाणेच सुरेख आलेत. वाळवंटात निर्माण केलेला जादुई देश पाहून आश्चर्य वाटते. तेलसाठे असल्यावर काय काय होऊ शकते याच्या बर्‍याच सुरस आणि चमत्कारिक अथा ऐकल्या आहेत. त्यांची आठवण झाली.

आराम्को कंपनीचा परिचय अत्यंत मोलाचा वाटला. लेख आवडला. नेमक्या मराठी शब्दांचा वापर सुखद वाटला. मात्र एक सूचना अशी की, आधी "प्रवेश" पूर्ण करून घ्या आणि मगच "द्वार" गाठा ना!

आत्ता सर्व लेख वाचले. मरजान बेट किती सुंदर दिसतय....वाळवंट म्हण्जे सगळं रुक्ष असं वाटत होतं , आता तिथली सुंदरता पण दिसली आणि तुमच्या फ़ोटोनी आणखी बहार आणली.. पुढील सफरनामा वाचायला तयार...

पैसा 25/05/2014 - 17:21
सगळं वर्णन आणि फोटो खासच आहेत! अरबस्तानच्या सुरस आणि चमत्कारिक कथा!
=================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८...

चोकलेट रोल

इशा१२३ ·

दिपक.कुवेत 20/05/2014 - 13:10
काय अप्रतिम रोल दिसत आहेत. शीवाय करायलाहो सोपे. तोंडात घातल्याक्षणीच विरघळतील. खोबर्‍याबरोबर सुका मेवाहि रोल मधे टाकल्यास अजुन रिचनेस येईल. बाकि ह्या निमित्ताने मुविनीं घारापुरी कट्ट्याला आणलेल्या चॉकलेट वड्या आठवल्या. त्या हि अश्याच अप्रतिम झाल्या होत्या.

दिपक.कुवेत 20/05/2014 - 19:07
अरे तेच तेच चॉकलेट काय परत परत खातोयेस?? ट्रे मधे बाकिची पण आहे ती एक तर खा तरी नाहितर आम्हाला तरी वाट

दिपक.कुवेत 21/05/2014 - 11:00
ड्रिंकिंग चॉकलेट पावडर स्वरुपातच उपलब्ध आहे. कोणत्याहि सुपरमार्केट/मॉल मधे कॅडबरी ब्रँडची मिळेल. हि पावडर नुसत्या दुधात घालुनहि (अजीबात साखर न घालता) छान लागते आणि अगदि १/२ चमचा पुरते. रेडिमेड चॉकलेट मिल्क आणण्यापेक्षा हे कितीतरी पटींनी मस्त. मुलं चटचट दुध संपवतात!

In reply to by दिपाली पाटिल

दिपक.कुवेत 22/05/2014 - 11:28
हम्म चालेल पण मग दुध घालायची गरज पडणार नाहि असं दिसतय पण ते घालुन त्याचा गोळा कितपत घट्ट होईल त्या बाबतीत जरा साशंक आहे. मिश्रण कदाचीत सैल राहण्याची शक्यता आहे.

दिपक.कुवेत 20/05/2014 - 13:10
काय अप्रतिम रोल दिसत आहेत. शीवाय करायलाहो सोपे. तोंडात घातल्याक्षणीच विरघळतील. खोबर्‍याबरोबर सुका मेवाहि रोल मधे टाकल्यास अजुन रिचनेस येईल. बाकि ह्या निमित्ताने मुविनीं घारापुरी कट्ट्याला आणलेल्या चॉकलेट वड्या आठवल्या. त्या हि अश्याच अप्रतिम झाल्या होत्या.

दिपक.कुवेत 20/05/2014 - 19:07
अरे तेच तेच चॉकलेट काय परत परत खातोयेस?? ट्रे मधे बाकिची पण आहे ती एक तर खा तरी नाहितर आम्हाला तरी वाट

दिपक.कुवेत 21/05/2014 - 11:00
ड्रिंकिंग चॉकलेट पावडर स्वरुपातच उपलब्ध आहे. कोणत्याहि सुपरमार्केट/मॉल मधे कॅडबरी ब्रँडची मिळेल. हि पावडर नुसत्या दुधात घालुनहि (अजीबात साखर न घालता) छान लागते आणि अगदि १/२ चमचा पुरते. रेडिमेड चॉकलेट मिल्क आणण्यापेक्षा हे कितीतरी पटींनी मस्त. मुलं चटचट दुध संपवतात!

In reply to by दिपाली पाटिल

दिपक.कुवेत 22/05/2014 - 11:28
हम्म चालेल पण मग दुध घालायची गरज पडणार नाहि असं दिसतय पण ते घालुन त्याचा गोळा कितपत घट्ट होईल त्या बाबतीत जरा साशंक आहे. मिश्रण कदाचीत सैल राहण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्याची सुट्टी लागली तशी चार दिवस आईकडे रहायला गेले.बरोबर मुल होतीच.मग काय मुलांसाठी रोज एक नविन पदार्थ करण्याची आई आणि मामीची लगबग सुरु झाली.त्यातले मुलांना खूप आवडले ते त्यांच्या मामीने केलेले चोकलेट रोल.

संग्रह

आशु जोग ·

आशु जोग 20/05/2014 - 18:57
६० / ७० दशक हा माझा संग्रह आहे... तो इतका मागे जाऊ शकणार नाही ;)

सुहासदवन 20/05/2014 - 19:18
त्यावेळी देखील भाजपा-सेना युतीला भ्रष्टाचार आणि महागाई ह्याच विषयांवर मते मागावी लागली होती आणि अगदी आता झालेल्या निवडणुकांत देखील त्याच मुद्यांवर मते मागीतली गेली. म्हणजे अजून देखील जास्त काही बदललेले नाही.

विकास 20/05/2014 - 21:04
असे अजून (इतर कुणाकडे असल्यास) फोटो पहायला आवडतील. :) तसेच घोषणा आठवत असल्यास त्या देखील लिहूयात... मला आठवणार्‍या काही घोषणा: आणिबाणीपूर्व काँग्रेसची निशाणी: गायवासरू नका विसरू Congress वर जनतापार्टीची निशणी आली आहेच... देशासाठी कष्टकरी नांगरधारी शेतकरी! JP आणिबाणीनंतरची कॉंग्रेस - ताई-माई-अक्का, विचार करा पक्का आणि हातावर मारा शिक्का अथवा न जातपर न पातपर इंदिराजी की बातपर, मुहंर लगाओ हातपर INC इंदिराहत्येनंतर - जबतक सूरज चांद रहेगा, इंदिरा तेरा नाम रहेगा अथवा इंदिराजी की अंतिम इच्छा बुंद बुंद से देश की रक्षा जेंव्हा शिवसेनेला एखादीच जागा मिळायची त्या काळात शिवसेनेची घोषणा: सुखात सगळे साथीदार, दु:खात, संकटात फक्त शिवसेनेचा आधार. १९८४ अथवा नंतरच्या काळातील पुलोद (पुरोगामी लोकशाही दल) निवडणुका लढण्याच्या काळात शरद पवारांबाबतः "महाराष्ट्राचा बुलंद आवाज!" (जो नंतर इंदिरा बँजो बँड मधे सामिल झाला! ;) ) भाजपाची मला फक्त "अबकी बारी अटलबिहारी" आणि "अबकी बार मोदी सरकार" या दोनच घोषणा आठवत आहेत..

कलंत्री 20/05/2014 - 21:10
मुंबई हो या गोहत्ती, अपना देश और अपनी मिट्टी. आणिबाणी के तिन दलाल, संजय शुक्ला और बन्सिलाल. राम जेठमलानी गोखलेको पिलो दो पाणी. पाणीवाली दिल्लीमे और दिल्लीवाली पाणीमै

जोशी 'ले' 20/05/2014 - 22:12
हे प्रचार साहित्य तर आता हद्दपारच झालंय, मला आठवतय ती 1989 विधानसभा निवडणुक तेव्हा आम्हि नगर ला रहायचो, मी पाचवी / सहावी ला असेल पण या बिल्यांमुळे व भित्तीचित्रां मुळे तसेच रिक्षां वरच्या प्रचारा मुळे नगर शहरातले प्रमुख उमेदवारांची नावे अजुनही लक्षात आहे.. काॅंग्रेस चे दादा'भाऊ' कळमकर, जनतादला चे अरुण'काका' जगताप अपक्ष बाबु'भाई' बार्शीकर वर तेंव्हापासुनचे आमदार शिवसेनेचे अनिल'भैय्या' राठोड.. या नावांवरुन केसरी मधले व्यंगचित्र सुध्दा आठवतयं .. भाउ, काका,भाई, - भैय्या मतदारांना मामा नाहि बनवलं म्हंजे मिळवली :-)

आशु जोग 20/05/2014 - 18:57
६० / ७० दशक हा माझा संग्रह आहे... तो इतका मागे जाऊ शकणार नाही ;)

सुहासदवन 20/05/2014 - 19:18
त्यावेळी देखील भाजपा-सेना युतीला भ्रष्टाचार आणि महागाई ह्याच विषयांवर मते मागावी लागली होती आणि अगदी आता झालेल्या निवडणुकांत देखील त्याच मुद्यांवर मते मागीतली गेली. म्हणजे अजून देखील जास्त काही बदललेले नाही.

विकास 20/05/2014 - 21:04
असे अजून (इतर कुणाकडे असल्यास) फोटो पहायला आवडतील. :) तसेच घोषणा आठवत असल्यास त्या देखील लिहूयात... मला आठवणार्‍या काही घोषणा: आणिबाणीपूर्व काँग्रेसची निशाणी: गायवासरू नका विसरू Congress वर जनतापार्टीची निशणी आली आहेच... देशासाठी कष्टकरी नांगरधारी शेतकरी! JP आणिबाणीनंतरची कॉंग्रेस - ताई-माई-अक्का, विचार करा पक्का आणि हातावर मारा शिक्का अथवा न जातपर न पातपर इंदिराजी की बातपर, मुहंर लगाओ हातपर INC इंदिराहत्येनंतर - जबतक सूरज चांद रहेगा, इंदिरा तेरा नाम रहेगा अथवा इंदिराजी की अंतिम इच्छा बुंद बुंद से देश की रक्षा जेंव्हा शिवसेनेला एखादीच जागा मिळायची त्या काळात शिवसेनेची घोषणा: सुखात सगळे साथीदार, दु:खात, संकटात फक्त शिवसेनेचा आधार. १९८४ अथवा नंतरच्या काळातील पुलोद (पुरोगामी लोकशाही दल) निवडणुका लढण्याच्या काळात शरद पवारांबाबतः "महाराष्ट्राचा बुलंद आवाज!" (जो नंतर इंदिरा बँजो बँड मधे सामिल झाला! ;) ) भाजपाची मला फक्त "अबकी बारी अटलबिहारी" आणि "अबकी बार मोदी सरकार" या दोनच घोषणा आठवत आहेत..

कलंत्री 20/05/2014 - 21:10
मुंबई हो या गोहत्ती, अपना देश और अपनी मिट्टी. आणिबाणी के तिन दलाल, संजय शुक्ला और बन्सिलाल. राम जेठमलानी गोखलेको पिलो दो पाणी. पाणीवाली दिल्लीमे और दिल्लीवाली पाणीमै

जोशी 'ले' 20/05/2014 - 22:12
हे प्रचार साहित्य तर आता हद्दपारच झालंय, मला आठवतय ती 1989 विधानसभा निवडणुक तेव्हा आम्हि नगर ला रहायचो, मी पाचवी / सहावी ला असेल पण या बिल्यांमुळे व भित्तीचित्रां मुळे तसेच रिक्षां वरच्या प्रचारा मुळे नगर शहरातले प्रमुख उमेदवारांची नावे अजुनही लक्षात आहे.. काॅंग्रेस चे दादा'भाऊ' कळमकर, जनतादला चे अरुण'काका' जगताप अपक्ष बाबु'भाई' बार्शीकर वर तेंव्हापासुनचे आमदार शिवसेनेचे अनिल'भैय्या' राठोड.. या नावांवरुन केसरी मधले व्यंगचित्र सुध्दा आठवतयं .. भाउ, काका,भाई, - भैय्या मतदारांना मामा नाहि बनवलं म्हंजे मिळवली :-)
कोण कसला संग्रह करेल सांगता येत नाही पण निवडणूक प्रचार साहित्याचा संग्रह करण्याचा प्रयत्न केला होता... आपण तो पहावा आणि आपल्याही याबाबतच्या आठवणी असतील तर इथे लिहाव्यात १५ फेब १९९० . अण्णा जोशींची विधानसभा निवडणूक . कसबा विधानसभा... . अण्णांची यशस्वी लोकस

पहिला पाऊस...

nasatiuthathev ·

मदनबाण 20/05/2014 - 12:21
स्वागत आहे.... पावसा वरुन एक मस्त गाणं आठवल... जाता जाता :--- पावसा पावसा लवकर ये... उगा दुष्काळाचे भ्या दाखवु नको ! मागल्या वर्षी माझ्या राज्यातली जनता गटाराचे पाणी पिउन जगली रे ! त्यांची तहान आता तरी भागव...

लिखाणाचा पहिला प्रयत्नही बरेचदा पहिल्या पावसावरच आजमवावासा वाटतो, किंवा पहिला पाऊसच आपल्याला लिहायला भाग पाडतो. गेल्या पावसाळ्याने मलाही सुख म्हणजे काय असते ते लिहायला स्फुरले होते. पुढे त्याचे आणखीही भाग झाले ज्यात अधूनमधून पाउस डोकावत होताच. तुम्हालाही या पावसाळ्यात सुचत जाईल तसे लिहित जालच, शुभेच्छा :)

मदनबाण 20/05/2014 - 12:21
स्वागत आहे.... पावसा वरुन एक मस्त गाणं आठवल... जाता जाता :--- पावसा पावसा लवकर ये... उगा दुष्काळाचे भ्या दाखवु नको ! मागल्या वर्षी माझ्या राज्यातली जनता गटाराचे पाणी पिउन जगली रे ! त्यांची तहान आता तरी भागव...

लिखाणाचा पहिला प्रयत्नही बरेचदा पहिल्या पावसावरच आजमवावासा वाटतो, किंवा पहिला पाऊसच आपल्याला लिहायला भाग पाडतो. गेल्या पावसाळ्याने मलाही सुख म्हणजे काय असते ते लिहायला स्फुरले होते. पुढे त्याचे आणखीही भाग झाले ज्यात अधूनमधून पाउस डोकावत होताच. तुम्हालाही या पावसाळ्यात सुचत जाईल तसे लिहित जालच, शुभेच्छा :)
पहिला पाऊस !!!!
पहिला पाऊस खूप जणांना वेड लावतो म्हणे ????? वेड ???? पण कुठले वेड ???? आनंदाचे , उत्साहाचे ,प्रेमाचे चैतन्याचे कि काही आठवणींनी आपल्याला वेड करतो ???कि विरहाने ??? पण मला तर नेहमी एक नवचैतन्य ,नव आशा दाखवत असतो . पहिला पाऊस म्हणजे प्रेम कवींचा हक्काचा विषय !!!! आणि त्या विषयावर प्रत्येक नव्या -जुन्या , उमलणाऱ्या ,विझाणाऱ्या कवीची एक तरी कविता !!!!!!!! पहिला पाऊस आणि विरह यांचे एक अतूट नात आहे.

जादूगर तू जादूगर, दाढीवाला तू जादूगर

पगला गजोधर ·

मदनबाण 20/05/2014 - 11:47
काहो... गजोधरवा. कौनो प्राब्लेम-वाल्बेम हुइ गवा का ? इ कौनसी रचना का आविस्कार करत रही तूम ? तोहार को मोदी आसिडीटी का प्राब्लेमवा हुइ गवा है... इ हमार प्रथम निदान रही तोहरी इ रचरना-वचना पढ के | इक बात बताव, मोदी तो अब आवत है, पर जो कांग्रेस बैठन रही तुम्हारी छातीपर १० साल, तब तोहार रचनाकारी को का सॉंप सुंघ गया था ? तोहार पागपलन पर एक जालिम नुस्का देता रहा हुं... मोदी-मोदी नाम रट, का पता... तोहार पागलपन इस नाम से ही ठीक होइ जाई ! तोहार हितचिंतक {मदन बिहारी} ;)

होबासराव 20/05/2014 - 12:02
एक नंबर प्रतिसाद्.....तुमच्या स्वाक्षरी वरुन तरी या आम्लपित्त झालेल्यानी काहि बोध घ्यावा हि माफक अपेक्षा.

मदनबाण 20/05/2014 - 11:47
काहो... गजोधरवा. कौनो प्राब्लेम-वाल्बेम हुइ गवा का ? इ कौनसी रचना का आविस्कार करत रही तूम ? तोहार को मोदी आसिडीटी का प्राब्लेमवा हुइ गवा है... इ हमार प्रथम निदान रही तोहरी इ रचरना-वचना पढ के | इक बात बताव, मोदी तो अब आवत है, पर जो कांग्रेस बैठन रही तुम्हारी छातीपर १० साल, तब तोहार रचनाकारी को का सॉंप सुंघ गया था ? तोहार पागपलन पर एक जालिम नुस्का देता रहा हुं... मोदी-मोदी नाम रट, का पता... तोहार पागलपन इस नाम से ही ठीक होइ जाई ! तोहार हितचिंतक {मदन बिहारी} ;)

होबासराव 20/05/2014 - 12:02
एक नंबर प्रतिसाद्.....तुमच्या स्वाक्षरी वरुन तरी या आम्लपित्त झालेल्यानी काहि बोध घ्यावा हि माफक अपेक्षा.
चाल: बाझीगर ओ बाझीगर चित्रपट : बाझीगर (सदर चित्रपटात शारूक पूर्वार्धात खून करतो… वैगरे वैगरे , तरी पब्लिक त्याला हिरो मानते … या चित्रपटा नंतरच हिरो व विलेन दोघा मधली रेषा पुसट व्हायला लागली . . चू भू दे घे असो तरी या चित्रपटाचा इथे काही संबंध नाही) वो किसन, झालता थकेला, तू खेल अस्सा केला, कोमात गेले पार्टीतले सगले उपवर. जादूगर तू जादूगर, दाढीवाला तू जादूगर ।।ध्रु ।। ओ ग्रोथ बोलके, मत लिया है, वादा अच्छेदिनोका, किया है, दिल्लीकी बाझी जिता, राजधर्मको भूलाकर ।।ध्रु ।। चुपकेसे आंटीलाके हस्ते, तू मेरे टीवीमें समाया, मेहेन्गाईकि चाय पिलाके, सबको दिवाना बनाया .

पार्वतीची व्यथा

कहर ·

नित्य नुतन 20/05/2014 - 11:47
दोनदा वाचूनही फारशी नाही कळली ... काही तरी गहन अर्थ असावा ... नक्कीच ... संदर्भासहित सपष्टीकरण मिळेल का हो ? खूप उत्सुकता लागून राहिली हो ...

In reply to by कहर

आत्मशून्य 22/05/2014 - 08:43
विशेषत: कवितेचे नावच संदर्भ आह म्हणने प्रचंड गोंधळदायक झाले आहे. अथवा विनाकारण विनासंदर्भ शिव पार्वती यात गोवायचा आचरटपणा घडला आहे वाटते. जरा कविता सम्जावाल काय ?

नित्य नुतन 20/05/2014 - 11:47
दोनदा वाचूनही फारशी नाही कळली ... काही तरी गहन अर्थ असावा ... नक्कीच ... संदर्भासहित सपष्टीकरण मिळेल का हो ? खूप उत्सुकता लागून राहिली हो ...

In reply to by कहर

आत्मशून्य 22/05/2014 - 08:43
विशेषत: कवितेचे नावच संदर्भ आह म्हणने प्रचंड गोंधळदायक झाले आहे. अथवा विनाकारण विनासंदर्भ शिव पार्वती यात गोवायचा आचरटपणा घडला आहे वाटते. जरा कविता सम्जावाल काय ?
देऊळ कफल्लक , वितळू लागे खांब गाभारी ध्यानस्थ तरीही सांब दुरून पार्वती जपे कसे सौभाग्य रोज उशीवर विरघळलेले थेंब ही आर्त हाक कि वनी लागली आग चिंतेत पार्वती कुठवर जपू विराग उंब-यात पाउल चाहूल सदाशिवाची अर्ध्यावर तुटले स्वप्न... आली का जाग ?

गमभन.ऑर्ग - ऐकू आनंदे

ॐकार ·

In reply to by तुमचा अभिषेक

ध्वनिमुद्रितांचे अधिकार गमभन.ऑर्ग कडे राहतील. यात उत्तर आहे असे मला वाटते.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

ॐकार 20/05/2014 - 18:21
फुकटात म्हणजे पैसे न घेता इतकेच. त्यासाठीचे तंत्र, कौशल्य, कला , वेळ इ . इ. आवड आणि हौस म्हणून करत असल्याने तसेच सर्वांसाठी मोफत ठेवायचे असल्याने Kind is pref. over cash. अधिकाराच्या कक्षेत ही ध्वनिमुद्रणे विकणे किंवा नाव बदलून , काटछाट करून पुनर्संपादित करणे इ.इ. बाबी येतील. We are seeking GPL/LGPL version for such a media content. याव्यतिरिक्त अधिकार लादण्याची इच्छा आणि शक्तीही नाही :)

विकास 20/05/2014 - 06:41
गमभन चे आम्ही पंखे आहोत, त्यामुळे विशेष शुभेच्छा! :) बाकी रेकॉर्डींग हे आपले आपण करणे सध्याच्या तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. त्यामुळे विशिष्ठ स्टूडीओत का यायला हवे? (उद्या नाहीतर मला बॉस्टनहून येयचे झाले तर एकावेळ पेक्षा जास्त डबा आणावा लागेल म्हणून विचारत आहे. ;) )

In reply to by विकास

ॐकार 20/05/2014 - 18:11
स्टुडिओ मधे यायची गरज नाही. तुम्ही स्वतः Noiseless recording करून wav file पाठवल्यासही चालेल. आमचा स्टुडिओ नाही. आम्हीही घरबसल्याच रेकॉर्डिंग करतो - फक्त Microphone, Mixer इ. साधने प्रत्येकाकडे उपलब्ध असतातच असे नाही. उत्तम प्रतीचे Vocal Recording पाठवता येणार असेल तर उत्तमच आहे.

रामदास 20/05/2014 - 11:32
माझ्याकडे तयार असलेली पाच मिनीटापेक्षा जास्त अशी मुद्रणे प्रकाशित करता येतील का ? मुद्रणावर माझे अधिकार कायम असतील का ?

In reply to by रामदास

ॐकार 20/05/2014 - 18:14
तुमच्याकडे तयारच असतील तर आम्ही कोण हक्क सांगणारे :D . त्यात Background scores, sound effects इ. नको असेल तर ते तुमचेच आहे आणि त्याच अधिकारत आम्ही आनंदात ठेऊ गमभनवर

In reply to by ॐकार

बहुगुणी 21/05/2014 - 03:06
रामदासांनी पाच मिनिटंच काय पाच तासांचं ध्वनिमुद्रण जरी ऐकवलं तर माझ्यासारखे असंख्य श्रोते वाट पाहतील! कृपया कराच, रामदासजी! 'मनकर्णिका' (राठीतील वीन कर्णिका") या नावाने असा प्रयत्न मी याआधी मिपावरच लेख लिहून केला होता, ज्यात मिपावर खूप प्रशंसल्या गेलेल्या 'वामनसुत'-लिखित 'स्मृतीगंध' लेखमालिकेचे श्राव्य रुपांतर धनिमुद्रित केलेलं होतं. ते सगळं जिथे एका विनामूल्य सर्व्हर टाकलेलं होतं, तो सर्व्हरच आता गायब झाल्याने, आता उपलब्ध नाही, पण एक भाग सापडला जो खाली देतो आहे http://www.divshare.com/download/25576646-5c9 असं ध्वनिमुद्रण चालणार असेल तर कळवा, नक्की सहभाग घ्यायला आवडेल.

आदूबाळ 21/05/2014 - 00:56
एक सुचवू का? Audio books या प्रकल्पापेक्षा मराठी जालजगताला OCR / handwritten text recognition या प्रकाराची जास्त निकड आहे. ते साध्य झाल्यास मिपा सारख्या संस्थळांवरच्या लेखनाची संख्या exponentially वाढेल.

वाचन संस्कृतीला, अभिनव, श्राव्य-आयाम प्रदान करणार्‍या ह्या अलौकिक प्रकल्पास हार्दिक शुभेच्छा! ह्यात सक्रिय सहभागाची अभिलाषा निर्माण झाली आहे. ती संतृप्त होवो!

In reply to by तुमचा अभिषेक

ध्वनिमुद्रितांचे अधिकार गमभन.ऑर्ग कडे राहतील. यात उत्तर आहे असे मला वाटते.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

ॐकार 20/05/2014 - 18:21
फुकटात म्हणजे पैसे न घेता इतकेच. त्यासाठीचे तंत्र, कौशल्य, कला , वेळ इ . इ. आवड आणि हौस म्हणून करत असल्याने तसेच सर्वांसाठी मोफत ठेवायचे असल्याने Kind is pref. over cash. अधिकाराच्या कक्षेत ही ध्वनिमुद्रणे विकणे किंवा नाव बदलून , काटछाट करून पुनर्संपादित करणे इ.इ. बाबी येतील. We are seeking GPL/LGPL version for such a media content. याव्यतिरिक्त अधिकार लादण्याची इच्छा आणि शक्तीही नाही :)

विकास 20/05/2014 - 06:41
गमभन चे आम्ही पंखे आहोत, त्यामुळे विशेष शुभेच्छा! :) बाकी रेकॉर्डींग हे आपले आपण करणे सध्याच्या तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. त्यामुळे विशिष्ठ स्टूडीओत का यायला हवे? (उद्या नाहीतर मला बॉस्टनहून येयचे झाले तर एकावेळ पेक्षा जास्त डबा आणावा लागेल म्हणून विचारत आहे. ;) )

In reply to by विकास

ॐकार 20/05/2014 - 18:11
स्टुडिओ मधे यायची गरज नाही. तुम्ही स्वतः Noiseless recording करून wav file पाठवल्यासही चालेल. आमचा स्टुडिओ नाही. आम्हीही घरबसल्याच रेकॉर्डिंग करतो - फक्त Microphone, Mixer इ. साधने प्रत्येकाकडे उपलब्ध असतातच असे नाही. उत्तम प्रतीचे Vocal Recording पाठवता येणार असेल तर उत्तमच आहे.

रामदास 20/05/2014 - 11:32
माझ्याकडे तयार असलेली पाच मिनीटापेक्षा जास्त अशी मुद्रणे प्रकाशित करता येतील का ? मुद्रणावर माझे अधिकार कायम असतील का ?

In reply to by रामदास

ॐकार 20/05/2014 - 18:14
तुमच्याकडे तयारच असतील तर आम्ही कोण हक्क सांगणारे :D . त्यात Background scores, sound effects इ. नको असेल तर ते तुमचेच आहे आणि त्याच अधिकारत आम्ही आनंदात ठेऊ गमभनवर

In reply to by ॐकार

बहुगुणी 21/05/2014 - 03:06
रामदासांनी पाच मिनिटंच काय पाच तासांचं ध्वनिमुद्रण जरी ऐकवलं तर माझ्यासारखे असंख्य श्रोते वाट पाहतील! कृपया कराच, रामदासजी! 'मनकर्णिका' (राठीतील वीन कर्णिका") या नावाने असा प्रयत्न मी याआधी मिपावरच लेख लिहून केला होता, ज्यात मिपावर खूप प्रशंसल्या गेलेल्या 'वामनसुत'-लिखित 'स्मृतीगंध' लेखमालिकेचे श्राव्य रुपांतर धनिमुद्रित केलेलं होतं. ते सगळं जिथे एका विनामूल्य सर्व्हर टाकलेलं होतं, तो सर्व्हरच आता गायब झाल्याने, आता उपलब्ध नाही, पण एक भाग सापडला जो खाली देतो आहे http://www.divshare.com/download/25576646-5c9 असं ध्वनिमुद्रण चालणार असेल तर कळवा, नक्की सहभाग घ्यायला आवडेल.

आदूबाळ 21/05/2014 - 00:56
एक सुचवू का? Audio books या प्रकल्पापेक्षा मराठी जालजगताला OCR / handwritten text recognition या प्रकाराची जास्त निकड आहे. ते साध्य झाल्यास मिपा सारख्या संस्थळांवरच्या लेखनाची संख्या exponentially वाढेल.

वाचन संस्कृतीला, अभिनव, श्राव्य-आयाम प्रदान करणार्‍या ह्या अलौकिक प्रकल्पास हार्दिक शुभेच्छा! ह्यात सक्रिय सहभागाची अभिलाषा निर्माण झाली आहे. ती संतृप्त होवो!
नमस्कार! लोकांना पैसे खर्च न करता युनिकोड मध्ये टाईप करता यायलाच हवे ह्या निकषावर मी गमभन चकटफु केले त्याला आता जवळपास नऊ वर्षं होत आली. आज हॅन्डहेल्ड डिव्हाइसेस आलेली असताना - गमभन चे तंत्र कालबाह्य होईल हे नक्की आहे. Physical किबोर्ड नसल्याने त्याला येणार्‍या मर्यादाच नाहीत त्यामुळे हे बदल स्वाभाविक आहेत. पण ह्या सर्वाचा विचार करता एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे मोबाईल किंवा तत्सम डिव्हाइसेसच्या लहान स्क्रीन आणि सारखे scroll करावे लागताना होणारा त्रास.

पौष्टिक मेथी धिरडे

सानिकास्वप्निल ·

In reply to by मदनबाण

सस्नेह 19/05/2014 - 22:19
अशी सुरेख जाळी पडण्यासाठी पीठ एक तर रात्रभर भिजत ठेवावे लागते नाहीतर त्यात सोडा घालावा लागतो. सानिकातैंच्या हाताचा गुण म्हणून असली भारी जाळी पडली आहे.

In reply to by सस्नेह

ह्या पिठात न सोडा घातला ना रात्रभर भिजवले, सुरेख जाळी येण्यासाठी थोड्या वरुन वाटीने पिठ तव्यावर ओतावे निदान मलातरी असा अनुभव आहे :) धन्यवाद.

In reply to by सस्नेह

जाळी पडण्यासाठी फ्राय पॅन किंवा तवा भरपूर तापलेला असला पाहीजे. त्यावर तेल टाकून साधारण धूर सदृष तापमानाला आला की ताकासारखे भिजवलेले पीठ त्यावर टाकावे लगेच जाळी पडते. कारण असे की तापलेल्या तव्यावर पीठाची धार पडताच अतिउष्णतेने त्यातील पाण्याची वाफ होऊन बाहेर पडते आणि बाहेर पडताना धिरड्याला जाळी पडते. पीठ आणि पाणी ह्याचे प्रमाण व्यवस्थित पाहिजे. पीठ घट्ट असेल तर विशेष जाळी पडत नाही आणि जास्त पातळ झाले तर धिरडे काढताना फाटू शकते. साधारण घट्ट ताकासारखे पीठ भिजवावे.

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह............... http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/super-hungry.pngस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल शेवटच्या फोटूतून नजर हलत नाहीये! http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif

In reply to by स्पंदना

सूड 19/05/2014 - 22:30
>>नाही जाळी पडतेच!! असेल असेल!! कोकणातल्या लोकांना घावन, आंबोळ्या, धिरडी करायची सवय असते. त्यामुळे जाळी आपसुक 'येते' पाडावी लागत नाही. म्हणून आम्ही आलीये म्हणतो. घाटावर महत्प्रयासाने पाडावी लागत असेल तर 'पडते' म्हणा. काहीही म्हणणं नाही. ;) ह. घ्या. हो. *mosking*

स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प !!!!!!!!!!!!!

In reply to by मनिष

१/२ वाटी मेथ्यांची छान चव लागते , करताना कधी ताजी मेथी घातली नाही तुम्ही ट्राय करु शकता, थोडीच घाला नाहीतर कडसर लागेल आधीच मेथीदाणे आहेत. धन्यवाद :)

विवेकपटाईत 12/06/2014 - 20:23
मस्त धिरडे. पाणी सुटल. हा प्रकार मला खायला आवडतो. कार्यालयातून परतल्यावर बहुतेक कुठला न कुठला धीरडा महिन्यातून ५-७ वेळा तरी खायला मिळतो. हिरवी मेथी बारीक चिरून नुसत्या बेसन किंवा बेसन + तांदूळाच्या पिठात मिसळून धिरडी केली तरी मस्त लागतील.

In reply to by मदनबाण

सस्नेह 19/05/2014 - 22:19
अशी सुरेख जाळी पडण्यासाठी पीठ एक तर रात्रभर भिजत ठेवावे लागते नाहीतर त्यात सोडा घालावा लागतो. सानिकातैंच्या हाताचा गुण म्हणून असली भारी जाळी पडली आहे.

In reply to by सस्नेह

ह्या पिठात न सोडा घातला ना रात्रभर भिजवले, सुरेख जाळी येण्यासाठी थोड्या वरुन वाटीने पिठ तव्यावर ओतावे निदान मलातरी असा अनुभव आहे :) धन्यवाद.

In reply to by सस्नेह

जाळी पडण्यासाठी फ्राय पॅन किंवा तवा भरपूर तापलेला असला पाहीजे. त्यावर तेल टाकून साधारण धूर सदृष तापमानाला आला की ताकासारखे भिजवलेले पीठ त्यावर टाकावे लगेच जाळी पडते. कारण असे की तापलेल्या तव्यावर पीठाची धार पडताच अतिउष्णतेने त्यातील पाण्याची वाफ होऊन बाहेर पडते आणि बाहेर पडताना धिरड्याला जाळी पडते. पीठ आणि पाणी ह्याचे प्रमाण व्यवस्थित पाहिजे. पीठ घट्ट असेल तर विशेष जाळी पडत नाही आणि जास्त पातळ झाले तर धिरडे काढताना फाटू शकते. साधारण घट्ट ताकासारखे पीठ भिजवावे.

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह............... http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/super-hungry.pngस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल शेवटच्या फोटूतून नजर हलत नाहीये! http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif

In reply to by स्पंदना

सूड 19/05/2014 - 22:30
>>नाही जाळी पडतेच!! असेल असेल!! कोकणातल्या लोकांना घावन, आंबोळ्या, धिरडी करायची सवय असते. त्यामुळे जाळी आपसुक 'येते' पाडावी लागत नाही. म्हणून आम्ही आलीये म्हणतो. घाटावर महत्प्रयासाने पाडावी लागत असेल तर 'पडते' म्हणा. काहीही म्हणणं नाही. ;) ह. घ्या. हो. *mosking*

स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प !!!!!!!!!!!!!

In reply to by मनिष

१/२ वाटी मेथ्यांची छान चव लागते , करताना कधी ताजी मेथी घातली नाही तुम्ही ट्राय करु शकता, थोडीच घाला नाहीतर कडसर लागेल आधीच मेथीदाणे आहेत. धन्यवाद :)

विवेकपटाईत 12/06/2014 - 20:23
मस्त धिरडे. पाणी सुटल. हा प्रकार मला खायला आवडतो. कार्यालयातून परतल्यावर बहुतेक कुठला न कुठला धीरडा महिन्यातून ५-७ वेळा तरी खायला मिळतो. हिरवी मेथी बारीक चिरून नुसत्या बेसन किंवा बेसन + तांदूळाच्या पिठात मिसळून धिरडी केली तरी मस्त लागतील.
साहित्य मेथी धिरडे पीठः ६ वाट्या तांदूळ २ वाट्या तूरडाळ २ वाट्या चणाडाळ २ वाट्या उडीदडाळ २ वाट्या ज्वारी १ वाटी गहू १ वाटी धणे १/२ वाटी मेथीदाणे वरील सर्व जिन्नस न भाजता एकत्र दळून आणा. (प्रमाण आईचे आहे, त्याप्रमाणे मी पिठ दळून आणते व हवे तेव्हा ही धिरडी बनवते) साहित्यः २ वाट्या तयार धिरडे पीठ १०-१५ लसूण ठेचून (भरपुर लसूण घालावा, मेथी+लसूण भन्नाट चव लागते) १/२ टीस्पून हळद १-१/२ टीस्पून लाल तिखट मीठ चवीनुसार २ चमचे तेल

राज्यसभेच जटील गणित

माहितगार ·

आनन्दा 19/05/2014 - 13:44
राज्यसभेचे गणित अवघड आहे हे तर खरेच. पण सत्तेवर आल्या आल्या मोदी ३७० वगैरे विषयांना हात घालतील अशी शक्यता कठीण वाटते, ते प्रथम आर्थिक प्रश्नांना हात घालतील असा माझा अंदाज आहे. आर्थिक सुधारणांची विधेयके राज्यसभा सबळ कारणाशिवाय अडवू शकत नाही, आणि अशी विधेयके जर संयुक्त अधिवेशन बोलवून ती मंजून करून घ्यावी लागली तर त्याने मोदींचे गुडविल आणखीनच वाढेल, त्यामुळे बाकीचे अशी आडमुठी भूमिका घेतील असे वाटत नाही. ४ वर्षे सुशासन देऊन अर्ध्या अधिक विधानसभा आपल्याकडे घ्यायच्या आणि नंतर निवडणूकांपूर्वी राम-मंदिर, ३७० वगैरे विषय घ्यायचे अशी मोदींची रणनीती राहील असे वाटते.

In reply to by आनन्दा

माहितगार 19/05/2014 - 14:32
लेख विवाद्य विषय समोर ठेऊन लिहिलेला नाही. राजकारणात अडवाअडवी केवळ विवाद्य विषयांवरच होते असे नाही. निव्वळ घोडेबाजारातील हिशेबांची व्यवस्था लावण्यासाठी अविवाद्य विषयावर सुद्धा होऊ शकते. साधे विधेयक जरी कमिटीकडे पाठवा असा ठराव सरकार विरोधात पास झाला तरी त्याच्या महत्वाचे आकलन आणि पडद्याच्या मागे काय चालु आहे ह्याची सर्वसामान्यांना माहितीचे फारसे साधन काही नाही. खाली बिरुटे सरांचाही प्रतिसाद आहे तोही येथे अनुषंगिक वाटतो. प्रतिसादासाठी धन्यवाद

In reply to by आनन्दा

सुबोध खरे 20/05/2014 - 14:38
४ वर्षे सुशासन देऊन अर्ध्या अधिक विधानसभा आपल्याकडे घ्यायच्या आणि नंतर निवडणूकांपूर्वी राम-मंदिर, ३७० वगैरे विषय घ्यायचे अशी मोदींची रणनीती राहील असे वाटते. यापेक्षा ते ५ वर्षे ४ वर्षे सुशासन देऊन अर्ध्या अधिक विधानसभा आपल्याकडे घ्यायच्या परत लोकसभेची निवडणूक लढवून विकासाच्या मुद्द्यावर जिंकायची आणी परत आल्याआल्या वरील विवादास्पद विषय सोडवून घ्यायचे म्हणजे परत पुढची चार वर्षे गदारोळ शांत होईपर्यंत चिघळलेल्या जखमा बर्या होतील. अशी रणनीती करतील असे वाटते

In reply to by सुबोध खरे

माहितगार 22/05/2014 - 09:51
(या धाग्यासाठी अनुषंगिक अवांतर आहे तरीही विषय काढलायत तेव्हा माझ मतः) मोदींना त्यांचे विरोधक आणि समर्थक दोघेही कितपत समजू शकले आहेत या बद्दल साशंकता वाटते या बद्दल विस्ताराने नंतर कधी लिहीन. मोदींकडे त्यांच्या विरोधकांनाही स्वतःकडे वळवण्याच (प्रसंगी विरोधकांवर कडी करण्याच) आणि स्वतःची वेगळी वाट चोखाळण्याच कौशल्य/मुत्सद्दीपणा आहे. मोदी त्यांच्या बाजूच्या गोतावळ्यापेक्षा वेगळे आहेत असा अंदाज आहे. विवाद्य विषय बहुमत असूनही बहुमताच्या जोरावर सोडवण्यापेक्षा विरोधकांना आपल्या बाजूने वळवून सामोपचाराने सोडवण्यावर त्यांचा भर राहील असा अंदाज आहे आणि तसे होण्या साठी ते विवाद्यविषयांबद्दल अतीघाई सुद्धा टाळतील असे वाटते.

ऋषिकेश 19/05/2014 - 13:46
चांगला लेख - संकलन राज्यसभेचे गणित सोडवणे ही दिड वर्षाची बाब असावी. आंध्र, राजस्थान, मध्यप्रदेश येथून पुढिल १/३ जागांची निवडणूक बहुदा जाने.२०१६ ला होईल (या वर्षी पहिली १/३ जागांची निवडणूक झाली असे गृहित धरून) नी भाजपाला तिथेही बहुमत मिळवणे कठीण जाऊ नये. शिवाय तोवर महाराष्ट्र, कदाचित बिहार येथेही निवडणूका झाल्यासतील तर राज्यसभेत संख्याबळ बरेच वाढले असेल.

अनुप ढेरे 19/05/2014 - 13:51
मस्त लेख ! जॉईंट सेशन घेऊन युपीए सरकारनी कुठली विधेयक पास केली होती का? किंवा इतर सरकरांनी सुद्धा?

In reply to by अनुप ढेरे

माहितगार 19/05/2014 - 14:23
धन्यवाद. मला वाटते मी आणि टाइम्स ऑफ इंडीयाचा लेखक एकाच वेळी एकाच विषयावर लिहित होतो :) हा टाइम्स ऑफ इंडीयावरील हा लेख याच विषयावर आहे. टाइम्स लेखानुसार आतापर्यंत विधेयके पारीत करण्यासाठी भारतीय संसदीय इतिहासात केवळ तीनदा बैठकी झाल्या पण आता भाजपा सरकारला स्वत:ची महत्वाची विधेयके अडकणे टाळण्याकरता हा मार्ग बर्‍याचदा वापरावयास लागेल. प्रतिसादा साठी धन्यवाद

राज्यसभेत एखादे विधेयक बहुमताने कसे मान्य करुन घेता येईल त्यासाठी एखाद्या पक्षाशी भाजपा ला मंत्रीपद वगैरे असे काही घोडेबाजार करावा लागेल काय, (आतून जमवून घ्यावे लागेल) असे वाटून गेले. बाकी, राज्यसभेत विरोध करुन अजून आपल्या पायावर धोंडा कोणी पाडून घेईल असे वाटत नाही. आम्ही तर विधेयक आणले होते राज्यसभेत अमुक अमुक पक्षांनी ते होऊ दिले नाही तेव्हा विधानसभा आपल्या ताब्यात कशा हव्यात याचं राजकारण भाजपा ला करता येईल असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 19/05/2014 - 14:10
आम्ही तर विधेयक आणले होते राज्यसभेत अमुक अमुक पक्षांनी ते होऊ दिले नाही तेव्हा विधानसभा आपल्या ताब्यात कशा हव्यात याचं राजकारण भाजपा ला करता येईल असे वाटते.
होय अडवणूक करणार्‍या विरोधीपक्षाच्या डोक्यावर खापर फोडता येते. अनेक विधेयकांच्या बाबतीत भाजपानेही मनमोहनसिंग सरकारची राज्यसभेत अडवणूक केली पण तेलंगणा राज्य निर्मितीच्या बाबतीत मात्र केली नाही, भाजपाने स्वतःच्या डोक्यावर खापर काँग्रेसने फोडू नये म्हणून अडवणूक करणे टाळले. मुख्य प्रॉब्लेम सर्वसामान्य जनतेला राज्यसभा आणि तिथे सत्ताधारीपक्षाची अडवणूक होऊ शकते हेच मुळी माहीत नसते त्यामुळे अपेक्षांचा भोपळा फुटल्याचा ठपका सत्ताधारी पक्षावर जनतेच्या अनिभिज्ञतेतून येऊ शकतो. विरोधीपक्षावर खापर फोडून फायदा मिळवण्यासाठी राज्यसभा ही जटील संकल्पना जनतेला समजावून देणे म्हणजे सत्ताधारी पक्षाची परीक्षाच पण आजच्या मिडीयाच्या आणि वाढत्या शिक्षणाच्या काळात यात बदल शक्य आहे. आपण म्हणता तसेही होऊ शकते.
राज्यसभेत एखादे विधेयक बहुमताने कसे मान्य करुन घेता येईल त्यासाठी एखाद्या पक्षाशी भाजपा ला मंत्रीपद वगैरे असे काही घोडेबाजार करावा लागेल काय, (आतून जमवून घ्यावे लागेल) असे वाटून गेले.
एनडीएला लोक्सभेत खासदार संख्या ३३६पेक्षा कमी आली असती तर राज्यसभेकरता सुद्धा घोडे बाजार तोही मोठ्या किमतीवर करावा लागू शकला असता पण भाजपाच्या सुदैवाने घोडेबाजाराच्या व्यथेतून थोडक्यात सुटले पण आपण म्हणता तसे 'आतून जमवून घ्यावे लागेल' अगदी ताजे उदाहरण म्हणजे जयललितांनी भाजपाशी तडजोडीचा जाहीर निर्देश करणारा स्वतःच्या पक्षाचा माणूस निलंबीत केला , मोदींचे पत्र लिहून अभिनंदन केले कारण केंद्र सरकारच्या सहकार्या शिवाय राज्याचा कारभारही जमत नाही पण जयललितांना अभिनंदनाचे पत्र मिळाल्यावर धन्यवादासाठी फोन उचलण्याचा पुढाकाराचे पाऊल मात्र मोदींना उचलावे लागले. हे असे बरेच काही होत असले पाहीजे उत्साही प्रतिसादांसाठी आपल्याला आणि सर्वांना धन्यवाद

In reply to by माहितगार

मुख्य प्रॉब्लेम सर्वसामान्य जनतेला राज्यसभा आणि तिथे सत्ताधारीपक्षाची अडवणूक होऊ शकते हेच मुळी माहीत नसते त्यामुळे अपेक्षांचा भोपळा फुटल्याचा ठपका सत्ताधारी पक्षावर जनतेच्या अनिभिज्ञतेतून येऊ शकतो. १०० टक्के सहमत. बाकी, नियमित लिहित चला. वाचक म्हणुन आपले लेखन वाचतोच वाचतो. नेहमीच वेगळा विचार करायला लावणारे लेखन प्रतिसाद असतात आपले. -दिलीप बिरुटे

प्रसाद१९७१ 19/05/2014 - 13:55
खरेतर देशापुढे खरा issue आहे तो execution चा. त्या साठी कुठलेही नविन कायदे, दुरुस्त्या करायची गरज नाही. आहे त्या चौकटीत सुद्धा बरेच काही करता येण्या सारखे आहे. राज्यसभेत बहुमत असले काय आणि नसले काय काही फरक पडत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

माहितगार 19/05/2014 - 14:25
शेवटी सरकारच्या प्राधान्यता (प्रियॉरिटीज) काय आहेत त्यावर अवलंबून आहे, नाही का. प्रतिसादासाठी धन्यवाद

क्लिंटन 19/05/2014 - 17:21
याविषयी २०१० मध्ये मी मिपावरच भारतीय राज्यव्यवस्थेत राष्ट्रपती आणि राज्यसभेचे स्थान हा लेख लिहिला होता त्याची आठवण झाली. राज्यसभा या लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून न दिलेल्या सभागृहाला इतके अधिकार का दिले आहेत हा प्रश्न नक्कीच पडतो.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश 19/05/2014 - 17:27
"फर्स्ट पास्ट द पोस्ट" या पद्धतीतही काही तृटी आहेत तर "प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन" मध्येही आपल्या तृटि आहेत. तसेच दोन्ही पद्धतींचे आपापली बलस्थाने आहेत. शिवाय लोकसभेत जागा नाही मात्र राज्यांमध्ये सत्ता आहे त्यांचाही कायदे निर्मितीत तितकाच सहभाग करण्याचे काम राज्यसभा करते. म्हणूनच मला राज्यसभा असल्याने इतर लोकशाही व्यवस्थापेक्षा आपली व्यवस्था अधिक बलशाली वाटते.

In reply to by क्लिंटन

माहितगार 19/05/2014 - 21:39
राज्यसभा या लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून न दिलेल्या सभागृहाला इतके अधिकार का दिले आहेत हा प्रश्न नक्कीच पडतो.
मला वाटते (म.वा.) या एकुण याचा अर्थ राज्यसभेलाही अधिकार आहेत एवढेच. (म.वा.) या अधिकारांची तुलना विमानास/वाहनास को पायलट असण्याशी करता येते. विमान मुख्यत्वे लोकसभेतील होतकरू वैमानिकांनाच हाकायचे आहे पण भावनेच्या भरात दिशा, वेग किंवा इतर हिशेब चुकण्याची शक्यता तर नाही ना हे पाहण्यासाठी राज्यसभेतील अनुभवी को-पायलट वेग जरासा काही काळाकरता कमी करु शकतात एवढेच. राज्यसभा सध्याचे सर्वसाधारण जनमत आहे त्या पेक्षा फारतर २ ते ६ वर्षे मागे चालते असे म्हणता येईल. सर्वसाधारण जनमत एखाद्या गोष्टीच्या बाजूनेच असेल तर, अप्रत्यक्षपणे राज्यांच्या विधानसभा २-६ वर्षाच्या कालावधीत राज्यसभेतील नेतृत्व/गणित बदलत नेतातच. त्यामुळे राज्यसभेच्या अधिकारांचा अगदीच बाउ करण्यासारखी परिस्थिती आहे असे मला वाटत नाही. लोकसभा मतदारसंघात काही विधानसभा मतदारसंघ असे असतात की जिथे मतदारांनी विरोधी मतदान केले पण लोकसभेत दुसर्‍याच पक्षाचा नेता निवडून गेला असे होते पण विधानसभेत अशा मतदारसंघाचे आमदारांच्या स्वरुपात प्रतिनिधीत्व असते. या आमदारांना विधानसभासदस्यातून सहसा प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनने राज्यसभेवर सदस्य पाठवता येतो त्यामुळे अशा मतदार संघांना रिप्रेझेंट करणार्‍या राज्यातील विचार धारेला संसदेत अंशतः का होईना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळते. उदाहरणार्थ मनसे अथवा शेकाप सारख्या पक्षांचा एखाद्या लोकसभा निवडणूकीत एकही खासदार निवडून येणार नाही पण त्यांचे विधानसभेत आमदार आहेत आणि या आमदारांच प्रतिनिधीत्व करणारा खासदार राज्यसभेत पोहोचू शकतो. एकुण एक चांगला राजकीय समतोल साधला जातो.

In reply to by आजानुकर्ण

माहितगार 19/05/2014 - 21:43
घटना दुरुस्ती कशासाठी करायची आहे?
मला घटना दुरुस्ती कशाचीच करावयाची नाहीए :) राज्यसभेच्या गणिताच विश्लेषण करताना एखाद्या गोष्टीची माहिती न देणेही सयुक्तीक झाले नसते म्हणून माहिती नमुद केली एवढेच. प्रतिसादासाठी धन्यवाद

विकास 19/05/2014 - 18:59
भारतात कायदे भरपूर आहेत पण ते आमलात आणणारे नाहीत आणि त्याच बरोबर निर्णय घेणारे सरकार गेल्या दशकात अस्तित्वात नसल्याने अजूनच गडबड झाली होती. त्यामुळे मला वाटते की मोदी सरकार प्रथम आहे त्या कायद्यांचाच वापर करून राज्य चालवू लागेल. प्रश्न कुठे येऊ शकतो तर अर्थकारणासंदर्भात लागणार्‍या लोकसभा-राज्यसभा संमतींना - जे कदाचीत टेक्नीकली नवीन कायदे असतील पण वास्तवात ते त्या त्या काळापुरते निर्णय असतात. (सगळ्यात मोठे उदा. अर्थसंकल्प).

In reply to by विकास

आजानुकर्ण 19/05/2014 - 19:04
गेल्या दशकात अस्तित्वात नसल्याने
गेल्या दशकात? अणुकरार, मनरेगा, फूड सेक्युरिटी बिल हे ठळकपणे आठवलेले ३ निर्णय. यूपीए-१ मध्ये अनेक चांगले निर्णय घेतल्याने यूपीए-२ मध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा जनादेश मिळाला. असो.

In reply to by आजानुकर्ण

प्रसाद१९७१ 19/05/2014 - 19:16
अणुकरार, मनरेगा, फूड सेक्युरिटी बिल
अश्या कीती अणुभट्ट्या चालू झाल्या गेल्या ५ वर्षात ?( १ पण नाही ). कुठलेही करार पण झाले नाहीत. उपयोग काय त्या अणुकराराचा. फुड बिला नी कोणाला धान्य मिळाले?

In reply to by आजानुकर्ण

आनन्दा 19/05/2014 - 19:20
माझ्यामते युपीए १ ला परत मिळालेला जनादेश हा मुख्यतः भारताच्या बळकत अर्थव्यवेस्थेमुळे मिळाला होता, ज्यामुळे अगदी सामान्य माणूस देखील खूश होता. ही बळकट अर्थव्यवस्था मुख्यत्वे नरसिंहराव, आणि रालोआ यांच्या धोरणांमुळे आली होती.

लेखात सरकारसाठी जी आव्हानात्मक परिस्थिती वर्णिलेली आहे ती काही फारशी नवी नाही. बहुधा रालोआ नव्याने सत्तेमधे आल्यावर अन संपुआच्या सुरुवातीच्या काळात दोन्ही सत्ताधारी आघाड्यांना राज्यसभेत बहुमत नव्हते.

In reply to by श्रीरंग_जोशी

आनन्दा 20/05/2014 - 14:42
खरे आहे, पण त्या सरकारंवर एव्हढे अपेक्षांचे ओझे पण नव्हते. मोदी सरकार डोक्यावर खूप अपेक्षा घेऊन आले आहे. त्यामुळे त्यांना ही परिस्थिती जास्त आव्हानात्मक आहे.

In reply to by आनन्दा

अपेक्षांची तुलना करणे तसे अवघड आहे. पण भूतकाळातील अपेक्षांना क्षूल्लक लेखले जाऊ नये अशी अपेक्षा आहे. मार्च १९९८ मध्ये वाजपेयी सरकार सत्तारूढ होण्यापूर्वी काही वर्षे केंद्रात फारच सुंदोपसुंदी होती. यात राव सरकारचा शेवटचा कार्यकाळ पण आला ज्यात कुठलाही निर्णय न घेणे हाच सर्वात मोठा निर्णय आहे अशी टिका त्यावेळी केली जायची. तोवर भाजप नेतृत्वाच्या सरकारला काम करण्याची संधी मिळाली नव्हती. ती संधी प्रथमच मिळाली होती. १९९१ उदारीकरणाचे लाभ तळागाळापर्यंत आजच्यासारखे मोठ्या प्रमाणात झिरपले नव्हते. सर्वसामान्य जनतेतील बऱ्याच भाजप समर्थकांचा त्या काळात भ्रमनिरास झाल्याचे निरिक्षण आहे.

माहितगार 09/08/2018 - 15:55
राज्य सभेचे गणित गेल्या चार वर्षात बरेच बदलले तरी भाजपा अद्यापी ७३ आणि एनडीए चे इतर पक्ष मिळून केवळ ८९ वर आहे. (पहा इंग्रजी विकिपीडियावरील राज्य सभा लेखातीलतपक्षवार तक्ता) तरीही आज झालेल्या राज्यसभेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत एनडिए घटक पक्षाचे नितीश कुमारांच्या जनता दलाचे उमेदवार हरिवंश नारायण सिंगांना १२५ मते मिळवून विजयश्री ओढवून आणली. हे गणित भाजपाने कसे जुळवले याचे कोडे पडले. ते एन.डिटिव्हीच्या या बातमी ने उलगडले. YSR Congress २ आणि मेहबूबा मुफीतींचे २ आणि अरविंद केजरीवालांचांचे ३ खासदार काँग्रेस नेत्याला सपोर्ट करणार नाही हे त्यांच्या राजकीय भूमिकेशी सुसंगत होते. The majority mark in the 244-member Rajya Sabha is 123, but abstentions pulled it down to 119. चौघे डि एम के खासदार अबसेंट होते ते ठिक त्रिनमुलचे ही एक खासदार अबसेंट असावेत. ऐनवेळी बिजू जनता दलाचे ९ खासदारांचे समर्थन मिळवण्यात भाजपाला यश आले. शिवसेना आणि अकाली दलाने कुरकुर केली तरी मतदान हरिवंश नारायण सिंगांनाच अपेक्षे प्रमाणे केले ८९ + ९ = ९८ खासदारांचा एन डि ए बाजूने हिशेब लागतो; हरिवंश नारायण सिंगांना मते देणारे बाकी २७ खासदार कोण कोणत्या पक्षाचे हयाचे, आणि या प्ढेही उर्वरीत विधेयकांना भाजपाच्या बाजूने येते वर्षभर कौल देत रहातील का याचे कुतूहल आहे. तसे झाल्यास भाजपाची अडकलेली बरीच बीले येत्या वर्षाभरात अधिक सहजपणे मार्गी लागू शकतील. विधेयके पास करुन घेण्यात मोदी सरकारला अधिक मोकळा श्वास घेता येऊ शकेल. त्याच वेळी अती अवलंबित्व ब्लॅकमेलींगची खाण असते त्या साठी काय काय राजकीय किमती मोजाव्या लागत असतील ते सत्ताधार्‍यांना ठाऊक.

In reply to by माहितगार

माहितगार 10/08/2018 - 11:22
ओके जयललीतांच्या ए.आय.ए. डि एम. के च्या थंबीदुराईंना २०१४ मध्ये लोकसभा उपाध्यक्षपदासाठी एन. डि. ए. ने सपोर्ट केल्याच्या बदल्यात राज्यसभा उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत त्यांनी १३ खासदारांचे पारडे एन.डिएच्या हरिवंश नारायण सिंगाच्या बाजूला झुकवले. सोबत चंद्रशेखरराव यांच्या तेलंगाणा राष्ट्र समितीने पलटी मारत ४ खादरांची मते एन.डि. ए. च्या बाजूने टाकली. राज्यसभेतील ६ अपक्ष आणि ४ नॉमीनेटेड मतेही हरिवंश नारायण सिंगाना मिळून १२५ चा आकडा पूर्ण झाला. म्हणजे २०१९ च्या लोक्सभा निवडणूकीत YSR काँग्रेस, मेहबूबा मुफीतीं , अरविंद केजरीवालएन, बिजू जनतादल, ए.आय.ए. डि एम. के , तेलंगाणा राष्ट्र समिती काँग्रेसच्या युपीए. गठंबंधन सोबत जाण्याची शक्यता कमी असेल. भाजपाच्या बाकी विधेयकांवर बिजू जनतादल, ए.आय.ए. डि एम. के , तेलंगाणा राष्ट्र समिती राज्यसभेत काय भूमिका घेत रहातील हे बघणे रोचक असेल.

माहितगार 24/05/2019 - 14:58
पाच वर्षांपुर्वी लेख लिहिताना एन.डी.ए. कडे राज्यसभेत केवळ ६२ राज्यसभा खासदार (भाजपा ४६) अशी स्थिती होती. आता पाच वर्षांनंतर भाजपाचे स्वतःचे ७३ (एन डि ए टोटल१०१) संख्या दहाने वाढण्यासाठी सुद्धा अजून तब्बल एक वर्ष थांबावे लागेल असा कयास आहे. दिल्लीत मोदींनी दणदणीत विजय पुन्हा खेचून आणला तरी विधान सभांच्या बाबतीत एक धरले तर एक सुटते अशीच स्थिती राहीलेली दिसते. उ.प्र. कर्नाटकातील स्थिती सुधारली तर म.प्र. राजस्थान, पंजाब या महत्वाच्या विधानसभा एन.डि . ए पासून दूर गेल्या. येत्या वर्षभरात आणखी विधानसभांच्या निवडणूका आहेत तिथे भाजपा आणि एन डि ए काय करणार याची अद्याप कल्पना नाही. असो

In reply to by माहितगार

राघव 26/05/2019 - 00:37
सध्या रालोआ कडे १०१ आकडा राज्यसभेत आहे. हिंदूस्थान टाईम्स मधील या लेखा प्रमाणे - "By November 2020, the NDA government will secure another 19 seats from as many as 14 states including Uttar Pradesh, Bihar, Tamil Nadu, Gujarat and Madhya Pradesh, helping it go past the halfway mark of 123 and get 125 seats, making it the first government to reach majority in the upper house in nearly 15 years. Most of its seats will come from Uttar Pradesh where it has 310 MLAs in the 403-member assembly. It will also gain 6 seats in Tamil Nadu thanks to its new ally the AIADMK, three in Assam, two in Rajasthan and perhaps one in Odisha — the last one with the help of a friendly party, the BJD." संयुक्त अधिवेशनाचा पर्याय आहेच, पण तसा पायंडा म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असा विरोधकांना कोलीत देण्याचा प्रकार होईल. त्यामुळे शक्यतो या पर्यायाचे अवलंबन मोदी सरकार करेल असे सध्यातरी वाटत नाही.

आनन्दा 19/05/2014 - 13:44
राज्यसभेचे गणित अवघड आहे हे तर खरेच. पण सत्तेवर आल्या आल्या मोदी ३७० वगैरे विषयांना हात घालतील अशी शक्यता कठीण वाटते, ते प्रथम आर्थिक प्रश्नांना हात घालतील असा माझा अंदाज आहे. आर्थिक सुधारणांची विधेयके राज्यसभा सबळ कारणाशिवाय अडवू शकत नाही, आणि अशी विधेयके जर संयुक्त अधिवेशन बोलवून ती मंजून करून घ्यावी लागली तर त्याने मोदींचे गुडविल आणखीनच वाढेल, त्यामुळे बाकीचे अशी आडमुठी भूमिका घेतील असे वाटत नाही. ४ वर्षे सुशासन देऊन अर्ध्या अधिक विधानसभा आपल्याकडे घ्यायच्या आणि नंतर निवडणूकांपूर्वी राम-मंदिर, ३७० वगैरे विषय घ्यायचे अशी मोदींची रणनीती राहील असे वाटते.

In reply to by आनन्दा

माहितगार 19/05/2014 - 14:32
लेख विवाद्य विषय समोर ठेऊन लिहिलेला नाही. राजकारणात अडवाअडवी केवळ विवाद्य विषयांवरच होते असे नाही. निव्वळ घोडेबाजारातील हिशेबांची व्यवस्था लावण्यासाठी अविवाद्य विषयावर सुद्धा होऊ शकते. साधे विधेयक जरी कमिटीकडे पाठवा असा ठराव सरकार विरोधात पास झाला तरी त्याच्या महत्वाचे आकलन आणि पडद्याच्या मागे काय चालु आहे ह्याची सर्वसामान्यांना माहितीचे फारसे साधन काही नाही. खाली बिरुटे सरांचाही प्रतिसाद आहे तोही येथे अनुषंगिक वाटतो. प्रतिसादासाठी धन्यवाद

In reply to by आनन्दा

सुबोध खरे 20/05/2014 - 14:38
४ वर्षे सुशासन देऊन अर्ध्या अधिक विधानसभा आपल्याकडे घ्यायच्या आणि नंतर निवडणूकांपूर्वी राम-मंदिर, ३७० वगैरे विषय घ्यायचे अशी मोदींची रणनीती राहील असे वाटते. यापेक्षा ते ५ वर्षे ४ वर्षे सुशासन देऊन अर्ध्या अधिक विधानसभा आपल्याकडे घ्यायच्या परत लोकसभेची निवडणूक लढवून विकासाच्या मुद्द्यावर जिंकायची आणी परत आल्याआल्या वरील विवादास्पद विषय सोडवून घ्यायचे म्हणजे परत पुढची चार वर्षे गदारोळ शांत होईपर्यंत चिघळलेल्या जखमा बर्या होतील. अशी रणनीती करतील असे वाटते

In reply to by सुबोध खरे

माहितगार 22/05/2014 - 09:51
(या धाग्यासाठी अनुषंगिक अवांतर आहे तरीही विषय काढलायत तेव्हा माझ मतः) मोदींना त्यांचे विरोधक आणि समर्थक दोघेही कितपत समजू शकले आहेत या बद्दल साशंकता वाटते या बद्दल विस्ताराने नंतर कधी लिहीन. मोदींकडे त्यांच्या विरोधकांनाही स्वतःकडे वळवण्याच (प्रसंगी विरोधकांवर कडी करण्याच) आणि स्वतःची वेगळी वाट चोखाळण्याच कौशल्य/मुत्सद्दीपणा आहे. मोदी त्यांच्या बाजूच्या गोतावळ्यापेक्षा वेगळे आहेत असा अंदाज आहे. विवाद्य विषय बहुमत असूनही बहुमताच्या जोरावर सोडवण्यापेक्षा विरोधकांना आपल्या बाजूने वळवून सामोपचाराने सोडवण्यावर त्यांचा भर राहील असा अंदाज आहे आणि तसे होण्या साठी ते विवाद्यविषयांबद्दल अतीघाई सुद्धा टाळतील असे वाटते.

ऋषिकेश 19/05/2014 - 13:46
चांगला लेख - संकलन राज्यसभेचे गणित सोडवणे ही दिड वर्षाची बाब असावी. आंध्र, राजस्थान, मध्यप्रदेश येथून पुढिल १/३ जागांची निवडणूक बहुदा जाने.२०१६ ला होईल (या वर्षी पहिली १/३ जागांची निवडणूक झाली असे गृहित धरून) नी भाजपाला तिथेही बहुमत मिळवणे कठीण जाऊ नये. शिवाय तोवर महाराष्ट्र, कदाचित बिहार येथेही निवडणूका झाल्यासतील तर राज्यसभेत संख्याबळ बरेच वाढले असेल.

अनुप ढेरे 19/05/2014 - 13:51
मस्त लेख ! जॉईंट सेशन घेऊन युपीए सरकारनी कुठली विधेयक पास केली होती का? किंवा इतर सरकरांनी सुद्धा?

In reply to by अनुप ढेरे

माहितगार 19/05/2014 - 14:23
धन्यवाद. मला वाटते मी आणि टाइम्स ऑफ इंडीयाचा लेखक एकाच वेळी एकाच विषयावर लिहित होतो :) हा टाइम्स ऑफ इंडीयावरील हा लेख याच विषयावर आहे. टाइम्स लेखानुसार आतापर्यंत विधेयके पारीत करण्यासाठी भारतीय संसदीय इतिहासात केवळ तीनदा बैठकी झाल्या पण आता भाजपा सरकारला स्वत:ची महत्वाची विधेयके अडकणे टाळण्याकरता हा मार्ग बर्‍याचदा वापरावयास लागेल. प्रतिसादा साठी धन्यवाद

राज्यसभेत एखादे विधेयक बहुमताने कसे मान्य करुन घेता येईल त्यासाठी एखाद्या पक्षाशी भाजपा ला मंत्रीपद वगैरे असे काही घोडेबाजार करावा लागेल काय, (आतून जमवून घ्यावे लागेल) असे वाटून गेले. बाकी, राज्यसभेत विरोध करुन अजून आपल्या पायावर धोंडा कोणी पाडून घेईल असे वाटत नाही. आम्ही तर विधेयक आणले होते राज्यसभेत अमुक अमुक पक्षांनी ते होऊ दिले नाही तेव्हा विधानसभा आपल्या ताब्यात कशा हव्यात याचं राजकारण भाजपा ला करता येईल असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 19/05/2014 - 14:10
आम्ही तर विधेयक आणले होते राज्यसभेत अमुक अमुक पक्षांनी ते होऊ दिले नाही तेव्हा विधानसभा आपल्या ताब्यात कशा हव्यात याचं राजकारण भाजपा ला करता येईल असे वाटते.
होय अडवणूक करणार्‍या विरोधीपक्षाच्या डोक्यावर खापर फोडता येते. अनेक विधेयकांच्या बाबतीत भाजपानेही मनमोहनसिंग सरकारची राज्यसभेत अडवणूक केली पण तेलंगणा राज्य निर्मितीच्या बाबतीत मात्र केली नाही, भाजपाने स्वतःच्या डोक्यावर खापर काँग्रेसने फोडू नये म्हणून अडवणूक करणे टाळले. मुख्य प्रॉब्लेम सर्वसामान्य जनतेला राज्यसभा आणि तिथे सत्ताधारीपक्षाची अडवणूक होऊ शकते हेच मुळी माहीत नसते त्यामुळे अपेक्षांचा भोपळा फुटल्याचा ठपका सत्ताधारी पक्षावर जनतेच्या अनिभिज्ञतेतून येऊ शकतो. विरोधीपक्षावर खापर फोडून फायदा मिळवण्यासाठी राज्यसभा ही जटील संकल्पना जनतेला समजावून देणे म्हणजे सत्ताधारी पक्षाची परीक्षाच पण आजच्या मिडीयाच्या आणि वाढत्या शिक्षणाच्या काळात यात बदल शक्य आहे. आपण म्हणता तसेही होऊ शकते.
राज्यसभेत एखादे विधेयक बहुमताने कसे मान्य करुन घेता येईल त्यासाठी एखाद्या पक्षाशी भाजपा ला मंत्रीपद वगैरे असे काही घोडेबाजार करावा लागेल काय, (आतून जमवून घ्यावे लागेल) असे वाटून गेले.
एनडीएला लोक्सभेत खासदार संख्या ३३६पेक्षा कमी आली असती तर राज्यसभेकरता सुद्धा घोडे बाजार तोही मोठ्या किमतीवर करावा लागू शकला असता पण भाजपाच्या सुदैवाने घोडेबाजाराच्या व्यथेतून थोडक्यात सुटले पण आपण म्हणता तसे 'आतून जमवून घ्यावे लागेल' अगदी ताजे उदाहरण म्हणजे जयललितांनी भाजपाशी तडजोडीचा जाहीर निर्देश करणारा स्वतःच्या पक्षाचा माणूस निलंबीत केला , मोदींचे पत्र लिहून अभिनंदन केले कारण केंद्र सरकारच्या सहकार्या शिवाय राज्याचा कारभारही जमत नाही पण जयललितांना अभिनंदनाचे पत्र मिळाल्यावर धन्यवादासाठी फोन उचलण्याचा पुढाकाराचे पाऊल मात्र मोदींना उचलावे लागले. हे असे बरेच काही होत असले पाहीजे उत्साही प्रतिसादांसाठी आपल्याला आणि सर्वांना धन्यवाद

In reply to by माहितगार

मुख्य प्रॉब्लेम सर्वसामान्य जनतेला राज्यसभा आणि तिथे सत्ताधारीपक्षाची अडवणूक होऊ शकते हेच मुळी माहीत नसते त्यामुळे अपेक्षांचा भोपळा फुटल्याचा ठपका सत्ताधारी पक्षावर जनतेच्या अनिभिज्ञतेतून येऊ शकतो. १०० टक्के सहमत. बाकी, नियमित लिहित चला. वाचक म्हणुन आपले लेखन वाचतोच वाचतो. नेहमीच वेगळा विचार करायला लावणारे लेखन प्रतिसाद असतात आपले. -दिलीप बिरुटे

प्रसाद१९७१ 19/05/2014 - 13:55
खरेतर देशापुढे खरा issue आहे तो execution चा. त्या साठी कुठलेही नविन कायदे, दुरुस्त्या करायची गरज नाही. आहे त्या चौकटीत सुद्धा बरेच काही करता येण्या सारखे आहे. राज्यसभेत बहुमत असले काय आणि नसले काय काही फरक पडत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

माहितगार 19/05/2014 - 14:25
शेवटी सरकारच्या प्राधान्यता (प्रियॉरिटीज) काय आहेत त्यावर अवलंबून आहे, नाही का. प्रतिसादासाठी धन्यवाद

क्लिंटन 19/05/2014 - 17:21
याविषयी २०१० मध्ये मी मिपावरच भारतीय राज्यव्यवस्थेत राष्ट्रपती आणि राज्यसभेचे स्थान हा लेख लिहिला होता त्याची आठवण झाली. राज्यसभा या लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून न दिलेल्या सभागृहाला इतके अधिकार का दिले आहेत हा प्रश्न नक्कीच पडतो.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश 19/05/2014 - 17:27
"फर्स्ट पास्ट द पोस्ट" या पद्धतीतही काही तृटी आहेत तर "प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन" मध्येही आपल्या तृटि आहेत. तसेच दोन्ही पद्धतींचे आपापली बलस्थाने आहेत. शिवाय लोकसभेत जागा नाही मात्र राज्यांमध्ये सत्ता आहे त्यांचाही कायदे निर्मितीत तितकाच सहभाग करण्याचे काम राज्यसभा करते. म्हणूनच मला राज्यसभा असल्याने इतर लोकशाही व्यवस्थापेक्षा आपली व्यवस्था अधिक बलशाली वाटते.

In reply to by क्लिंटन

माहितगार 19/05/2014 - 21:39
राज्यसभा या लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून न दिलेल्या सभागृहाला इतके अधिकार का दिले आहेत हा प्रश्न नक्कीच पडतो.
मला वाटते (म.वा.) या एकुण याचा अर्थ राज्यसभेलाही अधिकार आहेत एवढेच. (म.वा.) या अधिकारांची तुलना विमानास/वाहनास को पायलट असण्याशी करता येते. विमान मुख्यत्वे लोकसभेतील होतकरू वैमानिकांनाच हाकायचे आहे पण भावनेच्या भरात दिशा, वेग किंवा इतर हिशेब चुकण्याची शक्यता तर नाही ना हे पाहण्यासाठी राज्यसभेतील अनुभवी को-पायलट वेग जरासा काही काळाकरता कमी करु शकतात एवढेच. राज्यसभा सध्याचे सर्वसाधारण जनमत आहे त्या पेक्षा फारतर २ ते ६ वर्षे मागे चालते असे म्हणता येईल. सर्वसाधारण जनमत एखाद्या गोष्टीच्या बाजूनेच असेल तर, अप्रत्यक्षपणे राज्यांच्या विधानसभा २-६ वर्षाच्या कालावधीत राज्यसभेतील नेतृत्व/गणित बदलत नेतातच. त्यामुळे राज्यसभेच्या अधिकारांचा अगदीच बाउ करण्यासारखी परिस्थिती आहे असे मला वाटत नाही. लोकसभा मतदारसंघात काही विधानसभा मतदारसंघ असे असतात की जिथे मतदारांनी विरोधी मतदान केले पण लोकसभेत दुसर्‍याच पक्षाचा नेता निवडून गेला असे होते पण विधानसभेत अशा मतदारसंघाचे आमदारांच्या स्वरुपात प्रतिनिधीत्व असते. या आमदारांना विधानसभासदस्यातून सहसा प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनने राज्यसभेवर सदस्य पाठवता येतो त्यामुळे अशा मतदार संघांना रिप्रेझेंट करणार्‍या राज्यातील विचार धारेला संसदेत अंशतः का होईना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळते. उदाहरणार्थ मनसे अथवा शेकाप सारख्या पक्षांचा एखाद्या लोकसभा निवडणूकीत एकही खासदार निवडून येणार नाही पण त्यांचे विधानसभेत आमदार आहेत आणि या आमदारांच प्रतिनिधीत्व करणारा खासदार राज्यसभेत पोहोचू शकतो. एकुण एक चांगला राजकीय समतोल साधला जातो.

In reply to by आजानुकर्ण

माहितगार 19/05/2014 - 21:43
घटना दुरुस्ती कशासाठी करायची आहे?
मला घटना दुरुस्ती कशाचीच करावयाची नाहीए :) राज्यसभेच्या गणिताच विश्लेषण करताना एखाद्या गोष्टीची माहिती न देणेही सयुक्तीक झाले नसते म्हणून माहिती नमुद केली एवढेच. प्रतिसादासाठी धन्यवाद

विकास 19/05/2014 - 18:59
भारतात कायदे भरपूर आहेत पण ते आमलात आणणारे नाहीत आणि त्याच बरोबर निर्णय घेणारे सरकार गेल्या दशकात अस्तित्वात नसल्याने अजूनच गडबड झाली होती. त्यामुळे मला वाटते की मोदी सरकार प्रथम आहे त्या कायद्यांचाच वापर करून राज्य चालवू लागेल. प्रश्न कुठे येऊ शकतो तर अर्थकारणासंदर्भात लागणार्‍या लोकसभा-राज्यसभा संमतींना - जे कदाचीत टेक्नीकली नवीन कायदे असतील पण वास्तवात ते त्या त्या काळापुरते निर्णय असतात. (सगळ्यात मोठे उदा. अर्थसंकल्प).

In reply to by विकास

आजानुकर्ण 19/05/2014 - 19:04
गेल्या दशकात अस्तित्वात नसल्याने
गेल्या दशकात? अणुकरार, मनरेगा, फूड सेक्युरिटी बिल हे ठळकपणे आठवलेले ३ निर्णय. यूपीए-१ मध्ये अनेक चांगले निर्णय घेतल्याने यूपीए-२ मध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा जनादेश मिळाला. असो.

In reply to by आजानुकर्ण

प्रसाद१९७१ 19/05/2014 - 19:16
अणुकरार, मनरेगा, फूड सेक्युरिटी बिल
अश्या कीती अणुभट्ट्या चालू झाल्या गेल्या ५ वर्षात ?( १ पण नाही ). कुठलेही करार पण झाले नाहीत. उपयोग काय त्या अणुकराराचा. फुड बिला नी कोणाला धान्य मिळाले?

In reply to by आजानुकर्ण

आनन्दा 19/05/2014 - 19:20
माझ्यामते युपीए १ ला परत मिळालेला जनादेश हा मुख्यतः भारताच्या बळकत अर्थव्यवेस्थेमुळे मिळाला होता, ज्यामुळे अगदी सामान्य माणूस देखील खूश होता. ही बळकट अर्थव्यवस्था मुख्यत्वे नरसिंहराव, आणि रालोआ यांच्या धोरणांमुळे आली होती.

लेखात सरकारसाठी जी आव्हानात्मक परिस्थिती वर्णिलेली आहे ती काही फारशी नवी नाही. बहुधा रालोआ नव्याने सत्तेमधे आल्यावर अन संपुआच्या सुरुवातीच्या काळात दोन्ही सत्ताधारी आघाड्यांना राज्यसभेत बहुमत नव्हते.

In reply to by श्रीरंग_जोशी

आनन्दा 20/05/2014 - 14:42
खरे आहे, पण त्या सरकारंवर एव्हढे अपेक्षांचे ओझे पण नव्हते. मोदी सरकार डोक्यावर खूप अपेक्षा घेऊन आले आहे. त्यामुळे त्यांना ही परिस्थिती जास्त आव्हानात्मक आहे.

In reply to by आनन्दा

अपेक्षांची तुलना करणे तसे अवघड आहे. पण भूतकाळातील अपेक्षांना क्षूल्लक लेखले जाऊ नये अशी अपेक्षा आहे. मार्च १९९८ मध्ये वाजपेयी सरकार सत्तारूढ होण्यापूर्वी काही वर्षे केंद्रात फारच सुंदोपसुंदी होती. यात राव सरकारचा शेवटचा कार्यकाळ पण आला ज्यात कुठलाही निर्णय न घेणे हाच सर्वात मोठा निर्णय आहे अशी टिका त्यावेळी केली जायची. तोवर भाजप नेतृत्वाच्या सरकारला काम करण्याची संधी मिळाली नव्हती. ती संधी प्रथमच मिळाली होती. १९९१ उदारीकरणाचे लाभ तळागाळापर्यंत आजच्यासारखे मोठ्या प्रमाणात झिरपले नव्हते. सर्वसामान्य जनतेतील बऱ्याच भाजप समर्थकांचा त्या काळात भ्रमनिरास झाल्याचे निरिक्षण आहे.

माहितगार 09/08/2018 - 15:55
राज्य सभेचे गणित गेल्या चार वर्षात बरेच बदलले तरी भाजपा अद्यापी ७३ आणि एनडीए चे इतर पक्ष मिळून केवळ ८९ वर आहे. (पहा इंग्रजी विकिपीडियावरील राज्य सभा लेखातीलतपक्षवार तक्ता) तरीही आज झालेल्या राज्यसभेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत एनडिए घटक पक्षाचे नितीश कुमारांच्या जनता दलाचे उमेदवार हरिवंश नारायण सिंगांना १२५ मते मिळवून विजयश्री ओढवून आणली. हे गणित भाजपाने कसे जुळवले याचे कोडे पडले. ते एन.डिटिव्हीच्या या बातमी ने उलगडले. YSR Congress २ आणि मेहबूबा मुफीतींचे २ आणि अरविंद केजरीवालांचांचे ३ खासदार काँग्रेस नेत्याला सपोर्ट करणार नाही हे त्यांच्या राजकीय भूमिकेशी सुसंगत होते. The majority mark in the 244-member Rajya Sabha is 123, but abstentions pulled it down to 119. चौघे डि एम के खासदार अबसेंट होते ते ठिक त्रिनमुलचे ही एक खासदार अबसेंट असावेत. ऐनवेळी बिजू जनता दलाचे ९ खासदारांचे समर्थन मिळवण्यात भाजपाला यश आले. शिवसेना आणि अकाली दलाने कुरकुर केली तरी मतदान हरिवंश नारायण सिंगांनाच अपेक्षे प्रमाणे केले ८९ + ९ = ९८ खासदारांचा एन डि ए बाजूने हिशेब लागतो; हरिवंश नारायण सिंगांना मते देणारे बाकी २७ खासदार कोण कोणत्या पक्षाचे हयाचे, आणि या प्ढेही उर्वरीत विधेयकांना भाजपाच्या बाजूने येते वर्षभर कौल देत रहातील का याचे कुतूहल आहे. तसे झाल्यास भाजपाची अडकलेली बरीच बीले येत्या वर्षाभरात अधिक सहजपणे मार्गी लागू शकतील. विधेयके पास करुन घेण्यात मोदी सरकारला अधिक मोकळा श्वास घेता येऊ शकेल. त्याच वेळी अती अवलंबित्व ब्लॅकमेलींगची खाण असते त्या साठी काय काय राजकीय किमती मोजाव्या लागत असतील ते सत्ताधार्‍यांना ठाऊक.

In reply to by माहितगार

माहितगार 10/08/2018 - 11:22
ओके जयललीतांच्या ए.आय.ए. डि एम. के च्या थंबीदुराईंना २०१४ मध्ये लोकसभा उपाध्यक्षपदासाठी एन. डि. ए. ने सपोर्ट केल्याच्या बदल्यात राज्यसभा उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत त्यांनी १३ खासदारांचे पारडे एन.डिएच्या हरिवंश नारायण सिंगाच्या बाजूला झुकवले. सोबत चंद्रशेखरराव यांच्या तेलंगाणा राष्ट्र समितीने पलटी मारत ४ खादरांची मते एन.डि. ए. च्या बाजूने टाकली. राज्यसभेतील ६ अपक्ष आणि ४ नॉमीनेटेड मतेही हरिवंश नारायण सिंगाना मिळून १२५ चा आकडा पूर्ण झाला. म्हणजे २०१९ च्या लोक्सभा निवडणूकीत YSR काँग्रेस, मेहबूबा मुफीतीं , अरविंद केजरीवालएन, बिजू जनतादल, ए.आय.ए. डि एम. के , तेलंगाणा राष्ट्र समिती काँग्रेसच्या युपीए. गठंबंधन सोबत जाण्याची शक्यता कमी असेल. भाजपाच्या बाकी विधेयकांवर बिजू जनतादल, ए.आय.ए. डि एम. के , तेलंगाणा राष्ट्र समिती राज्यसभेत काय भूमिका घेत रहातील हे बघणे रोचक असेल.

माहितगार 24/05/2019 - 14:58
पाच वर्षांपुर्वी लेख लिहिताना एन.डी.ए. कडे राज्यसभेत केवळ ६२ राज्यसभा खासदार (भाजपा ४६) अशी स्थिती होती. आता पाच वर्षांनंतर भाजपाचे स्वतःचे ७३ (एन डि ए टोटल१०१) संख्या दहाने वाढण्यासाठी सुद्धा अजून तब्बल एक वर्ष थांबावे लागेल असा कयास आहे. दिल्लीत मोदींनी दणदणीत विजय पुन्हा खेचून आणला तरी विधान सभांच्या बाबतीत एक धरले तर एक सुटते अशीच स्थिती राहीलेली दिसते. उ.प्र. कर्नाटकातील स्थिती सुधारली तर म.प्र. राजस्थान, पंजाब या महत्वाच्या विधानसभा एन.डि . ए पासून दूर गेल्या. येत्या वर्षभरात आणखी विधानसभांच्या निवडणूका आहेत तिथे भाजपा आणि एन डि ए काय करणार याची अद्याप कल्पना नाही. असो

In reply to by माहितगार

राघव 26/05/2019 - 00:37
सध्या रालोआ कडे १०१ आकडा राज्यसभेत आहे. हिंदूस्थान टाईम्स मधील या लेखा प्रमाणे - "By November 2020, the NDA government will secure another 19 seats from as many as 14 states including Uttar Pradesh, Bihar, Tamil Nadu, Gujarat and Madhya Pradesh, helping it go past the halfway mark of 123 and get 125 seats, making it the first government to reach majority in the upper house in nearly 15 years. Most of its seats will come from Uttar Pradesh where it has 310 MLAs in the 403-member assembly. It will also gain 6 seats in Tamil Nadu thanks to its new ally the AIADMK, three in Assam, two in Rajasthan and perhaps one in Odisha — the last one with the help of a friendly party, the BJD." संयुक्त अधिवेशनाचा पर्याय आहेच, पण तसा पायंडा म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असा विरोधकांना कोलीत देण्याचा प्रकार होईल. त्यामुळे शक्यतो या पर्यायाचे अवलंबन मोदी सरकार करेल असे सध्यातरी वाटत नाही.
२०१४ निवडणूक मोदी-भाजपा-एनडीए घटकांना लोकसभेत मोठ अभूतपुर्व बहुमत (भाजपा २८२ जागा एनडीए ३३६ जागा) आणून पार पडली आणि त्यांची समर्थक मंडळी अर्थातच आनंदात आहेत तर विरोधकांना धक्क्यातून सावरण्यासाठीही काही कालावधी लागेल. लोकसभेत पुर्ण बहुमत आल्यामुळे इतर प्रादेशिक पक्षांसोबत अगदीच घोडेबाजार भरवावा लागणार नाही आणि आर्थीक विकासाच्या आश्वासनांना स्वतःच्या बळावर मोदी सरकार गोष्टी पुढे रेटू शकणार आहे. अर्थात, संसदीय गणितांच्या सर्व खाचा खोचा माहीत नसलेल्या भाजपा-मोदीच्या सर्वसामान्य जनतेतील समर्थकांना हा आनंद जरासा चिमुटभर मीठा सोबत घ्यायला लागणार आहे. लोकसभेत एन.डी.ए.

मोदींच्या विजयाचे परीक्षण

आनन्दा ·

प्रसाद१९७१ 19/05/2014 - 13:28
तिथे देखील मतदारांनी भाजपाला॑ कौल दिला आहे. >>>>>>मतदारांनी भाजपला कौल दिला नाही तर मोदींना दिला. मोदी नसते तर भाजपला १५० जागा पण मिळाल्या नसत्या. पुण्यात काँग्रेस पडुन शिरोळे सारखा कोणाला माहीती नसलेला माणुस निवडुन येउ शकला ते फक्त मोदीं मुळेच.

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा 19/05/2014 - 13:33
मतदारांनी भाजपला कौल दिला नाही तर मोदींना दिला
सहमत. सध्या मोदी म्हणजेच भाजपा. हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. पण
शिरोळे सारखा कोणाला माहीती नसलेला माणुस
या वाक्याशी असहमत. कलमाडी असताना देखील शिरोळे फक्त २४००० मतांनी हरले होते. पुण्याची सीट यावेळेस भाजपाचीह होती. मोदी लाटेमुळे फक्त ते सुकर झाले इतकेच.

प्रसाद१९७१ 19/05/2014 - 13:29
. परंपरागत मुस्लिम मतदार हा नेहमीच काँग्रेसचा समर्थक राहिला आहे. या मतदारानेदेखील काही प्रमाणात मोदींच्या बाजूने मतदान केले. >>>>>>>>> हे अशक्य आहे. मुस्लिमांची मते भाजप ला ( त्यात सुद्धा मोदींना ) मिळणे अशक्य आहे. ही बडबड सुद्धा तथाकथित सेक्युलर लोकांनी चालू केली आहे.

In reply to by प्रसाद१९७१

चित्रगुप्त 20/05/2014 - 09:46
मी रहातो, तिथे आठदहा मुस्लिम कुटुंबे असून त्यांची तरूण पिढीतील मुले माझ्या मुलांबरोबर लहानपणापासून खेळलेली आहेत. त्यांनी सांगितले, की त्यांच्या घरातील वृद्धांनी काँग्रेसला मते दिली, तर संख्येने जास्त असलेल्या सुशिक्षित तरूण पिढीने भाजपाला.

In reply to by प्रसाद१९७१

चित्रगुप्त 20/05/2014 - 12:41
ह्या तुम्हाला फसवायच्या खेळी आहेत. काहीतरी सांगुन तुम्हाला गंडवायचे
समजा, तुम्ही म्हणता तसे असले, तर हे तुम्हाला खात्रीपूर्वक कसे समजले, हे जाणून घेऊ इच्छितो.

In reply to by ऋषिकेश

आनन्दा 19/05/2014 - 13:56
आआपने भाजपाला कशी मदत केली?
आपने ठरवून भाजपाला मदत केली असे माझे म्हणणे नाही. मी असे म्हटले आहे की "पण कोंग्रेस्ची बी टीम असलेले केजरीवाल नकळतपणे भाजपाला कशी मदत करू लागले ते जिथे खुद्द केजरीवालांना कळले नाही, तर ते इतरांना काय कळणार" असे मी का म्हणतो याची कारणे अशी - १. आप ने कारणाशिवाय दिल्ली मधली सत्त सोडली. ती सत्ता ठेवून जर त्यांनी लोकसभा लढवल्या असत्या, तर ही निवडणूक भाजपाला थोडी जड गेली असती. २. केजरीवालांनी निवडणूकीला भाजपा विरुद्ध केजरवाल असे स्वरूप आणले. परंतु केजरीवालांकडे त्यांच्या शुद्ध (?) हेतूंच्या पलीकडे दाखवण्यासारखे काहीच नव्हते. त्यामुळे आपकडे वळलेला मतदार पुन्हा भाजपाकडे वळला. ३. स्वतःची प्रतिमा बनवण्याच्या नादात केजरीवालांनी आपल्या धर्मनिरपेक्षतेचा अतिरेक केला, परिणाम भाजपाचा हिंदुत्ववादी समर्थक वर्ग, जो केजरीवलांच्या मागे जाण्याची शक्यता होती, तो परत फिरला. कारण त्यांना केजरीवालांना मत देणे म्हणजे काँग्रेसला मत देण्यासारखेच वाटू लागले. इन अ नटशेल, केजरीवालांच्या माकडचेष्टांमुळे भाजपाची मते फुटण्याऐवजी भाजपाविरोधी मतेच फुटली. आणि मुख्य म्हणजे, नव्याने मतदान करणार्‍या १०% मतदारांसमोर मोदींशिवाय समर्थ पर्यायच राहिला नाही. त्याच १०%ची परिणिती या जास्तीच्या १०० जागांमध्ये झालेली आहे.

In reply to by आनन्दा

ऋषिकेश 19/05/2014 - 14:06
इन अ नटशेल, केजरीवालांच्या माकडचेष्टांमुळे भाजपाची मते फुटण्याऐवजी भाजपाविरोधी मतेच फुटली.
यालाच आधार मागतो आहे. मुळात ९९% ठिकाणी आआपचे डिपॉझिट जप्त झाले आहे. अशावेळी त्यांनी विरोधी मते कशी-कितपत फोडली? हे समजावून घ्यायचे आहे.

In reply to by ऋषिकेश

आनन्दा 19/05/2014 - 14:39
मुळात ९९% ठिकाणी आआपचे डिपॉझिट जप्त झाले आहे
हे तर खरेच आहे. लेट मी रेफ्रेझ इट - केजरीवालांना काँग्रेसविरोधी मते आपल्याकडे वळवण्यात अपयश आले. आणि त्याचे कारण त्यांच्या माकडचेष्टा. दिल्ली नीट सांभाळली असती, आणि देशात निवडक ठिकाणी जर निवडणूका लढवल्या असत्या, तर आप नक्कीच भाजपाला जड गेले असते. परंतु केजरीवालांकडून झालेल्या भ्रमनिरासामुळे भाजपाकडे मतांचे अधिक ध्रुवीकरण झाले. अर्थात याला आधार देण्यास विदा नाही, पण मी मिपावरच असे लोक दाखवू शकतो की जे प्रथम आपचे समर्थक होते, पण आपच्या कारन्यांमुळे ते नंतर विरोधक झाले. दिल्लीमध्ये ३०+% जागा मिळवल्यानंतर आप देशभर भाजपाच्या मार्गात पुरेसे काटे पसरेल असे वाटले होते, त्यावरच "हे काँग्रेसची बी टीम" वगौरे गृहीतके होती. पण आपच्या अनार्किस्ट भूमिकांमुळे आपचे बरेचसे समर्थक आपापल्या घरी परतले. म्हणून मला असे म्हणायचे आहे की आप ने ही निवडणूक भाजपाला अधिक सोपी केली.

अनुप ढेरे 19/05/2014 - 13:53
१. परंपरागत मुस्लिम मतदार हा नेहमीच काँग्रेसचा समर्थक राहिला आहे. या मतदारानेदेखील काही प्रमाणात मोदींच्या बाजूने मतदान केले. सर्व "धर्मनिरपेक्ष" पक्षांनी केलेला प्रचार या मतदारांनी फाट्यावर मारला याचे मला जरा आश्चर्यच वाटत आलेले आहे.
हा निष्कर्ष कसा काढलात? http://www.thehindu.com/opinion/op-ed/not-how-many-but-who-voted-made-the-difference/article6022959.ece इथे बरोब्बर उल्ट म्ह्टलं आहे.

In reply to by अनुप ढेरे

आनन्दा 19/05/2014 - 15:20
मी माझे शब्द मागे घेतो. तो माझा अंदाज होता, पटत नसला तरी. गुजरात मध्ये २६ पैकी २६ जागा, आणि उप्र मध्ये ८० पैकी ७०+ या विदावर आधारलेले होते. पण हेही तितकेच खरे की उप्र मध्ये देखील बिगर मुस्लिम मतांवर निवडणूक जिंकता येते.

In reply to by धन्या

आनन्दा 20/05/2014 - 11:04
बाकी काही दिवसांपूर्वी मोदींच्या नावाने खडे फोडणारे लोक आता मोदींच्या विजयाची हवा स्वतःच्या शिडात भरून घ्यायला लागलेत हे पाहून अंमळ मौज वाटली :)

ब्राह्मण ,ओबिसी बर्याच प्रमाणात दलित यांच्या एकसंध मतांच्या साथीने मोदी/ भाजपा सत्तेत आला आहे.बसपाला शून्य जागा याचेच द्योतक आहे. मुस्लिम क्षत्रीय(राज्यात मराठा ) व तत्सम जाती यांनी काँग्रेस व युपीएलाच मत दिले आहे ,राज्यातही मराठ्यांनी राकाँ काँच्याच बाजूने मत दिले आहे. आपल्या मुलभूत अधिकारांच्या बाबतीत जागृत असलेले मतदार हे ब्राह्मण ,ओबिसी, दलित वा तत्सम समाजातून येतात, यांच्याही जातीय धार्मिक अस्मिता आहेत परंतु त्या तितक्याशा धारदार नाहीत. आपल्या राज्यापुरते बोलायचे तर मुस्लिम, मराठा हे डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर मत देत नाहीत ,तसे असते तर राकाँ उभाच राहीला नसता. कोण इफ्तार पार्ट्यांना येतो? कोण बाबा ,दादा ,बापू, साहेब यांच्या जवळचा आहे?आपल्या जातीचाच आहे काय? हे बघूनच मतदान केले जाते/ मतदान होते. राज्यात युतीला सत्तेत यायचे असेल तर ब्राह्मण ओबिसी दलित समाज जैन वगैरे व्यापारी समूहांना लोकसभेप्रमाणे एकसंध बांधावे लागेल. धार्मिक व जातीय अस्मितेला कमालीची धार चढवलेले अनुक्रमे मुस्लिम व मराठा पुन्हा काँ व राकाँलाच मत देणार.

In reply to by नानासाहेब नेफळे

अगदी बरोबर बोललास नाना. येत्या विधान्सभा निवडणूकीत सेना-भाजपाला यश संपादन करायचे असेल तर जातिय धार बोथट कशी करता येईल हा विचार त्यांनी करणे गरजेचे आहे.जातीचे राजकारण करून अलिप्त राहण्यात पवार वाकब्गार आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

नाव आडनाव 19/05/2014 - 18:06
काय सरकार, आले का जातीवर? एक गोष्ट न कळण्या सारखी आहे - जवळपास ३ कोटी लोकसंख्या (३०% गृहीत धरून ) असलेल्या मराठा समाजाने कुणाला मत दिलंय हे तुम्हाला एकदम कसं कळतं हो नेफळे साहेब? तुम्ही एखादी एजेन्सी कडे दिला होता का सर्वे करायला?

In reply to by नाव आडनाव

यांचा एखादा बाबा दादा उभा राहीला की आख्ख्या वाड्या वस्त्या त्याला झाडून मतं देतात ,"ते आमचे पाहुणे लागतात" हा यांचा ठरलेला डायलॉग असतो. कशाला अशा लोकांचा सर्वे करायचीही गरज नाही. मी जात बघुन मत देत नाही, जात बघुन मत देणार्यांनी हे लक्षात ठेवावं की ते खासदार निवडणार आहेत 'जावई' नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

नाव आडनाव 20/05/2014 - 11:42
सरकार तुम्ही एखाद्या घटनेतून ३ कोटी लोकांबद्दल मत बनवता? कि मत बनवूनच घटनां कडे बघता?:) तुमच्या साठी माझ्या एका मित्राची एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो - मित्र नगरचा आहे, त्याचा भाचा ज्याचं आडनाव पवार आहे आणि नाव शरद आहे आणि तो मराठा पण आहे त्याने देखील भाजप ला मतदान केलंय :) मत कुणी कुणाला दिलंय याची जाहीर चर्चा करू नये, पण तुम्हाला आवडेल म्हणून हा किस्सा सांगितला. आता कशावर शंका घायची - त्या मित्राची जात मराठा असण्यावर, त्याच्या भाच्याने मतदान केलंय कि नाही यावर कि अजून काही? कारण "मराठा" "विकासाच्या मुद्द्यावर" राज कारण करत नाही म्हणता तुम्ही :) गेट वेल सून सरकार.

In reply to by नाव आडनाव

नाव शरद पवार... भाजपाला वोट ....इथेच फसलात राव तूम्ही ! :-P घेतला त्याने घोळात तूम्हाला ,वाणं नाय पण गुण या प्रत्येकात आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 19/05/2014 - 20:55
काय गंमत आहे! नाना नेफळे आपला दुसरा डु आय (माई फुसकुलीकर) स्वतःचेच कौतुक करतोय. माई, नानाच्या नावाने आता एखादा झकास उखाणा घ्या!

In reply to by नानासाहेब नेफळे

सूड 19/05/2014 - 15:18
>>आपल्या राज्यापुरते बोलायचे तर मुस्लिम, मराठा हे डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर मत देत नाहीत ,तसे असते तर राकाँ उभाच राहीला नसता. सहमत !!

In reply to by नानासाहेब नेफळे

>>>>मुस्लिम क्षत्रीय(राज्यात मराठा ) व तत्सम जाती यांनी काँग्रेस व युपीएलाच मत दिले आहे ,राज्यातही मराठ्यांनी राकाँ काँच्याच बाजूने मत दिले आहे. / धार्मिक व जातीय अस्मितेला कमालीची धार चढवलेले अनुक्रमे मुस्लिम व मराठा पुन्हा काँ व राकाँलाच मत देणार. चुकीचे विधान आहेत. बराच मराठा समाज शिवसेनेच्या तसेच भाजपाच्या बाजुने आहे.

दुश्यन्त 19/05/2014 - 16:03
व्हल २ म्हणजे कर्नाटक, छत्तीसगड, हरियाणा या ठिकाणी ५०- ६०% जागा भाजपाला मिळाल्या आहेत. त्याच्या पलिकडे त्रिपुराचा अपवाद वगळता भाजपाची डाळ फारशी शिजली नाही. भाजपला छत्तिसगढमध्ये मध्ये ५०-६०% पेक्षा भरपुर जास्त (११ पैकी ९) खासदार मिळाले आहेत.हरियानात १० पैकी ७. शिवाय आसाम मध्ये पण चांगले यश (१४ पैकी ८ खासदार) मिळाले आहे. त्रिपुरामध्ये भाजपचा एकही खासदार आला नाही.तिथे सीपीएम आहे.

In reply to by दुश्यन्त

आनन्दा 19/05/2014 - 18:31
शिवाय आसाम मध्ये पण चांगले यश (१४ पैकी ८ खासदार) मिळाले आहे. त्रिपुरामध्ये भाजपचा एकही खासदार आला नाही.तिथे सीपीएम आहे.
माफ करा, मला आसाम म्हणायचे होते.

चौकटराजा 19/05/2014 - 16:57
१९७७ मधे इंदिराजींसह कॉग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यावेळचे नको इतके श्रेय श्री जयप्रकाश नारायण याना देण्यात आले तेच आता होते आहे. ही लाट आहे पण ती मोदींची नव्हे तर अनेक शत्रू कॉंग्रेसने एकाच वेळी केले. त्यांचे यावेळी निवडणूक पूर्व समझोते फारसे झालेच नाहीत. मनमोहन सिंगामधील नेतृत्व गुणाचा पूर्ण अभाव. भिंतीआडून राजकारण करण्याची सोनियांची सवय,राहुल गांधी सारखा पोरकट निवडणूकनेता,हाय कमांड संस्कृति, लोकाना पद्धतशीर पणे रोजगार निर्माण करण्याऐवजी काहीतरी सारख्या योजना उकरीत बसणे,निरनिराळी पॅर्‍केज जाहीर करणे, इनकम टॅक्स ची मर्यादा न वाढविणे, करबुडवेगिरीचा नीट शोध न घेणे,फोमिली पेशन मधे केविलवाणी रक्कम देणे, नाईलाज म्हणून १२ सिलिंडर सबसिडाईज करणे,योजनांचे बजेट प्रमाणे अंमलबजावणी न होणे, अण्णा हजारेंच्या आंदोलनातून सरकारची नियत बाहेर येणे.,दागी मंत्त्र्याना संरक्षण देण्याचा प्रयत्न करणे, कलमाडीच्या विरोद्धात कारवाई उशीरा होणे, रामदेव बाबांच्या आंदोलनात त्याना घृणास्पद वागणूक देणे, रेलेवे दरांवरून ममतांशी आलेले वितुष्ट, कांगीचे मित्र लालूप्रसाद यांचा पाडाव, अत्यंत संथ अशा पृथवीराज चव्हाण यांना मुख्यमत्री करणे, आदर्श घोटाला, काँमनवेल्य गेम घोटाळा, कोळसा घोटाळा, लवासा प्रकरण,भुजबळ प्रकरण, सिंचन प्रकरण ई ई मुळे कॉग्रेसचा पराभव झाला. खरे रे तर तो १९८९ पासून होतच होता. आता व्हेंटीलेटर तरी किती दिवस काम करणार??? अर्थात सरकार मधील निम्न स्तरावर चालणारा भष्टाचार, महागाई असे काही प्रश मोदीनाही सोडविता येणार नाहीत याची खात्री आहे.स्थिर सरकार असल्याने मोदीना आता ब्लॅकमेल करायला कोणी नाही. पण मी सुडाचे राजकारण करणार नाही असे म्हणत त्यानी मुलायम मायावती ई बाबतचे काही गैरप्रकार आता सी बी आय ने बाहेर काढायचे ठरवले वा येडींचे आणखी काही प्रकार बाहेर आले तर त्यात अडथळा आणू नये.

In reply to by चौकटराजा

आनन्दा 19/05/2014 - 18:30
कोंग्रेसच्या विरोधात हवा होती हे तर खरेच आहे, पण ती हवा आपल्या शिडात भरायला बुद्धीबळ हवे ना. कारण आता १९७७ मध्ये इन्दिराजींनी जे केले ते आता करणे शक्य नाही. लोकांनी भाजपाला मते दिलेली नसून त्यांनी ती मोदींना दिली आहेत, त्यामुळे आता मोदींच्या विरोधात जाणे कोणालाही कठीण आहे.

In reply to by आनन्दा

चौकटराजा 20/05/2014 - 09:33
पण ती हवा आपल्या शिडात भरायला बुद्धीबळ हवे ना मोदींची शक्तीस्थळे १.मोदीनी आपल्या कुटुंबकबिल्यापासून स्वतःला अलग केलेले आहे. ( भुजबळ पवार ,शिंदे ठाकरे मुंडे) २.मोदी कोणत्याही प्रकरणात स्वत: अडकलेले आढललेले नाहीत..(अशोक चव्हाण,राजीव गांधी, सुखराम येडीयुरप्पा ) ३.मोदी भाषणात ज्याप्रंमाणे प्रबोधक आहेत त्याप्रमाणे ते एक उत्तम नट असून करंमणूक करणारे नेतेही आहेत. ( मनमोहन सिंग, सोनिया, राजनाथ सिंग, पवार ) ४.मोदीना इंग्रजी येते तरीही ते हिंदीत बोलण्याचा आग्रह धरतात. व संस्कृतोदभव तसेच उर्र्दू मिश्रित हिंदी ( राजनाथ , बाजपेयी यांच्या पेक्षा निराळी ) बोलू शकतात. ( चिदम्बरम ) ५.ते सतत शिकणारे नेते आहेत त्यामुळे अधुनिक युगाशी त्यांचे नाते चांगले आहे. पुढे मागे ते तमिळांशी तमिळमधून बोलू लागल्यास नवल नाही. ६.सामान्य लोकांमधून आल्याने त्यांची उदाहरणे फार जवळची वाटतात. ७.आता त्यांच्याकडे ५ वर्षे सत्ता व स्थिरता असल्याने त्यांच्या कल्पकतेला पारावर रहाणार नाही . कुणी सांगावे कदाचित ते बाजपेयी, राजीव, इंदिरा गांधी, नेहरू याना मागे टाकतील.

In reply to by आनन्दा

कोंग्रेसच्या विरोधात हवा होती हे तर खरेच आहे, पण ती हवा आपल्या शिडात भरायला बुद्धीबळ हवे ना. गुजरातचा गेल्या १२ वर्षांचा विकासाचा इतिहास पाहता माश्यांनी शिंकायला इतकी घाई करू नये ! =)) (तो विकास म्हणजे आकड्यांची बनवाबनवी होती असे म्हणायचे मनात येणार्‍यांनी प्रथम गुजरात सरकारच्या विकास योजनांना केंद्र सरकारने, त्याच्याशी संबंद्धीत संस्थांनी आणि गैरसरकारी संस्थांनी शेकड्यांनी दिलेल्या मानांकनाची / बहुमानांची यादी चाळावी... म्हणजे नंतर लाजून खाटेखाली लपावे लागणार नाही. *: या याद्या जालावर अनेक सरकारी / गैरसरकारी संस्थळांवर आणि इतरत्रही उपलब्ध आहेत. थोडेसे परिश्रम करून त्या स्वतः पाहाव्या. अश्या कृतीने आणि माहितीने बुद्धीबळात नक्की वाढ होते.)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आनन्दा 20/05/2014 - 15:28
गुजरातचा गेल्या १२ वर्षांचा विकासाचा इतिहास पाहता माश्यांनी शिंकायला इतकी घाई करू नये
मी कुठे शिंकतोय, उलट भाजपा स्वबळावर सत्तेत येईल असे म्हणणारा मिपावर मी पहिला होतो.

In reply to by चौकटराजा

विकास 19/05/2014 - 18:53
सहमत. अर्थात सरकार मधील निम्न स्तरावर चालणारा भष्टाचार, महागाई असे काही प्रश मोदीनाही सोडविता येणार नाहीत याची खात्री आहे. मोदींना आव्हाने खूप आहेत. पण असे वाटते आहे की त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. जनतेची अपेक्षा देखील एकदम सगळे बदलेल अशी नसावी. पण जर पुढच्या ३-६-१२ महीन्यात टप्याटप्याने पॉझिटीव्ह ट्रेंड दिसला तर जनतेल आपण घेतलेला निर्णय चुकीचा वाटणार नाही.

In reply to by चौकटराजा

प्रसाद१९७१ 19/05/2014 - 18:55
१९७७ मधे इंदिराजींसह कॉग्रेसचा दारूण पराभव झाला.>>>>>>>>>>> १९७७ मधे दारुण पराभव नव्हता झाला काँग्रेसचा. ३५ ट्क्क्यापेक्षा जास्त मते मिळाली होती. टक्केवारी २-३ % च घटली होती. सगळे विरोधक एकत्र आले होते म्हणुन जागा कमी मिळाल्या.

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा 19/05/2014 - 19:22
आणि मुख्य म्हणजे १९७७ मध्ये जनता पझ म्हणजे कडबोळे होते, यावेळेस तो एकखांबी तंबू आहे. तो खांब आहे तोपर्यंत तंबू कोसळत नाही हे नक्की.

In reply to by आजानुकर्ण

विकास 19/05/2014 - 20:47
ही घ्या.. ही आकड्यात. फक्त २०१४ मधे काँग्रेसने नक्की किती जागा लढवल्या ते माहीत नाही. त्यामुळे २००९ चाच नंबर (४४०) गृहीत धरला आहे. कुणाला माहीत असल्यास सांगावा ही विनंती.

In reply to by सूड

विकास 20/05/2014 - 20:43
There is no bigger joy than working for Bharat Mata! India has given us so much; now is the right time to give back to our nation through our positive contribution. Narendra Modi firmly believes that India has unparalleled talent. The people of India can take this nation to greater heights and make India the leading nation of the world. He also believes that the people, particularly the youth of India should devote their time, skills and energy towards the nation. Join this grand movement to create a strong, glorious and inclusive India. You are requested to fill this form. Remember- your contribution will be a gigantic step in creating a better India

In reply to by विकास

मदनबाण 21/05/2014 - 13:41
जी+ च्या आयडी ने लॉगिन करुन पाहिले... पण 404 ! चा एरर येतो आहे. :( याचा अर्थ क्लायंट सर्व्हरशी कम्युनिकेट करु शकत नाही. बहुदा फॉर्म भरणार्‍यांची संख्या जास्त असणार ! त्यामुळे लोड वाढले असेल असे वाटते. छ्या... आता फॉर्म कसा भरणार ?

In reply to by मदनबाण

लंबूटांग 21/05/2014 - 17:38
म्हणजे ते पान सापडत नाहीये असा होतो. उदा. http://www.google.com/asdasdasd टाइपल्यावर येते ते. त्यांच्या वेब-मास्टरला सांगा युआरएल ठीक करायला (किंवा गूगलला). लोडशी काहीही संबंध नाहीये. क्लायंट-सर्वरशी कम्युनिकेट करू शकत नसल्यास ४०८ एरर येतो.

In reply to by मदनबाण

विकास 21/05/2014 - 18:19
सब्मिट करताना होत आहे का फॉर्मला अ‍ॅक्सेसच मिळत नाही? कारण मी आत्ता त्या पानावर गेलो तर फॉर्म दिसतोय, पण मी भारतात रहात नसल्याने तो भरण्याच्या भानगडीत पडलो नाही. कारण तो मला वाटते भारतनिवासी भारतीयांसाठीच आहे.

In reply to by पिलीयन रायडर

विकास 22/05/2014 - 16:26
हे नरेंद्र मोदींचे अधिकृत प्रचार संस्थळ आहे. आता जरी प्रचार नसला तरी त्याचा वापर अशा पध्दतीने करणे आताच्या काळात कॉमन आहे. (उदा. बराकओबामा.कॉम). तरी देखील तुमच्या मुद्द्याशी सहमत.

In reply to by विकास

मला वाटलंच की ते प्रचारासाठिचे अधिकृत संस्थळ असेल. पण अशी माहिती उद्या पंतप्रधान कार्यालयानी सरकारी चॅनल्स कडुन मागवली तर एकवेळ ठिके.. पण ह्या संस्थळाची तशी खात्री वाटत नाही. लोक जनगणना करताना नीट माहिती देत नव्हते.. इथे तर खुप काही विचारलं आहे..

विकास 19/05/2014 - 18:48
काँग्रेस ने मोदींना अंडरएस्टिमेट केले, ही त्यांची चूक झाली. काँग्रेस मोदींना अंडरएस्टीमेट करत नव्हती. किंबहूना मौत का सौदागर म्हणले तेंव्हापासून किंवा त्याही आधीपासून काँग्रेसला (आणि डाव्यांना देखील) मोदीं राष्ट्रीय नेतृत्व आणि म्हणून आव्हान ठरतील ही भिती होती. काँग्रेसने आणि डाव्या विचारवंतांनी / राजकारण्यांनी जनतेला अंडरएस्टीमेट केले. आता काळ बदलला आहे आणि तेच ते बोलून काही उपयोग होणार नाही तर जनतेला काम करणारे नेतृत्व हवे आहे. भ्रष्टाचारी आणि मक्ख नको आहे किंवा नुसतेच स्वतः स्वच्छ, भ्रष्टाचार विरुद्ध असे म्हणणारे आक्रस्ताळी नाकर्ते नेतृत्व नको आहे. पण हे यांच्या लक्षातच आले नाही. त्यांना वाटले, "दूर गाँव मे जब बच्चा रात को रोता है तो मॉ केहती है..." च्या चालीवर मोदींची भिती घातली की झाले. त्याला कुठल्याच धर्माधारीत जनतेने कमीअधिक प्रमाणात विश्वास ठेवला नाही.

In reply to by विकास

arunjoshi123 19/05/2014 - 19:11
काँग्रेस मोदींना अंडरएस्टीमेट करत नव्हती. काँग्रेसने आणि डाव्या विचारवंतांनी / राजकारण्यांनी जनतेला अंडरएस्टीमेट केले.
करेक्ट, बूल्झाय

In reply to by arunjoshi123

काँग्रेसने आणि डाव्या विचारवंतांनी / राजकारण्यांनी जनतेला अंडरएस्टीमेट केले.
बरोब्बर. कुमार केतकरांसारखे तर साहित्य सम्मेलनातूनही संधी सोडत नव्हते."मोदी विद्वेषाचे राजकारण करत आहेत',देश फोडत आहेत वगैरे .अशी भिती घातली की मग काम झाले असा त्यांचा समज होता.तिथे केजरीवालही तोच प्रकार. भ्रष्टाचाराविरुद्ध चीड आहे तर ज्या नेत्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्याविरुद्ध तरी निवडणूक लढवायची-राणे,भुजबळ्,सिब्बल किंवा कॉन्ग्रेसची राज्ये.पण अरविंद फक्त गुजरातबद्दलच बोलायचा.त्यामुळे आपची मते फिरली.

मदनबाण 20/05/2014 - 16:11
अरे... अरनब गोस्वामीचे सुद्धा मोठे उपकार आहेत... पप्पुचा पोपट अख्या जगाला त्यानेच करुन दाखवला ना ? ;) बाकी मोदींची घौड-दौड सुरु होण्याची चिन्हे आता पासुनच दिसु लागली आहेत असे वाटु लागले आहे...कारण, Narendra Modi keen to deepen ties with Israel: Benjamin Netanyahu जाता जाता :- इस्त्राइलचा उल्लेख आलाच आहे,तर मोदकाची Munich Massacre... ही लेखमाला जरुर वाचा.

In reply to by मदनबाण

सूड 20/05/2014 - 17:42
>>अरे... अरनब गोस्वामीचे सुद्धा मोठे उपकार आहेत... पप्पुचा पोपट अख्या जगाला त्यानेच करुन दाखवला ना ? >> हे मात्र खरं !! ;)

In reply to by मदनबाण

आनन्दा 20/05/2014 - 18:39
अरे... अरनब गोस्वामीचे सुद्धा मोठे उपकार आहेत... पप्पुचा पोपट अख्या जगाला त्यानेच करुन दाखवला ना ?
+१०० बाकी मोदींच्या सत्तारोहणाचे / प्रतिमेचे जागतिक राजकारणावर होणारे संभाव्य परिणाम या गोष्टीवर कोणीतरी लेख लिहावा अश्या प्रतीक्षेत आहे. नाहीतर मग आहेच आतासारखी एक जिलबी आणि चर्चा. पण माझा या विषयांवर फारसा अभ्यास नसल्यामुळे बरीच चुकीची माहिती लेखात मांडली जातेय असे दिसतय.

मला राजकारणात विशेष कांही (किंवा कदाचित कांहीच) कळत नाही. तरीपण मला वाटतं काँग्रेसच्या राजवटीतील प्रचंड घोटाळे, मोदींची मुखदुर्बलता, राहूलची बालीश बडबड ह्यांना कंटाळलेल्या मतदारांना, मोदींच्या तडफदार व्यक्तिमत्वात एक आश्वासक नेता सापडला, संसर्गजन्य साथी प्रमाणे पसरलेली 'अब की बार मोदी सरकार' घोषणा, गुजराथ पॅटर्नचे आकर्षण, नवतरूणांमधील राजकारणातला वाढता रस आदी मुद्दे बिजेपीच्या फायद्यात गेले. काँग्रेससाठी काळ आणि वेळ दोन्ही आले होते. वरचा चौकटराजा ह्यांचा हा प्रतिसाद मला जास्त पटला.

In reply to by सुनील

चिरोटा 21/05/2014 - 12:00
पेठकर काकांनी त्यांना राजकारणातले विशेष कळत नाही असे म्हंटले आहे.!!

In reply to by प्रकाश घाटपांडे

मदनबाण 21/05/2014 - 20:15
पकाका धन्स ! :) धन्स अशासाठी कारण त्या लेखाच्या खाली ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत, त्यातली एक वाचुन मी शॉलिट्ट हसलो बघा ! ती प्रतिक्रिया मणोरंजनासाठी इथे चोप्य पेस्त करतो... Ravi - सोमवार, 19 मे 2014 - 08:20 PM IST अगदी बरोबर बोललात. शिवाय आंतरराष्ट्रीय मानवतावादाला मानणारे आणि झिम्बाब्वेचे माजी गोलंदाज पमेलेलो बांग्वा ह्यांनीही हा जातीयवादाचा विजय मानले आहे. एल्टन चिगुम्बरा आणि मौरीस ओडुम्बे यांनीही त्याला अनुमोदन दिले.ओडुम्बे हे मूळचे मराठी असल्याचे म्हटले जाते. पण हे भाई वैद्य कोण आहेत? *LOL*

In reply to by प्रकाश घाटपांडे

दुव्यासाठी धन्यु घाटपांडे साहेब ! असली माणसे तर आपले नेहमीचे अळणी जीवन मजेशीर बनवाणारे मीठ आहेत ! =)) ती जेवढी जास्त अगतिक बनतात तेवढी जास्त विनोदी होतात. पण सत्याचा सामना करणे त्यांना जरा कठीणच जाते, याची खंत वाटते :(

जनमानसाचा ठाव घेणारे हजरजबाबी वक्तृत्व , लाेकांना आश्वस्त करणारा आत्मविश्वास आणि गुजरातमधील कामगिरीचे वेळाेवेळी केलेले "उदाहरणासहीत स्पष्टीकरण" या गाेष्टींचा उल्लेख करावासा वाटताे. एका निर्नायकी अवस्थेतल्या देशाला अशा व्यक्तीमत्वाची भुरळ पडणे सहाजिकच !

प्रसाद१९७१ 19/05/2014 - 13:28
तिथे देखील मतदारांनी भाजपाला॑ कौल दिला आहे. >>>>>>मतदारांनी भाजपला कौल दिला नाही तर मोदींना दिला. मोदी नसते तर भाजपला १५० जागा पण मिळाल्या नसत्या. पुण्यात काँग्रेस पडुन शिरोळे सारखा कोणाला माहीती नसलेला माणुस निवडुन येउ शकला ते फक्त मोदीं मुळेच.

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा 19/05/2014 - 13:33
मतदारांनी भाजपला कौल दिला नाही तर मोदींना दिला
सहमत. सध्या मोदी म्हणजेच भाजपा. हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. पण
शिरोळे सारखा कोणाला माहीती नसलेला माणुस
या वाक्याशी असहमत. कलमाडी असताना देखील शिरोळे फक्त २४००० मतांनी हरले होते. पुण्याची सीट यावेळेस भाजपाचीह होती. मोदी लाटेमुळे फक्त ते सुकर झाले इतकेच.

प्रसाद१९७१ 19/05/2014 - 13:29
. परंपरागत मुस्लिम मतदार हा नेहमीच काँग्रेसचा समर्थक राहिला आहे. या मतदारानेदेखील काही प्रमाणात मोदींच्या बाजूने मतदान केले. >>>>>>>>> हे अशक्य आहे. मुस्लिमांची मते भाजप ला ( त्यात सुद्धा मोदींना ) मिळणे अशक्य आहे. ही बडबड सुद्धा तथाकथित सेक्युलर लोकांनी चालू केली आहे.

In reply to by प्रसाद१९७१

चित्रगुप्त 20/05/2014 - 09:46
मी रहातो, तिथे आठदहा मुस्लिम कुटुंबे असून त्यांची तरूण पिढीतील मुले माझ्या मुलांबरोबर लहानपणापासून खेळलेली आहेत. त्यांनी सांगितले, की त्यांच्या घरातील वृद्धांनी काँग्रेसला मते दिली, तर संख्येने जास्त असलेल्या सुशिक्षित तरूण पिढीने भाजपाला.

In reply to by प्रसाद१९७१

चित्रगुप्त 20/05/2014 - 12:41
ह्या तुम्हाला फसवायच्या खेळी आहेत. काहीतरी सांगुन तुम्हाला गंडवायचे
समजा, तुम्ही म्हणता तसे असले, तर हे तुम्हाला खात्रीपूर्वक कसे समजले, हे जाणून घेऊ इच्छितो.

In reply to by ऋषिकेश

आनन्दा 19/05/2014 - 13:56
आआपने भाजपाला कशी मदत केली?
आपने ठरवून भाजपाला मदत केली असे माझे म्हणणे नाही. मी असे म्हटले आहे की "पण कोंग्रेस्ची बी टीम असलेले केजरीवाल नकळतपणे भाजपाला कशी मदत करू लागले ते जिथे खुद्द केजरीवालांना कळले नाही, तर ते इतरांना काय कळणार" असे मी का म्हणतो याची कारणे अशी - १. आप ने कारणाशिवाय दिल्ली मधली सत्त सोडली. ती सत्ता ठेवून जर त्यांनी लोकसभा लढवल्या असत्या, तर ही निवडणूक भाजपाला थोडी जड गेली असती. २. केजरीवालांनी निवडणूकीला भाजपा विरुद्ध केजरवाल असे स्वरूप आणले. परंतु केजरीवालांकडे त्यांच्या शुद्ध (?) हेतूंच्या पलीकडे दाखवण्यासारखे काहीच नव्हते. त्यामुळे आपकडे वळलेला मतदार पुन्हा भाजपाकडे वळला. ३. स्वतःची प्रतिमा बनवण्याच्या नादात केजरीवालांनी आपल्या धर्मनिरपेक्षतेचा अतिरेक केला, परिणाम भाजपाचा हिंदुत्ववादी समर्थक वर्ग, जो केजरीवलांच्या मागे जाण्याची शक्यता होती, तो परत फिरला. कारण त्यांना केजरीवालांना मत देणे म्हणजे काँग्रेसला मत देण्यासारखेच वाटू लागले. इन अ नटशेल, केजरीवालांच्या माकडचेष्टांमुळे भाजपाची मते फुटण्याऐवजी भाजपाविरोधी मतेच फुटली. आणि मुख्य म्हणजे, नव्याने मतदान करणार्‍या १०% मतदारांसमोर मोदींशिवाय समर्थ पर्यायच राहिला नाही. त्याच १०%ची परिणिती या जास्तीच्या १०० जागांमध्ये झालेली आहे.

In reply to by आनन्दा

ऋषिकेश 19/05/2014 - 14:06
इन अ नटशेल, केजरीवालांच्या माकडचेष्टांमुळे भाजपाची मते फुटण्याऐवजी भाजपाविरोधी मतेच फुटली.
यालाच आधार मागतो आहे. मुळात ९९% ठिकाणी आआपचे डिपॉझिट जप्त झाले आहे. अशावेळी त्यांनी विरोधी मते कशी-कितपत फोडली? हे समजावून घ्यायचे आहे.

In reply to by ऋषिकेश

आनन्दा 19/05/2014 - 14:39
मुळात ९९% ठिकाणी आआपचे डिपॉझिट जप्त झाले आहे
हे तर खरेच आहे. लेट मी रेफ्रेझ इट - केजरीवालांना काँग्रेसविरोधी मते आपल्याकडे वळवण्यात अपयश आले. आणि त्याचे कारण त्यांच्या माकडचेष्टा. दिल्ली नीट सांभाळली असती, आणि देशात निवडक ठिकाणी जर निवडणूका लढवल्या असत्या, तर आप नक्कीच भाजपाला जड गेले असते. परंतु केजरीवालांकडून झालेल्या भ्रमनिरासामुळे भाजपाकडे मतांचे अधिक ध्रुवीकरण झाले. अर्थात याला आधार देण्यास विदा नाही, पण मी मिपावरच असे लोक दाखवू शकतो की जे प्रथम आपचे समर्थक होते, पण आपच्या कारन्यांमुळे ते नंतर विरोधक झाले. दिल्लीमध्ये ३०+% जागा मिळवल्यानंतर आप देशभर भाजपाच्या मार्गात पुरेसे काटे पसरेल असे वाटले होते, त्यावरच "हे काँग्रेसची बी टीम" वगौरे गृहीतके होती. पण आपच्या अनार्किस्ट भूमिकांमुळे आपचे बरेचसे समर्थक आपापल्या घरी परतले. म्हणून मला असे म्हणायचे आहे की आप ने ही निवडणूक भाजपाला अधिक सोपी केली.

अनुप ढेरे 19/05/2014 - 13:53
१. परंपरागत मुस्लिम मतदार हा नेहमीच काँग्रेसचा समर्थक राहिला आहे. या मतदारानेदेखील काही प्रमाणात मोदींच्या बाजूने मतदान केले. सर्व "धर्मनिरपेक्ष" पक्षांनी केलेला प्रचार या मतदारांनी फाट्यावर मारला याचे मला जरा आश्चर्यच वाटत आलेले आहे.
हा निष्कर्ष कसा काढलात? http://www.thehindu.com/opinion/op-ed/not-how-many-but-who-voted-made-the-difference/article6022959.ece इथे बरोब्बर उल्ट म्ह्टलं आहे.

In reply to by अनुप ढेरे

आनन्दा 19/05/2014 - 15:20
मी माझे शब्द मागे घेतो. तो माझा अंदाज होता, पटत नसला तरी. गुजरात मध्ये २६ पैकी २६ जागा, आणि उप्र मध्ये ८० पैकी ७०+ या विदावर आधारलेले होते. पण हेही तितकेच खरे की उप्र मध्ये देखील बिगर मुस्लिम मतांवर निवडणूक जिंकता येते.

In reply to by धन्या

आनन्दा 20/05/2014 - 11:04
बाकी काही दिवसांपूर्वी मोदींच्या नावाने खडे फोडणारे लोक आता मोदींच्या विजयाची हवा स्वतःच्या शिडात भरून घ्यायला लागलेत हे पाहून अंमळ मौज वाटली :)

ब्राह्मण ,ओबिसी बर्याच प्रमाणात दलित यांच्या एकसंध मतांच्या साथीने मोदी/ भाजपा सत्तेत आला आहे.बसपाला शून्य जागा याचेच द्योतक आहे. मुस्लिम क्षत्रीय(राज्यात मराठा ) व तत्सम जाती यांनी काँग्रेस व युपीएलाच मत दिले आहे ,राज्यातही मराठ्यांनी राकाँ काँच्याच बाजूने मत दिले आहे. आपल्या मुलभूत अधिकारांच्या बाबतीत जागृत असलेले मतदार हे ब्राह्मण ,ओबिसी, दलित वा तत्सम समाजातून येतात, यांच्याही जातीय धार्मिक अस्मिता आहेत परंतु त्या तितक्याशा धारदार नाहीत. आपल्या राज्यापुरते बोलायचे तर मुस्लिम, मराठा हे डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर मत देत नाहीत ,तसे असते तर राकाँ उभाच राहीला नसता. कोण इफ्तार पार्ट्यांना येतो? कोण बाबा ,दादा ,बापू, साहेब यांच्या जवळचा आहे?आपल्या जातीचाच आहे काय? हे बघूनच मतदान केले जाते/ मतदान होते. राज्यात युतीला सत्तेत यायचे असेल तर ब्राह्मण ओबिसी दलित समाज जैन वगैरे व्यापारी समूहांना लोकसभेप्रमाणे एकसंध बांधावे लागेल. धार्मिक व जातीय अस्मितेला कमालीची धार चढवलेले अनुक्रमे मुस्लिम व मराठा पुन्हा काँ व राकाँलाच मत देणार.

In reply to by नानासाहेब नेफळे

अगदी बरोबर बोललास नाना. येत्या विधान्सभा निवडणूकीत सेना-भाजपाला यश संपादन करायचे असेल तर जातिय धार बोथट कशी करता येईल हा विचार त्यांनी करणे गरजेचे आहे.जातीचे राजकारण करून अलिप्त राहण्यात पवार वाकब्गार आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

नाव आडनाव 19/05/2014 - 18:06
काय सरकार, आले का जातीवर? एक गोष्ट न कळण्या सारखी आहे - जवळपास ३ कोटी लोकसंख्या (३०% गृहीत धरून ) असलेल्या मराठा समाजाने कुणाला मत दिलंय हे तुम्हाला एकदम कसं कळतं हो नेफळे साहेब? तुम्ही एखादी एजेन्सी कडे दिला होता का सर्वे करायला?

In reply to by नाव आडनाव

यांचा एखादा बाबा दादा उभा राहीला की आख्ख्या वाड्या वस्त्या त्याला झाडून मतं देतात ,"ते आमचे पाहुणे लागतात" हा यांचा ठरलेला डायलॉग असतो. कशाला अशा लोकांचा सर्वे करायचीही गरज नाही. मी जात बघुन मत देत नाही, जात बघुन मत देणार्यांनी हे लक्षात ठेवावं की ते खासदार निवडणार आहेत 'जावई' नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

नाव आडनाव 20/05/2014 - 11:42
सरकार तुम्ही एखाद्या घटनेतून ३ कोटी लोकांबद्दल मत बनवता? कि मत बनवूनच घटनां कडे बघता?:) तुमच्या साठी माझ्या एका मित्राची एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो - मित्र नगरचा आहे, त्याचा भाचा ज्याचं आडनाव पवार आहे आणि नाव शरद आहे आणि तो मराठा पण आहे त्याने देखील भाजप ला मतदान केलंय :) मत कुणी कुणाला दिलंय याची जाहीर चर्चा करू नये, पण तुम्हाला आवडेल म्हणून हा किस्सा सांगितला. आता कशावर शंका घायची - त्या मित्राची जात मराठा असण्यावर, त्याच्या भाच्याने मतदान केलंय कि नाही यावर कि अजून काही? कारण "मराठा" "विकासाच्या मुद्द्यावर" राज कारण करत नाही म्हणता तुम्ही :) गेट वेल सून सरकार.

In reply to by नाव आडनाव

नाव शरद पवार... भाजपाला वोट ....इथेच फसलात राव तूम्ही ! :-P घेतला त्याने घोळात तूम्हाला ,वाणं नाय पण गुण या प्रत्येकात आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 19/05/2014 - 20:55
काय गंमत आहे! नाना नेफळे आपला दुसरा डु आय (माई फुसकुलीकर) स्वतःचेच कौतुक करतोय. माई, नानाच्या नावाने आता एखादा झकास उखाणा घ्या!

In reply to by नानासाहेब नेफळे

सूड 19/05/2014 - 15:18
>>आपल्या राज्यापुरते बोलायचे तर मुस्लिम, मराठा हे डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर मत देत नाहीत ,तसे असते तर राकाँ उभाच राहीला नसता. सहमत !!

In reply to by नानासाहेब नेफळे

>>>>मुस्लिम क्षत्रीय(राज्यात मराठा ) व तत्सम जाती यांनी काँग्रेस व युपीएलाच मत दिले आहे ,राज्यातही मराठ्यांनी राकाँ काँच्याच बाजूने मत दिले आहे. / धार्मिक व जातीय अस्मितेला कमालीची धार चढवलेले अनुक्रमे मुस्लिम व मराठा पुन्हा काँ व राकाँलाच मत देणार. चुकीचे विधान आहेत. बराच मराठा समाज शिवसेनेच्या तसेच भाजपाच्या बाजुने आहे.

दुश्यन्त 19/05/2014 - 16:03
व्हल २ म्हणजे कर्नाटक, छत्तीसगड, हरियाणा या ठिकाणी ५०- ६०% जागा भाजपाला मिळाल्या आहेत. त्याच्या पलिकडे त्रिपुराचा अपवाद वगळता भाजपाची डाळ फारशी शिजली नाही. भाजपला छत्तिसगढमध्ये मध्ये ५०-६०% पेक्षा भरपुर जास्त (११ पैकी ९) खासदार मिळाले आहेत.हरियानात १० पैकी ७. शिवाय आसाम मध्ये पण चांगले यश (१४ पैकी ८ खासदार) मिळाले आहे. त्रिपुरामध्ये भाजपचा एकही खासदार आला नाही.तिथे सीपीएम आहे.

In reply to by दुश्यन्त

आनन्दा 19/05/2014 - 18:31
शिवाय आसाम मध्ये पण चांगले यश (१४ पैकी ८ खासदार) मिळाले आहे. त्रिपुरामध्ये भाजपचा एकही खासदार आला नाही.तिथे सीपीएम आहे.
माफ करा, मला आसाम म्हणायचे होते.

चौकटराजा 19/05/2014 - 16:57
१९७७ मधे इंदिराजींसह कॉग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यावेळचे नको इतके श्रेय श्री जयप्रकाश नारायण याना देण्यात आले तेच आता होते आहे. ही लाट आहे पण ती मोदींची नव्हे तर अनेक शत्रू कॉंग्रेसने एकाच वेळी केले. त्यांचे यावेळी निवडणूक पूर्व समझोते फारसे झालेच नाहीत. मनमोहन सिंगामधील नेतृत्व गुणाचा पूर्ण अभाव. भिंतीआडून राजकारण करण्याची सोनियांची सवय,राहुल गांधी सारखा पोरकट निवडणूकनेता,हाय कमांड संस्कृति, लोकाना पद्धतशीर पणे रोजगार निर्माण करण्याऐवजी काहीतरी सारख्या योजना उकरीत बसणे,निरनिराळी पॅर्‍केज जाहीर करणे, इनकम टॅक्स ची मर्यादा न वाढविणे, करबुडवेगिरीचा नीट शोध न घेणे,फोमिली पेशन मधे केविलवाणी रक्कम देणे, नाईलाज म्हणून १२ सिलिंडर सबसिडाईज करणे,योजनांचे बजेट प्रमाणे अंमलबजावणी न होणे, अण्णा हजारेंच्या आंदोलनातून सरकारची नियत बाहेर येणे.,दागी मंत्त्र्याना संरक्षण देण्याचा प्रयत्न करणे, कलमाडीच्या विरोद्धात कारवाई उशीरा होणे, रामदेव बाबांच्या आंदोलनात त्याना घृणास्पद वागणूक देणे, रेलेवे दरांवरून ममतांशी आलेले वितुष्ट, कांगीचे मित्र लालूप्रसाद यांचा पाडाव, अत्यंत संथ अशा पृथवीराज चव्हाण यांना मुख्यमत्री करणे, आदर्श घोटाला, काँमनवेल्य गेम घोटाळा, कोळसा घोटाळा, लवासा प्रकरण,भुजबळ प्रकरण, सिंचन प्रकरण ई ई मुळे कॉग्रेसचा पराभव झाला. खरे रे तर तो १९८९ पासून होतच होता. आता व्हेंटीलेटर तरी किती दिवस काम करणार??? अर्थात सरकार मधील निम्न स्तरावर चालणारा भष्टाचार, महागाई असे काही प्रश मोदीनाही सोडविता येणार नाहीत याची खात्री आहे.स्थिर सरकार असल्याने मोदीना आता ब्लॅकमेल करायला कोणी नाही. पण मी सुडाचे राजकारण करणार नाही असे म्हणत त्यानी मुलायम मायावती ई बाबतचे काही गैरप्रकार आता सी बी आय ने बाहेर काढायचे ठरवले वा येडींचे आणखी काही प्रकार बाहेर आले तर त्यात अडथळा आणू नये.

In reply to by चौकटराजा

आनन्दा 19/05/2014 - 18:30
कोंग्रेसच्या विरोधात हवा होती हे तर खरेच आहे, पण ती हवा आपल्या शिडात भरायला बुद्धीबळ हवे ना. कारण आता १९७७ मध्ये इन्दिराजींनी जे केले ते आता करणे शक्य नाही. लोकांनी भाजपाला मते दिलेली नसून त्यांनी ती मोदींना दिली आहेत, त्यामुळे आता मोदींच्या विरोधात जाणे कोणालाही कठीण आहे.

In reply to by आनन्दा

चौकटराजा 20/05/2014 - 09:33
पण ती हवा आपल्या शिडात भरायला बुद्धीबळ हवे ना मोदींची शक्तीस्थळे १.मोदीनी आपल्या कुटुंबकबिल्यापासून स्वतःला अलग केलेले आहे. ( भुजबळ पवार ,शिंदे ठाकरे मुंडे) २.मोदी कोणत्याही प्रकरणात स्वत: अडकलेले आढललेले नाहीत..(अशोक चव्हाण,राजीव गांधी, सुखराम येडीयुरप्पा ) ३.मोदी भाषणात ज्याप्रंमाणे प्रबोधक आहेत त्याप्रमाणे ते एक उत्तम नट असून करंमणूक करणारे नेतेही आहेत. ( मनमोहन सिंग, सोनिया, राजनाथ सिंग, पवार ) ४.मोदीना इंग्रजी येते तरीही ते हिंदीत बोलण्याचा आग्रह धरतात. व संस्कृतोदभव तसेच उर्र्दू मिश्रित हिंदी ( राजनाथ , बाजपेयी यांच्या पेक्षा निराळी ) बोलू शकतात. ( चिदम्बरम ) ५.ते सतत शिकणारे नेते आहेत त्यामुळे अधुनिक युगाशी त्यांचे नाते चांगले आहे. पुढे मागे ते तमिळांशी तमिळमधून बोलू लागल्यास नवल नाही. ६.सामान्य लोकांमधून आल्याने त्यांची उदाहरणे फार जवळची वाटतात. ७.आता त्यांच्याकडे ५ वर्षे सत्ता व स्थिरता असल्याने त्यांच्या कल्पकतेला पारावर रहाणार नाही . कुणी सांगावे कदाचित ते बाजपेयी, राजीव, इंदिरा गांधी, नेहरू याना मागे टाकतील.

In reply to by आनन्दा

कोंग्रेसच्या विरोधात हवा होती हे तर खरेच आहे, पण ती हवा आपल्या शिडात भरायला बुद्धीबळ हवे ना. गुजरातचा गेल्या १२ वर्षांचा विकासाचा इतिहास पाहता माश्यांनी शिंकायला इतकी घाई करू नये ! =)) (तो विकास म्हणजे आकड्यांची बनवाबनवी होती असे म्हणायचे मनात येणार्‍यांनी प्रथम गुजरात सरकारच्या विकास योजनांना केंद्र सरकारने, त्याच्याशी संबंद्धीत संस्थांनी आणि गैरसरकारी संस्थांनी शेकड्यांनी दिलेल्या मानांकनाची / बहुमानांची यादी चाळावी... म्हणजे नंतर लाजून खाटेखाली लपावे लागणार नाही. *: या याद्या जालावर अनेक सरकारी / गैरसरकारी संस्थळांवर आणि इतरत्रही उपलब्ध आहेत. थोडेसे परिश्रम करून त्या स्वतः पाहाव्या. अश्या कृतीने आणि माहितीने बुद्धीबळात नक्की वाढ होते.)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आनन्दा 20/05/2014 - 15:28
गुजरातचा गेल्या १२ वर्षांचा विकासाचा इतिहास पाहता माश्यांनी शिंकायला इतकी घाई करू नये
मी कुठे शिंकतोय, उलट भाजपा स्वबळावर सत्तेत येईल असे म्हणणारा मिपावर मी पहिला होतो.

In reply to by चौकटराजा

विकास 19/05/2014 - 18:53
सहमत. अर्थात सरकार मधील निम्न स्तरावर चालणारा भष्टाचार, महागाई असे काही प्रश मोदीनाही सोडविता येणार नाहीत याची खात्री आहे. मोदींना आव्हाने खूप आहेत. पण असे वाटते आहे की त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. जनतेची अपेक्षा देखील एकदम सगळे बदलेल अशी नसावी. पण जर पुढच्या ३-६-१२ महीन्यात टप्याटप्याने पॉझिटीव्ह ट्रेंड दिसला तर जनतेल आपण घेतलेला निर्णय चुकीचा वाटणार नाही.

In reply to by चौकटराजा

प्रसाद१९७१ 19/05/2014 - 18:55
१९७७ मधे इंदिराजींसह कॉग्रेसचा दारूण पराभव झाला.>>>>>>>>>>> १९७७ मधे दारुण पराभव नव्हता झाला काँग्रेसचा. ३५ ट्क्क्यापेक्षा जास्त मते मिळाली होती. टक्केवारी २-३ % च घटली होती. सगळे विरोधक एकत्र आले होते म्हणुन जागा कमी मिळाल्या.

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा 19/05/2014 - 19:22
आणि मुख्य म्हणजे १९७७ मध्ये जनता पझ म्हणजे कडबोळे होते, यावेळेस तो एकखांबी तंबू आहे. तो खांब आहे तोपर्यंत तंबू कोसळत नाही हे नक्की.

In reply to by आजानुकर्ण

विकास 19/05/2014 - 20:47
ही घ्या.. ही आकड्यात. फक्त २०१४ मधे काँग्रेसने नक्की किती जागा लढवल्या ते माहीत नाही. त्यामुळे २००९ चाच नंबर (४४०) गृहीत धरला आहे. कुणाला माहीत असल्यास सांगावा ही विनंती.

In reply to by सूड

विकास 20/05/2014 - 20:43
There is no bigger joy than working for Bharat Mata! India has given us so much; now is the right time to give back to our nation through our positive contribution. Narendra Modi firmly believes that India has unparalleled talent. The people of India can take this nation to greater heights and make India the leading nation of the world. He also believes that the people, particularly the youth of India should devote their time, skills and energy towards the nation. Join this grand movement to create a strong, glorious and inclusive India. You are requested to fill this form. Remember- your contribution will be a gigantic step in creating a better India

In reply to by विकास

मदनबाण 21/05/2014 - 13:41
जी+ च्या आयडी ने लॉगिन करुन पाहिले... पण 404 ! चा एरर येतो आहे. :( याचा अर्थ क्लायंट सर्व्हरशी कम्युनिकेट करु शकत नाही. बहुदा फॉर्म भरणार्‍यांची संख्या जास्त असणार ! त्यामुळे लोड वाढले असेल असे वाटते. छ्या... आता फॉर्म कसा भरणार ?

In reply to by मदनबाण

लंबूटांग 21/05/2014 - 17:38
म्हणजे ते पान सापडत नाहीये असा होतो. उदा. http://www.google.com/asdasdasd टाइपल्यावर येते ते. त्यांच्या वेब-मास्टरला सांगा युआरएल ठीक करायला (किंवा गूगलला). लोडशी काहीही संबंध नाहीये. क्लायंट-सर्वरशी कम्युनिकेट करू शकत नसल्यास ४०८ एरर येतो.

In reply to by मदनबाण

विकास 21/05/2014 - 18:19
सब्मिट करताना होत आहे का फॉर्मला अ‍ॅक्सेसच मिळत नाही? कारण मी आत्ता त्या पानावर गेलो तर फॉर्म दिसतोय, पण मी भारतात रहात नसल्याने तो भरण्याच्या भानगडीत पडलो नाही. कारण तो मला वाटते भारतनिवासी भारतीयांसाठीच आहे.

In reply to by पिलीयन रायडर

विकास 22/05/2014 - 16:26
हे नरेंद्र मोदींचे अधिकृत प्रचार संस्थळ आहे. आता जरी प्रचार नसला तरी त्याचा वापर अशा पध्दतीने करणे आताच्या काळात कॉमन आहे. (उदा. बराकओबामा.कॉम). तरी देखील तुमच्या मुद्द्याशी सहमत.

In reply to by विकास

मला वाटलंच की ते प्रचारासाठिचे अधिकृत संस्थळ असेल. पण अशी माहिती उद्या पंतप्रधान कार्यालयानी सरकारी चॅनल्स कडुन मागवली तर एकवेळ ठिके.. पण ह्या संस्थळाची तशी खात्री वाटत नाही. लोक जनगणना करताना नीट माहिती देत नव्हते.. इथे तर खुप काही विचारलं आहे..

विकास 19/05/2014 - 18:48
काँग्रेस ने मोदींना अंडरएस्टिमेट केले, ही त्यांची चूक झाली. काँग्रेस मोदींना अंडरएस्टीमेट करत नव्हती. किंबहूना मौत का सौदागर म्हणले तेंव्हापासून किंवा त्याही आधीपासून काँग्रेसला (आणि डाव्यांना देखील) मोदीं राष्ट्रीय नेतृत्व आणि म्हणून आव्हान ठरतील ही भिती होती. काँग्रेसने आणि डाव्या विचारवंतांनी / राजकारण्यांनी जनतेला अंडरएस्टीमेट केले. आता काळ बदलला आहे आणि तेच ते बोलून काही उपयोग होणार नाही तर जनतेला काम करणारे नेतृत्व हवे आहे. भ्रष्टाचारी आणि मक्ख नको आहे किंवा नुसतेच स्वतः स्वच्छ, भ्रष्टाचार विरुद्ध असे म्हणणारे आक्रस्ताळी नाकर्ते नेतृत्व नको आहे. पण हे यांच्या लक्षातच आले नाही. त्यांना वाटले, "दूर गाँव मे जब बच्चा रात को रोता है तो मॉ केहती है..." च्या चालीवर मोदींची भिती घातली की झाले. त्याला कुठल्याच धर्माधारीत जनतेने कमीअधिक प्रमाणात विश्वास ठेवला नाही.

In reply to by विकास

arunjoshi123 19/05/2014 - 19:11
काँग्रेस मोदींना अंडरएस्टीमेट करत नव्हती. काँग्रेसने आणि डाव्या विचारवंतांनी / राजकारण्यांनी जनतेला अंडरएस्टीमेट केले.
करेक्ट, बूल्झाय

In reply to by arunjoshi123

काँग्रेसने आणि डाव्या विचारवंतांनी / राजकारण्यांनी जनतेला अंडरएस्टीमेट केले.
बरोब्बर. कुमार केतकरांसारखे तर साहित्य सम्मेलनातूनही संधी सोडत नव्हते."मोदी विद्वेषाचे राजकारण करत आहेत',देश फोडत आहेत वगैरे .अशी भिती घातली की मग काम झाले असा त्यांचा समज होता.तिथे केजरीवालही तोच प्रकार. भ्रष्टाचाराविरुद्ध चीड आहे तर ज्या नेत्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्याविरुद्ध तरी निवडणूक लढवायची-राणे,भुजबळ्,सिब्बल किंवा कॉन्ग्रेसची राज्ये.पण अरविंद फक्त गुजरातबद्दलच बोलायचा.त्यामुळे आपची मते फिरली.

मदनबाण 20/05/2014 - 16:11
अरे... अरनब गोस्वामीचे सुद्धा मोठे उपकार आहेत... पप्पुचा पोपट अख्या जगाला त्यानेच करुन दाखवला ना ? ;) बाकी मोदींची घौड-दौड सुरु होण्याची चिन्हे आता पासुनच दिसु लागली आहेत असे वाटु लागले आहे...कारण, Narendra Modi keen to deepen ties with Israel: Benjamin Netanyahu जाता जाता :- इस्त्राइलचा उल्लेख आलाच आहे,तर मोदकाची Munich Massacre... ही लेखमाला जरुर वाचा.

In reply to by मदनबाण

सूड 20/05/2014 - 17:42
>>अरे... अरनब गोस्वामीचे सुद्धा मोठे उपकार आहेत... पप्पुचा पोपट अख्या जगाला त्यानेच करुन दाखवला ना ? >> हे मात्र खरं !! ;)

In reply to by मदनबाण

आनन्दा 20/05/2014 - 18:39
अरे... अरनब गोस्वामीचे सुद्धा मोठे उपकार आहेत... पप्पुचा पोपट अख्या जगाला त्यानेच करुन दाखवला ना ?
+१०० बाकी मोदींच्या सत्तारोहणाचे / प्रतिमेचे जागतिक राजकारणावर होणारे संभाव्य परिणाम या गोष्टीवर कोणीतरी लेख लिहावा अश्या प्रतीक्षेत आहे. नाहीतर मग आहेच आतासारखी एक जिलबी आणि चर्चा. पण माझा या विषयांवर फारसा अभ्यास नसल्यामुळे बरीच चुकीची माहिती लेखात मांडली जातेय असे दिसतय.

मला राजकारणात विशेष कांही (किंवा कदाचित कांहीच) कळत नाही. तरीपण मला वाटतं काँग्रेसच्या राजवटीतील प्रचंड घोटाळे, मोदींची मुखदुर्बलता, राहूलची बालीश बडबड ह्यांना कंटाळलेल्या मतदारांना, मोदींच्या तडफदार व्यक्तिमत्वात एक आश्वासक नेता सापडला, संसर्गजन्य साथी प्रमाणे पसरलेली 'अब की बार मोदी सरकार' घोषणा, गुजराथ पॅटर्नचे आकर्षण, नवतरूणांमधील राजकारणातला वाढता रस आदी मुद्दे बिजेपीच्या फायद्यात गेले. काँग्रेससाठी काळ आणि वेळ दोन्ही आले होते. वरचा चौकटराजा ह्यांचा हा प्रतिसाद मला जास्त पटला.

In reply to by सुनील

चिरोटा 21/05/2014 - 12:00
पेठकर काकांनी त्यांना राजकारणातले विशेष कळत नाही असे म्हंटले आहे.!!

In reply to by प्रकाश घाटपांडे

मदनबाण 21/05/2014 - 20:15
पकाका धन्स ! :) धन्स अशासाठी कारण त्या लेखाच्या खाली ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत, त्यातली एक वाचुन मी शॉलिट्ट हसलो बघा ! ती प्रतिक्रिया मणोरंजनासाठी इथे चोप्य पेस्त करतो... Ravi - सोमवार, 19 मे 2014 - 08:20 PM IST अगदी बरोबर बोललात. शिवाय आंतरराष्ट्रीय मानवतावादाला मानणारे आणि झिम्बाब्वेचे माजी गोलंदाज पमेलेलो बांग्वा ह्यांनीही हा जातीयवादाचा विजय मानले आहे. एल्टन चिगुम्बरा आणि मौरीस ओडुम्बे यांनीही त्याला अनुमोदन दिले.ओडुम्बे हे मूळचे मराठी असल्याचे म्हटले जाते. पण हे भाई वैद्य कोण आहेत? *LOL*

In reply to by प्रकाश घाटपांडे

दुव्यासाठी धन्यु घाटपांडे साहेब ! असली माणसे तर आपले नेहमीचे अळणी जीवन मजेशीर बनवाणारे मीठ आहेत ! =)) ती जेवढी जास्त अगतिक बनतात तेवढी जास्त विनोदी होतात. पण सत्याचा सामना करणे त्यांना जरा कठीणच जाते, याची खंत वाटते :(

जनमानसाचा ठाव घेणारे हजरजबाबी वक्तृत्व , लाेकांना आश्वस्त करणारा आत्मविश्वास आणि गुजरातमधील कामगिरीचे वेळाेवेळी केलेले "उदाहरणासहीत स्पष्टीकरण" या गाेष्टींचा उल्लेख करावासा वाटताे. एका निर्नायकी अवस्थेतल्या देशाला अशा व्यक्तीमत्वाची भुरळ पडणे सहाजिकच !
२०१४च्या निवडणूकीत नमोंचा न भूतो असा विजय झाला आणि सगळी समीकरणेच बदलली. मोदींचा विजयाने आनंद होत असला, तरी त्या आनंदापेक्षा अश्या एकहाती विजयाबद्दल वाटणारे आश्चर्य हेच जास्त आहे. आणि त्याला पुष्टी देणारे घटक आहेत ते असे - १. परंपरागत मुस्लिम मतदार हा नेहमीच काँग्रेसचा समर्थक राहिला आहे. या मतदारानेदेखील काही प्रमाणात मोदींच्या बाजूने मतदान केले. सर्व "धर्मनिरपेक्ष" पक्षांनी केलेला प्रचार या मतदारांनी फाट्यावर मारला याचे मला जरा आश्चर्यच वाटत आलेले आहे. २. काँग्रेस ने नमोंविरुद्ध प्रचाराची प्रचंड राळ उठवून्ब दिल्ली होती. त्यलाही मतदारांनी भीक घातली नाही. ३.