मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कल्पना / प्रस्ताव : मिपाकरांनी ट्रेक ला जाण्याबाबत

वेल्लाभट ·
नमस्कार! भाईयों और बहनो..... (सॉरी सॉरी. ते मोदींचं भाषण ऐकलं ना नुकतंच टीव्हीवर... ) हां तर आता मोदी सरकार वगैरे सगळं आलंय. अशी बातमीही आली आहे की ५ जून ला मॉन्सून केरळात दाखल होणार आहे. तेंव्हा त्याच्या स्वागताला एखाद्या डोंगरावर नाही गेलं तर मजा काय नाही का! असा विचार मनात आला. गेल्या चार पाच ट्रेक चे वृत्तांत फोटो जेंव्हा मिपावर टाकले तेंव्हा `आम्हाला न नेल्याबद्दल निषेध' वगैरे अनेक शेरे वाचायला लागले. :) तेंव्हा, म्हटलं की या खेपेस त्याची भरपाई करावी. एक सहज प्लॅन डोक्यात आलाय.

उदयनराजे विक्रमी मतांनी विजयी

raudransh_27 ·
क्लिंटन सर यांच्या पडघम मालिकेचे पुर्नवाचन करत असताना माझ्या एका प्रतिसादावर http://misalpav.com/node/27769 काही सदस्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, त्या वाचुन खरच कीव आली. या प्रतिसादावरुन आणि अशाच तत्सम अनुभवांवरुन एकदंरीत विचारांची पातळी, द्वेष, एकांगी विचार, दुसर्याना कमी लेखण्याची आम्हीच श्रेष्ठ वृत्ती पाहुन दु:ख वाटते. विशेषत छत्रपती शिवराय याचां अनादर आणि वरील प्रतिसादात असलेले अंधत्व,दत्तक,बिरूदावली सारखे टोमणे. असो, ज्या गोष्टी आपण वैयक्तिक बदलवु शकत नाही त्यावर काय करणार.

<<< हा मिपाचा विजय >>>

प्यारे१ ·
लेखनप्रकार
आम्ही काही काळापूर्वी http://misalpav.com/node/27418 ह्या काकू द्वारे गणपा खरंच मिपाशेफ बनतील का असा एक सर्व्हे घेतला होता. तेव्हा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात 'गणपा' चा प्रचार काही जणांनी केला. त्यांच्या विरुद्ध देखील काही लोक बोलले. आज ह्या ठिकाणी निकालाच्या प्रसंगी गणपा जिंकून आलेला आहे. सगळ्या मिपाकरांनी गणपा लहरी आहे- आपलं- गणपा लहर आहे हे मान्य केलं आहे. तरी देखील गणपा जिंकला म्हणजे सगळं साध्य झालं असं होत नाही. त्याला बर्‍याच पा कृ शिकायच्या आहेत, बनवून दाखवायच्या आहेत, सुगरणींच्या सल्ल्यांमधून नेमकेपणा आणायचा आहे.

अभिनंदन!

राही ·
भाजपला पूर्ण आणि स्वच्छ बहुमत मिळाल्याबद्दल अभिनंदन. देशाला बदल हवा होता, तो मिळाला. आज देशभर उत्सव साजरा होतो आहे. देशभरातच नव्हे तर परदेशातही जिथे जिथे भारतीय आहेत तिथे रात्री जागून लोक दिवाळी साजरी करीत आहेत. पुढील वाटचालीसाठी मोदींना आणि त्यांच्या नवीन सरकारला मनापासून शुभेच्छा.

लोकसभा निवडणुक २०१४ निकाल - १

विकास ·
नमस्कार मंडळी! आज अनेक वर्षांनी आणि अनेक निवडणुकांंनंतर आधी निवडणुक आणि आता निकालांबाबत उत्सुकतेचे वातावरण आहे. काही ठिकाणी ही उत्सुकता ही उत्साहाने भरलेली आहे तर काही ठि़काणी चिंतेने ग्रासलेली आहे. नक्की काय होत आहे हे अजून काही तासात समजेल. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार भाप्रवे ९:३० पर्यंत सुरवातीचे ट्रेंड्स समजतील. पण दुपारी १२ पर्यंत चित्र स्पष्ट दिसेल. हा धागा निवडणुक निकालांवर चर्चा, अपडेट्स करण्यासाठी काढत आहे. आयबीएन ने गेल्या सर्व निवडणुकांवर आधारीत इन्फोचार्ट तयार केला आहे.

लिखाण

मित्रहो ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.” पुलंची ही वाक्ये वाचनात आली आणि मी भारावून गेलो. ठरवले आपण सुद्धा कुठल्या तरी कलेशी मैत्री जोडावी. कुठलीतरी कला आत्मसात करावी पण कुठली कला हा फार मोठा प्रश्न होता. गाणे शिकावे म्हटले तर मला माझ्या गाण्याची पट्टी चांगली ठाउक होती.

गांधी जिवंत आहे...!

बाबा पाटील ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गांधींना मारल पण गांधीत्व अमर आहे,अश्वस्थाम्याच्या भळभळणार्‍या जखमेसारख!त्याला जिवंत ठेवण्यासाठी अजुन ही पैदा होतायेत्,कोनी तरी मंडेला,लामा आणी आण्णा कारण जो पर्यंत शोषण आणी शोषक आहेत्,तो पर्यंत त्याला निशस्त्र प्रतिकार करणारा गांधी परत परत जिवंत होणार आहे कारण प्रत्येकाच्या मनात फक्त हिंसेलाच स्थान नसत्,कुठतरी प्रेम आणी दयाळुपणाही असतो, हेच गांधीच्या पुर्नजन्माच रहस्य आहे. जो पर्यंत रक्तपात होत राहिल्,माणुस माणसाला गुलामाची वागणुक देत राहिल्,गांधीला माणसाला माणुस बनवण्यासाठी नथुरामाने गाडलेल्या थड्याग्यातुन परत परत उठावेच लागेल्,नाहीतर परत आम्ही आदिम जमान्यात जावुन पोहचु. माणसाच्या प्रेमासाठी

तुमच्यातले सकारात्मक गुण काय आहेत

अम्रुता आफले ·
मला अनेकवेळा असा प्रश्न पडतो असे काय आपल्याकडे दिवे लावण्यासारखे गुण आहेत जे दुसर्यांकडे नाहीत . कधी मला वाटत मी फक्त ९-५.३० येवढा वेळ जो कंपनीत कामाचा वेळ आहे त्यात मी फक्त काम करते पण त्यानंतर मी एकदा का कंपनी बाहेर पडले कि मग मी लगेच आई,सून,बायको या भूमिकेत शिरते ,त्या वेळी मी ऑफिसचा काम नाहीच करत. आणि दुसरा म्हणजे मी काश्यातही मास्तर नाही पण मी सगळा जमवून घेऊ शकते … हे एकदम सर्वसाधारण गुण आहेत माझ्यात ,आणि मी हेच कुणीही विचारला तरी सांगते कारण मला माझ्यातले गुण माहित आहेत आणि मला काहीही चढवून सांगायचं नसत.

बालपणीचा काळ सुखाचा....

चिन्मय श्री जोशी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात … पण आपण लहान असताना ते पटत नाही आणि नंतर कळून फायदाच नसतो… पण तरी खूप काही मिळत आपल्याला आपण लहान असताना … अर्थात मला माझ्या लहान पाणी सगळ्यात जास्त मिळालेली कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे मार आणि बोलणी … पण त्यात माझा काही दोष नव्हता … लहानपणी काय करायचं नाही हे जवळ जवळ प्रत्येक जण सांगायचा … पण आम्ही उद्योग करून रिकामे झाल्यावर …(आधी सांगितलं तर बहुधा आपल्याला भोगायची शिक्षा सावध करणाऱ्याला भोगायला लागत असावी … ) असो… तर त्या रम्य बालपणीचा काल (शिक्षांसाहित) आठवून आज खूप काही बोलावस वाटलं ….