मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मदत हवी आहे

निलेश देसाई ·

पैसा 15/05/2014 - 19:58
पुणेकर लोक मदत करू शकतात. बाकीच्यांचा काही उपयोग नै!

In reply to by यसवायजी

मिपाकरांना जमेल तितकी मदत करणे, हेच आमचे तत्व असल्याने, आमच्या तत्वात ही वस्तू बसते. तुम्हाला पण मिपाकराने हवी ती वस्तू दिल्याशी कारण...(आम खाव्,पेड मत देखो.)

In reply to by मुक्त विहारि

यसवायजी 16/05/2014 - 07:57
आम खाव्,पेड मत देखो मेरेकु येहिच पेड हुना. ;) अहो ते असंच,जुने स्कोअर सेटल करायचं चाल्लंय. निल्या दोस्त हय अपना.

पियू परी 19/05/2014 - 15:53
कॉमनफ्लोर.कॉम नावाच्या साईटवर शोधा. एक सोडून हजार ऑपशन्स मिळतील. शिवाय तुमचा इमेल आयडी रजिस्टर करून ठेवलात (जो डिसप्ले होत नाही) तर तुमच्या अपेक्षांमध्ये बसणार्‍या घराची नवी एंट्री आली कि तुम्हाला मेल येतो. मला आत्तापर्यंत ९८ नवीन घरे सुचवली कॉमनफ्लोरवाल्यांनी. आणि सगळ्यात चांगले म्हणजे लॉगिन वै. करावे लागत नाही.

In reply to by पियू परी

पाषाणभेद 19/05/2014 - 22:08
परी ग परी पण कॉमनफ्लोर.कॉम नवीन घर विकत घेण्यासाठी तसेच असलेले घर भाड्याने देण्यासाठी आहे ना? आपल्या निलेशला तर घर भाड्याने हवे आहे. आता काय करावे बरं?

दादा कोंडके 19/05/2014 - 22:40
हौसींग ड्वाट इन म्हणून एक नवीन साईट छान आहे. आपल्याला हव्या त्या एरिया मधलं घर बघायची म्यापवर सोय आहे. फोटो वगैरे अपलोड केलेले असतात. गुगलवर हौशींग ड्वाट इन विदाउअट ब्रोकरेज असा सर्च मारा. एजंटांना टाळा, प्यारासाईट्स साले.

पैसा 15/05/2014 - 19:58
पुणेकर लोक मदत करू शकतात. बाकीच्यांचा काही उपयोग नै!

In reply to by यसवायजी

मिपाकरांना जमेल तितकी मदत करणे, हेच आमचे तत्व असल्याने, आमच्या तत्वात ही वस्तू बसते. तुम्हाला पण मिपाकराने हवी ती वस्तू दिल्याशी कारण...(आम खाव्,पेड मत देखो.)

In reply to by मुक्त विहारि

यसवायजी 16/05/2014 - 07:57
आम खाव्,पेड मत देखो मेरेकु येहिच पेड हुना. ;) अहो ते असंच,जुने स्कोअर सेटल करायचं चाल्लंय. निल्या दोस्त हय अपना.

पियू परी 19/05/2014 - 15:53
कॉमनफ्लोर.कॉम नावाच्या साईटवर शोधा. एक सोडून हजार ऑपशन्स मिळतील. शिवाय तुमचा इमेल आयडी रजिस्टर करून ठेवलात (जो डिसप्ले होत नाही) तर तुमच्या अपेक्षांमध्ये बसणार्‍या घराची नवी एंट्री आली कि तुम्हाला मेल येतो. मला आत्तापर्यंत ९८ नवीन घरे सुचवली कॉमनफ्लोरवाल्यांनी. आणि सगळ्यात चांगले म्हणजे लॉगिन वै. करावे लागत नाही.

In reply to by पियू परी

पाषाणभेद 19/05/2014 - 22:08
परी ग परी पण कॉमनफ्लोर.कॉम नवीन घर विकत घेण्यासाठी तसेच असलेले घर भाड्याने देण्यासाठी आहे ना? आपल्या निलेशला तर घर भाड्याने हवे आहे. आता काय करावे बरं?

दादा कोंडके 19/05/2014 - 22:40
हौसींग ड्वाट इन म्हणून एक नवीन साईट छान आहे. आपल्याला हव्या त्या एरिया मधलं घर बघायची म्यापवर सोय आहे. फोटो वगैरे अपलोड केलेले असतात. गुगलवर हौशींग ड्वाट इन विदाउअट ब्रोकरेज असा सर्च मारा. एजंटांना टाळा, प्यारासाईट्स साले.
अर्धांगिनीचा प्रवासात होणारा त्रास वाचविण्यासाठी अस्मादिकांनि स्वतःचा त्रास वाढविण्याचे ठराविले आहे. घर शोधुन देणार्‍या दलालांना दलाली *pardon* देणे आमच्या तत्वात बसत नसल्याने (आणि खिशाला परवडत नसल्याने *sad* ) नविन घर शोधण्यासाठी मिपावरिल मित्रांची मदत अपेक्षित आहे अपेक्षा : १. शहर : पुणे २. भाग : नगर रोड वरिल खराडी बायपास चौक अथवा मुंडवा-केशवनगर चौक (या ठिकाणांन पासुन पायी जावु शकेन इतपत अंतरावर) ३. १ अंतःपुर्-बैठक-स्वयंपाकघर ( 1BHK) ४. २४ तास पाणी ५.

माहिती हवी आहे - पुण्यात (हडपसर किंवा कोथरुड) छोटेखानी समारंभासाठी हॉल

समीरसूर ·

"उत्सव मंगल कार्यालय" ( वनाज जवळ ) : श्री डींगणकर यांचे केटरींग आहे....जेवण छान असते. एम आय टी कॉलेज जवळ "स्वप्नपूर्ती" म्हणुन एक आहे....ते पण छान आहे.... अजुन कोथरुड मद्दे बरेच कार्यालय व हॉल आहेत....सगळ्यांचे दर कमी अधिक प्रमणात सारखेच आहेत.... काही नावे: १. अंबर हॉल , स्वामीकॄपा सभागॄह ( दोन्ही देसाई बंधु जवळ ) २. राजलक्ष्मी सभागॄह ३. दिगंबर हॉल व लॉन्स... बाकी ह्डपसर चे काही माहिती नाही :-)

आदूबाळ 15/05/2014 - 13:42
कोथरूडातले ईशदान सभागृह अशा कार्यक्रमासाठी छान आहे. दिगंबर हॉलवाले श्री स्वप्नील मराठे यांचं केटरिंग आहे. एक नंबर जेवण! एक आगाव सल्ला:
संध्याकाळी जेवणे झाल्यानंतर हॉलवर जाऊन तिथे गप्पा, गाणी असा कार्यक्रम करण्याचे योजत आहे.
दहानंतर आजूबाजूचे रहिवाशी उखडण्याची शक्यता आहे.

In reply to by सूड

हडपसर, जर कोथरूड आणि चांदणीचौकाच्या आसपास येत असेल तर...आणि ते पण पुण्यांत... तर... जिथपर्यंत लोकल, तिथपर्यंत मुंबई का नको?

Dhananjay Borgaonkar 15/05/2014 - 15:35
मोरेश्वर सभाग्रुह - संगम प्रेस लेन कोथरुड. शैलेश सभाग्रुह - अलंकार पोलीस चौकीच्या समोर. प्रतिज्ञा मंगल - त्यांच्याकडे एक छोटा हॉल पण आहे. सगळीकडे जेवण भारी मिळतं

कन्यादान मंगल कार्यालय हमरस्त्यावर आहे. पार्किंग सोयः अंदाजे २०-३० मोटारी हॉलमधील बैठकीची सोयः अंदाजे २००-२५० (प्लॅस्टिक खुर्च्या)

काही वर्षांपूर्वी सातारा रस्त्यावरील श्रेयस सिद्धी (आपटे रस्त्यावरील श्रेयसची शाखा) येथे वरच्या मजल्यावर असे छोटेखानी समारंभ होताना पाहिले आहेत. श्रेयसचे जेवण ज्यांना आवडते त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. हडपसर व कोथरुड या दोन्ही उपनगरांतून जवळजवळ समान अंतरावर हे ठिकाण आहे. बाहेरगावहून येणारे काही आमंत्रित पुण्यात फारसे फिरले नसतील तर पुण्यातील अनेक पर्यटन स्थळे पर्वती, पेशवे उद्यान, केळकर संग्रहालय, शनिवारवाडा, लालमहाल इत्यादी जवळच आहेत. टीपः हा पर्याय आजही उपलब्ध आहे का याबाबत १००% खात्री नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

आजानुकर्ण 15/05/2014 - 19:40
श्रेयस सिद्धी आणि डिंगणकर दोन्ही पर्याय उत्तम. मागील वर्षापर्यंत पंचमीजवळील श्रेयस सिद्धी चालू होते. डिंगणकरांचे जेवण फारच छान असते.

Maharani 15/05/2014 - 20:07
Swamikrupa hall - karve putalyajaval...amchya gharatali/natevaikanchi barich karya zali ithe....hall Chan aahet..catering khupach Chan aahe..aajun loka athavan kadhatat...desai bandhu ambevalyancha hall ahe ha..rates pan reasonable aahet....agadi chandani chaukat hava aasel tar Jaika gardens aahe...mi gele nahiye pan catering changala aasata ASA aikala aahe....

बहुगुणी 15/05/2014 - 23:37
पुतणीचं लग्न तिथे झालं होतं, नानिवडेकरांचं व्यवस्थापन आणि जेवण होतं, पार्किंगसह इतर बर्‍याच सोयी चांगल्या वाटल्या. पण १०० लोकांच्या झोपण्याची सोय कितपत चांगली होईल कल्पना नाही, वधू-वरांच्या कुटुंबासाठी चार खोल्यांखेरीज हॉलमध्ये पथार्‍या पसरायची तयारी असेल तर हरकत नसावी. पण गायन-वादनाच्या कार्यक्रमाला पोलिस परवानगी लागते, आणि रात्री दहानंतर (आम्हाला तरी) परवानगी मिळाली नाही.

समीरसूर 18/05/2014 - 15:43
सगळ्यांनी दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद! :-) बरीच माहिती मिळाली. आता एक-एक करून चौकशी केली पाहिजे. अजूनही कुणाला काही माहिती असल्यास अवश्य द्यावी ही विनंती. पुनश्च धन्यवाद! --समीर

मैत्र 19/05/2014 - 12:40
आंबेवाल्या देसायांचा स्वामीकृपा हॉल - मृत्युंजय मंदिरासमोर. पूर्ण प्लॅन सांगितल्यास त्याप्रमाणे सोय करून देतील. जेवण पूर्वी उत्तम होते. इतक्यात कल्पना नाही. एरंडवण्यात गोखले सभागृह हॉल आणि लॉन छान आहे. फक्त नऊ वाजेपर्यंतच जेवण मिळेल वगैरे पद्धत चालणार असेल तरच पुढे चौकशी करा. त्याच्या समोरच अश्वमेध हॉल आणि जोडून टेरेस आहे. स्वप्नपूर्ती कदाचित इतक्या कार्यक्रमासाठी महाग पडेल. नवी पेठेत शास्त्री रस्त्यावर काका हलवाईच्या गल्ली मध्ये एल आय सी कॉलनीचे प्रशांत सभागृह आहे. तिथे दोन वर्षांपूर्वी याच धर्तीवर, भेटी गाठी, जेवण, गाण्याचा कार्यक्रम असा समारंभ केला होता. उत्तम सोय आहे. फक्त इतक्या लोकांची राहण्याची सोय होणार नाही. बाकी बहुतेक गोष्टी शोधता येतील आणि अलिकडे चांगली नवी सभागृहे झाली आहेत. पण १०० लोकांची झोपण्याची सोय हा अडचणीचा मुद्दा होऊ शकतो. त्याला काही पर्याय शोधता आला तर पहा.

सखी 19/05/2014 - 18:44
अनेक शुभेच्छा. कार्यक्रम सुखरुप पार पडो हिच सदिच्छा. माझ्याकडे विशेष माहीती नाही, रेवतीसारखेच मीही म्हणते, कि इथे माझ्यासारख्यांना माहीती मिळेल. काही प्रश्न होते (समीरसुर होपफुली हे प्रश्न अवांतर होणार नाहीत). ७५ व्या वाढदिवसांनतर ८०-८१ वा वाढदिवस करायचीपण पद्धत आहे का? विशेष कारण काय असेल कोणाला माहीती आहे का? अशा वाढ्दिवसांना काही विधी असतात का? मागे कोणीतरी पुस्तकांची तुला करुन ती कोणत्यातरी ग्रंथालयाला दिली होती. आणि बरेच लोक म्हणतात रहायची सोय अवघड आहे, मग आजकाल लग्नाच्या आदल्या दिवशी कार्यालयात जवळचे नातेवाईक लोक जात नाहीत का? काही वर्षांपूर्वी आदल्या दिवशीच दोन्ही बाजुची मंडळी कार्यालयात सीमांतपुजन वगैरे कार्यक्रमासाठी तिथेच मुक्कामाला असायची नाही, दोन्हीकडची मिळुन १०० लोक तरी होत असतील. हे हॉलपण मी छोटे कार्यालय असल्यासारखे समजुन चाललीय.

In reply to by सखी

रेवती 19/05/2014 - 20:00
पंचाहत्तरीपर्यंत अमूक एका व्यक्तीस देवाने आरोग्यपूर्ण आयुष्य बहाल केले आहे त्याचा आनंद व्यक्त करणे, नातेवाईकांस बोलावून पुढील आयुरोग्यासाठी शुभेच्छा देणे/घेणे. समवयस्कांच्या भेटी गाठी होतात म्हणून हा प्रसंग असतो. तसेच ८०व्या व ८१व्या वादीच्यामध्ये एकदा ८१ दिव्यांनी ओवाळण्याचा कार्यक्रम असतो असे ऐकले आहे. त्यानिमित्ताने काहीजण धान्य तूला, पुस्तक तूला, देणगी देणे वगैरे करतात. आजकाल नातेवाईकांची सोय कार्यालयात राहण्यासाठी केली तरी गावात राहणारे बहुतेकजण आपापल्या घरी झोपायला जातात हा अनुभव आहे. इतर नातेवाईकही कोणी या घरी, तर कोणी त्या घरी असे जातात. काहीजण कार्य असले म्हणजे तिथल्या इतर नातेवाईकांना भेटणे होईल अस दुहेरी प्ल्यान करतात. उदा. मुंबैतील लग्न्/कार्य असले म्हणजे (तिथे १ दिवसाचा कार्यक्रम असल्याने) आदल्या दिवशी मुलांना समुद्र दाखवून आणणे व चौपाटीवर भेळ खाणे, पुण्यात गेले म्हणजे सकाळचे लग्न लावून मध्ये मावशीच्या जावेच्या बहिणीला भेटून जेवणाच्या वेळेपर्यंत परत येणे. कोल्हापुरात लग्न अस्ल्यास जेवणे करून अंबाबाईचे दर्शन व तेथून सव्वाचार किमीवर राहणार्‍या मैत्रिणीच्या बहिणीस भेटून येणे. पैठणला गेल्यास तिथला साखरपुडा उरकून पैठणी खरेदीला जाणे (असेच चन्नैतही गेल्यावरही होते, फक्त पैठणीऐवजी कांजिवरम घेतली जाते). असो. पूर्वी सगळे लोक्स कार्यालयातच रहात त्यावेळी सकाळी उठून सगळ्या गोष्टींना नंबर लावावे लागत. त्याची सवय नसल्यास पंचाईत होते. घरी प्रत्येकाच्या नावे एक बाथरूम असते. पथ्यपाणी असल्यास घरी ब्रेफा करून औषधे, गोळ्या घेऊन, साडी व्यवस्थित नेसून जाता येते. कार्यालयात रहायचे म्हणजे दागिने सांभाळणे हा उद्योग असतो व साडीही कशीबशी गुंडाळावी लागते. शिवाय आपल्या साडीच्या पदरास पीन लावण्यास कोणी मिळते का बघत फिरावे लागते. घरीच आवरून गेल्यास शेजारणीकडून मदत मागता येते, त्याचवेळी तिला आपली साडी व दागिनेही दाखवता येतात. ;)

In reply to by सखी

प्यारे१ 19/05/2014 - 20:16
८० की ८१व्या वाढदिवसाला 'सहस्त्रचंद्रदर्शन' सोहळा पण म्हणतात म्हणे. लॉजिक असं की १२ *८०= ९६० म्हणजे जवळपास एक हजार (सहस्त्र) पूर्णचंद्र त्या व्यक्तिने पाहिले असतात.

In reply to by आदूबाळ

प्यारे१ 19/05/2014 - 20:38
समजूत हो माणसांची! उत्सवप्रियता आपली. थोडं कटू नि अस्थानी: वाढदिवस साजरे करण्यासाठीचा एकमेव क्रायटेरिया असतो. तो फुलफिल केला की जमतं. बर्‍याच जणांना ते(च) जमत नाही. ;)

In reply to by प्यारे१

सखी 19/05/2014 - 21:23
मस्त लॉजिक आहे की, धन्यवाद. सहस्त्रचंद्रदर्शन ऐकलं होतं पण असा अर्थ कळला नव्हता. कदाचित ८१ व्या वाढदिवसाला हे जास्त जवळचे वाटतयं का १२*८१= ९७२+२०=९९२. रेवाक्का अगं आता रोज काय तुझा फोटु लावुन नमस्कार करायचा का गं? मावशीच्या जावेच्या बहिणीला भेटून काय त्याचवेळी तिला आपली साडी व दागिनेही दाखवता येतात काय :))

In reply to by सखी

अनुप ढेरे 24/05/2014 - 10:03
अधिक मास राहिले. ८१ वर्षात २७ अधिक मास असतात. ८१*१२ = ९७२ ९७२+२७=९९९ सो ८१वर्षांच झाल्यावर पहिल्या पौर्णिमेला सहस्रचंद्रदर्शन करतात बहुदा.

इन्दुसुता 22/05/2014 - 19:09
वरचे गणित चुकले आहे. सौर कालगणने नुसार १२ x ८० असे धरले आहेत. ते हिन्दु कालगणतिनुसार धरलेत तर १००० वर जातात. धाग्यात विचारलेली माहिती नसल्यामुळे पास.

In reply to by आदूबाळ

आयुर्हित 23/05/2014 - 01:47
The Moon completes its orbit around the Earth in approximately 27.32 days आणि म्हणुन सहस्त्रचन्द्रदर्शन हा ७५व्या वाढदिवसाच्या आधि येतो. १०००*२७.३२ = २७३२०दिवस =२७३२०/३६५ =७४.८४वर्षे

"उत्सव मंगल कार्यालय" ( वनाज जवळ ) : श्री डींगणकर यांचे केटरींग आहे....जेवण छान असते. एम आय टी कॉलेज जवळ "स्वप्नपूर्ती" म्हणुन एक आहे....ते पण छान आहे.... अजुन कोथरुड मद्दे बरेच कार्यालय व हॉल आहेत....सगळ्यांचे दर कमी अधिक प्रमणात सारखेच आहेत.... काही नावे: १. अंबर हॉल , स्वामीकॄपा सभागॄह ( दोन्ही देसाई बंधु जवळ ) २. राजलक्ष्मी सभागॄह ३. दिगंबर हॉल व लॉन्स... बाकी ह्डपसर चे काही माहिती नाही :-)

आदूबाळ 15/05/2014 - 13:42
कोथरूडातले ईशदान सभागृह अशा कार्यक्रमासाठी छान आहे. दिगंबर हॉलवाले श्री स्वप्नील मराठे यांचं केटरिंग आहे. एक नंबर जेवण! एक आगाव सल्ला:
संध्याकाळी जेवणे झाल्यानंतर हॉलवर जाऊन तिथे गप्पा, गाणी असा कार्यक्रम करण्याचे योजत आहे.
दहानंतर आजूबाजूचे रहिवाशी उखडण्याची शक्यता आहे.

In reply to by सूड

हडपसर, जर कोथरूड आणि चांदणीचौकाच्या आसपास येत असेल तर...आणि ते पण पुण्यांत... तर... जिथपर्यंत लोकल, तिथपर्यंत मुंबई का नको?

Dhananjay Borgaonkar 15/05/2014 - 15:35
मोरेश्वर सभाग्रुह - संगम प्रेस लेन कोथरुड. शैलेश सभाग्रुह - अलंकार पोलीस चौकीच्या समोर. प्रतिज्ञा मंगल - त्यांच्याकडे एक छोटा हॉल पण आहे. सगळीकडे जेवण भारी मिळतं

कन्यादान मंगल कार्यालय हमरस्त्यावर आहे. पार्किंग सोयः अंदाजे २०-३० मोटारी हॉलमधील बैठकीची सोयः अंदाजे २००-२५० (प्लॅस्टिक खुर्च्या)

काही वर्षांपूर्वी सातारा रस्त्यावरील श्रेयस सिद्धी (आपटे रस्त्यावरील श्रेयसची शाखा) येथे वरच्या मजल्यावर असे छोटेखानी समारंभ होताना पाहिले आहेत. श्रेयसचे जेवण ज्यांना आवडते त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. हडपसर व कोथरुड या दोन्ही उपनगरांतून जवळजवळ समान अंतरावर हे ठिकाण आहे. बाहेरगावहून येणारे काही आमंत्रित पुण्यात फारसे फिरले नसतील तर पुण्यातील अनेक पर्यटन स्थळे पर्वती, पेशवे उद्यान, केळकर संग्रहालय, शनिवारवाडा, लालमहाल इत्यादी जवळच आहेत. टीपः हा पर्याय आजही उपलब्ध आहे का याबाबत १००% खात्री नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

आजानुकर्ण 15/05/2014 - 19:40
श्रेयस सिद्धी आणि डिंगणकर दोन्ही पर्याय उत्तम. मागील वर्षापर्यंत पंचमीजवळील श्रेयस सिद्धी चालू होते. डिंगणकरांचे जेवण फारच छान असते.

Maharani 15/05/2014 - 20:07
Swamikrupa hall - karve putalyajaval...amchya gharatali/natevaikanchi barich karya zali ithe....hall Chan aahet..catering khupach Chan aahe..aajun loka athavan kadhatat...desai bandhu ambevalyancha hall ahe ha..rates pan reasonable aahet....agadi chandani chaukat hava aasel tar Jaika gardens aahe...mi gele nahiye pan catering changala aasata ASA aikala aahe....

बहुगुणी 15/05/2014 - 23:37
पुतणीचं लग्न तिथे झालं होतं, नानिवडेकरांचं व्यवस्थापन आणि जेवण होतं, पार्किंगसह इतर बर्‍याच सोयी चांगल्या वाटल्या. पण १०० लोकांच्या झोपण्याची सोय कितपत चांगली होईल कल्पना नाही, वधू-वरांच्या कुटुंबासाठी चार खोल्यांखेरीज हॉलमध्ये पथार्‍या पसरायची तयारी असेल तर हरकत नसावी. पण गायन-वादनाच्या कार्यक्रमाला पोलिस परवानगी लागते, आणि रात्री दहानंतर (आम्हाला तरी) परवानगी मिळाली नाही.

समीरसूर 18/05/2014 - 15:43
सगळ्यांनी दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद! :-) बरीच माहिती मिळाली. आता एक-एक करून चौकशी केली पाहिजे. अजूनही कुणाला काही माहिती असल्यास अवश्य द्यावी ही विनंती. पुनश्च धन्यवाद! --समीर

मैत्र 19/05/2014 - 12:40
आंबेवाल्या देसायांचा स्वामीकृपा हॉल - मृत्युंजय मंदिरासमोर. पूर्ण प्लॅन सांगितल्यास त्याप्रमाणे सोय करून देतील. जेवण पूर्वी उत्तम होते. इतक्यात कल्पना नाही. एरंडवण्यात गोखले सभागृह हॉल आणि लॉन छान आहे. फक्त नऊ वाजेपर्यंतच जेवण मिळेल वगैरे पद्धत चालणार असेल तरच पुढे चौकशी करा. त्याच्या समोरच अश्वमेध हॉल आणि जोडून टेरेस आहे. स्वप्नपूर्ती कदाचित इतक्या कार्यक्रमासाठी महाग पडेल. नवी पेठेत शास्त्री रस्त्यावर काका हलवाईच्या गल्ली मध्ये एल आय सी कॉलनीचे प्रशांत सभागृह आहे. तिथे दोन वर्षांपूर्वी याच धर्तीवर, भेटी गाठी, जेवण, गाण्याचा कार्यक्रम असा समारंभ केला होता. उत्तम सोय आहे. फक्त इतक्या लोकांची राहण्याची सोय होणार नाही. बाकी बहुतेक गोष्टी शोधता येतील आणि अलिकडे चांगली नवी सभागृहे झाली आहेत. पण १०० लोकांची झोपण्याची सोय हा अडचणीचा मुद्दा होऊ शकतो. त्याला काही पर्याय शोधता आला तर पहा.

सखी 19/05/2014 - 18:44
अनेक शुभेच्छा. कार्यक्रम सुखरुप पार पडो हिच सदिच्छा. माझ्याकडे विशेष माहीती नाही, रेवतीसारखेच मीही म्हणते, कि इथे माझ्यासारख्यांना माहीती मिळेल. काही प्रश्न होते (समीरसुर होपफुली हे प्रश्न अवांतर होणार नाहीत). ७५ व्या वाढदिवसांनतर ८०-८१ वा वाढदिवस करायचीपण पद्धत आहे का? विशेष कारण काय असेल कोणाला माहीती आहे का? अशा वाढ्दिवसांना काही विधी असतात का? मागे कोणीतरी पुस्तकांची तुला करुन ती कोणत्यातरी ग्रंथालयाला दिली होती. आणि बरेच लोक म्हणतात रहायची सोय अवघड आहे, मग आजकाल लग्नाच्या आदल्या दिवशी कार्यालयात जवळचे नातेवाईक लोक जात नाहीत का? काही वर्षांपूर्वी आदल्या दिवशीच दोन्ही बाजुची मंडळी कार्यालयात सीमांतपुजन वगैरे कार्यक्रमासाठी तिथेच मुक्कामाला असायची नाही, दोन्हीकडची मिळुन १०० लोक तरी होत असतील. हे हॉलपण मी छोटे कार्यालय असल्यासारखे समजुन चाललीय.

In reply to by सखी

रेवती 19/05/2014 - 20:00
पंचाहत्तरीपर्यंत अमूक एका व्यक्तीस देवाने आरोग्यपूर्ण आयुष्य बहाल केले आहे त्याचा आनंद व्यक्त करणे, नातेवाईकांस बोलावून पुढील आयुरोग्यासाठी शुभेच्छा देणे/घेणे. समवयस्कांच्या भेटी गाठी होतात म्हणून हा प्रसंग असतो. तसेच ८०व्या व ८१व्या वादीच्यामध्ये एकदा ८१ दिव्यांनी ओवाळण्याचा कार्यक्रम असतो असे ऐकले आहे. त्यानिमित्ताने काहीजण धान्य तूला, पुस्तक तूला, देणगी देणे वगैरे करतात. आजकाल नातेवाईकांची सोय कार्यालयात राहण्यासाठी केली तरी गावात राहणारे बहुतेकजण आपापल्या घरी झोपायला जातात हा अनुभव आहे. इतर नातेवाईकही कोणी या घरी, तर कोणी त्या घरी असे जातात. काहीजण कार्य असले म्हणजे तिथल्या इतर नातेवाईकांना भेटणे होईल अस दुहेरी प्ल्यान करतात. उदा. मुंबैतील लग्न्/कार्य असले म्हणजे (तिथे १ दिवसाचा कार्यक्रम असल्याने) आदल्या दिवशी मुलांना समुद्र दाखवून आणणे व चौपाटीवर भेळ खाणे, पुण्यात गेले म्हणजे सकाळचे लग्न लावून मध्ये मावशीच्या जावेच्या बहिणीला भेटून जेवणाच्या वेळेपर्यंत परत येणे. कोल्हापुरात लग्न अस्ल्यास जेवणे करून अंबाबाईचे दर्शन व तेथून सव्वाचार किमीवर राहणार्‍या मैत्रिणीच्या बहिणीस भेटून येणे. पैठणला गेल्यास तिथला साखरपुडा उरकून पैठणी खरेदीला जाणे (असेच चन्नैतही गेल्यावरही होते, फक्त पैठणीऐवजी कांजिवरम घेतली जाते). असो. पूर्वी सगळे लोक्स कार्यालयातच रहात त्यावेळी सकाळी उठून सगळ्या गोष्टींना नंबर लावावे लागत. त्याची सवय नसल्यास पंचाईत होते. घरी प्रत्येकाच्या नावे एक बाथरूम असते. पथ्यपाणी असल्यास घरी ब्रेफा करून औषधे, गोळ्या घेऊन, साडी व्यवस्थित नेसून जाता येते. कार्यालयात रहायचे म्हणजे दागिने सांभाळणे हा उद्योग असतो व साडीही कशीबशी गुंडाळावी लागते. शिवाय आपल्या साडीच्या पदरास पीन लावण्यास कोणी मिळते का बघत फिरावे लागते. घरीच आवरून गेल्यास शेजारणीकडून मदत मागता येते, त्याचवेळी तिला आपली साडी व दागिनेही दाखवता येतात. ;)

In reply to by सखी

प्यारे१ 19/05/2014 - 20:16
८० की ८१व्या वाढदिवसाला 'सहस्त्रचंद्रदर्शन' सोहळा पण म्हणतात म्हणे. लॉजिक असं की १२ *८०= ९६० म्हणजे जवळपास एक हजार (सहस्त्र) पूर्णचंद्र त्या व्यक्तिने पाहिले असतात.

In reply to by आदूबाळ

प्यारे१ 19/05/2014 - 20:38
समजूत हो माणसांची! उत्सवप्रियता आपली. थोडं कटू नि अस्थानी: वाढदिवस साजरे करण्यासाठीचा एकमेव क्रायटेरिया असतो. तो फुलफिल केला की जमतं. बर्‍याच जणांना ते(च) जमत नाही. ;)

In reply to by प्यारे१

सखी 19/05/2014 - 21:23
मस्त लॉजिक आहे की, धन्यवाद. सहस्त्रचंद्रदर्शन ऐकलं होतं पण असा अर्थ कळला नव्हता. कदाचित ८१ व्या वाढदिवसाला हे जास्त जवळचे वाटतयं का १२*८१= ९७२+२०=९९२. रेवाक्का अगं आता रोज काय तुझा फोटु लावुन नमस्कार करायचा का गं? मावशीच्या जावेच्या बहिणीला भेटून काय त्याचवेळी तिला आपली साडी व दागिनेही दाखवता येतात काय :))

In reply to by सखी

अनुप ढेरे 24/05/2014 - 10:03
अधिक मास राहिले. ८१ वर्षात २७ अधिक मास असतात. ८१*१२ = ९७२ ९७२+२७=९९९ सो ८१वर्षांच झाल्यावर पहिल्या पौर्णिमेला सहस्रचंद्रदर्शन करतात बहुदा.

इन्दुसुता 22/05/2014 - 19:09
वरचे गणित चुकले आहे. सौर कालगणने नुसार १२ x ८० असे धरले आहेत. ते हिन्दु कालगणतिनुसार धरलेत तर १००० वर जातात. धाग्यात विचारलेली माहिती नसल्यामुळे पास.

In reply to by आदूबाळ

आयुर्हित 23/05/2014 - 01:47
The Moon completes its orbit around the Earth in approximately 27.32 days आणि म्हणुन सहस्त्रचन्द्रदर्शन हा ७५व्या वाढदिवसाच्या आधि येतो. १०००*२७.३२ = २७३२०दिवस =२७३२०/३६५ =७४.८४वर्षे
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार, ही माहिती कशी मिळवावी हा विचार करत होतो. सुलेखा.कॉमवर चौकशी टाकून झाली. काही विशेष हाती लागले नाही. आणि अचानक मिपा आठवले. आजकाल काही दुखलं-खुपलं तरी तोंडून 'आई गं' ऐवजी 'मिपा रे!' निघेल की काय असे वाटायला लागले आहे. :-) मिपावर माहिती आणि मदत नक्की मिळते हा अनुभव आहे. अमेरिकावारीच्या वेळी हा अनुभव घेतलाच आहे. मदतीची किंवा माहितीची अगदीच अडनिड 'नीड' असेल तरी मुबलक प्रमाणात हुरूप नक्कीच मिळतो. आणि हुरूप असेल तर ठरवलेले पार पाडणे खूप सोपे होते. :-) म्हणून हा पत्रप्रपंच! वडिलांच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये एक छोटेखानी हॉल शोधतो आहे.

आई

कहर ·
लेखनविषय:
आकाश उतरता खाली अस्तित्व नष्ट कराया मी हळूच पांघरून घेतो आईची हळवी माया ती पैलावरती माया ऐलावर होते रात ठेवता उशीवर डोके केसातून फिरतो हात का डोळ्यामध्ये आसू का अंतर्मन व्याकूळ गगनात भारली प्रतिमा अस्पष्ट करतसे धूळ झाकल्या पदराखाली आयुष्याचे कोंदण आईच्या हातावरती एक पिंडीचे गोंदण हातात चंद्र धरून स्वप्नात भेटते आई घेऊन कुशीत मजला गाते अजूनही अंगाई

अ‍ॅकलेशिया कार्डिया-एक जिवंत अनुभव -१

तिमा ·

आतिवास 15/05/2014 - 08:27
अनुभव भयानक आहे - तो लिहिल्यावर कदाचित तुम्हाला बरं वाटलं असेल. पुढच्या भागाची वाट पाहते असं म्हणवत नाही खरं तर :-( काळजी घ्या; लवकर बरे व्हा आणि पुढचा भागही लिहा. शुभेच्छा.

तुमच्या प्रकृतीला लवकर आराम पडो हिच देवाकडे प्रार्थना. पुढिल भागात तुम्ही शस्त्रक्रिया कोठे केली (म्हणजे कोणत्या इस्पितळात), अंदाजे कर्च खर्च किती आला, तसेच आजाराची काय लक्षणे आहेत या विषयी सविस्तर लिहा.

स्पंदना 15/05/2014 - 10:35
तिमा काळजी लावलात हो! शिस्तीत रहा बाबा! अहो आम्हाला रोशोमान फ्रेम बाय फ्रेम पहायला लावलात तुम्ही आता या ट्रीटमेंटच पण तसच करा. होउन जाउ दे फ्रेम बाय फ्रेम.

इतके घाबरून जाऊ नका. आता ही शस्त्रक्रिया आणि त्याच्यात झालेले काँप्लिकेशनचे उपचार या फार मोठ्या समस्या राहिलेल्या नाहीत. मात्र जखम भरण्यासाठी निसर्गाला जेवढा वेळ लागतो तेवढा द्यावा लागणारच. लेखात तुम्ही दाखवलेल्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही या समस्येला धिराने तोंड देत आहात हेच दिसत आहे ही तुमची मोठी जमेची बाजू आहे *good* तुम्ही लबकर बरे होण्यासाठी आणि नंतरच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा !

तुमची इच्छाशक्ती अतिशय प्रबळ आहे. तुमच्या विनोद्बुद्धीचे तर आपण फ्यान झालो बापु. लै झाक. छान लिहीत राहा.

सखी 15/05/2014 - 21:14
अंतिम भाग येईलच हो. तुम्ही लवकर बरे होण्यासाठी आणि नंतरच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा!

अंतिम भाग आलाच नाही तर सूज्ञास सांगणे नलगे!!! क्या बात है जिओ, इन्शाल्लाह अंतिम भाग नक्कीच येईल. आजारपणात विनोदबुद्धी शाबूत ठेवणे हा नक्कीच अक्सीर इलाज असतो. मी स्वतादेखील बरेचदा हा फंडा वापरला आहे. मात्र एक कौतुकास्पद वाटले आपले की आपण आजाराच्या वा उपचाराच्या मध्यावर हे लिहित आहात अन्यथा एखाद्याने सारे काही सुरळीत पार पाडल्यावर मग हौसेने लेखणी सरसावली असती. ते वरचे जिओ खास यासाठीच होते. सारे मिपाकर आपल्यासाठी नक्कीच प्रार्थना करतील.

बहुगुणी 16/05/2014 - 01:05
एक तिमा-कट्टा होऊ द्यात :-) अवघड आजारांची ऐशी-तैशी! मिपाकरांना ऐन आजारात हसवता आहात, तुमची सहनशक्ती वाया जाणार नाही!

तिमा 16/05/2014 - 07:25
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. हे लिहिण्यामागे सर्वांच्या सहानुभूतिचा विषय व्हावे ही इच्छा नव्हती. तरी तुमच्या प्रेमाने मन भरुन आले. 'दत्ताजी शिंदे' सारखा, 'बचेंगे तो और भी लढेंगे' ह्या वृत्तीचाच मी आहे. इतक्या लवकर नेटवर कसा आलो याचे गुपित म्हणजे, सध्या मला जास्त काळ आडवे झोपता येत नाही, खुर्चीत बसल्या बसल्या जास्त आरामशीर वाटते, हे आहे.

आतिवास 15/05/2014 - 08:27
अनुभव भयानक आहे - तो लिहिल्यावर कदाचित तुम्हाला बरं वाटलं असेल. पुढच्या भागाची वाट पाहते असं म्हणवत नाही खरं तर :-( काळजी घ्या; लवकर बरे व्हा आणि पुढचा भागही लिहा. शुभेच्छा.

तुमच्या प्रकृतीला लवकर आराम पडो हिच देवाकडे प्रार्थना. पुढिल भागात तुम्ही शस्त्रक्रिया कोठे केली (म्हणजे कोणत्या इस्पितळात), अंदाजे कर्च खर्च किती आला, तसेच आजाराची काय लक्षणे आहेत या विषयी सविस्तर लिहा.

स्पंदना 15/05/2014 - 10:35
तिमा काळजी लावलात हो! शिस्तीत रहा बाबा! अहो आम्हाला रोशोमान फ्रेम बाय फ्रेम पहायला लावलात तुम्ही आता या ट्रीटमेंटच पण तसच करा. होउन जाउ दे फ्रेम बाय फ्रेम.

इतके घाबरून जाऊ नका. आता ही शस्त्रक्रिया आणि त्याच्यात झालेले काँप्लिकेशनचे उपचार या फार मोठ्या समस्या राहिलेल्या नाहीत. मात्र जखम भरण्यासाठी निसर्गाला जेवढा वेळ लागतो तेवढा द्यावा लागणारच. लेखात तुम्ही दाखवलेल्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही या समस्येला धिराने तोंड देत आहात हेच दिसत आहे ही तुमची मोठी जमेची बाजू आहे *good* तुम्ही लबकर बरे होण्यासाठी आणि नंतरच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा !

तुमची इच्छाशक्ती अतिशय प्रबळ आहे. तुमच्या विनोद्बुद्धीचे तर आपण फ्यान झालो बापु. लै झाक. छान लिहीत राहा.

सखी 15/05/2014 - 21:14
अंतिम भाग येईलच हो. तुम्ही लवकर बरे होण्यासाठी आणि नंतरच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा!

अंतिम भाग आलाच नाही तर सूज्ञास सांगणे नलगे!!! क्या बात है जिओ, इन्शाल्लाह अंतिम भाग नक्कीच येईल. आजारपणात विनोदबुद्धी शाबूत ठेवणे हा नक्कीच अक्सीर इलाज असतो. मी स्वतादेखील बरेचदा हा फंडा वापरला आहे. मात्र एक कौतुकास्पद वाटले आपले की आपण आजाराच्या वा उपचाराच्या मध्यावर हे लिहित आहात अन्यथा एखाद्याने सारे काही सुरळीत पार पाडल्यावर मग हौसेने लेखणी सरसावली असती. ते वरचे जिओ खास यासाठीच होते. सारे मिपाकर आपल्यासाठी नक्कीच प्रार्थना करतील.

बहुगुणी 16/05/2014 - 01:05
एक तिमा-कट्टा होऊ द्यात :-) अवघड आजारांची ऐशी-तैशी! मिपाकरांना ऐन आजारात हसवता आहात, तुमची सहनशक्ती वाया जाणार नाही!

तिमा 16/05/2014 - 07:25
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. हे लिहिण्यामागे सर्वांच्या सहानुभूतिचा विषय व्हावे ही इच्छा नव्हती. तरी तुमच्या प्रेमाने मन भरुन आले. 'दत्ताजी शिंदे' सारखा, 'बचेंगे तो और भी लढेंगे' ह्या वृत्तीचाच मी आहे. इतक्या लवकर नेटवर कसा आलो याचे गुपित म्हणजे, सध्या मला जास्त काळ आडवे झोपता येत नाही, खुर्चीत बसल्या बसल्या जास्त आरामशीर वाटते, हे आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
लहानपणी आई मला, 'अकलेचा कांदा' म्हणत असे. पण मोठेपणी या शब्दाशी साधर्म्य असलेला, 'अ‍ॅकलेशिया कार्डिया'(Achalasia Cardia) हा दुर्मिळ रोग होईल याची कधी कल्पना केली नव्हती. गेले वर्षभर मला खाताना गिळण्याचा त्रास जाणवू लागला होता. सुरवातीला एखादाच घास अडकायचा आणि पुन्हा तोंडापर्यंत यायचा. पुढे पुढे हे प्रमाण वाढू लागले. डब्यात कोरडी भाजीपोळी नेली की जेवायला इतरांपेक्षा जास्त वेळ लागायचा. मग, सरबरीत भात-आमटी, रसभाज्या यावर चालू लागले. सुरवातीला अ‍ॅसिडिटी समजून अनेक डायजिन संपवल्या.रात्री-बेरात्री अचानक जाग येऊन, छातीत दुखायचे, पण पाणी प्यायले की ढेकर येऊन ते थांबायचे.

आरती संग्रह (मराठी) - नेहमीच्या वापरासाठी आम्ही बनवलेलं नवीन अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप

विश्व ·
नमस्कार मंडळी. सर्वांना नेहमीच्या वापरातल्या आरत्या, श्लोक, आणि मंत्र सहज आणि सोप्प व्हाव म्हणून मी आणि माझ्या साथीदारांनी "आरती संग्रह (मराठी)" नावाचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप तय्यार केले आहे. Google Play वर आपण हे अ‍ॅप या लिंक वर डाउनलोड करू शकता http://bit.ly/1hOrUnZ हे अ‍ॅप वापरण्यासाठी एकदम सोप्पे, आकर्षक, आणि सुटसुटीत असे आहे किंबहुना तसा बनवण्याच्या प्रयत्न केला आहे.

अभिनंदन ! अ‍ॅन्ड्रॉड अ‍ॅप डेव्हलपमेन्ट हा खरेच खुप इन्टरेस्टींग प्रकार आहे ! आपल्याकडुन ह्या विषयावर अधिक लेखन अपेक्षित आहे आता . पुलेशु :)

अभिनंदन ! अ‍ॅन्ड्रॉड अ‍ॅप डेव्हलपमेन्ट हा खरेच खुप इन्टरेस्टींग प्रकार आहे ! आपल्याकडुन ह्या विषयावर अधिक लेखन अपेक्षित आहे आता . पुलेशु :)

९० डिग्री साऊथ - १३ (अंतिम)

स्पार्टाकस ·

एस 15/05/2014 - 11:03
तटस्थ आणि खूपच बारकाईने लिहिलेली लेखमालिका. धन्यवाद! पुमाशु. :-)

स्मिता. 15/05/2014 - 15:50
अतिशय माहितीपूर्ण, तटस्थ भूमिकेतून लिहिलेली लेखमाला अतिशय सुरेख जमली आहे. रोज वाचनमात्र राहून अगदी अधाश्यासारखी वाचून काढत होते आणि आज खास प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगइन केलं :) अत्यंत सुरेख!!

ओसु 16/05/2014 - 02:02
जबरदस्त लेखन मालिका. भाग ५ नंतर थांबलो होतो. काल शेवटचा भाग पहिला आणि पुन्हा वाचायला सुरुवात केली ते संपेपर्यंत थांबलो नाही. अजून एखाद्या नवीन विषयाची मेजवानी येऊ द्या

ये स्पार्टाकस पागल बनाता हय. अभी सब भाग एक जगह बांधके रख्खे हय. आता उद्याची सुट्टी सत्कारणी लावतो.... अब हमरा प्रतिसाद सब भाग वाचनेके बाद...

स्पार्टाकस 16/05/2014 - 10:26
सर्वांचे मनापासून आभार..!!! एर्नेस्ट शॅकल्टनने १९१४ मध्ये अंटार्क्टीका खंड ओलांडण्याचा प्रयत्नं केला होता. त्या मोहीमेवरील (इंपिरीयल ट्रान्स अंटार्क्टीक) आल्फ्रेड लॅन्सींगचं Endurance: Shackleton's Incredible Voyage हे पुस्तकंही निव्वळ अप्रतिम आहे ! कोणाला इंटरेस्ट असल्यास जरुर वाचा..!!

पैसा 21/05/2014 - 10:35
तुमचं लिखाण थरारक आहेच. पण या सर्व दुर्दैवी प्रकारांबद्दल पूर्वी वाचलं होतं. तेव्हाही घोडे आणि कुत्र्यांशी कोणीही असं वागणं पटलं नव्हतंच. माणूस आपल्या स्वार्थासाठी काहीही करू शकतो. प्राणी झाला तरी त्याला भावना असतात. माणसाला जीव लावणार्‍या कुत्र्याला आपला मालक आपल्याला मारतो आहे हे कळलं नसेल पण तो सर्वात वाईट विश्वासघाताचा प्रकार वाटतो.

आदिजोशी 21/05/2014 - 18:32
लेखमालेल्या सुरुवात झाल्यापासून एकही भाग न वाचता लेखमाला पूर्ण होण्याची वाट बघत होतो. मागच्या २ दिवसात सगळी लेखमाला वाचून काढली. निव्वळ अप्रतिम आहे. ह्या सुंदर लेखमालेबद्दल अत्यंत आभारी आहोत.

अमित खोजे 18/06/2014 - 00:58
संपूर्ण मालिका अगदी दोनदा वाचून काढली. फारच थरारक. स्कॉटची तशी वाताहातच झाली म्हणायची. काही वेळेला तुमचा नको असलेला अट्टाहास अगदी जीवाशी येतो तो असा! ( कुत्रे आणि सामान स्वतः वाहून नेण्याची कल्पना ) संपूर्ण मालिका वाचत असताना अगदी आंतरजालावरून नकाशे शोधून शोधून मग वाचत होतो. तुम्ही नकाशा अगदी शेवटच्या भागात दिलात. मध्ये मध्ये पण एखादा टाकला असता तर लेख वाचताना संदर्भ लगेच लागत गेले असते. असो. नकाशे शोधताना हि clip पण मिळाली. 90 Degrees South

प्रास 25/10/2014 - 19:27
स्पार्टाकसराव, एका अत्यंत धाडसी मोहिमेची उत्तम शैलीत माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. आता इतर स्पार्टाकसी लिखाणाचाही आस्वाद घेईन म्हणतो..... :-)

एस 15/05/2014 - 11:03
तटस्थ आणि खूपच बारकाईने लिहिलेली लेखमालिका. धन्यवाद! पुमाशु. :-)

स्मिता. 15/05/2014 - 15:50
अतिशय माहितीपूर्ण, तटस्थ भूमिकेतून लिहिलेली लेखमाला अतिशय सुरेख जमली आहे. रोज वाचनमात्र राहून अगदी अधाश्यासारखी वाचून काढत होते आणि आज खास प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगइन केलं :) अत्यंत सुरेख!!

ओसु 16/05/2014 - 02:02
जबरदस्त लेखन मालिका. भाग ५ नंतर थांबलो होतो. काल शेवटचा भाग पहिला आणि पुन्हा वाचायला सुरुवात केली ते संपेपर्यंत थांबलो नाही. अजून एखाद्या नवीन विषयाची मेजवानी येऊ द्या

ये स्पार्टाकस पागल बनाता हय. अभी सब भाग एक जगह बांधके रख्खे हय. आता उद्याची सुट्टी सत्कारणी लावतो.... अब हमरा प्रतिसाद सब भाग वाचनेके बाद...

स्पार्टाकस 16/05/2014 - 10:26
सर्वांचे मनापासून आभार..!!! एर्नेस्ट शॅकल्टनने १९१४ मध्ये अंटार्क्टीका खंड ओलांडण्याचा प्रयत्नं केला होता. त्या मोहीमेवरील (इंपिरीयल ट्रान्स अंटार्क्टीक) आल्फ्रेड लॅन्सींगचं Endurance: Shackleton's Incredible Voyage हे पुस्तकंही निव्वळ अप्रतिम आहे ! कोणाला इंटरेस्ट असल्यास जरुर वाचा..!!

पैसा 21/05/2014 - 10:35
तुमचं लिखाण थरारक आहेच. पण या सर्व दुर्दैवी प्रकारांबद्दल पूर्वी वाचलं होतं. तेव्हाही घोडे आणि कुत्र्यांशी कोणीही असं वागणं पटलं नव्हतंच. माणूस आपल्या स्वार्थासाठी काहीही करू शकतो. प्राणी झाला तरी त्याला भावना असतात. माणसाला जीव लावणार्‍या कुत्र्याला आपला मालक आपल्याला मारतो आहे हे कळलं नसेल पण तो सर्वात वाईट विश्वासघाताचा प्रकार वाटतो.

आदिजोशी 21/05/2014 - 18:32
लेखमालेल्या सुरुवात झाल्यापासून एकही भाग न वाचता लेखमाला पूर्ण होण्याची वाट बघत होतो. मागच्या २ दिवसात सगळी लेखमाला वाचून काढली. निव्वळ अप्रतिम आहे. ह्या सुंदर लेखमालेबद्दल अत्यंत आभारी आहोत.

अमित खोजे 18/06/2014 - 00:58
संपूर्ण मालिका अगदी दोनदा वाचून काढली. फारच थरारक. स्कॉटची तशी वाताहातच झाली म्हणायची. काही वेळेला तुमचा नको असलेला अट्टाहास अगदी जीवाशी येतो तो असा! ( कुत्रे आणि सामान स्वतः वाहून नेण्याची कल्पना ) संपूर्ण मालिका वाचत असताना अगदी आंतरजालावरून नकाशे शोधून शोधून मग वाचत होतो. तुम्ही नकाशा अगदी शेवटच्या भागात दिलात. मध्ये मध्ये पण एखादा टाकला असता तर लेख वाचताना संदर्भ लगेच लागत गेले असते. असो. नकाशे शोधताना हि clip पण मिळाली. 90 Degrees South

प्रास 25/10/2014 - 19:27
स्पार्टाकसराव, एका अत्यंत धाडसी मोहिमेची उत्तम शैलीत माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. आता इतर स्पार्टाकसी लिखाणाचाही आस्वाद घेईन म्हणतो..... :-)
http://www.misalpav.com/node/27879 http://www.misalpav.com/node/27873 http://www.misalpav.com/node/27868 http://www.misalpav.com/node/27860 http://www.misalpav.com/node/27855 http://www.misalpav.com/node/27840 http://www.misalpav.com/node/27825 http://www.misalpav.com/node/27813 http://www.misalpav.com/node/27804 http://www.misalpav.com/node/27784 http://www.misalpav.com/node/27774 http://www.misalpav.com/node/27767 http://www.misalpav.com/node/27751 ________________________________________________________________________________ ९० डिग्री साऊथ -

दुस्री

आतिवास ·

In reply to by बालगंधर्व

त्मच म्हन्न क्ळ्ल न्हि. मरठित सन्गा. कोण म्हणतोय रे की, या बेशुद्ध कोलांट्या उड्या आता विनोदी न वाटता लक्ष वेधण्याचा करूण प्रयत्न वाटत आहेत म्हणून ?

In reply to by आदूबाळ

नाय, नाय. "त्य चुप्य प्येयस्त अहे"*. तेम्च इन्गलिश सपेलिन्ग पन ब्यकार अस्नार्च. (बेशुद्ध टाईप करण्याचा त्रास करून घेऊन लोक काय म्हणून स्वतःची फजिती करून घेतात बॉ? ह्याला स्वपिडन टाईपचं सॅडिझम म्हणता येईल का?)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन 18/05/2014 - 14:20
(बेशुद्ध टाईप करण्याचा त्रास करून घेऊन लोक काय म्हणून स्वतःची फजिती करून घेतात बॉ? ह्याला स्वपिडन टाईपचं सॅडिझम म्हणता येईल का?)
तुम्हांला मॅसोकिझम म्हणायचं असावं बहुधा.

In reply to by बॅटमॅन

नाय, नाय ! ही निर्बुद्ध टायपिंग करताना "स्वपीडन" करून घेऊन नंतर "स्वतःचे हसे" आणि "दुसर्‍याचे पीडन" करण्यात आनंद समजणारी चोम्प्लिचतेद च्रोनिच "ट्रीप्पल व्हॅम्मी" केस आहे ;) =))

आंजीच्या पराब्लेम्वर माज्याकडं येक आयड्या हाय ! आंजी लई डोस्केबाज हाय. दुस्री-तिस्रि येका वर्सात करून तिला फुडच्या वर्शि यकदम तिस्रीत टाका की वो, अतिवास मॅडम. मंग आंजीला राम्या-मुक्या-सुर्कीला ठेंगा दाकवता यील :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कुर्पया "यकदम तिस्रीत टाका" आयवजी "यकदम चौतीत टाका" आसं वाचा. गलतिशे मिस्टेक व्हुवा भाय ;)

चिगो 15/05/2014 - 10:54
म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं?
आन्जे आन्जे.. अगं किती गं दुखः ते तुझं? आतिवास ताईंच्या लेखणीतून उतरलेली आणखी एक सुंदर निरागस आन्जीकथा..

म्या तिस्रीत जाईल तवा हे चवथीत. म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं? त्या लहान मुलीचं सोडून द्या हो. पण यालाच प्राक्तन म्हणतात. मी पैलीतून दुस्त्रीत गेलो हयाचा आनंद न मानता तो तिस्त्रीत गेला म्हणून दु:खी होणार्‍यांची संख्या जगात कमी नाहीये.

एस 15/05/2014 - 11:22
म्या धावत घरी. वराडले, “म्या दुस्रीत ग्येली.” आयनं हसून श्येंगदानं दिलं. आज्जीनं गूळ दिला हातात. आण्णा पेन देनार हायेत.
आमच्याकडून आंजीला फूल... Rose

बबन ताम्बे 15/05/2014 - 16:10
आवडली आंजीचा निरागसपणा. "त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत.पन सोताला शाने समजत्येत जादा." आमच्यावानी कधी कधी साळंला बुट्टी पण मारते. :-)

हाडक्या 15/05/2014 - 16:26
त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत. पन सोताला शाने समजत्येत जादा. म्या म्हन्ली, “लई शानपना नका दावू. म्याबी दुस्रीत हाये आजपासून!” राम्या जीब दावत बोल्ला, “आन्जी दुस्रीत, आमी तिस्रीत!” म्या तिस्रीत जाईल तवा हे चवथीत. म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं?
हे बाकी शाश्वत सत्य बोलली बघा.. कितीही ठरवलं तरी तिस्रीतल्या लोकांकडे दुर्लक्ष करता येत नाही. आपण केलं तरी ते आपल्याकडे करतील असं सांगता येत नाही. थोडक्यात हा प्रश्न सहजासहजी सुटत नाही..

आंजीला म्हणावं, धीर सोडू नगस. त्येंच्या मागं हायेस ते फकस्त आधी जलमले म्हनून. राम्या, मुक्या, सुर्कीपेक्षाबी लय जोर मारून अभ्यास केलास तर ते ज्यवा त्येंच्या आयला 'मॉं मै बीए पास होगया' म्हनून पेढं देऊन कायतरी न्वाकरी करायला लागतील, त्यवा तू तुजं कायतरी वेगळं चालू ठ्यव. नक्की फु़डं जाशील बग. कारण तेच्यानंतर बी लय अंतर बाकी आस्तं.

जयनीत 16/05/2014 - 04:03
आन्जे पोट्टे नुस्त पास होऊन कसं जमनार? म्हन त्या शाईन्या पोट्टे लोकाईले का ह्या टायामाले म्या फक्त पास झाली, पुढच्या टायमाले वरपास होउन दाखवीन तवाच नावाची आन्जी! कसं?

आतिवास 18/05/2014 - 19:03
सर्व वाचकांचे आभार. प्रोत्साहनासाठी सर्व प्रतिसादकांचे आभार.

एस 28/05/2014 - 19:04
ही आन्जी मस्त डोक्यात भरून राहिलीय. एरवी धुरळा उडवत स्कोर सेटल करण्यात धन्यता मानणार्‍या लेखांच्या गदारोळात असं काही पुनःपुन्हा वाचावंसं वाटणारं आंतरजालावर कमीच भेटतं. वाचनखूण लावली आहेच. अजून येऊद्यात. सोबत एखादं धमाल व्यंगचित्र असेल तर अजूनच गंमत वाढेल. :-)

In reply to by एस

आतिवास 30/05/2014 - 12:17
सोबत एखादं धमाल व्यंगचित्र असेल तर अजूनच गंमत वाढेल. मी कसली चित्र काढतेय? मला चित्रकलेत नापास व्हायची नेहमीच भीती असायची :-) मिपाकर मीता यांनी एक प्रयत्न केला आहे. मी खरडवही वापरत नाही पण माझ्या 'खव'त तुम्हाला मीता यांनी केलेलं रेखाटन दिसेल. कदाचित ते मीता यांच्या 'खव'तही असेल - मला खात्री नाही.

म्हैस 30/05/2014 - 11:32
लय भारी. आम्ही पयलीत गेलो कि बाई रागवताना म्हणायच्या लहान आहात का बालवाडीतल्या मुलांसारख करताय ते .. दुसरीत गेलो कि म्हणायच्या पहिलीत आहात का? तिसरीत गेलो कि म्हणायच्या अक्कल नाही का पहिली दुसरीच्या पोरांसारखा वागताय ... :-( अतिवास तुमच्या अजून कविता आहेत का? सगळ्या एकत्र कुठे मिळतील ?

In reply to by म्हैस

आतिवास 30/05/2014 - 12:22
धन्यवाद. हे लेखन कविता नसून 'शतशब्दकथा' (म्हणजे शंभर शब्दांतली कथा) आहे. मला वाटतं तुम्ही माझ्या नावावर टिचकी मारलीत (क्लिक केलंत) की तुम्हाला माझे अन्य लेख पाहायला मिळतील. त्यातल्या नेमक्या शतशब्दकथा कोणत्या आहेत त्याचा दुवा बहुधा देता येणार नाही - मला तरी देता येणार नाही!

In reply to by आतिवास

सखी 30/05/2014 - 21:44
मला वाटतं तुम्ही माझ्या नावावर टिचकी मारलीत (क्लिक केलंत) की तुम्हाला माझे अन्य लेख पाहायला मिळतील. -खरतर असे केले तर तुमचे लेख आणि प्रतिसादही दिसतात. फक्त तुमचं लेखनच बघायच असेल तर इथे जा http://www.misalpav.com/user/13089/authored यातल्या जनातलं, मनातलं मधल्या शिर्षकांवर टिचकी मारली तर बहुतेक सर्व तुमच्या शतशब्दकथा आहेत. आणि अतिवासताई ते पुस्तकाचे खरच मनावर घ्या इथे तुमचे खुप फॅन, ऐसी आहेत :)

In reply to by बालगंधर्व

त्मच म्हन्न क्ळ्ल न्हि. मरठित सन्गा. कोण म्हणतोय रे की, या बेशुद्ध कोलांट्या उड्या आता विनोदी न वाटता लक्ष वेधण्याचा करूण प्रयत्न वाटत आहेत म्हणून ?

In reply to by आदूबाळ

नाय, नाय. "त्य चुप्य प्येयस्त अहे"*. तेम्च इन्गलिश सपेलिन्ग पन ब्यकार अस्नार्च. (बेशुद्ध टाईप करण्याचा त्रास करून घेऊन लोक काय म्हणून स्वतःची फजिती करून घेतात बॉ? ह्याला स्वपिडन टाईपचं सॅडिझम म्हणता येईल का?)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन 18/05/2014 - 14:20
(बेशुद्ध टाईप करण्याचा त्रास करून घेऊन लोक काय म्हणून स्वतःची फजिती करून घेतात बॉ? ह्याला स्वपिडन टाईपचं सॅडिझम म्हणता येईल का?)
तुम्हांला मॅसोकिझम म्हणायचं असावं बहुधा.

In reply to by बॅटमॅन

नाय, नाय ! ही निर्बुद्ध टायपिंग करताना "स्वपीडन" करून घेऊन नंतर "स्वतःचे हसे" आणि "दुसर्‍याचे पीडन" करण्यात आनंद समजणारी चोम्प्लिचतेद च्रोनिच "ट्रीप्पल व्हॅम्मी" केस आहे ;) =))

आंजीच्या पराब्लेम्वर माज्याकडं येक आयड्या हाय ! आंजी लई डोस्केबाज हाय. दुस्री-तिस्रि येका वर्सात करून तिला फुडच्या वर्शि यकदम तिस्रीत टाका की वो, अतिवास मॅडम. मंग आंजीला राम्या-मुक्या-सुर्कीला ठेंगा दाकवता यील :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कुर्पया "यकदम तिस्रीत टाका" आयवजी "यकदम चौतीत टाका" आसं वाचा. गलतिशे मिस्टेक व्हुवा भाय ;)

चिगो 15/05/2014 - 10:54
म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं?
आन्जे आन्जे.. अगं किती गं दुखः ते तुझं? आतिवास ताईंच्या लेखणीतून उतरलेली आणखी एक सुंदर निरागस आन्जीकथा..

म्या तिस्रीत जाईल तवा हे चवथीत. म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं? त्या लहान मुलीचं सोडून द्या हो. पण यालाच प्राक्तन म्हणतात. मी पैलीतून दुस्त्रीत गेलो हयाचा आनंद न मानता तो तिस्त्रीत गेला म्हणून दु:खी होणार्‍यांची संख्या जगात कमी नाहीये.

एस 15/05/2014 - 11:22
म्या धावत घरी. वराडले, “म्या दुस्रीत ग्येली.” आयनं हसून श्येंगदानं दिलं. आज्जीनं गूळ दिला हातात. आण्णा पेन देनार हायेत.
आमच्याकडून आंजीला फूल... Rose

बबन ताम्बे 15/05/2014 - 16:10
आवडली आंजीचा निरागसपणा. "त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत.पन सोताला शाने समजत्येत जादा." आमच्यावानी कधी कधी साळंला बुट्टी पण मारते. :-)

हाडक्या 15/05/2014 - 16:26
त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत. पन सोताला शाने समजत्येत जादा. म्या म्हन्ली, “लई शानपना नका दावू. म्याबी दुस्रीत हाये आजपासून!” राम्या जीब दावत बोल्ला, “आन्जी दुस्रीत, आमी तिस्रीत!” म्या तिस्रीत जाईल तवा हे चवथीत. म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं?
हे बाकी शाश्वत सत्य बोलली बघा.. कितीही ठरवलं तरी तिस्रीतल्या लोकांकडे दुर्लक्ष करता येत नाही. आपण केलं तरी ते आपल्याकडे करतील असं सांगता येत नाही. थोडक्यात हा प्रश्न सहजासहजी सुटत नाही..

आंजीला म्हणावं, धीर सोडू नगस. त्येंच्या मागं हायेस ते फकस्त आधी जलमले म्हनून. राम्या, मुक्या, सुर्कीपेक्षाबी लय जोर मारून अभ्यास केलास तर ते ज्यवा त्येंच्या आयला 'मॉं मै बीए पास होगया' म्हनून पेढं देऊन कायतरी न्वाकरी करायला लागतील, त्यवा तू तुजं कायतरी वेगळं चालू ठ्यव. नक्की फु़डं जाशील बग. कारण तेच्यानंतर बी लय अंतर बाकी आस्तं.

जयनीत 16/05/2014 - 04:03
आन्जे पोट्टे नुस्त पास होऊन कसं जमनार? म्हन त्या शाईन्या पोट्टे लोकाईले का ह्या टायामाले म्या फक्त पास झाली, पुढच्या टायमाले वरपास होउन दाखवीन तवाच नावाची आन्जी! कसं?

आतिवास 18/05/2014 - 19:03
सर्व वाचकांचे आभार. प्रोत्साहनासाठी सर्व प्रतिसादकांचे आभार.

एस 28/05/2014 - 19:04
ही आन्जी मस्त डोक्यात भरून राहिलीय. एरवी धुरळा उडवत स्कोर सेटल करण्यात धन्यता मानणार्‍या लेखांच्या गदारोळात असं काही पुनःपुन्हा वाचावंसं वाटणारं आंतरजालावर कमीच भेटतं. वाचनखूण लावली आहेच. अजून येऊद्यात. सोबत एखादं धमाल व्यंगचित्र असेल तर अजूनच गंमत वाढेल. :-)

In reply to by एस

आतिवास 30/05/2014 - 12:17
सोबत एखादं धमाल व्यंगचित्र असेल तर अजूनच गंमत वाढेल. मी कसली चित्र काढतेय? मला चित्रकलेत नापास व्हायची नेहमीच भीती असायची :-) मिपाकर मीता यांनी एक प्रयत्न केला आहे. मी खरडवही वापरत नाही पण माझ्या 'खव'त तुम्हाला मीता यांनी केलेलं रेखाटन दिसेल. कदाचित ते मीता यांच्या 'खव'तही असेल - मला खात्री नाही.

म्हैस 30/05/2014 - 11:32
लय भारी. आम्ही पयलीत गेलो कि बाई रागवताना म्हणायच्या लहान आहात का बालवाडीतल्या मुलांसारख करताय ते .. दुसरीत गेलो कि म्हणायच्या पहिलीत आहात का? तिसरीत गेलो कि म्हणायच्या अक्कल नाही का पहिली दुसरीच्या पोरांसारखा वागताय ... :-( अतिवास तुमच्या अजून कविता आहेत का? सगळ्या एकत्र कुठे मिळतील ?

In reply to by म्हैस

आतिवास 30/05/2014 - 12:22
धन्यवाद. हे लेखन कविता नसून 'शतशब्दकथा' (म्हणजे शंभर शब्दांतली कथा) आहे. मला वाटतं तुम्ही माझ्या नावावर टिचकी मारलीत (क्लिक केलंत) की तुम्हाला माझे अन्य लेख पाहायला मिळतील. त्यातल्या नेमक्या शतशब्दकथा कोणत्या आहेत त्याचा दुवा बहुधा देता येणार नाही - मला तरी देता येणार नाही!

In reply to by आतिवास

सखी 30/05/2014 - 21:44
मला वाटतं तुम्ही माझ्या नावावर टिचकी मारलीत (क्लिक केलंत) की तुम्हाला माझे अन्य लेख पाहायला मिळतील. -खरतर असे केले तर तुमचे लेख आणि प्रतिसादही दिसतात. फक्त तुमचं लेखनच बघायच असेल तर इथे जा http://www.misalpav.com/user/13089/authored यातल्या जनातलं, मनातलं मधल्या शिर्षकांवर टिचकी मारली तर बहुतेक सर्व तुमच्या शतशब्दकथा आहेत. आणि अतिवासताई ते पुस्तकाचे खरच मनावर घ्या इथे तुमचे खुप फॅन, ऐसी आहेत :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
म्या पास. निम्मी, अंक्या, भान्याबी पास. गुर्जी म्हन्लं "आता दुस्रीत". म्या धावत घरी. वराडले, “म्या दुस्रीत ग्येली.” आयनं हसून श्येंगदानं दिलं. आज्जीनं गूळ दिला हातात. आण्णा पेन देनार हायेत. गावभर हिंडून दारात बसली. मंग राम्या, मुक्या, सुर्की दिसली. आगावू हायती दुस्रीची पोरंपोरी. कायबी कराया गेलं की "ए पयलीच्या पोरांनो, मागं व्हा" म्हनत्येत. त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत. पन सोताला शाने समजत्येत जादा. म्या म्हन्ली, “लई शानपना नका दावू.

सिनेमा आणि प्रेम

राजेश घासकडवी ·

मस्त ! ना तो डिडीएलजे आला असता, ना मी वयात आलो असतो, ना तो मैने प्यार किया आला असता, ना मी प्रेमात पडलो असतो .. ना हम आपके कौन आला असता, ना मी तिला भिडलो असतो, ना तो दिल तो पागल है आला असता, ना मी आयुष्यभर रडलो असतो..

स्पंदना 15/05/2014 - 04:33
हं! बरोबर आहे तुमच. काही काळ सिनेमे समाजाच दर्शन करवत राह्यले अन काही काळाने समाज सिनेमाचं. अर्थात उपदेशात्मक लिहायला आम्ही अजुन ती उच्च पातळी गाठली नसल्याने तुमच उपरौधिक चालु द्या.

In reply to by स्पंदना

मला तुमचा प्रतिसाद नीट कळला नाही. तुम्हाला खरंच वाटतं का सिनेमा नसताना आई-मूल, भाऊ-बहीण, मित्र-मित्र, स्त्री-पुरुष यांच्यात प्रेम अस्तित्वात होतं? अहो सिनेमांनीच शिकवलं आहे हे सगळं. मला तर असं वाटतं की मुळात नाती, प्रेम ही संकल्पनाच सिनेमाने शिकवली. पण तुमचे विचार काहीतरी वेगळे वाटतात. कारण तुम्ही म्हणता की
काही काळ सिनेमे समाजाच दर्शन करवत राह्यले अन काही काळाने समाज सिनेमाचं.
हा टर्निंग पॉइंट नक्की कधी आला? कारण काही लोक तर म्हणतात की पूर्वी सिनेमा केवळ पौराणिक नाटकं, परीकथा वगैरेवर भर द्यायचा. सुरूवातीच्या काही सिनेमांची नावं तर पहा - श्री पुंडलिक, राजा हरिश्चंद्र, कीचकवधम... पहिले टॉकीज - आलम आरा, भक्त प्रल्हाद, कालिदास, सती सावित्री. नंतर तो सामाजिक आशय वगैरे मांडायला लागला. म्हणजे तुम्ही म्हणता त्याच्या बरोब्बर विरुद्ध थियरी. औपरोधिक न होता खरोखरच तुम्हाला असं का वाटतं हे मांडलंत तर नक्कीच सिनेमाकडे बघण्याची नवीन दृष्टी मिळेल.

सस्नेह 15/05/2014 - 08:19
हिंदी सिनेमांनी केलेलं मोठं काम म्हणजे राष्ट्रभाषेचा प्रसार. नाहीतर या अनेकभाषी देशात हिंदीला वाईट दिवस आले असते.

सिनेमे हवेतच कशाला म्हणतो मी? संस्कारी पिढी आणि निरोगी समाज घडवायचा असेल तर लहानपणापासुनच मुलांना पुजेची पथ्यं आणि मुलींना स्वैपाकाची पथ्यं शिकवावीत..

सर्वप्रथम लेख आवडला. लेखात अजून भर घालून घालता आली असती, म्हणजे आपला मुद्दा समजला असता. पण एक गोष्ट मलाही मान्य की चित्रपटाने प्रेम करायला शिकवलं पहिला मुकपट राजा हरिश्चंद्र. (इ.स.१९१२/१३) पात्रांच्या हालचालीवरुन पात्रांना काय म्हणायचं आहे ते समजून घ्यावं लागलं. प्रेम हे असं मुकच असतं आणि ते असं समजून घ्यावं लागतं. मला वाटतं प्रेमाची मुहुर्तमेढ रोवली ती राजाहरिश्चंद्र या चित्रपटांनेच. पुढे ती राधा, तो कृष्ण, ती मीरा.. वगैरे हे सर्व अगदी स्वातंत्र्यापुर्वी कळु लागलं होतं. आणि मग लोकांच्या समोर आला तो 'महल' (१९४९) हा चित्रपट. चित्रपटात झोपाळ्यावर बसलेली वीशीची मधुबाला आणि थोराड सॉरी अडतीशीचा अशोक कुमार चेह-यावरच्या रेषा हलु न देता सिगारेट ओढत झोपाळ्याकडे जाणारा आणि लता मंगेशकरचा 'आयेगा आनेवाला आयेगा' या ब्याग्राउंडला वाजणार्‍या गीत आणि प्रसंगानी लोकांच्या मनात प्रेमाची भावना उभी केली. लोक आपल्या आजुबाजुला मधुबाला शोधु लागले. माझ्या आजोबाच्या मनात या चित्रपटातील प्रेमानं घर केलं आणि चित्रपटांनी जशी प्रेमाची परंपरा पुढे नेली तशी ती प्रेमाची परंपरा आमच्या पिढीत आली. आमचं वय तेव्हा १५ असेल. कोणत्याही शिक्षकानं १५ वय काय प्रेमाबिमाचं असतं किमान १७ पर्यंत तरी असा विचार आणू नये, असं कै शिकवलं नै. आणि मग आम्ही माधुरी दिक्षीत, जुही चावला, ती मैने प्यार किया वाली ती 'सुमन' काय नाव तिचं सालं विसरुन गेलो यांच्याभोवती आमचं मन पिंगा घालु लागलं. आणि मग आम्हीही प्रेम वगैरे काय असतो हे चित्रपट पाहुन शिकलो. कॉलेजला दांड्या मारु मारु आम्ही या चित्रपटातील प्रेमाच्या आणाभाका पाहिल्या आणि आमच्याही मनात मोगर्‍याच्या सुंगधासारखं प्रेम फुललं. आजही तो सुगंध आमच्याबरोबर दरवळतोय.(येतोय ना दरवळ) बाकी, आईचं प्रेम, वडीलांच प्रेम, बहिनीचं प्रेम, वहिनीचं प्रेम (वहिनीच्या बांगड्या) मित्राचं प्रेम (दोस्त असावा तर असा) अशा विविध चित्रपटातून कळु लागलं. नाय तर आमचं काय खरं नव्हतं. सालं आम्ही दगडच राहीलो असतो. शाळेतल्या मारामा-या (ढिशीम ढिशीम) चित्रपटातूनच कळल्या नै तर आमचा जन्म सुरपारंब्यातच गेला असता. शाळेतल्या पोरांना दगड मारुन कोचा पाडल्या. हेअर स्टाईल बीए.पर्यंत अमिताब बच्चन सारखी ठेवली होती पण तोवरही आमच्या आयुष्यात कोणी जया नं पाऊल ठेवलं नाही. असो, चित्रपटाने खूप संस्कार केले (चांगले वाईट) याच्याशी सहमत. लेखापेक्षा प्रतिसाद मोठा होईल म्हणुन आवरते घेतो. नै तर चित्रपटाने कसे कसे संस्कार केले ते अजून लिहिलेच असते. -दिलीप बिरुटे

दिनेश सायगल 15/05/2014 - 09:34
एक footnote लिहा तशी. नाही म्हणजे चित्रपटांची उदाहरणे विनोदी आहेत. पण तो विनोद तुमच्या लिखाणात कुठे औषधाला पण दिसला नाही.

असंका 15/05/2014 - 10:34
सिनेमांनी आपल्या भावविश्वावर काहीच परीणाम होत नाही, हे म्हणणं इतकं सोपं वाटत नाही. उडदामाजी काळे गोरे! काही लोक आपल्या कामात चांगले असतात, काही लोक नसतात. त्यावरून सरसकट सगळ्या सिनेमांबद्दल कसं मतप्रदर्शन करणार? मुळात सिनेमा हे एक माध्यम आहे. आपली गोष्ट सांगण्याचं. जसं हे मिसळपाव किंवा इंटरनेट माध्यम आहे, तसंच. पण ते इतरांपेक्षा फार ताकदवान माध्यम आहे, आणि फार थोड्या वेळात ते आपला परीणाम करते. सिनेमाची गोष्ट स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न करते. शिवाय स्वप्न वास्तववादी व्हावं म्हणून सतत त्याची धडपड चालूच असते..आपण जे आयुष्य जगतो, ते इतरांच्या नजरेला कसे दिसत असेल? या प्रश्नाचे उत्तर सिनेमा द्यायचा प्रयत्न करतो. सिनेमातल्या गोष्टीत आपल्या आयुष्यातल्या काही जागा गाळल्या गेल्या तरी बहुतांश इतर ठिकाणी त्या जागा भरल्या जातात. गाळलेल्या जागा भरणे सोपे असेल, तर तशा त्या भरायचा एक प्रयत्न करायला काय हरकत आहे, कदाचित आपले आयुष्यही त्या सिनेमासारखे संगीतमय, रंगीत, आकर्षक होइल! ....हे असं मनात येणं अशक्य आहे का? जे आपण आजुबाजूला बघतो, ते सगळे संस्कार आपल्यावर होतच असतात. काही गोष्टी आपण करायच्या म्हणून स्विकारतो, काही न करण्यासारख्या किंवा टाळण्यासारख्या म्हणून. सिनेमात दाखवलेल्या गोष्टी म्हणजे बहुतांशवेळा एकांगी असतात. जसा पत्त्याचा बंगला. सगळ्या बाजूंनी जोवर बघितला जात नाही, तोवर तो बंगला छानच वाटतो. सिनेमा हा असा पत्त्याचा बंगला असतो. सगळ्या बाजूने तो बंगला दाखवणं न दाखवणं हे सिनेमा तयार करणार्‍यांच्या हातात असतं.

In reply to by असंका

सिनेमांनी आपल्या भावविश्वावर काहीच परीणाम होत नाही, हे म्हणणं इतकं सोपं वाटत नाही.
मी तर म्हणतोय की आपलं भावविश्वच सिनेमांमुळे तयार झालेलं आहे. त्याआधी काही नव्हतंच. मला सांगा, १७ व्या वर्षी प्रेम करायचं, किंवा बंगलेवाल्याच्या मुलीने रस्त्यावरच्या फळविक्याशी लग्न करायचं हे पूर्वी कधी व्हायचं का? आपल्याला साली श्रीमंताची पोरगी पटली पायजेल असं पूर्वीच्या गरीब मुलांच्या मनात तरी यायचं का? सिनेमांमध्ये हे सर्रास दाखवायला लागले तेव्हापासूनच या घटना वाढल्या. आता फॅंड्रीसारखे पिक्चर बघून उच्चवर्गियाच्या नाही तर उच्चवर्णियाच्या मुली हव्याशा झाल्या. नाहीतर पूर्वी असलं नसायचं हो.

In reply to by राजेश घासकडवी

सुबोध खरे 15/05/2014 - 12:08
ते वयच विचित्र असतं. सिनेमाशी संबंध नाही पण सिनेमात पाहून बंगल्यातील मुलीला फळवाल्याशी लग्न करणे हे बरोबर आहे असेच वाटते. (त्या मुलीच्या सौंदर्य प्रसाधनांचा खर्च त्या फळ वाल्याच्या कमाई एवढा होता.) असे केल्याने आपली काय वाताहत होईल हा विचार करण्याची प्रगल्भता त्या वयात नसते. तो दिलवाला आहे आणि मला फार सुखात ठेवेल अशी भाबडी अशा त्या मुलीला सिनेमातून मिळाली तर दोष कुणाचा?

In reply to by राजेश घासकडवी

असंका 15/05/2014 - 12:34
(पाच सात प्रतिसाद तयार करून खोडून टाकले मी....पुन्हा पुन्हा आपला प्रतिसाद वाचून खिन्नपणे हसत होतो. ठीक आहे. आणि खरं सांगू, आपण जर माझ्या प्रतिसादावर काही उलट लिहिताल तर हेच लिहिताल हे मला आधी पण लक्षात आले होते- तुम्ही तेच तर म्हणत आहात जे मी वर म्हणालो. फक्त वर आणखी शेर दोन शेर टाकून.) ते श्यामची आई कशाला मध्ये घेतलंत? ते नाव नस्तं तर मी काहीच बोललो नसतो.

In reply to by असंका

तुम्हाला थोडी गंभीर चर्चा करायची आहे आणि माझ्या उपरोधाने मी तिची मुस्कटदाबी करतो आहे असं काहीसं वाटलं. तेव्हा उपरोधाची ढाल बाजूला ठेवतो आणि गंभीरपणे बोलू.
सिनेमांनी आपल्या भावविश्वावर काहीच परीणाम होत नाही, हे म्हणणं इतकं सोपं वाटत नाही.
अर्थातच, सगळ्याच बाह्य गोष्टींचा काही ना काही परिणाम होतोच. मात्र मुद्दा परिणाम होतो की नाही हा नाहीये, तर किती परिणाम होतो हा आहे. जेव्हा कोणीतरी म्हणतं की '१७ हे काय प्रेमात पडण्याचं वय आहे का? हे टाइमपास, फॅंड्री वगैरेसारखे सिनेमे बघून तरुणांच्या मनात भलत्या कल्पना येतात' अशा प्रकारचं विधान होतं, त्यात 'असे सिनेमे यायच्या आधी कोणीच १७ व्या वर्षी प्रेमात पडत नसत. असलेच तर त्यांचं प्रमाण नगण्य होतं.' थोडक्यात, ही प्रेमात वगैरे पडण्याची थेरं सिनेमातून शिकलेली आहेत. तेव्हा मग प्रश्न असा येतो की पूर्वी जेव्हा सिनेमा नव्हता तेव्हा सतरा वर्षांची पोरं काय करायची? नगरीनिरंजन यांनी 'लाइफ इमिटेट्स आर्ट/ आर्ट इमिटेट्स लाइफ' हा मुद्दा मांडलेला आहे. हा लेख का लिहिला हे त्यांना बरोब्बर कळलेलं आहे. कला-जीवन हे नातं अत्यंत व्यामिश्र असताना या दोन टोकांपैकी एकच टोक स्वीकारणं हे चुकीचं आहे. हे दाखवून देण्यासाठीच या लेखाचा अट्टाहास होता. कारण प्रेमासारखी मानवी भावविश्वातली मूलभूत भावना सिनेमातून शिकली जाते असं म्हटलं तर इतरही सिनेमातूनच येतात असं म्हणावं लागतं. रिडक्शियो डि अॅब्सर्डम पद्धतीचा युक्तिवाद या लेखात आहे.
ते श्यामची आई कशाला मध्ये घेतलंत? ते नाव नस्तं तर मी काहीच बोललो नसतो.
श्यामची आई पूर्णपणे इन्सिडेंटल आहे. त्याऐवजी एक क्ष सिनेमा म्हणूनही चाललं असतं. शामची आई हे ओळखीचं आणि आजीच्या लहानपणीचं म्हणून वापरलं इतकंच. टीका त्या विशिष्ट सिनेमावर नसून 'सिनेमांमधून मूलभूत भावना शिकल्या जातात' या भूमिकेवर आहे.

In reply to by राजेश घासकडवी

अनुप ढेरे 19/05/2014 - 10:25
घुसखोरीबद्द्ल क्षमस्व. घासकडवींशी सहमत आहे.प्रेम, द्वेश, भांडणं या नैसर्गिक संकल्पना आहेतच यावर दुमत नाहीच. त्यांच्या अस्तित्वाचा आणि सिनेमाचा संबंध नाहीच. सिनेमा यायच्या आधिही त्या होत्याच. पण माझ्यामते सिनेमा हा प्रेम वगैरे सारख्या भावनांना मूर्त स्वरूप देतो. प्रेमाचं manifestation हे सिनेमा/ इतर कलाप्रकार प्रभावित करतात. सिनेमात दाखवतात तसंच करणं म्हणजेच प्रेम करणं असा समज होतो. हे केवळ सिनेमा नाही तर इतर अमेरिकन्/ईंग्लिश सिटकॉम्स पण प्रभावित करतात.

In reply to by राजेश घासकडवी

बाळ सप्रे 20/05/2014 - 10:18
तेव्हा उपरोधाची ढाल बाजूला ठेवतो
धन्यवाद.. आणि विचारांशी सहमत.. लेखात उपरोधाचा डोस जरा जास्तच झाल्याने खरा विचार समजण्यात गोंधळच होत होता..

In reply to by राजेश घासकडवी

आनन्दा 20/05/2014 - 17:04
असे दुसर्‍या टोकाला जाणे मला पटत नाही. सिनेमाचा प्रभाव पडतोच. म्हणजे मी सिनेमाचाच पडतो असे म्हणत नाही. संस्कारक्ष्॑म वयात माणसाला जे वाचायला, ऐकायला, पहायला मिळते, त्याचा त्याच्या जीवनावर परिणाम होतो यात शंका नाही. सिनेमा याला अपवाद कसा असू शकेल? असो, यासाठी तळणीत एक जिलबी टाकवी असा विचार आहे. पाहतो वेळ मिळेल तेव्हा.

चिगो 15/05/2014 - 12:51
माझी आजी सांगायची की तिच्या आईला मातृप्रेम म्हणजे काही माहीतच नव्हतं. जेव्हा 'श्यामची आई' चित्रपट आला तेव्हा तिला आईचं प्रेम म्हणजे नक्की काय असतं हे समजलं. 'माझ्या आईने माझ्यावर कधी प्रेम केलंच नाही' ती सांगत असे. 'आमच्या आसपासच्या सर्व मुलांचीही हीच कथा होती. त्यांच्या आयांना मुलांच्या आजारपणात रात्रीचा दिवस करणं, मुलांना मायेने जवळ घेणं, त्याला प्रेमाने डबा तयार करून देणं, आपल्या पोटचा घास काढून त्यांना भरवणं... या सगळ्या गोष्टी माहीतच नव्हत्या. श्यामची आई सिनेमा बघितला आणि आमचे डोळे खाडकन् उघडले. त्याचा आमच्या मनावर इतका गहिरा परिणाम झाला की तेव्हापासून आम्ही आमच्या मुलांवर प्रेम करायला शिकलो.'
हा फारच व्वाईटरित्या चांगला जमलेला भाग आहे.. सिनेमा नसता तर ना मातृप्रेम,ना पितृप्रेम, ना बंधुप्रेम आणि ना प्रेमाच्या इतर कॅटॅगिर्‍या लोकांना कळल्या असत्या. मारे "सिनेमाचा प्रभाव नसतोच पडत" म्हणणार्‍यांनी सिनेमातली गाणी आणि डायलॉक मारुनच लायनी मारल्या आणि खोडल्या असतील.. आम्हाला नका गमजा सांगू, भौ.. लेख जमलाय मस्त, गुर्जी..

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 15/05/2014 - 14:54
+२ पण तरी सीरियसनेसपणा आणि टंगीनचीक खवचटपणा याच्यामध्ये घोटाळणारा लेख असल्याने रणकंदन माजणार.

In reply to by आदूबाळ

सूड 15/05/2014 - 15:09
>>पण तरी सीरियसनेसपणा आणि टंगीनचीक खवचटपणा याच्यामध्ये घोटाळणारा लेख उलट यामुळेच रणकंदन माजायची शक्यता फार्फार कमी आहे. ;)

साती 15/05/2014 - 15:36
चित्रपटानी किती किती काँट्री दिलंय त्याचं काही काऊंटींगच नाही. आमच्या तर कॉलेजनेपण लेक्चर सोडून चित्रपटांचे शुटींग करायला हॉल भाड्याने दिले होते. मुन्नाभाई एम बी बी एस वैगेरे बघूनच पॉईजनिंग पेशंटला पेपर बनवायच्या आधी ट्रीटमेंट द्यायला, कॅन्सरच्या पेशंटला सायकॅट्रीक काऊंसेलिंग करायला, शिकलो.

In reply to by साती

नगरीनिरंजन 17/05/2014 - 23:01
पण अजूनही अनेक इस्पितळांतून जादू की झप्पी मिळत नसल्याने चिडून रुग्णाचे नातेवाईक डॉक्टर लोकांना मारहाण करतात. मी तर म्हणतो मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपट वैद्यकीय अभ्यासक्रमात लावला जावा.

बॅटमॅन 15/05/2014 - 16:45
गुंडांशी मारामारी कशी करायची तेही पिच्चरकडूनच शिकलो. अर्थात प्रत्यक्षात कधी चान्स नै आला, चाण्स आलेल्यांची अवस्था पाहिली पण तोही पिच्चर न पाहण्याचाच परिणाम असे त्यांस बजावून पळून आलो, हाकानाका.

नगरीनिरंजन 15/05/2014 - 20:36
लाईफ इमिटेट्स आर्ट असा निकाल लावून हा प्रश्न झटक्यात निकाली काढल्याबद्दल अभिनंदन! चित्रपटातल्या नायकाप्रमाणे हमाली, दारुचा धंदा, श्रीमंतांच्या पोरींचा माज उतरवणे, फसवाफसवी, गँगवॉर वा स्मगलिंग यापैकी काहीच करत नसल्याचे आयुष्यभर बाळगलेले दु:ख तुमच्या लेखाने पुन्हा ताजे केले. नशिब ऋशिकेष मुखर्जी व अमोल पालेकरांचे काही चित्रपट आले म्हणून मध्यमवर्गीय जगणं जगता येतंय नाहीतर कसं झालं असतं या कल्पनेने काटा येतो अंगावर. बागा-बागांमध्ये झाडामागे पळापळी करत प्रेम करणे किंवा जितेंद्र-श्रीदेवीसारखं पोजेस देत प्रेम करणे हा प्रकार लोक कधी शिकणार याची फार काळापासून उत्सुकता आहे. मुळात माणसाच्या इतिहासाचा विचार सिनेमासापेक्ष नव्याने करायला हवा. उत्क्रांतीच्या सिद्धांताची तर या पुराव्यापुढे लक्तरे निघतात. जर चित्रपट नसते तर माणसांना मुलं कशी होतात ते कळलंच कसं असतं? त्यामुळे माणसाचे अस्तित्त्व हे चित्रपटानंतरचे आहे हे सहज सिद्ध होते. असो. तरीही लेख थोडा अपूर्ण वाटला. यात "समाजाचे देणे" हा भाग आलेला नाही. संपूर्ण मानवजातीला जन्माला घालणार्‍या ईश्वरसमान चित्रपटाने मानवी समाजाला प्रत्येकवेळी नवा विचार देणे ही सगळ्या मानवजातीला जी आस लागून राहिलेली असते तिचा उल्लेख लेखात राहून गेला असे वाटते.

In reply to by नगरीनिरंजन

लाईफ इमिटेट्स आर्ट असा निकाल लावून हा प्रश्न झटक्यात निकाली काढल्याबद्दल अभिनंदन!
निकाल वगैरे लावण्यासाठी याबद्दल संदेह होताच कुठे? सामान्य जनांचे शब्द अर्थानुधावंते असतात, पण महान लोकांच्या बाबतीत अर्थ शब्दानुधावंते असतात. जेव्हा ते थोर ऋषि-मुनि बोलतात, तेव्हा त्या शब्दांनाच एक नवीन प्रमाण अर्थ प्राप्त होतो. जसजसे ऋषिमुनि संपत गेले तसतसा नाटक-सिनेमा त्यांची जागा भरून काढू लागला. त्यामुळे त्या कलाकृतींमधून जे 'शब्द' किंवा विधानं आली ती प्रमाण ठरायला लागली. आणि त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक पैलूवर सिनेमांमध्ये काय दाखवलं आहे याचा परिणाम व्हायला लागला. कारण सामान्य माणूस हा आदर्शांकडे टक लावून बघतो. मग ज्यांच्याकडे टक लावून बघायला झालं ते हिरो-हिरॉइनीच त्याचे आदर्श झाले. आणि मग तिथूनच सर्व लाइफ इमिटेटिंग आर्ट सुरू झालं. आर्टला इमिटेट करणार नाहीतर इमिटेट करायला दुसरं आहे तरी काय? आणि इमिटेट न करता आपल्या आपण काही करावं इतका प्रगल्भ थोडाच आहे माणूस?
जर चित्रपट नसते तर माणसांना मुलं कशी होतात ते कळलंच कसं असतं? त्यामुळे माणसाचे अस्तित्त्व हे चित्रपटानंतरचे आहे हे सहज सिद्ध होते.
एक्झॅक्टली! कुठच्यातरी एका आदिवासी समाजात पुरुषांचा उपयोग काय - मूल तर स्त्रीला होतं - असा प्रश्न पडलेला असल्याचं मी ऐकलेलं आहे. मागास समाजात सिनेमे न पोचल्यामुळे कशी दुरवस्था होते हे उघडच दिसून येतं. त्या समाजाला म्हणे शेती करायला लागल्यावर 'अच्छा, बी टाकली की जमिनीत काहीतरी उगवतं!' हे पाहून समजलं म्हणे. आता त्याच जागी जर हिंदी सिनेमे असते तर 'मै तुम्हारे बच्चे की मॉं बनने वाली हूॅं.' नंतर येणाऱ्या ढॅण् बरोबरच समजलं नसतं का?
संपूर्ण मानवजातीला जन्माला घालणार्‍या ईश्वरसमान चित्रपटाने मानवी समाजाला प्रत्येकवेळी नवा विचार देणे ही सगळ्या मानवजातीला जी आस लागून राहिलेली असते...
तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलात. आत्तापर्यंतच्या इतिहासात माणसाने देवाचं दर्शन मिळावं म्हणून किती प्रयत्न केले. संतांनी त्याची आळवणी केली, ऋषिमुनिंनी घोर तपश्चर्या केली. पण त्या काळी सिनेमेच नव्हते. आणि आपण असे नतद्रष्ट की आपल्यासमोर आज हजारोंनी सिनेमे आहेत, पण आपल्या डोळ्यासमोर देव असून दिसत नाही. परीस शोधणाऱ्या, आणि तो हाती गवसूनही न कळलेल्या माणसाप्रमाणे आपण वागत आहोत.

In reply to by राजेश घासकडवी

आत्मशून्य 17/05/2014 - 23:47
मानवी मनाची संवेदनशिलता आज धुळीस मिळवली याचेच हे ध्योतक असावे. ऑब्जेक्ट ओरीएंटेड प्रोग्रामींगव्र प्रभुत्व आले म्हणजे जिवनाचे कोडे सूटल्याचा जो थाट आज मनाला रुजलाय त्याची विशारी फळे आज ना उद्या आपणच भोगणार... आयुष्य फार निरागस होते जेंव्हा अ‍ॅपल आणी ब्लॅकबेरी फक्त फळे होती, चित्रपटकला समृध्दीचा तो सुखाचा काळ होता. तुझे आहे तुझपाशी परी तु संस्थळ चुकलाशी.. कालाय तस्मै नं:. इत्यलम् आणी बरेच काही

नामक एका विलक्षण आयडीची ही लक्षवेधी कमेंट वाचून लेखाचा परिणाम नक्की कोणत्या स्तरावर झालायं हे सहज लक्षात येतं!
गस्कदवी साहेब, चन्गले लिहिलेय. अजुण थोडा मासाला हवा होताआ. अजुण येउ दे.

मस्त ! ना तो डिडीएलजे आला असता, ना मी वयात आलो असतो, ना तो मैने प्यार किया आला असता, ना मी प्रेमात पडलो असतो .. ना हम आपके कौन आला असता, ना मी तिला भिडलो असतो, ना तो दिल तो पागल है आला असता, ना मी आयुष्यभर रडलो असतो..

स्पंदना 15/05/2014 - 04:33
हं! बरोबर आहे तुमच. काही काळ सिनेमे समाजाच दर्शन करवत राह्यले अन काही काळाने समाज सिनेमाचं. अर्थात उपदेशात्मक लिहायला आम्ही अजुन ती उच्च पातळी गाठली नसल्याने तुमच उपरौधिक चालु द्या.

In reply to by स्पंदना

मला तुमचा प्रतिसाद नीट कळला नाही. तुम्हाला खरंच वाटतं का सिनेमा नसताना आई-मूल, भाऊ-बहीण, मित्र-मित्र, स्त्री-पुरुष यांच्यात प्रेम अस्तित्वात होतं? अहो सिनेमांनीच शिकवलं आहे हे सगळं. मला तर असं वाटतं की मुळात नाती, प्रेम ही संकल्पनाच सिनेमाने शिकवली. पण तुमचे विचार काहीतरी वेगळे वाटतात. कारण तुम्ही म्हणता की
काही काळ सिनेमे समाजाच दर्शन करवत राह्यले अन काही काळाने समाज सिनेमाचं.
हा टर्निंग पॉइंट नक्की कधी आला? कारण काही लोक तर म्हणतात की पूर्वी सिनेमा केवळ पौराणिक नाटकं, परीकथा वगैरेवर भर द्यायचा. सुरूवातीच्या काही सिनेमांची नावं तर पहा - श्री पुंडलिक, राजा हरिश्चंद्र, कीचकवधम... पहिले टॉकीज - आलम आरा, भक्त प्रल्हाद, कालिदास, सती सावित्री. नंतर तो सामाजिक आशय वगैरे मांडायला लागला. म्हणजे तुम्ही म्हणता त्याच्या बरोब्बर विरुद्ध थियरी. औपरोधिक न होता खरोखरच तुम्हाला असं का वाटतं हे मांडलंत तर नक्कीच सिनेमाकडे बघण्याची नवीन दृष्टी मिळेल.

सस्नेह 15/05/2014 - 08:19
हिंदी सिनेमांनी केलेलं मोठं काम म्हणजे राष्ट्रभाषेचा प्रसार. नाहीतर या अनेकभाषी देशात हिंदीला वाईट दिवस आले असते.

सिनेमे हवेतच कशाला म्हणतो मी? संस्कारी पिढी आणि निरोगी समाज घडवायचा असेल तर लहानपणापासुनच मुलांना पुजेची पथ्यं आणि मुलींना स्वैपाकाची पथ्यं शिकवावीत..

सर्वप्रथम लेख आवडला. लेखात अजून भर घालून घालता आली असती, म्हणजे आपला मुद्दा समजला असता. पण एक गोष्ट मलाही मान्य की चित्रपटाने प्रेम करायला शिकवलं पहिला मुकपट राजा हरिश्चंद्र. (इ.स.१९१२/१३) पात्रांच्या हालचालीवरुन पात्रांना काय म्हणायचं आहे ते समजून घ्यावं लागलं. प्रेम हे असं मुकच असतं आणि ते असं समजून घ्यावं लागतं. मला वाटतं प्रेमाची मुहुर्तमेढ रोवली ती राजाहरिश्चंद्र या चित्रपटांनेच. पुढे ती राधा, तो कृष्ण, ती मीरा.. वगैरे हे सर्व अगदी स्वातंत्र्यापुर्वी कळु लागलं होतं. आणि मग लोकांच्या समोर आला तो 'महल' (१९४९) हा चित्रपट. चित्रपटात झोपाळ्यावर बसलेली वीशीची मधुबाला आणि थोराड सॉरी अडतीशीचा अशोक कुमार चेह-यावरच्या रेषा हलु न देता सिगारेट ओढत झोपाळ्याकडे जाणारा आणि लता मंगेशकरचा 'आयेगा आनेवाला आयेगा' या ब्याग्राउंडला वाजणार्‍या गीत आणि प्रसंगानी लोकांच्या मनात प्रेमाची भावना उभी केली. लोक आपल्या आजुबाजुला मधुबाला शोधु लागले. माझ्या आजोबाच्या मनात या चित्रपटातील प्रेमानं घर केलं आणि चित्रपटांनी जशी प्रेमाची परंपरा पुढे नेली तशी ती प्रेमाची परंपरा आमच्या पिढीत आली. आमचं वय तेव्हा १५ असेल. कोणत्याही शिक्षकानं १५ वय काय प्रेमाबिमाचं असतं किमान १७ पर्यंत तरी असा विचार आणू नये, असं कै शिकवलं नै. आणि मग आम्ही माधुरी दिक्षीत, जुही चावला, ती मैने प्यार किया वाली ती 'सुमन' काय नाव तिचं सालं विसरुन गेलो यांच्याभोवती आमचं मन पिंगा घालु लागलं. आणि मग आम्हीही प्रेम वगैरे काय असतो हे चित्रपट पाहुन शिकलो. कॉलेजला दांड्या मारु मारु आम्ही या चित्रपटातील प्रेमाच्या आणाभाका पाहिल्या आणि आमच्याही मनात मोगर्‍याच्या सुंगधासारखं प्रेम फुललं. आजही तो सुगंध आमच्याबरोबर दरवळतोय.(येतोय ना दरवळ) बाकी, आईचं प्रेम, वडीलांच प्रेम, बहिनीचं प्रेम, वहिनीचं प्रेम (वहिनीच्या बांगड्या) मित्राचं प्रेम (दोस्त असावा तर असा) अशा विविध चित्रपटातून कळु लागलं. नाय तर आमचं काय खरं नव्हतं. सालं आम्ही दगडच राहीलो असतो. शाळेतल्या मारामा-या (ढिशीम ढिशीम) चित्रपटातूनच कळल्या नै तर आमचा जन्म सुरपारंब्यातच गेला असता. शाळेतल्या पोरांना दगड मारुन कोचा पाडल्या. हेअर स्टाईल बीए.पर्यंत अमिताब बच्चन सारखी ठेवली होती पण तोवरही आमच्या आयुष्यात कोणी जया नं पाऊल ठेवलं नाही. असो, चित्रपटाने खूप संस्कार केले (चांगले वाईट) याच्याशी सहमत. लेखापेक्षा प्रतिसाद मोठा होईल म्हणुन आवरते घेतो. नै तर चित्रपटाने कसे कसे संस्कार केले ते अजून लिहिलेच असते. -दिलीप बिरुटे

दिनेश सायगल 15/05/2014 - 09:34
एक footnote लिहा तशी. नाही म्हणजे चित्रपटांची उदाहरणे विनोदी आहेत. पण तो विनोद तुमच्या लिखाणात कुठे औषधाला पण दिसला नाही.

असंका 15/05/2014 - 10:34
सिनेमांनी आपल्या भावविश्वावर काहीच परीणाम होत नाही, हे म्हणणं इतकं सोपं वाटत नाही. उडदामाजी काळे गोरे! काही लोक आपल्या कामात चांगले असतात, काही लोक नसतात. त्यावरून सरसकट सगळ्या सिनेमांबद्दल कसं मतप्रदर्शन करणार? मुळात सिनेमा हे एक माध्यम आहे. आपली गोष्ट सांगण्याचं. जसं हे मिसळपाव किंवा इंटरनेट माध्यम आहे, तसंच. पण ते इतरांपेक्षा फार ताकदवान माध्यम आहे, आणि फार थोड्या वेळात ते आपला परीणाम करते. सिनेमाची गोष्ट स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न करते. शिवाय स्वप्न वास्तववादी व्हावं म्हणून सतत त्याची धडपड चालूच असते..आपण जे आयुष्य जगतो, ते इतरांच्या नजरेला कसे दिसत असेल? या प्रश्नाचे उत्तर सिनेमा द्यायचा प्रयत्न करतो. सिनेमातल्या गोष्टीत आपल्या आयुष्यातल्या काही जागा गाळल्या गेल्या तरी बहुतांश इतर ठिकाणी त्या जागा भरल्या जातात. गाळलेल्या जागा भरणे सोपे असेल, तर तशा त्या भरायचा एक प्रयत्न करायला काय हरकत आहे, कदाचित आपले आयुष्यही त्या सिनेमासारखे संगीतमय, रंगीत, आकर्षक होइल! ....हे असं मनात येणं अशक्य आहे का? जे आपण आजुबाजूला बघतो, ते सगळे संस्कार आपल्यावर होतच असतात. काही गोष्टी आपण करायच्या म्हणून स्विकारतो, काही न करण्यासारख्या किंवा टाळण्यासारख्या म्हणून. सिनेमात दाखवलेल्या गोष्टी म्हणजे बहुतांशवेळा एकांगी असतात. जसा पत्त्याचा बंगला. सगळ्या बाजूंनी जोवर बघितला जात नाही, तोवर तो बंगला छानच वाटतो. सिनेमा हा असा पत्त्याचा बंगला असतो. सगळ्या बाजूने तो बंगला दाखवणं न दाखवणं हे सिनेमा तयार करणार्‍यांच्या हातात असतं.

In reply to by असंका

सिनेमांनी आपल्या भावविश्वावर काहीच परीणाम होत नाही, हे म्हणणं इतकं सोपं वाटत नाही.
मी तर म्हणतोय की आपलं भावविश्वच सिनेमांमुळे तयार झालेलं आहे. त्याआधी काही नव्हतंच. मला सांगा, १७ व्या वर्षी प्रेम करायचं, किंवा बंगलेवाल्याच्या मुलीने रस्त्यावरच्या फळविक्याशी लग्न करायचं हे पूर्वी कधी व्हायचं का? आपल्याला साली श्रीमंताची पोरगी पटली पायजेल असं पूर्वीच्या गरीब मुलांच्या मनात तरी यायचं का? सिनेमांमध्ये हे सर्रास दाखवायला लागले तेव्हापासूनच या घटना वाढल्या. आता फॅंड्रीसारखे पिक्चर बघून उच्चवर्गियाच्या नाही तर उच्चवर्णियाच्या मुली हव्याशा झाल्या. नाहीतर पूर्वी असलं नसायचं हो.

In reply to by राजेश घासकडवी

सुबोध खरे 15/05/2014 - 12:08
ते वयच विचित्र असतं. सिनेमाशी संबंध नाही पण सिनेमात पाहून बंगल्यातील मुलीला फळवाल्याशी लग्न करणे हे बरोबर आहे असेच वाटते. (त्या मुलीच्या सौंदर्य प्रसाधनांचा खर्च त्या फळ वाल्याच्या कमाई एवढा होता.) असे केल्याने आपली काय वाताहत होईल हा विचार करण्याची प्रगल्भता त्या वयात नसते. तो दिलवाला आहे आणि मला फार सुखात ठेवेल अशी भाबडी अशा त्या मुलीला सिनेमातून मिळाली तर दोष कुणाचा?

In reply to by राजेश घासकडवी

असंका 15/05/2014 - 12:34
(पाच सात प्रतिसाद तयार करून खोडून टाकले मी....पुन्हा पुन्हा आपला प्रतिसाद वाचून खिन्नपणे हसत होतो. ठीक आहे. आणि खरं सांगू, आपण जर माझ्या प्रतिसादावर काही उलट लिहिताल तर हेच लिहिताल हे मला आधी पण लक्षात आले होते- तुम्ही तेच तर म्हणत आहात जे मी वर म्हणालो. फक्त वर आणखी शेर दोन शेर टाकून.) ते श्यामची आई कशाला मध्ये घेतलंत? ते नाव नस्तं तर मी काहीच बोललो नसतो.

In reply to by असंका

तुम्हाला थोडी गंभीर चर्चा करायची आहे आणि माझ्या उपरोधाने मी तिची मुस्कटदाबी करतो आहे असं काहीसं वाटलं. तेव्हा उपरोधाची ढाल बाजूला ठेवतो आणि गंभीरपणे बोलू.
सिनेमांनी आपल्या भावविश्वावर काहीच परीणाम होत नाही, हे म्हणणं इतकं सोपं वाटत नाही.
अर्थातच, सगळ्याच बाह्य गोष्टींचा काही ना काही परिणाम होतोच. मात्र मुद्दा परिणाम होतो की नाही हा नाहीये, तर किती परिणाम होतो हा आहे. जेव्हा कोणीतरी म्हणतं की '१७ हे काय प्रेमात पडण्याचं वय आहे का? हे टाइमपास, फॅंड्री वगैरेसारखे सिनेमे बघून तरुणांच्या मनात भलत्या कल्पना येतात' अशा प्रकारचं विधान होतं, त्यात 'असे सिनेमे यायच्या आधी कोणीच १७ व्या वर्षी प्रेमात पडत नसत. असलेच तर त्यांचं प्रमाण नगण्य होतं.' थोडक्यात, ही प्रेमात वगैरे पडण्याची थेरं सिनेमातून शिकलेली आहेत. तेव्हा मग प्रश्न असा येतो की पूर्वी जेव्हा सिनेमा नव्हता तेव्हा सतरा वर्षांची पोरं काय करायची? नगरीनिरंजन यांनी 'लाइफ इमिटेट्स आर्ट/ आर्ट इमिटेट्स लाइफ' हा मुद्दा मांडलेला आहे. हा लेख का लिहिला हे त्यांना बरोब्बर कळलेलं आहे. कला-जीवन हे नातं अत्यंत व्यामिश्र असताना या दोन टोकांपैकी एकच टोक स्वीकारणं हे चुकीचं आहे. हे दाखवून देण्यासाठीच या लेखाचा अट्टाहास होता. कारण प्रेमासारखी मानवी भावविश्वातली मूलभूत भावना सिनेमातून शिकली जाते असं म्हटलं तर इतरही सिनेमातूनच येतात असं म्हणावं लागतं. रिडक्शियो डि अॅब्सर्डम पद्धतीचा युक्तिवाद या लेखात आहे.
ते श्यामची आई कशाला मध्ये घेतलंत? ते नाव नस्तं तर मी काहीच बोललो नसतो.
श्यामची आई पूर्णपणे इन्सिडेंटल आहे. त्याऐवजी एक क्ष सिनेमा म्हणूनही चाललं असतं. शामची आई हे ओळखीचं आणि आजीच्या लहानपणीचं म्हणून वापरलं इतकंच. टीका त्या विशिष्ट सिनेमावर नसून 'सिनेमांमधून मूलभूत भावना शिकल्या जातात' या भूमिकेवर आहे.

In reply to by राजेश घासकडवी

अनुप ढेरे 19/05/2014 - 10:25
घुसखोरीबद्द्ल क्षमस्व. घासकडवींशी सहमत आहे.प्रेम, द्वेश, भांडणं या नैसर्गिक संकल्पना आहेतच यावर दुमत नाहीच. त्यांच्या अस्तित्वाचा आणि सिनेमाचा संबंध नाहीच. सिनेमा यायच्या आधिही त्या होत्याच. पण माझ्यामते सिनेमा हा प्रेम वगैरे सारख्या भावनांना मूर्त स्वरूप देतो. प्रेमाचं manifestation हे सिनेमा/ इतर कलाप्रकार प्रभावित करतात. सिनेमात दाखवतात तसंच करणं म्हणजेच प्रेम करणं असा समज होतो. हे केवळ सिनेमा नाही तर इतर अमेरिकन्/ईंग्लिश सिटकॉम्स पण प्रभावित करतात.

In reply to by राजेश घासकडवी

बाळ सप्रे 20/05/2014 - 10:18
तेव्हा उपरोधाची ढाल बाजूला ठेवतो
धन्यवाद.. आणि विचारांशी सहमत.. लेखात उपरोधाचा डोस जरा जास्तच झाल्याने खरा विचार समजण्यात गोंधळच होत होता..

In reply to by राजेश घासकडवी

आनन्दा 20/05/2014 - 17:04
असे दुसर्‍या टोकाला जाणे मला पटत नाही. सिनेमाचा प्रभाव पडतोच. म्हणजे मी सिनेमाचाच पडतो असे म्हणत नाही. संस्कारक्ष्॑म वयात माणसाला जे वाचायला, ऐकायला, पहायला मिळते, त्याचा त्याच्या जीवनावर परिणाम होतो यात शंका नाही. सिनेमा याला अपवाद कसा असू शकेल? असो, यासाठी तळणीत एक जिलबी टाकवी असा विचार आहे. पाहतो वेळ मिळेल तेव्हा.

चिगो 15/05/2014 - 12:51
माझी आजी सांगायची की तिच्या आईला मातृप्रेम म्हणजे काही माहीतच नव्हतं. जेव्हा 'श्यामची आई' चित्रपट आला तेव्हा तिला आईचं प्रेम म्हणजे नक्की काय असतं हे समजलं. 'माझ्या आईने माझ्यावर कधी प्रेम केलंच नाही' ती सांगत असे. 'आमच्या आसपासच्या सर्व मुलांचीही हीच कथा होती. त्यांच्या आयांना मुलांच्या आजारपणात रात्रीचा दिवस करणं, मुलांना मायेने जवळ घेणं, त्याला प्रेमाने डबा तयार करून देणं, आपल्या पोटचा घास काढून त्यांना भरवणं... या सगळ्या गोष्टी माहीतच नव्हत्या. श्यामची आई सिनेमा बघितला आणि आमचे डोळे खाडकन् उघडले. त्याचा आमच्या मनावर इतका गहिरा परिणाम झाला की तेव्हापासून आम्ही आमच्या मुलांवर प्रेम करायला शिकलो.'
हा फारच व्वाईटरित्या चांगला जमलेला भाग आहे.. सिनेमा नसता तर ना मातृप्रेम,ना पितृप्रेम, ना बंधुप्रेम आणि ना प्रेमाच्या इतर कॅटॅगिर्‍या लोकांना कळल्या असत्या. मारे "सिनेमाचा प्रभाव नसतोच पडत" म्हणणार्‍यांनी सिनेमातली गाणी आणि डायलॉक मारुनच लायनी मारल्या आणि खोडल्या असतील.. आम्हाला नका गमजा सांगू, भौ.. लेख जमलाय मस्त, गुर्जी..

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 15/05/2014 - 14:54
+२ पण तरी सीरियसनेसपणा आणि टंगीनचीक खवचटपणा याच्यामध्ये घोटाळणारा लेख असल्याने रणकंदन माजणार.

In reply to by आदूबाळ

सूड 15/05/2014 - 15:09
>>पण तरी सीरियसनेसपणा आणि टंगीनचीक खवचटपणा याच्यामध्ये घोटाळणारा लेख उलट यामुळेच रणकंदन माजायची शक्यता फार्फार कमी आहे. ;)

साती 15/05/2014 - 15:36
चित्रपटानी किती किती काँट्री दिलंय त्याचं काही काऊंटींगच नाही. आमच्या तर कॉलेजनेपण लेक्चर सोडून चित्रपटांचे शुटींग करायला हॉल भाड्याने दिले होते. मुन्नाभाई एम बी बी एस वैगेरे बघूनच पॉईजनिंग पेशंटला पेपर बनवायच्या आधी ट्रीटमेंट द्यायला, कॅन्सरच्या पेशंटला सायकॅट्रीक काऊंसेलिंग करायला, शिकलो.

In reply to by साती

नगरीनिरंजन 17/05/2014 - 23:01
पण अजूनही अनेक इस्पितळांतून जादू की झप्पी मिळत नसल्याने चिडून रुग्णाचे नातेवाईक डॉक्टर लोकांना मारहाण करतात. मी तर म्हणतो मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपट वैद्यकीय अभ्यासक्रमात लावला जावा.

बॅटमॅन 15/05/2014 - 16:45
गुंडांशी मारामारी कशी करायची तेही पिच्चरकडूनच शिकलो. अर्थात प्रत्यक्षात कधी चान्स नै आला, चाण्स आलेल्यांची अवस्था पाहिली पण तोही पिच्चर न पाहण्याचाच परिणाम असे त्यांस बजावून पळून आलो, हाकानाका.

नगरीनिरंजन 15/05/2014 - 20:36
लाईफ इमिटेट्स आर्ट असा निकाल लावून हा प्रश्न झटक्यात निकाली काढल्याबद्दल अभिनंदन! चित्रपटातल्या नायकाप्रमाणे हमाली, दारुचा धंदा, श्रीमंतांच्या पोरींचा माज उतरवणे, फसवाफसवी, गँगवॉर वा स्मगलिंग यापैकी काहीच करत नसल्याचे आयुष्यभर बाळगलेले दु:ख तुमच्या लेखाने पुन्हा ताजे केले. नशिब ऋशिकेष मुखर्जी व अमोल पालेकरांचे काही चित्रपट आले म्हणून मध्यमवर्गीय जगणं जगता येतंय नाहीतर कसं झालं असतं या कल्पनेने काटा येतो अंगावर. बागा-बागांमध्ये झाडामागे पळापळी करत प्रेम करणे किंवा जितेंद्र-श्रीदेवीसारखं पोजेस देत प्रेम करणे हा प्रकार लोक कधी शिकणार याची फार काळापासून उत्सुकता आहे. मुळात माणसाच्या इतिहासाचा विचार सिनेमासापेक्ष नव्याने करायला हवा. उत्क्रांतीच्या सिद्धांताची तर या पुराव्यापुढे लक्तरे निघतात. जर चित्रपट नसते तर माणसांना मुलं कशी होतात ते कळलंच कसं असतं? त्यामुळे माणसाचे अस्तित्त्व हे चित्रपटानंतरचे आहे हे सहज सिद्ध होते. असो. तरीही लेख थोडा अपूर्ण वाटला. यात "समाजाचे देणे" हा भाग आलेला नाही. संपूर्ण मानवजातीला जन्माला घालणार्‍या ईश्वरसमान चित्रपटाने मानवी समाजाला प्रत्येकवेळी नवा विचार देणे ही सगळ्या मानवजातीला जी आस लागून राहिलेली असते तिचा उल्लेख लेखात राहून गेला असे वाटते.

In reply to by नगरीनिरंजन

लाईफ इमिटेट्स आर्ट असा निकाल लावून हा प्रश्न झटक्यात निकाली काढल्याबद्दल अभिनंदन!
निकाल वगैरे लावण्यासाठी याबद्दल संदेह होताच कुठे? सामान्य जनांचे शब्द अर्थानुधावंते असतात, पण महान लोकांच्या बाबतीत अर्थ शब्दानुधावंते असतात. जेव्हा ते थोर ऋषि-मुनि बोलतात, तेव्हा त्या शब्दांनाच एक नवीन प्रमाण अर्थ प्राप्त होतो. जसजसे ऋषिमुनि संपत गेले तसतसा नाटक-सिनेमा त्यांची जागा भरून काढू लागला. त्यामुळे त्या कलाकृतींमधून जे 'शब्द' किंवा विधानं आली ती प्रमाण ठरायला लागली. आणि त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक पैलूवर सिनेमांमध्ये काय दाखवलं आहे याचा परिणाम व्हायला लागला. कारण सामान्य माणूस हा आदर्शांकडे टक लावून बघतो. मग ज्यांच्याकडे टक लावून बघायला झालं ते हिरो-हिरॉइनीच त्याचे आदर्श झाले. आणि मग तिथूनच सर्व लाइफ इमिटेटिंग आर्ट सुरू झालं. आर्टला इमिटेट करणार नाहीतर इमिटेट करायला दुसरं आहे तरी काय? आणि इमिटेट न करता आपल्या आपण काही करावं इतका प्रगल्भ थोडाच आहे माणूस?
जर चित्रपट नसते तर माणसांना मुलं कशी होतात ते कळलंच कसं असतं? त्यामुळे माणसाचे अस्तित्त्व हे चित्रपटानंतरचे आहे हे सहज सिद्ध होते.
एक्झॅक्टली! कुठच्यातरी एका आदिवासी समाजात पुरुषांचा उपयोग काय - मूल तर स्त्रीला होतं - असा प्रश्न पडलेला असल्याचं मी ऐकलेलं आहे. मागास समाजात सिनेमे न पोचल्यामुळे कशी दुरवस्था होते हे उघडच दिसून येतं. त्या समाजाला म्हणे शेती करायला लागल्यावर 'अच्छा, बी टाकली की जमिनीत काहीतरी उगवतं!' हे पाहून समजलं म्हणे. आता त्याच जागी जर हिंदी सिनेमे असते तर 'मै तुम्हारे बच्चे की मॉं बनने वाली हूॅं.' नंतर येणाऱ्या ढॅण् बरोबरच समजलं नसतं का?
संपूर्ण मानवजातीला जन्माला घालणार्‍या ईश्वरसमान चित्रपटाने मानवी समाजाला प्रत्येकवेळी नवा विचार देणे ही सगळ्या मानवजातीला जी आस लागून राहिलेली असते...
तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलात. आत्तापर्यंतच्या इतिहासात माणसाने देवाचं दर्शन मिळावं म्हणून किती प्रयत्न केले. संतांनी त्याची आळवणी केली, ऋषिमुनिंनी घोर तपश्चर्या केली. पण त्या काळी सिनेमेच नव्हते. आणि आपण असे नतद्रष्ट की आपल्यासमोर आज हजारोंनी सिनेमे आहेत, पण आपल्या डोळ्यासमोर देव असून दिसत नाही. परीस शोधणाऱ्या, आणि तो हाती गवसूनही न कळलेल्या माणसाप्रमाणे आपण वागत आहोत.

In reply to by राजेश घासकडवी

आत्मशून्य 17/05/2014 - 23:47
मानवी मनाची संवेदनशिलता आज धुळीस मिळवली याचेच हे ध्योतक असावे. ऑब्जेक्ट ओरीएंटेड प्रोग्रामींगव्र प्रभुत्व आले म्हणजे जिवनाचे कोडे सूटल्याचा जो थाट आज मनाला रुजलाय त्याची विशारी फळे आज ना उद्या आपणच भोगणार... आयुष्य फार निरागस होते जेंव्हा अ‍ॅपल आणी ब्लॅकबेरी फक्त फळे होती, चित्रपटकला समृध्दीचा तो सुखाचा काळ होता. तुझे आहे तुझपाशी परी तु संस्थळ चुकलाशी.. कालाय तस्मै नं:. इत्यलम् आणी बरेच काही

नामक एका विलक्षण आयडीची ही लक्षवेधी कमेंट वाचून लेखाचा परिणाम नक्की कोणत्या स्तरावर झालायं हे सहज लक्षात येतं!
गस्कदवी साहेब, चन्गले लिहिलेय. अजुण थोडा मासाला हवा होताआ. अजुण येउ दे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सिनेमा का कोण जाणे उगीचच बदनाम झालेला आहे. सर्वच उच्चभ्रू लोकांची त्याला येनकेनप्रकारेण नावं ठेवण्याची अहमहमिका लागलेली असते. सर्वसामान्यांना आवडतं त्याला नाकं मुरडल्याशिवाय स्वतःला विचारवंत आणि उच्चभ्रू म्हणवूनच घेता येत नाही. 'सिनेमे बघून मुलं बिघडतात' हा त्यांचा सगळ्यात नवीन शोध. मुलं हे देशाचे भावी आधारस्तंभ असल्यामुळे मुलं बिघडली की समाज बिघडतो, आणि त्यातूनच कॉंग्रेससारख्या पक्षाचं राज्य दशकानुदशकं टिकून राहतं. अर्थात लवकरच हे बदलणार आहे, त्यामुळे मला तर समाज बिघडलेला आहे याची चिंता वाटत नाही. पण तरीही या उच्चभ्रूंचा सिनेमांना नावं ठेवण्याचा उद्योग चालूच असतो.

२०१४ लोकसभा निवडणुक - सर्वेक्षण अंदा़ज, मतमोजणी व निकाल

श्रीगुरुजी ·

उत्तम रे गुरुजी. तुझा अंदाजही सांग. हे अंदाज खरोखरच अभ्यास करून काढलेले असतात की आपल्याआवडी नुसार टाकलेले असतात काही कळायला मार्ग नाही. प्रत्येक मतदारसंघात निवडून येण्यासाठी वेगवेगळे निकष असतात. कुणाला आपला जातवालाच हवा अस्सतो तर कुणाला काम करणारा हवा असतो.काहीजण पंतप्रधान कोण ते पाहून मत देतात. शुक्रवारी सकाळी पाहुया काय होतय ते. (आज तक्,आय बी एन लोकमत्,स्टार प्रवाह्,टाइम्स नाउ पाहणारी)माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 15/05/2014 - 12:15
>>> उत्तम रे गुरुजी. तुझा अंदाजही सांग. माझा स्वतःचा काहीही अंदाज नाही. पण नान्या, तुझा स्वतःचा काहीतरी अंदाज असेल ना. तो सांगून टाक.

In reply to by श्रीगुरुजी

तुझा स्वतःचा काहीतरी अंदाज असेल ना. तो सांगून टाक.
मला आकडे वगैरे काही कळत नाहीत रे गुरुजी.माझे अंदाज- लाडू वाटपाचे काम सकाळपासून चालु होईल;मोदी दिल्लीला जायला दुपारी निघतील,संध्याकाळच्या सुमारास लेख पडायला चालु होतील-"चहावाला ते पंतप्रधान्","मोदींपुढील आव्हाने","जगभरातून अभिष्टचिंतनाचे संदेश","गांधीनगरमध्ये फटाक्यांची आतषबाजी"...

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हाडक्या 15/05/2014 - 19:31
ह्या माईसाहेब आणि नानासाहेब नेफळे जर गुरुजींचेच डु-आयडी असतील तर काय भलतीच गमज्या येईल असा अमंळ विचार करीत होतो.. :D .. :D

In reply to by हाडक्या

श्रीगुरुजी 15/05/2014 - 20:42
>>> ह्या माईसाहेब आणि नानासाहेब नेफळे जर गुरुजींचेच डु-आयडी असतील तर काय भलतीच गमज्या येईल असा अमंळ विचार करीत होतो.. :yahoo:

मैत्र 15/05/2014 - 09:35
ऐकीव माहिती : भाजपा संघाच्या एक्झिट पोल प्रमाणे एन डी ए ला २५८-२६० जागा मिळतील असा अंदाज आहे.. त्याप्रमाणे आणि क्लिंटनचा प्रत्येक जागेचा अभ्यास जास्त योग्य वाटतो आहे या चॅनेलवाल्यांच्या अवास्तव आकड्यांपेक्षा. पण गेल्या वेळच्या विधानसभा निकालांचे परफेक्ट अंदाज सांगणार्‍या टुडेज.चाणक्य ने ३२५ चा अवाढव्य आकडा सांगितला आहे. उद्याअखेर कळेलच खरे काय ते!

श्रीगुरुजी 15/05/2014 - 12:12
२००४ मध्ये एनडीटीव्ही चा मतदानोत्तर चाचणीचा अंदाज सर्वात कमी फरकाने चुकला होता. सर्व वाहिन्यांनी रालोआला संपुआच्या तुलनेत खूप जास्त जागांचा अंदाज दिला होता. आजतक ने रालोआला २६० व संपुआला १७० चा अंदाज दिला होता. एनडीटीव्ही ने रालोआला २२५ व संपुआला २०० चा अंदाज दिला होता. प्रत्यक्षात रालोआला १८७ व संपुआला २३४ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे एनडीटीव्ही चा अंदाज कमीतकमी फरकाने चुकला होता. काल एनडीटीव्ही ने रालोआला २५०, संपुआला ८९ व इतरांना १५६ चा अंदाज दिला आहे. उद्या काय ते कळेलच.

आनन्दा 15/05/2014 - 12:37
माझा अंदाज थोडा वेगळा आहे - रालोआ एक तर २५०-२७० मध्ये असेल, पण जर त्यांनी ती मॅजिक फिगर क्रॉस केलि तर मग मात्र कठीण आहे. यावेळेस वाढलेली १०% मते किमान १००-१५० जागांचा निकाल फिरवण्यास पुरेशी आहेत असे मला वाटते. ती जर आआप ने घेतली नाहीत तर भाजपालाच मिळणार. त्यमुळे ती मते मिळाल्यास भाजपाला एकहाती बहुमत देखील मिळू शकेल.

बाळकराम 16/05/2014 - 02:40
भाजप- २००-२०५, रालोआ- २२५-२३५ संपुआ- ११०-१२० आआप- ५-८ इतर- १८०-२०३ उद्या काय ते कळेलच

श्रीगुरुजी 16/05/2014 - 10:40
विकास यांनी निकालासाठी दुसरा धागा सुरू केलेला दिसतोय. हरकत नाही. प्रत्यक्ष निकाल व आधीचे अंदाज याची तुलना व्हावी या उद्देशाने मी हा धागा सुरू केला होता. पण आता निकालाविषयी तिथेच चर्चा करूया.

श्रीगुरुजी 16/05/2014 - 20:39
रालोआला शेवटी ३३७ च्या आसपास जागा मिळताना दिसत आहेत. जर सर्व मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजांची तुलना केली तर खालील चित्र दिसते. टाईम्स नाऊ : २४९-२६५ एनडीटीव्ही : २५० सीएनएन आयबीएन : २७०-२८२ आजतक : २७२ एबीपी न्यूजअ : २८१ इंडिया टीव्ही : २८९ न्यूज २४ (चाणक्य) : ३४० म्हणजे या सर्वांपैकी न्यूज २४ (चाणक्य) यांचाच अंदाज जवळपास ९९ टक्के बरोबर आला आहे. तर निकाल व अंदाज यातील सर्वाधिक अंतर (अंदाजे २७-२८ टक्के फरक) एनडीटीव्हीचे अंदाज व प्रत्यक्ष निकाल यात आहे. क्लिंटन यांचा अंदाज (२६०) हा देखील मोठ्या फरकाने चुकला. त्यांचे काही राज्यांचे अंदाज चुकले (उदा. कर्नाटक). पण आपले अंदाज चुकल्याचा त्यांना देखील आनंद झाला असणार.

श्रीगुरुजी 16/05/2014 - 20:40
महाराष्ट्रात व इतर अनेक राज्यात काँग्रेसचे पानिपत झाले. सुशीलकुमार शिन्द्यासारख्या दिग्गज नेत्याला पराभव पत्करावा लागला यावर अजूनही विश्वास बसत नाही. सुप्रिया सुळेंचे २००९ मधील मताधिक्य (३,३७,००० मतांची आघाडी) घसरून जेमतेम ७३००० वर आले. पवारांचा प्रभाव महाराष्ट्रातून संपत असल्याचे हे संकेत आहेत. भाजपला फक्त एकच धक्का बसला. तो म्हणजे अरूण जेटलींचा पराभव. अमृतसरमधून पूर्वी २ वेळा निवडून आलेल्या सिधूला तिकिट नाकारून जेटलींना देणे ही भाजपची चूक ठरली. जेटलींना दिल्लीतून उभे करून अमृतसरमधून परत सिधूला तिकिट दिले असते तर अमृतसरची जागा देखील मिळाली असती. काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळविता येतील इतक्या जागा देखील मिळालेल्या नाहीत (५५ पेक्षा कमी). ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. सिब्बल, खुर्शीद, राणे, भुजबळ इ. अत्यंत बेताल व उन्मत्त नेते किंवा त्यांचे नातेवाईक निवडणुक हरले हे चांगले झाले.

In reply to by श्रीगुरुजी

पैसा 16/05/2014 - 21:32
सिद्धूला तिकीट नाकारले तेव्हाच जेटली हरण्याची शक्यता आहे असं मनात आलं होतं. लोकांनी केवळ भाजपाच्या नावावर मते दिलेली नाहीत असा याचा अर्थ. जेटली भावी उपपंतप्रधान म्हणत होते त्याचं आता काय होतंय पाहूया. स्मृती इराणी किंवा सिद्धू यांना मोदींच्या दुसर्‍या जागेवर निवडून यायची संधी आहे.

In reply to by पैसा

दुश्यन्त 19/05/2014 - 16:31
सिद्धूला कशाला आता भाजप निवडून आणेल. तिकीट नाकारलं म्हणून या महाभागाने प्रचार केला नाही आणि मतदानाला पण आला नाही.एवढी नाराजी कशाला.तरी बर त्याची बायको भाजपची आमदार आहे.त्याला आता लगेच तरी भाजप निवडून आणणार नाही. बडोद्यातून अमित शहा किंवा अन्य कुणी गुजराती नेताच निवडून येईल.

In reply to by श्रीगुरुजी

विकास 16/05/2014 - 21:48
जे १९७७ साली देखील महाराष्ट्राला करायला जमले नाही ते या वेळेस करून दाखवले! त्याबद्दल मराठी जनतेचे अभिनंदन. राष्ट्रीय सत्ताधारी पक्षाच्या/आघाडीच्या जागा आपल्या राज्यात असणे महत्वाचे असते कारण त्यामुळे मंत्रीपदे देखील मिळू शकतात. महाराष्ट्राला यात नक्कीच फायदा होईल असे वाटते.

In reply to by विकास

ती तशी मंत्रीपदे आताही होती.अतिशय महत्वाचे असे देशाचे गृहमंत्रीपद आपले सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे भूषवत होते. शिवाय कृषीमंत्री शरद पवार,राजीव शुक्ला हे ही होते.असो. नेहमी कॉन्ग्रेसला चिकटून राहणार्‍या मराठी जनतेने ह्यावेळी त्यांच्या विरोधात कौल दिला हे बरे झाले.

आत्मशून्य 16/05/2014 - 23:19
काही म्हणा उध्दव ठाकरेंचे स्टार्स (?) बाकी जोरात आहेत. बोल्णे शामळु वाटते तरी एखादी संघटना न्हवे पण पक्ष चालवायचे मात्र सॉलीड डोके आहे की काय वाटु लागले आहे. विशेषतः बहुतांश जेष्ठ जुन्या जाणत्या उमेदवारांना डावलुन नव्या चेहर्‍यांना संधी देण्याची खेळी मोदी लाटेवर अचुक साधली तरी कौतुक करायलाच हवे.

In reply to by संपत

दुश्यन्त 19/05/2014 - 16:36
खरोखर उद्धवकडे पक्ष/संघटना चालवण्याचे कौशल्य आहे. २००७ आणि २०१२ ला विरोधक आणि मिडीयाने रान उठवून पण त्यानी मुंबई महापालिका आपल्याकडेच ठेवली. २००९ च्या लोकसभेत राज्यात शिवसेना कॉंग्रेसनंतर (११ जागा जिंकून) दुसर्या जागी होती.विशेष म्हणजे तेव्हा सेनेने मुंबई, ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग गमावले होते तरी खास करून ग्रामीण भागातून एकूण ११ जागा मिळवल्या होत्या. आता पण ते मनोहर जोशी वगैरे ज्येष्ठांना बरोबर हाताळत आहेत.

फोटोवाल्यादादाचे काही एक कर्तृत्व नाही ,मांडवलीदादाच्या कोहिनूर नवनिर्माण पक्षाचे पितळ उघडे पडल्याने फोटोग्राफरचा फायदा झाला.

श्रीगुरुजी 19/05/2014 - 20:48
दारूण पराभवानंतर काँग्रेस आता खडबडून जागी होईल. संपुआच्या दुसर्‍या सत्रात काँग्रेस नेते अत्यंत उन्मत्त आणि उर्मट झाले होते. त्यांचा रथ चार अंगुळे वर चालत होता. सिब्बल, मनीष तिवारी, दिग्विजय, बेनीप्रसाद वर्मा, खुर्शिद असे अनेक काँग्रेसजनांनी संपूर्ण ताळतंत्र सोडला होता. याच काळात तेलंगण राष्ट्रीय समिती, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, राजद, लोजप इ. अनेक सहकारी सोडून गेले तरी काँग्रेसची गुर्मी कायम होती आणि आता त्याचीच जबर शिक्षा त्यांना मिळाली. २०१४ ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्राची विधानसभा निवडणुक आहे. नंतर फेब्रु २०१५ मध्ये झारखंड व हरयानाची, डिसेंबर २०१५ मध्ये बिहार व मे २०१६ मध्ये केरळ, तामिळनाडू, पाँडिचेरी, प. बंगाल व आसामच्या निवडणुका आहेत. दिल्ली विधानसभेची मध्यावधी निवडणुक देखील होऊ शकते. आता काँग्रेस पुन्हा एकदा जुने व नवीन सहकारी शोधू लागेल. महाराष्ट्रात शेकाप व रिपब्लिकन पक्षाच्या आंबेडकर गट, गवई गट व कवाडे गटाशी काँग्रेस युती करण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये लालूच्या बरोबरीने संजदशी युती करण्याचा प्रयत्न राहील. कर्नाटकमध्ये निजद, तामिळनाडूत द्रमुक व इतर काही द्रविड पक्ष, बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस झारखंड मध्ये बाबुलाल मरांडीचा पक्ष इ. नवे, जुने सहकारी काँग्रेस शोधण्याच्या प्रयत्नात राहील. भारतीय राजकारणात अनेक वर्षे काँग्रेस विरूद्ध इतर विरोधी पक्ष असा सामना असायचा. विरोधी पक्षांच्या फाटाफुटीमुळे काँग्रेसचे फावायचे. जेव्हा जेव्हा विरोधी पक्ष एकत्र आले तेव्हा तेव्हा काँग्रेसचा पराभव झाला (१९७७, १९८९, १९९८, १९९९). पण यापुढील काळात भाजप विरूद्ध इतर विरोधी पक्ष असा सामना होईल.

In reply to by श्रीगुरुजी

विकास 19/05/2014 - 21:32
आज काँग्रेसजनांनी अपेक्षेप्रमाणे नेतृत्वावर विश्वास दाखवून गांधी मातापुत्राचे राजीनामे नाकारले! मनमोहनसिंग यांनी तर पंतप्रधान म्हणून स्वत:चीच जबाबदारी आहे असे म्हणले! एका अर्थी ते खरे देखील आहे. पण तरी देखील त्या माय-लेकराला कसे काही वाटत नाही? आता लोकसभेत किती हजेरी लावतात ते पहायचे.

In reply to by प्रचेतस

विकास 19/05/2014 - 22:33
तरी एक दु:खात सुख म्हणजे, आमच्या राहुलबाबांना (सत्तारूपी) विष खावे लागले नाही.

In reply to by विकास

ऋषिकेश 20/05/2014 - 11:54
पण तरी देखील त्या माय-लेकराला कसे काही वाटत नाही?
त्या मायलेकरांनीही जबाबदारी स्वीकारल्याचे जाहिर टिव्हीकर सांगितले आहे की!

In reply to by ऋषिकेश

विकास 20/05/2014 - 16:15
राजपुत्राने तर अगदी सुहास्य वदनाने सांगितले होते. प्रश्न खरेच काँग्रेस (आणि सोनीया-राहूल विशेष करून) आत्मपरीक्षण करत आहे का हा आहे. त्यांनी नाही केले तर काँग्रेसविरोधकांसाठी चांगलेच आहे. पण काँग्रेससाठी मात्र ... Rahul Gandhi आणि हो, मी राहूलच्या विरुद्ध नाही. कशासाठी विरुद्ध राहू? पण केवळ गांधी घराण्यातला म्हणून विश्वास ठेवावा असे म्हणणार्‍या काँग्रेसी वृत्तीच्या विरुद्ध नक्की आहे.

In reply to by विकास

इरसाल 20/05/2014 - 14:59
ह्या नाकारलेल्या राजीनाम्याबद्दल मटा वर बातमी आलेली आहे, त्यात पराभवाच्या ऐवजी बलात्कार टाकुन जरा ३ इडियट करुन पहावा ही लम्र इनंती. लिंक : http://maharashtratimes.indiatimes.com/nation/sonia-and-rahul-gandhi-congress/articleshow/35356561.cms

श्रीगुरुजी 20/05/2014 - 12:59
महाराष्ट्रात काँ-राकाँ विधानसभेतील विजयासाठी आता पुन्हा जुन्याच वाटेने जातील असं वाटंतय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राखीव जागा, नामांतर, मोफत गोष्टी इ. लोकानुनयी निर्णयांची पुढील काही महिन्यात खैरात होईल. सर्वात प्रथम पुणे विद्यापीठाचे नामांतर करून माळी समाजाला गाजर दाखविले जाईल. नंतर मराठा आरक्षण करून मराठ्यांना व फुकट वीज जाहीर करून शेतकर्‍यांना गाजर दाखविले जाईल. निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या अशा लोकानुययी सवंग निर्णयांचा पूर्वी मतांवर परीणाम होत होता. आता तसे होईल का? केंद्र सरकारने सुद्धा ऐन निवडणुकीच्या तोंडावर जैन समाजाचा अल्पसंख्याकांमध्ये समावेश, जाटांचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश असे निव्वळ सवंग व लोकानुययी निर्णय घेतले होते. डिझेल ची दरवाढ देखील रोखून धरली होती व १२ मे ला ७ वाजता निवडणुक संपल्यावर लगेच ८ वाजता डिझेलचे भाव वाढवून आपल्या नालायक कारकीर्दीचा संपुआने शेवट केला होता. अशा सवंग निर्णयांचा काहीच परीणाम झाला नव्हता व संपुआला जबरदस्त मार मिळाला. महाराष्ट्रात देखील तसेच होवो.

विकास 21/05/2014 - 09:02
गेले १२ वर्षे अथक कार्य करत असलेल्या टिस्टा सेटलवाड यांचे स्वप्न आज साकार होणारः आज (मे २१, २०१४) मोदी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार! ;)

In reply to by विकास

चौकटराजा 21/05/2014 - 09:21
आपले स्वप्न साकार करण्यासाठी माणूस काय काय करतो.तिस्ता मुळे तर मोदीना प्रसिद्धी मिळाली. मोदी हे "दादा" गिरी करायला ठीक आहेत हे भाजपाला पटले. मोदी प्रधानमंत्री झाले. आता गुजराथ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देऊन सांगतात कुणाला ?तिस्ताचा प्ल्यान फुलप्रूफ होता .

In reply to by विकास

श्रीगुरुजी 21/05/2014 - 20:16
>>> गेले १२ वर्षे अथक कार्य करत असलेल्या टिस्टा सेटलवाड यांचे स्वप्न आज साकार होणारः आज (मे २१, २०१४) मोदी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार! :yahoo: मोदींच्या विजयात टिस्टा, तहलका, कोब्रापोस्ट, गुलैल, तरूण तेजपाल, अनिरूद्ध बहल, डॉग्विजय इ. मंडळींचा सिंहाचा वाटा आहे. ही मंडळी नसती तर मोदी कधीही पंतप्रधान होऊ शकले नसते.

In reply to by श्रीगुरुजी

विकास 21/05/2014 - 20:27
"मौत का सौदागर" म्हणून हिणावणार्‍यांचे नाव तुम्ही घेतले नाहीत त्याबद्दल निषेध. ;) जर त्या वेळेस त्या "मौत का सौदागर" म्हणाल्या नसत्या आणि इमाने इतबारे प्रचार केला असता तर मोदी कदाचीत दुसर्‍यांदा मुख्यमंत्री देखील झाले नसते. परीणामी गुजरात डेव्हलपमेंट मॉडेल जनतेपुढे मांडू शकले नसते...

In reply to by विकास

श्रीगुरुजी 21/05/2014 - 20:46
अरे हो! राजमाता आणि युवराज राहिलेच. त्यांच्याप्रमाणे बेनीप्रसाद वर्मा, फारूख अब्दुल्ला, इम्रान मसूद, खुर्शिद, मणिशंकर इ. ना देखील निव्वळ अनावधानाने श्रेय द्यायचे राहून गेले याबद्दल दिलगीर आहे.

उत्तम रे गुरुजी. तुझा अंदाजही सांग. हे अंदाज खरोखरच अभ्यास करून काढलेले असतात की आपल्याआवडी नुसार टाकलेले असतात काही कळायला मार्ग नाही. प्रत्येक मतदारसंघात निवडून येण्यासाठी वेगवेगळे निकष असतात. कुणाला आपला जातवालाच हवा अस्सतो तर कुणाला काम करणारा हवा असतो.काहीजण पंतप्रधान कोण ते पाहून मत देतात. शुक्रवारी सकाळी पाहुया काय होतय ते. (आज तक्,आय बी एन लोकमत्,स्टार प्रवाह्,टाइम्स नाउ पाहणारी)माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 15/05/2014 - 12:15
>>> उत्तम रे गुरुजी. तुझा अंदाजही सांग. माझा स्वतःचा काहीही अंदाज नाही. पण नान्या, तुझा स्वतःचा काहीतरी अंदाज असेल ना. तो सांगून टाक.

In reply to by श्रीगुरुजी

तुझा स्वतःचा काहीतरी अंदाज असेल ना. तो सांगून टाक.
मला आकडे वगैरे काही कळत नाहीत रे गुरुजी.माझे अंदाज- लाडू वाटपाचे काम सकाळपासून चालु होईल;मोदी दिल्लीला जायला दुपारी निघतील,संध्याकाळच्या सुमारास लेख पडायला चालु होतील-"चहावाला ते पंतप्रधान्","मोदींपुढील आव्हाने","जगभरातून अभिष्टचिंतनाचे संदेश","गांधीनगरमध्ये फटाक्यांची आतषबाजी"...

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हाडक्या 15/05/2014 - 19:31
ह्या माईसाहेब आणि नानासाहेब नेफळे जर गुरुजींचेच डु-आयडी असतील तर काय भलतीच गमज्या येईल असा अमंळ विचार करीत होतो.. :D .. :D

In reply to by हाडक्या

श्रीगुरुजी 15/05/2014 - 20:42
>>> ह्या माईसाहेब आणि नानासाहेब नेफळे जर गुरुजींचेच डु-आयडी असतील तर काय भलतीच गमज्या येईल असा अमंळ विचार करीत होतो.. :yahoo:

मैत्र 15/05/2014 - 09:35
ऐकीव माहिती : भाजपा संघाच्या एक्झिट पोल प्रमाणे एन डी ए ला २५८-२६० जागा मिळतील असा अंदाज आहे.. त्याप्रमाणे आणि क्लिंटनचा प्रत्येक जागेचा अभ्यास जास्त योग्य वाटतो आहे या चॅनेलवाल्यांच्या अवास्तव आकड्यांपेक्षा. पण गेल्या वेळच्या विधानसभा निकालांचे परफेक्ट अंदाज सांगणार्‍या टुडेज.चाणक्य ने ३२५ चा अवाढव्य आकडा सांगितला आहे. उद्याअखेर कळेलच खरे काय ते!

श्रीगुरुजी 15/05/2014 - 12:12
२००४ मध्ये एनडीटीव्ही चा मतदानोत्तर चाचणीचा अंदाज सर्वात कमी फरकाने चुकला होता. सर्व वाहिन्यांनी रालोआला संपुआच्या तुलनेत खूप जास्त जागांचा अंदाज दिला होता. आजतक ने रालोआला २६० व संपुआला १७० चा अंदाज दिला होता. एनडीटीव्ही ने रालोआला २२५ व संपुआला २०० चा अंदाज दिला होता. प्रत्यक्षात रालोआला १८७ व संपुआला २३४ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे एनडीटीव्ही चा अंदाज कमीतकमी फरकाने चुकला होता. काल एनडीटीव्ही ने रालोआला २५०, संपुआला ८९ व इतरांना १५६ चा अंदाज दिला आहे. उद्या काय ते कळेलच.

आनन्दा 15/05/2014 - 12:37
माझा अंदाज थोडा वेगळा आहे - रालोआ एक तर २५०-२७० मध्ये असेल, पण जर त्यांनी ती मॅजिक फिगर क्रॉस केलि तर मग मात्र कठीण आहे. यावेळेस वाढलेली १०% मते किमान १००-१५० जागांचा निकाल फिरवण्यास पुरेशी आहेत असे मला वाटते. ती जर आआप ने घेतली नाहीत तर भाजपालाच मिळणार. त्यमुळे ती मते मिळाल्यास भाजपाला एकहाती बहुमत देखील मिळू शकेल.

बाळकराम 16/05/2014 - 02:40
भाजप- २००-२०५, रालोआ- २२५-२३५ संपुआ- ११०-१२० आआप- ५-८ इतर- १८०-२०३ उद्या काय ते कळेलच

श्रीगुरुजी 16/05/2014 - 10:40
विकास यांनी निकालासाठी दुसरा धागा सुरू केलेला दिसतोय. हरकत नाही. प्रत्यक्ष निकाल व आधीचे अंदाज याची तुलना व्हावी या उद्देशाने मी हा धागा सुरू केला होता. पण आता निकालाविषयी तिथेच चर्चा करूया.

श्रीगुरुजी 16/05/2014 - 20:39
रालोआला शेवटी ३३७ च्या आसपास जागा मिळताना दिसत आहेत. जर सर्व मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजांची तुलना केली तर खालील चित्र दिसते. टाईम्स नाऊ : २४९-२६५ एनडीटीव्ही : २५० सीएनएन आयबीएन : २७०-२८२ आजतक : २७२ एबीपी न्यूजअ : २८१ इंडिया टीव्ही : २८९ न्यूज २४ (चाणक्य) : ३४० म्हणजे या सर्वांपैकी न्यूज २४ (चाणक्य) यांचाच अंदाज जवळपास ९९ टक्के बरोबर आला आहे. तर निकाल व अंदाज यातील सर्वाधिक अंतर (अंदाजे २७-२८ टक्के फरक) एनडीटीव्हीचे अंदाज व प्रत्यक्ष निकाल यात आहे. क्लिंटन यांचा अंदाज (२६०) हा देखील मोठ्या फरकाने चुकला. त्यांचे काही राज्यांचे अंदाज चुकले (उदा. कर्नाटक). पण आपले अंदाज चुकल्याचा त्यांना देखील आनंद झाला असणार.

श्रीगुरुजी 16/05/2014 - 20:40
महाराष्ट्रात व इतर अनेक राज्यात काँग्रेसचे पानिपत झाले. सुशीलकुमार शिन्द्यासारख्या दिग्गज नेत्याला पराभव पत्करावा लागला यावर अजूनही विश्वास बसत नाही. सुप्रिया सुळेंचे २००९ मधील मताधिक्य (३,३७,००० मतांची आघाडी) घसरून जेमतेम ७३००० वर आले. पवारांचा प्रभाव महाराष्ट्रातून संपत असल्याचे हे संकेत आहेत. भाजपला फक्त एकच धक्का बसला. तो म्हणजे अरूण जेटलींचा पराभव. अमृतसरमधून पूर्वी २ वेळा निवडून आलेल्या सिधूला तिकिट नाकारून जेटलींना देणे ही भाजपची चूक ठरली. जेटलींना दिल्लीतून उभे करून अमृतसरमधून परत सिधूला तिकिट दिले असते तर अमृतसरची जागा देखील मिळाली असती. काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळविता येतील इतक्या जागा देखील मिळालेल्या नाहीत (५५ पेक्षा कमी). ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. सिब्बल, खुर्शीद, राणे, भुजबळ इ. अत्यंत बेताल व उन्मत्त नेते किंवा त्यांचे नातेवाईक निवडणुक हरले हे चांगले झाले.

In reply to by श्रीगुरुजी

पैसा 16/05/2014 - 21:32
सिद्धूला तिकीट नाकारले तेव्हाच जेटली हरण्याची शक्यता आहे असं मनात आलं होतं. लोकांनी केवळ भाजपाच्या नावावर मते दिलेली नाहीत असा याचा अर्थ. जेटली भावी उपपंतप्रधान म्हणत होते त्याचं आता काय होतंय पाहूया. स्मृती इराणी किंवा सिद्धू यांना मोदींच्या दुसर्‍या जागेवर निवडून यायची संधी आहे.

In reply to by पैसा

दुश्यन्त 19/05/2014 - 16:31
सिद्धूला कशाला आता भाजप निवडून आणेल. तिकीट नाकारलं म्हणून या महाभागाने प्रचार केला नाही आणि मतदानाला पण आला नाही.एवढी नाराजी कशाला.तरी बर त्याची बायको भाजपची आमदार आहे.त्याला आता लगेच तरी भाजप निवडून आणणार नाही. बडोद्यातून अमित शहा किंवा अन्य कुणी गुजराती नेताच निवडून येईल.

In reply to by श्रीगुरुजी

विकास 16/05/2014 - 21:48
जे १९७७ साली देखील महाराष्ट्राला करायला जमले नाही ते या वेळेस करून दाखवले! त्याबद्दल मराठी जनतेचे अभिनंदन. राष्ट्रीय सत्ताधारी पक्षाच्या/आघाडीच्या जागा आपल्या राज्यात असणे महत्वाचे असते कारण त्यामुळे मंत्रीपदे देखील मिळू शकतात. महाराष्ट्राला यात नक्कीच फायदा होईल असे वाटते.

In reply to by विकास

ती तशी मंत्रीपदे आताही होती.अतिशय महत्वाचे असे देशाचे गृहमंत्रीपद आपले सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे भूषवत होते. शिवाय कृषीमंत्री शरद पवार,राजीव शुक्ला हे ही होते.असो. नेहमी कॉन्ग्रेसला चिकटून राहणार्‍या मराठी जनतेने ह्यावेळी त्यांच्या विरोधात कौल दिला हे बरे झाले.

आत्मशून्य 16/05/2014 - 23:19
काही म्हणा उध्दव ठाकरेंचे स्टार्स (?) बाकी जोरात आहेत. बोल्णे शामळु वाटते तरी एखादी संघटना न्हवे पण पक्ष चालवायचे मात्र सॉलीड डोके आहे की काय वाटु लागले आहे. विशेषतः बहुतांश जेष्ठ जुन्या जाणत्या उमेदवारांना डावलुन नव्या चेहर्‍यांना संधी देण्याची खेळी मोदी लाटेवर अचुक साधली तरी कौतुक करायलाच हवे.

In reply to by संपत

दुश्यन्त 19/05/2014 - 16:36
खरोखर उद्धवकडे पक्ष/संघटना चालवण्याचे कौशल्य आहे. २००७ आणि २०१२ ला विरोधक आणि मिडीयाने रान उठवून पण त्यानी मुंबई महापालिका आपल्याकडेच ठेवली. २००९ च्या लोकसभेत राज्यात शिवसेना कॉंग्रेसनंतर (११ जागा जिंकून) दुसर्या जागी होती.विशेष म्हणजे तेव्हा सेनेने मुंबई, ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग गमावले होते तरी खास करून ग्रामीण भागातून एकूण ११ जागा मिळवल्या होत्या. आता पण ते मनोहर जोशी वगैरे ज्येष्ठांना बरोबर हाताळत आहेत.

फोटोवाल्यादादाचे काही एक कर्तृत्व नाही ,मांडवलीदादाच्या कोहिनूर नवनिर्माण पक्षाचे पितळ उघडे पडल्याने फोटोग्राफरचा फायदा झाला.

श्रीगुरुजी 19/05/2014 - 20:48
दारूण पराभवानंतर काँग्रेस आता खडबडून जागी होईल. संपुआच्या दुसर्‍या सत्रात काँग्रेस नेते अत्यंत उन्मत्त आणि उर्मट झाले होते. त्यांचा रथ चार अंगुळे वर चालत होता. सिब्बल, मनीष तिवारी, दिग्विजय, बेनीप्रसाद वर्मा, खुर्शिद असे अनेक काँग्रेसजनांनी संपूर्ण ताळतंत्र सोडला होता. याच काळात तेलंगण राष्ट्रीय समिती, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, राजद, लोजप इ. अनेक सहकारी सोडून गेले तरी काँग्रेसची गुर्मी कायम होती आणि आता त्याचीच जबर शिक्षा त्यांना मिळाली. २०१४ ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्राची विधानसभा निवडणुक आहे. नंतर फेब्रु २०१५ मध्ये झारखंड व हरयानाची, डिसेंबर २०१५ मध्ये बिहार व मे २०१६ मध्ये केरळ, तामिळनाडू, पाँडिचेरी, प. बंगाल व आसामच्या निवडणुका आहेत. दिल्ली विधानसभेची मध्यावधी निवडणुक देखील होऊ शकते. आता काँग्रेस पुन्हा एकदा जुने व नवीन सहकारी शोधू लागेल. महाराष्ट्रात शेकाप व रिपब्लिकन पक्षाच्या आंबेडकर गट, गवई गट व कवाडे गटाशी काँग्रेस युती करण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये लालूच्या बरोबरीने संजदशी युती करण्याचा प्रयत्न राहील. कर्नाटकमध्ये निजद, तामिळनाडूत द्रमुक व इतर काही द्रविड पक्ष, बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस झारखंड मध्ये बाबुलाल मरांडीचा पक्ष इ. नवे, जुने सहकारी काँग्रेस शोधण्याच्या प्रयत्नात राहील. भारतीय राजकारणात अनेक वर्षे काँग्रेस विरूद्ध इतर विरोधी पक्ष असा सामना असायचा. विरोधी पक्षांच्या फाटाफुटीमुळे काँग्रेसचे फावायचे. जेव्हा जेव्हा विरोधी पक्ष एकत्र आले तेव्हा तेव्हा काँग्रेसचा पराभव झाला (१९७७, १९८९, १९९८, १९९९). पण यापुढील काळात भाजप विरूद्ध इतर विरोधी पक्ष असा सामना होईल.

In reply to by श्रीगुरुजी

विकास 19/05/2014 - 21:32
आज काँग्रेसजनांनी अपेक्षेप्रमाणे नेतृत्वावर विश्वास दाखवून गांधी मातापुत्राचे राजीनामे नाकारले! मनमोहनसिंग यांनी तर पंतप्रधान म्हणून स्वत:चीच जबाबदारी आहे असे म्हणले! एका अर्थी ते खरे देखील आहे. पण तरी देखील त्या माय-लेकराला कसे काही वाटत नाही? आता लोकसभेत किती हजेरी लावतात ते पहायचे.

In reply to by प्रचेतस

विकास 19/05/2014 - 22:33
तरी एक दु:खात सुख म्हणजे, आमच्या राहुलबाबांना (सत्तारूपी) विष खावे लागले नाही.

In reply to by विकास

ऋषिकेश 20/05/2014 - 11:54
पण तरी देखील त्या माय-लेकराला कसे काही वाटत नाही?
त्या मायलेकरांनीही जबाबदारी स्वीकारल्याचे जाहिर टिव्हीकर सांगितले आहे की!

In reply to by ऋषिकेश

विकास 20/05/2014 - 16:15
राजपुत्राने तर अगदी सुहास्य वदनाने सांगितले होते. प्रश्न खरेच काँग्रेस (आणि सोनीया-राहूल विशेष करून) आत्मपरीक्षण करत आहे का हा आहे. त्यांनी नाही केले तर काँग्रेसविरोधकांसाठी चांगलेच आहे. पण काँग्रेससाठी मात्र ... Rahul Gandhi आणि हो, मी राहूलच्या विरुद्ध नाही. कशासाठी विरुद्ध राहू? पण केवळ गांधी घराण्यातला म्हणून विश्वास ठेवावा असे म्हणणार्‍या काँग्रेसी वृत्तीच्या विरुद्ध नक्की आहे.

In reply to by विकास

इरसाल 20/05/2014 - 14:59
ह्या नाकारलेल्या राजीनाम्याबद्दल मटा वर बातमी आलेली आहे, त्यात पराभवाच्या ऐवजी बलात्कार टाकुन जरा ३ इडियट करुन पहावा ही लम्र इनंती. लिंक : http://maharashtratimes.indiatimes.com/nation/sonia-and-rahul-gandhi-congress/articleshow/35356561.cms

श्रीगुरुजी 20/05/2014 - 12:59
महाराष्ट्रात काँ-राकाँ विधानसभेतील विजयासाठी आता पुन्हा जुन्याच वाटेने जातील असं वाटंतय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राखीव जागा, नामांतर, मोफत गोष्टी इ. लोकानुनयी निर्णयांची पुढील काही महिन्यात खैरात होईल. सर्वात प्रथम पुणे विद्यापीठाचे नामांतर करून माळी समाजाला गाजर दाखविले जाईल. नंतर मराठा आरक्षण करून मराठ्यांना व फुकट वीज जाहीर करून शेतकर्‍यांना गाजर दाखविले जाईल. निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या अशा लोकानुययी सवंग निर्णयांचा पूर्वी मतांवर परीणाम होत होता. आता तसे होईल का? केंद्र सरकारने सुद्धा ऐन निवडणुकीच्या तोंडावर जैन समाजाचा अल्पसंख्याकांमध्ये समावेश, जाटांचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश असे निव्वळ सवंग व लोकानुययी निर्णय घेतले होते. डिझेल ची दरवाढ देखील रोखून धरली होती व १२ मे ला ७ वाजता निवडणुक संपल्यावर लगेच ८ वाजता डिझेलचे भाव वाढवून आपल्या नालायक कारकीर्दीचा संपुआने शेवट केला होता. अशा सवंग निर्णयांचा काहीच परीणाम झाला नव्हता व संपुआला जबरदस्त मार मिळाला. महाराष्ट्रात देखील तसेच होवो.

विकास 21/05/2014 - 09:02
गेले १२ वर्षे अथक कार्य करत असलेल्या टिस्टा सेटलवाड यांचे स्वप्न आज साकार होणारः आज (मे २१, २०१४) मोदी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार! ;)

In reply to by विकास

चौकटराजा 21/05/2014 - 09:21
आपले स्वप्न साकार करण्यासाठी माणूस काय काय करतो.तिस्ता मुळे तर मोदीना प्रसिद्धी मिळाली. मोदी हे "दादा" गिरी करायला ठीक आहेत हे भाजपाला पटले. मोदी प्रधानमंत्री झाले. आता गुजराथ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देऊन सांगतात कुणाला ?तिस्ताचा प्ल्यान फुलप्रूफ होता .

In reply to by विकास

श्रीगुरुजी 21/05/2014 - 20:16
>>> गेले १२ वर्षे अथक कार्य करत असलेल्या टिस्टा सेटलवाड यांचे स्वप्न आज साकार होणारः आज (मे २१, २०१४) मोदी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार! :yahoo: मोदींच्या विजयात टिस्टा, तहलका, कोब्रापोस्ट, गुलैल, तरूण तेजपाल, अनिरूद्ध बहल, डॉग्विजय इ. मंडळींचा सिंहाचा वाटा आहे. ही मंडळी नसती तर मोदी कधीही पंतप्रधान होऊ शकले नसते.

In reply to by श्रीगुरुजी

विकास 21/05/2014 - 20:27
"मौत का सौदागर" म्हणून हिणावणार्‍यांचे नाव तुम्ही घेतले नाहीत त्याबद्दल निषेध. ;) जर त्या वेळेस त्या "मौत का सौदागर" म्हणाल्या नसत्या आणि इमाने इतबारे प्रचार केला असता तर मोदी कदाचीत दुसर्‍यांदा मुख्यमंत्री देखील झाले नसते. परीणामी गुजरात डेव्हलपमेंट मॉडेल जनतेपुढे मांडू शकले नसते...

In reply to by विकास

श्रीगुरुजी 21/05/2014 - 20:46
अरे हो! राजमाता आणि युवराज राहिलेच. त्यांच्याप्रमाणे बेनीप्रसाद वर्मा, फारूख अब्दुल्ला, इम्रान मसूद, खुर्शिद, मणिशंकर इ. ना देखील निव्वळ अनावधानाने श्रेय द्यायचे राहून गेले याबद्दल दिलगीर आहे.
२०१४ लोकसभा निवडणुकांचे निवडणुकपूर्व सर्वेक्षणाचे अंदाज झी-न्यूज अंदाज http://zeenews.india.com/news/general-elections-2014/bjp-to-emerge-as-single-largest-party-in-lok-sabha-polls-zee-taleem-survey_922122.html http://znn.india.com/Img/2014/4/3/Opinion%20Poll-%20Phase%202%20Report.pdf भाजप - २१५-२२५, रालोआ - २१९-२३२ काँग्रेस - १२१-१३२, संपुआ - १३२-१४९, इतर - १७१-१८१ टाईम्स नाऊ-सी व्होटर अंदाज http://timesofindia.indiatimes.com/tmes-now-cvoter-national-lok-sabha-election-survey/liveblog/30348665.cms भाजप - २०२, रालोआ - २२७ क

दमण बद्दल माहिती

कबीरा ·

कपिलमुनी 14/05/2014 - 17:57
दमण ची पाकृ पुढीलप्रमाणे .. १. नेट असलेल्या पीसी , लॅपटॉप किंवा मोबाईल वर .. ब्राउजर उघडावा.. दमण फोटो छोट्याशा बेटावरची केंदशासित नगरी --- दमण .. दमण....दमण.. इवलेसे दमण अशी संकलीत माहिती येथे मांडून बाकीची माहिती विचारावी.. आणि जाउन आलात की वृतांत टाकणे (फोटो मस्ट ) !!

कपिलमुनी 14/05/2014 - 17:57
दमण ची पाकृ पुढीलप्रमाणे .. १. नेट असलेल्या पीसी , लॅपटॉप किंवा मोबाईल वर .. ब्राउजर उघडावा.. दमण फोटो छोट्याशा बेटावरची केंदशासित नगरी --- दमण .. दमण....दमण.. इवलेसे दमण अशी संकलीत माहिती येथे मांडून बाकीची माहिती विचारावी.. आणि जाउन आलात की वृतांत टाकणे (फोटो मस्ट ) !!
दमण बद्द्ल कोणाला काही माहिती आहे का? राहण्याचे ठिकाण? खादाडी साठी उत्तम जागा? २-३ दिवस जायचे आहे.