मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अ‍ॅकलेशिया कार्डिया-रोग आणि उपचार -२

तिमा ·

स्पंदना Sat, 05/17/2014 - 18:53
बघा तिमा तुम्ही लाखात एक आहात ना? *pardon* म्हणजे आपण जे घास लागला म्हणतो ते असच काही असावं का? बरीच व्यवस्थीत माहीती दिली आहे तुम्ही. त्याबद्दल धन्यवाद. फार कष्ट घेउ नका. जरा आराम करा. नाहीतर घरातले," जरा बर वाटल नाही की चालले मिपावर उनाडायला!! काय ठेवलय त्या मिपात तरी काही समजत नाही" असे डायलॉग्ज मारायला लागतील. ;)

स्पंदना Sat, 05/17/2014 - 18:53
बघा तिमा तुम्ही लाखात एक आहात ना? *pardon* म्हणजे आपण जे घास लागला म्हणतो ते असच काही असावं का? बरीच व्यवस्थीत माहीती दिली आहे तुम्ही. त्याबद्दल धन्यवाद. फार कष्ट घेउ नका. जरा आराम करा. नाहीतर घरातले," जरा बर वाटल नाही की चालले मिपावर उनाडायला!! काय ठेवलय त्या मिपात तरी काही समजत नाही" असे डायलॉग्ज मारायला लागतील. ;)
लेखनविषय:
लेखनप्रकार
अ‍ॅकलेशिया कार्डिया (Achalasia Cardia) हा एक अन्ननलिकेचा व त्याच्या जठरावरील जोडणीच्या मधे जो स्नायुंचा वॉल्व्ह असतो त्याच्या क्रिया नीट न चालण्याचा रोग आहे. साधारणपणे लाखांत एका माणसाला हा होतो. अन्ननलिकेच्या खालच्या व जठरावरच्या वॉल्व्हला Lower Esophagal Sphincter (LES) असे म्हणतात. आपल्या अन्ननलिकेची व या एलईएस ची हालचाल मोटर सेन्सर नर्व्हसमुळे होत असते. म्हणून आपण कुठलीही खाद्यवस्तु चावून गिळली की त्या घासाची अन्ननलिकेतली हालचाल खालच्या दिशेने आकुंचन्-प्रसरण या तत्त्वावर होते. त्याचवेळेस, खालचा वॉल्व्ह उघडतो आणि खाऊन झाल्यावर आपोआप बंद होतो. त्यानंतर जठराचे काम चालू होते.

ब्याचलर्स पाकृ: स्टफ्ड थालीपीट विथ टॅन्गी टमॅटो अ‍ॅन्ड चीज़...

सूड ·

कवितानागेश Sat, 05/17/2014 - 15:45
अय्या, तुम्हाला पोळ्या येत नाहीत? :P मी याच साहित्यात कान्द्याचे थालिपीठ आणि टोमॅटोची कोशिम्बीर केली असती. आणि चीजचे वेगळे सॅन्ड्विच केले असते, परत थोड्यावेळानी भूक लागल्यावर खायला. किंवा धिरडं- फ्रॅन्की केली असती, म्हनजे दोन्ही बाजूनी भाजलेला पदार्थ मिळेल. हे थालिपीठ आतल्या बाजूनी नीट शिजलं का, शंका आहे.

रेवती Sat, 05/17/2014 - 17:07
तुमच्याकडे ना हव्वी तशी भाजणी हव्वी तेंव्हा मिळतेय ना लेको, म्हणून असे प्रयोग करण्याचे सुचते. आमच्याकडे सध्या भाजणी मिळत नैय्ये तर असलेली जपून वापरावी लागतेय. अशात केलेला प्रयोग फसला तर वैट वाट्टे.

प्यारे१ Sat, 05/17/2014 - 22:56
सूड मोड ऑन >>> त्या थालिपीठाची दुसरी बाजू फारशी भाजलेली दिसत नाही. थोडं तेल सोडून व्यवस्थित परतून घ्यायला हवी होती. आणि थालिपीठाला आतून तेल जायला नि भाजायला उलथण्यानं चिरा किंवा बोटांनी भोकं पाडायला हव्या होत्या. मोड ऑफ छान रे सूड! :)

In reply to by प्यारे१

@सूड मोड ऑन >>>त्या थालिपीठाची दुसरी बाजू फारशी भाजलेली दिसत नाही. थोडं तेल सोडून व्यवस्थित परतून घ्यायला हवी होती. आणि थालिपीठाला आतून तेल जायला नि भाजायला उलथण्यानं चिरा किंवा बोटांनी भोकं पाडायला हव्या होत्या. ...मोड ऑफ >>> चूक चूक!!! *biggrin* ते असं पाहिजे...
तेल कमी वापरता का...हल्ली?
=)) खला...स! =))

In reply to by प्यारे१

दिपक.कुवेत Sun, 05/18/2014 - 09:27
अरे तसं केलं तर थालिपीठ भाजताना आत घातलेलं चीज वितळुन बाहेर येउन थालिपीठाचा पार लगदा होईल व व्यवस्थीत उलटताहि नाहि येणार.....अगदि नॉनस्टिक पॅन असला तरी. अर्थात ह्या पेक्षा वेगळं कारण असल्यास सुड सांगेलच. बाकि खाली सानिका म्हणते त्या प्रमाणे भाजणीत यीस्ट घालायचे प्रयोजन समजले नाहि.

In reply to by दिपक.कुवेत

सूड Mon, 05/19/2014 - 14:54
>>तर थालिपीठ भाजताना आत घातलेलं चीज वितळुन बाहेर येउन थालिपीठाचा पार लगदा होईल व व्यवस्थीत उलटताहि नाहि येणार एकदम बरोबर. थालीपीट तव्यातून काढेस्तवर तीच धास्ती होती. सुदैवाने उलटताना वैगरे नीट उलटलं गेलं. सूड मोडसाठी प्यारेकाकांना दहापैकी पाच आणि बुवांना दहापैकी आठ गुण !! ;)

इनोव्हेशन आवडले :) थालीपिठ पिझ्झामध्ये यीस्ट घातले नाही तरी चालेल असे वाटतेय. पाकृसाठी धन्यवाद.

भावा, ही पा. कृ. कांदे पोह्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी बनव. कार्यक्रम नक्की यशस्वी होईल. बाकी सध्या आमचाही बॅचलर मोड ऑन असल्याने घरी हा प्रयोग नक्की करण्यात येईल.

In reply to by Prajakta२१

मुक्त विहारि Sun, 05/18/2014 - 15:05
ओवाच काय पण आवळ-जावळ कुटलेले मिरे, जिरे, धनेपूड पण चालते. आमच्या घरी ह्यात कधी-कधी भात पण घालतात.(उरलेला नाही, मुद्दाम...)कधी-कधी पोहे पण घालतात. पण थालीपीठाची खरी चव लागते ती कोलंबी बरोबर. कोलंबी-थालीपीठ आणि तांबडा रस्सा, नवर्‍याच्या मानसीक आरोग्याला उत्तम असल्याने, आजकाल ही डिश जास्त प्रमाणांत होत नाही.

In reply to by जेपी

मुक्त विहारि Sun, 05/18/2014 - 19:44
काय साहेब असे काय करता? एकदा थालीपीठ-लोणी, थालीपीठ आणि तिखट घातलेले ताक किंवा थालीपीठ आणि आंब्याचे लोणचे ट्राय करून बघा. बाकी, थालीपीठ ह्या पदार्थाची रंगत, माणसांच्या संख्येप्रमाणे वाढत जाते.

सूड Mon, 05/19/2014 - 14:49
ह्म्म्म!! वर बरेच जण म्हणतायेत तसं मला काही कच्चं वैगरे वाटलं नाही थालीपीट. कदाचित झाकण ठेवल्यामुळे किंवा काय,कच्चेपणा जाणवला नाही. आणि राह्यलंच एखादवेळेस कच्चं तर भाजणीत तसंही सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून दळलेले असतात, त्यामुळे बाधणार नाही इतकं नक्की!! यीस्टचं म्हणाल तर प्रयोजन असं काहीही नाही, प्रयोग म्हणून करुन बघितलं. मळून ठेवल्यानंतर वाटत होतं की चूक केली का काय, पण खाताना पश्चाताप झाला नाही. ;) सानिकातै म्हणतात तसं यीस्ट वगळून पण करता येईल. बाकी धाग्यावर हजेरी लावणार्‍या सर्वांचे आभार!! :)

बाबा पाटील Wed, 05/21/2014 - 19:53
आयला सुडमहाराज ,पण एव्हडा कांदा कसाकाय कापला बुवा.च्यामारी एक कांदा कापायचा म्हटल की आमच्या ड्याळे पाणवतात राव. नक्की तुम्हीच इतका बारिक कांदा कापला नव्ह ? का एखादी बॅचलरीन होती सोबतीला ? ? ? ?

In reply to by बाबा पाटील

सूड गुरुवार, 05/22/2014 - 14:36
>>पण एव्हडा कांदा कसाकाय कापला बुवा.च्यामारी एक कांदा कापायचा म्हटल की आमच्या ड्याळे पाणवतात राव. नक्की तुम्हीच इतका बारिक कांदा कापला नव्ह ?>> व्हय जी म्याच कापलाय. आता कसाकाय कापला म्हनशीला तं सरावानं जमतंय आपलं वाईच कसंबसं. :) >> का एखादी बॅचलरीन होती सोबतीला ?>> आता यकांदी ब्याचलरीन आसती संगं तं कांदा कशापायी कापत बसलो असतो. न्हाय म्हंजी हाटिलातच ग्येलो नस्तो का? ;)

स्पा गुरुवार, 05/22/2014 - 14:40
चला आता लगीन लौकरात लौकर जमेल,..... असा सुगरण नवरा असताना कुठली मुलगी नकार देईल. तयारीला लागायला हवे, नाय फोटोंचे contract आमच्याकडेच लागलेय णा.. लेन्स घेतो आता नवीन ;) अवांतर : पक्रु भरि दिस्तेय.. पुधिल विकन्तल ब्द्लपुरत अल्यवर खिल्व

कवितानागेश Sat, 05/17/2014 - 15:45
अय्या, तुम्हाला पोळ्या येत नाहीत? :P मी याच साहित्यात कान्द्याचे थालिपीठ आणि टोमॅटोची कोशिम्बीर केली असती. आणि चीजचे वेगळे सॅन्ड्विच केले असते, परत थोड्यावेळानी भूक लागल्यावर खायला. किंवा धिरडं- फ्रॅन्की केली असती, म्हनजे दोन्ही बाजूनी भाजलेला पदार्थ मिळेल. हे थालिपीठ आतल्या बाजूनी नीट शिजलं का, शंका आहे.

रेवती Sat, 05/17/2014 - 17:07
तुमच्याकडे ना हव्वी तशी भाजणी हव्वी तेंव्हा मिळतेय ना लेको, म्हणून असे प्रयोग करण्याचे सुचते. आमच्याकडे सध्या भाजणी मिळत नैय्ये तर असलेली जपून वापरावी लागतेय. अशात केलेला प्रयोग फसला तर वैट वाट्टे.

प्यारे१ Sat, 05/17/2014 - 22:56
सूड मोड ऑन >>> त्या थालिपीठाची दुसरी बाजू फारशी भाजलेली दिसत नाही. थोडं तेल सोडून व्यवस्थित परतून घ्यायला हवी होती. आणि थालिपीठाला आतून तेल जायला नि भाजायला उलथण्यानं चिरा किंवा बोटांनी भोकं पाडायला हव्या होत्या. मोड ऑफ छान रे सूड! :)

In reply to by प्यारे१

@सूड मोड ऑन >>>त्या थालिपीठाची दुसरी बाजू फारशी भाजलेली दिसत नाही. थोडं तेल सोडून व्यवस्थित परतून घ्यायला हवी होती. आणि थालिपीठाला आतून तेल जायला नि भाजायला उलथण्यानं चिरा किंवा बोटांनी भोकं पाडायला हव्या होत्या. ...मोड ऑफ >>> चूक चूक!!! *biggrin* ते असं पाहिजे...
तेल कमी वापरता का...हल्ली?
=)) खला...स! =))

In reply to by प्यारे१

दिपक.कुवेत Sun, 05/18/2014 - 09:27
अरे तसं केलं तर थालिपीठ भाजताना आत घातलेलं चीज वितळुन बाहेर येउन थालिपीठाचा पार लगदा होईल व व्यवस्थीत उलटताहि नाहि येणार.....अगदि नॉनस्टिक पॅन असला तरी. अर्थात ह्या पेक्षा वेगळं कारण असल्यास सुड सांगेलच. बाकि खाली सानिका म्हणते त्या प्रमाणे भाजणीत यीस्ट घालायचे प्रयोजन समजले नाहि.

In reply to by दिपक.कुवेत

सूड Mon, 05/19/2014 - 14:54
>>तर थालिपीठ भाजताना आत घातलेलं चीज वितळुन बाहेर येउन थालिपीठाचा पार लगदा होईल व व्यवस्थीत उलटताहि नाहि येणार एकदम बरोबर. थालीपीट तव्यातून काढेस्तवर तीच धास्ती होती. सुदैवाने उलटताना वैगरे नीट उलटलं गेलं. सूड मोडसाठी प्यारेकाकांना दहापैकी पाच आणि बुवांना दहापैकी आठ गुण !! ;)

इनोव्हेशन आवडले :) थालीपिठ पिझ्झामध्ये यीस्ट घातले नाही तरी चालेल असे वाटतेय. पाकृसाठी धन्यवाद.

भावा, ही पा. कृ. कांदे पोह्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी बनव. कार्यक्रम नक्की यशस्वी होईल. बाकी सध्या आमचाही बॅचलर मोड ऑन असल्याने घरी हा प्रयोग नक्की करण्यात येईल.

In reply to by Prajakta२१

मुक्त विहारि Sun, 05/18/2014 - 15:05
ओवाच काय पण आवळ-जावळ कुटलेले मिरे, जिरे, धनेपूड पण चालते. आमच्या घरी ह्यात कधी-कधी भात पण घालतात.(उरलेला नाही, मुद्दाम...)कधी-कधी पोहे पण घालतात. पण थालीपीठाची खरी चव लागते ती कोलंबी बरोबर. कोलंबी-थालीपीठ आणि तांबडा रस्सा, नवर्‍याच्या मानसीक आरोग्याला उत्तम असल्याने, आजकाल ही डिश जास्त प्रमाणांत होत नाही.

In reply to by जेपी

मुक्त विहारि Sun, 05/18/2014 - 19:44
काय साहेब असे काय करता? एकदा थालीपीठ-लोणी, थालीपीठ आणि तिखट घातलेले ताक किंवा थालीपीठ आणि आंब्याचे लोणचे ट्राय करून बघा. बाकी, थालीपीठ ह्या पदार्थाची रंगत, माणसांच्या संख्येप्रमाणे वाढत जाते.

सूड Mon, 05/19/2014 - 14:49
ह्म्म्म!! वर बरेच जण म्हणतायेत तसं मला काही कच्चं वैगरे वाटलं नाही थालीपीट. कदाचित झाकण ठेवल्यामुळे किंवा काय,कच्चेपणा जाणवला नाही. आणि राह्यलंच एखादवेळेस कच्चं तर भाजणीत तसंही सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून दळलेले असतात, त्यामुळे बाधणार नाही इतकं नक्की!! यीस्टचं म्हणाल तर प्रयोजन असं काहीही नाही, प्रयोग म्हणून करुन बघितलं. मळून ठेवल्यानंतर वाटत होतं की चूक केली का काय, पण खाताना पश्चाताप झाला नाही. ;) सानिकातै म्हणतात तसं यीस्ट वगळून पण करता येईल. बाकी धाग्यावर हजेरी लावणार्‍या सर्वांचे आभार!! :)

बाबा पाटील Wed, 05/21/2014 - 19:53
आयला सुडमहाराज ,पण एव्हडा कांदा कसाकाय कापला बुवा.च्यामारी एक कांदा कापायचा म्हटल की आमच्या ड्याळे पाणवतात राव. नक्की तुम्हीच इतका बारिक कांदा कापला नव्ह ? का एखादी बॅचलरीन होती सोबतीला ? ? ? ?

In reply to by बाबा पाटील

सूड गुरुवार, 05/22/2014 - 14:36
>>पण एव्हडा कांदा कसाकाय कापला बुवा.च्यामारी एक कांदा कापायचा म्हटल की आमच्या ड्याळे पाणवतात राव. नक्की तुम्हीच इतका बारिक कांदा कापला नव्ह ?>> व्हय जी म्याच कापलाय. आता कसाकाय कापला म्हनशीला तं सरावानं जमतंय आपलं वाईच कसंबसं. :) >> का एखादी बॅचलरीन होती सोबतीला ?>> आता यकांदी ब्याचलरीन आसती संगं तं कांदा कशापायी कापत बसलो असतो. न्हाय म्हंजी हाटिलातच ग्येलो नस्तो का? ;)

स्पा गुरुवार, 05/22/2014 - 14:40
चला आता लगीन लौकरात लौकर जमेल,..... असा सुगरण नवरा असताना कुठली मुलगी नकार देईल. तयारीला लागायला हवे, नाय फोटोंचे contract आमच्याकडेच लागलेय णा.. लेन्स घेतो आता नवीन ;) अवांतर : पक्रु भरि दिस्तेय.. पुधिल विकन्तल ब्द्लपुरत अल्यवर खिल्व
नाव कसं हुच्च वाटतंय ना पाकृचं? फार काही नाही टॉमेटोची चटणी भरुन केलेलं थालीपीट आहे. झालं असं की मेस दोन आठवडे बंद असल्याची बातमी आली मग दुपारच्या जेवणाचं काय करायचं याचा विचार करायला लागलो. रात्री टिफीन येतो त्याच्याकडून पहिला आठवडा टिफीन मागवला पण टिफीन एकदाही वेळेवर पोचला नाही दुपारी!! मग त्यानंतरच्या आठवड्यात शेवटी स्वत:च सैंपाकघरात पाऊल टाकायचं ठरवलं आणि काहीतरी वेगळं करायच्या नादात ह्या रेशिपीचा शोध लागला.

नमो लाटेचे साईड ईफेक्ट

वॉल्टर व्हाईट ·

हुप्प्या Sat, 05/17/2014 - 04:02
मोदींना अमेरिकेचा व्हिसा मिळू शकेल. ;-) (किंबहुना त्याकरताच हा नेत्रदीपक विजय त्यांनी मिळवला अशी कुजबूज आहे!)

In reply to by हुप्प्या

आजानुकर्ण गुरुवार, 05/22/2014 - 22:10
नवाज शरीफांनी निमंत्रण स्वीकारल्यास नमो लाटेच्या साईड इफेक्टमुळे त्यांना बिर्याणी खायला मिळू शकते. (नमोंनी पाकिस्तानशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याचे काँग्रेसचे धोरण पुढे चालू ठेवले याचा आनंद आहे. १६ मे नंतर पाकिस्तान नकाशातून गायब होणार होते असे काही ठिकाणी वाचले होते. सुदैवाने तसे काही होत नाही अशी प्राथमिक चिन्हे दिसत आहेत.)

In reply to by आजानुकर्ण

विकास गुरुवार, 05/22/2014 - 22:26
नवाज शरीफ ढोकळा खायला येत असतील आणि परत परत तीच बिर्याणी ती देखील गुज्जू स्टाईल मधली खायला लागल्यामुळे भारत-पाक संबंध परत बिघडायचे. नमोंनी पाकिस्तानशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याचे काँग्रेसचे धोरण पुढे चालू ठेवले याचा आनंद आहे. =)) काँग्रेसचे धोरण? गेल्या दहा वर्षात धोरण म्हणून काँग्रेसने काही केले असे म्हणण्यासारखी दुर्दैवाने अवस्था नाही. सगळा आनंदच होता. १६ मे नंतर पाकिस्तान नकाशातून गायब होणार होते असे काही ठिकाणी वाचले होते. मोदींच्या अथवा भाजपाच्या संस्थळावर वाचले होते का? नसल्यास "अफवांवर विश्वास ठेवू नये माणसांनी" इतकेच म्हणेन. :)

In reply to by विकास

आजानुकर्ण गुरुवार, 05/22/2014 - 23:09
गेल्या दहा वर्षात धोरण म्हणून काँग्रेसने काही केले असे म्हणण्यासारखी दुर्दैवाने अवस्था नाही.
दहा वर्षे काही केले नाही? शक्य आहे...त्यामुळेच २००९ च्या निवडणुकांमध्ये मूर्ख जनतेने काँग्रेसला तरीही निवडून दिले. मात्र २०१४ मध्ये जनता अचानक शहाणी झाली असावी. असो. येथील परंपरेनुसार अभ्यास वाढवा इतकेच म्हणेन. GDP School Defence Employment
मोदींच्या अथवा भाजपाच्या संस्थळावर वाचले होते का? नसल्यास "अफवांवर विश्वास ठेवू नये माणसांनी" इतकेच म्हणेन
मोदी आणि भाजपांनी काँग्रेसच्या बिर्याणी पॉलिटिक्सचा निषेध केला होता, मात्र आता कोलांटउडी मारून तेच धोरण पुढे चालू ठेवले आहे असे दिसते. (मुळात धोरण चांगले होते तर त्यावेळी टीकाच करायला नको होती असे वाटते. चांगले धोरण पुढे चालू ठेवल्याचा आनंद आहेच.) modi

In reply to by सुबोध खरे

थॉर माणूस Fri, 05/23/2014 - 15:23
जॉन स्टीवार्ट एक उत्तम कॉमेडीअन आहे. पण त्याने केलेल्या अमेरीकन हाऊसेस वरच्या सटायरीकल कमेंटला इथे क्वोट करण्यामागचे कारण कळले नाही.

पिवळा डांबिस Sat, 05/17/2014 - 09:55
भाजपामधल्याच जुन्या खोडांचे (आडवानी, जसवंतसिंग, मुमजोशी वगैरे) राजकीय विसर्जन झाले!!!! दे हॅव बिकम इररिलेव्हंट!!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रसाद१९७१ Mon, 05/19/2014 - 13:18
अडवाणींच्या खांद्यावर उभे राहुन कसला? आज जे मोदींना जमले ते बाजपाई आणि आडवाणींना २०-२५ वर्षा पूर्वी जमु शकले असते. पण ते अगदीच नालायक निघाले. बाजपाई तर काँग्रेस ची B Team असल्यासारखेच होते.

In reply to by पिवळा डांबिस

स्पंदना Sat, 05/17/2014 - 16:32
होय! नाही तर जावई रुसल्या सारखे हे ऐनवेळी मी पंतप्रधान होणार म्हणुन अडुन बसायचे.

In reply to by वेताळ

मदनबाण Sat, 05/17/2014 - 10:07
मायावती कुठे आहेत हो? हत्तीचे उभारलेले "पुतळे" मोजत बसल्या असतील ! आता वेळ घालवण्याचे तेच एक साधन उरले ना त्यांच्याकडे ! ;) बाकी... मोठ-मोठे माजलेले टोणगे-वळू या वेळी तबेल्यात गेले ते पाहुन फार बरे वाटले ! सर्वात महत्वाचे म्हणजे कॉग्रेसचा सुपडा साफ झाला ! सत्तेची मस्ती चढल्यामुळे त्यांच्या मग्रुरीला कोणतीच सीमा उरली नव्हती ! त्यांना त्यांची "योग्य" जागा दाखवुन दिल्या बद्धल हिंदूस्थानी जनतेचे आभार मानावे तितके कमीच आहे ! जनतेला विकास हवा आहे, आणि त्यासाठी ते उत्साहाने मतदान करुन सत्ता परिवर्तन घडवुन आणु शकतात हे आज जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीने दाखवुन दिले.

In reply to by मदनबाण

अर्धवटराव Sat, 05/17/2014 - 11:46
काँग्रेसला सत्तेची मग्रुरी नव्हती. किंबहुना आपलं तारु खडकावर आपटायच्या दिशेने चाललय हे काँग्रेसमधे ज्यांना कळायला हवं त्यांना कळत होतं. पण त्या तारुला योग्य दिशा देण्याचा वकुब असणार्‍यांना काँग्रेसने वापरलच नाहि. कंट्रोल होता नंबर मॅनेजर्स आणि तीसरी आघाडीचे वगैरे प्रयोगांवर विश्वास ठेवणार्‍या खुरट्या व्यक्तींकडे. काँग्रेसचा डाव स्वतःच्या कुवतीवर नव्हता. त्यांना आशा होति ति विरोधकांच्या फुटीची. त्यांच्या दुर्दैवाने आणि भारताच्या सुदैवाने डोळे मिटुन दुध पिणार्‍या बोक्याला मतदारांनी ओळखले व कचकचुन कमरेत लाथ घातली बोक्याच्या. परिणाम दिसतोच आहे.

In reply to by अर्धवटराव

मदनबाण Mon, 05/19/2014 - 07:22
काँग्रेसला सत्तेची मग्रुरी नव्हती. हॅ.हॅ.हॅ... असं कसं म्हणता अर्धवटराव ? त्यांच्या सर्व प्रवक्त्यांची विधाने / भाषा कधी ऐकलीच नाहीत का तुम्ही ? लोक बोफोर्स घोटाळा विसरले, कोलगेटही विसरतील ! हे "गॄहमंत्री" सुशील कुमार यांचे वक्तव्य लक्षात आहे का ? मौत का सौदागर असा मोदींचा उल्लेख करुन सोनिया गांधींनी सगळ्यात खालच्या पातळीचा प्रचार करुन दाखवला. शिवाय राज बब्बर यांचे १२ रुं पोटभर जेवण मिळते हे विधान देखील विसरलात की काय ? शिवाय तो वायझेड दिग्गीराज पिसाळलेल्या कुत्र्या सारखा सगळीकडे तोंडाला काही येइल ते बरळत सुटला होता, त्याला कॉंग्रेस मधल्या कुणालाच आवरावेसे का वाटले नाही ?{ ओसामा बिन लादेन ला ओसामाजी म्हणणारा वायझेडच म्हंटला पाहिजे} ही सगळी दिर्घकाळ सत्ता हातात असल्यामुळे आलेली मग्रुरीच होती. कोणावरही कुठलेही आरोप करत सुटले होते, गडकरींवर देखील असे आरोप करणारे मनिष तिवारी यांना बिनशर्त माफी मागावी लागली होती. मनिष तिवारी आणि कपिल सिब्बल यांनी अण्णा हजारेंच्या बाबतीत बोलताना असभ्य आणि एकेरी उच्चारण केले होते, त्यावर बीजेपीच्या सुशमा स्वराज यांनी त्यांना २ शब्द व्यवस्थित सुनवले होते.

In reply to by मदनबाण

अर्धवटराव Mon, 05/19/2014 - 10:32
फुकटचं खाय त्याला स्वस्त महाग काय... हि मग्रुरीची भाषा, बेताल वाचाळता काँग्रेसमधल्या फुकट्यांची होती. जे लोकं घाम गाळुन काँग्रेसकरता मतांची बेगमी करायचे त्यांना काँग्रेसच्या चुका कळत होत्या. पण राणि, राजपुत्र आणि प्रधान पक्षहितापेक्षा घराणेशाहिला महत्व देताहेत म्हटल्यावर निवडणुकांची रणनिती घराण्याचा करिश्मा आणि विरोधकांच्या चुका या दोनच घटकांवर मर्यादीत राहिली. असो.

In reply to by अर्धवटराव

मदनबाण Mon, 05/19/2014 - 15:41
ह्म्म... इथे फक्त फुकट्यां ऐवजी प्रामाणिक / वफादारपणे चाटुगिरी करणारे असे म्हणीन ! जे मन लावुन तळवे चाटतात ते पदास पात्र होतात असे साधे सोपे गणित आहे... मग मड्डम सॉरी सॉरी हाय कमांड ने सांगितले ते फॉलो करा ! सुशील कुमार शिंदे यांनी गॄहमंत्री होताच त्यांचे विधान होते :- "The Gandhi family has always taken care of the welfare of backward castes. Dalits can also take bigger responsibility. The home ministry is a critical ministry. I have performed in the past and I will again prove through my work as the home minister," संदर्भ :- Shinde thanks Sonia, PM for giving a 'Dalit' home ministry म्हणजे वफादारी और दलित कार्ड २ नो एकसाथ ! बरं आपल्या देश मातेचे इतके कौतुक केल्यावर राजपुत्र ? कसे स्वस्थ बसतील ? तेही लगेच शिंदे काकांना भेट देण्यास पोहचले. ;) संदर्भ :- Rahul Gandhi visits Shindes for dal-chawal after Sushil Kumar Shinde proclaims his dalit heritage बरं आपण देशाचे गॄहमंत्री या पदावर आहोत याचे भान न-ठेवता,आरएसएस आणि बीजेपी हे भगवा दहशदवाद पसरवत आहेत असा अजब शोध लावुन बसले.बरं इतक्यावर हे गॄहमंत्री थांबले नाहीत तर आमच्या विरुद्ध वार्तांकन करणार्‍या मिडियाला आम्ही चिरडुन टाकु अशी धमकी देउन मोकळे झाले. होम मिनिस्ट्री इज क्रिटीकल मिनिस्ट्री असे मोठे विधान करणारे असं कसं वागु शकतात ? संदर्भ :- RSS, BJP camps promoting Hindu terror: Sushilkumar Shinde Sushil Kumar Shinde’s threat: Will crush ‘elements’ in media plotting against Cong ही तर काही ठराविक उदा. झाली पण दिग्गीरांजां सारख्या मर्कटालाही सुशील कुमार शिंदे यांनी मागे टाकले आहे याची कल्पना आपल्या असेल-नसेल म्हणुन सांगतो... मुंबई हल्ल्याच्या कटाचा मुख्य सुत्रधार असणार्‍या हाफिद सइदचा मिस्टर हाफिद सइद आणि श्री.हाफिद सइद अशी विशेषण लावुन त्यांना उपकॄत केले. देशाचा गॄहमंत्रीच जर तुमच्या देशावर हल्ला करणार्‍याला अश्या उपाधी लावत असेल तर त्यांच्या "धर्मनिरपेक्षतेची" खात्री सार्‍या जगालाच पटेल नाही ? संदर्भ :-For home minister Shinde, Hafiz Saeed is 'Mr' and 'Shri' आणि अधिक हवे असेल तर इकडे :- Sushilkumar Shinde's GOOF UPs! When Sushilkumar Shinde was in news for wrong reasons जाता जाता :- इतके बेताल वक्तव्य इतक्या महत्वाच्या पदावर बसलेली व्यक्ती कसा करु शकतो ? अर्थातच...कारण समजले असेलच तुम्हाला.बादवे :- पॄथ्वीबाबा पण मड्डम्म... सॉरी सॉरी हायकंमाडची वाट बघत आहेत म्हणे.

कपिल सिब्बल आणि सलमान खुर्शिद दिसणार नाहीत आता संसदेत!!!! लालु चारा खायला मोकळा विरोधी पक्ष म्हणून काम कराव इतके पण खासदार कोंग्रेस कडे नाहीत अरविंद केजरीवाल आता कुठे धरण्यासाठी बसायच याचा विचार करत असतील.

In reply to by मृणालिनी

भृशुंडी Wed, 05/21/2014 - 01:33
अमेरिकादेखील माफी मागायला येतेच आहे. चीन मोदींना भिऊन दडी मारून बसलाय.. पाकिस्तान तर लपाछुपीच खेळतोय.. नाही का?

In reply to by भृशुंडी

पैसा Wed, 05/21/2014 - 12:09
ते त्या निकालांच्या दिवशी पाकिस्तान हूं की चूं न करता गप्प बसले त्यासाठी होतं. शेवट ते पाकिस्तान आहे. गप्प थोडेच बसणार? आपले रंग दाखवायला सुरुवात केलीच आहे परत त्यांनी.

आता मिपावर आंधळ्या पार्टीप्रेमाने आणि विनोदाने ओतप्रोत भरलेले लेख आणि प्रतिसाद वाचण्याला मुकणार की हो आम्ही :( :) ;) ते लेखकु लोगा ड्युआयडी काढणे शक्य केल्याने मिपाचे शतशः आभार मानत असणार (मनातल्या मनात) =))

अर्धवटराव Sat, 05/17/2014 - 11:58
काँग्रेसला गरज आहे एखाद्या यशवंतराव चव्हाणाची. तसा शोध कदाचीत आता सुरु होइल. अन्यथा काँग्रेसने निर्माण केलेली राजकीय पोकळी भारतीय राजकारणाला धक्के देत राहिल व त्यात आर.एस.एस चा विशेष फायदा होइल. आजीवन प्रचारकांच्या नोंदींची लाट उसळेल आता संघ कार्यालयात. हिंदु धर्मातल्या उच्चनीचतेच्या जातीबंधांवर सकारात्मक, सूप्त आणि लाँगटर्म परिणाम करेल मोदि इफेक्ट.

In reply to by अर्धवटराव

विकास Sat, 05/17/2014 - 16:37
काँग्रेसला गरज आहे एखाद्या यशवंतराव चव्हाणाची. तसा शोध कदाचीत आता सुरु होइल. अन्यथा काँग्रेसने निर्माण केलेली राजकीय पोकळी भारतीय राजकारणाला धक्के देत राहिल व त्यात आर.एस.एस चा विशेष फायदा होइल. सहमत. पण काँग्रेसला गांधी घराणे संपले आहे आणि एकूणच घराण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते. (अर्थात डाव्या विचारवंतांच्या मदतीने). पण संघाचे उद्दीष्ट सामाजीक आणि राष्ट्रीय आहे, तर काँग्रेसचे उद्दीष्ट हे केवळ राजकीय आहे (तसे असण्यात कहीच चूक नाही, पण ते कसे वापरले जाते यावर सगळे ठरते.) . पण थोडक्यात दोन विभिन्न गोष्टी आहेत. संघाला किमान प्रत्यक्षपणे काँग्रेसचे काही पडलेले नाही असे मला वाटते. आजीवन प्रचारकांच्या नोंदींची लाट उसळेल आता संघ कार्यालयात. प्रचारक होयला पब्लीक येईल असे म्हणायचे आहे का? तेव्हढे सोपे नाही, अगदी कुणाची इच्छा असली तरी होणे हे नुसते रजिस्ट्रेशन करण्याइतके सोपे नाही. इतकेच तुर्तास म्हणतो. :)

In reply to by विकास

संपत Sat, 05/17/2014 - 19:38
गांधी घराणे संपले आहे
राजकारणात एका पराभवाने कोणी कायमचे संपत नसते. इथे तर प्रियांका अजून शिल्लक आहे.
काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते
कोंग्रेसने ते केले असे वाटत नाही. संघाचे विचार स्पष्ट आहेत. जर तुमच्या वैचारिक घडणीला 'हिंदुस्तान हिन्दुओ का' पटत असेल तर संघाच्या विचारसरणी पटणारच. पण हा विचार जर व्यापक देशहितासाठी धोकादायक वाटत असेल तर संघाला विरोध राहणारच.
कुणाची इच्छा असली तरी होणे हे नुसते रजिस्ट्रेशन करण्याइतके सोपे नाही
सहमत.

In reply to by संपत

प्रियांका लावो ,पार्टी बचाव प्रियांका इज इंडिया तिचा राजकारणातील अनुभव फक्त आईचा व भावाचा प्रचार करते व तेव्हाच जनतेपुढे येते ,मात्र ती राजघराण्यातील आहे व देश तिच्या घर्राण्याला दत्तक दिला आहे. तिचा पक्ष भले गफलेबाज असेल , नाकर्ता असेल तरी तो सेक्युलर आहे तेव्हा त्यांना मते द्या तूर्तास अर्णव ने तिची मुलाखत आपल्या कायक्रमाच्या वेळी घेऊ नये अशी कपिल ने त्यास विनंती केली आहे. एक म्यान मे दो तलवार ....

In reply to by संपत

विकास Sun, 05/18/2014 - 06:04
राजकारणात एका पराभवाने कोणी कायमचे संपत नसते. इथे तर प्रियांका अजून शिल्लक आहे. दोन्ही वाक्यांशी सहमत. माझ्या मूळ वाक्यात लिहीताना गडबड झालेली दिसते... कारण वाक्याच्या शेवटी मला जे म्हणायचे ते आहे स्पष्ट होते: "(काँग्रेसला)...एकूणच घराण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. " संघाचे विचार स्पष्ट आहेत. जर तुमच्या वैचारिक घडणीला 'हिंदुस्तान हिन्दुओ का' पटत असेल तर संघाच्या विचारसरणी पटणारच. 'हिंदुस्तान हिन्दुओ का' असे संघाच्या विचारात मी कधी ऐकलेले नाही. किंबहूना संघाच्या नावात देखील हिंदू हा शब्द नाही ... संघाच्या प्रार्थनेत जी प्रत्येक स्वयंसेवक शाखेच्या शेवटी प्रतिज्ञा घेतल्यासारखी म्हणतो त्यात देखील हे शब्द येत नाहीत. तुम्ही जे म्हणता ते तुमचे स्युडोसेक्यूलर अथवा डाव्या विचारवंतांनी गेली अनेक दशके लेखन आणि भाषणातून केलेल्या ब्रेनवॉशिंगमुळे म्हणत आहात. हे म्हणजे "संघाचा गांधीद्वेष जगजाहीर आहे", असे म्हणण्यासारखे झाले... :) त्याला काही बेसीस नाही. :(

In reply to by विकास

संपत Sun, 05/18/2014 - 10:14
मी स्वतः संघाच्या शाखेत गेलो आहे. खेळताना, शाखा संपताना, बौधीकानंतर ही घोषणा दिली जात असे. गोळवलकरांचे विचारधन हे पुस्तक संघ विचारांचे सार समजले जाते. त्यातही हिंदुराष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मांडली आहे.

In reply to by पिशी अबोली

संघात हिंदुत्ववाद हा शब्द मी ऐकला आहे. पण आजपर्यंतच्या २९-३० वर्षात हिंदुराष्ट्राच्या जयाबद्दलची घोषणा कधीही ऐकली नाही. किंबहुना महाराष्ट्रात जिथे जिथे शाखेत गेलो आहे तिथेही ऐकली नाही. अर्थात हिंदूराष्ट्र होऊ नये अशी माझी इच्छा नाही असे नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

संपत Sun, 05/18/2014 - 13:01
हिंदुराष्ट्राच्या जयाबद्दल नाही हो..'हिन्दुओ का हिंदुस्थान' अशी घोषणा होती ती.. दादर आणि लालबाग ह्या दोन भागातील शाखाना मी गेलो होतो.

In reply to by पिशी अबोली

संपत Sun, 05/18/2014 - 12:58
आम्हाला बुवा सांगायचे घोषणा द्यायला.. दादर आणि लालबागच्या शाखांमध्ये.. राष्ट्रासेविकाना घोषणा द्यायला नाही सांगायचे वाटते?

In reply to by पिशी अबोली

संपत Sun, 05/18/2014 - 13:15
तुम्ही दोघेही संघाशी संबधित आहात असे दिसतंय (पिशि मावशी अर्थात राष्ट्रीय सेविका समितीत असतील, कारण माझ्या आठवणीत संघ शाखात मुलीना प्रवेश नव्हता), मग विचारधनबद्दल मी म्हटले तेही खोटे आहे काय? जालावर त्याची प्रत सापडली असती तर दुवा दिला असता.

In reply to by संपत

चौकटराजा Sun, 05/18/2014 - 13:31
मी संघात चारेक वर्षे तरी गेलेलो आहे. संघात मुसलमानांविरूद्ध वा बौधाविरूद्ध व ख्रिश्चन विरोधी काही मला शिकवल्याचे आठवत नाही. हिंद्र्राष्ट्र ही कल्पना १९६२ चा सुमारास ऐकल्याचे आठवते पण आता इतक्या वर्षानी समावेशकता हा हिंदू संकृतीचा एक मोठा गुण आहे हे संघवाल्याना पटले असावे. संघाने अनेक उत्तम कामे केल्याचे भूतकाळात दिसले आहे तसे समाजवादी वा कॉग्ग्रेस यानी केल्याचे दिसलेले नाही. जसे अमेरिकेला " पैसा" ही एकच संस्कृति दिसते तशी काहीही करून सत्ता ही कोंग्रेस संस्कृति आहे. आजच विनय सहस्त्रबुद्धे यानी संघाची एक मुस्लीम सेल स्थापित झाल्याची माहिती दिली आहे .

In reply to by चौकटराजा

संपत Sun, 05/18/2014 - 13:56
संघाने अनेक उत्तम कामे
सहमत. विशेषतः संघ स्वयंसेवकांनी चालवलेल्या अनेक संस्था उत्तम काम करतात ह्यावर माझा विश्वास आहे. मी स्वतः अनेक आदरणीय व्यक्तींना ओळखतो. संस्थाना मदत करताना त्या संघप्रणीत असतील तर मी विनियोगाब्द्दल अधिक निशंक असतो. पण माझा विरोध मूळ संघ तत्वांना आहे. ती केवळ मला पटणारी नाहीत म्हणून नसून ती देशाला विघातक आहेत अशी माझी बाबरी मस्जिद आणि त्यानंतर झालेल्या मुंबईमधील दंगली अतिशय जवळून पहिल्याने झालेली समजूत आहे.चुकीच्या तत्वांवर विश्वास ठेवणारी चांगली माणसे असे माझे संघाबद्दल मत आहे. (हे मत फक्त संघाबद्दल असून भाजपमधले लोक हे पक्के राजकारणी आणि चालू असतात. संघातून आयात केलेल्यांचा थोडाफार अपवाद.)
संघात मुसलमानांविरूद्ध वा बौधाविरूद्ध व ख्रिश्चन विरोधी काही मला शिकवल्याचे आठवत नाही.
आयला, म्हणजे मी ज्या शाखात गेलो फक्त तिथेच असे शिकवायचे काय? म्हणजे उघड संघ शाखेत मुसलमान विरोधी काही बोलले नाही तरी हिंदू राष्ट्राची भलावण चालायचीच.शाखा संपल्यानंतर मात्र दादा किंवा भैय्या स्पष्ट शब्दात आपल्या भावना मांडायचे. मला आलेला अनुभव स्थळसापेक्ष असेलही पण गोळवळकरांचा पुस्तकांचे काय? अर्थात आता संघ बदलला असेल अशी शक्यता असली तरी माझा विश्वास बसणे कठीण आहे.

In reply to by संपत

प्यारे१ Sun, 05/18/2014 - 14:07
हिंदूराष्ट्र म्हणत असावेत पण हिंदू कुणाला म्हणतात संघ वाले ते पण बघा. अवांतरः इथे अल्जिरिया मध्ये लोक इन जनरलच इन्डियन म्हणजे 'हिन्दू' असंच बोलतात. प्रश्न विचारताना 'हिन्दु?' असा अस्तो.

In reply to by प्यारे१

मिलिंद बोडस Wed, 05/21/2014 - 13:36
मी मोरोक्कोमधे वर्षभर होतो. तिथेही Indian म्हणजे हिंद असंच म्हणतात. पण त्यांच्या दृष्टीने भारतीय जर मुसलमान नसतील तर ते बौद्ध असतात. भारतीय म्हणजे बौद्ध हे समीकरण आहे इथे. आणि मी बौद्ध नाही हिंदू आहे असं सांगितल्यावर " Hindoo?? What is that? Is it a religion? असा प्रश्न सर्वसामान्यपणे विचारला जायचा. त्या धक्क्यातून मी अजून सावरलो नाहीये.

In reply to by मिलिंद बोडस

चौकटराजा Wed, 05/21/2014 - 16:59
हिंदू मुस्लीम द्वेष फक्त भारतात आहे. १८८५ साली कॉंगेस जन्माला आली अन १९२५ साली आर एस एस या काळात ( ४० वर्षात) असा कोण नेता कारणीभूत झाला यामुळे हा द्वेष पसरला ?

In reply to by संपत

बाळकराम Sun, 05/18/2014 - 14:36
देशाला विघातक आहेत अगदी बरोब्बर संपत जी. चुकीच्या तत्वांवर विश्वास ठेवणारी चांगली माणसे असे माझे संघाबद्दल मत आहे सहमत आहे, मी देखील अनेक निरलसपणे, नि:स्वार्थीपणे चांगली कामे करणारी लोक बघितली आहेत, माझे अनेक जवळचे मित्र संघवाले असून वैयक्तिक पातळीवर उत्तम प्रकारे समाजसेवा करतात. पण संघतत्त्वे ही घातक, दुभाजक आहेत याबद्दल शंका नाही.

In reply to by चौकटराजा

विकास Mon, 05/19/2014 - 04:40
२००२ साली तत्कालीन सरसंघचालक सुदर्शनजींच्या सुचनेप्रमाणे मुस्लीम राष्ट्रीय मंच ची स्थापना केली गेली. त्याचे कां इंद्रेश कुमार यांच्याकडे देण्यात आले होते. त्याच्या आधी सुदर्शनजींच्या आणि संघाच्या इतर कार्यकर्त्यांच्या मुस्लीम नेतृत्वाबरोबर देखील बैठका झाल्या होत्या असे वाचल्याचे आठवते. मात्र नंतर गोध्रा घडले पाठोपाठ दंगली उसळल्या आणि जा मंच जरा मागे फेकला गेला. पण नंतर परत त्याचे स्थान तयार होऊ लागले. अशा वेळेस संघातून जी व्यक्ती मुस्लीम समुदायास जवळची वाटू लागली होती तिच्या म्हणजे इंद्रेशकुमारांच्या सभोवताल अजमेर बाँबचे संशयाचे वातावरण तयार केले गेले. आरोपपत्र कधीच ठेवले गेले नाही. पण त्यातून डाव्या विचारवंतांना अजून भेद करण्याची संधी दिली गेली. अर्थात असे किती दिवस फसवता येणार... मग ते सगळे मागे पडले. नंतर तेच इंद्रेश कुमार मोदींच्या प्रचारासाठी वाराणसीत मुस्लीम राष्ट्रीय मंच आणि मुस्लीम महीला फाउंडेशन बरोबर काम करत होते. बाकी आता इतिहास आहे.

In reply to by संपत

पिशी अबोली Sun, 05/18/2014 - 21:30
अहो संपतकाका, मी तुम्हाला काय विचारले ते बघता का ज़रा? बौद्धिकानंतर अशी घोषणा व्हायची का? बाकी इथे आधीच कुणीतरी सांगितल्याप्रमाणे 'हिन्दू' ची व्याख्यासुद्धा बघावी आधी. आणि संघ आणि संघप्रणित संस्थांमधे काम करणारे मुस्लिम/ ख्रिश्चन कार्यकर्ते तुम्ही कधीच पाहिले नाहित का?

In reply to by प्रीत-मोहर

संपत Sun, 05/18/2014 - 23:43
तुम्ही दोघीं संघाच्या कुठल्या शाखेला गेल्या होत्या याचे कुतुहुल आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे अजूनही संघात स्त्रियांना प्रवेश नाही.(चू भू द्या घ्या)

In reply to by पिशी अबोली

संपत Sun, 05/18/2014 - 23:45
जरा मलाही समजावून सांगा कि संघाची हिंदूची व्याख्या. म्हणजे मला जर रामाबद्दल आदर नसेन तर संघ मला हिंदू मानेल का?

In reply to by संपत

पिशी अबोली Mon, 05/19/2014 - 00:33
तुम्ही बौद्धिकांबद्दल बोलताय न? जाहीर बौद्धिक म्हणून एक प्रकार असतो. त्याला महिलांना प्रवेश असतो. याव्यतिरिक्त मी समितीच्या मालवण, गोवा, पुणे अशा कमीत कमी तीन ठिकाणी शाखांना गेलेली आहे. प्रश्न हिंदूच्या व्याख्येचा. मला तुमचा दुवा आत्ता पाहता येत नाहिये. पण त्यावर खरोखर श्रीगुरुजींचे विचार दिलेले असतील, तर तुम्हाला याचे उत्तर तिथेच मिळावे..

In reply to by पिशी अबोली

संपत Mon, 05/19/2014 - 01:11
जाहीर बौद्धिक नाही हो.. रविवारी सकाळी खास शाखा भरायची.तिथे कुणी महनीय आदरणीय वगैरे व्यक्ती (म्हणजे आसपासची किंवा बाजूच्या शाखेतील) बौद्धिक द्यायची :). हे पुस्तक मी पूर्वी वाचले आहे. त्यावेळी राम जन्मभूमी, शहाबानो इत्यादी विषय गाजत असल्याने ह्या पुस्तकाच्या अनुषंगाने चर्चाही ऐकल्या आहेत. मला माझे उत्तर मिळाले आहे.त्या पुस्तकात दिलेल्या व्याखेच्या अनुषंगानेच मी हा प्रश्न विचारला आहे. बाकी तुम्ही हे पुस्तक वाचले नाही याचे आश्चर्य वाटते (खरच, उपरोध नाही). हे पुस्तक जवळपास कंपल्सरी रीडिंग होते. प्रचारक स्वताहून ह्याची प्रत फुकट वाटत असत. अवांतर : विंदांची पिशी मावशीची पिलावळ अशी कविता आहे बहुतेक.म्हणून माझा तुमच्या नावाबाबतीत गोंधळ उडाला असावा.

In reply to by पिशी अबोली

संपत Sun, 05/18/2014 - 23:55
मी चुकून तुमचा आयडी पिशि मावशी असा वाचला होता त्यामुळे तसे संबोधित होतो. चुकीबद्दल क्षमस्व.

In reply to by संपत

विकास Mon, 05/19/2014 - 00:31
मी ही घोषणा कधी ऐकलेली नाही. संघात बौद्धीकानंतर घोषणा देणे हा प्रकारच अस्तित्वात नाही. किंबहूना त्यांच्या शाखा पध्दतीत नाही. खेळताना घोषणा दिल्या जातात पण त्यात देखील ही मी ऐकलेली नाही. गोळवलकरांचे विचारधन हे पुस्तक संघ विचारांचे सार समजले जाते. त्यातही हिंदुराष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मांडली आहे. तुम्ही ते पुस्तक वाचून सांगत आहात का त्यावर केलेली डाव्या विचारवंतांची पोकळ विधाने वाचून सांगत आहात? थोडक्यात त्यांनी नक्की काय म्हणले आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे?

In reply to by विकास

संपत Mon, 05/19/2014 - 01:25
दुवा वर दिला आहे. तुम्ही स्वतः वाचू शकता.पुस्तकात हिंदू राष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मंडळी आहे. हिंदू राष्ट्रात इतर धर्मियांना स्थान असेल पण त्यांनी आपला धर्म स्वतःपुरता ठेवावा. हिंदुच्या संस्कृती आणि देवांचा आदर करावा. पण हे मुस्लीम / ख्रिश्चनाना जमणार नाही असेही म्हटले आहे. गोळवलकरांचे संघातील स्थान लक्षात घेता ते त्यांचे वैयक्तिक विचार होते, संघाचे नव्हते अस काहीतरी कृपया बोलू नका.

In reply to by संपत

विकास Mon, 05/19/2014 - 04:17
दुवा वर दिला आहे. तुम्ही स्वतः वाचू शकता. मी वाचला आहे पण तुम्ही नक्की काय वाचले हे समजत नाही... म्हणून बंच ऑफ थॉट्स मधले हिंदूराष्ट्र आणि अल्पसंख्य संदर्भातील वाक्य इथे चोप्य पस्ते करत आहे. त्यातून नक्की तुम्हाला काय अर्थ लागतो ते बघा... So, all that is expected of our Muslim and Christan co-citizens is the shedding of the notions of their being 'religious minorities' as also their foreign mental complexion and merging themselves in the common national stream of this soil. As far as the national tradition of this land is concerned, it never considers that with a change in the method of worship, an individual creases to be the son of the soil and should be treated as an alien. Here, in this land, there can be no objection to God being called by any name whatever. Ingrained in this soil is love and respect for all faiths and religious beliefs. He cannot be a son of this soil at all who is intolerant of other faiths.

In reply to by विकास

पिशी अबोली Mon, 05/19/2014 - 07:17
हेच म्हणायचे होते. मी जेवढं लिखाण वाचलंय, ऐकलंय, त्यात 'मुस्लिमांना हाकला, त्यांचे धर्मान्तर करा टायप कधीच ऐकल्याचं आठवत नाही.

In reply to by विकास

संपत Mon, 05/19/2014 - 12:10
संघाची हिंदुत्वाची आणि हिंदू राष्ट्राची भूमिका सर्वसमावेशक आहे कि नाही हा वेगळा चर्चेचा विषय आहे. मी वर म्हटल्याप्रमाणे तुमच्या वैचारिक घडणीप्रमाणे ते तुम्हाला योग्य वाटेल किंवा नाही. पण संघाचा आणि हिंदुत्वाचा संबंध नाही, ते डाव्यांचे ब्रेन वाशिंग आहे हा तुमचा गैरसमज दूर झाला असेल अशी अशा.

In reply to by संपत

पिशी अबोली Mon, 05/19/2014 - 13:03
संघाचा आणि हिंदुत्वाचा संबंध नाही
असं कुणी आणि कुठे म्हटलं? माझा मूळ प्रश्न अगदी साधा सरळ होता. बौद्धिकानंतर घोषणा दिली जात नाही हे मला माहीत आहे. ते कुठे होत असेल तर माझ्यासाठी मोठीच आश्चर्याची गोष्ट आहे. त्यातही 'हिंदुओं का हिंदुस्तान' ही घोषणा तर शाखेवरसुद्धा होत नाही (माझ्या घरात संघाची शाखा काही काळ तरी भरायची, त्याशिवाय मी समितीच्या शाखेत गेलेय/जाते हा भाग वेगळा) राहता राहिलं हिंदुत्व. 'हिंदुत्व इज अ वे ऑफ लाईफ' हे आता सांगायचापण कंटाळा आलाय. हिंदुत्व म्हणजे मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे शिरकाण नव्हे, तर सर्वांना सामावून घेण्याची एक जीवनपद्धती हे तुम्ही ऐकलेल्या कुठल्याच बौद्धिकात सांगितले नसेल तर ती माझ्यासाठी अजून एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे, किंबहुना असे होणे फारच कठीण. तुम्ही दिलेला दुवा आत्ताच पाहिला. काल उघडता येत नव्हता म्हणून मला नक्की कळतच नव्हतं की तुम्हाला असं काय सापडलं त्यात की संघ बिगरहिंदूंना कसा घातक याबद्दल तुमची खात्री पटली. कारण श्रीगुरुजींचे विचार मी वाचले आहेत. आत्ता दुवा बघूनही कळत नाहीये की तुमचा आक्षेप नेमका कशाला आहे.

In reply to by पिशी अबोली

संपत Mon, 05/19/2014 - 14:44
तसे विकास म्हणत होते,तुम्ही नाही.
सर्वांना सामावून घेण्याची एक जीवनपद्धती
मी तुम्हाला वर विचारल्याप्रमाणे जर का मला रामाबद्दल आदर नसेल तर मी हिंदुराष्ट्रात राहू शकीन का? उत्तर नकारार्थी आहे. म्हणजे मी जरी भारताचा नागरिक असलो आणि कुठल्याही प्रकारे देशाला धोका नसलो तरीदेखील मी हिंदू संस्कृतीचा आदर करत नसल्याने हिंदू राष्ट्रात राहण्याच्या लायक नाही. थोडक्यात हिंदू राष्ट्रात इतर धर्मियांना उदार अंत:कारणाने राहू दिले जाईल, पण त्यांनी औकातमध्ये राहावे(जे बहुतांश मुस्लीम राष्ट्रांचे इतर धर्मियांबद्दल धोरण आहे.)

In reply to by संपत

विकास Mon, 05/19/2014 - 16:04
मला रामाबद्दल आदर नसेल तर मी हिंदुराष्ट्रात राहू शकीन का? उत्तर नकारार्थी आहे. हे देखील तुम्हाला कोणी कानात सांगितले का? कारण मी कधी ऐकलेले नाही. रामावर कडक टिका करणारे आंबेडकर हे संघाच्या प्रातःस्मरणात आहेत हे कदाचीत आपल्याला माहीत नसेल.

In reply to by संपत

विकास Mon, 05/19/2014 - 16:02
संघाची हिंदुत्वाची आणि हिंदू राष्ट्राची भूमिका सर्वसमावेशक आहे कि नाही हा वेगळा चर्चेचा विषय आहे. वेगळा कसा काय? "हिंदूस्तान हिंदूओंका" असली कधी शाखेत न ऐकलेली घोषणा तुम्ही सांगता ज्यातून संघ सर्वसमावेषक नाही आणि संघ धोकादायक आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करता. मग त्यावर प्रश्न विचारले की, आधी बौद्धीकानंतर, मग नेहमीची शाखा नाही, रविवारची शाखा (हा काय प्रकार आहे? भारतात असे काही नसतेच) म्हणणार... मग त्याच वाक्याचे समर्थन करताना गुरूजींच्या पुस्तकाला मधे आणून "त्यातही हिंदुराष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मांडली आहे. " असे म्हणणार... त्यावर उत्तर म्हणून गुरूजी काय म्हणाले आहेत हे पुस्तकातल्या उतार्‍यानेच दाखवल्यावर आणि याचा अर्थ काय लागतो असे विचारल्यावर म्हणणार की तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे. हीच तर सगळ्या ब्रेनवॉश झालेल्या लोकांची गंमत आहे. त्यांना कळतच नाही की आपले ब्रेनवॉश केले आहे... जसे अंधश्रद्ध व्यक्तीचे अंधश्रद्धांच्या बाबतीत होते. म्हणून परत एकदा विचारतो की तुम्हीच चर्चेत आणलेल्या मुद्यासंदर्भात आणि तुम्हीच चर्चेत दिलेल्या गुरूजींच्या पुस्तकातीलचा संदर्भ घेऊन त्यातून दिलेल्या उतार्‍यावरून तुमच नक्की काय मत होते? असे कुठे लिहीले आहे? की हिंदूस्तान हिंदूओंका म्हणून ?

In reply to by विकास

संपत Mon, 05/19/2014 - 17:14
all that is expected of our Muslim and Christan co-citizens is the shedding of the notions of their being 'religious minorities' as also their foreign mental complexion and merging themselves in the common national stream of this soil.
समजा असतील माझ्यावर foreign mental complexion आणि नाही झालो मी समरस national stream of this soil शी तर काय बिघडले? मुळात national stream of this soil हा काय प्रकार आहे? थोडक्यात हिंदुराष्ट्रात हिंदू संकृती न स्वीकारनर्याना स्थान नाही. संघाने हे सर्व विचार त्यांच्या पुरतेच मर्यादित ठेवले तर काहीच हरकत नाही. पण एक राष्ट्रीय पक्ष जेव्हा ते विचार पुढे लोटतो तेव्हा तो चिंतेचा विषय होतो.
त्यांना कळतच नाही की आपले ब्रेनवॉश केले आहे
माझे हिंदुत्वावाद्याबद्दल हेच म्हणणे आहे म्हणून मी त्यावर वाद घालण्याचे टाळतो. तुम्ही संघ हा हिंदुत्ववादी नाहीच असे म्हणालात तेवढे मी स्पष्टीकरण दिले. जाता जाता: भाजप /संघ / शिवसेनेने आंबेडकरांच्या रामावर टीका केलेल्या (riddles of rama and krishna) ह्या पुस्तकावर बंदीची मागणी केली होती आणि त्यामुळे दंगलीदेखील झाल्या होत्या.

In reply to by संपत

विकास Wed, 05/21/2014 - 00:15
आत्ता लक्षात आले माझा प्रतिसाद प्रकाशीतच झाला नव्हता... आता परतः समजा असतील माझ्यावर foreign mental complexion आणि नाही झालो मी समरस national stream of this soil शी तर काय बिघडले? मुळात national stream of this soil हा काय प्रकार आहे? थोडक्यात हिंदुराष्ट्रात हिंदू संकृती न स्वीकारनर्याना स्थान नाही. "national stream of this soil" म्हणजे देशाला आपले म्हणणे. आपल्याला स्वतःला वेगळे न समजणे. भारतातील प्रत्येक व्यक्तीच भारतीय आहे. आणि जसे अनेक देशात आजही हिंदुस्तानातल्या कुणालाही म्हणले जाते तशा त्या हिंदूही आहेत. त्यात धर्म नसतो. पण त्यातील हिंदू म्हणायचे काही कारण नाही. जसे अमेरीकन नागरीकत्व घेताना नॅचरलायझेशन केले जाते असे म्हणतात तसे. त्यात कोणी ख्रिश्चन होत नाही तर अमेरीकन होतो. तसेच या भुमीस सर्व भुमीपुत्राने आपले तरी म्हणणे बरोबर आहे ना? का तसे न म्हणता त्याच भुमीचा दुस्वास करणे बरोबर आहे? बाकी हिंदु संस्कृती न स्विकारणार्‍यांना स्थान नाही असे तरी कुठे म्हणले आहे? पण एकमेकांच्या बाबतीत आदर ठेवावा हा संस्कृतीचा भाग आहे असे म्हणले आहे. आता तो खरं म्हणजे तुम्ही हिंदू संस्कृती पाळा अथवा नका पाळू सर्वत्रच असायला हवा का नाही? त्या परीच्छेदात पुढे असे देखील म्हणले आहे ना? "As far as the national tradition of this land is concerned, it never considers that with a change in the method of worship, an individual creases to be the son of the soil and should be treated as an alien. Here, in this land, there can be no objection to God being called by any name whatever. Ingrained in this soil is love and respect for all faiths and religious beliefs. He cannot be a son of this soil at all who is intolerant of other faiths." संघाने हे सर्व विचार त्यांच्या पुरतेच मर्यादित ठेवले तर काहीच हरकत नाही. पण एक राष्ट्रीय पक्ष जेव्हा ते विचार पुढे लोटतो तेव्हा तो चिंतेचा विषय होतो. संघाने आणि भाजपाने काहीच वेडेवाकडे विचार केलेले नाहीत. त्यांचा विरोध आहे तो सदानंद धुमेंच्या शब्दात वाचलेल्या "स्कलकॅप सेक्यूलॅरिझमला" आहे. सर्वांना आदर देण्याबाबत विरोध नाही. तुम्ही संघ हा हिंदुत्ववादी नाहीच असे म्हणालात तेवढे मी स्पष्टीकरण दिले. मी कधी आणि कुठे म्हणले आहे? किंबहुना या चर्चेत तर हिंदुत्ववाद हा शब्द देखील मी (ऑन माय ओन) वापरलेला नाही! आणि हिंदुत्ववाद हा मला फुटीरता पाडणारा, अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारा वाटत नाही. त्याचा अर्थ डाव्यांनी चुकीचा लावत ठेवला. संघाने अथवा भाजपाने नाही. जाता जाता: भाजप /संघ / शिवसेनेने आंबेडकरांच्या रामावर टीका केलेल्या (riddles of rama and krishna) ह्या पुस्तकावर बंदीची मागणी केली होती आणि त्यामुळे दंगलीदेखील झाल्या होत्या. कुठल्याही पुस्तकावर बंदी घालायला माझा विरोध आहे. ती प्रथा चुकीची आहे आणि तसेच पुस्तके जाळण्याची प्रथा देखील... पण वैचारीक विरोध जर एखाद्या व्यक्ती-पुस्तकाबद्दल केला म्हणून काय बिघडले? का आंबेडकरांनी राम - कृष्ण यांच्यावर टिका केली की विचारस्वातंत्र्य आणि शिवसेना - भाजपाने आंबेडकरांवर टिका केली की मात्र ते fanatic?

In reply to by विकास

संपत Wed, 05/21/2014 - 17:21
मग भारतीय आहेत ना लोक. हिंदू राष्ट्राची गरज काय? आणि इतर धर्मियनच ह्या अटी कशाला? हिंदू धर्मात जन्म झाला म्हणून हे सर्व गुण माझ्यात आपोआप येतात काय? जे वाक्य मला सरळ सरळ धार्मिक अहंकाराच उदाहरण वाटते ते तुम्ही संघाच्या सर्व समावेशकतेचे म्हणून देता ह्यातच आपल्या विचारातली दरी दिसते.
संघाच्या नावात देखील हिंदू हा शब्द नाही ... संघाच्या प्रार्थनेत जी प्रत्येक स्वयंसेवक शाखेच्या शेवटी प्रतिज्ञा घेतल्यासारखी म्हणतो त्यात देखील हे शब्द येत नाहीत. तुम्ही जे म्हणता ते तुमचे स्युडोसेक्यूलर अथवा डाव्या विचारवंतांनी गेली अनेक दशके लेखन आणि भाषणातून केलेल्या ब्रेनवॉशिंगमुळे म्हणत आहात.
तुमच्या ह्या वाक्यांवरून मला तसे वाटले. तुम्ही संघ हिंदुत्ववादी आहे हे मान्य केलेत हे ठीक. (अर्थात तुमचेही ह्या दोन दिवसात डाव्यांनी ब्रेन वाशिंग केले नसेल तर:))
रामावर कडक टिका करणारे आंबेडकर हे संघाच्या प्रातःस्मरणात आहेत हे कदाचीत आपल्याला माहीत नसेल.
तुमच्या ह्या म्हणण्याला उत्तर म्हणून ती आंबेडकरांची माहिती होती.

In reply to by विकास

संपत Wed, 05/21/2014 - 17:25
कोणी ख्रिश्चन होत नाही तर अमेरीकन होतो
मग भारतीय आहेत ना लोक. हिंदू राष्ट्राची गरज काय? आणि इतर धर्मियनच ह्या अटी कशाला? हिंदू धर्मात जन्म झाला म्हणून हे सर्व गुण माझ्यात आपोआप येतात काय? जे वाक्य मला सरळ सरळ धार्मिक अहंकाराच उदाहरण वाटते ते तुम्ही संघाच्या सर्व समावेशकतेचे म्हणून देता ह्यातच आपल्या विचारातली दरी दिसते.
संघाच्या नावात देखील हिंदू हा शब्द नाही ... संघाच्या प्रार्थनेत जी प्रत्येक स्वयंसेवक शाखेच्या शेवटी प्रतिज्ञा घेतल्यासारखी म्हणतो त्यात देखील हे शब्द येत नाहीत. तुम्ही जे म्हणता ते तुमचे स्युडोसेक्यूलर अथवा डाव्या विचारवंतांनी गेली अनेक दशके लेखन आणि भाषणातून केलेल्या ब्रेनवॉशिंगमुळे म्हणत आहात.
तुमच्या ह्या वाक्यांवरून मला तसे वाटले. तुम्ही संघ हिंदुत्ववादी आहे हे मान्य केलेत हे ठीक. (अर्थात तुमचेही ह्या दोन दिवसात डाव्यांनी ब्रेन वाशिंग केले नसेल तर:))
हिंदुत्ववाद हा मला फुटीरता पाडणारा, अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारा वाटत नाही
हिंदू हा ह्या देशाच उदार, सहिष्णू राजा आहे ही विचारसरणी सोळाव्या शतकात कौतुकाचा विषय ठरू शकते, एकविसाव्या शतकात नाही.
रामावर कडक टिका करणारे आंबेडकर हे संघाच्या प्रातःस्मरणात आहेत हे कदाचीत आपल्याला माहीत नसेल.
तुमच्या ह्या म्हणण्याला उत्तर म्हणून ती आंबेडकरांची माहिती होती.

In reply to by संपत

विकास Wed, 05/21/2014 - 19:00
इतर धर्मियनच ह्या अटी कशाला? कुठल्या अटी? दाखवून द्या बरं! त्यांचे म्हणणे हे "religious minority" हा शब्दप्रयोग करण्यासंदर्भात होते. त्यांच्या दृष्टीने सगळेच भारतीय आहेत. मग भारतीय आहेत ना लोक. हिंदू राष्ट्राची गरज काय? हिंदू राष्ट्र आणि भारत हे त्यांच्या लेखी वेगळे नाहीत. डाव्यांच्या आणि समाजवादी लोकांच्या लेखी वेगळे आहेत. तरी देखील गंमत म्हणून कालचे मोदींचे संसदेच्या सेंट्रल हॉल मधील भाषण बघा अथवा वाचा... ह्या भाषणाचे शबाना आणि शशी थरूर यांनी देखील मर्यादीत का होईना पण कौतुकच केले आहे. शबानाच्या म्हणण्याप्रमाणे न वाचता केलेले भाषण, आणि आतून (मनापासून) आलेले विचार दिसत होते. त्यामुळे तिच्या म्हणण्याप्रमाणे मोदी स्टेट्समन म्हणून शोभत होते. तरी देखील एक आक्षेप घेतला गेला की त्यांनी अल्पसंख्य असा उल्लेख केला नाही. पण गंमत म्हणजे त्यात कुठेही हिंदू हा शब्द देखील आलेला नाही, हे त्यांच्या लक्षात आले नाही अथवा दुर्लक्ष केले... तुम्ही संघ हिंदुत्ववादी आहे हे मान्य केलेत हे ठीक. जालीय अभ्यास कमी पडतोय वाटतं! ;) अहो संघच काय, मी देखील हिंदुत्ववादी आहे हे मान्य आहे आणि जालावर ज्यांना मी माहीत आहे त्या माझ्या वैचारीक विरोधकांना देखील ते माहीत आहे. त्यात नवीन काहीच नाही! पण तुमचा जर हिंदुत्ववादाला आक्षेप असला तर माझा कुणालाही अल्पसंख्य म्हणायला आक्षेप आहे. माझे सर्वधर्मिय मित्र आणि परीवार मित्र (म्हणजे संघपरीवार नाही ;) फॅमिलीफ्रेंड्स या अर्थाने) आहेत. पण माझ्या (संघाच्या) हिंदुत्ववादात कुठल्याही धर्माचा/धर्मियाचा अपमान होत नाही आणि कोण कसे पुजा/प्रार्थना करते अथवा अजिबात करत नाही, त्यावरून त्यांची किंमत केली जात नाही. मात्र जर हिंदूंच्या बाबतीत असे वागले गेले (ते बहुतांशी डावे-समाजवादी हिंदूच वागतात, इतर धर्मिय नाही) तर मात्र मला मान्य नाही! हिंदू हा ह्या देशाच उदार, सहिष्णू राजा आहे ही विचारसरणी सोळाव्या शतकात कौतुकाचा विषय ठरू शकते, एकविसाव्या शतकात नाही. वर मोदींचे उदाहरण दिले आहेच. गंमत म्हणून अथवा गांभिर्याने कोणी खरेच संशोधन केले तर आढळून येईल की हिंदू, हिंदूत्ववाद हे दोन्ही शब्द तसेच अल्पसंख्य हा शब्द राजकारणात आणि समाजकारणात संघ आणि भाजपा पेक्षा डावे आणि समाजवादीच जास्त वापरतात. तो त्यांनी तयार केलेला बागुलबुवा आहे. तुमच्या ह्या म्हणण्याला उत्तर म्हणून ती आंबेडकरांची माहिती होती. प्रतःस्मरण संघशाखांमध्ये चालते (ते देखील सकाळच्या अथवा शिबिराच्या वेळेस), भाजपा आणि शिवसेनेत नाही! :)

In reply to by संपत

विकास Wed, 05/21/2014 - 20:22
ते वाक्य पूर्ण का नाही दिलेत? आउट ऑफ कॉन्टेक्स्ट बोलायची पद्धत पण डावी अधिक आणि काही अंशी समाजवादी आहे... परत एकदा देतो ते वाक्यः So, all that is expected of our Muslim and Christan co-citizens is the shedding of the notions of their being 'religious minorities' as also their foreign mental complexion and merging themselves in the common national stream of this soil. अर्थात स्वतःला या देशातले अल्पसंख्य न म्हणता या देशाचेच म्हणा असा याच अर्थ आहे. पुढे ते असे देखील म्हणाले आहेत ना की, "As far as the national tradition of this land is concerned, it never considers that with a change in the method of worship, an individual creases to be the son of the soil and should be treated as an alien. Here, in this land, there can be no objection to God being called by any name whatever." थोडक्यात तुम्ही कुणाची पुजा करता, कुणाला प्रेषित मानता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण हिंदू धर्मात तरी कुठे एक समान पद्धत आहे? पण आमची पुजा पद्धत वेगळी, प्रेषित वेगळा म्हणून आम्ही वेगळे आणि त्यातून या देशाशी इमान राखण्याचा प्रश्नच नाही अशी वृत्ती तयार करणे योग्य आहे का?

In reply to by संपत

विकास Wed, 05/21/2014 - 20:39
मुद्याला धरून दिले नाही अथवा अर्थ समजलेला नाही... त्यातले फक्त मुस्लीम आणि ख्रिश्चन इतकेच शब्द समजले. त्यात पुढे त्यांनी स्वतःला अल्पसंख्य म्हणत बसू नये हे म्हणलेले दिसले नाही.

In reply to by विकास

संपत Wed, 05/21/2014 - 20:24
हिंदू राष्ट्र आणि भारत हे त्यांच्या लेखी वेगळे नाहीत
म्हणजे फक्त नावे वायली वायली.. आतला माल सेम.. विचारधन म्हणजे संविधानाची झेरॉक्सच जणू. बर्रर.
त्या माझ्या वैचारीक विरोधकांना देखील ते माहीत आहे
मला खरच नव्हते माहित हे. नाही तर एव्हढे डोके खपवलेच नसते. माझा समज होता कि तुम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर मोदींचे समर्थक आहात. जालीय अभ्यास वाढवला पाहिजे हे खरच :)

In reply to by संपत

विकास Wed, 05/21/2014 - 20:48
माझा समज होता कि तुम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर मोदींचे समर्थक आहात. तेच बरोबर आहे. बाकीचे मुद्दे आहेत त्यात मला डाव्या विचारवंतांनी आणि समाजवाद्यांनी केलेल्या समाजभेदाबद्दल तिडीक आहे. त्यांच्यामुळे बरेचसे नुकसान झाले आहे. सतत अल्पसंख्य - गरीब गरीब म्हणून काही होत नसते. नाहीतर गेल्या दहा वर्षात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मधे आपले स्थान बरेच वर गेले असते. फक्त भारतीय म्हणून सगळ्यांकडे बघणे हा कॉन्सेप्ट तमाम डाव्या-समाजवाद्यांसाठी अवघड आहे, चाकोरीच्या बाहेर आहे. पण त्यांना वाटत असलेल्या पध्दतीने आत्तापर्यंत आपण तळच गाठत आलो आहोत. आता थोडा वेळ देऊन नक्की या "सबका साथ सबका विकास" ने काय होते ते पाहूयात. त्यासाठी जरा वेळ द्या.

In reply to by विकास

तरी देखील एक आक्षेप घेतला गेला की त्यांनी अल्पसंख्य असा उल्लेख केला नाही. अल्पसंख्य असल्याचा आणि तसे वागणूक द्यायचा नेहमी आग्रह धरायचा आणि मग आम्हाला वेगळे वागवतात असा आरोप करायचा ! मुख्य म्हणजे या सगळ्यात तथाकथित विचारवंतांना काही विरोधाभास (कांगावाखोरपणा ?) दिसत नाही !! जय हो !!! असे "जाती-धर्मावर आधारीत भेदाभेद" करण्याचा आग्रह करण्याऐवजी "प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीवर आधारून मदत आणि समान संधी" याचा आग्रह धरण्याइतका या तथाकथित विचारवंतांचा मानसिक विकास कधी होईल ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एक भारतीय म्हणून नेहमी मला एक प्रश्न पडतो अल्पसंख्यांक म्हटले की सर्वप्रथम नाव येते ते मुस्लिम समाजाचे , असे का ह्या देशात पारसी , जैन , शीख , ख्रिस्ती , सिंधी आणि बरेच अल्पसंख्यांक आहेत. त्यांना कधी सरकार दरबारी एवढे आन्जारावे , गोंजारावे लागत नाही. ह्यांना स्वताच्या पायावर उभे राहण्यास काय संघाने व माजी सरकारने मदत किली होती का भारतात अजून हिंदूंच्या मध्ये अनेक वर्ग मागासलेले आहे. एका धर्मांच्या लोकांचे वेगळे लाड का ,त्यांचे चोचले का पुरवावे लागतात. सच्चर आयोग माजी सरकारचा त्यात मुस्लिमांची हालात चांगली नसल्याचे म्हटले आहे, आता बह्तांशी काळ अपवाद वगळता ह्यांचेच सरकार सत्तेवर होते तरीही जर मुस्लिमांची हालत खराब असेल तर त्याला संघ व मोदी जबाबदार नाही ,

In reply to by संपत

समजा असतील माझ्यावर foreign mental complexion आणि नाही झालो मी समरस national stream of this soil शी तर काय बिघडले >> काय राव, हे कुठल्याही राष्ट्राचं बेसिक तत्व नव्हे का आणि नको का?

In reply to by शिरपतराव्_टांगमारे

संपत Wed, 05/21/2014 - 18:52
अहो, नसेल आवडत मला देशातील काही गोष्टी आणि आवडत असतील परदेशातील गोष्टी म्हणून मला ह्या देशात स्थान नाही का? आणि ह्या अटी फक्त मुस्लीम, ख्रिश्चनांना.

In reply to by संपत

बस मग उत्तर तर तुम्हीच दिले आहे. हिंदुच्या संस्कृती आणि देवांचा आदर करावा. आदर करावा म्हटलंय भजन करावा म्हटलेले नाही ना! यावर अजून अन्य धर्मियांना दुय्यम वागणूक द्यावी वगैरे काही लिहीले आहे का त्यात? का त्यांच्या दैवतांना दुय्यम वागणूक द्यावी त्यांचा अपमान करावा म्हटले आहे. पण हे मुस्लीम / ख्रिश्चनाना जमणार नाही असेही म्हटले आहे. अगदी १०० % सत्यं आहे. आजच्या काळात १०० टक्के लागू होणारे. म्हनूनच गोळवलकर गुरुजींचे विचार फार आवडायचे मला. कटुसत्य बोलण्याचे धाडस होते त्यांच्यात.

In reply to by विकास

अर्धवटराव Sat, 05/17/2014 - 19:53
संघाच्या वाटेत काँग्रेस डायरेक्ट येत नाहि हे खरय. पण काँग्रेस केवळ गांधी घराण्याच्या पुण्याइवर जगत नव्हता. स्वातंत्र्य चळवळ, सहकार चळ्वळ, सेवा दल वगैरे मुळे काँग्रेसकरता भारतभूमी काँग्रेसी अनुकुल झाली होती/आहे. काँग्रेस नेतृत्वाने हि मशागत पुढे सियीयसली घेतली नाही व आता त्यांच्या हाती सत्ता नाहि. संघाला आपलं कार्य अधिकाधीक व्यापक करायला योग्य संधी आहे.
प्रचारक होयला पब्लीक येईल असे म्हणायचे आहे का? तेव्हढे सोपे नाही,
कपील देव, तेंडुलकर, धोनी मुळे एकुणच स्पोर्ट्सला जे जीवदान मिळाले, अटेन्शन मिळाले, जनाधार मिळाला तेच आता संघाच्या बाबतीत होइल. राजकारणात , समाजकारणात इंटरेस्ट असणारा टॅलेण्ट्पूल संघाच्या मार्गाने जाण्याचं ऑप्शन सिरीयसली विचारात घेईल असं वाटतं.

In reply to by विकास

बाळकराम Sun, 05/18/2014 - 14:30
काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते. संघाचे राक्षसीकरण करण्याची मुळात गरजच काँग्रेसला कधी नव्हती, संघ हा राजकीय आणि तात्त्विक लेव्ह्लवर काँग्रेसचा प्रतिस्पर्धीसुद्धा नव्हता. १९२५ साली संघाची स्थापना झाल्यापासून ते पुढची जवळपास ४०-४५ वर्षे गांधी-नेहरुंच्या आणि इतर अनेक काँग्रेस नेत्यांचा प्रभाव जनमानसावर खोल रुजलेला होता. हा प्रभाव निव्वळ राजकीय असा नव्हता तर तो तात्त्विक आणि नैतिक असा सुद्धा होता. विशेषतः गांधींजींचा आध्यात्मिक आणि नैतिक अधिकार जनतेवर मोठा होता- गांधीजींबरोबर कितीही मतभेद असले तरी कुणीही हे मान्य करेल असे वाटते. आणि त्याच बरोबर भगतसिन्घ इ. क्रांतिकारक, सावरकर, आंबेडकर प्रभृति काँग्रेसविरोधक यांचा सुद्धा मोठा प्रभाव जनमानसावर होता. या सगळ्या धामधुमीत संघ कुठेच नव्हता. ही झाली राजकीय क्षेत्रातली स्थिती. सामाजिक क्षेत्रात जेव्हा विनोबा भावे, पटवर्धन, महर्षी आणि र धो कर्वे- स्त्रीशिक्षण, सावरकर- हरिजनसुधार, गांधी- हरिजनसुधारणा, बाबा आमटे, आंबेडकर- दलितसुधारणा, मास्टर तारासिंग- पंजाबात ही आणि अशी अनेक उदाहरणे देशात सांगता येतील. तिथेही संघ कुठेच नव्हता. स्वातंत्र्यचळवळीत सुद्धा संघाचे काय योगदान होते हा संशोधनाचाच विषय आहे. एक हिंदुत्ववादी संघटना म्हणूनही संघाचा फारसा प्रभाव नव्हता (१९२५ पासून पुढच्या ३०-३५ वर्षापर्यंत तरी). एवढेच नव्हे तर पहिल्या १९५२ निवडणुकीत सावरकरांच्या हिंदू महासभेविरुद्ध जनसंघाने आपले उमेदवार उभे करुन हिंदूंची मते फोडण्याचा नतद्र्ष्टपणा केला होता. थोडक्यात, संघ ही कुणाच्या खिजगणतीतसुद्धा नसलेली, कर्तृत्त्वशून्य संघटना होती-कमीतकमी १९४८ पर्यंततरी. गांधीहत्या हे संघाचे पहिले आणि कदाचित एकमेव "कर्तृत्त्व" म्हटले तरी चालेल. संघाचे "राक्षसीकरण" करुन उगाच त्याचे महत्त्व वाढविण्याचे काम काँग्रेस करेल असे वाटत नाही. त्यामुळे केलंच असेल तर संघाचे राक्षसीकरण तर ते गोडसेने नकळत का होईना पण केलय. त्यामुळे संघाचे उद्दिष्ट सामाजिक आणि राष्ट्रीय आहे असे जे म्हणतात त्या दोन्ही क्षेत्रात संघाने नक्की काय कर्तृत्त्व गाजवलय ते जाणून घ्यायला आवडेल. अर्थात, संघाने कुठल्या भूकंपात/ वा आपत्तीत कार्यकर्ते वगैरे पाठवले आणि त्यालाच सामाजिक कार्य म्हणावे अशी फुटकळ उत्तरे तुम्ही देणार नाहीत अशी अपेक्षा. डिस्क्लेमर- मी स्वतः शाखेत ७-८ वर्षे गेलो आहे, कॉलेजात असताना अभाविप च्या वैद्यकीय विद्यार्थी परिषदेचा सदस्य होतो आणि माझी बायको देखील यूके मध्ये राष्ट्रसेविका समितीचे कार्य करते. त्यामुळे हे प्रश्न विचारण्यामागे पार्श्वभूमी आणि अभ्यास दोन्ही आहे. त्याच बरोबर, संघाच्या भूमिकेमुळे आलेले नैराश्य सुद्धा. त्यामुळे इथले टिपीकल संघीय जी उडवाउडवाची आणि उद्धट उत्तरे देतात ती माझ्यावर काम करणार नाहीत. :)

In reply to by बाळकराम

विकास Mon, 05/19/2014 - 00:36
गांधीहत्या हे संघाचे पहिले आणि कदाचित एकमेव "कर्तृत्त्व" म्हटले तरी चालेल. हे विधान खोटारडेपणाचे लक्षण आहे आणि एका संघटनेची बदनामी करणारे विधान आहे. यासंदर्भात संघाने राहूल गांधींवर देखील खटला भरला आहे असे आठवते. तुमच्याकडे जर पुरावा असला (नुसता आरोप केला असा नाही तर सिद्ध करणारा) तर दाखवा. नाहीतर नाही म्हणून सांगून आणि आपले विधान संपादीत करायला सांगा.

In reply to by विकास

बाळकराम Mon, 05/19/2014 - 15:46
गांधीहत्येत संघाचा हात नाही याची जर संघाला एवढी खात्री आहे तर मग १९४८ नंतर काँग्रेसने संघावर बंदी घालून हाच तर आरोप केला आणि त्यातही संघटनेची बदनामी झालीच की? मग संघाने काँग्रेसला कोर्टात खेचले का नाही? की संघ तेव्हा काँग्रेसची बी-टीम वा "शिवसेना" होती, म्हणून तेरी भी चूप और मेरी भी चूप चा मार्ग अनुसरला गेला? आणि खटले भरायची संघाला एवढीच जर हौस आली आहे तर एखाद खटला तुमच्या शरद पोंक्षेवर भरा जो खुलेआम मी संघीय असून मला गांधीहत्येबद्दल संघाचा अभिमानच आहे असं म्हणतो. पुराव्यांच म्हणाल तर भरपूर पुरावे तुम्हाला १९४८ च्या खटल्याच्या संदर्भात दिसतीलच, त्याचा अभ्यास करावा. ह्या खटल्याच्या अनुषंगाने संसदेत झालेल्या चर्चेची इतिवृत्ते उपलब्ध आहे संसदेच्या ग्रंथालयात, त्याचा लाभ घ्यावा. संघाची नथुराम आणि गोपाळ गोडसे ही माणसे तुरुंगात गेली ती काही पुराव्याशिवाय का? संघकार्यकर्ता असलेल्या नथुरामचा गुन्हा शाबित होउन त्याला फाशी होणे यापेक्षा मोठा दर्शनी पुरावा संघाच्या सहभागाचा काय असू शकेल? मी साध्या साध्या गोष्टींबद्दल- संघाचे सामजिक आणि राष्ट्रीय इ बाबतीतले योगदान याचा पुरावा मागतोय, तो मात्र काही अजून मला मिळाला नाही, ही गोष्ट रोचक म्हणावी का? ;)

In reply to by बाळकराम

आदूबाळ Mon, 05/19/2014 - 15:53
बाकी चालू द्या, पण "द मेन हू किल्ड गांधी" हे मनोहर माळगांवकरांचं पुस्तक खूपच अभिनिवेशरहित आणि तटस्थ विश्लेषण करतं.

In reply to by बाळकराम

मृत्युन्जय Mon, 05/19/2014 - 16:54
मग संघाचा गांधीहत्येत भाग नव्हता हे कबूल करणारे त्या काळचे काँग्रेसी नेते आणि न्यायालय मुर्ख होते असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?

In reply to by बाळकराम

विकास Mon, 05/19/2014 - 19:20
हे विष सतत पसरवले गेले आहे. येथे देखील असेच होत आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. १९४८ नंतर काँग्रेसने संघावर बंदी घालून हाच तर आरोप केला आणि त्यातही संघटनेची बदनामी झालीच की? मग संघाने काँग्रेसला कोर्टात खेचले का नाही? कोर्टातच खटला चालू होता. त्यात संघावर अथवा संघातील काही व्यक्तींवर आरोपपत्र होते. पण नंतर कुठेही संघ सरकारचे मत असलेल्या कॉन्स्पिरसीमधे दिसला नाही म्हणून पक्षि: निर्दोष असल्याचे कोर्टाने मान्य केले. नंतर संघावरची बंदी उठली कारण ज्या आरोप चुकीचे ठरले होते. संघाची नथुराम आणि गोपाळ गोडसे ही माणसे तुरुंगात गेली ती काही पुराव्याशिवाय का? गिल्ट बाय असोसिएशन... सर्वप्रथम नथुरामने आधीच संघ सोडला होता. तरी वादापुरते गृहीत धरूयात की गोडसे संघात होते. मग त्याच धरतीवर शिखांच्या हत्याकांडात काँग्रेसचे नेते (जे नंतर देखील खासदार -मंत्री झाले) होते, मग काँग्रेस बद्दलचे काय म्हणणे आहे? तेच अनेक डावे आणि समाजवादी (त्यात मेधा पाटकरपण आल्या) ह्या हिंस्त्रक नक्षलवादास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठींबा देतात. मग त्यांना देखील हिंस्त्र म्हणणार आहात का? संघकार्यकर्ता असलेल्या नथुरामचा गुन्हा शाबित होउन त्याला फाशी होणे यापेक्षा मोठा दर्शनी पुरावा संघाच्या सहभागाचा काय असू शकेल? संघपध्दतीत कार्यकर्ता ह्या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का? नसल्यास माहिती करून घ्या. आणि तरी देखील वादापुरते "संघकार्यकर्ता नथुराम" असे म्हणले तर त्याला झालेली शिक्षा ही तो काँग्रेसकार्यकर्ता असता तर कमी झाली असती का? म्हणजे शिक्षा ही गांधीहत्येबद्दल झाली का तुम्ही म्हणता तो वास्तवात नसलेला संघाशी संबंध आहे म्हणून झाली? मी साध्या साध्या गोष्टींबद्दल- संघाचे सामजिक आणि राष्ट्रीय इ बाबतीतले योगदान याचा पुरावा मागतोय, तो मात्र काही अजून मला मिळाला नाही, ही गोष्ट रोचक म्हणावी का? भरपूर आहेत. वेगळा धागा चालू करूयात का नवीन वर्गवारीच? पण त्याआधी खोटे आरोप मागे घेताका का सप्रमाण सिद्ध करता? (नुसते खटले वाचा वगैरे म्हणायचे नाही.)

In reply to by विकास

कडक प्रतिसाद सावरकर ह्या खटल्यातून निर्दोष सुटले तरी सूडबुद्धीने मणिशंकर ने त्यांचा पुतळा अंडमान मधून घालवला.

In reply to by नानासाहेब नेफळे

संपत Sat, 05/17/2014 - 14:52
कोंग्रेस आले तरी तेच होणार होते. अंबानीच्या डाव्या उजव्या खिशात भाजप कोंग्रेस आहेत.

In reply to by संपत

जाऊ द्या संपत साहेब ह्या लोकांना समजून न समजल्या सारखे करतात. खुद आप पार्टी ही अंबानी विरुद्ध अग्रवाल म्हणजे रिलायंस विरुद्ध वेदांत ह्यांच्या आद्योगिक लढाईचा परिपाक आहे. आता ह्यांच्यापैकी कोणाच्याही हातात तेल आहे की पहिले ह्यांचे खिसे फुगणार कशाला अंबानी वर जाळायचे मी तर दोन आठवड्यापूर्वी रिलायंस चे शेअर घेतले मज्जाणु लाइफ

In reply to by निनाद मुक्काम …

संपत Sun, 05/18/2014 - 10:19
म्हणजे रिलायंस विरुद्ध वेदांत ह्यांच्या आद्योगिक लढाईचा परिपाक आहे
आताच लोकसत्ता वाचलात वाटते :)

In reply to by संपत

तुम्ही सुद्धा वाचला वाटत. पण तुमचा ह्या सर्व गोष्टींवर कशाला विश्वास बसेल. आणि तो बसला किंवा नाही बसला तरी पुढील ५ बाकडे बडवत राहा. जयललिताने मोदींशी संवाद साधून केंद्र व राज्याची चांगले संबध ठेवण्यासाठी विनंती केली जी मोदी ह्यांनी मान्य केली. त्यामुळे आता पहिले राज्य चालविण्यासाठी व आता विरोधी पक्ष बनण्यासाठी ह्यांना आघाड्या कराव्या लागतील . आणि हो मी मटा सुद्धा वाचलाय,

विजुभाऊ Sat, 05/17/2014 - 12:31
१)लालुंचे विसर्जन झाले , २) जयललिता . ममता यांची राजकीय सौदेबाजी संपली. ३)सर्वात महत्वाचे म्हणजे शरदपवारांची चांगलीच गोची झाली. दोन डगरींवर पाय ठेवता ठेवता ते स्वतःचा तोंडघशी पडलेत. ४)छोट्या पक्षांचे राष्ट्रीय प्राबल्य कमी झाले. ५)मुलायम सिंगाना ज्या जागा मिळाल्या त्या बहुतेक त्यांच्या घरातल्या लोकानाच मिळाल्या आहेत. ( स्वतः दोन जागी , सून एका जागेवर , पुतणे दोन ठिकाणी ई.) मुलायमसिंगांचे उपद्रव मूल्य शून्यवत झाले. ६) अबू आझमी पुन्हा एकदा पडले. स्वाक्षरी : यूएस व्हिसा मिळवण्यासाथी गुजराथी माणूस कोणत्या खटपटी करेल सांगता येत नाही.

चावटमेला Sat, 05/17/2014 - 12:34
१. त्रिशंकू लोकसभा येवून नंबर गेम होईल तेव्हा आपल्या पारड्यांत काय काय पाडून घ्यायचे ह्यासाठी मनातल्या मनांत मांडे खात बसलेल्या जया अम्मा आणी ममता दीदी यांचा चांगलाच हीरमोड झाला २. केजरीवाल आता झाडूने स्वतःचेच घर झाडू लागला, आणि उडणार्‍या धूळीने त्याचा सुप्रसिध्द खोकला अजूनच वाढला बाकी, झालंच तर खोबरं तिकडं चांगभलं ह्या न्यायाने बर्‍याच इतर पक्षांतले संधिसाधू आता बेगडी मोदीप्रेम दाखवत भाजपाची वाट धरणार. असल्या मांजरांमुळं सच्च्या कार्यकर्त्यांवर अन्याय होवू नये हीच अपेक्षा.

विजुभाऊ Sat, 05/17/2014 - 12:49
चावटमेला काकू. त्रिशंकू लोकसभा आणि नम्बरगेम या वर आपल्या बारमातीच्या काकांची सगळी भिस्त होती. त्यांचे काय होणार आता?

तुमचा अभिषेक Sat, 05/17/2014 - 13:00
`ईस देश का कुछ नही हो सकता' म्हणत परदेशी पलायन करणार्‍या हुशार विद्यार्थ्यांचे प्रमाण कदाचित रोडावेल वा गेलेले परत येतील .. अर्थात त्या आधी मोदींनी दाखवलेले विकासाचे स्वप्न साकार होणे गरजेचे, यासाठी पाच वर्षे वाट बघूया.

In reply to by तुमचा अभिषेक

कदाचित परदेशात नोकरी करण्याच्या उद्देशाने जाणारे आता करलो दुनिया मुत्ठीमे मोड मध्ये परदेशात जातील. मोदींच्या राज्यात अनेक तरुण व छोटे , मोठे उद्योजक तयार होतील असा माझा कयास आहे,

गुजरातचे माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट वंझारा आता जेलमधून बाहेर पडतील व कदाचित दिल्लीत सी.बी.आय.मध्ये महत्वाच्या पदावर येतील. गुजरातचे माजी गृहंमंत्री हरेन पंड्या ह्यांचा खून नक्की कोणी केला हे पुढील पाच वर्षे तरी गुपीतच राहील.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आणि साध्वी सुद्धा , साला पाकिस्तानात तो हाफिज सैद मोकळा फिरतो , भारतात शीख दंगलीचे आरोपी मोकाट फिरतात , मग पुरोहित आदी प्रभूती मंडळींनी काय असे मोठे पाप केले आहे की विना खटला तुरुंगात खितपत पडायचे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी Tue, 05/20/2014 - 21:00
>>> गुजरातचे माजी गृहंमंत्री हरेन पंड्या ह्यांचा खून नक्की कोणी केला हे पुढील पाच वर्षे तरी गुपीतच राहील. त्यात काहीच गुपित नाही. हरेन पंड्यांच्या खुनातील आरोपींवर आरोप न्यायालयात ५-६ वर्षांपूर्वीच सिद्ध होऊन त्यांना शिक्षा सुद्धा मिळाली.

In reply to by श्रीगुरुजी

त्यांना शिक्षासुद्धा मिळाली
किती खोटं बोलाल श्रीगुरुजी??? हरेन पंड्या केसमधील आरोपी निर्दोष सुटलेले आहेत, पंड्यांचा मर्डर कुणी केला हे अजून गुपीतच आहे. जाणकारांनी गुगलून बघावे माहिती मिळेल. http://m.timesofindia.com/india/Haren-Pandya-murder-case-Gujarat-HC-acquits-all-accused/articleshow/9780920.cms

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Wed, 05/21/2014 - 20:39
या खटल्यातील १२ आरोपींवर २००७ मध्ये पोटा न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन त्यांना शिक्षा झाली होती.

बाळकराम Sat, 05/17/2014 - 15:00
सगळ्यात मोठा जो होइल, लगेच नाही पण काही दिवसानी, तो हा की मोदीप्रेमाचं आंधळं भगवं भरतं ओसरेल आणि लोक आपल्या कामधंद्याला लागतील ज्यातून अर्थव्यवस्थेला जरा चालना मिळेल. वातावरण जरा शुद्ध होइल. शेवटी पोटाची आग मिटल्याशिवाय "अच्छे दिन" नही आनेवाले है हे लोकांना कळेलच बहुधा. बाकी, राममंदिराची बांधणी, आसाराम बापूंना सन्मानपूर्वक तुरुंगातून मोकळे करुन उदार अंतःकरणाने आणखीन रेप करायची मोकळीक दिली जाणे हे किरकोळ साईड इफेक्ट्स तर पुढच्या १-२ महिन्यांत दिसतीलच, त्याचे काही एवढे विशेष नाही.

In reply to by बाळकराम

विकास Sat, 05/17/2014 - 16:23
शेवटी पोटाची आग मिटल्याशिवाय "अच्छे दिन" नही आनेवाले है हे लोकांना कळेलच बहुधा. सहमत. राममंदिराची बांधणी, आसाराम बापूंना सन्मानपूर्वक तुरुंगातून मोकळे करुन उदार अंतःकरणाने आणखीन रेप करायची मोकळीक दिली जाणे हे किरकोळ साईड इफेक्ट्स तर पुढच्या १-२ महिन्यांत दिसतीलच, त्याचे काही एवढे विशेष नाही. यातून अजूनही जुन्याच पध्दतीने विचार करत मोदींच्या राज्यात काय होईल असे वाटत आहे. जिंकण्यासाठी त्यांनी चाकोरीबाहेरचा विचार केला होता. आता तो विजय टिकवण्यासाठी देखील ते तसेच करतील असे वाटते. ज्या पध्दतीने गुजरातमधे ते लोकप्रिय झाले तसेच त्यांना भारतात होयचे असणार. आणि तशी महत्वाकांक्षा असणे चांगले कारण त्यानिमित्ताने काहीतरी घडेल. त्यांना ना धड कुटूंब, त्यामुळे फॅमिली डायनॅस्टी तयार करण्याचा प्रश्न नाही त्यामुळे मोदींच्या बाबतीत बाकी काही व्यक्तीगत स्वार्थ असण्याची शक्यता नाही.

In reply to by विकास

बाळकराम Sun, 05/18/2014 - 14:44
विकासजी, की मोदींना विकासच फक्त करायचा आहे हे घटकाभर खरं जरी धरलं तरी भाजपाभोवती असलेली संघ आणि विहिंप इ भुतावळ त्यांना तसे आणि तितक्या प्रमाणात करु देणार नाही हे ही तितकंच खरं. मोदींनी पहिली विजयसभा वाराणसीत आणि ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे.

In reply to by बाळकराम

आजानुकर्ण Sun, 05/18/2014 - 19:43
ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे.
संघाबाबतच्या तुमच्या मताशी सपशेल सहमत असलो तरी सध्या या पूजेपुरते मोदींना डिस्काऊंट द्यायला मी तयार आहे. विज्ञानाची कास धरणाऱ्या नेहरुंनीही त्यांच्या स्वतंत्र भारतातल्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ काशीविश्वनाथ पूजा करुन केला होता. (आंबेडकरांसह अनेकांनी त्यावर प्रखर टीका केली होती.) मात्र त्या पूजेमुळे नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला काही बाधा आल्याचे पुढे दिसले नाही. नव्या भारताचा पाया नेहरुंनी चांगल्या रीतीने घातला. मोदींपेक्षा मोदी मिनियन्स व इतर भुतावळीला आवरणे हे जास्त जिकीरीचे काम आहे असे सध्या तरी दिसते आहे. हे बहुमत कोणत्या मुद्द्यावर मिळाले याची स्वतः मोदींना चांगली जाणीव असावी आणि ते इमोशनल इश्यूजऐवजी विकासाचे प्रश्न सोडवतील अशी आशा आहे.

In reply to by आजानुकर्ण

बॅटमॅन Sun, 05/18/2014 - 23:06
पूजा केली काय किंवा नै काय, लोकांना बोलायचा हक्क नाही. हेच जर कुणा मौलानाचे आशीर्वाद घेतले असते तर सेक्युलरांनी भलामण केली असती. इस्रोचा अध्यक्षही देवळात गेला तरी कपाळशूळ उठणार्‍या लोकांची कीव येते. नाकर्ते अच्रत मेले!

In reply to by बॅटमॅन

आजानुकर्ण Mon, 05/19/2014 - 18:55
इस्रोचा अध्यक्षही देवळात गेला तरी कपाळशूळ उठणार्‍या लोकांची कीव येते.
इस्रोच्या अध्यक्षाने देवळात गेल्याची जाहिरात करणे चुकीचे आहे.

In reply to by आजानुकर्ण

बाळकराम Mon, 05/19/2014 - 15:57
ती पूजा कुठल्या उद्देशाने केली होती त्याबद्दल आहे. मोदींनी त्यापूजेतून पॉलिटिकल मायलेज मिळवण्याचाच उद्देशाने ती केली होती. देशाच्या इतर भागात विकासावर भर देणारा भाजपचा प्रचार यूपी आणि बिहारमध्ये राममंदिर, रामजन्मभूमी अशा गोष्टींवर केंद्रित झाला होता, त्या पार्श्वभूमीवर वाराणसीत पूजा करुन त्यांना काय साधायचे होते ते स्पष्टच आहे. आमच्या सारख्या असंख्य हिंदूंप्रमाणेच मोदींनाही त्यांचा धर्मपालन करण्याचा, पूजाविधी करण्याचा हक्क आहे. मग आमच्यासारखाच त्यांनीही घरात बसून साग्रसंगीत पूजा करावी, कोण काय म्हणतंय? उगा त्याचे प्रदर्शन कशाला?

In reply to by बाळकराम

बॅटमॅन Mon, 05/19/2014 - 15:58
चारचौघात पूजा करणे बेकायदेशीर नसेल तर या प्रतिसादाला आकांडतांडवाखेरीज अर्थ नाही.

In reply to by बाळकराम

arunjoshi123 Mon, 05/19/2014 - 16:46
बाळकरामजींची प्रवृत्ती असंतुष्ट घरलक्ष्मीसारखी आहे. म्हणे ८-९ वर्षे संघात काम केले, म्हणे बायको आजही करते. नि वर संघाच्या, भाजपच्या, मोदीच्या एकाही वागण्याचा चूकूनही एकही चांगला अर्थ काढायचा नाही. काय प्रकार आहे काही लक्षात आलं नाही.

In reply to by arunjoshi123

बाळकराम Mon, 05/19/2014 - 17:06
नीट वाचलेत तर लक्षात येइल की, माझा संघावरचा आक्षेप व्यक्तिगत स्वरुपाचा नाही. किंबहुना, माझे अनेक जवळचे मित्र आहेत जे संघात आहेत आणि वैयक्तिक पातळीवर अतिशय चांगले काम करतात. त्यामुळे संघीय सगळे वाईटच असं म्हणत नाहीच. संघाचे जे काही मर्यादित का होईना पण सामाजिक काम आहे त्याबद्दल त्यांचा आदरच आहे. दुसरे म्हणजे, भाजपा वा मोदी यांच्याबद्दलही मला व्यक्तिशः आकस नाही, किंबहुना मोदींसारखा अतिशय गरीब परिस्थितीतून आज पंतप्रधानपदी पोचलेल्या माणसाचे, त्यांच्या कष्टांचे मला कौतुकच आहे. त्यांचे सगळे विचार मला भलेही पटत नसतील, पण ते ठामपणे मांडण्यची, पद्धत, आत्मविश्वास या गोष्टींचे मला कौतुक आणि आदर आहे. याचप्रमाणे, भाजप अ‍ॅज अ पॉलिटिकल पार्टी, ते इतर राजकीय पार्ट्यांइतकेच चांगले वा वाईट आहेत. पण माझा मुख्य आक्षेप आहे तो संघाच्या राजकीय आणि सामाजिक विचारधारेबद्दल आणि त्यांच्या नैतिक श्रेष्ठत्त्वाच्या गंडाबद्दल. त्यांची व्हाईटर दॅन व्हाईट अशी जी प्रतिमा तयार केली जाते त्याला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे- संघाची अलोकशाहीक, एकचालकानुवर्तित्ववादी, सामाजिकदृष्ट्या असहिष्णू अशी वैचारिक बैठक भारतीय संविधानाच्या आणि भारतीय समाजाच्या मूळ बैठकीला छेद देउन जाते असे माझे संघात अनेक वर्षे काढून अनुभवांति झालेले मत आहे. आणि संघ त्याच्या मूळ सामाजिक ब्रीफच्या पुढे जाऊन जनमानसावर अतिक्रमण करायचा प्रयत्न करतो त्याची तुलना मी नित्शेच्या हिटलरवरील प्रभावाशी करीन. हा मूळ सैद्धांतिक दावा आहे.

In reply to by बाळकराम

मग केजुने गंगा स्नान प्रसार माध्यमांच्या साक्षीने कोणत्या उद्देशाने केले. हम करे तो साला केरेक्टेर ढिला हे मोदी प्रशासनात सुराज्य महत्वाचे , म्हणून त्यांच्या प्रशासनाचे हिंदू संघटनांची वाजले .

In reply to by बाळकराम

ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे. एखाद्याने जर आपल्या धार्मिक विश्वासाप्रमाणे काही कृती केली आणि तो हिंदू असला तर भुवया वर चढवणे आणि अहिंदू असला तर त्याची सेक्युलर म्हणून वाखाणणी करण्याची कांगावाखोर वृत्ती भारतात नवीन नाही. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत भारतातल्या सर्वसामान्य जनतेने अशी हायपोक्रसी फाट्यावर मारली आहेच. मात्र नेहमीप्रमाणे (अ)विचारवंतांना आपला इगो बाजूला ठेवून चूक सधारायला कठीणच जाणार आहे म्हणा ! =)) तेव्हा अनेक शुभेच्छा ! "धर्म / जात ही प्रत्येकाची खाजगी गोष्ट आहे" आणि "लोकशाहीत प्रत्येकाला (तो हिंदू असला तरीसुद्धा) आपापला धर्म पाळायची परवानगी आहे" ही सत्ये तथाकथित विचारवंतांनी स्विकारल्यास (कमीत कमी त्याची स्वतःची मानसिक) सुधारणा होईल हे ते कधी समजून घेणार ? मी स्वतः गंगापूजनाकडे, इफ्तार पार्टीकडे अथवा ख्रिस्मस सेलेब्रेशनकडे एका प्रवासी नजरेपेक्षा जास्त भक्तीभावाने पाहीन असे नाही. पण दुसर्‍या कोणी तसे केले तर मला त्याचा अधिकार मान्य असायला पाहिजे. हे खरा सेक्युलर असण्यासाठीच नव्हे तर चांगला प्रामाणिक माणूस असण्यासाठी आवश्यक आहे.

In reply to by बाळकराम

arunjoshi123 Mon, 05/19/2014 - 16:52
बाळकरामजी, मोदीचा धर्म त्याची व्यक्तिगत बाब आहे पण टीवी चॅनेल नाही. मोदी बिचारा काय करू शकतो?
धर्माच्या नावावर पॉलिटिकल मायलेज
आता मोदी मधे न आणता 'गांधीजींनी मी कट्टर हिंदू आहे' म्हणून आपल्या धर्माचा राजकीय लाभ घेतला नाही हे सिद्ध करा.

एम.जी. Sat, 05/17/2014 - 16:19
नारायणदादांचा मानसिक दृष्ट्या थकलेला चेहरा पहिल्यांदाच दूरदर्शनवर बघायची संधी मिळाली. कुमार केतकर प्रभृतींचे अडचण झाल्याचे दाखवणारे चेहरे बघण्याचाही लाभ मिळाला.

In reply to by वेताळ

संपत Sat, 05/17/2014 - 21:23
आम्ही गप्प कशाला बसू? आपच्या चार जागा आल्या, म्हणजे भाजपच्या पहिल्या निवडणुकीच्या दुप्पट :) दिल्लीत देखील सातही जागांवर प्रत्येकी ३ लाखांहून जास्त मते घेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली विधानसभेत बहुदा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून बसण्याची शक्यता आहे.

In reply to by संपत

सुहासदवन Sat, 05/17/2014 - 22:38
आपच्या चार जागा आल्या, म्हणजे भाजपच्या पहिल्या निवडणुकीच्या दुप्पट Smile दिल्लीत देखील सातही जागांवर प्रत्येकी ३ लाखांहून जास्त मते घेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली विधानसभेत बहुदा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता असली तरी राजधानी मुंबईत शिवसेनेने आपली सत्ता रा़खली पाहिजे हे जसं शिवसेनेला वाटतं ना तसच आप'ला देखील वाटायला हवं होतं, दिल्लीत मिळालेली सत्ता राखून. आता तर संपूर्ण देशात आणि दिल्लीत पण भाजपाची सत्ता आहे. अहो भारताच्या राजधानी दिल्लीत जिथे स्वबळावर ताठ मानेने बसावे लागले तिथे आता मान खाली घालून बसावे लागणार. स्वतःचं असलेलं जिथे सावरता आलं नाही तिथे आता दुसर्‍याला सावरा म्हणून कसं सांगणार?

In reply to by सुहासदवन

संपत Sat, 05/17/2014 - 22:59
शिवसेनेने मुंबईत सत्ता आता राखली. २००९ मध्ये काय झाले होते?आणि आप विधानसभेत दुसऱ्या नंबरवर होते आणि लोकसभेत देखील :)

हुप्प्या Sat, 05/17/2014 - 04:02
मोदींना अमेरिकेचा व्हिसा मिळू शकेल. ;-) (किंबहुना त्याकरताच हा नेत्रदीपक विजय त्यांनी मिळवला अशी कुजबूज आहे!)

In reply to by हुप्प्या

आजानुकर्ण गुरुवार, 05/22/2014 - 22:10
नवाज शरीफांनी निमंत्रण स्वीकारल्यास नमो लाटेच्या साईड इफेक्टमुळे त्यांना बिर्याणी खायला मिळू शकते. (नमोंनी पाकिस्तानशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याचे काँग्रेसचे धोरण पुढे चालू ठेवले याचा आनंद आहे. १६ मे नंतर पाकिस्तान नकाशातून गायब होणार होते असे काही ठिकाणी वाचले होते. सुदैवाने तसे काही होत नाही अशी प्राथमिक चिन्हे दिसत आहेत.)

In reply to by आजानुकर्ण

विकास गुरुवार, 05/22/2014 - 22:26
नवाज शरीफ ढोकळा खायला येत असतील आणि परत परत तीच बिर्याणी ती देखील गुज्जू स्टाईल मधली खायला लागल्यामुळे भारत-पाक संबंध परत बिघडायचे. नमोंनी पाकिस्तानशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याचे काँग्रेसचे धोरण पुढे चालू ठेवले याचा आनंद आहे. =)) काँग्रेसचे धोरण? गेल्या दहा वर्षात धोरण म्हणून काँग्रेसने काही केले असे म्हणण्यासारखी दुर्दैवाने अवस्था नाही. सगळा आनंदच होता. १६ मे नंतर पाकिस्तान नकाशातून गायब होणार होते असे काही ठिकाणी वाचले होते. मोदींच्या अथवा भाजपाच्या संस्थळावर वाचले होते का? नसल्यास "अफवांवर विश्वास ठेवू नये माणसांनी" इतकेच म्हणेन. :)

In reply to by विकास

आजानुकर्ण गुरुवार, 05/22/2014 - 23:09
गेल्या दहा वर्षात धोरण म्हणून काँग्रेसने काही केले असे म्हणण्यासारखी दुर्दैवाने अवस्था नाही.
दहा वर्षे काही केले नाही? शक्य आहे...त्यामुळेच २००९ च्या निवडणुकांमध्ये मूर्ख जनतेने काँग्रेसला तरीही निवडून दिले. मात्र २०१४ मध्ये जनता अचानक शहाणी झाली असावी. असो. येथील परंपरेनुसार अभ्यास वाढवा इतकेच म्हणेन. GDP School Defence Employment
मोदींच्या अथवा भाजपाच्या संस्थळावर वाचले होते का? नसल्यास "अफवांवर विश्वास ठेवू नये माणसांनी" इतकेच म्हणेन
मोदी आणि भाजपांनी काँग्रेसच्या बिर्याणी पॉलिटिक्सचा निषेध केला होता, मात्र आता कोलांटउडी मारून तेच धोरण पुढे चालू ठेवले आहे असे दिसते. (मुळात धोरण चांगले होते तर त्यावेळी टीकाच करायला नको होती असे वाटते. चांगले धोरण पुढे चालू ठेवल्याचा आनंद आहेच.) modi

In reply to by सुबोध खरे

थॉर माणूस Fri, 05/23/2014 - 15:23
जॉन स्टीवार्ट एक उत्तम कॉमेडीअन आहे. पण त्याने केलेल्या अमेरीकन हाऊसेस वरच्या सटायरीकल कमेंटला इथे क्वोट करण्यामागचे कारण कळले नाही.

पिवळा डांबिस Sat, 05/17/2014 - 09:55
भाजपामधल्याच जुन्या खोडांचे (आडवानी, जसवंतसिंग, मुमजोशी वगैरे) राजकीय विसर्जन झाले!!!! दे हॅव बिकम इररिलेव्हंट!!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रसाद१९७१ Mon, 05/19/2014 - 13:18
अडवाणींच्या खांद्यावर उभे राहुन कसला? आज जे मोदींना जमले ते बाजपाई आणि आडवाणींना २०-२५ वर्षा पूर्वी जमु शकले असते. पण ते अगदीच नालायक निघाले. बाजपाई तर काँग्रेस ची B Team असल्यासारखेच होते.

In reply to by पिवळा डांबिस

स्पंदना Sat, 05/17/2014 - 16:32
होय! नाही तर जावई रुसल्या सारखे हे ऐनवेळी मी पंतप्रधान होणार म्हणुन अडुन बसायचे.

In reply to by वेताळ

मदनबाण Sat, 05/17/2014 - 10:07
मायावती कुठे आहेत हो? हत्तीचे उभारलेले "पुतळे" मोजत बसल्या असतील ! आता वेळ घालवण्याचे तेच एक साधन उरले ना त्यांच्याकडे ! ;) बाकी... मोठ-मोठे माजलेले टोणगे-वळू या वेळी तबेल्यात गेले ते पाहुन फार बरे वाटले ! सर्वात महत्वाचे म्हणजे कॉग्रेसचा सुपडा साफ झाला ! सत्तेची मस्ती चढल्यामुळे त्यांच्या मग्रुरीला कोणतीच सीमा उरली नव्हती ! त्यांना त्यांची "योग्य" जागा दाखवुन दिल्या बद्धल हिंदूस्थानी जनतेचे आभार मानावे तितके कमीच आहे ! जनतेला विकास हवा आहे, आणि त्यासाठी ते उत्साहाने मतदान करुन सत्ता परिवर्तन घडवुन आणु शकतात हे आज जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीने दाखवुन दिले.

In reply to by मदनबाण

अर्धवटराव Sat, 05/17/2014 - 11:46
काँग्रेसला सत्तेची मग्रुरी नव्हती. किंबहुना आपलं तारु खडकावर आपटायच्या दिशेने चाललय हे काँग्रेसमधे ज्यांना कळायला हवं त्यांना कळत होतं. पण त्या तारुला योग्य दिशा देण्याचा वकुब असणार्‍यांना काँग्रेसने वापरलच नाहि. कंट्रोल होता नंबर मॅनेजर्स आणि तीसरी आघाडीचे वगैरे प्रयोगांवर विश्वास ठेवणार्‍या खुरट्या व्यक्तींकडे. काँग्रेसचा डाव स्वतःच्या कुवतीवर नव्हता. त्यांना आशा होति ति विरोधकांच्या फुटीची. त्यांच्या दुर्दैवाने आणि भारताच्या सुदैवाने डोळे मिटुन दुध पिणार्‍या बोक्याला मतदारांनी ओळखले व कचकचुन कमरेत लाथ घातली बोक्याच्या. परिणाम दिसतोच आहे.

In reply to by अर्धवटराव

मदनबाण Mon, 05/19/2014 - 07:22
काँग्रेसला सत्तेची मग्रुरी नव्हती. हॅ.हॅ.हॅ... असं कसं म्हणता अर्धवटराव ? त्यांच्या सर्व प्रवक्त्यांची विधाने / भाषा कधी ऐकलीच नाहीत का तुम्ही ? लोक बोफोर्स घोटाळा विसरले, कोलगेटही विसरतील ! हे "गॄहमंत्री" सुशील कुमार यांचे वक्तव्य लक्षात आहे का ? मौत का सौदागर असा मोदींचा उल्लेख करुन सोनिया गांधींनी सगळ्यात खालच्या पातळीचा प्रचार करुन दाखवला. शिवाय राज बब्बर यांचे १२ रुं पोटभर जेवण मिळते हे विधान देखील विसरलात की काय ? शिवाय तो वायझेड दिग्गीराज पिसाळलेल्या कुत्र्या सारखा सगळीकडे तोंडाला काही येइल ते बरळत सुटला होता, त्याला कॉंग्रेस मधल्या कुणालाच आवरावेसे का वाटले नाही ?{ ओसामा बिन लादेन ला ओसामाजी म्हणणारा वायझेडच म्हंटला पाहिजे} ही सगळी दिर्घकाळ सत्ता हातात असल्यामुळे आलेली मग्रुरीच होती. कोणावरही कुठलेही आरोप करत सुटले होते, गडकरींवर देखील असे आरोप करणारे मनिष तिवारी यांना बिनशर्त माफी मागावी लागली होती. मनिष तिवारी आणि कपिल सिब्बल यांनी अण्णा हजारेंच्या बाबतीत बोलताना असभ्य आणि एकेरी उच्चारण केले होते, त्यावर बीजेपीच्या सुशमा स्वराज यांनी त्यांना २ शब्द व्यवस्थित सुनवले होते.

In reply to by मदनबाण

अर्धवटराव Mon, 05/19/2014 - 10:32
फुकटचं खाय त्याला स्वस्त महाग काय... हि मग्रुरीची भाषा, बेताल वाचाळता काँग्रेसमधल्या फुकट्यांची होती. जे लोकं घाम गाळुन काँग्रेसकरता मतांची बेगमी करायचे त्यांना काँग्रेसच्या चुका कळत होत्या. पण राणि, राजपुत्र आणि प्रधान पक्षहितापेक्षा घराणेशाहिला महत्व देताहेत म्हटल्यावर निवडणुकांची रणनिती घराण्याचा करिश्मा आणि विरोधकांच्या चुका या दोनच घटकांवर मर्यादीत राहिली. असो.

In reply to by अर्धवटराव

मदनबाण Mon, 05/19/2014 - 15:41
ह्म्म... इथे फक्त फुकट्यां ऐवजी प्रामाणिक / वफादारपणे चाटुगिरी करणारे असे म्हणीन ! जे मन लावुन तळवे चाटतात ते पदास पात्र होतात असे साधे सोपे गणित आहे... मग मड्डम सॉरी सॉरी हाय कमांड ने सांगितले ते फॉलो करा ! सुशील कुमार शिंदे यांनी गॄहमंत्री होताच त्यांचे विधान होते :- "The Gandhi family has always taken care of the welfare of backward castes. Dalits can also take bigger responsibility. The home ministry is a critical ministry. I have performed in the past and I will again prove through my work as the home minister," संदर्भ :- Shinde thanks Sonia, PM for giving a 'Dalit' home ministry म्हणजे वफादारी और दलित कार्ड २ नो एकसाथ ! बरं आपल्या देश मातेचे इतके कौतुक केल्यावर राजपुत्र ? कसे स्वस्थ बसतील ? तेही लगेच शिंदे काकांना भेट देण्यास पोहचले. ;) संदर्भ :- Rahul Gandhi visits Shindes for dal-chawal after Sushil Kumar Shinde proclaims his dalit heritage बरं आपण देशाचे गॄहमंत्री या पदावर आहोत याचे भान न-ठेवता,आरएसएस आणि बीजेपी हे भगवा दहशदवाद पसरवत आहेत असा अजब शोध लावुन बसले.बरं इतक्यावर हे गॄहमंत्री थांबले नाहीत तर आमच्या विरुद्ध वार्तांकन करणार्‍या मिडियाला आम्ही चिरडुन टाकु अशी धमकी देउन मोकळे झाले. होम मिनिस्ट्री इज क्रिटीकल मिनिस्ट्री असे मोठे विधान करणारे असं कसं वागु शकतात ? संदर्भ :- RSS, BJP camps promoting Hindu terror: Sushilkumar Shinde Sushil Kumar Shinde’s threat: Will crush ‘elements’ in media plotting against Cong ही तर काही ठराविक उदा. झाली पण दिग्गीरांजां सारख्या मर्कटालाही सुशील कुमार शिंदे यांनी मागे टाकले आहे याची कल्पना आपल्या असेल-नसेल म्हणुन सांगतो... मुंबई हल्ल्याच्या कटाचा मुख्य सुत्रधार असणार्‍या हाफिद सइदचा मिस्टर हाफिद सइद आणि श्री.हाफिद सइद अशी विशेषण लावुन त्यांना उपकॄत केले. देशाचा गॄहमंत्रीच जर तुमच्या देशावर हल्ला करणार्‍याला अश्या उपाधी लावत असेल तर त्यांच्या "धर्मनिरपेक्षतेची" खात्री सार्‍या जगालाच पटेल नाही ? संदर्भ :-For home minister Shinde, Hafiz Saeed is 'Mr' and 'Shri' आणि अधिक हवे असेल तर इकडे :- Sushilkumar Shinde's GOOF UPs! When Sushilkumar Shinde was in news for wrong reasons जाता जाता :- इतके बेताल वक्तव्य इतक्या महत्वाच्या पदावर बसलेली व्यक्ती कसा करु शकतो ? अर्थातच...कारण समजले असेलच तुम्हाला.बादवे :- पॄथ्वीबाबा पण मड्डम्म... सॉरी सॉरी हायकंमाडची वाट बघत आहेत म्हणे.

कपिल सिब्बल आणि सलमान खुर्शिद दिसणार नाहीत आता संसदेत!!!! लालु चारा खायला मोकळा विरोधी पक्ष म्हणून काम कराव इतके पण खासदार कोंग्रेस कडे नाहीत अरविंद केजरीवाल आता कुठे धरण्यासाठी बसायच याचा विचार करत असतील.

In reply to by मृणालिनी

भृशुंडी Wed, 05/21/2014 - 01:33
अमेरिकादेखील माफी मागायला येतेच आहे. चीन मोदींना भिऊन दडी मारून बसलाय.. पाकिस्तान तर लपाछुपीच खेळतोय.. नाही का?

In reply to by भृशुंडी

पैसा Wed, 05/21/2014 - 12:09
ते त्या निकालांच्या दिवशी पाकिस्तान हूं की चूं न करता गप्प बसले त्यासाठी होतं. शेवट ते पाकिस्तान आहे. गप्प थोडेच बसणार? आपले रंग दाखवायला सुरुवात केलीच आहे परत त्यांनी.

आता मिपावर आंधळ्या पार्टीप्रेमाने आणि विनोदाने ओतप्रोत भरलेले लेख आणि प्रतिसाद वाचण्याला मुकणार की हो आम्ही :( :) ;) ते लेखकु लोगा ड्युआयडी काढणे शक्य केल्याने मिपाचे शतशः आभार मानत असणार (मनातल्या मनात) =))

अर्धवटराव Sat, 05/17/2014 - 11:58
काँग्रेसला गरज आहे एखाद्या यशवंतराव चव्हाणाची. तसा शोध कदाचीत आता सुरु होइल. अन्यथा काँग्रेसने निर्माण केलेली राजकीय पोकळी भारतीय राजकारणाला धक्के देत राहिल व त्यात आर.एस.एस चा विशेष फायदा होइल. आजीवन प्रचारकांच्या नोंदींची लाट उसळेल आता संघ कार्यालयात. हिंदु धर्मातल्या उच्चनीचतेच्या जातीबंधांवर सकारात्मक, सूप्त आणि लाँगटर्म परिणाम करेल मोदि इफेक्ट.

In reply to by अर्धवटराव

विकास Sat, 05/17/2014 - 16:37
काँग्रेसला गरज आहे एखाद्या यशवंतराव चव्हाणाची. तसा शोध कदाचीत आता सुरु होइल. अन्यथा काँग्रेसने निर्माण केलेली राजकीय पोकळी भारतीय राजकारणाला धक्के देत राहिल व त्यात आर.एस.एस चा विशेष फायदा होइल. सहमत. पण काँग्रेसला गांधी घराणे संपले आहे आणि एकूणच घराण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते. (अर्थात डाव्या विचारवंतांच्या मदतीने). पण संघाचे उद्दीष्ट सामाजीक आणि राष्ट्रीय आहे, तर काँग्रेसचे उद्दीष्ट हे केवळ राजकीय आहे (तसे असण्यात कहीच चूक नाही, पण ते कसे वापरले जाते यावर सगळे ठरते.) . पण थोडक्यात दोन विभिन्न गोष्टी आहेत. संघाला किमान प्रत्यक्षपणे काँग्रेसचे काही पडलेले नाही असे मला वाटते. आजीवन प्रचारकांच्या नोंदींची लाट उसळेल आता संघ कार्यालयात. प्रचारक होयला पब्लीक येईल असे म्हणायचे आहे का? तेव्हढे सोपे नाही, अगदी कुणाची इच्छा असली तरी होणे हे नुसते रजिस्ट्रेशन करण्याइतके सोपे नाही. इतकेच तुर्तास म्हणतो. :)

In reply to by विकास

संपत Sat, 05/17/2014 - 19:38
गांधी घराणे संपले आहे
राजकारणात एका पराभवाने कोणी कायमचे संपत नसते. इथे तर प्रियांका अजून शिल्लक आहे.
काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते
कोंग्रेसने ते केले असे वाटत नाही. संघाचे विचार स्पष्ट आहेत. जर तुमच्या वैचारिक घडणीला 'हिंदुस्तान हिन्दुओ का' पटत असेल तर संघाच्या विचारसरणी पटणारच. पण हा विचार जर व्यापक देशहितासाठी धोकादायक वाटत असेल तर संघाला विरोध राहणारच.
कुणाची इच्छा असली तरी होणे हे नुसते रजिस्ट्रेशन करण्याइतके सोपे नाही
सहमत.

In reply to by संपत

प्रियांका लावो ,पार्टी बचाव प्रियांका इज इंडिया तिचा राजकारणातील अनुभव फक्त आईचा व भावाचा प्रचार करते व तेव्हाच जनतेपुढे येते ,मात्र ती राजघराण्यातील आहे व देश तिच्या घर्राण्याला दत्तक दिला आहे. तिचा पक्ष भले गफलेबाज असेल , नाकर्ता असेल तरी तो सेक्युलर आहे तेव्हा त्यांना मते द्या तूर्तास अर्णव ने तिची मुलाखत आपल्या कायक्रमाच्या वेळी घेऊ नये अशी कपिल ने त्यास विनंती केली आहे. एक म्यान मे दो तलवार ....

In reply to by संपत

विकास Sun, 05/18/2014 - 06:04
राजकारणात एका पराभवाने कोणी कायमचे संपत नसते. इथे तर प्रियांका अजून शिल्लक आहे. दोन्ही वाक्यांशी सहमत. माझ्या मूळ वाक्यात लिहीताना गडबड झालेली दिसते... कारण वाक्याच्या शेवटी मला जे म्हणायचे ते आहे स्पष्ट होते: "(काँग्रेसला)...एकूणच घराण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. " संघाचे विचार स्पष्ट आहेत. जर तुमच्या वैचारिक घडणीला 'हिंदुस्तान हिन्दुओ का' पटत असेल तर संघाच्या विचारसरणी पटणारच. 'हिंदुस्तान हिन्दुओ का' असे संघाच्या विचारात मी कधी ऐकलेले नाही. किंबहूना संघाच्या नावात देखील हिंदू हा शब्द नाही ... संघाच्या प्रार्थनेत जी प्रत्येक स्वयंसेवक शाखेच्या शेवटी प्रतिज्ञा घेतल्यासारखी म्हणतो त्यात देखील हे शब्द येत नाहीत. तुम्ही जे म्हणता ते तुमचे स्युडोसेक्यूलर अथवा डाव्या विचारवंतांनी गेली अनेक दशके लेखन आणि भाषणातून केलेल्या ब्रेनवॉशिंगमुळे म्हणत आहात. हे म्हणजे "संघाचा गांधीद्वेष जगजाहीर आहे", असे म्हणण्यासारखे झाले... :) त्याला काही बेसीस नाही. :(

In reply to by विकास

संपत Sun, 05/18/2014 - 10:14
मी स्वतः संघाच्या शाखेत गेलो आहे. खेळताना, शाखा संपताना, बौधीकानंतर ही घोषणा दिली जात असे. गोळवलकरांचे विचारधन हे पुस्तक संघ विचारांचे सार समजले जाते. त्यातही हिंदुराष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मांडली आहे.

In reply to by पिशी अबोली

संघात हिंदुत्ववाद हा शब्द मी ऐकला आहे. पण आजपर्यंतच्या २९-३० वर्षात हिंदुराष्ट्राच्या जयाबद्दलची घोषणा कधीही ऐकली नाही. किंबहुना महाराष्ट्रात जिथे जिथे शाखेत गेलो आहे तिथेही ऐकली नाही. अर्थात हिंदूराष्ट्र होऊ नये अशी माझी इच्छा नाही असे नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

संपत Sun, 05/18/2014 - 13:01
हिंदुराष्ट्राच्या जयाबद्दल नाही हो..'हिन्दुओ का हिंदुस्थान' अशी घोषणा होती ती.. दादर आणि लालबाग ह्या दोन भागातील शाखाना मी गेलो होतो.

In reply to by पिशी अबोली

संपत Sun, 05/18/2014 - 12:58
आम्हाला बुवा सांगायचे घोषणा द्यायला.. दादर आणि लालबागच्या शाखांमध्ये.. राष्ट्रासेविकाना घोषणा द्यायला नाही सांगायचे वाटते?

In reply to by पिशी अबोली

संपत Sun, 05/18/2014 - 13:15
तुम्ही दोघेही संघाशी संबधित आहात असे दिसतंय (पिशि मावशी अर्थात राष्ट्रीय सेविका समितीत असतील, कारण माझ्या आठवणीत संघ शाखात मुलीना प्रवेश नव्हता), मग विचारधनबद्दल मी म्हटले तेही खोटे आहे काय? जालावर त्याची प्रत सापडली असती तर दुवा दिला असता.

In reply to by संपत

चौकटराजा Sun, 05/18/2014 - 13:31
मी संघात चारेक वर्षे तरी गेलेलो आहे. संघात मुसलमानांविरूद्ध वा बौधाविरूद्ध व ख्रिश्चन विरोधी काही मला शिकवल्याचे आठवत नाही. हिंद्र्राष्ट्र ही कल्पना १९६२ चा सुमारास ऐकल्याचे आठवते पण आता इतक्या वर्षानी समावेशकता हा हिंदू संकृतीचा एक मोठा गुण आहे हे संघवाल्याना पटले असावे. संघाने अनेक उत्तम कामे केल्याचे भूतकाळात दिसले आहे तसे समाजवादी वा कॉग्ग्रेस यानी केल्याचे दिसलेले नाही. जसे अमेरिकेला " पैसा" ही एकच संस्कृति दिसते तशी काहीही करून सत्ता ही कोंग्रेस संस्कृति आहे. आजच विनय सहस्त्रबुद्धे यानी संघाची एक मुस्लीम सेल स्थापित झाल्याची माहिती दिली आहे .

In reply to by चौकटराजा

संपत Sun, 05/18/2014 - 13:56
संघाने अनेक उत्तम कामे
सहमत. विशेषतः संघ स्वयंसेवकांनी चालवलेल्या अनेक संस्था उत्तम काम करतात ह्यावर माझा विश्वास आहे. मी स्वतः अनेक आदरणीय व्यक्तींना ओळखतो. संस्थाना मदत करताना त्या संघप्रणीत असतील तर मी विनियोगाब्द्दल अधिक निशंक असतो. पण माझा विरोध मूळ संघ तत्वांना आहे. ती केवळ मला पटणारी नाहीत म्हणून नसून ती देशाला विघातक आहेत अशी माझी बाबरी मस्जिद आणि त्यानंतर झालेल्या मुंबईमधील दंगली अतिशय जवळून पहिल्याने झालेली समजूत आहे.चुकीच्या तत्वांवर विश्वास ठेवणारी चांगली माणसे असे माझे संघाबद्दल मत आहे. (हे मत फक्त संघाबद्दल असून भाजपमधले लोक हे पक्के राजकारणी आणि चालू असतात. संघातून आयात केलेल्यांचा थोडाफार अपवाद.)
संघात मुसलमानांविरूद्ध वा बौधाविरूद्ध व ख्रिश्चन विरोधी काही मला शिकवल्याचे आठवत नाही.
आयला, म्हणजे मी ज्या शाखात गेलो फक्त तिथेच असे शिकवायचे काय? म्हणजे उघड संघ शाखेत मुसलमान विरोधी काही बोलले नाही तरी हिंदू राष्ट्राची भलावण चालायचीच.शाखा संपल्यानंतर मात्र दादा किंवा भैय्या स्पष्ट शब्दात आपल्या भावना मांडायचे. मला आलेला अनुभव स्थळसापेक्ष असेलही पण गोळवळकरांचा पुस्तकांचे काय? अर्थात आता संघ बदलला असेल अशी शक्यता असली तरी माझा विश्वास बसणे कठीण आहे.

In reply to by संपत

प्यारे१ Sun, 05/18/2014 - 14:07
हिंदूराष्ट्र म्हणत असावेत पण हिंदू कुणाला म्हणतात संघ वाले ते पण बघा. अवांतरः इथे अल्जिरिया मध्ये लोक इन जनरलच इन्डियन म्हणजे 'हिन्दू' असंच बोलतात. प्रश्न विचारताना 'हिन्दु?' असा अस्तो.

In reply to by प्यारे१

मिलिंद बोडस Wed, 05/21/2014 - 13:36
मी मोरोक्कोमधे वर्षभर होतो. तिथेही Indian म्हणजे हिंद असंच म्हणतात. पण त्यांच्या दृष्टीने भारतीय जर मुसलमान नसतील तर ते बौद्ध असतात. भारतीय म्हणजे बौद्ध हे समीकरण आहे इथे. आणि मी बौद्ध नाही हिंदू आहे असं सांगितल्यावर " Hindoo?? What is that? Is it a religion? असा प्रश्न सर्वसामान्यपणे विचारला जायचा. त्या धक्क्यातून मी अजून सावरलो नाहीये.

In reply to by मिलिंद बोडस

चौकटराजा Wed, 05/21/2014 - 16:59
हिंदू मुस्लीम द्वेष फक्त भारतात आहे. १८८५ साली कॉंगेस जन्माला आली अन १९२५ साली आर एस एस या काळात ( ४० वर्षात) असा कोण नेता कारणीभूत झाला यामुळे हा द्वेष पसरला ?

In reply to by संपत

बाळकराम Sun, 05/18/2014 - 14:36
देशाला विघातक आहेत अगदी बरोब्बर संपत जी. चुकीच्या तत्वांवर विश्वास ठेवणारी चांगली माणसे असे माझे संघाबद्दल मत आहे सहमत आहे, मी देखील अनेक निरलसपणे, नि:स्वार्थीपणे चांगली कामे करणारी लोक बघितली आहेत, माझे अनेक जवळचे मित्र संघवाले असून वैयक्तिक पातळीवर उत्तम प्रकारे समाजसेवा करतात. पण संघतत्त्वे ही घातक, दुभाजक आहेत याबद्दल शंका नाही.

In reply to by चौकटराजा

विकास Mon, 05/19/2014 - 04:40
२००२ साली तत्कालीन सरसंघचालक सुदर्शनजींच्या सुचनेप्रमाणे मुस्लीम राष्ट्रीय मंच ची स्थापना केली गेली. त्याचे कां इंद्रेश कुमार यांच्याकडे देण्यात आले होते. त्याच्या आधी सुदर्शनजींच्या आणि संघाच्या इतर कार्यकर्त्यांच्या मुस्लीम नेतृत्वाबरोबर देखील बैठका झाल्या होत्या असे वाचल्याचे आठवते. मात्र नंतर गोध्रा घडले पाठोपाठ दंगली उसळल्या आणि जा मंच जरा मागे फेकला गेला. पण नंतर परत त्याचे स्थान तयार होऊ लागले. अशा वेळेस संघातून जी व्यक्ती मुस्लीम समुदायास जवळची वाटू लागली होती तिच्या म्हणजे इंद्रेशकुमारांच्या सभोवताल अजमेर बाँबचे संशयाचे वातावरण तयार केले गेले. आरोपपत्र कधीच ठेवले गेले नाही. पण त्यातून डाव्या विचारवंतांना अजून भेद करण्याची संधी दिली गेली. अर्थात असे किती दिवस फसवता येणार... मग ते सगळे मागे पडले. नंतर तेच इंद्रेश कुमार मोदींच्या प्रचारासाठी वाराणसीत मुस्लीम राष्ट्रीय मंच आणि मुस्लीम महीला फाउंडेशन बरोबर काम करत होते. बाकी आता इतिहास आहे.

In reply to by संपत

पिशी अबोली Sun, 05/18/2014 - 21:30
अहो संपतकाका, मी तुम्हाला काय विचारले ते बघता का ज़रा? बौद्धिकानंतर अशी घोषणा व्हायची का? बाकी इथे आधीच कुणीतरी सांगितल्याप्रमाणे 'हिन्दू' ची व्याख्यासुद्धा बघावी आधी. आणि संघ आणि संघप्रणित संस्थांमधे काम करणारे मुस्लिम/ ख्रिश्चन कार्यकर्ते तुम्ही कधीच पाहिले नाहित का?

In reply to by प्रीत-मोहर

संपत Sun, 05/18/2014 - 23:43
तुम्ही दोघीं संघाच्या कुठल्या शाखेला गेल्या होत्या याचे कुतुहुल आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे अजूनही संघात स्त्रियांना प्रवेश नाही.(चू भू द्या घ्या)

In reply to by पिशी अबोली

संपत Sun, 05/18/2014 - 23:45
जरा मलाही समजावून सांगा कि संघाची हिंदूची व्याख्या. म्हणजे मला जर रामाबद्दल आदर नसेन तर संघ मला हिंदू मानेल का?

In reply to by संपत

पिशी अबोली Mon, 05/19/2014 - 00:33
तुम्ही बौद्धिकांबद्दल बोलताय न? जाहीर बौद्धिक म्हणून एक प्रकार असतो. त्याला महिलांना प्रवेश असतो. याव्यतिरिक्त मी समितीच्या मालवण, गोवा, पुणे अशा कमीत कमी तीन ठिकाणी शाखांना गेलेली आहे. प्रश्न हिंदूच्या व्याख्येचा. मला तुमचा दुवा आत्ता पाहता येत नाहिये. पण त्यावर खरोखर श्रीगुरुजींचे विचार दिलेले असतील, तर तुम्हाला याचे उत्तर तिथेच मिळावे..

In reply to by पिशी अबोली

संपत Mon, 05/19/2014 - 01:11
जाहीर बौद्धिक नाही हो.. रविवारी सकाळी खास शाखा भरायची.तिथे कुणी महनीय आदरणीय वगैरे व्यक्ती (म्हणजे आसपासची किंवा बाजूच्या शाखेतील) बौद्धिक द्यायची :). हे पुस्तक मी पूर्वी वाचले आहे. त्यावेळी राम जन्मभूमी, शहाबानो इत्यादी विषय गाजत असल्याने ह्या पुस्तकाच्या अनुषंगाने चर्चाही ऐकल्या आहेत. मला माझे उत्तर मिळाले आहे.त्या पुस्तकात दिलेल्या व्याखेच्या अनुषंगानेच मी हा प्रश्न विचारला आहे. बाकी तुम्ही हे पुस्तक वाचले नाही याचे आश्चर्य वाटते (खरच, उपरोध नाही). हे पुस्तक जवळपास कंपल्सरी रीडिंग होते. प्रचारक स्वताहून ह्याची प्रत फुकट वाटत असत. अवांतर : विंदांची पिशी मावशीची पिलावळ अशी कविता आहे बहुतेक.म्हणून माझा तुमच्या नावाबाबतीत गोंधळ उडाला असावा.

In reply to by पिशी अबोली

संपत Sun, 05/18/2014 - 23:55
मी चुकून तुमचा आयडी पिशि मावशी असा वाचला होता त्यामुळे तसे संबोधित होतो. चुकीबद्दल क्षमस्व.

In reply to by संपत

विकास Mon, 05/19/2014 - 00:31
मी ही घोषणा कधी ऐकलेली नाही. संघात बौद्धीकानंतर घोषणा देणे हा प्रकारच अस्तित्वात नाही. किंबहूना त्यांच्या शाखा पध्दतीत नाही. खेळताना घोषणा दिल्या जातात पण त्यात देखील ही मी ऐकलेली नाही. गोळवलकरांचे विचारधन हे पुस्तक संघ विचारांचे सार समजले जाते. त्यातही हिंदुराष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मांडली आहे. तुम्ही ते पुस्तक वाचून सांगत आहात का त्यावर केलेली डाव्या विचारवंतांची पोकळ विधाने वाचून सांगत आहात? थोडक्यात त्यांनी नक्की काय म्हणले आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे?

In reply to by विकास

संपत Mon, 05/19/2014 - 01:25
दुवा वर दिला आहे. तुम्ही स्वतः वाचू शकता.पुस्तकात हिंदू राष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मंडळी आहे. हिंदू राष्ट्रात इतर धर्मियांना स्थान असेल पण त्यांनी आपला धर्म स्वतःपुरता ठेवावा. हिंदुच्या संस्कृती आणि देवांचा आदर करावा. पण हे मुस्लीम / ख्रिश्चनाना जमणार नाही असेही म्हटले आहे. गोळवलकरांचे संघातील स्थान लक्षात घेता ते त्यांचे वैयक्तिक विचार होते, संघाचे नव्हते अस काहीतरी कृपया बोलू नका.

In reply to by संपत

विकास Mon, 05/19/2014 - 04:17
दुवा वर दिला आहे. तुम्ही स्वतः वाचू शकता. मी वाचला आहे पण तुम्ही नक्की काय वाचले हे समजत नाही... म्हणून बंच ऑफ थॉट्स मधले हिंदूराष्ट्र आणि अल्पसंख्य संदर्भातील वाक्य इथे चोप्य पस्ते करत आहे. त्यातून नक्की तुम्हाला काय अर्थ लागतो ते बघा... So, all that is expected of our Muslim and Christan co-citizens is the shedding of the notions of their being 'religious minorities' as also their foreign mental complexion and merging themselves in the common national stream of this soil. As far as the national tradition of this land is concerned, it never considers that with a change in the method of worship, an individual creases to be the son of the soil and should be treated as an alien. Here, in this land, there can be no objection to God being called by any name whatever. Ingrained in this soil is love and respect for all faiths and religious beliefs. He cannot be a son of this soil at all who is intolerant of other faiths.

In reply to by विकास

पिशी अबोली Mon, 05/19/2014 - 07:17
हेच म्हणायचे होते. मी जेवढं लिखाण वाचलंय, ऐकलंय, त्यात 'मुस्लिमांना हाकला, त्यांचे धर्मान्तर करा टायप कधीच ऐकल्याचं आठवत नाही.

In reply to by विकास

संपत Mon, 05/19/2014 - 12:10
संघाची हिंदुत्वाची आणि हिंदू राष्ट्राची भूमिका सर्वसमावेशक आहे कि नाही हा वेगळा चर्चेचा विषय आहे. मी वर म्हटल्याप्रमाणे तुमच्या वैचारिक घडणीप्रमाणे ते तुम्हाला योग्य वाटेल किंवा नाही. पण संघाचा आणि हिंदुत्वाचा संबंध नाही, ते डाव्यांचे ब्रेन वाशिंग आहे हा तुमचा गैरसमज दूर झाला असेल अशी अशा.

In reply to by संपत

पिशी अबोली Mon, 05/19/2014 - 13:03
संघाचा आणि हिंदुत्वाचा संबंध नाही
असं कुणी आणि कुठे म्हटलं? माझा मूळ प्रश्न अगदी साधा सरळ होता. बौद्धिकानंतर घोषणा दिली जात नाही हे मला माहीत आहे. ते कुठे होत असेल तर माझ्यासाठी मोठीच आश्चर्याची गोष्ट आहे. त्यातही 'हिंदुओं का हिंदुस्तान' ही घोषणा तर शाखेवरसुद्धा होत नाही (माझ्या घरात संघाची शाखा काही काळ तरी भरायची, त्याशिवाय मी समितीच्या शाखेत गेलेय/जाते हा भाग वेगळा) राहता राहिलं हिंदुत्व. 'हिंदुत्व इज अ वे ऑफ लाईफ' हे आता सांगायचापण कंटाळा आलाय. हिंदुत्व म्हणजे मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे शिरकाण नव्हे, तर सर्वांना सामावून घेण्याची एक जीवनपद्धती हे तुम्ही ऐकलेल्या कुठल्याच बौद्धिकात सांगितले नसेल तर ती माझ्यासाठी अजून एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे, किंबहुना असे होणे फारच कठीण. तुम्ही दिलेला दुवा आत्ताच पाहिला. काल उघडता येत नव्हता म्हणून मला नक्की कळतच नव्हतं की तुम्हाला असं काय सापडलं त्यात की संघ बिगरहिंदूंना कसा घातक याबद्दल तुमची खात्री पटली. कारण श्रीगुरुजींचे विचार मी वाचले आहेत. आत्ता दुवा बघूनही कळत नाहीये की तुमचा आक्षेप नेमका कशाला आहे.

In reply to by पिशी अबोली

संपत Mon, 05/19/2014 - 14:44
तसे विकास म्हणत होते,तुम्ही नाही.
सर्वांना सामावून घेण्याची एक जीवनपद्धती
मी तुम्हाला वर विचारल्याप्रमाणे जर का मला रामाबद्दल आदर नसेल तर मी हिंदुराष्ट्रात राहू शकीन का? उत्तर नकारार्थी आहे. म्हणजे मी जरी भारताचा नागरिक असलो आणि कुठल्याही प्रकारे देशाला धोका नसलो तरीदेखील मी हिंदू संस्कृतीचा आदर करत नसल्याने हिंदू राष्ट्रात राहण्याच्या लायक नाही. थोडक्यात हिंदू राष्ट्रात इतर धर्मियांना उदार अंत:कारणाने राहू दिले जाईल, पण त्यांनी औकातमध्ये राहावे(जे बहुतांश मुस्लीम राष्ट्रांचे इतर धर्मियांबद्दल धोरण आहे.)

In reply to by संपत

विकास Mon, 05/19/2014 - 16:04
मला रामाबद्दल आदर नसेल तर मी हिंदुराष्ट्रात राहू शकीन का? उत्तर नकारार्थी आहे. हे देखील तुम्हाला कोणी कानात सांगितले का? कारण मी कधी ऐकलेले नाही. रामावर कडक टिका करणारे आंबेडकर हे संघाच्या प्रातःस्मरणात आहेत हे कदाचीत आपल्याला माहीत नसेल.

In reply to by संपत

विकास Mon, 05/19/2014 - 16:02
संघाची हिंदुत्वाची आणि हिंदू राष्ट्राची भूमिका सर्वसमावेशक आहे कि नाही हा वेगळा चर्चेचा विषय आहे. वेगळा कसा काय? "हिंदूस्तान हिंदूओंका" असली कधी शाखेत न ऐकलेली घोषणा तुम्ही सांगता ज्यातून संघ सर्वसमावेषक नाही आणि संघ धोकादायक आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करता. मग त्यावर प्रश्न विचारले की, आधी बौद्धीकानंतर, मग नेहमीची शाखा नाही, रविवारची शाखा (हा काय प्रकार आहे? भारतात असे काही नसतेच) म्हणणार... मग त्याच वाक्याचे समर्थन करताना गुरूजींच्या पुस्तकाला मधे आणून "त्यातही हिंदुराष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मांडली आहे. " असे म्हणणार... त्यावर उत्तर म्हणून गुरूजी काय म्हणाले आहेत हे पुस्तकातल्या उतार्‍यानेच दाखवल्यावर आणि याचा अर्थ काय लागतो असे विचारल्यावर म्हणणार की तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे. हीच तर सगळ्या ब्रेनवॉश झालेल्या लोकांची गंमत आहे. त्यांना कळतच नाही की आपले ब्रेनवॉश केले आहे... जसे अंधश्रद्ध व्यक्तीचे अंधश्रद्धांच्या बाबतीत होते. म्हणून परत एकदा विचारतो की तुम्हीच चर्चेत आणलेल्या मुद्यासंदर्भात आणि तुम्हीच चर्चेत दिलेल्या गुरूजींच्या पुस्तकातीलचा संदर्भ घेऊन त्यातून दिलेल्या उतार्‍यावरून तुमच नक्की काय मत होते? असे कुठे लिहीले आहे? की हिंदूस्तान हिंदूओंका म्हणून ?

In reply to by विकास

संपत Mon, 05/19/2014 - 17:14
all that is expected of our Muslim and Christan co-citizens is the shedding of the notions of their being 'religious minorities' as also their foreign mental complexion and merging themselves in the common national stream of this soil.
समजा असतील माझ्यावर foreign mental complexion आणि नाही झालो मी समरस national stream of this soil शी तर काय बिघडले? मुळात national stream of this soil हा काय प्रकार आहे? थोडक्यात हिंदुराष्ट्रात हिंदू संकृती न स्वीकारनर्याना स्थान नाही. संघाने हे सर्व विचार त्यांच्या पुरतेच मर्यादित ठेवले तर काहीच हरकत नाही. पण एक राष्ट्रीय पक्ष जेव्हा ते विचार पुढे लोटतो तेव्हा तो चिंतेचा विषय होतो.
त्यांना कळतच नाही की आपले ब्रेनवॉश केले आहे
माझे हिंदुत्वावाद्याबद्दल हेच म्हणणे आहे म्हणून मी त्यावर वाद घालण्याचे टाळतो. तुम्ही संघ हा हिंदुत्ववादी नाहीच असे म्हणालात तेवढे मी स्पष्टीकरण दिले. जाता जाता: भाजप /संघ / शिवसेनेने आंबेडकरांच्या रामावर टीका केलेल्या (riddles of rama and krishna) ह्या पुस्तकावर बंदीची मागणी केली होती आणि त्यामुळे दंगलीदेखील झाल्या होत्या.

In reply to by संपत

विकास Wed, 05/21/2014 - 00:15
आत्ता लक्षात आले माझा प्रतिसाद प्रकाशीतच झाला नव्हता... आता परतः समजा असतील माझ्यावर foreign mental complexion आणि नाही झालो मी समरस national stream of this soil शी तर काय बिघडले? मुळात national stream of this soil हा काय प्रकार आहे? थोडक्यात हिंदुराष्ट्रात हिंदू संकृती न स्वीकारनर्याना स्थान नाही. "national stream of this soil" म्हणजे देशाला आपले म्हणणे. आपल्याला स्वतःला वेगळे न समजणे. भारतातील प्रत्येक व्यक्तीच भारतीय आहे. आणि जसे अनेक देशात आजही हिंदुस्तानातल्या कुणालाही म्हणले जाते तशा त्या हिंदूही आहेत. त्यात धर्म नसतो. पण त्यातील हिंदू म्हणायचे काही कारण नाही. जसे अमेरीकन नागरीकत्व घेताना नॅचरलायझेशन केले जाते असे म्हणतात तसे. त्यात कोणी ख्रिश्चन होत नाही तर अमेरीकन होतो. तसेच या भुमीस सर्व भुमीपुत्राने आपले तरी म्हणणे बरोबर आहे ना? का तसे न म्हणता त्याच भुमीचा दुस्वास करणे बरोबर आहे? बाकी हिंदु संस्कृती न स्विकारणार्‍यांना स्थान नाही असे तरी कुठे म्हणले आहे? पण एकमेकांच्या बाबतीत आदर ठेवावा हा संस्कृतीचा भाग आहे असे म्हणले आहे. आता तो खरं म्हणजे तुम्ही हिंदू संस्कृती पाळा अथवा नका पाळू सर्वत्रच असायला हवा का नाही? त्या परीच्छेदात पुढे असे देखील म्हणले आहे ना? "As far as the national tradition of this land is concerned, it never considers that with a change in the method of worship, an individual creases to be the son of the soil and should be treated as an alien. Here, in this land, there can be no objection to God being called by any name whatever. Ingrained in this soil is love and respect for all faiths and religious beliefs. He cannot be a son of this soil at all who is intolerant of other faiths." संघाने हे सर्व विचार त्यांच्या पुरतेच मर्यादित ठेवले तर काहीच हरकत नाही. पण एक राष्ट्रीय पक्ष जेव्हा ते विचार पुढे लोटतो तेव्हा तो चिंतेचा विषय होतो. संघाने आणि भाजपाने काहीच वेडेवाकडे विचार केलेले नाहीत. त्यांचा विरोध आहे तो सदानंद धुमेंच्या शब्दात वाचलेल्या "स्कलकॅप सेक्यूलॅरिझमला" आहे. सर्वांना आदर देण्याबाबत विरोध नाही. तुम्ही संघ हा हिंदुत्ववादी नाहीच असे म्हणालात तेवढे मी स्पष्टीकरण दिले. मी कधी आणि कुठे म्हणले आहे? किंबहुना या चर्चेत तर हिंदुत्ववाद हा शब्द देखील मी (ऑन माय ओन) वापरलेला नाही! आणि हिंदुत्ववाद हा मला फुटीरता पाडणारा, अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारा वाटत नाही. त्याचा अर्थ डाव्यांनी चुकीचा लावत ठेवला. संघाने अथवा भाजपाने नाही. जाता जाता: भाजप /संघ / शिवसेनेने आंबेडकरांच्या रामावर टीका केलेल्या (riddles of rama and krishna) ह्या पुस्तकावर बंदीची मागणी केली होती आणि त्यामुळे दंगलीदेखील झाल्या होत्या. कुठल्याही पुस्तकावर बंदी घालायला माझा विरोध आहे. ती प्रथा चुकीची आहे आणि तसेच पुस्तके जाळण्याची प्रथा देखील... पण वैचारीक विरोध जर एखाद्या व्यक्ती-पुस्तकाबद्दल केला म्हणून काय बिघडले? का आंबेडकरांनी राम - कृष्ण यांच्यावर टिका केली की विचारस्वातंत्र्य आणि शिवसेना - भाजपाने आंबेडकरांवर टिका केली की मात्र ते fanatic?

In reply to by विकास

संपत Wed, 05/21/2014 - 17:21
मग भारतीय आहेत ना लोक. हिंदू राष्ट्राची गरज काय? आणि इतर धर्मियनच ह्या अटी कशाला? हिंदू धर्मात जन्म झाला म्हणून हे सर्व गुण माझ्यात आपोआप येतात काय? जे वाक्य मला सरळ सरळ धार्मिक अहंकाराच उदाहरण वाटते ते तुम्ही संघाच्या सर्व समावेशकतेचे म्हणून देता ह्यातच आपल्या विचारातली दरी दिसते.
संघाच्या नावात देखील हिंदू हा शब्द नाही ... संघाच्या प्रार्थनेत जी प्रत्येक स्वयंसेवक शाखेच्या शेवटी प्रतिज्ञा घेतल्यासारखी म्हणतो त्यात देखील हे शब्द येत नाहीत. तुम्ही जे म्हणता ते तुमचे स्युडोसेक्यूलर अथवा डाव्या विचारवंतांनी गेली अनेक दशके लेखन आणि भाषणातून केलेल्या ब्रेनवॉशिंगमुळे म्हणत आहात.
तुमच्या ह्या वाक्यांवरून मला तसे वाटले. तुम्ही संघ हिंदुत्ववादी आहे हे मान्य केलेत हे ठीक. (अर्थात तुमचेही ह्या दोन दिवसात डाव्यांनी ब्रेन वाशिंग केले नसेल तर:))
रामावर कडक टिका करणारे आंबेडकर हे संघाच्या प्रातःस्मरणात आहेत हे कदाचीत आपल्याला माहीत नसेल.
तुमच्या ह्या म्हणण्याला उत्तर म्हणून ती आंबेडकरांची माहिती होती.

In reply to by विकास

संपत Wed, 05/21/2014 - 17:25
कोणी ख्रिश्चन होत नाही तर अमेरीकन होतो
मग भारतीय आहेत ना लोक. हिंदू राष्ट्राची गरज काय? आणि इतर धर्मियनच ह्या अटी कशाला? हिंदू धर्मात जन्म झाला म्हणून हे सर्व गुण माझ्यात आपोआप येतात काय? जे वाक्य मला सरळ सरळ धार्मिक अहंकाराच उदाहरण वाटते ते तुम्ही संघाच्या सर्व समावेशकतेचे म्हणून देता ह्यातच आपल्या विचारातली दरी दिसते.
संघाच्या नावात देखील हिंदू हा शब्द नाही ... संघाच्या प्रार्थनेत जी प्रत्येक स्वयंसेवक शाखेच्या शेवटी प्रतिज्ञा घेतल्यासारखी म्हणतो त्यात देखील हे शब्द येत नाहीत. तुम्ही जे म्हणता ते तुमचे स्युडोसेक्यूलर अथवा डाव्या विचारवंतांनी गेली अनेक दशके लेखन आणि भाषणातून केलेल्या ब्रेनवॉशिंगमुळे म्हणत आहात.
तुमच्या ह्या वाक्यांवरून मला तसे वाटले. तुम्ही संघ हिंदुत्ववादी आहे हे मान्य केलेत हे ठीक. (अर्थात तुमचेही ह्या दोन दिवसात डाव्यांनी ब्रेन वाशिंग केले नसेल तर:))
हिंदुत्ववाद हा मला फुटीरता पाडणारा, अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारा वाटत नाही
हिंदू हा ह्या देशाच उदार, सहिष्णू राजा आहे ही विचारसरणी सोळाव्या शतकात कौतुकाचा विषय ठरू शकते, एकविसाव्या शतकात नाही.
रामावर कडक टिका करणारे आंबेडकर हे संघाच्या प्रातःस्मरणात आहेत हे कदाचीत आपल्याला माहीत नसेल.
तुमच्या ह्या म्हणण्याला उत्तर म्हणून ती आंबेडकरांची माहिती होती.

In reply to by संपत

विकास Wed, 05/21/2014 - 19:00
इतर धर्मियनच ह्या अटी कशाला? कुठल्या अटी? दाखवून द्या बरं! त्यांचे म्हणणे हे "religious minority" हा शब्दप्रयोग करण्यासंदर्भात होते. त्यांच्या दृष्टीने सगळेच भारतीय आहेत. मग भारतीय आहेत ना लोक. हिंदू राष्ट्राची गरज काय? हिंदू राष्ट्र आणि भारत हे त्यांच्या लेखी वेगळे नाहीत. डाव्यांच्या आणि समाजवादी लोकांच्या लेखी वेगळे आहेत. तरी देखील गंमत म्हणून कालचे मोदींचे संसदेच्या सेंट्रल हॉल मधील भाषण बघा अथवा वाचा... ह्या भाषणाचे शबाना आणि शशी थरूर यांनी देखील मर्यादीत का होईना पण कौतुकच केले आहे. शबानाच्या म्हणण्याप्रमाणे न वाचता केलेले भाषण, आणि आतून (मनापासून) आलेले विचार दिसत होते. त्यामुळे तिच्या म्हणण्याप्रमाणे मोदी स्टेट्समन म्हणून शोभत होते. तरी देखील एक आक्षेप घेतला गेला की त्यांनी अल्पसंख्य असा उल्लेख केला नाही. पण गंमत म्हणजे त्यात कुठेही हिंदू हा शब्द देखील आलेला नाही, हे त्यांच्या लक्षात आले नाही अथवा दुर्लक्ष केले... तुम्ही संघ हिंदुत्ववादी आहे हे मान्य केलेत हे ठीक. जालीय अभ्यास कमी पडतोय वाटतं! ;) अहो संघच काय, मी देखील हिंदुत्ववादी आहे हे मान्य आहे आणि जालावर ज्यांना मी माहीत आहे त्या माझ्या वैचारीक विरोधकांना देखील ते माहीत आहे. त्यात नवीन काहीच नाही! पण तुमचा जर हिंदुत्ववादाला आक्षेप असला तर माझा कुणालाही अल्पसंख्य म्हणायला आक्षेप आहे. माझे सर्वधर्मिय मित्र आणि परीवार मित्र (म्हणजे संघपरीवार नाही ;) फॅमिलीफ्रेंड्स या अर्थाने) आहेत. पण माझ्या (संघाच्या) हिंदुत्ववादात कुठल्याही धर्माचा/धर्मियाचा अपमान होत नाही आणि कोण कसे पुजा/प्रार्थना करते अथवा अजिबात करत नाही, त्यावरून त्यांची किंमत केली जात नाही. मात्र जर हिंदूंच्या बाबतीत असे वागले गेले (ते बहुतांशी डावे-समाजवादी हिंदूच वागतात, इतर धर्मिय नाही) तर मात्र मला मान्य नाही! हिंदू हा ह्या देशाच उदार, सहिष्णू राजा आहे ही विचारसरणी सोळाव्या शतकात कौतुकाचा विषय ठरू शकते, एकविसाव्या शतकात नाही. वर मोदींचे उदाहरण दिले आहेच. गंमत म्हणून अथवा गांभिर्याने कोणी खरेच संशोधन केले तर आढळून येईल की हिंदू, हिंदूत्ववाद हे दोन्ही शब्द तसेच अल्पसंख्य हा शब्द राजकारणात आणि समाजकारणात संघ आणि भाजपा पेक्षा डावे आणि समाजवादीच जास्त वापरतात. तो त्यांनी तयार केलेला बागुलबुवा आहे. तुमच्या ह्या म्हणण्याला उत्तर म्हणून ती आंबेडकरांची माहिती होती. प्रतःस्मरण संघशाखांमध्ये चालते (ते देखील सकाळच्या अथवा शिबिराच्या वेळेस), भाजपा आणि शिवसेनेत नाही! :)

In reply to by संपत

विकास Wed, 05/21/2014 - 20:22
ते वाक्य पूर्ण का नाही दिलेत? आउट ऑफ कॉन्टेक्स्ट बोलायची पद्धत पण डावी अधिक आणि काही अंशी समाजवादी आहे... परत एकदा देतो ते वाक्यः So, all that is expected of our Muslim and Christan co-citizens is the shedding of the notions of their being 'religious minorities' as also their foreign mental complexion and merging themselves in the common national stream of this soil. अर्थात स्वतःला या देशातले अल्पसंख्य न म्हणता या देशाचेच म्हणा असा याच अर्थ आहे. पुढे ते असे देखील म्हणाले आहेत ना की, "As far as the national tradition of this land is concerned, it never considers that with a change in the method of worship, an individual creases to be the son of the soil and should be treated as an alien. Here, in this land, there can be no objection to God being called by any name whatever." थोडक्यात तुम्ही कुणाची पुजा करता, कुणाला प्रेषित मानता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण हिंदू धर्मात तरी कुठे एक समान पद्धत आहे? पण आमची पुजा पद्धत वेगळी, प्रेषित वेगळा म्हणून आम्ही वेगळे आणि त्यातून या देशाशी इमान राखण्याचा प्रश्नच नाही अशी वृत्ती तयार करणे योग्य आहे का?

In reply to by संपत

विकास Wed, 05/21/2014 - 20:39
मुद्याला धरून दिले नाही अथवा अर्थ समजलेला नाही... त्यातले फक्त मुस्लीम आणि ख्रिश्चन इतकेच शब्द समजले. त्यात पुढे त्यांनी स्वतःला अल्पसंख्य म्हणत बसू नये हे म्हणलेले दिसले नाही.

In reply to by विकास

संपत Wed, 05/21/2014 - 20:24
हिंदू राष्ट्र आणि भारत हे त्यांच्या लेखी वेगळे नाहीत
म्हणजे फक्त नावे वायली वायली.. आतला माल सेम.. विचारधन म्हणजे संविधानाची झेरॉक्सच जणू. बर्रर.
त्या माझ्या वैचारीक विरोधकांना देखील ते माहीत आहे
मला खरच नव्हते माहित हे. नाही तर एव्हढे डोके खपवलेच नसते. माझा समज होता कि तुम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर मोदींचे समर्थक आहात. जालीय अभ्यास वाढवला पाहिजे हे खरच :)

In reply to by संपत

विकास Wed, 05/21/2014 - 20:48
माझा समज होता कि तुम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर मोदींचे समर्थक आहात. तेच बरोबर आहे. बाकीचे मुद्दे आहेत त्यात मला डाव्या विचारवंतांनी आणि समाजवाद्यांनी केलेल्या समाजभेदाबद्दल तिडीक आहे. त्यांच्यामुळे बरेचसे नुकसान झाले आहे. सतत अल्पसंख्य - गरीब गरीब म्हणून काही होत नसते. नाहीतर गेल्या दहा वर्षात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मधे आपले स्थान बरेच वर गेले असते. फक्त भारतीय म्हणून सगळ्यांकडे बघणे हा कॉन्सेप्ट तमाम डाव्या-समाजवाद्यांसाठी अवघड आहे, चाकोरीच्या बाहेर आहे. पण त्यांना वाटत असलेल्या पध्दतीने आत्तापर्यंत आपण तळच गाठत आलो आहोत. आता थोडा वेळ देऊन नक्की या "सबका साथ सबका विकास" ने काय होते ते पाहूयात. त्यासाठी जरा वेळ द्या.

In reply to by विकास

तरी देखील एक आक्षेप घेतला गेला की त्यांनी अल्पसंख्य असा उल्लेख केला नाही. अल्पसंख्य असल्याचा आणि तसे वागणूक द्यायचा नेहमी आग्रह धरायचा आणि मग आम्हाला वेगळे वागवतात असा आरोप करायचा ! मुख्य म्हणजे या सगळ्यात तथाकथित विचारवंतांना काही विरोधाभास (कांगावाखोरपणा ?) दिसत नाही !! जय हो !!! असे "जाती-धर्मावर आधारीत भेदाभेद" करण्याचा आग्रह करण्याऐवजी "प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीवर आधारून मदत आणि समान संधी" याचा आग्रह धरण्याइतका या तथाकथित विचारवंतांचा मानसिक विकास कधी होईल ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एक भारतीय म्हणून नेहमी मला एक प्रश्न पडतो अल्पसंख्यांक म्हटले की सर्वप्रथम नाव येते ते मुस्लिम समाजाचे , असे का ह्या देशात पारसी , जैन , शीख , ख्रिस्ती , सिंधी आणि बरेच अल्पसंख्यांक आहेत. त्यांना कधी सरकार दरबारी एवढे आन्जारावे , गोंजारावे लागत नाही. ह्यांना स्वताच्या पायावर उभे राहण्यास काय संघाने व माजी सरकारने मदत किली होती का भारतात अजून हिंदूंच्या मध्ये अनेक वर्ग मागासलेले आहे. एका धर्मांच्या लोकांचे वेगळे लाड का ,त्यांचे चोचले का पुरवावे लागतात. सच्चर आयोग माजी सरकारचा त्यात मुस्लिमांची हालात चांगली नसल्याचे म्हटले आहे, आता बह्तांशी काळ अपवाद वगळता ह्यांचेच सरकार सत्तेवर होते तरीही जर मुस्लिमांची हालत खराब असेल तर त्याला संघ व मोदी जबाबदार नाही ,

In reply to by संपत

समजा असतील माझ्यावर foreign mental complexion आणि नाही झालो मी समरस national stream of this soil शी तर काय बिघडले >> काय राव, हे कुठल्याही राष्ट्राचं बेसिक तत्व नव्हे का आणि नको का?

In reply to by शिरपतराव्_टांगमारे

संपत Wed, 05/21/2014 - 18:52
अहो, नसेल आवडत मला देशातील काही गोष्टी आणि आवडत असतील परदेशातील गोष्टी म्हणून मला ह्या देशात स्थान नाही का? आणि ह्या अटी फक्त मुस्लीम, ख्रिश्चनांना.

In reply to by संपत

बस मग उत्तर तर तुम्हीच दिले आहे. हिंदुच्या संस्कृती आणि देवांचा आदर करावा. आदर करावा म्हटलंय भजन करावा म्हटलेले नाही ना! यावर अजून अन्य धर्मियांना दुय्यम वागणूक द्यावी वगैरे काही लिहीले आहे का त्यात? का त्यांच्या दैवतांना दुय्यम वागणूक द्यावी त्यांचा अपमान करावा म्हटले आहे. पण हे मुस्लीम / ख्रिश्चनाना जमणार नाही असेही म्हटले आहे. अगदी १०० % सत्यं आहे. आजच्या काळात १०० टक्के लागू होणारे. म्हनूनच गोळवलकर गुरुजींचे विचार फार आवडायचे मला. कटुसत्य बोलण्याचे धाडस होते त्यांच्यात.

In reply to by विकास

अर्धवटराव Sat, 05/17/2014 - 19:53
संघाच्या वाटेत काँग्रेस डायरेक्ट येत नाहि हे खरय. पण काँग्रेस केवळ गांधी घराण्याच्या पुण्याइवर जगत नव्हता. स्वातंत्र्य चळवळ, सहकार चळ्वळ, सेवा दल वगैरे मुळे काँग्रेसकरता भारतभूमी काँग्रेसी अनुकुल झाली होती/आहे. काँग्रेस नेतृत्वाने हि मशागत पुढे सियीयसली घेतली नाही व आता त्यांच्या हाती सत्ता नाहि. संघाला आपलं कार्य अधिकाधीक व्यापक करायला योग्य संधी आहे.
प्रचारक होयला पब्लीक येईल असे म्हणायचे आहे का? तेव्हढे सोपे नाही,
कपील देव, तेंडुलकर, धोनी मुळे एकुणच स्पोर्ट्सला जे जीवदान मिळाले, अटेन्शन मिळाले, जनाधार मिळाला तेच आता संघाच्या बाबतीत होइल. राजकारणात , समाजकारणात इंटरेस्ट असणारा टॅलेण्ट्पूल संघाच्या मार्गाने जाण्याचं ऑप्शन सिरीयसली विचारात घेईल असं वाटतं.

In reply to by विकास

बाळकराम Sun, 05/18/2014 - 14:30
काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते. संघाचे राक्षसीकरण करण्याची मुळात गरजच काँग्रेसला कधी नव्हती, संघ हा राजकीय आणि तात्त्विक लेव्ह्लवर काँग्रेसचा प्रतिस्पर्धीसुद्धा नव्हता. १९२५ साली संघाची स्थापना झाल्यापासून ते पुढची जवळपास ४०-४५ वर्षे गांधी-नेहरुंच्या आणि इतर अनेक काँग्रेस नेत्यांचा प्रभाव जनमानसावर खोल रुजलेला होता. हा प्रभाव निव्वळ राजकीय असा नव्हता तर तो तात्त्विक आणि नैतिक असा सुद्धा होता. विशेषतः गांधींजींचा आध्यात्मिक आणि नैतिक अधिकार जनतेवर मोठा होता- गांधीजींबरोबर कितीही मतभेद असले तरी कुणीही हे मान्य करेल असे वाटते. आणि त्याच बरोबर भगतसिन्घ इ. क्रांतिकारक, सावरकर, आंबेडकर प्रभृति काँग्रेसविरोधक यांचा सुद्धा मोठा प्रभाव जनमानसावर होता. या सगळ्या धामधुमीत संघ कुठेच नव्हता. ही झाली राजकीय क्षेत्रातली स्थिती. सामाजिक क्षेत्रात जेव्हा विनोबा भावे, पटवर्धन, महर्षी आणि र धो कर्वे- स्त्रीशिक्षण, सावरकर- हरिजनसुधार, गांधी- हरिजनसुधारणा, बाबा आमटे, आंबेडकर- दलितसुधारणा, मास्टर तारासिंग- पंजाबात ही आणि अशी अनेक उदाहरणे देशात सांगता येतील. तिथेही संघ कुठेच नव्हता. स्वातंत्र्यचळवळीत सुद्धा संघाचे काय योगदान होते हा संशोधनाचाच विषय आहे. एक हिंदुत्ववादी संघटना म्हणूनही संघाचा फारसा प्रभाव नव्हता (१९२५ पासून पुढच्या ३०-३५ वर्षापर्यंत तरी). एवढेच नव्हे तर पहिल्या १९५२ निवडणुकीत सावरकरांच्या हिंदू महासभेविरुद्ध जनसंघाने आपले उमेदवार उभे करुन हिंदूंची मते फोडण्याचा नतद्र्ष्टपणा केला होता. थोडक्यात, संघ ही कुणाच्या खिजगणतीतसुद्धा नसलेली, कर्तृत्त्वशून्य संघटना होती-कमीतकमी १९४८ पर्यंततरी. गांधीहत्या हे संघाचे पहिले आणि कदाचित एकमेव "कर्तृत्त्व" म्हटले तरी चालेल. संघाचे "राक्षसीकरण" करुन उगाच त्याचे महत्त्व वाढविण्याचे काम काँग्रेस करेल असे वाटत नाही. त्यामुळे केलंच असेल तर संघाचे राक्षसीकरण तर ते गोडसेने नकळत का होईना पण केलय. त्यामुळे संघाचे उद्दिष्ट सामाजिक आणि राष्ट्रीय आहे असे जे म्हणतात त्या दोन्ही क्षेत्रात संघाने नक्की काय कर्तृत्त्व गाजवलय ते जाणून घ्यायला आवडेल. अर्थात, संघाने कुठल्या भूकंपात/ वा आपत्तीत कार्यकर्ते वगैरे पाठवले आणि त्यालाच सामाजिक कार्य म्हणावे अशी फुटकळ उत्तरे तुम्ही देणार नाहीत अशी अपेक्षा. डिस्क्लेमर- मी स्वतः शाखेत ७-८ वर्षे गेलो आहे, कॉलेजात असताना अभाविप च्या वैद्यकीय विद्यार्थी परिषदेचा सदस्य होतो आणि माझी बायको देखील यूके मध्ये राष्ट्रसेविका समितीचे कार्य करते. त्यामुळे हे प्रश्न विचारण्यामागे पार्श्वभूमी आणि अभ्यास दोन्ही आहे. त्याच बरोबर, संघाच्या भूमिकेमुळे आलेले नैराश्य सुद्धा. त्यामुळे इथले टिपीकल संघीय जी उडवाउडवाची आणि उद्धट उत्तरे देतात ती माझ्यावर काम करणार नाहीत. :)

In reply to by बाळकराम

विकास Mon, 05/19/2014 - 00:36
गांधीहत्या हे संघाचे पहिले आणि कदाचित एकमेव "कर्तृत्त्व" म्हटले तरी चालेल. हे विधान खोटारडेपणाचे लक्षण आहे आणि एका संघटनेची बदनामी करणारे विधान आहे. यासंदर्भात संघाने राहूल गांधींवर देखील खटला भरला आहे असे आठवते. तुमच्याकडे जर पुरावा असला (नुसता आरोप केला असा नाही तर सिद्ध करणारा) तर दाखवा. नाहीतर नाही म्हणून सांगून आणि आपले विधान संपादीत करायला सांगा.

In reply to by विकास

बाळकराम Mon, 05/19/2014 - 15:46
गांधीहत्येत संघाचा हात नाही याची जर संघाला एवढी खात्री आहे तर मग १९४८ नंतर काँग्रेसने संघावर बंदी घालून हाच तर आरोप केला आणि त्यातही संघटनेची बदनामी झालीच की? मग संघाने काँग्रेसला कोर्टात खेचले का नाही? की संघ तेव्हा काँग्रेसची बी-टीम वा "शिवसेना" होती, म्हणून तेरी भी चूप और मेरी भी चूप चा मार्ग अनुसरला गेला? आणि खटले भरायची संघाला एवढीच जर हौस आली आहे तर एखाद खटला तुमच्या शरद पोंक्षेवर भरा जो खुलेआम मी संघीय असून मला गांधीहत्येबद्दल संघाचा अभिमानच आहे असं म्हणतो. पुराव्यांच म्हणाल तर भरपूर पुरावे तुम्हाला १९४८ च्या खटल्याच्या संदर्भात दिसतीलच, त्याचा अभ्यास करावा. ह्या खटल्याच्या अनुषंगाने संसदेत झालेल्या चर्चेची इतिवृत्ते उपलब्ध आहे संसदेच्या ग्रंथालयात, त्याचा लाभ घ्यावा. संघाची नथुराम आणि गोपाळ गोडसे ही माणसे तुरुंगात गेली ती काही पुराव्याशिवाय का? संघकार्यकर्ता असलेल्या नथुरामचा गुन्हा शाबित होउन त्याला फाशी होणे यापेक्षा मोठा दर्शनी पुरावा संघाच्या सहभागाचा काय असू शकेल? मी साध्या साध्या गोष्टींबद्दल- संघाचे सामजिक आणि राष्ट्रीय इ बाबतीतले योगदान याचा पुरावा मागतोय, तो मात्र काही अजून मला मिळाला नाही, ही गोष्ट रोचक म्हणावी का? ;)

In reply to by बाळकराम

आदूबाळ Mon, 05/19/2014 - 15:53
बाकी चालू द्या, पण "द मेन हू किल्ड गांधी" हे मनोहर माळगांवकरांचं पुस्तक खूपच अभिनिवेशरहित आणि तटस्थ विश्लेषण करतं.

In reply to by बाळकराम

मृत्युन्जय Mon, 05/19/2014 - 16:54
मग संघाचा गांधीहत्येत भाग नव्हता हे कबूल करणारे त्या काळचे काँग्रेसी नेते आणि न्यायालय मुर्ख होते असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?

In reply to by बाळकराम

विकास Mon, 05/19/2014 - 19:20
हे विष सतत पसरवले गेले आहे. येथे देखील असेच होत आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. १९४८ नंतर काँग्रेसने संघावर बंदी घालून हाच तर आरोप केला आणि त्यातही संघटनेची बदनामी झालीच की? मग संघाने काँग्रेसला कोर्टात खेचले का नाही? कोर्टातच खटला चालू होता. त्यात संघावर अथवा संघातील काही व्यक्तींवर आरोपपत्र होते. पण नंतर कुठेही संघ सरकारचे मत असलेल्या कॉन्स्पिरसीमधे दिसला नाही म्हणून पक्षि: निर्दोष असल्याचे कोर्टाने मान्य केले. नंतर संघावरची बंदी उठली कारण ज्या आरोप चुकीचे ठरले होते. संघाची नथुराम आणि गोपाळ गोडसे ही माणसे तुरुंगात गेली ती काही पुराव्याशिवाय का? गिल्ट बाय असोसिएशन... सर्वप्रथम नथुरामने आधीच संघ सोडला होता. तरी वादापुरते गृहीत धरूयात की गोडसे संघात होते. मग त्याच धरतीवर शिखांच्या हत्याकांडात काँग्रेसचे नेते (जे नंतर देखील खासदार -मंत्री झाले) होते, मग काँग्रेस बद्दलचे काय म्हणणे आहे? तेच अनेक डावे आणि समाजवादी (त्यात मेधा पाटकरपण आल्या) ह्या हिंस्त्रक नक्षलवादास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठींबा देतात. मग त्यांना देखील हिंस्त्र म्हणणार आहात का? संघकार्यकर्ता असलेल्या नथुरामचा गुन्हा शाबित होउन त्याला फाशी होणे यापेक्षा मोठा दर्शनी पुरावा संघाच्या सहभागाचा काय असू शकेल? संघपध्दतीत कार्यकर्ता ह्या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का? नसल्यास माहिती करून घ्या. आणि तरी देखील वादापुरते "संघकार्यकर्ता नथुराम" असे म्हणले तर त्याला झालेली शिक्षा ही तो काँग्रेसकार्यकर्ता असता तर कमी झाली असती का? म्हणजे शिक्षा ही गांधीहत्येबद्दल झाली का तुम्ही म्हणता तो वास्तवात नसलेला संघाशी संबंध आहे म्हणून झाली? मी साध्या साध्या गोष्टींबद्दल- संघाचे सामजिक आणि राष्ट्रीय इ बाबतीतले योगदान याचा पुरावा मागतोय, तो मात्र काही अजून मला मिळाला नाही, ही गोष्ट रोचक म्हणावी का? भरपूर आहेत. वेगळा धागा चालू करूयात का नवीन वर्गवारीच? पण त्याआधी खोटे आरोप मागे घेताका का सप्रमाण सिद्ध करता? (नुसते खटले वाचा वगैरे म्हणायचे नाही.)

In reply to by विकास

कडक प्रतिसाद सावरकर ह्या खटल्यातून निर्दोष सुटले तरी सूडबुद्धीने मणिशंकर ने त्यांचा पुतळा अंडमान मधून घालवला.

In reply to by नानासाहेब नेफळे

संपत Sat, 05/17/2014 - 14:52
कोंग्रेस आले तरी तेच होणार होते. अंबानीच्या डाव्या उजव्या खिशात भाजप कोंग्रेस आहेत.

In reply to by संपत

जाऊ द्या संपत साहेब ह्या लोकांना समजून न समजल्या सारखे करतात. खुद आप पार्टी ही अंबानी विरुद्ध अग्रवाल म्हणजे रिलायंस विरुद्ध वेदांत ह्यांच्या आद्योगिक लढाईचा परिपाक आहे. आता ह्यांच्यापैकी कोणाच्याही हातात तेल आहे की पहिले ह्यांचे खिसे फुगणार कशाला अंबानी वर जाळायचे मी तर दोन आठवड्यापूर्वी रिलायंस चे शेअर घेतले मज्जाणु लाइफ

In reply to by निनाद मुक्काम …

संपत Sun, 05/18/2014 - 10:19
म्हणजे रिलायंस विरुद्ध वेदांत ह्यांच्या आद्योगिक लढाईचा परिपाक आहे
आताच लोकसत्ता वाचलात वाटते :)

In reply to by संपत

तुम्ही सुद्धा वाचला वाटत. पण तुमचा ह्या सर्व गोष्टींवर कशाला विश्वास बसेल. आणि तो बसला किंवा नाही बसला तरी पुढील ५ बाकडे बडवत राहा. जयललिताने मोदींशी संवाद साधून केंद्र व राज्याची चांगले संबध ठेवण्यासाठी विनंती केली जी मोदी ह्यांनी मान्य केली. त्यामुळे आता पहिले राज्य चालविण्यासाठी व आता विरोधी पक्ष बनण्यासाठी ह्यांना आघाड्या कराव्या लागतील . आणि हो मी मटा सुद्धा वाचलाय,

विजुभाऊ Sat, 05/17/2014 - 12:31
१)लालुंचे विसर्जन झाले , २) जयललिता . ममता यांची राजकीय सौदेबाजी संपली. ३)सर्वात महत्वाचे म्हणजे शरदपवारांची चांगलीच गोची झाली. दोन डगरींवर पाय ठेवता ठेवता ते स्वतःचा तोंडघशी पडलेत. ४)छोट्या पक्षांचे राष्ट्रीय प्राबल्य कमी झाले. ५)मुलायम सिंगाना ज्या जागा मिळाल्या त्या बहुतेक त्यांच्या घरातल्या लोकानाच मिळाल्या आहेत. ( स्वतः दोन जागी , सून एका जागेवर , पुतणे दोन ठिकाणी ई.) मुलायमसिंगांचे उपद्रव मूल्य शून्यवत झाले. ६) अबू आझमी पुन्हा एकदा पडले. स्वाक्षरी : यूएस व्हिसा मिळवण्यासाथी गुजराथी माणूस कोणत्या खटपटी करेल सांगता येत नाही.

चावटमेला Sat, 05/17/2014 - 12:34
१. त्रिशंकू लोकसभा येवून नंबर गेम होईल तेव्हा आपल्या पारड्यांत काय काय पाडून घ्यायचे ह्यासाठी मनातल्या मनांत मांडे खात बसलेल्या जया अम्मा आणी ममता दीदी यांचा चांगलाच हीरमोड झाला २. केजरीवाल आता झाडूने स्वतःचेच घर झाडू लागला, आणि उडणार्‍या धूळीने त्याचा सुप्रसिध्द खोकला अजूनच वाढला बाकी, झालंच तर खोबरं तिकडं चांगभलं ह्या न्यायाने बर्‍याच इतर पक्षांतले संधिसाधू आता बेगडी मोदीप्रेम दाखवत भाजपाची वाट धरणार. असल्या मांजरांमुळं सच्च्या कार्यकर्त्यांवर अन्याय होवू नये हीच अपेक्षा.

विजुभाऊ Sat, 05/17/2014 - 12:49
चावटमेला काकू. त्रिशंकू लोकसभा आणि नम्बरगेम या वर आपल्या बारमातीच्या काकांची सगळी भिस्त होती. त्यांचे काय होणार आता?

तुमचा अभिषेक Sat, 05/17/2014 - 13:00
`ईस देश का कुछ नही हो सकता' म्हणत परदेशी पलायन करणार्‍या हुशार विद्यार्थ्यांचे प्रमाण कदाचित रोडावेल वा गेलेले परत येतील .. अर्थात त्या आधी मोदींनी दाखवलेले विकासाचे स्वप्न साकार होणे गरजेचे, यासाठी पाच वर्षे वाट बघूया.

In reply to by तुमचा अभिषेक

कदाचित परदेशात नोकरी करण्याच्या उद्देशाने जाणारे आता करलो दुनिया मुत्ठीमे मोड मध्ये परदेशात जातील. मोदींच्या राज्यात अनेक तरुण व छोटे , मोठे उद्योजक तयार होतील असा माझा कयास आहे,

गुजरातचे माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट वंझारा आता जेलमधून बाहेर पडतील व कदाचित दिल्लीत सी.बी.आय.मध्ये महत्वाच्या पदावर येतील. गुजरातचे माजी गृहंमंत्री हरेन पंड्या ह्यांचा खून नक्की कोणी केला हे पुढील पाच वर्षे तरी गुपीतच राहील.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आणि साध्वी सुद्धा , साला पाकिस्तानात तो हाफिज सैद मोकळा फिरतो , भारतात शीख दंगलीचे आरोपी मोकाट फिरतात , मग पुरोहित आदी प्रभूती मंडळींनी काय असे मोठे पाप केले आहे की विना खटला तुरुंगात खितपत पडायचे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी Tue, 05/20/2014 - 21:00
>>> गुजरातचे माजी गृहंमंत्री हरेन पंड्या ह्यांचा खून नक्की कोणी केला हे पुढील पाच वर्षे तरी गुपीतच राहील. त्यात काहीच गुपित नाही. हरेन पंड्यांच्या खुनातील आरोपींवर आरोप न्यायालयात ५-६ वर्षांपूर्वीच सिद्ध होऊन त्यांना शिक्षा सुद्धा मिळाली.

In reply to by श्रीगुरुजी

त्यांना शिक्षासुद्धा मिळाली
किती खोटं बोलाल श्रीगुरुजी??? हरेन पंड्या केसमधील आरोपी निर्दोष सुटलेले आहेत, पंड्यांचा मर्डर कुणी केला हे अजून गुपीतच आहे. जाणकारांनी गुगलून बघावे माहिती मिळेल. http://m.timesofindia.com/india/Haren-Pandya-murder-case-Gujarat-HC-acquits-all-accused/articleshow/9780920.cms

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Wed, 05/21/2014 - 20:39
या खटल्यातील १२ आरोपींवर २००७ मध्ये पोटा न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन त्यांना शिक्षा झाली होती.

बाळकराम Sat, 05/17/2014 - 15:00
सगळ्यात मोठा जो होइल, लगेच नाही पण काही दिवसानी, तो हा की मोदीप्रेमाचं आंधळं भगवं भरतं ओसरेल आणि लोक आपल्या कामधंद्याला लागतील ज्यातून अर्थव्यवस्थेला जरा चालना मिळेल. वातावरण जरा शुद्ध होइल. शेवटी पोटाची आग मिटल्याशिवाय "अच्छे दिन" नही आनेवाले है हे लोकांना कळेलच बहुधा. बाकी, राममंदिराची बांधणी, आसाराम बापूंना सन्मानपूर्वक तुरुंगातून मोकळे करुन उदार अंतःकरणाने आणखीन रेप करायची मोकळीक दिली जाणे हे किरकोळ साईड इफेक्ट्स तर पुढच्या १-२ महिन्यांत दिसतीलच, त्याचे काही एवढे विशेष नाही.

In reply to by बाळकराम

विकास Sat, 05/17/2014 - 16:23
शेवटी पोटाची आग मिटल्याशिवाय "अच्छे दिन" नही आनेवाले है हे लोकांना कळेलच बहुधा. सहमत. राममंदिराची बांधणी, आसाराम बापूंना सन्मानपूर्वक तुरुंगातून मोकळे करुन उदार अंतःकरणाने आणखीन रेप करायची मोकळीक दिली जाणे हे किरकोळ साईड इफेक्ट्स तर पुढच्या १-२ महिन्यांत दिसतीलच, त्याचे काही एवढे विशेष नाही. यातून अजूनही जुन्याच पध्दतीने विचार करत मोदींच्या राज्यात काय होईल असे वाटत आहे. जिंकण्यासाठी त्यांनी चाकोरीबाहेरचा विचार केला होता. आता तो विजय टिकवण्यासाठी देखील ते तसेच करतील असे वाटते. ज्या पध्दतीने गुजरातमधे ते लोकप्रिय झाले तसेच त्यांना भारतात होयचे असणार. आणि तशी महत्वाकांक्षा असणे चांगले कारण त्यानिमित्ताने काहीतरी घडेल. त्यांना ना धड कुटूंब, त्यामुळे फॅमिली डायनॅस्टी तयार करण्याचा प्रश्न नाही त्यामुळे मोदींच्या बाबतीत बाकी काही व्यक्तीगत स्वार्थ असण्याची शक्यता नाही.

In reply to by विकास

बाळकराम Sun, 05/18/2014 - 14:44
विकासजी, की मोदींना विकासच फक्त करायचा आहे हे घटकाभर खरं जरी धरलं तरी भाजपाभोवती असलेली संघ आणि विहिंप इ भुतावळ त्यांना तसे आणि तितक्या प्रमाणात करु देणार नाही हे ही तितकंच खरं. मोदींनी पहिली विजयसभा वाराणसीत आणि ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे.

In reply to by बाळकराम

आजानुकर्ण Sun, 05/18/2014 - 19:43
ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे.
संघाबाबतच्या तुमच्या मताशी सपशेल सहमत असलो तरी सध्या या पूजेपुरते मोदींना डिस्काऊंट द्यायला मी तयार आहे. विज्ञानाची कास धरणाऱ्या नेहरुंनीही त्यांच्या स्वतंत्र भारतातल्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ काशीविश्वनाथ पूजा करुन केला होता. (आंबेडकरांसह अनेकांनी त्यावर प्रखर टीका केली होती.) मात्र त्या पूजेमुळे नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला काही बाधा आल्याचे पुढे दिसले नाही. नव्या भारताचा पाया नेहरुंनी चांगल्या रीतीने घातला. मोदींपेक्षा मोदी मिनियन्स व इतर भुतावळीला आवरणे हे जास्त जिकीरीचे काम आहे असे सध्या तरी दिसते आहे. हे बहुमत कोणत्या मुद्द्यावर मिळाले याची स्वतः मोदींना चांगली जाणीव असावी आणि ते इमोशनल इश्यूजऐवजी विकासाचे प्रश्न सोडवतील अशी आशा आहे.

In reply to by आजानुकर्ण

बॅटमॅन Sun, 05/18/2014 - 23:06
पूजा केली काय किंवा नै काय, लोकांना बोलायचा हक्क नाही. हेच जर कुणा मौलानाचे आशीर्वाद घेतले असते तर सेक्युलरांनी भलामण केली असती. इस्रोचा अध्यक्षही देवळात गेला तरी कपाळशूळ उठणार्‍या लोकांची कीव येते. नाकर्ते अच्रत मेले!

In reply to by बॅटमॅन

आजानुकर्ण Mon, 05/19/2014 - 18:55
इस्रोचा अध्यक्षही देवळात गेला तरी कपाळशूळ उठणार्‍या लोकांची कीव येते.
इस्रोच्या अध्यक्षाने देवळात गेल्याची जाहिरात करणे चुकीचे आहे.

In reply to by आजानुकर्ण

बाळकराम Mon, 05/19/2014 - 15:57
ती पूजा कुठल्या उद्देशाने केली होती त्याबद्दल आहे. मोदींनी त्यापूजेतून पॉलिटिकल मायलेज मिळवण्याचाच उद्देशाने ती केली होती. देशाच्या इतर भागात विकासावर भर देणारा भाजपचा प्रचार यूपी आणि बिहारमध्ये राममंदिर, रामजन्मभूमी अशा गोष्टींवर केंद्रित झाला होता, त्या पार्श्वभूमीवर वाराणसीत पूजा करुन त्यांना काय साधायचे होते ते स्पष्टच आहे. आमच्या सारख्या असंख्य हिंदूंप्रमाणेच मोदींनाही त्यांचा धर्मपालन करण्याचा, पूजाविधी करण्याचा हक्क आहे. मग आमच्यासारखाच त्यांनीही घरात बसून साग्रसंगीत पूजा करावी, कोण काय म्हणतंय? उगा त्याचे प्रदर्शन कशाला?

In reply to by बाळकराम

बॅटमॅन Mon, 05/19/2014 - 15:58
चारचौघात पूजा करणे बेकायदेशीर नसेल तर या प्रतिसादाला आकांडतांडवाखेरीज अर्थ नाही.

In reply to by बाळकराम

arunjoshi123 Mon, 05/19/2014 - 16:46
बाळकरामजींची प्रवृत्ती असंतुष्ट घरलक्ष्मीसारखी आहे. म्हणे ८-९ वर्षे संघात काम केले, म्हणे बायको आजही करते. नि वर संघाच्या, भाजपच्या, मोदीच्या एकाही वागण्याचा चूकूनही एकही चांगला अर्थ काढायचा नाही. काय प्रकार आहे काही लक्षात आलं नाही.

In reply to by arunjoshi123

बाळकराम Mon, 05/19/2014 - 17:06
नीट वाचलेत तर लक्षात येइल की, माझा संघावरचा आक्षेप व्यक्तिगत स्वरुपाचा नाही. किंबहुना, माझे अनेक जवळचे मित्र आहेत जे संघात आहेत आणि वैयक्तिक पातळीवर अतिशय चांगले काम करतात. त्यामुळे संघीय सगळे वाईटच असं म्हणत नाहीच. संघाचे जे काही मर्यादित का होईना पण सामाजिक काम आहे त्याबद्दल त्यांचा आदरच आहे. दुसरे म्हणजे, भाजपा वा मोदी यांच्याबद्दलही मला व्यक्तिशः आकस नाही, किंबहुना मोदींसारखा अतिशय गरीब परिस्थितीतून आज पंतप्रधानपदी पोचलेल्या माणसाचे, त्यांच्या कष्टांचे मला कौतुकच आहे. त्यांचे सगळे विचार मला भलेही पटत नसतील, पण ते ठामपणे मांडण्यची, पद्धत, आत्मविश्वास या गोष्टींचे मला कौतुक आणि आदर आहे. याचप्रमाणे, भाजप अ‍ॅज अ पॉलिटिकल पार्टी, ते इतर राजकीय पार्ट्यांइतकेच चांगले वा वाईट आहेत. पण माझा मुख्य आक्षेप आहे तो संघाच्या राजकीय आणि सामाजिक विचारधारेबद्दल आणि त्यांच्या नैतिक श्रेष्ठत्त्वाच्या गंडाबद्दल. त्यांची व्हाईटर दॅन व्हाईट अशी जी प्रतिमा तयार केली जाते त्याला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे- संघाची अलोकशाहीक, एकचालकानुवर्तित्ववादी, सामाजिकदृष्ट्या असहिष्णू अशी वैचारिक बैठक भारतीय संविधानाच्या आणि भारतीय समाजाच्या मूळ बैठकीला छेद देउन जाते असे माझे संघात अनेक वर्षे काढून अनुभवांति झालेले मत आहे. आणि संघ त्याच्या मूळ सामाजिक ब्रीफच्या पुढे जाऊन जनमानसावर अतिक्रमण करायचा प्रयत्न करतो त्याची तुलना मी नित्शेच्या हिटलरवरील प्रभावाशी करीन. हा मूळ सैद्धांतिक दावा आहे.

In reply to by बाळकराम

मग केजुने गंगा स्नान प्रसार माध्यमांच्या साक्षीने कोणत्या उद्देशाने केले. हम करे तो साला केरेक्टेर ढिला हे मोदी प्रशासनात सुराज्य महत्वाचे , म्हणून त्यांच्या प्रशासनाचे हिंदू संघटनांची वाजले .

In reply to by बाळकराम

ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे. एखाद्याने जर आपल्या धार्मिक विश्वासाप्रमाणे काही कृती केली आणि तो हिंदू असला तर भुवया वर चढवणे आणि अहिंदू असला तर त्याची सेक्युलर म्हणून वाखाणणी करण्याची कांगावाखोर वृत्ती भारतात नवीन नाही. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत भारतातल्या सर्वसामान्य जनतेने अशी हायपोक्रसी फाट्यावर मारली आहेच. मात्र नेहमीप्रमाणे (अ)विचारवंतांना आपला इगो बाजूला ठेवून चूक सधारायला कठीणच जाणार आहे म्हणा ! =)) तेव्हा अनेक शुभेच्छा ! "धर्म / जात ही प्रत्येकाची खाजगी गोष्ट आहे" आणि "लोकशाहीत प्रत्येकाला (तो हिंदू असला तरीसुद्धा) आपापला धर्म पाळायची परवानगी आहे" ही सत्ये तथाकथित विचारवंतांनी स्विकारल्यास (कमीत कमी त्याची स्वतःची मानसिक) सुधारणा होईल हे ते कधी समजून घेणार ? मी स्वतः गंगापूजनाकडे, इफ्तार पार्टीकडे अथवा ख्रिस्मस सेलेब्रेशनकडे एका प्रवासी नजरेपेक्षा जास्त भक्तीभावाने पाहीन असे नाही. पण दुसर्‍या कोणी तसे केले तर मला त्याचा अधिकार मान्य असायला पाहिजे. हे खरा सेक्युलर असण्यासाठीच नव्हे तर चांगला प्रामाणिक माणूस असण्यासाठी आवश्यक आहे.

In reply to by बाळकराम

arunjoshi123 Mon, 05/19/2014 - 16:52
बाळकरामजी, मोदीचा धर्म त्याची व्यक्तिगत बाब आहे पण टीवी चॅनेल नाही. मोदी बिचारा काय करू शकतो?
धर्माच्या नावावर पॉलिटिकल मायलेज
आता मोदी मधे न आणता 'गांधीजींनी मी कट्टर हिंदू आहे' म्हणून आपल्या धर्माचा राजकीय लाभ घेतला नाही हे सिद्ध करा.

एम.जी. Sat, 05/17/2014 - 16:19
नारायणदादांचा मानसिक दृष्ट्या थकलेला चेहरा पहिल्यांदाच दूरदर्शनवर बघायची संधी मिळाली. कुमार केतकर प्रभृतींचे अडचण झाल्याचे दाखवणारे चेहरे बघण्याचाही लाभ मिळाला.

In reply to by वेताळ

संपत Sat, 05/17/2014 - 21:23
आम्ही गप्प कशाला बसू? आपच्या चार जागा आल्या, म्हणजे भाजपच्या पहिल्या निवडणुकीच्या दुप्पट :) दिल्लीत देखील सातही जागांवर प्रत्येकी ३ लाखांहून जास्त मते घेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली विधानसभेत बहुदा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून बसण्याची शक्यता आहे.

In reply to by संपत

सुहासदवन Sat, 05/17/2014 - 22:38
आपच्या चार जागा आल्या, म्हणजे भाजपच्या पहिल्या निवडणुकीच्या दुप्पट Smile दिल्लीत देखील सातही जागांवर प्रत्येकी ३ लाखांहून जास्त मते घेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली विधानसभेत बहुदा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता असली तरी राजधानी मुंबईत शिवसेनेने आपली सत्ता रा़खली पाहिजे हे जसं शिवसेनेला वाटतं ना तसच आप'ला देखील वाटायला हवं होतं, दिल्लीत मिळालेली सत्ता राखून. आता तर संपूर्ण देशात आणि दिल्लीत पण भाजपाची सत्ता आहे. अहो भारताच्या राजधानी दिल्लीत जिथे स्वबळावर ताठ मानेने बसावे लागले तिथे आता मान खाली घालून बसावे लागणार. स्वतःचं असलेलं जिथे सावरता आलं नाही तिथे आता दुसर्‍याला सावरा म्हणून कसं सांगणार?

In reply to by सुहासदवन

संपत Sat, 05/17/2014 - 22:59
शिवसेनेने मुंबईत सत्ता आता राखली. २००९ मध्ये काय झाले होते?आणि आप विधानसभेत दुसऱ्या नंबरवर होते आणि लोकसभेत देखील :)
नमस्कार, रालोच्या या दिमाखदार विजयानंतर, सरलेल्या काही महिन्यात नमो लाटेचे साईड ईफेक्ट काय काय झालेत, हे पाहिले तर बर्‍याच रोचक गोष्टी ध्यानात येतात, उदा. महाराष्ट्रात, १. शिवसेनेला जीवदान मिळाले २. मनसेची धुळ्दाण झाली ३. गोपीनाथ मुंडेंसारख्यांच्या खुर्च्या वाचल्या असे तुम्हाला जाणवलेले साईड ईफेक्ट कोणते ? टिपः कृपया साईड ईफेक्ट सांगावेत. उदा. कॉग्रेसच्या घराणेशाहीला दट्ट्या बसला हा साईड ईफेक्ट नाही/नसावा.

भारतीय वकीलातीतला अनुभव

मालविका ·

यशोधरा Sat, 05/17/2014 - 06:18
परदेशात असताना माझ्या पासपोर्टची मुदत संपली होती. वकिलातीत फोन केला होता तेह्वा व्यवस्थित माहिती मिळाली होती तसेच वेबसाईटवरही व्यवस्थित माहिती होती. त्या माहिती आधारे व फोन करुन मिळालेली माहिती ह्यावरुन सांगितलेली कादगपत्रे व पासपोर्ट / अर्ज वगैरे पोस्टाने पाठवून दिले व १५ दिवसांत नवीन पासपोर्ट आलाही.

फारएन्ड Sat, 05/17/2014 - 08:07
सॅ फ्रा. ची वकिलात पूर्वी एकदम उदास असायची. एक छोटा हॉल ई. पण गेल्या ३-४ वर्षांत बराच फरक पडला आहे. माझा अनुभव २०१० चा आहे - तेव्हा बरेच नवीन लोक आले असावे तेथे. सर्विस एकदम चांगली होती, तेथील लोक व्यवस्थित बोलून माहिती देत होते. नंबर घेण्याची सिस्टीमही चांगली होती.

पिवळा डांबिस Sat, 05/17/2014 - 09:48
आजवर विविध भारतीय वकिलातींमध्ये विविध कारणांसाठी पत्रव्यवहार करण्याचा प्रसंग आला आहे. जर त्यांनी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून त्यानुसार जर त्यांना योग्य ती कागदपत्रे पुरवली तर काहीही त्रास न होता आवश्यक ते प्रमाणपत्र घरबसल्या हाती मिळाले आहे... अगदी अलीकडलाच (एक महिन्यापूर्वीचा) अनुभव म्हणजे माझ्या मुलाचे ओसीआयचे नूतनीकरण त्यांना आवश्यक असलेली कागदपत्रे पुरवल्यानंतर त्यांनी ठरवून दिलेल्या वेळेच्या अगोदर घरपोच मिळालेली आहेत... उगीच भारतीय वकिलाती ह्या कानफाट्या ठरवल्या जाउ नयेत म्हणुन हा मुद्दाम प्रतिसाद!!!

In reply to by पिवळा डांबिस

नगरीनिरंजन Sat, 05/17/2014 - 12:19
इथल्या भारतीय वकिलातीत अतिशय चांगली व्यवस्था होती (आऊटसोर्सिंगनंतर तिथे जाण्याची वेळ आलेली नाही.) लोकांना बसायला चांगली जागा, टोकन सिस्टिम आणि हसतमुख कर्मचारी. कधीही वाईट अनुभव आलेला नाही.

In reply to by नगरीनिरंजन

स्पंदना Sat, 05/17/2014 - 18:43
गचाळ बिल्डींग, गचाळ बाग विसरलात काय हो नगरी? त्याच रस्त्यावर पुढे जाउन ब्रिटीश कौन्सील आहे. तिचा थाट बघा अन आपला गचाळ कारभार पहा!

In reply to by स्पंदना

नगरीनिरंजन Sat, 05/17/2014 - 22:50
त्याला नाईलाज आहे हो; श्रीमंत लोकांच्या गरीब देशातले आपण. सुंदर बाग आणि चकाचक इमारतींचे चोचले सार्वजनिक बाबतीत परवडत नाहीत आपल्याला.

In reply to by पिवळा डांबिस

यशोधरा Sat, 05/17/2014 - 19:47
उगीच भारतीय वकिलाती ह्या कानफाट्या ठरवल्या जाउ नयेत म्हणुन हा मुद्दाम प्रतिसाद!!!
मलाही भारतीय वकिलातींचा वाईट अनुभव असा आला नाहीये कधीच.

रेवती Sat, 05/17/2014 - 19:15
इतका वाईट नसला तरी जरा काळजी करायला लावणारा अनुभव आला आहे. आम्हा दोघांच्या पापोचे नुतनीकरण करण्यावेळी (याला बरीच वर्षे झालीत, कदाचित आता सेवा बदलली असेल) २ महिने लावले. त्यांनी वेबसाईट्वर सांगितलेलीच कागदपत्रे जोडली, नंतर एक महिना झाला तरी काही उत्तर नाही. मध्ये मध्ये न उचलला जाणार्‍या क्रमांकावर अनेकदा ट्राय मारून झाले, इमेला पाठवल्या पण उपयोग नाही. एकदा मात्र दिवसभर फोनसाठी प्रयत्न केल्यावर "आता आणखी एक कागद लगतो, (नवीन नियम आहे) तो पाठवा." असे समजले. याचा उल्लेख वेबसाईटवर केला नव्हता पण ते आपण बोलायचे नसते. नव्या कागदाची पाठवणी केल्यावर मात्र महिनाभरात दोघांचेही पापो आले.

सखी Sat, 05/17/2014 - 19:42
शिकागो आणि टोरांटो इथल्या भारतीय वकिलातचा अनुभव विशेष चांगला नव्हता आला होता. उद्दाम कर्मचारी हीच मुख्य डोकेदुखी होती. आतासुध्दा एका ऑफीसची वेळ ९:३० ते १२:३० आणि ३:३० ते ५:०० इतकीच आहे, म्हणजे फक्त ४:३० तासच ऑफीस लोकांसाठी चालु असते. मग नाही करायची म्ह्टले तरी तुलना होतेच कारण बाकीची बरेचशी ऑफीसे ७:३० ला उघडतात, किंवा ९ ला उघडली तर दिवसभर चालु असतात ६-७ वाजेपर्यंत.

In reply to by सखी

रेवती Sat, 05/17/2014 - 20:55
हो. या वेळांमुळे कचेरिस सुट्टी घ्यावी लागते. मला शिकागो व न्यूयॉर्कवाल्यांचा अनुभव आहे. शिकागोतल्या हापिसात पापो तयार होऊन पडला होता. तो ८ दिवसातच आला असल्याची नोंद होती पण आम्हाला बोलावले ते १ महिन्यानी. प्रवासाच्या तारखा उगीच पुढे गेल्या. पोष्टाने कागदपत्रे पाठवली तर माझ्या मामेबहिणीला पापो ४ महिन्यांनी मिळाला. अशावेळेस तुलना होते, वैताग येतो व कागदपत्रांची काळजी वाटते. बरे, तुमच्याकडून काही कागदांची चूक आहे का? तर तीही नाही. मग प्रश्न येतोच!

भारतीय वकिलातींमधिल व्यवस्था आणि सेवा यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचायला खूप मोठे फरक करावे लागतील... आणि ते केवळ इंटिरियर डेकोरेशनपुरते मर्यादित नसतील. इतकेच पुरे.

हुप्प्या Sat, 05/17/2014 - 22:25
सान फ्रान्सिस्कोची भारतीय वकिलात ही अन्य भारतीय वकिलातींप्रमाणेच कळकट, बेशिस्त आहे असा अनुभव आहे. पण एका खाजगी कंपनीकडे ते काम दिल्यापासून खूपच सुधारणा आहे. वकिलातीचे तोंडही बघावे लागत नाही हा त्यातील मुख्य भाग. कामाची वेळ थोडी वाढली आहे. कामे सुरळित होतात. मात्र फोनवर कुणी सापडत नाही. नीट उत्तरे मिळत नाहीत. काही कामांकरता नको इतका वेळ लावणे वगैरे समस्या आजही आहे. वेबवरील सूचना पूर्ण नसणे, चुकीच्या असणे ही दुखणी अजूनही आहेतच.

कुंदन Sun, 05/18/2014 - 01:07
दुबैला पण BLS कडे आहे काम. एकच फेरी मारावी लागली कागदपत्रे द्यायला. फोटो फक्त तिथेच काढावे लागले , योग्य आकारातले फोटो बरोबर नेउन सुद्धा.

अबुधाबी , लंडन येथे चांगला अनुभव आला आहे म्युन्शन मध्ये सुद्धा अनुभव चांगला आहे. म्हणजे फोन उशिरा जरी उचलला तरी व्यवस्थित माहिती देतात, आमच्या जर्मन मराठी मंडळातील आमच्या दोन स्नेही ह्या दुतावसात काम करतात त्यांनी मंडळीत सर्व सदस्यांना तांत्रिक माहिती हवी असल्यास इमेल किंवा फोन तर्फे संपर्क साधायला सांगतात. सुद्ध मराठीत सर्व माहिती मिळते. तरीही जर्मन दुतावासात अबुधाबी व मुंबईत जाण्याचा योग आला , त्यांची कस्टमर सर्विस अप्रतिम आहे, पण गंमत म्हणजे तेथील भारतीय कर्मचारी जर्मन मधून संवाद साधतात आणि कहर म्हणजे आपली काही लोक जर्मन भाषेत उत्तर देतात ,आम्हाला जर्मन येते हे सिद्ध करण्यासाठी माझी पत्नी हे पाहून चकीत झाली एखादा जर्मन मुंबई मधील जर्मन वकालती मध्ये हिंदी मध्ये सुसंवाद करतांना कसे दिसतील अगदी तसे वाटले.

स्वसंपादन करण्यापेक्ष्य एवढेच सुचवितो की गंमत म्हणजे नंतर चा अनुभव हा म्युन्शन मधील इंडियन दूतावासाचा आहे.

दिपक.कुवेत Sun, 05/18/2014 - 18:08
ईंडियन एंबसीने त्यांची काहि ठरावीक कामे आउटसोर्स केली आहेत त्यामुळे पासपोर्ट वगैरे तरी डॉक्युमेंट सबमीट केल्यापासुन ३ दिवसात मिळतो.

समिर१२३ Mon, 05/19/2014 - 02:20
मालविका- तुमच्या अनुभवाबद्द्ल दिलगिरि. मला पापो नविन घेन्यासाथि शिकागो भारतिय वकिलातित चान्गला अनुभव आला आहे. जून- २०१२. वेबसाइत मधे अपूर्न माहिति असल्याने इमेल केल. व्हि.सि. ने दूसरया दिवशि रिप्लाय करून समपूर्न माहिति दिलि. लाम्ब राहत असल्याने सर्व कागदपत्र पोस्ताने पाथिवलि. चारच दिवसानि नविन पापो पोस्ताने मिलाला. तात्परय- १.दिल्लित प्रिन्त साथि पापो पाथवन शिकागो भारतिय वकिलातित दोन वर्शा पूर्वि नव्हते. (BLS )ला outsource केले नव्हते. २. outsource = इन्वेसतरचा फायदा & कनझुमरचा तोता. समिर१२३.

श्रीरंग_जोशी Mon, 05/19/2014 - 05:31
काही वर्षांपूर्वी शिकागोच्या भारतीय वकिलातीमध्ये प्रत्यक्ष जावे लागले. अनुभव चांगला होता. वर रेवती यांनी म्हंटल्याप्रमाणे कार्यालयीन वेळा जरा गैरसोयीच्या आहेत. अन त्यात हे कार्यालय डाऊनटाउन मध्ये आहे. लांबच्या उपनगरातून गाडी चालवत गेल्यास रहदारीत अडकण्याची शक्यता असते. आपात्कालिन गरजांसाठी शनिवारी वकिलात ११ ते १२ दरम्यान सुरू असते. गेल्या वर्षीच माझ्या बायकोचे पारपत्र नुतनीकरण होऊन दोन आठवड्यांत घरपोच मिळाले.

मैत्र Mon, 05/19/2014 - 12:40
लहान मूल असल्यास त्याचा पासपोर्ट करताना जर पालकांपैकी कोणी भारताबाहेर असेल तर त्या देशातल्या वकिलातीकडून एक फॉर्म / अ‍ॅप्रूव्हल आणि पालकाची सही भारतातल्या पासपोर्ट ऑफिसला पाठवावी लागते. हेग मध्ये नेदरलँड्स मधल्या बहुतेक वकिलाती आहेत. नेहमीप्रमाणे आजूबाजूला अत्यंत लहान देशांच्या सुंदर नेटक्या इमारती आणि बागा. भारताच्या कॉन्सुलेटसाठी पुण्यात पत्ता शोधण्याप्रमाणे धडपड करावी लागते. मागच्या बाजूने एक छोटे दार. फार तर २० बाय १० ची एक खोली. असाच एक शिपाईवजा इसम. भय्या हिंदी, इंग्रजी यथा तथाच. सगळा ओपन कारभार आणि मोठ्याने बोलून प्रत्येकाला काम विचारणे. एक निळ्या ब्लेझरमधला मनुष्य येईपर्यंत काही काम झालं नाही. आणि नेटवर जी फी लिहिली होती त्यापेक्षा साधारण ९ का १२ युरो जास्त घेतले आणि चक्क त्या वाढीव पैशांची पावती दिली - इंडियन कम्युनिटी वेल्फेअर / कल्चरल अ‍ॅक्टिव्हीटीज वगैरे तत्सम नावाखाली. आणि त्यातही दोन वेगळ्या पावत्या. अगदी १००% सरकारी. तो इतका महत्त्वाचा फॉर्म जो तिथे सह्या शिक्के करून भारतात पाठवायचा तो चक्क सायक्लोस्टाईल! म्हणजे फोटो कॉपीही नाही. अगदी १५-२० वर्षांपूर्वी नीट शाई न उठल्याने बटबटीत झालेली अक्षरे असायची सायक्लोस्टाईल तस्सा! पोस्टाच्या फॉर्म्स सारखा. काम व्यवस्थित झालं एका फेरीत पण अव्यवस्थितपणा लक्षणीय होता..

मराठे Tue, 05/20/2014 - 22:12
मुलाच्या पासपोर्टच्या संदर्भात एकदा शिकागो वकिलातीला इमेल पाठवलं होतं. आणि काही तासांनी वकिलातीमधून चक्क फोन आला आणि सगळी माहिती दिली गेली. भडभडून आलं हो!

बहुगुणी Wed, 05/21/2014 - 01:07
अमेरिकेतील भारतीय दुतावासांनी व्हिसा, ओसीआय, पीआयओ वगैरेंसाठी ज्या BLS International Services ला काँट्रॅक्टर म्हणून नेमलं होतं, त्यांची मान्यता तडकाफडकी काढून घेण्यात आली आहे. नव्या काँट्रॅक्टरकडे कागदपत्रं परत पाठवावी लागणार आहेत, मे १० - मे २० या कालावधीत ज्यांनी अर्ज पाठवले असतील ती (माझ्यासारखी!) बरीच मंडळी या गोंधळात लटकली आहेत :-( BLS International Services च्या विषयी अनेक सुरस तक्रारी आंतर्जालावर प्रसिद्ध आहेत, त्यामुळेच भारतीय वकिलातींनी हे पाउल उचलले असावे (काल आणि आजही त्यांचे कोणतेही फोन 'स-मानव' चालू नाहीत, फोन केल्यावर 'प्रतीक्षा करा, आपण रांगेत आहात' या प्रकारची टेप वाजत रहाते..), पण या सर्व प्रकारात भारतात प्रवासास येऊ इच्छिणार्‍या सर्वांनाच खूपच मनस्ताप होणार आहे.

रेवती Wed, 05/21/2014 - 02:17
बहुगुणींनी सांगितलेले खरेच मनस्ताप वाढवणारे आहे. यानंतर तुमचे पासपोर्टस व्यवस्थित येवोत अशी इच्छा करते. अशाच गोंधळानंतर माझ्या मामेबहिणीच्या नवर्‍याला भारतात गेल्यानंतर परत येताना एयरपोर्टवर मुंबैला पासपोर्ट खोटा आहे या शंकेपायी परत घरी येऊन भारतात २ महिने अडकावे लागले होते. त्यात पापो अधिकार्‍याची चूक न्म्तर लक्षात आली. माझ्या मुलाचा पासपोर्ट अगदी तान्हे बाळ असताना केला होता त्यातही दोनदा चुका केल्या (दोनदा वेगळे पापो करावे लागले)व निघण्याच्या आधी २ दिवस लक्षात आले. मग जास्तीचे दीड हजार रुपये घेऊन तेथील अधिकार्‍यांनी दुसर्‍या पापोवर सही करून हा खरा आहे असे लिहून दिले. मुलाच्या बाबतीत घडलेले खूप जुने असले तरी मामेबहिणीच्या बाबतीतले ३ वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे पापो आल्यावर कृपया शक्य तितका बारकाईने तपासा.

यशोधरा Sat, 05/17/2014 - 06:18
परदेशात असताना माझ्या पासपोर्टची मुदत संपली होती. वकिलातीत फोन केला होता तेह्वा व्यवस्थित माहिती मिळाली होती तसेच वेबसाईटवरही व्यवस्थित माहिती होती. त्या माहिती आधारे व फोन करुन मिळालेली माहिती ह्यावरुन सांगितलेली कादगपत्रे व पासपोर्ट / अर्ज वगैरे पोस्टाने पाठवून दिले व १५ दिवसांत नवीन पासपोर्ट आलाही.

फारएन्ड Sat, 05/17/2014 - 08:07
सॅ फ्रा. ची वकिलात पूर्वी एकदम उदास असायची. एक छोटा हॉल ई. पण गेल्या ३-४ वर्षांत बराच फरक पडला आहे. माझा अनुभव २०१० चा आहे - तेव्हा बरेच नवीन लोक आले असावे तेथे. सर्विस एकदम चांगली होती, तेथील लोक व्यवस्थित बोलून माहिती देत होते. नंबर घेण्याची सिस्टीमही चांगली होती.

पिवळा डांबिस Sat, 05/17/2014 - 09:48
आजवर विविध भारतीय वकिलातींमध्ये विविध कारणांसाठी पत्रव्यवहार करण्याचा प्रसंग आला आहे. जर त्यांनी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून त्यानुसार जर त्यांना योग्य ती कागदपत्रे पुरवली तर काहीही त्रास न होता आवश्यक ते प्रमाणपत्र घरबसल्या हाती मिळाले आहे... अगदी अलीकडलाच (एक महिन्यापूर्वीचा) अनुभव म्हणजे माझ्या मुलाचे ओसीआयचे नूतनीकरण त्यांना आवश्यक असलेली कागदपत्रे पुरवल्यानंतर त्यांनी ठरवून दिलेल्या वेळेच्या अगोदर घरपोच मिळालेली आहेत... उगीच भारतीय वकिलाती ह्या कानफाट्या ठरवल्या जाउ नयेत म्हणुन हा मुद्दाम प्रतिसाद!!!

In reply to by पिवळा डांबिस

नगरीनिरंजन Sat, 05/17/2014 - 12:19
इथल्या भारतीय वकिलातीत अतिशय चांगली व्यवस्था होती (आऊटसोर्सिंगनंतर तिथे जाण्याची वेळ आलेली नाही.) लोकांना बसायला चांगली जागा, टोकन सिस्टिम आणि हसतमुख कर्मचारी. कधीही वाईट अनुभव आलेला नाही.

In reply to by नगरीनिरंजन

स्पंदना Sat, 05/17/2014 - 18:43
गचाळ बिल्डींग, गचाळ बाग विसरलात काय हो नगरी? त्याच रस्त्यावर पुढे जाउन ब्रिटीश कौन्सील आहे. तिचा थाट बघा अन आपला गचाळ कारभार पहा!

In reply to by स्पंदना

नगरीनिरंजन Sat, 05/17/2014 - 22:50
त्याला नाईलाज आहे हो; श्रीमंत लोकांच्या गरीब देशातले आपण. सुंदर बाग आणि चकाचक इमारतींचे चोचले सार्वजनिक बाबतीत परवडत नाहीत आपल्याला.

In reply to by पिवळा डांबिस

यशोधरा Sat, 05/17/2014 - 19:47
उगीच भारतीय वकिलाती ह्या कानफाट्या ठरवल्या जाउ नयेत म्हणुन हा मुद्दाम प्रतिसाद!!!
मलाही भारतीय वकिलातींचा वाईट अनुभव असा आला नाहीये कधीच.

रेवती Sat, 05/17/2014 - 19:15
इतका वाईट नसला तरी जरा काळजी करायला लावणारा अनुभव आला आहे. आम्हा दोघांच्या पापोचे नुतनीकरण करण्यावेळी (याला बरीच वर्षे झालीत, कदाचित आता सेवा बदलली असेल) २ महिने लावले. त्यांनी वेबसाईट्वर सांगितलेलीच कागदपत्रे जोडली, नंतर एक महिना झाला तरी काही उत्तर नाही. मध्ये मध्ये न उचलला जाणार्‍या क्रमांकावर अनेकदा ट्राय मारून झाले, इमेला पाठवल्या पण उपयोग नाही. एकदा मात्र दिवसभर फोनसाठी प्रयत्न केल्यावर "आता आणखी एक कागद लगतो, (नवीन नियम आहे) तो पाठवा." असे समजले. याचा उल्लेख वेबसाईटवर केला नव्हता पण ते आपण बोलायचे नसते. नव्या कागदाची पाठवणी केल्यावर मात्र महिनाभरात दोघांचेही पापो आले.

सखी Sat, 05/17/2014 - 19:42
शिकागो आणि टोरांटो इथल्या भारतीय वकिलातचा अनुभव विशेष चांगला नव्हता आला होता. उद्दाम कर्मचारी हीच मुख्य डोकेदुखी होती. आतासुध्दा एका ऑफीसची वेळ ९:३० ते १२:३० आणि ३:३० ते ५:०० इतकीच आहे, म्हणजे फक्त ४:३० तासच ऑफीस लोकांसाठी चालु असते. मग नाही करायची म्ह्टले तरी तुलना होतेच कारण बाकीची बरेचशी ऑफीसे ७:३० ला उघडतात, किंवा ९ ला उघडली तर दिवसभर चालु असतात ६-७ वाजेपर्यंत.

In reply to by सखी

रेवती Sat, 05/17/2014 - 20:55
हो. या वेळांमुळे कचेरिस सुट्टी घ्यावी लागते. मला शिकागो व न्यूयॉर्कवाल्यांचा अनुभव आहे. शिकागोतल्या हापिसात पापो तयार होऊन पडला होता. तो ८ दिवसातच आला असल्याची नोंद होती पण आम्हाला बोलावले ते १ महिन्यानी. प्रवासाच्या तारखा उगीच पुढे गेल्या. पोष्टाने कागदपत्रे पाठवली तर माझ्या मामेबहिणीला पापो ४ महिन्यांनी मिळाला. अशावेळेस तुलना होते, वैताग येतो व कागदपत्रांची काळजी वाटते. बरे, तुमच्याकडून काही कागदांची चूक आहे का? तर तीही नाही. मग प्रश्न येतोच!

भारतीय वकिलातींमधिल व्यवस्था आणि सेवा यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचायला खूप मोठे फरक करावे लागतील... आणि ते केवळ इंटिरियर डेकोरेशनपुरते मर्यादित नसतील. इतकेच पुरे.

हुप्प्या Sat, 05/17/2014 - 22:25
सान फ्रान्सिस्कोची भारतीय वकिलात ही अन्य भारतीय वकिलातींप्रमाणेच कळकट, बेशिस्त आहे असा अनुभव आहे. पण एका खाजगी कंपनीकडे ते काम दिल्यापासून खूपच सुधारणा आहे. वकिलातीचे तोंडही बघावे लागत नाही हा त्यातील मुख्य भाग. कामाची वेळ थोडी वाढली आहे. कामे सुरळित होतात. मात्र फोनवर कुणी सापडत नाही. नीट उत्तरे मिळत नाहीत. काही कामांकरता नको इतका वेळ लावणे वगैरे समस्या आजही आहे. वेबवरील सूचना पूर्ण नसणे, चुकीच्या असणे ही दुखणी अजूनही आहेतच.

कुंदन Sun, 05/18/2014 - 01:07
दुबैला पण BLS कडे आहे काम. एकच फेरी मारावी लागली कागदपत्रे द्यायला. फोटो फक्त तिथेच काढावे लागले , योग्य आकारातले फोटो बरोबर नेउन सुद्धा.

अबुधाबी , लंडन येथे चांगला अनुभव आला आहे म्युन्शन मध्ये सुद्धा अनुभव चांगला आहे. म्हणजे फोन उशिरा जरी उचलला तरी व्यवस्थित माहिती देतात, आमच्या जर्मन मराठी मंडळातील आमच्या दोन स्नेही ह्या दुतावसात काम करतात त्यांनी मंडळीत सर्व सदस्यांना तांत्रिक माहिती हवी असल्यास इमेल किंवा फोन तर्फे संपर्क साधायला सांगतात. सुद्ध मराठीत सर्व माहिती मिळते. तरीही जर्मन दुतावासात अबुधाबी व मुंबईत जाण्याचा योग आला , त्यांची कस्टमर सर्विस अप्रतिम आहे, पण गंमत म्हणजे तेथील भारतीय कर्मचारी जर्मन मधून संवाद साधतात आणि कहर म्हणजे आपली काही लोक जर्मन भाषेत उत्तर देतात ,आम्हाला जर्मन येते हे सिद्ध करण्यासाठी माझी पत्नी हे पाहून चकीत झाली एखादा जर्मन मुंबई मधील जर्मन वकालती मध्ये हिंदी मध्ये सुसंवाद करतांना कसे दिसतील अगदी तसे वाटले.

स्वसंपादन करण्यापेक्ष्य एवढेच सुचवितो की गंमत म्हणजे नंतर चा अनुभव हा म्युन्शन मधील इंडियन दूतावासाचा आहे.

दिपक.कुवेत Sun, 05/18/2014 - 18:08
ईंडियन एंबसीने त्यांची काहि ठरावीक कामे आउटसोर्स केली आहेत त्यामुळे पासपोर्ट वगैरे तरी डॉक्युमेंट सबमीट केल्यापासुन ३ दिवसात मिळतो.

समिर१२३ Mon, 05/19/2014 - 02:20
मालविका- तुमच्या अनुभवाबद्द्ल दिलगिरि. मला पापो नविन घेन्यासाथि शिकागो भारतिय वकिलातित चान्गला अनुभव आला आहे. जून- २०१२. वेबसाइत मधे अपूर्न माहिति असल्याने इमेल केल. व्हि.सि. ने दूसरया दिवशि रिप्लाय करून समपूर्न माहिति दिलि. लाम्ब राहत असल्याने सर्व कागदपत्र पोस्ताने पाथिवलि. चारच दिवसानि नविन पापो पोस्ताने मिलाला. तात्परय- १.दिल्लित प्रिन्त साथि पापो पाथवन शिकागो भारतिय वकिलातित दोन वर्शा पूर्वि नव्हते. (BLS )ला outsource केले नव्हते. २. outsource = इन्वेसतरचा फायदा & कनझुमरचा तोता. समिर१२३.

श्रीरंग_जोशी Mon, 05/19/2014 - 05:31
काही वर्षांपूर्वी शिकागोच्या भारतीय वकिलातीमध्ये प्रत्यक्ष जावे लागले. अनुभव चांगला होता. वर रेवती यांनी म्हंटल्याप्रमाणे कार्यालयीन वेळा जरा गैरसोयीच्या आहेत. अन त्यात हे कार्यालय डाऊनटाउन मध्ये आहे. लांबच्या उपनगरातून गाडी चालवत गेल्यास रहदारीत अडकण्याची शक्यता असते. आपात्कालिन गरजांसाठी शनिवारी वकिलात ११ ते १२ दरम्यान सुरू असते. गेल्या वर्षीच माझ्या बायकोचे पारपत्र नुतनीकरण होऊन दोन आठवड्यांत घरपोच मिळाले.

मैत्र Mon, 05/19/2014 - 12:40
लहान मूल असल्यास त्याचा पासपोर्ट करताना जर पालकांपैकी कोणी भारताबाहेर असेल तर त्या देशातल्या वकिलातीकडून एक फॉर्म / अ‍ॅप्रूव्हल आणि पालकाची सही भारतातल्या पासपोर्ट ऑफिसला पाठवावी लागते. हेग मध्ये नेदरलँड्स मधल्या बहुतेक वकिलाती आहेत. नेहमीप्रमाणे आजूबाजूला अत्यंत लहान देशांच्या सुंदर नेटक्या इमारती आणि बागा. भारताच्या कॉन्सुलेटसाठी पुण्यात पत्ता शोधण्याप्रमाणे धडपड करावी लागते. मागच्या बाजूने एक छोटे दार. फार तर २० बाय १० ची एक खोली. असाच एक शिपाईवजा इसम. भय्या हिंदी, इंग्रजी यथा तथाच. सगळा ओपन कारभार आणि मोठ्याने बोलून प्रत्येकाला काम विचारणे. एक निळ्या ब्लेझरमधला मनुष्य येईपर्यंत काही काम झालं नाही. आणि नेटवर जी फी लिहिली होती त्यापेक्षा साधारण ९ का १२ युरो जास्त घेतले आणि चक्क त्या वाढीव पैशांची पावती दिली - इंडियन कम्युनिटी वेल्फेअर / कल्चरल अ‍ॅक्टिव्हीटीज वगैरे तत्सम नावाखाली. आणि त्यातही दोन वेगळ्या पावत्या. अगदी १००% सरकारी. तो इतका महत्त्वाचा फॉर्म जो तिथे सह्या शिक्के करून भारतात पाठवायचा तो चक्क सायक्लोस्टाईल! म्हणजे फोटो कॉपीही नाही. अगदी १५-२० वर्षांपूर्वी नीट शाई न उठल्याने बटबटीत झालेली अक्षरे असायची सायक्लोस्टाईल तस्सा! पोस्टाच्या फॉर्म्स सारखा. काम व्यवस्थित झालं एका फेरीत पण अव्यवस्थितपणा लक्षणीय होता..

मराठे Tue, 05/20/2014 - 22:12
मुलाच्या पासपोर्टच्या संदर्भात एकदा शिकागो वकिलातीला इमेल पाठवलं होतं. आणि काही तासांनी वकिलातीमधून चक्क फोन आला आणि सगळी माहिती दिली गेली. भडभडून आलं हो!

बहुगुणी Wed, 05/21/2014 - 01:07
अमेरिकेतील भारतीय दुतावासांनी व्हिसा, ओसीआय, पीआयओ वगैरेंसाठी ज्या BLS International Services ला काँट्रॅक्टर म्हणून नेमलं होतं, त्यांची मान्यता तडकाफडकी काढून घेण्यात आली आहे. नव्या काँट्रॅक्टरकडे कागदपत्रं परत पाठवावी लागणार आहेत, मे १० - मे २० या कालावधीत ज्यांनी अर्ज पाठवले असतील ती (माझ्यासारखी!) बरीच मंडळी या गोंधळात लटकली आहेत :-( BLS International Services च्या विषयी अनेक सुरस तक्रारी आंतर्जालावर प्रसिद्ध आहेत, त्यामुळेच भारतीय वकिलातींनी हे पाउल उचलले असावे (काल आणि आजही त्यांचे कोणतेही फोन 'स-मानव' चालू नाहीत, फोन केल्यावर 'प्रतीक्षा करा, आपण रांगेत आहात' या प्रकारची टेप वाजत रहाते..), पण या सर्व प्रकारात भारतात प्रवासास येऊ इच्छिणार्‍या सर्वांनाच खूपच मनस्ताप होणार आहे.

रेवती Wed, 05/21/2014 - 02:17
बहुगुणींनी सांगितलेले खरेच मनस्ताप वाढवणारे आहे. यानंतर तुमचे पासपोर्टस व्यवस्थित येवोत अशी इच्छा करते. अशाच गोंधळानंतर माझ्या मामेबहिणीच्या नवर्‍याला भारतात गेल्यानंतर परत येताना एयरपोर्टवर मुंबैला पासपोर्ट खोटा आहे या शंकेपायी परत घरी येऊन भारतात २ महिने अडकावे लागले होते. त्यात पापो अधिकार्‍याची चूक न्म्तर लक्षात आली. माझ्या मुलाचा पासपोर्ट अगदी तान्हे बाळ असताना केला होता त्यातही दोनदा चुका केल्या (दोनदा वेगळे पापो करावे लागले)व निघण्याच्या आधी २ दिवस लक्षात आले. मग जास्तीचे दीड हजार रुपये घेऊन तेथील अधिकार्‍यांनी दुसर्‍या पापोवर सही करून हा खरा आहे असे लिहून दिले. मुलाच्या बाबतीत घडलेले खूप जुने असले तरी मामेबहिणीच्या बाबतीतले ३ वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे पापो आल्यावर कृपया शक्य तितका बारकाईने तपासा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
विटेकर काकांचा "एक उद्विग्न करणारा अनुभव"वाचला . खरच खूप चिडचिड झाली . त्यावरून परदेशातील आमचा भारतीय वकीलातीतला अनुभव सांगावासा वाटतो . मला पासपोर्ट वरील नाव बदलून घायचे होते. नवीन नावाने नवीन पासपोर्ट हवा होता . वकिलाती मध्ये सकाळी १० वाजता फोन केला. वेबसाईट वर १० वाजता ची वेळ दिलेली होती त्यानुसार . आधी कोणी फोन उचलला नहि. फोन घेणाऱ्या व्यक्तीने काय हवे विचारले. पासपोर्ट वरील नाव बदलण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात त्याची माहिती हवी म्हणून सांगितले . अत्यंत तुसडेपणाने उत्तर दिले कि वेबसाईट वर बघा . तिला सांगितले कि तिथे अर्धवट माहिती आहे .

कल्पना / प्रस्ताव : मिपाकरांनी ट्रेक ला जाण्याबाबत

वेल्लाभट ·

In reply to by टवाळ कार्टा

मुक्त विहारि Sat, 05/17/2014 - 00:14
एक तर तुला भेटण्याची संधी हुकलीच आहे. निदान ह्या वेल्लाभटां बरोबर तरी जावू दे. मी यानबूतून जेमतेम १४ दिवसांसाठी येणार, त्यात बायकोच्या नकळत कट्ट्याला जाणार.(तिच्या नकळतच पळायला लागणार आहे."मिपा" ही तिची सवत आहे.त्यामुळे ती हा प्रतिसाद नक्कीच वाचणार नाही.)आणि ऐन वेळी तू काडी सारणार. तू फक्त टवाळ नसून डामरट पण आहेस.डँबीस कुठला. ओ वेल्लाभट, मी आधीच ५ जुलै सांगीतले आहे हां.वाटल्यास २८ जून करा.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य Sun, 05/18/2014 - 10:28
तू फक्त टवाळ नसून डामरट पण आहेस.डँबीस कुठला.
वाव्वा मूवी, बालपण जागे करणारा प्रतिसाद.

In reply to by मुक्त विहारि

पिवळा डांबिस Mon, 05/19/2014 - 10:31
तू फक्त टवाळ नसून डामरट पण आहेस.डँबीस कुठला.
हे टवाळ -> डामरट -> डँबीस हे बघून ड्वाळे पानावले!!! मिपावर आल्याचे सार्थक झाले!!!! *yahoo* धन्यवाद मुविकाका!! बाकी गडाच्या ट्रेकला हार्दिक शुभेच्छा! (आमी फक्त भुईकोट किल्ले किंवा जलदुर्गच बघतो!!!)

In reply to by पिवळा डांबिस

मुक्त विहारि Mon, 05/19/2014 - 15:19
टवाळ कार्टा असल्याने, असे लिहीले. एखादे भारद्स्त व्यक्तीमत्व असते, तर थोडी वाक्य रचना बदलली असती.. ================================= "प्रिय अबक, आपण नेहमीच आमच्यावर प्रेम करता.तशी तुमची आणि माझी वैयक्तिक ओळख नाही.ह्यावेळी नेमके तुम्ही आमच्या गावांत आणि आम्ही पोटा-पाण्याच्या उद्योगाला बाहेर.त्यामुळे तो चान्स हुकला. असो, ह्यावेळी निदान वेल्लाभटांबरोबर जायचे ठरवत आहे आणि सुदैवाने आमची सूट्टी पण त्याच सुमारास आहे.बायकोच्या त्रासातून सुटण्यासाठी (निदान एक दिवस तरी) आम्ही बेत मांडावा आणि तुम्ही तो उधळावा, ह्यासारखे मानसीक दू:ख नाही. आम्ही , तुम्हाला भेटलो नाही म्हणून तुम्हाला त्रास झाला असेल.तसाच त्रास वेल्लाभटांना होवू द्यावा, असे तुम्हाला मनांतून नक्कीच वाटत असेल.पण आंतरजालावर तसे मनांतले प्रत्येक विचार मांडता येत नाहीत्,ह्याची तुम्हाला कल्पना आहेच. म्हणून तुम्ही वेगळी वाक्य रचना केलीत."ज्या गावच्या बोरी,त्याच गावच्या बाभळी" हे मात्र आपण विसरलांत. जावू दे, तुमचे आमच्यावरचे प्रेम आम्हालाच काय पण समस्त मिपाकरांना माहीत आहे.त्यावर आज शिक्का मोर्तब झाले." @ वेल्लाभट, प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य, हे आपण आधीच लिहायला हवे होते.पण आपण ते न लिहील्याने हा असा गोंधळ झाला.आपण पुढच्या धाग्याच्या वेळीस योग्य ती काळजी घ्याल अशी आशा. @ संपादक मंडळ, क्रुपया अशा गोष्टींसाठी एखादा छापील फॉर्म ठेवावा आणि मग तो परत एकदा चेक करावा.म्हणजे मग असे सभासदांना एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करण्याचा चान्स मिळणार नाही, आणि मिपाची बँडविड का बँडविथ, जे काय असेल ते बॅडवाले ते वाचेल. ================================

स्पार्टाकस Sat, 05/17/2014 - 02:20
एक दिवसाचा ट्रेक करत आहात की दोन किंवा जास्त ? सोपा ट्रेक करायचा आहे का थोडा मिडीयम ग्रेड ? मुख्य म्हणजे ट्रेक करायचा आहे का पिकनिक ?

In reply to by स्पार्टाकस

वेल्लाभट Sat, 05/17/2014 - 07:55
वरील (धाग्यातील) प्रस्तावाच्या अनुषंगाने उत्तरं १. एका २. सोपा. जेणेकरून जास्त जणांना येणं शक्य होईल ३. करायचा ट्रेकच; झालीच पिकनिक तर इलाज नाही. वरील सोडून इतर कुठला पर्याय असेल तर वेगळी गोष्ट आहे.

कंजूस Sat, 05/17/2014 - 09:34
तिथे जवळच एक {दिवसाच्या}कट्टयासाठी चांगली जागा आहे .कोणालाही येता येण्यासारखी .मुविँकडे सूत्रे सोपवा आणि तारीख ठरवा फक्त .जून महिना फार दूर नाही .

In reply to by कंजूस

मुक्त विहारि Sat, 05/17/2014 - 09:42
ट्रेकिंगचे आयोजकत्व स्वीकारायचा अनुभव नाही, आणि सध्या हे शिकायला अजिबात वेळ नाही. "कंजूस" साहेब तुम्हीच का नाही ठरवत? आपली मागची ट्रिप पण मस्त झाली होती. कमीत कमी पैशांत आणि वेळ वाचवत, ट्रिप करण्यात मजा आहे.

मागल्या वर्षीचा अख्खा पावसाळा सौदीत गेलाय रखरखीत वाळवंटात... एकांतात :( यंदाचा पावसाळा अख्खा पावसाळा मनसोक्त जगायचाय.... जंगलात रानावनात कोसळत्या पावसात हिरव्यागार गवतात धबाधबा धबधब्यांखाली दोंगरातल्या गुहेत डोंगराच्या कठड्यावर चिंब चिंब भिजत मग कुडकुडत थंडी वाजत मित्रांसोबत बीयर पीत मैत्रीणिंसोबत गंमत करीत .... छतावर पावसाचा आवाज ऐकीत , खिडकीत उभे राहुन चहा पीत शांत शात्रीय संगीत ऐकीत... अन पुन्हा नवीन ट्रेक्स्चे प्लॅन करीत ... यंदाचा पावसाळा जगायचा :) अवांतर : मी टेन्ट घेतलाय , आता स्लीपींग बॅग घेतो , एक ट्रेक कॅलेन्डर करुयात आणि मग धमाल !!

In reply to by प्रसाद गोडबोले

दिपक.कुवेत Wed, 05/21/2014 - 11:45
"मैत्रीणिंसोबत गंमत करीत ...." नेमकि कशी गंमत करता हो तुम्हि सार्वजनीक ठिकाणी जरा आम्हाला पण सांगाल का? (ह. घ्या). कोणतीहि तारीख ठरली तरी मला जमेल असे वाटत नाहि. तेव्हा ट्रेक करीता भरपुर शुभेच्छा.

भाते Sat, 05/17/2014 - 11:16
कॉलिंग 'भ ट क्या खे ड वा ला' या ट्रेकिंग किंगच्या अनुभवाचा आणि सल्ल्याचा नक्कीच फायदा होईल. अर्थात बाकीचे मिपाकरही आहेतच सल्ला द्यायला आणि मदतीला आपल्याबरोबर.

In reply to by भाते

मुक्त विहारि Sat, 05/17/2014 - 14:37
आजच मनाली वरून आले आहेत. फोन करा की रात्री.... हे कंजूस आणि भटक्या खेडवाला जिथे नेतील तिथे जा. भटक्या खेडवालांबरोबर २ ट्रेक (एक तर फार जबरदस्त होता.) केले आहेत आणि कंजुस बरोबर एक सहल केली आहे. कमीत कमी खर्च आणि वेळ वाचवत नेतात आणि आणतात.

स्पार्टाकस Sat, 05/17/2014 - 14:11
मी सध्या भारताबाहेर आहे. पण भारतात असताना अनेकदा ट्रेक अ‍ॅरेंज करत असे. मुंबई / पुण्याजवळ एक दिवसाचे बरेच ऑप्शन्स आहेत. मुंबईहून / पुण्याहून मधोमध :- लोहगड विसापूर राजमाची ( २ दिवस ) उंबरखिंड पुण्याहून १ दिवसाचे ट्रेक - पुरंदर हडसर चावंड मुंबईहून १ दिवसाचे ट्रेक :- माहुली अशेरी सागरगड कलावंतीण प्रबळगड हरिहर ( नाशीक हून जवळ ) २ दिवस सवडीने वेळ असेल तर पहिली पसंती अर्थातच हरिश्चंद्रगड, राजगड, तोरणा

कंजूस Sun, 05/18/2014 - 06:51
१)शनिवार ठीक आहे . २)पुण्याकडून बरेचजण असतील तर लोहगड ठीक आहे .त्यात मुंबईचेही (इंद्रायणी गाडीने )येऊ शकतात .इकडे साडे आठ ते पाच इतका वेळ हाताशी मिळतो . ३)मुंबईकडून असतील तर पनवेल -माथेरान -नेरळ आहे . ४)रात्री मुकाम करण्याचे ट्रेकबद्दल पावसाळयातील शनि /रवि ची खात्री देता येत नाही .गर्दी होते .

शशिकांत ओक Sun, 05/18/2014 - 12:40
वेलाभट, ट्रेकिंग मधे काय समाविष्ट आहे?... लोहगड ठरला असे मानून पायथ्या पर्यंत कसे पोहोचावे? काही बरोबर काय सामान असावे?, स्थूल आकारच्या मित्रांना एका दमात चढायला आले नाही तर वाटेत थांबायची काही सोय? मिपामैत्रिणींना काही विशेष सूचना? वास्तूची ऐतिहासिक ओळख, काही शस्त्रे वा प्रदर्शनीय वस्तू, पोटापाण्याची सोय, मिनी मेडिकल सोय?...

In reply to by शशिकांत ओक

ठरलेले नाही, तरीही प्राथमिक माहिती हवी...
हल्ली ठरवून करण्याचे दिवस राहिलेले नाहीत. प्रार्थमिक माहितीसाठी व्यनि करावा. चारचौघात विचारु नये.
लोहगड ठरला असे मानून पायथ्या पर्यंत कसे पोहोचावे?
पायथ्यापर्यंत कसे पोहोचावे हे पूर्वानुभवाने समजायला अडचण नसावी.
काही बरोबर काय सामान असावे?,
सामान शक्यतो स्वतःचे असावे. मंडळ सामानाची जवाबदारी घेत नाही.
स्थूल आकारच्या मित्रांना एका दमात चढायला आले नाही तर वाटेत थांबायची काही सोय?
स्थूल आकाराच्या लोकांनी एकादमात चढू नये. केंव्हा, कसे आणि कुठे थांबावे हे तुमचे तुम्ही ठरवायचे आहे.
मिपामैत्रिणींना काही विशेष सूचना?
उत्तेजक द्रव्ये, किंवा वस्त्रे, अथवा संभाषण यावर मंडळाचे निरिक्षण नसेल
वास्तूची ऐतिहासिक ओळख, काही शस्त्रे वा प्रदर्शनीय वस्तू,
वास्तू ऐतिहासिक वाटली आणि प्रदर्शनीय नसली तर... शस्त्रसंधी करावा.
पोटापाण्याची सोय
पाण्यात उतरल्यावर पोट जाणवणार नाही.
मिनी मेडिकल सोय
योग्य वेळी गोळ्या (किंवा सवयी प्रमाणे, रेनकोट) घेणे (शक्यतो घरुन निघतांना), म्हणजे ऐनवेळी मेडिकल शोध (किंवा नंतरचा त्रास) वाचेल.

युथ होस्टेल अंबरनाथ दर वर्षी पेठ किल्ला ट्रेक जून च्या २/३ रविवारी आयोजित करते. या वर्षी १५ जून ला हा ट्रेक आहे. या ट्रेक ला येण्यासाठी YHAI चे सभासद असण्याची गरज नाही. मात्र खालील नियम पाळणे आवश्यक आहे. ड्रेस कोड : फूल प्यांट, फूल शर्ट, बूट. दुपारच्या जेवणाचा डबा. / २ लिटर पाणी. नो लिकर / नो तंबाखू /नो सिगारेट . सकाळी ०७ वाजता नेरळ स्थानकात जमायचं. टम टम रिक्षेने श्री. गोपाळ सावंत यांच्या हॉटेलात पोहोचायचं. तेथे नाश्ता,चहा करून चालायला सुरवात करायची. पेठ किल्ला येथे २/३ तासात फोचायचं.ज्यांना शक्य असेल त्यांनी वर बाले किल्ल्यात जायचं, ज्यांना शक्य असेल त्यांनी किल्य्याला प्रदक्षिणा घालायची. जेवण करून खाली यायचं. ज्यांना भिजायचं असेल त्यांनी सूख्या कपड्यांचा एक सेट आणावा. हे कपडे बरोबर बाळगण्याची गरज नाही . सावंतांच्या घरी ठेऊ शकतो. कपडे बदलण्याची योग्य व्यवस्था आहे. खर्च अंदाजे १०० ते १५०. (रिक्षा आणि नाश्ता चहा ) YHAI अंबरनाथ युनिट चे एक संस्थापक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दर वर्षी हा ट्रेक केला जातो. गेली काही वर्षे या ट्रेक ला १०० च्या वर उपस्थिती असते. जर मि पा कराना यायचे असेल तर ९९६००९६४३५ वर संपर्क साधावा. संख्या समजली कि त्या प्रमाणे रिक्ष्या/नाश्ता सांगता येतात. साधारण ५/६ वाजे पर्यंत नेरळ ला परत येतो.

कंजूस Sun, 05/18/2014 - 20:22
मुवि ,आपण हीच लेणी पाहून येताना हाच किल्ला {दुरून}पाहिला होता. वल्ली ,लेणी म्हणजे चोवीस खोल्या असलेला पन्नास फुटी चौरस विहार नदीकाठी आहे .पहिल्या शतकातला आहे .आत्मुबुवांचा ओम ॐ इथे चांगला घुमतो . इथेच ट्रेकला न जाऊ शकणाऱ्यांसाठी कट्टा करायला आदर्श जागा (वर्षभर)आहे याची नोंद घ्यावी .अधिक माहितीसाठी "ओवर टू मुवि "कारण माझी धाव ताकापुरतीच आहे .स्ट्रॉंग अथवा वीक फिल्डींग मधले काही कळत नाही .

In reply to by प्रचेतस

मुक्त विहारि Sun, 05/18/2014 - 22:30
ते नेमके जागेचे नांव विसरलो बघा,तसे लिहून ठेवले आहे, पण आमची कागदपत्रे डोंबोलीतच राहीली. लेणी बघीतली, तीर्थ प्राशन केले आणि आनंदात घरी आलो. पक्षी-तीर्था सकट भटकंती करायला एकदम योग्य जागा.इथे ट्रेकिंग हा शब्द जाणीवपुर्वक टाळला आहे. (आम्हाला वक्ती आणि वल्लीं बरोबर भटकण्यांतच जास्त इंटरेस्ट.सुखरूप गेलो आणि सुखरूप आलो.)

In reply to by प्रचेतस

मुक्त विहारि Sun, 05/18/2014 - 23:37
सॉरी हां, हे कट्टे किंवा मिपाकरांबरोबर भटकंती म्हटले ना? की आम्हाला फक्त गप्पा आणि खाणे, इतकेच आठवते. मागच्या वेळी त्या रामदासांबरोबर भटक भटक भटकलो... पण लक्षांत काय राहीले तर, पारश्या कडचे बकरी आयटेम आणि एके ठिकाणी प्यायलेलो रस्सम (जेमतेम १० मिनीटे आधी बायकोच्या हातची इडली आणि मग राहवलेच नाही म्हणून मिसळ पाव खाल्ला होता.खरे तर त्यावेळी मला अजून रस्सम हवा होता, पण बायकोच्या डोळ्यातील भांव तिच्या कडे न बघताच ओळखले, आणि मनावर काबू ठेवला.) जावू द्या हो, आम्ही हे असेच बघा, घराबाहेर पडलो की आमचा पार शंकर्‍या होतो. @ कंजूस, दादा, ह्या वल्लींना जरा त्या गावाचे नाव सांगून टाका.

In reply to by मुक्त विहारि

मुक्त विहारि Sun, 05/18/2014 - 23:39
ह्या बकरी आयटेमचे बेकरी आयटेम, असे कुणी करेल काय? तसे त्या पारश्याकडे "बकरी आयटेम" पण होते. पण आम्ही बेकरी आयटेमच खाल्ले.

कंजूस Mon, 05/19/2014 - 06:42
पेठचे फोटो टाकल्याने छान वातावरण निर्मिती केलीत भटक्याखेडवाला . वल्ली ,बरोबर .किल्याच्या सुळक्यात एक मोठे लेणं आहे .परंतु हे गड चढून जाणाऱ्यांसाठी आहे .दुसरे आंबिवली गावापुढे एक दीड किमीवर रस्त्याकडे आहे . थोडे अवांतर . वल्ली ,तुम्ही बदामि ऐहोळेला (अधिक हम्पि)जायलाच पाहिजे .मी दोनदा गेलो होतो . त्यातले काही फोटो इथे आहेत http://s1366.photobucket.com/user/Wdapav/library/

In reply to by कंजूस

प्रचेतस Mon, 05/19/2014 - 08:51
धन्यवाद कंजूसराव. बदामी, हंपी, ऐहोळेला सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जायचा विचार आहे. मिपाकरांबरोबर भ्रमंती आखण्यास नक्कीच आवडेल.

In reply to by प्रचेतस

मुक्त विहारि Mon, 05/19/2014 - 09:28
१८ ऑक्टोबर पासून २८ ऑक्टोबर पर्यंत भारतात आहे.... त्याच वेळेत असेल तर आपण नक्की येणार... त्यातून ह्या ट्रिपला वल्ली साहेब, असतील तर हमखास.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस Mon, 05/19/2014 - 14:15
सप्टेँबर २५ ते५ ऑक्टो नवरात्र दसरा आणि १८ ऑक्टो ते २८ दिवाळीमुळे कर्नाटकाची रेल्वेची तिकीटे मिळणे अंमळ कठीणच .

In reply to by कंजूस

मुक्त विहारि Mon, 05/19/2014 - 15:02
मेलो...ठार मेलो... बायको लुटणार आणि आम्ही मिपाकरांच्या बरोबर सहलीला पण मुकणार.. (ऐन दिवाळीत घराबाहेर ते पण डोंबोलीत असतांना, अशक्य..कुछ तो तोड़गा निकालनाच पडेंगा.)

इरसाल Mon, 05/19/2014 - 10:01
तुम्हाला कोणत्या संस्थेबरोबर जायचे नसेल तर कर्जत रेल्वे स्थानका वर उतरा, दगड्याकडचे वडे चेपा नंतर कर्जत-आंबिवली एस्टी पकडुन थेट आंबिवली. तिथुन पेठचा किल्ला चढायचा पेठ गावात पुर्वी छान कलाकंद व पनीर सदृश्य पदार्थ मिळायचा सध्याचे माहित नाही. किल्ला परत उतरल्या नंतर जोर शिल्लक असेल तर मग आंबिवली गावाच्य जरासेच पुढे असणार्‍या बौद्ध कालीन लेण्या बघुन यायचे.पुन्हा आंबिवली-कर्जत मग कर्जत वरुन इकडे-तिकडे जायला लोकल हैतच.

पेठच्या किल्ल्यावर गेलात तर वरच्या पेठवाडी मध्ये (किल्ल्याच्या पायथ्याच्या) उत्कृष्ट खवा मिळतो.. जरूर आणावा.. ही पेठवाडी भेसळविरहीत आणी टिकाऊ खव्यासाठी प्रसिद्ध आहे आणी इथला खवा पुर्वी कल्याण/मुंबईला विकावयास यायचा...अगदी न चुकवण्यासारखी गोष्ट..

In reply to by स्वच्छंदी_मनोज

मुक्त विहारि Tue, 05/20/2014 - 22:15
मनोज भाऊ, तुमचे-आमचे जमणार बघा.हा अस्सा इतकुसा डोंगर चढायचा आणि खवा आणायचा.आम्ही पण असेच कुठेतरी जातो आणि काय बघीतले, ह्या पेक्षा काय खाल्ले, तेच लक्षांत राहते. बादवे, हा खवा, गुलाबजाम साठी की पेढ्यांसाठी? वरील प्रश्र्नाचा आणि "वडगांव, म्हणजे पुणे जिल्ह्यातील की नगर?" ह्याचा काही संबंध नाही.

दिपक.कुवेत Wed, 05/21/2014 - 11:55
पावसाळा होईस्त हे असले धागे काढु तर नयेच शीवाय जाउन आल्यावर त्याचे रसभरीत वर्णन पण ईथे प्रकाशीत करु नये. ईथे उन्हाने जीव कासावीस होतोय!!! च्या मारी तुम्हि पावसात येथेच्छ भीजणार आणि आम्हि ईथे उन्हात.....ये नॉ चॉलबे! आणि ट्रेक केलेच तर त्या मुविंना अजीबात नेउ नका. ईतकं रसभरीत वर्णन करतात कि जीवाचं पाणी पाणी होतं.

In reply to by दिपक.कुवेत

भाते गुरुवार, 05/29/2014 - 12:05
आता समजलं ना कसा त्रास होतो ते. सोमवारी सकाळी ऑफिसमध्ये बसुन तुमच्यासारख्या बल्लव आणि सुगरिणींच्या सचित्र पाकृ वाचताना आम्हाला सुध्दा असाच त्रास होतो. म्हणुनच तर मी सारखा पाकृचे धागे विकांताला टाकत जा म्हणुन बोंबलत असतो.

मुक्त विहारि Wed, 05/28/2014 - 19:44
तुम बसो बोंबलत... हमरा ट्रेक नक्की हो गयेला हय. हम जायेंगा और खायेंगा-पियेंगा. तुम वो सुकट घाल के वांगी की भाजी बनावता हय, तो हमको भी ऐसाच होता हय. तुम्हारे इस जलजल पर, मोगँबो खूष हुवा.

सुहास झेले गुरुवार, 05/29/2014 - 00:42
हरिश्चंद्र, राजमाची, लोहगड, माहुली, सुधागड विकांतात नकोसे असतात... प्रचंड प्रमाणात गर्दी असते. काही वेगळे पर्याय बघा. वसई/नाशिक रेंजसुद्धा मस्त आहे. काही पर्याय सुचवतो.. १. सरसगड (पाली) . २. कामण दुर्ग (वसई) - प्रचंड पायपीट, हमखास चकवा लागणारी... टेहळणी किल्ला असल्याने फक्त पाण्याच्या टाक्याच आहेत गडावर, पण फुलांची रास पसरलेले तीन डोंगर चढून मग उतरून पोचावे लागते ;-) . ==== . ==== . ३. सागरगड (पेण - अलिबाग रस्त्यावर अलिबागपासून ७ किमी. अलीकडे खंडाळे गावातून गडावर जायला सोपी वाट आहे... फारसा इतिहास ज्ञात नसला तरी पुरंदरच्या तहात दिलेल्या २३ किल्ल्यांच्या यादीत सागरगड होता. गडाच्या माथ्यावरून समुद्रातील हालचाली स्पष्ट दिसत असल्याने गडाला नक्कीच बरेच महत्व) . ४. अवचितगड (रोहा) - साक्षात रायगड परिसरातील सुरक्षाभिंत म्हणून ओळखला जाणारा किल्ला. किल्ल्यावर जाण्यासाठी पिंगळसई, मेढा किंवा पेंडसे गावातून मार्ग आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी रोह्याला उतरून पिंगळसई किंवा मेढासाठी एसटी किंवा रिक्षा मिळते. चढाई एकदम सोप्पी. ५. रतनगड (रतनवाडी) - इथेही गर्दी असतेच विकांतात, पण प्रचंड घनदाट जंगल आणि भरपावसात कितीही वेळा करायला आवडेल असा ट्रेक (रोप आवश्यक) . ६. किल्ले असावा… - बोईसर पूर्वेला, टाटा आणि ऑसवाल बिल्डर्सचे हाउसिंग प्रोजेक्ट ओलांडून पुढे काही किलोमीटरवर वरांगडे हे गाव आहे. एसटीने उतरल्यावर, उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता आहे. जिथे डाव्या बाजूला विराज इंडस्ट्रीचं एक प्रोजेक्टसुद्धा आहे. तिथून पुढे किल्ल्याला जाणारी वाट आहे. . ७. किल्ले कोहोज - पालघरपासून एसटीने ३० मिनिटांचा प्रवास. हया गडावर जाण्याचे तीन मार्ग आहे, एक नाणे गावातुन दुसरा अंबीत गावातुन तर तिसरा वाघोटे फाट्याजवळून . ८. किल्ले तांदुळवाडी - सफाळेहून तांदूळवाडी बेस व्हिलेज . ९. अशेरीगड - पालघरहून महामार्गाने १० किमी अंतरावर खोडकोना गाव (बेस व्हिलेज) . १०. किल्ले सिंदोळा - कल्याणहून अहमदनगरला जाणारी बस पकडून खुबी फाट्याला उतरावे. तिथे मारुती मंदिराच्या बाजूने ट्रेक रूट सुरु. इथून हरिश्चंद्रगडावरपण जाता येते.. . तूर्तास इतकेच ;-) वसई परिसरात श्रीदत्त राऊत यांच्या सोबत काही ट्रेक्स ठरवणार आहोत, ज्यामुळे आपल्याला अनेक लहान-मोठे अपरिचित किल्ले दोन अडीच दिवसात बघता येतील. सांगेनच ठरल्यावर :)

In reply to by सुहास झेले

शिद Fri, 05/30/2014 - 17:59
बोईसर-पालघर हा माझ्या गावचा परीसर पण तुम्ही वरील दिलेल्या बर्‍यांच ठीकाणी कधी जाणं झालं नाही. धन्यवाद, तुमच्यामुळे नविन ठीकाणांची माहीती कळली.

In reply to by शिद

सुहास झेले Fri, 05/30/2014 - 23:18
वसई ते बोईसर परिसरात जवळजवळ १४०-१४५ लहान मोठे किल्ले आहेत, ज्यातल्या ४८-४९ची नोंद पुरातत्व खात्याकडे आहे आणि त्यातील फक्त दोन किल्ले ते सांभाळतात. :-| तुमचा ईमेल आयडी व्यनि करून ठेवा. अडीच दिवसांची मोहीम ठरतेय, सांगेन ठरल्यावर...

कंजूस गुरुवार, 05/29/2014 - 08:20
सुहास झेले ,दहा ट्रेकची माहिती आवडली . माझा प्लान असा आहे :- १)दरवर्षी एकदा /दोनदा नियमित पावसाळयात /हिवाळ्यात भिमाशंकर करणे . २)मुबईकडचे कर्जत-खांडस मार्गे वर येतील .पुण्याकडचे राजगुरूनगर कडून गुप्त भिमाशंकर मार्गे येतील . ३)पुण्याकडचे फारसे चालू न शकणारे बसने अकरा वाजता येतील आणि वरती सोपा गुप्त भिमाशंकर अथवा हनुमानतळे करतील .परत बसने जातील . बसप्रवासामुळे सर्व साधनसामग्री आणणे सोपे जाते .कोणीही येऊ शकतो .न आवडल्यास परत त्याच दिवशी तीन आणि पाच वाजताची बस आहे . ४)एक दिवस मुकाम डबेवाले धर्मशाळा ,हॉल ,खोल्या आणि टॉइलट आहे .माझा अनुभव चांगला आहे . ५)पुण्याकडून बस तिकिट ,राहाणे ,नाश्ता २दा,चहा ,जेवण १दा धरून रुपये साडेचारशे पर्यँत खर्च होतो . ६)कर्जतकडून रुपये तिनशे . कसे वाटते अभिप्राय द्या

In reply to by कंजूस

सुहास झेले गुरुवार, 05/29/2014 - 09:46
भीमाशंकर जबरीच आहे, पण गर्दी असली की तिथे जायचा कंटाळा येतो. पण एकदा तरी शिडीच्या वाटेने करायचा आहे... तीच एक वाट राहिली आहे. तिथून गर्दी कमी असते, पण रोपची गरज लागते काही ठिकाणी.... :)

सुधीर जी गुरुवार, 05/29/2014 - 10:58
पण रोपची गरज लागते काही ठिका>> नाहि आता भिमाशंकर शिडि घाटाने जाताना रोप चि गरज लागत नाहि. अवगड जागि लोखंडि शिडि लावलेलि आहे. मि गेलि ५ वष भिमाशंकर करतो आहे जुले महिना एकदम बेस्ट आहे भिमाशंकर ट्रकिंग साठि

कंजूस गुरुवार, 05/29/2014 - 11:17
मुवि एक दिवसात होते की भिमाशंकर पण कर्जत टरेकिंग नाही .पुण्याहून बसने गेल्यास आणि पुण्याला परत असे केल्यास अकरा ते पाच इतका वेळ वरती हाताशी मिळतो .कार केल्यास आणखी दोन तास मिळतात . सुहास ,मी कधी शनी रवी जात नाही त्यामुळे त्रास होत नाही .आठ दहावेळा भि० ला गेलो आहे पण एकदाही शिडीच्या वाटेने मला गाववाल्यांनी जाऊ दिले नाही .तसा एक तासाचाच फरक पडतो आणि तिकडे पक्षी दिसत नाहीत . यावर्षी १२जुलै ते २५ ऑगस्ट गर्दी असेल . मी बहुतेक बुध ४ जूनला जाणार आह .

स्पार्टाकस Sat, 05/31/2014 - 12:06
बाराही महीने करण्याजोगा एक भन्नाट ट्रेक म्हणजे त्र्यंबकेश्वर जवळचा हरिहर. याला असलेली उभीच्या उभी दगडी शिडी खाचेत हात घालून चढून जाणं, विशेषतः पावसाळ्यात हा एक थरारक अनुभव असतो. मुंबई / नाशीकहून एक दिवसात होणारा ट्रेक आहे हा. H01

ह्या वीकेन्डला (८ जुन २०१४) मस्त टेल्को लेक पी-एम-आआयाणि पी-सी-एम-सी ग्रूपसोबतभ्रमंती आणि पक्षी निरिक्षण झाले ... संध्याकाळी मिपाकरांसोबत मस्त खादाडी ( काय पराठे होते राव ! लय भारी !!) आता पुढच्या वीकेन्डचा १४-१५ जुन चा काय प्लॅन ? पाऊसपडायच्या आधी एकदा हरिश्चंद्रगड करुन येवुयात का ? की वेरुळला जाऊन यायचे ?

In reply to by प्रसाद गोडबोले

सूड Mon, 06/09/2014 - 17:07
>>पाऊसपडायच्या आधी एकदा हरिश्चंद्रगड करुन येवुयात का ? हरिश्चंद्रगड पाऊस उलटून गेल्यानंतर मस्त ऑप्शन वाटला मला. पण बघा कसं काय ते!!

In reply to by प्रचेतस

मग एका दिवसात भाजे कार्ला केव्ह्ज करु ... जरा पाऊस वगैरे पडला तर मग राजमाची किंव्वा लोहगड करता येइल का? आणि बाकी कोणीच इन्टरेस्टेड नाहीये का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस Fri, 06/13/2014 - 12:30
भाजे लेणीला मागच्याच आठवड्यात जाऊन आलो. राजमाचीला एक मुक्काम लागतो. लोहगड कधीही करता येईल पण पावसात केल्यास अधिक सुंदर. भाजेला जायचे तर जाऊ परत. ६.४५ च्या लोकलने निघायचे. १२.३० पर्यंत घरी परत.

हुकुमीएक्का Wed, 06/11/2014 - 22:27
ट्रेकसाठी एखादे असे ठिकाण ठरवा जिथे सर्वाना सोईस्कर होईल. मावळात 'तिकोणा',; लोणावळ्यात 'राजमाची पॉईंट', लोहगड, कोरीगड, तुंग, असे पर्याय आहेत. 'सूड' यांनी सुचवल्याप्रमाणे हरिश्चंद्रगड देखील मस्त पर्याय आहे पण पावसाळ्यानंतरच. 'मुक्त विहारि' यांच्या म्हणण्याशी सहमत. एखादा 'फॉर्म' तयार केला पाहिजे ज्यावर ट्रेक बद्दल सर्व माहिती असेल. ट्रेकसाठी लागणारे साहित्य, आणि ट्रेक कितीपत अवघड आहे याची माहीती आधीच समजली तर अजुन छान. जेणेकरून ट्रेकला गेल्यावर काही अडचण भासणार नाही.

In reply to by हुकुमीएक्का

चौकटराजा Sun, 06/15/2014 - 07:31
ट्रेकसाठी " एखादा" फॉर्म ठेवा . असहमत. त्यापेक्षा स्वता:चा फॉर्म चांगला ठेवा . ( आम्ही फॉर्मात असताना ट्रेक केले नाहीत. आता बुवा म्हणतात आम्ही म्हातारे झालो ) .

हा अख्खा विकेन्ड निव्वळ झोपा काढण्यात गेला ... पुढच्या वेकेन्डचा काहीतरी प्लॅन करु राव ... जवळच्या जवळ तिकोना / लोहगड / विसापुर / राजमाची / सिंहगड / पुरंधर .... काहीतरी ट्रेक करुया राव ... नाहीतर मी आपला अजिंक्यतारा सज्जनगडचा ट्रेक करुन येईन म्हणतो *biggrin*

हुकुमीएक्का गुरुवार, 06/19/2014 - 01:57
नवीन कॅमेरा घेतल्यापासून सज्जनगड ला जायचा प्लॅन चालू आहे. पण अजून वेळच जुळून येत नाहीये. कोणी ठरवला सज्जनगड चा ट्रेक तर नक्की सांगा. जरूर येईन

कंजूस गुरुवार, 06/19/2014 - 03:07
कोंडेश्वर पाहा ।असे सुचवतो . कामशेत ते जांभिवली बस आहे .जांभिवली गावापासून एक किमीवर चालत कोंडेश्वर आहे .मागचा ओढा खतरनाक आहे .[हा ओलांडला तर खाली कोकणात ढाक -खांडपे-कर्जत वाट आहे] .

विअर्ड विक्स गुरुवार, 06/19/2014 - 11:33
१५ तारखेला तोरणा आणि बेडसे लेणीला जाऊन आलो. तोरणाला पोट भरून जांभळे , करवंदे नि रायवळ आंबे खाल्ले. असे उदर भरणाचेट्रेक सुचवा जरा …;)

In reply to by सूड

सुहास झेले Mon, 03/09/2015 - 15:35
ह्या भागातील बहुतेक किल्ले टेहळणीसाठी वापरले जायचे... त्यामुळे बहुतेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या आणि एखाद दुसरे बांधकाम असावे असा अंदाज. मीही ह्याभागात जास्त फिरलेलो नाही. श्रीदत्त राऊत सोबत आहेत म्हणून इथे माहिती दिली :)

In reply to by टवाळ कार्टा

मुक्त विहारि Sat, 05/17/2014 - 00:14
एक तर तुला भेटण्याची संधी हुकलीच आहे. निदान ह्या वेल्लाभटां बरोबर तरी जावू दे. मी यानबूतून जेमतेम १४ दिवसांसाठी येणार, त्यात बायकोच्या नकळत कट्ट्याला जाणार.(तिच्या नकळतच पळायला लागणार आहे."मिपा" ही तिची सवत आहे.त्यामुळे ती हा प्रतिसाद नक्कीच वाचणार नाही.)आणि ऐन वेळी तू काडी सारणार. तू फक्त टवाळ नसून डामरट पण आहेस.डँबीस कुठला. ओ वेल्लाभट, मी आधीच ५ जुलै सांगीतले आहे हां.वाटल्यास २८ जून करा.

In reply to by मुक्त विहारि

आत्मशून्य Sun, 05/18/2014 - 10:28
तू फक्त टवाळ नसून डामरट पण आहेस.डँबीस कुठला.
वाव्वा मूवी, बालपण जागे करणारा प्रतिसाद.

In reply to by मुक्त विहारि

पिवळा डांबिस Mon, 05/19/2014 - 10:31
तू फक्त टवाळ नसून डामरट पण आहेस.डँबीस कुठला.
हे टवाळ -> डामरट -> डँबीस हे बघून ड्वाळे पानावले!!! मिपावर आल्याचे सार्थक झाले!!!! *yahoo* धन्यवाद मुविकाका!! बाकी गडाच्या ट्रेकला हार्दिक शुभेच्छा! (आमी फक्त भुईकोट किल्ले किंवा जलदुर्गच बघतो!!!)

In reply to by पिवळा डांबिस

मुक्त विहारि Mon, 05/19/2014 - 15:19
टवाळ कार्टा असल्याने, असे लिहीले. एखादे भारद्स्त व्यक्तीमत्व असते, तर थोडी वाक्य रचना बदलली असती.. ================================= "प्रिय अबक, आपण नेहमीच आमच्यावर प्रेम करता.तशी तुमची आणि माझी वैयक्तिक ओळख नाही.ह्यावेळी नेमके तुम्ही आमच्या गावांत आणि आम्ही पोटा-पाण्याच्या उद्योगाला बाहेर.त्यामुळे तो चान्स हुकला. असो, ह्यावेळी निदान वेल्लाभटांबरोबर जायचे ठरवत आहे आणि सुदैवाने आमची सूट्टी पण त्याच सुमारास आहे.बायकोच्या त्रासातून सुटण्यासाठी (निदान एक दिवस तरी) आम्ही बेत मांडावा आणि तुम्ही तो उधळावा, ह्यासारखे मानसीक दू:ख नाही. आम्ही , तुम्हाला भेटलो नाही म्हणून तुम्हाला त्रास झाला असेल.तसाच त्रास वेल्लाभटांना होवू द्यावा, असे तुम्हाला मनांतून नक्कीच वाटत असेल.पण आंतरजालावर तसे मनांतले प्रत्येक विचार मांडता येत नाहीत्,ह्याची तुम्हाला कल्पना आहेच. म्हणून तुम्ही वेगळी वाक्य रचना केलीत."ज्या गावच्या बोरी,त्याच गावच्या बाभळी" हे मात्र आपण विसरलांत. जावू दे, तुमचे आमच्यावरचे प्रेम आम्हालाच काय पण समस्त मिपाकरांना माहीत आहे.त्यावर आज शिक्का मोर्तब झाले." @ वेल्लाभट, प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य, हे आपण आधीच लिहायला हवे होते.पण आपण ते न लिहील्याने हा असा गोंधळ झाला.आपण पुढच्या धाग्याच्या वेळीस योग्य ती काळजी घ्याल अशी आशा. @ संपादक मंडळ, क्रुपया अशा गोष्टींसाठी एखादा छापील फॉर्म ठेवावा आणि मग तो परत एकदा चेक करावा.म्हणजे मग असे सभासदांना एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करण्याचा चान्स मिळणार नाही, आणि मिपाची बँडविड का बँडविथ, जे काय असेल ते बॅडवाले ते वाचेल. ================================

स्पार्टाकस Sat, 05/17/2014 - 02:20
एक दिवसाचा ट्रेक करत आहात की दोन किंवा जास्त ? सोपा ट्रेक करायचा आहे का थोडा मिडीयम ग्रेड ? मुख्य म्हणजे ट्रेक करायचा आहे का पिकनिक ?

In reply to by स्पार्टाकस

वेल्लाभट Sat, 05/17/2014 - 07:55
वरील (धाग्यातील) प्रस्तावाच्या अनुषंगाने उत्तरं १. एका २. सोपा. जेणेकरून जास्त जणांना येणं शक्य होईल ३. करायचा ट्रेकच; झालीच पिकनिक तर इलाज नाही. वरील सोडून इतर कुठला पर्याय असेल तर वेगळी गोष्ट आहे.

कंजूस Sat, 05/17/2014 - 09:34
तिथे जवळच एक {दिवसाच्या}कट्टयासाठी चांगली जागा आहे .कोणालाही येता येण्यासारखी .मुविँकडे सूत्रे सोपवा आणि तारीख ठरवा फक्त .जून महिना फार दूर नाही .

In reply to by कंजूस

मुक्त विहारि Sat, 05/17/2014 - 09:42
ट्रेकिंगचे आयोजकत्व स्वीकारायचा अनुभव नाही, आणि सध्या हे शिकायला अजिबात वेळ नाही. "कंजूस" साहेब तुम्हीच का नाही ठरवत? आपली मागची ट्रिप पण मस्त झाली होती. कमीत कमी पैशांत आणि वेळ वाचवत, ट्रिप करण्यात मजा आहे.

मागल्या वर्षीचा अख्खा पावसाळा सौदीत गेलाय रखरखीत वाळवंटात... एकांतात :( यंदाचा पावसाळा अख्खा पावसाळा मनसोक्त जगायचाय.... जंगलात रानावनात कोसळत्या पावसात हिरव्यागार गवतात धबाधबा धबधब्यांखाली दोंगरातल्या गुहेत डोंगराच्या कठड्यावर चिंब चिंब भिजत मग कुडकुडत थंडी वाजत मित्रांसोबत बीयर पीत मैत्रीणिंसोबत गंमत करीत .... छतावर पावसाचा आवाज ऐकीत , खिडकीत उभे राहुन चहा पीत शांत शात्रीय संगीत ऐकीत... अन पुन्हा नवीन ट्रेक्स्चे प्लॅन करीत ... यंदाचा पावसाळा जगायचा :) अवांतर : मी टेन्ट घेतलाय , आता स्लीपींग बॅग घेतो , एक ट्रेक कॅलेन्डर करुयात आणि मग धमाल !!

In reply to by प्रसाद गोडबोले

दिपक.कुवेत Wed, 05/21/2014 - 11:45
"मैत्रीणिंसोबत गंमत करीत ...." नेमकि कशी गंमत करता हो तुम्हि सार्वजनीक ठिकाणी जरा आम्हाला पण सांगाल का? (ह. घ्या). कोणतीहि तारीख ठरली तरी मला जमेल असे वाटत नाहि. तेव्हा ट्रेक करीता भरपुर शुभेच्छा.

भाते Sat, 05/17/2014 - 11:16
कॉलिंग 'भ ट क्या खे ड वा ला' या ट्रेकिंग किंगच्या अनुभवाचा आणि सल्ल्याचा नक्कीच फायदा होईल. अर्थात बाकीचे मिपाकरही आहेतच सल्ला द्यायला आणि मदतीला आपल्याबरोबर.

In reply to by भाते

मुक्त विहारि Sat, 05/17/2014 - 14:37
आजच मनाली वरून आले आहेत. फोन करा की रात्री.... हे कंजूस आणि भटक्या खेडवाला जिथे नेतील तिथे जा. भटक्या खेडवालांबरोबर २ ट्रेक (एक तर फार जबरदस्त होता.) केले आहेत आणि कंजुस बरोबर एक सहल केली आहे. कमीत कमी खर्च आणि वेळ वाचवत नेतात आणि आणतात.

स्पार्टाकस Sat, 05/17/2014 - 14:11
मी सध्या भारताबाहेर आहे. पण भारतात असताना अनेकदा ट्रेक अ‍ॅरेंज करत असे. मुंबई / पुण्याजवळ एक दिवसाचे बरेच ऑप्शन्स आहेत. मुंबईहून / पुण्याहून मधोमध :- लोहगड विसापूर राजमाची ( २ दिवस ) उंबरखिंड पुण्याहून १ दिवसाचे ट्रेक - पुरंदर हडसर चावंड मुंबईहून १ दिवसाचे ट्रेक :- माहुली अशेरी सागरगड कलावंतीण प्रबळगड हरिहर ( नाशीक हून जवळ ) २ दिवस सवडीने वेळ असेल तर पहिली पसंती अर्थातच हरिश्चंद्रगड, राजगड, तोरणा

कंजूस Sun, 05/18/2014 - 06:51
१)शनिवार ठीक आहे . २)पुण्याकडून बरेचजण असतील तर लोहगड ठीक आहे .त्यात मुंबईचेही (इंद्रायणी गाडीने )येऊ शकतात .इकडे साडे आठ ते पाच इतका वेळ हाताशी मिळतो . ३)मुंबईकडून असतील तर पनवेल -माथेरान -नेरळ आहे . ४)रात्री मुकाम करण्याचे ट्रेकबद्दल पावसाळयातील शनि /रवि ची खात्री देता येत नाही .गर्दी होते .

शशिकांत ओक Sun, 05/18/2014 - 12:40
वेलाभट, ट्रेकिंग मधे काय समाविष्ट आहे?... लोहगड ठरला असे मानून पायथ्या पर्यंत कसे पोहोचावे? काही बरोबर काय सामान असावे?, स्थूल आकारच्या मित्रांना एका दमात चढायला आले नाही तर वाटेत थांबायची काही सोय? मिपामैत्रिणींना काही विशेष सूचना? वास्तूची ऐतिहासिक ओळख, काही शस्त्रे वा प्रदर्शनीय वस्तू, पोटापाण्याची सोय, मिनी मेडिकल सोय?...

In reply to by शशिकांत ओक

ठरलेले नाही, तरीही प्राथमिक माहिती हवी...
हल्ली ठरवून करण्याचे दिवस राहिलेले नाहीत. प्रार्थमिक माहितीसाठी व्यनि करावा. चारचौघात विचारु नये.
लोहगड ठरला असे मानून पायथ्या पर्यंत कसे पोहोचावे?
पायथ्यापर्यंत कसे पोहोचावे हे पूर्वानुभवाने समजायला अडचण नसावी.
काही बरोबर काय सामान असावे?,
सामान शक्यतो स्वतःचे असावे. मंडळ सामानाची जवाबदारी घेत नाही.
स्थूल आकारच्या मित्रांना एका दमात चढायला आले नाही तर वाटेत थांबायची काही सोय?
स्थूल आकाराच्या लोकांनी एकादमात चढू नये. केंव्हा, कसे आणि कुठे थांबावे हे तुमचे तुम्ही ठरवायचे आहे.
मिपामैत्रिणींना काही विशेष सूचना?
उत्तेजक द्रव्ये, किंवा वस्त्रे, अथवा संभाषण यावर मंडळाचे निरिक्षण नसेल
वास्तूची ऐतिहासिक ओळख, काही शस्त्रे वा प्रदर्शनीय वस्तू,
वास्तू ऐतिहासिक वाटली आणि प्रदर्शनीय नसली तर... शस्त्रसंधी करावा.
पोटापाण्याची सोय
पाण्यात उतरल्यावर पोट जाणवणार नाही.
मिनी मेडिकल सोय
योग्य वेळी गोळ्या (किंवा सवयी प्रमाणे, रेनकोट) घेणे (शक्यतो घरुन निघतांना), म्हणजे ऐनवेळी मेडिकल शोध (किंवा नंतरचा त्रास) वाचेल.

युथ होस्टेल अंबरनाथ दर वर्षी पेठ किल्ला ट्रेक जून च्या २/३ रविवारी आयोजित करते. या वर्षी १५ जून ला हा ट्रेक आहे. या ट्रेक ला येण्यासाठी YHAI चे सभासद असण्याची गरज नाही. मात्र खालील नियम पाळणे आवश्यक आहे. ड्रेस कोड : फूल प्यांट, फूल शर्ट, बूट. दुपारच्या जेवणाचा डबा. / २ लिटर पाणी. नो लिकर / नो तंबाखू /नो सिगारेट . सकाळी ०७ वाजता नेरळ स्थानकात जमायचं. टम टम रिक्षेने श्री. गोपाळ सावंत यांच्या हॉटेलात पोहोचायचं. तेथे नाश्ता,चहा करून चालायला सुरवात करायची. पेठ किल्ला येथे २/३ तासात फोचायचं.ज्यांना शक्य असेल त्यांनी वर बाले किल्ल्यात जायचं, ज्यांना शक्य असेल त्यांनी किल्य्याला प्रदक्षिणा घालायची. जेवण करून खाली यायचं. ज्यांना भिजायचं असेल त्यांनी सूख्या कपड्यांचा एक सेट आणावा. हे कपडे बरोबर बाळगण्याची गरज नाही . सावंतांच्या घरी ठेऊ शकतो. कपडे बदलण्याची योग्य व्यवस्था आहे. खर्च अंदाजे १०० ते १५०. (रिक्षा आणि नाश्ता चहा ) YHAI अंबरनाथ युनिट चे एक संस्थापक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दर वर्षी हा ट्रेक केला जातो. गेली काही वर्षे या ट्रेक ला १०० च्या वर उपस्थिती असते. जर मि पा कराना यायचे असेल तर ९९६००९६४३५ वर संपर्क साधावा. संख्या समजली कि त्या प्रमाणे रिक्ष्या/नाश्ता सांगता येतात. साधारण ५/६ वाजे पर्यंत नेरळ ला परत येतो.

कंजूस Sun, 05/18/2014 - 20:22
मुवि ,आपण हीच लेणी पाहून येताना हाच किल्ला {दुरून}पाहिला होता. वल्ली ,लेणी म्हणजे चोवीस खोल्या असलेला पन्नास फुटी चौरस विहार नदीकाठी आहे .पहिल्या शतकातला आहे .आत्मुबुवांचा ओम ॐ इथे चांगला घुमतो . इथेच ट्रेकला न जाऊ शकणाऱ्यांसाठी कट्टा करायला आदर्श जागा (वर्षभर)आहे याची नोंद घ्यावी .अधिक माहितीसाठी "ओवर टू मुवि "कारण माझी धाव ताकापुरतीच आहे .स्ट्रॉंग अथवा वीक फिल्डींग मधले काही कळत नाही .

In reply to by प्रचेतस

मुक्त विहारि Sun, 05/18/2014 - 22:30
ते नेमके जागेचे नांव विसरलो बघा,तसे लिहून ठेवले आहे, पण आमची कागदपत्रे डोंबोलीतच राहीली. लेणी बघीतली, तीर्थ प्राशन केले आणि आनंदात घरी आलो. पक्षी-तीर्था सकट भटकंती करायला एकदम योग्य जागा.इथे ट्रेकिंग हा शब्द जाणीवपुर्वक टाळला आहे. (आम्हाला वक्ती आणि वल्लीं बरोबर भटकण्यांतच जास्त इंटरेस्ट.सुखरूप गेलो आणि सुखरूप आलो.)

In reply to by प्रचेतस

मुक्त विहारि Sun, 05/18/2014 - 23:37
सॉरी हां, हे कट्टे किंवा मिपाकरांबरोबर भटकंती म्हटले ना? की आम्हाला फक्त गप्पा आणि खाणे, इतकेच आठवते. मागच्या वेळी त्या रामदासांबरोबर भटक भटक भटकलो... पण लक्षांत काय राहीले तर, पारश्या कडचे बकरी आयटेम आणि एके ठिकाणी प्यायलेलो रस्सम (जेमतेम १० मिनीटे आधी बायकोच्या हातची इडली आणि मग राहवलेच नाही म्हणून मिसळ पाव खाल्ला होता.खरे तर त्यावेळी मला अजून रस्सम हवा होता, पण बायकोच्या डोळ्यातील भांव तिच्या कडे न बघताच ओळखले, आणि मनावर काबू ठेवला.) जावू द्या हो, आम्ही हे असेच बघा, घराबाहेर पडलो की आमचा पार शंकर्‍या होतो. @ कंजूस, दादा, ह्या वल्लींना जरा त्या गावाचे नाव सांगून टाका.

In reply to by मुक्त विहारि

मुक्त विहारि Sun, 05/18/2014 - 23:39
ह्या बकरी आयटेमचे बेकरी आयटेम, असे कुणी करेल काय? तसे त्या पारश्याकडे "बकरी आयटेम" पण होते. पण आम्ही बेकरी आयटेमच खाल्ले.

कंजूस Mon, 05/19/2014 - 06:42
पेठचे फोटो टाकल्याने छान वातावरण निर्मिती केलीत भटक्याखेडवाला . वल्ली ,बरोबर .किल्याच्या सुळक्यात एक मोठे लेणं आहे .परंतु हे गड चढून जाणाऱ्यांसाठी आहे .दुसरे आंबिवली गावापुढे एक दीड किमीवर रस्त्याकडे आहे . थोडे अवांतर . वल्ली ,तुम्ही बदामि ऐहोळेला (अधिक हम्पि)जायलाच पाहिजे .मी दोनदा गेलो होतो . त्यातले काही फोटो इथे आहेत http://s1366.photobucket.com/user/Wdapav/library/

In reply to by कंजूस

प्रचेतस Mon, 05/19/2014 - 08:51
धन्यवाद कंजूसराव. बदामी, हंपी, ऐहोळेला सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जायचा विचार आहे. मिपाकरांबरोबर भ्रमंती आखण्यास नक्कीच आवडेल.

In reply to by प्रचेतस

मुक्त विहारि Mon, 05/19/2014 - 09:28
१८ ऑक्टोबर पासून २८ ऑक्टोबर पर्यंत भारतात आहे.... त्याच वेळेत असेल तर आपण नक्की येणार... त्यातून ह्या ट्रिपला वल्ली साहेब, असतील तर हमखास.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस Mon, 05/19/2014 - 14:15
सप्टेँबर २५ ते५ ऑक्टो नवरात्र दसरा आणि १८ ऑक्टो ते २८ दिवाळीमुळे कर्नाटकाची रेल्वेची तिकीटे मिळणे अंमळ कठीणच .

In reply to by कंजूस

मुक्त विहारि Mon, 05/19/2014 - 15:02
मेलो...ठार मेलो... बायको लुटणार आणि आम्ही मिपाकरांच्या बरोबर सहलीला पण मुकणार.. (ऐन दिवाळीत घराबाहेर ते पण डोंबोलीत असतांना, अशक्य..कुछ तो तोड़गा निकालनाच पडेंगा.)

इरसाल Mon, 05/19/2014 - 10:01
तुम्हाला कोणत्या संस्थेबरोबर जायचे नसेल तर कर्जत रेल्वे स्थानका वर उतरा, दगड्याकडचे वडे चेपा नंतर कर्जत-आंबिवली एस्टी पकडुन थेट आंबिवली. तिथुन पेठचा किल्ला चढायचा पेठ गावात पुर्वी छान कलाकंद व पनीर सदृश्य पदार्थ मिळायचा सध्याचे माहित नाही. किल्ला परत उतरल्या नंतर जोर शिल्लक असेल तर मग आंबिवली गावाच्य जरासेच पुढे असणार्‍या बौद्ध कालीन लेण्या बघुन यायचे.पुन्हा आंबिवली-कर्जत मग कर्जत वरुन इकडे-तिकडे जायला लोकल हैतच.

पेठच्या किल्ल्यावर गेलात तर वरच्या पेठवाडी मध्ये (किल्ल्याच्या पायथ्याच्या) उत्कृष्ट खवा मिळतो.. जरूर आणावा.. ही पेठवाडी भेसळविरहीत आणी टिकाऊ खव्यासाठी प्रसिद्ध आहे आणी इथला खवा पुर्वी कल्याण/मुंबईला विकावयास यायचा...अगदी न चुकवण्यासारखी गोष्ट..

In reply to by स्वच्छंदी_मनोज

मुक्त विहारि Tue, 05/20/2014 - 22:15
मनोज भाऊ, तुमचे-आमचे जमणार बघा.हा अस्सा इतकुसा डोंगर चढायचा आणि खवा आणायचा.आम्ही पण असेच कुठेतरी जातो आणि काय बघीतले, ह्या पेक्षा काय खाल्ले, तेच लक्षांत राहते. बादवे, हा खवा, गुलाबजाम साठी की पेढ्यांसाठी? वरील प्रश्र्नाचा आणि "वडगांव, म्हणजे पुणे जिल्ह्यातील की नगर?" ह्याचा काही संबंध नाही.

दिपक.कुवेत Wed, 05/21/2014 - 11:55
पावसाळा होईस्त हे असले धागे काढु तर नयेच शीवाय जाउन आल्यावर त्याचे रसभरीत वर्णन पण ईथे प्रकाशीत करु नये. ईथे उन्हाने जीव कासावीस होतोय!!! च्या मारी तुम्हि पावसात येथेच्छ भीजणार आणि आम्हि ईथे उन्हात.....ये नॉ चॉलबे! आणि ट्रेक केलेच तर त्या मुविंना अजीबात नेउ नका. ईतकं रसभरीत वर्णन करतात कि जीवाचं पाणी पाणी होतं.

In reply to by दिपक.कुवेत

भाते गुरुवार, 05/29/2014 - 12:05
आता समजलं ना कसा त्रास होतो ते. सोमवारी सकाळी ऑफिसमध्ये बसुन तुमच्यासारख्या बल्लव आणि सुगरिणींच्या सचित्र पाकृ वाचताना आम्हाला सुध्दा असाच त्रास होतो. म्हणुनच तर मी सारखा पाकृचे धागे विकांताला टाकत जा म्हणुन बोंबलत असतो.

मुक्त विहारि Wed, 05/28/2014 - 19:44
तुम बसो बोंबलत... हमरा ट्रेक नक्की हो गयेला हय. हम जायेंगा और खायेंगा-पियेंगा. तुम वो सुकट घाल के वांगी की भाजी बनावता हय, तो हमको भी ऐसाच होता हय. तुम्हारे इस जलजल पर, मोगँबो खूष हुवा.

सुहास झेले गुरुवार, 05/29/2014 - 00:42
हरिश्चंद्र, राजमाची, लोहगड, माहुली, सुधागड विकांतात नकोसे असतात... प्रचंड प्रमाणात गर्दी असते. काही वेगळे पर्याय बघा. वसई/नाशिक रेंजसुद्धा मस्त आहे. काही पर्याय सुचवतो.. १. सरसगड (पाली) . २. कामण दुर्ग (वसई) - प्रचंड पायपीट, हमखास चकवा लागणारी... टेहळणी किल्ला असल्याने फक्त पाण्याच्या टाक्याच आहेत गडावर, पण फुलांची रास पसरलेले तीन डोंगर चढून मग उतरून पोचावे लागते ;-) . ==== . ==== . ३. सागरगड (पेण - अलिबाग रस्त्यावर अलिबागपासून ७ किमी. अलीकडे खंडाळे गावातून गडावर जायला सोपी वाट आहे... फारसा इतिहास ज्ञात नसला तरी पुरंदरच्या तहात दिलेल्या २३ किल्ल्यांच्या यादीत सागरगड होता. गडाच्या माथ्यावरून समुद्रातील हालचाली स्पष्ट दिसत असल्याने गडाला नक्कीच बरेच महत्व) . ४. अवचितगड (रोहा) - साक्षात रायगड परिसरातील सुरक्षाभिंत म्हणून ओळखला जाणारा किल्ला. किल्ल्यावर जाण्यासाठी पिंगळसई, मेढा किंवा पेंडसे गावातून मार्ग आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी रोह्याला उतरून पिंगळसई किंवा मेढासाठी एसटी किंवा रिक्षा मिळते. चढाई एकदम सोप्पी. ५. रतनगड (रतनवाडी) - इथेही गर्दी असतेच विकांतात, पण प्रचंड घनदाट जंगल आणि भरपावसात कितीही वेळा करायला आवडेल असा ट्रेक (रोप आवश्यक) . ६. किल्ले असावा… - बोईसर पूर्वेला, टाटा आणि ऑसवाल बिल्डर्सचे हाउसिंग प्रोजेक्ट ओलांडून पुढे काही किलोमीटरवर वरांगडे हे गाव आहे. एसटीने उतरल्यावर, उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता आहे. जिथे डाव्या बाजूला विराज इंडस्ट्रीचं एक प्रोजेक्टसुद्धा आहे. तिथून पुढे किल्ल्याला जाणारी वाट आहे. . ७. किल्ले कोहोज - पालघरपासून एसटीने ३० मिनिटांचा प्रवास. हया गडावर जाण्याचे तीन मार्ग आहे, एक नाणे गावातुन दुसरा अंबीत गावातुन तर तिसरा वाघोटे फाट्याजवळून . ८. किल्ले तांदुळवाडी - सफाळेहून तांदूळवाडी बेस व्हिलेज . ९. अशेरीगड - पालघरहून महामार्गाने १० किमी अंतरावर खोडकोना गाव (बेस व्हिलेज) . १०. किल्ले सिंदोळा - कल्याणहून अहमदनगरला जाणारी बस पकडून खुबी फाट्याला उतरावे. तिथे मारुती मंदिराच्या बाजूने ट्रेक रूट सुरु. इथून हरिश्चंद्रगडावरपण जाता येते.. . तूर्तास इतकेच ;-) वसई परिसरात श्रीदत्त राऊत यांच्या सोबत काही ट्रेक्स ठरवणार आहोत, ज्यामुळे आपल्याला अनेक लहान-मोठे अपरिचित किल्ले दोन अडीच दिवसात बघता येतील. सांगेनच ठरल्यावर :)

In reply to by सुहास झेले

शिद Fri, 05/30/2014 - 17:59
बोईसर-पालघर हा माझ्या गावचा परीसर पण तुम्ही वरील दिलेल्या बर्‍यांच ठीकाणी कधी जाणं झालं नाही. धन्यवाद, तुमच्यामुळे नविन ठीकाणांची माहीती कळली.

In reply to by शिद

सुहास झेले Fri, 05/30/2014 - 23:18
वसई ते बोईसर परिसरात जवळजवळ १४०-१४५ लहान मोठे किल्ले आहेत, ज्यातल्या ४८-४९ची नोंद पुरातत्व खात्याकडे आहे आणि त्यातील फक्त दोन किल्ले ते सांभाळतात. :-| तुमचा ईमेल आयडी व्यनि करून ठेवा. अडीच दिवसांची मोहीम ठरतेय, सांगेन ठरल्यावर...

कंजूस गुरुवार, 05/29/2014 - 08:20
सुहास झेले ,दहा ट्रेकची माहिती आवडली . माझा प्लान असा आहे :- १)दरवर्षी एकदा /दोनदा नियमित पावसाळयात /हिवाळ्यात भिमाशंकर करणे . २)मुबईकडचे कर्जत-खांडस मार्गे वर येतील .पुण्याकडचे राजगुरूनगर कडून गुप्त भिमाशंकर मार्गे येतील . ३)पुण्याकडचे फारसे चालू न शकणारे बसने अकरा वाजता येतील आणि वरती सोपा गुप्त भिमाशंकर अथवा हनुमानतळे करतील .परत बसने जातील . बसप्रवासामुळे सर्व साधनसामग्री आणणे सोपे जाते .कोणीही येऊ शकतो .न आवडल्यास परत त्याच दिवशी तीन आणि पाच वाजताची बस आहे . ४)एक दिवस मुकाम डबेवाले धर्मशाळा ,हॉल ,खोल्या आणि टॉइलट आहे .माझा अनुभव चांगला आहे . ५)पुण्याकडून बस तिकिट ,राहाणे ,नाश्ता २दा,चहा ,जेवण १दा धरून रुपये साडेचारशे पर्यँत खर्च होतो . ६)कर्जतकडून रुपये तिनशे . कसे वाटते अभिप्राय द्या

In reply to by कंजूस

सुहास झेले गुरुवार, 05/29/2014 - 09:46
भीमाशंकर जबरीच आहे, पण गर्दी असली की तिथे जायचा कंटाळा येतो. पण एकदा तरी शिडीच्या वाटेने करायचा आहे... तीच एक वाट राहिली आहे. तिथून गर्दी कमी असते, पण रोपची गरज लागते काही ठिकाणी.... :)

सुधीर जी गुरुवार, 05/29/2014 - 10:58
पण रोपची गरज लागते काही ठिका>> नाहि आता भिमाशंकर शिडि घाटाने जाताना रोप चि गरज लागत नाहि. अवगड जागि लोखंडि शिडि लावलेलि आहे. मि गेलि ५ वष भिमाशंकर करतो आहे जुले महिना एकदम बेस्ट आहे भिमाशंकर ट्रकिंग साठि

कंजूस गुरुवार, 05/29/2014 - 11:17
मुवि एक दिवसात होते की भिमाशंकर पण कर्जत टरेकिंग नाही .पुण्याहून बसने गेल्यास आणि पुण्याला परत असे केल्यास अकरा ते पाच इतका वेळ वरती हाताशी मिळतो .कार केल्यास आणखी दोन तास मिळतात . सुहास ,मी कधी शनी रवी जात नाही त्यामुळे त्रास होत नाही .आठ दहावेळा भि० ला गेलो आहे पण एकदाही शिडीच्या वाटेने मला गाववाल्यांनी जाऊ दिले नाही .तसा एक तासाचाच फरक पडतो आणि तिकडे पक्षी दिसत नाहीत . यावर्षी १२जुलै ते २५ ऑगस्ट गर्दी असेल . मी बहुतेक बुध ४ जूनला जाणार आह .

स्पार्टाकस Sat, 05/31/2014 - 12:06
बाराही महीने करण्याजोगा एक भन्नाट ट्रेक म्हणजे त्र्यंबकेश्वर जवळचा हरिहर. याला असलेली उभीच्या उभी दगडी शिडी खाचेत हात घालून चढून जाणं, विशेषतः पावसाळ्यात हा एक थरारक अनुभव असतो. मुंबई / नाशीकहून एक दिवसात होणारा ट्रेक आहे हा. H01

ह्या वीकेन्डला (८ जुन २०१४) मस्त टेल्को लेक पी-एम-आआयाणि पी-सी-एम-सी ग्रूपसोबतभ्रमंती आणि पक्षी निरिक्षण झाले ... संध्याकाळी मिपाकरांसोबत मस्त खादाडी ( काय पराठे होते राव ! लय भारी !!) आता पुढच्या वीकेन्डचा १४-१५ जुन चा काय प्लॅन ? पाऊसपडायच्या आधी एकदा हरिश्चंद्रगड करुन येवुयात का ? की वेरुळला जाऊन यायचे ?

In reply to by प्रसाद गोडबोले

सूड Mon, 06/09/2014 - 17:07
>>पाऊसपडायच्या आधी एकदा हरिश्चंद्रगड करुन येवुयात का ? हरिश्चंद्रगड पाऊस उलटून गेल्यानंतर मस्त ऑप्शन वाटला मला. पण बघा कसं काय ते!!

In reply to by प्रचेतस

मग एका दिवसात भाजे कार्ला केव्ह्ज करु ... जरा पाऊस वगैरे पडला तर मग राजमाची किंव्वा लोहगड करता येइल का? आणि बाकी कोणीच इन्टरेस्टेड नाहीये का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस Fri, 06/13/2014 - 12:30
भाजे लेणीला मागच्याच आठवड्यात जाऊन आलो. राजमाचीला एक मुक्काम लागतो. लोहगड कधीही करता येईल पण पावसात केल्यास अधिक सुंदर. भाजेला जायचे तर जाऊ परत. ६.४५ च्या लोकलने निघायचे. १२.३० पर्यंत घरी परत.

हुकुमीएक्का Wed, 06/11/2014 - 22:27
ट्रेकसाठी एखादे असे ठिकाण ठरवा जिथे सर्वाना सोईस्कर होईल. मावळात 'तिकोणा',; लोणावळ्यात 'राजमाची पॉईंट', लोहगड, कोरीगड, तुंग, असे पर्याय आहेत. 'सूड' यांनी सुचवल्याप्रमाणे हरिश्चंद्रगड देखील मस्त पर्याय आहे पण पावसाळ्यानंतरच. 'मुक्त विहारि' यांच्या म्हणण्याशी सहमत. एखादा 'फॉर्म' तयार केला पाहिजे ज्यावर ट्रेक बद्दल सर्व माहिती असेल. ट्रेकसाठी लागणारे साहित्य, आणि ट्रेक कितीपत अवघड आहे याची माहीती आधीच समजली तर अजुन छान. जेणेकरून ट्रेकला गेल्यावर काही अडचण भासणार नाही.

In reply to by हुकुमीएक्का

चौकटराजा Sun, 06/15/2014 - 07:31
ट्रेकसाठी " एखादा" फॉर्म ठेवा . असहमत. त्यापेक्षा स्वता:चा फॉर्म चांगला ठेवा . ( आम्ही फॉर्मात असताना ट्रेक केले नाहीत. आता बुवा म्हणतात आम्ही म्हातारे झालो ) .

हा अख्खा विकेन्ड निव्वळ झोपा काढण्यात गेला ... पुढच्या वेकेन्डचा काहीतरी प्लॅन करु राव ... जवळच्या जवळ तिकोना / लोहगड / विसापुर / राजमाची / सिंहगड / पुरंधर .... काहीतरी ट्रेक करुया राव ... नाहीतर मी आपला अजिंक्यतारा सज्जनगडचा ट्रेक करुन येईन म्हणतो *biggrin*

हुकुमीएक्का गुरुवार, 06/19/2014 - 01:57
नवीन कॅमेरा घेतल्यापासून सज्जनगड ला जायचा प्लॅन चालू आहे. पण अजून वेळच जुळून येत नाहीये. कोणी ठरवला सज्जनगड चा ट्रेक तर नक्की सांगा. जरूर येईन

कंजूस गुरुवार, 06/19/2014 - 03:07
कोंडेश्वर पाहा ।असे सुचवतो . कामशेत ते जांभिवली बस आहे .जांभिवली गावापासून एक किमीवर चालत कोंडेश्वर आहे .मागचा ओढा खतरनाक आहे .[हा ओलांडला तर खाली कोकणात ढाक -खांडपे-कर्जत वाट आहे] .

विअर्ड विक्स गुरुवार, 06/19/2014 - 11:33
१५ तारखेला तोरणा आणि बेडसे लेणीला जाऊन आलो. तोरणाला पोट भरून जांभळे , करवंदे नि रायवळ आंबे खाल्ले. असे उदर भरणाचेट्रेक सुचवा जरा …;)

In reply to by सूड

सुहास झेले Mon, 03/09/2015 - 15:35
ह्या भागातील बहुतेक किल्ले टेहळणीसाठी वापरले जायचे... त्यामुळे बहुतेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या आणि एखाद दुसरे बांधकाम असावे असा अंदाज. मीही ह्याभागात जास्त फिरलेलो नाही. श्रीदत्त राऊत सोबत आहेत म्हणून इथे माहिती दिली :)
नमस्कार! भाईयों और बहनो..... (सॉरी सॉरी. ते मोदींचं भाषण ऐकलं ना नुकतंच टीव्हीवर... ) हां तर आता मोदी सरकार वगैरे सगळं आलंय. अशी बातमीही आली आहे की ५ जून ला मॉन्सून केरळात दाखल होणार आहे. तेंव्हा त्याच्या स्वागताला एखाद्या डोंगरावर नाही गेलं तर मजा काय नाही का! असा विचार मनात आला. गेल्या चार पाच ट्रेक चे वृत्तांत फोटो जेंव्हा मिपावर टाकले तेंव्हा `आम्हाला न नेल्याबद्दल निषेध' वगैरे अनेक शेरे वाचायला लागले. :) तेंव्हा, म्हटलं की या खेपेस त्याची भरपाई करावी. एक सहज प्लॅन डोक्यात आलाय.

उदयनराजे विक्रमी मतांनी विजयी

raudransh_27 ·
क्लिंटन सर यांच्या पडघम मालिकेचे पुर्नवाचन करत असताना माझ्या एका प्रतिसादावर http://misalpav.com/node/27769 काही सदस्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, त्या वाचुन खरच कीव आली. या प्रतिसादावरुन आणि अशाच तत्सम अनुभवांवरुन एकदंरीत विचारांची पातळी, द्वेष, एकांगी विचार, दुसर्याना कमी लेखण्याची आम्हीच श्रेष्ठ वृत्ती पाहुन दु:ख वाटते. विशेषत छत्रपती शिवराय याचां अनादर आणि वरील प्रतिसादात असलेले अंधत्व,दत्तक,बिरूदावली सारखे टोमणे. असो, ज्या गोष्टी आपण वैयक्तिक बदलवु शकत नाही त्यावर काय करणार.

सातार्‍यात महाराजांना हरवणे अशक्य आहे

अशक्य

खरेतर हिंदुत्ववादी पक्षांनी महाराजांना आपल्याबाजुला घ्यायला हवे ...पण महाराजांचा आधीचा बीजेपी बरोबरचा अनुभव वाईट असल्याने महाराज परत बीजेपी मधे जाण्याची शक्यता नाही . ह्या सगळ्या मधे सातार्‍यातला हिंदुत्ववाद्यांची गोची होते , हिंदुत्ववादी पक्षाला मत द्यायचे की ज्यांच्यामुळे हिंदु धर्म तरला त्यांना ? त्यामुळे मी मतदान करतच नाही :) पण मोदींनी एकदा प्रत्यक्ष भेट घेतली आणि पवारसाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जरासा कमी केला तर महाराज परत हिंदुत्ववादी पक्षाकडे येतील अशी आशा आहे ! अवांतरः मागे एकदा संभाजी भिडे गुरुजी ह्यांनी रायगडावर मोदी आणि महाराजांची भेट घडवुन आणण्याचा प्रयत्न केला होता पण ते जमले नाही :(

विजुभाऊ Sat, 05/17/2014 - 12:23
गिरीजा काका कोणतीही व्यक्ती जाणता राजा या पदापर्यन्त पोहोचते ते रयतेच्या प्रश्नांची जाण असल्यामुळे. ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे. सातार्‍यात गेल्या किमान तीस वर्षांपासूनच्या काही समस्या आहेत. १) येथील तरुणाना स्थानीक रोजगार उपलब्ध नाहीत त्यामुळे मुम्बै/पुणे येथे स्थलांतर करावे लागते :- मागील तीस वर्षांपासून उत्तम भौगोलीक परिस्थिती ( वीज / पाणी / राष्ट्रीय महामार्ग/प्रशिक्षीत मनुष्यबळ) उपलब्द असूनही येथे एकही नवा मोठा उद्योग आलेला नाही. उलट जे होते ते उद्योगच इतरत्र स्थलांतरीत झाले ( उदा अ‍ॅरीस्टोक्रॅट / डोबर्ग ) महाराष्ट्र स्कूटर्स चे तर मागील किमान पंधरा वर्षाम्पासून उत्पादन बंदच आहे. एकाही लोकप्रतिनीधीनी याबाबत कधीच आवाज उठवला नाही. २) यामुळे त्यावर अवलंबून असलेले छोटे उद्योजकसुद्धा देशोधडीला लागले आहेत. ३) केवळ साखर कारखाना हीच काय ती जमेची बाजू. ४) शेजारीच सूत गिरणी प्रकल्पाची भकास अर्धवट बांधलेली मोडकळलेली इमारत येताजाता नजरेस पडते. त्या प्रकल्पाचे काय झाले कोण जाणे. ५) सातार्‍याच्या आसपास निसर्गाने अक्षरश: वैभवाची उधळण केलेली आहे. शक्य असुनही एकाही पर्यटनस्थळाचा विकास केलेला नाहिय्ये. ( कोयनानगर हे अक्षरशः नम्दनवन आहे) ६) सातार्‍यात शक्य असूनही योग्य वैद्यकीय सोयी उपलब्ध नसल्याने रुग्णाना पुण्याला जावे लागते. ७) सातार्‍यात आयटी पार्क सारख्या किंवा तत्सम गोष्टी आणणे सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी प्रयत्नच होत नाहीत. ८) शेतीमालावर प्रक्रीया करणारा एकही मोठा उद्योग येथे नाही. ९) सातार्‍यात बर्‍याच हिंदी मराठी चित्रपटांची चित्रीकरणे होतात ( दबंग / अपहरण हे खुद्द सातारा शहरात) मात्र त्या अनुशंगीक एकही सोयी येथे उपलब्ध नाहीत. १०) स्मशानभूमी देखील लोकवर्गणीतून झालेली आहे. यात कोणते राजकारण आडवे येत होते कोण जाणे. पण इच्छेचा अभाव ) ११) जागा असुनही तीस वर्षात एकही नवे उद्यान , पोहोण्याचा तलाव , खेळण्याच्या सुविधा निर्माण केल्या नाहीत. सातार्‍यातील लोकांचे शिवाजी महाराजांवर असलेले प्रेम आणि आदर यामुळे एका हाकेसरशी अक्षरशः लाखो लोक जमा करण्याची क्षमता या नेत्यांकडे आहे मात्र याच उपयोग विकासासाठी कधीच केला गेला नाही. पर्यटन , कृषी उद्योग ,अ‍ॅटोमॉबाईल या उद्योगांत मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. मात्र केवळ इच्छेचा अभाव यामुळे क्षमता असूनही सातार्‍याचा विकास झालेला नाहिय्ये. हे झाले काही मोजकेच मुद्दे. कोणत्याही व्यक्तीबद्दल तक्रार नाही. मात्र तीस वर्षे हे मुद्दे असेच राहिले आहेत. या उलट पवारानी बारामतीसारख्या छोट्या गावाचा उत्तक विकास केलेला आहे. तेथे मोठे उद्योग आहेत. आसपासच्या कुरकुंभ. जेजुरी सारख्या गावातही मोठे उद्योग आलेले आहेत. ही वस्तुस्थिती नाकारत येत नाही. कोणाबद्दल वैयक्तीक आक्षेप नाहीत मात्र कोणाची व्यक्तीपूजा करताना ती विभागाच्या विकासाच्या निकषावर घासुन पाहिली तर दुर्दैवाने सर्व आक्षेप योग्य आहेत हेच खरे असे म्हणावे लागेल.

In reply to by विजुभाऊ

नगरीनिरंजन Sat, 05/17/2014 - 23:22
विजुभाऊ, जनतेच्या प्रतिनिधीने जनतेसाठी काम करणे अपेक्षितच आहे. कोणी कितीही विकास केला तरी व्यक्तिपूजा सर्वथैव असमर्थनीय आहे, हो की नाही?

बॅटमॅन Sat, 05/17/2014 - 12:25
या माणसाने सातार्‍यासाठी नक्की काय केले ते खरेच ऐकायला आवडेल. जे ऐकलेय त्यात फक्त मुजोरी सोडून दुसरे काही आढळले नाही आजवर. पण सातारकर नसल्याने काही प्रत्यक्ष अनुभव नाही, तरी कुणा सातारकराने माहिती पुरवावी-अभिनिवेशरहित होऊन. सातार्‍याच्या विकासात यांचे योगदान नक्की काय? छत्रपतींचा वंशज असणे हे काही कर्तृत्व नाही.

In reply to by बॅटमॅन

नगरीनिरंजन Sat, 05/17/2014 - 23:18
क्या बोला! क्या बोला! आजच्या जमान्यात एखाद्याला महाराज वगैरे संबोधणे वगैरे पाहून मला तर काय म्हणावे तेच कळत नाही. एकीकडे सत्तापालट करून स्थैर्यासाठी पक्षाला मतदान करण्याची परिपक्वता देशभरातले मतदार दाखवत असताना इथे व्यक्तिपूजेची थाळी सजवण्यात येत आहे हे पाहून अजून लोकशाही सगळीकडे रुजायची आहे याची साक्ष पटली.

In reply to by नगरीनिरंजन

हाडक्या Mon, 05/19/2014 - 03:33
या इथे एक सातारकर म्हणून थोडक्यात काही बाबी मांडल्या आहेत यांच्याबद्दल. पण या साहेबांना चर्चा नको आहे असे त्यंनी
असो, ज्या गोष्टी आपण वैयक्तिक बदलवु शकत नाही त्यावर काय करणार. त्या सर्व प्रतिसादावर, प्रत्येक मुद्दयावर माझ्याकडे संतुलित उत्तरे आहेत पण त्याच त्या विषयावर वाद घालण्याची अजिबात इच्छा नाहीये.
या इथे सांगितले असल्याने चर्चेचा प्रश्न येत नाही असे वाटले, त्यांची जी काही 'संतुलित उत्तरे' जरी द्यायला ते तयार असतील तर आम्ही पण बोलू.. पण RSS वाले आणि सीग्रेडी अशी मुक्ताफळे आधीच उधळल्यावर काय मग ? उदयन राजे आणि त्यांचे भरपूर 'प्रताप' आम्ही सातारकरांनी पाहिले आहेत.
तसा माझा आणि साताराृ्याचा विशेष संबंध नाही पण गेल्या वर्षभरात दुर्गभ्रमंती च्या निमित्ताने शिवकालिन प्रांत सातारा, कराड (सध्याचा ढोबळमानाने सातारा जिल्हा) पाहण्याचे भाग्य लाभले.
म्हणजे उदयन राजे तुमच्यासाठी दूरून डोंगर साजरे आहेत असेच म्हणायचे. निव्वळ शिवरायांचे वंशज मुद्द्यावरून यांना मते का द्यावीत कुणी..?
विशेषत छत्रपती शिवराय याचां अनादर
शिवरायांचा अनादर वगैरे लगेच मध्ये आणू नका हो.. आम्ही तिथेच सातार्‍यात वाढलोय. आणि तुम्ही एकदा शिवाजी संग्रहालयाची अवस्था पहा आणि मग या त्यांच्या वंशजानेच तिथे दुर्लक्ष करून कसा शिवरायांचा अपमान केलाय ते कळेल. बाकी तुम्हाला चर्चा करायची नसल्याने काहीच मुद्दे मांडत नाहीये तरी पण फारतर इथे विजुभाऊनी मांडलेले मुद्दे आहेत त्याच्याबद्दल बोललात तरी भरपूर..

In reply to by नगरीनिरंजन

मालोजीराव Tue, 05/20/2014 - 18:15
सातार्यातील अनेक जेष्ठ व्यक्ती, राजकारणातील काही लोक, राज्यातील बरेच पत्रकार उदयनराजेंना एकेरी नावाने संबोधतात, त्यांना महाराज वगैरे म्हणणे चूक आहे या तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहेच. पण आमचे घराणे असेल किंवा इतर अनेक घराणी आहेत ज्यांचे छत्रपतींच्या घराण्याशी पूर्वापार संबंध आहेत, त्यामुळे त्यांना राजे किंवा छत्रपती संबोधणे आमच्या चालीरितीमध्ये आहे आणि त्याबद्दल कुणाला आक्षेपही असू नये. इथे काहीजणांनी या लोकांना पत्त्याच्या कॅटमधल्या राजाएवढी सुद्धा किंमत नाही असे म्हंटले आहे, यांना कदाचित ठावूक नसावं देशातील काही पंतप्रधान उदा. विश्वनाथ प्रताप सिंह कित्येक आजी /माजी मुख्यमंत्री … वसुंधराराजे,अर्जुन सिंह ,दिग्विजय सिंह,भैरोसिंह शेखावत हे राजघराण्याशीच संबंधित आहेत. कित्येक आजी /माजी केंद्रीय मंत्री,राज्यांतील मंत्री यांची संख्या तर मोठीच आहे . महाराष्ट्रापुरते सांगायचे झाले तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (जाधवराव) , सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , खासदार विजयसिंह मोहिते, पुण्याचे नवीन खासदार अनिल शिरोळे हेही अश्याच घराण्यांशी संबंधित आहेत.

In reply to by मालोजीराव

व्वा !व्वा !!व्वा!!! मालोजी, ही एवढ्या कर्तृत्वाशाली व्यक्तींची यादी देऊन तूम्ही या भारतभूला उपकृतच केले नै का! हेच राजमान्य, मुजरामात्रे ,स्वकतृत्ववान लोक जेव्हा जाहिर सभेत फुले आंबेडकरांचे नाव घेतात व सत्ता येताच खुर्च्या उबवायला आपल्या ९६ बगलबच्च्यांची वर्णी लावतात ,आरक्षणाची मागणीकरुन तळागाळातल्या लोकांच्या भाकरीतला चतकोर तुकडा हिसकावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अंमळ गंमत वाटते. एक सांप्रतकालीन महाराष्ट्रीय नरपुंगव राजे सध्या आरक्षण मागत फिरत आहेत, तेही आलिशान मर्सिडीज, ऑडी यांचा ताफा घेऊन... कमाल नै!

In reply to by नानासाहेब नेफळे

वाडीचे सावंत Tue, 05/20/2014 - 23:25
नेफळे ( खर आडनाव असल्यास ) तुमचा प्रोब्लेम काय आहे...एकंदरित ब्राह्मण आणि मराठा ह्यान्च्याबद्दल तुमच्या मनात फ़ार आकस आहे... तुम्ही कोणताही विषय नेहमी धर्म आणि जातींकडे का नेता.... टीप: मी मराठा आरक्शणाचा कडवा वीरोधक आहे... पण मराठा आरक्शणा बाबत तुमच्या पोटात फ़ारच दुखत ... तुमचा टक्का कमी होईल म्हणुन का?

In reply to by मालोजीराव

मालोजीराजे, छत्रपतींच्या घराण्याविषयी लोकांना आस्था असलीचं पाहीजे. शिवाजी महाराजांचं कर्तुत्व तेवढं मोठं होतच ह्यात काही वाद नाही. पण त्यांचे वंशज म्हणुन छत्रपती लेव्हलचं कर्तुत्व नसताना मिरवणं मात्र नक्की खटकतं. शिवाजी महाराजांसारखं कर्तुत्व असेल तर त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला पण सगळ्यांची तयारी असेल.

विजुभाऊ Sat, 05/17/2014 - 12:34
ब्याटम्यान काका केवळ याच व्यक्तीने नाही तर त्यांच्या पूर्वसुरींनी सुद्धा. त्यामुळेच गेल्या तीस वर्षात असे म्हणतोय. त्यांच्या काकानी निदान काही पाणीपुरवठा योजना , सहकारी साखर कारखाना , नाट्यगृह इत्यादी मोजके का होईना काही गोष्टी जमेकडे आहेत. मात्र बाकी शून्य.

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन Sat, 05/17/2014 - 12:40
यांचे काका म्ह. ते अभयसिंहराजे काय? बाकी पूर्वसूरींचं माहिती नै पण मी उदयनराजेंचाच उदोउदो जास्त ऐकलाय, सबब प्रश्न त्यांच्याबद्दलच आहे. अन अजून एक प्रश्न असा की जर काहीच नै केले तर लोक मतं का देतात? फक्त दहशतीच्या जोरावर असे जमत असेलसे वाटत नै. नक्की माजरा क्या है?

विजुभाऊ Sat, 05/17/2014 - 12:39
सातार्‍यातील डोंगर दगड खाणीमुळे पोखरले जात आहेत. ऐतीहासीक अजिंक्यतारा तर मागील बाजूने अक्षरश पूर्ण उभा कातरला गेला आहे. अशाच एका दगड खाणीतील वादामुळे एका राष्ट्रवादी गुंडाचा खून झाला होता.

In reply to by विजुभाऊ

अजिंक्यतार्‍यातील गौणखनिज पश्याला बंधी होवुन किमान २० वर्षे होवुन गेलीत ... मी लहानपणापासुन खिडीतल्या गणपतीला जातोय पण चौथी नंतर एकदाही सुरुंग लावला आहे ह्या कारणाने थांबण्याचा योग आलेला नाही .

विजुभाऊ Sat, 05/17/2014 - 12:47
बरोबर ब्याटम्यान्काका. तेच ते . दहशत नाही मात्र छ. शिवाजी महाराजांबद्दल लोकाना इतके प्रचंड प्रेम आणि आदर आहे. ते प्रेम राजघराण्याबद्दल आहे. त्यांच्या मातोश्री ज्यावेळेस निवडणूकीत पडल्या त्यावेळेस अभयसिंह्राजे भोसले हेच विरोधात उभे होते. त्यामुळे लोकानी थोडा मवाळ पर्याय निवडला होता. अभयसिंहराजे भोसले आनि उदयनराजे यांच्यात एकदा लढत झाली होती. त्यावेळेस अभयसिंह राजे भोसले निवडणूक हरताहरता थोडक्यात बचावले. (तेही काही इतर कारणांमुळे).

विजुभाऊ Sat, 05/17/2014 - 12:58
नानासाहेब नेफळे.( पूर्वाश्रमीचे ग्रेट थिंकर) मी अजिंक्यातार्‍याच्या मागील बाजूचा म्हणजे हायवेकडच्या नव्हे तर "खिंडीतील गणपती" बाजूकडचे बोलतोय. उगाच वस्तुस्थिती माहीत नसताना उचलले बोट आपटले की बोरडावर असे करु नका.

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Mon, 05/19/2014 - 01:17
नक्की फरक काय आहे? शिवाजी महाराज काय किंवा गांधी-नेहरू काय, त्या त्या लोकांचे जे काही कर्तृत्व होते त्या बळावर त्यांच्या वंशजांनी किती माज करावा याला लिमिट असते. त्या दृष्टीने पाहता फरक नाहीच. समर्थ स्वतःच म्हणतात ना, "सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख" म्हणून? मग हे कसं चालतं? शिवाजीराजांचे वंशज असण्यात स्वतःचे कर्तृत्व काय आहे या प्रश्नाचे उत्तर द्या बॉ कुणीतरी. इतक्या प्रतिष्ठित कुळात जन्म घेऊन पुढं काही केलं तर ठीक, नैतर पोकळ बढाईपेक्षा त्याला काडीमात्र महत्त्व नाही.

आनन्दिता Sun, 05/18/2014 - 04:50
विजुभाऊंच्या सर्व प्रतिसादाशी अगदी सहमत. करता येण्यासारखी अनेक कामे केवळ करण्याची इच्छाशक्ती नसल्याने त्या घराण्याने केली नाहीयेत. मग ते अभयसिंह असो, उदयन असो किंवा शिवेंद्र असो. उदयनराजेंनी कार्यकर्त्यांची फौज मात्र उत्तम बांधली आहे. त्यामुळे सातारा शहर सोडा पण आसपासची अनेक गावे एकगठ्ठा मतं देतात. जोडीला गुंडगिरी आहेच. रच्याकने कालच्या निवडणुकीनंतर एबीपी माझा ला त्यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकली का? जरा जास्तच झालं त्यात .. किंवा " जास्त झाली" असावी . http://abpmajha.abplive.in/videos/2014/05/16/article324016.ece/कार्ट्यांनो-असे-घाणेरडे-प्र?id=324016#.U3fpR9q9KSM

दुश्यन्त Sun, 05/18/2014 - 12:14
महायुतीने ही जागा आर पी आय ला सोडली होती. आर पी आय ला तिथे उमेदवार मिळत नव्हता, एक उमेदवार मिळाला तो नामांकन भरायच्या आदल्या दिवशी बदलला. महायुतीत सगळा संभ्रम होता. त्यात सेनेच्या पुरुषोत्तम जाधवांनी बंडखोरी केली होती.महायुती खासकरून मुंडे आणि उदयन राजेंचे संबंध चांगले आहेत. सेनेने स्वतःचा उमेदवार दिला असता तर किमान एक चांगली लढत तरी झाली असती मात्र आठवलेंच्या पक्षाची ताकद एकदम तोल मासा तेव्हा एका अर्थाने हा महयुतीकडून उदयनराजेना बाय होता असेच म्हणावे लागेल. उद्या उदयनराजे भाजपमध्ये आले तरी नवल वाटायला नको.

सातार्‍याचा "पुणे मुंबई बारामती स्टाईल" विकास न होवु देणे हे माझ्या लेखी एक खुप मोठे पॉसिटीव्ह काम आहे ... नकोच आमच्या सातार्‍यात तसला विकास ... अवांतर : डॉ. पुष्कर श्रोत्रींनी एक कासच्या फुलांवर लिहिलेले पुस्तक आणि त्यांचे वर्ल्ड हेरीटेज करणाचे काम इतके सुप्रसिध्द झाले की आता कासला २-३ लाख लोक भेट देतात ... लवकरच कास उध्वस्त होईल ! आणि ऐकीव माहीती नुसार डॉक्टरांनाही कास बाबत जे झाले त्याबद्दल वाईटच वाटत आहे :( बाकी सविस्तर प्रतिसाद देतो जरा निवांत पणे !

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Sun, 05/18/2014 - 20:24
बेशिकमध्येच लोच्या झालाय अशी शंका आहे. सगळीकडे शिमिटाची खुराडी अन धुराडी उभी करणे म्हंजेच फक्त विकास नाही. पण संतुलित विकासही करता येऊ शकतो. पण यांनी नक्की केले तरी काय? विकास होऊ न देणे? प्रसादराव, अतिशयच असहमत. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहे.

In reply to by बॅटमॅन

संतुलित विकासही करता येऊ शकतो.
संतुलित विकास हेच कॉन्ट्रॅडिक्शन आहे ... एकीकडे खडडा खणल्या शिवाय दुसरीकडे डोंगर उभारताच येत नाही असे म्हाझे ठाम मत आहे. तुम्ही म्हणता तसल्या संतुलित विकासाचे माझ्या पाहण्यात तरी एकही उदाहरण नाही Please enlighten me !!

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्या निमित्ताने "विकास म्हणजे नक्की काय ?" ह्यावर एकदा सविस्तर चर्चा कली पाहिजे .... स्वतंत्र धागा काढतो त्याबद्दल :)

In reply to by प्रसाद गोडबोले

संतुलित विकास गोव्याला म्हणावे? आहेत त्या इंडस्ट्रीज नीट चालल्या आहेत आणि धुराडी उभी राहिली नाहीयेत. साताऱ्याने आहे तसेच रहावे आणि बदलू नये असं मला पण वाटतं. आणि एकीकडे त्यात लै लै स्वार्थीपणा असं पण वाटतं आहे. आपण सगळे (म्हणजे इथे चर्चा करणारे सातारकर कोणी राहतंय साताऱ्यात?? मी बंगळूरात आहे) ऑब्व्हीयस कारणासाठी बाहेर रहाणार आणि लोकल पब्लिक आहे तसंच रहावे, त्यांनी बदलू नये अशी अपेक्षा का करावी?? कोल्हापुरात मजबूत कास्टिंग आहे, पुण्यात कंपन्या आहेत. साताऱ्यात मशीनिंग जोरदार होण्यास काय हरकत आहे? नगर रोडवर सणसवाडी वगैरे एमआयडीसी झाल्यात. अ‍ॅबनॉर्मल सूज असलेली ग्रोथ नको पण वरती म्हणाल्या प्रमाणे आर्यांग्ल एक चांगलं फेमस कॉलेज झालं तर काय बिघडेल?? परिवारापैकी शिवेंद्रसिंह यांनी सुरुवात करून फुलं एक्स्पोर्ट (दुबईमध्ये वगैरे) करायला बऱ्याच जणांना मदत केली आहे. बरीच ग्रीन हाउस बांधली गेली आहेत. काही जणांनी एक्स्पोर्ट साठी स्ट्रॉबेरी वगैरेची पण उत्पादने घ्यायला सुरुवात केलेली आहे.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

बॅटमॅन Mon, 05/19/2014 - 01:17
तेच तर. आहे तसं रहावं, बदलू नये, इ. म्हटले तर तो एक स्वार्थीपणाच आहे कारण असे म्हणणारे लोक अन्य ठिकाणच्या डेव्हलपमेंटचा फायदा घेत असतात. उद्या मिरजेनेही बदलू नये असे मी म्हटले तर तो ढोंगीपणाच होईल.

In reply to by बॅटमॅन

हाडक्या Mon, 05/19/2014 - 03:52
हॅ हॅ हॅ .. आम्ही पममई, ममई आणि परदेशात काम करतो.. मंग सुट्टीला सातार्‍याला जातो.. मग कशाला पायजे बदल ? ;) फक्त तुमच्या एरिया मधल्या गुंडाशी ओळख ठेवा (तो पण कधी बदलत नाही) मग पोलिसाने अडवू दे नायतर अजून काय राडा होवू दे.. बिंदास सांगा 'वाड्यावर फोन लाऊ का रे ?' बास.. सिंपल लाईफ.. बॅटमॅन भौ, ढोंगीपणा आपल्या भारतीय रक्तातच खोलवर मुरला आहे, त्यात नवीन ते काय हो ?

विजुभाऊ Sun, 05/18/2014 - 20:33
गिरीजाकाका विकासाचा स्थानीक निसर्गाच्या प्रश्नाशी बादरायण संबन्ध जोडून नका. कास ची व्यथा वेगळी आहे.तेथे निसर्गाला धोका असण्याचा प्रश्न आहे. पण त्याव्यतिरीक्त अनेक मुद्दे आहेत. पुणे बारामती स्टाईल विकास म्हणजे काय जो? स्थानीक लोकाना रोजगार उपलब्ध व्हायला नको का? सातार्‍यातील लोकाना किमान सोई असलेली स्मशानभूमी देखील न मिळणे / मुलाना खेळण्यासाठी एकही उत्तम ग्राउंड / अकादमी नसणे / चांगल्या वैद्यकीय सोयी नसणे याचा विकासाशी काहीच संबन्ध नाही असे का म्हणायचे आहे. सातार्‍यात असलेल्या शैक्षणीक सोयी या काही खाजगी संस्थानी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
"सातार्‍याचा "पुणे मुंबई बारामती स्टाईल" विकास न होवु देणे हे माझ्या लेखी एक खुप मोठे पॉसिटीव्ह काम आहे ...
" आपल्या अफाट तार्कीकाला लाख सलाम. धन्यवाद. बरे झाले तुम्हीच तुमच्या बुद्धीमत्तेचे प्रमाण दिलेत.

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन Sun, 05/18/2014 - 20:40
स्थानिकांना रोजगार मिळणे, चांगली कॉलेजेस असणे, इ. महत्त्वाचे आहे. हेच सांगली-मिरजेत किंवा कोल्हापुरात पहा. मेडिकल सेवांबाबतीतच पहायचे झाले तर अख्ख्या दक्षिण महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात मिरज फेमस आहे. सांगलीत वालचंद कॉलेज आहे. कोल्हापुरात फौंड्री बिझनेस जोरात आहे. सातार्‍यात असं काय आहे साखर कारखाना एक वगळला तर?

In reply to by बॅटमॅन

आनन्दिता Sun, 05/18/2014 - 23:02
सातार्याचं आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय १९१३ ला स्थापन झालंय. हे भारतातलं पहिलं आयुर्वेदिक महाविद्यालय आहे. याचा विदा शोधायचा प्रयत्न करतेय. पण कुठे मिळाला नाही. ' पुढारी ' मधे त्यावर एक मोठं आर्टीकल आलं होतं दोन-तीन वर्षापुर्वी त्यात हा उल्लेख होता. सातार्याच्या नाकर्त्या नेतॄत्वामुळे हे कॉलेज आता अखेरच्या घटका मोजतंय. कॉलेज च्या इमारतीकडे पाहुन भुतबंगल्याची आठवण होते. होस्टेल ची अवस्था तर गचाळ शब्द कमी पडावा अशी आहे.

In reply to by आनन्दिता

बॅटमॅन Sun, 05/18/2014 - 23:12
धन्यवाद. अशा अजूनही काही गोष्टी असतील, पण त्यांचे कधी कुणी नावही ऐकलेले नसणे हे बाहेरच्यांचे अज्ञान सोडून तत्रस्थांच्या अनास्थेचाच परिणाम होय.

In reply to by बॅटमॅन

दुश्यन्त Mon, 05/19/2014 - 16:14
सहमत. सातार्यापेक्षा सांगली, कोल्हापूर, कराड झालच तर जवळचे फलटण, अकलूज पण बर्याचदा विकसित वाटतात.

In reply to by विजुभाऊ

गिरीजाकाका विकासाचा स्थानीक निसर्गाच्या प्रश्नाशी बादरायण संबन्ध जोडून नका.
विकास म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन मधील वाढ ... निसर्गातल्या रीसोर्सेस वर ओव्हर्लोडींग केल्या शिवाय अशी वाढ शक्यच नसते त्यामुळे हा बादरायण संबंध मुळीच नव्हे . ज्याला तुम्ही विकास म्हणता तो १६व्या शतकातील औद्योगिक क्रांती नंतर झालेला बदल आहे आणि त्यानंतर झालेला निसरगाचा र्‍हासही आपल्या पाहण्यात असेलच !!
पुणे बारामती स्टाईल विकास म्हणजे काय जो?
>>> पुण्याच्या आसपास उभे रहात असलेल्या काँक्रीटचा जंगलांकडे पहा मग लक्षात येईल की मला काय म्हणायचे आहे ते
स्थानीक लोकाना रोजगार उपलब्ध व्हायला नको का?
>>> नको . स्थानिक लोक अकार्यक्षम असतिल तर त्यांना रोजगार उत्पन्न व्हाय्ला नकोच्च. आणि जे कार्यक्षम असतील ते त्यांचा मार्ग शोधुन काढतील ( जसा की मी काढलाय :P)
सातार्‍यातील लोकाना किमान सोई असलेली स्मशानभूमी देखील न मिळणे / मुलाना खेळण्यासाठी एकही उत्तम ग्राउंड / अकादमी नसणे / चांगल्या वैद्यकीय सोयी नसणे याचा विकासाशी काहीच संबन्ध नाही असे का म्हणायचे आहे.
स्मशानभुमी हा चोरगेंनी केलेला राजकीय मुद्दा आहे . उत्तम शाहु स्टेडीयम हाही चोरगेंनीच केकेला राजकीय मुद्दा आहे . क्रांतीसिंंह नानापाटील रुग्णालया इतक्या सोयी अन्य कोणत्याही रुग्णालयात असल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही ९ अर्थात तुम्ही खाजगी रुग्णालयाशी तुलना करीत असाल तर ते अ‍ॅप्पल अ‍ॅन्ड ऑरेंजेस होईल )
सातार्‍यात असलेल्या शैक्षणीक सोयी या काही खाजगी संस्थानी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
>>> रयत शिक्षण संस्था खाजगी आहे काय ? आणि सातार्‍यात नवोदय आहे, सैनिक स्कुल आहे त्याबद्दल काय मत आहे ? शिवाय सगळ्याच गोष्ठी सरकारने पुरवाव्यात अशी का अपेक्षा ? समजा जरी पुरवल्यात तरी त्याचा किती जण लाभ घेतील ? सातार्‍यातील ३ सरकारी शाळांचे पत्ते सांगा पाहु ....
आपल्या अफाट तार्कीकाला लाख सलाम. धन्यवाद. बरे झाले तुम्हीच तुमच्या बुद्धीमत्तेचे प्रमाण दिलेत.
>>> व्यक्तीगत आरोप ! ज्याची त्याची स्वतंत्र मते असु शकतात आणि आपण आपल्यातील मतभिन्नतेचा आदर करायला शिकले पाहिजे ! . आपण ज्येष्ठ आहात , बहुत काय लिहिणे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

आनन्दिता Mon, 05/19/2014 - 07:04
>>> रयत शिक्षण संस्था खाजगी आहे काय ? आणि सातार्‍यात नवोदय आहे, सैनिक स्कुल आहे त्याबद्दल काय मत आहे ?
गिरिजाकाका, रयत शिक्षण संस्था सरकारी संस्था नक्कीच नाही. ती एक खासगीच संस्था आहे. रयत मधल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा कॉलेजं सरकार द्वारा ' अनुदानित' आहेत. सरकारी आणि अनुदानित संस्थांमधे बराच फरक असतो. याच रयत ची वोकेश्नल कॉलेजं म्हणजे " के. बी. पी. इंजिनिअरिंग कॉलेज " किंवा लॉ कॉलेज यासाठीची अ‍ॅड्मिशन्स खासगी कॉलेज म्हणुन होतात. सरकारी नाही कारण त्यांना सरकारचं अनुदान नाही, नवोदय विद्यालय सातार्यात आहे कारण सातारा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. आणि नवोदय विद्यालये भारतातल्या सर्व जिल्ह्यांमधे आहेत ( तामिळनाडू सोडुन ). किंबहुना तसा नियमच आहे. त्यामुळे त्यात स्पेशल असं काही नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रसाद१९७१ Mon, 05/19/2014 - 13:37
पुण्याच्या आसपास उभे रहात असलेल्या काँक्रीटचा जंगलांकडे पहा मग लक्षात येईल की मला काय म्हणायचे आहे ते >>>>>>> गिरिजा काकू - लोकांनी कायम झोपडीत च रहावे अशी तुमची अपेक्षा आहे काय? लोकसंख्या वाढते आहे, इमारती नाही बांधल्या तर लोकांनी रहायचे कुठे?

विजुभाऊ Sun, 05/18/2014 - 21:03
सातार्‍यात तसे बघायला गेले तर अनेक कोलेजेस उपलब्ध आहेत. मात्र मिरजसारखे गव्हर्न्मेंट मेडीकल कॉलेज उपलब्ध नाही. काही उपचार घ्यायचे झाले तर कराडच्या कृष्णा मेडीकल मधे जावे लागते. महाराष्ट्र स्कूटर्स सारखा कारखाना जोवर चालू होता तोवर स्थानीक छोट्या उद्योगाना फाउम्ड्री, मशिनिंगची कामे मिळायची. तो कारखाना गेली कित्येक वर्षे उत्पादन बंद अवस्थेत आहे. महाराष्ट्रा शासनाची थेट गुंतवणूक त्या उद्योगात आहे. तेथे इतर कोणतेही उत्पादन करणे सहज शक्य आहे. सातार्‍यात महाराष्ट्रात होणारी बहुतेक सर्व ( संत्री वगळता) पिके होतात. मात्र कृषी मालावर प्रक्रीया करणारा एकही मोठा उद्योग नाहिय्ये. सर्व सोयी उपलब्ध असूनही सातार्‍यातली एम आयडीसी कायम आजारी आहे. कारखाने बंद पडले आहेत. अर्थात हे सर्व त्या
मोठ्या पॉझीटीव्ह कामाचा
भाग असावा बहुतेक. सातार्‍यात काय आहे असे विचाराल तर पर्यतनासाठी अनेक स्थळे आहेत. उदा माहुली इथला कृष्णा कोयनेचा संगम. इथे अनेक सुंदर मंदीरे आहेत. पण ती अक्षरशः दुर्लक्षीत. काही मंदीरे तर कळसापर्यन्त अर्धवट वाळूत गाडली गेली आहेत. इथे तिथे साफसफाई करून एखादे अप्रमतीम ऐतीहासीक स्थळ उद्यान करणे शक्य आहे, पण इथे वाळू उपसा करून नदीचे डबके करून टाकले आहे. अर्थात हे सुद्धा कदाचित त्या "मोठ्या पॉझीटीव्ह " कामात अंतर्भूत असेल. करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पाटेश्वर सारख्या स्थळाचा विकास करणे शक्य आहे. सातार्‍यावर निसर्गाने भरभरून दिलेले आहे. कण्हेर धरणावर एखादे सुंदर बाग करणे शक्य आहे. पण असो........ मोठे पॉझीटीव्ह काम.

In reply to by विजुभाऊ

येस्स करेक्ट ... सातार्यात ज्या योगे बाहेरचे लोक येतील असे काहीच नको ... आम्ही आहे तसे आहे त्यात मस्त खुष आहोत ... ( खोटं नाही बोलत हो ... मागल्या वेळेस कासला फोटो काढायसाठी फी मागितली त्या भैयाच्या डोकयात दगड घालायची इच्छा झाली होती... हायला ह्या कासवर आम्ही खेळलो बागडलो लहानाचे मोठे झालो तिथे येवुन हिंदीत बोलुन आमच्याच कडुन फी वसुल करतो ... त्याच्यामायला #$%&*& ) तात्पर्य : असल्या लोकांना आणि असल्या विकासाला(?) सातरबाहेर ठेवणे हेच मोठ्ठे काम आहे

मृत्युन्जय Mon, 05/19/2014 - 11:11
रस्ते, पाणी आणि वीज या ३ बाबतीत सातार्‍यामध्ये काय विकास झाला हे कळाले तर उदयनराजेंनी काय केले हे कळेल. नाहितर लोक उगाचच उदयनराजेंच्या दारु पिउन बेफाम वर्तन करण्याबद्दल, त्यांच्या गुंडगिरीबद्दल आणि उर्मटपणाबद्द्ल, बेताल वर्तनाबद्दल अफवा पसरवत असतात. शिवाजी महाराजांच्या थोर घरण्यात जन्म घेउन कोणीही माणूस असली नीच कृत्ये करुच शकणार नाही. त्यांनी केलेली विकासकामे लोकांसमोर येउ द्यात म्हणजे लोकांची तोंडे आपोआप बंद पडतील. उदयनराजे इतक्या मताधिक्याने निवडुन येतात "ये लोगो का प्यार नही तो और क्या है?"

In reply to by मृत्युन्जय

टवाळ कार्टा Mon, 05/19/2014 - 12:55
सातार्यात लोडशेडींग आहे?? रस्त्यांवर खड्डे आहेत?? झोपडपट्ट्या आहेत?? सार्वजनिक शौचालये (स्वछ्छ) आहेत?? बेकायदेशीर बांधकामे आहेत??

In reply to by टवाळ कार्टा

मैत्र Mon, 05/19/2014 - 15:27
बाकी गोष्टींची माहीती सद्य सातारकर देतीलच पण सातार्‍यात रस्त्यांवर खड्डे नाहीत! -- कारण त्यासाठी रस्ते असावे लागतात. गेली किमान वीस वर्षे दर भेटीला सातार्‍यात "वरचा" रस्ता, राजवाडा रस्ता आणि पोवई नाका ते नगरपालिका इथे रस्ता शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. उदयनराजे हे शिवाजी महाराजांचे थेट वंशज म्हणून आदर आहेच आणि राहील. पण संसदीय लोकशाहीत लोकप्रतिनिधी म्हणून त्याव्यतिरिक्त काही जबाबदार्‍या असतात त्याबद्दल फारसं काही घडल्याचं ऐकलेलं नाही.

पिलीयन रायडर Mon, 05/19/2014 - 15:40
मला एकच प्रश्न विचारायचाय.. महाराज.. राजे एकच.. छत्रपती शिवाजी महाराज.. त्यांचा राज्याभिषेक झाला म्हणुन राजे नव्हेत.. ते खर्‍या अर्थानी राजे.. तर ह्या बाकीच्यांना कशामुळे "श्रीमंत..छत्रपती" अशा पदव्या द्यायच्या? हक्कच काय म्हणते मी हे लावण्याचा? केवळ वंशज म्हणुन? छत्रपती म्हणवुन घ्यायला कर्तुत्व काय ह्यांचे? उदय भोसले ह्या माणसा बद्दल चर्चा करा.. राजे बिजे कोणी नाही आता..

In reply to by पिलीयन रायडर

तर ह्या बाकीच्यांना कशामुळे "श्रीमंत..छत्रपती" अशा पदव्या द्यायच्या? हक्कच काय म्हणते मी हे लावण्याचा? केवळ वंशज म्हणुन? छत्रपती म्हणवुन घ्यायला कर्तुत्व काय ह्यांचे? उदय भोसले ह्या माणसा बद्दल चर्चा करा.. राजे बिजे कोणी नाही आता..
करेक्ट पिरा ! तुमच्या मताला कोण अनुमोदन देतय ते पहा ... हा व्हिडीयो ( २ मिनिट १५ सेकंद ला पहा ) https://www.youtube.com/watch?v=Gz28tde5FNo

सातार्‍यात महाराजांना हरवणे अशक्य आहे

अशक्य

खरेतर हिंदुत्ववादी पक्षांनी महाराजांना आपल्याबाजुला घ्यायला हवे ...पण महाराजांचा आधीचा बीजेपी बरोबरचा अनुभव वाईट असल्याने महाराज परत बीजेपी मधे जाण्याची शक्यता नाही . ह्या सगळ्या मधे सातार्‍यातला हिंदुत्ववाद्यांची गोची होते , हिंदुत्ववादी पक्षाला मत द्यायचे की ज्यांच्यामुळे हिंदु धर्म तरला त्यांना ? त्यामुळे मी मतदान करतच नाही :) पण मोदींनी एकदा प्रत्यक्ष भेट घेतली आणि पवारसाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जरासा कमी केला तर महाराज परत हिंदुत्ववादी पक्षाकडे येतील अशी आशा आहे ! अवांतरः मागे एकदा संभाजी भिडे गुरुजी ह्यांनी रायगडावर मोदी आणि महाराजांची भेट घडवुन आणण्याचा प्रयत्न केला होता पण ते जमले नाही :(

विजुभाऊ Sat, 05/17/2014 - 12:23
गिरीजा काका कोणतीही व्यक्ती जाणता राजा या पदापर्यन्त पोहोचते ते रयतेच्या प्रश्नांची जाण असल्यामुळे. ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे. सातार्‍यात गेल्या किमान तीस वर्षांपासूनच्या काही समस्या आहेत. १) येथील तरुणाना स्थानीक रोजगार उपलब्ध नाहीत त्यामुळे मुम्बै/पुणे येथे स्थलांतर करावे लागते :- मागील तीस वर्षांपासून उत्तम भौगोलीक परिस्थिती ( वीज / पाणी / राष्ट्रीय महामार्ग/प्रशिक्षीत मनुष्यबळ) उपलब्द असूनही येथे एकही नवा मोठा उद्योग आलेला नाही. उलट जे होते ते उद्योगच इतरत्र स्थलांतरीत झाले ( उदा अ‍ॅरीस्टोक्रॅट / डोबर्ग ) महाराष्ट्र स्कूटर्स चे तर मागील किमान पंधरा वर्षाम्पासून उत्पादन बंदच आहे. एकाही लोकप्रतिनीधीनी याबाबत कधीच आवाज उठवला नाही. २) यामुळे त्यावर अवलंबून असलेले छोटे उद्योजकसुद्धा देशोधडीला लागले आहेत. ३) केवळ साखर कारखाना हीच काय ती जमेची बाजू. ४) शेजारीच सूत गिरणी प्रकल्पाची भकास अर्धवट बांधलेली मोडकळलेली इमारत येताजाता नजरेस पडते. त्या प्रकल्पाचे काय झाले कोण जाणे. ५) सातार्‍याच्या आसपास निसर्गाने अक्षरश: वैभवाची उधळण केलेली आहे. शक्य असुनही एकाही पर्यटनस्थळाचा विकास केलेला नाहिय्ये. ( कोयनानगर हे अक्षरशः नम्दनवन आहे) ६) सातार्‍यात शक्य असूनही योग्य वैद्यकीय सोयी उपलब्ध नसल्याने रुग्णाना पुण्याला जावे लागते. ७) सातार्‍यात आयटी पार्क सारख्या किंवा तत्सम गोष्टी आणणे सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी प्रयत्नच होत नाहीत. ८) शेतीमालावर प्रक्रीया करणारा एकही मोठा उद्योग येथे नाही. ९) सातार्‍यात बर्‍याच हिंदी मराठी चित्रपटांची चित्रीकरणे होतात ( दबंग / अपहरण हे खुद्द सातारा शहरात) मात्र त्या अनुशंगीक एकही सोयी येथे उपलब्ध नाहीत. १०) स्मशानभूमी देखील लोकवर्गणीतून झालेली आहे. यात कोणते राजकारण आडवे येत होते कोण जाणे. पण इच्छेचा अभाव ) ११) जागा असुनही तीस वर्षात एकही नवे उद्यान , पोहोण्याचा तलाव , खेळण्याच्या सुविधा निर्माण केल्या नाहीत. सातार्‍यातील लोकांचे शिवाजी महाराजांवर असलेले प्रेम आणि आदर यामुळे एका हाकेसरशी अक्षरशः लाखो लोक जमा करण्याची क्षमता या नेत्यांकडे आहे मात्र याच उपयोग विकासासाठी कधीच केला गेला नाही. पर्यटन , कृषी उद्योग ,अ‍ॅटोमॉबाईल या उद्योगांत मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. मात्र केवळ इच्छेचा अभाव यामुळे क्षमता असूनही सातार्‍याचा विकास झालेला नाहिय्ये. हे झाले काही मोजकेच मुद्दे. कोणत्याही व्यक्तीबद्दल तक्रार नाही. मात्र तीस वर्षे हे मुद्दे असेच राहिले आहेत. या उलट पवारानी बारामतीसारख्या छोट्या गावाचा उत्तक विकास केलेला आहे. तेथे मोठे उद्योग आहेत. आसपासच्या कुरकुंभ. जेजुरी सारख्या गावातही मोठे उद्योग आलेले आहेत. ही वस्तुस्थिती नाकारत येत नाही. कोणाबद्दल वैयक्तीक आक्षेप नाहीत मात्र कोणाची व्यक्तीपूजा करताना ती विभागाच्या विकासाच्या निकषावर घासुन पाहिली तर दुर्दैवाने सर्व आक्षेप योग्य आहेत हेच खरे असे म्हणावे लागेल.

In reply to by विजुभाऊ

नगरीनिरंजन Sat, 05/17/2014 - 23:22
विजुभाऊ, जनतेच्या प्रतिनिधीने जनतेसाठी काम करणे अपेक्षितच आहे. कोणी कितीही विकास केला तरी व्यक्तिपूजा सर्वथैव असमर्थनीय आहे, हो की नाही?

बॅटमॅन Sat, 05/17/2014 - 12:25
या माणसाने सातार्‍यासाठी नक्की काय केले ते खरेच ऐकायला आवडेल. जे ऐकलेय त्यात फक्त मुजोरी सोडून दुसरे काही आढळले नाही आजवर. पण सातारकर नसल्याने काही प्रत्यक्ष अनुभव नाही, तरी कुणा सातारकराने माहिती पुरवावी-अभिनिवेशरहित होऊन. सातार्‍याच्या विकासात यांचे योगदान नक्की काय? छत्रपतींचा वंशज असणे हे काही कर्तृत्व नाही.

In reply to by बॅटमॅन

नगरीनिरंजन Sat, 05/17/2014 - 23:18
क्या बोला! क्या बोला! आजच्या जमान्यात एखाद्याला महाराज वगैरे संबोधणे वगैरे पाहून मला तर काय म्हणावे तेच कळत नाही. एकीकडे सत्तापालट करून स्थैर्यासाठी पक्षाला मतदान करण्याची परिपक्वता देशभरातले मतदार दाखवत असताना इथे व्यक्तिपूजेची थाळी सजवण्यात येत आहे हे पाहून अजून लोकशाही सगळीकडे रुजायची आहे याची साक्ष पटली.

In reply to by नगरीनिरंजन

हाडक्या Mon, 05/19/2014 - 03:33
या इथे एक सातारकर म्हणून थोडक्यात काही बाबी मांडल्या आहेत यांच्याबद्दल. पण या साहेबांना चर्चा नको आहे असे त्यंनी
असो, ज्या गोष्टी आपण वैयक्तिक बदलवु शकत नाही त्यावर काय करणार. त्या सर्व प्रतिसादावर, प्रत्येक मुद्दयावर माझ्याकडे संतुलित उत्तरे आहेत पण त्याच त्या विषयावर वाद घालण्याची अजिबात इच्छा नाहीये.
या इथे सांगितले असल्याने चर्चेचा प्रश्न येत नाही असे वाटले, त्यांची जी काही 'संतुलित उत्तरे' जरी द्यायला ते तयार असतील तर आम्ही पण बोलू.. पण RSS वाले आणि सीग्रेडी अशी मुक्ताफळे आधीच उधळल्यावर काय मग ? उदयन राजे आणि त्यांचे भरपूर 'प्रताप' आम्ही सातारकरांनी पाहिले आहेत.
तसा माझा आणि साताराृ्याचा विशेष संबंध नाही पण गेल्या वर्षभरात दुर्गभ्रमंती च्या निमित्ताने शिवकालिन प्रांत सातारा, कराड (सध्याचा ढोबळमानाने सातारा जिल्हा) पाहण्याचे भाग्य लाभले.
म्हणजे उदयन राजे तुमच्यासाठी दूरून डोंगर साजरे आहेत असेच म्हणायचे. निव्वळ शिवरायांचे वंशज मुद्द्यावरून यांना मते का द्यावीत कुणी..?
विशेषत छत्रपती शिवराय याचां अनादर
शिवरायांचा अनादर वगैरे लगेच मध्ये आणू नका हो.. आम्ही तिथेच सातार्‍यात वाढलोय. आणि तुम्ही एकदा शिवाजी संग्रहालयाची अवस्था पहा आणि मग या त्यांच्या वंशजानेच तिथे दुर्लक्ष करून कसा शिवरायांचा अपमान केलाय ते कळेल. बाकी तुम्हाला चर्चा करायची नसल्याने काहीच मुद्दे मांडत नाहीये तरी पण फारतर इथे विजुभाऊनी मांडलेले मुद्दे आहेत त्याच्याबद्दल बोललात तरी भरपूर..

In reply to by नगरीनिरंजन

मालोजीराव Tue, 05/20/2014 - 18:15
सातार्यातील अनेक जेष्ठ व्यक्ती, राजकारणातील काही लोक, राज्यातील बरेच पत्रकार उदयनराजेंना एकेरी नावाने संबोधतात, त्यांना महाराज वगैरे म्हणणे चूक आहे या तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहेच. पण आमचे घराणे असेल किंवा इतर अनेक घराणी आहेत ज्यांचे छत्रपतींच्या घराण्याशी पूर्वापार संबंध आहेत, त्यामुळे त्यांना राजे किंवा छत्रपती संबोधणे आमच्या चालीरितीमध्ये आहे आणि त्याबद्दल कुणाला आक्षेपही असू नये. इथे काहीजणांनी या लोकांना पत्त्याच्या कॅटमधल्या राजाएवढी सुद्धा किंमत नाही असे म्हंटले आहे, यांना कदाचित ठावूक नसावं देशातील काही पंतप्रधान उदा. विश्वनाथ प्रताप सिंह कित्येक आजी /माजी मुख्यमंत्री … वसुंधराराजे,अर्जुन सिंह ,दिग्विजय सिंह,भैरोसिंह शेखावत हे राजघराण्याशीच संबंधित आहेत. कित्येक आजी /माजी केंद्रीय मंत्री,राज्यांतील मंत्री यांची संख्या तर मोठीच आहे . महाराष्ट्रापुरते सांगायचे झाले तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (जाधवराव) , सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , खासदार विजयसिंह मोहिते, पुण्याचे नवीन खासदार अनिल शिरोळे हेही अश्याच घराण्यांशी संबंधित आहेत.

In reply to by मालोजीराव

व्वा !व्वा !!व्वा!!! मालोजी, ही एवढ्या कर्तृत्वाशाली व्यक्तींची यादी देऊन तूम्ही या भारतभूला उपकृतच केले नै का! हेच राजमान्य, मुजरामात्रे ,स्वकतृत्ववान लोक जेव्हा जाहिर सभेत फुले आंबेडकरांचे नाव घेतात व सत्ता येताच खुर्च्या उबवायला आपल्या ९६ बगलबच्च्यांची वर्णी लावतात ,आरक्षणाची मागणीकरुन तळागाळातल्या लोकांच्या भाकरीतला चतकोर तुकडा हिसकावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अंमळ गंमत वाटते. एक सांप्रतकालीन महाराष्ट्रीय नरपुंगव राजे सध्या आरक्षण मागत फिरत आहेत, तेही आलिशान मर्सिडीज, ऑडी यांचा ताफा घेऊन... कमाल नै!

In reply to by नानासाहेब नेफळे

वाडीचे सावंत Tue, 05/20/2014 - 23:25
नेफळे ( खर आडनाव असल्यास ) तुमचा प्रोब्लेम काय आहे...एकंदरित ब्राह्मण आणि मराठा ह्यान्च्याबद्दल तुमच्या मनात फ़ार आकस आहे... तुम्ही कोणताही विषय नेहमी धर्म आणि जातींकडे का नेता.... टीप: मी मराठा आरक्शणाचा कडवा वीरोधक आहे... पण मराठा आरक्शणा बाबत तुमच्या पोटात फ़ारच दुखत ... तुमचा टक्का कमी होईल म्हणुन का?

In reply to by मालोजीराव

मालोजीराजे, छत्रपतींच्या घराण्याविषयी लोकांना आस्था असलीचं पाहीजे. शिवाजी महाराजांचं कर्तुत्व तेवढं मोठं होतच ह्यात काही वाद नाही. पण त्यांचे वंशज म्हणुन छत्रपती लेव्हलचं कर्तुत्व नसताना मिरवणं मात्र नक्की खटकतं. शिवाजी महाराजांसारखं कर्तुत्व असेल तर त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला पण सगळ्यांची तयारी असेल.

विजुभाऊ Sat, 05/17/2014 - 12:34
ब्याटम्यान काका केवळ याच व्यक्तीने नाही तर त्यांच्या पूर्वसुरींनी सुद्धा. त्यामुळेच गेल्या तीस वर्षात असे म्हणतोय. त्यांच्या काकानी निदान काही पाणीपुरवठा योजना , सहकारी साखर कारखाना , नाट्यगृह इत्यादी मोजके का होईना काही गोष्टी जमेकडे आहेत. मात्र बाकी शून्य.

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन Sat, 05/17/2014 - 12:40
यांचे काका म्ह. ते अभयसिंहराजे काय? बाकी पूर्वसूरींचं माहिती नै पण मी उदयनराजेंचाच उदोउदो जास्त ऐकलाय, सबब प्रश्न त्यांच्याबद्दलच आहे. अन अजून एक प्रश्न असा की जर काहीच नै केले तर लोक मतं का देतात? फक्त दहशतीच्या जोरावर असे जमत असेलसे वाटत नै. नक्की माजरा क्या है?

विजुभाऊ Sat, 05/17/2014 - 12:39
सातार्‍यातील डोंगर दगड खाणीमुळे पोखरले जात आहेत. ऐतीहासीक अजिंक्यतारा तर मागील बाजूने अक्षरश पूर्ण उभा कातरला गेला आहे. अशाच एका दगड खाणीतील वादामुळे एका राष्ट्रवादी गुंडाचा खून झाला होता.

In reply to by विजुभाऊ

अजिंक्यतार्‍यातील गौणखनिज पश्याला बंधी होवुन किमान २० वर्षे होवुन गेलीत ... मी लहानपणापासुन खिडीतल्या गणपतीला जातोय पण चौथी नंतर एकदाही सुरुंग लावला आहे ह्या कारणाने थांबण्याचा योग आलेला नाही .

विजुभाऊ Sat, 05/17/2014 - 12:47
बरोबर ब्याटम्यान्काका. तेच ते . दहशत नाही मात्र छ. शिवाजी महाराजांबद्दल लोकाना इतके प्रचंड प्रेम आणि आदर आहे. ते प्रेम राजघराण्याबद्दल आहे. त्यांच्या मातोश्री ज्यावेळेस निवडणूकीत पडल्या त्यावेळेस अभयसिंह्राजे भोसले हेच विरोधात उभे होते. त्यामुळे लोकानी थोडा मवाळ पर्याय निवडला होता. अभयसिंहराजे भोसले आनि उदयनराजे यांच्यात एकदा लढत झाली होती. त्यावेळेस अभयसिंह राजे भोसले निवडणूक हरताहरता थोडक्यात बचावले. (तेही काही इतर कारणांमुळे).

विजुभाऊ Sat, 05/17/2014 - 12:58
नानासाहेब नेफळे.( पूर्वाश्रमीचे ग्रेट थिंकर) मी अजिंक्यातार्‍याच्या मागील बाजूचा म्हणजे हायवेकडच्या नव्हे तर "खिंडीतील गणपती" बाजूकडचे बोलतोय. उगाच वस्तुस्थिती माहीत नसताना उचलले बोट आपटले की बोरडावर असे करु नका.

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Mon, 05/19/2014 - 01:17
नक्की फरक काय आहे? शिवाजी महाराज काय किंवा गांधी-नेहरू काय, त्या त्या लोकांचे जे काही कर्तृत्व होते त्या बळावर त्यांच्या वंशजांनी किती माज करावा याला लिमिट असते. त्या दृष्टीने पाहता फरक नाहीच. समर्थ स्वतःच म्हणतात ना, "सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख" म्हणून? मग हे कसं चालतं? शिवाजीराजांचे वंशज असण्यात स्वतःचे कर्तृत्व काय आहे या प्रश्नाचे उत्तर द्या बॉ कुणीतरी. इतक्या प्रतिष्ठित कुळात जन्म घेऊन पुढं काही केलं तर ठीक, नैतर पोकळ बढाईपेक्षा त्याला काडीमात्र महत्त्व नाही.

आनन्दिता Sun, 05/18/2014 - 04:50
विजुभाऊंच्या सर्व प्रतिसादाशी अगदी सहमत. करता येण्यासारखी अनेक कामे केवळ करण्याची इच्छाशक्ती नसल्याने त्या घराण्याने केली नाहीयेत. मग ते अभयसिंह असो, उदयन असो किंवा शिवेंद्र असो. उदयनराजेंनी कार्यकर्त्यांची फौज मात्र उत्तम बांधली आहे. त्यामुळे सातारा शहर सोडा पण आसपासची अनेक गावे एकगठ्ठा मतं देतात. जोडीला गुंडगिरी आहेच. रच्याकने कालच्या निवडणुकीनंतर एबीपी माझा ला त्यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकली का? जरा जास्तच झालं त्यात .. किंवा " जास्त झाली" असावी . http://abpmajha.abplive.in/videos/2014/05/16/article324016.ece/कार्ट्यांनो-असे-घाणेरडे-प्र?id=324016#.U3fpR9q9KSM

दुश्यन्त Sun, 05/18/2014 - 12:14
महायुतीने ही जागा आर पी आय ला सोडली होती. आर पी आय ला तिथे उमेदवार मिळत नव्हता, एक उमेदवार मिळाला तो नामांकन भरायच्या आदल्या दिवशी बदलला. महायुतीत सगळा संभ्रम होता. त्यात सेनेच्या पुरुषोत्तम जाधवांनी बंडखोरी केली होती.महायुती खासकरून मुंडे आणि उदयन राजेंचे संबंध चांगले आहेत. सेनेने स्वतःचा उमेदवार दिला असता तर किमान एक चांगली लढत तरी झाली असती मात्र आठवलेंच्या पक्षाची ताकद एकदम तोल मासा तेव्हा एका अर्थाने हा महयुतीकडून उदयनराजेना बाय होता असेच म्हणावे लागेल. उद्या उदयनराजे भाजपमध्ये आले तरी नवल वाटायला नको.

सातार्‍याचा "पुणे मुंबई बारामती स्टाईल" विकास न होवु देणे हे माझ्या लेखी एक खुप मोठे पॉसिटीव्ह काम आहे ... नकोच आमच्या सातार्‍यात तसला विकास ... अवांतर : डॉ. पुष्कर श्रोत्रींनी एक कासच्या फुलांवर लिहिलेले पुस्तक आणि त्यांचे वर्ल्ड हेरीटेज करणाचे काम इतके सुप्रसिध्द झाले की आता कासला २-३ लाख लोक भेट देतात ... लवकरच कास उध्वस्त होईल ! आणि ऐकीव माहीती नुसार डॉक्टरांनाही कास बाबत जे झाले त्याबद्दल वाईटच वाटत आहे :( बाकी सविस्तर प्रतिसाद देतो जरा निवांत पणे !

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Sun, 05/18/2014 - 20:24
बेशिकमध्येच लोच्या झालाय अशी शंका आहे. सगळीकडे शिमिटाची खुराडी अन धुराडी उभी करणे म्हंजेच फक्त विकास नाही. पण संतुलित विकासही करता येऊ शकतो. पण यांनी नक्की केले तरी काय? विकास होऊ न देणे? प्रसादराव, अतिशयच असहमत. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहे.

In reply to by बॅटमॅन

संतुलित विकासही करता येऊ शकतो.
संतुलित विकास हेच कॉन्ट्रॅडिक्शन आहे ... एकीकडे खडडा खणल्या शिवाय दुसरीकडे डोंगर उभारताच येत नाही असे म्हाझे ठाम मत आहे. तुम्ही म्हणता तसल्या संतुलित विकासाचे माझ्या पाहण्यात तरी एकही उदाहरण नाही Please enlighten me !!

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्या निमित्ताने "विकास म्हणजे नक्की काय ?" ह्यावर एकदा सविस्तर चर्चा कली पाहिजे .... स्वतंत्र धागा काढतो त्याबद्दल :)

In reply to by प्रसाद गोडबोले

संतुलित विकास गोव्याला म्हणावे? आहेत त्या इंडस्ट्रीज नीट चालल्या आहेत आणि धुराडी उभी राहिली नाहीयेत. साताऱ्याने आहे तसेच रहावे आणि बदलू नये असं मला पण वाटतं. आणि एकीकडे त्यात लै लै स्वार्थीपणा असं पण वाटतं आहे. आपण सगळे (म्हणजे इथे चर्चा करणारे सातारकर कोणी राहतंय साताऱ्यात?? मी बंगळूरात आहे) ऑब्व्हीयस कारणासाठी बाहेर रहाणार आणि लोकल पब्लिक आहे तसंच रहावे, त्यांनी बदलू नये अशी अपेक्षा का करावी?? कोल्हापुरात मजबूत कास्टिंग आहे, पुण्यात कंपन्या आहेत. साताऱ्यात मशीनिंग जोरदार होण्यास काय हरकत आहे? नगर रोडवर सणसवाडी वगैरे एमआयडीसी झाल्यात. अ‍ॅबनॉर्मल सूज असलेली ग्रोथ नको पण वरती म्हणाल्या प्रमाणे आर्यांग्ल एक चांगलं फेमस कॉलेज झालं तर काय बिघडेल?? परिवारापैकी शिवेंद्रसिंह यांनी सुरुवात करून फुलं एक्स्पोर्ट (दुबईमध्ये वगैरे) करायला बऱ्याच जणांना मदत केली आहे. बरीच ग्रीन हाउस बांधली गेली आहेत. काही जणांनी एक्स्पोर्ट साठी स्ट्रॉबेरी वगैरेची पण उत्पादने घ्यायला सुरुवात केलेली आहे.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

बॅटमॅन Mon, 05/19/2014 - 01:17
तेच तर. आहे तसं रहावं, बदलू नये, इ. म्हटले तर तो एक स्वार्थीपणाच आहे कारण असे म्हणणारे लोक अन्य ठिकाणच्या डेव्हलपमेंटचा फायदा घेत असतात. उद्या मिरजेनेही बदलू नये असे मी म्हटले तर तो ढोंगीपणाच होईल.

In reply to by बॅटमॅन

हाडक्या Mon, 05/19/2014 - 03:52
हॅ हॅ हॅ .. आम्ही पममई, ममई आणि परदेशात काम करतो.. मंग सुट्टीला सातार्‍याला जातो.. मग कशाला पायजे बदल ? ;) फक्त तुमच्या एरिया मधल्या गुंडाशी ओळख ठेवा (तो पण कधी बदलत नाही) मग पोलिसाने अडवू दे नायतर अजून काय राडा होवू दे.. बिंदास सांगा 'वाड्यावर फोन लाऊ का रे ?' बास.. सिंपल लाईफ.. बॅटमॅन भौ, ढोंगीपणा आपल्या भारतीय रक्तातच खोलवर मुरला आहे, त्यात नवीन ते काय हो ?

विजुभाऊ Sun, 05/18/2014 - 20:33
गिरीजाकाका विकासाचा स्थानीक निसर्गाच्या प्रश्नाशी बादरायण संबन्ध जोडून नका. कास ची व्यथा वेगळी आहे.तेथे निसर्गाला धोका असण्याचा प्रश्न आहे. पण त्याव्यतिरीक्त अनेक मुद्दे आहेत. पुणे बारामती स्टाईल विकास म्हणजे काय जो? स्थानीक लोकाना रोजगार उपलब्ध व्हायला नको का? सातार्‍यातील लोकाना किमान सोई असलेली स्मशानभूमी देखील न मिळणे / मुलाना खेळण्यासाठी एकही उत्तम ग्राउंड / अकादमी नसणे / चांगल्या वैद्यकीय सोयी नसणे याचा विकासाशी काहीच संबन्ध नाही असे का म्हणायचे आहे. सातार्‍यात असलेल्या शैक्षणीक सोयी या काही खाजगी संस्थानी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
"सातार्‍याचा "पुणे मुंबई बारामती स्टाईल" विकास न होवु देणे हे माझ्या लेखी एक खुप मोठे पॉसिटीव्ह काम आहे ...
" आपल्या अफाट तार्कीकाला लाख सलाम. धन्यवाद. बरे झाले तुम्हीच तुमच्या बुद्धीमत्तेचे प्रमाण दिलेत.

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन Sun, 05/18/2014 - 20:40
स्थानिकांना रोजगार मिळणे, चांगली कॉलेजेस असणे, इ. महत्त्वाचे आहे. हेच सांगली-मिरजेत किंवा कोल्हापुरात पहा. मेडिकल सेवांबाबतीतच पहायचे झाले तर अख्ख्या दक्षिण महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात मिरज फेमस आहे. सांगलीत वालचंद कॉलेज आहे. कोल्हापुरात फौंड्री बिझनेस जोरात आहे. सातार्‍यात असं काय आहे साखर कारखाना एक वगळला तर?

In reply to by बॅटमॅन

आनन्दिता Sun, 05/18/2014 - 23:02
सातार्याचं आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय १९१३ ला स्थापन झालंय. हे भारतातलं पहिलं आयुर्वेदिक महाविद्यालय आहे. याचा विदा शोधायचा प्रयत्न करतेय. पण कुठे मिळाला नाही. ' पुढारी ' मधे त्यावर एक मोठं आर्टीकल आलं होतं दोन-तीन वर्षापुर्वी त्यात हा उल्लेख होता. सातार्याच्या नाकर्त्या नेतॄत्वामुळे हे कॉलेज आता अखेरच्या घटका मोजतंय. कॉलेज च्या इमारतीकडे पाहुन भुतबंगल्याची आठवण होते. होस्टेल ची अवस्था तर गचाळ शब्द कमी पडावा अशी आहे.

In reply to by आनन्दिता

बॅटमॅन Sun, 05/18/2014 - 23:12
धन्यवाद. अशा अजूनही काही गोष्टी असतील, पण त्यांचे कधी कुणी नावही ऐकलेले नसणे हे बाहेरच्यांचे अज्ञान सोडून तत्रस्थांच्या अनास्थेचाच परिणाम होय.

In reply to by बॅटमॅन

दुश्यन्त Mon, 05/19/2014 - 16:14
सहमत. सातार्यापेक्षा सांगली, कोल्हापूर, कराड झालच तर जवळचे फलटण, अकलूज पण बर्याचदा विकसित वाटतात.

In reply to by विजुभाऊ

गिरीजाकाका विकासाचा स्थानीक निसर्गाच्या प्रश्नाशी बादरायण संबन्ध जोडून नका.
विकास म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन मधील वाढ ... निसर्गातल्या रीसोर्सेस वर ओव्हर्लोडींग केल्या शिवाय अशी वाढ शक्यच नसते त्यामुळे हा बादरायण संबंध मुळीच नव्हे . ज्याला तुम्ही विकास म्हणता तो १६व्या शतकातील औद्योगिक क्रांती नंतर झालेला बदल आहे आणि त्यानंतर झालेला निसरगाचा र्‍हासही आपल्या पाहण्यात असेलच !!
पुणे बारामती स्टाईल विकास म्हणजे काय जो?
>>> पुण्याच्या आसपास उभे रहात असलेल्या काँक्रीटचा जंगलांकडे पहा मग लक्षात येईल की मला काय म्हणायचे आहे ते
स्थानीक लोकाना रोजगार उपलब्ध व्हायला नको का?
>>> नको . स्थानिक लोक अकार्यक्षम असतिल तर त्यांना रोजगार उत्पन्न व्हाय्ला नकोच्च. आणि जे कार्यक्षम असतील ते त्यांचा मार्ग शोधुन काढतील ( जसा की मी काढलाय :P)
सातार्‍यातील लोकाना किमान सोई असलेली स्मशानभूमी देखील न मिळणे / मुलाना खेळण्यासाठी एकही उत्तम ग्राउंड / अकादमी नसणे / चांगल्या वैद्यकीय सोयी नसणे याचा विकासाशी काहीच संबन्ध नाही असे का म्हणायचे आहे.
स्मशानभुमी हा चोरगेंनी केलेला राजकीय मुद्दा आहे . उत्तम शाहु स्टेडीयम हाही चोरगेंनीच केकेला राजकीय मुद्दा आहे . क्रांतीसिंंह नानापाटील रुग्णालया इतक्या सोयी अन्य कोणत्याही रुग्णालयात असल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही ९ अर्थात तुम्ही खाजगी रुग्णालयाशी तुलना करीत असाल तर ते अ‍ॅप्पल अ‍ॅन्ड ऑरेंजेस होईल )
सातार्‍यात असलेल्या शैक्षणीक सोयी या काही खाजगी संस्थानी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
>>> रयत शिक्षण संस्था खाजगी आहे काय ? आणि सातार्‍यात नवोदय आहे, सैनिक स्कुल आहे त्याबद्दल काय मत आहे ? शिवाय सगळ्याच गोष्ठी सरकारने पुरवाव्यात अशी का अपेक्षा ? समजा जरी पुरवल्यात तरी त्याचा किती जण लाभ घेतील ? सातार्‍यातील ३ सरकारी शाळांचे पत्ते सांगा पाहु ....
आपल्या अफाट तार्कीकाला लाख सलाम. धन्यवाद. बरे झाले तुम्हीच तुमच्या बुद्धीमत्तेचे प्रमाण दिलेत.
>>> व्यक्तीगत आरोप ! ज्याची त्याची स्वतंत्र मते असु शकतात आणि आपण आपल्यातील मतभिन्नतेचा आदर करायला शिकले पाहिजे ! . आपण ज्येष्ठ आहात , बहुत काय लिहिणे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

आनन्दिता Mon, 05/19/2014 - 07:04
>>> रयत शिक्षण संस्था खाजगी आहे काय ? आणि सातार्‍यात नवोदय आहे, सैनिक स्कुल आहे त्याबद्दल काय मत आहे ?
गिरिजाकाका, रयत शिक्षण संस्था सरकारी संस्था नक्कीच नाही. ती एक खासगीच संस्था आहे. रयत मधल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा कॉलेजं सरकार द्वारा ' अनुदानित' आहेत. सरकारी आणि अनुदानित संस्थांमधे बराच फरक असतो. याच रयत ची वोकेश्नल कॉलेजं म्हणजे " के. बी. पी. इंजिनिअरिंग कॉलेज " किंवा लॉ कॉलेज यासाठीची अ‍ॅड्मिशन्स खासगी कॉलेज म्हणुन होतात. सरकारी नाही कारण त्यांना सरकारचं अनुदान नाही, नवोदय विद्यालय सातार्यात आहे कारण सातारा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. आणि नवोदय विद्यालये भारतातल्या सर्व जिल्ह्यांमधे आहेत ( तामिळनाडू सोडुन ). किंबहुना तसा नियमच आहे. त्यामुळे त्यात स्पेशल असं काही नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रसाद१९७१ Mon, 05/19/2014 - 13:37
पुण्याच्या आसपास उभे रहात असलेल्या काँक्रीटचा जंगलांकडे पहा मग लक्षात येईल की मला काय म्हणायचे आहे ते >>>>>>> गिरिजा काकू - लोकांनी कायम झोपडीत च रहावे अशी तुमची अपेक्षा आहे काय? लोकसंख्या वाढते आहे, इमारती नाही बांधल्या तर लोकांनी रहायचे कुठे?

विजुभाऊ Sun, 05/18/2014 - 21:03
सातार्‍यात तसे बघायला गेले तर अनेक कोलेजेस उपलब्ध आहेत. मात्र मिरजसारखे गव्हर्न्मेंट मेडीकल कॉलेज उपलब्ध नाही. काही उपचार घ्यायचे झाले तर कराडच्या कृष्णा मेडीकल मधे जावे लागते. महाराष्ट्र स्कूटर्स सारखा कारखाना जोवर चालू होता तोवर स्थानीक छोट्या उद्योगाना फाउम्ड्री, मशिनिंगची कामे मिळायची. तो कारखाना गेली कित्येक वर्षे उत्पादन बंद अवस्थेत आहे. महाराष्ट्रा शासनाची थेट गुंतवणूक त्या उद्योगात आहे. तेथे इतर कोणतेही उत्पादन करणे सहज शक्य आहे. सातार्‍यात महाराष्ट्रात होणारी बहुतेक सर्व ( संत्री वगळता) पिके होतात. मात्र कृषी मालावर प्रक्रीया करणारा एकही मोठा उद्योग नाहिय्ये. सर्व सोयी उपलब्ध असूनही सातार्‍यातली एम आयडीसी कायम आजारी आहे. कारखाने बंद पडले आहेत. अर्थात हे सर्व त्या
मोठ्या पॉझीटीव्ह कामाचा
भाग असावा बहुतेक. सातार्‍यात काय आहे असे विचाराल तर पर्यतनासाठी अनेक स्थळे आहेत. उदा माहुली इथला कृष्णा कोयनेचा संगम. इथे अनेक सुंदर मंदीरे आहेत. पण ती अक्षरशः दुर्लक्षीत. काही मंदीरे तर कळसापर्यन्त अर्धवट वाळूत गाडली गेली आहेत. इथे तिथे साफसफाई करून एखादे अप्रमतीम ऐतीहासीक स्थळ उद्यान करणे शक्य आहे, पण इथे वाळू उपसा करून नदीचे डबके करून टाकले आहे. अर्थात हे सुद्धा कदाचित त्या "मोठ्या पॉझीटीव्ह " कामात अंतर्भूत असेल. करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पाटेश्वर सारख्या स्थळाचा विकास करणे शक्य आहे. सातार्‍यावर निसर्गाने भरभरून दिलेले आहे. कण्हेर धरणावर एखादे सुंदर बाग करणे शक्य आहे. पण असो........ मोठे पॉझीटीव्ह काम.

In reply to by विजुभाऊ

येस्स करेक्ट ... सातार्यात ज्या योगे बाहेरचे लोक येतील असे काहीच नको ... आम्ही आहे तसे आहे त्यात मस्त खुष आहोत ... ( खोटं नाही बोलत हो ... मागल्या वेळेस कासला फोटो काढायसाठी फी मागितली त्या भैयाच्या डोकयात दगड घालायची इच्छा झाली होती... हायला ह्या कासवर आम्ही खेळलो बागडलो लहानाचे मोठे झालो तिथे येवुन हिंदीत बोलुन आमच्याच कडुन फी वसुल करतो ... त्याच्यामायला #$%&*& ) तात्पर्य : असल्या लोकांना आणि असल्या विकासाला(?) सातरबाहेर ठेवणे हेच मोठ्ठे काम आहे

मृत्युन्जय Mon, 05/19/2014 - 11:11
रस्ते, पाणी आणि वीज या ३ बाबतीत सातार्‍यामध्ये काय विकास झाला हे कळाले तर उदयनराजेंनी काय केले हे कळेल. नाहितर लोक उगाचच उदयनराजेंच्या दारु पिउन बेफाम वर्तन करण्याबद्दल, त्यांच्या गुंडगिरीबद्दल आणि उर्मटपणाबद्द्ल, बेताल वर्तनाबद्दल अफवा पसरवत असतात. शिवाजी महाराजांच्या थोर घरण्यात जन्म घेउन कोणीही माणूस असली नीच कृत्ये करुच शकणार नाही. त्यांनी केलेली विकासकामे लोकांसमोर येउ द्यात म्हणजे लोकांची तोंडे आपोआप बंद पडतील. उदयनराजे इतक्या मताधिक्याने निवडुन येतात "ये लोगो का प्यार नही तो और क्या है?"

In reply to by मृत्युन्जय

टवाळ कार्टा Mon, 05/19/2014 - 12:55
सातार्यात लोडशेडींग आहे?? रस्त्यांवर खड्डे आहेत?? झोपडपट्ट्या आहेत?? सार्वजनिक शौचालये (स्वछ्छ) आहेत?? बेकायदेशीर बांधकामे आहेत??

In reply to by टवाळ कार्टा

मैत्र Mon, 05/19/2014 - 15:27
बाकी गोष्टींची माहीती सद्य सातारकर देतीलच पण सातार्‍यात रस्त्यांवर खड्डे नाहीत! -- कारण त्यासाठी रस्ते असावे लागतात. गेली किमान वीस वर्षे दर भेटीला सातार्‍यात "वरचा" रस्ता, राजवाडा रस्ता आणि पोवई नाका ते नगरपालिका इथे रस्ता शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. उदयनराजे हे शिवाजी महाराजांचे थेट वंशज म्हणून आदर आहेच आणि राहील. पण संसदीय लोकशाहीत लोकप्रतिनिधी म्हणून त्याव्यतिरिक्त काही जबाबदार्‍या असतात त्याबद्दल फारसं काही घडल्याचं ऐकलेलं नाही.

पिलीयन रायडर Mon, 05/19/2014 - 15:40
मला एकच प्रश्न विचारायचाय.. महाराज.. राजे एकच.. छत्रपती शिवाजी महाराज.. त्यांचा राज्याभिषेक झाला म्हणुन राजे नव्हेत.. ते खर्‍या अर्थानी राजे.. तर ह्या बाकीच्यांना कशामुळे "श्रीमंत..छत्रपती" अशा पदव्या द्यायच्या? हक्कच काय म्हणते मी हे लावण्याचा? केवळ वंशज म्हणुन? छत्रपती म्हणवुन घ्यायला कर्तुत्व काय ह्यांचे? उदय भोसले ह्या माणसा बद्दल चर्चा करा.. राजे बिजे कोणी नाही आता..

In reply to by पिलीयन रायडर

तर ह्या बाकीच्यांना कशामुळे "श्रीमंत..छत्रपती" अशा पदव्या द्यायच्या? हक्कच काय म्हणते मी हे लावण्याचा? केवळ वंशज म्हणुन? छत्रपती म्हणवुन घ्यायला कर्तुत्व काय ह्यांचे? उदय भोसले ह्या माणसा बद्दल चर्चा करा.. राजे बिजे कोणी नाही आता..
करेक्ट पिरा ! तुमच्या मताला कोण अनुमोदन देतय ते पहा ... हा व्हिडीयो ( २ मिनिट १५ सेकंद ला पहा ) https://www.youtube.com/watch?v=Gz28tde5FNo

<<< हा मिपाचा विजय >>>

प्यारे१ ·

चौकटराजा Fri, 05/16/2014 - 17:40
शाकाहारी (जातीयवादी) व मांसाहारी (शेकूलर ) यांच्या समाधानासाठी रोज नवे काय हा प्रशन गणपा सोडवू शकतील काय ? शिवाय पाककृती फसाव्या म्हणून गणपाविरोधकानी केलेले "षडयंत्र" याची ही त्याना काळजी घ्यावी लागेल. एफ डी आय म्हणजे फूड ड्युर्याबिलीटी इन्डेक्स वर त्याना सर्वाना बरोबर घेउन जाण्याचे खादकरण करावे लागेल ते वेगळेच. गणपा भाई त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा !

In reply to by बॅटमॅन

@शिवाय काश्मिरी पुलावाचे पेटंट कुणाकडे?हा प्रश्नही सोडवून घ्यावा.>>> +++१११ तिरंगी भाताच्या रेशिपीकडे जास्त लक्ष द्यावे! http://www.sherv.net/cm/emoticons/cook/cooking-dinner.gif त्याचबरोबर,विरोधी नॉन्व्हेज्यांसाठी पेटती भट्टी http://www.sherv.net/cm/emoticons/cook/steak-on-the-grill-smiley-emoticon.gif तयार ठेवावी! अंतर्गत फाटा-फुट करणार्‍या अंड्यां"ची वेळीच खांडोळीhttp://www.sherv.net/cm/emoticons/horror/egg-slicer-smiley-emoticon.gifउडवावी तसेच..नाराजांना नीट-सुपा'तhttp://www.sherv.net/cm/emoticons/cook/cooking.gif-घ्यावे! =)) एव्हढे केल्यानंतर खात्री बाळगावी-विजयhttp://www.sherv.net/cm/emoticons/cook/serving-food.gifआप'लाच होइल! =))

तरी निवडणुकीच्या काळात झालेल्या वादविवादांना, गोंधळांना, गदारोळाला, चिखलफेकीला मागं सारुन सगळ्या मिसळपावनं एकमुखानं गणपा शेफला सहकार्य करुन मिपा धर्म वाढवावा. नायहो ! असे (चक्क "शेफ" बद्दलच्या धाग्यात) आवाहन करून ग्रेट (अ)विचारवंताच्या पोटावर पाय देउ नका हो ! =))

चौकटराजा Fri, 05/16/2014 - 17:40
शाकाहारी (जातीयवादी) व मांसाहारी (शेकूलर ) यांच्या समाधानासाठी रोज नवे काय हा प्रशन गणपा सोडवू शकतील काय ? शिवाय पाककृती फसाव्या म्हणून गणपाविरोधकानी केलेले "षडयंत्र" याची ही त्याना काळजी घ्यावी लागेल. एफ डी आय म्हणजे फूड ड्युर्याबिलीटी इन्डेक्स वर त्याना सर्वाना बरोबर घेउन जाण्याचे खादकरण करावे लागेल ते वेगळेच. गणपा भाई त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा !

In reply to by बॅटमॅन

@शिवाय काश्मिरी पुलावाचे पेटंट कुणाकडे?हा प्रश्नही सोडवून घ्यावा.>>> +++१११ तिरंगी भाताच्या रेशिपीकडे जास्त लक्ष द्यावे! http://www.sherv.net/cm/emoticons/cook/cooking-dinner.gif त्याचबरोबर,विरोधी नॉन्व्हेज्यांसाठी पेटती भट्टी http://www.sherv.net/cm/emoticons/cook/steak-on-the-grill-smiley-emoticon.gif तयार ठेवावी! अंतर्गत फाटा-फुट करणार्‍या अंड्यां"ची वेळीच खांडोळीhttp://www.sherv.net/cm/emoticons/horror/egg-slicer-smiley-emoticon.gifउडवावी तसेच..नाराजांना नीट-सुपा'तhttp://www.sherv.net/cm/emoticons/cook/cooking.gif-घ्यावे! =)) एव्हढे केल्यानंतर खात्री बाळगावी-विजयhttp://www.sherv.net/cm/emoticons/cook/serving-food.gifआप'लाच होइल! =))

तरी निवडणुकीच्या काळात झालेल्या वादविवादांना, गोंधळांना, गदारोळाला, चिखलफेकीला मागं सारुन सगळ्या मिसळपावनं एकमुखानं गणपा शेफला सहकार्य करुन मिपा धर्म वाढवावा. नायहो ! असे (चक्क "शेफ" बद्दलच्या धाग्यात) आवाहन करून ग्रेट (अ)विचारवंताच्या पोटावर पाय देउ नका हो ! =))
लेखनप्रकार
आम्ही काही काळापूर्वी http://misalpav.com/node/27418 ह्या काकू द्वारे गणपा खरंच मिपाशेफ बनतील का असा एक सर्व्हे घेतला होता. तेव्हा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात 'गणपा' चा प्रचार काही जणांनी केला. त्यांच्या विरुद्ध देखील काही लोक बोलले. आज ह्या ठिकाणी निकालाच्या प्रसंगी गणपा जिंकून आलेला आहे. सगळ्या मिपाकरांनी गणपा लहरी आहे- आपलं- गणपा लहर आहे हे मान्य केलं आहे. तरी देखील गणपा जिंकला म्हणजे सगळं साध्य झालं असं होत नाही. त्याला बर्‍याच पा कृ शिकायच्या आहेत, बनवून दाखवायच्या आहेत, सुगरणींच्या सल्ल्यांमधून नेमकेपणा आणायचा आहे.

अभिनंदन!

राही ·

आनन्दिता Fri, 05/16/2014 - 10:39
मनापासुन भारी वाटतंय.. जनतेला मुर्ख समजणार्या सरकारला जनता जागेवर आणेल हे माहीत होत, पण अगदी तोंडावर आपटेल याची कल्पना नव्हती. मोदीं ची लाट नाही तर सुनामी होती... मोदींना त्यांच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा! जनतेच्या अपेक्षा पुर्ण होवोत ही प्रार्थना.. रात्रीचा १ वाजलाय अन इथे टाईम स्क्वेअर ला जल्लोषाचं वातावरण आहे. *yahoo*

In reply to by आनन्दिता

अगदी अगदी. आज सकाळी उठल्यापासून लक्ष फक्त निकालाकडेच होतं. आता आज सगळी भारतीय मित्र मंडळी मिळून पार्टी करणार. *clapping*

श्रीरंग_जोशी Fri, 05/16/2014 - 10:42
नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. भाजप व सहकारी पक्षांचे अभिनंदन. नव्या सरकारला शुभेच्छा!!

In reply to by श्रीरंग_जोशी

आजानुकर्ण Fri, 05/16/2014 - 11:48
नमोजींचे हार्दिक अभिनंदन. भारतीय जनता प्रगल्भ आहे. त्यांच्या विकासाच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजपा सरकारला शुभेच्छा.

नेत्रेश Fri, 05/16/2014 - 10:44
हल्ली लोकसत्तातले कुमार केतकरांचे संपासकीय लेख खुप मीस होतात. त्यांचा आजचा व उद्याचा अग्रलेख वाचायला मजा आली असती

In reply to by ऋषिकेश

नेत्रेश Sat, 05/17/2014 - 06:43
आजचा दिव्य मराठीतला अग्रलेख खुपच संतुलीत आहे. टीपिक केतकरी ट्च हरवला आहे. थोडी निराशाच झाली.

In reply to by नेत्रेश

विकास Sat, 05/17/2014 - 08:32
तिथल्या संपादक महाशयांचा आयडी हॅक झाला आहे का? जातीय आणि धार्मिकतेत अडकलेल्या समाजाला विकास, सुप्रशासन या मुद्द्यावर आवाहन करून निवडणूक जिंकणे, ही या देशात अशक्यप्राय मानली गेलेली गोष्ट नरेंद्र मोदी यांनी शक्य करून दाखविली आहे. अग्रलेखात हे वाक्य वाचले आणि भाजपाला स्वबळावर सत्ता काबीज करता येईल ह्या गेल्या २४ तासातील बातमीने पण धक्का बसला नाही इतका धक्का बसला. *yes3*

ऋषिकेश Fri, 05/16/2014 - 10:47
शांततमय पद्धतीने सत्ताबदलाबद्दल सगळ्या नागरीकांचे अभिनंदन भाजपा, एन्डीएच्या मतदारांचे व विजयी उमेदवारांचे विशेष अभिनंदन!

मदनबाण Fri, 05/16/2014 - 10:57
मला दोन व्यक्तिं बद्धल आता विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. १) राहुल गांधी :- सध्या ही व्यक्ती कुठे आहे आणि कॉग्रेसच्या कामगिरी बद्धल त्यांचे मत. २) केजरीवाल :- नविन नौट़कीचा अंक कुठला सुरु करणार ? शिवाय त्यांच्या पक्षाची भूमिका सुद्धा. जाता जाता :- अमेठीच्या निकालीची काय स्थिती /अंदाज आहेत ?

In reply to by मदनबाण

आत्मशून्य Fri, 05/16/2014 - 11:09
बाकी आशा आहे यापुढे देशात विकास व जागतिक सामर्थ्याच राजकारण सुरु होइल.

In reply to by आत्मशून्य

नाही. आप त्या लायकीचा आहे असे वाटत नाही. मेधा पाटकर पडल्या त्याबद्दल आनंद वाटला. दमानिया, इल्मी पडल्या नाही तर चांगल्या आप्टल्या त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. याबद्दल आनंद झाला. विकास आणि सामर्थ्याचे राजकारण सुरु व्हावे याच्याशी मात्र सहमत.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आत्मशून्य Fri, 05/16/2014 - 23:08
मानगुटीवर बसतात अगदी. बाकी लोकांनी विज बिले न्हवती भरली सांगण्यावरुन. सत्ता आल्यावर विजबीलमाफी वगैरे सगळे ठीक आहे हो, पण राजीनामा दिला, सत्ता सोडली आणी विज बिले न भरलेल्यांची अवस्था आता घर का ना घाट का करुन टाकली. १४ पैकी १३ मुद्दे तर जनलोकपाल संबंधी न्हवते ? मग किमान ते सर्व मार्गी लावुन लोकांची/सपोर्टर्सची कुचंबणा होणार नाही अशी वेळ पाहुन जनलोकपालच्या मुद्यावर राजीनामा देता आला असता जनतेचा दुवा मिळाला असता, आता लोकांच्या मनात विश्वासघाताची भावना निर्माण केलीत, आणे विचारवंताना निवडणुकीत उतरवे.. न्हवे कुजवले. जनतेछा बळी देउन आंदोलन यशस्वी होउ शकते सत्तापद न्हवे. बसा आता बोंबलत. दिल्लीत कोणीच निवडुन आले नाही. समाधान इतकेच आहे जे चार निवडुन आले ते भाजपचा जोर असलेल्या परिसरातुन निवडुन आलेत. रुपेरी किनार ती हीच. असो ३० वर्षापुर्वी भाजपचे फक्त २ सिटा आल्या होत्या आपच्या ४ ही काही वाइअट सुरुवात नाही. विरोधी पक्ष आपच हवा हे व्यक्तीगत मत आहे.

In reply to by आत्मशून्य

मानगुटीवर बसायचा प्रेत्न करतात पण मूळातच हेतू स्वच्छ नसल्याने मार खातात. दमानिया बाई कुठे गायब आहेत आता. मोठ्या संतपदी विराजमान होउ पाहत होत्या. गडकरींनी कोर्टात ललकारल्यावर कुठे गायबल्या? म्हणजे अभ्यासू वृत्तीचा पूर्ण अभाव आणि नुसताच थयथयाट हा लायकिचा क्रायटेरीया म्हणायचा का? बाकी आपचे आंदोलन म्हणजे रामदेवबाबाचा मुद्दा हायजॅक करण्यासाठीच होते असे नेहेमी वाटते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आत्मशून्य गुरुवार, 05/22/2014 - 00:41
स्वच्छ हेतूनेच बसतात पण त्यांचाअभ्यास कमी पडतोय म्हणुन केविलवाणे भासवले जातात. कणा हिन् विरोधक ही देशाला लागलेली किड आहे.

In reply to by मदनबाण

मदनबाण Wed, 05/21/2014 - 19:22
केजरीवाल :- नविन नौट़कीचा अंक कुठला सुरु करणार ? शिवाय त्यांच्या पक्षाची भूमिका सुद्धा. केजुच्या नौटंकीचा नवा अंक सुरु झाला आहे बरं का मंडळी ! ;) अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात रवानगी म्हंटल यांच्या नौटंकीचा नविन अंक अजुन सुरु कसा झाला नाही ? पण... नक्की काय झाले ? नितीन गडकरी यांच्यावर कोणतेही पुरावे नसताना भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना कोर्टानं माफी मागण्यास सांगितलं... परंतु, अरविंद केजरीवाल आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले आणि त्यांनी माफी मागण्यास स्पष्टपणे नकार दिला. सोबतच कोर्टानं अरविंद केजरीवाल यांना जामीनासाठी 10,000 रुपयांचा बॉन्ड भरण्यास सांगितलं... पण, केजरीवाल यांनी जामीन भरण्यासही नकार दिला. संदर्भ :- गडकरी अवमान प्रकरणी केजरीवाल दोन दिवस तुरुंगात अजुन एक प्रकरण कळाले, अर्थात ते केजरीवाल यांच्या बद्धल नसुन, सोनिया गांधी यांच्या बद्धल आहे. काय आहे हे प्रकरण ? तर या घोटाळ्याचे नाव आहे :- National Herald Scam आता तुम्हा सर्वांची बघण्याची आणि श्रवण भक्तीची सोय करतो :- श्रवण भक्तीची सोय इथे :- Congress’s role in National Herald scam जाता जाता :- केजुच्या नौटंकीचा अंक तर सुरु झाला आहे, आता... तेल तापते तशा जिलब्या पाडतो असे ब्रिद वाक्य मिरवणारे जिलबीवाले बाबा यांच्या नव्या ताज्या घाण्याची वाट पाहुया ! ;)

In reply to by मदनबाण

भृशुंडी गुरुवार, 05/22/2014 - 03:53
सुब्रमण्यम स्वामीदेखील बरेचदा ताळतंत्र सोडून आरोपांचा धुरळा उडवण्यात माहिर आहेत. त्यांच्या टोकाच्या मतांंमुळे आणि आरोपांमुळे "लांडगा आला रे आला" पातळीवरच त्यांची मतं विचारात घ्यावी लागतात.

In reply to by मदनबाण

मदनबाण Fri, 06/27/2014 - 07:05
National Herald Scam वरती ज्या घोटाळ्याचा उल्लेख केला होता, त्यावर काल दिल्लीच्या न्यायालयाने सोनिया गांधी,राहुल गांधी आणि ४ जणांना समन्स पाठवले आहे. संदर्भ :-Court summons Sonia, Rahul for alleged fraud मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- मेघा रे मेघा रे... :- प्यासा सावन

खटपट्या Fri, 05/16/2014 - 11:05
आत्तापर्यंत फक्त बीजेपी = २६८ जे काही जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलेय त्यासाठी २७२ फक्त बीजेपी ला मिळायला पाहिजेत. या बहुमताच्या जोरावर बीजेपीने एवढा विकास करून दाखवला पाहिजे कि पुढील १० ते १५ वर्षे दुसरा पर्याय लोकांसमोर नसेल. नाहीतर आप वाले आहेतच बोंबाबोंब करायला. राहुल गांधी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेत. या नाराजीचा बीजेपी ने जर उपयोग करून नाही घेतला तर त्यांच्यासारखे करंटे तेच असतील. बीजेपी मधील दिग्गजांना खुश ठेवून मोदिजी मुख्य खाती आपल्याकडे ठेवावी लागतील. मोदींची खरी परीक्षा बीजेपी मधील अंतर्गत राजकारणाला तोंड देण्यामध्ये असेल.

राजेश घासकडवी Fri, 05/16/2014 - 11:18
मोदींचे, भाजपचे आणि एनडीएचे अभिनंदन. भारताचा विकास घडवून आणण्याचं आश्वासन पुरं करण्याची शक्ती मिळो आणि अनुकूल परिस्थितीही मिळो अशी मनोमन सदीच्छा. ऋषिकेशने म्हटल्याप्रमाणे शांततमय पद्धतीने सत्ताबदलाबद्दल सगळ्या नागरिकांचे अभिनंदन. भारतीय लोकशाही कुचकामी आहे वगैरे म्हटलं जातं, पण वेळोवेळी जनता आपला कौल देऊन सरकार बदलते आणि ही प्रक्रिया बऱ्यापैकी शांततेने आणि पद्धतशीरपणे पार पडते. जवळपास दोन तृतियांश मतदारांनी यावेळी मतदान केलं. ही राजकीय जागृती अशीच राहो.

In reply to by ओंकार सुतार

उद्धवा मोदीमय तुझे सरकार असे नवीन राजकीय गाणे झाले आहे. भाजपच्या मित्रपक्षाला अकालीदलाला पर्याय म्हणून आप पक्ष पुढे आला त्यामानाने शिवसेनच्या पुढे राज ,राणे , भुजबळ असे दिग्गज होते. पण शांत ,संयमी नेत्तृत्व , उत्कृष्ट व्यवस्थापन ह्यामुळे शिवसेनेची समाजाच्या सर्व थरात एक वेगळी व सकारात्मक व समंजस प्रतिमा उद्धव ह्यांनी निर्माण केली. पूर्वीची शिवेसेना राडेबाज आणि त्याच मार्गावर जाणार्या राज ची मनसे ह्यांना मर्यादित यश होते. भावनात्मक , आक्रमक भाषणाने पूर्वी शिवसेनेने व आज मनसेने गर्दी जमवली मात्र आजच्या उद्धवप्रणीत शिवसनेने भाजपसह इतर पक्षांची मोट बांधून संघटीत विजय मिळवला आहे. महाराष्टार्त भाजपच्या खालोखाल जागा मिळवणारा शिवसेनेने आमच्याशी युती करण्यास खरा फायदा आहे हे नमोंना दाखवून दिले. पुढील विधानसभेत नमो ह्यांना उद्धव शी मसलत करणे अनिवार्य आहे. शिवसेनेला मात्तबर केंद्रीय मंत्रिपद मिळेल असा माझा होरा आहे, कारण गुणवत्ता प्रमाण मानणारे नमो ह्यांच्याकडे उद्धव गुणी खासदारांचे नाव पुढे करेल ह्यात शंका नाही. तळटीप संघाचे बाळकडू घरातून मिळाल्याने भाजपचा कट्टर समर्थक असलेला मी शिवसेनेचा चाहता नव्हतो. किंबहुना रथयात्रा , बाबरी मशीद ह्या राजकारणामुळे राजकारणातून मन उडाले होते. नमो ह्यांचे विकास व सुराज्य ह्या संकल्पनेने भाजपशी परत नाळ जोडल्या गेली. उद्धव ह्यांच्या हातात शिवसेना आल्यावर तो पक्ष खर्या अर्थाने गुद्याने नाहीतर मुद्द्यांवर निवडणुका लढवणार पक्ष झाला व माझे त्या पक्षाविषयी अंकुल मत झाले. उद्धव ज्यांची शेतीतील काही काळात नाही असे म्हणून खिल्ली उडवणारे आज त्याला ग्रामीण भागात प्रस्थापितांच्या बालेकिल्ल्यात असे यश मिळवून स्वताला सिद्ध केले आहे. राणे आता कोकणातील त्यांचे सर्व उपक्रम बंद करणार आहेत असे विधान केले आहे. ह्या बद्दल कोकण वासियांनी त्यांचे आभार मानले पाहिजे. मूळ मुद्दा असा आहे की अणु उर्जेवर मोदी ह्यांची काय भूमिका असेल व आता दाभोळ अरबी समुद्रात बुडणार का

In reply to by निनाद मुक्काम …

यशोधरा Sat, 05/17/2014 - 06:26
राणे आता कोकणातील त्यांचे सर्व उपक्रम बंद करणार आहेत असे विधान केले आहे. ह्या बद्दल कोकण वासियांनी त्यांचे आभार मानले पाहिजे.
कोकण प्रांताचे ग्रहण सुटले म्हणायला हरकत नाही.

In reply to by निनाद मुक्काम …

वॉल्टर व्हाईट Sat, 05/17/2014 - 09:48
बरोबर आहे निनाद तुमचे, तुमच्यासारखे अनेक मोदींच्या पॉझिटिव ट्च मुळे पुन्हा जोडले जात आहेत. तसेच मोदींना काळाची पावले ओळखता येतात असे जाणवते, उदा. इंटरनेट आणि सोशल मिडीयावर वावर आणि त्याचा संतुलित वापर.

In reply to by वॉल्टर व्हाईट

टेक्नोसेवी तरुणाई पुढे देवालये नाही तर शौचालये हवी म्हणणारे गुजरात मधील बेकायदेशीर मंदिरे तोडतांना विहिपी चा रोष ओढवून घेणारे ह्या निवडणुकीत संघ वगळता बजरंग दल व इतर हिंदू संघटना व त्यांच्या नेत्यांना लांब ठेवणारे व विकासाची व सुराज्याची भाषा करणारे मोदी ह्यांना हे यश अपेक्षित होते. सोशल नेटवर्क वर मोदींना पंतप्रधान मानणारे मोदी भक्त असे म्हणून आम्हाला हिणवणाऱ्या लोकांचे चेहरे त्यांनी सेल्फी काढून येथे टाकावे . घाबरू नये आम्ही तुम्हाला हसणार नाही सबको साथ लेके चलना हे भाई

In reply to by निनाद मुक्काम …

संपत Sun, 05/18/2014 - 00:23
दाभोळ अरबी समुद्रात बुडणार का
तुम्हाला जैतापूर म्हणायचे आहे का? कारण 'अर्थ'पूर्ण चर्चेनंतर दाभोळ एनर्जीला जीवदान मिळाले होते. जैतापूर बाबतीत देखील तसेच होईल.

In reply to by संपत

सुधारणे बद्दल धन्यवाद हो जैतपूर उद्द्ध्व ला विधानसभेत राण्यांना हरवायचे आहे. त्यामुळे ह्या प्रकल्पाला विरोध हा असणारच मोदी ह्यांना अणूउर्जेला विरोध ऐकिवात नाही आणि अपारंपरिक उर्जा ही भारतातील प्रचंड उर्जेची गरज पुरी करू शकत नाही तेव्हा सध्यातरी अणू उर्जेला पर्याय नाही काय होते ते पाहणे मनोरंजंक आहे महाराष्टार्त सौर उर्जेचे जाळे पसरणार जर्मन कंपन्यांना बाजारपेठ मिळणार तर महाराष्ट्राला प्रदूषणमुक्त उर्जा अच्छे दिन ....

In reply to by निनाद मुक्काम …

सहमत आहे. मोदींनी प्रगतीच्या आड येणारे पर्यावरण कायदे रद्द करावेत. आतल्या गोटातल्या माहीतीनुसार पुणे कोल्हापूर महामार्ग चौपदरीकरणाचे काम या पर्यावरण वाल्यांनी अडवले आहे. (टोल मात्र वसूल होतो हा भाग वेगळा) पुण्यातला नदीपात्रातला रस्ता तब्बल १० वर्षे या फालतू पर्यावरणवाद्यांनीच रोखून धरला होता. इतका लांब वळसा पडायचा सायकलवरून जाताना. असो. जैतापूर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा.

In reply to by निनाद मुक्काम …

दुश्यन्त Sun, 05/18/2014 - 19:14
बर्याच अंशी सहमत.आत्ताच्या निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा भाजप बरोबर सेनेला झाला हे खरेच आहे मात्र उद्धवच्या काळात सेना ग्रामीण भागात बर्यापैकी विस्तारली. याचे एक उदाहरण म्हणजे मागच्या २००९च्या लोकसभेत सेनेची मुंबईमध्ये पूर्ण धूळधाण उडाली होती, ठाणे-कोकण मध्ये पण मर्यादित यश होते मात्र उर्वरित महाराष्ट्रात ९ जागा आल्या होत्या (एकूण ११ पैकी ९ मुंबई-ठाणे-कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्रात). माझ्या मते असे यश बाळासाहेब भरात असताना पण मिळाले नसावे. सेना- भाजप युती बरोबर आर पी आय, स्वाभिमानी संघटना, रासप यांची मोट उद्धव ठाकरे आणि मुंडेंच्या पुढाकारानेच बांधली गेली आहे. उद्धव यांनी संयमी नेतृत्व सेनेला पुढे नेत आहे हे उशिरा का होईना लोकांना पण समजू लागले आहे.

In reply to by दुश्यन्त

ह्या ९ पैकी काही जागा राष्ट्रवादीच्या बालेकील्यातील होत्या. जेव्हा मोदी लाट नव्हती तेव्हा एकहाती उद्धव ने हा पराक्रम गाजवला. बाळासाहेब ,महाजन , मुंडे व हिंदुत्वाची हवा असतांना व कोन्ग्ग्रेज व राष्टवादी वेगेळे लढले तेव्हा सुद्धा असे आक्रित घडले नव्हते. मी अचानक उद्धव ह्यांचा खांदा समर्थक वैगरे झालो नाही , पण शेट्टी ,आठवले व मुंडे व गडकरी ह्यांना राज पेक्ष्या उद्धव आश्वासक वाटतो. हे पाहून बंदे मे दम हे असे मला वाटते.

In reply to by निनाद मुक्काम …

चौकटराजा Tue, 05/20/2014 - 18:14
राज पेक्ष्या उद्धव आश्वासक वाटतो. राज ठाकरे यानी सेनेपासून फारकत घेणे व पवारानी कॉग्रेस पासून फारकत घेणे यात साम्य आहे. त्यांच्या दोघांच्याही अंदाजाने आणकी वीसेक वर्षे राजकारण हे एका पक्षाचे न रहाणारे असणार. अशा स्थितीत लहान पक्षाचा प्रमुख असणे मध्यम पक्षाच्या महत्वाच्या नेता असण्यापेक्षा मह्त्वाचे ठरते. मंत्रीपदावर कब्जा मिळविता येतो.

सर्व भारतिय मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन ! ही निवडणूक म्हणजे भारतिय लोकशाहीचा विजय आहे !! भारताला एक सुजाण, पुरोगामी आणि विकसनशील सुशासन मिळून देशाचा खराखुरा विकास व्हावा हीच सदिच्छा !!! आज प्रत्येक भारतियाची मान अभिमानाने ताठ व्हायला हवी... मग त्याने / तिने मत दिलेला उमेदवार / पक्ष विजयी झालेला असो अथवा नसो.

पैसा Fri, 05/16/2014 - 11:53
सर्वांचेच अभिनंदन! लोकांनी त्यांचा राग न बोलता मतपेटीतून दाखवला. आणि काँग्रेस हा दबलेला राग जाणून घेऊ शकली नाही. आपल्या एकेक मताने काय होऊ शकते हे भारतीय मतदारांनी दाखवले आहे. यासाठी आनंद!

विजयी उमेद्वारांचे,मोदींचे अभिनंदन. १९७७ सारखेच होते आहे असे दिसतय. त्यावेळी जयप्रकाश नारायण व ईतर होते. ह्यावेळी मोदी. पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

चौकटराजा Fri, 05/16/2014 - 17:30
मोरारजींचा अवसानघात करणारे मधु लिमये यांच्या सारखे समाजवादी त्यावेळी होते म्हणून जनसंघीयाना पाण्यात पहाण्याचा प्रयोग त्या वेळी झाला. गेली पाच वर्षे राष्ट्रवादी व कॉंग्रेस हाच एकमेकाना पाण्यात पहाण्याचा प्रयोग करीत सत्ता खात होते. त्यावेळच्या जनता पक्षाला व आघाडीला मतदारानी धडा शिकवलाय. की सत्तेचा आयडियॉलॉजीचा माज करू नका. ३७० , राम बाजूला ठेवल्यावर काय घडू शकते हे दिसले आहे.आता काही काळ सुषमा स्वरात एल के काहीशी बोंब करतील पण त्याना गप्प केले जाईल. समाजवाद्यांइतके ते घातकी ( वैचारिक ) नसावेत.

तुमचा अभिषेक Fri, 05/16/2014 - 13:32
सर्व भारतीयांचे अभिनंदन ! काँग्रेस हा पक्ष यातून संपून न जाता पुन्हा नव्या दमाने नव्या चेहर्‍याने उभा राहील अशी अपेक्षा, लोकशाहीत विरोधी पक्षाचा अंकुशही तितकाच गरजेचा.

विकास Fri, 05/16/2014 - 17:04
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. मोदींनी "हा भारताचा विजय आहे" असे म्हणून आणि नेहमीप्रमाणे सर्वप्रथम आईचा आशिर्वाद घेऊन पाय जमिनीवर असल्याचे दाखवून दिले आहे. त्यात कृतज्ञता आणि कृतर्थता दिसते... असेच आता या सत्ताधारी आघाडीचे पाय जमिनीवर राहोत आणि भारताला मोठे करण्यासाठी भारतीयांना संधी प्राप्त होतील असे कार्य घडोत ही शुभेच्छा! राजीव गांधींना याहून मोठा विजय मिळाला होता पण ती सहानभुतीची लाट होती. नाहीतर आठवते त्याप्रमाणे जर इंदीराजी हयात असत्या तरी कदाचीत त्या जिंकल्या असत्या पण इतक्या मताधिक्याने नाही. त्यामुळे हा विजय पोलरायझेशनचा विजय आहे असे वाटत नाही. तर खर्‍या अर्थाने त्रासलेल्या आणि केवळ सामान्य इतकीच ओळख असलेल्या बिनचेहर्‍याच्या जनतेने दिलेला एक आशावादी कौल आहे. मनःपूर्वक शुभेच्छा!

In reply to by विकास

२००९ साली सुद्धा जनता ह्या सरकारला विटली होती पण त्यांच्यापुढे समर्थ पर्याय नव्हता, रथ यात्रा करणारे , तडफेने भाषण करणारे प्रत्यक्षात कृतीशून्य महाजन , वाजपेयी ,अडवाणी ह्यांचा पर्याय जनतेला मान्य नव्हता कारण शायनिंग इंडिया म्हणून काही होत नाही त्यासाठी तुमचा मतदारसंघ , तुमचे राज्य शायनिंग असले पाहिजे. मोदी ह्यांचे गुजरात मॉडेल उत्तर प्रदेशाला हवेसे वाटले .ह्यात जनतेचा व्यवहारी दृष्टीकोन आहे , त्यांना भावनिक रीत्या च्यु बनवायचा हेतू नव्हता. मोदी हा तत्कालीन सरकार विरुद्ध समर्थ पर्याय होता मात्र बंगाल व तामिळनाडू मध्ये मोदी लाट चालली नाही कारण तेथे दोघी मा, अम्मा खमक्या होत्या. अकाली दलावर नाराज जनतेने आपला मत देणे अनपेक्षित होते ह्याच पार्श्वभूमीवर आप , राज ला पुरून उरणारा उद्धवचे कर्तुत्व मोठे वाटते.

In reply to by निनाद मुक्काम …

दुश्यन्त Sun, 05/18/2014 - 19:22
एक दुरुस्ती २००९ ला महाजन हयात नव्हते तर वाजपेयी आत्तासारखेच थकलेले होते त्यामुळे वाजपेयी प्रचारपासून दूर होते. आडवाणी तसेच जेटली, स्वराज वगैरे लोक तेव्हा भाजपची आघाडी सांभाळत होते.

बॅटमॅन Fri, 05/16/2014 - 17:15
हबिणंदण!!! मात्र लै मोठ्या जबाबदार्‍या आहेत मोदीवर. कसा पार पाडतो ते पाहणे महत्त्वाचे आहे. मोदी व समस्त सर्कारमधील घटकांना पुनरेकवार शुभेच्छा!! बाकी या निवडणुकीनंतर प्रचाराची तंत्रे आमूलाग्र बदलून जातील असे वाटते.

राही Fri, 05/16/2014 - 17:56
आजची सकाळ खरोखरीच ऐतिहासिक आणि क्रांतिकारी होती. टीवीच्या पडद्यावर नाट्य उलगडत होते आणि ह्यूस्टन, न्यू जर्सी, पीट्स्बर्ग, लंडन्, सिडनी इथल्या निरोपांच्या देवाणघेवाणींनी कंप्यूटरचा पडदा भरून गेला होता. काळवेळ जणू थांबला होता. असा ऐतिहासिक क्षण या पूर्वीही एकदा अनुभवायला मिळाला होता. १९७७ साली. लहान वयामुळे त्या क्षणाचे ऐतिहासिक मूल्य तितके लक्षात आले नव्हते. पण मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी वातावरणातला जोश, उत्सुकता, थरार बघितला होता. शनिवारवाड्यावर, गायकवाड्यासमोर, सकाळ कचेरीसमोर जमलेला बेभान जमाव, निवडणूकपूर्व प्रचाराच्या मुंबईच्या लहान-लहान गल्ल्यातही रंगलेल्या सभा, सारे आठवतेय. पु.ल देशपांड्याची सभाही आठवतेय आणि त्याला मिळालेला तुडुंब प्रतिसादही. शब्द लक्षात नाहीत पण लोकांचा उत्साह आठवतोय. पण काही दिवसांतच हे सोनेरी स्वप्न भंगून गेले आणि लोकांचा पराकोटीचा हिरमोड झाला. आता तसे न होवो. ज्या बदलासाठी हा शांततामय कौल दिला गेला आहे, तो वास्तवात येवो. लोकाभिमुख सरकार आणि सुप्रशासन भारतात अवतरो. नागरी शिस्त आणि सार्वजनिक चारित्र्य भारतीयांमध्ये बाणो. एव्हढे तरी होवो. आमेन.

In reply to by राही

विकास Fri, 05/16/2014 - 19:55
वास्तवीक माझ्या मध्यरात्रीच एनडीटिव्हीवर प्रणव रॉय यांनी खात्रीने एनडीएला बहुमत मिळेल हे सांगितले. तरी झोपायला जावतच नव्हते. तसाच ३ पर्यंत बसलो आणि ऐतिहासीक क्षण अनुभवला. १९७७ ची मला देखील आठवण झाली. मृणाल गोरे, दुर्गा भागवत, सुब्रम्हण्यम स्वामी, जॉर्ज फर्नांडीस, आदींची भाषणे ऐकल्याचे आठवते. अर्थात मी तेंव्हा फारच लहान होतो. मृणाल गोरेंच्या भाषणाला आईने नेल्याचे आठवते! नंतर निवडणूक निकालाची रात्र आली आणि रेडीओवर अचानक मध्यरात्रीच्या आसपास, "जाने कहां गये वो दीन..." गाणे लागले. आमचे शेजारी, "इंदीरा गांधी पडल्या" म्हणतच घरात आले. विश्वास बसला नव्हता. नंतर घरावरून रामभाऊ म्हाळगींची मिरवणूक जाताना पाहीली, त्यांनी काँग्रेसच्या पा.शि. देशमुखांना हरवले होते, "चंद्रभागेला आला लोंढा, पाणी आले ठाण्याला, इंदीरा म्हणते यशवंताला, पाशि माझा बुडाला" म्हणत जोरात मिरवणूक गेली... नंतर दुर्दैवाने म्हाळगी मला वाटते त्यांची टर्म संपायच्या आधीच कॅन्सरने गेले. दुसरीकडे "संजीव-राजीव वात्रट कार्टी निवडून आणा जनता पार्टी!" ला प्रचंड प्रतिसाद मिळून देखील जनतापार्टीने सत्ताधिशांपेक्षा विरोधीपक्षाचेच काम चालू ठेवले आणि अंतर्गत लाथाळ्यांमधे सोनेरी स्वप्न भंगून गेले. :( १९८४ साली कदाचीत परत विरोधकांना संधी असती पण सहानभूटीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. सारे देशमे एक भिकारी, अटलबिहारी अटलबिहारी असे ओरडत काँग्रेसचे पब्लीक फिरत होते. पण तरी देखील भाजप पक्ष म्हणून भंगला नाही. मतभेद नक्कीच झाले असतील, पण त्यातील प्रमुख नेत्यांनी कधी वेगळी चूल मांडली नाही. हे नक्कीच वैशिष्ठ्य वाटते. असो. असा निवडणूक निकालांचा अनुभव नंतर अमेरीकेत बुश विरुद्ध गोर च्या वेळेस रात्रभर जागून आणि नंतर सततच्या बातम्या ऐकून घेतला. ज्या दिवशी गोरने हार मान्य केली त्या दिवशीचे त्याचे भाषण ऐकताना सामान्यांना जाउंदेत काही प्रसिद्ध माध्यमातील प्रसिद्ध अँकरमन्सना देखील वाईट वाटल्याचे दिसत होते. ओबामाच्या पहील्या निवडणुकीच्या वेळेस इतिहास घडला. पण नंतर त्याचा आत्यंतिक द्वेष करून बदनामी करणारे विचारवंत आणि राजकारणी पाहीले (कदाचीत तेच मोदींच्या बाबतीत झाले). दुसर्‍या वेळेस त्याच्या विरोधात रॉमनी उभा होता. तेंव्हा असेच उत्कंठावर्धक होते. असो.

नरेंद्र मोदींचे हार्दिक अभिनंदन. आता इथुन पुढे १०-१५ वर्ष देशात भा.ज.पा. आणि मित्रपक्षांना पर्यायच उरला नाही पाहिजे. काँग्रेसच्या तोंडावर 'पंज्या'चा जोरदार फटका देऊन पराभव केल्याबद्दल समस्त मतदार बंधुं-भगिनींचे आभार. आता गेल्या १० वर्षात यु.पी.ए. १-२ नी केलेले झोल बाहेर काढुन जावै बापु, बिटियारानी, मम्मा, पप्पु, सगळे "माजुर्डेवादी" ई.ई. ना कृष्णजन्मस्थान यात्रा घडवावी हीचं ईच्छा. मनमोहनसिंग यांनी कृपया राजकारणातील घाणीतुन बाजुला व्हावे आणि सन्मानाने जगावे हीचं ईच्छा!!

मदनबाण Fri, 05/16/2014 - 22:40
एक मुद्दा राहिलाच की... माझ्या आनंदाचे अजुन एक कारण म्हणजे...अमेरिकेची होणारी गंमत ! मोदींना व्हीसा नाकारणारा माजुरडा देश ! आता काय करतील ?

हुप्प्या Sat, 05/17/2014 - 06:17
खरोखरच चमत्कार म्हटला पाहिजे. एक सामान्य घरातील गुजराथी मुलगा जो लहानपणी स्टेशनावर चहा विकायचा तो निव्वळ स्वकर्तृत्त्वावर इतका मोठा होतो की त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या पक्षाला भारतातील इतिहासातील एक दैदीप्यमान विजय मिळवून देतो. एक थक्क करणारे कर्तृत्व यात शंकाच नाही. ह्या भारताच्या सुपुत्राला माझा सलाम! कितीही मतभेद असले तरी ह्या माणसाने ह्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे ह्याविषयी शंका नसावी. आणि ही सगळी प्रक्रिया ९०% शांततेत पार पडली (अजून तरी!) हे एक मोठेच अप्रूप म्हटले पाहिजे.

In reply to by हुप्प्या

एक सामान्य घरातील गुजराथी मुलगा जो लहानपणी स्टेशनावर चहा विकायचा तो निव्वळ स्वकर्तृत्त्वावर इतका मोठा होतो की त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या पक्षाला भारतातील इतिहासातील एक दैदीप्यमान विजय मिळवून देतो. एक थक्क करणारे कर्तृत्व यात शंकाच नाही.
ओ ... त्यात काय विशेष ? आमचे पट्टेवाले सुध्दा गृहमंत्री झालेच होते की ... औंदाची इलेक्शन जिंकली असती तर घरगुती पंतप्रधानही होण्याचा योग होता =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

आजचे लोकसत्तातले संपादकिय छान आहे.सत्तेत असूनही 'मी बिचारा,मी चहा विकायचो,मी ओ.बी.सी.' हे सांगण्यात मोदी व संघ यशस्वी झाले.अर्थात त्यांना गुजरातमधल्या केलेल्या कामाची जोड होतीच.नुसते काम करून भागत नाही तर त्याची व्य्वस्थित जाहिरात्बाजीही करावी लागते. मोदींनी हे संघाला शिकवले आहे असे म्हणावे लागेल. गुजरातमध्ये केलेले काम,एन.आर.आय.प्राध्यापक्,आय.टी.तज्ञ्,सोशल मिडिया,अंबानी,अडानींचा गडगंज पैसा,संघाची आखणी ह्या आधारावर मोदींनी भाजपाला विजय मिळवून दिला. मोदींचे हार्दिक अभिनंदन.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्यारे१ Sat, 05/17/2014 - 23:17
क्या माई तुम भी? मजाक कर रे क्या? चाय का किटली कौन निकाला? मोदी खुद निकाला? गुजरात एक छटाक भर राज्य. त्याची आक्ख्या देशापुढं काय महती? काँग्रेसनं देशभर केलेलं काम लोकांना का नाही दिसलं गं माऊली? जाहिरातबाजीसाठी मोठ्ठं कंत्राट दिलेलं ना कुणाला? मोदी कडं अडाणी होता तर काँग्रेसकडं डीएलएफ नि पुन्हा अंबानी पण होताच की. जयराम रमेश, शशी थरुर, अहमद पटेल, मीरा कुमार, कपि सिब्बल्ल (होतं कधी कधी एखादं अक्षर इकडं तिकडं) खूप शिकलेली आणि मातब्बर माणसं की! सोशल मिडीया वर लिमिटेड बंदी आणायचा विषय पण झालेला की कधी मधी...! राहुल बाबा पण जातच होता की अधून मधून गरी बांच्या घरी चहापाणी, जेवणखाणाला. चीटिंग नै करायची बाबा अशी. जिंकला तर जिंकला. बघायची वाट थोडे दिवस आता. 'अच्चे दिन आयेले हय' :)

In reply to by प्यारे१

अरे बाबा चिटिंग कसली?.माझे आधिचे प्रतिसाद पहा.नरेंद्रच पंतप्रधान व्हावा असे मलाही वाटत होते़. कॉन्ग्रेसनेही प्रचाराची सर्व हत्यारे वापरली असणारच पण तरीही ह्यांच्या तुलनेत ते नक्कीच कमी पडले. शिवाय रोजची भ्रष्टाचाराची प्रकरणे,मनमोहनांचे प्रसिद्ध मौन हे घटक कारणीभूत होतेच.

प्रभाकर पेठकर Sat, 05/17/2014 - 09:43
बिजेपीने मिळविलेले दैदिप्यमान यश नक्कीच कौतुकास्पद आहे. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचे मोठ्ठाल्ले घोटाळे, आमचं कोण काय वाकडं करू शकतो हा माज आणि महागाईने ग्रस्त सामान्य जनता ह्या सर्वाचा परिपाक म्हणूनच काँग्रेसची ह्या निवडणूकीत अक्षरशः वाताहात झाली. बिजेपीच्या हाती सत्तेची मशाल आली आहे. त्यांनी देशाला भरभराटीच्या मार्गावर नेऊन सोडावे. शिक्षण, पिण्याचे पाणी, वैद्यकिय सेवा, रस्ते आदी मूलभूत गरजा स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षांनीही दारूण अवस्थेत आहेत त्या सुधारून भारताची लाज वाचवावी. नरेन्द्र मोदी १० वर्षे पंतप्रधान राहतील आणि भारताच्या इतिहासातला हा सुवर्णकाळ असेल अशी भविष्यवाणी कोणीतरी उच्चारली आहे ती खरी ठरो.

सस्नेह Sat, 05/17/2014 - 14:56
तेव्हा करायचे जेव्हा नूतन सरकारकडून काही लोकहिताची देशहिताची कामे होतील. खरे आव्हान पुढेच आहे. म्हणून तूर्त मोदी सरकारला शुभेच्छा !

बॅटमॅन Sat, 05/17/2014 - 15:26
लोकहो पण अजून सगळे संपले नाही. विधानसभा निवडणुकाही तोंडावरच आहेत. केंद्रात मोदी आला म्हणून सगळं संपलं नाही. मोदीकडे बघून लोकांनी लोकसभेला मतदान केलं पण विधानसभेत तेवढं पुरं पडणार नाही. अधिक लोकलाईझ्ड मुद्यांवर बीजेपी एट ऑल काय करतात ते पाहणं उद्बोधक ठरेल. त्यांची खरी कसोटी तिकडे लागणार आहे.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य Sat, 05/17/2014 - 23:01
त्यांची खरी कसोटी तिकडे लागणार आहे.
हीच लोकशाहीची खरी मजा आहे. सगळ्यांना व्यवस्थीत तव्यावर ठेवता येते.

ह्या अभिनंदांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आगामी निवडनुकीसाठी महायुतीची घोषणा काय असेल अब की बार ..... अवांतर मायलेक राजीनामा देत आहेत हे वाचून जीव गलबलला त्यांची भाषणे म्हणजे निर्भेळ करमणूक त्याला कपिलरात्रीचा सवंग पणा नाही आणि त्यांच्या मुलाखती म्हणजे हास्यकवी संमेलन मम्मी तुसी ना जो रीयंका लावो , पार्टी बचाव प्रियंका इज इंडिया

In reply to by विकास

मस्त आहेत विनोद ! काही तर अगदी ज्युनियर बुशच्या तोडीचे आहेत !! राहूल आणि त्याच्या लेखनिकांना "स्टँड अप कॉमेडी"चे मैदान मारण्याची प्रचंड संधी आहे. आता हे सगळे विनोद "भोगायला" न लावता त्यांचा देशाच्या जनतेला निखळ आनंदाने आस्वाद देता येईल... आणि गाठी दोन पैसेही पडतील आणि लोक त्यांना "बेकार आहेत" असे म्हणात नाहीत... फार फार तर विनोद बेकार आहेत असे म्हणतील ! =))

नरेंद्र मोदींचे अभिनंदन, एकहाती सत्तेवर येणे काय म्हणतात ते नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. पक्षातल्या जेष्ठ नेत्यांची नाराजी असूनही एकट्याने सभा घेणे, माध्यमांचा योग्य वापर, काँग्रेसला कंटाळलेल्या जनतेला आपण आणि भाजपाच योग्य पर्याय असल्याचे दाखवून दिले. त्याचबरोबर, लोकशाहीचा प्रगल्भपणे वापर करणा-या जनतेचेही मनःपूर्वक अभिनंदन. भारत नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली सर्व दृष्टीने अधिकाधिक विकास करेल आणि एक आदर्श सरकार बनेल अशी कामनाही व्यक्त करतो. भारतीय लोकशाहीचा विजय असो. -दिलीप बिरुटे

दुश्यन्त Sun, 05/18/2014 - 19:49
महाराष्ट्रातील जनतेचा केंद्रातल्या सरकारपेक्षा जास्त राग राज्यातल्या कॉंग्रेस आघडी सरकारवर होता/आहे. १५ वर्षापासून कॉंग्रेस एनसीपीचे राज्य आहे. सिंचन घोटाळा, आदर्श, जमिनी हडपणे,गारपीट, शेतकरी आत्महत्या आदी बाबींत दाखवलेली सरकारी अनास्था, गुंडागर्दी (राणे-भुजबळ- तटकरे-अजित पवार वगैरे),महागाई, बेताल वक्तव्ये यामुळे या आघाडी सरकारचे जाणे अटळ आहे मात्र महायुतीने हुरळून न जाता एकजुटीने, जोमाने प्रचार करणे आवश्यक आहे.

राही Tue, 05/20/2014 - 17:37
आता २१ तारखेला मंत्रिमंडळाचा चेहरा जाहीर झाला की पुढच्या धोरणांचा काहीसा अंदाज येईल. आता आणखी उत्सुकता आहे ती महाराष्ट्र विधानसभेसाठी असणार्‍या युतीबद्दल. जागांच्या संख्यावाटपासाठी वाद होणारच. भाजप आता सेकंड फिडल वाजवण्यावर संतुष्ट राहीलच असे नाही.

विकास Wed, 05/21/2014 - 03:15
खालील व्हिडीओ हा ८ मिनिटांच्या किंचीत आधीपासून बघा. हेडलेस चिकन या शब्दाचा अर्थ समजेल. :)

In reply to by विकास

हुप्प्या Wed, 05/21/2014 - 09:32
मग केतकर असले मुद्दे काढून आकाश पाताळ एकत्र करणार. नेहरूंचे नाव नाही घेतले, गांधींचे नाव नाही घेतले, आंबेडकरांचे नाव नाही घेतले वगैरे ट्यँव ट्यँव ट्यँव चालू. काँग्रेसचे लोक टिळकांचे नाव किती घेतात? ते नसते तर काँग्रेसच बनली नसती. दादाभाई नौरोजी? लाला लजपतराय? बिपिनचंद्र पाल?

विकास Wed, 05/21/2014 - 07:43
इलिनॉय मधील काँग्रेसमन (/खासदार)Aaron Schock यांनी युट्यूबवर नरेन्द्र मोदींचे केलेले अभिनंदन! :)

जयनीत Mon, 05/26/2014 - 11:00
विजेत्यांचे अभिनंदन आणि आपल्या मुद्द्यां आणि निष्ठेसाठी साधनांची कमतरता असूनही नेटाने निवडणूक लढवणा-या काही पक्ष आणि त्यांची खंद्या कार्यकर्त्यांचेही मनपूर्वक अभिनदन. झालेल्या बदलातुन देश आणि लोकशाही समृद्ध होइल हीच अपेक्षा.

राही Tue, 05/27/2014 - 19:34
अभिनंदनात सहभागी झालेल्या सर्वांना धन्यवाद. सुप्रशासन येवो ही शुभेच्छा आणि सदिच्छा.

आनन्दिता Fri, 05/16/2014 - 10:39
मनापासुन भारी वाटतंय.. जनतेला मुर्ख समजणार्या सरकारला जनता जागेवर आणेल हे माहीत होत, पण अगदी तोंडावर आपटेल याची कल्पना नव्हती. मोदीं ची लाट नाही तर सुनामी होती... मोदींना त्यांच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा! जनतेच्या अपेक्षा पुर्ण होवोत ही प्रार्थना.. रात्रीचा १ वाजलाय अन इथे टाईम स्क्वेअर ला जल्लोषाचं वातावरण आहे. *yahoo*

In reply to by आनन्दिता

अगदी अगदी. आज सकाळी उठल्यापासून लक्ष फक्त निकालाकडेच होतं. आता आज सगळी भारतीय मित्र मंडळी मिळून पार्टी करणार. *clapping*

श्रीरंग_जोशी Fri, 05/16/2014 - 10:42
नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. भाजप व सहकारी पक्षांचे अभिनंदन. नव्या सरकारला शुभेच्छा!!

In reply to by श्रीरंग_जोशी

आजानुकर्ण Fri, 05/16/2014 - 11:48
नमोजींचे हार्दिक अभिनंदन. भारतीय जनता प्रगल्भ आहे. त्यांच्या विकासाच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजपा सरकारला शुभेच्छा.

नेत्रेश Fri, 05/16/2014 - 10:44
हल्ली लोकसत्तातले कुमार केतकरांचे संपासकीय लेख खुप मीस होतात. त्यांचा आजचा व उद्याचा अग्रलेख वाचायला मजा आली असती

In reply to by ऋषिकेश

नेत्रेश Sat, 05/17/2014 - 06:43
आजचा दिव्य मराठीतला अग्रलेख खुपच संतुलीत आहे. टीपिक केतकरी ट्च हरवला आहे. थोडी निराशाच झाली.

In reply to by नेत्रेश

विकास Sat, 05/17/2014 - 08:32
तिथल्या संपादक महाशयांचा आयडी हॅक झाला आहे का? जातीय आणि धार्मिकतेत अडकलेल्या समाजाला विकास, सुप्रशासन या मुद्द्यावर आवाहन करून निवडणूक जिंकणे, ही या देशात अशक्यप्राय मानली गेलेली गोष्ट नरेंद्र मोदी यांनी शक्य करून दाखविली आहे. अग्रलेखात हे वाक्य वाचले आणि भाजपाला स्वबळावर सत्ता काबीज करता येईल ह्या गेल्या २४ तासातील बातमीने पण धक्का बसला नाही इतका धक्का बसला. *yes3*

ऋषिकेश Fri, 05/16/2014 - 10:47
शांततमय पद्धतीने सत्ताबदलाबद्दल सगळ्या नागरीकांचे अभिनंदन भाजपा, एन्डीएच्या मतदारांचे व विजयी उमेदवारांचे विशेष अभिनंदन!

मदनबाण Fri, 05/16/2014 - 10:57
मला दोन व्यक्तिं बद्धल आता विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. १) राहुल गांधी :- सध्या ही व्यक्ती कुठे आहे आणि कॉग्रेसच्या कामगिरी बद्धल त्यांचे मत. २) केजरीवाल :- नविन नौट़कीचा अंक कुठला सुरु करणार ? शिवाय त्यांच्या पक्षाची भूमिका सुद्धा. जाता जाता :- अमेठीच्या निकालीची काय स्थिती /अंदाज आहेत ?

In reply to by मदनबाण

आत्मशून्य Fri, 05/16/2014 - 11:09
बाकी आशा आहे यापुढे देशात विकास व जागतिक सामर्थ्याच राजकारण सुरु होइल.

In reply to by आत्मशून्य

नाही. आप त्या लायकीचा आहे असे वाटत नाही. मेधा पाटकर पडल्या त्याबद्दल आनंद वाटला. दमानिया, इल्मी पडल्या नाही तर चांगल्या आप्टल्या त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. याबद्दल आनंद झाला. विकास आणि सामर्थ्याचे राजकारण सुरु व्हावे याच्याशी मात्र सहमत.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आत्मशून्य Fri, 05/16/2014 - 23:08
मानगुटीवर बसतात अगदी. बाकी लोकांनी विज बिले न्हवती भरली सांगण्यावरुन. सत्ता आल्यावर विजबीलमाफी वगैरे सगळे ठीक आहे हो, पण राजीनामा दिला, सत्ता सोडली आणी विज बिले न भरलेल्यांची अवस्था आता घर का ना घाट का करुन टाकली. १४ पैकी १३ मुद्दे तर जनलोकपाल संबंधी न्हवते ? मग किमान ते सर्व मार्गी लावुन लोकांची/सपोर्टर्सची कुचंबणा होणार नाही अशी वेळ पाहुन जनलोकपालच्या मुद्यावर राजीनामा देता आला असता जनतेचा दुवा मिळाला असता, आता लोकांच्या मनात विश्वासघाताची भावना निर्माण केलीत, आणे विचारवंताना निवडणुकीत उतरवे.. न्हवे कुजवले. जनतेछा बळी देउन आंदोलन यशस्वी होउ शकते सत्तापद न्हवे. बसा आता बोंबलत. दिल्लीत कोणीच निवडुन आले नाही. समाधान इतकेच आहे जे चार निवडुन आले ते भाजपचा जोर असलेल्या परिसरातुन निवडुन आलेत. रुपेरी किनार ती हीच. असो ३० वर्षापुर्वी भाजपचे फक्त २ सिटा आल्या होत्या आपच्या ४ ही काही वाइअट सुरुवात नाही. विरोधी पक्ष आपच हवा हे व्यक्तीगत मत आहे.

In reply to by आत्मशून्य

मानगुटीवर बसायचा प्रेत्न करतात पण मूळातच हेतू स्वच्छ नसल्याने मार खातात. दमानिया बाई कुठे गायब आहेत आता. मोठ्या संतपदी विराजमान होउ पाहत होत्या. गडकरींनी कोर्टात ललकारल्यावर कुठे गायबल्या? म्हणजे अभ्यासू वृत्तीचा पूर्ण अभाव आणि नुसताच थयथयाट हा लायकिचा क्रायटेरीया म्हणायचा का? बाकी आपचे आंदोलन म्हणजे रामदेवबाबाचा मुद्दा हायजॅक करण्यासाठीच होते असे नेहेमी वाटते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आत्मशून्य गुरुवार, 05/22/2014 - 00:41
स्वच्छ हेतूनेच बसतात पण त्यांचाअभ्यास कमी पडतोय म्हणुन केविलवाणे भासवले जातात. कणा हिन् विरोधक ही देशाला लागलेली किड आहे.

In reply to by मदनबाण

मदनबाण Wed, 05/21/2014 - 19:22
केजरीवाल :- नविन नौट़कीचा अंक कुठला सुरु करणार ? शिवाय त्यांच्या पक्षाची भूमिका सुद्धा. केजुच्या नौटंकीचा नवा अंक सुरु झाला आहे बरं का मंडळी ! ;) अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात रवानगी म्हंटल यांच्या नौटंकीचा नविन अंक अजुन सुरु कसा झाला नाही ? पण... नक्की काय झाले ? नितीन गडकरी यांच्यावर कोणतेही पुरावे नसताना भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना कोर्टानं माफी मागण्यास सांगितलं... परंतु, अरविंद केजरीवाल आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले आणि त्यांनी माफी मागण्यास स्पष्टपणे नकार दिला. सोबतच कोर्टानं अरविंद केजरीवाल यांना जामीनासाठी 10,000 रुपयांचा बॉन्ड भरण्यास सांगितलं... पण, केजरीवाल यांनी जामीन भरण्यासही नकार दिला. संदर्भ :- गडकरी अवमान प्रकरणी केजरीवाल दोन दिवस तुरुंगात अजुन एक प्रकरण कळाले, अर्थात ते केजरीवाल यांच्या बद्धल नसुन, सोनिया गांधी यांच्या बद्धल आहे. काय आहे हे प्रकरण ? तर या घोटाळ्याचे नाव आहे :- National Herald Scam आता तुम्हा सर्वांची बघण्याची आणि श्रवण भक्तीची सोय करतो :- श्रवण भक्तीची सोय इथे :- Congress’s role in National Herald scam जाता जाता :- केजुच्या नौटंकीचा अंक तर सुरु झाला आहे, आता... तेल तापते तशा जिलब्या पाडतो असे ब्रिद वाक्य मिरवणारे जिलबीवाले बाबा यांच्या नव्या ताज्या घाण्याची वाट पाहुया ! ;)

In reply to by मदनबाण

भृशुंडी गुरुवार, 05/22/2014 - 03:53
सुब्रमण्यम स्वामीदेखील बरेचदा ताळतंत्र सोडून आरोपांचा धुरळा उडवण्यात माहिर आहेत. त्यांच्या टोकाच्या मतांंमुळे आणि आरोपांमुळे "लांडगा आला रे आला" पातळीवरच त्यांची मतं विचारात घ्यावी लागतात.

In reply to by मदनबाण

मदनबाण Fri, 06/27/2014 - 07:05
National Herald Scam वरती ज्या घोटाळ्याचा उल्लेख केला होता, त्यावर काल दिल्लीच्या न्यायालयाने सोनिया गांधी,राहुल गांधी आणि ४ जणांना समन्स पाठवले आहे. संदर्भ :-Court summons Sonia, Rahul for alleged fraud मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- मेघा रे मेघा रे... :- प्यासा सावन

खटपट्या Fri, 05/16/2014 - 11:05
आत्तापर्यंत फक्त बीजेपी = २६८ जे काही जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलेय त्यासाठी २७२ फक्त बीजेपी ला मिळायला पाहिजेत. या बहुमताच्या जोरावर बीजेपीने एवढा विकास करून दाखवला पाहिजे कि पुढील १० ते १५ वर्षे दुसरा पर्याय लोकांसमोर नसेल. नाहीतर आप वाले आहेतच बोंबाबोंब करायला. राहुल गांधी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेत. या नाराजीचा बीजेपी ने जर उपयोग करून नाही घेतला तर त्यांच्यासारखे करंटे तेच असतील. बीजेपी मधील दिग्गजांना खुश ठेवून मोदिजी मुख्य खाती आपल्याकडे ठेवावी लागतील. मोदींची खरी परीक्षा बीजेपी मधील अंतर्गत राजकारणाला तोंड देण्यामध्ये असेल.

राजेश घासकडवी Fri, 05/16/2014 - 11:18
मोदींचे, भाजपचे आणि एनडीएचे अभिनंदन. भारताचा विकास घडवून आणण्याचं आश्वासन पुरं करण्याची शक्ती मिळो आणि अनुकूल परिस्थितीही मिळो अशी मनोमन सदीच्छा. ऋषिकेशने म्हटल्याप्रमाणे शांततमय पद्धतीने सत्ताबदलाबद्दल सगळ्या नागरिकांचे अभिनंदन. भारतीय लोकशाही कुचकामी आहे वगैरे म्हटलं जातं, पण वेळोवेळी जनता आपला कौल देऊन सरकार बदलते आणि ही प्रक्रिया बऱ्यापैकी शांततेने आणि पद्धतशीरपणे पार पडते. जवळपास दोन तृतियांश मतदारांनी यावेळी मतदान केलं. ही राजकीय जागृती अशीच राहो.

In reply to by ओंकार सुतार

उद्धवा मोदीमय तुझे सरकार असे नवीन राजकीय गाणे झाले आहे. भाजपच्या मित्रपक्षाला अकालीदलाला पर्याय म्हणून आप पक्ष पुढे आला त्यामानाने शिवसेनच्या पुढे राज ,राणे , भुजबळ असे दिग्गज होते. पण शांत ,संयमी नेत्तृत्व , उत्कृष्ट व्यवस्थापन ह्यामुळे शिवसेनेची समाजाच्या सर्व थरात एक वेगळी व सकारात्मक व समंजस प्रतिमा उद्धव ह्यांनी निर्माण केली. पूर्वीची शिवेसेना राडेबाज आणि त्याच मार्गावर जाणार्या राज ची मनसे ह्यांना मर्यादित यश होते. भावनात्मक , आक्रमक भाषणाने पूर्वी शिवसेनेने व आज मनसेने गर्दी जमवली मात्र आजच्या उद्धवप्रणीत शिवसनेने भाजपसह इतर पक्षांची मोट बांधून संघटीत विजय मिळवला आहे. महाराष्टार्त भाजपच्या खालोखाल जागा मिळवणारा शिवसेनेने आमच्याशी युती करण्यास खरा फायदा आहे हे नमोंना दाखवून दिले. पुढील विधानसभेत नमो ह्यांना उद्धव शी मसलत करणे अनिवार्य आहे. शिवसेनेला मात्तबर केंद्रीय मंत्रिपद मिळेल असा माझा होरा आहे, कारण गुणवत्ता प्रमाण मानणारे नमो ह्यांच्याकडे उद्धव गुणी खासदारांचे नाव पुढे करेल ह्यात शंका नाही. तळटीप संघाचे बाळकडू घरातून मिळाल्याने भाजपचा कट्टर समर्थक असलेला मी शिवसेनेचा चाहता नव्हतो. किंबहुना रथयात्रा , बाबरी मशीद ह्या राजकारणामुळे राजकारणातून मन उडाले होते. नमो ह्यांचे विकास व सुराज्य ह्या संकल्पनेने भाजपशी परत नाळ जोडल्या गेली. उद्धव ह्यांच्या हातात शिवसेना आल्यावर तो पक्ष खर्या अर्थाने गुद्याने नाहीतर मुद्द्यांवर निवडणुका लढवणार पक्ष झाला व माझे त्या पक्षाविषयी अंकुल मत झाले. उद्धव ज्यांची शेतीतील काही काळात नाही असे म्हणून खिल्ली उडवणारे आज त्याला ग्रामीण भागात प्रस्थापितांच्या बालेकिल्ल्यात असे यश मिळवून स्वताला सिद्ध केले आहे. राणे आता कोकणातील त्यांचे सर्व उपक्रम बंद करणार आहेत असे विधान केले आहे. ह्या बद्दल कोकण वासियांनी त्यांचे आभार मानले पाहिजे. मूळ मुद्दा असा आहे की अणु उर्जेवर मोदी ह्यांची काय भूमिका असेल व आता दाभोळ अरबी समुद्रात बुडणार का

In reply to by निनाद मुक्काम …

यशोधरा Sat, 05/17/2014 - 06:26
राणे आता कोकणातील त्यांचे सर्व उपक्रम बंद करणार आहेत असे विधान केले आहे. ह्या बद्दल कोकण वासियांनी त्यांचे आभार मानले पाहिजे.
कोकण प्रांताचे ग्रहण सुटले म्हणायला हरकत नाही.

In reply to by निनाद मुक्काम …

वॉल्टर व्हाईट Sat, 05/17/2014 - 09:48
बरोबर आहे निनाद तुमचे, तुमच्यासारखे अनेक मोदींच्या पॉझिटिव ट्च मुळे पुन्हा जोडले जात आहेत. तसेच मोदींना काळाची पावले ओळखता येतात असे जाणवते, उदा. इंटरनेट आणि सोशल मिडीयावर वावर आणि त्याचा संतुलित वापर.

In reply to by वॉल्टर व्हाईट

टेक्नोसेवी तरुणाई पुढे देवालये नाही तर शौचालये हवी म्हणणारे गुजरात मधील बेकायदेशीर मंदिरे तोडतांना विहिपी चा रोष ओढवून घेणारे ह्या निवडणुकीत संघ वगळता बजरंग दल व इतर हिंदू संघटना व त्यांच्या नेत्यांना लांब ठेवणारे व विकासाची व सुराज्याची भाषा करणारे मोदी ह्यांना हे यश अपेक्षित होते. सोशल नेटवर्क वर मोदींना पंतप्रधान मानणारे मोदी भक्त असे म्हणून आम्हाला हिणवणाऱ्या लोकांचे चेहरे त्यांनी सेल्फी काढून येथे टाकावे . घाबरू नये आम्ही तुम्हाला हसणार नाही सबको साथ लेके चलना हे भाई

In reply to by निनाद मुक्काम …

संपत Sun, 05/18/2014 - 00:23
दाभोळ अरबी समुद्रात बुडणार का
तुम्हाला जैतापूर म्हणायचे आहे का? कारण 'अर्थ'पूर्ण चर्चेनंतर दाभोळ एनर्जीला जीवदान मिळाले होते. जैतापूर बाबतीत देखील तसेच होईल.

In reply to by संपत

सुधारणे बद्दल धन्यवाद हो जैतपूर उद्द्ध्व ला विधानसभेत राण्यांना हरवायचे आहे. त्यामुळे ह्या प्रकल्पाला विरोध हा असणारच मोदी ह्यांना अणूउर्जेला विरोध ऐकिवात नाही आणि अपारंपरिक उर्जा ही भारतातील प्रचंड उर्जेची गरज पुरी करू शकत नाही तेव्हा सध्यातरी अणू उर्जेला पर्याय नाही काय होते ते पाहणे मनोरंजंक आहे महाराष्टार्त सौर उर्जेचे जाळे पसरणार जर्मन कंपन्यांना बाजारपेठ मिळणार तर महाराष्ट्राला प्रदूषणमुक्त उर्जा अच्छे दिन ....

In reply to by निनाद मुक्काम …

सहमत आहे. मोदींनी प्रगतीच्या आड येणारे पर्यावरण कायदे रद्द करावेत. आतल्या गोटातल्या माहीतीनुसार पुणे कोल्हापूर महामार्ग चौपदरीकरणाचे काम या पर्यावरण वाल्यांनी अडवले आहे. (टोल मात्र वसूल होतो हा भाग वेगळा) पुण्यातला नदीपात्रातला रस्ता तब्बल १० वर्षे या फालतू पर्यावरणवाद्यांनीच रोखून धरला होता. इतका लांब वळसा पडायचा सायकलवरून जाताना. असो. जैतापूर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा.

In reply to by निनाद मुक्काम …

दुश्यन्त Sun, 05/18/2014 - 19:14
बर्याच अंशी सहमत.आत्ताच्या निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा भाजप बरोबर सेनेला झाला हे खरेच आहे मात्र उद्धवच्या काळात सेना ग्रामीण भागात बर्यापैकी विस्तारली. याचे एक उदाहरण म्हणजे मागच्या २००९च्या लोकसभेत सेनेची मुंबईमध्ये पूर्ण धूळधाण उडाली होती, ठाणे-कोकण मध्ये पण मर्यादित यश होते मात्र उर्वरित महाराष्ट्रात ९ जागा आल्या होत्या (एकूण ११ पैकी ९ मुंबई-ठाणे-कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्रात). माझ्या मते असे यश बाळासाहेब भरात असताना पण मिळाले नसावे. सेना- भाजप युती बरोबर आर पी आय, स्वाभिमानी संघटना, रासप यांची मोट उद्धव ठाकरे आणि मुंडेंच्या पुढाकारानेच बांधली गेली आहे. उद्धव यांनी संयमी नेतृत्व सेनेला पुढे नेत आहे हे उशिरा का होईना लोकांना पण समजू लागले आहे.

In reply to by दुश्यन्त

ह्या ९ पैकी काही जागा राष्ट्रवादीच्या बालेकील्यातील होत्या. जेव्हा मोदी लाट नव्हती तेव्हा एकहाती उद्धव ने हा पराक्रम गाजवला. बाळासाहेब ,महाजन , मुंडे व हिंदुत्वाची हवा असतांना व कोन्ग्ग्रेज व राष्टवादी वेगेळे लढले तेव्हा सुद्धा असे आक्रित घडले नव्हते. मी अचानक उद्धव ह्यांचा खांदा समर्थक वैगरे झालो नाही , पण शेट्टी ,आठवले व मुंडे व गडकरी ह्यांना राज पेक्ष्या उद्धव आश्वासक वाटतो. हे पाहून बंदे मे दम हे असे मला वाटते.

In reply to by निनाद मुक्काम …

चौकटराजा Tue, 05/20/2014 - 18:14
राज पेक्ष्या उद्धव आश्वासक वाटतो. राज ठाकरे यानी सेनेपासून फारकत घेणे व पवारानी कॉग्रेस पासून फारकत घेणे यात साम्य आहे. त्यांच्या दोघांच्याही अंदाजाने आणकी वीसेक वर्षे राजकारण हे एका पक्षाचे न रहाणारे असणार. अशा स्थितीत लहान पक्षाचा प्रमुख असणे मध्यम पक्षाच्या महत्वाच्या नेता असण्यापेक्षा मह्त्वाचे ठरते. मंत्रीपदावर कब्जा मिळविता येतो.

सर्व भारतिय मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन ! ही निवडणूक म्हणजे भारतिय लोकशाहीचा विजय आहे !! भारताला एक सुजाण, पुरोगामी आणि विकसनशील सुशासन मिळून देशाचा खराखुरा विकास व्हावा हीच सदिच्छा !!! आज प्रत्येक भारतियाची मान अभिमानाने ताठ व्हायला हवी... मग त्याने / तिने मत दिलेला उमेदवार / पक्ष विजयी झालेला असो अथवा नसो.

पैसा Fri, 05/16/2014 - 11:53
सर्वांचेच अभिनंदन! लोकांनी त्यांचा राग न बोलता मतपेटीतून दाखवला. आणि काँग्रेस हा दबलेला राग जाणून घेऊ शकली नाही. आपल्या एकेक मताने काय होऊ शकते हे भारतीय मतदारांनी दाखवले आहे. यासाठी आनंद!

विजयी उमेद्वारांचे,मोदींचे अभिनंदन. १९७७ सारखेच होते आहे असे दिसतय. त्यावेळी जयप्रकाश नारायण व ईतर होते. ह्यावेळी मोदी. पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

चौकटराजा Fri, 05/16/2014 - 17:30
मोरारजींचा अवसानघात करणारे मधु लिमये यांच्या सारखे समाजवादी त्यावेळी होते म्हणून जनसंघीयाना पाण्यात पहाण्याचा प्रयोग त्या वेळी झाला. गेली पाच वर्षे राष्ट्रवादी व कॉंग्रेस हाच एकमेकाना पाण्यात पहाण्याचा प्रयोग करीत सत्ता खात होते. त्यावेळच्या जनता पक्षाला व आघाडीला मतदारानी धडा शिकवलाय. की सत्तेचा आयडियॉलॉजीचा माज करू नका. ३७० , राम बाजूला ठेवल्यावर काय घडू शकते हे दिसले आहे.आता काही काळ सुषमा स्वरात एल के काहीशी बोंब करतील पण त्याना गप्प केले जाईल. समाजवाद्यांइतके ते घातकी ( वैचारिक ) नसावेत.

तुमचा अभिषेक Fri, 05/16/2014 - 13:32
सर्व भारतीयांचे अभिनंदन ! काँग्रेस हा पक्ष यातून संपून न जाता पुन्हा नव्या दमाने नव्या चेहर्‍याने उभा राहील अशी अपेक्षा, लोकशाहीत विरोधी पक्षाचा अंकुशही तितकाच गरजेचा.

विकास Fri, 05/16/2014 - 17:04
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. मोदींनी "हा भारताचा विजय आहे" असे म्हणून आणि नेहमीप्रमाणे सर्वप्रथम आईचा आशिर्वाद घेऊन पाय जमिनीवर असल्याचे दाखवून दिले आहे. त्यात कृतज्ञता आणि कृतर्थता दिसते... असेच आता या सत्ताधारी आघाडीचे पाय जमिनीवर राहोत आणि भारताला मोठे करण्यासाठी भारतीयांना संधी प्राप्त होतील असे कार्य घडोत ही शुभेच्छा! राजीव गांधींना याहून मोठा विजय मिळाला होता पण ती सहानभुतीची लाट होती. नाहीतर आठवते त्याप्रमाणे जर इंदीराजी हयात असत्या तरी कदाचीत त्या जिंकल्या असत्या पण इतक्या मताधिक्याने नाही. त्यामुळे हा विजय पोलरायझेशनचा विजय आहे असे वाटत नाही. तर खर्‍या अर्थाने त्रासलेल्या आणि केवळ सामान्य इतकीच ओळख असलेल्या बिनचेहर्‍याच्या जनतेने दिलेला एक आशावादी कौल आहे. मनःपूर्वक शुभेच्छा!

In reply to by विकास

२००९ साली सुद्धा जनता ह्या सरकारला विटली होती पण त्यांच्यापुढे समर्थ पर्याय नव्हता, रथ यात्रा करणारे , तडफेने भाषण करणारे प्रत्यक्षात कृतीशून्य महाजन , वाजपेयी ,अडवाणी ह्यांचा पर्याय जनतेला मान्य नव्हता कारण शायनिंग इंडिया म्हणून काही होत नाही त्यासाठी तुमचा मतदारसंघ , तुमचे राज्य शायनिंग असले पाहिजे. मोदी ह्यांचे गुजरात मॉडेल उत्तर प्रदेशाला हवेसे वाटले .ह्यात जनतेचा व्यवहारी दृष्टीकोन आहे , त्यांना भावनिक रीत्या च्यु बनवायचा हेतू नव्हता. मोदी हा तत्कालीन सरकार विरुद्ध समर्थ पर्याय होता मात्र बंगाल व तामिळनाडू मध्ये मोदी लाट चालली नाही कारण तेथे दोघी मा, अम्मा खमक्या होत्या. अकाली दलावर नाराज जनतेने आपला मत देणे अनपेक्षित होते ह्याच पार्श्वभूमीवर आप , राज ला पुरून उरणारा उद्धवचे कर्तुत्व मोठे वाटते.

In reply to by निनाद मुक्काम …

दुश्यन्त Sun, 05/18/2014 - 19:22
एक दुरुस्ती २००९ ला महाजन हयात नव्हते तर वाजपेयी आत्तासारखेच थकलेले होते त्यामुळे वाजपेयी प्रचारपासून दूर होते. आडवाणी तसेच जेटली, स्वराज वगैरे लोक तेव्हा भाजपची आघाडी सांभाळत होते.

बॅटमॅन Fri, 05/16/2014 - 17:15
हबिणंदण!!! मात्र लै मोठ्या जबाबदार्‍या आहेत मोदीवर. कसा पार पाडतो ते पाहणे महत्त्वाचे आहे. मोदी व समस्त सर्कारमधील घटकांना पुनरेकवार शुभेच्छा!! बाकी या निवडणुकीनंतर प्रचाराची तंत्रे आमूलाग्र बदलून जातील असे वाटते.

राही Fri, 05/16/2014 - 17:56
आजची सकाळ खरोखरीच ऐतिहासिक आणि क्रांतिकारी होती. टीवीच्या पडद्यावर नाट्य उलगडत होते आणि ह्यूस्टन, न्यू जर्सी, पीट्स्बर्ग, लंडन्, सिडनी इथल्या निरोपांच्या देवाणघेवाणींनी कंप्यूटरचा पडदा भरून गेला होता. काळवेळ जणू थांबला होता. असा ऐतिहासिक क्षण या पूर्वीही एकदा अनुभवायला मिळाला होता. १९७७ साली. लहान वयामुळे त्या क्षणाचे ऐतिहासिक मूल्य तितके लक्षात आले नव्हते. पण मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी वातावरणातला जोश, उत्सुकता, थरार बघितला होता. शनिवारवाड्यावर, गायकवाड्यासमोर, सकाळ कचेरीसमोर जमलेला बेभान जमाव, निवडणूकपूर्व प्रचाराच्या मुंबईच्या लहान-लहान गल्ल्यातही रंगलेल्या सभा, सारे आठवतेय. पु.ल देशपांड्याची सभाही आठवतेय आणि त्याला मिळालेला तुडुंब प्रतिसादही. शब्द लक्षात नाहीत पण लोकांचा उत्साह आठवतोय. पण काही दिवसांतच हे सोनेरी स्वप्न भंगून गेले आणि लोकांचा पराकोटीचा हिरमोड झाला. आता तसे न होवो. ज्या बदलासाठी हा शांततामय कौल दिला गेला आहे, तो वास्तवात येवो. लोकाभिमुख सरकार आणि सुप्रशासन भारतात अवतरो. नागरी शिस्त आणि सार्वजनिक चारित्र्य भारतीयांमध्ये बाणो. एव्हढे तरी होवो. आमेन.

In reply to by राही

विकास Fri, 05/16/2014 - 19:55
वास्तवीक माझ्या मध्यरात्रीच एनडीटिव्हीवर प्रणव रॉय यांनी खात्रीने एनडीएला बहुमत मिळेल हे सांगितले. तरी झोपायला जावतच नव्हते. तसाच ३ पर्यंत बसलो आणि ऐतिहासीक क्षण अनुभवला. १९७७ ची मला देखील आठवण झाली. मृणाल गोरे, दुर्गा भागवत, सुब्रम्हण्यम स्वामी, जॉर्ज फर्नांडीस, आदींची भाषणे ऐकल्याचे आठवते. अर्थात मी तेंव्हा फारच लहान होतो. मृणाल गोरेंच्या भाषणाला आईने नेल्याचे आठवते! नंतर निवडणूक निकालाची रात्र आली आणि रेडीओवर अचानक मध्यरात्रीच्या आसपास, "जाने कहां गये वो दीन..." गाणे लागले. आमचे शेजारी, "इंदीरा गांधी पडल्या" म्हणतच घरात आले. विश्वास बसला नव्हता. नंतर घरावरून रामभाऊ म्हाळगींची मिरवणूक जाताना पाहीली, त्यांनी काँग्रेसच्या पा.शि. देशमुखांना हरवले होते, "चंद्रभागेला आला लोंढा, पाणी आले ठाण्याला, इंदीरा म्हणते यशवंताला, पाशि माझा बुडाला" म्हणत जोरात मिरवणूक गेली... नंतर दुर्दैवाने म्हाळगी मला वाटते त्यांची टर्म संपायच्या आधीच कॅन्सरने गेले. दुसरीकडे "संजीव-राजीव वात्रट कार्टी निवडून आणा जनता पार्टी!" ला प्रचंड प्रतिसाद मिळून देखील जनतापार्टीने सत्ताधिशांपेक्षा विरोधीपक्षाचेच काम चालू ठेवले आणि अंतर्गत लाथाळ्यांमधे सोनेरी स्वप्न भंगून गेले. :( १९८४ साली कदाचीत परत विरोधकांना संधी असती पण सहानभूटीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. सारे देशमे एक भिकारी, अटलबिहारी अटलबिहारी असे ओरडत काँग्रेसचे पब्लीक फिरत होते. पण तरी देखील भाजप पक्ष म्हणून भंगला नाही. मतभेद नक्कीच झाले असतील, पण त्यातील प्रमुख नेत्यांनी कधी वेगळी चूल मांडली नाही. हे नक्कीच वैशिष्ठ्य वाटते. असो. असा निवडणूक निकालांचा अनुभव नंतर अमेरीकेत बुश विरुद्ध गोर च्या वेळेस रात्रभर जागून आणि नंतर सततच्या बातम्या ऐकून घेतला. ज्या दिवशी गोरने हार मान्य केली त्या दिवशीचे त्याचे भाषण ऐकताना सामान्यांना जाउंदेत काही प्रसिद्ध माध्यमातील प्रसिद्ध अँकरमन्सना देखील वाईट वाटल्याचे दिसत होते. ओबामाच्या पहील्या निवडणुकीच्या वेळेस इतिहास घडला. पण नंतर त्याचा आत्यंतिक द्वेष करून बदनामी करणारे विचारवंत आणि राजकारणी पाहीले (कदाचीत तेच मोदींच्या बाबतीत झाले). दुसर्‍या वेळेस त्याच्या विरोधात रॉमनी उभा होता. तेंव्हा असेच उत्कंठावर्धक होते. असो.

नरेंद्र मोदींचे हार्दिक अभिनंदन. आता इथुन पुढे १०-१५ वर्ष देशात भा.ज.पा. आणि मित्रपक्षांना पर्यायच उरला नाही पाहिजे. काँग्रेसच्या तोंडावर 'पंज्या'चा जोरदार फटका देऊन पराभव केल्याबद्दल समस्त मतदार बंधुं-भगिनींचे आभार. आता गेल्या १० वर्षात यु.पी.ए. १-२ नी केलेले झोल बाहेर काढुन जावै बापु, बिटियारानी, मम्मा, पप्पु, सगळे "माजुर्डेवादी" ई.ई. ना कृष्णजन्मस्थान यात्रा घडवावी हीचं ईच्छा. मनमोहनसिंग यांनी कृपया राजकारणातील घाणीतुन बाजुला व्हावे आणि सन्मानाने जगावे हीचं ईच्छा!!

मदनबाण Fri, 05/16/2014 - 22:40
एक मुद्दा राहिलाच की... माझ्या आनंदाचे अजुन एक कारण म्हणजे...अमेरिकेची होणारी गंमत ! मोदींना व्हीसा नाकारणारा माजुरडा देश ! आता काय करतील ?

हुप्प्या Sat, 05/17/2014 - 06:17
खरोखरच चमत्कार म्हटला पाहिजे. एक सामान्य घरातील गुजराथी मुलगा जो लहानपणी स्टेशनावर चहा विकायचा तो निव्वळ स्वकर्तृत्त्वावर इतका मोठा होतो की त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या पक्षाला भारतातील इतिहासातील एक दैदीप्यमान विजय मिळवून देतो. एक थक्क करणारे कर्तृत्व यात शंकाच नाही. ह्या भारताच्या सुपुत्राला माझा सलाम! कितीही मतभेद असले तरी ह्या माणसाने ह्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे ह्याविषयी शंका नसावी. आणि ही सगळी प्रक्रिया ९०% शांततेत पार पडली (अजून तरी!) हे एक मोठेच अप्रूप म्हटले पाहिजे.

In reply to by हुप्प्या

एक सामान्य घरातील गुजराथी मुलगा जो लहानपणी स्टेशनावर चहा विकायचा तो निव्वळ स्वकर्तृत्त्वावर इतका मोठा होतो की त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या पक्षाला भारतातील इतिहासातील एक दैदीप्यमान विजय मिळवून देतो. एक थक्क करणारे कर्तृत्व यात शंकाच नाही.
ओ ... त्यात काय विशेष ? आमचे पट्टेवाले सुध्दा गृहमंत्री झालेच होते की ... औंदाची इलेक्शन जिंकली असती तर घरगुती पंतप्रधानही होण्याचा योग होता =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

आजचे लोकसत्तातले संपादकिय छान आहे.सत्तेत असूनही 'मी बिचारा,मी चहा विकायचो,मी ओ.बी.सी.' हे सांगण्यात मोदी व संघ यशस्वी झाले.अर्थात त्यांना गुजरातमधल्या केलेल्या कामाची जोड होतीच.नुसते काम करून भागत नाही तर त्याची व्य्वस्थित जाहिरात्बाजीही करावी लागते. मोदींनी हे संघाला शिकवले आहे असे म्हणावे लागेल. गुजरातमध्ये केलेले काम,एन.आर.आय.प्राध्यापक्,आय.टी.तज्ञ्,सोशल मिडिया,अंबानी,अडानींचा गडगंज पैसा,संघाची आखणी ह्या आधारावर मोदींनी भाजपाला विजय मिळवून दिला. मोदींचे हार्दिक अभिनंदन.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्यारे१ Sat, 05/17/2014 - 23:17
क्या माई तुम भी? मजाक कर रे क्या? चाय का किटली कौन निकाला? मोदी खुद निकाला? गुजरात एक छटाक भर राज्य. त्याची आक्ख्या देशापुढं काय महती? काँग्रेसनं देशभर केलेलं काम लोकांना का नाही दिसलं गं माऊली? जाहिरातबाजीसाठी मोठ्ठं कंत्राट दिलेलं ना कुणाला? मोदी कडं अडाणी होता तर काँग्रेसकडं डीएलएफ नि पुन्हा अंबानी पण होताच की. जयराम रमेश, शशी थरुर, अहमद पटेल, मीरा कुमार, कपि सिब्बल्ल (होतं कधी कधी एखादं अक्षर इकडं तिकडं) खूप शिकलेली आणि मातब्बर माणसं की! सोशल मिडीया वर लिमिटेड बंदी आणायचा विषय पण झालेला की कधी मधी...! राहुल बाबा पण जातच होता की अधून मधून गरी बांच्या घरी चहापाणी, जेवणखाणाला. चीटिंग नै करायची बाबा अशी. जिंकला तर जिंकला. बघायची वाट थोडे दिवस आता. 'अच्चे दिन आयेले हय' :)

In reply to by प्यारे१

अरे बाबा चिटिंग कसली?.माझे आधिचे प्रतिसाद पहा.नरेंद्रच पंतप्रधान व्हावा असे मलाही वाटत होते़. कॉन्ग्रेसनेही प्रचाराची सर्व हत्यारे वापरली असणारच पण तरीही ह्यांच्या तुलनेत ते नक्कीच कमी पडले. शिवाय रोजची भ्रष्टाचाराची प्रकरणे,मनमोहनांचे प्रसिद्ध मौन हे घटक कारणीभूत होतेच.

प्रभाकर पेठकर Sat, 05/17/2014 - 09:43
बिजेपीने मिळविलेले दैदिप्यमान यश नक्कीच कौतुकास्पद आहे. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचे मोठ्ठाल्ले घोटाळे, आमचं कोण काय वाकडं करू शकतो हा माज आणि महागाईने ग्रस्त सामान्य जनता ह्या सर्वाचा परिपाक म्हणूनच काँग्रेसची ह्या निवडणूकीत अक्षरशः वाताहात झाली. बिजेपीच्या हाती सत्तेची मशाल आली आहे. त्यांनी देशाला भरभराटीच्या मार्गावर नेऊन सोडावे. शिक्षण, पिण्याचे पाणी, वैद्यकिय सेवा, रस्ते आदी मूलभूत गरजा स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षांनीही दारूण अवस्थेत आहेत त्या सुधारून भारताची लाज वाचवावी. नरेन्द्र मोदी १० वर्षे पंतप्रधान राहतील आणि भारताच्या इतिहासातला हा सुवर्णकाळ असेल अशी भविष्यवाणी कोणीतरी उच्चारली आहे ती खरी ठरो.

सस्नेह Sat, 05/17/2014 - 14:56
तेव्हा करायचे जेव्हा नूतन सरकारकडून काही लोकहिताची देशहिताची कामे होतील. खरे आव्हान पुढेच आहे. म्हणून तूर्त मोदी सरकारला शुभेच्छा !

बॅटमॅन Sat, 05/17/2014 - 15:26
लोकहो पण अजून सगळे संपले नाही. विधानसभा निवडणुकाही तोंडावरच आहेत. केंद्रात मोदी आला म्हणून सगळं संपलं नाही. मोदीकडे बघून लोकांनी लोकसभेला मतदान केलं पण विधानसभेत तेवढं पुरं पडणार नाही. अधिक लोकलाईझ्ड मुद्यांवर बीजेपी एट ऑल काय करतात ते पाहणं उद्बोधक ठरेल. त्यांची खरी कसोटी तिकडे लागणार आहे.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य Sat, 05/17/2014 - 23:01
त्यांची खरी कसोटी तिकडे लागणार आहे.
हीच लोकशाहीची खरी मजा आहे. सगळ्यांना व्यवस्थीत तव्यावर ठेवता येते.

ह्या अभिनंदांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आगामी निवडनुकीसाठी महायुतीची घोषणा काय असेल अब की बार ..... अवांतर मायलेक राजीनामा देत आहेत हे वाचून जीव गलबलला त्यांची भाषणे म्हणजे निर्भेळ करमणूक त्याला कपिलरात्रीचा सवंग पणा नाही आणि त्यांच्या मुलाखती म्हणजे हास्यकवी संमेलन मम्मी तुसी ना जो रीयंका लावो , पार्टी बचाव प्रियंका इज इंडिया

In reply to by विकास

मस्त आहेत विनोद ! काही तर अगदी ज्युनियर बुशच्या तोडीचे आहेत !! राहूल आणि त्याच्या लेखनिकांना "स्टँड अप कॉमेडी"चे मैदान मारण्याची प्रचंड संधी आहे. आता हे सगळे विनोद "भोगायला" न लावता त्यांचा देशाच्या जनतेला निखळ आनंदाने आस्वाद देता येईल... आणि गाठी दोन पैसेही पडतील आणि लोक त्यांना "बेकार आहेत" असे म्हणात नाहीत... फार फार तर विनोद बेकार आहेत असे म्हणतील ! =))

नरेंद्र मोदींचे अभिनंदन, एकहाती सत्तेवर येणे काय म्हणतात ते नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. पक्षातल्या जेष्ठ नेत्यांची नाराजी असूनही एकट्याने सभा घेणे, माध्यमांचा योग्य वापर, काँग्रेसला कंटाळलेल्या जनतेला आपण आणि भाजपाच योग्य पर्याय असल्याचे दाखवून दिले. त्याचबरोबर, लोकशाहीचा प्रगल्भपणे वापर करणा-या जनतेचेही मनःपूर्वक अभिनंदन. भारत नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली सर्व दृष्टीने अधिकाधिक विकास करेल आणि एक आदर्श सरकार बनेल अशी कामनाही व्यक्त करतो. भारतीय लोकशाहीचा विजय असो. -दिलीप बिरुटे

दुश्यन्त Sun, 05/18/2014 - 19:49
महाराष्ट्रातील जनतेचा केंद्रातल्या सरकारपेक्षा जास्त राग राज्यातल्या कॉंग्रेस आघडी सरकारवर होता/आहे. १५ वर्षापासून कॉंग्रेस एनसीपीचे राज्य आहे. सिंचन घोटाळा, आदर्श, जमिनी हडपणे,गारपीट, शेतकरी आत्महत्या आदी बाबींत दाखवलेली सरकारी अनास्था, गुंडागर्दी (राणे-भुजबळ- तटकरे-अजित पवार वगैरे),महागाई, बेताल वक्तव्ये यामुळे या आघाडी सरकारचे जाणे अटळ आहे मात्र महायुतीने हुरळून न जाता एकजुटीने, जोमाने प्रचार करणे आवश्यक आहे.

राही Tue, 05/20/2014 - 17:37
आता २१ तारखेला मंत्रिमंडळाचा चेहरा जाहीर झाला की पुढच्या धोरणांचा काहीसा अंदाज येईल. आता आणखी उत्सुकता आहे ती महाराष्ट्र विधानसभेसाठी असणार्‍या युतीबद्दल. जागांच्या संख्यावाटपासाठी वाद होणारच. भाजप आता सेकंड फिडल वाजवण्यावर संतुष्ट राहीलच असे नाही.

विकास Wed, 05/21/2014 - 03:15
खालील व्हिडीओ हा ८ मिनिटांच्या किंचीत आधीपासून बघा. हेडलेस चिकन या शब्दाचा अर्थ समजेल. :)

In reply to by विकास

हुप्प्या Wed, 05/21/2014 - 09:32
मग केतकर असले मुद्दे काढून आकाश पाताळ एकत्र करणार. नेहरूंचे नाव नाही घेतले, गांधींचे नाव नाही घेतले, आंबेडकरांचे नाव नाही घेतले वगैरे ट्यँव ट्यँव ट्यँव चालू. काँग्रेसचे लोक टिळकांचे नाव किती घेतात? ते नसते तर काँग्रेसच बनली नसती. दादाभाई नौरोजी? लाला लजपतराय? बिपिनचंद्र पाल?

विकास Wed, 05/21/2014 - 07:43
इलिनॉय मधील काँग्रेसमन (/खासदार)Aaron Schock यांनी युट्यूबवर नरेन्द्र मोदींचे केलेले अभिनंदन! :)

जयनीत Mon, 05/26/2014 - 11:00
विजेत्यांचे अभिनंदन आणि आपल्या मुद्द्यां आणि निष्ठेसाठी साधनांची कमतरता असूनही नेटाने निवडणूक लढवणा-या काही पक्ष आणि त्यांची खंद्या कार्यकर्त्यांचेही मनपूर्वक अभिनदन. झालेल्या बदलातुन देश आणि लोकशाही समृद्ध होइल हीच अपेक्षा.

राही Tue, 05/27/2014 - 19:34
अभिनंदनात सहभागी झालेल्या सर्वांना धन्यवाद. सुप्रशासन येवो ही शुभेच्छा आणि सदिच्छा.
भाजपला पूर्ण आणि स्वच्छ बहुमत मिळाल्याबद्दल अभिनंदन. देशाला बदल हवा होता, तो मिळाला. आज देशभर उत्सव साजरा होतो आहे. देशभरातच नव्हे तर परदेशातही जिथे जिथे भारतीय आहेत तिथे रात्री जागून लोक दिवाळी साजरी करीत आहेत. पुढील वाटचालीसाठी मोदींना आणि त्यांच्या नवीन सरकारला मनापासून शुभेच्छा.

लोकसभा निवडणुक २०१४ निकाल - १

विकास ·
नमस्कार मंडळी! आज अनेक वर्षांनी आणि अनेक निवडणुकांंनंतर आधी निवडणुक आणि आता निकालांबाबत उत्सुकतेचे वातावरण आहे. काही ठिकाणी ही उत्सुकता ही उत्साहाने भरलेली आहे तर काही ठि़काणी चिंतेने ग्रासलेली आहे. नक्की काय होत आहे हे अजून काही तासात समजेल. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार भाप्रवे ९:३० पर्यंत सुरवातीचे ट्रेंड्स समजतील. पण दुपारी १२ पर्यंत चित्र स्पष्ट दिसेल. हा धागा निवडणुक निकालांवर चर्चा, अपडेट्स करण्यासाठी काढत आहे. आयबीएन ने गेल्या सर्व निवडणुकांवर आधारीत इन्फोचार्ट तयार केला आहे.

श्रीरंग_जोशी Fri, 05/16/2014 - 07:18
आज जे निकाल लागण्याची शक्यता आहे त्याची मी गेल्या दहा वर्षांपासून वाट पाहत आहे. २००४ व २००९ मध्ये निकाल (लोकसभा व महाराष्ट्रातील विधानसभा) बघतांना माझा चांगलाच हिरमोड झाला होता. व्यक्तिशः आजचे निकाल तेवढे उत्कंठावर्धक वाटत नाहीयेत. विविध माध्यमांनी व्यक्त केलेले अंदाज प्रत्यक्ष निकालांच्या जवळ जाणारे असतील याची खात्री आहे. अजून ५ महिन्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल मात्र आजपेक्षाही अधिक उत्कंठावर्धक असतील. महाराष्ट्रातील मतदारांची काही खात्री वाटत नाही (गेल्या ३ निवडणुकांवरून), विधानसभेसाठी फारच क्षमाशीलपणे मतदान करतात :-).

धर्मराजमुटके Fri, 05/16/2014 - 07:37
१. आमचा मतदारसंघ - प्रिया दत्त वि. पुनम महाजन. २. वाराणसी (मोदी वि. केजरीवाल) ३. निलेश राणे (कोकण) ४. छगन भुजबळ (नाशिक) ५. किरीट सोमैया वि. मेघा पाटकर वि. संजय पाटील ६. शिरुर ( आढाळराव वि. देवदत्त निकम

In reply to by पेरु

भीडस्त Fri, 05/16/2014 - 16:17
आढळराव पाटील २८६००० पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर अजून एक फेरी बाकी आहे. कैबिनेट स्तरावरचे मंत्रीपद मिळणार असं दिसतंय आमच्या मतदारसंघाला....

यशोधरा Fri, 05/16/2014 - 07:52
ऑफिसमध्ये सगळे जण आत्ता एकाच विषयावर बोलताहेत - नि आणि नि - निवडणूका आणि निकाल. टीव्ही चॅनेल (सीएनबीसी सुरु असतं हो आमच्या हापिसात! ) सकाळपासून निकालाच्या प्रोजेक्शनच्या बातम्या दाखवत आहे. खरं सांगू तर कंटाळा आला ह्याचा आता.

विकास Fri, 05/16/2014 - 09:15
महाराष्ट्रात मोदींची लाट. सुशीलकुमार शिंदे, निलेश राणे, छगन भुजबळ, विश्वजित कदम, विजयससिंह मोहिते-पाटील पिछाडीवर.

आनन्दिता Fri, 05/16/2014 - 10:16
मनसे फॅक्टरची यावेळी ऐसी की तैसी झालिये. मुंबई सहाच्या सहा जागा युतीकडे जाणार बहुतेक. निलेश राणे चा पराभव व्हायचेच चान्सेस जास्त वाटतायत. *yahoo*

खबो जाप Fri, 05/16/2014 - 10:22
Alliance Lead+Results Change BJP+ 307 +166 Cong+ 72 -160 Others 157 -6 Awaited 7 http://www.ndtv.com

In reply to by विकास

बाळ सप्रे Fri, 05/16/2014 - 10:36
काँग्रेसचे निदान बरोबर आहे.. कारणीभूत आहेत.. सोनिया, मनमोहनसिंग, कलमाडी, राजा, कन्निमोळी, वद्रा..इ. इ. बिचार्‍या राहुलचा काय दोष?? :-)

संपत Fri, 05/16/2014 - 10:33
भाजपाचे हार्दिक अभिनंदन. कॉंग्रेसचा पार बोऱ्या वाजला हे सर्वात उत्तम झाले. पण हे मिळालेले संपूर्ण बहुमत भाजपने राम मंदिरासारख्या प्रश्नांवर वापरण्यापेक्षा विकासासाठी वापरावे. आपचे काय होतंय ते बघुया.

In reply to by संपत

मतदारांनी भाजपाला मत विकास आणि सामाजिक न्यायासाठी दिलेले आहे. तस्मात भाजपाने दिलेली सर्व आश्वासने पाळावीत, राम मंदिरासह.

In reply to by आनन्दिता

सुहासदवन Fri, 05/16/2014 - 11:46
स्वतः राखी सावंत आणि तिच्या पक्षाचा उमेदवार हे दोघे सोडून बाकी ते कोण "अब तक छप्पन्न" आहेत, ज्यांनी तिला मत दिले? त्यांना काय शिक्षा द्यावी बर्रर्रर्र>>>>

श्रीरंग_जोशी Fri, 05/16/2014 - 07:18
आज जे निकाल लागण्याची शक्यता आहे त्याची मी गेल्या दहा वर्षांपासून वाट पाहत आहे. २००४ व २००९ मध्ये निकाल (लोकसभा व महाराष्ट्रातील विधानसभा) बघतांना माझा चांगलाच हिरमोड झाला होता. व्यक्तिशः आजचे निकाल तेवढे उत्कंठावर्धक वाटत नाहीयेत. विविध माध्यमांनी व्यक्त केलेले अंदाज प्रत्यक्ष निकालांच्या जवळ जाणारे असतील याची खात्री आहे. अजून ५ महिन्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल मात्र आजपेक्षाही अधिक उत्कंठावर्धक असतील. महाराष्ट्रातील मतदारांची काही खात्री वाटत नाही (गेल्या ३ निवडणुकांवरून), विधानसभेसाठी फारच क्षमाशीलपणे मतदान करतात :-).

धर्मराजमुटके Fri, 05/16/2014 - 07:37
१. आमचा मतदारसंघ - प्रिया दत्त वि. पुनम महाजन. २. वाराणसी (मोदी वि. केजरीवाल) ३. निलेश राणे (कोकण) ४. छगन भुजबळ (नाशिक) ५. किरीट सोमैया वि. मेघा पाटकर वि. संजय पाटील ६. शिरुर ( आढाळराव वि. देवदत्त निकम

In reply to by पेरु

भीडस्त Fri, 05/16/2014 - 16:17
आढळराव पाटील २८६००० पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर अजून एक फेरी बाकी आहे. कैबिनेट स्तरावरचे मंत्रीपद मिळणार असं दिसतंय आमच्या मतदारसंघाला....

यशोधरा Fri, 05/16/2014 - 07:52
ऑफिसमध्ये सगळे जण आत्ता एकाच विषयावर बोलताहेत - नि आणि नि - निवडणूका आणि निकाल. टीव्ही चॅनेल (सीएनबीसी सुरु असतं हो आमच्या हापिसात! ) सकाळपासून निकालाच्या प्रोजेक्शनच्या बातम्या दाखवत आहे. खरं सांगू तर कंटाळा आला ह्याचा आता.

विकास Fri, 05/16/2014 - 09:15
महाराष्ट्रात मोदींची लाट. सुशीलकुमार शिंदे, निलेश राणे, छगन भुजबळ, विश्वजित कदम, विजयससिंह मोहिते-पाटील पिछाडीवर.

आनन्दिता Fri, 05/16/2014 - 10:16
मनसे फॅक्टरची यावेळी ऐसी की तैसी झालिये. मुंबई सहाच्या सहा जागा युतीकडे जाणार बहुतेक. निलेश राणे चा पराभव व्हायचेच चान्सेस जास्त वाटतायत. *yahoo*

खबो जाप Fri, 05/16/2014 - 10:22
Alliance Lead+Results Change BJP+ 307 +166 Cong+ 72 -160 Others 157 -6 Awaited 7 http://www.ndtv.com

In reply to by विकास

बाळ सप्रे Fri, 05/16/2014 - 10:36
काँग्रेसचे निदान बरोबर आहे.. कारणीभूत आहेत.. सोनिया, मनमोहनसिंग, कलमाडी, राजा, कन्निमोळी, वद्रा..इ. इ. बिचार्‍या राहुलचा काय दोष?? :-)

संपत Fri, 05/16/2014 - 10:33
भाजपाचे हार्दिक अभिनंदन. कॉंग्रेसचा पार बोऱ्या वाजला हे सर्वात उत्तम झाले. पण हे मिळालेले संपूर्ण बहुमत भाजपने राम मंदिरासारख्या प्रश्नांवर वापरण्यापेक्षा विकासासाठी वापरावे. आपचे काय होतंय ते बघुया.

In reply to by संपत

मतदारांनी भाजपाला मत विकास आणि सामाजिक न्यायासाठी दिलेले आहे. तस्मात भाजपाने दिलेली सर्व आश्वासने पाळावीत, राम मंदिरासह.

In reply to by आनन्दिता

सुहासदवन Fri, 05/16/2014 - 11:46
स्वतः राखी सावंत आणि तिच्या पक्षाचा उमेदवार हे दोघे सोडून बाकी ते कोण "अब तक छप्पन्न" आहेत, ज्यांनी तिला मत दिले? त्यांना काय शिक्षा द्यावी बर्रर्रर्र>>>>

सौदी क्षणचित्रे : ०२ : दम्माम

डॉ सुहास म्हात्रे ·

मुक्त विहारि Fri, 05/16/2014 - 01:59
ये तो हमनें देखाइच नहीं, क्यों की मरेकू मालूमच नहीं था.सिर्फ वो मॉल में गया और ए.सी. में घूम के आया. फिर एक बार जाना पडेंगा. एक्का साहेब, आता परत कधी येत आहात?त्या इदच्या सुट्ट्या सुरु व्हायच्या आत आलांत तर बरे.सध्या आम्ही इथे ३ मिपाकर आहोतच आणि जुबेलला पण एक मिपाकर आहेच.आम्हा ४ जणांना दम्माम्,खोबार फिरवून आणाच.काय गाडी-घोडा-तेल-पाणी लागेल ते आम्ही बघू. (अवांतर, तुम्ही डॉ. पेशा सोडून पर्यटन व्यवसायात शिरला नाहीत, ते बरेच आहे.त्या बाकीच्या यात्रा कंपन्या कधीच बंद पडल्या असत्या आणि दुकानाला टाळे लावून त्यांचे मालक तीर्थयात्रेला गेले असते.)

In reply to by मुक्त विहारि

रेवती Fri, 05/16/2014 - 02:37
दुकानाला टाळे लावून त्यांचे मालक तीर्थयात्रेला गेले असते. तिथेही त्यांना शांतता मिळाली नसती. एक्कासाहेब आपल्याला मक्का ते काशीदर्शनही घडवतीलच. त्यांना पाहून मालकांना "जाये तो जाये कहाँ" असे वाटेल.

In reply to by रेवती

मुक्त विहारि Fri, 05/16/2014 - 16:15
आणि मदिनाचे देखील... बाकी वाक्याच्या भावार्थाशी सहमत... (अवांतर... शब्दाचा कीस काढण्यापेक्षा, भावार्थ घेणे उत्तम)

In reply to by मुक्त विहारि

सुन्दर लेखमाला, मी जुबेलला असतो. गाडी-घोडा-तेल-पाणी लागेल ते आम्ही बघू पन दवा दारु सोडुन बोला. सौदी विशयी गैर्समज दुर करा या लेखातुन.

In reply to by मुक्त विहारि

नरेंद्र गोळे गुरुवार, 05/22/2014 - 08:05
तुम्ही डॉ. पेशा सोडून पर्यटन व्यवसायात शिरला नाहीत, ते बरेच आहे.त्या बाकीच्या यात्रा कंपन्या कधीच बंद पडल्या असत्या आणि दुकानाला टाळे लावून त्यांचे मालक तीर्थयात्रेला गेले असते.>>>>> नक्कीच. मी तर एक्का साहेबांनी ह्या योजनेचा गांभीर्याने विचार करावा असे सुचवेन. माझ्या तरी पाहण्यात, एवढ्या बारकाईने आणि नेमकेपणाने कुणी विश्वदर्शन करवून दिल्याची उदाहरणे नाहीत!

रेवती Fri, 05/16/2014 - 02:35
फोटू बघतिये. पारंपारिक पद्धतीने बैठक मारून स्वयंपाक करवणारी उपहारगृहे आपल्याकडेही हवीत. तो प्रकार मला सोयिस्कर वाटला. विमानतळ अतिभव्य आहे. सफर नेहमीप्रमाणेच चांगली चालूए.

यशोधरा Fri, 05/16/2014 - 07:00
पारंपारिक उपहारगृह आवडले. असं मस्तपैकी बसून आरामात खायला प्यायला, गप्पा, गाणी, जवळची नातेवाईक मंडळी आणि मित्रमंडळ हवं! और क्या मंगताय! :) काश्मिरी काहव्याची (चहा) आठवण झाली.. ती खिडकी काय देखणी आहे!

प्रचेतस Fri, 05/16/2014 - 16:04
मस्त झालाय हा भाग. देखणं आहे विमानतळ. शहराच्या अगदी लगेचच बाहेर रूक्ष वाळवंट दिसतेय. दम्माम हे वाळवंटातले मरूस्थळ आहे का तिकडची झाडी/ हिरवळ ही कृत्रिमरित्या तयार केली गेलीय?

In reply to by प्रचेतस

दम्माम शहर वाळवंटातच वसले आहे. पण शहरात झाडेझुडुपे बरीच लावली आहेत. रस्त्यांचे दुभाजक आणि काही ठिकाणी रस्त्यांच्या कडांना हिरवळींनी बनविले आहे. सौदीत मोठी मरुस्थळेही आहेत. त्यापैकी काहींना आपण भेट देणार आहोतच.

In reply to by प्यारे१

कधीच्च! च्च! च्च! ? तुमचे घोडे आवरा (म्हंजे होल्ड युवर हॉर्सेस, हो ;) ). संपूर्ण लेखमालेचा आखोदेखा हाल पहा आणि मग मत काय ते बनवा. काय म्हंताव ?

तुमचा अभिषेक Fri, 05/16/2014 - 16:32
तेथून पुढे निघाल्यावर मात्र इमारतीच्या भव्यपणामुळे विमानतळ ओकाबोका वाटू लागतो ! प्रतिसादात हेच लिहिणार होतो, बरेचसे फोटो पाहून असेच वाटले. लोकसंख्येची घनता कमीच जाणवली. स्त्रिया देखील बुरखेधारी.. रेस्टॉरंट मात्र छान, हटके, संस्कृती दाखवणारे ..

संग्राम, मुक्त विहारि, रेवती, यशोधरा, वल्ली, प्रशांत आवले, तुमचा अभिषेक आणि सूड : सहलितल्या सहभागासाठी धन्यवाद !

भाते Sat, 05/17/2014 - 11:27
इथे जमिनीवर बैठक मारून अरबी कॉफीचा आस्वाद घेत मिपाकरांबरोबर एक कट्टा करायला हरकत नाही. :)

मदनबाण Tue, 05/20/2014 - 14:00
वल्ला ! क्या क्या एक एक चीज दिखती ! बहोत खुबसुरत लगती... :) इतना पैसा मिलती फिर भी उसका बराबर इस्तमाल करती...इसको बोलती समझदारी ! :) {मदन-वल-प्रेमी-वल-आषिक-बिन-बाण } ;)

इस्पिकचा एक्का यांना एक विनंती : दम्माम-खोबार हायवे जिथे खोबारमधे उतरतो, तिथे एअरलाइन सेन्टर नावाची उंच इआरत आहे त्या चौकातून थोडे खोबारच्या दिशेने गेल्यास, अल मक्तबा नावाचे एक मोठे दुकान आहे. त्या इमारतीचा फोटू देता येईल का? मी तिथेच रहायचो. आमच्या वेळी क्यामेरे फारसे कोणी बाळगत नसे व अशी उघडपणे फोटोग्राफी करायची पद्धतही नव्हती.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आठ वर्षांपूवी तेथे पोचलो तेव्हा इकडे फोटो काढू नको, तिकडे फोटो काढू नको असे म्हणून तेथल्या स्थिरस्थावर झालेल्या मंडळींनी भर गावांत फोटो काढू दिले नाही. जेव्हा मी स्थिरस्थावर झालो तोपर्यंत "शहरासारखे शहर. काय फोटो काढायचे" म्हणून मी काढले नाहीत. आता लेख लिहिताना ती उणीव जाणवतेय... विषेशतः कॉर्निश, काही इमारती आणि पुलांचे फोटो संग्रही असते तर बरे झाले असते असे वाटते. तेव्हा क्षमस्व :(

मुक्त विहारि Fri, 05/16/2014 - 01:59
ये तो हमनें देखाइच नहीं, क्यों की मरेकू मालूमच नहीं था.सिर्फ वो मॉल में गया और ए.सी. में घूम के आया. फिर एक बार जाना पडेंगा. एक्का साहेब, आता परत कधी येत आहात?त्या इदच्या सुट्ट्या सुरु व्हायच्या आत आलांत तर बरे.सध्या आम्ही इथे ३ मिपाकर आहोतच आणि जुबेलला पण एक मिपाकर आहेच.आम्हा ४ जणांना दम्माम्,खोबार फिरवून आणाच.काय गाडी-घोडा-तेल-पाणी लागेल ते आम्ही बघू. (अवांतर, तुम्ही डॉ. पेशा सोडून पर्यटन व्यवसायात शिरला नाहीत, ते बरेच आहे.त्या बाकीच्या यात्रा कंपन्या कधीच बंद पडल्या असत्या आणि दुकानाला टाळे लावून त्यांचे मालक तीर्थयात्रेला गेले असते.)

In reply to by मुक्त विहारि

रेवती Fri, 05/16/2014 - 02:37
दुकानाला टाळे लावून त्यांचे मालक तीर्थयात्रेला गेले असते. तिथेही त्यांना शांतता मिळाली नसती. एक्कासाहेब आपल्याला मक्का ते काशीदर्शनही घडवतीलच. त्यांना पाहून मालकांना "जाये तो जाये कहाँ" असे वाटेल.

In reply to by रेवती

मुक्त विहारि Fri, 05/16/2014 - 16:15
आणि मदिनाचे देखील... बाकी वाक्याच्या भावार्थाशी सहमत... (अवांतर... शब्दाचा कीस काढण्यापेक्षा, भावार्थ घेणे उत्तम)

In reply to by मुक्त विहारि

सुन्दर लेखमाला, मी जुबेलला असतो. गाडी-घोडा-तेल-पाणी लागेल ते आम्ही बघू पन दवा दारु सोडुन बोला. सौदी विशयी गैर्समज दुर करा या लेखातुन.

In reply to by मुक्त विहारि

नरेंद्र गोळे गुरुवार, 05/22/2014 - 08:05
तुम्ही डॉ. पेशा सोडून पर्यटन व्यवसायात शिरला नाहीत, ते बरेच आहे.त्या बाकीच्या यात्रा कंपन्या कधीच बंद पडल्या असत्या आणि दुकानाला टाळे लावून त्यांचे मालक तीर्थयात्रेला गेले असते.>>>>> नक्कीच. मी तर एक्का साहेबांनी ह्या योजनेचा गांभीर्याने विचार करावा असे सुचवेन. माझ्या तरी पाहण्यात, एवढ्या बारकाईने आणि नेमकेपणाने कुणी विश्वदर्शन करवून दिल्याची उदाहरणे नाहीत!

रेवती Fri, 05/16/2014 - 02:35
फोटू बघतिये. पारंपारिक पद्धतीने बैठक मारून स्वयंपाक करवणारी उपहारगृहे आपल्याकडेही हवीत. तो प्रकार मला सोयिस्कर वाटला. विमानतळ अतिभव्य आहे. सफर नेहमीप्रमाणेच चांगली चालूए.

यशोधरा Fri, 05/16/2014 - 07:00
पारंपारिक उपहारगृह आवडले. असं मस्तपैकी बसून आरामात खायला प्यायला, गप्पा, गाणी, जवळची नातेवाईक मंडळी आणि मित्रमंडळ हवं! और क्या मंगताय! :) काश्मिरी काहव्याची (चहा) आठवण झाली.. ती खिडकी काय देखणी आहे!

प्रचेतस Fri, 05/16/2014 - 16:04
मस्त झालाय हा भाग. देखणं आहे विमानतळ. शहराच्या अगदी लगेचच बाहेर रूक्ष वाळवंट दिसतेय. दम्माम हे वाळवंटातले मरूस्थळ आहे का तिकडची झाडी/ हिरवळ ही कृत्रिमरित्या तयार केली गेलीय?

In reply to by प्रचेतस

दम्माम शहर वाळवंटातच वसले आहे. पण शहरात झाडेझुडुपे बरीच लावली आहेत. रस्त्यांचे दुभाजक आणि काही ठिकाणी रस्त्यांच्या कडांना हिरवळींनी बनविले आहे. सौदीत मोठी मरुस्थळेही आहेत. त्यापैकी काहींना आपण भेट देणार आहोतच.

In reply to by प्यारे१

कधीच्च! च्च! च्च! ? तुमचे घोडे आवरा (म्हंजे होल्ड युवर हॉर्सेस, हो ;) ). संपूर्ण लेखमालेचा आखोदेखा हाल पहा आणि मग मत काय ते बनवा. काय म्हंताव ?

तुमचा अभिषेक Fri, 05/16/2014 - 16:32
तेथून पुढे निघाल्यावर मात्र इमारतीच्या भव्यपणामुळे विमानतळ ओकाबोका वाटू लागतो ! प्रतिसादात हेच लिहिणार होतो, बरेचसे फोटो पाहून असेच वाटले. लोकसंख्येची घनता कमीच जाणवली. स्त्रिया देखील बुरखेधारी.. रेस्टॉरंट मात्र छान, हटके, संस्कृती दाखवणारे ..

संग्राम, मुक्त विहारि, रेवती, यशोधरा, वल्ली, प्रशांत आवले, तुमचा अभिषेक आणि सूड : सहलितल्या सहभागासाठी धन्यवाद !

भाते Sat, 05/17/2014 - 11:27
इथे जमिनीवर बैठक मारून अरबी कॉफीचा आस्वाद घेत मिपाकरांबरोबर एक कट्टा करायला हरकत नाही. :)

मदनबाण Tue, 05/20/2014 - 14:00
वल्ला ! क्या क्या एक एक चीज दिखती ! बहोत खुबसुरत लगती... :) इतना पैसा मिलती फिर भी उसका बराबर इस्तमाल करती...इसको बोलती समझदारी ! :) {मदन-वल-प्रेमी-वल-आषिक-बिन-बाण } ;)

इस्पिकचा एक्का यांना एक विनंती : दम्माम-खोबार हायवे जिथे खोबारमधे उतरतो, तिथे एअरलाइन सेन्टर नावाची उंच इआरत आहे त्या चौकातून थोडे खोबारच्या दिशेने गेल्यास, अल मक्तबा नावाचे एक मोठे दुकान आहे. त्या इमारतीचा फोटू देता येईल का? मी तिथेच रहायचो. आमच्या वेळी क्यामेरे फारसे कोणी बाळगत नसे व अशी उघडपणे फोटोग्राफी करायची पद्धतही नव्हती.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आठ वर्षांपूवी तेथे पोचलो तेव्हा इकडे फोटो काढू नको, तिकडे फोटो काढू नको असे म्हणून तेथल्या स्थिरस्थावर झालेल्या मंडळींनी भर गावांत फोटो काढू दिले नाही. जेव्हा मी स्थिरस्थावर झालो तोपर्यंत "शहरासारखे शहर. काय फोटो काढायचे" म्हणून मी काढले नाहीत. आता लेख लिहिताना ती उणीव जाणवतेय... विषेशतः कॉर्निश, काही इमारती आणि पुलांचे फोटो संग्रही असते तर बरे झाले असते असे वाटते. तेव्हा क्षमस्व :(
=================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८...