मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उभा ठाकला

रोहन जगताप ·

निनाद 04/12/2024 - 05:36
नवकाव्याच्या मुक्तछंद वादळात वृत्तबद्ध काव्याची मशाल पेटवल्याबद्दल अनेक धन्यवाद! छान आहे!

निनाद 04/12/2024 - 05:36
नवकाव्याच्या मुक्तछंद वादळात वृत्तबद्ध काव्याची मशाल पेटवल्याबद्दल अनेक धन्यवाद! छान आहे!
भरण्या घडा रिक्त जो सांडलेला खेळण्या उगा डाव हा मांडलेला रडण्या कुठे काळ तो थांबलेला भिडण्या उभा ठाकला पांगलेला
जगाने जरी हारला मानलेला समर्पूण सारे जगा जाणलेला प्रसंगात ओढून तो ताणलेला सुटे बाण लक्ष्याकडे ठाणलेला
दिवा तेवता जागला लाविलेला उभी रात्र सांभाळतो वाहिलेला स्वतः साक्ष अंधार तो राहिलेला असा सूर्य नारायणा पाहिलेला
ललाटात आभाळही फाटलेला एकांतात सारे उरी दाटलेला जमा संपलेलाच तो वाटलेला तयातून साम्राज्यही थाटलेला

पावे मराठी

रोहन जगताप ·

राहूल,प्रदीर्घ, म्हणजे तब्बल बारा वर्ष काही महिने वाचन तपस्या केल्यानंतर पहिली वहीली कविता मिपावर डकवलीत. पहिलाच प्रयत्न चांगला जमला आहे. म्हणून पहिल्या धारेची. प्रथम दर्शनीच विडंबन करण्याची उबळ आली होती पण आपले इतर लेखन बघावे या हेतूने पान पालटले. बघतो तर "एकलीच दिपकळी मी अभागीनी ", एकच कविता दिसली. विडंबनाचा मोह टाळला. तरी दोन लाईना वानगीदाखल, बाटली ओतून प्यावी जराशी ताटलीतून मजा घ्यावी चकण्या ची.... मला कविता खुप आवडतात.खरा मद्यपि कुठल्याच मद्याला नावे ठेवत नाही. आपली कवीता समजून घेण्यासाठी संध्याकाळी बसावे लागेल. प्रतिसाद आणी वाचक संख्येवर जाऊ नका. ते फक्त नंबर आहेत. मिपावर लिहीत रहा. दर्दी वाचक वाचतात. पु.ले. शु.(पुढील लेखनास शुभेच्छा).

In reply to by कर्नलतपस्वी

प्रचेतस 23/10/2024 - 15:06
नवकवी हळवे असतात असा अनुभव आहे. विडंबन न केल्यामुळे एका नवकवीच्या भ्रुणहत्येच्या पातकापासून तुम्ही मुक्त झालात.

In reply to by कर्नलतपस्वी

रोहन जगताप 24/10/2024 - 00:02
मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाला आहे म्हटल्यावर त्या आनंदात माय मराठीला वंदन करून आपल्या तर्फे एक छोटे पुष्प वहावे या उद्देशाने हा एक छोटासा प्रयत्न केला आहे. परंतु १२ वर्षांची तपश्चर्या कमी पडल्याने आता आणखी १२ वर्षांची तपश्चर्या करण्याची आवश्यकता आहे असे दिसते. तूर्तास मला अभिप्रेत असलेला या कवितेचा भावार्थ खाली स्वतंत्र प्रतिक्रियेत देत आहे. कविता ‘सुमंदारमाला’ वृत्ताच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

रोहन जगताप 24/10/2024 - 00:06
मराठीत बोलून पावे मराठी मनातून वाहून विश्वात ती उभी राहता हीच जीवंत पाठी नसे भ्रांत जन्मास या कोणती
भावार्थ : देवाची आराधना केल्यानंतर देव जसा पावतो, प्रसन्न होतो, तशी मराठी भाषा पावण्यासाठी, प्रसन्न होण्यासाठी केवळ मराठी भाषेत बोलणे एव्हढेच पुरेसे आहे. विश्वाचे प्रतिबिंब हे सरतेशेवटी आपल्या मनात आणि तेही मराठी भाषेत उमटलेले आहे. पर्यायाने विश्वाचेच एक प्रतिरुप होऊन मराठी भाषा ही आपल्या मनातून सार्‍या विश्वात वहात आहे. देव जसा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, तशी साक्षात मराठी भाषाच जेंव्हा आपल्या पाठीशी जिवंतपणे उभी राहते, तेंव्हा या जन्मास, जीवनास कसलीही भ्रांत, चिंता, विवंचना उरत नाही.
महा होय राष्ट्र कसूनी मराठी फुलावीत शब्दे जगी जागती पुढे चालता हीच आधार काठी भटक्या मनाला दिशा दावती
भावार्थ : शेतकरी जसा प्रेमाने, कष्टाने जमीन कसून शेती फुलवतो, मोठी करतो, तसे मराठी भाषा कसल्याने, तिच्यात कला, साहित्यनिर्मिती केल्याने हा आपला ‘महाराष्ट्र’ एक ‘महान राष्ट्र’ होईल. मराठी भाषेतील शब्द, विचार हे सबंध जगात जागेपणाने, जिवंतपणाने, द्रष्टेपणाने फुलून येतील, मुक्त होतील. अशाप्रकारे आयुष्यात पुढे झेप घेत असताना, मार्गस्थ असताना जेंव्हा कधी एखादा कठीण प्रसंग येईल, तेंव्हा त्या हळव्या क्षणी मराठी भाषेतील विचार, ओळी या एखाद्या काठीप्रमाणे आपल्याला तसेच पुढे चालत राहण्याकरीता आधार देतील, आणि जे आपले भटकणारे, भरकटलेले मन आहे त्यास ती निश्चित अशी दिशा दाखवेल, वैचारिक अधिष्ठान देईल.
जगण्यास लाभेल मत्ता मराठी कमाई घडे साथ येऊन ती कुटूंबास पोसून राहून गाठी समाजास संपन्न देऊन ती
भावार्थ : आपल्या जगण्यास जी काही धन-संपत्ती, मत्ता लागणार आहे, ती आपणास लाभायची असेल, तर त्याकरीता मराठी भाषेचे वैभव पुरेसे आहे. मराठी भाषेला सोबत घेतल्याने, या भाषेत व्यवहार केल्याने आपल्या आयुष्यात आयुष्याची कमाई होईल. आपणास एव्हढे भरभरून मिळेल की, आपल्या कुटूंबास पोसून, कुटूंबाचा उदरनिर्वाह सांभाळून, आपल्या सर्व गरजा नि स्वप्ने पूर्ण करुन त्याऊपर विपुल अशी धनसंपत्ती, ज्ञानसंपत्ती ही आपल्या जवळ, आपल्या गाठीशी उरेल, आणि स्वतःसह मराठी भाषा देखील भरुन पावेल. पर्यायाने मराठी भाषेची, भाषेने दिलेली ही संपन्नता ओघळून समस्त समाजास लाभेल आणि यात सर्वांचाच उत्कर्ष होईल.
असण्यास मिळून सत्ता मराठी स्वराज्यात मानात थाटून ती घुमूनी तिचा नाद दिशांत आठी स्वतःशीच विश्वास बाणून ती
भावार्थ : मानवी अस्तित्त्व हे या विश्वात आपल्या सत्तेने अस्तित्त्वात आहे, आणि मराठी भाषा ही आपल्यासाठी या सत्तेचे चलन आहे, साधन आहे. तिने आपल्या मनात, स्वराज्यात, स्वतःच्या राज्यात मानाने, आत्मसन्मानाने आपले अधिराज्य थाटले आहे. तिच्या सर्वभौमत्त्वाचा नाद पृथ्वीतलाच्या आठही दिशांमध्ये घुमत असून ती आपल्यात एक अजिंक्य असा दैवी विश्वास बाळगून आहे. कविता : ‘पावे मराठी’ । रोहन जगताप

ग्रेस समजला नाहीच मुळी कधी.. तो भावला.. प्रकर्षाने जाणवला..!! आई माझी कृष्णकळीतील विष विसरला कंस देवकीच्याही पुढे निघाला शुभ्र पांढरा हंस... आई माझी रांगोळीतील टिंब हरवली टिकली कशास पाडू दार, कराया भिंत घराची मधली... माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल..... माझी आई भिरभिर संध्या सूर्य दिलासा नश्वर शब्दांच्याही ओठी काव्यकुळातील भाषा.... आई माझी अरण्यसरिता चंद्र झुलविते पाणी रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणी... आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी संध्याकाळी भगवी होते तिच्या तनूतील ओवी.... आई माझी काजळभरला रे! मायेचा नखरा वेणीमधली नागीण खुडते जसा हिऱ्यांचा गजरा... आई माझी कंचुकीतल्या तरल स्तनांचे दूध गोरजवेळी वाटत फिरतो जोगी कुठला वेध ? संध्येसाठी माझी आई जपून उजळे वात अश्वत्थाम्यापरी हिंडतो जिथे भयंकर घात... त्याहीनंतर आई निघते कळशी घेऊन दूर तेव्हा कळतो खुळ्या नदीला या मादीचा सूर..... आई माझी झुळझुळतांना किणकिणतीही तारा तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा ~ग्रेस कवीता प्रसवते लिहीता येत नाही असे माझे मत आहे.ज्या दृष्टीकोनातून कवी विचार करतो तो विचार वाचकांपर्यंत जर पोहोचलाच नाही तर कवीता दुर्बोध होते. मग वाचक आवांतर गोष्टी शोधतो नाहीच समजली तर दुर्लक्ष करतो किंवा विडंवनाच्या दृष्टीकोनातून चाचपण्याचा प्रयत्न करतो. अर्थात कवी व वाचक या दोघांनाही यात दोष देता येत नाही. आपली कवीता आवडली हे प्रथमच नमूद केले आहे. कृपया हलकेच घ्या व लिहीत रहा. आयुष्याची झाली उजवण येतो तो क्षण आनंदाचा त्यामुळे जास्त गंभीर होत नाही. भावार्थ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद

राहूल,प्रदीर्घ, म्हणजे तब्बल बारा वर्ष काही महिने वाचन तपस्या केल्यानंतर पहिली वहीली कविता मिपावर डकवलीत. पहिलाच प्रयत्न चांगला जमला आहे. म्हणून पहिल्या धारेची. प्रथम दर्शनीच विडंबन करण्याची उबळ आली होती पण आपले इतर लेखन बघावे या हेतूने पान पालटले. बघतो तर "एकलीच दिपकळी मी अभागीनी ", एकच कविता दिसली. विडंबनाचा मोह टाळला. तरी दोन लाईना वानगीदाखल, बाटली ओतून प्यावी जराशी ताटलीतून मजा घ्यावी चकण्या ची.... मला कविता खुप आवडतात.खरा मद्यपि कुठल्याच मद्याला नावे ठेवत नाही. आपली कवीता समजून घेण्यासाठी संध्याकाळी बसावे लागेल. प्रतिसाद आणी वाचक संख्येवर जाऊ नका. ते फक्त नंबर आहेत. मिपावर लिहीत रहा. दर्दी वाचक वाचतात. पु.ले. शु.(पुढील लेखनास शुभेच्छा).

In reply to by कर्नलतपस्वी

प्रचेतस 23/10/2024 - 15:06
नवकवी हळवे असतात असा अनुभव आहे. विडंबन न केल्यामुळे एका नवकवीच्या भ्रुणहत्येच्या पातकापासून तुम्ही मुक्त झालात.

In reply to by कर्नलतपस्वी

रोहन जगताप 24/10/2024 - 00:02
मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाला आहे म्हटल्यावर त्या आनंदात माय मराठीला वंदन करून आपल्या तर्फे एक छोटे पुष्प वहावे या उद्देशाने हा एक छोटासा प्रयत्न केला आहे. परंतु १२ वर्षांची तपश्चर्या कमी पडल्याने आता आणखी १२ वर्षांची तपश्चर्या करण्याची आवश्यकता आहे असे दिसते. तूर्तास मला अभिप्रेत असलेला या कवितेचा भावार्थ खाली स्वतंत्र प्रतिक्रियेत देत आहे. कविता ‘सुमंदारमाला’ वृत्ताच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

रोहन जगताप 24/10/2024 - 00:06
मराठीत बोलून पावे मराठी मनातून वाहून विश्वात ती उभी राहता हीच जीवंत पाठी नसे भ्रांत जन्मास या कोणती
भावार्थ : देवाची आराधना केल्यानंतर देव जसा पावतो, प्रसन्न होतो, तशी मराठी भाषा पावण्यासाठी, प्रसन्न होण्यासाठी केवळ मराठी भाषेत बोलणे एव्हढेच पुरेसे आहे. विश्वाचे प्रतिबिंब हे सरतेशेवटी आपल्या मनात आणि तेही मराठी भाषेत उमटलेले आहे. पर्यायाने विश्वाचेच एक प्रतिरुप होऊन मराठी भाषा ही आपल्या मनातून सार्‍या विश्वात वहात आहे. देव जसा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, तशी साक्षात मराठी भाषाच जेंव्हा आपल्या पाठीशी जिवंतपणे उभी राहते, तेंव्हा या जन्मास, जीवनास कसलीही भ्रांत, चिंता, विवंचना उरत नाही.
महा होय राष्ट्र कसूनी मराठी फुलावीत शब्दे जगी जागती पुढे चालता हीच आधार काठी भटक्या मनाला दिशा दावती
भावार्थ : शेतकरी जसा प्रेमाने, कष्टाने जमीन कसून शेती फुलवतो, मोठी करतो, तसे मराठी भाषा कसल्याने, तिच्यात कला, साहित्यनिर्मिती केल्याने हा आपला ‘महाराष्ट्र’ एक ‘महान राष्ट्र’ होईल. मराठी भाषेतील शब्द, विचार हे सबंध जगात जागेपणाने, जिवंतपणाने, द्रष्टेपणाने फुलून येतील, मुक्त होतील. अशाप्रकारे आयुष्यात पुढे झेप घेत असताना, मार्गस्थ असताना जेंव्हा कधी एखादा कठीण प्रसंग येईल, तेंव्हा त्या हळव्या क्षणी मराठी भाषेतील विचार, ओळी या एखाद्या काठीप्रमाणे आपल्याला तसेच पुढे चालत राहण्याकरीता आधार देतील, आणि जे आपले भटकणारे, भरकटलेले मन आहे त्यास ती निश्चित अशी दिशा दाखवेल, वैचारिक अधिष्ठान देईल.
जगण्यास लाभेल मत्ता मराठी कमाई घडे साथ येऊन ती कुटूंबास पोसून राहून गाठी समाजास संपन्न देऊन ती
भावार्थ : आपल्या जगण्यास जी काही धन-संपत्ती, मत्ता लागणार आहे, ती आपणास लाभायची असेल, तर त्याकरीता मराठी भाषेचे वैभव पुरेसे आहे. मराठी भाषेला सोबत घेतल्याने, या भाषेत व्यवहार केल्याने आपल्या आयुष्यात आयुष्याची कमाई होईल. आपणास एव्हढे भरभरून मिळेल की, आपल्या कुटूंबास पोसून, कुटूंबाचा उदरनिर्वाह सांभाळून, आपल्या सर्व गरजा नि स्वप्ने पूर्ण करुन त्याऊपर विपुल अशी धनसंपत्ती, ज्ञानसंपत्ती ही आपल्या जवळ, आपल्या गाठीशी उरेल, आणि स्वतःसह मराठी भाषा देखील भरुन पावेल. पर्यायाने मराठी भाषेची, भाषेने दिलेली ही संपन्नता ओघळून समस्त समाजास लाभेल आणि यात सर्वांचाच उत्कर्ष होईल.
असण्यास मिळून सत्ता मराठी स्वराज्यात मानात थाटून ती घुमूनी तिचा नाद दिशांत आठी स्वतःशीच विश्वास बाणून ती
भावार्थ : मानवी अस्तित्त्व हे या विश्वात आपल्या सत्तेने अस्तित्त्वात आहे, आणि मराठी भाषा ही आपल्यासाठी या सत्तेचे चलन आहे, साधन आहे. तिने आपल्या मनात, स्वराज्यात, स्वतःच्या राज्यात मानाने, आत्मसन्मानाने आपले अधिराज्य थाटले आहे. तिच्या सर्वभौमत्त्वाचा नाद पृथ्वीतलाच्या आठही दिशांमध्ये घुमत असून ती आपल्यात एक अजिंक्य असा दैवी विश्वास बाळगून आहे. कविता : ‘पावे मराठी’ । रोहन जगताप

ग्रेस समजला नाहीच मुळी कधी.. तो भावला.. प्रकर्षाने जाणवला..!! आई माझी कृष्णकळीतील विष विसरला कंस देवकीच्याही पुढे निघाला शुभ्र पांढरा हंस... आई माझी रांगोळीतील टिंब हरवली टिकली कशास पाडू दार, कराया भिंत घराची मधली... माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल..... माझी आई भिरभिर संध्या सूर्य दिलासा नश्वर शब्दांच्याही ओठी काव्यकुळातील भाषा.... आई माझी अरण्यसरिता चंद्र झुलविते पाणी रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणी... आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी संध्याकाळी भगवी होते तिच्या तनूतील ओवी.... आई माझी काजळभरला रे! मायेचा नखरा वेणीमधली नागीण खुडते जसा हिऱ्यांचा गजरा... आई माझी कंचुकीतल्या तरल स्तनांचे दूध गोरजवेळी वाटत फिरतो जोगी कुठला वेध ? संध्येसाठी माझी आई जपून उजळे वात अश्वत्थाम्यापरी हिंडतो जिथे भयंकर घात... त्याहीनंतर आई निघते कळशी घेऊन दूर तेव्हा कळतो खुळ्या नदीला या मादीचा सूर..... आई माझी झुळझुळतांना किणकिणतीही तारा तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा ~ग्रेस कवीता प्रसवते लिहीता येत नाही असे माझे मत आहे.ज्या दृष्टीकोनातून कवी विचार करतो तो विचार वाचकांपर्यंत जर पोहोचलाच नाही तर कवीता दुर्बोध होते. मग वाचक आवांतर गोष्टी शोधतो नाहीच समजली तर दुर्लक्ष करतो किंवा विडंवनाच्या दृष्टीकोनातून चाचपण्याचा प्रयत्न करतो. अर्थात कवी व वाचक या दोघांनाही यात दोष देता येत नाही. आपली कवीता आवडली हे प्रथमच नमूद केले आहे. कृपया हलकेच घ्या व लिहीत रहा. आयुष्याची झाली उजवण येतो तो क्षण आनंदाचा त्यामुळे जास्त गंभीर होत नाही. भावार्थ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
मराठीत बोलून पावे मराठी मनातून वाहून विश्वात ती उभी राहता हीच जीवंत पाठी नसे भ्रांत जन्मास या कोणती
महा होय राष्ट्र कसूनी मराठी फुलावीत शब्दे जगी जागती पुढे चालता हीच आधार काठी भटक्या मनाला दिशा दावती
जगण्यास लाभेल मत्ता मराठी कमाई घडे साथ येऊन ती कुटूंबास पोसून राहून गाठी समाजास संपन्न देऊन ती
असण्यास मिळून सत्ता मराठी स्वराज्यात मानात थाटून ती घुमूनी तिचा नाद दिशांत आठी स्वतःशीच विश्वास बाणून ती

देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाचीही चोरी?

माहितगार ·
देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाची चोरी? देशद्रोही दरोडेखोर भारतदेशाचे तुकडे करण्याचे भाषण स्वातंत्र्य मागत उड्या मारत मिरवून घेताना असे कुणि देशद्रोही दरोडेखोर माझा मुलगा मुलगी निघाले तरी उभ्या चितेवर चढवण्याची शिक्षा असावी एवढेही म्हणावयची देशप्रेमींनाच चोरी? देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाचीही चोरी? - सात्विक संतत्प्त माहितगार

मानवंदना, अनामिक कच्च्यापक्क्या भारतीय गुप्तच'वी'रास

माहितगार ·
भारताच्या एकात्मतेसाठी सीमेवर लढणार्‍या वीरांना मानवंदना नेहमीच देत असतो त्यांचे लढणे जसे समोर दिसते कौतुकही समोरून मिळते याच भारतीय एकात्मतेच्या लढायांना कानांची गरज असतेच गुपचरांच्या सगळकाही जीवन, कुटूंब, पणावर लावून कौतुकाचे दोन शब्दही लाभतील याची शाश्वती नसतानाही कधी आप्तस्वकीयांकडूनच नादान टिका ऐकुनही निष्ठेने कर्तव्य बजावणार्‍या अनामिक कच्च्यापक्क्या भारतीय गुप्तच'वी'रांनो स्विकाराव्या आमुच्या अनेक यशस्वीभव शुभेच्छा आणि साश्रू मानवंदना त्रिवार! त्रिवार!! त्रिवार!!! प्रेर्ना अर्थातच

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

त्यागी गजानना तुझ्या शौर्याला शतशः नमन

माहितगार ·
चैतत्न्याने प्रफुल्लित करणार्‍या सृष्टी आणि प्रकृतीच्या रक्षाबंधनाच्या कर्तव्याला पाळण्यासाठी साक्षात रुद्राच्या रौद्ररुपाला झेलणार्‍या त्यागी गजानना तुझ्या शौर्याला आमचे शतशः नमन असो.

नकोच ते युद्ध नको

पाषाणभेद ·
नकोच ते युद्ध नको नकोच ते मृत्यू नको सहन न होणार्या वेदना नकोच नको पैशापायी जायी पैसा युद्धापायी भरडते जनता भावनेला घालती गोळी "युद्धच हवे" बोलतो वर नेता रणभुमीवर कुणी मारतो कुणी मरतो बाप, मुलगा, नवरा, भाऊ जातो घर दार कोसळूनी होते सुने नशीबी राही केवळ वाट पहाणे जमावात बातमी युद्धाची ऐकता विरश्री संचारून अंगी हाताच्या मुठी वळतसे परी कुणी एकच घरचा धारातिर्थी पडता युद्ध नको, युद्ध नकोच शब्द वदनी येतसे - पाषाणभेद ०२/०३/२०२२

पुतळे आदर्शाचे

पाषाणभेद ·

काही अंशी भावनांशी सहमत देखिल आहे. महाराजांचे व्यक्तीमत्व इतके उत्तुंग आहे की असल्या फालतु लोकांनी केलेल्या मुर्ख कृतीने त्यांच्या बद्दलच्या आदराला जरा सुद्धा ओरखाडा जाणार नाही. उलट अशा घटनांना काडीचीही किम्मत देऊ नये असे मला वाटते. पैजारबुवा,

चित्रगुप्त 20/12/2021 - 11:13
मूर्तीची विटंबना कोणी केली? कायद्याप्रमाणे हा गुन्हा आहे का? कर्नाटक शासनाने या बद्दल काय पावले उचलली आहेत? 'म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो' ही म्हण आठवली.

काही अंशी भावनांशी सहमत देखिल आहे. महाराजांचे व्यक्तीमत्व इतके उत्तुंग आहे की असल्या फालतु लोकांनी केलेल्या मुर्ख कृतीने त्यांच्या बद्दलच्या आदराला जरा सुद्धा ओरखाडा जाणार नाही. उलट अशा घटनांना काडीचीही किम्मत देऊ नये असे मला वाटते. पैजारबुवा,

चित्रगुप्त 20/12/2021 - 11:13
मूर्तीची विटंबना कोणी केली? कायद्याप्रमाणे हा गुन्हा आहे का? कर्नाटक शासनाने या बद्दल काय पावले उचलली आहेत? 'म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो' ही म्हण आठवली.
कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची शुक्रवार १७/१२/२०२१ रोजी विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नका उखडू पुतळे आदर्शाचे जे आम्हा पुजनीय असती नका विटंबवू आदर्श आमचे जे आमच्या हृदयात वसती हे पुतळे नेहमीचे साधे नाहीत अगदीच लेचेपेचे नाहीत ते जीवंत जरी नसले तरीही कार्य त्यांचे तळपत राहील पुतळे जरी नष्ट केले आदर्श नष्ट होत नसतात त्यांच्या येथल्या असण्याने तुम्ही येथे राहत असतात - पाषाणभेद २०/१२/२०२१

शायरी..

अत्रुप्त आत्मा ·

प्रचेतस 12/12/2020 - 10:50
क्या बात है अत्रुप्तजी आत्मा, किती सहज सुंदर लिहिलंत.
पाना फुलांवरूनी, फिरतो कधी जरासा? शायरीचा मम मनाला, यत्किंचित गन्ध नाही!
एखाद्या भ्रमराला जसा पानाफुलांवर फिरुन फिरुनही जसा शायरीचा गंध येत नाही तद्वतच फुलापानांच्या रांगोळीत प्राविण्य मिळवलेल्या कवीला शायरीचा गंध नाही हे मोठ्या खुबीने उलगडून दाखविले आहे.
शब्दांवरी जरासा, आहे लोभ मनाचा सहसा तसा तयांना, मी हात लावत नाही!
इथं तर खुद्द कवीने आपल्याला कमीपणा घेतलेला आहे. वास्तविक कवीची शब्दांवर प्रचंड हुकूमत आहे. कवी सहज बोलतानाही गद्याचे पद्य करत असतो तरीही कवी शब्दांवर लोभ असूनही त्यांचा वापर करत नाही असे विनयाने म्हणत आहे. : :
भेटेन मात्र आता, पुन्हा कधी? कसाही? ही वाट मात्र माझी,नेहमीचीच नाही!
कवी म्हणतोय मी शायरीला भेटेन मात्र कधी, कसा ते ठाऊक नाही, म्हणजेच त्यालाही शायरी सुचेल पण कधी, कशी ते ठावकी नाही. माझी वाट तर कवितेची आहेच पण (शायरी ही काव्यातच अंतर्भूत असूनही) शायरीच्या वाटेला कवी क्वचितच जाईल हे कवीने मोठ्या तरलतेने येथे उलगडून दाखवले आहे.

प्रचेतस 12/12/2020 - 10:50
क्या बात है अत्रुप्तजी आत्मा, किती सहज सुंदर लिहिलंत.
पाना फुलांवरूनी, फिरतो कधी जरासा? शायरीचा मम मनाला, यत्किंचित गन्ध नाही!
एखाद्या भ्रमराला जसा पानाफुलांवर फिरुन फिरुनही जसा शायरीचा गंध येत नाही तद्वतच फुलापानांच्या रांगोळीत प्राविण्य मिळवलेल्या कवीला शायरीचा गंध नाही हे मोठ्या खुबीने उलगडून दाखविले आहे.
शब्दांवरी जरासा, आहे लोभ मनाचा सहसा तसा तयांना, मी हात लावत नाही!
इथं तर खुद्द कवीने आपल्याला कमीपणा घेतलेला आहे. वास्तविक कवीची शब्दांवर प्रचंड हुकूमत आहे. कवी सहज बोलतानाही गद्याचे पद्य करत असतो तरीही कवी शब्दांवर लोभ असूनही त्यांचा वापर करत नाही असे विनयाने म्हणत आहे. : :
भेटेन मात्र आता, पुन्हा कधी? कसाही? ही वाट मात्र माझी,नेहमीचीच नाही!
कवी म्हणतोय मी शायरीला भेटेन मात्र कधी, कसा ते ठाऊक नाही, म्हणजेच त्यालाही शायरी सुचेल पण कधी, कशी ते ठावकी नाही. माझी वाट तर कवितेची आहेच पण (शायरी ही काव्यातच अंतर्भूत असूनही) शायरीच्या वाटेला कवी क्वचितच जाईल हे कवीने मोठ्या तरलतेने येथे उलगडून दाखवले आहे.
पाना फुलांवरूनी, फिरतो कधी जरासा? शायरीचा मम मनाला, यत्किंचित गन्ध नाही! शब्दांवरी जरासा, आहे लोभ मनाचा सहसा तसा तयांना, मी हात लावत नाही! अर्थास प्राप्त होता,शब्दास जाग यावी ऐश्या प्रभावितेची,मी साक्ष मागत नाही! मी सहजतेचा प्रवासी,असतो तिच्याचपाशी रचनेत हाव रचितेची ,अशीही मनात नाही! जावे तिच्या कुशीशी,घेऊन ऊब यावे सहजता माऊली ही, असते मनात माझी! भेटेन मात्र आता, पुन्हा कधी? कसाही? ही वाट मात्र माझी,नेहमीचीच नाही! अतृप्त... ०====०====०====०====०====०====०====

यशाचे आता गा मंगल गान

पाषाणभेद ·
यशाचे आता गा मंगल गान विजय मिळाला, आनंद झाला, यशाचे आता गा मंगल गान बिगूल वाजला, रणभेरी वाजल्या, समरगीत गावूनी घ्या तानेवरती तान ||धृ|| बलाढ्य असा तो शत्रू होता, तोफा बंदूका शस्त्रसज्जता फंद फितूरी किती करविली, अंती आपणच ठरलो विजेता विजयाचे गीत म्हणा आता, अन नर्तन करा बेभान ||१|| युद्धखोरपणा उगा नका दाखवू, शत्रृ रणांगणी पाहून घेवू युद्धभुमी प्रिय आम्हा वीरांस, लढता लढता मरण पत्करू शरणागती नसे कदापी, ध्वजासवे उंच करू आमची मान ||२|| - पाषाणभेद २५/११/२०१९