मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शायरी..

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
पाना फुलांवरूनी, फिरतो कधी जरासा? शायरीचा मम मनाला, यत्किंचित गन्ध नाही! शब्दांवरी जरासा, आहे लोभ मनाचा सहसा तसा तयांना, मी हात लावत नाही! अर्थास प्राप्त होता,शब्दास जाग यावी ऐश्या प्रभावितेची,मी साक्ष मागत नाही! मी सहजतेचा प्रवासी,असतो तिच्याचपाशी रचनेत हाव रचितेची ,अशीही मनात नाही! जावे तिच्या कुशीशी,घेऊन ऊब यावे सहजता माऊली ही, असते मनात माझी! भेटेन मात्र आता, पुन्हा कधी? कसाही? ही वाट मात्र माझी,नेहमीचीच नाही! अतृप्त... ०====०====०====०====०====०====०====

वाचने 6051 वाचनखूण प्रतिक्रिया 7

प्रचेतस Sat, 12/12/2020 - 10:50
क्या बात है अत्रुप्तजी आत्मा, किती सहज सुंदर लिहिलंत.
पाना फुलांवरूनी, फिरतो कधी जरासा? शायरीचा मम मनाला, यत्किंचित गन्ध नाही!
एखाद्या भ्रमराला जसा पानाफुलांवर फिरुन फिरुनही जसा शायरीचा गंध येत नाही तद्वतच फुलापानांच्या रांगोळीत प्राविण्य मिळवलेल्या कवीला शायरीचा गंध नाही हे मोठ्या खुबीने उलगडून दाखविले आहे.
शब्दांवरी जरासा, आहे लोभ मनाचा सहसा तसा तयांना, मी हात लावत नाही!
इथं तर खुद्द कवीने आपल्याला कमीपणा घेतलेला आहे. वास्तविक कवीची शब्दांवर प्रचंड हुकूमत आहे. कवी सहज बोलतानाही गद्याचे पद्य करत असतो तरीही कवी शब्दांवर लोभ असूनही त्यांचा वापर करत नाही असे विनयाने म्हणत आहे. : :
भेटेन मात्र आता, पुन्हा कधी? कसाही? ही वाट मात्र माझी,नेहमीचीच नाही!
कवी म्हणतोय मी शायरीला भेटेन मात्र कधी, कसा ते ठाऊक नाही, म्हणजेच त्यालाही शायरी सुचेल पण कधी, कशी ते ठावकी नाही. माझी वाट तर कवितेची आहेच पण (शायरी ही काव्यातच अंतर्भूत असूनही) शायरीच्या वाटेला कवी क्वचितच जाईल हे कवीने मोठ्या तरलतेने येथे उलगडून दाखवले आहे.