मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जर्द पिवळी विजार

वामन देशमुख ·
जर्द पिवळी विजार, तीतून द्वार ठोठावत आलेले आतड्यांतुनी साठलेले पोटी आवळून धरलेले संधी मिळाली नाही तेंव्हा आडोशाला बसण्याची जे त्याज्य ते त्याग करूनी मोकलाया दाही दिश्यांची आधी असं झालं नाही कधी पिवळं झालं नाही त्या कातर वेळी मात्र रोखून धरणं झालं नाही मग जनाची ना मनाची कसली लाज कुणाची निसर्ग-हाकेला ओ देऊन क्लांत शांत होण्याची - (साधी सुती विजार घालणारा) द्येस्मुक् राव्

गुरू आतला

रोहन जगताप ·

In reply to by मुक्त विहारि

रोहन जगताप 14/12/2024 - 16:02
अगदी बरोबर आहे. बाकी प्रत्येक माणसाच्या आत एक गुरू असतो. वरील कविता ही त्या गुरूला वाहिलेली आहे. ‘कळते पण वळत नाही’ असे आपण म्हणतो. त्यातले जे कळतेपण आहे, तोच आपल्यातील गुरू आहे. पण त्याकडे लक्ष न दिल्याने कळूनही वळत नाही.

In reply to by रोहन जगताप

माझे एक मार्गदर्शक होते.. त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि आज देखील ती गोष्ट मी पाळतो. रात्री झोपण्यापूर्वी , स्वतः साठी १० मिनिटे काढायची आणि त्या १० मिनिटांत, आज दिवसभरात केलेल्या सर्व गोष्टी आठवायच्या. झोपेतील, अर्धजागृत अवस्थेत, मेंदु कुठल्या गोष्टी चुकीच्या केल्या आणि त्यावरची उपाय योजना शोधून काढतो आणि ही निरंतर चाललेली साधना आहे. काही उपाय लगेच मिळतात तर काहींना प्रत्यक्षांत यायला , बेंझीन काळ लागतो. (Benzene Time, हा माझ्या मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचा आवडता शब्द.) Benzene Time बद्दल माहिती हवी असेल तर, खालील लिंक बघा.. https://www.acs.org/molecule-of-the-week/archive/b/benzene.html#:~:text=In%201865%2C%20German%20chemist%20Friedrich,to%20conceive%20of%20the%20structure.

In reply to by रामचंद्र

रोहन जगताप 14/12/2024 - 16:12
मानवी आयुष्यात केवळ वडीलांचीच असे नव्हे, पण वडीलकीची अशी एक पोकळी असते. कोणीतरी आपल्याला सांभाळून घ्यावे, मार्गदर्शन करावे, दिशा दाखवावी अशी प्रत्येकाची कळत-नकळत इच्छा असते. परंतु अनेकदा ही पोकळी भरून येत नाही. अशावेळी माणसाच्या आतील गुरूच ही पोकळी भरून काढण्यास सक्षम असतो अशा अर्थाने वरील कविता लिहिलेली आहे. तरी कवितेच्या पहिल्या कडव्यात पुढील प्रमाणे बदल केल्यास कदाचित कविता आपल्याला परिपूर्ण वाटेल अशी आशा आहे.
नसे भोवती छत्रछाया वडील गुरू आतला सावली ती वसे नसे सोबती पितृमाया वडील गुरू लाभला माय पाठी तसे

चौथा कोनाडा 24/12/2024 - 22:25
सुंदर रचना ! गुरुचे महत्व कालातीत आहे ! म्हणुनच म्हटले आहे : गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा:, गुरु साक्षात परम ब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नम:। गुरू म्हणजे परम !

In reply to by मुक्त विहारि

रोहन जगताप 14/12/2024 - 16:02
अगदी बरोबर आहे. बाकी प्रत्येक माणसाच्या आत एक गुरू असतो. वरील कविता ही त्या गुरूला वाहिलेली आहे. ‘कळते पण वळत नाही’ असे आपण म्हणतो. त्यातले जे कळतेपण आहे, तोच आपल्यातील गुरू आहे. पण त्याकडे लक्ष न दिल्याने कळूनही वळत नाही.

In reply to by रोहन जगताप

माझे एक मार्गदर्शक होते.. त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि आज देखील ती गोष्ट मी पाळतो. रात्री झोपण्यापूर्वी , स्वतः साठी १० मिनिटे काढायची आणि त्या १० मिनिटांत, आज दिवसभरात केलेल्या सर्व गोष्टी आठवायच्या. झोपेतील, अर्धजागृत अवस्थेत, मेंदु कुठल्या गोष्टी चुकीच्या केल्या आणि त्यावरची उपाय योजना शोधून काढतो आणि ही निरंतर चाललेली साधना आहे. काही उपाय लगेच मिळतात तर काहींना प्रत्यक्षांत यायला , बेंझीन काळ लागतो. (Benzene Time, हा माझ्या मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचा आवडता शब्द.) Benzene Time बद्दल माहिती हवी असेल तर, खालील लिंक बघा.. https://www.acs.org/molecule-of-the-week/archive/b/benzene.html#:~:text=In%201865%2C%20German%20chemist%20Friedrich,to%20conceive%20of%20the%20structure.

In reply to by रामचंद्र

रोहन जगताप 14/12/2024 - 16:12
मानवी आयुष्यात केवळ वडीलांचीच असे नव्हे, पण वडीलकीची अशी एक पोकळी असते. कोणीतरी आपल्याला सांभाळून घ्यावे, मार्गदर्शन करावे, दिशा दाखवावी अशी प्रत्येकाची कळत-नकळत इच्छा असते. परंतु अनेकदा ही पोकळी भरून येत नाही. अशावेळी माणसाच्या आतील गुरूच ही पोकळी भरून काढण्यास सक्षम असतो अशा अर्थाने वरील कविता लिहिलेली आहे. तरी कवितेच्या पहिल्या कडव्यात पुढील प्रमाणे बदल केल्यास कदाचित कविता आपल्याला परिपूर्ण वाटेल अशी आशा आहे.
नसे भोवती छत्रछाया वडील गुरू आतला सावली ती वसे नसे सोबती पितृमाया वडील गुरू लाभला माय पाठी तसे

चौथा कोनाडा 24/12/2024 - 22:25
सुंदर रचना ! गुरुचे महत्व कालातीत आहे ! म्हणुनच म्हटले आहे : गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा:, गुरु साक्षात परम ब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नम:। गुरू म्हणजे परम !
लेखनविषय:
नसे भोवती छत्रछाया वडील गुरू आतला सावली ती वसे नसे सोबती पितृमाया वडील गुरू लाभला प्रेम पाठी तसे
उरी पोकळी पोरकी राहिलेली भरूनी जिवाला मनी पाविले नदी कोरडी आटली वाहिलेली भिजूनी किनारा तृषा भागिले
नसे पाहिले धैर्यशाली वडील गुरू राखला हात माथी असे नसे जाहले आप्तवाली वडील गुरू जागला साथ जन्मा जसे
मने कोवळी कोंडली घुस्मटून करी मोकळा बंध जे राहिले फुले पाकळी सांडली कुस्करून सुवासास वेचू गुरू वाहिले

वाहुनी तू रहावे

रोहन जगताप ·

चौथा कोनाडा 09/12/2024 - 21:30
छान रचना.... आवडली !
निसर्गास वाटेल जेही मनाशी अनाहूत साकार होई जगाशी जुळल्यास योग कृतीही करावी नसे अन्यथा शांतता बाळगावी
शेवटी हेच खरं ... नशिबात असेल तर आख्खी कायनात एकत्र येऊन तुम्हाला मिळेलच याची खात्री करते... नायतं .. शांत रहायचं

चौथा कोनाडा 09/12/2024 - 21:30
छान रचना.... आवडली !
निसर्गास वाटेल जेही मनाशी अनाहूत साकार होई जगाशी जुळल्यास योग कृतीही करावी नसे अन्यथा शांतता बाळगावी
शेवटी हेच खरं ... नशिबात असेल तर आख्खी कायनात एकत्र येऊन तुम्हाला मिळेलच याची खात्री करते... नायतं .. शांत रहायचं
लेखनविषय:
नसे सोय बोलून सत्यात काही जगाला हवे ते असत्यात राही उगा मौन राखून विश्वा पहावे वहात्या जगा वाहुनी तू रहावे
घळे आसवांतून पाषाण लेणी मुकी साचताना उरी दैव देणी अबोलाच बोलून गाईल गाणी स्थितप्रज्ञ राहूनही काळ वाणी
झरे ज्ञान मर्मातले होत ओळी जरी सांडले वेचले घेत झोळी शिदोरीच वाटेत ही चालवावी उपाशी जिवा तेवढी चाखवावी
निसर्गास वाटेल जेही मनाशी अनाहूत साकार होई जगाशी जुळल्यास योग कृतीही करावी नसे अन्यथा शांतता बाळगावी

उभा ठाकला

रोहन जगताप ·

निनाद 04/12/2024 - 05:36
नवकाव्याच्या मुक्तछंद वादळात वृत्तबद्ध काव्याची मशाल पेटवल्याबद्दल अनेक धन्यवाद! छान आहे!

निनाद 04/12/2024 - 05:36
नवकाव्याच्या मुक्तछंद वादळात वृत्तबद्ध काव्याची मशाल पेटवल्याबद्दल अनेक धन्यवाद! छान आहे!
लेखनविषय:
भरण्या घडा रिक्त जो सांडलेला खेळण्या उगा डाव हा मांडलेला रडण्या कुठे काळ तो थांबलेला भिडण्या उभा ठाकला पांगलेला
जगाने जरी हारला मानलेला समर्पूण सारे जगा जाणलेला प्रसंगात ओढून तो ताणलेला सुटे बाण लक्ष्याकडे ठाणलेला
दिवा तेवता जागला लाविलेला उभी रात्र सांभाळतो वाहिलेला स्वतः साक्ष अंधार तो राहिलेला असा सूर्य नारायणा पाहिलेला
ललाटात आभाळही फाटलेला एकांतात सारे उरी दाटलेला जमा संपलेलाच तो वाटलेला तयातून साम्राज्यही थाटलेला

नसूनी तयात

रोहन जगताप ·

चित्रगुप्त 10/11/2024 - 16:46
भुजंगप्रयातातली वृत्तबद्ध कविता आवडली. (रच्याकने, 'तेरे प्यार का आसरा चाहता हूं ... वफा कर रहा हूं वफा कर रहा हूं' हे जुने गाणेही याच वृत्तात आहे. म्हणून बघा).

चित्रगुप्त 10/11/2024 - 16:46
भुजंगप्रयातातली वृत्तबद्ध कविता आवडली. (रच्याकने, 'तेरे प्यार का आसरा चाहता हूं ... वफा कर रहा हूं वफा कर रहा हूं' हे जुने गाणेही याच वृत्तात आहे. म्हणून बघा).
लेखनविषय:
भिती वाटता जीव काहूर राही न जाणे कसे काय होणार काही विचारात गुंतून डोके सदाही उरी दाटता भाव आभास पाही
खरे काय ते की मनाचाच कावा कुणी ओळखावे कसे सांग देवा जिवाचा मुठीतून आकांत धावा धगत्या मनाला कसे शांत ठेवा
भिताना मनाची मनालाच याही हताश क्षणाची असे होत लाही रडूनी नसे साध्य इच्छाच काही मनी आसवांना जगी अंत नाही
दिसे स्वर्ग बाहेर पाताळ आत अडोसाच नाही उभा वादळात निमूट स्वतः पाहिले मी मनात दिसूनी मला मी नसूनी तयात

पावे मराठी

रोहन जगताप ·

राहूल,प्रदीर्घ, म्हणजे तब्बल बारा वर्ष काही महिने वाचन तपस्या केल्यानंतर पहिली वहीली कविता मिपावर डकवलीत. पहिलाच प्रयत्न चांगला जमला आहे. म्हणून पहिल्या धारेची. प्रथम दर्शनीच विडंबन करण्याची उबळ आली होती पण आपले इतर लेखन बघावे या हेतूने पान पालटले. बघतो तर "एकलीच दिपकळी मी अभागीनी ", एकच कविता दिसली. विडंबनाचा मोह टाळला. तरी दोन लाईना वानगीदाखल, बाटली ओतून प्यावी जराशी ताटलीतून मजा घ्यावी चकण्या ची.... मला कविता खुप आवडतात.खरा मद्यपि कुठल्याच मद्याला नावे ठेवत नाही. आपली कवीता समजून घेण्यासाठी संध्याकाळी बसावे लागेल. प्रतिसाद आणी वाचक संख्येवर जाऊ नका. ते फक्त नंबर आहेत. मिपावर लिहीत रहा. दर्दी वाचक वाचतात. पु.ले. शु.(पुढील लेखनास शुभेच्छा).

In reply to by कर्नलतपस्वी

प्रचेतस 23/10/2024 - 15:06
नवकवी हळवे असतात असा अनुभव आहे. विडंबन न केल्यामुळे एका नवकवीच्या भ्रुणहत्येच्या पातकापासून तुम्ही मुक्त झालात.

In reply to by कर्नलतपस्वी

रोहन जगताप 24/10/2024 - 00:02
मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाला आहे म्हटल्यावर त्या आनंदात माय मराठीला वंदन करून आपल्या तर्फे एक छोटे पुष्प वहावे या उद्देशाने हा एक छोटासा प्रयत्न केला आहे. परंतु १२ वर्षांची तपश्चर्या कमी पडल्याने आता आणखी १२ वर्षांची तपश्चर्या करण्याची आवश्यकता आहे असे दिसते. तूर्तास मला अभिप्रेत असलेला या कवितेचा भावार्थ खाली स्वतंत्र प्रतिक्रियेत देत आहे. कविता ‘सुमंदारमाला’ वृत्ताच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

रोहन जगताप 24/10/2024 - 00:06
मराठीत बोलून पावे मराठी मनातून वाहून विश्वात ती उभी राहता हीच जीवंत पाठी नसे भ्रांत जन्मास या कोणती
भावार्थ : देवाची आराधना केल्यानंतर देव जसा पावतो, प्रसन्न होतो, तशी मराठी भाषा पावण्यासाठी, प्रसन्न होण्यासाठी केवळ मराठी भाषेत बोलणे एव्हढेच पुरेसे आहे. विश्वाचे प्रतिबिंब हे सरतेशेवटी आपल्या मनात आणि तेही मराठी भाषेत उमटलेले आहे. पर्यायाने विश्वाचेच एक प्रतिरुप होऊन मराठी भाषा ही आपल्या मनातून सार्‍या विश्वात वहात आहे. देव जसा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, तशी साक्षात मराठी भाषाच जेंव्हा आपल्या पाठीशी जिवंतपणे उभी राहते, तेंव्हा या जन्मास, जीवनास कसलीही भ्रांत, चिंता, विवंचना उरत नाही.
महा होय राष्ट्र कसूनी मराठी फुलावीत शब्दे जगी जागती पुढे चालता हीच आधार काठी भटक्या मनाला दिशा दावती
भावार्थ : शेतकरी जसा प्रेमाने, कष्टाने जमीन कसून शेती फुलवतो, मोठी करतो, तसे मराठी भाषा कसल्याने, तिच्यात कला, साहित्यनिर्मिती केल्याने हा आपला ‘महाराष्ट्र’ एक ‘महान राष्ट्र’ होईल. मराठी भाषेतील शब्द, विचार हे सबंध जगात जागेपणाने, जिवंतपणाने, द्रष्टेपणाने फुलून येतील, मुक्त होतील. अशाप्रकारे आयुष्यात पुढे झेप घेत असताना, मार्गस्थ असताना जेंव्हा कधी एखादा कठीण प्रसंग येईल, तेंव्हा त्या हळव्या क्षणी मराठी भाषेतील विचार, ओळी या एखाद्या काठीप्रमाणे आपल्याला तसेच पुढे चालत राहण्याकरीता आधार देतील, आणि जे आपले भटकणारे, भरकटलेले मन आहे त्यास ती निश्चित अशी दिशा दाखवेल, वैचारिक अधिष्ठान देईल.
जगण्यास लाभेल मत्ता मराठी कमाई घडे साथ येऊन ती कुटूंबास पोसून राहून गाठी समाजास संपन्न देऊन ती
भावार्थ : आपल्या जगण्यास जी काही धन-संपत्ती, मत्ता लागणार आहे, ती आपणास लाभायची असेल, तर त्याकरीता मराठी भाषेचे वैभव पुरेसे आहे. मराठी भाषेला सोबत घेतल्याने, या भाषेत व्यवहार केल्याने आपल्या आयुष्यात आयुष्याची कमाई होईल. आपणास एव्हढे भरभरून मिळेल की, आपल्या कुटूंबास पोसून, कुटूंबाचा उदरनिर्वाह सांभाळून, आपल्या सर्व गरजा नि स्वप्ने पूर्ण करुन त्याऊपर विपुल अशी धनसंपत्ती, ज्ञानसंपत्ती ही आपल्या जवळ, आपल्या गाठीशी उरेल, आणि स्वतःसह मराठी भाषा देखील भरुन पावेल. पर्यायाने मराठी भाषेची, भाषेने दिलेली ही संपन्नता ओघळून समस्त समाजास लाभेल आणि यात सर्वांचाच उत्कर्ष होईल.
असण्यास मिळून सत्ता मराठी स्वराज्यात मानात थाटून ती घुमूनी तिचा नाद दिशांत आठी स्वतःशीच विश्वास बाणून ती
भावार्थ : मानवी अस्तित्त्व हे या विश्वात आपल्या सत्तेने अस्तित्त्वात आहे, आणि मराठी भाषा ही आपल्यासाठी या सत्तेचे चलन आहे, साधन आहे. तिने आपल्या मनात, स्वराज्यात, स्वतःच्या राज्यात मानाने, आत्मसन्मानाने आपले अधिराज्य थाटले आहे. तिच्या सर्वभौमत्त्वाचा नाद पृथ्वीतलाच्या आठही दिशांमध्ये घुमत असून ती आपल्यात एक अजिंक्य असा दैवी विश्वास बाळगून आहे. कविता : ‘पावे मराठी’ । रोहन जगताप

ग्रेस समजला नाहीच मुळी कधी.. तो भावला.. प्रकर्षाने जाणवला..!! आई माझी कृष्णकळीतील विष विसरला कंस देवकीच्याही पुढे निघाला शुभ्र पांढरा हंस... आई माझी रांगोळीतील टिंब हरवली टिकली कशास पाडू दार, कराया भिंत घराची मधली... माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल..... माझी आई भिरभिर संध्या सूर्य दिलासा नश्वर शब्दांच्याही ओठी काव्यकुळातील भाषा.... आई माझी अरण्यसरिता चंद्र झुलविते पाणी रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणी... आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी संध्याकाळी भगवी होते तिच्या तनूतील ओवी.... आई माझी काजळभरला रे! मायेचा नखरा वेणीमधली नागीण खुडते जसा हिऱ्यांचा गजरा... आई माझी कंचुकीतल्या तरल स्तनांचे दूध गोरजवेळी वाटत फिरतो जोगी कुठला वेध ? संध्येसाठी माझी आई जपून उजळे वात अश्वत्थाम्यापरी हिंडतो जिथे भयंकर घात... त्याहीनंतर आई निघते कळशी घेऊन दूर तेव्हा कळतो खुळ्या नदीला या मादीचा सूर..... आई माझी झुळझुळतांना किणकिणतीही तारा तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा ~ग्रेस कवीता प्रसवते लिहीता येत नाही असे माझे मत आहे.ज्या दृष्टीकोनातून कवी विचार करतो तो विचार वाचकांपर्यंत जर पोहोचलाच नाही तर कवीता दुर्बोध होते. मग वाचक आवांतर गोष्टी शोधतो नाहीच समजली तर दुर्लक्ष करतो किंवा विडंवनाच्या दृष्टीकोनातून चाचपण्याचा प्रयत्न करतो. अर्थात कवी व वाचक या दोघांनाही यात दोष देता येत नाही. आपली कवीता आवडली हे प्रथमच नमूद केले आहे. कृपया हलकेच घ्या व लिहीत रहा. आयुष्याची झाली उजवण येतो तो क्षण आनंदाचा त्यामुळे जास्त गंभीर होत नाही. भावार्थ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद

राहूल,प्रदीर्घ, म्हणजे तब्बल बारा वर्ष काही महिने वाचन तपस्या केल्यानंतर पहिली वहीली कविता मिपावर डकवलीत. पहिलाच प्रयत्न चांगला जमला आहे. म्हणून पहिल्या धारेची. प्रथम दर्शनीच विडंबन करण्याची उबळ आली होती पण आपले इतर लेखन बघावे या हेतूने पान पालटले. बघतो तर "एकलीच दिपकळी मी अभागीनी ", एकच कविता दिसली. विडंबनाचा मोह टाळला. तरी दोन लाईना वानगीदाखल, बाटली ओतून प्यावी जराशी ताटलीतून मजा घ्यावी चकण्या ची.... मला कविता खुप आवडतात.खरा मद्यपि कुठल्याच मद्याला नावे ठेवत नाही. आपली कवीता समजून घेण्यासाठी संध्याकाळी बसावे लागेल. प्रतिसाद आणी वाचक संख्येवर जाऊ नका. ते फक्त नंबर आहेत. मिपावर लिहीत रहा. दर्दी वाचक वाचतात. पु.ले. शु.(पुढील लेखनास शुभेच्छा).

In reply to by कर्नलतपस्वी

प्रचेतस 23/10/2024 - 15:06
नवकवी हळवे असतात असा अनुभव आहे. विडंबन न केल्यामुळे एका नवकवीच्या भ्रुणहत्येच्या पातकापासून तुम्ही मुक्त झालात.

In reply to by कर्नलतपस्वी

रोहन जगताप 24/10/2024 - 00:02
मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाला आहे म्हटल्यावर त्या आनंदात माय मराठीला वंदन करून आपल्या तर्फे एक छोटे पुष्प वहावे या उद्देशाने हा एक छोटासा प्रयत्न केला आहे. परंतु १२ वर्षांची तपश्चर्या कमी पडल्याने आता आणखी १२ वर्षांची तपश्चर्या करण्याची आवश्यकता आहे असे दिसते. तूर्तास मला अभिप्रेत असलेला या कवितेचा भावार्थ खाली स्वतंत्र प्रतिक्रियेत देत आहे. कविता ‘सुमंदारमाला’ वृत्ताच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

रोहन जगताप 24/10/2024 - 00:06
मराठीत बोलून पावे मराठी मनातून वाहून विश्वात ती उभी राहता हीच जीवंत पाठी नसे भ्रांत जन्मास या कोणती
भावार्थ : देवाची आराधना केल्यानंतर देव जसा पावतो, प्रसन्न होतो, तशी मराठी भाषा पावण्यासाठी, प्रसन्न होण्यासाठी केवळ मराठी भाषेत बोलणे एव्हढेच पुरेसे आहे. विश्वाचे प्रतिबिंब हे सरतेशेवटी आपल्या मनात आणि तेही मराठी भाषेत उमटलेले आहे. पर्यायाने विश्वाचेच एक प्रतिरुप होऊन मराठी भाषा ही आपल्या मनातून सार्‍या विश्वात वहात आहे. देव जसा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, तशी साक्षात मराठी भाषाच जेंव्हा आपल्या पाठीशी जिवंतपणे उभी राहते, तेंव्हा या जन्मास, जीवनास कसलीही भ्रांत, चिंता, विवंचना उरत नाही.
महा होय राष्ट्र कसूनी मराठी फुलावीत शब्दे जगी जागती पुढे चालता हीच आधार काठी भटक्या मनाला दिशा दावती
भावार्थ : शेतकरी जसा प्रेमाने, कष्टाने जमीन कसून शेती फुलवतो, मोठी करतो, तसे मराठी भाषा कसल्याने, तिच्यात कला, साहित्यनिर्मिती केल्याने हा आपला ‘महाराष्ट्र’ एक ‘महान राष्ट्र’ होईल. मराठी भाषेतील शब्द, विचार हे सबंध जगात जागेपणाने, जिवंतपणाने, द्रष्टेपणाने फुलून येतील, मुक्त होतील. अशाप्रकारे आयुष्यात पुढे झेप घेत असताना, मार्गस्थ असताना जेंव्हा कधी एखादा कठीण प्रसंग येईल, तेंव्हा त्या हळव्या क्षणी मराठी भाषेतील विचार, ओळी या एखाद्या काठीप्रमाणे आपल्याला तसेच पुढे चालत राहण्याकरीता आधार देतील, आणि जे आपले भटकणारे, भरकटलेले मन आहे त्यास ती निश्चित अशी दिशा दाखवेल, वैचारिक अधिष्ठान देईल.
जगण्यास लाभेल मत्ता मराठी कमाई घडे साथ येऊन ती कुटूंबास पोसून राहून गाठी समाजास संपन्न देऊन ती
भावार्थ : आपल्या जगण्यास जी काही धन-संपत्ती, मत्ता लागणार आहे, ती आपणास लाभायची असेल, तर त्याकरीता मराठी भाषेचे वैभव पुरेसे आहे. मराठी भाषेला सोबत घेतल्याने, या भाषेत व्यवहार केल्याने आपल्या आयुष्यात आयुष्याची कमाई होईल. आपणास एव्हढे भरभरून मिळेल की, आपल्या कुटूंबास पोसून, कुटूंबाचा उदरनिर्वाह सांभाळून, आपल्या सर्व गरजा नि स्वप्ने पूर्ण करुन त्याऊपर विपुल अशी धनसंपत्ती, ज्ञानसंपत्ती ही आपल्या जवळ, आपल्या गाठीशी उरेल, आणि स्वतःसह मराठी भाषा देखील भरुन पावेल. पर्यायाने मराठी भाषेची, भाषेने दिलेली ही संपन्नता ओघळून समस्त समाजास लाभेल आणि यात सर्वांचाच उत्कर्ष होईल.
असण्यास मिळून सत्ता मराठी स्वराज्यात मानात थाटून ती घुमूनी तिचा नाद दिशांत आठी स्वतःशीच विश्वास बाणून ती
भावार्थ : मानवी अस्तित्त्व हे या विश्वात आपल्या सत्तेने अस्तित्त्वात आहे, आणि मराठी भाषा ही आपल्यासाठी या सत्तेचे चलन आहे, साधन आहे. तिने आपल्या मनात, स्वराज्यात, स्वतःच्या राज्यात मानाने, आत्मसन्मानाने आपले अधिराज्य थाटले आहे. तिच्या सर्वभौमत्त्वाचा नाद पृथ्वीतलाच्या आठही दिशांमध्ये घुमत असून ती आपल्यात एक अजिंक्य असा दैवी विश्वास बाळगून आहे. कविता : ‘पावे मराठी’ । रोहन जगताप

ग्रेस समजला नाहीच मुळी कधी.. तो भावला.. प्रकर्षाने जाणवला..!! आई माझी कृष्णकळीतील विष विसरला कंस देवकीच्याही पुढे निघाला शुभ्र पांढरा हंस... आई माझी रांगोळीतील टिंब हरवली टिकली कशास पाडू दार, कराया भिंत घराची मधली... माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल..... माझी आई भिरभिर संध्या सूर्य दिलासा नश्वर शब्दांच्याही ओठी काव्यकुळातील भाषा.... आई माझी अरण्यसरिता चंद्र झुलविते पाणी रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणी... आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी संध्याकाळी भगवी होते तिच्या तनूतील ओवी.... आई माझी काजळभरला रे! मायेचा नखरा वेणीमधली नागीण खुडते जसा हिऱ्यांचा गजरा... आई माझी कंचुकीतल्या तरल स्तनांचे दूध गोरजवेळी वाटत फिरतो जोगी कुठला वेध ? संध्येसाठी माझी आई जपून उजळे वात अश्वत्थाम्यापरी हिंडतो जिथे भयंकर घात... त्याहीनंतर आई निघते कळशी घेऊन दूर तेव्हा कळतो खुळ्या नदीला या मादीचा सूर..... आई माझी झुळझुळतांना किणकिणतीही तारा तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा ~ग्रेस कवीता प्रसवते लिहीता येत नाही असे माझे मत आहे.ज्या दृष्टीकोनातून कवी विचार करतो तो विचार वाचकांपर्यंत जर पोहोचलाच नाही तर कवीता दुर्बोध होते. मग वाचक आवांतर गोष्टी शोधतो नाहीच समजली तर दुर्लक्ष करतो किंवा विडंवनाच्या दृष्टीकोनातून चाचपण्याचा प्रयत्न करतो. अर्थात कवी व वाचक या दोघांनाही यात दोष देता येत नाही. आपली कवीता आवडली हे प्रथमच नमूद केले आहे. कृपया हलकेच घ्या व लिहीत रहा. आयुष्याची झाली उजवण येतो तो क्षण आनंदाचा त्यामुळे जास्त गंभीर होत नाही. भावार्थ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
लेखनविषय:
मराठीत बोलून पावे मराठी मनातून वाहून विश्वात ती उभी राहता हीच जीवंत पाठी नसे भ्रांत जन्मास या कोणती
महा होय राष्ट्र कसूनी मराठी फुलावीत शब्दे जगी जागती पुढे चालता हीच आधार काठी भटक्या मनाला दिशा दावती
जगण्यास लाभेल मत्ता मराठी कमाई घडे साथ येऊन ती कुटूंबास पोसून राहून गाठी समाजास संपन्न देऊन ती
असण्यास मिळून सत्ता मराठी स्वराज्यात मानात थाटून ती घुमूनी तिचा नाद दिशांत आठी स्वतःशीच विश्वास बाणून ती

लघु गुरु कसे ओळखावेत - सूक्ष्मभेद आणि बारकावे

धष्टपुष्ट ·

चित्रगुप्त 24/08/2020 - 17:27
@धष्टपुष्ट साहेब, आधुनिक काळात मागे पडलेले, पण अतिशय मौल्यवान, अर्थपूर्ण आणि वृत्तबद्ध काव्य हे मराठी भाषेचे अपूर्व वैभव आहे. यात रुचि असणार्‍या, परंतु जेमतेमच माहिती असणार्‍या मजसारख्या वाचकांसाठी ही लेखमाला चालवत रहा. (प्रतिसाद कमी मिळत असले तरी-) असे लेख हे भाषेचे गतवैभव टिकवून ठेवण्यासाठी फार महत्वाचे आहेत. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

कंजूस 24/08/2020 - 20:13
लेख आवडला. लघुगुरू हे प्रकरण काव्यासाठी हवे तिथे फिरवतात हे पटलं. सुधीर फडकेंचं ' ला--जून हा--सणे ' त्यातलंच असावं.

In reply to by कंजूस

धष्टपुष्ट 26/11/2021 - 23:54
लाजून हासणे अन, हासून ते पहाणे मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे (गागालगालगागा, गागालगालगागा)
लघुगुरू हे प्रकरण काव्यासाठी हवे तिथे फिरवतात हे पटलं.
म्हणजे काव्यस्वातंत्र्य असतंच, पण मोकाट सुटलं तर गेयता घटते. आता काव्य गेय असावंच का यावर विद्वान लोकांनी बरीच चर्चा केली आहे. शुभांगी पातुरकरांचा मुक्तछंदावरचा प्रबंध चघळतोय. Ruth Padel चं Free Verse वरचं पुस्तकही वाचतोय. वाचून झालं, पुरलं, पटलं, मुरलं, की लिहीन इथे.

सिरुसेरि 24/08/2020 - 20:27
मराठी व्याकरण शास्त्राची छान माहिती . या खालील ओळी लक्षात आहेत . "मना सज्जना तु कडेनेच जावे , न स्वतःहुन कोणासही दुखवावे , कुणी दुष्ट लावील अंगास हात , तरी दाखवावा भुजंग प्रयात ."

चौकटराजा 25/08/2020 - 12:38
वृत्तांची लक्षणे लक्षात राहावीत म्हणून चारॊळी करीत असत पण एक गद्यात केलेले लक्षण असे ननमयय गणांनी मालिनी: वृत्त होते !!!

In reply to by चौकटराजा

Gk 25/08/2020 - 17:02
य ये चार वेळा भुजंग प्रयात मुहोब्बत कीझूठी कहानी पेरोये

In reply to by Gk

Gk 25/08/2020 - 17:58
य ये चार वेळा भुजंग प्रयात मुहोब्बत कीझूठी कहानी पेरोये बडीचो टखायी जवानी पेरोये

Gk 25/08/2020 - 20:39
य ये चार वेळा भुजंग प्रयात मुहोब्बत कीझूठी कहानी पेरोये बडीचो टखायी जवानी पेरोये हिंदी मधील की , पे वगैरेंच्या मात्रा उच्चारा नुसार बदलतात , ब्बत दोन्ही मिळून 2 मात्रा होतात की असा लिहिला तरी उच्चर थोडा र्हस्व आहे म्हणून 1 मात्रा पे देखील तसेच , 1 मात्रा भुजंग प्रयातात हिंदीत कितीतरी गाणी आहेत ( मराठी संस्कृतात हे अक्षरगण वृत्त आहे , उर्दूत काही ठिकाणी 2 ऐवजी 1,1 घेऊन मात्रा तितक्याच ठेवून वापरतात) ललाला ललाला ललाला ललाला ललाला ललाला ललाला ललाला पढा है मेरी जा नजर से पढा है बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है

पुष्कर 25/11/2021 - 05:29
मराठीत जसं जोडाक्षरात आधीच्या अक्षरावर आघात देऊन आणि न देता एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघतात (सृष्टी-लावण्याची शोभा आणि शेपूट लावण्याची स्पर्धा, शहर पुण्याची आणि पाप-पुण्याची इत्यादी) तसे इतर कुठल्या भाषेत असल्यास वाचायला आवडेल.

चित्रगुप्त 24/08/2020 - 17:27
@धष्टपुष्ट साहेब, आधुनिक काळात मागे पडलेले, पण अतिशय मौल्यवान, अर्थपूर्ण आणि वृत्तबद्ध काव्य हे मराठी भाषेचे अपूर्व वैभव आहे. यात रुचि असणार्‍या, परंतु जेमतेमच माहिती असणार्‍या मजसारख्या वाचकांसाठी ही लेखमाला चालवत रहा. (प्रतिसाद कमी मिळत असले तरी-) असे लेख हे भाषेचे गतवैभव टिकवून ठेवण्यासाठी फार महत्वाचे आहेत. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

कंजूस 24/08/2020 - 20:13
लेख आवडला. लघुगुरू हे प्रकरण काव्यासाठी हवे तिथे फिरवतात हे पटलं. सुधीर फडकेंचं ' ला--जून हा--सणे ' त्यातलंच असावं.

In reply to by कंजूस

धष्टपुष्ट 26/11/2021 - 23:54
लाजून हासणे अन, हासून ते पहाणे मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे (गागालगालगागा, गागालगालगागा)
लघुगुरू हे प्रकरण काव्यासाठी हवे तिथे फिरवतात हे पटलं.
म्हणजे काव्यस्वातंत्र्य असतंच, पण मोकाट सुटलं तर गेयता घटते. आता काव्य गेय असावंच का यावर विद्वान लोकांनी बरीच चर्चा केली आहे. शुभांगी पातुरकरांचा मुक्तछंदावरचा प्रबंध चघळतोय. Ruth Padel चं Free Verse वरचं पुस्तकही वाचतोय. वाचून झालं, पुरलं, पटलं, मुरलं, की लिहीन इथे.

सिरुसेरि 24/08/2020 - 20:27
मराठी व्याकरण शास्त्राची छान माहिती . या खालील ओळी लक्षात आहेत . "मना सज्जना तु कडेनेच जावे , न स्वतःहुन कोणासही दुखवावे , कुणी दुष्ट लावील अंगास हात , तरी दाखवावा भुजंग प्रयात ."

चौकटराजा 25/08/2020 - 12:38
वृत्तांची लक्षणे लक्षात राहावीत म्हणून चारॊळी करीत असत पण एक गद्यात केलेले लक्षण असे ननमयय गणांनी मालिनी: वृत्त होते !!!

In reply to by चौकटराजा

Gk 25/08/2020 - 17:02
य ये चार वेळा भुजंग प्रयात मुहोब्बत कीझूठी कहानी पेरोये

In reply to by Gk

Gk 25/08/2020 - 17:58
य ये चार वेळा भुजंग प्रयात मुहोब्बत कीझूठी कहानी पेरोये बडीचो टखायी जवानी पेरोये

Gk 25/08/2020 - 20:39
य ये चार वेळा भुजंग प्रयात मुहोब्बत कीझूठी कहानी पेरोये बडीचो टखायी जवानी पेरोये हिंदी मधील की , पे वगैरेंच्या मात्रा उच्चारा नुसार बदलतात , ब्बत दोन्ही मिळून 2 मात्रा होतात की असा लिहिला तरी उच्चर थोडा र्हस्व आहे म्हणून 1 मात्रा पे देखील तसेच , 1 मात्रा भुजंग प्रयातात हिंदीत कितीतरी गाणी आहेत ( मराठी संस्कृतात हे अक्षरगण वृत्त आहे , उर्दूत काही ठिकाणी 2 ऐवजी 1,1 घेऊन मात्रा तितक्याच ठेवून वापरतात) ललाला ललाला ललाला ललाला ललाला ललाला ललाला ललाला पढा है मेरी जा नजर से पढा है बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है

पुष्कर 25/11/2021 - 05:29
मराठीत जसं जोडाक्षरात आधीच्या अक्षरावर आघात देऊन आणि न देता एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघतात (सृष्टी-लावण्याची शोभा आणि शेपूट लावण्याची स्पर्धा, शहर पुण्याची आणि पाप-पुण्याची इत्यादी) तसे इतर कुठल्या भाषेत असल्यास वाचायला आवडेल.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कळीचा नियम: ज्या अक्षराला उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो ते लघु, आणि जास्त वेळ लागणारं अक्षर गुरु. . पण अनेक वेळेला नियम खूप संक्षिप्त असेल तर तो पुरत नाही. पुढे आलेले उपनियम या एकाच नियमाहून ओघाने आलेले आहेत. त्यातले सूक्ष्मभेद आणि बारकावे थोड्या विस्तारानं पुढे देतोय. . १) आपण शुद्धलेखनात जे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहितो ते ढोबळमानानं लघु किंवा गुरु असतात. मुले आणि भिणे या शब्दांची पहिली अक्षरे ऱ्हस्व आली आहेत म्हणून ती लघु. मूल आणि भीत-भीत या शब्दांची पहिली अक्षरे दीर्घ आहेत म्हणून ती गुरु.