मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही सुधाराव्याशा वाटणार्‍या ( प्रसिद्ध) सिनेमांच्या कथा...

भडकमकर मास्तर ·

मन 21/05/2008 - 03:05
मनातले प्रश्न बोललात. मलाही हेच सारे(आणि इतरही अशेच अनेक) प्रश्न पडलेत. पण आपण अगदी नेमक्या शब्दात बोललात. (आणखी एक उदाहरणः- दि.चा है मध्ये ही प्रीती झिंटा-आमिर प्रकरणाचा एंड असाच आहे. थोडक्यात काय एखाद्याची होणारी बायको पळवल्याशिवाय ह्या हीरो मंडळींना चैन पडेनासं झालय.) आपलाच, मनोबा

In reply to by मन

अन्या दातार 16/07/2008 - 23:50
दि.चा. है मध्ये प्रिती झिंटा आणि आमीर यांच्यातील प्रेम अव्यक्त आहे. ते दोघे परस्परांना मित्र म्हणूनच भेटत असत. दिदुलेजा मध्ये नायिका(?) प्रेमाचा इजहार वगैरे करुन बसली आहे. दिचाहै मध्ये नायक तिला सर्वात शेवटी प्रेमाचा इजहार करतो. ही बाब लक्षात घ्यायला हवी. आपला, अन्या

In reply to by अन्या दातार

टारझन 17/07/2008 - 00:20
दिल चाहता है आम्ही थेटरात ३ दा आणि कंप्युटर वर ३५ वेळा पाहीलाय बहुतेक.. ३० नंतर काऊंट सोडलेला.. तो एक अमेझिंग चित्रपट आहे. त्यात कुठेही कसलीही अतिशयोक्ती किंवा अव्यवहारिक वाटलेलं नाही.... आमच्या भावना दुखावता ? ---(यदा कदाचित -२ मधला अफझल्या) कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

धनंजय 21/05/2008 - 04:27
एका नात्यातल्या मुलीला मुलाने होकार दिला, आणि साखरपुडा होण्यापूर्वी (हे तरी बरे) आपले खरे प्रेम दुसर्‍या कोणावर आहे, लग्न नको, म्हणून सांगितले. एका काकूंच्या मुलाने साखरपुड्यानंतर लग्न मोडले, आणि "खर्‍या" प्रेयसीशी त्यानंतर कायमसाठी बिनसले म्हणून पुन्हा मोडलेल्या मुलीच्या घरच्यांच्याकडे विचारणा केली!!!! त्यांनी अर्थात अपमानास्पदपणे "चालता हो" म्हटले, हे बरेच केले. पण एक बघायला पाहिजे ना - लग्न म्हणजे एक महत्त्वाच्या वस्तूची खरेदी आहे. एखादी सुंदर आणि महाग मोटारगाडी घेताना, आपल्याला किती आवडली, आई-बाबांना किती आवडली, कसल्या वळणाची आहे, कसल्या रंगाची आहे, हे सगळे गुण बघणे आलेच. सर्व गुण संपन्न असतीलच असे नाही. शिवाय कुठला गुण जास्त महत्त्वाचा वाटतो तेही सकाळ-संध्याकाळ बदलू शकते. म्हणजे मित्रांबरोबर असताना होंडा-सिटीचे गुण जास्त दिसतात, आई-बाबांशी बोलताना ह्युन्डाई ऍक्सेंटचे. मग कधी या डीलरकडे "कार विकत घेतो" असे म्हणणार, कधी त्या डीलरकडे. आधी एकाला "हो" म्हणून मग दुसर्‍यापाशी गाडी विकत घेतली तर पहिल्या डीलरचा पचकाच झाला... त्यामुळे कंत्राटावर सही केल्याशिवाय कार विकली नाही; अक्षता डोक्यावर पडल्याशिवाय वर-वधू खपली नाही. (स्पष्टीकरण : वधू-वर-संयोजन हा एक बाजारही असल्यामुळे त्याचे बाजारशास्त्रीय विश्लेषण केले आहे. तो बाजार थोडाफार अनैतिक आहे, असे माझे मत आहे. खोटे बोलून किंवा अर्धसत्य झुलवत ठेवून कुठल्याही मनुष्याच्या भावनांशी खेळणे मला अनैतिक वाटते.)

In reply to by धनंजय

खोटे बोलून किंवा अर्धसत्य झुलवत ठेवून कुठल्याही मनुष्याच्या भावनांशी खेळणे मला अनैतिक वाटते.) एकदम खरे... पण ह्या असल्या कथानकांमुळे उगीचच वेगळाच संदेश जात असेल ( सिनेमा एवढा कोणी सीरियसली घेत नाही, हे खरे आहे.......पण ऊठसूठ " घराने के संस्कार रीतीरिवाज , पिताजीकी भावनाएं " याची चाड पोरीला फार आहे असे दाखवायचे पण त्याच वेळी एका संपूर्ण कुटुंबाला फसवत राहायचे , ते सुद्धा काही तास किंवा एखादा दुसरा दिवस ( हा की तो , हा निर्णय न होण्याच्या काळात , समजा मुलगा बघताना वगैरे...)नव्हे तर महिनाभर आणि त्यांच्या नकळत केलेल्या प्रेमचेष्टांचे उदात्तीकरण करायचे ...... हा तद्दन भंपकपणा आहे)... बरं ही नैतिकतेच्या मार्गावरून अल्पकाळासाठी का होईना पाय घसरलेल्या एका मुलीची गोष्ट असती तर एक वेळ ठीक होते, पण अर्थातच तसले काही दाखवायचे नाहीये ... ( आणि तिला तिच्या चुकांची जाणीव होते आणि ती त्या मुलाला सॉरी म्हणते, इतपत तरी काहीतरी घडायला हवे होते) कॉलेजात असतानाही ग्रुप मधल्या काही मुलींशी मी बोललो तेव्हा त्यांना त्या हीरॉईनची काही चूक आहे असे वाट्लेच नाही, "प्रेमासाठी तिने केवढे रिस्क घेतले "अशा अर्थाचे बर्‍याचशा मुलींचे मत पडले....... कमाल आहे च्यायला.. अरे रिस्कच घ्यायचे तर बापाचा आणि कुटुंबाचा राग पत्कर, त्यांना समजावायचा प्रयत्न कर आणि ते होत नसेल तर घर सोडून जा आणि स्वतःच्या हिमेतीवर स्वतःचे घर उभार... ही खरी रिस्क ..... तुझे कौटुंबिक संबंध नीट रहावेत म्हणून लोकांना कसा काय मनस्ताप देऊ शकता ? आणि पुन्हा आमची ही नेहमीची चिडचिड की बर्‍याच मंडळींना विशेषतः महिलावर्गाला हे जाणवतच नाही...... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मदनबाण 21/05/2008 - 06:09
खोटारडा असला तरी पैसेवाला एकुलता एक लंडनचा आहे... आता सोडावं झालं पोरीला...".... :D हा मोकॅम्बो आतल्या आत फारच खुष झाला असणार बघा..... (मिस्टर इंडिया चा पंखा) मदनबाण.....

फटू 21/05/2008 - 07:10
पण कधी कधी असंही होतं... म्हणजे ती पुण्याला बी ए एम एस ला होती... वैद्यकी शिकता शिकता आपल्या एका वर्गमीत्राच्या प्रेमात पडली... बी ए एम एस संपलं... दोघांनीही लग्न करायचं ठरवलं... तो तिचा भावी नवरा म्हणून तिच्या घरी येऊन गेला... आणि तिला परदेशस्थ डॉक्‍टर मुलाचं स्थळ सांगून आलं... झालं त्या मुलीने आपल्या प्रियकराचा पत्ता काटला अन् त्या परदेशस्थ डॉक्‍टर मुलाशी लग्न केलं... आता बोला... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

विसोबा खेचर 21/05/2008 - 08:53
याला आधीच चांगला पिटून काढला बरे झाले....ही ही पोरगी पण एक नंबरची अडाणी...आमच्या या मूर्ख पोरीने इतके गुण उधळले आहेत की सगळ्या गावात आता बदनामी झाली आहे.... कोण बोंबलायला आता हिच्याशी लग्न करणार आहे देव जाणे... आणि हा भडवा तर बापाबरोबर चालला...ह्याच्यायला ह्याच्या... हा कसला जातोय? हा थांबणार... थांबायलाच पाहिजे यानं... अरे महिनाभर बोंबलत इथे रंगढंग केलेस ना आमच्या नकळत ? तुला भाड्या आता जबाबदारी नको घ्यायला ? खुशाल हिला अशीच टाकून जातोस ? काय की... अरे गाडी सुटली की रे...उतर रे उतर...चाललाच वाटतं...जरासा वेडझवाच दिसतो हा ... हं.... किंवा भलताच पोचलेला आहे ... साल्याला माझी गोची कळलीय वाटतं... खरंतर असल्या मूर्ख, नालायक, वेंधळ्या आणि फ़सवणूक करणार्या या माणसाची अजिबात लायकी नाही...पण आता आपल्या मूर्ख आणि बदनाम पोरीला तरी कोण मिळणार याच्यापेक्षा बरा?? खोटारडा असला तरी पैसेवाला एकुलता एक लंडनचा आहे... आता सोडावं झालं पोरीला...".... जा बाई जा... हा हा हा! आमरसपुरीचे हे स्वागत क्लासच आहे! मुलीचा हात सोडण्यापूर्वी क्षणभर त्याचा चेहरा दाखवला आहे त्यावर मास्तर म्हणतात तेच स्वगताचे भाव अगदी नेमके दिसतात! :) मास्तर, अजूनही शिणेमे येऊ द्यात... आपला, (काजोलप्रेमी) तात्या देवगण.

मुलीचा हात सोडण्यापूर्वी क्षणभर त्याचा चेहरा दाखवला आहे त्यावर मास्तर म्हणतात तेच स्वगताचे भाव अगदी नेमके दिसतात धन्यवाद तात्या.... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आमची अजून दोन निरीक्षणे आहेत... १. कुकुहोहै, जप्याकिहोहै, दिचाहै,दितोपाहै या सर्व सिनेमांमध्ये थोड्याफार फरकाने "दुसर्‍याच्या लग्नात जाऊन आपली प्रेयसी पळवून आणणे " हा कार्यक्रम दिसतो परंतु सर्वात जास्त त्रास देणारा चित्रपट मला दिदुलेजाच वाटतो... असं का बरं होत असावं? २. वर उल्लेखिलेल्या सर्व सिनेमांमध्ये कथा अशाच बांधलेल्या दिसतात की हीरॉईनचं नक्की ठरत नाहीये आणि ती ऐन वेळी एका दुसर्‍याच ( म्हणजे आधीच्याच प्रियकर ) माणसाबरोबर लग्न करते... हेच पुरुषाने केले तर त्याला इतकी सहानुभूती कोणी देईल का ?... मग तो बरोबर व्हिलन ठरेल...मला आत्ता या क्षणी तरी असे सिनेमे आठवत नाहीयेत की ज्यात ( १.पुरुष ऐन वेळी लग्नाला नकार देतो आणि पळून जातो + २. त्याचे त्याच वेळी उदात्तीकरणही केले जाते...) .... असो... याचे स्त्रीमुक्तीवादी उत्तर हे असणार की १. पुरुषांवर लग्नासाठी कुटुंबाचे इतके प्रेशर नसते, त्यामुळे त्याला सहानुभूती कशाला कोण द्यायला बसलंय ? तो वाईटच.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मन 21/05/2008 - 13:57
हेच पुरुषाने केले तर त्याला इतकी सहानुभूती कोणी देईल का ?... मग तो बरोबर व्हिलन ठरेल... जबरान... :-) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय 21/05/2008 - 21:53
( १.पुरुष ऐन वेळी लग्नाला नकार देतो आणि पळून जातो + २. त्याचे त्याच वेळी उदात्तीकरणही केले जाते...) अगदी नेमके असे केलेला म्हणजे नारायण ठोसर हा मुलगा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. (पण तो दुसर्‍या कुठल्या मुलीबरोबर लग्न करत नाही. हा लहान मुलगा विश्वाची चिंता करण्याइतका मनाने प्रौढ होता, पण आईवडलांच्या आग्रहाखातर बोहोल्यावर चढलाच.) आणखीनही उदाहरणे असावीत. दुसरे लग्न करणारा कुठलाही वीरपुरुष पहिल्या बायकोच्या जीवनाचे काही प्रमाणात मातेरे करतो असो मानता येईल. (हे मातेरे लग्नाआधी नसून लग्नानंतर असते, पण अधिक वाईट कुठले, ते सांगता येत नाही.) अशा वीरांचे, 'राज्याला वारस पुरवण्यासाठी कर्तव्य करणारा' म्हणून उदात्तीकरण होते. वरील दोन्ही उदाहरणे ऐतिहासिक आहेत, पण त्या उदाहरणांचे उदात्तीकरण मात्र आधुनिक आहे. (सगळ्या टीव्ही मालिका मला एकसारख्या वाटतात - पण अशी एक साचेबद्ध कथा बरेचदा दिसते ना? श्रीमंत उपवर तरुणाशी लग्न करायचा घाट एक पाताळयंत्री सुंदर तरुणी घालते, आणि लग्न पक्के होते. पण लग्नाआधी मुलाला तिचा नीचपणा समजतो. आणि त्याच्यावर प्रेम करणार्‍या सोज्ज्वळ पण सुशील मुलीबरोबर तो लग्न करतो...)

In reply to by धनंजय

अगदी नेमके असे केलेला म्हणजे नारायण ठोसर हा मुलगा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. =)) ह्या मुलाचा आम्ही पंखा आहोत.

साथिया चित्रपटात राणी मुखर्जी च्या वडिलांचा विवेक ओबेरॉय च्या वडिलांकडून अपमान होतो...याबद्दल राणी ला राग येतो पण तो थोड्याच वेळासाठी आणि नंतर चक्क त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न करते. इथपर्यंत सुद्धा ठीक ... पण लग्नानंतर ते आपापल्या घरी राहतात!!! (याला हिंमत म्हणावी की शुद्ध बावळट पणा?) हे कमी की काय म्हणून बघायला आलेल्या पाहुण्यांसमोर सांगून टाकते की मी आधीच लग्न केलं आहे!! (पाहुण्यांसमोर सांगून आई बापाची इज्जत का घालवायची? :( )

वेताळ 22/05/2008 - 10:12
हे पण अश्याच सिनेमात घडत असते. प्रथम छपरी हिरोशी उदांत प्रेम करायचे. गळ्यात गळे घालुन फिरायचे. चुम्माचाटी करायची. आणि दुसरा मुलगा बघायला येण्याआधी घरी बोंबलायचे,उल्ट्या करायच्या आणि हाच संवाद फेकायचा " मैं मां बननेवाली हुं".पण हेच तिला आधी का कळत नाही.ह्यात पण सगळी सहानुभुती त्या मुलीला. कारण ह्यात तिचा दोष नसतो दोष तिला मां बनवणारयाचा असतो. अजब तर्क. वेताळ

In reply to by वेताळ

विसोबा खेचर 22/05/2008 - 12:31
गळ्यात गळे घालुन फिरायचे. चुम्माचाटी करायची. वा! मागे केव्हातरी ऐकल्यासारखा वाटतो, 'चुम्माचाटी' हा शब्द क्लासच आहे!..:) आपला, (जुम्म्याला चुम्मा देणारा!) तात्या.

धमाल मुलगा 22/05/2008 - 12:19
मुलाचा चांगुलपणा, हुशारी, सचोटी , मेहनती वृत्ती , प्रामाणिकपणा वगैरे आवडून बाप प्रभावित झाला नाही तर " माझ्या बदनाम पोरीशी लग्न करायला कोण येणार आता?" या भावनेने नाईलाजाने तो यांच्या लग्नाला तयार झाला असे वाटते... मग हीरोने हिरॊईनच्या आईपुढे मारलेले डायलॊग सगळे गेले ना बाराच्या भावात... मग सिनेमाचा संपूर्ण दुसरा भाग ज्या गोष्टीसाठी बिल्ड अप केला आहे त्याचीच वाट लागली... आणि आम्हाला येडा का बनवले?
हे हे हे....आमचं पण हेच मत झालं होतं :) आणि तो बाप तरी कसा असा एकदम चंबू? शेवटपर्यंत आजिबात कळत नाही त्याला, हा बकरा में में करत आपल्या पोरीच्या लग्नघरात का फिरतोय? बाकी त्याचं स्वगत एकदम झक्कास! येऊ दे अजुन... स्वगतः आमच्या भावी सासर्‍याचं पण हेच स्वगत असावं काय? :?

झकासराव 22/05/2008 - 19:13
मुलाचा चांगुलपणा, हुशारी, सचोटी , मेहनती वृत्ती , प्रामाणिकपणा व>>>> =)) मास्तर तुम्ही तर त्या दिलवाले ची बिनपाण्याने केलीत की. :) आवडल आपल्याला तुमच मत. मी अजुन देखील हा चित्रपट पाहिलेला नाहिये. फुकटात सुद्धा. आणि हो त्या मंदीराला शाहरुखने फसवलेच की त्याच वाइट नाही का वाटल??? ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

आणि हो त्या मंदीराला शाहरुखने फसवलेच की त्याच वाइट नाही का वाटल??? तसं तिच्याबद्दल थोडं वाईट वाटलं... जास्त नाही कारण या पोरानं काही कमिट केलं नव्हतं तिला...( नव्हतं बहुतेक, आता काय नीट आठवेना... की त्यांच्या आई बापाचं काहीसं बोलणं झालं होतं?...??... ) हां..बरोबर ..मग तिचीसुद्धा झालीच की फसवणूक... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by झकासराव

टारझन 15/07/2008 - 17:56
मी अजुन देखील हा चित्रपट पाहिलेला नाहिये. फुकटात सुद्धा. आणि हो त्या मंदीराला शाहरुखने फसवलेच की त्याच वाइट नाही का वाटल??? खोटं बोलतोस ? चित्रपट पाहीला नाही ? मग रुकरुक आणि बधिरा बद्दल एवढ डिटेल कसं माहीत आ? कस्सा पकडला चोर ? ;) असो.. त्या शाहरूक चे सरसकट सगळेच चित्रपट बावळट असतात... सगळ्यात हाईट म्हणजे .. मोहोब्बते.... आरे काय ? तो बच्चन बिचारा शिस्त लावतो.. अभ्यासाच्या वेळी अभ्यास करा ...आणि हा बहाद्दर पोरांना लफडी करायला शिकवतो ! केवळ बच्चनचा विरोध म्हणून..आणि मग ती अती स्कॉलर पोरं पण लफडी करून डॉक्टर होतात... च्यायला डोक्यात जातो रे तो.... काहीही ... हाणा तद् माताय(विजाभौ प्रसन्न) (रुकरुक चा अँटीफॅन) कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

राजे 22/05/2008 - 19:16
मास्तर..... ज्यावेळी हे चित्रपट आले होते खास करुन डीडीएलजे ;) त्यावेळी असे काही वाटत नव्हते .. पण आज पुन्हा त्रयस्थ नजरे ने काही चित्रपट पाहीले की त्या चित्रपटाची मजाच जाते ! उदा. मोहरा त्याकाळी गाजलेला चित्रपट .... मी कमीत कमी ५ वेळा पाहीला होता.... पण आज तो चित्रपट १० मिनिटे पाहणे म्हणजे भयंकर सजा आहे असे वाटत :)) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

"...खुशाल हिला अशीच टाकून जातोस ? काय की... अरे गाडी सुटली की रे...उतर रे उतर...चाललाच वाटतं...जरासा वेडझवाच दिसतो हा ... हं.... किंवा भलताच पोचलेला आहे ... साल्याला माझी गोची कळलीय वाटतं... " अमरिश पुरीचं स्वगत वाचून हसता हसता लोळायची वेळ आली खरोखर. अफलातून. :) असाच मनस्ताप मला 'हम दिल दे चुके सनम' बघताना झाला होता. बाई ग, तुझं प्रेमबिम आहे ना सलमानवर? मग लग्न का करतेस दुसर्‍या माणसाशी? हे मनमानी आईबाप पोरांचं न ऐकता लग्न ठरवतात इथपर्यंत ठीक. पण ही मूर्ख पोरं बोहल्यावर कशी चढतात? तिथल्या तिथे बोंबाबोंब नाही का करता येत? एरवी एवढी येता जाता बापाच्या गळ्यात पडत असतेस ना बये, मग आता थोबाड उघडायला काय धाड भरली? बाप नाही तर नाही ऐकत, त्या बिचार्‍या अजय देवगणला सरळ सांगता येत नाही, की बाबा रे, असं असं आहे... लग्न-बिग्न नको. फुकटच्या फाकट लग्न करून बसला ना तो? बरं, ठीक आहे, लग्न केलं. मग तरी गप बसायचं. तेपण नाही. नंतर सांगायचा धीर आला. आला तर आला. मग जायचं सलमानसोबत. तोतरी सुखी. तेही नाही. एकदम चार रात्रींमधे सलमानवरचं प्रेम उडून अजयवर? कारण काय, तर मंगळसूत्र. अरे काय चाललंय काय? पोरखेळ आहे का? हे मंगळसूत्र आणि लग्नाची गाठ भलतेच पॉवरफुल्ल असतात एवढाच सगळ्या लव्हस्टोरीचा अर्थ. मूर्ख लेकाचे.

In reply to by मेघना भुस्कुटे

धमाल मुलगा 23/05/2008 - 10:37
जबरान् !!!!! आयला, मीपण असाच वैतागलो होतो 'हम दिल दे चुके सनम' पाहून. एक तो सलमान, काय ते येडं भंजाळल्यासारखं आकाशाकडं बघून जोरजोरात एकटंच गप्पा हाणत असतं, आमच्या गावात आहेत अशी एक-दोन वेडी माणसं :) बरं, मान्य आहे बाबा तू हाडाचा गायक बियक आहेस..म्हणजे ते काय म्हणतात बरं...हां, जन्मजात कलाकार आहेस, अरे पण म्हणून इतकं खुळ्यासारखं वागायचं? कलाकार काय अक्कलशुन्य असतात का? दुसरी ती ऐश्वर्या, तीच्या आयुष्यात नक्की काय प्रॉब्लेम आहे हेच कळत नाही..आपण काय करतोय, काय करायचंय, काय होइल...कश्शा-कश्शाचाच विचार नाही? आज काय म्हणे सलमानवर प्रेम....उद्या काय म्हणे बाबा म्हणतात ह्याच्याशी लग्न करायचं म्हणून एकदम "निंबुडा निंबुडा" करुन नाचत लग्नाला तयार, परवा काय तर त्या अजय देवगणासमोर अचानक पहिल्या प्रेमाचा साक्षात्कार... तो बिचारा शिगारेटी फुंकुन फुंकुन छातीचं खोकडं करुन घेतोय, आणि ही हिंडतीये त्या सलमानला शोधत.... बरं तो भेटल्यावर तरी गप त्याच्याबरोबर सुखानं संसार करावा, तेही नाही...परत अजय देवगणकडे गाडी वळलेली... काय बाई आहे का भिंताड? येऊन जाऊन त्या अजय देवगणनं साकारलेला संयत, समजुतदार, भल्या मनाचा नवरा हेच काय ते दु:खात सुख! आणि "अलबेला सजन आयो..." एएएएएकदम मस्त!!!!!! केवळ त्यासाठी भन्साळ्याचे सगळे गुन्हे माफ !

In reply to by मेघना भुस्कुटे

एकाच पात्राच्या किती चुका... १.बाप नाही तर नाही ऐकत, त्या बिचार्‍या अजय देवगणला सरळ सांगता येत नाही, की बाबा रे, असं असं आहे... लग्न-बिग्न नको _ २.बरं, ठीक आहे, लग्न केलं. मग तरी गप बसायचं. तेपण नाही. नंतर नवर्‍याला सांगायचा धीर आला. ३.मग जायचं सलमानसोबत. तोतरी सुखी. तेही नाही. एकदम चार रात्रींमधे सलमानवरचं प्रेम उडून अजयवर? कारण काय, तर मंगळसूत्र पण पहिल्यांदा बघताना जास्त जाणवल्या नाहीत चुका... ऐश्वर्याचं दिसणं, उत्तम संगीत आणि गाणी यात आख्खा सलमान सहन केला...( ऐश्वर्याच्या डीव्हीडी कॅप्चर्सवरून कोलाजेस , वॉलपेपर्स बनवणे हा आमचा त्या काळातला आवडता उद्योग) अजयचं पात्र बेष्ट रंगवलंय... ( मला या सिनेमात एक मर्मभेदक ऍडिशन सुचतेय की अजय देवगण शेवटी ती बोंबलत तिच्याकडे आल्यावर तिला म्हणतो, "...आज आलीस उद्या परत तिसर्‍याकडे जाशील... तुझ्या आवडत्या खेळापायी मला का त्रास सारखा? या टायमाला युरोप दर्शन झालं, पुन्हा म्हणशील आता ऑस्ट्रेलियात फिरूयात...अशी मानसिकदृष्ट्या अस्थिर चंचल स्वभावाची बायको मला नको .. चल हो बाहेर..." ... मग अगदी काव्यात्म न्याय मिळाल्यासारखं झालं असतं... :)) :)) _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर 23/05/2008 - 13:42
"...आज आलीस उद्या परत तिसर्‍याकडे जाशील... तुझ्या आवडत्या खेळापायी मला का त्रास सारखा? या टायमाला युरोप दर्शन झालं, पुन्हा म्हणशील आता ऑस्ट्रेलियात फिरूयात...अशी मानसिकदृष्ट्या अस्थिर चंचल स्वभावाची बायको मला नको .. चल हो बाहेर..." =)) हा हा हा मास्तर, तुमची मर्मभेदक ऍडिशन लै भारी आहे! :))

In reply to by विसोबा खेचर

मन 23/05/2008 - 16:55
मला सुचली ती अशी... समजा हा पिकचर करण जोहर ह्या प्रेमाच्या घाउक विक्रेत्याला दिला असता, तर त्याने:- येक शाहरुख वाढवला असता.जो, मुळात नाराज अजयचे मन वळवुन त्या सटवीला सलमानच्या दारात सोडुन ये म्हणतो. आता,शाहरुख ने य्व्हढे उप्कार केलेच आहेत म्हणल्यावर त्याची "परतफेड" कशी करावी या विवंचनेत असलेली ती येडझवी नायिका त्याच्याही प्रेमात पडली असती! मग झाला असता साक्षात्कारः- शाहरुख तर आधिच त्याची "मैत्रिण" काजोल(किंवा राणी) ह्यांच्या प्रेमात आहे. मग त्याला खुश कसे करणार्?त्या काजोलच्या गळ्यात मारुन! पण काजोल सलमानच्या प्रेमात आणी सलमान ऐश्वर्याच्या विरहात व्याकुळ का काय म्हणतात ते झाला आहे. मग? करणार कसं? हे त्या येड्यालाही कळलं नसतं आणि तो जे दाखवेल, ते प्रेक्षकांनाही कळलं नसतं! ज्याने जो अर्थ घ्यायचाय , तो घेतला असता! (हाच चित्रपट दीपा मेहता(फायर, अर्थ्,वॉटर वाली) हीनं घेतला असता, तर शेवट दाखवला असता की, त्या भामट्या ऍश ला अद्दल घडवण्यासाठी सलमान्-अजय लग्न करतात क्यानडात जाउन! आणि मस्त ऍवार्डस वगैरे मारले असते ह्या बाईनं.म्हंजे ते दोघही खुश, ऍश ला अद्दल घडली ती वेगळीच. सगळाच कसा सुखांत!) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

In reply to by मन

(हाच चित्रपट दीपा मेहता हीनं घेतला असता, तर शेवट दाखवला असता की, त्या भामट्या ऍश ला अद्दल घडवण्यासाठी सलमान्-अजय लग्न करतात क्यानडात जाउन! हहाहा... हे फारच आवडले... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मन

झकासराव 23/05/2008 - 19:32
हाच चित्रपट दीपा मेहता(फायर, अर्थ्,वॉटर वाली) हीनं घेतला असता, तर शेवट दाखवला असता की, त्या भामट्या ऍश ला अद्दल घडवण्यासाठी सलमान्-अजय लग्न करतात क्यानडात जाउन! आणि मस्त ऍवार्डस वगैरे मारले असते ह्या बाईनं.म्हंजे ते दोघही खुश, ऍश ला अद्दल घडली ती वेगळीच. सगळाच कसा सुखांत =)) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

चावटमेला 23/05/2008 - 14:12
मस्तच मास्तर, लै भारी.. ह्या सीन मध्ये अमरिश पुरी प्रमाणेच मंदीराच्या मनात खालील विचार चालले असतील "अगं सटवे, अशी डाव खेळलीस काय ?इकडे माझ्या भावाला नादी लावलेस आणि तिकडे ह्याच्याबरोबर गुलछर्रे उडवित होतीस काय्?इथे हे आम्हाला समजले म्हणून बरे, नाहीतर, तिकडे त्या इंग्लंडात अजून काय धंदे केले असतील देवच जाणे??? आणि हा मुडदा सुध्दा काय निर्लज्ज आहे. एवढा मरेपर्यंत मार खावून सुद्धा कसा उजळमाथ्याने चालला आहे.बरं झालं , चांगलंच बदडलं ह्याला, मी तर म्हणते छान चेचून काढायला हवं होतं. मीच कपाळकरन्टी म्हणून ह्या नरसाळ्यावर भाळले होते.वेळीच समजलं म्हणून बरे, नाहीतर, मै मा बननेवालि हू म्हणायची वेळसुद्धा आणली असती ह्याने माझ्यावर, ह्या बाजारबसवीसाठी हा नरसाळाच ठीक आहे, जा आता आणि बसा गळ्यात गळे घालून( आणि मी जाते क्रिकेट कॉमेन्ट्री करायला गळा उघडा टाकून ;) )"

In reply to by चावटमेला

धमाल मुलगा 23/05/2008 - 14:17
सटवी काय, नरसाळा काय, मुडदा काय.... अगाबाबो..... त्यांच्यापैकी कोणी हे वाचलं तर झीट येऊन पडतील की :)
मै मा बननेवालि हू म्हणायची वेळसुद्धा आणली असती ह्याने माझ्यावर, ह्या बाजारबसवीसाठी हा नरसाळाच ठीक आहे, जा आता आणि बसा गळ्यात गळे घालून
:))
( आणि मी जाते क्रिकेट कॉमेन्ट्री करायला गळा उघडा टाकून Wink )"
=)) =)) =)) स्वगताचा शेवट मात्र एकदम वास्तवदर्शी आहे हो चावटशेठ ;)

अरे सकळ्या त्रिकोणी लव्हस्टोर्या अशाच असतात. मला आजही कळलेल नाही की सलमान अस काय सांगतो म्हणून दोन सीन पुर्वी दोन्ही नायकांच्या नावाने शिमगा करणारी माधुरी संजय दत्तशी लग्न करायला तयार होते.

शितल 24/05/2008 - 03:40
मास्तरा॑नी डीडीएलजी ची केलेली शाळा आणि त्या वरच्या सर्वच प्रतिक्रिया ह्या अफलातुन आहेत. चावटमेला साहेबा॑नी तर हातच॑ काहीच राखुन लिहिले नाही आहे. त्यामुळे हि॑दी पिक्कचर आणि त्यात ते करण जोहर असेल पैसे घालुन बघणे म्हणजे, आ बैल मुझे मार हा प्रकार. प्रेमाच्या भानगडी शिवाय हे हि॑दी पिक्कचर निर्माते पिक्कचर बनवु शकत नाहीत का ?

मनिष 27/05/2008 - 17:50
कदाचित संजय लीला भंसाळी नीट दाखवू/पट्वू शकला नसेल पण सिनेमात 'प्रेम करणे' आणि 'प्रेम निभावणे' यातला फरक ऐश्वर्याला (नंदिनीला) लग्नानंतर जाणवतो - सलमान (समीर) हा वेगळ्या वातावरणात वाढलेला, अवखळ, मजेशीर पुरुष - नंदिनी त्याच्या प्रेमात पडते आणि अजय देवगण (नाव काय त्याचे सिनेमात) फक्त तिच्या प्रेमाखातर आणि तिच्या इच्छेखातर तिला सलमानकडे घेऊन जातो. त्यात तिला जाणवणारा त्याचा दुहेरी पराभव ('इस मे दोनो तरफ हार मेरीही आहे') -- नवर्‍याबरोबर राहिली तर तिच्या मानाविरुद्ध रहाते आणि झुरते म्हणून तर सलमान (तिचे प्रेम) कडे नेले तर ती त्याच्याबरोबर जाणार म्हणून. असे असूनही तिला खरच तो भेटावा म्हणून अजय चा सच्चा प्रयत्न. त्या प्रवासात, प्रयासात त्यांच्यात तिला जाणवणारा 'प्रेमात पडणे'/आकर्षण (infatuation) आणि प्रेम निभावणे/खरे प्रेम (love) ह्यातला फरक -- त्याच्यात निर्माण होणारे नाजूक बंध हे सगळे जर नैसर्गिकपणे उलगडत/उमगत गेले तर मला वाटते हे इतके विचित्र वाटत नाही. भंसाळी चा प्रयत्न खूपच चांगला वाटला. तो जर कुठे फसला/अपयशी ठरला असेल तर तो माझ्या मते असा - (१) सलमान चा अतिशय पोरकट अभिनय (त्यात नवीन काय म्हणा?) -- ते वडिलांशी बोलण्याविषयी - भंसाळी म्हणे बोलायचा असा कल्पनेत त्याच्या वडिलांशी (तसे बरेच जण बोलतात कल्पनेत त्यांच्या प्रिय व्यक्तीशी/support system, त्या व्यक्तीच्या निधनानंतर) -- आणि एक दिवस सलमान्ने फोने करून त्याला विचारले कि असे करूया का? भंसाळी भारावला आणि त्याला वाटले की सलमान खूपच जोडला गेला आहे त्या स्क्रिप्टशी - हे भंसाळीनेच एका मुलाखातीत सांगितलेले आठवते. अर्थात चांगल्या कल्पनेची प्रत्यक्षात माती करावी तर सलमाननेच....ते प्रत्यक्षात इंटेन्स वाटण्याऐवजी विनोदीच वाटले. (२) अजय आणि ऐश्वर्याचे नाते फुलतांना अजून छान दाखवायला हवे होते - तिला होणारी प्रेमाची जाणीव, तिचे अजयमधे गुंतणे हे जरा प्रभावीपणे यायला हवे होते. त्या मनाने तिला जाणवणारे अजयचे प्रेम जाणवते. पण जेवढ्या तीव्रतेने तिचे समीरमधे गुंतणे, त्याच्या विरहात व्याकुळ होणे येते - तेवढ्या प्रभावीपणे अजयचे आणि तिचे नाते दिसत नाही. तसेच अपेक्षित शेवटाकडे जातांना भंसाळीने ऐश्वर्याच्या व्याकुळतेची तीव्रता कमी होतांना दाखवायला हवी होती - 'अरे खरच काय मी कशाच्या शोधात आहे, मला वाटलेल्या प्रेमाच्या मृगजळाच्या की माझा नवरा जे जीवापाड प्रेम करतो आहे ते खरे आहे?' हे नाही तितक्या प्रभावीपणे जाणवू शकले. (३) अजय आणि सलमानची भेट ही अतिशय वाईट कल्पना - अजयला वाटणारी असूया हि एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती - ती तशीच राहू द्यायला हवी होती. त्यांना 'फिल्मी योगायोगाने' मित्र बनवण्याची काहिच गरज नव्हती. मला वाटते, भंसाळी काही सीनच्या, गाण्याच्या आणि visualizations च्या प्रेमात पडला नसता (उदा.ढोली तारो ढोल बाजे) तर स्क्रीप्टला न्याय मिळाला असता. जितक्या प्रभावीपणे सलमान-ऐश्वर्याचे नाते येते तितक्या प्रभावीपणे अजय-ऐश्वर्याचे जुळणारे नाते येत नाही. हा भंसाळीचा पराभव. मंगळसुत्र हे commitment किंवा 'प्रेम निभावणे' (love is a verb, not noun) या सहज प्रतिकात्मक अर्थाने न येता पारंपारिक, फिल्मी पद्धतीने 'Cliché' होऊन येते. पण तरीही मला एकूण सिनेमा इतका विचित्र/विनोदी वाटला नाही. 'वो सात दिन' हाही असाच एक सिनेमा - त्यातही बरीचशी अशीच ट्रिटमेंट जाणवली. बाकी - धमु ने म्हटल्याप्रमाणे 'अलबेला सजन आयो रे...' साठी हजार चुका माफ! खर तर ह्यातली सगळीच गाणी अप्रतीम आहेत - दरबारीतला 'अलबेला सजन..' आणि 'तडप तडप के....' वर जीव ओवाळून टाकावासा वाटतो. असो! फारच सविस्तर झाले.... - (फिल्मी) मनिष अवांतर - नुकत्याच आलेल्या 'यू, मी और हम' मधेही हिच love is a verb, not noun कल्पना होती पण त्याचा साग्रसंगीत बट्ट्याबोळ केला आहे! :) कदाचित आपल्या 'प्यार किया नही जाता, हो जाता है" फिल्मवाल्यांना हि कल्पना माहित असेल पण अजून नीट उमजलीच नसेल.

In reply to by मनिष

धमाल मुलगा 27/05/2008 - 18:18
मनिष, छान सांगितलस :) माझ्यासारखं टोकाची भुमिका न घेता सांगोपांग विचार करुन सौम्य शब्दात योग्य भावना पोहोचवल्यास. अभिनंदन !
जितक्या प्रभावीपणे सलमान-ऐश्वर्याचे नाते येते तितक्या प्रभावीपणे अजय-ऐश्वर्याचे जुळणारे नाते येत नाही. हा भंसाळीचा पराभव.
+++१
तसेच अपेक्षित शेवटाकडे जातांना भंसाळीने ऐश्वर्याच्या व्याकुळतेची तीव्रता कमी होतांना दाखवायला हवी होती
सही रे भिडू!

In reply to by मनिष

फारच छान मनीष.. हम दिल दे चुके सनमचे अप्रतिम विश्लेषण....तुझे तीनही मुद्दे एकदम पटले... वो सात दिन सुद्धा तसाच आहे, मला थोडा जास्त छान वाटतो... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मनिष

मनीष, मग तिच्या आधीच्या प्रेमभावनेचं काय? तिला वाटले ते नुसतेच आकर्षण? की एक माणूस आपल्यावर इतकं समजूतदार इत्यादी प्रेम करतो आहे, म्हणून आपणच निर्माण केलेल्या आधीच्या नात्यांना मोडीत काढायचे? (सलमानचं कॆरेक्टर अत्यंत आचरटपणे रंगवल्यामुळे मला काही काळ ’बरे झाले’ असा एक आसुरी आनंद झाला, नाही असे नाही! पण) मंगळसूत्र क्लिशे होऊन येते हे खरेच आहे. पण समजा असे गृहित धरू, की तो क्लिशे नाही. तरीही ऐश्वर्या आपल्याच नात्याला तिलांजली देऊन नव्या नात्यात अडकते? मला हे फार उथळ वाटते. त्यापेक्षा भन्साळीच्याच ’सॉंवरिया’मधली प्रेयसी मला सच्ची आणि पुरेशी हट्टी वाटली होती. (बाकी सिनेमाबद्दल न बोलणे बरे!) एका ठिकाणी गुंतलेला जीव असा इतक्या सहजासहजी उचकटला जात नाही. मग समोरचा माणूस कितीही जिवापाड प्रेम करत असो. त्याचे प्रेम हे बर्‌याचदा आपण बाहेरूनच पाहू शकतो... असो. वाद नव्हे.... पण नाही पटले खरे... खूप समंजस शब्दांत उकलून दाखवले आहे तुम्ही.

In reply to by मेघना भुस्कुटे

मनिष 31/05/2008 - 11:10
खरे आहे....जर आधीची प्रेमभावना स्ट्रॉंग सेल तर तू (चालेल ना?) म्हणते ते बरोबर आहे. पण भंसाळीला ते दखवायचे नव्हते - त्याला अपेक्षित असलेल्या कथेच्या दृष्टीने मी सांगत होतो. आपल्या सारख्या स्वतंत्र वृत्तीने वाढलेल्यांना पटणार नाही हे, पण काही वेळा असे होते हे समजून घेता येईल.

In reply to by मनिष

मनीष, अर्थातच ’तू’ चालेल! काही वेळा असे होते खरे. बाकी भन्साळीच्या एकंदर आवाक्याचा विचार करता आपण त्यावर इतके शब्द उधळावेत का, असा एक पोटप्रश्न पडतो आहे मला. बाय दी वे, कुणाला ’कभी अलविदा ना केहना’ वर काहीच म्हणायचं नाहीय का? मुळात विवाहबाह्य संबंध हा करण जोहरच्या दृष्टीनं ’अब्रह्मण्यम्‌’ विषय. तो त्यानं निवडला हीच एक मोठ्ठ्ठ्ठी अचीव्हमेंट. पुढचा सगळा शेणकाला आपण त्याच्याकडे दयार्द्र दृष्टीनं पाहून माफ केला पाहिजे, असा माझा एकंदर दृष्टिकोन होता. पण सिनेमा पाहिल्यावर तो मला चक्क आवडला. अमिताभचा ’सेक्सी सॅम’ आचरटपणा किंवा राणी मुखर्जीचा निरागस मूर्खपणा (दुकानातल्या बेडवर बसून इतक्या संशयास्पद पद्धतीनं रात्रीच्या सीनची तालीम करतं कुणी? आचरट नाहीतर...) करणबद्दलच्या एकूण अपेक्षांना साजेसा होता. पण नात्यांबद्दलची जाण चक्क प्रगल्भ म्हणावी अशी होती. ’अर्धी-मुर्धी नाती असण्यापेक्षा ती तोडून टाकणे उत्तम’ ही स्पष्टोक्ती किंवा प्रामाणिकपणा या भावनेला महत्त्व देऊन तथाकथित पवित्र विवाहसंस्थेशी बेईमानी करणे किंवा ’इस घरमें मर्द मैं हूं’ असा प्रीती झिंटाचा स्पष्ट बोचरा उद्गार... सुखद धक्का. ध्यानीमनी नसताना. (तरी शाहरुख खान, प्रीती झिंटा, अभिषेक आणि राणी यथाशक्ती डॉक्यात गेलेच.) असे अजून काही सिनेमे आठवताहेत?

In reply to by मेघना भुस्कुटे

मुळात विवाहबाह्य संबंध हा करण जोहरच्या दृष्टीनं ’अब्रह्मण्यम्‌’ विषय. तो त्यानं निवडला हीच एक मोठ्ठ्ठ्ठी अचीव्हमेंट. हे खरं..तो इतपत रिस्क घेइल असे कधीच वाटले नव्हते ... निदान विषय निवडीसाठी त्याला बरे मार्क... पण पुढे सिनेमाभर प्रत्येक कॅरेक्टर विचित्र वागत राहते... ( ते सरप्राईज करायचे प्रसंग वगैरे) घडोघडी वैताग येत राहतो... मात्र प्रीती झिन्टा शाहरूखच्या कानाखाली ठेवून देते हा प्रसंग लै मज्जा आणतो... ... दोन किरकिरे जीव आधीच्या संसारातून भांडून एकत्र येतात ,...ठीकच आहे...पण ते पुढे एकमेकांबरोबर सुखाने राहतात की नाही हाच एक मोठा प्रश्न... तात्पर्य : दुरून दुसर्‍याच्या बायका (किंवा दुसर्‍यांचे नवरे ) कितीही साजरे दिसले तरी त्या स्वतःच्या बायका (किंवा स्वतःचे नवरे ) होतील तेव्हा साजरे नसतात ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनिष 27/05/2008 - 20:27
काही खरच डोक्यात जाणार्‍या सिनेमांच्या कथा... काही खरच डो़क फिरवणार्‍या कथा/सिनेमे असे आहेत की डायरेक्टर भेटला की डायरेक्ट त्याच्या श्रीमुखात द्यावी असे वातते. आठवेल तसे लिहितो इथे - चुपके-चुपके - मागच्या वर्षी आलेला शाहिद कपूर - करीना कपूर ह्यांचा सिनेमा. त्यात शाहिद चे गावात सुषमा रेड्डीवर प्रेम, इकडे काही अतर्क्य घतनानंतर साहेब करीनाच्या प्रेमात - त्याचा गैरसमज की सुषमा रेड्डीचे लग्ना झले आहे - करीना शाहिद च्या प्रेमाचा रस्ता मोकळा - मोकळा म्हणजे एकदम हायवे होतो (नाही, सैफ नव्हता सिनेमात! :)); इतका की सिनेमाभर गुजरातचे गोडवे गाणारे कुटुंब एकदम पंजाबी गाणे गाऊन आनंद साजरा करते..जाऊ दे. माफ प्रियदर्शनला! पण हाईट म्हण्जे, सिनेमाच्या शेवटी सुषमा रेड्डी लग्नघरी येते आणि सगळा खुलासा होतो - आता शहिदची अगदी शाही पंचायत -- आणि प्रियदर्शनची पण. काय करावा साहेबांनी क्लायमॅक्स?? तर सुषमा रेड्डी शहिदला म्हणते (करीनाचा आग्रह करून झाल्यावर) - तू करीनाशी लग्न कर,कारण?......कारण का तर म्हणे ती मुकी आहे?? 'उसे सहारा दो!' अरे किती मुर्ख आणि क्रूर कारण? दया म्हणून प्रेम/लग्न?? किती हॉरीबल??? हाच का तो हेराफेरी देणारा प्रियदर्शन?? कितीही विसरू म्हटले तरी हा क्लायमॅक्स डोक्यात जातो!!!

In reply to by मनिष

मनिष 28/05/2008 - 11:42
शाहिद कपूर - करीना ह्यांच्या सिनेमाचे नाव "चुप-चुपके" होते! चुकीबद्द्ल क्षमस्व. - मनिष स्वगत : तसेही कोणी वाचलेले दिसत नाही! :)

मनिष 27/05/2008 - 20:46
बेनाम बादशाह - आयुष्यात बकवास सिनेमे (थिएटर मधे जाऊन) बघण्याची पापे खूप केली, पण जेवढा संताप/उद्वेग/वैताग ह्या चित्रपटाने आला, तेवढा कुठल्याही इतर सिनेमाने आला नाही. ह्याची कथा साधारण अशी - अनिल कपूर असाच एक अनाथ, मवाली सुपारी घेणारा. एक दिवस सुपारी घेऊन तो (अनोळखी) जुही चावलावर बलात्कार करतो, ती मुर्ख मुलगी इतर काही करण्याऐवजी (जसे बदला) त्याच्या मागे लागते लग्न कर म्हणून. किती हिडिस कल्पना आहे ही?? काही बोलवत ही नाही. हे दोघेही तसे नावाजलेले कलाकार - त्यांनी होकार दिलाच कसा असा सिनेमा करायला? आणि डायरेक्टर कोणी 'के. रवी शंकर' म्हणून...त्याला भेटून एकदा कानाखाली जाळ काढायची खूप इच्छा आहे..किंवा विचारावेसे वाटते, जर असेच तुझ्या मुलीच्या बाबतीत झाले तर काय करशील?? किळसवाणा सिनेमा आहे खरच - जर 'रारंग ढांग' सारख्या कथेला सेन्सॉर परवानगी देत नसे, तर अशा कथेला कशी परवानगी मिळते?? मुर्खपणा सगळाच...

In reply to by मनिष

किती हिडिस कल्पना आहे ही?? खरंच...साउथचे सिनेमे भडक असतात माहित होते पण हा काय सिनेमा झाला? कसली गोष्ट? .. त्यातलं एक टुकार गाणं आठवतंय...( का आठवतंय कोण जाणे ?) बेवडा अनिल कपूर बोंबलत हिंडत गाणं म्हणत असतो, " माता कौन पिता कौन, कचरे के डिब्बे में गिराया गया कचरे के डिब्बेसे उठाया गया...." ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लक्ष्य हा डोक्यात जाणारा सिनेमा नाही... चांगला आहे...गोष्ट अभिनय गाणी नृत्य ( मै ऐसाही हूं) चगैरे मस्तच.... . ..पण एक मुद्दा नेहमी खटकत / जाणवत असे, ______ ही गोष्ट जर एका एमलेस माणसाला त्याचे ध्येय सापडणे यावर आहे, आणि त्याची एक प्रोमोज मध्ये जहिरात असे की " ही डिस्कव्हर्ड व्हॉट ही वाँटेड इन लाईफ ऍट अमुक अमुक थाउजंड फीट" ( शब्द थोडेफार वेगळे असतील ) अशा अर्थाची काहीतरी.... मग पिक्चर पाहिल्यावर असे वाटले, की ज्या क्षणी त्याने त्याचा आळशीपणा सोडला आणि आय एम ए गंभीररित्या (एकदा पळून आल्यानंतर पुन्हा ) जॉइन केली तेव्हा गोष्ट पूर्ण झाली, ही डिस्कव्हर्ड व्हॉट ही वॉन्टेड इन लाईफ..... मग पुढे तो सैनिक होतो, कारगिल मध्ये पराक्रम गाजवतो की नाही, युद्धात जिंकतो की नाही , मरतो का वाचतो हा प्रश्न लांबचा.... मुख्य सिनेमा कधीच संपला... ( म्हणजे प्रीमाईस यशस्वी होणे किंवा न होणे असा नसून ध्येय सापडणे असा आहे) हे मी कोणाला कधी बोललो नाही, पण एकदा जावेद अख्तरची मुलाखत चालली होती ,( कोणता सिनेमा चुका सुधारून पुन्हा लिहायला आवडेल? अशा प्रश्नावर त्याने मेरी जंग आणि लक्ष्य या दोन सिनेमांची नावे घेतली होती)) तेव्हा तोही असेच म्हणाला... (म्हटलं बेष्ट... लै खुश झालो...) लक्ष्य ची स्टोरी स्क्रीनप्ले जावेद चा की फरहानचा? कोणाला माहित आहे का? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ऋचा 28/05/2008 - 14:36
अस्साच एक डोक्यात जाणारा चित्रपट म्हणजे "कभी खुषी कभी गम" ~X(

In reply to by ऋचा

आईबापावर प्रेम करण्याचे दोनच मार्ग. त्यांच्या गळ्यात पडणे नाहीतर त्यांच्या पायांवर लोळण घेणे. मग ते चुकीचं सांगत असोत, बरोबर सांगत असोत, काहीही फरक पडत नाही. 'माफी माँगनेसे आदमी छोटा नहीं हो जाता' हे वर. म्हणजे? काही चुकलं नसेल तरी उग्ग्ग्ग्गाच माफी मागायची? का म्हणून? आणि लग्नासारख्या गोष्टीत मनमानी करायला येणारे आईबाप हा पुरातनकालीन विषय आपण कधी बंद करणार आहोत? (करण जोहरकडून ही अपेक्षा म्हणजे फारच झाले म्हणा!) त्यात आणि ती डॉक्यात जाणारी करीनाची 'पू'. आणि तिला 'कपडे घाल, कपडे घाल' म्हणून पिडणारा शाहरुख खान. भारतीय संस्कृती जपणारी काजोल. (केवळ काजोल होती म्हणूनच. नाहीतर...)

In reply to by मेघना भुस्कुटे

कोलबेर 31/05/2008 - 10:17
मस्त!! ह्यावर एक स्वतंत्र लेखच टाका! अवांतरः ह्या पंजाब्यांचं माहित नाही पण 'पू' म्हंटलं की आमच्या डोक्यात तरी जखमेतुन वाहणारा एक दुर्गंधीयुक्त स्त्राव येतो!!

मन 28/05/2008 - 14:44
हा चित्रपट पाहुन अब "प्र्क्षक क्या करे" तेच कळलं नाय. त्यो अजय देवगण म्हणे त्या (अविवाहित्/कुमारी) काजोलला वाचवतो. कुणापासुन काय म्हणताय? अर्थातच गुंडांपासुन,ते ही त्यांनी काही "भलतसलतं" करायच्या आत. आनि तत्काळ लगेच तेच "भलत सलतं" स्वतःच करुन मोकळा होतो, येका रात्रित,ट्रेन मधी. (थोडक्यात काय, तर तो गुंडांना जे करण्यापासुन अडवतो, तेच स्वतः खुशाल करुन मोकळा होतो.) आणि तोंडाला काळं लावुन जो पसार होतो, तो पुन्हा गावतच नाय लवकर. इकडे काजोलला (विवाहपुर्व)अपत्यप्राप्ती होतेच(अपेक्षेप्रमाणे). आणी तिथुन पुढं काय तर "मनाचा-गुंता", "तरल्-नाती" असला भुक्कड मालमसाला भरलाय. बाकी गाणी अप्रतिम,(केवळ त्यासाठी शिणुमा पुन्हा पुन्हा बघायची तयारी आहे आपली.) (हद्द हिच, की, अशा प्रकारे पसार होउन, कित्येक तपांनंतर हे महाशय जेव्हा गावतात त्या काजोलला, तेव्हा ती बया त्याच्या दोन मुस्काडात देण्याऐवजी,किंवा स्वतःवर आनी त्याच्यावर खजील राहण्याऐवजी खनकळत "नकळत" पुन्हा त्याच्या वर फिदा. हाय रे कर्मा. काय काय बघाव आता उघड्या डोळ्यांनी.) तर ह्या शिणुमातुन लेकी-बाळिंना संदेश्/उपदेश येकच, बायांनो, जो तुम्हाला "वाचवायला" येइल, त्याच्यापासुन जरा "वाचुन"(आणी वचकुनच) रहा. आपलाच, मनोबा

यशोधरा 28/05/2008 - 23:52
>>> लक्ष्य ची स्टोरी स्क्रीनप्ले जावेद चा की फरहानचा? जावेद अख्तर यांचा. दिग्दर्शन फरहानचे.

'लक्ष्य' पाहून मलाही असंच वाटलं होतं. ध्येय सापडणं आणि यशस्वी होणं या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत खर्‍या. आणि कहर वाटली होती ती हृतिकची व्यक्तिरेखा. पूर्वार्धात तो किती बालिशपणे वागतो! प्रीती झिंटा आणि तो एकमेकांच्या खरेच प्रेमात पडले आहेत, की 'बरी मैत्री आहे... सोयीचे आहे झाले' म्हणून ते प्रेमगाणी गाताहेत हेच कळत नाही. त्यांच्यात 'रोमान्स' कुठे दिसतच नाही. दिसते ती फक्त जुन्या मित्रमंडळींबद्दल होते ती सवयीची भावना. एकमेकांना आवडीने 'चालवून' घेणे. मग एकदम 'कितनी बातें केहनेकी हैं..'मधे रोमान्स. त्यांच्यात इतकं सगळं आठवण्याइतकं घडलं तरी कधी, आपण तेव्हा कुठे होतो... असे प्रश्न पडतात ते गाणं पाहताना.

In reply to by मेघना भुस्कुटे

कोलबेर 31/05/2008 - 11:35
अगदी खरंय...अरे तुच का तो 'दिल चाहता है' बनवणारा??? असा पश्चात्ताप करत बाहेर पडलो होतो.

In reply to by मेघना भुस्कुटे

_मग एकदम 'कितनी बातें केहनेकी हैं..'मधे रोमान्स. त्यांच्यात इतकं सगळं आठवण्याइतकं घडलं तरी कधी, आपण तेव्हा कुठे होतो... असे प्रश्न पडतात ते गाणं पाहताना. _ फार छान वाक्य... अगदी हेच म्हणतो... ____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आता थोडं लिहितो ओम शांती ओम बद्दल... मी या सिनेमाबद्दल अजिबात अपेक्षा न ठेवता गेलो होतो त्यामुळे मला बरा वाटला... दीपिका तर लै बेष्ट.. श्रेयसने सुद्धा छान काम केले आहे.. ( म्हातारा मात्र अजिबात दिसला नाही, श्रेयस म्हातारा आणि शाहरूख तरूण असलं पहायचं जीवावर आलं खरं)... ते जाऊदेत.. __________ शेवट थोडा अजून योग्य करता आला असता...ते झुंबर पडून अर्जुन मरतो वगैरे ठीकठाक.... मुख्य म्हणजे त्यानंतर हीरोला कळते की खरंच भूत हे सारे प्रकार करत होते... पण ही गोष्ट अर्जुनला कळायला नको का? नाहीतर त्याला इतकेच वाटणार की झुंबर पडायच्या अपघाताने आपण गेलो... मग इतके सारे प्रयत्न करून एवढी गोष्ट पाहून काय उपयोग? गोष्टीत दुष्टाला शासन हवेच पण त्याला ते कळायलाही हवे तर प्रेमाईस सिद्ध होणार ना... त्यातल्या झुंबराखाली पडलेल्या अर्जुनला दोन्ही दीपिका दिसतात आणि भूत त्याला त्या त्याच्व्या दुष्कृत्याची जाणीव करून देते आणि त्याची हीच शिक्षा आहे असे म्हणते ... आणि मरता मरता अर्जुन त्याच्या गुन्हयाची कबुली देतो..आणि ते दृश्य सारे लोक ( क्लोज सर्कीटवर पाहतात, किंवा चॆनलवाले ्शूट करून दाखवतात..) मृत्यूबरोबरच एखाद्याची संपूर्ण इमेज / जनमानसातली प्रतिमा संपणे ही मोठी शिक्षा आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मला नाही असं वाटलं. शांतिप्रिया सांगते की त्याला - मेरी सांसे चल रही थी... असं. आता हे थोडंच शाहरुखला माहीत असणारेय? म्हणजे ही ओरिजिनल शांती आणि हा तिनं घेतलेला सूड हे अर्जुनला कळणारच. त्यासाठी दोन दोन शांत्या (!) दाखवायची काय गरज आहे?

In reply to by मेघना भुस्कुटे

आता हे थोडंच शाहरुखला माहीत असणारेय? आता त्याला तर सगळंच आठवतंय म्हणून तर हे सारं करतोय तो...आणि ती काहीही बोलली असली तरी अर्जुनला तर असंच वाटत असणार की ही अभिनय करणारी नटी शाहरूखने शिकवलेले डायलॉग बोलतेय..( मला तरी असेच वाटले)......त्याला तिच्याबद्दल संशय आलेला आहेच... ... त्यामुळे आपल्याला दुसरी मानव दीपिका दिसल्यानंतरच नक्की कळते की हे आधीचे भूतच्...पण त्यांची अर्जुनशी काहीच इन्टरॅक्शन नाही , कारण तो आधीच मरतो... मग भुताचा सूड अगदी पक्केपणे कुठे दिसला ? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

छोट्या 15/07/2008 - 16:31
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ... कोणती तरि expectional गोष्ट असल्याशिवाय कोणी चित्रपट करत नाही (कमीत कमी चोप्रा family). अशा गोष्टिंमुळेच तर चित्रपट पहायला लोकं जातात. डोकं - बिकं लावून love story बघायच्या नसतात. त्यासाठी समांतर सिनेमे आहेत. मग चोप्रानीं कोन्या 'मास्तर' च्या जिंदगीवर पिक्चर काढायचा का? आणि तुमच्या डोक्यात जे प्रश्न आहेत त्याची थोडी फार उत्तरे आहेत पिक्चरमधे... उदा:: माझ्या बदनाम पोरीशी लग्न करायला कोण येणार आता?" किंवा त्या १५ २० सेकंदातले अमरीश पुरीचे स्वगत. याचं उत्तर तर लगेच सापडलं असतं... तिच्यासाठी तो 'कुलजीत' का कोण तो ..... कायम तयार असतो. आणि फसवा-फसवी च्या वर्तनावर जो आपला आक्षेप आहे तो पण काही बरोबर नाही वाटत... १०० पैकी ९५ love story मधे हा प्रकार सुरु असतो.... कोणी काही बापाची परवानगी घेउन असले उद्योग करत नाही.(काही सन्माननीय अपवाद सोडुन). मग चोप्रा दाखवले तर काय बिघडले??? त्यामुळे असल्या पिक्चरला उगाच नावे ठेवण्यात अर्थ नाही.

In reply to by छोट्या

तुझ्या भावना दुखावल्या असतील तर सॉरी रे बाबा..... लव्ह स्टोरी पाहताना सुद्धा डोके लावण्याची चूक झाली माझी... धन्यवाद, सल्ल्याबद्दल... आणि ९५ % लव्ह स्टोर्‍यांमध्ये कसा प्रकार चालू असतो ते सांगितल्याबद्दल सुद्धा धन्यवाद... तेवढे या सर्व्हेचे डीटेल्स दे म्हणजे झाले, का इथे सुद्धा डोके लावायचे नाही?? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

छोट्या 17/07/2008 - 12:30
काय मास्तर, आता या 'छोट्या' ने तुम्हाला शिकवायचं का? शेवटी डोकं आहे... कोणी कुठे लावायचं हा ज्याच्या त्याच्या डोक्याचा प्रश्न आहे. उगाच 'तुझ्या- माझ्या' करुन त्रागा नाही करुन घ्यायचा. आणि भावनांचं म्हणाल तर त्या 'पिक्चर' सारख्या फुटकळ गोष्टीत लावुन त्यांचा अपमान नाही करायचा!!! ;) ;) :P

In reply to by छोट्या

>> आणि भावनांचं म्हणाल तर त्या 'पिक्चर' सारख्या फुटकळ गोष्टीत लावुन त्यांचा अपमान नाही करायचा =)) पण हे मात्र मान्य की मास्तरांमुळेच जाम करमणूक झाली. येऊ द्या. (टुकार सिनेमांची चाहती) अदिती

गिरीराज 17/07/2008 - 15:54
आयला, मीपण असाच वैतागलो होतो 'हम दिल दे चुके सनम' पाहून>>>>> अहो असे म्हणा: "हम दिल देके चुके सनम"

मला या ठिकाणी एक नमूद करवेसे वाटते कि चित्रपट पाहताना असल्या तार्किक गोंष्टिंचा विचार करून चित्रपटाची मजा घालवू नये. व.पु. च्या कुठल्याश्या कथेमध्ये वाचले होते...चित्रपट म्हणजे ३ तासांचे एक सुन्दर स्वप्न. त्यामध्ये हे असेच का, ते तसेच का असे प्रश्न विचारून त्या स्वप्नाची मजा घालवू नये. जर चित्रपटात असे दाखवले कि नायक राकेलच्या रांगेत उभा आहे, तर कसे वाटेल. असे चित्रपट आपण बघु का? अरे आपल्या रोजच्याच जीवनातल्या समस्या पडद्यावर दाखवल्यातर ते पाहण्यासाठि कोण येइल? आणि मुख्य म्हणजे आपल्याला ते आवडेल का? तसेहि माणसाची प्रव्रुत्ती असते कि त्याला दुसर्‍याच्या पायात काय अडकले आहे ते बघण्याची उत्सुकता. आणि त्यात गैर काहि नाहि. तेवढेच निवांत क्षण/विरंगुळा आपल्या रोजच्या दगदगीतून आणि कटकटीतून. स्वप्नात काहिहि घडू शकते राव. त्याचा त्रास नाहि करुन घ्यायचा. त्यामुळे "रजनीकांत"चे चित्रपट पाहताना सुद्धा मी ऍंजाय करतो. (रजानीकांत केवळ मराठी आहे म्हणून मी तमिळ भाषेतील चित्रपट पाहण्याचे धाडस केले, आणि आपण एक स्वप्न पाहत आहोत एव्हढा एकच द्रुष्टीकोन असल्यामुळे त्याचे चित्रपट आवडले. त्यावेळी "हा असा काय हवेत उडतो" म्हणून मनाला त्रास करून नाही घेतला.) पण मला, भडकमकर मास्तरांनी लिहिलेले आमरस पुरि चे स्वगत आवडले....स्वप्न पाहण्याचा आणखी एक द्रुष्टिकोन. प्रत्येकाने आपापल्या द्रुष्टिने स्वप्न पाहावे अशा मताचा मी आहे. एखाद्या चित्रपटाचे/स्वप्नाचे अशा रितीने काथ्याकूट करणे मलाहि आवडेल.

In reply to by मध्यमवर्गीय

एखाद्या चित्रपटाचे/स्वप्नाचे अशा रितीने काथ्याकूट करणे मलाहि आवडेल. लिहा.. मग मीही त्यावर लिहीन की असल्या तार्किक गोंष्टिंचा विचार करून चित्रपटाची मजा घालवू नये ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

फारएन्ड 10/09/2010 - 05:46
एकदम आवडला :) मला या चित्रपटातील गाणी आणि बराच भाग आवडतो, पण हा शेवटचा भाग अजिबात आवडला नव्हता. त्या परमजीत ची काहीही चूक नसताना (मला नीट आठवत नाही) त्याचा उगाचच पचका केलेला आहे.

चिगो 12/09/2010 - 12:10
मस्त हाणामारी, चिरफाड केलीय... आणि DDLJ मला अजिबात न पचलेल्या पिक्चरपैकी एक आहे.. बाकी आपल्याला रजनीकांतचे पिक्चर आवडतात. डोकं शिणून दमतं आणि हलकं वाटतं बघा...

चिंतामणी 12/09/2010 - 13:00
जी पुढे कुकुहोहै, जप्याकिहोहै सारख्या अनेक सिनेमांमध्ये सुद्धा दिसली. चो चो (पक्षी चोरी चोरी) जप्याकिहोहैच्या आधिचा सिनेमा आहे. त्यातसुध्दा लग्नाच्या मांडवातुन नायीका नायकाबरोबर पळुन जाते. ही परंपरा या सिनेमाने सुरू केली आअहे असे म्हणले तर????????

In reply to by चिंतामणी

त्यातसुध्दा लग्नाच्या मांडवातुन नायीका नायकाबरोबर पळुन जाते. मुद्दा अमान्य कारण चोरीचोरीमध्ये ती नायकाबरोबर पळून जात नाही तर नुसतीच पळून जाते आणि त्यानंतर तिला बसमध्ये नायक भेटतो...

In reply to by भडकमकर मास्तर

मास्तर ब्याक इन फॉर्म! :-D मास्तर, आणखी कोणत्या पिच्चरची मापं काढा की! लै दिवस झाले तुमच्या लेखणीतून काही दमदार धागा आल्याला!

मन 21/05/2008 - 03:05
मनातले प्रश्न बोललात. मलाही हेच सारे(आणि इतरही अशेच अनेक) प्रश्न पडलेत. पण आपण अगदी नेमक्या शब्दात बोललात. (आणखी एक उदाहरणः- दि.चा है मध्ये ही प्रीती झिंटा-आमिर प्रकरणाचा एंड असाच आहे. थोडक्यात काय एखाद्याची होणारी बायको पळवल्याशिवाय ह्या हीरो मंडळींना चैन पडेनासं झालय.) आपलाच, मनोबा

In reply to by मन

अन्या दातार 16/07/2008 - 23:50
दि.चा. है मध्ये प्रिती झिंटा आणि आमीर यांच्यातील प्रेम अव्यक्त आहे. ते दोघे परस्परांना मित्र म्हणूनच भेटत असत. दिदुलेजा मध्ये नायिका(?) प्रेमाचा इजहार वगैरे करुन बसली आहे. दिचाहै मध्ये नायक तिला सर्वात शेवटी प्रेमाचा इजहार करतो. ही बाब लक्षात घ्यायला हवी. आपला, अन्या

In reply to by अन्या दातार

टारझन 17/07/2008 - 00:20
दिल चाहता है आम्ही थेटरात ३ दा आणि कंप्युटर वर ३५ वेळा पाहीलाय बहुतेक.. ३० नंतर काऊंट सोडलेला.. तो एक अमेझिंग चित्रपट आहे. त्यात कुठेही कसलीही अतिशयोक्ती किंवा अव्यवहारिक वाटलेलं नाही.... आमच्या भावना दुखावता ? ---(यदा कदाचित -२ मधला अफझल्या) कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

धनंजय 21/05/2008 - 04:27
एका नात्यातल्या मुलीला मुलाने होकार दिला, आणि साखरपुडा होण्यापूर्वी (हे तरी बरे) आपले खरे प्रेम दुसर्‍या कोणावर आहे, लग्न नको, म्हणून सांगितले. एका काकूंच्या मुलाने साखरपुड्यानंतर लग्न मोडले, आणि "खर्‍या" प्रेयसीशी त्यानंतर कायमसाठी बिनसले म्हणून पुन्हा मोडलेल्या मुलीच्या घरच्यांच्याकडे विचारणा केली!!!! त्यांनी अर्थात अपमानास्पदपणे "चालता हो" म्हटले, हे बरेच केले. पण एक बघायला पाहिजे ना - लग्न म्हणजे एक महत्त्वाच्या वस्तूची खरेदी आहे. एखादी सुंदर आणि महाग मोटारगाडी घेताना, आपल्याला किती आवडली, आई-बाबांना किती आवडली, कसल्या वळणाची आहे, कसल्या रंगाची आहे, हे सगळे गुण बघणे आलेच. सर्व गुण संपन्न असतीलच असे नाही. शिवाय कुठला गुण जास्त महत्त्वाचा वाटतो तेही सकाळ-संध्याकाळ बदलू शकते. म्हणजे मित्रांबरोबर असताना होंडा-सिटीचे गुण जास्त दिसतात, आई-बाबांशी बोलताना ह्युन्डाई ऍक्सेंटचे. मग कधी या डीलरकडे "कार विकत घेतो" असे म्हणणार, कधी त्या डीलरकडे. आधी एकाला "हो" म्हणून मग दुसर्‍यापाशी गाडी विकत घेतली तर पहिल्या डीलरचा पचकाच झाला... त्यामुळे कंत्राटावर सही केल्याशिवाय कार विकली नाही; अक्षता डोक्यावर पडल्याशिवाय वर-वधू खपली नाही. (स्पष्टीकरण : वधू-वर-संयोजन हा एक बाजारही असल्यामुळे त्याचे बाजारशास्त्रीय विश्लेषण केले आहे. तो बाजार थोडाफार अनैतिक आहे, असे माझे मत आहे. खोटे बोलून किंवा अर्धसत्य झुलवत ठेवून कुठल्याही मनुष्याच्या भावनांशी खेळणे मला अनैतिक वाटते.)

In reply to by धनंजय

खोटे बोलून किंवा अर्धसत्य झुलवत ठेवून कुठल्याही मनुष्याच्या भावनांशी खेळणे मला अनैतिक वाटते.) एकदम खरे... पण ह्या असल्या कथानकांमुळे उगीचच वेगळाच संदेश जात असेल ( सिनेमा एवढा कोणी सीरियसली घेत नाही, हे खरे आहे.......पण ऊठसूठ " घराने के संस्कार रीतीरिवाज , पिताजीकी भावनाएं " याची चाड पोरीला फार आहे असे दाखवायचे पण त्याच वेळी एका संपूर्ण कुटुंबाला फसवत राहायचे , ते सुद्धा काही तास किंवा एखादा दुसरा दिवस ( हा की तो , हा निर्णय न होण्याच्या काळात , समजा मुलगा बघताना वगैरे...)नव्हे तर महिनाभर आणि त्यांच्या नकळत केलेल्या प्रेमचेष्टांचे उदात्तीकरण करायचे ...... हा तद्दन भंपकपणा आहे)... बरं ही नैतिकतेच्या मार्गावरून अल्पकाळासाठी का होईना पाय घसरलेल्या एका मुलीची गोष्ट असती तर एक वेळ ठीक होते, पण अर्थातच तसले काही दाखवायचे नाहीये ... ( आणि तिला तिच्या चुकांची जाणीव होते आणि ती त्या मुलाला सॉरी म्हणते, इतपत तरी काहीतरी घडायला हवे होते) कॉलेजात असतानाही ग्रुप मधल्या काही मुलींशी मी बोललो तेव्हा त्यांना त्या हीरॉईनची काही चूक आहे असे वाट्लेच नाही, "प्रेमासाठी तिने केवढे रिस्क घेतले "अशा अर्थाचे बर्‍याचशा मुलींचे मत पडले....... कमाल आहे च्यायला.. अरे रिस्कच घ्यायचे तर बापाचा आणि कुटुंबाचा राग पत्कर, त्यांना समजावायचा प्रयत्न कर आणि ते होत नसेल तर घर सोडून जा आणि स्वतःच्या हिमेतीवर स्वतःचे घर उभार... ही खरी रिस्क ..... तुझे कौटुंबिक संबंध नीट रहावेत म्हणून लोकांना कसा काय मनस्ताप देऊ शकता ? आणि पुन्हा आमची ही नेहमीची चिडचिड की बर्‍याच मंडळींना विशेषतः महिलावर्गाला हे जाणवतच नाही...... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मदनबाण 21/05/2008 - 06:09
खोटारडा असला तरी पैसेवाला एकुलता एक लंडनचा आहे... आता सोडावं झालं पोरीला...".... :D हा मोकॅम्बो आतल्या आत फारच खुष झाला असणार बघा..... (मिस्टर इंडिया चा पंखा) मदनबाण.....

फटू 21/05/2008 - 07:10
पण कधी कधी असंही होतं... म्हणजे ती पुण्याला बी ए एम एस ला होती... वैद्यकी शिकता शिकता आपल्या एका वर्गमीत्राच्या प्रेमात पडली... बी ए एम एस संपलं... दोघांनीही लग्न करायचं ठरवलं... तो तिचा भावी नवरा म्हणून तिच्या घरी येऊन गेला... आणि तिला परदेशस्थ डॉक्‍टर मुलाचं स्थळ सांगून आलं... झालं त्या मुलीने आपल्या प्रियकराचा पत्ता काटला अन् त्या परदेशस्थ डॉक्‍टर मुलाशी लग्न केलं... आता बोला... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

विसोबा खेचर 21/05/2008 - 08:53
याला आधीच चांगला पिटून काढला बरे झाले....ही ही पोरगी पण एक नंबरची अडाणी...आमच्या या मूर्ख पोरीने इतके गुण उधळले आहेत की सगळ्या गावात आता बदनामी झाली आहे.... कोण बोंबलायला आता हिच्याशी लग्न करणार आहे देव जाणे... आणि हा भडवा तर बापाबरोबर चालला...ह्याच्यायला ह्याच्या... हा कसला जातोय? हा थांबणार... थांबायलाच पाहिजे यानं... अरे महिनाभर बोंबलत इथे रंगढंग केलेस ना आमच्या नकळत ? तुला भाड्या आता जबाबदारी नको घ्यायला ? खुशाल हिला अशीच टाकून जातोस ? काय की... अरे गाडी सुटली की रे...उतर रे उतर...चाललाच वाटतं...जरासा वेडझवाच दिसतो हा ... हं.... किंवा भलताच पोचलेला आहे ... साल्याला माझी गोची कळलीय वाटतं... खरंतर असल्या मूर्ख, नालायक, वेंधळ्या आणि फ़सवणूक करणार्या या माणसाची अजिबात लायकी नाही...पण आता आपल्या मूर्ख आणि बदनाम पोरीला तरी कोण मिळणार याच्यापेक्षा बरा?? खोटारडा असला तरी पैसेवाला एकुलता एक लंडनचा आहे... आता सोडावं झालं पोरीला...".... जा बाई जा... हा हा हा! आमरसपुरीचे हे स्वागत क्लासच आहे! मुलीचा हात सोडण्यापूर्वी क्षणभर त्याचा चेहरा दाखवला आहे त्यावर मास्तर म्हणतात तेच स्वगताचे भाव अगदी नेमके दिसतात! :) मास्तर, अजूनही शिणेमे येऊ द्यात... आपला, (काजोलप्रेमी) तात्या देवगण.

मुलीचा हात सोडण्यापूर्वी क्षणभर त्याचा चेहरा दाखवला आहे त्यावर मास्तर म्हणतात तेच स्वगताचे भाव अगदी नेमके दिसतात धन्यवाद तात्या.... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आमची अजून दोन निरीक्षणे आहेत... १. कुकुहोहै, जप्याकिहोहै, दिचाहै,दितोपाहै या सर्व सिनेमांमध्ये थोड्याफार फरकाने "दुसर्‍याच्या लग्नात जाऊन आपली प्रेयसी पळवून आणणे " हा कार्यक्रम दिसतो परंतु सर्वात जास्त त्रास देणारा चित्रपट मला दिदुलेजाच वाटतो... असं का बरं होत असावं? २. वर उल्लेखिलेल्या सर्व सिनेमांमध्ये कथा अशाच बांधलेल्या दिसतात की हीरॉईनचं नक्की ठरत नाहीये आणि ती ऐन वेळी एका दुसर्‍याच ( म्हणजे आधीच्याच प्रियकर ) माणसाबरोबर लग्न करते... हेच पुरुषाने केले तर त्याला इतकी सहानुभूती कोणी देईल का ?... मग तो बरोबर व्हिलन ठरेल...मला आत्ता या क्षणी तरी असे सिनेमे आठवत नाहीयेत की ज्यात ( १.पुरुष ऐन वेळी लग्नाला नकार देतो आणि पळून जातो + २. त्याचे त्याच वेळी उदात्तीकरणही केले जाते...) .... असो... याचे स्त्रीमुक्तीवादी उत्तर हे असणार की १. पुरुषांवर लग्नासाठी कुटुंबाचे इतके प्रेशर नसते, त्यामुळे त्याला सहानुभूती कशाला कोण द्यायला बसलंय ? तो वाईटच.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मन 21/05/2008 - 13:57
हेच पुरुषाने केले तर त्याला इतकी सहानुभूती कोणी देईल का ?... मग तो बरोबर व्हिलन ठरेल... जबरान... :-) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय 21/05/2008 - 21:53
( १.पुरुष ऐन वेळी लग्नाला नकार देतो आणि पळून जातो + २. त्याचे त्याच वेळी उदात्तीकरणही केले जाते...) अगदी नेमके असे केलेला म्हणजे नारायण ठोसर हा मुलगा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. (पण तो दुसर्‍या कुठल्या मुलीबरोबर लग्न करत नाही. हा लहान मुलगा विश्वाची चिंता करण्याइतका मनाने प्रौढ होता, पण आईवडलांच्या आग्रहाखातर बोहोल्यावर चढलाच.) आणखीनही उदाहरणे असावीत. दुसरे लग्न करणारा कुठलाही वीरपुरुष पहिल्या बायकोच्या जीवनाचे काही प्रमाणात मातेरे करतो असो मानता येईल. (हे मातेरे लग्नाआधी नसून लग्नानंतर असते, पण अधिक वाईट कुठले, ते सांगता येत नाही.) अशा वीरांचे, 'राज्याला वारस पुरवण्यासाठी कर्तव्य करणारा' म्हणून उदात्तीकरण होते. वरील दोन्ही उदाहरणे ऐतिहासिक आहेत, पण त्या उदाहरणांचे उदात्तीकरण मात्र आधुनिक आहे. (सगळ्या टीव्ही मालिका मला एकसारख्या वाटतात - पण अशी एक साचेबद्ध कथा बरेचदा दिसते ना? श्रीमंत उपवर तरुणाशी लग्न करायचा घाट एक पाताळयंत्री सुंदर तरुणी घालते, आणि लग्न पक्के होते. पण लग्नाआधी मुलाला तिचा नीचपणा समजतो. आणि त्याच्यावर प्रेम करणार्‍या सोज्ज्वळ पण सुशील मुलीबरोबर तो लग्न करतो...)

In reply to by धनंजय

अगदी नेमके असे केलेला म्हणजे नारायण ठोसर हा मुलगा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. =)) ह्या मुलाचा आम्ही पंखा आहोत.

साथिया चित्रपटात राणी मुखर्जी च्या वडिलांचा विवेक ओबेरॉय च्या वडिलांकडून अपमान होतो...याबद्दल राणी ला राग येतो पण तो थोड्याच वेळासाठी आणि नंतर चक्क त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न करते. इथपर्यंत सुद्धा ठीक ... पण लग्नानंतर ते आपापल्या घरी राहतात!!! (याला हिंमत म्हणावी की शुद्ध बावळट पणा?) हे कमी की काय म्हणून बघायला आलेल्या पाहुण्यांसमोर सांगून टाकते की मी आधीच लग्न केलं आहे!! (पाहुण्यांसमोर सांगून आई बापाची इज्जत का घालवायची? :( )

वेताळ 22/05/2008 - 10:12
हे पण अश्याच सिनेमात घडत असते. प्रथम छपरी हिरोशी उदांत प्रेम करायचे. गळ्यात गळे घालुन फिरायचे. चुम्माचाटी करायची. आणि दुसरा मुलगा बघायला येण्याआधी घरी बोंबलायचे,उल्ट्या करायच्या आणि हाच संवाद फेकायचा " मैं मां बननेवाली हुं".पण हेच तिला आधी का कळत नाही.ह्यात पण सगळी सहानुभुती त्या मुलीला. कारण ह्यात तिचा दोष नसतो दोष तिला मां बनवणारयाचा असतो. अजब तर्क. वेताळ

In reply to by वेताळ

विसोबा खेचर 22/05/2008 - 12:31
गळ्यात गळे घालुन फिरायचे. चुम्माचाटी करायची. वा! मागे केव्हातरी ऐकल्यासारखा वाटतो, 'चुम्माचाटी' हा शब्द क्लासच आहे!..:) आपला, (जुम्म्याला चुम्मा देणारा!) तात्या.

धमाल मुलगा 22/05/2008 - 12:19
मुलाचा चांगुलपणा, हुशारी, सचोटी , मेहनती वृत्ती , प्रामाणिकपणा वगैरे आवडून बाप प्रभावित झाला नाही तर " माझ्या बदनाम पोरीशी लग्न करायला कोण येणार आता?" या भावनेने नाईलाजाने तो यांच्या लग्नाला तयार झाला असे वाटते... मग हीरोने हिरॊईनच्या आईपुढे मारलेले डायलॊग सगळे गेले ना बाराच्या भावात... मग सिनेमाचा संपूर्ण दुसरा भाग ज्या गोष्टीसाठी बिल्ड अप केला आहे त्याचीच वाट लागली... आणि आम्हाला येडा का बनवले?
हे हे हे....आमचं पण हेच मत झालं होतं :) आणि तो बाप तरी कसा असा एकदम चंबू? शेवटपर्यंत आजिबात कळत नाही त्याला, हा बकरा में में करत आपल्या पोरीच्या लग्नघरात का फिरतोय? बाकी त्याचं स्वगत एकदम झक्कास! येऊ दे अजुन... स्वगतः आमच्या भावी सासर्‍याचं पण हेच स्वगत असावं काय? :?

झकासराव 22/05/2008 - 19:13
मुलाचा चांगुलपणा, हुशारी, सचोटी , मेहनती वृत्ती , प्रामाणिकपणा व>>>> =)) मास्तर तुम्ही तर त्या दिलवाले ची बिनपाण्याने केलीत की. :) आवडल आपल्याला तुमच मत. मी अजुन देखील हा चित्रपट पाहिलेला नाहिये. फुकटात सुद्धा. आणि हो त्या मंदीराला शाहरुखने फसवलेच की त्याच वाइट नाही का वाटल??? ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

आणि हो त्या मंदीराला शाहरुखने फसवलेच की त्याच वाइट नाही का वाटल??? तसं तिच्याबद्दल थोडं वाईट वाटलं... जास्त नाही कारण या पोरानं काही कमिट केलं नव्हतं तिला...( नव्हतं बहुतेक, आता काय नीट आठवेना... की त्यांच्या आई बापाचं काहीसं बोलणं झालं होतं?...??... ) हां..बरोबर ..मग तिचीसुद्धा झालीच की फसवणूक... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by झकासराव

टारझन 15/07/2008 - 17:56
मी अजुन देखील हा चित्रपट पाहिलेला नाहिये. फुकटात सुद्धा. आणि हो त्या मंदीराला शाहरुखने फसवलेच की त्याच वाइट नाही का वाटल??? खोटं बोलतोस ? चित्रपट पाहीला नाही ? मग रुकरुक आणि बधिरा बद्दल एवढ डिटेल कसं माहीत आ? कस्सा पकडला चोर ? ;) असो.. त्या शाहरूक चे सरसकट सगळेच चित्रपट बावळट असतात... सगळ्यात हाईट म्हणजे .. मोहोब्बते.... आरे काय ? तो बच्चन बिचारा शिस्त लावतो.. अभ्यासाच्या वेळी अभ्यास करा ...आणि हा बहाद्दर पोरांना लफडी करायला शिकवतो ! केवळ बच्चनचा विरोध म्हणून..आणि मग ती अती स्कॉलर पोरं पण लफडी करून डॉक्टर होतात... च्यायला डोक्यात जातो रे तो.... काहीही ... हाणा तद् माताय(विजाभौ प्रसन्न) (रुकरुक चा अँटीफॅन) कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

राजे 22/05/2008 - 19:16
मास्तर..... ज्यावेळी हे चित्रपट आले होते खास करुन डीडीएलजे ;) त्यावेळी असे काही वाटत नव्हते .. पण आज पुन्हा त्रयस्थ नजरे ने काही चित्रपट पाहीले की त्या चित्रपटाची मजाच जाते ! उदा. मोहरा त्याकाळी गाजलेला चित्रपट .... मी कमीत कमी ५ वेळा पाहीला होता.... पण आज तो चित्रपट १० मिनिटे पाहणे म्हणजे भयंकर सजा आहे असे वाटत :)) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

"...खुशाल हिला अशीच टाकून जातोस ? काय की... अरे गाडी सुटली की रे...उतर रे उतर...चाललाच वाटतं...जरासा वेडझवाच दिसतो हा ... हं.... किंवा भलताच पोचलेला आहे ... साल्याला माझी गोची कळलीय वाटतं... " अमरिश पुरीचं स्वगत वाचून हसता हसता लोळायची वेळ आली खरोखर. अफलातून. :) असाच मनस्ताप मला 'हम दिल दे चुके सनम' बघताना झाला होता. बाई ग, तुझं प्रेमबिम आहे ना सलमानवर? मग लग्न का करतेस दुसर्‍या माणसाशी? हे मनमानी आईबाप पोरांचं न ऐकता लग्न ठरवतात इथपर्यंत ठीक. पण ही मूर्ख पोरं बोहल्यावर कशी चढतात? तिथल्या तिथे बोंबाबोंब नाही का करता येत? एरवी एवढी येता जाता बापाच्या गळ्यात पडत असतेस ना बये, मग आता थोबाड उघडायला काय धाड भरली? बाप नाही तर नाही ऐकत, त्या बिचार्‍या अजय देवगणला सरळ सांगता येत नाही, की बाबा रे, असं असं आहे... लग्न-बिग्न नको. फुकटच्या फाकट लग्न करून बसला ना तो? बरं, ठीक आहे, लग्न केलं. मग तरी गप बसायचं. तेपण नाही. नंतर सांगायचा धीर आला. आला तर आला. मग जायचं सलमानसोबत. तोतरी सुखी. तेही नाही. एकदम चार रात्रींमधे सलमानवरचं प्रेम उडून अजयवर? कारण काय, तर मंगळसूत्र. अरे काय चाललंय काय? पोरखेळ आहे का? हे मंगळसूत्र आणि लग्नाची गाठ भलतेच पॉवरफुल्ल असतात एवढाच सगळ्या लव्हस्टोरीचा अर्थ. मूर्ख लेकाचे.

In reply to by मेघना भुस्कुटे

धमाल मुलगा 23/05/2008 - 10:37
जबरान् !!!!! आयला, मीपण असाच वैतागलो होतो 'हम दिल दे चुके सनम' पाहून. एक तो सलमान, काय ते येडं भंजाळल्यासारखं आकाशाकडं बघून जोरजोरात एकटंच गप्पा हाणत असतं, आमच्या गावात आहेत अशी एक-दोन वेडी माणसं :) बरं, मान्य आहे बाबा तू हाडाचा गायक बियक आहेस..म्हणजे ते काय म्हणतात बरं...हां, जन्मजात कलाकार आहेस, अरे पण म्हणून इतकं खुळ्यासारखं वागायचं? कलाकार काय अक्कलशुन्य असतात का? दुसरी ती ऐश्वर्या, तीच्या आयुष्यात नक्की काय प्रॉब्लेम आहे हेच कळत नाही..आपण काय करतोय, काय करायचंय, काय होइल...कश्शा-कश्शाचाच विचार नाही? आज काय म्हणे सलमानवर प्रेम....उद्या काय म्हणे बाबा म्हणतात ह्याच्याशी लग्न करायचं म्हणून एकदम "निंबुडा निंबुडा" करुन नाचत लग्नाला तयार, परवा काय तर त्या अजय देवगणासमोर अचानक पहिल्या प्रेमाचा साक्षात्कार... तो बिचारा शिगारेटी फुंकुन फुंकुन छातीचं खोकडं करुन घेतोय, आणि ही हिंडतीये त्या सलमानला शोधत.... बरं तो भेटल्यावर तरी गप त्याच्याबरोबर सुखानं संसार करावा, तेही नाही...परत अजय देवगणकडे गाडी वळलेली... काय बाई आहे का भिंताड? येऊन जाऊन त्या अजय देवगणनं साकारलेला संयत, समजुतदार, भल्या मनाचा नवरा हेच काय ते दु:खात सुख! आणि "अलबेला सजन आयो..." एएएएएकदम मस्त!!!!!! केवळ त्यासाठी भन्साळ्याचे सगळे गुन्हे माफ !

In reply to by मेघना भुस्कुटे

एकाच पात्राच्या किती चुका... १.बाप नाही तर नाही ऐकत, त्या बिचार्‍या अजय देवगणला सरळ सांगता येत नाही, की बाबा रे, असं असं आहे... लग्न-बिग्न नको _ २.बरं, ठीक आहे, लग्न केलं. मग तरी गप बसायचं. तेपण नाही. नंतर नवर्‍याला सांगायचा धीर आला. ३.मग जायचं सलमानसोबत. तोतरी सुखी. तेही नाही. एकदम चार रात्रींमधे सलमानवरचं प्रेम उडून अजयवर? कारण काय, तर मंगळसूत्र पण पहिल्यांदा बघताना जास्त जाणवल्या नाहीत चुका... ऐश्वर्याचं दिसणं, उत्तम संगीत आणि गाणी यात आख्खा सलमान सहन केला...( ऐश्वर्याच्या डीव्हीडी कॅप्चर्सवरून कोलाजेस , वॉलपेपर्स बनवणे हा आमचा त्या काळातला आवडता उद्योग) अजयचं पात्र बेष्ट रंगवलंय... ( मला या सिनेमात एक मर्मभेदक ऍडिशन सुचतेय की अजय देवगण शेवटी ती बोंबलत तिच्याकडे आल्यावर तिला म्हणतो, "...आज आलीस उद्या परत तिसर्‍याकडे जाशील... तुझ्या आवडत्या खेळापायी मला का त्रास सारखा? या टायमाला युरोप दर्शन झालं, पुन्हा म्हणशील आता ऑस्ट्रेलियात फिरूयात...अशी मानसिकदृष्ट्या अस्थिर चंचल स्वभावाची बायको मला नको .. चल हो बाहेर..." ... मग अगदी काव्यात्म न्याय मिळाल्यासारखं झालं असतं... :)) :)) _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर 23/05/2008 - 13:42
"...आज आलीस उद्या परत तिसर्‍याकडे जाशील... तुझ्या आवडत्या खेळापायी मला का त्रास सारखा? या टायमाला युरोप दर्शन झालं, पुन्हा म्हणशील आता ऑस्ट्रेलियात फिरूयात...अशी मानसिकदृष्ट्या अस्थिर चंचल स्वभावाची बायको मला नको .. चल हो बाहेर..." =)) हा हा हा मास्तर, तुमची मर्मभेदक ऍडिशन लै भारी आहे! :))

In reply to by विसोबा खेचर

मन 23/05/2008 - 16:55
मला सुचली ती अशी... समजा हा पिकचर करण जोहर ह्या प्रेमाच्या घाउक विक्रेत्याला दिला असता, तर त्याने:- येक शाहरुख वाढवला असता.जो, मुळात नाराज अजयचे मन वळवुन त्या सटवीला सलमानच्या दारात सोडुन ये म्हणतो. आता,शाहरुख ने य्व्हढे उप्कार केलेच आहेत म्हणल्यावर त्याची "परतफेड" कशी करावी या विवंचनेत असलेली ती येडझवी नायिका त्याच्याही प्रेमात पडली असती! मग झाला असता साक्षात्कारः- शाहरुख तर आधिच त्याची "मैत्रिण" काजोल(किंवा राणी) ह्यांच्या प्रेमात आहे. मग त्याला खुश कसे करणार्?त्या काजोलच्या गळ्यात मारुन! पण काजोल सलमानच्या प्रेमात आणी सलमान ऐश्वर्याच्या विरहात व्याकुळ का काय म्हणतात ते झाला आहे. मग? करणार कसं? हे त्या येड्यालाही कळलं नसतं आणि तो जे दाखवेल, ते प्रेक्षकांनाही कळलं नसतं! ज्याने जो अर्थ घ्यायचाय , तो घेतला असता! (हाच चित्रपट दीपा मेहता(फायर, अर्थ्,वॉटर वाली) हीनं घेतला असता, तर शेवट दाखवला असता की, त्या भामट्या ऍश ला अद्दल घडवण्यासाठी सलमान्-अजय लग्न करतात क्यानडात जाउन! आणि मस्त ऍवार्डस वगैरे मारले असते ह्या बाईनं.म्हंजे ते दोघही खुश, ऍश ला अद्दल घडली ती वेगळीच. सगळाच कसा सुखांत!) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

In reply to by मन

(हाच चित्रपट दीपा मेहता हीनं घेतला असता, तर शेवट दाखवला असता की, त्या भामट्या ऍश ला अद्दल घडवण्यासाठी सलमान्-अजय लग्न करतात क्यानडात जाउन! हहाहा... हे फारच आवडले... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मन

झकासराव 23/05/2008 - 19:32
हाच चित्रपट दीपा मेहता(फायर, अर्थ्,वॉटर वाली) हीनं घेतला असता, तर शेवट दाखवला असता की, त्या भामट्या ऍश ला अद्दल घडवण्यासाठी सलमान्-अजय लग्न करतात क्यानडात जाउन! आणि मस्त ऍवार्डस वगैरे मारले असते ह्या बाईनं.म्हंजे ते दोघही खुश, ऍश ला अद्दल घडली ती वेगळीच. सगळाच कसा सुखांत =)) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

चावटमेला 23/05/2008 - 14:12
मस्तच मास्तर, लै भारी.. ह्या सीन मध्ये अमरिश पुरी प्रमाणेच मंदीराच्या मनात खालील विचार चालले असतील "अगं सटवे, अशी डाव खेळलीस काय ?इकडे माझ्या भावाला नादी लावलेस आणि तिकडे ह्याच्याबरोबर गुलछर्रे उडवित होतीस काय्?इथे हे आम्हाला समजले म्हणून बरे, नाहीतर, तिकडे त्या इंग्लंडात अजून काय धंदे केले असतील देवच जाणे??? आणि हा मुडदा सुध्दा काय निर्लज्ज आहे. एवढा मरेपर्यंत मार खावून सुद्धा कसा उजळमाथ्याने चालला आहे.बरं झालं , चांगलंच बदडलं ह्याला, मी तर म्हणते छान चेचून काढायला हवं होतं. मीच कपाळकरन्टी म्हणून ह्या नरसाळ्यावर भाळले होते.वेळीच समजलं म्हणून बरे, नाहीतर, मै मा बननेवालि हू म्हणायची वेळसुद्धा आणली असती ह्याने माझ्यावर, ह्या बाजारबसवीसाठी हा नरसाळाच ठीक आहे, जा आता आणि बसा गळ्यात गळे घालून( आणि मी जाते क्रिकेट कॉमेन्ट्री करायला गळा उघडा टाकून ;) )"

In reply to by चावटमेला

धमाल मुलगा 23/05/2008 - 14:17
सटवी काय, नरसाळा काय, मुडदा काय.... अगाबाबो..... त्यांच्यापैकी कोणी हे वाचलं तर झीट येऊन पडतील की :)
मै मा बननेवालि हू म्हणायची वेळसुद्धा आणली असती ह्याने माझ्यावर, ह्या बाजारबसवीसाठी हा नरसाळाच ठीक आहे, जा आता आणि बसा गळ्यात गळे घालून
:))
( आणि मी जाते क्रिकेट कॉमेन्ट्री करायला गळा उघडा टाकून Wink )"
=)) =)) =)) स्वगताचा शेवट मात्र एकदम वास्तवदर्शी आहे हो चावटशेठ ;)

अरे सकळ्या त्रिकोणी लव्हस्टोर्या अशाच असतात. मला आजही कळलेल नाही की सलमान अस काय सांगतो म्हणून दोन सीन पुर्वी दोन्ही नायकांच्या नावाने शिमगा करणारी माधुरी संजय दत्तशी लग्न करायला तयार होते.

शितल 24/05/2008 - 03:40
मास्तरा॑नी डीडीएलजी ची केलेली शाळा आणि त्या वरच्या सर्वच प्रतिक्रिया ह्या अफलातुन आहेत. चावटमेला साहेबा॑नी तर हातच॑ काहीच राखुन लिहिले नाही आहे. त्यामुळे हि॑दी पिक्कचर आणि त्यात ते करण जोहर असेल पैसे घालुन बघणे म्हणजे, आ बैल मुझे मार हा प्रकार. प्रेमाच्या भानगडी शिवाय हे हि॑दी पिक्कचर निर्माते पिक्कचर बनवु शकत नाहीत का ?

मनिष 27/05/2008 - 17:50
कदाचित संजय लीला भंसाळी नीट दाखवू/पट्वू शकला नसेल पण सिनेमात 'प्रेम करणे' आणि 'प्रेम निभावणे' यातला फरक ऐश्वर्याला (नंदिनीला) लग्नानंतर जाणवतो - सलमान (समीर) हा वेगळ्या वातावरणात वाढलेला, अवखळ, मजेशीर पुरुष - नंदिनी त्याच्या प्रेमात पडते आणि अजय देवगण (नाव काय त्याचे सिनेमात) फक्त तिच्या प्रेमाखातर आणि तिच्या इच्छेखातर तिला सलमानकडे घेऊन जातो. त्यात तिला जाणवणारा त्याचा दुहेरी पराभव ('इस मे दोनो तरफ हार मेरीही आहे') -- नवर्‍याबरोबर राहिली तर तिच्या मानाविरुद्ध रहाते आणि झुरते म्हणून तर सलमान (तिचे प्रेम) कडे नेले तर ती त्याच्याबरोबर जाणार म्हणून. असे असूनही तिला खरच तो भेटावा म्हणून अजय चा सच्चा प्रयत्न. त्या प्रवासात, प्रयासात त्यांच्यात तिला जाणवणारा 'प्रेमात पडणे'/आकर्षण (infatuation) आणि प्रेम निभावणे/खरे प्रेम (love) ह्यातला फरक -- त्याच्यात निर्माण होणारे नाजूक बंध हे सगळे जर नैसर्गिकपणे उलगडत/उमगत गेले तर मला वाटते हे इतके विचित्र वाटत नाही. भंसाळी चा प्रयत्न खूपच चांगला वाटला. तो जर कुठे फसला/अपयशी ठरला असेल तर तो माझ्या मते असा - (१) सलमान चा अतिशय पोरकट अभिनय (त्यात नवीन काय म्हणा?) -- ते वडिलांशी बोलण्याविषयी - भंसाळी म्हणे बोलायचा असा कल्पनेत त्याच्या वडिलांशी (तसे बरेच जण बोलतात कल्पनेत त्यांच्या प्रिय व्यक्तीशी/support system, त्या व्यक्तीच्या निधनानंतर) -- आणि एक दिवस सलमान्ने फोने करून त्याला विचारले कि असे करूया का? भंसाळी भारावला आणि त्याला वाटले की सलमान खूपच जोडला गेला आहे त्या स्क्रिप्टशी - हे भंसाळीनेच एका मुलाखातीत सांगितलेले आठवते. अर्थात चांगल्या कल्पनेची प्रत्यक्षात माती करावी तर सलमाननेच....ते प्रत्यक्षात इंटेन्स वाटण्याऐवजी विनोदीच वाटले. (२) अजय आणि ऐश्वर्याचे नाते फुलतांना अजून छान दाखवायला हवे होते - तिला होणारी प्रेमाची जाणीव, तिचे अजयमधे गुंतणे हे जरा प्रभावीपणे यायला हवे होते. त्या मनाने तिला जाणवणारे अजयचे प्रेम जाणवते. पण जेवढ्या तीव्रतेने तिचे समीरमधे गुंतणे, त्याच्या विरहात व्याकुळ होणे येते - तेवढ्या प्रभावीपणे अजयचे आणि तिचे नाते दिसत नाही. तसेच अपेक्षित शेवटाकडे जातांना भंसाळीने ऐश्वर्याच्या व्याकुळतेची तीव्रता कमी होतांना दाखवायला हवी होती - 'अरे खरच काय मी कशाच्या शोधात आहे, मला वाटलेल्या प्रेमाच्या मृगजळाच्या की माझा नवरा जे जीवापाड प्रेम करतो आहे ते खरे आहे?' हे नाही तितक्या प्रभावीपणे जाणवू शकले. (३) अजय आणि सलमानची भेट ही अतिशय वाईट कल्पना - अजयला वाटणारी असूया हि एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती - ती तशीच राहू द्यायला हवी होती. त्यांना 'फिल्मी योगायोगाने' मित्र बनवण्याची काहिच गरज नव्हती. मला वाटते, भंसाळी काही सीनच्या, गाण्याच्या आणि visualizations च्या प्रेमात पडला नसता (उदा.ढोली तारो ढोल बाजे) तर स्क्रीप्टला न्याय मिळाला असता. जितक्या प्रभावीपणे सलमान-ऐश्वर्याचे नाते येते तितक्या प्रभावीपणे अजय-ऐश्वर्याचे जुळणारे नाते येत नाही. हा भंसाळीचा पराभव. मंगळसुत्र हे commitment किंवा 'प्रेम निभावणे' (love is a verb, not noun) या सहज प्रतिकात्मक अर्थाने न येता पारंपारिक, फिल्मी पद्धतीने 'Cliché' होऊन येते. पण तरीही मला एकूण सिनेमा इतका विचित्र/विनोदी वाटला नाही. 'वो सात दिन' हाही असाच एक सिनेमा - त्यातही बरीचशी अशीच ट्रिटमेंट जाणवली. बाकी - धमु ने म्हटल्याप्रमाणे 'अलबेला सजन आयो रे...' साठी हजार चुका माफ! खर तर ह्यातली सगळीच गाणी अप्रतीम आहेत - दरबारीतला 'अलबेला सजन..' आणि 'तडप तडप के....' वर जीव ओवाळून टाकावासा वाटतो. असो! फारच सविस्तर झाले.... - (फिल्मी) मनिष अवांतर - नुकत्याच आलेल्या 'यू, मी और हम' मधेही हिच love is a verb, not noun कल्पना होती पण त्याचा साग्रसंगीत बट्ट्याबोळ केला आहे! :) कदाचित आपल्या 'प्यार किया नही जाता, हो जाता है" फिल्मवाल्यांना हि कल्पना माहित असेल पण अजून नीट उमजलीच नसेल.

In reply to by मनिष

धमाल मुलगा 27/05/2008 - 18:18
मनिष, छान सांगितलस :) माझ्यासारखं टोकाची भुमिका न घेता सांगोपांग विचार करुन सौम्य शब्दात योग्य भावना पोहोचवल्यास. अभिनंदन !
जितक्या प्रभावीपणे सलमान-ऐश्वर्याचे नाते येते तितक्या प्रभावीपणे अजय-ऐश्वर्याचे जुळणारे नाते येत नाही. हा भंसाळीचा पराभव.
+++१
तसेच अपेक्षित शेवटाकडे जातांना भंसाळीने ऐश्वर्याच्या व्याकुळतेची तीव्रता कमी होतांना दाखवायला हवी होती
सही रे भिडू!

In reply to by मनिष

फारच छान मनीष.. हम दिल दे चुके सनमचे अप्रतिम विश्लेषण....तुझे तीनही मुद्दे एकदम पटले... वो सात दिन सुद्धा तसाच आहे, मला थोडा जास्त छान वाटतो... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मनिष

मनीष, मग तिच्या आधीच्या प्रेमभावनेचं काय? तिला वाटले ते नुसतेच आकर्षण? की एक माणूस आपल्यावर इतकं समजूतदार इत्यादी प्रेम करतो आहे, म्हणून आपणच निर्माण केलेल्या आधीच्या नात्यांना मोडीत काढायचे? (सलमानचं कॆरेक्टर अत्यंत आचरटपणे रंगवल्यामुळे मला काही काळ ’बरे झाले’ असा एक आसुरी आनंद झाला, नाही असे नाही! पण) मंगळसूत्र क्लिशे होऊन येते हे खरेच आहे. पण समजा असे गृहित धरू, की तो क्लिशे नाही. तरीही ऐश्वर्या आपल्याच नात्याला तिलांजली देऊन नव्या नात्यात अडकते? मला हे फार उथळ वाटते. त्यापेक्षा भन्साळीच्याच ’सॉंवरिया’मधली प्रेयसी मला सच्ची आणि पुरेशी हट्टी वाटली होती. (बाकी सिनेमाबद्दल न बोलणे बरे!) एका ठिकाणी गुंतलेला जीव असा इतक्या सहजासहजी उचकटला जात नाही. मग समोरचा माणूस कितीही जिवापाड प्रेम करत असो. त्याचे प्रेम हे बर्‌याचदा आपण बाहेरूनच पाहू शकतो... असो. वाद नव्हे.... पण नाही पटले खरे... खूप समंजस शब्दांत उकलून दाखवले आहे तुम्ही.

In reply to by मेघना भुस्कुटे

मनिष 31/05/2008 - 11:10
खरे आहे....जर आधीची प्रेमभावना स्ट्रॉंग सेल तर तू (चालेल ना?) म्हणते ते बरोबर आहे. पण भंसाळीला ते दखवायचे नव्हते - त्याला अपेक्षित असलेल्या कथेच्या दृष्टीने मी सांगत होतो. आपल्या सारख्या स्वतंत्र वृत्तीने वाढलेल्यांना पटणार नाही हे, पण काही वेळा असे होते हे समजून घेता येईल.

In reply to by मनिष

मनीष, अर्थातच ’तू’ चालेल! काही वेळा असे होते खरे. बाकी भन्साळीच्या एकंदर आवाक्याचा विचार करता आपण त्यावर इतके शब्द उधळावेत का, असा एक पोटप्रश्न पडतो आहे मला. बाय दी वे, कुणाला ’कभी अलविदा ना केहना’ वर काहीच म्हणायचं नाहीय का? मुळात विवाहबाह्य संबंध हा करण जोहरच्या दृष्टीनं ’अब्रह्मण्यम्‌’ विषय. तो त्यानं निवडला हीच एक मोठ्ठ्ठ्ठी अचीव्हमेंट. पुढचा सगळा शेणकाला आपण त्याच्याकडे दयार्द्र दृष्टीनं पाहून माफ केला पाहिजे, असा माझा एकंदर दृष्टिकोन होता. पण सिनेमा पाहिल्यावर तो मला चक्क आवडला. अमिताभचा ’सेक्सी सॅम’ आचरटपणा किंवा राणी मुखर्जीचा निरागस मूर्खपणा (दुकानातल्या बेडवर बसून इतक्या संशयास्पद पद्धतीनं रात्रीच्या सीनची तालीम करतं कुणी? आचरट नाहीतर...) करणबद्दलच्या एकूण अपेक्षांना साजेसा होता. पण नात्यांबद्दलची जाण चक्क प्रगल्भ म्हणावी अशी होती. ’अर्धी-मुर्धी नाती असण्यापेक्षा ती तोडून टाकणे उत्तम’ ही स्पष्टोक्ती किंवा प्रामाणिकपणा या भावनेला महत्त्व देऊन तथाकथित पवित्र विवाहसंस्थेशी बेईमानी करणे किंवा ’इस घरमें मर्द मैं हूं’ असा प्रीती झिंटाचा स्पष्ट बोचरा उद्गार... सुखद धक्का. ध्यानीमनी नसताना. (तरी शाहरुख खान, प्रीती झिंटा, अभिषेक आणि राणी यथाशक्ती डॉक्यात गेलेच.) असे अजून काही सिनेमे आठवताहेत?

In reply to by मेघना भुस्कुटे

मुळात विवाहबाह्य संबंध हा करण जोहरच्या दृष्टीनं ’अब्रह्मण्यम्‌’ विषय. तो त्यानं निवडला हीच एक मोठ्ठ्ठ्ठी अचीव्हमेंट. हे खरं..तो इतपत रिस्क घेइल असे कधीच वाटले नव्हते ... निदान विषय निवडीसाठी त्याला बरे मार्क... पण पुढे सिनेमाभर प्रत्येक कॅरेक्टर विचित्र वागत राहते... ( ते सरप्राईज करायचे प्रसंग वगैरे) घडोघडी वैताग येत राहतो... मात्र प्रीती झिन्टा शाहरूखच्या कानाखाली ठेवून देते हा प्रसंग लै मज्जा आणतो... ... दोन किरकिरे जीव आधीच्या संसारातून भांडून एकत्र येतात ,...ठीकच आहे...पण ते पुढे एकमेकांबरोबर सुखाने राहतात की नाही हाच एक मोठा प्रश्न... तात्पर्य : दुरून दुसर्‍याच्या बायका (किंवा दुसर्‍यांचे नवरे ) कितीही साजरे दिसले तरी त्या स्वतःच्या बायका (किंवा स्वतःचे नवरे ) होतील तेव्हा साजरे नसतात ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनिष 27/05/2008 - 20:27
काही खरच डोक्यात जाणार्‍या सिनेमांच्या कथा... काही खरच डो़क फिरवणार्‍या कथा/सिनेमे असे आहेत की डायरेक्टर भेटला की डायरेक्ट त्याच्या श्रीमुखात द्यावी असे वातते. आठवेल तसे लिहितो इथे - चुपके-चुपके - मागच्या वर्षी आलेला शाहिद कपूर - करीना कपूर ह्यांचा सिनेमा. त्यात शाहिद चे गावात सुषमा रेड्डीवर प्रेम, इकडे काही अतर्क्य घतनानंतर साहेब करीनाच्या प्रेमात - त्याचा गैरसमज की सुषमा रेड्डीचे लग्ना झले आहे - करीना शाहिद च्या प्रेमाचा रस्ता मोकळा - मोकळा म्हणजे एकदम हायवे होतो (नाही, सैफ नव्हता सिनेमात! :)); इतका की सिनेमाभर गुजरातचे गोडवे गाणारे कुटुंब एकदम पंजाबी गाणे गाऊन आनंद साजरा करते..जाऊ दे. माफ प्रियदर्शनला! पण हाईट म्हण्जे, सिनेमाच्या शेवटी सुषमा रेड्डी लग्नघरी येते आणि सगळा खुलासा होतो - आता शहिदची अगदी शाही पंचायत -- आणि प्रियदर्शनची पण. काय करावा साहेबांनी क्लायमॅक्स?? तर सुषमा रेड्डी शहिदला म्हणते (करीनाचा आग्रह करून झाल्यावर) - तू करीनाशी लग्न कर,कारण?......कारण का तर म्हणे ती मुकी आहे?? 'उसे सहारा दो!' अरे किती मुर्ख आणि क्रूर कारण? दया म्हणून प्रेम/लग्न?? किती हॉरीबल??? हाच का तो हेराफेरी देणारा प्रियदर्शन?? कितीही विसरू म्हटले तरी हा क्लायमॅक्स डोक्यात जातो!!!

In reply to by मनिष

मनिष 28/05/2008 - 11:42
शाहिद कपूर - करीना ह्यांच्या सिनेमाचे नाव "चुप-चुपके" होते! चुकीबद्द्ल क्षमस्व. - मनिष स्वगत : तसेही कोणी वाचलेले दिसत नाही! :)

मनिष 27/05/2008 - 20:46
बेनाम बादशाह - आयुष्यात बकवास सिनेमे (थिएटर मधे जाऊन) बघण्याची पापे खूप केली, पण जेवढा संताप/उद्वेग/वैताग ह्या चित्रपटाने आला, तेवढा कुठल्याही इतर सिनेमाने आला नाही. ह्याची कथा साधारण अशी - अनिल कपूर असाच एक अनाथ, मवाली सुपारी घेणारा. एक दिवस सुपारी घेऊन तो (अनोळखी) जुही चावलावर बलात्कार करतो, ती मुर्ख मुलगी इतर काही करण्याऐवजी (जसे बदला) त्याच्या मागे लागते लग्न कर म्हणून. किती हिडिस कल्पना आहे ही?? काही बोलवत ही नाही. हे दोघेही तसे नावाजलेले कलाकार - त्यांनी होकार दिलाच कसा असा सिनेमा करायला? आणि डायरेक्टर कोणी 'के. रवी शंकर' म्हणून...त्याला भेटून एकदा कानाखाली जाळ काढायची खूप इच्छा आहे..किंवा विचारावेसे वाटते, जर असेच तुझ्या मुलीच्या बाबतीत झाले तर काय करशील?? किळसवाणा सिनेमा आहे खरच - जर 'रारंग ढांग' सारख्या कथेला सेन्सॉर परवानगी देत नसे, तर अशा कथेला कशी परवानगी मिळते?? मुर्खपणा सगळाच...

In reply to by मनिष

किती हिडिस कल्पना आहे ही?? खरंच...साउथचे सिनेमे भडक असतात माहित होते पण हा काय सिनेमा झाला? कसली गोष्ट? .. त्यातलं एक टुकार गाणं आठवतंय...( का आठवतंय कोण जाणे ?) बेवडा अनिल कपूर बोंबलत हिंडत गाणं म्हणत असतो, " माता कौन पिता कौन, कचरे के डिब्बे में गिराया गया कचरे के डिब्बेसे उठाया गया...." ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लक्ष्य हा डोक्यात जाणारा सिनेमा नाही... चांगला आहे...गोष्ट अभिनय गाणी नृत्य ( मै ऐसाही हूं) चगैरे मस्तच.... . ..पण एक मुद्दा नेहमी खटकत / जाणवत असे, ______ ही गोष्ट जर एका एमलेस माणसाला त्याचे ध्येय सापडणे यावर आहे, आणि त्याची एक प्रोमोज मध्ये जहिरात असे की " ही डिस्कव्हर्ड व्हॉट ही वाँटेड इन लाईफ ऍट अमुक अमुक थाउजंड फीट" ( शब्द थोडेफार वेगळे असतील ) अशा अर्थाची काहीतरी.... मग पिक्चर पाहिल्यावर असे वाटले, की ज्या क्षणी त्याने त्याचा आळशीपणा सोडला आणि आय एम ए गंभीररित्या (एकदा पळून आल्यानंतर पुन्हा ) जॉइन केली तेव्हा गोष्ट पूर्ण झाली, ही डिस्कव्हर्ड व्हॉट ही वॉन्टेड इन लाईफ..... मग पुढे तो सैनिक होतो, कारगिल मध्ये पराक्रम गाजवतो की नाही, युद्धात जिंकतो की नाही , मरतो का वाचतो हा प्रश्न लांबचा.... मुख्य सिनेमा कधीच संपला... ( म्हणजे प्रीमाईस यशस्वी होणे किंवा न होणे असा नसून ध्येय सापडणे असा आहे) हे मी कोणाला कधी बोललो नाही, पण एकदा जावेद अख्तरची मुलाखत चालली होती ,( कोणता सिनेमा चुका सुधारून पुन्हा लिहायला आवडेल? अशा प्रश्नावर त्याने मेरी जंग आणि लक्ष्य या दोन सिनेमांची नावे घेतली होती)) तेव्हा तोही असेच म्हणाला... (म्हटलं बेष्ट... लै खुश झालो...) लक्ष्य ची स्टोरी स्क्रीनप्ले जावेद चा की फरहानचा? कोणाला माहित आहे का? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ऋचा 28/05/2008 - 14:36
अस्साच एक डोक्यात जाणारा चित्रपट म्हणजे "कभी खुषी कभी गम" ~X(

In reply to by ऋचा

आईबापावर प्रेम करण्याचे दोनच मार्ग. त्यांच्या गळ्यात पडणे नाहीतर त्यांच्या पायांवर लोळण घेणे. मग ते चुकीचं सांगत असोत, बरोबर सांगत असोत, काहीही फरक पडत नाही. 'माफी माँगनेसे आदमी छोटा नहीं हो जाता' हे वर. म्हणजे? काही चुकलं नसेल तरी उग्ग्ग्ग्गाच माफी मागायची? का म्हणून? आणि लग्नासारख्या गोष्टीत मनमानी करायला येणारे आईबाप हा पुरातनकालीन विषय आपण कधी बंद करणार आहोत? (करण जोहरकडून ही अपेक्षा म्हणजे फारच झाले म्हणा!) त्यात आणि ती डॉक्यात जाणारी करीनाची 'पू'. आणि तिला 'कपडे घाल, कपडे घाल' म्हणून पिडणारा शाहरुख खान. भारतीय संस्कृती जपणारी काजोल. (केवळ काजोल होती म्हणूनच. नाहीतर...)

In reply to by मेघना भुस्कुटे

कोलबेर 31/05/2008 - 10:17
मस्त!! ह्यावर एक स्वतंत्र लेखच टाका! अवांतरः ह्या पंजाब्यांचं माहित नाही पण 'पू' म्हंटलं की आमच्या डोक्यात तरी जखमेतुन वाहणारा एक दुर्गंधीयुक्त स्त्राव येतो!!

मन 28/05/2008 - 14:44
हा चित्रपट पाहुन अब "प्र्क्षक क्या करे" तेच कळलं नाय. त्यो अजय देवगण म्हणे त्या (अविवाहित्/कुमारी) काजोलला वाचवतो. कुणापासुन काय म्हणताय? अर्थातच गुंडांपासुन,ते ही त्यांनी काही "भलतसलतं" करायच्या आत. आनि तत्काळ लगेच तेच "भलत सलतं" स्वतःच करुन मोकळा होतो, येका रात्रित,ट्रेन मधी. (थोडक्यात काय, तर तो गुंडांना जे करण्यापासुन अडवतो, तेच स्वतः खुशाल करुन मोकळा होतो.) आणि तोंडाला काळं लावुन जो पसार होतो, तो पुन्हा गावतच नाय लवकर. इकडे काजोलला (विवाहपुर्व)अपत्यप्राप्ती होतेच(अपेक्षेप्रमाणे). आणी तिथुन पुढं काय तर "मनाचा-गुंता", "तरल्-नाती" असला भुक्कड मालमसाला भरलाय. बाकी गाणी अप्रतिम,(केवळ त्यासाठी शिणुमा पुन्हा पुन्हा बघायची तयारी आहे आपली.) (हद्द हिच, की, अशा प्रकारे पसार होउन, कित्येक तपांनंतर हे महाशय जेव्हा गावतात त्या काजोलला, तेव्हा ती बया त्याच्या दोन मुस्काडात देण्याऐवजी,किंवा स्वतःवर आनी त्याच्यावर खजील राहण्याऐवजी खनकळत "नकळत" पुन्हा त्याच्या वर फिदा. हाय रे कर्मा. काय काय बघाव आता उघड्या डोळ्यांनी.) तर ह्या शिणुमातुन लेकी-बाळिंना संदेश्/उपदेश येकच, बायांनो, जो तुम्हाला "वाचवायला" येइल, त्याच्यापासुन जरा "वाचुन"(आणी वचकुनच) रहा. आपलाच, मनोबा

यशोधरा 28/05/2008 - 23:52
>>> लक्ष्य ची स्टोरी स्क्रीनप्ले जावेद चा की फरहानचा? जावेद अख्तर यांचा. दिग्दर्शन फरहानचे.

'लक्ष्य' पाहून मलाही असंच वाटलं होतं. ध्येय सापडणं आणि यशस्वी होणं या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत खर्‍या. आणि कहर वाटली होती ती हृतिकची व्यक्तिरेखा. पूर्वार्धात तो किती बालिशपणे वागतो! प्रीती झिंटा आणि तो एकमेकांच्या खरेच प्रेमात पडले आहेत, की 'बरी मैत्री आहे... सोयीचे आहे झाले' म्हणून ते प्रेमगाणी गाताहेत हेच कळत नाही. त्यांच्यात 'रोमान्स' कुठे दिसतच नाही. दिसते ती फक्त जुन्या मित्रमंडळींबद्दल होते ती सवयीची भावना. एकमेकांना आवडीने 'चालवून' घेणे. मग एकदम 'कितनी बातें केहनेकी हैं..'मधे रोमान्स. त्यांच्यात इतकं सगळं आठवण्याइतकं घडलं तरी कधी, आपण तेव्हा कुठे होतो... असे प्रश्न पडतात ते गाणं पाहताना.

In reply to by मेघना भुस्कुटे

कोलबेर 31/05/2008 - 11:35
अगदी खरंय...अरे तुच का तो 'दिल चाहता है' बनवणारा??? असा पश्चात्ताप करत बाहेर पडलो होतो.

In reply to by मेघना भुस्कुटे

_मग एकदम 'कितनी बातें केहनेकी हैं..'मधे रोमान्स. त्यांच्यात इतकं सगळं आठवण्याइतकं घडलं तरी कधी, आपण तेव्हा कुठे होतो... असे प्रश्न पडतात ते गाणं पाहताना. _ फार छान वाक्य... अगदी हेच म्हणतो... ____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आता थोडं लिहितो ओम शांती ओम बद्दल... मी या सिनेमाबद्दल अजिबात अपेक्षा न ठेवता गेलो होतो त्यामुळे मला बरा वाटला... दीपिका तर लै बेष्ट.. श्रेयसने सुद्धा छान काम केले आहे.. ( म्हातारा मात्र अजिबात दिसला नाही, श्रेयस म्हातारा आणि शाहरूख तरूण असलं पहायचं जीवावर आलं खरं)... ते जाऊदेत.. __________ शेवट थोडा अजून योग्य करता आला असता...ते झुंबर पडून अर्जुन मरतो वगैरे ठीकठाक.... मुख्य म्हणजे त्यानंतर हीरोला कळते की खरंच भूत हे सारे प्रकार करत होते... पण ही गोष्ट अर्जुनला कळायला नको का? नाहीतर त्याला इतकेच वाटणार की झुंबर पडायच्या अपघाताने आपण गेलो... मग इतके सारे प्रयत्न करून एवढी गोष्ट पाहून काय उपयोग? गोष्टीत दुष्टाला शासन हवेच पण त्याला ते कळायलाही हवे तर प्रेमाईस सिद्ध होणार ना... त्यातल्या झुंबराखाली पडलेल्या अर्जुनला दोन्ही दीपिका दिसतात आणि भूत त्याला त्या त्याच्व्या दुष्कृत्याची जाणीव करून देते आणि त्याची हीच शिक्षा आहे असे म्हणते ... आणि मरता मरता अर्जुन त्याच्या गुन्हयाची कबुली देतो..आणि ते दृश्य सारे लोक ( क्लोज सर्कीटवर पाहतात, किंवा चॆनलवाले ्शूट करून दाखवतात..) मृत्यूबरोबरच एखाद्याची संपूर्ण इमेज / जनमानसातली प्रतिमा संपणे ही मोठी शिक्षा आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मला नाही असं वाटलं. शांतिप्रिया सांगते की त्याला - मेरी सांसे चल रही थी... असं. आता हे थोडंच शाहरुखला माहीत असणारेय? म्हणजे ही ओरिजिनल शांती आणि हा तिनं घेतलेला सूड हे अर्जुनला कळणारच. त्यासाठी दोन दोन शांत्या (!) दाखवायची काय गरज आहे?

In reply to by मेघना भुस्कुटे

आता हे थोडंच शाहरुखला माहीत असणारेय? आता त्याला तर सगळंच आठवतंय म्हणून तर हे सारं करतोय तो...आणि ती काहीही बोलली असली तरी अर्जुनला तर असंच वाटत असणार की ही अभिनय करणारी नटी शाहरूखने शिकवलेले डायलॉग बोलतेय..( मला तरी असेच वाटले)......त्याला तिच्याबद्दल संशय आलेला आहेच... ... त्यामुळे आपल्याला दुसरी मानव दीपिका दिसल्यानंतरच नक्की कळते की हे आधीचे भूतच्...पण त्यांची अर्जुनशी काहीच इन्टरॅक्शन नाही , कारण तो आधीच मरतो... मग भुताचा सूड अगदी पक्केपणे कुठे दिसला ? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

छोट्या 15/07/2008 - 16:31
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ... कोणती तरि expectional गोष्ट असल्याशिवाय कोणी चित्रपट करत नाही (कमीत कमी चोप्रा family). अशा गोष्टिंमुळेच तर चित्रपट पहायला लोकं जातात. डोकं - बिकं लावून love story बघायच्या नसतात. त्यासाठी समांतर सिनेमे आहेत. मग चोप्रानीं कोन्या 'मास्तर' च्या जिंदगीवर पिक्चर काढायचा का? आणि तुमच्या डोक्यात जे प्रश्न आहेत त्याची थोडी फार उत्तरे आहेत पिक्चरमधे... उदा:: माझ्या बदनाम पोरीशी लग्न करायला कोण येणार आता?" किंवा त्या १५ २० सेकंदातले अमरीश पुरीचे स्वगत. याचं उत्तर तर लगेच सापडलं असतं... तिच्यासाठी तो 'कुलजीत' का कोण तो ..... कायम तयार असतो. आणि फसवा-फसवी च्या वर्तनावर जो आपला आक्षेप आहे तो पण काही बरोबर नाही वाटत... १०० पैकी ९५ love story मधे हा प्रकार सुरु असतो.... कोणी काही बापाची परवानगी घेउन असले उद्योग करत नाही.(काही सन्माननीय अपवाद सोडुन). मग चोप्रा दाखवले तर काय बिघडले??? त्यामुळे असल्या पिक्चरला उगाच नावे ठेवण्यात अर्थ नाही.

In reply to by छोट्या

तुझ्या भावना दुखावल्या असतील तर सॉरी रे बाबा..... लव्ह स्टोरी पाहताना सुद्धा डोके लावण्याची चूक झाली माझी... धन्यवाद, सल्ल्याबद्दल... आणि ९५ % लव्ह स्टोर्‍यांमध्ये कसा प्रकार चालू असतो ते सांगितल्याबद्दल सुद्धा धन्यवाद... तेवढे या सर्व्हेचे डीटेल्स दे म्हणजे झाले, का इथे सुद्धा डोके लावायचे नाही?? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

छोट्या 17/07/2008 - 12:30
काय मास्तर, आता या 'छोट्या' ने तुम्हाला शिकवायचं का? शेवटी डोकं आहे... कोणी कुठे लावायचं हा ज्याच्या त्याच्या डोक्याचा प्रश्न आहे. उगाच 'तुझ्या- माझ्या' करुन त्रागा नाही करुन घ्यायचा. आणि भावनांचं म्हणाल तर त्या 'पिक्चर' सारख्या फुटकळ गोष्टीत लावुन त्यांचा अपमान नाही करायचा!!! ;) ;) :P

In reply to by छोट्या

>> आणि भावनांचं म्हणाल तर त्या 'पिक्चर' सारख्या फुटकळ गोष्टीत लावुन त्यांचा अपमान नाही करायचा =)) पण हे मात्र मान्य की मास्तरांमुळेच जाम करमणूक झाली. येऊ द्या. (टुकार सिनेमांची चाहती) अदिती

गिरीराज 17/07/2008 - 15:54
आयला, मीपण असाच वैतागलो होतो 'हम दिल दे चुके सनम' पाहून>>>>> अहो असे म्हणा: "हम दिल देके चुके सनम"

मला या ठिकाणी एक नमूद करवेसे वाटते कि चित्रपट पाहताना असल्या तार्किक गोंष्टिंचा विचार करून चित्रपटाची मजा घालवू नये. व.पु. च्या कुठल्याश्या कथेमध्ये वाचले होते...चित्रपट म्हणजे ३ तासांचे एक सुन्दर स्वप्न. त्यामध्ये हे असेच का, ते तसेच का असे प्रश्न विचारून त्या स्वप्नाची मजा घालवू नये. जर चित्रपटात असे दाखवले कि नायक राकेलच्या रांगेत उभा आहे, तर कसे वाटेल. असे चित्रपट आपण बघु का? अरे आपल्या रोजच्याच जीवनातल्या समस्या पडद्यावर दाखवल्यातर ते पाहण्यासाठि कोण येइल? आणि मुख्य म्हणजे आपल्याला ते आवडेल का? तसेहि माणसाची प्रव्रुत्ती असते कि त्याला दुसर्‍याच्या पायात काय अडकले आहे ते बघण्याची उत्सुकता. आणि त्यात गैर काहि नाहि. तेवढेच निवांत क्षण/विरंगुळा आपल्या रोजच्या दगदगीतून आणि कटकटीतून. स्वप्नात काहिहि घडू शकते राव. त्याचा त्रास नाहि करुन घ्यायचा. त्यामुळे "रजनीकांत"चे चित्रपट पाहताना सुद्धा मी ऍंजाय करतो. (रजानीकांत केवळ मराठी आहे म्हणून मी तमिळ भाषेतील चित्रपट पाहण्याचे धाडस केले, आणि आपण एक स्वप्न पाहत आहोत एव्हढा एकच द्रुष्टीकोन असल्यामुळे त्याचे चित्रपट आवडले. त्यावेळी "हा असा काय हवेत उडतो" म्हणून मनाला त्रास करून नाही घेतला.) पण मला, भडकमकर मास्तरांनी लिहिलेले आमरस पुरि चे स्वगत आवडले....स्वप्न पाहण्याचा आणखी एक द्रुष्टिकोन. प्रत्येकाने आपापल्या द्रुष्टिने स्वप्न पाहावे अशा मताचा मी आहे. एखाद्या चित्रपटाचे/स्वप्नाचे अशा रितीने काथ्याकूट करणे मलाहि आवडेल.

In reply to by मध्यमवर्गीय

एखाद्या चित्रपटाचे/स्वप्नाचे अशा रितीने काथ्याकूट करणे मलाहि आवडेल. लिहा.. मग मीही त्यावर लिहीन की असल्या तार्किक गोंष्टिंचा विचार करून चित्रपटाची मजा घालवू नये ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

फारएन्ड 10/09/2010 - 05:46
एकदम आवडला :) मला या चित्रपटातील गाणी आणि बराच भाग आवडतो, पण हा शेवटचा भाग अजिबात आवडला नव्हता. त्या परमजीत ची काहीही चूक नसताना (मला नीट आठवत नाही) त्याचा उगाचच पचका केलेला आहे.

चिगो 12/09/2010 - 12:10
मस्त हाणामारी, चिरफाड केलीय... आणि DDLJ मला अजिबात न पचलेल्या पिक्चरपैकी एक आहे.. बाकी आपल्याला रजनीकांतचे पिक्चर आवडतात. डोकं शिणून दमतं आणि हलकं वाटतं बघा...

चिंतामणी 12/09/2010 - 13:00
जी पुढे कुकुहोहै, जप्याकिहोहै सारख्या अनेक सिनेमांमध्ये सुद्धा दिसली. चो चो (पक्षी चोरी चोरी) जप्याकिहोहैच्या आधिचा सिनेमा आहे. त्यातसुध्दा लग्नाच्या मांडवातुन नायीका नायकाबरोबर पळुन जाते. ही परंपरा या सिनेमाने सुरू केली आअहे असे म्हणले तर????????

In reply to by चिंतामणी

त्यातसुध्दा लग्नाच्या मांडवातुन नायीका नायकाबरोबर पळुन जाते. मुद्दा अमान्य कारण चोरीचोरीमध्ये ती नायकाबरोबर पळून जात नाही तर नुसतीच पळून जाते आणि त्यानंतर तिला बसमध्ये नायक भेटतो...

In reply to by भडकमकर मास्तर

मास्तर ब्याक इन फॉर्म! :-D मास्तर, आणखी कोणत्या पिच्चरची मापं काढा की! लै दिवस झाले तुमच्या लेखणीतून काही दमदार धागा आल्याला!
१. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे तो दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे १९९५ ऑक्टोबर ला आल्यापासून मग अनेक वर्षे की काय तो एका थिएटराला चालला... आम्ही १९९५ मध्ये सुट्टीत पाहिल्यानन्तर पुन्हा कॉलेज ग्रुपबरोबर परत पाहिला... इतरांना जाम आवडला...

क्रांती एका क्षणाची

देवदत्त ·

देवदत्ता, अशा क्रांत्या म्हणजे मारामारीला आमंत्रण असते असे वाटते. खरे तर आरक्षण असलेल्या डब्यात सामान्य टीकीट असलेल्या प्रवाश्यांनी बसूच नये. रेल्वेत प्रवास करतांना आरक्षण असणा-यांना दादागिरीने उठवून बसणारी मंडळीही आपल्या पाहाण्यात असते. आणि संबधीत प्रवासी मारामारी होणार या भितीने आपली आरक्षण असलेली सीट सोडून देतो. रेल्वे आरक्षणाचा गोंधळही आपणास माहित असेलच, तेव्हा आम्हाला तरी ही काही क्रांती वाटली नाही. फारच गर्दी असेल तेव्हा थोडी फार 'ऐडजेसमेंट' करण्यास हरकत नसावी असेही वाटते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवदत्त 15/05/2008 - 10:29
ही क्रांती नसावी मान्य.. ही क्रांती नव्हतीच. क्रांती ती लोकांच्या भल्याकरीता, योग्य कारणाकरीता होते, लोक खरोखर ज्याचा उपयोग करून घेतील. हा शब्द मला त्या क्षणापुरता वाटला, आणि लेखनाला तेच नाव सुचले म्हणून लिहिले. :)

मनस्वी 15/05/2008 - 11:00
सर्व प्रवासी मॅनेज करणे म्हणजे फक्त रिझर्वेशन असलेले रिझर्वेशनच्या डब्यात, लेडिज डब्यात फक्त लेडिज, जनरल डब्यात जनरल.. विनातिकीटवाल्यांना हकलणे.. हे खरं रेल्वे कर्मचार्‍यांचे काम आहे. त्यांच्या कामचुकारपणामुळे आपल्याला ताप होतो. जेव्हा गाडी प्लॅटफॉर्मवर येते, तेव्हाच एक अधिकारी दारावर तैनात करून फक्त रिजर्वेशनवाल्यांना आत सोडेल, असे केले पाहिजे. मी एकदा मुंबई-पुणे प्रवास लेडिज डब्यात पूर्ण उभा राहून केला. लेडिज डब्यात वरच्या बर्थ वर एक १८-२० वर्षांचा मुलगा बसलेला. उतरताना त्याला लई शिव्या घातल्या. हातात बांगड्या भर म्हटलं. तो म्हणे मी माझ्या बहिणीला (वय वर्षे साधारण ३० ते ३५) सोबत म्हणून इथे बसलोय! शेवटी चिडचिड,मनस्ताप मलाच झाला. तसेच ट्रेन्समध्ये अवाढव्य तृतियपंथी पाहिले की बिथरल्यासारखे होते. माझ्यामते ते ते नसतातच. बेरोजगार पुरुषांनीच तो नवीन धंदा शोधला आहे. जर आपण आटोकाट प्रयत्न करून रिझर्वेशन मिळवतो.. का? आपला, आपल्या कुटुंबाच प्रवास सुखावह / बरा व्हावा.. अन् त्यात आरक्षित डबा असा विना आरक्षण वाल्यांनी असा खचाखच भरला.. प्रत्येकालाच वाटते सगळ्यांना हकलावे.. पण जोखीम कोणी सहसा घेत नाही. कारण आपल्यावरच धावा झाला तर 'आरक्षित' पांढरपेशे नुसतेच बघत रहाणार. जर घुसखोरांवर येवढा कणव असेल तर त्यांना स्वतःची जागा द्यावी किंवा स्वतः जनरलचेच तिकिट काढावे. अटीतटीच्या प्रसंगात ठीक आहे.. म्हणजे दंगल झालीये / लोक मोठ्या संख्येने गावी चाललेत / यात्रा आहे.. वगैरे.. तेव्हा कोणीही कोणाला समजून घेतो आणि घेतलेच पाहिजे.. पण असे रोजच होउ लागले तर त्याची सवयच होईल रेल्वेला. तिथे मॅनेजमेंटची गरज आहे हे रेल्वे कर्मचार्‍यांना कळणार कधी?

ईश्वरी 15/05/2008 - 12:13
जरी गाडीला गर्दी असली तरी डब्याचे आरक्षण केलेल्या लोकांना त्या डब्यात व्यवस्थित , comfortably बसण्याचा आणि प्रवासाचा आनंद घेण्याचा पूर्ण हक्क आहे. कारण त्यांनी तिकीटासाठी पैसे ही जास्त मोजलेले असतात. जनरलवाल्यांनी आरक्षित डब्यात गर्दी केली तर प्रवास निश्चितच सुखावह होणार नाही. त्यामुळे त्या मुलाने काही चुकीचे केले असे म्हणता येणार नाही. तसे असते तर ते लोक (आरक्षण नसलेले) त्याचे ओरडणे निमूटपणे ऐकून घेऊन खाली उतरले नसते. इतर आरक्षण असलेल्या लोकांनी बघ्याची भूमिका न घेता उलट त्या मुलाला साथ द्यायला हवी होती. अटीतटीच्या प्रसंगात ठीक आहे.. म्हणजे दंगल झालीये / लोक मोठ्या संख्येने गावी चाललेत / यात्रा आहे.. वगैरे.. तेव्हा कोणीही कोणाला समजून घेतो आणि घेतलेच पाहिजे.. पण असे रोजच होउ लागले तर त्याची सवयच होईल रेल्वेला. तिथे मॅनेजमेंटची गरज आहे हे रेल्वे कर्मचार्‍यांना कळणार कधी? हे मनस्वीचे म्हणणे पटले. -- ईश्वरी

एकदा आम्ही पुण्याहून ठाण्याला डेक्कन एक्स्प्रेसने येण्यासाठी आरक्षण केले होते.आमच्या जागेवर दुसरेच एक पोक्त जोडपे बसले होते,त्यांना सांगितले आमचे येथे आरक्षण आहे,त्यातील बाई म्हणाल्या अहो,"तुमच्या समोरच्या जागेवर आमचे रिझर्वेशन आहे पण पहाना तिथे बसलेल्या बाई हे ऐकूनच घेत नाहीत आणि उठत तर नाहीतच..काय करु हो?"हे सांगणार्‍या बाई अगदी अजिजीने सांगत होत्या.म्हटलं," अहो काकू तुमचे रिझर्वेशन आहे तर त्या बाईला इथे बसून कसे देता?" ती बाई हे सर्व ऐकून न ऐकल्यासारखे करत होती. मी तिला म्हटलं,"मावशी उठा,त्या आजींचं इथे रिझर्वेशन आहे,त्यांची जागा आहे ही.."बाई आडदांड होती,म्हणाली "म्या बी तिकट काढलया,फुकाट नाही प्रवास करत.." हुज्जत घालू लागली आणि उठेनाच.. गाडी सुटायची वेळ झाली होती.आजू बाजूचे प्रवासी कुजबुजत सारे पाहत होते.मदतीला कोणी पुढे येईना..पोलिस गायब होतेच.. पण प्लॅटर्मवर एक टीसी होता,त्याला हे सर्व सांगितले टीसी वैतागून एकदाचा माझ्याबरोबर आला,त्याने बाईंना सांगितले तरी बाई काही उठेनात.मग आम्हालाच तो "जाऊ दे ना,करुन घ्या ऍडजस्ट" असे म्हणायला लागला..मग मी चिडले आणि म्हटलं, ती जागा त्या आजींना नाही मिळाली तर मी साखळी खेचणार आणि गाडी पुढे जाऊ देणार नाही..शेवटी त्याने कुठूनसे पोलिस पैदा करून आणले.दोन हवालदारांनाही बाई ऐकेना..तिचं एकच टुमणं "म्या तिकट काढून बसलीया..लवकर येऊनशान जागा पकडलीया..म्या हतून उटणार न्हाय".. शेवटी गाडीने शिटी दिली..माझा हात साखळीकडे जायला लागला..ते पाहून त्यातील एक पोलिस म्हणाला,"ताई दमानं घ्या..आम्ही करतो बरोबर काय ते,आत्ता आमच्या बरोबर इथे लेडी पोलिस नाहीये ना,बाईंच्या अंगाला हात नाही लावता येत.."गाडी हलली आणि हवालदारांनी दंडु़क्यांनी त्या बाईला दोन दणके दिले आणि मुकाट्याने जागा खाली कर,नाहीतर शिवाजी नगरला बाई पोलिसाला बोलावतो असे खास पोलिसी आवाजात खडसावले.ती बाई अत्यंत घाणेरड्या शिव्या देत उठून गँग वे त बसली..पोलिसांना म्हटलं ,पुढे धुडगूस घातला तर? मग पोलिस उखडले इतर प्रवाशांवर.. चक्क म्हणाले," अरे काय बांगड्या भरल्यात काय? त्या आजीआजोबांसाठी फक्त ह्या ताईच झगडतायत आणि तुम्ही लोक निसता तमाशा बघताय? आणि मग म्हणता पोलिस काम करत नाहीत, आता मुंबई पर्यंत त्या आजी आजोबांचा सुखरुप प्रवास ही तुमची जबाबदारी! त्या बाईला इथे येऊ द्यायचं नाही.."बाईलाही परत दम भरला.. मग मात्र पुढचा प्रवास ठीक झाला..

In reply to by स्वाती दिनेश

मनस्वी 15/05/2008 - 12:35
छान केलंस स्वातीताई! काम रेल्वेवाल्यांचे आणि मनस्ताप आपल्याला!

In reply to by स्वाती दिनेश

आनंदयात्री 15/05/2008 - 12:42
एकदम मस्त केलेस स्वाती, स्वतःला काहिही त्रास नसतांना दुसर्‍याचा त्रास पाहुन मदत करणारे विरळाच ! यात मला थोडीफार तरी क्रांती दिसली :)

In reply to by स्वाती दिनेश

खरं तर साखळीऐवजी, त्या बाईचं बखोटं धरुन तिच्या सिटवरुन तिला खेचायला पाहिजे होतं पोलिसांची, टीसीची गरज पडू नये :) "जाऊ दे ना,करुन घ्या ऍडजस्ट" खरं तर असे बोलणा-या लोकांची जमातच वेगळी असते. आपण मारे ऐसपैस बसलेले असतात आणि जागेवरुन भांडणा-यांना, घ्या, ना राव ! ऍडजस्ट करुन.......असे म्हणतात. स्वतः मात्र कोणालाच ऍडजस्ट करुन घेत नाही. धरुन ठोकलं पाहिजे अशा लोकांना !!!!

In reply to by स्वाती दिनेश

  • मग पोलिस उखडले इतर प्रवाशांवर.. चक्क म्हणाले," अरे काय बांगड्या भरल्यात काय? त्या आजीआजोबांसाठी फक्त ह्या ताईच झगडतायत आणि तुम्ही लोक निसता तमाशा बघताय? आणि मग म्हणता पोलिस काम करत नाहीत, आता मुंबई पर्यंत त्या आजी आजोबांचा सुखरुप प्रवास ही तुमची जबाबदारी! त्या बाईला इथे येऊ द्यायचं नाही.."बाईलाही परत दम भरला.. मग मात्र पुढचा प्रवास ठीक झाला..
गोष्टीतील हा भाग फारच आवडला..

विसोबा खेचर 16/05/2008 - 08:19
मी त्या डब्यातला एक असतो तर त्या माणसाला माझे तिकिट मी मुळीच दाखवले नसते! तिकिट विचारायचा हक्क फक्त टी सी ला असतो, अन्य सहप्रवाशंना हा हक्क नाही! मी त्या माणसाला म्हटले असते की 'बाबारे, मला तिकिट विचारणारा तू कोण?? तू टी सी आहेस? तुझ्याकडे टीसीचा बॅच, ओळखपत्र आहे? जा भोसडिच्या, जाऊन पहिले टीसी ला बोलावून आण, मग या डब्यातून उतरायचं किंवा नाही ते मी ठरवीन! तू रागात असलास तरी मलाही राग येतो हे लक्षात ठेव! मी वेळप्रसंगी त्या माणसाशी मारामारीही केली असती आणि टीसी येईपर्यंत त्याची ती बेगडी क्रांती साफ मोडून काढली असती हेही नक्की! :) आपला, (कॉलेज जीवनात भरपूर मारामार्‍या केलेला!) तात्या.

विसोबा खेचर 16/05/2008 - 08:45
कोणी ऐकत नसल्याचे दिसल्यावर तो मित्रांना म्हणाला की "मी पोलिसांना बोलावत आहे." तिकडून तो उतरून बाहेर गेला. बहुधा रेल्वे पोलिसांना शोधायला. पण का कुणास ठाऊक परत आला. हा हा हा! पोलिसांना बोलावून काय उपयोग होणार? तिकिट विचारायचा हक्क टीसी व्यतिरिक्त कुणालाही नाही! :) आपला, (कायदेशीररित्या योग्य ऑथॉरिटीकडून सजा भोगण्यास सदैव तयार!) तात्या.

देवदत्त 16/05/2008 - 20:05
प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद. फारच गर्दी असेल तेव्हा थोडी फार 'ऐडजेसमेंट' करण्यास हरकत नसावी असेही वाटते. सहमत. पण असे रोजच होउ लागले तर त्याची सवयच होईल रेल्वेला.तिथे मॅनेजमेंटची गरज आहे हे रेल्वे कर्मचार्‍यांना कळणार कधी? मनस्वींच्या मुद्द्यांशीही सहमत. पण अहो मॅनेजमेंटच खराब झाले आहे हो आता. गर्दीच्या दिवसांत काही वेळा टी सी येतच नाही तिकिट बघायला हाही अनुभव आहे. स्वातीताई, तुम्ही केलेलेही पटले. ह्याची गरज पडते मध्ये मध्ये :) मी वेळप्रसंगी त्या माणसाशी मारामारीही केली असती आणि टीसी येईपर्यंत त्याची ती बेगडी क्रांती साफ मोडून काढली असती हेही नक्की! मी ही प्रश्नांत तेच विचारले आहे हो तात्या. :) आजकाल खरे तर हेच जास्त होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचे नशीब चांगले होते त्यादिवशी असेच वाटते. बाकी क्रांती हा शब्द जरा अतिशयोक्ती झाला माझ्याकडून असे वाटते. गेल्या २ वर्षांत मला असे कधी नाही वाटले की ती काही क्रांती होती. मागील आठवड्यात 'डोंबिवली फास्ट' बघताना हा प्रसंग आठवला. लोक जेव्हा नुसते बोलत असतात तेव्हा असे काही तरी क्वचितच होताना पाहिले. म्हणून वाटले इथे लिहुया. ह्यावरूनच वपुंची जेपी ही कथा आठवली. भांडणाचे क्लास घेणारे. त्यात आहे की त्यांनी दोन भांडणे लिहिली असतात. तुम्ही आरक्षित जागेवर आहात. उभा असलेला माणूस तुम्हाला जागा मागतोय, कसे भांडाल. तर दुसर्‍या पानावर नेमके ह्याच्या उलट लिहिले असते, तुम्ही उभे आहात, सीटवर बसलेल्या माणसाशी कसे भांडाल :)

देवदत्ता, अशा क्रांत्या म्हणजे मारामारीला आमंत्रण असते असे वाटते. खरे तर आरक्षण असलेल्या डब्यात सामान्य टीकीट असलेल्या प्रवाश्यांनी बसूच नये. रेल्वेत प्रवास करतांना आरक्षण असणा-यांना दादागिरीने उठवून बसणारी मंडळीही आपल्या पाहाण्यात असते. आणि संबधीत प्रवासी मारामारी होणार या भितीने आपली आरक्षण असलेली सीट सोडून देतो. रेल्वे आरक्षणाचा गोंधळही आपणास माहित असेलच, तेव्हा आम्हाला तरी ही काही क्रांती वाटली नाही. फारच गर्दी असेल तेव्हा थोडी फार 'ऐडजेसमेंट' करण्यास हरकत नसावी असेही वाटते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवदत्त 15/05/2008 - 10:29
ही क्रांती नसावी मान्य.. ही क्रांती नव्हतीच. क्रांती ती लोकांच्या भल्याकरीता, योग्य कारणाकरीता होते, लोक खरोखर ज्याचा उपयोग करून घेतील. हा शब्द मला त्या क्षणापुरता वाटला, आणि लेखनाला तेच नाव सुचले म्हणून लिहिले. :)

मनस्वी 15/05/2008 - 11:00
सर्व प्रवासी मॅनेज करणे म्हणजे फक्त रिझर्वेशन असलेले रिझर्वेशनच्या डब्यात, लेडिज डब्यात फक्त लेडिज, जनरल डब्यात जनरल.. विनातिकीटवाल्यांना हकलणे.. हे खरं रेल्वे कर्मचार्‍यांचे काम आहे. त्यांच्या कामचुकारपणामुळे आपल्याला ताप होतो. जेव्हा गाडी प्लॅटफॉर्मवर येते, तेव्हाच एक अधिकारी दारावर तैनात करून फक्त रिजर्वेशनवाल्यांना आत सोडेल, असे केले पाहिजे. मी एकदा मुंबई-पुणे प्रवास लेडिज डब्यात पूर्ण उभा राहून केला. लेडिज डब्यात वरच्या बर्थ वर एक १८-२० वर्षांचा मुलगा बसलेला. उतरताना त्याला लई शिव्या घातल्या. हातात बांगड्या भर म्हटलं. तो म्हणे मी माझ्या बहिणीला (वय वर्षे साधारण ३० ते ३५) सोबत म्हणून इथे बसलोय! शेवटी चिडचिड,मनस्ताप मलाच झाला. तसेच ट्रेन्समध्ये अवाढव्य तृतियपंथी पाहिले की बिथरल्यासारखे होते. माझ्यामते ते ते नसतातच. बेरोजगार पुरुषांनीच तो नवीन धंदा शोधला आहे. जर आपण आटोकाट प्रयत्न करून रिझर्वेशन मिळवतो.. का? आपला, आपल्या कुटुंबाच प्रवास सुखावह / बरा व्हावा.. अन् त्यात आरक्षित डबा असा विना आरक्षण वाल्यांनी असा खचाखच भरला.. प्रत्येकालाच वाटते सगळ्यांना हकलावे.. पण जोखीम कोणी सहसा घेत नाही. कारण आपल्यावरच धावा झाला तर 'आरक्षित' पांढरपेशे नुसतेच बघत रहाणार. जर घुसखोरांवर येवढा कणव असेल तर त्यांना स्वतःची जागा द्यावी किंवा स्वतः जनरलचेच तिकिट काढावे. अटीतटीच्या प्रसंगात ठीक आहे.. म्हणजे दंगल झालीये / लोक मोठ्या संख्येने गावी चाललेत / यात्रा आहे.. वगैरे.. तेव्हा कोणीही कोणाला समजून घेतो आणि घेतलेच पाहिजे.. पण असे रोजच होउ लागले तर त्याची सवयच होईल रेल्वेला. तिथे मॅनेजमेंटची गरज आहे हे रेल्वे कर्मचार्‍यांना कळणार कधी?

ईश्वरी 15/05/2008 - 12:13
जरी गाडीला गर्दी असली तरी डब्याचे आरक्षण केलेल्या लोकांना त्या डब्यात व्यवस्थित , comfortably बसण्याचा आणि प्रवासाचा आनंद घेण्याचा पूर्ण हक्क आहे. कारण त्यांनी तिकीटासाठी पैसे ही जास्त मोजलेले असतात. जनरलवाल्यांनी आरक्षित डब्यात गर्दी केली तर प्रवास निश्चितच सुखावह होणार नाही. त्यामुळे त्या मुलाने काही चुकीचे केले असे म्हणता येणार नाही. तसे असते तर ते लोक (आरक्षण नसलेले) त्याचे ओरडणे निमूटपणे ऐकून घेऊन खाली उतरले नसते. इतर आरक्षण असलेल्या लोकांनी बघ्याची भूमिका न घेता उलट त्या मुलाला साथ द्यायला हवी होती. अटीतटीच्या प्रसंगात ठीक आहे.. म्हणजे दंगल झालीये / लोक मोठ्या संख्येने गावी चाललेत / यात्रा आहे.. वगैरे.. तेव्हा कोणीही कोणाला समजून घेतो आणि घेतलेच पाहिजे.. पण असे रोजच होउ लागले तर त्याची सवयच होईल रेल्वेला. तिथे मॅनेजमेंटची गरज आहे हे रेल्वे कर्मचार्‍यांना कळणार कधी? हे मनस्वीचे म्हणणे पटले. -- ईश्वरी

एकदा आम्ही पुण्याहून ठाण्याला डेक्कन एक्स्प्रेसने येण्यासाठी आरक्षण केले होते.आमच्या जागेवर दुसरेच एक पोक्त जोडपे बसले होते,त्यांना सांगितले आमचे येथे आरक्षण आहे,त्यातील बाई म्हणाल्या अहो,"तुमच्या समोरच्या जागेवर आमचे रिझर्वेशन आहे पण पहाना तिथे बसलेल्या बाई हे ऐकूनच घेत नाहीत आणि उठत तर नाहीतच..काय करु हो?"हे सांगणार्‍या बाई अगदी अजिजीने सांगत होत्या.म्हटलं," अहो काकू तुमचे रिझर्वेशन आहे तर त्या बाईला इथे बसून कसे देता?" ती बाई हे सर्व ऐकून न ऐकल्यासारखे करत होती. मी तिला म्हटलं,"मावशी उठा,त्या आजींचं इथे रिझर्वेशन आहे,त्यांची जागा आहे ही.."बाई आडदांड होती,म्हणाली "म्या बी तिकट काढलया,फुकाट नाही प्रवास करत.." हुज्जत घालू लागली आणि उठेनाच.. गाडी सुटायची वेळ झाली होती.आजू बाजूचे प्रवासी कुजबुजत सारे पाहत होते.मदतीला कोणी पुढे येईना..पोलिस गायब होतेच.. पण प्लॅटर्मवर एक टीसी होता,त्याला हे सर्व सांगितले टीसी वैतागून एकदाचा माझ्याबरोबर आला,त्याने बाईंना सांगितले तरी बाई काही उठेनात.मग आम्हालाच तो "जाऊ दे ना,करुन घ्या ऍडजस्ट" असे म्हणायला लागला..मग मी चिडले आणि म्हटलं, ती जागा त्या आजींना नाही मिळाली तर मी साखळी खेचणार आणि गाडी पुढे जाऊ देणार नाही..शेवटी त्याने कुठूनसे पोलिस पैदा करून आणले.दोन हवालदारांनाही बाई ऐकेना..तिचं एकच टुमणं "म्या तिकट काढून बसलीया..लवकर येऊनशान जागा पकडलीया..म्या हतून उटणार न्हाय".. शेवटी गाडीने शिटी दिली..माझा हात साखळीकडे जायला लागला..ते पाहून त्यातील एक पोलिस म्हणाला,"ताई दमानं घ्या..आम्ही करतो बरोबर काय ते,आत्ता आमच्या बरोबर इथे लेडी पोलिस नाहीये ना,बाईंच्या अंगाला हात नाही लावता येत.."गाडी हलली आणि हवालदारांनी दंडु़क्यांनी त्या बाईला दोन दणके दिले आणि मुकाट्याने जागा खाली कर,नाहीतर शिवाजी नगरला बाई पोलिसाला बोलावतो असे खास पोलिसी आवाजात खडसावले.ती बाई अत्यंत घाणेरड्या शिव्या देत उठून गँग वे त बसली..पोलिसांना म्हटलं ,पुढे धुडगूस घातला तर? मग पोलिस उखडले इतर प्रवाशांवर.. चक्क म्हणाले," अरे काय बांगड्या भरल्यात काय? त्या आजीआजोबांसाठी फक्त ह्या ताईच झगडतायत आणि तुम्ही लोक निसता तमाशा बघताय? आणि मग म्हणता पोलिस काम करत नाहीत, आता मुंबई पर्यंत त्या आजी आजोबांचा सुखरुप प्रवास ही तुमची जबाबदारी! त्या बाईला इथे येऊ द्यायचं नाही.."बाईलाही परत दम भरला.. मग मात्र पुढचा प्रवास ठीक झाला..

In reply to by स्वाती दिनेश

मनस्वी 15/05/2008 - 12:35
छान केलंस स्वातीताई! काम रेल्वेवाल्यांचे आणि मनस्ताप आपल्याला!

In reply to by स्वाती दिनेश

आनंदयात्री 15/05/2008 - 12:42
एकदम मस्त केलेस स्वाती, स्वतःला काहिही त्रास नसतांना दुसर्‍याचा त्रास पाहुन मदत करणारे विरळाच ! यात मला थोडीफार तरी क्रांती दिसली :)

In reply to by स्वाती दिनेश

खरं तर साखळीऐवजी, त्या बाईचं बखोटं धरुन तिच्या सिटवरुन तिला खेचायला पाहिजे होतं पोलिसांची, टीसीची गरज पडू नये :) "जाऊ दे ना,करुन घ्या ऍडजस्ट" खरं तर असे बोलणा-या लोकांची जमातच वेगळी असते. आपण मारे ऐसपैस बसलेले असतात आणि जागेवरुन भांडणा-यांना, घ्या, ना राव ! ऍडजस्ट करुन.......असे म्हणतात. स्वतः मात्र कोणालाच ऍडजस्ट करुन घेत नाही. धरुन ठोकलं पाहिजे अशा लोकांना !!!!

In reply to by स्वाती दिनेश

  • मग पोलिस उखडले इतर प्रवाशांवर.. चक्क म्हणाले," अरे काय बांगड्या भरल्यात काय? त्या आजीआजोबांसाठी फक्त ह्या ताईच झगडतायत आणि तुम्ही लोक निसता तमाशा बघताय? आणि मग म्हणता पोलिस काम करत नाहीत, आता मुंबई पर्यंत त्या आजी आजोबांचा सुखरुप प्रवास ही तुमची जबाबदारी! त्या बाईला इथे येऊ द्यायचं नाही.."बाईलाही परत दम भरला.. मग मात्र पुढचा प्रवास ठीक झाला..
गोष्टीतील हा भाग फारच आवडला..

विसोबा खेचर 16/05/2008 - 08:19
मी त्या डब्यातला एक असतो तर त्या माणसाला माझे तिकिट मी मुळीच दाखवले नसते! तिकिट विचारायचा हक्क फक्त टी सी ला असतो, अन्य सहप्रवाशंना हा हक्क नाही! मी त्या माणसाला म्हटले असते की 'बाबारे, मला तिकिट विचारणारा तू कोण?? तू टी सी आहेस? तुझ्याकडे टीसीचा बॅच, ओळखपत्र आहे? जा भोसडिच्या, जाऊन पहिले टीसी ला बोलावून आण, मग या डब्यातून उतरायचं किंवा नाही ते मी ठरवीन! तू रागात असलास तरी मलाही राग येतो हे लक्षात ठेव! मी वेळप्रसंगी त्या माणसाशी मारामारीही केली असती आणि टीसी येईपर्यंत त्याची ती बेगडी क्रांती साफ मोडून काढली असती हेही नक्की! :) आपला, (कॉलेज जीवनात भरपूर मारामार्‍या केलेला!) तात्या.

विसोबा खेचर 16/05/2008 - 08:45
कोणी ऐकत नसल्याचे दिसल्यावर तो मित्रांना म्हणाला की "मी पोलिसांना बोलावत आहे." तिकडून तो उतरून बाहेर गेला. बहुधा रेल्वे पोलिसांना शोधायला. पण का कुणास ठाऊक परत आला. हा हा हा! पोलिसांना बोलावून काय उपयोग होणार? तिकिट विचारायचा हक्क टीसी व्यतिरिक्त कुणालाही नाही! :) आपला, (कायदेशीररित्या योग्य ऑथॉरिटीकडून सजा भोगण्यास सदैव तयार!) तात्या.

देवदत्त 16/05/2008 - 20:05
प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद. फारच गर्दी असेल तेव्हा थोडी फार 'ऐडजेसमेंट' करण्यास हरकत नसावी असेही वाटते. सहमत. पण असे रोजच होउ लागले तर त्याची सवयच होईल रेल्वेला.तिथे मॅनेजमेंटची गरज आहे हे रेल्वे कर्मचार्‍यांना कळणार कधी? मनस्वींच्या मुद्द्यांशीही सहमत. पण अहो मॅनेजमेंटच खराब झाले आहे हो आता. गर्दीच्या दिवसांत काही वेळा टी सी येतच नाही तिकिट बघायला हाही अनुभव आहे. स्वातीताई, तुम्ही केलेलेही पटले. ह्याची गरज पडते मध्ये मध्ये :) मी वेळप्रसंगी त्या माणसाशी मारामारीही केली असती आणि टीसी येईपर्यंत त्याची ती बेगडी क्रांती साफ मोडून काढली असती हेही नक्की! मी ही प्रश्नांत तेच विचारले आहे हो तात्या. :) आजकाल खरे तर हेच जास्त होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचे नशीब चांगले होते त्यादिवशी असेच वाटते. बाकी क्रांती हा शब्द जरा अतिशयोक्ती झाला माझ्याकडून असे वाटते. गेल्या २ वर्षांत मला असे कधी नाही वाटले की ती काही क्रांती होती. मागील आठवड्यात 'डोंबिवली फास्ट' बघताना हा प्रसंग आठवला. लोक जेव्हा नुसते बोलत असतात तेव्हा असे काही तरी क्वचितच होताना पाहिले. म्हणून वाटले इथे लिहुया. ह्यावरूनच वपुंची जेपी ही कथा आठवली. भांडणाचे क्लास घेणारे. त्यात आहे की त्यांनी दोन भांडणे लिहिली असतात. तुम्ही आरक्षित जागेवर आहात. उभा असलेला माणूस तुम्हाला जागा मागतोय, कसे भांडाल. तर दुसर्‍या पानावर नेमके ह्याच्या उलट लिहिले असते, तुम्ही उभे आहात, सीटवर बसलेल्या माणसाशी कसे भांडाल :)
२००५ च्या दिवाळीच्या नंतरचे दिवस. दक्षिण रेल्वेचा एक डबा. आमच्या समोर दरवाज्यापासून तिसर्‍या कंपार्टमेंट मध्ये ते ४ मित्र पत्ते कुटत, गाणी गात प्रवासाची मजा घेत चालले होते. बदाम सात, रमी, झब्बू जे आठवतील ते पत्त्यांचे खेळ चालले होते. आजूबाजूचे ही ३/४ जण त्यांना सामिल झाले. मस्त गट बनला होता त्यांचा. कार्यालयातील गंमतीजमती, विनोद सांगण्यात जो तो वरचढ व्हायच्या प्रयत्नात. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर उद्या पुन्हा कामावर रूजू व्हायचे म्हणून थोडा कंटाळाही आलेला दिसत होता त्यांच्या बोलण्यात. तरी आता परतीच्या प्रवासात घरून आणलेल्या दिवाळीच्या फराळावर मध्ये मध्ये हात मारणे चालू होते.

व्योमक्षेमं वहाम्यहम्

हेरंब ·

झकासराव 08/05/2008 - 18:10
"औषध व्योम 'गे' मजला" अशी झालेली असते.>>>>>>>>>>>>>>. जबरा कोटी :) हे नाटक पाहता पाहता राहुन गेलय सु-दर्शन निगडीपासुन लांब आहे म्हणून. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

वसंतराव देशपांडे 'मराठी संगीत नाटकाची वाटचाल' असा एक कार्यक्रम करत असत. त्यात त्यानी वर्णन केले होते की पूर्वी नाटकाना येवढी गर्दी होत असे कारण तेव्हा नाटक सोपे होते आणि सामान्य माणसाला कळत होते. आता सारखे नव्हे. म्हणजे पहील्या अंकात 'आपण फक्त नाटक पहायला आलो आहोत इतकेच कळ्ते'. दुसर्‍या अंकात 'अरेच्चा, असे असेल का हे नाटक' असे वाटते. आणि तिसर्‍या अंकात 'अच्छा अच्छा असे होते होय नाटक 'असे वाटते. आता मराठी नाटक जास्त उत्क्रांत झाले असे आहे असे वाटते. कारण ते वसंतरावांनी सांगितलेल्या वर्णनापेक्षाही जास्त क्लिष्ट वाटत आहे. कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत कळतच नाही की या नाटकात नक्की काय आहे ते. :) पुण्याचे पेशवे

झकासराव 08/05/2008 - 18:10
"औषध व्योम 'गे' मजला" अशी झालेली असते.>>>>>>>>>>>>>>. जबरा कोटी :) हे नाटक पाहता पाहता राहुन गेलय सु-दर्शन निगडीपासुन लांब आहे म्हणून. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

वसंतराव देशपांडे 'मराठी संगीत नाटकाची वाटचाल' असा एक कार्यक्रम करत असत. त्यात त्यानी वर्णन केले होते की पूर्वी नाटकाना येवढी गर्दी होत असे कारण तेव्हा नाटक सोपे होते आणि सामान्य माणसाला कळत होते. आता सारखे नव्हे. म्हणजे पहील्या अंकात 'आपण फक्त नाटक पहायला आलो आहोत इतकेच कळ्ते'. दुसर्‍या अंकात 'अरेच्चा, असे असेल का हे नाटक' असे वाटते. आणि तिसर्‍या अंकात 'अच्छा अच्छा असे होते होय नाटक 'असे वाटते. आता मराठी नाटक जास्त उत्क्रांत झाले असे आहे असे वाटते. कारण ते वसंतरावांनी सांगितलेल्या वर्णनापेक्षाही जास्त क्लिष्ट वाटत आहे. कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत कळतच नाही की या नाटकात नक्की काय आहे ते. :) पुण्याचे पेशवे
'मिपा' च्या वाचकांना 'प्रेमाची गोष्ट' वर लिहिलेले आवडले, म्हणून अजुन एक प्रायोगिक नाटक पाहिले होते, त्यावरचे लिखाण पाठवत आहे. आमची प्रायोगिक नाटकांची आवड तशी खूप जुनी. अगदी छबिलदास चळवळीपासून. त्यामुळे ,प्रायोगिक नाटक लागले की पाय तिथे आपोआप वळणारच! कधी फजितीही होते, सगळं डोक्यावरुन जातं. मग डोक्याला ताप. ह्याला विचार, त्याला विचार, असं चालतं, आपण इतके निर्बुद्ध कसे असे वाटून स्वतःचाच राग येतो. तरी पुढली वारी काही चुकत नाही. दहा नाटके डोक्यावरुन गेली तरी चालेल, पण एखादंच असं आनंद देऊन जातं की बस! 'अमृता सुभाष' , ही एक अत्यंत हुशार अभिनेत्री!

आवाज

हेरंब ·

शितल 01/05/2008 - 18:29
:) तुम्ही छान लिहले आहे, अगदी सरळ आणि मनातले. कधी कधी हा आवाज सहन होत नाही चिडचिड होते, त्या गो॑गाटात आपला आतला आवाजच आपल्याला ऐकु येईनासा होतो. पण नैसर्गिक आवाज हा कानाला सुखावतो. मन प्रसन्न करतो. काही काही माणसे फोनवर देखिल इतक्या मोठ्याने बोलतात तेव्हा तर फोन ठेवासा वाटतो. गणपती उत्सव आणि नवरात्रात तर ह्या आवाजाने ह्रदयाचे ठोके ही चुकतात की काय अशी भिती वाटते.

मदनबाण 01/05/2008 - 19:28
दूरदर्शन, रेडिओ, म्युझिक सिस्टिम हे कानठळ्या बसाव्यात यासाठीच तयार केले आहेत असा यांचा दृढविश्वास असतो. खरय तुमच म्हणण आज काल लोकांना वाटत की मोठा आवाज केला तरच एन्जॉय करता येत..... तुझ्या म्युझिक सिस्टिम पेक्षा माझी म्युझिक सिस्टिम कशी जबरदस्त आहे त्याचा खेळ चालतो..... खळखळणार्‍या पाण्याचा, वार्‍याचा, पावसाचा किंबहुना निसर्गातील प्रत्येकच गोष्टीचा आवाज हा कानांना सुखदच असतो. १०००%सहमत..... हिमालयात फिरायला गेल्यावर तर हे फारच जाणवते. फिरायला.....अहो मी तर म्हणतो आता तर कायमचेच वास्तव्य करावे..... (ध्वनी प्रदुषणाने त्रस्त ) ~X( मदनबाण

मानस 01/05/2008 - 20:28
या अनुषंगाने संत कबिरांचा एक दोहा आठवला. मुल्ला होकर बांग पुकारे, वो का साहीब बहीरा है | मुंगीके पाव मे घुंगरू बाजे, वो भी अल्ला सुनता है ||

मानस 01/05/2008 - 20:28
या अनुषंगाने संत कबिरांचा एक दोहा आठवला. मुल्ला होकर बांग पुकारे, वो का साहीब बहीरा है | मुंगीके पाव मे घुंगरू बाजे, वो भी अल्ला सुनता है ||

वरदा 01/05/2008 - 23:21
हे परमेश्वरा, डोळे बंद करता येतात, नाक मुठीत धरता येते, मग पाहिजे तेंव्हा कान बंद करण्याची विद्या फक्त मनोहरपंतांनाच का दिलीस रे ??? खरच....मी तिथे असताना तर आमच्या घरासमोर लग्नाचा हॉल सुरु झाला..एकाच वेळी एकाच मांडवात ३ लग्न होती आणि ३ जणांनी वेगवेगळे बँड आणले होते..इमॅजिन करा काय प्रचंड आवाज असेल्.....आणि ३ बँड जवळजवळ ६-७ तास सतत वाजत होते....ह्या लोकांचे कान कसले बनलेले असतात कोण जाणे....

माणसाचा बुध्यांक हा त्याच्या आवाज सहन करण्याच्या क्षमतेच्या व्यस्त प्रमाणांत असतो असे कुणा सूज्ञ गोर्‍या साहेबाने लिहून ठेवल्याचे स्मरते आणि हे वाक्य तर भन्नाटच... B)

धमाल मुलगा 02/05/2008 - 14:37
छान लेख. थोडंसं अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा.
हे परमेश्वरा, डोळे बंद करता येतात, नाक मुठीत धरता येते, मग पाहिजे तेंव्हा कान बंद करण्याची विद्या फक्त मनोहरपंतांनाच का दिलीस रे ???
आँ...पंताना चिमटा :) :) :) आणि मानस यांनी इथं उद्घत केलेला कबिरांचा
मुल्ला होकर बांग पुकारे, वो का साहीब बहीरा है | मुंगीके पाव मे घुंगरू बाजे, वो भी अल्ला सुनता है ||
दोहा ही अगदी यथोचित....

शितल 01/05/2008 - 18:29
:) तुम्ही छान लिहले आहे, अगदी सरळ आणि मनातले. कधी कधी हा आवाज सहन होत नाही चिडचिड होते, त्या गो॑गाटात आपला आतला आवाजच आपल्याला ऐकु येईनासा होतो. पण नैसर्गिक आवाज हा कानाला सुखावतो. मन प्रसन्न करतो. काही काही माणसे फोनवर देखिल इतक्या मोठ्याने बोलतात तेव्हा तर फोन ठेवासा वाटतो. गणपती उत्सव आणि नवरात्रात तर ह्या आवाजाने ह्रदयाचे ठोके ही चुकतात की काय अशी भिती वाटते.

मदनबाण 01/05/2008 - 19:28
दूरदर्शन, रेडिओ, म्युझिक सिस्टिम हे कानठळ्या बसाव्यात यासाठीच तयार केले आहेत असा यांचा दृढविश्वास असतो. खरय तुमच म्हणण आज काल लोकांना वाटत की मोठा आवाज केला तरच एन्जॉय करता येत..... तुझ्या म्युझिक सिस्टिम पेक्षा माझी म्युझिक सिस्टिम कशी जबरदस्त आहे त्याचा खेळ चालतो..... खळखळणार्‍या पाण्याचा, वार्‍याचा, पावसाचा किंबहुना निसर्गातील प्रत्येकच गोष्टीचा आवाज हा कानांना सुखदच असतो. १०००%सहमत..... हिमालयात फिरायला गेल्यावर तर हे फारच जाणवते. फिरायला.....अहो मी तर म्हणतो आता तर कायमचेच वास्तव्य करावे..... (ध्वनी प्रदुषणाने त्रस्त ) ~X( मदनबाण

मानस 01/05/2008 - 20:28
या अनुषंगाने संत कबिरांचा एक दोहा आठवला. मुल्ला होकर बांग पुकारे, वो का साहीब बहीरा है | मुंगीके पाव मे घुंगरू बाजे, वो भी अल्ला सुनता है ||

मानस 01/05/2008 - 20:28
या अनुषंगाने संत कबिरांचा एक दोहा आठवला. मुल्ला होकर बांग पुकारे, वो का साहीब बहीरा है | मुंगीके पाव मे घुंगरू बाजे, वो भी अल्ला सुनता है ||

वरदा 01/05/2008 - 23:21
हे परमेश्वरा, डोळे बंद करता येतात, नाक मुठीत धरता येते, मग पाहिजे तेंव्हा कान बंद करण्याची विद्या फक्त मनोहरपंतांनाच का दिलीस रे ??? खरच....मी तिथे असताना तर आमच्या घरासमोर लग्नाचा हॉल सुरु झाला..एकाच वेळी एकाच मांडवात ३ लग्न होती आणि ३ जणांनी वेगवेगळे बँड आणले होते..इमॅजिन करा काय प्रचंड आवाज असेल्.....आणि ३ बँड जवळजवळ ६-७ तास सतत वाजत होते....ह्या लोकांचे कान कसले बनलेले असतात कोण जाणे....

माणसाचा बुध्यांक हा त्याच्या आवाज सहन करण्याच्या क्षमतेच्या व्यस्त प्रमाणांत असतो असे कुणा सूज्ञ गोर्‍या साहेबाने लिहून ठेवल्याचे स्मरते आणि हे वाक्य तर भन्नाटच... B)

धमाल मुलगा 02/05/2008 - 14:37
छान लेख. थोडंसं अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा.
हे परमेश्वरा, डोळे बंद करता येतात, नाक मुठीत धरता येते, मग पाहिजे तेंव्हा कान बंद करण्याची विद्या फक्त मनोहरपंतांनाच का दिलीस रे ???
आँ...पंताना चिमटा :) :) :) आणि मानस यांनी इथं उद्घत केलेला कबिरांचा
मुल्ला होकर बांग पुकारे, वो का साहीब बहीरा है | मुंगीके पाव मे घुंगरू बाजे, वो भी अल्ला सुनता है ||
दोहा ही अगदी यथोचित....
जन्माला येणार्‍या बाळाचा पहिला आवाज ऐकायला सगळे किती उत्सुक असतात! खळखळणार्‍या पाण्याचा, वार्‍याचा, पावसाचा किंबहुना निसर्गातील प्रत्येकच गोष्टीचा आवाज हा कानांना सुखदच असतो. हिमालयात फिरायला गेल्यावर तर हे फारच जाणवते. पण हाच आवाज शहरांत फारच भीतिदायक रुप धारण करतो. शांतताप्रिय लोकांचे म्हणणे या गदारोळांत ऐकतो कोण? त्यांत ते संख्येने फारच कमी! तरी त्यातल्या कांहींनी दुर्दम्य चिकाटीने गोंगाट हा आरोग्याला कसा हानिकारक आहे हे सप्रमाण सिद्ध केले आणि सरकारला व न्यायालयांना तसे कायदे करावयास भाग पाडले. पण तिथेही तथाकथित धर्म आडवा आला.

भाषा आणि प्रमाण

नीलकांत ·

प्रमोद देव 20/04/2008 - 13:27
नीलकांत अगदी सुंदर,स्वच्छ आणि पटेल अशा भाषेत लिहिलेला हा लेख तुझ्या अभ्यासूपणाची तसेच नम्र, तरीही कणखरपणाची जाणिव करून देतोय.(मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास,कठीण वज्रास भेदू ऐसे... च्या चालीवर) आवडले तुझे विचार. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे...

In reply to by भडकमकर मास्तर

मदनबाण 20/04/2008 - 22:21
उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे... मी सुद्धा १००% सहमत आहे. (करा व्यक्त स्वःला मराठी मधेच )असे म्हणणारा..... मदनबाण

तुमच्या परिश्रमांचे. लेख वाचण्याइतका वेळ आत्ता नही मिळाला आणि लेखाची लांबी पाहून दमलेच. तसाही माझा या विषयात रस जरा कमीच आहे पण एखादी पिंक टाकायला काही हरकत नाही कधीतरी, काय? टाईम मॅनेज कसा करायचा या चिंतेत सध्या भरपूर टाईमपास करणारी, ऐश्वर्या

विदेश 20/04/2008 - 16:44
प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. अगदी मनातलं टंकलात!

ॐकार 20/04/2008 - 17:08
इंग्रजीचे स्पेलिंग आणि मराठीतील शुद्धाशुद्धता यात बराच फरक आहे. नॉट म्हटले तर इंग्रजीत काय लिहाल? naught? not? तिथे स्पेलिंग्ज बदलल्याने अर्थ बदलतो. मराठीत अर्थावरून कोणी हरकत घेतली तर एकवेळ समजू शकते. इंग्रजीत स्पेलिंग बरोबर लिहावे लागते म्हणून मराठीला मात्र त्या पंक्तीला बसवू नये. 'न्हाय' म्हणण्यातला दमदारपणा जसा सूटाबुटातल्या 'नाही'त नाही तसाच 'नाही' शब्दातला शिष्टपणा मुंडासे बांधलेल्या न्हायमध्ये न्हाय. मात्र, भावाच्या आधी घरी पोचल्यावर 'म्ह्या अदुगर आली' म्हणत भावाला चिडवणार्‍या चिमुरडीच्या डोळ्यातला आनंद हा काही 'मी अगोदर आले' म्हणणार्‍या बहिणीच्या डोळ्यातल्या आनंदापेक्षा वेगळा नक्कीच नाही. मुंबई-पुण्यात हरवलेली वस्तू भेटत नसते तर सापडत/मिळत असते. तीच वस्तू नागपूरात मात्र भेटू शकते. तुम्ही नाशकात जा किंवा नाशिकला, द्राक्ष जर आंबट असतील तर ती आंबटच राहतील. असे फरक लिहिण्या-बोलण्यात दोन्हीकडे येतात. पण म्हणून त्यातले एकच एक बरोबर आहे हे म्हणणे म्हणजे दुराग्रह आहे. आपल्या घरी जे बोललं जातं ते बरोबर हा साधा व्यवहार आपण कळत नकळत मानतोच. जे शाळेत जसं शिकलो ते घरी पडताळून पाहतो. आपणच भाषेची चौकट बनवत असतो; आपल्यापुरती. आणि इथेच मर्यादा येतात. आपण जे लिहितो-बोलतो-वाचतो फक्त ते आणि तेच शुद्ध म्हणायच्या आधी दुसर्‍याच्या घरात जाऊन एकदा 'चहा घेऊन' किंवा 'चहा मारून' किंवा नुसतं 'चहाला' जाऊन या. चहा सगळ्यांकडेच मिळेल, पण फक्त 'अमृततुल्य'चा चहा प्रमाण मानणार काय ( इथे हशा मिळेल अशी आमची खात्री आहे ;) )? आम्ही बिनसाखरेचा पितो म्हणून तुम्हाला तो आवडेलच ह्याची शाश्वती नाही, आणि तुम्ही पाणचट(पांचट) चहा आनंदाने पित असाल मात्र आम्हाला तो वंगाळही लागू शकतो. ह्या 'आम्ही' आणि 'तुम्ही'चे 'आपण' व्हायला दोन्ही बाजू तितक्या लवचिक असायला हव्यात.

In reply to by ॐकार

विजुभाऊ 22/04/2008 - 10:01
प्रमाण मर्‍हाटी म्हणजे ती पुन्या ३० मदे बोल्ली जाते ती त नव्हं? म्या आसच बोल्लनार.ती माजी मायची भाषा हाये.चान्ग्लं झेकपॅक लुगाडं नेस्यत न्हाय ,दिसायला आक्षी झैरातीतल्या बाईवानी दिसत न्हाय ;म्हनुन माजी माय काय वंगाळ म्हनायची व्हय? आता मना सांगा भौ तुमच्या प्रमाण मर्‍हाटीत १)"व्हतं"म्हननं हे चूक आन "नव्हतं" हे म्हननं बरुबर हे कसं काय? २) पास हा शब्द इंग्रजी आन नापास तेव्हढा देशी असं कसं काय? इंग्रजीत अनेक बोलीभाषा आहेत. जसे कॉकने , अमेरिकन , स्कॉटीश , तशा त्या प्रत्येक भाषेत असतात. मराठीमध्ये सुधा आहेत. प्रत्येकबोली भाषेचे सौन्दर्य वेगळे असते त्यामुळे एका प्रमाण भाषेचा आग्रह हे चूकच. ॐकारभौ तुमी लिवेले ते लै झ्याक केलत बगा. शुद्धलेखनाचे नियम पाळायला हवेत पण त्याचा अर्थ अस नव्हे की बोली भाषाना हिणकस ठरवुन त्याना हद्दपार करणे. अन्यथा बहिणाबाई वगैरेंसारखे हिरे उरणारच नाहीत. मराठीचा सार्थ अभिमान बाळगणारा : गुज्जुभाऊ विजुभाऊ

अविनाश ओगले 20/04/2008 - 20:45
नीलकांतजी, आपला ले़ख उत्तम. आपल्या ले़खातील "चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य." या विधानासंदर्भात काही नवीन संशाधनाची माहिती नुकतीच प्रकाशित झाली आहे. ती इथे वाचा

नीलकांत 20/04/2008 - 21:04
अविनाशजी धन्यवाद. ही माहिती नवीन आहे. तसे कोकणातील उल्लेख या आधी केवळ ऐकून माहिती होता. अद्ययावत झालेला - नीलकांत

व्यंकट 20/04/2008 - 22:07
नामदेव ढसाळांनी १-१.५ वर्षापूर्वी सर्व काही समष्टीसाठी ह्या सामनातील लेखमालेत प्रस्तुत विषयावर एक शोधपूर्ण निबंध लिहीला होता.. व्यंकट

प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. +१ लेख आवडला हेवेसांनल. स्वाती

हे जरा जास्तच होतंय असं नाही वाटत? आधी आमच्या भाषेला बोली म्हणायचं नंतर तिला कसं नियमांचं अधिष्ठान नाही हे सांगायचं, आणि शेवटी तर ती अशुद्ध आहे एवढं बोलण्या पर्यंत यांची मजल. अगदी खरे! नीलकांतरावांनी खूपच छान लेख लिहिला आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन...! मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. ह्या वाक्यास मिपा व्यवस्थापनाची पूर्ण सहमती आहे! येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. नीलकांतरावांशी पुन्हा एकदा सहमत! आणि असा अट्टाहास कुणी करू पाहिल तर त्याचे लेखन तर उडवून लावले जाईलच, शिवाय त्याचे सभसदत्वही रद्द केले जाईल, मग भले सभासदांवाचून मिसळपाव बंद पडले तरी बेहत्तर! अशीच या बाबतीत व्यवस्थपनाची भूमिका राहील, हे आम्ही व्यवस्थापनातर्फे सांगू इच्छितो! अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. सहमत आहे! मिपावर प्रमाण लादण्याला मिपा व्यवस्थापनाचा प्रखर विरोधच राहील! प्रमाणभाषेचा आग्रह असणार्‍यांनी आपला आग्रह आपल्याजवळच ठेवावा! तो त्यांनी मिसळपाववर करू नये! खरं तर प्रमाणभाषेची नसती ट्यांव ट्यांव करणार्‍यांसाठी मिसळपाव हे संकेतस्थळ नाही. सबब, त्यांनी इथे येऊ नये हेच उत्तम! -- जनरल डायर.

चित्रा 22/04/2008 - 08:14
प्रथम लेख अतिशय वाचनीय आहे आणि विचार जवळजवळ सर्वच पटले. तरी अंशतः सहमती अशासाठी की, बोली भाषा एखाद्याची बरोबर किंवा चूक असे मानण्याचा अधिकार कोणालाच नसावा हे मान्य. पण लेखनाचे काही एका प्रमाणात प्रमाणीकरण (स्टँडर्डायझेशन) करणे हे आवश्यक मात्र नक्की आहे, नाहीतर लेखनाचा अर्थ न कळण्यापलिकडे जाईल असे वाटते. भाषाशास्त्रात फोनेटिक्स किंवा उच्चारशास्त्र हा एक महत्त्वाचा अभ्यास करावा लागतो. लिखित भाषा सर्वत्र समजली जावी अशी अपेक्षा असल्यास काहीएक उच्चार हे अभ्यासाच्या परिघात आणावे लागतील (कारण तसे ते आत्ता नाहीत म्हणून) आणि भाषेचे प्रमाणीकरण करताना त्यात सामावून घ्यावे लागतील. ते सरळसोट वापरात आणून (म्हणजे ब्रूट फोर्सने) करण्याचा पायंडा पाडणे सर्वस्वी बरोबरच असेल असे मला वाटत नाही, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. अमेरिकेच्या न्यू इंग्लंड भागातील लोक हे शेवटच्या "र" चा उच्चार करत नाहीत ( जसे "कार" मधला र). पण लिहीताना स्पेलिंग बरोबर एकाच पद्धतीने लिहीले जाते. बोली भाषेची वैशिष्ट्ये जपली नक्कीच गेली पाहिजेत पण लिहीताना मात्र प्रमाणीकरणाचा वापर शक्य तेवढा व्हावा. त्या प्रमाणीकरणाची सीमा विस्तृत करावी ही अपेक्षा मात्र योग्य आहे आणि तशी करण्यास कोणाचा नकार नसावा. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे पूर्णपणे मान्य.

In reply to by चित्रा

ॐकार 22/04/2008 - 09:11
कार मधल्या र च उच्चार न करणे पण लिहिताना मात्र 'आर्' लिहिणे हे उदाहरण म्हणून ह्या अनुषंगाने पटत नाही. इंग्रजी उच्चारानुसार लिहिली जाणारी भाषा नाहीच. स्पेलिंगचे घोळ होतात म्हणूनच तिथे प्रमाणीकरण गरजेचे आहे. एखाद्या उच्चार करता येण्याजोग्या शब्दाचे स्पेलिंग पाठ करायला लागावे यासारखे दुर्दैव मराठीच्या नशिबी नक्कीच नाही. किंबहुना (काय शब्द आहे!) क चा उच्चार इंग्रजीत c,q,k,ch कशानेही करता येईल. असे असल्याने तिथे प्रमाणीकरण हवेच. मराठीत क्वार्टर (क्वॉटअ), कार(क्खाअ), कॅन , काइट् (काइच्ट), ऑक्शन लिहा. तिथे 'क' म्हणजे 'क'च. ह्या वादात इंग्रजीला प्रमाण (रेफ़रन्स) मानणे नक्कीच सयुक्तिक नाही. भाषिक तुलनेचं (तुलनेचे असं लिहिलं की कसे पुस्तकी वाटते हे वेगळे सांगायला नको!) आणखी उदाहरण द्यायचं झालं तर थाई भाषेत काही वर्णांचे चार उच्चार आहेत उदा. प् , प , पअ ( लो टोन), प? (हाय टोन). हे उच्चार लिहायला त्या भाषेत वेगळे वर्ण आणि वर्णसंकर(!) आहेत. पा?क (का? सारखे पा? असे विचारा आणि मग क म्हणा) आणि पाक (आपला साखरेचा पाक असतो तसा उच्चार) यांचे लेखन आणि अर्थ वेगळे. त्यांनी उच्चारांच्यादृष्टीने समृद्ध(!) अशी मराठी भाषा/ देवनागरी लिपी प्रमाण मानावी का? मराठीत किमान असे फारसे प्रकार आढळत नाहीत (क्ष = क्श , ज्ञ = द्न्य, ष/श अशा कुरापती काढायला वाव आहे). प्रश्न उरतो तो समोच्चारी वर्णांचा जसे ट-त , द-ड, ण-न, ळ-ल; र्‍हस्व दीर्घाचा आणि प्रत्ययांचा. हा प्रश्नही (प्रश्ण का नाही? ) काही ठरावीक शब्दांपुरताच आहे. (बाकी सामान्य व्याकरण जसे वचन , लिंग, काळ इ. इ. मात्र प्रमाण आहेत हे नाकारता येत नाही). केवळ अशा काही शब्दभेदांमुळे जर मराठी बाटणार असेल तर ती लोकभाषा कधीच होणार नाही. अवांतरः सारेगमप मधल्या पल्लवी जोशीने पुरुषाला स्पर्धक आणि स्त्रीलाही स्पर्धक म्हणणे खटकते का कोणाला? गायक-गायिका, लेखक-लेखिका सारखे स्पर्धक-स्पर्धिका वगैरे का नाही असा प्रश्न पडला का कोणाला? :)

In reply to by ॐकार

चतुरंग 22/04/2008 - 20:22
तो स्पर्धक - पुल्लिंग, ती स्पर्धक - स्त्रिलिंग, ते स्पर्धक - अनेकवचन. ह्यात मूळ 'स्पर्धक' हा शब्द उदासीन आहे असे वाटते. असेच आणखी एक उदाहरण 'वादक' (वादिका?) - तो वादक, ती वादक, ते वादक. जाणकार आणखी स्पष्टीकरण देऊ शकतील. चतुरंग

In reply to by मनस्वी

इनोबा म्हणे 22/04/2008 - 11:04
लई छान लिवलंय.. यक नंबर. ह्येच म्हंतू. च्यामारी परमाण का काय ते आपल्याला नाय कळत. आपल्याला पायजे तसंच लिवनार आपण. इरोध करणारे गेले खड्ड्यात. फारच मस्त लेख... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

इनोबा, प्रामाण्य सांभाळले नाही तर तुम्ही ज्या भाषेत इथे संवाद साधू चाहता ती भाषाही गाळात जाते हो. तुम्ही 'निवड'पूर्वक बोली अवश्य वापरा. विलासरावजी "निचितपने" ह्याचे अनुमोदन करतील. मात्र लेखनात (संवादलेखन, संबोधन, वगळता) प्रमाण भाषा वापरा. त्याचे फायदे अनेक आहेत. हेच ह्या संकेतस्थळ सांभाळणार्‍याचे मत झालेले ह्या लेखातून दिसून येते. अर्थात् ज्या स्वातंत्र्याखातर तुम्ही इथे वावरता त्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे निर्विवाद.

प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत.
सहमत आहे. नीलकांता असेच चांगले लेख येवो. एका भाषा शुद्धीचा आग्रह असणार्‍या लेखिकेकडे एकदा गेलो होतो. तिथे दुरदर्शन वर एक कार्यक्रम लागला होता. चर्चा असावी. त्यात एक प्राध्यापक आनि पानि लोनि असे उच्चार करत होता त्या कडे त्या विदुषीने माझे लक्ष वेधले. मी त्यांना एवढेच म्हणालो माझे लक्ष आशया कडे होते. किती वास्तव तो सांगत होता याकडे होतं. बलुत या पुस्तकाच्या मुद्रित शोधनात असंख्य 'चुका' मुद्रित शोधका ने दाखवल्या होत्या असे ऐकून आहे. प्रकाश घाटपांडे

अचानक नव्या जगाची ओळख झाली. हे... हे... सारं आमच्या भाषेत यायला हवं... आमच्या लोकांना कळायला हवं. ही कळकळ वाटायला लागली. १८३२ ला मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू झालं नावही सुंदर होतं 'दर्पन'. >> नीलकांत, विचारपूर्वक लिहीलेल्या विचारप्रवर्तक लेखाखातर मन:पूर्वक धन्यवाद. प्रमाणभाषा असण्याचे अनेक फायदे असतात. उदाहरणार्थ वरील वाक्यात चुकून 'दर्पन' लिहील्या गेले असावे असा समज होण्याची शक्यता आहे. जर खरोखरीचे ते 'दर्पन'च असेल आणि त्याचा यथार्थ बोध व्हावा असे वाटत असेल तर, एरव्ही लिहीतांना प्रमाण भाषेत 'दर्पण' लिहीणे गरजेचे आहे. मग, प्रमाणभाषेत लिखाण केलेले आहे आणि जे आहे ते बिनचूक आहे अशी खात्री दिल्यास योग्य तो बोध निस्संदिग्धपणे मिळू शकतो. मात्र, संकेतस्थळ सांभाळतांना येत जाणारी प्रगल्भता लेखात व्यवस्थित प्रकटली आहे.

In reply to by नरेंद्र गोळे

नीलकांत 23/04/2008 - 18:32
मराठीतील पहिले नियतकालीक 'दर्पण' आहे. गोळेसर, माझा प्रमाणभाषेला विरोध नाहिये. विरोध आहे तो त्या प्रमाणाचा अतिआग्रहाला. अहो, मला नाही जमत १००% प्रमाण लिहायला. मग का मी लिहूच नये की काय? केवळ प्रमाण हीच एकमेव भाषा आहे असं नाही, आणि प्रमाणभाषेत झालेलीच केवळ अभिव्यक्ती बाकीचा सगळा दुय्यम गावठी माल असंही काही नाही. प्रमाण असावी, ती सर्वसंमत,सर्वमान्य असावी, त्यामुळे अर्थाबाबत संदेह उरत नाही. हे खरं आहे. या बाबत कुणाचंही दुमत नाही. नीलकांत

In reply to by नीलकांत

दर्पण हे पहीले मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकारीते साठी दर्पण पुरस्काल दिला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांचे मूळ गाव पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधूदूर्ग. तेथे असलेल्या पोंभुर्ले गावच्या ग्रामदेवतेचे(जांभई देवी)पुजारी म्हणूने त्याना जांभेकर हे आडनाव प्राप्त झाले. आजही पोंभुर्ले गावी त्यांच्या जन्मघरी त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. तेथे जवळच असलेले जांभई देवीचे मंदिर हे कोकणातील काष्ठशिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे. पुण्याचे पेशवे

बॅटमॅन 07/06/2012 - 18:47
चेंगट्पना न कर्ता हा लेख वर आन्ल्याबद्दल श्री श्री नाना चेंगट यांचे त्रिवार हाबिणंदण!!! लै गरज व्हती या अशा लेखाची!! लै माजलेत प्रमाण-ब्रिगेडी अलिकडे ;)

In reply to by सुनील

मृगनयनी 07/06/2012 - 22:06
अरे वा वा!.. चान चान!...एकन्दर ह्या धाग्यास वर खेचण्याचे काम 'समिती' कडूनच चालू आहे तर!!!.. गुड.. कीप इट अप!!! ___________________________________ मूळचे उत्तर भारतीय असणार्‍या कृष्णाजीराव यादवां'ची राजधानी "द्वारका" गुजराथमध्ये असताना.. त्यांनी महाराश्ट्रातल्या ( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! ..

In reply to by मृगनयनी

बॅटमॅन 07/06/2012 - 22:11
महाराश्ट्रातल्या....( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! .. आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.

In reply to by बॅटमॅन

मृगनयनी 08/06/2012 - 09:56
आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.
:| :| :| .. इथे निषेध नोन्दवण्यासारखं काय आहे ? .. माझ्या "त्या" वाक्याचा अर्थ कळला नाही का तुम्हाला? ... मुळात वरच्या दोन प्रतिसादांमध्ये कृष्णाला "यादव" हे आडनाव प्रदान करणारे लोक्स वेगळे आहेत!... (सम्पादकही आहेत !) (पक्षी: मी नाही) ... आणि कृष्णाच्या पहिल्या पत्नीचे नाव- 'रुक्मिणी' असे असून तिचे माहेर विदर्भातले होते... अश्याप्रकारे कृष्णपत्नी'मुळे यादवांचा महाराष्ट्राशी संबंध जोडला गेलेला आहे... आणि "यादवांची संख्या महाराष्ट्रात वाढते आहे" हे राज ठाकरेंचे विधान आहे!!!... त्यामुळे मला नाही वाटत की यामुळे इथे मिसळपाव'वरती फार मोठा गदारोळ निर्माण व्हावा!... :| टीप :- सरळ साध्या वाक्यांचे अर्थ समजून घेण्यात कृपया चूक करू नये...... कुणीही

In reply to by मृगनयनी

नाना चेंगट 08/06/2012 - 13:22
एक प्रश्नः- हा लेख "नाना चेंगट" यांनी (किन्वा यांच्या करवी) इतक्या दिवसांनी वर काढण्यामागचा नक्की हेतू कळू शकेल का?... तुमच्या प्रश्न विचारण्यामागचा हेतु कळू शकेल काय? :)

प्रमोद देव 20/04/2008 - 13:27
नीलकांत अगदी सुंदर,स्वच्छ आणि पटेल अशा भाषेत लिहिलेला हा लेख तुझ्या अभ्यासूपणाची तसेच नम्र, तरीही कणखरपणाची जाणिव करून देतोय.(मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास,कठीण वज्रास भेदू ऐसे... च्या चालीवर) आवडले तुझे विचार. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे...

In reply to by भडकमकर मास्तर

मदनबाण 20/04/2008 - 22:21
उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.) प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे एक एक वाक्य जबरदस्त आहे... सहमतच आहे... मी सुद्धा १००% सहमत आहे. (करा व्यक्त स्वःला मराठी मधेच )असे म्हणणारा..... मदनबाण

तुमच्या परिश्रमांचे. लेख वाचण्याइतका वेळ आत्ता नही मिळाला आणि लेखाची लांबी पाहून दमलेच. तसाही माझा या विषयात रस जरा कमीच आहे पण एखादी पिंक टाकायला काही हरकत नाही कधीतरी, काय? टाईम मॅनेज कसा करायचा या चिंतेत सध्या भरपूर टाईमपास करणारी, ऐश्वर्या

विदेश 20/04/2008 - 16:44
प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत. मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. अगदी मनातलं टंकलात!

ॐकार 20/04/2008 - 17:08
इंग्रजीचे स्पेलिंग आणि मराठीतील शुद्धाशुद्धता यात बराच फरक आहे. नॉट म्हटले तर इंग्रजीत काय लिहाल? naught? not? तिथे स्पेलिंग्ज बदलल्याने अर्थ बदलतो. मराठीत अर्थावरून कोणी हरकत घेतली तर एकवेळ समजू शकते. इंग्रजीत स्पेलिंग बरोबर लिहावे लागते म्हणून मराठीला मात्र त्या पंक्तीला बसवू नये. 'न्हाय' म्हणण्यातला दमदारपणा जसा सूटाबुटातल्या 'नाही'त नाही तसाच 'नाही' शब्दातला शिष्टपणा मुंडासे बांधलेल्या न्हायमध्ये न्हाय. मात्र, भावाच्या आधी घरी पोचल्यावर 'म्ह्या अदुगर आली' म्हणत भावाला चिडवणार्‍या चिमुरडीच्या डोळ्यातला आनंद हा काही 'मी अगोदर आले' म्हणणार्‍या बहिणीच्या डोळ्यातल्या आनंदापेक्षा वेगळा नक्कीच नाही. मुंबई-पुण्यात हरवलेली वस्तू भेटत नसते तर सापडत/मिळत असते. तीच वस्तू नागपूरात मात्र भेटू शकते. तुम्ही नाशकात जा किंवा नाशिकला, द्राक्ष जर आंबट असतील तर ती आंबटच राहतील. असे फरक लिहिण्या-बोलण्यात दोन्हीकडे येतात. पण म्हणून त्यातले एकच एक बरोबर आहे हे म्हणणे म्हणजे दुराग्रह आहे. आपल्या घरी जे बोललं जातं ते बरोबर हा साधा व्यवहार आपण कळत नकळत मानतोच. जे शाळेत जसं शिकलो ते घरी पडताळून पाहतो. आपणच भाषेची चौकट बनवत असतो; आपल्यापुरती. आणि इथेच मर्यादा येतात. आपण जे लिहितो-बोलतो-वाचतो फक्त ते आणि तेच शुद्ध म्हणायच्या आधी दुसर्‍याच्या घरात जाऊन एकदा 'चहा घेऊन' किंवा 'चहा मारून' किंवा नुसतं 'चहाला' जाऊन या. चहा सगळ्यांकडेच मिळेल, पण फक्त 'अमृततुल्य'चा चहा प्रमाण मानणार काय ( इथे हशा मिळेल अशी आमची खात्री आहे ;) )? आम्ही बिनसाखरेचा पितो म्हणून तुम्हाला तो आवडेलच ह्याची शाश्वती नाही, आणि तुम्ही पाणचट(पांचट) चहा आनंदाने पित असाल मात्र आम्हाला तो वंगाळही लागू शकतो. ह्या 'आम्ही' आणि 'तुम्ही'चे 'आपण' व्हायला दोन्ही बाजू तितक्या लवचिक असायला हव्यात.

In reply to by ॐकार

विजुभाऊ 22/04/2008 - 10:01
प्रमाण मर्‍हाटी म्हणजे ती पुन्या ३० मदे बोल्ली जाते ती त नव्हं? म्या आसच बोल्लनार.ती माजी मायची भाषा हाये.चान्ग्लं झेकपॅक लुगाडं नेस्यत न्हाय ,दिसायला आक्षी झैरातीतल्या बाईवानी दिसत न्हाय ;म्हनुन माजी माय काय वंगाळ म्हनायची व्हय? आता मना सांगा भौ तुमच्या प्रमाण मर्‍हाटीत १)"व्हतं"म्हननं हे चूक आन "नव्हतं" हे म्हननं बरुबर हे कसं काय? २) पास हा शब्द इंग्रजी आन नापास तेव्हढा देशी असं कसं काय? इंग्रजीत अनेक बोलीभाषा आहेत. जसे कॉकने , अमेरिकन , स्कॉटीश , तशा त्या प्रत्येक भाषेत असतात. मराठीमध्ये सुधा आहेत. प्रत्येकबोली भाषेचे सौन्दर्य वेगळे असते त्यामुळे एका प्रमाण भाषेचा आग्रह हे चूकच. ॐकारभौ तुमी लिवेले ते लै झ्याक केलत बगा. शुद्धलेखनाचे नियम पाळायला हवेत पण त्याचा अर्थ अस नव्हे की बोली भाषाना हिणकस ठरवुन त्याना हद्दपार करणे. अन्यथा बहिणाबाई वगैरेंसारखे हिरे उरणारच नाहीत. मराठीचा सार्थ अभिमान बाळगणारा : गुज्जुभाऊ विजुभाऊ

अविनाश ओगले 20/04/2008 - 20:45
नीलकांतजी, आपला ले़ख उत्तम. आपल्या ले़खातील "चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य." या विधानासंदर्भात काही नवीन संशाधनाची माहिती नुकतीच प्रकाशित झाली आहे. ती इथे वाचा

नीलकांत 20/04/2008 - 21:04
अविनाशजी धन्यवाद. ही माहिती नवीन आहे. तसे कोकणातील उल्लेख या आधी केवळ ऐकून माहिती होता. अद्ययावत झालेला - नीलकांत

व्यंकट 20/04/2008 - 22:07
नामदेव ढसाळांनी १-१.५ वर्षापूर्वी सर्व काही समष्टीसाठी ह्या सामनातील लेखमालेत प्रस्तुत विषयावर एक शोधपूर्ण निबंध लिहीला होता.. व्यंकट

प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. +१ लेख आवडला हेवेसांनल. स्वाती

हे जरा जास्तच होतंय असं नाही वाटत? आधी आमच्या भाषेला बोली म्हणायचं नंतर तिला कसं नियमांचं अधिष्ठान नाही हे सांगायचं, आणि शेवटी तर ती अशुद्ध आहे एवढं बोलण्या पर्यंत यांची मजल. अगदी खरे! नीलकांतरावांनी खूपच छान लेख लिहिला आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन...! मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे. ह्या वाक्यास मिपा व्यवस्थापनाची पूर्ण सहमती आहे! येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. नीलकांतरावांशी पुन्हा एकदा सहमत! आणि असा अट्टाहास कुणी करू पाहिल तर त्याचे लेखन तर उडवून लावले जाईलच, शिवाय त्याचे सभसदत्वही रद्द केले जाईल, मग भले सभासदांवाचून मिसळपाव बंद पडले तरी बेहत्तर! अशीच या बाबतीत व्यवस्थपनाची भूमिका राहील, हे आम्ही व्यवस्थापनातर्फे सांगू इच्छितो! अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. सहमत आहे! मिपावर प्रमाण लादण्याला मिपा व्यवस्थापनाचा प्रखर विरोधच राहील! प्रमाणभाषेचा आग्रह असणार्‍यांनी आपला आग्रह आपल्याजवळच ठेवावा! तो त्यांनी मिसळपाववर करू नये! खरं तर प्रमाणभाषेची नसती ट्यांव ट्यांव करणार्‍यांसाठी मिसळपाव हे संकेतस्थळ नाही. सबब, त्यांनी इथे येऊ नये हेच उत्तम! -- जनरल डायर.

चित्रा 22/04/2008 - 08:14
प्रथम लेख अतिशय वाचनीय आहे आणि विचार जवळजवळ सर्वच पटले. तरी अंशतः सहमती अशासाठी की, बोली भाषा एखाद्याची बरोबर किंवा चूक असे मानण्याचा अधिकार कोणालाच नसावा हे मान्य. पण लेखनाचे काही एका प्रमाणात प्रमाणीकरण (स्टँडर्डायझेशन) करणे हे आवश्यक मात्र नक्की आहे, नाहीतर लेखनाचा अर्थ न कळण्यापलिकडे जाईल असे वाटते. भाषाशास्त्रात फोनेटिक्स किंवा उच्चारशास्त्र हा एक महत्त्वाचा अभ्यास करावा लागतो. लिखित भाषा सर्वत्र समजली जावी अशी अपेक्षा असल्यास काहीएक उच्चार हे अभ्यासाच्या परिघात आणावे लागतील (कारण तसे ते आत्ता नाहीत म्हणून) आणि भाषेचे प्रमाणीकरण करताना त्यात सामावून घ्यावे लागतील. ते सरळसोट वापरात आणून (म्हणजे ब्रूट फोर्सने) करण्याचा पायंडा पाडणे सर्वस्वी बरोबरच असेल असे मला वाटत नाही, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. अमेरिकेच्या न्यू इंग्लंड भागातील लोक हे शेवटच्या "र" चा उच्चार करत नाहीत ( जसे "कार" मधला र). पण लिहीताना स्पेलिंग बरोबर एकाच पद्धतीने लिहीले जाते. बोली भाषेची वैशिष्ट्ये जपली नक्कीच गेली पाहिजेत पण लिहीताना मात्र प्रमाणीकरणाचा वापर शक्य तेवढा व्हावा. त्या प्रमाणीकरणाची सीमा विस्तृत करावी ही अपेक्षा मात्र योग्य आहे आणि तशी करण्यास कोणाचा नकार नसावा. येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं. अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच. हे पूर्णपणे मान्य.

In reply to by चित्रा

ॐकार 22/04/2008 - 09:11
कार मधल्या र च उच्चार न करणे पण लिहिताना मात्र 'आर्' लिहिणे हे उदाहरण म्हणून ह्या अनुषंगाने पटत नाही. इंग्रजी उच्चारानुसार लिहिली जाणारी भाषा नाहीच. स्पेलिंगचे घोळ होतात म्हणूनच तिथे प्रमाणीकरण गरजेचे आहे. एखाद्या उच्चार करता येण्याजोग्या शब्दाचे स्पेलिंग पाठ करायला लागावे यासारखे दुर्दैव मराठीच्या नशिबी नक्कीच नाही. किंबहुना (काय शब्द आहे!) क चा उच्चार इंग्रजीत c,q,k,ch कशानेही करता येईल. असे असल्याने तिथे प्रमाणीकरण हवेच. मराठीत क्वार्टर (क्वॉटअ), कार(क्खाअ), कॅन , काइट् (काइच्ट), ऑक्शन लिहा. तिथे 'क' म्हणजे 'क'च. ह्या वादात इंग्रजीला प्रमाण (रेफ़रन्स) मानणे नक्कीच सयुक्तिक नाही. भाषिक तुलनेचं (तुलनेचे असं लिहिलं की कसे पुस्तकी वाटते हे वेगळे सांगायला नको!) आणखी उदाहरण द्यायचं झालं तर थाई भाषेत काही वर्णांचे चार उच्चार आहेत उदा. प् , प , पअ ( लो टोन), प? (हाय टोन). हे उच्चार लिहायला त्या भाषेत वेगळे वर्ण आणि वर्णसंकर(!) आहेत. पा?क (का? सारखे पा? असे विचारा आणि मग क म्हणा) आणि पाक (आपला साखरेचा पाक असतो तसा उच्चार) यांचे लेखन आणि अर्थ वेगळे. त्यांनी उच्चारांच्यादृष्टीने समृद्ध(!) अशी मराठी भाषा/ देवनागरी लिपी प्रमाण मानावी का? मराठीत किमान असे फारसे प्रकार आढळत नाहीत (क्ष = क्श , ज्ञ = द्न्य, ष/श अशा कुरापती काढायला वाव आहे). प्रश्न उरतो तो समोच्चारी वर्णांचा जसे ट-त , द-ड, ण-न, ळ-ल; र्‍हस्व दीर्घाचा आणि प्रत्ययांचा. हा प्रश्नही (प्रश्ण का नाही? ) काही ठरावीक शब्दांपुरताच आहे. (बाकी सामान्य व्याकरण जसे वचन , लिंग, काळ इ. इ. मात्र प्रमाण आहेत हे नाकारता येत नाही). केवळ अशा काही शब्दभेदांमुळे जर मराठी बाटणार असेल तर ती लोकभाषा कधीच होणार नाही. अवांतरः सारेगमप मधल्या पल्लवी जोशीने पुरुषाला स्पर्धक आणि स्त्रीलाही स्पर्धक म्हणणे खटकते का कोणाला? गायक-गायिका, लेखक-लेखिका सारखे स्पर्धक-स्पर्धिका वगैरे का नाही असा प्रश्न पडला का कोणाला? :)

In reply to by ॐकार

चतुरंग 22/04/2008 - 20:22
तो स्पर्धक - पुल्लिंग, ती स्पर्धक - स्त्रिलिंग, ते स्पर्धक - अनेकवचन. ह्यात मूळ 'स्पर्धक' हा शब्द उदासीन आहे असे वाटते. असेच आणखी एक उदाहरण 'वादक' (वादिका?) - तो वादक, ती वादक, ते वादक. जाणकार आणखी स्पष्टीकरण देऊ शकतील. चतुरंग

In reply to by मनस्वी

इनोबा म्हणे 22/04/2008 - 11:04
लई छान लिवलंय.. यक नंबर. ह्येच म्हंतू. च्यामारी परमाण का काय ते आपल्याला नाय कळत. आपल्याला पायजे तसंच लिवनार आपण. इरोध करणारे गेले खड्ड्यात. फारच मस्त लेख... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

इनोबा, प्रामाण्य सांभाळले नाही तर तुम्ही ज्या भाषेत इथे संवाद साधू चाहता ती भाषाही गाळात जाते हो. तुम्ही 'निवड'पूर्वक बोली अवश्य वापरा. विलासरावजी "निचितपने" ह्याचे अनुमोदन करतील. मात्र लेखनात (संवादलेखन, संबोधन, वगळता) प्रमाण भाषा वापरा. त्याचे फायदे अनेक आहेत. हेच ह्या संकेतस्थळ सांभाळणार्‍याचे मत झालेले ह्या लेखातून दिसून येते. अर्थात् ज्या स्वातंत्र्याखातर तुम्ही इथे वावरता त्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे निर्विवाद.

प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत.
सहमत आहे. नीलकांता असेच चांगले लेख येवो. एका भाषा शुद्धीचा आग्रह असणार्‍या लेखिकेकडे एकदा गेलो होतो. तिथे दुरदर्शन वर एक कार्यक्रम लागला होता. चर्चा असावी. त्यात एक प्राध्यापक आनि पानि लोनि असे उच्चार करत होता त्या कडे त्या विदुषीने माझे लक्ष वेधले. मी त्यांना एवढेच म्हणालो माझे लक्ष आशया कडे होते. किती वास्तव तो सांगत होता याकडे होतं. बलुत या पुस्तकाच्या मुद्रित शोधनात असंख्य 'चुका' मुद्रित शोधका ने दाखवल्या होत्या असे ऐकून आहे. प्रकाश घाटपांडे

अचानक नव्या जगाची ओळख झाली. हे... हे... सारं आमच्या भाषेत यायला हवं... आमच्या लोकांना कळायला हवं. ही कळकळ वाटायला लागली. १८३२ ला मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू झालं नावही सुंदर होतं 'दर्पन'. >> नीलकांत, विचारपूर्वक लिहीलेल्या विचारप्रवर्तक लेखाखातर मन:पूर्वक धन्यवाद. प्रमाणभाषा असण्याचे अनेक फायदे असतात. उदाहरणार्थ वरील वाक्यात चुकून 'दर्पन' लिहील्या गेले असावे असा समज होण्याची शक्यता आहे. जर खरोखरीचे ते 'दर्पन'च असेल आणि त्याचा यथार्थ बोध व्हावा असे वाटत असेल तर, एरव्ही लिहीतांना प्रमाण भाषेत 'दर्पण' लिहीणे गरजेचे आहे. मग, प्रमाणभाषेत लिखाण केलेले आहे आणि जे आहे ते बिनचूक आहे अशी खात्री दिल्यास योग्य तो बोध निस्संदिग्धपणे मिळू शकतो. मात्र, संकेतस्थळ सांभाळतांना येत जाणारी प्रगल्भता लेखात व्यवस्थित प्रकटली आहे.

In reply to by नरेंद्र गोळे

नीलकांत 23/04/2008 - 18:32
मराठीतील पहिले नियतकालीक 'दर्पण' आहे. गोळेसर, माझा प्रमाणभाषेला विरोध नाहिये. विरोध आहे तो त्या प्रमाणाचा अतिआग्रहाला. अहो, मला नाही जमत १००% प्रमाण लिहायला. मग का मी लिहूच नये की काय? केवळ प्रमाण हीच एकमेव भाषा आहे असं नाही, आणि प्रमाणभाषेत झालेलीच केवळ अभिव्यक्ती बाकीचा सगळा दुय्यम गावठी माल असंही काही नाही. प्रमाण असावी, ती सर्वसंमत,सर्वमान्य असावी, त्यामुळे अर्थाबाबत संदेह उरत नाही. हे खरं आहे. या बाबत कुणाचंही दुमत नाही. नीलकांत

In reply to by नीलकांत

दर्पण हे पहीले मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकारीते साठी दर्पण पुरस्काल दिला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांचे मूळ गाव पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधूदूर्ग. तेथे असलेल्या पोंभुर्ले गावच्या ग्रामदेवतेचे(जांभई देवी)पुजारी म्हणूने त्याना जांभेकर हे आडनाव प्राप्त झाले. आजही पोंभुर्ले गावी त्यांच्या जन्मघरी त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. तेथे जवळच असलेले जांभई देवीचे मंदिर हे कोकणातील काष्ठशिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे. पुण्याचे पेशवे

बॅटमॅन 07/06/2012 - 18:47
चेंगट्पना न कर्ता हा लेख वर आन्ल्याबद्दल श्री श्री नाना चेंगट यांचे त्रिवार हाबिणंदण!!! लै गरज व्हती या अशा लेखाची!! लै माजलेत प्रमाण-ब्रिगेडी अलिकडे ;)

In reply to by सुनील

मृगनयनी 07/06/2012 - 22:06
अरे वा वा!.. चान चान!...एकन्दर ह्या धाग्यास वर खेचण्याचे काम 'समिती' कडूनच चालू आहे तर!!!.. गुड.. कीप इट अप!!! ___________________________________ मूळचे उत्तर भारतीय असणार्‍या कृष्णाजीराव यादवां'ची राजधानी "द्वारका" गुजराथमध्ये असताना.. त्यांनी महाराश्ट्रातल्या ( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! ..

In reply to by मृगनयनी

बॅटमॅन 07/06/2012 - 22:11
महाराश्ट्रातल्या....( वैदर्भीय) रुक्मिणीदेवींशी लग्न केल्यामुळेच बहुधा महाराष्ट्रात यादवांची संख्या वाढते आहे!!! .. आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.

In reply to by बॅटमॅन

मृगनयनी 08/06/2012 - 09:56
आवरा हो मृगनैनीतै...लै झालं आता. जास्त बोलत नै, पण निषेध नोंदवतो आत्ताच.
:| :| :| .. इथे निषेध नोन्दवण्यासारखं काय आहे ? .. माझ्या "त्या" वाक्याचा अर्थ कळला नाही का तुम्हाला? ... मुळात वरच्या दोन प्रतिसादांमध्ये कृष्णाला "यादव" हे आडनाव प्रदान करणारे लोक्स वेगळे आहेत!... (सम्पादकही आहेत !) (पक्षी: मी नाही) ... आणि कृष्णाच्या पहिल्या पत्नीचे नाव- 'रुक्मिणी' असे असून तिचे माहेर विदर्भातले होते... अश्याप्रकारे कृष्णपत्नी'मुळे यादवांचा महाराष्ट्राशी संबंध जोडला गेलेला आहे... आणि "यादवांची संख्या महाराष्ट्रात वाढते आहे" हे राज ठाकरेंचे विधान आहे!!!... त्यामुळे मला नाही वाटत की यामुळे इथे मिसळपाव'वरती फार मोठा गदारोळ निर्माण व्हावा!... :| टीप :- सरळ साध्या वाक्यांचे अर्थ समजून घेण्यात कृपया चूक करू नये...... कुणीही

In reply to by मृगनयनी

नाना चेंगट 08/06/2012 - 13:22
एक प्रश्नः- हा लेख "नाना चेंगट" यांनी (किन्वा यांच्या करवी) इतक्या दिवसांनी वर काढण्यामागचा नक्की हेतू कळू शकेल का?... तुमच्या प्रश्न विचारण्यामागचा हेतु कळू शकेल काय? :)
गेल्या काही दिवसांपासून(ण) मिसळपाव वर शुद्धलेखन(ण) आणि(न) प्रमाण(न) भाषेचा जयघोष चालला आहे. काय आहे हो ही प्रमाण(न) भाषा? प्रमाण कशासाठी हवं? आणि प्रमाणा(ना)चं प्रमाण किती असावं? 'चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य. त्याकाळी मराठीला प्राकृत म्हणत असत. त्यानंतर आमच्या अमृतातेही पैजा जिंकणार्‍या मराठीत 'ज्ञानेश्वरी' लिहिल्या गेली. सुरुवातीला मराठीत पद्य रचनाच लिहिल्या जायच्या. लिहायला कमी जागा, गेयता असल्यामुळे सहज मुखोद्गत होत असत आणि सहज प्रसार होई.

जंगलकथा -२

हेरंब ·

सहज 20/04/2008 - 10:36
मजेशीर दोन्ही भाग आवडले. कधी काळी त्या जंगलात रहाणारा पण आता वेगळ्या झू मधे रमलेला वनवासी :-)

रुपक अतिशय समर्पक पणे वापरले आहे. दोन्ही भाग अर्थातच आवडले, आपण म्हटल्याप्रमाणे आधीच दुसर्‍या संस्थळावर वाचले होते पण काही कारणाने अभिप्राय द्यायचे राहून गेले होते, स्वाती

विसोबा खेचर 21/04/2008 - 07:23
पण हत्ती बेदरकारपणे ' आपलेच जंगल ही एक महासत्ता होणार असून एक दिवस ही माणसेच आपली गुलाम बनतील' असे उच्चरवाने सांगत होते. गरीब बिचार्‍या प्राण्यांना आपला वाली कोणीच नाही हे कधीच कळले होते. वा! सह्ही लिखा है भिडू! रुपकं वापरून मांडलेला सामाजिक आशय/वास्तव अतिशय आवडले.. व त्याला त्यांचीच कल्पनाशक्ती जबाबदार आहे असे समजावे. हे बाकी मस्तच! ;) असो, अजूनही असेच उत्तम लेखन येऊ द्या, ही विनंती... तात्या.

सहज 20/04/2008 - 10:36
मजेशीर दोन्ही भाग आवडले. कधी काळी त्या जंगलात रहाणारा पण आता वेगळ्या झू मधे रमलेला वनवासी :-)

रुपक अतिशय समर्पक पणे वापरले आहे. दोन्ही भाग अर्थातच आवडले, आपण म्हटल्याप्रमाणे आधीच दुसर्‍या संस्थळावर वाचले होते पण काही कारणाने अभिप्राय द्यायचे राहून गेले होते, स्वाती

विसोबा खेचर 21/04/2008 - 07:23
पण हत्ती बेदरकारपणे ' आपलेच जंगल ही एक महासत्ता होणार असून एक दिवस ही माणसेच आपली गुलाम बनतील' असे उच्चरवाने सांगत होते. गरीब बिचार्‍या प्राण्यांना आपला वाली कोणीच नाही हे कधीच कळले होते. वा! सह्ही लिखा है भिडू! रुपकं वापरून मांडलेला सामाजिक आशय/वास्तव अतिशय आवडले.. व त्याला त्यांचीच कल्पनाशक्ती जबाबदार आहे असे समजावे. हे बाकी मस्तच! ;) असो, अजूनही असेच उत्तम लेखन येऊ द्या, ही विनंती... तात्या.
3

जंगलकथा -१

हेरंब ·

प्राजु 20/04/2008 - 09:56
प्रतिकात्मक कथा आवडली. हत्तेरू, हत्तिरा आणि हत्तीव.... एकदम सह्ही. हा भाग आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विद्याधर३१ 20/04/2008 - 20:18
दुसर्‍या संस्थळावर भाग २ वाचला होता. पण भाग एक वाचण्याची उत्सुकता होती.. हत्तेरू, हत्तिरा आणि हत्तीव.... एकदम सह्ही. हा ही भाग आवडला. विद्याधर

प्राजु 20/04/2008 - 09:56
प्रतिकात्मक कथा आवडली. हत्तेरू, हत्तिरा आणि हत्तीव.... एकदम सह्ही. हा भाग आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विद्याधर३१ 20/04/2008 - 20:18
दुसर्‍या संस्थळावर भाग २ वाचला होता. पण भाग एक वाचण्याची उत्सुकता होती.. हत्तेरू, हत्तिरा आणि हत्तीव.... एकदम सह्ही. हा ही भाग आवडला. विद्याधर
3

आतले आणि बाहेरचे... (२)

नीलकांत ·

दोन्ही भाग एकदम आत्ताच वाचले आणि नंतर ह्या लेखांमागची प्रेरणा असलेला आधीचा लेख ! त्यातील वादातून हे लेख लिहायला उद्युक्त झालात हे चांगले झाले . आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित. हे अगदी पटले. स्वाती

आनंदयात्री 12/04/2008 - 19:36
मोठं होणं आणि जाणतं होणं म्हणजे हेच की, खरं काय आहे आणि योग्य काय आहे त्याचा शोध घेणं. आपली नजर अशी बहुआयामी होणं. काय बोल्लास मित्रा, लाखाची गोष्ट. ...'महापुरुषांचा पराभव' ह्यात भालचंद्र नेमाडे म्हणतात .... या धड्याचे उपकार आहेत आपल्यावर.. (बर्‍याच वर्षांपासुन झुल किलकीली करण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा पण नाण्याच्या दुसर्‍या बाजुमुळे व्यथित ) -आनंदयात्री

धनंजय 12/04/2008 - 19:51
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. ही झूल किलकिली केल्यानंतर सुरुवातीला आपण व्यथित होतो. पण त्यानंतर विलक्षण आनंद होऊ शकतो - मोकळेमोकळे वाटते. स्वातंत्र्याचा तो आनंद तुमच्या लेखातून तुम्ही व्यक्त करू शकलात. अभिनंदन.

प्रमोद देव 12/04/2008 - 19:52
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

अभिज्ञ 12/04/2008 - 22:11
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. अगदि हेच म्हणतो... आपल्या पुढिल लेखनास मनापासून शुभेच्छा. असेच उत्तमउत्तम लेख येउ द्यात. अबब

In reply to by अभिज्ञ

इनोबा म्हणे 13/04/2008 - 01:25
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. अगदी मनापासून हेच म्हणावेसे वाटते आहे... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by अभिज्ञ

गोट्या 15/04/2008 - 21:24
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. नेहमी प्रमाणेच वाचनीय व विचार करण्यायोग्य प्रतिसाद. अशाच काही लेखनाची वाट पाहत आहे मी अजून. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

आजानुकर्ण 12/04/2008 - 22:45
माझ्या मते महापुरुषांचा पराभव हा लेख जनार्दन वाघमारे यांचा आहे. नेमाडेशेठ असे वाक्य लिहिणारच नाहीत ;) लेख आवडला. अजून असे लेख येऊ द्यावेत (वाचक) आजानुकर्ण सांगवीकर

रामदास 12/04/2008 - 22:58
नीलकान्त. आपले मनापासून अभिनंदन्.अनेक कारणांसाठी . आपण केलेली विषयाची मांडणी.चौफेर विचार करून लेखाचा विषय हेतू पुढे नेणे. टीकेला आक्रस्ताळेपणा न करता चोख शब्दात उत्तर देणे .आपल्या वैचारीक भूमिकेशी ठामपणे प्रामाणिक राहणे.आपली तयारी खूपचं चान्गली झाली आहे.विनोबा अशा माणसाला स्थविर म्हणतात. स्थविर म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे असा.(विष्णू चे हे एक नाव आहे) वैचारीक मंथन असले तरी ललित लेखा चा पाठ्य पुस्तकातला धडा म्हणून प्रत्येकाने हा लेख वाचावा.जी मंडळी वकील होणार असतील त्यांनी जरूरवाचावा. सरोजीनी वैद्य ज्या प्रकारे शिकवत त्याची आठवण झाली. सामाजीक जाणीव जोपासणार्‍या विद्वानांची संख्या आता कमी आहे.पण आपण हे जोखमीचे काम अंगावर जाणीवपूर्वक घेतले आहे असे वाटते.पुन्हा एकदा अभिनंदन.

चित्रा 12/04/2008 - 23:40
विचारांना चालना देणार्‍या लेखाबद्दल मनापासून अभिनंदन. दुर्गा भागवत आणि य. दि. फडके यांचेही लेख विचारप्रवर्तक. वाचन किंवा मनन दिशा ठरवत नाहीये तर दिशा ठरवून वाचन आणि मनन होतं. नेमकं चुकतं येथेच... सारा घोळ येथेच. हे अगदी बरोबर. बहुतांशी लोकांचे असेच होते. वाचनात चौफेर दृष्टी नसली तर अंगवळणी पडलेले एकच विचार वेगवेगळ्या लेखकांच्या नावाने परत परत वाचले जातात. आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. हा तर मोठा विषय काढलात. अत्यंत विस्तृत आवाका असलेला विषय आहे - आपल्या सामाजिक आणि वैयक्तिक प्रत्येक वलयात आपण या झुली पाहत असतो. दोन वाक्यांत तुम्ही या विषयाचे चांगल्यापैकी संकलन केले आहे, पण तरी ते पूर्ण वाटत नाही - पण हा मुद्दा कळीचा आहे आणि तो अशा प्रकारे मांडलेला पाहून तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. आत्ता तूर्तास एवढेच. अवांतर - विषयांतर होईल, पण मॅट्रिक्स हा चित्रपट पहिल्याने पाहिला तेव्हा त्याचे स्वरूप वेगळे असले तरी मुख्यत्वे आपल्या मनावर असलेल्या विचारांच्या झुलीवरूनच होता. त्याची आठवण झाली. http://www.imdb.com/title/tt0133093/

गुंडोपंत 13/04/2008 - 06:25
अप्रतिम लेख! नीलकांतचे लिखाण असेही अतिशय अभ्यासपूर्ण असतेच. पूर्वीही त्याने अमेरिका विषयक एका चर्चेत अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिसाद सर्किट यांना दिला होता ते स्मरते. हे लिखाण, वृत्तपत्रात छापुन यावे असे लिखाण आहे. अतिशय मुद्देसूद! यातला ह्या लोकांना हा विरोध त्यांनी मांडलेले विचार चुकीचे आहेत यामुळे कमी आणि त्या विचारांमुळे आपल्या हितसंबंधांना बाधा येते म्हणून जास्त असतो. हा सगळीअगदीलागू होणारा मुद्दा आहे. किआहे.सुधारणेला खीळ घालणारी तीच मुख्य कळ आहे. भालचंद्र नेमाडे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात. अगदी खरे! सर्वस्वी मान्य आहे पण ही सामाजिक जागृती करण्याला अनेक पैलूआहेत, अनेक पदर आहेत. या झूल पांघरायला नकार देणारे न्या. रानडे,महात्मा फुले, गो.ग. आगरकर, ताराबाई शिंदे, छ. शाहू महाराज, वि.रा. शिंदे, पंडिता रमाबाई, विष्णूबुवा ब्रह्मचारी, बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर, धो.के. कर्वे, र.धो.कर्वे, भाऊराव पाटील असे अनेक नामवंत आहेत. अर्थातच ही यादी पूर्ण नाहीच पण वाचतांना इरावती कर्वे यांचेही यात नाव हवे असे वाटले. त्यांनी अतिशय विचारप्रवर्तक लेखन केले आहे. तसेच वि.रा. शिंदे व विष्णूबुवा ब्रह्मचारी यांच्या कार्या विषयी सर्वसाधारणपणे काहीच माहिती नाही असेही लक्षात आले. यावर काही लिहु शकाल का? आपला गुंडोपंत

विसोबा खेचर 13/04/2008 - 10:45
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. हे अगदी पटण्याजोगे! वैयक्तिकरित्या सांगायचं तर मला भोवतालच्या जगातअश्या निरनिराळ्या विचारांच्या मंडळींचे अस्तित्व अनुभवायचा छंदच आहे. कुठल्याही पुस्तकापेक्षा खूप काही शिकायला मिळतं या दुनियादारीतून! आणि याचा फायदा कुणा दुसर्‍या-तिसर्‍याला होत नसून मलाच होतो आणि खरं तर माझंच जीवन अधिकाधिक समृद्ध होण्यास मदत होते! आणि झुलींचं म्हणाल तर अश्या झुली पांघरून बसलेली मंडळीदेखील अगदी ठायी ठायी दिसतात! अहो एवढंच कशाला, या आभासी आंतरजालीय विश्वातही कोणत्या ना कोणत्या तरी झुली पांघरून बसलेली माणसं पाहायला मिळतात! ही मंडळी ठराविक झुली पांघरून डबक्यातच बसणं पसंत करतात आणि मग कालांतराने या डबक्यालाच समुद्र समजू लागतात! मग भले झुलींचं हे जोखड कसलंही असो, अध्यात्माचं असो, वैचारिकतेचं असो, कोत्या मनोवृत्तीचं असो, व्याकरण-शुद्धलेखनाचं असो, साहित्याचं असो, वा संतसाहित्याचं असो! ;) मनमोकळेपणाने, निर्मळतेने स्वत:लाच एक्सप्रेस करणं हीच खरी तर खूप कठीण गोष्ट आहे. आणि ती जमली नाही की मग कसल्या ना कसल्या तरी झुली पांघरून बसणं भाग पडतं किंवा ओघानेच येतं आणि मग अश्याच समविचारी झुली पांघरून बसलेली मंडळी शोधून काढून स्वतःचंच एक झुलीदार कंपूवजा डबकं बनवणंही ओघानेच आलं! ;) जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित. क्या बात है...! वा नीलकांता, दोन्ही भाग आवडले. अतिशय सुरेख लेखन. जियो..! तात्या.

विसोबा खेचर 13/04/2008 - 11:04
अरे नीलकांता, झुलींच्या बाबतीतलं अगदी आत्ताआत्ताचं उदाहरण आठवलं बघ! नुकतंच कुणीतरी तुला न आणि ण वरून दोन खडे बोल सुनावून ठेचायचा प्रयत्न केला आहे! ;) त्या व्यक्तिला तुझ्या इतक्या चांगल्या लेखावर बरावाईट प्रतिसाद द्यायला वेळ मिळाला नाही! कदाचित तुझ्यासारखा गावाकडचा मनुष्य इतकं चांगलं लिहू शकतो हेच मुळी खोट्या प्रतिष्ठेच्या सुशिक्षित, पांढरपेशी शहरी मनोवृतीला पचायला जड गेलं असावं! ;) आणि मग त्या व्यक्तिजवळ उरलं काय, तर व्याकरण-शुद्धलेखनाची एक सुसंस्कृत, सुशिक्षित झूल! त्यामुळे, "आता हीच झूल पांघरून कुठे 'न' लिहायचा आणि कुठे 'ण' लिहायचा ही 'व्याकरणी चो*गिरी' करून चांगला ठेचा आता या नीलकांताला आणि करा चांगला नामोहरम!" हाच एकमेव विचार उरला! ;) असो, तात्या.

नीलकांत 13/04/2008 - 11:21
हे नाव राहिलं खरं.महाराष्ट्राच्या व एकूनच भारतीय सामजिक संशोधनात यांचा मोठा वाटा आहे. वि. रा. शिंदे - हे डिप्रेस्ड क्लास मिशनचे संस्थापक. पुण्यात विद्यार्थी दशेत त्यांनी समाजकार्य सुरू केले. ऍमस्टरडॅम येथे भारतातील उदारमतवादी धर्म या विषयावर प्रबंध वाचला. अखील भारतीय कॉग्रेसच्या कलकत्याच्या अधीवेशनात (१९१७) , ज्या अधीवेशनाच्या अध्यक्षा ऍनी बेझन्ट होत्या, त्या अधीवेशनात त्यांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदा अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास करून घेतला. भारतात दलितांसाठी संघटनात्मक काम करण्यासाठी सुरूवात केली. ह्या मानसाची भारतीय समाजाने अवहेलनाच केली. खुप मोठं काम मात्र त्यांचा नामोल्लेख कमी आढळतो. कधी तरी यांच्याही कार्याचं संकलन तुमच्या समोर ठेवेन. विष्णुबुवा ब्रम्हचारी यांनी विधवा पुनरुथ्थानाचे कार्य केले. पुढे यांनी स्वतः एका विधवेशी लग्न केले होते. विधवेशी लग्न श्री धो.के. कर्वे यांनी सुध्दा केले होते. ह्या मोठ्या लोकांनी असा पायंडा पाडल्यामुळे ही चळवळ सहज रूजली. विधवा प्रश्नावर मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी म्हणून जिचं नाव घेतल्या जातं अशी 'यमुना पर्यटन' ही कादंबरी लिहील्या गेली. लेखक होते बाबा पद्मनजी. हे सुध्दा त्याकाळातील समाजसुधारक मात्र यांनी धर्मपरिवर्तन केल्याने पुढे त्यांना समाजकार्यात खुप मर्यादा आल्या. ------------------------------------------- कौतुका बद्दल तुम्हा सर्वांचे आभार. नीलकांत

चंबा मुतनाळ 14/04/2008 - 20:11
दोन्ही लेख एकदम वाचले. अप्रतीम झाले आहेत. नीलकांत, तुमचे लिखाण मनास भावले. "आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत." हे एकदम पटले! झूल कधिच झुगारून दिलेला --भ्रमरि

चतुरंग 14/04/2008 - 21:47
विचारांची नेमकी आणि अभ्यासू मांडणी कौतुकास्पद आहे. असेच समृध्द वैचारिक लेखन अधिकाधिक वाचायला मिळो ही इच्छा. (अवांतर - हा लेख वाचून अनेक झुली पांघरून अगदी नंदीबैल झालो आहे की काय असे वाटायला लागले;) चतुरंग

विसुनाना 15/04/2008 - 12:34
वा रे वा! काय सुंदर लेख लिहिलास. तुझं लेखन माझ्यासारख्या सर्वसामान्याला कळायला सोपं आहे. विचारपूर्वक लिहिलेलं आणि विचार देणारं आहे पण कंटाळवाणं, गांभिर्याचा आव आणणारं, जडशीळ नाही. (थोडक्यात बद्धकोष्ठ नाही.) हा लेख थोडा संपादित करून (जसे प्रतिसादात उल्लेख झालेल्या व्यक्तींचा उल्लेख करून) शहरी आणि ग्रामिण वर्तमानपत्रांकडे पाठव. असे लेख आणखी लिहिले जावेत, वाचले जावेत म्हणजेच या झुली कधीतरी थोड्याफार किलकिल्या होतील अशी आशा आहे. आता आणखी असेच लिहित जा. त्याची आवश्यकता आहे. तू मोठा आहेसच. पुढे नावही कमावशील हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. लिहिता रहा.

विदेश 15/04/2008 - 13:05
पुन्हा शाळेतील धडा आडवतोय, त्याचं नाव होतं 'महापुरुषांचा पराभव' ह्यात भालचंद्र नेमाडे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात. या विचारमंथनातूनच राष्ट्रविकासात का अडथळे येतात हे उमजते.

नंदन 15/04/2008 - 14:30
विचार आणि मांडणी. दोन्ही लेख अतिशय आवडले. एखाद्या वादातून तुझे असले विचारप्रवृत्त करणारे लेख वाचायला मिळणार असतील, तर असे वाद वरचेवर व्हावेत :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

विचार आणि मांडणी. दोन्ही लेख अतिशय आवडले. एखाद्या वादातून तुझे असले विचारप्रवृत्त करणारे लेख वाचायला मिळणार असतील, तर असे वाद वरचेवर व्हावेत :) ... फार सुंदर प्रतिसाद...

शितल 15/04/2008 - 18:30
लेख वाचुन झाल्यावर लेख मनातच साठुन राहतो, लेख प्रत्येकाच्या मनातील एक कप्पा नक्की उघड्तो.

त्यांनी घेतलेले विचार आपल्यासाठी नवे होते म्हणून कदाचित आपल्याला त्याचं आकलन झालं नसावं म्हणून आपल्या समाजाने त्याला विरोध केला, असा बचाव आपण थोडा मान्यही करू, मात्र आज स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे झाली तरीही आपण तटस्थ होऊन आपल्या पूर्वजांकडे पाहण्याची हिंमत करू शकत नाहि याला काय म्हणावं? मानसिक अपरिपक्वता, की अपंगत्व?
खर आहे ! कधी धड अपरिपक्वता नाही , धड अंपगत्व नाही अशावेळी गतानुगतिकता मात्र असते.कधि स्वार्था साठी तर कधी अगतिकतेतून. प्रकाश घाटपांडे

दोन्ही भाग एकदम आत्ताच वाचले आणि नंतर ह्या लेखांमागची प्रेरणा असलेला आधीचा लेख ! त्यातील वादातून हे लेख लिहायला उद्युक्त झालात हे चांगले झाले . आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित. हे अगदी पटले. स्वाती

आनंदयात्री 12/04/2008 - 19:36
मोठं होणं आणि जाणतं होणं म्हणजे हेच की, खरं काय आहे आणि योग्य काय आहे त्याचा शोध घेणं. आपली नजर अशी बहुआयामी होणं. काय बोल्लास मित्रा, लाखाची गोष्ट. ...'महापुरुषांचा पराभव' ह्यात भालचंद्र नेमाडे म्हणतात .... या धड्याचे उपकार आहेत आपल्यावर.. (बर्‍याच वर्षांपासुन झुल किलकीली करण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा पण नाण्याच्या दुसर्‍या बाजुमुळे व्यथित ) -आनंदयात्री

धनंजय 12/04/2008 - 19:51
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. ही झूल किलकिली केल्यानंतर सुरुवातीला आपण व्यथित होतो. पण त्यानंतर विलक्षण आनंद होऊ शकतो - मोकळेमोकळे वाटते. स्वातंत्र्याचा तो आनंद तुमच्या लेखातून तुम्ही व्यक्त करू शकलात. अभिनंदन.

प्रमोद देव 12/04/2008 - 19:52
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

अभिज्ञ 12/04/2008 - 22:11
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. अगदि हेच म्हणतो... आपल्या पुढिल लेखनास मनापासून शुभेच्छा. असेच उत्तमउत्तम लेख येउ द्यात. अबब

In reply to by अभिज्ञ

इनोबा म्हणे 13/04/2008 - 01:25
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. अगदी मनापासून हेच म्हणावेसे वाटते आहे... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by अभिज्ञ

गोट्या 15/04/2008 - 21:24
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. नेहमी प्रमाणेच वाचनीय व विचार करण्यायोग्य प्रतिसाद. अशाच काही लेखनाची वाट पाहत आहे मी अजून. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

आजानुकर्ण 12/04/2008 - 22:45
माझ्या मते महापुरुषांचा पराभव हा लेख जनार्दन वाघमारे यांचा आहे. नेमाडेशेठ असे वाक्य लिहिणारच नाहीत ;) लेख आवडला. अजून असे लेख येऊ द्यावेत (वाचक) आजानुकर्ण सांगवीकर

रामदास 12/04/2008 - 22:58
नीलकान्त. आपले मनापासून अभिनंदन्.अनेक कारणांसाठी . आपण केलेली विषयाची मांडणी.चौफेर विचार करून लेखाचा विषय हेतू पुढे नेणे. टीकेला आक्रस्ताळेपणा न करता चोख शब्दात उत्तर देणे .आपल्या वैचारीक भूमिकेशी ठामपणे प्रामाणिक राहणे.आपली तयारी खूपचं चान्गली झाली आहे.विनोबा अशा माणसाला स्थविर म्हणतात. स्थविर म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे असा.(विष्णू चे हे एक नाव आहे) वैचारीक मंथन असले तरी ललित लेखा चा पाठ्य पुस्तकातला धडा म्हणून प्रत्येकाने हा लेख वाचावा.जी मंडळी वकील होणार असतील त्यांनी जरूरवाचावा. सरोजीनी वैद्य ज्या प्रकारे शिकवत त्याची आठवण झाली. सामाजीक जाणीव जोपासणार्‍या विद्वानांची संख्या आता कमी आहे.पण आपण हे जोखमीचे काम अंगावर जाणीवपूर्वक घेतले आहे असे वाटते.पुन्हा एकदा अभिनंदन.

चित्रा 12/04/2008 - 23:40
विचारांना चालना देणार्‍या लेखाबद्दल मनापासून अभिनंदन. दुर्गा भागवत आणि य. दि. फडके यांचेही लेख विचारप्रवर्तक. वाचन किंवा मनन दिशा ठरवत नाहीये तर दिशा ठरवून वाचन आणि मनन होतं. नेमकं चुकतं येथेच... सारा घोळ येथेच. हे अगदी बरोबर. बहुतांशी लोकांचे असेच होते. वाचनात चौफेर दृष्टी नसली तर अंगवळणी पडलेले एकच विचार वेगवेगळ्या लेखकांच्या नावाने परत परत वाचले जातात. आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. हा तर मोठा विषय काढलात. अत्यंत विस्तृत आवाका असलेला विषय आहे - आपल्या सामाजिक आणि वैयक्तिक प्रत्येक वलयात आपण या झुली पाहत असतो. दोन वाक्यांत तुम्ही या विषयाचे चांगल्यापैकी संकलन केले आहे, पण तरी ते पूर्ण वाटत नाही - पण हा मुद्दा कळीचा आहे आणि तो अशा प्रकारे मांडलेला पाहून तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. आत्ता तूर्तास एवढेच. अवांतर - विषयांतर होईल, पण मॅट्रिक्स हा चित्रपट पहिल्याने पाहिला तेव्हा त्याचे स्वरूप वेगळे असले तरी मुख्यत्वे आपल्या मनावर असलेल्या विचारांच्या झुलीवरूनच होता. त्याची आठवण झाली. http://www.imdb.com/title/tt0133093/

गुंडोपंत 13/04/2008 - 06:25
अप्रतिम लेख! नीलकांतचे लिखाण असेही अतिशय अभ्यासपूर्ण असतेच. पूर्वीही त्याने अमेरिका विषयक एका चर्चेत अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिसाद सर्किट यांना दिला होता ते स्मरते. हे लिखाण, वृत्तपत्रात छापुन यावे असे लिखाण आहे. अतिशय मुद्देसूद! यातला ह्या लोकांना हा विरोध त्यांनी मांडलेले विचार चुकीचे आहेत यामुळे कमी आणि त्या विचारांमुळे आपल्या हितसंबंधांना बाधा येते म्हणून जास्त असतो. हा सगळीअगदीलागू होणारा मुद्दा आहे. किआहे.सुधारणेला खीळ घालणारी तीच मुख्य कळ आहे. भालचंद्र नेमाडे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात. अगदी खरे! सर्वस्वी मान्य आहे पण ही सामाजिक जागृती करण्याला अनेक पैलूआहेत, अनेक पदर आहेत. या झूल पांघरायला नकार देणारे न्या. रानडे,महात्मा फुले, गो.ग. आगरकर, ताराबाई शिंदे, छ. शाहू महाराज, वि.रा. शिंदे, पंडिता रमाबाई, विष्णूबुवा ब्रह्मचारी, बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर, धो.के. कर्वे, र.धो.कर्वे, भाऊराव पाटील असे अनेक नामवंत आहेत. अर्थातच ही यादी पूर्ण नाहीच पण वाचतांना इरावती कर्वे यांचेही यात नाव हवे असे वाटले. त्यांनी अतिशय विचारप्रवर्तक लेखन केले आहे. तसेच वि.रा. शिंदे व विष्णूबुवा ब्रह्मचारी यांच्या कार्या विषयी सर्वसाधारणपणे काहीच माहिती नाही असेही लक्षात आले. यावर काही लिहु शकाल का? आपला गुंडोपंत

विसोबा खेचर 13/04/2008 - 10:45
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. हे अगदी पटण्याजोगे! वैयक्तिकरित्या सांगायचं तर मला भोवतालच्या जगातअश्या निरनिराळ्या विचारांच्या मंडळींचे अस्तित्व अनुभवायचा छंदच आहे. कुठल्याही पुस्तकापेक्षा खूप काही शिकायला मिळतं या दुनियादारीतून! आणि याचा फायदा कुणा दुसर्‍या-तिसर्‍याला होत नसून मलाच होतो आणि खरं तर माझंच जीवन अधिकाधिक समृद्ध होण्यास मदत होते! आणि झुलींचं म्हणाल तर अश्या झुली पांघरून बसलेली मंडळीदेखील अगदी ठायी ठायी दिसतात! अहो एवढंच कशाला, या आभासी आंतरजालीय विश्वातही कोणत्या ना कोणत्या तरी झुली पांघरून बसलेली माणसं पाहायला मिळतात! ही मंडळी ठराविक झुली पांघरून डबक्यातच बसणं पसंत करतात आणि मग कालांतराने या डबक्यालाच समुद्र समजू लागतात! मग भले झुलींचं हे जोखड कसलंही असो, अध्यात्माचं असो, वैचारिकतेचं असो, कोत्या मनोवृत्तीचं असो, व्याकरण-शुद्धलेखनाचं असो, साहित्याचं असो, वा संतसाहित्याचं असो! ;) मनमोकळेपणाने, निर्मळतेने स्वत:लाच एक्सप्रेस करणं हीच खरी तर खूप कठीण गोष्ट आहे. आणि ती जमली नाही की मग कसल्या ना कसल्या तरी झुली पांघरून बसणं भाग पडतं किंवा ओघानेच येतं आणि मग अश्याच समविचारी झुली पांघरून बसलेली मंडळी शोधून काढून स्वतःचंच एक झुलीदार कंपूवजा डबकं बनवणंही ओघानेच आलं! ;) जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित. क्या बात है...! वा नीलकांता, दोन्ही भाग आवडले. अतिशय सुरेख लेखन. जियो..! तात्या.

विसोबा खेचर 13/04/2008 - 11:04
अरे नीलकांता, झुलींच्या बाबतीतलं अगदी आत्ताआत्ताचं उदाहरण आठवलं बघ! नुकतंच कुणीतरी तुला न आणि ण वरून दोन खडे बोल सुनावून ठेचायचा प्रयत्न केला आहे! ;) त्या व्यक्तिला तुझ्या इतक्या चांगल्या लेखावर बरावाईट प्रतिसाद द्यायला वेळ मिळाला नाही! कदाचित तुझ्यासारखा गावाकडचा मनुष्य इतकं चांगलं लिहू शकतो हेच मुळी खोट्या प्रतिष्ठेच्या सुशिक्षित, पांढरपेशी शहरी मनोवृतीला पचायला जड गेलं असावं! ;) आणि मग त्या व्यक्तिजवळ उरलं काय, तर व्याकरण-शुद्धलेखनाची एक सुसंस्कृत, सुशिक्षित झूल! त्यामुळे, "आता हीच झूल पांघरून कुठे 'न' लिहायचा आणि कुठे 'ण' लिहायचा ही 'व्याकरणी चो*गिरी' करून चांगला ठेचा आता या नीलकांताला आणि करा चांगला नामोहरम!" हाच एकमेव विचार उरला! ;) असो, तात्या.

नीलकांत 13/04/2008 - 11:21
हे नाव राहिलं खरं.महाराष्ट्राच्या व एकूनच भारतीय सामजिक संशोधनात यांचा मोठा वाटा आहे. वि. रा. शिंदे - हे डिप्रेस्ड क्लास मिशनचे संस्थापक. पुण्यात विद्यार्थी दशेत त्यांनी समाजकार्य सुरू केले. ऍमस्टरडॅम येथे भारतातील उदारमतवादी धर्म या विषयावर प्रबंध वाचला. अखील भारतीय कॉग्रेसच्या कलकत्याच्या अधीवेशनात (१९१७) , ज्या अधीवेशनाच्या अध्यक्षा ऍनी बेझन्ट होत्या, त्या अधीवेशनात त्यांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदा अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास करून घेतला. भारतात दलितांसाठी संघटनात्मक काम करण्यासाठी सुरूवात केली. ह्या मानसाची भारतीय समाजाने अवहेलनाच केली. खुप मोठं काम मात्र त्यांचा नामोल्लेख कमी आढळतो. कधी तरी यांच्याही कार्याचं संकलन तुमच्या समोर ठेवेन. विष्णुबुवा ब्रम्हचारी यांनी विधवा पुनरुथ्थानाचे कार्य केले. पुढे यांनी स्वतः एका विधवेशी लग्न केले होते. विधवेशी लग्न श्री धो.के. कर्वे यांनी सुध्दा केले होते. ह्या मोठ्या लोकांनी असा पायंडा पाडल्यामुळे ही चळवळ सहज रूजली. विधवा प्रश्नावर मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी म्हणून जिचं नाव घेतल्या जातं अशी 'यमुना पर्यटन' ही कादंबरी लिहील्या गेली. लेखक होते बाबा पद्मनजी. हे सुध्दा त्याकाळातील समाजसुधारक मात्र यांनी धर्मपरिवर्तन केल्याने पुढे त्यांना समाजकार्यात खुप मर्यादा आल्या. ------------------------------------------- कौतुका बद्दल तुम्हा सर्वांचे आभार. नीलकांत

चंबा मुतनाळ 14/04/2008 - 20:11
दोन्ही लेख एकदम वाचले. अप्रतीम झाले आहेत. नीलकांत, तुमचे लिखाण मनास भावले. "आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत." हे एकदम पटले! झूल कधिच झुगारून दिलेला --भ्रमरि

चतुरंग 14/04/2008 - 21:47
विचारांची नेमकी आणि अभ्यासू मांडणी कौतुकास्पद आहे. असेच समृध्द वैचारिक लेखन अधिकाधिक वाचायला मिळो ही इच्छा. (अवांतर - हा लेख वाचून अनेक झुली पांघरून अगदी नंदीबैल झालो आहे की काय असे वाटायला लागले;) चतुरंग

विसुनाना 15/04/2008 - 12:34
वा रे वा! काय सुंदर लेख लिहिलास. तुझं लेखन माझ्यासारख्या सर्वसामान्याला कळायला सोपं आहे. विचारपूर्वक लिहिलेलं आणि विचार देणारं आहे पण कंटाळवाणं, गांभिर्याचा आव आणणारं, जडशीळ नाही. (थोडक्यात बद्धकोष्ठ नाही.) हा लेख थोडा संपादित करून (जसे प्रतिसादात उल्लेख झालेल्या व्यक्तींचा उल्लेख करून) शहरी आणि ग्रामिण वर्तमानपत्रांकडे पाठव. असे लेख आणखी लिहिले जावेत, वाचले जावेत म्हणजेच या झुली कधीतरी थोड्याफार किलकिल्या होतील अशी आशा आहे. आता आणखी असेच लिहित जा. त्याची आवश्यकता आहे. तू मोठा आहेसच. पुढे नावही कमावशील हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. लिहिता रहा.

विदेश 15/04/2008 - 13:05
पुन्हा शाळेतील धडा आडवतोय, त्याचं नाव होतं 'महापुरुषांचा पराभव' ह्यात भालचंद्र नेमाडे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात. या विचारमंथनातूनच राष्ट्रविकासात का अडथळे येतात हे उमजते.

नंदन 15/04/2008 - 14:30
विचार आणि मांडणी. दोन्ही लेख अतिशय आवडले. एखाद्या वादातून तुझे असले विचारप्रवृत्त करणारे लेख वाचायला मिळणार असतील, तर असे वाद वरचेवर व्हावेत :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

विचार आणि मांडणी. दोन्ही लेख अतिशय आवडले. एखाद्या वादातून तुझे असले विचारप्रवृत्त करणारे लेख वाचायला मिळणार असतील, तर असे वाद वरचेवर व्हावेत :) ... फार सुंदर प्रतिसाद...

शितल 15/04/2008 - 18:30
लेख वाचुन झाल्यावर लेख मनातच साठुन राहतो, लेख प्रत्येकाच्या मनातील एक कप्पा नक्की उघड्तो.

त्यांनी घेतलेले विचार आपल्यासाठी नवे होते म्हणून कदाचित आपल्याला त्याचं आकलन झालं नसावं म्हणून आपल्या समाजाने त्याला विरोध केला, असा बचाव आपण थोडा मान्यही करू, मात्र आज स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे झाली तरीही आपण तटस्थ होऊन आपल्या पूर्वजांकडे पाहण्याची हिंमत करू शकत नाहि याला काय म्हणावं? मानसिक अपरिपक्वता, की अपंगत्व?
खर आहे ! कधी धड अपरिपक्वता नाही , धड अंपगत्व नाही अशावेळी गतानुगतिकता मात्र असते.कधि स्वार्था साठी तर कधी अगतिकतेतून. प्रकाश घाटपांडे
3

आतले आणि बाहेरचे... (१)

नीलकांत ·

इनोबा म्हणे 12/04/2008 - 16:47
अप्रतिम शब्दरचना. संयमीत व अभ्यासपुर्वक प्रतिसादात्मक लेख. या निमित्ताने पुन्हा एकदा महात्म्याला जवळून पाहता आले. नीलकांत यांचे आभार. महात्मा फूलेंना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

विकास 12/04/2008 - 17:06
लेख आवडलाच पण शिर्षक अजून आवडले, अर्थात योग्य वाटले. आपण सांगीतलेला सासरा-जावई प्रसंग आधीपण ऐकला-वाचल्याचे आठवले. अजून एक आठवण जी आत्ता नीट आठवत नाही आहे पण ते सिव्हील इंजिनियरींगची कंत्राटाची कामे घेत. मुंबईच्या "व्हि.टी." स्टेशनचे बांधकाम तेंव्हा चालू झाले होते त्यात पण त्यांचा संबंध होता. त्यांचे खालील वाक्य प्रसिद्ध होते.
विद्येविना मती गेली , मतीविना निती गेली , नितीविना वित्त गेले , वित्ताविना क्षुद्र खचले ,एवढे अनर्थ एका अविद्येने केले.
अवांतरः आचार्य अत्र्यांनी "महात्मा फुले" नावाचा चित्रपट काढला होता. ५०च्या दशकातला असावा पण त्यावेळेसही तो जनजागृती करायला काढल्यासारखाच असावा (मी तेंव्हा नव्हतो:) पण) ,नंतर अनेक वर्षांनी पाहीला. त्यांच्यावरील नाटक मात्र पाहीलेले नाही.

धनंजय 12/04/2008 - 18:38
हा आतला आणि बाहेरचा फरक लक्षात आला की मग खुपसे प्रश्न उलगडायला लागतील. नेहमी पडणारे प्रश्न म्हणजे की, 'लोक असं का वागतात ? त्यांना ही एवढी साधी गोष्ट का समजत नाही?' असे प्रश्न पडणं बंद होईल, किमान त्याचा त्रागा होणार नाही. कळीचे वाक्य. कित्येक हिरिरीने केलेले वाद वांझ असतात. कारण तो वाद करण्यापूर्वी प्रतिवादी हा "आतल्या-बाहेरच्या"चा विचार शांतपणे करत नाहीत. हा विचार केल्यानंतर सर्वत्र प्रेम-प्रेम माजणार नाही, हितसंबंध राहातीलच. पण वादांमध्ये "तू असा कसा अनैसर्गिक" हा आरोप-प्रत्यारोप राहाणार नाही. "आतल्या"ला फार गर्दीने काय जीवघेणा त्रास होत आहे, "बाहेरच्या"ला प्रवास किती निकडीचा आहे, अशा प्रकारचा वाद होईल. "तू अनैसर्गिक" हा वाद निष्फळच असणार. "तुझे माझे काय हितसंबंध" हादेखील वाद कधी निष्फळ असेल. पण त्यात प्रगतीची, समेटीची शक्यता तरी असते. फुल्यांचा विस्तृत परिचय दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. तो या संदर्भात खुलवून दाखवला यात तुमचे खास कौशल्य.

In reply to by धनंजय

आनंदयात्री 12/04/2008 - 19:17
उत्तम लेख नीलकांत. ..."तू अनैसर्गिक" हा वाद निष्फळच असणार. "तुझे माझे काय हितसंबंध" हादेखील वाद कधी निष्फळ असेल. पण त्यात प्रगतीची, समेटीची शक्यता तरी असते. पटले. अवांतरः रेल्वेतल्या लोकांच्या मानसिकतेला लाइफ बोट सिंड्रोम म्हणतात काय ?

सहज 12/04/2008 - 18:42
नीलकांत सुंदर लेख आहे. महात्मा फुले यांचे कार्य अलौकीक होतेच. आचार्य अत्रे यांचा महात्मा चित्रपट माझा एक अतिशय आवडता चित्रपट आहे. कितीही महान व्यक्ती होउन गेल्या तरी त्यांच्यावर टिका करणारे असतातच. शेवटि मनुष्य हा "प्राणी" आहे रे!! असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो.

In reply to by सहज

विकास 12/04/2008 - 19:05
असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो. १००% सहमत

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाई 12/04/2008 - 23:59
आतले बाहेरचे ही सुरूवात थोडी विसंगत वाटली. फुल्यांप्रमाणेच त्याचकाळी पाश्चात्य विचारांच्या प्रभावामुळे अनेकजण मोठे कार्य करते झाले. आपल्याला वाटणार्‍या फुल्याविषयीच्या आदराबद्दल कोणताही आकस नाही. त्याचप्रमाणे, आपणही दुसरी बाजू विचारात ठेवावी ही विनंती. आधिक चर्चा मी मूळ धाग्यावर केलेली आहेच.

नीलकांत 13/04/2008 - 10:36
भडकमकर, विकास, धनंजय, सहज, विनोबा, बिरूटे सर आणि भाई प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. व्हीटी स्टेशन बद्दल असं सांगता येईल की, स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी फुले त्या काळात बांधकाम व्यवसाय करत होते. भाईंसाठी... ज्या दुसर्‍या बाजूबद्दल तुम्ही सांगताय ती मी जवळून पाहून आहे. दोन्ही बाजूनी सगळंच आलबेल आहे असं नाहिये. पण तुम्हाला वाटनारा त्रागा आणि या लोकांच्या तात्कालीक लेखन किंवा भाषणांबद्दल असणारा तिरस्कार अनैसर्गीक आहे असं नाही मात्र त्याला थोडा त्याकाळचा सामाजीक़, राष्ट्रीय आणि धार्मीक संदर्भ दिल्यास हे लक्षात येईल की फुले किंवा इतर कुणीही जे केलं ती एका प्रदीर्घ क्रियेवरची प्रतिक्रिया होती. लोक आज या महापुरूषांच्या नावावर काय धिंगाणा घालताहेत त्याबद्दल कुणी काही बोलावं व कुणी काही लिहावं असं बाकी नाही. माझी भूमिका एवढीच की या महापुरूषांना त्यांच्या कार्याने ओळखल्या जावं, मुळात त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचावं. नीलकांत

ज्या दुसर्‍या बाजूबद्दल तुम्ही सांगताय ती मी जवळून पाहून आहे. दोन्ही बाजूनी सगळंच आलबेल आहे असं नाहिये. पण तुम्हाला वाटनारा त्रागा आणि या लोकांच्या तात्कालीक लेखन किंवा भाषणांबद्दल असणारा तिरस्कार अनैसर्गीक आहे असं नाही मात्र त्याला थोडा त्याकाळचा सामाजीक़, राष्ट्रीय आणि धार्मीक संदर्भ दिल्यास हे लक्षात येईल की फुले किंवा इतर कुणीही जे केलं ती एका प्रदीर्घ क्रियेवरची प्रतिक्रिया होती.
वर्तमानातून भूतकाळाकडे पहाताना आपले संदर्भ, दृष्टी ही बदलत असते. तटस्थपणे बघणे शक्य नसते. प्रत्येक काळात हे घडत असते. शेवटी तारतम्य हा भाग आहेच ना! नीलकांत नी चांगला विषय मांडला म्हणुन त्याला धन्यवाद प्रकाश घाटपांडे

चतुरंग 14/04/2008 - 21:31
अतिशय संयत आणि सहज, सोपे लेखन. अगदी आतून आलेले जाणवते आणि त्यामुळेच भावते. 'विधवा केशवपन' आणि 'बालहत्याबंदी' सारखी कामे ही जातीच्या पलीकडे विचार गेल्याशिवाय होऊच शकत नाहीत. ज्या तथाकथित उच्चभ्रू समाजात ह्या चालीरीती होत्या, नव्हे त्या पोसल्या गेल्या आणि त्याचा यथास्थित गैरफायदाही वर्षानुवर्षे घेतला गेला, त्या रुढी तोडतांना फुल्यांवर झालेले आरोप हे अटळ आहेत. ते हे आरोप पचवून पुढे गेले त्यामुळेच ते महात्मा झाले. योग्य आणि संयत चर्चेतून विधायक लिखाण कसे जन्म घेते त्याचा उत्तम वस्तुपाठ. नीलकांत, भाई आणि चर्चेला योग्य दिशा देणार्‍यांचे अभिनंदन! चतुरंग

भिंगरी 06/04/2015 - 12:56
शाळेत असताना (९ वीत )असा धडा होता आतले आणी बाहेरचे. त्या वेळेस या विषयाची व्याप्ती एव्हडी जाणवली नव्हती. छान लेख.

इनोबा म्हणे 12/04/2008 - 16:47
अप्रतिम शब्दरचना. संयमीत व अभ्यासपुर्वक प्रतिसादात्मक लेख. या निमित्ताने पुन्हा एकदा महात्म्याला जवळून पाहता आले. नीलकांत यांचे आभार. महात्मा फूलेंना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

विकास 12/04/2008 - 17:06
लेख आवडलाच पण शिर्षक अजून आवडले, अर्थात योग्य वाटले. आपण सांगीतलेला सासरा-जावई प्रसंग आधीपण ऐकला-वाचल्याचे आठवले. अजून एक आठवण जी आत्ता नीट आठवत नाही आहे पण ते सिव्हील इंजिनियरींगची कंत्राटाची कामे घेत. मुंबईच्या "व्हि.टी." स्टेशनचे बांधकाम तेंव्हा चालू झाले होते त्यात पण त्यांचा संबंध होता. त्यांचे खालील वाक्य प्रसिद्ध होते.
विद्येविना मती गेली , मतीविना निती गेली , नितीविना वित्त गेले , वित्ताविना क्षुद्र खचले ,एवढे अनर्थ एका अविद्येने केले.
अवांतरः आचार्य अत्र्यांनी "महात्मा फुले" नावाचा चित्रपट काढला होता. ५०च्या दशकातला असावा पण त्यावेळेसही तो जनजागृती करायला काढल्यासारखाच असावा (मी तेंव्हा नव्हतो:) पण) ,नंतर अनेक वर्षांनी पाहीला. त्यांच्यावरील नाटक मात्र पाहीलेले नाही.

धनंजय 12/04/2008 - 18:38
हा आतला आणि बाहेरचा फरक लक्षात आला की मग खुपसे प्रश्न उलगडायला लागतील. नेहमी पडणारे प्रश्न म्हणजे की, 'लोक असं का वागतात ? त्यांना ही एवढी साधी गोष्ट का समजत नाही?' असे प्रश्न पडणं बंद होईल, किमान त्याचा त्रागा होणार नाही. कळीचे वाक्य. कित्येक हिरिरीने केलेले वाद वांझ असतात. कारण तो वाद करण्यापूर्वी प्रतिवादी हा "आतल्या-बाहेरच्या"चा विचार शांतपणे करत नाहीत. हा विचार केल्यानंतर सर्वत्र प्रेम-प्रेम माजणार नाही, हितसंबंध राहातीलच. पण वादांमध्ये "तू असा कसा अनैसर्गिक" हा आरोप-प्रत्यारोप राहाणार नाही. "आतल्या"ला फार गर्दीने काय जीवघेणा त्रास होत आहे, "बाहेरच्या"ला प्रवास किती निकडीचा आहे, अशा प्रकारचा वाद होईल. "तू अनैसर्गिक" हा वाद निष्फळच असणार. "तुझे माझे काय हितसंबंध" हादेखील वाद कधी निष्फळ असेल. पण त्यात प्रगतीची, समेटीची शक्यता तरी असते. फुल्यांचा विस्तृत परिचय दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. तो या संदर्भात खुलवून दाखवला यात तुमचे खास कौशल्य.

In reply to by धनंजय

आनंदयात्री 12/04/2008 - 19:17
उत्तम लेख नीलकांत. ..."तू अनैसर्गिक" हा वाद निष्फळच असणार. "तुझे माझे काय हितसंबंध" हादेखील वाद कधी निष्फळ असेल. पण त्यात प्रगतीची, समेटीची शक्यता तरी असते. पटले. अवांतरः रेल्वेतल्या लोकांच्या मानसिकतेला लाइफ बोट सिंड्रोम म्हणतात काय ?

सहज 12/04/2008 - 18:42
नीलकांत सुंदर लेख आहे. महात्मा फुले यांचे कार्य अलौकीक होतेच. आचार्य अत्रे यांचा महात्मा चित्रपट माझा एक अतिशय आवडता चित्रपट आहे. कितीही महान व्यक्ती होउन गेल्या तरी त्यांच्यावर टिका करणारे असतातच. शेवटि मनुष्य हा "प्राणी" आहे रे!! असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो.

In reply to by सहज

विकास 12/04/2008 - 19:05
असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो. १००% सहमत

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाई 12/04/2008 - 23:59
आतले बाहेरचे ही सुरूवात थोडी विसंगत वाटली. फुल्यांप्रमाणेच त्याचकाळी पाश्चात्य विचारांच्या प्रभावामुळे अनेकजण मोठे कार्य करते झाले. आपल्याला वाटणार्‍या फुल्याविषयीच्या आदराबद्दल कोणताही आकस नाही. त्याचप्रमाणे, आपणही दुसरी बाजू विचारात ठेवावी ही विनंती. आधिक चर्चा मी मूळ धाग्यावर केलेली आहेच.

नीलकांत 13/04/2008 - 10:36
भडकमकर, विकास, धनंजय, सहज, विनोबा, बिरूटे सर आणि भाई प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. व्हीटी स्टेशन बद्दल असं सांगता येईल की, स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी फुले त्या काळात बांधकाम व्यवसाय करत होते. भाईंसाठी... ज्या दुसर्‍या बाजूबद्दल तुम्ही सांगताय ती मी जवळून पाहून आहे. दोन्ही बाजूनी सगळंच आलबेल आहे असं नाहिये. पण तुम्हाला वाटनारा त्रागा आणि या लोकांच्या तात्कालीक लेखन किंवा भाषणांबद्दल असणारा तिरस्कार अनैसर्गीक आहे असं नाही मात्र त्याला थोडा त्याकाळचा सामाजीक़, राष्ट्रीय आणि धार्मीक संदर्भ दिल्यास हे लक्षात येईल की फुले किंवा इतर कुणीही जे केलं ती एका प्रदीर्घ क्रियेवरची प्रतिक्रिया होती. लोक आज या महापुरूषांच्या नावावर काय धिंगाणा घालताहेत त्याबद्दल कुणी काही बोलावं व कुणी काही लिहावं असं बाकी नाही. माझी भूमिका एवढीच की या महापुरूषांना त्यांच्या कार्याने ओळखल्या जावं, मुळात त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचावं. नीलकांत

ज्या दुसर्‍या बाजूबद्दल तुम्ही सांगताय ती मी जवळून पाहून आहे. दोन्ही बाजूनी सगळंच आलबेल आहे असं नाहिये. पण तुम्हाला वाटनारा त्रागा आणि या लोकांच्या तात्कालीक लेखन किंवा भाषणांबद्दल असणारा तिरस्कार अनैसर्गीक आहे असं नाही मात्र त्याला थोडा त्याकाळचा सामाजीक़, राष्ट्रीय आणि धार्मीक संदर्भ दिल्यास हे लक्षात येईल की फुले किंवा इतर कुणीही जे केलं ती एका प्रदीर्घ क्रियेवरची प्रतिक्रिया होती.
वर्तमानातून भूतकाळाकडे पहाताना आपले संदर्भ, दृष्टी ही बदलत असते. तटस्थपणे बघणे शक्य नसते. प्रत्येक काळात हे घडत असते. शेवटी तारतम्य हा भाग आहेच ना! नीलकांत नी चांगला विषय मांडला म्हणुन त्याला धन्यवाद प्रकाश घाटपांडे

चतुरंग 14/04/2008 - 21:31
अतिशय संयत आणि सहज, सोपे लेखन. अगदी आतून आलेले जाणवते आणि त्यामुळेच भावते. 'विधवा केशवपन' आणि 'बालहत्याबंदी' सारखी कामे ही जातीच्या पलीकडे विचार गेल्याशिवाय होऊच शकत नाहीत. ज्या तथाकथित उच्चभ्रू समाजात ह्या चालीरीती होत्या, नव्हे त्या पोसल्या गेल्या आणि त्याचा यथास्थित गैरफायदाही वर्षानुवर्षे घेतला गेला, त्या रुढी तोडतांना फुल्यांवर झालेले आरोप हे अटळ आहेत. ते हे आरोप पचवून पुढे गेले त्यामुळेच ते महात्मा झाले. योग्य आणि संयत चर्चेतून विधायक लिखाण कसे जन्म घेते त्याचा उत्तम वस्तुपाठ. नीलकांत, भाई आणि चर्चेला योग्य दिशा देणार्‍यांचे अभिनंदन! चतुरंग

भिंगरी 06/04/2015 - 12:56
शाळेत असताना (९ वीत )असा धडा होता आतले आणी बाहेरचे. त्या वेळेस या विषयाची व्याप्ती एव्हडी जाणवली नव्हती. छान लेख.
3

थोडे असे, थोडे तसे

देवदत्त ·

विसोबा खेचर 12/04/2008 - 01:18
हम्म! लेखन बर्‍यापैकी वैचारिक झाले आहे! छान आहे! :) गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला. मुख्य म्हणजे पुढे ढकललेले इपत्र येथे जसेच्या तसे प्रकाशित न करता त्यातील मुद्द्यावर देवदत्तरावांनी स्वत:ही काही लेखन केले आहे, हे मी महत्वाचे मानतो! 'सभासदांनी येथे स्वत:चे लेखन करावे' या मिपाच्या धोरणाला हे साजेसेच आहे. अभिनंदन! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त 28/04/2008 - 23:08
धन्यवाद तात्या.. आणखी बरेच विचार असतात असे पण इथे येऊन लिहेपर्यंत काही विसरून जातो, काही वेळा दोन्ही मुद्दे आठवत नाही. आता एक आठवला तो लिहितो... वीजमंडळ भारनियमन करते काही कारणाकरीता. पण त्यातूनही असे वाटते. भारनियमन चांगले आहेच. ठराविक वेळ वीज न वापरल्याने वीजेची बचत होतेच. पण मग लगेच वाटते, अरे पण फायदा काय? जी वीजेची उपकरणे मी ती दिवसभरात त्याच प्रकारे वापरणार. त्यात जवळपास तेवढाच वीज वापर आहेच. पण मग तेच क्रिकेट, इतर समारंभात आपण वीज खर्ची घालतोच.

विसोबा खेचर 12/04/2008 - 01:18
हम्म! लेखन बर्‍यापैकी वैचारिक झाले आहे! छान आहे! :) गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला. मुख्य म्हणजे पुढे ढकललेले इपत्र येथे जसेच्या तसे प्रकाशित न करता त्यातील मुद्द्यावर देवदत्तरावांनी स्वत:ही काही लेखन केले आहे, हे मी महत्वाचे मानतो! 'सभासदांनी येथे स्वत:चे लेखन करावे' या मिपाच्या धोरणाला हे साजेसेच आहे. अभिनंदन! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त 28/04/2008 - 23:08
धन्यवाद तात्या.. आणखी बरेच विचार असतात असे पण इथे येऊन लिहेपर्यंत काही विसरून जातो, काही वेळा दोन्ही मुद्दे आठवत नाही. आता एक आठवला तो लिहितो... वीजमंडळ भारनियमन करते काही कारणाकरीता. पण त्यातूनही असे वाटते. भारनियमन चांगले आहेच. ठराविक वेळ वीज न वापरल्याने वीजेची बचत होतेच. पण मग लगेच वाटते, अरे पण फायदा काय? जी वीजेची उपकरणे मी ती दिवसभरात त्याच प्रकारे वापरणार. त्यात जवळपास तेवढाच वीज वापर आहेच. पण मग तेच क्रिकेट, इतर समारंभात आपण वीज खर्ची घालतोच.
गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला. एक माणूस आपल्या मुलीसोबत बाजारात गेलेला असतो. गर्दीत तो मुलीला म्हणतो, "तू माझे बोट किंवा हात पकडून ठेव, म्हणजे गर्दीत तू हरवणार नाहीस. माझ्या सोबतच राहशील." ह्यावर मुलगी म्हणते, "नको बाबा, त्यापेक्षा तुम्ही माझा हात पकडून ठेवा. गर्दीत माझा हात सुटू शकतो. तुम्ही पकडलेला हात नाही सुटणार." खरोखरच चांगला विचार. तेव्हाच हात धरण्यावरून मला हा विनोद आठवला, एकदा एक माणूस रस्त्यावरून चालता चालता एका खड्ड्यात पडतो.(कसा? माहीत नाही बुवा ;)) त्याला वर काढण्याकरीता लोक म्हणतात,"तुमचा हात द्या.