मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

!! चांडाळ चौकडी !!

अनिल हटेला ·

सगळ्या व्यक्तिरेखा छान सजवाल्या आहेत तुम्ही.. ,"सर्,आपण पॄथ्वीच्या आत रहातो की बाहेर?" हे भारीच.... :-) शेवट पण गोडच असावा असं वाटत होतं...पण.... असो..आता तुम्ही "चौघे " असे म्हणता येणार नाही पण तुम्ही "तिघे" तरी पुन्हा पूर्वीप्रमाणे मनाने एकत्र यावे अशी सदिच्छा व्यक्त करते... शेवटी "मैत्री" या शब्दातच जादु आहे नाही.. -(जीवलग मैत्रिणींच्या आठवणीने व्याकूळ झालेली)स्मिता श्रीपाद

सोनम 23/12/2008 - 13:58
हे लोक अमराठी असण्याचा फायदा की मी नेमका काय करतोये ते कुणालाच कळत नाय ..शिवाय सगळ देवनागरी ह्या लोकाना वाचता येतं पण समजत काहीच नाय....) बरोबर नाहीतरी आमचे घरचे ही म्हणतात दिवसभर काय असते मि.पा.वर? छान आहे लेख.

निखिलराव 23/12/2008 - 14:31
कधी कधी वटतं काळ पून्हा मागे सरकावा.. रम्य ते दिवस परत एकदा जगावेत... प्रत्येक क्षण ,प्रत्येक घटना पून्हा एकदा जगावी. गेले ते दिवस..... राहिल्या त्या आठवणी.......

अवलिया 23/12/2008 - 15:03
पण सत्य फार भयाण असते ,आणी ते स्वीकारावे लागते.... आणि ते स्विकारण्यातच शहाणपण असते. लेख आवडला की नाही हे सांगणे कठीण आहे पण खुपशा स्मृतिंना उजाळा मिळाला, आठवणी परत दाटुन आल्या आठवणींचे एक असते सुखद असो वा दुःखद... डोळे दोन्ही वेळेस भरुन येतात -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

प्राजु 24/12/2008 - 06:06
नाना, आठवणींचे एक असते सुखद असो वा दुःखद... डोळे दोन्ही वेळेस भरुन येतात काय जबरदस्त वाक्य आहे.. अक्षरशः जोरदार टाळ्या द्याव्या असं वाटलं.. अगदी खरं आहे. आपला लेख आवडला. शेवट असा असेल असं वाटलं नव्हतं. देव करो आणि तुम्ही , खरूभाई आणि डिके पुन्हा एकत्र येवो.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सहज 23/12/2008 - 15:34
ट्र्जीक एन्ड वाचुन वाईट वाटले.

मनीषा 23/12/2008 - 16:21
लेख आवडला ... आणी आपण आयुष्यात किमान १० वी फेल असावं असा थोर विचार करुन ह्या प्राण्याने सुद्धा अनुमोदन दिलेलं . ...मस्त >>"आता तुम्ही "चौघे " असे म्हणता येणार नाही पण तुम्ही "तिघे" तरी पुन्हा पूर्वीप्रमाणे मनाने एकत्र यावे अशी सदिच्छा व्यक्त करते..." असच म्हणते ..

झकासराव 23/12/2008 - 16:31
लेख आवडला रे. शेवट :( ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

दिपक 23/12/2008 - 16:33
खरचं आवडला :) शेवट चटका लावणारा. ’रॉक ऑन’ आणि ’दिल चाहता है" आठवला.

अनिल हटेला 23/12/2008 - 17:24
वरील सर्वाना धन्यवाद !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सोहम_व 23/12/2008 - 17:46
जुन्या आठवणिना उजाळा आला. खरोखरच शाळा-कॉलेजातल्या मित्रान्च्या आठवनिनि मन भरुन येत.कहा गये वो दिन??

सुचेल तसं 24/12/2008 - 08:29
छान!!! तुम्ही सर्व जण अगदी डोळ्यासमोर उभे राहिले. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

मदनबाण 24/12/2008 - 13:22
अन्या मस्त लिहले आहेस रे.... पण शेवट वाचुन वाईट वाटलं.. :( मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

मला पण माझे कॉलेजचे दिवस आठवले. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

झेल्या 24/12/2008 - 17:04
"हाक द्यायच्या आधी 'ओ' देणार."चल"म्हटलं की "कुठे "असा कधीच विचारणार नाय.चल म्हणजे चल." असे मित्र मिळायला खरंच नशीब लागतं.... चौकडीच्या कडा अशा निखळ्ल्याचे वाचून हृदयात कालवाकालव झाली.. :( -झेल्या

वाहीदा 24/12/2008 - 17:41
एकच Suggestion खरूभाइ आणी डीके मधील सामन्जस्य तु जुना मीत्र म्हणुन नककीच साधु शकतोस .... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ! गोड शेवट नक्की होउ शकतो ... ~ वाहीदा

अनिल हटेला 25/12/2008 - 09:20
धन्यवाद सर्वाना....... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ! एकदम मान्य.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

शितल 25/12/2008 - 12:09
छान लिहिले आहे. :) पण शेवट वाचुन वाईट वाटले. :(

shweta 25/12/2008 - 14:09
खरच छान लिहलं आहे. पुढे काय होइल ते हि लिहित रहा.

मॅन्ड्रेक 23/01/2009 - 14:41
मैत्रि हि अशिच असते. न बोलता खुप काहि सांगुन जाणरि . आमचा हि एक कम्पु आहे . साडे बाविस जणांचा. सवडिने लिहिन . एक क्षण भाळ्ण्याचा - बाकि सारे सांभाळ्ण्याचे.

सगळ्या व्यक्तिरेखा छान सजवाल्या आहेत तुम्ही.. ,"सर्,आपण पॄथ्वीच्या आत रहातो की बाहेर?" हे भारीच.... :-) शेवट पण गोडच असावा असं वाटत होतं...पण.... असो..आता तुम्ही "चौघे " असे म्हणता येणार नाही पण तुम्ही "तिघे" तरी पुन्हा पूर्वीप्रमाणे मनाने एकत्र यावे अशी सदिच्छा व्यक्त करते... शेवटी "मैत्री" या शब्दातच जादु आहे नाही.. -(जीवलग मैत्रिणींच्या आठवणीने व्याकूळ झालेली)स्मिता श्रीपाद

सोनम 23/12/2008 - 13:58
हे लोक अमराठी असण्याचा फायदा की मी नेमका काय करतोये ते कुणालाच कळत नाय ..शिवाय सगळ देवनागरी ह्या लोकाना वाचता येतं पण समजत काहीच नाय....) बरोबर नाहीतरी आमचे घरचे ही म्हणतात दिवसभर काय असते मि.पा.वर? छान आहे लेख.

निखिलराव 23/12/2008 - 14:31
कधी कधी वटतं काळ पून्हा मागे सरकावा.. रम्य ते दिवस परत एकदा जगावेत... प्रत्येक क्षण ,प्रत्येक घटना पून्हा एकदा जगावी. गेले ते दिवस..... राहिल्या त्या आठवणी.......

अवलिया 23/12/2008 - 15:03
पण सत्य फार भयाण असते ,आणी ते स्वीकारावे लागते.... आणि ते स्विकारण्यातच शहाणपण असते. लेख आवडला की नाही हे सांगणे कठीण आहे पण खुपशा स्मृतिंना उजाळा मिळाला, आठवणी परत दाटुन आल्या आठवणींचे एक असते सुखद असो वा दुःखद... डोळे दोन्ही वेळेस भरुन येतात -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

प्राजु 24/12/2008 - 06:06
नाना, आठवणींचे एक असते सुखद असो वा दुःखद... डोळे दोन्ही वेळेस भरुन येतात काय जबरदस्त वाक्य आहे.. अक्षरशः जोरदार टाळ्या द्याव्या असं वाटलं.. अगदी खरं आहे. आपला लेख आवडला. शेवट असा असेल असं वाटलं नव्हतं. देव करो आणि तुम्ही , खरूभाई आणि डिके पुन्हा एकत्र येवो.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सहज 23/12/2008 - 15:34
ट्र्जीक एन्ड वाचुन वाईट वाटले.

मनीषा 23/12/2008 - 16:21
लेख आवडला ... आणी आपण आयुष्यात किमान १० वी फेल असावं असा थोर विचार करुन ह्या प्राण्याने सुद्धा अनुमोदन दिलेलं . ...मस्त >>"आता तुम्ही "चौघे " असे म्हणता येणार नाही पण तुम्ही "तिघे" तरी पुन्हा पूर्वीप्रमाणे मनाने एकत्र यावे अशी सदिच्छा व्यक्त करते..." असच म्हणते ..

झकासराव 23/12/2008 - 16:31
लेख आवडला रे. शेवट :( ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

दिपक 23/12/2008 - 16:33
खरचं आवडला :) शेवट चटका लावणारा. ’रॉक ऑन’ आणि ’दिल चाहता है" आठवला.

अनिल हटेला 23/12/2008 - 17:24
वरील सर्वाना धन्यवाद !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सोहम_व 23/12/2008 - 17:46
जुन्या आठवणिना उजाळा आला. खरोखरच शाळा-कॉलेजातल्या मित्रान्च्या आठवनिनि मन भरुन येत.कहा गये वो दिन??

सुचेल तसं 24/12/2008 - 08:29
छान!!! तुम्ही सर्व जण अगदी डोळ्यासमोर उभे राहिले. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

मदनबाण 24/12/2008 - 13:22
अन्या मस्त लिहले आहेस रे.... पण शेवट वाचुन वाईट वाटलं.. :( मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

मला पण माझे कॉलेजचे दिवस आठवले. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

झेल्या 24/12/2008 - 17:04
"हाक द्यायच्या आधी 'ओ' देणार."चल"म्हटलं की "कुठे "असा कधीच विचारणार नाय.चल म्हणजे चल." असे मित्र मिळायला खरंच नशीब लागतं.... चौकडीच्या कडा अशा निखळ्ल्याचे वाचून हृदयात कालवाकालव झाली.. :( -झेल्या

वाहीदा 24/12/2008 - 17:41
एकच Suggestion खरूभाइ आणी डीके मधील सामन्जस्य तु जुना मीत्र म्हणुन नककीच साधु शकतोस .... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ! गोड शेवट नक्की होउ शकतो ... ~ वाहीदा

अनिल हटेला 25/12/2008 - 09:20
धन्यवाद सर्वाना....... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ! एकदम मान्य.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

शितल 25/12/2008 - 12:09
छान लिहिले आहे. :) पण शेवट वाचुन वाईट वाटले. :(

shweta 25/12/2008 - 14:09
खरच छान लिहलं आहे. पुढे काय होइल ते हि लिहित रहा.

मॅन्ड्रेक 23/01/2009 - 14:41
मैत्रि हि अशिच असते. न बोलता खुप काहि सांगुन जाणरि . आमचा हि एक कम्पु आहे . साडे बाविस जणांचा. सवडिने लिहिन . एक क्षण भाळ्ण्याचा - बाकि सारे सांभाळ्ण्याचे.
नमस्कार मंडळी !! मिपा म्हणजे आमचा पडीक अड्डा झालाये...बॉस किवा कलीग असोत,सारखे विचारत असतात की काय करत असतोस दिवसभर ह्या साइटवर....(हे लोक अमराठी असण्याचा फायदा की मी नेमका काय करतोये ते कुणालाच कळत नाय ..शिवाय सगळ देवनागरी ह्या लोकाना वाचता येतं पण समजत काहीच नाय....) तर मंडळी प्रत्येकाच्या आयुष्यात काही खास मित्र असतात..तसे आम्हाला ही ४ चांगले मित्र लाभले.सारे आमच्या ग्रुपला आवर्जुन चांडाळ चौकडी म्हणत...आणी नावाप्रमाणेच आम्ही होतोही (आहे म्हणनं जास्त सयुक्तीक ठरेन) तर ह्या मित्राशी आज तुमची ओळख करून द्यावी म्हटलं.. १)राजेश पाटीलः हे माननीय महोदय ९वी फेल..पण शिक्षका

आयटीवाले....

सुचेल तसं ·

विसोबा खेचर 23/12/2008 - 12:03
मी माझ्यापरीने आयटीवाल्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गुड! :) चालू द्या.. ते आयटीवाले गोडवे तयांचे गाणे हे नित्याचे तात्या म्हणे!

In reply to by अवलिया

डुप्लिकेट आय डी बर का 'तात्या' ह्यो... 'विसोबा खेचर' हा डुप्लीकेट आय डी आहे का? ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

In reply to by काहीतरीच

भिडू 23/12/2008 - 15:33
अहो "प्रा०५०३"......बोलतानां भाषा निट वापरा हो.... निदान कोणाशि बोलत आहत याचे तरि भान ठेवा....तात्या कोण आहेत हे तरि माहित आहे का तुम्हाला.. त्या मुळे प्रतिसाद देतानां विचार करा. आणी मगच प्रतिसाद द्या

यशोधरा 23/12/2008 - 12:04
चला, कोणी तरी आयटी वाल्यांची पण बाजू मांडली म्हणायची! थ्यांक्यू, थ्यांक्यू :)

मदनबाण 23/12/2008 - 12:04
मी सुध्दा नॉन आयटी मधुन आयटी मधे आलेलो आहे,,,त्यामुळे आयटीवाले किती मेहनत करतात याची जाणिव झाली !!! तुम्हाला कामाच्या मानानी उगीचच जास्त पगार मिळतो. हे म्हणजे बी.ई वाल्या माणसाने एम.बी.ए केल्याला माणसाला म्हणावे की तुझा पगार जास्त आहे..तो का जास्त आहे याचा आधी विचार करण्याची तसदी घेण्याची इच्छाच नसते मुळी... ज्या कस्ल्टंट चे बिलींग दर तासाचे असते आणि ते सुध्दा डॉलर किंवा युरो मध्ये त्याला महिन्याचा पगार मिळतो तो सुध्दा रुपयांमधे... बसून तर असता दिवसभर कंप्युटरसमोर आणि तेही एसी मधे. कॉस्ट कटींगमुळे गेली २ वर्ष शनि आणि रवि या दोन दिवसांनमधे काम करताना आमच्या इथे साध्या टेबल फॅनचा उपयोग होतो त्यामुळे नो एसी ऍट ऑल..एसी कायम असण्याचे दिवस कधीच गेलेत.. मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

यशोधरा 23/12/2008 - 12:16
ऩकळे कशास दुस्वास करीती बोटेही मोडती नावे आयटीच्या आयटीच्या योगे मिपाचा संसार सुहृदही सारे जमती जेथे धरा बोध मनी उमगो हे सत्य आयटीची साथ 'रौशनी' जगात! :D

In reply to by विसोबा खेचर

भिडू 23/12/2008 - 12:35
वरचे सगळे मुदद्दे पटलेच शिवाय डेड लाइन जवळ येते तेव्हा २/२ - ३/३ ऑफिस मधेच मुक्काम ठोकावा लागतो.तेव्हा घर-बिर ,पर्सनल लाइफ सगळ विसरायला लागते.वरुन क्लांयट च्या शिव्या खाव्या लागतात ते वेगळे.परत टेस्टर लोंकाचा ससेमिरा मागे असतोच(ते तरि काय करणार ,त्यांच्या वर पण प्रेशर असतेच). आहो कुठ्ल्याही कंपनि चा मेन उद्देश नफा हाच असतो. मग अशा कुठ्ल्या कंपनि ला पैसे वर आले असतात जे असे सहजासहजि भरभक्कम पगार देतिल. जेव्हा आम्हि त्यांना कोट्यावधी रुपये मिळवुन देतो तेव्हाच त्यातला काहिसा भाग ते पगार म्हणुन आम्हाला देतात्.एका CMM ५ लेवल च्या कंपनि मधे (मी स्वतः या कंपनि मधे २ वर्ष कामे केले आहे) सर्व साधारण पणे per day ,per employee १०,००० रुपये charge(Billing) करते कंपनि क्लांयट ला.म्हणाजेच एका employee मागे एका महिन्यात कंपनि ३ लाख रुपये कमवते.आणी या ३ लाखा पैकी आम्हाला मिळतात ६०-७० हजार रुपये(avrage). आणी क्लांयट तेवढे द्यायला तयार होतात्.कारण ते सुद्धा त्या सॉफ्टवेअर वर अब्जाबधी रुपये कमवणार असतात. त्यामुळे पगार जास्त मिळतो हा मुद्दा चुकिचा आहे. दुसरा मुद्दा ए.सी. मधे बसुन कामे करतात. अहो डोक्यावर ए.सी. असला म्हणजे सगळे आरामात असते, कामाचे प्रेशर नसते असे थोडिच आहे. आणी १०-१२ तास काँम्युंटर समोर बसुन काम करायचे म्हणजे बाकिच्या शारीरिक त्रास होतातच.

In reply to by भिडू

मदनबाण 23/12/2008 - 12:45
पर्सनल लाइफ सगळ विसरायला लागते. अगदी बरोबर...कुठे बाहेर जायचा प्लान करायचा आणि त्याच दिवशी एक्स्ट्रा शिफ्ट करण्यासाठी हापिसात हजर व्हायचे..कोणाचे बारसे,,कोणाचे लग्न,,,,,,कुठले सण्,,कुठली दिवाळी आणि दसरा??हे सगळ आयटीत आल्यावर विसराच !!! त्यांचे थॅक्स गिव्हींग,,ख्रीसमस तर अमची असते एक्स्ट्रा शिफ्ट...ते आयुष्याचा आनंद घेतात तर आम्ही शिफ्टचे तास मोजतो... आणि लोकांना फक्त पैसाच दिसतो !!! :( मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

In reply to by मदनबाण

सुनील 23/12/2008 - 15:35
कोणाचे बारसे,,कोणाचे लग्न,,,,,,कुठले सण्,,कुठली दिवाळी आणि दसरा??हे सगळ आयटीत आल्यावर विसराच (सतत दोन दिवाळ्या घर-कुटुंबापासून दूर, एकट्याने काढलेला) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by विसोबा खेचर

अवलिया 23/12/2008 - 13:28
बरं बुवा! आयटीवाले गिरेट! झालं समाधान? खुश? छयां ! तात्या तुम्ही पोपट केलात! चांगला तिकडे बेटींग घेत होतो... कोण जिंकणार... आयटी की नॉन आयटी ... चला रे चला! पळा घरी ! सामना रद्द. नॉन आयटी च्या कप्तानाने मॅच फिक्स केली. -- अवलिया अवलियाची अनुदिनी

अनिल हटेला 23/12/2008 - 13:07
डीस्क्लेमरः मी आयटीवाला नाही.. आधी मी पण असाच विचार करायचो की हे लोक म्हणजे फुल्ल टू ऐश.. बक्कळ पैसा ,एकदम जीवाची मुंबई.. पण नंतर एक मित्र आय टीत गेला .आणी त्याच्या कडे बघुन कळालं की घी देखा ,लेकीन बडगा नही देखा... जितका पैसा कमावतात्,तीतकीच मेहेनत करावी लागते.जागरण म्हणा किंवा बॉसींग म्हणा.ज्याचं जळतं त्यालाच माहिती.... असो... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अमोल केळकर 23/12/2008 - 13:38
मॅन्युफॅक्चरींग मधे दिवाळीला तगडा बोनस मिळतो. जो आयटी मधे नसतो. अहो विसरा आता ते सगळं इथं दर महिन्याला मिळतो पगार फक्त आपला मॅन्युफॅक्चरींग कामगार -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

In reply to by मराठी_माणूस

कुंदन 23/12/2008 - 16:00
असेच म्हणतो. मग, याच प्रमाणे , ज्यांना वाटते की आय टी वाल्यांना बसल्या जागी भरपुर पैसा मिळतो , त्यांनी आय टी मध्ये नोकर्‍या शोधाव्यात की. त्याला तर कोणी बंदी घातलेली नाही ना.

अनिल हटेला 23/12/2008 - 15:48
आय टी मधे जर इतके कष्ट आहेत तर तिथे का काम करता? ये बात सही है !! :? :-? बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

आय टी मधे जर इतके कष्ट आहेत तर तिथे का काम करता? कारण दिवसभर इंटरनेत वापरायला मिळते आणि ते सुद्धा भारी स्पीड आणि छान कनेक्टिवीटी... आणि त्यामुळेच दिवस भर मिपा मिपा खेळता येते :-)

In reply to by स्मिता श्रीपाद

>>आणि त्यामुळेच दिवस भर मिपा मिपा खेळता येते आम्ही तर नाही खेळत ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

In reply to by सखाराम_गटणे™

विजुभाऊ 28/12/2008 - 09:51
पुर्व लेखी परवानगीशिवाय याचा अर्थ काय? लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही. वरील वाक्य पूर्ण चुकले आहे लेखकाची पूर्व परवानगी लेखी असू शकते त्याच्या लेखी ती परवानगीच असते. अनुल्लेखापेक्षा पूर्वलेख वेगळा ठरतो आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

यशोधरा 23/12/2008 - 16:20
स्मिताताई, अन् बिन आयटी वाल्यांना पण आयटीच्या कृपेनेच येता येतं बर का मिपावर :)

In reply to by यशोधरा

मराठी_माणूस 23/12/2008 - 16:54
बरोबर आहे. रंग / ब्रश बनवणार्‍या लोकांच्या कृपे मुळेच सुंदर सुंदर चित्र काढली जातात, मुद्रण करणार्‍या लोकांच्या कृपे मुळेच उत्तोमत्तम साहित्य बनते

In reply to by यशोधरा

आज आय.टी.वाले जी काही कामं करतात (असं ऐकून आहे) त्यातून इंटरनेट, डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू, यांचा शोध लागला नाही. माझ्या माहितीत हा प्रकार उसाच्या सैन्यातल्या लोकांनी काढला.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

यशोधरा 23/12/2008 - 17:30
अगं अदिती ते तर मलाही माहित आहे :) पण आजकाल प्रत्येक हापिसातून आयटी च वेगळं डिपार्ट्मेंट असतं, जे ह्या सुविधा त्या हापिसपुरत्या व्यवस्थित चालताहेत ना हे पहात असत, अस म्हणायच होत मला. एकदम उसात कुठे शिरतेस?:)

In reply to by यशोधरा

कुंदन 23/12/2008 - 17:34
>>जे ह्या सुविधा त्या हापिसपुरत्या व्यवस्थित चालताहेत ना हे पहात असत व्यवस्थित (???) =)) त्यांनी मि पा ब्लॉक करुन ठेवल तर खेळता येईल का तुम्हाला मिपा मिपा?

In reply to by यशोधरा

त्यानी म्हनजे आम्ही आय् टी वाल्यानी जर हपिसात मिपा ब्लॉक केला तर तुम्हाला मिपा उघडता येनार नाहि मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एक 24/12/2008 - 05:03
इंटरनेट, www हे शोध उसाच्या सैन्यात लागले हे खरं आहे. आत्ताच्या लोकांना AARPA म्हणजे काय, इतकं प्रिमिटीव्ह होतं ते. ( :? www चा शोध कुठल्या तरी स्विस लॅब मधे लागला होता का?) पण आज त्याचा जसा वापर होत आहे ते आय. टी. ईजिनियर्समुळेच होत आहे. तसचं आय. टी. म्हणजे फक्त इंटरनेट, www एवढचं नाही. आय्. टी वाले या गोष्टींच्या शोधाच क्रेडीट घेत आहेत हे तुला कुठे दिसलं (तसा जर कोणी घेत असेल तर तो अर्धवट म्हटला पाहिजे). त्यामुळे वरील वाक्याचा उद्देश कळला नाही. अंतराळ संशोधनात सुद्धा प्रचंड आकडेमोड, वेगवान पद्धतीने कुठल्यातरी संगणक प्रणालीमुळेच होते ना ?(होत असावी असा अंदाज हा.. मी स्वःत बघितलं नाही त्यामुळे ठोकून देता येत नाही.) जर तसं असेल तर ते लिहिणारा कोणीतरी फोकलीचा, पैशाला पासरीभर मिळणार्‍यांपैकी असलेला, प्रोग्रॅमरच असला पाहिजे.. खालील वाक्य जेनेरीक वाक्य आहेत फक्त तुला उद्देशून नाहीत. जास्त पगार किंवा सोयी यांसाठी आय. टी. वाल्यांचा दुस्वास जरूर करा पण त्यांची व्हॅल्युपण ओळ्खा. आम्हाला दुस्वास, तुच्छता नवीन नाहीत.. १९९८-९९ साला पर्यंत संगणक किंवा इलेक्ट्रॉनिक्स ला जाणारा म्हणजे मेकॅनिकल, मेडीकल यांसारख्या ग्लॅमरस शाखेला एडमिशन न मिळवता आलेला विद्यार्थी अश्या तुच्छतेने बघायचे. आता दुस्वास करतात. काही काही प्रतिसाद बघितले तर हसायला येतं. आपणपण खपणार आहोत याकडे लक्ष नाही पण आय. टी. वाला खपतो आहे..ना "खपू दे..**व्यांची तीच लायकी होती, माजले होते साले " म्हणायला मोकळे. चालायचच कभी उपर कभी निचे.. -इलेक्ट्रॉनिक्स-संगणक अभियंता.

In reply to by एक

जेनेरीक आय.टी.वाल्यांकडून जे काही ऐकलं आहे, त्यावरून माझे सगळे अंदाजः (www चा शोध कुठल्या तरी स्विस लॅब मधे लागला होता का?) असू शकेल, माझी माहिती फारच तोकडी आहे. पण मुद्दा एवढाच होता की आंतरजाल, इमेल, www या गोष्टींचे "शोध" आणि जेनेरीक आय.टी.वाले करतात ती कामं यात प्रचंड फरक आहे का नाही? खालील वाक्य जेनेरीक वाक्य आहेत फक्त तुला उद्देशून नाहीत. पण त्यात मी पण येते ना? अंतराळ संशोधनात सुद्धा प्रचंड आकडेमोड, वेगवान पद्धतीने कुठल्यातरी संगणक प्रणालीमुळेच होते ना ? अर्थातच! पण मी वापरते ती सगळी सॉफ्टवर्स खगोलशास्त्रज्ञांनीच लिहिलेली आहेत. खगोलसंशोधनात (किमान भारतातरी) एवढा पैसा नाही की जेनेरीक आय.टी.वाल्यांकडून सॉफ्टवर्स लिहून घ्यावीत. (आमच्याकडे बर्‍याचशा तरूण, वय वर्ष ~ ४५, खगोलअभ्यासकांना संगणकाबद्दल किमान माहिती असते की आपल्याला हव्या त्या गोष्टी आपल्या आपणच करु शकतो, अगदी ऑपरेटींग सिस्टम इंन्स्टॉल करण्यापासून ते स्पीकर्सची कनेक्शन करेपर्यंत! अगदी सोप्या मराठीत सांगायचं झालं तर उठल्या-बसल्या सिस्टम ऍडमिनवाल्याला बोलावून आणावं लागत नाही.) जास्त पगार किंवा सोयी यांसाठी आय. टी. वाल्यांचा दुस्वास जरूर करा पण त्यांची व्हॅल्युपण ओळ्खा. दुस्वास अजिबातच नाही. पैसे छापायचे असते तर मी नक्कीच संशोधनाकडे वळले नसते, मला काय हवंय आणि काय आवडतं याचा विचार करुन मी या क्षेत्रात आले. आणि ही पण प्रांजळ कबूलीही की माझा नवरा माझ्यापेक्षा बरेच जास्त कमावतो म्हणून मला आज माझं विद्यार्थी म्हणून युकेमधे जे राहणीमान होतं ते बदलायला लागत नाही. आय.टी.वाल्यांचा दुस्वास करुन काहीही मिळणार नाही, त्यामुळे तो करावाच का? आणि आम्हाला खगोलशास्त्रात शिकवतात तसं, तुलना समान गोष्टींची करावी, (Compare like to like!) असमान नाही! तक्रार एवढीच आहे महिन्याला ५० हजार मिळवणार का १६ हजार असा प्रश्न वयाच्या तिसाव्या वर्षी विचारला तर माणूस ५० हजार असं उत्तर देतो. महागाई कोणामुळे वाढली हा प्रश्न मी विचारत नाही, पण महिना १६ आणि २० हजारात, एका छोट्याश्या खोलीत घर-संसार मांडून तू "तारे मोजणार" का "मान मोडेस्तोवर" काम करुन महिना ५० हजार कमावणार याचं उत्तर सोपं आहे ना? प्रगती फक्त एकाच दिशेत, क्षेत्रात होत आहे आणि हे चांगलं आहे का? शरीरासाठी व्यायाम करताना फक्त दंडाचेच व्यायाम केले आणि तुंदीलतनू असेल तर ते कसं असेल? हा प्रश्न जेनेरीक आय.टी.वाल्यांसाठी नाही, तर खरंतर "पॉलिसी मेकर्स"साठी आहे. ज्यांच्या हातात ससा नाही त्यांनी स्वतःला पारधी म्हणवून घेऊ नये.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अवलिया 24/12/2008 - 12:33
महागाई कोणामुळे वाढली हा प्रश्न मी विचारत नाही, पण महिना १६ आणि २० हजारात, एका छोट्याश्या खोलीत घर-संसार मांडून तू "तारे मोजणार" का "मान मोडेस्तोवर" काम करुन महिना ५० हजार कमावणार याचं उत्तर सोपं आहे ना? तारे संपणार नाहीत बै. पण ५०००० चे ५००० पण होवु शकतात... डॉलर.... कोसळ्णार आहे. (हे भाकित आहे. जास्त सिरीयसली घेवु नये. आमची भाकिते खरी होतातच असे नाही) -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एक 24/12/2008 - 23:40
>>खालील वाक्य जेनेरीक वाक्य आहेत फक्त तुला उद्देशून नाहीत. >>पण त्यात मी पण येते ना? डिपेन्डस तुला ते लागू होत असतील तर तू त्यात येतेस..तुझा बाकिचा प्रतिसाद बघितला तर येत नसावीस पण मला ते आधी माहित नव्हतं म्हणून "जेनेरीक" वाक्य. >>दुस्वास अजिबातच नाही. पैसे छापायचे असते तर मी नक्कीच संशोधनाकडे वळले नसते, मला काय हवंय आणि काय आवडतं याचा विचार करुन मी या क्षेत्रात आले. आणि ही पण प्रांजळ कबूलीही की माझा नवरा माझ्यापेक्षा बरेच जास्त कमावतो म्हणून मला आज माझं विद्यार्थी म्हणून युकेमधे जे राहणीमान होतं ते बदलायला लागत नाही. आय.टी.वाल्यांचा दुस्वास करुन काहीही मिळणार नाही, त्यामुळे तो करावाच का? धन्यवाद. पण ही मॅच्युरीटी मला इथल्या बर्‍याच प्रतिसादात आढळली नाही. इथे तर ब्लेम गेम सुरू झालेला दिसतो.. आय. टी खाली गेलं तर बाकिची फिल्ड्स (टाटा मोटर्स आठवड्यातून २-३ दिवस बंद असते..ते का?) पण खाली जाणार आहेत हे लोकांना कळत नसावं त्या शिवाय ""खपू दे..**व्यांची तीच लायकी होती, माजले होते साले "" अशी वाक्य दिसली नसती..

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>> पण मुद्दा एवढाच होता की आंतरजाल, इमेल, www या गोष्टींचे "शोध" आणि जेनेरीक आय.टी.वाले करतात ती कामं यात प्रचंड फरक आहे का नाही? हो नक्कीच फरक आहे पण म्हणून जेनेरिक आय्.टी.चे महत्व कमी होत नाही. उदा. औषधांचा शोध जनरल फिजिशियनने लावला नाही तरी तो ती औषधं कशी / कधी वापरायची ह्याचा योग्य सल्ला देतो (किंवा तसं अपेक्षित असतं.) आता जनरिक डॉक्टर्सची फी आपण देतोच ना... तो जी म्हणेल ती ? !!!! -------- दुसरं म्हणजे आयटीचे पगार वगैरे हा सगळा मागणी - पुरवठा खेळ आहे. ------- महत्वाचं म्हणजे आयटी म्हणजे फक्त programming or systems analysis or sys admin or testing or implementation असं नसतं... हे सगळं एकूण मिळून कंपनीचा / उद्योगाचा खर्च कमी करणे आणि/किंवा उत्पन्न वाढवणे ह्यासाठी कसं वापरलं जातंय ह्यावर आयटीचे खरं यश आहे.

In reply to by संदीप चित्रे

हो नक्कीच फरक आहे पण म्हणून जेनेरिक आय्.टी.चे महत्व कमी होत नाही. हे थोडं मान्य आहे. पण "आय.टी. नसतं तर मिपा-मिपा खेळता आलं नसतं" हे वाक्य थोडं अतिरंजित वाटतं. शिवाय आय.टी. मुळे (च ला महत्त्व आहे) हे शक्य आहे असा जो सूर वाटला तो आंतरजाल, डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू इत्यादींच्या संशोधकांवर अन्यायकारक वाटला म्हणून बोलले. खुद के सांथ बातां: व्यवहारात उपयुक्त असणार्‍या अनेक गोष्टी, वस्तू, सेवांसाठी काम करणारे अनेक लोक आहेत, बहुतांश असेच लोक इथे (आणि समाजातही) आहेत. डोक्यातला किडा शमवायला म्हणून व्यवहारात संपूर्णपणे (?) अनुपयुक्त गोष्टींवर काम करून काय आवाज चाललेला आहे तुझा? (संगणक वापरून तारे गणणारी) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>पण "आय.टी. नसतं तर मिपा-मिपा खेळता आलं नसतं" हे वाक्य थोडं अतिरंजित वाटतं. हे वाक्य अतिरजिंत वैगरे नाही. सगळे आय टी वाले एकमेकांना मदत करुनच सिस्टीम बनते. प्रत्येकाचा थोडा तरी हातभार असतोच. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

In reply to by सखाराम_गटणे™

हे वाक्य अतिरजिंत वैगरे नाही.सगळे आय टी वाले एकमेकांना मदत करुनच सिस्टीम बनते. प्रत्येकाचा थोडा तरी हातभार असतोच. गटणे, उलटा विचार करा, जेनेरीक आय.टी.वाले नसते तर काय इंटरनेट, इमेल, ब्लॉगिंग, शेअरवर्स, फ्री सॉफ्टवर्स हे काही नसतंच का? थोडा हातभार असणं वेगळं असतं, (त्याला खारीचा वाटा म्हणतात) आणि "शो स्टॉपर" असणं वेगळं असतं. मूळ संशोधकाशिवाय घोडं अडतं, पण टर्नर-फीटरचं काम थोड्या ट्रेनींगच्या सहाय्याने कोणालाही जमतं. कोंबडं झाकलं म्हणून तांबडं उगवायचं रहात नाही. आणि हो गटणे, तुमचा कॉपीराईट आतातरी रिन्यू करा, २००९ उजाडलं. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एक 01/01/2009 - 23:58
तुझे इतर लेख / अभिप्राय वाचून वाटत होतं कि एखाद्या क्षेत्राची व्यवस्थित माहिती नसताना तू बेधडक विधानं करत नाहीस म्हणून. पण खालच्या वाक्यांनी तडा गेला.. "..मूळ संशोधकाशिवाय घोडं अडतं, पण टर्नर-फीटरचं काम थोड्या ट्रेनींगच्या सहाय्याने कोणालाही जमतं. कोंबडं झाकलं म्हणून तांबडं उगवायचं रहात नाही..." यातला पहिला क्लॉज खरा आहे. पण.. "..पण टर्नर-फीटरचं काम थोड्या ट्रेनींगच्या सहाय्याने कोणालाही जमतं..." ???? हे असं बेधडक विधान करायला तू कधी ऍप्लिकेशन लेव्हल - सर्व्हर लेव्हल प्रोग्रॅमिंग केलं आहेस का? हे करायला अगदीच संशोधक लेव्हलच नाही पण नक्कीच टर्नर-फिटर पेक्षा थोडं जास्त नॉलेज लागतं. दुसरा मुद्दा, इतके शोध लागत आहेत, पेटंट्स घेतली जात आहेत मग ती सगळीच्या सगळी कमर्शियल डोमेन मधे का दिसत नाही. म्हणजे कुठेतरी संशोधकांना सुद्धा "टर्नर्-फिटर, कोंबड्या" ची गरज आहेच.. नाहीतर त्या संशोधनाचा उपयोग काय? साधं उदाहरण.. नॅनो टेक. चा शोध लागला आहे. पण जो पर्यंत सामन्य वापरात ते येत नाही तो पर्यंत त्याचा काय उपयोग? अशी प्रॉडक्टस तयार करण्यासाठी कुठल्याही येरा-गबळ्याला "थोडसं" ट्रेनींग देवून जॉब मिळणार आहे का? असं असेल तर आपला रेझ्यूमे पहिला. नाहीतरी प्रोग्रॅमिंग करून थोडा बोअर झालोच आहे.

झकासराव 23/12/2008 - 16:39
आयटी विरुद्ध नॉन आयटी असा सामना ह्याआधीच एकदा रंगुन (?) गेला आहे. धमाल ने चर्चा सुरु केली होती. बरेच महिने झाले त्याला. काहि फायदे काहि तोटे सगळीकडेच. ग्रे शेड लक्षात ठेवली तर चर्चा भरकटणार नाही. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

अप्पासाहेब 23/12/2008 - 17:20
एक जमाना होता जेव्हा 'टेल्को' तल्या झाडुवाल्याला सुध्दा १०००० पगार होता आणि त्याच वेळी ईतरत्र मैनेजर असणा-यांना ५-६००० रु मिळत. त्यावेळी का नाही आरडा ओरड झाली? विमानाच्या पायलट्स ना भरपुर पगार असतो त्या तुलनेत यस्टी च्या डायवर ला काय पगार मिळतो? कामाचे स्वरुप, प्रशिक्षीत माणसांची उपलब्धता , कंपनीला मिळणारा नफा ह्यावर पगार ठरत असतो. (आयटी वाला) आप्पा. लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते

अंतु बर्वा 23/12/2008 - 22:26
आयटी मुळे झालेले फायदे पण लक्षात घ्यायला हवेत... आज रेल्वे ची जी Centralised Reservation System आहे ज्यामुळे देशाच्या कानाकोपर्यातुन आरक्षण करता येतं, ते याचमुळे ना... मान्य, की पगार बाकीच्या क्षेत्रांपेक्षा जास्त मिळतो, पण कामाचं स्वरुप पाहिल्यास का ते हि लक्षात येईल.... आणी भारत आज ज्या आर्थीक महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे, त्यात थोडाफार वाटा आयटी वाल्यांचा सुद्धा आहेच की....

उदय 23/12/2008 - 23:19
>> तुम्हाला कामाच्या मानानी उगीचच जास्त पगार मिळतो. यामध्ये २ मुद्दे आहेत. पहिला मुद्दा "उगीचच" मिळतो. यावर माझे मत आहे की कोणी पैसे उगीचच जास्त देत नाही. मागणी आणी पुरवठा या तत्वाने पैसे दिले जातात (बहुतेक वेळा). उदाहरणार्थ माझ्या कंपनीत बरेच कंसल्टन्ट येतात ज्याना आम्ही तासाला $२५० किंवा जास्त देतो. कारण काय? मागणी आणी पुरवठा. दुसरा मुद्दा "जास्त पगार मिळतो". या मताशी मी थोडाफार सहमत आहे. मी एके ठिकाणी नोकरीला होतो, तिथे पी.एच.डी. फिजिक्स माणसाला वर्षाला $३३,००० पगार होता. मला सांगा, आय.टी.चे काम पी.एच.डी. फिजिक्स पेक्षा फार महान असते का? मला भारतातील पगार काय आहेत याची फार कल्पना नाही, पण १-२ उ.दा.माहीत आहेत, सी.ए. झालेला आय.टी.च्या तुलनेत १/३ पगार कमवतो. आय.टी.वाला सी.ए.च्या ३ पट हुशार असतो का किंवा ३ पट आउटपुट देतो का?

In reply to by उदय

कुंदन 23/12/2008 - 23:24
>>१-२ उ.दा.माहीत आहेत अशी ही उदाहरणे आहेत बी कॉम झालेला बी ई पेक्षा जास्त कमावतो. शेवटी ज्याची त्याची क्षमता , कामातले कौशल्य , हर हुन्नरीपणा यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबुन असतात.

In reply to by कुंदन

उदय 24/12/2008 - 04:36
शेवटी ज्याची त्याची क्षमता , कामातले कौशल्य , हर हुन्नरीपणा यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबुन असतात. चूक. डिमांड-सप्प्लाय, योग्य वेळी योग्य ठिकाणी व योग्य क्षेत्रात असणे, साहेबाची मर्जी असणे, चांगला ब्रेक मिळणे यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही स्वत:चे मालक असाल तरच उत्तम. नाहीतर नोकरदार आणी वेश्या यात काही फार फरक नाही. फरक इतकाच की एक जण शरीर विकतो आणि दुसरा बुद्धी. एकाची किम्मत अनुभवानंतर कमी होते तर एकाची वाढते. बस्स. (Sorry for such harsh words, but I think that is reality.)

In reply to by उदय

कुंदन 24/12/2008 - 10:11
>>योग्य वेळी योग्य ठिकाणी व योग्य क्षेत्रात असणे हे केवळ आय टी च नव्हे तर सर्वच क्षेत्रांसाठी लागु होईल.

उदय 24/12/2008 - 05:16
तुम्हाला कामाच्या मानानी उगीचच जास्त पगार मिळतो.
यामध्ये २ मुद्दे आहेत. पहिला मुद्दा "उगीचच" मिळतो. यावर माझे मत आहे की कोणी पैसे उगीचच जास्त देत नाही. मागणी आणी पुरवठा या तत्वाने पैसे दिले जातात (बहुतेक वेळा). उदाहरणार्थ माझ्या कंपनीत बरेच कंसल्टन्ट येतात ज्याना आम्ही तासाला $२५० किंवा जास्त देतो. कारण काय? मागणी आणी पुरवठा. दुसरा मुद्दा "जास्त पगार मिळतो". या मताशी मी थोडाफार सहमत आहे. मी एके ठिकाणी नोकरीला होतो, तिथे पी.एच.डी. फिजिक्स माणसाला वर्षाला $३३,००० पगार होता. मला सांगा, आय.टी.चे काम पी.एच.डी. फिजिक्स पेक्षा फार महान असते का? मला भारतातील पगार काय आहेत याची फार कल्पना नाही, पण १-२ उ.दा. भारतात माहीत आहेत, सी.ए. झालेला आय.टी.च्या तुलनेत १/३ पगार कमवतो. आय.टी.वाला सी.ए.च्या ३ पट हुशार असतो का किंवा ३ पट आउटपुट देतो का?
आयटी मधला कॉस्ट टू द कंपनी आणि इन हॅंड/टेक होम मधला फरक हा तुलनेने इतर क्षेत्रांमधल्या (मॅन्युफॅक्चरींग, अध्यापन, इत्यादि) फरकापेक्षा बर्‍यापैकी मोठा असतो. कारण आयटीमधे performance pay/variable pay हा पगारातला एक मोठा भाग असतो. तो केवळ व्यक्तिगतच नाही तर कंपनीच्या performance वर पण ठरत असतो. त्यामुळे तो कायम वरखाली होत असतो.
मॅन्युफॅक्चरींग मधे दिवाळीला तगडा बोनस मिळतो. जो आयटी मधे नसतो.
ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. मार्केटिंगचा माणूस पण कमिशनवर अवलंबून असतो. माल विकला नाही तर खाणार काय? माझा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण एखादी नोकरी घेतो तेव्हा आपण एक रिस्क घेतच असतो की आपला पगार कसा असणार आहे ते? (फिक्ड की बदलणारा). And you cannot claim a bonus as a matter of right. पण तरीही मी म्हणेन की आयटीमध्ये बक्कळ पैसा मिळतो. आणि कष्टाच्या तुलनेत तर खूपच जास्त.
डेड लाइन जवळ येते तेव्हा २/२ - ३/३ ऑफिस मधेच मुक्काम ठोकावा लागतो.तेव्हा घर-बिर ,पर्सनल लाइफ सगळ विसरायला लागते.वरुन क्लांयट च्या शिव्या खाव्या लागतात ते वेगळे.परत टेस्टर लोंकाचा ससेमिरा मागे असतोच(ते तरि काय करणार ,त्यांच्या वर पण प्रेशर असतेच).
या मताशी १००% नाही तर २००% सहमत. पण हा आयटी प्रोग्रामर किंवा टेस्टर चा दोष नाही तर Project मैनेजमेंट चा दोष आहे.
कंपनी क्लांयट ला.म्हणाजेच एका employee मागे एका महिन्यात कंपनि ३ लाख रुपये कमवते.आणी या ३ लाखा पैकी आम्हाला मिळतात ६०-७० हजार रुपये(average). आणी क्लांयट तेवढे द्यायला तयार होतात्.कारण ते सुद्धा त्या सॉफ्टवेअर वर अब्जाबधी रुपये कमवणार असतात.
मॅन्युफॅक्चरींगमध्ये खूप जास्त भांडवल लागते, आय.टी. मध्ये खूपच कमी. मग तू एखादी कंपनी का सुरू करत नाहीस? आपण ज्या प्रमाणात रिस्क घेतो त्या प्रमाणात पैसे मिळणार ना? २ रा जास्त पैसे कमावतो, म्हणून आपण बोलतो (आयटी आणी बिगर आयटी) पण आपल्याला फक्त १ च बाजू दिसते (किंवा आपण १ च बाजू बघतो). बिन-आयटीवाले कष्ट करत नाहीत का? कमी कष्टात सगळ्यानाच पैसे हवे असतात, पण ज्यांच्याकडे कमी पैसे आहेत किंवा अजिबातच नाहीत त्याना पैशाचे महत्व जास्त कळते. ज्याला जे जमते, जे पटते, ते त्याने करावे. आपण इथे चर्चा आणी वादावादी करत बसलेलो असताना ते हैदराबादी लोक ट्रेनिंग घेऊन, खोटे resume बनवून नोकरी कशी मिळेल ते बघत असतील. काही वर्षानी मग आपण "हे गुलटी लोक इतके पुढे कसे गेले" या विषयावर चर्चा करू. (आयटी. वाला) उदय

In reply to by उदय

सुचेल तसं 24/12/2008 - 08:21
>>सी.ए. झालेला आय.टी.च्या तुलनेत १/३ पगार कमवतो काहीच्या काही... आयटीमधे असणार्‍याला जर ४००००/- पगार असेल तर तुम्हाला असं म्हणायचं आहे का की चार्टर्ड अकाऊंटंटला १/३ म्हणजे १३३३३/- रुपये मिळतात. आणि जरी असं क्षणभर मानलं की असेल एखाद्या सी.ए. चा पगार कमी, तरीही १-२ उदाहरणावरुन सरसकट असं विधान नाही करता येत की सी.ए. झालेला आय.टी.च्या तुलनेत १/३ पगार कमवतो. >>बिन-आयटीवाले कष्ट करत नाहीत का? असं आत्तापर्यंतच्या प्रतिसादामधे कोणीही म्हटलेलं नाही. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

वेलदोडा 24/12/2008 - 12:21
म.टा. वर वाचलं.... ''पूर्वी जो माणूस आपला संसार, आपलं वैयक्तिक आयुष्य, सुखसोयी-चैनी, अन्न, हास्य अशा सर्व भौतिक आणि ऐहिक गोष्टींचा त्याग करे त्या माणसाला 'संत' असं संबोधलं जायचं... ... आता तसाच त्याग करणा-या माणसाला, 'आयटी प्रोफेशनल' म्हटलं जातं! ''

ऍडीजोशी 24/12/2008 - 13:18
समय से पहले और नसीब से ज्यादा, किसी हो कुछ नहीं मिलने वाला. - भगवान श्रीकॄष्ण

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

चष्मा 24/12/2008 - 15:46
आय टी वाल्यांसाठी डीलीव्हरी से पेहले और तेरे म्यानेजर से ज्यादा कुछ नही मिलता !!

नितिन थत्ते 29/12/2008 - 15:37
आय टी मधला जास्त पगार हा बहुतेक ग्राहक विदेशी असून ते डॉलर मध्ये पैसे देतात त्यातले अर्धे जरी इथल्या कम्पनीने दिले तरी भारतातील इतर लोकान्च्या पगारापेक्षा तो खूप जास्त दिसतो. मी पण एक आय टी वालाच आहे. आय टी वाल्यान्मुळे महागाई वाढली हे म्हणणे एकदम मान्य.

नीधप 29/12/2008 - 20:23
>>डेड लाइन जवळ येते तेव्हा २/२ - ३/३ ऑफिस मधेच मुक्काम ठोकावा लागतो.तेव्हा घर-बिर ,पर्सनल लाइफ सगळ विसरायला लागते.वरुन क्लांयट च्या शिव्या खाव्या लागतात ते वेगळे.परत टेस्टर लोंकाचा ससेमिरा मागे असतोच(ते तरि काय करणार ,त्यांच्या वर पण प्रेशर असतेच). >>दुसरा मुद्दा ए.सी. मधे बसुन कामे करतात. अहो डोक्यावर ए.सी. असला म्हणजे सगळे आरामात असते, कामाचे प्रेशर नसते असे थोडिच आहे. आणी १०-१२ तास काँम्युंटर समोर बसुन काम करायचे म्हणजे बाकिच्या शारीरिक त्रास होतातच. >>अगदी बरोबर...कुठे बाहेर जायचा प्लान करायचा आणि त्याच दिवशी एक्स्ट्रा शिफ्ट करण्यासाठी हापिसात हजर व्हायचे..कोणाचे बारसे,,कोणाचे लग्न,,,,,,कुठले सण्,,कुठली दिवाळी आणि दसरा??हे सगळ आयटीत आल्यावर विसराच !!! त्यांचे थॅक्स गिव्हींग,,ख्रीसमस तर अमची असते एक्स्ट्रा शिफ्ट...ते आयुष्याचा आनंद घेतात तर आम्ही शिफ्टचे तास मोजतो... आणि लोकांना फक्त पैसाच दिसतो !!! जामच ओळखीचे वाटतायत वरचे तीनही मुद्दे. अर्थात शेवटचा पैशाचा उल्लेख सोडून. कुठे बरं ऐकलंय? अरे हो माझ्याच क्षेत्रात की. माझ्या बदनाम क्षेत्रात आम्ही सगळेच यातून जात असतो हो. कौतुक काय त्याचं? फक्त यातून जात असलो तरी पैसा मात्र कुणाच्या डोळ्यावर यावा इतका नाही मिळत. अर्ध्याहून अधिक ठिकाणी बुडतोच. सुरूवातीच्या काळात तर हे सगळं अति होत असतं आणि पहिला महिना संपताना पगार नाही पडत हो हातात. आणि हे काही नवीन नाही. त्याबद्दल तक्रारही नाही. अंगवळणी पडलंय. सगळे खाचखळगे, सगळे धोके, त्रास ह्या सगळ्या गोष्टींची तयारी ठेवूनच आम्ही उतरतो या क्षेत्रात. कैक वर्षं हे असंच आहे. पण ते इतकं कौतुकाचं आहे हे आयटीवाल्यांमुळेच हल्लीच कळलं. >>जितका पैसा कमावतात्,तीतकीच मेहेनत करावी लागते.जागरण म्हणा किंवा बॉसींग म्हणा.ज्याचं जळतं त्यालाच माहिती. इतका बिचारा सूर कशासाठी? >>जास्त पगार किंवा सोयी यांसाठी आय. टी. वाल्यांचा दुस्वास जरूर करा पण त्यांची व्हॅल्युपण ओळ्खा. आम्हाला दुस्वास, तुच्छता नवीन नाहीत. आयटीवाले दुसर्‍यांना तुच्छ लेखत नाहीत असं काही म्हणणं आहे का यातून? कारण वरच्या अनेक प्रो आयटी पोस्टस मधे इतरांबद्दल तुच्छता, काम काय ते आपणच करतो बाकीचे नाहीत असे सूर दिसले. >>आपणपण खपणार आहोत याकडे लक्ष नाही पण आय. टी. वाला खपतो आहे..ना "खपू दे..**व्यांची तीच लायकी होती, माजले होते साले " म्हणायला मोकळे. माझा वरचा मुद्दा सोदाहरण सिद्ध... >>शेवटी ज्याची त्याची क्षमता , कामातले कौशल्य , हर हुन्नरीपणा यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबुन असतात. उदाहरण क्रमांक २ >>''पूर्वी जो माणूस आपला संसार, आपलं वैयक्तिक आयुष्य, सुखसोयी-चैनी, अन्न, हास्य अशा सर्व भौतिक आणि ऐहिक गोष्टींचा त्याग करे त्या माणसाला 'संत' असं संबोधलं जायचं...... आता तसाच त्याग करणा-या माणसाला, 'आयटी प्रोफेशनल' म्हटलं जातं! '' संत लोकांना पण पगार मिळायचे वाटतं यासाठी? कोणाचे पगार डोळ्यावर येत नाहीयेत. पैशासाठीच सगळं काही असतं तर माझ्या क्षेत्रात येऊन दळीद्री सिरियल्सच्या दळणाला वाहून घेता आलं असतं. तेही केलं नाही कारण चांगलं काम करण्याची आच आहे. असो. तो वाद निराळा. पण कामातल्या हार्डशिपचं नको इतकं उदात्तीकरण वाचलं आणि विनोदी वाटलं. कारण अशी हार्डशिप करतानाही आपला उदरनिर्वाहच जेमतेम सावरू शकणारे, अत्यंत चांगल्या दर्जाचे, शिक्षित एडिटर्स, साउंड डिझायनर्स, कॅमेरामन, दिग्दर्शक मी सतत पहात असते. तुम्हाला निदान नोकरी लागताक्षणी पगाराची खात्री असते. इथे सुरूवातीची ७-८ वर्ष (किमान.. कमाल कितीही!) तरी पैसा जमवणं अवघड असतं. आणि शेवटी एकदा काम थांबवलं की संपलं बँकेतली गंगाजळी असते तोवर असते. रिटायरमेंट प्लॅन इत्यादी गोष्टींचा संबंध नसतो हो. तेव्हा कामाचे प्रचंड तास, प्रोफेशनल हॅझार्डस इत्यादी गोष्टींचं कौतुक जरा जास्तच होतंय ते थांबवावं ही विनंती. (यावर सगळे आयटीवाले तुटून पडतील माझ्यावर पण आहेत ही माझी मतं त्याला कोण काय करणार?) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

सुचेल तसं 30/12/2008 - 09:32
>>''पूर्वी जो माणूस आपला संसार, आपलं वैयक्तिक आयुष्य, सुखसोयी-चैनी, अन्न, हास्य अशा सर्व भौतिक आणि ऐहिक गोष्टींचा त्याग करे त्या माणसाला 'संत' असं संबोधलं जायचं...... आता तसाच त्याग करणा-या माणसाला, 'आयटी प्रोफेशनल' म्हटलं जातं! '' >>संत लोकांना पण पगार मिळायचे वाटतं यासाठी? ज्यानी कोणी हे लिहीलं होतं ते केवळ विनोद म्हणून. हा विनोद मागे म.टा.मधे आला होता आणि प्रतिसाद देणार्‍यानि तो इथे सगळ्यांसोबत शेअर केला. कोणाचाच असा दावा नाहीये की आयटीवाले संत असतात. >>कोणाचे पगार डोळ्यावर येत नाहीयेत. पैशासाठीच सगळं काही असतं तर माझ्या क्षेत्रात येऊन दळीद्री सिरियल्सच्या दळणाला वाहून घेता आलं असतं. तेही केलं नाही कारण चांगलं काम करण्याची आच आहे. असो. तो वाद निराळा. कोणी कुठले क्षेत्र निवडावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न/आवड आहे. तुमच्याप्रमाणेच प्रत्येकाला वाटतं की तो/ती जे काम करत आहे ते चांगलं आहे. >>असो. तो वाद निराळा. पण कामातल्या हार्डशिपचं नको इतकं उदात्तीकरण वाचलं आणि विनोदी वाटलं. तुम्ही केवळ एकच बाजु पहात आहात. आयटीवाले पैशाला पसारीभर मिळतात हे वाक्यही इथेच बोललं गेलं आहे. मी (आणि प्रतिसाद देणार्‍या मित्र-मैत्रिणींनी) केवळ त्यांना आपल्या क्षेत्राबद्दल काय वाटतं ते मांडलं आहे. कोणीही असा दावा केला नाही की आयटीमधे कष्ट घ्यावे लागतात. बाकीच्या क्षेत्रांमधेही कौशल्य लागतचं की. >>तुम्हाला निदान नोकरी लागताक्षणी पगाराची खात्री असते. इथे सुरूवातीची ७-८ वर्ष (किमान.. कमाल कितीही!) तरी पैसा जमवणं अवघड असतं. ती सर्व नोकरदारांना असते. चित्रपट/दूरचित्रवाणी माध्यम ह्यांची तुलना करणंचं चुकीचं आहे. मान्य की तुम्हाला पहिली ७-८ वर्षं संघर्ष करावा लागतो. तेवढा पिरीयड तुम्हीही गृहीत धरलाच असतो. पण सेटल झाल्यावर रगड्ड पैसा मिळतो की. आज एवढ्या मालिका वेगवेगळ्या वाहिन्यांवर अव्याहतपणे चालू असतात. त्यामुळे पुर्वीपेक्षा रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. एका वर्षात कितीतरी मराठी/हिंदी आणि इतर प्रादेशिक चित्रपट प्रदर्शित होतात. कलावंत/तंत्रज्ञ गुणी असेल तर त्याला यश मिळाल्यावाचून रहाणार नाही. (उदा: कला दिग्दर्शक नितीन देसाई) >>आणि शेवटी एकदा काम थांबवलं की संपलं बँकेतली गंगाजळी असते तोवर असते. रिटायरमेंट प्लॅन इत्यादी गोष्टींचा संबंध नसतो हो आम्हाला तरी कुठे पेन्शन मिळतं? रिटायरमेंट प्लॅन कोणीही घेऊ शकतं. ती काही आयटीवाल्यांची मक्तेदारी आहे असं थोडचे? तुम्ही लोकंसुद्धा ह्यात पैसा गुंतवू शकता. त्यामुळे तुमचा हा मुद्दा अगदी निरर्थक आहे. >>तेव्हा कामाचे प्रचंड तास, प्रोफेशनल हॅझार्डस इत्यादी गोष्टींचं कौतुक जरा जास्तच होतंय ते थांबवावं ही विनंती. त्याचप्रमाणे ऊठसुठ आयटीवाल्यांना धारेवर धरणं थांबवावं ही आमची विनंती. >>(यावर सगळे आयटीवाले तुटून पडतील माझ्यावर पण आहेत ही माझी मतं त्याला कोण काय करणार?) तुमच्या उत्तरांना दिलेली प्रत्युत्तरं म्हणजं तुटून पडणं खचितचं नाही. संवाद दोन्ही बाजूनी व्हायला हवा. खरं ना? अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

In reply to by नीधप

एक 31/12/2008 - 23:52
कॉमेंट केली आहे म्हणून विचारतो. >>आयटीवाले दुसर्‍यांना तुच्छ लेखत नाहीत असं काही म्हणणं आहे का यातून? कारण वरच्या अनेक प्रो आयटी पोस्टस मधे इतरांबद्दल तुच्छता, काम काय ते आपणच करतो बाकीचे नाहीत असे सूर दिसले. कुठल्या पोस्ट मधे कुठलं वाक्यात हे सूर दिसले. ते जरा नमूद करा प्लिज. >>आपणपण खपणार आहोत याकडे लक्ष नाही पण आय. टी. वाला खपतो आहे..ना "खपू दे..**व्यांची तीच लायकी होती, माजले होते साले " म्हणायला मोकळे. यात तुच्छता का दिसली.? तुम्ही सोदाहरण वगैरे म्हणत आहात ते का? ते कळत नाही. ".."खपू दे..**व्यांची तीच लायकी होती, माजले होते साल".." ही एका नॉन्-आय टी वाल्याची कॉमेंट आहे. मी एवढच म्हणालो की " आपण सगळेच बुडणार्‍या जहाजात आहोत. सगळ्याच क्षेत्रात मंदी आली/येणार आहे. हे अश्या कॉमेंटस लिहणार्‍याला कळत आहे का?" >>शेवटी ज्याची त्याची क्षमता , कामातले कौशल्य , हर हुन्नरीपणा यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबुन असतात. >>उदाहरण क्रमांक २ हे तर एक प्लेन स्टेटमेंट आहे..असं कुठलं क्षेत्र आहे की ज्यात तुमची क्षमता, कौशल्य, काहीही असु दे, तुम्हाला मानधन एकच मिळेल? मला माहित नाही तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम करता, पण तुमच्या पेक्षा कमी मोबदला मिळणार्‍यात आणि तुमच्यात काय फरक आहे? कौशल्य, क्षमता हाच फरक असेल ना? आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही काही कष्ट घेतले असतीलच ना? मग तसं म्हणण्यात तुच्छता कसली आली आहे? ती फॅक्टच आहे ना? राहता राहिला, समान कष्टांना मिळणार्‍या पैशाचा प्रश्न..आय. टी वाल्यां ना मिळणार्‍या पैशाबद्दल तुम्हाला दुस्वास नाही हे तुम्हीच म्हणत आहात. मग तुमचा मुद्दा काय? आय. टी. वाल्यांनी त्यांना जाणवणारे कष्ट, प्रेशर नमूद केले तर चुकलं काय? तुमचं क्षेत्र कुठलं, त्यात किती कष्ट आहेत हे आम्हाला कसं माहीत असणारं? ते तुम्हीच लिहिलं पाहिजेत. का तुम्हाला असं म्हणायचं आहे? की आय. टी. वाल्यांना भरपूर मोबदला मिळत आहे ना मग त्यांनी त्यांच्या कष्टा-प्रेशर बद्द्ल ब्र सुद्धा काढू नये? हाच जर मुद्दा असेल तर हा वाद इथेच संपला.

नीधप 30/12/2008 - 10:27
>>कोणाचे पगार डोळ्यावर येत नाहीयेत. पैशासाठीच सगळं काही असतं तर माझ्या क्षेत्रात येऊन दळीद्री सिरियल्सच्या दळणाला वाहून घेता आलं असतं. तेही केलं नाही कारण चांगलं काम करण्याची आच आहे. असो. तो वाद निराळा. कोणी कुठले क्षेत्र निवडावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न/आवड आहे. तुमच्याप्रमाणेच प्रत्येकाला वाटतं की तो/ती जे काम करत आहे ते चांगलं आहे. ज्या संदर्भात तुमचा हा प्रतिसाद आहे त्याबद्दल म्हणायचं तर माझा मुद्दा तुम्हाला सपशेल बाउन्सर गेलेला आहे. कळलेला मुळीच नाहीये. तेव्हा त्यात पडूच नका. >>कोणीही असा दावा केला नाही की आयटीमधेच कष्ट घ्यावे लागतात. ह्या शब्दात कोणी म्हणालं नाही पण 'आम्ही इतरांपेक्षा वरचढ आहोत म्हणून आम्हाला जास्त पगार मिळतात' हा सूर वेगळं काय सांगतो हो? इतरांबद्दलची तुच्छता भरपूर दिसली वरच्या अनेक पोस्टस मधे. ती तशी पावलोपावली अनुभवायला मिळतेच की. >>चित्रपट/दूरचित्रवाणी माध्यम ह्यांची तुलना करणंचं चुकीचं आहे. मान्य की तुम्हाला पहिली ७-८ वर्षं संघर्ष करावा लागतो. तेवढा पिरीयड तुम्हीही गृहीत धरलाच असतो. पण सेटल झाल्यावर रगड्ड पैसा मिळतो की. आज एवढ्या मालिका वेगवेगळ्या वाहिन्यांवर अव्याहतपणे चालू असतात. त्यामुळे पुर्वीपेक्षा रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. एका वर्षात कितीतरी मराठी/हिंदी आणि इतर प्रादेशिक चित्रपट प्रदर्शित होतात. कलावंत/तंत्रज्ञ गुणी असेल तर त्याला यश मिळाल्यावाचून रहाणार नाही. (उदा: कला दिग्दर्शक नितीन देसाई) आयटीवाल्यांना सर्व क्षेत्रातलं ज्ञान असतं आणी सर्वकाही माहित असतं आणि सगळं काही त्यांनाच कळतं असा त्यांचा समज असतो हे उदाहरणासहित सिद्ध करणारं हे विधान. आम्ही अनेक गोष्टी गृहित धरून उतरतो आमच्या क्षेत्रात आणि म्हणूनच तक्रार नसते पण वरती बघावं तर तुम्हा लोकांची कामाच्या वेळा आणि कामाचं प्रेशर याबद्दल तक्रार आणि उदात्तीकरण हेच चाललंय. त्यावर आक्षेप आहे. आणि केवळ तेवढ्यासाठी माझ्या क्षेत्राचं उदाहरण दिलंय. बर सेटल झाल्यावर रग्गड पैसा मिळतो हा विनोदच करताय तुम्ही. किती तंत्रज्ञांना मालिकांच्या जोरावर रग्गड पैसा मिळतो हे जरा सांगाल का? अक्षरशः २४ तास काम करतात ते हे बघता जो मिळायला हवा तसा फार कमी वेळा मिळतो. आणि त्यातही ४-४ महिने उशीर. पैसा बुडणे, दोन कामांच्या मधे बरेच महिने बिनाकामाचे बसून रहावे लागणे, पगारी रजा, इतर पर्क्स यातलं काहीही माहित नसणे हे सगळं धरून मग विचार करा रग्गड पैसा की काय ते. मराठी चित्रपट किती प्रदर्शित होतात आणि त्यातून कोणाचा नक्की किती फायदा होतो (तंत्रज्ञांचा तर नक्कीच नाही.) याचं गणित एकदा कधीतरी बसून सविस्तर समजावून सांगेन. तूर्तास ते तुम्हाला माहित नाहीये एवढं मान्य केलंत तरी पुरे आहे. कलावंत/ तंत्रज्ञ गुणी असेल तर यश मिळेल हे मला कळत नसेल कारण मी आयटीवाली नाही असा तर तुमचा समज नाही ना झाला? अहो गुणी माणूस यशस्वी होतो ते माहितीये. मुद्दा तो नाहीये ना. मुद्दा आहे आयटीवाल्यांनी 'आम्ही ग्रेट म्हणून इतरांपेक्षा जास्त पैसे मिळतात. आमची हार्डशिप जास्त म्हणून इतरांपेक्षा जास्त पैसे मिळतात' असं मिरवण्याचा. यात प्रत्येक आयटीवाला हा गुणी आणि एक्स्ट्रॉऑर्डिनरी असतो म्हणूनच त्याला एवढा पगार मिळतो असं गृहितक मांडलेलं दिसतंय. मध्यम बुद्धीचे, मिडिऑकर म्हणता येईल असे कैक आयटीवाले माहीतीयेत की मला ज्यांनी आयुष्यभराचे पैसे १० वर्षातच कमावलेत. >>त्याचप्रमाणे ऊठसुठ आयटीवाल्यांना धारेवर धरणं थांबवावं ही आमची विनंती. धारेवर मी धरलेलं नाही. तुमच्या बाजूने येणारी अनेक विधानं ही इतरांसाठी तुच्छतापूर्वक आणि तुम्हीच ग्रेट अश्या स्वरूपाची यायला लागली तेव्हा बोललेय. मिळणार्‍या पगाराच्या बळावर समाजातला एक गट इतर सगळ्यांना कमी आणि तुच्छ समजू लागतो , आपल्यापेक्षा कमी पैसा मिळणारा आपल्यापेक्षा कमी दर्जाचा असतो असं म्हणू लागतो तेव्हा अशी प्रतिक्रिया येणारच. तुम्हाला १० पट काय १००पट पगार मिळाला तरी कुणाला वाईट वाटणार नाहीये पण त्या बळावर एखाद्या शास्त्रज्ञाला, एखाद्या प्राध्यापकाला, एखाद्या चित्रकाराला, एखाद्या विचारवंताला, एखाद्या समाजसेवकाला कमी लेखणार असाल तर धारेवर धरलं जाणारच ना. प्रत्यक्षात तुम्ही वैयक्तिकरित्या स्वतः असं वागत नसालही नव्हे नसालच पण आयटीवाले ह्या लेबलखालचे अनेक जण असे वागतात हे तुम्ही नाकारू शकत नाही कारण तो आमचा अनुभव आहे. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

सुचेल तसं 30/12/2008 - 11:56
>>ज्या संदर्भात तुमचा हा प्रतिसाद आहे त्याबद्दल म्हणायचं तर माझा मुद्दा तुम्हाला सपशेल बाउन्सर गेलेला आहे. कळलेला मुळीच नाहीये. तेव्हा त्यात पडूच नका. कळला नसेल तर तुम्ही समजावा. त्यात पडूच नका ही उद्धटपणाची भाषा झाली. >>ह्या शब्दात कोणी म्हणालं नाही पण 'आम्ही इतरांपेक्षा वरचढ आहोत म्हणून आम्हाला जास्त पगार मिळतात' हा सूर वेगळं काय सांगतो हो? इतरांबद्दलची तुच्छता भरपूर दिसली वरच्या अनेक पोस्टस मधे. ती तशी पावलोपावली अनुभवायला मिळतेच की. आम्ही इतरांपेक्षा वरचढ आहोत असं कु़णीही आयटीवाला म्हणाला नाही. हे तुम्ही तुमच्या चष्म्यातुन बघत आहात. >>आयटीवाल्यांना सर्व क्षेत्रातलं ज्ञान असतं आणी सर्वकाही माहित असतं आणि सगळं काही त्यांनाच कळतं असा त्यांचा समज असतो हे उदाहरणासहित सिद्ध करणारं हे विधान. असं कोण म्हटलय हो? जे वाचतो, पाहतो, ऐकतो त्यावरुन सांगितलं आणि ह्याबाबतीत मी काही बोललोय ते चुकीचं आहे असं मला अजिबात वाटत नाही. >>मध्यम बुद्धीचे, मिडिऑकर म्हणता येईल असे कैक आयटीवाले माहीतीयेत की मला ज्यांनी आयुष्यभराचे पैसे १० वर्षातच कमावलेत. त्यात चुकीचं काय? त्यांच्या नशिबात होतं म्हणून त्यांनी कमावले. सामान्य दर्जाचे कलाकार सुद्धा रग्ग्ड पैसा कमवतातच की. पण आमची काही तक्रार नाही त्यांच्याबद्दल Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

नीधप 30/12/2008 - 12:19
>>कळला नसेल तर तुम्ही समजावा. त्यात पडूच नका ही उद्धटपणाची भाषा झाली. या चर्चेचा तो विषय असता तर समजावलं असतं. >>आम्ही इतरांपेक्षा वरचढ आहोत असं कु़णीही आयटीवाला म्हणाला नाही. हे तुम्ही तुमच्या चष्म्यातुन बघत आहात. वरती अनेक ठिकाणी हा सूर दिसून आलाय आणि अनेक असे भेटलेही आहेत पण तुम्ही म्हणता म्हणून केवळ माझा चष्मा इत्यादी!! >>असं कोण म्हटलय हो? जे वाचतो, पाहतो, ऐकतो त्यावरुन सांगितलं आणि ह्याबाबतीत मी काही बोललोय ते चुकीचं आहे असं मला अजिबात वाटत नाही. वाक्यातच विरोधाभास आहे. दुसर्‍या क्षेत्राबद्दल माहित नसतानाही तुम्ही बोलताय तेच बरोबर असं म्हणणं याला उद्धटपणाच म्हणतात >>त्यात चुकीचं काय? त्यांच्या नशिबात होतं म्हणून त्यांनी कमावले. सामान्य दर्जाचे कलाकार सुद्धा रग्ग्ड पैसा कमवतातच की. पण आमची काही तक्रार नाही त्यांच्याबद्दल आमची तक्रार आहे असं तुम्ही मानताय? वास्तविक तक्रार नाही हे ह्याच शब्दात आम्ही बोलून दाखवले आहे. त्यांच्या नशिबात होते म्हणून लायकी असो नसो कमावले पण म्हणून ते श्रेष्ठ ठरत नाहीत. वरती अनेकांनी इतरांपेक्षा वरचढ असणारे पगार कसे योग्यच आहेत कारण त्यांची तेवढी लायकी आणि हार्डशिप आहे, ते कसे श्रेष्ठ आहेत असं तुणतुणं लावलंय आणि आता तुमचं हे वाक्य. डबल ढोलकी बाकी काही नाही. >>Finally I will be so matured that I will react to nothing. पलायनवादाचे उत्तम उदाहरण. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

सुचेल तसं 31/12/2008 - 08:48
>>कळला नसेल तर तुम्ही समजावा. त्यात पडूच नका ही उद्धटपणाची भाषा झाली. या चर्चेचा तो विषय असता तर समजावलं असतं. मग जर या चर्चेचा तो विषय नाही तर मुळात तुम्ही तो काढलाच कशाला? तसेच >>Finally I will be so matured that I will react to nothing. पलायनवादाचे उत्तम उदाहरण. इथे देखील तुम्ही विषयांतर करत आहे. माझ्या सिग्नेचरचा आणि प्रस्तुत विषयाचा अर्थाअर्थी संबंध नाही. केवळ विरोधासाठी विरोध ह्या भुमिकेतूनच तुम्ही अशी विधानं करत आहात. १० वर्षात आयुष्यभराची कमाई करणं ह्यात काय वावगं आहे? आणि ज्यांनी अशी कमाई केली त्यांचा - आम्ही श्रेष्ठ आहोत - असा दावा असल्याचं तुम्ही कुठेही लिहीलं नाही. मग ह्याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की तुमचा आक्षेप त्यांच्या कमाईवरच आहे. >>वाक्यातच विरोधाभास आहे. दुसर्‍या क्षेत्राबद्दल माहित नसतानाही तुम्ही बोलताय तेच बरोबर असं म्हणणं याला उद्धटपणाच म्हणतात जसं तुम्ही आयटीमधे नसताना अधिकारवाणीनी त्यावर बोलता की नाही? तुम्हाला जे कोण लोक भेटले असतील आणि त्यांनी जे काय तुम्हाला सांगितलं असेल त्यावरुनच तुम्ही मतं बनवली असणार. त्याचप्रमाणे चित्रपट, मालिकांशी संबंधित लोकांना भेटून, त्यांच्याशी बोलून माझी मतं तयार झाली... >>आमची तक्रार आहे असं तुम्ही मानताय? वास्तविक तक्रार नाही हे ह्याच शब्दात आम्ही बोलून दाखवले आहे. त्यांच्या नशिबात होते म्हणून लायकी असो नसो कमावले पण म्हणून ते श्रेष्ठ ठरत नाहीत. वरती अनेकांनी इतरांपेक्षा वरचढ असणारे पगार कसे योग्यच आहेत कारण त्यांची तेवढी लायकी आणि हार्डशिप आहे, ते कसे श्रेष्ठ आहेत असं तुणतुणं लावलंय आणि आता तुमचं हे वाक्य. डबल ढोलकी बाकी काही नाही. परत तेच. कोण असा दावा करतय की आयटीवाले श्रेष्ठ आहेत? इथे तर कोणीही केला नाही. पगार योग्य आहेत याबाबतीत काही दुमत नाही. एका माणसामागे कंपनीला किती मोठा रेवेन्यु मिळतो ह्याची आधी माहिती घ्या आणि मगच बोला. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

नीधप 31/12/2008 - 10:08
>>मग जर या चर्चेचा तो विषय नाही तर मुळात तुम्ही तो काढलाच कशाला? उदाहरण देणे अशी पण एक गोष्ट असते चर्चेत. >>आणि ज्यांनी अशी कमाई केली त्यांचा - आम्ही श्रेष्ठ आहोत - असा दावा असल्याचं तुम्ही कुठेही लिहीलं नाही. दहा ठिकाणी लिहिलंय की 'आम्हीच श्रेष्ठ' असा ऍटिट्यूड असतो. पण ते तुम्हाला वाचायचं नाहीये. समजायचं नाहीये किंवा अजून काही. >> मग ह्याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की तुमचा आक्षेप त्यांच्या कमाईवरच आहे. याला म्हणतात काही शेंडा बुडखा नसलेले आरोप. तुमच्या पैशावर आमचा डोळा नाही आणि आम्हाला त्याचं वाईटही वाटत नाही. हे पण स्पष्ट शब्दात वरती लिहिलंय. तुम्हाला ते वाचायचं नाहीये. उगाच झोडाझोडी करण्यासाठी आरोप करताय. >>माझ्या सिग्नेचरचा आणि प्रस्तुत विषयाचा अर्थाअर्थी संबंध नाही. ही सिग्नेचर त्याच पोस्टपासून आहे. आधी नाही. >>जसं तुम्ही आयटीमधे नसताना अधिकारवाणीनी त्यावर बोलता की नाही? तुम्हाला जे कोण लोक भेटले असतील आणि त्यांनी जे काय तुम्हाला सांगितलं असेल त्यावरुनच तुम्ही मतं बनवली असणार. त्याचप्रमाणे चित्रपट, मालिकांशी संबंधित लोकांना भेटून, त्यांच्याशी बोलून माझी मतं तयार झाली... मी आयटी क्षेत्राबद्दल अधिकारवाणीने बोलले? खोटे दावे करू नका. आयटीमधल्या लोकांच्या ऍटिट्यूडचा जो अनुभव आहे केवळ त्याबद्दल बोललेय. माझा अनुभव म्हणून. तुम्ही माझ्या क्षेत्रात किती आणि कसा पैसा मिळतो हे अधिकारवाणीने बोललात आणि ते तसं नाहीये हे मी सांगूनही तुमचा हेका की तुम्ही म्हणता तेच बरोबर. दोन्हीमधला फरक समजायचा प्रयत्न करा. तो तुम्ही करणार नाही हे आता उघड दिसतंय. पहिल्यापासून भांडायच्या पावित्र्यातच आहात तुम्ही. >>परत तेच. कोण असा दावा करतय की आयटीवाले श्रेष्ठ आहेत? इथे तर कोणीही केला नाही. पगार योग्य आहेत याबाबतीत काही दुमत नाही. एका माणसामागे कंपनीला किती मोठा रेवेन्यु मिळतो ह्याची आधी माहिती घ्या आणि मगच बोला. असा दावा कोण उघड उघड करतं का? पण ऍटिट्यूड तोच दिसून आलाय वरच्या सगळ्या चर्चेत आणि तुमच्याही प्रत्येक पोस्टमधे. पगार योग्य की अयोग्य हा प्रश्नच नाहीये. मिळालेला भला मोठ्ठा पगार इतरांना तुच्छ लेखण्याचं कारण ठरू शकत नाही पण दुर्दैवाने ही वृत्ती खूप आयटीवाल्यांची आहे. वरच्या चर्चेत एकदोन प्रतिसाद वगळता, अगदी तुमच्या प्रतिसादांसह सगळ्यात हिच वृत्ती दिसून आलेली आहे. ही वृत्ती नसती तर आयटीवाल्यांबद्दल एवढी नाराजी दिसली नसती लोकांच्यात. तुम्हाला फक्त वाटतं की तुमच्या पैशावर जळतात लोक. पण त्या पैशासाठी तुम्ही कष्ट करता आणि बाकीचे करत नाहीत म्हणून त्यांना काही मिळत नाही. तुमच्या बबल मधे रहा तुम्ही माझं काय जातंय. असो. यापुढे तुम्ही खोटे आरोप आणि खोटे दावे एवढंच करणार असं दिसतंय आणि या फालतूपणात घालवायला वेळ माझ्याकडे नाही. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

>>माझ्या सिग्नेचरचा आणि प्रस्तुत विषयाचा अर्थाअर्थी संबंध नाही. ही सिग्नेचर त्याच पोस्टपासून आहे. आधी नाही. ही सिग्नेचरची ओळ अनेक महिन्यांपासून वाचल्याचं स्मरतं, बाकी या वादावादीमधे मला काही रस नाही हे मी आधीच सकारण सांगितलं आहे; तेव्हा चालू द्या. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

In reply to by सुचेल तसं

नीधप 31/12/2008 - 10:10
>>मग जर या चर्चेचा तो विषय नाही तर मुळात तुम्ही तो काढलाच कशाला? उदाहरण देणे अशी पण एक गोष्ट असते चर्चेत. >>आणि ज्यांनी अशी कमाई केली त्यांचा - आम्ही श्रेष्ठ आहोत - असा दावा असल्याचं तुम्ही कुठेही लिहीलं नाही. दहा ठिकाणी लिहिलंय की 'आम्हीच श्रेष्ठ' असा ऍटिट्यूड असतो. पण ते तुम्हाला वाचायचं नाहीये. समजायचं नाहीये किंवा अजून काही. >> मग ह्याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की तुमचा आक्षेप त्यांच्या कमाईवरच आहे. याला म्हणतात काही शेंडा बुडखा नसलेले आरोप. तुमच्या पैशावर आमचा डोळा नाही आणि आम्हाला त्याचं वाईटही वाटत नाही. हे पण स्पष्ट शब्दात वरती लिहिलंय. तुम्हाला ते वाचायचं नाहीये. उगाच झोडाझोडी करण्यासाठी आरोप करताय. >>माझ्या सिग्नेचरचा आणि प्रस्तुत विषयाचा अर्थाअर्थी संबंध नाही. ही सिग्नेचर त्याच पोस्टपासून आहे. आधी नाही. >>जसं तुम्ही आयटीमधे नसताना अधिकारवाणीनी त्यावर बोलता की नाही? तुम्हाला जे कोण लोक भेटले असतील आणि त्यांनी जे काय तुम्हाला सांगितलं असेल त्यावरुनच तुम्ही मतं बनवली असणार. त्याचप्रमाणे चित्रपट, मालिकांशी संबंधित लोकांना भेटून, त्यांच्याशी बोलून माझी मतं तयार झाली... मी आयटी क्षेत्राबद्दल अधिकारवाणीने बोलले? खोटे दावे करू नका. आयटीमधल्या लोकांच्या ऍटिट्यूडचा जो अनुभव आहे केवळ त्याबद्दल बोललेय. माझा अनुभव म्हणून. तुम्ही माझ्या क्षेत्रात किती आणि कसा पैसा मिळतो हे अधिकारवाणीने बोललात आणि ते तसं नाहीये हे मी सांगूनही तुमचा हेका की तुम्ही म्हणता तेच बरोबर. दोन्हीमधला फरक समजायचा प्रयत्न करा. तो तुम्ही करणार नाही हे आता उघड दिसतंय. पहिल्यापासून भांडायच्या पावित्र्यातच आहात तुम्ही. >>परत तेच. कोण असा दावा करतय की आयटीवाले श्रेष्ठ आहेत? इथे तर कोणीही केला नाही. पगार योग्य आहेत याबाबतीत काही दुमत नाही. एका माणसामागे कंपनीला किती मोठा रेवेन्यु मिळतो ह्याची आधी माहिती घ्या आणि मगच बोला. असा दावा कोण उघड उघड करतं का? पण ऍटिट्यूड तोच दिसून आलाय वरच्या सगळ्या चर्चेत आणि तुमच्याही प्रत्येक पोस्टमधे. पगार योग्य की अयोग्य हा प्रश्नच नाहीये. मिळालेला भला मोठ्ठा पगार इतरांना तुच्छ लेखण्याचं कारण ठरू शकत नाही पण दुर्दैवाने ही वृत्ती खूप आयटीवाल्यांची आहे. वरच्या चर्चेत एकदोन प्रतिसाद वगळता, अगदी तुमच्या प्रतिसादांसह सगळ्यात हिच वृत्ती दिसून आलेली आहे. ही वृत्ती नसती तर आयटीवाल्यांबद्दल एवढी नाराजी दिसली नसती लोकांच्यात. तुम्हाला फक्त वाटतं की तुमच्या पैशावर जळतात लोक. पण त्या पैशासाठी तुम्ही कष्ट करता आणि बाकीचे करत नाहीत म्हणून त्यांना काही मिळत नाही. तुमच्या बबल मधे रहा तुम्ही माझं काय जातंय. असो. यापुढे तुम्ही खोटे आरोप आणि खोटे दावे एवढंच करणार असं दिसतंय आणि या फालतूपणात घालवायला वेळ माझ्याकडे नाही. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

सुचेल तसं 31/12/2008 - 12:16
>>उदाहरण देणे अशी पण एक गोष्ट असते चर्चेत. मग (विषयबाह्य असलेल...) उदाहरण दिलं तर त्याचं सुयोग्य स्पष्टिकरण पण द्यावं.. त्यावर तुम्ही बोलूच नका वगैरे ही भाषा मग्रुरी दर्शवते. >>दहा ठिकाणी लिहिलंय की 'आम्हीच श्रेष्ठ' असा ऍटिट्यूड असतो. पण ते तुम्हाला वाचायचं नाहीये. समजायचं नाहीये किंवा अजून काही. हे तुमचं परसेप्शन झालं.. कोणीही श्रेष्ठ/कनिष्ठ असा भेदभाव केलेला नाही. >>याला म्हणतात काही शेंडा बुडखा नसलेले आरोप. तुमच्या पैशावर आमचा डोळा नाही आणि आम्हाला त्याचं वाईटही वाटत नाही. हे पण स्पष्ट शब्दात वरती लिहिलंय. तुम्हाला ते वाचायचं नाहीये. उगाच झोडाझोडी करण्यासाठी आरोप करताय. नाही ना तुम्हाला असं म्हणायचं? मग १० वर्षात आयुष्यभराची कमाई वगैरे बेसलेस वाक्यं कशाला टाकता? कमाईवर टिप्पणी करायची आणि नंतर पैशावर डोळा नाही/ त्याचं काही वाईट वाटत नाही अशी सारवासारव करायची. कृपया तुमची स्वतःची विधानं परत एकदा तपासून पहा. >>ही सिग्नेचर त्याच पोस्टपासून आहे. आधी नाही. फक्त त्याच्या आधीच्या पोस्टमधून ते मिसिंग आहे. कारण ते चुकून डिलीट झालं होतं.. पण त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या प्रत्येक पोस्टमधे आहे. >>मी आयटी क्षेत्राबद्दल अधिकारवाणीने बोलले? खोटे दावे करू नका. आयटीमधल्या लोकांच्या ऍटिट्यूडचा जो अनुभव आहे केवळ त्याबद्दल बोललेय. माझा अनुभव म्हणून. तुम्ही माझ्या क्षेत्रात किती आणि कसा पैसा मिळतो हे अधिकारवाणीने बोललात आणि ते तसं नाहीये हे मी सांगूनही तुमचा हेका की तुम्ही म्हणता तेच बरोबर. दोन्हीमधला फरक समजायचा प्रयत्न करा. तो तुम्ही करणार नाही हे आता उघड दिसतंय. पहिल्यापासून भांडायच्या पावित्र्यातच आहात तुम्ही. आयुष्याची कमाई किती असावी हे व्यक्तिगणिक बदलतं... तुम्ही हे विधान कसं करु शकता की अमुक माणसानी आयुष्यभराचा पैसा १० वर्षात कमावला? हे गणित तुम्ही कुठल्या आधारे मांडलं? >>असा दावा कोण उघड उघड करतं का? पण ऍटिट्यूड तोच दिसून आलाय वरच्या सगळ्या चर्चेत आणि तुमच्याही प्रत्येक पोस्टमधे. पगार योग्य की अयोग्य हा प्रश्नच नाहीये. मिळालेला भला मोठ्ठा पगार इतरांना तुच्छ लेखण्याचं कारण ठरू शकत नाही पण दुर्दैवाने ही वृत्ती खूप आयटीवाल्यांची आहे. वरच्या चर्चेत एकदोन प्रतिसाद वगळता, अगदी तुमच्या प्रतिसादांसह सगळ्यात हिच वृत्ती दिसून आलेली आहे. ही वृत्ती नसती तर आयटीवाल्यांबद्दल एवढी नाराजी दिसली नसती लोकांच्यात. तुम्हाला फक्त वाटतं की तुमच्या पैशावर जळतात लोक. पण त्या पैशासाठी तुम्ही कष्ट करता आणि बाकीचे करत नाहीत म्हणून त्यांना काही मिळत नाही. तुमच्या बबल मधे रहा तुम्ही माझं काय जातंय. माझ्या कुठल्या पतिसादात मी इतरांना तुच्छ लेखलं? ही वृत्ती नसती तर आयटीवाल्यांबद्दल एवढी नाराजी दिसली नसती लोकांच्यात. ह्या वाक्याला तर काहीही अर्थ नाही. सिनेमावाले लोक वाईट असतात असंही लोक म्हणतात पण ह्याचा अर्थ तुम्ही लोक वाईट होता का? स्वतःलाच पहा विचारुन. मिळेल उत्तर. >>असो. यापुढे तुम्ही खोटे आरोप आणि खोटे दावे एवढंच करणार असं दिसतंय आणि या फालतूपणात घालवायला वेळ माझ्याकडे नाही. फालतूपणा करायला वेळ नाही तर मुळात पहिला प्रतिसाद दिलाच कशाला? ह्यातूनच तुमचा खोटेपणा दिसून येतो आणि तुमचं हे वाक्यच पलायनवाद दर्शवतं... Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

नितिन थत्ते 31/12/2008 - 15:12
"जसं काही आयटीवालेच बांधकाम व्यावसायिकांकडे गेले आणि म्हणाले की ..." आय टी वाले जाऊन किम्मत वाढवा असे नाही म्हणाले पण त्यांनी मागणी फुगविण्याचे काम नक्कीच केले.

हुप्प्या 03/01/2009 - 02:38
आयटी मधे खूप पैसा मिळतो हे खरे आहे. सिनेस्टार, राजकारणी, मोठे शेतकरी ह्यान्च्या तुलनेत आयटी मधे जास्त लोक असा रग्गड पैसा मिळवतात. त्याला सुरवातीची गुन्तवणूकही तुलनेने कमीच लागते. जसे प्रशिक्षण, सामग्री वगैरे. पण हा पैसा काही ते गादीत शिवून साठवून ठेवत नाहीत. त्याना मिळालेली समृध्दी वेगवेगळ्या मार्गाने उरलेल्या समाजालाही मिळते. तेव्हा त्याविषयी इतके वाईट वाटू नये. पण आयटी उद्योगात बहुतेक काम मजूरी टाईपच असते. आपण आपली स्वतःची उत्पादने बनवत नाही. इन्फोसिस वा टीसीएस ह्या बड्या लोकानी कुठले स्वतःचे उत्पादन बनवले आहे का? मला माहित नाही. तुम्हाला माहित असल्यास सान्गा. गुगलचे सर्च इन्जिन, सनची जावा भाषा, याहूचा सर्च वा मेल, सिस्कोचे राऊटर उपकरण, नोकिया वा अन्य लोकान्चा मोबाईल असले काही स्वतःचे भारतीय उत्पादन का दिसू नये बाजारात? जेव्हा चलती असेल तेव्हा आयटीतील मोलमजुरी पैसे मिळवून देईल पण दूरगामी गुन्तवणूक हवी असेल तर आपले स्वतःचे काहीतरी बनवले पाहिजे आणि ते विकता आले पाहिजे.

विसोबा खेचर 23/12/2008 - 12:03
मी माझ्यापरीने आयटीवाल्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गुड! :) चालू द्या.. ते आयटीवाले गोडवे तयांचे गाणे हे नित्याचे तात्या म्हणे!

In reply to by अवलिया

डुप्लिकेट आय डी बर का 'तात्या' ह्यो... 'विसोबा खेचर' हा डुप्लीकेट आय डी आहे का? ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

In reply to by काहीतरीच

भिडू 23/12/2008 - 15:33
अहो "प्रा०५०३"......बोलतानां भाषा निट वापरा हो.... निदान कोणाशि बोलत आहत याचे तरि भान ठेवा....तात्या कोण आहेत हे तरि माहित आहे का तुम्हाला.. त्या मुळे प्रतिसाद देतानां विचार करा. आणी मगच प्रतिसाद द्या

यशोधरा 23/12/2008 - 12:04
चला, कोणी तरी आयटी वाल्यांची पण बाजू मांडली म्हणायची! थ्यांक्यू, थ्यांक्यू :)

मदनबाण 23/12/2008 - 12:04
मी सुध्दा नॉन आयटी मधुन आयटी मधे आलेलो आहे,,,त्यामुळे आयटीवाले किती मेहनत करतात याची जाणिव झाली !!! तुम्हाला कामाच्या मानानी उगीचच जास्त पगार मिळतो. हे म्हणजे बी.ई वाल्या माणसाने एम.बी.ए केल्याला माणसाला म्हणावे की तुझा पगार जास्त आहे..तो का जास्त आहे याचा आधी विचार करण्याची तसदी घेण्याची इच्छाच नसते मुळी... ज्या कस्ल्टंट चे बिलींग दर तासाचे असते आणि ते सुध्दा डॉलर किंवा युरो मध्ये त्याला महिन्याचा पगार मिळतो तो सुध्दा रुपयांमधे... बसून तर असता दिवसभर कंप्युटरसमोर आणि तेही एसी मधे. कॉस्ट कटींगमुळे गेली २ वर्ष शनि आणि रवि या दोन दिवसांनमधे काम करताना आमच्या इथे साध्या टेबल फॅनचा उपयोग होतो त्यामुळे नो एसी ऍट ऑल..एसी कायम असण्याचे दिवस कधीच गेलेत.. मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

यशोधरा 23/12/2008 - 12:16
ऩकळे कशास दुस्वास करीती बोटेही मोडती नावे आयटीच्या आयटीच्या योगे मिपाचा संसार सुहृदही सारे जमती जेथे धरा बोध मनी उमगो हे सत्य आयटीची साथ 'रौशनी' जगात! :D

In reply to by विसोबा खेचर

भिडू 23/12/2008 - 12:35
वरचे सगळे मुदद्दे पटलेच शिवाय डेड लाइन जवळ येते तेव्हा २/२ - ३/३ ऑफिस मधेच मुक्काम ठोकावा लागतो.तेव्हा घर-बिर ,पर्सनल लाइफ सगळ विसरायला लागते.वरुन क्लांयट च्या शिव्या खाव्या लागतात ते वेगळे.परत टेस्टर लोंकाचा ससेमिरा मागे असतोच(ते तरि काय करणार ,त्यांच्या वर पण प्रेशर असतेच). आहो कुठ्ल्याही कंपनि चा मेन उद्देश नफा हाच असतो. मग अशा कुठ्ल्या कंपनि ला पैसे वर आले असतात जे असे सहजासहजि भरभक्कम पगार देतिल. जेव्हा आम्हि त्यांना कोट्यावधी रुपये मिळवुन देतो तेव्हाच त्यातला काहिसा भाग ते पगार म्हणुन आम्हाला देतात्.एका CMM ५ लेवल च्या कंपनि मधे (मी स्वतः या कंपनि मधे २ वर्ष कामे केले आहे) सर्व साधारण पणे per day ,per employee १०,००० रुपये charge(Billing) करते कंपनि क्लांयट ला.म्हणाजेच एका employee मागे एका महिन्यात कंपनि ३ लाख रुपये कमवते.आणी या ३ लाखा पैकी आम्हाला मिळतात ६०-७० हजार रुपये(avrage). आणी क्लांयट तेवढे द्यायला तयार होतात्.कारण ते सुद्धा त्या सॉफ्टवेअर वर अब्जाबधी रुपये कमवणार असतात. त्यामुळे पगार जास्त मिळतो हा मुद्दा चुकिचा आहे. दुसरा मुद्दा ए.सी. मधे बसुन कामे करतात. अहो डोक्यावर ए.सी. असला म्हणजे सगळे आरामात असते, कामाचे प्रेशर नसते असे थोडिच आहे. आणी १०-१२ तास काँम्युंटर समोर बसुन काम करायचे म्हणजे बाकिच्या शारीरिक त्रास होतातच.

In reply to by भिडू

मदनबाण 23/12/2008 - 12:45
पर्सनल लाइफ सगळ विसरायला लागते. अगदी बरोबर...कुठे बाहेर जायचा प्लान करायचा आणि त्याच दिवशी एक्स्ट्रा शिफ्ट करण्यासाठी हापिसात हजर व्हायचे..कोणाचे बारसे,,कोणाचे लग्न,,,,,,कुठले सण्,,कुठली दिवाळी आणि दसरा??हे सगळ आयटीत आल्यावर विसराच !!! त्यांचे थॅक्स गिव्हींग,,ख्रीसमस तर अमची असते एक्स्ट्रा शिफ्ट...ते आयुष्याचा आनंद घेतात तर आम्ही शिफ्टचे तास मोजतो... आणि लोकांना फक्त पैसाच दिसतो !!! :( मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

In reply to by मदनबाण

सुनील 23/12/2008 - 15:35
कोणाचे बारसे,,कोणाचे लग्न,,,,,,कुठले सण्,,कुठली दिवाळी आणि दसरा??हे सगळ आयटीत आल्यावर विसराच (सतत दोन दिवाळ्या घर-कुटुंबापासून दूर, एकट्याने काढलेला) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by विसोबा खेचर

अवलिया 23/12/2008 - 13:28
बरं बुवा! आयटीवाले गिरेट! झालं समाधान? खुश? छयां ! तात्या तुम्ही पोपट केलात! चांगला तिकडे बेटींग घेत होतो... कोण जिंकणार... आयटी की नॉन आयटी ... चला रे चला! पळा घरी ! सामना रद्द. नॉन आयटी च्या कप्तानाने मॅच फिक्स केली. -- अवलिया अवलियाची अनुदिनी

अनिल हटेला 23/12/2008 - 13:07
डीस्क्लेमरः मी आयटीवाला नाही.. आधी मी पण असाच विचार करायचो की हे लोक म्हणजे फुल्ल टू ऐश.. बक्कळ पैसा ,एकदम जीवाची मुंबई.. पण नंतर एक मित्र आय टीत गेला .आणी त्याच्या कडे बघुन कळालं की घी देखा ,लेकीन बडगा नही देखा... जितका पैसा कमावतात्,तीतकीच मेहेनत करावी लागते.जागरण म्हणा किंवा बॉसींग म्हणा.ज्याचं जळतं त्यालाच माहिती.... असो... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अमोल केळकर 23/12/2008 - 13:38
मॅन्युफॅक्चरींग मधे दिवाळीला तगडा बोनस मिळतो. जो आयटी मधे नसतो. अहो विसरा आता ते सगळं इथं दर महिन्याला मिळतो पगार फक्त आपला मॅन्युफॅक्चरींग कामगार -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

In reply to by मराठी_माणूस

कुंदन 23/12/2008 - 16:00
असेच म्हणतो. मग, याच प्रमाणे , ज्यांना वाटते की आय टी वाल्यांना बसल्या जागी भरपुर पैसा मिळतो , त्यांनी आय टी मध्ये नोकर्‍या शोधाव्यात की. त्याला तर कोणी बंदी घातलेली नाही ना.

अनिल हटेला 23/12/2008 - 15:48
आय टी मधे जर इतके कष्ट आहेत तर तिथे का काम करता? ये बात सही है !! :? :-? बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

आय टी मधे जर इतके कष्ट आहेत तर तिथे का काम करता? कारण दिवसभर इंटरनेत वापरायला मिळते आणि ते सुद्धा भारी स्पीड आणि छान कनेक्टिवीटी... आणि त्यामुळेच दिवस भर मिपा मिपा खेळता येते :-)

In reply to by स्मिता श्रीपाद

>>आणि त्यामुळेच दिवस भर मिपा मिपा खेळता येते आम्ही तर नाही खेळत ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

In reply to by सखाराम_गटणे™

विजुभाऊ 28/12/2008 - 09:51
पुर्व लेखी परवानगीशिवाय याचा अर्थ काय? लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही. वरील वाक्य पूर्ण चुकले आहे लेखकाची पूर्व परवानगी लेखी असू शकते त्याच्या लेखी ती परवानगीच असते. अनुल्लेखापेक्षा पूर्वलेख वेगळा ठरतो आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

यशोधरा 23/12/2008 - 16:20
स्मिताताई, अन् बिन आयटी वाल्यांना पण आयटीच्या कृपेनेच येता येतं बर का मिपावर :)

In reply to by यशोधरा

मराठी_माणूस 23/12/2008 - 16:54
बरोबर आहे. रंग / ब्रश बनवणार्‍या लोकांच्या कृपे मुळेच सुंदर सुंदर चित्र काढली जातात, मुद्रण करणार्‍या लोकांच्या कृपे मुळेच उत्तोमत्तम साहित्य बनते

In reply to by यशोधरा

आज आय.टी.वाले जी काही कामं करतात (असं ऐकून आहे) त्यातून इंटरनेट, डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू, यांचा शोध लागला नाही. माझ्या माहितीत हा प्रकार उसाच्या सैन्यातल्या लोकांनी काढला.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

यशोधरा 23/12/2008 - 17:30
अगं अदिती ते तर मलाही माहित आहे :) पण आजकाल प्रत्येक हापिसातून आयटी च वेगळं डिपार्ट्मेंट असतं, जे ह्या सुविधा त्या हापिसपुरत्या व्यवस्थित चालताहेत ना हे पहात असत, अस म्हणायच होत मला. एकदम उसात कुठे शिरतेस?:)

In reply to by यशोधरा

कुंदन 23/12/2008 - 17:34
>>जे ह्या सुविधा त्या हापिसपुरत्या व्यवस्थित चालताहेत ना हे पहात असत व्यवस्थित (???) =)) त्यांनी मि पा ब्लॉक करुन ठेवल तर खेळता येईल का तुम्हाला मिपा मिपा?

In reply to by यशोधरा

त्यानी म्हनजे आम्ही आय् टी वाल्यानी जर हपिसात मिपा ब्लॉक केला तर तुम्हाला मिपा उघडता येनार नाहि मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एक 24/12/2008 - 05:03
इंटरनेट, www हे शोध उसाच्या सैन्यात लागले हे खरं आहे. आत्ताच्या लोकांना AARPA म्हणजे काय, इतकं प्रिमिटीव्ह होतं ते. ( :? www चा शोध कुठल्या तरी स्विस लॅब मधे लागला होता का?) पण आज त्याचा जसा वापर होत आहे ते आय. टी. ईजिनियर्समुळेच होत आहे. तसचं आय. टी. म्हणजे फक्त इंटरनेट, www एवढचं नाही. आय्. टी वाले या गोष्टींच्या शोधाच क्रेडीट घेत आहेत हे तुला कुठे दिसलं (तसा जर कोणी घेत असेल तर तो अर्धवट म्हटला पाहिजे). त्यामुळे वरील वाक्याचा उद्देश कळला नाही. अंतराळ संशोधनात सुद्धा प्रचंड आकडेमोड, वेगवान पद्धतीने कुठल्यातरी संगणक प्रणालीमुळेच होते ना ?(होत असावी असा अंदाज हा.. मी स्वःत बघितलं नाही त्यामुळे ठोकून देता येत नाही.) जर तसं असेल तर ते लिहिणारा कोणीतरी फोकलीचा, पैशाला पासरीभर मिळणार्‍यांपैकी असलेला, प्रोग्रॅमरच असला पाहिजे.. खालील वाक्य जेनेरीक वाक्य आहेत फक्त तुला उद्देशून नाहीत. जास्त पगार किंवा सोयी यांसाठी आय. टी. वाल्यांचा दुस्वास जरूर करा पण त्यांची व्हॅल्युपण ओळ्खा. आम्हाला दुस्वास, तुच्छता नवीन नाहीत.. १९९८-९९ साला पर्यंत संगणक किंवा इलेक्ट्रॉनिक्स ला जाणारा म्हणजे मेकॅनिकल, मेडीकल यांसारख्या ग्लॅमरस शाखेला एडमिशन न मिळवता आलेला विद्यार्थी अश्या तुच्छतेने बघायचे. आता दुस्वास करतात. काही काही प्रतिसाद बघितले तर हसायला येतं. आपणपण खपणार आहोत याकडे लक्ष नाही पण आय. टी. वाला खपतो आहे..ना "खपू दे..**व्यांची तीच लायकी होती, माजले होते साले " म्हणायला मोकळे. चालायचच कभी उपर कभी निचे.. -इलेक्ट्रॉनिक्स-संगणक अभियंता.

In reply to by एक

जेनेरीक आय.टी.वाल्यांकडून जे काही ऐकलं आहे, त्यावरून माझे सगळे अंदाजः (www चा शोध कुठल्या तरी स्विस लॅब मधे लागला होता का?) असू शकेल, माझी माहिती फारच तोकडी आहे. पण मुद्दा एवढाच होता की आंतरजाल, इमेल, www या गोष्टींचे "शोध" आणि जेनेरीक आय.टी.वाले करतात ती कामं यात प्रचंड फरक आहे का नाही? खालील वाक्य जेनेरीक वाक्य आहेत फक्त तुला उद्देशून नाहीत. पण त्यात मी पण येते ना? अंतराळ संशोधनात सुद्धा प्रचंड आकडेमोड, वेगवान पद्धतीने कुठल्यातरी संगणक प्रणालीमुळेच होते ना ? अर्थातच! पण मी वापरते ती सगळी सॉफ्टवर्स खगोलशास्त्रज्ञांनीच लिहिलेली आहेत. खगोलसंशोधनात (किमान भारतातरी) एवढा पैसा नाही की जेनेरीक आय.टी.वाल्यांकडून सॉफ्टवर्स लिहून घ्यावीत. (आमच्याकडे बर्‍याचशा तरूण, वय वर्ष ~ ४५, खगोलअभ्यासकांना संगणकाबद्दल किमान माहिती असते की आपल्याला हव्या त्या गोष्टी आपल्या आपणच करु शकतो, अगदी ऑपरेटींग सिस्टम इंन्स्टॉल करण्यापासून ते स्पीकर्सची कनेक्शन करेपर्यंत! अगदी सोप्या मराठीत सांगायचं झालं तर उठल्या-बसल्या सिस्टम ऍडमिनवाल्याला बोलावून आणावं लागत नाही.) जास्त पगार किंवा सोयी यांसाठी आय. टी. वाल्यांचा दुस्वास जरूर करा पण त्यांची व्हॅल्युपण ओळ्खा. दुस्वास अजिबातच नाही. पैसे छापायचे असते तर मी नक्कीच संशोधनाकडे वळले नसते, मला काय हवंय आणि काय आवडतं याचा विचार करुन मी या क्षेत्रात आले. आणि ही पण प्रांजळ कबूलीही की माझा नवरा माझ्यापेक्षा बरेच जास्त कमावतो म्हणून मला आज माझं विद्यार्थी म्हणून युकेमधे जे राहणीमान होतं ते बदलायला लागत नाही. आय.टी.वाल्यांचा दुस्वास करुन काहीही मिळणार नाही, त्यामुळे तो करावाच का? आणि आम्हाला खगोलशास्त्रात शिकवतात तसं, तुलना समान गोष्टींची करावी, (Compare like to like!) असमान नाही! तक्रार एवढीच आहे महिन्याला ५० हजार मिळवणार का १६ हजार असा प्रश्न वयाच्या तिसाव्या वर्षी विचारला तर माणूस ५० हजार असं उत्तर देतो. महागाई कोणामुळे वाढली हा प्रश्न मी विचारत नाही, पण महिना १६ आणि २० हजारात, एका छोट्याश्या खोलीत घर-संसार मांडून तू "तारे मोजणार" का "मान मोडेस्तोवर" काम करुन महिना ५० हजार कमावणार याचं उत्तर सोपं आहे ना? प्रगती फक्त एकाच दिशेत, क्षेत्रात होत आहे आणि हे चांगलं आहे का? शरीरासाठी व्यायाम करताना फक्त दंडाचेच व्यायाम केले आणि तुंदीलतनू असेल तर ते कसं असेल? हा प्रश्न जेनेरीक आय.टी.वाल्यांसाठी नाही, तर खरंतर "पॉलिसी मेकर्स"साठी आहे. ज्यांच्या हातात ससा नाही त्यांनी स्वतःला पारधी म्हणवून घेऊ नये.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अवलिया 24/12/2008 - 12:33
महागाई कोणामुळे वाढली हा प्रश्न मी विचारत नाही, पण महिना १६ आणि २० हजारात, एका छोट्याश्या खोलीत घर-संसार मांडून तू "तारे मोजणार" का "मान मोडेस्तोवर" काम करुन महिना ५० हजार कमावणार याचं उत्तर सोपं आहे ना? तारे संपणार नाहीत बै. पण ५०००० चे ५००० पण होवु शकतात... डॉलर.... कोसळ्णार आहे. (हे भाकित आहे. जास्त सिरीयसली घेवु नये. आमची भाकिते खरी होतातच असे नाही) -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एक 24/12/2008 - 23:40
>>खालील वाक्य जेनेरीक वाक्य आहेत फक्त तुला उद्देशून नाहीत. >>पण त्यात मी पण येते ना? डिपेन्डस तुला ते लागू होत असतील तर तू त्यात येतेस..तुझा बाकिचा प्रतिसाद बघितला तर येत नसावीस पण मला ते आधी माहित नव्हतं म्हणून "जेनेरीक" वाक्य. >>दुस्वास अजिबातच नाही. पैसे छापायचे असते तर मी नक्कीच संशोधनाकडे वळले नसते, मला काय हवंय आणि काय आवडतं याचा विचार करुन मी या क्षेत्रात आले. आणि ही पण प्रांजळ कबूलीही की माझा नवरा माझ्यापेक्षा बरेच जास्त कमावतो म्हणून मला आज माझं विद्यार्थी म्हणून युकेमधे जे राहणीमान होतं ते बदलायला लागत नाही. आय.टी.वाल्यांचा दुस्वास करुन काहीही मिळणार नाही, त्यामुळे तो करावाच का? धन्यवाद. पण ही मॅच्युरीटी मला इथल्या बर्‍याच प्रतिसादात आढळली नाही. इथे तर ब्लेम गेम सुरू झालेला दिसतो.. आय. टी खाली गेलं तर बाकिची फिल्ड्स (टाटा मोटर्स आठवड्यातून २-३ दिवस बंद असते..ते का?) पण खाली जाणार आहेत हे लोकांना कळत नसावं त्या शिवाय ""खपू दे..**व्यांची तीच लायकी होती, माजले होते साले "" अशी वाक्य दिसली नसती..

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>> पण मुद्दा एवढाच होता की आंतरजाल, इमेल, www या गोष्टींचे "शोध" आणि जेनेरीक आय.टी.वाले करतात ती कामं यात प्रचंड फरक आहे का नाही? हो नक्कीच फरक आहे पण म्हणून जेनेरिक आय्.टी.चे महत्व कमी होत नाही. उदा. औषधांचा शोध जनरल फिजिशियनने लावला नाही तरी तो ती औषधं कशी / कधी वापरायची ह्याचा योग्य सल्ला देतो (किंवा तसं अपेक्षित असतं.) आता जनरिक डॉक्टर्सची फी आपण देतोच ना... तो जी म्हणेल ती ? !!!! -------- दुसरं म्हणजे आयटीचे पगार वगैरे हा सगळा मागणी - पुरवठा खेळ आहे. ------- महत्वाचं म्हणजे आयटी म्हणजे फक्त programming or systems analysis or sys admin or testing or implementation असं नसतं... हे सगळं एकूण मिळून कंपनीचा / उद्योगाचा खर्च कमी करणे आणि/किंवा उत्पन्न वाढवणे ह्यासाठी कसं वापरलं जातंय ह्यावर आयटीचे खरं यश आहे.

In reply to by संदीप चित्रे

हो नक्कीच फरक आहे पण म्हणून जेनेरिक आय्.टी.चे महत्व कमी होत नाही. हे थोडं मान्य आहे. पण "आय.टी. नसतं तर मिपा-मिपा खेळता आलं नसतं" हे वाक्य थोडं अतिरंजित वाटतं. शिवाय आय.टी. मुळे (च ला महत्त्व आहे) हे शक्य आहे असा जो सूर वाटला तो आंतरजाल, डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू इत्यादींच्या संशोधकांवर अन्यायकारक वाटला म्हणून बोलले. खुद के सांथ बातां: व्यवहारात उपयुक्त असणार्‍या अनेक गोष्टी, वस्तू, सेवांसाठी काम करणारे अनेक लोक आहेत, बहुतांश असेच लोक इथे (आणि समाजातही) आहेत. डोक्यातला किडा शमवायला म्हणून व्यवहारात संपूर्णपणे (?) अनुपयुक्त गोष्टींवर काम करून काय आवाज चाललेला आहे तुझा? (संगणक वापरून तारे गणणारी) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>पण "आय.टी. नसतं तर मिपा-मिपा खेळता आलं नसतं" हे वाक्य थोडं अतिरंजित वाटतं. हे वाक्य अतिरजिंत वैगरे नाही. सगळे आय टी वाले एकमेकांना मदत करुनच सिस्टीम बनते. प्रत्येकाचा थोडा तरी हातभार असतोच. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

In reply to by सखाराम_गटणे™

हे वाक्य अतिरजिंत वैगरे नाही.सगळे आय टी वाले एकमेकांना मदत करुनच सिस्टीम बनते. प्रत्येकाचा थोडा तरी हातभार असतोच. गटणे, उलटा विचार करा, जेनेरीक आय.टी.वाले नसते तर काय इंटरनेट, इमेल, ब्लॉगिंग, शेअरवर्स, फ्री सॉफ्टवर्स हे काही नसतंच का? थोडा हातभार असणं वेगळं असतं, (त्याला खारीचा वाटा म्हणतात) आणि "शो स्टॉपर" असणं वेगळं असतं. मूळ संशोधकाशिवाय घोडं अडतं, पण टर्नर-फीटरचं काम थोड्या ट्रेनींगच्या सहाय्याने कोणालाही जमतं. कोंबडं झाकलं म्हणून तांबडं उगवायचं रहात नाही. आणि हो गटणे, तुमचा कॉपीराईट आतातरी रिन्यू करा, २००९ उजाडलं. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एक 01/01/2009 - 23:58
तुझे इतर लेख / अभिप्राय वाचून वाटत होतं कि एखाद्या क्षेत्राची व्यवस्थित माहिती नसताना तू बेधडक विधानं करत नाहीस म्हणून. पण खालच्या वाक्यांनी तडा गेला.. "..मूळ संशोधकाशिवाय घोडं अडतं, पण टर्नर-फीटरचं काम थोड्या ट्रेनींगच्या सहाय्याने कोणालाही जमतं. कोंबडं झाकलं म्हणून तांबडं उगवायचं रहात नाही..." यातला पहिला क्लॉज खरा आहे. पण.. "..पण टर्नर-फीटरचं काम थोड्या ट्रेनींगच्या सहाय्याने कोणालाही जमतं..." ???? हे असं बेधडक विधान करायला तू कधी ऍप्लिकेशन लेव्हल - सर्व्हर लेव्हल प्रोग्रॅमिंग केलं आहेस का? हे करायला अगदीच संशोधक लेव्हलच नाही पण नक्कीच टर्नर-फिटर पेक्षा थोडं जास्त नॉलेज लागतं. दुसरा मुद्दा, इतके शोध लागत आहेत, पेटंट्स घेतली जात आहेत मग ती सगळीच्या सगळी कमर्शियल डोमेन मधे का दिसत नाही. म्हणजे कुठेतरी संशोधकांना सुद्धा "टर्नर्-फिटर, कोंबड्या" ची गरज आहेच.. नाहीतर त्या संशोधनाचा उपयोग काय? साधं उदाहरण.. नॅनो टेक. चा शोध लागला आहे. पण जो पर्यंत सामन्य वापरात ते येत नाही तो पर्यंत त्याचा काय उपयोग? अशी प्रॉडक्टस तयार करण्यासाठी कुठल्याही येरा-गबळ्याला "थोडसं" ट्रेनींग देवून जॉब मिळणार आहे का? असं असेल तर आपला रेझ्यूमे पहिला. नाहीतरी प्रोग्रॅमिंग करून थोडा बोअर झालोच आहे.

झकासराव 23/12/2008 - 16:39
आयटी विरुद्ध नॉन आयटी असा सामना ह्याआधीच एकदा रंगुन (?) गेला आहे. धमाल ने चर्चा सुरु केली होती. बरेच महिने झाले त्याला. काहि फायदे काहि तोटे सगळीकडेच. ग्रे शेड लक्षात ठेवली तर चर्चा भरकटणार नाही. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

अप्पासाहेब 23/12/2008 - 17:20
एक जमाना होता जेव्हा 'टेल्को' तल्या झाडुवाल्याला सुध्दा १०००० पगार होता आणि त्याच वेळी ईतरत्र मैनेजर असणा-यांना ५-६००० रु मिळत. त्यावेळी का नाही आरडा ओरड झाली? विमानाच्या पायलट्स ना भरपुर पगार असतो त्या तुलनेत यस्टी च्या डायवर ला काय पगार मिळतो? कामाचे स्वरुप, प्रशिक्षीत माणसांची उपलब्धता , कंपनीला मिळणारा नफा ह्यावर पगार ठरत असतो. (आयटी वाला) आप्पा. लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते

अंतु बर्वा 23/12/2008 - 22:26
आयटी मुळे झालेले फायदे पण लक्षात घ्यायला हवेत... आज रेल्वे ची जी Centralised Reservation System आहे ज्यामुळे देशाच्या कानाकोपर्यातुन आरक्षण करता येतं, ते याचमुळे ना... मान्य, की पगार बाकीच्या क्षेत्रांपेक्षा जास्त मिळतो, पण कामाचं स्वरुप पाहिल्यास का ते हि लक्षात येईल.... आणी भारत आज ज्या आर्थीक महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे, त्यात थोडाफार वाटा आयटी वाल्यांचा सुद्धा आहेच की....

उदय 23/12/2008 - 23:19
>> तुम्हाला कामाच्या मानानी उगीचच जास्त पगार मिळतो. यामध्ये २ मुद्दे आहेत. पहिला मुद्दा "उगीचच" मिळतो. यावर माझे मत आहे की कोणी पैसे उगीचच जास्त देत नाही. मागणी आणी पुरवठा या तत्वाने पैसे दिले जातात (बहुतेक वेळा). उदाहरणार्थ माझ्या कंपनीत बरेच कंसल्टन्ट येतात ज्याना आम्ही तासाला $२५० किंवा जास्त देतो. कारण काय? मागणी आणी पुरवठा. दुसरा मुद्दा "जास्त पगार मिळतो". या मताशी मी थोडाफार सहमत आहे. मी एके ठिकाणी नोकरीला होतो, तिथे पी.एच.डी. फिजिक्स माणसाला वर्षाला $३३,००० पगार होता. मला सांगा, आय.टी.चे काम पी.एच.डी. फिजिक्स पेक्षा फार महान असते का? मला भारतातील पगार काय आहेत याची फार कल्पना नाही, पण १-२ उ.दा.माहीत आहेत, सी.ए. झालेला आय.टी.च्या तुलनेत १/३ पगार कमवतो. आय.टी.वाला सी.ए.च्या ३ पट हुशार असतो का किंवा ३ पट आउटपुट देतो का?

In reply to by उदय

कुंदन 23/12/2008 - 23:24
>>१-२ उ.दा.माहीत आहेत अशी ही उदाहरणे आहेत बी कॉम झालेला बी ई पेक्षा जास्त कमावतो. शेवटी ज्याची त्याची क्षमता , कामातले कौशल्य , हर हुन्नरीपणा यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबुन असतात.

In reply to by कुंदन

उदय 24/12/2008 - 04:36
शेवटी ज्याची त्याची क्षमता , कामातले कौशल्य , हर हुन्नरीपणा यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबुन असतात. चूक. डिमांड-सप्प्लाय, योग्य वेळी योग्य ठिकाणी व योग्य क्षेत्रात असणे, साहेबाची मर्जी असणे, चांगला ब्रेक मिळणे यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही स्वत:चे मालक असाल तरच उत्तम. नाहीतर नोकरदार आणी वेश्या यात काही फार फरक नाही. फरक इतकाच की एक जण शरीर विकतो आणि दुसरा बुद्धी. एकाची किम्मत अनुभवानंतर कमी होते तर एकाची वाढते. बस्स. (Sorry for such harsh words, but I think that is reality.)

In reply to by उदय

कुंदन 24/12/2008 - 10:11
>>योग्य वेळी योग्य ठिकाणी व योग्य क्षेत्रात असणे हे केवळ आय टी च नव्हे तर सर्वच क्षेत्रांसाठी लागु होईल.

उदय 24/12/2008 - 05:16
तुम्हाला कामाच्या मानानी उगीचच जास्त पगार मिळतो.
यामध्ये २ मुद्दे आहेत. पहिला मुद्दा "उगीचच" मिळतो. यावर माझे मत आहे की कोणी पैसे उगीचच जास्त देत नाही. मागणी आणी पुरवठा या तत्वाने पैसे दिले जातात (बहुतेक वेळा). उदाहरणार्थ माझ्या कंपनीत बरेच कंसल्टन्ट येतात ज्याना आम्ही तासाला $२५० किंवा जास्त देतो. कारण काय? मागणी आणी पुरवठा. दुसरा मुद्दा "जास्त पगार मिळतो". या मताशी मी थोडाफार सहमत आहे. मी एके ठिकाणी नोकरीला होतो, तिथे पी.एच.डी. फिजिक्स माणसाला वर्षाला $३३,००० पगार होता. मला सांगा, आय.टी.चे काम पी.एच.डी. फिजिक्स पेक्षा फार महान असते का? मला भारतातील पगार काय आहेत याची फार कल्पना नाही, पण १-२ उ.दा. भारतात माहीत आहेत, सी.ए. झालेला आय.टी.च्या तुलनेत १/३ पगार कमवतो. आय.टी.वाला सी.ए.च्या ३ पट हुशार असतो का किंवा ३ पट आउटपुट देतो का?
आयटी मधला कॉस्ट टू द कंपनी आणि इन हॅंड/टेक होम मधला फरक हा तुलनेने इतर क्षेत्रांमधल्या (मॅन्युफॅक्चरींग, अध्यापन, इत्यादि) फरकापेक्षा बर्‍यापैकी मोठा असतो. कारण आयटीमधे performance pay/variable pay हा पगारातला एक मोठा भाग असतो. तो केवळ व्यक्तिगतच नाही तर कंपनीच्या performance वर पण ठरत असतो. त्यामुळे तो कायम वरखाली होत असतो.
मॅन्युफॅक्चरींग मधे दिवाळीला तगडा बोनस मिळतो. जो आयटी मधे नसतो.
ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. मार्केटिंगचा माणूस पण कमिशनवर अवलंबून असतो. माल विकला नाही तर खाणार काय? माझा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण एखादी नोकरी घेतो तेव्हा आपण एक रिस्क घेतच असतो की आपला पगार कसा असणार आहे ते? (फिक्ड की बदलणारा). And you cannot claim a bonus as a matter of right. पण तरीही मी म्हणेन की आयटीमध्ये बक्कळ पैसा मिळतो. आणि कष्टाच्या तुलनेत तर खूपच जास्त.
डेड लाइन जवळ येते तेव्हा २/२ - ३/३ ऑफिस मधेच मुक्काम ठोकावा लागतो.तेव्हा घर-बिर ,पर्सनल लाइफ सगळ विसरायला लागते.वरुन क्लांयट च्या शिव्या खाव्या लागतात ते वेगळे.परत टेस्टर लोंकाचा ससेमिरा मागे असतोच(ते तरि काय करणार ,त्यांच्या वर पण प्रेशर असतेच).
या मताशी १००% नाही तर २००% सहमत. पण हा आयटी प्रोग्रामर किंवा टेस्टर चा दोष नाही तर Project मैनेजमेंट चा दोष आहे.
कंपनी क्लांयट ला.म्हणाजेच एका employee मागे एका महिन्यात कंपनि ३ लाख रुपये कमवते.आणी या ३ लाखा पैकी आम्हाला मिळतात ६०-७० हजार रुपये(average). आणी क्लांयट तेवढे द्यायला तयार होतात्.कारण ते सुद्धा त्या सॉफ्टवेअर वर अब्जाबधी रुपये कमवणार असतात.
मॅन्युफॅक्चरींगमध्ये खूप जास्त भांडवल लागते, आय.टी. मध्ये खूपच कमी. मग तू एखादी कंपनी का सुरू करत नाहीस? आपण ज्या प्रमाणात रिस्क घेतो त्या प्रमाणात पैसे मिळणार ना? २ रा जास्त पैसे कमावतो, म्हणून आपण बोलतो (आयटी आणी बिगर आयटी) पण आपल्याला फक्त १ च बाजू दिसते (किंवा आपण १ च बाजू बघतो). बिन-आयटीवाले कष्ट करत नाहीत का? कमी कष्टात सगळ्यानाच पैसे हवे असतात, पण ज्यांच्याकडे कमी पैसे आहेत किंवा अजिबातच नाहीत त्याना पैशाचे महत्व जास्त कळते. ज्याला जे जमते, जे पटते, ते त्याने करावे. आपण इथे चर्चा आणी वादावादी करत बसलेलो असताना ते हैदराबादी लोक ट्रेनिंग घेऊन, खोटे resume बनवून नोकरी कशी मिळेल ते बघत असतील. काही वर्षानी मग आपण "हे गुलटी लोक इतके पुढे कसे गेले" या विषयावर चर्चा करू. (आयटी. वाला) उदय

In reply to by उदय

सुचेल तसं 24/12/2008 - 08:21
>>सी.ए. झालेला आय.टी.च्या तुलनेत १/३ पगार कमवतो काहीच्या काही... आयटीमधे असणार्‍याला जर ४००००/- पगार असेल तर तुम्हाला असं म्हणायचं आहे का की चार्टर्ड अकाऊंटंटला १/३ म्हणजे १३३३३/- रुपये मिळतात. आणि जरी असं क्षणभर मानलं की असेल एखाद्या सी.ए. चा पगार कमी, तरीही १-२ उदाहरणावरुन सरसकट असं विधान नाही करता येत की सी.ए. झालेला आय.टी.च्या तुलनेत १/३ पगार कमवतो. >>बिन-आयटीवाले कष्ट करत नाहीत का? असं आत्तापर्यंतच्या प्रतिसादामधे कोणीही म्हटलेलं नाही. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

वेलदोडा 24/12/2008 - 12:21
म.टा. वर वाचलं.... ''पूर्वी जो माणूस आपला संसार, आपलं वैयक्तिक आयुष्य, सुखसोयी-चैनी, अन्न, हास्य अशा सर्व भौतिक आणि ऐहिक गोष्टींचा त्याग करे त्या माणसाला 'संत' असं संबोधलं जायचं... ... आता तसाच त्याग करणा-या माणसाला, 'आयटी प्रोफेशनल' म्हटलं जातं! ''

ऍडीजोशी 24/12/2008 - 13:18
समय से पहले और नसीब से ज्यादा, किसी हो कुछ नहीं मिलने वाला. - भगवान श्रीकॄष्ण

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

चष्मा 24/12/2008 - 15:46
आय टी वाल्यांसाठी डीलीव्हरी से पेहले और तेरे म्यानेजर से ज्यादा कुछ नही मिलता !!

नितिन थत्ते 29/12/2008 - 15:37
आय टी मधला जास्त पगार हा बहुतेक ग्राहक विदेशी असून ते डॉलर मध्ये पैसे देतात त्यातले अर्धे जरी इथल्या कम्पनीने दिले तरी भारतातील इतर लोकान्च्या पगारापेक्षा तो खूप जास्त दिसतो. मी पण एक आय टी वालाच आहे. आय टी वाल्यान्मुळे महागाई वाढली हे म्हणणे एकदम मान्य.

नीधप 29/12/2008 - 20:23
>>डेड लाइन जवळ येते तेव्हा २/२ - ३/३ ऑफिस मधेच मुक्काम ठोकावा लागतो.तेव्हा घर-बिर ,पर्सनल लाइफ सगळ विसरायला लागते.वरुन क्लांयट च्या शिव्या खाव्या लागतात ते वेगळे.परत टेस्टर लोंकाचा ससेमिरा मागे असतोच(ते तरि काय करणार ,त्यांच्या वर पण प्रेशर असतेच). >>दुसरा मुद्दा ए.सी. मधे बसुन कामे करतात. अहो डोक्यावर ए.सी. असला म्हणजे सगळे आरामात असते, कामाचे प्रेशर नसते असे थोडिच आहे. आणी १०-१२ तास काँम्युंटर समोर बसुन काम करायचे म्हणजे बाकिच्या शारीरिक त्रास होतातच. >>अगदी बरोबर...कुठे बाहेर जायचा प्लान करायचा आणि त्याच दिवशी एक्स्ट्रा शिफ्ट करण्यासाठी हापिसात हजर व्हायचे..कोणाचे बारसे,,कोणाचे लग्न,,,,,,कुठले सण्,,कुठली दिवाळी आणि दसरा??हे सगळ आयटीत आल्यावर विसराच !!! त्यांचे थॅक्स गिव्हींग,,ख्रीसमस तर अमची असते एक्स्ट्रा शिफ्ट...ते आयुष्याचा आनंद घेतात तर आम्ही शिफ्टचे तास मोजतो... आणि लोकांना फक्त पैसाच दिसतो !!! जामच ओळखीचे वाटतायत वरचे तीनही मुद्दे. अर्थात शेवटचा पैशाचा उल्लेख सोडून. कुठे बरं ऐकलंय? अरे हो माझ्याच क्षेत्रात की. माझ्या बदनाम क्षेत्रात आम्ही सगळेच यातून जात असतो हो. कौतुक काय त्याचं? फक्त यातून जात असलो तरी पैसा मात्र कुणाच्या डोळ्यावर यावा इतका नाही मिळत. अर्ध्याहून अधिक ठिकाणी बुडतोच. सुरूवातीच्या काळात तर हे सगळं अति होत असतं आणि पहिला महिना संपताना पगार नाही पडत हो हातात. आणि हे काही नवीन नाही. त्याबद्दल तक्रारही नाही. अंगवळणी पडलंय. सगळे खाचखळगे, सगळे धोके, त्रास ह्या सगळ्या गोष्टींची तयारी ठेवूनच आम्ही उतरतो या क्षेत्रात. कैक वर्षं हे असंच आहे. पण ते इतकं कौतुकाचं आहे हे आयटीवाल्यांमुळेच हल्लीच कळलं. >>जितका पैसा कमावतात्,तीतकीच मेहेनत करावी लागते.जागरण म्हणा किंवा बॉसींग म्हणा.ज्याचं जळतं त्यालाच माहिती. इतका बिचारा सूर कशासाठी? >>जास्त पगार किंवा सोयी यांसाठी आय. टी. वाल्यांचा दुस्वास जरूर करा पण त्यांची व्हॅल्युपण ओळ्खा. आम्हाला दुस्वास, तुच्छता नवीन नाहीत. आयटीवाले दुसर्‍यांना तुच्छ लेखत नाहीत असं काही म्हणणं आहे का यातून? कारण वरच्या अनेक प्रो आयटी पोस्टस मधे इतरांबद्दल तुच्छता, काम काय ते आपणच करतो बाकीचे नाहीत असे सूर दिसले. >>आपणपण खपणार आहोत याकडे लक्ष नाही पण आय. टी. वाला खपतो आहे..ना "खपू दे..**व्यांची तीच लायकी होती, माजले होते साले " म्हणायला मोकळे. माझा वरचा मुद्दा सोदाहरण सिद्ध... >>शेवटी ज्याची त्याची क्षमता , कामातले कौशल्य , हर हुन्नरीपणा यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबुन असतात. उदाहरण क्रमांक २ >>''पूर्वी जो माणूस आपला संसार, आपलं वैयक्तिक आयुष्य, सुखसोयी-चैनी, अन्न, हास्य अशा सर्व भौतिक आणि ऐहिक गोष्टींचा त्याग करे त्या माणसाला 'संत' असं संबोधलं जायचं...... आता तसाच त्याग करणा-या माणसाला, 'आयटी प्रोफेशनल' म्हटलं जातं! '' संत लोकांना पण पगार मिळायचे वाटतं यासाठी? कोणाचे पगार डोळ्यावर येत नाहीयेत. पैशासाठीच सगळं काही असतं तर माझ्या क्षेत्रात येऊन दळीद्री सिरियल्सच्या दळणाला वाहून घेता आलं असतं. तेही केलं नाही कारण चांगलं काम करण्याची आच आहे. असो. तो वाद निराळा. पण कामातल्या हार्डशिपचं नको इतकं उदात्तीकरण वाचलं आणि विनोदी वाटलं. कारण अशी हार्डशिप करतानाही आपला उदरनिर्वाहच जेमतेम सावरू शकणारे, अत्यंत चांगल्या दर्जाचे, शिक्षित एडिटर्स, साउंड डिझायनर्स, कॅमेरामन, दिग्दर्शक मी सतत पहात असते. तुम्हाला निदान नोकरी लागताक्षणी पगाराची खात्री असते. इथे सुरूवातीची ७-८ वर्ष (किमान.. कमाल कितीही!) तरी पैसा जमवणं अवघड असतं. आणि शेवटी एकदा काम थांबवलं की संपलं बँकेतली गंगाजळी असते तोवर असते. रिटायरमेंट प्लॅन इत्यादी गोष्टींचा संबंध नसतो हो. तेव्हा कामाचे प्रचंड तास, प्रोफेशनल हॅझार्डस इत्यादी गोष्टींचं कौतुक जरा जास्तच होतंय ते थांबवावं ही विनंती. (यावर सगळे आयटीवाले तुटून पडतील माझ्यावर पण आहेत ही माझी मतं त्याला कोण काय करणार?) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

सुचेल तसं 30/12/2008 - 09:32
>>''पूर्वी जो माणूस आपला संसार, आपलं वैयक्तिक आयुष्य, सुखसोयी-चैनी, अन्न, हास्य अशा सर्व भौतिक आणि ऐहिक गोष्टींचा त्याग करे त्या माणसाला 'संत' असं संबोधलं जायचं...... आता तसाच त्याग करणा-या माणसाला, 'आयटी प्रोफेशनल' म्हटलं जातं! '' >>संत लोकांना पण पगार मिळायचे वाटतं यासाठी? ज्यानी कोणी हे लिहीलं होतं ते केवळ विनोद म्हणून. हा विनोद मागे म.टा.मधे आला होता आणि प्रतिसाद देणार्‍यानि तो इथे सगळ्यांसोबत शेअर केला. कोणाचाच असा दावा नाहीये की आयटीवाले संत असतात. >>कोणाचे पगार डोळ्यावर येत नाहीयेत. पैशासाठीच सगळं काही असतं तर माझ्या क्षेत्रात येऊन दळीद्री सिरियल्सच्या दळणाला वाहून घेता आलं असतं. तेही केलं नाही कारण चांगलं काम करण्याची आच आहे. असो. तो वाद निराळा. कोणी कुठले क्षेत्र निवडावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न/आवड आहे. तुमच्याप्रमाणेच प्रत्येकाला वाटतं की तो/ती जे काम करत आहे ते चांगलं आहे. >>असो. तो वाद निराळा. पण कामातल्या हार्डशिपचं नको इतकं उदात्तीकरण वाचलं आणि विनोदी वाटलं. तुम्ही केवळ एकच बाजु पहात आहात. आयटीवाले पैशाला पसारीभर मिळतात हे वाक्यही इथेच बोललं गेलं आहे. मी (आणि प्रतिसाद देणार्‍या मित्र-मैत्रिणींनी) केवळ त्यांना आपल्या क्षेत्राबद्दल काय वाटतं ते मांडलं आहे. कोणीही असा दावा केला नाही की आयटीमधे कष्ट घ्यावे लागतात. बाकीच्या क्षेत्रांमधेही कौशल्य लागतचं की. >>तुम्हाला निदान नोकरी लागताक्षणी पगाराची खात्री असते. इथे सुरूवातीची ७-८ वर्ष (किमान.. कमाल कितीही!) तरी पैसा जमवणं अवघड असतं. ती सर्व नोकरदारांना असते. चित्रपट/दूरचित्रवाणी माध्यम ह्यांची तुलना करणंचं चुकीचं आहे. मान्य की तुम्हाला पहिली ७-८ वर्षं संघर्ष करावा लागतो. तेवढा पिरीयड तुम्हीही गृहीत धरलाच असतो. पण सेटल झाल्यावर रगड्ड पैसा मिळतो की. आज एवढ्या मालिका वेगवेगळ्या वाहिन्यांवर अव्याहतपणे चालू असतात. त्यामुळे पुर्वीपेक्षा रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. एका वर्षात कितीतरी मराठी/हिंदी आणि इतर प्रादेशिक चित्रपट प्रदर्शित होतात. कलावंत/तंत्रज्ञ गुणी असेल तर त्याला यश मिळाल्यावाचून रहाणार नाही. (उदा: कला दिग्दर्शक नितीन देसाई) >>आणि शेवटी एकदा काम थांबवलं की संपलं बँकेतली गंगाजळी असते तोवर असते. रिटायरमेंट प्लॅन इत्यादी गोष्टींचा संबंध नसतो हो आम्हाला तरी कुठे पेन्शन मिळतं? रिटायरमेंट प्लॅन कोणीही घेऊ शकतं. ती काही आयटीवाल्यांची मक्तेदारी आहे असं थोडचे? तुम्ही लोकंसुद्धा ह्यात पैसा गुंतवू शकता. त्यामुळे तुमचा हा मुद्दा अगदी निरर्थक आहे. >>तेव्हा कामाचे प्रचंड तास, प्रोफेशनल हॅझार्डस इत्यादी गोष्टींचं कौतुक जरा जास्तच होतंय ते थांबवावं ही विनंती. त्याचप्रमाणे ऊठसुठ आयटीवाल्यांना धारेवर धरणं थांबवावं ही आमची विनंती. >>(यावर सगळे आयटीवाले तुटून पडतील माझ्यावर पण आहेत ही माझी मतं त्याला कोण काय करणार?) तुमच्या उत्तरांना दिलेली प्रत्युत्तरं म्हणजं तुटून पडणं खचितचं नाही. संवाद दोन्ही बाजूनी व्हायला हवा. खरं ना? अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

In reply to by नीधप

एक 31/12/2008 - 23:52
कॉमेंट केली आहे म्हणून विचारतो. >>आयटीवाले दुसर्‍यांना तुच्छ लेखत नाहीत असं काही म्हणणं आहे का यातून? कारण वरच्या अनेक प्रो आयटी पोस्टस मधे इतरांबद्दल तुच्छता, काम काय ते आपणच करतो बाकीचे नाहीत असे सूर दिसले. कुठल्या पोस्ट मधे कुठलं वाक्यात हे सूर दिसले. ते जरा नमूद करा प्लिज. >>आपणपण खपणार आहोत याकडे लक्ष नाही पण आय. टी. वाला खपतो आहे..ना "खपू दे..**व्यांची तीच लायकी होती, माजले होते साले " म्हणायला मोकळे. यात तुच्छता का दिसली.? तुम्ही सोदाहरण वगैरे म्हणत आहात ते का? ते कळत नाही. ".."खपू दे..**व्यांची तीच लायकी होती, माजले होते साल".." ही एका नॉन्-आय टी वाल्याची कॉमेंट आहे. मी एवढच म्हणालो की " आपण सगळेच बुडणार्‍या जहाजात आहोत. सगळ्याच क्षेत्रात मंदी आली/येणार आहे. हे अश्या कॉमेंटस लिहणार्‍याला कळत आहे का?" >>शेवटी ज्याची त्याची क्षमता , कामातले कौशल्य , हर हुन्नरीपणा यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबुन असतात. >>उदाहरण क्रमांक २ हे तर एक प्लेन स्टेटमेंट आहे..असं कुठलं क्षेत्र आहे की ज्यात तुमची क्षमता, कौशल्य, काहीही असु दे, तुम्हाला मानधन एकच मिळेल? मला माहित नाही तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम करता, पण तुमच्या पेक्षा कमी मोबदला मिळणार्‍यात आणि तुमच्यात काय फरक आहे? कौशल्य, क्षमता हाच फरक असेल ना? आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही काही कष्ट घेतले असतीलच ना? मग तसं म्हणण्यात तुच्छता कसली आली आहे? ती फॅक्टच आहे ना? राहता राहिला, समान कष्टांना मिळणार्‍या पैशाचा प्रश्न..आय. टी वाल्यां ना मिळणार्‍या पैशाबद्दल तुम्हाला दुस्वास नाही हे तुम्हीच म्हणत आहात. मग तुमचा मुद्दा काय? आय. टी. वाल्यांनी त्यांना जाणवणारे कष्ट, प्रेशर नमूद केले तर चुकलं काय? तुमचं क्षेत्र कुठलं, त्यात किती कष्ट आहेत हे आम्हाला कसं माहीत असणारं? ते तुम्हीच लिहिलं पाहिजेत. का तुम्हाला असं म्हणायचं आहे? की आय. टी. वाल्यांना भरपूर मोबदला मिळत आहे ना मग त्यांनी त्यांच्या कष्टा-प्रेशर बद्द्ल ब्र सुद्धा काढू नये? हाच जर मुद्दा असेल तर हा वाद इथेच संपला.

नीधप 30/12/2008 - 10:27
>>कोणाचे पगार डोळ्यावर येत नाहीयेत. पैशासाठीच सगळं काही असतं तर माझ्या क्षेत्रात येऊन दळीद्री सिरियल्सच्या दळणाला वाहून घेता आलं असतं. तेही केलं नाही कारण चांगलं काम करण्याची आच आहे. असो. तो वाद निराळा. कोणी कुठले क्षेत्र निवडावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न/आवड आहे. तुमच्याप्रमाणेच प्रत्येकाला वाटतं की तो/ती जे काम करत आहे ते चांगलं आहे. ज्या संदर्भात तुमचा हा प्रतिसाद आहे त्याबद्दल म्हणायचं तर माझा मुद्दा तुम्हाला सपशेल बाउन्सर गेलेला आहे. कळलेला मुळीच नाहीये. तेव्हा त्यात पडूच नका. >>कोणीही असा दावा केला नाही की आयटीमधेच कष्ट घ्यावे लागतात. ह्या शब्दात कोणी म्हणालं नाही पण 'आम्ही इतरांपेक्षा वरचढ आहोत म्हणून आम्हाला जास्त पगार मिळतात' हा सूर वेगळं काय सांगतो हो? इतरांबद्दलची तुच्छता भरपूर दिसली वरच्या अनेक पोस्टस मधे. ती तशी पावलोपावली अनुभवायला मिळतेच की. >>चित्रपट/दूरचित्रवाणी माध्यम ह्यांची तुलना करणंचं चुकीचं आहे. मान्य की तुम्हाला पहिली ७-८ वर्षं संघर्ष करावा लागतो. तेवढा पिरीयड तुम्हीही गृहीत धरलाच असतो. पण सेटल झाल्यावर रगड्ड पैसा मिळतो की. आज एवढ्या मालिका वेगवेगळ्या वाहिन्यांवर अव्याहतपणे चालू असतात. त्यामुळे पुर्वीपेक्षा रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. एका वर्षात कितीतरी मराठी/हिंदी आणि इतर प्रादेशिक चित्रपट प्रदर्शित होतात. कलावंत/तंत्रज्ञ गुणी असेल तर त्याला यश मिळाल्यावाचून रहाणार नाही. (उदा: कला दिग्दर्शक नितीन देसाई) आयटीवाल्यांना सर्व क्षेत्रातलं ज्ञान असतं आणी सर्वकाही माहित असतं आणि सगळं काही त्यांनाच कळतं असा त्यांचा समज असतो हे उदाहरणासहित सिद्ध करणारं हे विधान. आम्ही अनेक गोष्टी गृहित धरून उतरतो आमच्या क्षेत्रात आणि म्हणूनच तक्रार नसते पण वरती बघावं तर तुम्हा लोकांची कामाच्या वेळा आणि कामाचं प्रेशर याबद्दल तक्रार आणि उदात्तीकरण हेच चाललंय. त्यावर आक्षेप आहे. आणि केवळ तेवढ्यासाठी माझ्या क्षेत्राचं उदाहरण दिलंय. बर सेटल झाल्यावर रग्गड पैसा मिळतो हा विनोदच करताय तुम्ही. किती तंत्रज्ञांना मालिकांच्या जोरावर रग्गड पैसा मिळतो हे जरा सांगाल का? अक्षरशः २४ तास काम करतात ते हे बघता जो मिळायला हवा तसा फार कमी वेळा मिळतो. आणि त्यातही ४-४ महिने उशीर. पैसा बुडणे, दोन कामांच्या मधे बरेच महिने बिनाकामाचे बसून रहावे लागणे, पगारी रजा, इतर पर्क्स यातलं काहीही माहित नसणे हे सगळं धरून मग विचार करा रग्गड पैसा की काय ते. मराठी चित्रपट किती प्रदर्शित होतात आणि त्यातून कोणाचा नक्की किती फायदा होतो (तंत्रज्ञांचा तर नक्कीच नाही.) याचं गणित एकदा कधीतरी बसून सविस्तर समजावून सांगेन. तूर्तास ते तुम्हाला माहित नाहीये एवढं मान्य केलंत तरी पुरे आहे. कलावंत/ तंत्रज्ञ गुणी असेल तर यश मिळेल हे मला कळत नसेल कारण मी आयटीवाली नाही असा तर तुमचा समज नाही ना झाला? अहो गुणी माणूस यशस्वी होतो ते माहितीये. मुद्दा तो नाहीये ना. मुद्दा आहे आयटीवाल्यांनी 'आम्ही ग्रेट म्हणून इतरांपेक्षा जास्त पैसे मिळतात. आमची हार्डशिप जास्त म्हणून इतरांपेक्षा जास्त पैसे मिळतात' असं मिरवण्याचा. यात प्रत्येक आयटीवाला हा गुणी आणि एक्स्ट्रॉऑर्डिनरी असतो म्हणूनच त्याला एवढा पगार मिळतो असं गृहितक मांडलेलं दिसतंय. मध्यम बुद्धीचे, मिडिऑकर म्हणता येईल असे कैक आयटीवाले माहीतीयेत की मला ज्यांनी आयुष्यभराचे पैसे १० वर्षातच कमावलेत. >>त्याचप्रमाणे ऊठसुठ आयटीवाल्यांना धारेवर धरणं थांबवावं ही आमची विनंती. धारेवर मी धरलेलं नाही. तुमच्या बाजूने येणारी अनेक विधानं ही इतरांसाठी तुच्छतापूर्वक आणि तुम्हीच ग्रेट अश्या स्वरूपाची यायला लागली तेव्हा बोललेय. मिळणार्‍या पगाराच्या बळावर समाजातला एक गट इतर सगळ्यांना कमी आणि तुच्छ समजू लागतो , आपल्यापेक्षा कमी पैसा मिळणारा आपल्यापेक्षा कमी दर्जाचा असतो असं म्हणू लागतो तेव्हा अशी प्रतिक्रिया येणारच. तुम्हाला १० पट काय १००पट पगार मिळाला तरी कुणाला वाईट वाटणार नाहीये पण त्या बळावर एखाद्या शास्त्रज्ञाला, एखाद्या प्राध्यापकाला, एखाद्या चित्रकाराला, एखाद्या विचारवंताला, एखाद्या समाजसेवकाला कमी लेखणार असाल तर धारेवर धरलं जाणारच ना. प्रत्यक्षात तुम्ही वैयक्तिकरित्या स्वतः असं वागत नसालही नव्हे नसालच पण आयटीवाले ह्या लेबलखालचे अनेक जण असे वागतात हे तुम्ही नाकारू शकत नाही कारण तो आमचा अनुभव आहे. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

सुचेल तसं 30/12/2008 - 11:56
>>ज्या संदर्भात तुमचा हा प्रतिसाद आहे त्याबद्दल म्हणायचं तर माझा मुद्दा तुम्हाला सपशेल बाउन्सर गेलेला आहे. कळलेला मुळीच नाहीये. तेव्हा त्यात पडूच नका. कळला नसेल तर तुम्ही समजावा. त्यात पडूच नका ही उद्धटपणाची भाषा झाली. >>ह्या शब्दात कोणी म्हणालं नाही पण 'आम्ही इतरांपेक्षा वरचढ आहोत म्हणून आम्हाला जास्त पगार मिळतात' हा सूर वेगळं काय सांगतो हो? इतरांबद्दलची तुच्छता भरपूर दिसली वरच्या अनेक पोस्टस मधे. ती तशी पावलोपावली अनुभवायला मिळतेच की. आम्ही इतरांपेक्षा वरचढ आहोत असं कु़णीही आयटीवाला म्हणाला नाही. हे तुम्ही तुमच्या चष्म्यातुन बघत आहात. >>आयटीवाल्यांना सर्व क्षेत्रातलं ज्ञान असतं आणी सर्वकाही माहित असतं आणि सगळं काही त्यांनाच कळतं असा त्यांचा समज असतो हे उदाहरणासहित सिद्ध करणारं हे विधान. असं कोण म्हटलय हो? जे वाचतो, पाहतो, ऐकतो त्यावरुन सांगितलं आणि ह्याबाबतीत मी काही बोललोय ते चुकीचं आहे असं मला अजिबात वाटत नाही. >>मध्यम बुद्धीचे, मिडिऑकर म्हणता येईल असे कैक आयटीवाले माहीतीयेत की मला ज्यांनी आयुष्यभराचे पैसे १० वर्षातच कमावलेत. त्यात चुकीचं काय? त्यांच्या नशिबात होतं म्हणून त्यांनी कमावले. सामान्य दर्जाचे कलाकार सुद्धा रग्ग्ड पैसा कमवतातच की. पण आमची काही तक्रार नाही त्यांच्याबद्दल Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

नीधप 30/12/2008 - 12:19
>>कळला नसेल तर तुम्ही समजावा. त्यात पडूच नका ही उद्धटपणाची भाषा झाली. या चर्चेचा तो विषय असता तर समजावलं असतं. >>आम्ही इतरांपेक्षा वरचढ आहोत असं कु़णीही आयटीवाला म्हणाला नाही. हे तुम्ही तुमच्या चष्म्यातुन बघत आहात. वरती अनेक ठिकाणी हा सूर दिसून आलाय आणि अनेक असे भेटलेही आहेत पण तुम्ही म्हणता म्हणून केवळ माझा चष्मा इत्यादी!! >>असं कोण म्हटलय हो? जे वाचतो, पाहतो, ऐकतो त्यावरुन सांगितलं आणि ह्याबाबतीत मी काही बोललोय ते चुकीचं आहे असं मला अजिबात वाटत नाही. वाक्यातच विरोधाभास आहे. दुसर्‍या क्षेत्राबद्दल माहित नसतानाही तुम्ही बोलताय तेच बरोबर असं म्हणणं याला उद्धटपणाच म्हणतात >>त्यात चुकीचं काय? त्यांच्या नशिबात होतं म्हणून त्यांनी कमावले. सामान्य दर्जाचे कलाकार सुद्धा रग्ग्ड पैसा कमवतातच की. पण आमची काही तक्रार नाही त्यांच्याबद्दल आमची तक्रार आहे असं तुम्ही मानताय? वास्तविक तक्रार नाही हे ह्याच शब्दात आम्ही बोलून दाखवले आहे. त्यांच्या नशिबात होते म्हणून लायकी असो नसो कमावले पण म्हणून ते श्रेष्ठ ठरत नाहीत. वरती अनेकांनी इतरांपेक्षा वरचढ असणारे पगार कसे योग्यच आहेत कारण त्यांची तेवढी लायकी आणि हार्डशिप आहे, ते कसे श्रेष्ठ आहेत असं तुणतुणं लावलंय आणि आता तुमचं हे वाक्य. डबल ढोलकी बाकी काही नाही. >>Finally I will be so matured that I will react to nothing. पलायनवादाचे उत्तम उदाहरण. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

सुचेल तसं 31/12/2008 - 08:48
>>कळला नसेल तर तुम्ही समजावा. त्यात पडूच नका ही उद्धटपणाची भाषा झाली. या चर्चेचा तो विषय असता तर समजावलं असतं. मग जर या चर्चेचा तो विषय नाही तर मुळात तुम्ही तो काढलाच कशाला? तसेच >>Finally I will be so matured that I will react to nothing. पलायनवादाचे उत्तम उदाहरण. इथे देखील तुम्ही विषयांतर करत आहे. माझ्या सिग्नेचरचा आणि प्रस्तुत विषयाचा अर्थाअर्थी संबंध नाही. केवळ विरोधासाठी विरोध ह्या भुमिकेतूनच तुम्ही अशी विधानं करत आहात. १० वर्षात आयुष्यभराची कमाई करणं ह्यात काय वावगं आहे? आणि ज्यांनी अशी कमाई केली त्यांचा - आम्ही श्रेष्ठ आहोत - असा दावा असल्याचं तुम्ही कुठेही लिहीलं नाही. मग ह्याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की तुमचा आक्षेप त्यांच्या कमाईवरच आहे. >>वाक्यातच विरोधाभास आहे. दुसर्‍या क्षेत्राबद्दल माहित नसतानाही तुम्ही बोलताय तेच बरोबर असं म्हणणं याला उद्धटपणाच म्हणतात जसं तुम्ही आयटीमधे नसताना अधिकारवाणीनी त्यावर बोलता की नाही? तुम्हाला जे कोण लोक भेटले असतील आणि त्यांनी जे काय तुम्हाला सांगितलं असेल त्यावरुनच तुम्ही मतं बनवली असणार. त्याचप्रमाणे चित्रपट, मालिकांशी संबंधित लोकांना भेटून, त्यांच्याशी बोलून माझी मतं तयार झाली... >>आमची तक्रार आहे असं तुम्ही मानताय? वास्तविक तक्रार नाही हे ह्याच शब्दात आम्ही बोलून दाखवले आहे. त्यांच्या नशिबात होते म्हणून लायकी असो नसो कमावले पण म्हणून ते श्रेष्ठ ठरत नाहीत. वरती अनेकांनी इतरांपेक्षा वरचढ असणारे पगार कसे योग्यच आहेत कारण त्यांची तेवढी लायकी आणि हार्डशिप आहे, ते कसे श्रेष्ठ आहेत असं तुणतुणं लावलंय आणि आता तुमचं हे वाक्य. डबल ढोलकी बाकी काही नाही. परत तेच. कोण असा दावा करतय की आयटीवाले श्रेष्ठ आहेत? इथे तर कोणीही केला नाही. पगार योग्य आहेत याबाबतीत काही दुमत नाही. एका माणसामागे कंपनीला किती मोठा रेवेन्यु मिळतो ह्याची आधी माहिती घ्या आणि मगच बोला. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

नीधप 31/12/2008 - 10:08
>>मग जर या चर्चेचा तो विषय नाही तर मुळात तुम्ही तो काढलाच कशाला? उदाहरण देणे अशी पण एक गोष्ट असते चर्चेत. >>आणि ज्यांनी अशी कमाई केली त्यांचा - आम्ही श्रेष्ठ आहोत - असा दावा असल्याचं तुम्ही कुठेही लिहीलं नाही. दहा ठिकाणी लिहिलंय की 'आम्हीच श्रेष्ठ' असा ऍटिट्यूड असतो. पण ते तुम्हाला वाचायचं नाहीये. समजायचं नाहीये किंवा अजून काही. >> मग ह्याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की तुमचा आक्षेप त्यांच्या कमाईवरच आहे. याला म्हणतात काही शेंडा बुडखा नसलेले आरोप. तुमच्या पैशावर आमचा डोळा नाही आणि आम्हाला त्याचं वाईटही वाटत नाही. हे पण स्पष्ट शब्दात वरती लिहिलंय. तुम्हाला ते वाचायचं नाहीये. उगाच झोडाझोडी करण्यासाठी आरोप करताय. >>माझ्या सिग्नेचरचा आणि प्रस्तुत विषयाचा अर्थाअर्थी संबंध नाही. ही सिग्नेचर त्याच पोस्टपासून आहे. आधी नाही. >>जसं तुम्ही आयटीमधे नसताना अधिकारवाणीनी त्यावर बोलता की नाही? तुम्हाला जे कोण लोक भेटले असतील आणि त्यांनी जे काय तुम्हाला सांगितलं असेल त्यावरुनच तुम्ही मतं बनवली असणार. त्याचप्रमाणे चित्रपट, मालिकांशी संबंधित लोकांना भेटून, त्यांच्याशी बोलून माझी मतं तयार झाली... मी आयटी क्षेत्राबद्दल अधिकारवाणीने बोलले? खोटे दावे करू नका. आयटीमधल्या लोकांच्या ऍटिट्यूडचा जो अनुभव आहे केवळ त्याबद्दल बोललेय. माझा अनुभव म्हणून. तुम्ही माझ्या क्षेत्रात किती आणि कसा पैसा मिळतो हे अधिकारवाणीने बोललात आणि ते तसं नाहीये हे मी सांगूनही तुमचा हेका की तुम्ही म्हणता तेच बरोबर. दोन्हीमधला फरक समजायचा प्रयत्न करा. तो तुम्ही करणार नाही हे आता उघड दिसतंय. पहिल्यापासून भांडायच्या पावित्र्यातच आहात तुम्ही. >>परत तेच. कोण असा दावा करतय की आयटीवाले श्रेष्ठ आहेत? इथे तर कोणीही केला नाही. पगार योग्य आहेत याबाबतीत काही दुमत नाही. एका माणसामागे कंपनीला किती मोठा रेवेन्यु मिळतो ह्याची आधी माहिती घ्या आणि मगच बोला. असा दावा कोण उघड उघड करतं का? पण ऍटिट्यूड तोच दिसून आलाय वरच्या सगळ्या चर्चेत आणि तुमच्याही प्रत्येक पोस्टमधे. पगार योग्य की अयोग्य हा प्रश्नच नाहीये. मिळालेला भला मोठ्ठा पगार इतरांना तुच्छ लेखण्याचं कारण ठरू शकत नाही पण दुर्दैवाने ही वृत्ती खूप आयटीवाल्यांची आहे. वरच्या चर्चेत एकदोन प्रतिसाद वगळता, अगदी तुमच्या प्रतिसादांसह सगळ्यात हिच वृत्ती दिसून आलेली आहे. ही वृत्ती नसती तर आयटीवाल्यांबद्दल एवढी नाराजी दिसली नसती लोकांच्यात. तुम्हाला फक्त वाटतं की तुमच्या पैशावर जळतात लोक. पण त्या पैशासाठी तुम्ही कष्ट करता आणि बाकीचे करत नाहीत म्हणून त्यांना काही मिळत नाही. तुमच्या बबल मधे रहा तुम्ही माझं काय जातंय. असो. यापुढे तुम्ही खोटे आरोप आणि खोटे दावे एवढंच करणार असं दिसतंय आणि या फालतूपणात घालवायला वेळ माझ्याकडे नाही. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

>>माझ्या सिग्नेचरचा आणि प्रस्तुत विषयाचा अर्थाअर्थी संबंध नाही. ही सिग्नेचर त्याच पोस्टपासून आहे. आधी नाही. ही सिग्नेचरची ओळ अनेक महिन्यांपासून वाचल्याचं स्मरतं, बाकी या वादावादीमधे मला काही रस नाही हे मी आधीच सकारण सांगितलं आहे; तेव्हा चालू द्या. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

In reply to by सुचेल तसं

नीधप 31/12/2008 - 10:10
>>मग जर या चर्चेचा तो विषय नाही तर मुळात तुम्ही तो काढलाच कशाला? उदाहरण देणे अशी पण एक गोष्ट असते चर्चेत. >>आणि ज्यांनी अशी कमाई केली त्यांचा - आम्ही श्रेष्ठ आहोत - असा दावा असल्याचं तुम्ही कुठेही लिहीलं नाही. दहा ठिकाणी लिहिलंय की 'आम्हीच श्रेष्ठ' असा ऍटिट्यूड असतो. पण ते तुम्हाला वाचायचं नाहीये. समजायचं नाहीये किंवा अजून काही. >> मग ह्याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की तुमचा आक्षेप त्यांच्या कमाईवरच आहे. याला म्हणतात काही शेंडा बुडखा नसलेले आरोप. तुमच्या पैशावर आमचा डोळा नाही आणि आम्हाला त्याचं वाईटही वाटत नाही. हे पण स्पष्ट शब्दात वरती लिहिलंय. तुम्हाला ते वाचायचं नाहीये. उगाच झोडाझोडी करण्यासाठी आरोप करताय. >>माझ्या सिग्नेचरचा आणि प्रस्तुत विषयाचा अर्थाअर्थी संबंध नाही. ही सिग्नेचर त्याच पोस्टपासून आहे. आधी नाही. >>जसं तुम्ही आयटीमधे नसताना अधिकारवाणीनी त्यावर बोलता की नाही? तुम्हाला जे कोण लोक भेटले असतील आणि त्यांनी जे काय तुम्हाला सांगितलं असेल त्यावरुनच तुम्ही मतं बनवली असणार. त्याचप्रमाणे चित्रपट, मालिकांशी संबंधित लोकांना भेटून, त्यांच्याशी बोलून माझी मतं तयार झाली... मी आयटी क्षेत्राबद्दल अधिकारवाणीने बोलले? खोटे दावे करू नका. आयटीमधल्या लोकांच्या ऍटिट्यूडचा जो अनुभव आहे केवळ त्याबद्दल बोललेय. माझा अनुभव म्हणून. तुम्ही माझ्या क्षेत्रात किती आणि कसा पैसा मिळतो हे अधिकारवाणीने बोललात आणि ते तसं नाहीये हे मी सांगूनही तुमचा हेका की तुम्ही म्हणता तेच बरोबर. दोन्हीमधला फरक समजायचा प्रयत्न करा. तो तुम्ही करणार नाही हे आता उघड दिसतंय. पहिल्यापासून भांडायच्या पावित्र्यातच आहात तुम्ही. >>परत तेच. कोण असा दावा करतय की आयटीवाले श्रेष्ठ आहेत? इथे तर कोणीही केला नाही. पगार योग्य आहेत याबाबतीत काही दुमत नाही. एका माणसामागे कंपनीला किती मोठा रेवेन्यु मिळतो ह्याची आधी माहिती घ्या आणि मगच बोला. असा दावा कोण उघड उघड करतं का? पण ऍटिट्यूड तोच दिसून आलाय वरच्या सगळ्या चर्चेत आणि तुमच्याही प्रत्येक पोस्टमधे. पगार योग्य की अयोग्य हा प्रश्नच नाहीये. मिळालेला भला मोठ्ठा पगार इतरांना तुच्छ लेखण्याचं कारण ठरू शकत नाही पण दुर्दैवाने ही वृत्ती खूप आयटीवाल्यांची आहे. वरच्या चर्चेत एकदोन प्रतिसाद वगळता, अगदी तुमच्या प्रतिसादांसह सगळ्यात हिच वृत्ती दिसून आलेली आहे. ही वृत्ती नसती तर आयटीवाल्यांबद्दल एवढी नाराजी दिसली नसती लोकांच्यात. तुम्हाला फक्त वाटतं की तुमच्या पैशावर जळतात लोक. पण त्या पैशासाठी तुम्ही कष्ट करता आणि बाकीचे करत नाहीत म्हणून त्यांना काही मिळत नाही. तुमच्या बबल मधे रहा तुम्ही माझं काय जातंय. असो. यापुढे तुम्ही खोटे आरोप आणि खोटे दावे एवढंच करणार असं दिसतंय आणि या फालतूपणात घालवायला वेळ माझ्याकडे नाही. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

सुचेल तसं 31/12/2008 - 12:16
>>उदाहरण देणे अशी पण एक गोष्ट असते चर्चेत. मग (विषयबाह्य असलेल...) उदाहरण दिलं तर त्याचं सुयोग्य स्पष्टिकरण पण द्यावं.. त्यावर तुम्ही बोलूच नका वगैरे ही भाषा मग्रुरी दर्शवते. >>दहा ठिकाणी लिहिलंय की 'आम्हीच श्रेष्ठ' असा ऍटिट्यूड असतो. पण ते तुम्हाला वाचायचं नाहीये. समजायचं नाहीये किंवा अजून काही. हे तुमचं परसेप्शन झालं.. कोणीही श्रेष्ठ/कनिष्ठ असा भेदभाव केलेला नाही. >>याला म्हणतात काही शेंडा बुडखा नसलेले आरोप. तुमच्या पैशावर आमचा डोळा नाही आणि आम्हाला त्याचं वाईटही वाटत नाही. हे पण स्पष्ट शब्दात वरती लिहिलंय. तुम्हाला ते वाचायचं नाहीये. उगाच झोडाझोडी करण्यासाठी आरोप करताय. नाही ना तुम्हाला असं म्हणायचं? मग १० वर्षात आयुष्यभराची कमाई वगैरे बेसलेस वाक्यं कशाला टाकता? कमाईवर टिप्पणी करायची आणि नंतर पैशावर डोळा नाही/ त्याचं काही वाईट वाटत नाही अशी सारवासारव करायची. कृपया तुमची स्वतःची विधानं परत एकदा तपासून पहा. >>ही सिग्नेचर त्याच पोस्टपासून आहे. आधी नाही. फक्त त्याच्या आधीच्या पोस्टमधून ते मिसिंग आहे. कारण ते चुकून डिलीट झालं होतं.. पण त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या प्रत्येक पोस्टमधे आहे. >>मी आयटी क्षेत्राबद्दल अधिकारवाणीने बोलले? खोटे दावे करू नका. आयटीमधल्या लोकांच्या ऍटिट्यूडचा जो अनुभव आहे केवळ त्याबद्दल बोललेय. माझा अनुभव म्हणून. तुम्ही माझ्या क्षेत्रात किती आणि कसा पैसा मिळतो हे अधिकारवाणीने बोललात आणि ते तसं नाहीये हे मी सांगूनही तुमचा हेका की तुम्ही म्हणता तेच बरोबर. दोन्हीमधला फरक समजायचा प्रयत्न करा. तो तुम्ही करणार नाही हे आता उघड दिसतंय. पहिल्यापासून भांडायच्या पावित्र्यातच आहात तुम्ही. आयुष्याची कमाई किती असावी हे व्यक्तिगणिक बदलतं... तुम्ही हे विधान कसं करु शकता की अमुक माणसानी आयुष्यभराचा पैसा १० वर्षात कमावला? हे गणित तुम्ही कुठल्या आधारे मांडलं? >>असा दावा कोण उघड उघड करतं का? पण ऍटिट्यूड तोच दिसून आलाय वरच्या सगळ्या चर्चेत आणि तुमच्याही प्रत्येक पोस्टमधे. पगार योग्य की अयोग्य हा प्रश्नच नाहीये. मिळालेला भला मोठ्ठा पगार इतरांना तुच्छ लेखण्याचं कारण ठरू शकत नाही पण दुर्दैवाने ही वृत्ती खूप आयटीवाल्यांची आहे. वरच्या चर्चेत एकदोन प्रतिसाद वगळता, अगदी तुमच्या प्रतिसादांसह सगळ्यात हिच वृत्ती दिसून आलेली आहे. ही वृत्ती नसती तर आयटीवाल्यांबद्दल एवढी नाराजी दिसली नसती लोकांच्यात. तुम्हाला फक्त वाटतं की तुमच्या पैशावर जळतात लोक. पण त्या पैशासाठी तुम्ही कष्ट करता आणि बाकीचे करत नाहीत म्हणून त्यांना काही मिळत नाही. तुमच्या बबल मधे रहा तुम्ही माझं काय जातंय. माझ्या कुठल्या पतिसादात मी इतरांना तुच्छ लेखलं? ही वृत्ती नसती तर आयटीवाल्यांबद्दल एवढी नाराजी दिसली नसती लोकांच्यात. ह्या वाक्याला तर काहीही अर्थ नाही. सिनेमावाले लोक वाईट असतात असंही लोक म्हणतात पण ह्याचा अर्थ तुम्ही लोक वाईट होता का? स्वतःलाच पहा विचारुन. मिळेल उत्तर. >>असो. यापुढे तुम्ही खोटे आरोप आणि खोटे दावे एवढंच करणार असं दिसतंय आणि या फालतूपणात घालवायला वेळ माझ्याकडे नाही. फालतूपणा करायला वेळ नाही तर मुळात पहिला प्रतिसाद दिलाच कशाला? ह्यातूनच तुमचा खोटेपणा दिसून येतो आणि तुमचं हे वाक्यच पलायनवाद दर्शवतं... Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

नितिन थत्ते 31/12/2008 - 15:12
"जसं काही आयटीवालेच बांधकाम व्यावसायिकांकडे गेले आणि म्हणाले की ..." आय टी वाले जाऊन किम्मत वाढवा असे नाही म्हणाले पण त्यांनी मागणी फुगविण्याचे काम नक्कीच केले.

हुप्प्या 03/01/2009 - 02:38
आयटी मधे खूप पैसा मिळतो हे खरे आहे. सिनेस्टार, राजकारणी, मोठे शेतकरी ह्यान्च्या तुलनेत आयटी मधे जास्त लोक असा रग्गड पैसा मिळवतात. त्याला सुरवातीची गुन्तवणूकही तुलनेने कमीच लागते. जसे प्रशिक्षण, सामग्री वगैरे. पण हा पैसा काही ते गादीत शिवून साठवून ठेवत नाहीत. त्याना मिळालेली समृध्दी वेगवेगळ्या मार्गाने उरलेल्या समाजालाही मिळते. तेव्हा त्याविषयी इतके वाईट वाटू नये. पण आयटी उद्योगात बहुतेक काम मजूरी टाईपच असते. आपण आपली स्वतःची उत्पादने बनवत नाही. इन्फोसिस वा टीसीएस ह्या बड्या लोकानी कुठले स्वतःचे उत्पादन बनवले आहे का? मला माहित नाही. तुम्हाला माहित असल्यास सान्गा. गुगलचे सर्च इन्जिन, सनची जावा भाषा, याहूचा सर्च वा मेल, सिस्कोचे राऊटर उपकरण, नोकिया वा अन्य लोकान्चा मोबाईल असले काही स्वतःचे भारतीय उत्पादन का दिसू नये बाजारात? जेव्हा चलती असेल तेव्हा आयटीतील मोलमजुरी पैसे मिळवून देईल पण दूरगामी गुन्तवणूक हवी असेल तर आपले स्वतःचे काहीतरी बनवले पाहिजे आणि ते विकता आले पाहिजे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गटणेंचा "आयटीतील मंदी आणखी दोन-तीन वर्षे" हा काथ्याकूट वाचत होतो. त्यावरचे काही प्रतिसाद वाचून आयटीवाल्यांवर उगीचच आगपाखड करण्यात येते असं जाणवलं. मी जवळपास दोन वर्ष मॅन्युफॅक्चरींग कंपनीत आयटी खात्यात नोकरीला होतो आणि आता गेल्या अडीच वर्षांपासून आयटी कंपनीत आहे. त्यामुळे मला आयटी आणि नॉन-आयटी अशी दोन्ही ठिकाणं पहायला मिळाली. आयटीवाल्यांवर सर्वसाधारणपणे खालील आक्षेप ऐकायला मिळतात. आक्षेप क्र.१.

नामूमकीन हा चित्रपट कुणी पाहिला आहे काय?

चेतन सुभाष गुगळे ·

क्षमस्व, मी तरी नाही पाहीला. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

एका वाक्यात उत्तरे द्या. प्रश्न :- नामूमकीन हा चित्रपट कुणी पाहिला आहे काय? उत्तर :- असे पिक्चर कोणी बघणे णामूमकीण आहे. प्रश्न :- सदर चित्रपट आपल्यपैकी कोणी पाहिला आहे काय? उत्तर :- आम्ही फक्त णामूमकीण ह्या चित्रपटाविषयी उत्तरे देण्यास बांधिल आहोत. तरी 'सदर' ह्या चित्रपटाविषयी अभ्यासक्रमा बाहेरील प्रश्न विचारु नयेत. (हुकुमावरुन) प्रश्न :- या चित्रपटाची संकल्पना परकीय कथेवर आधारित आहे काय? उत्तर :- आपल्याला स्वदेशी कथेवर आधारलेला एखादा चित्रपट आठवत आहे काय ? (संत तुकाराम , राजा हरिश्चंद्र वगैरे नावे तोंडावर फेकु नयेत. हुकुमावरुन) सविस्तर उत्तरे द्या. प्रश्न :- हृषिकेश मुखर्जी ह्यांचे इतर अनेक चित्रपट गाजले. (जरी तिकीटबारीवर चालले नसले तरी त्यांच्याबद्दल कुठेना कुठे काहीतरी छापून आले आणि ते चर्चेत तरी राहिले) परंतू या चित्रपटाविषयी फारशी चर्चा होताना कुठे आढळत नाही. याचे कारण काय असावे? उत्तर :- (शंका १) जे चित्रपट तिकीटबारीवर चालत नाहित त्यांनाच गाजलेले चित्रपट असे म्हणतात. ह्या चित्रपटाने 'झीनत अमान' ह्या त्या वेळच्या चलनी नाण्याच्या जोरावर पहिल्या आठवड्यात आपले नाणे वाजवुन घेतले असावे, त्यामुळे ह्यास गाजलेला पिक्चर असे न म्हणता आल्याने त्याच्याविषयी कुठलेही 'छापील धंदे' उदयास आले नसावेत. (शंका २) हृषिकेश मुखर्जी + डॉ. श्रीराम लागू, संजीव कुमार, + झीनत अमान हे णामूमकीण 'भरीत' बघुन त्या काळच्या चित्रपट समिक्षकांच्या हातावरुन वारे गेले असावे !! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

या चित्रपटाविषयी परिकथेतील राजकुमाराने कल्पना केल्याप्रमाणे 'ह्या चित्रपटाने 'झीनत अमान' ह्या त्या वेळच्या चलनी नाण्याच्या जोरावर पहिल्या आठवड्यात आपले नाणे वाजवुन घेतले असावे' असे काही मला वाटत नाही. एक तर हा चित्रपट १९८९ सालचा आहे असे ह्याच्या प्रमाणपत्रावरून कळते व त्या काळी मी चित्रपटांची अत्यंत उत्सुकतेने माहीती घेत असे व त्या काळी झीनत अमान हे चलनी नाणे नव्हतेच मूळी. तो माधुरी, श्रीदेवी व जूही यांचा काळ होता. असो, तर मुद्दा हा की झीनत अमान च्या नावावर चित्रपट चालवणे शक्य नव्हते. चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

वर उल्लेख केल्याप्रमाणे ह्या चित्रपटाचे साल जरी १९८९ असले तरी तो १९८९ ला प्रदर्शित झाल्याचे मला तरी आठवत नाही. मी हा चित्रपट प्रथम पाहिला तो १९९३ च्या डिसेंबर महिन्यात दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात. त्या काळी दूरदर्शनवर दर शनिवारी सायंकाळी हिन्दी चित्रपट दाखविला जाई. परंतू ११ डिसेंबर १९९३ च्या त्या शनिवारी काही अपरिहार्य कारणामुळे चित्रपट अचानक सायंकाळच्या ऐवजी दुपारी दाखविण्यात आला. ही बाब आधी जाहीर न केल्यामुळे अनेक जण तो पाहू शकले नाहीत. मी घरात त्यावेळी एकटाच असल्याने कंटाळलो होतो व त्यामुळे टीव्ही लावला तर चित्रपटाचे प्रमाणपत्र दाखवले जात होते. पुढे चित्रपट संपेपर्यंत टीव्ही समोरची नजर ढळली नाही. हृषिकेश मुखर्जींनी एक अगदी अशक्य वाटणारी कथा सादर केली होती. या कथेने मला अगदी भारावून टाकले. हा चित्रपट इतरांना कसा वाटला हे जाणण्यासाठी अतिशय उत्सुक होतो. पण नंतर मला कळले की प्रसारण ठरलेल्या वेळे अगोदर झाल्याने तो माझ्या माहितीतल्या कुठल्याच व्यक्तिने बघितला नव्हता. त्यानंतर हा चित्रपट पुन्हा एकदा तरी बघायचाच असे मी ठरवले आणि माझ्या प्रयत्नांना ११ वर्षांनी यश आले. २००४ मध्ये मला या चित्रपटाची VCD मिळाली. त्यानंतर मी स्वत: हा चित्रपट कुटूंबियांसमवेत पुन्हा बघितला त्याचप्रमाणे परिचयातील इतर अनेकांना दाखविला. सर्वांनाच तो फ़ार आवडला. इतका अप्रतिम चित्रपट आपल्या पाहण्यात कसा आला नाही तसेच या चित्रपटाविषयी काहीच चर्चा ऐकण्यात / वाचण्यात कशी आली नाही यावर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

क्षमस्व, मी तरी नाही पाहीला. ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

एका वाक्यात उत्तरे द्या. प्रश्न :- नामूमकीन हा चित्रपट कुणी पाहिला आहे काय? उत्तर :- असे पिक्चर कोणी बघणे णामूमकीण आहे. प्रश्न :- सदर चित्रपट आपल्यपैकी कोणी पाहिला आहे काय? उत्तर :- आम्ही फक्त णामूमकीण ह्या चित्रपटाविषयी उत्तरे देण्यास बांधिल आहोत. तरी 'सदर' ह्या चित्रपटाविषयी अभ्यासक्रमा बाहेरील प्रश्न विचारु नयेत. (हुकुमावरुन) प्रश्न :- या चित्रपटाची संकल्पना परकीय कथेवर आधारित आहे काय? उत्तर :- आपल्याला स्वदेशी कथेवर आधारलेला एखादा चित्रपट आठवत आहे काय ? (संत तुकाराम , राजा हरिश्चंद्र वगैरे नावे तोंडावर फेकु नयेत. हुकुमावरुन) सविस्तर उत्तरे द्या. प्रश्न :- हृषिकेश मुखर्जी ह्यांचे इतर अनेक चित्रपट गाजले. (जरी तिकीटबारीवर चालले नसले तरी त्यांच्याबद्दल कुठेना कुठे काहीतरी छापून आले आणि ते चर्चेत तरी राहिले) परंतू या चित्रपटाविषयी फारशी चर्चा होताना कुठे आढळत नाही. याचे कारण काय असावे? उत्तर :- (शंका १) जे चित्रपट तिकीटबारीवर चालत नाहित त्यांनाच गाजलेले चित्रपट असे म्हणतात. ह्या चित्रपटाने 'झीनत अमान' ह्या त्या वेळच्या चलनी नाण्याच्या जोरावर पहिल्या आठवड्यात आपले नाणे वाजवुन घेतले असावे, त्यामुळे ह्यास गाजलेला पिक्चर असे न म्हणता आल्याने त्याच्याविषयी कुठलेही 'छापील धंदे' उदयास आले नसावेत. (शंका २) हृषिकेश मुखर्जी + डॉ. श्रीराम लागू, संजीव कुमार, + झीनत अमान हे णामूमकीण 'भरीत' बघुन त्या काळच्या चित्रपट समिक्षकांच्या हातावरुन वारे गेले असावे !! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

या चित्रपटाविषयी परिकथेतील राजकुमाराने कल्पना केल्याप्रमाणे 'ह्या चित्रपटाने 'झीनत अमान' ह्या त्या वेळच्या चलनी नाण्याच्या जोरावर पहिल्या आठवड्यात आपले नाणे वाजवुन घेतले असावे' असे काही मला वाटत नाही. एक तर हा चित्रपट १९८९ सालचा आहे असे ह्याच्या प्रमाणपत्रावरून कळते व त्या काळी मी चित्रपटांची अत्यंत उत्सुकतेने माहीती घेत असे व त्या काळी झीनत अमान हे चलनी नाणे नव्हतेच मूळी. तो माधुरी, श्रीदेवी व जूही यांचा काळ होता. असो, तर मुद्दा हा की झीनत अमान च्या नावावर चित्रपट चालवणे शक्य नव्हते. चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

वर उल्लेख केल्याप्रमाणे ह्या चित्रपटाचे साल जरी १९८९ असले तरी तो १९८९ ला प्रदर्शित झाल्याचे मला तरी आठवत नाही. मी हा चित्रपट प्रथम पाहिला तो १९९३ च्या डिसेंबर महिन्यात दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात. त्या काळी दूरदर्शनवर दर शनिवारी सायंकाळी हिन्दी चित्रपट दाखविला जाई. परंतू ११ डिसेंबर १९९३ च्या त्या शनिवारी काही अपरिहार्य कारणामुळे चित्रपट अचानक सायंकाळच्या ऐवजी दुपारी दाखविण्यात आला. ही बाब आधी जाहीर न केल्यामुळे अनेक जण तो पाहू शकले नाहीत. मी घरात त्यावेळी एकटाच असल्याने कंटाळलो होतो व त्यामुळे टीव्ही लावला तर चित्रपटाचे प्रमाणपत्र दाखवले जात होते. पुढे चित्रपट संपेपर्यंत टीव्ही समोरची नजर ढळली नाही. हृषिकेश मुखर्जींनी एक अगदी अशक्य वाटणारी कथा सादर केली होती. या कथेने मला अगदी भारावून टाकले. हा चित्रपट इतरांना कसा वाटला हे जाणण्यासाठी अतिशय उत्सुक होतो. पण नंतर मला कळले की प्रसारण ठरलेल्या वेळे अगोदर झाल्याने तो माझ्या माहितीतल्या कुठल्याच व्यक्तिने बघितला नव्हता. त्यानंतर हा चित्रपट पुन्हा एकदा तरी बघायचाच असे मी ठरवले आणि माझ्या प्रयत्नांना ११ वर्षांनी यश आले. २००४ मध्ये मला या चित्रपटाची VCD मिळाली. त्यानंतर मी स्वत: हा चित्रपट कुटूंबियांसमवेत पुन्हा बघितला त्याचप्रमाणे परिचयातील इतर अनेकांना दाखविला. सर्वांनाच तो फ़ार आवडला. इतका अप्रतिम चित्रपट आपल्या पाहण्यात कसा आला नाही तसेच या चित्रपटाविषयी काहीच चर्चा ऐकण्यात / वाचण्यात कशी आली नाही यावर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
लेखनविषय:
चित्रपट :- नामुमकीन (१९८९) दिग्दर्शक :- हृषिकेश मुखर्जी गीतकार :- आनंद बक्षी संगीतकार :- राहूल देव बर्मन गायक :- किशोर कुमार गायिका :- लता मंगेशकर, अनुराधा पौडवाल अभिनेते :- डॉ. श्रीराम लागू, संजीव कुमार, ओम शिवपुरी, राज बब्बर, विनोद मेहरा अभिनेत्री :- झीनत अमान सदर चित्रपट आपल्यपैकी कोणी पाहिला आहे काय? असल्यास तो आपल्याला आवडला का? तसेच हृषिकेश मुखर्जी ह्यांचे इतर अनेक चित्रपट गाजले. (जरी तिकीटबारीवर चालले नसले तरी त्यांच्याबद्दल कुठेना कुठे काहीतरी छापून आले आणि ते चर्चेत तरी राहिले) परंतू या चित्रपटाविषयी फारशी चर्चा होताना कुठे आढळत नाही. याचे कारण काय असावे?

यशस्वी प्रतिसादकर्ता होण्यासाठी काय करावे ... भाग २

छोटा डॉन ·

काय लिहिलंयत ........... नि:शब्द! (पुढच्या भागात ही प्रतिक्रिया वगळू नका हो! आम्ही वशिल्यातले ना?) --अदितीताई अवखळकर पाटील

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असेच म्हणतो , +१ (कर्मदरिद्री) अभिरत बाकी हसून काफी नाही पण पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतले पाणी बाहेर यायला लागले व्हते. पु. भा. प्रतिक्षेत. (तुमचा गाववाला) अभिरत

In reply to by अभिरत भिरभि-या

झकासराव 19/12/2008 - 09:53
+३ शब्ददरिद्री म्हणलास तरी चालेल. :) फंटाष्टिक, वंडरफूल्ल जमलाय लेख. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

लिखाळ 18/12/2008 - 17:14
>> विस्ताराच्या भयाने इथेच थांबतो. बाकीचे पुढ्च्या भागात मी वस्तर्‍याच्या भयाने असे चुकून वाचले. लेख निवांत वाचून प्रतिसाद देतो. आत्ता घाईत आहे. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

धमाल मुलगा 18/12/2008 - 17:30
=)) लिखाळराव, दोन दिवसांपासून् पाहतोय, एकदम जोरात सुसाट सुटलीय तुमची गाडी! हाबिणंदण :)

In reply to by विसोबा खेचर

आनंदयात्री 20/12/2008 - 10:31
असेच म्हणतो .. सहमत. बाकी या लेखाचा पुढचा भाग पण येउ द्या .. खरडवह्यात लोकप्रिय कसे व्हावे ? १. पोट आत घेउन बनियनवर डंबेल उचललेले फोटु काढुन खरडवहीत चिटकवावे अन उगाचच आख्ख्या मिपाला नमस्कारची खरड टाकावी. "अय्या काय मस्त फोटो" असे रिप्लाय आले की "आज १०० च रिपीटेशन्स मारले भारतात होतो तेव्हा ५०० मारायचो" ... २. स्वतःला कोणतातरी पेशवा डिक्लेअर करुन उगाचच इतरांना हंबीरराव वैगेरे सेनापतींच्या पदव्या देउन आदेश सोडत बसावे. ३. सकाळदुपार संध्याकाळ नमस्कार टाकावे. ४. च ची वैगेरे भाषा वापरायला सुरुवात करावी. ५. हाणामार्‍याच्या बाता कर्‍याव्यात. इ.इ. .. येउनच द्या पुढला लेख. तसा एकजरी पॉइंटर दिला असता तरी तुम्ही त्याचा विस्तार करुन एक लेख पाडलाच असता !! आता ५ लेख पाड्तात. :)

In reply to by विनायक प्रभू

नवीन प्रतिक्रिया प्रसविण्यासाठी बाह्य संप्रेरके वापरावीत. त्याच्या अंमलाखाली प्रतिभा आणी प्रतिमा स्फुरतात. ;) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

घाटावरचे भट 18/12/2008 - 18:03
नवीन प्रतिक्रिया प्रसविण्यासाठी बाह्य संप्रेरके वापरावीत.
त्यांच्या वापराने प्रसववेदना कमी होत असतील तर अधिक उत्तम.

सहज 18/12/2008 - 17:34
हाही पहिल्या भागासारखाच दमदार. असे फार कमी वेळा घडते. यशस्वी परदेश दौर्‍यानंतर लेखनाला एक नवी धार आली आहे. :-) *** लेख क्रमश : **** हे शब्द वाचायला आवडतील असे वाटले नव्हते हो. :-)

In reply to by सहज

छोटा डॉन 18/12/2008 - 17:41
>> हे शब्द वाचायला आवडतील असे वाटले नव्हते हो. बस का सहजशेठ, एवढ्यातच दमलात ? तुमच्या भाषेत अजुन मिपाची बँडविड्थ बोंबलली कुठे ??? "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ", बस इतकेच ... ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

सहज 18/12/2008 - 18:03
>>बस का सहजशेठ, एवढ्यातच दमलात ? अरे तसे नाही अजुन एकदा [पुढचा भाग] असे शब्दमोती फुटणार म्हणुन म्हणून खराखुरा आनंद. बरेच वेळा क्रमशः वाचुन च्यायला अजुन आहेच का? असे नकळत शब्द जे कळफलकापर्यंत येउ नये म्हणुन प्रयत्नांची पराकाष्ठा करतो की नाही? म्हणजे क्रमशः शब्द नकोसा वाटतो पण इथे त्याच्या उलट म्हणजे आनंद होतोय की अजुन नवे भाग येणार. पुढच्या भागाची वाट पहातोय. :-)

In reply to by सहज

छोटा डॉन 18/12/2008 - 18:22
>> म्हणजे क्रमशः शब्द नकोसा वाटतो पण इथे त्याच्या उलट म्हणजे आनंद होतोय की अजुन नवे भाग येणार. भावना पोहचल्या ... उलट माझाच गैरसमज झाला होता नेहमीप्रमाणे अर्धवट गडबडीत ... असो. आपल्याला अजुन वाचन्याची इच्छा आहे हे वाचुन आणंद झाला :) ------ छोटा डॉन

टारझन 18/12/2008 - 18:13
मित्रा ................. तोडलंस ... फोडलंस ... झकास !!
असा प्रतिसाद देऊन बसता व त्या बिचार्‍या लेखकाचा चेहरा कथेतल्या भुतापेक्षा भयानक होऊन बसतो.
आग्गाग्गाग्गा !! =)) =)) =)) - टार्‍याडॉण

In reply to by टारझन

ऍडीजोशी 18/12/2008 - 18:53
- टार्‍याडॉण ऐवजी टॉण कसं वाटतं?

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

टारझन 18/12/2008 - 19:20
ऐवजी टॉण कसं वाटतं?
ऐडी जौषी साहेब !! आपली कळकळ कळाली !! पण ते वृत्तात मार खातंय ना छोटा डॉण (७ मात्रा) चं विडंबण करताना मात्रा लक्षात घ्या, सहि विडंबण हे मात्रा वृत्त आहे !! म्हणून टारडॉण किंवा टॉण न करता टार्‍या डॉण चपलख आहे (वृत्ताकार रॉकिपंत) टारपंत

शितल 18/12/2008 - 18:26
डॉन्या, डोक्यावरील केसांना तेल लावल्यावर बुध्दी एवढी नॉनस्टॉप जाते माहित नव्हते. (ह.घे.) ;) हे राहिलेच की, समज कोणी नुसते विषय दिलेला नाही असे विषयात म्हटले आणी प्रतिक्रीया फक्त :) अशी असेल तर कधी विषय -:) प्रतिसाद दिलेला नाही, तर कधी विषय आणि प्रतिसाद - :) असे असेल तर कधी विषय आणी प्रतिसाद दोन्ही दिलेले नाहीत अशी प्ततिक्रीया असेल तर ह्या मार्गदर्शन करावे, मोठ्या प्रतिसादाचे सम्राट. :)

लिखाळ 18/12/2008 - 18:42
त्या ट्युलिप्सच्या फुलांचा ज्युस / मोरांबा मिळतो त्या शेडच्या मागे, घेतलात का ? हा हा हा.. एक्दम जोरात. ट्युलिप्सचा मोरांब्यापेक्षा आम्हाला आमच्या परसातल्या आंब्याचा मुरांबा फार आवडतो. बाय द वे आम्हाला ट्युलिपवरुन आमच्या परसातल्या मोगरीच्या फुलांची आठवण झाली अंमळ हळवा झालो. --(अ?? (निवासी)भारतीय) लिखाळ. त्या राजवाड्यची मागची पडकी विहीर पाहिलीत का ? अप्रतिम आहे बॉस .... " बिपिन यांची भयकथा वाचल्यापासून आम्ही विहिरीत डोकावत नाही. --(स्पष्टवक्ता) लिखाळ.

In reply to by लिखाळ

इनोबा म्हणे 19/12/2008 - 00:18
त्या ट्युलिप्सच्या फुलांचा ज्युस / मोरांबा मिळतो त्या शेडच्या मागे, घेतलात का ? 'त्या पोफळीच्या बागेत, जिथे तुम्ही सहकुटूंब फोटो काढला आहे तिथे मी चार वर्षापुर्वी तांब्या घेऊन बसलो होतो.' हे कसे वाटेल? -इंटरनैशनल इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन 19/12/2008 - 09:37
>>'त्या पोफळीच्या बागेत, जिथे तुम्ही सहकुटूंब फोटो काढला आहे तिथे मी चार वर्षापुर्वी तांब्या घेऊन बसलो होतो.' हे कसे वाटेल ? =)) =)) इनु यु टु ???? क्लासच ... अप्रतिम ..! "त्या" आठवणीने डोळ्यात पाणी आले शेठ, धन्यवाद आठवणी जागवल्याबद्दल ;) ------ ( हलकट ) छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

विजुभाऊ 20/12/2008 - 11:52
"त्या" आठवणीने डोळ्यात पाणी आले शेठ, धन्यवाद आठवणी जागवल्याबद्दल डोळ्यात पाणी येउ द्यावयाचे नसेल तर एरन्डेल वापरा. ( आमच्या शेजारांच्या अनुभवावरुन) अवांतर : ( डोळ्यात तेल घालून पहारा करणे हा वाक्प्रचार नक्की कशावरुन आला असेल) आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

In reply to by विजुभाऊ

आनंदयात्री 20/12/2008 - 11:56
>>डोळ्यात पाणी येउ द्यावयाचे नसेल तर एरन्डेल वापरा. ( आमच्या शेजारांच्या अनुभवावरुन) चामायला शेजार्‍यांशी काय काय शेअर करता ??

In reply to by आनंदयात्री

शितल 22/12/2008 - 21:39
>>चामायला शेजार्‍यांशी काय काय शेअर करता ?? =)) =))

In reply to by इनोबा म्हणे

लिखाळ 19/12/2008 - 20:15
>> 'त्या पोफळीच्या बागेत, जिथे तुम्ही सहकुटूंब फोटो काढला आहे तिथे मी चार वर्षापुर्वी तांब्या घेऊन बसलो होतो.' हे कसे वाटेल? हा हा हा ... :) -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

विसुनाना 18/12/2008 - 18:42
व्वा, काय टोप्या उडवल्यात , हसुन हसुन खुर्चीवरुन पडलो.शेवट जरा मतकर्‍यांसारखा केलेला वाटतोय, पण व्यवस्थीत जमते आहे तुम्हाला.जणु रणरणत्या वाळवंटातुन जाताना एकदम गार वार्‍याची झुळुक अंगावर आली असे वाटले , लेख वाचताना प्रयत्नाने आवरुन ठेवलेला अश्रुंचा बांध शेवटच्या परिच्छेदामुळे अनिर्बंध वहात गेला , ह्या उत्सवात अक्षरश: बेहोश होऊन न्हाऊन निघालो , खांडेकरांच्या कलात्मकतेच्या आणि हळुवारपणाच्या अंगाने कथा वहात जाते , आसपास चाललेल्या कल्लोळातसुद्धा एकदम सुन्न होऊन गेलो.जर फ्लेश वापरला नसता तर एक नैसर्गीक तजेला आला असता ...शेठ, चाल्लो आहे मसणात, काय काय पाहुन घेऊ? तुम्ही अनुभवी लोकं म्हणुन तुमचा सल्ला घ्यावा म्हटले.

In reply to by विसुनाना

विसुनाना, शेवट जरा मतकर्‍यांसारखा केलेला वाटतोय, पण व्यवस्थीत जमते आहे हे वाक्य समजल्यासारखं वाटतंय. पण... जणु रणरणत्या वाळवंटातुन जाताना एकदम गार वार्‍याची झुळुक अंगावर आली असे वाटले , लेख वाचताना प्रयत्नाने आवरुन ठेवलेला अश्रुंचा बांध शेवटच्या परिच्छेदामुळे अनिर्बंध वहात गेला , ह्या उत्सवात अक्षरश: बेहोश होऊन न्हाऊन निघालो , खांडेकरांच्या कलात्मकतेच्या आणि हळुवारपणाच्या अंगाने कथा वहात जाते , आसपास चाललेल्या कल्लोळातसुद्धा एकदम सुन्न होऊन गेलो.जर फ्लेश वापरला नसता तर एक नैसर्गीक तजेला आला असता हे नीटसं समजलं नाही. जरा विस्ताराने सांगाल का? (म्हणजे मी वाचल्याचे कष्ट घेतले असा खोटा अभिनिवेष आणणार नाही, पण तरीही!) (झालंच तर डान्यासारखा एक प्रतिसाद टर्न्ड लेख लिहाच!) ;-)

अवलिया 18/12/2008 - 19:25
मी सर्व भाग पूर्ण झाल्यावरच मग एका बैठकीत सर्व वाचत असतो. त्यामुळे तुमचे जोवर क्रमश: चालले आहे, तोवर मला त्यात खरडवहीत लिंक देऊन गुंतवू नका. धन्यवाद. (रामदास, हेच सांगणे तुम्हालाही. जेव्हा समाप्त लिहाल, तेव्हाच मी वाचीन. पी सी जेसी त्यामुळेच अजून वाचलेले नाही, आणि रोशनी न वाचताच "वा वा" म्हटलेले आहे, हे स्पष्ट आहे.) :) -- अवलिया अवलियाची अनुदिनी

डॉन भाऊ, तुमच्याकडे शिकवणी लावावी अशी इच्छा झाली. अर्थात मार्गदर्शनात्मक लेख आवडला.... (स्वगत - छे, काहीही लिहायचे ठरवले तरी त्याची पार चिरफाड केलेली आहे. भावना कशा पोचवू बाबा याला? :S ) असो. जे आहे ते खल्लास लिहिले आहे. आपला, (पंखा) भास्कर ता.क. - आम्ही तुमच्या बडी लिस्ट मध्ये नाही वा स्नेह्यांमध्येही नाही तरी पण लेख मनापासून आवडला आहे म्हणून केवळ हा प्रतिसाद.

चतुरंग 19/12/2008 - 01:41
जनातलं नसलं तरी मनातलं तुला सांगायला हरकत नसावी की इथला हैदोस कमी होण्यासाठी तुला आफ्रिकेला लवकरात लवकर पाठवून द्यावे असा काथ्याकूट तुझ्या हापिसात सुरु झाला आहे! ही बातमी मुक्तक किंवा विडंबन नसून साक्षात भयकथा आहे ह्याची जाणीव असूदे. तुला आगामी थरकापाची जाणीव करुन देणारे हे सूचक लेखन अजिबात क्रिप्टिक नाही हेही लक्षात ठेव. आफ्रिकेच्या दौर्‍यावरुन आलास की तू लगेच कविता करायला लागशील असा तुला आशीर्वाद आणि लगेहात तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा!! ;) चतुरंग

In reply to by चतुरंग

टारझन 19/12/2008 - 02:19
पण ते भयकथेतलं भुत आता काही दिवस तिकडंच भारतात चाल्लय !!! वार्ड क्र.४२० चे धडाडीचे, उमदे, तरूण , जागतिक किर्तीचे समाजसेवी णेतृत्व मा.श्री चतुरंगजी रावजी यांस मंडळातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! जिवेत सहस्त्र शरदम् !!! ढोलताशे : ढँणण्ण्ण ढँण्ण्ण्ण ढॅंण्ण्ण्ण .. धत्ताड तत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड शुभेच्छूक पै.कुबड्या खविस अध्यक्ष,टारझन मित्र मंडळ, अफ्रिका, रजि.नं. महा१२/४२०/१२३४४५ (शुभेच्छूक : पै.धमु, पै.इन्या, पै.डॉण, पै.आंद्या, पै.कुंद्या,पै.प्रभु., पै.बिप्स्, पै.सुर्य्, पै.णाणा,पै.लिखाळ.,पै.वरद्या,आणि बाकी रेवड्यांवर कुस्त्या करणारे पै लोक्स )

अप्पासाहेब 19/12/2008 - 09:42
ह्याच पध्दतीचा (का जशाच तसा) लेख कुठ्तरी वाचल्याचे आठ्वतय बॉ.... (सत्राशे साठ संकेत स्थळे धुंडाळणारा शि.आय. डि.) आप्पा लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते

In reply to by अप्पासाहेब

छोटा डॉन 19/12/2008 - 09:44
तसे असल्यास कॄपया लिंक द्यावी. हे लेखन अगदीच नवे आहे असा माझा दावा नाहीच पण तरीही "जशाच तसा लेख" आढळल्यास व मी त्याची कॉपी केली हे सिद्ध झाल्यास मी हा लेखच काय पण माझे मिपावरचे अकाउंट डिलीट करुन निघुन जाईन हिमालयात. असो. ------ ( स्पष्टावक्ता )छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

अवलिया 19/12/2008 - 09:51
निघुन जाईन हिमालयात. नको तिथे बरीच कार्टी आधीच गेली आहेत. तुम्ही सह्याद्री किंवा सातपुडा या भागात या. हवी ती मदत करण्यास तयार आहे. फक्त येतांना स्टॉक जास्तीचा आणा. सध्या थंडी जास्त आहे. -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

इनोबा म्हणे 19/12/2008 - 10:02
त्यापेक्षा पर्वतीवर यावे अशी मी डानरावांना इनंती करतो. स्टॉकची काळजी आम्ही घेऊ. (स्टॉकीस्ट) -इन्यालाडू पान खाउन कुठेही पचकन थुंकणे ही आमची वैयक्तीक बाब आहे आणि त्याचे कुणालाही स्पष्टीकरण देण्यास आम्ही बांधील नाही. -हूकूमावरुन -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

यशोधरा 19/12/2008 - 10:15
डान्या, हिमालय, सह्याद्री -सातपुडा, पर्वती कुठेही जा, ज्यांना हवा त्यांच्यासाठी ष्टाक पण घेऊन जा, पण आधी चाकलिटा दे जर्मनीवरुन आणलेली आणि मग उलथ कुठे तो! :P

धमाल मुलगा 19/12/2008 - 11:07
लेख फक्कड जमलाय.. शुध्दलेखनाच्या चुका सहज टाळता येण्याजोग्या आहेत. कृपया तिकडे थोडे लक्ष द्या. बाकी, तुम्हावर सरस्वती देवी प्रसन्न आहेत हे ह्या छोट्याश्या लेखातून जाणवतं आहेच! परंतु...... एकुणच पाहता, लेखाच्या माध्यमातून व्यक्तींवर, त्यांच्या सवयींवर आडून आडून शिखंडी वार करणे योग्य वाटत नाही. असो, ज्याची त्याची मर्जी! -(खवचट) ध मा ल. अवांतरः काय डान्या, कसा वाटला प्रतिसाद्द? हाय कं नाय येकदम हायकल्लास ;) येड्या, तुला काय वाटलं तू एकटाच प्रतिसादांचे अभ्यास करतोयस होय? :P

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 20/12/2008 - 11:58
एखाद्याला असे आडवळणाने शिखन्डी का म्हणता? ( हा घ्या) वैयक्तीक आवडी सार्वजनीक केल्या; की सर्व जण तुम्हाला वैयक्तीक त्रास देतात)

अनिल हटेला 19/12/2008 - 12:04
>>>लेखाच्या माध्यमातून व्यक्तींवर, त्यांच्या सवयींवर आडून आडून शिखंडी वार करणे योग्य वाटत नाही.=)) =)) सही रे धम्या....... डॉनराव ...फूल फॉर्मात आहे सध्या......=D> आंदे और भी...... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

बर्‍याच दिवसांनी एक अभ्यासपुर्ण व स्वानुभवावर आधारीत धगधगते लिखाण वाचण्यास मिळाले , त्याबद्दल आभार. उगाच मुळमुळीत आणी गुळमुळीत लिहिणार्‍यांच्या गर्दीत आपणा सारखा एखादा स्वता:ची वेगळी वाट निवडतो तेंव्हा एक मराठी वाचक म्हणुन अभिमानाने ह्रुदय भरुन येते, भावना उचंबळुन चंबळेच्या नदिप्रमाणे व्हायला लागतात ! आ हा हा आज तुमच्या शब्दवर्षावात एखाद्या पावसाच्या जोरदार सरीत कुत्र्याच्या छत्रीने भिजावे तसे चिंब भिजलो. भावनांच्या कोंडमार्‍यास आपण ज्या पद्धतीने एक मोकळी वाट करुन दिली आहे ती पाहता , मराठीस आता व.पु. किंवा रणजितांची उणिव नक्किच जाणवणार नाही. आपली लिखाण शैली व एकुणच विषयाची मांडणी बघता मराठी लेखनाचा अश्व आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचण्यास काहिच हरकत नाही असे वाटते. साहित्य संघातील काहि जाणत्या वाचकांशी आपल्या लिखाणाबद्दल चर्चा केली असती, विचारांचे अनेक प्रवाह समोर आले पण एकुणच सर्वांचा सुर हा आपल्याला अनुकुल असा दिसला. आपण दिलेले दाखले हे आपले ऐतीहासिक ज्ञान व अभ्यास ह्याचा एक चालता बोलता शब्दकोष ठरेल. बुद्धिभेद करणारे आपले हे एखाद्या नुकत्याच धार केलेल्या समशेरी सारखे लि़खाण मनावर आणी आमच्या बुद्धीवर खोलवर आघात करुन गेले हे निश्चीत ! आता ह्या भळभळ वाहणार्‍या जखमा घेउन आपला निरोप घेतो. जखमी राजकुमार |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन 19/12/2008 - 13:25
च्यामारी काय लिव्हलयं, काय लिव्हलयं !!! सलाम बॉस ...! अवांतर : च्यायला असली स्तुती ऐकायची आमाला सवय नाय हो, त्यापेक्षा "डॉन्या फोकलीच्या जोड्याने मारले पाहिजे तुला, आता येच पुण्यात पायच मोडतो तुझा एवढी सगळ्यांची खेचल्याबद्दल " असे लिहले असते तर जरा ओळखीचे ( म्हणजे धमालरावांच्या भाषेसारखे ) वाटले असते. असो. ------ छोटा डॉन

अनिल हटेला 19/12/2008 - 12:49
जखमी राजकुमार तु सुद्धा तोडलस मित्रा.....जिंकलस.....हरवललंस..... तुझे लिखाण वाचुन ह्रदय भडभडून ,उचंबळून ,गलबलून (इ.इ.) आले.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

३. जनातलं - मनातलं : जर तुम्ही सुक्ष्मात जाऊन निरीक्षण केलेत तर तुम्हाला मिपावरच्या दर ३ लेखामागे १ लेख हा "जनातलं मनातलं " ह्या सदरात आल्याचे दिसेल, थोडक्यात हा भाग महत्वाचा. बर्‍याच वेळा आपला लेख नक्की "काथ्याकुट / कविता / आणखी काही " ह्या पैकी कशात मोडतो हे ( वेळीच ) लक्षात न आल्याने बरेच लोक तो थम्ब रुलप्रमाणे "जनातलं मनातलं" ह्य सदरात बिनधास्त टाकुन देतात. असो. ह्यावर कसे प्रतिसाद द्यावेत ह्याचेसुद्धा मी थोडे वर्गीकरण केले आहे. जर लेखन "कथा" ह्या वर्गात मोडत असेल तर प्रतिसाद देण्याच्या व्याख्या थोड्या भिन्न आहेत. पहिल्यांदा ( जमल्यास ) कथा वाचुन ती नक्की कसली आहे ह्याचा निर्णय करावा. म्हणजे ती भयकथा आहे की सिरीअस आहे की विनोदी आहे की विडंबन करुन कुणाच्या टोप्या उडवणारी आहे ह्याचा निर्णय करुन घ्यावा. नाहीतर काय होते एखादी "भयकथा" असते आणि त्याला तुम्ही चुकुनच " व्वा, काय टोप्या उडवल्यात , हसुन हसुन खुर्चीवरुन पडलो " असा प्रतिसाद देऊन बसता व त्या बिचार्‍या लेखकाचा चेहरा कथेतल्या भुतापेक्षा भयानक होऊन बसतो. तर काळजी महत्वाची हे लक्षात आलेच असेल. जर कथा ही विनोदी असेल तर तुमचे काम सोपे होते, फक्त " अशक्य , ठ्ठ्या ऽऽऽऽऽ , फु ट लो , आग्गायायाया ऽऽऽ , कळफलकावर + मॉनीटरवर वर कॉफी सांडली , खुर्चीवरुन पडलो , हसुन हसुन मेलो " अशी ५-६ आतिशयोक्तीपुर्ण वाक्ये जवळ बाळगावीत. पण फक्त एवढेच लिहुन प्रतिसाद पुर्ण होत नाही, त्या लेखातीलच २-४ वाक्ये निवडुन ती आहे तशी आपल्या प्रतिक्रीयेत टाकुन त्याखाली वरील तुकडे वापरल्यास प्रतिसादाला "वजन येते" असा अनुभव आहे. सम्जा जर वाक्ये सुचली नाहीत तरीही काळजी नाही, नुसत्या " " अशा स्मायली टाकल्या तरी काम भागते. ह्यातलेसुद्धा काहीही करायचा कंटाळा आला असेल तर एखादी भलीमोठ्ठी प्रतिक्रीया निवडावी ( ह्या देणार्‍यांची संख्या मोप आहे, फिकर नॉट ) आणि त्यालाच "असेच म्हणतो , +१ " असा प्रतिसाद टाकुन मोकळे व्हावे ( मात्र ह्याला आम्ही कर्मदरिद्रीपणा म्हणतो. असो. ) जर लेखक एखादा "मिपावरील थोर व्यक्ती " असे तर मात्र " व्वा , भाईकाकांची आठवण आली ( पुलं म्हणणे म्हणजे घोर पाप बरे का. ) , चिंवी जोश्यांची शैली वाटते , हा प्रकार तुम्हाला चांगला जमतो " वगैरे लिहावे लागते, नाहीतर तुमच्या प्रतीक्रीयेला काडीइतकी किंमत नाही, तुम्ही नाही लिहले तर अजुन दुसरे कोणीतरी लिहतेच व लोक त्याला "सहमत आहे" असा उपप्रतिसाद देत राहतात, म्हणुन "स्टाईकर्स ऍडव्हान्टेज " कधीही सोडु नये ... जेवढा मोठ्ठा प्रतिसद तेवढे तुम्ही जास्त फेमस हे लक्षात आले मग पुढे काही अवघड नाही. जर कथा ही भयकथा "कॅटेगिरी" तली असेल तर मामला जरासा कठीण आहे, ह्यांना प्रतिक्रीया देण्यासाठी अभ्यास लागतो. नुसत्या " भयानक, दरदरुन घाम सुटला , सरसरौन काटा आला अंगावर , कच्चकन दचकलो " ह्या अगदीच सर्वसामान्य प्रतिक्रीया झाल्या. जर आपली छाप जमवायची असेल तर उगाच आपलं लेखकाची एखाद्या "प्रसिद्ध भयकथा लेखकाशी " तुलना करणे आवश्यक ठरते. उदा : शेवट जरा मतकर्‍यांसारखा (उल्लेख असाच करावा, जर तुम्ही "रत्नाकर मतकरी यांच्यासारखा" असे लिहलेले तर तुम्ही नवशिके आहात हे मिपावरचे पोरटे सुद्धा ओळखेल ) केलेला वाटतोय, पण व्यवस्थीत जमते आहे तुम्हाला. किंवा अगदी तंतोतंत धारपच, मला वाटतं त्यांची "अखेरचा प्रमाद ( म्हणजे काय कुणास ठाऊक ? ) " ही कथा ह्याच अंगाने जाते. किंवा ते त्या "मुडदे की जान खतरे मे है / सुखी नदीं मे बहती हुई लाश" मधल्या कथानकासारखे वाटते नाही ? असे प्रतिसाद टाकणे आवश्यक बनते, म्हणाजे काय होते की लेखकाच्या अंगावर मुठभर मास चढुन तो आपला सुमडीत "हॅहॅहॅ, कसेच कसे. त्यात शेवटी माणुस मरुन भुत होत नाही तर भुताला उ:शाप मिळुन त्याचा माणुस होतो व ते दोघे लग्न करतात " असे स्पष्तीकरण देत बसतो, तुम्ही आपलं " हम्म, पण शैली तशी वाटली बॉ,असो." असा ठेका सोडु नका ... हे एकदा जमले की झालेच ...! तिसरा प्रकार आहे तो म्हणजे "मुक्तक अथवा सिरीअस लिखाण " करणार्‍याचा ... महत्वाची सुचना : वर दिलेल्या "शँपल प्रतिक्रीया / सल्ला " ह्याचा वापर इथे अजिबात करु नये. ह्याचा साज पुर्ण वेगळा आहे. नेहमीप्रमाणे ( जमल्यास ) पुर्ण कथा वाचुन काढावी, शक्यतो हा प्रकार "मान्यवर व जाणाकार" व्यक्तीच हाताळत असल्याने ह्यांच्या लेखाला वजन असते, उगाच फालतु प्रतिक्रीया इथे टाकल्यास तुमच्यावर "बदनाम मिपाकर" व्हायची दुर्दशा येऊ शकते. सर्वसाधारण अशा लेखाला " सलाम ..! , केवळ अ प्र ति म , खल्लास वगैरे वगैरे " टारुने सांगितलेल्या प्रतिक्रीया प्राथमीक अवस्थीत टाकता येतील. पण आता तुम्ही जम बसवायचे ठरवल्याने तुम्हाला हे अलाऊड नाही. आता तुम्ही थोडाश्या कलात्मक, नाजुक व साहित्यीक प्रतिक्रीया टाकाव्यात अशी अपेक्षा असते. म्हणजे बघा की " जणु रणरणत्या वाळवंटातुन जाताना एकदम गार वार्‍याची झुळुक अंगावर आली असे वाटले , लेख वाचताना प्रयत्नाने आवरुन ठेवलेला अश्रुंचा बांध शेवटच्या परिच्छेदामुळे अनिर्बंध वहात गेला , ह्या उत्सवात अक्षरश: बेहोश होऊन न्हाऊन निघालो , खांडेकरांच्या कलात्मकतेच्या आणि हळुवारपणाच्या अंगाने कथा वहात जाते , आसपास चाललेल्या कल्लोळातसुद्धा एकदम सुन्न होऊन गेलो " अशा व तत्सम प्रतिक्रीया टाकणे आवश्यक ठरते. जेवढे जास्त "अनाकलनीय" लिहताल तेवढेच जास्त वजन पडते. साध्या सरळ प्रतिक्रीयेला जास्त भाव मिळत नाही. असो. अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काही वेळेला लेखकाचे " अप्रतिम बॉस , आत्तापर्यंत लेखणी का म्यान केली होतीत ? / रुद्ध प्रतिभा भरभरुन वाहु देत / अबक हे मिपावरचे मोठ्ठे फाउंड आहे असे मी आधीच म्हणलो होतो / तुमचे नाव वाचले आणि लेख वाचायला घेतल, नेहमीप्रमाणे निराशा झाली नाही. " वगैरे वगैरे प्रतिक्रीया टाकाव्यात, ह्याला समर्थन तर मिलतेच शिवाय तुम्ही लेख्काच्या "बडी लिस्ट" मध्ये जायला मोकळे होता. शेवटचा "अनकॅटेगराईझ्ड प्रकार " म्हणजे उगाच आपले काहीही लिहणार्‍यांचा, ते आपले उगाच " पुण्यात गादी कुठे मिळेल ? पंखा कुठे दुरुस्त करायचा ? सगळ्यात भारी शेवपापडी /अनारसे कुठे मिळतात ? संघाने चालवलेला गांधीवाद . सलमानने कत्रिनाला काय म्हटले " अशा विषयांवर काहीबाही खरडतो तो, ह्याला विषयांचे बंधन नाही, तुम्ही काहीही लिहु शकता. ह्याला जास्त भाव मिळत नसल्याने "तुम्ही ह्याकडे ढुंकुनही न पहाणे योग्य" ठरेल. तिकडे फिरकुच नका. उलट आपल्यासारख्याच एखाद्या पप्रथितयश प्रतिसादकर्त्याचा खरडवहीत "काय फालतुपणा चालला आहे, अक्षरशः उबग आला आता , आयला गिरणी लावल्यासारखे लेख पाडतात " अशा पिंका टाकुन द्याव्यात, आपली चर्चा मस्त रंगते व "भोचकपणे आपल्या खव वाचणार्‍यांना" आपण फार "अभिरुचीसंपन्न, चोखंदळ, साहित्याचे खरे वारसदार, गुणग्राहक " वगैरे असल्याचा उगाच गैरसमज होतो व आपली "इज्जत वाढते" , मग हा "गैरसमज" हळुहळु पसरवायला हीच मंडळी मदत करतात. मधुन आधुन त्यांच्याही खरडवह्यात "काय मग, काय नवे लिखाण ? " असे लिहुन यावे त्यावर रिप्लाय म्हणुन " बस का मालक, चेष्टा करता का गरिबाची ? आम्ही कसले लिहणार , आम्ही तर तुमचे फॅन. बोला कधी लिहताय ? " अशी खरड आलीच म्हणुन समजा. त्यावर उत्तर म्हनुन फक्त " लवकरच, सध्या थोडा बिसी आहे, मनासारखे लिहायला निवांत वेळ पाहिजे हो " असे ठोकुन द्यावे. म्हणजे पुढ्च्या वेळी तुम्ही काहीही लिहले तरी "ह्यांचा तुमची तोंड फाटुस्तोवर स्तुती" करणारा प्रतिसाद नक्की ... असो. ४. कलादालन : हा एक नवा प्रकार मिपावरच प्रथम अस्तित्वात आला आहे, अजुन नाविन्य असल्याने तुम्हाला हात चालवायला बर्‍याच संधी आहेत. पण इथे मात्र फक्त फोटाँवर प्रतिक्रीया द्यायची असल्याने फाफटपसारा चालत नाही, मुद्द्याचे बोलावे लागते. आता हे कसे जमवावे ते सांगतो. नेहमीप्रमाणे टारुबाबाने सांगितल्याप्रमाणे "फो टू के व ळ अ प्र ति म , ४ नंबरचा फोटू झकास आला आहे , डोळ्यचे पारणे फिटले, डेस्कटॉपवर लावला आहे, मस्तच " ह्यासारख्या प्रतिक्रीया टाकुन ठेवाव्यात. आता महत्वाचा मुद्दा, प्रत्येक प्रतीक्रियेच्या खालीच लगेच "अवांतर " ह्या सदराखाली आपला मोठ्ठेपणा, शहाणपणा , गर्व दाखवणार्‍या कमेंट्स द्याव्यात. जसे की "सेटिंग काय लावले हो ? नाही , जराशे दुसर वाट्तात फोटो, आय एस ओ ४००० वापरले असते तर अजुन ब्राईट आले असते. असो. लेन्स कुठली हो ? फोकस कसा मारलात ? जरा अजुन क्लोजअप हवा होता असे वाटते. जर फ्लेश वापरला नसता तर एक नैसर्गीक तजेला आला असता ... शटर स्पीड थोडे जास्त झाले असे वाटते, एवढ्या प्रकाशाला थोडे कमीच वापरा पुढ्च्या वेळी ..." ह्या प्रतिक्रीया ठोकल्या की तुम्ही म्हणजे अगदी जगप्रसिद्ध फोटोग्राफरचा आव आणायला रिकामे. लोक सुद्धा ह्यावर मनोसोक्त भांडतात. बिचारा लेखक सुद्धा आपल्याला "टेक्नीकल डिटेल्स्ची" काडीइतकी माहिती न्सल्याचे मान्य करतो व तुम्हाला सांगायची विनंती करतो. तुम्ही मात्र " हम्म, सांगायला हरकत नाही तसे, पण सध्या एवढा मोठ्ठा लेख लिहायला वेळ नाही, बघतो सवडीने " असे ठोकुन द्यावे. लोक वाट बघत बसतात पण कुणी विचारायची हिंमत करत नाही. थोडक्यात तुम्ही जिंकलात स्पष्टपणे .... अजुन एक प्रकार म्हणजे "फोटोम्च्या स्थानावर / लोकेशन वर कमेंट्स" द्यायच्या ... उदा " का हो तिथल्या डाळिंबच्या बागा अजुन तशाच आहेत का ? आम्हाला आमच्या ट्रीपची आठवण झाली, तुम्ही ज्या दगडाचा फोटो दिलात त्यावरुन पडुन माझा कपाळमोक्ष होता होता वाचला होता. आयला, डोंगर अजुन तशेच्या तसेच, मी गेलो होतो ४० वर्षापुर्वी, कमाल आहे. त्या ट्युलिप्सच्या फुलांचा ज्युस / मोरांबा मिळतो त्या शेडच्या मागे, घेतलात का ? तुम्ही नशिबवान खरे, आम्ही गेल्या वेळी गेलो होतो तेव्हा तेथे चक्क बर्फ होता, मग आमच्या हीने / ह्यांनी त्यावरुन स्कीईंग करता करता पाय मोडुन घेतला होता. असो. त्या राजवाड्यची मागची पडकी विहीर पाहिलीत का ? अप्रतिम आहे बॉस .... " असे जर तुम्ही बोललात तर लोक तुमच्याकडे "काय दर्दी माणुस आहे ?" ह्या नजरेने पाहतील. शिवाय तुम्ही गेलाबाजार निम्मे तरी जग हिंड्ला आहात हे १० लोकात सिद्ध होते. शिवाय तुम्हाला ह्यांची फारच माहिती आहे असा "गैरसमज" भराभर पसरुन तुमचे नाव होते. मग लोक तिकडे जाताना तुम्हाला विचारतात " शेठ, चाल्लो आहे मसणात, काय काय पाहुन घेऊ, तुम्ही अनुभवी लोकं म्हणुन तुमचा सल्ला घ्यावा म्हटले" ... सहमत

In reply to by पुणेरी मिसळ्पाव

धमाल मुलगा 19/12/2008 - 15:15
आयला, जवळपास आख्खा लेखच उचलुन टाकलाय की प्रतिक्रीयेत! =)) आमचा सादर प्रणाम हो तुम्हाला _/\_ लय भारी हो! आता बोल डान्या, हाय का तुझी हिंमत ह्याच्यावर भाष्य करायची?

shweta 31/12/2008 - 16:46
छोट डॉन .. तु खरा मोठ्ठा डॉन आहेस. मिसळपाव वरचे बाकिचे लेख नुसते मुळमुळीत आणि "अति शहाणपणा " करणारे वाटतात. तु तुझ्या लेखना ने त्या लेखकांना त्यांची जागा दाखवली आहेस. अभिनंदन.

limbutimbu 31/12/2008 - 17:26
>>>> मी गेलो होतो ४० वर्षापुर्वी, कमाल आहे. अस लिहिलत की आजोबाच काय, तमाम मिपाकर तुम्हाला पणजोबा खापर पणजोबा समजायला/म्हणायला मोकळे! मग नावामागे "छोटा" लावा की अजुन काय करा......! बरोबर की नाय "छोटा डॉन"? :D आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

काय लिहिलंयत ........... नि:शब्द! (पुढच्या भागात ही प्रतिक्रिया वगळू नका हो! आम्ही वशिल्यातले ना?) --अदितीताई अवखळकर पाटील

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असेच म्हणतो , +१ (कर्मदरिद्री) अभिरत बाकी हसून काफी नाही पण पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतले पाणी बाहेर यायला लागले व्हते. पु. भा. प्रतिक्षेत. (तुमचा गाववाला) अभिरत

In reply to by अभिरत भिरभि-या

झकासराव 19/12/2008 - 09:53
+३ शब्ददरिद्री म्हणलास तरी चालेल. :) फंटाष्टिक, वंडरफूल्ल जमलाय लेख. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

लिखाळ 18/12/2008 - 17:14
>> विस्ताराच्या भयाने इथेच थांबतो. बाकीचे पुढ्च्या भागात मी वस्तर्‍याच्या भयाने असे चुकून वाचले. लेख निवांत वाचून प्रतिसाद देतो. आत्ता घाईत आहे. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

धमाल मुलगा 18/12/2008 - 17:30
=)) लिखाळराव, दोन दिवसांपासून् पाहतोय, एकदम जोरात सुसाट सुटलीय तुमची गाडी! हाबिणंदण :)

In reply to by विसोबा खेचर

आनंदयात्री 20/12/2008 - 10:31
असेच म्हणतो .. सहमत. बाकी या लेखाचा पुढचा भाग पण येउ द्या .. खरडवह्यात लोकप्रिय कसे व्हावे ? १. पोट आत घेउन बनियनवर डंबेल उचललेले फोटु काढुन खरडवहीत चिटकवावे अन उगाचच आख्ख्या मिपाला नमस्कारची खरड टाकावी. "अय्या काय मस्त फोटो" असे रिप्लाय आले की "आज १०० च रिपीटेशन्स मारले भारतात होतो तेव्हा ५०० मारायचो" ... २. स्वतःला कोणतातरी पेशवा डिक्लेअर करुन उगाचच इतरांना हंबीरराव वैगेरे सेनापतींच्या पदव्या देउन आदेश सोडत बसावे. ३. सकाळदुपार संध्याकाळ नमस्कार टाकावे. ४. च ची वैगेरे भाषा वापरायला सुरुवात करावी. ५. हाणामार्‍याच्या बाता कर्‍याव्यात. इ.इ. .. येउनच द्या पुढला लेख. तसा एकजरी पॉइंटर दिला असता तरी तुम्ही त्याचा विस्तार करुन एक लेख पाडलाच असता !! आता ५ लेख पाड्तात. :)

In reply to by विनायक प्रभू

नवीन प्रतिक्रिया प्रसविण्यासाठी बाह्य संप्रेरके वापरावीत. त्याच्या अंमलाखाली प्रतिभा आणी प्रतिमा स्फुरतात. ;) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

घाटावरचे भट 18/12/2008 - 18:03
नवीन प्रतिक्रिया प्रसविण्यासाठी बाह्य संप्रेरके वापरावीत.
त्यांच्या वापराने प्रसववेदना कमी होत असतील तर अधिक उत्तम.

सहज 18/12/2008 - 17:34
हाही पहिल्या भागासारखाच दमदार. असे फार कमी वेळा घडते. यशस्वी परदेश दौर्‍यानंतर लेखनाला एक नवी धार आली आहे. :-) *** लेख क्रमश : **** हे शब्द वाचायला आवडतील असे वाटले नव्हते हो. :-)

In reply to by सहज

छोटा डॉन 18/12/2008 - 17:41
>> हे शब्द वाचायला आवडतील असे वाटले नव्हते हो. बस का सहजशेठ, एवढ्यातच दमलात ? तुमच्या भाषेत अजुन मिपाची बँडविड्थ बोंबलली कुठे ??? "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ", बस इतकेच ... ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

सहज 18/12/2008 - 18:03
>>बस का सहजशेठ, एवढ्यातच दमलात ? अरे तसे नाही अजुन एकदा [पुढचा भाग] असे शब्दमोती फुटणार म्हणुन म्हणून खराखुरा आनंद. बरेच वेळा क्रमशः वाचुन च्यायला अजुन आहेच का? असे नकळत शब्द जे कळफलकापर्यंत येउ नये म्हणुन प्रयत्नांची पराकाष्ठा करतो की नाही? म्हणजे क्रमशः शब्द नकोसा वाटतो पण इथे त्याच्या उलट म्हणजे आनंद होतोय की अजुन नवे भाग येणार. पुढच्या भागाची वाट पहातोय. :-)

In reply to by सहज

छोटा डॉन 18/12/2008 - 18:22
>> म्हणजे क्रमशः शब्द नकोसा वाटतो पण इथे त्याच्या उलट म्हणजे आनंद होतोय की अजुन नवे भाग येणार. भावना पोहचल्या ... उलट माझाच गैरसमज झाला होता नेहमीप्रमाणे अर्धवट गडबडीत ... असो. आपल्याला अजुन वाचन्याची इच्छा आहे हे वाचुन आणंद झाला :) ------ छोटा डॉन

टारझन 18/12/2008 - 18:13
मित्रा ................. तोडलंस ... फोडलंस ... झकास !!
असा प्रतिसाद देऊन बसता व त्या बिचार्‍या लेखकाचा चेहरा कथेतल्या भुतापेक्षा भयानक होऊन बसतो.
आग्गाग्गाग्गा !! =)) =)) =)) - टार्‍याडॉण

In reply to by टारझन

ऍडीजोशी 18/12/2008 - 18:53
- टार्‍याडॉण ऐवजी टॉण कसं वाटतं?

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

टारझन 18/12/2008 - 19:20
ऐवजी टॉण कसं वाटतं?
ऐडी जौषी साहेब !! आपली कळकळ कळाली !! पण ते वृत्तात मार खातंय ना छोटा डॉण (७ मात्रा) चं विडंबण करताना मात्रा लक्षात घ्या, सहि विडंबण हे मात्रा वृत्त आहे !! म्हणून टारडॉण किंवा टॉण न करता टार्‍या डॉण चपलख आहे (वृत्ताकार रॉकिपंत) टारपंत

शितल 18/12/2008 - 18:26
डॉन्या, डोक्यावरील केसांना तेल लावल्यावर बुध्दी एवढी नॉनस्टॉप जाते माहित नव्हते. (ह.घे.) ;) हे राहिलेच की, समज कोणी नुसते विषय दिलेला नाही असे विषयात म्हटले आणी प्रतिक्रीया फक्त :) अशी असेल तर कधी विषय -:) प्रतिसाद दिलेला नाही, तर कधी विषय आणि प्रतिसाद - :) असे असेल तर कधी विषय आणी प्रतिसाद दोन्ही दिलेले नाहीत अशी प्ततिक्रीया असेल तर ह्या मार्गदर्शन करावे, मोठ्या प्रतिसादाचे सम्राट. :)

लिखाळ 18/12/2008 - 18:42
त्या ट्युलिप्सच्या फुलांचा ज्युस / मोरांबा मिळतो त्या शेडच्या मागे, घेतलात का ? हा हा हा.. एक्दम जोरात. ट्युलिप्सचा मोरांब्यापेक्षा आम्हाला आमच्या परसातल्या आंब्याचा मुरांबा फार आवडतो. बाय द वे आम्हाला ट्युलिपवरुन आमच्या परसातल्या मोगरीच्या फुलांची आठवण झाली अंमळ हळवा झालो. --(अ?? (निवासी)भारतीय) लिखाळ. त्या राजवाड्यची मागची पडकी विहीर पाहिलीत का ? अप्रतिम आहे बॉस .... " बिपिन यांची भयकथा वाचल्यापासून आम्ही विहिरीत डोकावत नाही. --(स्पष्टवक्ता) लिखाळ.

In reply to by लिखाळ

इनोबा म्हणे 19/12/2008 - 00:18
त्या ट्युलिप्सच्या फुलांचा ज्युस / मोरांबा मिळतो त्या शेडच्या मागे, घेतलात का ? 'त्या पोफळीच्या बागेत, जिथे तुम्ही सहकुटूंब फोटो काढला आहे तिथे मी चार वर्षापुर्वी तांब्या घेऊन बसलो होतो.' हे कसे वाटेल? -इंटरनैशनल इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन 19/12/2008 - 09:37
>>'त्या पोफळीच्या बागेत, जिथे तुम्ही सहकुटूंब फोटो काढला आहे तिथे मी चार वर्षापुर्वी तांब्या घेऊन बसलो होतो.' हे कसे वाटेल ? =)) =)) इनु यु टु ???? क्लासच ... अप्रतिम ..! "त्या" आठवणीने डोळ्यात पाणी आले शेठ, धन्यवाद आठवणी जागवल्याबद्दल ;) ------ ( हलकट ) छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

विजुभाऊ 20/12/2008 - 11:52
"त्या" आठवणीने डोळ्यात पाणी आले शेठ, धन्यवाद आठवणी जागवल्याबद्दल डोळ्यात पाणी येउ द्यावयाचे नसेल तर एरन्डेल वापरा. ( आमच्या शेजारांच्या अनुभवावरुन) अवांतर : ( डोळ्यात तेल घालून पहारा करणे हा वाक्प्रचार नक्की कशावरुन आला असेल) आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

In reply to by विजुभाऊ

आनंदयात्री 20/12/2008 - 11:56
>>डोळ्यात पाणी येउ द्यावयाचे नसेल तर एरन्डेल वापरा. ( आमच्या शेजारांच्या अनुभवावरुन) चामायला शेजार्‍यांशी काय काय शेअर करता ??

In reply to by आनंदयात्री

शितल 22/12/2008 - 21:39
>>चामायला शेजार्‍यांशी काय काय शेअर करता ?? =)) =))

In reply to by इनोबा म्हणे

लिखाळ 19/12/2008 - 20:15
>> 'त्या पोफळीच्या बागेत, जिथे तुम्ही सहकुटूंब फोटो काढला आहे तिथे मी चार वर्षापुर्वी तांब्या घेऊन बसलो होतो.' हे कसे वाटेल? हा हा हा ... :) -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

विसुनाना 18/12/2008 - 18:42
व्वा, काय टोप्या उडवल्यात , हसुन हसुन खुर्चीवरुन पडलो.शेवट जरा मतकर्‍यांसारखा केलेला वाटतोय, पण व्यवस्थीत जमते आहे तुम्हाला.जणु रणरणत्या वाळवंटातुन जाताना एकदम गार वार्‍याची झुळुक अंगावर आली असे वाटले , लेख वाचताना प्रयत्नाने आवरुन ठेवलेला अश्रुंचा बांध शेवटच्या परिच्छेदामुळे अनिर्बंध वहात गेला , ह्या उत्सवात अक्षरश: बेहोश होऊन न्हाऊन निघालो , खांडेकरांच्या कलात्मकतेच्या आणि हळुवारपणाच्या अंगाने कथा वहात जाते , आसपास चाललेल्या कल्लोळातसुद्धा एकदम सुन्न होऊन गेलो.जर फ्लेश वापरला नसता तर एक नैसर्गीक तजेला आला असता ...शेठ, चाल्लो आहे मसणात, काय काय पाहुन घेऊ? तुम्ही अनुभवी लोकं म्हणुन तुमचा सल्ला घ्यावा म्हटले.

In reply to by विसुनाना

विसुनाना, शेवट जरा मतकर्‍यांसारखा केलेला वाटतोय, पण व्यवस्थीत जमते आहे हे वाक्य समजल्यासारखं वाटतंय. पण... जणु रणरणत्या वाळवंटातुन जाताना एकदम गार वार्‍याची झुळुक अंगावर आली असे वाटले , लेख वाचताना प्रयत्नाने आवरुन ठेवलेला अश्रुंचा बांध शेवटच्या परिच्छेदामुळे अनिर्बंध वहात गेला , ह्या उत्सवात अक्षरश: बेहोश होऊन न्हाऊन निघालो , खांडेकरांच्या कलात्मकतेच्या आणि हळुवारपणाच्या अंगाने कथा वहात जाते , आसपास चाललेल्या कल्लोळातसुद्धा एकदम सुन्न होऊन गेलो.जर फ्लेश वापरला नसता तर एक नैसर्गीक तजेला आला असता हे नीटसं समजलं नाही. जरा विस्ताराने सांगाल का? (म्हणजे मी वाचल्याचे कष्ट घेतले असा खोटा अभिनिवेष आणणार नाही, पण तरीही!) (झालंच तर डान्यासारखा एक प्रतिसाद टर्न्ड लेख लिहाच!) ;-)

अवलिया 18/12/2008 - 19:25
मी सर्व भाग पूर्ण झाल्यावरच मग एका बैठकीत सर्व वाचत असतो. त्यामुळे तुमचे जोवर क्रमश: चालले आहे, तोवर मला त्यात खरडवहीत लिंक देऊन गुंतवू नका. धन्यवाद. (रामदास, हेच सांगणे तुम्हालाही. जेव्हा समाप्त लिहाल, तेव्हाच मी वाचीन. पी सी जेसी त्यामुळेच अजून वाचलेले नाही, आणि रोशनी न वाचताच "वा वा" म्हटलेले आहे, हे स्पष्ट आहे.) :) -- अवलिया अवलियाची अनुदिनी

डॉन भाऊ, तुमच्याकडे शिकवणी लावावी अशी इच्छा झाली. अर्थात मार्गदर्शनात्मक लेख आवडला.... (स्वगत - छे, काहीही लिहायचे ठरवले तरी त्याची पार चिरफाड केलेली आहे. भावना कशा पोचवू बाबा याला? :S ) असो. जे आहे ते खल्लास लिहिले आहे. आपला, (पंखा) भास्कर ता.क. - आम्ही तुमच्या बडी लिस्ट मध्ये नाही वा स्नेह्यांमध्येही नाही तरी पण लेख मनापासून आवडला आहे म्हणून केवळ हा प्रतिसाद.

चतुरंग 19/12/2008 - 01:41
जनातलं नसलं तरी मनातलं तुला सांगायला हरकत नसावी की इथला हैदोस कमी होण्यासाठी तुला आफ्रिकेला लवकरात लवकर पाठवून द्यावे असा काथ्याकूट तुझ्या हापिसात सुरु झाला आहे! ही बातमी मुक्तक किंवा विडंबन नसून साक्षात भयकथा आहे ह्याची जाणीव असूदे. तुला आगामी थरकापाची जाणीव करुन देणारे हे सूचक लेखन अजिबात क्रिप्टिक नाही हेही लक्षात ठेव. आफ्रिकेच्या दौर्‍यावरुन आलास की तू लगेच कविता करायला लागशील असा तुला आशीर्वाद आणि लगेहात तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा!! ;) चतुरंग

In reply to by चतुरंग

टारझन 19/12/2008 - 02:19
पण ते भयकथेतलं भुत आता काही दिवस तिकडंच भारतात चाल्लय !!! वार्ड क्र.४२० चे धडाडीचे, उमदे, तरूण , जागतिक किर्तीचे समाजसेवी णेतृत्व मा.श्री चतुरंगजी रावजी यांस मंडळातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! जिवेत सहस्त्र शरदम् !!! ढोलताशे : ढँणण्ण्ण ढँण्ण्ण्ण ढॅंण्ण्ण्ण .. धत्ताड तत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड शुभेच्छूक पै.कुबड्या खविस अध्यक्ष,टारझन मित्र मंडळ, अफ्रिका, रजि.नं. महा१२/४२०/१२३४४५ (शुभेच्छूक : पै.धमु, पै.इन्या, पै.डॉण, पै.आंद्या, पै.कुंद्या,पै.प्रभु., पै.बिप्स्, पै.सुर्य्, पै.णाणा,पै.लिखाळ.,पै.वरद्या,आणि बाकी रेवड्यांवर कुस्त्या करणारे पै लोक्स )

अप्पासाहेब 19/12/2008 - 09:42
ह्याच पध्दतीचा (का जशाच तसा) लेख कुठ्तरी वाचल्याचे आठ्वतय बॉ.... (सत्राशे साठ संकेत स्थळे धुंडाळणारा शि.आय. डि.) आप्पा लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते

In reply to by अप्पासाहेब

छोटा डॉन 19/12/2008 - 09:44
तसे असल्यास कॄपया लिंक द्यावी. हे लेखन अगदीच नवे आहे असा माझा दावा नाहीच पण तरीही "जशाच तसा लेख" आढळल्यास व मी त्याची कॉपी केली हे सिद्ध झाल्यास मी हा लेखच काय पण माझे मिपावरचे अकाउंट डिलीट करुन निघुन जाईन हिमालयात. असो. ------ ( स्पष्टावक्ता )छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

अवलिया 19/12/2008 - 09:51
निघुन जाईन हिमालयात. नको तिथे बरीच कार्टी आधीच गेली आहेत. तुम्ही सह्याद्री किंवा सातपुडा या भागात या. हवी ती मदत करण्यास तयार आहे. फक्त येतांना स्टॉक जास्तीचा आणा. सध्या थंडी जास्त आहे. -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

इनोबा म्हणे 19/12/2008 - 10:02
त्यापेक्षा पर्वतीवर यावे अशी मी डानरावांना इनंती करतो. स्टॉकची काळजी आम्ही घेऊ. (स्टॉकीस्ट) -इन्यालाडू पान खाउन कुठेही पचकन थुंकणे ही आमची वैयक्तीक बाब आहे आणि त्याचे कुणालाही स्पष्टीकरण देण्यास आम्ही बांधील नाही. -हूकूमावरुन -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

यशोधरा 19/12/2008 - 10:15
डान्या, हिमालय, सह्याद्री -सातपुडा, पर्वती कुठेही जा, ज्यांना हवा त्यांच्यासाठी ष्टाक पण घेऊन जा, पण आधी चाकलिटा दे जर्मनीवरुन आणलेली आणि मग उलथ कुठे तो! :P

धमाल मुलगा 19/12/2008 - 11:07
लेख फक्कड जमलाय.. शुध्दलेखनाच्या चुका सहज टाळता येण्याजोग्या आहेत. कृपया तिकडे थोडे लक्ष द्या. बाकी, तुम्हावर सरस्वती देवी प्रसन्न आहेत हे ह्या छोट्याश्या लेखातून जाणवतं आहेच! परंतु...... एकुणच पाहता, लेखाच्या माध्यमातून व्यक्तींवर, त्यांच्या सवयींवर आडून आडून शिखंडी वार करणे योग्य वाटत नाही. असो, ज्याची त्याची मर्जी! -(खवचट) ध मा ल. अवांतरः काय डान्या, कसा वाटला प्रतिसाद्द? हाय कं नाय येकदम हायकल्लास ;) येड्या, तुला काय वाटलं तू एकटाच प्रतिसादांचे अभ्यास करतोयस होय? :P

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 20/12/2008 - 11:58
एखाद्याला असे आडवळणाने शिखन्डी का म्हणता? ( हा घ्या) वैयक्तीक आवडी सार्वजनीक केल्या; की सर्व जण तुम्हाला वैयक्तीक त्रास देतात)

अनिल हटेला 19/12/2008 - 12:04
>>>लेखाच्या माध्यमातून व्यक्तींवर, त्यांच्या सवयींवर आडून आडून शिखंडी वार करणे योग्य वाटत नाही.=)) =)) सही रे धम्या....... डॉनराव ...फूल फॉर्मात आहे सध्या......=D> आंदे और भी...... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

बर्‍याच दिवसांनी एक अभ्यासपुर्ण व स्वानुभवावर आधारीत धगधगते लिखाण वाचण्यास मिळाले , त्याबद्दल आभार. उगाच मुळमुळीत आणी गुळमुळीत लिहिणार्‍यांच्या गर्दीत आपणा सारखा एखादा स्वता:ची वेगळी वाट निवडतो तेंव्हा एक मराठी वाचक म्हणुन अभिमानाने ह्रुदय भरुन येते, भावना उचंबळुन चंबळेच्या नदिप्रमाणे व्हायला लागतात ! आ हा हा आज तुमच्या शब्दवर्षावात एखाद्या पावसाच्या जोरदार सरीत कुत्र्याच्या छत्रीने भिजावे तसे चिंब भिजलो. भावनांच्या कोंडमार्‍यास आपण ज्या पद्धतीने एक मोकळी वाट करुन दिली आहे ती पाहता , मराठीस आता व.पु. किंवा रणजितांची उणिव नक्किच जाणवणार नाही. आपली लिखाण शैली व एकुणच विषयाची मांडणी बघता मराठी लेखनाचा अश्व आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचण्यास काहिच हरकत नाही असे वाटते. साहित्य संघातील काहि जाणत्या वाचकांशी आपल्या लिखाणाबद्दल चर्चा केली असती, विचारांचे अनेक प्रवाह समोर आले पण एकुणच सर्वांचा सुर हा आपल्याला अनुकुल असा दिसला. आपण दिलेले दाखले हे आपले ऐतीहासिक ज्ञान व अभ्यास ह्याचा एक चालता बोलता शब्दकोष ठरेल. बुद्धिभेद करणारे आपले हे एखाद्या नुकत्याच धार केलेल्या समशेरी सारखे लि़खाण मनावर आणी आमच्या बुद्धीवर खोलवर आघात करुन गेले हे निश्चीत ! आता ह्या भळभळ वाहणार्‍या जखमा घेउन आपला निरोप घेतो. जखमी राजकुमार |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन 19/12/2008 - 13:25
च्यामारी काय लिव्हलयं, काय लिव्हलयं !!! सलाम बॉस ...! अवांतर : च्यायला असली स्तुती ऐकायची आमाला सवय नाय हो, त्यापेक्षा "डॉन्या फोकलीच्या जोड्याने मारले पाहिजे तुला, आता येच पुण्यात पायच मोडतो तुझा एवढी सगळ्यांची खेचल्याबद्दल " असे लिहले असते तर जरा ओळखीचे ( म्हणजे धमालरावांच्या भाषेसारखे ) वाटले असते. असो. ------ छोटा डॉन

अनिल हटेला 19/12/2008 - 12:49
जखमी राजकुमार तु सुद्धा तोडलस मित्रा.....जिंकलस.....हरवललंस..... तुझे लिखाण वाचुन ह्रदय भडभडून ,उचंबळून ,गलबलून (इ.इ.) आले.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

३. जनातलं - मनातलं : जर तुम्ही सुक्ष्मात जाऊन निरीक्षण केलेत तर तुम्हाला मिपावरच्या दर ३ लेखामागे १ लेख हा "जनातलं मनातलं " ह्या सदरात आल्याचे दिसेल, थोडक्यात हा भाग महत्वाचा. बर्‍याच वेळा आपला लेख नक्की "काथ्याकुट / कविता / आणखी काही " ह्या पैकी कशात मोडतो हे ( वेळीच ) लक्षात न आल्याने बरेच लोक तो थम्ब रुलप्रमाणे "जनातलं मनातलं" ह्य सदरात बिनधास्त टाकुन देतात. असो. ह्यावर कसे प्रतिसाद द्यावेत ह्याचेसुद्धा मी थोडे वर्गीकरण केले आहे. जर लेखन "कथा" ह्या वर्गात मोडत असेल तर प्रतिसाद देण्याच्या व्याख्या थोड्या भिन्न आहेत. पहिल्यांदा ( जमल्यास ) कथा वाचुन ती नक्की कसली आहे ह्याचा निर्णय करावा. म्हणजे ती भयकथा आहे की सिरीअस आहे की विनोदी आहे की विडंबन करुन कुणाच्या टोप्या उडवणारी आहे ह्याचा निर्णय करुन घ्यावा. नाहीतर काय होते एखादी "भयकथा" असते आणि त्याला तुम्ही चुकुनच " व्वा, काय टोप्या उडवल्यात , हसुन हसुन खुर्चीवरुन पडलो " असा प्रतिसाद देऊन बसता व त्या बिचार्‍या लेखकाचा चेहरा कथेतल्या भुतापेक्षा भयानक होऊन बसतो. तर काळजी महत्वाची हे लक्षात आलेच असेल. जर कथा ही विनोदी असेल तर तुमचे काम सोपे होते, फक्त " अशक्य , ठ्ठ्या ऽऽऽऽऽ , फु ट लो , आग्गायायाया ऽऽऽ , कळफलकावर + मॉनीटरवर वर कॉफी सांडली , खुर्चीवरुन पडलो , हसुन हसुन मेलो " अशी ५-६ आतिशयोक्तीपुर्ण वाक्ये जवळ बाळगावीत. पण फक्त एवढेच लिहुन प्रतिसाद पुर्ण होत नाही, त्या लेखातीलच २-४ वाक्ये निवडुन ती आहे तशी आपल्या प्रतिक्रीयेत टाकुन त्याखाली वरील तुकडे वापरल्यास प्रतिसादाला "वजन येते" असा अनुभव आहे. सम्जा जर वाक्ये सुचली नाहीत तरीही काळजी नाही, नुसत्या " " अशा स्मायली टाकल्या तरी काम भागते. ह्यातलेसुद्धा काहीही करायचा कंटाळा आला असेल तर एखादी भलीमोठ्ठी प्रतिक्रीया निवडावी ( ह्या देणार्‍यांची संख्या मोप आहे, फिकर नॉट ) आणि त्यालाच "असेच म्हणतो , +१ " असा प्रतिसाद टाकुन मोकळे व्हावे ( मात्र ह्याला आम्ही कर्मदरिद्रीपणा म्हणतो. असो. ) जर लेखक एखादा "मिपावरील थोर व्यक्ती " असे तर मात्र " व्वा , भाईकाकांची आठवण आली ( पुलं म्हणणे म्हणजे घोर पाप बरे का. ) , चिंवी जोश्यांची शैली वाटते , हा प्रकार तुम्हाला चांगला जमतो " वगैरे लिहावे लागते, नाहीतर तुमच्या प्रतीक्रीयेला काडीइतकी किंमत नाही, तुम्ही नाही लिहले तर अजुन दुसरे कोणीतरी लिहतेच व लोक त्याला "सहमत आहे" असा उपप्रतिसाद देत राहतात, म्हणुन "स्टाईकर्स ऍडव्हान्टेज " कधीही सोडु नये ... जेवढा मोठ्ठा प्रतिसद तेवढे तुम्ही जास्त फेमस हे लक्षात आले मग पुढे काही अवघड नाही. जर कथा ही भयकथा "कॅटेगिरी" तली असेल तर मामला जरासा कठीण आहे, ह्यांना प्रतिक्रीया देण्यासाठी अभ्यास लागतो. नुसत्या " भयानक, दरदरुन घाम सुटला , सरसरौन काटा आला अंगावर , कच्चकन दचकलो " ह्या अगदीच सर्वसामान्य प्रतिक्रीया झाल्या. जर आपली छाप जमवायची असेल तर उगाच आपलं लेखकाची एखाद्या "प्रसिद्ध भयकथा लेखकाशी " तुलना करणे आवश्यक ठरते. उदा : शेवट जरा मतकर्‍यांसारखा (उल्लेख असाच करावा, जर तुम्ही "रत्नाकर मतकरी यांच्यासारखा" असे लिहलेले तर तुम्ही नवशिके आहात हे मिपावरचे पोरटे सुद्धा ओळखेल ) केलेला वाटतोय, पण व्यवस्थीत जमते आहे तुम्हाला. किंवा अगदी तंतोतंत धारपच, मला वाटतं त्यांची "अखेरचा प्रमाद ( म्हणजे काय कुणास ठाऊक ? ) " ही कथा ह्याच अंगाने जाते. किंवा ते त्या "मुडदे की जान खतरे मे है / सुखी नदीं मे बहती हुई लाश" मधल्या कथानकासारखे वाटते नाही ? असे प्रतिसाद टाकणे आवश्यक बनते, म्हणाजे काय होते की लेखकाच्या अंगावर मुठभर मास चढुन तो आपला सुमडीत "हॅहॅहॅ, कसेच कसे. त्यात शेवटी माणुस मरुन भुत होत नाही तर भुताला उ:शाप मिळुन त्याचा माणुस होतो व ते दोघे लग्न करतात " असे स्पष्तीकरण देत बसतो, तुम्ही आपलं " हम्म, पण शैली तशी वाटली बॉ,असो." असा ठेका सोडु नका ... हे एकदा जमले की झालेच ...! तिसरा प्रकार आहे तो म्हणजे "मुक्तक अथवा सिरीअस लिखाण " करणार्‍याचा ... महत्वाची सुचना : वर दिलेल्या "शँपल प्रतिक्रीया / सल्ला " ह्याचा वापर इथे अजिबात करु नये. ह्याचा साज पुर्ण वेगळा आहे. नेहमीप्रमाणे ( जमल्यास ) पुर्ण कथा वाचुन काढावी, शक्यतो हा प्रकार "मान्यवर व जाणाकार" व्यक्तीच हाताळत असल्याने ह्यांच्या लेखाला वजन असते, उगाच फालतु प्रतिक्रीया इथे टाकल्यास तुमच्यावर "बदनाम मिपाकर" व्हायची दुर्दशा येऊ शकते. सर्वसाधारण अशा लेखाला " सलाम ..! , केवळ अ प्र ति म , खल्लास वगैरे वगैरे " टारुने सांगितलेल्या प्रतिक्रीया प्राथमीक अवस्थीत टाकता येतील. पण आता तुम्ही जम बसवायचे ठरवल्याने तुम्हाला हे अलाऊड नाही. आता तुम्ही थोडाश्या कलात्मक, नाजुक व साहित्यीक प्रतिक्रीया टाकाव्यात अशी अपेक्षा असते. म्हणजे बघा की " जणु रणरणत्या वाळवंटातुन जाताना एकदम गार वार्‍याची झुळुक अंगावर आली असे वाटले , लेख वाचताना प्रयत्नाने आवरुन ठेवलेला अश्रुंचा बांध शेवटच्या परिच्छेदामुळे अनिर्बंध वहात गेला , ह्या उत्सवात अक्षरश: बेहोश होऊन न्हाऊन निघालो , खांडेकरांच्या कलात्मकतेच्या आणि हळुवारपणाच्या अंगाने कथा वहात जाते , आसपास चाललेल्या कल्लोळातसुद्धा एकदम सुन्न होऊन गेलो " अशा व तत्सम प्रतिक्रीया टाकणे आवश्यक ठरते. जेवढे जास्त "अनाकलनीय" लिहताल तेवढेच जास्त वजन पडते. साध्या सरळ प्रतिक्रीयेला जास्त भाव मिळत नाही. असो. अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काही वेळेला लेखकाचे " अप्रतिम बॉस , आत्तापर्यंत लेखणी का म्यान केली होतीत ? / रुद्ध प्रतिभा भरभरुन वाहु देत / अबक हे मिपावरचे मोठ्ठे फाउंड आहे असे मी आधीच म्हणलो होतो / तुमचे नाव वाचले आणि लेख वाचायला घेतल, नेहमीप्रमाणे निराशा झाली नाही. " वगैरे वगैरे प्रतिक्रीया टाकाव्यात, ह्याला समर्थन तर मिलतेच शिवाय तुम्ही लेख्काच्या "बडी लिस्ट" मध्ये जायला मोकळे होता. शेवटचा "अनकॅटेगराईझ्ड प्रकार " म्हणजे उगाच आपले काहीही लिहणार्‍यांचा, ते आपले उगाच " पुण्यात गादी कुठे मिळेल ? पंखा कुठे दुरुस्त करायचा ? सगळ्यात भारी शेवपापडी /अनारसे कुठे मिळतात ? संघाने चालवलेला गांधीवाद . सलमानने कत्रिनाला काय म्हटले " अशा विषयांवर काहीबाही खरडतो तो, ह्याला विषयांचे बंधन नाही, तुम्ही काहीही लिहु शकता. ह्याला जास्त भाव मिळत नसल्याने "तुम्ही ह्याकडे ढुंकुनही न पहाणे योग्य" ठरेल. तिकडे फिरकुच नका. उलट आपल्यासारख्याच एखाद्या पप्रथितयश प्रतिसादकर्त्याचा खरडवहीत "काय फालतुपणा चालला आहे, अक्षरशः उबग आला आता , आयला गिरणी लावल्यासारखे लेख पाडतात " अशा पिंका टाकुन द्याव्यात, आपली चर्चा मस्त रंगते व "भोचकपणे आपल्या खव वाचणार्‍यांना" आपण फार "अभिरुचीसंपन्न, चोखंदळ, साहित्याचे खरे वारसदार, गुणग्राहक " वगैरे असल्याचा उगाच गैरसमज होतो व आपली "इज्जत वाढते" , मग हा "गैरसमज" हळुहळु पसरवायला हीच मंडळी मदत करतात. मधुन आधुन त्यांच्याही खरडवह्यात "काय मग, काय नवे लिखाण ? " असे लिहुन यावे त्यावर रिप्लाय म्हणुन " बस का मालक, चेष्टा करता का गरिबाची ? आम्ही कसले लिहणार , आम्ही तर तुमचे फॅन. बोला कधी लिहताय ? " अशी खरड आलीच म्हणुन समजा. त्यावर उत्तर म्हनुन फक्त " लवकरच, सध्या थोडा बिसी आहे, मनासारखे लिहायला निवांत वेळ पाहिजे हो " असे ठोकुन द्यावे. म्हणजे पुढ्च्या वेळी तुम्ही काहीही लिहले तरी "ह्यांचा तुमची तोंड फाटुस्तोवर स्तुती" करणारा प्रतिसाद नक्की ... असो. ४. कलादालन : हा एक नवा प्रकार मिपावरच प्रथम अस्तित्वात आला आहे, अजुन नाविन्य असल्याने तुम्हाला हात चालवायला बर्‍याच संधी आहेत. पण इथे मात्र फक्त फोटाँवर प्रतिक्रीया द्यायची असल्याने फाफटपसारा चालत नाही, मुद्द्याचे बोलावे लागते. आता हे कसे जमवावे ते सांगतो. नेहमीप्रमाणे टारुबाबाने सांगितल्याप्रमाणे "फो टू के व ळ अ प्र ति म , ४ नंबरचा फोटू झकास आला आहे , डोळ्यचे पारणे फिटले, डेस्कटॉपवर लावला आहे, मस्तच " ह्यासारख्या प्रतिक्रीया टाकुन ठेवाव्यात. आता महत्वाचा मुद्दा, प्रत्येक प्रतीक्रियेच्या खालीच लगेच "अवांतर " ह्या सदराखाली आपला मोठ्ठेपणा, शहाणपणा , गर्व दाखवणार्‍या कमेंट्स द्याव्यात. जसे की "सेटिंग काय लावले हो ? नाही , जराशे दुसर वाट्तात फोटो, आय एस ओ ४००० वापरले असते तर अजुन ब्राईट आले असते. असो. लेन्स कुठली हो ? फोकस कसा मारलात ? जरा अजुन क्लोजअप हवा होता असे वाटते. जर फ्लेश वापरला नसता तर एक नैसर्गीक तजेला आला असता ... शटर स्पीड थोडे जास्त झाले असे वाटते, एवढ्या प्रकाशाला थोडे कमीच वापरा पुढ्च्या वेळी ..." ह्या प्रतिक्रीया ठोकल्या की तुम्ही म्हणजे अगदी जगप्रसिद्ध फोटोग्राफरचा आव आणायला रिकामे. लोक सुद्धा ह्यावर मनोसोक्त भांडतात. बिचारा लेखक सुद्धा आपल्याला "टेक्नीकल डिटेल्स्ची" काडीइतकी माहिती न्सल्याचे मान्य करतो व तुम्हाला सांगायची विनंती करतो. तुम्ही मात्र " हम्म, सांगायला हरकत नाही तसे, पण सध्या एवढा मोठ्ठा लेख लिहायला वेळ नाही, बघतो सवडीने " असे ठोकुन द्यावे. लोक वाट बघत बसतात पण कुणी विचारायची हिंमत करत नाही. थोडक्यात तुम्ही जिंकलात स्पष्टपणे .... अजुन एक प्रकार म्हणजे "फोटोम्च्या स्थानावर / लोकेशन वर कमेंट्स" द्यायच्या ... उदा " का हो तिथल्या डाळिंबच्या बागा अजुन तशाच आहेत का ? आम्हाला आमच्या ट्रीपची आठवण झाली, तुम्ही ज्या दगडाचा फोटो दिलात त्यावरुन पडुन माझा कपाळमोक्ष होता होता वाचला होता. आयला, डोंगर अजुन तशेच्या तसेच, मी गेलो होतो ४० वर्षापुर्वी, कमाल आहे. त्या ट्युलिप्सच्या फुलांचा ज्युस / मोरांबा मिळतो त्या शेडच्या मागे, घेतलात का ? तुम्ही नशिबवान खरे, आम्ही गेल्या वेळी गेलो होतो तेव्हा तेथे चक्क बर्फ होता, मग आमच्या हीने / ह्यांनी त्यावरुन स्कीईंग करता करता पाय मोडुन घेतला होता. असो. त्या राजवाड्यची मागची पडकी विहीर पाहिलीत का ? अप्रतिम आहे बॉस .... " असे जर तुम्ही बोललात तर लोक तुमच्याकडे "काय दर्दी माणुस आहे ?" ह्या नजरेने पाहतील. शिवाय तुम्ही गेलाबाजार निम्मे तरी जग हिंड्ला आहात हे १० लोकात सिद्ध होते. शिवाय तुम्हाला ह्यांची फारच माहिती आहे असा "गैरसमज" भराभर पसरुन तुमचे नाव होते. मग लोक तिकडे जाताना तुम्हाला विचारतात " शेठ, चाल्लो आहे मसणात, काय काय पाहुन घेऊ, तुम्ही अनुभवी लोकं म्हणुन तुमचा सल्ला घ्यावा म्हटले" ... सहमत

In reply to by पुणेरी मिसळ्पाव

धमाल मुलगा 19/12/2008 - 15:15
आयला, जवळपास आख्खा लेखच उचलुन टाकलाय की प्रतिक्रीयेत! =)) आमचा सादर प्रणाम हो तुम्हाला _/\_ लय भारी हो! आता बोल डान्या, हाय का तुझी हिंमत ह्याच्यावर भाष्य करायची?

shweta 31/12/2008 - 16:46
छोट डॉन .. तु खरा मोठ्ठा डॉन आहेस. मिसळपाव वरचे बाकिचे लेख नुसते मुळमुळीत आणि "अति शहाणपणा " करणारे वाटतात. तु तुझ्या लेखना ने त्या लेखकांना त्यांची जागा दाखवली आहेस. अभिनंदन.

limbutimbu 31/12/2008 - 17:26
>>>> मी गेलो होतो ४० वर्षापुर्वी, कमाल आहे. अस लिहिलत की आजोबाच काय, तमाम मिपाकर तुम्हाला पणजोबा खापर पणजोबा समजायला/म्हणायला मोकळे! मग नावामागे "छोटा" लावा की अजुन काय करा......! बरोबर की नाय "छोटा डॉन"? :D आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P
तर मंडळी आता आम्ही आमच्या लेखाचा दुसरा भाग मोठ्ठ्या आनंदाने, उत्साहात आणि नेहमीच्याच जोशात प्रसिद्ध करत आहोत. पण पहिला पार्ट कुठे आहे असे विचारुन आम्हाला अडचणीत नका आणु. पहिला भाग तुम्हाला " यशस्वी प्रतिसादकर्ता होण्यासाठी काय करावे ... " येथे पहायला मिळेल. ह्याच लेखाला तुम्ही पर्यायाने टारुबाबाच्या "अवांतर प्रतिसादांवर उपाय ह्याचाही "भाग-२" म्हणु शकता. असो.

महाराष्ट्र कोणाचा ? काही तर्क, काही आडाखे ... भाग - १

छोटा डॉन ·

स्वप्निल.. 14/12/2008 - 03:20
डॉन भाऊ, मस्त लेख आहे..माझे पण काँग्रेसबद्दल असेच काहिसे मत आहे..त्यांची जातीयवाद विरोधी इमेज खोटी आहे..सगळ्यात जास्त जातीचे राजकारण मला वाटते काँग्रेसच करते.. >>तसे पहायला गेले तर गेली ८-९ वर्षे सगल मुख्यमंत्री हा कॉग्रेसचाच आहे पण त्यांच्या हातुन लक्षात राहण्यासारखे एकही भरीव काम अजुन झाले नाही. ह्यांचा बहुसंख्य वेळ आपली खुर्ची संभाळाण्यात व मजबुत करण्यात गेला. >>प्रामुख्याने ह्या वर्गातुन "एकगठ्ठा मतदानाचा " प्रभाव दिसतो म्हणुन ह्यांचा उल्लेख केला आहे १००% सहमत!!! स्वप्निल

In reply to by स्वप्निल..

आजानुकर्ण 14/12/2008 - 05:31
प्रत्येक पक्षाच्या जाती ठरलेल्या आहेत. प्रमोद महाजन गेल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे काय होत आहे? छगन भुजबळ, नारायण राणे यांना शिवसेना का सोडावी लागली. राष्ट्रवादी पक्षाचे सगळे नेते कोणत्या जातीचे आहेत? आणि सगळ्यात जास्त जातीचे राजकारण काँग्रेस करते हे आपण कुठे वाचले?

In reply to by आजानुकर्ण

छोटा डॉन 14/12/2008 - 19:00
>> प्रत्येक पक्षाच्या जाती ठरलेल्या आहेत. सहमत आहे ह्या वाक्याशी. आज बहुतांश पक्षांची तशीच इमेज आहे. भाजपा म्हणजे "ब्राम्हणांचा, बनियांचा, उच्च्वर्णीयाम्चा" पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस जरी दावा करत नसले तर बहुसंख्य नेत्यांच्या नावांवरुन तो सरळसरळ "मराठा समाज" डोमीनेटेड पक्ष आहे असे दिसते आहे, शिवसेनाचा तसा अजुन काही "जातीयवादी" चेहरा दिसला नाही, बसपा नेहमीच "बहुजन समजाच्या" मागे उभी राहिली आहे व त्यांनीसुद्धा बसपाला बर्‍यापैकी हात दिला आहे. तसे सध्या बसपाने पुर्वी "४ जुते" मारलेल्या "ब्राम्हण वर्गाला" सुद्धा चुचकारायला सुरवात केली आहे म्हणुन बेहनजींच्या खास गोटात सध्या मिश्रा, शर्मा, त्रिवेदी सारखी नावे प्रामुख्याने समोर येत आहेत, समाजवादी पक्षाचा "मुस्लीम अनुयय" हा काही लपुन राहिलेला नाही पण त्यांनी बर्‍याच वेळा "बहुजन समाजाचा" तारणहार बनण्याचा प्रयत्न केला, दक्षिणेत तर द्रविडी-अद्रवीडी वाद हा खुप जुना आहे व त्यावर अजुन मते मागीतली जातात... राहता राहिला प्रश्न काँग्रेसचा, तर ह्यांनी अजुन तरी "सर्वसमावेशक" हा चेहरा टिकवण्यात यश मिळवले आहे पण जेव्हा जेव्हा संधी मिलेल तेव्हा हा पक्ष "जाती आणि धर्माचा" फायदा घेण्याचा चान्स सोडत नाही. आजही गल्लीपासुन ते दिल्लीपर्यंतच्या तिकीटवाटपात बहुसंख्यवेळा या गोष्तींचा विचार होतोच. शिवाय आरक्षण, नामांतरे, खास आयोग, योजना वगैरे ह्या बहुसंख्य वेळा काँग्रेसकडुन प्रमोट केल्या गेल्या आहेत. नुकतेच उठलेले "ओबीसी आरक्षणाचे" वादळ हे काँग्रेसच्याच एका मंत्र्याच्या डोक्यातुन निघालेली पिल्लु आहे व ह्यात सरळ सरळ जातीच्या आधारे आपली "वोट बँक" मजबुत करण्याचे इरादे आहेत हे स्पष्त आहे. >>प्रमोद महाजन गेल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे काय होत आहे? मुंडेंना प्राथमीक अवस्थेत "मागासर्गीय उभरते नेतॄत्व" म्हणुन महाजनांनी प्रोजेक्ट केले ही जरी खरी गोष्त असली तरी जसा काळ गेला तसा मुंडे हे "सर्वांचेच नेते" झाले. त्यांच्यामागे जरी वंजारी समाज मोठ्ठ्या संख्येन उभा असल्याचे खरे असले तरी ही मुंडे सध्या खास करुन त्या वर्गाचे नेते नव्हे तर "सर्वांचेच नेते" म्हणुन प्रोजेक्ट होत आहेत. >>छगन भुजबळ, नारायण राणे यांना शिवसेना का सोडावी लागली. छगन भुजबळ ह्यांच्या शिवसेना सोडण्यामागे "मंडल आयोग" हे एकमेव न्यात कारण असल्याचे मानले जाते. शिवसेनेने कधीही जातीय राजकारण (कमीत कमी समोरासमोर ) केले नाही, ह्याच तत्वाने त्यांनी "मंडल आयोगाला" विरोध केला व भुजबळांचे बाळासाहेबांशी मतभेद होऊन त्यांनी शिवसेना सोडली असा इतिहास ( मलातरी ) ज्ञात आहे. नारायण राणेंची गोष्ट वेगळी आहे. त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर न पटल्याने, पक्षातच स्पर्धक निर्माण झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली असल्याच्या बातम्या आहेत. ह्यात कुठेच "जात" आल्याचे मला ज्ञात नाही. >>राष्ट्रवादी पक्षाचे सगळे नेते कोणत्या जातीचे आहेत? आणि सगळ्यात जास्त जातीचे राजकारण काँग्रेस करते हे आपण कुठे वाचले? दोन्ही प्रश्नाचे उत्तर ( माझ्यामाहितीप्रमाणे ) वर दिले आहे. छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

कलंत्री 14/12/2008 - 08:00
आपली कळकळ आवडते. आपण आपले मत व्यक्त करा. बर्‍याच वेळेस आपल्याला हवी असलेली प्रतिक्रिया येत नाही अथवा विषय भरकटवला जातो. अशा वेळेस मनाची शांती आपल्या उपयोगी येते. मी सर्वसाधारण पणे खालील विचारसरणी स्विकारतो. १. आपला लेख आल्यानंतर अनेक विरुद्ध प्रतिक्रियेचे उत्तर परस्परच दिले जाते. २. काही मुद्दयांचे उत्तर मात्र आपणच द्यायला हवे. ३. पुढील लेखात या सगळ्या मुद्द्यांचा विचार करावयाचा. ४. व्यक्तिश: कोणाबद्दलही द्वेष न ठेवता, आपण प्रबोधनाचे कार्य करित आहोत या वर अबाधित विश्वास ठेवायचा. आपल्या पुढील लेखाची वाट पाहत आहे.

शक्तिमान 14/12/2008 - 10:36
काँग्रेसचे निर्णय अमराठी हायकमांड वर अवलंबून असणे आणि यातून महाराष्ट्राची राष्ट्रीय पातळीवर होणारी गळचेपी थांबवण्यासाठी प्रादेशिक पक्षांना संधी मिळावयास हवी. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष चांगला म्हणायचा या बाबतीत. (इतर पक्ष राज्यपातळीवर म्हणावे एवढे तुल्यबळ नाहीत म्हणून उल्लेख केला नाही.) (जर त्यांनी हे धोरण बदलले नाही तर..) काँग्रेसला अधिक संधी देण्यात काही अर्थ नाही.

विसोबा खेचर 14/12/2008 - 12:08
"राजकारण म्हणजे गटार" असे मानणार्‍या मान्यवरांनी ह्या लेखाला तशा अथवा त्या अर्थाच्या प्रतिक्रीया देण्याची "तसदी घेऊ नये". उत्तम! आम्ही ही तसदी घेत नाही/घेऊ इच्छित नाही..कारण "राजकारण म्हणजे गटार" असेच आमचे मत आहे.. आम्ही आपले ह्याबद्दल आत्ताच आभार मानत आहोत. धन्यवाद. हा चांगला व आम्हाला सोयिस्कर असा डिस्क्लेमर टाकल्यामुळे आम्हीही आपले आभार मानत आहोत.. चालू द्या... तात्या.

कॉन्गेस ची नाव बुडेल असे मला तरी वाटत नाही. एकतर विरोधी पक्षात फारसा जोर नाही. आणि मुबंई-ठाणे जेथील जागा वाढल्या आहेत, तीथले परप्रांतिय कॉन्गेस किंवा राकॉ ला मदत करतील. मला नाही वाटत की राणे मुंबई - कोकणा बाहेर फारसे बिघडवु शकतील आणी मुळात कॉन्गेस कोकणात जीवच किती होता???. जे आता दिसत आहे ते राणेंमुळे. निवडुन येणारात किती जोर आहे, ह्या पेक्षा पाडणारर्‍यात किती जोर आहे ह्यावर पुढचे राजकारण ठरणार आहे. ---- सखाराम गटणे

In reply to by सखाराम_गटणे™

निवडुन येणारात किती जोर आहे, ह्या पेक्षा पाडणारर्‍यात किती जोर आहे ह्यावर पुढचे राजकारण ठरणार आहे. -- दुर्दैवाने हे एक उघड सत्य मागच्या काही निवडणुकांपासून अनुभवाला येत आहे. कळीच मुद्दा.

लिखाळ 15/12/2008 - 18:20
डॉन्या, लेख छान आहे. मुंबईमध्ये झालेली घटना निवडनूकीचे वारे वाहू लागल्यावर झाली आहे. कधी नव्हे तो या घटनेनंतर थेट पाकिस्तानचे नाव घेऊन पंतप्रधान-संरक्षणमंत्री त्यांच्याशी युद्ध करावे न कारावे अशी मते प्रकट करत आहेत. माझ्या मते याचा सरळ संबंध जनतेला तात्पुरते तुष्ट करुन या निवडणूकीमध्ये इतर मुद्दे दाबून स्वदेशप्रेम वगैरे दाखवून हेतू साध्य करणे याच्याशी आहे. आपले केंद्रातले मंत्री लोक अचानक इतके कठोर कसे झाले याचे उत्तर निवडणुका जवळ येत आहेत हेच वाटत आहे. आता स्थानिक जातीय दंगगली, वीज, पाणी यांपेक्षा मोठा व्यापक प्रश्न आयताच मिळाला आहे. याचाच उपयोग महाराष्ट्रात सुद्धा होईल असे वाटते. एकदा का सूनबाई सभेत येऊन म्हणाल्या की या देशासाठी मी माझ्या सासूबाई,.. वगैरे की सगळे वातावरण भारले जाईल. :) पुढचा भाग वाचण्यास उत्सुक. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

सुनील 15/12/2008 - 19:18
मुंबईमध्ये झालेली घटना निवडनूकीचे वारे वाहू लागल्यावर झाली आहे दिल्ली आणि राजस्थानातील निवडणूकांतील मतदान ह्या घटनेनंतर आठवड्याभरात झाले होते. तरीही दोन्ही ठिकाणी काँग्रेस निवडून आली. मला॑ वाटते, विधानसभा निवडणूकीत लोक राष्ट्रीय समस्या आणि स्थानिक (राज्यस्तरावरील) घटनांची फारकत करतात. तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झालाच तर तो सद्यसरकारच्या स्थानिक गैरकारभारामुळे होईल, दहशतवादी हल्ल्याचा थेट संबंध असेलच असे नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

छोटा डॉन 15/12/2008 - 20:26
>> विधानसभा निवडणूकीत लोक राष्ट्रीय समस्या आणि स्थानिक (राज्यस्तरावरील) घटनांची फारकत करतात. असेच म्हणतो ... प्रत्येक पातळीवरच्या निवडणुकांसाठी "विषय आणि मुद्दे" सर्वस्वी भिन्न असतात. त्याचा बहुतेक करुन "इतर पातळीशी" संबंध नसतोच / नसावाच. स्थानीक परिमाण, स्थानीक समस्या, स्थानीक नेतॄत्व, स्थानीक राजकारण ह्यांचा प्रामुख्याने संबंध येतो. तुम्हीच पहा ना, जेव्हा पंचायत समित्यांच्या वगैरे निवडणुका होतात तेव्हा एखाद्या महान / मोठ्ठ्या / बलदंड अशा मंत्री असलेल्या नेत्याच्या पॅनेलला स्थानीक पातळीवरची एखादी "आघाडी / पॅनेल / महासंघ " चक्क धुळ चारतो. कारण त्या मंत्र्याने स्वतः मंत्री म्हणुन केलेल्या कामापेक्षा स्थानीक संदर्भ जास्त वरचढ ठरतात. आपल्या राज्यात तर अशी भरपुर उदाहरणे आहेत, आपल्या मतदारसंघामध्ये येणार्‍या पंचायत समित्यात, बँकात, परसंस्था यांच्या इलेक्शनमध्ये तेथील "आमदार / खासदार" यांचे पॅनेल भुईसपाट होऊन राज्याच्या राजकारणात काडीचे स्थान नसलेली एखादी "विकास आघाडी" निवडुन आली आहे ... >>महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झालाच तर तो सद्यसरकारच्या स्थानिक गैरकारभारामुळे होईल, दहशतवादी हल्ल्याचा थेट संबंध असेलच असे नाही. नक्की सांगता येणे कठीण आहे, अजुन बराच वेळ आहे ना निवडणुकीला. आत्ताच लगेच जर निवडणुका झाल्या असत्या तर कदाचित "दहशतवादी हल्ल्याच्या ओघाने येणारा सुरक्षेचा मुद्दा" महत्वाचा ठरला असता ( असे मी मानतो) . छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

In reply to by छोटा डॉन

लिखाळ 15/12/2008 - 20:32
बरोबर आहे.. पण मुंबई प्रश्न हा केंद्र आणि राज्य दोन्ही स्तरांवर आहे. (मुंबई महाराष्ट्रात आहे म्हणून.)त्यामुळे मराठी माणसांच्या नोकरी प्रश्नाला देशभक्तीचे वातावरण टक्कर देऊ शकेल असे वाटते. काँग्रेसने जर देशभक्तीची लाट आणली तर ते शक्य होईल. पण अशी लाट किती टिकेल आणि खेडोपाडी याचा किती परिणाम होईल ते माहित नाही. ते असो. -- लिखाळ.

अनामिका 15/12/2008 - 19:07
छोटे सरदार! मस्तच जमलाय लेख.सध्या काही भाष्य करत नाही. जरा वेळ घेऊन व विचार पुर्वक मत मांडलेले बरे नाहि का? पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आम्ही सुद्धा! लिखाळ यांच्या मताशी मी सहमत आहे. "अनामिका"

डॉनबा, तुमच्या कल्पनाशक्ती समोर आम्ही नेहमीच चाट पडतो. आपणा सर्वांच्या जीवनावर कमी अधिक प्रमाणात राजकीय पक्ष बदल घडवून आणत असतात. त्यामुळे एक मतदार म्हणून आपणांस त्यांची माहिती असणे आवश्यक आहे. त्रयस्थाच्या नजरेतून आपण एक चांगली लेखमाला उतरवत आहात असे दिसते. अभिनंदन! पुढील भागांच्या प्रतिक्षेत. आपला, (वाचक) भास्कर

स्वप्निल.. 14/12/2008 - 03:20
डॉन भाऊ, मस्त लेख आहे..माझे पण काँग्रेसबद्दल असेच काहिसे मत आहे..त्यांची जातीयवाद विरोधी इमेज खोटी आहे..सगळ्यात जास्त जातीचे राजकारण मला वाटते काँग्रेसच करते.. >>तसे पहायला गेले तर गेली ८-९ वर्षे सगल मुख्यमंत्री हा कॉग्रेसचाच आहे पण त्यांच्या हातुन लक्षात राहण्यासारखे एकही भरीव काम अजुन झाले नाही. ह्यांचा बहुसंख्य वेळ आपली खुर्ची संभाळाण्यात व मजबुत करण्यात गेला. >>प्रामुख्याने ह्या वर्गातुन "एकगठ्ठा मतदानाचा " प्रभाव दिसतो म्हणुन ह्यांचा उल्लेख केला आहे १००% सहमत!!! स्वप्निल

In reply to by स्वप्निल..

आजानुकर्ण 14/12/2008 - 05:31
प्रत्येक पक्षाच्या जाती ठरलेल्या आहेत. प्रमोद महाजन गेल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे काय होत आहे? छगन भुजबळ, नारायण राणे यांना शिवसेना का सोडावी लागली. राष्ट्रवादी पक्षाचे सगळे नेते कोणत्या जातीचे आहेत? आणि सगळ्यात जास्त जातीचे राजकारण काँग्रेस करते हे आपण कुठे वाचले?

In reply to by आजानुकर्ण

छोटा डॉन 14/12/2008 - 19:00
>> प्रत्येक पक्षाच्या जाती ठरलेल्या आहेत. सहमत आहे ह्या वाक्याशी. आज बहुतांश पक्षांची तशीच इमेज आहे. भाजपा म्हणजे "ब्राम्हणांचा, बनियांचा, उच्च्वर्णीयाम्चा" पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस जरी दावा करत नसले तर बहुसंख्य नेत्यांच्या नावांवरुन तो सरळसरळ "मराठा समाज" डोमीनेटेड पक्ष आहे असे दिसते आहे, शिवसेनाचा तसा अजुन काही "जातीयवादी" चेहरा दिसला नाही, बसपा नेहमीच "बहुजन समजाच्या" मागे उभी राहिली आहे व त्यांनीसुद्धा बसपाला बर्‍यापैकी हात दिला आहे. तसे सध्या बसपाने पुर्वी "४ जुते" मारलेल्या "ब्राम्हण वर्गाला" सुद्धा चुचकारायला सुरवात केली आहे म्हणुन बेहनजींच्या खास गोटात सध्या मिश्रा, शर्मा, त्रिवेदी सारखी नावे प्रामुख्याने समोर येत आहेत, समाजवादी पक्षाचा "मुस्लीम अनुयय" हा काही लपुन राहिलेला नाही पण त्यांनी बर्‍याच वेळा "बहुजन समाजाचा" तारणहार बनण्याचा प्रयत्न केला, दक्षिणेत तर द्रविडी-अद्रवीडी वाद हा खुप जुना आहे व त्यावर अजुन मते मागीतली जातात... राहता राहिला प्रश्न काँग्रेसचा, तर ह्यांनी अजुन तरी "सर्वसमावेशक" हा चेहरा टिकवण्यात यश मिळवले आहे पण जेव्हा जेव्हा संधी मिलेल तेव्हा हा पक्ष "जाती आणि धर्माचा" फायदा घेण्याचा चान्स सोडत नाही. आजही गल्लीपासुन ते दिल्लीपर्यंतच्या तिकीटवाटपात बहुसंख्यवेळा या गोष्तींचा विचार होतोच. शिवाय आरक्षण, नामांतरे, खास आयोग, योजना वगैरे ह्या बहुसंख्य वेळा काँग्रेसकडुन प्रमोट केल्या गेल्या आहेत. नुकतेच उठलेले "ओबीसी आरक्षणाचे" वादळ हे काँग्रेसच्याच एका मंत्र्याच्या डोक्यातुन निघालेली पिल्लु आहे व ह्यात सरळ सरळ जातीच्या आधारे आपली "वोट बँक" मजबुत करण्याचे इरादे आहेत हे स्पष्त आहे. >>प्रमोद महाजन गेल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे काय होत आहे? मुंडेंना प्राथमीक अवस्थेत "मागासर्गीय उभरते नेतॄत्व" म्हणुन महाजनांनी प्रोजेक्ट केले ही जरी खरी गोष्त असली तरी जसा काळ गेला तसा मुंडे हे "सर्वांचेच नेते" झाले. त्यांच्यामागे जरी वंजारी समाज मोठ्ठ्या संख्येन उभा असल्याचे खरे असले तरी ही मुंडे सध्या खास करुन त्या वर्गाचे नेते नव्हे तर "सर्वांचेच नेते" म्हणुन प्रोजेक्ट होत आहेत. >>छगन भुजबळ, नारायण राणे यांना शिवसेना का सोडावी लागली. छगन भुजबळ ह्यांच्या शिवसेना सोडण्यामागे "मंडल आयोग" हे एकमेव न्यात कारण असल्याचे मानले जाते. शिवसेनेने कधीही जातीय राजकारण (कमीत कमी समोरासमोर ) केले नाही, ह्याच तत्वाने त्यांनी "मंडल आयोगाला" विरोध केला व भुजबळांचे बाळासाहेबांशी मतभेद होऊन त्यांनी शिवसेना सोडली असा इतिहास ( मलातरी ) ज्ञात आहे. नारायण राणेंची गोष्ट वेगळी आहे. त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर न पटल्याने, पक्षातच स्पर्धक निर्माण झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली असल्याच्या बातम्या आहेत. ह्यात कुठेच "जात" आल्याचे मला ज्ञात नाही. >>राष्ट्रवादी पक्षाचे सगळे नेते कोणत्या जातीचे आहेत? आणि सगळ्यात जास्त जातीचे राजकारण काँग्रेस करते हे आपण कुठे वाचले? दोन्ही प्रश्नाचे उत्तर ( माझ्यामाहितीप्रमाणे ) वर दिले आहे. छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

कलंत्री 14/12/2008 - 08:00
आपली कळकळ आवडते. आपण आपले मत व्यक्त करा. बर्‍याच वेळेस आपल्याला हवी असलेली प्रतिक्रिया येत नाही अथवा विषय भरकटवला जातो. अशा वेळेस मनाची शांती आपल्या उपयोगी येते. मी सर्वसाधारण पणे खालील विचारसरणी स्विकारतो. १. आपला लेख आल्यानंतर अनेक विरुद्ध प्रतिक्रियेचे उत्तर परस्परच दिले जाते. २. काही मुद्दयांचे उत्तर मात्र आपणच द्यायला हवे. ३. पुढील लेखात या सगळ्या मुद्द्यांचा विचार करावयाचा. ४. व्यक्तिश: कोणाबद्दलही द्वेष न ठेवता, आपण प्रबोधनाचे कार्य करित आहोत या वर अबाधित विश्वास ठेवायचा. आपल्या पुढील लेखाची वाट पाहत आहे.

शक्तिमान 14/12/2008 - 10:36
काँग्रेसचे निर्णय अमराठी हायकमांड वर अवलंबून असणे आणि यातून महाराष्ट्राची राष्ट्रीय पातळीवर होणारी गळचेपी थांबवण्यासाठी प्रादेशिक पक्षांना संधी मिळावयास हवी. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष चांगला म्हणायचा या बाबतीत. (इतर पक्ष राज्यपातळीवर म्हणावे एवढे तुल्यबळ नाहीत म्हणून उल्लेख केला नाही.) (जर त्यांनी हे धोरण बदलले नाही तर..) काँग्रेसला अधिक संधी देण्यात काही अर्थ नाही.

विसोबा खेचर 14/12/2008 - 12:08
"राजकारण म्हणजे गटार" असे मानणार्‍या मान्यवरांनी ह्या लेखाला तशा अथवा त्या अर्थाच्या प्रतिक्रीया देण्याची "तसदी घेऊ नये". उत्तम! आम्ही ही तसदी घेत नाही/घेऊ इच्छित नाही..कारण "राजकारण म्हणजे गटार" असेच आमचे मत आहे.. आम्ही आपले ह्याबद्दल आत्ताच आभार मानत आहोत. धन्यवाद. हा चांगला व आम्हाला सोयिस्कर असा डिस्क्लेमर टाकल्यामुळे आम्हीही आपले आभार मानत आहोत.. चालू द्या... तात्या.

कॉन्गेस ची नाव बुडेल असे मला तरी वाटत नाही. एकतर विरोधी पक्षात फारसा जोर नाही. आणि मुबंई-ठाणे जेथील जागा वाढल्या आहेत, तीथले परप्रांतिय कॉन्गेस किंवा राकॉ ला मदत करतील. मला नाही वाटत की राणे मुंबई - कोकणा बाहेर फारसे बिघडवु शकतील आणी मुळात कॉन्गेस कोकणात जीवच किती होता???. जे आता दिसत आहे ते राणेंमुळे. निवडुन येणारात किती जोर आहे, ह्या पेक्षा पाडणारर्‍यात किती जोर आहे ह्यावर पुढचे राजकारण ठरणार आहे. ---- सखाराम गटणे

In reply to by सखाराम_गटणे™

निवडुन येणारात किती जोर आहे, ह्या पेक्षा पाडणारर्‍यात किती जोर आहे ह्यावर पुढचे राजकारण ठरणार आहे. -- दुर्दैवाने हे एक उघड सत्य मागच्या काही निवडणुकांपासून अनुभवाला येत आहे. कळीच मुद्दा.

लिखाळ 15/12/2008 - 18:20
डॉन्या, लेख छान आहे. मुंबईमध्ये झालेली घटना निवडनूकीचे वारे वाहू लागल्यावर झाली आहे. कधी नव्हे तो या घटनेनंतर थेट पाकिस्तानचे नाव घेऊन पंतप्रधान-संरक्षणमंत्री त्यांच्याशी युद्ध करावे न कारावे अशी मते प्रकट करत आहेत. माझ्या मते याचा सरळ संबंध जनतेला तात्पुरते तुष्ट करुन या निवडणूकीमध्ये इतर मुद्दे दाबून स्वदेशप्रेम वगैरे दाखवून हेतू साध्य करणे याच्याशी आहे. आपले केंद्रातले मंत्री लोक अचानक इतके कठोर कसे झाले याचे उत्तर निवडणुका जवळ येत आहेत हेच वाटत आहे. आता स्थानिक जातीय दंगगली, वीज, पाणी यांपेक्षा मोठा व्यापक प्रश्न आयताच मिळाला आहे. याचाच उपयोग महाराष्ट्रात सुद्धा होईल असे वाटते. एकदा का सूनबाई सभेत येऊन म्हणाल्या की या देशासाठी मी माझ्या सासूबाई,.. वगैरे की सगळे वातावरण भारले जाईल. :) पुढचा भाग वाचण्यास उत्सुक. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

सुनील 15/12/2008 - 19:18
मुंबईमध्ये झालेली घटना निवडनूकीचे वारे वाहू लागल्यावर झाली आहे दिल्ली आणि राजस्थानातील निवडणूकांतील मतदान ह्या घटनेनंतर आठवड्याभरात झाले होते. तरीही दोन्ही ठिकाणी काँग्रेस निवडून आली. मला॑ वाटते, विधानसभा निवडणूकीत लोक राष्ट्रीय समस्या आणि स्थानिक (राज्यस्तरावरील) घटनांची फारकत करतात. तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झालाच तर तो सद्यसरकारच्या स्थानिक गैरकारभारामुळे होईल, दहशतवादी हल्ल्याचा थेट संबंध असेलच असे नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

छोटा डॉन 15/12/2008 - 20:26
>> विधानसभा निवडणूकीत लोक राष्ट्रीय समस्या आणि स्थानिक (राज्यस्तरावरील) घटनांची फारकत करतात. असेच म्हणतो ... प्रत्येक पातळीवरच्या निवडणुकांसाठी "विषय आणि मुद्दे" सर्वस्वी भिन्न असतात. त्याचा बहुतेक करुन "इतर पातळीशी" संबंध नसतोच / नसावाच. स्थानीक परिमाण, स्थानीक समस्या, स्थानीक नेतॄत्व, स्थानीक राजकारण ह्यांचा प्रामुख्याने संबंध येतो. तुम्हीच पहा ना, जेव्हा पंचायत समित्यांच्या वगैरे निवडणुका होतात तेव्हा एखाद्या महान / मोठ्ठ्या / बलदंड अशा मंत्री असलेल्या नेत्याच्या पॅनेलला स्थानीक पातळीवरची एखादी "आघाडी / पॅनेल / महासंघ " चक्क धुळ चारतो. कारण त्या मंत्र्याने स्वतः मंत्री म्हणुन केलेल्या कामापेक्षा स्थानीक संदर्भ जास्त वरचढ ठरतात. आपल्या राज्यात तर अशी भरपुर उदाहरणे आहेत, आपल्या मतदारसंघामध्ये येणार्‍या पंचायत समित्यात, बँकात, परसंस्था यांच्या इलेक्शनमध्ये तेथील "आमदार / खासदार" यांचे पॅनेल भुईसपाट होऊन राज्याच्या राजकारणात काडीचे स्थान नसलेली एखादी "विकास आघाडी" निवडुन आली आहे ... >>महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झालाच तर तो सद्यसरकारच्या स्थानिक गैरकारभारामुळे होईल, दहशतवादी हल्ल्याचा थेट संबंध असेलच असे नाही. नक्की सांगता येणे कठीण आहे, अजुन बराच वेळ आहे ना निवडणुकीला. आत्ताच लगेच जर निवडणुका झाल्या असत्या तर कदाचित "दहशतवादी हल्ल्याच्या ओघाने येणारा सुरक्षेचा मुद्दा" महत्वाचा ठरला असता ( असे मी मानतो) . छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

In reply to by छोटा डॉन

लिखाळ 15/12/2008 - 20:32
बरोबर आहे.. पण मुंबई प्रश्न हा केंद्र आणि राज्य दोन्ही स्तरांवर आहे. (मुंबई महाराष्ट्रात आहे म्हणून.)त्यामुळे मराठी माणसांच्या नोकरी प्रश्नाला देशभक्तीचे वातावरण टक्कर देऊ शकेल असे वाटते. काँग्रेसने जर देशभक्तीची लाट आणली तर ते शक्य होईल. पण अशी लाट किती टिकेल आणि खेडोपाडी याचा किती परिणाम होईल ते माहित नाही. ते असो. -- लिखाळ.

अनामिका 15/12/2008 - 19:07
छोटे सरदार! मस्तच जमलाय लेख.सध्या काही भाष्य करत नाही. जरा वेळ घेऊन व विचार पुर्वक मत मांडलेले बरे नाहि का? पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आम्ही सुद्धा! लिखाळ यांच्या मताशी मी सहमत आहे. "अनामिका"

डॉनबा, तुमच्या कल्पनाशक्ती समोर आम्ही नेहमीच चाट पडतो. आपणा सर्वांच्या जीवनावर कमी अधिक प्रमाणात राजकीय पक्ष बदल घडवून आणत असतात. त्यामुळे एक मतदार म्हणून आपणांस त्यांची माहिती असणे आवश्यक आहे. त्रयस्थाच्या नजरेतून आपण एक चांगली लेखमाला उतरवत आहात असे दिसते. अभिनंदन! पुढील भागांच्या प्रतिक्षेत. आपला, (वाचक) भास्कर
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

शत सर्व्हर शोधताना...

नीलकांत ·

विकास 11/12/2008 - 08:25
तात्यांनी एकट्याने खर्च उचलण्याऐवजी किमान स्वेच्छेने का होईना पण वर्गणी गोळा करणे योग्य पर्याय वाटतो. (वास्तवीक प्रत्येक सभासद नावामागे पैसे लावले तर कदाचीत काही तोतया नावे आपोआप गळून पडतील आणि सर्वर वरील दडपण कमी होऊ शकेल ;) ) सर्वांनी मिळून यावर नक्की "सक्रीय" विचार करावा असे वाटते. त्यात मी पण सहभागी आहे.

In reply to by विकास

वास्तवीक प्रत्येक सभासद नावामागे पैसे लावले तर कदाचीत काही तोतया नावे आपोआप गळून पडतील आणि सर्वर वरील दडपण कमी होऊ शकेल फेक आय्डी आणि नको असलेली नावे घालवायचा उत्तम उपाय... किती प्रॅक्टिकल आहे कल्पना नाही....नीलकांतने सुचवलेली गोष्ट पटते... तात्यांचे मत काही बदलले आहे का बघूयात... ______सर्वानुमते वर्गणीचे जे काही ठरेल ते मान्य आहे.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by विसोबा खेचर

विकास 11/12/2008 - 08:36
तात्यांच्या अवांतराला अजून थोडे अवांतरः (क्षमस्व!) मिपा वर्गणी, वापराप्रमाणे विविध दरात ठेवता येईलः
  • लेख लिहीणारे,
  • चर्चा चालू करणारे
  • चर्चेत वाद घालणारे
  • चर्चेत पुन्हा पुन्हा वाद घालणारे
  • कविता करणारे
  • विडंबने करणारे
  • मिपावरील कवितांची विडंबने करणारे
  • एका पेक्षा अधिक आयडी वापरणारे
  • चर्चेत अवांतर लिहीणारे (हा धागा सोडून :-) )
  • शुद्ध मराठीत, माहीतीपूर्ण पण वाचकांच्या अलगद डोक्यावरून जाईल असे लिहणारे
  • धर्म, निधर्म, राजकारण, समाजकारण, साम्यकारण (नवीनच शब्द आहे) यावरून एकमेकांना व्हर्चुअली चावणारे
आणि सगळ्यात शेवटी महत्वाचे
  • कुठल्यातरी नटीचा फोटू स्वतःबरोबर चिकटवणारे!
हे असेच काहीसे वाटलेले दर ठरवण्यासाठीचे विभाग आहेत, त्यात कोणाला जर साम्य वाटले तरी तो निव्वळ योगायोग समजावा. ;)

In reply to by विकास

अनंत छंदी 11/12/2008 - 10:18
:)) महत्वाचे म्हणजे सर्वात जास्त वर्गणी गांधीवादी लेखाचे गुर्‍हाळ चालविणार्‍यांना ठेवा, वाचकांना सहन करण्याचा किती ताप होतो?

सहज 11/12/2008 - 08:29
बहुमताने जे काही ठरेल ते मान्य. विकासराव म्हणतात तसे जितके आय डी तितकी जास्त वर्गणी. :-)

एड सेन्स सारख्याच अजुन जाहीराती देणार्‍या कंपण्या आहेत, त्याची सेवा वापरु शकता. मी काही मदत करु शकेन

नीलकांत 11/12/2008 - 08:40
मिसळपाव वाचण्यासाठी बंधण लादने योग्य होणार नाही असं मला वाटत. याशिवायही अनेक पर्याय आहेत की ! कुणावरच कसलेच बंधन यायला नको. स्वेच्छा ठिक आहे. याच वेळी येणार्‍या आणि चिकटून राहणार्‍या पाहूण्या वाचकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यासाठी मिसळपाव वाचण्यासाठी येण्याची नोंद बंधनकारक केली तर खुप ताण कमी होईल. याचे काही फायदे व काही तोटे आहेत. याविषयावर सुध्दा तुमचे मत द्यावे. नीलकांत

In reply to by नीलकांत

ऋषिकेश 11/12/2008 - 10:12
यापेक्षा केवळ वाचनमात्र राहण्यासाठीही फक्त कॅपचा ठेवला तरी फरक पडेल असे वाटाते म्हणजे केवळ वाचक ज्याला सभासदत्व नको आहे: तो फक्त कॅपचा टाकून प्रवेश करेल आणि ज्याला लॉगिन करायचं आहे तो आधी कॅपचा टाकून प्रवेश करेल तेव्हा नेहेमीचं मिसळपाव उघडेल मग हवंतर नेहेमीप्रमाणे लॉगिन डीटेल्स देईल यामुळे , मशीन जनरेटेड हिटसहि थांबतील आणि तात्यांना जी मुक्तता अपेक्षीत आहे (प्रत्येकाला वाचनाची मुभा असण्याची जी मला स्तुत्य वाटते) ती ही सांभाळली जाईल माझ्यामते आनंदयात्रीने असेच कुठेसे म्हटल्याचे आठवते. असल्यास द्वीरुक्तीबद्दल क्षमस्व बाकी नीलकांतशी सहमत आहे. तात्यां साईट चालवण्यास समर्थ असले तरी इतरांनी / साईटने स्वतः आर्थिक भार उचलावा. -(गोंधळलेला) ऋषिकेश

झकासराव 11/12/2008 - 09:52
याच वेळी येणार्‍या आणि चिकटून राहणार्‍या पाहूण्या वाचकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यासाठी मिसळपाव वाचण्यासाठी येण्याची नोंद बंधनकारक केली तर खुप ताण कमी होईल>>>>>>>>>. चिकटुन राहण्यार्‍या पाहुण्या वाचकाना येण्याची नोंद हा उपाय योग्य राहील. ते त्या निमित्ताने सदस्यत्व घेतील किंवा आधीच सदस्यत्व असेल तर लॉग इन करतील. जेणेकरुन मशीन जनरेटेड हिट्स वर थोडा तरी कंट्रोल येइल. पण आल्या आल्या लगेच येण्याची नोंद करण बंधनकारक करण हा उपाय तितकासा बरोबर राहणार नाही. सदस्यत्व घ्यायच्या आधी कोणी येवुन नुसतच वाचत बसेल किंवा साइटचा अंदाज घेत असेल (आपल्याला आवडेल का? किंवा इथे काय काय चांगल आहे ) तर अशा लोकाना हा प्रकार त्रासदायक वाटण्याची शक्यता आहे. त्यासाठी ठराविक टाइम लिमिट देता येइल का?? अजुन एक , मध्ये राजे (जैनाच कार्ट) यानी डेडिकेटेड सर्वर घ्या अशी कल्पना मांडली होती. त्याचा खर्च किते येतो?? स्वेच्छेने वर्गणी देणार्‍या मित्रांकडून असा सर्वर घेता यैल का? अवांतर : मला संगणकाच काडीइतक देखील ज्ञान नाही. वर लिहिलेल तुम्हा लोकांचच वाचुन जे सुचल ते लिहिलय. अतिअवांतर : आपल्यावर हिटसचा हल्ला करणार्‍या शत्रुवर आपण प्रतिहल्ला का करु नये??? त्यासाठी काहि खर्च येत असेल तर आधी त्याची वर्गणी द्यायला मी तयार आहे. ;) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

अनंत छंदी 11/12/2008 - 10:12
आपण आपणाला जी शक्य असेल ती मदत मिपाला करावी , खाते नं. दिल्यास आपण आपली मदत त्यावर जमा करू शकू. अर्थात तात्यांचे काय मत आहे ते पहावे, शेवटी ते म्हणतील ते अंतीम!

मुक्तसुनीत 11/12/2008 - 10:29
मिपावर होणार्‍या हल्ल्यांच्या आणि एकूणच वाढलेल्या वैध ट्रॅफिकच्या संदर्भातली एकूण परिस्थिती पहाता मेम्बरशिपचे बंधन असणे योग्य वाटायला लागले आहे. "कॅपचा" आले तर मात्र प्रचंड त्रास होईल ! :-( अर्थात तसे करणे अपरिहार्य असेल तर करावे लागेलच ! वर्गणी मात्र जरूर द्यायला आवडेल !

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री 11/12/2008 - 12:00
>>"कॅपचा" आले तर मात्र प्रचंड त्रास होईल ! काय त्रास होईल ?? ५०-१०० पाने वाचल्यावर एकदा कॅपचा किंवा वर्ड व्हेरिफिकेशन करावे लागले तर फारसा त्रास होईल असे वाटत नाही. या कॅपचामुळे जर ही बँडविड्थ दरोडेखोरी थांबली तर मोठे सर्व्हर घ्यायची किंवा हजारो रुपये खर्च करायची अजिबात गरज पडणार नाही हे मागे व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या दुरदेशींच्या हिट्स अन बँडविड्थ युसेजच्या तक्त्यांवरुन कळतेच आहे. तरीही जर पैसे गोळा करण्याचा निर्णय झालाच तर मी प्रिमियम सदस्यत्व घेईन असा विचार आहे. जर माझे मत विचारात घेतले जाणार असेल तर पैसे मंदिरातल्या देणगीसमान गोळा केले जावेत (गुप्तदान), मी देणगी दिली आहे की नाही किंवा दिलीच असेल तर किती दिली आहे याची माहिती व्यवस्थापनालाही नसावी. - आपलाच आनंदयात्री (सदस्य-खरडफळा संपादक) मिसळपाव डॉट कॉम

अभिजीत 11/12/2008 - 10:48
मिपा सर्वर वरचा ताण आणि खर्च या दोन गोष्टी स्वतंत्र पणे बघितल्या पाहिजेत. १) मिपा सर्वर वर ताण कमी करण्यासाठी - मिपाचा पूर्ण वापर करण्यासाठी सदस्य बनणे आवश्यक करावे. त्यासाठी येण्याची नोंद करणे बंधनकारक करणे हा एक चांगला उपाय आहे. नवीन येणार्‍या पाहुण्यांसाठी (जे सदस्य नाहीत) दर्शनी पानाचा 'पूर्व परिक्षण' हा पर्याय देता येइल. यात - नविन लेख/प्रतिसाद/सदस्यसंख्या वगैरे आकडेवारी, - ४-५ लेखांचे भाग जेणे करुन त्यांना संस्थळाचे स्वरुप वगैरे समजून येइल, २) संस्थळ उत्तरोत्तर खर्चाच्या बाबतीत स्व्ययंपूर्ण व्हावे यासाठी - या बाबतीत मिपाचे मालक या नात्याने तात्या अभ्यंकर यांचे विचार महत्वाचे आहेत. तरीही एक सुचवणी - पहिल्या प्रयत्नात - स्वेच्छा वर्गणी सुरु करावी. एक 'क्रिटिकल मास' जमे पर्यंत स्वेच्छा वर्गणी आणि नंतर वर्गणी चालु करावी. वर्गणी आत्ता लगेच चालु केल्यास वाचक संख्या कमी होउ शकते. (असे मला वाटते.) अर्थात याचे फायदे-तोटे दोन्ही आहेत. खर्च/वार्षिक वर्गणी देणारी संभाव्य सभासद संख्या यात मेळ येण्यासाठी लागणारे आकडे माझ्या जवळ नाहीत पण या दिशेने विचार करता येउ शकतो. तसेच, वर्गणी देणे/हिशोब वगैरे साठी जे कष्ट/गुंतवणूक/सोयी-सुविधा मालकांना कराव्या लागतील त्याची जुळणी करायचाही विचार करायला लागेल. जाहिरातीतून उत्पन्न वाढवता येइल हे खरेच, पण प्रथम इतर उपाय करुन बघावेत. जाहिरात विरहीत संस्थळ हाही एक महत्वाचा मुद्दा पुढे महत्वाचा ठरु शकतो. - अभिजीत

विसोबा खेचर 11/12/2008 - 11:02
सर्वंच्या सूचनांवर आदरपूर्वक विचार केला जाईल... सध्या मी स्वत:च खूप कामाच्या गडबडीत आहे त्यामुळे निवांतपणे विचार करायला टाईमच भेटत नाही.. तात्या.

सर्किट 11/12/2008 - 11:07
तात्या, तुझा पेपॅल किंवा गूगल चेकाऊट चा नंबर कळव. -- सर्किट

अभिज्ञ 11/12/2008 - 11:09
फेक आय डि बाबत. वरिल काहि सुचनांबरोबरच फेक आय डि टाळण्याकरिता, मिपावर नवीन सभासद होण्याकरिता, सद्य कुठल्याहि ३-५ सदस्यांचा पाठिंबा असावा. मिपावर येउन कुणि धुडगुस घालत असेल तर त्या सदस्यत्वाला पाठिंबा देणारे ५ सदस्य जबाबदार राहतील. ह्याचा मुळ उद्देश मिपावर आपल्या माहितीमधील मंडळी यावीत असाच आहे. स्पॅम आयडि टाळण्याकरिता गुगल मेल करिताहि सुरुवातीलाअसाच प्रकार करण्यात आला होता. अभिज्ञ.

वर्गणी प्रमुख म्हणुन मी आज स्वतःला मि.पा. ला अर्पण करत आहे ;) वर्गणी गोळा करणे व त्याची योग्य ती 'विल्हेवाट' लावणे हे काम मी स्वखुशीने करिन ;) आपलाच हिंदु ह्रुदय राजकुमार |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

आनंदयात्री 11/12/2008 - 12:08
तुझ्याकडे जी वर्गणी जमा होणार ती ... रिकामा बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या परवाचा ब्रेड, नासकी अंडी ! ये लवकर आमच्या बिल्डिंगची कचरी पैसे वाढवुन पाहिजे असे म्हणुन सोडुन गेलिये !!

तात्याबा,निलकांत, क्षमता वाढवल्याबद्दल अभिनंदन. अवांतरः आणखी कसल्या कसल्या क्षमता वाढवु शकता ह्याचा विचार व्हावा.

दवबिन्दु 11/12/2008 - 12:28
माकडांसारखं मोठे दगड नाही उचलता येनार पन खारुताईचा वाटा नक्की ऊचलु. काय ती खंडनी नक्की देउ.

लिखाळ 11/12/2008 - 20:36
कार्यक्षमता वाढवण्यात यशस्वी झाल्याबद्दल आपले अभिनंदन आणि विश्रांतीनंतर कार्यक्षम मिपा लवकर सुरु केल्याबद्दल आभार. :) नव्या रचनेमुळे मिपा बरेच जलद झाले आहे. पान उघडायला जो वेळ लागायचा तो सुद्धा कमी झाला आहे. मिपाच्या आर्थिक बाबीमध्ये जो निर्णय सर्वांना मान्य तो मला ही मान्य. --(शुभेच्छुक) लिखाळ.

सर्वसाक्षी 11/12/2008 - 22:56
पावत्या फाड. चांगुलपणाचा अतिरेक वाइटच रे. काहीतरी चांगले द्यावे हा तुझा अट्टाहास वाखाणण्यासारखा आहे, पण ते फुकट द्यावे असे का? अरे रस्त्याच्या कडेला टपरीवर कटिंग मारला तरी पैसे पडतात आणि पिणारे आनंदाने देतात. मग इथे कोण नाही म्हणेल? तू , मालक आम्ही भाडेकरू. सगळे मजा करू

शितल 11/12/2008 - 23:14
पण आता मिपा चांगले स्पीड देत आहे असे निदान मला तरी जाणवले आहे. :)

चतुरंग 11/12/2008 - 23:44
१ - पहिल्यापेक्षा मिपाचा पान उघडायचा वेग जवळजवळ दुपटीने वाढलाय (साधारण २ ते ३ सेकंदात पान येतेच). २ - दुहेरी प्रतिसाद यायचे प्रमाण जवळजवळ नगण्य झालेले दिसते. ३ - लेखातील चित्रे पहिल्यापेक्षा जलद उघडतात. एकूण झालेला बदल फायदेशीर दिसतोय असे वाटते. वर्गणीबाबत सर्वांच्या बरोबर आहे. (शक्यतो जाहिराती टाळता आल्या तर बरे असे वाटते. साईटचा आपलेपणा जाऊन थोडे बाजारु स्वरूप येते असे माझे मत पण कदाचित काळाच्या कसोटीवर काय जास्त व्यवहारी आहे ते बघावे लागेल!) चतुरंग

विसोबा खेचर 12/12/2008 - 00:07
सगळ्यांच्या मदतीच्या हाताबद्दल धन्यवाद... वार्षिक वर्गणी, स्वेच्छा मदत इत्यादी पर्याय बरे आहेत.. अगदीच कडकी लागली किंवा खर्च मज गरीबाच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला तर विनासंकोच मदत मागीन.. आपला, (कृतज्ञ) तात्या.

विकास 11/12/2008 - 08:25
तात्यांनी एकट्याने खर्च उचलण्याऐवजी किमान स्वेच्छेने का होईना पण वर्गणी गोळा करणे योग्य पर्याय वाटतो. (वास्तवीक प्रत्येक सभासद नावामागे पैसे लावले तर कदाचीत काही तोतया नावे आपोआप गळून पडतील आणि सर्वर वरील दडपण कमी होऊ शकेल ;) ) सर्वांनी मिळून यावर नक्की "सक्रीय" विचार करावा असे वाटते. त्यात मी पण सहभागी आहे.

In reply to by विकास

वास्तवीक प्रत्येक सभासद नावामागे पैसे लावले तर कदाचीत काही तोतया नावे आपोआप गळून पडतील आणि सर्वर वरील दडपण कमी होऊ शकेल फेक आय्डी आणि नको असलेली नावे घालवायचा उत्तम उपाय... किती प्रॅक्टिकल आहे कल्पना नाही....नीलकांतने सुचवलेली गोष्ट पटते... तात्यांचे मत काही बदलले आहे का बघूयात... ______सर्वानुमते वर्गणीचे जे काही ठरेल ते मान्य आहे.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by विसोबा खेचर

विकास 11/12/2008 - 08:36
तात्यांच्या अवांतराला अजून थोडे अवांतरः (क्षमस्व!) मिपा वर्गणी, वापराप्रमाणे विविध दरात ठेवता येईलः
  • लेख लिहीणारे,
  • चर्चा चालू करणारे
  • चर्चेत वाद घालणारे
  • चर्चेत पुन्हा पुन्हा वाद घालणारे
  • कविता करणारे
  • विडंबने करणारे
  • मिपावरील कवितांची विडंबने करणारे
  • एका पेक्षा अधिक आयडी वापरणारे
  • चर्चेत अवांतर लिहीणारे (हा धागा सोडून :-) )
  • शुद्ध मराठीत, माहीतीपूर्ण पण वाचकांच्या अलगद डोक्यावरून जाईल असे लिहणारे
  • धर्म, निधर्म, राजकारण, समाजकारण, साम्यकारण (नवीनच शब्द आहे) यावरून एकमेकांना व्हर्चुअली चावणारे
आणि सगळ्यात शेवटी महत्वाचे
  • कुठल्यातरी नटीचा फोटू स्वतःबरोबर चिकटवणारे!
हे असेच काहीसे वाटलेले दर ठरवण्यासाठीचे विभाग आहेत, त्यात कोणाला जर साम्य वाटले तरी तो निव्वळ योगायोग समजावा. ;)

In reply to by विकास

अनंत छंदी 11/12/2008 - 10:18
:)) महत्वाचे म्हणजे सर्वात जास्त वर्गणी गांधीवादी लेखाचे गुर्‍हाळ चालविणार्‍यांना ठेवा, वाचकांना सहन करण्याचा किती ताप होतो?

सहज 11/12/2008 - 08:29
बहुमताने जे काही ठरेल ते मान्य. विकासराव म्हणतात तसे जितके आय डी तितकी जास्त वर्गणी. :-)

एड सेन्स सारख्याच अजुन जाहीराती देणार्‍या कंपण्या आहेत, त्याची सेवा वापरु शकता. मी काही मदत करु शकेन

नीलकांत 11/12/2008 - 08:40
मिसळपाव वाचण्यासाठी बंधण लादने योग्य होणार नाही असं मला वाटत. याशिवायही अनेक पर्याय आहेत की ! कुणावरच कसलेच बंधन यायला नको. स्वेच्छा ठिक आहे. याच वेळी येणार्‍या आणि चिकटून राहणार्‍या पाहूण्या वाचकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यासाठी मिसळपाव वाचण्यासाठी येण्याची नोंद बंधनकारक केली तर खुप ताण कमी होईल. याचे काही फायदे व काही तोटे आहेत. याविषयावर सुध्दा तुमचे मत द्यावे. नीलकांत

In reply to by नीलकांत

ऋषिकेश 11/12/2008 - 10:12
यापेक्षा केवळ वाचनमात्र राहण्यासाठीही फक्त कॅपचा ठेवला तरी फरक पडेल असे वाटाते म्हणजे केवळ वाचक ज्याला सभासदत्व नको आहे: तो फक्त कॅपचा टाकून प्रवेश करेल आणि ज्याला लॉगिन करायचं आहे तो आधी कॅपचा टाकून प्रवेश करेल तेव्हा नेहेमीचं मिसळपाव उघडेल मग हवंतर नेहेमीप्रमाणे लॉगिन डीटेल्स देईल यामुळे , मशीन जनरेटेड हिटसहि थांबतील आणि तात्यांना जी मुक्तता अपेक्षीत आहे (प्रत्येकाला वाचनाची मुभा असण्याची जी मला स्तुत्य वाटते) ती ही सांभाळली जाईल माझ्यामते आनंदयात्रीने असेच कुठेसे म्हटल्याचे आठवते. असल्यास द्वीरुक्तीबद्दल क्षमस्व बाकी नीलकांतशी सहमत आहे. तात्यां साईट चालवण्यास समर्थ असले तरी इतरांनी / साईटने स्वतः आर्थिक भार उचलावा. -(गोंधळलेला) ऋषिकेश

झकासराव 11/12/2008 - 09:52
याच वेळी येणार्‍या आणि चिकटून राहणार्‍या पाहूण्या वाचकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यासाठी मिसळपाव वाचण्यासाठी येण्याची नोंद बंधनकारक केली तर खुप ताण कमी होईल>>>>>>>>>. चिकटुन राहण्यार्‍या पाहुण्या वाचकाना येण्याची नोंद हा उपाय योग्य राहील. ते त्या निमित्ताने सदस्यत्व घेतील किंवा आधीच सदस्यत्व असेल तर लॉग इन करतील. जेणेकरुन मशीन जनरेटेड हिट्स वर थोडा तरी कंट्रोल येइल. पण आल्या आल्या लगेच येण्याची नोंद करण बंधनकारक करण हा उपाय तितकासा बरोबर राहणार नाही. सदस्यत्व घ्यायच्या आधी कोणी येवुन नुसतच वाचत बसेल किंवा साइटचा अंदाज घेत असेल (आपल्याला आवडेल का? किंवा इथे काय काय चांगल आहे ) तर अशा लोकाना हा प्रकार त्रासदायक वाटण्याची शक्यता आहे. त्यासाठी ठराविक टाइम लिमिट देता येइल का?? अजुन एक , मध्ये राजे (जैनाच कार्ट) यानी डेडिकेटेड सर्वर घ्या अशी कल्पना मांडली होती. त्याचा खर्च किते येतो?? स्वेच्छेने वर्गणी देणार्‍या मित्रांकडून असा सर्वर घेता यैल का? अवांतर : मला संगणकाच काडीइतक देखील ज्ञान नाही. वर लिहिलेल तुम्हा लोकांचच वाचुन जे सुचल ते लिहिलय. अतिअवांतर : आपल्यावर हिटसचा हल्ला करणार्‍या शत्रुवर आपण प्रतिहल्ला का करु नये??? त्यासाठी काहि खर्च येत असेल तर आधी त्याची वर्गणी द्यायला मी तयार आहे. ;) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

अनंत छंदी 11/12/2008 - 10:12
आपण आपणाला जी शक्य असेल ती मदत मिपाला करावी , खाते नं. दिल्यास आपण आपली मदत त्यावर जमा करू शकू. अर्थात तात्यांचे काय मत आहे ते पहावे, शेवटी ते म्हणतील ते अंतीम!

मुक्तसुनीत 11/12/2008 - 10:29
मिपावर होणार्‍या हल्ल्यांच्या आणि एकूणच वाढलेल्या वैध ट्रॅफिकच्या संदर्भातली एकूण परिस्थिती पहाता मेम्बरशिपचे बंधन असणे योग्य वाटायला लागले आहे. "कॅपचा" आले तर मात्र प्रचंड त्रास होईल ! :-( अर्थात तसे करणे अपरिहार्य असेल तर करावे लागेलच ! वर्गणी मात्र जरूर द्यायला आवडेल !

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री 11/12/2008 - 12:00
>>"कॅपचा" आले तर मात्र प्रचंड त्रास होईल ! काय त्रास होईल ?? ५०-१०० पाने वाचल्यावर एकदा कॅपचा किंवा वर्ड व्हेरिफिकेशन करावे लागले तर फारसा त्रास होईल असे वाटत नाही. या कॅपचामुळे जर ही बँडविड्थ दरोडेखोरी थांबली तर मोठे सर्व्हर घ्यायची किंवा हजारो रुपये खर्च करायची अजिबात गरज पडणार नाही हे मागे व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या दुरदेशींच्या हिट्स अन बँडविड्थ युसेजच्या तक्त्यांवरुन कळतेच आहे. तरीही जर पैसे गोळा करण्याचा निर्णय झालाच तर मी प्रिमियम सदस्यत्व घेईन असा विचार आहे. जर माझे मत विचारात घेतले जाणार असेल तर पैसे मंदिरातल्या देणगीसमान गोळा केले जावेत (गुप्तदान), मी देणगी दिली आहे की नाही किंवा दिलीच असेल तर किती दिली आहे याची माहिती व्यवस्थापनालाही नसावी. - आपलाच आनंदयात्री (सदस्य-खरडफळा संपादक) मिसळपाव डॉट कॉम

अभिजीत 11/12/2008 - 10:48
मिपा सर्वर वरचा ताण आणि खर्च या दोन गोष्टी स्वतंत्र पणे बघितल्या पाहिजेत. १) मिपा सर्वर वर ताण कमी करण्यासाठी - मिपाचा पूर्ण वापर करण्यासाठी सदस्य बनणे आवश्यक करावे. त्यासाठी येण्याची नोंद करणे बंधनकारक करणे हा एक चांगला उपाय आहे. नवीन येणार्‍या पाहुण्यांसाठी (जे सदस्य नाहीत) दर्शनी पानाचा 'पूर्व परिक्षण' हा पर्याय देता येइल. यात - नविन लेख/प्रतिसाद/सदस्यसंख्या वगैरे आकडेवारी, - ४-५ लेखांचे भाग जेणे करुन त्यांना संस्थळाचे स्वरुप वगैरे समजून येइल, २) संस्थळ उत्तरोत्तर खर्चाच्या बाबतीत स्व्ययंपूर्ण व्हावे यासाठी - या बाबतीत मिपाचे मालक या नात्याने तात्या अभ्यंकर यांचे विचार महत्वाचे आहेत. तरीही एक सुचवणी - पहिल्या प्रयत्नात - स्वेच्छा वर्गणी सुरु करावी. एक 'क्रिटिकल मास' जमे पर्यंत स्वेच्छा वर्गणी आणि नंतर वर्गणी चालु करावी. वर्गणी आत्ता लगेच चालु केल्यास वाचक संख्या कमी होउ शकते. (असे मला वाटते.) अर्थात याचे फायदे-तोटे दोन्ही आहेत. खर्च/वार्षिक वर्गणी देणारी संभाव्य सभासद संख्या यात मेळ येण्यासाठी लागणारे आकडे माझ्या जवळ नाहीत पण या दिशेने विचार करता येउ शकतो. तसेच, वर्गणी देणे/हिशोब वगैरे साठी जे कष्ट/गुंतवणूक/सोयी-सुविधा मालकांना कराव्या लागतील त्याची जुळणी करायचाही विचार करायला लागेल. जाहिरातीतून उत्पन्न वाढवता येइल हे खरेच, पण प्रथम इतर उपाय करुन बघावेत. जाहिरात विरहीत संस्थळ हाही एक महत्वाचा मुद्दा पुढे महत्वाचा ठरु शकतो. - अभिजीत

विसोबा खेचर 11/12/2008 - 11:02
सर्वंच्या सूचनांवर आदरपूर्वक विचार केला जाईल... सध्या मी स्वत:च खूप कामाच्या गडबडीत आहे त्यामुळे निवांतपणे विचार करायला टाईमच भेटत नाही.. तात्या.

सर्किट 11/12/2008 - 11:07
तात्या, तुझा पेपॅल किंवा गूगल चेकाऊट चा नंबर कळव. -- सर्किट

अभिज्ञ 11/12/2008 - 11:09
फेक आय डि बाबत. वरिल काहि सुचनांबरोबरच फेक आय डि टाळण्याकरिता, मिपावर नवीन सभासद होण्याकरिता, सद्य कुठल्याहि ३-५ सदस्यांचा पाठिंबा असावा. मिपावर येउन कुणि धुडगुस घालत असेल तर त्या सदस्यत्वाला पाठिंबा देणारे ५ सदस्य जबाबदार राहतील. ह्याचा मुळ उद्देश मिपावर आपल्या माहितीमधील मंडळी यावीत असाच आहे. स्पॅम आयडि टाळण्याकरिता गुगल मेल करिताहि सुरुवातीलाअसाच प्रकार करण्यात आला होता. अभिज्ञ.

वर्गणी प्रमुख म्हणुन मी आज स्वतःला मि.पा. ला अर्पण करत आहे ;) वर्गणी गोळा करणे व त्याची योग्य ती 'विल्हेवाट' लावणे हे काम मी स्वखुशीने करिन ;) आपलाच हिंदु ह्रुदय राजकुमार |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

आनंदयात्री 11/12/2008 - 12:08
तुझ्याकडे जी वर्गणी जमा होणार ती ... रिकामा बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या परवाचा ब्रेड, नासकी अंडी ! ये लवकर आमच्या बिल्डिंगची कचरी पैसे वाढवुन पाहिजे असे म्हणुन सोडुन गेलिये !!

तात्याबा,निलकांत, क्षमता वाढवल्याबद्दल अभिनंदन. अवांतरः आणखी कसल्या कसल्या क्षमता वाढवु शकता ह्याचा विचार व्हावा.

दवबिन्दु 11/12/2008 - 12:28
माकडांसारखं मोठे दगड नाही उचलता येनार पन खारुताईचा वाटा नक्की ऊचलु. काय ती खंडनी नक्की देउ.

लिखाळ 11/12/2008 - 20:36
कार्यक्षमता वाढवण्यात यशस्वी झाल्याबद्दल आपले अभिनंदन आणि विश्रांतीनंतर कार्यक्षम मिपा लवकर सुरु केल्याबद्दल आभार. :) नव्या रचनेमुळे मिपा बरेच जलद झाले आहे. पान उघडायला जो वेळ लागायचा तो सुद्धा कमी झाला आहे. मिपाच्या आर्थिक बाबीमध्ये जो निर्णय सर्वांना मान्य तो मला ही मान्य. --(शुभेच्छुक) लिखाळ.

सर्वसाक्षी 11/12/2008 - 22:56
पावत्या फाड. चांगुलपणाचा अतिरेक वाइटच रे. काहीतरी चांगले द्यावे हा तुझा अट्टाहास वाखाणण्यासारखा आहे, पण ते फुकट द्यावे असे का? अरे रस्त्याच्या कडेला टपरीवर कटिंग मारला तरी पैसे पडतात आणि पिणारे आनंदाने देतात. मग इथे कोण नाही म्हणेल? तू , मालक आम्ही भाडेकरू. सगळे मजा करू

शितल 11/12/2008 - 23:14
पण आता मिपा चांगले स्पीड देत आहे असे निदान मला तरी जाणवले आहे. :)

चतुरंग 11/12/2008 - 23:44
१ - पहिल्यापेक्षा मिपाचा पान उघडायचा वेग जवळजवळ दुपटीने वाढलाय (साधारण २ ते ३ सेकंदात पान येतेच). २ - दुहेरी प्रतिसाद यायचे प्रमाण जवळजवळ नगण्य झालेले दिसते. ३ - लेखातील चित्रे पहिल्यापेक्षा जलद उघडतात. एकूण झालेला बदल फायदेशीर दिसतोय असे वाटते. वर्गणीबाबत सर्वांच्या बरोबर आहे. (शक्यतो जाहिराती टाळता आल्या तर बरे असे वाटते. साईटचा आपलेपणा जाऊन थोडे बाजारु स्वरूप येते असे माझे मत पण कदाचित काळाच्या कसोटीवर काय जास्त व्यवहारी आहे ते बघावे लागेल!) चतुरंग

विसोबा खेचर 12/12/2008 - 00:07
सगळ्यांच्या मदतीच्या हाताबद्दल धन्यवाद... वार्षिक वर्गणी, स्वेच्छा मदत इत्यादी पर्याय बरे आहेत.. अगदीच कडकी लागली किंवा खर्च मज गरीबाच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला तर विनासंकोच मदत मागीन.. आपला, (कृतज्ञ) तात्या.
काल मिसळपाव सेवादात्याच्या कामासाठी दिवसभर बंद होते. आहे तो सेवादाता(सर्व्हर) बदलून मोठ्या क्षमतेच्या सेवादात्याकडे आपले संकेतस्थळ हलवलेले आहे. मिसळपावचा सतत वाढणारा डेटाबेस बघता हे काम मिपा काही काळ विश्रांती अवस्थेत नेल्याशिवाय शक्य नव्हते. रात्री ९ पर्यंत काम होईल अशी अपेक्षा होती मात्र काही अनपेक्षीत अडचणींमुळे मिपा सुरू व्हायला १२:४१ वाजावे लागले. आता मिपा सुरळीत सुरू आहे. गेले दोन तीन महिने मिपासाठी नवा सेवादाता शोधतांना अनेक बाबी जाणवल्या. त्यातील खास बाब म्हणजे मिपावर वाढत जाणारा सदस्यांचा आणि पाहूण्यांचा ओघ. त्यांना सेवा पुरवण्यासाठी आहे तो सेवादाता कमी पडत होता.

गांधीवादाने मिपाच्या अहितचिंतकांचे निर्मूलन होऊ शकते काय?

छोटा डॉन ·

आनंदयात्री 08/12/2008 - 15:11
अहो आम्ही तर केव्हाचे म्हणतोय .. गांधीवाद काय करताय .. चीनवाद करा .. चीनच्या भिंतीसारखी कॅपचा प्रणाली लावा ! दारे उघडी ठेवायचीच कशाला ? प्रशासनाचीच इच्छा नाही असे दिसतेय.

ऍडीजोशी 08/12/2008 - 16:08
अवांतर - सिंगल मॉल्ट वाद जास्त प्रभावी आहे अशा मताचा मी आहे. लोकांनी शांततामय मार्गाने बैठका केल्या तर बरेच प्रश्न सुटतील. मी. पा. बँगलोर कट्ट्यातर्फे एक ग्लेन ड्रम्माँड स्पाँसर करत आहे. अती-महत्वाचे - बैठकीला मि. पा. बँगलोर कट्ट्यातर्फे मी एकटाच जाणार आहे. धम्या आणि डोण्या, क्रुपया आपआपले ग्लास आणि धोतरं सांभाळत माझ्या घराच्या दिशेने धावत सुटू नका.

धमाल मुलगा 08/12/2008 - 16:21
मोठाच गहन विषय आहे. श्री.छोटा डॉनबाबा बंगाली-बंगळूरकर ह्यांनी ज्या हातोटीने हा कुटप्रश्न हाताळण्याचं धाडस केलं आहे ते वाखाणण्याजोगे आहे.
त्याच प्रमाणे दुसरीकडुन संतापी, दुसर्‍याचे न बगवणारे, टोकाची विचारसारणी असणारे अशा भिन्नविचारांच्या नागरिकांना भारतात सन्मानपूर्वेक बोलावले पाहिजे.
:) चिंता नसावी डॉनबाबा, असे नागरीक येतच आहेत, पुर्वीपासून. जर आपण निरनिराळ्या धाग्यांवर आलेले प्रतिसाद नीट अभ्यासले तर केवळ वैयक्तिक टिका करण्यासाठी हे नागरीक वेळोवेळी बांग्लादेशींप्रमाणे खोट्या ओळखपत्रांवर मिपामध्ये प्रवेश करुन इथलं नागरिकत्व मिळवून राहताहेत.
आजारी / दुर्धररोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना भारताने सर्वतोपरी मदत केली पाहिजे. ताप्तुरता आपण "इनोचा" पुरवठा कमी पडणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी ... जळाज्ळ फार वाढल्याचे ऐकिवात आहे ...
=)) आणि गुळ??? क्षणभर चेष्टा-मस्करी सोडुन द्या, पण बाकी बरेचसे मुद्दे जर आपण एक 'तात्विक बैठकीच्या' नजरेने विचारात घेतले तर खरोखरच मराठी संस्थळांना सोन्याचे दिवस येतील हे नक्की!! ..... आणि हो, डॉनबाबा,
* डॉनवाद : निष्कारण तुमच्या वाटेला जाणार्‍या व्यक्तीच्या आधी "एकाच श्रीमुखात" भडकवा, वाट पहा, त्याने स्वतःहुन दुसरा गाल पुढे न केल्यास सत्वर त्याच्या "दोन्हीही नडग्या " फोडुन टाका. विरोधक आपोआपच तुमच्यापुढे नतमस्तक होईल ... नडग्या फोडल्याने त्याला उभे राहता येणार नाही व पुढची कानफाटीत वाचवण्यासाठी मान खाली घालुन लपण्याशिवाय पर्याय नाही, पर्यायाने तो "नतमस्तक" होईल
हा डॉनवाद शॉल्लेट आवडला भो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! अवांतरः ऍड्याच्या 'शिंगल माल्ट'वादाला आमचंही मत ग्राह्य धरणेत यावे ही इनंती.. अतिअवांतरः मी आणि डॉन्या आपल्या घराकडे धावत सुटु नये असे सुचवण्यामागे भिरभिर्‍या आला तर चालेल असा गर्भितार्थ आम्ही काढावा काय?

In reply to by धमाल मुलगा

ऍडीजोशी 08/12/2008 - 16:25
अतिअवांतरः मी आणि डॉन्या आपल्या घराकडे धावत सुटु नये असे सुचवण्यामागे भिरभिर्‍या आला तर चालेल असा गर्भितार्थ आम्ही काढावा काय? अभिरत बिचारा बुचानी पितो. आपण दारूत दारू घालून पिणारी लोकं. बैठकीच्या वेळी आपल्याला पिताना बघून बिचारा किती बुजल्यासारखा झाला होता पाहिलं नाहिस का???

विसोबा खेचर 08/12/2008 - 16:31
अरे डॉन्या, तुझ्या उपाय योजना चांगल्या आहेत परंतु मुख्य प्रश्न असा आहे की मिपावर हल्ले करणारी ही काही मनोगती मंडळी मुलखाची गांडू असल्यामुळे छुपे हल्ले करत असतात! ;) असो.. लेखमाला चालू द्या... तात्या. -- आपल्या ब्लॉगव्यतिरिक्त एस्क्लुझिव्ली फक्त मिपावरच लिहिणार्‍यांबद्दल आम्हाला विशेष आदर आहे!

कवटी 08/12/2008 - 17:23
२.मिपातून हुशार, सज्जन, शांत, सुजाण नागरिकांना दुसरीकडे जाण्यासाठी मदत केली पाहिजे. त्याच प्रमाणे दुसरीकडुन संतापी, दुसर्‍याचे न बगवणारे, टोकाची विचारसारणी असणारे अशा भिन्नविचारांच्या नागरिकांना भारतात सन्मानपूर्वेक बोलावले पाहिजे. ४. आजारी / दुर्धररोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना भारताने सर्वतोपरी मदत केली पाहिजे. ताप्तुरता आपण "इनोचा" पुरवठा कमी पडणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी ... जळाज्ळ फार वाढल्याचे ऐकिवात आहे ... अरे कॉपी करुन झाल्यावर एडिट करताना या दोन ठिकाणी भारताचे मिपा करायचे राहिले बघ. बाकी लेख सुंदर! कवटी http://www.misalpav.com/user/765

In reply to by कवटी

छोटा डॉन 08/12/2008 - 17:27
लेख कॉपी पेस्ट केला आहे हे "खरेच" आहे, कारण मुळचा कलंत्रीसाहेबांचा फॉर्मॅट मी आहे तसा वापरला आहे. त्यात थोडे आवश्यक बदल करताना "गडबडीत / अजाणता " दुर्लक्ष झाल्याने काही त्रुटी राहिल्या होत्या, आता त्या दुरुस्त केल्या आहेत. लक्षात आणु दिल्याबद्दल व लेखाबद्दल मत दिल्याबद्दल आभारी आहोत ... छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

In reply to by छोटा डॉन

कवटी 08/12/2008 - 17:40
छोटा डॉन, त्रुटी दूर केल्या बद्दल अभार. लक्षात आणु दिल्याबद्दल व लेखाबद्दल मत दिल्याबद्दल आभारी आहोत ... धन्यवाद. याच बरोबर "लेख काळजीपूर्वक वाचण्याचा आणि विचार्पूवक प्रतिसाद दिल्याचा गुण विशेष आवडला" अशी प्रतिक्रीया आली असती तर विशेष आनंद झाला आसता. कवटी http://www.misalpav.com/user/765

वेताळ 08/12/2008 - 17:39
खरतर डॉनवादी दणके बसल्याशिवाय सदर हल्लेखोराना अक्कल यायची नाही. बाकी तात्या जी जी उपाययोजना करताहेत त्याला आपला( हातापायासह) सक्रिय पाठिंबा. वेताळ

In reply to by वेताळ

इनोबा म्हणे 08/12/2008 - 18:55
या 'हात-पाय्'वादात आम्हीही सहभागी आहोत. (हात-पायवादी) - इन्या कोलकर कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by वेताळ

जी.जी उपाययोजनेबरोबर जी.डी. उपाय योजना चालु आहे असे आमच्या खात्रीलायक सुत्रांकडुन कळते. यन्ना रास्कला मिपाकर वन्ली वि.प्र.

JAGOMOHANPYARE 08/12/2008 - 18:44
डॉनवाद आवडला ... लई भारी हाय.... ( ह्यो वाद देशाच्या बाबानी वापरला नाही म्हणून तर आज आपण एवढा काथ्याकूट करत आहोत, हे कृपया विसरू नका ! ) ( भारत म्हणजे भारतमाता आणि हे बाबा म्हणजे देशाचे पिता.. हेही एक न समजलेले लॉजिक आहे )

कलंत्री 09/12/2008 - 20:46
मी परत अशा प्रकारे मिपावर हल्ला करणार्‍या लोकांना हात जोडुन विनंती करतो की कृपया मिपा हे मराठीवर पेम करणार्‍या लोकांचे एक प्रतिक आहे. आपण जर मराठी असाल तर असे नतद्रष्ट कृत्य करु नये. यात तात्याच्या नुकसानीपेक्षा सर्वसामान्य मराठीलोकांचेच जास्त नुकसान आहे. झाले ते गंगेला मिळाले, यापुढे कृपया सहकार्य करावे ही विनंती. आपणास एखादे संकेतस्थळ निर्माण करावयाचे असल्यास कृपया निर्माण करा. मिपापेक्षा ते चांगले होईल असा आपण प्रयत्न करु या. परंतु असा अधिक्षेप करु नका. आपण सुज्ञ आहात. तात्या : आपण थोडासा सयंम बाळगावा ही आपणास विनंती.

आनंदयात्री 08/12/2008 - 15:11
अहो आम्ही तर केव्हाचे म्हणतोय .. गांधीवाद काय करताय .. चीनवाद करा .. चीनच्या भिंतीसारखी कॅपचा प्रणाली लावा ! दारे उघडी ठेवायचीच कशाला ? प्रशासनाचीच इच्छा नाही असे दिसतेय.

ऍडीजोशी 08/12/2008 - 16:08
अवांतर - सिंगल मॉल्ट वाद जास्त प्रभावी आहे अशा मताचा मी आहे. लोकांनी शांततामय मार्गाने बैठका केल्या तर बरेच प्रश्न सुटतील. मी. पा. बँगलोर कट्ट्यातर्फे एक ग्लेन ड्रम्माँड स्पाँसर करत आहे. अती-महत्वाचे - बैठकीला मि. पा. बँगलोर कट्ट्यातर्फे मी एकटाच जाणार आहे. धम्या आणि डोण्या, क्रुपया आपआपले ग्लास आणि धोतरं सांभाळत माझ्या घराच्या दिशेने धावत सुटू नका.

धमाल मुलगा 08/12/2008 - 16:21
मोठाच गहन विषय आहे. श्री.छोटा डॉनबाबा बंगाली-बंगळूरकर ह्यांनी ज्या हातोटीने हा कुटप्रश्न हाताळण्याचं धाडस केलं आहे ते वाखाणण्याजोगे आहे.
त्याच प्रमाणे दुसरीकडुन संतापी, दुसर्‍याचे न बगवणारे, टोकाची विचारसारणी असणारे अशा भिन्नविचारांच्या नागरिकांना भारतात सन्मानपूर्वेक बोलावले पाहिजे.
:) चिंता नसावी डॉनबाबा, असे नागरीक येतच आहेत, पुर्वीपासून. जर आपण निरनिराळ्या धाग्यांवर आलेले प्रतिसाद नीट अभ्यासले तर केवळ वैयक्तिक टिका करण्यासाठी हे नागरीक वेळोवेळी बांग्लादेशींप्रमाणे खोट्या ओळखपत्रांवर मिपामध्ये प्रवेश करुन इथलं नागरिकत्व मिळवून राहताहेत.
आजारी / दुर्धररोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना भारताने सर्वतोपरी मदत केली पाहिजे. ताप्तुरता आपण "इनोचा" पुरवठा कमी पडणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी ... जळाज्ळ फार वाढल्याचे ऐकिवात आहे ...
=)) आणि गुळ??? क्षणभर चेष्टा-मस्करी सोडुन द्या, पण बाकी बरेचसे मुद्दे जर आपण एक 'तात्विक बैठकीच्या' नजरेने विचारात घेतले तर खरोखरच मराठी संस्थळांना सोन्याचे दिवस येतील हे नक्की!! ..... आणि हो, डॉनबाबा,
* डॉनवाद : निष्कारण तुमच्या वाटेला जाणार्‍या व्यक्तीच्या आधी "एकाच श्रीमुखात" भडकवा, वाट पहा, त्याने स्वतःहुन दुसरा गाल पुढे न केल्यास सत्वर त्याच्या "दोन्हीही नडग्या " फोडुन टाका. विरोधक आपोआपच तुमच्यापुढे नतमस्तक होईल ... नडग्या फोडल्याने त्याला उभे राहता येणार नाही व पुढची कानफाटीत वाचवण्यासाठी मान खाली घालुन लपण्याशिवाय पर्याय नाही, पर्यायाने तो "नतमस्तक" होईल
हा डॉनवाद शॉल्लेट आवडला भो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! अवांतरः ऍड्याच्या 'शिंगल माल्ट'वादाला आमचंही मत ग्राह्य धरणेत यावे ही इनंती.. अतिअवांतरः मी आणि डॉन्या आपल्या घराकडे धावत सुटु नये असे सुचवण्यामागे भिरभिर्‍या आला तर चालेल असा गर्भितार्थ आम्ही काढावा काय?

In reply to by धमाल मुलगा

ऍडीजोशी 08/12/2008 - 16:25
अतिअवांतरः मी आणि डॉन्या आपल्या घराकडे धावत सुटु नये असे सुचवण्यामागे भिरभिर्‍या आला तर चालेल असा गर्भितार्थ आम्ही काढावा काय? अभिरत बिचारा बुचानी पितो. आपण दारूत दारू घालून पिणारी लोकं. बैठकीच्या वेळी आपल्याला पिताना बघून बिचारा किती बुजल्यासारखा झाला होता पाहिलं नाहिस का???

विसोबा खेचर 08/12/2008 - 16:31
अरे डॉन्या, तुझ्या उपाय योजना चांगल्या आहेत परंतु मुख्य प्रश्न असा आहे की मिपावर हल्ले करणारी ही काही मनोगती मंडळी मुलखाची गांडू असल्यामुळे छुपे हल्ले करत असतात! ;) असो.. लेखमाला चालू द्या... तात्या. -- आपल्या ब्लॉगव्यतिरिक्त एस्क्लुझिव्ली फक्त मिपावरच लिहिणार्‍यांबद्दल आम्हाला विशेष आदर आहे!

कवटी 08/12/2008 - 17:23
२.मिपातून हुशार, सज्जन, शांत, सुजाण नागरिकांना दुसरीकडे जाण्यासाठी मदत केली पाहिजे. त्याच प्रमाणे दुसरीकडुन संतापी, दुसर्‍याचे न बगवणारे, टोकाची विचारसारणी असणारे अशा भिन्नविचारांच्या नागरिकांना भारतात सन्मानपूर्वेक बोलावले पाहिजे. ४. आजारी / दुर्धररोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना भारताने सर्वतोपरी मदत केली पाहिजे. ताप्तुरता आपण "इनोचा" पुरवठा कमी पडणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी ... जळाज्ळ फार वाढल्याचे ऐकिवात आहे ... अरे कॉपी करुन झाल्यावर एडिट करताना या दोन ठिकाणी भारताचे मिपा करायचे राहिले बघ. बाकी लेख सुंदर! कवटी http://www.misalpav.com/user/765

In reply to by कवटी

छोटा डॉन 08/12/2008 - 17:27
लेख कॉपी पेस्ट केला आहे हे "खरेच" आहे, कारण मुळचा कलंत्रीसाहेबांचा फॉर्मॅट मी आहे तसा वापरला आहे. त्यात थोडे आवश्यक बदल करताना "गडबडीत / अजाणता " दुर्लक्ष झाल्याने काही त्रुटी राहिल्या होत्या, आता त्या दुरुस्त केल्या आहेत. लक्षात आणु दिल्याबद्दल व लेखाबद्दल मत दिल्याबद्दल आभारी आहोत ... छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

In reply to by छोटा डॉन

कवटी 08/12/2008 - 17:40
छोटा डॉन, त्रुटी दूर केल्या बद्दल अभार. लक्षात आणु दिल्याबद्दल व लेखाबद्दल मत दिल्याबद्दल आभारी आहोत ... धन्यवाद. याच बरोबर "लेख काळजीपूर्वक वाचण्याचा आणि विचार्पूवक प्रतिसाद दिल्याचा गुण विशेष आवडला" अशी प्रतिक्रीया आली असती तर विशेष आनंद झाला आसता. कवटी http://www.misalpav.com/user/765

वेताळ 08/12/2008 - 17:39
खरतर डॉनवादी दणके बसल्याशिवाय सदर हल्लेखोराना अक्कल यायची नाही. बाकी तात्या जी जी उपाययोजना करताहेत त्याला आपला( हातापायासह) सक्रिय पाठिंबा. वेताळ

In reply to by वेताळ

इनोबा म्हणे 08/12/2008 - 18:55
या 'हात-पाय्'वादात आम्हीही सहभागी आहोत. (हात-पायवादी) - इन्या कोलकर कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by वेताळ

जी.जी उपाययोजनेबरोबर जी.डी. उपाय योजना चालु आहे असे आमच्या खात्रीलायक सुत्रांकडुन कळते. यन्ना रास्कला मिपाकर वन्ली वि.प्र.

JAGOMOHANPYARE 08/12/2008 - 18:44
डॉनवाद आवडला ... लई भारी हाय.... ( ह्यो वाद देशाच्या बाबानी वापरला नाही म्हणून तर आज आपण एवढा काथ्याकूट करत आहोत, हे कृपया विसरू नका ! ) ( भारत म्हणजे भारतमाता आणि हे बाबा म्हणजे देशाचे पिता.. हेही एक न समजलेले लॉजिक आहे )

कलंत्री 09/12/2008 - 20:46
मी परत अशा प्रकारे मिपावर हल्ला करणार्‍या लोकांना हात जोडुन विनंती करतो की कृपया मिपा हे मराठीवर पेम करणार्‍या लोकांचे एक प्रतिक आहे. आपण जर मराठी असाल तर असे नतद्रष्ट कृत्य करु नये. यात तात्याच्या नुकसानीपेक्षा सर्वसामान्य मराठीलोकांचेच जास्त नुकसान आहे. झाले ते गंगेला मिळाले, यापुढे कृपया सहकार्य करावे ही विनंती. आपणास एखादे संकेतस्थळ निर्माण करावयाचे असल्यास कृपया निर्माण करा. मिपापेक्षा ते चांगले होईल असा आपण प्रयत्न करु या. परंतु असा अधिक्षेप करु नका. आपण सुज्ञ आहात. तात्या : आपण थोडासा सयंम बाळगावा ही आपणास विनंती.
मित्रांनो गेले काही दिवस आपल्याकडे "गांधीवादाचा उपयोग व मिपावरचे मशिन जनरेटेड हिट्स लाऊन केलेले हल्ले" हे २ विषय वारंवार समोर येत आहे.

गांधीवाद्याची थप्पड

भास्कर केन्डे ·

विसोबा खेचर 05/12/2008 - 01:09
"भडव्या, स्वतःच्या बहिनीला अपमानित करणार्‍याला तिथल्या तिथे चोपणारे षंढ असतात अहिंसक नव्हे" षंढ असतात?? हे वाक्य कळले नाही! "तिथल्या तिथे चोपणारे षंढ असतात.." असे वाक्य असावे का? टंकनदोष? मी शांत झालो. म्हणालो "जोश्या, अहिंसा फक्त पुस्तकात असते. जिवनात शक्य नसते... अगदी तुम्हा गांधी वाद्यांच्या सुद्धा... हे सिद्ध करुन दिल्याबद्दल आभार! अन त्यासाठी तुझ्यावर हात उगारावा लागल्याबद्दल माफ कर मित्रा." सह्हीच करून टाकली गांधीवादी जोश्याची! :) तात्या.

In reply to by भास्कर केन्डे

प्राजु 05/12/2008 - 01:25
चोपणाते भ्याड असताता का? की.. न चोपणारे??- (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

अरेच्चा! "न" राहिला होता तर! टंकनदोष दाखवून दिल्याबद्दल तात्या व प्राजूताईंचे आभार!

In reply to by विसोबा खेचर

अंमळ वेंधळाच दिसतोस! -- काय करणार ओरोसला राहून सोलकढी जरा जास्त प्यालो ना... (केवळ सोलकढीच बरं ;) ) आपला, (अशंतः कोकणी) भास्कर

In reply to by विसोबा खेचर

धम्मकलाडू 05/12/2008 - 12:16
"भडव्या, स्वतःच्या बहिनीला अपमानित करणार्‍याला तिथल्या तिथे चोपणारे षंढ असतात अहिंसक नव्हे" षंढ असतात?? हे वाक्य कळले नाही!
फ्रॉइडीयन स्लिप तर नसावी? हलकेच घ्या हं. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्राजु 05/12/2008 - 01:24
"तिथल्या तिथे न चोपणारे षंढ असतात.." असे वाक्य असावे का? टंकनदोष? हे वाक्य जरा संपादन कराल का भास्करराव.? बाकी, गांधीवाद हा पुस्तकातच असतो आणि तिथेच तो साजर्‍या गोजर्‍या शब्दांत खुलून दिसतो. व्यवहारी जीवनात केवळ अशक्य आहे. भास्करराव, हा प्रसंग चांगला रंगवून लिहिला आहे तुम्ही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 05/12/2008 - 01:33
बाकी काय हो भास्करराव, तुमच्या मित्रात जोश्याचा पुळका येऊन नवीन धागे उघडून (शाद्बिक चर्चेचे हो!) त्याचे समर्थन करणारी इतर काही मित्रमंडळी होती की नाही? :) आपला, धनंजय अभ्यंकर. :)

In reply to by विसोबा खेचर

होती की. पण हा किस्सा घडला चौथ्या वर्षात. पूर्वीच्या तीन्-साडेतीन वर्षात बहुतेकांचे मिंदेपणाचे विचार झटकवून टाकायला लावले होते. तरी काही शेलके धेंड होते. ते शांत राहण्यात धन्यता मानत. कारण आमच्या मोहोळाला त्यांची अहिंसा समजत नसे व त्यांना आमचे मार्ग परवडत नसत. ;) धनंजय अभ्यंकर हे मात्र खासच!! =)) =))

टारझन 05/12/2008 - 02:25
हे राम !! अरे मुलांनो मला जरा शांत जगू द्या रे !! किती कांगावा कराल त्या गांधीवादाचा ? आता तर तो आतंकवाद परवडला पण गांधीवाद नको -(वाद प्रेमी) टारोबा खेचर

इनोबा म्हणे 05/12/2008 - 02:31
येता जाता स्वतःच्या पोराला धोपटणारे हे महाशय त्यावेळी गांधींची अहिंसावादी तत्वे बासनात गुंडाळून टाकीत. हा हा हा!!! लय भारी गांधीवाद आहे हा. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

आनंद घारे 05/12/2008 - 07:00
महात्मा गांधीची या ना त्या प्रकाराने टर उडवणे हा मिसळपाव खाणार्‍या बहुतेक लोकांचा आवडता उद्योग आहे असे दिसते. गांधीजींची यावर वाद घातला नाही. किंवा आपला 'वाद' निर्माण केला नाही. त्यांनी हिंदू धर्मग्रंथात वाचलेल्या अहिसा आणि सत्य या तत्वांचा आग्रह धरला. पण त्यातून जगातले सारे प्रश्न सुटतील असे त्यांनी कुठेही म्हंटलेले नाही. त्यांच्या स्वतःच्या जीवनात देखील अनेक वेळा त्यात ते यशस्वी झाले नव्हते हे त्यांनी आपल्या 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकात अनेक ठिकाणी नमूद केले आहे. त्यांना सुद्धा कधी कोणी थोबाडीत मारली होती की नव्हती आणि त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया झाली याचा उल्लेख कोठे वाचला नाही. माझ्या माहितीप्रमाणे "एका गालावर थोबाडात मारली तर दुसरा गाल पुढे करावा" ही शिकवण आंधीजींची स्वतःची नाही. त्यांच्याआधीच कोणा महात्म्याने ती देऊन ठेवली आहे. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींशी मी स्वतःसुद्धा सहमत नाही, पण मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

अहो आनंदराव जरा धिरानं घ्या. महात्मा गांधीची या ना त्या प्रकाराने टर उडवणे हा मिसळपाव खाणार्‍या बहुतेक लोकांचा आवडता उद्योग आहे असे दिसते. मी गांधीजींची टर उडवली नाहीये. मला महात्मा गांधी हे आदर्श वाटतात. त्यामुळेच त्यांच्या जयंतीला आम्ही विविध विधायक कार्यक्रम हाती घेत असतो. वरील लेखातही तसा संदर्भ आहेच. मी समाचार घेतला आहे तो गांधीवादाच्या नावावर भ्याडपणाचा उदो उदो करणार्‍यांचा. या तथाकथित गांधीवाद्यांनीच "एका गालात मारली तर दुसरा पुढे करावा" असे बावळट विचार प्रसिद्धी पोचवले आहेत. पण त्यातून जगातले सारे प्रश्न सुटतील असे त्यांनी कुठेही म्हंटलेले नाही. कमाल आहे बॉ तुमची! दहशतवाद ही जगासमोरील भयंकर मोठी समस्या आहे. तिला या क्षणी तरी तथाकथित गांधीवादाने सोडवता येईल असे वाटत नाही. भूकबळी, जगात ठिकठिकाणी चाललेले मृत्यूचे तांडव यावरही गांधीवाद या क्षणाला कामाचा नाही. मात्र सध्या ज्या गांधीवाद्यांचा येथे उदो-उदे चालू आहे त्यांनी मात्र यावर एकमेव इलाज म्हणजे गांधीवाद सुचवला आहे. प्रत्यक्ष पाकड्या दहशतवाद्यांच्या दाड्या कुरवळयाचे सल्लेही दिले गेलेत. वाचा जरा. या क्षणी जगासमोर वा आपल्या देशा समोर असणारे कोणते प्रश्न सुटणार आहेत त्या तथाकथित गांधीवादाने? मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. आम्हालाही वाततो तर. नाही कुठे म्हटले आहे. पण अततायी पणा नको बा. आपला, (रोखठोक) भास्कर

In reply to by भास्कर केन्डे

कोलबेर 05/12/2008 - 11:15
मी समाचार घेतला आहे तो गांधीवादाच्या नावावर भ्याडपणाचा उदो उदो करणार्‍यांचा.
कशच्याही नावाखाली भ्याडपणाचा उदो उदो करणार्‍यांचा समाचार घेतलाच पाहिजे!
कमाल आहे बॉ तुमची! दहशतवाद ही जगासमोरील भयंकर मोठी समस्या आहे. तिला या क्षणी तरी तथाकथित गांधीवादाने सोडवता येईल असे वाटत नाही.
मग तुम्हाला अपेक्षीत असणारा गांधीवाद कोणता? आणि त्याने तरी ही समस्या सुटू शकते का? महात्मा गांधींना आदर्श मानता म्हणून विचारतो.

In reply to by कोलबेर

एक गाढव पाठीवर मीठाचे ओझे घेऊन जात असतो. रस्त्यात नदी पार करताना ते खाली पडते व त्याचे ओझे मीठ विरघळल्याने कमी होते. गाढव हा धडा लक्षात ठेवतो. पुन्हा असाच नदी पार करत असताना तो मुद्दाम खाली बसतो. पण यावेळी त्याच्या पाठीवर कापसाचे ओझे असते.... गांधींच्या पूर्वी किती टक्के भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते? एखाद्या टक्क्याच्या आसपास. जर स्वातंत्र्य लढ्यात यशस्वी होऊन यशस्वी लोकशाही देश उभारायचा असेल तर सर्व जनता सक्रीय झाली पाहिजे हे त्यांनी हेरले होते. राजकारणापासून दूर असणार्‍या नि:शस्त्र जनतेला सक्रीय आंदोलनात आणायला त्यांनी आवलंबलेले उपाय एकदम अफलातून होते. नाहीतर किती लोक अभिनव भारत वा अझाद हिंद मध्ये सहभागी होऊ शकले असते? त्यामुळे गांधींनी त्या काळात केले ते योग्यच. आजही तेच करायचे म्हणजे त्या गाढवासारखी आपली स्थिती होईल. आज समाज जागरुक आहे, आपण स्वतंत्र देश आहोत, आपल्या कडे सशस्त्र फौजा आहेत, नवनवीन तंत्रज्ञान आपल्या दिमतीला आहे, प्रसारमाध्यमे वेगळी आहेत. तेव्हा आज जर गांधी उदयाला आले असते तर त्यांनी कदाचित नवीन पर्यायांचा विचार केला असता असे वाटते.

In reply to by भास्कर केन्डे

>>आज समाज जागरुक आहे, आपण स्वतंत्र देश आहोत, आपल्या कडे सशस्त्र फौजा आहेत, नवनवीन तंत्रज्ञान आपल्या दिमतीला आहे, प्रसारमाध्यमे वेगळी आहेत. तेव्हा >>आज जर गांधी उदयाला आले असते तर त्यांनी कदाचित नवीन पर्यायांचा विचार केला असता असे वाटते. पटले. पुण्याचे पेशवे

In reply to by भास्कर केन्डे

आनंद घारे 05/12/2008 - 19:25
मी गांधीजींची टर उडवली नाहीये. मान्य आहे. आपला लेख संतुलित आणि वाचनीय आहे. या क्षणी जगासमोर वा आपल्या देशा समोर असणारे कोणते प्रश्न सुटणार आहेत त्या तथाकथित गांधीवादाने?'गांधीवाद' हा प्रश्नावर इलाज नाही. कदाचित प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी केलेला एक प्रयत्न आहे. पण अततायी पणा नको बा. हीच महात्मा गांधींची शिकवण होती. तिचासुद्धा अतिरेक करणे योग्य नाहीच. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

केदार 17/12/2008 - 00:14
एका गालावर थोबाडात मारली तर दुसरा गाल पुढे करावा" ही शिकवण आंधीजींची स्वतःची नाही. त्यांच्याआधीच कोणा महात्म्याने ती देऊन ठेवली आहे. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींशी मी स्वतःसुद्धा सहमत नाही, पण मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. >> बरोबर आहे. ही शिकवन येशू ख्रिस्ताची आहे. एकदा गांधीं सोबत एक ख्रिश्चन तज्ञ वाद घालू लागला की हिंदू कसे वाईट आणी ख्रिश्चन कसे चांगले आणी गांधीनी सच्चा माणूस असला तर ख्रिश्च्अन धर्म स्विकारावा. त्यावर उत्तर म्हणून गांधी बोलले की ' तूमच्या धर्मात तर एक गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा असे सांगीतले आहे, तरी देखील तूम्ही सर्व जगावर अत्याचार करत आहात. अश्या धर्माचा मी कधीही स्विकार करनार नाही, शिवाय मी हिंदू म्हणून जन्मलो पण मला अजुन खरा हिंदू काय असतो हेच माहीत नाहीत. मी ते आधी शिकनार." एवढे बोलून त्यांनी त्या तज्ञाला निरुत्तर केले. पण पुढे गांधीचे हे वाक्य पुर्ण संदर्भाने न घेता लोकांनी अर्धवट घेतल्यामूळे हा घोळ झाला आहे. गांधीचा डोळस विरोध करता यायला पाहीजे. टर सगळेच जण उडवू शकतात.

आदर भास्करला सुद्धा आहे. मला सुद्धा आहे. बहुतेकांना आहे. फिजिक्स चा नियम इक्वल अँड अपोझिट रिऍक्शनचा. बा़की काहीही नाही.

अनिता 05/12/2008 - 07:44
कुठेतरी वाचलेले आठवते.. गा॑धी'ना कुणीतरी विचारले की जमीनदारा॑च्या (बहुतेक उत्तर प्रदेश/ बिहार/आसाम भागातील) जाचापासुन लोका॑ची सुटका करताना हि॑सेचा वापर कराल का? गा॑धी'चे उत्तर होते की सा॑गून एकले नाही तर जरूर हि॑सेचा वापर करू.

विजुभाऊ 05/12/2008 - 09:24
एका गालावर थोबाडात मारली तर दुसरा गाल पुढे करावा" ही शिकवण देवाचा पुत्र प्रभू येशुची आहे. आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

In reply to by विजुभाऊ

देवाचा पुत्र प्रभू येशुची आहे. हे देवा... आत हे आनखी काय नवीन उपटलय? आम्ही तर बॉ सगळेच देवाचे पुत्र-पौत्री असे शिकत लहानाचे मोठे झालो. मग हे केवळ त्या येशूलाच देवाचा पुत्र का बरे म्हणतात? असो. हे सुद्धा गांधीवादाप्रमाणे आपल्याला न झेपणारं प्रकरण दिसतय. आपला, (देवाचा पुत्र) भास्कर आम्ही येथे वसतो.

लिखाळ 05/12/2008 - 17:51
चांगलं आहे :) कोणतेही तत्व आगीकारायला निर्धार आणि जररुकता लागते. आपल्या मित्राच्या ठायी त्या वेळी याचा अभाव असावा. -- लिखाळ.

विसोबा खेचर 05/12/2008 - 01:09
"भडव्या, स्वतःच्या बहिनीला अपमानित करणार्‍याला तिथल्या तिथे चोपणारे षंढ असतात अहिंसक नव्हे" षंढ असतात?? हे वाक्य कळले नाही! "तिथल्या तिथे चोपणारे षंढ असतात.." असे वाक्य असावे का? टंकनदोष? मी शांत झालो. म्हणालो "जोश्या, अहिंसा फक्त पुस्तकात असते. जिवनात शक्य नसते... अगदी तुम्हा गांधी वाद्यांच्या सुद्धा... हे सिद्ध करुन दिल्याबद्दल आभार! अन त्यासाठी तुझ्यावर हात उगारावा लागल्याबद्दल माफ कर मित्रा." सह्हीच करून टाकली गांधीवादी जोश्याची! :) तात्या.

In reply to by भास्कर केन्डे

प्राजु 05/12/2008 - 01:25
चोपणाते भ्याड असताता का? की.. न चोपणारे??- (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

अरेच्चा! "न" राहिला होता तर! टंकनदोष दाखवून दिल्याबद्दल तात्या व प्राजूताईंचे आभार!

In reply to by विसोबा खेचर

अंमळ वेंधळाच दिसतोस! -- काय करणार ओरोसला राहून सोलकढी जरा जास्त प्यालो ना... (केवळ सोलकढीच बरं ;) ) आपला, (अशंतः कोकणी) भास्कर

In reply to by विसोबा खेचर

धम्मकलाडू 05/12/2008 - 12:16
"भडव्या, स्वतःच्या बहिनीला अपमानित करणार्‍याला तिथल्या तिथे चोपणारे षंढ असतात अहिंसक नव्हे" षंढ असतात?? हे वाक्य कळले नाही!
फ्रॉइडीयन स्लिप तर नसावी? हलकेच घ्या हं. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्राजु 05/12/2008 - 01:24
"तिथल्या तिथे न चोपणारे षंढ असतात.." असे वाक्य असावे का? टंकनदोष? हे वाक्य जरा संपादन कराल का भास्करराव.? बाकी, गांधीवाद हा पुस्तकातच असतो आणि तिथेच तो साजर्‍या गोजर्‍या शब्दांत खुलून दिसतो. व्यवहारी जीवनात केवळ अशक्य आहे. भास्करराव, हा प्रसंग चांगला रंगवून लिहिला आहे तुम्ही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 05/12/2008 - 01:33
बाकी काय हो भास्करराव, तुमच्या मित्रात जोश्याचा पुळका येऊन नवीन धागे उघडून (शाद्बिक चर्चेचे हो!) त्याचे समर्थन करणारी इतर काही मित्रमंडळी होती की नाही? :) आपला, धनंजय अभ्यंकर. :)

In reply to by विसोबा खेचर

होती की. पण हा किस्सा घडला चौथ्या वर्षात. पूर्वीच्या तीन्-साडेतीन वर्षात बहुतेकांचे मिंदेपणाचे विचार झटकवून टाकायला लावले होते. तरी काही शेलके धेंड होते. ते शांत राहण्यात धन्यता मानत. कारण आमच्या मोहोळाला त्यांची अहिंसा समजत नसे व त्यांना आमचे मार्ग परवडत नसत. ;) धनंजय अभ्यंकर हे मात्र खासच!! =)) =))

टारझन 05/12/2008 - 02:25
हे राम !! अरे मुलांनो मला जरा शांत जगू द्या रे !! किती कांगावा कराल त्या गांधीवादाचा ? आता तर तो आतंकवाद परवडला पण गांधीवाद नको -(वाद प्रेमी) टारोबा खेचर

इनोबा म्हणे 05/12/2008 - 02:31
येता जाता स्वतःच्या पोराला धोपटणारे हे महाशय त्यावेळी गांधींची अहिंसावादी तत्वे बासनात गुंडाळून टाकीत. हा हा हा!!! लय भारी गांधीवाद आहे हा. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

आनंद घारे 05/12/2008 - 07:00
महात्मा गांधीची या ना त्या प्रकाराने टर उडवणे हा मिसळपाव खाणार्‍या बहुतेक लोकांचा आवडता उद्योग आहे असे दिसते. गांधीजींची यावर वाद घातला नाही. किंवा आपला 'वाद' निर्माण केला नाही. त्यांनी हिंदू धर्मग्रंथात वाचलेल्या अहिसा आणि सत्य या तत्वांचा आग्रह धरला. पण त्यातून जगातले सारे प्रश्न सुटतील असे त्यांनी कुठेही म्हंटलेले नाही. त्यांच्या स्वतःच्या जीवनात देखील अनेक वेळा त्यात ते यशस्वी झाले नव्हते हे त्यांनी आपल्या 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकात अनेक ठिकाणी नमूद केले आहे. त्यांना सुद्धा कधी कोणी थोबाडीत मारली होती की नव्हती आणि त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया झाली याचा उल्लेख कोठे वाचला नाही. माझ्या माहितीप्रमाणे "एका गालावर थोबाडात मारली तर दुसरा गाल पुढे करावा" ही शिकवण आंधीजींची स्वतःची नाही. त्यांच्याआधीच कोणा महात्म्याने ती देऊन ठेवली आहे. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींशी मी स्वतःसुद्धा सहमत नाही, पण मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

अहो आनंदराव जरा धिरानं घ्या. महात्मा गांधीची या ना त्या प्रकाराने टर उडवणे हा मिसळपाव खाणार्‍या बहुतेक लोकांचा आवडता उद्योग आहे असे दिसते. मी गांधीजींची टर उडवली नाहीये. मला महात्मा गांधी हे आदर्श वाटतात. त्यामुळेच त्यांच्या जयंतीला आम्ही विविध विधायक कार्यक्रम हाती घेत असतो. वरील लेखातही तसा संदर्भ आहेच. मी समाचार घेतला आहे तो गांधीवादाच्या नावावर भ्याडपणाचा उदो उदो करणार्‍यांचा. या तथाकथित गांधीवाद्यांनीच "एका गालात मारली तर दुसरा पुढे करावा" असे बावळट विचार प्रसिद्धी पोचवले आहेत. पण त्यातून जगातले सारे प्रश्न सुटतील असे त्यांनी कुठेही म्हंटलेले नाही. कमाल आहे बॉ तुमची! दहशतवाद ही जगासमोरील भयंकर मोठी समस्या आहे. तिला या क्षणी तरी तथाकथित गांधीवादाने सोडवता येईल असे वाटत नाही. भूकबळी, जगात ठिकठिकाणी चाललेले मृत्यूचे तांडव यावरही गांधीवाद या क्षणाला कामाचा नाही. मात्र सध्या ज्या गांधीवाद्यांचा येथे उदो-उदे चालू आहे त्यांनी मात्र यावर एकमेव इलाज म्हणजे गांधीवाद सुचवला आहे. प्रत्यक्ष पाकड्या दहशतवाद्यांच्या दाड्या कुरवळयाचे सल्लेही दिले गेलेत. वाचा जरा. या क्षणी जगासमोर वा आपल्या देशा समोर असणारे कोणते प्रश्न सुटणार आहेत त्या तथाकथित गांधीवादाने? मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. आम्हालाही वाततो तर. नाही कुठे म्हटले आहे. पण अततायी पणा नको बा. आपला, (रोखठोक) भास्कर

In reply to by भास्कर केन्डे

कोलबेर 05/12/2008 - 11:15
मी समाचार घेतला आहे तो गांधीवादाच्या नावावर भ्याडपणाचा उदो उदो करणार्‍यांचा.
कशच्याही नावाखाली भ्याडपणाचा उदो उदो करणार्‍यांचा समाचार घेतलाच पाहिजे!
कमाल आहे बॉ तुमची! दहशतवाद ही जगासमोरील भयंकर मोठी समस्या आहे. तिला या क्षणी तरी तथाकथित गांधीवादाने सोडवता येईल असे वाटत नाही.
मग तुम्हाला अपेक्षीत असणारा गांधीवाद कोणता? आणि त्याने तरी ही समस्या सुटू शकते का? महात्मा गांधींना आदर्श मानता म्हणून विचारतो.

In reply to by कोलबेर

एक गाढव पाठीवर मीठाचे ओझे घेऊन जात असतो. रस्त्यात नदी पार करताना ते खाली पडते व त्याचे ओझे मीठ विरघळल्याने कमी होते. गाढव हा धडा लक्षात ठेवतो. पुन्हा असाच नदी पार करत असताना तो मुद्दाम खाली बसतो. पण यावेळी त्याच्या पाठीवर कापसाचे ओझे असते.... गांधींच्या पूर्वी किती टक्के भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते? एखाद्या टक्क्याच्या आसपास. जर स्वातंत्र्य लढ्यात यशस्वी होऊन यशस्वी लोकशाही देश उभारायचा असेल तर सर्व जनता सक्रीय झाली पाहिजे हे त्यांनी हेरले होते. राजकारणापासून दूर असणार्‍या नि:शस्त्र जनतेला सक्रीय आंदोलनात आणायला त्यांनी आवलंबलेले उपाय एकदम अफलातून होते. नाहीतर किती लोक अभिनव भारत वा अझाद हिंद मध्ये सहभागी होऊ शकले असते? त्यामुळे गांधींनी त्या काळात केले ते योग्यच. आजही तेच करायचे म्हणजे त्या गाढवासारखी आपली स्थिती होईल. आज समाज जागरुक आहे, आपण स्वतंत्र देश आहोत, आपल्या कडे सशस्त्र फौजा आहेत, नवनवीन तंत्रज्ञान आपल्या दिमतीला आहे, प्रसारमाध्यमे वेगळी आहेत. तेव्हा आज जर गांधी उदयाला आले असते तर त्यांनी कदाचित नवीन पर्यायांचा विचार केला असता असे वाटते.

In reply to by भास्कर केन्डे

>>आज समाज जागरुक आहे, आपण स्वतंत्र देश आहोत, आपल्या कडे सशस्त्र फौजा आहेत, नवनवीन तंत्रज्ञान आपल्या दिमतीला आहे, प्रसारमाध्यमे वेगळी आहेत. तेव्हा >>आज जर गांधी उदयाला आले असते तर त्यांनी कदाचित नवीन पर्यायांचा विचार केला असता असे वाटते. पटले. पुण्याचे पेशवे

In reply to by भास्कर केन्डे

आनंद घारे 05/12/2008 - 19:25
मी गांधीजींची टर उडवली नाहीये. मान्य आहे. आपला लेख संतुलित आणि वाचनीय आहे. या क्षणी जगासमोर वा आपल्या देशा समोर असणारे कोणते प्रश्न सुटणार आहेत त्या तथाकथित गांधीवादाने?'गांधीवाद' हा प्रश्नावर इलाज नाही. कदाचित प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी केलेला एक प्रयत्न आहे. पण अततायी पणा नको बा. हीच महात्मा गांधींची शिकवण होती. तिचासुद्धा अतिरेक करणे योग्य नाहीच. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

केदार 17/12/2008 - 00:14
एका गालावर थोबाडात मारली तर दुसरा गाल पुढे करावा" ही शिकवण आंधीजींची स्वतःची नाही. त्यांच्याआधीच कोणा महात्म्याने ती देऊन ठेवली आहे. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींशी मी स्वतःसुद्धा सहमत नाही, पण मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. >> बरोबर आहे. ही शिकवन येशू ख्रिस्ताची आहे. एकदा गांधीं सोबत एक ख्रिश्चन तज्ञ वाद घालू लागला की हिंदू कसे वाईट आणी ख्रिश्चन कसे चांगले आणी गांधीनी सच्चा माणूस असला तर ख्रिश्च्अन धर्म स्विकारावा. त्यावर उत्तर म्हणून गांधी बोलले की ' तूमच्या धर्मात तर एक गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा असे सांगीतले आहे, तरी देखील तूम्ही सर्व जगावर अत्याचार करत आहात. अश्या धर्माचा मी कधीही स्विकार करनार नाही, शिवाय मी हिंदू म्हणून जन्मलो पण मला अजुन खरा हिंदू काय असतो हेच माहीत नाहीत. मी ते आधी शिकनार." एवढे बोलून त्यांनी त्या तज्ञाला निरुत्तर केले. पण पुढे गांधीचे हे वाक्य पुर्ण संदर्भाने न घेता लोकांनी अर्धवट घेतल्यामूळे हा घोळ झाला आहे. गांधीचा डोळस विरोध करता यायला पाहीजे. टर सगळेच जण उडवू शकतात.

आदर भास्करला सुद्धा आहे. मला सुद्धा आहे. बहुतेकांना आहे. फिजिक्स चा नियम इक्वल अँड अपोझिट रिऍक्शनचा. बा़की काहीही नाही.

अनिता 05/12/2008 - 07:44
कुठेतरी वाचलेले आठवते.. गा॑धी'ना कुणीतरी विचारले की जमीनदारा॑च्या (बहुतेक उत्तर प्रदेश/ बिहार/आसाम भागातील) जाचापासुन लोका॑ची सुटका करताना हि॑सेचा वापर कराल का? गा॑धी'चे उत्तर होते की सा॑गून एकले नाही तर जरूर हि॑सेचा वापर करू.

विजुभाऊ 05/12/2008 - 09:24
एका गालावर थोबाडात मारली तर दुसरा गाल पुढे करावा" ही शिकवण देवाचा पुत्र प्रभू येशुची आहे. आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

In reply to by विजुभाऊ

देवाचा पुत्र प्रभू येशुची आहे. हे देवा... आत हे आनखी काय नवीन उपटलय? आम्ही तर बॉ सगळेच देवाचे पुत्र-पौत्री असे शिकत लहानाचे मोठे झालो. मग हे केवळ त्या येशूलाच देवाचा पुत्र का बरे म्हणतात? असो. हे सुद्धा गांधीवादाप्रमाणे आपल्याला न झेपणारं प्रकरण दिसतय. आपला, (देवाचा पुत्र) भास्कर आम्ही येथे वसतो.

लिखाळ 05/12/2008 - 17:51
चांगलं आहे :) कोणतेही तत्व आगीकारायला निर्धार आणि जररुकता लागते. आपल्या मित्राच्या ठायी त्या वेळी याचा अभाव असावा. -- लिखाळ.
लेखनविषय:
आमच्या महाविद्यालयात अभियांत्रिकीव्यतिरिक्त अनेक सामजिक कर्यावर सुद्धा उहापोह होत असे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे अशा उपक्रमांना सुद्धा खेळाच्या स्पर्धांप्रमाणेच भरगोस प्रतिसाद मिळे. शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, गांधीजी, डॉ सर्वपल्ली राधकृष्णन यांच्या जयंत्या आम्ही वादविवादासारख्या स्पर्धा भरवून साजर्‍या करत असू. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण वल्ली होता जीवन जोशी, आमचा एक वर्गमित्र. गांधींविषयीची त्याची भक्ती सुपरिचित होती. कट्टयांवरच्या गप्पा असोत की चर्चासत्रे, तो मोठ्या चिकाटीने आणि विश्वासाने गांधीवादी विचारांचे मुद्दे मांडत असे.

अनाम वीरा ...

मैत्र ·

मैत्र 23/11/2012 - 05:54
सुदैवाने काही काळ दिग्गजांच्या मृत्युमुळे काहीसे झाकोळले गेलेले ओंबळे यांचे हौतात्म्य राजकारणातून का होईना गौरवले गेले. गिरगाव चौपाटीजवळ त्यांचा पुतळा आणि प्रेरणा स्थळ उभारण्यात आले - २६/११/११ रोजी.. ओंबळे यांना शांतताकाळातला सर्वोच्च पुरस्कार - अशोक चक्र देण्यात आला. खटला पूर्ण करून संविधानिक दृष्ट्या काम पूर्ण करून सार्वभौमत्वावर हल्ला या आरोपाखाली कसाबला फाशी देण्यात आले.. कसाबला मृत्यूदंड देणे हा एकमेव उद्देश नक्कीच नव्हता ज्यासाठी मरण पत्करून ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडले. कसाबची फाशी हे या सर्व करकरे, साळसकर, ओंबळे यांपासून ते उज्ज्वल निकम यांच्यापर्यंत सर्वांच्या इतक्या प्रचंड कामाचे, प्रयत्नांवरचे केवळ शिक्कामोर्तब. भारताला २६/११ च्या कटाची माहिती मिळवण्यासाठी आणि जगापुढे पाकिस्तानचा खरा चेहरा आणण्यासाठी कसाबचा उपयोग झाला. आणि निशःस्त्र ओंबळे यांच्या ज्याला आर्मीच्या भाषेत Supreme Sacrifice - सर्वोच्च त्याग / बलिदान म्हणतात त्याचे सार्थक झाले. मिठाई, फटाके, फुगड्या या तमाशाऐवजी या सर्व हुतात्म्यांचे आणि त्यांना साथ देणार्‍या गोविलकरांसारख्या इतर शूरांचे स्मरण जास्त योग्य ठरले असते. असो.. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना पुनःश्च विनम्र श्रद्धांजली.

दत्ता काळे 23/11/2012 - 12:15
मिठाई, फटाके, फुगड्या या तमाशाऐवजी या सर्व हुतात्म्यांचे आणि त्यांना साथ देणार्‍या गोविलकरांसारख्या इतर शूरांचे स्मरण जास्त योग्य ठरले असते. .. खरं आहे. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना विनम्र श्रद्धांजली.

मैत्र 23/11/2012 - 05:54
सुदैवाने काही काळ दिग्गजांच्या मृत्युमुळे काहीसे झाकोळले गेलेले ओंबळे यांचे हौतात्म्य राजकारणातून का होईना गौरवले गेले. गिरगाव चौपाटीजवळ त्यांचा पुतळा आणि प्रेरणा स्थळ उभारण्यात आले - २६/११/११ रोजी.. ओंबळे यांना शांतताकाळातला सर्वोच्च पुरस्कार - अशोक चक्र देण्यात आला. खटला पूर्ण करून संविधानिक दृष्ट्या काम पूर्ण करून सार्वभौमत्वावर हल्ला या आरोपाखाली कसाबला फाशी देण्यात आले.. कसाबला मृत्यूदंड देणे हा एकमेव उद्देश नक्कीच नव्हता ज्यासाठी मरण पत्करून ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडले. कसाबची फाशी हे या सर्व करकरे, साळसकर, ओंबळे यांपासून ते उज्ज्वल निकम यांच्यापर्यंत सर्वांच्या इतक्या प्रचंड कामाचे, प्रयत्नांवरचे केवळ शिक्कामोर्तब. भारताला २६/११ च्या कटाची माहिती मिळवण्यासाठी आणि जगापुढे पाकिस्तानचा खरा चेहरा आणण्यासाठी कसाबचा उपयोग झाला. आणि निशःस्त्र ओंबळे यांच्या ज्याला आर्मीच्या भाषेत Supreme Sacrifice - सर्वोच्च त्याग / बलिदान म्हणतात त्याचे सार्थक झाले. मिठाई, फटाके, फुगड्या या तमाशाऐवजी या सर्व हुतात्म्यांचे आणि त्यांना साथ देणार्‍या गोविलकरांसारख्या इतर शूरांचे स्मरण जास्त योग्य ठरले असते. असो.. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना पुनःश्च विनम्र श्रद्धांजली.

दत्ता काळे 23/11/2012 - 12:15
मिठाई, फटाके, फुगड्या या तमाशाऐवजी या सर्व हुतात्म्यांचे आणि त्यांना साथ देणार्‍या गोविलकरांसारख्या इतर शूरांचे स्मरण जास्त योग्य ठरले असते. .. खरं आहे. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना विनम्र श्रद्धांजली.
लेखनविषय:
काल झी वर लहान मुलं अतिशय शांत आणि गंभीर पणे देशभक्तीची गाणी सुरेख म्हणत होती... आणि त्यातच एक होतं - अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत तिथे चिरा ना कुणी बांधिला पेटली न वात... कुसुमाग्रजांचेच शब्द ते! साधे सुधे नव्हेत. पण अजूनही हेच घडतं आणि आजही घडते आहे. गेल्या काही दिवसातल्या प्रतिसादात सर्व शहीदांना अभिवादन करताना मला पुन्हा पुन्हा वाटत होतं की तीन मोठ्या अधिकार्‍यांचा जो राष्ट्रीय गौरव होतो आहे त्यात कदाचित बाकी लहान पदावरच्यांवर थोडा अन्याय तर होत नाही?

थोडे डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर... प्रतिसाद आणि माझे मत

श्रावण मोडक ·

विजय राणे 30/11/2008 - 18:28
आपल्या लिखाणातून आपला लष्कराशी संबंधित नाही आणि या विषयातला अभ्यासही हे सिद्ध होते. उगाच काहीतरी लिहित जाऊ नका. हा विषय अगदी गहन आहे. आपल्याला त्याची माहिती नसताना त्यात आपण हात घालण्याची हिम्मत केलीय. आपल्या हिम्मतीला खरे तर "दाद' द्यायला हवी.

विसुनाना 01/12/2008 - 12:41
अशासाठी की आपल्या लेखातील सर्व मुद्द्यांशी सहमत व्हायला आवडले असते. इतर अनेक बाबतीत आपली मते बर्‍यापैकी एकसारखी असतात. पण येथे तसे घडले नाही. :( विचार करत आहे.

भोचक 01/12/2008 - 18:00
तुमच्या बहुतांश मतांशी सहमत. दहशतवाद्यांच्या राजकीय उद्दिष्टांआड इस्लामी दहशतवादाचा मुखवटा आहे हे पटते. पण मुंबई वा गेल्या काही महिन्यात देशांत झालेल्या बॉम्बस्फोटांसंदर्भात या दहशतवाद्यांचे राजकीय उद्दिष्ट काय असावे? हे कुठेही स्पष्ट झालेले नाही. दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी घेणे यातून त्यांचे राजकीय उद्दिष्टही अनेकदा स्पष्ट होत असते. (उदा. कोणती संघटना ती जबाबदारी स्वीकारते त्यावरून त्यांचे उद्दिष्ट काय ते कळते) तसे या हल्ल्यांत झालेले नाही. अद्याप तरी त्याची जबाबदारी कोणी स्वीकारलेली नाही. डेक्कन मुजाहिदीन या नावाला फारशी ओळख नाही. त्यातून त्यांचे हेतूही स्पष्ट होत नाही. पाकिस्तानातील एखाद्या गटाने हे हल्ले केले असे म्हटले तरी त्यामागचे उद्दिष्ट काय असावे? काश्मीरचे स्वातंत्र्य हा मुद्दा असेल तर या हल्ल्याचे नेतृत्व करणार्‍या मंडळीत काश्मीरी असणे आवश्यक आहे. तसे अद्याप तरी दिसून आलेले नाही. कारण तो धर्माच्या नावावर अतिरेकी जमवेल. पण त्याचे राजकीय उद्दिष्ट हे त्याच्या डोक्यात पक्के असेल आणि त्याचे सहकारी इस्लाम म्हणून लढतील. त्याचवेळी पाकिस्तानात होणार्‍या अंतर्गत हल्ल्यांचा हेतूही काय असावा? बेनझीर भुट्टोंची झालेली हत्या, नवाज शरीफ व खुद्द मुशर्रफ यांच्यावर अनेकदा झालेले हल्ले हे का झाले असावेत? माझ्या मते कडव्या दहशतवादी गटांना त्यांची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी जे नेते अडथळे ठरतील त्यांची ते हत्या करणार हे उघड आहे. याही कडव्या गटांत काश्मिरी मुस्लिमांचा सहभाग असणे आवश्यक असेल. कारण त्यांना आपल्याला बाहुले ठरणारा नेता हवा आहे. कारण काश्मिर प्रकरणात एकूणातच भारताविरोधी भूमिका घेणार्‍या राजकीय नेत्यालाच त्यांचा पाठिंबा असेल. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

नाना चेंगट 16/02/2013 - 12:31
४ वर्षांनंतर तुम्हाला या लेखमालेतील विचारांबद्दल काय वाटते? समर्पक आहेत की काही त्रुटी जाणवते? सध्या तुम्ही तुमच्या विचारांकडे तटस्थपणे पाहिले तर तुम्ही काय म्हणाल?

In reply to by नाना चेंगट

श्रावण मोडक 16/02/2013 - 13:11
चार वर्षांनंतर वास्तव बदललेले असेल तर माझे विचार बदलले असले पाहिजेत. वास्तव तेच असेल तर विचार बदलता कामा नयेत - हे एवढे तुम्हालाही मान्य व्हावे. माझ्या दृष्टीने विचार बदलावेत, असा वास्तविक बदल झालेला नाही. अर्थात, वास्तवात झालेला तसा बदल तुम्ही दाखवून दिलात तर मला त्यांचा विचार करून आधीच्या संदर्भात माझे विचार कसे बदलले आहेत हे पाहावे लागेल आणि ते मांडावे लागेल. वास्तव बदलले नाही, असे मी म्हणतोय, कारण हे सारे विचार ज्या भूमिकेतून आले आहेत ती भूमिका तशीच आहे. माझ्या मते आजही "इस्लामी दहशतवाद" यामागे राजकीय उद्दिष्ट्ये आहेत, आणि त्यांचा सामना राजकीय स्तरावर करावाच लागेल. दहशतवादाला केवळ बळाचा आविष्कार मानून (एकमेव) बळानेच त्याचा सामना करण्यातून शाश्वत उपाय होणार नाही. तसा शाश्वत उपाय (एकमेव) राजकीय आघाडीवरही मिळणार नाही. या दोहोंची सांगड घालावीच लागेल आणि त्यात राजकीय आघाडी किंवा मुत्सद्देगिरीलाच अधिक वाव असला पाहिजे. चार वर्षांनंतर माझ्या या मांडणीविषयी तुमचे मत मांडलेत तर चर्चा अधिक पुढे जाईल. :-)

In reply to by श्रावण मोडक

नाना चेंगट 16/02/2013 - 13:42
सहमत आहे. वास्तव बदललेलं नाही हे मान्य. बळ आणि मुत्सद्देगिरीचा वापर करायला हवा हे सुद्धा मान्य. बळापेक्षा मुत्सद्देगिरीला वाव जास्त असायला हवा हे सुद्धा तत्वतः मान्य. तत्वतः का तर समोरील पक्ष सुद्धा मुत्सद्देगिरिला प्राधान्य देत चर्चेला तयार असेल तर चर्चा करायलाच हवी. परंतु चर्चेआड दिशाभुल करुन बळाचा वापर करुन नामोहरम करायचा प्रयत्न करायचा हे धोरण समोरील पक्ष स्विकारत असेल तर चर्चेचे गुर्‍हाळ विफल होण्याची शक्यता वाढते. अशा वेळेस काय पर्याय शोधता येतात त्याचा विचार करायला हवा. काश्मिर समस्येचा विचार केल्यास साम दाम दंड भेद या पैकी साम आणि दंड हे वापरुन झाले आहेत. दाम (केवळ पर्यटनामुळे नव्हे तर उद्योगाच्या सहाय्याने जनतेला कामधंदा, रोजगार यामधे गुंतवून ठेवणे) तसेच भेदाचा वापर करुन तेथील संघटन खीळखिळे करणे व जमल्यास संपवणे असे प्रकार करुन समस्या सोडवण्याचा प्रयत्न भारत सरकार करत आहे असे आपण मानू शकतो का? (इथे काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे या घोषणेनुसार भारत सरकारची जबाबदारी काय असू शकते त्या अनुषंगाने विचार केला आहे. काश्मिर स्वतंत्र आहे असा विचार केला तरी कधी न कधी तेथील निवासी जनतेला, ज्यांना आपण फुटीरतावादी नेते म्हणतो त्यांच्या प्रभावळीतून मुक्त होणे आवश्यक वाटेलच, तेव्हा हा प्रश्न त्यांना भेडसावणार आहेच. कारण बंडखोरी यशस्वी झाली की क्रांती होते आणि क्रांतीतच पुढील बंडखोरीची बीजे असतातच.)

In reply to by नाना चेंगट

श्रावण मोडक 16/02/2013 - 13:51
समोरचा पक्ष चर्चेला तयार नाही, असे आपण मानू. (सरसकट तसे नाही. रादर, साम, दाम, दंड, भेद यातील 'भेद' काही ठिकाणी चालू आहेच...) मुत्सद्देगिरी तिथेच असते, असे मला वाटते. चर्चेला तयार नसणाऱ्यांना चर्चेला आणणे, त्यातच गुंतवणे आणि त्यातूनच मार्ग काढणे यालाच मुत्सद्देगिरी म्हणतात, असे मला वाटते. काश्मिरात काही गोष्टी होताहेत. स्वतंत्र बोलू.

In reply to by श्रावण मोडक

विसुनाना 16/02/2013 - 15:07
पण चार वर्षांत समोरचा पक्ष एकसंध राहिलेला नाही. राष्ट्र या संकल्पनेवर पाकिस्तानातल्या कट्टर इस्लामवाद्यांनी मोठाच आघात केलेला आहे. आता बोलणी करायची तर कुणाशी? पाकिस्तान सरकारशी? पाकिस्तानी लष्कर आणि आय एस आयशी की तिथल्या कट्टरपंथीय संघटनांशी? भारताने पाकिस्तान-काश्मिरबाबत मुत्सद्देगिरी करण्याला फारसा वावच राहिलेला नाही. मध्ये मुंडकी उडवण्यावरून तर प्रकरण फारच पुढे गेलेले होते.

In reply to by विसुनाना

श्रावण मोडक 16/02/2013 - 15:21
मी जे लिहिलं ते एकंदर इस्लामी दहशतवाद म्हणून. त्यात पाकिस्तानविशिष्ट असे मी काही म्हणत नाहीये. पाकिस्तानविशिष्ट बोलायचे तर मी आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे "काश्मिरात काही गोष्टी होताहेत". अधिक तपशिलात सांगू शकत नाही, पण इतके नक्की की तिथे, काही प्रमाणात तरी, मुत्सद्देगिरी आणि बळ अशा दोन्ही गोष्टी होताहेत. त्यात अडथळे आहेतच. एक अडथळा पाकिस्तान (किंवा जे खंडीत राष्ट्र आहे ते). तिथेच मुत्सद्देगिरीची कसोटी आहे.

In reply to by श्रावण मोडक

राही 18/02/2013 - 20:35
कश्मीरमध्ये बर्‍याच गोष्टी होताहेत. खरे आहे. दाम आणि भेद हे देखील.

हुप्प्या 19/02/2013 - 00:08
सौदी अरेबिया हे अत्यंत श्रीमंत राज्य आहे ह्याबद्दल संदेह नसावा. १९८० पासून त्या देशाने आपल्या वहाबी विचारांच्या रानटी, ताठर इस्लामचा प्रचार करण्याकरता मोठ्या प्रमाणात पैसा वापरायला सुरवात केली. (१९७९ साली मक्का मशिदीवर काही धर्मपिसाटांनी ताबा मिळवायचा प्रयत्न केला त्याला प्रत्युत्तर म्हणून) सौदी अरेबियातील कट्टर इस्लामी लोकांना खूश करायला आणि सौदी सरकारची डोकेदुखी कमी व्हावी म्हणून हा उपाय केला गेला. पण ह्याचे घातक परिणाम अन्य देशात दिसू लागले आहेत. इंडोनिशिया, मलेशिया हे देश पूर्वी फार मवाळ समजले जायचे. तिथले मुस्लिम लोक स्थानिक संस्कृतीशी एकरुप झाले होते. तिथले उत्सव, भाषा, रीतीरिवाज पाळत होते. पण आता ते बदलत आहे. आखाती देशाचा पैसा आणि तिथला विखारी प्रचार यामुळे तिथेही कडवा इस्लाम उदयास येत आहे. स्थानिक रीतिरिवाज त्यागून मूळ इस्लामच कसा चांगला असे लोकांच्या मनावर बिंबवले जाते आहे. हाच प्रकार अफ्रिकेत, भारत, पाकिस्तान आणि बांगला देशातही होत आहे. भारतात सुफी परंपरा, अफ्रिकेतील तिथला जादूटोणा वगैरेसारखे प्रकार इस्लाममधे मिसळून थोडा सौम्य इस्लाम बनू घातला होता त्यावर ह्या अरबी इस्लामी दहशतवादाचा मोठा प्रभाव पडतो आहे. झाकिर नाईकासारख्या वरवर अभ्यासू वाटणार्‍या धर्मपिसाटाचे विचार ऐकलेत तर हे लगेचच कळेल. बुरख्याचे महत्त्व, पीरदर्ग्यापुढे नतमस्तक होणे कसे गैरइस्लामी आहे हे समजावणे वगैरे. त्यामुळे इस्लामी दहशतवाद हा अगदी खरा आहे. तो निव्वळ एक राजकीय लढ्याचा मुखवटा आहे असे मानणे भोळसटपणाचे आहे. मुळात इस्लाम हा अरबी संस्कृतीचे वर्चस्व गाजवणारा आहे. तथाकथित इस्लामी नेते कुराण हे केवळ अरबीतून वाचावे असे ठणकावून सांगतात. अनुवाद वगैरे त्यांना मंजूर नसतो. नमाज पढताना जे काही म्हटले जाते ते केवळ अरबी आणि निव्वळ अरबीतच असावे असा नियम आहे. नमाज पढणार्या गटात एकही जण अरबी जाणत नसला तरीही ह्यात बदल संभवत नाही. आणि अफाट पैशाचे पाठबळ. ह्या जोरावर हा घातक प्रकारचा इस्लाम जगभर पसरावा म्हणून एक मोठी मोहिम राबवली जात आहे. साम, दाम, भेद, दंड सगळे उपाय वापरुन त्याचे अनुयायी काम करत आहेत. आणि हे अन्य धर्मियांकरता धोक्याचे आहे.

विजय राणे 30/11/2008 - 18:28
आपल्या लिखाणातून आपला लष्कराशी संबंधित नाही आणि या विषयातला अभ्यासही हे सिद्ध होते. उगाच काहीतरी लिहित जाऊ नका. हा विषय अगदी गहन आहे. आपल्याला त्याची माहिती नसताना त्यात आपण हात घालण्याची हिम्मत केलीय. आपल्या हिम्मतीला खरे तर "दाद' द्यायला हवी.

विसुनाना 01/12/2008 - 12:41
अशासाठी की आपल्या लेखातील सर्व मुद्द्यांशी सहमत व्हायला आवडले असते. इतर अनेक बाबतीत आपली मते बर्‍यापैकी एकसारखी असतात. पण येथे तसे घडले नाही. :( विचार करत आहे.

भोचक 01/12/2008 - 18:00
तुमच्या बहुतांश मतांशी सहमत. दहशतवाद्यांच्या राजकीय उद्दिष्टांआड इस्लामी दहशतवादाचा मुखवटा आहे हे पटते. पण मुंबई वा गेल्या काही महिन्यात देशांत झालेल्या बॉम्बस्फोटांसंदर्भात या दहशतवाद्यांचे राजकीय उद्दिष्ट काय असावे? हे कुठेही स्पष्ट झालेले नाही. दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी घेणे यातून त्यांचे राजकीय उद्दिष्टही अनेकदा स्पष्ट होत असते. (उदा. कोणती संघटना ती जबाबदारी स्वीकारते त्यावरून त्यांचे उद्दिष्ट काय ते कळते) तसे या हल्ल्यांत झालेले नाही. अद्याप तरी त्याची जबाबदारी कोणी स्वीकारलेली नाही. डेक्कन मुजाहिदीन या नावाला फारशी ओळख नाही. त्यातून त्यांचे हेतूही स्पष्ट होत नाही. पाकिस्तानातील एखाद्या गटाने हे हल्ले केले असे म्हटले तरी त्यामागचे उद्दिष्ट काय असावे? काश्मीरचे स्वातंत्र्य हा मुद्दा असेल तर या हल्ल्याचे नेतृत्व करणार्‍या मंडळीत काश्मीरी असणे आवश्यक आहे. तसे अद्याप तरी दिसून आलेले नाही. कारण तो धर्माच्या नावावर अतिरेकी जमवेल. पण त्याचे राजकीय उद्दिष्ट हे त्याच्या डोक्यात पक्के असेल आणि त्याचे सहकारी इस्लाम म्हणून लढतील. त्याचवेळी पाकिस्तानात होणार्‍या अंतर्गत हल्ल्यांचा हेतूही काय असावा? बेनझीर भुट्टोंची झालेली हत्या, नवाज शरीफ व खुद्द मुशर्रफ यांच्यावर अनेकदा झालेले हल्ले हे का झाले असावेत? माझ्या मते कडव्या दहशतवादी गटांना त्यांची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी जे नेते अडथळे ठरतील त्यांची ते हत्या करणार हे उघड आहे. याही कडव्या गटांत काश्मिरी मुस्लिमांचा सहभाग असणे आवश्यक असेल. कारण त्यांना आपल्याला बाहुले ठरणारा नेता हवा आहे. कारण काश्मिर प्रकरणात एकूणातच भारताविरोधी भूमिका घेणार्‍या राजकीय नेत्यालाच त्यांचा पाठिंबा असेल. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

नाना चेंगट 16/02/2013 - 12:31
४ वर्षांनंतर तुम्हाला या लेखमालेतील विचारांबद्दल काय वाटते? समर्पक आहेत की काही त्रुटी जाणवते? सध्या तुम्ही तुमच्या विचारांकडे तटस्थपणे पाहिले तर तुम्ही काय म्हणाल?

In reply to by नाना चेंगट

श्रावण मोडक 16/02/2013 - 13:11
चार वर्षांनंतर वास्तव बदललेले असेल तर माझे विचार बदलले असले पाहिजेत. वास्तव तेच असेल तर विचार बदलता कामा नयेत - हे एवढे तुम्हालाही मान्य व्हावे. माझ्या दृष्टीने विचार बदलावेत, असा वास्तविक बदल झालेला नाही. अर्थात, वास्तवात झालेला तसा बदल तुम्ही दाखवून दिलात तर मला त्यांचा विचार करून आधीच्या संदर्भात माझे विचार कसे बदलले आहेत हे पाहावे लागेल आणि ते मांडावे लागेल. वास्तव बदलले नाही, असे मी म्हणतोय, कारण हे सारे विचार ज्या भूमिकेतून आले आहेत ती भूमिका तशीच आहे. माझ्या मते आजही "इस्लामी दहशतवाद" यामागे राजकीय उद्दिष्ट्ये आहेत, आणि त्यांचा सामना राजकीय स्तरावर करावाच लागेल. दहशतवादाला केवळ बळाचा आविष्कार मानून (एकमेव) बळानेच त्याचा सामना करण्यातून शाश्वत उपाय होणार नाही. तसा शाश्वत उपाय (एकमेव) राजकीय आघाडीवरही मिळणार नाही. या दोहोंची सांगड घालावीच लागेल आणि त्यात राजकीय आघाडी किंवा मुत्सद्देगिरीलाच अधिक वाव असला पाहिजे. चार वर्षांनंतर माझ्या या मांडणीविषयी तुमचे मत मांडलेत तर चर्चा अधिक पुढे जाईल. :-)

In reply to by श्रावण मोडक

नाना चेंगट 16/02/2013 - 13:42
सहमत आहे. वास्तव बदललेलं नाही हे मान्य. बळ आणि मुत्सद्देगिरीचा वापर करायला हवा हे सुद्धा मान्य. बळापेक्षा मुत्सद्देगिरीला वाव जास्त असायला हवा हे सुद्धा तत्वतः मान्य. तत्वतः का तर समोरील पक्ष सुद्धा मुत्सद्देगिरिला प्राधान्य देत चर्चेला तयार असेल तर चर्चा करायलाच हवी. परंतु चर्चेआड दिशाभुल करुन बळाचा वापर करुन नामोहरम करायचा प्रयत्न करायचा हे धोरण समोरील पक्ष स्विकारत असेल तर चर्चेचे गुर्‍हाळ विफल होण्याची शक्यता वाढते. अशा वेळेस काय पर्याय शोधता येतात त्याचा विचार करायला हवा. काश्मिर समस्येचा विचार केल्यास साम दाम दंड भेद या पैकी साम आणि दंड हे वापरुन झाले आहेत. दाम (केवळ पर्यटनामुळे नव्हे तर उद्योगाच्या सहाय्याने जनतेला कामधंदा, रोजगार यामधे गुंतवून ठेवणे) तसेच भेदाचा वापर करुन तेथील संघटन खीळखिळे करणे व जमल्यास संपवणे असे प्रकार करुन समस्या सोडवण्याचा प्रयत्न भारत सरकार करत आहे असे आपण मानू शकतो का? (इथे काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे या घोषणेनुसार भारत सरकारची जबाबदारी काय असू शकते त्या अनुषंगाने विचार केला आहे. काश्मिर स्वतंत्र आहे असा विचार केला तरी कधी न कधी तेथील निवासी जनतेला, ज्यांना आपण फुटीरतावादी नेते म्हणतो त्यांच्या प्रभावळीतून मुक्त होणे आवश्यक वाटेलच, तेव्हा हा प्रश्न त्यांना भेडसावणार आहेच. कारण बंडखोरी यशस्वी झाली की क्रांती होते आणि क्रांतीतच पुढील बंडखोरीची बीजे असतातच.)

In reply to by नाना चेंगट

श्रावण मोडक 16/02/2013 - 13:51
समोरचा पक्ष चर्चेला तयार नाही, असे आपण मानू. (सरसकट तसे नाही. रादर, साम, दाम, दंड, भेद यातील 'भेद' काही ठिकाणी चालू आहेच...) मुत्सद्देगिरी तिथेच असते, असे मला वाटते. चर्चेला तयार नसणाऱ्यांना चर्चेला आणणे, त्यातच गुंतवणे आणि त्यातूनच मार्ग काढणे यालाच मुत्सद्देगिरी म्हणतात, असे मला वाटते. काश्मिरात काही गोष्टी होताहेत. स्वतंत्र बोलू.

In reply to by श्रावण मोडक

विसुनाना 16/02/2013 - 15:07
पण चार वर्षांत समोरचा पक्ष एकसंध राहिलेला नाही. राष्ट्र या संकल्पनेवर पाकिस्तानातल्या कट्टर इस्लामवाद्यांनी मोठाच आघात केलेला आहे. आता बोलणी करायची तर कुणाशी? पाकिस्तान सरकारशी? पाकिस्तानी लष्कर आणि आय एस आयशी की तिथल्या कट्टरपंथीय संघटनांशी? भारताने पाकिस्तान-काश्मिरबाबत मुत्सद्देगिरी करण्याला फारसा वावच राहिलेला नाही. मध्ये मुंडकी उडवण्यावरून तर प्रकरण फारच पुढे गेलेले होते.

In reply to by विसुनाना

श्रावण मोडक 16/02/2013 - 15:21
मी जे लिहिलं ते एकंदर इस्लामी दहशतवाद म्हणून. त्यात पाकिस्तानविशिष्ट असे मी काही म्हणत नाहीये. पाकिस्तानविशिष्ट बोलायचे तर मी आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे "काश्मिरात काही गोष्टी होताहेत". अधिक तपशिलात सांगू शकत नाही, पण इतके नक्की की तिथे, काही प्रमाणात तरी, मुत्सद्देगिरी आणि बळ अशा दोन्ही गोष्टी होताहेत. त्यात अडथळे आहेतच. एक अडथळा पाकिस्तान (किंवा जे खंडीत राष्ट्र आहे ते). तिथेच मुत्सद्देगिरीची कसोटी आहे.

In reply to by श्रावण मोडक

राही 18/02/2013 - 20:35
कश्मीरमध्ये बर्‍याच गोष्टी होताहेत. खरे आहे. दाम आणि भेद हे देखील.

हुप्प्या 19/02/2013 - 00:08
सौदी अरेबिया हे अत्यंत श्रीमंत राज्य आहे ह्याबद्दल संदेह नसावा. १९८० पासून त्या देशाने आपल्या वहाबी विचारांच्या रानटी, ताठर इस्लामचा प्रचार करण्याकरता मोठ्या प्रमाणात पैसा वापरायला सुरवात केली. (१९७९ साली मक्का मशिदीवर काही धर्मपिसाटांनी ताबा मिळवायचा प्रयत्न केला त्याला प्रत्युत्तर म्हणून) सौदी अरेबियातील कट्टर इस्लामी लोकांना खूश करायला आणि सौदी सरकारची डोकेदुखी कमी व्हावी म्हणून हा उपाय केला गेला. पण ह्याचे घातक परिणाम अन्य देशात दिसू लागले आहेत. इंडोनिशिया, मलेशिया हे देश पूर्वी फार मवाळ समजले जायचे. तिथले मुस्लिम लोक स्थानिक संस्कृतीशी एकरुप झाले होते. तिथले उत्सव, भाषा, रीतीरिवाज पाळत होते. पण आता ते बदलत आहे. आखाती देशाचा पैसा आणि तिथला विखारी प्रचार यामुळे तिथेही कडवा इस्लाम उदयास येत आहे. स्थानिक रीतिरिवाज त्यागून मूळ इस्लामच कसा चांगला असे लोकांच्या मनावर बिंबवले जाते आहे. हाच प्रकार अफ्रिकेत, भारत, पाकिस्तान आणि बांगला देशातही होत आहे. भारतात सुफी परंपरा, अफ्रिकेतील तिथला जादूटोणा वगैरेसारखे प्रकार इस्लाममधे मिसळून थोडा सौम्य इस्लाम बनू घातला होता त्यावर ह्या अरबी इस्लामी दहशतवादाचा मोठा प्रभाव पडतो आहे. झाकिर नाईकासारख्या वरवर अभ्यासू वाटणार्‍या धर्मपिसाटाचे विचार ऐकलेत तर हे लगेचच कळेल. बुरख्याचे महत्त्व, पीरदर्ग्यापुढे नतमस्तक होणे कसे गैरइस्लामी आहे हे समजावणे वगैरे. त्यामुळे इस्लामी दहशतवाद हा अगदी खरा आहे. तो निव्वळ एक राजकीय लढ्याचा मुखवटा आहे असे मानणे भोळसटपणाचे आहे. मुळात इस्लाम हा अरबी संस्कृतीचे वर्चस्व गाजवणारा आहे. तथाकथित इस्लामी नेते कुराण हे केवळ अरबीतून वाचावे असे ठणकावून सांगतात. अनुवाद वगैरे त्यांना मंजूर नसतो. नमाज पढताना जे काही म्हटले जाते ते केवळ अरबी आणि निव्वळ अरबीतच असावे असा नियम आहे. नमाज पढणार्या गटात एकही जण अरबी जाणत नसला तरीही ह्यात बदल संभवत नाही. आणि अफाट पैशाचे पाठबळ. ह्या जोरावर हा घातक प्रकारचा इस्लाम जगभर पसरावा म्हणून एक मोठी मोहिम राबवली जात आहे. साम, दाम, भेद, दंड सगळे उपाय वापरुन त्याचे अनुयायी काम करत आहेत. आणि हे अन्य धर्मियांकरता धोक्याचे आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
दोन भागांतील या लेखावर आलेल्या प्रतिसादांनंतर तो धागा बराच खालवर लांबत गेल्याने हा स्वतंत्र धागा केला आहे. मूळ लेख आणि २ व चर्चा लेखावर प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार. प्रतिसादांचे स्वरूप साधारणपणे मुद्देसूद लेखन येथून सुरू होणारे आहे.