मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अरून सवास, सायं सवास! भाग - २

ॐकार ·

पक्या 07/06/2008 - 00:33
मस्तच चित्र सफर. माशाच्या आकाराची डिश खासच. जपानी खानपान मध्ये वर्णन केलेला खाद्यप्रकार/खाद्यक्रिया म्हणजे स्टीमबोट. .हो ना. आपणच आपले पदार्थ उकडून / उकळून घेउन खायचे. मीठ - मीरपूड सोडल्यास इतर काही मसाले नसतात त्यात. अर्ध्या अननसाचा डीश सारखा केलेला वापर पण खास. सर्व फोटोज छान.

शितल 07/06/2008 - 00:52
सचित्र माहिती छान फोटो ही अगदी खास आहेत, आणि फळा॑नी भरलेली नाव तर अगदी सही.

यशोधरा 07/06/2008 - 09:36
सह्ही फोटो टाकले आहेत ॐकार!! मस्त!! बसल्या जागी थायलंडची सफर झाली!! बुद्ध वृंदावन मस्तच :)

मदनबाण 07/06/2008 - 10:04
ॐकारराव मस्तच !!!!!,,,फोटो मस्त आहेत..... ताटलीत अननस -भात - बिर्याणी हा एकदम सॉलिड प्रकार दिसतोय..... (अननस प्रेमी) मदनबाण.....

पक्या 07/06/2008 - 00:33
मस्तच चित्र सफर. माशाच्या आकाराची डिश खासच. जपानी खानपान मध्ये वर्णन केलेला खाद्यप्रकार/खाद्यक्रिया म्हणजे स्टीमबोट. .हो ना. आपणच आपले पदार्थ उकडून / उकळून घेउन खायचे. मीठ - मीरपूड सोडल्यास इतर काही मसाले नसतात त्यात. अर्ध्या अननसाचा डीश सारखा केलेला वापर पण खास. सर्व फोटोज छान.

शितल 07/06/2008 - 00:52
सचित्र माहिती छान फोटो ही अगदी खास आहेत, आणि फळा॑नी भरलेली नाव तर अगदी सही.

यशोधरा 07/06/2008 - 09:36
सह्ही फोटो टाकले आहेत ॐकार!! मस्त!! बसल्या जागी थायलंडची सफर झाली!! बुद्ध वृंदावन मस्तच :)

मदनबाण 07/06/2008 - 10:04
ॐकारराव मस्तच !!!!!,,,फोटो मस्त आहेत..... ताटलीत अननस -भात - बिर्याणी हा एकदम सॉलिड प्रकार दिसतोय..... (अननस प्रेमी) मदनबाण.....
3

चाहूल.... नाटक...

भडकमकर मास्तर ·

झकासराव 06/06/2008 - 19:14
छान लिहिल आहात. ह्याच नाटकाची समीक्षा मी बरच आधी वाचली होती पेपरात. त्यानी देखील कौतुक केले होते. पहायच होत पण नाही जमल. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

मनिष 06/06/2008 - 21:13
तुम्ही असे काही लिहिता आणि अस्वस्थ करून सोडता....
बॊसनं प्रश्न विचारणं फ़क्त एक निमित्त आहे..असा एखादा नैतिक प्रश्न अंगावर कोसळल्यावर वैचारिक बैठक पक्की नसेल तर चांगले वाईट ठरवायला आपण कसे असमर्थ ठरतो, कोणती भावनिक , नैतिक आणि बौद्धिक उलथापालथ होते त्याचं हे नाटक आहे...त्यात बॊस येतोच कुठे? आणि बॊस आला असत तर सगळा दोष त्याच्यावर ढकलण्याचा धोका होताच...
सलाम!!! किती नेमकेपणे लिहिले आहे...

मास्तर मागचे 'साठेच काय करायचे' आणि 'चाहूल' दोन्हीने अस्वस्थ करून सोडलत. नकारात्मक शेवट केल्याशिवाय ही सकारात्मक लाज येणार कुठून? हेच खरं. पुण्याचे पेशवे

शेखस्पिअर 07/06/2008 - 00:33
तुम्हाला दुसरे कुठले नाटक सापडले नाही का??? का असा त्रास देता.. आम्हाला तर हे नाटक बघत असताना सारखी आमच्या लेडी मॅकबेथचीच आठवण येत होती... रात्रि घरी आल्यावर आम्हाला झोपच येत नव्हती... मग तमसेच्या तीरावर बसून राहीलो.. एकच वेळी एखादी गोष्ट आवडते आणी आवडतही नाही असे प्रसंग आयुष्यात फार थोड्या वेळेस येतात... असो.. (सोनालीने आमची मॅकबेथ काय उभी केली असती!!!)

In reply to by शेखस्पिअर

(सोनालीने आमची मॅकबेथ काय उभी केली असती!!!) एका साउथच्या सिनेमात सोनालीने मॅक्बेथचा रोल केला आहे.... त्या सिनेमाबद्दल आणि एकूणच त्या शूटिंगच्या अनुभवाबद्दल सोनालीने २००० सालच्या मटा दिवाळी अंकात छान लेख लिहिला होता... चित्रपटाचे नाव आठवत नाही... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत 07/06/2008 - 01:23
पारंपारिक नीतीमत्तेच्या सीमारेषेच्या जवळचा नि पलिकडचा प्रदेश दाखविणे हा या नाटकाचा मूळ उद्देश असावा. ज्या नीतीबंधनांना आपण गृहित धरून चालतो, पुरुषार्थ, पातिव्रत्य, सहजीवन या सर्व रूढ संकल्पनाना आपण जे परमोच्च स्थान देतो , त्या गृहितकांना जेव्हा फाटा द्यायची वेळ येते, त्या आदर्शांना झुगारून जेव्हा जगण्याची निवड आपण करतो तेव्हा काय होते ? याची एक झलक हे नाटक दाखवते असे वरकरणी दिसते आहे. पण तसा प्रयत्न असल्यास नाटकाच्या प्रेमिस मधे (मराठी शब्द ?) काहीतरी गोची आहे असे दिसते. कारण जोडप्याची जी चर्चा चालते ती आपल्या गरजा-चैनी आणि त्या गरजा भागवण्यासाठी कुठवर जायला हवे येथवर चालते असे दिसते. म्हणजे नीती-अनीतीच्यापलिकडचा जो न-नैतिकतेचा प्रदेश ( द रीजन ऑफ एमॉरॅलिटी) आहे तो जाणून घ्यायच्या ध्यासाने हे चालले आहे असे दिसत नाही. हे चाललेले दिसते आहे रोजच्या नीतीमत्तेच्या अधिपत्याखालच्या आयुष्याची आर्थिक/सामाजिक/अधिभौतिक पातळी उंचावण्यासाठी एका रात्रीपुरते नैतिकतेच्या राज्याबाहेर मागच्या दरवाज्याने जाण्याविषयी नि पहाट व्हायच्या आधी पुन्हा त्या पारंपारिक नैतिकतेच्या अधिष्ठानाखाली परत येण्यापुरते. नीतीमत्तेच्या पलिकडे जाऊन जगण्यासाठी लागणरी किंमत कायमस्वरूपी मोजण्याची धगधग इथे कुठे आहे ? लैंगिक स्वातंत्र्य मिळवण्याकरता गावकूसाबाहेर पडायची आणि तिथे रहायची तयारी लागते. ते इथे कुठे आहे ? र.धों कर्वे यांचे उदाहरण घ्या. आयुष्यभर हा माणूस"लैंगिकता आणि नीतीमत्ता यांचा कसलाही संबंध असण्याची गरज नाही. विधवांनाही लग्नाशिवाय लैंगिक सुख मिळ्ण्याचा हक्क आहे" या सारखे विचार १९२५ च्या काळात मांडत होता ! समाजाने त्यांचे काय हाल केले हे आपण सगळे जाणतोच. पण माणूस वाकला नाही. त्यामुळे एकूण या नाटकाचे स्वरूप म्हणजे "दिवसा मिळण्याच्या इभ्रतीकरता रात्रौ खाल्लेले शेण" इतपतच ठरते असे मानले तर चूक ठरेल काय ?

In reply to by मुक्तसुनीत

द रीजन ऑफ एमॉरॅलिटी) आहे तो जाणून घ्यायच्या ध्यासाने वगैरे काय हे चालले आहे असे वाटत नाही....लेखकाला अपेक्षितही नसावे... गावात राहून भौतिक प्रगतीच अपेक्षित आहे यांना... त्यामुळे आपण म्हणता ते शब्द थोडे कठोर असले तरी "दिवसा मिळण्याच्या इभ्रतीकरता रात्रौ खाल्लेले शेण" काही चूक वाटत नाहीत.... ....पण त्यामुळे या नाटकाला याचे स्वरूप.... इतपतच म्हणणेही पटत नाही... असो, तुमचा असा समज व्हावा यात नाटकाची ओळख करून देण्यात माझा कुठेतरी गोंधळ झाला असणार.... ते जाउदेत.... ... तुमच्या नाटकांच्या पुस्तकाच्या लिस्ट मध्ये हे पुस्तकसुद्धा ऍड करून टाका.... वाचल्यानंतर सगळा गैरसमज दूर होईल.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मुक्तसुनीत 07/06/2008 - 02:22
माझ्या हातून थोडे कठोर शब्द वापरले गेले खरे. माझ्या पोस्ट मधील शेवटच्या विधानाला तर सरळ सरळ "जजमेंटल" होण्याचा वास आहे. असो. एकूणच प्रशांत दळवी यांची एक नाटककार म्हणून मोठी झेप मला वाटली नाही. "चारचौघी" सारखे त्यांचे नाटक ८० च्या दशकात गाजले आणि स्त्रियांचा दृष्टीकोन त्यानी प्रभावीपणे मांडला हे खरे ; पण माणसामाणसामधल्या व्यवहारांमधली गूढता, खोली त्यानी टिपल्याचे मला स्मरत नाही. "चाहूल" च्या बाबतीत सुद्धा असेच काहीसे झाले असावे. तुम्ही करून दिलेली ओळख अपुरी नाही. माझी कदाचित छिद्रान्वेषक वृत्ती आड आली असावी. "काय नाही" हे माहीत करून निराश होण्याऐवजी "काय आहे" हे समजून घेणे योग्य. (अर्थात गुणात्मक दृष्ट्या "काय असू शकले असते" याबद्दलचे वुइशफुल थिंकींग चालू रहातेच.)

In reply to by मुक्तसुनीत

"काय नाही" हे माहीत करून निराश होण्याऐवजी "काय आहे" हे समजून घेणे योग्य हे वाक्य छान... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वाचक 07/06/2008 - 02:01
तुम्ही कशी करता ह्यावर ही गोष्ट 'शेण खाणे' किंवा 'तडजोड' ह्या पैकी एका गटात बसते. आणि माझ्या समजुती प्रमाणे नाटककाराचाही उद्देश तोच आहे. सर्वात पहिला (आणि कदाचित महत्त्वाचाही) प्रश्न म्हणजे ' बॉसला अशी धाडसी मागणी करायची हिंमत तरी कशी झाली ? ' जोडप्याचे वागणे तशाच प्रकारात बसणारे असल्याशिवाय एवढी हिंमत होणेच शक्य नाही. तेव्हा आपोआपच जोडप्याने 'एक विशिष्ट' सीमारेषा आधीच ओलांडलेली आहे हे कळून चुकते. मग प्रश्न उरतो तो फक्त 'अजून पुढे जायचे की नाही एवढाच.... कदाचित हा एक अपरिहार्य शेवट असावा की आता आपण अशा ठिकाणी पोहोचलेलो आहोत की जिथून परतीचा मार्ग नाही. मग आधीच केलेल्या अनेक तडजोडींवर कशाला पाणी सोडा ? (शेवटी एक रात्र काय आणि अनेक काय - कृतीचे समर्थन सुरु झाले की टोचणी संपली) :)

जोडप्याने 'एक विशिष्ट' सीमारेषा आधीच ओलांडलेली आहे हे कळून चुकते. मग प्रश्न उरतो तो फक्त 'अजून पुढे जायचे की नाही एवढाच.... ........कृतीचे समर्थन सुरु झाले की टोचणी संपली अगदी योग्य बोललात... सहमत.... ________________ अजून एक सांगावेसे वाटते, असा जर विचार केला की या सार्‍यातून नेमका गुन्हा किंवा अपराध काय घडला ?.... सगळाच राजीखुशीचा मामला आहे, तीन कन्सेण्टिंग ऍडल्ट्स मधलं हे पर्सनल मॅटर आहे, तर तुम्ही आम्ही कोण यांना नैतिकतेचे धडे देणारे ? ज्याची त्याची नैतिकता काय आहे ते त्यांचं बघून घेतील....(च्यायला पण नैतिकता इतकी सापेक्ष असते का ? आमचा सगळाच वैचारिक गोंधळ... इथे याच विषयावरचा पेठकरकाका आणि तात्या यांचा एक संवाद आठवतो...) .... हां मग फसवणूक कोणाची झाली?... या सार्‍यातून लायकी नसताना मकरंद जी भराभरा प्रमोशन्स मिळवतो आहे, त्या वेळी एखाद्या लायक माणसाची वाट लागली असणार त्याचे हे दोघे अपराधी आहेत,त्याची नक्कीच फसवणूक होत आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वाचक 07/06/2008 - 07:59
आता अजून विचार केला तर अस वाटतं की बॉसने अशी मागणी केली तिथे नाटक सुरु न होता संपले पाहिजे. नाटकाची सुरुवात 'भौतिक प्रगतीकरता (किंवा चंगळवादाकरिता म्हणूया फार तर) सर्वसामान्यपणे अनैतिक समजली जाणारी कृती करावी की नाही ' ह्याचा उहापोह करताना व्हायला हवी म्हणजे मग त्या व्यक्तिरेखांचा प्रवास नैतिक अधःपतनाकडे कसा झाला हे पाहणे मनोरंजक ठरेल. बॉसची मागणी ही खरे तर एक अपरिहार्य अशी परिणती आहे - सुरुवात नाही.

विसोबा खेचर 07/06/2008 - 12:31
मला असं वाटतं की ज्याला जे जमेल, पटेल तसा प्रयेकजण त्याच्या त्याच्या विचाराने वागत असतो. त्यात चूक काय, बरोबर काय, हे कुणीच ठरवू नये, तो अधिकार कुणालाच नाही! (अर्थात, यात भादंसं मध्ये ज्याची 'गुन्हा' म्हणून नोंद झालेली आहे या गोष्टी येत नाहीत!) असो.. मास्तर! बाकी छानच लिहिता तुम्ही. एखाद्या नाटकाकडे किती विविध अँगलने पाहता याचं कौतुक वाटतं! अजूनही मराठी रंगभूमीवरच्या अश्याच काही चांगल्या नाटकांचा आपण मिपावर परामर्श घ्यावा अशी आपल्याला विनंती! 'नाटक' हा मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आपले लेखन वाचायला मजा येते! काय हो मास्तर, मला असं पुसटसं आठवतंय की शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी या दोघांच्याच भूमिका केलेलं एक नाटक होतं. त्या नाटकाचं नावंही बहुधा चाहूलच होतं! (चूभूदेघे!) कृपया खुलासा कराल का? ते नाटकही छान होतं! आपला, (नाट्यप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी या दोघांच्याच भूमिका केलेलं एक नाटक होतं. त्या नाटकाचं नावंही बहुधा चाहूलच होतं नाही... लेखक दिग्दर्शक तेच होते.... पण त्या नाटकाचं नाव होतं.. ध्यानीमनी त्यात तिला संपूर्ण नाटकभर स्वतःच्या मुलाच्या अस्तित्त्वाचा भास होत असतो परंतु तो नसतोच, अशा आशयाचे कथानक होते... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर 07/06/2008 - 17:29
नाही... लेखक दिग्दर्शक तेच होते.... पण त्या नाटकाचं नाव होतं.. ध्यानीमनी येस्स! मास्तर, यू आर राईट! :) माझाच काहितरी घोटाळा झाला होता...

चाहूल वाचले. नाटकाची कथा समजून घेतली आणि एक वाचक म्हणून आपल्या मित्रांच्या मनात जो विचार आला हा लेखकाच्या लेखनीचा अतिरेक तर नाही ना ? असे म्हणुन सोडून दिले असते. किंवा हॅ, असे होऊ शकते का ? याच्यावर जरा स्वतःशीच वाद करत बसलो असतो. वर काही प्रतिसादात उल्लेख आलाच आहे, की बॉसने मकरंदला बोलण्याची हिम्मतच कशी केली ? मकरंद मधे नकार देण्याची क्षमता नसते का ? चंगळवादात त्याला आता कोणतेच पर्याय उरले नाहीत का ? आणि त्याचा आतला आवाज जो आहे, तो हताशपणाचा आहे. पावित्र्य, नैतिकता या केवळ गप्पा आहेत. त्याला सामोरे जा !!! असा संदेश नाटककाराला द्यायचा आहे असेच वाटले. नाटक आणि राजकारण मराठी माणसाचे वीक प्वॉइंट. तेव्हा आरामात परिक्षणे येऊ दे, आम्हाला आपले परिक्षण वाचायला आवडतेच.

एकंदर कथानक इंग्रजी 'डॉल्स हाऊस' च्या कथेवरून प्रेरित झालेले वाटते आहे. तथाकथित उच्चभू समाजातील कांही उदाहरणे भौतिक सुखाच्या लालसे पोटी हा मार्ग स्विकारतात असे वाटते. 'डॉल्स हाऊस' ची नायिका नवर्‍याला प्रमोशन्स मिळवून देण्यासाठी वरील मार्गाने जाते (आपल्याला भराभर प्रमोशन्स का मिळतात आणि आपली आर्थिक, सामाजिक भरभराट का होते आहे ह्याचा नायकाला संभ्रम पडतो). हे नाटक १९७४ मध्ये वाचले होते. त्यामुळे तपशील चुकण्याची शक्यता आहे पण आशय तोच आहे.

चतुरंग 08/06/2008 - 00:54
नाटकांची ओळख करुन देऊन फार छान लिखाण करत आहात. काय वापरुन काय मिळवायचं ह्यातला विवेक कोणत्याही कारणाने संपला की ह्या नाटकाची कथा सुरु होणार असं वाटतं! मूळ संहिता वाचायला हवी. चतुरंग

दंभकुठार 08/06/2008 - 09:55
अरेच्या !! हॉलिवूडकरांनी इनडिसेंट प्रपोजल नामक सिनेमा सदर मराठी नाटकावरून उचलला होता असे दिसते !!! http://www.imdb.com/title/tt0107211/

आज जे काही समाजात चालले आहे ते पहाता हे नाटक म्हणजे फार मोठी गोष्ट आहे असे मला वाटत नाही. 'पेशव्यांचे विलास जीवन' वाचावे. त्यात जो दुसरा बाजीराव पेशवे, नाना फडनिस यांच्या बद्दलचे उतारे वाचुन मनाला खुप वेदना होतात. दुसरा बाजीराव पेशवे यांनी पण हे केलेले आहे. म्हणजे हा प्रकार म्हणजे बरो बर आहे, असे मी म्हणत नाही. ऐकदा माणुस षड रीपु च्या स्वाधिन झाले तरी कि बाकिचे सगळे क्षुल्लक वाट्ते. ज्या क्षेत्रात ग्लैमर आहे, त्या ठिकाणी असे प्रकार खुप आहेत. ज्या ठिकाणी (उदा. आर & डी) खरोख्रर बुध्दीमत्त्ता लागते अशा ठिकाणी असे प्रकार फारसे नाहीत. मी सुद्धा असे काही प्रकार बघितले आहेत. 'तेरी भी चुप, मेरी भी चुप' हा प्रकार असतो. आणि ह्या प्रकारातली लोक जो पर्यंत सापडत नाही तो पर्यंत खुप संक्रुती रक्षणाच्या घोषणा करतात. बॉस ने अशी मागणी केली कारण त्याला म्हाहीत होते कि कोण मागणी पुर्ण करणार आहे. लोक आधी पाणी किती खोल आहे बघतात आणि मगच पाण्यात उतरतात. हा विषय खुप मोठा आहे, मास्तरांनी हा धागा सुरु केल्या बद्दल धन्यवाद. नाटक परीकक्षण पण चांगले आहे. इतरांच्या प्रतिक्रीयाही आवड्ल्या.

झकासराव 06/06/2008 - 19:14
छान लिहिल आहात. ह्याच नाटकाची समीक्षा मी बरच आधी वाचली होती पेपरात. त्यानी देखील कौतुक केले होते. पहायच होत पण नाही जमल. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

मनिष 06/06/2008 - 21:13
तुम्ही असे काही लिहिता आणि अस्वस्थ करून सोडता....
बॊसनं प्रश्न विचारणं फ़क्त एक निमित्त आहे..असा एखादा नैतिक प्रश्न अंगावर कोसळल्यावर वैचारिक बैठक पक्की नसेल तर चांगले वाईट ठरवायला आपण कसे असमर्थ ठरतो, कोणती भावनिक , नैतिक आणि बौद्धिक उलथापालथ होते त्याचं हे नाटक आहे...त्यात बॊस येतोच कुठे? आणि बॊस आला असत तर सगळा दोष त्याच्यावर ढकलण्याचा धोका होताच...
सलाम!!! किती नेमकेपणे लिहिले आहे...

मास्तर मागचे 'साठेच काय करायचे' आणि 'चाहूल' दोन्हीने अस्वस्थ करून सोडलत. नकारात्मक शेवट केल्याशिवाय ही सकारात्मक लाज येणार कुठून? हेच खरं. पुण्याचे पेशवे

शेखस्पिअर 07/06/2008 - 00:33
तुम्हाला दुसरे कुठले नाटक सापडले नाही का??? का असा त्रास देता.. आम्हाला तर हे नाटक बघत असताना सारखी आमच्या लेडी मॅकबेथचीच आठवण येत होती... रात्रि घरी आल्यावर आम्हाला झोपच येत नव्हती... मग तमसेच्या तीरावर बसून राहीलो.. एकच वेळी एखादी गोष्ट आवडते आणी आवडतही नाही असे प्रसंग आयुष्यात फार थोड्या वेळेस येतात... असो.. (सोनालीने आमची मॅकबेथ काय उभी केली असती!!!)

In reply to by शेखस्पिअर

(सोनालीने आमची मॅकबेथ काय उभी केली असती!!!) एका साउथच्या सिनेमात सोनालीने मॅक्बेथचा रोल केला आहे.... त्या सिनेमाबद्दल आणि एकूणच त्या शूटिंगच्या अनुभवाबद्दल सोनालीने २००० सालच्या मटा दिवाळी अंकात छान लेख लिहिला होता... चित्रपटाचे नाव आठवत नाही... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत 07/06/2008 - 01:23
पारंपारिक नीतीमत्तेच्या सीमारेषेच्या जवळचा नि पलिकडचा प्रदेश दाखविणे हा या नाटकाचा मूळ उद्देश असावा. ज्या नीतीबंधनांना आपण गृहित धरून चालतो, पुरुषार्थ, पातिव्रत्य, सहजीवन या सर्व रूढ संकल्पनाना आपण जे परमोच्च स्थान देतो , त्या गृहितकांना जेव्हा फाटा द्यायची वेळ येते, त्या आदर्शांना झुगारून जेव्हा जगण्याची निवड आपण करतो तेव्हा काय होते ? याची एक झलक हे नाटक दाखवते असे वरकरणी दिसते आहे. पण तसा प्रयत्न असल्यास नाटकाच्या प्रेमिस मधे (मराठी शब्द ?) काहीतरी गोची आहे असे दिसते. कारण जोडप्याची जी चर्चा चालते ती आपल्या गरजा-चैनी आणि त्या गरजा भागवण्यासाठी कुठवर जायला हवे येथवर चालते असे दिसते. म्हणजे नीती-अनीतीच्यापलिकडचा जो न-नैतिकतेचा प्रदेश ( द रीजन ऑफ एमॉरॅलिटी) आहे तो जाणून घ्यायच्या ध्यासाने हे चालले आहे असे दिसत नाही. हे चाललेले दिसते आहे रोजच्या नीतीमत्तेच्या अधिपत्याखालच्या आयुष्याची आर्थिक/सामाजिक/अधिभौतिक पातळी उंचावण्यासाठी एका रात्रीपुरते नैतिकतेच्या राज्याबाहेर मागच्या दरवाज्याने जाण्याविषयी नि पहाट व्हायच्या आधी पुन्हा त्या पारंपारिक नैतिकतेच्या अधिष्ठानाखाली परत येण्यापुरते. नीतीमत्तेच्या पलिकडे जाऊन जगण्यासाठी लागणरी किंमत कायमस्वरूपी मोजण्याची धगधग इथे कुठे आहे ? लैंगिक स्वातंत्र्य मिळवण्याकरता गावकूसाबाहेर पडायची आणि तिथे रहायची तयारी लागते. ते इथे कुठे आहे ? र.धों कर्वे यांचे उदाहरण घ्या. आयुष्यभर हा माणूस"लैंगिकता आणि नीतीमत्ता यांचा कसलाही संबंध असण्याची गरज नाही. विधवांनाही लग्नाशिवाय लैंगिक सुख मिळ्ण्याचा हक्क आहे" या सारखे विचार १९२५ च्या काळात मांडत होता ! समाजाने त्यांचे काय हाल केले हे आपण सगळे जाणतोच. पण माणूस वाकला नाही. त्यामुळे एकूण या नाटकाचे स्वरूप म्हणजे "दिवसा मिळण्याच्या इभ्रतीकरता रात्रौ खाल्लेले शेण" इतपतच ठरते असे मानले तर चूक ठरेल काय ?

In reply to by मुक्तसुनीत

द रीजन ऑफ एमॉरॅलिटी) आहे तो जाणून घ्यायच्या ध्यासाने वगैरे काय हे चालले आहे असे वाटत नाही....लेखकाला अपेक्षितही नसावे... गावात राहून भौतिक प्रगतीच अपेक्षित आहे यांना... त्यामुळे आपण म्हणता ते शब्द थोडे कठोर असले तरी "दिवसा मिळण्याच्या इभ्रतीकरता रात्रौ खाल्लेले शेण" काही चूक वाटत नाहीत.... ....पण त्यामुळे या नाटकाला याचे स्वरूप.... इतपतच म्हणणेही पटत नाही... असो, तुमचा असा समज व्हावा यात नाटकाची ओळख करून देण्यात माझा कुठेतरी गोंधळ झाला असणार.... ते जाउदेत.... ... तुमच्या नाटकांच्या पुस्तकाच्या लिस्ट मध्ये हे पुस्तकसुद्धा ऍड करून टाका.... वाचल्यानंतर सगळा गैरसमज दूर होईल.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मुक्तसुनीत 07/06/2008 - 02:22
माझ्या हातून थोडे कठोर शब्द वापरले गेले खरे. माझ्या पोस्ट मधील शेवटच्या विधानाला तर सरळ सरळ "जजमेंटल" होण्याचा वास आहे. असो. एकूणच प्रशांत दळवी यांची एक नाटककार म्हणून मोठी झेप मला वाटली नाही. "चारचौघी" सारखे त्यांचे नाटक ८० च्या दशकात गाजले आणि स्त्रियांचा दृष्टीकोन त्यानी प्रभावीपणे मांडला हे खरे ; पण माणसामाणसामधल्या व्यवहारांमधली गूढता, खोली त्यानी टिपल्याचे मला स्मरत नाही. "चाहूल" च्या बाबतीत सुद्धा असेच काहीसे झाले असावे. तुम्ही करून दिलेली ओळख अपुरी नाही. माझी कदाचित छिद्रान्वेषक वृत्ती आड आली असावी. "काय नाही" हे माहीत करून निराश होण्याऐवजी "काय आहे" हे समजून घेणे योग्य. (अर्थात गुणात्मक दृष्ट्या "काय असू शकले असते" याबद्दलचे वुइशफुल थिंकींग चालू रहातेच.)

In reply to by मुक्तसुनीत

"काय नाही" हे माहीत करून निराश होण्याऐवजी "काय आहे" हे समजून घेणे योग्य हे वाक्य छान... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वाचक 07/06/2008 - 02:01
तुम्ही कशी करता ह्यावर ही गोष्ट 'शेण खाणे' किंवा 'तडजोड' ह्या पैकी एका गटात बसते. आणि माझ्या समजुती प्रमाणे नाटककाराचाही उद्देश तोच आहे. सर्वात पहिला (आणि कदाचित महत्त्वाचाही) प्रश्न म्हणजे ' बॉसला अशी धाडसी मागणी करायची हिंमत तरी कशी झाली ? ' जोडप्याचे वागणे तशाच प्रकारात बसणारे असल्याशिवाय एवढी हिंमत होणेच शक्य नाही. तेव्हा आपोआपच जोडप्याने 'एक विशिष्ट' सीमारेषा आधीच ओलांडलेली आहे हे कळून चुकते. मग प्रश्न उरतो तो फक्त 'अजून पुढे जायचे की नाही एवढाच.... कदाचित हा एक अपरिहार्य शेवट असावा की आता आपण अशा ठिकाणी पोहोचलेलो आहोत की जिथून परतीचा मार्ग नाही. मग आधीच केलेल्या अनेक तडजोडींवर कशाला पाणी सोडा ? (शेवटी एक रात्र काय आणि अनेक काय - कृतीचे समर्थन सुरु झाले की टोचणी संपली) :)

जोडप्याने 'एक विशिष्ट' सीमारेषा आधीच ओलांडलेली आहे हे कळून चुकते. मग प्रश्न उरतो तो फक्त 'अजून पुढे जायचे की नाही एवढाच.... ........कृतीचे समर्थन सुरु झाले की टोचणी संपली अगदी योग्य बोललात... सहमत.... ________________ अजून एक सांगावेसे वाटते, असा जर विचार केला की या सार्‍यातून नेमका गुन्हा किंवा अपराध काय घडला ?.... सगळाच राजीखुशीचा मामला आहे, तीन कन्सेण्टिंग ऍडल्ट्स मधलं हे पर्सनल मॅटर आहे, तर तुम्ही आम्ही कोण यांना नैतिकतेचे धडे देणारे ? ज्याची त्याची नैतिकता काय आहे ते त्यांचं बघून घेतील....(च्यायला पण नैतिकता इतकी सापेक्ष असते का ? आमचा सगळाच वैचारिक गोंधळ... इथे याच विषयावरचा पेठकरकाका आणि तात्या यांचा एक संवाद आठवतो...) .... हां मग फसवणूक कोणाची झाली?... या सार्‍यातून लायकी नसताना मकरंद जी भराभरा प्रमोशन्स मिळवतो आहे, त्या वेळी एखाद्या लायक माणसाची वाट लागली असणार त्याचे हे दोघे अपराधी आहेत,त्याची नक्कीच फसवणूक होत आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वाचक 07/06/2008 - 07:59
आता अजून विचार केला तर अस वाटतं की बॉसने अशी मागणी केली तिथे नाटक सुरु न होता संपले पाहिजे. नाटकाची सुरुवात 'भौतिक प्रगतीकरता (किंवा चंगळवादाकरिता म्हणूया फार तर) सर्वसामान्यपणे अनैतिक समजली जाणारी कृती करावी की नाही ' ह्याचा उहापोह करताना व्हायला हवी म्हणजे मग त्या व्यक्तिरेखांचा प्रवास नैतिक अधःपतनाकडे कसा झाला हे पाहणे मनोरंजक ठरेल. बॉसची मागणी ही खरे तर एक अपरिहार्य अशी परिणती आहे - सुरुवात नाही.

विसोबा खेचर 07/06/2008 - 12:31
मला असं वाटतं की ज्याला जे जमेल, पटेल तसा प्रयेकजण त्याच्या त्याच्या विचाराने वागत असतो. त्यात चूक काय, बरोबर काय, हे कुणीच ठरवू नये, तो अधिकार कुणालाच नाही! (अर्थात, यात भादंसं मध्ये ज्याची 'गुन्हा' म्हणून नोंद झालेली आहे या गोष्टी येत नाहीत!) असो.. मास्तर! बाकी छानच लिहिता तुम्ही. एखाद्या नाटकाकडे किती विविध अँगलने पाहता याचं कौतुक वाटतं! अजूनही मराठी रंगभूमीवरच्या अश्याच काही चांगल्या नाटकांचा आपण मिपावर परामर्श घ्यावा अशी आपल्याला विनंती! 'नाटक' हा मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आपले लेखन वाचायला मजा येते! काय हो मास्तर, मला असं पुसटसं आठवतंय की शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी या दोघांच्याच भूमिका केलेलं एक नाटक होतं. त्या नाटकाचं नावंही बहुधा चाहूलच होतं! (चूभूदेघे!) कृपया खुलासा कराल का? ते नाटकही छान होतं! आपला, (नाट्यप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी या दोघांच्याच भूमिका केलेलं एक नाटक होतं. त्या नाटकाचं नावंही बहुधा चाहूलच होतं नाही... लेखक दिग्दर्शक तेच होते.... पण त्या नाटकाचं नाव होतं.. ध्यानीमनी त्यात तिला संपूर्ण नाटकभर स्वतःच्या मुलाच्या अस्तित्त्वाचा भास होत असतो परंतु तो नसतोच, अशा आशयाचे कथानक होते... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर 07/06/2008 - 17:29
नाही... लेखक दिग्दर्शक तेच होते.... पण त्या नाटकाचं नाव होतं.. ध्यानीमनी येस्स! मास्तर, यू आर राईट! :) माझाच काहितरी घोटाळा झाला होता...

चाहूल वाचले. नाटकाची कथा समजून घेतली आणि एक वाचक म्हणून आपल्या मित्रांच्या मनात जो विचार आला हा लेखकाच्या लेखनीचा अतिरेक तर नाही ना ? असे म्हणुन सोडून दिले असते. किंवा हॅ, असे होऊ शकते का ? याच्यावर जरा स्वतःशीच वाद करत बसलो असतो. वर काही प्रतिसादात उल्लेख आलाच आहे, की बॉसने मकरंदला बोलण्याची हिम्मतच कशी केली ? मकरंद मधे नकार देण्याची क्षमता नसते का ? चंगळवादात त्याला आता कोणतेच पर्याय उरले नाहीत का ? आणि त्याचा आतला आवाज जो आहे, तो हताशपणाचा आहे. पावित्र्य, नैतिकता या केवळ गप्पा आहेत. त्याला सामोरे जा !!! असा संदेश नाटककाराला द्यायचा आहे असेच वाटले. नाटक आणि राजकारण मराठी माणसाचे वीक प्वॉइंट. तेव्हा आरामात परिक्षणे येऊ दे, आम्हाला आपले परिक्षण वाचायला आवडतेच.

एकंदर कथानक इंग्रजी 'डॉल्स हाऊस' च्या कथेवरून प्रेरित झालेले वाटते आहे. तथाकथित उच्चभू समाजातील कांही उदाहरणे भौतिक सुखाच्या लालसे पोटी हा मार्ग स्विकारतात असे वाटते. 'डॉल्स हाऊस' ची नायिका नवर्‍याला प्रमोशन्स मिळवून देण्यासाठी वरील मार्गाने जाते (आपल्याला भराभर प्रमोशन्स का मिळतात आणि आपली आर्थिक, सामाजिक भरभराट का होते आहे ह्याचा नायकाला संभ्रम पडतो). हे नाटक १९७४ मध्ये वाचले होते. त्यामुळे तपशील चुकण्याची शक्यता आहे पण आशय तोच आहे.

चतुरंग 08/06/2008 - 00:54
नाटकांची ओळख करुन देऊन फार छान लिखाण करत आहात. काय वापरुन काय मिळवायचं ह्यातला विवेक कोणत्याही कारणाने संपला की ह्या नाटकाची कथा सुरु होणार असं वाटतं! मूळ संहिता वाचायला हवी. चतुरंग

दंभकुठार 08/06/2008 - 09:55
अरेच्या !! हॉलिवूडकरांनी इनडिसेंट प्रपोजल नामक सिनेमा सदर मराठी नाटकावरून उचलला होता असे दिसते !!! http://www.imdb.com/title/tt0107211/

आज जे काही समाजात चालले आहे ते पहाता हे नाटक म्हणजे फार मोठी गोष्ट आहे असे मला वाटत नाही. 'पेशव्यांचे विलास जीवन' वाचावे. त्यात जो दुसरा बाजीराव पेशवे, नाना फडनिस यांच्या बद्दलचे उतारे वाचुन मनाला खुप वेदना होतात. दुसरा बाजीराव पेशवे यांनी पण हे केलेले आहे. म्हणजे हा प्रकार म्हणजे बरो बर आहे, असे मी म्हणत नाही. ऐकदा माणुस षड रीपु च्या स्वाधिन झाले तरी कि बाकिचे सगळे क्षुल्लक वाट्ते. ज्या क्षेत्रात ग्लैमर आहे, त्या ठिकाणी असे प्रकार खुप आहेत. ज्या ठिकाणी (उदा. आर & डी) खरोख्रर बुध्दीमत्त्ता लागते अशा ठिकाणी असे प्रकार फारसे नाहीत. मी सुद्धा असे काही प्रकार बघितले आहेत. 'तेरी भी चुप, मेरी भी चुप' हा प्रकार असतो. आणि ह्या प्रकारातली लोक जो पर्यंत सापडत नाही तो पर्यंत खुप संक्रुती रक्षणाच्या घोषणा करतात. बॉस ने अशी मागणी केली कारण त्याला म्हाहीत होते कि कोण मागणी पुर्ण करणार आहे. लोक आधी पाणी किती खोल आहे बघतात आणि मगच पाण्यात उतरतात. हा विषय खुप मोठा आहे, मास्तरांनी हा धागा सुरु केल्या बद्दल धन्यवाद. नाटक परीकक्षण पण चांगले आहे. इतरांच्या प्रतिक्रीयाही आवड्ल्या.
लेखनविषय:
चाहूल चंद्रलेखा प्रकाशित चिरंतन निर्मित दोन अंकी नाटक... चाहूल.. लेखक : प्रशांत दळवी दिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी कलाकार : तुषार दळवी सोनाली कुलकर्णी कथासूत्र : मकरंद आणि माधवी या तथाकथित आधुनिक, शहरी जोडप्याची एका रात्रीत घडणारी ही गोष्ट...मकरंद ऒफ़िसमधून घरी आलाय आणि चिडचिड करतोय , नंतर त्यामागचं कारण असं कळतं की त्याच्या बॊसनं माधवीला एक रात्र त्याच्याबरोबर लोणावळ्याला पाठवण्याची विनंती केलीय... मग एकमेकांवर दोषारोप ( तूच जास्त नटतेस वगैरे आणि ती म्हणते तिथेच त्याला ठणकावून शिव्या देऊन नकार का नाही कळवलास वगैरे)... मग चर्चेलाच तोंड फ़ुटते....

बीबी का मकबरा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

आनंदयात्री 06/06/2008 - 11:13
ओळख बिरुटेसर, अशी पाणचक्की अन इतर एतिहासिक मानदंडांची ओळख करुन द्या पुढील लेखात. धन्यवाद.

मराठी_माणूस 06/06/2008 - 11:20
सुंदर छायाचित्रे या महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानीची कबर आहे. ही कबर औरंगजेबाच्याच काळात बांधलेली आहे असे म्हणतात. परंतु ही प्रतिकृती मलिकाच्या मुलाने आजम शाहने १६७९ इ.स. मध्ये आपल्या आइच्या स्मरणार्थ बनविली आहे. यातले खरे कोणते ?

In reply to by मराठी_माणूस

आनंदयात्री 06/06/2008 - 11:27
अरे जागा हो ! त्यात काही २ वेगवेगळे प्रतिवाद सांगितले नाहित, मुळ कबर म्हणजे जिथे खरेच प्रेत दफन केलेले असते तो चौथारा जेव्हा राबिया दुर्रानी मेली तेव्हाच म्हणजे औरंगजेबाच्या काळातच बांधली गेली अन ते सहाजिक आहे, बाहेरची ताजमहालाची प्रतिकृती मात्र नंतर बांधली/ वाढवली/ अमेंड केली गेली.

खूप वर्षांपूर्वी औरंगाबादला आमची (शाळेची)सहल गेली होती त्याची आठवण करून दिलीत सर.. छान फोटो ! अजून येऊ देत, स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

चित्रा 06/06/2008 - 15:41
मी अगदी लहानपणी औरंगाबादला गेले होते, त्याची आठवण झाली. जास्त आठवण जॅम लावून खाल्लेल्या पावाची! बिबीका मकबरा नावामुळे लक्षात राहिला. आणि अर्थातच अजंठा. बिबी का मकबरा हा सँडस्टोन म्हणजे जयपूर जवळ मिळत असलेल्या दगडातून बनवला आहे असे ऐकले. जर खरेच असे असले आणि खरे तर तो तसाच ठेवला असता तर त्याच्या दगडांची शोभा चांगली दिसली असती. पण मुसलमानी लोकांमध्ये वास्तूंसाठी पांढरा रंग प्रचलित आहे असे एक निरीक्षण. त्यामुळे वरून पांढर्‍या रंगाचे लेप /प्लास्टर लावले असावेत. बाकी लेख छान. अजून येऊ देत.

सहज 06/06/2008 - 12:31
सर फोटो छान आहेत. आता असेच औरंगाबादच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यपुर्ण स्थळे, संस्था, इतिहास अशी एक माहीतीपुर्ण मालीका होऊनच जाउ दे. औरंगाबादची संपुर्ण ओळख करुन द्या सर.

विसोबा खेचर 06/06/2008 - 13:22
वा बिरुटेसाहेब, छोटेखानी परंतु सुंदर लेख.. चित्रमय सफर चित्रांसकट आवडली! :) अजूनही असेच उत्तम लेखन येऊ द्या, ही विनंती! तर आजुबाजुच्या वीटभट्ट्यामुळे ही सुंदर शिल्प काळाचे पडद्याआड जातील असे मात्र राहुन राहुन वाटते. असे खरंच होऊ नये! असो, आपला, तात्या.

राजे 06/06/2008 - 13:23
छोटेखानी परंतु सुंदर लेख.. चित्रमय सफर चित्रांसकट आवडली !!!! अजून काही लेख येऊ देत :) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मन 06/06/2008 - 14:40
अगदि आपल्या गावची आठवण करुन दिलीत दिलीपराव. धन्यवाद. हा फोटु पाह्य्ला.. मन आलं उचंबळुन. लगेच केलय तिकिट बुक आणि पोचतोय दोनेक दिवसात घरी. मग पुन्हा भेट देइनच ऐतिहासिक स्थळांना. आपलाच, मनोबा

प्रियाली 06/06/2008 - 15:05
छोटेखानी लेख आवडला. मी औरंगाबादला कधी भेट दिलेली नाही पण सरांच्या चित्रदर्शी लेखांतून शहराचे उत्तम दर्शन होते. धन्यवाद!

शितल 06/06/2008 - 17:57
छान फोटो आहेत, आणि मी बीबी का मक्बरा पाहिला होता तेव्हा ही मला ते छान वाटला होता प्रत्यक्ष ताजमहाल पहायला मिळाले नाही अजुन पण आ॑नदयात्री म्हणतो तसे पाणीचक्की राहिला ना. औ.बाद शहराला ऐतहासिक महत्व आहे, तुम्हाला खुप फोटो काढता येतील. (अज॑ठा वेरूळ लेणी ,देवगिरी किल्ला )

प्रमोद देव 06/06/2008 - 20:40
देवगिरीचा किल्ला वरील दुवा बिरुटेसाहेबांनी ह्याआधीच लिहिलेल्या लेखाचा आहे. दिलीपराव बिकाम चा हा माहितीपूर्ण लेख आणि त्यामधील मस्त छायाचित्रेही आवडली. झकास!!!!! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

चतुरंग 06/06/2008 - 20:55
सुरेख चित्रे आणि नेटके लेखन पाहून छान उजळणी झाली! लहानपणी सातवी-आठवीत असताना सहल गेलेली त्यानंतर ही वास्तू पाहिलेली नाही. पुन्हा पहायला आवडेल. पाणचक्कीसुधा आठवते आहे. (औरंगाबादेप्रमाणेच अहमदनगरलाही बारा वेशी होत्या त्यातल्या आता फक्त दोन (माळीवाडा वेस आणि दिल्ली दरवाजा) शिल्लक आहेत.) चतुरंग

भाग्यश्री 06/06/2008 - 23:05
कसली मस्त चित्रं आहेत हो.. आणि एकदम मस्त लहानपणची, शाळेची सहल गेली होती,आग्र्याला गेलो होतो, ती आठवण झाली!! लहानपणी औरंगाबादला २-३ वेळा गेले होते, नंतर गेलेच नाही.. आता परत बिबिका मकबरा,दौलताबाद्,अजंठ-वेरूळ करावेसे वाटते आहे.. (औरंगाबादहून मी नेहेमी खड्यांचे आणि कवडीसारखे दिसणारे कानातले - गळ्यातले आणायचे.. भयंकर आवडायचे ते मला.. नंतर एक हरवलं.. :( नाहीतर अजुनपर्यंत घातले असते! अजुन मिळतात का हो? असे पारदर्शी,निळसर मोठा गोल खडा.. आणि आत सोनेरी डिझाईन.. ) असो, बाकी शेवटचे चित्र खूप मस्त घेतलंय!! http://bhagyashreee.blogspot.com/

धनंजय 07/06/2008 - 00:19
फोटोही सुंदर. मी घाईघाईच्या सहलीत बीबी का मकबरा रात्री चंद्रप्रकाशात बघितला. फोटो सगळे बेकार आले, पण त्या प्रकाशातली विलक्षण स्मृतिचित्रे अजून जतन केलेली आहेत.

आता औरंगाबादला भेट द्यायलाच पाहिजे. दौलताबाद किल्ला झाला. बीबी का मकबरा झाला. आण्खै अशीच स्थळे असतीलच. आमच्या भेटीपुर्वी ती येथे आली तर मजा येईल. तरी दोन्ही बाजुने सरुची वृक्ष लावलेली आहेत. याचा अर्थ नीट कळला नाही. सुधीर कांदळकर.

यशोधरा 07/06/2008 - 09:38
सुरेख फोटो, खूप आवडले. हिमरू शालींबद्दल लिहिले नाहीत? बनत नाहीत का आता??

प्रतिक्रिया लिहिणारे, आनंदयात्री,मनोबा ( औरंगाबादचेच) मराठी माणूस, स्वाती,चित्रा,सहज,बेला, तात्या,राजे,मदनबाण,मन,प्रियाली,शितल,मुक्तसुनीत,देवसाहेब, चतुररंग,भाग्यश्री,धनंजय,कांदळकरसाहेब आणि यशोधरा कौतुकाच्या प्रतिक्रियेबद्दल आपले आभार........वाचकांचेही आभार....बीबीका मकब-याच्या निमित्ताने आपल्या आठवणींना उजाळा मिळाला, आनंद वाटला !!! चित्रा(जी) म्हणतात : बिबी का मकबरा हा सँडस्टोन म्हणजे जयपूर जवळ मिळत असलेल्या दगडातून नवला आहे असे ऐकले. जर खरेच असे असले आणि खरे तर तो तसाच ठेवला असता तर त्याच्या दगडांची शोभा चांगली दिसली असती. मिनार तर पांढ-या मातीचेच आहेत.तर काही ठिकाणी दगड वापरले आहेत. मात्र पांढ-या मातीचा वापर असल्यामुळे मिनारला आणि वास्तूलाही तितकी चमक नाही. सहज :औरंगाबादच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यपुर्ण स्थळे, संस्था, इतिहास अशी एक माहीतीपुर्ण मालीका होऊनच जाउ दे. जसे जमेल तसे लिहित असतोच, पण मिपाच्या ध्येय धोरणाचाही विचार करावा लागतो ना ? शशांकच्या गोदामाचा माल इथे उतरवल्यासारखा वाटला :) शितल : पाणीचक्की राहिला ना. पाणचक्कीत सध्या पाणी नाही, आणि ते पाण्यावर फिरणारे जाते तर पाहण्यासही मिळत नाही. पण कधीतरी त्याच्यावरही लेखनी चालवूच. भाग्यश्री : औरंगाबादहून मी नेहेमी खड्यांचे आणि कवडीसारखे दिसणारे कानातले - गळ्यातले आणायचे.. भयंकर आवडायचे ते मला.. नंतर एक हरवलं.. नाहीतर अजुनपर्यंत घातले असते! अजुन मिळतात का हो? बाप रे !!! अवघड प्रश्न विचारला. पण जरा चौकशी करुन सांगतो. कांदळकर साहेब, सुरुची झाडे खाली फुगीर व वर निमुळता अशा मजेदार आकाराचा सरळ उंच वाढत जाणारा शोभीवंत वृक्ष, आम्ही त्याचा सरुची असा उल्लेख केल्यामुळे गोंधळ झाला असावा. यशोधरा : हिमरू शालींबद्दल लिहिले नाहीत? बनत नाहीत का आता?? अजूनही बनतात, त्या बद्दल आम्हालाच लेखनासाठी जरा माहिती गोळा करावी लागेल. प्रियाली : मी औरंगाबादला कधी भेट दिलेली नाही. एकदा याच आपण औरंगाबादला आम्ही मिपाच्या वतीने आपले स्वागत करु,मिपामित्रांना आमचे आग्रहाचे निमंत्रण,जर आलात तर आम्ही आपल्या आदरातिथ्यात कमी पडणार नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 08/06/2008 - 09:24
जसे जमेल तसे लिहित असतोच, पण मिपाच्या ध्येय धोरणाचाही विचार करावा लागतो ना ? शशांकच्या गोदामाचा माल इथे उतरवल्यासारखा वाटला बास काय बिरुटेशेठ! अहो फक्त भाषा, भाषाशास्त्र, व्याकरण, प्रमाणभाषा, शुद्धलेखन याच विषयांवर चर्चा करायला मिपावर बंदी आहे. हे सोडून बाकी तुम्हाला काय लिहायचं ते लिहा की बिनधास्त! कुणाची ना आहे सांगा बरं! :) शिवाय, बोलीभाषेवर लिवा की राव! बोलीभाषेवर लिहायला मिपाची मुळीच ना नाही! आम्हाला चीड आहे ती प्रमाणभाषा, भाषाशास्त्र, व्याकरण, शुद्धलेखन या विषयावर नसती ट्यांव ट्यांव करून दुसर्‍याला तुच्छ लेखणार्‍या मंडळींची. आणि हे विषय निघाले की ह्या मंडळींना चेव चढलाच म्हणून समजा! म्हणूनच केवळ आम्हाला बंदी घालावी लागली आहे, अन्य कारण नाही! शशांकच्या गोदामाचा माल इथे उतरवल्यासारखा वाटला हा हा हा! हरकत नाही. अहो कधी कधी आमच्याही गोदामाचा माल शशांकच्या गोदामात उतरवलात तर चालेल की आम्हाला! शशांक आम्हाला परका नाही, आमचाही तो दोस्तच आहे. भला माणूस! मिपाच्या किंवा नमोगताच्या मालकासारखा हलकट नव्हे! ;) आपला, (मिपाच्या गोदामाचा चौकिदार) तात्या.

झकासराव 07/06/2008 - 21:20
सगळी प्रकाश चित्र छान आहेत. :) माहिती अजुन थोडी हवी होती अस वाटल. अवांतर : वा! आता कधी औरंगाबादची सफर झाली तर हक्काच घरच माणूस आहे दाखवायला सगळ फिरुन :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

झकासराव, प्रकाशचित्राच्या कौतुकाबद्दल आभारी !!! माहिती अजुन थोडी हवी होती अस वाटल. फारच त्रोटक माहिती झाली, याच्याशी सहमत !!! पण भर घालावी तर काय भर घालावी विचार करता, करता लेखन बरेच दिवस पडून होते. पडुन राहण्यापेक्षा लेखन प्रकाशित केलेले बरे असे वाटले. :) अवांतर : वा! आता कधी औरंगाबादची सफर झाली तर हक्काच घरच माणूस आहे दाखवायला सगळ फिरुन नक्की दाखवेन !!! आपले स्वागत आहे.

इनोबा म्हणे 07/06/2008 - 22:19
मस्त काम केले आहे आपण. मला अजूनतरई कधी तिकडे यायचा योग आलेला नाही. पाहूया कधी जमतंय... या महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानीची कबर आहे. ही कबर औरंगजेबाच्याच काळात बांधलेली आहे असे म्हणतात. परंतु ही प्रतिकृती मलिकाच्या मुलाने आजम शाहने १६७९ इ.स. मध्ये आपल्या आइच्या स्मरणार्थ बनविली आहे. हि 'बीबी' कोण? कारण 'बीबी का मकबरा' हे नाव ऐकून तर मला वाटले होते की कुणीतरी आपल्या बायकोची(ताजमहालप्रमाणे)कबर बांधली असावी. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

माझ्या माहितीनुसार 'बिवी' म्हणजे बायको आणि 'बीबी' म्हणजे कोणीही 'स्त्री'. उर्दूचे जाणकार ह्यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.

In reply to by प्रभाकर पेठकर

बीबी म्हणजे 'स्त्री'. हा तुर्की शब्द आणि त्याचा अर्थ आहे, पत्नी, भार्या,कुलवधू. बीवी म्हणजे पत्नी. इथे मात्र एक 'स्त्री' असाच अर्थ अपेक्षीत असावा !!! अर्थात जाणकार काय म्हणतात ? तेही पाहिलं पाहिजे. इनोबा आणि पेठकरसाहेब, प्रतिक्रियेबद्दल आभारी !!!

बिबी का मकबराची छायाचित्रे आणि वर्णन औरंगाबादची ओढ वाढविणारे आहे. एकदा धावती भेट दिली होती ह्या शहराला पण आता मुद्दाम 'औरंगाबाद पाहण्यासाठी' मुहूर्त पाहावा असे मनात आहे. धन्यवाद आणि अभिनंदन बिरूटे साहेब.

बिरूटे साहेब तुम्ही अपलोड केलेली चित्रे सुंदरच आहेत. इतकी की पुढल्या वारीत औरंगाबाद करायचेच असे ठरवून आम्ही अधिक माहिती काढायला सुरवात केली. पण तुमच्या एअरपोर्टचे नांव "चिखलठाणा" असे वाचून उत्साह मावळला.... आयला, तिथेच चिटकून पडलो तर काय करायचं?:)) माझा एक पाव्हणा जालन्याला असतोय त्याला फोन करून माझी शंका विचारली तर ते बेनं खोखो हसायला लागलं. म्हणतंय, की मराठवाडा आधीच दुष्काळी भाग, तिथं चिखलठाण्यात चिखल कुठला असायला? आता मला सांगा, आमी जन्मजात मुंबईकर, आमाला कसं कळायचं हो?:) च्यामारी, जर आसं आहे तर जरा नांव तरी बदला ना विमानतळाचं!:)) ह्.घ्या.

In reply to by पिवळा डांबिस

बिरूटे साहेब तुम्ही अपलोड केलेली चित्रे सुंदरच आहेत. कौतुकानं भारावलोय शेठ....!!! इतकी की पुढल्या वारीत औरंगाबाद करायचेच असे ठरवून आम्ही अधिक माहिती काढायला सुरवात केली. अरे, नक्की या !!! अजून दोन- तीन पाऊस होऊ द्या, डोगंरांवर हिरवे गालिचे दिसू द्या , फीर देखो हमारे शहर का नजारा.......!!! पण तुमच्या एअरपोर्टचे नांव "चिखलठाणा" असे वाचून उत्साह मावळला.... आयला, तिथेच चिटकून पडलो तर काय करायचं? हाहाहाहा =)) मराठवाडा आधीच दुष्काळी भाग, तिथं चिखलठाण्यात चिखल कुठला असायला? पाव्हण्यानं बाकी दुष्काळाचं खरं सांगितलं !!! असतं एक एकाचं दुर्दैव बाकी काय :( च्यामारी, जर आसं आहे तर जरा नांव तरी बदला ना विमानतळाचं! डांबिसराव, आमचं विमानतळ आता फार मोट्ठं होणार आहे, ते काम पुर्ण झाल्यावर कोणत्या तरी राजकारणी माणसाला नामांतराची आठवण येईलच, तेव्हा त्याची फिकीर करु नका ते बदलेल असे वाटते.

गमत्या 10/06/2008 - 21:05
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, मि देखील औरंगाबादचाच आहे. परंतु कामाच्या व्यापामुळे जास्त प्रतिक्रिया लिहीत नाही. पण वाचन मात्र चालु असते. आपण लिहीलेला लेख अतिशय सुंदर आणि माहिती पुर्ण आहे. औरंगाबादला आल्यावर आपल्याला जरुर भेटेल............... (औरंगाबादचा) गमत्या

In reply to by गमत्या

औरंगाबादच्या गमत्याची भेट झाली आनंद वाटला !!! :) परंतु कामाच्या व्यापामुळे जास्त प्रतिक्रिया लिहीत नाही. पण वाचन मात्र चालु असते. अरे, दोस्ता प्रतिक्रिया लिहिल्या पाहिजे म्हणजे लिहिणा-याचा उत्साह वाढतो. औरंगाबादला आल्यावर आपल्याला जरुर भेटेल............... अरे, साहेब !! केव्हाही भेटा हजर असेन !!!

विकास 11/06/2008 - 00:56
व्यस्त असल्याने जरा गुमान होतो,नंतर वाचायला लागलो तेंव्हा म्हणलं बिरूटे साहेबांचा लेख म्हणजे वाद घालायला स्कोप नाही, म्हणून अंमळ उशीरा वाचला ;) आत्ताच आपला लेख वाचला. फोटू एकदम आवडले. लहानपणी शाळेच्या सहलीबरोबर आणि नंतर अजून एकदा घरच्यांबरोबर औरंगाबादेला गेलो होतो तेंव्हाची आठवण झाली. या बिविका मकबर्‍यापाशीच पाणचक्की आहे ना? विकास

मनस्वी 11/06/2008 - 11:18
बिरुटेसर माहितीपूर्ण सचित्र लेख आवडला. अजूनही आवडेल बसल्या बसल्या औरंगाबाद हिंडायला :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसुनाना 11/06/2008 - 12:09
परवाच (म्हणजे जानेवारीत) औरंगाबाद सहल केली होती. त्या आठवणींना उजाळा मिळाला. बिबी का मकबरा खरेच सुंदर आहे. (त्याची तुलना ताजमहालाशी करू नये. पण निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर ही इमारत फारच आकर्षक दिसते हे निर्विवाद सत्य आहे.) बिरुटेसाहेब, अजिंठा, वेरूळ, बिबी-का-मकबरा, दौलताबादचा किल्ला, पैठण अशा अनेक प्रेक्षणीय स्थळांच्या सान्निध्यात तुम्ही राहता. भाग्यवान आहात. अजिंठा आणि वेरूळ तर संपूर्ण आयुष्य निछावर करावे अशी स्थळे आहेत. पण तुम्ही म्हणता तसे पाणचक्की पाण्याविना नेहमी बंद असते आणि जाते दिसत नाही ही गोष्ट खरी नाही. कदाचित उन्हाळ्यात पाणी नसेल. पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात चक्की फिरते, कारंजे उडते आणि जातेही शाबूत आहे. मी पाहिले आहे. हे पहा - मी काढलेला सूर्यप्रकाशात न्हाऊन निघणार्‍या बीबी-का-मकबर्‍याचा फोटू - आणि मकबर्‍याच्या आत -

काय सुरेख फोटो काढले आहेत, अहो, आम्ही आपलीच वाट पाहात होतो. आपण काढलेली सुरेख छायाचित्रे आम्ही पाहिलेली होतीच आता आमच्या भ्रमनध्वनीच्या कॅमे-याने आपल्याइतके सुंदर फोटो थोडे काढता येतील आम्हाला :( पण तुम्ही म्हणता तसे पाणचक्की पाण्याविना नेहमी बंद असते आणि जाते दिसत नाही ही गोष्ट खरी नाही. बंद असते असे आम्ही कुठे म्हटले आहे ? पाण्यावर फिरणारे जाते म्हणजे पाण्याच्या दाबाने फिरतांना दिसणारे जाते ? केवळ दिसणे म्हणजे फिरणे नाही ना ! काय म्हणता ? नहरीमधून येणारे पाणी फक्त पावसळ्यात पाहण्यास मिळते त्यात आपल्याही छायाचित्रात नहरीतून पडलेले पाणी दिसत नाही. पाणचक्की सतत उघडीच असते :) बाकी आपले छायाचित्र सुरेख आहेत, आम्ही डकवलेली छायाचित्रे सरपंचाना सांगुन काढावेत असे वाटत आहे :? :) ( थोड्याच दिवसात नहरीतून पडणा-या पाणचक्कीचे फोटो डकवतो ) बिरुटेसाहेब, अजिंठा, वेरूळ, बिबी-का-मकबरा, दौलताबादचा किल्ला, पैठण अशा अनेक प्रेक्षणीय स्थळांच्या सान्निध्यात तुम्ही राहता. भाग्यवान आहात. अजिंठा आणि वेरूळ तर संपूर्ण आयुष्य निछावर करावे अशी स्थळे आहेत. हाहाहाहा भाग्यवान तर आहोतच आम्ही, आमची भुमीच मुळी संताची आणि ऐतिहासिक वारसा सांगणारी. आमच्यात दिसतात की नाही संताचे आणि आमच्या मातीचे गुण ? :( प्रतिक्रियेबद्दल, फोटो डकवल्याबद्दलही आभार !! विकासराव, मनस्वी, आपल्याही प्रतिक्रियेबद्दल आभार !!!

विसुनाना 11/06/2008 - 12:58
बिरुटेसर, तुमचे अजिंठा-वेरुळाचे सौंदर्य उलगडणारे लेख लवकर यावेत ही अपेक्षा आहे. शिवाय चक्रधर स्वामींबद्दलही ललित लेख लिहिल्यास उत्तम. आमची भुमीच मुळी संताची आणि ऐतिहासिक वारसा सांगणारी. आमच्यात दिसतात की नाही संताचे आणि आमच्या मातीचे गुण ? अर्थातच! बिरुटे सर, तुमची मायमराठीबद्दलची कळकळ ज्ञानेश्वर, एकनाथांचा वारसा सांगते. आणि महाराष्ट्राच्या भाषिक संस्कृतीचा तुमचा अभ्यास भल्याभल्यांना लाजवणारा आहे. पाणचक्की केवळ दिसणे म्हणजे फिरणे नाही ना ! काय म्हणता ? नाही हो. मी पाणचक्कीची पाती आणि जाते दोन्ही पाण्याच्या दाबाने फिरताना पाहिली आहेत. त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. कधी सवड मिळाली तर जालावर चढवीन. असो. आम्ही डकवलेली छायाचित्रे सरपंचाना सांगुन काढावेत असे वाटत आहे . -नको, नको. तसे झाले तर मूळ लेखाला बाध येईल. त्यापरास माझीच प्रकाशचित्रे उडवता येतील. :)

In reply to by विसुनाना

नाही हो. मी पाणचक्कीची पाती आणि जाते दोन्ही पाण्याच्या दाबाने फिरताना पाहिली आहेत. त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. कधी सवड मिळाली तर जालावर चढवीन. असो खरच मी आतापर्यंत जाते फिरतांना पाहिलेलेच नाही. पण आपण पाहिलीत यावर माझा विश्वास आहे. आता पुढल्या वेळेला जाईन तेव्हा ते काळजीपुर्वक पाहीन !!! स्वगत : औरंगाबादला राहुन आपल्याला मित्र माहिती सांगतो की पाणचक्कीचे जाते फिरते, या पेक्षा नामुष्की कोणती :) अर्थातच! बिरुटे सर, तुमची मायमराठीबद्दलची कळकळ ज्ञानेश्वर, एकनाथांचा वारसा सांगते. आणि महाराष्ट्राच्या भाषिक संस्कृतीचा तुमचा अभ्यास भल्याभल्यांना लाजवणारा आहे. खेचा भो खेचा गरीबाची !!! :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास 11/06/2008 - 20:39
खरच मी आतापर्यंत जाते फिरतांना पाहिलेलेच नाही. पण आपण पाहिलीत यावर माझा विश्वास आहे. आता पुढल्या वेळेला जाईन तेव्हा ते काळजीपुर्वक पाहीन !!! ही पाणचक्की मी माझ्या दोन्ही प्रवासात चालू असताना पाहील्याचे चांगले लक्षात आहे.

गणा मास्तर 13/06/2008 - 12:26
लेख आवडला. औरंगबादेस जाणे झाले होते पण बीबीका मकबरा पाहणे राहुन गेले. परत कधी गेलो तर नक्की पाहीन.

ऋचा 13/06/2008 - 12:30
मी खुप लहानपणी गेलेले चित्र पाहुन आठवणी जाग्या झाल्या "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

काळा_पहाड 13/06/2008 - 15:02
लहानपणी शाळेच्या सहलीत "बीबीका मकबरा" आणि "पानचक्की" बघितल्याचे आठवते. बिरुटेसरांनी त्या आठवणी जागविल्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. मात्र आता औरंगाबादला गेल्यावर पुन्हा जाईन म्हणतो. काळा पहाड

प्रचेतस 29/10/2015 - 21:08
सरांनी ह्यावर लेखन केलेलं माहितच नव्हतं. खुद्द सरांबरोबरच ह्या वास्तूची दोनेक वर्षापूर्वी भेट झाली होती. प्रांगणात बसून अगदी निवांत गप्पा झाल्या होत्या.

आनंदयात्री 06/06/2008 - 11:13
ओळख बिरुटेसर, अशी पाणचक्की अन इतर एतिहासिक मानदंडांची ओळख करुन द्या पुढील लेखात. धन्यवाद.

मराठी_माणूस 06/06/2008 - 11:20
सुंदर छायाचित्रे या महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानीची कबर आहे. ही कबर औरंगजेबाच्याच काळात बांधलेली आहे असे म्हणतात. परंतु ही प्रतिकृती मलिकाच्या मुलाने आजम शाहने १६७९ इ.स. मध्ये आपल्या आइच्या स्मरणार्थ बनविली आहे. यातले खरे कोणते ?

In reply to by मराठी_माणूस

आनंदयात्री 06/06/2008 - 11:27
अरे जागा हो ! त्यात काही २ वेगवेगळे प्रतिवाद सांगितले नाहित, मुळ कबर म्हणजे जिथे खरेच प्रेत दफन केलेले असते तो चौथारा जेव्हा राबिया दुर्रानी मेली तेव्हाच म्हणजे औरंगजेबाच्या काळातच बांधली गेली अन ते सहाजिक आहे, बाहेरची ताजमहालाची प्रतिकृती मात्र नंतर बांधली/ वाढवली/ अमेंड केली गेली.

खूप वर्षांपूर्वी औरंगाबादला आमची (शाळेची)सहल गेली होती त्याची आठवण करून दिलीत सर.. छान फोटो ! अजून येऊ देत, स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

चित्रा 06/06/2008 - 15:41
मी अगदी लहानपणी औरंगाबादला गेले होते, त्याची आठवण झाली. जास्त आठवण जॅम लावून खाल्लेल्या पावाची! बिबीका मकबरा नावामुळे लक्षात राहिला. आणि अर्थातच अजंठा. बिबी का मकबरा हा सँडस्टोन म्हणजे जयपूर जवळ मिळत असलेल्या दगडातून बनवला आहे असे ऐकले. जर खरेच असे असले आणि खरे तर तो तसाच ठेवला असता तर त्याच्या दगडांची शोभा चांगली दिसली असती. पण मुसलमानी लोकांमध्ये वास्तूंसाठी पांढरा रंग प्रचलित आहे असे एक निरीक्षण. त्यामुळे वरून पांढर्‍या रंगाचे लेप /प्लास्टर लावले असावेत. बाकी लेख छान. अजून येऊ देत.

सहज 06/06/2008 - 12:31
सर फोटो छान आहेत. आता असेच औरंगाबादच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यपुर्ण स्थळे, संस्था, इतिहास अशी एक माहीतीपुर्ण मालीका होऊनच जाउ दे. औरंगाबादची संपुर्ण ओळख करुन द्या सर.

विसोबा खेचर 06/06/2008 - 13:22
वा बिरुटेसाहेब, छोटेखानी परंतु सुंदर लेख.. चित्रमय सफर चित्रांसकट आवडली! :) अजूनही असेच उत्तम लेखन येऊ द्या, ही विनंती! तर आजुबाजुच्या वीटभट्ट्यामुळे ही सुंदर शिल्प काळाचे पडद्याआड जातील असे मात्र राहुन राहुन वाटते. असे खरंच होऊ नये! असो, आपला, तात्या.

राजे 06/06/2008 - 13:23
छोटेखानी परंतु सुंदर लेख.. चित्रमय सफर चित्रांसकट आवडली !!!! अजून काही लेख येऊ देत :) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मन 06/06/2008 - 14:40
अगदि आपल्या गावची आठवण करुन दिलीत दिलीपराव. धन्यवाद. हा फोटु पाह्य्ला.. मन आलं उचंबळुन. लगेच केलय तिकिट बुक आणि पोचतोय दोनेक दिवसात घरी. मग पुन्हा भेट देइनच ऐतिहासिक स्थळांना. आपलाच, मनोबा

प्रियाली 06/06/2008 - 15:05
छोटेखानी लेख आवडला. मी औरंगाबादला कधी भेट दिलेली नाही पण सरांच्या चित्रदर्शी लेखांतून शहराचे उत्तम दर्शन होते. धन्यवाद!

शितल 06/06/2008 - 17:57
छान फोटो आहेत, आणि मी बीबी का मक्बरा पाहिला होता तेव्हा ही मला ते छान वाटला होता प्रत्यक्ष ताजमहाल पहायला मिळाले नाही अजुन पण आ॑नदयात्री म्हणतो तसे पाणीचक्की राहिला ना. औ.बाद शहराला ऐतहासिक महत्व आहे, तुम्हाला खुप फोटो काढता येतील. (अज॑ठा वेरूळ लेणी ,देवगिरी किल्ला )

प्रमोद देव 06/06/2008 - 20:40
देवगिरीचा किल्ला वरील दुवा बिरुटेसाहेबांनी ह्याआधीच लिहिलेल्या लेखाचा आहे. दिलीपराव बिकाम चा हा माहितीपूर्ण लेख आणि त्यामधील मस्त छायाचित्रेही आवडली. झकास!!!!! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

चतुरंग 06/06/2008 - 20:55
सुरेख चित्रे आणि नेटके लेखन पाहून छान उजळणी झाली! लहानपणी सातवी-आठवीत असताना सहल गेलेली त्यानंतर ही वास्तू पाहिलेली नाही. पुन्हा पहायला आवडेल. पाणचक्कीसुधा आठवते आहे. (औरंगाबादेप्रमाणेच अहमदनगरलाही बारा वेशी होत्या त्यातल्या आता फक्त दोन (माळीवाडा वेस आणि दिल्ली दरवाजा) शिल्लक आहेत.) चतुरंग

भाग्यश्री 06/06/2008 - 23:05
कसली मस्त चित्रं आहेत हो.. आणि एकदम मस्त लहानपणची, शाळेची सहल गेली होती,आग्र्याला गेलो होतो, ती आठवण झाली!! लहानपणी औरंगाबादला २-३ वेळा गेले होते, नंतर गेलेच नाही.. आता परत बिबिका मकबरा,दौलताबाद्,अजंठ-वेरूळ करावेसे वाटते आहे.. (औरंगाबादहून मी नेहेमी खड्यांचे आणि कवडीसारखे दिसणारे कानातले - गळ्यातले आणायचे.. भयंकर आवडायचे ते मला.. नंतर एक हरवलं.. :( नाहीतर अजुनपर्यंत घातले असते! अजुन मिळतात का हो? असे पारदर्शी,निळसर मोठा गोल खडा.. आणि आत सोनेरी डिझाईन.. ) असो, बाकी शेवटचे चित्र खूप मस्त घेतलंय!! http://bhagyashreee.blogspot.com/

धनंजय 07/06/2008 - 00:19
फोटोही सुंदर. मी घाईघाईच्या सहलीत बीबी का मकबरा रात्री चंद्रप्रकाशात बघितला. फोटो सगळे बेकार आले, पण त्या प्रकाशातली विलक्षण स्मृतिचित्रे अजून जतन केलेली आहेत.

आता औरंगाबादला भेट द्यायलाच पाहिजे. दौलताबाद किल्ला झाला. बीबी का मकबरा झाला. आण्खै अशीच स्थळे असतीलच. आमच्या भेटीपुर्वी ती येथे आली तर मजा येईल. तरी दोन्ही बाजुने सरुची वृक्ष लावलेली आहेत. याचा अर्थ नीट कळला नाही. सुधीर कांदळकर.

यशोधरा 07/06/2008 - 09:38
सुरेख फोटो, खूप आवडले. हिमरू शालींबद्दल लिहिले नाहीत? बनत नाहीत का आता??

प्रतिक्रिया लिहिणारे, आनंदयात्री,मनोबा ( औरंगाबादचेच) मराठी माणूस, स्वाती,चित्रा,सहज,बेला, तात्या,राजे,मदनबाण,मन,प्रियाली,शितल,मुक्तसुनीत,देवसाहेब, चतुररंग,भाग्यश्री,धनंजय,कांदळकरसाहेब आणि यशोधरा कौतुकाच्या प्रतिक्रियेबद्दल आपले आभार........वाचकांचेही आभार....बीबीका मकब-याच्या निमित्ताने आपल्या आठवणींना उजाळा मिळाला, आनंद वाटला !!! चित्रा(जी) म्हणतात : बिबी का मकबरा हा सँडस्टोन म्हणजे जयपूर जवळ मिळत असलेल्या दगडातून नवला आहे असे ऐकले. जर खरेच असे असले आणि खरे तर तो तसाच ठेवला असता तर त्याच्या दगडांची शोभा चांगली दिसली असती. मिनार तर पांढ-या मातीचेच आहेत.तर काही ठिकाणी दगड वापरले आहेत. मात्र पांढ-या मातीचा वापर असल्यामुळे मिनारला आणि वास्तूलाही तितकी चमक नाही. सहज :औरंगाबादच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यपुर्ण स्थळे, संस्था, इतिहास अशी एक माहीतीपुर्ण मालीका होऊनच जाउ दे. जसे जमेल तसे लिहित असतोच, पण मिपाच्या ध्येय धोरणाचाही विचार करावा लागतो ना ? शशांकच्या गोदामाचा माल इथे उतरवल्यासारखा वाटला :) शितल : पाणीचक्की राहिला ना. पाणचक्कीत सध्या पाणी नाही, आणि ते पाण्यावर फिरणारे जाते तर पाहण्यासही मिळत नाही. पण कधीतरी त्याच्यावरही लेखनी चालवूच. भाग्यश्री : औरंगाबादहून मी नेहेमी खड्यांचे आणि कवडीसारखे दिसणारे कानातले - गळ्यातले आणायचे.. भयंकर आवडायचे ते मला.. नंतर एक हरवलं.. नाहीतर अजुनपर्यंत घातले असते! अजुन मिळतात का हो? बाप रे !!! अवघड प्रश्न विचारला. पण जरा चौकशी करुन सांगतो. कांदळकर साहेब, सुरुची झाडे खाली फुगीर व वर निमुळता अशा मजेदार आकाराचा सरळ उंच वाढत जाणारा शोभीवंत वृक्ष, आम्ही त्याचा सरुची असा उल्लेख केल्यामुळे गोंधळ झाला असावा. यशोधरा : हिमरू शालींबद्दल लिहिले नाहीत? बनत नाहीत का आता?? अजूनही बनतात, त्या बद्दल आम्हालाच लेखनासाठी जरा माहिती गोळा करावी लागेल. प्रियाली : मी औरंगाबादला कधी भेट दिलेली नाही. एकदा याच आपण औरंगाबादला आम्ही मिपाच्या वतीने आपले स्वागत करु,मिपामित्रांना आमचे आग्रहाचे निमंत्रण,जर आलात तर आम्ही आपल्या आदरातिथ्यात कमी पडणार नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 08/06/2008 - 09:24
जसे जमेल तसे लिहित असतोच, पण मिपाच्या ध्येय धोरणाचाही विचार करावा लागतो ना ? शशांकच्या गोदामाचा माल इथे उतरवल्यासारखा वाटला बास काय बिरुटेशेठ! अहो फक्त भाषा, भाषाशास्त्र, व्याकरण, प्रमाणभाषा, शुद्धलेखन याच विषयांवर चर्चा करायला मिपावर बंदी आहे. हे सोडून बाकी तुम्हाला काय लिहायचं ते लिहा की बिनधास्त! कुणाची ना आहे सांगा बरं! :) शिवाय, बोलीभाषेवर लिवा की राव! बोलीभाषेवर लिहायला मिपाची मुळीच ना नाही! आम्हाला चीड आहे ती प्रमाणभाषा, भाषाशास्त्र, व्याकरण, शुद्धलेखन या विषयावर नसती ट्यांव ट्यांव करून दुसर्‍याला तुच्छ लेखणार्‍या मंडळींची. आणि हे विषय निघाले की ह्या मंडळींना चेव चढलाच म्हणून समजा! म्हणूनच केवळ आम्हाला बंदी घालावी लागली आहे, अन्य कारण नाही! शशांकच्या गोदामाचा माल इथे उतरवल्यासारखा वाटला हा हा हा! हरकत नाही. अहो कधी कधी आमच्याही गोदामाचा माल शशांकच्या गोदामात उतरवलात तर चालेल की आम्हाला! शशांक आम्हाला परका नाही, आमचाही तो दोस्तच आहे. भला माणूस! मिपाच्या किंवा नमोगताच्या मालकासारखा हलकट नव्हे! ;) आपला, (मिपाच्या गोदामाचा चौकिदार) तात्या.

झकासराव 07/06/2008 - 21:20
सगळी प्रकाश चित्र छान आहेत. :) माहिती अजुन थोडी हवी होती अस वाटल. अवांतर : वा! आता कधी औरंगाबादची सफर झाली तर हक्काच घरच माणूस आहे दाखवायला सगळ फिरुन :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

झकासराव, प्रकाशचित्राच्या कौतुकाबद्दल आभारी !!! माहिती अजुन थोडी हवी होती अस वाटल. फारच त्रोटक माहिती झाली, याच्याशी सहमत !!! पण भर घालावी तर काय भर घालावी विचार करता, करता लेखन बरेच दिवस पडून होते. पडुन राहण्यापेक्षा लेखन प्रकाशित केलेले बरे असे वाटले. :) अवांतर : वा! आता कधी औरंगाबादची सफर झाली तर हक्काच घरच माणूस आहे दाखवायला सगळ फिरुन नक्की दाखवेन !!! आपले स्वागत आहे.

इनोबा म्हणे 07/06/2008 - 22:19
मस्त काम केले आहे आपण. मला अजूनतरई कधी तिकडे यायचा योग आलेला नाही. पाहूया कधी जमतंय... या महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानीची कबर आहे. ही कबर औरंगजेबाच्याच काळात बांधलेली आहे असे म्हणतात. परंतु ही प्रतिकृती मलिकाच्या मुलाने आजम शाहने १६७९ इ.स. मध्ये आपल्या आइच्या स्मरणार्थ बनविली आहे. हि 'बीबी' कोण? कारण 'बीबी का मकबरा' हे नाव ऐकून तर मला वाटले होते की कुणीतरी आपल्या बायकोची(ताजमहालप्रमाणे)कबर बांधली असावी. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

माझ्या माहितीनुसार 'बिवी' म्हणजे बायको आणि 'बीबी' म्हणजे कोणीही 'स्त्री'. उर्दूचे जाणकार ह्यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.

In reply to by प्रभाकर पेठकर

बीबी म्हणजे 'स्त्री'. हा तुर्की शब्द आणि त्याचा अर्थ आहे, पत्नी, भार्या,कुलवधू. बीवी म्हणजे पत्नी. इथे मात्र एक 'स्त्री' असाच अर्थ अपेक्षीत असावा !!! अर्थात जाणकार काय म्हणतात ? तेही पाहिलं पाहिजे. इनोबा आणि पेठकरसाहेब, प्रतिक्रियेबद्दल आभारी !!!

बिबी का मकबराची छायाचित्रे आणि वर्णन औरंगाबादची ओढ वाढविणारे आहे. एकदा धावती भेट दिली होती ह्या शहराला पण आता मुद्दाम 'औरंगाबाद पाहण्यासाठी' मुहूर्त पाहावा असे मनात आहे. धन्यवाद आणि अभिनंदन बिरूटे साहेब.

बिरूटे साहेब तुम्ही अपलोड केलेली चित्रे सुंदरच आहेत. इतकी की पुढल्या वारीत औरंगाबाद करायचेच असे ठरवून आम्ही अधिक माहिती काढायला सुरवात केली. पण तुमच्या एअरपोर्टचे नांव "चिखलठाणा" असे वाचून उत्साह मावळला.... आयला, तिथेच चिटकून पडलो तर काय करायचं?:)) माझा एक पाव्हणा जालन्याला असतोय त्याला फोन करून माझी शंका विचारली तर ते बेनं खोखो हसायला लागलं. म्हणतंय, की मराठवाडा आधीच दुष्काळी भाग, तिथं चिखलठाण्यात चिखल कुठला असायला? आता मला सांगा, आमी जन्मजात मुंबईकर, आमाला कसं कळायचं हो?:) च्यामारी, जर आसं आहे तर जरा नांव तरी बदला ना विमानतळाचं!:)) ह्.घ्या.

In reply to by पिवळा डांबिस

बिरूटे साहेब तुम्ही अपलोड केलेली चित्रे सुंदरच आहेत. कौतुकानं भारावलोय शेठ....!!! इतकी की पुढल्या वारीत औरंगाबाद करायचेच असे ठरवून आम्ही अधिक माहिती काढायला सुरवात केली. अरे, नक्की या !!! अजून दोन- तीन पाऊस होऊ द्या, डोगंरांवर हिरवे गालिचे दिसू द्या , फीर देखो हमारे शहर का नजारा.......!!! पण तुमच्या एअरपोर्टचे नांव "चिखलठाणा" असे वाचून उत्साह मावळला.... आयला, तिथेच चिटकून पडलो तर काय करायचं? हाहाहाहा =)) मराठवाडा आधीच दुष्काळी भाग, तिथं चिखलठाण्यात चिखल कुठला असायला? पाव्हण्यानं बाकी दुष्काळाचं खरं सांगितलं !!! असतं एक एकाचं दुर्दैव बाकी काय :( च्यामारी, जर आसं आहे तर जरा नांव तरी बदला ना विमानतळाचं! डांबिसराव, आमचं विमानतळ आता फार मोट्ठं होणार आहे, ते काम पुर्ण झाल्यावर कोणत्या तरी राजकारणी माणसाला नामांतराची आठवण येईलच, तेव्हा त्याची फिकीर करु नका ते बदलेल असे वाटते.

गमत्या 10/06/2008 - 21:05
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, मि देखील औरंगाबादचाच आहे. परंतु कामाच्या व्यापामुळे जास्त प्रतिक्रिया लिहीत नाही. पण वाचन मात्र चालु असते. आपण लिहीलेला लेख अतिशय सुंदर आणि माहिती पुर्ण आहे. औरंगाबादला आल्यावर आपल्याला जरुर भेटेल............... (औरंगाबादचा) गमत्या

In reply to by गमत्या

औरंगाबादच्या गमत्याची भेट झाली आनंद वाटला !!! :) परंतु कामाच्या व्यापामुळे जास्त प्रतिक्रिया लिहीत नाही. पण वाचन मात्र चालु असते. अरे, दोस्ता प्रतिक्रिया लिहिल्या पाहिजे म्हणजे लिहिणा-याचा उत्साह वाढतो. औरंगाबादला आल्यावर आपल्याला जरुर भेटेल............... अरे, साहेब !! केव्हाही भेटा हजर असेन !!!

विकास 11/06/2008 - 00:56
व्यस्त असल्याने जरा गुमान होतो,नंतर वाचायला लागलो तेंव्हा म्हणलं बिरूटे साहेबांचा लेख म्हणजे वाद घालायला स्कोप नाही, म्हणून अंमळ उशीरा वाचला ;) आत्ताच आपला लेख वाचला. फोटू एकदम आवडले. लहानपणी शाळेच्या सहलीबरोबर आणि नंतर अजून एकदा घरच्यांबरोबर औरंगाबादेला गेलो होतो तेंव्हाची आठवण झाली. या बिविका मकबर्‍यापाशीच पाणचक्की आहे ना? विकास

मनस्वी 11/06/2008 - 11:18
बिरुटेसर माहितीपूर्ण सचित्र लेख आवडला. अजूनही आवडेल बसल्या बसल्या औरंगाबाद हिंडायला :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसुनाना 11/06/2008 - 12:09
परवाच (म्हणजे जानेवारीत) औरंगाबाद सहल केली होती. त्या आठवणींना उजाळा मिळाला. बिबी का मकबरा खरेच सुंदर आहे. (त्याची तुलना ताजमहालाशी करू नये. पण निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर ही इमारत फारच आकर्षक दिसते हे निर्विवाद सत्य आहे.) बिरुटेसाहेब, अजिंठा, वेरूळ, बिबी-का-मकबरा, दौलताबादचा किल्ला, पैठण अशा अनेक प्रेक्षणीय स्थळांच्या सान्निध्यात तुम्ही राहता. भाग्यवान आहात. अजिंठा आणि वेरूळ तर संपूर्ण आयुष्य निछावर करावे अशी स्थळे आहेत. पण तुम्ही म्हणता तसे पाणचक्की पाण्याविना नेहमी बंद असते आणि जाते दिसत नाही ही गोष्ट खरी नाही. कदाचित उन्हाळ्यात पाणी नसेल. पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात चक्की फिरते, कारंजे उडते आणि जातेही शाबूत आहे. मी पाहिले आहे. हे पहा - मी काढलेला सूर्यप्रकाशात न्हाऊन निघणार्‍या बीबी-का-मकबर्‍याचा फोटू - आणि मकबर्‍याच्या आत -

काय सुरेख फोटो काढले आहेत, अहो, आम्ही आपलीच वाट पाहात होतो. आपण काढलेली सुरेख छायाचित्रे आम्ही पाहिलेली होतीच आता आमच्या भ्रमनध्वनीच्या कॅमे-याने आपल्याइतके सुंदर फोटो थोडे काढता येतील आम्हाला :( पण तुम्ही म्हणता तसे पाणचक्की पाण्याविना नेहमी बंद असते आणि जाते दिसत नाही ही गोष्ट खरी नाही. बंद असते असे आम्ही कुठे म्हटले आहे ? पाण्यावर फिरणारे जाते म्हणजे पाण्याच्या दाबाने फिरतांना दिसणारे जाते ? केवळ दिसणे म्हणजे फिरणे नाही ना ! काय म्हणता ? नहरीमधून येणारे पाणी फक्त पावसळ्यात पाहण्यास मिळते त्यात आपल्याही छायाचित्रात नहरीतून पडलेले पाणी दिसत नाही. पाणचक्की सतत उघडीच असते :) बाकी आपले छायाचित्र सुरेख आहेत, आम्ही डकवलेली छायाचित्रे सरपंचाना सांगुन काढावेत असे वाटत आहे :? :) ( थोड्याच दिवसात नहरीतून पडणा-या पाणचक्कीचे फोटो डकवतो ) बिरुटेसाहेब, अजिंठा, वेरूळ, बिबी-का-मकबरा, दौलताबादचा किल्ला, पैठण अशा अनेक प्रेक्षणीय स्थळांच्या सान्निध्यात तुम्ही राहता. भाग्यवान आहात. अजिंठा आणि वेरूळ तर संपूर्ण आयुष्य निछावर करावे अशी स्थळे आहेत. हाहाहाहा भाग्यवान तर आहोतच आम्ही, आमची भुमीच मुळी संताची आणि ऐतिहासिक वारसा सांगणारी. आमच्यात दिसतात की नाही संताचे आणि आमच्या मातीचे गुण ? :( प्रतिक्रियेबद्दल, फोटो डकवल्याबद्दलही आभार !! विकासराव, मनस्वी, आपल्याही प्रतिक्रियेबद्दल आभार !!!

विसुनाना 11/06/2008 - 12:58
बिरुटेसर, तुमचे अजिंठा-वेरुळाचे सौंदर्य उलगडणारे लेख लवकर यावेत ही अपेक्षा आहे. शिवाय चक्रधर स्वामींबद्दलही ललित लेख लिहिल्यास उत्तम. आमची भुमीच मुळी संताची आणि ऐतिहासिक वारसा सांगणारी. आमच्यात दिसतात की नाही संताचे आणि आमच्या मातीचे गुण ? अर्थातच! बिरुटे सर, तुमची मायमराठीबद्दलची कळकळ ज्ञानेश्वर, एकनाथांचा वारसा सांगते. आणि महाराष्ट्राच्या भाषिक संस्कृतीचा तुमचा अभ्यास भल्याभल्यांना लाजवणारा आहे. पाणचक्की केवळ दिसणे म्हणजे फिरणे नाही ना ! काय म्हणता ? नाही हो. मी पाणचक्कीची पाती आणि जाते दोन्ही पाण्याच्या दाबाने फिरताना पाहिली आहेत. त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. कधी सवड मिळाली तर जालावर चढवीन. असो. आम्ही डकवलेली छायाचित्रे सरपंचाना सांगुन काढावेत असे वाटत आहे . -नको, नको. तसे झाले तर मूळ लेखाला बाध येईल. त्यापरास माझीच प्रकाशचित्रे उडवता येतील. :)

In reply to by विसुनाना

नाही हो. मी पाणचक्कीची पाती आणि जाते दोन्ही पाण्याच्या दाबाने फिरताना पाहिली आहेत. त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. कधी सवड मिळाली तर जालावर चढवीन. असो खरच मी आतापर्यंत जाते फिरतांना पाहिलेलेच नाही. पण आपण पाहिलीत यावर माझा विश्वास आहे. आता पुढल्या वेळेला जाईन तेव्हा ते काळजीपुर्वक पाहीन !!! स्वगत : औरंगाबादला राहुन आपल्याला मित्र माहिती सांगतो की पाणचक्कीचे जाते फिरते, या पेक्षा नामुष्की कोणती :) अर्थातच! बिरुटे सर, तुमची मायमराठीबद्दलची कळकळ ज्ञानेश्वर, एकनाथांचा वारसा सांगते. आणि महाराष्ट्राच्या भाषिक संस्कृतीचा तुमचा अभ्यास भल्याभल्यांना लाजवणारा आहे. खेचा भो खेचा गरीबाची !!! :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास 11/06/2008 - 20:39
खरच मी आतापर्यंत जाते फिरतांना पाहिलेलेच नाही. पण आपण पाहिलीत यावर माझा विश्वास आहे. आता पुढल्या वेळेला जाईन तेव्हा ते काळजीपुर्वक पाहीन !!! ही पाणचक्की मी माझ्या दोन्ही प्रवासात चालू असताना पाहील्याचे चांगले लक्षात आहे.

गणा मास्तर 13/06/2008 - 12:26
लेख आवडला. औरंगबादेस जाणे झाले होते पण बीबीका मकबरा पाहणे राहुन गेले. परत कधी गेलो तर नक्की पाहीन.

ऋचा 13/06/2008 - 12:30
मी खुप लहानपणी गेलेले चित्र पाहुन आठवणी जाग्या झाल्या "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

काळा_पहाड 13/06/2008 - 15:02
लहानपणी शाळेच्या सहलीत "बीबीका मकबरा" आणि "पानचक्की" बघितल्याचे आठवते. बिरुटेसरांनी त्या आठवणी जागविल्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. मात्र आता औरंगाबादला गेल्यावर पुन्हा जाईन म्हणतो. काळा पहाड

प्रचेतस 29/10/2015 - 21:08
सरांनी ह्यावर लेखन केलेलं माहितच नव्हतं. खुद्द सरांबरोबरच ह्या वास्तूची दोनेक वर्षापूर्वी भेट झाली होती. प्रांगणात बसून अगदी निवांत गप्पा झाल्या होत्या.
नमस्कार, आम्हाला आमच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं फार कौतुक. प्रत्येकाला प्रत्येकाच्या शहरात अभिमान वाटावा अशा काही कलाकृती सतत आनंद देत असतात. ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा त्या पैकी एक.

बीवी का मकबरा

तुमचे कोणत्या राशीच्या लोका॑शी चा॑गले जमते.

शितल ·

भाग्यश्री 05/06/2008 - 23:03
माझी गम्मत अशी आहे की, माझ्या सगळ्यात जवळच्या लोकांची रास कन्या आहे.. आई, २ मैत्रीणी वगैरे.. माझं मत , मकर अन कन्याचं म्हणजे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना असे असावे.. बाकीच्या राशींचे माहीत नाही.. कधी नीट पाहीले नाही.. पण मजा असते, राशींवरून स्वभाव्,किंवा जनरल गेस करायला मजा येते..

In reply to by यशोधरा

भाग्यश्री 05/06/2008 - 23:11
:( मग, तूळ... किंवा कन्या,मकर्,कर्क्,वृश्चिक्,मीन्,कुंभ.. आणि उरलेल्या ३..आठवत नाहीये.. :( पोप्पट केलास हं! :)

In reply to by भाग्यश्री

इनोबा म्हणे 05/06/2008 - 23:11
तूळ असावी. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शितल 05/06/2008 - 23:08
यशोधरा तुझ्याशी मी अजुन बोलले नाही तुझी रास कर्क कि॑वा मीन. (नाही तर १२ राशी॑पैकी एक कोणतीही)

झकासराव 05/06/2008 - 23:13
मिथुन, धनु, काहि प्रमाणात मेष वाले यांच्याशी चांगल जमत अस मला वाटतं. कुंभ वृस्चिक वाल्याशी मध्यम प्रमाणार असाव. कारण तसे फार लोक माझे मित्र नाहियेत. बाकी राशीच्या लोकासोबत फार नाही सांगता येणार पण कपटी लोकांबरोबर माझ अजिबात जमत नाय. ................. http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

भाग्यश्री 05/06/2008 - 23:16
कपटी राशी कोणत्या असतात रे? बाकी तुम्हाला काय वाटतं, शरद उपाध्ये ना कन्या रास फारच आवडते.. मकर वर काहीच कोणी बोलत नाही.. बोलले तर काय, आध्यत्मिक रास !! :(

शितल 05/06/2008 - 23:15
यशोधरा सा॑ग ना चल भाव खाऊ नको सा॑गुन टाक रास कोणती ते. नाही तर मिसळ्पाव लागु तुला.

यशोधरा 05/06/2008 - 23:17
तूळ नै काय!! भाग्यश्री, इनोबाजी शून्य मार्क तुम्हाला, अभ्यास न करता उनाडक्या करायच्या अन मग चुकीची उत्तरं द्यायची??? काय चाललय हे? आँ??? :W शीतल, पुढच्या वेळी पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे... :) म्या खेकडा हाय जी... :D

In reply to by यशोधरा

शितल 05/06/2008 - 23:21
हो, नक्की मी मगाशीच म्हट॑ले माझे धनु, सि॑ह आणि तुळ राशीशी छान जमते. तु तर आपुणकी मैत्रींण हाय न्हव.

In reply to by शितल

छोटा डॉन 05/06/2008 - 23:48
रास कुठली ह्याला महत्व नाही पण ती "सात्विक गुण" आहे का हे ज्योतिषशात्रात महत्वाचे समजले जाते ... [ हा जोक नाही ..] माझ्या माहितीप्रमाणे "तुळ, कर्क, धनु आणि कुंभ" या राशी सात्विक समजल्या जातात ... [ हा पण जोक नाही ...] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

शितल 05/06/2008 - 23:19
>>बाकी राशीच्या लोकासोबत फार नाही सांगता येणार पण कपटी लोकांबरोबर माझ अजिबात जमत नाय. हे बर॑ न्हाय का? कपटी . अरे बाप रे.

In reply to by प्रभाकर पेठकर

इनोबा म्हणे 05/06/2008 - 23:29
कर्क रास सगळ्यात चांगली असे शरद उपाध्ये म्हणतात ते मला पटते. काय काका,तुम्हीपण खेकडा दिसताय. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

यशोधरा 05/06/2008 - 23:27
थँक्यू थँक्यू काका :) बाकी शरद उपाध्ये हुश्शारच हो अगदी!! कसं बरोब्बर ओळखलं त्यांनी!! =))

शितल 05/06/2008 - 23:28
सि॑ह राशीचा पिता असावा आणि कर्क राशीची आई असावी असे म्हणतात. शरद उपाध्येची पत्नी कर्क राशीची आहे.

In reply to by शितल

इनोबा म्हणे 05/06/2008 - 23:31
शरद उपाध्ये साहेब स्वतः सिंह राशीचे असावेत. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शितल 05/06/2008 - 23:31
तरीच काय भाग्यश्री .मन मोकळे पणाने बोल. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.

In reply to by शितल

भाग्यश्री 05/06/2008 - 23:35
अगं, शरद उपाध्ये म्हणतात ना, की कर्क चांगली.. आता बायकोची रास आहे म्हटल्यावर त्याना म्हणवेच लागणार ना असे.. :) हेहे किडींग..

छोटा डॉन 05/06/2008 - 23:34
"कुंभ" राशीचा म्हणजे चक्क "माठ" किंवा "ज्ञानकुंभ" ... माझ्या बाबतील "ज्ञानकुंभ" हा गुण अगदी फिट्ट होतो ... [ ह्यावर दाताड काढून हसायची गरज नाही ...] पण "कुंभ" रास सगळ्यात चांगली असे "सात्विक बाबा" म्हणतात ... कुंभ राशीचे लोक "सात्विक, मनमिळाऊ, हुशार, मनमोकळे, दिलखुलास, संशोधकवृत्तीचे, भावूक " असतात असे सांगितले जाते. त्या बाबतील माझे एकदम "३६ गुण" जुळतात ... [ लोकांनी ह्या वाक्यावर टिका करण्यासाधी माझी दुसरी रास "सिंह" आहे हे लक्षात घावे ... सिंह राशीचे लोक हे "भडक माथ्याचे, खतरनाक सूड घेणारे, समोरच्याला चारी मुंड्या चीत करणारे म्हणजे थोडक्यात डेंजर" असतात हे ध्यानी घावे. मागून म्हणू नये की मी आधी "वॉर्निंग दिली" नव्हती .... ] अजून कोण आहे आमच्या "राशीचे" व आमच्या "राशीला लागलेले" ??? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

यशोधरा 05/06/2008 - 23:35
शीतल, भाग्यश्री, इनूभाव चालूंद्या!! आपुन आता भेटू उंद्याच्याला :))

भाग्यश्री 05/06/2008 - 23:39
आपण प्रत्येक राशीची मजा लिहूया का.. म्हणजे उदा.. कन्या राशीचा अतीचिकित्सकपणा.. दाराला कूलुप लावलं कि जवळजवळ लोंबकळुन पाहणार.. आणि मग बाहेर गेले की, आपल्या लोंबकळ्ण्यामुळे तुटले नाही ना कुलुप म्हणून चिंताग्रस्त होणार.. :) शिवाय तो विमानातला जोक.. वृषभ राशीची बाई भाजी आणायला जरी निघाली तरी लग्नाला निघाल्यासारखी तयार होऊन जाईल.. सिंह राशीचा वाढपी कधी नसावा.. जराही न वाकता सरळ निघून जाईल्,भाजी भाजी करत.. :) अजून आठवतय का कोणाला?

In reply to by भाग्यश्री

इनोबा म्हणे 05/06/2008 - 23:46
वृषभ राशीचे लोक फारच धार्मीक व रोमँटीक असतात असं ऐकून आहे. ;) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन 05/06/2008 - 23:50
>>वृषभ राशीचे लोक फारच धार्मीक व रोमँटीक असतात असं ऐकून आहे मग माझी "ख्राईस्ट कॅलेंडर" च्या आधारे "वॄषभ रास" असू शकते ... एकदा चौकशी केली पाहिजे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by इनोबा म्हणे

भाग्यश्री 05/06/2008 - 23:55
धार्मिकची काही कल्पना नाही.. म्हणजे रोमँटीकची पण नाहीये.. पण शरद उपाध्ये म्हणतात, रोमँटीक असते.. माझी सन साईन आणि मून साईन दोन्ही मकर.. कॅप्रिकॉर्न.. असं कुणाकुणाच आहे??

In reply to by भाग्यश्री

झकासराव 06/06/2008 - 00:11
माझे दोन्हि हात वर. एक सुर्य राशीसाठी आणि एक चंद्रराशीसाठी. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by इनोबा म्हणे

विजुभाऊ 06/06/2008 - 14:47
माझी रास वृषभ आहे. चण्द्र अणि सूर्य रास सुद्धा. सन साईन प्रमाणे सुद्धा मी वृषभ आहे. बायकोपुढे पण मी वृषभा सारखा वागत असतो असे आई म्हणते.( म्हणजे सूद्ध मर्‍हाटीत बायकोपुढला नन्दीबैल) :::::सूद्द नन्दीबैल विजुभाऊ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by भाग्यश्री

मनस्वी 06/06/2008 - 12:41
सिंह राशीचा वाढपी कधी नसावा.. जराही न वाकता सरळ निघून जाईल्,भाजी भाजी करत..
असं नाहीये... तो भजी घेउन येईल.. भांडं वर धरून.. म्हणजे लोकांना दिसणार नाही काय आहे ते.. आणि काही न बोलता सरळ निघून जाईल... :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

शितल 05/06/2008 - 23:40
माझ्या बाबतील "ज्ञानकुंभ" हा गुण अगदी फिट्ट होतो ... [ ह्यावर दाताड काढून हसायची गरज नाही ...] बर॑ बाबा राहिले दाताड काढुन हसायचे, कुंभ राशीचे लोक "सात्विक, मनमिळाऊ, हुशार, मनमोकळे, दिलखुलास, संशोधकवृत्तीचे, भावूक " असतात असे सांगितले जाते. त्या बाबतील माझे एकदम "३६ गुण" जुळतात ... किती ही स्वतः बद्दल तारीफ म्हणते मी. आणि सि॑ह राशीशी आपली तरी मैत्री असते. त्यामुळे सि॑हाला आम्ही भित नाही जो पर्य॑त तो समोर येत नाही तो पर्य॑तच बर॑ का.

In reply to by चतुरंग

छोटा डॉन 05/06/2008 - 23:55
तुमच्यात "इन मीन तीन" हा काय प्रकार असतो शेठ ??? मंदबुद्धी कुंभवाला छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

अभिज्ञ 05/06/2008 - 23:54
माझी रास "सिंह" आहे. छोटा डॉनने म्हंटल्याप्रमाणे , "सिंह राशीचे लोक हे "भडक माथ्याचे, खतरनाक सूड घेणारे, समोरच्याला चारी मुंड्या चीत करणारे म्हणजे थोडक्यात डेंजर" असतात हे ध्यानी घावे. मागून म्हणू नये की मी आधी "वॉर्निंग दिली" नव्हती .... " अगदि हेच म्हणतो. B) (साडेसातिग्रस्त)अभिज्ञ. ~X( (अवांतर-खुद्द तात्यांचि रास "मिथुन" आहे का हो? माझा तसा अंदाज आहे. :D )

In reply to by अभिज्ञ

चतुरंग 05/06/2008 - 23:57
(अवांतर-खुद्द तात्यांचि रास "मिथुन" आहे का हो? (स्वगत - अनुष्का वहिनींना विचारायला हवं. हैदराबाद ऑफिसला फोन करावा की काय? :? :W ) चतुरंग

In reply to by अभिज्ञ

छोटा डॉन 05/06/2008 - 23:58
आपले एवढं जमतयं कसं !!! सिंह रास जिंदाबाद ... पार्ट टाईम सिंहवाला छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

शितल 05/06/2008 - 23:54
मीन रास ही जगाचे गुढ उलघडणारी सात्विक रास. हे लोक खुप चपळ असतात.

In reply to by शितल

इनोबा म्हणे 05/06/2008 - 23:59
मीन रास ही जगाचे गुढ उलघडणारी सात्विक रास. म्हंजी आता रंगराव कुठलं गुढ उकलणार हाईत? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

झकासराव 05/06/2008 - 23:59
ये डॉन तुला नाय हा हसलो (उगाच फुकटात बंदुकीची गोळी कोण खाइल रे ) :D डोन ने कुंभाच वर्णन बरोब्बर केलय की. चांगला चाललाय विषय. :) शरद उपाध्ये धनुवाले आहेत. कन्या ही खेचण्यासाठीच त्यांच नेहमीच गिर्‍हाईक असत. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

इनोबा म्हणे 06/06/2008 - 00:03
शरद उपाध्ये धनुवाले आहेत. हा माणुस एवढा हुशार कसा? धनू राशीचे लोक फार हूशार असतात असे ऐकून आहे. ;) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

झकासराव 06/06/2008 - 00:05
हा माणुस एवढा हुशार कसा? धनू राशीचे लोक फार हूशार असतात असे ऐकून आहे. >>>>>>>>>>> इनोबा अगदी बरोब्बर ऐकल आहेस बघ. :D ;) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by इनोबा म्हणे

शितल 06/06/2008 - 00:05
शरद उपाध्ये धनुवाले आहेत. हा माणुस एवढा हुशार कसा? धनू राशीचे लोक फार हूशार असतात असे ऐकून आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं अरे प्रत्येक गोष्टील अपवाद असतात आता त्या॑ची आणि तुझी रास धनु म्हणुन म्ह॑टले. वाईट वाटुन घेऊ नको.

In reply to by झकासराव

विजुभाऊ 06/06/2008 - 14:51
ओळखा पाहु जर कुंभकर्णाची रास कुंभ होती .....तर..... ***कर्णाची रास कोणती? पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

शितल 06/06/2008 - 00:03
कन्या राशीचे पुरूष खुप चिकित्सक, आणि पारखुन घेतल्या शिवाय विश्वास नाय ठेवणारे असतात. पण मनात कायम श॑का घेतलेला निर्णय बरोबर की चुक.

झकासराव 06/06/2008 - 00:03
ते कपटीपणा हा लोकांमध्ये असतो ते बोल्लो होतो मी. राशीच नाही हा. :) तात्या नक्कीच मिथुन वाला असणार. तस मी वाचलय कुठेतरी. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

इनोबा म्हणे 06/06/2008 - 00:08
मग आपला मिथून कुठल्या राशीचा असेल रे? :) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मन 06/06/2008 - 00:07
रास मेष ते मीन यापैकी कुठलीच नसुन "चक्रम" नावाची एक वेगळीच १३वी रास आहे. असं माझे जवळचे दोस्त म्हणतात. त्यामुळं उपाध्ये साहेबांनी सांगितलेले कुठलेच "एखाद्या राशीशी न जुळणे" वगैरे नियम अपुनको लागु नही होते है. सगळ्याच राशी वाले दोस्त आहेत बुवा आपल्याला. बाकी जोक्स अपार्ट माझी रास कन्या . ....... पण माझ्या स्वभावा नुसार मी कर्क राशीची असावी असे बर्‍याच जणा॑ना वाटते.च॑द्राची च॑चलता माझ्यात खुप आहे आणि हळवापणाही. लग्न राशी प्रमाणे माणसाचे स्वभाव असतात असे मला ऐकुन माहिती आहे. विश्वास ठेवा अगर नाही; पण हे तंतोतंत मला ही लागु होतयं. माझीही जन्मरास आहे कन्या. आणि कर्क लग्न! आणि पुन्हा तेच कुंडली वर चंद्राचा फारच प्रभाव आहे असं बर्‍याच जणांनी सांगितलयं. आणि त्यात पुन्हा गुरु-चंद्र का गुरु- मंगळ अशी कसलिशी युती आहे म्हणे कुंडलीत(गूढ ज्ञानास कारक.) त्यात जोडीला गूढ ज्ञानवाला नेपच्युन का प्लुटो उच्च्चीचा. (त्यामुळचं माझं व्यवहार ज्ञान मात्र "अगाध" आहे असं तीर्थरुप म्हणत असतात. :-) :-) ) आपलाच, मनोबा

In reply to by मन

मनोबाची रास तेरावी आहे!!!! शरद उपाध्येंवर ८९-९० च्या आसपास माहिम पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. दृढ श्रद्धा रोपण समिती नावाच्या कुठल्या तरी समितीने हे प्रकरण काढल होतं. महिला व आर्थिक शोषण संदर्भात.त्यावेळी त्यांचे ज्योतिष वर्ग चालू होते. नंतरच्या काळात त्यांचे राशीचक्र हे कार्यक्रम चालु झाले. ज्योतिष वर्गाला नंतर रामराम ठोकला. पन लै भारी मानुस बरका? बराब्बर मान्सांची नाडी पकाडतयं! पब्लिक मेमेरी इज आल्वेज शॉर्ट हे तत्व ११) तेरावी रास नवीन आल्यामुळे ज्योतिषातली सगळी गणित बदलली का? वाचा. प्रकाश घाटपांडे

शितल 06/06/2008 - 00:10
तात्या तुमची रास कोणती हे सर्व मि पा करा॑ना जाणुन घ्यायची लै इच्छा आहे. मिथुन असावी असा अ॑दाज मि पा करा॑नी लावला आहे. तुम्हीच सा॑गा तुमची रास कोणती ते.

In reply to by भाग्यश्री

झकासराव 06/06/2008 - 00:15
(कोणी जवळ राहात नाही माझ्या, ते बरयं!! )>>>>>>>>>>. पुण्ञात कधीतरी येशीलच की. :) तसहि उत्तर चुकणार नाहिये म्हणा................. http://picasaweb.google.co.in/zakasrao

वरदा 06/06/2008 - 01:22
तात्यांची रास वृश्चिक असेल....ते बराच वेळ शांत रहातात आणि राग आला तर मात्र सरळ नांगी... बाय द वे शितल मी पण कन्या आणि सॉलिड चंचल...बर्‍याच वेळा खूप कन्फ्युज्ड असते.... पण प्रचंड चिकित्सक आणि शरद उपाध्येंच्या म्हणण्याप्रमाणे साएंटीस्ट पण झाले गं....

शितल 06/06/2008 - 02:10
मिथुन आणि कन्या राशीचे लोक प्रच॑ड बुध्दीमान असतात. (राशी स्वामी बुध आहे ना दोन्ही राशी॑चा ) आणि कन्या राशीचे लोक कायम च॑चल ही असतात हे करू का ते करू आणि दोन्ही दगडावर पाय ठेवुन चालणारे.

In reply to by शितल

वरदा 06/06/2008 - 20:10
कसल्या बुद्धीवान आहोत आपण दोघीही..... चंचल पणा तर ह्या जन्मी नाहीच जाणार माझा...कसली गोंधळलेली असते मी सदानकदा....

In reply to by वरदा

शितल 06/06/2008 - 21:27
अग वरदा तुझे ठिक आहे तु सायटि॑स्ट आहेस तुझी हुशारी जग जाहिर पण मी कन्या राशीची असुन मी त्या राशीला अपवाद आहे.

In reply to by शितल

वरदा 06/06/2008 - 22:25
हुशारी म्हणजे अभ्यासातली असं कोन म्हणतं? व्यवहारचातुर्य असू शकतं कलेत हुशारी असू शकते...अगदी मुलांना सांभाळण्यात सुद्धा हुशारी लागतेच्.....तेव्हा तू माझी हुशार मैत्रीण.....

बेसनलाडू 06/06/2008 - 02:47
माझी चंद्ररास तूळ तर लग्नरास वृश्चिक. चंद्र मनाचा कारक तर लग्न तनूचे (रंगरूप,मेंदू(बुद्धी?)). त्यामुळे होराभूषण धोंडोपंत म्हणतात त्याप्रमाणे -
  1. मेषेसारखे मागचा पुढचा विचार न करता हे लोक धडक देणार नाहीत, कर्केसारखे अती भावनाप्रधान होऊन जगाने मला कसा त्रास दिला हे रडून रडून सांगणार नाहीत आणि आयुष्यात जी परवड वाट्याला आली त्यावर कविता करत बसणार नाहीत, वृश्चिकेसारखे आपल्या जहरी बोलण्यातून उगाच कोणाला दुखवणार नाहीत, सिंहेसारखे आपण कोणीतरी ’ग्रेट’ आहोत आणि जगाने आपल्या पाया पडावं अशा अविर्भावात वावरणार नाहीत, मिथुनेसारखे कधी कधी बालीश आणि अल्लडपणाने वागणार नाहीत, मीनेसारखे इतरांकडून सहजासहजी फसले जाणार नाहीत.
  2. हे लोक जिथे जातील तिथे सामंजस्य, समतोल राखण्याचा प्रयत्न करतील (जे मी येनकेनप्रकारेण आणि शक्य तेव्हढे करतच असतो ;) ).
  3. ही शुक्राची रास आहे. या राशीत जन्मणारे लोक हे सौंदर्यवान आणि कलासक्त असतात.
  4. राशीतत्वामध्ये या राशीकडे वायुतत्व आलेले आहे. वायुतत्वाची माणसे ही बुध्दीवान असतात. संशोधक वृत्ती असते. ३/७/११ म्हणजे मिथुन, तुला आणि कुंभ या वायुतत्वाच्या राशी आहेत. जगातले अनेक संशोधक या तीन राशींवर जन्मलेले आहेत.या व्यक्ती आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वाने, नि:पक्षपाती आचरणाने, विद्वत्तापूर्ण अक्कलहुषारीने, आदर्शवादी स्वभावाने, निर्मळ अंत:स्फूर्तीने जगत असतात. संघर्ष, द्वेष, कपट, अनीती, अप्रामाणिकपणा या गोष्टींना त्यांच्याकडे थारा नसतो. मध्यस्त बनून तडजोड घडवून आणणे हे या लोकांना फार आवडते.
(समतोल)बेसनलाडू आता माझी लग्नरास वृश्चिक. त्यामुळे - स्वभावधर्म मंगळाच्या स्वभावासारखा म्हणजे तापट;पण अंत:करण दयाळू (तूळ प्रभाव?) कधी स्वत:हून कोणाला दुखवणार नाही;पण कुणी दुखवले तर मग जन्मभर लक्षात राहील असे शासन करण्यास मागेपुढे पाहणार नाही. स्वतःहून जहरी बोलून समोरच्याला दुखावणार नाही; पण समोरच्याने मर्यादा सोडली, तर आपण त्याच्यापेक्षाही खालच्या पातळीला जातील :) मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्‍याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे! :) (जहरी)बेसनलाडू कोणत्या राशीच्या लोकांशी पटते किंवा नाही, हे बघितले नाही; पण माझा आजवरचा अनुभव असा की माझे जिवश्चकंठश्च मित्र/आप्तेष्ट - म्हणजे मी ज्यांच्यासाठी काही वाट्टेल ते (!) आणि जे माझ्यासाठी (माझ्या समजुतीप्रमाणे) वाट्टेल ते करू शकतात - तूळ,कुंभ नि मीन राशीचे आहेत. मिथुनेच्या लोकांशी गप्पाटप्पा करायलाही मला (आणि कदाचित माझ्याशी गप्पा मारायला त्यांना) मजा येते. माझी सन् साइन् जेमिनी (मिथुन) असल्याचा किंवा मिथुनेच्या शुक्राचा (शुक्र = तुळेचा स्वामी, तो मिथुनेत) हा परिणाम समजावा काय? :) बाकी राशींचा फारसा अनुभव नाही आला अजून. पाहूया. (सविस्तर)बेसनलाडू

शितल 06/06/2008 - 02:26
मस्त सविस्तर राशी लिखाण बेसनलाडु तुमच्चे. कधी स्वत:हून कोणाला दुखवणार नाही;पण कुणी दुखवले तर मग जन्मभर लक्षात राहील असे शासन करण्यास मागेपुढे पाहणार नाही. स्वतःहून जहरी बोलवून समोरच्याला दुखावणार नाही; पण समोरच्याने मर्यादा सोडली, तर आपण त्याच्यापेक्षाही खालच्या पातळीला जातील मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्‍याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे! हे तर मी कन्या राशीची आणि कर्क लग्नाची असुन सुध्दा करते.

In reply to by शितल

बेसनलाडू 06/06/2008 - 02:55
मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्‍याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे! अधोरेखित स्वभावविशेष व्यवहार्य नाही,हे तुम्हीही जाणत असालच शीतलताई :) मलाही ते कळते, पण जेव्हा वागायची पाळी येता तेव्हा कळत असूनही वळत नाही, असे वाटते :D हाच तूळ-वृश्चिक मिक्सचा परिणाम असावा,असा अंदाज आहे ;) ((अ)व्यवहारी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

खरा डॉन 15/08/2008 - 23:03
>>मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्‍याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे! तात्या, आजकाल मिपावर उपद्रव इतका का वाढला आहे ह्याचे उत्तर मिळाले का? त्या काकाला तू हाकलुन लावलेस पण पुतण्याचे काय? (सावध) खरा डॉन बाकीचे क्लॉन...

रामदास 06/06/2008 - 05:58
मेष- साठ वर्षं अपमान लक्षात ठेवणार. वृषभ-रसास्वाद हेच जीवन मिथुन-वेगवान विचार. पण खोली कमी. कर्क-फार जपून बोलाव लागतं. टचकन पाणी डोळ्यात. सिंह-मोठेपणा द्या. काय वाट्टेल ते मागून घ्या. कन्या-वि. सू.-ही मुलं झोपली आहेत असं वाटलं तरी झोपलेली नसतात. तूळ -बायको असेल ह्या राशीची तर संसाराची नैया पार. वॄश्चीक-कुढणार. विसरणार नाही. धनू-ह्या घडीला माणूस आहे कि जनावर ते तपासा. मकर-व्यवहार निपूण. कुंभ-ज्ञानी ?होय. उपयोग-तुम्हाला माहीत असेल तर करून घ्या. मीन-अनामीक ताणाची रास. सर्व शास्त्रींची माफी मागून वर्णने लिहीतो आहे. खरी आहेत ताडून बघा.

In reply to by रामदास

शुचि 29/04/2010 - 06:55
मस्त!!!!!! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

विसोबा खेचर 06/06/2008 - 08:16
उत्तर देईन देईन म्हणेस्तोवर विसरूनच गेलो आणि ५० च्या वर प्रतिसाद गेलेदेखील?! :) आत्ता भाग्यश्रीने आठवण करून दिली तेव्हा प्रथमच बघितला हा थ्रेड! असो, भाग्यश्रीची खात्री खरी आहे, माझी रास मिथुनच आहे! :) आमचे रामदासबुवा म्हणतात त्याप्रमाणे वेगवान विचार परंतु खोली कमी! :( चालायचंच! सगळ्यांनी जळ्ळं खोल खोल होऊन कसं चालेल? आमच्यासारखे काही उथळ नकोत का? आणि अहो आमच्यासारखे काही उथळ आहेत म्हणूनच तर तुम्हा खोलीवाल्यांचं जळ्ळं कौतुक! काय रामदासबुवा, खरं की नाय? :) आपला, (बोलण्यात वस्ताद!) मिथुनेचा तात्या!

माझी पण कन्या रास च आहे. ओफिसच्या मिंटींग मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न माझेच. खुप त्रास होतो, प्रश्न विचारले नाहीत तर, सतत उलटी झालया सारखे वाट्ते. आणि कोणताही निर्णय घेण्याआधी इतकी म्हाहीती जमवतो, बाकीचे लोक वैतागुन जातात.

रामदास 06/06/2008 - 08:34
मिथुन ,तूळ,कुंभ या तिन्ही राशी एकाच जातकुळीच्या .विचाराचा वेग याच क्रमात घटत जातो. मिथुनेचे काही गुण.अंकगणित पक्के.आडाखे ,अंदाज ,अचूक असतात. डे ट्रेडींग , सट्टा यात यशस्वी होतात. प्रत्येक क्षण जगतात. अवांतर-मी मिथुनेच्या वरच्या पायरीवर आहे?गेस?

In reply to by रामदास

वेदश्री 06/06/2008 - 10:51
>मी मिथुनेच्या वरच्या पायरीवर आहे?गेस? एक पायरी वर असाल तर तुळ आणि दोन पायर्‍या वर असाल तर कुंभ.. याहून जास्त पायर्‍या वर असाल तर कल्पना नाही बॉ !

माझी चन्द्र रास कर्क आहे आणि लग्न रास (ascendant) कन्या आहे. साधारणपणे चन्द्र राशिवरुन मनाचा ठाव घेता येतो, पण स्वभाव विशेष, अथवा behaviora characteristics लग्न राशिवरुनच कळ्तात.

विजुभाऊ 06/06/2008 - 14:52
कन्या राशीचे पुरूष खुप चिकित्सक, आणि पारखुन घेतल्या शिवाय विश्वास नाय ठेवणारे असतात. पण मनात कायम श॑का घेतलेला निर्णय बरोबर की चुक. बापरे माझ्या हीचे वडील कन्या राशीचे आहेत्.(त्यांच्या मनात अजुन शन्का असावी असे वाटते मला) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

शितल 06/06/2008 - 22:51
मला ह्यात आता नविन आलेल्या प्रतिक्रीया कोणत्या ओळखता येत नाही आहे. पण मी म्हणते विषय हा होता की तुमचे कोणत्या राशीच्या लोका॑शी पटते पण जो तो आपली रासच फक्त सा॑गु लागला बाकी चे गुडा॑ळुन टाकले का ?

यशोधरा 07/06/2008 - 09:23
>>> मला ह्यात आता नविन आलेल्या प्रतिक्रीया कोणत्या ओळखता येत नाही आहे. मलाही :S :

भाग्यश्री 05/06/2008 - 23:03
माझी गम्मत अशी आहे की, माझ्या सगळ्यात जवळच्या लोकांची रास कन्या आहे.. आई, २ मैत्रीणी वगैरे.. माझं मत , मकर अन कन्याचं म्हणजे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना असे असावे.. बाकीच्या राशींचे माहीत नाही.. कधी नीट पाहीले नाही.. पण मजा असते, राशींवरून स्वभाव्,किंवा जनरल गेस करायला मजा येते..

In reply to by यशोधरा

भाग्यश्री 05/06/2008 - 23:11
:( मग, तूळ... किंवा कन्या,मकर्,कर्क्,वृश्चिक्,मीन्,कुंभ.. आणि उरलेल्या ३..आठवत नाहीये.. :( पोप्पट केलास हं! :)

In reply to by भाग्यश्री

इनोबा म्हणे 05/06/2008 - 23:11
तूळ असावी. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शितल 05/06/2008 - 23:08
यशोधरा तुझ्याशी मी अजुन बोलले नाही तुझी रास कर्क कि॑वा मीन. (नाही तर १२ राशी॑पैकी एक कोणतीही)

झकासराव 05/06/2008 - 23:13
मिथुन, धनु, काहि प्रमाणात मेष वाले यांच्याशी चांगल जमत अस मला वाटतं. कुंभ वृस्चिक वाल्याशी मध्यम प्रमाणार असाव. कारण तसे फार लोक माझे मित्र नाहियेत. बाकी राशीच्या लोकासोबत फार नाही सांगता येणार पण कपटी लोकांबरोबर माझ अजिबात जमत नाय. ................. http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

भाग्यश्री 05/06/2008 - 23:16
कपटी राशी कोणत्या असतात रे? बाकी तुम्हाला काय वाटतं, शरद उपाध्ये ना कन्या रास फारच आवडते.. मकर वर काहीच कोणी बोलत नाही.. बोलले तर काय, आध्यत्मिक रास !! :(

शितल 05/06/2008 - 23:15
यशोधरा सा॑ग ना चल भाव खाऊ नको सा॑गुन टाक रास कोणती ते. नाही तर मिसळ्पाव लागु तुला.

यशोधरा 05/06/2008 - 23:17
तूळ नै काय!! भाग्यश्री, इनोबाजी शून्य मार्क तुम्हाला, अभ्यास न करता उनाडक्या करायच्या अन मग चुकीची उत्तरं द्यायची??? काय चाललय हे? आँ??? :W शीतल, पुढच्या वेळी पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे... :) म्या खेकडा हाय जी... :D

In reply to by यशोधरा

शितल 05/06/2008 - 23:21
हो, नक्की मी मगाशीच म्हट॑ले माझे धनु, सि॑ह आणि तुळ राशीशी छान जमते. तु तर आपुणकी मैत्रींण हाय न्हव.

In reply to by शितल

छोटा डॉन 05/06/2008 - 23:48
रास कुठली ह्याला महत्व नाही पण ती "सात्विक गुण" आहे का हे ज्योतिषशात्रात महत्वाचे समजले जाते ... [ हा जोक नाही ..] माझ्या माहितीप्रमाणे "तुळ, कर्क, धनु आणि कुंभ" या राशी सात्विक समजल्या जातात ... [ हा पण जोक नाही ...] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

शितल 05/06/2008 - 23:19
>>बाकी राशीच्या लोकासोबत फार नाही सांगता येणार पण कपटी लोकांबरोबर माझ अजिबात जमत नाय. हे बर॑ न्हाय का? कपटी . अरे बाप रे.

In reply to by प्रभाकर पेठकर

इनोबा म्हणे 05/06/2008 - 23:29
कर्क रास सगळ्यात चांगली असे शरद उपाध्ये म्हणतात ते मला पटते. काय काका,तुम्हीपण खेकडा दिसताय. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

यशोधरा 05/06/2008 - 23:27
थँक्यू थँक्यू काका :) बाकी शरद उपाध्ये हुश्शारच हो अगदी!! कसं बरोब्बर ओळखलं त्यांनी!! =))

शितल 05/06/2008 - 23:28
सि॑ह राशीचा पिता असावा आणि कर्क राशीची आई असावी असे म्हणतात. शरद उपाध्येची पत्नी कर्क राशीची आहे.

In reply to by शितल

इनोबा म्हणे 05/06/2008 - 23:31
शरद उपाध्ये साहेब स्वतः सिंह राशीचे असावेत. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शितल 05/06/2008 - 23:31
तरीच काय भाग्यश्री .मन मोकळे पणाने बोल. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.

In reply to by शितल

भाग्यश्री 05/06/2008 - 23:35
अगं, शरद उपाध्ये म्हणतात ना, की कर्क चांगली.. आता बायकोची रास आहे म्हटल्यावर त्याना म्हणवेच लागणार ना असे.. :) हेहे किडींग..

छोटा डॉन 05/06/2008 - 23:34
"कुंभ" राशीचा म्हणजे चक्क "माठ" किंवा "ज्ञानकुंभ" ... माझ्या बाबतील "ज्ञानकुंभ" हा गुण अगदी फिट्ट होतो ... [ ह्यावर दाताड काढून हसायची गरज नाही ...] पण "कुंभ" रास सगळ्यात चांगली असे "सात्विक बाबा" म्हणतात ... कुंभ राशीचे लोक "सात्विक, मनमिळाऊ, हुशार, मनमोकळे, दिलखुलास, संशोधकवृत्तीचे, भावूक " असतात असे सांगितले जाते. त्या बाबतील माझे एकदम "३६ गुण" जुळतात ... [ लोकांनी ह्या वाक्यावर टिका करण्यासाधी माझी दुसरी रास "सिंह" आहे हे लक्षात घावे ... सिंह राशीचे लोक हे "भडक माथ्याचे, खतरनाक सूड घेणारे, समोरच्याला चारी मुंड्या चीत करणारे म्हणजे थोडक्यात डेंजर" असतात हे ध्यानी घावे. मागून म्हणू नये की मी आधी "वॉर्निंग दिली" नव्हती .... ] अजून कोण आहे आमच्या "राशीचे" व आमच्या "राशीला लागलेले" ??? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

यशोधरा 05/06/2008 - 23:35
शीतल, भाग्यश्री, इनूभाव चालूंद्या!! आपुन आता भेटू उंद्याच्याला :))

भाग्यश्री 05/06/2008 - 23:39
आपण प्रत्येक राशीची मजा लिहूया का.. म्हणजे उदा.. कन्या राशीचा अतीचिकित्सकपणा.. दाराला कूलुप लावलं कि जवळजवळ लोंबकळुन पाहणार.. आणि मग बाहेर गेले की, आपल्या लोंबकळ्ण्यामुळे तुटले नाही ना कुलुप म्हणून चिंताग्रस्त होणार.. :) शिवाय तो विमानातला जोक.. वृषभ राशीची बाई भाजी आणायला जरी निघाली तरी लग्नाला निघाल्यासारखी तयार होऊन जाईल.. सिंह राशीचा वाढपी कधी नसावा.. जराही न वाकता सरळ निघून जाईल्,भाजी भाजी करत.. :) अजून आठवतय का कोणाला?

In reply to by भाग्यश्री

इनोबा म्हणे 05/06/2008 - 23:46
वृषभ राशीचे लोक फारच धार्मीक व रोमँटीक असतात असं ऐकून आहे. ;) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन 05/06/2008 - 23:50
>>वृषभ राशीचे लोक फारच धार्मीक व रोमँटीक असतात असं ऐकून आहे मग माझी "ख्राईस्ट कॅलेंडर" च्या आधारे "वॄषभ रास" असू शकते ... एकदा चौकशी केली पाहिजे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by इनोबा म्हणे

भाग्यश्री 05/06/2008 - 23:55
धार्मिकची काही कल्पना नाही.. म्हणजे रोमँटीकची पण नाहीये.. पण शरद उपाध्ये म्हणतात, रोमँटीक असते.. माझी सन साईन आणि मून साईन दोन्ही मकर.. कॅप्रिकॉर्न.. असं कुणाकुणाच आहे??

In reply to by भाग्यश्री

झकासराव 06/06/2008 - 00:11
माझे दोन्हि हात वर. एक सुर्य राशीसाठी आणि एक चंद्रराशीसाठी. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by इनोबा म्हणे

विजुभाऊ 06/06/2008 - 14:47
माझी रास वृषभ आहे. चण्द्र अणि सूर्य रास सुद्धा. सन साईन प्रमाणे सुद्धा मी वृषभ आहे. बायकोपुढे पण मी वृषभा सारखा वागत असतो असे आई म्हणते.( म्हणजे सूद्ध मर्‍हाटीत बायकोपुढला नन्दीबैल) :::::सूद्द नन्दीबैल विजुभाऊ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by भाग्यश्री

मनस्वी 06/06/2008 - 12:41
सिंह राशीचा वाढपी कधी नसावा.. जराही न वाकता सरळ निघून जाईल्,भाजी भाजी करत..
असं नाहीये... तो भजी घेउन येईल.. भांडं वर धरून.. म्हणजे लोकांना दिसणार नाही काय आहे ते.. आणि काही न बोलता सरळ निघून जाईल... :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

शितल 05/06/2008 - 23:40
माझ्या बाबतील "ज्ञानकुंभ" हा गुण अगदी फिट्ट होतो ... [ ह्यावर दाताड काढून हसायची गरज नाही ...] बर॑ बाबा राहिले दाताड काढुन हसायचे, कुंभ राशीचे लोक "सात्विक, मनमिळाऊ, हुशार, मनमोकळे, दिलखुलास, संशोधकवृत्तीचे, भावूक " असतात असे सांगितले जाते. त्या बाबतील माझे एकदम "३६ गुण" जुळतात ... किती ही स्वतः बद्दल तारीफ म्हणते मी. आणि सि॑ह राशीशी आपली तरी मैत्री असते. त्यामुळे सि॑हाला आम्ही भित नाही जो पर्य॑त तो समोर येत नाही तो पर्य॑तच बर॑ का.

In reply to by चतुरंग

छोटा डॉन 05/06/2008 - 23:55
तुमच्यात "इन मीन तीन" हा काय प्रकार असतो शेठ ??? मंदबुद्धी कुंभवाला छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

अभिज्ञ 05/06/2008 - 23:54
माझी रास "सिंह" आहे. छोटा डॉनने म्हंटल्याप्रमाणे , "सिंह राशीचे लोक हे "भडक माथ्याचे, खतरनाक सूड घेणारे, समोरच्याला चारी मुंड्या चीत करणारे म्हणजे थोडक्यात डेंजर" असतात हे ध्यानी घावे. मागून म्हणू नये की मी आधी "वॉर्निंग दिली" नव्हती .... " अगदि हेच म्हणतो. B) (साडेसातिग्रस्त)अभिज्ञ. ~X( (अवांतर-खुद्द तात्यांचि रास "मिथुन" आहे का हो? माझा तसा अंदाज आहे. :D )

In reply to by अभिज्ञ

चतुरंग 05/06/2008 - 23:57
(अवांतर-खुद्द तात्यांचि रास "मिथुन" आहे का हो? (स्वगत - अनुष्का वहिनींना विचारायला हवं. हैदराबाद ऑफिसला फोन करावा की काय? :? :W ) चतुरंग

In reply to by अभिज्ञ

छोटा डॉन 05/06/2008 - 23:58
आपले एवढं जमतयं कसं !!! सिंह रास जिंदाबाद ... पार्ट टाईम सिंहवाला छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

शितल 05/06/2008 - 23:54
मीन रास ही जगाचे गुढ उलघडणारी सात्विक रास. हे लोक खुप चपळ असतात.

In reply to by शितल

इनोबा म्हणे 05/06/2008 - 23:59
मीन रास ही जगाचे गुढ उलघडणारी सात्विक रास. म्हंजी आता रंगराव कुठलं गुढ उकलणार हाईत? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

झकासराव 05/06/2008 - 23:59
ये डॉन तुला नाय हा हसलो (उगाच फुकटात बंदुकीची गोळी कोण खाइल रे ) :D डोन ने कुंभाच वर्णन बरोब्बर केलय की. चांगला चाललाय विषय. :) शरद उपाध्ये धनुवाले आहेत. कन्या ही खेचण्यासाठीच त्यांच नेहमीच गिर्‍हाईक असत. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

इनोबा म्हणे 06/06/2008 - 00:03
शरद उपाध्ये धनुवाले आहेत. हा माणुस एवढा हुशार कसा? धनू राशीचे लोक फार हूशार असतात असे ऐकून आहे. ;) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

झकासराव 06/06/2008 - 00:05
हा माणुस एवढा हुशार कसा? धनू राशीचे लोक फार हूशार असतात असे ऐकून आहे. >>>>>>>>>>> इनोबा अगदी बरोब्बर ऐकल आहेस बघ. :D ;) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by इनोबा म्हणे

शितल 06/06/2008 - 00:05
शरद उपाध्ये धनुवाले आहेत. हा माणुस एवढा हुशार कसा? धनू राशीचे लोक फार हूशार असतात असे ऐकून आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं अरे प्रत्येक गोष्टील अपवाद असतात आता त्या॑ची आणि तुझी रास धनु म्हणुन म्ह॑टले. वाईट वाटुन घेऊ नको.

In reply to by झकासराव

विजुभाऊ 06/06/2008 - 14:51
ओळखा पाहु जर कुंभकर्णाची रास कुंभ होती .....तर..... ***कर्णाची रास कोणती? पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

शितल 06/06/2008 - 00:03
कन्या राशीचे पुरूष खुप चिकित्सक, आणि पारखुन घेतल्या शिवाय विश्वास नाय ठेवणारे असतात. पण मनात कायम श॑का घेतलेला निर्णय बरोबर की चुक.

झकासराव 06/06/2008 - 00:03
ते कपटीपणा हा लोकांमध्ये असतो ते बोल्लो होतो मी. राशीच नाही हा. :) तात्या नक्कीच मिथुन वाला असणार. तस मी वाचलय कुठेतरी. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

इनोबा म्हणे 06/06/2008 - 00:08
मग आपला मिथून कुठल्या राशीचा असेल रे? :) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मन 06/06/2008 - 00:07
रास मेष ते मीन यापैकी कुठलीच नसुन "चक्रम" नावाची एक वेगळीच १३वी रास आहे. असं माझे जवळचे दोस्त म्हणतात. त्यामुळं उपाध्ये साहेबांनी सांगितलेले कुठलेच "एखाद्या राशीशी न जुळणे" वगैरे नियम अपुनको लागु नही होते है. सगळ्याच राशी वाले दोस्त आहेत बुवा आपल्याला. बाकी जोक्स अपार्ट माझी रास कन्या . ....... पण माझ्या स्वभावा नुसार मी कर्क राशीची असावी असे बर्‍याच जणा॑ना वाटते.च॑द्राची च॑चलता माझ्यात खुप आहे आणि हळवापणाही. लग्न राशी प्रमाणे माणसाचे स्वभाव असतात असे मला ऐकुन माहिती आहे. विश्वास ठेवा अगर नाही; पण हे तंतोतंत मला ही लागु होतयं. माझीही जन्मरास आहे कन्या. आणि कर्क लग्न! आणि पुन्हा तेच कुंडली वर चंद्राचा फारच प्रभाव आहे असं बर्‍याच जणांनी सांगितलयं. आणि त्यात पुन्हा गुरु-चंद्र का गुरु- मंगळ अशी कसलिशी युती आहे म्हणे कुंडलीत(गूढ ज्ञानास कारक.) त्यात जोडीला गूढ ज्ञानवाला नेपच्युन का प्लुटो उच्च्चीचा. (त्यामुळचं माझं व्यवहार ज्ञान मात्र "अगाध" आहे असं तीर्थरुप म्हणत असतात. :-) :-) ) आपलाच, मनोबा

In reply to by मन

मनोबाची रास तेरावी आहे!!!! शरद उपाध्येंवर ८९-९० च्या आसपास माहिम पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. दृढ श्रद्धा रोपण समिती नावाच्या कुठल्या तरी समितीने हे प्रकरण काढल होतं. महिला व आर्थिक शोषण संदर्भात.त्यावेळी त्यांचे ज्योतिष वर्ग चालू होते. नंतरच्या काळात त्यांचे राशीचक्र हे कार्यक्रम चालु झाले. ज्योतिष वर्गाला नंतर रामराम ठोकला. पन लै भारी मानुस बरका? बराब्बर मान्सांची नाडी पकाडतयं! पब्लिक मेमेरी इज आल्वेज शॉर्ट हे तत्व ११) तेरावी रास नवीन आल्यामुळे ज्योतिषातली सगळी गणित बदलली का? वाचा. प्रकाश घाटपांडे

शितल 06/06/2008 - 00:10
तात्या तुमची रास कोणती हे सर्व मि पा करा॑ना जाणुन घ्यायची लै इच्छा आहे. मिथुन असावी असा अ॑दाज मि पा करा॑नी लावला आहे. तुम्हीच सा॑गा तुमची रास कोणती ते.

In reply to by भाग्यश्री

झकासराव 06/06/2008 - 00:15
(कोणी जवळ राहात नाही माझ्या, ते बरयं!! )>>>>>>>>>>. पुण्ञात कधीतरी येशीलच की. :) तसहि उत्तर चुकणार नाहिये म्हणा................. http://picasaweb.google.co.in/zakasrao

वरदा 06/06/2008 - 01:22
तात्यांची रास वृश्चिक असेल....ते बराच वेळ शांत रहातात आणि राग आला तर मात्र सरळ नांगी... बाय द वे शितल मी पण कन्या आणि सॉलिड चंचल...बर्‍याच वेळा खूप कन्फ्युज्ड असते.... पण प्रचंड चिकित्सक आणि शरद उपाध्येंच्या म्हणण्याप्रमाणे साएंटीस्ट पण झाले गं....

शितल 06/06/2008 - 02:10
मिथुन आणि कन्या राशीचे लोक प्रच॑ड बुध्दीमान असतात. (राशी स्वामी बुध आहे ना दोन्ही राशी॑चा ) आणि कन्या राशीचे लोक कायम च॑चल ही असतात हे करू का ते करू आणि दोन्ही दगडावर पाय ठेवुन चालणारे.

In reply to by शितल

वरदा 06/06/2008 - 20:10
कसल्या बुद्धीवान आहोत आपण दोघीही..... चंचल पणा तर ह्या जन्मी नाहीच जाणार माझा...कसली गोंधळलेली असते मी सदानकदा....

In reply to by वरदा

शितल 06/06/2008 - 21:27
अग वरदा तुझे ठिक आहे तु सायटि॑स्ट आहेस तुझी हुशारी जग जाहिर पण मी कन्या राशीची असुन मी त्या राशीला अपवाद आहे.

In reply to by शितल

वरदा 06/06/2008 - 22:25
हुशारी म्हणजे अभ्यासातली असं कोन म्हणतं? व्यवहारचातुर्य असू शकतं कलेत हुशारी असू शकते...अगदी मुलांना सांभाळण्यात सुद्धा हुशारी लागतेच्.....तेव्हा तू माझी हुशार मैत्रीण.....

बेसनलाडू 06/06/2008 - 02:47
माझी चंद्ररास तूळ तर लग्नरास वृश्चिक. चंद्र मनाचा कारक तर लग्न तनूचे (रंगरूप,मेंदू(बुद्धी?)). त्यामुळे होराभूषण धोंडोपंत म्हणतात त्याप्रमाणे -
  1. मेषेसारखे मागचा पुढचा विचार न करता हे लोक धडक देणार नाहीत, कर्केसारखे अती भावनाप्रधान होऊन जगाने मला कसा त्रास दिला हे रडून रडून सांगणार नाहीत आणि आयुष्यात जी परवड वाट्याला आली त्यावर कविता करत बसणार नाहीत, वृश्चिकेसारखे आपल्या जहरी बोलण्यातून उगाच कोणाला दुखवणार नाहीत, सिंहेसारखे आपण कोणीतरी ’ग्रेट’ आहोत आणि जगाने आपल्या पाया पडावं अशा अविर्भावात वावरणार नाहीत, मिथुनेसारखे कधी कधी बालीश आणि अल्लडपणाने वागणार नाहीत, मीनेसारखे इतरांकडून सहजासहजी फसले जाणार नाहीत.
  2. हे लोक जिथे जातील तिथे सामंजस्य, समतोल राखण्याचा प्रयत्न करतील (जे मी येनकेनप्रकारेण आणि शक्य तेव्हढे करतच असतो ;) ).
  3. ही शुक्राची रास आहे. या राशीत जन्मणारे लोक हे सौंदर्यवान आणि कलासक्त असतात.
  4. राशीतत्वामध्ये या राशीकडे वायुतत्व आलेले आहे. वायुतत्वाची माणसे ही बुध्दीवान असतात. संशोधक वृत्ती असते. ३/७/११ म्हणजे मिथुन, तुला आणि कुंभ या वायुतत्वाच्या राशी आहेत. जगातले अनेक संशोधक या तीन राशींवर जन्मलेले आहेत.या व्यक्ती आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वाने, नि:पक्षपाती आचरणाने, विद्वत्तापूर्ण अक्कलहुषारीने, आदर्शवादी स्वभावाने, निर्मळ अंत:स्फूर्तीने जगत असतात. संघर्ष, द्वेष, कपट, अनीती, अप्रामाणिकपणा या गोष्टींना त्यांच्याकडे थारा नसतो. मध्यस्त बनून तडजोड घडवून आणणे हे या लोकांना फार आवडते.
(समतोल)बेसनलाडू आता माझी लग्नरास वृश्चिक. त्यामुळे - स्वभावधर्म मंगळाच्या स्वभावासारखा म्हणजे तापट;पण अंत:करण दयाळू (तूळ प्रभाव?) कधी स्वत:हून कोणाला दुखवणार नाही;पण कुणी दुखवले तर मग जन्मभर लक्षात राहील असे शासन करण्यास मागेपुढे पाहणार नाही. स्वतःहून जहरी बोलून समोरच्याला दुखावणार नाही; पण समोरच्याने मर्यादा सोडली, तर आपण त्याच्यापेक्षाही खालच्या पातळीला जातील :) मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्‍याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे! :) (जहरी)बेसनलाडू कोणत्या राशीच्या लोकांशी पटते किंवा नाही, हे बघितले नाही; पण माझा आजवरचा अनुभव असा की माझे जिवश्चकंठश्च मित्र/आप्तेष्ट - म्हणजे मी ज्यांच्यासाठी काही वाट्टेल ते (!) आणि जे माझ्यासाठी (माझ्या समजुतीप्रमाणे) वाट्टेल ते करू शकतात - तूळ,कुंभ नि मीन राशीचे आहेत. मिथुनेच्या लोकांशी गप्पाटप्पा करायलाही मला (आणि कदाचित माझ्याशी गप्पा मारायला त्यांना) मजा येते. माझी सन् साइन् जेमिनी (मिथुन) असल्याचा किंवा मिथुनेच्या शुक्राचा (शुक्र = तुळेचा स्वामी, तो मिथुनेत) हा परिणाम समजावा काय? :) बाकी राशींचा फारसा अनुभव नाही आला अजून. पाहूया. (सविस्तर)बेसनलाडू

शितल 06/06/2008 - 02:26
मस्त सविस्तर राशी लिखाण बेसनलाडु तुमच्चे. कधी स्वत:हून कोणाला दुखवणार नाही;पण कुणी दुखवले तर मग जन्मभर लक्षात राहील असे शासन करण्यास मागेपुढे पाहणार नाही. स्वतःहून जहरी बोलवून समोरच्याला दुखावणार नाही; पण समोरच्याने मर्यादा सोडली, तर आपण त्याच्यापेक्षाही खालच्या पातळीला जातील मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्‍याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे! हे तर मी कन्या राशीची आणि कर्क लग्नाची असुन सुध्दा करते.

In reply to by शितल

बेसनलाडू 06/06/2008 - 02:55
मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्‍याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे! अधोरेखित स्वभावविशेष व्यवहार्य नाही,हे तुम्हीही जाणत असालच शीतलताई :) मलाही ते कळते, पण जेव्हा वागायची पाळी येता तेव्हा कळत असूनही वळत नाही, असे वाटते :D हाच तूळ-वृश्चिक मिक्सचा परिणाम असावा,असा अंदाज आहे ;) ((अ)व्यवहारी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

खरा डॉन 15/08/2008 - 23:03
>>मग असे करताना भले स्वत:चे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण दुसर्‍याचे तीनतेरा वाज(व)णे सर्वाधिक महत्त्वाचे! तात्या, आजकाल मिपावर उपद्रव इतका का वाढला आहे ह्याचे उत्तर मिळाले का? त्या काकाला तू हाकलुन लावलेस पण पुतण्याचे काय? (सावध) खरा डॉन बाकीचे क्लॉन...

रामदास 06/06/2008 - 05:58
मेष- साठ वर्षं अपमान लक्षात ठेवणार. वृषभ-रसास्वाद हेच जीवन मिथुन-वेगवान विचार. पण खोली कमी. कर्क-फार जपून बोलाव लागतं. टचकन पाणी डोळ्यात. सिंह-मोठेपणा द्या. काय वाट्टेल ते मागून घ्या. कन्या-वि. सू.-ही मुलं झोपली आहेत असं वाटलं तरी झोपलेली नसतात. तूळ -बायको असेल ह्या राशीची तर संसाराची नैया पार. वॄश्चीक-कुढणार. विसरणार नाही. धनू-ह्या घडीला माणूस आहे कि जनावर ते तपासा. मकर-व्यवहार निपूण. कुंभ-ज्ञानी ?होय. उपयोग-तुम्हाला माहीत असेल तर करून घ्या. मीन-अनामीक ताणाची रास. सर्व शास्त्रींची माफी मागून वर्णने लिहीतो आहे. खरी आहेत ताडून बघा.

In reply to by रामदास

शुचि 29/04/2010 - 06:55
मस्त!!!!!! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

विसोबा खेचर 06/06/2008 - 08:16
उत्तर देईन देईन म्हणेस्तोवर विसरूनच गेलो आणि ५० च्या वर प्रतिसाद गेलेदेखील?! :) आत्ता भाग्यश्रीने आठवण करून दिली तेव्हा प्रथमच बघितला हा थ्रेड! असो, भाग्यश्रीची खात्री खरी आहे, माझी रास मिथुनच आहे! :) आमचे रामदासबुवा म्हणतात त्याप्रमाणे वेगवान विचार परंतु खोली कमी! :( चालायचंच! सगळ्यांनी जळ्ळं खोल खोल होऊन कसं चालेल? आमच्यासारखे काही उथळ नकोत का? आणि अहो आमच्यासारखे काही उथळ आहेत म्हणूनच तर तुम्हा खोलीवाल्यांचं जळ्ळं कौतुक! काय रामदासबुवा, खरं की नाय? :) आपला, (बोलण्यात वस्ताद!) मिथुनेचा तात्या!

माझी पण कन्या रास च आहे. ओफिसच्या मिंटींग मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न माझेच. खुप त्रास होतो, प्रश्न विचारले नाहीत तर, सतत उलटी झालया सारखे वाट्ते. आणि कोणताही निर्णय घेण्याआधी इतकी म्हाहीती जमवतो, बाकीचे लोक वैतागुन जातात.

रामदास 06/06/2008 - 08:34
मिथुन ,तूळ,कुंभ या तिन्ही राशी एकाच जातकुळीच्या .विचाराचा वेग याच क्रमात घटत जातो. मिथुनेचे काही गुण.अंकगणित पक्के.आडाखे ,अंदाज ,अचूक असतात. डे ट्रेडींग , सट्टा यात यशस्वी होतात. प्रत्येक क्षण जगतात. अवांतर-मी मिथुनेच्या वरच्या पायरीवर आहे?गेस?

In reply to by रामदास

वेदश्री 06/06/2008 - 10:51
>मी मिथुनेच्या वरच्या पायरीवर आहे?गेस? एक पायरी वर असाल तर तुळ आणि दोन पायर्‍या वर असाल तर कुंभ.. याहून जास्त पायर्‍या वर असाल तर कल्पना नाही बॉ !

माझी चन्द्र रास कर्क आहे आणि लग्न रास (ascendant) कन्या आहे. साधारणपणे चन्द्र राशिवरुन मनाचा ठाव घेता येतो, पण स्वभाव विशेष, अथवा behaviora characteristics लग्न राशिवरुनच कळ्तात.

विजुभाऊ 06/06/2008 - 14:52
कन्या राशीचे पुरूष खुप चिकित्सक, आणि पारखुन घेतल्या शिवाय विश्वास नाय ठेवणारे असतात. पण मनात कायम श॑का घेतलेला निर्णय बरोबर की चुक. बापरे माझ्या हीचे वडील कन्या राशीचे आहेत्.(त्यांच्या मनात अजुन शन्का असावी असे वाटते मला) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

शितल 06/06/2008 - 22:51
मला ह्यात आता नविन आलेल्या प्रतिक्रीया कोणत्या ओळखता येत नाही आहे. पण मी म्हणते विषय हा होता की तुमचे कोणत्या राशीच्या लोका॑शी पटते पण जो तो आपली रासच फक्त सा॑गु लागला बाकी चे गुडा॑ळुन टाकले का ?

यशोधरा 07/06/2008 - 09:23
>>> मला ह्यात आता नविन आलेल्या प्रतिक्रीया कोणत्या ओळखता येत नाही आहे. मलाही :S :
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझे ज्या लोका॑शी छान मैत्री होते त्या लोका॑ची रास मी आवश्य नोद॑वते. माझी रास कन्या माझ्या नवर्‍याची ही कन्या पण एकाच राशीचे असुन आम्ही अत्य॑त वेगळ्या मता॑चे आहोत आणि माझ्या नवर्‍याच्या मते अशाच जोडप्याचा स॑सार छान होतो. पण माझ्या स्वभावा नुसार मी कर्क राशीची असावी असे बर्‍याच जणा॑ना वाटते.च॑द्राची च॑चलता माझ्यात खुप आहे आणि हळवापणाही. लग्न राशी प्रमाणे माणसाचे स्वभाव असतात असे मला ऐकुन माहिती आहे. माझ्या मित्र मैत्रिणी धनु, सि॑ह, आणि तुळ ह्या राशीच्या लोका॑शी माझे छान जमते. मेष राशीशी अजिबात जमत नाही.

आर्यांचे मुळस्थान कोणते? : डॉ. आंबेडकर - २

पंकज ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

प्रवासातील माणुसकीचे दर्शन

शितल ·

विसोबा खेचर 01/06/2008 - 08:20
सभ्य चारित्र्याच्या त्या भल्या माणसाला आपलाही सलाम..! शितल, साध्या सोप्या शब्दातलं अनुभवकथन आवडलं. अजूनही येऊ देत... तात्या.

फटू 01/06/2008 - 09:14
अशी माणसं हल्ली खुप कमी भेटतात... (भल्या माणसांनी वेळोवेळी मदत केल्यामुळे आयुष्यात काही मिळवलेला) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

एक पुरुष म्हणून तुमच्या भितीशी मी कदाचित १०० टक्के समरस होणार नाही. निसर्गानेच हे दोन्ही स्वभावविशेष असे बनविले आहेत की 'जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे' ही उक्ती सार्थ ठरावी. तरीपण एक अबला नारीच्या भूमिकेत शिरण्याचा प्रयत्न केला तर खरोखर फार मोठी जोखिम तुम्ही उचललीत असे वाटते. नंतर कितीही वाटले तरी आपला निर्णय बदलता येत नाही ही त्यातील अगतिकता जास्तच त्रासदायक. तुमच्या नशीबाने ड्रायव्हर चांगला भेटला आणि प्रवास निभावला. प्रवासाच्या शेवटी त्या भल्या गृहस्थाला तुम्ही 'धन्यवाद' दिले असतेत तर त्या ड्रायव्हरला आणि आम्हा वाचकांनाही खूप बरे वाटले असते. असो. अवांतरः बायकांच्या पर्स मध्ये विश्व सामावलेले असते. कोल्हापुरी अस्सल तिखटाची एखादी पुडी, दुर्धर प्रसंगी स्वसंरक्षणार्थ, ठेवायला काही हरकत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 01/06/2008 - 15:24
पेठकर काकांशी सहमत..... आणि बायकांच्या पर्स मध्ये विश्व सामावलेले असते. कोल्हापुरी अस्सल तिखटाची एखादी पुडी, दुर्धर प्रसंगी स्वसंरक्षणार्थ, ठेवायला काही हरकत नाही. हा तर अतिशय योग्य सल्ला आहे.....

In reply to by प्रभाकर पेठकर

शितल 01/06/2008 - 16:09
प्रवासाच्या शेवटी त्या भल्या गृहस्थाला तुम्ही 'धन्यवाद' दिले असतेत तर त्या ड्रायव्हरला आणि आम्हा वाचकांनाही खूप बरे वाटले असते. हो ते ही मी बोलले पण फक्त थॅक्स एवढेच, (ते मात्र लिहायचे राहुन गेले) कारण तो माणुस एक ही शब्द बोलत नव्हता त्यामुळे मला ऑकवर्ड फिल होत होते. कोल्हापुरी अस्सल तिखटाची एखादी पुडी, दुर्धर प्रसंगी स्वसंरक्षणार्थ, ठेवायला काही हरकत नाही हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण जळ्ली आम्ही त्या पर्स मध्ये १०० दा हात घालतो आणि आमचीच बोटे त्या तिकटात जाऊन आमचेच डोले लाल व्हायचे. (ह्.घ्या.)

In reply to by शितल

हो ते ही मी बोलले पण फक्त थॅक्स एवढेच, (ते मात्र लिहायचे राहुन गेले) वाचून बरे वाटले. धन्यवाद. आमचीच बोटे त्या तिकटात जाऊन आमचेच डोले लाल व्हायचे. हलकेच घेऊ नका. मी सल्ला गांभिर्याने दिला आहे. पर्सच्या एका खणात (अनंत खण असतात) फक्त तिखटाची पुडी ठेवायची. म्हणजे त्याला चुकूनही आपला हात लागू नये आणि ऐनवेळी शेकडो अनावश्याक वस्तूंमधून तिखट शोधण्यात वेळ ही जाऊ नये. कसे?

राजे 01/06/2008 - 12:04
:) अशी सभ्य माणसं ह्या भुतलावर आहेत म्हणून विश्वास नावाची चीज तगधरुन आहे ! सलाम ! अवांतर : पेठेकर काकांचा सल्ला मोलाचा आहे... मी नेहमी आपल्या गाडी मध्ये.. एक चाकू, सुई-दोरा व मस्त पैकी बेसबॉल ची बॅट संगतीला ठेवतोच ;) काय माहीत कधी वापरायची गरज पडलीच तर ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मन 01/06/2008 - 13:35
"माणुस" सापडतो तो असा. छान लेख. एक छोटिशी गोष्ट खटकलीए पण व्य नि केलाय त्यासाठी. (आदमियों के बीच "इन्सान" मिलता है, वो ऐसे.) आपलाच, मनोबा

इनोबा म्हणे 01/06/2008 - 16:18
खरं आहे! पेठकर काकांचा सल्ला मोलाचा आहे... हेच म्हणतो.. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

यशोधरा 02/06/2008 - 08:37
शीतल, छान लिहिले आहेस, साधे आणि प्रामाणिक. तेह्वा तू किती घाबरली असशील ना?

ऋचा 02/06/2008 - 10:43
खुप छान लिहिले आहेस. पेठकर काकांचा सल्ला अगदी योग्य वाटतो.

खरेच गांभीर्याने घ्यावा. 'डा व्हिन्सी कोड'मध्ये एक मुलगी मिरपुडीचे सॅचेट वापरते. ते जास्त सोयिस्कर आहे. सगळीकडे मिळते. त्याला हात लागला तरी हरकत नाही. अनुभव छान लिहिला आहे. सुधीर कांदळकर.

चतुरंग 02/06/2008 - 20:29
वाचलेल्या, ऐकलेल्या अनुभवांचा आपल्या मनावरचा पगडा किती दृढ असतो आणि त्यातूनच बघताना आपल्याला येणारा अनुभव त्याच पठडीतून जाणारा असेल की काय ह्या आशंकेने मन कातरुन जाते त्याचे वर्णन एकदम नैसर्गिक आहे. मिरची पुडी शिवाय स्वसंरक्षणार्थ स्त्रिया अनेक साधने वापरतात. त्याचीही येथे दिलेली माहिती मनोरंजक ठरावी. :) चतुरंग

विदेश 02/06/2008 - 22:02
छान लिहिला आहे प्रवासानुभव. पण माझे नशिब खुप चा॑गले होते आणि आहे, त्या भल्या माणसाने गाडीतील चालु असलेला रोम्यान्टि॑क गाणी मी गाडीत एकटी असल्याने ब॑द केली . नशीब चांगले,माणूस भला भेटला!

शितल 02/06/2008 - 22:46
सर्व वाचका॑चे आभार आणि प्रतिसादा बद्दल धन्यवाद ! पेठकार काका आणि चतुर॑गजी या॑नी स्वतःच्या स॑रक्षणासाठी प्रवासात बाळगायचे साहित्य आहे त्याची माहिती दिल्या बद्दल त्या॑चे ही आभार.

वरदा 02/06/2008 - 23:33
मीही असले उद्योग केलेत बरेच वेळा आणि देवाच्या दयेने चांगली माणसं भेटलेयत....घरुन भयंकर शिव्या खाल्ल्यायत....माझं नशिब बलवत्तर आहे याची खात्री पटलेय.... तुझे पुढचे अनुभव लिही मग माझेहि सांगेन....आता पळायला हवय....

शीतल अनुभव कथन आवडलं, पण काळजी घे.पेठकर आणि चतुरंगनी दिलेल्या टिप्स ध्यानात ठेव. भला माणूस होता तो,नशिब ! स्वाती

प्राजु 03/06/2008 - 12:45
अनुभव छान सांगितला आहेस. खरंच त्या सद् गृहस्थाला सलाम. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ईश्वरी 05/06/2008 - 03:57
>>अनुभव छान सांगितला आहेस. खरंच त्या सद् गृहस्थाला सलाम. -- माझेही हेच मत. पण अशी एकटी जाऊ नकोस परत कधी. पुढचेही अनुभव टाक ना लवकर. ईश्वरी

शुचि 24/06/2010 - 19:22
अंगावर काटा आला. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अर्धवट 24/06/2010 - 19:34
बाय जपुन र्‍हावाव.. पण छान लीवलय.. (उरलेल्या दोन अनुभवांच्या प्रतीक्षेतला) अर्धवट

पाषाणभेद 24/06/2010 - 19:53
बर्‍याचदा प्रवासातली माणसे चांगलीच वागतात. एखाद्या माणसामुळे माणसाच्या नावाला काळीमा लागतो. वरील प्रसंगाच्या लिखाणात अन प्रतिक्रीयांत असे जाणवले नाही. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

विसोबा खेचर 01/06/2008 - 08:20
सभ्य चारित्र्याच्या त्या भल्या माणसाला आपलाही सलाम..! शितल, साध्या सोप्या शब्दातलं अनुभवकथन आवडलं. अजूनही येऊ देत... तात्या.

फटू 01/06/2008 - 09:14
अशी माणसं हल्ली खुप कमी भेटतात... (भल्या माणसांनी वेळोवेळी मदत केल्यामुळे आयुष्यात काही मिळवलेला) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

एक पुरुष म्हणून तुमच्या भितीशी मी कदाचित १०० टक्के समरस होणार नाही. निसर्गानेच हे दोन्ही स्वभावविशेष असे बनविले आहेत की 'जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे' ही उक्ती सार्थ ठरावी. तरीपण एक अबला नारीच्या भूमिकेत शिरण्याचा प्रयत्न केला तर खरोखर फार मोठी जोखिम तुम्ही उचललीत असे वाटते. नंतर कितीही वाटले तरी आपला निर्णय बदलता येत नाही ही त्यातील अगतिकता जास्तच त्रासदायक. तुमच्या नशीबाने ड्रायव्हर चांगला भेटला आणि प्रवास निभावला. प्रवासाच्या शेवटी त्या भल्या गृहस्थाला तुम्ही 'धन्यवाद' दिले असतेत तर त्या ड्रायव्हरला आणि आम्हा वाचकांनाही खूप बरे वाटले असते. असो. अवांतरः बायकांच्या पर्स मध्ये विश्व सामावलेले असते. कोल्हापुरी अस्सल तिखटाची एखादी पुडी, दुर्धर प्रसंगी स्वसंरक्षणार्थ, ठेवायला काही हरकत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 01/06/2008 - 15:24
पेठकर काकांशी सहमत..... आणि बायकांच्या पर्स मध्ये विश्व सामावलेले असते. कोल्हापुरी अस्सल तिखटाची एखादी पुडी, दुर्धर प्रसंगी स्वसंरक्षणार्थ, ठेवायला काही हरकत नाही. हा तर अतिशय योग्य सल्ला आहे.....

In reply to by प्रभाकर पेठकर

शितल 01/06/2008 - 16:09
प्रवासाच्या शेवटी त्या भल्या गृहस्थाला तुम्ही 'धन्यवाद' दिले असतेत तर त्या ड्रायव्हरला आणि आम्हा वाचकांनाही खूप बरे वाटले असते. हो ते ही मी बोलले पण फक्त थॅक्स एवढेच, (ते मात्र लिहायचे राहुन गेले) कारण तो माणुस एक ही शब्द बोलत नव्हता त्यामुळे मला ऑकवर्ड फिल होत होते. कोल्हापुरी अस्सल तिखटाची एखादी पुडी, दुर्धर प्रसंगी स्वसंरक्षणार्थ, ठेवायला काही हरकत नाही हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण जळ्ली आम्ही त्या पर्स मध्ये १०० दा हात घालतो आणि आमचीच बोटे त्या तिकटात जाऊन आमचेच डोले लाल व्हायचे. (ह्.घ्या.)

In reply to by शितल

हो ते ही मी बोलले पण फक्त थॅक्स एवढेच, (ते मात्र लिहायचे राहुन गेले) वाचून बरे वाटले. धन्यवाद. आमचीच बोटे त्या तिकटात जाऊन आमचेच डोले लाल व्हायचे. हलकेच घेऊ नका. मी सल्ला गांभिर्याने दिला आहे. पर्सच्या एका खणात (अनंत खण असतात) फक्त तिखटाची पुडी ठेवायची. म्हणजे त्याला चुकूनही आपला हात लागू नये आणि ऐनवेळी शेकडो अनावश्याक वस्तूंमधून तिखट शोधण्यात वेळ ही जाऊ नये. कसे?

राजे 01/06/2008 - 12:04
:) अशी सभ्य माणसं ह्या भुतलावर आहेत म्हणून विश्वास नावाची चीज तगधरुन आहे ! सलाम ! अवांतर : पेठेकर काकांचा सल्ला मोलाचा आहे... मी नेहमी आपल्या गाडी मध्ये.. एक चाकू, सुई-दोरा व मस्त पैकी बेसबॉल ची बॅट संगतीला ठेवतोच ;) काय माहीत कधी वापरायची गरज पडलीच तर ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मन 01/06/2008 - 13:35
"माणुस" सापडतो तो असा. छान लेख. एक छोटिशी गोष्ट खटकलीए पण व्य नि केलाय त्यासाठी. (आदमियों के बीच "इन्सान" मिलता है, वो ऐसे.) आपलाच, मनोबा

इनोबा म्हणे 01/06/2008 - 16:18
खरं आहे! पेठकर काकांचा सल्ला मोलाचा आहे... हेच म्हणतो.. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

यशोधरा 02/06/2008 - 08:37
शीतल, छान लिहिले आहेस, साधे आणि प्रामाणिक. तेह्वा तू किती घाबरली असशील ना?

ऋचा 02/06/2008 - 10:43
खुप छान लिहिले आहेस. पेठकर काकांचा सल्ला अगदी योग्य वाटतो.

खरेच गांभीर्याने घ्यावा. 'डा व्हिन्सी कोड'मध्ये एक मुलगी मिरपुडीचे सॅचेट वापरते. ते जास्त सोयिस्कर आहे. सगळीकडे मिळते. त्याला हात लागला तरी हरकत नाही. अनुभव छान लिहिला आहे. सुधीर कांदळकर.

चतुरंग 02/06/2008 - 20:29
वाचलेल्या, ऐकलेल्या अनुभवांचा आपल्या मनावरचा पगडा किती दृढ असतो आणि त्यातूनच बघताना आपल्याला येणारा अनुभव त्याच पठडीतून जाणारा असेल की काय ह्या आशंकेने मन कातरुन जाते त्याचे वर्णन एकदम नैसर्गिक आहे. मिरची पुडी शिवाय स्वसंरक्षणार्थ स्त्रिया अनेक साधने वापरतात. त्याचीही येथे दिलेली माहिती मनोरंजक ठरावी. :) चतुरंग

विदेश 02/06/2008 - 22:02
छान लिहिला आहे प्रवासानुभव. पण माझे नशिब खुप चा॑गले होते आणि आहे, त्या भल्या माणसाने गाडीतील चालु असलेला रोम्यान्टि॑क गाणी मी गाडीत एकटी असल्याने ब॑द केली . नशीब चांगले,माणूस भला भेटला!

शितल 02/06/2008 - 22:46
सर्व वाचका॑चे आभार आणि प्रतिसादा बद्दल धन्यवाद ! पेठकार काका आणि चतुर॑गजी या॑नी स्वतःच्या स॑रक्षणासाठी प्रवासात बाळगायचे साहित्य आहे त्याची माहिती दिल्या बद्दल त्या॑चे ही आभार.

वरदा 02/06/2008 - 23:33
मीही असले उद्योग केलेत बरेच वेळा आणि देवाच्या दयेने चांगली माणसं भेटलेयत....घरुन भयंकर शिव्या खाल्ल्यायत....माझं नशिब बलवत्तर आहे याची खात्री पटलेय.... तुझे पुढचे अनुभव लिही मग माझेहि सांगेन....आता पळायला हवय....

शीतल अनुभव कथन आवडलं, पण काळजी घे.पेठकर आणि चतुरंगनी दिलेल्या टिप्स ध्यानात ठेव. भला माणूस होता तो,नशिब ! स्वाती

प्राजु 03/06/2008 - 12:45
अनुभव छान सांगितला आहेस. खरंच त्या सद् गृहस्थाला सलाम. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ईश्वरी 05/06/2008 - 03:57
>>अनुभव छान सांगितला आहेस. खरंच त्या सद् गृहस्थाला सलाम. -- माझेही हेच मत. पण अशी एकटी जाऊ नकोस परत कधी. पुढचेही अनुभव टाक ना लवकर. ईश्वरी

शुचि 24/06/2010 - 19:22
अंगावर काटा आला. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अर्धवट 24/06/2010 - 19:34
बाय जपुन र्‍हावाव.. पण छान लीवलय.. (उरलेल्या दोन अनुभवांच्या प्रतीक्षेतला) अर्धवट

पाषाणभेद 24/06/2010 - 19:53
बर्‍याचदा प्रवासातली माणसे चांगलीच वागतात. एखाद्या माणसामुळे माणसाच्या नावाला काळीमा लागतो. वरील प्रसंगाच्या लिखाणात अन प्रतिक्रीयांत असे जाणवले नाही. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रवासातील खुप चा॑गले अनुभव माझ्या पाठीशी आहेत त्यातील दोन तीन सा॑गते. कोर्टात नविनच नोकरीला लागुन अगदी २ ते ३ महिनेच झाले होते, स्वतःच्या गावापासुन दुर गावी नोकरीला असल्याने दुसर्‍या आणि चौथ्या शनिवार, रविवारी मी कोल्हापुरला म्हणजे स्वतःच्या गावी याचचे .

आर्यांचे मुळस्थान कोणते? : डॉ. आंबेडकर

पंकज ·

चिन्या१९८५ 31/05/2008 - 22:28
आर्य बाहेरचे होते ही थिअरी बर्‍यापैकी चुकिची आहे. खालील लिंक्स पहा- http://video.google.com/videoplay?docid=7678538942425297587 लेख- http://www.archaeologyonline.net/artifacts/scientific-verif-vedas.html

मन 01/06/2008 - 01:00
माझ्या वाचण्यात जी काय माहिती आली त्यानुसार मलाही तेच पटतं("बाहेरुन" वगैरे कुणी काही आक्रमण केलेलं नाही.) याबाबतीत पुढले भाग वाचायला आवडतील, काही नवीन मुद्दे, नवीन गोष्टी , नवीन दृष्टिकोन असल्यास तेही जाणुन घ्यायला आवडेल. येउ द्यात मग ते ही लवकर. आपलाच, मनोबा

विकास 01/06/2008 - 08:24
लेख माहीतीपूर्ण आहे. फक्त तो आंबेडकरांनी लिहीला आहे का तुम्ही ते नीटसे स्प्ष्ट झाले नाही. कारण लेख चालू झाल्यावर पण, "यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला"" असे वाक्य आहे, म्हणून हा प्रश्न. धन्यवाद

राजे 01/06/2008 - 12:07
आर्य आकाशातून पडले अथवा जमीनीतून आले... येथेच राहत होते.. अथवा बाहेरुन आले.... हे माहित झाल्यावर काय फरक पडणार आहे हे कोणी समजावून सांगेल का मला ? स्वगत : हे माहीत नाही आहे ते माहीती करुन घेणे कधी कधी त्रासदायक ठरते... तर कधी वरदान ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

पंकज 01/06/2008 - 14:15
"यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला" मुळ लेख आंबेडकरांनीच लिहिला आहे. मात्र तो बराच मोठा आहे. प्रत्येक मुद्याचे स्पष्टिकरन करताना मुळ लेखात वैदिक वांङ्मयात तसेच जागतीक इतिहासातील बरेच संदर्भ दिलेले आहेत, ते संदर्भ टाळताना अनावधानाने वरील वाक्य आलेले आहे. मात्र वरील वाक्याची काहिही गरज नव्हती. ते वाक्य माझ्या चुकीने आलेले आहे.

आम्हाघरीधन 30/06/2008 - 14:53
आर्यांचे मुळस्थान कोणते? याबद्दल बरेच वाद आहेत. एका चर्चेमध्ये नुकताच त्याचा उल्लेख झाला. जगातील अनेक विचारवंतांनी त्याबद्दल मते मांडली आहेत. भारतातील एक विचारवंत डॉ. भि. रा. आंबेडकर यांनी आर्यांच्या मुळस्थानाबद्दल १९४६ साली मते मांडली. आंबेडकरांनी आर्यवंशाबद्दल व आर्यांच्या मुळस्थानाबद्दल प्रचलीत असलेल्या सिध्दांताचा या लेखामध्ये अभ्यास केलेला आहे. ते पुढिलप्रमाणे.. आर्य वंशाबद्दल बरेच मतभेद आहेत परंतू काहि अंगाबद्दल पुर्ण एकमत आहे ते येणेप्रमाणे: - १. ज्यांनी वैदिक वांङमय तयार केले ते लोक आर्य वंशाचे होते. २. हे लोक मुळचे भारताबाहेरचे. त्यांनी भारतावर स्वारी केली. ३. मुळ रहिवाशी दास व दस्यू या नावाने ओळखले जात. त्यांचा वंश व आर्यांचा वंश यात फरक होता. ४. आर्यांचा रंग गोरा होता. दास व दस्यू यांचा रंग काळा होता ५. आर्यांनी दास व दस्यू यांना जिंकून अंकित केले. आर्यवंश या नावाच एक वंश अस्तित्वात होता, या पायावर सिध्दांताची उभारणी केलेली आहे, या मुद्दाचा प्रथम विचार करणे जरूर आहे. हा आर्यवंश म्हणजे काय? यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला. मित्रा पन्कज वरिल वाक्ये सत्य प्रमाणच आहेत. आर्य भारताबाहेरुनच आलेले आहेत हे वरिल वाक्यान्वरुनच सिद्ध आहे. असो, आता ते स्वतः भारतीय आहेत असे मानायला हरकत नसावी किमान पक्षी त्यान्नी तसे मानावे.

आर्यांचा रंग गोरा होता. दास व दस्यू यांचा रंग काळा होता असो, आता ते स्वतः भारतीय आहेत असे मानायला हरकत नसावी किमान पक्षी त्यान्नी तसे मानावे. म्हणजे कोण आतापर्यंत स्वत:ला परके समजत होते ? आणि आर्य म्हणजे उच्चवर्णिय (मुख्यत्वे ब्राह्मण) म्हणाल तर रंगाने काळे पण जातीने ब्राह्मण असे लोक महाराष्ट्रात वा दक्षिण भारतात खूप दिसतात याउलट निम्नवर्णिय ( खालच्या जातीचे) असूनही रंगाने गोरे असलेल्याची उदाहरणेही आहेत.

चिन्या१९८५ 31/05/2008 - 22:28
आर्य बाहेरचे होते ही थिअरी बर्‍यापैकी चुकिची आहे. खालील लिंक्स पहा- http://video.google.com/videoplay?docid=7678538942425297587 लेख- http://www.archaeologyonline.net/artifacts/scientific-verif-vedas.html

मन 01/06/2008 - 01:00
माझ्या वाचण्यात जी काय माहिती आली त्यानुसार मलाही तेच पटतं("बाहेरुन" वगैरे कुणी काही आक्रमण केलेलं नाही.) याबाबतीत पुढले भाग वाचायला आवडतील, काही नवीन मुद्दे, नवीन गोष्टी , नवीन दृष्टिकोन असल्यास तेही जाणुन घ्यायला आवडेल. येउ द्यात मग ते ही लवकर. आपलाच, मनोबा

विकास 01/06/2008 - 08:24
लेख माहीतीपूर्ण आहे. फक्त तो आंबेडकरांनी लिहीला आहे का तुम्ही ते नीटसे स्प्ष्ट झाले नाही. कारण लेख चालू झाल्यावर पण, "यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला"" असे वाक्य आहे, म्हणून हा प्रश्न. धन्यवाद

राजे 01/06/2008 - 12:07
आर्य आकाशातून पडले अथवा जमीनीतून आले... येथेच राहत होते.. अथवा बाहेरुन आले.... हे माहित झाल्यावर काय फरक पडणार आहे हे कोणी समजावून सांगेल का मला ? स्वगत : हे माहीत नाही आहे ते माहीती करुन घेणे कधी कधी त्रासदायक ठरते... तर कधी वरदान ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

पंकज 01/06/2008 - 14:15
"यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला" मुळ लेख आंबेडकरांनीच लिहिला आहे. मात्र तो बराच मोठा आहे. प्रत्येक मुद्याचे स्पष्टिकरन करताना मुळ लेखात वैदिक वांङ्मयात तसेच जागतीक इतिहासातील बरेच संदर्भ दिलेले आहेत, ते संदर्भ टाळताना अनावधानाने वरील वाक्य आलेले आहे. मात्र वरील वाक्याची काहिही गरज नव्हती. ते वाक्य माझ्या चुकीने आलेले आहे.

आम्हाघरीधन 30/06/2008 - 14:53
आर्यांचे मुळस्थान कोणते? याबद्दल बरेच वाद आहेत. एका चर्चेमध्ये नुकताच त्याचा उल्लेख झाला. जगातील अनेक विचारवंतांनी त्याबद्दल मते मांडली आहेत. भारतातील एक विचारवंत डॉ. भि. रा. आंबेडकर यांनी आर्यांच्या मुळस्थानाबद्दल १९४६ साली मते मांडली. आंबेडकरांनी आर्यवंशाबद्दल व आर्यांच्या मुळस्थानाबद्दल प्रचलीत असलेल्या सिध्दांताचा या लेखामध्ये अभ्यास केलेला आहे. ते पुढिलप्रमाणे.. आर्य वंशाबद्दल बरेच मतभेद आहेत परंतू काहि अंगाबद्दल पुर्ण एकमत आहे ते येणेप्रमाणे: - १. ज्यांनी वैदिक वांङमय तयार केले ते लोक आर्य वंशाचे होते. २. हे लोक मुळचे भारताबाहेरचे. त्यांनी भारतावर स्वारी केली. ३. मुळ रहिवाशी दास व दस्यू या नावाने ओळखले जात. त्यांचा वंश व आर्यांचा वंश यात फरक होता. ४. आर्यांचा रंग गोरा होता. दास व दस्यू यांचा रंग काळा होता ५. आर्यांनी दास व दस्यू यांना जिंकून अंकित केले. आर्यवंश या नावाच एक वंश अस्तित्वात होता, या पायावर सिध्दांताची उभारणी केलेली आहे, या मुद्दाचा प्रथम विचार करणे जरूर आहे. हा आर्यवंश म्हणजे काय? यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला. मित्रा पन्कज वरिल वाक्ये सत्य प्रमाणच आहेत. आर्य भारताबाहेरुनच आलेले आहेत हे वरिल वाक्यान्वरुनच सिद्ध आहे. असो, आता ते स्वतः भारतीय आहेत असे मानायला हरकत नसावी किमान पक्षी त्यान्नी तसे मानावे.

आर्यांचा रंग गोरा होता. दास व दस्यू यांचा रंग काळा होता असो, आता ते स्वतः भारतीय आहेत असे मानायला हरकत नसावी किमान पक्षी त्यान्नी तसे मानावे. म्हणजे कोण आतापर्यंत स्वत:ला परके समजत होते ? आणि आर्य म्हणजे उच्चवर्णिय (मुख्यत्वे ब्राह्मण) म्हणाल तर रंगाने काळे पण जातीने ब्राह्मण असे लोक महाराष्ट्रात वा दक्षिण भारतात खूप दिसतात याउलट निम्नवर्णिय ( खालच्या जातीचे) असूनही रंगाने गोरे असलेल्याची उदाहरणेही आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

मजेशीर शब्द

आर्य ·

ईश्वरी 30/05/2008 - 22:18
अमेरिकेत बर्‍याचदा कानावर पडलेले स्पॅनिश शब्द स्पॅनिश शब्द: अर्थ Hola : (उच्चार) ओला - हॅलो , Gracias - धन्यवाद Amigo: अमिगो - मित्र Cero सिरो - शून्य Uno, dos, tres, cuatro(क्वात्रो), cinco (सिंको) : एक दोन तीन चार पाच Negro - काळा (रंग) , blanco (ब्लांको)- पांढरा Esposo , Esposa - (एस्पोसो - एस्पोसा) नवरा बायको Hijo - इहो - मुलगा (son) (स्पनिश मधे j चा उचार ह करतात ) Hija- इहा - मुलगी (daughter) Nino - Nina : छोटा मुलगा - छोटी मुलगी Padre / Papa / Papi : वडील Madre/ mama/ mami : आई Luna: चंद्र Perfecto: perfect तसेच Fantastico ईश्वरी

आजानुकर्ण 30/05/2008 - 22:12
कुमारस्वामी यांनी कुंडी हा शब्द भाषणात वापरला? कुमारस्वामींचे आडनाव ठाकरे तर नाही ना? आपला, (नवनिर्माणसैनिक) आजानुकर्ण ठोकरे

विसोबा खेचर 31/05/2008 - 00:10
तसे अनेक शब्द आहेत, परंतु आमच्या देवगडी बोलीभाषेतले दोन खास शब्द! १) आंडिलपाड्या - जेव्हा एखादी बाई एखाद्या पुरुषाला 'ठेवते' तेव्हा त्या पुरुषाला आमच्याकडे 'आंडिलपाड्या' असं म्हणतात! २) अक्करमाश्या - अनौरस अपत्याला अक्करमाश्या असे संबोधतात! तूर्तास इतकेच. बाकी अनेक शब्द आहेत. सांगेन सवडीने! आपला, (सध्या कुणाचाही 'आंडिलपाड्या' नसलेला!) तात्या देवगडकर.

पक्या 31/05/2008 - 00:20
यूएस मधे असताना एका चायनिज कलीग कडून शिकलेले शब्द Ni Hao - हॅलो Shi shi - धन्यवाद Shing - हो (येस) Dong budong - do you understand? Zou ba - Let's go Sheshiao - शाळा ba ba : बाबा (सबोंधन , वडील नव्हे) ma ma: आई ye ye : ये ऽऽऽ ये - आजोबा (वडीलांचे वडील) Nei nei - नेय ऽ ने - आजी (वडीलांची आई) ga ga - ग ग - मोठा भाऊ di di- दी दी - लहान भाऊ gu gu - आत्या Ji Ji - मोठी बहीण mei mei - लहान बहीण Jiu Jiu - मामा shooooshu - काका Tai tai - बायको (साधीसुधी नव्हे बरं का- गर्भ श्रीमंताची) बाकी चायनीज उच्चार ऐकताना मजा वाटते. दोन चायनीज बोलत असतील तर भांडतात की काय असे वाटते. चायनीज ग्रेट वॉल ला 'चांग चंग ' म्हणतात. -- आपलाच पक्या त्सेंग

धनंजय 31/05/2008 - 01:59
जनेलाकडे कदेल वर : खिडकीपाही खुर्ची ने बांगड्यां रेशियाद : भरलेले बांगडे हे झाले केवळ अनोळखी शब्द. पण पुढचे जरा अभावित विनोद करून जातात. कुलेर-लात दी : चमचा-डबा दे. शी खाता : थंडी वाजते

राजे 31/05/2008 - 11:16
"कुंडी" - हा शब्द तुमची चुकीचा लिहला आहे.. तो " खुंडी " - बसा !!! "कुंडी"- अर्थ जरा वेगळा आहे (जो भाग बसण्यासाठी वापरतात तो ;) ) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विजुभाऊ 31/05/2008 - 11:36
" खुंडी " - बसा !!! मग राखुंडी म्हणजे काय? पूर्वी लोक राखुंडीने दात घासायचे भांडी घासायचे. आणखी मजेदार गुजराती शब्द. नवरा = रिकामटेकडा खाकरा = कडक भाजलेली पोळी पादर = भाग /गल्ली पोळ = बोळ / विभाग अघोरी = झोपल्यावर घोरणारे. चिबुक = हनुवटी घुटण = गुढगा चकली = चिमणी (पक्षी)

In reply to by विजुभाऊ

अभिज्ञ 31/05/2008 - 12:09
अघोरी = झोपल्यावर घोरणारे. मग जागे पणि घोरण्या-यांना काय म्हणावे? ह.घ्या. (अनभिज्ञ) अभिज्ञ.

आनंद घारे 31/05/2008 - 12:05
सध्या मी मैसूरला आल्यावर माझ्या कानडीच्या (अ)ज्ञानाची उजळणी करतो आहे आणि घरातील इतर लोकांना ती भाषा शिकवण्याचा प्रयत्न. कानाला एकासारखे वाटणारे पण वेगळ्या अर्थांचे काही शब्दः एले (यले)= पान ---- कानडीत र्‍हस्व व दीर्घ असे दोन ए आणि ओ स्वर आहेत. र्‍ह्स्व ए चा उच्चार ऐकतांना थोडा य सारखा वाटतो. र्‍हस्व ओ चा उच्चार व सारखा. एल्ले (यल्ले)= कोठे इल्ले = इथे इल्ला = नाही एल्ला(यल्ला) = सर्व एळ= ऊठ एळु = सात गोंधळ उडवणारे कांही शब्द : मरा = सूप हाल = दूध कसा = केरकचरा माडी = करा अंगडी = दुकान मने = घर बेक री = पाहिजे हो

सीधा = सरळ रो / रा = जा मरातब = गादी (मान मरातब?) हिंद = हिंदुस्तान हिंदसा = इंजिनीरिंग किंवा गणित या संबंधीचे ज्ञान -- ज्याला पाश्चात्य 'अरेबिक न्यूमरल' म्हणतात त्याला अरब 'हिंदसा' म्हणतात. कारण त्यांनी ते आकडे हिंदुस्तानातून शिकले. मुहंदेस = इंजिनीयर तबीब = डॉक्टर -- आपल्या कडे पण हा शब्द पूर्वी वापरात होता... शु = काय? व्हॉट? (हुबेहूब गुजराती अर्थ) कम = किती? नुस = अर्धा अख्खु = भाऊ उख्ति = बहिण वालिद / वालिदा = वडिल / आई मोया = पाणी बहर = समुद्र साबुन = साबण वाहेद, इथनेन, तलाता, अरबा, खमसा, सित्ता, सबाह, तमानिया, तिस्सा, आशरा... = १,२,३,४,५,६,७,८,९,१०

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अरबस्थानातही देशा-देशांमध्ये शब्दांचे उच्चार बदलतात. निळ्या अक्षरातील उच्चार मस्कतमध्ये प्रचलीत आहेत. मुहंदेस = इंजिनीयर = मुहांदिस तबीब = डॉक्टर -- आपल्या कडे पण हा शब्द पूर्वी वापरात होता... तबीब (पुरूष डॉक्टर); तबीबा (स्त्री डॉक्टर) शु = काय? व्हॉट? (हुबेहूब गुजराती अर्थ)= मु = काय? व्हॉट? अख्खु = भाऊ = अखोई मोया = पाणी= माई बहर = समुद्र = बहार (बहारेन = दोन समुद्रांनी वेढलेला प्रदेश) मैदान = मैदान सेम सेम = तसेच (इंग्रजी सेम ह्या अर्थी) गोल =गोल (गोलाकार) कमर = दिवा, चंद्र खमर = दारू (व्हिस्की)

अरुण मनोहर 01/06/2008 - 09:55
सिंगापूर इथे मलय, तामीळ, मॅन्डेरिन आणि इंग्लीश च्या मिश्रणातून तयार झालेली सिंग्लीश बोली भाषा कधी कधी इनफॉरमली वापरल्या जाते. ह्या बोली भाषेत इंग्लीशच्या व्याकरणाची वाट लावली जाते, म्हणून क्वीन्स इंग्लीश वापरणारे दु:खी होतात. Kiasu (adj) Pronounced 'kee-a-soo'. Derived from the Hokkien dialect meaning afraid to lose out to others or not to lose face. Example: He sent his family to line up in different queues for the same item, so kiasu. Arrow (verb) Derived from the English language meaning to be given a task that you don't want to do. Example: I was arrowed to paint this wall. Lah The most famous of Singaporean expressions used at the end of sentences for emphasis. Example: Very funny, lah! Langgar (verb) Derived from the Malay language meaning to collide. Example: This van suddenly pulled out and langgar my car. Sotong (adj) Derived from the Malay language meaning does not know what is going on. Similar meaning to 'blur'. (Sotong is the Malay word for octopus which squirts ink and clouds everything.) Example: This has been going on for months, didn't you know? Sotong! Goondu: stupid or acting stupid Can meh: are you certain?

आर्य 02/06/2008 - 11:06
मित्रांनो ! काय कुंडी घेऊन बसलाय यालाच अंडू पण म्हणतात. याप्रांतात आल्यावर हे शब्द जरा जपून ऊच्चारा ऐवढेच, बेळगांवकरच यावर जास्त प्रकाष टाकू शकतील ! बाकी आणखी काही कन्नड शब्द अळु - रडणे कुत कोळी / कुळी तिको - बसा सुमने कुतको - गप्प बस बीडी - सोड (माड बीडी / होग बिडी - करुन सोड / जाऊदे सोड) ताई - आई बायको - बाई / स्त्री सर्वात गंमतीची बाब म्हणजे - गणेशोत्सव -कधीही साजरा करतात गणेश चतुर्थी पासुन अगदी नोव्हेंबर पर्यंत गणपती बसवायला आणि विर्सजनाला काही ताळ-मेळच नाही राव ! अगदी पक्ष पंधरड्यात सुध्दा बसवता. आणि विधी-निषेध तर सोडाच ! बाजारात जाऊन पिशवीत घालून ऐका काकूंनी गणपती घरी नेला. काय बोंबलायच यावर ?

मन 02/06/2008 - 17:48
मी काल "हलवा:-ओरिजनल ग्रीक स्वीट"-मेड इन मॅसिडोनिया असा लिहिलेला बॉक्स आणला. खाउन पाह्यला तर राव चव अगदि थेट आपल्या गज्जग सारखेच की राव. काय म्हंजी काय बी फरक नाय. फक्त नाव "हलवा" दिलय त्ये लोकांनी त्येला. (ज्यांना गज्जग माहित नाही त्यांच्यासाठी:- ही मिठाई महाराश्ट्रात तितकीशी लोकप्रिय नाही दिसत््इचं खर ं प्रस्थ कळत मध्य प्रदेशात, आणी त्यातही इंदुरमध्ये.) आपलाच, मनोबा

ईश्वरी 30/05/2008 - 22:18
अमेरिकेत बर्‍याचदा कानावर पडलेले स्पॅनिश शब्द स्पॅनिश शब्द: अर्थ Hola : (उच्चार) ओला - हॅलो , Gracias - धन्यवाद Amigo: अमिगो - मित्र Cero सिरो - शून्य Uno, dos, tres, cuatro(क्वात्रो), cinco (सिंको) : एक दोन तीन चार पाच Negro - काळा (रंग) , blanco (ब्लांको)- पांढरा Esposo , Esposa - (एस्पोसो - एस्पोसा) नवरा बायको Hijo - इहो - मुलगा (son) (स्पनिश मधे j चा उचार ह करतात ) Hija- इहा - मुलगी (daughter) Nino - Nina : छोटा मुलगा - छोटी मुलगी Padre / Papa / Papi : वडील Madre/ mama/ mami : आई Luna: चंद्र Perfecto: perfect तसेच Fantastico ईश्वरी

आजानुकर्ण 30/05/2008 - 22:12
कुमारस्वामी यांनी कुंडी हा शब्द भाषणात वापरला? कुमारस्वामींचे आडनाव ठाकरे तर नाही ना? आपला, (नवनिर्माणसैनिक) आजानुकर्ण ठोकरे

विसोबा खेचर 31/05/2008 - 00:10
तसे अनेक शब्द आहेत, परंतु आमच्या देवगडी बोलीभाषेतले दोन खास शब्द! १) आंडिलपाड्या - जेव्हा एखादी बाई एखाद्या पुरुषाला 'ठेवते' तेव्हा त्या पुरुषाला आमच्याकडे 'आंडिलपाड्या' असं म्हणतात! २) अक्करमाश्या - अनौरस अपत्याला अक्करमाश्या असे संबोधतात! तूर्तास इतकेच. बाकी अनेक शब्द आहेत. सांगेन सवडीने! आपला, (सध्या कुणाचाही 'आंडिलपाड्या' नसलेला!) तात्या देवगडकर.

पक्या 31/05/2008 - 00:20
यूएस मधे असताना एका चायनिज कलीग कडून शिकलेले शब्द Ni Hao - हॅलो Shi shi - धन्यवाद Shing - हो (येस) Dong budong - do you understand? Zou ba - Let's go Sheshiao - शाळा ba ba : बाबा (सबोंधन , वडील नव्हे) ma ma: आई ye ye : ये ऽऽऽ ये - आजोबा (वडीलांचे वडील) Nei nei - नेय ऽ ने - आजी (वडीलांची आई) ga ga - ग ग - मोठा भाऊ di di- दी दी - लहान भाऊ gu gu - आत्या Ji Ji - मोठी बहीण mei mei - लहान बहीण Jiu Jiu - मामा shooooshu - काका Tai tai - बायको (साधीसुधी नव्हे बरं का- गर्भ श्रीमंताची) बाकी चायनीज उच्चार ऐकताना मजा वाटते. दोन चायनीज बोलत असतील तर भांडतात की काय असे वाटते. चायनीज ग्रेट वॉल ला 'चांग चंग ' म्हणतात. -- आपलाच पक्या त्सेंग

धनंजय 31/05/2008 - 01:59
जनेलाकडे कदेल वर : खिडकीपाही खुर्ची ने बांगड्यां रेशियाद : भरलेले बांगडे हे झाले केवळ अनोळखी शब्द. पण पुढचे जरा अभावित विनोद करून जातात. कुलेर-लात दी : चमचा-डबा दे. शी खाता : थंडी वाजते

राजे 31/05/2008 - 11:16
"कुंडी" - हा शब्द तुमची चुकीचा लिहला आहे.. तो " खुंडी " - बसा !!! "कुंडी"- अर्थ जरा वेगळा आहे (जो भाग बसण्यासाठी वापरतात तो ;) ) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विजुभाऊ 31/05/2008 - 11:36
" खुंडी " - बसा !!! मग राखुंडी म्हणजे काय? पूर्वी लोक राखुंडीने दात घासायचे भांडी घासायचे. आणखी मजेदार गुजराती शब्द. नवरा = रिकामटेकडा खाकरा = कडक भाजलेली पोळी पादर = भाग /गल्ली पोळ = बोळ / विभाग अघोरी = झोपल्यावर घोरणारे. चिबुक = हनुवटी घुटण = गुढगा चकली = चिमणी (पक्षी)

In reply to by विजुभाऊ

अभिज्ञ 31/05/2008 - 12:09
अघोरी = झोपल्यावर घोरणारे. मग जागे पणि घोरण्या-यांना काय म्हणावे? ह.घ्या. (अनभिज्ञ) अभिज्ञ.

आनंद घारे 31/05/2008 - 12:05
सध्या मी मैसूरला आल्यावर माझ्या कानडीच्या (अ)ज्ञानाची उजळणी करतो आहे आणि घरातील इतर लोकांना ती भाषा शिकवण्याचा प्रयत्न. कानाला एकासारखे वाटणारे पण वेगळ्या अर्थांचे काही शब्दः एले (यले)= पान ---- कानडीत र्‍हस्व व दीर्घ असे दोन ए आणि ओ स्वर आहेत. र्‍ह्स्व ए चा उच्चार ऐकतांना थोडा य सारखा वाटतो. र्‍हस्व ओ चा उच्चार व सारखा. एल्ले (यल्ले)= कोठे इल्ले = इथे इल्ला = नाही एल्ला(यल्ला) = सर्व एळ= ऊठ एळु = सात गोंधळ उडवणारे कांही शब्द : मरा = सूप हाल = दूध कसा = केरकचरा माडी = करा अंगडी = दुकान मने = घर बेक री = पाहिजे हो

सीधा = सरळ रो / रा = जा मरातब = गादी (मान मरातब?) हिंद = हिंदुस्तान हिंदसा = इंजिनीरिंग किंवा गणित या संबंधीचे ज्ञान -- ज्याला पाश्चात्य 'अरेबिक न्यूमरल' म्हणतात त्याला अरब 'हिंदसा' म्हणतात. कारण त्यांनी ते आकडे हिंदुस्तानातून शिकले. मुहंदेस = इंजिनीयर तबीब = डॉक्टर -- आपल्या कडे पण हा शब्द पूर्वी वापरात होता... शु = काय? व्हॉट? (हुबेहूब गुजराती अर्थ) कम = किती? नुस = अर्धा अख्खु = भाऊ उख्ति = बहिण वालिद / वालिदा = वडिल / आई मोया = पाणी बहर = समुद्र साबुन = साबण वाहेद, इथनेन, तलाता, अरबा, खमसा, सित्ता, सबाह, तमानिया, तिस्सा, आशरा... = १,२,३,४,५,६,७,८,९,१०

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अरबस्थानातही देशा-देशांमध्ये शब्दांचे उच्चार बदलतात. निळ्या अक्षरातील उच्चार मस्कतमध्ये प्रचलीत आहेत. मुहंदेस = इंजिनीयर = मुहांदिस तबीब = डॉक्टर -- आपल्या कडे पण हा शब्द पूर्वी वापरात होता... तबीब (पुरूष डॉक्टर); तबीबा (स्त्री डॉक्टर) शु = काय? व्हॉट? (हुबेहूब गुजराती अर्थ)= मु = काय? व्हॉट? अख्खु = भाऊ = अखोई मोया = पाणी= माई बहर = समुद्र = बहार (बहारेन = दोन समुद्रांनी वेढलेला प्रदेश) मैदान = मैदान सेम सेम = तसेच (इंग्रजी सेम ह्या अर्थी) गोल =गोल (गोलाकार) कमर = दिवा, चंद्र खमर = दारू (व्हिस्की)

अरुण मनोहर 01/06/2008 - 09:55
सिंगापूर इथे मलय, तामीळ, मॅन्डेरिन आणि इंग्लीश च्या मिश्रणातून तयार झालेली सिंग्लीश बोली भाषा कधी कधी इनफॉरमली वापरल्या जाते. ह्या बोली भाषेत इंग्लीशच्या व्याकरणाची वाट लावली जाते, म्हणून क्वीन्स इंग्लीश वापरणारे दु:खी होतात. Kiasu (adj) Pronounced 'kee-a-soo'. Derived from the Hokkien dialect meaning afraid to lose out to others or not to lose face. Example: He sent his family to line up in different queues for the same item, so kiasu. Arrow (verb) Derived from the English language meaning to be given a task that you don't want to do. Example: I was arrowed to paint this wall. Lah The most famous of Singaporean expressions used at the end of sentences for emphasis. Example: Very funny, lah! Langgar (verb) Derived from the Malay language meaning to collide. Example: This van suddenly pulled out and langgar my car. Sotong (adj) Derived from the Malay language meaning does not know what is going on. Similar meaning to 'blur'. (Sotong is the Malay word for octopus which squirts ink and clouds everything.) Example: This has been going on for months, didn't you know? Sotong! Goondu: stupid or acting stupid Can meh: are you certain?

आर्य 02/06/2008 - 11:06
मित्रांनो ! काय कुंडी घेऊन बसलाय यालाच अंडू पण म्हणतात. याप्रांतात आल्यावर हे शब्द जरा जपून ऊच्चारा ऐवढेच, बेळगांवकरच यावर जास्त प्रकाष टाकू शकतील ! बाकी आणखी काही कन्नड शब्द अळु - रडणे कुत कोळी / कुळी तिको - बसा सुमने कुतको - गप्प बस बीडी - सोड (माड बीडी / होग बिडी - करुन सोड / जाऊदे सोड) ताई - आई बायको - बाई / स्त्री सर्वात गंमतीची बाब म्हणजे - गणेशोत्सव -कधीही साजरा करतात गणेश चतुर्थी पासुन अगदी नोव्हेंबर पर्यंत गणपती बसवायला आणि विर्सजनाला काही ताळ-मेळच नाही राव ! अगदी पक्ष पंधरड्यात सुध्दा बसवता. आणि विधी-निषेध तर सोडाच ! बाजारात जाऊन पिशवीत घालून ऐका काकूंनी गणपती घरी नेला. काय बोंबलायच यावर ?

मन 02/06/2008 - 17:48
मी काल "हलवा:-ओरिजनल ग्रीक स्वीट"-मेड इन मॅसिडोनिया असा लिहिलेला बॉक्स आणला. खाउन पाह्यला तर राव चव अगदि थेट आपल्या गज्जग सारखेच की राव. काय म्हंजी काय बी फरक नाय. फक्त नाव "हलवा" दिलय त्ये लोकांनी त्येला. (ज्यांना गज्जग माहित नाही त्यांच्यासाठी:- ही मिठाई महाराश्ट्रात तितकीशी लोकप्रिय नाही दिसत््इचं खर ं प्रस्थ कळत मध्य प्रदेशात, आणी त्यातही इंदुरमध्ये.) आपलाच, मनोबा
आज काल भाषाशुद्धी-शुद्धलेखन या आणि अशा बर्‍याच विषयांवर बराच काथ्याकुट करुन झाला आहे. शब्दकोश हा धनकोशापेक्षा वेगळाच आहे! तो वापरल्याने मोठा होतो आणि नुसताच ठेवून दिला तर त्याचा र्‍ह्सा होतो, हाच धागा पकडून ऐक नविन चर्चा पुढे चालू करु. मिपावर फक्त पश्चिम महाराष्ट्रातले नसून जगातल्या विविध भागातले सदस्य आहेत / गेलेत. चला तर मग आपला शब्द संग्रह वाढवूया.

अरून सवास! भाग १

ॐकार ·

प्राजु 30/05/2008 - 12:47
लेखहि खास आहे. थाई लोकां बद्दल बरिच माहिती सांगितली आहेत आपण. छायाचित्रेही एकदम छान आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ईश्वरी 30/05/2008 - 13:04
वा , फारच छान फोटो आहेत सर्व . थायलंड ट्रिप ची आठवण जागी झाली . (मी ८-९ वर्षापूर्वी थायलंड ला गेले होते. ) बँकॉक मधील वातारूण (Wat Arun) टेम्पल , नदीतले फ्लोटींग मार्केट , पॅलेस, डाऊनटाऊन, हत्ती आणि मगरींचा थरारक शो ..सगळच सही . पुढचे भाग लवकर टाका. वाचायला उत्सुक. ईश्वरी

आनंदयात्री 30/05/2008 - 12:57
सुंदर लेख ओंकार अन भरपुर सुरेख छायाचित्रांबद्दल धन्यवाद :) >>अयुथया - अयुत्थ्या (अयोद्ध्या) 'ऍना अँड दी किंग ऑफ सयाम' या पुस्तकात अयोध्येचा असाच उल्लेख होता असे स्मरले.

अन्जलि 30/05/2008 - 13:14
फोतो खुप छान आले आहेत मस्त वाटले जेथे सोनेरि रन्ग् दिस्तो आहे ते सोने आहे का? शेशनाग, सोनेरि खाम्ब इ.

ध्रुव 30/05/2008 - 13:59
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत -- ध्रुव

फोटो छान आहेत. थायलंड बद्दल कुतूहल आहेच. अजून पुढे लवकर लिहा. एक प्रश्न नेहमी पडतो, थाय संस्कृति वर भारताचा एवढा प्रभाव आहे, पण आज तिथे भारता बद्दल किंवा भारतीय संस्कृतिबद्दल एकंदरीत काय मत आहे? ते भारताला कोणत्या नजरेने बघतात? तुम्हाला असे काही माहित असेल तर जरूर लिहा. बिपिन.

राजे 30/05/2008 - 15:32
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत हेच म्हण्तो आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मदनबाण 31/05/2008 - 14:14
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत अगदी असेच म्हणतो.....

अजिंक्य 30/05/2008 - 18:18
आपल्याकडे "अरुणोदय" असं म्हणतात, त्याचप्रमाणे हे अरुन सवास आहे काय? (माझी आपली शंका!) बाकी लेख मात्र अतिशय उत्तम. छायाचित्रे तर अप्रतिम! असेच लेख अजूनही लिहावेत. चालू दे!

शितल 30/05/2008 - 18:30
फोटो पाहुन एकदम छान वाटले तो देश पाहण्याची इच्छा निमार्ण झाली. आणि भारतीय स॑स्कृतीशी जवळीक असल्याचे वर्णन ही छान केले आहे.

मन 30/05/2008 - 22:36
सुरेख वर्णन. सुरुवात तर झकास झालिये. आता पुढले ही भाग द्या टाकुन पटापट. आपलाच, मनोबा

पक्या 30/05/2008 - 23:49
एकसे एक प्रकाशचित्रे. थायलंड च्या सफरीची सुरवात झकास झाली आहे . येऊ द्यात अजून. -- पक्या

प्रियाली 31/05/2008 - 00:54
थायलंडची प्रकाशचित्रे सुरेखच आहेत. रामायणातील प्रसंग बहुधा कुंभकर्णाचा असावा का काय असे वाटून गेले.
हे शहर ख्मेर राजवटीत वसवले होते आणि ते आधी राजधानीचे शहर होते.
अयुथ्थ्याबद्दल हा उल्लेख कुठे सापडला? कारण अयुथ्थ्याचे राजे हिंदू/बौद्ध असले तरी ख्मेर नसावेत आणि अयुथ्थ्याचा उदय ख्मेर घराण्याच्या पडत्या काळात झाला, शहरही तेव्हाच वसवले असावे असे वाटते. अयुथ्थ्याच्या एका राजाने सुमारे १४व्या शतकात (चू. भू. दे. घे.) ख्मेर घराणे खिळखिळे झाल्यावर त्यावर स्वारी केली होती असे वाटते.

In reply to by प्रियाली

ॐकार 03/06/2008 - 00:10
ख्मेर राजवटीत वसवल्याचा उल्लेख चुकला. ख्मेर राजवटीच्या अस्तकाळात वसवले गेले असे वाक्य असावयास हवे होते. ख्मेर शिल्पकलेच्या प्रभावाबद्दल लिहायचे होते. ते राहून गेले. संदर्भ - http://www.tourismthailand.org/destination-guide/phranakhonsiayutthaya-14-1-1.html

चित्रा 31/05/2008 - 05:56
सर्वच छायाचित्रे आवडली आणि वर्णनावरून देश बघण्याची इच्छा झालेली आहे. सोनेरी रंग थायलंडमध्ये कुठच्यातरी एका काळात प्रिय झालेला दिसतो आहे. दुसरीकडे अयुथ्थ्यास मात्र इमारतींची नैसर्गिक रंगसंगती दिसते आहे. मस्त चित्रे.

In reply to by चित्रा

प्रियाली 31/05/2008 - 06:36
पुराणे, जातककथा इ. मध्ये वर्णन केलेली सुवर्णभूमी ही थायलंड आहे असे मानले गेल्याने बहुधा येथे सोनेरी रंग प्रिय होता आणि असावा.

विसोबा खेचर 31/05/2008 - 08:31
ओंकारा, सर्व फोटू व वर्णन क्लासच आहे! मला जुन्या थाई लाकडी घराचा फोटू सर्वाधिक आवडला! :) पुढच्या भागांत फ्लोटींग मार्केट आणि थाई खादाडीबद्दल लिहीन. तूर्तास इतकेच... अरे वाट पाहतो आहे रे! तुझ्या हा लेख म्हणजे मेजवानीच आहे. आम्हाला घरबसल्या थायलंडची चित्रदर्शी सफर घडली. आता थाई खादाडीचं सचित्र वर्णन येऊ द्यात! तात्या.

प्राजु 30/05/2008 - 12:47
लेखहि खास आहे. थाई लोकां बद्दल बरिच माहिती सांगितली आहेत आपण. छायाचित्रेही एकदम छान आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ईश्वरी 30/05/2008 - 13:04
वा , फारच छान फोटो आहेत सर्व . थायलंड ट्रिप ची आठवण जागी झाली . (मी ८-९ वर्षापूर्वी थायलंड ला गेले होते. ) बँकॉक मधील वातारूण (Wat Arun) टेम्पल , नदीतले फ्लोटींग मार्केट , पॅलेस, डाऊनटाऊन, हत्ती आणि मगरींचा थरारक शो ..सगळच सही . पुढचे भाग लवकर टाका. वाचायला उत्सुक. ईश्वरी

आनंदयात्री 30/05/2008 - 12:57
सुंदर लेख ओंकार अन भरपुर सुरेख छायाचित्रांबद्दल धन्यवाद :) >>अयुथया - अयुत्थ्या (अयोद्ध्या) 'ऍना अँड दी किंग ऑफ सयाम' या पुस्तकात अयोध्येचा असाच उल्लेख होता असे स्मरले.

अन्जलि 30/05/2008 - 13:14
फोतो खुप छान आले आहेत मस्त वाटले जेथे सोनेरि रन्ग् दिस्तो आहे ते सोने आहे का? शेशनाग, सोनेरि खाम्ब इ.

ध्रुव 30/05/2008 - 13:59
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत -- ध्रुव

फोटो छान आहेत. थायलंड बद्दल कुतूहल आहेच. अजून पुढे लवकर लिहा. एक प्रश्न नेहमी पडतो, थाय संस्कृति वर भारताचा एवढा प्रभाव आहे, पण आज तिथे भारता बद्दल किंवा भारतीय संस्कृतिबद्दल एकंदरीत काय मत आहे? ते भारताला कोणत्या नजरेने बघतात? तुम्हाला असे काही माहित असेल तर जरूर लिहा. बिपिन.

राजे 30/05/2008 - 15:32
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत हेच म्हण्तो आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मदनबाण 31/05/2008 - 14:14
थायलंडची सचित्र सफर घडवुन आणलीत. पुढील लेखाच्या व चित्रांच्या प्रतिक्षेत अगदी असेच म्हणतो.....

अजिंक्य 30/05/2008 - 18:18
आपल्याकडे "अरुणोदय" असं म्हणतात, त्याचप्रमाणे हे अरुन सवास आहे काय? (माझी आपली शंका!) बाकी लेख मात्र अतिशय उत्तम. छायाचित्रे तर अप्रतिम! असेच लेख अजूनही लिहावेत. चालू दे!

शितल 30/05/2008 - 18:30
फोटो पाहुन एकदम छान वाटले तो देश पाहण्याची इच्छा निमार्ण झाली. आणि भारतीय स॑स्कृतीशी जवळीक असल्याचे वर्णन ही छान केले आहे.

मन 30/05/2008 - 22:36
सुरेख वर्णन. सुरुवात तर झकास झालिये. आता पुढले ही भाग द्या टाकुन पटापट. आपलाच, मनोबा

पक्या 30/05/2008 - 23:49
एकसे एक प्रकाशचित्रे. थायलंड च्या सफरीची सुरवात झकास झाली आहे . येऊ द्यात अजून. -- पक्या

प्रियाली 31/05/2008 - 00:54
थायलंडची प्रकाशचित्रे सुरेखच आहेत. रामायणातील प्रसंग बहुधा कुंभकर्णाचा असावा का काय असे वाटून गेले.
हे शहर ख्मेर राजवटीत वसवले होते आणि ते आधी राजधानीचे शहर होते.
अयुथ्थ्याबद्दल हा उल्लेख कुठे सापडला? कारण अयुथ्थ्याचे राजे हिंदू/बौद्ध असले तरी ख्मेर नसावेत आणि अयुथ्थ्याचा उदय ख्मेर घराण्याच्या पडत्या काळात झाला, शहरही तेव्हाच वसवले असावे असे वाटते. अयुथ्थ्याच्या एका राजाने सुमारे १४व्या शतकात (चू. भू. दे. घे.) ख्मेर घराणे खिळखिळे झाल्यावर त्यावर स्वारी केली होती असे वाटते.

In reply to by प्रियाली

ॐकार 03/06/2008 - 00:10
ख्मेर राजवटीत वसवल्याचा उल्लेख चुकला. ख्मेर राजवटीच्या अस्तकाळात वसवले गेले असे वाक्य असावयास हवे होते. ख्मेर शिल्पकलेच्या प्रभावाबद्दल लिहायचे होते. ते राहून गेले. संदर्भ - http://www.tourismthailand.org/destination-guide/phranakhonsiayutthaya-14-1-1.html

चित्रा 31/05/2008 - 05:56
सर्वच छायाचित्रे आवडली आणि वर्णनावरून देश बघण्याची इच्छा झालेली आहे. सोनेरी रंग थायलंडमध्ये कुठच्यातरी एका काळात प्रिय झालेला दिसतो आहे. दुसरीकडे अयुथ्थ्यास मात्र इमारतींची नैसर्गिक रंगसंगती दिसते आहे. मस्त चित्रे.

In reply to by चित्रा

प्रियाली 31/05/2008 - 06:36
पुराणे, जातककथा इ. मध्ये वर्णन केलेली सुवर्णभूमी ही थायलंड आहे असे मानले गेल्याने बहुधा येथे सोनेरी रंग प्रिय होता आणि असावा.

विसोबा खेचर 31/05/2008 - 08:31
ओंकारा, सर्व फोटू व वर्णन क्लासच आहे! मला जुन्या थाई लाकडी घराचा फोटू सर्वाधिक आवडला! :) पुढच्या भागांत फ्लोटींग मार्केट आणि थाई खादाडीबद्दल लिहीन. तूर्तास इतकेच... अरे वाट पाहतो आहे रे! तुझ्या हा लेख म्हणजे मेजवानीच आहे. आम्हाला घरबसल्या थायलंडची चित्रदर्शी सफर घडली. आता थाई खादाडीचं सचित्र वर्णन येऊ द्यात! तात्या.
3

बाकी शून्य ...कादंबरी परीक्षण

भडकमकर मास्तर ·

कोलबेर 29/05/2008 - 02:34
पुस्तक परिक्षण आवडलं! तटस्थ नजरेतुन पुस्तकाची छान ओळख करुन दिली आहे. कादंबरीला 'बाकी शून्य' हे नाव तरी अगदी समर्पक दिलेले दिसतय.

अन्जलि 29/05/2008 - 12:26
माझेहि हेच मत झाले होते पुस्तक वाचल्यावर. खुप छान आहे असे ऐकले म्हनुन वाचले पन खरेच शुन्य निघाले.

विदुषक 29/05/2008 - 14:29
फार जास्त पाने लिहुन शेवटी 'बाकी शून्य' !!!! असे स्वरुप आहे कदम्बरी चे कोसला ची आठवण करुन देण्याचा केविलवणा प्रयत्न असे माझे मत आहे मजेदार विदुषक

भोचक 29/05/2008 - 14:58
सहमत. माझाही हाच अनुभव. वाचूनही पदरात पडते, ते बाकी शून्यच. असेच अनंत सामंतांच्या अविरत नावाच्या जाडजूड कादंबरीनंतरी वाटले होते.

देवदत्त 16/09/2008 - 22:59
नुकतेच हे पुस्तक वाचायला घेतले. सुरूवातीची काही पाने वाचताना वाटले की सलगता नाही. वेगवेगळे प्रसंग एकत्र लिहिलेत बस्स. नंतर बहुधा त्याची सवय झाली म्हणून वाचू शकलो. अजूनही अर्धेच पुस्तक वाचले आहे. #:S त्यातल्या त्यात ह्याआधीच "दुनियादारी" वाचले होते, त्याचा प्रभाव अजूनही आहेच. त्यामुळेही बहुधा हे पुस्तक विस्कळीत वाटतेय. पुढे वाचू की नाही विचार करतोय. :?

आपला आभि 18/09/2008 - 17:00
मला ही कादंबरी खूप आवडली......... छोटा डॉन आणि माझे याबाबत बरेच विचारमंथन झाले आहे... मला फारसे साहित्यिक भाषेत लिहता येत नाही... पण जय सरदेसाई ने खूप दिवस अस्वस्थ केलं होतं..... अनेकवेळा वाचून शेवटी माझी प्रत डॉनने जर्मनी ला पळवली. :& परत मिळेल अशी आशा आहे.............. :/

In reply to by आनंदयात्री

छोटा डॉन 18/09/2008 - 17:14
ती प्रत माझीच आहे, काय म्हणणे आहे ? पावती दाखवु का ? झालच तर त्या दुकानदाराची पण साक्ष आपण काढु शकतो ... बाकी " बाकी शुन्य" म्हटल्यावर लगेच आमच्यावर टिका करायची संधी काय तुम्ही सोडु नका ... बाकी सविस्तर तुमच्या "खरडवहीत" ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

छोटा डॉन 18/09/2008 - 17:27
आजकाल जमाना खराब आला आहे ... आंतरजालीय साहित्य प्रकाशित व्हायच्या आतच त्याची चोरी होती . हे आमचे वाक्य कुणीतरी " जीम ची पावती दाखवु का ? " म्हणुन खपवले ... काय म्हणातेस आदिती, बरोबर ना ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

हे आमचे वाक्य कुणीतरी " जीम ची पावती दाखवु का ? " म्हणुन खपवले ... अगदी, अगदी! तुझ्या डोक्यातूनच चोरी झाली असणार! काय करणार कलियुग आहे ना! मला तुझ्याबद्दल अंमळ (कोरडी) सहानुभूती वाटत्ये रे! त्यातून ते अत्री लोक जीवालाही नाडतात!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदयात्री 18/09/2008 - 17:28
जिकडे तिकडे पावत्या दाखवत फिरणारी एक भुरटी तोंडाळ जमातच आंतरजालावर अस्तित्वात आहे. काही आद्य पावतीजातीचे लोक कट्ट्यांना सुद्धा पावत्या घेउन येतात !! - (पावत्या फाडणारा) आंद्या मल्ल

In reply to by आनंदयात्री

जिकडे तिकडे पावत्या दाखवत फिरणारी एक भुरटी तोंडाळ जमातच आंतरजालावर अस्तित्वात आहे. काही आद्य पावतीजातीचे लोक कट्ट्यांना सुद्धा पावत्या घेउन येतात !! मॉनिटर नसला की काही लोकं फार बोलतात बाबा इतरांना!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अती अवांतर गप्पा मारण्यासाठी, खरडफळ्याची ,खरडवहीची, व्य. निरोपाची चांगली सुविधा दिल्याबद्दल मिपाच्या चालकांचे मनापासून आभार !!! ;) (ह. घ्या) -दिलीप बिरुटे (खडूस मास्तर )

छोटा डॉन 18/09/2008 - 17:12
मुळात आपण तुलना का करत आहात ? सरळ आहे की पुस्तक आवडले का नाही, ह्याच्या तुलनेत भिकार** आहे , त्याचा तुलनेने बरे आहे ह्याला अर्थ नाही ... असो. पुस्तक अर्धेच वाचले आहे तर पुर्ण वाचा ... आणि मग मत बनवा, मग ते " भंगार पुस्तक" असे झाले तर कदाचित मान्य करु ... पण एवढीही टाकाऊ कादंबरी नाही ...
... मला फारसे साहित्यिक भाषेत लिहता येत नाही... पण जय सरदेसाई ने खूप दिवस अस्वस्थ केलं होतं..... अनेकवेळा वाचून शेवटी माझी प्रत डॉनने जर्मनी ला पळवली. :& परत मिळेल अशी आशा आहे..............
बस का अभि मालक, कशाला खेचता राव आमची ... कादंबरी जर्मनीला आणली ही बाब खरी आहे. त्यामचा उद्देश असा आहे की कादंबरीची समिक्षा करणारा "एक फक्कड लेख " लिहावा ... लवकरच वेळ मिळेल अशी आशा आहे, तेव्हा टाकुच सविस्तर ... ता . क : " आपली " कादंबरी परत मिळेल कदाचित ... बाकी सर्व कर्ता करविता परमेश्वर आहे ... अवांतर ( काही खास लोकांसाठी ) : "लेख कधी टाकणार" असे सारखे प्रश्न विचारुन मझे जिने हराम नका करु. वेळ मिळाला की टाकतो ... सध्या जर्मन सरकारशी " युरोपमधल्या आर्थीक मंदीचा तुलनात्मक अभ्यास " ह्या महत्वाच्या विषयावर चर्चा चालु आहे. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

देवदत्त 19/09/2008 - 00:25
मुळात आपण तुलना का करत आहात ? नाही. तुलना करत नाही आहे. आधीच मी त्या पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया लिहिली. जे सुरूवातीला वाटले ते लिहिले. बाकी पुस्तक वाचेन जमेल तसे.

आपला आभि 18/09/2008 - 17:15
इतका विश्वासघात? थांब जर्मनीच्या प्रेसिडेंटला फोन लावतो ....आणि जर्मनीत दारू , सिगरेट आणि 'इतर' गोष्टींवर बन्दी आणतो..........

बाकी शुन्यचे परिक्षण आवडले. अवांतर : 'एबारो बारो, सत्यजित राय यांच्या कथेंचे विलास गितेंनी अनुवाद केलेले मस्त पुस्तक.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हटले, एकदम बाकी शून्यला इतके प्रतिसाद?? ... मग कळलं खरडफळा झालाय होय? मग ठीकंय ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत 18/09/2008 - 18:38
ही कादंबरी वाचल्याला काही महिने उलटले. कसे कुणास ठाऊक , पण मास्तरांच्या या धाग्यावर लिहायला जमलेच नव्हते... ज्या पुस्तकाचा (कुठल्याही गोष्टीचा ?) "बिल्ड्-अप" अमुक-अमुक-पार्ट्-टू असा होतो , त्या गोष्टीबाबतच्या अपेक्षाभंगाला मनाची तयारी करून ठेवणेच इष्ट ; अशी आपली माझी खूणगाठ. त्यामुळे एकूणच अपेक्षा मी खाली आणलेल्या होत्या. पुस्तकाच्या एकंदर रूपरेषेबाबत मास्तरानी लिहिले आहेच. स्वतःचा शोध म्हणा, स्वत:ची कैफियत म्हणा , अशा स्वरूपाची पुस्तके मराठीत खूप काळापासून चालत आली आहेत. "कोसला" हे पुस्तक आत्मचरित्रात्मक नसले तरी अर्थातच प्रथमपुरुषी आहे. "कोसला" मधे कार्‍या लोकांचे , कॉलेजजीवनाचे , हॉस्टेल वास्तव्याचे चित्रण आहे. तर "बाकी शून्य" मधे एकंदरच पौगंडावस्थेवाटे , उमेदवारीच्या दिवसांपर्यंत केलेला प्रवास चितारलेला आहे. तर मग "बाकी शून्य" चा माझ्या दृष्टीने जमाखर्च नेमका काय ? काही लैंगिक अनुभव यात धाडसीपणे मांडले आहेत. पौगंडावस्थेच्याही आधी कथानायकाला जवळच्या नातेसंबंधामधील मुलींशी संबंध येतो. अगदी संभोग नाही , तरी ज्याचे वर्णन "लैंगिक" असे करता येईल असेच. अशा स्वरूपाच्या धक्कादायक - कारण चाकोरीपेक्षा वेगळ्या - प्रसंगांची रेलचेल यात आहे. कथानायक आपल्या शालेय आणि व्यावसायिक शिक्षणाचा प्रवास, आपल्या नोकरी मधे आलेले सुरवातीचे अनुभव वर्णितो. या सार्‍यामधे कथानायक आपली संवेदनशीलता - अगदी बालपणापासूनच - इतरांपेक्षा जास्त तीव्र आहे , आपले लुक्स (कादंबरी अंती चक्क लेखकाचा फोटू !!) आणि आपली ही संवेदनशीलता यामुळे मुली आपल्याकडे वेगवेगळ्या परिस्थितीमधे आकर्षित होतात असे ठायीठायी सांगितलेले आहे. आणि या सार्‍यातून धावणारा "सबझूट्"वादाचा एक धागा. कादंबरीचा प्याटर्न ( ज्याचा पन्नासेक पानानंतर मला कंटाळा येऊ लागला) हा असा आहे. माझे आक्षेप : आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल , स्वतःबद्दल , स्वतःला आलेल्या अनुभवांबद्दल लिहीता येणे ही एक सुरवात आहे - इतिकर्तव्यता नव्हे. जे अनुभव आले , यातून तुमचा "वर्ल्ड्-व्ह्यू " काय बनतो ? त्याचा इथे मागमूस नाही. उदाहरणार्थ , कोसला मधे धाकट्या बहिणीचा मृत्यू, त्यानंतरचे अजिंठ्यातील बुद्धाच्या शिल्पाबद्दलचा भाग , कोसलातील महान डायरी यातून आपल्याला जाणवते , की आयुष्याच्या बहुस्तरीय स्वरूपाची , गुंतागुंतीच्या विणीची जाणीव लेखकाला प्रखरतेने जाणवते. "बाकी शून्य" मधे असे एकदाही दिसत नाही की , गुंतागुंतीच्या क्षणी, एखादा धारदार निर्णय नायकाला घ्यावा लागला आहे. त्यातली चलबिचल , नैतिक प्रश्नांची घालमेल यातले काहीच नाही. आयुष्य येऊन आदळते तसे वर्णिले आहे ; आणि कदाचित चारचौघांपेक्षा किंचित वेगळे आहे ; पण लेखकाला निव्वळ ते दिसले . त्याने पाहिले काहीच नाही. त्यामुळे ही झाली आहे एक जंत्री - प्रसंगांची, घटनांची. एकूण अस्तित्त्वविषयक प्रश्नांचा , आपल्या सामाजिक बाबीचा त्याच्याशी असणारा संबंध याबाबतील हाताशी लागेल असे काही नाहीच.

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री 18/09/2008 - 18:44
सुरेख प्रतिसाद !! >>सार्‍यामधे कथानायक आपली संवेदनशीलता - अगदी बालपणापासूनच - इतरांपेक्षा जास्त तीव्र आहे , आपले लुक्स (कादंबरी अंती चक्क लेखकाचा फोटू !!) आणि आपली ही संवेदनशीलता यामुळे मुली आपल्याकडे वेगवेगळ्या परिस्थितीमधे आकर्षित होतात असे अगदी अगदी ... अन फोटु टाकणे तर अत्यंत हास्यास्पद ! स्वत:च स्वतःला लिव्हिंग लिजेंड बनवायचा प्रचंड फसलेला प्रयत्न !

In reply to by मुक्तसुनीत

कादंबरी वाचल्यानंतर माझा माझ्याशीच प्रचंड गोंधळ उडाला होता. हे जे काही आहे, ते धक्कादायक आहे म्हणून केवळ आपण नाकारतो आहोत काय, हा त्यातला मुख्य प्रश्न होता. पण तुमच्या परीक्षणाने माझ्या गोंधळावर नेमके बोट ठेवले आहे. जसे अंगावर आदळते, तसे लिहिणे ही केवळ सुरुवात आहे, इतिकर्तव्यता नव्हे. इतक्या नेमक्या शब्दांत 'बाकी शून्य'चा फुगा फोडल्याबद्दल आभारी आहे. :)

In reply to by मुक्तसुनीत

त्यामुळे ही झाली आहे एक जंत्री - प्रसंगांची, घटनांची. एकूण अस्तित्त्वविषयक प्रश्नांचा , आपल्या सामाजिक बाबीचा त्याच्याशी असणारा संबंध याबाबतील हाताशी लागेल असे काही नाहीच. अगदी करेक्ट... विशेषतः शेवटी शेवटी स्वतःच्या अधःपतनात कौतुक करून घेण्यासारखं काय आहे? ( मी खूप हुशार आहे, मी आय ए एस होऊ शकतो पण होऊन तरी काय उपयोग आहे? कशालाच अर्थ नाही =सगळं शून्य आहे,म्हणून मी नशा, बाई वगैरे नाद करतो आणि वाया जातो, वेडा होतो ) अवांतर : काही पेशंट दाताच्या डॉक्टरला म्हणतात, " हा दात नाहीतरी कधीतरी पडणारच आहे, मग काढून टाका...." ..असलं काहीतरी लॉजिक वाटलं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 19/09/2008 - 01:42
सहसा कादंबरीचे नैतिक मूल्य माझ्या मूल्यांपेक्षा वेगळे आहे, हा त्यातला दोष मी मानत नाही. मास्तरांचे परीक्षण त्या अंगाने जात होते, असे मला वाटले, पण ते तसे नाही, म्हणून आवडले. सबझूठवादाच्या समर्थनात कादंबरी लिहू नये असे नाही, पण तो मानव्य अनुभव म्हणून वाचकाला पटवता आला पाहिजे. स्वतःबद्दल खूप मुलींना लैंगिक आकर्षण वाटते असा वृथाभिमान असलेल्या तरुणाच्या दृष्टिकोनातून कादंबरी जर समर्थपणे लिहिली असेल तर मी जरूर वाचणार. पण दोन्ही समीक्षणांवरून असे दिसते की लेखक मानवी मनाचा अनपेक्षित पैलू (मग तो माझ्या दृष्टीने हीन का असेना) दाखवण्याचे काम समर्थपणे करत नाही - उलट कंटाळा आणतो. सारांश : हे पुस्तक मी विकत घेणार नाही, पण कोणा मित्राने विकत घेतले असेल तर फुकटात १५-२० मिनिटे चाळायचा विचार करतो आहे.

In reply to by धनंजय

पण दोन्ही समीक्षणांवरून असे दिसते की लेखक मानवी मनाचा अनपेक्षित पैलू (मग तो माझ्या दृष्टीने हीन का असेना) दाखवण्याचे काम समर्थपणे करत नाही - उलट कंटाळा आणतो. मला शब्द सापडत नव्हते मास्तर आणि मुक्तसुनीत यांची परिक्षणं वाचून! पण धनंजय, तुम्ही माझं काम केलंत! सारांश : हे पुस्तक मी विकत घेणार नाही, पण कोणा मित्राने विकत घेतले असेल तर फुकटात १५-२० मिनिटे चाळायचा विचार करतो आहे. :-D

अभिज्ञ 18/09/2008 - 19:03
मु़क्तसुनीतजी व मास्तर या दोघांचेहि परिक्षण आवडले व त्यांच्या मतांशी १००% सहमत. विशेषतः मुक्तसुनीत जी ह्यांनी केलेले विमोचन आवडले. मला ह्या कादंबरितील पहिली काहि पाने प्रचंड ओंगळवाणि वाटली. मुसु म्हणतात त्याप्रमाणे पौगंडाअवस्थेतील काहि वर्णने अतिशय बकवास वाटली होती. मी त्यापुढेचे वाचायला गेलो नाहि. अभिज्ञ.

विसोबा खेचर 18/09/2008 - 22:44
आंद्या, छोटा डॉन आणि अदिती, कृपया प्रत्येकच ठिकाणी अवांतर गप्पा मारून येथील मोकळ्या वातावरणाचा गैरफायदा घेऊ नये अशी हात जोडून कळकळीची विनंती...! त्यामुळे मूळ धाग्याचे गांभिर्य/महत्व निघून जाते! कृपया विनंतीचा जमल्यास विचार व्हावा अशी कळकळीची विनंती.. तात्या.

कोलबेर 29/05/2008 - 02:34
पुस्तक परिक्षण आवडलं! तटस्थ नजरेतुन पुस्तकाची छान ओळख करुन दिली आहे. कादंबरीला 'बाकी शून्य' हे नाव तरी अगदी समर्पक दिलेले दिसतय.

अन्जलि 29/05/2008 - 12:26
माझेहि हेच मत झाले होते पुस्तक वाचल्यावर. खुप छान आहे असे ऐकले म्हनुन वाचले पन खरेच शुन्य निघाले.

विदुषक 29/05/2008 - 14:29
फार जास्त पाने लिहुन शेवटी 'बाकी शून्य' !!!! असे स्वरुप आहे कदम्बरी चे कोसला ची आठवण करुन देण्याचा केविलवणा प्रयत्न असे माझे मत आहे मजेदार विदुषक

भोचक 29/05/2008 - 14:58
सहमत. माझाही हाच अनुभव. वाचूनही पदरात पडते, ते बाकी शून्यच. असेच अनंत सामंतांच्या अविरत नावाच्या जाडजूड कादंबरीनंतरी वाटले होते.

देवदत्त 16/09/2008 - 22:59
नुकतेच हे पुस्तक वाचायला घेतले. सुरूवातीची काही पाने वाचताना वाटले की सलगता नाही. वेगवेगळे प्रसंग एकत्र लिहिलेत बस्स. नंतर बहुधा त्याची सवय झाली म्हणून वाचू शकलो. अजूनही अर्धेच पुस्तक वाचले आहे. #:S त्यातल्या त्यात ह्याआधीच "दुनियादारी" वाचले होते, त्याचा प्रभाव अजूनही आहेच. त्यामुळेही बहुधा हे पुस्तक विस्कळीत वाटतेय. पुढे वाचू की नाही विचार करतोय. :?

आपला आभि 18/09/2008 - 17:00
मला ही कादंबरी खूप आवडली......... छोटा डॉन आणि माझे याबाबत बरेच विचारमंथन झाले आहे... मला फारसे साहित्यिक भाषेत लिहता येत नाही... पण जय सरदेसाई ने खूप दिवस अस्वस्थ केलं होतं..... अनेकवेळा वाचून शेवटी माझी प्रत डॉनने जर्मनी ला पळवली. :& परत मिळेल अशी आशा आहे.............. :/

In reply to by आनंदयात्री

छोटा डॉन 18/09/2008 - 17:14
ती प्रत माझीच आहे, काय म्हणणे आहे ? पावती दाखवु का ? झालच तर त्या दुकानदाराची पण साक्ष आपण काढु शकतो ... बाकी " बाकी शुन्य" म्हटल्यावर लगेच आमच्यावर टिका करायची संधी काय तुम्ही सोडु नका ... बाकी सविस्तर तुमच्या "खरडवहीत" ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

छोटा डॉन 18/09/2008 - 17:27
आजकाल जमाना खराब आला आहे ... आंतरजालीय साहित्य प्रकाशित व्हायच्या आतच त्याची चोरी होती . हे आमचे वाक्य कुणीतरी " जीम ची पावती दाखवु का ? " म्हणुन खपवले ... काय म्हणातेस आदिती, बरोबर ना ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

हे आमचे वाक्य कुणीतरी " जीम ची पावती दाखवु का ? " म्हणुन खपवले ... अगदी, अगदी! तुझ्या डोक्यातूनच चोरी झाली असणार! काय करणार कलियुग आहे ना! मला तुझ्याबद्दल अंमळ (कोरडी) सहानुभूती वाटत्ये रे! त्यातून ते अत्री लोक जीवालाही नाडतात!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदयात्री 18/09/2008 - 17:28
जिकडे तिकडे पावत्या दाखवत फिरणारी एक भुरटी तोंडाळ जमातच आंतरजालावर अस्तित्वात आहे. काही आद्य पावतीजातीचे लोक कट्ट्यांना सुद्धा पावत्या घेउन येतात !! - (पावत्या फाडणारा) आंद्या मल्ल

In reply to by आनंदयात्री

जिकडे तिकडे पावत्या दाखवत फिरणारी एक भुरटी तोंडाळ जमातच आंतरजालावर अस्तित्वात आहे. काही आद्य पावतीजातीचे लोक कट्ट्यांना सुद्धा पावत्या घेउन येतात !! मॉनिटर नसला की काही लोकं फार बोलतात बाबा इतरांना!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अती अवांतर गप्पा मारण्यासाठी, खरडफळ्याची ,खरडवहीची, व्य. निरोपाची चांगली सुविधा दिल्याबद्दल मिपाच्या चालकांचे मनापासून आभार !!! ;) (ह. घ्या) -दिलीप बिरुटे (खडूस मास्तर )

छोटा डॉन 18/09/2008 - 17:12
मुळात आपण तुलना का करत आहात ? सरळ आहे की पुस्तक आवडले का नाही, ह्याच्या तुलनेत भिकार** आहे , त्याचा तुलनेने बरे आहे ह्याला अर्थ नाही ... असो. पुस्तक अर्धेच वाचले आहे तर पुर्ण वाचा ... आणि मग मत बनवा, मग ते " भंगार पुस्तक" असे झाले तर कदाचित मान्य करु ... पण एवढीही टाकाऊ कादंबरी नाही ...
... मला फारसे साहित्यिक भाषेत लिहता येत नाही... पण जय सरदेसाई ने खूप दिवस अस्वस्थ केलं होतं..... अनेकवेळा वाचून शेवटी माझी प्रत डॉनने जर्मनी ला पळवली. :& परत मिळेल अशी आशा आहे..............
बस का अभि मालक, कशाला खेचता राव आमची ... कादंबरी जर्मनीला आणली ही बाब खरी आहे. त्यामचा उद्देश असा आहे की कादंबरीची समिक्षा करणारा "एक फक्कड लेख " लिहावा ... लवकरच वेळ मिळेल अशी आशा आहे, तेव्हा टाकुच सविस्तर ... ता . क : " आपली " कादंबरी परत मिळेल कदाचित ... बाकी सर्व कर्ता करविता परमेश्वर आहे ... अवांतर ( काही खास लोकांसाठी ) : "लेख कधी टाकणार" असे सारखे प्रश्न विचारुन मझे जिने हराम नका करु. वेळ मिळाला की टाकतो ... सध्या जर्मन सरकारशी " युरोपमधल्या आर्थीक मंदीचा तुलनात्मक अभ्यास " ह्या महत्वाच्या विषयावर चर्चा चालु आहे. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

देवदत्त 19/09/2008 - 00:25
मुळात आपण तुलना का करत आहात ? नाही. तुलना करत नाही आहे. आधीच मी त्या पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया लिहिली. जे सुरूवातीला वाटले ते लिहिले. बाकी पुस्तक वाचेन जमेल तसे.

आपला आभि 18/09/2008 - 17:15
इतका विश्वासघात? थांब जर्मनीच्या प्रेसिडेंटला फोन लावतो ....आणि जर्मनीत दारू , सिगरेट आणि 'इतर' गोष्टींवर बन्दी आणतो..........

बाकी शुन्यचे परिक्षण आवडले. अवांतर : 'एबारो बारो, सत्यजित राय यांच्या कथेंचे विलास गितेंनी अनुवाद केलेले मस्त पुस्तक.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हटले, एकदम बाकी शून्यला इतके प्रतिसाद?? ... मग कळलं खरडफळा झालाय होय? मग ठीकंय ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत 18/09/2008 - 18:38
ही कादंबरी वाचल्याला काही महिने उलटले. कसे कुणास ठाऊक , पण मास्तरांच्या या धाग्यावर लिहायला जमलेच नव्हते... ज्या पुस्तकाचा (कुठल्याही गोष्टीचा ?) "बिल्ड्-अप" अमुक-अमुक-पार्ट्-टू असा होतो , त्या गोष्टीबाबतच्या अपेक्षाभंगाला मनाची तयारी करून ठेवणेच इष्ट ; अशी आपली माझी खूणगाठ. त्यामुळे एकूणच अपेक्षा मी खाली आणलेल्या होत्या. पुस्तकाच्या एकंदर रूपरेषेबाबत मास्तरानी लिहिले आहेच. स्वतःचा शोध म्हणा, स्वत:ची कैफियत म्हणा , अशा स्वरूपाची पुस्तके मराठीत खूप काळापासून चालत आली आहेत. "कोसला" हे पुस्तक आत्मचरित्रात्मक नसले तरी अर्थातच प्रथमपुरुषी आहे. "कोसला" मधे कार्‍या लोकांचे , कॉलेजजीवनाचे , हॉस्टेल वास्तव्याचे चित्रण आहे. तर "बाकी शून्य" मधे एकंदरच पौगंडावस्थेवाटे , उमेदवारीच्या दिवसांपर्यंत केलेला प्रवास चितारलेला आहे. तर मग "बाकी शून्य" चा माझ्या दृष्टीने जमाखर्च नेमका काय ? काही लैंगिक अनुभव यात धाडसीपणे मांडले आहेत. पौगंडावस्थेच्याही आधी कथानायकाला जवळच्या नातेसंबंधामधील मुलींशी संबंध येतो. अगदी संभोग नाही , तरी ज्याचे वर्णन "लैंगिक" असे करता येईल असेच. अशा स्वरूपाच्या धक्कादायक - कारण चाकोरीपेक्षा वेगळ्या - प्रसंगांची रेलचेल यात आहे. कथानायक आपल्या शालेय आणि व्यावसायिक शिक्षणाचा प्रवास, आपल्या नोकरी मधे आलेले सुरवातीचे अनुभव वर्णितो. या सार्‍यामधे कथानायक आपली संवेदनशीलता - अगदी बालपणापासूनच - इतरांपेक्षा जास्त तीव्र आहे , आपले लुक्स (कादंबरी अंती चक्क लेखकाचा फोटू !!) आणि आपली ही संवेदनशीलता यामुळे मुली आपल्याकडे वेगवेगळ्या परिस्थितीमधे आकर्षित होतात असे ठायीठायी सांगितलेले आहे. आणि या सार्‍यातून धावणारा "सबझूट्"वादाचा एक धागा. कादंबरीचा प्याटर्न ( ज्याचा पन्नासेक पानानंतर मला कंटाळा येऊ लागला) हा असा आहे. माझे आक्षेप : आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल , स्वतःबद्दल , स्वतःला आलेल्या अनुभवांबद्दल लिहीता येणे ही एक सुरवात आहे - इतिकर्तव्यता नव्हे. जे अनुभव आले , यातून तुमचा "वर्ल्ड्-व्ह्यू " काय बनतो ? त्याचा इथे मागमूस नाही. उदाहरणार्थ , कोसला मधे धाकट्या बहिणीचा मृत्यू, त्यानंतरचे अजिंठ्यातील बुद्धाच्या शिल्पाबद्दलचा भाग , कोसलातील महान डायरी यातून आपल्याला जाणवते , की आयुष्याच्या बहुस्तरीय स्वरूपाची , गुंतागुंतीच्या विणीची जाणीव लेखकाला प्रखरतेने जाणवते. "बाकी शून्य" मधे असे एकदाही दिसत नाही की , गुंतागुंतीच्या क्षणी, एखादा धारदार निर्णय नायकाला घ्यावा लागला आहे. त्यातली चलबिचल , नैतिक प्रश्नांची घालमेल यातले काहीच नाही. आयुष्य येऊन आदळते तसे वर्णिले आहे ; आणि कदाचित चारचौघांपेक्षा किंचित वेगळे आहे ; पण लेखकाला निव्वळ ते दिसले . त्याने पाहिले काहीच नाही. त्यामुळे ही झाली आहे एक जंत्री - प्रसंगांची, घटनांची. एकूण अस्तित्त्वविषयक प्रश्नांचा , आपल्या सामाजिक बाबीचा त्याच्याशी असणारा संबंध याबाबतील हाताशी लागेल असे काही नाहीच.

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री 18/09/2008 - 18:44
सुरेख प्रतिसाद !! >>सार्‍यामधे कथानायक आपली संवेदनशीलता - अगदी बालपणापासूनच - इतरांपेक्षा जास्त तीव्र आहे , आपले लुक्स (कादंबरी अंती चक्क लेखकाचा फोटू !!) आणि आपली ही संवेदनशीलता यामुळे मुली आपल्याकडे वेगवेगळ्या परिस्थितीमधे आकर्षित होतात असे अगदी अगदी ... अन फोटु टाकणे तर अत्यंत हास्यास्पद ! स्वत:च स्वतःला लिव्हिंग लिजेंड बनवायचा प्रचंड फसलेला प्रयत्न !

In reply to by मुक्तसुनीत

कादंबरी वाचल्यानंतर माझा माझ्याशीच प्रचंड गोंधळ उडाला होता. हे जे काही आहे, ते धक्कादायक आहे म्हणून केवळ आपण नाकारतो आहोत काय, हा त्यातला मुख्य प्रश्न होता. पण तुमच्या परीक्षणाने माझ्या गोंधळावर नेमके बोट ठेवले आहे. जसे अंगावर आदळते, तसे लिहिणे ही केवळ सुरुवात आहे, इतिकर्तव्यता नव्हे. इतक्या नेमक्या शब्दांत 'बाकी शून्य'चा फुगा फोडल्याबद्दल आभारी आहे. :)

In reply to by मुक्तसुनीत

त्यामुळे ही झाली आहे एक जंत्री - प्रसंगांची, घटनांची. एकूण अस्तित्त्वविषयक प्रश्नांचा , आपल्या सामाजिक बाबीचा त्याच्याशी असणारा संबंध याबाबतील हाताशी लागेल असे काही नाहीच. अगदी करेक्ट... विशेषतः शेवटी शेवटी स्वतःच्या अधःपतनात कौतुक करून घेण्यासारखं काय आहे? ( मी खूप हुशार आहे, मी आय ए एस होऊ शकतो पण होऊन तरी काय उपयोग आहे? कशालाच अर्थ नाही =सगळं शून्य आहे,म्हणून मी नशा, बाई वगैरे नाद करतो आणि वाया जातो, वेडा होतो ) अवांतर : काही पेशंट दाताच्या डॉक्टरला म्हणतात, " हा दात नाहीतरी कधीतरी पडणारच आहे, मग काढून टाका...." ..असलं काहीतरी लॉजिक वाटलं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 19/09/2008 - 01:42
सहसा कादंबरीचे नैतिक मूल्य माझ्या मूल्यांपेक्षा वेगळे आहे, हा त्यातला दोष मी मानत नाही. मास्तरांचे परीक्षण त्या अंगाने जात होते, असे मला वाटले, पण ते तसे नाही, म्हणून आवडले. सबझूठवादाच्या समर्थनात कादंबरी लिहू नये असे नाही, पण तो मानव्य अनुभव म्हणून वाचकाला पटवता आला पाहिजे. स्वतःबद्दल खूप मुलींना लैंगिक आकर्षण वाटते असा वृथाभिमान असलेल्या तरुणाच्या दृष्टिकोनातून कादंबरी जर समर्थपणे लिहिली असेल तर मी जरूर वाचणार. पण दोन्ही समीक्षणांवरून असे दिसते की लेखक मानवी मनाचा अनपेक्षित पैलू (मग तो माझ्या दृष्टीने हीन का असेना) दाखवण्याचे काम समर्थपणे करत नाही - उलट कंटाळा आणतो. सारांश : हे पुस्तक मी विकत घेणार नाही, पण कोणा मित्राने विकत घेतले असेल तर फुकटात १५-२० मिनिटे चाळायचा विचार करतो आहे.

In reply to by धनंजय

पण दोन्ही समीक्षणांवरून असे दिसते की लेखक मानवी मनाचा अनपेक्षित पैलू (मग तो माझ्या दृष्टीने हीन का असेना) दाखवण्याचे काम समर्थपणे करत नाही - उलट कंटाळा आणतो. मला शब्द सापडत नव्हते मास्तर आणि मुक्तसुनीत यांची परिक्षणं वाचून! पण धनंजय, तुम्ही माझं काम केलंत! सारांश : हे पुस्तक मी विकत घेणार नाही, पण कोणा मित्राने विकत घेतले असेल तर फुकटात १५-२० मिनिटे चाळायचा विचार करतो आहे. :-D

अभिज्ञ 18/09/2008 - 19:03
मु़क्तसुनीतजी व मास्तर या दोघांचेहि परिक्षण आवडले व त्यांच्या मतांशी १००% सहमत. विशेषतः मुक्तसुनीत जी ह्यांनी केलेले विमोचन आवडले. मला ह्या कादंबरितील पहिली काहि पाने प्रचंड ओंगळवाणि वाटली. मुसु म्हणतात त्याप्रमाणे पौगंडाअवस्थेतील काहि वर्णने अतिशय बकवास वाटली होती. मी त्यापुढेचे वाचायला गेलो नाहि. अभिज्ञ.

विसोबा खेचर 18/09/2008 - 22:44
आंद्या, छोटा डॉन आणि अदिती, कृपया प्रत्येकच ठिकाणी अवांतर गप्पा मारून येथील मोकळ्या वातावरणाचा गैरफायदा घेऊ नये अशी हात जोडून कळकळीची विनंती...! त्यामुळे मूळ धाग्याचे गांभिर्य/महत्व निघून जाते! कृपया विनंतीचा जमल्यास विचार व्हावा अशी कळकळीची विनंती.. तात्या.
जय सरदेसाई नावाच्या सांगलीतल्या एका हुशार , संवेदनशील माणसाची शाळेपासून ( १९७० ते १९८६) इंजिनियर होईपर्यंत...मग पुढे आयुष्यातील एक से एक वळणांची ही एक बरीचशी इण्ट्रेष्टिंग गोष्ट...( लेखक कमलेश वालावलकर ,राजहंस प्रकाशन ,पृष्ठे ४२५, किंमत १७० रु.) जयची शाळा, मित्र, अभ्यासातली हुशारी, दहावी बोर्डात येणे, खच्चून अभ्यास, बी ई करताना नाटकाचा नाद लागणे, लेखनाचा छंद, सिनेमात जायचा निश्चय, डीग्री घेतल्यानंतर मराठी सिनेमात असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम,पुण्यामध्ये फिल्म बनवणे शिकायसाठी आगमन, पार्टटाईम पत्रकारिता, दिल्लीची बिनधास्त पत्रकार मैत्रीण, नाशिकमधल्या एका कंपनीत मार्केटिंगचा जॉब, प