मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मत

राष्ट्राय स्वाहा: इदं न मम!!!!

सौरभ वैशंपायन ·
लेखनप्रकार
भारतात अनेक अश्या व्यक्ती झाल्या कि ज्यांचे कर्तृत्व असामान्य आहे. त्या ज्या क्षेत्रात काम केले ते मैलाचा दगड ठरले. आजही त्या हजारो व्यक्तींना १०० करोड व्यक्ती आदर्श मानत आहेत आणि राहतील. थोडक्यात भारतभूचे सुपूत्र या सदरात ते येतात. मात्र भारतभूचे सुपूत्र होणे इतके सोपे आहे का? प्रचंड उलथापालथी नंतर भारताच्या सुपूत्रांपैकी ४ जण माझ्या डोळ्यांसमोर रात्रं-दिवस येत आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतर भारतात किंवा भारता बाहेर हजारो आदरणीय व्यक्ती झाल्या वा होतील पण या चौघांचे स्थान एकमेवाद्वितीय आहे. या चौघांचाहि कालखंड भिन्न आहे.

पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाध्यक्षांची 'मिसळपावसाठी' एक धावती मुलाखत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
लेखनविषय:

डॊ.गंगाधर पानतावणे          डॊ.गंगाधर पानतावणे आणि प्राचार्य ठाले पाटील डॉ.गंगाधर पानतावणे    सोबत प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील अमेरिकेत होणार्‍या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक, विचारवंत व समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे यांची आम्ही दि.

सिंग इज किंग : शुद्ध व निखळ मनोरंजन नव्हे तर "फसवणुक" !!!

छोटा डॉन ·
लेखनविषय:
. समजा तुम्ही अतिशय पट्टीचे खवय्ये आहात. चवदार व लजीज अन्न हा तुमचा विक पॉइंट आहे. बाजारात आलेली नवी "चटपटीत डिश" चाखण्यासाठी तुम्ही पैशाचा विचार करत नाही. तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे टाकुन खास "हॉटेलात" जाऊन त्या डिशचा आस्वाद घेता, कुठेतरी नेटवरुन त्याची पाककॄती उतरवुन हेऊन त्याचे घरगुती प्रयोग करुन पैसे वाचवण्याचा नतद्रष्टपणा तुम्ही करत नसता. योग्य मालाच्या व लायकीच्या पदार्थासाठी पाहिजेतेवढा पैसा मोजण्याची तुमची दानत व तयारी असते. पण तुम्ही सध्या आयुष्याच्या कंटाळवाण्या कालखंडातुन मार्गक्रमण करत आहात. काहीच तुमच्या मनासारखे होत नाही. जाईल तिकडे निराशा पदरी पडत आहे.

नाहि चिरा...नाहि पणती....

सौरभ वैशंपायन ·
लेखनविषय:
सैनिक स्वत: स्वतंत्र विचार करत नाहि. त्याने तो करावा अशी अपेक्षाहि नसते. तो शिस्त पाळतो, सज्ज राहतो. काहि ठराविक शब्दांचा उच्चार झाला कि तो यंत्रवत काम करतो. पण त्याचे मन सुद्धा यंत्राप्रमाणेच निर्विकार असेल का? नक्किच नाहि! युद्धाच्यावेळी त्याचा विचारांवर ताबा नसतो, शत्रुला मारायचे या एकाच विचाराने तो पिसाट झाला असतो. पण शीतयुद्धासारख्या परीस्थितीत वर्षानुवर्षे सतत दक्ष अवस्थेत त्याला ’तिष्ठत’ रहावे लागते. कधी आसामच्या किर्र जंगलात, कधी चटके लावणार्‍या थर किंवा कच्छच्या वाळवंटात आणि कधी-कधी सियाचीनसारख्या जगातल्या सर्वात उंच रणभूमीवर हाडं गोठवणार्‍या बर्फाळ थंडीत, तो सज्ज असतो.

रुद्ध प्रतिभा चतुरस्र वाहू दे

धनंजय ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
रंगांची चतुरस्र फेक जमते, काव्ये म्हणे चेष्टिता - का तो फक्त विडंबने करि कवी? प्याला मधूचा रिता! निवृत्तीत सुमार - काव्यप्रतिभा याची रुळा सोडते! जैशी का अनिरुद्ध होत स्रवते, वाटा नव्या शोधते. ("विडंबकाची कात चढवल्यानंतरही उत्तम कवींच्या प्रतिभेच्या प्रसवास मुळीच निरोध होत नाही," असे काही लोकांचे मत आहे. मिसळपावावरील दोन सिद्धहस्त कवींची उदाहरणे लक्षात घेता हे मत मला पटत नाही.)

गणेशोत्सव

ऐका दाजीबा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
टिळकांनी गणेशोत्सवाची स्थापना का केली? लोकांनी एकत्र यावे म्हणून. त्यांचा उद्देश साध्य झाला. लोक एकत्र आले. पण त्यांनी एकत्र येऊन काय केलं? गणेशोत्सवाच्या निमित्ताने दहा दिवस जो तमाशा चालतो, त्याबद्दल हा ऊहापोह. काही मंडळं निदान दहा दिवसांत काही वेळा तरी भजनं लावतात. पण विसर्जनाच्या दिवशी मात्र कहर होतो. अक्षरश: दारु पिऊन, "कोई मेरे साथ कोई रात गुजारे..." सारख्या गीतांच्या तालावर हे तथाकथित "गणेशभक्त" नाचत असतात. अरे, दारू पिऊन नाचायचंच आहे तर पब्ज मध्ये जा ना! त्यासाठी गणपतीची अशी विटंबना कशाला? खेदपूर्वक नमूद करावंसं वाटतं की टिळक जर आज हयात असते, तर त्यांनी आज गणेशोत्सव बंद केले असते!!

बदल तर घडतोय...

स्वाती फडणीस ·
टीक-टॉक टीक-टॉक टीक-टॉक ठांग! लोलक, जागच्या जागी फिरतोय! लेफ्ट-राइट लेफ्ट-राइट लेफ्ट-राइट ठक्काक! मानव, जागच्या जागीच चालतोय! ठांग!. ठांग!!.. ठांग!!!... तरी ..बदल तर घडतोय... मुंगीच्या पावलानं..कासवाच्या गतीनं! अखंड, अविरत... अथक!! बदल तर घडतोच आहे... क्षणा क्षणाला..कणा कणाने, वाढणार्‍या एव्हरेस्ट प्रमाणे! क्षणा क्षणाला..थेंबा थेंबाने, वितळणार्‍या हिमाद्री प्रमाणे! एक पाऊल पुढे..एक पाऊल मागे, दोन पाउले पुढे..एक पाऊल मागे! एक पाऊल पुढे..दोन पाउले मागे... पुढे.. मागे.. जिथल्या तिथे! जिथल्या तिथे.. मागे..

माझी कविता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
प्रयत्नही करुनही जमत नाही कविता तेव्हा होणारा वैचारिक मनस्ताप माझ्या अहंकाराला डिवचतो. ही अस्वस्थता कोसळत जाते, तिन्ही सांजेला. धुक्यात लपेटलेल्या रस्त्यावरुन कवितेला बिलगुन चालतांना कोणताच विचार मला सुचत नाही. ऐनिलिसिस करता येत नाही गुदमरलेल्या श्वासांचा. आभाळ भरुन आल्यावर मी डोकावून पाहतो, निर्वासित वेदनांच्या गोंगाटात दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत, माझी कविता एकाकी असते.

आता कशाला उद्दयाची बात

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आज कालचा उद्दया असतो आणि आज उद्दयाचा काल असतो मग उद्दया जेव्हा ’आज’ होईल आणि ’आज’ त्याचा ’काल’ होईल तेव्हा त्या उद्दयाच्या उद्दयाला ’आजचा’ ’उद्दयाच’ म्हटलं जाईल आता आज जे होत राहिलंय त्याचं काल म्हणून होत जाणार जे उद्दया म्हणून होणार आहे त्याला आज म्हणून म्हटलं जाणार म्हणून “आता कशाला उद्दयाची बात बघ उडुनी चालली रात भर भरूनी पिऊ रस रंग नऊ चल बुडुनी जाऊ रंगात” हे माणूस सिनेमातलं गोड गाणं शांताबाई हुबळीकरांच्या तोंडून ऐकून मजा यायची. श्रीकृष्ण सामंत