मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राष्ट्राय स्वाहा: इदं न मम!!!!

सौरभ वैशंपायन ·

विकास 27/08/2008 - 20:24
चांगले विचार. चाणक्याचं द्रष्टेपण, शंकराचार्यांचे ज्ञान, शिवरायांची शुचिता आणि विवेकानंदांची निष्ठाच भारताला महासता बनवु शकते. भारताला महासत्ता बनवण्यासाठी वरील आणि अजून अनेक गोष्टींची गरज आहे. तसेच त्यावरून सावरकरांच्या शिवाजीला उद्देशून म्हणलेल्या (लताने गायलेल्या) ओळी आठवल्या, ज्यात ते "आम्हाला" म्हणजे "जनसामान्यांना" काय दे हे सांगतात... हे गूण फक्त शिवाजीतले त्यांनी दाखवलेत कारण ते एकत्रीत त्या व्यक्तिमत्वात दिसतात जे (व्यक्तिमत्व) तमाम मराठी माणसाला आपले वाटते. इतर अनेक नेतृत्वात (ऐतिहासिक विशेषकरून) ते दिसू शकतील..
जी शुद्धी हृदाची रामदास शीर डुलवी जी बुद्धी पातशाह्यास शत्रूच्या झुलवी जी युक्ती कूटनितीस खलासी बुडवी जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी
ती शुद्धी हेतूची कर्मी राहूदे ती बुद्धी भाबड्या जीवा लाहू दे ती शक्ती शोणितामाजी वाहू दे दे मंत्र पुन्हा, जो दिले समर्थे तुजज्या हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा

आजानुकर्ण 27/08/2008 - 20:59
मात्र "थोडक्यात या चौघांना 'आचरल्यास' भारत महासत्ता होणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे" हे वाक्य कळले नाही. या चौघांना आचरायचे म्हणजे काय करायचे याचे स्पष्टीकरण वाचायला आवडेल. आपला, (आचरट) आजानुकर्ण

आजानुकर्ण 27/08/2008 - 20:48
अन्यथा र्‍हास पावलेल्या बाबिलोनियन, माया, पारसिक, रोमन, ग्रीक, इजिप्शीयन अश्या प्रचंड मोठ्या संस्कृतींच्या वा साम्राज्यांच्या यादित भारत किंवा हिंदु संस्कृतीचे नाव आले असते
बाबिलोनियन,माया,पारसिक,रोमन,ग्रीक,इजिप्शियन संस्कृतींची हिंदू संस्कृतीशी तुलना चुकीची आहे. ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध संस्कृती जशा हयात आहेत तशीच हिंदू संस्कृती हयात आहे. उपरोल्लिखित संस्कृतींची तुलना मोहेंजदडो आणि हडप्पा संस्कृतीशी होऊ शकते. त्या र्‍हास पावलेल्या आहेत. आपला, (हिंदू) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास 27/08/2008 - 21:42
ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध संस्कृती जशा हयात आहेत तशीच हिंदू संस्कृती हयात आहे. उपरोल्लिखित संस्कृतींची तुलना मोहेंजदडो आणि हडप्पा संस्कृतीशी होऊ शकते. त्या र्‍हास पावलेल्या आहेत. बहुतांशी सहमत आणि योग्य मुद्दा! :-) काही मला वाटणारे फरक - (या चर्चेत कदाचीत गौण मुद्दा) हिंदू संस्कृती हा शब्द धर्मापेक्षा (रिलीजन या अर्थी) "civilization" या अर्थी शब्द आहे आणि तो भूगोलाशीपण संबंधीत आहे. ख्रिश्चन, मुस्लीम आणि बौद्ध हे जास्त करून रीलीजनशी संबंधीत आहेत. मोहेंजेदडो आणि हडप्पा ह्या संस्कृती होत्या म्हणण्या पेक्षा नागरी व्यवस्था होत्या ज्यांचे कौतूक आजही संस्कृतीपेक्षा नगररचना शास्त्रापुरते मर्यादीत होते. पण त्या विस्तृत प्रमाणावात हिंदू संस्कृतीच्याच भाग होत्या जी आपण म्हणल्याप्रमाणे र्‍हास झालेली नाही.

In reply to by विकास

आजानुकर्ण 27/08/2008 - 21:48
हिंदू संस्कृती हा शब्द धर्मापेक्षा (रिलीजन या अर्थी) "civilization" या अर्थी शब्द आहे आणि तो भूगोलाशीपण संबंधीत आहे. ख्रिश्चन, मुस्लीम आणि बौद्ध हे जास्त करून रीलीजनशी संबंधीत आहेत. बरोबर. आणि भारतात (किंवा हिंदुस्तानात किंवा हिंदुस्थानात) राहणारे ख्रिश्चन, मुसलमान, बौद्ध हे देखील या सिव्हिलायझेशनचाच भाग असल्याने ते देखील हिंदूच आहेत. असे मानता येईल का? आपला, (हिंदुत्त्ववादी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास 27/08/2008 - 22:12
भारतात (किंवा हिंदुस्तानात किंवा हिंदुस्थानात) राहणारे ख्रिश्चन, मुसलमान, बौद्ध हे देखील या सिव्हिलायझेशनचाच भाग असल्याने ते देखील हिंदूच आहेत. असे मानता येईल का? सिव्हीलिझेशनचा भाग म्हणून हिंदू म्हणता येतील. पण धर्म म्हणून त्यांचा धर्म वेगळाच आहे आणि तसे असण्यात काही गैर नाही. दुर्दैवाने "हिंदू" हा शब्द धर्माला चिकटला असल्याने आणि ते पण भारतात विशेषकरून त्यातून गैरअर्थ निघतात. अवांतरः मधे कधीतरी मी या संदर्भात लिहीले होते, पण गेल्या वर्षी न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघात, वातावरण बदलावरून असलेल्या कार्यक्रमात गेलो होतो. तेंव्हा पाण्यावरून एक परीसंवाद होता. त्यात एक युरोपमधील उच्च अधिकारी स्त्री विकसनशील देशातील पाण्यावरून बोलत होती. त्यात तिने भारतातील व्यक्तींचा उल्लेख हा "हिंदू" म्हणून केला "इंडीयन" म्हणून नाही. कारण अनेक शतके ते तसेच ऐकतात. थोडक्यात हा त्यांच्यासाठी भौगोलीक शब्द आहे. अतिअवांतर: अमेरिकेतील नेटीव्हांना ज्यांना भारतात आपण "रेड इंडीयन" म्हणतो त्यांना बर्‍याचदा येथे फक्त, "इंडीयन" म्हणतात. कारण जेंव्हा येथे युरोपातून लोकं आली तेंव्हा त्यांना हीच "इंडीया" वाटली होती आणि म्हणून ते "इंडीयन्स". अर्थात मी पहील्यांदा ते जेंव्हा ऐकले तेंव्हा "ऑफेन्सिव्ह" वाटले. नंतर समजले... तेंव्हा शब्दांचे अर्थ जरी भौगोलीक आणि राजकीय सीमांनी ठरतात तसेच धर्माधारीत पण जर असले तर तसे शब्द सार्वजनीक करण्याचे टाळावे. थोडक्यात संस्कृतिचा भाग असले तरी, "ख्रिश्चन, मुसलमान, बौद्ध " यांना हट्टाने हिंदू म्हणावे असे मला वाटत नाही.

In reply to by विकास

आजानुकर्ण 27/08/2008 - 23:33
ते अजूनही भारतात प्रत्येकाच्या घरी हत्ती असतो आणि रस्त्यांवर गारूडी साप घेऊन फिरतात असा विचार करतात, असे 'इथे'च वाचले आहे. त्यांच्या मताला महत्त्व देण्याचे कारण नाही! आपला, (देशी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

एकलव्य 28/08/2008 - 17:14
ते अजूनही भारतात प्रत्येकाच्या घरी हत्ती असतो .... कधीतरी कोणीतरी अशा तर्‍हेचे अजूनही बोलतो हे खरे आहे. पण अलिकडे हे अज्ञानमूलक नसून थोडेसे खोडसाळपणाकडे असते. मला कोणी असे म्हणाल्यास माझे उत्तर तयार असते - हो आमच्याकडे तीन हत्ती आहेत. नुसता हत्ती ठेवणे बरं नाही, हत्तीणही पाळावी लागते ना. घरामागच्या तळ्यात दिवसरात्र डुंबत असतात. मस्त मजा येते. ही उपरोक्त प्रतिक्रिया वगळता अन्य कोणतीही प्रतिक्रिया येथे द्यावीशी वाटली नाही. असो.... (महाभारतीय) एकलव्य

प्रियाली 27/08/2008 - 21:06
वर आलेले मुद्दे पुन्हा उगाळत नाही परंतु,
चार जणांतील तिघे तर आजन्म ब्रह्मचारी राहिले तर चौथा संसारी असला तरी आपल्या संसाराला आपल्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त स्थान त्याने कधीच दिले नाहि
सर्वप्रथम आर्य चाणक्य ब्रह्मचारी असण्याबद्दल मला पटत नाहीत. चाणक्य काही संन्यासी नाही त्यामुळे त्याने ब्रह्मचारी असणे लागू होत नाही. तसेही त्याचे कुटुंब होते असे उल्लेख वाचले आहेत. शिवाजीने संसाराकडे दुर्लक्ष केलं अशी माझी समजूत आहे. ते त्यांनी जाणून बुजून केले असे म्हणायचे नाही, तेवढा वेळ त्यांना पुरला नसावा पण घरातील कलागतींकडे लक्ष देते तर कदाचित इतिहास बदलला असता. (याबाबत मी महाराजांना दोषी ठरवत नाही परंतु त्यांनी संसाराकडे गरजेपुरते लक्ष दिले हे चांगले झाले असेही म्हणणार नाही)

ऋषिकेश 27/08/2008 - 22:21
लेख आवडला. किंचीत शब्दबंबाळ वाटला. असो, या चार जणांचं महत्व वादातीत आहेच पण
ज्याला ’भारत’ समजुन घ्ययचा असेल त्याने या चौघांचे चरीत्र समजुन घेण्याचा प्रयत्न करावा
हे काहि प्रमाणात पटलं नाहि. केवळ या चौघांच्या चरित्र समजुन घेऊन भारत (विशेषतः सध्याचा भारत) समजता येईलसं वाटत नाहि. अवांतर: मला लेख पूर्ण वाचायच्या आधी भारतातील चार व्यक्ती म्हटल्यावर महात्मा गांधी, ए.पी.जे अब्दुल कलाम, रविंद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या व्यक्ती डोळ्यापुढे आल्या. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

नीलकांत 27/08/2008 - 23:24
लेख छान झालाय. या चौघांपैकी आद्य शंकराचार्यांबद्दल जास्त माहिती नाही. मात्र त्या सर्वांचं काम मोठंच आहे. नीलकांत

प्रियाली 27/08/2008 - 23:34
रामदास का तुकाराम?
चार जणांच्या गुरुकुलाच्या अथवा गुरुच्या प्रभावाखाली-छत्राखाली कदाचित इतरही हजारो जण शिकले असतीलही, पण मग हेच चौघ का?
शिवाजी महाराज रामदासांना उमेदीच्या काळात भेटल्याचे आठवत नाही. जेव्हा भेटले तेव्हा आधीच प्रस्थापित होते त्यामु़ळे वरील प्रश्न इथे लागू होत नाही असे वाटते. तुकारामांशी त्यांची भेट त्यामानाने लवकर झाली असावी असे वाटते.

In reply to by प्रियाली

आजानुकर्ण 27/08/2008 - 23:37
शिवाजीराजे उमेदीच्या काळात तुकारामांनाही भेटले नाहीत आणि रामदासांनाही भेटले नाहीत. याबाबत रामदास आणि तुकाराम यांचे काही आक्षेप नसतील. मात्र असे म्हटले की रामदास आणि तुकारामांची ब्र्यांड अँबेसिडरशिप करणार्‍यांना ते कमीपणाचे वाटते. (शिवाय जातीयवादी असे लेबलही लागते) त्यामुळे हा मुद्दा काढला नाही. 'सोने आणि धन आम्हा मृत्तिकासमान' या तुकारामांच्या अभंगाची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. मात्र त्याबाबत पुन्हा कधीतरी. आपला, (क्रमशः) आजानुकर्ण

दोयल 28/08/2008 - 02:25
चांगल्या विचाराना कोणी मांडले कि त्याला नस्ते फाटे फोडायची लाटच आहे.

In reply to by दोयल

विकास 28/08/2008 - 02:30
चांगल्या विचाराना कोणी मांडले कि त्याला नस्ते फाटे फोडायची लाटच आहे. मात्र असली प्रतिक्रीया नस्ता फाटा फोडत आहे असे वाटत नाही का? एखादा लेख वगैरे लिहील्यावर जर त्यावर उलट सुलट प्रतिक्रीया आल्यातर त्याचे दोन अर्थ होतात - एक म्हणजे लोकांनी वाचले. दुसरे म्हणजे त्यांना काय वाटते ते सांगितले आणि त्यावर चर्चा सुरू झाली...थोडक्यात फाटा फोडला वगैरे काही वाटत नाही.

In reply to by विकास

प्रियाली 28/08/2008 - 03:05
जर ताबडतोब प्रतिक्रिया येणार्‍या संकेतस्थळावर लेख टाकला तर त्यातील त्रुटी दाखवणे, शंका विचारणे, वेगळे मत मांडणे इ. लोक करणारच तेव्हा उगीच असले विषयाशी संबंधीत नसणारे प्रतिसाद देऊन नस्ते फाटे फोडण्याची गरज नाही.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 28/08/2008 - 08:40
विकास आणि प्रियालीशी सहमत आहे... सदर लेखात मला कोणतेही विषयांतर जाणवत नाही आणि फाटे फोडले गेले आहेत असे वाटत नाही.... तात्या.

राघव 28/08/2008 - 12:27
सुंदर लेख. चौघे कोण अन् चौघेच का याबद्दल चर्चा होणे स्वाभाविक आहे. पण असे म्हणता येईल की या चौघांमुळे एक राष्ट्र म्हणून खूप बदल घडला. चाणक्यांनी राजनीतीचा पाया परत मजबूत केला. शंकराचार्यांनी धर्म, रूढी, रीतीरीवाज याबद्दल असणार्‍या मानसिकतेत काळानुरूप योग्य बदल घडवून आणला. शिवरायांनी तर धर्मरक्षण केलेय, नाही तर काय झाले असते ती कल्पना पण करवत नाही. विवेकानंदांनी सगळ्यांना भारताची ओळख करून दिली अन् राष्ट्रभिमान जागृत केला जे अत्यंत महत्वाचे होते त्याकाळच्या परिस्थितीत; किंबहुना आजही आहे. या सर्वात चाणाक्यांचे स्थान इतर तिघांच्या मानाने थोडे कमी वाटू शकेल पण त्यांनी सांगितलेल्या नीतीच्या विस्मराणामुळेच नंतर पृथ्वीराज चौहान सारखा नेता हकनाक हारला अन् परकियांच्या घनघोर आक्रमणांना वाटा फुटल्या. इतका छान लेख लिहील्याबद्दल पुन्हा अभिनंदन. मुमुक्षू

"बाबिलोनियन,माया,पारसिक,रोमन,ग्रीक,इजिप्शियन संस्कृतींची हिंदू संस्कृतीशी तुलना चुकीची आहे. ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध संस्कृती जशा हयात आहेत तशीच हिंदू संस्कृती हयात आहे. उपरोल्लिखित संस्कृतींची तुलना मोहेंजदडो आणि हडप्पा संस्कृतीशी होऊ शकते. त्या र्‍हास पावलेल्या आहेत. " "हिंदु धर्मावर" आणि "वैदिक संस्कृतीवर" अनेक धार्मिक, सामाजिक, राजकिय आक्रमणे झाली याबाबत कुणाचे दुमत नसावे. तुमच्या वरील वाक्यातील आक्षेप नीट लक्षात घेता मी हिंदु आणि वैदिक असे दोन भाग केले आहेत. मात्र दोन्हि गोष्टि एकमेकांपासुन फारश्या वेगळ्या नाहित. ख्रिश्चन, मुस्लिम, बौध्द, जैन हे मु़ख्यत्वे धर्म आहेत यांना संस्कृती कितपत म्हणता येईल हा वेगळा विषय आहे असं मला वाटतं. त्यातुन ख्रिश्चन, मुस्लिम ह्यांनी त्यांचा धर्म तलवारीच्या जोरावर पसरवला आहे हे सत्य आहे त्यामुळे त्यांना संस्कृती म्हणावं का? आणि बौध्द-जैन तत्वांबाबत म्हणाल तर ती हिंदु धर्माचीच नवी रुपे आहेत. एक उदाहरण घ्यायचे झाले तर यज्ञ हि वैदिक संस्कृती आहे जी ग्रीकांची देखिल होती ते सुध्दा यज्ञ करीत. पण आज तिथे ख्रिश्चन धर्म पसरला आहे, रोमन संस्कृती हि आज फक्त अवषेशांच्या रुपाने उभी आहे. पारसिक संस्क्रुती झोपवणारे ग्रीक कालांतराने स्वतः कालाच्या उदरात गडप झाले. मात्र वैदिक संस्कृती व हिंदु धर्म दोन्हि आजहि तग धरुन उभे आहेत. सिकंदराच्या आक्रमणाला चाणक्य आणि इतर शुर गण राज्यांनी थोपवलं. आदि शंकराचार्यांनी बुध्द धर्माने मिळमिळित केलेला भारत पुन्हा नव्या ताकदिने उभा केला. गुप्त साम्राज्य हा भारताचा सुवर्णकाल समजला जातो त्यावेळि अगदि कंबोडिआ पर्यंत आपले राज्य पसरले होते. नंतर खुळचट कल्पनांनी भारताचे नुकसान केले. मात्र फक्त एकाच भूमीत आपले पाय रोवुन देखिल हिंदु धर्माचा अथवा वैदिक संस्क्रुतीचा नाश झाला नाहि. तेच इतर साम्राज्यांचा व संस्कृतींचा विनाश झाला हे मला ठळक पणे दाखवुन द्यायचय.

धन्यवाद! हेच चौघे का? याचे उत्तर तुम्हि दिलेत याचा मला आनंद होतोय! या चौघांचा काल बघता त्या काळी त्यांच्या सारखेच काम करणारा दुसरा झाला नाहि. एकछत्री भारतीय साम्राज्य हे स्वप्न प्रथमतः चाणक्यांनी बघितल. म्हणुन खर तर राष्ट्रपिता एकच आर्य चाणक्य. जे राष्ट्र घडवतात तेच राष्ट्रपिता म्हणावले जाऊ शकतात. बुध्द धर्माच्या अतिक्रमणाने भारतीय पुरुषार्थाची अतोनात हानी झाली. मिन्यांडर्(मिलींद) बुध्द धर्म स्वीकारुन आपले साम्राज्य वाढवु पाहत होता आणि आम्हि आंधळेपणाने महान बौध्द राजा म्हणुन त्याला अजुनहि डोक्यावर घेतो. हा असला आचरट्पणा थांबवण्याचे कार्य आदि शंकराचार्यांनी केले. बौध्द धर्म जवळपास भारतातुन पिटाळुन लावला. पुढे मुस्लिम आक्रमकांनी नालंदा ३ वेळा जाळले आणि बुध्द धर्माच्या अहिंसेचा संपुर्ण पराभव झाला. मात्र त्याला उत्तर दिले शिवरायांनी. तलवारीला त्यांनी त्याच भाषेत उत्तर दिले. पुढे बाजीरावांनी दिल्लीला धडक दिली. तर राघोबांनी अटकेवर. शस्त्र हेच शास्त्र टिकवुन ठेवते हेच अंतिम सत्य आहे. आत्यंतिक अहिंसेने काय होतं हे तिबेटच्या रुपाने आपण बघतोय नाहि का? आणि विवेकानंदांचे कार्य तर इतके अलौकिक आहे कि त्यांच्याच शब्दात सांगायच झालं तर "या विवेकानंदाने काय केले आहे हे जाणुन घ्यायला दुसर्‍या विवेकानंदालाच जन्म घ्यावा लागेल!" विवेकानंदांनी हिंदु धर्माला शिकागो येथिल परीषदेत ज्या ताकदिने पुढे आणले त्या बद्दल विवेकानंदांचे कार्य हे दुसरे शंकराचार्य जन्माला आले होते असेच करावे लागेल.

"हे काहि प्रमाणात पटलं नाहि. केवळ या चौघांच्या चरित्र समजुन घेऊन भारत (विशेषतः सध्याचा भारत) समजता येईलसं वाटत नाहि. अवांतर: मला लेख पूर्ण वाचायच्या आधी भारतातील चार व्यक्ती म्हटल्यावर महात्मा गांधी, ए.पी.जे अब्दुल कलाम, रविंद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या व्यक्ती डोळ्यापुढे आल्या." ------------------------- आपण सांगितलेल्या व्यक्ती या मोठ्या आहेत यात वाद नाहि मात्र यांच्या समकालीन लोकांची लिस्ट मोठी आहे. गांधी, टागोर,नेताजी हि लोकं समकालीन होती. एकवेळ तुम्हि टिळकांचे नाव घेऊ शकता अगदी त्यांचे खंदे विरोधी शाहु राजे सुध्दा टिळक गेल्यावर म्हणाअले होते "मर्दानी माणुस गेला आता लढायचे कोणाशी? त्यांच्या मागे सगळाच पोरकटाअंचा बाजार. आम्हि एकत्र आलो असतो तर मोठे काम केले असते. पण दोघेहि चुकलो. नको इतके ताणाले!" आणि नंतरची १९४७ पर्यंतची ती वेळच अशी होती की एकाच वेळी शेकडो सारख्या ताकदिची माणसे वावरत होती ,डावपेच टाकत होती. मात्र वरील चौघांचा काल बघता अथवा त्यांचे कार्य बघता ते कार्य दुसर्‍याने क्वचित अथवा मु़ळिच केले नव्हते किंवा केले असले तरी त्याला अपयश आले होते उदा. शहाजी राजांनी केलेला स्वातंत्र्याचा प्रयत्न. आर्य चाण्यक्यच्या आधी आपले राज्य आणि आपण इतकाच हेतु होता. पांडवांनी राजसुर्य केला देखिल पण अशी कितीशी भुमी त्यांनी जिंकली? उलट भूमी न जिंकता फक्त "तु मोठा! हा कर घे आणि जा!" या प्रकाराने राजसुर्य यज्ञ होत असे. मात्र चाणक्याने एकच राज्य या उद्देशाने मोठि भूमी एकाच साम्राज्याखाली आणली. आदि शंकराचार्यांच्या कार्याला तर तोड नाहि कोणी झाला नाहि कोणी होणारहि नाहि. शिवरायांच्या समकालीन छत्रसाल बुंदेला लढत होता पण बुंदेल्याला वाट शिवरायांनीच दाखवली. शिवाय बुंदेल्याने साम्राज्य उभे केले पाहिजे अशी महत्वाकांक्षा धरल्याचे दिसत नाहि मात्र तेच शिवरायांनी "थोरली मसलत" नेहमी डोळ्या समोर ठेवुन कार्य केले आणि हि थोरली मसलत म्हणजेच "दिल्ली".

In reply to by सौरभ वैशंपायन

ऋषिकेश 28/08/2008 - 13:26
मुळ प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे या चार जणांचं महत्व वादातीत आहेच . तेव्हा ते वेगळं पटवण्याची गरज नाहिच / नव्हती. प्रश्न इतकाच पडला की या चार जणांना समजून घेऊन सध्याचा भारत समजता कसा येईल? (कदाचित शिवरायांचा प्रभाव आधुनिक भारतावर काहि अंशी जाणवतो) .पुन्हा भारत म्हणताना मी केवळ सुशिक्षित - वाचक असा भारत म्हणत नाहि आहे. तर खरा ज्यात ३०-४०% लोकांना अक्षर ओळखही नाहि, १५-१७% लोकांना आपण कोणत्या देशात राहतो याचं उत्तर देता आलं नाहि इ. इ. (आकडेवारीला पाठबळ देणारे दुवे घरी गेलो की शोधुन देतोच) भारत म्हणतो आहे. तुम्हीच विचार करा अश्या भारताला ओळखण्यासाठी समजा एखाद्या परकीयाने चाणक्य, विवेकानंद, शिवराय आणि आद्य शंकराचार्य अभ्यासले तर त्याला खर्‍या आधुनिक भारताची ओळख होईल का? पुन्हा एकदा नमुद करतो मुळ लेखातील व्यक्ती या आदरणीय, स्फुर्तीस्थाने निश्चितच आहेत. परंतू त्यांचा काळ खूप पूर्वीचा असल्याने त्यांचे आपण केवळ विचार घेऊ शकतो. जिथे योग्य आहे तिथे आचरणात आणण्याचा प्रयत्न करू शतो. परंतू सध्याचा भारत ओळखायला सध्याच्या जनमानसावर पगडा असलेल्या प्रमुख व्यक्ती घेतल्या इतकंच. (त्याही चारच घ्यायच्या होत्या म्हणून नाहितर लोकमान्य, सावरकर, बाबा आमटे आदी मंडळी आहेतच) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

दुर्दैवाने परकियांनी भारताला ओळखले म्हणुनच त्यांनी आपल्यावर राज्य केले. त्यांनी ओळखले असे मी म्हणालो कारण एका इंग्रज अधिकार्‍याने १८१८ नंतर हुकुम काढला महाराष्ट्रातील किल्ले ओस पडतील असे बघा, त्यांच्या नित्याच्या वाटा बुजवुन टाका कारण शिवाजी लोकांच्या मनात जिवंत राहिल तोवर आपण इथे तग धरु शकणार नाहि. आणि म्हणुनच १८१८ नंतर रायगड आणि अनेक महत्वाचे गड हे तोफांचा मारा करुन झोपवले. तिथे वाट अडचणीची करुन टकली. आणि हेच ल़क्षात घेऊन टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरु केला. तो अगदि बंगाल पावतो पसरला. त्यातुनच इंग्रजांना बायकी वाटणार्‍या बंगाल मधुन खुदिराम बोस उभे राहिले. शिवरायांची प्रेरणा घेऊन किती जणांनी आपले आयुष्य देशाला समर्पित केले याचा इतिहास आपल्याला माहितच असेल. मी ज्यांची नावे घेतली ती स्थल कालाच्या पुढची माणसे आहेत. कौटिलिय अर्थशास्त्राचे नियम आजहि राजकारणातले सर्वोत्तम नियम समजले जातात. राजेशाहि गेली अन्यथा आजहि कौटिलिय अर्थशास्त्र वापरता आले असते यात शंका नाहि. शिवरायांची युध्दनीती आज लष्करात धडा म्हणुन वापरतात. या चौघांना समजुन भारत कसा जाणुन घेता येईल या प्रश्नांचे उत्तर सरळ आहे - यांची अनेक तत्वे हि आजहि लागु पडतात. मुळात ते द्र्ष्टे होते हि गोष्ट माझ्यासाठि खुप महत्वाची आहे. चाणक्याच अर्थशास्त्र व राजनिती. आदि शंकराचार्यांची वैदिक धर्मा वरील निष्ठा व त्याचे पुनरुत्थान करायला घेतलेले कष्ट. शिवरायांची युध्दनीती आणि माणसे जमावण्याची कला. विवेकानंदांची आधुनिक तरुणाईला जोश देणारी विचारसरणी. यातु भरपुर काहि शिकण्यासारखे आहे. आणि या चौघांकडेहि कॉमन असलेली गोष्ट म्हणाजे धैर्य, ज्याला स्थल कालाच्या सीमा नसतात. प्रत्येक देशाचा-मातीचा एक स्वभाव असतो असे माझे मत आहे तो भूभाग कितिहि आधुनिक झाला तरी त्या भूमीचा मुळ स्वभाव बदलत नाहि. या मातीतुनच हि चार माणसे घडली होती.

In reply to by सौरभ वैशंपायन

ऋषिकेश 28/08/2008 - 21:56
मी ज्यांची नावे घेतली ती स्थल कालाच्या पुढची माणसे आहेत
: : :
यातु भरपुर काहि शिकण्यासारखे आहे.
अगदी मान्य. प्रश्न हा नाहि की या व्यक्तींची पात्रता काय. प्रश्न हा आहे की या व्यक्तींच्या अभ्यासाने आधुनिक भारत पर्यायाने समाजाची जडणघडण कशी कळेल? माझा मुद्दा बहुदा आपल्याला कळला नसावा हा माझ्या लिखाणाचा दोष समजून आता अगदी उदा. देऊन सांगतो "समजा माझा / तुमचा एखादा परदेशी / देशी मित्र म्हणाला मला भारतात यायचंय तेव्हा भारतातील समाज कसा आहे? त्यांच्या समस्या काय? शक्तीस्थाने काय? भारत हा बाकी जगापेक्षा वेगळा आहे पण तो नक्की कसा आहे? मला भारतात येण्या आधी एक कल्पना म्हणून भारत समजून घ्यायचाय. खरंतर यासाठी बरंच वाचावं लागेल? पण अश्या चार व्यक्तींची नावं मला सांग ज्याच्याबद्दल वाचून मला हल्लीच्या भारतील समाजरचना, संस्कृती, विचार, आचार आणि संस्कार ढोबळपणे कळून येतील" व त्यावेळी जर मी आपण सांगितलेल्या वक्ती सांगितल्या तर मग त्याने भारत अतिशय प्रज्ञावंत देश आहे. तिथे तत्त्वज्ञान, अर्थकारण, धर्म आणि क्षात्रधर्माचा उत्तम मिलाफ आहे. पण भारतात घरासमोर हत्ती आहेत असा विचार केल्यास नवल नाहि ;) [शेवटी थोडे ह. घ्यावे आणि भावना समजून घ्याव्यात] आपण सांगितलेल्या व्यक्तींनी त्यांच्या क्षेत्रात बरेच कार्य/संशोधन/पराक्रम केले आहेत आणि त्याचा उपयोग प्रश्न सोडवण्यासाठी होऊ शकतो / व्हावाच. परंतू भारताची सद्यस्थिती, समाजरचना वगैरे समजून घ्यालला सध्याच्या जिवंत पिढीवर ज्या व्यक्तींचा बहुमताने पगडा आहे त्यांचाच विचार करावा लागेल. तुमच्यावर उपरोल्लेखित व्यक्तींचा पगडा आहे. पण तुमच्यासारखे आजच्या भारतात किती आहेत असे वाटते? अगदी शिवरायांच्या नावाने गोंगाट करणार्‍यांपैकी किती जणांनी राजा शिवछत्रपती (अथव असे कोणतेही चरीत्र्)एकदा देखील वाचले असेल व त्यांच्यावर त्याचा परिणाम वगैरे झाला आहे असे तुम्हाला वाटते? ;) तेव्हा, तुम्ही दिलेल्या वक्तीचा अभ्यास करून काहि अपेक्षा धरून भारतात आलेला मनुष्याचा कीती मोठा अपेक्षाभंग होईल विचार करा. म्हणून मी म्हणत होतो की उपरोल्लेखित व्यक्ती असामान्य आणि थोर असल्या (आहेतच!) तरी आधुनिक भारतावर (राजकारणावर नव्हे हा! )त्यांचा फारसा प्रभाव राहिलेला वाटत नाहि . आपल्या यादीतील विवेकानंद व शिवराय हे तुलनेने हल्लीचे नेते असल्याने भारतातील काहि समाजघटकांवर त्यांचा काहिसा प्रभाव जाणवतो हे कबूल -(सपष्ट) ऋषिकेश

"सर्वप्रथम आर्य चाणक्य ब्रह्मचारी असण्याबद्दल मला पटत नाहीत. चाणक्य काही संन्यासी नाही त्यामुळे त्याने ब्रह्मचारी असणे लागू होत नाही. तसेही त्याचे कुटुंब होते असे उल्लेख वाचले आहेत. शिवाजीने संसाराकडे दुर्लक्ष केलं अशी माझी समजूत आहे. ते त्यांनी जाणून बुजून केले असे म्हणायचे नाही, तेवढा वेळ त्यांना पुरला नसावा पण घरातील कलागतींकडे लक्ष देते तर कदाचित इतिहास बदलला असता. (याबाबत मी महाराजांना दोषी ठरवत नाही परंतु त्यांनी संसाराकडे गरजेपुरते लक्ष दिले हे चांगले झाले असेही म्हणणार नाही)"" ----------------------- माझ्या अल्पमती आणि अल्पज्ञानानुसार चाणक्य हे अविवाहित होते. तरी त्यांच्या वैवाहिक जिवनाचे उल्लेख आपल्याला माहित असल्यास संदर्भ देणे. संन्यासी नसणे आणि अविवाहित राहणे यांचा काहि संबध नाहि. शिवाय त्यांचे माता-पिता यांचा अंत जसा झाला ते बघता लग्नासाठी त्यांच्यावर दबाव टाकणारे कोणीच नव्हते. हा मनुष्य धेय्यासाठि पछाडलेला होता आणि आपले जिवन त्यांनी त्यालाच वाहिले होते. विवाह केलाच पाहिजे असा नियम कुठेहि नाहिये. उलट चाणक्यच त्यांच्या अर्थशास्त्रात हेर हे विवाहित नसतील तर उत्तम असेच म्हणातात. आणि "हेर" हे एखाद्या कळत्या मुला-मुली पासुन ज़ख्ख म्हातारा-म्हातारी पर्यंत कोणीहि असत. वेश्या वृतीच्या जोगिणींना हेर नेमावे असेहि कौटिल्य म्हणतो. आता जोगिण असुन वेश्या वृत्तीची कशी ?हा प्रश्न आपल्याला पडेलहि मात्र 'देवदासी' हा प्रकार काहिसा तसाच आहे. त्याचेह आधीचे रुप जोगिण भिक्षुकीण असे होते. अश्या स्त्रीयांचा वापर हेर म्हणुन करावा हे चाणक्याचे वाक्य आहे. राहता राहिला शिवरायांचा मुद्दा. तर शिवरायांची ८ लग्ने झाली होती व हि लग्ने सोयरीक या गोष्टिसाठि केली होती. त्यावेळची परीस्थिती बघता हि ८ लग्ने सांभाळायची(राज्याभिषेका पर्यंत ५(कि ६??) दोन(?) पत्नींचा तोवर मृत्यु झाला होता. ) कि राज्याचा व्याप सांभाळायचा हि चिंता होती. म्हणुनच मी दुर्लक्ष केले असे न म्हणता अधिक महत्व दिले नाहि असे म्हंटले आहे.

In reply to by सौरभ वैशंपायन

प्रियाली 28/08/2008 - 14:45
माझ्या अल्पमती आणि अल्पज्ञानानुसार चाणक्य हे अविवाहित होते. तरी त्यांच्या वैवाहिक जिवनाचे उल्लेख आपल्याला माहित असल्यास संदर्भ देणे.
संदर्भ आता जालावरील देणे म्हणजे शोधायला हवेत परंतु चाणक्य अविवाहीत निश्चित नव्हते. त्यांच्या पुत्राचे, नातवाचे इ. संदर्भ वाचलेले आहेत. तत्कालीन समाजरचनेनुसार चाणक्यांना अविवाहीत राहण्याचे काहीही कारण नाही. विवाहासाठी दबाव टाकावा लागतो असे वाटत नाही. ध्येयासाठी जीवन अनेकांनी टाकले - गांधींपासून, शिवाजीपर्यंत पण सर्वांचे विवाह झाले होते. ध्येय आणि विवाह यांचा परस्परसंबंध नाही. संन्यास आणि अविवाहीत राहणे यांचा नक्की आहे. चाणक्यांनी हेरांबद्दल लिहिले हे ठीक पण चाणक्य स्वतः [उघड]हेर नव्हते. त्यामुळे हेराचा मुद्दा इथे का यावा तेच कळल नाही. याहूनही पुढची गोष्ट अशी की चाणक्य आणि कौटिल्य हे एक होते का वेगळे यावर अनेक तज्ज्ञांचे वाद आहेत. (परंतु तो वेगळा मुद्दा) वर एका प्रतिसादात सिकंदराबद्दल वाचले. सिंकदर बॅबिलोनियात मेला इ.स्.पूर्व ३२३ मध्ये. भारत सोडला इ.स.पूर्व ३२६ मध्ये. चाणक्यांचे योद्धा म्हणून किंवा ब्राह्मण सल्लागार म्हणून कोठेही कार्य त्या काळात नाही, त्याकाळात ते विशीत असावेत. सोळाव्या वर्षी तक्षशीलेला अध्ययनासाठी गेल्याचा उल्लेख वाचला आहे आणि त्यानंतर तेथेच अध्यापनाचे कार्य सांभाळल्याचा. म्हणजे बहुधा शिकून अध्यापन करत असावेत (वयाचा फारसा संबंध नाही ) आणि त्याकाळात ते फार प्रस्थापितही नव्हते. तक्षशीलेत सिकंदराला अटकाव झालेला नाही. ज्या माळवा आणि इतर प्रांतात झाला त्यांचा आणि चाणक्याचा संबंध नाही. तक्षशीलेवर स्वारी केली असता, तिथे जी वाताहत झाली त्यातून चाणक्य पाटण्याच्या दिशेनेच गेल्याची ऐतिहासिक शक्यता जास्त. असाच सनावळ्यांचा गोंधळ रामदास आणि तुकारामांबद्दल. इतिहासाचा विचार केला असता, रामदास आणि तुकाराम हे राजांना गुरुस्थानी असतील पण ते राजांचे गुरू नसावेत. राजांचे गुरू त्यांचे आई-बाप, दादोजी आणि तत्कालीन राजकारण.
सिकंदराच्या आक्रमणाला चाणक्य आणि इतर शुर गण राज्यांनी थोपवलं.
कोणत्या काळात? आता शिवरायांबद्दल, मी आठ लग्नांबद्दल बोलत नाही, त्याचा मराठी साम्राज्याशी काय संबंध? सोयरिक साधून मराठे बांधून ठेवणे इतकाच असावा. संभाजी आणि सोयराबाईच्या अंतर्गत राजकारणाकडे महाराजांनी लक्ष पुरवले असते तर मराठ्यांचा इतिहास बदलता. बाप आणि नवरा आणि राज्याच्या भविष्याची चिंता म्हणून या गोष्टींना महत्त्व देता आले असते. राज्याचा युवराज घडवण्यात महाराज कमी पडले. (पुन्हा वर म्हटल्याप्रमाणे महाराजांना सर्वच करणे शक्य होते असे नाही पण त्यांनी या गोष्टींना महत्व दिले नाही, हे मुद्दामहून सांगण्यासारखेही काही नाही)

In reply to by प्रियाली

चाणक्याने गुरुकुलातील विद्यार्थ्यांना क्रांतिकार्याची दि़क्षा दिली होती. चाणक्याने त्याकाळी अनेक राज्यांची फळी बांधली यावर आज बहुतांशी एकमत आहे. चाणक्य त्यावेळि गुरुकुलात शिकवत होते. आणि त्यांच्या हाताखाली चंद्रगुप्त, अक्षय अशी मुले शिकत होती आज त्यातील काहि विद्यार्थ्यांची नावे मिळतात. सिकंदराविरुध्द मालवक, क्षूद्रक इ.इ. गणाराज्यांनी युध्द केले होते. सिकंदराने पौरवाला हरवले खरे मात्र परीस्थिती बघुन त्याने पौरवाला राज्यावरुन काढुन टाकले नाहि. अंभीने सिकंदराला मदत केली व पुढे त्यामुळे पौरवाकडुन आपल्या राज्याला धोका होऊ नये म्हणुन सिकंदराला मध्यस्थी करायला लावुन पौरवाशी सोयरीक जुळवली, त्याच्या मुलीशी लग्न केले. पुढे सिंहारण्य या माजी सेनापतीला हाताशी धरुन चाणक्याने सिकंदरा विरुध्द विरोधाची फळी उभी केली. सिकंदाराच्या सेनेतील अंतर्गत कुरबुरीमुले सिकंदराने परतीचा रस्ता धरला तेव्हा सिकंदर जाताच याच क्रांतिकारकांनी उठाव करुन सिकंदराचे अधिकारी मारले. पुढे मगध साम्राज्याच्या आजुबाजुच्या राजांशी हातमिळवणी करुन नंदा विरुध्द कारस्थाने करुन नंद वंशाच उच्छेद केला. व जेव्हा मगधाचे तुकडे करण्याची भाषा करणार्‍या त्या राजांना रस्त्यातुन अनेक प्रकारे हटवुन चंद्रगुप्ताला सम्राट बनवले होते. आता शिवरायांचा मुद्दा - राज्याशी काय संबध म्हणजे???? राज्याला बळकटि आणुन देण्यासाठि हि लग्न केली होती. महाराज जौहराच्या वेढ्यातुन निसटुन उगीच विशाळगडावर गेले नव्हते. विशाळगडाची भौगोलिक परीस्थीती या कारणा बरोबर विशाळगड हे महाराजांचे सासर होते जिथे दगा होण्याची शक्यता नव्हती या कारणासाठिच महाराजांनी विशाळगडाला जवळ केले. अजुन महाराजांच्या आयुष्यातले काहि प्रसंग सांगता येतिल. आणि युवराज-महाराणी यांच्या संघर्षाबाबत म्हणाल तर महाराजांना खरच तिथे लक्ष द्यायला वेळ नसावा. महाराज वर्षातले किमान ६ महिने राजधानी बाहेर असायचे पुढे तर दिड वर्षांच्या द्ख्खन मोहिमेवर गेले आणि तिथुनच तंट्याला सुरुवात झाली.

In reply to by सौरभ वैशंपायन

प्रियाली 28/08/2008 - 18:38
चाणक्याने गुरुकुलातील विद्यार्थ्यांना क्रांतिकार्याची दि़क्षा दिली होती.
कशाबद्दल क्रांतिकार्याची दिक्षा? चाणक्य युद्धनिती शिकवत होता का? (राजनीती किंवा अर्थशास्त्र शिकवत असावा असे मला वाटते) कुठे बंडाळी, अव्यवस्था सुरु होती की चाणक्य क्रांतीकारी निर्माण करत होता? की सिकंदर चालून येतो आहे म्हणून तो ग्रीक सैन्याविरूद्ध विद्यार्थ्यांची फळी निर्माण करत होता? तक्षशिलेत असताना चाणक्य हा एक सामान्य तरूण अध्यापक होता. बाकी, काहीही योगदान नाही. चंद्रगुप्त तक्षशीलेचा विद्यार्थी असल्याबद्दल आजच कळले. असावाही मला फारशी कल्पना नाही परंतु चंद्रगुप्त सिकंदराच्या सैन्यातून लढल्याच्याही कथा-आख्यायिका सांगितल्या जातात. चंद्रगुप्ताचे वय त्याकाळात १३-१४ असल्याने तो कितपत लढला असावा याचीही कल्पना नाही आणि चंद्रगुप्त भारताच्या वायव्येकडे राहिला होता यालाही काहीही ऐतिहासिक पुरावे नाहीत. आहेत त्या सर्व कपोलकल्पित कथा.
चाणक्याने त्याकाळी अनेक राज्यांची फळी बांधली यावर आज बहुतांशी एकमत आहे.
बांधली पण ती मगध साम्राज्याविरुद्ध. वायव्य भारतात अशी फळी बांधल्याचे मी कोठेही वाचलेले नाही पण संदर्भ आवडेल.
सिकंदर जाताच याच क्रांतिकारकांनी उठाव करुन सिकंदराचे अधिकारी मारले.
क्रांतिकारकांनी नाही, लहान मोठ्या गणराज्यांनी गनिमी काव्यांनी हल्ले करून मारले आणि चाणक्यांचा किंवा त्याच्या तथाकथित दूरवर पसरलेल्या शिष्यांचा यात काहीही संबंध नसावा. तक्षशीलेची वाताहत, युद्धपरिस्थिती वगैरेतून सुटका करून चाणक्य पाटलीपुत्राच्या दिशेने गेला. तेथे नंदाच्या दरबारी त्याने नोकरी स्वीकारली. आपल्या हुशारीमुळे वर चढला आणि हेकटपणा मुळे मूर्ख नंदाची मर्जी गमवून बसला आणि मगध साम्राज्याशी वैर धरले. ही परिस्थिती येईपर्यंत तो मगधसाम्राज्यातील एक राजकारणी म्हणून प्रसिद्धी पावलेला होता आणि म्हणूनच आजूबाजूच्या लहान-मोठ्या राज्यांशी हातमिळवणी करू शकला.
आता शिवरायांचा मुद्दा - राज्याशी काय संबध म्हणजे???? राज्याला बळकटि आणुन देण्यासाठि हि लग्न केली होती.
हे तर मी म्हटलेलेच आहे पण बळकटी शासन करत नाही. महाराजांच्या आठ लग्नांबद्दल माझे काहीच म्हणणे नसल्याने मी त्यावर विषय वाढवत नाही. युवराज आणि महाराणींचा तंटा मात्र खूप जुना होता आणि महाराजांचे त्याकडे दुर्लक्षच झाले.

In reply to by प्रियाली

चंद्रगुप्त तक्षशीलेचा विद्यार्थी होता कि नव्हता याची कल्पना नसताना सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळी तो १२-१४ वर्षांचा असेल हे अनुमान आपण कसे लावलेत? कारण चाणक्य अथवा चंद्रगुप्त यांची अचुक जन्म तारिख कोणालाच माहित नाहि. चाणक्याने चंद्रगुप्ताच्या मामाला काहि पैसे देऊन चंद्रगुप्ताला आपल्या बरोबर तक्षशीलेला आणाले यावर बरेच जण मान्यता देतात. सिकंदराशी अंभीने हातमिळवणी केल्याची बातमी आल्यावर त्यांनी हि फळी बांधायला सुरुवात केली होती. राजाच नाकर्ता निघाल्यावर काय करणार? संदर्भा साठि भा.द.खेर यांचे चाणक्य वाचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सहा सोनेरी पाने वाचा. शिवाय अजुन अनेक पुस्तके मिळतील. शिवाय चंद्रप्रकाश द्विवेदि यांची चाणक्य हि सिरीअल लागायची सध्या तिच्या सीडिज मिळतात. चंद्रप्रकाश द्विवेदि ह्या माणसाने चाणक्यावर विद्यावाचस्पति हि पदवी प्राप्त केली आहे निदान आपले ज्ञान त्यांच्यापेक्षा जास्त नाहि हे मान्य करुन त्यांनी ज्या घटना सांगितल्या अथवा दाखवल्या आहेत त्या नविन माहिती समोर येईतोवर प्रमाण मानायला हरकत नाहि. अगदिच कोणावरहि विश्वास ठेवा असे मी सांगत नाहिये. तुम्हि म्हणता तसे तो नंदाच्या दरबारी होता कि नव्हता याबाबत दे़खिल दुमत आहे. मात्र चाणक्याचा नंदाने दोनवेळा अपमान केला होता व फक्त वैयक्तीक अपमानासाठि चाणक्याने नंदाचा उच्छेद केला नसुन नंदाच्या नाकर्तेपणामुळे त्याचा नाश केला होता हे स्प्ष्ट आहे.

In reply to by सौरभ वैशंपायन

प्रियाली 28/08/2008 - 19:03
चंद्रगुप्त तक्षशीलेचा विद्यार्थी होता कि नव्हता याची कल्पना नसताना सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळी तो १२-१४ वर्षांचा असेल हे अनुमान आपण कसे लावलेत
चंद्रगुप्त तक्षशीलेचा विद्यार्थी असण्याचा आणि १२-१४ वर्षांचा असण्याचा आणि एकत्रित अनुमानाचा संबंध काय? चंद्रगुप्ताचे वय इतिहासकारांनी निश्चित केले आहे. त्यानुसार जन्म सुमारे इ.स्.पूर्व ३४० ते ३३५ मध्ये झाल्याचे सांगितले जाते. अचूक तारखा माहित असण्याचा प्रश्न नाही. नंदराज्याचा कालावधी, मौर्यराज्याचा कालावधी, चंद्रगुप्ताचा शासनकाळ, त्यानंतर आलेले राजे यावरून हे वय निश्चित केले जाते.
चाणक्याने चंद्रगुप्ताच्या मामाला काहि पैसे देऊन चंद्रगुप्ताला आपल्या बरोबर तक्षशीलेला आणाले यावर बरेच जण मान्यता देतात.
चाणक्याने चंद्रगुप्ताला विकत घेतले, चंद्रगुप्त नंदाचा अनौरस पुत्रच होता, नंदाने त्याला पितृत्व नाकारले होते वगैरे वगैरे या फक्त आख्यायिकाच आहेत. त्यांना पुष्टी देणारे कोणतेही संदर्भ नाहीत.
चंद्रप्रकाश द्विवेदि ह्या माणसाने चाणक्यावर विद्यावाचस्पति हि पदवी प्राप्त केली आहे निदान आपले ज्ञान त्यांच्यापेक्षा जास्त नाहि हे मान्य करुन त्यांनी ज्या घटना सांगितल्या अथवा दाखवल्या आहेत त्या नविन माहिती समोर येईतोवर प्रमाण मानायला हरकत नाहि.
चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या ज्ञानाबद्दल माझे काहीच म्हणणे नाही परंतु त्यांचे ज्ञान माझ्यापेक्षा जास्त आहे म्हणून मी त्यांनी सांगितलेल्या घटना प्रमाण मानाव्या असे कुठे आहे? यासंदर्भात मी पार्थसारथी बोस, डॉ. बरुआ यांचे लेख काही काळापूर्वी वाचले होते, कोणीही चाणक्याने सिकंदराविरुद्ध लढाई लढण्याबद्दल म्हटलेले नाही. ग्रीकांचा इतिहास वाचलेला आहे. त्यात तत्कालीन अनेक लहान मोठ्या राजा किंवा सेनानींची नावे आहेत..कुठेही चाणक्याचे नाव नाही.
चाणक्याचा नंदाने दोनवेळा अपमान केला होता व फक्त वैयक्तीक अपमानासाठि चाणक्याने नंदाचा उच्छेद केला नसुन नंदाच्या नाकर्तेपणामुळे त्याचा नाश केला होता हे स्प्ष्ट आहे.
चाणक्याचा अपमान याच कारणासाठी झाला की तो नंदाच्या दरबारी होता, नंदाला सल्ल्यांची नाहीतर हुजर्‍यांची गरज होती आणि त्यामुळे त्यांचे एकमेकांशी पटत नव्हते.

लिखाळ 28/08/2008 - 15:23
सौरभ, लेख ठिक वाटला. वक्तृत्व स्पर्धेतले भाषण असते त्या धाटणीचा वाटला. लेख शेवटीसुद्धा कोठलीच ठोस माहिती वा मत मांडत नाही त्यामुळे तो वाचून संपल्यावर टाळ्या वाजवण्यापलिकडे हातात काहिच राहिले नाही. >>आणि अगदी शत्रुनेही "स्त्री-दाक्षीण्य" या गुणाबाबत त्यावरुन आपले सर्वस्व ओवाळुन टाकावे इतकी शुचिता त्याच्याकडे होती. या सारख्या वाक्यांमुळे मला तसे वाटले असेल कदाचित. असो. पण, आपण निवड केलेल्या चारही व्यक्ती या नक्कीच अनेक शतके भारतावर, त्याच्या संस्कृतीवर प्रभाव पाडणार्‍या आहेत हे सत्यच. यांबद्दल आपल्याला वाटणारा आदरसुद्धा योग्यच आहे. शंकराचार्य आणि विवेकानंद यांनी भारतभ्रमण करुन भारताचा, तेथील लोकांचा स्वभाव ओळखला होता. मला त्यांच्या समाजकारणाचा हा भक्कम पाया वाटतो. पुढे झालेल्या रामदास आणि इतरही काही संत (आणि समाजसेवकांनी) मंडळींनी भारतभ्रमण करुन रावा पासून रंकापर्यंत सर्व समाजजीवन जवळून पाहिल्यामुळेच त्यांना सामाजिक स्थितीवर काही ठोस मते बनवता आली आणि उपाय योजता आले असे वाटते. सध्याच्या नेत्यांनी कितीही प्रवास केला तरी ते एक तर्‍हेच्या प्रभावळीत राहुन प्रवास करतात. त्यांना हे भान येणे शक्य दिसत नाही. आपले इतरही काही लिखाण वाचले. आवडले. शुभेच्छुक --लिखाळ.

लेखन आणि चर्चा दोन्ही वाचत आहे. लेख सोपा करता आला असता या विचारांशी सहमत. आपण लेखासाठी निवडलेल्या श्रेष्ठ माणसांनी भारतीय मनाला नेहमीच भुरळ घातली आहे. इतिहासाची आठवण यासाठी करावी की, भविष्यातली पावलं दमदार पडावी. इतिहासातील चरित्र /विचारांच्या पावलावर पाऊल टाकून आपण महासत्तेकडे कुच केले पाहिजे हा लेखनातला आशावाद आवडला. चाणक्याचं द्रष्टेपण, शंकराचार्यांचे ज्ञान, शिवरायांची शुचिता आणि विवेकानंदांची निष्ठाच भारताला महासता बनवु शकते. हम्म, नक्कीच बनवू शकते. पण सुरुवात कुठून करायची ? त्याचे जर विवेचन आले असते तर, लेखाला चार चांद लागले असते, असो आपले लेखन आम्ही आवडीने वाचत असतोच , लगे रहो. :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास 27/08/2008 - 20:24
चांगले विचार. चाणक्याचं द्रष्टेपण, शंकराचार्यांचे ज्ञान, शिवरायांची शुचिता आणि विवेकानंदांची निष्ठाच भारताला महासता बनवु शकते. भारताला महासत्ता बनवण्यासाठी वरील आणि अजून अनेक गोष्टींची गरज आहे. तसेच त्यावरून सावरकरांच्या शिवाजीला उद्देशून म्हणलेल्या (लताने गायलेल्या) ओळी आठवल्या, ज्यात ते "आम्हाला" म्हणजे "जनसामान्यांना" काय दे हे सांगतात... हे गूण फक्त शिवाजीतले त्यांनी दाखवलेत कारण ते एकत्रीत त्या व्यक्तिमत्वात दिसतात जे (व्यक्तिमत्व) तमाम मराठी माणसाला आपले वाटते. इतर अनेक नेतृत्वात (ऐतिहासिक विशेषकरून) ते दिसू शकतील..
जी शुद्धी हृदाची रामदास शीर डुलवी जी बुद्धी पातशाह्यास शत्रूच्या झुलवी जी युक्ती कूटनितीस खलासी बुडवी जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी
ती शुद्धी हेतूची कर्मी राहूदे ती बुद्धी भाबड्या जीवा लाहू दे ती शक्ती शोणितामाजी वाहू दे दे मंत्र पुन्हा, जो दिले समर्थे तुजज्या हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा

आजानुकर्ण 27/08/2008 - 20:59
मात्र "थोडक्यात या चौघांना 'आचरल्यास' भारत महासत्ता होणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे" हे वाक्य कळले नाही. या चौघांना आचरायचे म्हणजे काय करायचे याचे स्पष्टीकरण वाचायला आवडेल. आपला, (आचरट) आजानुकर्ण

आजानुकर्ण 27/08/2008 - 20:48
अन्यथा र्‍हास पावलेल्या बाबिलोनियन, माया, पारसिक, रोमन, ग्रीक, इजिप्शीयन अश्या प्रचंड मोठ्या संस्कृतींच्या वा साम्राज्यांच्या यादित भारत किंवा हिंदु संस्कृतीचे नाव आले असते
बाबिलोनियन,माया,पारसिक,रोमन,ग्रीक,इजिप्शियन संस्कृतींची हिंदू संस्कृतीशी तुलना चुकीची आहे. ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध संस्कृती जशा हयात आहेत तशीच हिंदू संस्कृती हयात आहे. उपरोल्लिखित संस्कृतींची तुलना मोहेंजदडो आणि हडप्पा संस्कृतीशी होऊ शकते. त्या र्‍हास पावलेल्या आहेत. आपला, (हिंदू) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास 27/08/2008 - 21:42
ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध संस्कृती जशा हयात आहेत तशीच हिंदू संस्कृती हयात आहे. उपरोल्लिखित संस्कृतींची तुलना मोहेंजदडो आणि हडप्पा संस्कृतीशी होऊ शकते. त्या र्‍हास पावलेल्या आहेत. बहुतांशी सहमत आणि योग्य मुद्दा! :-) काही मला वाटणारे फरक - (या चर्चेत कदाचीत गौण मुद्दा) हिंदू संस्कृती हा शब्द धर्मापेक्षा (रिलीजन या अर्थी) "civilization" या अर्थी शब्द आहे आणि तो भूगोलाशीपण संबंधीत आहे. ख्रिश्चन, मुस्लीम आणि बौद्ध हे जास्त करून रीलीजनशी संबंधीत आहेत. मोहेंजेदडो आणि हडप्पा ह्या संस्कृती होत्या म्हणण्या पेक्षा नागरी व्यवस्था होत्या ज्यांचे कौतूक आजही संस्कृतीपेक्षा नगररचना शास्त्रापुरते मर्यादीत होते. पण त्या विस्तृत प्रमाणावात हिंदू संस्कृतीच्याच भाग होत्या जी आपण म्हणल्याप्रमाणे र्‍हास झालेली नाही.

In reply to by विकास

आजानुकर्ण 27/08/2008 - 21:48
हिंदू संस्कृती हा शब्द धर्मापेक्षा (रिलीजन या अर्थी) "civilization" या अर्थी शब्द आहे आणि तो भूगोलाशीपण संबंधीत आहे. ख्रिश्चन, मुस्लीम आणि बौद्ध हे जास्त करून रीलीजनशी संबंधीत आहेत. बरोबर. आणि भारतात (किंवा हिंदुस्तानात किंवा हिंदुस्थानात) राहणारे ख्रिश्चन, मुसलमान, बौद्ध हे देखील या सिव्हिलायझेशनचाच भाग असल्याने ते देखील हिंदूच आहेत. असे मानता येईल का? आपला, (हिंदुत्त्ववादी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास 27/08/2008 - 22:12
भारतात (किंवा हिंदुस्तानात किंवा हिंदुस्थानात) राहणारे ख्रिश्चन, मुसलमान, बौद्ध हे देखील या सिव्हिलायझेशनचाच भाग असल्याने ते देखील हिंदूच आहेत. असे मानता येईल का? सिव्हीलिझेशनचा भाग म्हणून हिंदू म्हणता येतील. पण धर्म म्हणून त्यांचा धर्म वेगळाच आहे आणि तसे असण्यात काही गैर नाही. दुर्दैवाने "हिंदू" हा शब्द धर्माला चिकटला असल्याने आणि ते पण भारतात विशेषकरून त्यातून गैरअर्थ निघतात. अवांतरः मधे कधीतरी मी या संदर्भात लिहीले होते, पण गेल्या वर्षी न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघात, वातावरण बदलावरून असलेल्या कार्यक्रमात गेलो होतो. तेंव्हा पाण्यावरून एक परीसंवाद होता. त्यात एक युरोपमधील उच्च अधिकारी स्त्री विकसनशील देशातील पाण्यावरून बोलत होती. त्यात तिने भारतातील व्यक्तींचा उल्लेख हा "हिंदू" म्हणून केला "इंडीयन" म्हणून नाही. कारण अनेक शतके ते तसेच ऐकतात. थोडक्यात हा त्यांच्यासाठी भौगोलीक शब्द आहे. अतिअवांतर: अमेरिकेतील नेटीव्हांना ज्यांना भारतात आपण "रेड इंडीयन" म्हणतो त्यांना बर्‍याचदा येथे फक्त, "इंडीयन" म्हणतात. कारण जेंव्हा येथे युरोपातून लोकं आली तेंव्हा त्यांना हीच "इंडीया" वाटली होती आणि म्हणून ते "इंडीयन्स". अर्थात मी पहील्यांदा ते जेंव्हा ऐकले तेंव्हा "ऑफेन्सिव्ह" वाटले. नंतर समजले... तेंव्हा शब्दांचे अर्थ जरी भौगोलीक आणि राजकीय सीमांनी ठरतात तसेच धर्माधारीत पण जर असले तर तसे शब्द सार्वजनीक करण्याचे टाळावे. थोडक्यात संस्कृतिचा भाग असले तरी, "ख्रिश्चन, मुसलमान, बौद्ध " यांना हट्टाने हिंदू म्हणावे असे मला वाटत नाही.

In reply to by विकास

आजानुकर्ण 27/08/2008 - 23:33
ते अजूनही भारतात प्रत्येकाच्या घरी हत्ती असतो आणि रस्त्यांवर गारूडी साप घेऊन फिरतात असा विचार करतात, असे 'इथे'च वाचले आहे. त्यांच्या मताला महत्त्व देण्याचे कारण नाही! आपला, (देशी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

एकलव्य 28/08/2008 - 17:14
ते अजूनही भारतात प्रत्येकाच्या घरी हत्ती असतो .... कधीतरी कोणीतरी अशा तर्‍हेचे अजूनही बोलतो हे खरे आहे. पण अलिकडे हे अज्ञानमूलक नसून थोडेसे खोडसाळपणाकडे असते. मला कोणी असे म्हणाल्यास माझे उत्तर तयार असते - हो आमच्याकडे तीन हत्ती आहेत. नुसता हत्ती ठेवणे बरं नाही, हत्तीणही पाळावी लागते ना. घरामागच्या तळ्यात दिवसरात्र डुंबत असतात. मस्त मजा येते. ही उपरोक्त प्रतिक्रिया वगळता अन्य कोणतीही प्रतिक्रिया येथे द्यावीशी वाटली नाही. असो.... (महाभारतीय) एकलव्य

प्रियाली 27/08/2008 - 21:06
वर आलेले मुद्दे पुन्हा उगाळत नाही परंतु,
चार जणांतील तिघे तर आजन्म ब्रह्मचारी राहिले तर चौथा संसारी असला तरी आपल्या संसाराला आपल्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त स्थान त्याने कधीच दिले नाहि
सर्वप्रथम आर्य चाणक्य ब्रह्मचारी असण्याबद्दल मला पटत नाहीत. चाणक्य काही संन्यासी नाही त्यामुळे त्याने ब्रह्मचारी असणे लागू होत नाही. तसेही त्याचे कुटुंब होते असे उल्लेख वाचले आहेत. शिवाजीने संसाराकडे दुर्लक्ष केलं अशी माझी समजूत आहे. ते त्यांनी जाणून बुजून केले असे म्हणायचे नाही, तेवढा वेळ त्यांना पुरला नसावा पण घरातील कलागतींकडे लक्ष देते तर कदाचित इतिहास बदलला असता. (याबाबत मी महाराजांना दोषी ठरवत नाही परंतु त्यांनी संसाराकडे गरजेपुरते लक्ष दिले हे चांगले झाले असेही म्हणणार नाही)

ऋषिकेश 27/08/2008 - 22:21
लेख आवडला. किंचीत शब्दबंबाळ वाटला. असो, या चार जणांचं महत्व वादातीत आहेच पण
ज्याला ’भारत’ समजुन घ्ययचा असेल त्याने या चौघांचे चरीत्र समजुन घेण्याचा प्रयत्न करावा
हे काहि प्रमाणात पटलं नाहि. केवळ या चौघांच्या चरित्र समजुन घेऊन भारत (विशेषतः सध्याचा भारत) समजता येईलसं वाटत नाहि. अवांतर: मला लेख पूर्ण वाचायच्या आधी भारतातील चार व्यक्ती म्हटल्यावर महात्मा गांधी, ए.पी.जे अब्दुल कलाम, रविंद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या व्यक्ती डोळ्यापुढे आल्या. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

नीलकांत 27/08/2008 - 23:24
लेख छान झालाय. या चौघांपैकी आद्य शंकराचार्यांबद्दल जास्त माहिती नाही. मात्र त्या सर्वांचं काम मोठंच आहे. नीलकांत

प्रियाली 27/08/2008 - 23:34
रामदास का तुकाराम?
चार जणांच्या गुरुकुलाच्या अथवा गुरुच्या प्रभावाखाली-छत्राखाली कदाचित इतरही हजारो जण शिकले असतीलही, पण मग हेच चौघ का?
शिवाजी महाराज रामदासांना उमेदीच्या काळात भेटल्याचे आठवत नाही. जेव्हा भेटले तेव्हा आधीच प्रस्थापित होते त्यामु़ळे वरील प्रश्न इथे लागू होत नाही असे वाटते. तुकारामांशी त्यांची भेट त्यामानाने लवकर झाली असावी असे वाटते.

In reply to by प्रियाली

आजानुकर्ण 27/08/2008 - 23:37
शिवाजीराजे उमेदीच्या काळात तुकारामांनाही भेटले नाहीत आणि रामदासांनाही भेटले नाहीत. याबाबत रामदास आणि तुकाराम यांचे काही आक्षेप नसतील. मात्र असे म्हटले की रामदास आणि तुकारामांची ब्र्यांड अँबेसिडरशिप करणार्‍यांना ते कमीपणाचे वाटते. (शिवाय जातीयवादी असे लेबलही लागते) त्यामुळे हा मुद्दा काढला नाही. 'सोने आणि धन आम्हा मृत्तिकासमान' या तुकारामांच्या अभंगाची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. मात्र त्याबाबत पुन्हा कधीतरी. आपला, (क्रमशः) आजानुकर्ण

दोयल 28/08/2008 - 02:25
चांगल्या विचाराना कोणी मांडले कि त्याला नस्ते फाटे फोडायची लाटच आहे.

In reply to by दोयल

विकास 28/08/2008 - 02:30
चांगल्या विचाराना कोणी मांडले कि त्याला नस्ते फाटे फोडायची लाटच आहे. मात्र असली प्रतिक्रीया नस्ता फाटा फोडत आहे असे वाटत नाही का? एखादा लेख वगैरे लिहील्यावर जर त्यावर उलट सुलट प्रतिक्रीया आल्यातर त्याचे दोन अर्थ होतात - एक म्हणजे लोकांनी वाचले. दुसरे म्हणजे त्यांना काय वाटते ते सांगितले आणि त्यावर चर्चा सुरू झाली...थोडक्यात फाटा फोडला वगैरे काही वाटत नाही.

In reply to by विकास

प्रियाली 28/08/2008 - 03:05
जर ताबडतोब प्रतिक्रिया येणार्‍या संकेतस्थळावर लेख टाकला तर त्यातील त्रुटी दाखवणे, शंका विचारणे, वेगळे मत मांडणे इ. लोक करणारच तेव्हा उगीच असले विषयाशी संबंधीत नसणारे प्रतिसाद देऊन नस्ते फाटे फोडण्याची गरज नाही.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 28/08/2008 - 08:40
विकास आणि प्रियालीशी सहमत आहे... सदर लेखात मला कोणतेही विषयांतर जाणवत नाही आणि फाटे फोडले गेले आहेत असे वाटत नाही.... तात्या.

राघव 28/08/2008 - 12:27
सुंदर लेख. चौघे कोण अन् चौघेच का याबद्दल चर्चा होणे स्वाभाविक आहे. पण असे म्हणता येईल की या चौघांमुळे एक राष्ट्र म्हणून खूप बदल घडला. चाणक्यांनी राजनीतीचा पाया परत मजबूत केला. शंकराचार्यांनी धर्म, रूढी, रीतीरीवाज याबद्दल असणार्‍या मानसिकतेत काळानुरूप योग्य बदल घडवून आणला. शिवरायांनी तर धर्मरक्षण केलेय, नाही तर काय झाले असते ती कल्पना पण करवत नाही. विवेकानंदांनी सगळ्यांना भारताची ओळख करून दिली अन् राष्ट्रभिमान जागृत केला जे अत्यंत महत्वाचे होते त्याकाळच्या परिस्थितीत; किंबहुना आजही आहे. या सर्वात चाणाक्यांचे स्थान इतर तिघांच्या मानाने थोडे कमी वाटू शकेल पण त्यांनी सांगितलेल्या नीतीच्या विस्मराणामुळेच नंतर पृथ्वीराज चौहान सारखा नेता हकनाक हारला अन् परकियांच्या घनघोर आक्रमणांना वाटा फुटल्या. इतका छान लेख लिहील्याबद्दल पुन्हा अभिनंदन. मुमुक्षू

"बाबिलोनियन,माया,पारसिक,रोमन,ग्रीक,इजिप्शियन संस्कृतींची हिंदू संस्कृतीशी तुलना चुकीची आहे. ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध संस्कृती जशा हयात आहेत तशीच हिंदू संस्कृती हयात आहे. उपरोल्लिखित संस्कृतींची तुलना मोहेंजदडो आणि हडप्पा संस्कृतीशी होऊ शकते. त्या र्‍हास पावलेल्या आहेत. " "हिंदु धर्मावर" आणि "वैदिक संस्कृतीवर" अनेक धार्मिक, सामाजिक, राजकिय आक्रमणे झाली याबाबत कुणाचे दुमत नसावे. तुमच्या वरील वाक्यातील आक्षेप नीट लक्षात घेता मी हिंदु आणि वैदिक असे दोन भाग केले आहेत. मात्र दोन्हि गोष्टि एकमेकांपासुन फारश्या वेगळ्या नाहित. ख्रिश्चन, मुस्लिम, बौध्द, जैन हे मु़ख्यत्वे धर्म आहेत यांना संस्कृती कितपत म्हणता येईल हा वेगळा विषय आहे असं मला वाटतं. त्यातुन ख्रिश्चन, मुस्लिम ह्यांनी त्यांचा धर्म तलवारीच्या जोरावर पसरवला आहे हे सत्य आहे त्यामुळे त्यांना संस्कृती म्हणावं का? आणि बौध्द-जैन तत्वांबाबत म्हणाल तर ती हिंदु धर्माचीच नवी रुपे आहेत. एक उदाहरण घ्यायचे झाले तर यज्ञ हि वैदिक संस्कृती आहे जी ग्रीकांची देखिल होती ते सुध्दा यज्ञ करीत. पण आज तिथे ख्रिश्चन धर्म पसरला आहे, रोमन संस्कृती हि आज फक्त अवषेशांच्या रुपाने उभी आहे. पारसिक संस्क्रुती झोपवणारे ग्रीक कालांतराने स्वतः कालाच्या उदरात गडप झाले. मात्र वैदिक संस्कृती व हिंदु धर्म दोन्हि आजहि तग धरुन उभे आहेत. सिकंदराच्या आक्रमणाला चाणक्य आणि इतर शुर गण राज्यांनी थोपवलं. आदि शंकराचार्यांनी बुध्द धर्माने मिळमिळित केलेला भारत पुन्हा नव्या ताकदिने उभा केला. गुप्त साम्राज्य हा भारताचा सुवर्णकाल समजला जातो त्यावेळि अगदि कंबोडिआ पर्यंत आपले राज्य पसरले होते. नंतर खुळचट कल्पनांनी भारताचे नुकसान केले. मात्र फक्त एकाच भूमीत आपले पाय रोवुन देखिल हिंदु धर्माचा अथवा वैदिक संस्क्रुतीचा नाश झाला नाहि. तेच इतर साम्राज्यांचा व संस्कृतींचा विनाश झाला हे मला ठळक पणे दाखवुन द्यायचय.

धन्यवाद! हेच चौघे का? याचे उत्तर तुम्हि दिलेत याचा मला आनंद होतोय! या चौघांचा काल बघता त्या काळी त्यांच्या सारखेच काम करणारा दुसरा झाला नाहि. एकछत्री भारतीय साम्राज्य हे स्वप्न प्रथमतः चाणक्यांनी बघितल. म्हणुन खर तर राष्ट्रपिता एकच आर्य चाणक्य. जे राष्ट्र घडवतात तेच राष्ट्रपिता म्हणावले जाऊ शकतात. बुध्द धर्माच्या अतिक्रमणाने भारतीय पुरुषार्थाची अतोनात हानी झाली. मिन्यांडर्(मिलींद) बुध्द धर्म स्वीकारुन आपले साम्राज्य वाढवु पाहत होता आणि आम्हि आंधळेपणाने महान बौध्द राजा म्हणुन त्याला अजुनहि डोक्यावर घेतो. हा असला आचरट्पणा थांबवण्याचे कार्य आदि शंकराचार्यांनी केले. बौध्द धर्म जवळपास भारतातुन पिटाळुन लावला. पुढे मुस्लिम आक्रमकांनी नालंदा ३ वेळा जाळले आणि बुध्द धर्माच्या अहिंसेचा संपुर्ण पराभव झाला. मात्र त्याला उत्तर दिले शिवरायांनी. तलवारीला त्यांनी त्याच भाषेत उत्तर दिले. पुढे बाजीरावांनी दिल्लीला धडक दिली. तर राघोबांनी अटकेवर. शस्त्र हेच शास्त्र टिकवुन ठेवते हेच अंतिम सत्य आहे. आत्यंतिक अहिंसेने काय होतं हे तिबेटच्या रुपाने आपण बघतोय नाहि का? आणि विवेकानंदांचे कार्य तर इतके अलौकिक आहे कि त्यांच्याच शब्दात सांगायच झालं तर "या विवेकानंदाने काय केले आहे हे जाणुन घ्यायला दुसर्‍या विवेकानंदालाच जन्म घ्यावा लागेल!" विवेकानंदांनी हिंदु धर्माला शिकागो येथिल परीषदेत ज्या ताकदिने पुढे आणले त्या बद्दल विवेकानंदांचे कार्य हे दुसरे शंकराचार्य जन्माला आले होते असेच करावे लागेल.

"हे काहि प्रमाणात पटलं नाहि. केवळ या चौघांच्या चरित्र समजुन घेऊन भारत (विशेषतः सध्याचा भारत) समजता येईलसं वाटत नाहि. अवांतर: मला लेख पूर्ण वाचायच्या आधी भारतातील चार व्यक्ती म्हटल्यावर महात्मा गांधी, ए.पी.जे अब्दुल कलाम, रविंद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या व्यक्ती डोळ्यापुढे आल्या." ------------------------- आपण सांगितलेल्या व्यक्ती या मोठ्या आहेत यात वाद नाहि मात्र यांच्या समकालीन लोकांची लिस्ट मोठी आहे. गांधी, टागोर,नेताजी हि लोकं समकालीन होती. एकवेळ तुम्हि टिळकांचे नाव घेऊ शकता अगदी त्यांचे खंदे विरोधी शाहु राजे सुध्दा टिळक गेल्यावर म्हणाअले होते "मर्दानी माणुस गेला आता लढायचे कोणाशी? त्यांच्या मागे सगळाच पोरकटाअंचा बाजार. आम्हि एकत्र आलो असतो तर मोठे काम केले असते. पण दोघेहि चुकलो. नको इतके ताणाले!" आणि नंतरची १९४७ पर्यंतची ती वेळच अशी होती की एकाच वेळी शेकडो सारख्या ताकदिची माणसे वावरत होती ,डावपेच टाकत होती. मात्र वरील चौघांचा काल बघता अथवा त्यांचे कार्य बघता ते कार्य दुसर्‍याने क्वचित अथवा मु़ळिच केले नव्हते किंवा केले असले तरी त्याला अपयश आले होते उदा. शहाजी राजांनी केलेला स्वातंत्र्याचा प्रयत्न. आर्य चाण्यक्यच्या आधी आपले राज्य आणि आपण इतकाच हेतु होता. पांडवांनी राजसुर्य केला देखिल पण अशी कितीशी भुमी त्यांनी जिंकली? उलट भूमी न जिंकता फक्त "तु मोठा! हा कर घे आणि जा!" या प्रकाराने राजसुर्य यज्ञ होत असे. मात्र चाणक्याने एकच राज्य या उद्देशाने मोठि भूमी एकाच साम्राज्याखाली आणली. आदि शंकराचार्यांच्या कार्याला तर तोड नाहि कोणी झाला नाहि कोणी होणारहि नाहि. शिवरायांच्या समकालीन छत्रसाल बुंदेला लढत होता पण बुंदेल्याला वाट शिवरायांनीच दाखवली. शिवाय बुंदेल्याने साम्राज्य उभे केले पाहिजे अशी महत्वाकांक्षा धरल्याचे दिसत नाहि मात्र तेच शिवरायांनी "थोरली मसलत" नेहमी डोळ्या समोर ठेवुन कार्य केले आणि हि थोरली मसलत म्हणजेच "दिल्ली".

In reply to by सौरभ वैशंपायन

ऋषिकेश 28/08/2008 - 13:26
मुळ प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे या चार जणांचं महत्व वादातीत आहेच . तेव्हा ते वेगळं पटवण्याची गरज नाहिच / नव्हती. प्रश्न इतकाच पडला की या चार जणांना समजून घेऊन सध्याचा भारत समजता कसा येईल? (कदाचित शिवरायांचा प्रभाव आधुनिक भारतावर काहि अंशी जाणवतो) .पुन्हा भारत म्हणताना मी केवळ सुशिक्षित - वाचक असा भारत म्हणत नाहि आहे. तर खरा ज्यात ३०-४०% लोकांना अक्षर ओळखही नाहि, १५-१७% लोकांना आपण कोणत्या देशात राहतो याचं उत्तर देता आलं नाहि इ. इ. (आकडेवारीला पाठबळ देणारे दुवे घरी गेलो की शोधुन देतोच) भारत म्हणतो आहे. तुम्हीच विचार करा अश्या भारताला ओळखण्यासाठी समजा एखाद्या परकीयाने चाणक्य, विवेकानंद, शिवराय आणि आद्य शंकराचार्य अभ्यासले तर त्याला खर्‍या आधुनिक भारताची ओळख होईल का? पुन्हा एकदा नमुद करतो मुळ लेखातील व्यक्ती या आदरणीय, स्फुर्तीस्थाने निश्चितच आहेत. परंतू त्यांचा काळ खूप पूर्वीचा असल्याने त्यांचे आपण केवळ विचार घेऊ शकतो. जिथे योग्य आहे तिथे आचरणात आणण्याचा प्रयत्न करू शतो. परंतू सध्याचा भारत ओळखायला सध्याच्या जनमानसावर पगडा असलेल्या प्रमुख व्यक्ती घेतल्या इतकंच. (त्याही चारच घ्यायच्या होत्या म्हणून नाहितर लोकमान्य, सावरकर, बाबा आमटे आदी मंडळी आहेतच) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

दुर्दैवाने परकियांनी भारताला ओळखले म्हणुनच त्यांनी आपल्यावर राज्य केले. त्यांनी ओळखले असे मी म्हणालो कारण एका इंग्रज अधिकार्‍याने १८१८ नंतर हुकुम काढला महाराष्ट्रातील किल्ले ओस पडतील असे बघा, त्यांच्या नित्याच्या वाटा बुजवुन टाका कारण शिवाजी लोकांच्या मनात जिवंत राहिल तोवर आपण इथे तग धरु शकणार नाहि. आणि म्हणुनच १८१८ नंतर रायगड आणि अनेक महत्वाचे गड हे तोफांचा मारा करुन झोपवले. तिथे वाट अडचणीची करुन टकली. आणि हेच ल़क्षात घेऊन टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरु केला. तो अगदि बंगाल पावतो पसरला. त्यातुनच इंग्रजांना बायकी वाटणार्‍या बंगाल मधुन खुदिराम बोस उभे राहिले. शिवरायांची प्रेरणा घेऊन किती जणांनी आपले आयुष्य देशाला समर्पित केले याचा इतिहास आपल्याला माहितच असेल. मी ज्यांची नावे घेतली ती स्थल कालाच्या पुढची माणसे आहेत. कौटिलिय अर्थशास्त्राचे नियम आजहि राजकारणातले सर्वोत्तम नियम समजले जातात. राजेशाहि गेली अन्यथा आजहि कौटिलिय अर्थशास्त्र वापरता आले असते यात शंका नाहि. शिवरायांची युध्दनीती आज लष्करात धडा म्हणुन वापरतात. या चौघांना समजुन भारत कसा जाणुन घेता येईल या प्रश्नांचे उत्तर सरळ आहे - यांची अनेक तत्वे हि आजहि लागु पडतात. मुळात ते द्र्ष्टे होते हि गोष्ट माझ्यासाठि खुप महत्वाची आहे. चाणक्याच अर्थशास्त्र व राजनिती. आदि शंकराचार्यांची वैदिक धर्मा वरील निष्ठा व त्याचे पुनरुत्थान करायला घेतलेले कष्ट. शिवरायांची युध्दनीती आणि माणसे जमावण्याची कला. विवेकानंदांची आधुनिक तरुणाईला जोश देणारी विचारसरणी. यातु भरपुर काहि शिकण्यासारखे आहे. आणि या चौघांकडेहि कॉमन असलेली गोष्ट म्हणाजे धैर्य, ज्याला स्थल कालाच्या सीमा नसतात. प्रत्येक देशाचा-मातीचा एक स्वभाव असतो असे माझे मत आहे तो भूभाग कितिहि आधुनिक झाला तरी त्या भूमीचा मुळ स्वभाव बदलत नाहि. या मातीतुनच हि चार माणसे घडली होती.

In reply to by सौरभ वैशंपायन

ऋषिकेश 28/08/2008 - 21:56
मी ज्यांची नावे घेतली ती स्थल कालाच्या पुढची माणसे आहेत
: : :
यातु भरपुर काहि शिकण्यासारखे आहे.
अगदी मान्य. प्रश्न हा नाहि की या व्यक्तींची पात्रता काय. प्रश्न हा आहे की या व्यक्तींच्या अभ्यासाने आधुनिक भारत पर्यायाने समाजाची जडणघडण कशी कळेल? माझा मुद्दा बहुदा आपल्याला कळला नसावा हा माझ्या लिखाणाचा दोष समजून आता अगदी उदा. देऊन सांगतो "समजा माझा / तुमचा एखादा परदेशी / देशी मित्र म्हणाला मला भारतात यायचंय तेव्हा भारतातील समाज कसा आहे? त्यांच्या समस्या काय? शक्तीस्थाने काय? भारत हा बाकी जगापेक्षा वेगळा आहे पण तो नक्की कसा आहे? मला भारतात येण्या आधी एक कल्पना म्हणून भारत समजून घ्यायचाय. खरंतर यासाठी बरंच वाचावं लागेल? पण अश्या चार व्यक्तींची नावं मला सांग ज्याच्याबद्दल वाचून मला हल्लीच्या भारतील समाजरचना, संस्कृती, विचार, आचार आणि संस्कार ढोबळपणे कळून येतील" व त्यावेळी जर मी आपण सांगितलेल्या वक्ती सांगितल्या तर मग त्याने भारत अतिशय प्रज्ञावंत देश आहे. तिथे तत्त्वज्ञान, अर्थकारण, धर्म आणि क्षात्रधर्माचा उत्तम मिलाफ आहे. पण भारतात घरासमोर हत्ती आहेत असा विचार केल्यास नवल नाहि ;) [शेवटी थोडे ह. घ्यावे आणि भावना समजून घ्याव्यात] आपण सांगितलेल्या व्यक्तींनी त्यांच्या क्षेत्रात बरेच कार्य/संशोधन/पराक्रम केले आहेत आणि त्याचा उपयोग प्रश्न सोडवण्यासाठी होऊ शकतो / व्हावाच. परंतू भारताची सद्यस्थिती, समाजरचना वगैरे समजून घ्यालला सध्याच्या जिवंत पिढीवर ज्या व्यक्तींचा बहुमताने पगडा आहे त्यांचाच विचार करावा लागेल. तुमच्यावर उपरोल्लेखित व्यक्तींचा पगडा आहे. पण तुमच्यासारखे आजच्या भारतात किती आहेत असे वाटते? अगदी शिवरायांच्या नावाने गोंगाट करणार्‍यांपैकी किती जणांनी राजा शिवछत्रपती (अथव असे कोणतेही चरीत्र्)एकदा देखील वाचले असेल व त्यांच्यावर त्याचा परिणाम वगैरे झाला आहे असे तुम्हाला वाटते? ;) तेव्हा, तुम्ही दिलेल्या वक्तीचा अभ्यास करून काहि अपेक्षा धरून भारतात आलेला मनुष्याचा कीती मोठा अपेक्षाभंग होईल विचार करा. म्हणून मी म्हणत होतो की उपरोल्लेखित व्यक्ती असामान्य आणि थोर असल्या (आहेतच!) तरी आधुनिक भारतावर (राजकारणावर नव्हे हा! )त्यांचा फारसा प्रभाव राहिलेला वाटत नाहि . आपल्या यादीतील विवेकानंद व शिवराय हे तुलनेने हल्लीचे नेते असल्याने भारतातील काहि समाजघटकांवर त्यांचा काहिसा प्रभाव जाणवतो हे कबूल -(सपष्ट) ऋषिकेश

"सर्वप्रथम आर्य चाणक्य ब्रह्मचारी असण्याबद्दल मला पटत नाहीत. चाणक्य काही संन्यासी नाही त्यामुळे त्याने ब्रह्मचारी असणे लागू होत नाही. तसेही त्याचे कुटुंब होते असे उल्लेख वाचले आहेत. शिवाजीने संसाराकडे दुर्लक्ष केलं अशी माझी समजूत आहे. ते त्यांनी जाणून बुजून केले असे म्हणायचे नाही, तेवढा वेळ त्यांना पुरला नसावा पण घरातील कलागतींकडे लक्ष देते तर कदाचित इतिहास बदलला असता. (याबाबत मी महाराजांना दोषी ठरवत नाही परंतु त्यांनी संसाराकडे गरजेपुरते लक्ष दिले हे चांगले झाले असेही म्हणणार नाही)"" ----------------------- माझ्या अल्पमती आणि अल्पज्ञानानुसार चाणक्य हे अविवाहित होते. तरी त्यांच्या वैवाहिक जिवनाचे उल्लेख आपल्याला माहित असल्यास संदर्भ देणे. संन्यासी नसणे आणि अविवाहित राहणे यांचा काहि संबध नाहि. शिवाय त्यांचे माता-पिता यांचा अंत जसा झाला ते बघता लग्नासाठी त्यांच्यावर दबाव टाकणारे कोणीच नव्हते. हा मनुष्य धेय्यासाठि पछाडलेला होता आणि आपले जिवन त्यांनी त्यालाच वाहिले होते. विवाह केलाच पाहिजे असा नियम कुठेहि नाहिये. उलट चाणक्यच त्यांच्या अर्थशास्त्रात हेर हे विवाहित नसतील तर उत्तम असेच म्हणातात. आणि "हेर" हे एखाद्या कळत्या मुला-मुली पासुन ज़ख्ख म्हातारा-म्हातारी पर्यंत कोणीहि असत. वेश्या वृतीच्या जोगिणींना हेर नेमावे असेहि कौटिल्य म्हणतो. आता जोगिण असुन वेश्या वृत्तीची कशी ?हा प्रश्न आपल्याला पडेलहि मात्र 'देवदासी' हा प्रकार काहिसा तसाच आहे. त्याचेह आधीचे रुप जोगिण भिक्षुकीण असे होते. अश्या स्त्रीयांचा वापर हेर म्हणुन करावा हे चाणक्याचे वाक्य आहे. राहता राहिला शिवरायांचा मुद्दा. तर शिवरायांची ८ लग्ने झाली होती व हि लग्ने सोयरीक या गोष्टिसाठि केली होती. त्यावेळची परीस्थिती बघता हि ८ लग्ने सांभाळायची(राज्याभिषेका पर्यंत ५(कि ६??) दोन(?) पत्नींचा तोवर मृत्यु झाला होता. ) कि राज्याचा व्याप सांभाळायचा हि चिंता होती. म्हणुनच मी दुर्लक्ष केले असे न म्हणता अधिक महत्व दिले नाहि असे म्हंटले आहे.

In reply to by सौरभ वैशंपायन

प्रियाली 28/08/2008 - 14:45
माझ्या अल्पमती आणि अल्पज्ञानानुसार चाणक्य हे अविवाहित होते. तरी त्यांच्या वैवाहिक जिवनाचे उल्लेख आपल्याला माहित असल्यास संदर्भ देणे.
संदर्भ आता जालावरील देणे म्हणजे शोधायला हवेत परंतु चाणक्य अविवाहीत निश्चित नव्हते. त्यांच्या पुत्राचे, नातवाचे इ. संदर्भ वाचलेले आहेत. तत्कालीन समाजरचनेनुसार चाणक्यांना अविवाहीत राहण्याचे काहीही कारण नाही. विवाहासाठी दबाव टाकावा लागतो असे वाटत नाही. ध्येयासाठी जीवन अनेकांनी टाकले - गांधींपासून, शिवाजीपर्यंत पण सर्वांचे विवाह झाले होते. ध्येय आणि विवाह यांचा परस्परसंबंध नाही. संन्यास आणि अविवाहीत राहणे यांचा नक्की आहे. चाणक्यांनी हेरांबद्दल लिहिले हे ठीक पण चाणक्य स्वतः [उघड]हेर नव्हते. त्यामुळे हेराचा मुद्दा इथे का यावा तेच कळल नाही. याहूनही पुढची गोष्ट अशी की चाणक्य आणि कौटिल्य हे एक होते का वेगळे यावर अनेक तज्ज्ञांचे वाद आहेत. (परंतु तो वेगळा मुद्दा) वर एका प्रतिसादात सिकंदराबद्दल वाचले. सिंकदर बॅबिलोनियात मेला इ.स्.पूर्व ३२३ मध्ये. भारत सोडला इ.स.पूर्व ३२६ मध्ये. चाणक्यांचे योद्धा म्हणून किंवा ब्राह्मण सल्लागार म्हणून कोठेही कार्य त्या काळात नाही, त्याकाळात ते विशीत असावेत. सोळाव्या वर्षी तक्षशीलेला अध्ययनासाठी गेल्याचा उल्लेख वाचला आहे आणि त्यानंतर तेथेच अध्यापनाचे कार्य सांभाळल्याचा. म्हणजे बहुधा शिकून अध्यापन करत असावेत (वयाचा फारसा संबंध नाही ) आणि त्याकाळात ते फार प्रस्थापितही नव्हते. तक्षशीलेत सिकंदराला अटकाव झालेला नाही. ज्या माळवा आणि इतर प्रांतात झाला त्यांचा आणि चाणक्याचा संबंध नाही. तक्षशीलेवर स्वारी केली असता, तिथे जी वाताहत झाली त्यातून चाणक्य पाटण्याच्या दिशेनेच गेल्याची ऐतिहासिक शक्यता जास्त. असाच सनावळ्यांचा गोंधळ रामदास आणि तुकारामांबद्दल. इतिहासाचा विचार केला असता, रामदास आणि तुकाराम हे राजांना गुरुस्थानी असतील पण ते राजांचे गुरू नसावेत. राजांचे गुरू त्यांचे आई-बाप, दादोजी आणि तत्कालीन राजकारण.
सिकंदराच्या आक्रमणाला चाणक्य आणि इतर शुर गण राज्यांनी थोपवलं.
कोणत्या काळात? आता शिवरायांबद्दल, मी आठ लग्नांबद्दल बोलत नाही, त्याचा मराठी साम्राज्याशी काय संबंध? सोयरिक साधून मराठे बांधून ठेवणे इतकाच असावा. संभाजी आणि सोयराबाईच्या अंतर्गत राजकारणाकडे महाराजांनी लक्ष पुरवले असते तर मराठ्यांचा इतिहास बदलता. बाप आणि नवरा आणि राज्याच्या भविष्याची चिंता म्हणून या गोष्टींना महत्त्व देता आले असते. राज्याचा युवराज घडवण्यात महाराज कमी पडले. (पुन्हा वर म्हटल्याप्रमाणे महाराजांना सर्वच करणे शक्य होते असे नाही पण त्यांनी या गोष्टींना महत्व दिले नाही, हे मुद्दामहून सांगण्यासारखेही काही नाही)

In reply to by प्रियाली

चाणक्याने गुरुकुलातील विद्यार्थ्यांना क्रांतिकार्याची दि़क्षा दिली होती. चाणक्याने त्याकाळी अनेक राज्यांची फळी बांधली यावर आज बहुतांशी एकमत आहे. चाणक्य त्यावेळि गुरुकुलात शिकवत होते. आणि त्यांच्या हाताखाली चंद्रगुप्त, अक्षय अशी मुले शिकत होती आज त्यातील काहि विद्यार्थ्यांची नावे मिळतात. सिकंदराविरुध्द मालवक, क्षूद्रक इ.इ. गणाराज्यांनी युध्द केले होते. सिकंदराने पौरवाला हरवले खरे मात्र परीस्थिती बघुन त्याने पौरवाला राज्यावरुन काढुन टाकले नाहि. अंभीने सिकंदराला मदत केली व पुढे त्यामुळे पौरवाकडुन आपल्या राज्याला धोका होऊ नये म्हणुन सिकंदराला मध्यस्थी करायला लावुन पौरवाशी सोयरीक जुळवली, त्याच्या मुलीशी लग्न केले. पुढे सिंहारण्य या माजी सेनापतीला हाताशी धरुन चाणक्याने सिकंदरा विरुध्द विरोधाची फळी उभी केली. सिकंदाराच्या सेनेतील अंतर्गत कुरबुरीमुले सिकंदराने परतीचा रस्ता धरला तेव्हा सिकंदर जाताच याच क्रांतिकारकांनी उठाव करुन सिकंदराचे अधिकारी मारले. पुढे मगध साम्राज्याच्या आजुबाजुच्या राजांशी हातमिळवणी करुन नंदा विरुध्द कारस्थाने करुन नंद वंशाच उच्छेद केला. व जेव्हा मगधाचे तुकडे करण्याची भाषा करणार्‍या त्या राजांना रस्त्यातुन अनेक प्रकारे हटवुन चंद्रगुप्ताला सम्राट बनवले होते. आता शिवरायांचा मुद्दा - राज्याशी काय संबध म्हणजे???? राज्याला बळकटि आणुन देण्यासाठि हि लग्न केली होती. महाराज जौहराच्या वेढ्यातुन निसटुन उगीच विशाळगडावर गेले नव्हते. विशाळगडाची भौगोलिक परीस्थीती या कारणा बरोबर विशाळगड हे महाराजांचे सासर होते जिथे दगा होण्याची शक्यता नव्हती या कारणासाठिच महाराजांनी विशाळगडाला जवळ केले. अजुन महाराजांच्या आयुष्यातले काहि प्रसंग सांगता येतिल. आणि युवराज-महाराणी यांच्या संघर्षाबाबत म्हणाल तर महाराजांना खरच तिथे लक्ष द्यायला वेळ नसावा. महाराज वर्षातले किमान ६ महिने राजधानी बाहेर असायचे पुढे तर दिड वर्षांच्या द्ख्खन मोहिमेवर गेले आणि तिथुनच तंट्याला सुरुवात झाली.

In reply to by सौरभ वैशंपायन

प्रियाली 28/08/2008 - 18:38
चाणक्याने गुरुकुलातील विद्यार्थ्यांना क्रांतिकार्याची दि़क्षा दिली होती.
कशाबद्दल क्रांतिकार्याची दिक्षा? चाणक्य युद्धनिती शिकवत होता का? (राजनीती किंवा अर्थशास्त्र शिकवत असावा असे मला वाटते) कुठे बंडाळी, अव्यवस्था सुरु होती की चाणक्य क्रांतीकारी निर्माण करत होता? की सिकंदर चालून येतो आहे म्हणून तो ग्रीक सैन्याविरूद्ध विद्यार्थ्यांची फळी निर्माण करत होता? तक्षशिलेत असताना चाणक्य हा एक सामान्य तरूण अध्यापक होता. बाकी, काहीही योगदान नाही. चंद्रगुप्त तक्षशीलेचा विद्यार्थी असल्याबद्दल आजच कळले. असावाही मला फारशी कल्पना नाही परंतु चंद्रगुप्त सिकंदराच्या सैन्यातून लढल्याच्याही कथा-आख्यायिका सांगितल्या जातात. चंद्रगुप्ताचे वय त्याकाळात १३-१४ असल्याने तो कितपत लढला असावा याचीही कल्पना नाही आणि चंद्रगुप्त भारताच्या वायव्येकडे राहिला होता यालाही काहीही ऐतिहासिक पुरावे नाहीत. आहेत त्या सर्व कपोलकल्पित कथा.
चाणक्याने त्याकाळी अनेक राज्यांची फळी बांधली यावर आज बहुतांशी एकमत आहे.
बांधली पण ती मगध साम्राज्याविरुद्ध. वायव्य भारतात अशी फळी बांधल्याचे मी कोठेही वाचलेले नाही पण संदर्भ आवडेल.
सिकंदर जाताच याच क्रांतिकारकांनी उठाव करुन सिकंदराचे अधिकारी मारले.
क्रांतिकारकांनी नाही, लहान मोठ्या गणराज्यांनी गनिमी काव्यांनी हल्ले करून मारले आणि चाणक्यांचा किंवा त्याच्या तथाकथित दूरवर पसरलेल्या शिष्यांचा यात काहीही संबंध नसावा. तक्षशीलेची वाताहत, युद्धपरिस्थिती वगैरेतून सुटका करून चाणक्य पाटलीपुत्राच्या दिशेने गेला. तेथे नंदाच्या दरबारी त्याने नोकरी स्वीकारली. आपल्या हुशारीमुळे वर चढला आणि हेकटपणा मुळे मूर्ख नंदाची मर्जी गमवून बसला आणि मगध साम्राज्याशी वैर धरले. ही परिस्थिती येईपर्यंत तो मगधसाम्राज्यातील एक राजकारणी म्हणून प्रसिद्धी पावलेला होता आणि म्हणूनच आजूबाजूच्या लहान-मोठ्या राज्यांशी हातमिळवणी करू शकला.
आता शिवरायांचा मुद्दा - राज्याशी काय संबध म्हणजे???? राज्याला बळकटि आणुन देण्यासाठि हि लग्न केली होती.
हे तर मी म्हटलेलेच आहे पण बळकटी शासन करत नाही. महाराजांच्या आठ लग्नांबद्दल माझे काहीच म्हणणे नसल्याने मी त्यावर विषय वाढवत नाही. युवराज आणि महाराणींचा तंटा मात्र खूप जुना होता आणि महाराजांचे त्याकडे दुर्लक्षच झाले.

In reply to by प्रियाली

चंद्रगुप्त तक्षशीलेचा विद्यार्थी होता कि नव्हता याची कल्पना नसताना सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळी तो १२-१४ वर्षांचा असेल हे अनुमान आपण कसे लावलेत? कारण चाणक्य अथवा चंद्रगुप्त यांची अचुक जन्म तारिख कोणालाच माहित नाहि. चाणक्याने चंद्रगुप्ताच्या मामाला काहि पैसे देऊन चंद्रगुप्ताला आपल्या बरोबर तक्षशीलेला आणाले यावर बरेच जण मान्यता देतात. सिकंदराशी अंभीने हातमिळवणी केल्याची बातमी आल्यावर त्यांनी हि फळी बांधायला सुरुवात केली होती. राजाच नाकर्ता निघाल्यावर काय करणार? संदर्भा साठि भा.द.खेर यांचे चाणक्य वाचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सहा सोनेरी पाने वाचा. शिवाय अजुन अनेक पुस्तके मिळतील. शिवाय चंद्रप्रकाश द्विवेदि यांची चाणक्य हि सिरीअल लागायची सध्या तिच्या सीडिज मिळतात. चंद्रप्रकाश द्विवेदि ह्या माणसाने चाणक्यावर विद्यावाचस्पति हि पदवी प्राप्त केली आहे निदान आपले ज्ञान त्यांच्यापेक्षा जास्त नाहि हे मान्य करुन त्यांनी ज्या घटना सांगितल्या अथवा दाखवल्या आहेत त्या नविन माहिती समोर येईतोवर प्रमाण मानायला हरकत नाहि. अगदिच कोणावरहि विश्वास ठेवा असे मी सांगत नाहिये. तुम्हि म्हणता तसे तो नंदाच्या दरबारी होता कि नव्हता याबाबत दे़खिल दुमत आहे. मात्र चाणक्याचा नंदाने दोनवेळा अपमान केला होता व फक्त वैयक्तीक अपमानासाठि चाणक्याने नंदाचा उच्छेद केला नसुन नंदाच्या नाकर्तेपणामुळे त्याचा नाश केला होता हे स्प्ष्ट आहे.

In reply to by सौरभ वैशंपायन

प्रियाली 28/08/2008 - 19:03
चंद्रगुप्त तक्षशीलेचा विद्यार्थी होता कि नव्हता याची कल्पना नसताना सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळी तो १२-१४ वर्षांचा असेल हे अनुमान आपण कसे लावलेत
चंद्रगुप्त तक्षशीलेचा विद्यार्थी असण्याचा आणि १२-१४ वर्षांचा असण्याचा आणि एकत्रित अनुमानाचा संबंध काय? चंद्रगुप्ताचे वय इतिहासकारांनी निश्चित केले आहे. त्यानुसार जन्म सुमारे इ.स्.पूर्व ३४० ते ३३५ मध्ये झाल्याचे सांगितले जाते. अचूक तारखा माहित असण्याचा प्रश्न नाही. नंदराज्याचा कालावधी, मौर्यराज्याचा कालावधी, चंद्रगुप्ताचा शासनकाळ, त्यानंतर आलेले राजे यावरून हे वय निश्चित केले जाते.
चाणक्याने चंद्रगुप्ताच्या मामाला काहि पैसे देऊन चंद्रगुप्ताला आपल्या बरोबर तक्षशीलेला आणाले यावर बरेच जण मान्यता देतात.
चाणक्याने चंद्रगुप्ताला विकत घेतले, चंद्रगुप्त नंदाचा अनौरस पुत्रच होता, नंदाने त्याला पितृत्व नाकारले होते वगैरे वगैरे या फक्त आख्यायिकाच आहेत. त्यांना पुष्टी देणारे कोणतेही संदर्भ नाहीत.
चंद्रप्रकाश द्विवेदि ह्या माणसाने चाणक्यावर विद्यावाचस्पति हि पदवी प्राप्त केली आहे निदान आपले ज्ञान त्यांच्यापेक्षा जास्त नाहि हे मान्य करुन त्यांनी ज्या घटना सांगितल्या अथवा दाखवल्या आहेत त्या नविन माहिती समोर येईतोवर प्रमाण मानायला हरकत नाहि.
चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या ज्ञानाबद्दल माझे काहीच म्हणणे नाही परंतु त्यांचे ज्ञान माझ्यापेक्षा जास्त आहे म्हणून मी त्यांनी सांगितलेल्या घटना प्रमाण मानाव्या असे कुठे आहे? यासंदर्भात मी पार्थसारथी बोस, डॉ. बरुआ यांचे लेख काही काळापूर्वी वाचले होते, कोणीही चाणक्याने सिकंदराविरुद्ध लढाई लढण्याबद्दल म्हटलेले नाही. ग्रीकांचा इतिहास वाचलेला आहे. त्यात तत्कालीन अनेक लहान मोठ्या राजा किंवा सेनानींची नावे आहेत..कुठेही चाणक्याचे नाव नाही.
चाणक्याचा नंदाने दोनवेळा अपमान केला होता व फक्त वैयक्तीक अपमानासाठि चाणक्याने नंदाचा उच्छेद केला नसुन नंदाच्या नाकर्तेपणामुळे त्याचा नाश केला होता हे स्प्ष्ट आहे.
चाणक्याचा अपमान याच कारणासाठी झाला की तो नंदाच्या दरबारी होता, नंदाला सल्ल्यांची नाहीतर हुजर्‍यांची गरज होती आणि त्यामुळे त्यांचे एकमेकांशी पटत नव्हते.

लिखाळ 28/08/2008 - 15:23
सौरभ, लेख ठिक वाटला. वक्तृत्व स्पर्धेतले भाषण असते त्या धाटणीचा वाटला. लेख शेवटीसुद्धा कोठलीच ठोस माहिती वा मत मांडत नाही त्यामुळे तो वाचून संपल्यावर टाळ्या वाजवण्यापलिकडे हातात काहिच राहिले नाही. >>आणि अगदी शत्रुनेही "स्त्री-दाक्षीण्य" या गुणाबाबत त्यावरुन आपले सर्वस्व ओवाळुन टाकावे इतकी शुचिता त्याच्याकडे होती. या सारख्या वाक्यांमुळे मला तसे वाटले असेल कदाचित. असो. पण, आपण निवड केलेल्या चारही व्यक्ती या नक्कीच अनेक शतके भारतावर, त्याच्या संस्कृतीवर प्रभाव पाडणार्‍या आहेत हे सत्यच. यांबद्दल आपल्याला वाटणारा आदरसुद्धा योग्यच आहे. शंकराचार्य आणि विवेकानंद यांनी भारतभ्रमण करुन भारताचा, तेथील लोकांचा स्वभाव ओळखला होता. मला त्यांच्या समाजकारणाचा हा भक्कम पाया वाटतो. पुढे झालेल्या रामदास आणि इतरही काही संत (आणि समाजसेवकांनी) मंडळींनी भारतभ्रमण करुन रावा पासून रंकापर्यंत सर्व समाजजीवन जवळून पाहिल्यामुळेच त्यांना सामाजिक स्थितीवर काही ठोस मते बनवता आली आणि उपाय योजता आले असे वाटते. सध्याच्या नेत्यांनी कितीही प्रवास केला तरी ते एक तर्‍हेच्या प्रभावळीत राहुन प्रवास करतात. त्यांना हे भान येणे शक्य दिसत नाही. आपले इतरही काही लिखाण वाचले. आवडले. शुभेच्छुक --लिखाळ.

लेखन आणि चर्चा दोन्ही वाचत आहे. लेख सोपा करता आला असता या विचारांशी सहमत. आपण लेखासाठी निवडलेल्या श्रेष्ठ माणसांनी भारतीय मनाला नेहमीच भुरळ घातली आहे. इतिहासाची आठवण यासाठी करावी की, भविष्यातली पावलं दमदार पडावी. इतिहासातील चरित्र /विचारांच्या पावलावर पाऊल टाकून आपण महासत्तेकडे कुच केले पाहिजे हा लेखनातला आशावाद आवडला. चाणक्याचं द्रष्टेपण, शंकराचार्यांचे ज्ञान, शिवरायांची शुचिता आणि विवेकानंदांची निष्ठाच भारताला महासता बनवु शकते. हम्म, नक्कीच बनवू शकते. पण सुरुवात कुठून करायची ? त्याचे जर विवेचन आले असते तर, लेखाला चार चांद लागले असते, असो आपले लेखन आम्ही आवडीने वाचत असतोच , लगे रहो. :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखनप्रकार
भारतात अनेक अश्या व्यक्ती झाल्या कि ज्यांचे कर्तृत्व असामान्य आहे. त्या ज्या क्षेत्रात काम केले ते मैलाचा दगड ठरले. आजही त्या हजारो व्यक्तींना १०० करोड व्यक्ती आदर्श मानत आहेत आणि राहतील. थोडक्यात भारतभूचे सुपूत्र या सदरात ते येतात. मात्र भारतभूचे सुपूत्र होणे इतके सोपे आहे का? प्रचंड उलथापालथी नंतर भारताच्या सुपूत्रांपैकी ४ जण माझ्या डोळ्यांसमोर रात्रं-दिवस येत आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतर भारतात किंवा भारता बाहेर हजारो आदरणीय व्यक्ती झाल्या वा होतील पण या चौघांचे स्थान एकमेवाद्वितीय आहे. या चौघांचाहि कालखंड भिन्न आहे.

पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाध्यक्षांची 'मिसळपावसाठी' एक धावती मुलाखत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

प्रियाली 26/08/2008 - 21:23
लहानशी मुलाखत आवडली. मिसळपाव स्पेशल झाली की.
इंटरनेटवरील लेखनाचा साहित्यविषयक लेखनाचा काळ फार थोडासा आहे, त्याची दखल साहित्याला घ्यावी लागेल.
वाह! योग्य बोलले.

सहज 26/08/2008 - 21:31
छोटेखानी मुलाखत आवडली सर. धन्यवाद! मराठी साहित्य जगातील इतर साहित्याचे तोडीचेच आहे, म्हणुन त्याची ही पावती आहे. मराठी साहीत्य महान म्हणुन डॉ. पानतावणे यांची मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली?? समजले नायं

चतुरंग 26/08/2008 - 21:44
पानतावण्यांशी झालेला छोटासा संवाद आवडला. छायाचित्रांसह दिलात त्यामुळे जास्त आपुलकीचा वाटला! धन्यवाद! इंटरनेटवरील लेखनाचा साहित्यविषयक लेखनाचा काळ फार थोडासा आहे, त्याची दखल साहित्याला घ्यावी लागेल. हे ते लाख बोलले, कर्मण्येवाधिकारस्ते! चतुरंग

In reply to by चतुरंग

इंटरनेटवरील लेखनाचा साहित्यविषयक लेखनाचा काळ फार थोडासा आहे, त्याची दखल साहित्याला घ्यावी लागेल. अगदी पटले. पानतावण्यांशी झालेला छोटासा संवाद आवडला. स्वाती

लिखाळ 26/08/2008 - 21:52
छान मुलाखत ! आपल्याला अशी संधी मिळाली आणि लगेच आपण तीचा योग्य सुंदर वापर केलात. आपले अभिनंदन. संकेतस्थळांवरील साहित्याबद्दल प्रश्न विचारल्याबद्दल आभार. अवांतर : विश्व मराठी साहित्यसंमेलनासाठी त्यांची निवड झाली आहे ना ! त्यांच्या या वाक्याचा काही अर्थ लागला नाही .. ''माझी निवड ही सर्व लेखन प्रकारातील मराठी साहित्यिकांचा सन्मान समजतो. मराठी साहित्य जगातील इतर साहित्याचे तोडीचेच आहे, म्हणुन त्याची ही पावती आहे. '' --लिखाळ.

In reply to by लिखाळ

मराठी साहित्य हे जागतिक साहित्याचे तोडीचे आहे, म्हणजे मराठी साहित्य, साहित्यिक हा सुद्धा वैश्विक जाणिवेचे आहे, तो लिहु शकतो. म्हणुन डॉ. पानतावणे यांची निवड ही वयक्तिक असली तरी ती निवड सर्व मराठी साहित्यिकांची आहे, ती वैश्विक आहे. म्हणुन त्या सर्वांचा तो सन्मान म्हणुन माझी निवड असे म्हणायचे असावे, असे वाटते.

वैद्य 26/08/2008 - 22:00
मुलाखतीबद्दल धन्यवाद ! पुढच्या वेळी भेटाल, तेव्हा त्यांना स्वतःचा ब्लॉग तयार करण्याचा आग्रह करा माझ्या वतीने. -- वैद्य

In reply to by वैद्य (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर 26/08/2008 - 22:44
मुलाखतीबद्दल धन्यवाद !
पुढच्या वेळी भेटाल, तेव्हा त्यांना स्वतःचा ब्लॉग तयार करण्याचा आग्रह करा माझ्या वतीने.
नाहीतर तुम्ही भेटालच की बे-एरियात त्यावेळेला (पुढे पुढे न करता) सांगुन बघा ;) ह.घ्या

In reply to by कोलबेर

वैद्य 26/08/2008 - 23:07
संमेलना आधी पानतावणे गुरुजींचा ब्लॉग सुरू झाला, तर केवढा पी आर स्कूप मिळेल ! -- वैद्य

धनंजय 26/08/2008 - 23:40
बिरुटेसर, धन्यवाद. तुम्हाला संधी मिळाली आणि तुम्ही आठवणीने आम्हालाही सहभागी करून घेतले.

विसोबा खेचर 27/08/2008 - 02:02
बिरुटे सर, खास मिपाकरता म्हणून संमेलनाध्यक्षांची धावती मुलाखत घेतलीत याचा आनद वाटतो...! विश्वसाहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून एक अत्यंत व्यासंगी व लायक व्यक्ति लाभली ही चांगलीच बाब आहे. परंतु, आम्हा महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचे कष्टाचे, कररुपाने भरलेले २५ लाख रुपये परदेशी साजर्‍या होणार्‍या संमेलनाकरता वापरले जाणार याचा महाराष्ट्रातील जनतेला काहीच उपयोग होणार नाही. महाराष्ट्रातील अनेकानेक रसिकजनांना इतक्या दूर जाणे शक्य होणार नसल्याने या संमेलनाला मुकावे लागणार याचा खेद वाटतो...! बिरुटेसर, या संबंधात आपण पानतवणे सरांना काही प्रश्न विचारला असतात तर अधिक बरे झाले असते असे वाटते! ज्या पैशांवर महाराष्ट्रातील जनतेचाच सर्वस्वी हक्क आहे त्या पैशांची मुक्त उधळण करीत काही मोजकीच मंडळी संमेलनाच्या नावाखाली चकटफू अमेरिकावारी करू पाहात आहेत याची कीव वाटते! अरे अमेरिकेला जायचे तर खुशाल जा की भडव्यांनो! पण स्वत:च्या पैशांनी, स्वत:च्या हिंमतीवर जा आणि भरवा ना तिकडे हवी तेवढी संमेलने! साला, नाही कोण म्हणतंय? ठालेपाटील तर अमेरिकेला जायला केव्हाचे गुडघ्याला बाशिंग बांधून तैय्यार आहेत! असो, वरील कारणाकरता मी व्यक्तिश: एक मराठी साहित्यप्रेमी महाराष्ट्रीयन या नात्याने या संमेलनाचा तीव्र निषेध करतो.. या पार्श्वभूमीवर रत्नांगिरीकरांनी विश्व साहित्य संमेलनाच्या नाकावर टिच्चून रत्नागिरीतच एक समांतर साहित्य संमेलन भरवून ते दणक्यात साजरे केले पाहिजे असे वाटते! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

वैद्य 27/08/2008 - 02:09
या पार्श्वभूमीवर रत्नांगिरीकरांनी विश्व साहित्य संमेलनाच्या नाकावर टिच्चून रत्नागिरीतच एक समांतर साहित्य संमेलन भरवून ते दणक्यात साजरे केले पाहिजे असे वाटते! अरे तात्या, बातम्या वाचतोस की नाही हल्ली ? रत्नांग्रीकर गोगटे महाविद्यालयाच्या मैदानात भरवणारच आहेत डिसेंबरात समांतर संमेलन. जाणार आहेस ना ? -- वैद्य

In reply to by वैद्य (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 27/08/2008 - 02:23
जाणार आहेस ना ? जायची इच्छा आहे आणि ते रत्नांग्रीत असल्यामुळे जाणं शक्यही आहे! परंतु घरी वृद्ध आई असल्यामुळे ऐनवेळेस जाऊ शकेन याची खात्री देता येत नाही. ती हल्ली काही वेळा अंमळ आजारी असते त्यामुळे तिच्या प्रकृतीवर ते ठरेल... असो, बातम्या वाचायला हल्ली वेळ मिळत नाही परंतु रत्नांग्रीत सम्मेलन होणार ही अत्यंत आनंदाची बातमी.. माझा व्यक्तिश: याच संमेलनाला भरभरून पाठिंबा आणि मन:पूर्वक शुभेच्छा! :) तात्या.

चित्रा 27/08/2008 - 03:49
डॉ. पानतावणे यांची मुलाखत आठवणीने घेतलीत आणि इथे प्रसिद्ध केलीत याबद्दल धन्यवाद!

बिरुटे मास्तर, आवर्जून मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद... फोटोही छान.. . अवांतर : तात्या, जाउद्यात ना आता...पुन्हा नको तेच तेच... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर 27/08/2008 - 11:38
अवांतर : तात्या, जाउद्यात ना आता...पुन्हा नको तेच तेच... का नको? अहो २५ लाखांचा प्रश्न आहे आणि ते पैसे महाराष्ट्राचे आहेत! मग त्याचा जास्तीत जास्त उपयोग येथे महाराष्ट्रात राहणार्‍या आणि कर भरणार्‍या लोकांकरता का होऊ नये? मी म्हणतो की अगदी एकवेळ महाराष्ट्रात नको, भारतात कुठेही घ्या. कारण भारतात कुठेही जाणे एकवेळ शक्य आहे, अमेरिकेच्या मानाने परवडण्याजोगंही आहे. पण भारताबाहेर जायचं म्हणजे अगदी व्हिसा, पासपोर्ट, परदेशी राहण्याचा खर्च इथपासून तयारी लागते! इथल्या प्रत्येक सर्वसामान्य साहित्यप्रेमीची आहे का तशी तयारी?? त्या ठाले पाटलाच्या बापाचं काय जाणार आहे? त्याचा खर्च त्या २५ लाखांतून आपसूक होणार आहे! परंतु हाच ठाले पाटील जर साहित्य महामंडळाच्या कोणत्याही पदावर नसतांना एक सर्वसामान्य मराठी साहित्यप्रेमी या नात्याने स्वत:च्या खर्चाने गेला असता का अमेरिकेला ते सांगा पाहू! पण मी म्हणतो की काहितरी विवेक जागेवर असलेल्या पानतवण्यांनीदेखील अध्यक्षपद स्विकारण्यापूर्वी हा विचार करायला नको का? प्रश्न संमेलन अमेरिकेत भरवण्याचा नाहीये, प्रश्न आहे तो महाराष्ट्रातील जनतेच्या २५ लाखांचा! बिरुटेसाहेबांच्या जागी मी असतो तर हा परखड प्रश्न पानतवण्यांना अगदी बेधडक विचारला असता! परंतु मानाच्या जागा मिळाल्यावर माणसाचा विवेक सुटतो तेच बहुधा गंगाधररावांच्या बाबतीत झालं असावं! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मराठी_माणूस 27/08/2008 - 13:22
बिरुटेसाहेबांच्या जागी मी असतो तर हा परखड प्रश्न पानतवण्यांना अगदी बेधडक विचारला असता! अगदि बरोबर. कमीत कमी त्यांचे ह्या बाबतितले मत तर कळले असते.

In reply to by भडकमकर मास्तर

अवांतर : तात्या, जाउद्यात ना आता...पुन्हा नको तेच तेच... आम्हाला वाटतं साहित्य संमेलन कुठे घ्यावे, महाराष्ट्रीय माणूस आणि साहित्य रसिक म्हणुन काय वाटते, यावर चर्चा मिपावर झालेली आहे. या मुलाखतीच्या निमित्ताने काही प्रतिसाद अप्रस्तुत वाटत असले तरी, मिपावर प्रतिसादाचे स्वातंत्र्य असल्याने अवांतर वाटण्यार्‍या प्रतिसादांवर आम्ही तरी काही मत प्रदर्शीत करु इच्छित नाही. धन्यवाद !!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 28/08/2008 - 00:01
या मुलाखतीच्या निमित्ताने काही प्रतिसाद अप्रस्तुत वाटत असले तरी, अप्रस्तूत कसे काय? ज्या विषयावर फक्त मिपावरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली त्याबाबत संमेलनाध्यक्षांचं वैयक्तिक मत काय आहे हे कळलं असतं तर बरं झालं असतं! कदाचित बिरुटेसाहेबांच्या सहृदय स्वभावामुळे - महाराष्ट्रातील स्थानिक जनतेची बाजू मांडणारा परंतु पानतवण्यांना अडचणीत आणणारा प्रश्न बिरुटेसाहेबांनी त्यांना विचारला नसेल असे वाटते! अवांतर वाटण्यार्‍या प्रतिसादांवर आम्ही तरी काही मत प्रदर्शीत करु इच्छित नाही. धन्यवाद !!! अवांतर कसे काय? सदर मुलाखत ही संमेलनाध्यक्षांची होती तेव्हा त्यांना अभामसासंचे विसासं असे सोयिस्कररित्या नाव बदलून सदर संमेलन केवळ काही लोकांच्या हट्टापायी, महाराष्ट्रीय जनतेच्या पैशांवर परदेशात भरवण्याबद्दल आपले वैयक्तिक तसेच संमेलनाध्यक्ष या नात्याने मत काय? हे आपल्याला योग्य वाटते की अयोग्य? हे प्रश्न विचारणे हे अवांतर आहे असं मला वाटत नाही.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कदाचित बिरुटेसाहेबांच्या सहृदय स्वभावामुळे - महाराष्ट्रातील स्थानिक जनतेची बाजू मांडणारा परंतु पानतवण्यांना अडचणीत आणणारा प्रश्न बिरुटेसाहेबांनी त्यांना विचारला नसेल असे वाटते! तात्या, आपण म्हणता तसे कदाचित असेलही. आम्ही सरांसमोर जरा दडपणानेच बोलत असतो, वावरत असतो. त्यामुळे आमच्यासंबधी आपण केलेला ( सहृदय स्वभावाचा ) विचार अगदी योग्य आहे. :) संमेलन केवळ काही लोकांच्या हट्टापायी, महाराष्ट्रीय जनतेच्या पैशांवर परदेशात भरवण्याबद्दल आपले वैयक्तिक तसेच संमेलनाध्यक्ष या नात्याने मत काय? हे आपल्याला योग्य वाटते की अयोग्य? तात्या, आपला प्रश्न अगदी योग्य आहे, त्याबद्दल शंका नाही. मुलाखत घेण्यासाठी आम्ही काही नियोजन करुन गेलो नव्हतो. तसे केले असते तर कागदावर अनेक प्रश्न लिहुन कदाचित वरील प्रश्न विचारता आला असता ! दुसरी गोष्ट, आम्ही काही सराईत मुलाखतकार नाही, त्यामुळे हौशी वाचकाकडून पहिली-वाहिली मुलाखत घेतांना काही उणिवा राहु शकतात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 28/08/2008 - 08:28
मुलाखत घेण्यासाठी आम्ही काही नियोजन करुन गेलो नव्हतो. तसे केले असते तर कागदावर अनेक प्रश्न लिहुन कदाचित वरील प्रश्न विचारता आला असता ! दुसरी गोष्ट, आम्ही काही सराईत मुलाखतकार नाही, त्यामुळे हौशी वाचकाकडून पहिली-वाहिली मुलाखत घेतांना काही उणिवा राहु शकतात. हे मात्र पटले. इन फॅक्ट, खास मिपाकरता आपण मुलाखत घेतलीत हे मात्र नक्कीच प्रशंसनीय आहे हे आम्ही आधीच म्हटले आहे आणि आताही म्हणतो...! :) असो, काही कडवट शब्दांकरता आम्ही बिरुटेसरांची क्षमा मागतो. परंतु प्रश्न महाराष्ट्रीय जनतेच्या २५ लाखांचा आहे म्हणून अंमळ जीव जळतो इतकंच.... आपला, (मवाळ बिरुटेसरांचा अंमळ जहाल विद्यार्थी) तात्या. :)

In reply to by विसोबा खेचर

असो, काही कडवट शब्दांकरता आम्ही बिरुटेसरांची क्षमा मागतो. बस का आता !!! आपल्या एका चाहत्याची क्षमा वगैरे, आम्हाला असे लाजवू नका. आमचंच चुकत असेल तर आमच्याच चुका पदरात घेत चला. असो, आपल्या स्पष्ट आणि कडवटपणाबरोबर एक ललित लेखक म्हणुन याबाबतीत तर आम्ही आपले सर्वात जुने फॅन आहोत. -दिलीप बिरुटे (आपला)

जनोबा रेगे 27/08/2008 - 12:51
तात्या॑शी सहमत. फुकट गावले तर वायट कित्याक? अमेरिकेला, तेही फुकटात जायला अन राह्यला मिळत असेल तर भल्या भल्या॑चे 'सामाजिक भान आणि सामाजिक जाणीवा' उलट्या पालट्या होतात :) हे सगळे वर्गात शिकवायला चा॑गले असते! महाराष्ट्र अतिशय श्रीम॑त राज्य आहे हे आपण विसरता कामा नये, हा॑ आता (विदर्भातल्याच!) काही पाच-पन्नास मूर्ख शेतकर्‍या॑नी केल्या असतील आत्महत्त्या, त्यात काय एव्हढे? त्यातर सैनिक पण करतात आजकाल! म्हणा- जय जवान, जय किसान! आणि वाढती महागाई, बेकारी वगैरे सामान्य (तथाकथीत मध्यमवर्गीय) लोका॑ना हादरवणार्‍या प्रॉब्लेम्सचा आणि साहित्यिका॑चा काही स॑ब॑ध असण्याची गरजही नाही. श्रीम॑त मराठी लेखक- वाचका॑च्या तो॑डी असल॑ काही शोभत नाही हो! शाईनि॑ग मराठी !! (आणि बर्नि॑ग मराठी माणूस) जाऊ दे!

ऋषिकेश 27/08/2008 - 15:57
खास मिपासाठी मुलाखत! वा वाचूनच बरं वाटलं! प्रा डॉ. , अनेक आभार -('मिसळ'लेला) ऋषिकेश

दोस्त हो, आपणास मुलाखत आवडली, आपण केलेलं कौतुक आणि दिलेलं प्रोत्साहान नव-नवीन लेखनप्रकारास बळ देते. आपले सर्वांचे मनःपुर्वक आभार !!!
इतनी मुहब्बत मिलती है आपसे, ये मेरा हक नही मेरी तकदीर है इस मुहब्बत के बदले हम क्या नजर दे, हम तो कुछ भी नही !!!
-दिलीप बिरुटे

धम्मकलाडू 28/08/2008 - 01:43
साहित्य संमेलनापासून इतके दिवस वेगळी चूल मांडणाऱ्या अस्मितादर्श चळवळीचे अध्वर्यू आता विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होत आहेत.... थोडक्यात दलित चळवळीचा, साहित्याचा गौरव होतो आहे.... मंडळाने चांगलाच गेम खेळलांय.... "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सुनील 28/08/2008 - 13:40
मुलाखत आणि तिही खास मिपासाठी, हे तर खासच! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रियाली 26/08/2008 - 21:23
लहानशी मुलाखत आवडली. मिसळपाव स्पेशल झाली की.
इंटरनेटवरील लेखनाचा साहित्यविषयक लेखनाचा काळ फार थोडासा आहे, त्याची दखल साहित्याला घ्यावी लागेल.
वाह! योग्य बोलले.

सहज 26/08/2008 - 21:31
छोटेखानी मुलाखत आवडली सर. धन्यवाद! मराठी साहित्य जगातील इतर साहित्याचे तोडीचेच आहे, म्हणुन त्याची ही पावती आहे. मराठी साहीत्य महान म्हणुन डॉ. पानतावणे यांची मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली?? समजले नायं

चतुरंग 26/08/2008 - 21:44
पानतावण्यांशी झालेला छोटासा संवाद आवडला. छायाचित्रांसह दिलात त्यामुळे जास्त आपुलकीचा वाटला! धन्यवाद! इंटरनेटवरील लेखनाचा साहित्यविषयक लेखनाचा काळ फार थोडासा आहे, त्याची दखल साहित्याला घ्यावी लागेल. हे ते लाख बोलले, कर्मण्येवाधिकारस्ते! चतुरंग

In reply to by चतुरंग

इंटरनेटवरील लेखनाचा साहित्यविषयक लेखनाचा काळ फार थोडासा आहे, त्याची दखल साहित्याला घ्यावी लागेल. अगदी पटले. पानतावण्यांशी झालेला छोटासा संवाद आवडला. स्वाती

लिखाळ 26/08/2008 - 21:52
छान मुलाखत ! आपल्याला अशी संधी मिळाली आणि लगेच आपण तीचा योग्य सुंदर वापर केलात. आपले अभिनंदन. संकेतस्थळांवरील साहित्याबद्दल प्रश्न विचारल्याबद्दल आभार. अवांतर : विश्व मराठी साहित्यसंमेलनासाठी त्यांची निवड झाली आहे ना ! त्यांच्या या वाक्याचा काही अर्थ लागला नाही .. ''माझी निवड ही सर्व लेखन प्रकारातील मराठी साहित्यिकांचा सन्मान समजतो. मराठी साहित्य जगातील इतर साहित्याचे तोडीचेच आहे, म्हणुन त्याची ही पावती आहे. '' --लिखाळ.

In reply to by लिखाळ

मराठी साहित्य हे जागतिक साहित्याचे तोडीचे आहे, म्हणजे मराठी साहित्य, साहित्यिक हा सुद्धा वैश्विक जाणिवेचे आहे, तो लिहु शकतो. म्हणुन डॉ. पानतावणे यांची निवड ही वयक्तिक असली तरी ती निवड सर्व मराठी साहित्यिकांची आहे, ती वैश्विक आहे. म्हणुन त्या सर्वांचा तो सन्मान म्हणुन माझी निवड असे म्हणायचे असावे, असे वाटते.

वैद्य 26/08/2008 - 22:00
मुलाखतीबद्दल धन्यवाद ! पुढच्या वेळी भेटाल, तेव्हा त्यांना स्वतःचा ब्लॉग तयार करण्याचा आग्रह करा माझ्या वतीने. -- वैद्य

In reply to by वैद्य (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर 26/08/2008 - 22:44
मुलाखतीबद्दल धन्यवाद !
पुढच्या वेळी भेटाल, तेव्हा त्यांना स्वतःचा ब्लॉग तयार करण्याचा आग्रह करा माझ्या वतीने.
नाहीतर तुम्ही भेटालच की बे-एरियात त्यावेळेला (पुढे पुढे न करता) सांगुन बघा ;) ह.घ्या

In reply to by कोलबेर

वैद्य 26/08/2008 - 23:07
संमेलना आधी पानतावणे गुरुजींचा ब्लॉग सुरू झाला, तर केवढा पी आर स्कूप मिळेल ! -- वैद्य

धनंजय 26/08/2008 - 23:40
बिरुटेसर, धन्यवाद. तुम्हाला संधी मिळाली आणि तुम्ही आठवणीने आम्हालाही सहभागी करून घेतले.

विसोबा खेचर 27/08/2008 - 02:02
बिरुटे सर, खास मिपाकरता म्हणून संमेलनाध्यक्षांची धावती मुलाखत घेतलीत याचा आनद वाटतो...! विश्वसाहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून एक अत्यंत व्यासंगी व लायक व्यक्ति लाभली ही चांगलीच बाब आहे. परंतु, आम्हा महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचे कष्टाचे, कररुपाने भरलेले २५ लाख रुपये परदेशी साजर्‍या होणार्‍या संमेलनाकरता वापरले जाणार याचा महाराष्ट्रातील जनतेला काहीच उपयोग होणार नाही. महाराष्ट्रातील अनेकानेक रसिकजनांना इतक्या दूर जाणे शक्य होणार नसल्याने या संमेलनाला मुकावे लागणार याचा खेद वाटतो...! बिरुटेसर, या संबंधात आपण पानतवणे सरांना काही प्रश्न विचारला असतात तर अधिक बरे झाले असते असे वाटते! ज्या पैशांवर महाराष्ट्रातील जनतेचाच सर्वस्वी हक्क आहे त्या पैशांची मुक्त उधळण करीत काही मोजकीच मंडळी संमेलनाच्या नावाखाली चकटफू अमेरिकावारी करू पाहात आहेत याची कीव वाटते! अरे अमेरिकेला जायचे तर खुशाल जा की भडव्यांनो! पण स्वत:च्या पैशांनी, स्वत:च्या हिंमतीवर जा आणि भरवा ना तिकडे हवी तेवढी संमेलने! साला, नाही कोण म्हणतंय? ठालेपाटील तर अमेरिकेला जायला केव्हाचे गुडघ्याला बाशिंग बांधून तैय्यार आहेत! असो, वरील कारणाकरता मी व्यक्तिश: एक मराठी साहित्यप्रेमी महाराष्ट्रीयन या नात्याने या संमेलनाचा तीव्र निषेध करतो.. या पार्श्वभूमीवर रत्नांगिरीकरांनी विश्व साहित्य संमेलनाच्या नाकावर टिच्चून रत्नागिरीतच एक समांतर साहित्य संमेलन भरवून ते दणक्यात साजरे केले पाहिजे असे वाटते! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

वैद्य 27/08/2008 - 02:09
या पार्श्वभूमीवर रत्नांगिरीकरांनी विश्व साहित्य संमेलनाच्या नाकावर टिच्चून रत्नागिरीतच एक समांतर साहित्य संमेलन भरवून ते दणक्यात साजरे केले पाहिजे असे वाटते! अरे तात्या, बातम्या वाचतोस की नाही हल्ली ? रत्नांग्रीकर गोगटे महाविद्यालयाच्या मैदानात भरवणारच आहेत डिसेंबरात समांतर संमेलन. जाणार आहेस ना ? -- वैद्य

In reply to by वैद्य (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 27/08/2008 - 02:23
जाणार आहेस ना ? जायची इच्छा आहे आणि ते रत्नांग्रीत असल्यामुळे जाणं शक्यही आहे! परंतु घरी वृद्ध आई असल्यामुळे ऐनवेळेस जाऊ शकेन याची खात्री देता येत नाही. ती हल्ली काही वेळा अंमळ आजारी असते त्यामुळे तिच्या प्रकृतीवर ते ठरेल... असो, बातम्या वाचायला हल्ली वेळ मिळत नाही परंतु रत्नांग्रीत सम्मेलन होणार ही अत्यंत आनंदाची बातमी.. माझा व्यक्तिश: याच संमेलनाला भरभरून पाठिंबा आणि मन:पूर्वक शुभेच्छा! :) तात्या.

चित्रा 27/08/2008 - 03:49
डॉ. पानतावणे यांची मुलाखत आठवणीने घेतलीत आणि इथे प्रसिद्ध केलीत याबद्दल धन्यवाद!

बिरुटे मास्तर, आवर्जून मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद... फोटोही छान.. . अवांतर : तात्या, जाउद्यात ना आता...पुन्हा नको तेच तेच... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर 27/08/2008 - 11:38
अवांतर : तात्या, जाउद्यात ना आता...पुन्हा नको तेच तेच... का नको? अहो २५ लाखांचा प्रश्न आहे आणि ते पैसे महाराष्ट्राचे आहेत! मग त्याचा जास्तीत जास्त उपयोग येथे महाराष्ट्रात राहणार्‍या आणि कर भरणार्‍या लोकांकरता का होऊ नये? मी म्हणतो की अगदी एकवेळ महाराष्ट्रात नको, भारतात कुठेही घ्या. कारण भारतात कुठेही जाणे एकवेळ शक्य आहे, अमेरिकेच्या मानाने परवडण्याजोगंही आहे. पण भारताबाहेर जायचं म्हणजे अगदी व्हिसा, पासपोर्ट, परदेशी राहण्याचा खर्च इथपासून तयारी लागते! इथल्या प्रत्येक सर्वसामान्य साहित्यप्रेमीची आहे का तशी तयारी?? त्या ठाले पाटलाच्या बापाचं काय जाणार आहे? त्याचा खर्च त्या २५ लाखांतून आपसूक होणार आहे! परंतु हाच ठाले पाटील जर साहित्य महामंडळाच्या कोणत्याही पदावर नसतांना एक सर्वसामान्य मराठी साहित्यप्रेमी या नात्याने स्वत:च्या खर्चाने गेला असता का अमेरिकेला ते सांगा पाहू! पण मी म्हणतो की काहितरी विवेक जागेवर असलेल्या पानतवण्यांनीदेखील अध्यक्षपद स्विकारण्यापूर्वी हा विचार करायला नको का? प्रश्न संमेलन अमेरिकेत भरवण्याचा नाहीये, प्रश्न आहे तो महाराष्ट्रातील जनतेच्या २५ लाखांचा! बिरुटेसाहेबांच्या जागी मी असतो तर हा परखड प्रश्न पानतवण्यांना अगदी बेधडक विचारला असता! परंतु मानाच्या जागा मिळाल्यावर माणसाचा विवेक सुटतो तेच बहुधा गंगाधररावांच्या बाबतीत झालं असावं! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मराठी_माणूस 27/08/2008 - 13:22
बिरुटेसाहेबांच्या जागी मी असतो तर हा परखड प्रश्न पानतवण्यांना अगदी बेधडक विचारला असता! अगदि बरोबर. कमीत कमी त्यांचे ह्या बाबतितले मत तर कळले असते.

In reply to by भडकमकर मास्तर

अवांतर : तात्या, जाउद्यात ना आता...पुन्हा नको तेच तेच... आम्हाला वाटतं साहित्य संमेलन कुठे घ्यावे, महाराष्ट्रीय माणूस आणि साहित्य रसिक म्हणुन काय वाटते, यावर चर्चा मिपावर झालेली आहे. या मुलाखतीच्या निमित्ताने काही प्रतिसाद अप्रस्तुत वाटत असले तरी, मिपावर प्रतिसादाचे स्वातंत्र्य असल्याने अवांतर वाटण्यार्‍या प्रतिसादांवर आम्ही तरी काही मत प्रदर्शीत करु इच्छित नाही. धन्यवाद !!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 28/08/2008 - 00:01
या मुलाखतीच्या निमित्ताने काही प्रतिसाद अप्रस्तुत वाटत असले तरी, अप्रस्तूत कसे काय? ज्या विषयावर फक्त मिपावरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली त्याबाबत संमेलनाध्यक्षांचं वैयक्तिक मत काय आहे हे कळलं असतं तर बरं झालं असतं! कदाचित बिरुटेसाहेबांच्या सहृदय स्वभावामुळे - महाराष्ट्रातील स्थानिक जनतेची बाजू मांडणारा परंतु पानतवण्यांना अडचणीत आणणारा प्रश्न बिरुटेसाहेबांनी त्यांना विचारला नसेल असे वाटते! अवांतर वाटण्यार्‍या प्रतिसादांवर आम्ही तरी काही मत प्रदर्शीत करु इच्छित नाही. धन्यवाद !!! अवांतर कसे काय? सदर मुलाखत ही संमेलनाध्यक्षांची होती तेव्हा त्यांना अभामसासंचे विसासं असे सोयिस्कररित्या नाव बदलून सदर संमेलन केवळ काही लोकांच्या हट्टापायी, महाराष्ट्रीय जनतेच्या पैशांवर परदेशात भरवण्याबद्दल आपले वैयक्तिक तसेच संमेलनाध्यक्ष या नात्याने मत काय? हे आपल्याला योग्य वाटते की अयोग्य? हे प्रश्न विचारणे हे अवांतर आहे असं मला वाटत नाही.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कदाचित बिरुटेसाहेबांच्या सहृदय स्वभावामुळे - महाराष्ट्रातील स्थानिक जनतेची बाजू मांडणारा परंतु पानतवण्यांना अडचणीत आणणारा प्रश्न बिरुटेसाहेबांनी त्यांना विचारला नसेल असे वाटते! तात्या, आपण म्हणता तसे कदाचित असेलही. आम्ही सरांसमोर जरा दडपणानेच बोलत असतो, वावरत असतो. त्यामुळे आमच्यासंबधी आपण केलेला ( सहृदय स्वभावाचा ) विचार अगदी योग्य आहे. :) संमेलन केवळ काही लोकांच्या हट्टापायी, महाराष्ट्रीय जनतेच्या पैशांवर परदेशात भरवण्याबद्दल आपले वैयक्तिक तसेच संमेलनाध्यक्ष या नात्याने मत काय? हे आपल्याला योग्य वाटते की अयोग्य? तात्या, आपला प्रश्न अगदी योग्य आहे, त्याबद्दल शंका नाही. मुलाखत घेण्यासाठी आम्ही काही नियोजन करुन गेलो नव्हतो. तसे केले असते तर कागदावर अनेक प्रश्न लिहुन कदाचित वरील प्रश्न विचारता आला असता ! दुसरी गोष्ट, आम्ही काही सराईत मुलाखतकार नाही, त्यामुळे हौशी वाचकाकडून पहिली-वाहिली मुलाखत घेतांना काही उणिवा राहु शकतात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 28/08/2008 - 08:28
मुलाखत घेण्यासाठी आम्ही काही नियोजन करुन गेलो नव्हतो. तसे केले असते तर कागदावर अनेक प्रश्न लिहुन कदाचित वरील प्रश्न विचारता आला असता ! दुसरी गोष्ट, आम्ही काही सराईत मुलाखतकार नाही, त्यामुळे हौशी वाचकाकडून पहिली-वाहिली मुलाखत घेतांना काही उणिवा राहु शकतात. हे मात्र पटले. इन फॅक्ट, खास मिपाकरता आपण मुलाखत घेतलीत हे मात्र नक्कीच प्रशंसनीय आहे हे आम्ही आधीच म्हटले आहे आणि आताही म्हणतो...! :) असो, काही कडवट शब्दांकरता आम्ही बिरुटेसरांची क्षमा मागतो. परंतु प्रश्न महाराष्ट्रीय जनतेच्या २५ लाखांचा आहे म्हणून अंमळ जीव जळतो इतकंच.... आपला, (मवाळ बिरुटेसरांचा अंमळ जहाल विद्यार्थी) तात्या. :)

In reply to by विसोबा खेचर

असो, काही कडवट शब्दांकरता आम्ही बिरुटेसरांची क्षमा मागतो. बस का आता !!! आपल्या एका चाहत्याची क्षमा वगैरे, आम्हाला असे लाजवू नका. आमचंच चुकत असेल तर आमच्याच चुका पदरात घेत चला. असो, आपल्या स्पष्ट आणि कडवटपणाबरोबर एक ललित लेखक म्हणुन याबाबतीत तर आम्ही आपले सर्वात जुने फॅन आहोत. -दिलीप बिरुटे (आपला)

जनोबा रेगे 27/08/2008 - 12:51
तात्या॑शी सहमत. फुकट गावले तर वायट कित्याक? अमेरिकेला, तेही फुकटात जायला अन राह्यला मिळत असेल तर भल्या भल्या॑चे 'सामाजिक भान आणि सामाजिक जाणीवा' उलट्या पालट्या होतात :) हे सगळे वर्गात शिकवायला चा॑गले असते! महाराष्ट्र अतिशय श्रीम॑त राज्य आहे हे आपण विसरता कामा नये, हा॑ आता (विदर्भातल्याच!) काही पाच-पन्नास मूर्ख शेतकर्‍या॑नी केल्या असतील आत्महत्त्या, त्यात काय एव्हढे? त्यातर सैनिक पण करतात आजकाल! म्हणा- जय जवान, जय किसान! आणि वाढती महागाई, बेकारी वगैरे सामान्य (तथाकथीत मध्यमवर्गीय) लोका॑ना हादरवणार्‍या प्रॉब्लेम्सचा आणि साहित्यिका॑चा काही स॑ब॑ध असण्याची गरजही नाही. श्रीम॑त मराठी लेखक- वाचका॑च्या तो॑डी असल॑ काही शोभत नाही हो! शाईनि॑ग मराठी !! (आणि बर्नि॑ग मराठी माणूस) जाऊ दे!

ऋषिकेश 27/08/2008 - 15:57
खास मिपासाठी मुलाखत! वा वाचूनच बरं वाटलं! प्रा डॉ. , अनेक आभार -('मिसळ'लेला) ऋषिकेश

दोस्त हो, आपणास मुलाखत आवडली, आपण केलेलं कौतुक आणि दिलेलं प्रोत्साहान नव-नवीन लेखनप्रकारास बळ देते. आपले सर्वांचे मनःपुर्वक आभार !!!
इतनी मुहब्बत मिलती है आपसे, ये मेरा हक नही मेरी तकदीर है इस मुहब्बत के बदले हम क्या नजर दे, हम तो कुछ भी नही !!!
-दिलीप बिरुटे

धम्मकलाडू 28/08/2008 - 01:43
साहित्य संमेलनापासून इतके दिवस वेगळी चूल मांडणाऱ्या अस्मितादर्श चळवळीचे अध्वर्यू आता विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होत आहेत.... थोडक्यात दलित चळवळीचा, साहित्याचा गौरव होतो आहे.... मंडळाने चांगलाच गेम खेळलांय.... "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सुनील 28/08/2008 - 13:40
मुलाखत आणि तिही खास मिपासाठी, हे तर खासच! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
लेखनविषय:

डॊ.गंगाधर पानतावणे          डॊ.गंगाधर पानतावणे आणि प्राचार्य ठाले पाटील डॉ.गंगाधर पानतावणे    सोबत प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील अमेरिकेत होणार्‍या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक, विचारवंत व समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे यांची आम्ही दि.

सिंग इज किंग : शुद्ध व निखळ मनोरंजन नव्हे तर "फसवणुक" !!!

छोटा डॉन ·

छोटा डॉन 27/08/2008 - 20:11
लेखात ज्या ज्या ठिकाणी "पगडी, सिंग वा कुठल्या धर्माचा उल्लेख" जर झाला असेल तर तो फक्त "सिंग इज किंग" ह्या सिनेमावर टिका करण्यासाठीच आहे. मनातुन आम्हाला "सर्व धर्मांविषयी" अतिशय आदर आहे. वरची सगळी मते ही फक्त वैयक्तीकरित्या माझी आणि माझीच आहेत, इतक कुणाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करु नये ... स्वगत : कसले डिस्क्लेमर आणि कसले काय ? क्रमशः लिखाणामुळे चक्क २ दिवस मागे पडलेला लेख पुढे आणण्याच्या युक्त्या ह्या. येवढं न समजायला पब्लिक काय "हॅप्पी सिंग" आहे काय ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

टारझन 28/08/2008 - 00:28
काय बे डॉण्या .. एवढ भयताड पिक्चर आहे हे .. आधी नाय का सांगता आलं ... मी "व्हाट हॅपन्स वेगास" ला डावलून हे १.५ जीबीच खुसपाट डाउनलोडवलं ... साला .. तुम्ही अंमळ उशीर केलात .. असो .. शिफ्ट्+डिलीट मारतो आहे... हल्ली डोक्याचे ताप वाढलेत. बरं पिक्चर बघायच्या आधी सांगितलं ... पिक्चर चं आणि जेवणाच्या डिशचं अगदी चपलख सांगड घातलीस .. आणि पिक्चर बकवास असलं तरी विश्लेषणात बोर होणार नाही याची काळजी घेतल्याबद्दल धन्यू...
कारण कुठल्याही अंगविक्षेपाला वा पाचकणाला पोट धरुन हासायला आपण काही युपी/बिहारचे भैय्या प्रेक्षक किंवा नवज्योतसिंग सिद्धु नसतो.
=)) जबरा ... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

मस्त डान्या! मी पिच्चर पाहिला नाहीये, इच्छा नव्हतीच आता तर फुकट दाखवला तरीही विचार करेन! क्षुल्लक [ यात्री, बरोबर आहे ना शब्द ? ] ...." श्रीखंड, चायनीज मंचुरीअन, पंजाबी पराठा व तंदुरी चिकन, .... =)) पिच्चर भिकार असेल तरीही अगदीच टाकाऊ नाही कारण त्याच्यामुळेच एवढी टोलेबाजी वाचता आली! ;-)

रेवती 27/08/2008 - 20:24
एवढेच या सिनेमा बद्दल म्हणू शकते. मी १५ मिनिटात सिनेमा बंद केला. रेवती

प्रियाली 27/08/2008 - 20:28
मी हा टुकार चित्रपट पाहण्याचा प्रयत्न केला आहे. थर्ड डिग्री द्यावे लागणारे गुन्हेगार असतात त्यांना असे चित्रपट दाखवावे. असो, परिक्षण वाचले नाही अद्याप, टोलेबाजी असल्यास वाचावे म्हणते. तेवढेच जखमेवर मलम!

In reply to by प्रियाली

>> मी हा टुकार चित्रपट पाहण्याचा प्रयत्न केला आहे. केवढं हे धाडस! >> थर्ड डिग्री द्यावे लागणारे गुन्हेगार असतात त्यांना असे चित्रपट दाखवावे. असं ऐकलंय इराकमधे टॉर्चर म्हणून अमेरिकन सैनिक इराकी लोकांना मेटलिका सारखं हेवी मेटल म्युझिक ऐकवतात (आणि स्वतः नाचतात त्यावर)! >> असो, परिक्षण वाचले नाही अद्याप, टोलेबाजी असल्यास वाचावे म्हणते. तेवढेच जखमेवर मलम! (अजून वाचलं नसलंस तर) जरूर वाच! मी सॉलिड्ड एन्जॉय केलं परीक्षण. (छोटी) अदिती

शितल 27/08/2008 - 20:30
परिक्षण छान केले आहेस. लेखाची सुरूवात तर अगदी फक्कड झाली आहे. मी अजुन हा मुव्ही पाहिला नाही. पण तु़झा लेख वाचुन तर आता असे वाटते तो मुव्ही फक्त सरदारजींसाठीच बनविला असावा. ;)

अनामिक 27/08/2008 - 20:37
अगदि भिक्कार आहे असे आधिच कळले होते, त्यामुळे पाहिला नाही. आणि आता वाचलेल्या परिक्षणानंतर तर अजिबात ईच्छा नाही.

डॉन्या, या सिनेमासंदर्भातला मोठ्ठा विनोद म्हणजे माझी मराठी रूममेट अस्सल मराठी शिव्या घालत अर्ध्या सिनेमातून उठून आली. माझ्या एका पंजाबी कलीगची त्यावरची प्रतिक्रिया - 'अरे, उसे समझ में नहीं आया होगा, वोह मराठी है ना!' यावरूनच मी सिनेमाच्या लायकीचा अंदाज बांधला! भारतातला अप्रतिम विनोदी सिनेमा 'जाने भी दो यारों' बनवणार्‍या कुंदन शाहचं हे 'सिंग इज किंग'बद्दलचं चिंतन. मनोरंजक आणि खरंच चिंतनीय आहे - http://passionforcinema.com/comedy-films-today/

In reply to by मेघना भुस्कुटे

छोटा डॉन 27/08/2008 - 22:20
असाच शॉट इकडे बेंगलोरात घडला. एका कलिगला माझी पिक्चरबद्दलची "जहाल मते" सांगताच तो खवळला व त्याने सेम हाच डायलॉक टाकला. त्यावर हाईट म्हणजे त्याने मला पंजाबीतुन २-४ शिव्या घाउन " आधी ह्याचा अर्थ समजुन घे व मग पिक्चर बघायचे धाडस कर" असे सुनावले. आपण काय ऐकतोय का ? मी पण मग "अस्सल मराठी साजांची काही स्तुतिसुमने " त्याच्यावर उधळली व सुनावले की "जर ह्याचा अर्थ तुला समजला असेल तर पुन्हा असले फालतु सल्ले देऊ नकोस" ... पंजाबी समजणार्‍यांनाच पिक्चर समजेल व आवडेल अशी अपेक्षा करणे मुर्खपणाचे आहे. कुंदन शहांनी ह्यापुढे ऑस्करचे ज्युरी म्हणुन काम करायला आता हरकत नाही, आजकाल त्यांच्या दॄष्टी फारच व्यापक, अभ्यासु आणि चौकस झाली आहे. जय हो ! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विजुभाऊ 28/08/2008 - 14:23
पंजाबी समजणार्‍यांनाच पिक्चर समजेल व आवडेल अशी अपेक्षा करणे मुर्खपणाचे आहे. कुंदन शहांनी ह्यापुढे ....... ह्या शहा लोकानी भाषा तरी किती बोलायच्या =)) कैच्या कैच धमुशी पण्जाबीत बोलणारा गुज्जुभाई मराठी विजुभौ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

भाग्यश्री 27/08/2008 - 22:12
भिक्कार पिक्चर ! फार अपेक्षा न ठेवताच पाहायला बसले होते, तरी अपेक्षाभंग झाला! किती तो आचरटपणा!? एकाही जोकला हसू आले नाही.. किरण खेरने तर निवृत्ती घ्यावी आता.. असली डोक्यात जाते ना? ओम पुरीने कसा साईन केला हा पिक्चर? वाईट चिडचिड झाली होती! हल्ली हिंदी पिक्चर्स पाहणे कमीच झालंय , तेच बरं!

ऋषिकेश 27/08/2008 - 22:27
डॉनजी ;) खुमासदार लेखन आवडले. आधीच मित्रांकडून (तेही आश्चर्य म्हणजे अमराठी मित्रांकडून) मिळालेल्या सल्ल्यानुसार चित्रपट न पाहिल्याचा (आसूरी )आनंद होतोय -('मिसळ'लेला) ऋषिकेश

डॉन साहेबांच्या 'सिनेप्रिक्षान' वरून असे वाटते की निर्माता आणि दिग्दर्शकाची ' आधीच मर्कटं, त्यात मद्य प्याला, तशात विंचवाने दंश केला' अशी अवस्था झाली असणार आणि त्यामुळे हा चित्रपट जन्माला आला.

बेसनलाडू 27/08/2008 - 23:55
चित्रपटाकडून अपेक्षा काहीच नव्हती; फक्त कतरीनाला (तिचा अभिनय नव्हे ;) ) पाहण्यासाठी चित्रपटाला पाहिले ;) :D (सलमान)बेसनलाडू

विसोबा खेचर 28/08/2008 - 00:06
डॉन्या, फक्कड परिक्षण रे! त्या गधड्या कात्रीला हिंदीत एक वाक्यही धड बोलता येत नाही!

In reply to by विसोबा खेचर

टारझन 28/08/2008 - 00:30
कोन कंबख्त जाता है कत्री का खत्री अभिनय देखने ... हम तो जाते है उसका दिदार करने ... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

अनिल हटेला 28/08/2008 - 15:08
डॉन भो !!! पिक्च्र रद्दड असला म्हुन काय झाल .... परीक्षण एक्दम जोरदार ..... ५ * एक्दम ................... आम्ही पण झक मारली पार डबल पैसे घालून शी डी मागवली ... आणी बघत बघता समजले हा मूव्ही आपणासाठी नोहे.... हा किंग लोकासाठी आहे..... असो ......... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मनस्वी 28/08/2008 - 15:29
सावध केल्याबद्दल धन्यवाद. असेच अगम्य चित्रपट बघून वेळोवेळी सावधानतेचा इशारा तुझ्याकडून अपेक्षित आहे. अवांतर : 'जनलज्जा' शब्द प्रथमच वाचला.. मजेशीरच आहे. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

डानराव, लै भारी परिक्षण! इनफॅक्ट नजीकच्या काळात वाचण्यात आलेले सगळ्यात बेस्ट परिक्षण! :) कॅटरीनाचा चित्रपट असल्याने बघावाच लागला......अक्षयकुमार 'अशा' चित्रपटात काम करु शकतो ह्यावर विश्वास बसला नाही! जावेद जाफरीनेही स्वत:ला वाया घालवले आहे. असो, नुकताच "मान गय मुघल-ए-आजम" हा तद्दन टुकार विनोदी चित्र(आ)पट बघितला. या चित्रपटाचेही परिक्षण आपलेकडून अपेक्षित आहे! (कॅटरीना-मल्लिका प्रेमी) टिंग्या

लिखाळ 28/08/2008 - 20:31
परिक्षण मजेदार. मी काही दिवसांपूर्वी एका फुकट चित्रपट दाखवणार्‍या संकेतस्थळावर हा चित्रपट पहायला सुरुवात केली होती. कोंबडी पकडणे कार्यक्रम झाल्यावर काही कारणाने पुढचा चित्रपट पाहिला नाही. वाचलो म्हणायचो ! नशीब बलवत्तर होते तर ! :) --लिखाळ.

In reply to by लिखाळ

प्रियाली 28/08/2008 - 20:33
पकडणे कार्यक्रम झाल्यावर काही कारणाने पुढचा चित्रपट पाहिला नाही. वाचलो म्हणायचो ! नशीब बलवत्तर होते तर !
नश्शीबवान हो! ;) मी रणवीर शौरी घरात येईपर्यंत पाहिले. विकतची डोकेदुखी. परिक्षणाने जखमेवर मलमपट्टी झाली. ;)

In reply to by प्रियाली

छोटा डॉन 28/08/2008 - 21:00
मी रणवीर शौरी घरात येईपर्यंत पाहिले. विकतची डोकेदुखी.
रणवीर शौरी म्हणजे तोच ना "थप्पडखाऊ " अभिनेता, हा पिक्चर बघायच्या आधीच "९९ थपडा व १ [कसाबसा] किस" असलेला " पग्ली आनि अग्ली" हा शिनेमा पाहिला होता. त्यात ह्याचा रोल बघुन कीव आली ... पैशासाठी "नितीमत्ता" किती ढासळावी ह्याचे उत्तम उदाहरण आहे हे ... बाकी कुणी हाणामार्‍या फेम होते, कुणी रडुबाई फेम होते, कुणी किस फेम होते [ कोण बरे तो लब्बाड, ओळखला असेलच ना ], कुणी डान्स फेम होते तर कुणी क..क्..क्...किरन फेम होते ... पण हा कर्मदरिद्री "थप्पड फेम" झाला. धन्य आहे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by प्रियाली

छोटा डॉन 28/08/2008 - 22:42
>>पाहिलेला नाही त्याचे फर्मास परिक्षण लिहिणार का? की यापेक्षा बरी कामं आहेत परिक्षण !!! नको गं बाई, असले उलटे धंदे करायला सध्या वेळ नाही ... आयुष्यातल्या काही "मुर्खपणामुळे घडलेल्या चुका" शक्य तितक्या लवकर विसरणेच आरोग्याला मानवते ... तशी अगदी वेळ आलीच तर मी लेखन वगैरे सगळे सोडुन "गोरक्षण समितीचा कार्यकर्ता " बनुन वर्गण्या गोळा करत फिरेन किंवा "दुधाच्या बाटल्या" घरपोच पोहचवायचा किफायतशीर धंदा सुरु करेन. अशा कामात कमीत कमी इज्जत तरी आहे, त्या "अग्ली और पग्ली" मध्ये काय "फतरं इज्जत" आहे ? काय म्हणतेस ? गोरक्षण समितीचा कार्यकर्ता - छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

पण डॉन .. सिनेमाची आणि जेवणाची सांगड मस्त घातलीयस... कुठलाही हिंदी सिनेमा मी अर्धवट बंद करत नाही त्यामुळे 'सिंग इज किंग' बघीन असं वाटतंय. ('अल्ला मेहरबान तो गधा पहेलवान' ह्या सिनेमाची व्हिडियो कॅसेट आणलेला) संदीप :)

मदनबाण 29/08/2008 - 08:32
डॉन्या मस्तच चिर-फाड केली आहेस रे.. :) थोडक्यात सिंगचे १२ वाजले आहेत... :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

परीक्षण फस्क्लास! वाचून करमणूक झाली आणि सिनेमा न पाहण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब.. स्वाती

छोटा डॉन 27/08/2008 - 20:11
लेखात ज्या ज्या ठिकाणी "पगडी, सिंग वा कुठल्या धर्माचा उल्लेख" जर झाला असेल तर तो फक्त "सिंग इज किंग" ह्या सिनेमावर टिका करण्यासाठीच आहे. मनातुन आम्हाला "सर्व धर्मांविषयी" अतिशय आदर आहे. वरची सगळी मते ही फक्त वैयक्तीकरित्या माझी आणि माझीच आहेत, इतक कुणाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करु नये ... स्वगत : कसले डिस्क्लेमर आणि कसले काय ? क्रमशः लिखाणामुळे चक्क २ दिवस मागे पडलेला लेख पुढे आणण्याच्या युक्त्या ह्या. येवढं न समजायला पब्लिक काय "हॅप्पी सिंग" आहे काय ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

टारझन 28/08/2008 - 00:28
काय बे डॉण्या .. एवढ भयताड पिक्चर आहे हे .. आधी नाय का सांगता आलं ... मी "व्हाट हॅपन्स वेगास" ला डावलून हे १.५ जीबीच खुसपाट डाउनलोडवलं ... साला .. तुम्ही अंमळ उशीर केलात .. असो .. शिफ्ट्+डिलीट मारतो आहे... हल्ली डोक्याचे ताप वाढलेत. बरं पिक्चर बघायच्या आधी सांगितलं ... पिक्चर चं आणि जेवणाच्या डिशचं अगदी चपलख सांगड घातलीस .. आणि पिक्चर बकवास असलं तरी विश्लेषणात बोर होणार नाही याची काळजी घेतल्याबद्दल धन्यू...
कारण कुठल्याही अंगविक्षेपाला वा पाचकणाला पोट धरुन हासायला आपण काही युपी/बिहारचे भैय्या प्रेक्षक किंवा नवज्योतसिंग सिद्धु नसतो.
=)) जबरा ... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

मस्त डान्या! मी पिच्चर पाहिला नाहीये, इच्छा नव्हतीच आता तर फुकट दाखवला तरीही विचार करेन! क्षुल्लक [ यात्री, बरोबर आहे ना शब्द ? ] ...." श्रीखंड, चायनीज मंचुरीअन, पंजाबी पराठा व तंदुरी चिकन, .... =)) पिच्चर भिकार असेल तरीही अगदीच टाकाऊ नाही कारण त्याच्यामुळेच एवढी टोलेबाजी वाचता आली! ;-)

रेवती 27/08/2008 - 20:24
एवढेच या सिनेमा बद्दल म्हणू शकते. मी १५ मिनिटात सिनेमा बंद केला. रेवती

प्रियाली 27/08/2008 - 20:28
मी हा टुकार चित्रपट पाहण्याचा प्रयत्न केला आहे. थर्ड डिग्री द्यावे लागणारे गुन्हेगार असतात त्यांना असे चित्रपट दाखवावे. असो, परिक्षण वाचले नाही अद्याप, टोलेबाजी असल्यास वाचावे म्हणते. तेवढेच जखमेवर मलम!

In reply to by प्रियाली

>> मी हा टुकार चित्रपट पाहण्याचा प्रयत्न केला आहे. केवढं हे धाडस! >> थर्ड डिग्री द्यावे लागणारे गुन्हेगार असतात त्यांना असे चित्रपट दाखवावे. असं ऐकलंय इराकमधे टॉर्चर म्हणून अमेरिकन सैनिक इराकी लोकांना मेटलिका सारखं हेवी मेटल म्युझिक ऐकवतात (आणि स्वतः नाचतात त्यावर)! >> असो, परिक्षण वाचले नाही अद्याप, टोलेबाजी असल्यास वाचावे म्हणते. तेवढेच जखमेवर मलम! (अजून वाचलं नसलंस तर) जरूर वाच! मी सॉलिड्ड एन्जॉय केलं परीक्षण. (छोटी) अदिती

शितल 27/08/2008 - 20:30
परिक्षण छान केले आहेस. लेखाची सुरूवात तर अगदी फक्कड झाली आहे. मी अजुन हा मुव्ही पाहिला नाही. पण तु़झा लेख वाचुन तर आता असे वाटते तो मुव्ही फक्त सरदारजींसाठीच बनविला असावा. ;)

अनामिक 27/08/2008 - 20:37
अगदि भिक्कार आहे असे आधिच कळले होते, त्यामुळे पाहिला नाही. आणि आता वाचलेल्या परिक्षणानंतर तर अजिबात ईच्छा नाही.

डॉन्या, या सिनेमासंदर्भातला मोठ्ठा विनोद म्हणजे माझी मराठी रूममेट अस्सल मराठी शिव्या घालत अर्ध्या सिनेमातून उठून आली. माझ्या एका पंजाबी कलीगची त्यावरची प्रतिक्रिया - 'अरे, उसे समझ में नहीं आया होगा, वोह मराठी है ना!' यावरूनच मी सिनेमाच्या लायकीचा अंदाज बांधला! भारतातला अप्रतिम विनोदी सिनेमा 'जाने भी दो यारों' बनवणार्‍या कुंदन शाहचं हे 'सिंग इज किंग'बद्दलचं चिंतन. मनोरंजक आणि खरंच चिंतनीय आहे - http://passionforcinema.com/comedy-films-today/

In reply to by मेघना भुस्कुटे

छोटा डॉन 27/08/2008 - 22:20
असाच शॉट इकडे बेंगलोरात घडला. एका कलिगला माझी पिक्चरबद्दलची "जहाल मते" सांगताच तो खवळला व त्याने सेम हाच डायलॉक टाकला. त्यावर हाईट म्हणजे त्याने मला पंजाबीतुन २-४ शिव्या घाउन " आधी ह्याचा अर्थ समजुन घे व मग पिक्चर बघायचे धाडस कर" असे सुनावले. आपण काय ऐकतोय का ? मी पण मग "अस्सल मराठी साजांची काही स्तुतिसुमने " त्याच्यावर उधळली व सुनावले की "जर ह्याचा अर्थ तुला समजला असेल तर पुन्हा असले फालतु सल्ले देऊ नकोस" ... पंजाबी समजणार्‍यांनाच पिक्चर समजेल व आवडेल अशी अपेक्षा करणे मुर्खपणाचे आहे. कुंदन शहांनी ह्यापुढे ऑस्करचे ज्युरी म्हणुन काम करायला आता हरकत नाही, आजकाल त्यांच्या दॄष्टी फारच व्यापक, अभ्यासु आणि चौकस झाली आहे. जय हो ! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विजुभाऊ 28/08/2008 - 14:23
पंजाबी समजणार्‍यांनाच पिक्चर समजेल व आवडेल अशी अपेक्षा करणे मुर्खपणाचे आहे. कुंदन शहांनी ह्यापुढे ....... ह्या शहा लोकानी भाषा तरी किती बोलायच्या =)) कैच्या कैच धमुशी पण्जाबीत बोलणारा गुज्जुभाई मराठी विजुभौ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

भाग्यश्री 27/08/2008 - 22:12
भिक्कार पिक्चर ! फार अपेक्षा न ठेवताच पाहायला बसले होते, तरी अपेक्षाभंग झाला! किती तो आचरटपणा!? एकाही जोकला हसू आले नाही.. किरण खेरने तर निवृत्ती घ्यावी आता.. असली डोक्यात जाते ना? ओम पुरीने कसा साईन केला हा पिक्चर? वाईट चिडचिड झाली होती! हल्ली हिंदी पिक्चर्स पाहणे कमीच झालंय , तेच बरं!

ऋषिकेश 27/08/2008 - 22:27
डॉनजी ;) खुमासदार लेखन आवडले. आधीच मित्रांकडून (तेही आश्चर्य म्हणजे अमराठी मित्रांकडून) मिळालेल्या सल्ल्यानुसार चित्रपट न पाहिल्याचा (आसूरी )आनंद होतोय -('मिसळ'लेला) ऋषिकेश

डॉन साहेबांच्या 'सिनेप्रिक्षान' वरून असे वाटते की निर्माता आणि दिग्दर्शकाची ' आधीच मर्कटं, त्यात मद्य प्याला, तशात विंचवाने दंश केला' अशी अवस्था झाली असणार आणि त्यामुळे हा चित्रपट जन्माला आला.

बेसनलाडू 27/08/2008 - 23:55
चित्रपटाकडून अपेक्षा काहीच नव्हती; फक्त कतरीनाला (तिचा अभिनय नव्हे ;) ) पाहण्यासाठी चित्रपटाला पाहिले ;) :D (सलमान)बेसनलाडू

विसोबा खेचर 28/08/2008 - 00:06
डॉन्या, फक्कड परिक्षण रे! त्या गधड्या कात्रीला हिंदीत एक वाक्यही धड बोलता येत नाही!

In reply to by विसोबा खेचर

टारझन 28/08/2008 - 00:30
कोन कंबख्त जाता है कत्री का खत्री अभिनय देखने ... हम तो जाते है उसका दिदार करने ... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

अनिल हटेला 28/08/2008 - 15:08
डॉन भो !!! पिक्च्र रद्दड असला म्हुन काय झाल .... परीक्षण एक्दम जोरदार ..... ५ * एक्दम ................... आम्ही पण झक मारली पार डबल पैसे घालून शी डी मागवली ... आणी बघत बघता समजले हा मूव्ही आपणासाठी नोहे.... हा किंग लोकासाठी आहे..... असो ......... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मनस्वी 28/08/2008 - 15:29
सावध केल्याबद्दल धन्यवाद. असेच अगम्य चित्रपट बघून वेळोवेळी सावधानतेचा इशारा तुझ्याकडून अपेक्षित आहे. अवांतर : 'जनलज्जा' शब्द प्रथमच वाचला.. मजेशीरच आहे. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

डानराव, लै भारी परिक्षण! इनफॅक्ट नजीकच्या काळात वाचण्यात आलेले सगळ्यात बेस्ट परिक्षण! :) कॅटरीनाचा चित्रपट असल्याने बघावाच लागला......अक्षयकुमार 'अशा' चित्रपटात काम करु शकतो ह्यावर विश्वास बसला नाही! जावेद जाफरीनेही स्वत:ला वाया घालवले आहे. असो, नुकताच "मान गय मुघल-ए-आजम" हा तद्दन टुकार विनोदी चित्र(आ)पट बघितला. या चित्रपटाचेही परिक्षण आपलेकडून अपेक्षित आहे! (कॅटरीना-मल्लिका प्रेमी) टिंग्या

लिखाळ 28/08/2008 - 20:31
परिक्षण मजेदार. मी काही दिवसांपूर्वी एका फुकट चित्रपट दाखवणार्‍या संकेतस्थळावर हा चित्रपट पहायला सुरुवात केली होती. कोंबडी पकडणे कार्यक्रम झाल्यावर काही कारणाने पुढचा चित्रपट पाहिला नाही. वाचलो म्हणायचो ! नशीब बलवत्तर होते तर ! :) --लिखाळ.

In reply to by लिखाळ

प्रियाली 28/08/2008 - 20:33
पकडणे कार्यक्रम झाल्यावर काही कारणाने पुढचा चित्रपट पाहिला नाही. वाचलो म्हणायचो ! नशीब बलवत्तर होते तर !
नश्शीबवान हो! ;) मी रणवीर शौरी घरात येईपर्यंत पाहिले. विकतची डोकेदुखी. परिक्षणाने जखमेवर मलमपट्टी झाली. ;)

In reply to by प्रियाली

छोटा डॉन 28/08/2008 - 21:00
मी रणवीर शौरी घरात येईपर्यंत पाहिले. विकतची डोकेदुखी.
रणवीर शौरी म्हणजे तोच ना "थप्पडखाऊ " अभिनेता, हा पिक्चर बघायच्या आधीच "९९ थपडा व १ [कसाबसा] किस" असलेला " पग्ली आनि अग्ली" हा शिनेमा पाहिला होता. त्यात ह्याचा रोल बघुन कीव आली ... पैशासाठी "नितीमत्ता" किती ढासळावी ह्याचे उत्तम उदाहरण आहे हे ... बाकी कुणी हाणामार्‍या फेम होते, कुणी रडुबाई फेम होते, कुणी किस फेम होते [ कोण बरे तो लब्बाड, ओळखला असेलच ना ], कुणी डान्स फेम होते तर कुणी क..क्..क्...किरन फेम होते ... पण हा कर्मदरिद्री "थप्पड फेम" झाला. धन्य आहे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by प्रियाली

छोटा डॉन 28/08/2008 - 22:42
>>पाहिलेला नाही त्याचे फर्मास परिक्षण लिहिणार का? की यापेक्षा बरी कामं आहेत परिक्षण !!! नको गं बाई, असले उलटे धंदे करायला सध्या वेळ नाही ... आयुष्यातल्या काही "मुर्खपणामुळे घडलेल्या चुका" शक्य तितक्या लवकर विसरणेच आरोग्याला मानवते ... तशी अगदी वेळ आलीच तर मी लेखन वगैरे सगळे सोडुन "गोरक्षण समितीचा कार्यकर्ता " बनुन वर्गण्या गोळा करत फिरेन किंवा "दुधाच्या बाटल्या" घरपोच पोहचवायचा किफायतशीर धंदा सुरु करेन. अशा कामात कमीत कमी इज्जत तरी आहे, त्या "अग्ली और पग्ली" मध्ये काय "फतरं इज्जत" आहे ? काय म्हणतेस ? गोरक्षण समितीचा कार्यकर्ता - छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

पण डॉन .. सिनेमाची आणि जेवणाची सांगड मस्त घातलीयस... कुठलाही हिंदी सिनेमा मी अर्धवट बंद करत नाही त्यामुळे 'सिंग इज किंग' बघीन असं वाटतंय. ('अल्ला मेहरबान तो गधा पहेलवान' ह्या सिनेमाची व्हिडियो कॅसेट आणलेला) संदीप :)

मदनबाण 29/08/2008 - 08:32
डॉन्या मस्तच चिर-फाड केली आहेस रे.. :) थोडक्यात सिंगचे १२ वाजले आहेत... :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

परीक्षण फस्क्लास! वाचून करमणूक झाली आणि सिनेमा न पाहण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब.. स्वाती
लेखनविषय:
. समजा तुम्ही अतिशय पट्टीचे खवय्ये आहात. चवदार व लजीज अन्न हा तुमचा विक पॉइंट आहे. बाजारात आलेली नवी "चटपटीत डिश" चाखण्यासाठी तुम्ही पैशाचा विचार करत नाही. तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे टाकुन खास "हॉटेलात" जाऊन त्या डिशचा आस्वाद घेता, कुठेतरी नेटवरुन त्याची पाककॄती उतरवुन हेऊन त्याचे घरगुती प्रयोग करुन पैसे वाचवण्याचा नतद्रष्टपणा तुम्ही करत नसता. योग्य मालाच्या व लायकीच्या पदार्थासाठी पाहिजेतेवढा पैसा मोजण्याची तुमची दानत व तयारी असते. पण तुम्ही सध्या आयुष्याच्या कंटाळवाण्या कालखंडातुन मार्गक्रमण करत आहात. काहीच तुमच्या मनासारखे होत नाही. जाईल तिकडे निराशा पदरी पडत आहे.

नाहि चिरा...नाहि पणती....

सौरभ वैशंपायन ·

II राजे II 24/08/2008 - 13:45
जीव देउन, रक्त सांडुन किंवा आयुष्यभरासाठी पंगु होऊन सैनिक युद्ध जिंकतात. नेते मात्र चर्चा करुन ’माघार’ घेतात. आपल्याच शहीद झालेल्या साथीदारांच्या रक्तरेषेवरुन जवान मागे फिरतात. पुढे त्रयस्थ देशांच्या सांगण्यावरुन चर्चेची कधीच न संपणारी गुर्‍हाळे चालत राहतात. "झाले गेले विसरुन जाऊ" अशी भाकड तत्वज्ञान असलेली आणि कधीच चाल न बदलणारी शांततेची गाणी एकतर्फीच गायली जातात. पण मागे उरतात - तिरंग्यात लपेटलेले मृतदेह....२१ फैरींची सलामी.... सन्मानपत्रके व पदके...आणि सरतेशेवटी अस्थिकलशातील पाण्यावर पसरलेली मुठभर राख आणि २-४ बुड्बुडे बस्स!!! हिजडे सत्ताधारी असल्यावर हेच होत राहणार नेहमी ! भारताचे शुरवीर पुत्र असेच नाहक बळी जात रहणार... व आमचे सत्ताधारी... कधी बस सेवा तर कधी ट्रेन सेवा... कधी ईफ्तेहार पार्टी करत... ये दोस्ती... हम नही छोडेंगे म्हणणार तर... ते पाकड पाठीमागून खंजरावर खंजर मारुन... पुन्हा पुन्हा जख्मा ओल्या करत राहणार... हिंदुंची संघटना म्हणून सत्तेत आलेली भाजपा... एक अणूबॉम्ब फोडून चुप्प बसली .... व पाकने कारगील पर्यंत धडक मारली.. पाक शत्रु राष्ट्र आहे... पण त्यांच्या जवळ एक जिद्द आहे... भारताला संपवण्याची .... अनेकवेळा प्रयत्न केले... अनेक सरकार बदलले... अनेक नेते त्यांचे मारले गेले पण जो नवीन आला त्याचा विचार व उद्देश पक्का होता... युध्द.... समोरासमोर नाही तर छुप्पे युध्द... व आमच्या भारतात.... महात्मा होते.... लोहपुरुष होते... कमालीची जिद्द असलेली इंद्रा गांधी होती... ए सरकार कुछ नही कर सकती... असे म्हनून मोठा पॉज घेणारे वाजपयी आहेत.... तोडक्या तोडक्या हिंदी मध्ये गेली १५ वर्ष मी पण भारतीय आहे म्हनून गळा फाडणारी सोनिया आहे .. पण कोठेच दुरवर एक जिद्दी चेहरा दिसत नाही आहे जो पाकचें कंबरडे मोडू शकेल.... त्यांना सरळ सरळ आवाहन देऊन... गरज पडलीच तर युध्दाची तयारी करत असलेला दिसत नाही आहे..... ! ते आमच्या घरापर्यंत येऊन बॉम्ब फोडून निघून जातात आरामात... पकडने तर दुर .. त्यांचे साधे ठस्से पण भेटत नाहीत.... न्युज चॅनलवर सिमीचे ठीकाणे कार्य पध्दती, योजना (अहमदाबाद बॉम्ब हल्ल्यापुर्वीच ) व्यवस्थीत ..... ये देखो, एसे बनाते ने बॉम्ब.... करत सब से तेज कालच दाखवत होता... व वर ही पुस्ती .... यह टेप अहमदाबाद बॉम्ब हल्ला होणे के पुर्व का आहे... सिर्फ हमारे चॅनेल पर... ! रोज एक शार्प शुटर आरामात टिव्हीवर कार्यक्रम करुन जात आहे.. गेली तीन दिवस बघतो आहे.. पण कोठे हे नाही पाहीले वाचले की पोलिसांनी त्याला पकड्ले अथवा नाही ? तुम्ही आम्ही सामान्य जण ..... असेच काहीतरी मोठ मोठे लेख व प्रतिसाद लिहणार्...व शांत पणे सिगरेटचे घोट घेत... ह्या देशाच काही खरं नाही म्हणत... रात्री कुठ्ला चित्रपट पाहयचा आहे ह्याची तयारी करणार... अथवा कोठे तरी बस मध्ये, बाजारामध्ये... लोकल ट्रेन मध्ये.. एखादा दहशतवादी बॉम्ब फोडेल व त्यात कोठे तरी कोप-यात.. रक्ताच्या थारोळ्यात हात कोठेतरी पडलेला व पायाचा अतापत्ता नसलेला आपला मृतदेहा कडे पाहून तो न्युज चॅनेल वाला म्हणत असेल " आप देख रे हे ... बॉम्ब ब्लास्ट हुवा है .... अभी अभी... सबसे तेज... सिर्फ हम आप के लिए लाये है ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

मदनबाण 24/08/2008 - 18:31
१००% सहमत... मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

सध्या भारतीय लष्करात तरूण जायला नाखूष आहेत ह्याची बरीच कारणे आहेत. मुख्य कारण कामाच्या मानाने कमी पगार असावे (सहाव्या वेतन आयोगात कदाचित बर्‍यापैकी वाढ मिळेल) इतरही बरीच ग॑भीर कारणे आहेत - बाबू लोका॑ची अमर्याद सत्ता - भ्रष्टाचार - कालबाह्य नियम - सरकारचे 'गरज सरो..' धोरण - सतत बदलीची टा॑गती तलवार त्यामुळे स॑साराची, मुला॑च्या शिक्षणाची आबाळ - धोक्याचे काम

आज आपल्यात जागरुकता नाहि. तुम्हि आमच्या जवानांची आणि शेतकर्‍यांची योग्य काळजी घ्याल तरच तुम्हांला खुर्ची उबवायला मिळेल हे सत्ताधिशांना सांगण्याची गरज आहे.

II राजे II 24/08/2008 - 13:45
जीव देउन, रक्त सांडुन किंवा आयुष्यभरासाठी पंगु होऊन सैनिक युद्ध जिंकतात. नेते मात्र चर्चा करुन ’माघार’ घेतात. आपल्याच शहीद झालेल्या साथीदारांच्या रक्तरेषेवरुन जवान मागे फिरतात. पुढे त्रयस्थ देशांच्या सांगण्यावरुन चर्चेची कधीच न संपणारी गुर्‍हाळे चालत राहतात. "झाले गेले विसरुन जाऊ" अशी भाकड तत्वज्ञान असलेली आणि कधीच चाल न बदलणारी शांततेची गाणी एकतर्फीच गायली जातात. पण मागे उरतात - तिरंग्यात लपेटलेले मृतदेह....२१ फैरींची सलामी.... सन्मानपत्रके व पदके...आणि सरतेशेवटी अस्थिकलशातील पाण्यावर पसरलेली मुठभर राख आणि २-४ बुड्बुडे बस्स!!! हिजडे सत्ताधारी असल्यावर हेच होत राहणार नेहमी ! भारताचे शुरवीर पुत्र असेच नाहक बळी जात रहणार... व आमचे सत्ताधारी... कधी बस सेवा तर कधी ट्रेन सेवा... कधी ईफ्तेहार पार्टी करत... ये दोस्ती... हम नही छोडेंगे म्हणणार तर... ते पाकड पाठीमागून खंजरावर खंजर मारुन... पुन्हा पुन्हा जख्मा ओल्या करत राहणार... हिंदुंची संघटना म्हणून सत्तेत आलेली भाजपा... एक अणूबॉम्ब फोडून चुप्प बसली .... व पाकने कारगील पर्यंत धडक मारली.. पाक शत्रु राष्ट्र आहे... पण त्यांच्या जवळ एक जिद्द आहे... भारताला संपवण्याची .... अनेकवेळा प्रयत्न केले... अनेक सरकार बदलले... अनेक नेते त्यांचे मारले गेले पण जो नवीन आला त्याचा विचार व उद्देश पक्का होता... युध्द.... समोरासमोर नाही तर छुप्पे युध्द... व आमच्या भारतात.... महात्मा होते.... लोहपुरुष होते... कमालीची जिद्द असलेली इंद्रा गांधी होती... ए सरकार कुछ नही कर सकती... असे म्हनून मोठा पॉज घेणारे वाजपयी आहेत.... तोडक्या तोडक्या हिंदी मध्ये गेली १५ वर्ष मी पण भारतीय आहे म्हनून गळा फाडणारी सोनिया आहे .. पण कोठेच दुरवर एक जिद्दी चेहरा दिसत नाही आहे जो पाकचें कंबरडे मोडू शकेल.... त्यांना सरळ सरळ आवाहन देऊन... गरज पडलीच तर युध्दाची तयारी करत असलेला दिसत नाही आहे..... ! ते आमच्या घरापर्यंत येऊन बॉम्ब फोडून निघून जातात आरामात... पकडने तर दुर .. त्यांचे साधे ठस्से पण भेटत नाहीत.... न्युज चॅनलवर सिमीचे ठीकाणे कार्य पध्दती, योजना (अहमदाबाद बॉम्ब हल्ल्यापुर्वीच ) व्यवस्थीत ..... ये देखो, एसे बनाते ने बॉम्ब.... करत सब से तेज कालच दाखवत होता... व वर ही पुस्ती .... यह टेप अहमदाबाद बॉम्ब हल्ला होणे के पुर्व का आहे... सिर्फ हमारे चॅनेल पर... ! रोज एक शार्प शुटर आरामात टिव्हीवर कार्यक्रम करुन जात आहे.. गेली तीन दिवस बघतो आहे.. पण कोठे हे नाही पाहीले वाचले की पोलिसांनी त्याला पकड्ले अथवा नाही ? तुम्ही आम्ही सामान्य जण ..... असेच काहीतरी मोठ मोठे लेख व प्रतिसाद लिहणार्...व शांत पणे सिगरेटचे घोट घेत... ह्या देशाच काही खरं नाही म्हणत... रात्री कुठ्ला चित्रपट पाहयचा आहे ह्याची तयारी करणार... अथवा कोठे तरी बस मध्ये, बाजारामध्ये... लोकल ट्रेन मध्ये.. एखादा दहशतवादी बॉम्ब फोडेल व त्यात कोठे तरी कोप-यात.. रक्ताच्या थारोळ्यात हात कोठेतरी पडलेला व पायाचा अतापत्ता नसलेला आपला मृतदेहा कडे पाहून तो न्युज चॅनेल वाला म्हणत असेल " आप देख रे हे ... बॉम्ब ब्लास्ट हुवा है .... अभी अभी... सबसे तेज... सिर्फ हम आप के लिए लाये है ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

मदनबाण 24/08/2008 - 18:31
१००% सहमत... मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

सध्या भारतीय लष्करात तरूण जायला नाखूष आहेत ह्याची बरीच कारणे आहेत. मुख्य कारण कामाच्या मानाने कमी पगार असावे (सहाव्या वेतन आयोगात कदाचित बर्‍यापैकी वाढ मिळेल) इतरही बरीच ग॑भीर कारणे आहेत - बाबू लोका॑ची अमर्याद सत्ता - भ्रष्टाचार - कालबाह्य नियम - सरकारचे 'गरज सरो..' धोरण - सतत बदलीची टा॑गती तलवार त्यामुळे स॑साराची, मुला॑च्या शिक्षणाची आबाळ - धोक्याचे काम

आज आपल्यात जागरुकता नाहि. तुम्हि आमच्या जवानांची आणि शेतकर्‍यांची योग्य काळजी घ्याल तरच तुम्हांला खुर्ची उबवायला मिळेल हे सत्ताधिशांना सांगण्याची गरज आहे.
लेखनविषय:
सैनिक स्वत: स्वतंत्र विचार करत नाहि. त्याने तो करावा अशी अपेक्षाहि नसते. तो शिस्त पाळतो, सज्ज राहतो. काहि ठराविक शब्दांचा उच्चार झाला कि तो यंत्रवत काम करतो. पण त्याचे मन सुद्धा यंत्राप्रमाणेच निर्विकार असेल का? नक्किच नाहि! युद्धाच्यावेळी त्याचा विचारांवर ताबा नसतो, शत्रुला मारायचे या एकाच विचाराने तो पिसाट झाला असतो. पण शीतयुद्धासारख्या परीस्थितीत वर्षानुवर्षे सतत दक्ष अवस्थेत त्याला ’तिष्ठत’ रहावे लागते. कधी आसामच्या किर्र जंगलात, कधी चटके लावणार्‍या थर किंवा कच्छच्या वाळवंटात आणि कधी-कधी सियाचीनसारख्या जगातल्या सर्वात उंच रणभूमीवर हाडं गोठवणार्‍या बर्फाळ थंडीत, तो सज्ज असतो.

रुद्ध प्रतिभा चतुरस्र वाहू दे

धनंजय ·

विसोबा खेचर 08/08/2008 - 22:53
धनंजया, मानलं रे तुला! तुझ्या अवघ्या चार ओळी खूप काही सांगून गेल्या! आपला, (मिपावर मधुशालेच्या सुरेख अनुवादाची वाट पाहणारा!) तात्या.

प्राजु 08/08/2008 - 22:55
मिपावर मधुशालेच्या सुरेख अनुवादाची वाट पाहणारा!) तात्या. मीही वाट पहाते आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by मेघना भुस्कुटे

प्राजु 08/08/2008 - 23:54
रंगांची चतुरस्र फेक जमते, काव्ये म्हणे चेष्टिता - का तो फक्त विडंबने करि कवी? प्याला मधूचा रिता! धनंजय, मानलं तुम्हाला. दरवेळी गाडी घसरली खाली की, तिला रूळावर नेण्यासाठी आपल्या सारख्याच जाणकार चालकाची गरज पडते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by मेघना भुस्कुटे

विसोबा खेचर 09/08/2008 - 00:05
असं काही वाचलं ना, की मिसळपाववर आल्याचा अभिमान वाटतो. मेघनाताई, मी आपल्याशी सहमत आहे! लोकांना मिपावर येणे नकोसे वाटावे या प्रयत्नात काही मंडळी असतात परंतु त्याचसोबत धन्याशेठच्या उत्तुंग प्रतिभेचे अवघे चार शब्द मिपाची शोभा वाढवतात! आणि अशी धन्याशेठसारखी मंडळी जोवर इथे आहेत तोवर मिपावर येणे माझ्यासारख्या सामान्य वाचकाकरता निश्चितच आनंददायी ठरते/ठरेल! या निमित्ताने एक सामान्य वाचक म्हणून अजून एक व्यक्तिगत मत नोंदवू इच्छितो! ते असे की मिपावर आताशा विडंबनांचा इतका प्रचंड भडिमार होत आहे की त्याचा अक्षरश: उबग यावा! आणि म्हणूनच निदान मी तरी पुढचा काही काळ मिपावरील कोणत्याच विडंबनाला बरा-वाईट असा कुठलाच प्रतिसाद द्यायचा नाही असे ठरवले आहे! अर्थात, हा माझा केवळ एका सामान्य वाचकाच्या भूमिकेतून घेतलेला निर्णय आहे, माझ्या व्यक्तिगत चॉईसचा अन् इच्छेचा तो एक भाग आहे! बाकी कुणी काय लिहावं अन् काय लिहू नये, विडंबने लिहावीत की लिहू नये, हा प्रत्येकाचा अगदी वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याचाही मी आदरच करतो! बट आय विश टू क्विट! सो लेट मी....! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

घाटावरचे भट 09/08/2008 - 16:15
या निमित्ताने एक सामान्य वाचक म्हणून अजून एक व्यक्तिगत मत नोंदवू इच्छितो! ते असे की मिपावर आताशा विडंबनांचा इतका प्रचंड भडिमार होत आहे की त्याचा अक्षरश: उबग यावा! हेच म्हणतो.... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

चतुरंग 09/08/2008 - 01:21
रंगांची चतुरस्र फेक जमते, काव्ये म्हणे चेष्टिता - का तो फक्त विडंबने करि कवी? प्याला मधूचा रिता! निवृत्तीत सुमार - काव्यप्रतिभा याची रुळा सोडते! जैशी का अनिरुद्ध होत स्रवते, वाटा नव्या शोधते. वा! क्या बात है! आपले हे काव्यात्म चपखल कान पिळणे आम्हाला चांगलेच लागले! पार डोक्यापर्यंत कळ गेली! रंगांची चतुरस्र फेक भरुनी, आणेल प्याला पुन्हा झाले जरा विडंबन अती तरी, माफाल आम्हा गुन्हा निवृत्तीत सुमारही वसतसे काव्यांबरी शोभतो सिद्धहस्त अनिरुद्ध कवी तो कविता पहा रेखितो चतुरंग

In reply to by चतुरंग

मुक्तसुनीत 09/08/2008 - 01:34
रंगास्की ! उत्तम प्रतिसाद ! मात्र "वजनात मारण्याकरता" ;-) तुमच्या ताजमहालाला आमच्या विटा जोडतोय ! रंगांची चतुरस्र फेक भरुनी, आणेल प्याला पुन्हा झाले जरा विडंबन अती तरी, सोडुनि द्यावा गुन्हा निवृत्तीत सुमारही वसतसे काव्यांबरी शोभतो प्रत्युन्मती अनिरुद्ध श्रेष्ठ कवी तो कविता पहा रेखितो

केशवसुमार 09/08/2008 - 16:02
काय लिहावे उत्तर थोडा विचार केला दिर्घ एक मग छाती मध्ये श्वास घेतला.. धनंजया मज पटते आहे तुमचे म्हणणे एक तर्‍हेचे व्यसन असे विडंबन लिहिणे शिघ्र काव्य लिहिण्यात असे ती नशा वेगळी विडंबने लिहिताना अन ती मिळते सगळी वाव्वांची त्या नंतर इतकी सवय लागते ना येता त्या लगेच अन अस्वस्थ वाटते अहं स्वतःचा सुखावण्या मग लिहित राहतो विडंबना मागून विडंबन करत राहतो फुलून येण्या काव्य कुठे मग वेळ राहतो बनुन विडंबक रहण्यातच तो धन्य मानतो विडंबकाची कात जरी ही बरी वाटते अबोल अनवट आत कविता ती गुदमरते म्हणून टाकली कात मी फाडून शेवटी आणि घेतली विडंबनातून मी निवृत्ती रंग्या मेल्या सावध हो तू अत्तापासून नकोस देऊ तुझ्या आतली कविता नासून धनंजयाचे ऐक निवेदन कर वेषांतर मधुशालेचे पुर्ण अधी कर तू भाषांतर

ऋषिकेश 09/08/2008 - 19:19
वा धनंजय! सुचक, नेमक्या आणि वृत्तबद्ध ओळी आवडल्या रंगराव, प्रतिसाद आवडला फक्त "माफाल" शब्द वाचुन एकदम दातात सुपारी अडकल्यागत झाले :) ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

धनंजय 09/08/2008 - 21:13
एक नव्हे दोनदोन बल्लवाचार्यांकडून मेजवानी मिळणार. शिवाय इथे आणखी कितीतरी छुप्या कवींना त्यांच्याकडून स्फुरण मिळेल. मधुशालेला ५-१०च प्रतिसाद येत, पण हरखून नि:शब्द होणारे वाचक खूप आहेत. तसेच अनिरुद्धांच्या आजकालच्या कवितांना - प्रतिसाद थोडे येतात. पण ह.ह.पु.वा. होत प्रतिसाद देऊन ती कडवी झटकता येत नाहीत. दोनदोनदा तीनतीनदा परत येऊन वाचन होते. कवीला मात्र ते दिसत नाही... पण मनोमन खात्री असावी. (किती लोकांनी वाचनखुणा साठवल्या आहेत तो आकडा देणे शक्य आहे का? लिखित प्रतिसाद आला नाही, तरी कवीला तो आकडा बघून आपल्या चाहात्यांकडून पोच मिळेल.)

एकंदर छान. "रुद्ध प्रतिभा चतुरस्त्र वाहू दे" ह्या ओळी एखाद्या बद्धकोष्ठाने पीडित प्रतिभावंताला उद्देशून केल्यासारख्या वाटल्या. कविता छान आहे. काव्यात आणि संस्कृतात थोडीबहुत गती असलेल्या वृत्तसाक्षर अशा निवृत्त काकांनी विरंगुळ्यासाठी लिहिल्यासारख्या ओळी आहेत. हे जरा कठोर झाले असावे. एवढे नाही पण थोडेबहुत असेच. अर्थातच ह्या ओळी धनंजय ह्यांनी विरंगुळ्यासाठीच लिहिल्या असाव्यात.

In reply to by चित्तरंजन भट

सर्किट 11/08/2008 - 09:24
काव्यात आणि संस्कृतात थोडीबहुत गती असलेल्या वृत्तसाक्षर अशा निवृत्त काकांनी विरंगुळ्यासाठी लिहिल्यासारख्या ओळी आहेत. लीव्ह इट टु चित्तोपंत टु स्टेट इट प्रिसाईजली !!! (आणि हो, अशाच ओळींसाठी मिसळपावावर अनेकांना यावेसे वाटते, असे वरील काही प्रतिसादांतून दिसते ;-) - (वृत्तसाक्षर पण अनिवृत्त, म्हणूनच अद्यापही कार्यरत ;-) सर्किट

In reply to by चित्तरंजन भट

धनंजय 11/08/2008 - 18:01
पण नाही, केवळ वृत्तविरंगुळा नव्हता. टीकाही होती. टीका केलेली प्रवृत्ती बद्धकोष्ठ प्रतिभा नाही खास. "अंगावरुन अती जाण्यामुळे गर्भ राहात नसलेली प्रतिभा" असे म्हटले तर अधिक समर्पक सारांश होईल. हे माझे नेहमीचे "शो मी द डेटा" कसावर वाद घालणे होते. ज्यांची नावे गोवली होती त्यांनी सुयोग्य उत्तरे दिलीही आहेत.

मुक्तसुनीत 11/08/2008 - 03:29
विरंगुळ्याकरता लिहीलेली कविता नि कंडुशमनार्थ लिहीलेले प्रतिसाद.... चांगले इंटरप्रिटेशन ! ;-)

विसोबा खेचर 08/08/2008 - 22:53
धनंजया, मानलं रे तुला! तुझ्या अवघ्या चार ओळी खूप काही सांगून गेल्या! आपला, (मिपावर मधुशालेच्या सुरेख अनुवादाची वाट पाहणारा!) तात्या.

प्राजु 08/08/2008 - 22:55
मिपावर मधुशालेच्या सुरेख अनुवादाची वाट पाहणारा!) तात्या. मीही वाट पहाते आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by मेघना भुस्कुटे

प्राजु 08/08/2008 - 23:54
रंगांची चतुरस्र फेक जमते, काव्ये म्हणे चेष्टिता - का तो फक्त विडंबने करि कवी? प्याला मधूचा रिता! धनंजय, मानलं तुम्हाला. दरवेळी गाडी घसरली खाली की, तिला रूळावर नेण्यासाठी आपल्या सारख्याच जाणकार चालकाची गरज पडते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by मेघना भुस्कुटे

विसोबा खेचर 09/08/2008 - 00:05
असं काही वाचलं ना, की मिसळपाववर आल्याचा अभिमान वाटतो. मेघनाताई, मी आपल्याशी सहमत आहे! लोकांना मिपावर येणे नकोसे वाटावे या प्रयत्नात काही मंडळी असतात परंतु त्याचसोबत धन्याशेठच्या उत्तुंग प्रतिभेचे अवघे चार शब्द मिपाची शोभा वाढवतात! आणि अशी धन्याशेठसारखी मंडळी जोवर इथे आहेत तोवर मिपावर येणे माझ्यासारख्या सामान्य वाचकाकरता निश्चितच आनंददायी ठरते/ठरेल! या निमित्ताने एक सामान्य वाचक म्हणून अजून एक व्यक्तिगत मत नोंदवू इच्छितो! ते असे की मिपावर आताशा विडंबनांचा इतका प्रचंड भडिमार होत आहे की त्याचा अक्षरश: उबग यावा! आणि म्हणूनच निदान मी तरी पुढचा काही काळ मिपावरील कोणत्याच विडंबनाला बरा-वाईट असा कुठलाच प्रतिसाद द्यायचा नाही असे ठरवले आहे! अर्थात, हा माझा केवळ एका सामान्य वाचकाच्या भूमिकेतून घेतलेला निर्णय आहे, माझ्या व्यक्तिगत चॉईसचा अन् इच्छेचा तो एक भाग आहे! बाकी कुणी काय लिहावं अन् काय लिहू नये, विडंबने लिहावीत की लिहू नये, हा प्रत्येकाचा अगदी वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याचाही मी आदरच करतो! बट आय विश टू क्विट! सो लेट मी....! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

घाटावरचे भट 09/08/2008 - 16:15
या निमित्ताने एक सामान्य वाचक म्हणून अजून एक व्यक्तिगत मत नोंदवू इच्छितो! ते असे की मिपावर आताशा विडंबनांचा इतका प्रचंड भडिमार होत आहे की त्याचा अक्षरश: उबग यावा! हेच म्हणतो.... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

चतुरंग 09/08/2008 - 01:21
रंगांची चतुरस्र फेक जमते, काव्ये म्हणे चेष्टिता - का तो फक्त विडंबने करि कवी? प्याला मधूचा रिता! निवृत्तीत सुमार - काव्यप्रतिभा याची रुळा सोडते! जैशी का अनिरुद्ध होत स्रवते, वाटा नव्या शोधते. वा! क्या बात है! आपले हे काव्यात्म चपखल कान पिळणे आम्हाला चांगलेच लागले! पार डोक्यापर्यंत कळ गेली! रंगांची चतुरस्र फेक भरुनी, आणेल प्याला पुन्हा झाले जरा विडंबन अती तरी, माफाल आम्हा गुन्हा निवृत्तीत सुमारही वसतसे काव्यांबरी शोभतो सिद्धहस्त अनिरुद्ध कवी तो कविता पहा रेखितो चतुरंग

In reply to by चतुरंग

मुक्तसुनीत 09/08/2008 - 01:34
रंगास्की ! उत्तम प्रतिसाद ! मात्र "वजनात मारण्याकरता" ;-) तुमच्या ताजमहालाला आमच्या विटा जोडतोय ! रंगांची चतुरस्र फेक भरुनी, आणेल प्याला पुन्हा झाले जरा विडंबन अती तरी, सोडुनि द्यावा गुन्हा निवृत्तीत सुमारही वसतसे काव्यांबरी शोभतो प्रत्युन्मती अनिरुद्ध श्रेष्ठ कवी तो कविता पहा रेखितो

केशवसुमार 09/08/2008 - 16:02
काय लिहावे उत्तर थोडा विचार केला दिर्घ एक मग छाती मध्ये श्वास घेतला.. धनंजया मज पटते आहे तुमचे म्हणणे एक तर्‍हेचे व्यसन असे विडंबन लिहिणे शिघ्र काव्य लिहिण्यात असे ती नशा वेगळी विडंबने लिहिताना अन ती मिळते सगळी वाव्वांची त्या नंतर इतकी सवय लागते ना येता त्या लगेच अन अस्वस्थ वाटते अहं स्वतःचा सुखावण्या मग लिहित राहतो विडंबना मागून विडंबन करत राहतो फुलून येण्या काव्य कुठे मग वेळ राहतो बनुन विडंबक रहण्यातच तो धन्य मानतो विडंबकाची कात जरी ही बरी वाटते अबोल अनवट आत कविता ती गुदमरते म्हणून टाकली कात मी फाडून शेवटी आणि घेतली विडंबनातून मी निवृत्ती रंग्या मेल्या सावध हो तू अत्तापासून नकोस देऊ तुझ्या आतली कविता नासून धनंजयाचे ऐक निवेदन कर वेषांतर मधुशालेचे पुर्ण अधी कर तू भाषांतर

ऋषिकेश 09/08/2008 - 19:19
वा धनंजय! सुचक, नेमक्या आणि वृत्तबद्ध ओळी आवडल्या रंगराव, प्रतिसाद आवडला फक्त "माफाल" शब्द वाचुन एकदम दातात सुपारी अडकल्यागत झाले :) ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

धनंजय 09/08/2008 - 21:13
एक नव्हे दोनदोन बल्लवाचार्यांकडून मेजवानी मिळणार. शिवाय इथे आणखी कितीतरी छुप्या कवींना त्यांच्याकडून स्फुरण मिळेल. मधुशालेला ५-१०च प्रतिसाद येत, पण हरखून नि:शब्द होणारे वाचक खूप आहेत. तसेच अनिरुद्धांच्या आजकालच्या कवितांना - प्रतिसाद थोडे येतात. पण ह.ह.पु.वा. होत प्रतिसाद देऊन ती कडवी झटकता येत नाहीत. दोनदोनदा तीनतीनदा परत येऊन वाचन होते. कवीला मात्र ते दिसत नाही... पण मनोमन खात्री असावी. (किती लोकांनी वाचनखुणा साठवल्या आहेत तो आकडा देणे शक्य आहे का? लिखित प्रतिसाद आला नाही, तरी कवीला तो आकडा बघून आपल्या चाहात्यांकडून पोच मिळेल.)

एकंदर छान. "रुद्ध प्रतिभा चतुरस्त्र वाहू दे" ह्या ओळी एखाद्या बद्धकोष्ठाने पीडित प्रतिभावंताला उद्देशून केल्यासारख्या वाटल्या. कविता छान आहे. काव्यात आणि संस्कृतात थोडीबहुत गती असलेल्या वृत्तसाक्षर अशा निवृत्त काकांनी विरंगुळ्यासाठी लिहिल्यासारख्या ओळी आहेत. हे जरा कठोर झाले असावे. एवढे नाही पण थोडेबहुत असेच. अर्थातच ह्या ओळी धनंजय ह्यांनी विरंगुळ्यासाठीच लिहिल्या असाव्यात.

In reply to by चित्तरंजन भट

सर्किट 11/08/2008 - 09:24
काव्यात आणि संस्कृतात थोडीबहुत गती असलेल्या वृत्तसाक्षर अशा निवृत्त काकांनी विरंगुळ्यासाठी लिहिल्यासारख्या ओळी आहेत. लीव्ह इट टु चित्तोपंत टु स्टेट इट प्रिसाईजली !!! (आणि हो, अशाच ओळींसाठी मिसळपावावर अनेकांना यावेसे वाटते, असे वरील काही प्रतिसादांतून दिसते ;-) - (वृत्तसाक्षर पण अनिवृत्त, म्हणूनच अद्यापही कार्यरत ;-) सर्किट

In reply to by चित्तरंजन भट

धनंजय 11/08/2008 - 18:01
पण नाही, केवळ वृत्तविरंगुळा नव्हता. टीकाही होती. टीका केलेली प्रवृत्ती बद्धकोष्ठ प्रतिभा नाही खास. "अंगावरुन अती जाण्यामुळे गर्भ राहात नसलेली प्रतिभा" असे म्हटले तर अधिक समर्पक सारांश होईल. हे माझे नेहमीचे "शो मी द डेटा" कसावर वाद घालणे होते. ज्यांची नावे गोवली होती त्यांनी सुयोग्य उत्तरे दिलीही आहेत.

मुक्तसुनीत 11/08/2008 - 03:29
विरंगुळ्याकरता लिहीलेली कविता नि कंडुशमनार्थ लिहीलेले प्रतिसाद.... चांगले इंटरप्रिटेशन ! ;-)
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
रंगांची चतुरस्र फेक जमते, काव्ये म्हणे चेष्टिता - का तो फक्त विडंबने करि कवी? प्याला मधूचा रिता! निवृत्तीत सुमार - काव्यप्रतिभा याची रुळा सोडते! जैशी का अनिरुद्ध होत स्रवते, वाटा नव्या शोधते. ("विडंबकाची कात चढवल्यानंतरही उत्तम कवींच्या प्रतिभेच्या प्रसवास मुळीच निरोध होत नाही," असे काही लोकांचे मत आहे. मिसळपावावरील दोन सिद्धहस्त कवींची उदाहरणे लक्षात घेता हे मत मला पटत नाही.)

गणेशोत्सव

ऐका दाजीबा ·

टारझन 27/07/2008 - 21:29
तुम्ही म्हणताय ते बरोबर असेल. पण मला त्यामूळे भंग पावणारी शांतता , या कारणामुळे याचा राग योतो. मग तो गणेशोत्सव असो किंवा लग्नाची वरात. माझी शांतता कोणी कर्णकर्कश्य आवाजात भजन लाऊन जरी भंग केली तर त्याचा मला रागच येतो. बाकी लोक गणपतीच्या नावाखाली काही ऊद्योग करोत मला वैयक्तिक काही फरक पडत नाही. फक्त मला त्रास नको. आणि म्हसोबाच्या जत्रेत दारू पिऊन नाचगाणे तमाशे चालतातच की ? मग खास गणेशोत्स्वाचं काय एवढ वाटाव. धिंगाणा तो धिंगाणाच ! (स्वगत : एखाद्या दिवशी मला पण धिंगाण्यात सामिल होऊन नाचावे वाट्ट, क्राऊड मधे मिसळावे वाट्टे. ती मजा पब मधे नाहीच) कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

In reply to by टारझन

फटू 27/07/2008 - 23:19
माझी शांतता कोणी कर्णकर्कश्य आवाजात भजन लाऊन जरी भंग केली तर त्याचा मला रागच येतो मी सुद्धा याच मताचा आहे... आणि तसंही देव भावाचा भुकेला आहे. कर्णकर्कश्य आवाजात वाजणार्‍या संगीताचा नाही. मग ती भजनं का असेनात... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

विकास 28/07/2008 - 05:19
कोण म्हणतेय की आज सार्वजनीक गणेशोत्सव हे लोकमान्य टिळकांच्या प्रेरणे मुळे होतात? या वर्षी एक गंमत करून पहा खालील प्रश्न वर्गणी विचारायला येणार्‍या व्यक्तीस विचारा आणि पहा १००% बरोबर उत्तरे मिळतात का ते...
  • गणेशोत्सव कोणी सुरू केला?
  • कधी सुरू केला?
  • का सुरू केला?
  • तुम्ही (सार्वजनीक) गणेशोत्सव करता त्याची कारणे काय?

मराठी_माणूस 28/07/2008 - 09:14
आमच्या इथले एक मंडळ , सकाळ पासुन रात्रि पर्यंत प्रचंड मोठ्या आवाजात गाणि लावतात. ह्या लोकाना, अभ्यास करणारे विद्यार्थि, वॄध्द , आजारि कोणा कोणा ची पर्वा नसते. दारे खिडक्या लावुन घेतल्या, कानात बोळे घातले तरि तो आवज येतच असतो. एरवि लोड शेडिंग नको वाटते पण ह्या १० दिवसात त्याचा खुप आधार वाटतो , कारण तेव्हड्या वेळ तरि ह्या जांचा पासुन सुटका होते.

मनिष 28/07/2008 - 16:19
माझी शांतता कोणी कर्णकर्कश्य आवाजात भजन लाऊन जरी भंग केली तर त्याचा मला रागच येतो
हे खरे आहे, पण ह्यांना पटवणार कोण? विकासची प्रश्नावली भन्नाट! विचारून पहायला हवे...खरे तर ह्या प्रश्नाचे मंडळाने जाहिर उत्तर द्यावे असे बंधन हवे! :)
तुम्ही (सार्वजनीक) गणेशोत्सव करता त्याची कारणे काय?

विसोबा खेचर 28/07/2008 - 17:46
अरे, दारू पिऊन नाचायचंच आहे तर पब्ज मध्ये जा ना! हम्म! खरं आहे. प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली आहे. गणपती मिरवणुकीत दारू पिऊन नाचणे, धिंगाणा करणे योग्य नाही. आपला, (लालबागच्या राजाचा भक्त) तात्या.

ऐका दाजीबा 28/07/2008 - 18:35
बाकी लोक गणपतीच्या नावाखाली काही ऊद्योग करोत मला वैयक्तिक काही फरक पडत नाही. पण मला पडतो. एक गणेशभक्त म्हणून मला याचा त्रास होतो.

प्राजु 28/07/2008 - 18:54
विसर्जन झाल्यानंतर, नदीच्या काठी किंवा समुद्राच्या काठी.. चिखलात रूतून बसलेल्या, भग्न झालेल्या, दुखावल्या गेलेल्या गणेशमूर्ती पाहून खूप त्रास होतो. ज्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा ... मनोभावे, अगदी स्वतःच्या प्राणांपासून करायची त्याची अशी विटंबन!.... दरवर्षी अशी दृष्य बघून मी रडलेली आठवते मला. एकतर ती अशा ठिकाणी विसर्जन करावी जिथून ती पाण्याबाहेर येणार नाही , नाहीतर तिचा आकार असा आसावा की कमी पातळीच्या पाण्यामध्ये सुद्धा ती मूर्ती विरघळून जाईल... बस्स! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ऐका दाजीबा 22/08/2008 - 02:14
हीच गोष्ट गोपाळकाल्याची आणि कोजागिरीची! मला आठवते माझी लहानपणाची कोजागिरी. आम्ही सर्व कुटुंबीय रात्री घराच्या गच्चीवर जमायचो. छान गप्पा चालायच्या. शांत वातावरण आणि शीतल चांदणं. आईनं तयार केलेलं गरमागरम केशरी दूध त्यात चंद्र पाहून प्यायचो. त्या निमित्तानं खूप चांगल्या विषयांवर चर्चा व्हायची. आणि आता.... कोजागिरी साजरी करावीशीच वाटत नाही. कारण गच्चीवर गेलो तर तेच शीतल चांदणं असतं, पण ते शांत वातावरण मात्र नसतं. त्याची जागा घेतलेली असते कर्णकठोर पाश्चिमात्य गाण्यांनी. असं म्हणतात की लक्ष्मी या रात्री सर्वत्र फिरत असते आणि विचारत असते "को जागर्ति?" ( कोण जागा आहे?) [सहजच विषय निघाला म्हणून: असं म्हणतात की शिवाजी महाराजांना या रात्री असा आवाज आला होता. त्यांचं संस्कृत अर्थातच चांगलं होतं. त्यांनी "अहं जागर्मि" (मी जागा आहे) असं प्रत्युत्तरही दिलं होतं!]. असं विचारत असते, आणि जो जागा असतो (ईश्वरचिंतन करीत!) त्याला ती संपत्ती देते. मला वाटतं आता अशा वातावरणात लक्ष्मीलाही फिरावंसं वाटत नसणार! गोपाळकाल्याचंही काय हो? काय वातावरण असायचं पूर्वी! या जोरात गाणी (तीही पाश्चात्य संस्कृतीची) वाजवण्याच्या पद्धतीमुळं सगळा आनंदच मावळला आहे असं म्हणावसं वाटतं.

रेवती 22/08/2008 - 05:36
करणं चूकच आहे. आता गाणी लावताय ना तर भजनं तरी लावा. त्याच्याही पुढे जावून ही मंडळे सिनेमातले तारे जमिनीवर म्हणजे मंडळांमध्ये पूजेसाठी बोलवतात. त्यांना पहायला तूफान गर्दी होते. एकदा एका मंडळाने हेमामालिनी ला आरती करण्यासाठी बोलावले. त्यावेळच्या भाषणात एका पुढार्‍याने हेमामालिनीची ओळख(?) करून देताना म्हटले की आज आपल्या येथे सुप्रसिद्ध्................(हे सर्व बोलून झाल्यावर तो म्हणाला)आता आपण सर्व हेमामालिनीचा लाभ घेऊया! (आम्ही सर्वजण घरात बसून ऐकत होतो व ह. ह. पु. वा.) त्याला म्हणायचे होते की दर्शनाचा लाभ घेऊया. रेवती

टारझन 27/07/2008 - 21:29
तुम्ही म्हणताय ते बरोबर असेल. पण मला त्यामूळे भंग पावणारी शांतता , या कारणामुळे याचा राग योतो. मग तो गणेशोत्सव असो किंवा लग्नाची वरात. माझी शांतता कोणी कर्णकर्कश्य आवाजात भजन लाऊन जरी भंग केली तर त्याचा मला रागच येतो. बाकी लोक गणपतीच्या नावाखाली काही ऊद्योग करोत मला वैयक्तिक काही फरक पडत नाही. फक्त मला त्रास नको. आणि म्हसोबाच्या जत्रेत दारू पिऊन नाचगाणे तमाशे चालतातच की ? मग खास गणेशोत्स्वाचं काय एवढ वाटाव. धिंगाणा तो धिंगाणाच ! (स्वगत : एखाद्या दिवशी मला पण धिंगाण्यात सामिल होऊन नाचावे वाट्ट, क्राऊड मधे मिसळावे वाट्टे. ती मजा पब मधे नाहीच) कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

In reply to by टारझन

फटू 27/07/2008 - 23:19
माझी शांतता कोणी कर्णकर्कश्य आवाजात भजन लाऊन जरी भंग केली तर त्याचा मला रागच येतो मी सुद्धा याच मताचा आहे... आणि तसंही देव भावाचा भुकेला आहे. कर्णकर्कश्य आवाजात वाजणार्‍या संगीताचा नाही. मग ती भजनं का असेनात... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

विकास 28/07/2008 - 05:19
कोण म्हणतेय की आज सार्वजनीक गणेशोत्सव हे लोकमान्य टिळकांच्या प्रेरणे मुळे होतात? या वर्षी एक गंमत करून पहा खालील प्रश्न वर्गणी विचारायला येणार्‍या व्यक्तीस विचारा आणि पहा १००% बरोबर उत्तरे मिळतात का ते...
  • गणेशोत्सव कोणी सुरू केला?
  • कधी सुरू केला?
  • का सुरू केला?
  • तुम्ही (सार्वजनीक) गणेशोत्सव करता त्याची कारणे काय?

मराठी_माणूस 28/07/2008 - 09:14
आमच्या इथले एक मंडळ , सकाळ पासुन रात्रि पर्यंत प्रचंड मोठ्या आवाजात गाणि लावतात. ह्या लोकाना, अभ्यास करणारे विद्यार्थि, वॄध्द , आजारि कोणा कोणा ची पर्वा नसते. दारे खिडक्या लावुन घेतल्या, कानात बोळे घातले तरि तो आवज येतच असतो. एरवि लोड शेडिंग नको वाटते पण ह्या १० दिवसात त्याचा खुप आधार वाटतो , कारण तेव्हड्या वेळ तरि ह्या जांचा पासुन सुटका होते.

मनिष 28/07/2008 - 16:19
माझी शांतता कोणी कर्णकर्कश्य आवाजात भजन लाऊन जरी भंग केली तर त्याचा मला रागच येतो
हे खरे आहे, पण ह्यांना पटवणार कोण? विकासची प्रश्नावली भन्नाट! विचारून पहायला हवे...खरे तर ह्या प्रश्नाचे मंडळाने जाहिर उत्तर द्यावे असे बंधन हवे! :)
तुम्ही (सार्वजनीक) गणेशोत्सव करता त्याची कारणे काय?

विसोबा खेचर 28/07/2008 - 17:46
अरे, दारू पिऊन नाचायचंच आहे तर पब्ज मध्ये जा ना! हम्म! खरं आहे. प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली आहे. गणपती मिरवणुकीत दारू पिऊन नाचणे, धिंगाणा करणे योग्य नाही. आपला, (लालबागच्या राजाचा भक्त) तात्या.

ऐका दाजीबा 28/07/2008 - 18:35
बाकी लोक गणपतीच्या नावाखाली काही ऊद्योग करोत मला वैयक्तिक काही फरक पडत नाही. पण मला पडतो. एक गणेशभक्त म्हणून मला याचा त्रास होतो.

प्राजु 28/07/2008 - 18:54
विसर्जन झाल्यानंतर, नदीच्या काठी किंवा समुद्राच्या काठी.. चिखलात रूतून बसलेल्या, भग्न झालेल्या, दुखावल्या गेलेल्या गणेशमूर्ती पाहून खूप त्रास होतो. ज्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा ... मनोभावे, अगदी स्वतःच्या प्राणांपासून करायची त्याची अशी विटंबन!.... दरवर्षी अशी दृष्य बघून मी रडलेली आठवते मला. एकतर ती अशा ठिकाणी विसर्जन करावी जिथून ती पाण्याबाहेर येणार नाही , नाहीतर तिचा आकार असा आसावा की कमी पातळीच्या पाण्यामध्ये सुद्धा ती मूर्ती विरघळून जाईल... बस्स! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ऐका दाजीबा 22/08/2008 - 02:14
हीच गोष्ट गोपाळकाल्याची आणि कोजागिरीची! मला आठवते माझी लहानपणाची कोजागिरी. आम्ही सर्व कुटुंबीय रात्री घराच्या गच्चीवर जमायचो. छान गप्पा चालायच्या. शांत वातावरण आणि शीतल चांदणं. आईनं तयार केलेलं गरमागरम केशरी दूध त्यात चंद्र पाहून प्यायचो. त्या निमित्तानं खूप चांगल्या विषयांवर चर्चा व्हायची. आणि आता.... कोजागिरी साजरी करावीशीच वाटत नाही. कारण गच्चीवर गेलो तर तेच शीतल चांदणं असतं, पण ते शांत वातावरण मात्र नसतं. त्याची जागा घेतलेली असते कर्णकठोर पाश्चिमात्य गाण्यांनी. असं म्हणतात की लक्ष्मी या रात्री सर्वत्र फिरत असते आणि विचारत असते "को जागर्ति?" ( कोण जागा आहे?) [सहजच विषय निघाला म्हणून: असं म्हणतात की शिवाजी महाराजांना या रात्री असा आवाज आला होता. त्यांचं संस्कृत अर्थातच चांगलं होतं. त्यांनी "अहं जागर्मि" (मी जागा आहे) असं प्रत्युत्तरही दिलं होतं!]. असं विचारत असते, आणि जो जागा असतो (ईश्वरचिंतन करीत!) त्याला ती संपत्ती देते. मला वाटतं आता अशा वातावरणात लक्ष्मीलाही फिरावंसं वाटत नसणार! गोपाळकाल्याचंही काय हो? काय वातावरण असायचं पूर्वी! या जोरात गाणी (तीही पाश्चात्य संस्कृतीची) वाजवण्याच्या पद्धतीमुळं सगळा आनंदच मावळला आहे असं म्हणावसं वाटतं.

रेवती 22/08/2008 - 05:36
करणं चूकच आहे. आता गाणी लावताय ना तर भजनं तरी लावा. त्याच्याही पुढे जावून ही मंडळे सिनेमातले तारे जमिनीवर म्हणजे मंडळांमध्ये पूजेसाठी बोलवतात. त्यांना पहायला तूफान गर्दी होते. एकदा एका मंडळाने हेमामालिनी ला आरती करण्यासाठी बोलावले. त्यावेळच्या भाषणात एका पुढार्‍याने हेमामालिनीची ओळख(?) करून देताना म्हटले की आज आपल्या येथे सुप्रसिद्ध्................(हे सर्व बोलून झाल्यावर तो म्हणाला)आता आपण सर्व हेमामालिनीचा लाभ घेऊया! (आम्ही सर्वजण घरात बसून ऐकत होतो व ह. ह. पु. वा.) त्याला म्हणायचे होते की दर्शनाचा लाभ घेऊया. रेवती
लेखनविषय:
लेखनप्रकार
टिळकांनी गणेशोत्सवाची स्थापना का केली? लोकांनी एकत्र यावे म्हणून. त्यांचा उद्देश साध्य झाला. लोक एकत्र आले. पण त्यांनी एकत्र येऊन काय केलं? गणेशोत्सवाच्या निमित्ताने दहा दिवस जो तमाशा चालतो, त्याबद्दल हा ऊहापोह. काही मंडळं निदान दहा दिवसांत काही वेळा तरी भजनं लावतात. पण विसर्जनाच्या दिवशी मात्र कहर होतो. अक्षरश: दारु पिऊन, "कोई मेरे साथ कोई रात गुजारे..." सारख्या गीतांच्या तालावर हे तथाकथित "गणेशभक्त" नाचत असतात. अरे, दारू पिऊन नाचायचंच आहे तर पब्ज मध्ये जा ना! त्यासाठी गणपतीची अशी विटंबना कशाला? खेदपूर्वक नमूद करावंसं वाटतं की टिळक जर आज हयात असते, तर त्यांनी आज गणेशोत्सव बंद केले असते!!

बदल तर घडतोय...

स्वाती फडणीस ·
टीक-टॉक टीक-टॉक टीक-टॉक ठांग! लोलक, जागच्या जागी फिरतोय! लेफ्ट-राइट लेफ्ट-राइट लेफ्ट-राइट ठक्काक! मानव, जागच्या जागीच चालतोय! ठांग!. ठांग!!.. ठांग!!!... तरी ..बदल तर घडतोय... मुंगीच्या पावलानं..कासवाच्या गतीनं! अखंड, अविरत... अथक!! बदल तर घडतोच आहे... क्षणा क्षणाला..कणा कणाने, वाढणार्‍या एव्हरेस्ट प्रमाणे! क्षणा क्षणाला..थेंबा थेंबाने, वितळणार्‍या हिमाद्री प्रमाणे! एक पाऊल पुढे..एक पाऊल मागे, दोन पाउले पुढे..एक पाऊल मागे! एक पाऊल पुढे..दोन पाउले मागे... पुढे.. मागे.. जिथल्या तिथे! जिथल्या तिथे.. मागे..

माझी कविता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

चतुरंग 05/07/2008 - 04:23
अथक भरुन आलेल्या आभाळाने स्वत:चेच वजन असह्य होऊन बेधुंद कोसळणार्‍या पावसाच्या रुपाने जमिनीवर धाव घ्यावी तशी, बिरुटे साहेबांच्या काव्य प्रतिभेने मिपावर धाव घेतली!! :) छान मुक्तछंद साधलाय प्रा.डॉ. अजून कविता येऊदेत. चतुरंग

डॉ.दिलीपजी, वैचारिक मनस्ताप जेव्हा अहंकाराला डिवचतो त्याच वेळी अश्या कवितेची निर्मीती होते. स्वानुभव www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

अरुण मनोहर 05/07/2008 - 08:14
कविता आपोआपच झरते. झरते तेव्हा एकाकीच असते. त्या झर्‍याचा झुळझुळ आवाज ऐकून पांथस्थ येतात आणि तृप्त होऊन जातात.

विसोबा खेचर 05/07/2008 - 08:24
बिरुटेसाहेब, लै भारी कविता केली आहे राव तुम्ही! आशय जबर्‍या आहे... कविता खूप आवडली. अजूनही लिहा बिरुटेशेठ! अगदी भरभरून...! आपला, (प्राध्यापक बिरुट्यांचा विद्यार्थी) तात्या.

सहज 05/07/2008 - 08:45
प्रयत्नही करुनही समजत नाही कविता तेव्हा होणारा निर्मळ आनंद माझ्या आयुष्याला सुखावतो. ही मंगलता बहरत जाते, अनंत काळापर्यंत. सुखाने लपेटलेल्या आयुष्यातुन कवितेला लाथाडून चालतांना एकदा तरी विचार घोळुन जातोच ह्या गुदमरवणार्‍या कविंचे काय करायचे? अजुन सुख गोळा करुन आल्यावर मीच मला समजावतो रंजले, गांजले, रोगी पिडीत, पछाडीत व इतर सगळ्यांची काळजी घेणारेय वेलूचे मनोगत, तात्याबाचा मिपा तु लेका निवांत रहा..

In reply to by सहज

सहजा, असा बदला घेतला तर :) प्रयत्नही करुनही समजत नाही कविता तेव्हा होणारा निर्मळ आनंद माझ्या आयुष्याला सुखावतो. ही मंगलता बहरत जाते, अनंत काळापर्यंत. अरे, मग काय कवींनी कविताच करु नये. कोणी कविता करुन सुख मिळवतो कोणी अलिप्त राहुन !!! सुखाने लपेटलेल्या आयुष्यातुन कवितेला लाथाडून चालतांना एकदा तरी विचार घोळुन जातोच ह्या गुदमरवणार्‍या कविंचे काय करायचे? कविंना माफ कर !!! अजुन सुख गोळा करुन आल्यावर मीच मला समजावतो रंजले, गांजले, रोगी पिडीत, पछाडीत व इतर सगळ्यांची काळजी घेणारेय वेलूचे मनोगत, तात्याबाचा मिपा तु लेका निवांत रहा.. दोस्ता एकवेळ निवांत राहता येईल, वेदनेपासून अलिप्त नाही !!!

एकलव्य 05/07/2008 - 09:37
अहो सर - अर्थ पोहचला... पण मला विचाराल तर तुम्ही साधे सरळ लिहिता तेव्हा शब्द आणि गोडी मनात तासनतास गुणगुणत राहते. (अकव्य)लव्य

II राजे II 05/07/2008 - 10:41
काय लिहू !! मस्त वेदना व्यक्त झाल्या आहेत... छान कविता.... स्वगतः राजे आपले एक एक मित्र ह्या कवितारोगामुळे अस्वस्थ आहेत... त्यां सर्वांना लवकर आराम मिळो अशी प्रार्थना करावयास हवी आपल्याला ! बेचारी काल यशो ह्या रोगाची बळी होती... आज सर देखील ..... वाईट वाटतं .. असे मोठ मोठे लेखक अचानक चार ओळीच्या कविता करतात तेव्हा ;) राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

विसुनाना 05/07/2008 - 11:44
निर्वासित वेदनांच्या गोंगाटात दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत, माझी कविता एकाकी असते. या ओळी खास आहेत.

धनंजय 05/07/2008 - 16:59
झपाटणारी कल्पना आहे, पण तिला मूर्त करायला समर्थ शब्द नाहीत. अशी घालमेल चितारली आहे बिरुटेसरंनी. त्या अस्वस्थतेतून आणखी स्फुरण येत राहो!

नारदाचार्य 05/07/2008 - 23:06
... करून जाणारी रचना... अभिनंदन... बर्‍याच काळानं मुक्तछंदात काही चांगलं वाचायला मिळालं... अधिक मागणी करीत नाही. कारण हा मागणी तसा पुरवठा यातला प्रकार नाही.

निर्वासित वेदनांच्या गोंगाटात दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत, माझी कविता एकाकी असते. क्या बात है!!! मस्त!!!!

बेसनलाडू 07/07/2008 - 11:04
ऐनिलिसिस करता येत नाही गुदमरलेल्या श्वासांचा. आभाळ भरुन आल्यावर मी डोकावून पाहतो, निर्वासित वेदनांच्या गोंगाटात दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत, माझी कविता एकाकी असते. फारच छान. खूप आवडले. (एकाकी)बेसनलाडू

निशांत_खाडे 24/02/2016 - 22:48
वर्तमानपत्री लेखकांची मराठी भाषेत खूपच गर्दी झालेली आहे धुक्यात लपेटलेल्या रस्त्यावरुन कवितेला बिलगुन चालतांना कोणताच विचार मला सुचत नाही. ऐनिलिसिस करता येत नाही गुदमरलेल्या श्वासांचा. हेहेहे... फक्त यमक आणि अर्थ नसलेली कडवी एकत्र करून कविता होत नाही महाशय!

चतुरंग 05/07/2008 - 04:23
अथक भरुन आलेल्या आभाळाने स्वत:चेच वजन असह्य होऊन बेधुंद कोसळणार्‍या पावसाच्या रुपाने जमिनीवर धाव घ्यावी तशी, बिरुटे साहेबांच्या काव्य प्रतिभेने मिपावर धाव घेतली!! :) छान मुक्तछंद साधलाय प्रा.डॉ. अजून कविता येऊदेत. चतुरंग

डॉ.दिलीपजी, वैचारिक मनस्ताप जेव्हा अहंकाराला डिवचतो त्याच वेळी अश्या कवितेची निर्मीती होते. स्वानुभव www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

अरुण मनोहर 05/07/2008 - 08:14
कविता आपोआपच झरते. झरते तेव्हा एकाकीच असते. त्या झर्‍याचा झुळझुळ आवाज ऐकून पांथस्थ येतात आणि तृप्त होऊन जातात.

विसोबा खेचर 05/07/2008 - 08:24
बिरुटेसाहेब, लै भारी कविता केली आहे राव तुम्ही! आशय जबर्‍या आहे... कविता खूप आवडली. अजूनही लिहा बिरुटेशेठ! अगदी भरभरून...! आपला, (प्राध्यापक बिरुट्यांचा विद्यार्थी) तात्या.

सहज 05/07/2008 - 08:45
प्रयत्नही करुनही समजत नाही कविता तेव्हा होणारा निर्मळ आनंद माझ्या आयुष्याला सुखावतो. ही मंगलता बहरत जाते, अनंत काळापर्यंत. सुखाने लपेटलेल्या आयुष्यातुन कवितेला लाथाडून चालतांना एकदा तरी विचार घोळुन जातोच ह्या गुदमरवणार्‍या कविंचे काय करायचे? अजुन सुख गोळा करुन आल्यावर मीच मला समजावतो रंजले, गांजले, रोगी पिडीत, पछाडीत व इतर सगळ्यांची काळजी घेणारेय वेलूचे मनोगत, तात्याबाचा मिपा तु लेका निवांत रहा..

In reply to by सहज

सहजा, असा बदला घेतला तर :) प्रयत्नही करुनही समजत नाही कविता तेव्हा होणारा निर्मळ आनंद माझ्या आयुष्याला सुखावतो. ही मंगलता बहरत जाते, अनंत काळापर्यंत. अरे, मग काय कवींनी कविताच करु नये. कोणी कविता करुन सुख मिळवतो कोणी अलिप्त राहुन !!! सुखाने लपेटलेल्या आयुष्यातुन कवितेला लाथाडून चालतांना एकदा तरी विचार घोळुन जातोच ह्या गुदमरवणार्‍या कविंचे काय करायचे? कविंना माफ कर !!! अजुन सुख गोळा करुन आल्यावर मीच मला समजावतो रंजले, गांजले, रोगी पिडीत, पछाडीत व इतर सगळ्यांची काळजी घेणारेय वेलूचे मनोगत, तात्याबाचा मिपा तु लेका निवांत रहा.. दोस्ता एकवेळ निवांत राहता येईल, वेदनेपासून अलिप्त नाही !!!

एकलव्य 05/07/2008 - 09:37
अहो सर - अर्थ पोहचला... पण मला विचाराल तर तुम्ही साधे सरळ लिहिता तेव्हा शब्द आणि गोडी मनात तासनतास गुणगुणत राहते. (अकव्य)लव्य

II राजे II 05/07/2008 - 10:41
काय लिहू !! मस्त वेदना व्यक्त झाल्या आहेत... छान कविता.... स्वगतः राजे आपले एक एक मित्र ह्या कवितारोगामुळे अस्वस्थ आहेत... त्यां सर्वांना लवकर आराम मिळो अशी प्रार्थना करावयास हवी आपल्याला ! बेचारी काल यशो ह्या रोगाची बळी होती... आज सर देखील ..... वाईट वाटतं .. असे मोठ मोठे लेखक अचानक चार ओळीच्या कविता करतात तेव्हा ;) राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

विसुनाना 05/07/2008 - 11:44
निर्वासित वेदनांच्या गोंगाटात दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत, माझी कविता एकाकी असते. या ओळी खास आहेत.

धनंजय 05/07/2008 - 16:59
झपाटणारी कल्पना आहे, पण तिला मूर्त करायला समर्थ शब्द नाहीत. अशी घालमेल चितारली आहे बिरुटेसरंनी. त्या अस्वस्थतेतून आणखी स्फुरण येत राहो!

नारदाचार्य 05/07/2008 - 23:06
... करून जाणारी रचना... अभिनंदन... बर्‍याच काळानं मुक्तछंदात काही चांगलं वाचायला मिळालं... अधिक मागणी करीत नाही. कारण हा मागणी तसा पुरवठा यातला प्रकार नाही.

निर्वासित वेदनांच्या गोंगाटात दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत, माझी कविता एकाकी असते. क्या बात है!!! मस्त!!!!

बेसनलाडू 07/07/2008 - 11:04
ऐनिलिसिस करता येत नाही गुदमरलेल्या श्वासांचा. आभाळ भरुन आल्यावर मी डोकावून पाहतो, निर्वासित वेदनांच्या गोंगाटात दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत, माझी कविता एकाकी असते. फारच छान. खूप आवडले. (एकाकी)बेसनलाडू

निशांत_खाडे 24/02/2016 - 22:48
वर्तमानपत्री लेखकांची मराठी भाषेत खूपच गर्दी झालेली आहे धुक्यात लपेटलेल्या रस्त्यावरुन कवितेला बिलगुन चालतांना कोणताच विचार मला सुचत नाही. ऐनिलिसिस करता येत नाही गुदमरलेल्या श्वासांचा. हेहेहे... फक्त यमक आणि अर्थ नसलेली कडवी एकत्र करून कविता होत नाही महाशय!
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
प्रयत्नही करुनही जमत नाही कविता तेव्हा होणारा वैचारिक मनस्ताप माझ्या अहंकाराला डिवचतो. ही अस्वस्थता कोसळत जाते, तिन्ही सांजेला. धुक्यात लपेटलेल्या रस्त्यावरुन कवितेला बिलगुन चालतांना कोणताच विचार मला सुचत नाही. ऐनिलिसिस करता येत नाही गुदमरलेल्या श्वासांचा. आभाळ भरुन आल्यावर मी डोकावून पाहतो, निर्वासित वेदनांच्या गोंगाटात दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत, माझी कविता एकाकी असते.

आता कशाला उद्दयाची बात

श्रीकृष्ण सामंत ·

सहज 25/06/2008 - 22:20
सामंत साहेब आज न लिहता उद्या लिहले असते तरी चालले असते!! ;-) आज उद्या कधीतरी इतर लोकांना प्रतिसाद द्या मग परवापासुन परत लेख, कविता लिहा. कृ. ह. घ्या.

In reply to by सहज

उद्दाचा उद्दया म्हणजेच तुमच्या भाषेत "परवा" ते तर मी करीतच आहे www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर 28/06/2008 - 08:32
काल, आज, उद्या? अहो काय ह्या कोलांट्या उड्या लावल्या आहेत? तुम्हाला नक्की म्हणायचं काय आहे ते कालही कळलं नव्हतं, आजही कळत नाहीये आणि उद्याही बहुदा कळणार नाही! :) आपला, (फक्त कालचा अन् आजचा, उद्याचं माहीत नसलेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नमस्कार तात्याराव, म्हणूनच मी फक्त एव्हडंच म्हणत आहे "आता कशाल उद्दाची बात" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

शेख-स्पिअर साहेब, प्याले रिचवून कविता सुचण्याचे दिवस आता गेले साहेब. एव्हडं खरं माझी ही कविता एकदा वाचून पिल्या सारखं कदाचीत वाटावं. किंवा पिऊन ही कविता एकदा वाचल्यावर "त्यापेक्षा आणखी एक पेला बरा" असंही वाटणं संभवतं. कविता सुचण्यासाठी प्याले रिचविण्याचे निमीत्त करणं हे काही खरं नाही बघा! मी स्वतः मात्र "सुपारीचं खांड" पण खात नाही.पेले कुठून रिचविणार सांगा? www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

अभिज्ञ 30/06/2008 - 22:44
किती प्याले रिचवल्यावर अश्या कविता सुचतात? :( सामंतजी, आपण काय करावे आणि काय करु नये हे सांगायचा मला काहिहि अधिकार नाहि. तरिहि एक गोष्ट खटकली ती सांगाविशी वाटते, आपले इथे बरेच लेखन आढळले,किमान तीस धाग्यांवर आपल्या प्रतिक्रिया आहेत. अन त्यातले २८ धागे हे आपणच सुरु केलेले आहेत.फ़ार क्वचित आपण इतर विषयांना प्रतिसाद देताना दिसता. इथे लिहिणारा प्रत्येकजण हा बाकिच्यांच्या लिखाणावर ब-या वाइट का होइना प्रतिक्रिया देताना आढळतो. तसा प्रकार आपल्या बाबतीत घडताना दिसत नाहि. इथे बाकिच्यांना प्रतिक्रिया लिहायलाच पाहिजे असा काहि नियम वगैरे नाहि..नसावा.... परंतु इथला एक नियमित वाचक म्हणून हि बाब खटकली,म्हणुनच ह्या प्रतिक्रियेचा खटाटोप. असो, तात्या,ह्या प्रतिक्रियेत काहि वावगे आढळल्यास ती जरुर उडवून लावावी,हि विनंती. अभिज्ञ

In reply to by अभिज्ञ

विसोबा खेचर 30/06/2008 - 23:45
अभिज्ञराव, तात्या,ह्या प्रतिक्रियेत काहि वावगे आढळल्यास ती जरुर उडवून लावावी,हि विनंती. आपल्या प्रतिक्रियेत काही वावगं असेल तर ते इतकंच की आपल्या प्रतिसादाचा 'आता कशाला उद्याची बात...' या कवितेशी काहीही संबंध नाही. ते विषयांतर वाटते व आपण आपले मत सामंतसाहेबांना पोष्टकार्ड पाठवून कळवायला हवे होतेत! असो, बाकी मी आपल्याशी पूर्ण सहमत आहे. परंतु सोडून द्या! कुणाला प्रतिक्रिया द्यायची किंवा नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. शिवाय, अहो असतो एकेकाचा कुणालाही दाद न देण्याचा स्वभाव! त्याला काय इलाज? किंबहुना, मिपावरील इतर बरेचसे लेखन हे सामंतसाहेबांना कुठलीच बरीवाईट दाद देण्याच्या लायकीचे वाटत नसेल! कारणं अनेक असू शकतात... असो, आपला, (विश्लेषक) तात्या.

In reply to by अभिज्ञ

अभिज्ञजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.आपलं ऑबझरवेशन खरं आहे,आपल्याला खटकण्याजोग आहे,आणि आपल्या प्रतिक्रियेचा खटाटोप अगदी योग्य आहे. त्याचं असं आहे,मला ह्या संस्थळावर येवून अवघे एक दोन आठवडे झाले असतील.ह्या बहुचर्चीत संस्थाळावर मी एव्हडा रमून जाण्याचं मुख्य कारण माझ्या कविता अथवा लेखावर एव्हड्या अंतःकरणापासून लिहिलेल्या प्रतिक्रिया येतात की माझा मीच त्या वाचून आणि त्याला उत्तर देवून हरवून जातो. आता पावेतो मी माझ्या लेखनावरच्या प्रतिक्रियेचा सूर,नूर आणि किती धूर होतो ते निरखून पहात आणि वाचत होतो. मी या संस्थाळावरचे लेखन वाचत नाही असं नाही.पण एव्हडं खरं की जात्याच मी टिका केलीच पाहिजे म्हणून करायला उद्दयुक्त होत नाही.याचा अर्थ इतर तसं करतात असं मला मुळीच म्हणायचं नाही,नव्हे तर मला ते तंत्र कदाचीत जमत नसावं.पण मनाला अत्यंत भावलेलं एखाद्दा लेखनाचं भरभरून प्रशंसा करायला मागे पुढे पहात नाही. आता इथे आल्यावर जरा सराव झाल्याने बघुया कसं जमतं ते. तात्यांचं टिकास्त्र,डॉ,दिलीपजीचं मार्गदर्शन,फटू,बेसनलाडू,आपल्या सारखे अभिज्ञ यांच्या सुचना,अरूण मनोहर,सहज,राजे,शितल,विजूभाऊ,मदनबाण,पक्या,धृव,वैशाली हसबनीस,विश्वजीत,मयुरे लपते,चतुरंग,प्राजु,शेखर,यशोधरा,चाणाक्य,रुपेश आणि -कुणी चुकलं असेल तर ते अवधाने असं समजू नये- वगैरेची प्रशंसा त्याशिवाय आणखी किती तरी लोकांच्या प्रतिक्रिया वाचून लेखन करायला स्फुर्ति येते हे मात्र नक्कीच. वेळात वेळ काढून माझी पण प्रतिक्रिया देण्याचा मी प्रयत्न करीन. "किंबहुना, मिपावरील इतर बरेचसे लेखन हे सामंतसाहेबांना कुठलीच बरीवाईट दाद देण्याच्या लायकीचे वाटत नसेल!" असा चुकून सुद्धा विचार माझ्या मनात येणं म्हणजे पाप होईल. अहो लेखन ही निर्मिती आहे.अशी माझी धारणा आहे. आणि प्रत्येक लेखाचा मला आदर आहे. मीच माझ्या एका कवितेत म्हणतो " प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे" आपल्या सगळ्यांचा माझ्यावर कृपालोभ,कृपादृष्टी आणि लेखनावर वक्रदृष्टी ठेवून सुद्धा माझ्या वर लोभ असावा हीच विनंती. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

सहज 25/06/2008 - 22:20
सामंत साहेब आज न लिहता उद्या लिहले असते तरी चालले असते!! ;-) आज उद्या कधीतरी इतर लोकांना प्रतिसाद द्या मग परवापासुन परत लेख, कविता लिहा. कृ. ह. घ्या.

In reply to by सहज

उद्दाचा उद्दया म्हणजेच तुमच्या भाषेत "परवा" ते तर मी करीतच आहे www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर 28/06/2008 - 08:32
काल, आज, उद्या? अहो काय ह्या कोलांट्या उड्या लावल्या आहेत? तुम्हाला नक्की म्हणायचं काय आहे ते कालही कळलं नव्हतं, आजही कळत नाहीये आणि उद्याही बहुदा कळणार नाही! :) आपला, (फक्त कालचा अन् आजचा, उद्याचं माहीत नसलेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नमस्कार तात्याराव, म्हणूनच मी फक्त एव्हडंच म्हणत आहे "आता कशाल उद्दाची बात" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

शेख-स्पिअर साहेब, प्याले रिचवून कविता सुचण्याचे दिवस आता गेले साहेब. एव्हडं खरं माझी ही कविता एकदा वाचून पिल्या सारखं कदाचीत वाटावं. किंवा पिऊन ही कविता एकदा वाचल्यावर "त्यापेक्षा आणखी एक पेला बरा" असंही वाटणं संभवतं. कविता सुचण्यासाठी प्याले रिचविण्याचे निमीत्त करणं हे काही खरं नाही बघा! मी स्वतः मात्र "सुपारीचं खांड" पण खात नाही.पेले कुठून रिचविणार सांगा? www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

अभिज्ञ 30/06/2008 - 22:44
किती प्याले रिचवल्यावर अश्या कविता सुचतात? :( सामंतजी, आपण काय करावे आणि काय करु नये हे सांगायचा मला काहिहि अधिकार नाहि. तरिहि एक गोष्ट खटकली ती सांगाविशी वाटते, आपले इथे बरेच लेखन आढळले,किमान तीस धाग्यांवर आपल्या प्रतिक्रिया आहेत. अन त्यातले २८ धागे हे आपणच सुरु केलेले आहेत.फ़ार क्वचित आपण इतर विषयांना प्रतिसाद देताना दिसता. इथे लिहिणारा प्रत्येकजण हा बाकिच्यांच्या लिखाणावर ब-या वाइट का होइना प्रतिक्रिया देताना आढळतो. तसा प्रकार आपल्या बाबतीत घडताना दिसत नाहि. इथे बाकिच्यांना प्रतिक्रिया लिहायलाच पाहिजे असा काहि नियम वगैरे नाहि..नसावा.... परंतु इथला एक नियमित वाचक म्हणून हि बाब खटकली,म्हणुनच ह्या प्रतिक्रियेचा खटाटोप. असो, तात्या,ह्या प्रतिक्रियेत काहि वावगे आढळल्यास ती जरुर उडवून लावावी,हि विनंती. अभिज्ञ

In reply to by अभिज्ञ

विसोबा खेचर 30/06/2008 - 23:45
अभिज्ञराव, तात्या,ह्या प्रतिक्रियेत काहि वावगे आढळल्यास ती जरुर उडवून लावावी,हि विनंती. आपल्या प्रतिक्रियेत काही वावगं असेल तर ते इतकंच की आपल्या प्रतिसादाचा 'आता कशाला उद्याची बात...' या कवितेशी काहीही संबंध नाही. ते विषयांतर वाटते व आपण आपले मत सामंतसाहेबांना पोष्टकार्ड पाठवून कळवायला हवे होतेत! असो, बाकी मी आपल्याशी पूर्ण सहमत आहे. परंतु सोडून द्या! कुणाला प्रतिक्रिया द्यायची किंवा नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. शिवाय, अहो असतो एकेकाचा कुणालाही दाद न देण्याचा स्वभाव! त्याला काय इलाज? किंबहुना, मिपावरील इतर बरेचसे लेखन हे सामंतसाहेबांना कुठलीच बरीवाईट दाद देण्याच्या लायकीचे वाटत नसेल! कारणं अनेक असू शकतात... असो, आपला, (विश्लेषक) तात्या.

In reply to by अभिज्ञ

अभिज्ञजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.आपलं ऑबझरवेशन खरं आहे,आपल्याला खटकण्याजोग आहे,आणि आपल्या प्रतिक्रियेचा खटाटोप अगदी योग्य आहे. त्याचं असं आहे,मला ह्या संस्थळावर येवून अवघे एक दोन आठवडे झाले असतील.ह्या बहुचर्चीत संस्थाळावर मी एव्हडा रमून जाण्याचं मुख्य कारण माझ्या कविता अथवा लेखावर एव्हड्या अंतःकरणापासून लिहिलेल्या प्रतिक्रिया येतात की माझा मीच त्या वाचून आणि त्याला उत्तर देवून हरवून जातो. आता पावेतो मी माझ्या लेखनावरच्या प्रतिक्रियेचा सूर,नूर आणि किती धूर होतो ते निरखून पहात आणि वाचत होतो. मी या संस्थाळावरचे लेखन वाचत नाही असं नाही.पण एव्हडं खरं की जात्याच मी टिका केलीच पाहिजे म्हणून करायला उद्दयुक्त होत नाही.याचा अर्थ इतर तसं करतात असं मला मुळीच म्हणायचं नाही,नव्हे तर मला ते तंत्र कदाचीत जमत नसावं.पण मनाला अत्यंत भावलेलं एखाद्दा लेखनाचं भरभरून प्रशंसा करायला मागे पुढे पहात नाही. आता इथे आल्यावर जरा सराव झाल्याने बघुया कसं जमतं ते. तात्यांचं टिकास्त्र,डॉ,दिलीपजीचं मार्गदर्शन,फटू,बेसनलाडू,आपल्या सारखे अभिज्ञ यांच्या सुचना,अरूण मनोहर,सहज,राजे,शितल,विजूभाऊ,मदनबाण,पक्या,धृव,वैशाली हसबनीस,विश्वजीत,मयुरे लपते,चतुरंग,प्राजु,शेखर,यशोधरा,चाणाक्य,रुपेश आणि -कुणी चुकलं असेल तर ते अवधाने असं समजू नये- वगैरेची प्रशंसा त्याशिवाय आणखी किती तरी लोकांच्या प्रतिक्रिया वाचून लेखन करायला स्फुर्ति येते हे मात्र नक्कीच. वेळात वेळ काढून माझी पण प्रतिक्रिया देण्याचा मी प्रयत्न करीन. "किंबहुना, मिपावरील इतर बरेचसे लेखन हे सामंतसाहेबांना कुठलीच बरीवाईट दाद देण्याच्या लायकीचे वाटत नसेल!" असा चुकून सुद्धा विचार माझ्या मनात येणं म्हणजे पाप होईल. अहो लेखन ही निर्मिती आहे.अशी माझी धारणा आहे. आणि प्रत्येक लेखाचा मला आदर आहे. मीच माझ्या एका कवितेत म्हणतो " प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे" आपल्या सगळ्यांचा माझ्यावर कृपालोभ,कृपादृष्टी आणि लेखनावर वक्रदृष्टी ठेवून सुद्धा माझ्या वर लोभ असावा हीच विनंती. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आज कालचा उद्दया असतो आणि आज उद्दयाचा काल असतो मग उद्दया जेव्हा ’आज’ होईल आणि ’आज’ त्याचा ’काल’ होईल तेव्हा त्या उद्दयाच्या उद्दयाला ’आजचा’ ’उद्दयाच’ म्हटलं जाईल आता आज जे होत राहिलंय त्याचं काल म्हणून होत जाणार जे उद्दया म्हणून होणार आहे त्याला आज म्हणून म्हटलं जाणार म्हणून “आता कशाला उद्दयाची बात बघ उडुनी चालली रात भर भरूनी पिऊ रस रंग नऊ चल बुडुनी जाऊ रंगात” हे माणूस सिनेमातलं गोड गाणं शांताबाई हुबळीकरांच्या तोंडून ऐकून मजा यायची. श्रीकृष्ण सामंत