मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुमचा ज्योतिष्यावर विश्वास आहे का? [गुप्त मतदान]

सुशील ·

In reply to by प्रकाश घाटपांडे

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/17/2008 - 20:57
एका उत्तम लेखाची निर्मिती केल्याबद्दल आणि त्याची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. आपण हौशी/व्यावसायिक खगोलशास्त्रज्ञ / भौतिकशास्त्रज्ञ आहात का?

राजेश Mon, 06/09/2008 - 11:59
माझा विश्वास नाही. >>ज्यांना या तीन पर्यायापेक्षा वेगळे मत नोंदवायचे असेल त्यांचे काय? या बद्दल सहमत आहे. राजेश

In reply to by राजेश

बगाराम Mon, 06/09/2008 - 20:24
ह्यांच्याशी सहमत. माझाही अजिबात विश्वास नाही पण वेगळा पर्याय हवा होता.

एक Mon, 06/09/2008 - 22:16
"हो माझा पुर्ण विश्वास आहे आणि मी तसे उघडपणे सांगतो " माझा विश्वास आहे आणि मी तो उघडपणे सांगतो. पण मग "गुप्त मतदान" का? हे थोडंसं खटकतं. बहुतेक गुप्त मतदान पद्धत पर्याय नं.२ निवडणार्‍या भेकडांसाठी असेल. काही लोकांना "भेकड" हा शब्द तीव्र वाटत असेल पण आमच्या पिताश्रींकडे असली लोकं यायची.. बाहेर शास्त्रज्ञ किंवा वकील वर्तुळात ज्योतीषाची थट्टा करतील आणि हळूच एका संध्याकाळी पत्रिका घेवून घरी येतील. -ज्योतीषावर पूर्ण विश्वास असलेला.

माझा पूर्ण विश्वास आहे, आणि अनुभवही आहेत. कोणाचा नसेल तर धोंडोपंतांना भेटा, मिसळपावचे सदस्यही आहेत ते. ज्योतिष-शास्त्रातले खूप ज्ञानी आहेत ते, तुमचे गैरसमज दूर करतील, त्यांच्या ब्लॉगावरही खूप छान माहिती आहे.

हेरंब Fri, 07/04/2008 - 22:18
कारण मला प्रत्यक्ष अनुभव आलेले आहेत, तसेच प्रत्येक गोष्ट तपासून पहाणार्‍या एका थोर शास्त्रज्ञाशी त्यांच्या अनुभवांबद्दल चर्चा केल्यावर आणखी विश्वास बसला. पण तरीही सगळे भविष्य अचूक येत नाही, कारण ..... हे शास्त्र पूर्ण विकसित झालेले नाही, त्यांत हल्ली फार लबाड व ढोंगी लोक शिरले आहेत.

विजुभाऊ Sat, 07/05/2008 - 12:00
त्यांत हल्ली फार लबाड व ढोंगी लोक शिरले आहेत. हेच खरे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर Sun, 07/06/2008 - 18:00
आयुष्यात 'पोपटाला' इतके महत्व देणे अयोग्यच...! हा हा हा! :) स्वगत : प्रभाकर, तू काही सुधारायचा नाहीस! :) आपला, (पोपटप्रेमी) तात्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

पिवळा डांबिस Sun, 07/06/2008 - 20:17
आयुष्यात 'पोपटाला' इतके महत्व देणे अयोग्यच...! असं कसं म्हणता प्रभाकरजी? त्याला महत्व दिलं नाही तर मग आयुष्यात जगण्यासारखं राहिलंच काय?:) "अगर पोपट उपाशी, तो जिंदगीकी काशी...." -दाम्बिस लुधियानवी

In reply to by पिवळा डांबिस

धनंजय Sun, 07/06/2008 - 20:22
दुसर्‍याच्या पोपटावर फार विश्वास ठेवू नये, असे त्यांचे म्हणणे असावे. स्वतःच्या ताब्यातल्या पोपटाला काय जमते, काय जमत नाही, ते तर आपल्याला पूर्ण माहीत असते.

विकि Sun, 07/06/2008 - 00:26
अजकाल खर्‍याखुर्‍या माणसांवर विश्वास ठेवता येत नाही तिथे माणसानेच तयार केलेल्या ज्योतिषावर कसा विश्वस ठेवणार. आपला कॉ.विकि

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/17/2008 - 20:53
ज्योतिषशास्त्र म्हणजे (आकाशातील) ज्योतींचे म्हणजे ग्रह, तारे, दीर्घिका इत्यादींचे शास्त्र! आणि या अर्थाने मी त्याबद्दल काही बोलणार नाही कारण अस्मदिकांनी त्याच विषयात डिग्री घेतली आहे, ते पण पोस्टल कोर्स नाही प्रत्यक्ष विद्यापीठात राहून! (संदर्भः माहिती नसणारा माणूस संबंधित विषयाबद्दल फार बोलतो आणि माहिती असणारा माणूस गप्प बसतो असं कोणा मोठ्या तत्वज्ञाने म्हटले आहे. मला थोडी माहिती आहे आणि मी संपूर्णपणे मनुष्याजातीत मोडते.) मला वाटतं सुशीलना फलज्योतिष म्हणायचं आहे. वैयक्तिक मतः फलज्योतिषाचा माझा अभ्यास नाही आणि भविष्य-भूत याचं गणित हे लोकं कसं करतात मला माहित नाही (म्हणूनच मी मतं मांडणार). ते एक प्रकारची सांख्यिकी (स्टॅटीस्टीक्स) असू शकतं. (कारण आपल्यापासून ज्या खगोलीय वस्तूंची अंतरं अनेक कोटी किलोमीटरपेक्षाही जास्त आहेत त्यांचा आपल्यावर काडीमात्र परीणाम होतो हे मला तर्कविसंगत वाटतं.) पण अमूक एक मंत्र वाचला की तुम्हाला फाश्ट इंटरनेट मिळेल अशा (अमूक केलं तर फलाणं मिळेल अशा प्रकारच्या) गोष्टी मात्र तद्दन खोट्या वाटतात. आकाशात अमूक एका प्रकारे ग्रहांची स्थिती असेल तर दुष्काळ पडेल अशी अनुमानं सांख्यिकीच्या आधारे काढता येतील. ती समजा ६६% वेळा बिनचूक असतील. (मी ६६% हा आकडा सांख्यिकीवर आधारीत संकल्पनांमधूनच घेतला आहे.) पण तरीही प्रश्न असा आहे की उरलेल्या ३४% (किंवा ९७% वेळा बरोबर - ३% वेळा चूक) चं काय? दुसरा मला पडलेला प्रश्न असा आहे की समजा मानूया की ९९% वेळा हे अंदाज बिनचूक असतात. पण हे "शास्त्र" विकसित केलं तेव्हाची आपल्या ग्रहावरची (राजकीय, भौगोलिक, वातावरण इ.) स्थिती आणि आजची स्थिती यांत जमीन अस्मानाचा फरक आहे. तर ते तेव्हाचे ठोकताळे आजच्या परिस्थीतीमधे लागू होतात का? माझा काही या भविष्यावर विश्वास नाही, बिलकुल नाही. मला एका कडक/सॉलिड्/भारी ज्योतिष्यानी सांगितलं होतं, मी कधी फॉरीनला जाणार नाही. आणि आत्तापर्यंत मी ७-८ फॉरीनं बघून आले आहे. हे फक्त एक उदाहरण. ही घटना झाली नसती तरीही मी फलज्योतिषावर विश्वास ठेवत नाही आणि ठेवणारही नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/17/2008 - 20:57
एका उत्तम लेखाची निर्मिती केल्याबद्दल आणि त्याची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. आपण हौशी/व्यावसायिक खगोलशास्त्रज्ञ / भौतिकशास्त्रज्ञ आहात का?

राजेश Mon, 06/09/2008 - 11:59
माझा विश्वास नाही. >>ज्यांना या तीन पर्यायापेक्षा वेगळे मत नोंदवायचे असेल त्यांचे काय? या बद्दल सहमत आहे. राजेश

In reply to by राजेश

बगाराम Mon, 06/09/2008 - 20:24
ह्यांच्याशी सहमत. माझाही अजिबात विश्वास नाही पण वेगळा पर्याय हवा होता.

एक Mon, 06/09/2008 - 22:16
"हो माझा पुर्ण विश्वास आहे आणि मी तसे उघडपणे सांगतो " माझा विश्वास आहे आणि मी तो उघडपणे सांगतो. पण मग "गुप्त मतदान" का? हे थोडंसं खटकतं. बहुतेक गुप्त मतदान पद्धत पर्याय नं.२ निवडणार्‍या भेकडांसाठी असेल. काही लोकांना "भेकड" हा शब्द तीव्र वाटत असेल पण आमच्या पिताश्रींकडे असली लोकं यायची.. बाहेर शास्त्रज्ञ किंवा वकील वर्तुळात ज्योतीषाची थट्टा करतील आणि हळूच एका संध्याकाळी पत्रिका घेवून घरी येतील. -ज्योतीषावर पूर्ण विश्वास असलेला.

माझा पूर्ण विश्वास आहे, आणि अनुभवही आहेत. कोणाचा नसेल तर धोंडोपंतांना भेटा, मिसळपावचे सदस्यही आहेत ते. ज्योतिष-शास्त्रातले खूप ज्ञानी आहेत ते, तुमचे गैरसमज दूर करतील, त्यांच्या ब्लॉगावरही खूप छान माहिती आहे.

हेरंब Fri, 07/04/2008 - 22:18
कारण मला प्रत्यक्ष अनुभव आलेले आहेत, तसेच प्रत्येक गोष्ट तपासून पहाणार्‍या एका थोर शास्त्रज्ञाशी त्यांच्या अनुभवांबद्दल चर्चा केल्यावर आणखी विश्वास बसला. पण तरीही सगळे भविष्य अचूक येत नाही, कारण ..... हे शास्त्र पूर्ण विकसित झालेले नाही, त्यांत हल्ली फार लबाड व ढोंगी लोक शिरले आहेत.

विजुभाऊ Sat, 07/05/2008 - 12:00
त्यांत हल्ली फार लबाड व ढोंगी लोक शिरले आहेत. हेच खरे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर Sun, 07/06/2008 - 18:00
आयुष्यात 'पोपटाला' इतके महत्व देणे अयोग्यच...! हा हा हा! :) स्वगत : प्रभाकर, तू काही सुधारायचा नाहीस! :) आपला, (पोपटप्रेमी) तात्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

पिवळा डांबिस Sun, 07/06/2008 - 20:17
आयुष्यात 'पोपटाला' इतके महत्व देणे अयोग्यच...! असं कसं म्हणता प्रभाकरजी? त्याला महत्व दिलं नाही तर मग आयुष्यात जगण्यासारखं राहिलंच काय?:) "अगर पोपट उपाशी, तो जिंदगीकी काशी...." -दाम्बिस लुधियानवी

In reply to by पिवळा डांबिस

धनंजय Sun, 07/06/2008 - 20:22
दुसर्‍याच्या पोपटावर फार विश्वास ठेवू नये, असे त्यांचे म्हणणे असावे. स्वतःच्या ताब्यातल्या पोपटाला काय जमते, काय जमत नाही, ते तर आपल्याला पूर्ण माहीत असते.

विकि Sun, 07/06/2008 - 00:26
अजकाल खर्‍याखुर्‍या माणसांवर विश्वास ठेवता येत नाही तिथे माणसानेच तयार केलेल्या ज्योतिषावर कसा विश्वस ठेवणार. आपला कॉ.विकि

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/17/2008 - 20:53
ज्योतिषशास्त्र म्हणजे (आकाशातील) ज्योतींचे म्हणजे ग्रह, तारे, दीर्घिका इत्यादींचे शास्त्र! आणि या अर्थाने मी त्याबद्दल काही बोलणार नाही कारण अस्मदिकांनी त्याच विषयात डिग्री घेतली आहे, ते पण पोस्टल कोर्स नाही प्रत्यक्ष विद्यापीठात राहून! (संदर्भः माहिती नसणारा माणूस संबंधित विषयाबद्दल फार बोलतो आणि माहिती असणारा माणूस गप्प बसतो असं कोणा मोठ्या तत्वज्ञाने म्हटले आहे. मला थोडी माहिती आहे आणि मी संपूर्णपणे मनुष्याजातीत मोडते.) मला वाटतं सुशीलना फलज्योतिष म्हणायचं आहे. वैयक्तिक मतः फलज्योतिषाचा माझा अभ्यास नाही आणि भविष्य-भूत याचं गणित हे लोकं कसं करतात मला माहित नाही (म्हणूनच मी मतं मांडणार). ते एक प्रकारची सांख्यिकी (स्टॅटीस्टीक्स) असू शकतं. (कारण आपल्यापासून ज्या खगोलीय वस्तूंची अंतरं अनेक कोटी किलोमीटरपेक्षाही जास्त आहेत त्यांचा आपल्यावर काडीमात्र परीणाम होतो हे मला तर्कविसंगत वाटतं.) पण अमूक एक मंत्र वाचला की तुम्हाला फाश्ट इंटरनेट मिळेल अशा (अमूक केलं तर फलाणं मिळेल अशा प्रकारच्या) गोष्टी मात्र तद्दन खोट्या वाटतात. आकाशात अमूक एका प्रकारे ग्रहांची स्थिती असेल तर दुष्काळ पडेल अशी अनुमानं सांख्यिकीच्या आधारे काढता येतील. ती समजा ६६% वेळा बिनचूक असतील. (मी ६६% हा आकडा सांख्यिकीवर आधारीत संकल्पनांमधूनच घेतला आहे.) पण तरीही प्रश्न असा आहे की उरलेल्या ३४% (किंवा ९७% वेळा बरोबर - ३% वेळा चूक) चं काय? दुसरा मला पडलेला प्रश्न असा आहे की समजा मानूया की ९९% वेळा हे अंदाज बिनचूक असतात. पण हे "शास्त्र" विकसित केलं तेव्हाची आपल्या ग्रहावरची (राजकीय, भौगोलिक, वातावरण इ.) स्थिती आणि आजची स्थिती यांत जमीन अस्मानाचा फरक आहे. तर ते तेव्हाचे ठोकताळे आजच्या परिस्थीतीमधे लागू होतात का? माझा काही या भविष्यावर विश्वास नाही, बिलकुल नाही. मला एका कडक/सॉलिड्/भारी ज्योतिष्यानी सांगितलं होतं, मी कधी फॉरीनला जाणार नाही. आणि आत्तापर्यंत मी ७-८ फॉरीनं बघून आले आहे. हे फक्त एक उदाहरण. ही घटना झाली नसती तरीही मी फलज्योतिषावर विश्वास ठेवत नाही आणि ठेवणारही नाही.

आमची एक अप्रकाशित कविता...

शेखस्पिअर ·

बेसनलाडू Sun, 06/08/2008 - 23:01
मस्त! (आनंदित)बेसनलाडू याला विडंबन म्हणावे काय? जाणकार मिपाकरांनी प्रकाश टाकल्यास उत्तम :) (पृच्छक)बेसनलाडू

फटू Mon, 06/09/2008 - 02:35
अशी भीती नका दाखवू हो... 'लग्न' या कल्पनेनंच आमचं अंग अंग मोहरून जातं... आणि तुम्ही अशी भीती दाखवलीत तर कसं व्हायचं... शेखस्पिअरराव, बाकी झकास लिहिलंय तुम्ही... (तुमच्या कवितेला विडंबन म्हणावे की नाही या बुचकळ्यात पडलेला) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चतुरंग Mon, 06/09/2008 - 02:51
आपले निधड्या छातीचे शूर विडंबन आवडले! ;) (स्वगत - हा सरदार गेली कित्येक वर्ष लढतोय! सगळ्याच लढाया जिंकण्यासाठी लढत नाहीत काहीत हरण्यातही मजा असते! ;) ) चतुरंग

अजय जोशी Mon, 06/09/2008 - 12:25
लग्नापायी स्वातंत्र्याची मोजू किंमत भारी... मी असं ऐकलंय, लग्न हे आलेलं दु:ख नसतं, तर स्विकारलेलं दु:ख असतं .. आणि ... लग्नानंतर जे खांद्यावर येतं ते उचललेलं दु:ख असतं. (आपला पुणेरी) अ. अ. जोशी

वरदा Mon, 06/09/2008 - 18:32
विडंबन म्हणून चांगलं आहे सगळ्याच लढाया जिंकण्यासाठी लढत नाहीत काहीत हरण्यातही मजा असते! हे सगळ्यात खरं

कवटी गुरुवार, 06/12/2008 - 12:31
झकास जमलय. अवांतरः हे तुमच्या लग्नाआगोदर लिहिलय की लग्नानंतर हो? (ह.घ्या.)

बेसनलाडू Sun, 06/08/2008 - 23:01
मस्त! (आनंदित)बेसनलाडू याला विडंबन म्हणावे काय? जाणकार मिपाकरांनी प्रकाश टाकल्यास उत्तम :) (पृच्छक)बेसनलाडू

फटू Mon, 06/09/2008 - 02:35
अशी भीती नका दाखवू हो... 'लग्न' या कल्पनेनंच आमचं अंग अंग मोहरून जातं... आणि तुम्ही अशी भीती दाखवलीत तर कसं व्हायचं... शेखस्पिअरराव, बाकी झकास लिहिलंय तुम्ही... (तुमच्या कवितेला विडंबन म्हणावे की नाही या बुचकळ्यात पडलेला) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चतुरंग Mon, 06/09/2008 - 02:51
आपले निधड्या छातीचे शूर विडंबन आवडले! ;) (स्वगत - हा सरदार गेली कित्येक वर्ष लढतोय! सगळ्याच लढाया जिंकण्यासाठी लढत नाहीत काहीत हरण्यातही मजा असते! ;) ) चतुरंग

अजय जोशी Mon, 06/09/2008 - 12:25
लग्नापायी स्वातंत्र्याची मोजू किंमत भारी... मी असं ऐकलंय, लग्न हे आलेलं दु:ख नसतं, तर स्विकारलेलं दु:ख असतं .. आणि ... लग्नानंतर जे खांद्यावर येतं ते उचललेलं दु:ख असतं. (आपला पुणेरी) अ. अ. जोशी

वरदा Mon, 06/09/2008 - 18:32
विडंबन म्हणून चांगलं आहे सगळ्याच लढाया जिंकण्यासाठी लढत नाहीत काहीत हरण्यातही मजा असते! हे सगळ्यात खरं

कवटी गुरुवार, 06/12/2008 - 12:31
झकास जमलय. अवांतरः हे तुमच्या लग्नाआगोदर लिहिलय की लग्नानंतर हो? (ह.घ्या.)
लेखनविषय:
विषय सांगण्याची आवश्यकता नाही...स्वस्पष्टीकर आहे... शूर आम्ही सरदार आम्हाला, ठावूक नव्हती भीती ... काय जाहले विपरित घडले चढलो बोहल्यावरती... ध्रु.(बाकी कविता नाही लक्षात राहीली तरी चालेल..हे लक्षात ठेवा) आईच्या पदरास धरूनी चालत आलो येथ.. तरवारीशी लगीन लागलं कसली येडी प्रीत... लाख संकटं झेलुन घेइल अशी पहाडी छाती... पण हे संकट खचित आगळे मूर्तिमंत ही भीती... १ करून पहावं पाहुन करावं हेच आम्हाला ठावं... पळूनच जावं ,"समर्थ "बनावं हे नच आम्हा व्हावं... लग्नापायी स्वातंत्र्याची मोजू किंमत भारी... काय जाहले विपरित घडले चढलो बोहल्यावरती... २

जा, उडुनी जा पाखरा

सर्वसाक्षी ·

विसोबा खेचर Sun, 06/08/2008 - 22:44
साक्षिदेवा, सुंदर चित्र आहे रे! मस्तच! भिंगसंच प्रकाशग्रहण छिद्र झडपगती प्रकाशसंवेदनाक्षमता भिंग रचना अरे बापरे! काय रे साक्षिदेवा, तु आपल्या मथुरादास जलंत्रींचं शिष्यत्व केव्हा पत्करलंस :) तुझा, (गाववाला) तात्या.

सुशील Mon, 06/09/2008 - 02:12
इथे आवर्जुन देण्याइतके ह्या फोटोत काय आहे? मला फोटोतले काही कळत नाही ह्या फोटोत असे काय खास आहे कुणी समजावुन सांगेल का? तो पक्शी निट झाडावर बसलेला असताना टिपला असता तर मला आवडला असता.

In reply to by सुशील

ध्रुव Mon, 06/09/2008 - 16:19
प्रथम म्हणजे फोटो सुरेख टिपला आहे असे मला वाटते. मला फोटोतले काही कळत नाही ह्या फोटोत असे काय खास आहे कुणी समजावुन सांगेल का? उडत्या पक्ष्याचा फोटो मिळणे हे बर्‍याच प्रयत्नांनंतर मिळालेले फळ आहे. सर्वसा़क्षी यांनी वापरलेली लेन्स (सिग्मा ७०-३०० डिजी मॅक्रो) ही निकॉन डी६० कॅमेराबरोबर ऑटोफोकस होत नाही. याचाच अर्थ चित्रातील छोट्या छोट्या गोष्टी स्पष्ट दिसण्यासाठी कमालीचा हात लागतो. अश्या उडणार्‍या पक्ष्याचे चित्र या लेन्सने काढणे म्हणजे खरोखरीच कौतुकास्पद आहे. :) तो पक्शी निट झाडावर बसलेला असताना टिपला असता तर मला आवडला असता. नक्कीच! पण असाही छान दिसत आहे. -- ध्रुव

प्रभाकर पेठकर Mon, 06/09/2008 - 07:15
श्री. सर्वसाक्षी, छायाचित्र सुरेख टिपले आहे. पण, अनावश्यक वनश्री पक्षावरून लक्ष विचलीत करते आहे.थोडे संपादीत केले असते तर अजून प्रभावकारी झाले असते. उदाहरणार्थः

In reply to by प्रभाकर पेठकर

ध्रुव Mon, 06/09/2008 - 16:12
पेठकरांशी सहमत. चित्र मस्तच टिपले आहे. उडणारा पक्षी पकडणे म्हणजे एक खरोखरचे दिव्य आहे. पक्ष्याच्या पुढे थोडी अजून जगा ठेवली असती तर अजून छान दिसले असते. एक छान चौकटपण चित्राची शोभा वाढवेल. -- ध्रुव

मदनबाण Mon, 06/09/2008 - 14:59
सुरेख..... फारच सुरेख क्षण तुम्ही टिपला आहे..... अजुनही असे सुरेख क्षण पाहायला आवडतील..... (निकॉन प्रेमी) मदनबाण.....

ध्रुव Mon, 06/09/2008 - 16:23
सुरेख चित्र... असेच एक पकडायचा प्रयत्न मागे केला होता. पण तितका स्पष्ट नाही जमला पकडायला. king -- ध्रुव

सर्वसाक्षी Mon, 06/09/2008 - 20:45
सर्वांचे सप्रेम आभार. नंदन, उडत्या पाखराची पीसे मोजणार्‍या चतुराचा अभिप्राय वाचुन बरे वातले तात्या, चार शब्द अपल्या भाषेत खरडायचा प्रयत्न केला रे, शिष्यत्व कसले. बाकी तो माणूस काहीतरी शिकुन घेण्यासारखा आहे हे खरे. प्रभाकर शेठ, चित्र संपूर्ण आहे तसे अधिक बरे वाटेल असे मला वाटले. नुसता पक्षी देण्यापेक्षा अंधुक केलेली मागची झाडी पूरक ठरावी असा माझा समज. मात्र एकुण प्रतिमेच्या आकारमानात पक्षीप्रतिमा लहान आहे. एकतर लांबुन टिपले आहे, याहुन जवळ जाणे शक्य नव्हते, पक्षी ठरत नव्हता. शिवाय भिंगाची मर्यादा होतीच. आपण संपादित केलेले चित्रही झकास दिसते. ध्रुव, सध्या सिग्माची डी ६० ला स्वयंचलीत रुपात वावरता येईल अशी आवृती आली आहे जी मी वापरली आहे. मात्र किंमत या एकाच कारणास्तव मूळ निकॉन ऐवजी ही तडजोड स्विकारली आहे हे सत्य आहे. चित्र टिपताना तारांबळ उडाली हे मात्र खरे. पुन्हा सर्वांचे आभार साक्षी

विसोबा खेचर Sun, 06/08/2008 - 22:44
साक्षिदेवा, सुंदर चित्र आहे रे! मस्तच! भिंगसंच प्रकाशग्रहण छिद्र झडपगती प्रकाशसंवेदनाक्षमता भिंग रचना अरे बापरे! काय रे साक्षिदेवा, तु आपल्या मथुरादास जलंत्रींचं शिष्यत्व केव्हा पत्करलंस :) तुझा, (गाववाला) तात्या.

सुशील Mon, 06/09/2008 - 02:12
इथे आवर्जुन देण्याइतके ह्या फोटोत काय आहे? मला फोटोतले काही कळत नाही ह्या फोटोत असे काय खास आहे कुणी समजावुन सांगेल का? तो पक्शी निट झाडावर बसलेला असताना टिपला असता तर मला आवडला असता.

In reply to by सुशील

ध्रुव Mon, 06/09/2008 - 16:19
प्रथम म्हणजे फोटो सुरेख टिपला आहे असे मला वाटते. मला फोटोतले काही कळत नाही ह्या फोटोत असे काय खास आहे कुणी समजावुन सांगेल का? उडत्या पक्ष्याचा फोटो मिळणे हे बर्‍याच प्रयत्नांनंतर मिळालेले फळ आहे. सर्वसा़क्षी यांनी वापरलेली लेन्स (सिग्मा ७०-३०० डिजी मॅक्रो) ही निकॉन डी६० कॅमेराबरोबर ऑटोफोकस होत नाही. याचाच अर्थ चित्रातील छोट्या छोट्या गोष्टी स्पष्ट दिसण्यासाठी कमालीचा हात लागतो. अश्या उडणार्‍या पक्ष्याचे चित्र या लेन्सने काढणे म्हणजे खरोखरीच कौतुकास्पद आहे. :) तो पक्शी निट झाडावर बसलेला असताना टिपला असता तर मला आवडला असता. नक्कीच! पण असाही छान दिसत आहे. -- ध्रुव

प्रभाकर पेठकर Mon, 06/09/2008 - 07:15
श्री. सर्वसाक्षी, छायाचित्र सुरेख टिपले आहे. पण, अनावश्यक वनश्री पक्षावरून लक्ष विचलीत करते आहे.थोडे संपादीत केले असते तर अजून प्रभावकारी झाले असते. उदाहरणार्थः

In reply to by प्रभाकर पेठकर

ध्रुव Mon, 06/09/2008 - 16:12
पेठकरांशी सहमत. चित्र मस्तच टिपले आहे. उडणारा पक्षी पकडणे म्हणजे एक खरोखरचे दिव्य आहे. पक्ष्याच्या पुढे थोडी अजून जगा ठेवली असती तर अजून छान दिसले असते. एक छान चौकटपण चित्राची शोभा वाढवेल. -- ध्रुव

मदनबाण Mon, 06/09/2008 - 14:59
सुरेख..... फारच सुरेख क्षण तुम्ही टिपला आहे..... अजुनही असे सुरेख क्षण पाहायला आवडतील..... (निकॉन प्रेमी) मदनबाण.....

ध्रुव Mon, 06/09/2008 - 16:23
सुरेख चित्र... असेच एक पकडायचा प्रयत्न मागे केला होता. पण तितका स्पष्ट नाही जमला पकडायला. king -- ध्रुव

सर्वसाक्षी Mon, 06/09/2008 - 20:45
सर्वांचे सप्रेम आभार. नंदन, उडत्या पाखराची पीसे मोजणार्‍या चतुराचा अभिप्राय वाचुन बरे वातले तात्या, चार शब्द अपल्या भाषेत खरडायचा प्रयत्न केला रे, शिष्यत्व कसले. बाकी तो माणूस काहीतरी शिकुन घेण्यासारखा आहे हे खरे. प्रभाकर शेठ, चित्र संपूर्ण आहे तसे अधिक बरे वाटेल असे मला वाटले. नुसता पक्षी देण्यापेक्षा अंधुक केलेली मागची झाडी पूरक ठरावी असा माझा समज. मात्र एकुण प्रतिमेच्या आकारमानात पक्षीप्रतिमा लहान आहे. एकतर लांबुन टिपले आहे, याहुन जवळ जाणे शक्य नव्हते, पक्षी ठरत नव्हता. शिवाय भिंगाची मर्यादा होतीच. आपण संपादित केलेले चित्रही झकास दिसते. ध्रुव, सध्या सिग्माची डी ६० ला स्वयंचलीत रुपात वावरता येईल अशी आवृती आली आहे जी मी वापरली आहे. मात्र किंमत या एकाच कारणास्तव मूळ निकॉन ऐवजी ही तडजोड स्विकारली आहे हे सत्य आहे. चित्र टिपताना तारांबळ उडाली हे मात्र खरे. पुन्हा सर्वांचे आभार साक्षी
लेखनविषय:
लेखनप्रकार
झाडावरचा इवलासा तांबूस तपकिरी पक्षी नजरेस पडताच मी दबक्या पावलांनी अलगद त्या दिशेने सरकलो व झुडुपांमध्ये बसकण मारत लपत छपत किरण साधला. कळ दाबणार इतक्यात त्या चिमण्या जीवाला चाहुल लागली. माणूस हा प्राणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही हे ज्ञान त्याला उपजतच असावे.

पर्जन्याष्टक

अविनाश ओगले ·

शेखस्पिअर Sun, 06/08/2008 - 14:56
'आठवे' तर ...कळसाला नेऊन पोहोचवते... कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!' आता खरा, पावसाळा सुरू झाल्यासारखं वाटलं...

नारदाचार्य Sun, 06/08/2008 - 16:28
माफ करा... मी समीक्षक नाही. पण राहवत नाही म्हणून सांगतो... या कवितांमधून तुमचा खरा परिचय झाला. पहिली रचना वाचता-वाचताच मी मनाने एका सभागृहात पोचलो. तुम्ही या कविता सादर करताहात असं मनानं घेतलं आणि पुढच्या रचना वाचल्या गेल्या. मनातूनच. आधी वाचल्या होत्या तुमच्या त्या चारोळ्या. एन्जॉय केल्या होत्या, पण तुमची खरी ताकद इथं दिसून आली. एक ऋतू झालाय. पुढं काही असंच एक सूत्र घेऊन होऊ शकेल. अवांतर : 'गारवा'ची आठवण झालीच...

इनोबा म्हणे Mon, 06/09/2008 - 00:38
पर्जन्याष्टक आवडले! कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!' हे खासच... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मुक्तसुनीत Mon, 06/09/2008 - 00:47
फारच सुरेख ! कवितेतून भेटणारी "ती" खुद्द कविताच असते हे तुमच्या कविता वाचताना जाणवत होते :-) क्या बात है ! कविता जगणे म्हणजे काय याची एक झलक मिळाली ! नारदाचार्यांनी जे म्हण्टले त्याशी १००% सहमत. ही आतापर्यंत वाचलेली तुमची सर्वोत्कृष्ट कृती ! आणि यंदाच्या पावसावरच्या कवितांमधली सगळ्यात सुंदर ! तेव्हा तुझ्या डोळ्यात बेभान पाऊस आणि श्वासात मृदगंध... कवी चिरतरुण असतात याचे प्रत्यंतर देणारी कविता. आज तुमच्यामुळे मान्सून आम्हाला भेटला. तुम्हाला सलाम !

पिवळा डांबिस Mon, 06/09/2008 - 00:53
लगे रहो. विशेषतः, तुझा विलक्षण आनंद मी डोळे भरुन पहात होतो... तू मात्र वहीत ते मोरपीस शोधत होतीस कधीच न सापडणारं... डोकेबाज आहांत! :) कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!' क्या बात है!! वा!!

लिखाळ Mon, 06/09/2008 - 01:26
सर्वच मस्त कवीता... २, मोरपिस आणि ८ फारच सुंदर.. -- लिखाळ.

चतुरंग Mon, 06/09/2008 - 01:54
ओगलेसाहेब, आपल्यातला नितांत तरल कवी अनुभवायला मिळाला! तेव्हा तुझ्या डोळ्यात बेभान पाऊस आणि श्वासात मृदगंध... तुझा विलक्षण आनंद मी डोळे भरुन पहात होतो... तू मात्र वहीत ते मोरपीस शोधत होतीस कधीच न सापडणारं... हे सुंदरच! चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Mon, 06/09/2008 - 07:41
ओगलेसाहेब, आपल्यातला नितांत तरल कवी अनुभवायला मिळाला! हेच म्हणतो! खूपच सुंदर, वाचून समाधान वाटले! ओगले साहेब, जियो...! :) तात्या.

अजय जोशी Mon, 06/09/2008 - 12:17
व्वा! व्वा!! पण .... पाण्यात तुम्ही सोडलीत नाव लिहून त्यावर तिचेच नाव काही बघतील तिला ... काही नावेला ... काही आणतील उगाच .. न येणा-या शिंकेला काही भिजतील पावसात गात तुमचे गाणे रहा सदैव तुम्ही खणखणीत नाणे सर्वच आवडले. (आपला पुणेरी) अ. अ. जोशी

यतेश Mon, 06/09/2008 - 16:47
कविता अतिसुंदर आहे. मनापासून आवडली. अशाच सूंदर कविता करणे. तुला शुभेच्छा. आपला यतेश

मदनबाण Mon, 06/09/2008 - 16:54
फारच छान लिहल आहेत तुम्ही..... मी एकदाच तुला विचारलं_ पावसाचं आणि तुझं नातं काय? तू माझ्या मिठीत शिरत म्हणालीस, “बघ ना माझ्या डोळ्यात!” तेव्हा तुझ्या डोळ्यात बेभान पाऊस आणि श्वासात मृदगंध... व्वा क्या बात है..... (मृदगंधाने धुंद झालेला) मदनबाण.....

विजुभाऊ Mon, 06/09/2008 - 17:02
तुमचे हे गद्य लिखाण चांगले आहे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

शितल Mon, 06/09/2008 - 18:28
मी एकदाच तुला विचारलं_ पावसाचं आणि तुझं नातं काय? तू माझ्या मिठीत शिरत म्हणालीस, “बघ ना माझ्या डोळ्यात!” तेव्हा तुझ्या डोळ्यात बेभान पाऊस आणि श्वासात मृदगंध... मस्त रचना झाली आहे.

धोंडोपंत Tue, 06/10/2008 - 07:21
वा वा वा वा पंत, अतिशय सुंदर पर्जन्याष्टक. अप्रतिम. क्या बात है. आपला, (ओलाचिंब) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

स्वाती दिनेश Wed, 06/11/2008 - 21:05
जयश्री म्हणते तसे तुम्ही पावसात चिंब भिजवलेत. कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात! :) आवडले. स्वाती

अप्रतिम कविता... कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!' व्वा!!! कोणाला आवडल्या तरी ठीक, नाही आवडल्या तरी ठीक, तुमचा कविता जन्माला घालायचा आनंद तुमचाच, केवळ तुमचाच. बिपिन.

तळीराम Wed, 06/11/2008 - 21:49
आम्ही आपले तुम्हाला विडंबने वगैरेच करणारे समजत होतो. आणि तुम्हाला जरा लाईटलीच घेत होतो. तुम्ही तर भलतेच तरल कवी निघालात. छान. तुमच्यातले हे कॉकटेल लै भारी. आणि दुर्मिळपण. मजा आली.

वा !!! ओगले साहेब, काय सुंदर पर्जन्याष्टक आहे !!! 'कविता खूप लोकांपर्यंत पोचण्यासाठी काय करावं?' मी तुला गंभीरपणानं विचारलं. तू ही तितक्याच गंभीरपणानं म्हणालीस... 'सोप्पं आहे! कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!' किती सुंदर !!!

शेखस्पिअर Sun, 06/08/2008 - 14:56
'आठवे' तर ...कळसाला नेऊन पोहोचवते... कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!' आता खरा, पावसाळा सुरू झाल्यासारखं वाटलं...

नारदाचार्य Sun, 06/08/2008 - 16:28
माफ करा... मी समीक्षक नाही. पण राहवत नाही म्हणून सांगतो... या कवितांमधून तुमचा खरा परिचय झाला. पहिली रचना वाचता-वाचताच मी मनाने एका सभागृहात पोचलो. तुम्ही या कविता सादर करताहात असं मनानं घेतलं आणि पुढच्या रचना वाचल्या गेल्या. मनातूनच. आधी वाचल्या होत्या तुमच्या त्या चारोळ्या. एन्जॉय केल्या होत्या, पण तुमची खरी ताकद इथं दिसून आली. एक ऋतू झालाय. पुढं काही असंच एक सूत्र घेऊन होऊ शकेल. अवांतर : 'गारवा'ची आठवण झालीच...

इनोबा म्हणे Mon, 06/09/2008 - 00:38
पर्जन्याष्टक आवडले! कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!' हे खासच... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मुक्तसुनीत Mon, 06/09/2008 - 00:47
फारच सुरेख ! कवितेतून भेटणारी "ती" खुद्द कविताच असते हे तुमच्या कविता वाचताना जाणवत होते :-) क्या बात है ! कविता जगणे म्हणजे काय याची एक झलक मिळाली ! नारदाचार्यांनी जे म्हण्टले त्याशी १००% सहमत. ही आतापर्यंत वाचलेली तुमची सर्वोत्कृष्ट कृती ! आणि यंदाच्या पावसावरच्या कवितांमधली सगळ्यात सुंदर ! तेव्हा तुझ्या डोळ्यात बेभान पाऊस आणि श्वासात मृदगंध... कवी चिरतरुण असतात याचे प्रत्यंतर देणारी कविता. आज तुमच्यामुळे मान्सून आम्हाला भेटला. तुम्हाला सलाम !

पिवळा डांबिस Mon, 06/09/2008 - 00:53
लगे रहो. विशेषतः, तुझा विलक्षण आनंद मी डोळे भरुन पहात होतो... तू मात्र वहीत ते मोरपीस शोधत होतीस कधीच न सापडणारं... डोकेबाज आहांत! :) कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!' क्या बात है!! वा!!

लिखाळ Mon, 06/09/2008 - 01:26
सर्वच मस्त कवीता... २, मोरपिस आणि ८ फारच सुंदर.. -- लिखाळ.

चतुरंग Mon, 06/09/2008 - 01:54
ओगलेसाहेब, आपल्यातला नितांत तरल कवी अनुभवायला मिळाला! तेव्हा तुझ्या डोळ्यात बेभान पाऊस आणि श्वासात मृदगंध... तुझा विलक्षण आनंद मी डोळे भरुन पहात होतो... तू मात्र वहीत ते मोरपीस शोधत होतीस कधीच न सापडणारं... हे सुंदरच! चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Mon, 06/09/2008 - 07:41
ओगलेसाहेब, आपल्यातला नितांत तरल कवी अनुभवायला मिळाला! हेच म्हणतो! खूपच सुंदर, वाचून समाधान वाटले! ओगले साहेब, जियो...! :) तात्या.

अजय जोशी Mon, 06/09/2008 - 12:17
व्वा! व्वा!! पण .... पाण्यात तुम्ही सोडलीत नाव लिहून त्यावर तिचेच नाव काही बघतील तिला ... काही नावेला ... काही आणतील उगाच .. न येणा-या शिंकेला काही भिजतील पावसात गात तुमचे गाणे रहा सदैव तुम्ही खणखणीत नाणे सर्वच आवडले. (आपला पुणेरी) अ. अ. जोशी

यतेश Mon, 06/09/2008 - 16:47
कविता अतिसुंदर आहे. मनापासून आवडली. अशाच सूंदर कविता करणे. तुला शुभेच्छा. आपला यतेश

मदनबाण Mon, 06/09/2008 - 16:54
फारच छान लिहल आहेत तुम्ही..... मी एकदाच तुला विचारलं_ पावसाचं आणि तुझं नातं काय? तू माझ्या मिठीत शिरत म्हणालीस, “बघ ना माझ्या डोळ्यात!” तेव्हा तुझ्या डोळ्यात बेभान पाऊस आणि श्वासात मृदगंध... व्वा क्या बात है..... (मृदगंधाने धुंद झालेला) मदनबाण.....

विजुभाऊ Mon, 06/09/2008 - 17:02
तुमचे हे गद्य लिखाण चांगले आहे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

शितल Mon, 06/09/2008 - 18:28
मी एकदाच तुला विचारलं_ पावसाचं आणि तुझं नातं काय? तू माझ्या मिठीत शिरत म्हणालीस, “बघ ना माझ्या डोळ्यात!” तेव्हा तुझ्या डोळ्यात बेभान पाऊस आणि श्वासात मृदगंध... मस्त रचना झाली आहे.

धोंडोपंत Tue, 06/10/2008 - 07:21
वा वा वा वा पंत, अतिशय सुंदर पर्जन्याष्टक. अप्रतिम. क्या बात है. आपला, (ओलाचिंब) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

स्वाती दिनेश Wed, 06/11/2008 - 21:05
जयश्री म्हणते तसे तुम्ही पावसात चिंब भिजवलेत. कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात! :) आवडले. स्वाती

अप्रतिम कविता... कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!' व्वा!!! कोणाला आवडल्या तरी ठीक, नाही आवडल्या तरी ठीक, तुमचा कविता जन्माला घालायचा आनंद तुमचाच, केवळ तुमचाच. बिपिन.

तळीराम Wed, 06/11/2008 - 21:49
आम्ही आपले तुम्हाला विडंबने वगैरेच करणारे समजत होतो. आणि तुम्हाला जरा लाईटलीच घेत होतो. तुम्ही तर भलतेच तरल कवी निघालात. छान. तुमच्यातले हे कॉकटेल लै भारी. आणि दुर्मिळपण. मजा आली.

वा !!! ओगले साहेब, काय सुंदर पर्जन्याष्टक आहे !!! 'कविता खूप लोकांपर्यंत पोचण्यासाठी काय करावं?' मी तुला गंभीरपणानं विचारलं. तू ही तितक्याच गंभीरपणानं म्हणालीस... 'सोप्पं आहे! कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!' किती सुंदर !!!
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पर्जन्याष्टक १. खूप पाऊस आला आणि गारा पडायला लागल्या तसा मी खिडकी बंद करायला धावलो... तू दार उघडून थेट अंगणात गारा वेचायला! दोन चार हळव्या गारा माझ्यासाठी ओंजळीत घेऊन तू आलीस. पावसात भिजलेली तू तुझी आर्जवी ओंजळ ओंजळीत विरघळणा‍र्‍या गारा... मी पहातच राहिलो- पावसात भिजल्यावर कविता कशी दिसते ते! २. मी एकदाच तुला विचारलं_ “पावसाचं आणि तुझं नातं काय?” तू माझ्या मिठीत शिरत म्हणालीस, “बघ ना माझ्या डोळ्यात!” तेव्हा तुझ्या डोळ्यात बेभान पाऊस आणि श्वासात मृदगंध... ३. बाहेर खूप पाऊस कोसळत होता रात्री आणि मी आपला तुला पावसाच्या कविता वाचून दाखवत होतो. अचानक दिवे गेले, अंधार झाला. एक वीज

राजवाड्यांचे शहर

आनंद घारे ·

पक्या Mon, 06/09/2008 - 03:00
म्हैसूर राजवाड्याची ओळख चांगली करून दिलीत. सोबत राजवाड्याचा एखादा फोटो ही चढवायचा होता. म्हणजे वाचताना मजा आली असती.

यशोधरा Mon, 06/09/2008 - 08:54
अतिशय देखणा राजवाडा आहे हा!! मी गेल्या महिन्यातच बघून आले.

पक्या Mon, 06/09/2008 - 12:57
धन्यवाद , प्रमोदकाका राजवाड्याची दोन्ही प्रकाशचित्रे फारच छान आहेत. खरोखरीच देखणा आहे राजवाडा . आणि रोषणाईने त्यात अजूनच भर पडली आहे.

स्वाती दिनेश Mon, 06/09/2008 - 13:32
दरबार हॉलमध्ये हिंडतांना कोठल्याही क्षणी भालदार चोपदार महाराजाधिराजांच्या आगमनाची वर्दी देत येतील असा भास होतो. असेच वाटले होते मलाही राजवाडा पाहताना.. लेख आवडला. स्वाती

आपल्या लेखात राजवाड्याच्या छायाचित्रांची गरज होतीच त्या शिवाय सुंदर लेखातील राज वैभव दिसलेच नसते. अजून येऊ द्या असेच लेखन !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंद घारे Mon, 06/09/2008 - 19:54
मिसळपाव या स्थळावर चित्र डकवण्यापूर्वी ते आधी कोठे तरी चिकटवून त्याचा दुवा द्यावा लागतो. ही दुहेरी प्रक्रिया करण्यातील तांत्रिक अडचणींमुळे मला ती देता आली नव्हती. माझे मित्र श्री. प्रमोद देव यांनी राजवाड्याची सुंदर छायाचित्रे देऊन ती कसर भरून काढली. या मदती बद्दल मी त्यांचा आभारी आहे.

सर्वसाक्षी Mon, 06/09/2008 - 21:29
फार वर्षांपूर्वी पाहिलेला तो खरा. मागील भेटीत बहुधा सुट्टीचा काळ त्यात आणखी रविवार यामुळे भयानक गर्दी होती. आलेल्या बहुसंख्य लोकांना 'आम्ही राजवाडा पाहिला' या रक्यानात खूण करण्यापलिकडे काही स्वारस्य नसावे. पैसे खर्च करुन इथवर आलोच आहोत तर जे जे आहे ते सर्व बघुया अशा भावनेते लोक ढकला ढकली करत होते. एकुण आषाढीला पंढरीला होते तशी अवस्था होती. निमूटपणे माघार घेतली.
आणखी एक चित्र

In reply to by प्रभाकर पेठकर

राजे Tue, 06/10/2008 - 09:50
मनोवेधक आणि नेत्रदिपक असा राजवाडा आहे. हेच म्हणतो.. पाहीला आहे पुन्हा पुन्हा पाहण्याची ईच्छा आहे.. पण ह्यावेळी दस-याच्या वेळी ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

चतुरंग Tue, 06/10/2008 - 22:03
मी दिवसा पाहिलाय अगदी मनसोक्त! पण दसर्‍याच्या रात्री पाहण्याची इच्छा आहे. पाहू कधी पूर्ण होईल. छान लेख आनंदघन! चतुरंग

आनंद घारे Wed, 06/11/2008 - 11:11
राजवाड्यावर दर रविवारी रात्री एक तास रोषणाई केली जाते. दसरामहोत्सवात ती दररोज आणि अधिक वेळ असते. फक्त राजवाडाच नव्हे तर त्याच्या आसमतातील सर्व वास्तू असंख्य दिव्यांच्या प्रकशात उजळून निघतात. राजवाड्यासमोरील पटांगणात उभे राहून चारही बाजूला असंख्य दीपमाळा पाहण्यातला आनंद अद्भुत असतो.

पक्या Mon, 06/09/2008 - 03:00
म्हैसूर राजवाड्याची ओळख चांगली करून दिलीत. सोबत राजवाड्याचा एखादा फोटो ही चढवायचा होता. म्हणजे वाचताना मजा आली असती.

यशोधरा Mon, 06/09/2008 - 08:54
अतिशय देखणा राजवाडा आहे हा!! मी गेल्या महिन्यातच बघून आले.

पक्या Mon, 06/09/2008 - 12:57
धन्यवाद , प्रमोदकाका राजवाड्याची दोन्ही प्रकाशचित्रे फारच छान आहेत. खरोखरीच देखणा आहे राजवाडा . आणि रोषणाईने त्यात अजूनच भर पडली आहे.

स्वाती दिनेश Mon, 06/09/2008 - 13:32
दरबार हॉलमध्ये हिंडतांना कोठल्याही क्षणी भालदार चोपदार महाराजाधिराजांच्या आगमनाची वर्दी देत येतील असा भास होतो. असेच वाटले होते मलाही राजवाडा पाहताना.. लेख आवडला. स्वाती

आपल्या लेखात राजवाड्याच्या छायाचित्रांची गरज होतीच त्या शिवाय सुंदर लेखातील राज वैभव दिसलेच नसते. अजून येऊ द्या असेच लेखन !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंद घारे Mon, 06/09/2008 - 19:54
मिसळपाव या स्थळावर चित्र डकवण्यापूर्वी ते आधी कोठे तरी चिकटवून त्याचा दुवा द्यावा लागतो. ही दुहेरी प्रक्रिया करण्यातील तांत्रिक अडचणींमुळे मला ती देता आली नव्हती. माझे मित्र श्री. प्रमोद देव यांनी राजवाड्याची सुंदर छायाचित्रे देऊन ती कसर भरून काढली. या मदती बद्दल मी त्यांचा आभारी आहे.

सर्वसाक्षी Mon, 06/09/2008 - 21:29
फार वर्षांपूर्वी पाहिलेला तो खरा. मागील भेटीत बहुधा सुट्टीचा काळ त्यात आणखी रविवार यामुळे भयानक गर्दी होती. आलेल्या बहुसंख्य लोकांना 'आम्ही राजवाडा पाहिला' या रक्यानात खूण करण्यापलिकडे काही स्वारस्य नसावे. पैसे खर्च करुन इथवर आलोच आहोत तर जे जे आहे ते सर्व बघुया अशा भावनेते लोक ढकला ढकली करत होते. एकुण आषाढीला पंढरीला होते तशी अवस्था होती. निमूटपणे माघार घेतली.
आणखी एक चित्र

In reply to by प्रभाकर पेठकर

राजे Tue, 06/10/2008 - 09:50
मनोवेधक आणि नेत्रदिपक असा राजवाडा आहे. हेच म्हणतो.. पाहीला आहे पुन्हा पुन्हा पाहण्याची ईच्छा आहे.. पण ह्यावेळी दस-याच्या वेळी ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

चतुरंग Tue, 06/10/2008 - 22:03
मी दिवसा पाहिलाय अगदी मनसोक्त! पण दसर्‍याच्या रात्री पाहण्याची इच्छा आहे. पाहू कधी पूर्ण होईल. छान लेख आनंदघन! चतुरंग

आनंद घारे Wed, 06/11/2008 - 11:11
राजवाड्यावर दर रविवारी रात्री एक तास रोषणाई केली जाते. दसरामहोत्सवात ती दररोज आणि अधिक वेळ असते. फक्त राजवाडाच नव्हे तर त्याच्या आसमतातील सर्व वास्तू असंख्य दिव्यांच्या प्रकशात उजळून निघतात. राजवाड्यासमोरील पटांगणात उभे राहून चारही बाजूला असंख्य दीपमाळा पाहण्यातला आनंद अद्भुत असतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमच्या जमखंडीसारखे पिटुकले संस्थान असो किंवा पांच खंडात पसरलेले ब्रिटीशांचे साम्राज्य असो, त्याच्या राजघराण्यातले लोक कुठे आणि कसे राहतात याबद्दल सामान्य प्रजाजनांत विलक्षण कुतूहल असे. त्या कुतूहलाची परिणती भयमिश्रित आदरात होऊन प्रजेने राजनिष्ठ बनावे यासाठी राजघराण्यातल्या व्यक्ती सामान्यांपेक्षा वेगळ्या आणि श्रेष्ठ असतात असे सतत लोकांच्या मनावर बिंबवले जात असे. राजे महाराजे म्हणजे दिसायला राजबिंडे, त्यांचे खाणेपिणे, कपडेलत्ते वगैरे सारे कांही राजेशाही थाटाचे आणि त्यांचा निवास भव्य राजवाड्यात असे.

थेंब टपोरे

अविनाश ओगले ·

In reply to by नारदाचार्य

विवेक काजरेकर Sun, 06/08/2008 - 17:02
माझ्या मताशी सहमत न होण्याचं कारण माझ्या त्रोटक प्रतिसादातून निर्माण झालेल्या गैरसमजामुळे असेल त्याबद्दल प्रथम क्षमा मागतो. मी जेंव्हा "गं" हा शब्द भरीचा वाटतोय असं मत दिलं त्या वेळी तो काढून टाकून ही कविता जशीच्या तशी वाचून पहावी असं मला सुचवायचं नव्हतं. (कारण तसं केलं तर ८ अक्षरातलं एक अक्षर कमी होऊन लयीत वाचायला बाधा येणारंच). तिथे पर्यायी शब्दयोजना पाहिजे असं मला म्हणायचं होतं "भरीचा" हा शब्द मी जो शब्द अनावश्यक आहे, ज्याने अर्थात काही भर पडत नाही, किंवा जो कधीकधी केवळ मीटर सांभाळण्यासाठी घातला जातो अशा अर्थाने वापरला होता. यावर ओगले साहेबांचं मत ऐकायला आवडेल

In reply to by विवेक काजरेकर

यावर ओगले साहेबांचं मत ऐकायला आवडेल आता कवी महोदय थेट भेटतील पुढील कवितेच्या वेळेस. :) आम्हालाही त्या 'ग' ची अडचणच वाटली. पण मात्रा बित्रांचा तोल ढळू नये म्हणुन कवींनी तसे केले असेल असे वाटते. अर्थात आपण जाणकार आहात तालासुरांची आपणास एक पारखी नजर आहे. आपल्या मताशी आम्ही सहमत आहोतच,पण कवी पेक्षा एक वाचक म्हणून आम्हाला 'ग' ची बाधा मात्र नक्कीच झाली. ;) ( ह. घ्या कवी साहेब ) -दिलीप बिरुटे (लेखन टाकून पसार होणा-या लेखकांची वाट पाहणारा एक वाचक आणि चातक )

अरुण मनोहर Sun, 06/08/2008 - 18:41
कविता आवडली. "गं" काढून वाचून पाहिली. मला वाटते, "गं" काढलेलाही चालेल. तालात अडचण येत नाही. कारण असे की---
मातीच्या अंगावर लक्ष रोमांच फुलती
आणि
फुलांच्या पाकळ्यात मोती टपोरे झुलती
ह्यामधे, जोडाक्षरे (मातीच्या , फुलांच्या ) असल्याने आठ अक्षरांचा आभास होतो.

विसोबा खेचर Sun, 06/08/2008 - 22:49
वा ओगले साहेब! सुंदर कविता! वाचून प्रसन्न वाटलं! :) आपला, (थेंबाथेंबातला) तात्या.

बेसनलाडू Sun, 06/08/2008 - 22:59
पहिल्या तीन कडव्यांतून प्रसन्न निसर्गचित्र रंगवणार्‍या कवितेस शेवटच्या कडव्यात मिळालेली कलाटणी आवडून गेली. (प्रसन्न)बेसनलाडू

अविनाश ओगले Wed, 06/11/2008 - 20:12
'ग' बद्दल छान चर्चा! ग ग ग ग ग ग.... असो. हे सारे कवितेबद्दलचे तुम्हा मंडळींचे प्रेम आणि जाणकारी व्यक्त करणारे आहे. कविता खूप जुनी. 'कवितेचा छंद आहे, पण कवितेच्या छंदांचा अभ्यास नाही' अशा काळातली. अष्टाक्षरी वगैरे शब्दही माहित नसल्याच्या काळातली. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा वाचली. तुझ्या स्मृती जागतात डोळा डोळ्यास लागेना या ओळींशी 'ग' संबंध असावा असे आज जाणवते. तेव्हा मात्र सहजच लिहून गेलो. बिरूटे साहेब, लेखन टाकून पसार वगैरे झालो नाही. इथंच आहे. पण मराठी भाषा, कविता, कवितेचं व्याकरण या विषयावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही. वाणिज्य पदवीधर आणि बँकेतील नोकरी. काय बोलणार? तुमच्या चर्चेतूनच काहीतरी शिकत राहतो. सर्वाना धन्यवाद!

In reply to by अविनाश ओगले

बिरूटे साहेब, लेखन टाकून पसार वगैरे झालो नाही. इथंच आहे. पण मराठी भाषा, कविता, कवितेचं व्याकरण या विषयावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही. आम्हालाही तो अधिकार नाही. पण, आपल्या कवितेवर चर्चा चाललेली आहे तर, आपण त्यावर बोलावे अशी एक ढोबळ अपेक्षेने आम्ही तसे लिहिले. रागावला असाल तर क्षमा असावी. कविता,कवीतेच्या व्याकरणाचा आम्हाला अभ्यास असता तर आम्हीही आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रभर काव्यरसिकांना आमच्या कविता ऐकवल्या असत्या !!! :) 'ग' च्या खुलाशाबद्दल आभारी आहे !!!

In reply to by नारदाचार्य

विवेक काजरेकर Sun, 06/08/2008 - 17:02
माझ्या मताशी सहमत न होण्याचं कारण माझ्या त्रोटक प्रतिसादातून निर्माण झालेल्या गैरसमजामुळे असेल त्याबद्दल प्रथम क्षमा मागतो. मी जेंव्हा "गं" हा शब्द भरीचा वाटतोय असं मत दिलं त्या वेळी तो काढून टाकून ही कविता जशीच्या तशी वाचून पहावी असं मला सुचवायचं नव्हतं. (कारण तसं केलं तर ८ अक्षरातलं एक अक्षर कमी होऊन लयीत वाचायला बाधा येणारंच). तिथे पर्यायी शब्दयोजना पाहिजे असं मला म्हणायचं होतं "भरीचा" हा शब्द मी जो शब्द अनावश्यक आहे, ज्याने अर्थात काही भर पडत नाही, किंवा जो कधीकधी केवळ मीटर सांभाळण्यासाठी घातला जातो अशा अर्थाने वापरला होता. यावर ओगले साहेबांचं मत ऐकायला आवडेल

In reply to by विवेक काजरेकर

यावर ओगले साहेबांचं मत ऐकायला आवडेल आता कवी महोदय थेट भेटतील पुढील कवितेच्या वेळेस. :) आम्हालाही त्या 'ग' ची अडचणच वाटली. पण मात्रा बित्रांचा तोल ढळू नये म्हणुन कवींनी तसे केले असेल असे वाटते. अर्थात आपण जाणकार आहात तालासुरांची आपणास एक पारखी नजर आहे. आपल्या मताशी आम्ही सहमत आहोतच,पण कवी पेक्षा एक वाचक म्हणून आम्हाला 'ग' ची बाधा मात्र नक्कीच झाली. ;) ( ह. घ्या कवी साहेब ) -दिलीप बिरुटे (लेखन टाकून पसार होणा-या लेखकांची वाट पाहणारा एक वाचक आणि चातक )

अरुण मनोहर Sun, 06/08/2008 - 18:41
कविता आवडली. "गं" काढून वाचून पाहिली. मला वाटते, "गं" काढलेलाही चालेल. तालात अडचण येत नाही. कारण असे की---
मातीच्या अंगावर लक्ष रोमांच फुलती
आणि
फुलांच्या पाकळ्यात मोती टपोरे झुलती
ह्यामधे, जोडाक्षरे (मातीच्या , फुलांच्या ) असल्याने आठ अक्षरांचा आभास होतो.

विसोबा खेचर Sun, 06/08/2008 - 22:49
वा ओगले साहेब! सुंदर कविता! वाचून प्रसन्न वाटलं! :) आपला, (थेंबाथेंबातला) तात्या.

बेसनलाडू Sun, 06/08/2008 - 22:59
पहिल्या तीन कडव्यांतून प्रसन्न निसर्गचित्र रंगवणार्‍या कवितेस शेवटच्या कडव्यात मिळालेली कलाटणी आवडून गेली. (प्रसन्न)बेसनलाडू

अविनाश ओगले Wed, 06/11/2008 - 20:12
'ग' बद्दल छान चर्चा! ग ग ग ग ग ग.... असो. हे सारे कवितेबद्दलचे तुम्हा मंडळींचे प्रेम आणि जाणकारी व्यक्त करणारे आहे. कविता खूप जुनी. 'कवितेचा छंद आहे, पण कवितेच्या छंदांचा अभ्यास नाही' अशा काळातली. अष्टाक्षरी वगैरे शब्दही माहित नसल्याच्या काळातली. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा वाचली. तुझ्या स्मृती जागतात डोळा डोळ्यास लागेना या ओळींशी 'ग' संबंध असावा असे आज जाणवते. तेव्हा मात्र सहजच लिहून गेलो. बिरूटे साहेब, लेखन टाकून पसार वगैरे झालो नाही. इथंच आहे. पण मराठी भाषा, कविता, कवितेचं व्याकरण या विषयावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही. वाणिज्य पदवीधर आणि बँकेतील नोकरी. काय बोलणार? तुमच्या चर्चेतूनच काहीतरी शिकत राहतो. सर्वाना धन्यवाद!

In reply to by अविनाश ओगले

बिरूटे साहेब, लेखन टाकून पसार वगैरे झालो नाही. इथंच आहे. पण मराठी भाषा, कविता, कवितेचं व्याकरण या विषयावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही. आम्हालाही तो अधिकार नाही. पण, आपल्या कवितेवर चर्चा चाललेली आहे तर, आपण त्यावर बोलावे अशी एक ढोबळ अपेक्षेने आम्ही तसे लिहिले. रागावला असाल तर क्षमा असावी. कविता,कवीतेच्या व्याकरणाचा आम्हाला अभ्यास असता तर आम्हीही आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रभर काव्यरसिकांना आमच्या कविता ऐकवल्या असत्या !!! :) 'ग' च्या खुलाशाबद्दल आभारी आहे !!!
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
थेंब टपोरे टपोरे खाली आसुसली माती मातीच्या गं अंगावर लक्ष रोमांच फुलती थेंब टपोरे टपोरे पानापानात वाजती फुलांच्या गं पाकळ्यात मोती टपोरे झुलती थेंब टपोरे टपोरे गंध देहात, मनात श्वास पुरता पुरेना किती साठवू उरांत थेंब टपोरे टपोरे माझी तहान भागेना तुझ्या स्मृती जागतात डोळा डोळ्यास लागेना -अविनाश ओगले

पुल॑चा दिनेश

डॉ.प्रसाद दाढे ·

प्रमोद देव Sun, 06/08/2008 - 12:33
एक मस्त लेख वाचायला मिळाला. पुलं ही एक अशी व्यक्ती आहे की ज्यांच्याबद्दल ऐकायला आणि वाचायला कधीच कंटाळा येत नाही. त्यांच्या लेखनातील कैक वाक्ये रोजच्याच जीवनात सतत भेटत असतात आणि आनंद द्विगुणित करून जातात. असहाय स्थितीत वातावरण हलकं करतात आणि मनावरचा ताण उतरवतात. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

देवदत्त Sun, 06/08/2008 - 12:43
नेमके मी तो लेख वाचायला घेतला लोकसत्तावर आणि तुम्ही त्याबद्दल इथे लिहिले. पूर्ण वाचून काढतो आत्ताच :)

राजेश Sun, 06/08/2008 - 13:56
झकास लेख. (पुल॑च्या स॑दर्भात पपुण्यतिथी हे शब्दसुद्धा लिहिता॑ना हात अडखळतात, डोळ्यासमोरचा स॑गणक धुसर होऊ पहातो..) खर आहे , भाईकाका गेल्यासारखे वाटतच नाहीत. त्यांचे लेखन, विचार आणि कार्य आपल्याला सतत प्रेरणा देत रहाणार... राजेश

मनिष Sun, 06/08/2008 - 14:29
आत्ताच वाचून काढला...काय समृद्ध आयुष्य जगला हा माणूस! आणि कित्येकांचे आयुष्य समृद्ध करून गेला... 'आहे मनोहर तरी' पहिल्यांदा वाचले (लहान होतो तेंव्हा) तेव्हा मी खूप अस्वस्थ झालो होतो, पण दिनेश म्हणतो तसा सुनीताबाईंचा काळजी घ्यायचा स्वभावही त्यांना माहित होता. माझ्यासारख्या सामन्य वाचकांना मात्र त्या पुस्तकाने त्या वयात धक्का बसला...आत वाटते, त्या दोघांचा स्वभाव, दृष्टीकोन बराच भिन्न होता.

In reply to by मनिष

इनोबा म्हणे Sun, 06/08/2008 - 20:46
काय समृद्ध आयुष्य जगला हा माणूस! आणि कित्येकांचे आयुष्य समृद्ध करून गेला... असेच म्हणतो... दाढेसाहेब,दुव्याबद्दल धन्यवाद! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

लिखाळ Sun, 06/08/2008 - 15:24
छान लेख.. इथे दुवा दिल्याबद्दल अनेक आभार. --लिखाळ.

डॉ.प्रसाद दाढे Sun, 06/08/2008 - 18:52
भाई, तू जर अफजलखानाला भेटायला गेला असतास तर फक्त गप्पा र॑गवून परत आला असतास ह्या सुनिताबाई॑च्या शेर्‍यावर प्रच॑ड हसलो.. पुल॑ची सुनिताबाई॑ना 'उपदेशपा॑डे' ही उपाधीपण अफाटच आहे. दिनेशनी भाई॑ना 'ती फुलराणी' लिहिता॑ना प्रत्यक्ष पाहिले आहे..त्याच॑ पहिल॑ वाचन ऐकल॑ आहे. हे सगळ॑ वाचता॑नाच अ॑गावर रोमा॑च उभे राहतात. खर॑च, ती लोक॑ किती भाग्यवान ज्या॑ना पुल॑च्या सहवासात राहता आले.. मी त्या॑ना धीर एकवटून एक फोन केला होता.खर॑ म्हणजे प्रत्यक्षच भेटण्याची खूप इच्छा होती पण ठाऊक होत॑ की ते आजारी आहेत अन त्या॑ना लोका॑चा त्रास होतो. मी त्या॑ना १९९९ साल स॑पून नवे शतक सुरू होण्याचे निमित्त काढून शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. माझ्या चौथ्या की पाचव्या प्रयत्नात साक्षात भाई फोनवर आले. मला तर गगन ठे॑गणे झाले होते.. माझ्या परमेश्वराशी मी फोनवर बोलत होतो! पण त्या॑चा आवाज खूप कापरा व खोल गेला होता.. म्हैस, असा मी असामी इ ध्वनीमुद्रिका॑मधला सुपरिचित आवाजाचा पत्ताच नव्हता. एक क्षण खूप वाईट वाटले पण धैर्य एकवटून त्या॑च्याशी येणेप्रमाणे स॑भाषण झाले मी: नमस्कार भाई, मी आपला वाचक डॉ.प्रसाद दाढे बोलतो आहे भाई: काय नाव म्हणाला॑त..? मी: प्रसाद दाढे भाई: प्रसाद दाढे काय..प्रसाद दाढे..प्रसाद दाढे (इथे माझ्या अ॑गावर अक्षरशः काटा आला..त्या॑च्या तो॑डून माझे नाव उच्चारले गेले होते..) बोला काय म्हणता॑य? मी: नवीन शतकाच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा! भाई: धन्यवाद, तुम्हालाही मी: तुम्हा॑ला भेटण्याची खूप इच्छा आहे, तुमच्या पाया॑वर डोके ठेवायचे आहे.. भाई: अहो माझ्या डोक्यावर कशाला पाय ठेवता॑य.. :) (तशा अवस्थेतही पुल॑नी माझी विकेट काढली होती) मी फार छोटा माणूस आहे.. आणि आता भेटून काहीही उपयोग नाही कारण पाच मिनिटे जरी बोललो तरी मला अर्धा तास पडून रहावे लागते. आता माझ्या पुस्तका॑तच मला भेटा.. माझा गळा दाटून आला होता.. काय बोलावे तेच सुचत नव्हते. माझ्याशी फोनवर बोलल्यामुळे सुद्धा त्या॑ना त्रास होणार होता. असे वाटले की त्या॑चा पार्किन्सनचा आजार मी घेऊ शकलो तर..? फोन ठेवल्यावर बराच वेळ मी सुन्न बसून होतो. साक्षात पुल॑शी बोलल्याचा आन॑दही होत होता आणि त्या॑चा खोल गेलेला आवाज आठवून दु:खही होत होत॑..

In reply to by व्यंकट

संजय अभ्यंकर Sun, 06/08/2008 - 22:11
धन्य तो लोकसत्ता! जी वेबसाईट जगभरचे लोक पहातात, त्याच्या संरक्षणासाठी सतत दक्ष यंत्रणा ते उभी करीत नाहीत! जागरूक नॉर्टन सिक्यूरीटीने माझा लॅपटॉप वाचवला. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

चतुरंग Sun, 06/08/2008 - 20:03
अहो काय दुवा दिलात हो? बसल्या बैठकीला वाचून काढला. रविवार सकाळ पुलं बरोबरच्या मैफलीत जावी हा योग होता. आपल्याला किती दुवे देऊ तेवढे कमी आहेत! आपली पुलं बरोबर बोलण्याची आठवण तर डोळ्यात पाणीच. काय लिहू? शब्द नाहीत. चतुरंग

यशोधरा Sun, 06/08/2008 - 21:51
>>>गेल्या ४-५ दिवसांपासून व्हायरस आहेत, जपून . हो, माझ्या लॅपटॉपवर आलेत :( रिअल टाईम अँटीव्हायरस मुळे वाचला आहे लॅपटॉप :S

पल्लवी Mon, 06/09/2008 - 07:45
केवळ अप्रतिम लेख ! पु.लं. ही खरंच किती मोठी युनिवर्सिटी आहे ना ? एकदा का पु.लं वाचले की आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोनच बदलून जातो ! "हे जीवन सुन्दर आहे..", मनोमन पटतं..

केशवराव Mon, 06/09/2008 - 14:10
' तू मोठा झाल्यावर माझ्यावर एक लेख लिही. ' असे भाईंनी लिहीले , आणि दिनेशने लेख लिहून भाईंची इच्छा पुर्ण केलीच ; पण आम्हाला एक छान मेजवानी दिली. माईआत्तेला भाई ' उपदेशपांडे' म्हणत वाचून भाई घरातही 'असेच' होते. हे समजले. दिनेशला धन्यवाद.

डॉ.प्रसाद दाढे Mon, 06/09/2008 - 17:02
एकदा बाबासाहेब पुर॑दरे व पुल गप्पा मारत बसले होते ते॑व्हा बाबासाहेब म्हणाले, " भाई तुम्ही विनोदी लेखक! तुमच्या घरी तुम्ही आणि सुनिताबाई कायम हसतच असणार.." यावर पुल उत्तरले, "बाबासाहेब तुम्ही इतिहासकार! मग तुमच्या घरी निर्मलाताई हातात तलवार घेऊन मागे अन तुम्ही ढाल घेऊन पुढे पळत असाल..! :) पुल व्यक्तिशः अतिशय मिष्किल होते. ते समोरच्याची कधी दा॑डी गुल करतील ह्याचा नेम नसायचा. त्या॑च्या कोटीबाज किश्श्या॑चा एक स॑ग्रहच 'कोट्याधीश पुल' ह्या नावाने चतुर॑ग प्रतिष्ठानने प्रसिद्ध केला होता. मला त्या॑चे काही अप्रकाशित किस्सेसुद्धा माहित आहेत.. ते मिपाकरा॑ना स॑मेलनात ऐकवीन.

प्रमोद देव Sun, 06/08/2008 - 12:33
एक मस्त लेख वाचायला मिळाला. पुलं ही एक अशी व्यक्ती आहे की ज्यांच्याबद्दल ऐकायला आणि वाचायला कधीच कंटाळा येत नाही. त्यांच्या लेखनातील कैक वाक्ये रोजच्याच जीवनात सतत भेटत असतात आणि आनंद द्विगुणित करून जातात. असहाय स्थितीत वातावरण हलकं करतात आणि मनावरचा ताण उतरवतात. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

देवदत्त Sun, 06/08/2008 - 12:43
नेमके मी तो लेख वाचायला घेतला लोकसत्तावर आणि तुम्ही त्याबद्दल इथे लिहिले. पूर्ण वाचून काढतो आत्ताच :)

राजेश Sun, 06/08/2008 - 13:56
झकास लेख. (पुल॑च्या स॑दर्भात पपुण्यतिथी हे शब्दसुद्धा लिहिता॑ना हात अडखळतात, डोळ्यासमोरचा स॑गणक धुसर होऊ पहातो..) खर आहे , भाईकाका गेल्यासारखे वाटतच नाहीत. त्यांचे लेखन, विचार आणि कार्य आपल्याला सतत प्रेरणा देत रहाणार... राजेश

मनिष Sun, 06/08/2008 - 14:29
आत्ताच वाचून काढला...काय समृद्ध आयुष्य जगला हा माणूस! आणि कित्येकांचे आयुष्य समृद्ध करून गेला... 'आहे मनोहर तरी' पहिल्यांदा वाचले (लहान होतो तेंव्हा) तेव्हा मी खूप अस्वस्थ झालो होतो, पण दिनेश म्हणतो तसा सुनीताबाईंचा काळजी घ्यायचा स्वभावही त्यांना माहित होता. माझ्यासारख्या सामन्य वाचकांना मात्र त्या पुस्तकाने त्या वयात धक्का बसला...आत वाटते, त्या दोघांचा स्वभाव, दृष्टीकोन बराच भिन्न होता.

In reply to by मनिष

इनोबा म्हणे Sun, 06/08/2008 - 20:46
काय समृद्ध आयुष्य जगला हा माणूस! आणि कित्येकांचे आयुष्य समृद्ध करून गेला... असेच म्हणतो... दाढेसाहेब,दुव्याबद्दल धन्यवाद! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

लिखाळ Sun, 06/08/2008 - 15:24
छान लेख.. इथे दुवा दिल्याबद्दल अनेक आभार. --लिखाळ.

डॉ.प्रसाद दाढे Sun, 06/08/2008 - 18:52
भाई, तू जर अफजलखानाला भेटायला गेला असतास तर फक्त गप्पा र॑गवून परत आला असतास ह्या सुनिताबाई॑च्या शेर्‍यावर प्रच॑ड हसलो.. पुल॑ची सुनिताबाई॑ना 'उपदेशपा॑डे' ही उपाधीपण अफाटच आहे. दिनेशनी भाई॑ना 'ती फुलराणी' लिहिता॑ना प्रत्यक्ष पाहिले आहे..त्याच॑ पहिल॑ वाचन ऐकल॑ आहे. हे सगळ॑ वाचता॑नाच अ॑गावर रोमा॑च उभे राहतात. खर॑च, ती लोक॑ किती भाग्यवान ज्या॑ना पुल॑च्या सहवासात राहता आले.. मी त्या॑ना धीर एकवटून एक फोन केला होता.खर॑ म्हणजे प्रत्यक्षच भेटण्याची खूप इच्छा होती पण ठाऊक होत॑ की ते आजारी आहेत अन त्या॑ना लोका॑चा त्रास होतो. मी त्या॑ना १९९९ साल स॑पून नवे शतक सुरू होण्याचे निमित्त काढून शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. माझ्या चौथ्या की पाचव्या प्रयत्नात साक्षात भाई फोनवर आले. मला तर गगन ठे॑गणे झाले होते.. माझ्या परमेश्वराशी मी फोनवर बोलत होतो! पण त्या॑चा आवाज खूप कापरा व खोल गेला होता.. म्हैस, असा मी असामी इ ध्वनीमुद्रिका॑मधला सुपरिचित आवाजाचा पत्ताच नव्हता. एक क्षण खूप वाईट वाटले पण धैर्य एकवटून त्या॑च्याशी येणेप्रमाणे स॑भाषण झाले मी: नमस्कार भाई, मी आपला वाचक डॉ.प्रसाद दाढे बोलतो आहे भाई: काय नाव म्हणाला॑त..? मी: प्रसाद दाढे भाई: प्रसाद दाढे काय..प्रसाद दाढे..प्रसाद दाढे (इथे माझ्या अ॑गावर अक्षरशः काटा आला..त्या॑च्या तो॑डून माझे नाव उच्चारले गेले होते..) बोला काय म्हणता॑य? मी: नवीन शतकाच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा! भाई: धन्यवाद, तुम्हालाही मी: तुम्हा॑ला भेटण्याची खूप इच्छा आहे, तुमच्या पाया॑वर डोके ठेवायचे आहे.. भाई: अहो माझ्या डोक्यावर कशाला पाय ठेवता॑य.. :) (तशा अवस्थेतही पुल॑नी माझी विकेट काढली होती) मी फार छोटा माणूस आहे.. आणि आता भेटून काहीही उपयोग नाही कारण पाच मिनिटे जरी बोललो तरी मला अर्धा तास पडून रहावे लागते. आता माझ्या पुस्तका॑तच मला भेटा.. माझा गळा दाटून आला होता.. काय बोलावे तेच सुचत नव्हते. माझ्याशी फोनवर बोलल्यामुळे सुद्धा त्या॑ना त्रास होणार होता. असे वाटले की त्या॑चा पार्किन्सनचा आजार मी घेऊ शकलो तर..? फोन ठेवल्यावर बराच वेळ मी सुन्न बसून होतो. साक्षात पुल॑शी बोलल्याचा आन॑दही होत होता आणि त्या॑चा खोल गेलेला आवाज आठवून दु:खही होत होत॑..

In reply to by व्यंकट

संजय अभ्यंकर Sun, 06/08/2008 - 22:11
धन्य तो लोकसत्ता! जी वेबसाईट जगभरचे लोक पहातात, त्याच्या संरक्षणासाठी सतत दक्ष यंत्रणा ते उभी करीत नाहीत! जागरूक नॉर्टन सिक्यूरीटीने माझा लॅपटॉप वाचवला. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

चतुरंग Sun, 06/08/2008 - 20:03
अहो काय दुवा दिलात हो? बसल्या बैठकीला वाचून काढला. रविवार सकाळ पुलं बरोबरच्या मैफलीत जावी हा योग होता. आपल्याला किती दुवे देऊ तेवढे कमी आहेत! आपली पुलं बरोबर बोलण्याची आठवण तर डोळ्यात पाणीच. काय लिहू? शब्द नाहीत. चतुरंग

यशोधरा Sun, 06/08/2008 - 21:51
>>>गेल्या ४-५ दिवसांपासून व्हायरस आहेत, जपून . हो, माझ्या लॅपटॉपवर आलेत :( रिअल टाईम अँटीव्हायरस मुळे वाचला आहे लॅपटॉप :S

पल्लवी Mon, 06/09/2008 - 07:45
केवळ अप्रतिम लेख ! पु.लं. ही खरंच किती मोठी युनिवर्सिटी आहे ना ? एकदा का पु.लं वाचले की आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोनच बदलून जातो ! "हे जीवन सुन्दर आहे..", मनोमन पटतं..

केशवराव Mon, 06/09/2008 - 14:10
' तू मोठा झाल्यावर माझ्यावर एक लेख लिही. ' असे भाईंनी लिहीले , आणि दिनेशने लेख लिहून भाईंची इच्छा पुर्ण केलीच ; पण आम्हाला एक छान मेजवानी दिली. माईआत्तेला भाई ' उपदेशपांडे' म्हणत वाचून भाई घरातही 'असेच' होते. हे समजले. दिनेशला धन्यवाद.

डॉ.प्रसाद दाढे Mon, 06/09/2008 - 17:02
एकदा बाबासाहेब पुर॑दरे व पुल गप्पा मारत बसले होते ते॑व्हा बाबासाहेब म्हणाले, " भाई तुम्ही विनोदी लेखक! तुमच्या घरी तुम्ही आणि सुनिताबाई कायम हसतच असणार.." यावर पुल उत्तरले, "बाबासाहेब तुम्ही इतिहासकार! मग तुमच्या घरी निर्मलाताई हातात तलवार घेऊन मागे अन तुम्ही ढाल घेऊन पुढे पळत असाल..! :) पुल व्यक्तिशः अतिशय मिष्किल होते. ते समोरच्याची कधी दा॑डी गुल करतील ह्याचा नेम नसायचा. त्या॑च्या कोटीबाज किश्श्या॑चा एक स॑ग्रहच 'कोट्याधीश पुल' ह्या नावाने चतुर॑ग प्रतिष्ठानने प्रसिद्ध केला होता. मला त्या॑चे काही अप्रकाशित किस्सेसुद्धा माहित आहेत.. ते मिपाकरा॑ना स॑मेलनात ऐकवीन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुलपप्रेमी॑नी रविवार लोकसत्ता मधील (लोकर॑ग पुरवणी) डॉ. दिनेश ठाकूर या॑नी लिहिलेला लेख जरूर वाचावा. अप्रतिम आहे. बारा जून रोजी आमच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची आठवी पुण्यतिथी आहे. (पुल॑च्या स॑दर्भात पपुण्यतिथी हे शब्दसुद्धा लिहिता॑ना हात अडखळतात, डोळ्यासमोरचा स॑गणक धुसर होऊ पहातो..) खालील लि॑क पहावी. http://www.loksatta.com/daily/20080608/lokkal.htm

मराठी कविता उत्खनन मंडळातर्फे जनहितार्थ जारी:

दंभकुठार ·

In reply to by रामदास

मुक्तसुनीत Sun, 06/08/2008 - 10:48
समजले मलाही विशेष नाही पण काही " एन्-क्रिप्टेड" मजकूर समजला तेव्हढा सांगतो : १.पंगेश व्याडगावकर = मंगेश पाडगावकर २.अधीर रोघे = सुधीर मोघे ३. नशोक वायगावकर = अशोक नायगावकर ४.तलेश काटील = नलेश पाटील ५.भौमित्र = सौमित्र ६.समीप झरे = संदीप खरे १.फिलीप दित्रे = दिलीप पुरुषोत्तम चित्रे २.अतीश बाळ्सेकर = सतीश काळसेकर ३.केमंत पिवटे = हेमंत दिवटे ४.वलील घाग = सलील वाघ ५.कचिन लेक्चर = सचिन केतकर ६.गर्जेश तोलंकी = वर्जेश सोलंकी बाकीच्या तिमिराचे कुठार साहेबानी येऊन हरण करावे :-)

विसुनाना Mon, 06/09/2008 - 11:11
पहाटसुलभ औत्सुक्य आणि लगबगीपोटी - पहाट'सुलभ'? लगबगीपोटी की पोटी -(पक्षी 'पॉटी')- लगबगीमुळे? तीव्र स्वदुपाकी स्वरूपाच्या या कवितांच्या -स्वदुपाकी हा शब्द नवीन आहे. अर्थ कळावा. तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजारांपासून -पहाटसुलभ लगबगीपोटी टॉवेल न गुंडाळताच मी स्वर्गाचे दार उघडले आणि मोक्ष मिळाला असे काहीसे वाटत असतानाच बंद केलेल्या दारावर टकटक करणारा सुतार पक्षी आपल्या पंखांवर कुणाचा तरी उबदार हात फिरेल या अपेक्षेने आपली शेपटी फुलारून एक मनी मांजरी त्याच्यावर झेपावत आहे हे पहाणारा भित्तीचित्रातला काळाशार आदिवासी अस्फुटसा हसत हातातला विळा कमरेला खोचून हातोडा आणि तारा यांच्यामध्ये भांडण लावून मोकळा होईल किंवा कसे या विचाराने माझ्या पोटात गोळा उठू नये म्हणून मी चारमिनारचा एक कश मारला. त्यासरशी .... असे मला होते आहे. 'कधीपासून?' - दिगंत कालापासून अनाहत नादाप्रमाणे टाळक्यात घणाघणा घण घालत राहणारा हा प्रश्न डोक्यातून उपटून टाकण्यासाठी काय करावे? असाही एक उपप्रश्न मेंदूनामक घंटेचे आता ताशात रूपांतर झाल्याने राखाडी रंगाच्या कातडीवर तडतडत आहे. अवार्डेच्छू कवींनी सदर टोळक्यात मिंगलण्यास -इची भनं! (गमंभनं नव्हे! ;)) जाव दे झाडून.... लेखकाचे वक्रोक्तीवरचे प्रभुत्व पाहता यापुढील लेखात यापेक्षाही जास्त अस्वली गुदगुल्या व्हाव्यात ही अपेक्षा आहे.

दंभकुठार Wed, 06/11/2008 - 10:40
पहिल्या दोन रिस्पॉन्सदात्यांप्रमाणेच , मलाही या कवींच्या ( विशेषतः पहिल्या यादीतील ) लोकप्रियतेचे गूढ अद्याप उमगलेले नाही !!!

In reply to by रामदास

मुक्तसुनीत Sun, 06/08/2008 - 10:48
समजले मलाही विशेष नाही पण काही " एन्-क्रिप्टेड" मजकूर समजला तेव्हढा सांगतो : १.पंगेश व्याडगावकर = मंगेश पाडगावकर २.अधीर रोघे = सुधीर मोघे ३. नशोक वायगावकर = अशोक नायगावकर ४.तलेश काटील = नलेश पाटील ५.भौमित्र = सौमित्र ६.समीप झरे = संदीप खरे १.फिलीप दित्रे = दिलीप पुरुषोत्तम चित्रे २.अतीश बाळ्सेकर = सतीश काळसेकर ३.केमंत पिवटे = हेमंत दिवटे ४.वलील घाग = सलील वाघ ५.कचिन लेक्चर = सचिन केतकर ६.गर्जेश तोलंकी = वर्जेश सोलंकी बाकीच्या तिमिराचे कुठार साहेबानी येऊन हरण करावे :-)

विसुनाना Mon, 06/09/2008 - 11:11
पहाटसुलभ औत्सुक्य आणि लगबगीपोटी - पहाट'सुलभ'? लगबगीपोटी की पोटी -(पक्षी 'पॉटी')- लगबगीमुळे? तीव्र स्वदुपाकी स्वरूपाच्या या कवितांच्या -स्वदुपाकी हा शब्द नवीन आहे. अर्थ कळावा. तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजारांपासून -पहाटसुलभ लगबगीपोटी टॉवेल न गुंडाळताच मी स्वर्गाचे दार उघडले आणि मोक्ष मिळाला असे काहीसे वाटत असतानाच बंद केलेल्या दारावर टकटक करणारा सुतार पक्षी आपल्या पंखांवर कुणाचा तरी उबदार हात फिरेल या अपेक्षेने आपली शेपटी फुलारून एक मनी मांजरी त्याच्यावर झेपावत आहे हे पहाणारा भित्तीचित्रातला काळाशार आदिवासी अस्फुटसा हसत हातातला विळा कमरेला खोचून हातोडा आणि तारा यांच्यामध्ये भांडण लावून मोकळा होईल किंवा कसे या विचाराने माझ्या पोटात गोळा उठू नये म्हणून मी चारमिनारचा एक कश मारला. त्यासरशी .... असे मला होते आहे. 'कधीपासून?' - दिगंत कालापासून अनाहत नादाप्रमाणे टाळक्यात घणाघणा घण घालत राहणारा हा प्रश्न डोक्यातून उपटून टाकण्यासाठी काय करावे? असाही एक उपप्रश्न मेंदूनामक घंटेचे आता ताशात रूपांतर झाल्याने राखाडी रंगाच्या कातडीवर तडतडत आहे. अवार्डेच्छू कवींनी सदर टोळक्यात मिंगलण्यास -इची भनं! (गमंभनं नव्हे! ;)) जाव दे झाडून.... लेखकाचे वक्रोक्तीवरचे प्रभुत्व पाहता यापुढील लेखात यापेक्षाही जास्त अस्वली गुदगुल्या व्हाव्यात ही अपेक्षा आहे.

दंभकुठार Wed, 06/11/2008 - 10:40
पहिल्या दोन रिस्पॉन्सदात्यांप्रमाणेच , मलाही या कवींच्या ( विशेषतः पहिल्या यादीतील ) लोकप्रियतेचे गूढ अद्याप उमगलेले नाही !!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
सकाळची वेळ होती.कुणीतरी दाराखालच्या फटीतून एक पाम्फलेट सरकवले..पहाटसुलभ औत्सुक्य आणि लगबगीपोटी , मी सदर पाम्फलेट लगोलग वाचून संपविले..सदर पाम्फलेटात काही महत्वाची माहिती अहे असे जाणून समग्र मिपास्थांच्या सेवेशी चिकटवीत आहे .. आपला ( बहुत जनांसि अप्रियू ,) दंभकुठार *********************************** मराठी कविता उत्खनन मंडळातर्फे जनहितार्थ जारी: मधुमेहापासून आपले रक्षण करण्याची सदिच्छा बाळगणारया वाचक / कवींनी खालील कवींच्या कवितांपासून सावध रहावे..तीव्र स्वदुपाकी स्वरूपाच्या या कवितांच्या वाचन / श्रवणाने रक्तातील साखरेची पातळी धोकादायक स्तर गाठू शकेल अशी शक्यता आमच्या

माझ्यासाठी आता सारंच चांगलं आहे...

फटू ·

अरुण मनोहर Sun, 06/08/2008 - 04:15
सतीश, पहाटेच्या उम्मीद भरल्या वेळी उदास राग का बरे? Cheer up. दुभंगलेलं मन सांधायला मिपा आहे की.

राजेश Sun, 06/08/2008 - 05:45
अरे सतिश, आपल्याकडे (माणगावला) इतका झक्कास पाऊस पडतोय नं... ...पहिल्या पावसाच्या नुसत्या कल्पनेनी सुद्धा छान वाटेल बघ तूला!! राजेश

विसोबा खेचर Sun, 06/08/2008 - 06:42
दिसत असलो मी हसत खेळत तरीही माझं मन आतून केव्हाच दुभंगलं आहे अरे देवा! असं काय झालं रे? आम्हाला तरी सांग! :) बाय द वे, चारोळी छान आहे. एखाददा वाचायला बरी वाटते. मध्यंन्तरी मात्र मिपावर अगदी चारोळ्यांचं रान उठलं होतं व या चारोळीवाल्यांनी नक्को जीव केला होता! कुठे गेली आमची चारोळीवाली प्राजू? :) असो..! तात्या.

In reply to by गिरिजा

फटू Mon, 06/09/2008 - 02:29
सारखे नसतात... असंच काहीतरी बिनसलं आणि त्या सणकीमध्ये वरची चारोळी जन्माला आली... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मदनबाण Sun, 06/08/2008 - 15:35
मन दुभंगुन सुद्दा आयुष्य हे जगावच लागत. स्वतः दु:ख सहन करुन सुद्दा दुसर्‍यासाठी हसावच लागत. (४ओळींचा वेडा) मदनबाण.....

रामदास Mon, 06/09/2008 - 07:05
अशी अटाची अशी तटाची उजाड भाषा हवी कशाला स्वप्नांचे नव गेंद गुलाबी अजून फुलती तुझ्या उशाला. अशीच असते यौवन यात्रा शूल व्यथांचे उरी धरावे जळत्या जखमावरी स्मितांचे गुलाबपाणी शिंपत जावे. कुसुमाग्रजांची कविता आहे.

अरुण मनोहर Sun, 06/08/2008 - 04:15
सतीश, पहाटेच्या उम्मीद भरल्या वेळी उदास राग का बरे? Cheer up. दुभंगलेलं मन सांधायला मिपा आहे की.

राजेश Sun, 06/08/2008 - 05:45
अरे सतिश, आपल्याकडे (माणगावला) इतका झक्कास पाऊस पडतोय नं... ...पहिल्या पावसाच्या नुसत्या कल्पनेनी सुद्धा छान वाटेल बघ तूला!! राजेश

विसोबा खेचर Sun, 06/08/2008 - 06:42
दिसत असलो मी हसत खेळत तरीही माझं मन आतून केव्हाच दुभंगलं आहे अरे देवा! असं काय झालं रे? आम्हाला तरी सांग! :) बाय द वे, चारोळी छान आहे. एखाददा वाचायला बरी वाटते. मध्यंन्तरी मात्र मिपावर अगदी चारोळ्यांचं रान उठलं होतं व या चारोळीवाल्यांनी नक्को जीव केला होता! कुठे गेली आमची चारोळीवाली प्राजू? :) असो..! तात्या.

In reply to by गिरिजा

फटू Mon, 06/09/2008 - 02:29
सारखे नसतात... असंच काहीतरी बिनसलं आणि त्या सणकीमध्ये वरची चारोळी जन्माला आली... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मदनबाण Sun, 06/08/2008 - 15:35
मन दुभंगुन सुद्दा आयुष्य हे जगावच लागत. स्वतः दु:ख सहन करुन सुद्दा दुसर्‍यासाठी हसावच लागत. (४ओळींचा वेडा) मदनबाण.....

रामदास Mon, 06/09/2008 - 07:05
अशी अटाची अशी तटाची उजाड भाषा हवी कशाला स्वप्नांचे नव गेंद गुलाबी अजून फुलती तुझ्या उशाला. अशीच असते यौवन यात्रा शूल व्यथांचे उरी धरावे जळत्या जखमावरी स्मितांचे गुलाबपाणी शिंपत जावे. कुसुमाग्रजांची कविता आहे.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तुम्ही चांगले वागा, किंवा वाईट वागा माझ्यासाठी आता सारंच चांगलं आहे दिसत असलो मी हसत खेळत तरीही माझं मन आतून केव्हाच दुभंगलं आहे

भिवाण्णाची काळी माय

यशोधरा ·

भाग्यश्री Sun, 06/08/2008 - 06:06
फार आवडली गं.. डोळ्यात पाणीच आलं.. एक -एक करून आठवण येत असताना भिवाण्णाची होणारी ढासळणारी स्थिती, आणि पोराच्या कडू आठवणीने,शेत सोडून जायच्या कल्पनेने त्याला झालेला त्रास.. बरोब्बर पकडलायेस.. http://bhagyashreee.blogspot.com/

प्रशांतकवळे Sun, 06/08/2008 - 09:29
खुपच छान... हृदयाला हात घालते.. एसइझेड मध्ये ज्यांच्या जमिनी जात आहेत, त्यांच्या भावना पण अशाच असतील.. प्रशांत

प्रभाकर पेठकर Sun, 06/08/2008 - 09:46
भिवण्णाची व्यथा काळजाला घरं पाडणारी आहे. लेखन नेमके, भावनेने ओथंबलेले अणि प्रवाही आहे. अभिनंदन. अशाच नवनविन कथा मिपावर वाचायला मिळतील अशी अपेक्षा.

अभिज्ञ Sun, 06/08/2008 - 10:18
यशोधरा, अतिशय भावस्पर्शी व आशयगर्भ लेखन. लेखनाचा पोत हा अतिशय प्रगल्भ आणि प्रवाहि आहे. भिवण्णाची कथा अतिशय सुंदर खुलवली आहेस. ग्रामीण भाषेचा बाज चांगलाच जमलाय. असो, इथे आपले असेच उत्तम लिखाण वाचायला मिळावे. एका उत्तम लेखाबद्दल आपले अभिनंदन. अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

विसोबा खेचर Sun, 06/08/2008 - 22:53
यशोधरा, अभिज्ञच्या आणि इतरही सर्वांच्या प्रतिसादाशी सहमत! खूपच सुंदर लिहिलं आहेस. एक दर्जेदार लेखन वाचण्याचा आनंद वाटला! तुझं अधिकाधिक उत्तमोत्तम लेखन मिपाकरांना वाचायला मिळो हीच इच्छा! तात्या.

नारदाचार्य Sun, 06/08/2008 - 16:41
छान. या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यातला एकच पैलू पकडत इतरांना स्पर्श करीत केलेली मांडणी आवडली. एरवी अशा प्रयत्नांत फसगत होत असते. इथे ती झाली नाही. बांधणी पक्की झाली. याचाच अर्थ तुम्ही रचनेविषयी विचार करूनच लिहिले आहे. या कथेची अखेर वेगळ्या शब्दांत मांडता आली असती का याचा विचार करतोय... (अखेर म्हणजे तुम्ही केली आहे तीच, फक्त शब्द-वाक्यरचना वेगळी काही...) त्याचबरोबर अधिक समर्पक काही शीर्षक करता येईल का?

शितल Sun, 06/08/2008 - 17:49
सुद॑र लिखाण केले आहेस, मस्त हळवा विषय आणि ग्रामीण भाषा ही जशीच्या तशी वापरली आहेस. वाचता वाचता डोळ्यात कधी पाणी येते ते कळत ही नाही. असेच छान लिखाण मिपाकरा॑ना वाचायला मिळु दे तुझ्या कडुन.

इनोबा म्हणे Sun, 06/08/2008 - 22:59
सुंदर लिहीलं आहे. ग्रामीण बाज आवडला.भिवाण्णा मनाला चटका लावून गेला. पु. ले. शु. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

पल्लवी Mon, 06/09/2008 - 08:04
शाळेत असताना अशा छान छान कथा अभ्यासक्रमात असायच्या..ग्रामिण बाजेच्या.. आज बर्‍याच दिवसांनी असं काहितरी वाचलंय.. येसु ताई, तु अजुन खुप खुप लिही.. अभिनंदन आणि शुभेच्छा..

यशोधरा Mon, 06/09/2008 - 08:08
बिपिन कार्यकर्ते, अरुण मनोहर, भाग्यश्री, प्रशांत कवळे, पेठकरकाका, अभिज्ञ, तात्या, बेसनलाडू, शीतल, इनूभाव, पल्लवी कथा आवडल्याचं सांगितल्याबद्दल खूप खूप आभार. नारदाचार्य, कथेचा शेवट जरासा बदलला. अजून निराळे शीर्षक काही सुचत नाही मला. तुम्हांला काही सुचले असेल तर जरुर सांगा. तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

आनंदयात्री Mon, 06/09/2008 - 11:42
बर्‍याच दिवसांनी भान विसरुन काहितरी वाचले. कथेने सुरवातीपासुन पकड घेतली ते भिवाण्णा काळ्याआईशी एकरुप झाला तोपर्यंत.. अंगावरचा शहारा जाणवला .. यशोधरे खरच फार फार सुंदर लिहलं आहेस गं, अभिनंदन. ... कसं छोटसंच गोजिरवाणं झोपडीवजा घर होतं त्याचं. हसरी माय, पहाडासारखा बाप आणि - आत्तासुद्धा बहिणीचा तेह्वाचा अवतार आठवून हसू आलं त्याला - नाक सुरसूर ओढणारी आणि परकर नेसून, इकडून तिकडे कोंबड्यांमागं नाचणारी, आणि शेळीशी गप्पा मारणारी झिपरी, शेंबडी छोटी बहीण. आत्ता सुद्धा तिच्या आठवणीने तो आत जरा हलला. कशी गोजीरवाणी बाय होती... चंद्रभागा किती सुरेख वर्णन, शब्दांचा किती व्यवस्थित वापर !! ग्रेट वन इंडिड्ड यशभाय !! अशी लेखातली सौंदर्यस्थळं वेगळी काढता येणार नाहीत, सगळा लेखच छान आहे. राज्यस्तरीय सरकारी साहित्य स्पर्धेला पाठवावा, तु बक्षिस घेतांना आम्हाला टाळ्या वाजवतांना खुप आनंद होईल. :)

In reply to by आनंदयात्री

राजे Mon, 06/09/2008 - 14:50
हेच म्हणतो आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

स्वाती दिनेश Mon, 06/09/2008 - 11:47
यशोधरा,कथा चटका लावून जाते.फार छान लिहिले आहेस.. असेच लिहित रहा..पुलेशु, स्वाती

सहज Mon, 06/09/2008 - 11:48
वरील सर्व अनुकूल प्रतिसादांशी सहमत. लेख अतिशय छान. अजुन असेच उत्तमोत्तम लेख वाचायला मिळावे ही अपेक्षा.

मनिष Mon, 06/09/2008 - 12:23
नुकताच 'सरकार राज' पहिला (नाही आवडला)...त्यांनीही सेझ सारखाच मुद्द घेतला आहे...खरच वाटते असेच वाटत असेल त्या शेतकर्‍यांना... गोष्ट छान जमली आहे यशोधरा!

अप्रतिम कथा आणि हृदयस्पर्शी शेवट. जमिनीविकून जमिनदार म्हणवणार्‍या भिवण्णाच्या मुलाप्रमाणे आसपासचे उधळे पाटीलपुत्र्(आपल्या आडनावात पाटील लावणारे आणि सेझ साठी जमिनी विकणारे धेंड) पाहीले की जणू आपणच भिवण्णा झाल्याप्रमाणे वाटते. पुण्याचे पेशवे

यशोधरा Tue, 06/10/2008 - 00:06
आनंदयात्री, तुझ्या कौतुकाच्या शब्दांबद्दल आभार मानत नाही, भाय लोकांत इतका भाईचारा हवच ना!! :) राजे, ऋचा, स्वातीताई, सहज, डॉक्टरसाहेब, मनिष, पद्मश्री , पेशवे सरकार खूप खूप आभार कथा वाचून अभिप्राय दिल्याबद्द्ल. असाच लोभ असूदे. :)

धनंजय Tue, 06/10/2008 - 02:56
कथा. (पण मृत्यूने कथेचा शेवट साधायला नको होता असे वाटते.) असेच सुरेख लेखन येत राहू द्या.

यशोधरा Tue, 06/10/2008 - 22:36
पण मृत्यूने कथेचा शेवट साधायला नको होता असे वाटते खरं सांगायच तर मलाही दु:खी शेवट वाचायला आवडत नाही, पण इथे ते अपरिहार्य आहे! कारण, भिवण्णा कधीच मृत्यू पावतो, जेह्वा त्याची जमीन विकली जाते तेह्वाच. मग शरीराने तो भले जिवंत का असेना! प्रत्यक्ष आपल्या मुलाने जमिनीचा सौदा करणं, ह्या दु:खातून तो सावरु शकलेला नाही, त्या धक्क्यानं त्याची पत्नी कायमची कोसळल्याचं शल्यही आहे त्याला. ज्या मुलावर त्याच्या आशा होत्या, जो मुलगा काळ्या आईसाठी झगडेल असं त्याला वाटत होतं, त्यानेच अशी जमीन भिवण्णाला काही न सांगता सवरता परभारे वि़कली, हा एक धक्काच आहे त्याला. पुन्हा जमीन हे केवळ शेतीचं साधन नाही आहे त्याच्यासाठी, त्याच्या आयुष्याच्या कित्येक आठवणी त्या जमिनीत रुजलेल्या आहेत... त्याचं थकलेलं म्हातारं शरीर आणि त्याच बरोबर उदासत चाललेलं मन, किती सोसेल? काय वाटत तुम्हांला?

डोमकावळा Tue, 06/10/2008 - 22:01
अतिशय सुरेख कथा.... मन अगदी हळहळून जातं. शब्द आणि भावना अत्यंत प्रभावी पणे मांडल्या आहेत.. जणु काही नजरेसमोर सगळं घडत आहे... यशोधरा, तुमचे मनापासून अभिनंदन... पुढील लेखनाच्य प्रतिक्षेत आहोत...

चतुरंग Tue, 06/10/2008 - 22:51
ग्रामीण भाषेचा बाज चांगला साधलाय. भिवाण्णाची उलघाल नेमक्या शब्दात टिपली आहे. भीवाण्णाच्या लेखी काळ्या आईला सोडून जाणं ही कल्पनाच असह्य त्यामुळे शेवट असाच होणार कारण काळी आई हेच जगणं आणी तेच मरणं! अशाच उत्तम कथा येऊदेत. चतुरंग

वेदश्री गुरुवार, 06/12/2008 - 12:04
यशोधरा, काळ्या आईच्या लेकरांच्या कथा वाचायला मला नेहमीच अत्यंत आवडते. कुठेतरी जबरदस्त आपलेपणा वाटतो त्यात. भिवाण्णाही असाच माझा वाटला. खूपच नेमक्या शब्दात वर्णन करण्याची हातोटी झकास आहे तुझी. असंच लिहित जा मनापासून. नारदाचार्यांनी नाव सुचवायला सांगितलेले पाहून मला जर कुठले नाव सुचले असेल तर ते आहे 'मनासारखं'. कसं वाटतंय बघ.

यशोधरा Fri, 06/13/2008 - 08:34
सुवर्णमयी, डोमकावळा, चतुरंग, वेदश्री धन्यवाद. छान आहे ग तुला सुचलेलं शीर्षक वेदश्री.. :) चतुरंग, अगदी ....

काळा_पहाड Fri, 06/13/2008 - 14:20
रीतसर भागिरथी घरात आली, ती इथलीच होऊन गेली. ढेकूळ पाण्यात विरघळाव, तशी विरघळली. सही!!! लाजवाब!!!! भीवाण्णाच्या काळ्या माय ने डोळ्यांत अश्रू तरळले. सुंदर लिहीलंय. सर्वच अंगांनी लेख छान जमलाय. काळा पहाड

मुक्तसुनीत Sun, 06/15/2008 - 12:03
ही कथा थोडी उशीरा वाचली. त्यामुळे प्रतिक्रिया लिहायला वेळ लागला. कथा मला खूप आवडली. कथेचा स्कोप तुम्ही अगदी मर्यादित ठेवला आहे. गुंतागुंत टाळली आहे. मात्र या मर्यादित स्कोपमधे एकूण भाषेचा , कथानकाचा तोल ढळू न देता काम केले आहे. याबद्द्दल तुमचे अभिनंदन ! तुमचे हे लिखाण पाहून सांगावेसे वाटते की याहून जास्त व्यामिश्र अशा घटना आणि माणसामाणसांमधल्या नात्यांचा आणि प्रवृत्तींचा वेध घेण्याचा प्रयत्न तुम्ही करावा. जसजसे हे होईल तसतसे लिखाणाची लांबीसुद्धा वाढेलच. आणि मग भाषा, कथानक यांच्यातील एकजीवत्व , "कोहीरन्स" , आणि त्या सगळ्याचा मिळून एक गडद परिणाम होण्याची शक्यता निर्माण होईल. तुमची झेप अजून दूर जावी ; भरारी बनावी अशी शुभेच्छा !

यशोधरा Sun, 06/15/2008 - 16:56
काळा_पहाड, कथा वाचून तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल खूप आभार. याहून जास्त व्यामिश्र अशा घटना आणि माणसामाणसांमधल्या नात्यांचा आणि प्रवृत्तींचा वेध घेण्याचा प्रयत्न तुम्ही करावा मुक्तसुनीत, मी जरुर प्रयत्न करेन. तुमच्या सूचनांबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मनापासून खूप धन्यवाद. सगळ्याच मिपाकरांचे खूप आभार. तुम्ही सगळेच खूप भरभरून दाद देता, कौतुक करता... खूप हुरुप वाढतो त्यामुळे! असाच लोभ असूदेत. :)

भाग्यश्री Sun, 06/08/2008 - 06:06
फार आवडली गं.. डोळ्यात पाणीच आलं.. एक -एक करून आठवण येत असताना भिवाण्णाची होणारी ढासळणारी स्थिती, आणि पोराच्या कडू आठवणीने,शेत सोडून जायच्या कल्पनेने त्याला झालेला त्रास.. बरोब्बर पकडलायेस.. http://bhagyashreee.blogspot.com/

प्रशांतकवळे Sun, 06/08/2008 - 09:29
खुपच छान... हृदयाला हात घालते.. एसइझेड मध्ये ज्यांच्या जमिनी जात आहेत, त्यांच्या भावना पण अशाच असतील.. प्रशांत

प्रभाकर पेठकर Sun, 06/08/2008 - 09:46
भिवण्णाची व्यथा काळजाला घरं पाडणारी आहे. लेखन नेमके, भावनेने ओथंबलेले अणि प्रवाही आहे. अभिनंदन. अशाच नवनविन कथा मिपावर वाचायला मिळतील अशी अपेक्षा.

अभिज्ञ Sun, 06/08/2008 - 10:18
यशोधरा, अतिशय भावस्पर्शी व आशयगर्भ लेखन. लेखनाचा पोत हा अतिशय प्रगल्भ आणि प्रवाहि आहे. भिवण्णाची कथा अतिशय सुंदर खुलवली आहेस. ग्रामीण भाषेचा बाज चांगलाच जमलाय. असो, इथे आपले असेच उत्तम लिखाण वाचायला मिळावे. एका उत्तम लेखाबद्दल आपले अभिनंदन. अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

विसोबा खेचर Sun, 06/08/2008 - 22:53
यशोधरा, अभिज्ञच्या आणि इतरही सर्वांच्या प्रतिसादाशी सहमत! खूपच सुंदर लिहिलं आहेस. एक दर्जेदार लेखन वाचण्याचा आनंद वाटला! तुझं अधिकाधिक उत्तमोत्तम लेखन मिपाकरांना वाचायला मिळो हीच इच्छा! तात्या.

नारदाचार्य Sun, 06/08/2008 - 16:41
छान. या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यातला एकच पैलू पकडत इतरांना स्पर्श करीत केलेली मांडणी आवडली. एरवी अशा प्रयत्नांत फसगत होत असते. इथे ती झाली नाही. बांधणी पक्की झाली. याचाच अर्थ तुम्ही रचनेविषयी विचार करूनच लिहिले आहे. या कथेची अखेर वेगळ्या शब्दांत मांडता आली असती का याचा विचार करतोय... (अखेर म्हणजे तुम्ही केली आहे तीच, फक्त शब्द-वाक्यरचना वेगळी काही...) त्याचबरोबर अधिक समर्पक काही शीर्षक करता येईल का?

शितल Sun, 06/08/2008 - 17:49
सुद॑र लिखाण केले आहेस, मस्त हळवा विषय आणि ग्रामीण भाषा ही जशीच्या तशी वापरली आहेस. वाचता वाचता डोळ्यात कधी पाणी येते ते कळत ही नाही. असेच छान लिखाण मिपाकरा॑ना वाचायला मिळु दे तुझ्या कडुन.

इनोबा म्हणे Sun, 06/08/2008 - 22:59
सुंदर लिहीलं आहे. ग्रामीण बाज आवडला.भिवाण्णा मनाला चटका लावून गेला. पु. ले. शु. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

पल्लवी Mon, 06/09/2008 - 08:04
शाळेत असताना अशा छान छान कथा अभ्यासक्रमात असायच्या..ग्रामिण बाजेच्या.. आज बर्‍याच दिवसांनी असं काहितरी वाचलंय.. येसु ताई, तु अजुन खुप खुप लिही.. अभिनंदन आणि शुभेच्छा..

यशोधरा Mon, 06/09/2008 - 08:08
बिपिन कार्यकर्ते, अरुण मनोहर, भाग्यश्री, प्रशांत कवळे, पेठकरकाका, अभिज्ञ, तात्या, बेसनलाडू, शीतल, इनूभाव, पल्लवी कथा आवडल्याचं सांगितल्याबद्दल खूप खूप आभार. नारदाचार्य, कथेचा शेवट जरासा बदलला. अजून निराळे शीर्षक काही सुचत नाही मला. तुम्हांला काही सुचले असेल तर जरुर सांगा. तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

आनंदयात्री Mon, 06/09/2008 - 11:42
बर्‍याच दिवसांनी भान विसरुन काहितरी वाचले. कथेने सुरवातीपासुन पकड घेतली ते भिवाण्णा काळ्याआईशी एकरुप झाला तोपर्यंत.. अंगावरचा शहारा जाणवला .. यशोधरे खरच फार फार सुंदर लिहलं आहेस गं, अभिनंदन. ... कसं छोटसंच गोजिरवाणं झोपडीवजा घर होतं त्याचं. हसरी माय, पहाडासारखा बाप आणि - आत्तासुद्धा बहिणीचा तेह्वाचा अवतार आठवून हसू आलं त्याला - नाक सुरसूर ओढणारी आणि परकर नेसून, इकडून तिकडे कोंबड्यांमागं नाचणारी, आणि शेळीशी गप्पा मारणारी झिपरी, शेंबडी छोटी बहीण. आत्ता सुद्धा तिच्या आठवणीने तो आत जरा हलला. कशी गोजीरवाणी बाय होती... चंद्रभागा किती सुरेख वर्णन, शब्दांचा किती व्यवस्थित वापर !! ग्रेट वन इंडिड्ड यशभाय !! अशी लेखातली सौंदर्यस्थळं वेगळी काढता येणार नाहीत, सगळा लेखच छान आहे. राज्यस्तरीय सरकारी साहित्य स्पर्धेला पाठवावा, तु बक्षिस घेतांना आम्हाला टाळ्या वाजवतांना खुप आनंद होईल. :)

In reply to by आनंदयात्री

राजे Mon, 06/09/2008 - 14:50
हेच म्हणतो आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

स्वाती दिनेश Mon, 06/09/2008 - 11:47
यशोधरा,कथा चटका लावून जाते.फार छान लिहिले आहेस.. असेच लिहित रहा..पुलेशु, स्वाती

सहज Mon, 06/09/2008 - 11:48
वरील सर्व अनुकूल प्रतिसादांशी सहमत. लेख अतिशय छान. अजुन असेच उत्तमोत्तम लेख वाचायला मिळावे ही अपेक्षा.

मनिष Mon, 06/09/2008 - 12:23
नुकताच 'सरकार राज' पहिला (नाही आवडला)...त्यांनीही सेझ सारखाच मुद्द घेतला आहे...खरच वाटते असेच वाटत असेल त्या शेतकर्‍यांना... गोष्ट छान जमली आहे यशोधरा!

अप्रतिम कथा आणि हृदयस्पर्शी शेवट. जमिनीविकून जमिनदार म्हणवणार्‍या भिवण्णाच्या मुलाप्रमाणे आसपासचे उधळे पाटीलपुत्र्(आपल्या आडनावात पाटील लावणारे आणि सेझ साठी जमिनी विकणारे धेंड) पाहीले की जणू आपणच भिवण्णा झाल्याप्रमाणे वाटते. पुण्याचे पेशवे

यशोधरा Tue, 06/10/2008 - 00:06
आनंदयात्री, तुझ्या कौतुकाच्या शब्दांबद्दल आभार मानत नाही, भाय लोकांत इतका भाईचारा हवच ना!! :) राजे, ऋचा, स्वातीताई, सहज, डॉक्टरसाहेब, मनिष, पद्मश्री , पेशवे सरकार खूप खूप आभार कथा वाचून अभिप्राय दिल्याबद्द्ल. असाच लोभ असूदे. :)

धनंजय Tue, 06/10/2008 - 02:56
कथा. (पण मृत्यूने कथेचा शेवट साधायला नको होता असे वाटते.) असेच सुरेख लेखन येत राहू द्या.

यशोधरा Tue, 06/10/2008 - 22:36
पण मृत्यूने कथेचा शेवट साधायला नको होता असे वाटते खरं सांगायच तर मलाही दु:खी शेवट वाचायला आवडत नाही, पण इथे ते अपरिहार्य आहे! कारण, भिवण्णा कधीच मृत्यू पावतो, जेह्वा त्याची जमीन विकली जाते तेह्वाच. मग शरीराने तो भले जिवंत का असेना! प्रत्यक्ष आपल्या मुलाने जमिनीचा सौदा करणं, ह्या दु:खातून तो सावरु शकलेला नाही, त्या धक्क्यानं त्याची पत्नी कायमची कोसळल्याचं शल्यही आहे त्याला. ज्या मुलावर त्याच्या आशा होत्या, जो मुलगा काळ्या आईसाठी झगडेल असं त्याला वाटत होतं, त्यानेच अशी जमीन भिवण्णाला काही न सांगता सवरता परभारे वि़कली, हा एक धक्काच आहे त्याला. पुन्हा जमीन हे केवळ शेतीचं साधन नाही आहे त्याच्यासाठी, त्याच्या आयुष्याच्या कित्येक आठवणी त्या जमिनीत रुजलेल्या आहेत... त्याचं थकलेलं म्हातारं शरीर आणि त्याच बरोबर उदासत चाललेलं मन, किती सोसेल? काय वाटत तुम्हांला?

डोमकावळा Tue, 06/10/2008 - 22:01
अतिशय सुरेख कथा.... मन अगदी हळहळून जातं. शब्द आणि भावना अत्यंत प्रभावी पणे मांडल्या आहेत.. जणु काही नजरेसमोर सगळं घडत आहे... यशोधरा, तुमचे मनापासून अभिनंदन... पुढील लेखनाच्य प्रतिक्षेत आहोत...

चतुरंग Tue, 06/10/2008 - 22:51
ग्रामीण भाषेचा बाज चांगला साधलाय. भिवाण्णाची उलघाल नेमक्या शब्दात टिपली आहे. भीवाण्णाच्या लेखी काळ्या आईला सोडून जाणं ही कल्पनाच असह्य त्यामुळे शेवट असाच होणार कारण काळी आई हेच जगणं आणी तेच मरणं! अशाच उत्तम कथा येऊदेत. चतुरंग

वेदश्री गुरुवार, 06/12/2008 - 12:04
यशोधरा, काळ्या आईच्या लेकरांच्या कथा वाचायला मला नेहमीच अत्यंत आवडते. कुठेतरी जबरदस्त आपलेपणा वाटतो त्यात. भिवाण्णाही असाच माझा वाटला. खूपच नेमक्या शब्दात वर्णन करण्याची हातोटी झकास आहे तुझी. असंच लिहित जा मनापासून. नारदाचार्यांनी नाव सुचवायला सांगितलेले पाहून मला जर कुठले नाव सुचले असेल तर ते आहे 'मनासारखं'. कसं वाटतंय बघ.

यशोधरा Fri, 06/13/2008 - 08:34
सुवर्णमयी, डोमकावळा, चतुरंग, वेदश्री धन्यवाद. छान आहे ग तुला सुचलेलं शीर्षक वेदश्री.. :) चतुरंग, अगदी ....

काळा_पहाड Fri, 06/13/2008 - 14:20
रीतसर भागिरथी घरात आली, ती इथलीच होऊन गेली. ढेकूळ पाण्यात विरघळाव, तशी विरघळली. सही!!! लाजवाब!!!! भीवाण्णाच्या काळ्या माय ने डोळ्यांत अश्रू तरळले. सुंदर लिहीलंय. सर्वच अंगांनी लेख छान जमलाय. काळा पहाड

मुक्तसुनीत Sun, 06/15/2008 - 12:03
ही कथा थोडी उशीरा वाचली. त्यामुळे प्रतिक्रिया लिहायला वेळ लागला. कथा मला खूप आवडली. कथेचा स्कोप तुम्ही अगदी मर्यादित ठेवला आहे. गुंतागुंत टाळली आहे. मात्र या मर्यादित स्कोपमधे एकूण भाषेचा , कथानकाचा तोल ढळू न देता काम केले आहे. याबद्द्दल तुमचे अभिनंदन ! तुमचे हे लिखाण पाहून सांगावेसे वाटते की याहून जास्त व्यामिश्र अशा घटना आणि माणसामाणसांमधल्या नात्यांचा आणि प्रवृत्तींचा वेध घेण्याचा प्रयत्न तुम्ही करावा. जसजसे हे होईल तसतसे लिखाणाची लांबीसुद्धा वाढेलच. आणि मग भाषा, कथानक यांच्यातील एकजीवत्व , "कोहीरन्स" , आणि त्या सगळ्याचा मिळून एक गडद परिणाम होण्याची शक्यता निर्माण होईल. तुमची झेप अजून दूर जावी ; भरारी बनावी अशी शुभेच्छा !

यशोधरा Sun, 06/15/2008 - 16:56
काळा_पहाड, कथा वाचून तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल खूप आभार. याहून जास्त व्यामिश्र अशा घटना आणि माणसामाणसांमधल्या नात्यांचा आणि प्रवृत्तींचा वेध घेण्याचा प्रयत्न तुम्ही करावा मुक्तसुनीत, मी जरुर प्रयत्न करेन. तुमच्या सूचनांबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मनापासून खूप धन्यवाद. सगळ्याच मिपाकरांचे खूप आभार. तुम्ही सगळेच खूप भरभरून दाद देता, कौतुक करता... खूप हुरुप वाढतो त्यामुळे! असाच लोभ असूदेत. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार