मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंधार

अजय जोशी ·
लेखनविषय:
यानामधून फिरणा-याला अंधार कधी चुकणार नाही, स्वतःची ओळख विसरला त्याला देव कधी दिसणार नाही.

शिवरायांचे स्मारक

हेरंब ·

अभिज्ञ 05/06/2008 - 19:57
आपण हया विषयावरील कालच्या लोकसत्तेतला अग्रलेख वाचलेला दिसतोय. शिवाय पुतळा उभारणार्‍या नेत्यांना महाराजांविषयी किती आस्था आहे हे जनता चांगलेच ओळखून आहे. स्मारक हवेच तर सर्व प्रमुख गडांच्या डागडुजीसाठी काहीतरी करा. राजगडाकडे तर सरकारचे लक्षच नाही. शिवसेना-भाजप सत्तेवर असताना त्यांना कोणि आडवले होते? हाच उपक्रम जर शिवसेना भाजप ह्यांनी केला असता तर? मुळात मला तरी आपला आक्षेप हा राष्ट्रवादी-कोंग्रेस ह्यांनी स्मारक उभारण्यावर वाटतोय. तुम्हाला राजगडाचाही "सिंहगड" करायचा आहे का?म्हणजे अगदि गडाच्या माथ्यावर नेणारे रस्ते वगैरे? हे राजकारणि लोक गडा-किल्ल्यांकडे लक्ष देत नाहित ते एका द्रॄष्टिने उत्तमच आहे.नाहितर तिथेहि हि लोके आपल्या "गढ्या" उभारतील. त्यापेक्षा हे स्मारक समुद्रात उभारत आहेत तेच उत्तम. अभि़ज्ञ

In reply to by अभिज्ञ

हेरंब 05/06/2008 - 20:14
माझा आक्षेप सध्याच्या सरकारबद्द्ल नाही. सर्व राजकारणी सारखेच. म्हणूनच आज केतकरांच्या घरावर हल्ला झाला. तुमचा मुद्दाही पटला. राजगड तर आम्हा ट्रेकर्स् चा आवडता आहे. त्याचा काय कुठल्याच गडाचा 'सिंहगड' होऊ नये. पण समुद्रांत एवढा खर्च करुन तो बांधायला माझा आक्षेप आहे.

In reply to by हेरंब

मध्यंतरी प्रतापगड किल्ल्याचा एक बुरुज ढासळला. आणि या प्रकाराची शक्यता अनेक गिरीप्रेमींनी अगोदरच वर्तविली होती. तसे निवेदनही पुरातत्व खाते आणि सरकारला दिले होते. पण सरकारने दुर्लक्ष केले. मंडणगड तालुक्यातील गोपाळगड त्यावर एका व्यक्तीने तटबंदीच्या कमानीत भक्कम दरवाजा बसवून आतमधे आंब्याची बाग केली आहे. आणि ती जमिन माझीच आहे म्हणतो मग सरकार तेव्हा काय करत आहे? कोट्यावधी रुपये खर्चून स्मारक उभारण्याआधी ह्या तटबंद्या तर पक्क्या करा. पुण्याचे पेशवे

देवदत्त 05/06/2008 - 21:59
आहेत त्याच मूर्त्या/पुतळे सांभाळणे कठीण आहे. त्यांच्या विटंबनेवरूनच तर मारामार्‍या/ जाळपोळ /दंगली होत असतात. आता ऐतिहासिक महापुरूष तर सोडाच एखाद्या मंत्र्याच्या फोटोला काळे लावले म्हणून लोक रस्त्यावर जाळपोळ करतात. ह्या पार्श्वभूमीवर नवीन काही स्मारके बनविणे गरजेचे तर नाहीच, उलट खरे तर गल्लोगल्ली आहे तेच पुतळे काढून एकत्र ठेवावेत व त्यांचा सांभाळ करा असे म्हणावेसे वाटते. आधीच सरकार म्हणते पैसे नाहीत/ कमी आहेत. पुन्हा १०० कोटी रू खर्च करून स्मारक उभारणार. त्यापेक्षा ते पैसे लोकांच्या इतर कामाकरीता वापरा म्हणावे. शिवसेना-भाजप सत्तेवर असताना त्यांना कोणि आडवले होते? हाच उपक्रम जर शिवसेना भाजप ह्यांनी केला असता तर? तर मी तोही दिखाऊपणा आहे असे म्हणालो असतो. वास्तविक कोणत्याही पक्षाने असे काही करावे असे मला नाही वाटत.

In reply to by भाग्यश्री

देवदत्त 06/06/2008 - 17:41
बायदवे.. 'शुद्धलेखन' नही सांगते.. पण मूर्तीचे अनेकवचन मूर्तीच राहते.. दुरूस्ती सांगितल्याबद्दल धन्यवाद . मी आपला तो शब्द नेहमीच्या वापरातील म्हणूनच लिहिला. आणि तुम्ही सांगितल्यावर शोधले तर 'मूर्त्या' हा शब्द ही भरपूर ठिकाणी मिळाला. त्याचाच परिणाम असेल :) असो, तो मुद्दा गौण आहे. नेमक्या मुद्यावर पुन्हा लिहिन.

In reply to by देवदत्त

विसोबा खेचर 06/06/2008 - 00:18
देवदत्ताशी सहमत आहे! उगाच स्मारकांची शोबाजी करण्यापेक्षा राजकारण्यांनी जनतेचा पैसा प्रामाणिकपणे व सचोटीने जनतेच्याच हिताकरता खर्च करावा. आज महाराष्ट्रातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष आहे, त्याकरता काहीतरी ठोस कार्यक्रम आखला पाहिजे! खुद्द महाराजांनादेखील तेच अधिक आवडेल असं मला वाटतं! आपला, (महाराजांचा भक्त) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मन 06/06/2008 - 00:25
अगदि मनातलं बोललात. १००% सहमत. आपलाच, मनोबा

अभिज्ञ 06/06/2008 - 00:42
आहेत त्याच मूर्त्या/पुतळे सांभाळणे कठीण आहे. त्यांच्या विटंबनेवरूनच तर मारामार्‍या/ जाळपोळ /दंगली होत असतात. आता ऐतिहासिक महापुरूष तर सोडाच एखाद्या मंत्र्याच्या फोटोला काळे लावले म्हणून लोक रस्त्यावर जाळपोळ करतात. ह्या पार्श्वभूमीवर नवीन काही स्मारके बनविणे गरजेचे तर नाहीच, उलट खरे तर गल्लोगल्ली आहे तेच पुतळे काढून एकत्र ठेवावेत व त्यांचा सांभाळ करा असे म्हणावेसे वाटते. आधीच सरकार म्हणते पैसे नाहीत/ कमी आहेत. पुन्हा १०० कोटी रू खर्च करून स्मारक उभारणार. त्यापेक्षा ते पैसे लोकांच्या इतर कामाकरीता वापरा म्हणावे. अहो अशा अनेक गोष्टी आहेत. दर वेळेला काहि वेगळा विषय आला कि काहि लोक (उदा.केतकर...) लगेच आधिच पैसा कमी आहे त्यात केवढी गरिबि आहे, कुपोषण आहे,पुर आहेत,दुष्काळ आहेत वगैरे ठराविक रडगाणि गायला सुरु करतात. हे प्रोब्लेम्स गेले कित्येक वर्षे भारतात आहेतच.अजुन पुढची १०० वर्षे गेलीत तरि सुध्दा हे प्रोब्लेम्स राहणारच. म्हणुन काय हे असले उपक्रम सरकारने कधिच हाति घेउ नयेत का? आधीच सरकार म्हणते पैसे नाहीत/ कमी आहेत. पुन्हा १०० कोटी रू खर्च करून स्मारक उभारणार. त्यापेक्षा ते पैसे लोकांच्या इतर कामाकरीता वापरा म्हणावे. हे विधान फक्त टाळ्या घेण्यासाठी ठीक आहे.परंतु असे कधि होते का हो? वास्तविक पाहता हि ओरड महाराष्ट्रातील संकुचित विचार करणारी मंडळि सतत करत असतात हेच महाराष्ट्राचे दुर्दैव. हे च स्मारक जर आंबेडकर किंवा गांधी ह्यांचे असते तर मात्र हेच तथाकथित पुरोगामी संपादक सरकारचा उदो उदो करत गावभर फिरले असते. असो, अभिज्ञ.

उदय सप्रे 06/06/2008 - 10:41
आपल्या सगळ्या बुजुर्ग लोकांना विरोध म्हणून मी म्हणत नाहिये पण मला असे वाटते की..... शिवाजी महाराजांसारख्या उन्नत व्य्क्तीमत्वाच्या पुतळ्यावर हे पैसे खर्च झले तरी "गंगेत घोडे न्हाले" म्हणायची वेळ आहे , त्यामुळे वाईटातून चांगले शोधायची सवय लागलेले मन असे सांगते की, त्या निमिताने अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा जर आमचे महाराज जगाला दिसणार असतील तर आमच्या मुख्यमंत्र्यांना ही सुबुध्दीच झाली म्हणायची नाही का? शिवाय अभिज्ञ यांनी म्हटल्याप्रमाणे :आधीच सरकार म्हणते पैसे नाहीत/ कमी आहेत. पुन्हा १०० कोटी रू खर्च करून स्मारक उभारणार. त्यापेक्षा ते पैसे लोकांच्या इतर कामाकरीता वापरा म्हणावे. हे विधान फक्त टाळ्या घेण्यासाठी ठीक आहे.परंतु असे कधि होते का हो:" हे पण खरेच आहे. तेंव्हा मला जरी तुमच्या सगळ्यांच्या मनातील भावना / सद्हेतू कळले तरी पण या आपल्या सगळ्यांच्याच "वांझोट्या" भावना कवटाळत बसण्यापेक्षाही "महाराज" अजून "उंच" होत जगाला दिसणार , विमानातून आपण मुंबईजवळ आलो की आधी आपल्याला आप्ल्या हृदयावर विराजमान असलेला परमेश्वर - आपले महाराज दिसणार असा व्यापक दृष्टीकोन हवाय..... हे फक्त माझे मत आहे , कुणावरही टीका नव्हे.....तसे वाटत असल्यास क्षमस्व ! हेरंब साहेब , आपले मत : आपले नेते (सर्व पक्षातले) एक दिवस जरी शिवबांसारखे प्रामाणिकपणे वागले तरी मोठे आश्चर्य म्हणावे लागेल! हे फारच अपेक्षा करताय तुम्ही ! अहो, आपल्याला अटल बिहारी वाजपेयी किंवा ए.पी.जे.अब्दुल कलाम यासारखे संशोधक नकोच आहेत हो, आपल्याला "सावरकरांचा पुतळा / फोटो विधान्भवनात नको" असे म्हणणारे माजोरडे दाक्षिण्यात्य मणीशंकर अय्यरच हवे आहेत हो ! तेंव्हा हे सगळे लोक (कोण ते कळले असेलच , लिहीत नाहिये , महाराजांचे शिष्य म्हणवणारे) का शांत असतात? एम्.एफ. हुसैन सारख्या आपल्या देवी देवतांची खिली उडवणारे "आंबट शौकीन" लोक उजळ माअथ्याने रहातातच आहेत ना आपल्या मराठी लोकांच्या नाकावर टिच्चून? .....असो विषय खूपच जहाल आहे..... आपला विनम्र, उदय सप्रें

रम्या 06/06/2008 - 14:01
.. सहमत. अशा प्रकारच्या पुतळ्याकडे फक्त एक दगडमाती आणि घातूंनी बनवलेली मुर्ती समजायचं कारण नाही. ही मुर्ती शिवरायांच्या पराक्रमाचं प्रतिक म्हणून मानूया ना. हा पुतळा मुंबईत येणार्‍या परदेशीयांचं महाराजांबद्दलचं कुतुहल तरी जागृत करेल. त्यांना पुतळा कोणाचा? कोण हे शिवाजी महाराज? असे प्रश्न विचारणं भाग तरी पडेल. मान्य आहे की गडकिल्ल्यांचे संरक्षण महत्वाचे आहे, ते व्हायलाच पाहिजे पण त्यासाठी या पुतळ्याला विरोध करायची काय गरज आहे? खर्चाचं म्हणाल तर ज्या सरकार कडे मुंबईचं शांघाईकरण करायला पैसा आहे त्यांच सरकारला मुंबईचं थोडं तरी मराठीकरण करायला पैसा उभा करणं काहीच अवघड नाही. अहो यापुर्वी सरकार तर्फे खर्च होणारा सारा पैसा विधायक कामासाठीच खर्चं झाला? अहो धरणं, रस्ते, कालवे, पुल बांधताना एवढा भ्रष्टाचार होऊन एवढा पैसा खर्च होतो तेव्हा का नाही सुमार साहेबांना जाग येत. रम्या

चिन्या१९८५ 06/06/2008 - 21:15
ज्या पध्दतीने सरकारने योजना सांगितली आहे ती तशीच्या तशी अमलात येणार नाहिच पण जर तशी अमलात आणली तर हे नक्कीच स्वागतार्ह आहे. पण पुतळ्याबरोबर तिथे एक संग्रहालय पण बनवणार आहेत. माझ मत इतकच आहे की या सर्व स्थळाच्या स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. शिवाय सरकारला या अशा प्रोजेक्ट्सचा फारसा अनुभव नसल्याने खासगिकरणातुन ही मोहिम राबवली तर अजुन चांगले होईल असे वाटते. शिवाय याचबरोबर याचे मार्केटिंगही चांगल्या पध्दतीने करावे त्यामुळे हे एक प्रेक्षणिय स्थळ बनायला हवे व त्यातुन पर्यटकांना आकर्षीत करायला हवे. त्याचबरोबर किल्ल्यांच्या डागडुजीसाठीही काही अशीच मोठी तरतुद करावी.

देवदत्त 06/06/2008 - 22:47
हे विधान फक्त टाळ्या घेण्यासाठी ठीक आहे.परंतु असे कधि होते का हो? बहुधा अशाच विधानामुळे केतकरांना टाळ्या नाही मिळाल्या पण त्यांच्या घरावर हल्ला झाला. (वाचून बघावाच लागेल आता त्यांचा अग्रलेख.) अरेच्च्या, बहुतेक प्रतिसाद केतकरांकरीताच लिहिले आहेत :) मी त्यांचा अग्रलेख अजून पाहिलाही नाही आहे. मी आपले एक सर्वसामान्य नागरीक म्हणून माझी प्रतिक्रिया दिली. आणखी एक, इथे लिहिल्याप्रमाणे सर्वांकरिताच स्मारके बनवावे लागणार आहेत. मग कशाला सरकारने लोकांच्या इतर प्रश्नांकडे बघावे? वर्षानुवर्षे हे प्रश्न राहणार आहेतच त्याकडे नंतर पाहता येईल. आणि नाहीतरी सरकार कुठे सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे बघते. असो, हे मतभेद राहणारच. तुम्ही तुमचे मत सांगितले, मी माझे. उगाच वाद का वाढवावा? :)

पक्या 07/06/2008 - 00:05
अभिज्ञ , उदय यांच्या मताशी सहमत. महाराज" अजून "उंच" होत जगाला दिसणार , विमानातून आपण मुंबईजवळ आलो की आधी आपल्याला आप्ल्या हृदयावर विराजमान असलेला परमेश्वर - आपले महाराज दिसणार असा व्यापक दृष्टीकोन हवाय..... ज्यांना माहीत नाही त्यांना महाराजांबद्द्ल आपसूकच माहीती मिळेल. एक मराठी माणसं सोडली तर देश पातळी वर आपल्या शिवबांचा पराक्रम आहे का माहित इतर अमराठी माणसांना? असला माहित तरी त्रोटक च असणार. महाराजांचे भव्यदिव्य स्मारक बांधणे हा स्वागतार्ह प्रकल्प आहे. एवढ्या खर्चिक प्रकल्पाचे काम तेवढ्याच उच्च प्रतिचे असावे आणि स्मारक बांधून पूर्ण झाल्यावर त्याचा मेंटेनन्स उत्तम सांभाळावा ही अपेक्षा मात्र आहे.

शेखस्पिअर 07/06/2008 - 00:57
अजूनही आपल्याकडे महाराजांचेच पुतळे उभे होतायत यात काही अर्थ नाही... तरीही माझा पक्या,अभि़ज्ञ,देवदत्त यांना पाठिंबा आहे... फक्त अभि़ज्ञचे एक वाक्य खटकते... "हे च स्मारक जर आंबेडकर किंवा गांधी ह्यांचे असते तर मात्र हेच तथाकथित पुरोगामी संपादक सरकारचा उदो उदो करत गावभर फिरले असते."

In reply to by शेखस्पिअर

अन्या दातार 07/06/2008 - 20:04
"हे च स्मारक जर आंबेडकर किंवा गांधी ह्यांचे असते तर मात्र हेच तथाकथित पुरोगामी संपादक सरकारचा उदो उदो करत गावभर फिरले असते." यात काहीच खटकण्यासारखे नाही. आजच माणणीय रामदास आठवले यांनी आंबेडकरांचे स्मारक उभे करण्याची मागणी केली आहे. त्यावर कोणीच काही बोलत नाहीए.

In reply to by शेखस्पिअर

अभिज्ञ 08/06/2008 - 17:22
अहो , इथे आपलि रेख मोठीच आहे. मी म्हणो ,वा कोणि ना म्हणो ,ती मोठिच राहणार. तसेच बाकिच्या रेषाहि ब-यापैकी मोठ्याच आहेत. इथे रेषांच्या लाबींची तुलना मुळीच नाहिये. प्रश्न हा कोण कुठल्या रेषेकडे कुठल्या महत्वाने पहाते आहे त्याचा आहे. किंवा जास्तच सविस्तर बोलायचे झाले तर इथे ह्या रेषेचा रंग हा काहि जणांना नेहमी खटकत असतो. माझे विधान आपण काळजीपुर्वक वाचले असतेत तर ते आपल्याला खटकले नसते. असो. अभिज्ञ.

In reply to by अनन्त जोशि

सर्किट 24/06/2008 - 07:52
नक्कीच . महाराष्ट्रात कुमार गंधर्वांचे स्मारक देखील उभारावे. पुण्यात बालगंधर्वांचे स्मारक म्हणून पुलंनी नाट्यगृह उभारले. मुंबईचे लोक कुमारांचे स्मारक उभारण्यात किती पुढाकार घेतात, ते बघायचे. - सर्किट

अभिज्ञ 05/06/2008 - 19:57
आपण हया विषयावरील कालच्या लोकसत्तेतला अग्रलेख वाचलेला दिसतोय. शिवाय पुतळा उभारणार्‍या नेत्यांना महाराजांविषयी किती आस्था आहे हे जनता चांगलेच ओळखून आहे. स्मारक हवेच तर सर्व प्रमुख गडांच्या डागडुजीसाठी काहीतरी करा. राजगडाकडे तर सरकारचे लक्षच नाही. शिवसेना-भाजप सत्तेवर असताना त्यांना कोणि आडवले होते? हाच उपक्रम जर शिवसेना भाजप ह्यांनी केला असता तर? मुळात मला तरी आपला आक्षेप हा राष्ट्रवादी-कोंग्रेस ह्यांनी स्मारक उभारण्यावर वाटतोय. तुम्हाला राजगडाचाही "सिंहगड" करायचा आहे का?म्हणजे अगदि गडाच्या माथ्यावर नेणारे रस्ते वगैरे? हे राजकारणि लोक गडा-किल्ल्यांकडे लक्ष देत नाहित ते एका द्रॄष्टिने उत्तमच आहे.नाहितर तिथेहि हि लोके आपल्या "गढ्या" उभारतील. त्यापेक्षा हे स्मारक समुद्रात उभारत आहेत तेच उत्तम. अभि़ज्ञ

In reply to by अभिज्ञ

हेरंब 05/06/2008 - 20:14
माझा आक्षेप सध्याच्या सरकारबद्द्ल नाही. सर्व राजकारणी सारखेच. म्हणूनच आज केतकरांच्या घरावर हल्ला झाला. तुमचा मुद्दाही पटला. राजगड तर आम्हा ट्रेकर्स् चा आवडता आहे. त्याचा काय कुठल्याच गडाचा 'सिंहगड' होऊ नये. पण समुद्रांत एवढा खर्च करुन तो बांधायला माझा आक्षेप आहे.

In reply to by हेरंब

मध्यंतरी प्रतापगड किल्ल्याचा एक बुरुज ढासळला. आणि या प्रकाराची शक्यता अनेक गिरीप्रेमींनी अगोदरच वर्तविली होती. तसे निवेदनही पुरातत्व खाते आणि सरकारला दिले होते. पण सरकारने दुर्लक्ष केले. मंडणगड तालुक्यातील गोपाळगड त्यावर एका व्यक्तीने तटबंदीच्या कमानीत भक्कम दरवाजा बसवून आतमधे आंब्याची बाग केली आहे. आणि ती जमिन माझीच आहे म्हणतो मग सरकार तेव्हा काय करत आहे? कोट्यावधी रुपये खर्चून स्मारक उभारण्याआधी ह्या तटबंद्या तर पक्क्या करा. पुण्याचे पेशवे

देवदत्त 05/06/2008 - 21:59
आहेत त्याच मूर्त्या/पुतळे सांभाळणे कठीण आहे. त्यांच्या विटंबनेवरूनच तर मारामार्‍या/ जाळपोळ /दंगली होत असतात. आता ऐतिहासिक महापुरूष तर सोडाच एखाद्या मंत्र्याच्या फोटोला काळे लावले म्हणून लोक रस्त्यावर जाळपोळ करतात. ह्या पार्श्वभूमीवर नवीन काही स्मारके बनविणे गरजेचे तर नाहीच, उलट खरे तर गल्लोगल्ली आहे तेच पुतळे काढून एकत्र ठेवावेत व त्यांचा सांभाळ करा असे म्हणावेसे वाटते. आधीच सरकार म्हणते पैसे नाहीत/ कमी आहेत. पुन्हा १०० कोटी रू खर्च करून स्मारक उभारणार. त्यापेक्षा ते पैसे लोकांच्या इतर कामाकरीता वापरा म्हणावे. शिवसेना-भाजप सत्तेवर असताना त्यांना कोणि आडवले होते? हाच उपक्रम जर शिवसेना भाजप ह्यांनी केला असता तर? तर मी तोही दिखाऊपणा आहे असे म्हणालो असतो. वास्तविक कोणत्याही पक्षाने असे काही करावे असे मला नाही वाटत.

In reply to by भाग्यश्री

देवदत्त 06/06/2008 - 17:41
बायदवे.. 'शुद्धलेखन' नही सांगते.. पण मूर्तीचे अनेकवचन मूर्तीच राहते.. दुरूस्ती सांगितल्याबद्दल धन्यवाद . मी आपला तो शब्द नेहमीच्या वापरातील म्हणूनच लिहिला. आणि तुम्ही सांगितल्यावर शोधले तर 'मूर्त्या' हा शब्द ही भरपूर ठिकाणी मिळाला. त्याचाच परिणाम असेल :) असो, तो मुद्दा गौण आहे. नेमक्या मुद्यावर पुन्हा लिहिन.

In reply to by देवदत्त

विसोबा खेचर 06/06/2008 - 00:18
देवदत्ताशी सहमत आहे! उगाच स्मारकांची शोबाजी करण्यापेक्षा राजकारण्यांनी जनतेचा पैसा प्रामाणिकपणे व सचोटीने जनतेच्याच हिताकरता खर्च करावा. आज महाराष्ट्रातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष आहे, त्याकरता काहीतरी ठोस कार्यक्रम आखला पाहिजे! खुद्द महाराजांनादेखील तेच अधिक आवडेल असं मला वाटतं! आपला, (महाराजांचा भक्त) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मन 06/06/2008 - 00:25
अगदि मनातलं बोललात. १००% सहमत. आपलाच, मनोबा

अभिज्ञ 06/06/2008 - 00:42
आहेत त्याच मूर्त्या/पुतळे सांभाळणे कठीण आहे. त्यांच्या विटंबनेवरूनच तर मारामार्‍या/ जाळपोळ /दंगली होत असतात. आता ऐतिहासिक महापुरूष तर सोडाच एखाद्या मंत्र्याच्या फोटोला काळे लावले म्हणून लोक रस्त्यावर जाळपोळ करतात. ह्या पार्श्वभूमीवर नवीन काही स्मारके बनविणे गरजेचे तर नाहीच, उलट खरे तर गल्लोगल्ली आहे तेच पुतळे काढून एकत्र ठेवावेत व त्यांचा सांभाळ करा असे म्हणावेसे वाटते. आधीच सरकार म्हणते पैसे नाहीत/ कमी आहेत. पुन्हा १०० कोटी रू खर्च करून स्मारक उभारणार. त्यापेक्षा ते पैसे लोकांच्या इतर कामाकरीता वापरा म्हणावे. अहो अशा अनेक गोष्टी आहेत. दर वेळेला काहि वेगळा विषय आला कि काहि लोक (उदा.केतकर...) लगेच आधिच पैसा कमी आहे त्यात केवढी गरिबि आहे, कुपोषण आहे,पुर आहेत,दुष्काळ आहेत वगैरे ठराविक रडगाणि गायला सुरु करतात. हे प्रोब्लेम्स गेले कित्येक वर्षे भारतात आहेतच.अजुन पुढची १०० वर्षे गेलीत तरि सुध्दा हे प्रोब्लेम्स राहणारच. म्हणुन काय हे असले उपक्रम सरकारने कधिच हाति घेउ नयेत का? आधीच सरकार म्हणते पैसे नाहीत/ कमी आहेत. पुन्हा १०० कोटी रू खर्च करून स्मारक उभारणार. त्यापेक्षा ते पैसे लोकांच्या इतर कामाकरीता वापरा म्हणावे. हे विधान फक्त टाळ्या घेण्यासाठी ठीक आहे.परंतु असे कधि होते का हो? वास्तविक पाहता हि ओरड महाराष्ट्रातील संकुचित विचार करणारी मंडळि सतत करत असतात हेच महाराष्ट्राचे दुर्दैव. हे च स्मारक जर आंबेडकर किंवा गांधी ह्यांचे असते तर मात्र हेच तथाकथित पुरोगामी संपादक सरकारचा उदो उदो करत गावभर फिरले असते. असो, अभिज्ञ.

उदय सप्रे 06/06/2008 - 10:41
आपल्या सगळ्या बुजुर्ग लोकांना विरोध म्हणून मी म्हणत नाहिये पण मला असे वाटते की..... शिवाजी महाराजांसारख्या उन्नत व्य्क्तीमत्वाच्या पुतळ्यावर हे पैसे खर्च झले तरी "गंगेत घोडे न्हाले" म्हणायची वेळ आहे , त्यामुळे वाईटातून चांगले शोधायची सवय लागलेले मन असे सांगते की, त्या निमिताने अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा जर आमचे महाराज जगाला दिसणार असतील तर आमच्या मुख्यमंत्र्यांना ही सुबुध्दीच झाली म्हणायची नाही का? शिवाय अभिज्ञ यांनी म्हटल्याप्रमाणे :आधीच सरकार म्हणते पैसे नाहीत/ कमी आहेत. पुन्हा १०० कोटी रू खर्च करून स्मारक उभारणार. त्यापेक्षा ते पैसे लोकांच्या इतर कामाकरीता वापरा म्हणावे. हे विधान फक्त टाळ्या घेण्यासाठी ठीक आहे.परंतु असे कधि होते का हो:" हे पण खरेच आहे. तेंव्हा मला जरी तुमच्या सगळ्यांच्या मनातील भावना / सद्हेतू कळले तरी पण या आपल्या सगळ्यांच्याच "वांझोट्या" भावना कवटाळत बसण्यापेक्षाही "महाराज" अजून "उंच" होत जगाला दिसणार , विमानातून आपण मुंबईजवळ आलो की आधी आपल्याला आप्ल्या हृदयावर विराजमान असलेला परमेश्वर - आपले महाराज दिसणार असा व्यापक दृष्टीकोन हवाय..... हे फक्त माझे मत आहे , कुणावरही टीका नव्हे.....तसे वाटत असल्यास क्षमस्व ! हेरंब साहेब , आपले मत : आपले नेते (सर्व पक्षातले) एक दिवस जरी शिवबांसारखे प्रामाणिकपणे वागले तरी मोठे आश्चर्य म्हणावे लागेल! हे फारच अपेक्षा करताय तुम्ही ! अहो, आपल्याला अटल बिहारी वाजपेयी किंवा ए.पी.जे.अब्दुल कलाम यासारखे संशोधक नकोच आहेत हो, आपल्याला "सावरकरांचा पुतळा / फोटो विधान्भवनात नको" असे म्हणणारे माजोरडे दाक्षिण्यात्य मणीशंकर अय्यरच हवे आहेत हो ! तेंव्हा हे सगळे लोक (कोण ते कळले असेलच , लिहीत नाहिये , महाराजांचे शिष्य म्हणवणारे) का शांत असतात? एम्.एफ. हुसैन सारख्या आपल्या देवी देवतांची खिली उडवणारे "आंबट शौकीन" लोक उजळ माअथ्याने रहातातच आहेत ना आपल्या मराठी लोकांच्या नाकावर टिच्चून? .....असो विषय खूपच जहाल आहे..... आपला विनम्र, उदय सप्रें

रम्या 06/06/2008 - 14:01
.. सहमत. अशा प्रकारच्या पुतळ्याकडे फक्त एक दगडमाती आणि घातूंनी बनवलेली मुर्ती समजायचं कारण नाही. ही मुर्ती शिवरायांच्या पराक्रमाचं प्रतिक म्हणून मानूया ना. हा पुतळा मुंबईत येणार्‍या परदेशीयांचं महाराजांबद्दलचं कुतुहल तरी जागृत करेल. त्यांना पुतळा कोणाचा? कोण हे शिवाजी महाराज? असे प्रश्न विचारणं भाग तरी पडेल. मान्य आहे की गडकिल्ल्यांचे संरक्षण महत्वाचे आहे, ते व्हायलाच पाहिजे पण त्यासाठी या पुतळ्याला विरोध करायची काय गरज आहे? खर्चाचं म्हणाल तर ज्या सरकार कडे मुंबईचं शांघाईकरण करायला पैसा आहे त्यांच सरकारला मुंबईचं थोडं तरी मराठीकरण करायला पैसा उभा करणं काहीच अवघड नाही. अहो यापुर्वी सरकार तर्फे खर्च होणारा सारा पैसा विधायक कामासाठीच खर्चं झाला? अहो धरणं, रस्ते, कालवे, पुल बांधताना एवढा भ्रष्टाचार होऊन एवढा पैसा खर्च होतो तेव्हा का नाही सुमार साहेबांना जाग येत. रम्या

चिन्या१९८५ 06/06/2008 - 21:15
ज्या पध्दतीने सरकारने योजना सांगितली आहे ती तशीच्या तशी अमलात येणार नाहिच पण जर तशी अमलात आणली तर हे नक्कीच स्वागतार्ह आहे. पण पुतळ्याबरोबर तिथे एक संग्रहालय पण बनवणार आहेत. माझ मत इतकच आहे की या सर्व स्थळाच्या स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. शिवाय सरकारला या अशा प्रोजेक्ट्सचा फारसा अनुभव नसल्याने खासगिकरणातुन ही मोहिम राबवली तर अजुन चांगले होईल असे वाटते. शिवाय याचबरोबर याचे मार्केटिंगही चांगल्या पध्दतीने करावे त्यामुळे हे एक प्रेक्षणिय स्थळ बनायला हवे व त्यातुन पर्यटकांना आकर्षीत करायला हवे. त्याचबरोबर किल्ल्यांच्या डागडुजीसाठीही काही अशीच मोठी तरतुद करावी.

देवदत्त 06/06/2008 - 22:47
हे विधान फक्त टाळ्या घेण्यासाठी ठीक आहे.परंतु असे कधि होते का हो? बहुधा अशाच विधानामुळे केतकरांना टाळ्या नाही मिळाल्या पण त्यांच्या घरावर हल्ला झाला. (वाचून बघावाच लागेल आता त्यांचा अग्रलेख.) अरेच्च्या, बहुतेक प्रतिसाद केतकरांकरीताच लिहिले आहेत :) मी त्यांचा अग्रलेख अजून पाहिलाही नाही आहे. मी आपले एक सर्वसामान्य नागरीक म्हणून माझी प्रतिक्रिया दिली. आणखी एक, इथे लिहिल्याप्रमाणे सर्वांकरिताच स्मारके बनवावे लागणार आहेत. मग कशाला सरकारने लोकांच्या इतर प्रश्नांकडे बघावे? वर्षानुवर्षे हे प्रश्न राहणार आहेतच त्याकडे नंतर पाहता येईल. आणि नाहीतरी सरकार कुठे सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे बघते. असो, हे मतभेद राहणारच. तुम्ही तुमचे मत सांगितले, मी माझे. उगाच वाद का वाढवावा? :)

पक्या 07/06/2008 - 00:05
अभिज्ञ , उदय यांच्या मताशी सहमत. महाराज" अजून "उंच" होत जगाला दिसणार , विमानातून आपण मुंबईजवळ आलो की आधी आपल्याला आप्ल्या हृदयावर विराजमान असलेला परमेश्वर - आपले महाराज दिसणार असा व्यापक दृष्टीकोन हवाय..... ज्यांना माहीत नाही त्यांना महाराजांबद्द्ल आपसूकच माहीती मिळेल. एक मराठी माणसं सोडली तर देश पातळी वर आपल्या शिवबांचा पराक्रम आहे का माहित इतर अमराठी माणसांना? असला माहित तरी त्रोटक च असणार. महाराजांचे भव्यदिव्य स्मारक बांधणे हा स्वागतार्ह प्रकल्प आहे. एवढ्या खर्चिक प्रकल्पाचे काम तेवढ्याच उच्च प्रतिचे असावे आणि स्मारक बांधून पूर्ण झाल्यावर त्याचा मेंटेनन्स उत्तम सांभाळावा ही अपेक्षा मात्र आहे.

शेखस्पिअर 07/06/2008 - 00:57
अजूनही आपल्याकडे महाराजांचेच पुतळे उभे होतायत यात काही अर्थ नाही... तरीही माझा पक्या,अभि़ज्ञ,देवदत्त यांना पाठिंबा आहे... फक्त अभि़ज्ञचे एक वाक्य खटकते... "हे च स्मारक जर आंबेडकर किंवा गांधी ह्यांचे असते तर मात्र हेच तथाकथित पुरोगामी संपादक सरकारचा उदो उदो करत गावभर फिरले असते."

In reply to by शेखस्पिअर

अन्या दातार 07/06/2008 - 20:04
"हे च स्मारक जर आंबेडकर किंवा गांधी ह्यांचे असते तर मात्र हेच तथाकथित पुरोगामी संपादक सरकारचा उदो उदो करत गावभर फिरले असते." यात काहीच खटकण्यासारखे नाही. आजच माणणीय रामदास आठवले यांनी आंबेडकरांचे स्मारक उभे करण्याची मागणी केली आहे. त्यावर कोणीच काही बोलत नाहीए.

In reply to by शेखस्पिअर

अभिज्ञ 08/06/2008 - 17:22
अहो , इथे आपलि रेख मोठीच आहे. मी म्हणो ,वा कोणि ना म्हणो ,ती मोठिच राहणार. तसेच बाकिच्या रेषाहि ब-यापैकी मोठ्याच आहेत. इथे रेषांच्या लाबींची तुलना मुळीच नाहिये. प्रश्न हा कोण कुठल्या रेषेकडे कुठल्या महत्वाने पहाते आहे त्याचा आहे. किंवा जास्तच सविस्तर बोलायचे झाले तर इथे ह्या रेषेचा रंग हा काहि जणांना नेहमी खटकत असतो. माझे विधान आपण काळजीपुर्वक वाचले असतेत तर ते आपल्याला खटकले नसते. असो. अभिज्ञ.

In reply to by अनन्त जोशि

सर्किट 24/06/2008 - 07:52
नक्कीच . महाराष्ट्रात कुमार गंधर्वांचे स्मारक देखील उभारावे. पुण्यात बालगंधर्वांचे स्मारक म्हणून पुलंनी नाट्यगृह उभारले. मुंबईचे लोक कुमारांचे स्मारक उभारण्यात किती पुढाकार घेतात, ते बघायचे. - सर्किट
शिवरायांचा पुतळा समुद्रात हे काही पटले नाही. शिवाय पुतळा उभारणार्‍या नेत्यांना महाराजांविषयी किती आस्था आहे हे जनता चांगलेच ओळखून आहे. स्मारक हवेच तर सर्व प्रमुख गडांच्या डागडुजीसाठी काहीतरी करा. राजगडाकडे तर सरकारचे लक्षच नाही. आपले नेते (सर्व पक्षातले) एक दिवस जरी शिवबांसारखे प्रामाणिकपणे वागले तरी मोठे आश्चर्य म्हणावे लागेल!

यौवनाची बाग

पुष्कराज ·

चेतन 05/06/2008 - 19:13
सही लिहलय रे रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे मस्तचं त्याच गंधाने अजुनी जेवनाचा बहर आहे हे जिवनाचा पाहिजे ना.? युवक चेतन

"पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा" ची आठवण आली. गंध ऐसा त्या फुलांचा धुंदी आजही राहीली छानच. रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे या दोन वाक्यांचा तर मी फॅन आहे. :) पुण्याचे पेशवे

इनोबा म्हणे 05/06/2008 - 21:31
त्याच गंधाने अजुनी जेवनाचा बहर आहे रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे हे मस्तच! पुढिल लेखनाकरिता शुभेच्छा! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

वरदा 05/06/2008 - 21:59
आवडली... अवांतरः गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे मग ह्या कविता अशा सुचत असाव्यात म्हणते मी या वयात? :W

विसोबा खेचर 06/06/2008 - 05:39
प्रियेस माझ्या आजवरी मी फुले कैक हो वाहिली गंध ऐसा त्या फुलांचा धुंदी आजही राहीली वा! छान आहे...

विजुभाऊ 06/06/2008 - 10:03
अवांतरः गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे मग ह्या कविता अशा सुचत असाव्यात म्हणते मी या वयात? रिटायरमेंट प्लॅन आहे हो हा :) कविता छान आहे. आवडली. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अरुण मनोहर 06/06/2008 - 15:17
रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे आवडल. फार दूरवरचा विचार केलाय पुष्कराजे!

चतुरंग 06/06/2008 - 19:34
नुकतीच साठी मागे सरुनी यौवनाला जाग आली बहर पुन्हा आला असा की जीवनाची बाग झाली प्रियेस माझ्या आजवरी मी फुले कैक हो वाहिली गंध ऐसा त्या फुलांचा धुंदी आजही राहीली हे विशेष आवडले. चतुरंग

चेतन 05/06/2008 - 19:13
सही लिहलय रे रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे मस्तचं त्याच गंधाने अजुनी जेवनाचा बहर आहे हे जिवनाचा पाहिजे ना.? युवक चेतन

"पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा" ची आठवण आली. गंध ऐसा त्या फुलांचा धुंदी आजही राहीली छानच. रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे या दोन वाक्यांचा तर मी फॅन आहे. :) पुण्याचे पेशवे

इनोबा म्हणे 05/06/2008 - 21:31
त्याच गंधाने अजुनी जेवनाचा बहर आहे रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे हे मस्तच! पुढिल लेखनाकरिता शुभेच्छा! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

वरदा 05/06/2008 - 21:59
आवडली... अवांतरः गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे मग ह्या कविता अशा सुचत असाव्यात म्हणते मी या वयात? :W

विसोबा खेचर 06/06/2008 - 05:39
प्रियेस माझ्या आजवरी मी फुले कैक हो वाहिली गंध ऐसा त्या फुलांचा धुंदी आजही राहीली वा! छान आहे...

विजुभाऊ 06/06/2008 - 10:03
अवांतरः गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे मग ह्या कविता अशा सुचत असाव्यात म्हणते मी या वयात? रिटायरमेंट प्लॅन आहे हो हा :) कविता छान आहे. आवडली. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अरुण मनोहर 06/06/2008 - 15:17
रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे आवडल. फार दूरवरचा विचार केलाय पुष्कराजे!

चतुरंग 06/06/2008 - 19:34
नुकतीच साठी मागे सरुनी यौवनाला जाग आली बहर पुन्हा आला असा की जीवनाची बाग झाली प्रियेस माझ्या आजवरी मी फुले कैक हो वाहिली गंध ऐसा त्या फुलांचा धुंदी आजही राहीली हे विशेष आवडले. चतुरंग
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कोण म्हणतो रात्र झाली आत्ताच आमुच्या जीवनाची आत्ता कुठे सुरवात झाली फिरुनी पुन्हा या यौवनाची नुकतीच साठी मागे सरुनी यौवनाला जाग आली बहर पुन्हा आला असा की जीवनाची बाग झाली प्रियेस माझ्या आजवरी मी फुले कैक हो वाहिली गंध ऐसा त्या फुलांचा धुंदी आजही राहीली त्याच गंधाने अजुनी जेवनाचा बहर आहे रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे

गुलाबाचे काटे

पुष्कराज ·

पार्टनर 06/06/2008 - 16:35
गुलाबाचे फुल देता काटे तुला बोचतात शब्द तुझे प्रेममय रातदिन टोचतात वाह ! मान गये ! :)

पार्टनर 06/06/2008 - 16:35
गुलाबाचे फुल देता काटे तुला बोचतात शब्द तुझे प्रेममय रातदिन टोचतात वाह ! मान गये ! :)
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तुझे माझे गुलाबाचे जुळ्लेच नाही नाते गुलाबाच्या गंधाहून काट्याचीच ओढ वाटे मैत्री मध्ये आपुल्या या भांडणच होती फार रुसुनिया कित्येकदा शब्दांचीच मारामार गुलाबाचे फुल देता काटे तुला बोचतात शब्द तुझे प्रेममय रातदिन टोचतात शब्दाविना फुलाविना तुझे माझे आहे नाते म्हणुनच गुलाबाच्या काट्यांचीही ओढ वाटे

"एक होता पोल्ट्रीयात्री"

विजुभाऊ ·

विजुभाऊ 05/06/2008 - 18:58
अरे हो लिहायला विसरलो चित्रपटात कंदील लाउन प्रकाश योजना असणार आहे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

आनंदयात्री 06/06/2008 - 09:41
पोल्ट्रीयात्रीच्या पोल्ट्रीत एकदा मोठा पेच निर्माण होतो, त्याचा अंडे विकायचा धंदा एकदम डाउन होतो. का म्हणुन तो कारण शोधायला लागतो. सगळ्या डिलर्स ला जाउन भेटतो, कर्मचार्‍यांना भेटतो. मग त्याला उमगते की आपल्या पोल्ट्रीतली अंडी पोक्कळ निघतात म्हणुन धंदा बसलाय. मग तो प्रचंड मोठी मोहिम राबवतो हे शोधायला की आपल्या कोंबड्यांना असा कोणता रोग झाला की ज्यामुळे अंडी पोक्कळ निघायला लागलीत ? १०-२० व्हेटरनरी डाक्टरांचा थवा अविरत भिडलेला असतो त्यासाठी. काहिच सापडत नाही. तो कंटाळतो, वैतागतो, हताश होतो अन सरतशेवटी डॉन नामक एका भाई ला शरण जातो. मग त्याला टिप मिळते की विजाभाई नामक एका त्याच्या रायव्हल ने कुटुंबनियोजन अधिकार्‍यांना(कंडोम वाटणार्‍या) पैसे खाउ घालुन त्याच्या पोल्ट्रीत त्यांची विजिट रोज संध्याकाळी ऍरेंज केलेली असते. त्या कुटुंबनियोजन अधिकार्‍यांचा अन विजाभाईचा बंदोबस्त करुन पोल्ट्रीयात्री निर्धास्त होतो. =)) =)) =))

छोटा डॉन 05/06/2008 - 19:33
>>अन सरतशेवटी डॉन नामक एका भाई ला शरण जातो. मग त्याला टिप मिळते की विजाभाई नामक एका त्याच्या रायव्हल ने कुटुंबनियोजन अधिकार्‍यांना पैसे खाउ घालुन त्याच्या पोल्ट्रीत त्यांची विजिट रोज संध्याकाळी ऍरेंज केलेली असते. लै भारी ... टेन्शन नको हां भाय, आपल्याकडे लै उपाय हायतं ... तात्पुरता उपाय म्हणून सगळ्या कोंबड्यांना सकाळ-सकाळ योगासन करायला लाव, आहार हा "सात्विक " हवा, मी लवकरच "रेसीपी" पाठवतो. त्यासाठी सगळ्या "सुगरणतायांना" संशोधनाला लावले आहे ... पाणी मात्र "पवित्र गंगाजल" वापर .... सध्याच्या वापरातल्या "डबक्याचा" उपयोग "गळ किंवा नांगर" टाकून बसण्यासाठी कर ... "राजें" कडून "टिप" मिळाली आहे, भविष्यात "शाकाहारी कोंबड्यांना व त्यांच्या अंड्यांना" चांगली मागणी येण्याची चिन्हे आहेत. >>आपल्या पोल्ट्रीतली अंडी पोक्कळ निघतात म्हणुन धंदा बसलाय हां, म्हणजे थोडक्यात हे "मिस्ड कॉल" प्रकरण आहे. लक्ष ठेवावे लागेल. भविष्यात मोठ्ठे नुकसान संभवते .... ये विजाभाई का नाम आजकल बहुत सुननेका पड रहा है, कहासे है ये पंटर ? ह्याचा "मोदी नामक मोटाभाई" बरोबर सेटिंग आहे ऐसा ऐक्या है, फिर तो लफडा हुवा ना ... टायरवाला भाई - छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

पोल्टीयात्री पोकळ अंड्यांचा विचार करत असता तिकडून तात्या येतो. आणि विचारतो "कसला विचार करतो आहेस पोल्ट्रय्या". पोल्टीयात्री: "घरात आणि विकायला कोणती अंडी पाठवावी?" तात्या: " घरची पोल्ट्री असताना तुला का रे अंड्यांची चिंता? त्या धमाल्याने तुझ्या सर्व कोंबड्या तर पळवल्या नाहीत ना?" पोल्टीयात्री: " अरे नाही रे. आज काल कोंबड्या पोकळ अंडी देऊ लागल्या आहेत" तात्या: "तू इनो घालतोस का कोंबड्याना?" पोल्टीयात्री: "हो. पण तुला कसे कळले." तात्या: "हा हा हा. अरे साधे आहे म्हणूनच कोंबड्यांची नुसती पोटंच नाही तर आतली अंडी पण साफ होतात.अरे आजकाल इनोचा खप वाढल्याची बातमी आहे. आणि हे नवीन इनो पोट जरा जास्तच साफ करते." पोल्टीयात्री: "तरीच. आजपासून कोंबड्याना इनो घालणे बंद. बंद म्हणजे बंद " अशाप्रकारे पोल्टीयात्रीने कोंबड्याना(माद्या) इनो घालणे बंद केले आणि कोंबड्या परत पहील्यासारखी भरदार अंडी देऊ लागल्या. आणि लोकांनीही कोंबड्यांच्या(नर) क्षमतेवर संशय घेणे सोडून दिले. डीस्क्लेमरः वरील कथानकातील सर्व पात्रे, घटना काल्पनिक आहेत. त्यातील कशाचाही वास्तविक जीवनाशी संबंध आढळला तर तो निव्वळ योगायोग समजावा. पुण्याचे पेशवे

वरदा 05/06/2008 - 20:49
मग पोल्ट्रीयात्री ने मिपावरुन सर्व सुग्रणींना कोंबड्यांसाठी उत्तमोत्तम रेसिपीज शोधुन द्यायला सांगितल्या.... वरदाची स्वयपाकातली गती यथातथाच पण तिने ठरवलं यावेळी आपण एक रेसिपी शोधून काढायचीच... तिची रेसिपी... घरात आणलेली सगळे धान्य निवडताना खाली गोळा झालेला कचरा फेकू नका...सगळा कोंबड्यांना खाऊ घाला...फुकट आणि होल ग्रेन्सची रेसिपी..करायला सोपी....पटकन होते आणि पौष्टीक असते.... मग सगळ्या तायांनी तिला अनुमोदन दिलं. पि.डा. काकूंनी स्पेश्शल निरोप पाठवला काकांबरोबर ' कित्ती सह्ही रेसिपी गं धान्य निवडायची कशी हे माहीतच नव्हतं आम्हाला' बाकीच्या तायांच्या आणि पेठकर काकांच्या रेसिपीज होत्या त्या अशा.... क्रमशः.....(झालं की नाही पर्फेक्ट विजुभाऊ ष्टाईल)

विजुभाऊ 06/06/2008 - 09:57
ए लेको चांगले पिक्चर बघायचे सोडुन तुमी "आमची माती आमची माणसे " आणि "अन्नदाता " कार्यक्रम लिहित सुटला आहात. अजुन दोनतीन छान गाणी टाका ना राव(!) हे घ्या एक गाणे जवा जुनाच पोपट हा लागला ईनो ईनो बोलायला गोष्ट निघाली चांगलीच खाष्ट पोपट म्हणतो मैनाच फाष्ट सांगुन सांगुन थकला हा पोपट लागला डोलायला...... जवा जुनाच पोपट हा लागला ईनो ईनो बोलायला आता तिकडुन हिरवीण येत्ये आन म्हन्त्ये कशी काय च्या काय...तू हिकडं बसलायस व्हयरं आन म्या सम्दं गाव धुंडाळून आल्ये की रे... मंग हीरो म्हंतो कसा सम्दे गाव धुंडाळुन आलीस पर पर माझ्या साठी नौकरी बघायची सुचलं न्हाय तुला तुजा बापुस मला म्हंतो की या हिकडे यायचे तर पोल्ट्रीत प्रॉडक्षन वाढव आता हे म्या कसं सांगु त्याना. ( हा आत्ता आठवलं आपल्या लक्ष्या वर चित्रित केलेलं एक गानं हाय " कोंबड्यानो अंडी द्या नायतर खुराडं सोडा" ) काय राव कै च्या कै.......जर्रा चांगला प्लॉट लिवा की........ लै छन्ना छन्नी हानामारी ठाकुर सरपंच पाटील असलं कायतरी लिवा. कथासुत्र तुमच्या हाता दिल्यालं हाय त्याचा गुत्ता ( सूद्ध मर्‍हाटीत गुंता गैरसमज नकु) करु नका. कता फुडं जाऊ द्या रं बिगीबिगी...... काटी न घोंगडं घिउद्या की रं मला बी पिक्चर पाहु द्या की. :::::::: पिक्चर पाहनारं ईजुभौ... पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विजुभाऊ 06/06/2008 - 14:59
हीरो ला नोकरी मिळते रोज कोंबड्याना गाडीतुन फिरवुन आणण्याची. ह्या इथे हीरो आनि हीरवीणीचे स्वित्झर्लंड ला गाणे( हीरोला नोकरी नसते मग स्वित्झर्लंडचे तिकिट कोण देते हे विचारु नका. तो ऑन साईट असाइनमेटवर गेलाय) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

ऋचा 06/06/2008 - 15:22
मग तिकडे हिरो गाणं गात आणि नाचत असताना एक कोंबडी पळून जाते. मग हिरोला जेव्हा कळते कि १ कोंबडी गायब आहे तेव्हा तो खाडकन "जमिनीवर" येतो. आणि स्वित्झर्लंड च्या रस्त्यांवर फिरत सर्वांना विचारत असतो-- "कोणी कोंबडी पाहिली का कोंबडी??" असाच तो भटकत बसतो. (क्रमशः) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

वरदा 06/06/2008 - 18:45
ती कोंबडी पळून जाते हिरॉइनच्या घरी तिचा बाप अनायसे आलेली कोंबडी पाहून खूष होतो...लगेच त्याच्या शेफ ला सांगतो आज चिकन तंदुरी कर्..इथे हिरॉईन त्या कोंबडीला ओळखते आणि तिला वाचवायचे प्रयत्न करायला लागते..... पुढं काही म्हणून सुचत नाही बगा..... ~X(

झकासराव 06/06/2008 - 20:35
हिरॉईन त्या कोंबडीला ओळखते आणि तिला वाचवायचे प्रयत्न करायला लागते.....>>>>>>>. वरदा कथा अशी चटकन पुढे नेली तर केकता बाई लेखिकेचा फाउल धरतात बर. :) हे बघ अस लिहाव. त्या कोंबडीला पाहुन क्षणार्धात हिरॉइने तिला ओळखले. (त्यावेळेच्या तिच्या चेहर्‍यावरचे हावभाव कमीत कमी साडेअडतीस वेळा वेगवेगळ्या कोनातुन दाखवावेत. सोबत प्रत्येक वेळी वेगळाच धक्कादायक आवाज मागे असु द्यावा. आणि लग्गेच एक ब्रेक घ्यावा. ;) मग १०० एक जाहिरातीनंतर कॅमेरा तिच्या बापाच्या तोंडावर. त्याचय चेहर्‍यावर एकाच वेळी आश्चर्य, राग व शंका दाखवावी. हे त्या हिऱोइनीच्या लक्षात येताच तिने समजुन न समजल्याचे नाटक करण्याचा प्रयत्न करावा. आणि सारवासारव करावी की नाही ही कोंबडी बघताच तिला बर्डफ्ल्यु ची आठवण झाली अस. (इथे चिकनगुनिया अस लिहिल तरी चालेल) त्या बिनडोक पोरीच्या बापाला आणि प्रेक्षकाना नावात चिकन असल्याने उलट जास्तच पटेल. :) आता पुढे लिहा बॉ. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

वरदा 06/06/2008 - 20:38
खूपच क काकिकी बघता की तुम्ही....अगदी बरोब्बर लिहिलय..... पुढे ती कुठचं गाणं म्हणेल हो विजुभाऊ?

विजुभाऊ 08/06/2008 - 18:59
झकासपाव तुमचे बरोबर आहे. वरदा तै हीरोईन आता गाणे म्हणते. या कोम्बड्यानो ...परत फिरा रे पोल्ट्री कडे परतुन तिन्ही सांजा जाहल्या....येइल आता अंधाराला पूर जाऊ नका तुम्ही पोल्ट्री पासुन दूर. या कोम्बड्यानो ...परत फिरा रे... पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विजुभाऊ 05/06/2008 - 18:58
अरे हो लिहायला विसरलो चित्रपटात कंदील लाउन प्रकाश योजना असणार आहे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

आनंदयात्री 06/06/2008 - 09:41
पोल्ट्रीयात्रीच्या पोल्ट्रीत एकदा मोठा पेच निर्माण होतो, त्याचा अंडे विकायचा धंदा एकदम डाउन होतो. का म्हणुन तो कारण शोधायला लागतो. सगळ्या डिलर्स ला जाउन भेटतो, कर्मचार्‍यांना भेटतो. मग त्याला उमगते की आपल्या पोल्ट्रीतली अंडी पोक्कळ निघतात म्हणुन धंदा बसलाय. मग तो प्रचंड मोठी मोहिम राबवतो हे शोधायला की आपल्या कोंबड्यांना असा कोणता रोग झाला की ज्यामुळे अंडी पोक्कळ निघायला लागलीत ? १०-२० व्हेटरनरी डाक्टरांचा थवा अविरत भिडलेला असतो त्यासाठी. काहिच सापडत नाही. तो कंटाळतो, वैतागतो, हताश होतो अन सरतशेवटी डॉन नामक एका भाई ला शरण जातो. मग त्याला टिप मिळते की विजाभाई नामक एका त्याच्या रायव्हल ने कुटुंबनियोजन अधिकार्‍यांना(कंडोम वाटणार्‍या) पैसे खाउ घालुन त्याच्या पोल्ट्रीत त्यांची विजिट रोज संध्याकाळी ऍरेंज केलेली असते. त्या कुटुंबनियोजन अधिकार्‍यांचा अन विजाभाईचा बंदोबस्त करुन पोल्ट्रीयात्री निर्धास्त होतो. =)) =)) =))

छोटा डॉन 05/06/2008 - 19:33
>>अन सरतशेवटी डॉन नामक एका भाई ला शरण जातो. मग त्याला टिप मिळते की विजाभाई नामक एका त्याच्या रायव्हल ने कुटुंबनियोजन अधिकार्‍यांना पैसे खाउ घालुन त्याच्या पोल्ट्रीत त्यांची विजिट रोज संध्याकाळी ऍरेंज केलेली असते. लै भारी ... टेन्शन नको हां भाय, आपल्याकडे लै उपाय हायतं ... तात्पुरता उपाय म्हणून सगळ्या कोंबड्यांना सकाळ-सकाळ योगासन करायला लाव, आहार हा "सात्विक " हवा, मी लवकरच "रेसीपी" पाठवतो. त्यासाठी सगळ्या "सुगरणतायांना" संशोधनाला लावले आहे ... पाणी मात्र "पवित्र गंगाजल" वापर .... सध्याच्या वापरातल्या "डबक्याचा" उपयोग "गळ किंवा नांगर" टाकून बसण्यासाठी कर ... "राजें" कडून "टिप" मिळाली आहे, भविष्यात "शाकाहारी कोंबड्यांना व त्यांच्या अंड्यांना" चांगली मागणी येण्याची चिन्हे आहेत. >>आपल्या पोल्ट्रीतली अंडी पोक्कळ निघतात म्हणुन धंदा बसलाय हां, म्हणजे थोडक्यात हे "मिस्ड कॉल" प्रकरण आहे. लक्ष ठेवावे लागेल. भविष्यात मोठ्ठे नुकसान संभवते .... ये विजाभाई का नाम आजकल बहुत सुननेका पड रहा है, कहासे है ये पंटर ? ह्याचा "मोदी नामक मोटाभाई" बरोबर सेटिंग आहे ऐसा ऐक्या है, फिर तो लफडा हुवा ना ... टायरवाला भाई - छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

पोल्टीयात्री पोकळ अंड्यांचा विचार करत असता तिकडून तात्या येतो. आणि विचारतो "कसला विचार करतो आहेस पोल्ट्रय्या". पोल्टीयात्री: "घरात आणि विकायला कोणती अंडी पाठवावी?" तात्या: " घरची पोल्ट्री असताना तुला का रे अंड्यांची चिंता? त्या धमाल्याने तुझ्या सर्व कोंबड्या तर पळवल्या नाहीत ना?" पोल्टीयात्री: " अरे नाही रे. आज काल कोंबड्या पोकळ अंडी देऊ लागल्या आहेत" तात्या: "तू इनो घालतोस का कोंबड्याना?" पोल्टीयात्री: "हो. पण तुला कसे कळले." तात्या: "हा हा हा. अरे साधे आहे म्हणूनच कोंबड्यांची नुसती पोटंच नाही तर आतली अंडी पण साफ होतात.अरे आजकाल इनोचा खप वाढल्याची बातमी आहे. आणि हे नवीन इनो पोट जरा जास्तच साफ करते." पोल्टीयात्री: "तरीच. आजपासून कोंबड्याना इनो घालणे बंद. बंद म्हणजे बंद " अशाप्रकारे पोल्टीयात्रीने कोंबड्याना(माद्या) इनो घालणे बंद केले आणि कोंबड्या परत पहील्यासारखी भरदार अंडी देऊ लागल्या. आणि लोकांनीही कोंबड्यांच्या(नर) क्षमतेवर संशय घेणे सोडून दिले. डीस्क्लेमरः वरील कथानकातील सर्व पात्रे, घटना काल्पनिक आहेत. त्यातील कशाचाही वास्तविक जीवनाशी संबंध आढळला तर तो निव्वळ योगायोग समजावा. पुण्याचे पेशवे

वरदा 05/06/2008 - 20:49
मग पोल्ट्रीयात्री ने मिपावरुन सर्व सुग्रणींना कोंबड्यांसाठी उत्तमोत्तम रेसिपीज शोधुन द्यायला सांगितल्या.... वरदाची स्वयपाकातली गती यथातथाच पण तिने ठरवलं यावेळी आपण एक रेसिपी शोधून काढायचीच... तिची रेसिपी... घरात आणलेली सगळे धान्य निवडताना खाली गोळा झालेला कचरा फेकू नका...सगळा कोंबड्यांना खाऊ घाला...फुकट आणि होल ग्रेन्सची रेसिपी..करायला सोपी....पटकन होते आणि पौष्टीक असते.... मग सगळ्या तायांनी तिला अनुमोदन दिलं. पि.डा. काकूंनी स्पेश्शल निरोप पाठवला काकांबरोबर ' कित्ती सह्ही रेसिपी गं धान्य निवडायची कशी हे माहीतच नव्हतं आम्हाला' बाकीच्या तायांच्या आणि पेठकर काकांच्या रेसिपीज होत्या त्या अशा.... क्रमशः.....(झालं की नाही पर्फेक्ट विजुभाऊ ष्टाईल)

विजुभाऊ 06/06/2008 - 09:57
ए लेको चांगले पिक्चर बघायचे सोडुन तुमी "आमची माती आमची माणसे " आणि "अन्नदाता " कार्यक्रम लिहित सुटला आहात. अजुन दोनतीन छान गाणी टाका ना राव(!) हे घ्या एक गाणे जवा जुनाच पोपट हा लागला ईनो ईनो बोलायला गोष्ट निघाली चांगलीच खाष्ट पोपट म्हणतो मैनाच फाष्ट सांगुन सांगुन थकला हा पोपट लागला डोलायला...... जवा जुनाच पोपट हा लागला ईनो ईनो बोलायला आता तिकडुन हिरवीण येत्ये आन म्हन्त्ये कशी काय च्या काय...तू हिकडं बसलायस व्हयरं आन म्या सम्दं गाव धुंडाळून आल्ये की रे... मंग हीरो म्हंतो कसा सम्दे गाव धुंडाळुन आलीस पर पर माझ्या साठी नौकरी बघायची सुचलं न्हाय तुला तुजा बापुस मला म्हंतो की या हिकडे यायचे तर पोल्ट्रीत प्रॉडक्षन वाढव आता हे म्या कसं सांगु त्याना. ( हा आत्ता आठवलं आपल्या लक्ष्या वर चित्रित केलेलं एक गानं हाय " कोंबड्यानो अंडी द्या नायतर खुराडं सोडा" ) काय राव कै च्या कै.......जर्रा चांगला प्लॉट लिवा की........ लै छन्ना छन्नी हानामारी ठाकुर सरपंच पाटील असलं कायतरी लिवा. कथासुत्र तुमच्या हाता दिल्यालं हाय त्याचा गुत्ता ( सूद्ध मर्‍हाटीत गुंता गैरसमज नकु) करु नका. कता फुडं जाऊ द्या रं बिगीबिगी...... काटी न घोंगडं घिउद्या की रं मला बी पिक्चर पाहु द्या की. :::::::: पिक्चर पाहनारं ईजुभौ... पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विजुभाऊ 06/06/2008 - 14:59
हीरो ला नोकरी मिळते रोज कोंबड्याना गाडीतुन फिरवुन आणण्याची. ह्या इथे हीरो आनि हीरवीणीचे स्वित्झर्लंड ला गाणे( हीरोला नोकरी नसते मग स्वित्झर्लंडचे तिकिट कोण देते हे विचारु नका. तो ऑन साईट असाइनमेटवर गेलाय) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

ऋचा 06/06/2008 - 15:22
मग तिकडे हिरो गाणं गात आणि नाचत असताना एक कोंबडी पळून जाते. मग हिरोला जेव्हा कळते कि १ कोंबडी गायब आहे तेव्हा तो खाडकन "जमिनीवर" येतो. आणि स्वित्झर्लंड च्या रस्त्यांवर फिरत सर्वांना विचारत असतो-- "कोणी कोंबडी पाहिली का कोंबडी??" असाच तो भटकत बसतो. (क्रमशः) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

वरदा 06/06/2008 - 18:45
ती कोंबडी पळून जाते हिरॉइनच्या घरी तिचा बाप अनायसे आलेली कोंबडी पाहून खूष होतो...लगेच त्याच्या शेफ ला सांगतो आज चिकन तंदुरी कर्..इथे हिरॉईन त्या कोंबडीला ओळखते आणि तिला वाचवायचे प्रयत्न करायला लागते..... पुढं काही म्हणून सुचत नाही बगा..... ~X(

झकासराव 06/06/2008 - 20:35
हिरॉईन त्या कोंबडीला ओळखते आणि तिला वाचवायचे प्रयत्न करायला लागते.....>>>>>>>. वरदा कथा अशी चटकन पुढे नेली तर केकता बाई लेखिकेचा फाउल धरतात बर. :) हे बघ अस लिहाव. त्या कोंबडीला पाहुन क्षणार्धात हिरॉइने तिला ओळखले. (त्यावेळेच्या तिच्या चेहर्‍यावरचे हावभाव कमीत कमी साडेअडतीस वेळा वेगवेगळ्या कोनातुन दाखवावेत. सोबत प्रत्येक वेळी वेगळाच धक्कादायक आवाज मागे असु द्यावा. आणि लग्गेच एक ब्रेक घ्यावा. ;) मग १०० एक जाहिरातीनंतर कॅमेरा तिच्या बापाच्या तोंडावर. त्याचय चेहर्‍यावर एकाच वेळी आश्चर्य, राग व शंका दाखवावी. हे त्या हिऱोइनीच्या लक्षात येताच तिने समजुन न समजल्याचे नाटक करण्याचा प्रयत्न करावा. आणि सारवासारव करावी की नाही ही कोंबडी बघताच तिला बर्डफ्ल्यु ची आठवण झाली अस. (इथे चिकनगुनिया अस लिहिल तरी चालेल) त्या बिनडोक पोरीच्या बापाला आणि प्रेक्षकाना नावात चिकन असल्याने उलट जास्तच पटेल. :) आता पुढे लिहा बॉ. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

वरदा 06/06/2008 - 20:38
खूपच क काकिकी बघता की तुम्ही....अगदी बरोब्बर लिहिलय..... पुढे ती कुठचं गाणं म्हणेल हो विजुभाऊ?

विजुभाऊ 08/06/2008 - 18:59
झकासपाव तुमचे बरोबर आहे. वरदा तै हीरोईन आता गाणे म्हणते. या कोम्बड्यानो ...परत फिरा रे पोल्ट्री कडे परतुन तिन्ही सांजा जाहल्या....येइल आता अंधाराला पूर जाऊ नका तुम्ही पोल्ट्री पासुन दूर. या कोम्बड्यानो ...परत फिरा रे... पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
लेखनविषय:
लेखनप्रकार
सांगायला बरे वाटतेय की आपले काही सदस्य मिळुन एक नवचित्रपट काढत आहेत. नव्या टेक्नीक नुसार या चित्रपटात प्रेक्षकाना कथेत हवा तो हवा तसा तसा बदल करण्याची सोय असेल. लव्ह ष्टोरी/ शादी / ताटातुट / व्हीलन / हीरो ला चॅलेन्ज / पोलीस/ चोर / तस्करी / लैच लाथाबुक्याने / तलवारीने / सायकल च्या चेन ने / बंदुकानी हाणामारी काय वाट्टेल ते लिहु शकता. थेटरात पिक्चर दिसताना *ज्याला जसा हवा तसा एकाच वेळेस दिसेल अशी सोय ह्या नव्या टेक्नीक मधे आहे (*ही आयडीया : मिपा कुटुंबीयांकडुन पेटंटेड) तुम्ही यात भर घालु शकता / काटछाट करु शकता. तर मग वाट कशाची पहाताय ?

नाते पावसाचे

चेतन ·

अथांग सागर 05/06/2008 - 20:19
प्रत्येक क्षणामध्ये काहितरी आपले असते || दु:खात जरी रडलो तरी, सुखात हास्य असते ||| विरह जरी आले तरी, मिलनात गोडवा असतो || ग्रीष्मात जरी उकडलो तरी, पहिल्या पावसात गारवा असतो ||| || पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा ||

विसोबा खेचर 06/06/2008 - 05:36
पडुन गेल्यावरही पाउस मनाला उफाळतो, वेलींना नटवतो आणि भावनांना ओघळवतो नदितले ते भोवरे भिरभिरतात मनात, चहाच्या कपात अन् कांदाभज्यांच्या मोहात पावसाचे अन् मोहाचे नाते तरी काय? क्या बात है!

चेतन 06/06/2008 - 10:25
धन्यवाद तात्या आणि अथांग सागर (वा! मस्त नाव आहे) पाउसप्रेमी चेतन अवांतरः तात्या हा फोटु का दिसत नाही हो?

In reply to by चेतन

विसोबा खेचर 06/06/2008 - 15:21
अवांतरः तात्या हा फोटु का दिसत नाही हो? पिकासावर टाकलेल्या चित्रांच्या बाबतीत बर्‍याचदा हा प्रॉब्लेम होतो.. तात्या.

अथांग सागर 05/06/2008 - 20:19
प्रत्येक क्षणामध्ये काहितरी आपले असते || दु:खात जरी रडलो तरी, सुखात हास्य असते ||| विरह जरी आले तरी, मिलनात गोडवा असतो || ग्रीष्मात जरी उकडलो तरी, पहिल्या पावसात गारवा असतो ||| || पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा ||

विसोबा खेचर 06/06/2008 - 05:36
पडुन गेल्यावरही पाउस मनाला उफाळतो, वेलींना नटवतो आणि भावनांना ओघळवतो नदितले ते भोवरे भिरभिरतात मनात, चहाच्या कपात अन् कांदाभज्यांच्या मोहात पावसाचे अन् मोहाचे नाते तरी काय? क्या बात है!

चेतन 06/06/2008 - 10:25
धन्यवाद तात्या आणि अथांग सागर (वा! मस्त नाव आहे) पाउसप्रेमी चेतन अवांतरः तात्या हा फोटु का दिसत नाही हो?

In reply to by चेतन

विसोबा खेचर 06/06/2008 - 15:21
अवांतरः तात्या हा फोटु का दिसत नाही हो? पिकासावर टाकलेल्या चित्रांच्या बाबतीत बर्‍याचदा हा प्रॉब्लेम होतो.. तात्या.
Taxonomy upgrade extras
नाते पावसाचे पावसाचा शिडकावा अन् मायेचा ओलावा , मातीचा गंध आणि ह्रुदयाचा हा बंध वार्‍याची साद हेलावणारी ती हाक, चमकणारी विजं अन् प्रेमाचे हे बिजं पावसाचे अन् प्रेमाचे नाते तरी काय? सागराचे उधाण अन् कल्पनांचे आसमान चेहर्‍यावर उडणार्‍या तुषारांचे नसते भान हेलकावणार्‍या लाटा अन् भिजलेल्या वाटा, भिरभिरते विचार आणतं असतात मनातं पावसाचे अन् मनाचे नाते तरी काय? पडुन गेल्यावरही पाउस मनाला उफाळतो, वेलींना नटवतो आणि भावनांना ओघळवतो नदितले ते भोवरे भिरभिरतात

साठेचं काय करायचं?? ... नाटक...

भडकमकर मास्तर ·

मन 05/06/2008 - 16:33
आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?".. निस्ती एका वाक्यात आमच्यासारख्यांची गोची कुठं होते ते सांगुन टाकलं ना राव. सहिच. (कुठं मिळालं तर पाह्य्ला नक्की आवडेल.) आपलाच, मनोबा

वाचक 05/06/2008 - 16:56
गेल्या वर्षी 'एकांकिका' स्पर्धा झाल्या होत्या त्यात शिकागो ला झालेल्या उपांत्य फेरीत हे नाटक सॅन होजे च्या मराठी मंडळाने केल होत. (नंतर ती एकांकिका अंतिम फेरीत दुसरी आली. ) त्यांच्याकडे त्याचे रेकॉर्डिंग असेल - विचारुन बघितलेत तर मिळू शकेल.

मनिष 05/06/2008 - 17:29
साठेचं काय करायचं हे बघायला आवडेल...ती अमृता सुभाष मात्र बर्‍याच वेळा तिच्या बालिश/पोरकट अभिनयाने डोक्यात जाते. (आठवा श्वास) मधे मकरंद देशपांडे, सोनाली कुलकर्णी आणि ह्या दोघांचे (निखिल रत्नपारखी, अमृता सुभाष) एक नाटक पाहिले होते (मला वाटते संदेश कुलकर्णीच दिग्दर्शक होता...), ते वेगळे पण बकवास होते...आता नाव आठवत नाही!

In reply to by मनिष

ते वेगळे पण बकवास होते... :)) त्या नाटकाचं नाव पहिलं वहिलं... वरच्या समन्वयच्या व्हिडीओमध्ये साडेसातव्या मिनिटाला त्याची माहिती आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मनिष

अमृता सुभाष बर्‍याचदा डोक्यात जाते हे खरंय. मी तिला प्रथम 'झोका'मधे पाहिलं आणि ती भन्नाट आवडली. पण मग त्याच त्या प्रकारचा अभिनय आणि अतिउत्कट काहीतरी केल्याचा आविर्भाव (तशीच ती सोनाली कुलकर्णी. अभिनेत्री म्हणून चांगलीय ती. पण मुलाखती? पार डोक्यात. अरे किती निरागसपणा दाखवावा माणसानं? सतत त्याचीच टिमकी? रडवेल्या आवाजात-गळा दाटून आणून किंवा अतिशयोक्त गंभीरपणे काही बोललं म्हणजेच तुम्ही शहाणे? जाऊ द्या...) दर वेळी पाहिल्यावर मग आमचं प्रेम ओसरलं! बाय दी वे, 'पहिलं-वहिलं' मला बकवास नव्हतं हं वाटलं. त्या मुलाच्या वाढण्याचा आलेख होता तो आणि तो मला आवडलाही होता.

In reply to by मेघना भुस्कुटे

भाग्यश्री 06/06/2008 - 07:18
अगदी खरं.. अमृता सुभाष मेजर डोक्यात जाते.. सावली पाहीलाय का? सुंदर पिक्चर.. पण तिची ती टीपिकल बोलण्याची स्टाईल.. अति निरागसपणा.. इरिटेटींङ..! पण हो.. झोका सुरेख होती!! http://bhagyashreee.blogspot.com/

हा ऑर्कुटवर सापडलाय समन्वयचा विडीओ... http://www.youtube.com/watch?v=ltvNU-CxtEw त्यात तिसर्‍या मिनिटाला या नाटकाची माहिती आहे... नाटकातले कलाकार निखिल रत्नपारखी आणि अमृता सुभाष ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनिष 05/06/2008 - 17:34
"आपली मीडिऒक्रिटी , सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आता अभयची समस्या तीच माझीही समस्या आहे. आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?"
ह्या ओळी खरच विचार करायला लावणार्‍या आहेत...कित्येक कलाकार ह्या विचारांनी उध्वस्त झालेत किंवा नुसत्याच पाट्या टाकायला लागलेत, हे पचवायला खरच अवघड. राजीव नाईक ह्यांचे इतरही लिखाण वाचायला आवडेल.

आंबोळी 05/06/2008 - 17:55
मास्तर तुमचा व्यासंग अफाट आहे हो.... अशीच चांगली चांगली नाटकांची/पुस्तकांची परिक्षणे देत चला.... त्यानिमित्ताने आमचेही वाचन वाढेल....

मुक्तसुनीत 05/06/2008 - 18:05
भडकमकर यांनी या नाटकाचा इथे आवर्जून उल्लेख केला याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. चार वर्षांपूर्वी या नाटकाचे स्क्रिप्ट मी वाचले होते. आणि वाचतानाच असे वाटले होते की हे नाटक म्हणजे आपल्याकरता एक आरसा आहे. ज्या कलाकृती असा अनुभव देतात त्या अर्थातच फार मार्मिक , आणि प्रसंगी वेदनादायक असतात. अभयचा दृष्टिकोन हा (POV) , नेमाड्यांच्या भाषेत सांगायचे तर , "शंभरापैकी नव्व्याण्णवांचा" आहे. प्रज्ञा आणि जुळारीपणा यांच्यातला फरक , कलेच्या निर्मितीचा विमर्श, आपल्या समकालीनांबद्दलची असूया, हेवेदावे , आणि यातून दिसणार्‍या माणसातल्या क्षुद्रपणाच्या छटा ....कधीतरी घडलेले कठोर आत्मपरीक्षण , असूयेपोटी केलेल्या पापांचा वाचलेला पाढा ... दहा प्रवेशांच्यामधे माणसाचे आरपार दर्शन आहे यात. जत्रेमधे आरसे असतात पहा. त्यांच्यासमोर उभे रहायचे नि आपले वेडेविद्रे रूप पहायचे असा तो गमतीचा प्रकार असतो. "साठे" वाचताना असे काहीसे झाले. आणि गम्मत वाटत नव्हती ! पण "पहा , तुझ्यातसुद्धा हे आहे ! " असे कुणीतरी सतत सांगते आहे अशी एक भावना होत होती. या नाटकाचा कॅलीफोर्नियाच्या एका संस्थेने केलेला प्रयोग मी डीवीडीवर पाहिला. प्रयोग उत्तम झाला आहे. मला केवळ एकच उणीव जाणवली. भडकमकरानी ज्या प्रदीर्घ स्वगताचा उल्लेख वर केला आहे ते स्वगतच प्रयोगात गाळले आहे ! हा एक मोठाच दोष मानायला हवा. कदाचित त्यांच्यासमोर वेळेचा प्रश्न असेल ; पण ते स्वगत फार महत्त्वाचे आहे असे मला वाटते.

In reply to by मुक्तसुनीत

"पहा , तुझ्यातसुद्धा हे आहे ! " असे कुणीतरी सतत सांगते आहे अशी एक भावना होत होती. __ वा.. काय बोललात !! .... असंच होतं... भडकमकरानी ज्या प्रदीर्घ स्वगताचा उल्लेख वर केला आहे ते स्वगतच प्रयोगात गाळले आहे ! हा एक मोठाच दोष मानायला हवा. कदाचित त्यांच्यासमोर वेळेचा प्रश्न असेल ; पण ते स्वगत फार महत्त्वाचे आहे असे मला वाटते. स्पर्धा होती म्हणताय, म्हणजे कदाचित वेळाचा प्रॉब्लेम असेल... कारण वाचायचे म्हटले तर तासभर लागतो... मग ४५ मिन्टांच्या एकांकिकेसाठी काही सीन उडवणे आलेच...( मी इतर काही सीन कमी केले असते पण हा नसता उडवला...) अजून एक शक्यता.... लेखकाने शेवटी लिहिल्याप्रमाणे जेव्हा हे नाटक अनुष्टुभ नावाच्या नियतकालिकात छापून आले , तेव्हा त्यात तो प्रवेश नव्हताच.... कदाचित ते स्क्रिप्ट त्यांच्या हाती लागले असेल... ____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

हेरंब 05/06/2008 - 18:48
हे नाटक मी एन्.सी. पी.ए. ला पाहिले आहे. अतिशय उत्तम सादरीकरण व सहजसुंदर अभिनय असे या नाटकाचे वर्णन करता येईल. निखिल इतकाच अमृतानेही सुरेख अभिनय केला आहे. कुठेही पहायला मिळाले तर सोडू नका.

In reply to by मुक्तसुनीत

हेरंब 06/06/2008 - 17:53
मी पाहिलेल्या प्रयोगात अभयचे स्वगत होते, पण ते प्रदीर्घ वाटले नाही. मी मूळ संहिता वाचलेली नाही.

धनंजय 05/06/2008 - 21:49
परीक्षण आवडले.
हे नाटक पुनरावृत्तीचं आहे, मध्ये मध्ये इतर सूर लागतातच पण मुख्य भावना परत परत येत राहतात.. पण संवाद अत्यंत छान, खटकेबाज...नाटक कुठे सुरू होतं आणि कुठे संपतं असं फ़ारसं नाहीच...
स्वगत : पण काही प्रमाणात पात्रांचे वेगवेगळे पैलू खुलत असावेत - नाहीतर मास्तरांना ते इतके भावले नसते...

In reply to by धनंजय

स्वगत : पण काही प्रमाणात पात्रांचे वेगवेगळे पैलू खुलत असावेत - नाहीतर मास्तरांना ते इतके भावले नसते... हो... पण काही प्रमाणातच वेगळे पैलू खुलतात.... :) .. मला स्वतःला असली नाटकं फार आवडतात...पण सर्वांनाच आवडतील असंही नाही... ( आमच्या ओळखीचे एक ज्येष्ठ नाटकवाले आहेत त्यांना ही चर्चा करणारी नाटकं अजिबात खपत नाहीत... " अरे काहीतरी घटना तर घडवा रे.." असा त्यांचा अट्टाहास असतो...उदा... खून, मारामार्‍या, तळपत्या तलवारींचे युद्ध, कटकारस्थान वगैरे..असो ..ज्याची त्याची आवड... एक स्पष्टीकरण... नाटक रिपीटीशनचं आहे असं खुद्द लेखक स्वतःच म्हणतात...नाटकात एक वाक्यही आहे, अभय म्हणतो," आपल्या गप्पांना सुरुवात, मध्य, शेवट नसतोच्...सुरुवात, मध्य की परत सुरुवात..." लेखकाच्याच शब्दात..."... प्रश्न असा होता की कितीदा अशी पुनरावृत्ती झाल्यावर बंध लक्षात येईल? आणि कितीदा झालं तर हे फार होईल? प्रेक्षकांचं परत परत तेच होण्याकडे लक्ष जाईल की दरम्यानचं इथे तिथे जाणंही पोचेल त्यांच्यापर्यंत?क्रोएशियातल्या प्रयोगानंतर तिथल्या एका लॅरी झापिआ नावाच्या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया हायसं वाटायला लावणारी होती,काही खटकणं तर सोडाच, तो म्हणाला," राजीव, यू हॅव ऍन अमेझिंगली लिरिकल सेन्स ऑफ रेपिटीशन..." ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

एक 05/06/2008 - 22:10
या नाटकाची ऑडिशन पास होवू शकलो नाही ..त्याची खूप खंत लागली.. पण ज्यांनी तो प्रयोग केला त्यांनी माझ्यापेक्षा निश्चीतच छान न्याय दिला.. उत्तम नाटक..

In reply to by एक

सर्किट 06/06/2008 - 03:56
होय, मनोज आणि हेमांगीने खरेच सुंदर केले होते ते नाटक. मी स्पर्धेतील नाटक बघू शकलो नाही, पण त्यांच्या तालमी बघितल्या. - सर्किट

भाग्यश्री 05/06/2008 - 23:13
छान परिक्षण.. नाव खूप ऐकले होते या नाटकाचे.. पण विषय माहीत नव्हता.. असेच अजुन नाटकांबद्दल येऊद्या..

चतुरंग 05/06/2008 - 23:34
"साठेचं काय करायचं?" हे ज्यावेळी रंगभूमीवर आलं त्यावेळी त्याबद्दल चांगले ऐकू आले, ते बघायचे असे ठरवलेले पण ते अचानकच गायब झालेले आठवते. आता पुन्हा नव्याने त्याचे परीक्षण वाचून निदान संहिता तरी वाचायला मिळावी असे तीव्रतेने वाटते. (स्वगत - ह्या संहितेचं काय करायचं? :? ) चतुरंग

मास्तर, अगदी नेमके परीक्षण. आणि प्रास्ताविकातल्याही काय अचूक ओळी उचलल्या आहात हो तुम्ही! 'आताची नाटके'प्रमाणे 'सततची नाटके' आणि 'पूर्वीची नाटके' (नावाबद्दल खात्री नाही बुवा)बद्दल पण लिहा ना काहीतरी. त्यातले ते महाभारताबद्दलचे नाटक आणि स्त्री-पुरुषांतील काही प्रकृतीभेदांबद्दलचे नाटक.. मजा येईल. राजीव नाईक यांचेच 'नाटकः एक पडदा तीन घंटा' वाचलेच असेल तुम्ही. का कोण जाणे, इतके सुंदर पुस्तक असून त्याबद्दल कुणीच कुठेच बोलताना दिसत नाही. नाटकातला काळ आणि नाटकातला अवकाश याबद्दलचे विवेचन (मान्य आहे, हे जरा किचकट विषयासारखे वाटते!) आहे त्यात. पण किती सहज-सोपे आणि रंजक केले आहे त्यांनी ते. सगळेच विषय सोपे करता येत नाहीत आणि तसे करूही नयेत. पण हा काहीसा तांत्रिक विषय त्यांनी उदाहरणे घेऊन इतका छान लिहिला आहे, की त्या पुस्तकाला जवळ जवळ एखाद्या कादंबरीइतके पकडमूल्य आले आहे. मी बर्‍याच वाचणार्‍या मंडळींना हौसेहौसेनं हे पुस्तक सुचवले. पण कुणाकडूनच काहीच प्रतिसाद आला नाही. नकारात्मकही नाही आणि होकारात्मकही. तुम्ही लिहाल का त्याबद्दल?

In reply to by मेघना भुस्कुटे

धन्यवाद.... सततची नाटकं आणि मधली नाटकं... हे दोन संग्रह शोधायच्या प्रयत्नात आहे बराच काळ... पटकन दिसत नाहीत कुठे... 'नाटकः एक पडदा तीन घंटा नाही वाचलंय... मिळालंच नाही... पण आता आवर्जून शोधून वाचतो ... नक्की लिहीन त्याबद्दल.... कुणाकडूनच काहीच प्रतिसाद आला नाही. नकारात्मकही नाही आणि होकारात्मकही. माझं असं खूप वेळा होतं .... अरे आमच्या सूचनेवर पाहिजे तर टीका करा पण दुर्लक्ष नका रे करू ;) ;) ... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

या ज्योतिषाच काय करायचं? हा साप्ताहिक सकाळ १७ मे २००८ चा डॉ एन सी एडल यांचा लेख वाचला. त्या शिर्षका वरुन मला " साठेचं काय करायचं? " हे आठवलं . मास्तर लई भारी लिहिता बर का? त्याच्या मुळे आम्हाला नाटक जरा नीट पहाता येतात. हे नाटक आले कि पाहू. तुम्हि लिहिल्या मुळे ज्याच त्याच अभयारण्य पाहिल होतं आवडलं. प्रकाश घाटपांडे

शितल 06/06/2008 - 18:09
" आपली मीडिऒक्रिटी , सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आता अभयची समस्या तीच माझीही समस्या आहे. आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?".. हे वाचुन तर ते नाटक पहाव असे वाटते.

मनिष 06/06/2008 - 18:09
जरा (अती) सविस्तर प्रतिक्रिया ह्या नाटकाच्या निमित्ताने... http://www.misalpav.com/node/2010

मनिष 10/04/2014 - 00:04
गेल्या महिन्यात विनोद दोशी महोत्सवात राजीव नाईकांचेच नवीन नाटक 'बंदिश' पाहिले. खूप अ‍ॅब्स्ट्रॅक्ट, अ‍ॅब्सर्ड असे वाटले. प्रायोगिक नाटकांचे वावडे नाही, पण काहिही करावे का? कोणी पाहिले का? कसे वाटले? नाट्य अभ्यास वर्गात (Understanding Theatre) ह्या नाटकाविषयी चर्चा झाली म्हणे, तर तिथली मंडळी (ररा इ.) काही प्रकाश टाकतील का?

In reply to by मनिष

रमताराम 10/04/2014 - 19:44
तुला धन्यवाद द्यायला पाहिजे याबद्दल. एरवी लिहिलं नसतं, कंटाळा दुसरं काय. कुणाला वाचावसं वाटतंय हे समजलं तरच लिहायची तसदी घेतो. एरवी नुसते लाईक करणार्‍यांसाठी हे सगळं टाईप करायचा कंटाळाच येतो.

मन 05/06/2008 - 16:33
आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?".. निस्ती एका वाक्यात आमच्यासारख्यांची गोची कुठं होते ते सांगुन टाकलं ना राव. सहिच. (कुठं मिळालं तर पाह्य्ला नक्की आवडेल.) आपलाच, मनोबा

वाचक 05/06/2008 - 16:56
गेल्या वर्षी 'एकांकिका' स्पर्धा झाल्या होत्या त्यात शिकागो ला झालेल्या उपांत्य फेरीत हे नाटक सॅन होजे च्या मराठी मंडळाने केल होत. (नंतर ती एकांकिका अंतिम फेरीत दुसरी आली. ) त्यांच्याकडे त्याचे रेकॉर्डिंग असेल - विचारुन बघितलेत तर मिळू शकेल.

मनिष 05/06/2008 - 17:29
साठेचं काय करायचं हे बघायला आवडेल...ती अमृता सुभाष मात्र बर्‍याच वेळा तिच्या बालिश/पोरकट अभिनयाने डोक्यात जाते. (आठवा श्वास) मधे मकरंद देशपांडे, सोनाली कुलकर्णी आणि ह्या दोघांचे (निखिल रत्नपारखी, अमृता सुभाष) एक नाटक पाहिले होते (मला वाटते संदेश कुलकर्णीच दिग्दर्शक होता...), ते वेगळे पण बकवास होते...आता नाव आठवत नाही!

In reply to by मनिष

ते वेगळे पण बकवास होते... :)) त्या नाटकाचं नाव पहिलं वहिलं... वरच्या समन्वयच्या व्हिडीओमध्ये साडेसातव्या मिनिटाला त्याची माहिती आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मनिष

अमृता सुभाष बर्‍याचदा डोक्यात जाते हे खरंय. मी तिला प्रथम 'झोका'मधे पाहिलं आणि ती भन्नाट आवडली. पण मग त्याच त्या प्रकारचा अभिनय आणि अतिउत्कट काहीतरी केल्याचा आविर्भाव (तशीच ती सोनाली कुलकर्णी. अभिनेत्री म्हणून चांगलीय ती. पण मुलाखती? पार डोक्यात. अरे किती निरागसपणा दाखवावा माणसानं? सतत त्याचीच टिमकी? रडवेल्या आवाजात-गळा दाटून आणून किंवा अतिशयोक्त गंभीरपणे काही बोललं म्हणजेच तुम्ही शहाणे? जाऊ द्या...) दर वेळी पाहिल्यावर मग आमचं प्रेम ओसरलं! बाय दी वे, 'पहिलं-वहिलं' मला बकवास नव्हतं हं वाटलं. त्या मुलाच्या वाढण्याचा आलेख होता तो आणि तो मला आवडलाही होता.

In reply to by मेघना भुस्कुटे

भाग्यश्री 06/06/2008 - 07:18
अगदी खरं.. अमृता सुभाष मेजर डोक्यात जाते.. सावली पाहीलाय का? सुंदर पिक्चर.. पण तिची ती टीपिकल बोलण्याची स्टाईल.. अति निरागसपणा.. इरिटेटींङ..! पण हो.. झोका सुरेख होती!! http://bhagyashreee.blogspot.com/

हा ऑर्कुटवर सापडलाय समन्वयचा विडीओ... http://www.youtube.com/watch?v=ltvNU-CxtEw त्यात तिसर्‍या मिनिटाला या नाटकाची माहिती आहे... नाटकातले कलाकार निखिल रत्नपारखी आणि अमृता सुभाष ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनिष 05/06/2008 - 17:34
"आपली मीडिऒक्रिटी , सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आता अभयची समस्या तीच माझीही समस्या आहे. आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?"
ह्या ओळी खरच विचार करायला लावणार्‍या आहेत...कित्येक कलाकार ह्या विचारांनी उध्वस्त झालेत किंवा नुसत्याच पाट्या टाकायला लागलेत, हे पचवायला खरच अवघड. राजीव नाईक ह्यांचे इतरही लिखाण वाचायला आवडेल.

आंबोळी 05/06/2008 - 17:55
मास्तर तुमचा व्यासंग अफाट आहे हो.... अशीच चांगली चांगली नाटकांची/पुस्तकांची परिक्षणे देत चला.... त्यानिमित्ताने आमचेही वाचन वाढेल....

मुक्तसुनीत 05/06/2008 - 18:05
भडकमकर यांनी या नाटकाचा इथे आवर्जून उल्लेख केला याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. चार वर्षांपूर्वी या नाटकाचे स्क्रिप्ट मी वाचले होते. आणि वाचतानाच असे वाटले होते की हे नाटक म्हणजे आपल्याकरता एक आरसा आहे. ज्या कलाकृती असा अनुभव देतात त्या अर्थातच फार मार्मिक , आणि प्रसंगी वेदनादायक असतात. अभयचा दृष्टिकोन हा (POV) , नेमाड्यांच्या भाषेत सांगायचे तर , "शंभरापैकी नव्व्याण्णवांचा" आहे. प्रज्ञा आणि जुळारीपणा यांच्यातला फरक , कलेच्या निर्मितीचा विमर्श, आपल्या समकालीनांबद्दलची असूया, हेवेदावे , आणि यातून दिसणार्‍या माणसातल्या क्षुद्रपणाच्या छटा ....कधीतरी घडलेले कठोर आत्मपरीक्षण , असूयेपोटी केलेल्या पापांचा वाचलेला पाढा ... दहा प्रवेशांच्यामधे माणसाचे आरपार दर्शन आहे यात. जत्रेमधे आरसे असतात पहा. त्यांच्यासमोर उभे रहायचे नि आपले वेडेविद्रे रूप पहायचे असा तो गमतीचा प्रकार असतो. "साठे" वाचताना असे काहीसे झाले. आणि गम्मत वाटत नव्हती ! पण "पहा , तुझ्यातसुद्धा हे आहे ! " असे कुणीतरी सतत सांगते आहे अशी एक भावना होत होती. या नाटकाचा कॅलीफोर्नियाच्या एका संस्थेने केलेला प्रयोग मी डीवीडीवर पाहिला. प्रयोग उत्तम झाला आहे. मला केवळ एकच उणीव जाणवली. भडकमकरानी ज्या प्रदीर्घ स्वगताचा उल्लेख वर केला आहे ते स्वगतच प्रयोगात गाळले आहे ! हा एक मोठाच दोष मानायला हवा. कदाचित त्यांच्यासमोर वेळेचा प्रश्न असेल ; पण ते स्वगत फार महत्त्वाचे आहे असे मला वाटते.

In reply to by मुक्तसुनीत

"पहा , तुझ्यातसुद्धा हे आहे ! " असे कुणीतरी सतत सांगते आहे अशी एक भावना होत होती. __ वा.. काय बोललात !! .... असंच होतं... भडकमकरानी ज्या प्रदीर्घ स्वगताचा उल्लेख वर केला आहे ते स्वगतच प्रयोगात गाळले आहे ! हा एक मोठाच दोष मानायला हवा. कदाचित त्यांच्यासमोर वेळेचा प्रश्न असेल ; पण ते स्वगत फार महत्त्वाचे आहे असे मला वाटते. स्पर्धा होती म्हणताय, म्हणजे कदाचित वेळाचा प्रॉब्लेम असेल... कारण वाचायचे म्हटले तर तासभर लागतो... मग ४५ मिन्टांच्या एकांकिकेसाठी काही सीन उडवणे आलेच...( मी इतर काही सीन कमी केले असते पण हा नसता उडवला...) अजून एक शक्यता.... लेखकाने शेवटी लिहिल्याप्रमाणे जेव्हा हे नाटक अनुष्टुभ नावाच्या नियतकालिकात छापून आले , तेव्हा त्यात तो प्रवेश नव्हताच.... कदाचित ते स्क्रिप्ट त्यांच्या हाती लागले असेल... ____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

हेरंब 05/06/2008 - 18:48
हे नाटक मी एन्.सी. पी.ए. ला पाहिले आहे. अतिशय उत्तम सादरीकरण व सहजसुंदर अभिनय असे या नाटकाचे वर्णन करता येईल. निखिल इतकाच अमृतानेही सुरेख अभिनय केला आहे. कुठेही पहायला मिळाले तर सोडू नका.

In reply to by मुक्तसुनीत

हेरंब 06/06/2008 - 17:53
मी पाहिलेल्या प्रयोगात अभयचे स्वगत होते, पण ते प्रदीर्घ वाटले नाही. मी मूळ संहिता वाचलेली नाही.

धनंजय 05/06/2008 - 21:49
परीक्षण आवडले.
हे नाटक पुनरावृत्तीचं आहे, मध्ये मध्ये इतर सूर लागतातच पण मुख्य भावना परत परत येत राहतात.. पण संवाद अत्यंत छान, खटकेबाज...नाटक कुठे सुरू होतं आणि कुठे संपतं असं फ़ारसं नाहीच...
स्वगत : पण काही प्रमाणात पात्रांचे वेगवेगळे पैलू खुलत असावेत - नाहीतर मास्तरांना ते इतके भावले नसते...

In reply to by धनंजय

स्वगत : पण काही प्रमाणात पात्रांचे वेगवेगळे पैलू खुलत असावेत - नाहीतर मास्तरांना ते इतके भावले नसते... हो... पण काही प्रमाणातच वेगळे पैलू खुलतात.... :) .. मला स्वतःला असली नाटकं फार आवडतात...पण सर्वांनाच आवडतील असंही नाही... ( आमच्या ओळखीचे एक ज्येष्ठ नाटकवाले आहेत त्यांना ही चर्चा करणारी नाटकं अजिबात खपत नाहीत... " अरे काहीतरी घटना तर घडवा रे.." असा त्यांचा अट्टाहास असतो...उदा... खून, मारामार्‍या, तळपत्या तलवारींचे युद्ध, कटकारस्थान वगैरे..असो ..ज्याची त्याची आवड... एक स्पष्टीकरण... नाटक रिपीटीशनचं आहे असं खुद्द लेखक स्वतःच म्हणतात...नाटकात एक वाक्यही आहे, अभय म्हणतो," आपल्या गप्पांना सुरुवात, मध्य, शेवट नसतोच्...सुरुवात, मध्य की परत सुरुवात..." लेखकाच्याच शब्दात..."... प्रश्न असा होता की कितीदा अशी पुनरावृत्ती झाल्यावर बंध लक्षात येईल? आणि कितीदा झालं तर हे फार होईल? प्रेक्षकांचं परत परत तेच होण्याकडे लक्ष जाईल की दरम्यानचं इथे तिथे जाणंही पोचेल त्यांच्यापर्यंत?क्रोएशियातल्या प्रयोगानंतर तिथल्या एका लॅरी झापिआ नावाच्या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया हायसं वाटायला लावणारी होती,काही खटकणं तर सोडाच, तो म्हणाला," राजीव, यू हॅव ऍन अमेझिंगली लिरिकल सेन्स ऑफ रेपिटीशन..." ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

एक 05/06/2008 - 22:10
या नाटकाची ऑडिशन पास होवू शकलो नाही ..त्याची खूप खंत लागली.. पण ज्यांनी तो प्रयोग केला त्यांनी माझ्यापेक्षा निश्चीतच छान न्याय दिला.. उत्तम नाटक..

In reply to by एक

सर्किट 06/06/2008 - 03:56
होय, मनोज आणि हेमांगीने खरेच सुंदर केले होते ते नाटक. मी स्पर्धेतील नाटक बघू शकलो नाही, पण त्यांच्या तालमी बघितल्या. - सर्किट

भाग्यश्री 05/06/2008 - 23:13
छान परिक्षण.. नाव खूप ऐकले होते या नाटकाचे.. पण विषय माहीत नव्हता.. असेच अजुन नाटकांबद्दल येऊद्या..

चतुरंग 05/06/2008 - 23:34
"साठेचं काय करायचं?" हे ज्यावेळी रंगभूमीवर आलं त्यावेळी त्याबद्दल चांगले ऐकू आले, ते बघायचे असे ठरवलेले पण ते अचानकच गायब झालेले आठवते. आता पुन्हा नव्याने त्याचे परीक्षण वाचून निदान संहिता तरी वाचायला मिळावी असे तीव्रतेने वाटते. (स्वगत - ह्या संहितेचं काय करायचं? :? ) चतुरंग

मास्तर, अगदी नेमके परीक्षण. आणि प्रास्ताविकातल्याही काय अचूक ओळी उचलल्या आहात हो तुम्ही! 'आताची नाटके'प्रमाणे 'सततची नाटके' आणि 'पूर्वीची नाटके' (नावाबद्दल खात्री नाही बुवा)बद्दल पण लिहा ना काहीतरी. त्यातले ते महाभारताबद्दलचे नाटक आणि स्त्री-पुरुषांतील काही प्रकृतीभेदांबद्दलचे नाटक.. मजा येईल. राजीव नाईक यांचेच 'नाटकः एक पडदा तीन घंटा' वाचलेच असेल तुम्ही. का कोण जाणे, इतके सुंदर पुस्तक असून त्याबद्दल कुणीच कुठेच बोलताना दिसत नाही. नाटकातला काळ आणि नाटकातला अवकाश याबद्दलचे विवेचन (मान्य आहे, हे जरा किचकट विषयासारखे वाटते!) आहे त्यात. पण किती सहज-सोपे आणि रंजक केले आहे त्यांनी ते. सगळेच विषय सोपे करता येत नाहीत आणि तसे करूही नयेत. पण हा काहीसा तांत्रिक विषय त्यांनी उदाहरणे घेऊन इतका छान लिहिला आहे, की त्या पुस्तकाला जवळ जवळ एखाद्या कादंबरीइतके पकडमूल्य आले आहे. मी बर्‍याच वाचणार्‍या मंडळींना हौसेहौसेनं हे पुस्तक सुचवले. पण कुणाकडूनच काहीच प्रतिसाद आला नाही. नकारात्मकही नाही आणि होकारात्मकही. तुम्ही लिहाल का त्याबद्दल?

In reply to by मेघना भुस्कुटे

धन्यवाद.... सततची नाटकं आणि मधली नाटकं... हे दोन संग्रह शोधायच्या प्रयत्नात आहे बराच काळ... पटकन दिसत नाहीत कुठे... 'नाटकः एक पडदा तीन घंटा नाही वाचलंय... मिळालंच नाही... पण आता आवर्जून शोधून वाचतो ... नक्की लिहीन त्याबद्दल.... कुणाकडूनच काहीच प्रतिसाद आला नाही. नकारात्मकही नाही आणि होकारात्मकही. माझं असं खूप वेळा होतं .... अरे आमच्या सूचनेवर पाहिजे तर टीका करा पण दुर्लक्ष नका रे करू ;) ;) ... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

या ज्योतिषाच काय करायचं? हा साप्ताहिक सकाळ १७ मे २००८ चा डॉ एन सी एडल यांचा लेख वाचला. त्या शिर्षका वरुन मला " साठेचं काय करायचं? " हे आठवलं . मास्तर लई भारी लिहिता बर का? त्याच्या मुळे आम्हाला नाटक जरा नीट पहाता येतात. हे नाटक आले कि पाहू. तुम्हि लिहिल्या मुळे ज्याच त्याच अभयारण्य पाहिल होतं आवडलं. प्रकाश घाटपांडे

शितल 06/06/2008 - 18:09
" आपली मीडिऒक्रिटी , सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आता अभयची समस्या तीच माझीही समस्या आहे. आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?".. हे वाचुन तर ते नाटक पहाव असे वाटते.

मनिष 06/06/2008 - 18:09
जरा (अती) सविस्तर प्रतिक्रिया ह्या नाटकाच्या निमित्ताने... http://www.misalpav.com/node/2010

मनिष 10/04/2014 - 00:04
गेल्या महिन्यात विनोद दोशी महोत्सवात राजीव नाईकांचेच नवीन नाटक 'बंदिश' पाहिले. खूप अ‍ॅब्स्ट्रॅक्ट, अ‍ॅब्सर्ड असे वाटले. प्रायोगिक नाटकांचे वावडे नाही, पण काहिही करावे का? कोणी पाहिले का? कसे वाटले? नाट्य अभ्यास वर्गात (Understanding Theatre) ह्या नाटकाविषयी चर्चा झाली म्हणे, तर तिथली मंडळी (ररा इ.) काही प्रकाश टाकतील का?

In reply to by मनिष

रमताराम 10/04/2014 - 19:44
तुला धन्यवाद द्यायला पाहिजे याबद्दल. एरवी लिहिलं नसतं, कंटाळा दुसरं काय. कुणाला वाचावसं वाटतंय हे समजलं तरच लिहायची तसदी घेतो. एरवी नुसते लाईक करणार्‍यांसाठी हे सगळं टाईप करायचा कंटाळाच येतो.
लेखनविषय:
साठेचं काय करायचं... लेखक : राजीव नाईक... दिग्दर्शक संदेश कुलकर्णी कलाकार : निखिल रत्नपारखी, अमृता सुभाष निर्मिती :समन्वय पुणे... ( मौज प्रकाशनाच्या आताची नाटकं या नाईक यांच्या नाट्यसंग्रहात हे नाटक आहे.) हे नाटक पाच सहा भाषांमध्ये भाषांतरित झालं...समन्वयने साठच्या आसपास प्रयोगही केले.. क्रोएशियन रंगभूमीवरही त्याचे प्रयोग झाले... मी या नाटकाचा प्रयोग पाहू शकलो नाही तरी केवळ वाचूनही ते मला फ़ार आवडते..

बाबा...

प्राजु ·

विसोबा खेचर 05/06/2008 - 16:31
पण माझ्या बाबांनी, जराही का कू न करता ते पाणी भातावर घेऊन खाल्लं. तो स्वयंपाक कसा झालाय यापेक्षासुद्धा तो मी केला होता म्हणजे त्यांच्या लाडक्या लेकीने... ही भावना जास्ती होती. क्या बात है! जियो...! प्राजू, छोटेखानी परंतु सुंदर लेख. अगदी मनापासनं लिहिलेला वाटतो आहे! कविताही छान आणि बोलकी आहे...! आपला, (मातृभक्त) तात्या.

ऋचा 05/06/2008 - 16:44
मी पिता पुत्रात भांडणं झालेली खूप पाहिली आहेत. पण मुलगी आणि वडील यांचं भांडण कधीच नाही पाहिलं. जसं आई होणं हे स्त्रीसाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं तसं एका मुलीचा बाप होणं हे एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं असं मी म्हणेन. आमच्या घरात मी आणि माझी बहीण आहोत माझे बाबा दुप्पट सुखी आहेत . ;;) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

वेदश्री 05/06/2008 - 16:49
प्राजु, मस्तच लेख लिहिला आहेस. आता लवकरच माझ्या बाबांबद्दलचे लेखन माझ्या ब्लॉगवर आले तर नवल राहणार नाही.. :) >मला दिलेल्या रूपयांचा बाबांनी कधीही हिशोब मागितला नाही की, पैसे कशाला हवेत असं विचारलं नाही माझ्याहीबद्दल असेच झाले.बाबांनी कधी हिशेब विचारायचीच वेळ आली नाही कारण तो त्यांनी विचारण्यागोदरच त्यांच्याकडे पोहोचलेला असायचा आणि आजही पोहोचतो. मी त्यांच्यापेक्षा हिशेबात पक्की निघाल्याने उलट हिशेबतपासणी मात्र नेहमी झाली...आजही होते .. म्हणजे मी बाबांना हिशेब विचारण्याची आणि ती त्यांनी राजरोसपणे देण्याची ! अर्थव्यवहारातले कळायला लागल्यापासून तो सगळा प्रकारच मला संभाळायला घेतला शेवटी मी बाबांकडून... त्यांना समजवण्यापेक्षा ते तरी सोपे ! त्यांच्याकडून मार्गदर्शन होत असतेच म्हणा वेळोवेळी... :)

सुंदर लिहिले आहेस... एक एक प्रसंग कसे डोळ्यासमोरून जातात. बाबा रिझर्वेशन न मिळाल्यामुळे मुंबईहून माझ्यासाठी गाड्या बदलत.. रात्रभर हेक्टीक प्रवास करत.. इचलकरंजीत पोचले होते. तेव्हा डोळे भरून यण्या इतकी मी मोठी नब्व्हते किंवा बाबांनी आपल्यासाठी वेगळं काहीतरी केलं याचीही जाण नव्हती. खरे आहे त्यावेळी आपल्याला जाणीव नसते, पण त्याची खरी किंमत आता जाणवते... आपण मोठे झाल्यानंतर... कविता छान आहे.. सारे जन्म तुमच्या पोटी घ्यावे.. हेच स्वप्न उराशी आशिर्वाद तुमचे राहोत सदैव माझ्या पाठिशी..

फक्त संदीप 05/06/2008 - 16:57
सर्वाच्या नशिबात असे भाग्य नसते प्रत्येक मुलीला असेच वडिलांचे प्रेम लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना मी संदीप..................(विचारात गुंतलेला)

राजे 05/06/2008 - 17:09
ख-या अर्थाने आज तुम्ही आपल्या वडिलांचे आभार व्यक्त केले आहेत... प्राजु... खरोखर मनापासून आवडले लेखन ! तु खुप भाग्यवान आहेस... राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

डोमकावळा 05/06/2008 - 17:10
जसं आई होणं हे स्त्रीसाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं तसं एका मुलीचा बाप होणं हे एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं उत्कृष्ट..... मलाही आवडेल जगातलं सगळ्यात मोठं सुख मिळवायला... :)

जयवी 05/06/2008 - 17:22
प्राजु...... तू तर अगदी डोळ्यात पाणी आणलंस गं.....!! खूप छान चितारले आहेस तुझे बाबा :) बहुतेक सगळ्याच मुलींचा बाबा काहीसा असाच असतो ना गं...!!

प्राजु 05/06/2008 - 17:50
मुलीला बाबा इतका जवळचा मित्र नसतोच. पिता आणि बाबा या दोन शब्दांमध्ये हाच तर फरक आहे.. पितृत्व हे नाकारता येतं पण "बाबापण" हे मायेनं वेढलेलं असतं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सखी 05/06/2008 - 17:59
प्राजु छानच लिहला आहेस लेख. कविताही छान आहे, आणि शेवटचे वाक्य खूपच समर्पक आहे.

मनिष 05/06/2008 - 18:01
छान लिहिले आहेस प्राजू! आमटीचा किस्सा तू आधी सांगितला होता. तुझे बाबांचे प्रेम छान दिसून येते. :)
मी पिता पुत्रात भांडणं झालेली खूप पाहिली आहेत. पण मुलगी आणि वडील यांचं भांडण कधीच नाही पाहिलं.
मी पाहिली आहेत, जवळच्या नात्यात वितुष्ट आले की खूप कडवटपणा येतो...आरुषी आणि रमेश तलवार हयांचे पण नाते फार चांगले होते असे वाटत नाही....खूप उदाहरणे आहेत अशी. तू भाग्यवान आहेस खरच!
जसं आई होणं हे स्त्रीसाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं तसं एका मुलीचा बाप होणं हे एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं असं मी म्हणेन.
तुझ्या भावनांचा आदर राखूनही मला वाटते की हे नेहमीच खरे नसते, थोडे ओव्हर-जनरलायझेशन होते आहे. तसे असते तर एवढ्या स्त्री भ्रुण हत्या का झाल्या असत्या? प्रत्येक पुरुषासाठी हे वेग-वेगळे असावे असे वाटते. शिवाय - हे (एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख...) पुरुषानेच सांगितले तर बरे नाही का? :)

शितल 05/06/2008 - 18:09
प्राजु मस्त लिहिले आहेस तुझ्या बा॑बा बद्दल. माझे लग्न झाल्यावर पाठवणीच्या वेळी माझ्या प॑पाचे रडुन रडुन लाल झालेले डोळे अजुन आठवतात आणि ते आठवुन आज ही माझे डोळे पाणवतात.

In reply to by आनंदयात्री

इनोबा म्हणे 05/06/2008 - 20:49
खूप सुंदर लेख लिहीला आहेस. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

वरदा 05/06/2008 - 18:26
अगदी सुरेख.. अस्सेच आहेत माझेही बाबा...खूप आठवण करुन दिलीस गं.... बाबांचं काम सगळं भव्यदिव्यचं असतं. अगदी अगदी ११ खोल्यांच घर होतं माझं...... सगळे प्रयोग बाबांवरच होत असत. हेही १००% खरं बिचार्‍यांना काय काय पदार्थ खावे लागलेत...पिझ्झा केला होता मी पहिल्यांदा इतका जळला होता..पण चांगला लागतोय म्हणून खाल्ला बिचार्‍यांनी.....आई म्हणाली माझी पोळी थोडी जळली की म्हणता आज पोळी बनवताना पोटातले गॅस निघून जावे ह्या उद्देशाने बनली वाट्टं आणि पोरीने कसंही बनवलं तरी चालतं... तर म्हणाले, लाडकी लेक काय असते ते फक्त मलाच माहीत तिने काहीही वाढलं तरी ते किती चविष्ट लागतं हे समजायला मी होऊन पहा...... खूप खूप आठवणी आल्या...इतक्या सुंदर लेखासाठी तुझं अभिनंदन! कविताही खूपच छान!

चतुरंग 05/06/2008 - 20:06
तुझ्या आणि बाबांमधल्या नातेसंबंधाचा एक हळवा पट अवचित उलगडला आहेस. तो स्वयंपाक कसा झालाय यापेक्षासुद्धा तो मी केला होता म्हणजे त्यांच्या लाडक्या लेकीने... ही भावना जास्ती होती क्या बात है! खरं आहे. हे फक्त बाबाच करु शकतात. तुझी कविताही उत्स्फूर्त आहे, सुंदर आहे! वडील-मुलगी हे नातंच फार वेगळं आहे, खूप गुंतागुंतीचं आणि त्याच वेळी साधं, सोपं आणि सरळ असं मला वाटतं! माझे बाबा मला जे निकष लावत त्यातून माझ्या बहिणीला त्यांनी कित्येकवेळा सूट दिलेली दिसली की मी त्यांच्याशी भांडे पण मोठा झाल्यावर हळूहळू समजू लागले की बाप-लेक नात्यात तर्काचे नियम नव्हे तर भावनांचे गोफ असतात. एकाचवेळी आपल्या मुलीबद्दल, तिच्या कर्तृत्त्वाबद्दल गाढ विश्वास असणारे बाबा मनात कुठेतरी तिच्याबद्दल काळजीने धास्तावलेले असतात. तसं दाखवणं हे त्यांना मनानं मान्य नसतं पण ते न दाखवण्याइतकं राजकारणीही त्यांना होता येत नाही! चतुरंग

भाग्यश्री 05/06/2008 - 22:01
ए प्राजु मस्तच लेख लिहीलास बघ! ... माझे बाबा पण अस्सेच आहेत!! कधीही हिशोब मागितला नाही, कायम विश्वास दाखव्ला माझ्यावर, अपयशाच्यावेळेला एक मस्त पत्र लिहून एन्करेज केले होते त्यांनी मला.. बाबांचा कायमच आधार वाटतो मला... शितलशी पण सहमत.. कधीही डोळ्यातून पाणी न काढणारे बाबा , त्या दिवशी इतके रडले.. मी बघायचच टाळत होते.. आईची बँगलोर ला बदली झाली होती मी १ वर्षची पण नसेन तेव्हा.. ते १-१.५ वर्ष बाबांनीच सांभाळल मला न दादा ला.. मी म्हणे तेव्हा बाबांनाच आई म्हणायचे ! :)

एक 05/06/2008 - 22:17
तुमच्या वडिलांवरून "फादर ऑफ द ब्राईड" सिनेमामधल्या वडिलांची आठवण झाली.. तो सुद्धा अतिशय सुंदर सिनेमा. वडिलांच्या मनाची मुलीच्या लग्नामुळे झालेली अवस्था अतिशय तरल पणे दाखवली आहे. अर्थात एका हिंदी सिनेमाने त्याची कॉपी करून करायच ते कडबोळ केलच.

मुक्तसुनीत 05/06/2008 - 22:32
आवडला. प्रामाणिकपणामुळे , साधेपणामुळे सुंदर झाला आहे. या विषयावरून आठवले. "बापलेकी" या नावाचा लेखसंग्रह अलिकडे प्रकाशित झाला आहे. बाप-मुलीचे नाते हा या सर्व लेखांमधला धागा. अनेक चांगल्या लेखिका, अभिनेत्री आणि इतर क्षेत्रातील मान्यवर स्त्रियांनी आपल्या वडीलांबद्दल लिहीलेले आहे. सर्वच लेख "काँग्रॅचुलेटरी" नाहीत. उदा. ना सी फडक्यांच्या मुलीने लिहिलेला लेख एक बाप आणि पती - आणि पर्यायाने एक व्यक्ती म्हणून फडक्यांची काळीकभिन्न बाजू दाखविणारा आहे. (असे लेख लिहायला प्रचंड धैर्य एकवटावे लागले असणार !) काही लेख वडीलांनीही मुलींबद्दल लिहीलेले आहेत. विजय आणि प्रिया तेंडुलकर या दोघांचेही लेख अत्यंत सुंदर झालेले आहेत ! पद्मजा फाटक, जाई निम्बकर, सई परांजपे सारख्या लोकांनी हजेरी लावलेली आहे. साडेचारशे पानांचा एक उत्तम दस्तावेज.

ईश्वरी 06/06/2008 - 11:56
सुंदर लेख लिहीला आहेस. कविता पण छान. आमटीचा प्रसंग तर खासच. >>माझे लग्न झाल्यावर पाठवणीच्या वेळी माझ्या प॑पाचे रडुन रडुन लाल झालेले डोळे अजुन आठवतात - शितल माझे ही बाबा पाठवणीच्या वेळी असेच रडले होते. आईपेक्षा ही तेच जास्त रडले. आणि अजूनही जेव्हा केव्हा दिड दोन वर्षानी भारतात जाणं होतं त्या वेळी मी परत निघताना त्यांना रडू आवरत नाही. तिच स्थिती नवर्‍याची. एरवी कधीही डोळ्यात पाणी येणार नाही . पण गमतीत ७ वर्षाच्या मुलीचा लग्नाचा विषय काढला की लगेच त्याचे डोळे पाणावतात. >> १५ जून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. कधी पासून ते नाही माहिती. अमेरिका मध्ये पहिला फादर्स डे १९ जून १९१० ला साजरा केला...स्पोकेन, वॉश्गिंटन येथे. अमेरिकेत आणि बर्‍याच इतर देशात दरवर्षी जून च्या ३ र्‍या रविवारी फादर्स डे असतो. या वर्षी ३ रा रविवार १५ जून ला आला आहे. काही देशात जून च्या २ र्‍या रविवारी असतो. ईश्वरी

'माता देवो भवो' वर अनेकदा भरभरून लिहीले जाते. आणि वडील मात्र बहुतेकवेळा 'अन् संग हिरो'च राहतात. आईचे महत्व असतेच आभाळाएवढे पण त्याच बरोबर वडीलही संपूर्ण संसारावर 'निळी छत्रीवाले' बनून राहतात. डॉक्टरांचे बील नको म्हणून अंगावर आजारपण काढणारे, शर्ट शिवला की एक एक्स्ट्रा कॉलर शिवून घेणारे (कॉलर जूनी झाली, फाटली तर ही जास्तीची कॉलर शर्टाला शीवून तोच शर्ट वापरता येतो. तेवढ्यासाठी नवीन शर्टाचा खर्च नको, हा विचार), कर्तव्यकठोर आणि तरीही मुलांच्या बाबतीत हळवे वडील मलाही लाभले होते. सगळ्याच वडीलांना मुलांपेक्षा मुली जास्त जवळच्या असतात. ह्याला कारण त्या आई-वडीलांना सोडून सासरी जाणार असतात. मुली बर्‍यापैकी संवेदनशील असतात. वडीलांच्या भावना, त्यांच्या मनातील विचार शब्दाविना ओळखतात. मुलांचे तसे नसते, लहानपणी ती हूड असतात, भावना ओळखण्याच्या कोमल संवेदनेपेक्षा व्यवहारातला रोखठोकपणा त्यांना जास्त भावतो. रफ अँड टफपणा त्यांच्या ठायी नैसर्गिकपणे असतो. आणि त्याहूनही भावना ओळखल्या तरी त्या नजरेतून दाखविण्याची, शब्दांतून मांडण्याची आवश्यकता त्यांना भासत नाही/जमत नाही. मुलांकडे बघण्याचा आई-वडीलांचा दृष्टीकोन लहानपणा पासूनच वेगळा असतो. त्याला वेगळ्या पद्धतीने वाढविले जाते. त्यालाही संवेदना असतात. वडीलांची शिस्त आणि आईचे प्रेम त्यालाही दिसते. त्याला वडीलांबद्दल आदर वाटला तरी वडीलांची सक्षमता त्याला जाणवते आणि त्यातल्या त्यात दुर्बल आईकडे तो प्रेमाने आकर्षित होतो. तिचा संरक्षक बनतो. असो. ह्या विपरीतही अनुभव येऊ शकतात ह्याची जाणीव आहे. पण जनरली मुली वडीलांकडे आणि मुलगे आईकडे आकर्षित होतात. प्राजू, लेख मनाला भिडणारा आहे. अभिनंदन. अवांतरः सुदैवाने किंवा दुर्दैवाने मला मुलगी नाही. ह्याची खंत अनेकदा वाटते पण मुलगी नाही ह्याचा आनंदही होतो कारण तिचे 'सासरी' जाणे मला झेपले नसते.

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर 06/06/2008 - 06:33
आणि मुलगे आईकडे आकर्षित होतात. सहमत आहे...! बाप आता वारला बिचारा! त्याचा खूप जीव होता माझ्यावर. मलाही त्याच्याबद्दल खूप आदर अन् प्रेम वाटे. परंतु कधी त्याची भक्ति नाही केली! भक्ति हा प्रकार काही निराळाच असतो! ती फक्त आईचीच केली आजतागायत! :) बाप कितीही चांगला अन् प्रेमळ असला तरी मांडीवर डोकं ठेवायला आईच पाहिजे, डोक्यावर तेल थापायला आईच पाहिजे! :) आपला, (कट्टर मातृभक्त!) तात्या.

प्राजु, मस्तच लिहिले आहे तुम्ही. माझ्या बाबांनीही आमच्यासाठी खूप काही केले. मी १०वीत असताना माझे बाबा ज्या कंपनीत होते ती बंद पडली. त्या नंतर ते काही दिवस घरी होते. आणि रोज दुपारी घराच्या बाल्कनीत बसून दूरवर काही तरी बघत आपल्याच विचारात असायचे. तेव्हा काय कळणार, आज माझा स्वतःचा संसार उभा राहिल्यावर मला थोडी थोडी कल्पना येत आहे त्यांच्या मनात काय विचार येत असतील तेव्हा, अर्ध्या संसारात असा आघात झाल्यावर. बोट तुझे धरूनी पाऊल माझे स्थिरावले.. मायेच्या वर्षावात माझे बालपण विसावले.. छोटी पोळी , छोटा भात... वरण इवलसं बाहुलीचं घर आपण बांधलं.. ते ही इवलसं.. क्षितिजाच्या पारचे विश्व मला तू दाखवले पंखामध्ये बळ घेऊनी.. मी आभाळाकडे झेपावले सारे जन्म तुमच्या पोटी घ्यावे.. हेच स्वप्न उराशी आशिर्वाद तुमचे राहोत सदैव माझ्या पाठिशी.. प्राजुताई, मला कविता वगैरे करता येत नाहित, तेव्हा तुमच्या परवानगीशिवाय, ह्या ओळी माझ्याही बाबांसाठी, माफ कराल अशी आशा आहे कारण मला वाटते की ह्या ओळी केवळ तुमचेच बाबा नाही तर 'बाबा' ह्या नात्याबद्दल आहेत. बिपिन.

फटू 06/06/2008 - 08:22
खुप छान लिहिलं आहेस गं... वाचता वाचता भारतात असलेल्या बाबांच्या आठवणीने डोळे भरून आले... आईच्या ममतेबद्दल खुप लिहिलं जातं पण बाबांबद्दल सहसा नाही... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्राजु 06/06/2008 - 14:48
सर्वांचे मनापासून धन्यवाद. हा लेख मी खरंच मनापासून लिहिला आहे. माझ्या सगळ्या मिपा परिवाराला फादर्स डे च्या आतापासूनच शुभेच्छा! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चित्रा 06/06/2008 - 15:55
बाबांवरचा उत्कटतेने लिहीलेला लेख आवडला. ड्रेसची आठवण आवडली. असे कुठेतरी वाचले आहे की वडिलांनी मुलींना प्रेमाने प्रोत्साहन दिले, त्यांच्या वाढीत सक्रिय सहभाग घेतला, सांभाळून घेतले तर मुलींचा जगात वावरण्याचा आत्मविश्वास वाढतो. म्हणजे आईने ते करायची गरज नाही असा नव्हे!

मदनबाण 06/06/2008 - 21:00
प्राजुताई खरच सुंदर आहे हा लेख..... माझ्या बाबांबद्दलच्या माझ्या भावना:-- माझ्या वडीलांमुळेच मी आज इथ पर्यन्त पोहचु शकलो आहे...आईच प्रेम असतच पण वडीलांच हे प्रेम मात्र मुलासाठी न बोलताही सबकुछ अस असत..... लहानपणी मी व माझे बाबा बर्‍याच वेळी बुद्धीबळ खेळायचो ..मला हा खेळ काही आवडायचा नाही कारण,,, १ नाही तर सलग अनेक खेळ मी हारायचो..सगळी कडुन कोंडी करुन माझे वडील काही चालीतच मला गारद करुन टाकत्...मी मग भरपुर चिडायचो...त्यांना सांगायचो..एकदा तरी तुम्हाला मी हरवणारच !!!!!.....आणि मला जिंकण्याचा आनंद देण्यासाठी ते मग एखादा डाव अगदी सहजपणे हारत. लहानपणी मला सायकल शिकवताना त्या मागे धावणार्‍या माझ्या बाबांनी मला अता पर्यन्त बरच काही शिकवल आहे आणि अजुनही मी त्यांच्या कडुन शिकतच आहे... कधी प्रेमळ तर कधी कठोर होऊन त्यांनी मला नेहमी योग्य तेच कसं कराव आणि वागाव ते समजवल... माझ्या बाबांबद्दल लिहाव तेवढ कमीच आहे... फक्त एवढच म्हणतो... की गेले कित्येक जन्म मी भरपुर पुण्य कमवल असणार म्हणुनच या जन्मी मला असे बाबा आणि आई मिळाले. (पितृछाया प्रेमी) मदनबाण.....

In reply to by ऋषिकेश

सहज 07/06/2008 - 07:03
हेच म्हणतो. सुरज बडजात्याच्या सिनेमातील गाणे, भारतात असताना तो सिनेमा, गाणे मी बघीतले किंवा ऐकले ही नसते. एनी हाउ.. हे गाणे "ते शब्द ऐकल्यावर" डोळे जरा पाणावले होते.

म्हणुन तर इथे असं म्हणतात, "माय सन इज माय सन, टिल ही गेटस् हिज वाईफ बट माय डॉटर इज माय डॉटर, फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ" हॅपी मदर आणि फादर्स डे!!!

विसोबा खेचर 05/06/2008 - 16:31
पण माझ्या बाबांनी, जराही का कू न करता ते पाणी भातावर घेऊन खाल्लं. तो स्वयंपाक कसा झालाय यापेक्षासुद्धा तो मी केला होता म्हणजे त्यांच्या लाडक्या लेकीने... ही भावना जास्ती होती. क्या बात है! जियो...! प्राजू, छोटेखानी परंतु सुंदर लेख. अगदी मनापासनं लिहिलेला वाटतो आहे! कविताही छान आणि बोलकी आहे...! आपला, (मातृभक्त) तात्या.

ऋचा 05/06/2008 - 16:44
मी पिता पुत्रात भांडणं झालेली खूप पाहिली आहेत. पण मुलगी आणि वडील यांचं भांडण कधीच नाही पाहिलं. जसं आई होणं हे स्त्रीसाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं तसं एका मुलीचा बाप होणं हे एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं असं मी म्हणेन. आमच्या घरात मी आणि माझी बहीण आहोत माझे बाबा दुप्पट सुखी आहेत . ;;) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

वेदश्री 05/06/2008 - 16:49
प्राजु, मस्तच लेख लिहिला आहेस. आता लवकरच माझ्या बाबांबद्दलचे लेखन माझ्या ब्लॉगवर आले तर नवल राहणार नाही.. :) >मला दिलेल्या रूपयांचा बाबांनी कधीही हिशोब मागितला नाही की, पैसे कशाला हवेत असं विचारलं नाही माझ्याहीबद्दल असेच झाले.बाबांनी कधी हिशेब विचारायचीच वेळ आली नाही कारण तो त्यांनी विचारण्यागोदरच त्यांच्याकडे पोहोचलेला असायचा आणि आजही पोहोचतो. मी त्यांच्यापेक्षा हिशेबात पक्की निघाल्याने उलट हिशेबतपासणी मात्र नेहमी झाली...आजही होते .. म्हणजे मी बाबांना हिशेब विचारण्याची आणि ती त्यांनी राजरोसपणे देण्याची ! अर्थव्यवहारातले कळायला लागल्यापासून तो सगळा प्रकारच मला संभाळायला घेतला शेवटी मी बाबांकडून... त्यांना समजवण्यापेक्षा ते तरी सोपे ! त्यांच्याकडून मार्गदर्शन होत असतेच म्हणा वेळोवेळी... :)

सुंदर लिहिले आहेस... एक एक प्रसंग कसे डोळ्यासमोरून जातात. बाबा रिझर्वेशन न मिळाल्यामुळे मुंबईहून माझ्यासाठी गाड्या बदलत.. रात्रभर हेक्टीक प्रवास करत.. इचलकरंजीत पोचले होते. तेव्हा डोळे भरून यण्या इतकी मी मोठी नब्व्हते किंवा बाबांनी आपल्यासाठी वेगळं काहीतरी केलं याचीही जाण नव्हती. खरे आहे त्यावेळी आपल्याला जाणीव नसते, पण त्याची खरी किंमत आता जाणवते... आपण मोठे झाल्यानंतर... कविता छान आहे.. सारे जन्म तुमच्या पोटी घ्यावे.. हेच स्वप्न उराशी आशिर्वाद तुमचे राहोत सदैव माझ्या पाठिशी..

फक्त संदीप 05/06/2008 - 16:57
सर्वाच्या नशिबात असे भाग्य नसते प्रत्येक मुलीला असेच वडिलांचे प्रेम लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना मी संदीप..................(विचारात गुंतलेला)

राजे 05/06/2008 - 17:09
ख-या अर्थाने आज तुम्ही आपल्या वडिलांचे आभार व्यक्त केले आहेत... प्राजु... खरोखर मनापासून आवडले लेखन ! तु खुप भाग्यवान आहेस... राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

डोमकावळा 05/06/2008 - 17:10
जसं आई होणं हे स्त्रीसाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं तसं एका मुलीचा बाप होणं हे एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं उत्कृष्ट..... मलाही आवडेल जगातलं सगळ्यात मोठं सुख मिळवायला... :)

जयवी 05/06/2008 - 17:22
प्राजु...... तू तर अगदी डोळ्यात पाणी आणलंस गं.....!! खूप छान चितारले आहेस तुझे बाबा :) बहुतेक सगळ्याच मुलींचा बाबा काहीसा असाच असतो ना गं...!!

प्राजु 05/06/2008 - 17:50
मुलीला बाबा इतका जवळचा मित्र नसतोच. पिता आणि बाबा या दोन शब्दांमध्ये हाच तर फरक आहे.. पितृत्व हे नाकारता येतं पण "बाबापण" हे मायेनं वेढलेलं असतं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सखी 05/06/2008 - 17:59
प्राजु छानच लिहला आहेस लेख. कविताही छान आहे, आणि शेवटचे वाक्य खूपच समर्पक आहे.

मनिष 05/06/2008 - 18:01
छान लिहिले आहेस प्राजू! आमटीचा किस्सा तू आधी सांगितला होता. तुझे बाबांचे प्रेम छान दिसून येते. :)
मी पिता पुत्रात भांडणं झालेली खूप पाहिली आहेत. पण मुलगी आणि वडील यांचं भांडण कधीच नाही पाहिलं.
मी पाहिली आहेत, जवळच्या नात्यात वितुष्ट आले की खूप कडवटपणा येतो...आरुषी आणि रमेश तलवार हयांचे पण नाते फार चांगले होते असे वाटत नाही....खूप उदाहरणे आहेत अशी. तू भाग्यवान आहेस खरच!
जसं आई होणं हे स्त्रीसाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं तसं एका मुलीचा बाप होणं हे एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं असं मी म्हणेन.
तुझ्या भावनांचा आदर राखूनही मला वाटते की हे नेहमीच खरे नसते, थोडे ओव्हर-जनरलायझेशन होते आहे. तसे असते तर एवढ्या स्त्री भ्रुण हत्या का झाल्या असत्या? प्रत्येक पुरुषासाठी हे वेग-वेगळे असावे असे वाटते. शिवाय - हे (एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख...) पुरुषानेच सांगितले तर बरे नाही का? :)

शितल 05/06/2008 - 18:09
प्राजु मस्त लिहिले आहेस तुझ्या बा॑बा बद्दल. माझे लग्न झाल्यावर पाठवणीच्या वेळी माझ्या प॑पाचे रडुन रडुन लाल झालेले डोळे अजुन आठवतात आणि ते आठवुन आज ही माझे डोळे पाणवतात.

In reply to by आनंदयात्री

इनोबा म्हणे 05/06/2008 - 20:49
खूप सुंदर लेख लिहीला आहेस. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

वरदा 05/06/2008 - 18:26
अगदी सुरेख.. अस्सेच आहेत माझेही बाबा...खूप आठवण करुन दिलीस गं.... बाबांचं काम सगळं भव्यदिव्यचं असतं. अगदी अगदी ११ खोल्यांच घर होतं माझं...... सगळे प्रयोग बाबांवरच होत असत. हेही १००% खरं बिचार्‍यांना काय काय पदार्थ खावे लागलेत...पिझ्झा केला होता मी पहिल्यांदा इतका जळला होता..पण चांगला लागतोय म्हणून खाल्ला बिचार्‍यांनी.....आई म्हणाली माझी पोळी थोडी जळली की म्हणता आज पोळी बनवताना पोटातले गॅस निघून जावे ह्या उद्देशाने बनली वाट्टं आणि पोरीने कसंही बनवलं तरी चालतं... तर म्हणाले, लाडकी लेक काय असते ते फक्त मलाच माहीत तिने काहीही वाढलं तरी ते किती चविष्ट लागतं हे समजायला मी होऊन पहा...... खूप खूप आठवणी आल्या...इतक्या सुंदर लेखासाठी तुझं अभिनंदन! कविताही खूपच छान!

चतुरंग 05/06/2008 - 20:06
तुझ्या आणि बाबांमधल्या नातेसंबंधाचा एक हळवा पट अवचित उलगडला आहेस. तो स्वयंपाक कसा झालाय यापेक्षासुद्धा तो मी केला होता म्हणजे त्यांच्या लाडक्या लेकीने... ही भावना जास्ती होती क्या बात है! खरं आहे. हे फक्त बाबाच करु शकतात. तुझी कविताही उत्स्फूर्त आहे, सुंदर आहे! वडील-मुलगी हे नातंच फार वेगळं आहे, खूप गुंतागुंतीचं आणि त्याच वेळी साधं, सोपं आणि सरळ असं मला वाटतं! माझे बाबा मला जे निकष लावत त्यातून माझ्या बहिणीला त्यांनी कित्येकवेळा सूट दिलेली दिसली की मी त्यांच्याशी भांडे पण मोठा झाल्यावर हळूहळू समजू लागले की बाप-लेक नात्यात तर्काचे नियम नव्हे तर भावनांचे गोफ असतात. एकाचवेळी आपल्या मुलीबद्दल, तिच्या कर्तृत्त्वाबद्दल गाढ विश्वास असणारे बाबा मनात कुठेतरी तिच्याबद्दल काळजीने धास्तावलेले असतात. तसं दाखवणं हे त्यांना मनानं मान्य नसतं पण ते न दाखवण्याइतकं राजकारणीही त्यांना होता येत नाही! चतुरंग

भाग्यश्री 05/06/2008 - 22:01
ए प्राजु मस्तच लेख लिहीलास बघ! ... माझे बाबा पण अस्सेच आहेत!! कधीही हिशोब मागितला नाही, कायम विश्वास दाखव्ला माझ्यावर, अपयशाच्यावेळेला एक मस्त पत्र लिहून एन्करेज केले होते त्यांनी मला.. बाबांचा कायमच आधार वाटतो मला... शितलशी पण सहमत.. कधीही डोळ्यातून पाणी न काढणारे बाबा , त्या दिवशी इतके रडले.. मी बघायचच टाळत होते.. आईची बँगलोर ला बदली झाली होती मी १ वर्षची पण नसेन तेव्हा.. ते १-१.५ वर्ष बाबांनीच सांभाळल मला न दादा ला.. मी म्हणे तेव्हा बाबांनाच आई म्हणायचे ! :)

एक 05/06/2008 - 22:17
तुमच्या वडिलांवरून "फादर ऑफ द ब्राईड" सिनेमामधल्या वडिलांची आठवण झाली.. तो सुद्धा अतिशय सुंदर सिनेमा. वडिलांच्या मनाची मुलीच्या लग्नामुळे झालेली अवस्था अतिशय तरल पणे दाखवली आहे. अर्थात एका हिंदी सिनेमाने त्याची कॉपी करून करायच ते कडबोळ केलच.

मुक्तसुनीत 05/06/2008 - 22:32
आवडला. प्रामाणिकपणामुळे , साधेपणामुळे सुंदर झाला आहे. या विषयावरून आठवले. "बापलेकी" या नावाचा लेखसंग्रह अलिकडे प्रकाशित झाला आहे. बाप-मुलीचे नाते हा या सर्व लेखांमधला धागा. अनेक चांगल्या लेखिका, अभिनेत्री आणि इतर क्षेत्रातील मान्यवर स्त्रियांनी आपल्या वडीलांबद्दल लिहीलेले आहे. सर्वच लेख "काँग्रॅचुलेटरी" नाहीत. उदा. ना सी फडक्यांच्या मुलीने लिहिलेला लेख एक बाप आणि पती - आणि पर्यायाने एक व्यक्ती म्हणून फडक्यांची काळीकभिन्न बाजू दाखविणारा आहे. (असे लेख लिहायला प्रचंड धैर्य एकवटावे लागले असणार !) काही लेख वडीलांनीही मुलींबद्दल लिहीलेले आहेत. विजय आणि प्रिया तेंडुलकर या दोघांचेही लेख अत्यंत सुंदर झालेले आहेत ! पद्मजा फाटक, जाई निम्बकर, सई परांजपे सारख्या लोकांनी हजेरी लावलेली आहे. साडेचारशे पानांचा एक उत्तम दस्तावेज.

ईश्वरी 06/06/2008 - 11:56
सुंदर लेख लिहीला आहेस. कविता पण छान. आमटीचा प्रसंग तर खासच. >>माझे लग्न झाल्यावर पाठवणीच्या वेळी माझ्या प॑पाचे रडुन रडुन लाल झालेले डोळे अजुन आठवतात - शितल माझे ही बाबा पाठवणीच्या वेळी असेच रडले होते. आईपेक्षा ही तेच जास्त रडले. आणि अजूनही जेव्हा केव्हा दिड दोन वर्षानी भारतात जाणं होतं त्या वेळी मी परत निघताना त्यांना रडू आवरत नाही. तिच स्थिती नवर्‍याची. एरवी कधीही डोळ्यात पाणी येणार नाही . पण गमतीत ७ वर्षाच्या मुलीचा लग्नाचा विषय काढला की लगेच त्याचे डोळे पाणावतात. >> १५ जून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. कधी पासून ते नाही माहिती. अमेरिका मध्ये पहिला फादर्स डे १९ जून १९१० ला साजरा केला...स्पोकेन, वॉश्गिंटन येथे. अमेरिकेत आणि बर्‍याच इतर देशात दरवर्षी जून च्या ३ र्‍या रविवारी फादर्स डे असतो. या वर्षी ३ रा रविवार १५ जून ला आला आहे. काही देशात जून च्या २ र्‍या रविवारी असतो. ईश्वरी

'माता देवो भवो' वर अनेकदा भरभरून लिहीले जाते. आणि वडील मात्र बहुतेकवेळा 'अन् संग हिरो'च राहतात. आईचे महत्व असतेच आभाळाएवढे पण त्याच बरोबर वडीलही संपूर्ण संसारावर 'निळी छत्रीवाले' बनून राहतात. डॉक्टरांचे बील नको म्हणून अंगावर आजारपण काढणारे, शर्ट शिवला की एक एक्स्ट्रा कॉलर शिवून घेणारे (कॉलर जूनी झाली, फाटली तर ही जास्तीची कॉलर शर्टाला शीवून तोच शर्ट वापरता येतो. तेवढ्यासाठी नवीन शर्टाचा खर्च नको, हा विचार), कर्तव्यकठोर आणि तरीही मुलांच्या बाबतीत हळवे वडील मलाही लाभले होते. सगळ्याच वडीलांना मुलांपेक्षा मुली जास्त जवळच्या असतात. ह्याला कारण त्या आई-वडीलांना सोडून सासरी जाणार असतात. मुली बर्‍यापैकी संवेदनशील असतात. वडीलांच्या भावना, त्यांच्या मनातील विचार शब्दाविना ओळखतात. मुलांचे तसे नसते, लहानपणी ती हूड असतात, भावना ओळखण्याच्या कोमल संवेदनेपेक्षा व्यवहारातला रोखठोकपणा त्यांना जास्त भावतो. रफ अँड टफपणा त्यांच्या ठायी नैसर्गिकपणे असतो. आणि त्याहूनही भावना ओळखल्या तरी त्या नजरेतून दाखविण्याची, शब्दांतून मांडण्याची आवश्यकता त्यांना भासत नाही/जमत नाही. मुलांकडे बघण्याचा आई-वडीलांचा दृष्टीकोन लहानपणा पासूनच वेगळा असतो. त्याला वेगळ्या पद्धतीने वाढविले जाते. त्यालाही संवेदना असतात. वडीलांची शिस्त आणि आईचे प्रेम त्यालाही दिसते. त्याला वडीलांबद्दल आदर वाटला तरी वडीलांची सक्षमता त्याला जाणवते आणि त्यातल्या त्यात दुर्बल आईकडे तो प्रेमाने आकर्षित होतो. तिचा संरक्षक बनतो. असो. ह्या विपरीतही अनुभव येऊ शकतात ह्याची जाणीव आहे. पण जनरली मुली वडीलांकडे आणि मुलगे आईकडे आकर्षित होतात. प्राजू, लेख मनाला भिडणारा आहे. अभिनंदन. अवांतरः सुदैवाने किंवा दुर्दैवाने मला मुलगी नाही. ह्याची खंत अनेकदा वाटते पण मुलगी नाही ह्याचा आनंदही होतो कारण तिचे 'सासरी' जाणे मला झेपले नसते.

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर 06/06/2008 - 06:33
आणि मुलगे आईकडे आकर्षित होतात. सहमत आहे...! बाप आता वारला बिचारा! त्याचा खूप जीव होता माझ्यावर. मलाही त्याच्याबद्दल खूप आदर अन् प्रेम वाटे. परंतु कधी त्याची भक्ति नाही केली! भक्ति हा प्रकार काही निराळाच असतो! ती फक्त आईचीच केली आजतागायत! :) बाप कितीही चांगला अन् प्रेमळ असला तरी मांडीवर डोकं ठेवायला आईच पाहिजे, डोक्यावर तेल थापायला आईच पाहिजे! :) आपला, (कट्टर मातृभक्त!) तात्या.

प्राजु, मस्तच लिहिले आहे तुम्ही. माझ्या बाबांनीही आमच्यासाठी खूप काही केले. मी १०वीत असताना माझे बाबा ज्या कंपनीत होते ती बंद पडली. त्या नंतर ते काही दिवस घरी होते. आणि रोज दुपारी घराच्या बाल्कनीत बसून दूरवर काही तरी बघत आपल्याच विचारात असायचे. तेव्हा काय कळणार, आज माझा स्वतःचा संसार उभा राहिल्यावर मला थोडी थोडी कल्पना येत आहे त्यांच्या मनात काय विचार येत असतील तेव्हा, अर्ध्या संसारात असा आघात झाल्यावर. बोट तुझे धरूनी पाऊल माझे स्थिरावले.. मायेच्या वर्षावात माझे बालपण विसावले.. छोटी पोळी , छोटा भात... वरण इवलसं बाहुलीचं घर आपण बांधलं.. ते ही इवलसं.. क्षितिजाच्या पारचे विश्व मला तू दाखवले पंखामध्ये बळ घेऊनी.. मी आभाळाकडे झेपावले सारे जन्म तुमच्या पोटी घ्यावे.. हेच स्वप्न उराशी आशिर्वाद तुमचे राहोत सदैव माझ्या पाठिशी.. प्राजुताई, मला कविता वगैरे करता येत नाहित, तेव्हा तुमच्या परवानगीशिवाय, ह्या ओळी माझ्याही बाबांसाठी, माफ कराल अशी आशा आहे कारण मला वाटते की ह्या ओळी केवळ तुमचेच बाबा नाही तर 'बाबा' ह्या नात्याबद्दल आहेत. बिपिन.

फटू 06/06/2008 - 08:22
खुप छान लिहिलं आहेस गं... वाचता वाचता भारतात असलेल्या बाबांच्या आठवणीने डोळे भरून आले... आईच्या ममतेबद्दल खुप लिहिलं जातं पण बाबांबद्दल सहसा नाही... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्राजु 06/06/2008 - 14:48
सर्वांचे मनापासून धन्यवाद. हा लेख मी खरंच मनापासून लिहिला आहे. माझ्या सगळ्या मिपा परिवाराला फादर्स डे च्या आतापासूनच शुभेच्छा! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चित्रा 06/06/2008 - 15:55
बाबांवरचा उत्कटतेने लिहीलेला लेख आवडला. ड्रेसची आठवण आवडली. असे कुठेतरी वाचले आहे की वडिलांनी मुलींना प्रेमाने प्रोत्साहन दिले, त्यांच्या वाढीत सक्रिय सहभाग घेतला, सांभाळून घेतले तर मुलींचा जगात वावरण्याचा आत्मविश्वास वाढतो. म्हणजे आईने ते करायची गरज नाही असा नव्हे!

मदनबाण 06/06/2008 - 21:00
प्राजुताई खरच सुंदर आहे हा लेख..... माझ्या बाबांबद्दलच्या माझ्या भावना:-- माझ्या वडीलांमुळेच मी आज इथ पर्यन्त पोहचु शकलो आहे...आईच प्रेम असतच पण वडीलांच हे प्रेम मात्र मुलासाठी न बोलताही सबकुछ अस असत..... लहानपणी मी व माझे बाबा बर्‍याच वेळी बुद्धीबळ खेळायचो ..मला हा खेळ काही आवडायचा नाही कारण,,, १ नाही तर सलग अनेक खेळ मी हारायचो..सगळी कडुन कोंडी करुन माझे वडील काही चालीतच मला गारद करुन टाकत्...मी मग भरपुर चिडायचो...त्यांना सांगायचो..एकदा तरी तुम्हाला मी हरवणारच !!!!!.....आणि मला जिंकण्याचा आनंद देण्यासाठी ते मग एखादा डाव अगदी सहजपणे हारत. लहानपणी मला सायकल शिकवताना त्या मागे धावणार्‍या माझ्या बाबांनी मला अता पर्यन्त बरच काही शिकवल आहे आणि अजुनही मी त्यांच्या कडुन शिकतच आहे... कधी प्रेमळ तर कधी कठोर होऊन त्यांनी मला नेहमी योग्य तेच कसं कराव आणि वागाव ते समजवल... माझ्या बाबांबद्दल लिहाव तेवढ कमीच आहे... फक्त एवढच म्हणतो... की गेले कित्येक जन्म मी भरपुर पुण्य कमवल असणार म्हणुनच या जन्मी मला असे बाबा आणि आई मिळाले. (पितृछाया प्रेमी) मदनबाण.....

In reply to by ऋषिकेश

सहज 07/06/2008 - 07:03
हेच म्हणतो. सुरज बडजात्याच्या सिनेमातील गाणे, भारतात असताना तो सिनेमा, गाणे मी बघीतले किंवा ऐकले ही नसते. एनी हाउ.. हे गाणे "ते शब्द ऐकल्यावर" डोळे जरा पाणावले होते.

म्हणुन तर इथे असं म्हणतात, "माय सन इज माय सन, टिल ही गेटस् हिज वाईफ बट माय डॉटर इज माय डॉटर, फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ" हॅपी मदर आणि फादर्स डे!!!
फादर्स डे च्या निमित्ताने... १५ जून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. कधी पासून ते नाही माहिती. खरं तर मदर्स डे आणि फादर्स डे हे साजरे करण्यासाठी अमुक एखादी तारिखच हवी असं नाही. कारण आपल्या मात्यापित्यांचे आपण नेहमीच ऋणी असतो. माझ्या बाबांबद्द्ल काय सांगू मी?? आई सांगते की, माझा जन्म झाला त्याचदिवशी माझ्या काकाच्या पॉवर लूम्सच्या कारखान्याचं उद्घाटन झालं. सगळे जण कार्यक्रम आटोपून बसले होते आणि बाबा सांगत आले की, "मुलगी झाली, मुलगी झाली". त्या काळाला शोभेल अशीच असलेली माझी आजी थोडी नाराज झाली.. .. आणि आई का नाराज झाली या विचाराने माझे बाबा ही नाराज झाले.

चटका !

उदय सप्रे ·
लेखनविषय:
चटका.....एक विरह कविता..... तुझी साथ असल्यावर मरणातसुध्दा जगल्यासारखं वाटतं ! माझ्या तुझ्यावरील प्रेमाच्या उंचीपुढे मला आभाळही ठेंगणं वाटतं ! प्रेम डोळ्यांतून डोकावतं आणि स्पर्शामधे रेंगाळतं ! नि:शब्द भावांचा हा अनुभव, जणू आपलंच बोलणं गेंगणं वाटतं ! कधीतरी बरस ना सखे माझ्यासाठी, वळवाच्या पावसासारखी ! मला सम्पूर्ण वाचून पण तू थंडच ! जसं "पाण्याने" आगीला "डागणं" वाटतं ! ------------------------------------------------------------------------------------ आपण मला इथेही भेटू शकता : कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/ आणि कलास्वाद : http://uday-sapre

घर.....

उदय सप्रे ·

अरुण मनोहर 05/06/2008 - 14:28
सलामी तर मस्त जमलीय. जरा बारा ओळीपर्यंत वाढवा की. --- वाढता वाढता वाढे----------------

विसोबा खेचर 06/06/2008 - 05:30
अरे बापरे! चारोळी? नको रे बाब्बा! पळा पळा.... :) आपला, (चारोळ्यांना जाम घाबरणारा) तात्या.

अरुण मनोहर 05/06/2008 - 14:28
सलामी तर मस्त जमलीय. जरा बारा ओळीपर्यंत वाढवा की. --- वाढता वाढता वाढे----------------

विसोबा खेचर 06/06/2008 - 05:30
अरे बापरे! चारोळी? नको रे बाब्बा! पळा पळा.... :) आपला, (चारोळ्यांना जाम घाबरणारा) तात्या.
लेखनविषय:
घर..... तो म्हणाला, "मी आपल्या दोघांसाठी बारा खोल्यांचं प्रशस्त घर बांधलंय !" मी म्हणालो, " मी बारा माणसांचं दोन खोल्यांचं घर वर्षानुवर्षे सांधलंय !"