मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गालिब च्या शायरी चा आस्वाद भाग १

गुल-फिशानी ·

रामदास 09/10/2013 - 10:26
काहीतरी नविन वाचायला मिळेल अशी आशा वाटते आहे. थोडे विस्ताराने लिहीलेले वाचायला आवडेल. म्हणजे हा लेख अपुरा आहे असे नाही पण पुरेसा नुमायला (व्यक्त झाला) नाही एव्हढंच.

रमेश आठवले 09/10/2013 - 11:40
'है औरभी दुनियामे सुखनवर बहुत अच्छे केहते है की गालिब का अंदाजे बयान और' आणखी गालिबचे शेर येऊ द्या त्यांच्यावर शेरे मारणारे मिपा सदस्य खूप भेटतील.

वेल्लाभट 09/10/2013 - 14:46
गुड. मिर्झा असदुल्लाह खान गालिब हे एक विद्यापीठ आहे. कब वो सुनता है कहानी मेरी और फिर वो भी जबानी मेरी

अर्धवटराव 09/10/2013 - 20:44
दसरा-दिवाळीची मेजवानी मिपावर सुरु झाली म्हणायची. हा शेर स्वतः पूर्ण असला (म्हणजे सौंदर्याचा टीप ऑफ आईसबर्ग सुचवण्यापुरता) तरी ते अव्यक्त सौंदर्य गालीब साहेबांनी आपल्या शायरीत कसं मुरवलं हे वाचण्याची तल्लफ आहेच. पुभाप्र.

प्यारे१ 10/10/2013 - 00:32
संपलं???? सुरु व्हायच्या आधीच? दोन घास तोंडात टाकून काय मस्त टेस्ट आहे म्हणेपर्यंत संपलं? नाय चालणार मियाँ नाय चालणार!

रामदास 09/10/2013 - 10:26
काहीतरी नविन वाचायला मिळेल अशी आशा वाटते आहे. थोडे विस्ताराने लिहीलेले वाचायला आवडेल. म्हणजे हा लेख अपुरा आहे असे नाही पण पुरेसा नुमायला (व्यक्त झाला) नाही एव्हढंच.

रमेश आठवले 09/10/2013 - 11:40
'है औरभी दुनियामे सुखनवर बहुत अच्छे केहते है की गालिब का अंदाजे बयान और' आणखी गालिबचे शेर येऊ द्या त्यांच्यावर शेरे मारणारे मिपा सदस्य खूप भेटतील.

वेल्लाभट 09/10/2013 - 14:46
गुड. मिर्झा असदुल्लाह खान गालिब हे एक विद्यापीठ आहे. कब वो सुनता है कहानी मेरी और फिर वो भी जबानी मेरी

अर्धवटराव 09/10/2013 - 20:44
दसरा-दिवाळीची मेजवानी मिपावर सुरु झाली म्हणायची. हा शेर स्वतः पूर्ण असला (म्हणजे सौंदर्याचा टीप ऑफ आईसबर्ग सुचवण्यापुरता) तरी ते अव्यक्त सौंदर्य गालीब साहेबांनी आपल्या शायरीत कसं मुरवलं हे वाचण्याची तल्लफ आहेच. पुभाप्र.

प्यारे१ 10/10/2013 - 00:32
संपलं???? सुरु व्हायच्या आधीच? दोन घास तोंडात टाकून काय मस्त टेस्ट आहे म्हणेपर्यंत संपलं? नाय चालणार मियाँ नाय चालणार!
शेर सब कहॉ, कुछ लाला-ओ-गुल मे नुमायॉ हो गई खाक मे क्या सुरते होंगी कि पिनहॉ हो गई. आस्वाद या सुंदर शेर मध्ये शायर असे सुचवित आहे की जगातले सर्वकाही असे जे सौंदर्य आहे ते अजुन ही पुर्णपणे कुठे लाला-ओ-गुल(अफिम चे लाल सुंदर फुल) मध्ये पुर्णपणे व्यक्त झालेले आहे.

'लोकायत' विचारचर्चा

प्रास ·

आतिवास 19/09/2013 - 09:36
स्तुत्य प्रयत्न. अधिक वाचण्यास उत्सुक आहे. अवांतरः तेवढं ते 'पुरुष १' बदलून त्या बुवांना एखादे नाव दिलेत तर संवाद शैलीशी ते सुसंगत ठरेल.

In reply to by आतिवास

प्रास 19/09/2013 - 23:11
माधवासमोरच्या व्यक्तीला नाव देण्याचा विचार केला होता पण दिलं नाही कारण पुढे पुढे एक जाऊन दुसरी व्यक्ती येते आणि आपापल्या मान्यतेच्या दर्शनाच्या मण्डनाचे विचार मांडते. तेव्हा नावापेक्षा क्रमांक उपयुक्त ठरतील असं वाटलं.

उद्दाम 19/09/2013 - 09:38
आण्णा, लिवलंत छान . पण काही उपेग नाही. चार्वाक ते दाभोळकर , काळ बदलला. लोक तेच आहेत.

चौकटराजा 19/09/2013 - 09:57
धर्म, देव , संस्कृति, परंपरा, रुढी, योगविज्ञान ई ची सरमिसळ करणारी एक भयानक संस्कृति तयार होत चालली आहे. एका बाजूला उच्चशिक्षित 'निसर्ग नावाची एक व्यवस्था आहे. उत्पती स्थिति व लय या बेसवर ती चालते. ' या निष्कर्षाप्रत आले आहेत . तर तितकेच उच्च शिक्षित देवाने, धर्मानेच, रूढींनीच, हे जग नीट चालविले आहे व हेतूपूर्वक चालविले आहे .बुद्धीवाद्याना काही अक्क्क्ल नाही असे ठामपणे म्हणणारे आहेत. जास्तीत जास्त मनांमधे वेगळा विचार करण्याचा आळस असतो. सबब बरेच लोक स्थितिवादी असतात फिलॉसिफिकली .

अर्धवटराव 19/09/2013 - 23:31
लईच भारी :) अवांतरः लोकायत फिलॉसॉफीचा बेस इतका कच्चा असेल असं वाटलं नव्हतं. असो... वेगवेगळ्या तत्वज्ञानांच्या तौलनीक अभ्यासाचे सार एकच... कि माणासाने दिवेआगारचा समुद्रकिनारा, पर्वती टेकडी, किंवा माऊंट एव्हरेस्ट, कुठुनही उडी मारली तरी त्याचे हात चंद्राला टेकणार नाहित. उड्या मारण्याची मजा मात्र नक्की अनुभवावी :)

एस 20/09/2013 - 00:02
अतिशय थोडक्यात चार्वाक किंवा लोकायतमताची व त्यातील काही मूलभूत सिद्धांतांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. यासंदर्भात 'आस्तिकशिरोमणी चार्वाक' हे प्रा. आ. ह. साळुंखे यांचे पुस्तक सुंदर व वाचनीय आहे. त्यात त्यांनी चार्वाकांना आस्तिक का म्हटले पाहिजे याची छान मीमांसा केली आहे. 'चार्वाक: ऐतिहासिक आणि तात्त्विक मीमांसा: डी. वाय. हाडेकर' हे या विषयावर मी वाचलेलं सर्वात उत्तम पुस्तक होय. मिपावरीलच शरद यांचा दर्शने ५ चार्वाक ऊर्फ लोकायत दर्शन हा लेखही सुंदर आहे

चार्वाकाचे विचार लय भारी आहेत . (अवांतर : कॉलेजात असताना विविध गृप डिस्कशन मधे पोरींना ते विचार पटवुन द्यायचा लाख प्रयत्न केला ...पण हाय रे देवा :( असो. म्हणुन मग सध्या आम्ही ओशो कडे वळालो आहोत ;) )

@वाचकांना पसंतीस पडल्यास पुढील चर्चा अशाच स्वरूपात सादर करण्याचा विचार आहे हीच 'क्रमशः' मागची भूमिका.)>>>>>> पसंत आहेच. अता त्या क्रमा'ला लवकर शह द्या! :)

धर्माचा काय संबंध? जगामध्ये अर्थ आणि काम हे दोनच पुरूषार्थ आहेत. आमचाच काय पण लोकांचाही हाच अनुभव आहे आणि म्हणूनच चार्वाकाच्या मताला लोकायत असंही म्हणतात.
पुरुषार्थ कळाले पण स्त्रियार्थाबाबत काहि विवेचन आहे काय ? का एखादा विषिश्ट परिघ निर्माण करुन केवळ त्यात नांदायच म्हणजे स्त्रियार्थ असतो.... वगैरे वगैरे वगैरे ?
जोवर जीव आहे, तोवर सुखाने राहावे, मरण कुणाचं टळलंय? एकदा का शरीरीचं चितेवर भस्म बनलं तर या जगात पुन्हा कुठे येणं होणार आहे?
आधुनिक काळातिल मानवी मेंदु व मनासंबधि काहि प्रयोग ह्या मताला दुजोरा देत नाहित.
या द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो. तो झिंगतो. अगदी तसंच आहे बघा आपलं! पृथ्वी, जल, तेज आणि वायु या चार महाभूत तत्त्वांच्या संयोगातून देह निर्माण होताना त्यात चैतन्याचा आविष्कार होतो.
नशा शराबमे होता तो नाचती बोतल. द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो, त्या वारुणिला नाही म्हणजेच माणुस अन वारुणी या दोन वेगवेगळ्या गोश्टी आहेत ज्या संयोगे मद तयार होतो... जसे की चैतन्य अन देह संयोगे मानव... नाहि का ?
बुवाजी, याचा अर्थ, देहाशिवाय आत्म्याच्या अस्तित्वाला काहीच प्रमाण नाही तर चैतन्ययुक्त देह हाच आत्मा, असा घ्यायचा का?
देह्धारण केला आहे म्हणून आत्म्याचे (अत्रुप्त न्हवे) अस्तित्व सदा जाणवत असते हाच मुळात गैरसमज आहे.. उदा. झोपेत हे अस्तित्व जाणवत नाही म्हणजे देह नश्ट झालेला असतो नाहि उलट यावरुन असे म्हणता येइल कि देहामधे आत्म्याचि विस्मृति निर्माण करायची क्षमता नक्किच आहे. थोडक्यात देहाचे अस्तित्व आत्म्याच्या अस्तित्वाचे प्रमाण ठरु शकत नाही. उरलेल्या गोश्टिवर विचार ३१ सप्टेंबरचि कामे संपल्याव्र करुया.

In reply to by अग्निकोल्हा

एस 21/09/2013 - 00:40
एखाद्याला एकतर उथळ किंवा आपलाच ठरवून येनकेनप्रकारेण संपवायचा हे इहवाद्यांचे जुनेच धोरण आहे.
पुरुषार्थ कळाले पण स्त्रियार्थाबाबत काहि विवेचन आहे काय ? का एखादा विषिश्ट परिघ निर्माण करुन केवळ त्यात नांदायच म्हणजे स्त्रियार्थ असतो.... वगैरे वगैरे वगैरे ?
पुरुषार्थ या शब्दामधील पुरुष म्हणजे मनुष्यप्रजातीतील नर हा एवढाच संकुचित अर्थ लावून वरील वाक्याला छेद देण्याचा प्रयत्न चांगलाय पण हास्यास्पद आहे. आधुनिक काळाच्या संदर्भाने यातील पुरुष म्हणजे मानव. त्याअर्थाने पुरुषार्थाला अधिक सुसंगत असा मानवार्थ हा शब्दप्रयोग इथे करता येईल.
आधुनिक काळातिल मानवी मेंदु व मनासंबधि काहि प्रयोग ह्या मताला दुजोरा देत नाहित.
शास्त्रीय पुरावे/संदर्भ वगैरे?? की उगाचच मतांची पिंक टाकली की झाले?
द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो, त्या वारुणिला नाही म्हणजेच माणुस अन वारुणी या दोन वेगवेगळ्या गोश्टी आहेत ज्या संयोगे मद तयार होतो
येथे आपणच आपले मत खोडून काढले आहे. जोपर्यंत वारुणी आणि माणूस ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत तेथे मद उत्पन्न होत नाही. वारुणी जेव्हा मनुष्याच्या शरीरात जाते तेव्हा त्यांच्या संयोगे मद तयार होतो. वारूणीला मद चढत नाही तसेच माणसालाही मद चढत नाही. मद ही वारूणीमय देहाची एक अवस्था आहे. थोडक्यात मदाचे वारूणी व मनुष्य यांच्याबाहेर अस्तित्व नाही. मदावस्था माणसाच्या देहातील वारुणीच्या प्रमाणावर टिकते. म्हणजेच जडाची एका विशिष्ट वेळी एक विशिष्ट प्रमाणातील स्थिती हे त्या जडसंयोगाला चैतन्य प्रदान करते. चैतन्य हे जडाचे फल (Function) आहे. जड चैतन्याचे फल नव्हे. किंबहुना जडाबाहेर चैतन्याला अस्तित्त्व असू शकत नाही असे चार्वाकमत सांगते. कृपया हा फरक लक्षात घ्या. 'चैतन्य अन देह संयोगे मानव' असू शकत नाही. देहाची विशिष्ट अवस्था म्हणजे जिवंत देह. चार्वाकांनी पृथ्वी-आप-तेज-वायू हीच महाभूते मानली व केवळ त्यांच्या विशिष्ट संयोगे चैतन्यावस्थेतील जड निर्माण होऊ शकते असे म्हटले. आजचे विज्ञान चार्वाकमताचे आधुनिक स्वरूप आहे असे म्हणावे लागेल. अणुरेणूंची योग्य प्रमाणात व योग्य स्थितीत सांगड घातली असता चैतन्य असलेला जीव निर्माण करता येऊ शकेल. अर्थात ती एवढी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे की प्रायोगिक विज्ञान तेथपर्यंत अजून पोहोचू शकलेले नाही. परंतु शुद्धसैद्धान्तिकरित्या हे शक्य आहे.
चैतन्ययुक्त देह हाच आत्मा
आत्म्याचे अस्तित्त्व सिद्ध करायची किंवा आत्मा कुठल्याही स्वरूपात मानायची गरजच संपते.
चर्वाक खरच मुद्देसुद असते तर...प्रेताने मुलं जन्माला घातली असती
नेहमीप्रमाणेच पातळी सोडून टीकेखातर टीका. असोत. जर प्रेत ह्या देहाच्या स्थितीतून देहाला पुन्हा जिवंतावस्थेत नेता येण्यासारखे बदल देहाच्या भौतिक संरचनेत करता आले तर असा जिवंत झालेला देह नक्कीच जिवंतपणाची सर्व कार्ये त्याच्या कुवतीनुसार करू शकेल. बाकी चार्वाकबौद्धादी मतांचे खंडन करण्यासाठी तर्काचा आधार घेणारे आदिशंकराचार्य वेदांची मीमांसा मात्र तर्काने करायची नाही अशी दुटप्पी भूमिका का घेतात हे काही कळत नाही. शेवटी उद्वेगाने म्हणावेसे वाटते... त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचरा: ! जर्फरी तुर्फरीत्यादी पंडितानां वच: स्मृतम !! माधवाचार्य. (शरद यांच्या लेखाच्या सौजन्याने साभार)

In reply to by एस

अर्धवटराव 21/09/2013 - 01:36
या सगळ्या चर्चेचा परिपाक असा, कि जीवन/चेतना हि देहाची एक अवस्था आहे. इन अदर वर्ड्स, चैतन्य हि व्हर्च्युअल टर्म आहे. नेमकं हेच आहे का चार्वाक/लोकायत मत?

In reply to by एस

रयत्न चांगलाय पण हास्यास्पद आहे...
विनोद हा विनोदच असतो हे आपणास कळाले यातच त्या वाक्याचे सार्थक झाले .
शास्त्रीय पुरावे/संदर्भ वगैरे?? की उगाचच मतांची पिंक टाकली की झाले?
अरे हो चमचा तोंडात द्यायला विसरलो कि.
नेहमीप्रमाणेच पातळी सोडून टीकेखातर टीका.
सॉरी तुम्हाला प्रेतांबद्दल इतका आदर आहे हे माहित न्हवते म्हणून भावना दुखावली गेल्यास क्षमस्व. आणि हो मी नेहमी नेहमी प्रेतांवर टिका करत नाही बरक टिका मुर्दाडपणावर असते.
असोत. जर प्रेत ह्या देहाच्या स्थितीतून देहाला पुन्हा जिवंतावस्थेत नेता येण्यासारखे बदल देहाच्या भौतिक संरचनेत करता आले तर असा जिवंत झालेला देह नक्कीच जिवंतपणाची सर्व कार्ये त्याच्या कुवतीनुसार करू शकेल.
शास्त्रीय पुरावे/संदर्भ वगैरे?? की उगाचच मतांची पिंक टाकली की झाले? तरीही शब्दात तुमची भावना समजुन घ्यायची म्हटले तर आपल्याला असं म्हणायच आहे काय की यु वॉंट टु रिप्लेस अ कॉम्प्लिटली डेड ऑर्गन (ऑर कंप्लिट डेड स्टेट ऑफ ऑर्गन)ओफ अब्सोलुटली डेड हुमन बॉडी विद अ लाइव वन सो दॅट ह्युमन बॉडी कॅन फंक्शन बॅक अगेन ??? गुड लक!

In reply to by अग्निकोल्हा

एस 23/09/2013 - 00:54
आपल्या आणि अर्धवटरावांच्या प्रतिसादातील दोन मुद्दे इथे स्पष्ट करण्यासारखे आहेत म्हणून हा संयुक्त प्रतिसाद. चैतन्य हे जडापेक्षा वेगळे असते आणि ते बाहेरून जडात घालता येते किंवा जडातून काढता येते. असे करण्याची क्षमता कुठल्यातरी विशेष शक्तीत आहे व अशा शक्तीचे अस्तित्त्व आहे किंवा त्याला देव वगैरे म्हणले जावे हे चार्वाकविरोधकांचे मुख्य मत आहे. आणि चैतन्य ही जडाच्याच अवस्थेचे फल असल्याने अशा कुठल्याही बाह्यशक्तीचे अस्तित्व नाकारणे हा चार्वाकमताचा मुख्य मुद्दा. हाच दोन्हींमधला फरक आहे. देह आणि आत्मा हेही ह्याच आधारे स्पष्ट करता येईल. आत्मा हे चैतन्याचे जडापेक्षा वेगळे अस्तित्त्व असे मान्य करून त्याला दिलेले रूप आहे. जर चार्वाकांच्या मते असे वेगळे अस्तित्त्वच नाही त्यामुळे आत्मा, देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे कारणच संपते हे चार्वाकमत आहे. थोडक्यात देहातील (जडावस्थेतील) वार्धक्यामुळे होणारे बदल थोपवणे आणि जमल्यास ते विरूद्ध फिरवून चैतन्य किंवा जीवन पुन्हा बहाल करणे वा चिरतारुण्य मिळवणे हे आजच्या आधुनिक जैवविज्ञानाचे धेय्य व त्याचे मूळ हे चार्वाकमताच्या जड विरुद्ध चैतन्य ह्या वादावरील सिद्धांतात सापडते. जीवनपूर्व आणि जीवनप्रश्चात कालाचे अस्तित्त्व नाकारून माणसांना त्यांचे असलेले आयुष्य सुंदर रितीने योग्य प्रकारे उपभोग घेत व्यतित करायला लावणे हे चार्वाकांचे सर्वात मोठे उद्दिष्ट होय. बाकी चालू द्या.

In reply to by एस

अर्धवटराव 23/09/2013 - 08:52
चार्वाक मताचा तुमचा आणखी अभ्यास असल्यास काही मुद्द्यांवर प्रकाश पाडा प्लीज. >>चैतन्य हे जडापेक्षा वेगळे असते आणि ते बाहेरून जडात घालता येते किंवा जडातून काढता येते. असे करण्याची क्षमता कुठल्यातरी विशेष शक्तीत आहे व अशा शक्तीचे अस्तित्त्व आहे किंवा त्याला देव वगैरे म्हणले जावे हे चार्वाकविरोधकांचे मुख्य मत आहे. -- हे मत चार्वाक युगानंतरचे कि त्या पूर्वीचे? म्हणजे हे मत चार्वाकाला प्रतिवाद करायला म्हंणुन जन्माला आले काय? नसल्यास ते "चार्वाकविरोधकांचे" नाहि. >>जीवनपूर्व आणि जीवनप्रश्चात कालाचे अस्तित्त्व नाकारून माणसांना त्यांचे असलेले आयुष्य सुंदर रितीने योग्य प्रकारे उपभोग घेत व्यतित करायला लावणे हे चार्वाकांचे सर्वात मोठे उद्दिष्ट होय. -- माणसाचे आयुष्य सुंदर बनवायला हे असे काळाचे अस्तित्व नाकारणे चार्वाकाने अनिवार्य मानले आहे काय?

In reply to by अर्धवटराव

एस 23/09/2013 - 15:28
छान प्रश्न विचारले आहेत आपण मी काही तत्त्वज्ञानाचा अभ्यासक नाही. परंतु जेवढी मला माहिती आहे त्यावरून तुमच्या शंकांचे निरसन करण्याचा अल्प प्रयत्न करतो.
हे मत चार्वाक युगानंतरचे कि त्या पूर्वीचे? म्हणजे हे मत चार्वाकाला प्रतिवाद करायला म्हंणुन जन्माला आले काय? नसल्यास ते "चार्वाकविरोधकांचे" नाहि
या प्रश्नात दोन उपप्रश्न सामावले आहेत. एक म्हणजे चार्वाकयुगाचा काळ कोणता. व दुसरा म्हणजे चार्वाकविरोधक ही संज्ञा नेमकी कोणाला वापरावी. चार्वाकमताचा काळ किंवा त्याचा उद्भव ठामपणे सांगता येणे कठीण आहे कारण चार्वाकांचे साहित्य अतिशय तुटपुंज्या स्वरूपात शिल्लक राहिले आहे. 'चार्वाक: ऐतिहासिक आणि तात्त्विक मीमांसा: डी. वाय. हाडेकर' ह्या ग्रंथात लोकायतसाहित्याच्या र्‍हासाची काही कारणे त्यांनी स्पष्ट केली आहेत. http://www.misalpav.com/node/15418#new येथे उद्दाम यांनी 'भारतात त्या वेळी विरोधी पंथांचे ग्रंथ जाळण्याची पद्धत नव्हती. ती मुसलमान आक्रमकांनी आणली' असे मत मांडले आहे. ते तितकेसे बरोबर नाही. आपल्यापेक्षा वेगळ्या किंवा विरोधी मतांचे खंडण करणे केवळ यापुरतेच तेव्हाचे वादविवाद किंवा संघर्ष मर्यादित नसून त्यासाठी विरोधकांना संपवण्याचे किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचेही तंत्र यशस्वीपणे अवलंबले गेले. महाभारतातील युद्धानंतर चार्वाक नावाच्या असुराने युधिष्ठिराला आपल्याच रक्ताच्या नात्यांच्या माणसांना मारल्याबद्दल भरसभेत दोष दिला तेव्हा तिथे उपस्थित ऋषीगणांनी क्रोधाने त्याला जाळून टाकले असा उल्लेख आहे. या उदाहरणावरून विरोधकांबद्दल इतकी टोकाची असहिष्णुता तेव्हाही तितकीच प्रचलित होती हे समजण्यासारखे आहे. कौटिल्याने आन्विक्षिकी या लोकायतमताचा समावेश असलेल्या विद्येचा गौरवाने उल्लेख केला यामुळेही कदाचित त्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ गेल्या शतकात म्हैसूरला सापडेपर्यंत उपलब्ध नव्हता ही बाब इथे उल्लेखनीय आहे. चार्वाकमताचा उदय हा सर्व षड्दर्शनांपैकी सर्वात प्राचीन असावा असे मानण्यास वाव आहे. कारण मनुष्याने उत्क्रांतीच्या ओघात नैसर्गिक शक्तींची उपासना करण्यास सुरुवात करून आजचे सोफिस्टिकेटेड देव-अध्यात्मरूपी कल्पनांचे युग आणले हा प्रवास जेवढा जुना तेवढेच चार्वाकांचा भौतिकवादही प्राचीन असण्याची शक्यता मला सर्वात नैसर्गिक वाटते. ऋग्वेदातील उषा, वरूण, इत्यादी देवता मागे पडून आज विष्णू व अनार्यांच्या रुद्राचे आर्यकरण म्हणजे शंकर इ. देवता लोकप्रिय झालेल्या दिसतात ही देव किंवा अभौतिक संकल्पनांची उत्क्रांती म्हणता येईल. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक या मतांनी नंतर उत्तरमीमांसकांशी काहीसे जुळवून घेतल्याने त्यांचे खंडन करण्याची तीव्रता कमी ओघाने कमी होत गेली. बौद्ध व जैन तत्वज्ञानांनीही चार्वाकांइतका ठाम नास्तिकपणा जपला नाही. एकटे चार्वाक आपल्या मूळ भौतिकवादाशी प्रामाणिक राहिले व त्याची जबर किंमत त्यांना मोजावी लागली. याबाबत माझी मते चुकीची किंवा अल्प माहितीवर आधारित असल्याची शक्यता आहे, तरी आपणाला अजून माहिती किंवा संदर्भ हवे असल्यास मिपावरील जाणकारांना विचारता येईल.
माणसाचे आयुष्य सुंदर बनवायला हे असे काळाचे अस्तित्व नाकारणे चार्वाकाने अनिवार्य मानले आहे काय?
या प्रश्नाचा रोख मला समजला नाही. तरी शब्दशः अर्थ घेतला तर होय. थोडी भर - चार्वाकांना निव्वळ भोगवादी ठरवून मोकळे होण्याची किंवा त्यांना नीतिमत्ताशून्य ठरवण्याची चार्वाकविरोधकांची घाई होते असा अनुभव आहे. चार्वाकमत, जे समाजातील प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार आचरीत असतो, ते असे नैतिकमूल्यांचे विरोधक नसून एका अर्थाने नैतिकतेचे सर्वात मोठे पाईक आहेत. नैतिकता व धार्मिकता यांचा आपापसात कसलाही संबंध नाही हे मी ठामपणे म्हणू शकतो.

In reply to by एस

अर्धवटराव 30/09/2013 - 23:17
माझी प्रश्न मांडण्यात चुक झाली. चार्वाकयुग म्हणजे चार्वाक नामक तत्ववेत्त्याचा काळ असं मला विचारायचं नव्हतं. थोडं इलॅबोरेट करतो. सत्याची आस अणि सुखाची कामना या स्वयंभू प्रेरणा मानवी मनात नांदतात. या प्रेरणा कधी म्युचुअली एक्स्क्लुझीव्ह, कधी समांतर, तर कधी अगदी परस्पर विरोधी देखील असु शकतात. या दोन्ही प्रेरणांची एकसंगत लावण्याचे कार्य प्रत्येक दार्शनीक करतो. कुठलं दर्शन किती प्रभाव पाडतं हे तत्कालीन समाज परिस्थीती ठरवते. चार्वाकाचा मूळ सिद्धांत काय, तर यावत् जीवेत सुखं जीवेत. त्याचं कारण तो देतो कि भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम् कुतः . चैतन्य हे जडापासुन तयार होत नाहि असं मानणारं तत्वज्ञान तसंही भस्मीभूत देहाचं पुनरागमन होतं असं म्हणत नाहि, किंबहुना जुनं वस्त्र टाकुनच नवीन वस्त्र परिधान करावं लागतं असं त्यांचं म्हणणं. त्यामुळे ते चार्वाकाला विरोधी ठरत नाहिच, तर चार्वाक संपतो तिथुन ते सुरु होतं. हे तत्वज्ञान एस्टॅब्लीश झालं, सशक्त झालं, आणि इतकं उग्र झालं कि त्याने चार्वाकाला फाईट दिली असं होणं अशक्य आहे. या सर्व घाडामोडी होण्याचा काळ एखाद्या तत्ववेत्याच्या आयुष्यापेक्षा खुपच जास्त मोठा असणार. चार्वाक विचारधारेशी, चार्वाक पंथाशी संघर्ष झाला असेल, पण तसं अजुन तरी वाचनात आले नाहि. थोडक्यात काय, तर सत्याप्रती मानवी मनाची भूक चार्वाक तत्वज्ञान भागवु शकलं नाहि, आणि सुखप्राप्तीची साधनं गोळा करण्यास मानवाला कुठल्या दार्शनीकाची आवश्यकता तशिही राहात नाहि, म्हणुन चार्वाक संपला. यज्ञसंस्कृतीने सुरुवातीला मानवी सुखाची भरपूर सोय करुन ठेवली. पण पुढे त्यातलं कर्मकांड मानवी सुखाच्या आड येत गेलं, म्हणुन चार्वाक तत्वज्ञान उदयास आलं, अशी एक उपपत्ती लावता येते. पण ज्याप्रमाणे फक्त कम्युनीझम सोडा म्हणुन सांगुन भागत नाहि तर त्यानंतर लोकशाहीचा प्रोग्राम देखील द्यावा लागतो, त्याचप्रमाणे सुखप्राप्तीकरता कर्मकांड सोडा म्हणुन सांगुन भागत नाहि तर त्याला रिप्लेसमेण्ट म्हणुन इतर संस्था-यंत्रणा उभ्या कराव्या लागतात जे चार्वाकाला जमलं नाहि म्हणुन तो मागे पडला. आजच्या युगात चार्वाक तत्वज्ञान पुन्हा उसळी मारणं सहाजीक आहे, कारण सुखोपभोगाचे स्वातंत्र कधि नव्हे तेव्हढं माणासाला आज उपलब्ध आहे, व सत्य शोधनाची इन्स्टीक्ट शमवण्यासाठी विज्ञानाचे राजमार्ग उपलब्ध आहेत. पण हि परिमाणं काहि शतके आगोदरच्या समाज परिस्थितीला लावता येत नाहित. असो. माझं वाचन याबाबतीत फार म्हणजे फारच तुटपुंजं आहे. म्हणुन एकुणच चार्वाकीझम बद्दल शक्य असेल तिथे प्रश्न विचारतो. त्याचकारणाने तुम्हाला तसदी दिली. मिपावर आणि इतरत्र जी उपलब्ध साधनं आहेत त्याचा शक्य होईल तेंव्हा अभ्यास करेनच... बघु. अवांतरः युधीष्ठीराच्या सभेची कथा विरोधी विचारांप्रती असहिष्णुतेचे उदाहरण म्हणुन अजीबात पटलं नाहि. असो.

In reply to by अर्धवटराव

एस 01/10/2013 - 01:11
एकूणच चार्वाकमत काय किंवा इतर दर्शने काय, समाजातील त्यांची वैयक्तिक आणि सामाजिक पातळ्यांवरील स्वीकृती ही नेहमीच बदलती आणि जाणीव-नेणिवेच्या धूसरतेआड जात राहिली आहे. तसे का याचे विवेचन आपण केलेच आहे. व्यावहार्यिकतेच्या पातळीवर आणि मानसिक स्थिरतेच्या कसोटीवर लोकायत संपूर्णपणे आणि कठोरपणे स्वीकारणे तितके सोपे नाही. सामान्यांना तर मुळीच नाही. प्रत्येक दर्शनाची किंवा शास्त्राचीही सुरुवात ही सत्याचा नव्याने प्रसंगी नवा किंवा जुना असा शोध घेण्यातून झाली. पण इतर दर्शनांमध्ये मूळ तत्त्वज्ञानाच्या विपरित कित्येक बाबींची कालांतराने सरमिसळ झाल्याचे दिसून येते. उदा. सुरुवातीला केवळ प्रकृतीप्रधान असणारा सांख्यवाद नंतर पुरुष आणि हळूहळू परमपुरुष आणि त्याच्या मुक्तीभोवती गुरफटला गेला. हे केवळ उदाहरण झाले. अशाच पद्धतीने दर्शनांतून उपदर्शने, पंथ आणि वाद उदयास येत गेले - येत आहेत. आणि या सगळ्यांची एक विलक्षण गुंफण आपल्या भारतीय समाजमनात झालेले दिसून येते. हा गुंता सोडवायला म्हटलं तर अवघड आणि म्हटलं तर सोपाही आहे. असो. चार्वाकांचे मला सर्वात जास्त आवडणारे गुण म्हणजे केवळ प्रत्यक्ष प्रमाणाला मान्यता आणि त्याआधारे सिद्ध होणार्‍या गोष्टी स्वीकारायचा उदारपणा. हा उदारपणा इतर दर्शनांच्या कर्मठ ताठरतेपेक्षा उठून दिसतो. आज लोकायत विज्ञानाच्या परिभाषेत मांडणे त्यामुळेच शक्य आहे आणि आवश्यकही. एवढे सांगून या धाग्यावरून आपला निरोप घेतो. धन्यवाद.

In reply to by एस

आत्मा हे चैतन्याचे जडापेक्षा वेगळे अस्तित्त्व असे मान्य करून त्याला दिलेले रूप आहे. जर चार्वाकांच्या मते असे वेगळे अस्तित्त्वच नाही
आत्मा.... जडापेक्षा वेगळे अस्तित्त्व ? माझ्या माहिती (व काही अनुभवानुसार) आत्मस्वरुप यापध्दतिने जडापासुन सुक्ष्माकडे अधोरेखित होत जाते. प्रुथ्वि->>जल->>अग्नि->>वायु->>आकाश->> आणि आत्मतत्व/ स्वरुप (आत्मा).
त्यामुळे आत्मा, देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे कारणच संपते हे चार्वाकमत आहे.
आता आत्मस्वरुपाची कल्पना येत असली तरी देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे/असण्याचे वा नसण्याचे कारण काय आहे हे अजुनही मी अस्तित्वात का आहे (कसा आहे न्हवे तर का आहे) या प्रश्ना इतकेच अनुत्तरित वाटते. असे माझे मत आहे. थोडक्यात केवळ जडता नाही म्हणून आत्मा नाकारणे हे जडता नाही म्हणून अवकाश (स्पेस) तत्वही नाकारण्या इतक सकृतदर्शनी अनावश्यक वाटते. अवकाशतत्वाची अजुन एक गंमत अशी आहे कि यामधे चैतन्य दिसत नाही पण ते आहे गृहित धरले तर आइन्स्टाइनचा टाइम-स्पेस बेंडीगचा सिध्दांत कमालिचा योग्य ठरु लागतो. ( टाइम-स्पेस बेंडीग बद्दल लिहणे मोठि अन रोचक कल्पना आहे परंतु त्याचे विस्तारभय प्रचंड असल्याने गुगल हाच एकमेव पर्याय आहे याबद्दल अधिक माहिती घ्यायला)

In reply to by अग्निकोल्हा

एस 24/09/2013 - 08:46
आपल्या प्रतिसादातील तर्काशी असहमत.
आत्मस्वरुप यापध्दतिने जडापासुन सुक्ष्माकडे अधोरेखित होत जाते. प्रुथ्वि->>जल->>अग्नि->>वायु->>आकाश->> आणि आत्मतत्व/ स्वरुप (आत्मा).
यामागील तर्क मला विज्ञानाच्या कुठल्याच कसोटीवर खरा उतरताना दिसत नाही. त्यातही पंचमहाभूतांची आपण वरप्रमाणे घातलेली सांगडही मला अतर्क्य वाटते.
देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे/असण्याचे वा नसण्याचे कारण काय आहे हे अजुनही मी अस्तित्वात का आहे (कसा आहे न्हवे तर का आहे) या प्रश्ना इतकेच अनुत्तरित वाटते. असे माझे मत आहे.
सांख्यिकी किंवा विज्ञानाच्या कुठलाही सिद्धांत स्वीकारण्याच्या काही कसोट्या असतात. त्यात एखाद्या सिद्धांताची सिद्धी किंवा प्रूफ ही नकारात्मकतेकडून म्हणजेच तो सिद्धांत फेटाळून सुरू केली जाते. उदा. एखादे नवीन औषध हे त्या आजारावर उपयोगी आहे असे जर प्रतिपादन करायचे असेल तर विविध चाचण्यांमधून त्या औषधाच्या सकारात्मक परिणामकारतेच्या पुराव्यांपेक्षा जास्त काटेकोरपणे त्याचे नकारात्मक किंवा न्यूट्रल इफेक्ट - उदासीन परिणाम तपासले जातात. असे का, तर एखाद्या गोष्टीचे अस्तित्त्व आहे हे मानून चालले आणि ती गोष्ट नसली तर होणारे नुकसान हे एखादी गोष्ट नाही असे मानून चालले आणि ती गोष्ट खरोखर असली तर होणार्‍या नुकसानीपेक्षा कितीतरी पटींने हानिकारक आणि इर्रिवर्सिबल - अपरिवर्तनीय असते. त्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोन हा नेहमी नवीन वा जुने सिद्धांत त्यांच्या वैश्विकतेला सतत आव्हान देऊन त्यांची वैधता तपासण्याला महत्त्व देतो. वरील बाब लक्षात घेता अशा संकल्पनांचे अस्तित्त्व सिद्ध झाले नसताना त्या आहेत हे मानणे हे त्या असल्याच तर न मानण्यामुळे होणार्‍या नुकसानीपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकेल. त्यामुळे जोपर्यंत अशा संकल्पनांचे अस्तित्त्व वर उल्लेखलेल्या आणि इतरही शास्त्रीय कसोट्यांवर जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मान्य न करणे हेच शहाणपणाचे ठरेल हे इथे महत्त्वाचे आहे. थोडक्यात बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल इतक्या कठोरपणे तपासूनच मगच अशा सिद्धांतांचे अस्तित्त्व मानावे हे चार्वाकांनी सांगितले.
थोडक्यात केवळ जडता नाही म्हणून आत्मा नाकारणे हे जडता नाही म्हणून अवकाश (स्पेस) तत्वही नाकारण्या इतक सकृतदर्शनी अनावश्यक वाटते.
इतर दर्शनांनी पाच महाभूतांचे अस्तित्त्व मान्य केले असताना चार्वाकांनी मात्र अवकाश सोडून फक्त इतर चार महाभूते मानली याचे कारण अवकाश मुळातच इतर महाभूतांच्या अस्तित्त्वाचा अभाव किंवा त्यांच्यामधील पोकळी होय. त्याला स्वतःचे गुणधर्म नाहीत. जसे अंधार म्हणजे प्रकाशाचा पूर्ण अभाव, पण अंधार निर्माण करायला केवळ प्रकाशाचा स्रोत अडवणे हाच एक मार्ग असल्याने अंधाराचे अस्तित्त्व हे प्रकाशाशी पूर्णपणे निगडित आहे, प्रकाश हा अंधारावर अवलंबून नाही. त्याचप्रमाणे अवकाश आपले अस्तित्त्व इतर महाभूतांच्या मदतीनेच दाखवून देऊ शकते. समजा केवळ उदाहरणासाठी सैद्धांतिकरित्या असे समजू की जडाची निर्मिती करण्यासाठी तुम्हांला काही भांड्यांत पृथ्वी-आप-तेज-वायू ही महाभूते दिली आहेत. केवळ या चार महाभूतांच्या मदतीने आपण जडाची निर्मिती करू शकतो. त्यासाठी पाचव्या भांड्यातून थोडे अवकाश घेऊन त्यात मिसळण्याची गरज नसते. या कारणांनी चार्वाकांनी अवकाशाला पाचवे महाभूत म्हणून स्थान दिले नाही.
आइन्स्टाइनचा टाइम-स्पेस बेंडीगचा सिध्दांत
टाइम-स्पेस बेंडिंग हे गुरुत्वाकर्षणाच्या अतिप्रचंड बलामुळे घडून येते. त्यासाठी तितक्या प्रचंड वस्तुमानाची खगोलीय वस्तू हवी असते. गुरुत्वाकर्षणाचा इतर मूलभूत बलांशी (विद्युतचुंबकीय बल, रेण्वीय बल आणि केंद्रकीय बल) संबंध सिद्ध करण्यात अद्याप शास्त्रज्ञांना उल्लेखनीय यश आलेले नसले तरी गुरुत्वाकर्षण हे चैतन्य वगैरे मुळीच नव्हे. तसेच निव्वळ अवकाशात स्थळकाळाला वळवण्याची वा नियंत्रित करण्याची क्षमता नसते. ती केवळ त्या अवकाशात असलेल्या वेगवेगळ्या वस्तुमानाच्या घटकांमुळेच होऊ शकते.

In reply to by एस

हु नेवर नो व्हेर दि हेल इस तमिलनाड ? हेन्स दे डाँट क्नो इंडिया डज एगझिस्ट नॉर दि तमिलनाड इन सेम वर्ल्ड दे आर लिवींग. ऑर पिपल लाइक यु एंड मी हु थिक्स आनेवाडी इज एम्याजिनरी विलेज. आय्नीवेय... स्पेस बेंडिंग हे फक्त आणी फक्त गुरुत्वाकर्षणाच्या अतिप्रचंड बलामुळे घडून येत नाहि हो :) म्हणूनच स्पेस बेंडिग समजुन घ्या हा रेफरन्स दिला.
याचे कारण अवकाश मुळातच इतर महाभूतांच्या अस्तित्त्वाचा अभाव किंवा त्यांच्यामधील पोकळी होय. त्याला स्वतःचे गुणधर्म नाहीत.
स्पेस बेंडिग समजुन घ्या. मगच ह्या विषयावर चिंतन करा, गुगल केल्यावर उघडणारी पहिलीच लिंक चाळून स्पेसवर मत प्रदर्षित करण्याइतका छोटा आवाका या विषयाचा खरोखर नाहिये.
यामागील तर्क मला विज्ञानाच्या कुठल्याच कसोटीवर खरा उतरताना दिसत नाही.
अनेको आयुर्वेदिक औषधे विज्ञानाच्या कसोटीवर विषारीच असतात पण आयुर्वेद मात्र शरिराच्या वात कफ पित्त लक्षणाने उपचार करतेच. सो चर्वाक शुड हॅव क्नो की विज्ञान शुडंट बी टोटल बेस टु उण्डरस्टँड आल एंटिटीज. तसही विज्ञान पंचमहाभुते न्हवे तर सॉलिड लिक्विड अन गॅस अशा पदार्थाच्या मात्र तिनच अवस्था असतात इतकच मानते. पण अध्यात्म यामधे अवस्थां/तत्वां सोबत अग्नि आणि पोकळी तत्वांचाही अतंर्भाव करते. खर तर विज्ञानाच्या कसोटिवर चर्वाक घासले तरी उताणे पडतिल असे असताना इतर गोश्टी सध्या घासणे अप्रस्तुत आहे.

In reply to by एस

अनिरुद्ध प 24/09/2013 - 13:35
म्हणजे मानवी शरीरात आकाश /अवकाश हे तत्व नसून फक्त चार तत्वांनी हे शरीर बनले आहे असे आपले मत आहे असे दिसून येते हे जरा स्पष्ट कराल का ? तेव्हडीच आमचे अज्ञान दूर होण्यास मदत होईल असे वाटते.

In reply to by उद्दाम

एस 23/09/2013 - 00:35
शरद यांचा दर्शने ५ चार्वाक ऊर्फ लोकायत दर्शन हा लेख वाचावा अशी विनंती करत आहे. जेणेकरून हा सुंदर लेख आपल्या व इतरांच्या वाचनात येईल.

In reply to by अग्निकोल्हा

उद्दाम 24/09/2013 - 14:19
There are many differences between a living body and a dead body.

आशु जोग 21/09/2013 - 15:00
लेख समजून घ्यायचा प्रयत्न केला पण नाही जमले. मग प्रतिक्रिया वाचल्या. तेव्हा एक गोष्ट ध्यानात आली. या जगात दोन जाती आहे एक चार्वाकाला नावे ठेवणार्‍यांची दुसरी त्याचे समर्थन करणारी. इथे जात आय मीन कॅटेगरी हे लक्षात ठेवावे.

पैसा 22/09/2013 - 18:19
संवादरूपात चार्वाक मताची ओळख करून देणारा प्रयोग आवडला. चर्चा वाचत आहे. आणि पुढील क्रमश: भाग कधी येतोय याची प्रतीक्षा करत आहे.

आतिवास 19/09/2013 - 09:36
स्तुत्य प्रयत्न. अधिक वाचण्यास उत्सुक आहे. अवांतरः तेवढं ते 'पुरुष १' बदलून त्या बुवांना एखादे नाव दिलेत तर संवाद शैलीशी ते सुसंगत ठरेल.

In reply to by आतिवास

प्रास 19/09/2013 - 23:11
माधवासमोरच्या व्यक्तीला नाव देण्याचा विचार केला होता पण दिलं नाही कारण पुढे पुढे एक जाऊन दुसरी व्यक्ती येते आणि आपापल्या मान्यतेच्या दर्शनाच्या मण्डनाचे विचार मांडते. तेव्हा नावापेक्षा क्रमांक उपयुक्त ठरतील असं वाटलं.

उद्दाम 19/09/2013 - 09:38
आण्णा, लिवलंत छान . पण काही उपेग नाही. चार्वाक ते दाभोळकर , काळ बदलला. लोक तेच आहेत.

चौकटराजा 19/09/2013 - 09:57
धर्म, देव , संस्कृति, परंपरा, रुढी, योगविज्ञान ई ची सरमिसळ करणारी एक भयानक संस्कृति तयार होत चालली आहे. एका बाजूला उच्चशिक्षित 'निसर्ग नावाची एक व्यवस्था आहे. उत्पती स्थिति व लय या बेसवर ती चालते. ' या निष्कर्षाप्रत आले आहेत . तर तितकेच उच्च शिक्षित देवाने, धर्मानेच, रूढींनीच, हे जग नीट चालविले आहे व हेतूपूर्वक चालविले आहे .बुद्धीवाद्याना काही अक्क्क्ल नाही असे ठामपणे म्हणणारे आहेत. जास्तीत जास्त मनांमधे वेगळा विचार करण्याचा आळस असतो. सबब बरेच लोक स्थितिवादी असतात फिलॉसिफिकली .

अर्धवटराव 19/09/2013 - 23:31
लईच भारी :) अवांतरः लोकायत फिलॉसॉफीचा बेस इतका कच्चा असेल असं वाटलं नव्हतं. असो... वेगवेगळ्या तत्वज्ञानांच्या तौलनीक अभ्यासाचे सार एकच... कि माणासाने दिवेआगारचा समुद्रकिनारा, पर्वती टेकडी, किंवा माऊंट एव्हरेस्ट, कुठुनही उडी मारली तरी त्याचे हात चंद्राला टेकणार नाहित. उड्या मारण्याची मजा मात्र नक्की अनुभवावी :)

एस 20/09/2013 - 00:02
अतिशय थोडक्यात चार्वाक किंवा लोकायतमताची व त्यातील काही मूलभूत सिद्धांतांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. यासंदर्भात 'आस्तिकशिरोमणी चार्वाक' हे प्रा. आ. ह. साळुंखे यांचे पुस्तक सुंदर व वाचनीय आहे. त्यात त्यांनी चार्वाकांना आस्तिक का म्हटले पाहिजे याची छान मीमांसा केली आहे. 'चार्वाक: ऐतिहासिक आणि तात्त्विक मीमांसा: डी. वाय. हाडेकर' हे या विषयावर मी वाचलेलं सर्वात उत्तम पुस्तक होय. मिपावरीलच शरद यांचा दर्शने ५ चार्वाक ऊर्फ लोकायत दर्शन हा लेखही सुंदर आहे

चार्वाकाचे विचार लय भारी आहेत . (अवांतर : कॉलेजात असताना विविध गृप डिस्कशन मधे पोरींना ते विचार पटवुन द्यायचा लाख प्रयत्न केला ...पण हाय रे देवा :( असो. म्हणुन मग सध्या आम्ही ओशो कडे वळालो आहोत ;) )

@वाचकांना पसंतीस पडल्यास पुढील चर्चा अशाच स्वरूपात सादर करण्याचा विचार आहे हीच 'क्रमशः' मागची भूमिका.)>>>>>> पसंत आहेच. अता त्या क्रमा'ला लवकर शह द्या! :)

धर्माचा काय संबंध? जगामध्ये अर्थ आणि काम हे दोनच पुरूषार्थ आहेत. आमचाच काय पण लोकांचाही हाच अनुभव आहे आणि म्हणूनच चार्वाकाच्या मताला लोकायत असंही म्हणतात.
पुरुषार्थ कळाले पण स्त्रियार्थाबाबत काहि विवेचन आहे काय ? का एखादा विषिश्ट परिघ निर्माण करुन केवळ त्यात नांदायच म्हणजे स्त्रियार्थ असतो.... वगैरे वगैरे वगैरे ?
जोवर जीव आहे, तोवर सुखाने राहावे, मरण कुणाचं टळलंय? एकदा का शरीरीचं चितेवर भस्म बनलं तर या जगात पुन्हा कुठे येणं होणार आहे?
आधुनिक काळातिल मानवी मेंदु व मनासंबधि काहि प्रयोग ह्या मताला दुजोरा देत नाहित.
या द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो. तो झिंगतो. अगदी तसंच आहे बघा आपलं! पृथ्वी, जल, तेज आणि वायु या चार महाभूत तत्त्वांच्या संयोगातून देह निर्माण होताना त्यात चैतन्याचा आविष्कार होतो.
नशा शराबमे होता तो नाचती बोतल. द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो, त्या वारुणिला नाही म्हणजेच माणुस अन वारुणी या दोन वेगवेगळ्या गोश्टी आहेत ज्या संयोगे मद तयार होतो... जसे की चैतन्य अन देह संयोगे मानव... नाहि का ?
बुवाजी, याचा अर्थ, देहाशिवाय आत्म्याच्या अस्तित्वाला काहीच प्रमाण नाही तर चैतन्ययुक्त देह हाच आत्मा, असा घ्यायचा का?
देह्धारण केला आहे म्हणून आत्म्याचे (अत्रुप्त न्हवे) अस्तित्व सदा जाणवत असते हाच मुळात गैरसमज आहे.. उदा. झोपेत हे अस्तित्व जाणवत नाही म्हणजे देह नश्ट झालेला असतो नाहि उलट यावरुन असे म्हणता येइल कि देहामधे आत्म्याचि विस्मृति निर्माण करायची क्षमता नक्किच आहे. थोडक्यात देहाचे अस्तित्व आत्म्याच्या अस्तित्वाचे प्रमाण ठरु शकत नाही. उरलेल्या गोश्टिवर विचार ३१ सप्टेंबरचि कामे संपल्याव्र करुया.

In reply to by अग्निकोल्हा

एस 21/09/2013 - 00:40
एखाद्याला एकतर उथळ किंवा आपलाच ठरवून येनकेनप्रकारेण संपवायचा हे इहवाद्यांचे जुनेच धोरण आहे.
पुरुषार्थ कळाले पण स्त्रियार्थाबाबत काहि विवेचन आहे काय ? का एखादा विषिश्ट परिघ निर्माण करुन केवळ त्यात नांदायच म्हणजे स्त्रियार्थ असतो.... वगैरे वगैरे वगैरे ?
पुरुषार्थ या शब्दामधील पुरुष म्हणजे मनुष्यप्रजातीतील नर हा एवढाच संकुचित अर्थ लावून वरील वाक्याला छेद देण्याचा प्रयत्न चांगलाय पण हास्यास्पद आहे. आधुनिक काळाच्या संदर्भाने यातील पुरुष म्हणजे मानव. त्याअर्थाने पुरुषार्थाला अधिक सुसंगत असा मानवार्थ हा शब्दप्रयोग इथे करता येईल.
आधुनिक काळातिल मानवी मेंदु व मनासंबधि काहि प्रयोग ह्या मताला दुजोरा देत नाहित.
शास्त्रीय पुरावे/संदर्भ वगैरे?? की उगाचच मतांची पिंक टाकली की झाले?
द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो, त्या वारुणिला नाही म्हणजेच माणुस अन वारुणी या दोन वेगवेगळ्या गोश्टी आहेत ज्या संयोगे मद तयार होतो
येथे आपणच आपले मत खोडून काढले आहे. जोपर्यंत वारुणी आणि माणूस ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत तेथे मद उत्पन्न होत नाही. वारुणी जेव्हा मनुष्याच्या शरीरात जाते तेव्हा त्यांच्या संयोगे मद तयार होतो. वारूणीला मद चढत नाही तसेच माणसालाही मद चढत नाही. मद ही वारूणीमय देहाची एक अवस्था आहे. थोडक्यात मदाचे वारूणी व मनुष्य यांच्याबाहेर अस्तित्व नाही. मदावस्था माणसाच्या देहातील वारुणीच्या प्रमाणावर टिकते. म्हणजेच जडाची एका विशिष्ट वेळी एक विशिष्ट प्रमाणातील स्थिती हे त्या जडसंयोगाला चैतन्य प्रदान करते. चैतन्य हे जडाचे फल (Function) आहे. जड चैतन्याचे फल नव्हे. किंबहुना जडाबाहेर चैतन्याला अस्तित्त्व असू शकत नाही असे चार्वाकमत सांगते. कृपया हा फरक लक्षात घ्या. 'चैतन्य अन देह संयोगे मानव' असू शकत नाही. देहाची विशिष्ट अवस्था म्हणजे जिवंत देह. चार्वाकांनी पृथ्वी-आप-तेज-वायू हीच महाभूते मानली व केवळ त्यांच्या विशिष्ट संयोगे चैतन्यावस्थेतील जड निर्माण होऊ शकते असे म्हटले. आजचे विज्ञान चार्वाकमताचे आधुनिक स्वरूप आहे असे म्हणावे लागेल. अणुरेणूंची योग्य प्रमाणात व योग्य स्थितीत सांगड घातली असता चैतन्य असलेला जीव निर्माण करता येऊ शकेल. अर्थात ती एवढी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे की प्रायोगिक विज्ञान तेथपर्यंत अजून पोहोचू शकलेले नाही. परंतु शुद्धसैद्धान्तिकरित्या हे शक्य आहे.
चैतन्ययुक्त देह हाच आत्मा
आत्म्याचे अस्तित्त्व सिद्ध करायची किंवा आत्मा कुठल्याही स्वरूपात मानायची गरजच संपते.
चर्वाक खरच मुद्देसुद असते तर...प्रेताने मुलं जन्माला घातली असती
नेहमीप्रमाणेच पातळी सोडून टीकेखातर टीका. असोत. जर प्रेत ह्या देहाच्या स्थितीतून देहाला पुन्हा जिवंतावस्थेत नेता येण्यासारखे बदल देहाच्या भौतिक संरचनेत करता आले तर असा जिवंत झालेला देह नक्कीच जिवंतपणाची सर्व कार्ये त्याच्या कुवतीनुसार करू शकेल. बाकी चार्वाकबौद्धादी मतांचे खंडन करण्यासाठी तर्काचा आधार घेणारे आदिशंकराचार्य वेदांची मीमांसा मात्र तर्काने करायची नाही अशी दुटप्पी भूमिका का घेतात हे काही कळत नाही. शेवटी उद्वेगाने म्हणावेसे वाटते... त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचरा: ! जर्फरी तुर्फरीत्यादी पंडितानां वच: स्मृतम !! माधवाचार्य. (शरद यांच्या लेखाच्या सौजन्याने साभार)

In reply to by एस

अर्धवटराव 21/09/2013 - 01:36
या सगळ्या चर्चेचा परिपाक असा, कि जीवन/चेतना हि देहाची एक अवस्था आहे. इन अदर वर्ड्स, चैतन्य हि व्हर्च्युअल टर्म आहे. नेमकं हेच आहे का चार्वाक/लोकायत मत?

In reply to by एस

रयत्न चांगलाय पण हास्यास्पद आहे...
विनोद हा विनोदच असतो हे आपणास कळाले यातच त्या वाक्याचे सार्थक झाले .
शास्त्रीय पुरावे/संदर्भ वगैरे?? की उगाचच मतांची पिंक टाकली की झाले?
अरे हो चमचा तोंडात द्यायला विसरलो कि.
नेहमीप्रमाणेच पातळी सोडून टीकेखातर टीका.
सॉरी तुम्हाला प्रेतांबद्दल इतका आदर आहे हे माहित न्हवते म्हणून भावना दुखावली गेल्यास क्षमस्व. आणि हो मी नेहमी नेहमी प्रेतांवर टिका करत नाही बरक टिका मुर्दाडपणावर असते.
असोत. जर प्रेत ह्या देहाच्या स्थितीतून देहाला पुन्हा जिवंतावस्थेत नेता येण्यासारखे बदल देहाच्या भौतिक संरचनेत करता आले तर असा जिवंत झालेला देह नक्कीच जिवंतपणाची सर्व कार्ये त्याच्या कुवतीनुसार करू शकेल.
शास्त्रीय पुरावे/संदर्भ वगैरे?? की उगाचच मतांची पिंक टाकली की झाले? तरीही शब्दात तुमची भावना समजुन घ्यायची म्हटले तर आपल्याला असं म्हणायच आहे काय की यु वॉंट टु रिप्लेस अ कॉम्प्लिटली डेड ऑर्गन (ऑर कंप्लिट डेड स्टेट ऑफ ऑर्गन)ओफ अब्सोलुटली डेड हुमन बॉडी विद अ लाइव वन सो दॅट ह्युमन बॉडी कॅन फंक्शन बॅक अगेन ??? गुड लक!

In reply to by अग्निकोल्हा

एस 23/09/2013 - 00:54
आपल्या आणि अर्धवटरावांच्या प्रतिसादातील दोन मुद्दे इथे स्पष्ट करण्यासारखे आहेत म्हणून हा संयुक्त प्रतिसाद. चैतन्य हे जडापेक्षा वेगळे असते आणि ते बाहेरून जडात घालता येते किंवा जडातून काढता येते. असे करण्याची क्षमता कुठल्यातरी विशेष शक्तीत आहे व अशा शक्तीचे अस्तित्त्व आहे किंवा त्याला देव वगैरे म्हणले जावे हे चार्वाकविरोधकांचे मुख्य मत आहे. आणि चैतन्य ही जडाच्याच अवस्थेचे फल असल्याने अशा कुठल्याही बाह्यशक्तीचे अस्तित्व नाकारणे हा चार्वाकमताचा मुख्य मुद्दा. हाच दोन्हींमधला फरक आहे. देह आणि आत्मा हेही ह्याच आधारे स्पष्ट करता येईल. आत्मा हे चैतन्याचे जडापेक्षा वेगळे अस्तित्त्व असे मान्य करून त्याला दिलेले रूप आहे. जर चार्वाकांच्या मते असे वेगळे अस्तित्त्वच नाही त्यामुळे आत्मा, देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे कारणच संपते हे चार्वाकमत आहे. थोडक्यात देहातील (जडावस्थेतील) वार्धक्यामुळे होणारे बदल थोपवणे आणि जमल्यास ते विरूद्ध फिरवून चैतन्य किंवा जीवन पुन्हा बहाल करणे वा चिरतारुण्य मिळवणे हे आजच्या आधुनिक जैवविज्ञानाचे धेय्य व त्याचे मूळ हे चार्वाकमताच्या जड विरुद्ध चैतन्य ह्या वादावरील सिद्धांतात सापडते. जीवनपूर्व आणि जीवनप्रश्चात कालाचे अस्तित्त्व नाकारून माणसांना त्यांचे असलेले आयुष्य सुंदर रितीने योग्य प्रकारे उपभोग घेत व्यतित करायला लावणे हे चार्वाकांचे सर्वात मोठे उद्दिष्ट होय. बाकी चालू द्या.

In reply to by एस

अर्धवटराव 23/09/2013 - 08:52
चार्वाक मताचा तुमचा आणखी अभ्यास असल्यास काही मुद्द्यांवर प्रकाश पाडा प्लीज. >>चैतन्य हे जडापेक्षा वेगळे असते आणि ते बाहेरून जडात घालता येते किंवा जडातून काढता येते. असे करण्याची क्षमता कुठल्यातरी विशेष शक्तीत आहे व अशा शक्तीचे अस्तित्त्व आहे किंवा त्याला देव वगैरे म्हणले जावे हे चार्वाकविरोधकांचे मुख्य मत आहे. -- हे मत चार्वाक युगानंतरचे कि त्या पूर्वीचे? म्हणजे हे मत चार्वाकाला प्रतिवाद करायला म्हंणुन जन्माला आले काय? नसल्यास ते "चार्वाकविरोधकांचे" नाहि. >>जीवनपूर्व आणि जीवनप्रश्चात कालाचे अस्तित्त्व नाकारून माणसांना त्यांचे असलेले आयुष्य सुंदर रितीने योग्य प्रकारे उपभोग घेत व्यतित करायला लावणे हे चार्वाकांचे सर्वात मोठे उद्दिष्ट होय. -- माणसाचे आयुष्य सुंदर बनवायला हे असे काळाचे अस्तित्व नाकारणे चार्वाकाने अनिवार्य मानले आहे काय?

In reply to by अर्धवटराव

एस 23/09/2013 - 15:28
छान प्रश्न विचारले आहेत आपण मी काही तत्त्वज्ञानाचा अभ्यासक नाही. परंतु जेवढी मला माहिती आहे त्यावरून तुमच्या शंकांचे निरसन करण्याचा अल्प प्रयत्न करतो.
हे मत चार्वाक युगानंतरचे कि त्या पूर्वीचे? म्हणजे हे मत चार्वाकाला प्रतिवाद करायला म्हंणुन जन्माला आले काय? नसल्यास ते "चार्वाकविरोधकांचे" नाहि
या प्रश्नात दोन उपप्रश्न सामावले आहेत. एक म्हणजे चार्वाकयुगाचा काळ कोणता. व दुसरा म्हणजे चार्वाकविरोधक ही संज्ञा नेमकी कोणाला वापरावी. चार्वाकमताचा काळ किंवा त्याचा उद्भव ठामपणे सांगता येणे कठीण आहे कारण चार्वाकांचे साहित्य अतिशय तुटपुंज्या स्वरूपात शिल्लक राहिले आहे. 'चार्वाक: ऐतिहासिक आणि तात्त्विक मीमांसा: डी. वाय. हाडेकर' ह्या ग्रंथात लोकायतसाहित्याच्या र्‍हासाची काही कारणे त्यांनी स्पष्ट केली आहेत. http://www.misalpav.com/node/15418#new येथे उद्दाम यांनी 'भारतात त्या वेळी विरोधी पंथांचे ग्रंथ जाळण्याची पद्धत नव्हती. ती मुसलमान आक्रमकांनी आणली' असे मत मांडले आहे. ते तितकेसे बरोबर नाही. आपल्यापेक्षा वेगळ्या किंवा विरोधी मतांचे खंडण करणे केवळ यापुरतेच तेव्हाचे वादविवाद किंवा संघर्ष मर्यादित नसून त्यासाठी विरोधकांना संपवण्याचे किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचेही तंत्र यशस्वीपणे अवलंबले गेले. महाभारतातील युद्धानंतर चार्वाक नावाच्या असुराने युधिष्ठिराला आपल्याच रक्ताच्या नात्यांच्या माणसांना मारल्याबद्दल भरसभेत दोष दिला तेव्हा तिथे उपस्थित ऋषीगणांनी क्रोधाने त्याला जाळून टाकले असा उल्लेख आहे. या उदाहरणावरून विरोधकांबद्दल इतकी टोकाची असहिष्णुता तेव्हाही तितकीच प्रचलित होती हे समजण्यासारखे आहे. कौटिल्याने आन्विक्षिकी या लोकायतमताचा समावेश असलेल्या विद्येचा गौरवाने उल्लेख केला यामुळेही कदाचित त्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ गेल्या शतकात म्हैसूरला सापडेपर्यंत उपलब्ध नव्हता ही बाब इथे उल्लेखनीय आहे. चार्वाकमताचा उदय हा सर्व षड्दर्शनांपैकी सर्वात प्राचीन असावा असे मानण्यास वाव आहे. कारण मनुष्याने उत्क्रांतीच्या ओघात नैसर्गिक शक्तींची उपासना करण्यास सुरुवात करून आजचे सोफिस्टिकेटेड देव-अध्यात्मरूपी कल्पनांचे युग आणले हा प्रवास जेवढा जुना तेवढेच चार्वाकांचा भौतिकवादही प्राचीन असण्याची शक्यता मला सर्वात नैसर्गिक वाटते. ऋग्वेदातील उषा, वरूण, इत्यादी देवता मागे पडून आज विष्णू व अनार्यांच्या रुद्राचे आर्यकरण म्हणजे शंकर इ. देवता लोकप्रिय झालेल्या दिसतात ही देव किंवा अभौतिक संकल्पनांची उत्क्रांती म्हणता येईल. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक या मतांनी नंतर उत्तरमीमांसकांशी काहीसे जुळवून घेतल्याने त्यांचे खंडन करण्याची तीव्रता कमी ओघाने कमी होत गेली. बौद्ध व जैन तत्वज्ञानांनीही चार्वाकांइतका ठाम नास्तिकपणा जपला नाही. एकटे चार्वाक आपल्या मूळ भौतिकवादाशी प्रामाणिक राहिले व त्याची जबर किंमत त्यांना मोजावी लागली. याबाबत माझी मते चुकीची किंवा अल्प माहितीवर आधारित असल्याची शक्यता आहे, तरी आपणाला अजून माहिती किंवा संदर्भ हवे असल्यास मिपावरील जाणकारांना विचारता येईल.
माणसाचे आयुष्य सुंदर बनवायला हे असे काळाचे अस्तित्व नाकारणे चार्वाकाने अनिवार्य मानले आहे काय?
या प्रश्नाचा रोख मला समजला नाही. तरी शब्दशः अर्थ घेतला तर होय. थोडी भर - चार्वाकांना निव्वळ भोगवादी ठरवून मोकळे होण्याची किंवा त्यांना नीतिमत्ताशून्य ठरवण्याची चार्वाकविरोधकांची घाई होते असा अनुभव आहे. चार्वाकमत, जे समाजातील प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार आचरीत असतो, ते असे नैतिकमूल्यांचे विरोधक नसून एका अर्थाने नैतिकतेचे सर्वात मोठे पाईक आहेत. नैतिकता व धार्मिकता यांचा आपापसात कसलाही संबंध नाही हे मी ठामपणे म्हणू शकतो.

In reply to by एस

अर्धवटराव 30/09/2013 - 23:17
माझी प्रश्न मांडण्यात चुक झाली. चार्वाकयुग म्हणजे चार्वाक नामक तत्ववेत्त्याचा काळ असं मला विचारायचं नव्हतं. थोडं इलॅबोरेट करतो. सत्याची आस अणि सुखाची कामना या स्वयंभू प्रेरणा मानवी मनात नांदतात. या प्रेरणा कधी म्युचुअली एक्स्क्लुझीव्ह, कधी समांतर, तर कधी अगदी परस्पर विरोधी देखील असु शकतात. या दोन्ही प्रेरणांची एकसंगत लावण्याचे कार्य प्रत्येक दार्शनीक करतो. कुठलं दर्शन किती प्रभाव पाडतं हे तत्कालीन समाज परिस्थीती ठरवते. चार्वाकाचा मूळ सिद्धांत काय, तर यावत् जीवेत सुखं जीवेत. त्याचं कारण तो देतो कि भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम् कुतः . चैतन्य हे जडापासुन तयार होत नाहि असं मानणारं तत्वज्ञान तसंही भस्मीभूत देहाचं पुनरागमन होतं असं म्हणत नाहि, किंबहुना जुनं वस्त्र टाकुनच नवीन वस्त्र परिधान करावं लागतं असं त्यांचं म्हणणं. त्यामुळे ते चार्वाकाला विरोधी ठरत नाहिच, तर चार्वाक संपतो तिथुन ते सुरु होतं. हे तत्वज्ञान एस्टॅब्लीश झालं, सशक्त झालं, आणि इतकं उग्र झालं कि त्याने चार्वाकाला फाईट दिली असं होणं अशक्य आहे. या सर्व घाडामोडी होण्याचा काळ एखाद्या तत्ववेत्याच्या आयुष्यापेक्षा खुपच जास्त मोठा असणार. चार्वाक विचारधारेशी, चार्वाक पंथाशी संघर्ष झाला असेल, पण तसं अजुन तरी वाचनात आले नाहि. थोडक्यात काय, तर सत्याप्रती मानवी मनाची भूक चार्वाक तत्वज्ञान भागवु शकलं नाहि, आणि सुखप्राप्तीची साधनं गोळा करण्यास मानवाला कुठल्या दार्शनीकाची आवश्यकता तशिही राहात नाहि, म्हणुन चार्वाक संपला. यज्ञसंस्कृतीने सुरुवातीला मानवी सुखाची भरपूर सोय करुन ठेवली. पण पुढे त्यातलं कर्मकांड मानवी सुखाच्या आड येत गेलं, म्हणुन चार्वाक तत्वज्ञान उदयास आलं, अशी एक उपपत्ती लावता येते. पण ज्याप्रमाणे फक्त कम्युनीझम सोडा म्हणुन सांगुन भागत नाहि तर त्यानंतर लोकशाहीचा प्रोग्राम देखील द्यावा लागतो, त्याचप्रमाणे सुखप्राप्तीकरता कर्मकांड सोडा म्हणुन सांगुन भागत नाहि तर त्याला रिप्लेसमेण्ट म्हणुन इतर संस्था-यंत्रणा उभ्या कराव्या लागतात जे चार्वाकाला जमलं नाहि म्हणुन तो मागे पडला. आजच्या युगात चार्वाक तत्वज्ञान पुन्हा उसळी मारणं सहाजीक आहे, कारण सुखोपभोगाचे स्वातंत्र कधि नव्हे तेव्हढं माणासाला आज उपलब्ध आहे, व सत्य शोधनाची इन्स्टीक्ट शमवण्यासाठी विज्ञानाचे राजमार्ग उपलब्ध आहेत. पण हि परिमाणं काहि शतके आगोदरच्या समाज परिस्थितीला लावता येत नाहित. असो. माझं वाचन याबाबतीत फार म्हणजे फारच तुटपुंजं आहे. म्हणुन एकुणच चार्वाकीझम बद्दल शक्य असेल तिथे प्रश्न विचारतो. त्याचकारणाने तुम्हाला तसदी दिली. मिपावर आणि इतरत्र जी उपलब्ध साधनं आहेत त्याचा शक्य होईल तेंव्हा अभ्यास करेनच... बघु. अवांतरः युधीष्ठीराच्या सभेची कथा विरोधी विचारांप्रती असहिष्णुतेचे उदाहरण म्हणुन अजीबात पटलं नाहि. असो.

In reply to by अर्धवटराव

एस 01/10/2013 - 01:11
एकूणच चार्वाकमत काय किंवा इतर दर्शने काय, समाजातील त्यांची वैयक्तिक आणि सामाजिक पातळ्यांवरील स्वीकृती ही नेहमीच बदलती आणि जाणीव-नेणिवेच्या धूसरतेआड जात राहिली आहे. तसे का याचे विवेचन आपण केलेच आहे. व्यावहार्यिकतेच्या पातळीवर आणि मानसिक स्थिरतेच्या कसोटीवर लोकायत संपूर्णपणे आणि कठोरपणे स्वीकारणे तितके सोपे नाही. सामान्यांना तर मुळीच नाही. प्रत्येक दर्शनाची किंवा शास्त्राचीही सुरुवात ही सत्याचा नव्याने प्रसंगी नवा किंवा जुना असा शोध घेण्यातून झाली. पण इतर दर्शनांमध्ये मूळ तत्त्वज्ञानाच्या विपरित कित्येक बाबींची कालांतराने सरमिसळ झाल्याचे दिसून येते. उदा. सुरुवातीला केवळ प्रकृतीप्रधान असणारा सांख्यवाद नंतर पुरुष आणि हळूहळू परमपुरुष आणि त्याच्या मुक्तीभोवती गुरफटला गेला. हे केवळ उदाहरण झाले. अशाच पद्धतीने दर्शनांतून उपदर्शने, पंथ आणि वाद उदयास येत गेले - येत आहेत. आणि या सगळ्यांची एक विलक्षण गुंफण आपल्या भारतीय समाजमनात झालेले दिसून येते. हा गुंता सोडवायला म्हटलं तर अवघड आणि म्हटलं तर सोपाही आहे. असो. चार्वाकांचे मला सर्वात जास्त आवडणारे गुण म्हणजे केवळ प्रत्यक्ष प्रमाणाला मान्यता आणि त्याआधारे सिद्ध होणार्‍या गोष्टी स्वीकारायचा उदारपणा. हा उदारपणा इतर दर्शनांच्या कर्मठ ताठरतेपेक्षा उठून दिसतो. आज लोकायत विज्ञानाच्या परिभाषेत मांडणे त्यामुळेच शक्य आहे आणि आवश्यकही. एवढे सांगून या धाग्यावरून आपला निरोप घेतो. धन्यवाद.

In reply to by एस

आत्मा हे चैतन्याचे जडापेक्षा वेगळे अस्तित्त्व असे मान्य करून त्याला दिलेले रूप आहे. जर चार्वाकांच्या मते असे वेगळे अस्तित्त्वच नाही
आत्मा.... जडापेक्षा वेगळे अस्तित्त्व ? माझ्या माहिती (व काही अनुभवानुसार) आत्मस्वरुप यापध्दतिने जडापासुन सुक्ष्माकडे अधोरेखित होत जाते. प्रुथ्वि->>जल->>अग्नि->>वायु->>आकाश->> आणि आत्मतत्व/ स्वरुप (आत्मा).
त्यामुळे आत्मा, देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे कारणच संपते हे चार्वाकमत आहे.
आता आत्मस्वरुपाची कल्पना येत असली तरी देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे/असण्याचे वा नसण्याचे कारण काय आहे हे अजुनही मी अस्तित्वात का आहे (कसा आहे न्हवे तर का आहे) या प्रश्ना इतकेच अनुत्तरित वाटते. असे माझे मत आहे. थोडक्यात केवळ जडता नाही म्हणून आत्मा नाकारणे हे जडता नाही म्हणून अवकाश (स्पेस) तत्वही नाकारण्या इतक सकृतदर्शनी अनावश्यक वाटते. अवकाशतत्वाची अजुन एक गंमत अशी आहे कि यामधे चैतन्य दिसत नाही पण ते आहे गृहित धरले तर आइन्स्टाइनचा टाइम-स्पेस बेंडीगचा सिध्दांत कमालिचा योग्य ठरु लागतो. ( टाइम-स्पेस बेंडीग बद्दल लिहणे मोठि अन रोचक कल्पना आहे परंतु त्याचे विस्तारभय प्रचंड असल्याने गुगल हाच एकमेव पर्याय आहे याबद्दल अधिक माहिती घ्यायला)

In reply to by अग्निकोल्हा

एस 24/09/2013 - 08:46
आपल्या प्रतिसादातील तर्काशी असहमत.
आत्मस्वरुप यापध्दतिने जडापासुन सुक्ष्माकडे अधोरेखित होत जाते. प्रुथ्वि->>जल->>अग्नि->>वायु->>आकाश->> आणि आत्मतत्व/ स्वरुप (आत्मा).
यामागील तर्क मला विज्ञानाच्या कुठल्याच कसोटीवर खरा उतरताना दिसत नाही. त्यातही पंचमहाभूतांची आपण वरप्रमाणे घातलेली सांगडही मला अतर्क्य वाटते.
देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे/असण्याचे वा नसण्याचे कारण काय आहे हे अजुनही मी अस्तित्वात का आहे (कसा आहे न्हवे तर का आहे) या प्रश्ना इतकेच अनुत्तरित वाटते. असे माझे मत आहे.
सांख्यिकी किंवा विज्ञानाच्या कुठलाही सिद्धांत स्वीकारण्याच्या काही कसोट्या असतात. त्यात एखाद्या सिद्धांताची सिद्धी किंवा प्रूफ ही नकारात्मकतेकडून म्हणजेच तो सिद्धांत फेटाळून सुरू केली जाते. उदा. एखादे नवीन औषध हे त्या आजारावर उपयोगी आहे असे जर प्रतिपादन करायचे असेल तर विविध चाचण्यांमधून त्या औषधाच्या सकारात्मक परिणामकारतेच्या पुराव्यांपेक्षा जास्त काटेकोरपणे त्याचे नकारात्मक किंवा न्यूट्रल इफेक्ट - उदासीन परिणाम तपासले जातात. असे का, तर एखाद्या गोष्टीचे अस्तित्त्व आहे हे मानून चालले आणि ती गोष्ट नसली तर होणारे नुकसान हे एखादी गोष्ट नाही असे मानून चालले आणि ती गोष्ट खरोखर असली तर होणार्‍या नुकसानीपेक्षा कितीतरी पटींने हानिकारक आणि इर्रिवर्सिबल - अपरिवर्तनीय असते. त्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोन हा नेहमी नवीन वा जुने सिद्धांत त्यांच्या वैश्विकतेला सतत आव्हान देऊन त्यांची वैधता तपासण्याला महत्त्व देतो. वरील बाब लक्षात घेता अशा संकल्पनांचे अस्तित्त्व सिद्ध झाले नसताना त्या आहेत हे मानणे हे त्या असल्याच तर न मानण्यामुळे होणार्‍या नुकसानीपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकेल. त्यामुळे जोपर्यंत अशा संकल्पनांचे अस्तित्त्व वर उल्लेखलेल्या आणि इतरही शास्त्रीय कसोट्यांवर जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मान्य न करणे हेच शहाणपणाचे ठरेल हे इथे महत्त्वाचे आहे. थोडक्यात बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल इतक्या कठोरपणे तपासूनच मगच अशा सिद्धांतांचे अस्तित्त्व मानावे हे चार्वाकांनी सांगितले.
थोडक्यात केवळ जडता नाही म्हणून आत्मा नाकारणे हे जडता नाही म्हणून अवकाश (स्पेस) तत्वही नाकारण्या इतक सकृतदर्शनी अनावश्यक वाटते.
इतर दर्शनांनी पाच महाभूतांचे अस्तित्त्व मान्य केले असताना चार्वाकांनी मात्र अवकाश सोडून फक्त इतर चार महाभूते मानली याचे कारण अवकाश मुळातच इतर महाभूतांच्या अस्तित्त्वाचा अभाव किंवा त्यांच्यामधील पोकळी होय. त्याला स्वतःचे गुणधर्म नाहीत. जसे अंधार म्हणजे प्रकाशाचा पूर्ण अभाव, पण अंधार निर्माण करायला केवळ प्रकाशाचा स्रोत अडवणे हाच एक मार्ग असल्याने अंधाराचे अस्तित्त्व हे प्रकाशाशी पूर्णपणे निगडित आहे, प्रकाश हा अंधारावर अवलंबून नाही. त्याचप्रमाणे अवकाश आपले अस्तित्त्व इतर महाभूतांच्या मदतीनेच दाखवून देऊ शकते. समजा केवळ उदाहरणासाठी सैद्धांतिकरित्या असे समजू की जडाची निर्मिती करण्यासाठी तुम्हांला काही भांड्यांत पृथ्वी-आप-तेज-वायू ही महाभूते दिली आहेत. केवळ या चार महाभूतांच्या मदतीने आपण जडाची निर्मिती करू शकतो. त्यासाठी पाचव्या भांड्यातून थोडे अवकाश घेऊन त्यात मिसळण्याची गरज नसते. या कारणांनी चार्वाकांनी अवकाशाला पाचवे महाभूत म्हणून स्थान दिले नाही.
आइन्स्टाइनचा टाइम-स्पेस बेंडीगचा सिध्दांत
टाइम-स्पेस बेंडिंग हे गुरुत्वाकर्षणाच्या अतिप्रचंड बलामुळे घडून येते. त्यासाठी तितक्या प्रचंड वस्तुमानाची खगोलीय वस्तू हवी असते. गुरुत्वाकर्षणाचा इतर मूलभूत बलांशी (विद्युतचुंबकीय बल, रेण्वीय बल आणि केंद्रकीय बल) संबंध सिद्ध करण्यात अद्याप शास्त्रज्ञांना उल्लेखनीय यश आलेले नसले तरी गुरुत्वाकर्षण हे चैतन्य वगैरे मुळीच नव्हे. तसेच निव्वळ अवकाशात स्थळकाळाला वळवण्याची वा नियंत्रित करण्याची क्षमता नसते. ती केवळ त्या अवकाशात असलेल्या वेगवेगळ्या वस्तुमानाच्या घटकांमुळेच होऊ शकते.

In reply to by एस

हु नेवर नो व्हेर दि हेल इस तमिलनाड ? हेन्स दे डाँट क्नो इंडिया डज एगझिस्ट नॉर दि तमिलनाड इन सेम वर्ल्ड दे आर लिवींग. ऑर पिपल लाइक यु एंड मी हु थिक्स आनेवाडी इज एम्याजिनरी विलेज. आय्नीवेय... स्पेस बेंडिंग हे फक्त आणी फक्त गुरुत्वाकर्षणाच्या अतिप्रचंड बलामुळे घडून येत नाहि हो :) म्हणूनच स्पेस बेंडिग समजुन घ्या हा रेफरन्स दिला.
याचे कारण अवकाश मुळातच इतर महाभूतांच्या अस्तित्त्वाचा अभाव किंवा त्यांच्यामधील पोकळी होय. त्याला स्वतःचे गुणधर्म नाहीत.
स्पेस बेंडिग समजुन घ्या. मगच ह्या विषयावर चिंतन करा, गुगल केल्यावर उघडणारी पहिलीच लिंक चाळून स्पेसवर मत प्रदर्षित करण्याइतका छोटा आवाका या विषयाचा खरोखर नाहिये.
यामागील तर्क मला विज्ञानाच्या कुठल्याच कसोटीवर खरा उतरताना दिसत नाही.
अनेको आयुर्वेदिक औषधे विज्ञानाच्या कसोटीवर विषारीच असतात पण आयुर्वेद मात्र शरिराच्या वात कफ पित्त लक्षणाने उपचार करतेच. सो चर्वाक शुड हॅव क्नो की विज्ञान शुडंट बी टोटल बेस टु उण्डरस्टँड आल एंटिटीज. तसही विज्ञान पंचमहाभुते न्हवे तर सॉलिड लिक्विड अन गॅस अशा पदार्थाच्या मात्र तिनच अवस्था असतात इतकच मानते. पण अध्यात्म यामधे अवस्थां/तत्वां सोबत अग्नि आणि पोकळी तत्वांचाही अतंर्भाव करते. खर तर विज्ञानाच्या कसोटिवर चर्वाक घासले तरी उताणे पडतिल असे असताना इतर गोश्टी सध्या घासणे अप्रस्तुत आहे.

In reply to by एस

अनिरुद्ध प 24/09/2013 - 13:35
म्हणजे मानवी शरीरात आकाश /अवकाश हे तत्व नसून फक्त चार तत्वांनी हे शरीर बनले आहे असे आपले मत आहे असे दिसून येते हे जरा स्पष्ट कराल का ? तेव्हडीच आमचे अज्ञान दूर होण्यास मदत होईल असे वाटते.

In reply to by उद्दाम

एस 23/09/2013 - 00:35
शरद यांचा दर्शने ५ चार्वाक ऊर्फ लोकायत दर्शन हा लेख वाचावा अशी विनंती करत आहे. जेणेकरून हा सुंदर लेख आपल्या व इतरांच्या वाचनात येईल.

In reply to by अग्निकोल्हा

उद्दाम 24/09/2013 - 14:19
There are many differences between a living body and a dead body.

आशु जोग 21/09/2013 - 15:00
लेख समजून घ्यायचा प्रयत्न केला पण नाही जमले. मग प्रतिक्रिया वाचल्या. तेव्हा एक गोष्ट ध्यानात आली. या जगात दोन जाती आहे एक चार्वाकाला नावे ठेवणार्‍यांची दुसरी त्याचे समर्थन करणारी. इथे जात आय मीन कॅटेगरी हे लक्षात ठेवावे.

पैसा 22/09/2013 - 18:19
संवादरूपात चार्वाक मताची ओळख करून देणारा प्रयोग आवडला. चर्चा वाचत आहे. आणि पुढील क्रमश: भाग कधी येतोय याची प्रतीक्षा करत आहे.
माधव : असे आश्रय ज्ञानाचा। निःश्रेयसरूपी पुरूषार्थाचा । धनी माझ्या नमस्काराचा । शिव सृष्टीकर्ता।। १ पावले जे दर्शनसागरापार। करवली जनयोग्य ईप्सितार्थप्राप्ती अपार। असे सर्वज्ञ विष्णु गुरूवर । मम आश्रयदाता।। विचित्रपुष्पांसम शास्त्रांचा हा सर । गहन, दुस्तर तरी आनंद देई फार। अवलोकावा दूर ठेऊनि मत्सर । होई आल्हाददाता। पुरूष क्र. १ : नमस्कार माधवराव! माधव : नमस्कार बुवा! काय म्हणता? पुरूष क्र.

काही पालुपदे...

शशिकांत ओक ·

आदूबाळ 18/08/2013 - 12:20
माझ्या एका क्लायंटला बोलताना मधे मधे "माने" असं म्हणायची सवय होती. मूळचा आसामी भाषिक असल्याने आधीच भाषेतल्या लिंगभेदांचा आनंदीआनंद होता. त्यातून हे "माने". अगदी कोणाला कचकावून शिव्या घालताना सुद्धा "माने" असायचंच. त्यामुळे कोणा मानेला शिव्या घालतोय असं चित्र निर्माण व्हायचं. उदा. "वो भें** माने मा**** को मैने बताया रिको देनेको, लेकिन माने भो**** सुनेगही नहीं तो क्या करें" :)

शशिकांत ओक 18/08/2013 - 12:37
मित्रांनो, कधी कधी कैच्याकै वाटणारे शब्द समूह हास्यनिर्मिती करताना ... माने... मज़ाक वाटतात... आदू बाळ...

धन्या 18/08/2013 - 13:36
या धाग्याला "वॉचर" लावला आहे का? माझा प्रतिसाद दोन मिनिटांत उडाला. प्रतिसाद टाकताना अगदी निरागस मनाने टाकला होता. प्रतिसाद उडाल्यानंतर तो का उडाला याचा विचार करु लागलो आणि मीच उडालो. भलताच अर्थ निघत होता त्यातून, अर्थात तसा अर्थ काढायचा ठरवला तर ;) असो. ओक काकांनी नाडी या विषयावर धागा न टाकता वेगळा विषय हाताळला आहे हे चांगलं झालं. (माझ्या उडालेल्या प्रतिसादाचा अर्थ हाच होता :( )

तिमा 18/08/2013 - 13:59
हिंग्लिशमधे ऐकलेले, बट, लेकिन..... लेकिन यू नो, वोके डिअर इत्यादि इत्यादि.

In reply to by प्रकाश घाटपांडे

धन्या 18/08/2013 - 14:31
आमच्याही हापिसात असंच एक "मी मोठा शहाणा" क्याटेगरीतील पात्र आहे. दोन वाक्य बोलून झाली की तो त्याच्या आवडीचं "तुम समझ रहे हो ना?" हे पालुपद आळवतो. जसं काही त्यालाच सारं कळतं. बाकीचे म्हणजे डोक्यावर पडलेले. :)

In reply to by धन्या

बॅटमॅन 18/08/2013 - 15:32
"तुम समझ रहे हो ना?"
दि अंग्रेझ मधील सलीम फेकू मल्लिका शेरावतबरोबरच्या मजेचे वर्णन इस्माईलभाईला अगदी फुलवून सांगतो ते आठवलं. "वो मेरेको लप्टी उस्ताद..लपटके इधर उधर.....तुम समझ रहे हो ना?" =)) =))

दादा कोंडके 20/08/2013 - 14:22
माझे आण्भव. मराठी खास करून स्थानिक भाष्णात: या ठिकाणी इंग्रजी: सी, लाइक, यु नो, आय मीन. माझा एक मित्र बर्‍याचदा वाक्यातल्या विशेष नामा नंतर 'ऑर सम शिट लाइक द्याट' असं म्हणतो. :) हिंदी: कंबख्त, भेंचोद या निमित्ताने, 'यु सी, वी हॅव बीन हेल्ड हिअर युसी फॉर मोअर दॅन फोर हाफ पास्ट सिक्स आवर्स यु सी...' हे आठवलं.

बॅटमॅन 20/08/2013 - 14:57
काही पालुपदे खालीलप्रमाणे. मराठी: या ठिकाणी (हे भाषणात स्पेस फिलर म्हणून लै वापरले जाते), कळ्ळं का, बरं का, इ.इ. हिंदी: भेंचोद, गां*, इ.इ. इंग्रजी (सौधिंडियन): "आय से", उदा. व्हॉट इज धिस आय से?" इंग्रजी (जण्रल): यू नो दॅट, यू सी, अ‍ॅज इट वेअर, (या प्रत्येकाचा उच्चार जितका जास्त साहेबी तितके अधिक भारी), इ. बंगाली: बाणा (पुरुषी बोलीतच आढळतो), साला (उच्चार: शाला),इ. अन्य काही आहेत पण हे सर्वव्यापी आहेत.

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 21/08/2013 - 12:02
"या माध्यमातून" राहिलं की! त्यावरून आठवलं: एका प्रथितयश तबला कलाकाराच्या तबला अ‍ॅकॅडमीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. तिथे त्या भागाच्या नगरसेवकाला बोलावलं होतं. बरीच गर्दी पाहून साहेबांना चेव चढला. "या ठिकानी (पॉज) आपन जे सर्व जमलेलो आहोत (पॉज) ते या अत्यंत मंगलमयी प्रसंगासाठी. (पॉज) आपल्या वॉर्डच्या सर्वांगीन विकासासाठी या माध्यमातून (पॉज) जे प्रयत्न होत आहेत (पॉज) त्याबद्दल मी या ठिकानी (पॉज) #### यांचे आभार मानतो..." त्यानंतर रामदास पळसुलेंच्या एकल तबलावादनाचा कार्यक्रम होता. ते आधीच येऊन बसले होते. या बाबांची लांबण संपेनाच. त्यांच्या चेहेर्‍यावर हतबल झाल्याचे भाव होते. ते बघून समोरचे श्रोते हसू दाबत होते. अखेर चाळीस मिनिटांनी भाषण संपलं आणि लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

In reply to by बॅटमॅन

दादा कोंडके 21/08/2013 - 12:33
बाकी किस्सा टि"प्पि"कल एकदम!!
सहमत. आणि भाषणातल्या प्रत्येक नावाआधी 'माननिय' अगदी मस्टच. मला वाटतं, एक पण्णास-साठ शब्दांचा संग्रह असलेली माणसं असली शेकडो भाषणे देउ शकतील - (अशी अनेक भाषणं ऐकलेला) दादा

In reply to by दादा कोंडके

बॅटमॅन 21/08/2013 - 12:45
अगदी अगदी :D शेकडो हजारो भाषणांचा भवसागर या थोड्याशा चवैतुहिंनी आरामात पार करता येतो. (अशी अनेक भाषणे ऐकून पकलेला) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 21/08/2013 - 12:58
सारखे सारखे पॉज का घेतात हे मला पहिले कळायचं नाही. असली खूप भाषणं ऐकल्यावर एके दिवशी ट्यूब पेटली. माईकवर बोलणार्‍याला स्वतःचा आवाज थोड्या डीलेने ऐकू येतो. आपला आवाज कसा ऐकू येतोय याची उत्सुकता तर असतेच. त्यामुळे चार-पाच शब्द बोलून पॉज घेतात, जेणेकरून ऐकता येईल. नवख्या "मान्नीय" वक्त्याचा कधीकधी एक विचित्र पोपट होतो. आपला आवाज ऐकण्याच्या गडबडीत आपल्याला पुढे काय बोलायचंय हेच मान्नीयसाहेब विसरून जातात! मग पुढे काहीही अनकनेक्टेड बोलतात. मग श्रोत्यांची करमणूक होते किंवा ते बुचकळ्यात पडतात की काय चालू आहे बुवा. अशा वेळी पत्रकारांचं कौतुक वाटतं. या गाळातून ते बरोब्बर काय हवं ते टिपून घेतात!

माझी मामी जुन्नरची, जेव्हा ती लग्न करून आली होती तेव्हा ती तिच्या बोलण्यात नेहमीच वाईज, राहू द्या वले असे शब्द बोलायची, मला काहीच कळायचे नाही, मग समजले कि हि तिची पालुपदे आहेत म्हणुन. :)

In reply to by भावना कल्लोळ

मस्तच! जाउं द्या वले! जाउं दे वली! जाउं द्या वला! ही पालुपदे तिकल्डीच. बोलण्यातील सहजता व सहवेदनेतील आश्वासकता या पालुपदांनी अगदी सार्थ केली. बर्‍याच दिवसांनी ऐकल्यावर बर वाटल.

शशिकांत ओक 23/08/2013 - 00:01
मित्रांनो, हवाईदलात असताना मुर्दाड व नाठाळ लोकांशी बोलताना भाषेला धार नसेल तर गुळुमुळू बोलणे हवेत विरून जाई असे दिसून आल्यावर काम फटक्यात व्हावे अशा आवेशात बोलता-बोलता न कळत काही शब्द असे जिभेवर येत असत. त्यात ब्लडी फेलो, निनकंपूप, गुड फॉर नथिंग अशी व अन्य न लिहिता येतील अशी दूषणे माझ्यामुखातून वाक्यावाक्याला झरू लागली. घरी मुलांचा अभ्यास घेताना ती मुलांवर डाफरायला ही वापरात येऊ लागल्यावर अभ्यास राहायचा बाजूला व आमच्या वरिष्ठांची झकाझकी व्हायला लागली. तेंव्हा विचारपुर्वक मी त्यावर नियंत्रण केले खरे पण तरीही कधी कधी जशी खोकल्याची उबळ थांबवता येत नाही तसे व्हायचे कधी कधी ... पुढे (वयाने वाढला एरंड?) अर्थात जेष्ठ झाल्यावर निवृत्तीनंतर कॉलेजात नोकरी करताना खट्याळ मुला-मुलींना त्यांच्या वात्रटपणाच्या तंगड्या त्याच्या गळ्यात अडकवता अडकवता मला 'व्हाट यू कॉल', असे पालुपद नकळत ओठी येऊ लागले. एकदा कॅन्टीन मधे माझ्या मागील टेबलवर माझ्या चालढालीची नक्कल करत नंतर 'व्हाट यू कॉल' असे म्हणून पोरपोरी फिदीफिदी हसल्याचे माझ्या चाणाक्ष नजरेला व तिखट कानांना जाणवल्यानंतर मी ही शब्द योजना काढून टाकीन असे दाढी करताना स्वतःच्या चेहऱ्याकडे पहात सेल्फटॉक मधे स्वतःला बजावत दुरुस्त करून घेतली तो भाग वेगळा.

शशिकांत ओक 03/12/2013 - 21:58
मी माधवनगरकर होतो तेव्हाची गोष्ट. आमच्या बंगल्याशेजारच्या बंगल्यात एक कुटुंब राहायला आले. साहेब कॉटन मिलमधे वरिष्ठ अधिकारी होते साहजिकच दरमहा भरपूर पगाराचे पाकीट. त्यांच्या पत्नी ही सढळ हाताने खर्च करणाऱ्या. सदरहू साहेबांचा मूड नेहमी पत्नीला खुष ठेवायचा असायचा. त्यांना 'नाही म्हणजे काय यै 'असा तकिया कलाम घेऊन पत्नीची येता जाता तारीफ करताना ऐकून आम्हा मित्र मंडळींना मजा वाटे. एकदा,'नाही म्हणजे काय यै' म्हणून आम्हाला त्यांनी जेवायच्या निमंत्रण दिले. कारण त्यांच्या मते सौ. फुलके फार छान करतात असा दावा ते करत असत. दर शुक्रवारी फुकट स्क्रीन वाचायला मिळत असे म्हणून आम्ही त्यांच्या तकिया कलामाला दुर्लक्ष करून भोजनाला बसलो. फुलक्या पानात पडल्या की दरवेळी नाही म्हणजे कशा झाल्यात आमच्या हिच्या हाताच्या फुलक्या ? एका घासात पुरीच्या आकाराच्या फुलक्या फस्त करून आमचा मित्र ( खरे नाव सुधीर ज्याला आम्ही त्याच्या अपरोक्ष गठ्ठ्या म्हणायचो!) म्हणाला, नाही म्हणजे काय यै अशा फुलक्या कधीच खाल्या नव्हत्या. शिवाय नाजुक हातानी बनवताना अशा फक्कड दिसतात काही विचारू नका. गॅस वरील फुलका पालथा करताना बोटं चटकेखात असताना चेहरा हसरा ठेवून फुलके ताटात त्या टाकत राहिल्या. साहेब खुष होत म्हणाले, नाही म्हणजे कशी फुगतेय पहा..! होना इतक्या टंच! गठ्ठ्या हळूच म्हणे. नाही म्हणजे आवडल्या का? साहेब विचारते झाले. नाही म्हणायला जागाच नाही! स्थूल पोटावरून वरून हाथ फिरवत गठ्ठ्या म्हणाला, नाही म्हणजे रोज अशी गर्मागरम फरमाइश! मग काय कशी काय वाटली ? या फरमाईशला उत्तर देत म्हणाला. असो. नुकताच दिवंगत मित्र सुधीरच्या मिश्किलपणाला समर्पित थोडासा फुगवून व फुलवून सांगितलेला किस्सा...

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 07/09/2018 - 00:05
अनेक जण लकबीतून आपले व्यक्तिमत्त्व साकार करतात. काहींची एक भुवई वर जाते. डोक्यावरची गांधी टोपी पुढे सारून निगरगट्टपण साधून, तर हक्काने टाळी मागणारे हात पुढे करून, तरुणी पदराशी चाळे करून लक्षवेधन करतात.

ज्ञानव 03/12/2013 - 22:09
'नाही म्हणजे काय यै '
ह्या वरून आठवले माझा एक "पुतण्या " कारण बरेच जण हल्ली मला काका म्हणून संबोधतात तो फोन केल्यावर "हाय हलो" वगैरे न म्हणता "ओ ऐका ना...मी काय म्हणतो " अशी सुरुवात करतो. "जल्ला तुला कल्ला"

आदूबाळ 18/08/2013 - 12:20
माझ्या एका क्लायंटला बोलताना मधे मधे "माने" असं म्हणायची सवय होती. मूळचा आसामी भाषिक असल्याने आधीच भाषेतल्या लिंगभेदांचा आनंदीआनंद होता. त्यातून हे "माने". अगदी कोणाला कचकावून शिव्या घालताना सुद्धा "माने" असायचंच. त्यामुळे कोणा मानेला शिव्या घालतोय असं चित्र निर्माण व्हायचं. उदा. "वो भें** माने मा**** को मैने बताया रिको देनेको, लेकिन माने भो**** सुनेगही नहीं तो क्या करें" :)

शशिकांत ओक 18/08/2013 - 12:37
मित्रांनो, कधी कधी कैच्याकै वाटणारे शब्द समूह हास्यनिर्मिती करताना ... माने... मज़ाक वाटतात... आदू बाळ...

धन्या 18/08/2013 - 13:36
या धाग्याला "वॉचर" लावला आहे का? माझा प्रतिसाद दोन मिनिटांत उडाला. प्रतिसाद टाकताना अगदी निरागस मनाने टाकला होता. प्रतिसाद उडाल्यानंतर तो का उडाला याचा विचार करु लागलो आणि मीच उडालो. भलताच अर्थ निघत होता त्यातून, अर्थात तसा अर्थ काढायचा ठरवला तर ;) असो. ओक काकांनी नाडी या विषयावर धागा न टाकता वेगळा विषय हाताळला आहे हे चांगलं झालं. (माझ्या उडालेल्या प्रतिसादाचा अर्थ हाच होता :( )

तिमा 18/08/2013 - 13:59
हिंग्लिशमधे ऐकलेले, बट, लेकिन..... लेकिन यू नो, वोके डिअर इत्यादि इत्यादि.

In reply to by प्रकाश घाटपांडे

धन्या 18/08/2013 - 14:31
आमच्याही हापिसात असंच एक "मी मोठा शहाणा" क्याटेगरीतील पात्र आहे. दोन वाक्य बोलून झाली की तो त्याच्या आवडीचं "तुम समझ रहे हो ना?" हे पालुपद आळवतो. जसं काही त्यालाच सारं कळतं. बाकीचे म्हणजे डोक्यावर पडलेले. :)

In reply to by धन्या

बॅटमॅन 18/08/2013 - 15:32
"तुम समझ रहे हो ना?"
दि अंग्रेझ मधील सलीम फेकू मल्लिका शेरावतबरोबरच्या मजेचे वर्णन इस्माईलभाईला अगदी फुलवून सांगतो ते आठवलं. "वो मेरेको लप्टी उस्ताद..लपटके इधर उधर.....तुम समझ रहे हो ना?" =)) =))

दादा कोंडके 20/08/2013 - 14:22
माझे आण्भव. मराठी खास करून स्थानिक भाष्णात: या ठिकाणी इंग्रजी: सी, लाइक, यु नो, आय मीन. माझा एक मित्र बर्‍याचदा वाक्यातल्या विशेष नामा नंतर 'ऑर सम शिट लाइक द्याट' असं म्हणतो. :) हिंदी: कंबख्त, भेंचोद या निमित्ताने, 'यु सी, वी हॅव बीन हेल्ड हिअर युसी फॉर मोअर दॅन फोर हाफ पास्ट सिक्स आवर्स यु सी...' हे आठवलं.

बॅटमॅन 20/08/2013 - 14:57
काही पालुपदे खालीलप्रमाणे. मराठी: या ठिकाणी (हे भाषणात स्पेस फिलर म्हणून लै वापरले जाते), कळ्ळं का, बरं का, इ.इ. हिंदी: भेंचोद, गां*, इ.इ. इंग्रजी (सौधिंडियन): "आय से", उदा. व्हॉट इज धिस आय से?" इंग्रजी (जण्रल): यू नो दॅट, यू सी, अ‍ॅज इट वेअर, (या प्रत्येकाचा उच्चार जितका जास्त साहेबी तितके अधिक भारी), इ. बंगाली: बाणा (पुरुषी बोलीतच आढळतो), साला (उच्चार: शाला),इ. अन्य काही आहेत पण हे सर्वव्यापी आहेत.

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 21/08/2013 - 12:02
"या माध्यमातून" राहिलं की! त्यावरून आठवलं: एका प्रथितयश तबला कलाकाराच्या तबला अ‍ॅकॅडमीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. तिथे त्या भागाच्या नगरसेवकाला बोलावलं होतं. बरीच गर्दी पाहून साहेबांना चेव चढला. "या ठिकानी (पॉज) आपन जे सर्व जमलेलो आहोत (पॉज) ते या अत्यंत मंगलमयी प्रसंगासाठी. (पॉज) आपल्या वॉर्डच्या सर्वांगीन विकासासाठी या माध्यमातून (पॉज) जे प्रयत्न होत आहेत (पॉज) त्याबद्दल मी या ठिकानी (पॉज) #### यांचे आभार मानतो..." त्यानंतर रामदास पळसुलेंच्या एकल तबलावादनाचा कार्यक्रम होता. ते आधीच येऊन बसले होते. या बाबांची लांबण संपेनाच. त्यांच्या चेहेर्‍यावर हतबल झाल्याचे भाव होते. ते बघून समोरचे श्रोते हसू दाबत होते. अखेर चाळीस मिनिटांनी भाषण संपलं आणि लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

In reply to by बॅटमॅन

दादा कोंडके 21/08/2013 - 12:33
बाकी किस्सा टि"प्पि"कल एकदम!!
सहमत. आणि भाषणातल्या प्रत्येक नावाआधी 'माननिय' अगदी मस्टच. मला वाटतं, एक पण्णास-साठ शब्दांचा संग्रह असलेली माणसं असली शेकडो भाषणे देउ शकतील - (अशी अनेक भाषणं ऐकलेला) दादा

In reply to by दादा कोंडके

बॅटमॅन 21/08/2013 - 12:45
अगदी अगदी :D शेकडो हजारो भाषणांचा भवसागर या थोड्याशा चवैतुहिंनी आरामात पार करता येतो. (अशी अनेक भाषणे ऐकून पकलेला) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 21/08/2013 - 12:58
सारखे सारखे पॉज का घेतात हे मला पहिले कळायचं नाही. असली खूप भाषणं ऐकल्यावर एके दिवशी ट्यूब पेटली. माईकवर बोलणार्‍याला स्वतःचा आवाज थोड्या डीलेने ऐकू येतो. आपला आवाज कसा ऐकू येतोय याची उत्सुकता तर असतेच. त्यामुळे चार-पाच शब्द बोलून पॉज घेतात, जेणेकरून ऐकता येईल. नवख्या "मान्नीय" वक्त्याचा कधीकधी एक विचित्र पोपट होतो. आपला आवाज ऐकण्याच्या गडबडीत आपल्याला पुढे काय बोलायचंय हेच मान्नीयसाहेब विसरून जातात! मग पुढे काहीही अनकनेक्टेड बोलतात. मग श्रोत्यांची करमणूक होते किंवा ते बुचकळ्यात पडतात की काय चालू आहे बुवा. अशा वेळी पत्रकारांचं कौतुक वाटतं. या गाळातून ते बरोब्बर काय हवं ते टिपून घेतात!

माझी मामी जुन्नरची, जेव्हा ती लग्न करून आली होती तेव्हा ती तिच्या बोलण्यात नेहमीच वाईज, राहू द्या वले असे शब्द बोलायची, मला काहीच कळायचे नाही, मग समजले कि हि तिची पालुपदे आहेत म्हणुन. :)

In reply to by भावना कल्लोळ

मस्तच! जाउं द्या वले! जाउं दे वली! जाउं द्या वला! ही पालुपदे तिकल्डीच. बोलण्यातील सहजता व सहवेदनेतील आश्वासकता या पालुपदांनी अगदी सार्थ केली. बर्‍याच दिवसांनी ऐकल्यावर बर वाटल.

शशिकांत ओक 23/08/2013 - 00:01
मित्रांनो, हवाईदलात असताना मुर्दाड व नाठाळ लोकांशी बोलताना भाषेला धार नसेल तर गुळुमुळू बोलणे हवेत विरून जाई असे दिसून आल्यावर काम फटक्यात व्हावे अशा आवेशात बोलता-बोलता न कळत काही शब्द असे जिभेवर येत असत. त्यात ब्लडी फेलो, निनकंपूप, गुड फॉर नथिंग अशी व अन्य न लिहिता येतील अशी दूषणे माझ्यामुखातून वाक्यावाक्याला झरू लागली. घरी मुलांचा अभ्यास घेताना ती मुलांवर डाफरायला ही वापरात येऊ लागल्यावर अभ्यास राहायचा बाजूला व आमच्या वरिष्ठांची झकाझकी व्हायला लागली. तेंव्हा विचारपुर्वक मी त्यावर नियंत्रण केले खरे पण तरीही कधी कधी जशी खोकल्याची उबळ थांबवता येत नाही तसे व्हायचे कधी कधी ... पुढे (वयाने वाढला एरंड?) अर्थात जेष्ठ झाल्यावर निवृत्तीनंतर कॉलेजात नोकरी करताना खट्याळ मुला-मुलींना त्यांच्या वात्रटपणाच्या तंगड्या त्याच्या गळ्यात अडकवता अडकवता मला 'व्हाट यू कॉल', असे पालुपद नकळत ओठी येऊ लागले. एकदा कॅन्टीन मधे माझ्या मागील टेबलवर माझ्या चालढालीची नक्कल करत नंतर 'व्हाट यू कॉल' असे म्हणून पोरपोरी फिदीफिदी हसल्याचे माझ्या चाणाक्ष नजरेला व तिखट कानांना जाणवल्यानंतर मी ही शब्द योजना काढून टाकीन असे दाढी करताना स्वतःच्या चेहऱ्याकडे पहात सेल्फटॉक मधे स्वतःला बजावत दुरुस्त करून घेतली तो भाग वेगळा.

शशिकांत ओक 03/12/2013 - 21:58
मी माधवनगरकर होतो तेव्हाची गोष्ट. आमच्या बंगल्याशेजारच्या बंगल्यात एक कुटुंब राहायला आले. साहेब कॉटन मिलमधे वरिष्ठ अधिकारी होते साहजिकच दरमहा भरपूर पगाराचे पाकीट. त्यांच्या पत्नी ही सढळ हाताने खर्च करणाऱ्या. सदरहू साहेबांचा मूड नेहमी पत्नीला खुष ठेवायचा असायचा. त्यांना 'नाही म्हणजे काय यै 'असा तकिया कलाम घेऊन पत्नीची येता जाता तारीफ करताना ऐकून आम्हा मित्र मंडळींना मजा वाटे. एकदा,'नाही म्हणजे काय यै' म्हणून आम्हाला त्यांनी जेवायच्या निमंत्रण दिले. कारण त्यांच्या मते सौ. फुलके फार छान करतात असा दावा ते करत असत. दर शुक्रवारी फुकट स्क्रीन वाचायला मिळत असे म्हणून आम्ही त्यांच्या तकिया कलामाला दुर्लक्ष करून भोजनाला बसलो. फुलक्या पानात पडल्या की दरवेळी नाही म्हणजे कशा झाल्यात आमच्या हिच्या हाताच्या फुलक्या ? एका घासात पुरीच्या आकाराच्या फुलक्या फस्त करून आमचा मित्र ( खरे नाव सुधीर ज्याला आम्ही त्याच्या अपरोक्ष गठ्ठ्या म्हणायचो!) म्हणाला, नाही म्हणजे काय यै अशा फुलक्या कधीच खाल्या नव्हत्या. शिवाय नाजुक हातानी बनवताना अशा फक्कड दिसतात काही विचारू नका. गॅस वरील फुलका पालथा करताना बोटं चटकेखात असताना चेहरा हसरा ठेवून फुलके ताटात त्या टाकत राहिल्या. साहेब खुष होत म्हणाले, नाही म्हणजे कशी फुगतेय पहा..! होना इतक्या टंच! गठ्ठ्या हळूच म्हणे. नाही म्हणजे आवडल्या का? साहेब विचारते झाले. नाही म्हणायला जागाच नाही! स्थूल पोटावरून वरून हाथ फिरवत गठ्ठ्या म्हणाला, नाही म्हणजे रोज अशी गर्मागरम फरमाइश! मग काय कशी काय वाटली ? या फरमाईशला उत्तर देत म्हणाला. असो. नुकताच दिवंगत मित्र सुधीरच्या मिश्किलपणाला समर्पित थोडासा फुगवून व फुलवून सांगितलेला किस्सा...

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 07/09/2018 - 00:05
अनेक जण लकबीतून आपले व्यक्तिमत्त्व साकार करतात. काहींची एक भुवई वर जाते. डोक्यावरची गांधी टोपी पुढे सारून निगरगट्टपण साधून, तर हक्काने टाळी मागणारे हात पुढे करून, तरुणी पदराशी चाळे करून लक्षवेधन करतात.

ज्ञानव 03/12/2013 - 22:09
'नाही म्हणजे काय यै '
ह्या वरून आठवले माझा एक "पुतण्या " कारण बरेच जण हल्ली मला काका म्हणून संबोधतात तो फोन केल्यावर "हाय हलो" वगैरे न म्हणता "ओ ऐका ना...मी काय म्हणतो " अशी सुरुवात करतो. "जल्ला तुला कल्ला"
मित्रांनो, गाण्यात जसे तेच तेच ओळींचे लकेर येतात त्यांना पालुपद म्हणतात, तसे बोलताना न कळत आपल्या जिव्हेला लागलेल्या लकबींचा भाग म्हणजे मराठी लोकांच्या संभाषणातील काही आठवतात ती पालुपदे... आपलं.... म्हणून म्हटलं... काय समजलं... हिंदी भाषिक - मतलब किंवा मतबल... आप बिलीव नहीं करोगे... इंग्रजी संवादात - आय मीन... प्रौढी दर्शक - आय से... आपण आता यात भर घालावी ... बर का ...

आनंदाचे डोही आनंद तरंग (तीन)

ज्ञानोबाचे पैजार ·

पैसा 14/07/2013 - 19:27
पैजारबुवा, समजून घेण्यासाठी प्रिंट औट काढत आहे!

जेपी 14/07/2013 - 21:59
उपदेश कळाला ..... बाकी डोक्यावरुन गेल.. अजुनहि एकटा

In reply to by लॉरी टांगटूंगकर

सुबोध खरे 15/07/2013 - 09:29
नवर्याला बैल का म्हणतात ? कारण सर्व बायका स्वतःला गरीब गाय समजत असतात असे ऐकले आहे

In reply to by संजय क्षीरसागर

लग्न काय चीज आहे याची कल्पना नसलेली व्यक्ती या जगात दुर्मिळ आहे, तद्वत मुक्ती ही आपल्या प्रत्येकाची आंतरीक आस आहे. त्यामुळे या पोस्टवर एकझॅक्टली असेच प्रतिसाद येत रहातील. ज्यांनी कधी मुक्त आयुष्याचा अनुभव घेतला आहे ते आनंदुन जातील. स्वतःला रिलेट करु शकतील. त्यांना नवी दिशा दिसेल. आपणही मुक्त होउ शकतो असा त्यांना विश्र्वास वाटेल. जे वंचीत आहेत ते: या लेखनातल्या तृटी शोधत बसतील किंवा असहमत होतील अथवा घाबरुन काहिच प्रतिक्रीया देणार नाही पण मजा अशीये, लेखनात त्रूटी असण शक्यच नाही कारण तो एक अनुभव आहे. त्या मुळे जे असहमत आहेत किंवा जे घाबरुन या लेखावर काही प्रतिक्रीया देत नाहीत त्या सगळ्यांना मी कळवळुन सांगतो मी म्हणतो म्हणुन याचा एकदा अनुभव घ्याच मग माझ्या आश्रमाचा पत्ता शोधण्यासाठी जीवाचा आटापीटा कराल याची मला गॅरेंटी आहे. _____________ जे खातो तेच ...... (संजयजी कृ. ह. घ्या. ही न. वि.) (कच्च्या मडक्या सारखा)

स्पंदना 15/07/2013 - 09:14
सांगतो पैजार। होउनी बेजार। आता तरी बये दया दाखवावी! कशास सोफा। विचार तो कोता। गटारच बरी समजावी। हलके घ्या हो बुवा. लेखन आवडले हे वे. सां. न लगे

सस्नेह 15/07/2013 - 10:40
जगात 'गरीब गायी' नसत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? पैजारबुवांनी आश्रम कधी स्थापन केला म्हणायचा ?

In reply to by सस्नेह

स्नेहांकीता ताईंच्या वाक्यात थोडी दुरुस्ती जगात 'गरीब गायी' असत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? आश्रमाच म्हणाल तर सध्या आम्ही आश्रमवासीच आहोत. सध्या गृहस्थाश्रमात असतो आणि लवकरच वानप्रस्थाश्रमात जाणार आहे. वृध्दाश्रमा पेक्षा तो केव्हाही बरा.

पैसा 14/07/2013 - 19:27
पैजारबुवा, समजून घेण्यासाठी प्रिंट औट काढत आहे!

जेपी 14/07/2013 - 21:59
उपदेश कळाला ..... बाकी डोक्यावरुन गेल.. अजुनहि एकटा

In reply to by लॉरी टांगटूंगकर

सुबोध खरे 15/07/2013 - 09:29
नवर्याला बैल का म्हणतात ? कारण सर्व बायका स्वतःला गरीब गाय समजत असतात असे ऐकले आहे

In reply to by संजय क्षीरसागर

लग्न काय चीज आहे याची कल्पना नसलेली व्यक्ती या जगात दुर्मिळ आहे, तद्वत मुक्ती ही आपल्या प्रत्येकाची आंतरीक आस आहे. त्यामुळे या पोस्टवर एकझॅक्टली असेच प्रतिसाद येत रहातील. ज्यांनी कधी मुक्त आयुष्याचा अनुभव घेतला आहे ते आनंदुन जातील. स्वतःला रिलेट करु शकतील. त्यांना नवी दिशा दिसेल. आपणही मुक्त होउ शकतो असा त्यांना विश्र्वास वाटेल. जे वंचीत आहेत ते: या लेखनातल्या तृटी शोधत बसतील किंवा असहमत होतील अथवा घाबरुन काहिच प्रतिक्रीया देणार नाही पण मजा अशीये, लेखनात त्रूटी असण शक्यच नाही कारण तो एक अनुभव आहे. त्या मुळे जे असहमत आहेत किंवा जे घाबरुन या लेखावर काही प्रतिक्रीया देत नाहीत त्या सगळ्यांना मी कळवळुन सांगतो मी म्हणतो म्हणुन याचा एकदा अनुभव घ्याच मग माझ्या आश्रमाचा पत्ता शोधण्यासाठी जीवाचा आटापीटा कराल याची मला गॅरेंटी आहे. _____________ जे खातो तेच ...... (संजयजी कृ. ह. घ्या. ही न. वि.) (कच्च्या मडक्या सारखा)

स्पंदना 15/07/2013 - 09:14
सांगतो पैजार। होउनी बेजार। आता तरी बये दया दाखवावी! कशास सोफा। विचार तो कोता। गटारच बरी समजावी। हलके घ्या हो बुवा. लेखन आवडले हे वे. सां. न लगे

सस्नेह 15/07/2013 - 10:40
जगात 'गरीब गायी' नसत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? पैजारबुवांनी आश्रम कधी स्थापन केला म्हणायचा ?

In reply to by सस्नेह

स्नेहांकीता ताईंच्या वाक्यात थोडी दुरुस्ती जगात 'गरीब गायी' असत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? आश्रमाच म्हणाल तर सध्या आम्ही आश्रमवासीच आहोत. सध्या गृहस्थाश्रमात असतो आणि लवकरच वानप्रस्थाश्रमात जाणार आहे. वृध्दाश्रमा पेक्षा तो केव्हाही बरा.
उनक जे समोर आहे ते बिनशर्त खाणे हा बायकोच्या जाचातुन सुटायचा सर्वोत्तम मार्ग आहे. तीने जे बनवले ते बिनशर्त खाल्ले की मग तक्रारीला जागाच रहात नाही. पण मुकाट खायला तुमचे मन धजवत नाही. आणि "तुम्हाला माझे कौतुकच नाही" असे म्हणत बायको हॉटेल मधुन पार्सल आणु देत नाही. आपले लगाम बायको कडे आहेत हे आपण उघडपणे नाकारतो (किंवा चारचौघात तसे कबुल करायला लाजतो). पण त्या मुळे सत्य लपुन रहात नाही आणि मग चारचौघात बायकोच्या इशार्‍यावर नाचत नाही हे दाखवणार कस?

गंप्या ची विनोद ग्रहिता

राजा सोव्नी ·

अनिरुद्ध प 30/05/2013 - 13:24
परोपकारी गम्पु,पु ल देशपान्डे यान्ची आठ्वण झाली,त्यामुळे 'गम्पु' हे पात्र विनोदासाठी वाहिलेले आहे असे वाटते.

गवि 30/05/2013 - 17:33
"हसू नका बरे" हे सदर माझ्या लहानपणी "चंपक"मधे यायचे. अजूनही येत असेल. त्या तोडीचं किंबहुना त्याला मागे टाकणारं लिखाण आज बर्‍याच वर्षांनी वाचलं.

अनिरुद्ध प 30/05/2013 - 13:24
परोपकारी गम्पु,पु ल देशपान्डे यान्ची आठ्वण झाली,त्यामुळे 'गम्पु' हे पात्र विनोदासाठी वाहिलेले आहे असे वाटते.

गवि 30/05/2013 - 17:33
"हसू नका बरे" हे सदर माझ्या लहानपणी "चंपक"मधे यायचे. अजूनही येत असेल. त्या तोडीचं किंबहुना त्याला मागे टाकणारं लिखाण आज बर्‍याच वर्षांनी वाचलं.
गंप्या च्या मते आनंदी जीवनात विनोदाचा फार मोठा वाटा आहे,चेहऱ्या वरचे हास्य सर्वाना आनंद दाई वा टते ,मनात आणले तर छोट्या,छोट्या गोष्टीतहि विनोद सापडू शकतो , विनोद शोधण्या साठी चौकस बुद्धी व निरीक्षण शक्ती चांगली हवी स्वयंपाक घरातल्या पंचपाल्यात देखील विनोद सापडतो ,काळा मसाला ला ,काळा मस आला , म्हंटले तिखट आहे ला ती खट आहे म्हंटले कि विनोद होतो. गंप्या सतत काहिना काही विनोद शोधण्याच्या मागे असतो ,असेच एकदा त्याला एका महिला मंडळाची स्मरणिका वाचून खूपच गंमत वाटली .

नायक क्रमांक एक

ज्ञानोबाचे पैजार ·

अभ्या.. 02/04/2013 - 18:34
सुरुवातीचे हन्न हन्न हन्न वाले मुजिक राह्यले माऊली. ते पण भारी हाय. :)

In reply to by श्रीरंग_जोशी

नायकाची अंतिम निवड अजुन झाली नाही. जोशीसर विचार करा येताय का पुण्याला? या निमित्त मि.पा.वरच्या समस्त पुरुष मंडळींना ऑडीशन देण्याचे आव्हान करतो. मराठी सिनेमाला एक नवा चेहरा दाखवुया. मि.पा. मॅनचा. पाशवी शक्तींनी क्षमा करावी हिरवीन आम्ही आधिच ठरवली आहे. पण खलनायिकेची जागा अजुन रिकामी आहे.

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 04/04/2013 - 23:34
बहुत धण्यवाद हां काय अभ्या ;) मात्र हिरवीण कशी आहे ते कळाल्यावर मगच कुबूल करण्यात येईल याची दिग्दर्शकांनी नोंद घ्यावी =))

In reply to by बॅटमॅन

तुम्हाला हिरवीणीत कशाला इंट्रेस्ट? तुम्ही आपले अभिनय कौशल्य दाखवण्या साठी सिनेमा घेताय की....? हिरवीण आमच्या शेजारच्या चाळीत रहाते हे वाचले नाही बहुतेक आपण.... आमची करडी नजर असेल तिच्यावर. म्हणुनच तुम्ही किंवा रंगरावां सारख्या झंटलमन ना विचारले. @ पुजा बाई, आम्हाला एक निखळ विनोदी चित्रपट बनवायचा आहे... भयपट नाही.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, नायिकेच्या बापाच्या भूमिकेसाठी आमची निवड केली तरी आम्ही समाधान मानू? बाकी या फोटोतला तरूण कसा वाटतो नायक म्हणून. फोटो खफवरून साभार.

आतिवास 03/04/2013 - 08:10
कंसातल्या सूचना मजेदार आहेत. बहुतेक चित्रिकरण अशाच पद्धतीने होत असावे अशी शंका येतेच म्हणा :-)

धन्या 04/04/2013 - 00:09
आ व रा !!!
ताकाचे लपवुन भांड, उगा दाखवी मज अंड
हे वाचून डोळे भरुन आले आणि घातलेली मांडी मोडावीशी वाटली. ;)

पैसा 05/04/2013 - 23:56
मजेशीर! मी तर हीरो हिरोईनपेक्षा शक्ती कपूर आणी जॉनी लीव्हरची भूमिका कोण करणार याच्या विचारात आहे! =))

In reply to by यशोधरा

त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा,

बरखा 09/12/2016 - 12:39
"त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा, " हिरवीण कशी हवी आहे. काय अपे़क्षा आहेत हिरवणी बाद्दल.....

ज ह ब ह र ह द ह स्त! =)) =)) तुफान हसलो पैबू माउली! पैबू - हेही आवडल्या गेले आहे. आमचे एक (तसे खूपच आहेत) गैबू मित्र आहेत त्यांचाशी यमक छान जुळालंय त्यामुळे! Sandy

अभ्या.. 02/04/2013 - 18:34
सुरुवातीचे हन्न हन्न हन्न वाले मुजिक राह्यले माऊली. ते पण भारी हाय. :)

In reply to by श्रीरंग_जोशी

नायकाची अंतिम निवड अजुन झाली नाही. जोशीसर विचार करा येताय का पुण्याला? या निमित्त मि.पा.वरच्या समस्त पुरुष मंडळींना ऑडीशन देण्याचे आव्हान करतो. मराठी सिनेमाला एक नवा चेहरा दाखवुया. मि.पा. मॅनचा. पाशवी शक्तींनी क्षमा करावी हिरवीन आम्ही आधिच ठरवली आहे. पण खलनायिकेची जागा अजुन रिकामी आहे.

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 04/04/2013 - 23:34
बहुत धण्यवाद हां काय अभ्या ;) मात्र हिरवीण कशी आहे ते कळाल्यावर मगच कुबूल करण्यात येईल याची दिग्दर्शकांनी नोंद घ्यावी =))

In reply to by बॅटमॅन

तुम्हाला हिरवीणीत कशाला इंट्रेस्ट? तुम्ही आपले अभिनय कौशल्य दाखवण्या साठी सिनेमा घेताय की....? हिरवीण आमच्या शेजारच्या चाळीत रहाते हे वाचले नाही बहुतेक आपण.... आमची करडी नजर असेल तिच्यावर. म्हणुनच तुम्ही किंवा रंगरावां सारख्या झंटलमन ना विचारले. @ पुजा बाई, आम्हाला एक निखळ विनोदी चित्रपट बनवायचा आहे... भयपट नाही.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, नायिकेच्या बापाच्या भूमिकेसाठी आमची निवड केली तरी आम्ही समाधान मानू? बाकी या फोटोतला तरूण कसा वाटतो नायक म्हणून. फोटो खफवरून साभार.

आतिवास 03/04/2013 - 08:10
कंसातल्या सूचना मजेदार आहेत. बहुतेक चित्रिकरण अशाच पद्धतीने होत असावे अशी शंका येतेच म्हणा :-)

धन्या 04/04/2013 - 00:09
आ व रा !!!
ताकाचे लपवुन भांड, उगा दाखवी मज अंड
हे वाचून डोळे भरुन आले आणि घातलेली मांडी मोडावीशी वाटली. ;)

पैसा 05/04/2013 - 23:56
मजेशीर! मी तर हीरो हिरोईनपेक्षा शक्ती कपूर आणी जॉनी लीव्हरची भूमिका कोण करणार याच्या विचारात आहे! =))

In reply to by यशोधरा

त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा,

बरखा 09/12/2016 - 12:39
"त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा, " हिरवीण कशी हवी आहे. काय अपे़क्षा आहेत हिरवणी बाद्दल.....

ज ह ब ह र ह द ह स्त! =)) =)) तुफान हसलो पैबू माउली! पैबू - हेही आवडल्या गेले आहे. आमचे एक (तसे खूपच आहेत) गैबू मित्र आहेत त्यांचाशी यमक छान जुळालंय त्यामुळे! Sandy
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

जळ.लि..

गवि ·

स्पंदना 07/01/2013 - 18:16
हापसणे, भडभडून, लगदा, बिळबिळीत, षंढ, नागवा, हिजडा, नासवणे, खरुज, निखारा, जळजळ, मळमळ, तडफड, फडफड, आचके, रक्ताची गुळणी, उकिरडा, गावकुस, गटारं, तटतटून, चिळकांड्या, फराफरा, टराटर, पच्चकन, ढवळून, आसूड, कडकलक्ष्मी, फटके, चामडी,खच्चून...
गवि __/\__!! चला गवि इज बॅक.

चिर्कुट 07/01/2013 - 18:23
मिळ.लि. - बरेच दिवसांपासून गविकाकांच्या लेखनविषयक सल्ल्यांची उणीव भासत होती. मस्त मस्त. (करा आता याचे जळ.लि.) :D स्वाध्यायाची उत्तरे सवडीने..

-"काळ्यानिळ्या पडलेल्या गालांच्या आणि सुजलेल्या डाव्या डोळ्याच्या आरश्यातल्या उजवीकडच्या प्रतिबिंबाकडे पाहात मी स्वतःलाच प्रश्न केला.. "लिहीशील पुन्हा असे लेख? बोल.. लिहीशील?" ____/\____!!

प्रचेतस 07/01/2013 - 19:50
काळ्यानिळ्या पडलेल्या गालांच्या आणि सुजलेल्या डाव्या डोळ्याच्या आरश्यातल्या उजवीकडच्या प्रतिबिंबाकडे पाहात मी स्वतःलाच प्रश्न केला.. "लिहीशील पुन्हा असे लेख? बोल.. लिहीशील?
अमर अकबर अ‍ॅन्थनी मधला अमिताभचा अजरामर सीन आठवला. बाकी लिखाण लैच जळजळीत, दणदणीत, खणखणीत की काय ते.

मराठे 07/01/2013 - 21:16
मिळ.लि. चे जळ.लि. प्रमाणेच भडक.लि (भडकाऊ लिखाण) मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काही टिपा असतील तर द्या हो गवि. आजकाल भडक.लि. ला २०० प्रतिसाद कुठेच गेले नाहीत. उदा. तुमच्याच स्वाध्यायातलं हे वाक्यः मिळ.लि. : "नगरपालिका उद्यानात फुलंच फुलं उगवली होती. प्रसन्न हवेत पक्ष्यांचा पाखरहाट चालला होता.. किलबिलीने आसमंत भरला होता.." भडक.लि. : "त्या भंगीवाड्याच्या नाल्यालगतच्या बागेत सगळी फॉरेनची झाडं आणि फुलं! सगळे साले एनाराय अर्ध्या चड्ड्या घालून धावत होते. वेगवेगळ्या रिंगटोनचे त्यांचे मोबाईल वाजत होते आणि 'व्हेन इ वॉज इन यु-एस' हे भरतवाक्य ऐकू येत होतं. ही साली एनारायची जातच..." इ.इ.

नंदन 07/01/2013 - 23:35
मस्त! या जळ.लि स्लमडॉगला दिलेली देशीवादाची डूब म्हणावे काय? ;)

सहज 08/01/2013 - 06:16
लै भारी! गृहपाठः जेव्हा आजचे जळ. लि. शिळे [पक्षी: मिळ. ली] होईल तेव्हा नवे जळ. लि काय असेल त्याचे पाच शब्द लिहणे.

बुचकळ्या, फुटाण्या, बत्ताशा किंवा सटवे, बाजारवसवी, (ही थोडी जुन्या काळची, पण ग्लॅमरचं पोटेंशिअल असणारी) विशेषणं कशी वाटतील गविकाका?
-"आपण दोघांनी एकमेकांना विसरुन गेलेलंच चांगलं.. ती हातातल्या चाफ्याच्या फुलाची पाकळी कुस्करत म्हणाली."
१. अरे ए कुरमुर्‍या, दमडी मिळवायची अक्कल नाही तुला. माझ्या म्हतारीला समजलं तर बुकणी (=पावडर, कातकरी परिभाषाकोष) करून आंघोळ घालेल ती मला. चल फुट इथून! २. काय रे लिमिटलेस प्राण्या, तुझं इंटीग्रेशन केलं तरी माझ्या टाईम डिफरन्शियलच्या अर्ध्याएवढं होणार नाही. माझा विचार काय करतोस?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

दादा कोंडके 08/01/2013 - 16:12
काय पण उदाहरण. बिलकूल जम्या नही. त्यापेक्षा हे कसं वाटतं बघा, त्या कुबट आंधार्‍या खोलीचं फक्त नावालाच कडी असलेलं दार बंद करून दोनच मिनिटात सैल होउन निपचित पडलेल्या म्हाद्याला, "मुडद्या, तुझ्यापेक्षा तो लूत भरलेला कोपर्‍यावरचा संत्या जास्त वेळ दम काढतोकी!" कित्येक महिन्यात पाण्याचा थेंब न लागलेल्या आपल्या केसांच्या जटात बोट घालून खरा खरा खाजवत गुळव्वा शब्द थूंकत म्हणाली. :)

पैसा 08/01/2013 - 09:27
त्याची नजर खूपच भेदक होती. ती नजर तिच्या निळ्या डोळ्यांना आरपार भेदून गेली..तिने नकळत डोळे मिटून घेतले.
तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी तिच्याकडे टक लावून पहात होता. ती नजर तिच्या मस्तकात गेली. तिने भडकून डोळे एकदा मिटले आणि गरजली... "साल्या,.... जमतंय. पुढचा लेख लवकर टाका हो. किती उशीर करताय??? :D

In reply to by पैसा

राघव 08/01/2013 - 16:36
हे कसं वाटतंय...? "साल्या,.." "नाल्यातल्या सांडपाण्यात पडलेल्या गंजलेल्या टिनाच्या फुटक्या टमरेला..." "शेवाळल्या चिखलानं माखलेल्या फाटक्या पायजम्याच्या तुटक्या नाड्या..." "उकीरड्यात फेकलेल्या कुजक्या शेंगदाण्याच्या पिचल्या टरफला..." बाकी लेख क्लास!! पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत... राघव

In reply to by राघव

jaypal 08/01/2013 - 17:39
शेवाळल्या चिखलानं माखलेल्या फाटक्या पायजम्याच्या तुटक्या नाड्या... राघव साहेब आपन काय पायजेल ते ऐकु पण साला नाडीचा नाव काढयच नाय. ;-) गवि पेशल लेख टाळ्या आणि शिट्या.

ऋषिकेश 08/01/2013 - 09:54
एका शिकवणीवरून लगेच ती पातळी गाठणे कठीण आहे. पण तरी स्वाध्याय सोडवायचा प्रयत्न केलाय. तुम्ही दिलेला शब्दसंग्रह शक्य तितका वापरलाही आहे.
-"त्याची नजर खूपच भेदक होती. ती नजर तिच्या निळ्या डोळ्यांना आरपार भेदून गेली..तिने नकळत डोळे मिटून घेतले.."
त्या भो**च्या वखवखलेल्या जळजळीत कटाक्षाने तिच्या फडफड करणार्‍या निळ्या डोळ्यांना नासवल्याचा भास झाला आणि तिने गच्चकन आपले डोळेच मिटून घ्तले
-"नगरपालिका उद्यानात फुलंच फुलं उगवली होती. प्रसन्न हवेत पक्ष्यांचा पाखरहाट चालला होता.. किलबिलीने आसमंत भरला होता.."
गटाराच्यालगतच चार कुंड्याटाकून त्याला नगरपालिकेचे उद्यान असे ते म्हणत. तिथे उगवलेल्या चार घाणेरीच्या फुलांचा वास त्या गटाराच्या वासात मिसळला असला आणि शेजारी मेलेल्या उंदरासाठी कावळे कलकलाट करत असले तरी त्याला तो भाग प्रसन्न वाटत होता.
-"आपण दोघांनी एकमेकांना विसरुन गेलेलंच चांगलं.. ती हातातल्या चाफ्याच्या फुलाची पाकळी कुस्करत म्हणाली."
ती म्हन्ली की माझ्या दारुडा बा मला एका भाडखावाबरोबर शाह्रात लगीन लाऊन पाठवणार हाये. या वाक्याने तिच्या हातातल्या चाफ्यासारखं तिला कुस्करता येणार न्हाई म्हणून माझं काळीज गलबललं
-"पुण्यात त्या पहाटे प्रचंड थंडी होती. मी कुडकुडतच बाईकला किक मारली.. सुट्टीच्या दिवशीही पहाटे बाहेर पडण्याचा वैताग "तिच्या" आठवणीने एकदम दूर पळाला.."
अंगावर दोन ठिकाणी ठिगळं लावलेला एक पातळसा शर्ट घातला होता. त्या हाडांना ढवळून काढणार्‍या थंडीतही तिला भेटाया मिळणार म्हणून त्या थंडीला चार शिव्या हासडल्या आणि तिच्या आठवणीने तटतटून बाईकला कीक मारली
-"काळ्यानिळ्या पडलेल्या गालांच्या आणि सुजलेल्या डाव्या डोळ्याच्या आरश्यातल्या उजवीकडच्या प्रतिबिंबाकडे पाहात मी स्वतःलाच प्रश्न केला.. "लिहीशील पुन्हा असे लेख? बोल.. लिहीशील?"
(&*($%&^&^%%^$##$%^^&*&*&^%%$%^%&%%##$%&^$%#%&*^&% "अयाइई **** **** ******, गाल, सुजलेले डोळे.. "लिहीशील पुन्हा असे लेख? बोल.. लिहीशील?"

In reply to by ऋषिकेश

खबो जाप 08/01/2013 - 15:09
(&*($%&^&^%%^$##$%&*&*&^%%$%^%&%%##$%&^$%#%&*^&% "अयाइई **** **** ******, गाल, सुजलेले डोळे.. "लिहीशील पुन्हा असे लेख? बोल.. लिहीशील?"
च्यायला गविच लिहायचे सोडून देतात वाटत .....

कवितानागेश 08/01/2013 - 13:50
गविकाका, हे तुमचे वर्ग झाले की मी 'पोलिटिअक्ली करेक्ट' लिहिण्याचे वर्ग सुरु करणार आहे. आणि त्यावर शिक्षक म्हणून २ आयडींची नेमणूक करणार आहे! ;)

निश 08/01/2013 - 15:03
गविसाहेब, मुळात लिहिणार्‍याच्या लिखाणात ताकद असावी लागते. जशी ती तुमच्या लिखाणात आहे. विचारातुन आलेल्या लिखाणाला वाचकपसंती मिळायला जळजळीत भडकाऊ किवां मिळमिळीत, बोचर्‍या लिखाणाची आवश्यकता नसतेच मुळि तर लिखाण वाचकपसंतीस उतरायला त्या लिखाणातील ताकद, विचार, वाचकाना काय सांगायचे आहे ते अतिशय सोप्प्या भाषेत लिहायची हातोटी ह्यांची गरज असते. उलट ज्या लेखकांनी अतिशय साध्या पण मनाचा ठाव घेणार्‍या भाषेत लिहिल आहे त्याच लेखक, लिखिका व कवी व कवयत्रींच लिखाण हे जास्त वाचकपसंतीस उतरले आहे.

चिगो 08/01/2013 - 15:45
भेंडी.. भें*** काय गां*फाड लिहलंय, साला.. भुकनीच्या भाषेला पार *ट्यावर कोललाय. चिंध्या केल्यात पार.. मीळ.लि.. गविंनी आपल्या अफाट अभ्यासातून जीवनातील भीषण अनुभवान्वये येणार्या दग्ध भाषाशैलीचे अत्यंत अभ्यासपुर्ण विश्लेषण वाचकांसमोर मांडले आहे.. ;-) ख.खु. प्र.. जबराट लिहिलंय, गविराज.. एकदम झट्याक..

छोटा डॉन 08/01/2013 - 16:52
लेख रोचक आहे, काही प्रतिसादही गंमतशीर आहेत. वाचतो आहे. खरी राऊडी भाषा म्हणाल तर दुनयादारीमधल्या दिग्याची (नाव बहुतेक चुकीचे असु शकते) आणि 'बाकी शुन्य' मधल्या काही प्रकरणांची. लेटेस्ट उदाहरण म्हणजे मोरया, झेंडा इत्यादी पिक्चरमधला संत्याचा रोल म्हणजे ही भाषा. - छोटा डॉन

वपाडाव 08/01/2013 - 17:15
"सदस्यत्व गेले भो**त" असा आशय असलेला एक प्रतिसाद मी लै वेळचा शोधत आहे पण मिळेना... तो तर ह्या सर्वात हुच्च/अव्वल दर्जाचा आहे... बाकी सर्व चाय कम पाणी आहेत... समजदार लोकांनी शोधुन दुवा द्यावा...

In reply to by वपाडाव

गवि 08/01/2013 - 17:19
या लेखामागे उपरोधात्मक करमणूक असा उद्देश आहे हा डिस्क्लेमर वेगळा टाकलेला नाही, पण या धाग्याच्या निमित्ताने इथलेच पूर्वीचे धागे, प्रतिसाद, वादविवाद, चकमकी आणि त्यातील शब्दरचना (जळ.लि किंवा अदरवाईज) उसवून काढू नये, अन्यथा उगीचच वेगळी, नकोशी दिशा लागून विषय भरकटेल. ही फक्त सूचना, बाकी प्रत्येकाची इच्छा...

सूड 08/01/2013 - 17:56
>>"त्याची नजर खूपच भेदक होती. ती नजर तिच्या निळ्या डोळ्यांना आरपार भेदून गेली..तिने नकळत डोळे मिटून घेतले.." लहान कार्टी दुसर्‍या पोराच्या हातातल्या आईसक्रीमकडे जसं वखवखलेल्या नजरेनं बघतात तसं तो तिच्याकडं टक लावून बघत होता. तिनं निळ्या रॉकेलसारखे दिसणारे तिचे डोळे गपकन मिटले. >"नगरपालिका उद्यानात फुलंच फुलं उगवली होती. प्रसन्न हवेत पक्ष्यांचा पाखरहाट चालला होता.. किलबिलीने आसमंत भरला होता.." माताय !! कोणत्या नगरपालिकेच्या उद्यानात फुलं फुललेली दिसली ते दाखवा आधी. >>"आपण दोघांनी एकमेकांना विसरुन गेलेलंच चांगलं.. ती हातातल्या चाफ्याच्या फुलाची पाकळी कुस्करत म्हणाली." "अंऽऽऽऽय ही मजनूगिरी बास झाली हां आता" असं म्हणत तिने तिच्या हातातलं सिग्रेटिचं थोटूक टेबलावर कुस्करलं. >"पुण्यात त्या पहाटे प्रचंड थंडी होती. मी कुडकुडतच बाईकला किक मारली.. सुट्टीच्या दिवशीही पहाटे बाहेर पडण्याचा वैताग "तिच्या" आठवणीने एकदम दूर पळाला.." तसल्या हाडं गोठवणार्‍या थंडीत मला बाईकवरुन जावं लागत होतं. माताय सुट्टीच्या दिवशी तंगड्या वर करुन पडायचं सोडून तिच्यासाठी **ला पाय लावून पळावं लागत होतं.

Nile 09/01/2013 - 01:11
पण हे अशी कन्व्हर्टं केलेली भाषा वापरणे म्हणजे भाडोत्री गुंडाच्या दमावर टिवटीव करण्यासारखं आहे. वरणाभात खाण्यार्‍याने मिरचीची फोडणी दिली म्हणजे ते खाऊन अस्सल मिरचीचा ठेचा खाल्यावर जशी जळते तशी जळणारे थोडीच? उगाच अवसान आणून भेंचोद वगैरे लिहून बसाल पण समोरच्या नुसतं भोसडीच्या म्हणलं तर ओलं व्हायचं. आपल्याल्या पेलेल तेव्हढीच घ्यावी बोडख्यावर, नाहीतर "मोठी दिसली म्हणून हौसेनं घेतली अन पोसता पोसता कंबर खचली" असं व्हायचं, काय? . . . . .. . . (काय मास्तर जमलंय का?)

चौकटराजा 10/01/2013 - 08:21
आता कळले कळफलकावर साहेबाने "*:" ही खूण का टाकली आहे ते ! आम्हाला आतपर्यंत त्याचा उपयोग वाईल्ड कार्डात होतो एवढेच कळले. मायला ष्टार वापरला की पांढर्‍या कॉलरला देखील जळ " लि" स्कूल ऑफ लेखन चे सुरक्षित ( शेणसारसंमत) सदस्य होता येते की ? म्या आता फुडच्या लिखानापासून या ष्टाराचा वापर करनार मग् माज्या लिखानांव पेचडी करन्यासाठी कशी वावटळ उठती बघा ! आन क्रांतिकारी लेखनापायी मला साहित्य आकादमीचा पुरस्कार बी मिळणार !

तर्री 10/01/2013 - 15:37
जळ.लि.......फळ.लि..... अपत्य लवकरच आपल्या पदरी टाकतो . बेहद्द आआआवडले.

नाना चेंगट 10/01/2013 - 15:49
च्यामायचा ट* ! अरे काय हे ऑ ! हसुन हसून पोट दुखलं रे !! बाकी आम्ही साजुक तुपातले लेख लिहिले तरी कधी काळी उडत होते... असले लिहिले असते तर इन्स्पे़क्टर सायबांनी सैबर क्रैम मधेच आत घेतले असते :)

बोलघेवडा 12/06/2016 - 17:47
ह.ह.पु.वा. होतकरू नवीन लेखकांना यातून मार्गदर्शन मिळेल अशी आशा वाटते . गविशेट, लिवा कि वाइच कायतरी!! लेखणीत मज्जा हो तुमच्या !!! देव बाकी कोणाच्या बोटात काय ठेवेल सांगता येत नाही!!!

स्पंदना 07/01/2013 - 18:16
हापसणे, भडभडून, लगदा, बिळबिळीत, षंढ, नागवा, हिजडा, नासवणे, खरुज, निखारा, जळजळ, मळमळ, तडफड, फडफड, आचके, रक्ताची गुळणी, उकिरडा, गावकुस, गटारं, तटतटून, चिळकांड्या, फराफरा, टराटर, पच्चकन, ढवळून, आसूड, कडकलक्ष्मी, फटके, चामडी,खच्चून...
गवि __/\__!! चला गवि इज बॅक.

चिर्कुट 07/01/2013 - 18:23
मिळ.लि. - बरेच दिवसांपासून गविकाकांच्या लेखनविषयक सल्ल्यांची उणीव भासत होती. मस्त मस्त. (करा आता याचे जळ.लि.) :D स्वाध्यायाची उत्तरे सवडीने..

-"काळ्यानिळ्या पडलेल्या गालांच्या आणि सुजलेल्या डाव्या डोळ्याच्या आरश्यातल्या उजवीकडच्या प्रतिबिंबाकडे पाहात मी स्वतःलाच प्रश्न केला.. "लिहीशील पुन्हा असे लेख? बोल.. लिहीशील?" ____/\____!!

प्रचेतस 07/01/2013 - 19:50
काळ्यानिळ्या पडलेल्या गालांच्या आणि सुजलेल्या डाव्या डोळ्याच्या आरश्यातल्या उजवीकडच्या प्रतिबिंबाकडे पाहात मी स्वतःलाच प्रश्न केला.. "लिहीशील पुन्हा असे लेख? बोल.. लिहीशील?
अमर अकबर अ‍ॅन्थनी मधला अमिताभचा अजरामर सीन आठवला. बाकी लिखाण लैच जळजळीत, दणदणीत, खणखणीत की काय ते.

मराठे 07/01/2013 - 21:16
मिळ.लि. चे जळ.लि. प्रमाणेच भडक.लि (भडकाऊ लिखाण) मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काही टिपा असतील तर द्या हो गवि. आजकाल भडक.लि. ला २०० प्रतिसाद कुठेच गेले नाहीत. उदा. तुमच्याच स्वाध्यायातलं हे वाक्यः मिळ.लि. : "नगरपालिका उद्यानात फुलंच फुलं उगवली होती. प्रसन्न हवेत पक्ष्यांचा पाखरहाट चालला होता.. किलबिलीने आसमंत भरला होता.." भडक.लि. : "त्या भंगीवाड्याच्या नाल्यालगतच्या बागेत सगळी फॉरेनची झाडं आणि फुलं! सगळे साले एनाराय अर्ध्या चड्ड्या घालून धावत होते. वेगवेगळ्या रिंगटोनचे त्यांचे मोबाईल वाजत होते आणि 'व्हेन इ वॉज इन यु-एस' हे भरतवाक्य ऐकू येत होतं. ही साली एनारायची जातच..." इ.इ.

नंदन 07/01/2013 - 23:35
मस्त! या जळ.लि स्लमडॉगला दिलेली देशीवादाची डूब म्हणावे काय? ;)

सहज 08/01/2013 - 06:16
लै भारी! गृहपाठः जेव्हा आजचे जळ. लि. शिळे [पक्षी: मिळ. ली] होईल तेव्हा नवे जळ. लि काय असेल त्याचे पाच शब्द लिहणे.

बुचकळ्या, फुटाण्या, बत्ताशा किंवा सटवे, बाजारवसवी, (ही थोडी जुन्या काळची, पण ग्लॅमरचं पोटेंशिअल असणारी) विशेषणं कशी वाटतील गविकाका?
-"आपण दोघांनी एकमेकांना विसरुन गेलेलंच चांगलं.. ती हातातल्या चाफ्याच्या फुलाची पाकळी कुस्करत म्हणाली."
१. अरे ए कुरमुर्‍या, दमडी मिळवायची अक्कल नाही तुला. माझ्या म्हतारीला समजलं तर बुकणी (=पावडर, कातकरी परिभाषाकोष) करून आंघोळ घालेल ती मला. चल फुट इथून! २. काय रे लिमिटलेस प्राण्या, तुझं इंटीग्रेशन केलं तरी माझ्या टाईम डिफरन्शियलच्या अर्ध्याएवढं होणार नाही. माझा विचार काय करतोस?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

दादा कोंडके 08/01/2013 - 16:12
काय पण उदाहरण. बिलकूल जम्या नही. त्यापेक्षा हे कसं वाटतं बघा, त्या कुबट आंधार्‍या खोलीचं फक्त नावालाच कडी असलेलं दार बंद करून दोनच मिनिटात सैल होउन निपचित पडलेल्या म्हाद्याला, "मुडद्या, तुझ्यापेक्षा तो लूत भरलेला कोपर्‍यावरचा संत्या जास्त वेळ दम काढतोकी!" कित्येक महिन्यात पाण्याचा थेंब न लागलेल्या आपल्या केसांच्या जटात बोट घालून खरा खरा खाजवत गुळव्वा शब्द थूंकत म्हणाली. :)

पैसा 08/01/2013 - 09:27
त्याची नजर खूपच भेदक होती. ती नजर तिच्या निळ्या डोळ्यांना आरपार भेदून गेली..तिने नकळत डोळे मिटून घेतले.
तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी तिच्याकडे टक लावून पहात होता. ती नजर तिच्या मस्तकात गेली. तिने भडकून डोळे एकदा मिटले आणि गरजली... "साल्या,.... जमतंय. पुढचा लेख लवकर टाका हो. किती उशीर करताय??? :D

In reply to by पैसा

राघव 08/01/2013 - 16:36
हे कसं वाटतंय...? "साल्या,.." "नाल्यातल्या सांडपाण्यात पडलेल्या गंजलेल्या टिनाच्या फुटक्या टमरेला..." "शेवाळल्या चिखलानं माखलेल्या फाटक्या पायजम्याच्या तुटक्या नाड्या..." "उकीरड्यात फेकलेल्या कुजक्या शेंगदाण्याच्या पिचल्या टरफला..." बाकी लेख क्लास!! पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत... राघव

In reply to by राघव

jaypal 08/01/2013 - 17:39
शेवाळल्या चिखलानं माखलेल्या फाटक्या पायजम्याच्या तुटक्या नाड्या... राघव साहेब आपन काय पायजेल ते ऐकु पण साला नाडीचा नाव काढयच नाय. ;-) गवि पेशल लेख टाळ्या आणि शिट्या.

ऋषिकेश 08/01/2013 - 09:54
एका शिकवणीवरून लगेच ती पातळी गाठणे कठीण आहे. पण तरी स्वाध्याय सोडवायचा प्रयत्न केलाय. तुम्ही दिलेला शब्दसंग्रह शक्य तितका वापरलाही आहे.
-"त्याची नजर खूपच भेदक होती. ती नजर तिच्या निळ्या डोळ्यांना आरपार भेदून गेली..तिने नकळत डोळे मिटून घेतले.."
त्या भो**च्या वखवखलेल्या जळजळीत कटाक्षाने तिच्या फडफड करणार्‍या निळ्या डोळ्यांना नासवल्याचा भास झाला आणि तिने गच्चकन आपले डोळेच मिटून घ्तले
-"नगरपालिका उद्यानात फुलंच फुलं उगवली होती. प्रसन्न हवेत पक्ष्यांचा पाखरहाट चालला होता.. किलबिलीने आसमंत भरला होता.."
गटाराच्यालगतच चार कुंड्याटाकून त्याला नगरपालिकेचे उद्यान असे ते म्हणत. तिथे उगवलेल्या चार घाणेरीच्या फुलांचा वास त्या गटाराच्या वासात मिसळला असला आणि शेजारी मेलेल्या उंदरासाठी कावळे कलकलाट करत असले तरी त्याला तो भाग प्रसन्न वाटत होता.
-"आपण दोघांनी एकमेकांना विसरुन गेलेलंच चांगलं.. ती हातातल्या चाफ्याच्या फुलाची पाकळी कुस्करत म्हणाली."
ती म्हन्ली की माझ्या दारुडा बा मला एका भाडखावाबरोबर शाह्रात लगीन लाऊन पाठवणार हाये. या वाक्याने तिच्या हातातल्या चाफ्यासारखं तिला कुस्करता येणार न्हाई म्हणून माझं काळीज गलबललं
-"पुण्यात त्या पहाटे प्रचंड थंडी होती. मी कुडकुडतच बाईकला किक मारली.. सुट्टीच्या दिवशीही पहाटे बाहेर पडण्याचा वैताग "तिच्या" आठवणीने एकदम दूर पळाला.."
अंगावर दोन ठिकाणी ठिगळं लावलेला एक पातळसा शर्ट घातला होता. त्या हाडांना ढवळून काढणार्‍या थंडीतही तिला भेटाया मिळणार म्हणून त्या थंडीला चार शिव्या हासडल्या आणि तिच्या आठवणीने तटतटून बाईकला कीक मारली
-"काळ्यानिळ्या पडलेल्या गालांच्या आणि सुजलेल्या डाव्या डोळ्याच्या आरश्यातल्या उजवीकडच्या प्रतिबिंबाकडे पाहात मी स्वतःलाच प्रश्न केला.. "लिहीशील पुन्हा असे लेख? बोल.. लिहीशील?"
(&*($%&^&^%%^$##$%^^&*&*&^%%$%^%&%%##$%&^$%#%&*^&% "अयाइई **** **** ******, गाल, सुजलेले डोळे.. "लिहीशील पुन्हा असे लेख? बोल.. लिहीशील?"

In reply to by ऋषिकेश

खबो जाप 08/01/2013 - 15:09
(&*($%&^&^%%^$##$%&*&*&^%%$%^%&%%##$%&^$%#%&*^&% "अयाइई **** **** ******, गाल, सुजलेले डोळे.. "लिहीशील पुन्हा असे लेख? बोल.. लिहीशील?"
च्यायला गविच लिहायचे सोडून देतात वाटत .....

कवितानागेश 08/01/2013 - 13:50
गविकाका, हे तुमचे वर्ग झाले की मी 'पोलिटिअक्ली करेक्ट' लिहिण्याचे वर्ग सुरु करणार आहे. आणि त्यावर शिक्षक म्हणून २ आयडींची नेमणूक करणार आहे! ;)

निश 08/01/2013 - 15:03
गविसाहेब, मुळात लिहिणार्‍याच्या लिखाणात ताकद असावी लागते. जशी ती तुमच्या लिखाणात आहे. विचारातुन आलेल्या लिखाणाला वाचकपसंती मिळायला जळजळीत भडकाऊ किवां मिळमिळीत, बोचर्‍या लिखाणाची आवश्यकता नसतेच मुळि तर लिखाण वाचकपसंतीस उतरायला त्या लिखाणातील ताकद, विचार, वाचकाना काय सांगायचे आहे ते अतिशय सोप्प्या भाषेत लिहायची हातोटी ह्यांची गरज असते. उलट ज्या लेखकांनी अतिशय साध्या पण मनाचा ठाव घेणार्‍या भाषेत लिहिल आहे त्याच लेखक, लिखिका व कवी व कवयत्रींच लिखाण हे जास्त वाचकपसंतीस उतरले आहे.

चिगो 08/01/2013 - 15:45
भेंडी.. भें*** काय गां*फाड लिहलंय, साला.. भुकनीच्या भाषेला पार *ट्यावर कोललाय. चिंध्या केल्यात पार.. मीळ.लि.. गविंनी आपल्या अफाट अभ्यासातून जीवनातील भीषण अनुभवान्वये येणार्या दग्ध भाषाशैलीचे अत्यंत अभ्यासपुर्ण विश्लेषण वाचकांसमोर मांडले आहे.. ;-) ख.खु. प्र.. जबराट लिहिलंय, गविराज.. एकदम झट्याक..

छोटा डॉन 08/01/2013 - 16:52
लेख रोचक आहे, काही प्रतिसादही गंमतशीर आहेत. वाचतो आहे. खरी राऊडी भाषा म्हणाल तर दुनयादारीमधल्या दिग्याची (नाव बहुतेक चुकीचे असु शकते) आणि 'बाकी शुन्य' मधल्या काही प्रकरणांची. लेटेस्ट उदाहरण म्हणजे मोरया, झेंडा इत्यादी पिक्चरमधला संत्याचा रोल म्हणजे ही भाषा. - छोटा डॉन

वपाडाव 08/01/2013 - 17:15
"सदस्यत्व गेले भो**त" असा आशय असलेला एक प्रतिसाद मी लै वेळचा शोधत आहे पण मिळेना... तो तर ह्या सर्वात हुच्च/अव्वल दर्जाचा आहे... बाकी सर्व चाय कम पाणी आहेत... समजदार लोकांनी शोधुन दुवा द्यावा...

In reply to by वपाडाव

गवि 08/01/2013 - 17:19
या लेखामागे उपरोधात्मक करमणूक असा उद्देश आहे हा डिस्क्लेमर वेगळा टाकलेला नाही, पण या धाग्याच्या निमित्ताने इथलेच पूर्वीचे धागे, प्रतिसाद, वादविवाद, चकमकी आणि त्यातील शब्दरचना (जळ.लि किंवा अदरवाईज) उसवून काढू नये, अन्यथा उगीचच वेगळी, नकोशी दिशा लागून विषय भरकटेल. ही फक्त सूचना, बाकी प्रत्येकाची इच्छा...

सूड 08/01/2013 - 17:56
>>"त्याची नजर खूपच भेदक होती. ती नजर तिच्या निळ्या डोळ्यांना आरपार भेदून गेली..तिने नकळत डोळे मिटून घेतले.." लहान कार्टी दुसर्‍या पोराच्या हातातल्या आईसक्रीमकडे जसं वखवखलेल्या नजरेनं बघतात तसं तो तिच्याकडं टक लावून बघत होता. तिनं निळ्या रॉकेलसारखे दिसणारे तिचे डोळे गपकन मिटले. >"नगरपालिका उद्यानात फुलंच फुलं उगवली होती. प्रसन्न हवेत पक्ष्यांचा पाखरहाट चालला होता.. किलबिलीने आसमंत भरला होता.." माताय !! कोणत्या नगरपालिकेच्या उद्यानात फुलं फुललेली दिसली ते दाखवा आधी. >>"आपण दोघांनी एकमेकांना विसरुन गेलेलंच चांगलं.. ती हातातल्या चाफ्याच्या फुलाची पाकळी कुस्करत म्हणाली." "अंऽऽऽऽय ही मजनूगिरी बास झाली हां आता" असं म्हणत तिने तिच्या हातातलं सिग्रेटिचं थोटूक टेबलावर कुस्करलं. >"पुण्यात त्या पहाटे प्रचंड थंडी होती. मी कुडकुडतच बाईकला किक मारली.. सुट्टीच्या दिवशीही पहाटे बाहेर पडण्याचा वैताग "तिच्या" आठवणीने एकदम दूर पळाला.." तसल्या हाडं गोठवणार्‍या थंडीत मला बाईकवरुन जावं लागत होतं. माताय सुट्टीच्या दिवशी तंगड्या वर करुन पडायचं सोडून तिच्यासाठी **ला पाय लावून पळावं लागत होतं.

Nile 09/01/2013 - 01:11
पण हे अशी कन्व्हर्टं केलेली भाषा वापरणे म्हणजे भाडोत्री गुंडाच्या दमावर टिवटीव करण्यासारखं आहे. वरणाभात खाण्यार्‍याने मिरचीची फोडणी दिली म्हणजे ते खाऊन अस्सल मिरचीचा ठेचा खाल्यावर जशी जळते तशी जळणारे थोडीच? उगाच अवसान आणून भेंचोद वगैरे लिहून बसाल पण समोरच्या नुसतं भोसडीच्या म्हणलं तर ओलं व्हायचं. आपल्याल्या पेलेल तेव्हढीच घ्यावी बोडख्यावर, नाहीतर "मोठी दिसली म्हणून हौसेनं घेतली अन पोसता पोसता कंबर खचली" असं व्हायचं, काय? . . . . .. . . (काय मास्तर जमलंय का?)

चौकटराजा 10/01/2013 - 08:21
आता कळले कळफलकावर साहेबाने "*:" ही खूण का टाकली आहे ते ! आम्हाला आतपर्यंत त्याचा उपयोग वाईल्ड कार्डात होतो एवढेच कळले. मायला ष्टार वापरला की पांढर्‍या कॉलरला देखील जळ " लि" स्कूल ऑफ लेखन चे सुरक्षित ( शेणसारसंमत) सदस्य होता येते की ? म्या आता फुडच्या लिखानापासून या ष्टाराचा वापर करनार मग् माज्या लिखानांव पेचडी करन्यासाठी कशी वावटळ उठती बघा ! आन क्रांतिकारी लेखनापायी मला साहित्य आकादमीचा पुरस्कार बी मिळणार !

तर्री 10/01/2013 - 15:37
जळ.लि.......फळ.लि..... अपत्य लवकरच आपल्या पदरी टाकतो . बेहद्द आआआवडले.

नाना चेंगट 10/01/2013 - 15:49
च्यामायचा ट* ! अरे काय हे ऑ ! हसुन हसून पोट दुखलं रे !! बाकी आम्ही साजुक तुपातले लेख लिहिले तरी कधी काळी उडत होते... असले लिहिले असते तर इन्स्पे़क्टर सायबांनी सैबर क्रैम मधेच आत घेतले असते :)

बोलघेवडा 12/06/2016 - 17:47
ह.ह.पु.वा. होतकरू नवीन लेखकांना यातून मार्गदर्शन मिळेल अशी आशा वाटते . गविशेट, लिवा कि वाइच कायतरी!! लेखणीत मज्जा हो तुमच्या !!! देव बाकी कोणाच्या बोटात काय ठेवेल सांगता येत नाही!!!
तुमचं लिखाण मिळमिळीत आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या लिखाणाला वरणभाताची उपमा कधी मिळाली आहे का? तुमच्या शब्दांची तुलना वपु काळेंच्या लेखनाशी केली गेली आहे का? तुमच्या लेखनात ज्वलंत अनुभवविश्व नाही अशी प्रतिक्रिया तुम्हाला मिळाली आहे का? तुमचं लिखाण वाचून तुम्हाला कोणी मिडिऑकर, कार्कुंडा, किंवा एसी केबिनमधे बसून कल्पनेचे मनोरे रचणारा अशी दूषणं दिली आहेत का? वरीलपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर "लाजयुक्त हो" असं असेल तर वाईट वाटून घेऊ नका. पुढे वाचा.

झाली माझी गोष्ट

वामन देशमुख ·

In reply to by अत्रुप्त आत्मा

किसन शिंदे 27/12/2012 - 23:04
ओव्हन मधे घातली एवढी मोठ्ठी पोश्टं तीचा झाला कडक टोश्टं
=)) =)) =)) कविच्या आडनावाचा आणि कवितेचा विरोधाभास वाटतोय. :)

In reply to by ५० फक्त

धन्या 30/12/2012 - 21:38
कुणाचा टोस्ट मोठया ओव्हनमध्ये कडक होईल तर कुणाचा छोटयाशा टोस्टरमध्ये. प्रत्येकाच्या टोस्टच्या कडक होण्यासाठीच्या तापमानाच्या, लागणार्‍या जागेच्या गरजा वेगवेगळ्या असतात.

In reply to by धन्या

सस्नेह 30/12/2012 - 21:42
धाग्याची एकूण लांबी-रुंदी व आशयघनता तसेच विषय-व्याप्ती पाहता मोठ्ठ्यात मोठ्ठा ओव्हनही पुरे पडेल काय शंका वाटते...!

In reply to by सस्नेह

धन्या 30/12/2012 - 21:50
आजपर्यंत विषयाच्या व्याप्तीसंदर्भात "व्यासोच्छीष्टं जगत सर्वम" असं म्हटलं जायचं, कारण व्यासांनी महाभारतात मानवी मनाचे सर्व पैलू, कंगोरे वगैरे वगैरे हाताळले आहेत. तेच आज इथे वामनपंडीतांनी केलं आहे. एक मिपाकर म्हणून मला वामनपंडीतांचा अभिमान वाटतो. काही नतद्र्ष्टांना यानिमित्ताने "यमक्या वामन" नावाचे इतिहासातील वामनपंडीत आठवण्याची शक्यता आहे. पण तिकडे आपण दुर्लक्ष करावे.

तिमा 30/12/2012 - 10:54
कविता कळायला अंमळ कठीण आहे. आपण आपली पुढील कविता, 'मानवी उत्क्रांतीवाद' किंवा ' कवितेतील वर्डस्वर्थचे स्थान' अशा एखाद्या सोप्प्या विषयावर करावी ही विनंती.

वामन देशमुख 02/01/2013 - 17:21
प्रतिसादकांचे आभार. माझ्या पुतण्या-पुतणींना रिझविण्यासाठी मी अश्या बाळबोध रचना करायचो. त्यांना त्यांचा अर्थ कळत नसला तरी नक्कीच आवडायच्या. आता "गोष्ट" मालिकेतल्या जेवढ्या गोष्टी आठवल्या तितक्या इथे लिहिल्यात. शाब्दिक गमतीजमती दोन ते पाच वयोगटातील मुलांना खूप आवडतात आणि त्यातून त्यांची Lateral thinking (?), तर्कशक्ती अधिक चांगल्या तऱ्हेने विकसित होते आणि एकूणच भाषेतील गोडी वाढते असा माझा अनुभव आहे.
एक होता वामन त्याला माझे नमन ----^---- झाले माझे स्तवन
पंडितांच्या पांडित्याला __/\__
धाग्याची एकूण लांबी-रुंदी व आशयघनता तसेच विषय-व्याप्ती पाहता मोठ्ठ्यात मोठ्ठा ओव्हनही पुरे पडेल काय शंका वाटते...!
दिस इज मात्र टू मच हं!
आजपर्यंत विषयाच्या व्याप्तीसंदर्भात "व्यासोच्छीष्टं जगत सर्वम" असं म्हटलं जायचं, कारण व्यासांनी महाभारतात मानवी मनाचे सर्व पैलू, कंगोरे वगैरे वगैरे हाताळले आहेत. तेच आज इथे वामनपंडीतांनी केलं आहे. एक मिपाकर म्हणून मला वामनपंडीतांचा अभिमान वाटतो.
दिस इज मात्र फारच टू मच हं! तरीही धन्स बरं का धन्याजी!
गोळा केल्या चिंध्या घातली त्यांना ठिगळं… 'गोष्टीच्या' खोक्यात कोम्बलंय भलतच सगळं…
हं, बरोब्बर ओळखलंत!
कविता कळायला अंमळ कठीण आहे.
सॉरी...!
आपण आपली पुढील कविता, 'मानवी उत्क्रांतीवाद' किंवा ' कवितेतील वर्डस्वर्थचे स्थान' अशा एखाद्या सोप्प्या विषयावर करावी ही विनंती.
हम्म्मम्म... गम्मत करताय नं!

माझ्या पुतण्या-पुतणींना रिझविण्यासाठी मी अश्या बाळबोध रचना करायचो. त्यांना त्यांचा अर्थ कळत नसला तरी नक्कीच आवडायच्या. आता "गोष्ट" मालिकेतल्या जेवढ्या गोष्टी आठवल्या तितक्या इथे लिहिल्यात. हम्म... हा तुमचा मिपावरील वाचकांच्या सर्वसाधारण वयाचा अंदाज समजायचा का? +D

बॅटमॅन 02/01/2013 - 18:43
एक होते पंडित केलं सर्व विषयांना उष्टं झाली माझी गोष्ट मस्त "वामनी" कविता हो पंडितजी. आवडेश!

In reply to by ५० फक्त

मनीषा 03/01/2013 - 10:13
नाही नाही पन्नासजी ... तुमचा काहीतरी गोंधळ होतो आहे. ही इस्कूलात जाणारी न्हाई.. झाडाखाली पारावर राहणारी आहे.. एका पाठोपाठ एक आली तरी चालतीय .

वामन देशमुख 03/01/2013 - 09:17
हम्म... हा तुमचा मिपावरील वाचकांच्या सर्वसाधारण वयाचा अंदाज समजायचा का?
नाही हो, इस्पिकराव! मिपाकरांच्या वयाचा अंदाज कुणाला येऊ शकेल का? आणि आजकाल स्त्री-पुरुषांना वयं विचारायची नसतात ना!

मूकवाचक 03/01/2013 - 17:15
तीन शब्दांच्या काव्यात ... कविला थोडेच कष्ट आयडीया लै ब्येष्ट सुटली गाडी फाष्ट कवि होता ज्येष्ठ त्याची बायको खाष्ट लाल तिचे ओष्ठ सासू सासरे शिष्ठ कवि झाला रूष्ट त्याने खाल्ले टोस्ट त्यावर पिलं बूस्ट झाला थोडा पुष्ट मग बोलला स्पष्ट तुम्ही आहात दुष्ट विवाह संस्था भ्रष्ट जळो हे शुक्लकाष्ठ पुरे झाले कष्ट एकटे राहणे इष्ट संपली आमची गोष्ट!

In reply to by अत्रुप्त आत्मा

किसन शिंदे 27/12/2012 - 23:04
ओव्हन मधे घातली एवढी मोठ्ठी पोश्टं तीचा झाला कडक टोश्टं
=)) =)) =)) कविच्या आडनावाचा आणि कवितेचा विरोधाभास वाटतोय. :)

In reply to by ५० फक्त

धन्या 30/12/2012 - 21:38
कुणाचा टोस्ट मोठया ओव्हनमध्ये कडक होईल तर कुणाचा छोटयाशा टोस्टरमध्ये. प्रत्येकाच्या टोस्टच्या कडक होण्यासाठीच्या तापमानाच्या, लागणार्‍या जागेच्या गरजा वेगवेगळ्या असतात.

In reply to by धन्या

सस्नेह 30/12/2012 - 21:42
धाग्याची एकूण लांबी-रुंदी व आशयघनता तसेच विषय-व्याप्ती पाहता मोठ्ठ्यात मोठ्ठा ओव्हनही पुरे पडेल काय शंका वाटते...!

In reply to by सस्नेह

धन्या 30/12/2012 - 21:50
आजपर्यंत विषयाच्या व्याप्तीसंदर्भात "व्यासोच्छीष्टं जगत सर्वम" असं म्हटलं जायचं, कारण व्यासांनी महाभारतात मानवी मनाचे सर्व पैलू, कंगोरे वगैरे वगैरे हाताळले आहेत. तेच आज इथे वामनपंडीतांनी केलं आहे. एक मिपाकर म्हणून मला वामनपंडीतांचा अभिमान वाटतो. काही नतद्र्ष्टांना यानिमित्ताने "यमक्या वामन" नावाचे इतिहासातील वामनपंडीत आठवण्याची शक्यता आहे. पण तिकडे आपण दुर्लक्ष करावे.

तिमा 30/12/2012 - 10:54
कविता कळायला अंमळ कठीण आहे. आपण आपली पुढील कविता, 'मानवी उत्क्रांतीवाद' किंवा ' कवितेतील वर्डस्वर्थचे स्थान' अशा एखाद्या सोप्प्या विषयावर करावी ही विनंती.

वामन देशमुख 02/01/2013 - 17:21
प्रतिसादकांचे आभार. माझ्या पुतण्या-पुतणींना रिझविण्यासाठी मी अश्या बाळबोध रचना करायचो. त्यांना त्यांचा अर्थ कळत नसला तरी नक्कीच आवडायच्या. आता "गोष्ट" मालिकेतल्या जेवढ्या गोष्टी आठवल्या तितक्या इथे लिहिल्यात. शाब्दिक गमतीजमती दोन ते पाच वयोगटातील मुलांना खूप आवडतात आणि त्यातून त्यांची Lateral thinking (?), तर्कशक्ती अधिक चांगल्या तऱ्हेने विकसित होते आणि एकूणच भाषेतील गोडी वाढते असा माझा अनुभव आहे.
एक होता वामन त्याला माझे नमन ----^---- झाले माझे स्तवन
पंडितांच्या पांडित्याला __/\__
धाग्याची एकूण लांबी-रुंदी व आशयघनता तसेच विषय-व्याप्ती पाहता मोठ्ठ्यात मोठ्ठा ओव्हनही पुरे पडेल काय शंका वाटते...!
दिस इज मात्र टू मच हं!
आजपर्यंत विषयाच्या व्याप्तीसंदर्भात "व्यासोच्छीष्टं जगत सर्वम" असं म्हटलं जायचं, कारण व्यासांनी महाभारतात मानवी मनाचे सर्व पैलू, कंगोरे वगैरे वगैरे हाताळले आहेत. तेच आज इथे वामनपंडीतांनी केलं आहे. एक मिपाकर म्हणून मला वामनपंडीतांचा अभिमान वाटतो.
दिस इज मात्र फारच टू मच हं! तरीही धन्स बरं का धन्याजी!
गोळा केल्या चिंध्या घातली त्यांना ठिगळं… 'गोष्टीच्या' खोक्यात कोम्बलंय भलतच सगळं…
हं, बरोब्बर ओळखलंत!
कविता कळायला अंमळ कठीण आहे.
सॉरी...!
आपण आपली पुढील कविता, 'मानवी उत्क्रांतीवाद' किंवा ' कवितेतील वर्डस्वर्थचे स्थान' अशा एखाद्या सोप्प्या विषयावर करावी ही विनंती.
हम्म्मम्म... गम्मत करताय नं!

माझ्या पुतण्या-पुतणींना रिझविण्यासाठी मी अश्या बाळबोध रचना करायचो. त्यांना त्यांचा अर्थ कळत नसला तरी नक्कीच आवडायच्या. आता "गोष्ट" मालिकेतल्या जेवढ्या गोष्टी आठवल्या तितक्या इथे लिहिल्यात. हम्म... हा तुमचा मिपावरील वाचकांच्या सर्वसाधारण वयाचा अंदाज समजायचा का? +D

बॅटमॅन 02/01/2013 - 18:43
एक होते पंडित केलं सर्व विषयांना उष्टं झाली माझी गोष्ट मस्त "वामनी" कविता हो पंडितजी. आवडेश!

In reply to by ५० फक्त

मनीषा 03/01/2013 - 10:13
नाही नाही पन्नासजी ... तुमचा काहीतरी गोंधळ होतो आहे. ही इस्कूलात जाणारी न्हाई.. झाडाखाली पारावर राहणारी आहे.. एका पाठोपाठ एक आली तरी चालतीय .

वामन देशमुख 03/01/2013 - 09:17
हम्म... हा तुमचा मिपावरील वाचकांच्या सर्वसाधारण वयाचा अंदाज समजायचा का?
नाही हो, इस्पिकराव! मिपाकरांच्या वयाचा अंदाज कुणाला येऊ शकेल का? आणि आजकाल स्त्री-पुरुषांना वयं विचारायची नसतात ना!

मूकवाचक 03/01/2013 - 17:15
तीन शब्दांच्या काव्यात ... कविला थोडेच कष्ट आयडीया लै ब्येष्ट सुटली गाडी फाष्ट कवि होता ज्येष्ठ त्याची बायको खाष्ट लाल तिचे ओष्ठ सासू सासरे शिष्ठ कवि झाला रूष्ट त्याने खाल्ले टोस्ट त्यावर पिलं बूस्ट झाला थोडा पुष्ट मग बोलला स्पष्ट तुम्ही आहात दुष्ट विवाह संस्था भ्रष्ट जळो हे शुक्लकाष्ठ पुरे झाले कष्ट एकटे राहणे इष्ट संपली आमची गोष्ट!
झाली माझी गोष्ट एक होतं गाव तिथं होतं पोस्ट झाली माझी गोष्ट.

दीप

समयांत ·

In reply to by परिकथेतील राजकुमार

समयांत 21/12/2012 - 15:06
पुस्तक लॉक्ड ओह्ह, तसं हे आवडलंय गिफ्ट. अनलॉक करायचा प्रयत्न करतो. :)

ह भ प 21/12/2012 - 15:32
दैदिप्यमान सुर्याची दुसरी प्रतिमा पृथ्वीवर बनवणे सामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेरचं, पण चिमुकल्या पणतीमधे त्याचा अंश सामावलेला असतो.. तशात तापलेल्या जमिनीत पण शिशीर उन्मळू पहातो.. त्याचं प्रतीक म्हणजे तो कोंब.. उसळी घेऊ पहाणारा.. वाह!! मानलं तुमच्या प्रतिभेला समयांत.. मस्तच लिहिलय..

पहिल्या दोन ओळी वाचून रवींद्रनाथांची कविता आठवली... आपली कविता तर त्याच्याही २ ओळी पुढे जाणारी... खूप सुंदर! मावळतीला जाताना सूर्याने प्रश्‍न केला, "माझ्‍यानंतर या जगाला प्रकाश देण्‍याचे काम कोण करील?".. चंद्र आणि नक्षत्रे, सारे खाली माना घालून स्‍तब्‍ध उभे राहिले.. तेव्‍हां एक चिटुकली पणती चटकन्‌ पुढे होऊन म्‍हणाली, "प्रभो,माझ्‍याकडून जितके होईल, तितके मी करीन......." - रवींद्रनाथ टागोर

समयांत 23/12/2012 - 22:47
अनुप धन्यवाद. मला रविन्द्रनाथांचे साहित्य माहीत नाही आहे, तरी त्यांच्या प्रतिभेची आठवण माझ्या साध्याश्या ओळींमुळे करून दिलीत आभार. :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

समयांत 21/12/2012 - 15:06
पुस्तक लॉक्ड ओह्ह, तसं हे आवडलंय गिफ्ट. अनलॉक करायचा प्रयत्न करतो. :)

ह भ प 21/12/2012 - 15:32
दैदिप्यमान सुर्याची दुसरी प्रतिमा पृथ्वीवर बनवणे सामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेरचं, पण चिमुकल्या पणतीमधे त्याचा अंश सामावलेला असतो.. तशात तापलेल्या जमिनीत पण शिशीर उन्मळू पहातो.. त्याचं प्रतीक म्हणजे तो कोंब.. उसळी घेऊ पहाणारा.. वाह!! मानलं तुमच्या प्रतिभेला समयांत.. मस्तच लिहिलय..

पहिल्या दोन ओळी वाचून रवींद्रनाथांची कविता आठवली... आपली कविता तर त्याच्याही २ ओळी पुढे जाणारी... खूप सुंदर! मावळतीला जाताना सूर्याने प्रश्‍न केला, "माझ्‍यानंतर या जगाला प्रकाश देण्‍याचे काम कोण करील?".. चंद्र आणि नक्षत्रे, सारे खाली माना घालून स्‍तब्‍ध उभे राहिले.. तेव्‍हां एक चिटुकली पणती चटकन्‌ पुढे होऊन म्‍हणाली, "प्रभो,माझ्‍याकडून जितके होईल, तितके मी करीन......." - रवींद्रनाथ टागोर

समयांत 23/12/2012 - 22:47
अनुप धन्यवाद. मला रविन्द्रनाथांचे साहित्य माहीत नाही आहे, तरी त्यांच्या प्रतिभेची आठवण माझ्या साध्याश्या ओळींमुळे करून दिलीत आभार. :)
तेजोवलय असे जे परिपूर्ण अस्मानाचे गिरवणे हे कठीण तरी दीपात सामावलेले शिशिर धरावा अधरी तप्त जमिनीत ज्याने अंकुर ही लयाला होते तरुतून दुसरे...

गाल चोळ फक्त

ज्ञानोबाचे पैजार ·

पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही
1
ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.
1 मी होतो झाडावर ती होती आडावर मी म्हटले म्हणतेस का दोन गानी तीने मला पाजले पानी

@पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif लै खेचून मारलीय बगा =))

सुनील 11/12/2012 - 23:10
काव्यरस: कोडाईकनाल भूछत्री शृंगार भयानक हास्य बिभत्स करुण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस
अगाध कविता!! पुलेशु ...

" पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते "....... लय भारी ! ! !

पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही
1
ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.
1 मी होतो झाडावर ती होती आडावर मी म्हटले म्हणतेस का दोन गानी तीने मला पाजले पानी

@पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif लै खेचून मारलीय बगा =))

सुनील 11/12/2012 - 23:10
काव्यरस: कोडाईकनाल भूछत्री शृंगार भयानक हास्य बिभत्स करुण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस
अगाध कविता!! पुलेशु ...

" पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते "....... लय भारी ! ! !
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,