मी सुखाची भेट घेणे टाळतो ..
वेळ दु:खाला दिलेली पाळतो
मी सुखाची भेट घेणे टाळतो
फारसे घडले नसावे कालही
मी उगाचच रात सारी चाळतो
ही फुलांची वाट आहे पण इथे
ऱोज एखादातरी ठेचाळतो
कोणते असते हवेमध्ये जहर
रंग प्रेमाचा कसा डागाळतो
केवढी जडशीळ दुनिया वाटते
देव जाणे कोण ही सांभाळतो
चालला असता तुझा साधेपणा
मी कुठे रंगारुपावर भाळतो
डॉ. सुनील अहिरराव
मिसळपाव
छायाचित्र जालावरून साभार
भिंतीपल्याड जग असतं, निरखावं की
कड्या काढून दार सताड उघडावं की
पुढे जायचा वसा कधी टाकू नये
ठेच लागली जराशी तर लंगडावं की
आहे त्यातच समाधानी रहावं, पण
इच्छित साध्य करण्या थोडं झगडावं की
घेऊ द्यावा मनालाही निर्णय त्याचा
मनाला जे आवडतं ते, निवडावं की
सदासर्वदा चांगुलपणा अळणी होतो
अधनं मधनं जरा जरासं बिघडावं की
निसटून जातो काळ हातून तरीसुद्धा
जमेल तितकं आपण घट्ट पकडावं की
भिंतीपल्याड जग असतं निरखावं की
कड्या काढून दार सताड उघडावं की
- अपूर्व ओक
सर्वांनी बंद केल्या मजकडे येणार्या वाटा
राहिली फ़क्त तुझ्या पाऊलाची वाट आत्ता
स्वत:चे जीर्णावशेष घेवुन सोबतीला
जुन्या स्मृतींच्या आधारे उभा गाभारा
माझ्या स्वप्न राज्यात ना राणी ना प्रजा
विना प्रजेच्या राज्याचा मी हा अभागी राजा
न उगवताच कशी मावळते चांदणी
किनार्यास न भेटताच परततात लाटा
सुमनावरती स्वप्न शय्या सजलीच नाही
फ