मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल

.मला मात्र पत्नी गोरी हवी..

कानडाऊ योगेशु ·
लेखनविषय:
..मला मात्र पत्नी गोरी हवी.. ------------------------------------- तशी शक्यतोही कोरी हवी. मला मात्र पत्नी गोरी हवी जरा घेऊ वीम्याचा फायदा. घरी एक साधी चोरी हवी. ( मला चोर अट्टल मानेन मी. तिच्या स्पंदनांची चोरी हवी..) असे एक संधी निसटायची. जवळ फक्त बळकट दोरी हवी. तुला भोगतो मी की तू मला? कशाला हि मग शिरजोरी हवी? हुश्श..आत घुसलो मी शेवटी नको आणखी घुसखोरी हवी किती प्रेम त्याचे काट्यांवरी सरण म्हणुन बाभळिबोरी हवी. --------------------------- + कानडाऊ योगेशु

..तुझे टाळतो मी अताशा शहर..

कानडाऊ योगेशु ·
लेखनविषय:
++तुझे टाळतो मी अताशा शहर++ --------------------------------------------------- सुशोभीत केली जुनीशी कबर.! स्वतः मीच केली स्वतःची कदर. जसा बोललो आरश्याशी जुन्या तशी घेतली मी स्वतःची खबर! किती जीव घेतील शस्त्रे तुझी कधी ओढणी वा कधी तो पदर म्हणे फार होती पवित्र अधी तिची मग बनवलीच नंतर गटर ठरवताच पार्टी मनाने कधी तिथे सर्व दु:खे सुखेही हजर तसा तोच रस्ता जवळचा तरिहि तुझे टाळतो मी अताशा शहर दवा बनुनी येताच मृत्यु असा उतरते तिथे जीवनाचे जहर कळाली तुझी मज खुशाली जशी किती छान आला मनाला बहर तुझे रुप आहे तसे देखणे. तुझे हास्य त्याहुनि तौबा कहर + कानडाऊ योगेशु

गझल :- जंगलातले नियम इथे लावायचे

स्वामी संकेतानंद ·
लेखनविषय:
मानवांस खूळ लागले धावायचे जाणतील ते कधी, कुठे थांबायचे? घाबरून राहिले सदा काठावरी सांगतात आज ते, कसे पोहायचे! 'माज' जो समाज मिरवतो आभूषणे नम्र राहुनी तिथे कसे चालायचे? गोंधळात यारहो , तलत मी ऐकतो शान्तिदूत रोज रोज का शोधायचे? कोणत्या युगात ते मला नेतील रे? 'काम फ़क्त आपले खुळ्या चालायचे' टांगतील? जाळतील? भोसकतील का? ठरवतील आज ते, कसे मारायचे कोण तू? विचारतो कुणाला प्रश्न तू? तो म्हणेल 'नाच!' आणि तू नाचायचे शायरास त्या म्हणे मिळाली सूचना शेर आपले लिहायचे, फाडायचे काल बोलला कुणीतरी 'स्वामी' पुन्हा जंगलातले नियम इथे लावायचे - स्वामी संकेतानंद

..कुणी दार माझे ठोठावले..

कानडाऊ योगेशु ·
लेखनविषय:
उगा आग्रहाने बोलावले. किती आज तेही सोकावले. कुठे चोर दडला अकस्मात तो? कुणी दार माझे ठोठावले..!!! पुन्हा झूळुकिशि सख्य सांधले पुन्हा एक वादळ घोंघावले. तिचे बेत होते,तिला धार्जिणे. तिने बेत माझे धुडकावले.

..आयुष्याला मी सौख्याचा बाजार म्हणालो..

कानडाऊ योगेशु ·
लेखनविषय:
आयुष्याला मी सौख्याचा बाजार म्हणालो. अन दु:खाला जगण्याचा अधीभार म्हणालो हाताने ती भरवीत होती घास कुणाला . तेव्हा मज तू दिसलीस सुंदर फार म्हणालो.

जीवनाच्या डावपेचांची नसे पत्रास आता ....

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
*************************************** मी तरी कोठे स्वतःचे मोजतो निःश्वास आता डाव मांडायास कोठे राहिला सहवास आता भोवताली गारद्यांचे कृर जथ्थे केवढाले आरशाला टाळतो, जपतोच मी जीवास आता मरण झाले यार आता रंगते मैफल स्मशानी जीवनाच्या डावपेचांची नसे पत्रास आता ऊन्हओल्या सावल्यांचे सोसले चाळे मुक्याने पावसाचा थेंब नाही कोरडे आभास आता कोण येतो कोण जातो खूण ना उरते कशाची 'चित्रगुप्ताच्या' सहीला मागणी हमखास आता *************************************** विशाल २३-५-२०१६

..कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले..

कानडाऊ योगेशु ·
लेखनविषय:
..कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले.. हातात हात आले,ह्रदयात नाम झाले ती सोबतीस आली,कामात काम झाले शिकवण समान होती,त्यांची जरी तरी ती.. कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले.. ऐटीत कार गेली,मंत्रीमहोदयांची.. शिस्तीत चालणारे,ट्राफिक जाम झाले.. सारेच चोर होते,पण एकला पळाला त्याच्या फरार नावे,नंतर इनाम झाले रावण नको म्हणुनि,ज्यांना पसंत केले ते ही पुढे परंतु,पुरते हराम झाले त्यांचीच सर्व दु:खे,त्यांनाच छान विकली पाहुनि खूश तेव्हा,पब्लिक तमाम झाले शेजारुनि निघाली,अवखळ बदाम राणी खिडकित त्वरित गोळा,सारे गुलाम झाले रस्ते अरूंद झाले,शेतात फ्लॅट आले, गुत्तेहि बार झाले,विकसित ग्राम झाले + कानडाऊ योगेशु

....विश्वाची उलगड होते.....

कानडाऊ योगेशु ·
....विश्वाची उलगड होते..... केसांस झटकता सखये,ह्रदयाची पडझड होते.. केसांत माळता गजरा,ह्रदयाची फुलझड होते.. पंखांस विसरतो जेव्हा,(तू) सदनाचा पत्ता देते. मी ऊंच भरारी घेतो,पंखांची फडफड होते. तू कविता बनूनी भिनता,श्वासांचे ध्रुपद होते! मी गीत लिहाया बसतो,शब्दांची गडबड होते. मी चाळली किति समिकरणे,पण गुढ उकलले नाही तव मिठित सखये अवघ्या,विश्वाची उलगड होते.** असतेस जवळि तू जेव्हा..जगण्याचे गाणे होते... नसतेस जवळि तू तेव्हा....जगण्याची तडफड होते धग ती नव्हतीच वणव्याची,होळीची ऊब असावी. निद्रेत सुखाने शिरता..स्वप्नांतहि धुळवड होते... सर्वस्व अर्पूनि मजला,तू मज ईश्वरसम करते मी तुझा पुजारी बनतो...

एक उर्दू गझल - जो ठिकाना हैं हमारा

पथिक ·
लेखनविषय:
काव्यरस
जो ठिकाना हैं हमारा हम वही जा रहेंगे मिटटी से आये हैं मिटटी से जा मिलेंगे ये हवा जो चली हैं इसके संग संग बहेंगे कभी फूलों को चूमेंगे कभी धुल से खेलेंगे न काफ़िलों से दोस्ती न मंज़िलों से यारी कहीं भी रुकेंगे, किधरको भी चलेंगे बेकार न जायेगा रोना यहाँ हमारा एक आंसूं में से कल हज़ार फुल खिलेंगे होशवालों को मुबारक बाग़े होश की सैर हम दश्ते जुनूं में अपने यार से मिलेंगे (कुणी अनुवाद केला तर उत्तम)

..विचारेन त्यालाच कॉफी चहा..

कानडाऊ योगेशु ·
लेखनविषय:
भरोसा करावा कुणाचा जरी.. भरोसाच नाही कशाचा जरी..! विचारेन त्यालाच कॉफी चहा घरी दूत आला यमाचा जरी मिळो गार माझी तुला सावली किती त्रास मजला उन्हाचा जरी मनी मान्य केले शशीचोर मी! खुळा आळ आहे नभाचा जरी. म्हणे वाघ गेल्याच जन्मातला अता जन्म आहे सशाचा जरी किती त्यात जो तो पुरा गुंतला खरा खेळ होता मनाचा जरी अरे वाकला तो कशाने असा.? तसा भार नव्हता जगाचा जरी! खरा भक्त त्याला मिळो एकदा तिथे प्रश्न असला युगाचा जरी! - कानडाऊ योगेशु