मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सस्नेह निमंत्रण

ऋचा ·

प्रत्यक्षात येऊन अभिनंदन करणे शक्य नाही म्हणून इथेच शुभेच्छा देते. Marriage is not a word, it's a sentence. दुसय्राच्या अनुभवावरुन शहाणी न झालेली संहिता

विसोबा खेचर 07/07/2008 - 11:25
ऋचा, तुला लग्नाकरता अनेकानेक शुभेच्छा! उद्याच धम्याच्या लग्नाला पुण्यात येतो आहे त्यामुळे पुन्हा १२ तारखेला तुझ्या लग्नाला पुण्यात येणं कितपत जमेल हा प्रश्नच आहे. तरीही प्रयत्न करेन.. असो, तुला आणि तुझ्या भावी नवर्‍याला लग्नाकरता मनापासून शुभेच्छा! दोघं सुखानं नांदा आणि संसार करा... मिपा हे तुझं माहेर आहे आणि आम्ही सर्व माहेरची माणसं तुझ्या आनंदात सहभागी आहोत.... (वडीलबंधू) तात्या. :)

मनस्वी 07/07/2008 - 11:26
ऋचा तुला आणि तुझ्या भावी नवर्‍याला लग्नाकरता आणि संसाराकरता मनापासून शुभेच्छा! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

प्रमोद देव 07/07/2008 - 11:29
तुमचा मैत्रिण ? आपलाच? ऋचा उपाख्य क्षितिजा ऋचा लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा. पण ऋचा हा आहे की ही आहे? वरती असे का लिहिलेय...तुमचा,आपलाच? मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

>>तुमचा मैत्रिण "ऋचा" विवाहबध्द होत आहे. तुमचा ???? आम्च्या पण शुभेच्छा !!!!!!!! सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

अनिल हटेला 07/07/2008 - 11:42
क्या बात है!!! भावी आयुष्यासाठी वधु -वरास अनेक शुभेच्छा.......... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा 07/07/2008 - 12:36
असेच म्हणतो ;) ॠचा, अभिनंदन आणि शुभेच्छा...... पण मी नाही येऊ शकणार लग्नाला :( क्षमस्व!!!!

In reply to by धमाल मुलगा

असेच म्हणतो ;) ॠचा, अभिनंदन आणि शुभेच्छा...... पुण्यात असतो तर नक्की आलो असतो लग्नाला...... एनीवे, परत आल्यावर तुझ्याकडुन अन् धम्याकडून पार्टी उकळणार आहे मी :) (शुभेच्छुक) टिंग्या :)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

II राजे II 07/07/2008 - 15:45
हेच म्हणतो आहे !!!! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

केशवसुमार 07/07/2008 - 13:55
ऋचा, हर्दिक आभिनंदन आणि शुभेच्छा!! (शुभेच्छुक)केशवसुमार स्वगतः तुमचा मैत्रिण ?आपलाच? :O कॉपी पेस्ट ची सवय काय जात नाही :W :B

कुंदन 07/07/2008 - 14:38
हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!! तुमचा मैत्रिण ?आपलाच? हा कॉपी पेस्ट चा परिणाम दिसतोय , लवकरच तु प्रकल्प व्यवस्थापक होणार असे दिसतेय .... ;-)

अन्जलि 07/07/2008 - 15:18
वैवाहिक जिवनासाथि हार्दिक शुभेछ्आ. गमतिचि गोश्ट अशि आहे कि टाटा मोतोर्स मधिल दुसर्या एकाचे पण त्याच दिवशि पुन्यामधे लग्न आहे माझ्या भचिशि कदाचित तुझा नवरा अनि माझा जावइ एक्मेकन्चे मित्र असु शकतिल. त्यामुळे मि पुन्यात आहे म्हनुन जमल्यास नक्कि येन्याचा प्रयत्न करिन. मग काय बुवा आता मजा आहे एका मुलिचि आम्हि आता पुनेकर होनार.

प्रत्यक्षात येऊन अभिनंदन करणे शक्य नाही म्हणून इथेच शुभेच्छा देते. Marriage is not a word, it's a sentence. दुसय्राच्या अनुभवावरुन शहाणी न झालेली संहिता

विसोबा खेचर 07/07/2008 - 11:25
ऋचा, तुला लग्नाकरता अनेकानेक शुभेच्छा! उद्याच धम्याच्या लग्नाला पुण्यात येतो आहे त्यामुळे पुन्हा १२ तारखेला तुझ्या लग्नाला पुण्यात येणं कितपत जमेल हा प्रश्नच आहे. तरीही प्रयत्न करेन.. असो, तुला आणि तुझ्या भावी नवर्‍याला लग्नाकरता मनापासून शुभेच्छा! दोघं सुखानं नांदा आणि संसार करा... मिपा हे तुझं माहेर आहे आणि आम्ही सर्व माहेरची माणसं तुझ्या आनंदात सहभागी आहोत.... (वडीलबंधू) तात्या. :)

मनस्वी 07/07/2008 - 11:26
ऋचा तुला आणि तुझ्या भावी नवर्‍याला लग्नाकरता आणि संसाराकरता मनापासून शुभेच्छा! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

प्रमोद देव 07/07/2008 - 11:29
तुमचा मैत्रिण ? आपलाच? ऋचा उपाख्य क्षितिजा ऋचा लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा. पण ऋचा हा आहे की ही आहे? वरती असे का लिहिलेय...तुमचा,आपलाच? मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

>>तुमचा मैत्रिण "ऋचा" विवाहबध्द होत आहे. तुमचा ???? आम्च्या पण शुभेच्छा !!!!!!!! सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

अनिल हटेला 07/07/2008 - 11:42
क्या बात है!!! भावी आयुष्यासाठी वधु -वरास अनेक शुभेच्छा.......... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा 07/07/2008 - 12:36
असेच म्हणतो ;) ॠचा, अभिनंदन आणि शुभेच्छा...... पण मी नाही येऊ शकणार लग्नाला :( क्षमस्व!!!!

In reply to by धमाल मुलगा

असेच म्हणतो ;) ॠचा, अभिनंदन आणि शुभेच्छा...... पुण्यात असतो तर नक्की आलो असतो लग्नाला...... एनीवे, परत आल्यावर तुझ्याकडुन अन् धम्याकडून पार्टी उकळणार आहे मी :) (शुभेच्छुक) टिंग्या :)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

II राजे II 07/07/2008 - 15:45
हेच म्हणतो आहे !!!! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

केशवसुमार 07/07/2008 - 13:55
ऋचा, हर्दिक आभिनंदन आणि शुभेच्छा!! (शुभेच्छुक)केशवसुमार स्वगतः तुमचा मैत्रिण ?आपलाच? :O कॉपी पेस्ट ची सवय काय जात नाही :W :B

कुंदन 07/07/2008 - 14:38
हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!! तुमचा मैत्रिण ?आपलाच? हा कॉपी पेस्ट चा परिणाम दिसतोय , लवकरच तु प्रकल्प व्यवस्थापक होणार असे दिसतेय .... ;-)

अन्जलि 07/07/2008 - 15:18
वैवाहिक जिवनासाथि हार्दिक शुभेछ्आ. गमतिचि गोश्ट अशि आहे कि टाटा मोतोर्स मधिल दुसर्या एकाचे पण त्याच दिवशि पुन्यामधे लग्न आहे माझ्या भचिशि कदाचित तुझा नवरा अनि माझा जावइ एक्मेकन्चे मित्र असु शकतिल. त्यामुळे मि पुन्यात आहे म्हनुन जमल्यास नक्कि येन्याचा प्रयत्न करिन. मग काय बुवा आता मजा आहे एका मुलिचि आम्हि आता पुनेकर होनार.
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रति, समस्त मिसळपाव.कॉम कुटुंबीय, सप्रेम नमस्कार, येत्या जुलै महिन्याच्या १२ तारखेस तुमचा मैत्रिण "ऋचा" विवाहबध्द होत आहे. वैयक्तिकरित्या सर्वांनाच व्यक्तिशः भेटून निमंत्रण पत्रिका देणे केवळ अशक्य असल्याकारणे,इथेच आमंत्रण देत आहे. कृपया हेच आग्रहाचे निमंत्रण समजुन ह्या विवाहसोहळ्यास उपस्थित राहून आम्हांस आपले शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती. आपलाच, ऋचा उपाख्य क्षितिजा विवाहस्थळ : कोहीनूर मंगल कार्यालय, एरंडवणा प्रभात रस्ता,गल्ली क्र. ८, गरवारे कॉलेज समोर पुणे-४ मुहुर्तः १२ जुलै-२००८ वेळः स. १० वा.

संवाद-३ [कुठलाही वाचा, ही मालिका नाही]

चाणक्य ·

मनिष 07/07/2008 - 10:03
पण, एक महत्वाची गोष्ट म्हणजे - अशा विधायक कार्यासाठी मदत स्वतःहून, मनापासून आली तर उत्तम; ती अशी 'समजावून' देऊ नये. जेव्हा आतून वाटेल तेव्हा ती व्यक्ती यथाशक्ती, किंबहुना त्यपेक्षाही अधिक करेल.

ऍडीजोशी 07/07/2008 - 18:02
अनोळखी गरिबांना मदत करायच्या फंदात मी आता पडत नाही. आणून दिलेले कपडे नी वह्या पुस्तकं विकायचे प्रकार घडले आहेत. मदत सत्कारणी आणि योग्य माणसाला होणार असेल तर हरकत नाही. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

धनंजय 07/07/2008 - 23:58
वैचारिक आहे. (शेवटचे दोन डायलॉग मात्र लांब असल्यामुळे सुरुवातीचा नैसर्गिक ओघ हरवला आहे. हेच मुद्दे सुरुवातीसारखेच सवाल-जबाब-प्रतिजबाब अशा तर्‍हेने लिहिणे शक्य आहे का?) संवाद वाचून इस्लामातील "ज़कात" किंवा ख्रिस्ती लोकांचा "टाइथ" हा प्रकार मनात येतो. मिळकतीचा साधारण १/१० भाग दानधर्मासाठी वापरावा, असे काही धार्मिक कर्तव्य असते. हिंदू धर्मात असा कुठला आकडा सांगितलेला नाही, पण जितके अधिक दान करावे तितके चांगले, अशी कल्पना रूढ आहे. खरे म्हणजे संवादातला महत्त्वाचा संघर्ष हा नव्हे की किती पैसे द्यायची क्षमता आहे की नाही. दोघांनी तत्त्वतः "द्यावे" असे मान्य केले, तरच "किती द्यावे"/"क्षमता किती" हे प्रश्न सयुक्तिक होतात. संघर्ष हा की पैसे द्यावेत की देऊ नयेत. मी स्वतः पैसे देणे हे धर्मकर्तव्य मानत नाही. परंतु काही बाबतीत स्वतःऐवजी सामाजिक कार्यांत पैसे खर्च करण्यात मलाच दूरगामी फायदा आहे असे मला वाटते. तो नेमका फायदा काय याचे बुद्धिबळातल्यासारखे खेळींसारखे गणित करता येत नाही. त्यामुळे हा स्वार्थी विचार पाताळयंत्री नाही, असे मला वाटते. या स्वार्थासाठी मी काही थोडे पैसे लोकांवर खर्च करतो. पैसे मागणार्‍या भिकार्‍यांना सहसा भीक देत नाही. पण बेघर लोकांना रात्रीच्या आसर्‍यासाठी शहरात संस्था आहे, तिला थोडे पैसे देतो. रात्री भिकार्‍यांनी माझ्या घरासमोर बसून कुडकुडू नये, त्यांच्या कुडकुडण्याच्या दर्शनाने माझ्या हृदयात कालवाकालव होऊन घराबाहेर मित्रांशी मस्तपैकी गप्पा मारताना विरस होऊ नये, हा स्वार्थ इथे अगदी उघड आहे. अशा प्रकारे आणखी काही संस्थांना पैसे देतो, पण स्वार्थ नेहमीच इतका स्पष्ट नाही. वह्या पेन्सिली देण्यातली गंमत मला मागच्याच वर्षी कळली. (मला हा अनुभव घृष्णेश्वराच्या देवळाबाहेरच्या बाजारात आला). ही भीक मागण्याची कल्पक युक्ती बघून मला त्या मुलाचे कौतूक वाटले. म्हणून मी त्याला पेन विकत घेऊन दिले - भीक म्हणून नव्हे तर त्याच्या कल्पकतेने माझे मनोरंजन केल्याचे शुल्क म्हणून. बहुधा हे बिझिनेस मॉडेल त्या मुलाच्या सुपीक डोक्यातले नव्हते - पण माझ्यासाठी नवीन होते. आता पुन्हा त्याच युक्तीने माझे मनोरंजन होणार नाही, आणि मी पेन किंवा वही विकत घेऊन देणारही नाही.

मनीष म्हणतो तशा दोन्ही बाजू पटतात... :)... सुरुवातीला तर संवाद एकदम खटकेबाज आणि उत्तम... शेवटी जरा लांबल्यामुळे मजा कमी झालीय...पण एकूण छान चाललंय .. लिहित राहा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

यशोधरा 08/07/2008 - 08:06
दोन्ही बाजू पटतात... मलाही, पण केलेल्या मदतीचा गैरफायदा घेतलेलाही २-३ दा पाहिलेले आहे, लक्षात आले आहे, म्हणून आता मदत करताना दहावेळा विचार तरी नक्कीच करावासा वाटतो...

चाणक्य 08/07/2008 - 09:26
खरे म्हणजे संवादातला महत्त्वाचा संघर्ष हा नव्हे की किती पैसे द्यायची क्षमता आहे की नाही. दोघांनी तत्त्वतः "द्यावे" असे मान्य केले, तरच "किती द्यावे"/"क्षमता किती" हे प्रश्न सयुक्तिक होतात. संघर्ष हा की पैसे द्यावेत की देऊ नयेत.
बरोबर आहे, परंतू आर्थिक मदत मिळवण्यासाठी नेहेमीच 'तुम्हाला फक्त अमुक ईतकेच पैसे भरावे लागतील / किंवा ईतका खर्च करणं तुम्हाला कसं सहज शक्य आहे' हे पटवून देण्याचा प्रयत्न असतो. विक्री (सेल्स) मध्ये एक मुलभूत सिद्धांत आहे, ग्राहकाला वस्तूच्या किमती पेक्षा त्या वस्तूमुळे होणारा फायदा समजवून द्यावा. परंतू फार थोड्या लोकांना हे माहीती असते. किंबहूना माहिती असलं तरी अमलात फार थोडी लोकं आणतात. एडी, यशोधरा, मनिष तुमच्यासारखाच माझाही अनुभव आहे. खर म्हणजे हा संवाद माझ्याच मनातला संघर्ष आहे. कधी एक बाजु पटते तर कधी दुसरी. धनंजयने चांगला सुवर्णमध्य साधला आहे.पण तरीही एडी म्हणतात तसं मदत सत्कारणी आणि योग्य माणसाला व्हावी असं वाटत. शेवटी कुठेही गेला तरी चालेल असं म्हणायला आपला पैसा काही काळा पैसा नाही. कष्ट करून मिळवलेला पैसा आहे. तो योग्य ठिकाणीच खर्च व्हायला हवा.
(शेवटचे दोन डायलॉग मात्र लांब असल्यामुळे सुरुवातीचा नैसर्गिक ओघ हरवला आहे. हेच मुद्दे सुरुवातीसारखेच सवाल-जबाब-प्रतिजबाब अशा तर्‍हेने लिहिणे शक्य आहे का?)
पुढच्या वेळी जरूर विचार करीन.

झकासराव 08/07/2008 - 11:07
सवांद आवडला. दोन्ही बाजु पटतात. पण अगदीच ४-५ हजार नसले तरी हजार बाराशे रुपये देखील एका गरजु मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवु शकतात की. त्या दृश्टीने पटवुन देणे सोपे जाइल. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

चाणक्य 08/07/2008 - 15:01
अगदीच ४-५ हजार नसले तरी हजार बाराशे रुपये देखील एका गरजु मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवु शकतात की.
प्रश्न पैश्यांचा नसून धनंजय म्हणाले तसा, पैसे द्यावेत की न द्यावेत हा आहे. मला पैश्यांची गरज असताना मी दुसर्‍या कुणाला पैसे का द्यावेत असे त्या संवादातल्या पात्राचे म्हणणे आहे. आणि हे म्हणतानाच 'माझी गरज मीच ठरवणार' असंही तो म्हणतो.

विसोबा खेचर 09/07/2008 - 09:19
संवाद आवडले, धन्याशेठचा प्रतिसादही आवडला... चाणक्यराव, येऊ द्या अजूनही. चांगलं लिहिताय! तात्या.

मनिष 07/07/2008 - 10:03
पण, एक महत्वाची गोष्ट म्हणजे - अशा विधायक कार्यासाठी मदत स्वतःहून, मनापासून आली तर उत्तम; ती अशी 'समजावून' देऊ नये. जेव्हा आतून वाटेल तेव्हा ती व्यक्ती यथाशक्ती, किंबहुना त्यपेक्षाही अधिक करेल.

ऍडीजोशी 07/07/2008 - 18:02
अनोळखी गरिबांना मदत करायच्या फंदात मी आता पडत नाही. आणून दिलेले कपडे नी वह्या पुस्तकं विकायचे प्रकार घडले आहेत. मदत सत्कारणी आणि योग्य माणसाला होणार असेल तर हरकत नाही. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

धनंजय 07/07/2008 - 23:58
वैचारिक आहे. (शेवटचे दोन डायलॉग मात्र लांब असल्यामुळे सुरुवातीचा नैसर्गिक ओघ हरवला आहे. हेच मुद्दे सुरुवातीसारखेच सवाल-जबाब-प्रतिजबाब अशा तर्‍हेने लिहिणे शक्य आहे का?) संवाद वाचून इस्लामातील "ज़कात" किंवा ख्रिस्ती लोकांचा "टाइथ" हा प्रकार मनात येतो. मिळकतीचा साधारण १/१० भाग दानधर्मासाठी वापरावा, असे काही धार्मिक कर्तव्य असते. हिंदू धर्मात असा कुठला आकडा सांगितलेला नाही, पण जितके अधिक दान करावे तितके चांगले, अशी कल्पना रूढ आहे. खरे म्हणजे संवादातला महत्त्वाचा संघर्ष हा नव्हे की किती पैसे द्यायची क्षमता आहे की नाही. दोघांनी तत्त्वतः "द्यावे" असे मान्य केले, तरच "किती द्यावे"/"क्षमता किती" हे प्रश्न सयुक्तिक होतात. संघर्ष हा की पैसे द्यावेत की देऊ नयेत. मी स्वतः पैसे देणे हे धर्मकर्तव्य मानत नाही. परंतु काही बाबतीत स्वतःऐवजी सामाजिक कार्यांत पैसे खर्च करण्यात मलाच दूरगामी फायदा आहे असे मला वाटते. तो नेमका फायदा काय याचे बुद्धिबळातल्यासारखे खेळींसारखे गणित करता येत नाही. त्यामुळे हा स्वार्थी विचार पाताळयंत्री नाही, असे मला वाटते. या स्वार्थासाठी मी काही थोडे पैसे लोकांवर खर्च करतो. पैसे मागणार्‍या भिकार्‍यांना सहसा भीक देत नाही. पण बेघर लोकांना रात्रीच्या आसर्‍यासाठी शहरात संस्था आहे, तिला थोडे पैसे देतो. रात्री भिकार्‍यांनी माझ्या घरासमोर बसून कुडकुडू नये, त्यांच्या कुडकुडण्याच्या दर्शनाने माझ्या हृदयात कालवाकालव होऊन घराबाहेर मित्रांशी मस्तपैकी गप्पा मारताना विरस होऊ नये, हा स्वार्थ इथे अगदी उघड आहे. अशा प्रकारे आणखी काही संस्थांना पैसे देतो, पण स्वार्थ नेहमीच इतका स्पष्ट नाही. वह्या पेन्सिली देण्यातली गंमत मला मागच्याच वर्षी कळली. (मला हा अनुभव घृष्णेश्वराच्या देवळाबाहेरच्या बाजारात आला). ही भीक मागण्याची कल्पक युक्ती बघून मला त्या मुलाचे कौतूक वाटले. म्हणून मी त्याला पेन विकत घेऊन दिले - भीक म्हणून नव्हे तर त्याच्या कल्पकतेने माझे मनोरंजन केल्याचे शुल्क म्हणून. बहुधा हे बिझिनेस मॉडेल त्या मुलाच्या सुपीक डोक्यातले नव्हते - पण माझ्यासाठी नवीन होते. आता पुन्हा त्याच युक्तीने माझे मनोरंजन होणार नाही, आणि मी पेन किंवा वही विकत घेऊन देणारही नाही.

मनीष म्हणतो तशा दोन्ही बाजू पटतात... :)... सुरुवातीला तर संवाद एकदम खटकेबाज आणि उत्तम... शेवटी जरा लांबल्यामुळे मजा कमी झालीय...पण एकूण छान चाललंय .. लिहित राहा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

यशोधरा 08/07/2008 - 08:06
दोन्ही बाजू पटतात... मलाही, पण केलेल्या मदतीचा गैरफायदा घेतलेलाही २-३ दा पाहिलेले आहे, लक्षात आले आहे, म्हणून आता मदत करताना दहावेळा विचार तरी नक्कीच करावासा वाटतो...

चाणक्य 08/07/2008 - 09:26
खरे म्हणजे संवादातला महत्त्वाचा संघर्ष हा नव्हे की किती पैसे द्यायची क्षमता आहे की नाही. दोघांनी तत्त्वतः "द्यावे" असे मान्य केले, तरच "किती द्यावे"/"क्षमता किती" हे प्रश्न सयुक्तिक होतात. संघर्ष हा की पैसे द्यावेत की देऊ नयेत.
बरोबर आहे, परंतू आर्थिक मदत मिळवण्यासाठी नेहेमीच 'तुम्हाला फक्त अमुक ईतकेच पैसे भरावे लागतील / किंवा ईतका खर्च करणं तुम्हाला कसं सहज शक्य आहे' हे पटवून देण्याचा प्रयत्न असतो. विक्री (सेल्स) मध्ये एक मुलभूत सिद्धांत आहे, ग्राहकाला वस्तूच्या किमती पेक्षा त्या वस्तूमुळे होणारा फायदा समजवून द्यावा. परंतू फार थोड्या लोकांना हे माहीती असते. किंबहूना माहिती असलं तरी अमलात फार थोडी लोकं आणतात. एडी, यशोधरा, मनिष तुमच्यासारखाच माझाही अनुभव आहे. खर म्हणजे हा संवाद माझ्याच मनातला संघर्ष आहे. कधी एक बाजु पटते तर कधी दुसरी. धनंजयने चांगला सुवर्णमध्य साधला आहे.पण तरीही एडी म्हणतात तसं मदत सत्कारणी आणि योग्य माणसाला व्हावी असं वाटत. शेवटी कुठेही गेला तरी चालेल असं म्हणायला आपला पैसा काही काळा पैसा नाही. कष्ट करून मिळवलेला पैसा आहे. तो योग्य ठिकाणीच खर्च व्हायला हवा.
(शेवटचे दोन डायलॉग मात्र लांब असल्यामुळे सुरुवातीचा नैसर्गिक ओघ हरवला आहे. हेच मुद्दे सुरुवातीसारखेच सवाल-जबाब-प्रतिजबाब अशा तर्‍हेने लिहिणे शक्य आहे का?)
पुढच्या वेळी जरूर विचार करीन.

झकासराव 08/07/2008 - 11:07
सवांद आवडला. दोन्ही बाजु पटतात. पण अगदीच ४-५ हजार नसले तरी हजार बाराशे रुपये देखील एका गरजु मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवु शकतात की. त्या दृश्टीने पटवुन देणे सोपे जाइल. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

चाणक्य 08/07/2008 - 15:01
अगदीच ४-५ हजार नसले तरी हजार बाराशे रुपये देखील एका गरजु मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवु शकतात की.
प्रश्न पैश्यांचा नसून धनंजय म्हणाले तसा, पैसे द्यावेत की न द्यावेत हा आहे. मला पैश्यांची गरज असताना मी दुसर्‍या कुणाला पैसे का द्यावेत असे त्या संवादातल्या पात्राचे म्हणणे आहे. आणि हे म्हणतानाच 'माझी गरज मीच ठरवणार' असंही तो म्हणतो.

विसोबा खेचर 09/07/2008 - 09:19
संवाद आवडले, धन्याशेठचा प्रतिसादही आवडला... चाणक्यराव, येऊ द्या अजूनही. चांगलं लिहिताय! तात्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार
संवाद-१ संवाद-२ --------------------------------------------------------------------------------------- संवाद-३ "पण म्हणून मी का त्यांच्यासाठी काही करावं?" तो तावातावाने मला विचारत होता. "कारण तुझी तेवढी क्षमता आहे" मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होतो. "क्षमता? महिना २० हजाराला तू क्षमता म्हणतोस?" "of course, निदान माझ्यापेक्षातरी नक्कीच जास्त आहे.

मी लेलेंना शोधतोय....

दिनेश५७ ·

प्राजु 07/07/2008 - 01:36
अशी माणसं जगात आहेत अजून ही नक्कीच एका चांगल्या समजाच्या निर्मितीच्या मार्गावरची आशा म्हणावी लागेल.. त्या सिद्धीविनायकाच्या शेजार्‍याला माझा दंडवत..... कधी तुम्हाला भेटलेच तर आमच्याशीही ओळख करून द्या त्या देवाची. लेख आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अभय 07/07/2008 - 07:26
सुरेख! आपल्या लिखाणात व्.पु. ची झाक दिसते!. फारच छान! अजुन लिहा.

सहज 07/07/2008 - 08:10
या लेखामुळे लेले यांनी अनेकांच्या मनात घर केले. भले इस्पीतळातल्या वृद्धाचा पुर्व इतिहास, ओढावलेली परिस्थीती काही असो. जाणिवपुर्वक चांगला निर्णय घेणारे लेले ग्रेट आहेत. कोण म्हणते देव फक्त त्या सिद्धिविनायक मंदीरातच आहे.

यशोधरा 07/07/2008 - 08:49
लेले आणि तत्सम माणसंच समाजातला चांगुलपणा टिकवून आहेत. लेल्यांची ओ़ळख करुन दिल्याबद्दल आभार.

विसोबा खेचर 07/07/2008 - 09:03
सुंदर लिहिलं आहे. आजही लेलेंसारखी काही माणसं निश्चितच आहेत.. म्हणून सिद्धिविनायकाजवळून जाताना, मी फक्त नमस्कार करतो... हे वाक्य सर्वात आवडलं. वपुंचीदेखील एक अशीच काहीशी कथा होती असं आठवतंय. दिनेशराव, औरभी आने दो... पुलेशु... तात्या.

रिमझिम 07/07/2008 - 11:08
लेले सारखी माणसे नेहमीच प्रेरणादायी ठरतात,आजही अशी माणसं निश्चितच आहेत जी विचार करायला लावतात की आयुष्याचा नेमका अर्थ काय? फार छान लिहीले आहे,तुमच्या मुळे अजुन एका चागल्या माणसाची ओळ्ख झाली!!

श्री. लेले एक सकारात्मक आस्तिक जीवन जगत आहेत. देवाच्या मुर्तीसमोर दक्षिणा आणि नारळ ठेवण्यापेक्षा श्री. लेले करीत असलेली सेवा मला जास्त भक्तीपूर्ण वाटते.

चतुरंग 07/07/2008 - 21:36
हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी| असं सर्वत्र घडत असताना, हा भगवंत उपाशी रहाणार नाही ह्याची काळजी घेणारे लेले अत्यंत हृद्य लिखाणातून आमच्यापर्यंत पोचवलेत त्याबद्दल धन्यवाद दिनेश! पुलेशु! चतुरंग

प्राजु 07/07/2008 - 01:36
अशी माणसं जगात आहेत अजून ही नक्कीच एका चांगल्या समजाच्या निर्मितीच्या मार्गावरची आशा म्हणावी लागेल.. त्या सिद्धीविनायकाच्या शेजार्‍याला माझा दंडवत..... कधी तुम्हाला भेटलेच तर आमच्याशीही ओळख करून द्या त्या देवाची. लेख आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अभय 07/07/2008 - 07:26
सुरेख! आपल्या लिखाणात व्.पु. ची झाक दिसते!. फारच छान! अजुन लिहा.

सहज 07/07/2008 - 08:10
या लेखामुळे लेले यांनी अनेकांच्या मनात घर केले. भले इस्पीतळातल्या वृद्धाचा पुर्व इतिहास, ओढावलेली परिस्थीती काही असो. जाणिवपुर्वक चांगला निर्णय घेणारे लेले ग्रेट आहेत. कोण म्हणते देव फक्त त्या सिद्धिविनायक मंदीरातच आहे.

यशोधरा 07/07/2008 - 08:49
लेले आणि तत्सम माणसंच समाजातला चांगुलपणा टिकवून आहेत. लेल्यांची ओ़ळख करुन दिल्याबद्दल आभार.

विसोबा खेचर 07/07/2008 - 09:03
सुंदर लिहिलं आहे. आजही लेलेंसारखी काही माणसं निश्चितच आहेत.. म्हणून सिद्धिविनायकाजवळून जाताना, मी फक्त नमस्कार करतो... हे वाक्य सर्वात आवडलं. वपुंचीदेखील एक अशीच काहीशी कथा होती असं आठवतंय. दिनेशराव, औरभी आने दो... पुलेशु... तात्या.

रिमझिम 07/07/2008 - 11:08
लेले सारखी माणसे नेहमीच प्रेरणादायी ठरतात,आजही अशी माणसं निश्चितच आहेत जी विचार करायला लावतात की आयुष्याचा नेमका अर्थ काय? फार छान लिहीले आहे,तुमच्या मुळे अजुन एका चागल्या माणसाची ओळ्ख झाली!!

श्री. लेले एक सकारात्मक आस्तिक जीवन जगत आहेत. देवाच्या मुर्तीसमोर दक्षिणा आणि नारळ ठेवण्यापेक्षा श्री. लेले करीत असलेली सेवा मला जास्त भक्तीपूर्ण वाटते.

चतुरंग 07/07/2008 - 21:36
हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी| असं सर्वत्र घडत असताना, हा भगवंत उपाशी रहाणार नाही ह्याची काळजी घेणारे लेले अत्यंत हृद्य लिखाणातून आमच्यापर्यंत पोचवलेत त्याबद्दल धन्यवाद दिनेश! पुलेशु! चतुरंग
लेखनविषय:
लेखनप्रकार
त्यांचं आडनाव लेले नाही. म्हणजे, लेलेच आहे, की नाही, ते मला नक्की माहीत नाही. त्यांचा नक्की पत्ता मला माहीत नाही. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराजवळ कुठेतरी ते राहातात. एवढंच मला माहीत आहे. म्हणजे, माझ्या सहकार्‍यानं मला त्यांच्याबद्दल सांगितलं, तेव्हा ते तिथं कुठतरी राहातात, एव्हढच मला कळलं होतं. तेव्हापासून, सिद्धिविनायकासमोरून येताजाताना मी त्या दिशेनं भक्तिभावानं हात जोडतो. अर्धा सिद्धिविनायकाला, आणि अर्धा त्या लेले, की कुणी, त्यांना... सिद्धिविनायकाच्या शेजार्‍याला... ...

मिपा संपादकीय - अरे एनारायेनाराय !

संपादक ·

विसोबा खेचर 06/07/2008 - 23:57
पाहुण्या संपादकाच्या पहिल्यावहिल्या अग्रलेखाकरता मुक्तसुनीत यांचे मनापासून आभार. हा उपक्रम असाच सुरू राहावा असे मनापसून वाटते. पैशाचे गणित कुठल्याही दिशेने बदलो. तागडी कुठल्याही दिशेने फिरो. "मानवी संक्रमण" ही घटना चालूच रहाणार आहे. "जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत. जिकडे तिकडे माझ्या खुणा मला दिसताहेत" या केशवसुतांच्या ओळी उद्याही आपल्याला साथ देतील , दिलासा देत रहातील . उत्तम अग्रलेख..! पुन्हा एकदा अभिनंदन व मनापासून आभार... तात्या.

प्रमोद देव 07/07/2008 - 00:19
खरंच प्रश्न विचार करायला लावणारा आहे. एनाराय..म्हणजे न घरका ना घाटका...अशी परिस्थिती आहे खरी. ह्या प्रश्नाचे उत्तर देणे खरंच अवघड आहे. हे एक वरवर सोपे वाटणारे पण न सुटणारे कोडे आहे असे वाटते. मुक्तसुनीत आपण ही व्यथा अतिशय समर्पक शब्दात मांडलेय. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

रामदास 07/07/2008 - 00:42
जोपर्यंतज्या भाषेच्या पुलाखाली आपण सर्व वाढलो, तो पूल सातासमुद्रांपेक्षा मोठा आहे. राष्ट्राराष्ट्रातल्या भिंतींपेक्षा उंच आहे , त्याना ओलांडणार आहे. जिच्या छायेखाली वाढलो तिच्याच दुव्याने एकमेकांशी आपण बांधले गेलो." तोपर्यंत आपण एकत्रच आहोत. भौगोलीक अंतराची काय तमा बाळगायची? सुरेख सुरवात. धन्यवाद. मुक्तसुनीत . धन्यवाद तात्या .

स्वप्निल.. 07/07/2008 - 00:54
मुक्तसुनीत, "....तुमचे मराठी भाषेवरचे प्रेम नि तुमचे अमेरिकन् वास्तव्य या दोन गोष्टी एकमेकांना छेद देत नाहीत." हे आवडले..संपुर्ण लेख आवडला..चांगली सुरुवात.. स्वप्निल..

प्राजु 07/07/2008 - 01:00
मुक्तसुनित आपले आणि तात्यांचे मनापासून अभिनंदन. एका सुंदर उपक्रमाला सुरूवात. उत्तम सुरूवात. खूप विचार करायला लावणारा लेख आहे. रामदास यांच्याशी सहमत आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

संक्रमणशील माणसाच्या मनातलं कन्फ्यूजन ( मी नक्की कोण?) आणि ( थोडं दुखावले गेल्याची भावनाही ) समर्पक शब्दांत मांडली आहे... पहिला लेख आवडला... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

केशवसुमार 07/07/2008 - 02:32
मुक्तीशेठ, एकदम दमदार सुरवात.. आभिनंदन!! तात्याशेठ, मिपावर चालू केलेल्या ह्या 'संक्रमणा' बद्दल आपले आभार आणि अभिनंदन.. (रेसिडेंट जर्मन)केशवसुमार स्वगतः ह्या मुक्तीशेठच्या संपादकिय लेखामुळे वाचकांच्या अपेक्षा वाढल्यात :B ...अता पुढच्या संपादकाची काही खैर नाही.. :W (नॉन रिलायबल )केशवसुमार

धनंजय 07/07/2008 - 02:47
मुक्तसुनीत यांनी अंतर्मुख करणार्‍या लेखाने संपादकीयांचा श्रीगणेशा केला आहे. असे लेखन या सदराचा पायंडा होईल, असे दिसते आहे. मिसळपावची ही अफलातून कल्पना सफल होणार! स्थलांतर करताना सुरुवातीची कित्येक वर्षे रोजच्या सामान्य जगण्याशी झटण्यात आगंतुक मग्न असतो. संस्कृती वेगळी, वागण्याचे रीतीरिवाज वेगळे, ते सर्व आत्मसात करून घ्यायचे असते. ज्या काही व्यवसायासाठी स्थलांतर केलेले असते, त्याचा भार सांभाळायचा असतो. या सगळ्या बदलांना सामोरे जाताना आपली ओळख कुठेतरी बदलत असते. पण त्याच्याकडे लक्ष द्यायला उसंत नसते. काही लोक स्थलांतर करण्यापूर्वीच मायदेशाला तुच्छ लेखत असतात. अमेरिकन वकिलातीबाहेर तिष्ठत असलेल्या रांगेत काही थोड्या लोकांकडून तसा स्पष्ट सुर ऐकू येतो. ईश्वरकृपेने पारपत्रावर अमेरिकन कृपेचा छप्पा पडू दे आणि या नावडत्या देशातून निसटू दे... त्यांना कदाचित बदललेली अस्मिता म्हणजे खरे स्वत्व सापडण्यासारखे असेल - पण त्यांच्याबद्दलही हे खरे असेलच असे वाटत नाही. अमेरिकेचे दिवास्वप्न हे कुठल्याही दिवास्वप्नासारखे नेमके वास्तव नसते. वास्तवातली अमेरिका त्या दिवास्वप्नापेक्षा बरीच वाईट आहे, आणि बरीच चांगली आहे - म्हणजे सगळ्याच प्रकारे वेगळी आहे. अपेक्षाभंग करणार्‍या या देशाबद्दल रागही येऊ शकतो, आणि अनपेक्षित दालने उघडणार्‍या या देशाबद्दल कौतुकही वाटू लागते - मनाचा मोठा गोंधळ घालणारी परिस्थिती असते. मायदेशाबद्दल आधीपासून जिव्हाळाच असलेल्या लोकांना तर आपली बदलणारी ओळख चक्रावून टाकणार नाही तर काय? त्याच वेळी ताटातूट झालेल्या आपल्या देशाबद्दल स्थलांतरित माणूस काल्पनिक प्रतिमा तयार करू लागतो. काही थोड्या वर्षांचा मातृभूमीच्या अनुभवाचे तुटपुंजे भांडवल असते, त्याच्यावर रम्य मनोरे चढवतो. तिथे तो प्रचंड प्रवाही भारत आपल्या गतीने पुढे सरकत असतो. दूर स्वप्नरंजन करणार्‍या लेकराच्या कल्पनाविश्वाचे त्याला सोयरसुतक नसते. मग भारतभेट झाली की खरा भारत त्या काल्पनिक प्रतिमेला तडा देतो. अशा प्रकारे दोन आवडणारे, पण कधी न समजणारे देश, अशांत आपली अस्मिता विभागली जाते. कोणास वाटावे की ही घालमेल म्हणजे स्थलांतराची शोकांतिका आहे. पण मुक्तसुनीत अचूकपणे निरीक्षण करतात, की मानवी संक्रमण म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतींना जोडणारा पूल आहे. स्थलांतरिताची कथा ही शोकांतिका नसून दुर्दम्य आशावादाचा आलेख आहे.

In reply to by धनंजय

बेसनलाडू 07/07/2008 - 07:53
अशा प्रकारे दोन आवडणारे, पण कधी न समजणारे देश, अशांत आपली अस्मिता विभागली जाते. कोणास वाटावे की ही घालमेल म्हणजे स्थलांतराची शोकांतिका आहे. पण मुक्तसुनीत अचूकपणे निरीक्षण करतात, की मानवी संक्रमण म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतींना जोडणारा पूल आहे. स्थलांतरिताची कथा ही शोकांतिका नसून दुर्दम्य आशावादाचा आलेख आहे. अगदी! उत्तम लेख.आवडला.दुसर्‍या बाजूची निरीक्षणे मांडायचा प्रयत्न झाल्यासही उत्तम. (सहमत)बेसनलाडू

विकास 07/07/2008 - 02:50
मिपाच्या पाहुणे संपादकीय प्रकल्पाच्या शुभारंभानिमित्त तात्यांचे आणि त्यातील पहील्या अग्रलेखाने चांगला श्रीगणेशा करणार्‍या मुक्तसुनीत यांचे अभिनंदन! लेख चांगलाच आणि वैचारीक आहे. त्यात वृत्तीप्रवृत्तीने भारतीय असलेल्या पण कर्मभूमीमुळे प्रत्यक्ष नाळ तुटलेल्या भारतीयाच्या मनातील केवळ व्यथाच नाही तर कधीकधी परिस्थिती समजून घेत आलेले समतोल विचार दिसतात. भारतीयत्व हे जर एक खणखणीत नाणे असले तर त्याची एक बाजू हे कायद्याने भारतीय असलेली तमाम जनता आहे तर दुसर्‍या बाजूस तुमच्याआमच्यासारखे "घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी" म्हणणारे पण "पिल्लाऐवजी", "मातृभूमीशी" कुठल्यान् कुठल्या पद्धतीने संबंध ठेवणारी एनआरआय मंड़ळी आहोत...आणि हो नुसताच एनाआरआय म्हणून विचार केला तर ते नाणे नाही तर "रुबिक क्यूब" आहे - ५४ तुकडे एकमेकांशी रंगसंगतीने नीट लावण्याचे कोडे... तीच कथा भारतातील भारतीयांची पण म्हणायला हरकत नाही. तर आपल्या अग्रलेखामुळे नाण्याची एक बाजू दिसली आता याचीच दुसरी बाजू (अर्थात भारतातील भारतीयांबद्दल) दाखवणारा लेख / अग्रलेख पण वाचायला मिळोत अशी मिपासदस्यांना विनंती... बाकी जाता जाता कालच एका लग्नसमारंभात गप्पा मारत असताना ऐकलेला एक किस्सा: संघात असे म्हणले जाते की "वन्स स्वयंसेवक इज ऑलवेज स्वयंसेवक"... जर कामाच्या/संसाराच्या व्यापाने एखादी व्यक्ती जर नंतर संघाच्या कार्यक्रमाला हजर रहात नसेल तरी ती आपलीच असते तीला वेगळे का धरायचे? तीला कधी "एक्स स्वयंसेवक" म्हणू नये... आपली मुले कामानिमित्त घर सोडून बाहेर गावी रहायला जातात तेंव्हा ती काय आपली "एक्स मुले" होतात का? थोडक्यात मुक्तसुनीतराव मला इतकेच म्हणायचे आहे की, तुम्ही-आम्ही जरी "एनआर" लावले तरी अगदी कुणाला आवडो न आवडो "इंडीयन" राहतोच. फक्त त्याचा बदलेल्या परीस्थितीतपण जाणीव ठेवून योग्य अर्थ लावणे आणि तसे आचरण करणे हे ज्या त्या व्यक्तीवर अवलंबून राहते. त्याला काही पर्याय नाही. धन्यवाद

In reply to by विकास

ऋषिकेश 07/07/2008 - 20:39
सर्वप्रथम मुक्तसुनीत व तात्यांचे अभिनंदन व आभार !. मुक्तसुनीत राव, "मी कोण"? हा बहुदा जगातील सर्वात कठीण प्रश्न असावा. आणि त्या प्रश्नावर आधारीत हा अप्रतिम लेख लिहून तुम्ही मिपाच्या संपादकियांची पातळी फार उंचावर नेऊन ठेवली आहे. लेख प्रचंड आवडला.
लेख चांगलाच आणि वैचारीक आहे. त्यात वृत्तीप्रवृत्तीने भारतीय असलेल्या पण कर्मभूमीमुळे प्रत्यक्ष नाळ तुटलेल्या भारतीयाच्या मनातील केवळ व्यथाच नाही तर कधीकधी परिस्थिती समजून घेत आलेले समतोल विचार दिसतात.
अगदी सहमत. अवांतरः अग्रलेख वाचून विकास यांच्या "ओळख" या लेखाचीही आठवण झाली -('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग 07/07/2008 - 05:29
'मिपा'च्या संपादकीय सदराची सुरुवात मुक्तसुनीत ह्यांच्याकडून चांगलीच होणार ह्याची खात्री होती तसेच झाले ह्याचा आनंद आहे!:) परिचयाचा विषय असूनही त्याच्या वेगळ्या बाजूचे दर्शन मुक्तरावांनी घडवले आहे. स्थलांतरितांची जातकुळी कोणतीही असो, म्हणजे धरणग्रस्त विस्थापित असोत, किंवा नैसर्गिक आपत्तीतून झालेले असोत, किंवा कामामुळे झालेले असो; असे की तसे, इकडे की तिकडे, ह्या मूलभूत मानसिक द्वंदातून सुटका नसते हे सत्य त्यांनी नेटक्या आणि नेमक्या शब्दात अधोरेखित केले आहे. अमेरिकेत येणे म्हणजे जणू स्वर्गात पोचणे अशी कल्पना उराशी बाळगून, ऐकलेल्या, वाचलेल्या आणि काल्पनिक अशा सर्व प्रकारांनी अमेरिकेतल्या विश्वाचे चित्र डोळ्यांपुढे आणून, तेच खरे मानून, येनकेन प्रकारेण इकडे येण्याची मनीषा बाळगणार्‍या लोकांची आजही आपल्याकडे कमी नाही! इथे म्हणजे सर्व चांगलेच असा भ्रम इथे आल्यावर हळूहळू वितळत जातो. अनेक बाबतीत टोकाचे चांगले आणि वाईट धक्के देण्याची अमेरिकेची क्षमता काही वर्षात आपल्याला कळून येते. ऐहिक सुखाची परमावधी पूर्ण करुन उतरणीच्या दिशेने चक्राच्या प्रवासाची सुरुवात झालेल्या अमेरिकेचं चित्र आणि त्याच वेळी सर्वप्रकारच्या उत्थानामधून, उलथापालथीमधून बदल होत असलेल्या भारतासारख्या देशाचे चित्र हे एकमेकांशी अनेक बाबतीत विसंगत आहे. तिकडून इकडे आल्यानंतरची मानसिक जडणघडणीची वर्षे ही व्यक्तीसापेक्ष असतात असे माझे मत. काही लोक हे इथेच जन्मल्याप्रमाणे सराइतासारखे इथलेच बनून जातात, बरेचसे कित्येक वर्षे आंदोलित अवस्थेतून प्रवास करीत, अनेक गोष्टींना मुरड घालीत एकदाचे इथले होतात पण ते मनातून खोलवर अस्वस्थ असतात, आणि काही लोक कधीच इथले होऊ शकत नाहीत, त्यांचे मन हे कायम तिकडेच असते आणि आत्मा हरवलेल्या व्यक्तीसारखे ते फक्त परिस्थितीसमोर मान तुकवून जगत राहतात. मुक्तरावांनी अचूक शब्दात पकडलेली स्थलांतरितांची वेदना ही चिरस्थायी आहे. ही परिस्थिती केव्हाही, कुठेही, आणि कोणत्याही काळात उद्भवू शकते आणि त्याचवेळी जोडलेले मैत्र, मानवी संबंध, गणगोत ही सर्व आपल्या जीवनरुपी झाडाची मुळे आहेत, त्यामुळे बदलाला चिवटपणे सामोरे जाण्याचे रसायन हे त्यातूनच आपल्याला मिळणार आहे हे त्यातले सत्य जेवढे लवकर लक्षात येईल तेवढी वरवर दिसणार्‍या गोष्टींनी भुलून जाण्याची शक्यता आणि बदल झाला तरी नशिबाला/परिस्थितीला दोष देण्याची मानसिकता आणि अगतिकता कमीकमी होत जाते आणि आपण विजिगीषु होतो! चतुरंग

In reply to by चतुरंग

मराठी_माणूस 07/07/2008 - 10:15
तिकडून इकडे आल्यानंतरची मानसिक जडणघडणीची वर्षे ही व्यक्तीसापेक्ष असतात असे माझे मत. काही लोक हे इथेच जन्मल्याप्रमाणे सराइतासारखे इथलेच बनून जातात, बरेचसे कित्येक वर्षे आंदोलित अवस्थेतून प्रवास करीत, अनेक गोष्टींना मुरड घालीत एकदाचे इथले होतात पण ते मनातून खोलवर अस्वस्थ असतात, आणि काही लोक कधीच इथले होऊ शकत नाहीत, त्यांचे मन हे कायम तिकडेच असते आणि आत्मा हरवलेल्या व्यक्तीसारखे ते फक्त परिस्थितीसमोर मान तुकवून जगत राहतात. अत्यंत चपखल आणि योग्य शब्दात घेतलेला परमर्श. हे सर्व अनुभवले असल्यामुले जास्त भिडते.

चित्रा 07/07/2008 - 06:48
मुक्तसुनीत यांचे आणि मिपाचे या पहिल्यावहिल्या अग्रलेखाबद्दल अभिनंदन. अग्रलेखांच्या या मालिकेतील अगदी पहिलाच लेख विचार करायला लावणारा. सर्वांनी दिलेले प्रतिसाद मनातल्या भावना पोचवत आहेतच, पण आपला सुरक्षित कोश सोडून बाहेर पडलेल्या कुणालाही ह्याच सगळ्या उलाघालीतून जावे लागते असे वाटते. मग ते कोकणातून मुंबईला आलेले लोक असोत की दूरगावी शिकायला आलेले विद्यार्थी. त्यात अनेकदा मदत करणारे लोक मिळतात तर कधी कधी अत्यंत कटू अनुभवही येतात. यातून तावून सुलाखून निघत कधी जोमाने तर कधी दु:खी होऊन आपापल्या मगदुराप्रमाणे माणसे मार्ग काढत राहतात. हे असेच सर्वत्र दिसते. मराठी भाषेच्या नि भारतीयत्वाच्या संकल्पना प्रसरणशील नि सामावून घेणार्‍या बनल्याखेरीज पर्याय नाही. हे अगदी योग्य.

अग्रलेखाकडून काही विशिष्ट अपेक्षा असतात. संपूर्ण पत्राची भूमिका नेमकी आणि स्पष्टपणे पुढ्यात ठेवून पत्राला स्वतःचा चेहरा देण्याची मोठी जबाबदारी त्या लेखावर असते. बातम्यांच्या निवडीतून, मांडणीतून आणि प्राधान्यक्रमातून जे अमूर्तपणे व्यक्त होत असतं, तेच मूर्त स्वरूपात, पण कंठाळी होऊ न देता मांडण्याची ही नाजूक कामगिरी. 'मिसळपाव' सारख्या व्यासपीठाच्या बाबतीत ती अजूनच जोखमीची. कारण वृत्तपत्राचं स्वरूप संपादक ठरवतात. संकेतस्थळाच्या बाबतीत हे काम मोठ्या प्रमाणावर वाचक-लेखकांचंच - आणि त्यामुळे काहीसं विस्कळीत-शिथिल असतं. शिवाय वृत्तपत्राला असलेले स्थलकालाचे संदर्भही इथे विस्तारलेले असतात. या सगळ्या अस्ताव्यस्त मंथनातून काही मोजकं-देखणं काढून देणं, प्रश्नांना चालना देणं, एकांगी भूमिका न घेताही ठाम मत मांडणं - म्हणजे निव्वळ महाद्वार किलकिलं करणं नक्कीच नव्हे. उलट ही मिरवणुकीची देखणी, अपेक्षा वाढवणारी - आणि मागच्या फळीतल्या लोकांच्या जबाबदार्‍याही!- सुरुवात आहे. मुक्त सुनीत यांचं अभिनंदन. पुढच्या पाहुण्या संपादकांना शुभेच्छा. अवांतरः आधीच्या संपादकानं त्याच्या निवडीनं पुढच्या संपादकाला 'खो' देण्याची कल्पना कशी वाटते? म्हणजे एकमेकांना आग्रह करायला नको आणि स्वेच्छेनं कुणी पुढे येण्याची वाटही पाहायला नको. अर्थात वेळाच्या अडचणी जाणून संपादकांच्या संमतीनं 'खो' पुढेही पाठवता येईल.

नंदन 07/07/2008 - 08:04
आणि समयोचित अग्रलेख (४ जुलै, साहित्य संमेलन आणि अच्युत गोडबोलेंच्या लेखाच्या पार्श्वभूमीवर). ह्या उपक्रमाची सलामी दमदार झाली आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

अग्रलेखात स्थलांतरितांचे प्रश्न आणि त्या निमिताने एनराय म्हणुन होणारी विचारांची कोंडी काही प्रश्न विचार करायला लावणारे असेच आहेत. अग्रलेख आवडला !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यशोधरा 07/07/2008 - 08:47
संपादकीय अतिशय उत्तम जमलं अहे, मुक्तसुनीत आणि मिपावर ही कल्पना मांडून ती साकार करणारे तात्या अन् पडद्यामागचे तंत्रज्ञ, सार्‍यांचेच अभिनंदन. संयत भाषेत परदेशस्थ भारतीयांच्या मनातली उलघाल, मानसिक द्वंद म्हणा, संक्रमण म्हणा - अतिशय परिणामकारक रीत्या मांडले आहे. वेडावाकडासा उहापोह अचूक जमला आहे!! पुढील संपादकीय कधी?

अमोल केळकर 07/07/2008 - 09:23
मुक्त सुनित , साप्ताहिक संपादकीय सदराच्या शुभारंभाचा पहिला लेख आवडला. पहिल्या सादरीकरणाबद्दल तुमचे अभिनंदन त्याचप्रमाणे मिपा व्यवस्थापनाने हा उपक्रम लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करुन एका महान नेत्याची आठवण ठेवली त्यावद्दल व्यवस्थापनाचे ही अभिनंदन -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

"डॉलर कमावतो, अमेरिकन नव्हे, इंडीयावर प्रेम करतो, इंडीयन नव्हे, साहित्य संमेलन भरवतो , महाराष्ट्रीय नव्हे , तर मी कोण !"
खरं आहे! मी कोण ? हा प्रश्न स्वयम अध्ययनाचा आहे, आत्मशोधनाचा आहे. व्यथांचा आहे ,कथांचा आहे आत्मस्तुतीचा ही आहे, आत्मक्लेशाचा ही आहे. न जाणो एखाद्या संवेदनशिल माणसाला तो आत्मबलिदानाचा ही ठरेल. प्रकाश घाटपांडे

सहज 07/07/2008 - 10:13
मिरवणुकीच्या सुरवातीच्या ह्या मानाच्या अग्रलेखाला मुजरा!!! एनाराय म्हणले की बहुतेक वेळा ६०-७० च्या दशकानंतरचे परदेशस्थ भारतीय डोळ्यासमोर येतात. बहुतेक वेळा ते अमेरिका, इंग्लंड मधलेच असतात. :-) जगात जवळजवळ १०० देशात कदाचित जास्तच देशात "भारतीय लोक" आहेत. ब्रिटिश साम्राज्यात मजुर म्हणुन शतकांपुर्वी नेलेले मजुर भारतीय, काही सुशिक्षित डॉक्टर, इंजिनियर तसेच व्यापारी भारतीय अशी अनेक भारतीय मंडळी शेकडो वर्षांपुर्वी स्थलांतरीत झाली. आजही आपण पेपर मधे वाचतो की बाली मधे ९३% जनता हिंदु आहे. पुर्वेला कोरीया मधे, पश्चिमेला वेस्ट इंडीज बेटामधे रामाचे, कृष्णाचे मंदीर आहे. फिजी, मॉरिशस, साउथ अफ्रिका मधे कित्येक पिढ्यान पिढ्या भारतीय वंशाचे अनेक लोक आहेत. गेल्या शतकात पेहराव, बोलीभाषा, धर्माने, पारपत्राने बदलले असले तरी आजही त्यांची ओळख सांगताना इतिहासाला, मानववंशशास्त्राला किंवा कमी शिक्षीत माणसाला त्यांचे भारतीयत्व नक्कीच आठवते. अगदी जरी आपण भारतीय त्यांच्याबद्दल विचार करत नसलो तरी. काही जाणत्या लोकांना धन्यवाद की पर्सन ऑफ इंडीयन ओरीजीन ह्या कागदपत्राने त्यांनी ही परदेशस्थ भारतीयांना आपले मुळ टिकवून ठेवायला एक संधी दिली आहे. वसुधैव कुटूंबकम, हे विश्वची माझे घर वाक्यांना खराखुरा अर्थ द्यायला ह्या जगभरच्या ३० दशलक्षावधी भारतीय बांधवाना मेनलॅंड भारतीयांनी जोडून ठेवले पाहीजे. आंतरजालाच्या युगात हे अशक्य नाही.

परदेशस्थ भारतीयांच्या व्यथा अगदी अचूक ,योग्य शब्दांत मांड्ल्या आहेत.अभिनंदन.पण त्याचबरोबर भारतात राहू इछिणारे अनेक हुषार,होतकरु तरुण दिसतात.पण ते केवळ स्वदेशात राहतात,अमेरीकन चलन मिळवित नाहीत म्हणून त्यांना भारतातच योग्य मान मिळत नाही किंबहुना त्यांच्याकडे बघण्याची व्रुत्ती थोडी अवहेलनेची असते असा अनुभव येतो.त्यांचीही मानसिक स्थिती अधांतरी ,त्रिशंकूसारखी होते.त्यावरही मि.पा.संपादकांनी केव्हातरी प्रकाश टाकावा ही विनंती.

आनंदयात्री 07/07/2008 - 16:43
"अग्रलेख" ही संकल्पना अवृत्तपत्रिय माध्यमात आणनारे मिसळपाव डॉट कॉम हे पहिले संस्थळ - ट्रेंड सेटर ! हे ही एक संक्रमणच. माय मराठीची अशी सेवा करायचे भाग्य लाभले म्हणुन मिसळपाव डॉट कॉम चे अन तात्यांचे अभिनंदन. मुक्तसुनितरावांची पहिला पाहुणा संपादक म्हणुन निवड योग्यच आहे, एका बर्‍यापैकी चर्चित पण इथे अत्यंत ऍप्लिकेबल अशा विषयावर सुंदर विवेचन केल्याबद्दल धन्यवाद. लेख सगळ्या अंगाने उत्तम आहे विशेष म्हणजे अग्रलेख आहे, लेखाचा विषय जरी बर्‍यापैकी भावनिक बाबींशी निगडित असला तरी कुठेही ललित लेखनाचा सुर जाणवला नाही, हे ही अग्रलेखाचे एक यशच आहे. आपलाच, आनंदयात्री सदस्य मिसळपाव डॉट कॉम

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर 07/07/2008 - 22:56
लेखाचा विषय जरी बर्‍यापैकी भावनिक बाबींशी निगडित असला तरी कुठेही ललित लेखनाचा सुर जाणवला नाही, हे ही अग्रलेखाचे एक यशच आहे. अगदी सहमत आहे! तात्या.

पाहुण्या संपादकांचे (मुक्तसुनितांचे) हार्दीक अभिनंदन. फार मोठा, बहु आयामी प्रश्न संपादकांनी हाताळला आहे. माणसं मायदेश सोडून परक्या देशात स्थलांतर का करतात? ते करताना त्यांनी कोणकोणती रास्त स्वप्ने उराशी बाळगलेली असतात? त्यातील किती आणि किती कालावधीत पुर्ण होतात? परदेशातील वास्तव्याने होणारे फायदे किती आणि तोटे किती? प्रत्येक व्यक्तीच्या (स्थलातरीत) आर्थिक, मानसिक, भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक गरजांची होणारी पुर्ती आणि फरपट दोन्हीचा अनुभव वजनदार असतो. भारत सोडून जाताना अर्थातच मित्रांनी, आप्तेष्टांनी, व्यवसाय बंधूंनी 'भाग्यवान' हा शिक्का कपाळी मारलेला असतो. आपणही तो मंगलप्रसंगी भाळावर रेखिलेल्या चंदनाच्या टिळ्याप्रमाणे मिरवत असतो. परदेशातील पहिलंदर्शन छाती दडपून टाकणारं असतं. त्या भूमीवर पहिला प्रश्न मनांत येतो, 'मी घेतलेला निर्णय धाडसी खरा, पण खरंच आपली स्वप्नं (बहुतांशी आर्थिक) पुर्ण होतील नं?' तिथल्या वातावरणात आपण रुळतो, संघर्ष सुरू होतो. रजेवर जाताना मनातला जमा-खर्च (काहींजणांना) तितकासा भावणारा नसतो. भारतात आल्यावर तेच सगेसोयरे भेटतात, आपल्या कपड्यांवरून, आपण आणलेल्या भेटवस्तूंवरून आपली परदेशातील परीस्थिती जोखतात. आपणही बोलण्यातून आभासी दुनिया उभारतो. सर्वत्र आनंदआनंद असतो. आई किंवा वडील एकच प्रश्न विचारतात, 'अजून किती दिवस राहणार 'तिथे'?' इथे, 'बघू, अजून काही ठरवलं नाही' असं मोघम उत्तर दिलं जातं. पुढे अनेक वर्षांच्या वास्तव्यात आपणच हा प्रश्न स्वतःला विचारू लागतो. जी स्वप्न उराशी बाळगली होती (आर्थिक) ती केंव्हाच पुर्ण झालेली असतात पण भारतातील वाढती महागाई आणि आपले उंचालेले 'लिव्हींग स्टँडर्ड' ह्यांचा मेळ मनात बसत नाही. परत गेलो आणि हे 'स्टँडर्ड' सांभाळता नाही आले तर आपले हसे होईल ही भिती वाटते. जुने व्यावसायिक सहकारी पुढे गेलेले असतात. जी छाप इतकी वर्षोंनवर्षे सर्वांवर पडली आहे त्यातील पोकळपणा उघडा पडेल अशी भिती वाटत राहते आणि माणूस परतीचा विचार पुढे ढकलत राहतो. त्यात पुन्हा, त्याच्या आधी मायदेशी परतलेले कालांतराने पुन्हा नव्या नोकरीच्या निमित्ताने परदेशात परत येतात, भारतातल्य वाढलेल्या महागाईची, वाढत्या गर्दीची, भ्रष्टाचारांची, डॉक्टरीपेशातील खालावलेल्या नितीमत्तेची अतिरंजीत चित्रे नजरे समोर उभी करताता आणि चांगला जुळवून आणलेला आपला धीर खचतो. अति विचारांमुळे 'कृती' घडत नाही. परदेशात जाताना भारतातील दोर कापून जावे. तसेच, परदेशातून परतताना तिथले दोर कापून यावे. 'जमलं नाही तर परत येईन' हा विचार चौफेर संघर्ष करू देत नाही. त्यामुळे अपयश पदरी येतं किंवा मर्यादीत यश प्राप्त होतं. परतीचे दोर कापून टाकले तरच माणूस जीवाच्या आकांताने लढतो. तेंव्हाच पौर्णिमेसारखे यश नजरेस पडते. माझा अनुभव युरोप-अमेरिकेतला नाही. आखाती देशातील आहे. त्यामुळे मुळ उद्देश आर्थिक आणि आर्थिकच होता. पण तरीही, संपूर्ण वेगळी संस्कृती, वेगळी भाषा, वेगळे हवामान, वेगळी राजकिय व्यवस्था अशा वणव्यात सापडल्यावर बसणारे चटके आणि एकटेपण ह्यावर एखादी कादंबरी लिहीता येईल. सणवार, लग्न-मुंज, मिरवणूका हे सर्व तर नाहीच नाही पण साली कधी 'रामनाम सत्य है।' वाली शाश्वताचे दर्शन देणारी प्रेतयात्राही नजरेस पडली नाही. मी भारत सोडून आखातात गेलो तेंव्हा भारतात अशा प्रेतयात्रा दिसायच्या. हल्ली इथेही दिसत नाहीत. पण झगडत राहीलो, इतरांसारखाच, मुंडी तुटलेल्या मुरारबाजीच्या आवेशात. १९६० च्या दशकात अमेरीकेत गेलेल्या मराठी स्थलांतरांच्या संघर्षाविषयी समर्पक माहिती 'फॉर हिअर, ऑर टू गो' (मेहता पब्लीशिंग हाऊस) ह्या अपर्णा वेलणकरांच्या पुस्तकात वाचावयास मिळते. तसेच, 'गोठलेल्या वाटा' (श्रीविद्या प्रकाशन) हे शोभा चित्रे ह्यांचे पुस्तकही वाचनिय आहे. विषय बराच गहन आहे. असो.

वरदा 07/07/2008 - 18:17
अग्रलेख. तात्या आणि मुक्तसुनीत दोघांचही अभिनंदन! डॉलर कमावतो, अमेरिकन नव्हे, इंडीयावर प्रेम करतो, इंडीयन नव्हे, साहित्य संमेलन भरवतो , महाराष्ट्रीय नव्हे , तर मी कोण !" हे १००% खरं... तिकडून इकडे आल्यानंतरची मानसिक जडणघडणीची वर्षे ही व्यक्तीसापेक्ष असतात असे माझे मत. काही लोक हे इथेच जन्मल्याप्रमाणे सराइतासारखे इथलेच बनून जातात, बरेचसे कित्येक वर्षे आंदोलित अवस्थेतून प्रवास करीत, अनेक गोष्टींना मुरड घालीत एकदाचे इथले होतात पण ते मनातून खोलवर अस्वस्थ असतात, आणि काही लोक कधीच इथले होऊ शकत नाहीत, त्यांचे मन हे कायम तिकडेच असते आणि आत्मा हरवलेल्या व्यक्तीसारखे ते फक्त परिस्थितीसमोर मान तुकवून जगत राहतात. खूप छान चतुरंग्..अगदी असेच अनुभव आलेत मलाही . तुम्ही म्हणता ते १००% खरं (पुढच्या अग्रलेखाच्या प्रतिक्षेत) वरदा "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

विसुनाना 07/07/2008 - 18:26
मिपावर सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाबद्दल तात्यांचे आणि संबंधितांचे अभिनंदन. मुक्तसुनीत यांच्यावर टाकलेली पाहुण्या संपादकाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पेलली असे म्हणावेसे वाटते.( ही क्लीशे वाक्ये म्हणावी लागतात - असे म्हणणेही क्लीशे झालेले आहे.) पण खरोखरीच एतद्देशीय लोकांच्या नजरेतून अमेरिका अथवा तत्सम 'प्रगत' देशात गेलेल्या लोकांबद्दल नेहमीच एक प्रश्नचिन्ह दिसते. ते भौगोलिक कुतुहल असेल, सुबत्तेबद्दलचे आकर्षण असेल किंवा त्यांची मानसिकता जाणून घेण्याची इच्छा असेल - या प्रश्नांमधल्या मानसिकतेच्या प्रश्नाचे निराकरण करणारा हा लेख आहे. यानिमित्ताने (आणि याबरोबरीने) टांझानिया,अझरबैजान, वेस्ट इंडीज इ. येथेही जी भारतीय, महाराष्ट्रीय प्रजा स्थायिक झालेली आहे त्यांची मानसिकता काय असते? यावरही भाष्य झाले असते तर बरे झाले असते. "देशादेशातल्या सुसंस्कृत माणसांना कृत्रिम भिंतींच्या नि सीमारेषांच्या पलिकडे पोचण्याशिवाय पर्याय नाही. "हा महत्त्वाचा विचार मुक्तसुनीत यांनी प्रभावीपणे मांडला आहे. परंतु असे करताना मुळात "वसुधैव कुटुंबकम" असे सांगणारी भारतीय संस्कृती परप्रांतात घडणार्‍या अनिवासी भारतीयांच्या भावी पिढ्यांपर्यंत पोचत आहे काय? मुक्तसुनीत यांचा हा स्पृहणीय विचार अनिवासी भारतीयांच्या परसंस्कृतीत वाढणार्‍या पुढील पिढ्याही अंगिकारतील काय? याही प्रश्नाचा उहापोह व्हायला होता असे वाटले. अमेरिकेचे ठळक उदाहरण घ्यायचे झाल्यास तेथील बहुतांश जनता बाहेरून आलेल्या लोकांच्या पिढ्यांनी बनली आहे. आज या पिढ्या आपल्या पूर्वमातृराष्ट्राशी किती आत्मियता बाळगून आहेत? मागे रीडर्स डायजेस्टमध्ये आलेली एका चिनी - अमेरिकन मुलीची कहाणी वाचनात आली होती. तिचे अमेरिकेत स्थायिक आईवडील तिला ती अठरा-वीस वर्षांची झाल्यानंतर तिच्या मनाविरुद्ध कळत्या वयात पहिल्यांदा चीनला घेऊन आले. तिला चीन कुठे आहे? इथेपासून तयारी करावी लागली होती. तशीच अवस्था आता तेथील भारतीयांच्या मुलांची होत आहे काय? (आय डोंट वॉना कम टू इंडिया!) या पुढच्या पिढ्यांची सांस्कृतिक नाळ भारतीय सहिष्णु विचारांपासून तुटेल आणि तीही अमेरिकेच्या आत्मग्लानीरत समाजाचा एक हिस्सा बनतील काय अशी भीती पहिल्या पिढीतील पालकांना वाटते काय? असो. एकूण अग्रलेख आवडला.

अरुण मनोहर 07/07/2008 - 18:37
मुक्तसुनीत ह्यांचे आभिनंदन. संपादकीयाची सुरवात तर दणक्यात झाली. बाहेर रहाणारे एन आर आय बांधव भाषेच्या नाळेने बांधल्या गेले आहेत हे निरीक्षण अचूक आहे. मिपा साऱखी संकेतस्थळे ह्या बंधनाचा सकारात्मक उपयोग करून घेत आहेत ही खूप भाग्याची गोष्ट आहे.

मुक्तसुनीत 07/07/2008 - 18:42
सर्व मिपावासीयांचे आभार. तुमचे शब्द लिहायला उभारी देत रहातात. तात्या अभ्यंकरांचे आभार मानणे त्याना उपचारासारखे वाटेल. पण तसे न करणे चुकीचे होईल. त्यांचे मनःपूर्वक आभार. अनेक लोकांनी विचारांना चालना देणारे प्रतिसाद दिले आहेत. काही महत्त्वाचे प्रश्न उभे केले आहेत. वेळेअभावी आताच मला (जमतील तशी का होईना पण ) उत्तरे देणे शक्य होणार नाही. पण तुम्ही दाखवलेल्या विश्वासाची आणि प्रेमाची पोच द्यावी म्हणून लिहीत आहे. मिसळपाव आपल्या सर्वांकरता असा आरसा बनते आहे, ज्यात आपल्याला आपल्या आयुष्याच्या छोट्या मोठ्या गोष्टींची, बर्‍या वाईट अनुभवांची प्रतिबिंबे पहायला मिळतात. पुढच्या वाटचालीत मिसळपावने होकायंत्रसुद्धा बनावे अशी सदिच्छा व्यक्त करतो.

रामदास 07/07/2008 - 22:13
ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल क़ुरबान तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू, तू ही मेरी जान तेरे दामन से जो आए उन हवाओं को सलाम, चूम लूँ मैं उस ज़ुबाँ को जिसपे आए तेरा नाम आपला देश सोडून आलेला रेहमान आणि मिनीची स्टोरी आज परत आठवली. काबुलीवालाची आठवण इथे अप्रस्तुत ठरू नये.

In reply to by रामदास

विसोबा खेचर 07/07/2008 - 23:10
ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल क़ुरबान तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू, तू ही मेरी जान तेरे दामन से जो आए उन हवाओं को सलाम, चूम लूँ मैं उस ज़ुबाँ को जिसपे आए तेरा नाम रामदासराव, तसे हे गाणे अनेकदा ऐकले आहे परंतु मुक्तरावांच्या अग्रलेखाच्या आणि त्याला आलेल्या अभ्यासपूर्ण प्रतिसादांच्या पार्श्वभूमीवर, मी स्वत: अनिवासी भारतीय नसलो तरीदेखील वरील गाण्याचे शब्द वाचून जीव अगदी हळवा अन् थोडास्सा झाला! असो.. आपला, (तिरंगाप्रेमी) तात्या.

In reply to by रामदास

चतुरंग 07/07/2008 - 23:34
वतन पासून दूर आल्याशिवाय ती जाणीव काय असते हे खरोखरच समजत नाही! दूधवाल्या भैय्यापासून आणि कोपर्‍यावरच्या इस्त्रीवाल्यापासून ते नेहेमीच्या पानाच्या ठेल्यावरल्या पानवाल्यापर्यंत आपले ऋणानुबंध किती नकळत जोडले गेलेत हे ते भवती नसतानाच कळतं. गौरी-गणपती, दसरा, दिवाळी असे सणवार येतात, ते आम्ही आपापल्या परीने साजरेही करतो पण 'ती' मजा नाही हा भाव काही केल्या पुसता येत नाही! लग्न-मुंजीसारखे नात्यागोत्यात रमण्याचे प्रसंगही बर्‍याचवेळा चुकल्याची चुटपुट कायमसाठी लागून राहते. असे असताना 'तुम्हाला काय कमी, तुम्ही तिकडे डॉलर्समधे लोळताय' किंवा 'एवढे वाटत होते तर जायला कोणी सांगितले होते?' अशांसारखी वाक्ये ऐकली की मन करपून जाते! चतुरंग

सर्वसाक्षी 07/07/2008 - 23:56
मा. पाहुणे संपादक, तात्या आणि मिपाचे हार्दिक अभिंनंदन! सुंदर उपक्रम, सुंदर प्रतिसाद, सुरेख अग्रलेख असा त्रिवेणीसंगम साधला आहे. मुक्तसुनित यांचे अभिनंद आणि एका चांगल्या लेखाबद्दल आभार.

मुक्तसुनीत 08/07/2008 - 00:02
पर्याय आणि स्वीकृती : एक आणखी विचार माझ्या मनात येतो तो म्हणजे स्थलांतरित केलेल्या ( आणि न केलेल्या) लोकांनी , "स्थलांतरा"बद्दल स्वीकारलेल्या पर्यायांबद्दल. चतुरंग यानी लोकांच्या वेगवेगळ्या मनःस्थितींचे वर्णन केले आहे. मला तात्यांच्या कुठल्याशा पोस्टमधील एक विधान आठवते की, काही वर्षांमागे त्यांच्याकडे देश सोडण्याचा पर्याय अगदी सहज म्हणावा असा उपलब्ध होता. आपल्या कौटुंबिक परिस्थितीला लक्षात घेऊन त्यानी हा पर्याय नाकारला. आज या निर्णयाबद्दल त्याना पश्चात्तापच काय , पण साधी रुखरुख वाटण्याचे काडीइतकेही कारण नाही. माझ्यामते आपण स्वीकारलेल्या पर्यायाला डोळसपणे स्वीकारण्याचे हे एक उदाहरण आहे. "यू कांट हॅव द केक अँड ईट इट्" हे जर नीट उमजले असेल तर दोन डगरींवर पाय ठेवण्यातले वैय्यर्थ समजेल. पेठकर यानी परतीचे दोर कापण्याचा उल्लेख केला आहे त्याचा एक अर्थ हा असासुद्धा आहे. अमेरिकन एनाराय आणि इतर : सहज आणि विसुनाना यानी आणखी एक मुद्दा मांडलाय : युरोप/अमेरिका सोडून इतर ठिकाणी असलेले आपले लोक. मी स्वतः अमेरिकेत स्थायिक झालेला आहे, पण आजूबाजूला बघताना मला एक गमतीची गोष्ट जाणवते : ज्या प्रमाणे अमेरिकेतल्या एस्टॅब्लिशमेंटला पृथ्वी सूर्याभवती फिरत नसून , अमेरिकेभवती फिरते आहे असे भास होतात , त्याची काही प्रमाणात लागण अमेरिकास्थित एनारायनाही कधीकधी होते. स्थलांतरणाची प्रक्रिया गेल्या १-२ दशकांची नाही. हां , जागतिकीकरणामुळे या प्रक्रियेला वेग जरूर आला असेल. पण कितीतरी दशके - प्रसंगी शतके - आधी लोक आफ्रिका खंडात, आशियातल्या इतर भागात गेलेले आहेत. त्यांचे पिढ्यानुपिढ्यांचे लागेबांधे भारताशी आहेत. अमेरिकास्थित लोकांना आपल्यापलिकडे याची जाणीव असते की नाही असा प्रश्न कधीकधी पडतो. या लेखानिमित्त तेथील लोकानी आपापल्या अनुभवांबद्दल लिहावे असे वाटते.

In reply to by मुक्तसुनीत

मनिष 08/07/2008 - 15:44
युरोप/अमेरिका सोडून इतर ठिकाणी असलेले आपले लोक. मी स्वतः अमेरिकेत स्थायिक झालेला आहे, पण आजूबाजूला बघताना मला एक गमतीची गोष्ट जाणवते : ज्या प्रमाणे अमेरिकेतल्या एस्टॅब्लिशमेंटला पृथ्वी सूर्याभवती फिरत नसून , अमेरिकेभवती फिरते आहे असे भास होतात , त्याची काही प्रमाणात लागण अमेरिकास्थित एनारायनाही कधीकधी होते. स्थलांतरणाची प्रक्रिया गेल्या १-२ दशकांची नाही. हां , जागतिकीकरणामुळे या प्रक्रियेला वेग जरूर आला असेल. पण कितीतरी दशके - प्रसंगी शतके - आधी लोक आफ्रिका खंडात, आशियातल्या इतर भागात गेलेले आहेत. त्यांचे पिढ्यानुपिढ्यांचे लागेबांधे भारताशी आहेत. अमेरिकास्थित लोकांना आपल्यापलिकडे याची जाणीव असते की नाही असा प्रश्न कधीकधी पडतो.
खरे आहे. ह्याच अर्थाने अमएरिकनांविषयी म्हटले जाते की त्यांना वाटते की "world starts & ends with America"

पाहुण्या संपादकाच्या पहिल्यावहिल्या अग्रलेखाकरता मुक्तसुनीत यांचे मनापासून अभिनंदन!! सर्वच मराठी माणसांच्या मनाच्या कोषात, मग तो निवासी असो वा अनिवासी, वास करत असणार्‍या या विषयाची अभिनिवेषरहित चर्चा घडवून आणण्याचे कार्य या अग्रलेखाने केले आहे. बाकीच्या भारतीय माणसांचे ठाऊक नाही पण मराठी माणूस हा कुठेही राहिला तरी मनाने मराठीच असतो हेच आमच्या पहाण्यात आले आहे. मग तो बंगळूरात असो की दिल्लीत! आणि अमेरिकेत असो की इंग्लंडात!! आपल्या परंपरांचा, सणवारांचा, चालिरितींचा अभिमान बाळगत आपण जगत असतो.... लग्न-मुंजीसारखे नात्यागोत्यात रमण्याचे प्रसंगही बर्‍याचवेळा चुकल्याची चुटपुट कायमसाठी लागून राहते. चतुरंगजी, तुम्ही लग्न-मुंजीचं म्हणताय, पण खरं दु:ख्ख केंव्हा होतं माहितीये? आपले आई-वडिल जेंव्हा निधन पावतात तेंव्हा ताबडतोब जाण्याची तयारी असूनही आपण पोहोचेपर्यंत तिथे अंत्यविधी पूर्ण झाला असेल, आपल्याला अंत्यदर्शन घडणार नाही ही जाणीव उरात घेऊन माणूस जेंव्हा तो २४-३० तासांचा प्रवास करतो तेंव्हा!!! अर्थात यात फक्त इंग्लंड-अमेरिकेचाच संदर्भ नाही. माझ्या एका मित्राला त्याची आई गेल्यावर दिग्बोई (सैन्यात असल्याने) ते सावंतवाडी हा प्रवास करायला लागला होता!! काही जाणत्या लोकांना धन्यवाद की पर्सन ऑफ इंडीयन ओरीजीन ह्या कागदपत्राने त्यांनी ही परदेशस्थ भारतीयांना आपले मुळ टिकवून ठेवायला एक संधी दिली आहे. सहजराव, खरं आहे! इतक्या वर्षांनंतर का होईना तो कायदा करण्यासाठी जोर लावल्याबद्दल भारतीय राजकारण्यांची (मग कसे का असेनात ते!) अनिवासी जनता अत्यंत आभारी आहे. देशादेशातल्या सुसंस्कृत माणसांना कृत्रिम भिंतींच्या नि सीमारेषांच्या पलिकडे पोचण्याशिवाय पर्याय नाही. "हा महत्त्वाचा विचार मुक्तसुनीत यांनी प्रभावीपणे मांडला आहे. सहमत! आणि श्री. मुक्तसुनीत यांनी या विषयाचा इतका उत्तम परामर्ष आपल्या अग्रलेखात घेतलेला आहे की त्यावर टिप्पणी करण्यासारखे वा त्याच्यात भर घालण्यासारखे आम्हाला तरी काही सुचत नाही. सुरवात तर सुरेख झाली आहे! श्री. मुक्तसुनीत यांनी अपेक्षा अतिशय उंचावून ठेवल्या आहेत. तेंव्हा यापुढे लिहिणार्‍या भविष्यातील सर्व पाहुण्या संपादकांना आमच्या शुभेच्छा!! -पिवळा डांबिस

कोलबेर 08/07/2008 - 03:58
मुक्तसुनीत ह्यांच्या अग्रलेखाने उंचावलेल्या अपेक्षा अगदी पुरेपूर पूर्ण केल्या. त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही बोलक्या आणि वैचारीक आहेत. सॅम्युअल हंटींगटन् ह्यांच्या 'क्लॅश ऑफ सिव्हीलायजेशन' ह्या उत्कृष्ट पुस्तकाची आठवण करुन देणारा लेख वाटला. हंटींगटन सायबाच्या म्हणण्या प्रमाणे माणसाची खरी ओळख ही देश/धर्म/विचारसरणी ही नसून त्याची 'संस्कृती' (ज्या संस्कृतीत तो वाढला ती) आहे. कळत नकळत देशापेक्षा जास्त जपली जाते ती संस्कृती. देशा बद्दलच बोलायचे झाले, तर जर इच्छा असेल , मनाची तयारी असेल आणि त्याला कर्तृत्वाची जोड असेल तर कुणीही एका सही शिक्क्या मध्ये आपला देश बदलू शकतो. पण आपण ज्या संस्कृतीत वाढलो त्याच्याशी असलेली नाळ कधीच तोडता येणार नाही. डांबीसरावांचा सुलेश आणि पाकिस्तानी अब्दुल खान. ह्यांचे जे मेतकुट जमले ते ह्याच सामायीक धाग्यामुळे. हाच सुलेश एखाद्या चिनी माणसा बरोबर राहिला असता तर त्याच्याशी कदचित इतकी घनिष्ठ मैत्री होऊ शकली नसती, कारण कोपर्‍या वरच्या दुकनातुन जिलब्या आणि समोसे आणून त्यावर ताव मारत लता मंगेशकरची गाणी लावुन सुलेश त्याच्याशी कधीच गप्पा मारू शकला नसता.

In reply to by कोलबेर

कारण कोपर्‍या वरच्या दुकनातुन जिलब्या आणि समोसे आणून त्यावर ताव मारत लता मंगेशकरची गाणी लावुन सुलेश त्याच्याशी कधीच गप्पा मारू शकला नसता. खरं आहे! फक्त गाणी "झीनत अमान"ची! ती कोणी गायलीयत याची अब्दुलखान फिकीर करीत नसे!! :)

बबलु 08/07/2008 - 04:39
पाहुणा संपादक, अतिशय छान लेख. आणि पेठ्कर साहेबांचा reply उत्तम.

मुक्तसुनीत ... सर्व प्रथम हार्दिक अभिनंदन ! विचार प्रवृत्त करणारा लेख विचारपूर्वक लिहिल्याबद्दल !! :) एन.आर.आय लोकांची घालमेल एक वेगळाच प्रकार असतो. तीन आठवड्यात देश डोळ्यांनी पिऊन घ्यायचा, बँक बॅलन्सला भगदाड पाडून घ्यायचं आणि शरीरानं दमून पण मनानं ताजं होऊन परतायचं ...ते पुढच्या भारतवारीची वाट पहात !! आपले आई-वडील इथे आले की चार - सहा महिन्यांचा सहवास आधाशासारखा साठवायचा आणि त्यांना इथला विंटर न झेपणार्‍या जागी राहतो म्हणून कुढायचं. मुलांच्या संस्कारांत अचानक घडणारे चांगले बदल पाहून सुखवायचं आणि मग जाणवतं आपण कितीही प्रयत्न केला तरी आजी - आजोबा ह्यांची जादू वेगळीच !!! आता कुणी म्हणेल मग एवढं वाटतं तर जावं भारतात परत, कुणी अडवलंय ? (पण प्रत्येक सोप्या प्रश्नाचं उत्तरही सोपं असतंच असं नाही ना !!!) स्वत:पुरतं बोलायचं तर आमच्या मुलाचा जन्म इथे झाला म्हणून त्याचा अमेरिकन पासपोर्ट पहिल्यांदा हातात घेताना माझी आणि बायकोची एकमेकांबरोबर जी अस्वस्थ नजरानजर झाली ती शब्दांत मांडणं योग्य नव्हे. माझी खात्री आहे अनेक जोडप्यांमधे तसाच मूक संवाद झाला असेल. चला इथेच थांबावं पण पुन्हा एकदा तुमचं हार्दिक अभिनंदन ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------

मनिष 08/07/2008 - 17:12
मुक्तसुनीत यांचा लेख अपेक्षेप्रमाणेच उत्कृष्ट झाला आहे. त्यांनी मांडलेले मुद्दे निश्चितच विचार करण्यासारखे आहेत. मधे "स्व...देश" हे भूषण केळकर ह्यांनी संपादने केलेले पुस्तक वाचले. त्यातील बर्‍याच परतणार्‍या एन आर आय चा सूर असा होता -- आम्ही एवढी समृद्धी, पैसा सोडून इथे परत भारतात आलो, आणि इथे साधं XYZ मिळत नाही, होत नाही म्हणजे काय?? आता हे XYZ - गॅस पासून शाळेच्या ऍडमिषन पर्यंत काहिही असेल. त्यात बरेच जणांनी कित्येक पाने खर्च केलीत ती हे सिद्धे करण्यात कि इथल्यापेक्षा तिथे आम्हाला किती चांगला स्कोप होता....वैताग येतो ते वाचून किंवा ऐकून. अरे मग कशाला परत आलात?? जी काही कारणं असतील पण परतण्याचा निर्णय तुमचाच होता ना? मग का उठसुठ शिव्या घालताय जिथे तुम्ही शिकलात, वाढलात त्या भारताला? निर्णय तुमचाच होता ना? तसेच तिथे रहाणार्‍यांबाबत - कोलबेर म्हणाले त्याप्रमाणे आपण जगतो ते आपल्या संस्कृतीबरोबर...देश/धर्म/विचारसरणी ह्यांच्यापेक्षाही जवळची ती संस्कृती. त्याचबरोबर परक्या देशाची संस्कृती उंबरठ्याबाहेर असतेच. जसा भोवतालच्या वातावरणाचा आपल्यावर परिणाम होतो, तसाच आपणही यथाशक्ती आपल्या भोवतालच्या वातावरणावर परिनाम करतो. ह्या दोन्हीमधून तयार होते ती स्थळांतरीतांची, संक्रमणाची संस्कृती....त्यात दोन संस्कृतींची सरमिसळ होणारच....पण वेगवेगळ्या प्रमाणात, ते प्रमाण ज्या त्या व्यक्तिवर/कुटुंबावर अवलंबून असेल..तिथल्या सोयी, सुविधा आणि समृद्धी हवी पण भयाण एकाकीपण, (आपल्या दृष्टीने) टोकाचे व्यक्तिस्वातंत्र्य, भांडवलशाहीचा अतिरेक - त्यातून अपरिहार्यपणे येणार कंस्युमरीझम - त्यापेक्षाही वाईट म्हणजे, माणसालाच वस्तू समजणारी तिथली जीवनशैली हयांचा काही लोकांना उबग येतो...शिवाय आपली मुळे, संस्कार इथले असतील तरी मुलांवर बाहेर, शाळेत संस्कार होतात ते तिथल्या परक्या संस्कृतीचे...त्याचा प्रभाव किती राहील हे पुर्णपणे आपल्या हातात नसते. मग १४-१५ वर्षाच्या मुलाला/मुलीला हातात कॉन्ट्रासेप्टीव्ह देऊन "have fun" म्हणण्याची मानसिक तयारी आहे का हे पण तपासावे! खरं तर ८-१० वर्षे तिथे वाढलेल्या लहान मुलांनाही परत इथे आणने हे महा-कठीण काम असते. त्यात खरच घरका-न-घाटका अशी अवस्था होऊ शकते... पण तिथे रहायचे हा निर्णय तुमचाच होता ना? कुठलाही निर्णय असला तर तो एक "पॅकेज डील" म्हणून येतो...थोडेफार इकडे-तिकडे होऊ शकते, पण मुळात हे पॅकेज डीलच. मग आपल्याच निर्णयाचे एकदा प्राईस-चॉईस इक्वेशन मांडून बघावे....काय मिळवण्यासाठी काय गमवाए लागते ते तर बघावे...मग आपली त्याची मान्सिक तयारी झाली कि मग निर्णय अंमलात आणतांना फार घालमेल होत नाही. मुळात इकडे-तिकडे बोट दाखवण्याऐजी तिकडे जाण्याचा किंवा परतण्याचा -- कुठलाही असला तरी तो निर्णय आपलाच होता हे स्वीकारावे...नाहीतर दोन्ही बाजुंनी हवे तितके मुद्दे मिळतात वाद घालायला.

In reply to by मनिष

मुक्तसुनीत यांचा अग्रलेख तर उत्तमच पण इथे आलेल्या अनेक प्रतिक्रियांचे संपादन केले तर अजून एक उत्तम अग्रलेख तयार होईल असे वाटते. चतुरंग, पेठकरकाका, पिडांकाका आणि इतर अनेकानी उत्तमोत्तम प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वच वाचनीय. संदिपने मांडलेला अमेरिकन पासपोर्टचा मुद्दा म्हणजे भारतीय आई-वडीलांच्या अमेरीकन मुलाना देशात काय काय समस्या येऊ शकतात याची नांदीच आहे. शिवाय आपली मुळे, संस्कार इथले असतील तरी मुलांवर बाहेर, शाळेत संस्कार होतात ते तिथल्या परक्या संस्कृतीचे...त्याचा प्रभाव किती राहील हे पुर्णपणे आपल्या हातात नसते. मग १४-१५ वर्षाच्या मुलाला/मुलीला हातात कॉन्ट्रासेप्टीव्ह देऊन "have fun" म्हणण्याची मानसिक तयारी आहे का हे पण तपासावे! खरं तर ८-१० वर्षे तिथे वाढलेल्या लहान मुलांनाही परत इथे आणने हे महा-कठीण काम असते. त्यात खरच घरका-न-घाटका अशी अवस्था होऊ शकते... पण तिथे रहायचे हा निर्णय तुमचाच होता ना? हेही अगदी पटले. उत्तम लेखाबद्दल सुनीतरावांचे आभार. पुण्याचे पेशवे

सखी 08/07/2008 - 22:27
कोणतीही एकच बाजु न घेता तटस्थपणे केलेले विश्लेषण आवडले. सर्वसाक्षींनी म्हटल्याप्रमाणे - सुंदर उपक्रम, सुंदर प्रतिसाद, सुरेख अग्रलेख. मुक्तसुनीत, तात्या आणि मिपाचे हार्दिक अभिंनंदन!

शितल 09/07/2008 - 02:38
एन्.आय्.रायच्या मनाची घालमेल व्यवस्थित टिपली आहे. आणि मानवी स॑क्रमण ही होतच राहणार. पेठकर काका॑ची प्रतिक्रीया ही अतिशय बोलकी आणि जिव॑त. पाहुणा स॑पादक एक छान लेख वाचायला मिळाला. धन्यवाद.

प्रियाली 09/07/2008 - 03:07
असा चांगला उपक्रम सुरू केल्याबद्दल मिपा आणि मिपापरिवाराचे अभिनंदन!

अग्रलेख आवडला. एक गोष्ट मात्र खटकली ती अशी. अग्रलेखात म्हटले आहे "अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारण्याची माझी वेळ अजून काही आली नाही. परंतु ऐकीव माहितीवर आधारित जे कळले ते असे की, नागरिकत्वाच्या प्रक्रियेमधे अशी एक पायरी येते जिथे तुम्हाला अशा अर्थाच प्रश्न विचारलेला असतो : उद्या समजा , अमेरिकेचे आणि तुमच्या मातृभूमी असणार्‍या देशाचे युद्ध झाले, तर तुमची सहानुभूती, तुमची एकूण प्रतिक्रिया कुणाच्या पक्षाला फायदेशीर ठरेल अशी असेआहे." हे कांही खरं नाही.अर्थात वरील माहिती ऐकीव असल्याच्या माहितीवरून असल्याने गैरसमज होवू नये म्हणून हा खुलासा. १ ते १०० प्रश्न असतात त्यातील कुठलेही १० प्रश्न मुलाखतीत विचारले जातात.त्या १०० प्रश्नात वर उल्लेखलेल्या प्रश्नासारखा प्रश्न किंवा तसा संदर्भ येईल असा प्रश्न नाही. INS Citizenship Test Questions http://usgovinfo.about.com/blinstst.htm वरिल साईटवर क्लिक करून सर्व प्रश्न कुणालाही वाचता येतात,-वाचकापैकी कुणीही हवं तर पहावी- त्याची योग्य उत्तरे पण अभ्यासासाठी दिली जातात. ह्या १०० प्रश्नाच्या बाहेर कुठलाही प्रश्न विचारण्याची परवानगी नाही. मी स्वतः अमेरिकन सिटीझन असल्याने आणि ह्या नाकरिकत्वाच्या प्रक्रियेमधून गेलो असल्यामुळे असं लिहित आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

धनंजय 10/07/2008 - 00:25
नागरिकत्वाच्या शपथेचे पाठ्य : त्यातले काही महत्त्वाचे भाग येणेप्रमाणे: I hereby declare, on oath, * that I absolutely and entirely renounce and abjure all allegiance and fidelity to any foreign prince, potentate, state, or sovereignty of whom or which I have heretofore been a subject or citizen; ... that I will support and defend the Constitution and laws of the United States of America against all enemies, foreign and domestic; ... that I will bear arms on behalf of the United States when required by law; "यापूर्वी जिथला प्रजाजन किंवा नागरिक होतो त्या ... राज्याच्या किंवा सार्वभौमत्वाच्या निष्ठेचा आणि विश्वासार्हतेचा पूर्णपणे त्याग करतो आणि नकारतो" "सर्व अंतर्गत आणि बाह्य शत्रूंविरुद्ध अमेरिकेच्या घटनेचे समर्थन आणि संरक्षण करीन" "कायद्याने जरुरीचे असल्यास अमेरिकेच्या बाजूने शस्त्र बाळगेन" ही सर्व शपथवचने एकत्र वाचता, असे लक्षात येते, की जर कधी मायदेशाचे अमेरिकेशी युद्ध झाले, किंवा अमेरिकेच्या राज्यघटनेला मायदेशाकडून धोका येऊ शकला, तर मायदेशाशी शपथ घेणार्‍याची निष्ठा नसेलच, शपथ घेणारा अमेरिकेचे (घटनेचे) संरक्षण करेल, किंवा कायद्याने जरुरीचे असल्यास अमेरिकेच्या बाजूने शस्त्रे बाळगेल, त्यांचा वापर मायदेशाच्या विरुद्ध असो नसो, कारण त्या मायदेशाशी निष्ठा शपथपूर्वक त्यागलेली असते. मला वाटते बहुतेक शपथ घेणारे "जर कधी" शब्दांवर विचारात जोर देत असावेत, आणि "असे कधीच होणार नाही" असे स्वतःला मनापासून पटवत असावेत. कारण आपल्या हयातीत मायदेशाने अमेरिकेच्या घटनेला धोका पोचवला नाही, तर मायदेशावरची आंतरिक निष्ठा खरोखर त्यागून मायदेशाविरुद्ध कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. श्रीकृष्ण सामंत यांच्या मनात, किंवा ही शपथ घेतलेल्या अन्य लोकांच्या मनात काय विचार आलेत ते जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by धनंजय

धनंजयजी, आपण म्हणता अगदी तसेच विचार शपथ घेताना माझ्या मनात आले. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

शिप्रा 11/07/2008 - 10:56
खुप खुप छान लिहिले आहे..संपाद्कांनि आणि इतर लोकांनि पण ... >>मग १४-१५ वर्षाच्या मुलाला/मुलीला हातात कॉन्ट्रासेप्टीव्ह देऊन "have fun" म्हणण्याची मानसिक तयारी आहे का हे पण तपासावे! अगदि खरे आहे...मि तिथे असताना तेथिल मुलांसाथि हे बघितले आहे...आणि तेव्हाच मला आपल्या संस्क्रुतिबद्द्ल अभिमान वाट्ला... जिथे कमी तिथे आम्ही ..:)

विसोबा खेचर 06/07/2008 - 23:57
पाहुण्या संपादकाच्या पहिल्यावहिल्या अग्रलेखाकरता मुक्तसुनीत यांचे मनापासून आभार. हा उपक्रम असाच सुरू राहावा असे मनापसून वाटते. पैशाचे गणित कुठल्याही दिशेने बदलो. तागडी कुठल्याही दिशेने फिरो. "मानवी संक्रमण" ही घटना चालूच रहाणार आहे. "जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत. जिकडे तिकडे माझ्या खुणा मला दिसताहेत" या केशवसुतांच्या ओळी उद्याही आपल्याला साथ देतील , दिलासा देत रहातील . उत्तम अग्रलेख..! पुन्हा एकदा अभिनंदन व मनापासून आभार... तात्या.

प्रमोद देव 07/07/2008 - 00:19
खरंच प्रश्न विचार करायला लावणारा आहे. एनाराय..म्हणजे न घरका ना घाटका...अशी परिस्थिती आहे खरी. ह्या प्रश्नाचे उत्तर देणे खरंच अवघड आहे. हे एक वरवर सोपे वाटणारे पण न सुटणारे कोडे आहे असे वाटते. मुक्तसुनीत आपण ही व्यथा अतिशय समर्पक शब्दात मांडलेय. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

रामदास 07/07/2008 - 00:42
जोपर्यंतज्या भाषेच्या पुलाखाली आपण सर्व वाढलो, तो पूल सातासमुद्रांपेक्षा मोठा आहे. राष्ट्राराष्ट्रातल्या भिंतींपेक्षा उंच आहे , त्याना ओलांडणार आहे. जिच्या छायेखाली वाढलो तिच्याच दुव्याने एकमेकांशी आपण बांधले गेलो." तोपर्यंत आपण एकत्रच आहोत. भौगोलीक अंतराची काय तमा बाळगायची? सुरेख सुरवात. धन्यवाद. मुक्तसुनीत . धन्यवाद तात्या .

स्वप्निल.. 07/07/2008 - 00:54
मुक्तसुनीत, "....तुमचे मराठी भाषेवरचे प्रेम नि तुमचे अमेरिकन् वास्तव्य या दोन गोष्टी एकमेकांना छेद देत नाहीत." हे आवडले..संपुर्ण लेख आवडला..चांगली सुरुवात.. स्वप्निल..

प्राजु 07/07/2008 - 01:00
मुक्तसुनित आपले आणि तात्यांचे मनापासून अभिनंदन. एका सुंदर उपक्रमाला सुरूवात. उत्तम सुरूवात. खूप विचार करायला लावणारा लेख आहे. रामदास यांच्याशी सहमत आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

संक्रमणशील माणसाच्या मनातलं कन्फ्यूजन ( मी नक्की कोण?) आणि ( थोडं दुखावले गेल्याची भावनाही ) समर्पक शब्दांत मांडली आहे... पहिला लेख आवडला... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

केशवसुमार 07/07/2008 - 02:32
मुक्तीशेठ, एकदम दमदार सुरवात.. आभिनंदन!! तात्याशेठ, मिपावर चालू केलेल्या ह्या 'संक्रमणा' बद्दल आपले आभार आणि अभिनंदन.. (रेसिडेंट जर्मन)केशवसुमार स्वगतः ह्या मुक्तीशेठच्या संपादकिय लेखामुळे वाचकांच्या अपेक्षा वाढल्यात :B ...अता पुढच्या संपादकाची काही खैर नाही.. :W (नॉन रिलायबल )केशवसुमार

धनंजय 07/07/2008 - 02:47
मुक्तसुनीत यांनी अंतर्मुख करणार्‍या लेखाने संपादकीयांचा श्रीगणेशा केला आहे. असे लेखन या सदराचा पायंडा होईल, असे दिसते आहे. मिसळपावची ही अफलातून कल्पना सफल होणार! स्थलांतर करताना सुरुवातीची कित्येक वर्षे रोजच्या सामान्य जगण्याशी झटण्यात आगंतुक मग्न असतो. संस्कृती वेगळी, वागण्याचे रीतीरिवाज वेगळे, ते सर्व आत्मसात करून घ्यायचे असते. ज्या काही व्यवसायासाठी स्थलांतर केलेले असते, त्याचा भार सांभाळायचा असतो. या सगळ्या बदलांना सामोरे जाताना आपली ओळख कुठेतरी बदलत असते. पण त्याच्याकडे लक्ष द्यायला उसंत नसते. काही लोक स्थलांतर करण्यापूर्वीच मायदेशाला तुच्छ लेखत असतात. अमेरिकन वकिलातीबाहेर तिष्ठत असलेल्या रांगेत काही थोड्या लोकांकडून तसा स्पष्ट सुर ऐकू येतो. ईश्वरकृपेने पारपत्रावर अमेरिकन कृपेचा छप्पा पडू दे आणि या नावडत्या देशातून निसटू दे... त्यांना कदाचित बदललेली अस्मिता म्हणजे खरे स्वत्व सापडण्यासारखे असेल - पण त्यांच्याबद्दलही हे खरे असेलच असे वाटत नाही. अमेरिकेचे दिवास्वप्न हे कुठल्याही दिवास्वप्नासारखे नेमके वास्तव नसते. वास्तवातली अमेरिका त्या दिवास्वप्नापेक्षा बरीच वाईट आहे, आणि बरीच चांगली आहे - म्हणजे सगळ्याच प्रकारे वेगळी आहे. अपेक्षाभंग करणार्‍या या देशाबद्दल रागही येऊ शकतो, आणि अनपेक्षित दालने उघडणार्‍या या देशाबद्दल कौतुकही वाटू लागते - मनाचा मोठा गोंधळ घालणारी परिस्थिती असते. मायदेशाबद्दल आधीपासून जिव्हाळाच असलेल्या लोकांना तर आपली बदलणारी ओळख चक्रावून टाकणार नाही तर काय? त्याच वेळी ताटातूट झालेल्या आपल्या देशाबद्दल स्थलांतरित माणूस काल्पनिक प्रतिमा तयार करू लागतो. काही थोड्या वर्षांचा मातृभूमीच्या अनुभवाचे तुटपुंजे भांडवल असते, त्याच्यावर रम्य मनोरे चढवतो. तिथे तो प्रचंड प्रवाही भारत आपल्या गतीने पुढे सरकत असतो. दूर स्वप्नरंजन करणार्‍या लेकराच्या कल्पनाविश्वाचे त्याला सोयरसुतक नसते. मग भारतभेट झाली की खरा भारत त्या काल्पनिक प्रतिमेला तडा देतो. अशा प्रकारे दोन आवडणारे, पण कधी न समजणारे देश, अशांत आपली अस्मिता विभागली जाते. कोणास वाटावे की ही घालमेल म्हणजे स्थलांतराची शोकांतिका आहे. पण मुक्तसुनीत अचूकपणे निरीक्षण करतात, की मानवी संक्रमण म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतींना जोडणारा पूल आहे. स्थलांतरिताची कथा ही शोकांतिका नसून दुर्दम्य आशावादाचा आलेख आहे.

In reply to by धनंजय

बेसनलाडू 07/07/2008 - 07:53
अशा प्रकारे दोन आवडणारे, पण कधी न समजणारे देश, अशांत आपली अस्मिता विभागली जाते. कोणास वाटावे की ही घालमेल म्हणजे स्थलांतराची शोकांतिका आहे. पण मुक्तसुनीत अचूकपणे निरीक्षण करतात, की मानवी संक्रमण म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतींना जोडणारा पूल आहे. स्थलांतरिताची कथा ही शोकांतिका नसून दुर्दम्य आशावादाचा आलेख आहे. अगदी! उत्तम लेख.आवडला.दुसर्‍या बाजूची निरीक्षणे मांडायचा प्रयत्न झाल्यासही उत्तम. (सहमत)बेसनलाडू

विकास 07/07/2008 - 02:50
मिपाच्या पाहुणे संपादकीय प्रकल्पाच्या शुभारंभानिमित्त तात्यांचे आणि त्यातील पहील्या अग्रलेखाने चांगला श्रीगणेशा करणार्‍या मुक्तसुनीत यांचे अभिनंदन! लेख चांगलाच आणि वैचारीक आहे. त्यात वृत्तीप्रवृत्तीने भारतीय असलेल्या पण कर्मभूमीमुळे प्रत्यक्ष नाळ तुटलेल्या भारतीयाच्या मनातील केवळ व्यथाच नाही तर कधीकधी परिस्थिती समजून घेत आलेले समतोल विचार दिसतात. भारतीयत्व हे जर एक खणखणीत नाणे असले तर त्याची एक बाजू हे कायद्याने भारतीय असलेली तमाम जनता आहे तर दुसर्‍या बाजूस तुमच्याआमच्यासारखे "घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी" म्हणणारे पण "पिल्लाऐवजी", "मातृभूमीशी" कुठल्यान् कुठल्या पद्धतीने संबंध ठेवणारी एनआरआय मंड़ळी आहोत...आणि हो नुसताच एनाआरआय म्हणून विचार केला तर ते नाणे नाही तर "रुबिक क्यूब" आहे - ५४ तुकडे एकमेकांशी रंगसंगतीने नीट लावण्याचे कोडे... तीच कथा भारतातील भारतीयांची पण म्हणायला हरकत नाही. तर आपल्या अग्रलेखामुळे नाण्याची एक बाजू दिसली आता याचीच दुसरी बाजू (अर्थात भारतातील भारतीयांबद्दल) दाखवणारा लेख / अग्रलेख पण वाचायला मिळोत अशी मिपासदस्यांना विनंती... बाकी जाता जाता कालच एका लग्नसमारंभात गप्पा मारत असताना ऐकलेला एक किस्सा: संघात असे म्हणले जाते की "वन्स स्वयंसेवक इज ऑलवेज स्वयंसेवक"... जर कामाच्या/संसाराच्या व्यापाने एखादी व्यक्ती जर नंतर संघाच्या कार्यक्रमाला हजर रहात नसेल तरी ती आपलीच असते तीला वेगळे का धरायचे? तीला कधी "एक्स स्वयंसेवक" म्हणू नये... आपली मुले कामानिमित्त घर सोडून बाहेर गावी रहायला जातात तेंव्हा ती काय आपली "एक्स मुले" होतात का? थोडक्यात मुक्तसुनीतराव मला इतकेच म्हणायचे आहे की, तुम्ही-आम्ही जरी "एनआर" लावले तरी अगदी कुणाला आवडो न आवडो "इंडीयन" राहतोच. फक्त त्याचा बदलेल्या परीस्थितीतपण जाणीव ठेवून योग्य अर्थ लावणे आणि तसे आचरण करणे हे ज्या त्या व्यक्तीवर अवलंबून राहते. त्याला काही पर्याय नाही. धन्यवाद

In reply to by विकास

ऋषिकेश 07/07/2008 - 20:39
सर्वप्रथम मुक्तसुनीत व तात्यांचे अभिनंदन व आभार !. मुक्तसुनीत राव, "मी कोण"? हा बहुदा जगातील सर्वात कठीण प्रश्न असावा. आणि त्या प्रश्नावर आधारीत हा अप्रतिम लेख लिहून तुम्ही मिपाच्या संपादकियांची पातळी फार उंचावर नेऊन ठेवली आहे. लेख प्रचंड आवडला.
लेख चांगलाच आणि वैचारीक आहे. त्यात वृत्तीप्रवृत्तीने भारतीय असलेल्या पण कर्मभूमीमुळे प्रत्यक्ष नाळ तुटलेल्या भारतीयाच्या मनातील केवळ व्यथाच नाही तर कधीकधी परिस्थिती समजून घेत आलेले समतोल विचार दिसतात.
अगदी सहमत. अवांतरः अग्रलेख वाचून विकास यांच्या "ओळख" या लेखाचीही आठवण झाली -('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग 07/07/2008 - 05:29
'मिपा'च्या संपादकीय सदराची सुरुवात मुक्तसुनीत ह्यांच्याकडून चांगलीच होणार ह्याची खात्री होती तसेच झाले ह्याचा आनंद आहे!:) परिचयाचा विषय असूनही त्याच्या वेगळ्या बाजूचे दर्शन मुक्तरावांनी घडवले आहे. स्थलांतरितांची जातकुळी कोणतीही असो, म्हणजे धरणग्रस्त विस्थापित असोत, किंवा नैसर्गिक आपत्तीतून झालेले असोत, किंवा कामामुळे झालेले असो; असे की तसे, इकडे की तिकडे, ह्या मूलभूत मानसिक द्वंदातून सुटका नसते हे सत्य त्यांनी नेटक्या आणि नेमक्या शब्दात अधोरेखित केले आहे. अमेरिकेत येणे म्हणजे जणू स्वर्गात पोचणे अशी कल्पना उराशी बाळगून, ऐकलेल्या, वाचलेल्या आणि काल्पनिक अशा सर्व प्रकारांनी अमेरिकेतल्या विश्वाचे चित्र डोळ्यांपुढे आणून, तेच खरे मानून, येनकेन प्रकारेण इकडे येण्याची मनीषा बाळगणार्‍या लोकांची आजही आपल्याकडे कमी नाही! इथे म्हणजे सर्व चांगलेच असा भ्रम इथे आल्यावर हळूहळू वितळत जातो. अनेक बाबतीत टोकाचे चांगले आणि वाईट धक्के देण्याची अमेरिकेची क्षमता काही वर्षात आपल्याला कळून येते. ऐहिक सुखाची परमावधी पूर्ण करुन उतरणीच्या दिशेने चक्राच्या प्रवासाची सुरुवात झालेल्या अमेरिकेचं चित्र आणि त्याच वेळी सर्वप्रकारच्या उत्थानामधून, उलथापालथीमधून बदल होत असलेल्या भारतासारख्या देशाचे चित्र हे एकमेकांशी अनेक बाबतीत विसंगत आहे. तिकडून इकडे आल्यानंतरची मानसिक जडणघडणीची वर्षे ही व्यक्तीसापेक्ष असतात असे माझे मत. काही लोक हे इथेच जन्मल्याप्रमाणे सराइतासारखे इथलेच बनून जातात, बरेचसे कित्येक वर्षे आंदोलित अवस्थेतून प्रवास करीत, अनेक गोष्टींना मुरड घालीत एकदाचे इथले होतात पण ते मनातून खोलवर अस्वस्थ असतात, आणि काही लोक कधीच इथले होऊ शकत नाहीत, त्यांचे मन हे कायम तिकडेच असते आणि आत्मा हरवलेल्या व्यक्तीसारखे ते फक्त परिस्थितीसमोर मान तुकवून जगत राहतात. मुक्तरावांनी अचूक शब्दात पकडलेली स्थलांतरितांची वेदना ही चिरस्थायी आहे. ही परिस्थिती केव्हाही, कुठेही, आणि कोणत्याही काळात उद्भवू शकते आणि त्याचवेळी जोडलेले मैत्र, मानवी संबंध, गणगोत ही सर्व आपल्या जीवनरुपी झाडाची मुळे आहेत, त्यामुळे बदलाला चिवटपणे सामोरे जाण्याचे रसायन हे त्यातूनच आपल्याला मिळणार आहे हे त्यातले सत्य जेवढे लवकर लक्षात येईल तेवढी वरवर दिसणार्‍या गोष्टींनी भुलून जाण्याची शक्यता आणि बदल झाला तरी नशिबाला/परिस्थितीला दोष देण्याची मानसिकता आणि अगतिकता कमीकमी होत जाते आणि आपण विजिगीषु होतो! चतुरंग

In reply to by चतुरंग

मराठी_माणूस 07/07/2008 - 10:15
तिकडून इकडे आल्यानंतरची मानसिक जडणघडणीची वर्षे ही व्यक्तीसापेक्ष असतात असे माझे मत. काही लोक हे इथेच जन्मल्याप्रमाणे सराइतासारखे इथलेच बनून जातात, बरेचसे कित्येक वर्षे आंदोलित अवस्थेतून प्रवास करीत, अनेक गोष्टींना मुरड घालीत एकदाचे इथले होतात पण ते मनातून खोलवर अस्वस्थ असतात, आणि काही लोक कधीच इथले होऊ शकत नाहीत, त्यांचे मन हे कायम तिकडेच असते आणि आत्मा हरवलेल्या व्यक्तीसारखे ते फक्त परिस्थितीसमोर मान तुकवून जगत राहतात. अत्यंत चपखल आणि योग्य शब्दात घेतलेला परमर्श. हे सर्व अनुभवले असल्यामुले जास्त भिडते.

चित्रा 07/07/2008 - 06:48
मुक्तसुनीत यांचे आणि मिपाचे या पहिल्यावहिल्या अग्रलेखाबद्दल अभिनंदन. अग्रलेखांच्या या मालिकेतील अगदी पहिलाच लेख विचार करायला लावणारा. सर्वांनी दिलेले प्रतिसाद मनातल्या भावना पोचवत आहेतच, पण आपला सुरक्षित कोश सोडून बाहेर पडलेल्या कुणालाही ह्याच सगळ्या उलाघालीतून जावे लागते असे वाटते. मग ते कोकणातून मुंबईला आलेले लोक असोत की दूरगावी शिकायला आलेले विद्यार्थी. त्यात अनेकदा मदत करणारे लोक मिळतात तर कधी कधी अत्यंत कटू अनुभवही येतात. यातून तावून सुलाखून निघत कधी जोमाने तर कधी दु:खी होऊन आपापल्या मगदुराप्रमाणे माणसे मार्ग काढत राहतात. हे असेच सर्वत्र दिसते. मराठी भाषेच्या नि भारतीयत्वाच्या संकल्पना प्रसरणशील नि सामावून घेणार्‍या बनल्याखेरीज पर्याय नाही. हे अगदी योग्य.

अग्रलेखाकडून काही विशिष्ट अपेक्षा असतात. संपूर्ण पत्राची भूमिका नेमकी आणि स्पष्टपणे पुढ्यात ठेवून पत्राला स्वतःचा चेहरा देण्याची मोठी जबाबदारी त्या लेखावर असते. बातम्यांच्या निवडीतून, मांडणीतून आणि प्राधान्यक्रमातून जे अमूर्तपणे व्यक्त होत असतं, तेच मूर्त स्वरूपात, पण कंठाळी होऊ न देता मांडण्याची ही नाजूक कामगिरी. 'मिसळपाव' सारख्या व्यासपीठाच्या बाबतीत ती अजूनच जोखमीची. कारण वृत्तपत्राचं स्वरूप संपादक ठरवतात. संकेतस्थळाच्या बाबतीत हे काम मोठ्या प्रमाणावर वाचक-लेखकांचंच - आणि त्यामुळे काहीसं विस्कळीत-शिथिल असतं. शिवाय वृत्तपत्राला असलेले स्थलकालाचे संदर्भही इथे विस्तारलेले असतात. या सगळ्या अस्ताव्यस्त मंथनातून काही मोजकं-देखणं काढून देणं, प्रश्नांना चालना देणं, एकांगी भूमिका न घेताही ठाम मत मांडणं - म्हणजे निव्वळ महाद्वार किलकिलं करणं नक्कीच नव्हे. उलट ही मिरवणुकीची देखणी, अपेक्षा वाढवणारी - आणि मागच्या फळीतल्या लोकांच्या जबाबदार्‍याही!- सुरुवात आहे. मुक्त सुनीत यांचं अभिनंदन. पुढच्या पाहुण्या संपादकांना शुभेच्छा. अवांतरः आधीच्या संपादकानं त्याच्या निवडीनं पुढच्या संपादकाला 'खो' देण्याची कल्पना कशी वाटते? म्हणजे एकमेकांना आग्रह करायला नको आणि स्वेच्छेनं कुणी पुढे येण्याची वाटही पाहायला नको. अर्थात वेळाच्या अडचणी जाणून संपादकांच्या संमतीनं 'खो' पुढेही पाठवता येईल.

नंदन 07/07/2008 - 08:04
आणि समयोचित अग्रलेख (४ जुलै, साहित्य संमेलन आणि अच्युत गोडबोलेंच्या लेखाच्या पार्श्वभूमीवर). ह्या उपक्रमाची सलामी दमदार झाली आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

अग्रलेखात स्थलांतरितांचे प्रश्न आणि त्या निमिताने एनराय म्हणुन होणारी विचारांची कोंडी काही प्रश्न विचार करायला लावणारे असेच आहेत. अग्रलेख आवडला !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यशोधरा 07/07/2008 - 08:47
संपादकीय अतिशय उत्तम जमलं अहे, मुक्तसुनीत आणि मिपावर ही कल्पना मांडून ती साकार करणारे तात्या अन् पडद्यामागचे तंत्रज्ञ, सार्‍यांचेच अभिनंदन. संयत भाषेत परदेशस्थ भारतीयांच्या मनातली उलघाल, मानसिक द्वंद म्हणा, संक्रमण म्हणा - अतिशय परिणामकारक रीत्या मांडले आहे. वेडावाकडासा उहापोह अचूक जमला आहे!! पुढील संपादकीय कधी?

अमोल केळकर 07/07/2008 - 09:23
मुक्त सुनित , साप्ताहिक संपादकीय सदराच्या शुभारंभाचा पहिला लेख आवडला. पहिल्या सादरीकरणाबद्दल तुमचे अभिनंदन त्याचप्रमाणे मिपा व्यवस्थापनाने हा उपक्रम लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करुन एका महान नेत्याची आठवण ठेवली त्यावद्दल व्यवस्थापनाचे ही अभिनंदन -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

"डॉलर कमावतो, अमेरिकन नव्हे, इंडीयावर प्रेम करतो, इंडीयन नव्हे, साहित्य संमेलन भरवतो , महाराष्ट्रीय नव्हे , तर मी कोण !"
खरं आहे! मी कोण ? हा प्रश्न स्वयम अध्ययनाचा आहे, आत्मशोधनाचा आहे. व्यथांचा आहे ,कथांचा आहे आत्मस्तुतीचा ही आहे, आत्मक्लेशाचा ही आहे. न जाणो एखाद्या संवेदनशिल माणसाला तो आत्मबलिदानाचा ही ठरेल. प्रकाश घाटपांडे

सहज 07/07/2008 - 10:13
मिरवणुकीच्या सुरवातीच्या ह्या मानाच्या अग्रलेखाला मुजरा!!! एनाराय म्हणले की बहुतेक वेळा ६०-७० च्या दशकानंतरचे परदेशस्थ भारतीय डोळ्यासमोर येतात. बहुतेक वेळा ते अमेरिका, इंग्लंड मधलेच असतात. :-) जगात जवळजवळ १०० देशात कदाचित जास्तच देशात "भारतीय लोक" आहेत. ब्रिटिश साम्राज्यात मजुर म्हणुन शतकांपुर्वी नेलेले मजुर भारतीय, काही सुशिक्षित डॉक्टर, इंजिनियर तसेच व्यापारी भारतीय अशी अनेक भारतीय मंडळी शेकडो वर्षांपुर्वी स्थलांतरीत झाली. आजही आपण पेपर मधे वाचतो की बाली मधे ९३% जनता हिंदु आहे. पुर्वेला कोरीया मधे, पश्चिमेला वेस्ट इंडीज बेटामधे रामाचे, कृष्णाचे मंदीर आहे. फिजी, मॉरिशस, साउथ अफ्रिका मधे कित्येक पिढ्यान पिढ्या भारतीय वंशाचे अनेक लोक आहेत. गेल्या शतकात पेहराव, बोलीभाषा, धर्माने, पारपत्राने बदलले असले तरी आजही त्यांची ओळख सांगताना इतिहासाला, मानववंशशास्त्राला किंवा कमी शिक्षीत माणसाला त्यांचे भारतीयत्व नक्कीच आठवते. अगदी जरी आपण भारतीय त्यांच्याबद्दल विचार करत नसलो तरी. काही जाणत्या लोकांना धन्यवाद की पर्सन ऑफ इंडीयन ओरीजीन ह्या कागदपत्राने त्यांनी ही परदेशस्थ भारतीयांना आपले मुळ टिकवून ठेवायला एक संधी दिली आहे. वसुधैव कुटूंबकम, हे विश्वची माझे घर वाक्यांना खराखुरा अर्थ द्यायला ह्या जगभरच्या ३० दशलक्षावधी भारतीय बांधवाना मेनलॅंड भारतीयांनी जोडून ठेवले पाहीजे. आंतरजालाच्या युगात हे अशक्य नाही.

परदेशस्थ भारतीयांच्या व्यथा अगदी अचूक ,योग्य शब्दांत मांड्ल्या आहेत.अभिनंदन.पण त्याचबरोबर भारतात राहू इछिणारे अनेक हुषार,होतकरु तरुण दिसतात.पण ते केवळ स्वदेशात राहतात,अमेरीकन चलन मिळवित नाहीत म्हणून त्यांना भारतातच योग्य मान मिळत नाही किंबहुना त्यांच्याकडे बघण्याची व्रुत्ती थोडी अवहेलनेची असते असा अनुभव येतो.त्यांचीही मानसिक स्थिती अधांतरी ,त्रिशंकूसारखी होते.त्यावरही मि.पा.संपादकांनी केव्हातरी प्रकाश टाकावा ही विनंती.

आनंदयात्री 07/07/2008 - 16:43
"अग्रलेख" ही संकल्पना अवृत्तपत्रिय माध्यमात आणनारे मिसळपाव डॉट कॉम हे पहिले संस्थळ - ट्रेंड सेटर ! हे ही एक संक्रमणच. माय मराठीची अशी सेवा करायचे भाग्य लाभले म्हणुन मिसळपाव डॉट कॉम चे अन तात्यांचे अभिनंदन. मुक्तसुनितरावांची पहिला पाहुणा संपादक म्हणुन निवड योग्यच आहे, एका बर्‍यापैकी चर्चित पण इथे अत्यंत ऍप्लिकेबल अशा विषयावर सुंदर विवेचन केल्याबद्दल धन्यवाद. लेख सगळ्या अंगाने उत्तम आहे विशेष म्हणजे अग्रलेख आहे, लेखाचा विषय जरी बर्‍यापैकी भावनिक बाबींशी निगडित असला तरी कुठेही ललित लेखनाचा सुर जाणवला नाही, हे ही अग्रलेखाचे एक यशच आहे. आपलाच, आनंदयात्री सदस्य मिसळपाव डॉट कॉम

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर 07/07/2008 - 22:56
लेखाचा विषय जरी बर्‍यापैकी भावनिक बाबींशी निगडित असला तरी कुठेही ललित लेखनाचा सुर जाणवला नाही, हे ही अग्रलेखाचे एक यशच आहे. अगदी सहमत आहे! तात्या.

पाहुण्या संपादकांचे (मुक्तसुनितांचे) हार्दीक अभिनंदन. फार मोठा, बहु आयामी प्रश्न संपादकांनी हाताळला आहे. माणसं मायदेश सोडून परक्या देशात स्थलांतर का करतात? ते करताना त्यांनी कोणकोणती रास्त स्वप्ने उराशी बाळगलेली असतात? त्यातील किती आणि किती कालावधीत पुर्ण होतात? परदेशातील वास्तव्याने होणारे फायदे किती आणि तोटे किती? प्रत्येक व्यक्तीच्या (स्थलातरीत) आर्थिक, मानसिक, भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक गरजांची होणारी पुर्ती आणि फरपट दोन्हीचा अनुभव वजनदार असतो. भारत सोडून जाताना अर्थातच मित्रांनी, आप्तेष्टांनी, व्यवसाय बंधूंनी 'भाग्यवान' हा शिक्का कपाळी मारलेला असतो. आपणही तो मंगलप्रसंगी भाळावर रेखिलेल्या चंदनाच्या टिळ्याप्रमाणे मिरवत असतो. परदेशातील पहिलंदर्शन छाती दडपून टाकणारं असतं. त्या भूमीवर पहिला प्रश्न मनांत येतो, 'मी घेतलेला निर्णय धाडसी खरा, पण खरंच आपली स्वप्नं (बहुतांशी आर्थिक) पुर्ण होतील नं?' तिथल्या वातावरणात आपण रुळतो, संघर्ष सुरू होतो. रजेवर जाताना मनातला जमा-खर्च (काहींजणांना) तितकासा भावणारा नसतो. भारतात आल्यावर तेच सगेसोयरे भेटतात, आपल्या कपड्यांवरून, आपण आणलेल्या भेटवस्तूंवरून आपली परदेशातील परीस्थिती जोखतात. आपणही बोलण्यातून आभासी दुनिया उभारतो. सर्वत्र आनंदआनंद असतो. आई किंवा वडील एकच प्रश्न विचारतात, 'अजून किती दिवस राहणार 'तिथे'?' इथे, 'बघू, अजून काही ठरवलं नाही' असं मोघम उत्तर दिलं जातं. पुढे अनेक वर्षांच्या वास्तव्यात आपणच हा प्रश्न स्वतःला विचारू लागतो. जी स्वप्न उराशी बाळगली होती (आर्थिक) ती केंव्हाच पुर्ण झालेली असतात पण भारतातील वाढती महागाई आणि आपले उंचालेले 'लिव्हींग स्टँडर्ड' ह्यांचा मेळ मनात बसत नाही. परत गेलो आणि हे 'स्टँडर्ड' सांभाळता नाही आले तर आपले हसे होईल ही भिती वाटते. जुने व्यावसायिक सहकारी पुढे गेलेले असतात. जी छाप इतकी वर्षोंनवर्षे सर्वांवर पडली आहे त्यातील पोकळपणा उघडा पडेल अशी भिती वाटत राहते आणि माणूस परतीचा विचार पुढे ढकलत राहतो. त्यात पुन्हा, त्याच्या आधी मायदेशी परतलेले कालांतराने पुन्हा नव्या नोकरीच्या निमित्ताने परदेशात परत येतात, भारतातल्य वाढलेल्या महागाईची, वाढत्या गर्दीची, भ्रष्टाचारांची, डॉक्टरीपेशातील खालावलेल्या नितीमत्तेची अतिरंजीत चित्रे नजरे समोर उभी करताता आणि चांगला जुळवून आणलेला आपला धीर खचतो. अति विचारांमुळे 'कृती' घडत नाही. परदेशात जाताना भारतातील दोर कापून जावे. तसेच, परदेशातून परतताना तिथले दोर कापून यावे. 'जमलं नाही तर परत येईन' हा विचार चौफेर संघर्ष करू देत नाही. त्यामुळे अपयश पदरी येतं किंवा मर्यादीत यश प्राप्त होतं. परतीचे दोर कापून टाकले तरच माणूस जीवाच्या आकांताने लढतो. तेंव्हाच पौर्णिमेसारखे यश नजरेस पडते. माझा अनुभव युरोप-अमेरिकेतला नाही. आखाती देशातील आहे. त्यामुळे मुळ उद्देश आर्थिक आणि आर्थिकच होता. पण तरीही, संपूर्ण वेगळी संस्कृती, वेगळी भाषा, वेगळे हवामान, वेगळी राजकिय व्यवस्था अशा वणव्यात सापडल्यावर बसणारे चटके आणि एकटेपण ह्यावर एखादी कादंबरी लिहीता येईल. सणवार, लग्न-मुंज, मिरवणूका हे सर्व तर नाहीच नाही पण साली कधी 'रामनाम सत्य है।' वाली शाश्वताचे दर्शन देणारी प्रेतयात्राही नजरेस पडली नाही. मी भारत सोडून आखातात गेलो तेंव्हा भारतात अशा प्रेतयात्रा दिसायच्या. हल्ली इथेही दिसत नाहीत. पण झगडत राहीलो, इतरांसारखाच, मुंडी तुटलेल्या मुरारबाजीच्या आवेशात. १९६० च्या दशकात अमेरीकेत गेलेल्या मराठी स्थलांतरांच्या संघर्षाविषयी समर्पक माहिती 'फॉर हिअर, ऑर टू गो' (मेहता पब्लीशिंग हाऊस) ह्या अपर्णा वेलणकरांच्या पुस्तकात वाचावयास मिळते. तसेच, 'गोठलेल्या वाटा' (श्रीविद्या प्रकाशन) हे शोभा चित्रे ह्यांचे पुस्तकही वाचनिय आहे. विषय बराच गहन आहे. असो.

वरदा 07/07/2008 - 18:17
अग्रलेख. तात्या आणि मुक्तसुनीत दोघांचही अभिनंदन! डॉलर कमावतो, अमेरिकन नव्हे, इंडीयावर प्रेम करतो, इंडीयन नव्हे, साहित्य संमेलन भरवतो , महाराष्ट्रीय नव्हे , तर मी कोण !" हे १००% खरं... तिकडून इकडे आल्यानंतरची मानसिक जडणघडणीची वर्षे ही व्यक्तीसापेक्ष असतात असे माझे मत. काही लोक हे इथेच जन्मल्याप्रमाणे सराइतासारखे इथलेच बनून जातात, बरेचसे कित्येक वर्षे आंदोलित अवस्थेतून प्रवास करीत, अनेक गोष्टींना मुरड घालीत एकदाचे इथले होतात पण ते मनातून खोलवर अस्वस्थ असतात, आणि काही लोक कधीच इथले होऊ शकत नाहीत, त्यांचे मन हे कायम तिकडेच असते आणि आत्मा हरवलेल्या व्यक्तीसारखे ते फक्त परिस्थितीसमोर मान तुकवून जगत राहतात. खूप छान चतुरंग्..अगदी असेच अनुभव आलेत मलाही . तुम्ही म्हणता ते १००% खरं (पुढच्या अग्रलेखाच्या प्रतिक्षेत) वरदा "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

विसुनाना 07/07/2008 - 18:26
मिपावर सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाबद्दल तात्यांचे आणि संबंधितांचे अभिनंदन. मुक्तसुनीत यांच्यावर टाकलेली पाहुण्या संपादकाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पेलली असे म्हणावेसे वाटते.( ही क्लीशे वाक्ये म्हणावी लागतात - असे म्हणणेही क्लीशे झालेले आहे.) पण खरोखरीच एतद्देशीय लोकांच्या नजरेतून अमेरिका अथवा तत्सम 'प्रगत' देशात गेलेल्या लोकांबद्दल नेहमीच एक प्रश्नचिन्ह दिसते. ते भौगोलिक कुतुहल असेल, सुबत्तेबद्दलचे आकर्षण असेल किंवा त्यांची मानसिकता जाणून घेण्याची इच्छा असेल - या प्रश्नांमधल्या मानसिकतेच्या प्रश्नाचे निराकरण करणारा हा लेख आहे. यानिमित्ताने (आणि याबरोबरीने) टांझानिया,अझरबैजान, वेस्ट इंडीज इ. येथेही जी भारतीय, महाराष्ट्रीय प्रजा स्थायिक झालेली आहे त्यांची मानसिकता काय असते? यावरही भाष्य झाले असते तर बरे झाले असते. "देशादेशातल्या सुसंस्कृत माणसांना कृत्रिम भिंतींच्या नि सीमारेषांच्या पलिकडे पोचण्याशिवाय पर्याय नाही. "हा महत्त्वाचा विचार मुक्तसुनीत यांनी प्रभावीपणे मांडला आहे. परंतु असे करताना मुळात "वसुधैव कुटुंबकम" असे सांगणारी भारतीय संस्कृती परप्रांतात घडणार्‍या अनिवासी भारतीयांच्या भावी पिढ्यांपर्यंत पोचत आहे काय? मुक्तसुनीत यांचा हा स्पृहणीय विचार अनिवासी भारतीयांच्या परसंस्कृतीत वाढणार्‍या पुढील पिढ्याही अंगिकारतील काय? याही प्रश्नाचा उहापोह व्हायला होता असे वाटले. अमेरिकेचे ठळक उदाहरण घ्यायचे झाल्यास तेथील बहुतांश जनता बाहेरून आलेल्या लोकांच्या पिढ्यांनी बनली आहे. आज या पिढ्या आपल्या पूर्वमातृराष्ट्राशी किती आत्मियता बाळगून आहेत? मागे रीडर्स डायजेस्टमध्ये आलेली एका चिनी - अमेरिकन मुलीची कहाणी वाचनात आली होती. तिचे अमेरिकेत स्थायिक आईवडील तिला ती अठरा-वीस वर्षांची झाल्यानंतर तिच्या मनाविरुद्ध कळत्या वयात पहिल्यांदा चीनला घेऊन आले. तिला चीन कुठे आहे? इथेपासून तयारी करावी लागली होती. तशीच अवस्था आता तेथील भारतीयांच्या मुलांची होत आहे काय? (आय डोंट वॉना कम टू इंडिया!) या पुढच्या पिढ्यांची सांस्कृतिक नाळ भारतीय सहिष्णु विचारांपासून तुटेल आणि तीही अमेरिकेच्या आत्मग्लानीरत समाजाचा एक हिस्सा बनतील काय अशी भीती पहिल्या पिढीतील पालकांना वाटते काय? असो. एकूण अग्रलेख आवडला.

अरुण मनोहर 07/07/2008 - 18:37
मुक्तसुनीत ह्यांचे आभिनंदन. संपादकीयाची सुरवात तर दणक्यात झाली. बाहेर रहाणारे एन आर आय बांधव भाषेच्या नाळेने बांधल्या गेले आहेत हे निरीक्षण अचूक आहे. मिपा साऱखी संकेतस्थळे ह्या बंधनाचा सकारात्मक उपयोग करून घेत आहेत ही खूप भाग्याची गोष्ट आहे.

मुक्तसुनीत 07/07/2008 - 18:42
सर्व मिपावासीयांचे आभार. तुमचे शब्द लिहायला उभारी देत रहातात. तात्या अभ्यंकरांचे आभार मानणे त्याना उपचारासारखे वाटेल. पण तसे न करणे चुकीचे होईल. त्यांचे मनःपूर्वक आभार. अनेक लोकांनी विचारांना चालना देणारे प्रतिसाद दिले आहेत. काही महत्त्वाचे प्रश्न उभे केले आहेत. वेळेअभावी आताच मला (जमतील तशी का होईना पण ) उत्तरे देणे शक्य होणार नाही. पण तुम्ही दाखवलेल्या विश्वासाची आणि प्रेमाची पोच द्यावी म्हणून लिहीत आहे. मिसळपाव आपल्या सर्वांकरता असा आरसा बनते आहे, ज्यात आपल्याला आपल्या आयुष्याच्या छोट्या मोठ्या गोष्टींची, बर्‍या वाईट अनुभवांची प्रतिबिंबे पहायला मिळतात. पुढच्या वाटचालीत मिसळपावने होकायंत्रसुद्धा बनावे अशी सदिच्छा व्यक्त करतो.

रामदास 07/07/2008 - 22:13
ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल क़ुरबान तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू, तू ही मेरी जान तेरे दामन से जो आए उन हवाओं को सलाम, चूम लूँ मैं उस ज़ुबाँ को जिसपे आए तेरा नाम आपला देश सोडून आलेला रेहमान आणि मिनीची स्टोरी आज परत आठवली. काबुलीवालाची आठवण इथे अप्रस्तुत ठरू नये.

In reply to by रामदास

विसोबा खेचर 07/07/2008 - 23:10
ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल क़ुरबान तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू, तू ही मेरी जान तेरे दामन से जो आए उन हवाओं को सलाम, चूम लूँ मैं उस ज़ुबाँ को जिसपे आए तेरा नाम रामदासराव, तसे हे गाणे अनेकदा ऐकले आहे परंतु मुक्तरावांच्या अग्रलेखाच्या आणि त्याला आलेल्या अभ्यासपूर्ण प्रतिसादांच्या पार्श्वभूमीवर, मी स्वत: अनिवासी भारतीय नसलो तरीदेखील वरील गाण्याचे शब्द वाचून जीव अगदी हळवा अन् थोडास्सा झाला! असो.. आपला, (तिरंगाप्रेमी) तात्या.

In reply to by रामदास

चतुरंग 07/07/2008 - 23:34
वतन पासून दूर आल्याशिवाय ती जाणीव काय असते हे खरोखरच समजत नाही! दूधवाल्या भैय्यापासून आणि कोपर्‍यावरच्या इस्त्रीवाल्यापासून ते नेहेमीच्या पानाच्या ठेल्यावरल्या पानवाल्यापर्यंत आपले ऋणानुबंध किती नकळत जोडले गेलेत हे ते भवती नसतानाच कळतं. गौरी-गणपती, दसरा, दिवाळी असे सणवार येतात, ते आम्ही आपापल्या परीने साजरेही करतो पण 'ती' मजा नाही हा भाव काही केल्या पुसता येत नाही! लग्न-मुंजीसारखे नात्यागोत्यात रमण्याचे प्रसंगही बर्‍याचवेळा चुकल्याची चुटपुट कायमसाठी लागून राहते. असे असताना 'तुम्हाला काय कमी, तुम्ही तिकडे डॉलर्समधे लोळताय' किंवा 'एवढे वाटत होते तर जायला कोणी सांगितले होते?' अशांसारखी वाक्ये ऐकली की मन करपून जाते! चतुरंग

सर्वसाक्षी 07/07/2008 - 23:56
मा. पाहुणे संपादक, तात्या आणि मिपाचे हार्दिक अभिंनंदन! सुंदर उपक्रम, सुंदर प्रतिसाद, सुरेख अग्रलेख असा त्रिवेणीसंगम साधला आहे. मुक्तसुनित यांचे अभिनंद आणि एका चांगल्या लेखाबद्दल आभार.

मुक्तसुनीत 08/07/2008 - 00:02
पर्याय आणि स्वीकृती : एक आणखी विचार माझ्या मनात येतो तो म्हणजे स्थलांतरित केलेल्या ( आणि न केलेल्या) लोकांनी , "स्थलांतरा"बद्दल स्वीकारलेल्या पर्यायांबद्दल. चतुरंग यानी लोकांच्या वेगवेगळ्या मनःस्थितींचे वर्णन केले आहे. मला तात्यांच्या कुठल्याशा पोस्टमधील एक विधान आठवते की, काही वर्षांमागे त्यांच्याकडे देश सोडण्याचा पर्याय अगदी सहज म्हणावा असा उपलब्ध होता. आपल्या कौटुंबिक परिस्थितीला लक्षात घेऊन त्यानी हा पर्याय नाकारला. आज या निर्णयाबद्दल त्याना पश्चात्तापच काय , पण साधी रुखरुख वाटण्याचे काडीइतकेही कारण नाही. माझ्यामते आपण स्वीकारलेल्या पर्यायाला डोळसपणे स्वीकारण्याचे हे एक उदाहरण आहे. "यू कांट हॅव द केक अँड ईट इट्" हे जर नीट उमजले असेल तर दोन डगरींवर पाय ठेवण्यातले वैय्यर्थ समजेल. पेठकर यानी परतीचे दोर कापण्याचा उल्लेख केला आहे त्याचा एक अर्थ हा असासुद्धा आहे. अमेरिकन एनाराय आणि इतर : सहज आणि विसुनाना यानी आणखी एक मुद्दा मांडलाय : युरोप/अमेरिका सोडून इतर ठिकाणी असलेले आपले लोक. मी स्वतः अमेरिकेत स्थायिक झालेला आहे, पण आजूबाजूला बघताना मला एक गमतीची गोष्ट जाणवते : ज्या प्रमाणे अमेरिकेतल्या एस्टॅब्लिशमेंटला पृथ्वी सूर्याभवती फिरत नसून , अमेरिकेभवती फिरते आहे असे भास होतात , त्याची काही प्रमाणात लागण अमेरिकास्थित एनारायनाही कधीकधी होते. स्थलांतरणाची प्रक्रिया गेल्या १-२ दशकांची नाही. हां , जागतिकीकरणामुळे या प्रक्रियेला वेग जरूर आला असेल. पण कितीतरी दशके - प्रसंगी शतके - आधी लोक आफ्रिका खंडात, आशियातल्या इतर भागात गेलेले आहेत. त्यांचे पिढ्यानुपिढ्यांचे लागेबांधे भारताशी आहेत. अमेरिकास्थित लोकांना आपल्यापलिकडे याची जाणीव असते की नाही असा प्रश्न कधीकधी पडतो. या लेखानिमित्त तेथील लोकानी आपापल्या अनुभवांबद्दल लिहावे असे वाटते.

In reply to by मुक्तसुनीत

मनिष 08/07/2008 - 15:44
युरोप/अमेरिका सोडून इतर ठिकाणी असलेले आपले लोक. मी स्वतः अमेरिकेत स्थायिक झालेला आहे, पण आजूबाजूला बघताना मला एक गमतीची गोष्ट जाणवते : ज्या प्रमाणे अमेरिकेतल्या एस्टॅब्लिशमेंटला पृथ्वी सूर्याभवती फिरत नसून , अमेरिकेभवती फिरते आहे असे भास होतात , त्याची काही प्रमाणात लागण अमेरिकास्थित एनारायनाही कधीकधी होते. स्थलांतरणाची प्रक्रिया गेल्या १-२ दशकांची नाही. हां , जागतिकीकरणामुळे या प्रक्रियेला वेग जरूर आला असेल. पण कितीतरी दशके - प्रसंगी शतके - आधी लोक आफ्रिका खंडात, आशियातल्या इतर भागात गेलेले आहेत. त्यांचे पिढ्यानुपिढ्यांचे लागेबांधे भारताशी आहेत. अमेरिकास्थित लोकांना आपल्यापलिकडे याची जाणीव असते की नाही असा प्रश्न कधीकधी पडतो.
खरे आहे. ह्याच अर्थाने अमएरिकनांविषयी म्हटले जाते की त्यांना वाटते की "world starts & ends with America"

पाहुण्या संपादकाच्या पहिल्यावहिल्या अग्रलेखाकरता मुक्तसुनीत यांचे मनापासून अभिनंदन!! सर्वच मराठी माणसांच्या मनाच्या कोषात, मग तो निवासी असो वा अनिवासी, वास करत असणार्‍या या विषयाची अभिनिवेषरहित चर्चा घडवून आणण्याचे कार्य या अग्रलेखाने केले आहे. बाकीच्या भारतीय माणसांचे ठाऊक नाही पण मराठी माणूस हा कुठेही राहिला तरी मनाने मराठीच असतो हेच आमच्या पहाण्यात आले आहे. मग तो बंगळूरात असो की दिल्लीत! आणि अमेरिकेत असो की इंग्लंडात!! आपल्या परंपरांचा, सणवारांचा, चालिरितींचा अभिमान बाळगत आपण जगत असतो.... लग्न-मुंजीसारखे नात्यागोत्यात रमण्याचे प्रसंगही बर्‍याचवेळा चुकल्याची चुटपुट कायमसाठी लागून राहते. चतुरंगजी, तुम्ही लग्न-मुंजीचं म्हणताय, पण खरं दु:ख्ख केंव्हा होतं माहितीये? आपले आई-वडिल जेंव्हा निधन पावतात तेंव्हा ताबडतोब जाण्याची तयारी असूनही आपण पोहोचेपर्यंत तिथे अंत्यविधी पूर्ण झाला असेल, आपल्याला अंत्यदर्शन घडणार नाही ही जाणीव उरात घेऊन माणूस जेंव्हा तो २४-३० तासांचा प्रवास करतो तेंव्हा!!! अर्थात यात फक्त इंग्लंड-अमेरिकेचाच संदर्भ नाही. माझ्या एका मित्राला त्याची आई गेल्यावर दिग्बोई (सैन्यात असल्याने) ते सावंतवाडी हा प्रवास करायला लागला होता!! काही जाणत्या लोकांना धन्यवाद की पर्सन ऑफ इंडीयन ओरीजीन ह्या कागदपत्राने त्यांनी ही परदेशस्थ भारतीयांना आपले मुळ टिकवून ठेवायला एक संधी दिली आहे. सहजराव, खरं आहे! इतक्या वर्षांनंतर का होईना तो कायदा करण्यासाठी जोर लावल्याबद्दल भारतीय राजकारण्यांची (मग कसे का असेनात ते!) अनिवासी जनता अत्यंत आभारी आहे. देशादेशातल्या सुसंस्कृत माणसांना कृत्रिम भिंतींच्या नि सीमारेषांच्या पलिकडे पोचण्याशिवाय पर्याय नाही. "हा महत्त्वाचा विचार मुक्तसुनीत यांनी प्रभावीपणे मांडला आहे. सहमत! आणि श्री. मुक्तसुनीत यांनी या विषयाचा इतका उत्तम परामर्ष आपल्या अग्रलेखात घेतलेला आहे की त्यावर टिप्पणी करण्यासारखे वा त्याच्यात भर घालण्यासारखे आम्हाला तरी काही सुचत नाही. सुरवात तर सुरेख झाली आहे! श्री. मुक्तसुनीत यांनी अपेक्षा अतिशय उंचावून ठेवल्या आहेत. तेंव्हा यापुढे लिहिणार्‍या भविष्यातील सर्व पाहुण्या संपादकांना आमच्या शुभेच्छा!! -पिवळा डांबिस

कोलबेर 08/07/2008 - 03:58
मुक्तसुनीत ह्यांच्या अग्रलेखाने उंचावलेल्या अपेक्षा अगदी पुरेपूर पूर्ण केल्या. त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही बोलक्या आणि वैचारीक आहेत. सॅम्युअल हंटींगटन् ह्यांच्या 'क्लॅश ऑफ सिव्हीलायजेशन' ह्या उत्कृष्ट पुस्तकाची आठवण करुन देणारा लेख वाटला. हंटींगटन सायबाच्या म्हणण्या प्रमाणे माणसाची खरी ओळख ही देश/धर्म/विचारसरणी ही नसून त्याची 'संस्कृती' (ज्या संस्कृतीत तो वाढला ती) आहे. कळत नकळत देशापेक्षा जास्त जपली जाते ती संस्कृती. देशा बद्दलच बोलायचे झाले, तर जर इच्छा असेल , मनाची तयारी असेल आणि त्याला कर्तृत्वाची जोड असेल तर कुणीही एका सही शिक्क्या मध्ये आपला देश बदलू शकतो. पण आपण ज्या संस्कृतीत वाढलो त्याच्याशी असलेली नाळ कधीच तोडता येणार नाही. डांबीसरावांचा सुलेश आणि पाकिस्तानी अब्दुल खान. ह्यांचे जे मेतकुट जमले ते ह्याच सामायीक धाग्यामुळे. हाच सुलेश एखाद्या चिनी माणसा बरोबर राहिला असता तर त्याच्याशी कदचित इतकी घनिष्ठ मैत्री होऊ शकली नसती, कारण कोपर्‍या वरच्या दुकनातुन जिलब्या आणि समोसे आणून त्यावर ताव मारत लता मंगेशकरची गाणी लावुन सुलेश त्याच्याशी कधीच गप्पा मारू शकला नसता.

In reply to by कोलबेर

कारण कोपर्‍या वरच्या दुकनातुन जिलब्या आणि समोसे आणून त्यावर ताव मारत लता मंगेशकरची गाणी लावुन सुलेश त्याच्याशी कधीच गप्पा मारू शकला नसता. खरं आहे! फक्त गाणी "झीनत अमान"ची! ती कोणी गायलीयत याची अब्दुलखान फिकीर करीत नसे!! :)

बबलु 08/07/2008 - 04:39
पाहुणा संपादक, अतिशय छान लेख. आणि पेठ्कर साहेबांचा reply उत्तम.

मुक्तसुनीत ... सर्व प्रथम हार्दिक अभिनंदन ! विचार प्रवृत्त करणारा लेख विचारपूर्वक लिहिल्याबद्दल !! :) एन.आर.आय लोकांची घालमेल एक वेगळाच प्रकार असतो. तीन आठवड्यात देश डोळ्यांनी पिऊन घ्यायचा, बँक बॅलन्सला भगदाड पाडून घ्यायचं आणि शरीरानं दमून पण मनानं ताजं होऊन परतायचं ...ते पुढच्या भारतवारीची वाट पहात !! आपले आई-वडील इथे आले की चार - सहा महिन्यांचा सहवास आधाशासारखा साठवायचा आणि त्यांना इथला विंटर न झेपणार्‍या जागी राहतो म्हणून कुढायचं. मुलांच्या संस्कारांत अचानक घडणारे चांगले बदल पाहून सुखवायचं आणि मग जाणवतं आपण कितीही प्रयत्न केला तरी आजी - आजोबा ह्यांची जादू वेगळीच !!! आता कुणी म्हणेल मग एवढं वाटतं तर जावं भारतात परत, कुणी अडवलंय ? (पण प्रत्येक सोप्या प्रश्नाचं उत्तरही सोपं असतंच असं नाही ना !!!) स्वत:पुरतं बोलायचं तर आमच्या मुलाचा जन्म इथे झाला म्हणून त्याचा अमेरिकन पासपोर्ट पहिल्यांदा हातात घेताना माझी आणि बायकोची एकमेकांबरोबर जी अस्वस्थ नजरानजर झाली ती शब्दांत मांडणं योग्य नव्हे. माझी खात्री आहे अनेक जोडप्यांमधे तसाच मूक संवाद झाला असेल. चला इथेच थांबावं पण पुन्हा एकदा तुमचं हार्दिक अभिनंदन ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------

मनिष 08/07/2008 - 17:12
मुक्तसुनीत यांचा लेख अपेक्षेप्रमाणेच उत्कृष्ट झाला आहे. त्यांनी मांडलेले मुद्दे निश्चितच विचार करण्यासारखे आहेत. मधे "स्व...देश" हे भूषण केळकर ह्यांनी संपादने केलेले पुस्तक वाचले. त्यातील बर्‍याच परतणार्‍या एन आर आय चा सूर असा होता -- आम्ही एवढी समृद्धी, पैसा सोडून इथे परत भारतात आलो, आणि इथे साधं XYZ मिळत नाही, होत नाही म्हणजे काय?? आता हे XYZ - गॅस पासून शाळेच्या ऍडमिषन पर्यंत काहिही असेल. त्यात बरेच जणांनी कित्येक पाने खर्च केलीत ती हे सिद्धे करण्यात कि इथल्यापेक्षा तिथे आम्हाला किती चांगला स्कोप होता....वैताग येतो ते वाचून किंवा ऐकून. अरे मग कशाला परत आलात?? जी काही कारणं असतील पण परतण्याचा निर्णय तुमचाच होता ना? मग का उठसुठ शिव्या घालताय जिथे तुम्ही शिकलात, वाढलात त्या भारताला? निर्णय तुमचाच होता ना? तसेच तिथे रहाणार्‍यांबाबत - कोलबेर म्हणाले त्याप्रमाणे आपण जगतो ते आपल्या संस्कृतीबरोबर...देश/धर्म/विचारसरणी ह्यांच्यापेक्षाही जवळची ती संस्कृती. त्याचबरोबर परक्या देशाची संस्कृती उंबरठ्याबाहेर असतेच. जसा भोवतालच्या वातावरणाचा आपल्यावर परिणाम होतो, तसाच आपणही यथाशक्ती आपल्या भोवतालच्या वातावरणावर परिनाम करतो. ह्या दोन्हीमधून तयार होते ती स्थळांतरीतांची, संक्रमणाची संस्कृती....त्यात दोन संस्कृतींची सरमिसळ होणारच....पण वेगवेगळ्या प्रमाणात, ते प्रमाण ज्या त्या व्यक्तिवर/कुटुंबावर अवलंबून असेल..तिथल्या सोयी, सुविधा आणि समृद्धी हवी पण भयाण एकाकीपण, (आपल्या दृष्टीने) टोकाचे व्यक्तिस्वातंत्र्य, भांडवलशाहीचा अतिरेक - त्यातून अपरिहार्यपणे येणार कंस्युमरीझम - त्यापेक्षाही वाईट म्हणजे, माणसालाच वस्तू समजणारी तिथली जीवनशैली हयांचा काही लोकांना उबग येतो...शिवाय आपली मुळे, संस्कार इथले असतील तरी मुलांवर बाहेर, शाळेत संस्कार होतात ते तिथल्या परक्या संस्कृतीचे...त्याचा प्रभाव किती राहील हे पुर्णपणे आपल्या हातात नसते. मग १४-१५ वर्षाच्या मुलाला/मुलीला हातात कॉन्ट्रासेप्टीव्ह देऊन "have fun" म्हणण्याची मानसिक तयारी आहे का हे पण तपासावे! खरं तर ८-१० वर्षे तिथे वाढलेल्या लहान मुलांनाही परत इथे आणने हे महा-कठीण काम असते. त्यात खरच घरका-न-घाटका अशी अवस्था होऊ शकते... पण तिथे रहायचे हा निर्णय तुमचाच होता ना? कुठलाही निर्णय असला तर तो एक "पॅकेज डील" म्हणून येतो...थोडेफार इकडे-तिकडे होऊ शकते, पण मुळात हे पॅकेज डीलच. मग आपल्याच निर्णयाचे एकदा प्राईस-चॉईस इक्वेशन मांडून बघावे....काय मिळवण्यासाठी काय गमवाए लागते ते तर बघावे...मग आपली त्याची मान्सिक तयारी झाली कि मग निर्णय अंमलात आणतांना फार घालमेल होत नाही. मुळात इकडे-तिकडे बोट दाखवण्याऐजी तिकडे जाण्याचा किंवा परतण्याचा -- कुठलाही असला तरी तो निर्णय आपलाच होता हे स्वीकारावे...नाहीतर दोन्ही बाजुंनी हवे तितके मुद्दे मिळतात वाद घालायला.

In reply to by मनिष

मुक्तसुनीत यांचा अग्रलेख तर उत्तमच पण इथे आलेल्या अनेक प्रतिक्रियांचे संपादन केले तर अजून एक उत्तम अग्रलेख तयार होईल असे वाटते. चतुरंग, पेठकरकाका, पिडांकाका आणि इतर अनेकानी उत्तमोत्तम प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वच वाचनीय. संदिपने मांडलेला अमेरिकन पासपोर्टचा मुद्दा म्हणजे भारतीय आई-वडीलांच्या अमेरीकन मुलाना देशात काय काय समस्या येऊ शकतात याची नांदीच आहे. शिवाय आपली मुळे, संस्कार इथले असतील तरी मुलांवर बाहेर, शाळेत संस्कार होतात ते तिथल्या परक्या संस्कृतीचे...त्याचा प्रभाव किती राहील हे पुर्णपणे आपल्या हातात नसते. मग १४-१५ वर्षाच्या मुलाला/मुलीला हातात कॉन्ट्रासेप्टीव्ह देऊन "have fun" म्हणण्याची मानसिक तयारी आहे का हे पण तपासावे! खरं तर ८-१० वर्षे तिथे वाढलेल्या लहान मुलांनाही परत इथे आणने हे महा-कठीण काम असते. त्यात खरच घरका-न-घाटका अशी अवस्था होऊ शकते... पण तिथे रहायचे हा निर्णय तुमचाच होता ना? हेही अगदी पटले. उत्तम लेखाबद्दल सुनीतरावांचे आभार. पुण्याचे पेशवे

सखी 08/07/2008 - 22:27
कोणतीही एकच बाजु न घेता तटस्थपणे केलेले विश्लेषण आवडले. सर्वसाक्षींनी म्हटल्याप्रमाणे - सुंदर उपक्रम, सुंदर प्रतिसाद, सुरेख अग्रलेख. मुक्तसुनीत, तात्या आणि मिपाचे हार्दिक अभिंनंदन!

शितल 09/07/2008 - 02:38
एन्.आय्.रायच्या मनाची घालमेल व्यवस्थित टिपली आहे. आणि मानवी स॑क्रमण ही होतच राहणार. पेठकर काका॑ची प्रतिक्रीया ही अतिशय बोलकी आणि जिव॑त. पाहुणा स॑पादक एक छान लेख वाचायला मिळाला. धन्यवाद.

प्रियाली 09/07/2008 - 03:07
असा चांगला उपक्रम सुरू केल्याबद्दल मिपा आणि मिपापरिवाराचे अभिनंदन!

अग्रलेख आवडला. एक गोष्ट मात्र खटकली ती अशी. अग्रलेखात म्हटले आहे "अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारण्याची माझी वेळ अजून काही आली नाही. परंतु ऐकीव माहितीवर आधारित जे कळले ते असे की, नागरिकत्वाच्या प्रक्रियेमधे अशी एक पायरी येते जिथे तुम्हाला अशा अर्थाच प्रश्न विचारलेला असतो : उद्या समजा , अमेरिकेचे आणि तुमच्या मातृभूमी असणार्‍या देशाचे युद्ध झाले, तर तुमची सहानुभूती, तुमची एकूण प्रतिक्रिया कुणाच्या पक्षाला फायदेशीर ठरेल अशी असेआहे." हे कांही खरं नाही.अर्थात वरील माहिती ऐकीव असल्याच्या माहितीवरून असल्याने गैरसमज होवू नये म्हणून हा खुलासा. १ ते १०० प्रश्न असतात त्यातील कुठलेही १० प्रश्न मुलाखतीत विचारले जातात.त्या १०० प्रश्नात वर उल्लेखलेल्या प्रश्नासारखा प्रश्न किंवा तसा संदर्भ येईल असा प्रश्न नाही. INS Citizenship Test Questions http://usgovinfo.about.com/blinstst.htm वरिल साईटवर क्लिक करून सर्व प्रश्न कुणालाही वाचता येतात,-वाचकापैकी कुणीही हवं तर पहावी- त्याची योग्य उत्तरे पण अभ्यासासाठी दिली जातात. ह्या १०० प्रश्नाच्या बाहेर कुठलाही प्रश्न विचारण्याची परवानगी नाही. मी स्वतः अमेरिकन सिटीझन असल्याने आणि ह्या नाकरिकत्वाच्या प्रक्रियेमधून गेलो असल्यामुळे असं लिहित आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

धनंजय 10/07/2008 - 00:25
नागरिकत्वाच्या शपथेचे पाठ्य : त्यातले काही महत्त्वाचे भाग येणेप्रमाणे: I hereby declare, on oath, * that I absolutely and entirely renounce and abjure all allegiance and fidelity to any foreign prince, potentate, state, or sovereignty of whom or which I have heretofore been a subject or citizen; ... that I will support and defend the Constitution and laws of the United States of America against all enemies, foreign and domestic; ... that I will bear arms on behalf of the United States when required by law; "यापूर्वी जिथला प्रजाजन किंवा नागरिक होतो त्या ... राज्याच्या किंवा सार्वभौमत्वाच्या निष्ठेचा आणि विश्वासार्हतेचा पूर्णपणे त्याग करतो आणि नकारतो" "सर्व अंतर्गत आणि बाह्य शत्रूंविरुद्ध अमेरिकेच्या घटनेचे समर्थन आणि संरक्षण करीन" "कायद्याने जरुरीचे असल्यास अमेरिकेच्या बाजूने शस्त्र बाळगेन" ही सर्व शपथवचने एकत्र वाचता, असे लक्षात येते, की जर कधी मायदेशाचे अमेरिकेशी युद्ध झाले, किंवा अमेरिकेच्या राज्यघटनेला मायदेशाकडून धोका येऊ शकला, तर मायदेशाशी शपथ घेणार्‍याची निष्ठा नसेलच, शपथ घेणारा अमेरिकेचे (घटनेचे) संरक्षण करेल, किंवा कायद्याने जरुरीचे असल्यास अमेरिकेच्या बाजूने शस्त्रे बाळगेल, त्यांचा वापर मायदेशाच्या विरुद्ध असो नसो, कारण त्या मायदेशाशी निष्ठा शपथपूर्वक त्यागलेली असते. मला वाटते बहुतेक शपथ घेणारे "जर कधी" शब्दांवर विचारात जोर देत असावेत, आणि "असे कधीच होणार नाही" असे स्वतःला मनापासून पटवत असावेत. कारण आपल्या हयातीत मायदेशाने अमेरिकेच्या घटनेला धोका पोचवला नाही, तर मायदेशावरची आंतरिक निष्ठा खरोखर त्यागून मायदेशाविरुद्ध कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. श्रीकृष्ण सामंत यांच्या मनात, किंवा ही शपथ घेतलेल्या अन्य लोकांच्या मनात काय विचार आलेत ते जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by धनंजय

धनंजयजी, आपण म्हणता अगदी तसेच विचार शपथ घेताना माझ्या मनात आले. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

शिप्रा 11/07/2008 - 10:56
खुप खुप छान लिहिले आहे..संपाद्कांनि आणि इतर लोकांनि पण ... >>मग १४-१५ वर्षाच्या मुलाला/मुलीला हातात कॉन्ट्रासेप्टीव्ह देऊन "have fun" म्हणण्याची मानसिक तयारी आहे का हे पण तपासावे! अगदि खरे आहे...मि तिथे असताना तेथिल मुलांसाथि हे बघितले आहे...आणि तेव्हाच मला आपल्या संस्क्रुतिबद्द्ल अभिमान वाट्ला... जिथे कमी तिथे आम्ही ..:)
विशेष
3

अशी ही एक श्रद्धा

श्रीकृष्ण सामंत ·

In reply to by अभिषेक पटवर्धन

आपल्याला आनंद झाला हे वाचून मला बरं वाटलं आपल्या सर्वांना आनंद होईल असं लेखन करायचा मी नक्कीच प्रयत्न करीन www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

प्राजु 07/07/2008 - 01:24
आई नेहमीच सांगते... मानलं तर सगळंच आहे नाहीतर काहीच नाही". हा शेवटी श्रद्धेचा भाग आहे. माणसांतला देव शोधणं मला आवडतं आणि प्रयत्नही तसाच असतो.... एखाद्या शेंदूर फासलेल्या केशरी दगडासमोर हात जोडण्यापेक्षा मला वेळोवेळी मदत करणारा, मार्ग दाखवणारा आणि प्रसंगी माझा आत्मविश्वास वाढवणारा तो/ती.. माझ्यासाठी देवच आहे. लेख आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

II राजे II 07/07/2008 - 10:05
एखाद्या शेंदूर फासलेल्या केशरी दगडासमोर हात जोडण्यापेक्षा मला वेळोवेळी मदत करणारा, मार्ग दाखवणारा आणि प्रसंगी माझा आत्मविश्वास वाढवणारा तो/ती.. माझ्यासाठी देवच आहे. अगदी हेच म्हणतो ..... मालिक की मेहर ! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

In reply to by प्राजु

आपल्याला माझा लेख आवडला हे वाचून बरं वाटलं. आपल्या आईचं म्हणणं अगदी बरोबर आहे.हा श्रद्धेचा भाग आहे यात वाद नाही.मला असं वाटतं आपल्या सभोवती देवभोळे लोक असल्याने मुर्ती पूजेच्या संदर्भातून भक्तिभाव वाढवावा-मग शेंदूर फासून दगड ठेवून सुद्धा- उद्देश साध्य करायचा भाबडा प्रयत्न असावा.पण नंतर नंतर अतिच होऊ लागल्याने संताना सुद्धा माणसातला खरा देव समजावून सांगावा लागला. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

विजुभाऊ 09/07/2008 - 10:00
मला कित्येक वर्ष पोरका करून एका निश्चल दुःखात टाकून ते निघून गेले होते. हे शब्दांच्या पलीकडले पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विजुभाऊ , खरचं ,हे शब्दांच्या पलीकडले आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by अभिषेक पटवर्धन

आपल्याला आनंद झाला हे वाचून मला बरं वाटलं आपल्या सर्वांना आनंद होईल असं लेखन करायचा मी नक्कीच प्रयत्न करीन www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

प्राजु 07/07/2008 - 01:24
आई नेहमीच सांगते... मानलं तर सगळंच आहे नाहीतर काहीच नाही". हा शेवटी श्रद्धेचा भाग आहे. माणसांतला देव शोधणं मला आवडतं आणि प्रयत्नही तसाच असतो.... एखाद्या शेंदूर फासलेल्या केशरी दगडासमोर हात जोडण्यापेक्षा मला वेळोवेळी मदत करणारा, मार्ग दाखवणारा आणि प्रसंगी माझा आत्मविश्वास वाढवणारा तो/ती.. माझ्यासाठी देवच आहे. लेख आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

II राजे II 07/07/2008 - 10:05
एखाद्या शेंदूर फासलेल्या केशरी दगडासमोर हात जोडण्यापेक्षा मला वेळोवेळी मदत करणारा, मार्ग दाखवणारा आणि प्रसंगी माझा आत्मविश्वास वाढवणारा तो/ती.. माझ्यासाठी देवच आहे. अगदी हेच म्हणतो ..... मालिक की मेहर ! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

In reply to by प्राजु

आपल्याला माझा लेख आवडला हे वाचून बरं वाटलं. आपल्या आईचं म्हणणं अगदी बरोबर आहे.हा श्रद्धेचा भाग आहे यात वाद नाही.मला असं वाटतं आपल्या सभोवती देवभोळे लोक असल्याने मुर्ती पूजेच्या संदर्भातून भक्तिभाव वाढवावा-मग शेंदूर फासून दगड ठेवून सुद्धा- उद्देश साध्य करायचा भाबडा प्रयत्न असावा.पण नंतर नंतर अतिच होऊ लागल्याने संताना सुद्धा माणसातला खरा देव समजावून सांगावा लागला. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

विजुभाऊ 09/07/2008 - 10:00
मला कित्येक वर्ष पोरका करून एका निश्चल दुःखात टाकून ते निघून गेले होते. हे शब्दांच्या पलीकडले पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विजुभाऊ , खरचं ,हे शब्दांच्या पलीकडले आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
लेखनविषय:
लेखनप्रकार
"मी लहान असताना घरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावरच्या गाड्याना पाहून एक दिवस कुणी तरी गाडी थांबवून उतरणारी व्यक्ति माझे वडिल व्हावेत अशी मी उगाचच कल्पना करीत रहायचो.

..

प्रियाली ·

विसोबा खेचर 06/07/2008 - 17:53
त्या रात्री आमच्या स्वागताला पर्जन्यराज नेहमीप्रमाणे हजर झाले. विजांच्या चकचकाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस पडला. भर जंगलात डोंगरमाथ्यावर रात्रीच्या काळोखात निसर्गाचे विलोभनीय रुद्र रूप आणि अधूनमधून येणारे प्राण्यांचे चित्रविचित्र आवाज, घुत्कार आणि चित्कारांत ती रात्र सरली. वा! मस्त वर्णन... तिला माणसांची भीती नव्हती की या माणसांना आपण पिंजर्‍यात बंद केलं आहे याची खात्री झाली होती का काय देव जाणे. क्या बात है! हे वाक्य आवडलं... प्रियाली, जियो! बर्‍याच दिवसांनी तुझा लेख वाचायला मिळाला. सुंदर अनुभवकथन... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 06/07/2008 - 18:10
हल्ली पूर्वीसारखा वेळ नसतो. हा लेखही तासाभरात उरकावा लागला. त्यामुळे मनासारखं उतरत नाही म्हणून लिहित नाही. लिहिण्याची इच्छा झाली हेच खूप...सुट्टीचा परिणाम असावा. ;)

In reply to by नंदन

प्रियाली 06/07/2008 - 18:09
सध्या आम्ही आमच्या ब्याकयार्डात उगवतो आहे. ;)
लेखाचे 'बेअरिंग' उत्तम सांभाळले आहे
शब्दच्छल मस्त!

सहज 06/07/2008 - 18:32
सहल वर्णन मस्त. मामाबेयर बेबीबेयर अनुभव छानच!

In reply to by सहज

चित्रा 06/07/2008 - 19:59
लेखन आवडलेच. आपण बहुतेक वेळा निसर्ग अगदी हवा तेवढाच घरात येऊ देत असतो , कुठे फुलदाणीतली फुले, एखादा पाळीव प्राणी, पक्षी वगैरे, असे कुठेतरी बाहेर गेले की कळते आपण किती नगण्य प्राणी असतो ते :-)

छान लेख, आवडला! अस्वलांच्या बाबतीतला अनुभव तर अगदी प्रातिनिधीक!! उत्तर अमेरिकेत हिंडण्याफिरण्याचे महिने तीन. जून ते ऑगस्ट. खरं आहे, पण स्मोकी माऊंटनला जायला फॉल उत्तम हो. फोलियेज काय सुंदर रंग पकडतं म्हणून सांगू!! पुढल्या वेळी एक फॉलमध्ये ट्रीप कराच! यू वोन्ट बी डिसअपॉईंटेड!!! मिडवेस्टात राहणारी माणसं माणूसघाणी असतात का असा प्रश्न एखाद्याला पडला असेल तर खरेखुरे उत्तर येथे मिळून जावे. हे मस्त!!:) अहो एलाय लिलीचा उमेदवार आमच्याकडे मुलाखतीसाठी आला तर अर्धा दिवस त्याला नुसतं बोलतं करण्यात निघून जातो!!:)) खरंतर, माणसांपासून दूर जाऊन आराम करायचा झाला तर मिडवेस्टासारखी दुसरी जागा नाही!!! हा तर षटकार!!!:)) आम्ही आधी इस्ट (खडूस) आणि आता वेस्ट (उधळे) कोस्ट वाले असल्याने तुमच्या विधानातली सत्यता लगेच पटली!!!!:) “माझी गाडी.... ही अस्वलं खरवडून तर नाही ना ठेवणार?” ह्याच्या डोक्यात तिसरेच विचार सुरू होते. तुम्हाला विनोदी वाटतंय, पण खरंतर मी 'त्याच्या' भावनेशी सहमत आहे. अहो जावे त्याच्या (नवरेलोकांच्या) वंशा, तेंव्हा कळे...:)) बाकी त्याला म्हणावं की गाडीत एकही खाद्यपदार्थ ठेवू नकोस मग काही ताप नाही. पण एक बिस्कीट जरी आत राहिलं तर गाडीची खैर नाही. अस्वलांना वास येतो. गाडी लॉक करूनही काही उपयोग नाही. स्वानुभवावरून सांगतोय, अस्वलं त्यांची एक ट्रीक वापरून लॉक उघडतात...:( सध्या आम्ही आमच्या ब्याकयार्डात उगवतो आहे. कधी बोलावताय पार्टीला? :)

In reply to by पिवळा डांबिस

प्रियाली 06/07/2008 - 21:06
स्मोकी माऊंटनला जायला फॉल उत्तम हो. फोलियेज काय सुंदर रंग पकडतं म्हणून सांगू!!
सहमत आहे. स्प्रिंग आणि फॉल ट्रिप्स केल्या होत्या. उन्हाळ्यात राहिली होती, यावर्षी ती ही केली.
अहो एलाय लिलीचा उमेदवार आमच्याकडे मुलाखतीसाठी आला तर अर्धा दिवस त्याला नुसतं बोलतं करण्यात निघून जातो!!
शक्य आहे. मी तर ऐकून आहे की एलाय लिलीत मुलाखतीला आलेल्या क्यांडिडेटला विचारतात की 'तुला बोलता येतं का?' उत्तर नाही आलं तरच नोकरी मिळते. स्वानुभव!!
तुम्हाला विनोदी वाटतंय, पण खरंतर मी 'त्याच्या' भावनेशी सहमत आहे.
अहो विनोदी नाही, इतक्या वर्षांचा अनुभव आहे. तिथे अस्वलं होती, त्यांना सांगून काही परिणाम होणार नाही म्हणून ठीक. मी गाडी घेऊन लांबवर जात असेन तर "तू धड परतली नाहीस तर चालेल पण गाडी धड परत आली पाहिजे." असा हुकूम नेहमी मिळतो. ;) गाडीत बरंच खाण्यापिण्याचं सामान होतं म्हणूनच आम्ही थोडे धास्तावलो होतो पण त्या आईला आपल्या छाव्यांपुढे बाकी काही दिसलं नसावं.
कधी बोलावताय पार्टीला?
हे बरंय आधी लिलीच्या लोकांना माणूसघाणं म्हणायचं आणि वर पार्टीही मागायची. ;) पण साहित्यसंमेलनाचं सूप वाजलं का श्रमपरिहार पार्टी इथेच ठेवू, आमच्या ब्याकयार्डात. :) जोक्स अपार्ट, कधीही या!

In reply to by प्रियाली

हे बरंय आधी लिलीच्या लोकांना माणूसघाणं म्हणायचं आणि वर पार्टीही मागायची. आयला, तुम्ही लिलीच्या? मग सॉरी हां! आम्हाला तरी काय माहिती? इथे मिपावर बरेचसे लोक कॉम्प्यूटरवाले आहेत, आमच्यासारखे फार्मावाले कमीच! पण आम्ही आम्हालाही खडूस आणि उधळं म्हटलंय हो!!!:) जोक्स अपार्ट, कधीही या! थॅक्यू! आणि तुम्ही जेंव्हा कधी एल्.ए. ला याल तेंव्हा जरूर या!!

विकास 06/07/2008 - 21:30
लेख मस्त आहे. माउंट वॉशिंग्टनच्या भागात (व्हर्माँट/न्यू हँम्पशायर) बर्‍याचदा जाणे होते पण स्मोकी माउंटनचे वरील वर्णन ऐकून निश्चितच जावेसे वाटत आहे...

ऋषिकेश 06/07/2008 - 21:49
वा! लई भारी! फोटु आवडले खासच! प्रवासवर्णन / अनुभवकथन माझा आवडता प्रकार असल्याने वाचायला खूप मजा आली.... अजून असेच लिखाण होऊ द्यात! बाकी अनुभवकथन आवडलं ... मधेच थोडं विस्कळीत वाटलं.. पण एका तासात एका बैठकीत लिहिलं आहे .. म्हणून " कम्माल का है ! ;)" -('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्रियाली 06/07/2008 - 22:49
ऋषिकेश, अरे प्रवासवर्णन म्हणून लिहायला बसले नव्हते. अनुभव लिहायचा होता, दोघांची मिसळ झालीसं वाटतं. कुठे विस्कळीतपणा आला आहे ते खरडीतून कळव. मी ब्लॉगावर तरी व्यवस्थित करते. विकास, स्मोकीची ट्रिप जरूर करा. अतिशय सुरेख जागा आहे. नॅशनलपार्क सोडून गॅटलीनबर्ग आणि पिजन फोर्ज अशा दोन फनसिटिजही आहेत. तिथे म्युझिअम्स, आर्केड, अक्वेरियम, थीमपार्क्स, शोज आणि बरेच प्रकार आहेत. मुलांनाही आवडेल असे स्थळ आहे. परंतु, सहल कराल तेव्हा निवांत सहल करा. आम्ही मागे ३ दिवस आणि ५ दिवसांची ट्रिप केली होती. यावेळी तब्बल ७ दिवसांची. तरी कमीच पडली. काही अधिक फोटो येथे लावते. DSC01896 ओढ्यावर पाणी पिणारे हरिण DSC01849 स्मोकीतील धुक्याने अच्छादित एक पहाट DSC00653 गॅटलिनबर्ग

चतुरंग 07/07/2008 - 00:04
स्मोकी माऊंटनबद्दल ऐकून होतो आता वाचूनही आहे. जंगलात जाऊन, तब्बल ७ दिवस राहूनही अपुरी वाटली ट्रिप, म्हणजे जबरदस्तच असणार निसर्गसौंदर्य. प्रवासवर्णन छान आहे आणि फोटोही चांगले आलेत. अस्वल आई-बेट्यांची कहाणी 'रंजक' आहे! :S चतुरंग

बेसनलाडू 07/07/2008 - 07:59
लेखन आवडले. फोटोही. गॅटलिनबर्ग सुंदरच जागा आहे.रिवर राफ्टिंग इ. करता येते;ते मिळाल्यास जरूर करावे. (एक्स्-एन्. सी. आइट् ;) )बेसनलाडू

अनिल हटेला 07/07/2008 - 10:17
प्रियाली जी!!! छान प्रवास वर्णन ... लिखाण ही मस्त आणी फोटोज ही.... जंगली असो का पाळीव, प्राणी असो का मनुष्य- आईही आईच असते याची जाणीव त्या दृष्यातून होत होती. आवडले... अजुन ही प्रवास वर्णन वाचायला आवडेल.... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

प्रियाली 07/07/2008 - 14:43
लेखाला प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे धन्यवाद. चतुरंग, बेलाने म्हटल्याप्रमाणे स्मोकीच्या या परिसरात रिव्हर राफ्टींग, हॉर्स रायडींग, बाईकिंग, ट्रेकिंग वगैरेही करता येते. पीजन फोर्ज परिसरात डॉलीपार्क, गो-कार्ट्स, गॉल्फ इ. करता येते. वेळ काढून जाऊन या. सात दिवस अपुरे आहेत याची प्रचीती यावी. :)

अनुभवकथन अतिशय प्रवाही, उत्कंठावर्धक आणि (अस्वलांच्या भितीपोटी) तणावपूर्ण झाले आहे. छायाचित्रेही सुरेख आली आहेत. ओढ्यावर पाणी पिणारे हरीण मस्त. अभिनंदन.

ऍडीजोशी 07/07/2008 - 18:16
मीच जाऊन आल्या सारखे वाटले. अवांतर - अस्वलांच्या माद्या या धोकादायक असून त्या माणसांवर हल्ले करण्याची शक्यता अधिक असते :D प्राण्यांच्यातही हे काँट्रॅक्ट स्त्री वर्गाकडेच का. छान आहे. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

आनंदयात्री 07/07/2008 - 18:30
>>प्राण्यांच्यातही हे काँट्रॅक्ट स्त्री वर्गाकडेच का. छान आहे. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली 07/07/2008 - 19:21
प्राण्यांच्यातही हे काँट्रॅक्ट स्त्री वर्गाकडेच का. छान आहे.
=)) अगदी! तुमचं काँट्रॅक्ट दिलेलं आहे की द्यायचं आहे?

In reply to by प्रियाली

ऍडीजोशी 07/07/2008 - 20:17
ऍडी म्हणे आता, उरलो पिटण्या पुरता. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

विसुनाना 07/07/2008 - 18:49
सुंदर लेख. इतक्या गडबडीत लिहूनही छान जमलाय.सर्व प्रकाशचित्रंही उत्तम. धबधब्याचं पेंटिंग करावं असं आहे.

झकासराव 08/07/2008 - 11:22
प्राण्यांच्यातही हे काँट्रॅक्ट स्त्री वर्गाकडेच का. छान आहे. >>>>>>>>> =)) प्रियाली अनुभव कथन छान आहे. प्रकाशचित्रे सगळीच मस्त. मला धबधब्याच सर्वात जास्त आवडलं :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

प्रियाली 08/07/2008 - 15:10
प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे धन्यवाद. हरीण पाणी प्यायला वाकले होते म्हणून क्यामेराची कळ दाबली तोपर्यंत त्याने पोझ देणे नाकारले. धबधब्याचा फोटो, धबधब्याखाली उतरून काढल्याने बरा आला पण त्या फोटोच्या आम्हीही दिसतोय हे आजच लक्षात आले. :)

सुवर्णमयी 08/07/2008 - 17:01
प्रियाली, लेख आणि फोटो आवडले. बेयन (माझ्या मुलाच्या भाषेत, र चा पत्ता नाहीये अजून) फार धमाल आहेत. मुले एकदम खूष झालीत. काल बराच वेळ हेच फोटो बघणे सुरु होते.मी स्मोकी ला पाहिलेले फॉल कलर्स गेल्या दहा वर्षातले सर्वोत्तम आहेत.तेव्हा गॅटलिनबर्ग ला धावती भेट दिली होती. तो सर्व परिसर अतिशय मोहक आहे. त्या सर्व आठवणी लेख वाचून ताज्या झाल्यात. सोनाली

लेख आणि फोटू छान आहेत प्रियाली.... स्मोकीला यायला पाहिजे एकदा. आम्हा बाराकरांना (बाग राज्यकरांना) अवतीभवती माणसंच माणसं (त्यातही देसीच देसी !!) बघायची सवय ;) -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------

सर्किट 09/07/2008 - 00:27
छायाचित्रे आवडली. नेहमीचीच क्खुसखुशीत शैली वाचून बरे वाटले. - सर्किट

टारझन 09/07/2008 - 01:38
असे अफाट निसर्ग सौंदर्य चित्रासकट आणि तेवढ्याच प्रभावी शब्दात मांडलेत... धन्यवाद प्रियाली.... अफ्रिकाही अशीच अफाट आहे.. सुंदर आहे... पण अजून जायचा योग नाही आला. पुन्हा त्यात आम्ही पडलो पुणेकर (सेंट न सेंट वाचवणारे) म्हणजे सफारीला जाताणा १० वेळा विचार... फोटोज ने फार प्रभाव पडला .. अतिऊत्तम.. तुमच्या पूढच्या सूट्टीची आणि भटकंतीच्या अनूभव वाचण्याची वाट बघतोय... चेंगट ) कु ख.
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

विसोबा खेचर 06/07/2008 - 17:53
त्या रात्री आमच्या स्वागताला पर्जन्यराज नेहमीप्रमाणे हजर झाले. विजांच्या चकचकाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस पडला. भर जंगलात डोंगरमाथ्यावर रात्रीच्या काळोखात निसर्गाचे विलोभनीय रुद्र रूप आणि अधूनमधून येणारे प्राण्यांचे चित्रविचित्र आवाज, घुत्कार आणि चित्कारांत ती रात्र सरली. वा! मस्त वर्णन... तिला माणसांची भीती नव्हती की या माणसांना आपण पिंजर्‍यात बंद केलं आहे याची खात्री झाली होती का काय देव जाणे. क्या बात है! हे वाक्य आवडलं... प्रियाली, जियो! बर्‍याच दिवसांनी तुझा लेख वाचायला मिळाला. सुंदर अनुभवकथन... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 06/07/2008 - 18:10
हल्ली पूर्वीसारखा वेळ नसतो. हा लेखही तासाभरात उरकावा लागला. त्यामुळे मनासारखं उतरत नाही म्हणून लिहित नाही. लिहिण्याची इच्छा झाली हेच खूप...सुट्टीचा परिणाम असावा. ;)

In reply to by नंदन

प्रियाली 06/07/2008 - 18:09
सध्या आम्ही आमच्या ब्याकयार्डात उगवतो आहे. ;)
लेखाचे 'बेअरिंग' उत्तम सांभाळले आहे
शब्दच्छल मस्त!

सहज 06/07/2008 - 18:32
सहल वर्णन मस्त. मामाबेयर बेबीबेयर अनुभव छानच!

In reply to by सहज

चित्रा 06/07/2008 - 19:59
लेखन आवडलेच. आपण बहुतेक वेळा निसर्ग अगदी हवा तेवढाच घरात येऊ देत असतो , कुठे फुलदाणीतली फुले, एखादा पाळीव प्राणी, पक्षी वगैरे, असे कुठेतरी बाहेर गेले की कळते आपण किती नगण्य प्राणी असतो ते :-)

छान लेख, आवडला! अस्वलांच्या बाबतीतला अनुभव तर अगदी प्रातिनिधीक!! उत्तर अमेरिकेत हिंडण्याफिरण्याचे महिने तीन. जून ते ऑगस्ट. खरं आहे, पण स्मोकी माऊंटनला जायला फॉल उत्तम हो. फोलियेज काय सुंदर रंग पकडतं म्हणून सांगू!! पुढल्या वेळी एक फॉलमध्ये ट्रीप कराच! यू वोन्ट बी डिसअपॉईंटेड!!! मिडवेस्टात राहणारी माणसं माणूसघाणी असतात का असा प्रश्न एखाद्याला पडला असेल तर खरेखुरे उत्तर येथे मिळून जावे. हे मस्त!!:) अहो एलाय लिलीचा उमेदवार आमच्याकडे मुलाखतीसाठी आला तर अर्धा दिवस त्याला नुसतं बोलतं करण्यात निघून जातो!!:)) खरंतर, माणसांपासून दूर जाऊन आराम करायचा झाला तर मिडवेस्टासारखी दुसरी जागा नाही!!! हा तर षटकार!!!:)) आम्ही आधी इस्ट (खडूस) आणि आता वेस्ट (उधळे) कोस्ट वाले असल्याने तुमच्या विधानातली सत्यता लगेच पटली!!!!:) “माझी गाडी.... ही अस्वलं खरवडून तर नाही ना ठेवणार?” ह्याच्या डोक्यात तिसरेच विचार सुरू होते. तुम्हाला विनोदी वाटतंय, पण खरंतर मी 'त्याच्या' भावनेशी सहमत आहे. अहो जावे त्याच्या (नवरेलोकांच्या) वंशा, तेंव्हा कळे...:)) बाकी त्याला म्हणावं की गाडीत एकही खाद्यपदार्थ ठेवू नकोस मग काही ताप नाही. पण एक बिस्कीट जरी आत राहिलं तर गाडीची खैर नाही. अस्वलांना वास येतो. गाडी लॉक करूनही काही उपयोग नाही. स्वानुभवावरून सांगतोय, अस्वलं त्यांची एक ट्रीक वापरून लॉक उघडतात...:( सध्या आम्ही आमच्या ब्याकयार्डात उगवतो आहे. कधी बोलावताय पार्टीला? :)

In reply to by पिवळा डांबिस

प्रियाली 06/07/2008 - 21:06
स्मोकी माऊंटनला जायला फॉल उत्तम हो. फोलियेज काय सुंदर रंग पकडतं म्हणून सांगू!!
सहमत आहे. स्प्रिंग आणि फॉल ट्रिप्स केल्या होत्या. उन्हाळ्यात राहिली होती, यावर्षी ती ही केली.
अहो एलाय लिलीचा उमेदवार आमच्याकडे मुलाखतीसाठी आला तर अर्धा दिवस त्याला नुसतं बोलतं करण्यात निघून जातो!!
शक्य आहे. मी तर ऐकून आहे की एलाय लिलीत मुलाखतीला आलेल्या क्यांडिडेटला विचारतात की 'तुला बोलता येतं का?' उत्तर नाही आलं तरच नोकरी मिळते. स्वानुभव!!
तुम्हाला विनोदी वाटतंय, पण खरंतर मी 'त्याच्या' भावनेशी सहमत आहे.
अहो विनोदी नाही, इतक्या वर्षांचा अनुभव आहे. तिथे अस्वलं होती, त्यांना सांगून काही परिणाम होणार नाही म्हणून ठीक. मी गाडी घेऊन लांबवर जात असेन तर "तू धड परतली नाहीस तर चालेल पण गाडी धड परत आली पाहिजे." असा हुकूम नेहमी मिळतो. ;) गाडीत बरंच खाण्यापिण्याचं सामान होतं म्हणूनच आम्ही थोडे धास्तावलो होतो पण त्या आईला आपल्या छाव्यांपुढे बाकी काही दिसलं नसावं.
कधी बोलावताय पार्टीला?
हे बरंय आधी लिलीच्या लोकांना माणूसघाणं म्हणायचं आणि वर पार्टीही मागायची. ;) पण साहित्यसंमेलनाचं सूप वाजलं का श्रमपरिहार पार्टी इथेच ठेवू, आमच्या ब्याकयार्डात. :) जोक्स अपार्ट, कधीही या!

In reply to by प्रियाली

हे बरंय आधी लिलीच्या लोकांना माणूसघाणं म्हणायचं आणि वर पार्टीही मागायची. आयला, तुम्ही लिलीच्या? मग सॉरी हां! आम्हाला तरी काय माहिती? इथे मिपावर बरेचसे लोक कॉम्प्यूटरवाले आहेत, आमच्यासारखे फार्मावाले कमीच! पण आम्ही आम्हालाही खडूस आणि उधळं म्हटलंय हो!!!:) जोक्स अपार्ट, कधीही या! थॅक्यू! आणि तुम्ही जेंव्हा कधी एल्.ए. ला याल तेंव्हा जरूर या!!

विकास 06/07/2008 - 21:30
लेख मस्त आहे. माउंट वॉशिंग्टनच्या भागात (व्हर्माँट/न्यू हँम्पशायर) बर्‍याचदा जाणे होते पण स्मोकी माउंटनचे वरील वर्णन ऐकून निश्चितच जावेसे वाटत आहे...

ऋषिकेश 06/07/2008 - 21:49
वा! लई भारी! फोटु आवडले खासच! प्रवासवर्णन / अनुभवकथन माझा आवडता प्रकार असल्याने वाचायला खूप मजा आली.... अजून असेच लिखाण होऊ द्यात! बाकी अनुभवकथन आवडलं ... मधेच थोडं विस्कळीत वाटलं.. पण एका तासात एका बैठकीत लिहिलं आहे .. म्हणून " कम्माल का है ! ;)" -('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्रियाली 06/07/2008 - 22:49
ऋषिकेश, अरे प्रवासवर्णन म्हणून लिहायला बसले नव्हते. अनुभव लिहायचा होता, दोघांची मिसळ झालीसं वाटतं. कुठे विस्कळीतपणा आला आहे ते खरडीतून कळव. मी ब्लॉगावर तरी व्यवस्थित करते. विकास, स्मोकीची ट्रिप जरूर करा. अतिशय सुरेख जागा आहे. नॅशनलपार्क सोडून गॅटलीनबर्ग आणि पिजन फोर्ज अशा दोन फनसिटिजही आहेत. तिथे म्युझिअम्स, आर्केड, अक्वेरियम, थीमपार्क्स, शोज आणि बरेच प्रकार आहेत. मुलांनाही आवडेल असे स्थळ आहे. परंतु, सहल कराल तेव्हा निवांत सहल करा. आम्ही मागे ३ दिवस आणि ५ दिवसांची ट्रिप केली होती. यावेळी तब्बल ७ दिवसांची. तरी कमीच पडली. काही अधिक फोटो येथे लावते. DSC01896 ओढ्यावर पाणी पिणारे हरिण DSC01849 स्मोकीतील धुक्याने अच्छादित एक पहाट DSC00653 गॅटलिनबर्ग

चतुरंग 07/07/2008 - 00:04
स्मोकी माऊंटनबद्दल ऐकून होतो आता वाचूनही आहे. जंगलात जाऊन, तब्बल ७ दिवस राहूनही अपुरी वाटली ट्रिप, म्हणजे जबरदस्तच असणार निसर्गसौंदर्य. प्रवासवर्णन छान आहे आणि फोटोही चांगले आलेत. अस्वल आई-बेट्यांची कहाणी 'रंजक' आहे! :S चतुरंग

बेसनलाडू 07/07/2008 - 07:59
लेखन आवडले. फोटोही. गॅटलिनबर्ग सुंदरच जागा आहे.रिवर राफ्टिंग इ. करता येते;ते मिळाल्यास जरूर करावे. (एक्स्-एन्. सी. आइट् ;) )बेसनलाडू

अनिल हटेला 07/07/2008 - 10:17
प्रियाली जी!!! छान प्रवास वर्णन ... लिखाण ही मस्त आणी फोटोज ही.... जंगली असो का पाळीव, प्राणी असो का मनुष्य- आईही आईच असते याची जाणीव त्या दृष्यातून होत होती. आवडले... अजुन ही प्रवास वर्णन वाचायला आवडेल.... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

प्रियाली 07/07/2008 - 14:43
लेखाला प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे धन्यवाद. चतुरंग, बेलाने म्हटल्याप्रमाणे स्मोकीच्या या परिसरात रिव्हर राफ्टींग, हॉर्स रायडींग, बाईकिंग, ट्रेकिंग वगैरेही करता येते. पीजन फोर्ज परिसरात डॉलीपार्क, गो-कार्ट्स, गॉल्फ इ. करता येते. वेळ काढून जाऊन या. सात दिवस अपुरे आहेत याची प्रचीती यावी. :)

अनुभवकथन अतिशय प्रवाही, उत्कंठावर्धक आणि (अस्वलांच्या भितीपोटी) तणावपूर्ण झाले आहे. छायाचित्रेही सुरेख आली आहेत. ओढ्यावर पाणी पिणारे हरीण मस्त. अभिनंदन.

ऍडीजोशी 07/07/2008 - 18:16
मीच जाऊन आल्या सारखे वाटले. अवांतर - अस्वलांच्या माद्या या धोकादायक असून त्या माणसांवर हल्ले करण्याची शक्यता अधिक असते :D प्राण्यांच्यातही हे काँट्रॅक्ट स्त्री वर्गाकडेच का. छान आहे. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

आनंदयात्री 07/07/2008 - 18:30
>>प्राण्यांच्यातही हे काँट्रॅक्ट स्त्री वर्गाकडेच का. छान आहे. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली 07/07/2008 - 19:21
प्राण्यांच्यातही हे काँट्रॅक्ट स्त्री वर्गाकडेच का. छान आहे.
=)) अगदी! तुमचं काँट्रॅक्ट दिलेलं आहे की द्यायचं आहे?

In reply to by प्रियाली

ऍडीजोशी 07/07/2008 - 20:17
ऍडी म्हणे आता, उरलो पिटण्या पुरता. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

विसुनाना 07/07/2008 - 18:49
सुंदर लेख. इतक्या गडबडीत लिहूनही छान जमलाय.सर्व प्रकाशचित्रंही उत्तम. धबधब्याचं पेंटिंग करावं असं आहे.

झकासराव 08/07/2008 - 11:22
प्राण्यांच्यातही हे काँट्रॅक्ट स्त्री वर्गाकडेच का. छान आहे. >>>>>>>>> =)) प्रियाली अनुभव कथन छान आहे. प्रकाशचित्रे सगळीच मस्त. मला धबधब्याच सर्वात जास्त आवडलं :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

प्रियाली 08/07/2008 - 15:10
प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे धन्यवाद. हरीण पाणी प्यायला वाकले होते म्हणून क्यामेराची कळ दाबली तोपर्यंत त्याने पोझ देणे नाकारले. धबधब्याचा फोटो, धबधब्याखाली उतरून काढल्याने बरा आला पण त्या फोटोच्या आम्हीही दिसतोय हे आजच लक्षात आले. :)

सुवर्णमयी 08/07/2008 - 17:01
प्रियाली, लेख आणि फोटो आवडले. बेयन (माझ्या मुलाच्या भाषेत, र चा पत्ता नाहीये अजून) फार धमाल आहेत. मुले एकदम खूष झालीत. काल बराच वेळ हेच फोटो बघणे सुरु होते.मी स्मोकी ला पाहिलेले फॉल कलर्स गेल्या दहा वर्षातले सर्वोत्तम आहेत.तेव्हा गॅटलिनबर्ग ला धावती भेट दिली होती. तो सर्व परिसर अतिशय मोहक आहे. त्या सर्व आठवणी लेख वाचून ताज्या झाल्यात. सोनाली

लेख आणि फोटू छान आहेत प्रियाली.... स्मोकीला यायला पाहिजे एकदा. आम्हा बाराकरांना (बाग राज्यकरांना) अवतीभवती माणसंच माणसं (त्यातही देसीच देसी !!) बघायची सवय ;) -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------

सर्किट 09/07/2008 - 00:27
छायाचित्रे आवडली. नेहमीचीच क्खुसखुशीत शैली वाचून बरे वाटले. - सर्किट

टारझन 09/07/2008 - 01:38
असे अफाट निसर्ग सौंदर्य चित्रासकट आणि तेवढ्याच प्रभावी शब्दात मांडलेत... धन्यवाद प्रियाली.... अफ्रिकाही अशीच अफाट आहे.. सुंदर आहे... पण अजून जायचा योग नाही आला. पुन्हा त्यात आम्ही पडलो पुणेकर (सेंट न सेंट वाचवणारे) म्हणजे सफारीला जाताणा १० वेळा विचार... फोटोज ने फार प्रभाव पडला .. अतिऊत्तम.. तुमच्या पूढच्या सूट्टीची आणि भटकंतीच्या अनूभव वाचण्याची वाट बघतोय... चेंगट ) कु ख.
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
लेखनविषय:
लेखनप्रकार
..

आयुष्यावर प्रेम करावे--

पुष्कराज ·

मिसळपाव 07/07/2008 - 05:41
सुंदर काव्य आहे. फक्त शेवटून दुसरी ओळ (...मातीत शेवटी जाणे आहे.....) जरा खटकली. म्हणजे अर्थ चपखल आहे पण शब्द थोडे खटकताहेत. "मातीशी तर अखेर नाते" जमेल का? पुष्कराज, मला कल्पना आहे की ही अगदि रावसाहेबांच्या "पी यल्, 'गच्ची'त 'ची' येत नाही काSSय शेवटी"? छाप सूचना आहे!!

शितल 07/07/2008 - 05:58
छान कविता कधी वाटते सोडून जावे अवतीभवतीचे हे सारे कुठुन कशाची ओढ लागते पुन्हा गुंततो इथे कसा रे हे तर मस्तच.

विसोबा खेचर 07/07/2008 - 08:49
तरीही येथे गुंतुन जावे आयुष्यावर प्रेम करावे मातीत शेवटी जाणे आहे कुठे तरी पण नाव उरावे कविता चांगली आहे. पुलेशु... तात्या.

यशोधरा 07/07/2008 - 08:58
कधी वाटते सोडून जावे अवतीभवतीचे हे सारे कुठुन कशाची ओढ लागते पुन्हा गुंततो इथे कसा रे हे खूप आवडले

मिसळपाव 07/07/2008 - 05:41
सुंदर काव्य आहे. फक्त शेवटून दुसरी ओळ (...मातीत शेवटी जाणे आहे.....) जरा खटकली. म्हणजे अर्थ चपखल आहे पण शब्द थोडे खटकताहेत. "मातीशी तर अखेर नाते" जमेल का? पुष्कराज, मला कल्पना आहे की ही अगदि रावसाहेबांच्या "पी यल्, 'गच्ची'त 'ची' येत नाही काSSय शेवटी"? छाप सूचना आहे!!

शितल 07/07/2008 - 05:58
छान कविता कधी वाटते सोडून जावे अवतीभवतीचे हे सारे कुठुन कशाची ओढ लागते पुन्हा गुंततो इथे कसा रे हे तर मस्तच.

विसोबा खेचर 07/07/2008 - 08:49
तरीही येथे गुंतुन जावे आयुष्यावर प्रेम करावे मातीत शेवटी जाणे आहे कुठे तरी पण नाव उरावे कविता चांगली आहे. पुलेशु... तात्या.

यशोधरा 07/07/2008 - 08:58
कधी वाटते सोडून जावे अवतीभवतीचे हे सारे कुठुन कशाची ओढ लागते पुन्हा गुंततो इथे कसा रे हे खूप आवडले
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कधी वाटते सोडून जावे अवतीभवतीचे हे सारे कुठुन कशाची ओढ लागते पुन्हा गुंततो इथे कसा रे कधी वाटते का जाउ मी सोडून माझे सखे सोबती अशाच वेळी श्वास कोंडतो विझुनी जाते जीवन ज्योती येणे जाणे आणि थांबणे आपुल्या हाती नाहीच काही तोच मांडतो खेळ पसारा तोच नकळता आवरून घेई तरीही येथे गुंतुन जावे आयुष्यावर प्रेम करावे मातीत शेवटी जाणे आहे कुठे तरी पण नाव उरावे

अशी गुमसुम आवडतेस मला

धनंजय ·

मनिष 06/07/2008 - 09:33
धनंजय........सुरेखच जमलाय! इंग्लिश अनुवादापेक्षा तुझ मराठी अनुवाद फारच सकस.
गुमसुम अशी आवडतेस मला, ... जणू नसतेसच इथे दूर, दुखरी, जणू काही ... मरण पावलीस असे दिसते
'जणू मरण पावलीस' अशा प्रतिमा मराठी काव्यात सहसा आढळत नाही.

मुक्तसुनीत 06/07/2008 - 09:48
धनंजय यांनी काही लिहीले असले की आवर्जून वाचणे होतेच. बहुदा ते वाचणे म्हणजे वेळ सार्थकी लागणे असते. या कवितेच्या बाबतीत काही नेहमीची जादू घडली नाही. मी इंग्रजी कविता वाचली. तिचाच मला स्पर्श झाला नाही. त्यामुळे मराठी अनुवादात मन रमले नाही याबद्दल मला आश्चर्य वाटले नाही... इट्स् अ हिट् ऑर अ मिस्. यावेळच्या कवितेशी सूर जुळले नाहीत; तरी आगामी कवितांची वाट पाहीनच.

In reply to by धनंजय

चित्रा 07/07/2008 - 18:11
खूपच तरल कविता. सर्व ओळी चित्रदर्शी वाटल्या. प्रत्येकाच्या मनात ही कविता वाचून उभे राहणारे चित्र वेगळेच असणार यात काही आश्चर्य नाही. पण सहज मनात आले म्हणून पिकासोच्या काही चित्रांचा शोध घेतला असता या कवितेजवळ जाणारे एक चित्र सापडल्यासारखे वाटले.. http://picasso.tamu.edu/picasso/ImgViewer?imageURL=./graphics/1903/opp03-047.jpg कवितावाचनही आवडले. दोन्ही कविता आणि अनुवाद ऐकल्यानंतर अनुवादात मूळ स्पॅनिशचा तोल सांभाळण्याची खूपच काळजी घेतली असल्याचे जाणवते.

In reply to by चित्रा

नंदन 07/07/2008 - 18:58
चित्रदर्शी ओळी, पिकासोचे चित्र, कवितावाचनात सांभाळलेली मूळ स्पॅनिशची लय -- याबाबत चित्रा यांच्याशी सहमत. मात्र 'वळ्यासारख्या सुगम अशा' ह्या उपमेचा अर्थ नीटसा समजला नाही.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

धनंजय 08/07/2008 - 02:15
"ब्ल्यू मूड" मध्ये, पण तरीही शांत, अशी वाटते आहे पिकासोच्या चित्रामधील मुलगी. धन्यवाद, चित्रा! "वळ्यासारखी सुगम" इथे "वळ्यासारखी साधी" असे भाषांतर करावे की नाही हा प्रश्न मला पडला होता. इतर दागिन्यांसारखे वळे नक्षीदार गुंतागुंतीचे नाही, साधे आहे. म्हणावे तर त्याचा आकार मनात भरण्यास सुगम आहे. तशी "तू"ची नि:शब्दता गुंतागुंतीची नाही. समजण्यास सुगम आहे. त्या वेळी वाटले की "साधी" शब्दात "मामूली"ची झाक येत होती. पण आता वाटते "वळ्यासारखी साधी" अशीच शब्दांची निवड करायला हवी होती. शिवाय "सुगम" मध्ये लय सांभाळता येत होती आणि त्यामुळे कदाचित तोच शब्द अर्थपूर्ण आहे, असे मी स्वतःला पटवून घेतले असावे.

In reply to by धनंजय

विकास 08/07/2008 - 02:56
सुंदर काव्ये (स्पॅनिश आणि मराठी). वर दोन्ही भाषेत ऐकताना एकदम "द ग्रेट गँबलर" मधील "दो लफ्जों की है एक कहानी" या अजून एका सुंदर गाण्याची आठवण झाली!

विसोबा खेचर 06/07/2008 - 17:41
कविता सुंदर आहे.. रात्रीसारखी शांत आहेस, ... नक्षत्रांनी भरगच्च नि:शब्द जणू चांदण्याही - ... दूरही तशा, सहजही तशा. या ओळी सर्वाधिक आवडल्या. तात्या.

मनिष 06/07/2008 - 09:33
धनंजय........सुरेखच जमलाय! इंग्लिश अनुवादापेक्षा तुझ मराठी अनुवाद फारच सकस.
गुमसुम अशी आवडतेस मला, ... जणू नसतेसच इथे दूर, दुखरी, जणू काही ... मरण पावलीस असे दिसते
'जणू मरण पावलीस' अशा प्रतिमा मराठी काव्यात सहसा आढळत नाही.

मुक्तसुनीत 06/07/2008 - 09:48
धनंजय यांनी काही लिहीले असले की आवर्जून वाचणे होतेच. बहुदा ते वाचणे म्हणजे वेळ सार्थकी लागणे असते. या कवितेच्या बाबतीत काही नेहमीची जादू घडली नाही. मी इंग्रजी कविता वाचली. तिचाच मला स्पर्श झाला नाही. त्यामुळे मराठी अनुवादात मन रमले नाही याबद्दल मला आश्चर्य वाटले नाही... इट्स् अ हिट् ऑर अ मिस्. यावेळच्या कवितेशी सूर जुळले नाहीत; तरी आगामी कवितांची वाट पाहीनच.

In reply to by धनंजय

चित्रा 07/07/2008 - 18:11
खूपच तरल कविता. सर्व ओळी चित्रदर्शी वाटल्या. प्रत्येकाच्या मनात ही कविता वाचून उभे राहणारे चित्र वेगळेच असणार यात काही आश्चर्य नाही. पण सहज मनात आले म्हणून पिकासोच्या काही चित्रांचा शोध घेतला असता या कवितेजवळ जाणारे एक चित्र सापडल्यासारखे वाटले.. http://picasso.tamu.edu/picasso/ImgViewer?imageURL=./graphics/1903/opp03-047.jpg कवितावाचनही आवडले. दोन्ही कविता आणि अनुवाद ऐकल्यानंतर अनुवादात मूळ स्पॅनिशचा तोल सांभाळण्याची खूपच काळजी घेतली असल्याचे जाणवते.

In reply to by चित्रा

नंदन 07/07/2008 - 18:58
चित्रदर्शी ओळी, पिकासोचे चित्र, कवितावाचनात सांभाळलेली मूळ स्पॅनिशची लय -- याबाबत चित्रा यांच्याशी सहमत. मात्र 'वळ्यासारख्या सुगम अशा' ह्या उपमेचा अर्थ नीटसा समजला नाही.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

धनंजय 08/07/2008 - 02:15
"ब्ल्यू मूड" मध्ये, पण तरीही शांत, अशी वाटते आहे पिकासोच्या चित्रामधील मुलगी. धन्यवाद, चित्रा! "वळ्यासारखी सुगम" इथे "वळ्यासारखी साधी" असे भाषांतर करावे की नाही हा प्रश्न मला पडला होता. इतर दागिन्यांसारखे वळे नक्षीदार गुंतागुंतीचे नाही, साधे आहे. म्हणावे तर त्याचा आकार मनात भरण्यास सुगम आहे. तशी "तू"ची नि:शब्दता गुंतागुंतीची नाही. समजण्यास सुगम आहे. त्या वेळी वाटले की "साधी" शब्दात "मामूली"ची झाक येत होती. पण आता वाटते "वळ्यासारखी साधी" अशीच शब्दांची निवड करायला हवी होती. शिवाय "सुगम" मध्ये लय सांभाळता येत होती आणि त्यामुळे कदाचित तोच शब्द अर्थपूर्ण आहे, असे मी स्वतःला पटवून घेतले असावे.

In reply to by धनंजय

विकास 08/07/2008 - 02:56
सुंदर काव्ये (स्पॅनिश आणि मराठी). वर दोन्ही भाषेत ऐकताना एकदम "द ग्रेट गँबलर" मधील "दो लफ्जों की है एक कहानी" या अजून एका सुंदर गाण्याची आठवण झाली!

विसोबा खेचर 06/07/2008 - 17:41
कविता सुंदर आहे.. रात्रीसारखी शांत आहेस, ... नक्षत्रांनी भरगच्च नि:शब्द जणू चांदण्याही - ... दूरही तशा, सहजही तशा. या ओळी सर्वाधिक आवडल्या. तात्या.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
अशी गुमसुम आवडतेस मला *** अशी गुमसुम आवडतेस मला, ... जणू नसतेसच इथे खूप दुरून ऐकतेयस - माझा ... आवाज तुला नाही शिवत. वाटते तुझी दृष्टी तुला ... सोडून गेलीये दूर उडून एक चुंबन जणू तुझे ... ओठ असावे घट्ट शिवत. * सगळ्याच गोष्टी आहेत जशा ... माझ्या आत्म्याने भरलेल्या माझ्या आत्म्याने भरलेली ...

सबनीसांचा वसंता

श्रीकृष्ण सामंत ·

वसंता सबनिस ह्या व्यक्तीमत्त्वाची आयुष्याशी दिलेली चिवट झुंज वाखाणण्याजोगी आहे. कथानक २ भागात विस्तारून अधिक तपशीलवार केले असते तर वसंता सबनिस नांवाच्या आयुष्याचे विविध, सप्तरंगी कंगोरे वाचकांच्या समोर आले असते. (तसे ते येणे गरजेचे वाटते आहे). लौकिक दृष्ट्या 'सामान्य' माणसाच्या आयुष्यातील 'असामान्य' धडपड हिच इतरांच्या 'उमेदवारी' कार्यकालातील प्रेरणा स्रोत ठरते. अशा धडपडीकडे 'डोळस' दृष्टीकोनाने पाहिल्यास कित्येक चिरकाल तत्वे नजरेस पडतात.असो. ऐन तारुण्यात शिकार करणाऱ्या आयाळलेल्या सिंव्हाला, पाहिलेल्या मला, आता आयाळ विरहीत, आणि दात पडलेल्या सिंव्हाला, पाहायला कसंसंच वाटतं. हे जरी खरं असलं तरीही, त्या वृद्ध सिंहाला आपल्या भेटीतून जुन्या स्मृतींना उजाळा मिळून, आपले ऐन तारुण्यातील काही क्षण पुन्हा जगल्याचा आनंद मिळतो. हाच आनंद त्यांच्या सद्य पोकळ परिस्थितीत उमेद जागृत ठेवण्यास आधारभूत असतो. त्यांची भेट जरूर घ्या. त्यांचे आयुष्य २-५ वर्षांनी नक्कीच वाढेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकरपंतजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. खरं म्हणजे वसंत सबनीस त्याच्या ऐन उमेदीच्या पर्वा मधे माझ्या संपर्कात आला.त्यामुळे त्या पुर्वीचा त्याचा काळ हा मला फक्त त्याच्या तोंडून मिळालेल्या माहितीवर अगदी स्वल्प असा होता.आणि तो उतारवयात जाण्यापुर्वीच मी सात समुद्र पार करून त्याच्या पासून दूर आलो.आणि ह्या काळातलं त्याचं आयुष्य फक्त ऐकीवातलंच आहे.त्यामुळे आपल्या योग्य सुचनेची स्टेप घेऊ शकलो नाही.तरीपण माझ्या स्मरणशक्तिला थोडा ताण देऊन आपली सुचना विचारात घेण्याचा प्रयत्न करीन.आपल्या प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद. दुसरं "वृद्ध सिव्हा" बद्दलचं आपलं म्हणणं वाचून आपल्या विचाराने आता मी पण थोडा सद्गदीत झालो.नव्हे तर क्षणभर तसं मी कदाचीत लिहायला नको होतं असं ही वाटलं.पण खरं सांगायचं तर माझ्या स्वतःच्याच एव्हडा परतीचा प्रवास करण्याच्या असमर्थतेचे इंडायरेक्ट समर्थन करून समाधान होण्यासाठी लिहिलं असावं असं मला प्रांजाळपणे वाटतं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

चित्रा 06/07/2008 - 19:48
लेखन आवडले. शेवट त्रोटक वाटला, पण त्याचे कारणही कळले.

माफ करा, सामंतजी, आमचा थोडा गोंधळ झाला. आम्हाला शीर्षक वाचून हे सबनीस म्हणजे मराठीतले विनोदी नट/लेखक (विच्छा माझी पुरी करा चे लेखक) वसंत सबनीस वाटले. त्यांच्या आयुष्याशी थोडाफार परिचित असल्याने मग तुमच्या व्यक्तिचित्रातले सगळेच सूर मनात वेगळे लागत गेले. पण ते सबनीस ते हेच का? नसावेत! नांवासारखी नांवं असतात म्हणा! त्यातून वसंत आणि सबनीस ही दोन्ही नांवं अगदी कॉमन आहेत कोकणात... गोंधळलेला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

आपला गोंधळ करायला मीच कारणीभूत आहे.त्या बद्दल क्षमस्व. खरं सांगू का ते सबनीस पण मझ्या चांगले परिचयाचे आहेत्.पण ते माझ्याहूनही वयाने आणि कर्तुत्वाने मोठे आहेत्.हा आमचा मित्र एक सामान्य माणूस पण तो "माणूस" होता ह्यामुळेच त्याची आठवण काढून मी त्याच्या बद्दल लिहायला उद्युक्त झालो एव्हडेच www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

प्रियाली 06/07/2008 - 23:14
ग्रँटरोड, निवास सोडल्यावर सर्व कुडाळदेशकरांनी गोरेगावात मुक्काम ठोकला हे खरेच. लेख आवडला पण थोडा लहान वाटला. अधिक विस्तृत आवडला असता. मधू सामंत कोण? मधुकर सामंत तर नव्हेत?
चार मुद भात,दोन वाटया माशाची आमटी, दोन तळलेली माशाची कापं,दोन चपात्या, आणि लाल भडक कोकमाचं सार
हे वाचून आजीची (वडलांची आई) आठवण येते. ती अस्सल कुडाळी कोकणी. बाकी, आमच्या मातोश्रींकडील वसईचे लोक माशाचे काप आणि कोकमाचं सार कधी म्हणणार नाहीत.

In reply to by प्रियाली

आपल्या मनात आहेत तेच असावेत्.मधूकर सामंत काही लोकांचे मास्तर गुरूजी ज्यांची संगीत क्लासेस आहेत तेच का आपल्या मनात आहेत? तेच माझे भाऊजी माझ्या बहिणीचे यजमान्.विरेंद्र सामंतचे वडिल. वसईचे लोक मुंबईच्या संपर्कात असल्याने जरा जास्त माहिती असलेले कुडाळदेशकर. आजीची आठवण कुणाला येणार नाही? www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

प्रियाली 06/07/2008 - 23:30
नावाच्या ३-४ जणांना मी ओळखते :) त्यापैकी संगीत क्लासेस चालवणारे सामंतसरही ओळखीचे आहे. त्यांच्याकडे काही काळ मी पेटी शिकले होते. नंतर अभ्यासामुळे सोडून दिले.

In reply to by प्रियाली

दुसरे मधूकर सामंत माझे चुलत भाऊ ज्यानी "बॉम्बेचे " "मुंबई "असे कोर्टात जावून शिवसेनेची मदत घेवून बदलून घेतले ते.ते पण गोरेगावात राहतात. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

प्रियाली 06/07/2008 - 23:42
आमच्याच बिल्डींगमध्ये राहात. त्यांना सर्व एम. एल. सामंत (मधुकर लक्ष्मण सामंत) म्हणून ओळखत. काही वर्षांपूर्वी वारले. मी अगदी बॉम्बेचे मुंबईबद्दल लिहिणारच होते पण संगीत शिकवणार्‍या सामंत गुरूजींचा उल्लेख झाल्याने मी ते टाळले.

In reply to by प्रियाली

प्रियाली, खरंच काय हा योगायोग.माझ्या सख्या चुलत भावाचं निर्वतणं काही वर्षापूर्वी झालं हे मला आज कळावं.मी त्यांच्यावर यापूर्वीच "बॉम्बेचे मुंबई"आणि माझा भाऊ मधूकर सामंत असा लेख माझ्या "कृष्ण उवाच" ह्या ब्लॉगवर लिहिला होता.आणि मी त्याला शुभ चिंतलं होतं. आपणाकडून कळल्या बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 07/07/2008 - 09:03
पैकी संगीत क्लासेस चालवणारे सामंतसरही ओळखीचे आहे. त्यांच्याकडे काही काळ मी पेटी शिकले होते पण पुढे सोडून दिल्यामुळे भारतीय संगीत प्रियालीच्या तावडीतून बचावलं म्हणायचं! नायतर काय खैर नव्हती! :) आपला, (कुडाळ देशकरी सारस्वत प्रियालीचा मित्र) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 07/07/2008 - 14:40
पण पुढे सोडून दिल्यामुळे भारतीय संगीत प्रियालीच्या तावडीतून बचावलं म्हणायचं! नायतर काय खैर नव्हती!
अगदी अगदी! भारतीय संगितावर माझे किती थोर उपकार आहेत याची जाणीव आजच झाली. ;)

वसंता सबनिस ह्या व्यक्तीमत्त्वाची आयुष्याशी दिलेली चिवट झुंज वाखाणण्याजोगी आहे. कथानक २ भागात विस्तारून अधिक तपशीलवार केले असते तर वसंता सबनिस नांवाच्या आयुष्याचे विविध, सप्तरंगी कंगोरे वाचकांच्या समोर आले असते. (तसे ते येणे गरजेचे वाटते आहे). लौकिक दृष्ट्या 'सामान्य' माणसाच्या आयुष्यातील 'असामान्य' धडपड हिच इतरांच्या 'उमेदवारी' कार्यकालातील प्रेरणा स्रोत ठरते. अशा धडपडीकडे 'डोळस' दृष्टीकोनाने पाहिल्यास कित्येक चिरकाल तत्वे नजरेस पडतात.असो. ऐन तारुण्यात शिकार करणाऱ्या आयाळलेल्या सिंव्हाला, पाहिलेल्या मला, आता आयाळ विरहीत, आणि दात पडलेल्या सिंव्हाला, पाहायला कसंसंच वाटतं. हे जरी खरं असलं तरीही, त्या वृद्ध सिंहाला आपल्या भेटीतून जुन्या स्मृतींना उजाळा मिळून, आपले ऐन तारुण्यातील काही क्षण पुन्हा जगल्याचा आनंद मिळतो. हाच आनंद त्यांच्या सद्य पोकळ परिस्थितीत उमेद जागृत ठेवण्यास आधारभूत असतो. त्यांची भेट जरूर घ्या. त्यांचे आयुष्य २-५ वर्षांनी नक्कीच वाढेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकरपंतजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. खरं म्हणजे वसंत सबनीस त्याच्या ऐन उमेदीच्या पर्वा मधे माझ्या संपर्कात आला.त्यामुळे त्या पुर्वीचा त्याचा काळ हा मला फक्त त्याच्या तोंडून मिळालेल्या माहितीवर अगदी स्वल्प असा होता.आणि तो उतारवयात जाण्यापुर्वीच मी सात समुद्र पार करून त्याच्या पासून दूर आलो.आणि ह्या काळातलं त्याचं आयुष्य फक्त ऐकीवातलंच आहे.त्यामुळे आपल्या योग्य सुचनेची स्टेप घेऊ शकलो नाही.तरीपण माझ्या स्मरणशक्तिला थोडा ताण देऊन आपली सुचना विचारात घेण्याचा प्रयत्न करीन.आपल्या प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद. दुसरं "वृद्ध सिव्हा" बद्दलचं आपलं म्हणणं वाचून आपल्या विचाराने आता मी पण थोडा सद्गदीत झालो.नव्हे तर क्षणभर तसं मी कदाचीत लिहायला नको होतं असं ही वाटलं.पण खरं सांगायचं तर माझ्या स्वतःच्याच एव्हडा परतीचा प्रवास करण्याच्या असमर्थतेचे इंडायरेक्ट समर्थन करून समाधान होण्यासाठी लिहिलं असावं असं मला प्रांजाळपणे वाटतं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

चित्रा 06/07/2008 - 19:48
लेखन आवडले. शेवट त्रोटक वाटला, पण त्याचे कारणही कळले.

माफ करा, सामंतजी, आमचा थोडा गोंधळ झाला. आम्हाला शीर्षक वाचून हे सबनीस म्हणजे मराठीतले विनोदी नट/लेखक (विच्छा माझी पुरी करा चे लेखक) वसंत सबनीस वाटले. त्यांच्या आयुष्याशी थोडाफार परिचित असल्याने मग तुमच्या व्यक्तिचित्रातले सगळेच सूर मनात वेगळे लागत गेले. पण ते सबनीस ते हेच का? नसावेत! नांवासारखी नांवं असतात म्हणा! त्यातून वसंत आणि सबनीस ही दोन्ही नांवं अगदी कॉमन आहेत कोकणात... गोंधळलेला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

आपला गोंधळ करायला मीच कारणीभूत आहे.त्या बद्दल क्षमस्व. खरं सांगू का ते सबनीस पण मझ्या चांगले परिचयाचे आहेत्.पण ते माझ्याहूनही वयाने आणि कर्तुत्वाने मोठे आहेत्.हा आमचा मित्र एक सामान्य माणूस पण तो "माणूस" होता ह्यामुळेच त्याची आठवण काढून मी त्याच्या बद्दल लिहायला उद्युक्त झालो एव्हडेच www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

प्रियाली 06/07/2008 - 23:14
ग्रँटरोड, निवास सोडल्यावर सर्व कुडाळदेशकरांनी गोरेगावात मुक्काम ठोकला हे खरेच. लेख आवडला पण थोडा लहान वाटला. अधिक विस्तृत आवडला असता. मधू सामंत कोण? मधुकर सामंत तर नव्हेत?
चार मुद भात,दोन वाटया माशाची आमटी, दोन तळलेली माशाची कापं,दोन चपात्या, आणि लाल भडक कोकमाचं सार
हे वाचून आजीची (वडलांची आई) आठवण येते. ती अस्सल कुडाळी कोकणी. बाकी, आमच्या मातोश्रींकडील वसईचे लोक माशाचे काप आणि कोकमाचं सार कधी म्हणणार नाहीत.

In reply to by प्रियाली

आपल्या मनात आहेत तेच असावेत्.मधूकर सामंत काही लोकांचे मास्तर गुरूजी ज्यांची संगीत क्लासेस आहेत तेच का आपल्या मनात आहेत? तेच माझे भाऊजी माझ्या बहिणीचे यजमान्.विरेंद्र सामंतचे वडिल. वसईचे लोक मुंबईच्या संपर्कात असल्याने जरा जास्त माहिती असलेले कुडाळदेशकर. आजीची आठवण कुणाला येणार नाही? www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

प्रियाली 06/07/2008 - 23:30
नावाच्या ३-४ जणांना मी ओळखते :) त्यापैकी संगीत क्लासेस चालवणारे सामंतसरही ओळखीचे आहे. त्यांच्याकडे काही काळ मी पेटी शिकले होते. नंतर अभ्यासामुळे सोडून दिले.

In reply to by प्रियाली

दुसरे मधूकर सामंत माझे चुलत भाऊ ज्यानी "बॉम्बेचे " "मुंबई "असे कोर्टात जावून शिवसेनेची मदत घेवून बदलून घेतले ते.ते पण गोरेगावात राहतात. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

प्रियाली 06/07/2008 - 23:42
आमच्याच बिल्डींगमध्ये राहात. त्यांना सर्व एम. एल. सामंत (मधुकर लक्ष्मण सामंत) म्हणून ओळखत. काही वर्षांपूर्वी वारले. मी अगदी बॉम्बेचे मुंबईबद्दल लिहिणारच होते पण संगीत शिकवणार्‍या सामंत गुरूजींचा उल्लेख झाल्याने मी ते टाळले.

In reply to by प्रियाली

प्रियाली, खरंच काय हा योगायोग.माझ्या सख्या चुलत भावाचं निर्वतणं काही वर्षापूर्वी झालं हे मला आज कळावं.मी त्यांच्यावर यापूर्वीच "बॉम्बेचे मुंबई"आणि माझा भाऊ मधूकर सामंत असा लेख माझ्या "कृष्ण उवाच" ह्या ब्लॉगवर लिहिला होता.आणि मी त्याला शुभ चिंतलं होतं. आपणाकडून कळल्या बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 07/07/2008 - 09:03
पैकी संगीत क्लासेस चालवणारे सामंतसरही ओळखीचे आहे. त्यांच्याकडे काही काळ मी पेटी शिकले होते पण पुढे सोडून दिल्यामुळे भारतीय संगीत प्रियालीच्या तावडीतून बचावलं म्हणायचं! नायतर काय खैर नव्हती! :) आपला, (कुडाळ देशकरी सारस्वत प्रियालीचा मित्र) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 07/07/2008 - 14:40
पण पुढे सोडून दिल्यामुळे भारतीय संगीत प्रियालीच्या तावडीतून बचावलं म्हणायचं! नायतर काय खैर नव्हती!
अगदी अगदी! भारतीय संगितावर माझे किती थोर उपकार आहेत याची जाणीव आजच झाली. ;)
लेखनविषय:
लेखनप्रकार
आम्ही त्याला वसंता कधीच म्हटलं नाही.त्याला आम्ही सबनीस म्हणूनच ओळखत होतो.त्यालापण सबनीस म्हणून हांक ऐकण्याची संवय झाली होती. हा सबनीस मडुऱ्याचा.हे एक सावंतवाडी तालुक्यातलं लहानसं खेडं. दहा पांच घरं सबनीसांची होती.लहानपणी जवळच्या मराठी शाळेत शिकून झाल्यावर, सबनीस सावंतवाडीला ईग्रजी शिकायला आपल्या एका नातेवाईकाच्या घरी राहात होता.त्याचे वडील, त्याच्या खर्चाचे पैसे नियमीत पाठवीत असत सबनीसाचं शिक्षणात जास्त मन रमलं नाही.जेमतेम मॅट्रीक झाल्यावर, तो वडीलांची परवानगी घेऊन मुंबईला गेला.

मिसळपाव आता पोलिसांच्या ताब्यात! :)

विसोबा खेचर ·

मैत्र 05/07/2008 - 18:51
नीलकांत चं अभिनंदन... तुमच्या प्रयत्नांचं चीज झालं... पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा!

आजानुकर्ण 05/07/2008 - 18:51
प्रिय नीलकांत, तुझ्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आपला (शुभचिंतक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

केशवसुमार 06/07/2008 - 06:59
निलकांतशेठ, हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आपला (शुभचिंतक) केशवसुमार स्वगतः शेठ पोलिसात भरती झाले समजले की सगळे चोर B) कसे ओळख ठेवा म्हणायला लागले ... :O :W

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर 06/07/2008 - 08:08
स्वगतः शेठ पोलिसात भरती झाले समजले की सगळे चोर कसे ओळख ठेवा म्हणायला लागले ... हे स्वगत बाकी लै भारी! :)

संजीव नाईक 05/07/2008 - 19:07
सो. नीलकांत हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी विसोबा खेचर यांना तुझा सारखे एक खेचर दे बाबा! नाही तर तात्याश्रीची मि.पा वर खैर नाही. संजीव

In reply to by संजीव नाईक

विसोबा खेचर 05/07/2008 - 23:25
आणि पुढील वाटचालीसाठी विसोबा खेचर यांना तुझा सारखे एक खेचर दे बाबा नाही तर तात्याश्रीची मि.पा वर खैर नाही. संजीव, कुणाला खेचर म्हणतो आहेस? नीलकांताला? काय म्हणून अन् कुठल्या अधिकाराने?? ही काय फालतूगिरी आहे? माझी खैर आहे की नाही याची फिकीर तू का करतोस? आणि काय रे? स्वत:ला काय खूप शहाणा समजतोस? माझा उल्लेख केल्याशिवाय एकही प्रतिसाद तुला लिहिता येत नाही?? प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रतिसदात माझी काहीतरी भंकस केल्याशिवाय चैन पडत नाही तुला?? तात्या.

एकलव्य 05/07/2008 - 19:12
वा! वा!! वा!!! नीलकांतरावांचे मनापासून अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा!

In reply to by यशोधरा

प्राजु 07/07/2008 - 01:06
निलकांत, अरे आजच आले की रे इकडे अमेरिकेला... नाहीतर एक जोरदार पार्टी घेतली असती तुझ्याकडून. असो.... पुढच्यावेळी आले ना की नक्की करू मस्त पार्टी. जोरदार अभिनंदन तुझं... आणि हो.. माझी ही तेवढी ओळख ठेव बरं का! ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अभिज्ञ 05/07/2008 - 19:30
नीलकांतजी, मनःपुर्वक अभिनंदन. आपल्यासारख्या तज्ञ लोकांची खरोखरच तिथे गरज आहे. आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. अभिज्ञ.

हेरंब 05/07/2008 - 19:37
अभिनंदन, तात्यांनी सुचवलेल्या सचोटीच्या मार्गावरुन चालाल ही शुभेच्छा!!

विकास 05/07/2008 - 19:51
नमस्कार नीलकांत, मनःपूर्वक अभिनंदन ! आपल्याला उदंड यश तर महाराष्ट्राला आणि भारताला एक सच्चा पोलीस अधिकारी लाभोत अशी मनापासून सदीच्छा! तात्या: ही चांगली बातमी आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभार!

आमच्या ही शुभेच्छा. शिर्षक वाचुन थोडीशी भिती वाट्ली होती, पण शेवटी चांगली बातमी मिळाली. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

ऋषिकेश 05/07/2008 - 20:24
वा! बातमी वाचून बरं वाटलं. नीलकांतराव, पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा! तात्या, छान बातमी दिलीत. आभार! -('मिसळ'लेला शुभेच्छुक) ऋषिकेश

झकासराव 05/07/2008 - 20:34
नीलकांत अभिनंदन अभिनंदन अभिनंदन! चला म्हणजे विश्वास नांगरे पाटिल यांच्या मागोमाग तुमचही नाव गाजेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

रामराम नील्कांतराव! आनी आम्च्याकडून पन "कांग्रेस्-लोशन"!! गरिबाची वळख ठेवा हां सायेब! येकदम "तडीपारी" लावू नगा आमाला!!!:) बा़की एक कॉम्प्युटरतज्ञ पोलिसात जाणार ही पोलीसखात्याच्या दृष्टीने स्वागतार्ह घटना आहे!! आमच्या शुभेच्छा!! -डांबिसकाका

अविनाश ओगले 05/07/2008 - 21:09
नीलकांतजी, खूप मनापासून अभिनंदन... खाकी आणि खादी ही दोन बदनाम खाती. तुमच्यासारख्या उच्चशिक्षित, सुसंस्कृत मंडळींमुळे त्यांची प्रतिमा उजळो या शुभेच्छा.

मा. पोलिस उपनिरिक्षक साहेब, नीलकांतजी.........आपले मनपुर्वक अभिनंदन !!! यशाची बातमी कळवल्याबद्दल तात्यासाहेबांचे आभार !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिन॑दन नीलका॑त! पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा! (एकेकाळी पोलिस अधिकारी होण्याची स्वप्ने पाहिलेला) प्रसाद

भाग्यश्री 05/07/2008 - 23:22
शिर्षक पाहून आत काय असेल याचा अंदाज येईना.. पण फारच छान बातमी कळली!! अभिनंदन नीलकांत!! तात्यांची प्रार्थना तुम्ही जरूर मनापासून पूरी कराल याची खात्री.. :) http://bhagyashreee.blogspot.com/

कोलबेर 05/07/2008 - 23:48
निलकांतरावांसारखे प्रगल्भ विचारसरणीचे लोक शासकीय सेवेत जात आहेत हे पाहून खूप आनंद झाला. पोलिस खात्यात अधिकाधीक असे लोक येवोत. अभिनंदन !!

In reply to by कोलबेर

छोटा डॉन 06/07/2008 - 14:30
असेच म्हणतो ... खुप चांगली गोष्ट आहे की असे हुशार लोक शासकीय सेवेत जात आहेत. जनतेला नक्की फायदा होईल .... *** निलकांतचे हार्दीक अभिनंदन *** छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चतुरंग 06/07/2008 - 00:08
'मिपा'सारखी साईट तयार करणार्‍या संगणकतज्ञाकडून पोलीसखात्याला नवीन 'फोरसाइट' मिळेल अशी आशा आहे!:) पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा!! चतुरंग

विकि 06/07/2008 - 00:17
सर्वप्रथम तुझे अभिनंदन आणि तुला पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा ! आपला कॉ.विकि

धनंजय 06/07/2008 - 01:34
एक विचारी आणि कर्तबगार अधिकारी महाराष्ट्र पोलिसांना लाभतो आहे.

ओहो... खूप छान खबर.. फार आनंद झाला... अभिनंदन नीलकांत ... आणि पुढील कारकीर्दीस शुभेच्छा.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनिष 06/07/2008 - 09:24
यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !! :) तुझ्यातील विचारी, समंजस आणि सहिष्णू माणसाला पोलिसात जप. - मनिष

प्रगती 06/07/2008 - 11:11
आपल्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दीक शुभेच्छा! लहानपणापासून माझं पण पी. एस. आय. व्हायचं स्वप्न होतं पण मी जेव्हा परीक्षा दिली तेव्हाच पेपरफुटीचा गोंधळ होउन तीन ते चार वर्ष हे प्रकरण रखडलं होतं म्हणून नाइलाजाने मी हा नाद सोडून दिला. :( असो मात्र आमची पण ओळख ठेवा. ;;)

II राजे II 06/07/2008 - 11:48
निलकांतशेठ, हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा !!!!!!!!!!! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

नीलकांत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन, नाशिकच्या पोलिस प्रशिक्षणसंस्थेत रूजू होत असल्याचे वर्तमान समजताच खूप आनंद झाला. हार्दिक अभिनंदन. नीलकांतांसारख्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आद्य क्रियायोगी गाडगे महाराज यांच्या शिकवणूकीवर दृढ विश्वास असणार्‍या उद्यमी, महाजाल विद्वानास महाराष्ट्राच्या शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळणे हा मी समस्त प्रामाणिक मराठी नागरिकांचा सन्मान समजतो. नीलकांतजी, आपली संस्कृती आणि परंपरांचा ध्वज तुम्ही कायम फडकता ठेवाल ह्यात मुळीच संशय नाही. मात्र त्यादरम्यान तुम्हाला कधीही आवश्यकता भासली तर आम्ही सारेच पाठीशी आहोत असा विश्वास बाळगा. आमच्याही अपेक्षांना मूर्त स्वरूप देण्याची उमेद बाळगा. उद्याचा महाराष्ट्र सशक्त घडवा. तुम्हाला पुन्हा एकदा मन:पूर्वक शुभेच्छा!

नीलकांत .. हार्दिक अभिनंदन ! ' सद रक्षणाय....' ह्या पोलिसांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे तुमच्या प्रामाणिक वाटचालीस अनेक शुभेच्छा ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------

रिमझिम 07/07/2008 - 10:38
नीलकांतचे मनःपूर्वक अभिनंदन! ! आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !! :)

मनस्वी 07/07/2008 - 10:41
नीलकांत, एम्. पी. एस्. सी. उत्तीर्ण झाल्याबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी आणि प्रशिक्षणासाठी शुभेच्छा. :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

सागर 07/07/2008 - 15:10
नीलकांत, तुमचे मनापासून अभिनंदन ... आमची वळख ठेवा राव.... पुढेमागे कशी भेट होईल काय सांगता येत नाय... (कर्तव्यदक्ष पोलिसांचा चाहता...) सागर

वरदा 07/07/2008 - 18:27
मस्तच बातमी नीलकांत, मनःपूर्वक अभिनंदन ! आपल्याला उदंड यश तर महाराष्ट्राला आणि भारताला एक सच्चा पोलीस अधिकारी लाभोत अशी मनापासून सदीच्छा! तात्या: ही चांगली बातमी आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभार! हेच म्हणते... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

सर्वसाक्षी 08/07/2008 - 00:16
सुयशाबद्दल नीलकांतचे आणि असे व्यक्तिमत्व 'खात्याला' लाभल्याबद्दल पोलिसखात्याचेही अभिनंदन. देव करो आणि सरकारला अशा पात्र उमेदवारास संगणकिय गुन्हेगारी हे कार्यक्षेत्र देण्याची सुबुद्धि मिळो.

लिखाळ 10/07/2008 - 15:58
नीलकांत, फार उत्तम ! आपले हार्दीक अभिनंदन ! पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा ! --लिखाळ.

चावटमेला 10/07/2008 - 16:09
फौजदार साहेबांचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा ! http://chilmibaba.blogspot.com

अवलिया 10/07/2008 - 16:16
नीलकांत, फार उत्तम ! आपले हार्दीक अभिनंदन ! पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा ! नाना

प्रिय नीलकांत, मनःपूर्वक अभिनंदन. आणि पुढील वाटचालीस (डीवायएसपी, आयएएस वगैरे) हार्दिक शुभेच्छा! नाशिकला गेल्यावर तिथल्या संस्थेचेही चांगलेसे संकेतस्थळ बनवून टाक.

कलंत्री 11/07/2008 - 19:00
तात्याचे शीर्षक वाचून घाबरत घाबरतच लेख उघडला, पण धक्का बसलाच पण गोड धक्का होता इतकेच. नीलकांत आता आपली जबाबदारी वाढली हेही खरे. मराठी मध्ये बर्‍याच ठिकाणी पाट्या नसतात हे आपल्या अखत्यारीत येत असेल तर बारीक लक्ष ठेवा. बाकी शीर्षक असे हवे होते,"पोलिसखाते मिसलपावाच्या हातात." परत एकदा नीलकांत आपले अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा.

५० फक्त 06/01/2011 - 21:49
निलकांत, अतिशय अभिनंदन, पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. माझे भावजी नाशिकच्याच पोलिस ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीचे पास आउट आहेत. काही मदत लागली तर त्यांना विचारेन. हर्षद.

ग्रेट !! मूळ धागा तब्बल दोन वर्षापूर्वीचा असल्याने व मी २०१० च्या मध्यास इथला सदस्य झालो असल्याने [त्यातही श्री.नीलकांत यांच्याकडे ज्या आठवड्यात श्री.तात्यांनी मिपाची सूत्रे दिल्याचे जाहीर केले, त्याच आठवड्यात...] नीलच्या प्रत्यक्षातील करीअरविषयी काहीच माहिती नव्हते. पुढे त्यांच्यासमवेत ज्या ज्या वेळी इथे खरडीतून वा अन्यत्र प्रतिसादातून विचाराची देवाणघेवाण झाली त्यावेळीही माझी समजूत अशी झाली की ते आय.टी. क्षेत्राशी निगडीत आहेत. पण आज अचानक या धाग्याचे पुनर्रज्जीवन झाल्याने श्री.नीलकांत हे पोलिस दलात आपले कर्तृत्व दाखवित आहे. आनंद झाला. या क्षेत्रात तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !! इन्द्रा

मैत्र 05/07/2008 - 18:51
नीलकांत चं अभिनंदन... तुमच्या प्रयत्नांचं चीज झालं... पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा!

आजानुकर्ण 05/07/2008 - 18:51
प्रिय नीलकांत, तुझ्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आपला (शुभचिंतक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

केशवसुमार 06/07/2008 - 06:59
निलकांतशेठ, हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आपला (शुभचिंतक) केशवसुमार स्वगतः शेठ पोलिसात भरती झाले समजले की सगळे चोर B) कसे ओळख ठेवा म्हणायला लागले ... :O :W

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर 06/07/2008 - 08:08
स्वगतः शेठ पोलिसात भरती झाले समजले की सगळे चोर कसे ओळख ठेवा म्हणायला लागले ... हे स्वगत बाकी लै भारी! :)

संजीव नाईक 05/07/2008 - 19:07
सो. नीलकांत हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी विसोबा खेचर यांना तुझा सारखे एक खेचर दे बाबा! नाही तर तात्याश्रीची मि.पा वर खैर नाही. संजीव

In reply to by संजीव नाईक

विसोबा खेचर 05/07/2008 - 23:25
आणि पुढील वाटचालीसाठी विसोबा खेचर यांना तुझा सारखे एक खेचर दे बाबा नाही तर तात्याश्रीची मि.पा वर खैर नाही. संजीव, कुणाला खेचर म्हणतो आहेस? नीलकांताला? काय म्हणून अन् कुठल्या अधिकाराने?? ही काय फालतूगिरी आहे? माझी खैर आहे की नाही याची फिकीर तू का करतोस? आणि काय रे? स्वत:ला काय खूप शहाणा समजतोस? माझा उल्लेख केल्याशिवाय एकही प्रतिसाद तुला लिहिता येत नाही?? प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रतिसदात माझी काहीतरी भंकस केल्याशिवाय चैन पडत नाही तुला?? तात्या.

एकलव्य 05/07/2008 - 19:12
वा! वा!! वा!!! नीलकांतरावांचे मनापासून अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा!

In reply to by यशोधरा

प्राजु 07/07/2008 - 01:06
निलकांत, अरे आजच आले की रे इकडे अमेरिकेला... नाहीतर एक जोरदार पार्टी घेतली असती तुझ्याकडून. असो.... पुढच्यावेळी आले ना की नक्की करू मस्त पार्टी. जोरदार अभिनंदन तुझं... आणि हो.. माझी ही तेवढी ओळख ठेव बरं का! ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अभिज्ञ 05/07/2008 - 19:30
नीलकांतजी, मनःपुर्वक अभिनंदन. आपल्यासारख्या तज्ञ लोकांची खरोखरच तिथे गरज आहे. आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. अभिज्ञ.

हेरंब 05/07/2008 - 19:37
अभिनंदन, तात्यांनी सुचवलेल्या सचोटीच्या मार्गावरुन चालाल ही शुभेच्छा!!

विकास 05/07/2008 - 19:51
नमस्कार नीलकांत, मनःपूर्वक अभिनंदन ! आपल्याला उदंड यश तर महाराष्ट्राला आणि भारताला एक सच्चा पोलीस अधिकारी लाभोत अशी मनापासून सदीच्छा! तात्या: ही चांगली बातमी आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभार!

आमच्या ही शुभेच्छा. शिर्षक वाचुन थोडीशी भिती वाट्ली होती, पण शेवटी चांगली बातमी मिळाली. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

ऋषिकेश 05/07/2008 - 20:24
वा! बातमी वाचून बरं वाटलं. नीलकांतराव, पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा! तात्या, छान बातमी दिलीत. आभार! -('मिसळ'लेला शुभेच्छुक) ऋषिकेश

झकासराव 05/07/2008 - 20:34
नीलकांत अभिनंदन अभिनंदन अभिनंदन! चला म्हणजे विश्वास नांगरे पाटिल यांच्या मागोमाग तुमचही नाव गाजेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

रामराम नील्कांतराव! आनी आम्च्याकडून पन "कांग्रेस्-लोशन"!! गरिबाची वळख ठेवा हां सायेब! येकदम "तडीपारी" लावू नगा आमाला!!!:) बा़की एक कॉम्प्युटरतज्ञ पोलिसात जाणार ही पोलीसखात्याच्या दृष्टीने स्वागतार्ह घटना आहे!! आमच्या शुभेच्छा!! -डांबिसकाका

अविनाश ओगले 05/07/2008 - 21:09
नीलकांतजी, खूप मनापासून अभिनंदन... खाकी आणि खादी ही दोन बदनाम खाती. तुमच्यासारख्या उच्चशिक्षित, सुसंस्कृत मंडळींमुळे त्यांची प्रतिमा उजळो या शुभेच्छा.

मा. पोलिस उपनिरिक्षक साहेब, नीलकांतजी.........आपले मनपुर्वक अभिनंदन !!! यशाची बातमी कळवल्याबद्दल तात्यासाहेबांचे आभार !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिन॑दन नीलका॑त! पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा! (एकेकाळी पोलिस अधिकारी होण्याची स्वप्ने पाहिलेला) प्रसाद

भाग्यश्री 05/07/2008 - 23:22
शिर्षक पाहून आत काय असेल याचा अंदाज येईना.. पण फारच छान बातमी कळली!! अभिनंदन नीलकांत!! तात्यांची प्रार्थना तुम्ही जरूर मनापासून पूरी कराल याची खात्री.. :) http://bhagyashreee.blogspot.com/

कोलबेर 05/07/2008 - 23:48
निलकांतरावांसारखे प्रगल्भ विचारसरणीचे लोक शासकीय सेवेत जात आहेत हे पाहून खूप आनंद झाला. पोलिस खात्यात अधिकाधीक असे लोक येवोत. अभिनंदन !!

In reply to by कोलबेर

छोटा डॉन 06/07/2008 - 14:30
असेच म्हणतो ... खुप चांगली गोष्ट आहे की असे हुशार लोक शासकीय सेवेत जात आहेत. जनतेला नक्की फायदा होईल .... *** निलकांतचे हार्दीक अभिनंदन *** छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चतुरंग 06/07/2008 - 00:08
'मिपा'सारखी साईट तयार करणार्‍या संगणकतज्ञाकडून पोलीसखात्याला नवीन 'फोरसाइट' मिळेल अशी आशा आहे!:) पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा!! चतुरंग

विकि 06/07/2008 - 00:17
सर्वप्रथम तुझे अभिनंदन आणि तुला पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा ! आपला कॉ.विकि

धनंजय 06/07/2008 - 01:34
एक विचारी आणि कर्तबगार अधिकारी महाराष्ट्र पोलिसांना लाभतो आहे.

ओहो... खूप छान खबर.. फार आनंद झाला... अभिनंदन नीलकांत ... आणि पुढील कारकीर्दीस शुभेच्छा.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनिष 06/07/2008 - 09:24
यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !! :) तुझ्यातील विचारी, समंजस आणि सहिष्णू माणसाला पोलिसात जप. - मनिष

प्रगती 06/07/2008 - 11:11
आपल्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दीक शुभेच्छा! लहानपणापासून माझं पण पी. एस. आय. व्हायचं स्वप्न होतं पण मी जेव्हा परीक्षा दिली तेव्हाच पेपरफुटीचा गोंधळ होउन तीन ते चार वर्ष हे प्रकरण रखडलं होतं म्हणून नाइलाजाने मी हा नाद सोडून दिला. :( असो मात्र आमची पण ओळख ठेवा. ;;)

II राजे II 06/07/2008 - 11:48
निलकांतशेठ, हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा !!!!!!!!!!! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

नीलकांत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन, नाशिकच्या पोलिस प्रशिक्षणसंस्थेत रूजू होत असल्याचे वर्तमान समजताच खूप आनंद झाला. हार्दिक अभिनंदन. नीलकांतांसारख्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आद्य क्रियायोगी गाडगे महाराज यांच्या शिकवणूकीवर दृढ विश्वास असणार्‍या उद्यमी, महाजाल विद्वानास महाराष्ट्राच्या शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळणे हा मी समस्त प्रामाणिक मराठी नागरिकांचा सन्मान समजतो. नीलकांतजी, आपली संस्कृती आणि परंपरांचा ध्वज तुम्ही कायम फडकता ठेवाल ह्यात मुळीच संशय नाही. मात्र त्यादरम्यान तुम्हाला कधीही आवश्यकता भासली तर आम्ही सारेच पाठीशी आहोत असा विश्वास बाळगा. आमच्याही अपेक्षांना मूर्त स्वरूप देण्याची उमेद बाळगा. उद्याचा महाराष्ट्र सशक्त घडवा. तुम्हाला पुन्हा एकदा मन:पूर्वक शुभेच्छा!

नीलकांत .. हार्दिक अभिनंदन ! ' सद रक्षणाय....' ह्या पोलिसांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे तुमच्या प्रामाणिक वाटचालीस अनेक शुभेच्छा ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------

रिमझिम 07/07/2008 - 10:38
नीलकांतचे मनःपूर्वक अभिनंदन! ! आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !! :)

मनस्वी 07/07/2008 - 10:41
नीलकांत, एम्. पी. एस्. सी. उत्तीर्ण झाल्याबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी आणि प्रशिक्षणासाठी शुभेच्छा. :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

सागर 07/07/2008 - 15:10
नीलकांत, तुमचे मनापासून अभिनंदन ... आमची वळख ठेवा राव.... पुढेमागे कशी भेट होईल काय सांगता येत नाय... (कर्तव्यदक्ष पोलिसांचा चाहता...) सागर

वरदा 07/07/2008 - 18:27
मस्तच बातमी नीलकांत, मनःपूर्वक अभिनंदन ! आपल्याला उदंड यश तर महाराष्ट्राला आणि भारताला एक सच्चा पोलीस अधिकारी लाभोत अशी मनापासून सदीच्छा! तात्या: ही चांगली बातमी आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभार! हेच म्हणते... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

सर्वसाक्षी 08/07/2008 - 00:16
सुयशाबद्दल नीलकांतचे आणि असे व्यक्तिमत्व 'खात्याला' लाभल्याबद्दल पोलिसखात्याचेही अभिनंदन. देव करो आणि सरकारला अशा पात्र उमेदवारास संगणकिय गुन्हेगारी हे कार्यक्षेत्र देण्याची सुबुद्धि मिळो.

लिखाळ 10/07/2008 - 15:58
नीलकांत, फार उत्तम ! आपले हार्दीक अभिनंदन ! पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा ! --लिखाळ.

चावटमेला 10/07/2008 - 16:09
फौजदार साहेबांचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा ! http://chilmibaba.blogspot.com

अवलिया 10/07/2008 - 16:16
नीलकांत, फार उत्तम ! आपले हार्दीक अभिनंदन ! पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा ! नाना

प्रिय नीलकांत, मनःपूर्वक अभिनंदन. आणि पुढील वाटचालीस (डीवायएसपी, आयएएस वगैरे) हार्दिक शुभेच्छा! नाशिकला गेल्यावर तिथल्या संस्थेचेही चांगलेसे संकेतस्थळ बनवून टाक.

कलंत्री 11/07/2008 - 19:00
तात्याचे शीर्षक वाचून घाबरत घाबरतच लेख उघडला, पण धक्का बसलाच पण गोड धक्का होता इतकेच. नीलकांत आता आपली जबाबदारी वाढली हेही खरे. मराठी मध्ये बर्‍याच ठिकाणी पाट्या नसतात हे आपल्या अखत्यारीत येत असेल तर बारीक लक्ष ठेवा. बाकी शीर्षक असे हवे होते,"पोलिसखाते मिसलपावाच्या हातात." परत एकदा नीलकांत आपले अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा.

५० फक्त 06/01/2011 - 21:49
निलकांत, अतिशय अभिनंदन, पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. माझे भावजी नाशिकच्याच पोलिस ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीचे पास आउट आहेत. काही मदत लागली तर त्यांना विचारेन. हर्षद.

ग्रेट !! मूळ धागा तब्बल दोन वर्षापूर्वीचा असल्याने व मी २०१० च्या मध्यास इथला सदस्य झालो असल्याने [त्यातही श्री.नीलकांत यांच्याकडे ज्या आठवड्यात श्री.तात्यांनी मिपाची सूत्रे दिल्याचे जाहीर केले, त्याच आठवड्यात...] नीलच्या प्रत्यक्षातील करीअरविषयी काहीच माहिती नव्हते. पुढे त्यांच्यासमवेत ज्या ज्या वेळी इथे खरडीतून वा अन्यत्र प्रतिसादातून विचाराची देवाणघेवाण झाली त्यावेळीही माझी समजूत अशी झाली की ते आय.टी. क्षेत्राशी निगडीत आहेत. पण आज अचानक या धाग्याचे पुनर्रज्जीवन झाल्याने श्री.नीलकांत हे पोलिस दलात आपले कर्तृत्व दाखवित आहे. आनंद झाला. या क्षेत्रात तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !! इन्द्रा
लेखनविषय:
राम राम मंडळी, आता येथे जरा जपून लेखन करा बरं! कारंण आपलं मिसळपाव आता महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात गेलं आहे! :) अतिशय कष्टाने व जीव लावून मिसळपाव हे संकेतस्थळ उभारणारे मिसळपावचे तांत्रिक सल्लागार नीलकांतराव हे एम पी एस सी ची परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची पोलिस उप-निरिक्षक (PSI) या पदाकरता निवड झाली आहे.