Skip to main content

स्वप्नविश्वाचा विरह...

लेखक वेदश्री यांनी मंगळवार, 08/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कधी सकाळचा गजर वाजून सांगतो की, "उठा, आवरा, ऑफीसला जा... " आणि आपले मात्र ढिम्म हलायचे मन नसते. इत्तके मस्त स्वप्न पडत असते की ते सोडून ऑफीसला जायचे म्हणजे कैच्याकैच असे वाटावे. ऑफिसमध्ये फोन करून सुट्टी घ्यावी आणि असेच अनादीअनंत काळासाठी आपण आपल्या स्वप्नात रममाण व्हावे अशी अनावर इच्छा होते. फोन करायलाही स्वप्नातून बाहेर पडवत नाही. स्वप्नात मन रमवावे वाटत असतानाही का कोण जाणे मनाचे अर्धेअधिक लक्ष मात्र त्या मेल्या पुढेपुढे सरकणाऱ्या काट्यासोबत टिकटिक करत फिरत राहते. जी दोलायमानता शेवटी असह्य होऊन तिरीमिरीत उठून आवरून ऑफिसला जावेच लागते.

धमु चे लग्न..एक शहिद दिवस..

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 08/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी आज एजून एक योध्दा धारातिर्थी पडला शहिद झाला ( आमच्यात आला) कस काय झाले आपल्या धमुचे लग्न? कोण कोण मिपाकर जमले होते? लग्ना आधीचा मिसळ कट्टा कसा झाला? धमु आणि धमी ने कुठले उखाणे घेतले? आणि इथे फोटो कोण देणार ?**** वृतांत कोण लिहिणार?**** बाकी बरेच प्रश्न आहेत ते धमुला नंतर विचारेन ;)

गर्दी

लेखक छोट्या यांनी मंगळवार, 08/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
एक रस्ता , आणि माणसं. खुप माणसं, कळपासारखी. एवढ़ी माणसं असुनही रस्त्यावर फारसा गोंधळ नाही. आपापले सामान घेउन जो तो चालतोय ... फक्त चालतोय. रस्त्याला थोडा उतार आहे , रस्ताही रुंद, मग चालणंही सोप्प झालयं. गर्दीलाही उत्साह आलाय, उतारबघुन. काहीजण जात्याच मजबुत आहेत, मग त्यांचा वेग अजुन वाढतो ... त्यांच्या नकळत. त्यांना समजत नाही की बाकीचे का हळू चालतायेत. स्वतःशीच हसत चालत रहातात, दुसर्यावर. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सापाच्या आकाराचे चर... नागमोडी पण समांतर. चर मोठे गूढ़.

प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं? दिपक पासे

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 08/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
बरिस्तात जाऊन Coffie प्यायची की CCD तला थंड चहा प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं कोणी सांगेल का मला? कधी Mc'd चा बर्गर खा नाहीतर मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन एखादा पिक्चर पाहा प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं कोणी सांगेल का मला? तिला घेऊन खडकवासला की कार काढून लोणावळा प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं कोणी सांगेल का मला? दररोज फोन calls आणि SMS करावे लागतील तिला? प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं कोणी सांगेल का मला? प्रेम हा विषयच आमचा कच्चा ह्याचा कोचिंग क्लास असेल कुठे तर पाहा प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं कोणी सांगेल का मला? अहो, ह्या कसल्या प्रेमात पडायच्या ना ना तऱ्हा प्रे

चाहूल

लेखक मनीषा यांनी मंगळवार, 08/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे हसू आरशात आज आहे चांदण्याची, बरसात आज आहे | मिटले कसे कमलदल अलगद बंदिवान त्यात, भ्रमर आज आहे | घुमती आसमंती नाद पैंजणांचे सूर-लयीत हरवले, जग आज आहे | उमटती हळूवार तरंग जळावरी विश्व हे रजनीच्या, अधीन आज आहे | सळसळती पाने, रान सारे जागे सर्वांगी भिनलेला, गंध आज आहे | नयनी उमटे लाली, मन धुंदावलेले स्वप्नांची मज, चाहूल आज आहे |

पहिली शेर, दुसरी सव्वाशेर, नवरा पावशेर.

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 08/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
झाला बुवा एकदाचा तो बहुप्रतीक्षित घटस्फोट! किती ग वाट बघायची त्यासाठी? किती वेळा देव पाण्यात ठेवायचे? (त्यांना सर्दी-पडसंच नव्हे, आताशा न्युमोनिया पण व्हायला लागला होता...) त्याच्या `बाहेरख्याली'पणाबद्दल तिनं जाहीर संशय घ्यायला सुरवात केलीच होती. परदेशी माणसांबरोबरचं लफडंही चव्याट्यावर आण्लं होतं. तरी त्याला काही शुद्ध नव्हती. त्याचं वेगळंच गणित सुरू होतं. त्याला घरचं अन्न गोड लागेनासं झालं होतं. बायकोने भरवलेलं आधी जे अम्रुत लागायचं, ते आता कडू जहर लागायला लागलं होतं. तुला घटस्फोट घ्यायचा तर घे, मी `बाहेरख्याली'पणा सोडणार नाही, असंच त्याला सुचवायचं होतं.

रोठ

लेखक वैशाली हसमनीस यांनी मंगळवार, 08/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
:SS साहित्य--एक वाटी बारीक रवा,बारीक चिरलेला कांदा,मिरची व कोथिंबीर,एक वाटी आंबट ताक,मीठ,पाव टी स्पून खायचा सोडा(पूड),एक चमचा तेल,निर्लेपचे भांडे कॄती---रवा घेऊन त्यात ताक व थोडे पाणी घालून फेटावे, नंतर कांदा,मिरची व कोथिंबीर घालावी.अर्धा तास मिश्रण तसेच ठेवावे.भांड्याला थोडे तेल सर्व बाजूने लावून घ्यावें. नंतर मिश्रणात सोडा घालून ते एकवार फेटून लगेच भांड्यात ओतावे.ओव्हनमध्ये किंवा गॅसवर १० ते १५ मि.ठेवावे.मिश्रण फुगून येइल.ताटात ते घेऊन वड्या पाडाव्यात.कोणत्याही पातळ चटणीबरोबर खावे. झटपट नाश्ता तयार!

मरण मला पाहून हंसले

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 08/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मागे वळून मी पाहिले माझेच मरण मला पाहून हंसले हंसण्याचे काय कारण पुसता म्हणाले ते आलीच वेळ नेण्याची, न विसरता असते मी सदैव सर्वांच्या मागे सावली होऊन पहाते कोण कसा वागे झडप घालते पाहून तो गाफील जो न समजे जीवन असे मुष्कील खातो मी सदैव हेल्थी फूड ठेवीतो माझे मी आनंदी मूड घेतो मी नियमीत व्यायाम का मी नये राहू इथे कायम जनन मरण असे निसर्गाचा नियम घेशी तू काळजी तुझ्या जीवनाची वाढवीशी मर्यादा तुझ्या आयुष्याची जन्मणे हे जरी असे आजचे वृत्त मरणे हे तरी असे उद्याचे सत्य श्रीकृष्ण सामंत

पौराणिक कथांवरील नवीन मालिकांविषयी थोडंसं...

लेखक देवदत्त यांनी मंगळवार, 08/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांची पौराणिक कथांवर मालिका दाखविण्याची स्पर्धा सुरू आहे असे दिसते. साईबाबा, वैष्णोदेवी, हनुमान, रामायण ह्या मालिका (आणि इतर भरपूर) सुरू आहेत. पुर्वी ह्या सर्व मालिकांची वेळ रविवार सकाळ असायची. त्याला पहिले कारण म्हणजे रविवारी सर्वांना सुट्टी असते आणि सकाळपासून लोक टीव्ही बघत असतात. तसेच दुसरे कारण म्हणजे आधी दाखविलेल्या रामायण, महाभारत, श्रीकृष्ण ह्या मालिकांचे यश असेल. असो, सध्या तरी त्या मालिका इतरवेळीही पुन्हा दाखविणे चालू होते. मग एन डी टी व्ही इमॅजिन ने नवीन ’रामायण’ आणले. निर्माते जुन्या रामायणचेच. सागर आर्ट्स. त्यामुळे लोकांच्या थोडाफार अपेक्षा असतीलच.