Skip to main content

स्वप्न

लेखक धोंडोपंत यांनी गुरुवार, 03/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
भेटण्याची काय पण ही रीत आहे? टाळुनी म्हणतेस वरती प्रीत आहे गांजलेल्या माणसांच्या स्वागताला झोपडी माझी उभ्या वस्तीत आहे राहिल्या आता न चिंता कोणत्याही मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे आठवण गेली तुझी देऊन झोका मी पुन्हा आता गडे मस्तीत आहे ये भविष्याचे पुन्हा चल स्वप्न पाहू कालचा इतिहास त्या रद्दीत आहे ----धोंडोपंत आपटे
Taxonomy upgrade extras

(छंदात छंद तो प्रवासछंद --)

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 03/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
(छंदात छंद तो प्रवासछंद, फिरण्या मन हे उल्हासिते ! ) चालः राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी ! -------------------------------------------------- छंदात छंद तो प्रवासछंद, फिरण्या मन हे उल्हासिते ! घेऊन बॅग, विसरुनी काम, ही वर्षा सहल सजते ! त्या सहलीच्या या आठवणींची गुंजी सतत राही ! आम्ही हो प्रवासी, सृष्टिचे आम्ही हो प्रवासी !! पावसाचा हा शिडकावा सकाळी लवकर निघताना ! ओल्या चिंब कपडयानी गाडीमध्ये बसताना !! हा दरवळणारा गंध मैत्रिचा मस्ती भरपुर होई !
Taxonomy upgrade extras

मिपावर लिहीणं धोक्याचं!

लेखक पिवळा डांबिस यांनी गुरुवार, 03/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
("सोळावं वरीस धोक्याचं" या लावणीवरून स्फूर्ती घेऊन,) मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं || कथा-लेख मी कसा लिहू? प्रवासवर्णन कसा करू? जागोजागी उभे "समीक्षक", निशाण बांधून मोक्याचं | मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं || ओढ लागली खरडीची धम्या-डॉन्याच्या गंमतीची इनोबाही इथे नाचतो, बँडेज सावरत गुढघ्याचं | मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं || तात्याची खादाडी खरी वरदा टाईम-पास करी नाना चेंगट गुह्य उकलती, "समभागां"च्या मटक्याचं | मिपावर लिहीणं धोक्याचं गं, मिपावर लिहीणं धोक्याचं || चतुरंगाची बुद्धिबळं विजुभाऊचं स्वप्न खुळं स्वातीबाई कट्लेट तळते,
Taxonomy upgrade extras

उद्वेग विसरून कसं चालेल?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 03/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात केव्हातरी मुखवटे चढवावे लागतात रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर भंगलेल्या तोंडाचेही मुके घ्यावे लागतात मी असा असतानाही मी तसा आहे ह्याचं नाटक करावं लागतं पण मग हे नाटकच आहे हे विसरून कसं चालेल? कसले कसले असले तसले झाले की मग असले तसले कसले कसले होतात आणि मग मी माझ्याच हिंमतीवर आलो आणि माझ्याच हिंमतीवर रहाणार असे म्हणताना ही हिंमत तात्पुर्ती आहे हे विसरून कसं चालेल? अंधार दूर करणारा प्रकाश पाहून कंदीलाचे आभार मानावे लागतात पण मग कंदील हातात धरून प्रकाश दाखवणाऱ्याला विसरून कसं चालेल? गेले ते गेले आणि राहीलेले पण जाणार असे म्हणताना आपण पण राहील्यातले आहो हे विसरून कसं चालेल? ज

पानी तेरा रंग कैसा?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 03/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"ज्ञान निर्मितीच्या क्रियेमधे जसं तू पहाशिल तसं तुला दिसत जातं.शास्त्रिय जगात एका पद्धतीत विचार करून मुलभूत शोध लागून ते शोध जवळ जवळ स्थापित झालेच आहेत असं समजून जाता जाता परत तेच शोध दुसऱ्या पद्धतीने विचार करून तेव्हड्याच हिरिरीने स्थापित करून दाखवले गेले आहेत. देवाचं अस्थित्व आहे आणि देवाचं अस्थित्व नाही हा पण त्यातलाच प्रकार असावा." मी आणि प्रो.देसाई तळ्यावर गप्पा मारत बसलो होतो.समोरून दोन उमदे तरूण येताना पाहिले.त्यात प्रो.देसायांचा नातू होता हे नक्की समजलं.पण दुसरी व्यक्ति कोण हे ते दोघे जवळ यई पर्यंत कळलं नाही.नंतर समजलं तो त्याचा मित्र होता. ह्या पुर्वी भाऊसाहेबांच्या नातवाने देवाचं अस

(...मी खरा की तू खरा?)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 03/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
प्रदीप कुलकर्णी ह्यांची '...मी खरा की तू खरा?' ही अप्रतिम गजल अनेक प्रश्न उभे करुन गेली आणि त्या प्रश्नांना वाचा फुटली ह्या काव्यातून! ........................................ ...मी खरा की तू खरा ? ........................................ बॉस मज माझा विचारी - मी खरा की तू खरा ? ही पुरे झाली 'हुशारी' - मी खरा की तू खरा ? मध्यरात्री काल मी जे काम त्याचे उपसले... आज तो म्हणतो दुपारी - मी खरा की तू खरा ? उत्तराची मेल नाही धाडता आली मला... प्रश्न आला तोच भारी - मी खरा की तू खरा ? शेवटी घोळात मी!

अध्यक्षपदाची फिल्डिंग!

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 03/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी साहित्य संमेलन सान फ्रान्सिस्कोमधे होणार की नाही, हे अजून नक्की होत नसल्यानं भल्याभल्या कवी-साहित्यिकांच्या डोळ्याला डोळा नाही. महामंडळाचे पदाधिकारी- म्हण्जे कौतिकराव- गेल्या काही दिवसांपास्नं सदस्यांची यादी खिशात घेऊनच फिरतायत. ५१ जणांची नावं फायनल करून निमंत्रणाचा कागद त्यांच्याकडे पोहोचेपर्यंत कौतिकराव कुणालाच भेटणार नाहीत, असं महामंडळाचे भालदार-चोपदार सांगत सुटल्यानं साहित्यिक वर्तुळात खळबळ उडालीय. एक बरे झालेय. आम्च्या रत्नांग्रीकरांनी हा विशय लावून धरला, हे आम्हाला एकदम आवडले. संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी मंडळी नकोत, असा मातब्बर साहित्यिकांचा जुना आग्रह होता.

"लाला! मी पास की नापास? "

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 02/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
लाला हा जन्माने मुसलमान होता असावा.बुटकीशी व्यक्ति,जेमतेम साडेचार फुट उंची,डोक्याला गुंडाळलेली पगडी (मुंडासे),खाली तोटके धोतर,वरती एक सदरा, रस्त्यातून चालताना मोकळे पाय,हातात आधाराला दांडका त्याची उंची थोडी त्याच्यापेक्षा जास्त,तोंड सतत पान खावून लाल दिसणारे,तिच तोंडातली लाल थुंकी दोन्ही बाजुच्या ओठाच्या फटीतून खाली ओघळणारी, मान सतत रस्त्याकडे खाली झुकलेली,चेहऱ्यावर दाढीचे खुंट,अशी ही व्यक्ति वेंगुर्ल्याच्या मेनरोड वरून सकाळी, मध्यांनी आणि तिन्हीसांजा झाल्यावर चालत जाताना हटकून दिसायची.वाटलंतर त्याला जाताना पाहून, दिवसाची घटका कळायला कठीण होत नसे. वेंगुर्ल्याचे लाल मातीचे त्यावेळचे रस्ते आणि

सांभाळा हो! मला कुणीतरी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 02/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी- आनंद बक्षी) पाहूनी तुझे नयन गुलाबी मन माझे झाले शराबी सांभाळा हो! मला कुणीतरी माझेच सांभाळणे मला झाले आता अशक्यपरी असते एकच जशी प्रतिमा भिंतीवरच्या तस्वीरी आहे तशी तुझी प्रतिमा सदैव माझ्या अंतरी का झालो तुझ्यावर फिदा कळेल का एकदा विचार करूनी कळे ना मला संताप येई माझ्याच प्रीतिवरी ऐकून माझ्या मना गेलो मी पस्तावूनी माझाच मी नाही आता काय करू मी साजणी जादू तुझ्या नयनातली पाहून झालो मी तिचा दुष्मन वाटे सदैव मला रहावे जपून अनेक सुंदरी पासून शपथ तुझी सांगतो तुला वाचवी स्वपनातुनही मला अरेरे! मिळाले नयनासी नयन जरासे हास्य तुझे पाहून तसाच झालो मी घायाळ श्रीकृष्ण सामंत

मंदी, महागाई, कर्ज आणि गुंतवणूक

लेखक मनिष यांनी बुधवार, 02/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
जरा टेन्शन देणार्‍या विषयावर जाणकार (तात्या, नाना आणि इतर) व्यक्तिंचा सल्ला घ्यावा असे वाटले म्हणून ही चर्चा. मंदी आणि महागाई हळुहळू पाय पसरत आहेत. अशा वेळेस काय करावे? घरांच्या कर्जाचे व्याजदर वाढतात आहे, त्यामुळे परतफेडीचा काळ वाढणार, तसेच इतर कर्जेही महाग होणार. असे दिसते आहे की ऑटो आणि आय टी इंडस्ट्री ची वाट लागणार - तसेच आय टी मधील बर्‍याच नोकर्‍या जातील (२०००-२००१ चे ले-ऑफ अनुभवलेत मी), परिणामी बरीच घरांची कर्जे बुडतील, त्यामुळे कदाचित जागांचे भावही खाली येतील. पण अशा परिस्थितीत काय करावे? कर्जे प्री-पेमेंट करून लवकर फेडावीत का? की व्याजदर ४-५ वर्षाने खाली येईल म्हणून वाट पहावी?