नमस्कार मंडळी, हि काही कथा नाही किंवा कुठल्या कथेचा भागही नाही.हा आहे संवाद... दोघांमधला...दोन मित्रांमधला, प्रियकर- प्रेयसी मधला... दोन माणसांमधला....! हे संवाद मी जसे सुचले तसे लिहिले आहेत. यातुन काही सांगायचे वगैरे नाही. त्या त्या क्षणी जे विचार मनात याय्चे ते कागदावर उतरवायचो. ते बरोबर असतीलही किंवा नसतीलही. या संवादातल्या पात्रांना नाव नाहीत, किंबहुना त्याची गरज भासत नाही इतके लहान संवाद आहेत हे. हे संवाद कुठलीही पार्श्वभुमी न देता अचानक सुरु होतात. एखादं गाणं जसं अंत-यापासुन सुरु व्हावं तसं. जसे सुरु होतात तसेच संपतातही
हा प्रकार जरा वेगळा असल्यामुळे मि.पा. वर टाकावा की नाही या विचारात होतो....पण म्हणलं जाउदे..फार फार तर काय होईल, आपलीच लोकं शिव्या घालतील ना, ठीक आहे, खाऊ शिव्या... शेवटी हे मनातलं आहे आणि मनातलं सगळं बरोबरंच असल सगळ्यांना पटलंच पाहीजे असं थोडी आहे.
-----------------------------------------------------------------------------------------
संवाद - १
"निसर्गात किती अफाट शक्ती आहे नाही?"
"हं...."
"आणि आपण माणसं तर निसर्गाला सुद्धा आपल्या मनासारखं राबवू शकतो."
"हं...."
दोघंही ब-याच वेळ शांतपणे समोर कोसळणा-या जलप्रपाताकडे बघत राहीले. समाधी लागल्यासारखे.
"ए, तुझ्यामते सर्वात सामर्थ्यवान कोण?" अचानक शांततेचा भंग करत त्याने विचारलं
"काळ"
"काळ...? का, माणुस का नाही?"
"माणुसच का?"
"कारण...कारण, माणुस काय वाट्टेल ते करु शकतो, माणसा कडे निर्मितीची अफाट क्षमता आहे. मनात आणलं तर तो ईकडची दुनिया तिकडे करु शकतो."
"असच जर असेल तर या चराचर श्रुष्टीची निर्मिती ज्या शक्तीमुळे झाली ती किती सामर्थ्यवान असेल"
"तुला देव म्हणायचंय का?"
"हो आणि नाही..दोन्हीही"
"म्हणजे?"
"म्हणजे तुला देव म्हणजे काय अभिप्रेत आहे ते आधी सांग"
"देव म्हणजे...देव...देवानेच तर सगळी दुनिया निर्माण केली ना. "
"हंहं..!"
"का? हसलास का?"
"ज्या देवाला तु कधी पाहीलं देखिल नाहीस त्याच्या बद्दल ईतका विश्वास?"
"मग काळ श्रेष्ठ कसा?"
"काळामध्ये अश्रु थांबवायचे विलक्षण सामर्थ्य आहे. काळ जसे सुख आणण्याचे काम करतो तसेच दु:खावर मलमपट्टीही करतो. काळ जसा निर्मितीला कारणीभुत असतो तसाच उन्नतीला आणि विद्ध्वंसालाही. ... प्रत्येक क्षणी, प्रत्येक घटनेत काळाचे अस्तित्त्व आहे. काळ श्रेष्ठ आहे, पण म्हणुन तो आपली महती कुठल्याच रुपाने सांगत नाही. मंदीरं नाहीत, पोथ्या नाहीत, पुराणं नाहीत, धर्मग्रंथ नाहीत. काळ तटस्थ आहे, अलिप्तं आहे. एखद्या निष्काम कर्मयोग्या सारखा तो काम करत राहतो... सतत ... अविरत ..... अखंड ....!!! "
समोरच्या जलप्रपाताचा आवाज आता त्या आसमंतात भरुन राहीला होता
वाचने
4434
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
काळामध्ये
आवडले....
छान
चाणक्य!!! खर
छान..
धन्यवाद
धन्यवाद
In reply to धन्यवाद by चाणक्य
विचारमंथन
हेच म्हणते..