मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साहित्य सहवास

बिपिन६८ ·

अनुप ढेरे 28/03/2014 - 13:27
छान लिहिलय. 'वपुं'च लेखन आणि कथाकथन खूप आवडतं. गप्पा माराव्या इतक्या सहजतेनं गोष्ट सांगतात.

शशिकांत ओक 28/03/2014 - 15:43
बिपीन, वपुंचे लेखन न वाचलेले मराठी भाषिक महाभाग फार कमी असतील. सहज सुंदर, आपापल्या अनुभव विश्वाशी जवळीक साधणारे. आपण काही उदाहरणे देऊन वपुंचे लेखन पुन्हा वाचायला प्रवृत्त केलेत. धन्यवाद

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 28/03/2014 - 16:30
तरी दवण्यांपेक्षा बरेच बरे. अंमळ मॅच्युअर. तत्त्वज्ञानाचा डोस असला तरी तो दरवेळेस उपदेशपरच असतो असे नाही, सबब त्यांचं लेखन रञ्जक वाटतं.

दिव्यश्री 28/03/2014 - 16:16
लहानपणी व.पु.यांच्या कथाकथनाच्या जुन्या केसेटस घरी होत्या . माझ्या दुर्दैवाने मला आठवत नाही आता कुठे असतील . त्यानंतर घरच बदलल . काही मिळालं , कुठे तर नक्की घेणार आहे , वाचणार आहे आणि ऐकणार आहे . :)

In reply to by यसवायजी

दिव्यश्री 28/03/2014 - 18:37
मना/णा पासून धन्यवाद . सरळ मणाणे घेणे . :) श्रीमंत अन दानशूर पण.;) हव्या असतील तर मेलू शकतो.>>> अरे व्वा. बर्याच चांगल्या क्वालीटीज आहेत . :) आणि अजून टिकूण आहेत म्हणायचं . ;) :D (ह. घ्या. किंव्हा ज .घ्या. युवर चोइस . :P )

In reply to by दिव्यश्री

@(ह. घ्या. किंव्हा ज .घ्या.युवर चोइस, :p )>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif चांगलेच खेळवता हो तुंम्ही!!! =)) . . . . . . . . . . . . . शब्दांना..शब्दांना ..म्हणतोय मी!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

In reply to by दिव्यश्री

यसवायजी 31/03/2014 - 11:42
ह. घ्या. किंव्हा ज .घ्या. युवर चोइस आता तुम्हाला म्या जड कसा काय घेणार?? आधीच "भारी" आहात तुम्ही (सब पे भारी हुं मय). पण काSSय होSSS?? खर्रच इतक्या भारी आहात का?? कस्सं होणार बाई.... आता तुम्ही हे ह.घ्या. किंवा तुमच्याच इष्टाईलमध्ये जड(भारी) घ्या. :P (वजनदार)

In reply to by यसवायजी

दिव्यश्री 31/03/2014 - 21:54
पण काSSय होSSS?? खर्रच इतक्या भारी आहात का??>>> आत्मस्तुती वायीट अस आमचे गुरु म्हण्तात . *beee* तसंही सोतावरूण दिवे वोवलण्याची सवयच णसल्याणे मौण . :D आता तुम्ही हे ह.घ्या. किंवा तुमच्याच इष्टाईलमध्ये जड(भारी) घ्या. Blum 3>>> आम्ही हंच घेत्तो . नेहमीच . जड(भारी) कंदी(पेडे नव्ह) घ्येयाच ते माहिती हाव(आहे) . ;) :)

In reply to by दिव्यश्री

बरखा 28/03/2014 - 18:02
आमच्या घरी सर्वाना एक सवय होती (सासरे- नवरा- दिर) रोज रात्रि झोपताना वपु,पुल यांचे कथाकथन ऐकत झोपायच. कथाकथनाच्या जुन्या केसेटस घरी होत्या आता माहीत नाही . पण संगणकावर आणी फिरत्या संग्रह साच्या (योग्य मराठी नाव माहित नाही)( (पेन ड्राईव्ह) मधे काही कथाकथनाचे भाग आहेत. अधुन मधुन बाहेर गेल्यावर गाडीत गाणी ऐकण्या ऐवजी ते ऐकायला खुप छान वाटत.

विकास 30/03/2014 - 02:43
लेखन - मुक्तक आवडले. मला वाटते वपुंना त्यांच्या कर्मचारी पुस्तकाने प्रसिद्धी दिली पण त्याआधीच ते टेकाडे भाउजींमुळे घरोघरी पोचले होते. बरीचशी (बहुतेक सगळीच) पुस्तके मी वाचली आहेत. त्यातले जसे भूलभुलैय्या हे वेगळेच होते पण आवडले. तसे "आपण सारे अर्जून" वाचायला घेतले पण त्यातला (दु:खद/डिप्रेस करणारा या अर्थाने) उदास भाव बघून ते तसेच ठेवून दिले ते एकदम आठवले...

उपास 30/03/2014 - 09:00
सहज जाता जाता तत्वज्ञान सांगून जायचं वपुनी आणि मग रवंथ करत आपण त्यावर विचार करायचा हे तेव्हा नेहमीचं झालं होतं त्यांच्या कथा वाचताना. अंमळ जास्त वेळ लागायचा त्यामुळे त्यांच्या कथा वाचताना, पण व्वा! सह्ही! असं म्हणत मान डोलावलीच जायची. आजूबाजूच्या साध्या साध्या प्रसंगांकडे डोळसपणे बघायची दृष्टी जशी पु.लं. नी दिली तशी त्या गोष्टींपलिकडली माणसं आणि खर्या जगातली माणसं उलगडायला वपु नी शिकवलं, अर्थात त्यांचं साहित्य योग्य वयात वाचल्याने तसं झालं असावं. पार्टनर, तुच माझी वहिदा, अमिताभ, हसरे दु:ख अशा कितीतरी गोष्टी त्यांच्या आवाजासहित डोक्यात फिट्ट बसल्या. 'दोत्त' सगळ्यात आवडती! 'आपण सारे अर्जुन' वाचून तर डोकं सुन्न झालं, नियती नावाची गोष्ट आहे जिचं आपण शप्प वाकडं करु शकत नाही हे पहिल्या प्रथम तिथं कळलं! अवचटांचं धागे उभे आडवे वाचताना असंच काहीसं झालं होतं तेव्हा वपुंचे संस्कार आठवले! अर्थात वपु मलाही अत्ता आवडतात का, तर उत्तर हो असेल पण तितकेच आवडतात का, तर उत्तर हो च असेल असं नाही. काळ पुढे सरकला, कक्षा रुंदावल्या, संदर्भ बदलले त्यामुळेही असेल पण भदे सदृश अतिशयोक्तिमधे मन रमत नाही आताशा.. पण तरीही वपुंचे संस्कार अजूनही रेल्वेत 'तुझ्यापेक्षा माझी हालत वाईट' म्हणत दुसर्‍याचे दु:ख हलके करणारा 'अनोळखी' माणूस दिसला की दाद देतातच! :) 'साहित्य सहवास' आवडलाचं ,त्यानिमित्त वपुंची आठवण काढल्याबद्दल धन्यवाद!

In reply to by उपास

सुबोध खरे 31/03/2014 - 13:46
वसंत पुरुषोत्तम काळे हा लेखक "हलकं फुलकं " या श्रेणीत नाहीच मुळी. त्यांनी जीवनाबद्दल इतकं स्वच्छ आणि स्पष्ट लिहिलं आहे कि ते सुरुवातीला बर्याच लोकांना झेपत नाही. पण ते आपल्याला विचार करण्यास भाग पाडतच. अफाट ताकतीचं लेखन आहे आणि कितीही वेळा वाचला तरी परत त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळते. माणसं वाचायला त्यांनीच शिकवलं. त्यांच्या लेखनाचा समग्र संच कुठे मिळेल काय? ( जसा व्यंकटेश माडगुळकरांच्या लेखनाचा संच मेहता यांच्या कडे मिळतो.) मला माझ्या संग्रही ठेवायचा आहे.

In reply to by उपास

सखी 31/03/2014 - 22:10
अर्थात वपु मलाही अत्ता आवडतात का, तर उत्तर हो असेल पण तितकेच आवडतात का, तर उत्तर हो च असेल असं नाही. काळ पुढे सरकला, कक्षा रुंदावल्या, संदर्भ बदलले त्यामुळेही असेल पण भदे सदृश अतिशयोक्तिमधे मन रमत नाही आताशा.. पण तरीही वपुंचे संस्कार अजूनही रेल्वेत 'तुझ्यापेक्षा माझी हालत वाईट' म्हणत दुसर्‍याचे दु:ख हलके करणारा 'अनोळखी' माणूस दिसला की दाद देतातच! -- अचुक निरीक्षण ब-याच जणांना लागु पडेल. मला त्यांची 'पप्पा' कथा जास्त आवडली पण त्यांचा स्वत:चा यात कमी रोल आहे, मुग्धा चिटणीसने तिच्या आवाजात फार कमाल केली आहे या कथाकथनात - तिसरी-चौथीत असताना घरी भावाने मित्राकडुन कॅसेट आणली होती, तेव्हा तिचा एकलेला आवाज मागील काही वर्षापर्यंत लक्षात होता आणि शेवटी ते ध्वनीमुद्रण सापडले.

चौकटराजा 31/03/2014 - 09:36
वपुं बरोबर प्रत्यक्ष बोलायचा योग आला व त्यांच्या सौ शी.फोनवरून.त्यांच्या कथेचा बाज काहीस वेगळा होता. त्यात ते स्वतः कथा सादर करीत असल्याने अधिक न्याय देउ शकत. काही वेळा ते कथन एकसुरीही वाटत असे. वपु आपल्या सारखेच सामान्या माणूस होते. राग लोभ, मनस्ताप, दु:ख, तृप्ती , यश , सन्मान, प्रेम सगंळं भलं बुरं त्यांच्याही वाट्याला आलं. मुळात माणूस दिलखुलास. अनेकाना त्यांची आलेली " रेखीव" पत्रे हा एक अमुल्य ठेवा वाटतो. जी ए कुलकर्णी, ह मो मराठे, मतकरी यांचा जसा एक बाज आहे तसाच वपुंचा ! यत रोचते तत्ग्राह्यम !

विजुभाऊ 31/03/2014 - 16:03
वपु हे सुंदर पेटी वाजवायचे. त्यांच्या कोणत्याच कथेत त्यांचा हा गुण दिसत नाही. अर्थात हे थोडेसे अवांतर. वपुनी जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद कसा घ्यायचा ते अगदी सहज सांगितले. त्यांच्या " घर हरवलेली माणसे " कथा संग्रह वाचताना आपण इगो नामक एका भयंकर व्हायरसशी कसे रोज झगडत असतो. हे अनुभवायला मिळते.

मनिष 31/03/2014 - 22:57
वपु खूप पुर्वी वाचले आणि तेंव्हा आवडायचे. आता आवडतील की नाही सांगता येत नाही. पण सध्या टेहळणीच्या सुरात वपुंविषयी बोलायची पध्दत आहे, तरी तुम्ही स्वच्छपणे वपु आवडतात असे लिहिले हे पाहून बरे वाटले. :-)

In reply to by मनिष

प्यारे१ 01/04/2014 - 15:06
>>>>टेहळणीच्या सुरात हेटाळणीच्या म्हणायचंय का? बाकी वपु वाचायचं एक वय असतं असं म्हणावंसं वाटतं. ( वय १२ ते लग्न होईपर्यंत (आसपास) ;) ) अर्थात 'आपण सारे अर्जुन' आजही थोडंफार भावतं. बाकीची पुस्तकं काहीच नसलं तर वाचायला ठीक.

In reply to by मनिष

मारकुटे 01/04/2014 - 15:35
हे समजले नाही. आवडतात असे लिहिले तर तुम्हाला आवडले. तसेच जर आवडत नाहीत असे स्पष्टपणे कुणी म्हणत असेल तर ती हेटाळणी कशी होते ? आवडत नाही तर आवडत नाही, भारतीय घटनेनुसार प्रत्येक लेखक प्रत्येक वाचकाला आवडलाच पाहिजे असा नियम नाही. पुल वपुंच मध्यमवर्गीय लेखन नसेल कुणाला आवडत तर तसे सांगण्याचा त्याला अधिकार नाही का?

अनुप ढेरे 28/03/2014 - 13:27
छान लिहिलय. 'वपुं'च लेखन आणि कथाकथन खूप आवडतं. गप्पा माराव्या इतक्या सहजतेनं गोष्ट सांगतात.

शशिकांत ओक 28/03/2014 - 15:43
बिपीन, वपुंचे लेखन न वाचलेले मराठी भाषिक महाभाग फार कमी असतील. सहज सुंदर, आपापल्या अनुभव विश्वाशी जवळीक साधणारे. आपण काही उदाहरणे देऊन वपुंचे लेखन पुन्हा वाचायला प्रवृत्त केलेत. धन्यवाद

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 28/03/2014 - 16:30
तरी दवण्यांपेक्षा बरेच बरे. अंमळ मॅच्युअर. तत्त्वज्ञानाचा डोस असला तरी तो दरवेळेस उपदेशपरच असतो असे नाही, सबब त्यांचं लेखन रञ्जक वाटतं.

दिव्यश्री 28/03/2014 - 16:16
लहानपणी व.पु.यांच्या कथाकथनाच्या जुन्या केसेटस घरी होत्या . माझ्या दुर्दैवाने मला आठवत नाही आता कुठे असतील . त्यानंतर घरच बदलल . काही मिळालं , कुठे तर नक्की घेणार आहे , वाचणार आहे आणि ऐकणार आहे . :)

In reply to by यसवायजी

दिव्यश्री 28/03/2014 - 18:37
मना/णा पासून धन्यवाद . सरळ मणाणे घेणे . :) श्रीमंत अन दानशूर पण.;) हव्या असतील तर मेलू शकतो.>>> अरे व्वा. बर्याच चांगल्या क्वालीटीज आहेत . :) आणि अजून टिकूण आहेत म्हणायचं . ;) :D (ह. घ्या. किंव्हा ज .घ्या. युवर चोइस . :P )

In reply to by दिव्यश्री

@(ह. घ्या. किंव्हा ज .घ्या.युवर चोइस, :p )>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif चांगलेच खेळवता हो तुंम्ही!!! =)) . . . . . . . . . . . . . शब्दांना..शब्दांना ..म्हणतोय मी!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

In reply to by दिव्यश्री

यसवायजी 31/03/2014 - 11:42
ह. घ्या. किंव्हा ज .घ्या. युवर चोइस आता तुम्हाला म्या जड कसा काय घेणार?? आधीच "भारी" आहात तुम्ही (सब पे भारी हुं मय). पण काSSय होSSS?? खर्रच इतक्या भारी आहात का?? कस्सं होणार बाई.... आता तुम्ही हे ह.घ्या. किंवा तुमच्याच इष्टाईलमध्ये जड(भारी) घ्या. :P (वजनदार)

In reply to by यसवायजी

दिव्यश्री 31/03/2014 - 21:54
पण काSSय होSSS?? खर्रच इतक्या भारी आहात का??>>> आत्मस्तुती वायीट अस आमचे गुरु म्हण्तात . *beee* तसंही सोतावरूण दिवे वोवलण्याची सवयच णसल्याणे मौण . :D आता तुम्ही हे ह.घ्या. किंवा तुमच्याच इष्टाईलमध्ये जड(भारी) घ्या. Blum 3>>> आम्ही हंच घेत्तो . नेहमीच . जड(भारी) कंदी(पेडे नव्ह) घ्येयाच ते माहिती हाव(आहे) . ;) :)

In reply to by दिव्यश्री

बरखा 28/03/2014 - 18:02
आमच्या घरी सर्वाना एक सवय होती (सासरे- नवरा- दिर) रोज रात्रि झोपताना वपु,पुल यांचे कथाकथन ऐकत झोपायच. कथाकथनाच्या जुन्या केसेटस घरी होत्या आता माहीत नाही . पण संगणकावर आणी फिरत्या संग्रह साच्या (योग्य मराठी नाव माहित नाही)( (पेन ड्राईव्ह) मधे काही कथाकथनाचे भाग आहेत. अधुन मधुन बाहेर गेल्यावर गाडीत गाणी ऐकण्या ऐवजी ते ऐकायला खुप छान वाटत.

विकास 30/03/2014 - 02:43
लेखन - मुक्तक आवडले. मला वाटते वपुंना त्यांच्या कर्मचारी पुस्तकाने प्रसिद्धी दिली पण त्याआधीच ते टेकाडे भाउजींमुळे घरोघरी पोचले होते. बरीचशी (बहुतेक सगळीच) पुस्तके मी वाचली आहेत. त्यातले जसे भूलभुलैय्या हे वेगळेच होते पण आवडले. तसे "आपण सारे अर्जून" वाचायला घेतले पण त्यातला (दु:खद/डिप्रेस करणारा या अर्थाने) उदास भाव बघून ते तसेच ठेवून दिले ते एकदम आठवले...

उपास 30/03/2014 - 09:00
सहज जाता जाता तत्वज्ञान सांगून जायचं वपुनी आणि मग रवंथ करत आपण त्यावर विचार करायचा हे तेव्हा नेहमीचं झालं होतं त्यांच्या कथा वाचताना. अंमळ जास्त वेळ लागायचा त्यामुळे त्यांच्या कथा वाचताना, पण व्वा! सह्ही! असं म्हणत मान डोलावलीच जायची. आजूबाजूच्या साध्या साध्या प्रसंगांकडे डोळसपणे बघायची दृष्टी जशी पु.लं. नी दिली तशी त्या गोष्टींपलिकडली माणसं आणि खर्या जगातली माणसं उलगडायला वपु नी शिकवलं, अर्थात त्यांचं साहित्य योग्य वयात वाचल्याने तसं झालं असावं. पार्टनर, तुच माझी वहिदा, अमिताभ, हसरे दु:ख अशा कितीतरी गोष्टी त्यांच्या आवाजासहित डोक्यात फिट्ट बसल्या. 'दोत्त' सगळ्यात आवडती! 'आपण सारे अर्जुन' वाचून तर डोकं सुन्न झालं, नियती नावाची गोष्ट आहे जिचं आपण शप्प वाकडं करु शकत नाही हे पहिल्या प्रथम तिथं कळलं! अवचटांचं धागे उभे आडवे वाचताना असंच काहीसं झालं होतं तेव्हा वपुंचे संस्कार आठवले! अर्थात वपु मलाही अत्ता आवडतात का, तर उत्तर हो असेल पण तितकेच आवडतात का, तर उत्तर हो च असेल असं नाही. काळ पुढे सरकला, कक्षा रुंदावल्या, संदर्भ बदलले त्यामुळेही असेल पण भदे सदृश अतिशयोक्तिमधे मन रमत नाही आताशा.. पण तरीही वपुंचे संस्कार अजूनही रेल्वेत 'तुझ्यापेक्षा माझी हालत वाईट' म्हणत दुसर्‍याचे दु:ख हलके करणारा 'अनोळखी' माणूस दिसला की दाद देतातच! :) 'साहित्य सहवास' आवडलाचं ,त्यानिमित्त वपुंची आठवण काढल्याबद्दल धन्यवाद!

In reply to by उपास

सुबोध खरे 31/03/2014 - 13:46
वसंत पुरुषोत्तम काळे हा लेखक "हलकं फुलकं " या श्रेणीत नाहीच मुळी. त्यांनी जीवनाबद्दल इतकं स्वच्छ आणि स्पष्ट लिहिलं आहे कि ते सुरुवातीला बर्याच लोकांना झेपत नाही. पण ते आपल्याला विचार करण्यास भाग पाडतच. अफाट ताकतीचं लेखन आहे आणि कितीही वेळा वाचला तरी परत त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळते. माणसं वाचायला त्यांनीच शिकवलं. त्यांच्या लेखनाचा समग्र संच कुठे मिळेल काय? ( जसा व्यंकटेश माडगुळकरांच्या लेखनाचा संच मेहता यांच्या कडे मिळतो.) मला माझ्या संग्रही ठेवायचा आहे.

In reply to by उपास

सखी 31/03/2014 - 22:10
अर्थात वपु मलाही अत्ता आवडतात का, तर उत्तर हो असेल पण तितकेच आवडतात का, तर उत्तर हो च असेल असं नाही. काळ पुढे सरकला, कक्षा रुंदावल्या, संदर्भ बदलले त्यामुळेही असेल पण भदे सदृश अतिशयोक्तिमधे मन रमत नाही आताशा.. पण तरीही वपुंचे संस्कार अजूनही रेल्वेत 'तुझ्यापेक्षा माझी हालत वाईट' म्हणत दुसर्‍याचे दु:ख हलके करणारा 'अनोळखी' माणूस दिसला की दाद देतातच! -- अचुक निरीक्षण ब-याच जणांना लागु पडेल. मला त्यांची 'पप्पा' कथा जास्त आवडली पण त्यांचा स्वत:चा यात कमी रोल आहे, मुग्धा चिटणीसने तिच्या आवाजात फार कमाल केली आहे या कथाकथनात - तिसरी-चौथीत असताना घरी भावाने मित्राकडुन कॅसेट आणली होती, तेव्हा तिचा एकलेला आवाज मागील काही वर्षापर्यंत लक्षात होता आणि शेवटी ते ध्वनीमुद्रण सापडले.

चौकटराजा 31/03/2014 - 09:36
वपुं बरोबर प्रत्यक्ष बोलायचा योग आला व त्यांच्या सौ शी.फोनवरून.त्यांच्या कथेचा बाज काहीस वेगळा होता. त्यात ते स्वतः कथा सादर करीत असल्याने अधिक न्याय देउ शकत. काही वेळा ते कथन एकसुरीही वाटत असे. वपु आपल्या सारखेच सामान्या माणूस होते. राग लोभ, मनस्ताप, दु:ख, तृप्ती , यश , सन्मान, प्रेम सगंळं भलं बुरं त्यांच्याही वाट्याला आलं. मुळात माणूस दिलखुलास. अनेकाना त्यांची आलेली " रेखीव" पत्रे हा एक अमुल्य ठेवा वाटतो. जी ए कुलकर्णी, ह मो मराठे, मतकरी यांचा जसा एक बाज आहे तसाच वपुंचा ! यत रोचते तत्ग्राह्यम !

विजुभाऊ 31/03/2014 - 16:03
वपु हे सुंदर पेटी वाजवायचे. त्यांच्या कोणत्याच कथेत त्यांचा हा गुण दिसत नाही. अर्थात हे थोडेसे अवांतर. वपुनी जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद कसा घ्यायचा ते अगदी सहज सांगितले. त्यांच्या " घर हरवलेली माणसे " कथा संग्रह वाचताना आपण इगो नामक एका भयंकर व्हायरसशी कसे रोज झगडत असतो. हे अनुभवायला मिळते.

मनिष 31/03/2014 - 22:57
वपु खूप पुर्वी वाचले आणि तेंव्हा आवडायचे. आता आवडतील की नाही सांगता येत नाही. पण सध्या टेहळणीच्या सुरात वपुंविषयी बोलायची पध्दत आहे, तरी तुम्ही स्वच्छपणे वपु आवडतात असे लिहिले हे पाहून बरे वाटले. :-)

In reply to by मनिष

प्यारे१ 01/04/2014 - 15:06
>>>>टेहळणीच्या सुरात हेटाळणीच्या म्हणायचंय का? बाकी वपु वाचायचं एक वय असतं असं म्हणावंसं वाटतं. ( वय १२ ते लग्न होईपर्यंत (आसपास) ;) ) अर्थात 'आपण सारे अर्जुन' आजही थोडंफार भावतं. बाकीची पुस्तकं काहीच नसलं तर वाचायला ठीक.

In reply to by मनिष

मारकुटे 01/04/2014 - 15:35
हे समजले नाही. आवडतात असे लिहिले तर तुम्हाला आवडले. तसेच जर आवडत नाहीत असे स्पष्टपणे कुणी म्हणत असेल तर ती हेटाळणी कशी होते ? आवडत नाही तर आवडत नाही, भारतीय घटनेनुसार प्रत्येक लेखक प्रत्येक वाचकाला आवडलाच पाहिजे असा नियम नाही. पुल वपुंच मध्यमवर्गीय लेखन नसेल कुणाला आवडत तर तसे सांगण्याचा त्याला अधिकार नाही का?
लेखनविषय:
लेखनप्रकार
25th Mar 2014 २५ मार्च १९३३ - २६ जुन २००१ प्रिय वपु, आज तुमचा वाढदिवस, आपल्या समाजात नावाच्या मागे कै लागले कि जयंती म्हणायची पद्धत, पण खरेच तुम्ही गेलात का ? ज्या नियती बद्दल तुम्ही एवढे लिहून ठेवलेत ती नियती अशी का रुसली तुमच्या वर आणि का आमच्या पासून केवळ ६८ व्या वर्षी हिरावून घेतले? ६८ हे जाण्याचे वय नक्कीच नाही, पण शेवटी ग दि माडगुळकर म्हणून गेले तसेच आहे " पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" आज तुम्ही असतात तर आमच्या सारख्या असंख्य चाहत्यांनी, तुमच्या कुटुंबीयांनी नक्कीच तुमचे सहस्त्रचंद्र दर्शन केले असते, पण आता या सगळ्या जर तर च्या गोष्टी.

प्रवास

पैसा ·

विटेकर 28/03/2014 - 12:32
फारच छान ! खास आवडले ! रेल्वेचा प्रवास हा आम्हां भारतीयांसाठी एक सांस्कृतिक भाग आहे. तुमच्या बालपणीच्या आठ्वणी वाचताना चुलीसमोर केस मागे घेत खरकट्या हाताने फुंकणी तून हवा घालून जाळ मोठा करणारी माझी आई समोर दिसली. ती फुंकणी वापरे त्यावेळेपुरते आवर्तन थांबे अन्यथा सतत रामरक्षा अथवा व्यंक्टेश स्तोत्र चाले. चुलीतील जाळ मोठा झाला की आईचा मूळ्चा तेजस्वी चेहरा आणखी उजळे.. त्यावेळी ती जगातील सर्वात सुंदर स्त्री असे आणि आम्ही तिची पिल्ले तिच्या भोवती कोंडाले करुन बसू. दादा आईच्या सुरात सूर मिसळून म्हणे .. त्याकाळी आमच्या घरी रामरक्षा पाठ असणे हे मुंजीसाठी प्री- क्वालिफिकेशन होते. आजही झोप आली नाही की रामरक्षा म्हणते. लगेच निद्रादेवीच्या अंगणात पोचायला होतं. अगदी अगदी .. माझाही असाच अनुभव आहे. रामरक्षा सहसा पूर्ण होत नाही .. तत्पूर्वी च झोप लागून जाते.

कंजूस 28/03/2014 - 12:53
विरंगुळा खासच .निवडणुकीचा काथ्या आणि पाकृच्या वासातून सुटलो जरा . प्रवासात काय काय मागचे आठवत राहाते .रेडीओवरचे सहज सुचले म्हणून आणि शनिवारचे नभोनाट्य .रविंद्र पिंगे ,शंना ,जयवंत दळवींचे कल्याणी .ओरिसा कोणार्कच्या सूर्यमंदिरावर कोणी लिहिले होते ?प्रेमचंदच्या एका गोष्टीत नोकरीच्या शोधात निघालेला तरूण आर्मितील भावाचा कोट घालून रेल्वेने जातो आणि त्यालाच आर्मितला समजून बसायला जागा करून देतात .तुम्ही सिग्नल दिलात नी आमची गाडी सुटली सुसाट .

भाते 28/03/2014 - 13:44
पैसाताई, संपादक मंडळात असल्याने धाग्यावरचे प्रतिसाद संपादित करण्याच्या कामातुन वेळ काढुन अधुनमधुन असेच छान लेख लिहित जा!

अजया 28/03/2014 - 13:48
थंड वार्‍याच्या झुळकीसारखाच वाटून गेला लेख सद्य निवडणूक हल्लकल्लोळामध्ये !!

In reply to by अजया

+१०००, अजून काय ? स्वतःच्या मालकांना निर्दोष देव बनवून त्यांच्या बाजूने काढलेले चिरके एकांगी सूर ऐकून लै वैताग आला होता !

सस्नेह 28/03/2014 - 14:29
रेल्वे, निदान भारतीय रेल्वेचं एक खास वेगळं विश्व असतं. खूपदा प्रवासात असे अनुभव आलेत. शेवट अगदी खास ! आपल्या गावाची चाहूल किती सुखद असते याचा कितिदा तरी अनुभव घेतला आहे, घेते आहे !

पिशी अबोली 28/03/2014 - 15:04
लवकरच गाडीने लक्षात येईल असं एक वळण घेतलं आणि बाहेर दूरवर काळोखावर रांगोळी काढल्यासारखे प्रकाशाचे अनेक झगमगते ठिपके दिसायला लागले. माझ्या ओळखीच्या शहराचं पहिलं दर्शन! नेहमीच अतिशय सुखद वाटणारं. त्याने मला त्या स्वप्नातल्या गावाहून परत वर्तमानात आणलं. हळूहळू शहरातले रस्ते आणि त्यावरचे दिवे दिसायला लागले. गाडीने हलकेच ब्रेक लावल्याचा आणि रूळ बदलल्याचा आवाज जाणवला. सुक्या मासळीचा विशिष्ट वास यायला लागला. अनेकांना हा वास अजिबात आवडत नाही. पण माझ्यासाठी मात्र हा वास माझ्या ओळखीच्या शहराची खूण आहे.
खरंच... रत्नागिरीला पोहोचवलंत... :)

ब़जरबट्टू 28/03/2014 - 15:56
छान लिहलेय... खरच हलके फुलके... धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभे राहुन, वारे अंगावर घेत, युफोरियाचे "ओ माय री.. " गळा फाडून गाण्यात जी मजा अहे ना, त्याला तोड नाही दुसरी... :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभाऊ 31/03/2014 - 16:10
हजार दोनहजार वर्षातून एखादा क्षण संक्षींशी सहमत होण्याचा येतो. हे सहमत होणे मागल्या सहस्त्रकातले की या? म्हणजे आम्हालाही कळेल की ३०१४ मध्ये प्रा डॉ बिरुटे पुन्हा एकदा संक्षि शी सहमत होण्याची वळ आली.

चिगो 28/03/2014 - 17:05
सुंदर, हळूवार लेख.. झक्कास, ज्योतितै.. प्रवास आणि अनुभव-प्रवास, दोन्ही आवडले. बाकी रेल्वेप्रवासाचा लै अनुभव घेतलाय. त्यात दिल्ली-हैदराबाद सेकंद क्लासातला प्रवास, त्याच रुटवर अनकन्फर्म्ड टिकीटावर स्लीपरमधला प्रवास, नागपूर-दिल्ली रुटवरचा सेकंड-स्लीपर-एसी असा चढत्या भाजणीचा प्रवास, दिल्ली ते आसाम स्लीपरक्लासचा प्रवास, ज्यात सैनिकांच्या बस्त्यांमध्ये घळ करुन झोप घेतली होती. बाकी, अनकन्फर्म तिकीटावर स्लीपर किंवा एसीतून प्रवास करण्यापेक्षा सेकंडक्लासमध्ये फाईट मारलेली परवडते, हा अनुभव आहे बरेचदा.. ;-)

बरखा 28/03/2014 - 17:48
खुप छान लिहलयत. "सुक्या मासळीचा विशिष्ट वास यायला लागला. अनेकांना हा वास अजिबात आवडत नाही. पण माझ्यासाठी मात्र हा वास माझ्या ओळखीच्या शहराची खूण आहे." तसं कोकण माझ मुळ गाव नाही. पण कोकणात जायच म्हणल की मी लगेच तयार होते. मी शाकाहारी असल्याने मासळीचा विशिष्ट वासाच्या जागी मला ऊकडीच्या मोदकाची स्वप्न पडायला लागतात. कोकण्यातल्या ऊकडीच्या मोदकाची सर बाकी कुठ्ल्याही मोदकाला नाही.

धन्या 28/03/2014 - 18:39
मस्त. आवडलं. आम्ही आठवीला असताना संस्कृतच्या तासाला मास्तरीण बाई आमच्याकडून रामरक्षा घोकून घ्यायच्या. अर्थ समजावण्याच्या भानगडीत त्या कधीच पडल्या नाहीत. रामरक्षा का घोकून घ्यायच्या तेही कधी कळलं नाही. आम्ही मात्र बेंबीच्या देठापासून "आत्तसज्ज धनुष्या विशुस्पुशा वक्षया शुगनसंगीनौ" म्हणून ओरडायचो.

विकास 28/03/2014 - 18:50
एकदम आवडले आणि भावले! मला वाटते ८० च्या दशकात शाळा-कॉलेज केलेल्या पिढीपर्यंतच्या (ज्यात मी देखील येतो) व्यक्तींनी अनेक बदल झपाट्याने पाहीले आहेत. त्यामुळे जेंव्हा परत परत असे लहानपणच्या घरापाशी मनाने जाणे होते तेंव्हा अशीच कुठेतरी अस्वस्थता येते.

बॅटमॅन 28/03/2014 - 19:03
चित्रदर्शी वर्णन आवडले. लहानपणी हरिप्रिया एक्स्प्रेसने केलेल्या अनेक मिरज-धारवाड प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या. बहुत धन्यवाद!

पैसा 28/03/2014 - 20:27
सुहास झेले, अनुप ढेरे, मुवि, नंदन, मृत्युंजय, प्रमोद देर्देकर, पिरा, विटेकर, गणपा, सखी, मूकवाचक, कंजूस, शैलेन्द्र, यशोधरा, भाते, अजया, यसवायजी, सूड, स्नेहांकिता, विशाखा राऊत, पिशी अबोली, बजरबट्टू, संजय क्षीरसागर सर, आयुर्हित, आदूबाळ, चिगो, पल्लवी कुलकर्णी, जेपी, रेवती, धन्या, विकास, बॆटमॆन, जोशी ले, मेघनाद, किसना, मधुरा सर्वांना मनापासून धन्यवाद! विटेकर, कंजूस, बजरबट्टू, चिगो, पल्लवी, विकास, प्रतिसाद आवडले. जोशी ले, 'केमो' चा उलगडा जरा वेळाने झाला! शब्दप्रयोग लै आवडला आहे! मेघनाद, हा छोटासा प्रवास मुंबई एक्सप्रेसने मडगावहून रत्नागिरीपर्यंतचा! सर्व वाचक आणि प्रतिसादकांना पुन्हा एकदा धन्यवाद!

भारतीय रेल्वे प्रवास हा व्यक्ती आणि वल्ली निरीक्षण करण्यासाठी उत्कृष्ट जागा आहे. पक्षी व प्राणी पाहण्यासाठी जसे अभयारण्यात जावे लागते. तसे मानवी स्वभावाचे वेगवेगळे नमुने आपल्या समाजातील विविध स्वतारातील , धर्माची जातीची , वयोगटातील माणसे निरीक्षण रेल्वेच्या डब्यात होते. तुमच्या लेखनाच्या शैलीला तुमच्या बारीक निरीक्षणाची जोड मिळाल्याने आम्ही सुद्धा तुमच्यासारखा हा प्रवास अनुभवला. फार पूर्वी यात्रा ह्या मालिकेतून आपल्या भारतचे दर्शन घडविणाऱ्या शाम बेनेगल व ओम पुरी ची ची आठवण आली.

उपास 28/03/2014 - 23:53
नॉस्टेल्जिक वाटलंच, रेवदंड्याला आईच्या आजोळी आम्ही भावंड जमत असू तेव्हाचं चित्र आलं डोळ्यासमोर, लंपनच्या भाषेत सांगायचं तर तंतोतंत! रामरक्षा, अथर्वशीर्श अगदी हुबेहुब.. रेल्वेच्या प्रवासाची मज्जाच और.. अगदी मुंबईतला रोजचा प्रवास करायचो ते दिवस आठवले.. फक्त प्रवासातले असे मित्र/ कंपू होते ते विश्वच वेगळं! खूप छान मांडलय लेखात.. आवडलंच!

धमाल मुलगा 29/03/2014 - 00:37
बढिया एकदम! सर्वप्रथम, पैसाताईला 'आपण खूप छान लिहू शकतो' हे आठवलं त्याबद्दल तिचे अभिनंदन. :) मुक्तक एकदम छान उतरलं आहे. बाकी, रेल्वेप्रवास असा एंजॉय करणार्‍यांचा फार हेवा वाटतो. दहा एक वर्षांखाली गवाल्यार ते पुणे असा शेवटचा छळवादी रेल्वेप्रवास केल्यापासून रेल्वेत बसायच्या कल्पनेनंच कसंतरी व्हायला लागतं. हवं तर चोवीसतास बाईक चालवतो पण रेल्वे नको असं झालं. त्यापुर्वी आवडायचं, पण त्या प्रवासानं मात्र आवडच मारली. पण आज मात्र तुझ्या लेखामुळं कोकणरेल्वेची ही छोटेखानी सफर मस्त एंजॉय करता आली. :)

स्पंदना 29/03/2014 - 03:04
कालच मुलाला अंगणात बोलावुन तारका दाखवायचा प्रयत्न केला. पण टीव्हीवर त्याच काहीतरी सुरु होतं. मस्त गो पै तै. किती दिवसांनी वाचत असताना आठवणी झरझर पुढुन येउन मागे पडत चालल्याचा भास झाला. रेडीओच्या आठवणीने तर चक्क हळव केलं. मी सुद्धा रेडीओ आमच्या अंगणातल्या फळीच्या कॉटवर उपडं पडुन ऐकायचे. "वाटसरु" हे तेंव्हाचे भयानक नाटक मी असच अंगणात पडुन ऐकल अन शेवटी घाबरुन आत चुलीजवळ येउन बसले.

पैसा 29/03/2014 - 08:55
नगरीनिरंजन, निनाद, आतिवास, उपास, धम्या, पिडां, अपर्णा, डॉ अहिरराव मनापासून धन्यवाद! निनाद आणि उपास, प्रतिसाद आवडले! धम्या, रेल्वे आवडून घे परत! मज्जा येते! अपर्णा, खरं आहे. आजकाल कोणाला असल्या गोष्टींसाठी वेळ राहिलेला नाही. मुलांना कॉम्प्युटर टीव्हीसमोरून उठवणं भयंकर कठीण जातं. त्यांना मोठे झाल्यावर आपल्याबद्दल काय आठवणी राहतील देवजाणे. आपण लहान असताना हे प्रकार नसल्याने इतर गोष्टी आहेत हे समजत होतं! पिडां, तुम्हाला "पेढा" चा अर्थ माहिती असणारच! पण अजाण बॅट्यासाठी परत सांगते! तोही लै जुना वाक्प्रचार मला बरेच दिवसांनी आठवला. साधारण गव्हाळ गोर्‍या, गोलसर (अंगावर फॅट आहे हे लक्षात येणारी) अंगलट, बेताची उंची आणि गोड चेहरा असणार्‍या व्यक्तीविशेषांना तेव्हा पेढा ही संज्ञा असायची!

श्रिया 29/03/2014 - 11:59
प्रवासवर्णन भावले, हे वाचताना माझ्याही रेल्वेप्रवासाच्या काही आठवणी जाग्या झाल्या.

इशा१२३ 29/03/2014 - 15:14
किती छान लिहीलय....अनेक प्रवास आठवले या लेखामुळे.कोकण रल्वेने मात्र अजून प्रवास नाही करायला मिळाला..निसर्ग बघण्यासाठी तरी कोकणात रेल्वेने जायचय.

पै सर्वप्रथम अभिनंदन...! निवडणुका आणि आपापल्या समर्थकांचे वैचारिक दावे प्रतिदाव्यातून आम्हा वाचकांना जरा उसंत दिली. थ्यांक्स....! :) पै प्रवास आवडला. लेखनशैली सुरेख. आपल्याबरोबर आमचाही प्रवास छान सुरु होता. ''समोरच्या सीटवर एक टिपिकल मंगलोरी 'पेढा' आणि त्याची नवथर बायको बसले होते'' इथे फिस्सकन हसु आलं. आणि रेल्वेचा चलचित्र प्रवास आपल्याबरोबर आमचाही सुरु झाला. पूर्ण प्रवास रंगला मजा आली. आनंद वाटला. ब-याच दिवसानंतर एकेक ओळ वाचतांना मजा आली. मन लावून वाचावं वाटलं. पै, मार्क द्यावे वाटले ते...''मन सहजच काही शे मैल आणि साडेतीन दशकांचा प्रवास करून रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात पोचलं...येथून पुढे जे वर्णन केलं ना ते केवळ सुरेख. कोकणात आम्हीही जाऊन आलो. आमचा आजचा प्रवास इथेच संपत होता, पण गाडी मात्र अशीच धावत पुढे जाणार होती....इथे आम्हीही उतरलो. निरोप द्यायचा म्हटलं की जड होतं तसं. आतून काही तरी हलतंय असा सुरेख शेवट...दमदार लेखनीचा प्रवास दोन बोटांमधून सुटणा-या रांगोळीसारखा सुंदर प्रवास. (अजून खूप कौतुक करावं वाटतंय पण आवरतो.) लिहित राहा हो...!!! -दिलीप बिरुटे

@मन सहजच काही शे मैल आणि साडेतीन दशकांचा प्रवास करून रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात पोचलं. एका साध्यासुध्या बैठ्या घराच्या अंगणात. चोपून तयार केलेलं लख्ख अंगण. त्याच्या कडेने लावलेले चिरे, आणि त्या चिर्‍यांच्या पलिकडे ओळीत लावलेली अनेक फुलझाडं आणि शोभेची झाडं. तगर, कण्हेरी, बिट्टी, कुंद, मोगरा, नेवाळी, लिली, गावठी गुलाब, वेलगुलाब, अगस्ती नाना प्रकार. त्या लहान झाडांच्या पुढे पाण्याची दगडी पन्हळ, पाण्याने भरलेली दोण, आणि माड, आंब्याची कलमं, चिकू, रामफळ, कोकम अशी मोठी झाडं. या माडांच्या मुळात सतत पाणी शिंपल्यामुळे ओलसर मऊ माती असायची आणि बाजूला दुर्वा. पलिकडे एक लहानसं शेत आणि त्याही पलिकडे बांबूचं बेट. घराच्या मागच्या बाजूलाही प्राजक्ताची श्रीमंती उधळत असायची. अंगणाच्या छोट्या भागात पत्र्याचा मांडव घातला होता. पण आमचा वावर बराचसा मोकळ्या आकाशाखालीच असायचा. तिन्हीसांजा वडील अंगणात फेर्‍या मारत रामरक्षा म्हणायचे. कधी पडवीतल्या झोपाळ्यावर बसून रामरक्षा, अथर्वशीर्ष म्हणायचे. आई पण काम करता करता असं काही म्हणायची. त्यांच्यामागून फिरताना आम्हालाही ती पाठ होऊन गेली होती. आजही झोप आली नाही की रामरक्षा म्हणते. लगेच निद्रादेवीच्या अंगणात पोचायला होतं. रात्री नीरव शांततेत माड झावळ्या हलवत उभे असायचे. सगळी फुलझाडं पाणी पिऊन प्रसन्न झालेली असायची. जेवणं झाली की कधी मर्फीचा रेडिओ पण आम्हाला सोबत करायला त्या अंगणात येऊन गाणी गायचा. रात्रीच्या वेळी लता, रफी, तलत, अरुण दाते सगळ्यांचेच आवाज जादुई भासायचे. >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-195.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/clapping-smiley-emoticon.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-195.gif

इरसाल 29/03/2014 - 17:31
आमी बी नॉस्टॅलजिक झालो. दिल्लीसाठी केलेला वेगवेगळ्या ऋतुतला १० वर्षांचा प्रवास डोळ्यासमोर तरळुन गेला.

रम्य आहे आवडला. प्रवासातून कसे मस्त अलगद साडेतीन दशकांचा प्रवास करून मागे नेलेत. मी पाच दशके मागे गेलो. रेडीओ तर मी अजूनही ऐकतो. मुंबई सोडल्यापासून मात्र मुंबई आकाशवाणीची साथ तुटली. माझ्याही बालपणींच्या आजोळच्या हळव्याआठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.

पैसा 29/03/2014 - 21:22
इस्पीकचा एक्का, भिकापाटील, श्रिया, आत्मशून्य, इशा१२३, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, श्रुती कुलकर्णी, लीमाऊजेट, त्रिवेनि, अत्रुप्त आत्मा, इरसाल, सुधीर कांदळकर, इन्दुसुता, माहितगार, अनन्न्या, वल्ली, मनापासून धन्यवाद! इशा१२३, केवळ निसर्ग पाहण्यासाठी कोंकण रेल्वेने जरूर जा. सुधीर कांदळकर, आठवणी आवडल्या. प्रा.डॉ.बिरुटे सर, _/\_ तुम्हीही लिहीत जा हो!

राही 30/03/2014 - 19:18
सध्याच्या तप्त वातावरणात हा लेख वाचल्यावर ऐन वैशाखात वाळ्याचे पाणी अंगावर शिंपडावे तसे थंडगार वाटले. रेल प्रवास माझाही अत्यंत आवडता. पण उत्तर भारत सोडून. दक्षिण भारतात रसम-सांबाराचा वास सतत सोबत करतो तेव्हढे सोडले तर बाकी प्रवास छान होतो. काही ठिकाणचे विशिष्ट वास अगदी लक्षात रहातात. नासिक रोड नंतरचा (बहुधा लासलगाव) कुजकट दुर्गंध झोपेतून हमखास जाग आणतो. एकदा जम्मू-दिल्ली प्रवासात चादरी-उश्या अस्वच्छ मिळाल्या म्हणून त्या देणार्‍याकडे तक्रार केली तर त्याने रेल-वे च्या कपडेधुलाईचा पार इतिहासभूगोल सांगितला. चादरी गोळा करून कुठे पाठवल्या जातात, कोणत्या धुलाईकंपनीचा वशिला कुठे असतो, 'लालूसाब' कसे अचानक भेट देऊन लिनन तपासत असत वगैरे. आम्हांला जबरदस्त झोप येत होती त्यामुळे 'स्वच्छ चादरी नकोत पण लेक्चर आवर' असे झाले. खिडकीतून पहाताना दृश्ये भराभर सरकत जावी त्याप्रमाणे अनेक प्रसंगांचे धावते पण नेमके वर्णन वाचताना खरोखर रेलवे प्रवास करीत आहोत असे वाटले. प्रतिसादातला 'केमोथेरपी' शब्दसुद्धा जबरदस्त. क्षणभर कळलेच नाही.

स्पा 30/03/2014 - 22:33
मिपावर सद्ध्या येत असलेल्या एक से एक भंगार आणि भिकार राजकरणावरील लेखात पॆ ताइचं हे ललित वेगळाच आनंद देउन गेलं. लिहित जा ग नेहमी.

मस्तच, कोकण नाही पण कोकणकन्या फिरवून आणलीत, असे कैक प्रवास आठवले. आम्ही कणकवलीचेच :) सुक्या मासळीचा वास माझ्याही खास आवडीचा, छानशी तरतरी येते त्याने मला, त्यातही समुद्राच्या खार्‍या वार्‍यात मिसळून आला तर क्या बात !

सुबोध खरे 31/03/2014 - 14:08
त्यातून २३ वर्षे लष्करी सेवेत गेल्याने रेल्वेच्या उभ्या आडव्या जाळ्यातून भारत भर प्रवास केला आहे. मुळात गोव्यात पाच वर्षे पोस्टिंग असल्यामुळे कोकण रेल्वे चे प्रत्येक स्टेशन उतरून पाहिलेले आहे. मांडवी, कोकणकन्या आणि जनशताब्दी च्या अनारक्षित ते वातानुकुलीत १ ल्या दर्जाच्या सर्व डब्यातून प्रवास केलेला आहे. शिवाय रेल्वेच्या YP(मीटर गेज कोळसा इंजिन) YDM ४(मीटर गेज), WDM २ WDM ३A, WDP ४ या डीझेल आणि WCM २, WCG २, WCAM ३, WAM ४, WAP ५ अशा इंजिनातून सुद्धा प्रवास केला आहे.(IRFCA http://www.irfca.org/ हि साईट पहा) यात सर्वात आनंदाचा प्रवास कैसल रॉक ते मडगाव हा मीटर गेज चा प्रवास गोमंतक एक्सप्रेस च्या YDM ४ इंजिनातूनहि केला आहे. आपल्या लेखामुळे पुनः प्रत्ययाचा आनंद मिळाला.आणि मडगाव ते रत्नागिरी हा प्रवास तर डोळ्याचे पारणे फेडणारे निसर्गाचे दर्शन घडवतो. कोकण कन्या एक्स्प्रेस ने हाच प्रवास पावसाळ्याच्या नंतर सप्टेंबर मध्ये दुसर्या वर्गाच्या दारात बसून करून पहा.(रत्नागिरी सकाळी सहा ते मडगाव पावणे अकरा) स्वित्झर्लंड च्या तोंडात मारेल असे रम्य देखावे दिसतील. बाकी लेख सुंदरच आहे.

पैसा 03/04/2014 - 13:06
प्रशांत आवले, पाभे, मदनबण, स्पा, राही, तुमचा अभिषेक, डो. सुबोध खरे, सुहास.. आणि सानिका, मनापासून धन्यवाद! डॉ. खरे, प्रतिसाद आवडला. राही, प्रतिसाद आवडला. रेल्वेच्या वासांचं एक वेगळंच जग आहे!

नाखु 03/04/2014 - 16:12
प्रवास सगळेच करतात पन " प्रवास अनुभवणं आणि नेमक्या शब्दात मांडण अगदी अचूक" पुन्हा पुन्हा लज्जत घेत वाचावा असा लेख.

विटेकर 28/03/2014 - 12:32
फारच छान ! खास आवडले ! रेल्वेचा प्रवास हा आम्हां भारतीयांसाठी एक सांस्कृतिक भाग आहे. तुमच्या बालपणीच्या आठ्वणी वाचताना चुलीसमोर केस मागे घेत खरकट्या हाताने फुंकणी तून हवा घालून जाळ मोठा करणारी माझी आई समोर दिसली. ती फुंकणी वापरे त्यावेळेपुरते आवर्तन थांबे अन्यथा सतत रामरक्षा अथवा व्यंक्टेश स्तोत्र चाले. चुलीतील जाळ मोठा झाला की आईचा मूळ्चा तेजस्वी चेहरा आणखी उजळे.. त्यावेळी ती जगातील सर्वात सुंदर स्त्री असे आणि आम्ही तिची पिल्ले तिच्या भोवती कोंडाले करुन बसू. दादा आईच्या सुरात सूर मिसळून म्हणे .. त्याकाळी आमच्या घरी रामरक्षा पाठ असणे हे मुंजीसाठी प्री- क्वालिफिकेशन होते. आजही झोप आली नाही की रामरक्षा म्हणते. लगेच निद्रादेवीच्या अंगणात पोचायला होतं. अगदी अगदी .. माझाही असाच अनुभव आहे. रामरक्षा सहसा पूर्ण होत नाही .. तत्पूर्वी च झोप लागून जाते.

कंजूस 28/03/2014 - 12:53
विरंगुळा खासच .निवडणुकीचा काथ्या आणि पाकृच्या वासातून सुटलो जरा . प्रवासात काय काय मागचे आठवत राहाते .रेडीओवरचे सहज सुचले म्हणून आणि शनिवारचे नभोनाट्य .रविंद्र पिंगे ,शंना ,जयवंत दळवींचे कल्याणी .ओरिसा कोणार्कच्या सूर्यमंदिरावर कोणी लिहिले होते ?प्रेमचंदच्या एका गोष्टीत नोकरीच्या शोधात निघालेला तरूण आर्मितील भावाचा कोट घालून रेल्वेने जातो आणि त्यालाच आर्मितला समजून बसायला जागा करून देतात .तुम्ही सिग्नल दिलात नी आमची गाडी सुटली सुसाट .

भाते 28/03/2014 - 13:44
पैसाताई, संपादक मंडळात असल्याने धाग्यावरचे प्रतिसाद संपादित करण्याच्या कामातुन वेळ काढुन अधुनमधुन असेच छान लेख लिहित जा!

अजया 28/03/2014 - 13:48
थंड वार्‍याच्या झुळकीसारखाच वाटून गेला लेख सद्य निवडणूक हल्लकल्लोळामध्ये !!

In reply to by अजया

+१०००, अजून काय ? स्वतःच्या मालकांना निर्दोष देव बनवून त्यांच्या बाजूने काढलेले चिरके एकांगी सूर ऐकून लै वैताग आला होता !

सस्नेह 28/03/2014 - 14:29
रेल्वे, निदान भारतीय रेल्वेचं एक खास वेगळं विश्व असतं. खूपदा प्रवासात असे अनुभव आलेत. शेवट अगदी खास ! आपल्या गावाची चाहूल किती सुखद असते याचा कितिदा तरी अनुभव घेतला आहे, घेते आहे !

पिशी अबोली 28/03/2014 - 15:04
लवकरच गाडीने लक्षात येईल असं एक वळण घेतलं आणि बाहेर दूरवर काळोखावर रांगोळी काढल्यासारखे प्रकाशाचे अनेक झगमगते ठिपके दिसायला लागले. माझ्या ओळखीच्या शहराचं पहिलं दर्शन! नेहमीच अतिशय सुखद वाटणारं. त्याने मला त्या स्वप्नातल्या गावाहून परत वर्तमानात आणलं. हळूहळू शहरातले रस्ते आणि त्यावरचे दिवे दिसायला लागले. गाडीने हलकेच ब्रेक लावल्याचा आणि रूळ बदलल्याचा आवाज जाणवला. सुक्या मासळीचा विशिष्ट वास यायला लागला. अनेकांना हा वास अजिबात आवडत नाही. पण माझ्यासाठी मात्र हा वास माझ्या ओळखीच्या शहराची खूण आहे.
खरंच... रत्नागिरीला पोहोचवलंत... :)

ब़जरबट्टू 28/03/2014 - 15:56
छान लिहलेय... खरच हलके फुलके... धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभे राहुन, वारे अंगावर घेत, युफोरियाचे "ओ माय री.. " गळा फाडून गाण्यात जी मजा अहे ना, त्याला तोड नाही दुसरी... :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभाऊ 31/03/2014 - 16:10
हजार दोनहजार वर्षातून एखादा क्षण संक्षींशी सहमत होण्याचा येतो. हे सहमत होणे मागल्या सहस्त्रकातले की या? म्हणजे आम्हालाही कळेल की ३०१४ मध्ये प्रा डॉ बिरुटे पुन्हा एकदा संक्षि शी सहमत होण्याची वळ आली.

चिगो 28/03/2014 - 17:05
सुंदर, हळूवार लेख.. झक्कास, ज्योतितै.. प्रवास आणि अनुभव-प्रवास, दोन्ही आवडले. बाकी रेल्वेप्रवासाचा लै अनुभव घेतलाय. त्यात दिल्ली-हैदराबाद सेकंद क्लासातला प्रवास, त्याच रुटवर अनकन्फर्म्ड टिकीटावर स्लीपरमधला प्रवास, नागपूर-दिल्ली रुटवरचा सेकंड-स्लीपर-एसी असा चढत्या भाजणीचा प्रवास, दिल्ली ते आसाम स्लीपरक्लासचा प्रवास, ज्यात सैनिकांच्या बस्त्यांमध्ये घळ करुन झोप घेतली होती. बाकी, अनकन्फर्म तिकीटावर स्लीपर किंवा एसीतून प्रवास करण्यापेक्षा सेकंडक्लासमध्ये फाईट मारलेली परवडते, हा अनुभव आहे बरेचदा.. ;-)

बरखा 28/03/2014 - 17:48
खुप छान लिहलयत. "सुक्या मासळीचा विशिष्ट वास यायला लागला. अनेकांना हा वास अजिबात आवडत नाही. पण माझ्यासाठी मात्र हा वास माझ्या ओळखीच्या शहराची खूण आहे." तसं कोकण माझ मुळ गाव नाही. पण कोकणात जायच म्हणल की मी लगेच तयार होते. मी शाकाहारी असल्याने मासळीचा विशिष्ट वासाच्या जागी मला ऊकडीच्या मोदकाची स्वप्न पडायला लागतात. कोकण्यातल्या ऊकडीच्या मोदकाची सर बाकी कुठ्ल्याही मोदकाला नाही.

धन्या 28/03/2014 - 18:39
मस्त. आवडलं. आम्ही आठवीला असताना संस्कृतच्या तासाला मास्तरीण बाई आमच्याकडून रामरक्षा घोकून घ्यायच्या. अर्थ समजावण्याच्या भानगडीत त्या कधीच पडल्या नाहीत. रामरक्षा का घोकून घ्यायच्या तेही कधी कळलं नाही. आम्ही मात्र बेंबीच्या देठापासून "आत्तसज्ज धनुष्या विशुस्पुशा वक्षया शुगनसंगीनौ" म्हणून ओरडायचो.

विकास 28/03/2014 - 18:50
एकदम आवडले आणि भावले! मला वाटते ८० च्या दशकात शाळा-कॉलेज केलेल्या पिढीपर्यंतच्या (ज्यात मी देखील येतो) व्यक्तींनी अनेक बदल झपाट्याने पाहीले आहेत. त्यामुळे जेंव्हा परत परत असे लहानपणच्या घरापाशी मनाने जाणे होते तेंव्हा अशीच कुठेतरी अस्वस्थता येते.

बॅटमॅन 28/03/2014 - 19:03
चित्रदर्शी वर्णन आवडले. लहानपणी हरिप्रिया एक्स्प्रेसने केलेल्या अनेक मिरज-धारवाड प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या. बहुत धन्यवाद!

पैसा 28/03/2014 - 20:27
सुहास झेले, अनुप ढेरे, मुवि, नंदन, मृत्युंजय, प्रमोद देर्देकर, पिरा, विटेकर, गणपा, सखी, मूकवाचक, कंजूस, शैलेन्द्र, यशोधरा, भाते, अजया, यसवायजी, सूड, स्नेहांकिता, विशाखा राऊत, पिशी अबोली, बजरबट्टू, संजय क्षीरसागर सर, आयुर्हित, आदूबाळ, चिगो, पल्लवी कुलकर्णी, जेपी, रेवती, धन्या, विकास, बॆटमॆन, जोशी ले, मेघनाद, किसना, मधुरा सर्वांना मनापासून धन्यवाद! विटेकर, कंजूस, बजरबट्टू, चिगो, पल्लवी, विकास, प्रतिसाद आवडले. जोशी ले, 'केमो' चा उलगडा जरा वेळाने झाला! शब्दप्रयोग लै आवडला आहे! मेघनाद, हा छोटासा प्रवास मुंबई एक्सप्रेसने मडगावहून रत्नागिरीपर्यंतचा! सर्व वाचक आणि प्रतिसादकांना पुन्हा एकदा धन्यवाद!

भारतीय रेल्वे प्रवास हा व्यक्ती आणि वल्ली निरीक्षण करण्यासाठी उत्कृष्ट जागा आहे. पक्षी व प्राणी पाहण्यासाठी जसे अभयारण्यात जावे लागते. तसे मानवी स्वभावाचे वेगवेगळे नमुने आपल्या समाजातील विविध स्वतारातील , धर्माची जातीची , वयोगटातील माणसे निरीक्षण रेल्वेच्या डब्यात होते. तुमच्या लेखनाच्या शैलीला तुमच्या बारीक निरीक्षणाची जोड मिळाल्याने आम्ही सुद्धा तुमच्यासारखा हा प्रवास अनुभवला. फार पूर्वी यात्रा ह्या मालिकेतून आपल्या भारतचे दर्शन घडविणाऱ्या शाम बेनेगल व ओम पुरी ची ची आठवण आली.

उपास 28/03/2014 - 23:53
नॉस्टेल्जिक वाटलंच, रेवदंड्याला आईच्या आजोळी आम्ही भावंड जमत असू तेव्हाचं चित्र आलं डोळ्यासमोर, लंपनच्या भाषेत सांगायचं तर तंतोतंत! रामरक्षा, अथर्वशीर्श अगदी हुबेहुब.. रेल्वेच्या प्रवासाची मज्जाच और.. अगदी मुंबईतला रोजचा प्रवास करायचो ते दिवस आठवले.. फक्त प्रवासातले असे मित्र/ कंपू होते ते विश्वच वेगळं! खूप छान मांडलय लेखात.. आवडलंच!

धमाल मुलगा 29/03/2014 - 00:37
बढिया एकदम! सर्वप्रथम, पैसाताईला 'आपण खूप छान लिहू शकतो' हे आठवलं त्याबद्दल तिचे अभिनंदन. :) मुक्तक एकदम छान उतरलं आहे. बाकी, रेल्वेप्रवास असा एंजॉय करणार्‍यांचा फार हेवा वाटतो. दहा एक वर्षांखाली गवाल्यार ते पुणे असा शेवटचा छळवादी रेल्वेप्रवास केल्यापासून रेल्वेत बसायच्या कल्पनेनंच कसंतरी व्हायला लागतं. हवं तर चोवीसतास बाईक चालवतो पण रेल्वे नको असं झालं. त्यापुर्वी आवडायचं, पण त्या प्रवासानं मात्र आवडच मारली. पण आज मात्र तुझ्या लेखामुळं कोकणरेल्वेची ही छोटेखानी सफर मस्त एंजॉय करता आली. :)

स्पंदना 29/03/2014 - 03:04
कालच मुलाला अंगणात बोलावुन तारका दाखवायचा प्रयत्न केला. पण टीव्हीवर त्याच काहीतरी सुरु होतं. मस्त गो पै तै. किती दिवसांनी वाचत असताना आठवणी झरझर पुढुन येउन मागे पडत चालल्याचा भास झाला. रेडीओच्या आठवणीने तर चक्क हळव केलं. मी सुद्धा रेडीओ आमच्या अंगणातल्या फळीच्या कॉटवर उपडं पडुन ऐकायचे. "वाटसरु" हे तेंव्हाचे भयानक नाटक मी असच अंगणात पडुन ऐकल अन शेवटी घाबरुन आत चुलीजवळ येउन बसले.

पैसा 29/03/2014 - 08:55
नगरीनिरंजन, निनाद, आतिवास, उपास, धम्या, पिडां, अपर्णा, डॉ अहिरराव मनापासून धन्यवाद! निनाद आणि उपास, प्रतिसाद आवडले! धम्या, रेल्वे आवडून घे परत! मज्जा येते! अपर्णा, खरं आहे. आजकाल कोणाला असल्या गोष्टींसाठी वेळ राहिलेला नाही. मुलांना कॉम्प्युटर टीव्हीसमोरून उठवणं भयंकर कठीण जातं. त्यांना मोठे झाल्यावर आपल्याबद्दल काय आठवणी राहतील देवजाणे. आपण लहान असताना हे प्रकार नसल्याने इतर गोष्टी आहेत हे समजत होतं! पिडां, तुम्हाला "पेढा" चा अर्थ माहिती असणारच! पण अजाण बॅट्यासाठी परत सांगते! तोही लै जुना वाक्प्रचार मला बरेच दिवसांनी आठवला. साधारण गव्हाळ गोर्‍या, गोलसर (अंगावर फॅट आहे हे लक्षात येणारी) अंगलट, बेताची उंची आणि गोड चेहरा असणार्‍या व्यक्तीविशेषांना तेव्हा पेढा ही संज्ञा असायची!

श्रिया 29/03/2014 - 11:59
प्रवासवर्णन भावले, हे वाचताना माझ्याही रेल्वेप्रवासाच्या काही आठवणी जाग्या झाल्या.

इशा१२३ 29/03/2014 - 15:14
किती छान लिहीलय....अनेक प्रवास आठवले या लेखामुळे.कोकण रल्वेने मात्र अजून प्रवास नाही करायला मिळाला..निसर्ग बघण्यासाठी तरी कोकणात रेल्वेने जायचय.

पै सर्वप्रथम अभिनंदन...! निवडणुका आणि आपापल्या समर्थकांचे वैचारिक दावे प्रतिदाव्यातून आम्हा वाचकांना जरा उसंत दिली. थ्यांक्स....! :) पै प्रवास आवडला. लेखनशैली सुरेख. आपल्याबरोबर आमचाही प्रवास छान सुरु होता. ''समोरच्या सीटवर एक टिपिकल मंगलोरी 'पेढा' आणि त्याची नवथर बायको बसले होते'' इथे फिस्सकन हसु आलं. आणि रेल्वेचा चलचित्र प्रवास आपल्याबरोबर आमचाही सुरु झाला. पूर्ण प्रवास रंगला मजा आली. आनंद वाटला. ब-याच दिवसानंतर एकेक ओळ वाचतांना मजा आली. मन लावून वाचावं वाटलं. पै, मार्क द्यावे वाटले ते...''मन सहजच काही शे मैल आणि साडेतीन दशकांचा प्रवास करून रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात पोचलं...येथून पुढे जे वर्णन केलं ना ते केवळ सुरेख. कोकणात आम्हीही जाऊन आलो. आमचा आजचा प्रवास इथेच संपत होता, पण गाडी मात्र अशीच धावत पुढे जाणार होती....इथे आम्हीही उतरलो. निरोप द्यायचा म्हटलं की जड होतं तसं. आतून काही तरी हलतंय असा सुरेख शेवट...दमदार लेखनीचा प्रवास दोन बोटांमधून सुटणा-या रांगोळीसारखा सुंदर प्रवास. (अजून खूप कौतुक करावं वाटतंय पण आवरतो.) लिहित राहा हो...!!! -दिलीप बिरुटे

@मन सहजच काही शे मैल आणि साडेतीन दशकांचा प्रवास करून रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात पोचलं. एका साध्यासुध्या बैठ्या घराच्या अंगणात. चोपून तयार केलेलं लख्ख अंगण. त्याच्या कडेने लावलेले चिरे, आणि त्या चिर्‍यांच्या पलिकडे ओळीत लावलेली अनेक फुलझाडं आणि शोभेची झाडं. तगर, कण्हेरी, बिट्टी, कुंद, मोगरा, नेवाळी, लिली, गावठी गुलाब, वेलगुलाब, अगस्ती नाना प्रकार. त्या लहान झाडांच्या पुढे पाण्याची दगडी पन्हळ, पाण्याने भरलेली दोण, आणि माड, आंब्याची कलमं, चिकू, रामफळ, कोकम अशी मोठी झाडं. या माडांच्या मुळात सतत पाणी शिंपल्यामुळे ओलसर मऊ माती असायची आणि बाजूला दुर्वा. पलिकडे एक लहानसं शेत आणि त्याही पलिकडे बांबूचं बेट. घराच्या मागच्या बाजूलाही प्राजक्ताची श्रीमंती उधळत असायची. अंगणाच्या छोट्या भागात पत्र्याचा मांडव घातला होता. पण आमचा वावर बराचसा मोकळ्या आकाशाखालीच असायचा. तिन्हीसांजा वडील अंगणात फेर्‍या मारत रामरक्षा म्हणायचे. कधी पडवीतल्या झोपाळ्यावर बसून रामरक्षा, अथर्वशीर्ष म्हणायचे. आई पण काम करता करता असं काही म्हणायची. त्यांच्यामागून फिरताना आम्हालाही ती पाठ होऊन गेली होती. आजही झोप आली नाही की रामरक्षा म्हणते. लगेच निद्रादेवीच्या अंगणात पोचायला होतं. रात्री नीरव शांततेत माड झावळ्या हलवत उभे असायचे. सगळी फुलझाडं पाणी पिऊन प्रसन्न झालेली असायची. जेवणं झाली की कधी मर्फीचा रेडिओ पण आम्हाला सोबत करायला त्या अंगणात येऊन गाणी गायचा. रात्रीच्या वेळी लता, रफी, तलत, अरुण दाते सगळ्यांचेच आवाज जादुई भासायचे. >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-195.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/clapping-smiley-emoticon.gif http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-195.gif

इरसाल 29/03/2014 - 17:31
आमी बी नॉस्टॅलजिक झालो. दिल्लीसाठी केलेला वेगवेगळ्या ऋतुतला १० वर्षांचा प्रवास डोळ्यासमोर तरळुन गेला.

रम्य आहे आवडला. प्रवासातून कसे मस्त अलगद साडेतीन दशकांचा प्रवास करून मागे नेलेत. मी पाच दशके मागे गेलो. रेडीओ तर मी अजूनही ऐकतो. मुंबई सोडल्यापासून मात्र मुंबई आकाशवाणीची साथ तुटली. माझ्याही बालपणींच्या आजोळच्या हळव्याआठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.

पैसा 29/03/2014 - 21:22
इस्पीकचा एक्का, भिकापाटील, श्रिया, आत्मशून्य, इशा१२३, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, श्रुती कुलकर्णी, लीमाऊजेट, त्रिवेनि, अत्रुप्त आत्मा, इरसाल, सुधीर कांदळकर, इन्दुसुता, माहितगार, अनन्न्या, वल्ली, मनापासून धन्यवाद! इशा१२३, केवळ निसर्ग पाहण्यासाठी कोंकण रेल्वेने जरूर जा. सुधीर कांदळकर, आठवणी आवडल्या. प्रा.डॉ.बिरुटे सर, _/\_ तुम्हीही लिहीत जा हो!

राही 30/03/2014 - 19:18
सध्याच्या तप्त वातावरणात हा लेख वाचल्यावर ऐन वैशाखात वाळ्याचे पाणी अंगावर शिंपडावे तसे थंडगार वाटले. रेल प्रवास माझाही अत्यंत आवडता. पण उत्तर भारत सोडून. दक्षिण भारतात रसम-सांबाराचा वास सतत सोबत करतो तेव्हढे सोडले तर बाकी प्रवास छान होतो. काही ठिकाणचे विशिष्ट वास अगदी लक्षात रहातात. नासिक रोड नंतरचा (बहुधा लासलगाव) कुजकट दुर्गंध झोपेतून हमखास जाग आणतो. एकदा जम्मू-दिल्ली प्रवासात चादरी-उश्या अस्वच्छ मिळाल्या म्हणून त्या देणार्‍याकडे तक्रार केली तर त्याने रेल-वे च्या कपडेधुलाईचा पार इतिहासभूगोल सांगितला. चादरी गोळा करून कुठे पाठवल्या जातात, कोणत्या धुलाईकंपनीचा वशिला कुठे असतो, 'लालूसाब' कसे अचानक भेट देऊन लिनन तपासत असत वगैरे. आम्हांला जबरदस्त झोप येत होती त्यामुळे 'स्वच्छ चादरी नकोत पण लेक्चर आवर' असे झाले. खिडकीतून पहाताना दृश्ये भराभर सरकत जावी त्याप्रमाणे अनेक प्रसंगांचे धावते पण नेमके वर्णन वाचताना खरोखर रेलवे प्रवास करीत आहोत असे वाटले. प्रतिसादातला 'केमोथेरपी' शब्दसुद्धा जबरदस्त. क्षणभर कळलेच नाही.

स्पा 30/03/2014 - 22:33
मिपावर सद्ध्या येत असलेल्या एक से एक भंगार आणि भिकार राजकरणावरील लेखात पॆ ताइचं हे ललित वेगळाच आनंद देउन गेलं. लिहित जा ग नेहमी.

मस्तच, कोकण नाही पण कोकणकन्या फिरवून आणलीत, असे कैक प्रवास आठवले. आम्ही कणकवलीचेच :) सुक्या मासळीचा वास माझ्याही खास आवडीचा, छानशी तरतरी येते त्याने मला, त्यातही समुद्राच्या खार्‍या वार्‍यात मिसळून आला तर क्या बात !

सुबोध खरे 31/03/2014 - 14:08
त्यातून २३ वर्षे लष्करी सेवेत गेल्याने रेल्वेच्या उभ्या आडव्या जाळ्यातून भारत भर प्रवास केला आहे. मुळात गोव्यात पाच वर्षे पोस्टिंग असल्यामुळे कोकण रेल्वे चे प्रत्येक स्टेशन उतरून पाहिलेले आहे. मांडवी, कोकणकन्या आणि जनशताब्दी च्या अनारक्षित ते वातानुकुलीत १ ल्या दर्जाच्या सर्व डब्यातून प्रवास केलेला आहे. शिवाय रेल्वेच्या YP(मीटर गेज कोळसा इंजिन) YDM ४(मीटर गेज), WDM २ WDM ३A, WDP ४ या डीझेल आणि WCM २, WCG २, WCAM ३, WAM ४, WAP ५ अशा इंजिनातून सुद्धा प्रवास केला आहे.(IRFCA http://www.irfca.org/ हि साईट पहा) यात सर्वात आनंदाचा प्रवास कैसल रॉक ते मडगाव हा मीटर गेज चा प्रवास गोमंतक एक्सप्रेस च्या YDM ४ इंजिनातूनहि केला आहे. आपल्या लेखामुळे पुनः प्रत्ययाचा आनंद मिळाला.आणि मडगाव ते रत्नागिरी हा प्रवास तर डोळ्याचे पारणे फेडणारे निसर्गाचे दर्शन घडवतो. कोकण कन्या एक्स्प्रेस ने हाच प्रवास पावसाळ्याच्या नंतर सप्टेंबर मध्ये दुसर्या वर्गाच्या दारात बसून करून पहा.(रत्नागिरी सकाळी सहा ते मडगाव पावणे अकरा) स्वित्झर्लंड च्या तोंडात मारेल असे रम्य देखावे दिसतील. बाकी लेख सुंदरच आहे.

पैसा 03/04/2014 - 13:06
प्रशांत आवले, पाभे, मदनबण, स्पा, राही, तुमचा अभिषेक, डो. सुबोध खरे, सुहास.. आणि सानिका, मनापासून धन्यवाद! डॉ. खरे, प्रतिसाद आवडला. राही, प्रतिसाद आवडला. रेल्वेच्या वासांचं एक वेगळंच जग आहे!

नाखु 03/04/2014 - 16:12
प्रवास सगळेच करतात पन " प्रवास अनुभवणं आणि नेमक्या शब्दात मांडण अगदी अचूक" पुन्हा पुन्हा लज्जत घेत वाचावा असा लेख.
लेखनविषय:
बरेच दिवसांनी नवर्‍याबरोबर रेल्वेने एका छोट्या प्रवासाला निघाले होते. आदल्या दिवशीच पुण्याहून बसने परत आले होते आणि तत्कालमधे रिझर्व्हेशन करायलाही जमलं नव्हतं. तीन साडेतीन तासांचा प्रवास आहे, जाऊ जनरलमधे बसून म्हटलं आणि निघालो. स्टेशनवर पोचलो तर गाडी अर्धा तास लेट असल्याचं शुभवर्तमान कळलं. मग तिकीट काढून जनरलचा डबा समोर येईल अशा बेताने प्लॆटफॉर्मवरच पेपर टाकून मस्त बैठक मारली. रूळ क्रॉस करणार्‍या बर्‍याच मंडळीचं निरीक्षण करून झालं. एक पाणचट चहा पिऊन झाला. शेवट अर्धा तास उशीरा येणारी गाडी एक तास उशीरा येऊन प्लॆटफॉर्मला लागली.

लोकशाहीचा सांगावा

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
लोकशाहीचा सांगावा

आली भूमाता घेऊन । लोकशाहीचा सांगावा ।
पाचावर्षाच्या बोलीन । गडी-चाकर नेमावा ॥

लोकप्रतिनिधी नको । म्हणा लोकांचे नोकर ।
जनतेच्या मतावर । यांची शिजते भाकर ॥

होऊ नका लोभापायी । कोण्या पालखीचे भोई ।
करा फक्त तेच ज्याने । सुखावेल काळीआई ॥

धन-द्रव्य घेतल्याने । होते कर्तृत्व गहाण ।
नको स्वत्वाचा व्यापार । राखा आत्म्याचा सन्मान ॥

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - १

स्पार्टाकस ·

चिगो 31/03/2014 - 12:17
के२ बद्दल एवढं डिट्टेलवार पहिल्यांदाच वाचतोय.. माझ्या माहितीप्रमाणे के२ हे एव्हरेस्टपेक्षा कमी उंचीचे शिखर असले, तरी पर्वतारोहणासाठी जगातील सगळ्यात कठीण शिखर मानले जाते.. दमदार उत्कंठावर्धक लेख आणि लेखन.. पु.ले.शु.

पैसा 31/03/2014 - 23:18
के२ सर्वात कठीण आणि धोकादायक शिखर असल्याचं वाचलं होतं. पण इतके अयशस्वी प्रयत्न आणि एवढे मृत्यू झाले होते हे माहित नव्हतं. तुमचं लिखाण थरारक आहेच! सुपर्ब!

चिगो 31/03/2014 - 12:17
के२ बद्दल एवढं डिट्टेलवार पहिल्यांदाच वाचतोय.. माझ्या माहितीप्रमाणे के२ हे एव्हरेस्टपेक्षा कमी उंचीचे शिखर असले, तरी पर्वतारोहणासाठी जगातील सगळ्यात कठीण शिखर मानले जाते.. दमदार उत्कंठावर्धक लेख आणि लेखन.. पु.ले.शु.

पैसा 31/03/2014 - 23:18
के२ सर्वात कठीण आणि धोकादायक शिखर असल्याचं वाचलं होतं. पण इतके अयशस्वी प्रयत्न आणि एवढे मृत्यू झाले होते हे माहित नव्हतं. तुमचं लिखाण थरारक आहेच! सुपर्ब!
भारताच्या उत्तरेला हिमालयाच्याच तोडीची पण कमी लांबीची एक पर्वतरांग पसरलेली आहे. काराकोरम ! काराकोरम पर्वतरांग सुमारे ५०० किमी पसरलेली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टीस्तान, भारतातील लडाख आणि चीनच्या झिअ‍ॅन्ग्जँग प्रांतात पसरलेल्या या पर्वतश्रेणीत जगातील काही सर्वोच्च शिखरांचा समावेश होतो. काराकोरमचा सुमारे २८ ते ५०% भाग ग्लेशीयर्सने भरलेला आहे. हिमालय (८-१२%) आणि आल्प्स (२-३%) च्या तुलनेत हे प्रमाण खूपच जास्त आहे. धृवीय प्रदेशांचा अपवाद वगळता जगातील सर्वात मोठी ग्लेशीयर्स इथे पसरलेली आहेत.

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : ११ : वृक्षसम्राटांच्या विळख्यातील ता प्रोम

डॉ सुहास म्हात्रे ·

सल्ला.............म! काय ते एकेक वृक्ष! जमिनीसह सगळ्या प्रदेशावर कब्जाच केलाय जणू.अफाट..महाकाय..म्हणण्यापेक्षा या वृक्षांना सम्राटवृक्षच म्हणावसं वाटतय.

स्पंदना 28/03/2014 - 04:34
खर सांगु का एक्का साहेब? अस पहात रहावस वाटत नुसत. इतक खुज वाटत या सगळ्या फोटोंपुढे की शेवटी प्रतिसाद लिहायला काही उमटतच नाही मनातुन. तुम्ही फिरत रहा. लिहीत रहा. पण येथे प्रतिसाद नसला तरी अपर्णाने धागा वाचलाय हे नक्की.

विलासराव, अत्रुप्त आत्मा, सुहास झेले, aparna akshay, जेपी आणि खटपट्या : अनेक धन्यवाद ! तुम्हा सर्वांच्या सहभागाने सफर अधिक आनंददाई होत आहे.

प्रचेतस 29/03/2014 - 21:22
वृक्षराजींनी कवेत घेतलेलं मंदिर अतिशय आवडलं. निसर्गाची किमया अद्भूत आहे. जरी हे मंदिर वृक्षविळख्यांमुळे अतिशय अद्भूत दिसत असलं तरी तरी यापासून मंदिराला हानी निर्माण होऊ नये म्हणून नेमकी कशा प्रकारची उपाययोजना केली आहे? कृत्रिम उपायांनी पारंब्यांची वाढ आता थांबवली आहे का?

In reply to by प्रचेतस

हे वृक्ष आता इतक्या प्रचंड आकाराचे झालेले आहेत की तेच जास्त प्रवासी खेचतात... सुंदर मंदिरे काय अंगकोर मध्ये पेशाला पासरी आहेत. त्यामुळे ता प्रोममध्ये पुरातत्व खाते प्रथम झाडांची काळजी घेते आणि मग त्याअनुषंगाने मंदिर कसे जास्तित जास्त सुरक्षीत राहील असे बघते !

पैसा 29/03/2014 - 21:43
वल्लीने लिहिलंय तेच मनात आलं. एवढी मोठमोठी झाडे वाढून इमारतींना आणखी हानी होऊ नये म्हणून काहीतरी केलंच असणार! तिथली नक्षी कापडावर प्रिंट करावी अशी अगदी बारीक कुसरीची आहे! भारीच!

In reply to by पैसा

तिथली नक्षी कापडावर प्रिंट करावी अशी अगदी बारीक कुसरीची आहे! भारीच! नक्कीच ! मुख्य म्हणजे इतके प्रकार की सहसा चोप्य पस्ते दिसून येत नाही !

सल्ला.............म! काय ते एकेक वृक्ष! जमिनीसह सगळ्या प्रदेशावर कब्जाच केलाय जणू.अफाट..महाकाय..म्हणण्यापेक्षा या वृक्षांना सम्राटवृक्षच म्हणावसं वाटतय.

स्पंदना 28/03/2014 - 04:34
खर सांगु का एक्का साहेब? अस पहात रहावस वाटत नुसत. इतक खुज वाटत या सगळ्या फोटोंपुढे की शेवटी प्रतिसाद लिहायला काही उमटतच नाही मनातुन. तुम्ही फिरत रहा. लिहीत रहा. पण येथे प्रतिसाद नसला तरी अपर्णाने धागा वाचलाय हे नक्की.

विलासराव, अत्रुप्त आत्मा, सुहास झेले, aparna akshay, जेपी आणि खटपट्या : अनेक धन्यवाद ! तुम्हा सर्वांच्या सहभागाने सफर अधिक आनंददाई होत आहे.

प्रचेतस 29/03/2014 - 21:22
वृक्षराजींनी कवेत घेतलेलं मंदिर अतिशय आवडलं. निसर्गाची किमया अद्भूत आहे. जरी हे मंदिर वृक्षविळख्यांमुळे अतिशय अद्भूत दिसत असलं तरी तरी यापासून मंदिराला हानी निर्माण होऊ नये म्हणून नेमकी कशा प्रकारची उपाययोजना केली आहे? कृत्रिम उपायांनी पारंब्यांची वाढ आता थांबवली आहे का?

In reply to by प्रचेतस

हे वृक्ष आता इतक्या प्रचंड आकाराचे झालेले आहेत की तेच जास्त प्रवासी खेचतात... सुंदर मंदिरे काय अंगकोर मध्ये पेशाला पासरी आहेत. त्यामुळे ता प्रोममध्ये पुरातत्व खाते प्रथम झाडांची काळजी घेते आणि मग त्याअनुषंगाने मंदिर कसे जास्तित जास्त सुरक्षीत राहील असे बघते !

पैसा 29/03/2014 - 21:43
वल्लीने लिहिलंय तेच मनात आलं. एवढी मोठमोठी झाडे वाढून इमारतींना आणखी हानी होऊ नये म्हणून काहीतरी केलंच असणार! तिथली नक्षी कापडावर प्रिंट करावी अशी अगदी बारीक कुसरीची आहे! भारीच!

In reply to by पैसा

तिथली नक्षी कापडावर प्रिंट करावी अशी अगदी बारीक कुसरीची आहे! भारीच! नक्कीच ! मुख्य म्हणजे इतके प्रकार की सहसा चोप्य पस्ते दिसून येत नाही !
================================================================== जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६...

त्रिशंकु संसदेची शक्यता; प्रणव मुखर्जी: २०१४ ते २०१७ , येती ३ वर्षे भारतीय राजकीय सरकस सांभाळण्याची घटनात्मक आव्हाने

माहितगार ·
जुलै २०१२ मध्ये राष्ट्रपती पदावर आरूढ झालेले प्रणव मुखर्जी साधारणतः जुलै २०१७ पर्यंततरी राष्ट्रपतीपदावर राहतील. एकदा का स्पष्ट बहुमत उभारून सरकार स्थापन झालेकी भारताच्या राष्ट्रपतींना राजकीय काम फारसे राहत नाही. पण तेच त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली तर राष्ट्रपतींची घटनात्मक निर्णय घेताना सत्वपरीक्षेची वेळ असते. राज्य विधानसभेत त्रिशंकु राजकीय परिस्थिती निर्माण झाली आणि प्रश्न घोडेबाजारकरूनही मिटलाच नाहीतर तर राष्ट्रपती राजवटीचा मार्ग खुला आहे. पण लोकसभेच्या बाबतीत तसे नाही.

क्लिंटन 27/03/2014 - 15:17

ऋषिकेश 27/03/2014 - 15:52
राहुल, मोदी, आणि केजरीवाल तीघांकडेह बहुमत नसेल तर पंतप्रधानपदाचे पहीले आमंत्रण राष्ट्रपतींनी कुणाला द्यावे असे तुम्हाला वाटते ?
सर्वाधिक बहुमत असलेल्या राजकीय "आघाडीच्या " नेत्याला राष्ट्रपतींनी निमंत्रण द्यावे असे वाटते. बाकी या पेचांवर क्लिंटन यांनी बरेच उत्तम लेखन ऑलरेडी केलेले आहे. (क्लिंटन त्याचे दुवे देतील का?)

In reply to by ऋषिकेश

माहितगार 28/03/2014 - 09:36
क्लिंटन यांचे सर्व लेख आवडले. दुव्यां करीता धन्यवाद. त्यांनी म्हटल्या प्रमाणे नारायणन यांचा मार्ग चांगला असला तरीही पुरेसा वाटत नाही त्यातही पेचाच्या जागा आहेतच जसे की काही खासदार कुणालाच समर्थनाचे पत्र देणार नाहीत स्थिती त्रिशंकुच राहील अशा स्थितीत मावळत्या पंतप्रधानास किती दिवस ताटकळत ठेवणार का मावळत्या पंतप्रधानास ठेऊन नव्या लोकसभेचे अधिवेशन घेणार. क्लिंटन यांना एक शंका विचारायची होती, संसद चालवण्याच्या खर्चाचा भाग बाजूला ठेवला आणि कुणालाच बहुमत नसलेल्या स्थितीतील संसद हंगामी सरकार सोबत कंटीन्यूअस सेशन मध्ये ठेऊन रोजच्या रोज विधेयके पारीत करून घेत राहील; असे तांत्रीक दृष्ट्या शक्य आहे का ? त्यात काय अडचणी येऊ शकतील लोकपालाच्या मंत्र्यांवरील कारवाईमुळे राष्ट्रपतींपुढे काही पेच निर्माण होऊ शकतात का ? एकुण राष्ट्रपतीच्या स्वतः डिप्लोमॅटीक आणि राजकीय कौशल्यांचा कस लागतो त्या शिवाय त्यांच्या सदसद विवेकबुद्धीवर बरेच काही अवलंबून आहे. आता बघुया यावेळी काय होते ते.

In reply to by माहितगार

क्लिंटन 28/03/2014 - 18:51
अशा स्थितीत मावळत्या पंतप्रधानास किती दिवस ताटकळत ठेवणार का मावळत्या पंतप्रधानास ठेऊन नव्या लोकसभेचे अधिवेशन घेणार.
३१ मे पूर्वी नवे सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. पंधराव्या लोकसभेचा कार्यकाळ त्या दिवशी संपणार आहे. फार तर मनमोहनसिंगांना तोपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून राहता येईल.तोपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास मात्र घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होईल. १९९० मध्ये आसामचे मुख्यमंत्री प्रफुलकुमार महंत यांनी, १९९३ मध्ये त्रिपुराचे मुख्यमंत्री समीररंजन बर्मन आणि १९९५ मध्ये बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी जुन्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्या दिवशी राजीनामा दिला होता (त्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया तोपर्यंत पूर्ण झाली नव्हती). राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लावायचा पर्याय असतो त्यामुळे राज्यात अशी परिस्थिती आली तर फार कटकट नाही.पण केंद्रात मात्र सरकारची स्थापना त्यापूर्वी व्हायला हवी हे नक्की.
संसद चालवण्याच्या खर्चाचा भाग बाजूला ठेवला...
संसद चालवायला लागणारा खर्च हा एकूण सरकारच्या खर्चाच्या ०.१% सुध्दा नाही.त्यामुळे तो नक्कीच बाजूला ठेवत आहे :)
कुणालाच बहुमत नसलेल्या स्थितीतील संसद हंगामी सरकार सोबत कंटीन्यूअस सेशन मध्ये ठेऊन रोजच्या रोज विधेयके पारीत करून घेत राहील; असे तांत्रीक दृष्ट्या शक्य आहे का ?
एक तर हंगामी सरकार असे राज्यघटनेप्रमाणे काही नाहीच. दुसरे म्हणजे कोणतेही सरकार सत्तेत असेल तर ते अल्पमतात असले तरी लोकसभेत पराभव होत नाही तोपर्यंत सत्तेत राहू शकते. राज्यघटनेप्रमाणे सरकारचा पराभव तीन प्रकारे करता येऊ शकतो-- १. लोकसभेने सरकारविरूध्द अविश्वासाचा ठराव पास केला तर २. लोकसभेने अर्थ विधेयक फेटाळले तर ३. लोकसभेने राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव फेटाळला तर यापैकी काही होत नाही तोपर्यंत सरकार सत्तेत राहू शकते. विश्वासदर्शक ठराव हा राज्यघटनेत नसलेला प्रकार आहे. नव्या सरकारला १५ दिवसात (किंवा काही मुदतीत) लोकसभेत बहुमत सिध्द करा असे राष्ट्रपती सांगायची शक्यता बरीच जास्त आहे. या ठरावावर पराभव झाला नाही तरी सरकार सत्तेत राहू शकते. नरसिंह रावांचे सरकार जून १९९१ ते डिसेंबर १९९३ या काळात अल्पमतात होते. (त्यांच्या सरकारला विश्वासदर्शक ठरावावर २४७ मते मिळाली होती तर विरोधात ११९. केवळ भाजपने ठरावाच्या विरोधात मतदान केले होते.राष्ट्रीय आघाडी आणि डावे पक्ष यांनी मतदानात भाग घेतला नाही म्हणून सरकारचा पराभव टळला. नाहीतर नरसिंह रावांचे सरकारही तेरा दिवसात पडले असते). तेव्हा सरकारचा पराभव होत नाही तोपर्यंत अर्थसंकल्प, इतर विधेयके आणि इतर सगळ्या गोष्टी सरकार प्रत्यक्षात अल्पमतात असले तरी चालू शकतात.
लोकपालाच्या मंत्र्यांवरील कारवाईमुळे राष्ट्रपतींपुढे काही पेच निर्माण होऊ शकतात का ?
हा प्रश्न कळला नाही.लोकपाल अजून नियुक्तही झालेला नाही.

In reply to by क्लिंटन

माहितगार 28/03/2014 - 20:00
प्रतिसादा बद्दल धन्यवाद. पारीत झालेला लोकपाल कायदा मी सुद्धा आधी वाचलेला नव्हता. आत्ताच वाचला त्यात कलम ३२ अनुसार पब्लीक सर्वंटची चौकशी चालू असताना संबंधीत व्यक्तीची बदली अथवा सस्पेंशनची केंद्र सरकारला विनंती करू शकतो जी सर्वसाधारणपणे केंद्रसरकारने स्वीकारावी असा संकेत दिला आहे ते बंधन नाही असे दिसते. माझा प्रश्न असा होता की "समजा" सरकार चालवण्यासाठी खासदारांची बेरीज करण्याकरता डिएमकेशी अथवा अबकड पक्षाशी जमवून घेण्यासाठी गरज आहे त्या करता राजांना/ डिएमके पुत्र कन्या अन्य कुणाला परत मंत्री करायचे आहे ज्यांच्यावर लोकपाल केस चालवत आहेत आणि लोकपालमात्र अशा व्यक्तीला पद खाली करण्याची मागणी करत आहेत अशा स्थितीत नेमके काय होऊ शकेल ?

In reply to by माहितगार

क्लिंटन 29/03/2014 - 13:49
मुळात लोकपाल या प्रकारातून सगळा भ्रष्टाचार संपेल वगैरे भ्रम मी तरी बाळगत नाही.त्यामुळे लोकपाल बिल संसदेत पास झाले त्यावेळी आणि नंतरही मी त्या प्रकारात फारसा इंटरेस्ट घेतलेला नव्हता. तरीही तुम्ही हे लिहिले आहे त्यावरून लिहितो.
आत्ताच वाचला त्यात कलम ३२ अनुसार पब्लीक सर्वंटची चौकशी चालू असताना संबंधीत व्यक्तीची बदली अथवा सस्पेंशनची केंद्र सरकारला विनंती करू शकतो जी सर्वसाधारणपणे केंद्रसरकारने स्वीकारावी असा संकेत दिला आहे ते बंधन नाही असे दिसते.
पब्लिक सर्वंट म्हणजे नक्की कोण? खासदार-मंत्री हे पब्लिक सर्वंट नाहीत. पब्लिक सर्वंट म्हणजे सरकारी नोकरीत असलेले (अगदी कॅबिनेट सेक्रेटरी पासून सगळ्यात लहान पातळीवरील सरकारी नोकरापर्यंत). चिगोराव, यात काही दुरूस्ती हवी असेल तर जरूर सुचवा. पब्लिक सर्वंट ना निवडणुक लढविता येत नाही. अर्थातच खासदार-मंत्री यांना हे बंधन नाही. त्यामुळे कलम ३२ मध्ये जे काही म्हटले आहे ते खासदारांना (आणि म्हणून मंत्र्यांना) लागू आहे असे वाटत नाही.
"समजा" सरकार चालवण्यासाठी खासदारांची बेरीज करण्याकरता डिएमकेशी अथवा अबकड पक्षाशी जमवून घेण्यासाठी गरज आहे त्या करता राजांना/ डिएमके पुत्र कन्या अन्य कुणाला परत मंत्री करायचे आहे ज्यांच्यावर लोकपाल केस चालवत आहेत आणि लोकपालमात्र अशा व्यक्तीला पद खाली करण्याची मागणी करत आहेत अशा स्थितीत नेमके काय होऊ शकेल ?
भ्रष्टाचाराच्या इतर कोणत्याही प्रकरणाप्रमाणे लोकपाल समजा एखाद्या प्रकरणी चौकशी करत आहेत. जर लोकपालाने त्या व्यक्तीला दोषी ठरविले तरी लोकपाल त्या व्यक्तीला पद (मंत्री/खासदार) खाली करायची मागणी करू शकेल असे वाटत नाही. लोकपाल नक्की कोणत्या पध्दतीची शिक्षा दोषी व्यक्तिस ठोठावू शकेल याची कल्पना नाही.पण समजा तुरूंगवासाची शिक्षा लोकपाल ठोठावू शकतो असे क्षणभर समजू. न्यायालयाने मध्यंतरी दिलेल्या निर्णयाप्रमाणे जर संबंधित व्यक्तीला २ पेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाली तर त्या व्यक्तीचे संसद सदस्यपद (आणि म्हणून मंत्रीपदही) रद्द होईल. पण समजा त्या व्यक्तीला २ पेक्षा कमी वर्षांची शिक्षा दिली तर त्या व्यक्तीने आपले खासदार/मंत्रीपद खाली करावे असे म्हणणे लोकपालाच्या कार्यक्षेत असेल असे वाटत नाही.

In reply to by क्लिंटन

चिगो 31/03/2014 - 16:46
चिगोराव, यात काही दुरूस्ती हवी असेल तर जरूर सुचवा.
माझ्यामाहितीते, तुम्ही "पब्लिक सर्व्हंट" बद्दल जे बोलताय, ते बरोबर आहे. जनरली, सगळेच "पब्लिक सर्व्हंट" हे कंडक्ट रुल्सनी बांधिल असतात. राजकारणी/नेते/मंत्री ह्यांच्याकरीत असले आहे रुल्स असतील, असे मला तरी वाटत नाही. तसेच मंत्र्यांची कसली आली बदली आणि सस्पेंशन? म्हणजे खातेबदल होतो, आणि सस्पेंशनपन होऊ शकते, पन ते विधानसभा/ राज्यसभा/ लोकसभा सदस्य म्हणून.. मी लोकपाल विधेयक डिट्टेलवार पाहिलेले नाहीय. पन मला वाटतंय, की लोकपाल हे "रेकमेंडरी" पद असेल. म्हणजे, आरोप झाल्यास लोकपाल चौकशी करेल आणि आपला निर्णय ऐकवेल, पण त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार त्यांना नसणार.. क्लिंटन, तुमच्या अभ्यासाला मानला हां..

विकास 28/03/2014 - 20:33
घटनात्मकदृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या काय होईल हे वरील माहितीपूर्ण चर्चेत आणि क्लिंटन यांच्या लेखांमधे आले आहेच. मला वाटते निवडणुकांनंतर त्रिशंकू अवस्था झाली तरी एनडीए अथवा युपिएचे सरकार येईल. फक्त ज्यांचे कुणाचे सरकार येईल त्यात किती जागा मिळाल्या आहेत त्यावर पंतप्रधानपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे बदलू शकेल. अर्थात ती माळ या वेळेस हत्तीच्या कडून घातली जांण्याची शक्यता कमी आहे. ;) तिसर्‍या आघाडीबद्दल साशंकता आहे. अर्थात हे सगळे "वाटते" सदरातील आहे.

क्लिंटन 27/03/2014 - 15:17

ऋषिकेश 27/03/2014 - 15:52
राहुल, मोदी, आणि केजरीवाल तीघांकडेह बहुमत नसेल तर पंतप्रधानपदाचे पहीले आमंत्रण राष्ट्रपतींनी कुणाला द्यावे असे तुम्हाला वाटते ?
सर्वाधिक बहुमत असलेल्या राजकीय "आघाडीच्या " नेत्याला राष्ट्रपतींनी निमंत्रण द्यावे असे वाटते. बाकी या पेचांवर क्लिंटन यांनी बरेच उत्तम लेखन ऑलरेडी केलेले आहे. (क्लिंटन त्याचे दुवे देतील का?)

In reply to by ऋषिकेश

माहितगार 28/03/2014 - 09:36
क्लिंटन यांचे सर्व लेख आवडले. दुव्यां करीता धन्यवाद. त्यांनी म्हटल्या प्रमाणे नारायणन यांचा मार्ग चांगला असला तरीही पुरेसा वाटत नाही त्यातही पेचाच्या जागा आहेतच जसे की काही खासदार कुणालाच समर्थनाचे पत्र देणार नाहीत स्थिती त्रिशंकुच राहील अशा स्थितीत मावळत्या पंतप्रधानास किती दिवस ताटकळत ठेवणार का मावळत्या पंतप्रधानास ठेऊन नव्या लोकसभेचे अधिवेशन घेणार. क्लिंटन यांना एक शंका विचारायची होती, संसद चालवण्याच्या खर्चाचा भाग बाजूला ठेवला आणि कुणालाच बहुमत नसलेल्या स्थितीतील संसद हंगामी सरकार सोबत कंटीन्यूअस सेशन मध्ये ठेऊन रोजच्या रोज विधेयके पारीत करून घेत राहील; असे तांत्रीक दृष्ट्या शक्य आहे का ? त्यात काय अडचणी येऊ शकतील लोकपालाच्या मंत्र्यांवरील कारवाईमुळे राष्ट्रपतींपुढे काही पेच निर्माण होऊ शकतात का ? एकुण राष्ट्रपतीच्या स्वतः डिप्लोमॅटीक आणि राजकीय कौशल्यांचा कस लागतो त्या शिवाय त्यांच्या सदसद विवेकबुद्धीवर बरेच काही अवलंबून आहे. आता बघुया यावेळी काय होते ते.

In reply to by माहितगार

क्लिंटन 28/03/2014 - 18:51
अशा स्थितीत मावळत्या पंतप्रधानास किती दिवस ताटकळत ठेवणार का मावळत्या पंतप्रधानास ठेऊन नव्या लोकसभेचे अधिवेशन घेणार.
३१ मे पूर्वी नवे सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. पंधराव्या लोकसभेचा कार्यकाळ त्या दिवशी संपणार आहे. फार तर मनमोहनसिंगांना तोपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून राहता येईल.तोपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास मात्र घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होईल. १९९० मध्ये आसामचे मुख्यमंत्री प्रफुलकुमार महंत यांनी, १९९३ मध्ये त्रिपुराचे मुख्यमंत्री समीररंजन बर्मन आणि १९९५ मध्ये बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी जुन्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्या दिवशी राजीनामा दिला होता (त्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया तोपर्यंत पूर्ण झाली नव्हती). राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लावायचा पर्याय असतो त्यामुळे राज्यात अशी परिस्थिती आली तर फार कटकट नाही.पण केंद्रात मात्र सरकारची स्थापना त्यापूर्वी व्हायला हवी हे नक्की.
संसद चालवण्याच्या खर्चाचा भाग बाजूला ठेवला...
संसद चालवायला लागणारा खर्च हा एकूण सरकारच्या खर्चाच्या ०.१% सुध्दा नाही.त्यामुळे तो नक्कीच बाजूला ठेवत आहे :)
कुणालाच बहुमत नसलेल्या स्थितीतील संसद हंगामी सरकार सोबत कंटीन्यूअस सेशन मध्ये ठेऊन रोजच्या रोज विधेयके पारीत करून घेत राहील; असे तांत्रीक दृष्ट्या शक्य आहे का ?
एक तर हंगामी सरकार असे राज्यघटनेप्रमाणे काही नाहीच. दुसरे म्हणजे कोणतेही सरकार सत्तेत असेल तर ते अल्पमतात असले तरी लोकसभेत पराभव होत नाही तोपर्यंत सत्तेत राहू शकते. राज्यघटनेप्रमाणे सरकारचा पराभव तीन प्रकारे करता येऊ शकतो-- १. लोकसभेने सरकारविरूध्द अविश्वासाचा ठराव पास केला तर २. लोकसभेने अर्थ विधेयक फेटाळले तर ३. लोकसभेने राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव फेटाळला तर यापैकी काही होत नाही तोपर्यंत सरकार सत्तेत राहू शकते. विश्वासदर्शक ठराव हा राज्यघटनेत नसलेला प्रकार आहे. नव्या सरकारला १५ दिवसात (किंवा काही मुदतीत) लोकसभेत बहुमत सिध्द करा असे राष्ट्रपती सांगायची शक्यता बरीच जास्त आहे. या ठरावावर पराभव झाला नाही तरी सरकार सत्तेत राहू शकते. नरसिंह रावांचे सरकार जून १९९१ ते डिसेंबर १९९३ या काळात अल्पमतात होते. (त्यांच्या सरकारला विश्वासदर्शक ठरावावर २४७ मते मिळाली होती तर विरोधात ११९. केवळ भाजपने ठरावाच्या विरोधात मतदान केले होते.राष्ट्रीय आघाडी आणि डावे पक्ष यांनी मतदानात भाग घेतला नाही म्हणून सरकारचा पराभव टळला. नाहीतर नरसिंह रावांचे सरकारही तेरा दिवसात पडले असते). तेव्हा सरकारचा पराभव होत नाही तोपर्यंत अर्थसंकल्प, इतर विधेयके आणि इतर सगळ्या गोष्टी सरकार प्रत्यक्षात अल्पमतात असले तरी चालू शकतात.
लोकपालाच्या मंत्र्यांवरील कारवाईमुळे राष्ट्रपतींपुढे काही पेच निर्माण होऊ शकतात का ?
हा प्रश्न कळला नाही.लोकपाल अजून नियुक्तही झालेला नाही.

In reply to by क्लिंटन

माहितगार 28/03/2014 - 20:00
प्रतिसादा बद्दल धन्यवाद. पारीत झालेला लोकपाल कायदा मी सुद्धा आधी वाचलेला नव्हता. आत्ताच वाचला त्यात कलम ३२ अनुसार पब्लीक सर्वंटची चौकशी चालू असताना संबंधीत व्यक्तीची बदली अथवा सस्पेंशनची केंद्र सरकारला विनंती करू शकतो जी सर्वसाधारणपणे केंद्रसरकारने स्वीकारावी असा संकेत दिला आहे ते बंधन नाही असे दिसते. माझा प्रश्न असा होता की "समजा" सरकार चालवण्यासाठी खासदारांची बेरीज करण्याकरता डिएमकेशी अथवा अबकड पक्षाशी जमवून घेण्यासाठी गरज आहे त्या करता राजांना/ डिएमके पुत्र कन्या अन्य कुणाला परत मंत्री करायचे आहे ज्यांच्यावर लोकपाल केस चालवत आहेत आणि लोकपालमात्र अशा व्यक्तीला पद खाली करण्याची मागणी करत आहेत अशा स्थितीत नेमके काय होऊ शकेल ?

In reply to by माहितगार

क्लिंटन 29/03/2014 - 13:49
मुळात लोकपाल या प्रकारातून सगळा भ्रष्टाचार संपेल वगैरे भ्रम मी तरी बाळगत नाही.त्यामुळे लोकपाल बिल संसदेत पास झाले त्यावेळी आणि नंतरही मी त्या प्रकारात फारसा इंटरेस्ट घेतलेला नव्हता. तरीही तुम्ही हे लिहिले आहे त्यावरून लिहितो.
आत्ताच वाचला त्यात कलम ३२ अनुसार पब्लीक सर्वंटची चौकशी चालू असताना संबंधीत व्यक्तीची बदली अथवा सस्पेंशनची केंद्र सरकारला विनंती करू शकतो जी सर्वसाधारणपणे केंद्रसरकारने स्वीकारावी असा संकेत दिला आहे ते बंधन नाही असे दिसते.
पब्लिक सर्वंट म्हणजे नक्की कोण? खासदार-मंत्री हे पब्लिक सर्वंट नाहीत. पब्लिक सर्वंट म्हणजे सरकारी नोकरीत असलेले (अगदी कॅबिनेट सेक्रेटरी पासून सगळ्यात लहान पातळीवरील सरकारी नोकरापर्यंत). चिगोराव, यात काही दुरूस्ती हवी असेल तर जरूर सुचवा. पब्लिक सर्वंट ना निवडणुक लढविता येत नाही. अर्थातच खासदार-मंत्री यांना हे बंधन नाही. त्यामुळे कलम ३२ मध्ये जे काही म्हटले आहे ते खासदारांना (आणि म्हणून मंत्र्यांना) लागू आहे असे वाटत नाही.
"समजा" सरकार चालवण्यासाठी खासदारांची बेरीज करण्याकरता डिएमकेशी अथवा अबकड पक्षाशी जमवून घेण्यासाठी गरज आहे त्या करता राजांना/ डिएमके पुत्र कन्या अन्य कुणाला परत मंत्री करायचे आहे ज्यांच्यावर लोकपाल केस चालवत आहेत आणि लोकपालमात्र अशा व्यक्तीला पद खाली करण्याची मागणी करत आहेत अशा स्थितीत नेमके काय होऊ शकेल ?
भ्रष्टाचाराच्या इतर कोणत्याही प्रकरणाप्रमाणे लोकपाल समजा एखाद्या प्रकरणी चौकशी करत आहेत. जर लोकपालाने त्या व्यक्तीला दोषी ठरविले तरी लोकपाल त्या व्यक्तीला पद (मंत्री/खासदार) खाली करायची मागणी करू शकेल असे वाटत नाही. लोकपाल नक्की कोणत्या पध्दतीची शिक्षा दोषी व्यक्तिस ठोठावू शकेल याची कल्पना नाही.पण समजा तुरूंगवासाची शिक्षा लोकपाल ठोठावू शकतो असे क्षणभर समजू. न्यायालयाने मध्यंतरी दिलेल्या निर्णयाप्रमाणे जर संबंधित व्यक्तीला २ पेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाली तर त्या व्यक्तीचे संसद सदस्यपद (आणि म्हणून मंत्रीपदही) रद्द होईल. पण समजा त्या व्यक्तीला २ पेक्षा कमी वर्षांची शिक्षा दिली तर त्या व्यक्तीने आपले खासदार/मंत्रीपद खाली करावे असे म्हणणे लोकपालाच्या कार्यक्षेत असेल असे वाटत नाही.

In reply to by क्लिंटन

चिगो 31/03/2014 - 16:46
चिगोराव, यात काही दुरूस्ती हवी असेल तर जरूर सुचवा.
माझ्यामाहितीते, तुम्ही "पब्लिक सर्व्हंट" बद्दल जे बोलताय, ते बरोबर आहे. जनरली, सगळेच "पब्लिक सर्व्हंट" हे कंडक्ट रुल्सनी बांधिल असतात. राजकारणी/नेते/मंत्री ह्यांच्याकरीत असले आहे रुल्स असतील, असे मला तरी वाटत नाही. तसेच मंत्र्यांची कसली आली बदली आणि सस्पेंशन? म्हणजे खातेबदल होतो, आणि सस्पेंशनपन होऊ शकते, पन ते विधानसभा/ राज्यसभा/ लोकसभा सदस्य म्हणून.. मी लोकपाल विधेयक डिट्टेलवार पाहिलेले नाहीय. पन मला वाटतंय, की लोकपाल हे "रेकमेंडरी" पद असेल. म्हणजे, आरोप झाल्यास लोकपाल चौकशी करेल आणि आपला निर्णय ऐकवेल, पण त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार त्यांना नसणार.. क्लिंटन, तुमच्या अभ्यासाला मानला हां..

विकास 28/03/2014 - 20:33
घटनात्मकदृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या काय होईल हे वरील माहितीपूर्ण चर्चेत आणि क्लिंटन यांच्या लेखांमधे आले आहेच. मला वाटते निवडणुकांनंतर त्रिशंकू अवस्था झाली तरी एनडीए अथवा युपिएचे सरकार येईल. फक्त ज्यांचे कुणाचे सरकार येईल त्यात किती जागा मिळाल्या आहेत त्यावर पंतप्रधानपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे बदलू शकेल. अर्थात ती माळ या वेळेस हत्तीच्या कडून घातली जांण्याची शक्यता कमी आहे. ;) तिसर्‍या आघाडीबद्दल साशंकता आहे. अर्थात हे सगळे "वाटते" सदरातील आहे.

निवडणुक २०१४: अनुभव ३: केजरीवाल मुंबईत (२)

आतिवास ·
अनुभव १ अनुभव २ लोकसभा मतदारसंघ ‘मोठे’ असतात हे माहिती आहे, पण ते किती मोठे असतात हे प्रत्यक्ष त्या मतदारसंघाविषयी माहिती घेतली की कळतं. ईशान्य मुंबई मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. ते आहेत शिवाजीनगर (मानखुर्द), मुलुंड, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, विक्रोळी आणि भांडूप. २००९ मध्ये या मतदारसंघात सुमारे १६ लाख मतदार होते – गेल्या पाच वर्षांत यात अजून चार लाख मतदारांची भर पडली आहे असे कुठेतरी वाचल्याचे आठवते.

ढब्बू पैसा 26/03/2014 - 18:22
हे रिपोर्ताज शैलीतील लि़खाण आवडतंय. माध्यमांच्या प्रचंड केऑस मध्ये असं इतकं तटस्थ, शांत आणि थेट लिखाण वाचायला मिळणं अत्यंत सुखद आहे. पुढच्या भागांची उत्सुकता आहेच :)

जयनीत 26/03/2014 - 18:25
' what come's with power gose with it ' हे विधान किती खरं आहे हे मागील काही दिवसां मध्ये प्रकर्षाने जाणवले. दिल्ली मध्ये आप च्या सरकारने राजीनामा दिल्यावर अनेक लोकांचे मत त्यांच्या विषयी बदलले. आता त्यांच्या सोबत जे ही लोक आहेत ते संख्येने कमी असले तरी महत्वाचे आहेत. लोकप्रियतेच्या लाटा येत जात राहतात. पण मूळ मुद्या वर सहमत असलेले लोकच पुढे टिकून राहतील. कुठलाही पक्ष उभा राहतो तेव्हा ज्या प्रक्रियेतुन त्याला जावे लागते तो आप साठी सध्याचा काळ आहे. आप कडून जास्त अपेक्षा आहेत तेव्हा झालेल्या चुकांमधून शिकून हा पक्ष शिकेल अन वाढेल हीच अपेक्षा आहे. पारंपारीक पक्षांच्या काही चांगलया गोष्टी आप ने नक्की घ्याव्यात पण मात्र पूर्णपणे त्यांच्या सारखे आपने होउ नये हेच वाटते.

एकांगी बोलणं, लिहीणं आणि रिपोर्टींग यांच्या भाउगर्दीत हे संतुलित, विश्वासू लिखाण प्रकर्षाने उठून दिसते ! सर्व भाग वाचले, सर्व आवडले हेवेसांनल.

संपत 26/03/2014 - 19:17
सध्या केजरीवालकेंद्रित असलेले ‘आप’
हा मलाही डाचत असलेला मुद्दा. सध्याचे निवडणुकीचे वातावरण, भारतीय व्यक्तीपुजक मानसिकता, केजरीवालांचे चाललेले स्लेजिंग ह्यामुळे सध्या हे अपरिहार्य आणि आआपसाठी लाभदायक असेल, पण लांब टप्प्यात ह्या मुद्द्याकडे आआप लक्ष देईल अशी आशा वाटते. मेधाताईचे मानखुर्द आणि बांद्रा परिसरातले काम ठाऊक होते. गेली ४-५ वर्षे तरी विधानसभा अधिवेशनाच्या वेळी त्या ह्या मुद्द्यांवर धरणे, उपोषणे करत आहेत. पण मानखुर्द, मुलुंड एकाच मतदारसंघात येते हे ठाऊक नव्हते. त्यामुळे त्या मुलुन्डमधून उभ्या राहिल्यात ह्याचे आश्चर्य वाटत होते, ते कोडे सुटले.

विकास 26/03/2014 - 20:55
हा भाग देखील मस्त आहे. आमच्या सारख्यांना तिथे नसताना देखील काहीतरी अनुभव मिळाला असे वाटले. त्याबद्दल धन्यवाद! मेधाताईंचे भाषण मी तूनळीवर ऐकले होते. भाषण आवडले - एका समाजसेवेस आयुष्य वाहीलेल्या व्यक्तीचे म्हणून... पण ते बरखा दत्तने घेतलेल्या मुलाखतीतील राजकारणी मेधाताईंचे वाटले नाही तर जरा जास्तच भाबडे वाटले. इतकी भाबडी सामान्य जनता देखील नसते असे वाटते. अर्थात ते माझे निरीक्षण झाले. मेधाताईंवर टिका नाही. पण त्यातून मतदारांना मत देण्यासाठी प्रेरणा मिळेल असे वाटले नाही. वास्तवीक तुम्ही म्हणालात तसे मेधाताई आणि इतर सामाजीक जाण असलेले काही जर आपकडून देखील निवडून आले तर त्यांना वास्तवाची अधिक जाण येईल आणि त्यांच्या असण्याचा सांसदीय लोकशाहीत काही अंशी असेल पण नक्कीच फायदा होईल असे वाटते.

गणपा 26/03/2014 - 21:01
वास्तविक ‘आप’ने सामाजिक जाण आणि अनुभव असलेले अनेक उमेदवार उभे केले आहेत. त्यातले काही निवडून आले तरी सध्या केजरीवालकेंद्रित असलेले ‘आप’ अधिक समाजाभिमुख होईल याची मला खात्री आहे.
असेच होवो. लिखाण आवडले हे वेसांनल.

kurlekaar 27/03/2014 - 10:00
खुप छान. मला ही वाक्ये खुप आवडली, "आपण ज्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलोय त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलावेत इतकं सौजन्यही त्यांनी दाखवलं नाही. मेधाताईंचा उल्लेख त्यांनी एकदाच केला तोही ‘मेधा पाटेकर’ असा. आपल्या उमेदवाराचं नावही नीट माहिती नसणारा हा कसला नेता? शिवाय मेधाताई काही ‘अनोळखी’ नाहीत. एकंदर दिवसभर मला केजरीवालांचा ‘डिसकनेक्ट’ जाणवत राहिला."

ऋषिकेश 27/03/2014 - 10:12
पण ईशान्य मुंबई मतदारसंघात ते संध्याकाळी साडेपाच ते रात्री साडेनऊ असे चार तास असणार होते – म्हणजे ईशान्य मुंबईत विजयाची संधी जास्त आहे असा निष्कर्ष ‘आप’मधल्या जबाबदार लोकांनी काढला आहे का? जरा कुतूहल वाटत राहिलं मला या नियोजनाबद्दल.
अर्थात, आनि ते योग्यही असावे असे वाटते. जर आपचे उमेदवार पाहिले, मेधाताई काय, पुण्यातील वारे काय, ठाण्याचे संजीव साने काय अनेक जण मुळातच या व्यवस्थेने बाहेर हाकललेल्या म्हणा किंवा व्यवस्थेच्या तृटिंवर, व्यवस्थेवरच हल्ला करून अश्या तळातील लोकांसाठी लढणार्‍या व्यक्ती आहेत. ईशान्य मुंबईतील भांडुपसारखा भाग, मानखुर्द सारखा भाग इथे या नेत्यांबद्दल आकर्षण नसेल तरच नवल! आआपचा खरा अ‍ॅसेट हे वर्षानु वर्षे व्यवस्थेशी बाहुरून लढून पाहिलेले, लोकांसाठी खरोखर कोणतेही पद न स्वीकारता लढलेले उमेदवार आहेत. केजरीवाल या पक्षाचा चेहराअसण्यापेक्षा एक खळ/गोंदाचं काम करताहेत इतंच त्यांचं महत्त्व आहे असे मला वाटते.
वास्तविक ‘आप’ने सामाजिक जाण आणि अनुभव असलेले अनेक उमेदवार उभे केले आहेत. त्यातले काही निवडून आले तरी सध्या केजरीवालकेंद्रित असलेले ‘आप’ अधिक समाजाभिमुख होईल याची मला खात्री आहे.
+१ अगदी अस्सेच म्हणतो. आणि त्यासाठी जनतेनेही केजरीवाल/मोदी सारख्या बालीश व बाष्कळ लढतीतून बाहेर पडून आपल्या मतदारसंघात कोण उभे आहे, त्याचे काम काय हे बघायला हवे असे वाटते. आपण निवडलेल्या उमेदवाराने नेहमी सरकारच बनवावे असे नाही. तुमचे मत तुम्ही चांगले विरोधक निवडण्यासाठीही देणे योग्यच आहे असे वाटते.

अर्धवटराव 28/03/2014 - 04:05
संतुलीत लेखमालेचं हे पुष्प देखील आवडलं. मेधाताई अत्यंत खमकी बाई. कुठुन एव्हढी एनर्जी येते देव जाणे. व्यवस्थेशी सदा वाकडं यांचं. कारणहि तसच. ज्या प्रश्नांना हि बाई भिडते तिथपर्यंत व्यवस्था पोचलेलीच नसते. पोचली तरी हुकुमनामा घेऊन. अशा लोकांना अगदी थेट निवडणुकीला उभं राहण्यापर्यंत व्यवस्थेत उतरावसं वाटलं याचं श्रेय सर्वस्वी आआपला, आणि अर्थात आआपच्या संस्थापकांना. असे नग (चांगल्या अर्थाने) यापुर्वी देखील राजकारणात उतरले होते. पण नेतृत्वाला ते पेलले नाहित. आआप या लोकांचा सांभाळ करु शकेल काय? आआपच्या सध्याच्या नेतृत्वाकडे बघितल्यास अगदी खात्री देता येत नाहि. पण एक चॅनल ओपन झालं आहे हे ही नसे थोडके. इन जनरल चित्र आशावादी आहे. मेधाताईंना शुभेच्छा... आणि सावधगिरीचा इशारा देखील.

पैसा 30/03/2014 - 17:07
खूपच छान लिहिलंय. मेधाताईंच्या धरणग्रस्तांबद्दलच्या कामाबद्दल प्रचंड आदर वाटला तरी अनधिकृत झोपडपट्ट्यातून त्याही सरकारी/खाजगी जमिनी बळकावून राहणार्‍या लोकांबद्दल मला तेवढी सहानुभूती वाटत नाही. केजरीवाल यांच्याबद्दल तुमचं निरीक्षण परफेक्ट आहे. डिसकनेक्टेड. मेधाताईंसारखी मंडळी राजकारणात येऊन राजकारण काही प्रमाणात स्वच्छ झालं तर उत्तमच. नाहीतर इतक्या चांगल्या माणसांना बुद्धिबळातली प्यादी म्हणून वापरलं जाईल आणि गेल्या निवडणुकीत शिशिर शिंदेंनी जी भूमिका निभावली तेच मेधाताईंच्या वाट्याला येईल अशी जास्त भीती वाटते आहे.

राही 30/03/2014 - 19:37
संयत, समतोल आणि सम्यक नोंदी.(आणि सत्यही.) लेखमाला अत्यंत आवडते आहे.

आतिवास 30/03/2014 - 20:32
सर्व वाचकांचे आणि प्रोत्साहनपर शब्दांसाठी प्रतिसादकांचे आभार.

+७८६ अन्यथा राजकारणावरचे एकतर्फी लेख नाहीच वाचवत, प्रतिसादांमध्येच रमतो, पण इथले प्रतिसाद वाचून लेख वाचावासा वाटला. आप'कडे एका आशेने मी स्वता देखील बघत आहे, पण सध्या त्यांच्या खरेखोटेपणाचा काही अंदाज यावा अशी परिस्थिती नाहीये. तर दगडापेक्षा वीट मऊ म्हणत अबकी बार मोदी सरकार करावे की आप नावाचा ब्लांईड पत्ता ओपन करून बघावा या विचारात..

सुधीर 31/03/2014 - 17:20
मेघाताई निवडून येण्याच्या शक्यता कमी आहे असं मला वाटतं. गेल्या वर्षी हा सामना चुरशीचा झाला होता. संजय दिना पाटील(राष्ट्रवादी) यांनी शिषीर शिंदे (मनसे) आणि किरीट सोमय्या(भाजप) यांच्यावर थोड्याफार मतफरकाने विजय मिळवला होता. यावेळी मनसेने इथे उमेद्वार उभा केलेला नाही. या मतदार संघातला मुलुंड आणि घाटकोपर हा विभाग गुजराथीबहुल आहे. प्रादेशिक अस्मितेवरून राजकारण करण्याला मेघाताईंचा विरोध आहे. किरीट सोमय्यांच्या मतांची हिस्सेवारी कमी होणार नाही असं गृहीत धरलं तर, प्रादेशिक अस्मितेच्या बाजूने मनसेला कौल देणारी जनता कोणाच्या पारड्यात किती मत टाकते आणि पाटील यांची किती मतं मेघाताई फोडतात यावर या सगळं गणित अवलंबून आहे. माझ्या मते मनसेची २०-३०% मतं किरीटभाईंना मिळाली तर त्यांच पारडं जड होईल. न जाणो शेवटी हे राजकारण आहे, मेघाताईंनी आपल्या इमेजमुळे वा केजरीवालच्या गोरीला अ‍ॅटॅक स्ट्रॅटेजीमुळे सोमय्या यांचीच मत फुटली तर सामना पूर्ण फिरेल पण ती शक्यता फारच कमी आहे. केजरीवालचं डिस्कनेक्ट असणं अपेक्षित असंच आहे. त्याला कारणीभूत त्याची पक्षउभारणी आणि पक्षबांधणीचं अपारंपारीक मॉडेल असावं असं मला वाटतं. पण त्यामुळेच त्याला इतक्या कमी वेळात ३५० उमेदवार उभे करता आलेत.

ढब्बू पैसा 26/03/2014 - 18:22
हे रिपोर्ताज शैलीतील लि़खाण आवडतंय. माध्यमांच्या प्रचंड केऑस मध्ये असं इतकं तटस्थ, शांत आणि थेट लिखाण वाचायला मिळणं अत्यंत सुखद आहे. पुढच्या भागांची उत्सुकता आहेच :)

जयनीत 26/03/2014 - 18:25
' what come's with power gose with it ' हे विधान किती खरं आहे हे मागील काही दिवसां मध्ये प्रकर्षाने जाणवले. दिल्ली मध्ये आप च्या सरकारने राजीनामा दिल्यावर अनेक लोकांचे मत त्यांच्या विषयी बदलले. आता त्यांच्या सोबत जे ही लोक आहेत ते संख्येने कमी असले तरी महत्वाचे आहेत. लोकप्रियतेच्या लाटा येत जात राहतात. पण मूळ मुद्या वर सहमत असलेले लोकच पुढे टिकून राहतील. कुठलाही पक्ष उभा राहतो तेव्हा ज्या प्रक्रियेतुन त्याला जावे लागते तो आप साठी सध्याचा काळ आहे. आप कडून जास्त अपेक्षा आहेत तेव्हा झालेल्या चुकांमधून शिकून हा पक्ष शिकेल अन वाढेल हीच अपेक्षा आहे. पारंपारीक पक्षांच्या काही चांगलया गोष्टी आप ने नक्की घ्याव्यात पण मात्र पूर्णपणे त्यांच्या सारखे आपने होउ नये हेच वाटते.

एकांगी बोलणं, लिहीणं आणि रिपोर्टींग यांच्या भाउगर्दीत हे संतुलित, विश्वासू लिखाण प्रकर्षाने उठून दिसते ! सर्व भाग वाचले, सर्व आवडले हेवेसांनल.

संपत 26/03/2014 - 19:17
सध्या केजरीवालकेंद्रित असलेले ‘आप’
हा मलाही डाचत असलेला मुद्दा. सध्याचे निवडणुकीचे वातावरण, भारतीय व्यक्तीपुजक मानसिकता, केजरीवालांचे चाललेले स्लेजिंग ह्यामुळे सध्या हे अपरिहार्य आणि आआपसाठी लाभदायक असेल, पण लांब टप्प्यात ह्या मुद्द्याकडे आआप लक्ष देईल अशी आशा वाटते. मेधाताईचे मानखुर्द आणि बांद्रा परिसरातले काम ठाऊक होते. गेली ४-५ वर्षे तरी विधानसभा अधिवेशनाच्या वेळी त्या ह्या मुद्द्यांवर धरणे, उपोषणे करत आहेत. पण मानखुर्द, मुलुंड एकाच मतदारसंघात येते हे ठाऊक नव्हते. त्यामुळे त्या मुलुन्डमधून उभ्या राहिल्यात ह्याचे आश्चर्य वाटत होते, ते कोडे सुटले.

विकास 26/03/2014 - 20:55
हा भाग देखील मस्त आहे. आमच्या सारख्यांना तिथे नसताना देखील काहीतरी अनुभव मिळाला असे वाटले. त्याबद्दल धन्यवाद! मेधाताईंचे भाषण मी तूनळीवर ऐकले होते. भाषण आवडले - एका समाजसेवेस आयुष्य वाहीलेल्या व्यक्तीचे म्हणून... पण ते बरखा दत्तने घेतलेल्या मुलाखतीतील राजकारणी मेधाताईंचे वाटले नाही तर जरा जास्तच भाबडे वाटले. इतकी भाबडी सामान्य जनता देखील नसते असे वाटते. अर्थात ते माझे निरीक्षण झाले. मेधाताईंवर टिका नाही. पण त्यातून मतदारांना मत देण्यासाठी प्रेरणा मिळेल असे वाटले नाही. वास्तवीक तुम्ही म्हणालात तसे मेधाताई आणि इतर सामाजीक जाण असलेले काही जर आपकडून देखील निवडून आले तर त्यांना वास्तवाची अधिक जाण येईल आणि त्यांच्या असण्याचा सांसदीय लोकशाहीत काही अंशी असेल पण नक्कीच फायदा होईल असे वाटते.

गणपा 26/03/2014 - 21:01
वास्तविक ‘आप’ने सामाजिक जाण आणि अनुभव असलेले अनेक उमेदवार उभे केले आहेत. त्यातले काही निवडून आले तरी सध्या केजरीवालकेंद्रित असलेले ‘आप’ अधिक समाजाभिमुख होईल याची मला खात्री आहे.
असेच होवो. लिखाण आवडले हे वेसांनल.

kurlekaar 27/03/2014 - 10:00
खुप छान. मला ही वाक्ये खुप आवडली, "आपण ज्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलोय त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलावेत इतकं सौजन्यही त्यांनी दाखवलं नाही. मेधाताईंचा उल्लेख त्यांनी एकदाच केला तोही ‘मेधा पाटेकर’ असा. आपल्या उमेदवाराचं नावही नीट माहिती नसणारा हा कसला नेता? शिवाय मेधाताई काही ‘अनोळखी’ नाहीत. एकंदर दिवसभर मला केजरीवालांचा ‘डिसकनेक्ट’ जाणवत राहिला."

ऋषिकेश 27/03/2014 - 10:12
पण ईशान्य मुंबई मतदारसंघात ते संध्याकाळी साडेपाच ते रात्री साडेनऊ असे चार तास असणार होते – म्हणजे ईशान्य मुंबईत विजयाची संधी जास्त आहे असा निष्कर्ष ‘आप’मधल्या जबाबदार लोकांनी काढला आहे का? जरा कुतूहल वाटत राहिलं मला या नियोजनाबद्दल.
अर्थात, आनि ते योग्यही असावे असे वाटते. जर आपचे उमेदवार पाहिले, मेधाताई काय, पुण्यातील वारे काय, ठाण्याचे संजीव साने काय अनेक जण मुळातच या व्यवस्थेने बाहेर हाकललेल्या म्हणा किंवा व्यवस्थेच्या तृटिंवर, व्यवस्थेवरच हल्ला करून अश्या तळातील लोकांसाठी लढणार्‍या व्यक्ती आहेत. ईशान्य मुंबईतील भांडुपसारखा भाग, मानखुर्द सारखा भाग इथे या नेत्यांबद्दल आकर्षण नसेल तरच नवल! आआपचा खरा अ‍ॅसेट हे वर्षानु वर्षे व्यवस्थेशी बाहुरून लढून पाहिलेले, लोकांसाठी खरोखर कोणतेही पद न स्वीकारता लढलेले उमेदवार आहेत. केजरीवाल या पक्षाचा चेहराअसण्यापेक्षा एक खळ/गोंदाचं काम करताहेत इतंच त्यांचं महत्त्व आहे असे मला वाटते.
वास्तविक ‘आप’ने सामाजिक जाण आणि अनुभव असलेले अनेक उमेदवार उभे केले आहेत. त्यातले काही निवडून आले तरी सध्या केजरीवालकेंद्रित असलेले ‘आप’ अधिक समाजाभिमुख होईल याची मला खात्री आहे.
+१ अगदी अस्सेच म्हणतो. आणि त्यासाठी जनतेनेही केजरीवाल/मोदी सारख्या बालीश व बाष्कळ लढतीतून बाहेर पडून आपल्या मतदारसंघात कोण उभे आहे, त्याचे काम काय हे बघायला हवे असे वाटते. आपण निवडलेल्या उमेदवाराने नेहमी सरकारच बनवावे असे नाही. तुमचे मत तुम्ही चांगले विरोधक निवडण्यासाठीही देणे योग्यच आहे असे वाटते.

अर्धवटराव 28/03/2014 - 04:05
संतुलीत लेखमालेचं हे पुष्प देखील आवडलं. मेधाताई अत्यंत खमकी बाई. कुठुन एव्हढी एनर्जी येते देव जाणे. व्यवस्थेशी सदा वाकडं यांचं. कारणहि तसच. ज्या प्रश्नांना हि बाई भिडते तिथपर्यंत व्यवस्था पोचलेलीच नसते. पोचली तरी हुकुमनामा घेऊन. अशा लोकांना अगदी थेट निवडणुकीला उभं राहण्यापर्यंत व्यवस्थेत उतरावसं वाटलं याचं श्रेय सर्वस्वी आआपला, आणि अर्थात आआपच्या संस्थापकांना. असे नग (चांगल्या अर्थाने) यापुर्वी देखील राजकारणात उतरले होते. पण नेतृत्वाला ते पेलले नाहित. आआप या लोकांचा सांभाळ करु शकेल काय? आआपच्या सध्याच्या नेतृत्वाकडे बघितल्यास अगदी खात्री देता येत नाहि. पण एक चॅनल ओपन झालं आहे हे ही नसे थोडके. इन जनरल चित्र आशावादी आहे. मेधाताईंना शुभेच्छा... आणि सावधगिरीचा इशारा देखील.

पैसा 30/03/2014 - 17:07
खूपच छान लिहिलंय. मेधाताईंच्या धरणग्रस्तांबद्दलच्या कामाबद्दल प्रचंड आदर वाटला तरी अनधिकृत झोपडपट्ट्यातून त्याही सरकारी/खाजगी जमिनी बळकावून राहणार्‍या लोकांबद्दल मला तेवढी सहानुभूती वाटत नाही. केजरीवाल यांच्याबद्दल तुमचं निरीक्षण परफेक्ट आहे. डिसकनेक्टेड. मेधाताईंसारखी मंडळी राजकारणात येऊन राजकारण काही प्रमाणात स्वच्छ झालं तर उत्तमच. नाहीतर इतक्या चांगल्या माणसांना बुद्धिबळातली प्यादी म्हणून वापरलं जाईल आणि गेल्या निवडणुकीत शिशिर शिंदेंनी जी भूमिका निभावली तेच मेधाताईंच्या वाट्याला येईल अशी जास्त भीती वाटते आहे.

राही 30/03/2014 - 19:37
संयत, समतोल आणि सम्यक नोंदी.(आणि सत्यही.) लेखमाला अत्यंत आवडते आहे.

आतिवास 30/03/2014 - 20:32
सर्व वाचकांचे आणि प्रोत्साहनपर शब्दांसाठी प्रतिसादकांचे आभार.

+७८६ अन्यथा राजकारणावरचे एकतर्फी लेख नाहीच वाचवत, प्रतिसादांमध्येच रमतो, पण इथले प्रतिसाद वाचून लेख वाचावासा वाटला. आप'कडे एका आशेने मी स्वता देखील बघत आहे, पण सध्या त्यांच्या खरेखोटेपणाचा काही अंदाज यावा अशी परिस्थिती नाहीये. तर दगडापेक्षा वीट मऊ म्हणत अबकी बार मोदी सरकार करावे की आप नावाचा ब्लांईड पत्ता ओपन करून बघावा या विचारात..

सुधीर 31/03/2014 - 17:20
मेघाताई निवडून येण्याच्या शक्यता कमी आहे असं मला वाटतं. गेल्या वर्षी हा सामना चुरशीचा झाला होता. संजय दिना पाटील(राष्ट्रवादी) यांनी शिषीर शिंदे (मनसे) आणि किरीट सोमय्या(भाजप) यांच्यावर थोड्याफार मतफरकाने विजय मिळवला होता. यावेळी मनसेने इथे उमेद्वार उभा केलेला नाही. या मतदार संघातला मुलुंड आणि घाटकोपर हा विभाग गुजराथीबहुल आहे. प्रादेशिक अस्मितेवरून राजकारण करण्याला मेघाताईंचा विरोध आहे. किरीट सोमय्यांच्या मतांची हिस्सेवारी कमी होणार नाही असं गृहीत धरलं तर, प्रादेशिक अस्मितेच्या बाजूने मनसेला कौल देणारी जनता कोणाच्या पारड्यात किती मत टाकते आणि पाटील यांची किती मतं मेघाताई फोडतात यावर या सगळं गणित अवलंबून आहे. माझ्या मते मनसेची २०-३०% मतं किरीटभाईंना मिळाली तर त्यांच पारडं जड होईल. न जाणो शेवटी हे राजकारण आहे, मेघाताईंनी आपल्या इमेजमुळे वा केजरीवालच्या गोरीला अ‍ॅटॅक स्ट्रॅटेजीमुळे सोमय्या यांचीच मत फुटली तर सामना पूर्ण फिरेल पण ती शक्यता फारच कमी आहे. केजरीवालचं डिस्कनेक्ट असणं अपेक्षित असंच आहे. त्याला कारणीभूत त्याची पक्षउभारणी आणि पक्षबांधणीचं अपारंपारीक मॉडेल असावं असं मला वाटतं. पण त्यामुळेच त्याला इतक्या कमी वेळात ३५० उमेदवार उभे करता आलेत.

पुणे (अचानक) कट्टा

अत्रुप्त आत्मा ·

झकासराव 26/03/2014 - 18:05
२८ एप्रिल होय. दिवसभर जमल नसल तरी मिपाकराना भेटायला रामदेव धाब्याला हजेरी लावेन. सोबत रबडी- गुलाबजामुनचा आस्वाद घेता येइलच. :)

आदूबाळ 26/03/2014 - 18:13
श्रीकृष्ण मिसळ (मारक्या बैलाची स्मायली) कट्ट्याला शुभेच्छा (गुरगुरणार्‍या बोक्याची स्मायली)

पुण्यास येउन, त्यातल्या त्यात तुळशीबागेत कमित कमी १२ वेळेला फेरफटका (?) मारुनही "श्रीकृष्ण मिसळ" न दिसल्याने आणि त्या अनुभवास मुकल्याने अतिव दुख्खः होत हाए.

In reply to by दिव्यश्री

बॅटमॅन 26/03/2014 - 19:38
म्हैलांना एण्ट्री ब्यान असा ढिस्क्लेमर दिसतोय का कुठे? अन तुम्ही तर बाहेर असता ना हो? तिथे बसून शलाकाक्षेपण आणि कसलं करतांव आँ?

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 26/03/2014 - 20:10
म्हैलांना एण्ट्री ब्यान असा ढिस्क्लेमर दिसतोय का कुठे?>>> नयी हु मय . अतृप्त आत्मा कुड , कसा , कंदी(पेडा नाय बर का :P ) ढिस्क्लेमर टाकतील याचा नेम नाय . म्हणल इचारूण खात्री करावी . अन तुम्ही तर बाहेर असता ना हो?>>> व्हय जी ...आम्ही बाहेरच असतो . म्हणून आम्ही कंदी आत यायच्च नाही का ? यायला बंदी हाये का आम्हाले ?? तिथे बसून शलाकाक्षेपण आणि कसलं करतांव आँ?>>> नाय बा ...आधीच नयी हु मय .त्यात कुठल्याही कंपूत नाही ...अल्पसंख्यांक ...कसलं शलाकाक्षेपण...आण कसलं काय . :)

In reply to by प्रभाकर पेठकर

शशिकांत ओक 28/03/2014 - 01:24
पुंण्यात्मा व अन्य पुणेरी मिपाकर आपल्या आगमनासाठी अत्तराच्या फायासह सज्ज आहेत. येणे करावे. चपाती कम पराठा जास्त व मिसळ कम पाव जास्त असे करत खाणे कम पिणे जास्त असा काहीसा अहवाल फोटू सह पहायला मिळावा अशी आग्रहाची विणंति.

प्रशांत 27/03/2014 - 09:03
कट्ट्याला शुभेच्छा.... एक तर शुक्रावार आणि सध्याकाळी ८ च्या ट्रवल्सने अकोला जातोय :(

निश 27/03/2014 - 18:22
श्रीकृष्ण मिसळ ला मिसळ म्हंणणे म्हंजे चपातीला परोठा म्हणण्यासारख आहे. तो बट्याट्याचा रस्सा नामक जे काही ताटात येते ते असत मात्र भारी ह्यात शंकाच नाही. फार मस्त. पाव स्लाईस बरोबर खाताना अजुनच मजा येते.

विटेकर 28/03/2014 - 12:42
आत्ताच पेठ्कर काकांशी बोललो .. आत्मुबाबा स्मयलीवाले यांच्या फोन्वर. श्रीकृष्ण ची मिसळ चेपून मंडळी अमंळ सुस्तावलीत.

भाते 28/03/2014 - 13:49
आम्ही इथे हापिसात बसुन काम करतोय आणि हे धाग्यावर कट्टयाचे धावते समालोचन देत आहेत दुष्ट लेकाचे! आता खादाडीचे फोटो आणि सविस्तर वृत्तांत टाकुन आणखी जळवतिल.

आम्ही इथे हापिसात बसुन काम करतोय आणि हे धाग्यावर कट्टयाचे धावते समालोचन देत आहेत दुष्ट लेकाचे! आता खादाडीचे फोटो आणि सविस्तर वृत्तांत टाकुन आणखी जळवतिल

प्रचेतस 28/03/2014 - 15:21
आत्मुदा, पेठकर काका आणि एक्काश्री ही मंडळी आता पवनानगर येथील बेडसे लेण्यांच्या भटकंतीला निघाली आहेत अशी आमच्या आतल्या गोटातून खबर आहे. =))

पेठकर काका २ तारखेला मुंबईत आहात ना मी तेव्हा मुंबईत असेल ता. क मी मुंबईत ० मार्च ते १४ एप्रिल आहे. मुंबईत महा कट्टा करता आला तर खूप बरे होईल , म्हणजे जास्तीसजास्त मिपाकरांना भेटता येईल. मिपाकरांना भेटण्यास उतावीळ व कट्टा आयोजकाच्या शोधत निनाद , मुक्काम पोस्ट मुंबई दोन आठवड्या पुरता

In reply to by निनाद मुक्काम …

मी मुंबईत ० मार्च ते १४ एप्रिल आहे.
० मार्च? हे काय जर्मन कॅलेंडर काय हो? :) (टायपो हाय तां कलतांव, पन पीजे करांचा मोह आवरंना!!!)

In reply to by पिवळा डांबिस

उपास 28/03/2014 - 23:37
आँ पिंडाकाका, मला तर दिसतांव ३० मार्च, तुमका दिसत नाय, हॅप्पी अवर की काय तां? ;)

In reply to by उपास

हॅप्पी अवर खंयचो इतक्या लवकर? मांका अजूनही ० मार्चच दिसतांसा, तुमी काय ३डी स्क्रीन वापरतसांत की माझो स्क्रीन १डी झालो तां काय कळना!!! मिपावर भुताटकी आसां ता म्हायती होतां पण इतको प्रत्यक्ष अनुभव पहिल्यांदाच!!! :) असो. ३० मार्च तर ३० मार्च...

In reply to by पिवळा डांबिस

सूड 29/03/2014 - 01:22
>>मिपावर भुताटकी आसां ता म्हायती होतां पण इतको प्रत्यक्ष अनुभव पहिल्यांदाच!!! साक्षात पिवळो डांबिस हंयसर असताना वेगळी भुताटकी कित्यां होयी महो?

In reply to by सूड

पण म्हंटलां अत्रूप्त आत्म्याचो धागो म्हंटल्याकारणान काय सांगूक येतां? :) असो. धाग्याचा इतक्या जम्मू पुरे, उगीच पार श्रीनगर नुको करूयांत!!! :)

आता पहिले मला सुद्धा ० मार्च दिसत आहेत. तीस तारखेला असेच म्हणायचे होते. मुंबईत राहणार आहे त्यामुळे डोंबिवली ते मुंबई व तिची उपनगरे कुठेही कट्टे करण्यास उत्सुक रविवार वगळता सकाळ चा कट्टा करण्यास पुण्य नगरीला सुद्धा धावती भेट देऊ शकतो. ता . क आताच मूवी ह्यांचा व्यनि आल्याने जीव भांड्यात पडला आहे. पुण्याच्या कट्याला शुभेच्छा

In reply to by निनाद मुक्काम …

यशोधरा 29/03/2014 - 09:21
डोंबोली म्हट्ले की लग्गेच मुविकाकांचा व्य नि आला काय? बरी नव्हे हो पार्श्यालिटी! :P बाकी मलाही ० मार्च दिसत आहे!

In reply to by यशोधरा

उपास 30/03/2014 - 05:49
मलाही शून्यच दिसतेय पण ३० चा अंदाज लावला, पिडांकाका मोकळेच होते म्हटलं टाकावा गुगली.. बर्‍याच विकेट्स मिळाल्या पण ;) गंमत हां!

'अतृप्त' आयोजकाने श्रीकृष्णमध्ये मिसळपाव सदस्यांना मिसळपावच खाऊ घालून अगदी तृप्त केले. सूड, इस्पिकचा एक्का, पिंगू, यशोधरा आणि दस्तुरखुद्द अतृप्त आत्मा ह्यांच्या समवेत सकाळचा कट्टा संपन्न झाला. ह्या कट्ट्याला माझ्या लेकानेही उपस्थिती लावली. नंतर सूड, पिंगू आणि यशोधरा ह्यांना कामे असल्याने (म्हणजे आम्ही रिकामटेकडे होतो असे नाही) त्यांनी उपस्थितांचा दु:खी अंतःकरणाने निरोप घेतला. तिथून पुढे, अम्मळ शतपावली करीत आणि पुण्याचे 'सृष्टीसौंदर्य' पेन्शनर्सच्या नजरेने पाहात पाहात, बाकीचे आम्ही (इस्पिकचा एक्का, आत्मा आणि मी) अतृप्ताम्याच्या वाहनाकडे निघालो. वाटेत, अतृप्त आत्मा ह्यांच्या शिफारशीनुसार एका अस्सल पुणेरी दुकानातून अस्सल अत्तराची खरेदी झाली. पुढील पाडाव कोथरुडात माझ्या घरी होता. तिथे चहापाना दरम्यान इस्पिकचा एक्का ह्यांनी मस्कतच्या जुन्या आठवणी जागवल्या. गप्पा छान रंगल्या होत्या परंतू पुढे बेडसे लेणी पाहायला जायचे होते. गुरुजींनी, लेण्यादर्शनार्थ अगदी जुजबी पायर्‍या चढाव्या लागतील आणि त्या घारापुरी पेक्षा अगदी सहज आहेत असे आश्वासन दिले होते. त्या नंतर तिथे पोहोचल्यावर डोंगराच्या पायथ्याशी उभे असताना, मला वाटले पायर्‍यांच्या पहिल्या वळणानंतर लेणी सुरु होतील. परंतु, माझ्या ह्या भाबड्या विचारांना अतृप्त आत्म्याने, ' ते चाफ्याचे झाड दिसते आहे नं, तिथे आहेत ती लेणी' असे म्हणून भूसुरुंग लावला. मी पाहिले तर ते चाफ्याचे झाड, मी उभा होतो तिथून तुळशी वृंदावनातल्या तुळशीच्या अशक्त रोपट्याएवढे दिसत होते. एका सत्शील दिसणार्‍या गुरुजींनी एवढ्या लांब आणून आपला 'कात्रज' केला आहे हे तत्क्षणी मला जाणवले. दर आठ-दहा पायर्‍यांवर विसावत उरलेल्या मार्गाचा आढावा घेत मार्गक्रमणा सुरु झाली. 'गुरुजी' जमातीवरून माझा विश्वास उडाला. गुरुजी आणि तरुण इस्पिकचा एक्का टणाटण उड्या मारत पायर्‍या चढत होते, त्यांचा उत्साह बापुडवाण्या चेहर्‍याने पाहात, मी (माझेच) पाय ओढत, माझा देह चाफ्याच्या झाडाच्या दिशेने निकराने ढकलत होतो. सोबत काकू होत्याच त्यांना आता हा माणूस वर (म्हणजे लेण्यांपर्यंत) कसा पोहोचणार आणि सदेह कसा परतणार ह्या चिंतेने ग्रासलं होतं. बर्‍याच खडतर प्रयत्नांनंतर चाफ्याच्या झाडापाशी पोहोचलो आणि हुश्श (सर्वांनीच) केलं. तळावरून तुळशीच्या अशक्त रोपट्याएवढे दिसणारे ते झाड चांगलेच १५ बाय १५ फुट असे डेरेदार होते. लेणी पाहताना आत्तापर्यंतच्या सर्व श्रमांचा विसर पडला. दगडात कोरलेली नक्षी, आणि भावदर्शी शिल्पं पाहून मन मोहून जाते. आम्हा उरलेल्या ३ 'व्यक्तीं'साठी आज अतृप्त आत्मा हेच 'वल्ली' होते. त्यांनी त्यांच्या परीने ती भूमिका सुंदर वठवली. लेण्यांची माहिती देत अविस्मरणिय अशी सहल घडवली. एवढ्या उंचावर पाषाणात कोरलेली शिल्पं,गोड पाण्याची टांकं, बौद्ध भिख्खूंची चर्चा कक्ष, विश्रांती कक्ष, स्नानगृह आणि ध्यानगृह पाहून मन खरंच विस्मयचकित होतं. मी आणि काकू फक्त श्रवणभक्ती करीत होतो. पण गुरुजी आणि इस्पिकचा एक्का ह्या ज्ञानी जनांमध्ये ही शिल्पं , आपला धर्म आणि मुसलमान धर्मातील फोलपणा ह्यावर व्यासंगी चर्चा झाली. दांभिकपणा बाबत सर्व धर्मात एक वाक्यता आहे, धर्मसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालून, स्वार्थ साधण्यासाठी भोळ्या भाबड्या (म्हणजेच मूर्ख) जनतेस वेठीस धरतात ह्यावर एकमत झालं. परतीचा प्रवास (माझ्यासाठी) सुकर होता. निगडीकडे मार्गस्थ झाल्यावर वाटेत एका क्षुधाशांती उपहारगृहात पुनःश्च एकवार मिसळपाव आणि चहानामक पेयावर ताव मारून झाला जड अंतःकरणाने (आणि देहाने) बेडसे लेण्यांचा निरोप घेतला. काकूंना तिच्या बहिणीकडे 'मनमोकळ्या' गप्पासत्रासाठी सोडून मी 'श्री रामदेव बाबा ढाब्याकडे' संध्याकाळच्या कट्ट्यासाठी प्रयाण केलं. 'श्री रामदेव बाबा ढाब्यावर' अतृप्त आत्मा, इस्पिकचा एक्का ह्यांच्या समवेत चौकटराजा, श्री आणि चिरंजिव नादखुळा, मी मिपाचा मित्र (मी आधी 'नीताचा' ऐकलं. त्यामुळे ही 'नीता' कोण ह्या विचारात कांही सेकंद गेले), झकासराव, वल्ली, यसवायजी, देवांग आदी जमले होते. थोड्या उशीराने श्री. बाबा पाटील ह्यांनी उपस्थिती नोंदविली. 'श्री रामदेव बाबा ढाबा' ह्या नांवामुळे आपल्या पुढे काय 'वाढून' ठेवले असेल धाकधुक मनांत होती. पण डाल बट्टी ह्या राजस्थानी पारंपारिक पदार्था समवेत, व्हेज कडाई, मटर-मेथी-मलाई,भाकरी, दहिखिचडी वगैरे पदार्थ छान होते. गोड खाणार्‍यानी रबडी हादडली. भरपूर साधकबाधक चर्चा झाली. मराठी चर्चेला चिं. नादखुळा ह्या मिपाच्या भावी क्रिकेटप्रेमी सदस्याने कानडी तडका दिला. जेवूनखाऊन तृप्त मनाने शेजारच्याच पानाच्या टपरीची विक्रि वाढविली तिथे उर्वरीत चर्चा (वल्ली आणि अतृप्त आत्मा ह्यांची लटकी खणाखणी) रंगली. अचानक किसन शिंदेंनी हजेरी लावून सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. पुढे त्यांच्या आणि मिपाच्या वादग्रस्त सदस्याच्या जवळिकीवरून हास्यविनोदाला उधाण आले. निरोप घेता घेता चर्चा रंगत राहिल्या. निघता पाय पुन्हा पुन्हा मागे घेतला जात होता शेवटी 'उद्या ऑफिस आहे' ह्या व्यावहारिक विचाराने मिपाची सुंदर संध्याकाळ आवरती घेतली. सर्वांनाच मजा आली. यशस्वी कट्टा आयोजनाबद्दल अतृप्त आत्मा ह्यांचे विशेष आभार. कोणीतरी कट्टुयाची छायाचित्रे टाकेलच.(मी सुद्धा वाट पाहात आहे).

In reply to by प्रभाकर पेठकर

धन्या 29/03/2014 - 10:30
अचानक किसन शिंदेंनी हजेरी लावून सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.
किसन शिंदे नाही काका. मी मी धन्या. :)

झकासराव 26/03/2014 - 18:05
२८ एप्रिल होय. दिवसभर जमल नसल तरी मिपाकराना भेटायला रामदेव धाब्याला हजेरी लावेन. सोबत रबडी- गुलाबजामुनचा आस्वाद घेता येइलच. :)

आदूबाळ 26/03/2014 - 18:13
श्रीकृष्ण मिसळ (मारक्या बैलाची स्मायली) कट्ट्याला शुभेच्छा (गुरगुरणार्‍या बोक्याची स्मायली)

पुण्यास येउन, त्यातल्या त्यात तुळशीबागेत कमित कमी १२ वेळेला फेरफटका (?) मारुनही "श्रीकृष्ण मिसळ" न दिसल्याने आणि त्या अनुभवास मुकल्याने अतिव दुख्खः होत हाए.

In reply to by दिव्यश्री

बॅटमॅन 26/03/2014 - 19:38
म्हैलांना एण्ट्री ब्यान असा ढिस्क्लेमर दिसतोय का कुठे? अन तुम्ही तर बाहेर असता ना हो? तिथे बसून शलाकाक्षेपण आणि कसलं करतांव आँ?

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 26/03/2014 - 20:10
म्हैलांना एण्ट्री ब्यान असा ढिस्क्लेमर दिसतोय का कुठे?>>> नयी हु मय . अतृप्त आत्मा कुड , कसा , कंदी(पेडा नाय बर का :P ) ढिस्क्लेमर टाकतील याचा नेम नाय . म्हणल इचारूण खात्री करावी . अन तुम्ही तर बाहेर असता ना हो?>>> व्हय जी ...आम्ही बाहेरच असतो . म्हणून आम्ही कंदी आत यायच्च नाही का ? यायला बंदी हाये का आम्हाले ?? तिथे बसून शलाकाक्षेपण आणि कसलं करतांव आँ?>>> नाय बा ...आधीच नयी हु मय .त्यात कुठल्याही कंपूत नाही ...अल्पसंख्यांक ...कसलं शलाकाक्षेपण...आण कसलं काय . :)

In reply to by प्रभाकर पेठकर

शशिकांत ओक 28/03/2014 - 01:24
पुंण्यात्मा व अन्य पुणेरी मिपाकर आपल्या आगमनासाठी अत्तराच्या फायासह सज्ज आहेत. येणे करावे. चपाती कम पराठा जास्त व मिसळ कम पाव जास्त असे करत खाणे कम पिणे जास्त असा काहीसा अहवाल फोटू सह पहायला मिळावा अशी आग्रहाची विणंति.

प्रशांत 27/03/2014 - 09:03
कट्ट्याला शुभेच्छा.... एक तर शुक्रावार आणि सध्याकाळी ८ च्या ट्रवल्सने अकोला जातोय :(

निश 27/03/2014 - 18:22
श्रीकृष्ण मिसळ ला मिसळ म्हंणणे म्हंजे चपातीला परोठा म्हणण्यासारख आहे. तो बट्याट्याचा रस्सा नामक जे काही ताटात येते ते असत मात्र भारी ह्यात शंकाच नाही. फार मस्त. पाव स्लाईस बरोबर खाताना अजुनच मजा येते.

विटेकर 28/03/2014 - 12:42
आत्ताच पेठ्कर काकांशी बोललो .. आत्मुबाबा स्मयलीवाले यांच्या फोन्वर. श्रीकृष्ण ची मिसळ चेपून मंडळी अमंळ सुस्तावलीत.

भाते 28/03/2014 - 13:49
आम्ही इथे हापिसात बसुन काम करतोय आणि हे धाग्यावर कट्टयाचे धावते समालोचन देत आहेत दुष्ट लेकाचे! आता खादाडीचे फोटो आणि सविस्तर वृत्तांत टाकुन आणखी जळवतिल.

आम्ही इथे हापिसात बसुन काम करतोय आणि हे धाग्यावर कट्टयाचे धावते समालोचन देत आहेत दुष्ट लेकाचे! आता खादाडीचे फोटो आणि सविस्तर वृत्तांत टाकुन आणखी जळवतिल

प्रचेतस 28/03/2014 - 15:21
आत्मुदा, पेठकर काका आणि एक्काश्री ही मंडळी आता पवनानगर येथील बेडसे लेण्यांच्या भटकंतीला निघाली आहेत अशी आमच्या आतल्या गोटातून खबर आहे. =))

पेठकर काका २ तारखेला मुंबईत आहात ना मी तेव्हा मुंबईत असेल ता. क मी मुंबईत ० मार्च ते १४ एप्रिल आहे. मुंबईत महा कट्टा करता आला तर खूप बरे होईल , म्हणजे जास्तीसजास्त मिपाकरांना भेटता येईल. मिपाकरांना भेटण्यास उतावीळ व कट्टा आयोजकाच्या शोधत निनाद , मुक्काम पोस्ट मुंबई दोन आठवड्या पुरता

In reply to by निनाद मुक्काम …

मी मुंबईत ० मार्च ते १४ एप्रिल आहे.
० मार्च? हे काय जर्मन कॅलेंडर काय हो? :) (टायपो हाय तां कलतांव, पन पीजे करांचा मोह आवरंना!!!)

In reply to by पिवळा डांबिस

उपास 28/03/2014 - 23:37
आँ पिंडाकाका, मला तर दिसतांव ३० मार्च, तुमका दिसत नाय, हॅप्पी अवर की काय तां? ;)

In reply to by उपास

हॅप्पी अवर खंयचो इतक्या लवकर? मांका अजूनही ० मार्चच दिसतांसा, तुमी काय ३डी स्क्रीन वापरतसांत की माझो स्क्रीन १डी झालो तां काय कळना!!! मिपावर भुताटकी आसां ता म्हायती होतां पण इतको प्रत्यक्ष अनुभव पहिल्यांदाच!!! :) असो. ३० मार्च तर ३० मार्च...

In reply to by पिवळा डांबिस

सूड 29/03/2014 - 01:22
>>मिपावर भुताटकी आसां ता म्हायती होतां पण इतको प्रत्यक्ष अनुभव पहिल्यांदाच!!! साक्षात पिवळो डांबिस हंयसर असताना वेगळी भुताटकी कित्यां होयी महो?

In reply to by सूड

पण म्हंटलां अत्रूप्त आत्म्याचो धागो म्हंटल्याकारणान काय सांगूक येतां? :) असो. धाग्याचा इतक्या जम्मू पुरे, उगीच पार श्रीनगर नुको करूयांत!!! :)

आता पहिले मला सुद्धा ० मार्च दिसत आहेत. तीस तारखेला असेच म्हणायचे होते. मुंबईत राहणार आहे त्यामुळे डोंबिवली ते मुंबई व तिची उपनगरे कुठेही कट्टे करण्यास उत्सुक रविवार वगळता सकाळ चा कट्टा करण्यास पुण्य नगरीला सुद्धा धावती भेट देऊ शकतो. ता . क आताच मूवी ह्यांचा व्यनि आल्याने जीव भांड्यात पडला आहे. पुण्याच्या कट्याला शुभेच्छा

In reply to by निनाद मुक्काम …

यशोधरा 29/03/2014 - 09:21
डोंबोली म्हट्ले की लग्गेच मुविकाकांचा व्य नि आला काय? बरी नव्हे हो पार्श्यालिटी! :P बाकी मलाही ० मार्च दिसत आहे!

In reply to by यशोधरा

उपास 30/03/2014 - 05:49
मलाही शून्यच दिसतेय पण ३० चा अंदाज लावला, पिडांकाका मोकळेच होते म्हटलं टाकावा गुगली.. बर्‍याच विकेट्स मिळाल्या पण ;) गंमत हां!

'अतृप्त' आयोजकाने श्रीकृष्णमध्ये मिसळपाव सदस्यांना मिसळपावच खाऊ घालून अगदी तृप्त केले. सूड, इस्पिकचा एक्का, पिंगू, यशोधरा आणि दस्तुरखुद्द अतृप्त आत्मा ह्यांच्या समवेत सकाळचा कट्टा संपन्न झाला. ह्या कट्ट्याला माझ्या लेकानेही उपस्थिती लावली. नंतर सूड, पिंगू आणि यशोधरा ह्यांना कामे असल्याने (म्हणजे आम्ही रिकामटेकडे होतो असे नाही) त्यांनी उपस्थितांचा दु:खी अंतःकरणाने निरोप घेतला. तिथून पुढे, अम्मळ शतपावली करीत आणि पुण्याचे 'सृष्टीसौंदर्य' पेन्शनर्सच्या नजरेने पाहात पाहात, बाकीचे आम्ही (इस्पिकचा एक्का, आत्मा आणि मी) अतृप्ताम्याच्या वाहनाकडे निघालो. वाटेत, अतृप्त आत्मा ह्यांच्या शिफारशीनुसार एका अस्सल पुणेरी दुकानातून अस्सल अत्तराची खरेदी झाली. पुढील पाडाव कोथरुडात माझ्या घरी होता. तिथे चहापाना दरम्यान इस्पिकचा एक्का ह्यांनी मस्कतच्या जुन्या आठवणी जागवल्या. गप्पा छान रंगल्या होत्या परंतू पुढे बेडसे लेणी पाहायला जायचे होते. गुरुजींनी, लेण्यादर्शनार्थ अगदी जुजबी पायर्‍या चढाव्या लागतील आणि त्या घारापुरी पेक्षा अगदी सहज आहेत असे आश्वासन दिले होते. त्या नंतर तिथे पोहोचल्यावर डोंगराच्या पायथ्याशी उभे असताना, मला वाटले पायर्‍यांच्या पहिल्या वळणानंतर लेणी सुरु होतील. परंतु, माझ्या ह्या भाबड्या विचारांना अतृप्त आत्म्याने, ' ते चाफ्याचे झाड दिसते आहे नं, तिथे आहेत ती लेणी' असे म्हणून भूसुरुंग लावला. मी पाहिले तर ते चाफ्याचे झाड, मी उभा होतो तिथून तुळशी वृंदावनातल्या तुळशीच्या अशक्त रोपट्याएवढे दिसत होते. एका सत्शील दिसणार्‍या गुरुजींनी एवढ्या लांब आणून आपला 'कात्रज' केला आहे हे तत्क्षणी मला जाणवले. दर आठ-दहा पायर्‍यांवर विसावत उरलेल्या मार्गाचा आढावा घेत मार्गक्रमणा सुरु झाली. 'गुरुजी' जमातीवरून माझा विश्वास उडाला. गुरुजी आणि तरुण इस्पिकचा एक्का टणाटण उड्या मारत पायर्‍या चढत होते, त्यांचा उत्साह बापुडवाण्या चेहर्‍याने पाहात, मी (माझेच) पाय ओढत, माझा देह चाफ्याच्या झाडाच्या दिशेने निकराने ढकलत होतो. सोबत काकू होत्याच त्यांना आता हा माणूस वर (म्हणजे लेण्यांपर्यंत) कसा पोहोचणार आणि सदेह कसा परतणार ह्या चिंतेने ग्रासलं होतं. बर्‍याच खडतर प्रयत्नांनंतर चाफ्याच्या झाडापाशी पोहोचलो आणि हुश्श (सर्वांनीच) केलं. तळावरून तुळशीच्या अशक्त रोपट्याएवढे दिसणारे ते झाड चांगलेच १५ बाय १५ फुट असे डेरेदार होते. लेणी पाहताना आत्तापर्यंतच्या सर्व श्रमांचा विसर पडला. दगडात कोरलेली नक्षी, आणि भावदर्शी शिल्पं पाहून मन मोहून जाते. आम्हा उरलेल्या ३ 'व्यक्तीं'साठी आज अतृप्त आत्मा हेच 'वल्ली' होते. त्यांनी त्यांच्या परीने ती भूमिका सुंदर वठवली. लेण्यांची माहिती देत अविस्मरणिय अशी सहल घडवली. एवढ्या उंचावर पाषाणात कोरलेली शिल्पं,गोड पाण्याची टांकं, बौद्ध भिख्खूंची चर्चा कक्ष, विश्रांती कक्ष, स्नानगृह आणि ध्यानगृह पाहून मन खरंच विस्मयचकित होतं. मी आणि काकू फक्त श्रवणभक्ती करीत होतो. पण गुरुजी आणि इस्पिकचा एक्का ह्या ज्ञानी जनांमध्ये ही शिल्पं , आपला धर्म आणि मुसलमान धर्मातील फोलपणा ह्यावर व्यासंगी चर्चा झाली. दांभिकपणा बाबत सर्व धर्मात एक वाक्यता आहे, धर्मसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालून, स्वार्थ साधण्यासाठी भोळ्या भाबड्या (म्हणजेच मूर्ख) जनतेस वेठीस धरतात ह्यावर एकमत झालं. परतीचा प्रवास (माझ्यासाठी) सुकर होता. निगडीकडे मार्गस्थ झाल्यावर वाटेत एका क्षुधाशांती उपहारगृहात पुनःश्च एकवार मिसळपाव आणि चहानामक पेयावर ताव मारून झाला जड अंतःकरणाने (आणि देहाने) बेडसे लेण्यांचा निरोप घेतला. काकूंना तिच्या बहिणीकडे 'मनमोकळ्या' गप्पासत्रासाठी सोडून मी 'श्री रामदेव बाबा ढाब्याकडे' संध्याकाळच्या कट्ट्यासाठी प्रयाण केलं. 'श्री रामदेव बाबा ढाब्यावर' अतृप्त आत्मा, इस्पिकचा एक्का ह्यांच्या समवेत चौकटराजा, श्री आणि चिरंजिव नादखुळा, मी मिपाचा मित्र (मी आधी 'नीताचा' ऐकलं. त्यामुळे ही 'नीता' कोण ह्या विचारात कांही सेकंद गेले), झकासराव, वल्ली, यसवायजी, देवांग आदी जमले होते. थोड्या उशीराने श्री. बाबा पाटील ह्यांनी उपस्थिती नोंदविली. 'श्री रामदेव बाबा ढाबा' ह्या नांवामुळे आपल्या पुढे काय 'वाढून' ठेवले असेल धाकधुक मनांत होती. पण डाल बट्टी ह्या राजस्थानी पारंपारिक पदार्था समवेत, व्हेज कडाई, मटर-मेथी-मलाई,भाकरी, दहिखिचडी वगैरे पदार्थ छान होते. गोड खाणार्‍यानी रबडी हादडली. भरपूर साधकबाधक चर्चा झाली. मराठी चर्चेला चिं. नादखुळा ह्या मिपाच्या भावी क्रिकेटप्रेमी सदस्याने कानडी तडका दिला. जेवूनखाऊन तृप्त मनाने शेजारच्याच पानाच्या टपरीची विक्रि वाढविली तिथे उर्वरीत चर्चा (वल्ली आणि अतृप्त आत्मा ह्यांची लटकी खणाखणी) रंगली. अचानक किसन शिंदेंनी हजेरी लावून सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. पुढे त्यांच्या आणि मिपाच्या वादग्रस्त सदस्याच्या जवळिकीवरून हास्यविनोदाला उधाण आले. निरोप घेता घेता चर्चा रंगत राहिल्या. निघता पाय पुन्हा पुन्हा मागे घेतला जात होता शेवटी 'उद्या ऑफिस आहे' ह्या व्यावहारिक विचाराने मिपाची सुंदर संध्याकाळ आवरती घेतली. सर्वांनाच मजा आली. यशस्वी कट्टा आयोजनाबद्दल अतृप्त आत्मा ह्यांचे विशेष आभार. कोणीतरी कट्टुयाची छायाचित्रे टाकेलच.(मी सुद्धा वाट पाहात आहे).

In reply to by प्रभाकर पेठकर

धन्या 29/03/2014 - 10:30
अचानक किसन शिंदेंनी हजेरी लावून सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.
किसन शिंदे नाही काका. मी मी धन्या. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो.........

शैक्षणीक वळण

रामदास ·

बॅटमॅन 26/03/2014 - 17:39
एकेक पंचेस इतके भारी आहेत की ते वेगळे काढायचे म्हटलं तर अख्खा लेखच पुन्हा पेष्टवावा लागेल. ती ऑष्ट्रेलिया वि. सौथाफ्रिका म्याच न्हौती का ४३४ वाली? हायलैट्स अन म्याचीत फरकच नै.

रेवती 26/03/2014 - 18:24
लेखन आवडले. आता मनाची तयारी सुरु करते. प्रत्येक आईबापाला आपापलं भविष्य दिसायला लागलं असेल. सध्या आमच्याकडे दुधापेक्षा 'मॅड्रास कॉफी' कशी चांगली याचे धडे आम्हालाच मिळतात. पाह्यलं तर मद्रास कुठे आहे किंवा काय आहे हेही माहीत नसेल.

दिव्यश्री 26/03/2014 - 19:34
माझा चश्मा नाकाच्या शेंड्यावरून गळून खाली पडला. हे वाण नक्कीच ह्याच्या आईकडून आलं असावं माझ्या प्रश्नामुळे आणखीच खूष झाले. कानातल्या डुलाला हलकेच स्पर्श करत मला म्हणाले "डॅड -तुम्ही फार लवकर गोंधळता." >>>> :D *LOL* सहीच लेख आहे . पंचेस कसे असावेत याचे उत्तम उदाहरण . :)

>>>आपलं नशिब मिराकुमार सारखं एका उंच खुर्चीवर बसून फक्त हसतंच आहे. ...एकदम डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं :) रामदासांचे पूर्वीचे लेखन वाचले आहेच. त्यामुळे ताजे, स्ट्रेट फ्रॉम ओव्हन, लेखन वाचायला मिळाल्यामुळे खास मजा आली. खास रामदास टच. भन्नाट.

स्पंदना 27/03/2014 - 08:25
मस्त! बाकी सारं तर आहेच पण अर्धांगिनीची स्तुती फार म्हणजे फारच भावली.
पण हे तसं आता आताशाचं.पोस्टमन घरापर्यंत टपाल आणून द्यायच्या काळात ही माउली पोस्टमनला कोथींबीर मिरच्या आणायला पण पिटाळायची.
डोळ्यासमोर धुक तरळल हे वाचताना. आठवणींच हो! असो

तुम्हाला साष्टांग __/\__!!
आम्ही सगळे फार लवकर गोंधळून जातो.याच्या बहीणीच्या आणि याच्या वयात पाच वर्षाचं तरी अंतर असावं अशी आमची अपेक्षा होती... पण गोंधळाच्या मनस्थितीतून बाहेर येण्यापूर्वीच याचा जन्म झाला होता. असं मला उगाचच सारखं सारखं आठवायला लागलं.
=))

In reply to by सुहास झेले

किसन शिंदे 12/04/2014 - 13:45
+१ ते "ळ" पटकन क्लिक झालं नाही आणि जेव्हा झालं तेव्हा दात काढून हसलोय. :D हे असं. :)

भाते 27/03/2014 - 20:02
नेहमीप्रमाणेच खास रामदासकाका टच. काका, येऊ द्या असेच आणखी बरेच काही.

पैसा 27/03/2014 - 21:27
मस्तच! आमच्या हापिसात "इतकी वर्षे काम करून काहीच शिकला नाहीत म्हणून ट्रेनिंगला पाठवताहेत" असं म्हणायचे. भारताचे भविष्य असलेल्या पिढीबद्दल लिहिलेलं तर मस्तच!

चिगो 31/03/2014 - 16:07
फर्मास, रामदासकाका.. लै म्हणजे लैच जोरदार..
"अ वन डे मॅरॅथॉन इन्स्पीरेशनल कोर्स फॉर लोअर मिडल मॅनेजमेंट सिनीअर्स "
हे अजूनही समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.. %)
माझ्या शेजारी बसलेले गुप्ते पुढच्या आठवड्यात सेवा निवृत्त होणार्‍यांच्या यादीतलेहोते.ह्यालाच म्हणतात एचआर. त्यांच्या डाव्या हातानी घेतलेला निर्णय उजव्या हाताला कळत नाही.
आयला.. हे तर एकदमच "सर्कारी" टायपातलं की.. ;-) एक एक पंच म्हणजे अगदी लोळवणारा आहे. =))

लहानपणी सार्वजनिक स्वछतागृहासमोर प्रवेशाच्या प्रतिक्षेत दाब असह्य झाल्यास आम्ही बेंबीला थुंकी लावायचो, चारचौघात फजिती होत नसे. आपला बेंबीला थुंकी लावण्याचा हेतू तोच असेल तर तुम्ही आम्ही सेम सेम ...

जयराज 12/04/2014 - 07:31
त्यांना जन्मजात पाण्याची अ‍ॅलर्जी आहे हे लक्षात ठेवून तुम्ही त्यांना आंघोळीचा आग्रह करायचा नाही. केलाच तर बाथरुंअमध्ये त्यांनी काढून टाकलेल्या चड्डीचा "ळ" उचलून टाकण्याची जबाबदारी आग्रहकर्त्याची असेल. हसून हसून मेलो. .:-)

बॅटमॅन 26/03/2014 - 17:39
एकेक पंचेस इतके भारी आहेत की ते वेगळे काढायचे म्हटलं तर अख्खा लेखच पुन्हा पेष्टवावा लागेल. ती ऑष्ट्रेलिया वि. सौथाफ्रिका म्याच न्हौती का ४३४ वाली? हायलैट्स अन म्याचीत फरकच नै.

रेवती 26/03/2014 - 18:24
लेखन आवडले. आता मनाची तयारी सुरु करते. प्रत्येक आईबापाला आपापलं भविष्य दिसायला लागलं असेल. सध्या आमच्याकडे दुधापेक्षा 'मॅड्रास कॉफी' कशी चांगली याचे धडे आम्हालाच मिळतात. पाह्यलं तर मद्रास कुठे आहे किंवा काय आहे हेही माहीत नसेल.

दिव्यश्री 26/03/2014 - 19:34
माझा चश्मा नाकाच्या शेंड्यावरून गळून खाली पडला. हे वाण नक्कीच ह्याच्या आईकडून आलं असावं माझ्या प्रश्नामुळे आणखीच खूष झाले. कानातल्या डुलाला हलकेच स्पर्श करत मला म्हणाले "डॅड -तुम्ही फार लवकर गोंधळता." >>>> :D *LOL* सहीच लेख आहे . पंचेस कसे असावेत याचे उत्तम उदाहरण . :)

>>>आपलं नशिब मिराकुमार सारखं एका उंच खुर्चीवर बसून फक्त हसतंच आहे. ...एकदम डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं :) रामदासांचे पूर्वीचे लेखन वाचले आहेच. त्यामुळे ताजे, स्ट्रेट फ्रॉम ओव्हन, लेखन वाचायला मिळाल्यामुळे खास मजा आली. खास रामदास टच. भन्नाट.

स्पंदना 27/03/2014 - 08:25
मस्त! बाकी सारं तर आहेच पण अर्धांगिनीची स्तुती फार म्हणजे फारच भावली.
पण हे तसं आता आताशाचं.पोस्टमन घरापर्यंत टपाल आणून द्यायच्या काळात ही माउली पोस्टमनला कोथींबीर मिरच्या आणायला पण पिटाळायची.
डोळ्यासमोर धुक तरळल हे वाचताना. आठवणींच हो! असो

तुम्हाला साष्टांग __/\__!!
आम्ही सगळे फार लवकर गोंधळून जातो.याच्या बहीणीच्या आणि याच्या वयात पाच वर्षाचं तरी अंतर असावं अशी आमची अपेक्षा होती... पण गोंधळाच्या मनस्थितीतून बाहेर येण्यापूर्वीच याचा जन्म झाला होता. असं मला उगाचच सारखं सारखं आठवायला लागलं.
=))

In reply to by सुहास झेले

किसन शिंदे 12/04/2014 - 13:45
+१ ते "ळ" पटकन क्लिक झालं नाही आणि जेव्हा झालं तेव्हा दात काढून हसलोय. :D हे असं. :)

भाते 27/03/2014 - 20:02
नेहमीप्रमाणेच खास रामदासकाका टच. काका, येऊ द्या असेच आणखी बरेच काही.

पैसा 27/03/2014 - 21:27
मस्तच! आमच्या हापिसात "इतकी वर्षे काम करून काहीच शिकला नाहीत म्हणून ट्रेनिंगला पाठवताहेत" असं म्हणायचे. भारताचे भविष्य असलेल्या पिढीबद्दल लिहिलेलं तर मस्तच!

चिगो 31/03/2014 - 16:07
फर्मास, रामदासकाका.. लै म्हणजे लैच जोरदार..
"अ वन डे मॅरॅथॉन इन्स्पीरेशनल कोर्स फॉर लोअर मिडल मॅनेजमेंट सिनीअर्स "
हे अजूनही समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.. %)
माझ्या शेजारी बसलेले गुप्ते पुढच्या आठवड्यात सेवा निवृत्त होणार्‍यांच्या यादीतलेहोते.ह्यालाच म्हणतात एचआर. त्यांच्या डाव्या हातानी घेतलेला निर्णय उजव्या हाताला कळत नाही.
आयला.. हे तर एकदमच "सर्कारी" टायपातलं की.. ;-) एक एक पंच म्हणजे अगदी लोळवणारा आहे. =))

लहानपणी सार्वजनिक स्वछतागृहासमोर प्रवेशाच्या प्रतिक्षेत दाब असह्य झाल्यास आम्ही बेंबीला थुंकी लावायचो, चारचौघात फजिती होत नसे. आपला बेंबीला थुंकी लावण्याचा हेतू तोच असेल तर तुम्ही आम्ही सेम सेम ...

जयराज 12/04/2014 - 07:31
त्यांना जन्मजात पाण्याची अ‍ॅलर्जी आहे हे लक्षात ठेवून तुम्ही त्यांना आंघोळीचा आग्रह करायचा नाही. केलाच तर बाथरुंअमध्ये त्यांनी काढून टाकलेल्या चड्डीचा "ळ" उचलून टाकण्याची जबाबदारी आग्रहकर्त्याची असेल. हसून हसून मेलो. .:-)
लेखनविषय:
लेखनप्रकार
साक्षात्कार वगैरे मला कधीच होत नव्हते पण गेल्या शुक्रवारी आमच्या एचआर डिपार्ट्मेंटनी एका एक दिवसीय झंझावाती कार्यशाळेला मला पाठवल्यानंतर हे असं काहीतरी मला व्हायला लागलं आहे. आयुष्यात शिकायचं थांबू नका-आयुष्य तुम्हाला रोज काहीतरी शिकवत राहील असं काहीतरी एक मुलायम कोमलांगी सांगत होती. आता खरं सांगायचं तर हे दिवस काही शिकण्याचे आहेत यावरून विश्वास उडलेल्या लोकांसाठी ही कार्यशाळा होती, म्हणजे आमच्या कंपनीने "पुढील शिक्षणास निकामी" असा शेरा मारलेल्या लोकांचा एक जथ्था या कार्यशाळेला पाठवला होता.

< गणपा खरंच मिपाशेफ बनतील का ! >

प्यारे१ ·

In reply to by गणपा

प्यारे१ 26/03/2014 - 20:08
एक वर्षापूर्वीची कोअर टीम आठवली. ;) (हलकं घ्या हो. सगळ्या मिपाशेफ ना पाकृ करायला नि खिलवायला सब कुछ उत्तम लाभो!)

गणपा 26/03/2014 - 15:03
गणपा येडा आहे गणपा बावळ्ट आहे गणपा बाशिंग बांध्ले आहे गणपा हरणार आहे गणपा आला मोठा फार शाहणा लागुन गेला गणपा इत्का बिंडोक कोणी नाही गणपा सेटिंग कर्तो गणपा भ्रश्टाचारी आहे गणपा थापाड्या आहे गणपा अम्का गणपा ढ्म्का - मीएकशुन्य

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 26/03/2014 - 15:16
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ १ १ १ १ ११ ११ ११११ ११११११ १११११११ १११११११११ ११११११११ ११११११११ १११११११११ ११११११११ ११११११११११

चिरोटा 26/03/2014 - 15:15
गणपा येवोत अथवा कोणीही! आपल्याला मिपावर अधिकाधिक सुविधा हव्यात. कुठलाही धागा कमीत्कमी संपादित केला जावा. जिलब्या पाडणे( प्रदूषण) कमी करण्याचे सक्षम पर्याय डुप्लिकेट आय्.डीज्.,खरडफळ्यावरचे प्रदूषण रोखता आले पाहिजे. या सर्वात मिपाकरांची वाढती जागरुकता व सहभाग हवाय! (आपल्या सर्वांचा)होमियोहित

गणपा 26/03/2014 - 15:16
अन घटकाभर धरा, झाला तुमचा गणपा मिपाशेफ.. त्यानं काय होणारे? पाककृती विभागाचा अत्याचार थांबणारे? वेगेवेगळ्या दालनातले वाचक अन त्यांचे पित्ते यांची पाककृती पाहुन होणारी जळजळ थांबणारे? चमचमीत पदार्थांचे नुसते फोटोच्या फोटो टाकून लोकांना त्रास देणे थांबणारे? सगळ्या गफ्फा आहेत हो गफ्फा....

In reply to by गणपा

बॅटमॅन 26/03/2014 - 15:18
या प्रतिसादात गणपाऐवजी सानिकास्वप्निल/पेठकरकाका/मृणालिनी किंवा इतर कोणीही क्षयज्ञ टाकला तरी चालू शकेल :)

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 26/03/2014 - 15:26
पुणह्ह्ह्हा एकदा सहमत आहे . :D तसेही येथे सुग्रणीनची आणि सुग्रणांची(बल्लव हा शब्द आवडत नसल्याने ), पाककला निपुण लोकांची कमी नाही . भरपूर मातब्बर मंडळी आहेत येथे हे माझे(आपले) भाग्यचं आहे . :)

In reply to by आत्मशून्य

भिकापाटील 26/03/2014 - 15:49
नो डौट पण धागा गणपांबद्दल आहे म्हणून त्यांचे नाव टाकायचे इतकेच.
आशू, आपण वास्तव सांगितलत. खाणासाहेब चिपळे

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 26/03/2014 - 15:36
वरची नावं घेतलेले गणपाशेठचे स्पर्धक आहेत हो! ;) -'पेठकरकाकांची रेसिपी ४७.५ मिनिट वाली' वाला प्रायोजित कार्यक्रम बघायला उत्सुक =))

In reply to by गणपा

बॅटमॅन 26/03/2014 - 15:37
यांच्याशी अंशतः सहमत .. अंशतः सहमत नाही कारण गणपा मिपाशेफ झाल्यावर रोजच्या लेखन-प्रतिसादात फार मोठा फरक पडला नाही तरी लोकांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व पाकृंमध्ये जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे. इतर बल्लवाचार्यांनी कुरापत काढली , महागाई वाढली , संपादनशाही वाढली, ब्रह्मघोटाळे झाले ,धाग्याचे भाव गगनाला भीडले तरी आमचे शेफ ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल ! गणपा मिपाशेफ झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "हाणा" म्हणणारा शेफ लागतो मगच राष्ट्रात बुभुक्षु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही. मिपाकर म्हणून आमची काही एक अस्मिता आहे आणि ती राहीली पाहीजे असे मूळात प्रत्येक मिपाकराला वाटत असतेच! हल्ली परदेश प्रवास आणि एकूणच जग जवळ्येत चालले आहे त्यामुळे ही भावना अधिक जोमाने वाढीस लागली आहे आणि म्हणून गणपा मिपाशेफ झाल्यास फरक पडायला सुरुवात होईल. गणपाच असे नव्हे तर कोणी ही एक प्रसन्न मुद्रेने हाणण्याचे आवाहन करणारा माणूस आत्ता हवा आहे ही काळाची गरज आहे.. बॅटेकर गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !! (ह.घ्या. हेवेसांनल)

In reply to by बॅटमॅन

विटेकर 26/03/2014 - 16:47
खो खो हसलो ! धमाल .. (पीसासारखे हलके घेतले आहे... हेवेसांनल ) आत्मुस .. एक पिसाची स्मायली टाका बघू..

In reply to by बॅटमॅन

गेल्या आख्ख्या आठवड्यात सर्व जगभरच्या अतिरेक्यांनी मिळून एवढा गोळिबार केलेला नाही, हे पहिलेच नमूद करतो. आता तुम्ही याचा पुरावा मागणार, मग तुमच्याशी चर्चा शक्य नाही. गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !! हे पहा तुम्हीच तुमच्या अतिरेकीपणाचा पुरावा देताहात. जो तुमचे इतके मनोरंजन करतो त्या जोलरलाच तुम्ही खलास करता. मग फिल गुड फॅक्टर कसा येईल ? आणि 'फिल गुड' ऐवजी 'फिल शक्कर' वापरली तर मग पाकृ बिघडणार नाही तर काय ? तुम्हाला हे कळणं कठीणच आहे म्हणा. कारण तुम्ही सर्व पदार्थ पातेल्याच्या बाहेरून बघता आहात. कधी पातेल्यात बसून किचनकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि पहा किती फरक पडतो ते. हे मला माहिती आहे पण तुम्हाला समजणे कठीण आहे. तुमच्याकडे ती मानसिकताच नाही. आता परत पुरावा पुरावा म्हणायला लागू नका. कारण किचनमध्ये पदार्थ कसा पुरणार?... फारतर आपण तो जाळू शकतो. बघा मीच जिंकलो तुम्ही सर्व हारलात, नेहमीप्रमाणे.

In reply to by बॅटमॅन

अरे ब्याटमाणा, शेवटी झालीच ना माझी आठवण? प.पु. गुर्जीन्नना णमास्कार क्रून सांगट्त्टो,... आणुभवावीण माण हालवू णको रे... .

In reply to by बॅटमॅन

मिपा-शेफनं त्यांना किचनमधे यायला मज्जाव केल्यामुळे ते गर्दभ-शेफ "पातेल्यात बसून किचन कसे दिसेल" याचा अंदाज घेत आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पैसा 26/03/2014 - 17:54
बाकी कसल्याही आठवणी काढा ओ, पातेली आणि भांड्यांच्या नका काढू! अत्रुप्त आत्मे बंदुका घेऊन धावत येतील!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कवितानागेश 27/03/2014 - 00:11
खतर्नाक! =)) "कधी पातेल्यात बसून किचनकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि पहा किती फरक पडतो ते." हे वाक्य सही म्हणून घेउ का हो काका? ;)

अजया 26/03/2014 - 15:42
कोणी एकच मिपाशेफ बनेल असे नाही. गणपादादा ,सानिका,पेठकर काका,दिपक यातले कोणीहे होऊ शकते!।हा शेफ फार तर दोन-अडीच वर्ष टिकेल. तोवर कोणीतरी मित्र जोडुन ठेवेल. मग मात्र सेमीफायनल मॅच होईल. मिपानिरिक्षक अजया मिपाकर संघटीत झाला की कोणाच्या बापाचे ऐकत नाही.

In reply to by बॅटमॅन

विटेकर 26/03/2014 - 16:54
मिपाकर संघटीत झाला की कोणाच्या बापाचे ऐकत नाही.
तोच तर प्रोब्लेम आहे , मिपाकर संघटीत्च होत नाहीत! शिंची कंपूबाजी करत बसतात आपआप्ल्या खुराड्यात आणि गहूम्हणून एरंड्या विकतील लेकाचे आप्ल्या कंपूमित्रांचे .. संपादक लोक्स पण त्यांनाच सामिल.... . .. . . . . . .. पूर्वी हे नव्हतं ... स्वातंत्र्यपूर्व काळात ..

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 27/03/2014 - 11:15
मिपाकर संघटीत झाला की कोणाच्या बापाचे ऐकत नाही.
तो संगठीत न होउ देणे हा दळभद्री लोकांचा डाव आहे. त्यासाठी मिपाबंधन हा अतूट धागा आहे.

बाळ सप्रे 26/03/2014 - 15:54
बट्टमण्ण यांच्याशी अंशतः सहमत .. अंशतः सहमत नाही कारण गणपा मिपाशेफ झाल्यावर रोजच्या स्वयंपाकात फार मोठा फरक पडला नाही तरी सर्व आचार्‍यांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व स्वयंपाकघरात जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे. शेजारच्या हॉटेलने कुरापत काढली , रेट वाढवले, मेनु कमी केला, भेसळ केली तरी आमचे मिशे ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल ! गणपा मिशे झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "जीभ" असलेला शेफ लागतो मगच स्वयंपाकघरात विजिगिषु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही. @$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^& गणपाच असे नव्हे तर कोणी ही एक तीक्ष्ण जीभेचा माणूस आत्ता हवा आहे ही काळाची गरज आहे..

In reply to by बाळ सप्रे

क्लिंटन 26/03/2014 - 21:45
भगवान करो अन तुमची बात सच निकलो! पण सध्या तरी इतके आशावादी रहावे असे वाटत नै. असो, घोडामैदान जवळच आहे.

In reply to by बॅटमॅन

मूकवाचक 26/03/2014 - 16:25
तसा पुरावा देणे अशक्य कोटीतले असले तरी गणपाशेठ भेसळीचे पदार्थ वापरून तयार केलेले हाटेलातले पदार्थ चोरवाटेने आणून शेफ म्हणून मिरवतो हे मी सप्रमाण सिद्ध केलेले असूनही गणपा मिपाशेफ व्हावेत यावर तुम्ही अडून बसता हे नवल आहे! तुमच्याशी चर्चा संभवत नाही. खातो तेच ...

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 27/03/2014 - 11:19
ब्याटाजीराव
त्यांनी मिपाची जिलबी करण्यापेक्षा मिपाचा रसगुल्ला बनवावा.
तुमचे बंगालप्रेम आत्ताच का एवढे उचळंबुन आले. जीलेबी हा मराठी पदार्थ आहे. मराठी पदार्थाऐवजी बंगाली पदार्थ सुचवून मराठी माणसाची गळचेपी करुन त्याला हद्दपार करण्याचा हा डाव कदापी सहन करणार नाही. आमचे मिपाबंधन अभेद्य आहे......करुन दाखवले. ब्याटाजीराव तुम्ही ब्याटाजीरॉय हे नाव लावा आता.

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन 27/03/2014 - 12:06
साफ चूक. उलट जिलेबी हा मूळचा इराकमधील झलाबिया गावचा पदार्थ आहे. त्याउलट रसगुल्ला हा भारतातच पैदा झालेला पदार्थ आहे. शिवाय रसगुल्ला कसा रसाने भरलेला असतो. त्यामुळे रसगुल्लाच पाहिजे होऽऽऽ!!!!!!!!

मूकवाचक 26/03/2014 - 15:58
पेठकर काकांचे नाव चर्चेत आल्याने गणपासेठ मिपाशेफ बनण्याचा धोका वाटत नाही. सध्या कुठल्याही मिपाकराच्या नावावर निर्णायक सहमती होण्याचे दिवस गेले आहेत. अविनाश डोईफोडे पाककला समीक्षक महामंडळ

In reply to by मूकवाचक

शी बाबा कंटाळा आला अश्या धाग्याचा सारख-सारख काय गणपामोडी, राहुल पेठकर , सास्ववाल ह्याचे धागे वॅकॅयक ....सगळ्यानी 16 मे 3014 पर्यंत वाट बघा आपोआप उत्तर मिळेल ना !! (चूप-चाप भक्षक) शॅम्पेन :)

In reply to by माझीही शॅम्पेन

क्लिंटन 27/03/2014 - 13:34
सगळ्यानी 16 मे 3014 पर्यंत वाट बघा आपोआप उत्तर मिळेल ना !!
मला वाटलं ९० च्या दशकातील आणि अजून कुठली कुठली आकडेवारी गोळा करुन हे आधीच सांगता येतं :)

In reply to by क्लिंटन

काही तरी काय क्लिंटन मामा, आकडेवारीला काय अर्थ असतो का? मुद्दे, आकडे यातून काहीही निष्पन्न होत नाही. शेवटी तुम्हाला काय वाटतं तेवढं आणि फक्त तेच खरं - बरोबर आहे ना? :)

पैसा 26/03/2014 - 17:08
माझा एकच स्टँड आहे. गणपा कोंबड्यांचा मॅसॅकर करतो. त्यामुळे मांसाहारवादी आहे. पण तरीही शेवटी तो आमचा बाब्या आहे आणि फेसबुकावर मी काही लिहिलं तरी त्याला लाईक करतो. त्यामुळे "आप"लं मत गणपालाच! तुम्हीही सगळ्यांनी बर्‍या बोलाने ऐका. नाहीतर मी तुमच्या प्रश्नांना उत्तरे न देता चर्चा बंद करीन!

In reply to by पैसा

विटेकर 26/03/2014 - 17:21
संपादक लोक्स पण त्यांनाच सामिल....
हेच तर आम्ही म्हण्तोय>>>>> Dont waste your time in Tunking .. People only pratisad what they want to pratisad... (हे कोणीतरी निळे करा रे !)

In reply to by पैसा

दिव्यश्री 26/03/2014 - 17:55
भारीच पैतै... :D मी तुझ्या गटात , कंपूत या बाबतीत . ;) :P कारण मी पण सुद्द साकाहरीच हाये . *beee* तंवर बाकीच्याणी इ णो ग्यावे . *drinks* *lol*

In reply to by पैसा

मी पण, मी पण. माझा पण एक स्ट्यांड आहे. गणपा भाज्यांचाही मॅसॅकर करतो. अजून एक आहे तो दरवेळेस चिकनऐवजी चीज चालेल म्हणतो आणि लोक म्हणतात की "धागा उघडला आणि चीज झालं" आता पाकृत चीज टाकलं की तिचं चीज होणारच हे तुम्हाला अगोदर पासून कळायला पाहिजे. ते मला कळतं, पण तुम्हाला नाही. कारण तुमच्या दृष्टीचा कोन वेगळा आहे. तो काय आयस्क्रिम कोन नाहिये. बघा परत मलाच ते माहितेय, तुम्हाला कधीच कळणार नाही. असो. फेसबुकाचं म्हणाल तर आम्हीच तुमच्या दोन पावलं पुढे आहोत. हे दोन्ही शेफ आम्ही काहि लिहीलं नाही तरी त्याला लाईक करतात (कोणी काही लिहील्यावर लाईक केलं यात काय नविन?). आता बोला... नको, नको कायपण बोलू नका, तो हक्क माझा. तुम्ही फक्त मी म्हणतो त्याला हो बोला बर्‍या बोलाने; तो हक्क तुमचा, माझ्या सौजन्याने. नाहीतर तुम्ही न विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देवून मी "तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही" असे म्हणत चर्चा लै लै लांबवीन. कारण मला नैतिकता समजते, तुम्हाला ती समजणे शक्य नाही.

In reply to by पैसा

अहो ही तर माझीच favorite pose आहे. गुर्जींची कॄपा, otherwise आमचं कसलं आलंय करतुब? पण आता पैसाताईंनासुद्धा अखेर माझी आठवण झाली म्हणायची. .

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाळ सप्रे 27/03/2014 - 10:10
ग्रेट पिस्पिकचा केक्का चिकन अथवा भाज्यांचं मॅसॅकर नव्हतं.. त्याला संमं नी कधीच क्लीनचिट दिली आहे. //misalpav.com/mit_clean_chit_to_Ganapa.pdf तुम्हाला हे सिद्ध करता आलेलं नाही. मी तुम्हाला उघडं पाडलयं. (पुन्हा येताना शर्ट घालून या :-) ) गेट वेल सून आणि किती दिवस हे चिकनचं मॅसॅकर वापरणार. यात फक्त गणपाद्वेष दिसुन येतो. पण त्यांच्या मिपावरील पाककृतीना सलग ३० वेळा मिपाकरांनी शंभराहून अधिक प्रतिसाद देउन उचलून धरलयं ते काय उगाच. पाकृ विभागाचे वाचक मूर्ख नाहीत.. आज मिपाकरांच्या घराघरात चांगलेचुंगले पदार्थ घडत आहेत ते फक्त गणपांच्या उत्तम पाकृंमुळेच .. फेकु, पप्पु पाकृंवर प्रतिसाद सोडा त्यांची १०० वाचनेदेखिल होत नाहीत. प्रीगुर्जी

In reply to by बाळ सप्रे

दिव्यश्री 27/03/2014 - 10:32
ओह्ह्ह्ह्ह ...ओके . फारच भयानक अर्थ निघाला . :( मला वाटल होत काहीतरी चेष्टेचा/ मजेचा असेल . असो . अर्थ लिहिल्याबद्दल धन्यवाद . (पहिल्यांदा अर्थ समजल्यावर कसतरी झालेली.)

आदूबाळ 26/03/2014 - 17:08
मूढबालकाच्या मूषकलीला सुरु झाल्या! विषयाचं गांभीर्य काय आणि विडंबनाची बाष्कळता किती. आणि त्यावर जवाबदार मंडळींची ही: ही: ही:! आयला, कमाल आहे. - बंदय वीजपावर

In reply to by गणपा

प्यारे१ 26/03/2014 - 20:08
एक वर्षापूर्वीची कोअर टीम आठवली. ;) (हलकं घ्या हो. सगळ्या मिपाशेफ ना पाकृ करायला नि खिलवायला सब कुछ उत्तम लाभो!)

गणपा 26/03/2014 - 15:03
गणपा येडा आहे गणपा बावळ्ट आहे गणपा बाशिंग बांध्ले आहे गणपा हरणार आहे गणपा आला मोठा फार शाहणा लागुन गेला गणपा इत्का बिंडोक कोणी नाही गणपा सेटिंग कर्तो गणपा भ्रश्टाचारी आहे गणपा थापाड्या आहे गणपा अम्का गणपा ढ्म्का - मीएकशुन्य

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 26/03/2014 - 15:16
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ १ १ १ १ ११ ११ ११११ ११११११ १११११११ १११११११११ ११११११११ ११११११११ १११११११११ ११११११११ ११११११११११

चिरोटा 26/03/2014 - 15:15
गणपा येवोत अथवा कोणीही! आपल्याला मिपावर अधिकाधिक सुविधा हव्यात. कुठलाही धागा कमीत्कमी संपादित केला जावा. जिलब्या पाडणे( प्रदूषण) कमी करण्याचे सक्षम पर्याय डुप्लिकेट आय्.डीज्.,खरडफळ्यावरचे प्रदूषण रोखता आले पाहिजे. या सर्वात मिपाकरांची वाढती जागरुकता व सहभाग हवाय! (आपल्या सर्वांचा)होमियोहित

गणपा 26/03/2014 - 15:16
अन घटकाभर धरा, झाला तुमचा गणपा मिपाशेफ.. त्यानं काय होणारे? पाककृती विभागाचा अत्याचार थांबणारे? वेगेवेगळ्या दालनातले वाचक अन त्यांचे पित्ते यांची पाककृती पाहुन होणारी जळजळ थांबणारे? चमचमीत पदार्थांचे नुसते फोटोच्या फोटो टाकून लोकांना त्रास देणे थांबणारे? सगळ्या गफ्फा आहेत हो गफ्फा....

In reply to by गणपा

बॅटमॅन 26/03/2014 - 15:18
या प्रतिसादात गणपाऐवजी सानिकास्वप्निल/पेठकरकाका/मृणालिनी किंवा इतर कोणीही क्षयज्ञ टाकला तरी चालू शकेल :)

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 26/03/2014 - 15:26
पुणह्ह्ह्हा एकदा सहमत आहे . :D तसेही येथे सुग्रणीनची आणि सुग्रणांची(बल्लव हा शब्द आवडत नसल्याने ), पाककला निपुण लोकांची कमी नाही . भरपूर मातब्बर मंडळी आहेत येथे हे माझे(आपले) भाग्यचं आहे . :)

In reply to by आत्मशून्य

भिकापाटील 26/03/2014 - 15:49
नो डौट पण धागा गणपांबद्दल आहे म्हणून त्यांचे नाव टाकायचे इतकेच.
आशू, आपण वास्तव सांगितलत. खाणासाहेब चिपळे

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 26/03/2014 - 15:36
वरची नावं घेतलेले गणपाशेठचे स्पर्धक आहेत हो! ;) -'पेठकरकाकांची रेसिपी ४७.५ मिनिट वाली' वाला प्रायोजित कार्यक्रम बघायला उत्सुक =))

In reply to by गणपा

बॅटमॅन 26/03/2014 - 15:37
यांच्याशी अंशतः सहमत .. अंशतः सहमत नाही कारण गणपा मिपाशेफ झाल्यावर रोजच्या लेखन-प्रतिसादात फार मोठा फरक पडला नाही तरी लोकांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व पाकृंमध्ये जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे. इतर बल्लवाचार्यांनी कुरापत काढली , महागाई वाढली , संपादनशाही वाढली, ब्रह्मघोटाळे झाले ,धाग्याचे भाव गगनाला भीडले तरी आमचे शेफ ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल ! गणपा मिपाशेफ झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "हाणा" म्हणणारा शेफ लागतो मगच राष्ट्रात बुभुक्षु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही. मिपाकर म्हणून आमची काही एक अस्मिता आहे आणि ती राहीली पाहीजे असे मूळात प्रत्येक मिपाकराला वाटत असतेच! हल्ली परदेश प्रवास आणि एकूणच जग जवळ्येत चालले आहे त्यामुळे ही भावना अधिक जोमाने वाढीस लागली आहे आणि म्हणून गणपा मिपाशेफ झाल्यास फरक पडायला सुरुवात होईल. गणपाच असे नव्हे तर कोणी ही एक प्रसन्न मुद्रेने हाणण्याचे आवाहन करणारा माणूस आत्ता हवा आहे ही काळाची गरज आहे.. बॅटेकर गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !! (ह.घ्या. हेवेसांनल)

In reply to by बॅटमॅन

विटेकर 26/03/2014 - 16:47
खो खो हसलो ! धमाल .. (पीसासारखे हलके घेतले आहे... हेवेसांनल ) आत्मुस .. एक पिसाची स्मायली टाका बघू..

In reply to by बॅटमॅन

गेल्या आख्ख्या आठवड्यात सर्व जगभरच्या अतिरेक्यांनी मिळून एवढा गोळिबार केलेला नाही, हे पहिलेच नमूद करतो. आता तुम्ही याचा पुरावा मागणार, मग तुमच्याशी चर्चा शक्य नाही. गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !! हे पहा तुम्हीच तुमच्या अतिरेकीपणाचा पुरावा देताहात. जो तुमचे इतके मनोरंजन करतो त्या जोलरलाच तुम्ही खलास करता. मग फिल गुड फॅक्टर कसा येईल ? आणि 'फिल गुड' ऐवजी 'फिल शक्कर' वापरली तर मग पाकृ बिघडणार नाही तर काय ? तुम्हाला हे कळणं कठीणच आहे म्हणा. कारण तुम्ही सर्व पदार्थ पातेल्याच्या बाहेरून बघता आहात. कधी पातेल्यात बसून किचनकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि पहा किती फरक पडतो ते. हे मला माहिती आहे पण तुम्हाला समजणे कठीण आहे. तुमच्याकडे ती मानसिकताच नाही. आता परत पुरावा पुरावा म्हणायला लागू नका. कारण किचनमध्ये पदार्थ कसा पुरणार?... फारतर आपण तो जाळू शकतो. बघा मीच जिंकलो तुम्ही सर्व हारलात, नेहमीप्रमाणे.

In reply to by बॅटमॅन

अरे ब्याटमाणा, शेवटी झालीच ना माझी आठवण? प.पु. गुर्जीन्नना णमास्कार क्रून सांगट्त्टो,... आणुभवावीण माण हालवू णको रे... .

In reply to by बॅटमॅन

मिपा-शेफनं त्यांना किचनमधे यायला मज्जाव केल्यामुळे ते गर्दभ-शेफ "पातेल्यात बसून किचन कसे दिसेल" याचा अंदाज घेत आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पैसा 26/03/2014 - 17:54
बाकी कसल्याही आठवणी काढा ओ, पातेली आणि भांड्यांच्या नका काढू! अत्रुप्त आत्मे बंदुका घेऊन धावत येतील!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कवितानागेश 27/03/2014 - 00:11
खतर्नाक! =)) "कधी पातेल्यात बसून किचनकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि पहा किती फरक पडतो ते." हे वाक्य सही म्हणून घेउ का हो काका? ;)

अजया 26/03/2014 - 15:42
कोणी एकच मिपाशेफ बनेल असे नाही. गणपादादा ,सानिका,पेठकर काका,दिपक यातले कोणीहे होऊ शकते!।हा शेफ फार तर दोन-अडीच वर्ष टिकेल. तोवर कोणीतरी मित्र जोडुन ठेवेल. मग मात्र सेमीफायनल मॅच होईल. मिपानिरिक्षक अजया मिपाकर संघटीत झाला की कोणाच्या बापाचे ऐकत नाही.

In reply to by बॅटमॅन

विटेकर 26/03/2014 - 16:54
मिपाकर संघटीत झाला की कोणाच्या बापाचे ऐकत नाही.
तोच तर प्रोब्लेम आहे , मिपाकर संघटीत्च होत नाहीत! शिंची कंपूबाजी करत बसतात आपआप्ल्या खुराड्यात आणि गहूम्हणून एरंड्या विकतील लेकाचे आप्ल्या कंपूमित्रांचे .. संपादक लोक्स पण त्यांनाच सामिल.... . .. . . . . . .. पूर्वी हे नव्हतं ... स्वातंत्र्यपूर्व काळात ..

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 27/03/2014 - 11:15
मिपाकर संघटीत झाला की कोणाच्या बापाचे ऐकत नाही.
तो संगठीत न होउ देणे हा दळभद्री लोकांचा डाव आहे. त्यासाठी मिपाबंधन हा अतूट धागा आहे.

बाळ सप्रे 26/03/2014 - 15:54
बट्टमण्ण यांच्याशी अंशतः सहमत .. अंशतः सहमत नाही कारण गणपा मिपाशेफ झाल्यावर रोजच्या स्वयंपाकात फार मोठा फरक पडला नाही तरी सर्व आचार्‍यांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व स्वयंपाकघरात जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे. शेजारच्या हॉटेलने कुरापत काढली , रेट वाढवले, मेनु कमी केला, भेसळ केली तरी आमचे मिशे ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल ! गणपा मिशे झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "जीभ" असलेला शेफ लागतो मगच स्वयंपाकघरात विजिगिषु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही. @$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^&@$@#%@%$@$%%$^%^#$%^^%#%$^& गणपाच असे नव्हे तर कोणी ही एक तीक्ष्ण जीभेचा माणूस आत्ता हवा आहे ही काळाची गरज आहे..

In reply to by बाळ सप्रे

क्लिंटन 26/03/2014 - 21:45
भगवान करो अन तुमची बात सच निकलो! पण सध्या तरी इतके आशावादी रहावे असे वाटत नै. असो, घोडामैदान जवळच आहे.

In reply to by बॅटमॅन

मूकवाचक 26/03/2014 - 16:25
तसा पुरावा देणे अशक्य कोटीतले असले तरी गणपाशेठ भेसळीचे पदार्थ वापरून तयार केलेले हाटेलातले पदार्थ चोरवाटेने आणून शेफ म्हणून मिरवतो हे मी सप्रमाण सिद्ध केलेले असूनही गणपा मिपाशेफ व्हावेत यावर तुम्ही अडून बसता हे नवल आहे! तुमच्याशी चर्चा संभवत नाही. खातो तेच ...

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 27/03/2014 - 11:19
ब्याटाजीराव
त्यांनी मिपाची जिलबी करण्यापेक्षा मिपाचा रसगुल्ला बनवावा.
तुमचे बंगालप्रेम आत्ताच का एवढे उचळंबुन आले. जीलेबी हा मराठी पदार्थ आहे. मराठी पदार्थाऐवजी बंगाली पदार्थ सुचवून मराठी माणसाची गळचेपी करुन त्याला हद्दपार करण्याचा हा डाव कदापी सहन करणार नाही. आमचे मिपाबंधन अभेद्य आहे......करुन दाखवले. ब्याटाजीराव तुम्ही ब्याटाजीरॉय हे नाव लावा आता.

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन 27/03/2014 - 12:06
साफ चूक. उलट जिलेबी हा मूळचा इराकमधील झलाबिया गावचा पदार्थ आहे. त्याउलट रसगुल्ला हा भारतातच पैदा झालेला पदार्थ आहे. शिवाय रसगुल्ला कसा रसाने भरलेला असतो. त्यामुळे रसगुल्लाच पाहिजे होऽऽऽ!!!!!!!!

मूकवाचक 26/03/2014 - 15:58
पेठकर काकांचे नाव चर्चेत आल्याने गणपासेठ मिपाशेफ बनण्याचा धोका वाटत नाही. सध्या कुठल्याही मिपाकराच्या नावावर निर्णायक सहमती होण्याचे दिवस गेले आहेत. अविनाश डोईफोडे पाककला समीक्षक महामंडळ

In reply to by मूकवाचक

शी बाबा कंटाळा आला अश्या धाग्याचा सारख-सारख काय गणपामोडी, राहुल पेठकर , सास्ववाल ह्याचे धागे वॅकॅयक ....सगळ्यानी 16 मे 3014 पर्यंत वाट बघा आपोआप उत्तर मिळेल ना !! (चूप-चाप भक्षक) शॅम्पेन :)

In reply to by माझीही शॅम्पेन

क्लिंटन 27/03/2014 - 13:34
सगळ्यानी 16 मे 3014 पर्यंत वाट बघा आपोआप उत्तर मिळेल ना !!
मला वाटलं ९० च्या दशकातील आणि अजून कुठली कुठली आकडेवारी गोळा करुन हे आधीच सांगता येतं :)

In reply to by क्लिंटन

काही तरी काय क्लिंटन मामा, आकडेवारीला काय अर्थ असतो का? मुद्दे, आकडे यातून काहीही निष्पन्न होत नाही. शेवटी तुम्हाला काय वाटतं तेवढं आणि फक्त तेच खरं - बरोबर आहे ना? :)

पैसा 26/03/2014 - 17:08
माझा एकच स्टँड आहे. गणपा कोंबड्यांचा मॅसॅकर करतो. त्यामुळे मांसाहारवादी आहे. पण तरीही शेवटी तो आमचा बाब्या आहे आणि फेसबुकावर मी काही लिहिलं तरी त्याला लाईक करतो. त्यामुळे "आप"लं मत गणपालाच! तुम्हीही सगळ्यांनी बर्‍या बोलाने ऐका. नाहीतर मी तुमच्या प्रश्नांना उत्तरे न देता चर्चा बंद करीन!

In reply to by पैसा

विटेकर 26/03/2014 - 17:21
संपादक लोक्स पण त्यांनाच सामिल....
हेच तर आम्ही म्हण्तोय>>>>> Dont waste your time in Tunking .. People only pratisad what they want to pratisad... (हे कोणीतरी निळे करा रे !)

In reply to by पैसा

दिव्यश्री 26/03/2014 - 17:55
भारीच पैतै... :D मी तुझ्या गटात , कंपूत या बाबतीत . ;) :P कारण मी पण सुद्द साकाहरीच हाये . *beee* तंवर बाकीच्याणी इ णो ग्यावे . *drinks* *lol*

In reply to by पैसा

मी पण, मी पण. माझा पण एक स्ट्यांड आहे. गणपा भाज्यांचाही मॅसॅकर करतो. अजून एक आहे तो दरवेळेस चिकनऐवजी चीज चालेल म्हणतो आणि लोक म्हणतात की "धागा उघडला आणि चीज झालं" आता पाकृत चीज टाकलं की तिचं चीज होणारच हे तुम्हाला अगोदर पासून कळायला पाहिजे. ते मला कळतं, पण तुम्हाला नाही. कारण तुमच्या दृष्टीचा कोन वेगळा आहे. तो काय आयस्क्रिम कोन नाहिये. बघा परत मलाच ते माहितेय, तुम्हाला कधीच कळणार नाही. असो. फेसबुकाचं म्हणाल तर आम्हीच तुमच्या दोन पावलं पुढे आहोत. हे दोन्ही शेफ आम्ही काहि लिहीलं नाही तरी त्याला लाईक करतात (कोणी काही लिहील्यावर लाईक केलं यात काय नविन?). आता बोला... नको, नको कायपण बोलू नका, तो हक्क माझा. तुम्ही फक्त मी म्हणतो त्याला हो बोला बर्‍या बोलाने; तो हक्क तुमचा, माझ्या सौजन्याने. नाहीतर तुम्ही न विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देवून मी "तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही" असे म्हणत चर्चा लै लै लांबवीन. कारण मला नैतिकता समजते, तुम्हाला ती समजणे शक्य नाही.

In reply to by पैसा

अहो ही तर माझीच favorite pose आहे. गुर्जींची कॄपा, otherwise आमचं कसलं आलंय करतुब? पण आता पैसाताईंनासुद्धा अखेर माझी आठवण झाली म्हणायची. .

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाळ सप्रे 27/03/2014 - 10:10
ग्रेट पिस्पिकचा केक्का चिकन अथवा भाज्यांचं मॅसॅकर नव्हतं.. त्याला संमं नी कधीच क्लीनचिट दिली आहे. //misalpav.com/mit_clean_chit_to_Ganapa.pdf तुम्हाला हे सिद्ध करता आलेलं नाही. मी तुम्हाला उघडं पाडलयं. (पुन्हा येताना शर्ट घालून या :-) ) गेट वेल सून आणि किती दिवस हे चिकनचं मॅसॅकर वापरणार. यात फक्त गणपाद्वेष दिसुन येतो. पण त्यांच्या मिपावरील पाककृतीना सलग ३० वेळा मिपाकरांनी शंभराहून अधिक प्रतिसाद देउन उचलून धरलयं ते काय उगाच. पाकृ विभागाचे वाचक मूर्ख नाहीत.. आज मिपाकरांच्या घराघरात चांगलेचुंगले पदार्थ घडत आहेत ते फक्त गणपांच्या उत्तम पाकृंमुळेच .. फेकु, पप्पु पाकृंवर प्रतिसाद सोडा त्यांची १०० वाचनेदेखिल होत नाहीत. प्रीगुर्जी

In reply to by बाळ सप्रे

दिव्यश्री 27/03/2014 - 10:32
ओह्ह्ह्ह्ह ...ओके . फारच भयानक अर्थ निघाला . :( मला वाटल होत काहीतरी चेष्टेचा/ मजेचा असेल . असो . अर्थ लिहिल्याबद्दल धन्यवाद . (पहिल्यांदा अर्थ समजल्यावर कसतरी झालेली.)

आदूबाळ 26/03/2014 - 17:08
मूढबालकाच्या मूषकलीला सुरु झाल्या! विषयाचं गांभीर्य काय आणि विडंबनाची बाष्कळता किती. आणि त्यावर जवाबदार मंडळींची ही: ही: ही:! आयला, कमाल आहे. - बंदय वीजपावर
लेखनविषय:
सध्या गणपाशेठ हे मिपाचे जवळ जवळ शेफ बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या गणपासमर्थकां चे उन्मादक ;) प्रतिसाद विशेष लक्षात येण्याजोगे आहेत... गणपाहूनही गणपाभक्त किंवा मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे असो तर प्रश्न असा आहे खरेच गणपाशेठ मिपाशेफ बनतील का ? त्यासाठी ते किती रेसिपी टाकतील ? अपर्णा अक्षय, पैसा, लिमाऊ, यशो, दिव्यश्री, अ आ अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल... प्रश्न अनेक आहेत. हे पाहता होणारे मिपाशेफ हे कुणी दुसरेच होईल, झाले तरी इतर नवशेफ त्यांना टिकू देतील का?