मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मदतीचा हात हवाय…….

अनिकेत प्रकाश आमटे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार ! हे पत्र आपल्याला पाठवण्याचे कारण, आजवर या न त्या कारणाने आपला डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘लोक बिरादरी प्रकल्प- हेमलकसा, ता. भामरागड, जि. गडचिरोलीशी’ आपला संबंध आला असावा. आपण कदाचित प्रकल्पाला भेट अथवा देणगी दिली असेल, सौ. साधनाताई आमटे, डॉ. प्रकाश आमटे किंवा श्री. विलास मनोहर यांचे एखादे पुस्तक निश्चितच आपल्या वाचनात आले असेल. तसे नसतानाही आपल्याला अनवधानाने हे पत्र मिळाल्यास दिलगिरी व्यक्त करून या पत्रामागचे प्रयोजन स्पष्ट करते. ज्येष्ठ समाजसेवक श्री. बाबा आमटे प्रस्थापित आणि डॉ. प्रकाश आमटे संचलित हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाच्या स्थापनेला आज 40 वर्षे पूर्ण झाली आहेत.

कॅलिडोस्कोप ३

kurlekaar ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बेगम अख्तर “हमरी अटरियापे आओ सांवरिया, देखा देखी बलम हो जाये आओ साजन तुम हमरे द्वारे, सारा झगडा खतम हो जाये” ठुमरी “ये मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया” गझल पंकज मलिक. सी एच आत्मा व सेहगल ही मंडळी आमच्या आधीच्या पिढीतली. बेगम अख्तर देखिल त्याच पिढीतली. या पुरुष मंडळींच्या आवाजातला दर्दीला भारदस्तपणा अजून ऐकायला बरं वाटत असलं तरी एका दृष्टीने पाह्यला गेलं तर ही पुरुष गायक मंडळी किंचितशी कालबाह्य झालीयत, कारण नंतर तलत मेहमूद, गुलाम अली, भूपिंदर, जगजीत सिंग यांची inning सुरु झाली. तसं बेगम अख्तरचं नाहीं.

रंग आणखी मळतो आहे

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
रंग आणखी मळतो आहे

रंग सुगीचा छळतो आहे
वसंतही हळहळतो आहे

गारपिटाचे गुलाबजामुन
डोळ्यामध्ये तळतो आहे

मावळतीचा तवा तांबडा
भातुकलीला जळतो आहे

पडतो आहे, झडतो आहे
तरी न मी ढासळतो आहे !

भोळसटांच्या वस्तीमध्ये
घाम फुकाचा गळतो आहे

बेरंगाच्या रंगामध्ये
रंग आणखी मळतो आहे

ऐलथडीच्या सुप्तभयाने
पैलथडीने पळतो आहे

'अभय'पणाचा वाण तरी पण;
पाय बावळा वळतो आहे

निवडणूक २०१४ अनुभवः २ केजरीवाल मुंबईत (१)

आतिवास ·
अनुभव १ ‘रोड शो’ ही संकल्पना मला स्वत:ला फारशी आवडत नाही. शहरांत रस्त्यावर आधीच कितीतरी वाहनं असतात, प्रदूषण असतं, वेळ लागतो. एखाद्या राजकीय नेत्याचा ‘रोड शो’ म्हटला की सामान्य प्रवाशांचे हाल वाढतात. काय ज्या यात्रा वगैरे करायच्या आहेत त्या चालत कराव्यात, अगदी फार फार तर सायकल वापरावी असं माझं मत. अर्थात माझ्या मताला कोण विचारतंय म्हणा! तरीही ‘आप’चे श्री. अरविंद केजरीवाल यांचा मुंबईत ‘रोड शो’ आहे म्हटल्यावर मी १२ मार्चला मुंबईत जायचं ठरवलं. अरविंद केजरीवाल यांना पाहायचं किंवा ऐकायचं असा माझा हेतू नव्हता.

अशीच एक फँटसी..(१)

सस्नेह ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शॉपिंग मॉलचा मधला जिना चढताना अर्णवने आधी शर्टचा अन मग पँटचे दोन असे तीनही खिसे नीट तपासले. तिथे ती यादी नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने आपले डोके तीन वेळा झटकले. मग त्याच्या (म्हणजे डोक्याच्या) मागच्या भागावर पालथ्या मुठीने तीन खारका मारल्या. ..इतके करून झाल्यावर त्याला पक्के कळून चुकले की सामानाची यादी खिशातून अन उर्मीने आणायला सांगितलेली तेरावी ( की सतरावी ?)वस्तू त्याच्या आठवणीतून, नेहमीप्रमाणे, हद्दपार झाली आहे.

ट-२० विश्वचषक स्पर्धा

श्रीगुरुजी ·
ट-२० विश्वचषक स्पर्धा बांगलादेशात सुरू झाली आहे. स्पर्धेत एकूण १० संघ आहेत. गट १ - श्रीलंका, इंग्लंड, द. आफ्रिका, न्यूझीलँड, नेदरलँड्स गट २ - भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, बांगलादेश पहिला सामना भारत व पाक यांच्यात २१ मार्च रोजी आहे. ३ व ४ एप्रिलला उपांत्य फेरीचे सामने असून एप्रिलला अंतिम सामना आहे.

गीतरामायणाचे छंदवृत्त, अलंकार, गायक, राग, आणि इतर माहिती

माहितगार ·
टिव्हीपुर्व काळातील महाराष्ट्रात जेव्हा रेडिओ केवळ जिवंत नव्हते, तर आकाशवाणीही भारतीय संस्कृतीच्या जिवंतपणाच प्रतीक होती; त्या काळात भक्तीसंगीताच्या सूरांच्या रोज सकाळी आकाशवाणीवरून होणार्‍या भावपूर्ण मैफिलीत, गीतरामायणातल एखाद पद अचानक कानावर पडल की सकाळच नाही आख्खा दिवस रम्य होऊन जात असे. मराठी विकिपीडियावर मागच्या वर्षाभरात (२०१३) जे काही लेखन मी केल त्यात गीतरामायण लेखाच ज्ञानकोशीय लेखन करण्यात समाधान मिळालं.

सत्ययुग कधी येणार...?

संतोषएकांडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
चहुकोर वेगवेगळे अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचाराच्या बातम्या आपण ऐकतो.बहुतांश लोकं म्हणत असतात की कधी एकदाचा हा कलीयुग संपतो आणी सत्ययुग येतो. आपल्या प्रत्येकाच्या मनात पण कधीतरी हा विचार आलाच असणार. आपण पृथ्वीच्या प्रलयाच्या बर्‍याचशा भविष्यवाण्या ऐकल्या. त्या पोकळ असल्याचा अनुभवही केला. या विषयाचे बरेचशे चित्रपट बघीतले.'२०१२' तर जणूकाही पढे आपल्याशी काय घडणार' ह्याची भीती दाखवणारंच चित्रपट होतं. तर कधी होतोय या पृथ्वीचा विनाश..! कधी येणार हा सत्ययुग...! नोस्ट्राडमस ची भविष्यवाणी सन ३७९७ चं वर्ष पृथ्वीचा आयुष्याचं शेवटचं वर्ष असण्याचं दाखवत आहे.

ही अता विद्रोह करते कातडी

drsunilahirrao ·
लेखनविषय:
दावती नुसता उमाळा बेगडी माणसे आतून सारी कोरडी पाय मातीचेच सार्यांचे इथे चाल उंटाचीच होती वाकडी पोट छोटे भूक मोठी फार ही ही पहा कुरकूर करते आतडी थोर समतेचा तुझा दावा खरा मारती ही हात आता मापडी तू जरी आजन्म करशी भिक्षुकी रे तुझी झोळीच राहे तोकडी छान तू हा न्याय सार्यांना दिला वाजतो हा दंड नुसता लाकडी जी मघा मिरवीत गेली पालखी त्यात होती जातधर्माची मढी हे कसे स्वातंत्र्य आम्हाला दिले ही अता विद्रोह करते कातडी पापपुण्ये मोज सारी तु पुन्हा थरथरु दे ही जीवाची पालडी वस्त्र आत्म्याचे नव्याने वीण तू ने भरोनी देह अमुचे कापडी डॉ.सुनील अहिरराव

तिकीट

अत्रन्गि पाउस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पूर्वी रेल्वेची तिकिटे सुद्धा प्रथम श्रेणी हिरवी , द्वितीय श्रेणी पिवळी/केशरी , platform पांढरी अशी वेगवेगळ्या रंगांची असायची.. आता मात्र सरसकट एकाच पद्धतीच्या कागदावर छपाई ... किती रटाळ वाटते.. आणि विमानाची तिकिटे तर सुरेख चेकबुक सारखी असायची .. प्रत्येक विमानकंपनीचे स्वतंत्र रंगसंगतने नटलेले कव्हर, सुरेखश्या पाकिटात घालून आपल्याकडे यायची. राजधानीचे तिकीट सुद्धा तसेच चेकबुक सारखे असायचे.. त्या तिकिटांना एक सौंदर्य, भारदस्तपणा असायचा, एक ऐट असायची.. हल्ली ई-तिकीट ह्या प्रकाराने हा सगळा प्रकार अतिशय रुक्ष झालेला आहे..