मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आणखी एक मध्यवर्ती डोंबिवली कट्टा.....

भाते ·

सुबोध खरे 02/04/2014 - 13:44
मी येणार. आजच श्री निनाद यांच्या बरोबर कॉफी पण झाले. ते राहायला मुलुंडला आहेत असे कळले म्हनून लगेच भेट हि घेतली. आणी शुक्रवारी भेटण्य़ाचेही नक्की झाले.

आत्मशून्य 02/04/2014 - 16:29
डोंबोलीला "मध्यवर्ती ठिकाण" (सेंटर प्लेस) संबोधु नका हो. फार अश्लिल वाटते.

कंजूस 02/04/2014 - 18:27
मध्यवर्ती म्हणजे सेंटर प्लेस नाही फक्त सेँट्रल प्लेस .अश्लिलच अर्थ काढायचा असेल तर अटकेपार झेंडा लावायला नको आणि क्रिकेट ,फुटबॉल मधले बरेच शब्द बदलायला लागतील .

आत्मशून्य 02/04/2014 - 20:40
मध्यवर्ती म्हणजे सेंटर प्लेस नाही फक्त सेँट्रल प्लेस .अश्लिलच अर्थ काढायचा असेल तर अटकेपार झेंडा लावायला नको आणि क्रिकेट ,फुटबॉल मधले बरेच शब्द बदलायला लागतील .
नको नको... एव्हडा बदल अपेक्षित नाही फक्त "मध्यवर्ती" एव्हडा उल्लेख टाळला तरी अश्लिलता बाजुला होउन जाइल हे नक्कि.

सुबोध खरे 02/04/2014 - 13:44
मी येणार. आजच श्री निनाद यांच्या बरोबर कॉफी पण झाले. ते राहायला मुलुंडला आहेत असे कळले म्हनून लगेच भेट हि घेतली. आणी शुक्रवारी भेटण्य़ाचेही नक्की झाले.

आत्मशून्य 02/04/2014 - 16:29
डोंबोलीला "मध्यवर्ती ठिकाण" (सेंटर प्लेस) संबोधु नका हो. फार अश्लिल वाटते.

कंजूस 02/04/2014 - 18:27
मध्यवर्ती म्हणजे सेंटर प्लेस नाही फक्त सेँट्रल प्लेस .अश्लिलच अर्थ काढायचा असेल तर अटकेपार झेंडा लावायला नको आणि क्रिकेट ,फुटबॉल मधले बरेच शब्द बदलायला लागतील .

आत्मशून्य 02/04/2014 - 20:40
मध्यवर्ती म्हणजे सेंटर प्लेस नाही फक्त सेँट्रल प्लेस .अश्लिलच अर्थ काढायचा असेल तर अटकेपार झेंडा लावायला नको आणि क्रिकेट ,फुटबॉल मधले बरेच शब्द बदलायला लागतील .
नको नको... एव्हडा बदल अपेक्षित नाही फक्त "मध्यवर्ती" एव्हडा उल्लेख टाळला तरी अश्लिलता बाजुला होउन जाइल हे नक्कि.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार लोक्स, कट्टा नियोजन अधिकारी मा. श्री. मुक्तविहारि यांच्या मार्गदर्शनानुसार ऊत्त्सवमुर्ती 'निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी' यांच्यासोबत मध्यवर्ती डोंबिवलीमध्ये कट्टा करायचे ठरले आहे. काय करणार, सर्वात जास्त मिपाकर मध्यवर्ती डोंबिवलीतले असल्याने, इथे वारंवार कट्टे होणे सहाजिकच आहे! बाकीच्या नेहमीच्या इतर गोष्टी खालीलप्रमाणे… तारीख / वार : ४ एप्रिल २०१४ / शुक्रवार ठिकाण : हॉटेल नंदी पॅलेस, डोंबिवली वेळ : संध्याकाळी ७:३० वाजता

कार्पोरेट

चिनार ·

मृत्युन्जय 02/04/2014 - 15:48
खल्लास. सहीच. त्यात परत खालच्या सिंहासाठी तर डब्बल अभिनंदनः जहर दे के वो फ़रमाते हैं के पीना होगा, जहर पीता हुं तो केहते हैं के जीना होगा !!! “

सविता००१ 02/04/2014 - 15:56
ऑफिसमधे बसून कोण कस आहे याचा विचार करत करत पुन्हा पुन्हा वाचतेय. भन्नाट. आणि एकदम चपखल. मस्तच. मझ्या ऑफिसवरच लिहिलय अस वाटतंय!

वाटाड्या... 02/04/2014 - 19:02
एकुण परिस्थीती तशीच दिसते. ७-८ वर्षापुर्वी अशीच असायची. शहाण्याने असल्या क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करुन लवकरात लवकर आपले पाय परदेशी जाणार्‍या विमानाला लावावेत हेच खरं. तसही परदेशी काय म्हणा, देशी बॉस मिळाला तर हाल कुत्रं खात नाही पण बाहेर पडुन जाता येतं. असो.. उत्तम लिखाण...मजा आली. -वाट्या..

खेडूत 02/04/2014 - 23:52
>> या व्यक्तीला भूतकाळ आणि भविष्य काळातच राहायला आवडतं. वर्तमानकाळ त्याच्या गावीच नसतो . आपण आपलं मस्त मिपा वर येतो. मज्जा! बरोब्बर वर्तमानात रहातो. :) बाकी हे बिझिनेस मॉडेल आहे, ते समजून घेतले आणि आपण त्यात कुठे आणि का आहोत, हे ओळखून चाललं की काही त्रास होत नाही!

फारएन्ड 03/04/2014 - 05:28
जहर दे के वो फ़रमाते हैं के पीना होगा, जहर पीता हुं तो केहते हैं के जीना होगा !!! “ >>> बहुधा 'ये इश्क इश्क है' कव्वालीतील आहे. साहिरच्या आहेत हे नक्की.

In reply to by फारएन्ड

पैसा 03/04/2014 - 08:52
त्यातल्याच आहेत! पण इथे थोडा फरक करून वापरल्या आहेत. नाजो अंदाज से कहते हैं क़ि जीना होगा जहर भी देते हैं तो कहते हैं क़ि पीना होगा जब मैं पीता हूँ तो कहते हैं क़ि मरता भी नहीं जब मैं मरता हूँ तो कहते हैं क़ि जीना होगा

मस्तच ! कंपनोकंपनी मशीनचीच कॉफी. याबाबत आम्ही तेवढे सुदैवी, म्हणजे दोन-तीन वेळा मस्त बनवलेली चहा येते बाहेरून, इतरवेळी तल्ल्लफ लागल्यास मग मशीनला पर्याय नाही.

चिनार 10/09/2014 - 10:02
प्रस्तूत लेख "उत्तमकथा " मासिकाच्या September अंकात प्रकाशित झाला आहे

मृत्युन्जय 02/04/2014 - 15:48
खल्लास. सहीच. त्यात परत खालच्या सिंहासाठी तर डब्बल अभिनंदनः जहर दे के वो फ़रमाते हैं के पीना होगा, जहर पीता हुं तो केहते हैं के जीना होगा !!! “

सविता००१ 02/04/2014 - 15:56
ऑफिसमधे बसून कोण कस आहे याचा विचार करत करत पुन्हा पुन्हा वाचतेय. भन्नाट. आणि एकदम चपखल. मस्तच. मझ्या ऑफिसवरच लिहिलय अस वाटतंय!

वाटाड्या... 02/04/2014 - 19:02
एकुण परिस्थीती तशीच दिसते. ७-८ वर्षापुर्वी अशीच असायची. शहाण्याने असल्या क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करुन लवकरात लवकर आपले पाय परदेशी जाणार्‍या विमानाला लावावेत हेच खरं. तसही परदेशी काय म्हणा, देशी बॉस मिळाला तर हाल कुत्रं खात नाही पण बाहेर पडुन जाता येतं. असो.. उत्तम लिखाण...मजा आली. -वाट्या..

खेडूत 02/04/2014 - 23:52
>> या व्यक्तीला भूतकाळ आणि भविष्य काळातच राहायला आवडतं. वर्तमानकाळ त्याच्या गावीच नसतो . आपण आपलं मस्त मिपा वर येतो. मज्जा! बरोब्बर वर्तमानात रहातो. :) बाकी हे बिझिनेस मॉडेल आहे, ते समजून घेतले आणि आपण त्यात कुठे आणि का आहोत, हे ओळखून चाललं की काही त्रास होत नाही!

फारएन्ड 03/04/2014 - 05:28
जहर दे के वो फ़रमाते हैं के पीना होगा, जहर पीता हुं तो केहते हैं के जीना होगा !!! “ >>> बहुधा 'ये इश्क इश्क है' कव्वालीतील आहे. साहिरच्या आहेत हे नक्की.

In reply to by फारएन्ड

पैसा 03/04/2014 - 08:52
त्यातल्याच आहेत! पण इथे थोडा फरक करून वापरल्या आहेत. नाजो अंदाज से कहते हैं क़ि जीना होगा जहर भी देते हैं तो कहते हैं क़ि पीना होगा जब मैं पीता हूँ तो कहते हैं क़ि मरता भी नहीं जब मैं मरता हूँ तो कहते हैं क़ि जीना होगा

मस्तच ! कंपनोकंपनी मशीनचीच कॉफी. याबाबत आम्ही तेवढे सुदैवी, म्हणजे दोन-तीन वेळा मस्त बनवलेली चहा येते बाहेरून, इतरवेळी तल्ल्लफ लागल्यास मग मशीनला पर्याय नाही.

चिनार 10/09/2014 - 10:02
प्रस्तूत लेख "उत्तमकथा " मासिकाच्या September अंकात प्रकाशित झाला आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार
कॉलेज चे सोनेरी दिवस सरत असतानाच आम्हाला भविष्याचे वेध लागले होते. आता आपण कार्पोरेट विश्वात पदार्पण करणार ही जाणीव आम्हाला सुखावून जायची . बघता बघता कॉलेज संपल .पण कॉलेज मधून बाहेर पडताच मनात आलेला पहिला विचार म्हणजे , " आता डोक्यावर कॉलेजच छप्पर नाही " असा होता .त्या छपराखाली आम्ही किती सुरक्षित होतो हे कार्पोरेट विश्वाचे चटके बसल्यावर कळलं . मग तो सोनियाचा दिन आला आणि आम्ही कंपनीत रुजू झालो . ‘Induction programme, Traning session’ असे करत करत भरभर दिवस पुढे जात होते . त्याकाळात कंपनीच्या भव्य इमारतीपासून ते मशीनमधल्या बेचव कॉफी पर्यन्त सगळ्या गोष्टींच कौतुक वाटत.

माझा पहिला स्मार्टफोन्

चिनार ·

Prajakta२१ 02/04/2014 - 10:59
त्यादिवशी माझ्या भावांसोबत गप्पा मारत असताना मी सहज म्हणालो , " मला नवीन फोन घ्यायचा आहे. स्मार्टफोन् घ्यायचा विचार आहे. " ते ऐकून त्या दोघांचा चेहरा इतका गंभीर झाला कि जणू काही मी त्यांना ," माझी भारतरत्न साठी शिफारस करा" असं म्हणालोय !!!! +++++++++१ :-)

मदनबाण 02/04/2014 - 12:00
म्हणजे कॉलेज मध्ये जाउन अभ्यास करा किंवा लेक्चर करा असे सल्ले मी देणार नाही पण कॉलेज च्या प्रेक्षणीय स्थळांकडे बघायचं सोडून मोबाईलच्या स्क्रीन कडे बघण्यात काय सुख असतं ?? इतका स्मार्ट प्रश्न पडणार्‍यांना स्मार्ट फोन शिकताना कष्ट पडतात यह कुछ हजम नही होत्या मेरेकु... ;) बाकी प्रेक्षणीय स्थळांकडे बघायचं सोडून मोबाईलच्या स्क्रीन बघणारी अरसिक मंडळी आहेत असं समजण्यास हरकत नसावी ! ;) किंवा ते स्मार्ट नसुन मठ्ठ आहेत. ;) हल्ली लोकांना निसर्ग सौंदर्यं म्हणजे नक्की काय तेच कळतं नाही बाँ ! ;) मिपावर स्वागत... :)

चिगो 02/04/2014 - 12:34
मस्त खुसखुशीत लेख..
पण कॉलेज च्या प्रेक्षणीय स्थळांकडे बघायचं सोडून मोबाईलच्या स्क्रीन कडे बघण्यात काय सुख असतं ??
आम्ही नशिबवान.. कॉलेजात असतांना मोबाईल ही परवडणारी वस्तू नव्हती, त्यामुळे सौंदर्यस्थळे बघायचो मस्तपैकी.. ;-) ह्यावरुन एक किस्सा आठवला. तेव्हा मोबाईल जेमेतेम आला होता. (म्हणजे रिलायन्सने "इनकमिंग फ्री"वालं क्रांतिकारक पाऊल उचललं, त्याच्या जस्ट आधी.) आणि त्यामुळे ज्यांच्याकडे मोबाईल आहे, अश्यांना कॉलेजात जाम भाव होता. एकदा एक सुबक ठेंगणी ज्युनियर कन्यका आम्हास विचारता झाली. "आप के पास सेल है?" मी म्हणालो,"हां, है ना.. लेकीन हॉस्टेल पे है.." आता आम्हा काय ठाऊक की मोबाईलला सेल पण म्हणतात म्हणून.. मी बापडा बॅटरी वाले सेल समजत होतो.. ;-)

बाबा पाटील 02/04/2014 - 14:37
मला पण हे स्मार्ट फोनचे लफडे अजुन जमले नाही,माझी कन्या मात्र सतत त्यात काही तरी करत असते आपल्या काय डोक्यात त्याबद्दल प्रकाश पडत नाही.त्यामुळे आमचा जुना नोकिया ई सिरिज जिंदाबाद्,तोडा,फोडा परत जोडा,काम चालु.

In reply to by बाबा पाटील

भाते 02/04/2014 - 20:21
झक्कास! कोणीतरी आहे तर माझ्याबरोबर ई सिरिजचा फोन वापरणारे! धड १२ तास न चालणाऱ्या अँड्रॉईड फोनसमोर २-३ दिवस ब्याटरी चालवणारे हे नोकियाचे फोन! :)

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 03/04/2014 - 15:02
स्मार्ट्फोन म्हणजे गर्ल फ्रेन्ड. मिरवायला बरी. बेसिक फोन म्हणजे बायको. (ह्यानंतर कमेंट येत नसतात. धन्यवाद)

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 03/04/2014 - 15:19
(ह्यानंतर कमेंट येत नसतात. धन्यवाद)
यावर "ठ्ठो" करू की उगा स्त्रीद्वेष्टेपणावर मेगाबायटी निबंध लिहू ते कळेना, सबब एक स्मायलीच टाकतो झालं. =))

शिद 02/04/2014 - 15:01
पण कॉलेज च्या प्रेक्षणीय स्थळांकडे बघायचं सोडून मोबाईलच्या स्क्रीन कडे बघण्यात काय सुख असतं ??
१००० वेळा सहमत. बाकी लेख एकदम खुसखुशीत. :)

कंजूस 02/04/2014 - 15:43
ज्यांना आइनस्टाइनची थेअरी कळली नाही असे म्हटतात त्यांना खरं म्हणजे त्यातलं बरंच काही कळलेलं असतं .आपले डोळे मल्टी अॅंगल नी बोटे मल्टी टच आहेत .नोटिफिकेशन ,टच ,आणि चिमटेही काढू शकतात .तुमच्यासारख्या स्माट लोकांनी हे फोन नाही वापरायचे तर कोणी वापरायचे ?थोड्याच दिवसांत गुगल ग्लास ही घ्याल आणि काय धमाल उडवाल ते सांगता येत नाही . बाकी सहाव्या आयोगापर्यंत प्रतिसाद जाईल असे वाटले नव्हते .त्यात त्या प्राध्यापकांचा काय दोष ? पुढे मागे नोकिआ इ सिरिज अथवा एन एट मध्ये नोकिआने ६००मेहर्ज चा प्रसेसर बदलून ड्यूल कोर टाकला असता तर चांगलीच सूमो कुस्ती झाली असती . पाहाते राहा नी लिहिते राहा .

धन्या 02/04/2014 - 17:55
चांगला. मी पन दोन दिवसान आदी माजा पयला मार्टफोन घ्यातला. लय भारी वाटताय त्या फोननी. मना आता आसा वाटताय का मी आदीच का नाय यांड्रॉड फोन घ्यातला. कदी पायजे तवा इंटरनेट बगायचा. तो ल्यापटॉप चालू कराय नुको आनी काय पन नुको.

In reply to by मारकुटे

स्पंदना 03/04/2014 - 16:40
मला एक समजत नाही माधवा, आधी खुपावंच का? ऑ? जरा मिळुन मिसळुन राह्यल तर काय बिघडतय? उगा भरल्या घरात एखादी वचावचा बोलणारी काकी असते तसं का व्हावं माणसानं?

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 03/04/2014 - 18:31
उगा भरल्या घरात एखादी वचावचा बोलणारी काकी असते तसं का व्हावं माणसानं?
हाच प्रश्न कैक पुतणीवर्गातील लोकांनाही इच्यारता येतोच, नै? (आमचं सोडा हो, आम्ही अगोदरपासूनच ब्याडबॉय इ.इ. आहोत.)

In reply to by बॅटमॅन

स्पंदना 04/04/2014 - 03:57
पुतण्यांच काय आहे बॅटमॅन त्या कुत्र वगैरे म्हणवुन घेउ शकत नाहीत. तसच त्या कुणाची पाठही धरत नाहीत. समोर येउन कुणी सुनवुन जात असेल तर ऐकुन घेत नाहीत एव्हढच ना? अन बाकिच्या सोज्वळ कन्या रस्ता बदलतात असच ना? मग त्या न्यायाने झाशीच्या राणीनेपण गप खाली मान घालुन राज्य सोडायच होतं. आधीच बाई जीला काहीच स्थान नाही, त्यात तिच्याच भाषेत सांगायच तर "रांडमुंड" (विधवा). तरीही तात्या टोपेंसारखी वयस्क, निर्भाड माणस तिची साथ देतात? प्रश्न पडला पाहिजे तुला. त्या धाग्यावर ही चर्चा काढण्याजोग काय खुपलं तुला मला हेच समजल नाही. एकत्र कुटुंब या धाग्यावर तुझाच तर प्रतिसाद होता, असल्या फॅमिलीत मुलींचे लय बेक्कार हाल होतात म्हणुन. त्यात मुलींचेच का म्हणावेसे वाटले तुला हा ही विचार कर. नुसते शब्दाला शब्द वाढवत नेण्याऐवजी लेखनसीमा अन खरच चुकलं असेल तर कबुली बर्‍याचदा वेळेवर सावरते.

Prajakta२१ 02/04/2014 - 10:59
त्यादिवशी माझ्या भावांसोबत गप्पा मारत असताना मी सहज म्हणालो , " मला नवीन फोन घ्यायचा आहे. स्मार्टफोन् घ्यायचा विचार आहे. " ते ऐकून त्या दोघांचा चेहरा इतका गंभीर झाला कि जणू काही मी त्यांना ," माझी भारतरत्न साठी शिफारस करा" असं म्हणालोय !!!! +++++++++१ :-)

मदनबाण 02/04/2014 - 12:00
म्हणजे कॉलेज मध्ये जाउन अभ्यास करा किंवा लेक्चर करा असे सल्ले मी देणार नाही पण कॉलेज च्या प्रेक्षणीय स्थळांकडे बघायचं सोडून मोबाईलच्या स्क्रीन कडे बघण्यात काय सुख असतं ?? इतका स्मार्ट प्रश्न पडणार्‍यांना स्मार्ट फोन शिकताना कष्ट पडतात यह कुछ हजम नही होत्या मेरेकु... ;) बाकी प्रेक्षणीय स्थळांकडे बघायचं सोडून मोबाईलच्या स्क्रीन बघणारी अरसिक मंडळी आहेत असं समजण्यास हरकत नसावी ! ;) किंवा ते स्मार्ट नसुन मठ्ठ आहेत. ;) हल्ली लोकांना निसर्ग सौंदर्यं म्हणजे नक्की काय तेच कळतं नाही बाँ ! ;) मिपावर स्वागत... :)

चिगो 02/04/2014 - 12:34
मस्त खुसखुशीत लेख..
पण कॉलेज च्या प्रेक्षणीय स्थळांकडे बघायचं सोडून मोबाईलच्या स्क्रीन कडे बघण्यात काय सुख असतं ??
आम्ही नशिबवान.. कॉलेजात असतांना मोबाईल ही परवडणारी वस्तू नव्हती, त्यामुळे सौंदर्यस्थळे बघायचो मस्तपैकी.. ;-) ह्यावरुन एक किस्सा आठवला. तेव्हा मोबाईल जेमेतेम आला होता. (म्हणजे रिलायन्सने "इनकमिंग फ्री"वालं क्रांतिकारक पाऊल उचललं, त्याच्या जस्ट आधी.) आणि त्यामुळे ज्यांच्याकडे मोबाईल आहे, अश्यांना कॉलेजात जाम भाव होता. एकदा एक सुबक ठेंगणी ज्युनियर कन्यका आम्हास विचारता झाली. "आप के पास सेल है?" मी म्हणालो,"हां, है ना.. लेकीन हॉस्टेल पे है.." आता आम्हा काय ठाऊक की मोबाईलला सेल पण म्हणतात म्हणून.. मी बापडा बॅटरी वाले सेल समजत होतो.. ;-)

बाबा पाटील 02/04/2014 - 14:37
मला पण हे स्मार्ट फोनचे लफडे अजुन जमले नाही,माझी कन्या मात्र सतत त्यात काही तरी करत असते आपल्या काय डोक्यात त्याबद्दल प्रकाश पडत नाही.त्यामुळे आमचा जुना नोकिया ई सिरिज जिंदाबाद्,तोडा,फोडा परत जोडा,काम चालु.

In reply to by बाबा पाटील

भाते 02/04/2014 - 20:21
झक्कास! कोणीतरी आहे तर माझ्याबरोबर ई सिरिजचा फोन वापरणारे! धड १२ तास न चालणाऱ्या अँड्रॉईड फोनसमोर २-३ दिवस ब्याटरी चालवणारे हे नोकियाचे फोन! :)

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 03/04/2014 - 15:02
स्मार्ट्फोन म्हणजे गर्ल फ्रेन्ड. मिरवायला बरी. बेसिक फोन म्हणजे बायको. (ह्यानंतर कमेंट येत नसतात. धन्यवाद)

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 03/04/2014 - 15:19
(ह्यानंतर कमेंट येत नसतात. धन्यवाद)
यावर "ठ्ठो" करू की उगा स्त्रीद्वेष्टेपणावर मेगाबायटी निबंध लिहू ते कळेना, सबब एक स्मायलीच टाकतो झालं. =))

शिद 02/04/2014 - 15:01
पण कॉलेज च्या प्रेक्षणीय स्थळांकडे बघायचं सोडून मोबाईलच्या स्क्रीन कडे बघण्यात काय सुख असतं ??
१००० वेळा सहमत. बाकी लेख एकदम खुसखुशीत. :)

कंजूस 02/04/2014 - 15:43
ज्यांना आइनस्टाइनची थेअरी कळली नाही असे म्हटतात त्यांना खरं म्हणजे त्यातलं बरंच काही कळलेलं असतं .आपले डोळे मल्टी अॅंगल नी बोटे मल्टी टच आहेत .नोटिफिकेशन ,टच ,आणि चिमटेही काढू शकतात .तुमच्यासारख्या स्माट लोकांनी हे फोन नाही वापरायचे तर कोणी वापरायचे ?थोड्याच दिवसांत गुगल ग्लास ही घ्याल आणि काय धमाल उडवाल ते सांगता येत नाही . बाकी सहाव्या आयोगापर्यंत प्रतिसाद जाईल असे वाटले नव्हते .त्यात त्या प्राध्यापकांचा काय दोष ? पुढे मागे नोकिआ इ सिरिज अथवा एन एट मध्ये नोकिआने ६००मेहर्ज चा प्रसेसर बदलून ड्यूल कोर टाकला असता तर चांगलीच सूमो कुस्ती झाली असती . पाहाते राहा नी लिहिते राहा .

धन्या 02/04/2014 - 17:55
चांगला. मी पन दोन दिवसान आदी माजा पयला मार्टफोन घ्यातला. लय भारी वाटताय त्या फोननी. मना आता आसा वाटताय का मी आदीच का नाय यांड्रॉड फोन घ्यातला. कदी पायजे तवा इंटरनेट बगायचा. तो ल्यापटॉप चालू कराय नुको आनी काय पन नुको.

In reply to by मारकुटे

स्पंदना 03/04/2014 - 16:40
मला एक समजत नाही माधवा, आधी खुपावंच का? ऑ? जरा मिळुन मिसळुन राह्यल तर काय बिघडतय? उगा भरल्या घरात एखादी वचावचा बोलणारी काकी असते तसं का व्हावं माणसानं?

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 03/04/2014 - 18:31
उगा भरल्या घरात एखादी वचावचा बोलणारी काकी असते तसं का व्हावं माणसानं?
हाच प्रश्न कैक पुतणीवर्गातील लोकांनाही इच्यारता येतोच, नै? (आमचं सोडा हो, आम्ही अगोदरपासूनच ब्याडबॉय इ.इ. आहोत.)

In reply to by बॅटमॅन

स्पंदना 04/04/2014 - 03:57
पुतण्यांच काय आहे बॅटमॅन त्या कुत्र वगैरे म्हणवुन घेउ शकत नाहीत. तसच त्या कुणाची पाठही धरत नाहीत. समोर येउन कुणी सुनवुन जात असेल तर ऐकुन घेत नाहीत एव्हढच ना? अन बाकिच्या सोज्वळ कन्या रस्ता बदलतात असच ना? मग त्या न्यायाने झाशीच्या राणीनेपण गप खाली मान घालुन राज्य सोडायच होतं. आधीच बाई जीला काहीच स्थान नाही, त्यात तिच्याच भाषेत सांगायच तर "रांडमुंड" (विधवा). तरीही तात्या टोपेंसारखी वयस्क, निर्भाड माणस तिची साथ देतात? प्रश्न पडला पाहिजे तुला. त्या धाग्यावर ही चर्चा काढण्याजोग काय खुपलं तुला मला हेच समजल नाही. एकत्र कुटुंब या धाग्यावर तुझाच तर प्रतिसाद होता, असल्या फॅमिलीत मुलींचे लय बेक्कार हाल होतात म्हणुन. त्यात मुलींचेच का म्हणावेसे वाटले तुला हा ही विचार कर. नुसते शब्दाला शब्द वाढवत नेण्याऐवजी लेखनसीमा अन खरच चुकलं असेल तर कबुली बर्‍याचदा वेळेवर सावरते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर "पूरब से सुर्य उगा" असं एक गाणं लागायचं. भारत सरकारच्या साक्षरता अभियानाची ती जाहिरात होती. त्या अभियानाच पुढे काय झालं ते माहिती नाही. पण त्यातून साक्षर झालेल्या जनतेसमोर लवकरच एक नवीन आव्हान निर्माण झालं. अक्षरओळख तर झाली, लिहिता - वाचता पण यायला लागलं पण , "कॉम्पुटर येतो का तुम्हाला ?" या प्रश्नाच "नाही" असंच उत्तर द्यावा लागायचं. नंतर त्या गरीब जनतेनी महत्प्रयासाने कॉम्पुटर सुद्धा शिकून घेतला. पण आता परत त्याच जनतेसमोर आणखी एक आव्हान निर्माण झालं आहे. त्याच जनसमुदायाचा मी एक प्रतिनिधी आहे. " मला सुद्धा स्मार्टफोन्स वापरता येत नाहीत".

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - ५

स्पार्टाकस ·

पैसा 05/04/2014 - 23:12
मात्र या मोहिमातील मृत्यूंची संख्या पाहून सुन्न व्हायला होतं. :(

पैसा 05/04/2014 - 23:12
मात्र या मोहिमातील मृत्यूंची संख्या पाहून सुन्न व्हायला होतं. :(
२००८ २००८ च्या मोसमात के २ च्या बेस कँपवर अनेक वेगवेगळ्या मोहींमातील गिर्यारोहकांनी मुक्काम ठोकला होता. त्यांच्यापैकी काहीजणांनी यापूर्वीही के २ वर चढाईचा प्रयत्न केला होता. काही जणांची मात्र ही के २ वरील पहिलीच मोहीम होती. किम जे सू च्या दक्षिण कोरीयन अ‍ॅब्रझी स्पर फ्लाईंग जंप मोहीमेत सर्वात जास्त - १५ गिर्यारोहक होते. सुप्रसिध्द महिला गिर्यारोहक गो मी यंग हिचा त्यात समावेश होता. अनुभवी गिर्यारोहक असलेल्या गो ने पूर्वी मकालू, कांचनगंगा आणि धौलागीरीवर यशस्वी चढाई केली होती.

नवीन मराठी शब्द- सोपे मराठी शब्द

कौशिक लेले ·

सचिन 01/04/2014 - 23:40
स्वैपाक करण्याऐवजी "जेवण बनवतात". .. असो, पण कौशिकभाऊंना इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द हवेत. शोधूया ...!!

आदिजोशी 02/04/2014 - 12:02
पण ह्या मराठीकरणाच्या नादात भाषेला भयाण आणि अकलेचा खंदक दाखवणारे गचाळ शब्द बहाल करू नका ही नम्र विनंती. उदा: तूनळी - youtube थोबाडपुस्तक - facebook चोप्य-पस्त - copy paste ह्या वरच्या टुकार शब्दांबरोबरच काही चांगले समर्पक शब्दही मराठी भाषेला मिळाले आहेत. उदा: खरडवही - scrapbook जालनिशी - blog

In reply to by आदिजोशी

धन्या 02/04/2014 - 17:39
तूनळी - youtube थोबाडपुस्तक - facebook चोप्य-पस्त - copy paste
हे अतिउत्साही लोकांचे उपद्व्याप आहेत. ही सारी उदाहरणे "विशेषनामे" आहेत. विशेषनामांचे शब्दशः भाषांतर होत नाही. त्यामुळे इंग्रजीतील "युटयुब" हा शब्द असलेले वाक्य इतर भाषांमध्ये भाषांतरीत होतात "युटयुब" असेच राहायला हवे.

In reply to by प्रचेतस

धन्या 02/04/2014 - 17:48
"फेसबुक" हे इतर भाषांमध्ये सुद्धा "फेसबुक"च राहायला हवे. ते विशेषनाम आहे. उदा. "अत्रुप्त आत्म्याने ताकाचे भांडे लपवले" हे वाक्य इंग्रजीत भाषांतरीत करताना ते "Atrupt Aatma hid buttermilk pot" असे होईल. "Unsatisfied soul hid buttermilk pot" असे नाही होणार. "Atrupt Aatma" हे विशेषनाम आहे.

In reply to by धन्या

प्रचेतस 02/04/2014 - 18:03
सहमत आहे. माझा आक्षेप फक्त 'मुखप्रुष्ठाविषयीच' होता.
अत्रुप्त आत्म्याने ताकाचे भांडे लपवले
वाक्य कितीही बरोबर असले तरी प्रत्यक्षात अत्रुत आत्मा भांडे लपवित नसून 'भांडे का लपविता' असे विचारीत असतो

In reply to by धन्या

बॅटमॅन 02/04/2014 - 19:28
संस्कृतमधील ऋ या स्वराचा मराठीत 'रु' असा उच्चार होतो, इतकाच काय तो फरक. वरिजिनल ऋ चा उच्चार ३ प्रकारे केला तर चालतो. पण पाणिनीचे सूत्र पाहू अगोदर. ऋटुरषाणां मूर्धा| याचा अर्थ असा, की ऋ, ट-ठ-ड-ढ आणि ष या सर्व वर्णांचे उच्चारस्थान मूर्धा आहे. बाकी डीटेल्स जाऊद्यात. वरीलप्रमाणे ऋ चा उच्चार करणे अत्यंत सोपे आहे. आम्रविकन लोकांचे उच्चार ठौक असतीलच. त्यात उदा. we're going there या. वाक्यामध्ये r चा उच्चार कसा असतो? तसाच याचा उच्चार करावा. अन हा उच्चार मराठीत "ऴ" ने दाखवता येतो. "तमिऴ" मध्येही हाच उच्चार आहे.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन 02/04/2014 - 19:32
किंवा अजून सोपे उदा. "बहुत प्यार करते हैं, तुमको सनम" या गाण्यात "करते" हा शब्द, त्यातही "र" हे अक्षर लांबवलेले आहे. तो र चा उच्चार म्हणजेच संस्कृतचा ऋ म्हटला तरी चालेल.

In reply to by बॅटमॅन

शिद 02/04/2014 - 20:15
किंवा अजून सोपे उदा. "बहुत प्यार करते हैं, तुमको सनम"
आम्हाला आमच्या बाई/मास्तरांनी अश्या साध्या सोप्या सरळ पद्धतीने समजावले असते तर आमचे पण व्याकरण थोडेफार सुधारले असते. ;)

In reply to by शिद

यसवायजी 02/04/2014 - 20:51
:) आम्हाला आमच्या बाईंनी अश्या साध्या सोप्या सरळ पद्धतीने समजावले असते तर.. आमचे पंटर म्हन्ले अस्ते.. बहुत प्यार करते हैं, तुमको मॅडम्म.. हंम्महंम्म्..म्म ;)

In reply to by बॅटमॅन

बहुत सुंदर ! "बहुत प्यार करते हैं, तुमको सनम" या गाण्यात "करते" हा शब्द, त्यातही "र" हे अक्षर लांबवलेले आहे. तो र चा उच्चार म्हणजेच संस्कृतचा ऋ म्हटला तरी चालेल. अशी उदाहरणे देऊन मराठी शिकवायला सुरुवात केली तर "मराठी भाषेचा वापर कमी होत चालला आहे" किंवा "मराठी भाषा चुकीच्या पद्धतीने लिहिली/बोलली जाते" ही भिती कमी व्हायला मदत होईल ! :)

In reply to by धन्या

बॅटमॅन 02/04/2014 - 18:19
शाळा कादंबरीतली व्याक्रणाची उदा. आठवली: "सुरेशने महेशला मारिले", "महेश दूध पितो", "महेश मार खातो", इ.इ.इ. =))

In reply to by धन्या

विजुभाऊ 03/04/2014 - 09:40
धन्या काका तुमचे बरोबर आहे. आत्र एक चूक आहे फेसबुक या नावाचे भाषाम्तर करणे म्हणजे "नील आर्मस्ट्राँग" याचे भाषांतर निळूभाऊ भुजबळ असे किंवा उदा " मायकेल शूमाखर" चे भाषांतर "मायकेल चांभारे" असे भास्।आम्तर करण्यासारखे आहे.

In reply to by प्रचेतस

@मला 'मुखप्रुष्ठ' ऐवजी 'मुखपृष्ठ' हा शब्द बरोबर वाटतो.>>> राम..राम..राम..राम... कहर झाला. :-/ अहो ते मोबॉइल वरून पृ टाइप करता येत न्हाई! तिथे पृ च्या जागी प्रु च टाइप करावं लागतं ! :-/ तरिही खाली आलेलं खाटुकम्यानाचं अप्रतिम विवेचन पहाता.. झालं ते बरच(अवांतर) झालेलं असलं ;) तरी बरच झालं! :D

वेल्लाभट 02/04/2014 - 22:03
आहे ती मराठी टिकवा त्यापेक्षा..... तू असं का बोलला? (या नंतरचा 'स' नेहमी गाळला जातो. 'बोललास' असं रूप असतं) मी तुला भेटेल. (भेटेल????? तृतीयपुरुष एकवचन आहे का?) मी तिला बोलली, ती मला बोलली..... (अरे काय!!!) अगणित चुका असतात... अगणित...! त्या सुधारायची मोहीम काढली तर बरं. अजून नवीन शब्दांची गरज नाही !

खटपट्या 02/04/2014 - 23:45
खालील वाक्यांवर स्वतंत्र धागा होऊ शकतो.
मी चहा पिलो / प्यायलो / पिली / प्यायली (?) तो चहा/ती चहा (?)
सद्या मी "मी चहा प्यायलो" असेच म्हणतो/बोलतो. मी ठाण्याचा रहिवासी/रहिवाशी आहे.

केसं, दगडं किवा असेच काही .. आणि आजकालची मराठी गाणी सुद्धा याच वाटेने चालली आहेत. उदाहरणार्थ - आयचा घो आयचा घो येडा झाला का रे आयचा घो आयचा घो पागल हुआ है ये आपणच अशी गाणी लिहायची आणि वर मराठी भाषा कशी लोप पावत चालली आहे वगैरे यावर चर्चा झाडायची.

हिंदीच्या अतिप्रचारामुळे आणि सुलभीकरणाच्या भोंगळ कल्पनांमुळे मराठीचा संपूर्ण साचा बदलत चालला आहे आणि माझ्या मते तो योग्य नाही. उदा. मी अकोला जातो. विभक्ती प्रत्यय कुठे गेला? माझा वाढदिवस पुण्यात मनवला. मनवला? साजरा केला असे म्हणतात मराठीत. विभक्ती प्रत्यय तर हरवत चालले आहेत. मी त्याची मदत केली हे आणखी एक उदाहरण. पैसे भेटले. भेटले? पैसे काय मनुष्य आहेत काय भेटायला? असो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बॅटमॅन 03/04/2014 - 12:28
हिंदीच्या अतिप्रचाराबद्दल अतिशयच सहमत. तदुपरि भेटणे हे कियापद मिळणे या अर्थी वापरणे हे फक्त अलीकडचे नसावे असे वाटते. विदर्भ इ. भागांत अगोदरपासून असेच बोलत असावेत असे वाटते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मारकुटे 03/04/2014 - 13:15
भाषा सतत बदलत असते. विभक्ती प्रत्ययांची रुपे बदलत असतात. इतर भाषांच्या संपर्कामुळे नवनवे प्रयोग होत असतात. जीभेला ऐकायला बोलायला जे नीट वाटतात ते रुढपावत असतात. असंच आणि असंच हवं या हव्यासापोटी संस्कृत मृत झाली. मराठीबद्दल अजुन आशा आहे. पैसे मिळाले हेच योग्य रुप हे कुणी ठरवल? त्यांना तो हक्क कुणी दिला? समोरचा माणुस पैसे भेटले म्हटल्यावर ज्याला सांगत आहे त्याला समजले ना? संवाद पूर्ण झाला. संवाद होणे महत्वाचे. असो.

In reply to by मारकुटे

असहमत भाषा नवसंपर्क वगैरे वगैरे जरी असले तरी 'अति' वर्ज्य असावे आणि असावेच. मी मुंबईला जातोय च्या ऐवजी मी मुंबई जातोय हे कुठल्याही प्रकारे स्वीकारार्ह नाही. अशा अतिरेकी सुलभीकरणामुळेच मराठीची पिछेहाट होत आहे हे नक्की. एकतर न्यूनगंडापायी इंग्रजीचा केला गेलेला अतिरेकी स्वीकार आणि भाषाभिमान नसल्यामुळे कुठलेही टुकार बदल 'झाला ना संवाद पूर्ण?' अशा मानसिकते पायी स्वीकारणे निव्वळ मूर्खपणाचे आहे. विचारणार्‍याला विचारण्याचा हक्क कोणी दिला हे विचारण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला असाही उपप्रश्न विचारला जाऊ शकतो. झालंच तर आपल्या भाषेवर हिंदी, इंग्रजीचा प्रभाव पाडून घेण्यापेक्षा उलटा प्रयत्नही कधी करावा. भले लगेच जमणार नाही किंवा लगेच शक्यही नाही परंतु सुरुवात नक्की व्हावी.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बॅटमॅन 03/04/2014 - 16:45
पैसे भेटले हा प्रयोग हिंदीच्या प्रभावाखालीच होतोय याला विदा काय? हिंदीचा मराठीशी खूप जवळून संपर्क फारतर गेल्या पन्नासेक वर्षांचा. त्याआधी हा प्रयोग असेल तर काय म्हणणार मग? अन उलटा प्रभाव हिंदीवर थोडासा का होईना, आहेच.

In reply to by बॅटमॅन

कदाचित हिंदीच्या प्रभावाचा मुद्दा आधी आल्यामुळे भेटणे वर त्याचा प्रादुर्भाव झाल्यासारखा वाटतो आहे. तसे नाही २न्ही मुद्दे स्वतंत्र आहेत. विदाच पहायचा झाला तर पूर्वीचे चित्रपट , झालंच तर आकाशवाणीवरच्या श्रुतीका, नाटके यात पैसे भेटणे या वाक्प्रचाराचा अभाव दिसेल आणि तो मी लहान असल्यापासून अनुभवलाच आहे. झालंच तर विदर्भात तो वापरात असेल तर तो वीर वामनराव जोशी या वैदर्भिय नाट्यकाराच्या नाटकांमधे तो दिसत नाही. आणि हो प्रभावाबद्द्लच बोलायचे झाले तर मराठीतील विभक्ती प्रत्यय बाद करण्याचे कारण मला उमजले नाही. मग भले विदर्भातले लोक "मी नागपूर जातो" म्हणत असतील तरी ते चूकच आहे. मग अशा बोलण्याला कोणी बोलीभाषेचा लेप देऊ पाहत असेल तर त्याला विरोध नक्की करावा. कारण माझे जवळचे नातेवाईक देखील विदर्भातील आहेत परंतु तेही असे बोलताना ऐकले नाही. अर्थात त्याच्याशी तुम्ही आधीच सहमत आहात असे वाटते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बॅटमॅन 03/04/2014 - 17:57
विभक्तीच्या मुद्यावर सहमती आहेच. बाकी तुम्ही दिलेली उदा. 'प्रमाण' मराठीची आहेत. नाटककार वैदर्भी असले तरी नाटके वर्‍हाडी बोलीचे प्रतिनिधित्व करतील असे क्वचितच दिसावे. त्यामुळे फक्त बोलीभाषेतली उदा. पाहिजे होती.

In reply to by बॅटमॅन

पैसा 03/04/2014 - 18:17
असे कोकणातही सर्रास बोलीभाषेत ऐकायला मिळते. प्रमाण मराठीत आहे तसा बोलीभाषेत 'मिळणे' आणि 'भेटणे' यात फारसा फरक नाही. याशिवाय 'गावले नाय' असंही म्हणतात. प्रमाण मराठीत मात्र 'गावले' म्हणजे फक्त 'सापडले'. कोंकणीतही मिळाले आणि भेटले या दोन्हीसाठी 'मेळ्ळे (मेळले)' असंच वापरलं जातं. तेव्हा हे शब्दप्रयोग चूक असं म्हणता येणार नाही. प्रमाण मराठीत वापरले जात नाहीत एवढंच.

In reply to by पैसा

बॅटमॅन 03/04/2014 - 18:22
सहमत. गावणे हाही शब्द आहेच. प्रमाण मराठी सोडूनही मराठीचे एक प्रचंड मोठे विश्व आहे त्यात काय काय घडतं याची नोंद करून ठेवणे मस्ट आहे.

In reply to by बॅटमॅन

सुहासदवन 03/04/2014 - 22:43
सध्या मिपावर आणि इतर अनेक संस्थळांवर हे दिसत आहे.....
पूर्ण सहमत!!!!!!! खच्चून निषेध केल्या गेला आहे.
बर्‍याच मालिकांत ऐकू येते - मी काय म्हणली, तू काय म्हणला, ते काय म्हणले....

In reply to by सुहासदवन

बॅटमॅन 04/04/2014 - 12:29
केल्या गेला आहे इ.इ. ही मिपावरची स्टाईल आहे, मराठवाड्यातल्या मंडळींनी पापिलवार केलेली. ती इतरांनी उचलली, इतकेच. अन म्हणला इ.इ. तर बोलीभाषा आहेच-फक्त त्यांना दरवेळेस अशुद्ध अशुद्ध म्हणून हिणवल्या जाऊ नये.

In reply to by बॅटमॅन

सुहासदवन 04/04/2014 - 15:02
पण इतर अव्याकरणीय जालीय संस्थळांच्या यादीत आपले मिपा मात्र नसावे हे माझे स्पष्ट मत आहे. ह्या संस्थळावर अनेक सुन्दर आणि अभ्यासपूर्ण लेख / लेखमालिका सातत्याने येत असतात. इस्पीकचा एक्का, ऋषिकेश, क्लिंटन, गवि, बॅटमॅन आणि इतर अनेक मान्यवर लेखक बरीच मेहनत घेऊन हे लेख मांडतात. त्या ले़खांचे प्रयोजन, त्यात असणारी माहिती, शब्दभांडार, व्याकरण, उपमा इत्यादी आम्हा सार्‍या वाचकांसाठी एक पर्वणीच असते. अगदी त्या लेखांखालील असणाऱ्या टिप्पण्या देखील बऱ्याचदा खूप मार्मिक आणि माहितीपूर्ण असतात. आजच्या युगात जिथे छापील पुस्तके आणि त्यातही व्याकरणासारखं काहीतरी कठीण वाचण्यास जेव्हा अजिबात वेळ नसतो त्यावेळी मिपा सारखी संस्थळे दर्जेदार वाचनाची भूक भागावितात. आणि हेच मिपाचे यश देखील आहे. पण ह्या लेखांनी आणि त्या खालील असणाऱ्या टिप्पण्यानी आपल्या दर्जा बरोबरच आपल्या मराठी भाषेची शब्द प्रामाण्यता टिकवली तर किती चांगले होइल... कारण अनेक युवक / युवती हे लेख आणि लेखमालिका आपल्या किंवा मित्रांच्या संदर्भांसाठी उतरवून घेतात, अशा वेळी आपली भाषा किती सशक्त आणि प्रमाणबद्ध हे माहित पडते. अशा वेळी अगदी एखादा चुकीचा शब्द किंवा चुकीचे व्याकरण भाषेचे सौंदर्य नकळत नष्ट करू शकते आणि चुकीच्या व्याकरणाचा पायंडा पाडू शकते. आणि मला वाटते ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, मराठी भाषा टिकवायची असेल तर… कारण चांगली सवय पटकन लागत नाही पण चटकन सुटते वाईट सवय पटकन सुटत नाही पण चटकन लागते. इथे कोणालाही सुनावण्याचा, दुखावण्याचा काहीही हेतू नाही. कृ. ह. घ्या.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मारकुटे 03/04/2014 - 18:50
>>>भाषाभिमान नसल्यामुळे कुठलेही टुकार बदल 'झाला ना संवाद पूर्ण?' अशा मानसिकते पायी स्वीकारणे निव्वळ मूर्खपणाचे आहे. भाषाभिमान आणि बदल ( ते सुद्धा म्हणे टुकार..ब्वार) यांची गल्लत होत आहे, पतंजली २००० वर्षांपूर्वी म्हणाला होता जसे कुंभाराकडे जाऊन हवे तसे मडके मागतो, बनवुन घेतो तसे कुणीही वैयाकरण्याकडे जाऊन शब्द पाडून घेऊन वापरत नाही, तर त्याचा वापर सुरु करतो. वैयाकरणी केवळ त्याची नोंद घेत व्याकरण बनवतो (जे दर काही वर्षांनी बदलत असते.) बाकी चालू द्या ... आम्ही मुर्ख आहोत हे मान्य !

राजो 03/04/2014 - 14:15
नागपुरी मराठी अशीच हिंदाळलेली आहे.. मी आली/गेली/बोल्ली, तो चाल्ला गेला, काहीही काय बोलून राहिला?? वगैरे.. अलीकडे मराठी टीव्ही जाहिरातींत सुद्धा डोक्यात जाणारे शब्दप्रयोग असतात.. उदा. "काय आपल्या टूथपेस्टमधे मीठ आहे?" (कुठ्ल्या मराठी मधे असे वाक्य असते??)

नाखु 03/04/2014 - 16:49
केलेल्या जाहीराती आणि चित्रपट हे "रेम्या" डोक्याचे असतात त्यामुळे व्याकरणाचे "शिकरण" झालेले आसतेच आसते.

कंजूस 03/04/2014 - 16:54
मिस करणे =तु नसल्यामुळे चुकल्यासारखं वाटतंय . इक्सपायर झाले =वारले . तुमच्या लुकला सुट होईल =तुम्हाला खुलुन दिसेल .तुम्ही या कपड्यात चमकाल . ट्रेंडी =चलाख चटपटीत तरतरीत . फ्रेश होऊन आलोच =आवरून आलोच . टेंशन घेऊ नका =एवढा ताण देऊ नका . डाइअट करा =पथ्य पाळा . हेल्थी फुड =पौष्टिक खाणं . मेन डिश =पक्वान्न ,स्वीट =गोड पदार्थ . बेसिकली =मुळातच . क्लायमैक्स =टोकच गाठलं अपडेटस =नवीन कळवा . रेंटल अपाटमेंट =महिना भाड्याने . फाटली =फजिती झाली ,वाजंत्री वाजली ,आडवाच झालो ,फरफट झाली . बोअर झालो =अगदी कंटाळलो . ऑफ झालो =सुन्न झालो . टेक इट ऑर लीव इट मिपाशटाईल आइ मिन =मला असं म्हणायचं होतं मिप्पाछाप पटलं तर घ्या हेवेसांन .

यसवायजी 03/04/2014 - 17:32
लूट, ठग, जंगल, गुरु, अवतार,योगा, डे़कॉईट, चटनी, चड्डी, आलू, देसी, गोरा, यार,अछा, अंग्रेज, बदमाश, धोती सारखे शब्द त्यांनी घेतले. ते लोक पण असाच विचार करतात काय हो ???

राही 03/04/2014 - 17:34
शेजारच्या घरी मत्स्यपेटिका आणली होती. व्यवस्था ठेवण्यात काहीतरी गडबड झाली आणि काही मासे मेले. तर घरातली छोटी (वय वर्षे पाच) मुलगी दु;खाने सांगू लागली, 'ममा, ते सगळे फिश सँड मध्येच बसलेत. ते वरच येत नाहीयेत. ते सगळे मेले झालेत का?(आर दे डेड?)' सोसायटीमध्ये मांजरांच्या पिल्लांची संख्या खूप झालीय. एकदा त्यातले एक पिल्लू मेले. तर एक चिमखडा धावत येऊन सांगू लागला, 'ती कॅट मेरली. ती पाठीवर पडली, वॉमिट केरली आणि मग ती मेरली' मेली, केली ही मुलांच्या दृष्टीने अनियमित रूपेच आहेत. पडली, बसली, उठली प्रमाणे मरली, करली असे व्हायला पाहिजे. पण आपण मोठी माणसे तर मेली, केली म्हणतो. मग मुलांनी आपल्या मतीने मेली केलीतला 'ए'कार आणि त्यांच्या दृष्टीने योग्य मरली, करली ही रूपे यांचा मेळ घालून मेरली, केरली ही नवी रूपे निर्माण केली!

राही 03/04/2014 - 17:59
'स्वीकारार्ह' नाही, 'वर्ज्य' असावे हे काही मर्यादेपर्यंत ठीक आहे. म्हणजे असे प्रयोग वापरणार्‍यांना आपण मराठीच्या उत्तरपत्रिकेत कमी गुण देऊन शिक्षा करू शकतो. पण फार मोठ्या प्रमाणातल्या मौखिक मराठीचे काय? तिथे निर्बंध कसे काय आणि कोणाकोणावर घालणार? नवनव्या शब्दांचा आणि शब्दप्रयोगांचा खूप मोठा आणि ताकदवान लोंढा मराठीच्या पात्रात घुसतो आहे. तेव्हा मूळ नदी आपले पात्र बदलणारच. हे पात्र विस्तारणे नव्हे तर एका वेगळ्याच दिशेने वाहू लागणे आहे. ह्याला व्याकरणनियमरूपी धरणांनी किंवा बांधांनी आवरता येण्याजोगे नाही. इफ यु कान्ट रेज़िस्ट, एन्ड्युअर, असे वचन आहे; त्याची आठवण होते. तसे तर नपुंसक लिंगही मराठीतून नामशेष होऊ घातले आहे. 'सर्वांचे धाबे दणाणले आहेत' किंवा 'हे ऋण फेडता येण्याजोगे नाहीत' हे सररास ऐकू येते. बदल हे व्हायचेच. ज्ञानेश्वरी, गाथा, गुरुचरित्र त्यातल्या भाषेमुळे आज दुर्बोध आहे. अगदी निबंधमाला सुद्धा वाचताना मध्ये मध्ये ठेच लागते. पण ती भाषा 'मराठी'च आहे आणि सध्याची आणि भविष्यात बदलणारीसुद्धा 'मराठी'च असेल. तेव्हा काळजीचे कारण नाही.

In reply to by राही

प्रदीप 03/04/2014 - 18:40
होत रहातात हे खरे,पण त्याला काही विधीविशेष असावा, नाही? मराठीतील रूढ अर्थाचे शब्द (विनाकारण) नव्या अर्थाने येऊ का लागावेत? उदा. 'प्रभावित', 'संपन्न'. ८० च्या दशकापासून 'शासकीय' मराठी, आमच्या भाषेत अगम्य बदल करू लागली. आता तर, माध्यमांच्या परिणामामुळे काही धरबंदच राहिलेला नाही. (जाता जाता, पूर्वी - म्हणजे अगदी सत्तरीच्या दशकाच्या मध्यावर तरी नक्कीच- 'सरकार' हा शब्द खुद्द सरकारच वापरायचे. मग कधीतरी त्याचे 'शासन' झाले). आता मुंबई-पुण्याकडे जी लिहीली व बोलली जाते, ती भाषा मराठी नसून 'हिंदीठी' आहे. येथील मिपावरीलच लेखन पाहिले तर प्रत्यय यावा! भाषा प्रवाही असावी, हे ठीक. पण ह्याचा अर्थ निव्वळ दहा- वीस वर्षात, तिचे रूपडे ओळखू येऊ नये इतकी ती प्रवाही असेल, तर तिच्या प्रवाहाचे स्त्रोत तपासून पहावेत असे वाटते.

In reply to by प्रदीप

राही 03/04/2014 - 18:49
वेगवेगळ्या स्रोतांमधून 'जीवन' मिळू लागले तर त्यात वावगे काय? बदल सोपे वाटले, सर्वमान्य झाले तर टिकतील, नाही तर उडून जातील. मराठी साहित्याचा उगम स्रोत बदलतो आहे, बदलला आहे, ही वर्गबदलाची प्रक्रिया आम्ही कधी लक्षात घेणार?

In reply to by राही

मारकुटे 05/04/2014 - 13:09
>>>मराठी साहित्याचा उगम स्रोत बदलतो आहे, बदलला आहे, ही वर्गबदलाची प्रक्रिया आम्ही कधी लक्षात घेणार? सहमत आहे. गेली दोन हजार वर्षे ज्यांना गावकुसाबाहेर ठेवले त्यांच्या हातात आता मराठी आहे. हे सत्य स्विकारणे अनेकांना जड जाते त्यामधुन आम्ही बोलतो तीच मराठी बाकी भुक्कड ही प्रवृत्ती गेल्या पन्नास वर्षांत पुण्यामुंबईतील विशिष्ट वर्गातील लोकांमधे उदयास आलेली आहे. त्याचाच वापर करुन बोलण्यावरुन जात शोधुन त्याच्याशी व्यवहार करण्याचे तंत्र विकसित केले गेले आहे.

In reply to by मारकुटे

प्रदीप 05/04/2014 - 14:38
गेली दोन हजार वर्षे ज्यांना गावकुसाबाहेर ठेवले त्यांच्या हातात आता मराठी आहे..... हे टाळीवाक्य इथे (म्हणजे सदर उपधाग्याच्या संदर्भात) अगदी गैरलागू आहे. माझा प्रतिसाद नीट वाचलात तर आपल्या लक्षात यावे की माझा आ़क्षेप कुठल्याही मराठी बोलीभाषेला नाहीच. उलट संस्कृताळलेले 'शासकीय मराठी' व हिंदीच्या अतिप्रभावातून आलेल्या बदलांविषयी मी लिहीले आहे. तेव्हा पुणेमुंबई, गावकुसाबाहेरील माणसे इ. इ. ह्या उपधाग्यावर गैरलागू.

In reply to by राही

सुबोध खरे 03/04/2014 - 19:00
एक प्रमाण भाषा असणे आवश्यक आहे. जसे कायदेशीर इंग्रजी हि अगदी इंग्लंड मध्ये जन्माला आलेल्या माणसाला सुद्धा कठीण जाते म्हणून ती सोडून द्यावी असे कोणी म्हणणार नाही. पण एखाद्या शब्दाचा अचूक अर्थ असण्यासाठी किंवा दुसर्याला सांगण्यासाठी प्रमाण भाषा असणे आवश्यक असते. सर्वसामान्य माणसाला ती अवघड होते हि वस्तुस्थिती आहे. जर आपण law ,act आणि statute याचे भाषांतर कार्याचा प्रयत्न केला तर सर्वसामान्य माणसाला कायदा हा एकाच अर्थ कळतो म्हणूनच अधिनियम, कायदा आणि विधी असे शब्द वापरावे लागतात. मुळात कोणतीही भाषा प्रमाण असो वा बोलीभाषा असो हि शुद्ध स्वरुपातच बोलली जावी. मालवणी भाषा आपल्या मूळ ढंगात जितकी गोड लागते तितकी संकरीत / अर्धवट हिंग्लिश मालवणी कानाला खटकते. हीच गोष्ट कोकणी किंवा वर्हाडी व खानदेशी भाषे बद्दल किंवा हिंदी किंवा कोणत्याही हिंदीच्या बोलीभाषे बाबत( मगधी, मैथिली वा भोजपुरी बद्दलहि) म्हणता येईल. थोडेसे च्या ऐवजी वाईच म्हणले तर कानाला गोड लागते पण "जरासी" हा हिंदी शब्द खटकतो. आपल्याला मराठी चांगली बोलता येत नाही याची लाज वाटायच्या ऐवजी अभिमान वाटू लागला आहे हि काळजीची बाब आहे.

In reply to by सुबोध खरे

बास बास. माझा आक्षेप ज्याला होता ती गोष्ट डॉक्टरांनी अचूक हेरली. आपल्याला मराठी चांगली बोलता येत नाही याची लाज वाटायच्या ऐवजी अभिमान वाटू लागला आहे हि काळजीची बाब आहे.

In reply to by सुबोध खरे

मारकुटे 05/04/2014 - 13:11
>>>आपल्याला मराठी चांगली बोलता येत नाही भाषाशास्त्रानुसार जी काही जशी काही बोलली जाते ती भाषा चांगलीच असते. त्यामधे शुद्ध अशुद्ध, चांगलं वाईट असं काही नसतं. अशी वर्गवारी कृत्रिम असून गेल्या दोनशे वर्षांत स्वत:चे स्थान डळमळीत झालेल्या वर्गाने इतरांवर कुरघोडी करण्याच्या हव्यासाचा परिपाक आहे.

In reply to by मारकुटे

सुबोध खरे 08/04/2014 - 10:09
मारकुटे साहेब, भाषेतील किंवा बोलीभाषेतील कोणताही शब्द वापर करण्यास हरकत नसावी पण परभाषेतील दोन शब्द प्रत्येक वाक्यात आणून हीच बोलीभाषा म्हणणार्या बद्दल काय म्हणावे. मला वेळ नाही च्या ऐवजी "टायम" नाही. किंवा वय विचारले तर "ट्वेंटी एट कम्प्लीट" होतील, अद्रक घालून चं पिली असे म्हणणे याला काय म्हणावे. माझे म्हणणे इतकेच कि आपण जी भाषा बोलत असाल तिच्यात सरमिसळ होऊ नये इतकेच. मग अहिराणी असेल तर अहिराणी असावी. हिंदी असेल तर हिंदी असावी किंवा इंग्रजी असेल तर इंग्रजी स्वच्छ असावी. दुर्दैवाने कोणतीही भाषा शुद्धच असते या आग्रहा पायी आपल्यातील काही लोक कोणतीच भाषा धड बोलू शकत नाहीत. आणि याने जेंव्हा आपण मुलाखतीसाठी जाता किंवा लेखी अर्ज करत तेंव्हा आपले अपरिमित नुकसान होते हे आपल्याला( मराठी माणसाना) लक्षात येत नाही. प्रमाण भाषे बद्दल असे आहे कि आपण एखादा प्रश्न माहितीच्या अधीकारात विचारला आणि कोणी आपल्याला अशा सरमिसळ भाषेत उत्तर दिले तर त्याचे नक्की अर्थ काढणे कठीण होते आणि नंतर अशी माणसे कायद्याचा कीस पडून आपल्या मुळ हेतूला हरताळ फासू शकतात. यासाठीच सरकार दरबारी प्रमाण भाषा असणे आवश्यक असते. दुचाकी वाहन चालवताना आपल्याकडे परवाना नसेल तर लोचा होईल /लफडा हो जायेगा असे आपल्याला कळवले तर कसे वाटेल. आपल्याला आपल्या जमिनीचा/ घराचा सात बाराचा उतारा अशा अर्धवट भाषेत मिळाला तर त्यावर येणारे कायदेशीर हक्क किंवा अधिकार आपल्याला सिद्ध करणे फार कठीण होईल आणि आपला लांबचा मावस चुलत भाऊ आपल्या हक्कावर "लोचा" करू शकेल. कोणत्याही भाषेला अधिकृत दर्जा देताना हा विचार करावा लागतो. सरकारी अधिकार्याला विचारलेल्या प्रश्नाला अधिकृत भाषेतच उत्तर देणे बंधनकारक ठरते . मग या प्रमाण भाषेला आपल्याला शुध्द म्हणायचे नसेल तर नसो. जर आपण वादासाठी वाद घालत असाल तर बोलणेच खुंटले.

In reply to by सुबोध खरे

बॅटमॅन 08/04/2014 - 15:33
सर्कारदर्बारची भाषा अन बोलीभाषा यात फरक नाही काय? मारकुटे यांचे अर्ग्युमेंट बरोबर आहे. शुद्ध-अशुद्ध याचा संबंध तुम्ही कायदेशीर अन कार्यालयीन भाषेशी लावताहात तर मारकुटे भाषाशास्त्राच्या दृष्टिकोनातून बोलताहेत इतकंच. प्रमाणभाषेची गरज कोणीही नाकारत नाहीये, पण कायदेशीर मान्यता आणि व्याकरणाची शुद्धता यांचा संबंध नाही. मी बोलतोय तो तुम्हांला संज्ञांचा फजूलपणे काढलेला कीस वाटत असेल तर त्याला इलाज नाही पण तुम्हां दोघांच्या अर्ग्युमेंटची संदर्भचौकट अंमळ वेगळी असून त्या त्या चौकटीत ते ते अर्ग्युमेंट बरोबर आहे इतकेच सांगायचे होते.

In reply to by बॅटमॅन

बाळ सप्रे 08/04/2014 - 16:00
कायदेशीर मान्यता आणि व्याकरणाची शुद्धता यांचा संबंध नाही
नक्की शुद्धताच का?? की प्रमाणता.. यावर किती किस पाडु तेवढा कमी आहे.. शुद्ध-अशुद्ध, प्रमाण-प्रमाणेतर, चांगले-वाईट या सगळ्या संज्ञा सापेक्ष (मराठीत - relative terms) आहेत एवढच म्हणू शकतो .. इथे जरा "भावना पोचल्या की झालं" हा नियम लावून पहा !!

In reply to by बाळ सप्रे

बॅटमॅन 08/04/2014 - 16:09
होय शुद्धताच. कायदेशीर मान्यता असलेल्या एका बोलीत काही वेगळे शब्द असतील, पण मान्यता नसलेल्या दुसर्‍या बोलीत व्याकरणाचे नियम प्रमाणबोलीतल्यासारखेच पाळले जाऊ शकतात. असो.

In reply to by बॅटमॅन

बाळ सप्रे 08/04/2014 - 17:48
म्हणजे व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्ध ?? मान्यता नसलेली बोली अशुद्ध?? मागचे काही प्रतिसाद पाहता 'अशुद्ध' शब्द भाषेच्याबाबतीत तुम्हाला निषिद्ध वाटतोय !!

In reply to by बाळ सप्रे

बॅटमॅन 08/04/2014 - 17:52
मान्यता नसलेली बोली फक्त प्रमाणेतर. व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्ध. अशुद्ध हा शब्द भाषेबाबतीत पूर्णपणे निषिद्ध नाहीये.

In reply to by बॅटमॅन

बाळ सप्रे 09/04/2014 - 10:40
शुद्ध आणि अशुद्ध असे म्हणण्यामागे एक अ‍ॅझम्प्शन आहे की शुद्ध नामक काहीएक ऑब्जेक्टिव्ह गोष्ट अस्तित्वात आहे. जे भाषाशास्त्रदृष्ट्या चूक आहे
व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्ध
वरील दोन्ही विधाने परस्परविरोधी आहेत.. मला दुसरे विधान पटते.. त्याप्रमाणे.. 'त्याची मदत केली' - अशुद्ध 'त्याला मदत केली' - शुद्ध का इथे बोलीभाषेचा संदर्भ लावून प्रमाणेतर म्हणणार?? व्याकरणाप्रमाणे अशुद्ध म्हटल्यास व्याकरणाचे 'अज्ञान' हे कारण स्वीकारण्यास हरकत नसावी.. इथे 'सामाजिक अभिसरणामुळे झालेले बदल अज्ञानातून होतात हे म्हणणे अज्ञानमूलक आहे' ही पळवाट आहे.. काही लोकं व्याकरणाच्या/ भाषेच्या 'अज्ञानामुळे' अशुद्ध बोलतात हे मान्य न करता.. भाषेचा प्रवाहीपणा, सामाजिक अभिसरण वगैरे मुद्दे सांगुन सरसकटपणे पाठराखण होउ नये इतकेच!!

In reply to by बाळ सप्रे

बॅटमॅन 09/04/2014 - 12:59
अंमळ गफलत झाली वाट्टे. पण
काही लोकं व्याकरणाच्या/ भाषेच्या 'अज्ञानामुळे' अशुद्ध बोलतात हे मान्य न करता.. भाषेचा प्रवाहीपणा, सामाजिक अभिसरण वगैरे मुद्दे सांगुन सरसकटपणे पाठराखण होउ नये इतकेच!!
हे असलं तरी वेगळ्या बोलींना रेकग्निशन देणे हे कधी होणारच नाही. प्रमाणभाषेपुरते ठीक आहे, बाकी वेगळ्या बोलीचं असू नये असं. व्याकरण ही गोष्ट फक्त प्रमाणबोलीपुरती मर्यादित नाही. थोड्या फरकांसहित पाहिले तर साधारणपणे व्याकरणाचा एकच नियम बर्‍याच बोलींना लागू पडतो म्हणून तो शुद्धतेचा मुद्दा काढला इतकेच. ऑब्जेक्टिव्हलि शुद्ध म्हणून जे काही अस्तित्वात असते अथवा असू शकते ते एका प्रमाण बोलीशी निगडित नसते अथवा नसावे इतकाच मुद्दा आहे.

राही 03/04/2014 - 18:43
प्रचलित नियमांनुसार काही ठिकाणी द्वितीयेचे प्रत्यय 'स', 'ला' हे न लावणे अशुद्ध ठरते. पण तृतीयेचे 'एं','शीं', 'ईं' 'हीं' हे प्रत्यय कालौघात गळून पडले आहेत हे आपल्या लक्षात येत नाही. रायगड जिल्ह्यात बोलीभाषेत अजूनही ते वापरले जातात पण आपण ते बोलणे अशुद्ध समजतो! 'त्यांईं मला हे घड्याळ दिले' किंवा 'तिएं ओवाळले' किंवा 'काकाहीं वाटणी मागितली' ही वाक्ये कानाला कशी वाटतात? शुद्ध असूनही अशुद्ध वाटतात ना? दक्षिण कोंकणात ताणे, तेणा अशी रूपे आहेत. ही संस्कृत 'तेन' ला अधिक जवळची आहेत. पण ही रूपे अशुद्ध आणि 'त्याने' मात्र शुद्ध. जाता जाता : तृतीयेचा 'ने' हा एकवचनी प्रत्यय सध्या अदृश्य होऊ लागला आहे. त्याऐवजी 'नी' च वापरला जातोय.

In reply to by राही

बॅटमॅन 03/04/2014 - 18:45
पुनरेकवार अतिशयच सहमत. तदुपरि
तृतीयेचा 'ने' हा एकवचनी प्रत्यय सध्या अदृश्य होऊ लागला आहे. त्याऐवजी 'नी' च वापरला जातोय.
एक छोटीशी दुरुस्ती: 'ने' हा प्रत्यय प्रत्यक्ष बोलण्यात कधीच नव्हता, फक्त लेखनात होता. अन नी ऐवजी नं हा जास्त ऐकला आहे.

In reply to by राही

प्रत्ययाबाबत मुद्दा लक्षातच घ्यायचाच नसेल तर ठीक आहे. मुद्दा कोणते प्रत्यय गळून पडले नाही पडले हा नाही तर हिंदीच्या अतिरेकामुळे आपण मराठीतील प्रत्यय गाळतो आहे हा आहे. आणि समजा एखाद्याने ते लक्षात आणून दिले तर प्रवाहीपणा, स्त्रोत, वर्गवारी असली फुसकी कारणे देतो हे आहे. म्हणूनच डॉक्टर खरेंशी सहमती दर्शवली आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

राही 04/04/2014 - 12:07
ही कारणे अजिबात फुसकी नाहीत. तशी ती मानणे म्हणजे आत्मवंचना करून घेणे आहे. मुद्दा प्रत्ययांचा नाहीच. मराठीच्या स्वरूपात वेगाने होत असलेल्या बदलांचा आहे. हे बदल होतच नाहीयेत असे तर कोणी म्हणत नसावे. हे बदल होऊच नयेत, झालेच तर ते 'वर्ज्य' मानावेत, 'स्वीकारार्ह' नसावेत असे मत दिसते; ज्याचे नियमांत रूपांतर होऊन अंमलबजावणी होणे कठीण वाटते. जे फीज़िबल नाही, त्याच्यामागे आपली शक्ती का दवडावी? त्याऐवजी मराठीच्या विकासाचे अन्य मार्ग का हाताळू नयेत? समजा, सध्या हिंदीच्या प्रभावामुळे मराठी नको इतकी बदलतेय, मग आतापर्यंत जे बदल झाले, ते तेव्हा हिंदीचा प्रभाव नसताना(च) झाले(च) ना? म्हणजे हिंदीचा प्रभाव असो वा नसो, मराठीत बदल हे होतच आहेत. यातून एक अर्थ असाही निघू शकतो, की बिगरहिंदी प्रभावांनी बदल झाले तर चालतील, पण हिंदीमुळे मात्र नको. असो. वाढत्या शिक्षणामुळे आणि अभिसरणामुळे होत असलेले बदल खुल्या मनाने स्वीकारणे हा एकच पर्याय दिसतो आणि तो योग्यही आहे, आपद्धर्म नव्हे, असेही मला वाटते.

In reply to by राही

मारकुटे 05/04/2014 - 13:14
सहमत आहे. अशाच वृत्तीमुळे संस्कृत लयास गेली. पाणिनी नंतर पतंजली झालेले बदल नोंदवतो पण आम्ही अष्टाध्याचीच घोकत बसलो, महाभाष्य उघडून पण पाहिले नाही. हीच अशीच हेच असेच उच्चार आणि प्रत्यय आणि शब्द असल्या वृत्तीमुळे संस्कृत संपली. बरे आहे मराठीबाबत असली अरेरावी इथला समाज फाट्यावर मारतो.

In reply to by राही

बाळ सप्रे 04/04/2014 - 12:00
भाषा प्रवाही असते.. नवीन शब्द सामावुन घेतल्याने समृद्ध होते वगैरे मान्य. म्हणून लिहिण्या, बोलण्यातील सर्वच अशुद्धता सामावून घ्यावी आणि तोच नियम व्हावा हे अमान्यच.. आणि जास्त लोक तसे बोलतात म्हणून तो नियम व्हावा हे ही अमान्य.. असे असते तर चायनीज्/इतर लोकांमुळे इंग्लिश भाषा कितीतरी बदलली असती!! बर्‍याच वेळा हे चूक, हे बरोबर हे सांगायला कोणी जात नाही म्हणून काय बरोबर काय चूक हे न समजता ते बोलणे लिहिणे पुढे चालत रहाते.. हे कोणी सांगितल्यास अज्ञान मान्य करून सुधारण्यास काय हरकत आहे.. प्रत्येक चुकीला सामावून घ्यायचे असेल तर व्याकरण तरी कशाला शिकवावे शाळेत.. "भावना समजल्या की झाले" याचाही अतिरेक नको.. भावना कधीकधी भाषेशिवायही पोहोचु शकतात! प्रमाण भाषा ही सर्व बोलीभाषांमधील दुवा असते.. भाषेत बदल सामावून घेताना अपरिहार्यता लक्षात घेणेही गरजेचे आहे.. बदल समृद्ध होण्याइतका असावा .. अस्तित्व/ओळख हरवण्याइतका नसावा..

In reply to by बाळ सप्रे

राही 04/04/2014 - 13:04
प्रमाण भाषा हवीच पण प्रमाण भाषेचे स्वरूप सर्वकाळ तेच हवे हा आग्रह योग्य नाही. भाषा बदलते आहे याचा अर्थ प्रमाण भाषाच बदलते आहे. सर्वच प्रमाणे बदलली. वाल, रती, गुंज जाऊन तोळा, मासा छटाक,शेर आले. तेही जाऊन ग्राम मिलिग्रॅम आले. प्रहर, घटिका पळे, निमिष जाउन सेकंद् ,मिनिटे आली, टीच-वीत-तसू गेले, योजन-क्रोश गेले, फर्लॉग-माइल गेले, यार्ड-फुट-इंच गेले, मीटर-किलोमीटर आले. हे सर्व बदलले आणि हे बदल व्यक्त करणारी 'प्रमाण'भाषा मात्र तशीच राहिली, असे घडेल काय? चिनी भाषेच्या इंग्लिशवरील प्रभावाचे उदाहरण तितकेसे समर्पक नाही. चिनी भूभागावर जिथे जिथे कोपर्‍या-खबदाडीतून (पॉकेट्स) इंग्लिश बोलली जाते तिथे त्या इंग्लिशवर चिनी भाषेचा प्रभाव पडेलच पडेल. पण जोपर्यंत इंग्लिश मेन लँड म्हणजे यू.के.,अमेरिका वगैरे मध्ये चिनी लोक 'साय्ज़ेबल' प्रमाणात नाहीत तो पर्यंत तिथे चिनी भाषेचा प्रभाव पडणार नाही. घरातले उदाहरण द्यायचे झाले तर पूर्व आणि पश्चिम बंगालमधले बांग्लाभाषक मराठीभाषकांपेक्षा संख्येने अधिक आहेत पण ते मराठी मेन्लँड्मध्ये नाहीत किंवा महाराष्ट्रातल्या माध्यमांवरही त्यांचा प्रभाव नाही त्यामुळे बांग्ला भाषेचा प्रभाव मराठीवर नाही. बृहन्मुंबई भागात मनोरंजन-वाहिन्या आणि बॉलिवुडमुळे हिंदीचा प्रभाव आहे. बाकी वृत्तावाहिन्यांची मुख्य कार्यालये दिल्लीतच आहेत. हां, आपण एक गोष्ट करू शकतो. बॉलिवुड मुंबईत नको अशी चळवळ उभारू शकतो. किंवा मराठी लोकांनी ह्या वाहिन्या-चित्रपट पाहू नयेत असा शुद्ध मराठमोळा नियमही करू शकतो. हिंदी मनोरंजनाचा प्रभाव केवळ महाराष्ट्रातच नाही, तर सर्वत्र, अगदी चेन्नैपासून तुर्कस्तानपर्यंत आहे. चेन्नैमध्ये मुली आजकाल हाफ-साडी (पवडै दवनी) ऐवजी सल्वार-कमीज़ वापरतात हे हिंदी चित्रपटांमुळे झाले असे तेथील लोक खेदाने म्हणतात. या पोशाख-क्रांतीने कितीतरी नवे शब्द तमिळमध्ये घुसवले असतील आणि कितीतरी जुन्या शब्दांना डच्चू दिला असेल. आपल्याकडेसुद्धा लुगडी-पातळे-साड्या-धोतरे-पंचे हे निर्‍या काढून 'नेसायचे' असत. आता पँट-शर्ट-जीन्स-सल्वारकमीज् 'घालतात'. वेणी 'घालायची' असे, आज केस 'बांधतात'. भाजी, कांदे विळीवर चिरायचे असत, आज सुरीने 'कापतात' किंवा प्रोसेसरमध्ये 'फिरवतात'. 'तू टाक चिरुनी ही मान' हे आता अतिजुने झाले. ही एक प्रकारची समृद्धीच नव्हे तर दुसरे काय?

In reply to by राही

बाळ सप्रे 04/04/2014 - 13:39
लुगडी-पातळे-साड्या-धोतरे-पंचे हे निर्‍या काढून 'नेसायचे' असत. आता पँट-शर्ट-जीन्स-सल्वारकमीज् 'घालतात'. वेणी 'घालायची' असे, आज केस 'बांधतात'
इथे सामाजिक बदलांना अनुसरुन भाषा बदल अपेक्षितच आहे.. पण म्हणून साडी 'घातली' हे अशुद्धच!! तेवढच म्हणायचय मला.. प्रत्येक भाषिक अशुद्धतेची प्रवाहीपणा/समृद्धी याकारणासाठी पाठराखण होउ नये इतकच!! 'त्याला मदत करणे ' हे सुट्सुटित वाक्यरचनेचे रूप माहित नाही म्हणून जास्त हिंदी कानावर पडण्यामुळे 'त्याची मदत करणे' असे केले जाते. इथे सामजिक बदल अथवा कुठल्याही प्रकारची अपरीहार्यता हे कारण नसून अज्ञान आहे हे कारण आहे हे मान्य करायला हरकत नसावी.

In reply to by बाळ सप्रे

राही 04/04/2014 - 16:25
आता 'घालणे' हेच जर कपड्यांच्या संदर्भातले योग्य क्रियापद ठरले तर नेसणे आणि घालणे हा भेद रहाणारच नाही. कारण 'नेसण्या'ची कृती करण्याची वेळच येणार नाही किंवा कमीत कमी वेळा येईल.(लुगडी धोतरे वापरातून गेल्यामुळे.) त्यामुळे तो शब्द स्मृतीतून जाईल. आणखी वीस वर्षांनी सारी-ड्रेपिंग हा शब्द रूढ झालेला असेल. आता ड्रेप म्हणजे वस्त्रांनी सजवणे, (भरजरी राजवस्त्रे वगैरे) अंगावर व्यवस्थित चढवणे. साडी हा नित्य वापरातला प्रकार राहिला नसून खास सणासुदींचा पोशाख बनल्यामुळे तो काळजीपूर्वक 'ड्रेप'च करावा लागतो. जुन्या मराठीतली 'लेणे', 'माळणे' ही क्रियापदे हद्दपार झाली कारण त्या क्रियांमागच्या कृती बदलल्या. आज कोणी 'मी शर्ट ल्या(य)लो' किंवा 'मी परकर ल्यायले' असे म्हणत नाहीत. आज कोणी फुले 'माळीत' नाहीत.

In reply to by बाळ सप्रे

राही 04/04/2014 - 16:44
खरे तर साड्या वापरातून जात चालल्या आहेत म्हणूनच 'नेसणे' हा शब्दसुद्धा वापरातून जात चालला आहे. भाषेच्या बाबतीत 'डेड-लाइन' 'डिमार्केशन' वगैरे असे काही नसते की शेवटची साडी शेवटच्या वेळी नेसली जाईल तेव्हाच अमुक एक शब्द बाद होईल. ही हळू हळू चालणारी आणि 'ओवरलॅपिंग' अशी प्रक्रिया असते.

In reply to by प्यारे१

राही 05/04/2014 - 14:22
"साड्या वापरातून जात चालल्या आहेत" असे म्हटले आहे. 'वापरातून गेल्या आहेत' असे नाही म्हटलेले. अर्थ असा की साड्या वापरण्याचा कल कमी होतो आहे. लोकसंख्यावाढीचा वेग कमी होतो आहे म्हणजे लोकसंख्या कमी होते आहे असे नव्हे; अ‍ॅक्सिलरेशन कमी होते आहे म्हणजे स्पीड कमी होतो आहे असे नव्हे. मुंबईत तरी हा कल स्पष्ट दिसतो. साड्यांची दुकाने जाऊन त्या जागी पंजाबी कपड्यांची (किंवा त्याहूनही पुढे म्हणजे वेस्टर्न आउट्फिट्सची) दुकाने दिसू लागली आहेत. पोलक्याच्या कापडाची अनेक दुकाने बंद झाली आहेत. रेल वे फलाटावर विशेषतः कचेर्‍यांच्या वेळात बायकांच्या डब्याशेजारी उभे राहून निरीक्षण केले (आपापल्या रिस्कवर) तर साडीवाल्या बायका कमी दिसतात. ग्रामीण भागातही कित्येक ठिकाणी नवतरुणी आता पंजाबीसूट किंवा मॅक्सी (खरे तर गाउन, हाउस-कोट) घालतात.

राही 04/04/2014 - 15:12
सामाजिक अभिसरणामुळे झालेले बदल अज्ञानातून होतात हे म्हणणे अज्ञानमूलक आहे. भिन्न संस्कृतीशी आदानप्रदान (किंवा आपण संघर्ष म्हणू या हवे तर ) होताना मूळ संस्कृतीला समांतर किंवा तिचीच एक शाखा अशी एक संस्कृती जन्म घेत असते आणि ती दोन्ही जनक संस्कृतींना समृद्ध करते. गांधारकला हे एक उत्तम उदाहरण ठरेल. सध्या हिंदीवर बॉलिवुडी प्रभाव नाही असे आपल्याला वाटते का? वाट लग गयी, श्यानपन, कानपट्टी, सुमडी, नक्को (दखनी) हे शब्द कुठून आले? हे शब्द तर पाकिस्तानी उर्दूतही शिरले आहेत. आज हिंदीवर मराठीचा प्रभाव गुजरातीपेक्षाही जास्त आहे तो बॉलिवुडमुळेच. खरे तर जुनी गुजरातीभाखा ही मुळापासूनच राजस्थानीशी आणि पर्यायाने हिंदीशी साधर्म्य राखते. पण आज मात्र हिंदीवरचा मराठी प्रभाव जाणवण्याजोगा आहे. मुंबईमध्ये हिंदी चित्रपट-उद्योग भरभराटीस येणे ही घटना आर्थिक, भाषिक आणि सामाजिक अंगांनी तपासता येण्याजोगी आहे. भाषेवर या सर्व बलांचे कार्य चालते. यात भाषा कधी या अंगाने झुकते तर कधी त्या. अशी मुरडत, वळसे घेत चाललेली भाषा स्वतःचा एक वेव्ह फॉर्म किंवा पॅटर्न स्थापन करीत पुढे वाटचाल करीत असते. ही गति सरासरीने एकदिक् मानता येईल पण काळाच्या एखाद्या छोट्या तुकड्यात ती हेलकावे खाताना दिसू शकते. असो. मराठी बिघडत नाहीय आणि मराठीची अधोगती होत नाहीय हे मात्र नक्की.

In reply to by राही

बाळ सप्रे 04/04/2014 - 15:33
मराठी बिघडत नाहीय आणि मराठीची अधोगती होत नाहीय हे मात्र नक्की
हे मान्य.. पण बरेच शब्दप्रयोग डोक्यात जातात हे मात्र खरं.. पण शुद्ध आणि अशुद्ध हा फरक राहाणारच.. प्रत्येक जण आपल्याला वाटेल तसेच बोलणार .. पण त्यात चूक दाखवल्यास वाईट वाटून घेउ नये.. 'शुद्ध आणि अशुद्ध असं काहिच भाषेत नसतं' असं म्हणणं हे देखिल आत्मवंचना करणेच ठरेल.

In reply to by बॅटमॅन

बाळ सप्रे 04/04/2014 - 15:56
भाषेबाबत जास्त आग्रही असणार्‍यांना "शुद्ध आणि अशुद्ध" जास्त योग्य वाटेल.. पण "प्रमाण-प्रमाणेतर" ला सर्वसंमती मिळू शकेल.. :-)

In reply to by बाळ सप्रे

बॅटमॅन 04/04/2014 - 16:03
शुद्ध आणि अशुद्ध असे म्हणण्यामागे एक अ‍ॅझम्प्शन आहे की शुद्ध नामक काहीएक ऑब्जेक्टिव्ह गोष्ट अस्तित्वात आहे. जे भाषाशास्त्रदृष्ट्या चूक आहे. त्यामुळे प्रमाण आणि प्रमाणेतर हे वर्गीकरण बरोबर आहे.

In reply to by बॅटमॅन

बाळ सप्रे 04/04/2014 - 16:23
शुद्ध आणि अशुद्ध असे म्हणण्यामागे एक अ‍ॅझम्प्शन आहे की शुद्ध नामक काहीएक ऑब्जेक्टिव्ह गोष्ट अस्तित्वात आहे. जे भाषाशास्त्रदृष्ट्या चूक आहे
भाषाशास्त्र असेदेखिल ऑब्जेक्टीव्ह काही नसते (कारण प्रमाण काय आणि प्रमाणेतर काय यावरदेखिल वाद होउ शकतात) .. मुद्दा एवढाच.. अशुद्ध भाषा म्हटल्यावर राग येउ शकतो.. प्रमाणेतर म्हटल्यास ती शक्यता कमी.. म्हणूनच म्हटलं "प्रमाण - प्रमाणेतर" ला सर्वसंमती मिळू शकेल.. पण हे डावंउजवं राहायचचं..

In reply to by बाळ सप्रे

बॅटमॅन 04/04/2014 - 16:34
भाषाशास्त्र असेदेखिल ऑब्जेक्टीव्ह काही नसते
पिशी अबोलीबै, ऐकताहात का ;) एनीवेज, हे विधान चूक आहे. ऑब्जेक्टिव्ह कंटेंट भाषाशास्त्रात खच्चून भरला आहे. ते न पाहता प्रमाण भाषेलाच शुद्ध म्हणण्याचा आग्रह रोचक वाटला.

In reply to by बॅटमॅन

राही 04/04/2014 - 16:00
अगदी सहमत. खरे तर ह्याच संज्ञा वापरून प्रतिवाद करायला हवा होता पण शुद्ध-अशुद्धाच्या मुद्द्याआधीचे विवेचन करण्यात माझ्याकडून जास्त जागा (वाया) गेली.

In reply to by राही

प्रदीप 05/04/2014 - 15:19
सध्या हिंदीवर बॉलिवुडी प्रभाव नाही असे आपल्याला वाटते का? वाट लग गयी, श्यानपन, कानपट्टी, सुमडी, नक्को (दखनी) हे शब्द कुठून आले? हे शब्द तर पाकिस्तानी उर्दूतही शिरले आहेत. पाकिस्तानी उर्दूबद्दल माहिती नाही. हिंदी चित्रपटांत हे शब्द सर्रास येत असल्याने, व पाकिस्तानीही ते बर्‍यापैकी बघत असावेत, त्यामुळे अशा एका शब्दाचा मीच अलिकडे येथील एका पाकिस्तान्याशी बोलतांना वापर केला आणि मला काय म्हणायचे आहे ते त्याला अगदी झटकन समजले. पण हा anecdotal evidence झाला. ह्यापुढे प्रत्यक्ष आपापसात बोलतांना हे लोक असे, मराठीतून हिंदी चित्रपटांपुरते गेलेले शब्द वापरतात का, ह्याबद्दल काही माहिती नाही. पण हे शब्द आता सर्रास हिंदी भाषेत गेले आहेत व हिंदीभाषिक जनताही ते नियमीत वापरते, ह्याविषयी मात्र मी साशंक आहे. पुन्हा माझा anecdotal evidence तरी मला हे दर्शवत नाही. वास्तविक हिंदी चित्रपटांचा आपल्या सर्वांगीण जीवनावर प्रभाव अगदी चाळीशीच्या दशकापासून आहे. पण गेल्या पंधरा-वीस वर्षातच आपले पुण्या- मुंबईकडील लोक इतके हिंदाळलेले का बोलू लागले, आणि तसेच लिहूही लागले, ह्याचे मात्र मलातरी सखेदाश्चर्य वाटत राहिले आहे. इतर भाषांतून आपण पूर्वापार शब्द स्वीकारत आलेलो आहोत. पण, ती प्रक्रिया इतक्या वेगाने झालेली नाही. तसेच आपल्या अंवतीभोवती जे असते, त्याचा आपल्या बोलण्याचालण्यावर परिणाम होणे साहजिक आहे. पण तरीही आपले म्हणून जे काही असते ते अगदी 'पातळ' करून टाकायचे का, हा प्रश्न आहे. मला वाटते ह्याला थोडी शिस्त, व आपल्याच भाषेचा रास्त अभिमान असणे जरूरीचे आहे. माझा मुलगा वयाच्या आठव्या वर्षापासून परदेशी वाढला,इंटरनॅशनल शाळेत जावयास लागल्यानंतर त्याच्या मराठीत कधीमधी चुकीच्या वाकरचना येऊ लागल्या, उदा. 'तो मला बसवर भेटला'. अशा वेळी त्याला सौम्यपणे 'मराठीत आपण असे म्हणत नाही,' असे सांगून आपण ते मराठीत कसे म्हणतो, हे सांगून सुधारणा करत राहिलो. माझ्याप्रमाणेच आमच्या येथील अनेक मराठी कुटुंबियांतील मुले अगदी नीट मराठी बोलू शकतात, ते बहुधा अशाच शिस्तीमुळे असावे. इतर भाषेतील विशेषनामे उगाच चमत्कारीक मराठीकरण करून वापरावीत (उदा. 'चेपू', 'तूनळी' इत्यादी) हे मलातरी खुळचटपणाचे वाटते. तसेच ज्या संकल्पनाच परकी आहेत, त्यांना त्या त्या भाषांतील मूळ नावांनीच संबोधावे, ह्याविषयी अजिबात वाद नाही. त्याचबरोबर मराठीतील काही शब्दांना नवे अर्थ देऊन ते वापरणे हेही बेजबाबदारपणाचे वाटते. फार पूर्वीचे सांगत नाही, अगदी ऐशीच्या दशकापर्यंत कुठलाही दर्जेदार कार्यक्रमही 'समाप्त' व्हायचा. (आठवा: "आजचा 'आपली आवड' हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूयात पुढल्या मंगळवारी, रात्रौ दहा वाजता"). आता गल्लीबोळातला कार्यक्रमही 'संपन्न' होतो. (पूर्वी आमची जीवने कुठल्या ना कुठल्या कारणाने संपन्न व्हायची). हीच गोष्ट 'प्रभावित' ची! 'आलेल्या पुराने अमूकेक क्षेत्र 'प्रभावित' झालेले आहे' म्हणे! तेव्हा भाषेच्या प्रवाही असण्याबद्दल तक्रार नाही. मात्र बेजबाबदार राहून आपण आपली कात भर्र्कन टाकणे कितपत रास्त आहे, ह्याविषयी दुमत आहे.

In reply to by प्रदीप

पैसा 05/04/2014 - 19:04
प्रतिसाद आवडला. मराठीत हिंदी शब्द घुसण्याचं कारण मराठी मानसिकता असावी. तुम्ही तमिळनाडूत गेलात तर तिथले लोक तुमच्याशी हिंदी/मराठी बोलायला येणार नाहीत. पण मुंबईतला मराठी माणूस दुसरा माणूस कुठला आहे हे शोधून त्याच्याशी हिंदी/गुजराती इ. बोलायचा प्रयत्न करतो. गंमत म्हणजे मुंबईत हल्ली सार्वजनिक जागी २ मराठी माणसे भेटली तर हिंदीत बोलतात असे ऐकून आहे. या प्रकारात एक ना धड, भाराभर चिंध्या असली गत होत जाते. सरकारी मराठीबद्दल लिहिलंत तेही पटलं.

In reply to by पैसा

प्रदीप 05/04/2014 - 19:53
गंमत म्हणजे मुंबईत हल्ली सार्वजनिक जागी २ मराठी माणसे भेटली तर हिम्दीत बोलतात असे ऐकून आहे. माझा असाच अनुभव आहे. एका मुंबईच्या मित्राशी ह्या विषयावर अलिकडेच बोलत होतो. त्याने त्याचा मुंबईच्या आसपासच्या काही गावांतील स्वतःचा अनुभव सांगितला. त्याच्या अनुभवानुसार तिथेही, तेथील स्थानिक गांवकरी, आपण मराठीरून प्रश्न विचरल्यावर, आपणास हिंदीतून उत्तरे देतात. मित्राचे म्हणणे असे की असे हिंदीतून बोलणे, हे आता गावांतून प्रतिष्ठेचे होऊ लागले आहे.

In reply to by राही

पैसा 05/04/2014 - 19:16
राही, तुमचेही बरेच प्रतिसाद आवडले. भाषा बिघडत नाही आणि अधोगती होत नाही हे पटले. मात्र अशाच वेगाने मराठी आणि हिंदीचे मिश्रण होत राहिले तर मात्र एका मोठ्या कालखंडाचा विचार केला तर आजचे मराठी साहित्य ४००/५०० वर्षांनी तेव्हाच्या मराठी लोकांना दुर्बोध वाटेल, ज्ञानेश्वरीतली मराठी आज लोकांना कठीण वाटते तशीच. गंमत म्हणजे ज्ञानेश्वरीची भाषा अनेक ठिकाणी आज कोंकणीला जवळची वाटते. काही कोंकणी ग्रुप्स तर ज्ञानेश्वरी कोंकणीत आहे असे ठासून सांगतात. तसेच विचार करा, २५५० सालात कुसुमाग्रजांचे साहित्य तेव्हाच्या एखाद्या मुंबईत रहाणार्‍या तथाकथित मराठी माणसाला अजिबात समजणार नाही. ते पुणेरी बोलीला जवळचे आहे असे तो कदाचित म्हणेल! संस्कृत आणि अनेक प्राकृत भाषांमधून एके काळी अनेक भाषांची उत्पत्ती झाली. आता परत सगळ्या भाषांचे एकीकरण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असे म्हणता येईल का? या सगळ्या गदारोळात द्रविड भाषा आपले अस्तित्व टिकवून ठेवतील का त्यांचीही अशी सरमिसळ होत आहे?

In reply to by पैसा

बॅटमॅन 05/04/2014 - 22:37
या सगळ्या गदारोळात द्रविड भाषा आपले अस्तित्व टिकवून ठेवतील का त्यांचीही अशी सरमिसळ होत आहे?
सरमिसळ त्यांच्यातही होत आहे. पण मुळात फरक बराच असल्याने त्यांच्या वेगळ्या अस्तित्वाला तितका फरक पडणार नै. मराठीत हिंदी प्रमाणाबाहेर मिसळली तर कदाचित एक वेगळीच भाषा तयार होईल, पण द्राविडी भाषांची मूळ शब्दसंपदा वेगळी असल्याने तसे होण्याची शक्यता कमीच. अर्थात लाँग रेंजमध्ये काय होईल कुणी सांगावे? मराठीची उत्पत्ती हीच मुळात प्राकृत + द्राविडी भाषांचे मिश्रण म्हणून झाली असे म्हंटात. तसेही होईल.

In reply to by पैसा

राही 05/04/2014 - 22:59
गंमत अशी आहे की भाषेच्या विकासाच्या एका विवक्षित टप्प्यावर जेव्हा बदलाचा वेग वाढतो आणि ती भाषा एक वेगळे वळण घेऊन मूळ भाषेहून वेगळी दिसू लागते, तेव्हा त्या संधिकाळात किंवा मेटॅमॉर्फसिसच्या काळात निर्माण झालेल्या साहित्यावर त्या वेळी निर्मितीअवस्थेत असलेल्या आणि पुढे स्वतंत्र बनलेल्या अनेक भाषा हक्क सांगू शकतात. मीरेच्या भजनांवर गुजराती, राजस्थानी, हिंदी या भाषा हक्क सांगतात. तुलसीरामायणाचेही तसेच. भोजपुरी, मैथिली या सारख्या बोलींना भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे एका सामाईक साहित्यठेव्याचा वारसा या सर्वांनाच मिळाला आहे. कोंकणी आणि मराठीचेही तसेच आहे. 'चामुण्डराजें करवियले' हे वाक्य कोंकणी लोक आपले मानतात. त्यासाठी 'वियले' या क्रियारूपाचा दाखला देतात की ही कोंकणीची टेंडन्सी आहे. पण अशी रूपे तर विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांपर्यंत मराठीत प्रचलित होती आणि अजूनही कधी कधी काव्यरूपात दिसतात. जसे : लावियलें नंदादीपा, तुवां मंदिरात' किंवा 'बहुत छळियलें, नाथा' वगैरे. उद्या पुणे-सातारा परिसरातली घाटी बोली जर भाषारूप पावली तर शंकर पाटलांच्या कथा हा मराठी आणि ही नवी भाषा यांचा सामाईक वारसा ठरेल.

भाषा हे केवळ संवादाचे साधन असल्याने आपला कोणत्याच भाषेबद्दल / शब्दांबद्दल ह्ट्ट नाही ... जेव्हा जसे जे शब्द सुचतील तेव्हा ते तसे वापरावेत :) अर्थ कळाल्याशी मतलब !! असो. (मराठी भाशेचा पेपर संपल्यावर ) चंगु : अरे तिसर्‍या प्रश्नात , "सात्विक " चा विरुध्द अर्थी शब्द विचारला होता त्याचे तु काय उत्तर लोहिलेस ? मंगु : का रे ? तु काय लिहिलेस ? चंगु : मी लिहिले "सातस्ट्राँग" ... :D मंगु : अरे नाही यार , त्याचे उत्तर आहे "सात खरेदी कर" =)) चंगु : हां .... तरी मी म्हणत होतोच की मराठीच्या पेपरात इंग्लिश प्रश्न कसा काय विचारला ते =))))

कौशिक लेले 05/04/2014 - 18:28
बरीच चर्चा झाली. पण इथे नवीन शब्द काही हाती लागले नाहीत. ते असो. ज्यांना इच्छा आहे त्यांनी वर दिलेला फेसबुक गटाचे नक्की सदस्य व्हावे.

युरेका...युरेका...युरेका...! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif मला इंटरनेट कनेक्शनला जो मराठी म्हणून संस्कृतनिष्ठ जालंजोडणी ,हा शब्द वापरतात..त्याऐवजी येक सहजशब्द सुचला!!!

जोडजाळं

अता या शब्दावर माझा कॉपिराइट हां!!! http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/winking-victory-sign-smiley-emoticon.gif

समीरसूर 08/04/2014 - 15:21
उपक्रम चांगला आहे. शुभेच्छा! एका प्रतिसादात म्हटले आहे की आहे ती मराठी नीट बोलणे महत्वाचे आहे. हे देखील बरोबर वाटते. मी एका आठवड्यासाठी बाहेर गावी जातोय >> मी एक वीकसाठी बाहेर जातोय. किंमत आहे एक कोटी रुपये >> किंमत आहे एक करोड रुपये वारांची नावे सहसा इंग्रजीतूनच घेतली जातात आज-काल. "मी संडेला गेलो होतो; मंडेला वापस आलो." बाकी हिंदाळलेले मराठी ऐकायला विचित्र वाटते. "बर्थडे मनवला...", "जेवण बनवले...", "चहा बनवली..", "या, तुमचीच कमी होती..." (अशा नावाचे बहुधा एक नाटकदेखील होते. 'कमतरता' शब्द मोठा म्हणून 'कमी' ला कामाला लावले बहुधा), "तिथे गुफा आहेत" (गुहा हा मराठी शब्द तर जवळ-जवळ आटोपला आहे; सगळेच 'गुफा' म्हणतात), "तिथे मोठी खाई होती" (दरी गेली आणि खाई आली), "त्याला शक आला..." (हे नि:संशय हिंदीच्).....अशी अगणित उदाहरणे आहेत. आणि हे पुन्हा मूळ शुद्ध मराठीवर ओढून आणणे जवळ-जवळ अशक्य आहे. इतका वेळ आहे का असं मराठी बोलणार्‍यांकडे? वाचतात का ते?

In reply to by प्रसाद गोडबोले

पैसा 09/04/2014 - 11:02
=)) मोबाईलला भ्रमणध्वनी असा श्ब्द वापरतात की. आता सेलफोनला काय म्हणायचं ते बघा! बाकी पर्याय एकदम भारीतले आहेत! मॅनेजरला कामलाव्या पेक्षा वाटलाव्या शब्द जास्त बरोबर आहे.

मान्यता नसलेली बोली फक्त प्रमाणेतर. व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्ध. अशुद्ध हा शब्द भाषेबाबतीत पूर्णपणे निषिद्ध नाहीये. आशयाशी सहमत. पण खालील फरकासहः प्रमाणित भाषा: सांविधिक संस्थेने (statutory body) मान्यता दिलेल्या नियमाप्रमाणे वापरलेली वापरलेली भाषा. अप्रमाणित भाषा: प्रचलित असलेली पण प्रमाणित भाषेशी सुसंगत नसलेली भाषा. अशुद्ध भाषा: सांविधिक संस्थेने मान्यता दिलेले नियम पाळण्याचा प्रयत्न/दावा करून त्या बाबतीतल्या चुका असलेली भाषा. या संदर्भात माझे दोन पैसे: १. बोलीभाषा बोलीभाषा ही रोजच्या वापरातली आणि म्हणून अत्यंत प्रवाही असते. ती वापरली जाण्यार्‍या लोकांत रुजलेल्या सवयी, तत्कालीन प्रचलित आवडी-निवडी (इन थिंग,फॅड, इ); बोलण्याच्या सवयी (हेल, च/ज इ उच्चारण्याच्या पद्धती,इ); इ ने प्रचंड प्रभावित असते. या सर्व गोष्टी काळाबरोबर सतत बदलत असतात आणि त्यामुळेच बोलीभाषा प्रवाही (सतत बदलत राहणारी) होते. एक प्रकारे बोली भाषा ही सतत चालू अवस्थेतले काम (वर्क इन प्रोग्रेस) आणि त्याबरोबर होणारा प्रत्येक बदल त्वरित वापरात आणणारे काम असते. लोकांना पसंत पडलेले / उपयोगी वाटणारे बदल प्रचारात राहतात आणि तसे नसलेले आपोआप कमी कमी वापर झाल्याने प्रचारातून निघून जातात. वरच्या वस्थुस्थितीमुळे कोणतीही बोलीभाषा नियमांच्या एका चौकटीत बसवणे शक्य नाही ... तो एक निष्फळ प्रयत्न आहे. लोक तुमचे मत ऐकतील न ऐकतील, पण त्यांना सोयीचे / आवडेल तसेच बोलतील/ लिहितील. म्हणूनच, अ) बोलीभाषा दर २०-३० किलोमीटरवर वेगळी असते. (याचा अर्थ ती नकाश्यांवर आखलेल्या रेषांच्या पुढेमागे एकदम बदलत नाही, तर एकीतून दुसरीत लोकांच्या गरजेनुरूप सहजपणे रूपांतरित होत जाते.) तसेच, ब) ती कोणत्याही एका स्थानावरही कालप्रवाहाबरोबर सतत बदलत जाणारी असते. क) एवढेच काय तर एकाच स्थानावर (उदा गाव, शहर, भौगोलिक विभाग, इ) आणि एकाच काळी वेगवेगळ्या लोकसमूहातली बोलीभाषा वेगळी असणे सामान्य आहे. हे जाती-धर्माच्या विविधतेने भरलेल्या भारतात प्रकर्षाने दिसत असले तरी तितकीशी विविधता नसलेल्या इतर ठिकाणीही फार अभावाने आहे असे नाही. २. प्रमाण भाषा ही एखाद्या भाषेसाठी नेमलेल्या सांविधिक संस्थेने सद्य काळाकरिता नक्की केलेले नियम वापरून लिहिली-बोललेली स्थिर भाषा असते. याची काही प्रमाणात सॉफ्टवेअर प्रणालीच्या व्हर्शनशी तुलना होऊ शकते. आज जाहीर केलेले व्हर्शन त्यापुढचे व्हर्शन जाहीर होईपर्यंत स्थिर असते. याचा अर्थ भाषेची बदलण्याची प्रक्रिया थांबली असे नाही... ती सतत चालूच राहते. काही काळाने, बहुसंख्य लोकांनी बदललेल्या लिहिण्याच्या-बोलण्याच्या सवयींप्रमाणे झालेले बदल जेव्हा लक्षणीय प्रमाणात होतात तेव्हा प्रमाणित भाषेचे नवीनं व्हर्शन बनविणे भाग पडते. हे मराठीसकट सर्व वापरात असलेल्या भाषांच्या बाबतीत घडले आहे, घडत राहील. उदा. मराठीतले बदललेले र्‍हस्व-दीर्घ आणि अनुस्वारांचे नियम. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीच्या गेल्या काही दशकांतील आवृत्त्या नजरेखालून घातल्या तरी इंग्लिश मध्ये झालेल्या अनेक बदलांचा पुरेसा पुरावा मिळेल. ३. भाषेचा वापर कशासाठी भाषा वापरली जाते यावर कोणती बोलीभाषा / प्रमाणित भाषा वापरायची आणि त्यांचे कोणते (प्रमाणित / अप्रमाणित) व्हर्शन वापरायचे हे बहुतेक वेळा नैसर्गिकपणे ठरते... आणि तेच योग्य आहे. उदा: कट्ट्यात मित्रांबरोबर गंमत म्हणून अप्रमाणित गावरान मराठी वापरणारा माणूस वरिष्ठ अधिकार्‍याबरोबर मराठी बोलताना प्रमाणित मराठी बोलला नाही तर आश्चर्य वाटेल नाही का? साधारणपणे भाषेच्या वापराचे खालील प्रमाणे दंडक आहेत / असावेतः अ) शासकीय / औपचारिक लेखन / बोलणे : प्रमाणित भाषा. ब) खाजगी / अनौपचारिक लेखन / बोलणे : योग्य परिणाम साधण्यासाठी आवश्यक ती बोलीभाषा अथवा प्रमाणित भाषा. क) साहित्य : योग्य परिणाम साधण्यासाठी आवश्यक तसे बदल करत बोलीभाषा अथवा प्रमाणित भाषा. उदा. जुन्या संस्कृत नाटकांत सामान्य पात्रांच्या तोंडी (संस्कृत नाही तर) प्राकृत भाषा आहे... तसे नसते तर ते हास्यास्पद वाटले असते. कारण जगात कोणत्याही काळी कोणत्याही प्रदेशात १००% लोक प्रमाणित भाषा वापरत नव्हते / नाहीत / नसतील. तसेच ग्रामीण कादंबरीतल्या अशिक्षित पात्रांच्या तोंडी संस्कृतप्रचुर / प्रमाणित भाषा अवास्तविकच वाटेल. ३. परकीय भाषेचा हल्ला परकीय भाषेचा आपल्या भाषेवर हल्ला ही बहुदा "कोल्हा आला रे सारखी" आवई असते. मात्र या आवईमुळे काहीही फरक पडत नाही... तिचे महत्त्व फुसका समस्तरिय दबाव (इनइफेक्टीव्ह पियर प्रेशर) पेक्षा फार जास्त नाही. अ) आज इंग्लिश जगभरात ताकदवान भाषा म्हणून प्रचारात आहे ती तिचे उत्तम विपणन केल्यामुळे नाही किंवा तिच्या संरक्षणासाठी भाषामार्तंडांची फौज असल्यामुळे नाही तर तिच्या योग्य वापरामुळे होणार्‍या निर्विवादी आर्थिक-सामाजिक-व्यावसायिक फायद्यांमुळे आहे. जर उद्या मराठीच्या बाबतीत असेच झाले तर मराठीच्या प्रचारासाठी दुसरे काही विशेष करणे जरूरीचे नसेल. ब) परक्या भाषेतले शब्द / शब्दरचना आपल्या भाषेने अंगीकृत करण्यात सारासारविवेकबुद्धी वापरणे नक्कीच आवश्यक आहे, पण हा मुद्दाही इतर काहीपेक्षा भावनिकच जास्त आहे. भाषा-भाषा प्रक्रिया सर्व भाषांत सर्वकाळ होत आलेली आहे व आर्थिक-सामाजिक-व्यावसायिक फायद्यांच्या वस्तुस्थितीवर आधारितच ती सर्वस्वी अवलंबून आहे. दुसर्‍या भाषेमुळे आपली भाषा मलिन होईल हा दावाही तसा फोल आहे. कारण भाषा ही ती भाषा वापरणार्‍या लोकांची मालमत्ता आणि ती कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी त्यांचाच आहे. एखाद्या अनिष्ट गोष्टीची काही काळासाठी "हवा" तयार होऊ शकते. पण सर्वसाधारणपणे, ना लोक त्यांना अयोग्य वाटणारे बदल स्वीकारतील, ना कोणी त्यांच्यावर ते लादू शकेल... लोकांना आवडतील / फायद्याचे असतील तेच बदल जीव धरतील / फोफावतील / शिल्लक राहतील. क) आजच्या जगतील कोणतीच भाषा स्वयंभू असल्याचा दावा करू शकणार नाही. जिला अनभिषिक्त जागतिक भाषा असे समजले जाते, त्या इंग्लिश भाषेत ८०% पेक्षा जास्त शब्द परकीय भाषांतून आलेले आहेत आणि त्यामुळे तिला "उधार-उसनवार भाषा (borrowed language) असे म्हटले जाते. cola (कोला) हा सर्वव्यापी आणि सर्वमान्य शब्द इंग्लिशने पश्चिम आफ्रिकेतील Temne (kola) आणि Mandinka (kolo) या भाषांतून उचलेला आहे. आश्चर्यचकित व्हायचे असेल तर, पुढचा दुवा नुसता वरवर चाळून पहा : इंग्लिशमध्ये उसने घेतलेले शब्द आणि त्यांचा मूळ भाषा इथे सापडतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन 09/04/2014 - 17:31
लैवेळा सहमत. अतिविस्तृत प्रतिसादासाठी खूप धन्यवाद! इंग्लिशसारखे अनेक शब्द मराठी पचवत गेली तर काय बिशाद आहे मराठी मरेल असे म्हणायची? फक्त तो जोर तूर्तास मराठीभाषकांत नाही, इतकेच. तो आला की फरक पडेलच!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

राही 09/04/2014 - 18:23
प्रतिसाद अतिशय आवडला. विशेषतः 'परकी भाषेचा हल्ला' विषयीचा परिच्छेद. भाषेची ताकद त्या त्या भाषकांच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय ताकदीवर अवलंबून असते याच्याशी जोरदार सहमति. समृद्ध समाजाची भाषाही समृद्धच असते. कारण समृद्ध समाजात दैनंदिन व्यवहार अनेक परींनी होतात. एक साच्याचे नसतात. (म्हणजे एक पिढी कारकुनी तर कारकुनीच करते असे नसते.) वेगवेगळ्या क्षेत्रांत उलाढाल वाढली की ती व्यक्त करणारे शब्दही वाढतात. आणि ह्या उलाढाली जर अभिजनसंमत असल्या (म्हणजे अभिजन वर्गात ह्या उलाढाली/व्यवसाय लोकप्रिय झाले) तर ते शब्दही अभिजनांच्या भाषेत/प्रमाण भाषेत शिरतात. पुन्हा एकदा, प्रतिसादासाठी जोरदार टाळ्या.

सचिन 01/04/2014 - 23:40
स्वैपाक करण्याऐवजी "जेवण बनवतात". .. असो, पण कौशिकभाऊंना इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द हवेत. शोधूया ...!!

आदिजोशी 02/04/2014 - 12:02
पण ह्या मराठीकरणाच्या नादात भाषेला भयाण आणि अकलेचा खंदक दाखवणारे गचाळ शब्द बहाल करू नका ही नम्र विनंती. उदा: तूनळी - youtube थोबाडपुस्तक - facebook चोप्य-पस्त - copy paste ह्या वरच्या टुकार शब्दांबरोबरच काही चांगले समर्पक शब्दही मराठी भाषेला मिळाले आहेत. उदा: खरडवही - scrapbook जालनिशी - blog

In reply to by आदिजोशी

धन्या 02/04/2014 - 17:39
तूनळी - youtube थोबाडपुस्तक - facebook चोप्य-पस्त - copy paste
हे अतिउत्साही लोकांचे उपद्व्याप आहेत. ही सारी उदाहरणे "विशेषनामे" आहेत. विशेषनामांचे शब्दशः भाषांतर होत नाही. त्यामुळे इंग्रजीतील "युटयुब" हा शब्द असलेले वाक्य इतर भाषांमध्ये भाषांतरीत होतात "युटयुब" असेच राहायला हवे.

In reply to by प्रचेतस

धन्या 02/04/2014 - 17:48
"फेसबुक" हे इतर भाषांमध्ये सुद्धा "फेसबुक"च राहायला हवे. ते विशेषनाम आहे. उदा. "अत्रुप्त आत्म्याने ताकाचे भांडे लपवले" हे वाक्य इंग्रजीत भाषांतरीत करताना ते "Atrupt Aatma hid buttermilk pot" असे होईल. "Unsatisfied soul hid buttermilk pot" असे नाही होणार. "Atrupt Aatma" हे विशेषनाम आहे.

In reply to by धन्या

प्रचेतस 02/04/2014 - 18:03
सहमत आहे. माझा आक्षेप फक्त 'मुखप्रुष्ठाविषयीच' होता.
अत्रुप्त आत्म्याने ताकाचे भांडे लपवले
वाक्य कितीही बरोबर असले तरी प्रत्यक्षात अत्रुत आत्मा भांडे लपवित नसून 'भांडे का लपविता' असे विचारीत असतो

In reply to by धन्या

बॅटमॅन 02/04/2014 - 19:28
संस्कृतमधील ऋ या स्वराचा मराठीत 'रु' असा उच्चार होतो, इतकाच काय तो फरक. वरिजिनल ऋ चा उच्चार ३ प्रकारे केला तर चालतो. पण पाणिनीचे सूत्र पाहू अगोदर. ऋटुरषाणां मूर्धा| याचा अर्थ असा, की ऋ, ट-ठ-ड-ढ आणि ष या सर्व वर्णांचे उच्चारस्थान मूर्धा आहे. बाकी डीटेल्स जाऊद्यात. वरीलप्रमाणे ऋ चा उच्चार करणे अत्यंत सोपे आहे. आम्रविकन लोकांचे उच्चार ठौक असतीलच. त्यात उदा. we're going there या. वाक्यामध्ये r चा उच्चार कसा असतो? तसाच याचा उच्चार करावा. अन हा उच्चार मराठीत "ऴ" ने दाखवता येतो. "तमिऴ" मध्येही हाच उच्चार आहे.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन 02/04/2014 - 19:32
किंवा अजून सोपे उदा. "बहुत प्यार करते हैं, तुमको सनम" या गाण्यात "करते" हा शब्द, त्यातही "र" हे अक्षर लांबवलेले आहे. तो र चा उच्चार म्हणजेच संस्कृतचा ऋ म्हटला तरी चालेल.

In reply to by बॅटमॅन

शिद 02/04/2014 - 20:15
किंवा अजून सोपे उदा. "बहुत प्यार करते हैं, तुमको सनम"
आम्हाला आमच्या बाई/मास्तरांनी अश्या साध्या सोप्या सरळ पद्धतीने समजावले असते तर आमचे पण व्याकरण थोडेफार सुधारले असते. ;)

In reply to by शिद

यसवायजी 02/04/2014 - 20:51
:) आम्हाला आमच्या बाईंनी अश्या साध्या सोप्या सरळ पद्धतीने समजावले असते तर.. आमचे पंटर म्हन्ले अस्ते.. बहुत प्यार करते हैं, तुमको मॅडम्म.. हंम्महंम्म्..म्म ;)

In reply to by बॅटमॅन

बहुत सुंदर ! "बहुत प्यार करते हैं, तुमको सनम" या गाण्यात "करते" हा शब्द, त्यातही "र" हे अक्षर लांबवलेले आहे. तो र चा उच्चार म्हणजेच संस्कृतचा ऋ म्हटला तरी चालेल. अशी उदाहरणे देऊन मराठी शिकवायला सुरुवात केली तर "मराठी भाषेचा वापर कमी होत चालला आहे" किंवा "मराठी भाषा चुकीच्या पद्धतीने लिहिली/बोलली जाते" ही भिती कमी व्हायला मदत होईल ! :)

In reply to by धन्या

बॅटमॅन 02/04/2014 - 18:19
शाळा कादंबरीतली व्याक्रणाची उदा. आठवली: "सुरेशने महेशला मारिले", "महेश दूध पितो", "महेश मार खातो", इ.इ.इ. =))

In reply to by धन्या

विजुभाऊ 03/04/2014 - 09:40
धन्या काका तुमचे बरोबर आहे. आत्र एक चूक आहे फेसबुक या नावाचे भाषाम्तर करणे म्हणजे "नील आर्मस्ट्राँग" याचे भाषांतर निळूभाऊ भुजबळ असे किंवा उदा " मायकेल शूमाखर" चे भाषांतर "मायकेल चांभारे" असे भास्।आम्तर करण्यासारखे आहे.

In reply to by प्रचेतस

@मला 'मुखप्रुष्ठ' ऐवजी 'मुखपृष्ठ' हा शब्द बरोबर वाटतो.>>> राम..राम..राम..राम... कहर झाला. :-/ अहो ते मोबॉइल वरून पृ टाइप करता येत न्हाई! तिथे पृ च्या जागी प्रु च टाइप करावं लागतं ! :-/ तरिही खाली आलेलं खाटुकम्यानाचं अप्रतिम विवेचन पहाता.. झालं ते बरच(अवांतर) झालेलं असलं ;) तरी बरच झालं! :D

वेल्लाभट 02/04/2014 - 22:03
आहे ती मराठी टिकवा त्यापेक्षा..... तू असं का बोलला? (या नंतरचा 'स' नेहमी गाळला जातो. 'बोललास' असं रूप असतं) मी तुला भेटेल. (भेटेल????? तृतीयपुरुष एकवचन आहे का?) मी तिला बोलली, ती मला बोलली..... (अरे काय!!!) अगणित चुका असतात... अगणित...! त्या सुधारायची मोहीम काढली तर बरं. अजून नवीन शब्दांची गरज नाही !

खटपट्या 02/04/2014 - 23:45
खालील वाक्यांवर स्वतंत्र धागा होऊ शकतो.
मी चहा पिलो / प्यायलो / पिली / प्यायली (?) तो चहा/ती चहा (?)
सद्या मी "मी चहा प्यायलो" असेच म्हणतो/बोलतो. मी ठाण्याचा रहिवासी/रहिवाशी आहे.

केसं, दगडं किवा असेच काही .. आणि आजकालची मराठी गाणी सुद्धा याच वाटेने चालली आहेत. उदाहरणार्थ - आयचा घो आयचा घो येडा झाला का रे आयचा घो आयचा घो पागल हुआ है ये आपणच अशी गाणी लिहायची आणि वर मराठी भाषा कशी लोप पावत चालली आहे वगैरे यावर चर्चा झाडायची.

हिंदीच्या अतिप्रचारामुळे आणि सुलभीकरणाच्या भोंगळ कल्पनांमुळे मराठीचा संपूर्ण साचा बदलत चालला आहे आणि माझ्या मते तो योग्य नाही. उदा. मी अकोला जातो. विभक्ती प्रत्यय कुठे गेला? माझा वाढदिवस पुण्यात मनवला. मनवला? साजरा केला असे म्हणतात मराठीत. विभक्ती प्रत्यय तर हरवत चालले आहेत. मी त्याची मदत केली हे आणखी एक उदाहरण. पैसे भेटले. भेटले? पैसे काय मनुष्य आहेत काय भेटायला? असो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बॅटमॅन 03/04/2014 - 12:28
हिंदीच्या अतिप्रचाराबद्दल अतिशयच सहमत. तदुपरि भेटणे हे कियापद मिळणे या अर्थी वापरणे हे फक्त अलीकडचे नसावे असे वाटते. विदर्भ इ. भागांत अगोदरपासून असेच बोलत असावेत असे वाटते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मारकुटे 03/04/2014 - 13:15
भाषा सतत बदलत असते. विभक्ती प्रत्ययांची रुपे बदलत असतात. इतर भाषांच्या संपर्कामुळे नवनवे प्रयोग होत असतात. जीभेला ऐकायला बोलायला जे नीट वाटतात ते रुढपावत असतात. असंच आणि असंच हवं या हव्यासापोटी संस्कृत मृत झाली. मराठीबद्दल अजुन आशा आहे. पैसे मिळाले हेच योग्य रुप हे कुणी ठरवल? त्यांना तो हक्क कुणी दिला? समोरचा माणुस पैसे भेटले म्हटल्यावर ज्याला सांगत आहे त्याला समजले ना? संवाद पूर्ण झाला. संवाद होणे महत्वाचे. असो.

In reply to by मारकुटे

असहमत भाषा नवसंपर्क वगैरे वगैरे जरी असले तरी 'अति' वर्ज्य असावे आणि असावेच. मी मुंबईला जातोय च्या ऐवजी मी मुंबई जातोय हे कुठल्याही प्रकारे स्वीकारार्ह नाही. अशा अतिरेकी सुलभीकरणामुळेच मराठीची पिछेहाट होत आहे हे नक्की. एकतर न्यूनगंडापायी इंग्रजीचा केला गेलेला अतिरेकी स्वीकार आणि भाषाभिमान नसल्यामुळे कुठलेही टुकार बदल 'झाला ना संवाद पूर्ण?' अशा मानसिकते पायी स्वीकारणे निव्वळ मूर्खपणाचे आहे. विचारणार्‍याला विचारण्याचा हक्क कोणी दिला हे विचारण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला असाही उपप्रश्न विचारला जाऊ शकतो. झालंच तर आपल्या भाषेवर हिंदी, इंग्रजीचा प्रभाव पाडून घेण्यापेक्षा उलटा प्रयत्नही कधी करावा. भले लगेच जमणार नाही किंवा लगेच शक्यही नाही परंतु सुरुवात नक्की व्हावी.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बॅटमॅन 03/04/2014 - 16:45
पैसे भेटले हा प्रयोग हिंदीच्या प्रभावाखालीच होतोय याला विदा काय? हिंदीचा मराठीशी खूप जवळून संपर्क फारतर गेल्या पन्नासेक वर्षांचा. त्याआधी हा प्रयोग असेल तर काय म्हणणार मग? अन उलटा प्रभाव हिंदीवर थोडासा का होईना, आहेच.

In reply to by बॅटमॅन

कदाचित हिंदीच्या प्रभावाचा मुद्दा आधी आल्यामुळे भेटणे वर त्याचा प्रादुर्भाव झाल्यासारखा वाटतो आहे. तसे नाही २न्ही मुद्दे स्वतंत्र आहेत. विदाच पहायचा झाला तर पूर्वीचे चित्रपट , झालंच तर आकाशवाणीवरच्या श्रुतीका, नाटके यात पैसे भेटणे या वाक्प्रचाराचा अभाव दिसेल आणि तो मी लहान असल्यापासून अनुभवलाच आहे. झालंच तर विदर्भात तो वापरात असेल तर तो वीर वामनराव जोशी या वैदर्भिय नाट्यकाराच्या नाटकांमधे तो दिसत नाही. आणि हो प्रभावाबद्द्लच बोलायचे झाले तर मराठीतील विभक्ती प्रत्यय बाद करण्याचे कारण मला उमजले नाही. मग भले विदर्भातले लोक "मी नागपूर जातो" म्हणत असतील तरी ते चूकच आहे. मग अशा बोलण्याला कोणी बोलीभाषेचा लेप देऊ पाहत असेल तर त्याला विरोध नक्की करावा. कारण माझे जवळचे नातेवाईक देखील विदर्भातील आहेत परंतु तेही असे बोलताना ऐकले नाही. अर्थात त्याच्याशी तुम्ही आधीच सहमत आहात असे वाटते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बॅटमॅन 03/04/2014 - 17:57
विभक्तीच्या मुद्यावर सहमती आहेच. बाकी तुम्ही दिलेली उदा. 'प्रमाण' मराठीची आहेत. नाटककार वैदर्भी असले तरी नाटके वर्‍हाडी बोलीचे प्रतिनिधित्व करतील असे क्वचितच दिसावे. त्यामुळे फक्त बोलीभाषेतली उदा. पाहिजे होती.

In reply to by बॅटमॅन

पैसा 03/04/2014 - 18:17
असे कोकणातही सर्रास बोलीभाषेत ऐकायला मिळते. प्रमाण मराठीत आहे तसा बोलीभाषेत 'मिळणे' आणि 'भेटणे' यात फारसा फरक नाही. याशिवाय 'गावले नाय' असंही म्हणतात. प्रमाण मराठीत मात्र 'गावले' म्हणजे फक्त 'सापडले'. कोंकणीतही मिळाले आणि भेटले या दोन्हीसाठी 'मेळ्ळे (मेळले)' असंच वापरलं जातं. तेव्हा हे शब्दप्रयोग चूक असं म्हणता येणार नाही. प्रमाण मराठीत वापरले जात नाहीत एवढंच.

In reply to by पैसा

बॅटमॅन 03/04/2014 - 18:22
सहमत. गावणे हाही शब्द आहेच. प्रमाण मराठी सोडूनही मराठीचे एक प्रचंड मोठे विश्व आहे त्यात काय काय घडतं याची नोंद करून ठेवणे मस्ट आहे.

In reply to by बॅटमॅन

सुहासदवन 03/04/2014 - 22:43
सध्या मिपावर आणि इतर अनेक संस्थळांवर हे दिसत आहे.....
पूर्ण सहमत!!!!!!! खच्चून निषेध केल्या गेला आहे.
बर्‍याच मालिकांत ऐकू येते - मी काय म्हणली, तू काय म्हणला, ते काय म्हणले....

In reply to by सुहासदवन

बॅटमॅन 04/04/2014 - 12:29
केल्या गेला आहे इ.इ. ही मिपावरची स्टाईल आहे, मराठवाड्यातल्या मंडळींनी पापिलवार केलेली. ती इतरांनी उचलली, इतकेच. अन म्हणला इ.इ. तर बोलीभाषा आहेच-फक्त त्यांना दरवेळेस अशुद्ध अशुद्ध म्हणून हिणवल्या जाऊ नये.

In reply to by बॅटमॅन

सुहासदवन 04/04/2014 - 15:02
पण इतर अव्याकरणीय जालीय संस्थळांच्या यादीत आपले मिपा मात्र नसावे हे माझे स्पष्ट मत आहे. ह्या संस्थळावर अनेक सुन्दर आणि अभ्यासपूर्ण लेख / लेखमालिका सातत्याने येत असतात. इस्पीकचा एक्का, ऋषिकेश, क्लिंटन, गवि, बॅटमॅन आणि इतर अनेक मान्यवर लेखक बरीच मेहनत घेऊन हे लेख मांडतात. त्या ले़खांचे प्रयोजन, त्यात असणारी माहिती, शब्दभांडार, व्याकरण, उपमा इत्यादी आम्हा सार्‍या वाचकांसाठी एक पर्वणीच असते. अगदी त्या लेखांखालील असणाऱ्या टिप्पण्या देखील बऱ्याचदा खूप मार्मिक आणि माहितीपूर्ण असतात. आजच्या युगात जिथे छापील पुस्तके आणि त्यातही व्याकरणासारखं काहीतरी कठीण वाचण्यास जेव्हा अजिबात वेळ नसतो त्यावेळी मिपा सारखी संस्थळे दर्जेदार वाचनाची भूक भागावितात. आणि हेच मिपाचे यश देखील आहे. पण ह्या लेखांनी आणि त्या खालील असणाऱ्या टिप्पण्यानी आपल्या दर्जा बरोबरच आपल्या मराठी भाषेची शब्द प्रामाण्यता टिकवली तर किती चांगले होइल... कारण अनेक युवक / युवती हे लेख आणि लेखमालिका आपल्या किंवा मित्रांच्या संदर्भांसाठी उतरवून घेतात, अशा वेळी आपली भाषा किती सशक्त आणि प्रमाणबद्ध हे माहित पडते. अशा वेळी अगदी एखादा चुकीचा शब्द किंवा चुकीचे व्याकरण भाषेचे सौंदर्य नकळत नष्ट करू शकते आणि चुकीच्या व्याकरणाचा पायंडा पाडू शकते. आणि मला वाटते ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, मराठी भाषा टिकवायची असेल तर… कारण चांगली सवय पटकन लागत नाही पण चटकन सुटते वाईट सवय पटकन सुटत नाही पण चटकन लागते. इथे कोणालाही सुनावण्याचा, दुखावण्याचा काहीही हेतू नाही. कृ. ह. घ्या.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मारकुटे 03/04/2014 - 18:50
>>>भाषाभिमान नसल्यामुळे कुठलेही टुकार बदल 'झाला ना संवाद पूर्ण?' अशा मानसिकते पायी स्वीकारणे निव्वळ मूर्खपणाचे आहे. भाषाभिमान आणि बदल ( ते सुद्धा म्हणे टुकार..ब्वार) यांची गल्लत होत आहे, पतंजली २००० वर्षांपूर्वी म्हणाला होता जसे कुंभाराकडे जाऊन हवे तसे मडके मागतो, बनवुन घेतो तसे कुणीही वैयाकरण्याकडे जाऊन शब्द पाडून घेऊन वापरत नाही, तर त्याचा वापर सुरु करतो. वैयाकरणी केवळ त्याची नोंद घेत व्याकरण बनवतो (जे दर काही वर्षांनी बदलत असते.) बाकी चालू द्या ... आम्ही मुर्ख आहोत हे मान्य !

राजो 03/04/2014 - 14:15
नागपुरी मराठी अशीच हिंदाळलेली आहे.. मी आली/गेली/बोल्ली, तो चाल्ला गेला, काहीही काय बोलून राहिला?? वगैरे.. अलीकडे मराठी टीव्ही जाहिरातींत सुद्धा डोक्यात जाणारे शब्दप्रयोग असतात.. उदा. "काय आपल्या टूथपेस्टमधे मीठ आहे?" (कुठ्ल्या मराठी मधे असे वाक्य असते??)

नाखु 03/04/2014 - 16:49
केलेल्या जाहीराती आणि चित्रपट हे "रेम्या" डोक्याचे असतात त्यामुळे व्याकरणाचे "शिकरण" झालेले आसतेच आसते.

कंजूस 03/04/2014 - 16:54
मिस करणे =तु नसल्यामुळे चुकल्यासारखं वाटतंय . इक्सपायर झाले =वारले . तुमच्या लुकला सुट होईल =तुम्हाला खुलुन दिसेल .तुम्ही या कपड्यात चमकाल . ट्रेंडी =चलाख चटपटीत तरतरीत . फ्रेश होऊन आलोच =आवरून आलोच . टेंशन घेऊ नका =एवढा ताण देऊ नका . डाइअट करा =पथ्य पाळा . हेल्थी फुड =पौष्टिक खाणं . मेन डिश =पक्वान्न ,स्वीट =गोड पदार्थ . बेसिकली =मुळातच . क्लायमैक्स =टोकच गाठलं अपडेटस =नवीन कळवा . रेंटल अपाटमेंट =महिना भाड्याने . फाटली =फजिती झाली ,वाजंत्री वाजली ,आडवाच झालो ,फरफट झाली . बोअर झालो =अगदी कंटाळलो . ऑफ झालो =सुन्न झालो . टेक इट ऑर लीव इट मिपाशटाईल आइ मिन =मला असं म्हणायचं होतं मिप्पाछाप पटलं तर घ्या हेवेसांन .

यसवायजी 03/04/2014 - 17:32
लूट, ठग, जंगल, गुरु, अवतार,योगा, डे़कॉईट, चटनी, चड्डी, आलू, देसी, गोरा, यार,अछा, अंग्रेज, बदमाश, धोती सारखे शब्द त्यांनी घेतले. ते लोक पण असाच विचार करतात काय हो ???

राही 03/04/2014 - 17:34
शेजारच्या घरी मत्स्यपेटिका आणली होती. व्यवस्था ठेवण्यात काहीतरी गडबड झाली आणि काही मासे मेले. तर घरातली छोटी (वय वर्षे पाच) मुलगी दु;खाने सांगू लागली, 'ममा, ते सगळे फिश सँड मध्येच बसलेत. ते वरच येत नाहीयेत. ते सगळे मेले झालेत का?(आर दे डेड?)' सोसायटीमध्ये मांजरांच्या पिल्लांची संख्या खूप झालीय. एकदा त्यातले एक पिल्लू मेले. तर एक चिमखडा धावत येऊन सांगू लागला, 'ती कॅट मेरली. ती पाठीवर पडली, वॉमिट केरली आणि मग ती मेरली' मेली, केली ही मुलांच्या दृष्टीने अनियमित रूपेच आहेत. पडली, बसली, उठली प्रमाणे मरली, करली असे व्हायला पाहिजे. पण आपण मोठी माणसे तर मेली, केली म्हणतो. मग मुलांनी आपल्या मतीने मेली केलीतला 'ए'कार आणि त्यांच्या दृष्टीने योग्य मरली, करली ही रूपे यांचा मेळ घालून मेरली, केरली ही नवी रूपे निर्माण केली!

राही 03/04/2014 - 17:59
'स्वीकारार्ह' नाही, 'वर्ज्य' असावे हे काही मर्यादेपर्यंत ठीक आहे. म्हणजे असे प्रयोग वापरणार्‍यांना आपण मराठीच्या उत्तरपत्रिकेत कमी गुण देऊन शिक्षा करू शकतो. पण फार मोठ्या प्रमाणातल्या मौखिक मराठीचे काय? तिथे निर्बंध कसे काय आणि कोणाकोणावर घालणार? नवनव्या शब्दांचा आणि शब्दप्रयोगांचा खूप मोठा आणि ताकदवान लोंढा मराठीच्या पात्रात घुसतो आहे. तेव्हा मूळ नदी आपले पात्र बदलणारच. हे पात्र विस्तारणे नव्हे तर एका वेगळ्याच दिशेने वाहू लागणे आहे. ह्याला व्याकरणनियमरूपी धरणांनी किंवा बांधांनी आवरता येण्याजोगे नाही. इफ यु कान्ट रेज़िस्ट, एन्ड्युअर, असे वचन आहे; त्याची आठवण होते. तसे तर नपुंसक लिंगही मराठीतून नामशेष होऊ घातले आहे. 'सर्वांचे धाबे दणाणले आहेत' किंवा 'हे ऋण फेडता येण्याजोगे नाहीत' हे सररास ऐकू येते. बदल हे व्हायचेच. ज्ञानेश्वरी, गाथा, गुरुचरित्र त्यातल्या भाषेमुळे आज दुर्बोध आहे. अगदी निबंधमाला सुद्धा वाचताना मध्ये मध्ये ठेच लागते. पण ती भाषा 'मराठी'च आहे आणि सध्याची आणि भविष्यात बदलणारीसुद्धा 'मराठी'च असेल. तेव्हा काळजीचे कारण नाही.

In reply to by राही

प्रदीप 03/04/2014 - 18:40
होत रहातात हे खरे,पण त्याला काही विधीविशेष असावा, नाही? मराठीतील रूढ अर्थाचे शब्द (विनाकारण) नव्या अर्थाने येऊ का लागावेत? उदा. 'प्रभावित', 'संपन्न'. ८० च्या दशकापासून 'शासकीय' मराठी, आमच्या भाषेत अगम्य बदल करू लागली. आता तर, माध्यमांच्या परिणामामुळे काही धरबंदच राहिलेला नाही. (जाता जाता, पूर्वी - म्हणजे अगदी सत्तरीच्या दशकाच्या मध्यावर तरी नक्कीच- 'सरकार' हा शब्द खुद्द सरकारच वापरायचे. मग कधीतरी त्याचे 'शासन' झाले). आता मुंबई-पुण्याकडे जी लिहीली व बोलली जाते, ती भाषा मराठी नसून 'हिंदीठी' आहे. येथील मिपावरीलच लेखन पाहिले तर प्रत्यय यावा! भाषा प्रवाही असावी, हे ठीक. पण ह्याचा अर्थ निव्वळ दहा- वीस वर्षात, तिचे रूपडे ओळखू येऊ नये इतकी ती प्रवाही असेल, तर तिच्या प्रवाहाचे स्त्रोत तपासून पहावेत असे वाटते.

In reply to by प्रदीप

राही 03/04/2014 - 18:49
वेगवेगळ्या स्रोतांमधून 'जीवन' मिळू लागले तर त्यात वावगे काय? बदल सोपे वाटले, सर्वमान्य झाले तर टिकतील, नाही तर उडून जातील. मराठी साहित्याचा उगम स्रोत बदलतो आहे, बदलला आहे, ही वर्गबदलाची प्रक्रिया आम्ही कधी लक्षात घेणार?

In reply to by राही

मारकुटे 05/04/2014 - 13:09
>>>मराठी साहित्याचा उगम स्रोत बदलतो आहे, बदलला आहे, ही वर्गबदलाची प्रक्रिया आम्ही कधी लक्षात घेणार? सहमत आहे. गेली दोन हजार वर्षे ज्यांना गावकुसाबाहेर ठेवले त्यांच्या हातात आता मराठी आहे. हे सत्य स्विकारणे अनेकांना जड जाते त्यामधुन आम्ही बोलतो तीच मराठी बाकी भुक्कड ही प्रवृत्ती गेल्या पन्नास वर्षांत पुण्यामुंबईतील विशिष्ट वर्गातील लोकांमधे उदयास आलेली आहे. त्याचाच वापर करुन बोलण्यावरुन जात शोधुन त्याच्याशी व्यवहार करण्याचे तंत्र विकसित केले गेले आहे.

In reply to by मारकुटे

प्रदीप 05/04/2014 - 14:38
गेली दोन हजार वर्षे ज्यांना गावकुसाबाहेर ठेवले त्यांच्या हातात आता मराठी आहे..... हे टाळीवाक्य इथे (म्हणजे सदर उपधाग्याच्या संदर्भात) अगदी गैरलागू आहे. माझा प्रतिसाद नीट वाचलात तर आपल्या लक्षात यावे की माझा आ़क्षेप कुठल्याही मराठी बोलीभाषेला नाहीच. उलट संस्कृताळलेले 'शासकीय मराठी' व हिंदीच्या अतिप्रभावातून आलेल्या बदलांविषयी मी लिहीले आहे. तेव्हा पुणेमुंबई, गावकुसाबाहेरील माणसे इ. इ. ह्या उपधाग्यावर गैरलागू.

In reply to by राही

सुबोध खरे 03/04/2014 - 19:00
एक प्रमाण भाषा असणे आवश्यक आहे. जसे कायदेशीर इंग्रजी हि अगदी इंग्लंड मध्ये जन्माला आलेल्या माणसाला सुद्धा कठीण जाते म्हणून ती सोडून द्यावी असे कोणी म्हणणार नाही. पण एखाद्या शब्दाचा अचूक अर्थ असण्यासाठी किंवा दुसर्याला सांगण्यासाठी प्रमाण भाषा असणे आवश्यक असते. सर्वसामान्य माणसाला ती अवघड होते हि वस्तुस्थिती आहे. जर आपण law ,act आणि statute याचे भाषांतर कार्याचा प्रयत्न केला तर सर्वसामान्य माणसाला कायदा हा एकाच अर्थ कळतो म्हणूनच अधिनियम, कायदा आणि विधी असे शब्द वापरावे लागतात. मुळात कोणतीही भाषा प्रमाण असो वा बोलीभाषा असो हि शुद्ध स्वरुपातच बोलली जावी. मालवणी भाषा आपल्या मूळ ढंगात जितकी गोड लागते तितकी संकरीत / अर्धवट हिंग्लिश मालवणी कानाला खटकते. हीच गोष्ट कोकणी किंवा वर्हाडी व खानदेशी भाषे बद्दल किंवा हिंदी किंवा कोणत्याही हिंदीच्या बोलीभाषे बाबत( मगधी, मैथिली वा भोजपुरी बद्दलहि) म्हणता येईल. थोडेसे च्या ऐवजी वाईच म्हणले तर कानाला गोड लागते पण "जरासी" हा हिंदी शब्द खटकतो. आपल्याला मराठी चांगली बोलता येत नाही याची लाज वाटायच्या ऐवजी अभिमान वाटू लागला आहे हि काळजीची बाब आहे.

In reply to by सुबोध खरे

बास बास. माझा आक्षेप ज्याला होता ती गोष्ट डॉक्टरांनी अचूक हेरली. आपल्याला मराठी चांगली बोलता येत नाही याची लाज वाटायच्या ऐवजी अभिमान वाटू लागला आहे हि काळजीची बाब आहे.

In reply to by सुबोध खरे

मारकुटे 05/04/2014 - 13:11
>>>आपल्याला मराठी चांगली बोलता येत नाही भाषाशास्त्रानुसार जी काही जशी काही बोलली जाते ती भाषा चांगलीच असते. त्यामधे शुद्ध अशुद्ध, चांगलं वाईट असं काही नसतं. अशी वर्गवारी कृत्रिम असून गेल्या दोनशे वर्षांत स्वत:चे स्थान डळमळीत झालेल्या वर्गाने इतरांवर कुरघोडी करण्याच्या हव्यासाचा परिपाक आहे.

In reply to by मारकुटे

सुबोध खरे 08/04/2014 - 10:09
मारकुटे साहेब, भाषेतील किंवा बोलीभाषेतील कोणताही शब्द वापर करण्यास हरकत नसावी पण परभाषेतील दोन शब्द प्रत्येक वाक्यात आणून हीच बोलीभाषा म्हणणार्या बद्दल काय म्हणावे. मला वेळ नाही च्या ऐवजी "टायम" नाही. किंवा वय विचारले तर "ट्वेंटी एट कम्प्लीट" होतील, अद्रक घालून चं पिली असे म्हणणे याला काय म्हणावे. माझे म्हणणे इतकेच कि आपण जी भाषा बोलत असाल तिच्यात सरमिसळ होऊ नये इतकेच. मग अहिराणी असेल तर अहिराणी असावी. हिंदी असेल तर हिंदी असावी किंवा इंग्रजी असेल तर इंग्रजी स्वच्छ असावी. दुर्दैवाने कोणतीही भाषा शुद्धच असते या आग्रहा पायी आपल्यातील काही लोक कोणतीच भाषा धड बोलू शकत नाहीत. आणि याने जेंव्हा आपण मुलाखतीसाठी जाता किंवा लेखी अर्ज करत तेंव्हा आपले अपरिमित नुकसान होते हे आपल्याला( मराठी माणसाना) लक्षात येत नाही. प्रमाण भाषे बद्दल असे आहे कि आपण एखादा प्रश्न माहितीच्या अधीकारात विचारला आणि कोणी आपल्याला अशा सरमिसळ भाषेत उत्तर दिले तर त्याचे नक्की अर्थ काढणे कठीण होते आणि नंतर अशी माणसे कायद्याचा कीस पडून आपल्या मुळ हेतूला हरताळ फासू शकतात. यासाठीच सरकार दरबारी प्रमाण भाषा असणे आवश्यक असते. दुचाकी वाहन चालवताना आपल्याकडे परवाना नसेल तर लोचा होईल /लफडा हो जायेगा असे आपल्याला कळवले तर कसे वाटेल. आपल्याला आपल्या जमिनीचा/ घराचा सात बाराचा उतारा अशा अर्धवट भाषेत मिळाला तर त्यावर येणारे कायदेशीर हक्क किंवा अधिकार आपल्याला सिद्ध करणे फार कठीण होईल आणि आपला लांबचा मावस चुलत भाऊ आपल्या हक्कावर "लोचा" करू शकेल. कोणत्याही भाषेला अधिकृत दर्जा देताना हा विचार करावा लागतो. सरकारी अधिकार्याला विचारलेल्या प्रश्नाला अधिकृत भाषेतच उत्तर देणे बंधनकारक ठरते . मग या प्रमाण भाषेला आपल्याला शुध्द म्हणायचे नसेल तर नसो. जर आपण वादासाठी वाद घालत असाल तर बोलणेच खुंटले.

In reply to by सुबोध खरे

बॅटमॅन 08/04/2014 - 15:33
सर्कारदर्बारची भाषा अन बोलीभाषा यात फरक नाही काय? मारकुटे यांचे अर्ग्युमेंट बरोबर आहे. शुद्ध-अशुद्ध याचा संबंध तुम्ही कायदेशीर अन कार्यालयीन भाषेशी लावताहात तर मारकुटे भाषाशास्त्राच्या दृष्टिकोनातून बोलताहेत इतकंच. प्रमाणभाषेची गरज कोणीही नाकारत नाहीये, पण कायदेशीर मान्यता आणि व्याकरणाची शुद्धता यांचा संबंध नाही. मी बोलतोय तो तुम्हांला संज्ञांचा फजूलपणे काढलेला कीस वाटत असेल तर त्याला इलाज नाही पण तुम्हां दोघांच्या अर्ग्युमेंटची संदर्भचौकट अंमळ वेगळी असून त्या त्या चौकटीत ते ते अर्ग्युमेंट बरोबर आहे इतकेच सांगायचे होते.

In reply to by बॅटमॅन

बाळ सप्रे 08/04/2014 - 16:00
कायदेशीर मान्यता आणि व्याकरणाची शुद्धता यांचा संबंध नाही
नक्की शुद्धताच का?? की प्रमाणता.. यावर किती किस पाडु तेवढा कमी आहे.. शुद्ध-अशुद्ध, प्रमाण-प्रमाणेतर, चांगले-वाईट या सगळ्या संज्ञा सापेक्ष (मराठीत - relative terms) आहेत एवढच म्हणू शकतो .. इथे जरा "भावना पोचल्या की झालं" हा नियम लावून पहा !!

In reply to by बाळ सप्रे

बॅटमॅन 08/04/2014 - 16:09
होय शुद्धताच. कायदेशीर मान्यता असलेल्या एका बोलीत काही वेगळे शब्द असतील, पण मान्यता नसलेल्या दुसर्‍या बोलीत व्याकरणाचे नियम प्रमाणबोलीतल्यासारखेच पाळले जाऊ शकतात. असो.

In reply to by बॅटमॅन

बाळ सप्रे 08/04/2014 - 17:48
म्हणजे व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्ध ?? मान्यता नसलेली बोली अशुद्ध?? मागचे काही प्रतिसाद पाहता 'अशुद्ध' शब्द भाषेच्याबाबतीत तुम्हाला निषिद्ध वाटतोय !!

In reply to by बाळ सप्रे

बॅटमॅन 08/04/2014 - 17:52
मान्यता नसलेली बोली फक्त प्रमाणेतर. व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्ध. अशुद्ध हा शब्द भाषेबाबतीत पूर्णपणे निषिद्ध नाहीये.

In reply to by बॅटमॅन

बाळ सप्रे 09/04/2014 - 10:40
शुद्ध आणि अशुद्ध असे म्हणण्यामागे एक अ‍ॅझम्प्शन आहे की शुद्ध नामक काहीएक ऑब्जेक्टिव्ह गोष्ट अस्तित्वात आहे. जे भाषाशास्त्रदृष्ट्या चूक आहे
व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्ध
वरील दोन्ही विधाने परस्परविरोधी आहेत.. मला दुसरे विधान पटते.. त्याप्रमाणे.. 'त्याची मदत केली' - अशुद्ध 'त्याला मदत केली' - शुद्ध का इथे बोलीभाषेचा संदर्भ लावून प्रमाणेतर म्हणणार?? व्याकरणाप्रमाणे अशुद्ध म्हटल्यास व्याकरणाचे 'अज्ञान' हे कारण स्वीकारण्यास हरकत नसावी.. इथे 'सामाजिक अभिसरणामुळे झालेले बदल अज्ञानातून होतात हे म्हणणे अज्ञानमूलक आहे' ही पळवाट आहे.. काही लोकं व्याकरणाच्या/ भाषेच्या 'अज्ञानामुळे' अशुद्ध बोलतात हे मान्य न करता.. भाषेचा प्रवाहीपणा, सामाजिक अभिसरण वगैरे मुद्दे सांगुन सरसकटपणे पाठराखण होउ नये इतकेच!!

In reply to by बाळ सप्रे

बॅटमॅन 09/04/2014 - 12:59
अंमळ गफलत झाली वाट्टे. पण
काही लोकं व्याकरणाच्या/ भाषेच्या 'अज्ञानामुळे' अशुद्ध बोलतात हे मान्य न करता.. भाषेचा प्रवाहीपणा, सामाजिक अभिसरण वगैरे मुद्दे सांगुन सरसकटपणे पाठराखण होउ नये इतकेच!!
हे असलं तरी वेगळ्या बोलींना रेकग्निशन देणे हे कधी होणारच नाही. प्रमाणभाषेपुरते ठीक आहे, बाकी वेगळ्या बोलीचं असू नये असं. व्याकरण ही गोष्ट फक्त प्रमाणबोलीपुरती मर्यादित नाही. थोड्या फरकांसहित पाहिले तर साधारणपणे व्याकरणाचा एकच नियम बर्‍याच बोलींना लागू पडतो म्हणून तो शुद्धतेचा मुद्दा काढला इतकेच. ऑब्जेक्टिव्हलि शुद्ध म्हणून जे काही अस्तित्वात असते अथवा असू शकते ते एका प्रमाण बोलीशी निगडित नसते अथवा नसावे इतकाच मुद्दा आहे.

राही 03/04/2014 - 18:43
प्रचलित नियमांनुसार काही ठिकाणी द्वितीयेचे प्रत्यय 'स', 'ला' हे न लावणे अशुद्ध ठरते. पण तृतीयेचे 'एं','शीं', 'ईं' 'हीं' हे प्रत्यय कालौघात गळून पडले आहेत हे आपल्या लक्षात येत नाही. रायगड जिल्ह्यात बोलीभाषेत अजूनही ते वापरले जातात पण आपण ते बोलणे अशुद्ध समजतो! 'त्यांईं मला हे घड्याळ दिले' किंवा 'तिएं ओवाळले' किंवा 'काकाहीं वाटणी मागितली' ही वाक्ये कानाला कशी वाटतात? शुद्ध असूनही अशुद्ध वाटतात ना? दक्षिण कोंकणात ताणे, तेणा अशी रूपे आहेत. ही संस्कृत 'तेन' ला अधिक जवळची आहेत. पण ही रूपे अशुद्ध आणि 'त्याने' मात्र शुद्ध. जाता जाता : तृतीयेचा 'ने' हा एकवचनी प्रत्यय सध्या अदृश्य होऊ लागला आहे. त्याऐवजी 'नी' च वापरला जातोय.

In reply to by राही

बॅटमॅन 03/04/2014 - 18:45
पुनरेकवार अतिशयच सहमत. तदुपरि
तृतीयेचा 'ने' हा एकवचनी प्रत्यय सध्या अदृश्य होऊ लागला आहे. त्याऐवजी 'नी' च वापरला जातोय.
एक छोटीशी दुरुस्ती: 'ने' हा प्रत्यय प्रत्यक्ष बोलण्यात कधीच नव्हता, फक्त लेखनात होता. अन नी ऐवजी नं हा जास्त ऐकला आहे.

In reply to by राही

प्रत्ययाबाबत मुद्दा लक्षातच घ्यायचाच नसेल तर ठीक आहे. मुद्दा कोणते प्रत्यय गळून पडले नाही पडले हा नाही तर हिंदीच्या अतिरेकामुळे आपण मराठीतील प्रत्यय गाळतो आहे हा आहे. आणि समजा एखाद्याने ते लक्षात आणून दिले तर प्रवाहीपणा, स्त्रोत, वर्गवारी असली फुसकी कारणे देतो हे आहे. म्हणूनच डॉक्टर खरेंशी सहमती दर्शवली आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

राही 04/04/2014 - 12:07
ही कारणे अजिबात फुसकी नाहीत. तशी ती मानणे म्हणजे आत्मवंचना करून घेणे आहे. मुद्दा प्रत्ययांचा नाहीच. मराठीच्या स्वरूपात वेगाने होत असलेल्या बदलांचा आहे. हे बदल होतच नाहीयेत असे तर कोणी म्हणत नसावे. हे बदल होऊच नयेत, झालेच तर ते 'वर्ज्य' मानावेत, 'स्वीकारार्ह' नसावेत असे मत दिसते; ज्याचे नियमांत रूपांतर होऊन अंमलबजावणी होणे कठीण वाटते. जे फीज़िबल नाही, त्याच्यामागे आपली शक्ती का दवडावी? त्याऐवजी मराठीच्या विकासाचे अन्य मार्ग का हाताळू नयेत? समजा, सध्या हिंदीच्या प्रभावामुळे मराठी नको इतकी बदलतेय, मग आतापर्यंत जे बदल झाले, ते तेव्हा हिंदीचा प्रभाव नसताना(च) झाले(च) ना? म्हणजे हिंदीचा प्रभाव असो वा नसो, मराठीत बदल हे होतच आहेत. यातून एक अर्थ असाही निघू शकतो, की बिगरहिंदी प्रभावांनी बदल झाले तर चालतील, पण हिंदीमुळे मात्र नको. असो. वाढत्या शिक्षणामुळे आणि अभिसरणामुळे होत असलेले बदल खुल्या मनाने स्वीकारणे हा एकच पर्याय दिसतो आणि तो योग्यही आहे, आपद्धर्म नव्हे, असेही मला वाटते.

In reply to by राही

मारकुटे 05/04/2014 - 13:14
सहमत आहे. अशाच वृत्तीमुळे संस्कृत लयास गेली. पाणिनी नंतर पतंजली झालेले बदल नोंदवतो पण आम्ही अष्टाध्याचीच घोकत बसलो, महाभाष्य उघडून पण पाहिले नाही. हीच अशीच हेच असेच उच्चार आणि प्रत्यय आणि शब्द असल्या वृत्तीमुळे संस्कृत संपली. बरे आहे मराठीबाबत असली अरेरावी इथला समाज फाट्यावर मारतो.

In reply to by राही

बाळ सप्रे 04/04/2014 - 12:00
भाषा प्रवाही असते.. नवीन शब्द सामावुन घेतल्याने समृद्ध होते वगैरे मान्य. म्हणून लिहिण्या, बोलण्यातील सर्वच अशुद्धता सामावून घ्यावी आणि तोच नियम व्हावा हे अमान्यच.. आणि जास्त लोक तसे बोलतात म्हणून तो नियम व्हावा हे ही अमान्य.. असे असते तर चायनीज्/इतर लोकांमुळे इंग्लिश भाषा कितीतरी बदलली असती!! बर्‍याच वेळा हे चूक, हे बरोबर हे सांगायला कोणी जात नाही म्हणून काय बरोबर काय चूक हे न समजता ते बोलणे लिहिणे पुढे चालत रहाते.. हे कोणी सांगितल्यास अज्ञान मान्य करून सुधारण्यास काय हरकत आहे.. प्रत्येक चुकीला सामावून घ्यायचे असेल तर व्याकरण तरी कशाला शिकवावे शाळेत.. "भावना समजल्या की झाले" याचाही अतिरेक नको.. भावना कधीकधी भाषेशिवायही पोहोचु शकतात! प्रमाण भाषा ही सर्व बोलीभाषांमधील दुवा असते.. भाषेत बदल सामावून घेताना अपरिहार्यता लक्षात घेणेही गरजेचे आहे.. बदल समृद्ध होण्याइतका असावा .. अस्तित्व/ओळख हरवण्याइतका नसावा..

In reply to by बाळ सप्रे

राही 04/04/2014 - 13:04
प्रमाण भाषा हवीच पण प्रमाण भाषेचे स्वरूप सर्वकाळ तेच हवे हा आग्रह योग्य नाही. भाषा बदलते आहे याचा अर्थ प्रमाण भाषाच बदलते आहे. सर्वच प्रमाणे बदलली. वाल, रती, गुंज जाऊन तोळा, मासा छटाक,शेर आले. तेही जाऊन ग्राम मिलिग्रॅम आले. प्रहर, घटिका पळे, निमिष जाउन सेकंद् ,मिनिटे आली, टीच-वीत-तसू गेले, योजन-क्रोश गेले, फर्लॉग-माइल गेले, यार्ड-फुट-इंच गेले, मीटर-किलोमीटर आले. हे सर्व बदलले आणि हे बदल व्यक्त करणारी 'प्रमाण'भाषा मात्र तशीच राहिली, असे घडेल काय? चिनी भाषेच्या इंग्लिशवरील प्रभावाचे उदाहरण तितकेसे समर्पक नाही. चिनी भूभागावर जिथे जिथे कोपर्‍या-खबदाडीतून (पॉकेट्स) इंग्लिश बोलली जाते तिथे त्या इंग्लिशवर चिनी भाषेचा प्रभाव पडेलच पडेल. पण जोपर्यंत इंग्लिश मेन लँड म्हणजे यू.के.,अमेरिका वगैरे मध्ये चिनी लोक 'साय्ज़ेबल' प्रमाणात नाहीत तो पर्यंत तिथे चिनी भाषेचा प्रभाव पडणार नाही. घरातले उदाहरण द्यायचे झाले तर पूर्व आणि पश्चिम बंगालमधले बांग्लाभाषक मराठीभाषकांपेक्षा संख्येने अधिक आहेत पण ते मराठी मेन्लँड्मध्ये नाहीत किंवा महाराष्ट्रातल्या माध्यमांवरही त्यांचा प्रभाव नाही त्यामुळे बांग्ला भाषेचा प्रभाव मराठीवर नाही. बृहन्मुंबई भागात मनोरंजन-वाहिन्या आणि बॉलिवुडमुळे हिंदीचा प्रभाव आहे. बाकी वृत्तावाहिन्यांची मुख्य कार्यालये दिल्लीतच आहेत. हां, आपण एक गोष्ट करू शकतो. बॉलिवुड मुंबईत नको अशी चळवळ उभारू शकतो. किंवा मराठी लोकांनी ह्या वाहिन्या-चित्रपट पाहू नयेत असा शुद्ध मराठमोळा नियमही करू शकतो. हिंदी मनोरंजनाचा प्रभाव केवळ महाराष्ट्रातच नाही, तर सर्वत्र, अगदी चेन्नैपासून तुर्कस्तानपर्यंत आहे. चेन्नैमध्ये मुली आजकाल हाफ-साडी (पवडै दवनी) ऐवजी सल्वार-कमीज़ वापरतात हे हिंदी चित्रपटांमुळे झाले असे तेथील लोक खेदाने म्हणतात. या पोशाख-क्रांतीने कितीतरी नवे शब्द तमिळमध्ये घुसवले असतील आणि कितीतरी जुन्या शब्दांना डच्चू दिला असेल. आपल्याकडेसुद्धा लुगडी-पातळे-साड्या-धोतरे-पंचे हे निर्‍या काढून 'नेसायचे' असत. आता पँट-शर्ट-जीन्स-सल्वारकमीज् 'घालतात'. वेणी 'घालायची' असे, आज केस 'बांधतात'. भाजी, कांदे विळीवर चिरायचे असत, आज सुरीने 'कापतात' किंवा प्रोसेसरमध्ये 'फिरवतात'. 'तू टाक चिरुनी ही मान' हे आता अतिजुने झाले. ही एक प्रकारची समृद्धीच नव्हे तर दुसरे काय?

In reply to by राही

बाळ सप्रे 04/04/2014 - 13:39
लुगडी-पातळे-साड्या-धोतरे-पंचे हे निर्‍या काढून 'नेसायचे' असत. आता पँट-शर्ट-जीन्स-सल्वारकमीज् 'घालतात'. वेणी 'घालायची' असे, आज केस 'बांधतात'
इथे सामाजिक बदलांना अनुसरुन भाषा बदल अपेक्षितच आहे.. पण म्हणून साडी 'घातली' हे अशुद्धच!! तेवढच म्हणायचय मला.. प्रत्येक भाषिक अशुद्धतेची प्रवाहीपणा/समृद्धी याकारणासाठी पाठराखण होउ नये इतकच!! 'त्याला मदत करणे ' हे सुट्सुटित वाक्यरचनेचे रूप माहित नाही म्हणून जास्त हिंदी कानावर पडण्यामुळे 'त्याची मदत करणे' असे केले जाते. इथे सामजिक बदल अथवा कुठल्याही प्रकारची अपरीहार्यता हे कारण नसून अज्ञान आहे हे कारण आहे हे मान्य करायला हरकत नसावी.

In reply to by बाळ सप्रे

राही 04/04/2014 - 16:25
आता 'घालणे' हेच जर कपड्यांच्या संदर्भातले योग्य क्रियापद ठरले तर नेसणे आणि घालणे हा भेद रहाणारच नाही. कारण 'नेसण्या'ची कृती करण्याची वेळच येणार नाही किंवा कमीत कमी वेळा येईल.(लुगडी धोतरे वापरातून गेल्यामुळे.) त्यामुळे तो शब्द स्मृतीतून जाईल. आणखी वीस वर्षांनी सारी-ड्रेपिंग हा शब्द रूढ झालेला असेल. आता ड्रेप म्हणजे वस्त्रांनी सजवणे, (भरजरी राजवस्त्रे वगैरे) अंगावर व्यवस्थित चढवणे. साडी हा नित्य वापरातला प्रकार राहिला नसून खास सणासुदींचा पोशाख बनल्यामुळे तो काळजीपूर्वक 'ड्रेप'च करावा लागतो. जुन्या मराठीतली 'लेणे', 'माळणे' ही क्रियापदे हद्दपार झाली कारण त्या क्रियांमागच्या कृती बदलल्या. आज कोणी 'मी शर्ट ल्या(य)लो' किंवा 'मी परकर ल्यायले' असे म्हणत नाहीत. आज कोणी फुले 'माळीत' नाहीत.

In reply to by बाळ सप्रे

राही 04/04/2014 - 16:44
खरे तर साड्या वापरातून जात चालल्या आहेत म्हणूनच 'नेसणे' हा शब्दसुद्धा वापरातून जात चालला आहे. भाषेच्या बाबतीत 'डेड-लाइन' 'डिमार्केशन' वगैरे असे काही नसते की शेवटची साडी शेवटच्या वेळी नेसली जाईल तेव्हाच अमुक एक शब्द बाद होईल. ही हळू हळू चालणारी आणि 'ओवरलॅपिंग' अशी प्रक्रिया असते.

In reply to by प्यारे१

राही 05/04/2014 - 14:22
"साड्या वापरातून जात चालल्या आहेत" असे म्हटले आहे. 'वापरातून गेल्या आहेत' असे नाही म्हटलेले. अर्थ असा की साड्या वापरण्याचा कल कमी होतो आहे. लोकसंख्यावाढीचा वेग कमी होतो आहे म्हणजे लोकसंख्या कमी होते आहे असे नव्हे; अ‍ॅक्सिलरेशन कमी होते आहे म्हणजे स्पीड कमी होतो आहे असे नव्हे. मुंबईत तरी हा कल स्पष्ट दिसतो. साड्यांची दुकाने जाऊन त्या जागी पंजाबी कपड्यांची (किंवा त्याहूनही पुढे म्हणजे वेस्टर्न आउट्फिट्सची) दुकाने दिसू लागली आहेत. पोलक्याच्या कापडाची अनेक दुकाने बंद झाली आहेत. रेल वे फलाटावर विशेषतः कचेर्‍यांच्या वेळात बायकांच्या डब्याशेजारी उभे राहून निरीक्षण केले (आपापल्या रिस्कवर) तर साडीवाल्या बायका कमी दिसतात. ग्रामीण भागातही कित्येक ठिकाणी नवतरुणी आता पंजाबीसूट किंवा मॅक्सी (खरे तर गाउन, हाउस-कोट) घालतात.

राही 04/04/2014 - 15:12
सामाजिक अभिसरणामुळे झालेले बदल अज्ञानातून होतात हे म्हणणे अज्ञानमूलक आहे. भिन्न संस्कृतीशी आदानप्रदान (किंवा आपण संघर्ष म्हणू या हवे तर ) होताना मूळ संस्कृतीला समांतर किंवा तिचीच एक शाखा अशी एक संस्कृती जन्म घेत असते आणि ती दोन्ही जनक संस्कृतींना समृद्ध करते. गांधारकला हे एक उत्तम उदाहरण ठरेल. सध्या हिंदीवर बॉलिवुडी प्रभाव नाही असे आपल्याला वाटते का? वाट लग गयी, श्यानपन, कानपट्टी, सुमडी, नक्को (दखनी) हे शब्द कुठून आले? हे शब्द तर पाकिस्तानी उर्दूतही शिरले आहेत. आज हिंदीवर मराठीचा प्रभाव गुजरातीपेक्षाही जास्त आहे तो बॉलिवुडमुळेच. खरे तर जुनी गुजरातीभाखा ही मुळापासूनच राजस्थानीशी आणि पर्यायाने हिंदीशी साधर्म्य राखते. पण आज मात्र हिंदीवरचा मराठी प्रभाव जाणवण्याजोगा आहे. मुंबईमध्ये हिंदी चित्रपट-उद्योग भरभराटीस येणे ही घटना आर्थिक, भाषिक आणि सामाजिक अंगांनी तपासता येण्याजोगी आहे. भाषेवर या सर्व बलांचे कार्य चालते. यात भाषा कधी या अंगाने झुकते तर कधी त्या. अशी मुरडत, वळसे घेत चाललेली भाषा स्वतःचा एक वेव्ह फॉर्म किंवा पॅटर्न स्थापन करीत पुढे वाटचाल करीत असते. ही गति सरासरीने एकदिक् मानता येईल पण काळाच्या एखाद्या छोट्या तुकड्यात ती हेलकावे खाताना दिसू शकते. असो. मराठी बिघडत नाहीय आणि मराठीची अधोगती होत नाहीय हे मात्र नक्की.

In reply to by राही

बाळ सप्रे 04/04/2014 - 15:33
मराठी बिघडत नाहीय आणि मराठीची अधोगती होत नाहीय हे मात्र नक्की
हे मान्य.. पण बरेच शब्दप्रयोग डोक्यात जातात हे मात्र खरं.. पण शुद्ध आणि अशुद्ध हा फरक राहाणारच.. प्रत्येक जण आपल्याला वाटेल तसेच बोलणार .. पण त्यात चूक दाखवल्यास वाईट वाटून घेउ नये.. 'शुद्ध आणि अशुद्ध असं काहिच भाषेत नसतं' असं म्हणणं हे देखिल आत्मवंचना करणेच ठरेल.

In reply to by बॅटमॅन

बाळ सप्रे 04/04/2014 - 15:56
भाषेबाबत जास्त आग्रही असणार्‍यांना "शुद्ध आणि अशुद्ध" जास्त योग्य वाटेल.. पण "प्रमाण-प्रमाणेतर" ला सर्वसंमती मिळू शकेल.. :-)

In reply to by बाळ सप्रे

बॅटमॅन 04/04/2014 - 16:03
शुद्ध आणि अशुद्ध असे म्हणण्यामागे एक अ‍ॅझम्प्शन आहे की शुद्ध नामक काहीएक ऑब्जेक्टिव्ह गोष्ट अस्तित्वात आहे. जे भाषाशास्त्रदृष्ट्या चूक आहे. त्यामुळे प्रमाण आणि प्रमाणेतर हे वर्गीकरण बरोबर आहे.

In reply to by बॅटमॅन

बाळ सप्रे 04/04/2014 - 16:23
शुद्ध आणि अशुद्ध असे म्हणण्यामागे एक अ‍ॅझम्प्शन आहे की शुद्ध नामक काहीएक ऑब्जेक्टिव्ह गोष्ट अस्तित्वात आहे. जे भाषाशास्त्रदृष्ट्या चूक आहे
भाषाशास्त्र असेदेखिल ऑब्जेक्टीव्ह काही नसते (कारण प्रमाण काय आणि प्रमाणेतर काय यावरदेखिल वाद होउ शकतात) .. मुद्दा एवढाच.. अशुद्ध भाषा म्हटल्यावर राग येउ शकतो.. प्रमाणेतर म्हटल्यास ती शक्यता कमी.. म्हणूनच म्हटलं "प्रमाण - प्रमाणेतर" ला सर्वसंमती मिळू शकेल.. पण हे डावंउजवं राहायचचं..

In reply to by बाळ सप्रे

बॅटमॅन 04/04/2014 - 16:34
भाषाशास्त्र असेदेखिल ऑब्जेक्टीव्ह काही नसते
पिशी अबोलीबै, ऐकताहात का ;) एनीवेज, हे विधान चूक आहे. ऑब्जेक्टिव्ह कंटेंट भाषाशास्त्रात खच्चून भरला आहे. ते न पाहता प्रमाण भाषेलाच शुद्ध म्हणण्याचा आग्रह रोचक वाटला.

In reply to by बॅटमॅन

राही 04/04/2014 - 16:00
अगदी सहमत. खरे तर ह्याच संज्ञा वापरून प्रतिवाद करायला हवा होता पण शुद्ध-अशुद्धाच्या मुद्द्याआधीचे विवेचन करण्यात माझ्याकडून जास्त जागा (वाया) गेली.

In reply to by राही

प्रदीप 05/04/2014 - 15:19
सध्या हिंदीवर बॉलिवुडी प्रभाव नाही असे आपल्याला वाटते का? वाट लग गयी, श्यानपन, कानपट्टी, सुमडी, नक्को (दखनी) हे शब्द कुठून आले? हे शब्द तर पाकिस्तानी उर्दूतही शिरले आहेत. पाकिस्तानी उर्दूबद्दल माहिती नाही. हिंदी चित्रपटांत हे शब्द सर्रास येत असल्याने, व पाकिस्तानीही ते बर्‍यापैकी बघत असावेत, त्यामुळे अशा एका शब्दाचा मीच अलिकडे येथील एका पाकिस्तान्याशी बोलतांना वापर केला आणि मला काय म्हणायचे आहे ते त्याला अगदी झटकन समजले. पण हा anecdotal evidence झाला. ह्यापुढे प्रत्यक्ष आपापसात बोलतांना हे लोक असे, मराठीतून हिंदी चित्रपटांपुरते गेलेले शब्द वापरतात का, ह्याबद्दल काही माहिती नाही. पण हे शब्द आता सर्रास हिंदी भाषेत गेले आहेत व हिंदीभाषिक जनताही ते नियमीत वापरते, ह्याविषयी मात्र मी साशंक आहे. पुन्हा माझा anecdotal evidence तरी मला हे दर्शवत नाही. वास्तविक हिंदी चित्रपटांचा आपल्या सर्वांगीण जीवनावर प्रभाव अगदी चाळीशीच्या दशकापासून आहे. पण गेल्या पंधरा-वीस वर्षातच आपले पुण्या- मुंबईकडील लोक इतके हिंदाळलेले का बोलू लागले, आणि तसेच लिहूही लागले, ह्याचे मात्र मलातरी सखेदाश्चर्य वाटत राहिले आहे. इतर भाषांतून आपण पूर्वापार शब्द स्वीकारत आलेलो आहोत. पण, ती प्रक्रिया इतक्या वेगाने झालेली नाही. तसेच आपल्या अंवतीभोवती जे असते, त्याचा आपल्या बोलण्याचालण्यावर परिणाम होणे साहजिक आहे. पण तरीही आपले म्हणून जे काही असते ते अगदी 'पातळ' करून टाकायचे का, हा प्रश्न आहे. मला वाटते ह्याला थोडी शिस्त, व आपल्याच भाषेचा रास्त अभिमान असणे जरूरीचे आहे. माझा मुलगा वयाच्या आठव्या वर्षापासून परदेशी वाढला,इंटरनॅशनल शाळेत जावयास लागल्यानंतर त्याच्या मराठीत कधीमधी चुकीच्या वाकरचना येऊ लागल्या, उदा. 'तो मला बसवर भेटला'. अशा वेळी त्याला सौम्यपणे 'मराठीत आपण असे म्हणत नाही,' असे सांगून आपण ते मराठीत कसे म्हणतो, हे सांगून सुधारणा करत राहिलो. माझ्याप्रमाणेच आमच्या येथील अनेक मराठी कुटुंबियांतील मुले अगदी नीट मराठी बोलू शकतात, ते बहुधा अशाच शिस्तीमुळे असावे. इतर भाषेतील विशेषनामे उगाच चमत्कारीक मराठीकरण करून वापरावीत (उदा. 'चेपू', 'तूनळी' इत्यादी) हे मलातरी खुळचटपणाचे वाटते. तसेच ज्या संकल्पनाच परकी आहेत, त्यांना त्या त्या भाषांतील मूळ नावांनीच संबोधावे, ह्याविषयी अजिबात वाद नाही. त्याचबरोबर मराठीतील काही शब्दांना नवे अर्थ देऊन ते वापरणे हेही बेजबाबदारपणाचे वाटते. फार पूर्वीचे सांगत नाही, अगदी ऐशीच्या दशकापर्यंत कुठलाही दर्जेदार कार्यक्रमही 'समाप्त' व्हायचा. (आठवा: "आजचा 'आपली आवड' हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूयात पुढल्या मंगळवारी, रात्रौ दहा वाजता"). आता गल्लीबोळातला कार्यक्रमही 'संपन्न' होतो. (पूर्वी आमची जीवने कुठल्या ना कुठल्या कारणाने संपन्न व्हायची). हीच गोष्ट 'प्रभावित' ची! 'आलेल्या पुराने अमूकेक क्षेत्र 'प्रभावित' झालेले आहे' म्हणे! तेव्हा भाषेच्या प्रवाही असण्याबद्दल तक्रार नाही. मात्र बेजबाबदार राहून आपण आपली कात भर्र्कन टाकणे कितपत रास्त आहे, ह्याविषयी दुमत आहे.

In reply to by प्रदीप

पैसा 05/04/2014 - 19:04
प्रतिसाद आवडला. मराठीत हिंदी शब्द घुसण्याचं कारण मराठी मानसिकता असावी. तुम्ही तमिळनाडूत गेलात तर तिथले लोक तुमच्याशी हिंदी/मराठी बोलायला येणार नाहीत. पण मुंबईतला मराठी माणूस दुसरा माणूस कुठला आहे हे शोधून त्याच्याशी हिंदी/गुजराती इ. बोलायचा प्रयत्न करतो. गंमत म्हणजे मुंबईत हल्ली सार्वजनिक जागी २ मराठी माणसे भेटली तर हिंदीत बोलतात असे ऐकून आहे. या प्रकारात एक ना धड, भाराभर चिंध्या असली गत होत जाते. सरकारी मराठीबद्दल लिहिलंत तेही पटलं.

In reply to by पैसा

प्रदीप 05/04/2014 - 19:53
गंमत म्हणजे मुंबईत हल्ली सार्वजनिक जागी २ मराठी माणसे भेटली तर हिम्दीत बोलतात असे ऐकून आहे. माझा असाच अनुभव आहे. एका मुंबईच्या मित्राशी ह्या विषयावर अलिकडेच बोलत होतो. त्याने त्याचा मुंबईच्या आसपासच्या काही गावांतील स्वतःचा अनुभव सांगितला. त्याच्या अनुभवानुसार तिथेही, तेथील स्थानिक गांवकरी, आपण मराठीरून प्रश्न विचरल्यावर, आपणास हिंदीतून उत्तरे देतात. मित्राचे म्हणणे असे की असे हिंदीतून बोलणे, हे आता गावांतून प्रतिष्ठेचे होऊ लागले आहे.

In reply to by राही

पैसा 05/04/2014 - 19:16
राही, तुमचेही बरेच प्रतिसाद आवडले. भाषा बिघडत नाही आणि अधोगती होत नाही हे पटले. मात्र अशाच वेगाने मराठी आणि हिंदीचे मिश्रण होत राहिले तर मात्र एका मोठ्या कालखंडाचा विचार केला तर आजचे मराठी साहित्य ४००/५०० वर्षांनी तेव्हाच्या मराठी लोकांना दुर्बोध वाटेल, ज्ञानेश्वरीतली मराठी आज लोकांना कठीण वाटते तशीच. गंमत म्हणजे ज्ञानेश्वरीची भाषा अनेक ठिकाणी आज कोंकणीला जवळची वाटते. काही कोंकणी ग्रुप्स तर ज्ञानेश्वरी कोंकणीत आहे असे ठासून सांगतात. तसेच विचार करा, २५५० सालात कुसुमाग्रजांचे साहित्य तेव्हाच्या एखाद्या मुंबईत रहाणार्‍या तथाकथित मराठी माणसाला अजिबात समजणार नाही. ते पुणेरी बोलीला जवळचे आहे असे तो कदाचित म्हणेल! संस्कृत आणि अनेक प्राकृत भाषांमधून एके काळी अनेक भाषांची उत्पत्ती झाली. आता परत सगळ्या भाषांचे एकीकरण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असे म्हणता येईल का? या सगळ्या गदारोळात द्रविड भाषा आपले अस्तित्व टिकवून ठेवतील का त्यांचीही अशी सरमिसळ होत आहे?

In reply to by पैसा

बॅटमॅन 05/04/2014 - 22:37
या सगळ्या गदारोळात द्रविड भाषा आपले अस्तित्व टिकवून ठेवतील का त्यांचीही अशी सरमिसळ होत आहे?
सरमिसळ त्यांच्यातही होत आहे. पण मुळात फरक बराच असल्याने त्यांच्या वेगळ्या अस्तित्वाला तितका फरक पडणार नै. मराठीत हिंदी प्रमाणाबाहेर मिसळली तर कदाचित एक वेगळीच भाषा तयार होईल, पण द्राविडी भाषांची मूळ शब्दसंपदा वेगळी असल्याने तसे होण्याची शक्यता कमीच. अर्थात लाँग रेंजमध्ये काय होईल कुणी सांगावे? मराठीची उत्पत्ती हीच मुळात प्राकृत + द्राविडी भाषांचे मिश्रण म्हणून झाली असे म्हंटात. तसेही होईल.

In reply to by पैसा

राही 05/04/2014 - 22:59
गंमत अशी आहे की भाषेच्या विकासाच्या एका विवक्षित टप्प्यावर जेव्हा बदलाचा वेग वाढतो आणि ती भाषा एक वेगळे वळण घेऊन मूळ भाषेहून वेगळी दिसू लागते, तेव्हा त्या संधिकाळात किंवा मेटॅमॉर्फसिसच्या काळात निर्माण झालेल्या साहित्यावर त्या वेळी निर्मितीअवस्थेत असलेल्या आणि पुढे स्वतंत्र बनलेल्या अनेक भाषा हक्क सांगू शकतात. मीरेच्या भजनांवर गुजराती, राजस्थानी, हिंदी या भाषा हक्क सांगतात. तुलसीरामायणाचेही तसेच. भोजपुरी, मैथिली या सारख्या बोलींना भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे एका सामाईक साहित्यठेव्याचा वारसा या सर्वांनाच मिळाला आहे. कोंकणी आणि मराठीचेही तसेच आहे. 'चामुण्डराजें करवियले' हे वाक्य कोंकणी लोक आपले मानतात. त्यासाठी 'वियले' या क्रियारूपाचा दाखला देतात की ही कोंकणीची टेंडन्सी आहे. पण अशी रूपे तर विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांपर्यंत मराठीत प्रचलित होती आणि अजूनही कधी कधी काव्यरूपात दिसतात. जसे : लावियलें नंदादीपा, तुवां मंदिरात' किंवा 'बहुत छळियलें, नाथा' वगैरे. उद्या पुणे-सातारा परिसरातली घाटी बोली जर भाषारूप पावली तर शंकर पाटलांच्या कथा हा मराठी आणि ही नवी भाषा यांचा सामाईक वारसा ठरेल.

भाषा हे केवळ संवादाचे साधन असल्याने आपला कोणत्याच भाषेबद्दल / शब्दांबद्दल ह्ट्ट नाही ... जेव्हा जसे जे शब्द सुचतील तेव्हा ते तसे वापरावेत :) अर्थ कळाल्याशी मतलब !! असो. (मराठी भाशेचा पेपर संपल्यावर ) चंगु : अरे तिसर्‍या प्रश्नात , "सात्विक " चा विरुध्द अर्थी शब्द विचारला होता त्याचे तु काय उत्तर लोहिलेस ? मंगु : का रे ? तु काय लिहिलेस ? चंगु : मी लिहिले "सातस्ट्राँग" ... :D मंगु : अरे नाही यार , त्याचे उत्तर आहे "सात खरेदी कर" =)) चंगु : हां .... तरी मी म्हणत होतोच की मराठीच्या पेपरात इंग्लिश प्रश्न कसा काय विचारला ते =))))

कौशिक लेले 05/04/2014 - 18:28
बरीच चर्चा झाली. पण इथे नवीन शब्द काही हाती लागले नाहीत. ते असो. ज्यांना इच्छा आहे त्यांनी वर दिलेला फेसबुक गटाचे नक्की सदस्य व्हावे.

युरेका...युरेका...युरेका...! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif मला इंटरनेट कनेक्शनला जो मराठी म्हणून संस्कृतनिष्ठ जालंजोडणी ,हा शब्द वापरतात..त्याऐवजी येक सहजशब्द सुचला!!!

जोडजाळं

अता या शब्दावर माझा कॉपिराइट हां!!! http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/winking-victory-sign-smiley-emoticon.gif

समीरसूर 08/04/2014 - 15:21
उपक्रम चांगला आहे. शुभेच्छा! एका प्रतिसादात म्हटले आहे की आहे ती मराठी नीट बोलणे महत्वाचे आहे. हे देखील बरोबर वाटते. मी एका आठवड्यासाठी बाहेर गावी जातोय >> मी एक वीकसाठी बाहेर जातोय. किंमत आहे एक कोटी रुपये >> किंमत आहे एक करोड रुपये वारांची नावे सहसा इंग्रजीतूनच घेतली जातात आज-काल. "मी संडेला गेलो होतो; मंडेला वापस आलो." बाकी हिंदाळलेले मराठी ऐकायला विचित्र वाटते. "बर्थडे मनवला...", "जेवण बनवले...", "चहा बनवली..", "या, तुमचीच कमी होती..." (अशा नावाचे बहुधा एक नाटकदेखील होते. 'कमतरता' शब्द मोठा म्हणून 'कमी' ला कामाला लावले बहुधा), "तिथे गुफा आहेत" (गुहा हा मराठी शब्द तर जवळ-जवळ आटोपला आहे; सगळेच 'गुफा' म्हणतात), "तिथे मोठी खाई होती" (दरी गेली आणि खाई आली), "त्याला शक आला..." (हे नि:संशय हिंदीच्).....अशी अगणित उदाहरणे आहेत. आणि हे पुन्हा मूळ शुद्ध मराठीवर ओढून आणणे जवळ-जवळ अशक्य आहे. इतका वेळ आहे का असं मराठी बोलणार्‍यांकडे? वाचतात का ते?

In reply to by प्रसाद गोडबोले

पैसा 09/04/2014 - 11:02
=)) मोबाईलला भ्रमणध्वनी असा श्ब्द वापरतात की. आता सेलफोनला काय म्हणायचं ते बघा! बाकी पर्याय एकदम भारीतले आहेत! मॅनेजरला कामलाव्या पेक्षा वाटलाव्या शब्द जास्त बरोबर आहे.

मान्यता नसलेली बोली फक्त प्रमाणेतर. व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्ध. अशुद्ध हा शब्द भाषेबाबतीत पूर्णपणे निषिद्ध नाहीये. आशयाशी सहमत. पण खालील फरकासहः प्रमाणित भाषा: सांविधिक संस्थेने (statutory body) मान्यता दिलेल्या नियमाप्रमाणे वापरलेली वापरलेली भाषा. अप्रमाणित भाषा: प्रचलित असलेली पण प्रमाणित भाषेशी सुसंगत नसलेली भाषा. अशुद्ध भाषा: सांविधिक संस्थेने मान्यता दिलेले नियम पाळण्याचा प्रयत्न/दावा करून त्या बाबतीतल्या चुका असलेली भाषा. या संदर्भात माझे दोन पैसे: १. बोलीभाषा बोलीभाषा ही रोजच्या वापरातली आणि म्हणून अत्यंत प्रवाही असते. ती वापरली जाण्यार्‍या लोकांत रुजलेल्या सवयी, तत्कालीन प्रचलित आवडी-निवडी (इन थिंग,फॅड, इ); बोलण्याच्या सवयी (हेल, च/ज इ उच्चारण्याच्या पद्धती,इ); इ ने प्रचंड प्रभावित असते. या सर्व गोष्टी काळाबरोबर सतत बदलत असतात आणि त्यामुळेच बोलीभाषा प्रवाही (सतत बदलत राहणारी) होते. एक प्रकारे बोली भाषा ही सतत चालू अवस्थेतले काम (वर्क इन प्रोग्रेस) आणि त्याबरोबर होणारा प्रत्येक बदल त्वरित वापरात आणणारे काम असते. लोकांना पसंत पडलेले / उपयोगी वाटणारे बदल प्रचारात राहतात आणि तसे नसलेले आपोआप कमी कमी वापर झाल्याने प्रचारातून निघून जातात. वरच्या वस्थुस्थितीमुळे कोणतीही बोलीभाषा नियमांच्या एका चौकटीत बसवणे शक्य नाही ... तो एक निष्फळ प्रयत्न आहे. लोक तुमचे मत ऐकतील न ऐकतील, पण त्यांना सोयीचे / आवडेल तसेच बोलतील/ लिहितील. म्हणूनच, अ) बोलीभाषा दर २०-३० किलोमीटरवर वेगळी असते. (याचा अर्थ ती नकाश्यांवर आखलेल्या रेषांच्या पुढेमागे एकदम बदलत नाही, तर एकीतून दुसरीत लोकांच्या गरजेनुरूप सहजपणे रूपांतरित होत जाते.) तसेच, ब) ती कोणत्याही एका स्थानावरही कालप्रवाहाबरोबर सतत बदलत जाणारी असते. क) एवढेच काय तर एकाच स्थानावर (उदा गाव, शहर, भौगोलिक विभाग, इ) आणि एकाच काळी वेगवेगळ्या लोकसमूहातली बोलीभाषा वेगळी असणे सामान्य आहे. हे जाती-धर्माच्या विविधतेने भरलेल्या भारतात प्रकर्षाने दिसत असले तरी तितकीशी विविधता नसलेल्या इतर ठिकाणीही फार अभावाने आहे असे नाही. २. प्रमाण भाषा ही एखाद्या भाषेसाठी नेमलेल्या सांविधिक संस्थेने सद्य काळाकरिता नक्की केलेले नियम वापरून लिहिली-बोललेली स्थिर भाषा असते. याची काही प्रमाणात सॉफ्टवेअर प्रणालीच्या व्हर्शनशी तुलना होऊ शकते. आज जाहीर केलेले व्हर्शन त्यापुढचे व्हर्शन जाहीर होईपर्यंत स्थिर असते. याचा अर्थ भाषेची बदलण्याची प्रक्रिया थांबली असे नाही... ती सतत चालूच राहते. काही काळाने, बहुसंख्य लोकांनी बदललेल्या लिहिण्याच्या-बोलण्याच्या सवयींप्रमाणे झालेले बदल जेव्हा लक्षणीय प्रमाणात होतात तेव्हा प्रमाणित भाषेचे नवीनं व्हर्शन बनविणे भाग पडते. हे मराठीसकट सर्व वापरात असलेल्या भाषांच्या बाबतीत घडले आहे, घडत राहील. उदा. मराठीतले बदललेले र्‍हस्व-दीर्घ आणि अनुस्वारांचे नियम. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीच्या गेल्या काही दशकांतील आवृत्त्या नजरेखालून घातल्या तरी इंग्लिश मध्ये झालेल्या अनेक बदलांचा पुरेसा पुरावा मिळेल. ३. भाषेचा वापर कशासाठी भाषा वापरली जाते यावर कोणती बोलीभाषा / प्रमाणित भाषा वापरायची आणि त्यांचे कोणते (प्रमाणित / अप्रमाणित) व्हर्शन वापरायचे हे बहुतेक वेळा नैसर्गिकपणे ठरते... आणि तेच योग्य आहे. उदा: कट्ट्यात मित्रांबरोबर गंमत म्हणून अप्रमाणित गावरान मराठी वापरणारा माणूस वरिष्ठ अधिकार्‍याबरोबर मराठी बोलताना प्रमाणित मराठी बोलला नाही तर आश्चर्य वाटेल नाही का? साधारणपणे भाषेच्या वापराचे खालील प्रमाणे दंडक आहेत / असावेतः अ) शासकीय / औपचारिक लेखन / बोलणे : प्रमाणित भाषा. ब) खाजगी / अनौपचारिक लेखन / बोलणे : योग्य परिणाम साधण्यासाठी आवश्यक ती बोलीभाषा अथवा प्रमाणित भाषा. क) साहित्य : योग्य परिणाम साधण्यासाठी आवश्यक तसे बदल करत बोलीभाषा अथवा प्रमाणित भाषा. उदा. जुन्या संस्कृत नाटकांत सामान्य पात्रांच्या तोंडी (संस्कृत नाही तर) प्राकृत भाषा आहे... तसे नसते तर ते हास्यास्पद वाटले असते. कारण जगात कोणत्याही काळी कोणत्याही प्रदेशात १००% लोक प्रमाणित भाषा वापरत नव्हते / नाहीत / नसतील. तसेच ग्रामीण कादंबरीतल्या अशिक्षित पात्रांच्या तोंडी संस्कृतप्रचुर / प्रमाणित भाषा अवास्तविकच वाटेल. ३. परकीय भाषेचा हल्ला परकीय भाषेचा आपल्या भाषेवर हल्ला ही बहुदा "कोल्हा आला रे सारखी" आवई असते. मात्र या आवईमुळे काहीही फरक पडत नाही... तिचे महत्त्व फुसका समस्तरिय दबाव (इनइफेक्टीव्ह पियर प्रेशर) पेक्षा फार जास्त नाही. अ) आज इंग्लिश जगभरात ताकदवान भाषा म्हणून प्रचारात आहे ती तिचे उत्तम विपणन केल्यामुळे नाही किंवा तिच्या संरक्षणासाठी भाषामार्तंडांची फौज असल्यामुळे नाही तर तिच्या योग्य वापरामुळे होणार्‍या निर्विवादी आर्थिक-सामाजिक-व्यावसायिक फायद्यांमुळे आहे. जर उद्या मराठीच्या बाबतीत असेच झाले तर मराठीच्या प्रचारासाठी दुसरे काही विशेष करणे जरूरीचे नसेल. ब) परक्या भाषेतले शब्द / शब्दरचना आपल्या भाषेने अंगीकृत करण्यात सारासारविवेकबुद्धी वापरणे नक्कीच आवश्यक आहे, पण हा मुद्दाही इतर काहीपेक्षा भावनिकच जास्त आहे. भाषा-भाषा प्रक्रिया सर्व भाषांत सर्वकाळ होत आलेली आहे व आर्थिक-सामाजिक-व्यावसायिक फायद्यांच्या वस्तुस्थितीवर आधारितच ती सर्वस्वी अवलंबून आहे. दुसर्‍या भाषेमुळे आपली भाषा मलिन होईल हा दावाही तसा फोल आहे. कारण भाषा ही ती भाषा वापरणार्‍या लोकांची मालमत्ता आणि ती कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी त्यांचाच आहे. एखाद्या अनिष्ट गोष्टीची काही काळासाठी "हवा" तयार होऊ शकते. पण सर्वसाधारणपणे, ना लोक त्यांना अयोग्य वाटणारे बदल स्वीकारतील, ना कोणी त्यांच्यावर ते लादू शकेल... लोकांना आवडतील / फायद्याचे असतील तेच बदल जीव धरतील / फोफावतील / शिल्लक राहतील. क) आजच्या जगतील कोणतीच भाषा स्वयंभू असल्याचा दावा करू शकणार नाही. जिला अनभिषिक्त जागतिक भाषा असे समजले जाते, त्या इंग्लिश भाषेत ८०% पेक्षा जास्त शब्द परकीय भाषांतून आलेले आहेत आणि त्यामुळे तिला "उधार-उसनवार भाषा (borrowed language) असे म्हटले जाते. cola (कोला) हा सर्वव्यापी आणि सर्वमान्य शब्द इंग्लिशने पश्चिम आफ्रिकेतील Temne (kola) आणि Mandinka (kolo) या भाषांतून उचलेला आहे. आश्चर्यचकित व्हायचे असेल तर, पुढचा दुवा नुसता वरवर चाळून पहा : इंग्लिशमध्ये उसने घेतलेले शब्द आणि त्यांचा मूळ भाषा इथे सापडतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन 09/04/2014 - 17:31
लैवेळा सहमत. अतिविस्तृत प्रतिसादासाठी खूप धन्यवाद! इंग्लिशसारखे अनेक शब्द मराठी पचवत गेली तर काय बिशाद आहे मराठी मरेल असे म्हणायची? फक्त तो जोर तूर्तास मराठीभाषकांत नाही, इतकेच. तो आला की फरक पडेलच!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

राही 09/04/2014 - 18:23
प्रतिसाद अतिशय आवडला. विशेषतः 'परकी भाषेचा हल्ला' विषयीचा परिच्छेद. भाषेची ताकद त्या त्या भाषकांच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय ताकदीवर अवलंबून असते याच्याशी जोरदार सहमति. समृद्ध समाजाची भाषाही समृद्धच असते. कारण समृद्ध समाजात दैनंदिन व्यवहार अनेक परींनी होतात. एक साच्याचे नसतात. (म्हणजे एक पिढी कारकुनी तर कारकुनीच करते असे नसते.) वेगवेगळ्या क्षेत्रांत उलाढाल वाढली की ती व्यक्त करणारे शब्दही वाढतात. आणि ह्या उलाढाली जर अभिजनसंमत असल्या (म्हणजे अभिजन वर्गात ह्या उलाढाली/व्यवसाय लोकप्रिय झाले) तर ते शब्दही अभिजनांच्या भाषेत/प्रमाण भाषेत शिरतात. पुन्हा एकदा, प्रतिसादासाठी जोरदार टाळ्या.
ऑनलाईन मराठी शिकवण्याच्या यशस्वी आणि लोकप्रिय उपक्रमानंतर काल गुढीपाडव्याच्या - मराठी नवीन वर्षाच्या - शुभमुहूर्तावर मराठी भाषा विषयक नवीन उपक्रम सुरू केला आहे. जो आहे - "नवीन मराठी शब्द- सोपे मराठी शब्द". चला, नवीन मराठी शब्द घडवूया; असा शब्द सुचला की जास्तित जास्त जणांपर्यंत तो पोचवूया; एकापेक्षा जास्त पर्याय असतील तर कुठला जास्त चांगला वाटतो ते ठरवूया; आणि असे नवीन शब्द मराठी भाषेत रुळवुया. इतका साधा सोपा उपक्रम आहे हा !!. हा उपक्रम माझं एकट्याचं किंवा कोणा एका व्यक्तीचं काम नाही. आपण सर्वांनी हा जगन्नाथाचा रथ ओढायचा आहे. आणि वाटतं तितकं हे काम अवघड नाही.

क्विन...

पिलीयन रायडर ·

मितान 01/04/2014 - 17:11
मस्त चुरचुरीत लिहिलंयस पिरा ! आता बघावाच काय क्वीन ?

पैसा 01/04/2014 - 17:16
सिनेमा आणि त्या निमित्ताने आणखी जे लिहिलंस ते सगळंच आवडलंय. सीडी आणलीय. कधी मुहूर्त मिळतो बघू!

सूड 01/04/2014 - 17:24
>>मी कानात प्राण आणुन आता एका मोठ्या डायलॉगची वाट पहात होते.. पण नाही.. "थँक्यु" व्यतिरिक्त चकार शब्द नाही.. अगदी हेच आलं होतं शेवट्चा सीन बघताना डोक्यात. एका थँक्युवर कसं काय संपू शकतं सगळं!! पण त्याचं उत्तरही इथेच मिळालं आणि त्या उत्तराबरोबर बरेच प्रश्न सुटले...माझेही !! :)

(दु:ख उगाळत बसणे हा बायकांचा आवडता छंद आहे).. आणि आता नवरा "झाली म्हणलो ना चुक..प्रत्येकाच्या आयुष्यात होते.. आता काय पाया पडु का तुझ्या?" अशी मोठ्या मनानी माफी मागतो तर ही त्याला नाकारते.. तेरी ये जुर्रत?? >>>>> ,थोर भारतीय संस्कृती आणि बॉलीवुडका वास्ता है तुम्हे रानी.. असं मुलींना "अलाऊड" नसतं ग.. स्वतःचे विचार नसतात बाळगायचे, निर्णय असे नसतात घ्यायचे मुलींनी.. >>>> +++१११११११११११११ मस्त लिहिलयं, आवडलं..

In reply to by स्मिता चौगुले

>>>(दु:ख उगाळत बसणे हा बायकांचा आवडता छंद आहे).. आणि आता नवरा "झाली म्हणलो ना चुक..प्रत्येकाच्या आयुष्यात होते.. आता काय पाया पडु का तुझ्या?" अशी मोठ्या मनानी माफी मागतो तर ही त्याला नाकारते.. तेरी ये जुर्रत?? >>>>थोर भारतीय संस्कृती आणि बॉलीवुडका वास्ता है तुम्हे रानी.. असं मुलींना "अलाऊड" नसतं ग.. स्वतःचे विचार नसतात बाळगायचे, निर्णय असे नसतात घ्यायचे मुलींनी..

प्यारे१ 01/04/2014 - 17:47
आधी चेपुवर बघितला. खरंच सांगतो, कुणाचा शेअर वगैरे केलाय का ते पाहिलं. :) (लेख जमल्याचं लक्षण आहे हे. उगाच दंगा करु नये.) पुन्हा लेख वाचला. आवडलाच्च. कंगना आवडत नसल्यानं क्वीन बघेन की नाही ठाऊक नाही. महिन्या भरात येईल कुठंतरी. चाळेन तेव्हा.

In reply to by बॅटमॅन

किसन शिंदे 01/04/2014 - 18:13
अर्धा सिनेमा बघेतो लईच्च बोर व्हायला लागलं, मग बंद केला आणि तुकड्या-तुकड्यात पाह्यला. सलग तीन तास बसून बघावं असा नाय वाटला. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.

In reply to by किसन शिंदे

आत्मशून्य 02/04/2014 - 00:35
अर्धा सिनेमा बघेतो लईच्च बोर व्हायला लागलं, मग बंद केला आणि तुकड्या-तुकड्यात पाह्यला. सलग तीन तास बसून बघावं असा नाय वाटला. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.
की एप्रिल फुल वगैरे करतोयस ? काहीही असो. प्रतिसाद पटला.... म्हणजेच आवडलाही. बरं वाटत लोकांना अभिव्यक्त होताना जेंव्हा मनातलंच बोलतात आणी स्वतःसाठी बोलतात तेंव्हा.

चिगो 01/04/2014 - 18:23
सुंदर परीक्षण.. 'क्विन' मलापण अत्यंत आवडला तो त्याच्या सटल टचेस (मराठी प्रतिशब्द?) मुळेच.. रानी स्वतंत्र, मुक्त होत जाते, पण सैरभैर होत नाही. "हंगामा हो गया" गाण्यावर नाचतांना अंगातला स्वेटर काढते, मात्र गरागरा फिरवून झाल्यावर फेकत नाही तर हँडबॅगेत कोंबते, ते लैच भावलं.. कसलेही लंबेचौडे डायलॉग,अभिनिवेष आणि "ओव्हर द बोर्ड" असे स्वभावपरीवर्तन न दाखवता, अत्यंत संयमित रित्या "स्व"ची रानीला झालेली जाणिव दाखवली आहे..
इथेही हिरोईन बदलते आणि हिरोला उपरती होते.. फक्त मधल्या स्टेप्स घडत नाहीत.. म्हणजे कंगना अजुनही तिला कंफरटेबल वाटेल अशाच नॉर्मल कपड्यात असते.. सतत घट्ट उराशी बाळगलेला स्वेटर तेवढा काढते.. पण ते कदाचित तिची भीती ओसरत जाते तसं ती जात मोकळी होते हे दाखवण्या इतपतच.. ती कूणालाही स्तब्ध करत नाही.. अवाक करत नाही.. कुण्णा कुण्णाला तिच्या शब्दबंबाळ डायलॉगमुळे उपरती होते नाही.. कुणाचही आयुष्य एक पल मध्ये बदलत नाही..
हे आणि हेच मला क्विन जाम आवडण्याचे कारण आहे.. कंगणाचा अभिनय तर सुंदर आहेच, पण दिग्दर्शनाचे प्रचंड कौतूक वाटले.. आणि हो, बरेच दिवसांनी प्रसंग आठवून आठवून हसण्यासारखा आणि गप्पा मारण्याजोगा पिक्चर दिल्याबद्दल्ही "क्विन"चे आभार.. पिराताई, लेख आणि त्यातले पंचेस जाम आवडलेत, हेवेसांनल.. :-)

रेवती 01/04/2014 - 18:27
वाहव्वा! ष्टोरी तरी आवडलीये हे वाचून! छान लिहिलयस. मेरेकूभी ये शिनेमा देखना हय. कब टैम मिलता अल्ला को मालूम! भारतात "लग्न" ही तशीही फार्फार डेंजर गोष्ट आहे.. मुलींसाठी तर फारचं.. हे वाक्य व यासंदर्भातील सगळी वाक्यं आवडली. भयंकर सहमत. ;)

पिरा..मस्स्स्त लिहिलयस! आधी फॅन्ड्री पाहिला आणि पाठोपाठ क्विन. दोन्हिकडे तीच घुसमट...मुक्त मोकळा श्वास घ्यायची तीच चिरंतन धडपड. पण फॅन्ड्री चा शेवट 'पुढे काय झाल असेल..?' ची फार भीषण उत्तरं देतो... तर क्विन चा शेवट म्हणजे पुढे काहितरी नक्की सुखद घडले असणार याची खात्री देतो.

In reply to by स्वप्नांची राणी

खरं तर विजय नाही तर अजय शी लग्न केलं हे उत्तर नसावं म्हणजे मिळवलं..! पण मुळात अशा बॅकग्राउंडच्या मुलीनं लग्न खानदान की इज्जत च्या नावाखाली मान्य केलं नाही हिच मोठी गोष्ट आहे..!

नगरीनिरंजन 01/04/2014 - 18:52
वा वा, पर्फेक्ट लिहिलं आहे. पिच्चर पाहताना असंच काहीसं वाटलं. शिवाय भारतीय ते भारी समजायच्या आणि सगळ्याचं भारतीयीकरण करायच्या प्रवृत्तीवर मारलेले शालजोडीतले तर अप्रतिमच आहेत. पण एक बात खटकली, क्वीन साहेबांना "भारी" व्हायला युरोपात जावं लागतं. वास्तवात भारतात राहूनच जगण्याची लढाई लढणार्‍या कित्येक अनग्लॅमरस क्वीन्स असतात. ही क्वीन मात्र (उच्च)मध्यमवर्गीयांना भावेल इतपतच गोडगोडुलं वास्तव अनुभवते आणि भेटलेल्या मदतशील लोकांच्या कृपेने कोणतेही मोठे संकट न येता "सुखरुप" परत येते. थोडक्यात बॉलिवूडच्या अनेक बावळट प्रथा मोडणारा चित्रपट महत्त्वाची गोष्टमात्र व्यावसायिक सोयीने जपून चालतो.

In reply to by नगरीनिरंजन

बॅटमॅन 01/04/2014 - 19:00
ही क्वीन मात्र (उच्च)मध्यमवर्गीयांना भावेल इतपतच गोडगोडुलं वास्तव अनुभवते आणि भेटलेल्या मदतशील लोकांच्या कृपेने कोणतेही मोठे संकट न येता "सुखरुप" परत येते. थोडक्यात बॉलिवूडच्या अनेक बावळट प्रथा मोडणारा चित्रपट महत्त्वाची गोष्टमात्र व्यावसायिक सोयीने जपून चालतो.
लोकं शाणी नैत हो आपल्याकडची. मूर्खांसाठी पिच्चर काढायचे तर ते टोन डौन केलेले असावेत तरच झेपतात, नैतर घंटा कै होत नै. किमान यात बेशिक गोष्ट तरी बरोबर दाखवलीय हेच लै आहे म्हंटो मी तर. तुमचा आक्षेप मान्यच आहे, पण लोकं मूर्खागमनी आहेत त्याला इलाज नै.

In reply to by बॅटमॅन

नगरीनिरंजन 01/04/2014 - 20:40
बरोबर आहे; पण मूर्खागमनी लोकांना तसेही अशा विषयांवरचे चित्रपट फारसे आवडत नाहीत आणि त्यांच्यामुळे ना कलाकाराला समाधान ना प्रेक्षकांना अत्युत्तम पाहिल्याचे समाधान. अर्थात चित्रपट चांगलाच आहे; पण अजून चांगला नक्कीच होऊ शकला असता एवढेच.

In reply to by नगरीनिरंजन

धन्या 04/04/2014 - 14:17
पण एक बात खटकली, क्वीन साहेबांना "भारी" व्हायला युरोपात जावं लागतं. वास्तवात भारतात राहूनच जगण्याची लढाई लढणार्‍या कित्येक अनग्लॅमरस क्वीन्स असतात. ही क्वीन मात्र (उच्च)मध्यमवर्गीयांना भावेल इतपतच गोडगोडुलं वास्तव अनुभवते आणि भेटलेल्या मदतशील लोकांच्या कृपेने कोणतेही मोठे संकट न येता "सुखरुप" परत येते. थोडक्यात बॉलिवूडच्या अनेक बावळट प्रथा मोडणारा चित्रपट महत्त्वाची गोष्टमात्र व्यावसायिक सोयीने जपून चालतो.
अगदी नेमकं मांडलंत.

In reply to by नगरीनिरंजन

क्वीन साहेबांना "भारी" व्हायला युरोपात जावं लागतं.
रानीसारखी स्वतःचा शोध घेणारी व्यक्ती उच्चमध्यमवर्गातली असेल याबद्दल मला फार शंका वाटत नाही. हे असे प्रश्न बूर्ज्वा वर्गालाच पडतात, परवडतात. या वर्गातले लोक जेव्हा रोमँटिक विचार करतात तेव्हा 'सरसों का खेत'चा किंवा मामाच्या गावाचा विचार करत नाहीत, ट्युलिप गार्डन किंवा फॅशन, सौंदर्यदृष्टी असणाऱ्या फ्रांस, पारी (पॅरीस)चा विचार करतात यातही मला काही विचित्र वाटत नाही. 'डोर'मधली, बऱ्या राजस्थानी घरातली तरुण विधवा स्वातंत्र्याचा विचार नवऱ्याशिवाय करू शकत नाही हे जितपत खटकत नाही तितपत मला हे ही खटकत नाही. आता चित्रपट सेट करतानाच गरीब-बिचाऱ्या, दुःखी-कष्टी बाईचा केला नाही, याला 'व्यावसायिक सोय' म्हणायचं असेल तर त्याबद्दल काही चर्चा संभवत नाही.
(उच्च)मध्यमवर्गीयांना भावेल इतपतच गोडगोडुलं वास्तव अनुभवते आणि भेटलेल्या मदतशील लोकांच्या कृपेने कोणतेही मोठे संकट न येता "सुखरुप" परत येते.
यातल्या छद्मामागचं कारणही समजलं नाही. एकटी परदेशात जाऊन भटकण्याचा अनुभव फक्त रानीला नाही, मलाही आहे. आणि अशा अनेक मुली माझ्या ओळखीच्या आहेत ज्या कामानिमित्त किंवा उगाच भटकायला परदेशात जातात. त्यांना काही वाईट अनुभव येत नाहीत, चांगले लोक भेटतात त्यांच्या ओळखीमुळे प्रवासात आणखी रंगत येते. पुढे हे संबंध टिकतात किंवा टिकत नाहीत. 'क्वीन' हा चित्रपट आहे, बातमीपत्रक नाही. काहीतरी वेगळं झालं, कोणावर अन्याय झाला तर बातमी येते. दारू प्यायलेल्या मुलीवर बलात्कार झाला (मुलावर दरोडा पडला) तर बातमी येते. दारू पिऊन, गांजा ओढून झिंगलेल्या मुलीची मित्रांनी काळजी घेतली, तिला कॉफी पाजली तर बातमी होत नाही. पण त्या प्रसंगामुळे त्या मुलीचं आयुष्य किंचित अधिक समृद्ध होऊ शकतं. या अशा तऱ्हतऱ्हेच्या अनुभवांमुळे मला उलट 'क्वीन' वास्तववादी असेलसा वाटतो. माझ्या दृष्टीने, उच्चमध्यमवर्गीय मुलींसाठी वास्तव जग हे असंच असतं. पण स्वतःचा शोध वगैरे चैन हवी कशाला, असं काही म्हणायचं असेल तर मग 'व्यावसायिक सोय' म्हणणं (पटलं नाही तरी) समजू शकतं. --- 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी' रंगमंचावर आणणाऱ्या वंदना खरे म्हणतात - एकूणातच ‘दु:खाचा’ अनुभव पोचवणं ही अडचण नव्हतीच. स्त्रियांवर अत्याचार होतात आणि ते होऊ नयेत इतपत समजूत समाजात तयार झालेली आहे. खरी अडचण दिसली ती स्त्रियांनी स्वत:ला "सुख होत आहे" हे जाहीरपणे म्हटलेले पचवण्याची. अगदी जेन्डरविषयी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेदेखील येऊन सांगत असत की "बलात्काराबद्दल सांगणारे गंभीर भाग छान आहेत पण बाकी विनोदी भाग जरा कमी करा ना!"

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्मशून्य 05/04/2014 - 04:11
दारू प्यायलेल्या मुलीवर बलात्कार झाला (मुलावर दरोडा पडला) तर बातमी येते. दारू पिऊन, गांजा ओढून झिंगलेल्या मुलीची मित्रांनी काळजी घेतली, तिला कॉफी पाजली तर बातमी होत नाही. पण त्या प्रसंगामुळे त्या मुलीचं आयुष्य किंचित अधिक समृद्ध होऊ शकतं.
फ्रेम करावा असा प्रतिसाद. अतिशय आवडला.
स्त्रियांवर अत्याचार होतात आणि ते होऊ नयेत इतपत समजूत समाजात तयार झालेली आहे
नक्किच.खरी
अडचण दिसली ती स्त्रियांनी स्वत:ला "सुख होत आहे" हे जाहीरपणे म्हटलेले पचवण्याची.
व्यवस्थीत कळला नाही पण कोणीही व्यक्ती तो सुखी आहे म्हणु लागला की जग जळु लागते हे वास्तव आहे. त्यात स्त्रि पुरुष भेद कितपत धरावा ?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नगरीनिरंजन 08/04/2014 - 05:37
मुळात जगात चांगले लोक आहेत यात दुमत नाहीच. रानी युरोपमध्ये फिरायला जाते वगैरेही ठीक. पण मुळात रस्ता चुकणे किंवा बॅग चोरीला जाण्याचा प्रसंग उद्भवणे किंवा झिंगलेल्या मुलीला कॉफी पाजणे हे फक्त युरोपातभारतात? इथे भारतात यासगळ्याबरोबर शारीरिक अंगलटीला वगैरे तोंड देत गावातून तालुक्याला कॉलेजसाठी जाणार्‍या मुलींची कमतरता नाही. अतिसुरक्षित वातावरणात वाढलेल्या आपल्याला बॅग चोरीचा प्रयत्न व झिंगल्यावर कोणीतरी कॉफी पाजली हेच प्रसंग लै भारी वाटतात म्हणून आपल्या मुक्तीच्या आणि वास्तवाच्या कल्पना फारच बाळबोध आहेत असे वाटते. घरून पैशाचं मजबूत पाठबळ असेल तर प्यारिसला एकट्याने जाणे म्हणजे स्वत्वाचा शोध असं असेल तर स्वतःभोवतीचा सुरक्षित कोश मोडायचा फार मोठा पल्ला गाठायचा आहे असेच मी म्हणेन. स्त्रियांना सुख होत आहे ही गोष्ट बोचणारे लोक असतीलच, म्हणूनच दुसर्‍याच्या जीवावर सुख मिळवू नये. विजयालक्ष्मीचं व त्या पाकिस्तानी मुलीचं पात्र मला आवडलं. त्यांच्या तुलनेत रानीचे स्वातंत्र्याकडे फक्त एक पाऊल आहे आणि त्याचंच इतकं कौतुक असेल तर अवघड आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे उत्तरेपेक्षा बरी स्थिती आहे तरीही इथल्या स्त्रियांना ती एकटी पॅरिसला जाते आणि तिला असे "अग्गंबाई" अनुभव येतात याचंच अप्रूप वाटावं हे अनाकलनीय आहे.

In reply to by नगरीनिरंजन

मला तिच्या पेरिसला जाण्याच कौतुक नाहिये.. कौतुक वाटतं ते जनरली अशा वेळेस महाराष्ट्र काय किंवा उत्तर भारत काय.. मुली दु:खाला कवटाळुन, स्वतःच्या नशिबाला बोल लावत..घरातच दडुन बसतात.. त्यात ती पॅरिसला जाण्याचा निर्णय घेते.. आता इथे ती आई वडीलांना "मला फार फार दु:ख झालय, जरा २-३ लाख काढा बरं..पॅरिसला जाऊन दु:ख हलकं करुन येते जरा.." असं म्हणत नाही.. तिचं स्वप्न असतं पॅरिसला हनिमुन ला जाणं. त्यासाठी तिने पैसे गोळा केलेले असतात.. इथेही "ज्या हनिमुनची स्वप्न आपल्या प्रियकरासोबत पाहिली, तिथे एक्ट्यानी जायचं म्हणजे कित्ती सॅड..." असं ही जनरली घडलं असतं.. पण तिचं स्वप्न तिला तिच्या दु:खा पेक्षा महत्वाचं वाटतं.. हे मला जास्त भावलं.. इथे मुद्दा "पॅरिस" चा नाहीचे.. स्वतःच्या स्वप्नाला पुर्ण करण्यासाठी दु:खाला मागे सारण्याचा आहे..ज्यानी आयुष्यात काहिही फरक पडणार नाहीये अशा रडारडी पेक्षा हातात असलेलं पॅरिसचं तिकिट वापरणे हा प्रॅक्टिकल विचार ती करते हे जास्त कौतुकास्पद आहे.. आता नेमकी तिचं स्वप्न हे "पॅरिसला हनिमुनला जाणे" हे असल्याने लोकांना आता पॅरिसच का? हनिमुनच का? असे प्रश्न पडत आहेत.. तिला तिथे सगळेच अनुभव चांगले येतात.. चांगलीच माणसे भेटतात.. आता हा कथेचा भाग झाला.. दरवेळी खुप अन्याय होऊन मग त्यातुन उभी राहिलेलीच स्त्री स्वतंत्र होते का? आणि आधीच भेदरलेल्या रानीसाठी लोकांनी चांगलं वागणं सुद्धा वेगळा अनुभव असु शकतो ना.. पारंपारिक घरातल्या रानीसाठी बाइनी तिर्‍हाईतासोबत झोपणे, लग्नाशिवाय झालेले मुल आनंदाने न अभिमानाने सांभाळणे, घरातल्यांचे पोट भरण्यासाठी स्ट्रिप क्लब मध्ये काम करणे हे अनुभवच धक्कादायी आहेत.. तिच्या साठी पब मध्ये दारु पिऊन, केस मो़कळे सोडुन नाचणं सुद्धा मोठी गोष्ट आहे.. कारण तिला घरात नातेवाईकांसमोर नाचणं सुद्धा "अलाऊड" नाही.. तिच्या दृष्टीने हे सगळच खुप लिबरेटींग आहे.. इथे तिची तुलना विजयालक्ष्मी किंवा इतर कुणाशी करुन कसं चालेल.. तिची परिस्थिती वेगळी होती.. म्हणुन तिच्यासाठी "स्वतंत्र" होण्याचा मार्गही वेगळा होता.. मोडलेलं लग्न परत जोडण्याची संधी मिळणं ही भारतीय मुलीसाठी निश्चित मोठी गोष्ट आहे.. स्वत: रानी सुद्धा विजयला म्हणतेच ना "आप जो कहेंगे मै वैसेही करुंगी.. ये शादी मत तोडीये..".. आयुष्यभर तुझ्या तालावर नाचायला मी तयार आहे इतकी ती अगतिक होते.. फक्त एक लग्न व्हावं म्हणुन.. अशावेळी जेव्हा विजय परत येतो तेव्हा त्याला नाकारणं ही मला मोठी गोष्ट वाटते.. मी जर रानीच्या जागी असते तर तसही विजयला समोर उभा केला नसता.. आणि तरीही ती स्वाभाविकच गोष्ट असती.. नो बिग डील.. रादर अपेक्षितच असतं अशा मुलाला नाकारणं.. पण भारतात (जिथे लग्न हा खानदानाच्या इज्जतचा सवाल असतो..)अशा अनेक रानी आहेत ज्यांच्यासाठी विजयला नाकारणं ही मुक्त होण्याची पहिली पायरी आहे..

In reply to by पिलीयन रायडर

चिगो 08/04/2014 - 16:39
प्रतिसाद आवडला, पिराताई.. "क्विन" हा चित्रपट रानीने स्वत:ला जाणण्याचा, एन्जॉय करण्याचा प्रवास आहे. त्याला ह्या किंवा त्या स्त्रीमुक्तीच्या कल्पना लावत "कंपॅरेटीव स्टेटमेंट" सारखं बघण्यात काय हशील?

In reply to by नगरीनिरंजन

आत्मशून्य 08/04/2014 - 17:33
त्यांच्या तुलनेत रानीचे स्वातंत्र्याकडे फक्त एक पाऊल आहे आणि त्याचंच इतकं कौतुक असेल तर अवघड आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे उत्तरेपेक्षा बरी स्थिती आहे तरीही इथल्या स्त्रियांना ती एकटी पॅरिसला जाते आणि तिला असे "अग्गंबाई" अनुभव येतात याचंच अप्रूप वाटावं हे अनाकलनीय आहे.
क्या. बात. मला हेच म्हणायचय. क्विन बघुन त्याणूभवात असलेल्या व्यक्तीचा अभिनीवेश, आणी अशा व्यक्तींसाठीच्या सहानुभुतीच्या कृत्रीम अभिनीवेशात लेखीकेने लिखाण करताना मोठी गल्लत करुन क्विन चित्रपटावर या धाग्यात अन्याय केला आहेच, पण त्यामुळे तिला नक्कि काय म्हणायचे आहे, बॉलीवुडला काय सांगायचे आहे, प्रत्यक्ष अशा स्थितीत गेलेल्या व्यक्तीरेखेची काय भावना असते आणी स्त्रिमुक्ती म्हणजे काय या डिमेनशनचा अचुक माग घेण्याचा बट्याबोळ या धाग्यात व्हायला वेळ लागलेला नाही. क्विन पात्र मस्त आहे. चकदे मधे नाही काय हॉकी-चंडीका क्रिकेटरला जिंकुन परत आल्यावर लग्नास नकार देते हे विसरुन की ती हारुन जरी परत आली असती तरी त्याने प्रपोज केलेच असते.

In reply to by आत्मशून्य

क्विन बघुन त्याणूभवात असलेल्या व्यक्तीचा अभिनीवेश, आणी अशा व्यक्तींसाठीच्या सहानुभुतीच्या कृत्रीम अभिनीवेशात
लेखीकेने लिखाण करताना मोठी गल्लत करुन क्विन चित्रपटावर या धाग्यात अन्याय केला आहेच, पण त्यामुळे तिला नक्कि काय म्हणायचे आहे, बॉलीवुडला काय सांगायचे आहे, प्रत्यक्ष अशा स्थितीत गेलेल्या व्यक्तीरेखेची काय भावना असते आणी स्त्रिमुक्ती म्हणजे काय या डिमेनशनचा अचुक माग घेण्याचा बट्याबोळ या धाग्यात व्हायला वेळ लागलेला नाही
मी काय म्हणते, तुम्हाला एवढं कळलय ना मग तुम्हीच का लिहीत नाही? कसं असतं ना शुन्य भाउ.. दुसर्‍याच्या लेखाची पीसं काढायला खरच काही अक्कल लागत नाही.. पण स्वतः विचार करुन १० ओळी लिहायला बरंच काही असावं लागतं माणसात.. हे जे काही तुमचं ओथंबुन वहात आहे ना, ते जरा नीट व्यक्त होऊ द्या की.. उगाच "बट्ट्याबोळ केलाय.. समजलच नाहीये.. अभिनिवेश आहे.." वगैरे पेक्षा मला तुम्ही स्वतःच एक परीक्षण लिहुन दाखवाच..

Dhananjay Borgaonkar 01/04/2014 - 19:09
झकास परी़क्षण. एकच नंबर आहे क्वीन. सगळ्यांनी भारी काम केलय. डायरेक्टरला १०० गुण. ताका,इटालियन शेफ,चित्रकार,कंगनाचा धाकटा भाऊ, आणि ऑफकोर्स विजे..भारी कॅरेक्टर्स आहेत. लेख वाचुन परत एकदा बघावासा वाट्टोय.

In reply to by Dhananjay Borgaonkar

सोत्रि 06/04/2014 - 22:31
लेख वाचुन परत एकदा बघावासा वाट्टोय.
चित्रपटाबरोबरच हे ह्या लेखाचीही यश! - (चित्रपट आणी लेख दोन्ही अतिशय आवडलेला) सोकाजी

सव्यसाची 01/04/2014 - 19:10
पिरा ताई, अगदी योग्य शब्दात मांडले आहे तुम्ही.. क्वीन पाहून आल्यावर खरेतर कितीतरी दिवस 'हंगामा हो गया' आणि 'रांझा' हि दोन गाणी मनात गुणगुणत होतो.. 'हंगामा हो गया' हे गाणे तर अगदीच आवडले.. राणी जेव्हा म्हणते कि 'हिंदी गाना लगा है' तेव्हा मी विचार केला कि अश्या प्रसंगात कोणते गाणे वापरले असेल दिग्दर्शकाने ?(कारण गाण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता), पण जेव्हा हे गाणे ऐकले तेव्हा त्यातील शब्दनिशब्द अगदी समर्पक वाटला. इथे दिग्दर्शकाचे कौतुक करावे लागेल. चिगो सरांनी सांगितल्याप्रमाणे खूप सटल (मराठी?) गोष्टी चित्रपटात आहेत.. उदा: ती फ्रांस मध्ये तिच्या नातेवाइकांना भेटायला जाते तो प्रसंग तर समाजात दांभिकपणा किती कुटून कुटून भरला आहे हे समजण्यास पुरेसा आहे, ती जेव्हा लीप कीस करते तेव्हा फक्त इम्रान हाश्मी किस करतो म्हणून सगळे भारतीय चांगले लीप किस करू शकतात हे तिचे गृहीतक, आयफेल टावर* पासून दूर पळतानाचा सीन, ती अ‍ॅमस्टरडॅममध्ये असताना जो टीशर्ट घालते तो पण तितकाच सूचक आहे (Alice In Wonderland with white rabbit), जेव्हा ताका आपल्या आईवडिलांचा फोटो होस्टेल मध्ये सोडतो तेव्हाच राणी पण आपली लग्नपत्रिका तिथे सोडते असो.. असे कितीतरी सुंदर, सूचक आणि समर्पक प्रसंग आहेत.. तिचे थँक्यु म्हणणे तर खूपच भावते.. सगळ्यात शेवटी टायटल येतात तिथे तरी ती Married असेल कि काय असे वाटत राहते पण टायटल संपले तरी ती सिंगलच राहते (Queen Foerver). हे अतिशय सुखद होते.. *- हे Tower मराठीत कसे लिहायचे ते कुणी सांगेल का?

जेपी 01/04/2014 - 20:40
मी पयला मनणार होतो पण पाच अनाहिताचा प्रतिसाद येऊ द्या मनल आणी गप राहिलो . परीक्षण आवडल पण पैसे मोजुन म . इं . हिं चित्रपट बगत नाय त्यामुळे टिवीवर आल्यावर बगेन

Prajakta२१ 01/04/2014 - 23:11
परीक्षण छान लिहले आहे मी हा picture youtube वर पहिला त्यामुळे असेल कदाचित पण जास्त भावला नाही इंग्लिश विन्ग्लीश चीच सुधारित आवृत्ती उत्तर भारतीय पंजाबी संस्कृती/समाज जीवनाचे चित्रण हाच फरक आणि शेवट चांगला घेतला आहे पूर्वी दूरदर्शन वर telefilms यायच्या १-२ तासांच्या तसा वाटला

चित्रपट खूपच चांगला आहे पण या निमित्ताने आपणच इतरांपेक्षा पुढारलेल्या विचारांचे कसे आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केविलवाणा आहे. परिस्थिती खूप अंशी बदललेली आहे. लग्न मोडणे, घटस्फोट, स्त्रियांनी तोकडे कपडे वापरणे, अविवाहीत राहणे या गोष्टींना शहरांमधे सर्रास आणि गावांमधे थोडीफार मान्यता मिळत आहे. उठल्या सुटल्या हौ एक्सायटिंग, यम्मी, सेक्सी असे करत किंचाळत राहण्यालासुद्धा दांभिक्पणाच म्हणतात. त्यापेक्षा समोरच्याची चौकशी, विचारपूस करणारा भारतीय भोचकपणा कितीतरी चांगला.

In reply to by अप्पा जोगळेकर

आपणच इतरांपेक्षा पुढारलेल्या विचारांचे कसे आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केविलवाणा आहे कोण "आपण" नक्की? समजले नाही..
उठल्या सुटल्या हौ एक्सायटिंग, यम्मी, सेक्सी असे करत किंचाळत राहण्यालासुद्धा दांभिक्पणाच म्हणतात
हो.. बरं मग? प्ययोजन काय ह्या वाक्याचे नक्की? मी कुठे म्हणलयं का असं?
त्यापेक्षा समोरच्याची चौकशी, विचारपूस करणारा भारतीय भोचकपणा कितीतरी चांगला.
अगत्य आणि भोचकपणा मधला फरक मी तुम्हाला सांगायला हवा का आता?!!

चित्रपट बरा आहे. या धाग्याबद्दल तसं म्हणता येणार नाही. चित्रपटात जे जाणीवपूर्वक टाळलं आहे (डायलॉगबाजी,सरसकटीकरण) ते धागाकर्तीला मात्र टाळता आलं नाही. माझ्या मते आता समाज देखिल बदलतो आहे आणि बॉलिवुडदेखिल. अवांतर- 'क्विन'ला सुद्धा गल्लाभरूपणा करण्याचा मोह पुरेपूर टाळता आला नाही. एरवी रानीला अ‍ॅमस्टरडॅमलाच न्यायचं कारण काय? रस्त्याच्या कडेला शोकेसमध्ये स्ट्रिप-टिझ करणार्‍या बायका दाखवता याव्यात, हे एक कारण असेल का?

In reply to by चिन्मय खंडागळे

समीरसूर 04/04/2014 - 17:31
गल्लाभरू असणं वाईट कसं? चांगलंच आहे गल्लाभरू असणं. त्याशिवाय इकॉनॉमी कशी चालणार? व्यवसाय आहे तो; सत्यनारायणाची पूजा नाही! आणि आपण किती खोटं बोलणार आहोत स्वतःशी? स्ट्रीप करणार्‍या बायकांची दृष्ये चवीने बघितली गेली नसतील? 'दोस्ताना'मधला चड्डी सरकवणारा जॉन अब्राहम चवीने बघितला गेला नव्हता? अहो, नैसर्गिक आहे ते. त्यात कसला आलाय गल्लाभरूपणा? आपण आपला ढोंगीपणा सोडू तो खरा सुदिन बाकी दसरे, दिवाळ्या, आणि गुढी पाडवे काय, येतच राहतील आणि ठराविक 'चैतन्याची गुढी', 'प्रकाशमान दीपावली' सारख्या छापील शब्दात गुडूप सुद्धा होतील. लेख खूपच छान आहे. विशेष म्हणजे धागाकर्तीचे स्वतःचे मत असल्याने बाकी सगळे पृथ्थकरणाचे मुद्दे आपोआपच गैरलागू होतात. पढने में मजा आया...और क्या चाहिये, भई? :-)

In reply to by समीरसूर

@अहो, नैसर्गिक आहे ते. त्यात कसला आलाय गल्लाभरूपणा? आपण आपला ढोंगीपणा सोडू तो खरा सुदिन>>> +++१११ आणि जोरद्दार टाळ्या!!! जे नैसर्गिक आहे,ते दिसलं आणि असलं तरी अमान्य करायचं आणि जे अनैसर्गिक आहे,त्याचं वैयक्तिक नितिमत्तेच्या(?) अंगानी समर्थन करत राहायच! हा या लोकांचा लाडका खेळ असतो.

In reply to by चित्रगुप्त

@सत्यनारायणाची पूजा हा सुद्धा भोळसट लोकांना गंडवण्याचा धूर्त व्यवसायच.>>> नुस्ता सत्य नारायण नाही हो..आमची सगळी धर्मव्यवस्थाच तशी आहे. आणि ती तशीच लोकांना हवी आहे. जर मी नारायणातलं सत्य सांगितलं,किंवा धर्माधिष्ठित सत्यातला "खरा" नारायण सांगितला तर माझा समाज "मला" स्विकारेल काय??? हाच खरा प्रश्न आहे. :)

In reply to by चिन्मय खंडागळे

एरवी रानीला अ‍ॅमस्टरडॅमलाच न्यायचं कारण काय?
अ‍ॅमस्टरडॅमच का? अंबेजोगाई का नाही.. ह्याला उत्तर नाही.. पण अगदी विचार केलाच की का अ‍ॅमस्टरडॅम.. तर मला असं वाटतं की आपण जितके स्वतःच्या कंफर्ट झोन मधुन बाहेर निघु तेवढे आपण स्वतःच्या जास्त जवळ जातो.. तेवढे आपण स्वतंत्र होतो.. कम्फर्ट झोन सुटल्याने आधी आपण धडपडतो.. सावरायला पाहातो.... पण आजुबाजुला हात देणारं कुणीच नाही हे जाणवलं की स्वतः तोल सावरायला शिकतो.. एकदा का आपल्याला ही जाणीव झाली की आपण स्वतःला सांभाळु शकतो, की माणुस मुक्त... एका दिल्ली कडच्या पारंपारिक वातावरणात वाढलेल्या मुलीसाठी अ‍ॅमस्टरडॅम हा फार मोठा कल्चरल शॉक आहे.. जो तिच्या साठी आवश्यक होता..

In reply to by पिलीयन रायडर

सव्यसाची 04/04/2014 - 22:35
चित्रपटामध्येच सांगितल्याप्रमाणे क्वीन चे आवडते शहर पॅरिस आणि त्याचे अ‍ॅमस्टरडॅम.. त्यामुळे हनिमूनसाठी दोघेजण हि शहरे निवडतात. चित्रपटात सांगितल्याप्रमाणे ते अंतर १०० किमी (किंवा मैल ) असावे. कित्येक लोकांची इच्छा असते परदेशात फिरायला जाण्याची.. तसेच चित्रपटात दाखवले तर त्यात गैर काय आहे ते कळले नाही..

In reply to by सव्यसाची

आत्मशून्य 06/04/2014 - 17:23
कित्येक लोकांची इच्छा असते परदेशात फिरायला जाण्याची.. तसेच चित्रपटात दाखवले तर त्यात गैर काय आहे ते कळले नाही..
प्वाइंटायम ट्राइंग टु मेक इज... हनिमुनला प्रवास करणे वेगळे आणी परेदेशात फिरायला आवडते म्हणून ते फिरताना दाखवणे वेगळी. जरुर फिरावे. पण त्यामागे हनिमुन चुकला म्हणुन हे कारण का बरे असावे ? लग्न मोडल्यावरच हे का दाखवावे ? म्हणजे लग्न संस्थेपेक्षा स्त्रि स्वातंत्र्य मोठ्ठी गोष्ट आहे हे अप्रत्यक्ष बिंब्वले जात नाहीये का ? जसे केजोच्या दोस्ताना नामक चुत्या चित्रपटात समलिंगी पध्दत मॉक करणारे लोक अतिशय स्मार्ट (अभ्या अन अब्र्या) अन स्ट्रेट आकर्षण राखणारे लोक अनकुल पर्सनॅलिटी (बॉबी देओल) दाखवुन गेइसम इज कुल हे अप्रत्यक्षपणे बिंबवायचा प्रयत्न केला न्हवता काय ? तिथे बॉबी देओलच्या ऐवजी सलमान नाही भेटला गेस्ट कलाकार म्हणून त्या रद्दड बॉबी देओलला का घेतले? असो, लग्न संस्थेपेक्षा (स्त्री)स्वैराचार ही मोठ्ठी गोष्ट आहे हे अप्रत्यक्ष बिंब्वले जात नाहीये का.. मला इतकेच म्हणायचे आहे भारतीय स्त्रीची मानसिकता प्रश्न वेगळे आहेत तिच्या आनंदाला भारताची पार्श्वभुमी हवी परदेशाची नको.. असेल आवड-गरज परदेश फिरायची, रहायची, नोकरी करायची पण अमेरीकी स्त्रियांचा हॅपिनेस इंडेक्स कमी होतोय...हे मी नाही, शास्त्रज्ञ बोलतात. गुगल करा, नाहीच मिळाला विदा तर मी अधिकृत लिंक देइन. म्हणजे पुर्वी स्त्रियांवर जेंव्हा बंधने होती तेव्हांचा इंडेक्स आणी आता अत्यल्प बंधने असतानाच्या हॅपिनेस इंडेक्स दोन्ही पडताळुन बघितल्यावर हे चकितजन्य सत्य सामोरे आले आहे. म्हणून क्विन हा निरागस स्त्रियांची भ्रामक दिशाभुल करणारा व चित्रपट ज्का गणू नये असा विचार येतो.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 06/04/2014 - 18:30
लग्नसंस्थेपेक्षा स्वैराचार महत्त्वाचा असे त्या पिच्चरमधून बिंबवले जात आहे असे मला वाटत नै. लग्नव्यवस्थेतही कैक गोष्टींचे अवडंबर फुका माजवलेय ते झुगारले तर आभाळ कोसळत नै असा ओव्हरऑल टोन आहे पिच्चरचा. आणि तो मला पटतो. बाकी हॅपिनेस इंडेक्सबद्दल म्हणाल तर..स्वातंत्र्य म्ह. स्वैराचार असे समीकरण करणार्‍यांनी दु:ख ओढवून घेतलेले आहे. काही झाले तरी शेवटी पुरुष काही प्रसूत होणार नाहीत. एका मर्यादेपलीकडे स्त्रीपुरुषांत भेद हे राहणारच. पण त्यामुळे संसारात एकावरच जास्त बंधने असावीत हे पटत नाही. शेवटी स्वातंत्र्य म्ह. देखील दुधारी तलवार आहे, तिचा वापर करायला अक्कल लागते. पण ते न देणे म्ह. बेसिक हक्क नाकारणे असल्याने ते दिलेच पाहिजे. बाकी मग ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे जो तो आनंदी वा निराश होईल.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 06/04/2014 - 18:35
लग्नसंस्थेपेक्षा स्वैराचार महत्त्वाचा असे त्या पिच्चरमधून बिंबवले जात आहे असे मला वाटत नै. लग्नव्यवस्थेतही कैक गोष्टींचे अवडंबर फुका माजवलेय ते झुगारले तर आभाळ कोसळत नै असा ओव्हरऑल टोन आहे पिच्चरचा. आणि तो मला पटतो.
मग स्वैराचाराचे (स्वछ्चंदीपणा म्हणा पण तो हळु हळु स्वैराचारच बनतो) अनुभवच नायिकेचे जिवनानुभुवविश्व समृध्द करताना का दाखवले आहे ? ते सुधा नेमके लग्न तुटल्यावर ? फिरायला तर कोणीही केंव्हाही परदेशात जाउ शकते, पण तुटलेल्या लग्नाच्या हनीमुनच्या तिकीटाचे कारण काय मानसिकता दर्शवते ?

In reply to by आत्मशून्य

=)) Before Sunrise मधे स्त्रीमुक्ती घुसडलेली नाही, असं म्हणणं हेच मुळात स्त्रीमुक्ती आणि Before Sunrise दोन्ही गोष्टी न समजल्याचं लक्षण आहे. Before Sunrise च्या विनोदाची जातकुळीसुद्धा फार नर्मविनोदी आहे. "(Before Sunrise मध्ये) स्त्रिमुक्ती वगैरे मसाला न घुसडता" हे वाक्य एपिक आहे, फेसबुकावर वापरण्याची परवानगी द्या प्लीज. इतरांनाही थोडं हसायला येईल. Before Sunrise मधली सेलिन मुक्त स्त्री आहे, ती काल भेटलेल्या माणसाबरोबर झोपते ते चालतं, पण भारतीय रानीने मात्र लग्न मोडल्यावर आनंद शोधावा, स्वतःचा शोध घ्यावा, मुक्तता पहिल्यांदा अनुभवावी तर ते नाही चालणार. आमच्या देशातल्या स्त्रिया बुरख्यात आणि स्वयंपाकघरातच पाहिजेत. का तर आम्ही कालच शोध लावला ना, 'सिंहासना'वर असताना, "भारतीय स्त्रीची मानसिकता प्रश्न वेगळे आहेत..."

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्मशून्य 07/04/2014 - 19:45
मला या चित्रपटातिल आपल्या आवडीचा एक प्रसंग सांगावा. तुम्हाला तुमच्या घोड्चुका समजायला सुरुवात करता येइल.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 06/04/2014 - 19:13
तो एक प्रसंग दाखवला म्हणून तेवढ्यावरून मानसिकतेचा आरोप करणे मला पटत नाही. असे तर कुठलाही प्रसंग दाखवला तरी त्याबद्दल विचारता येईल, नै का?

In reply to by आत्मशून्य

सव्यसाची 06/04/2014 - 19:09
आत्मशुन्यजी, हनिमूनला जायला तिने फ्रांस निवडले आहे. आता लग्न तर नाही झाले. मग त्या तिकिटाचे काय करायचे हा एक व्यावहारिक विचार. शिवाय आपल्या आवडत्या शहरात जाण्याची अशी दुसरी संधी परत कधी मिळणार हा दुसरा विचार. आता ते तसेच का? किंवा कथा अशीच का लिहिली याला काही कारण नाही देता येणार. लग्न संस्था महत्वाची नाही असा जर कथेचा संदेश असेल तर कथा अशी झाली असती: लग्न राणीने मोडले असते. तिकीट तयार आहेच असे म्हणून ती हुंदडून आली असती. आता परत कधी आली असतीं, कशी आली असती याची कल्पना मी तरी काही करत नाही. पण जी कथा आपल्याला समोर दिसते ती अशी नक्कीच नाहीये. माझ्या मते कुठलाही स्वैराचार बिंबवला गेला नाहीये. निरागस स्त्रियांची दिशाभूल वगैरे असे शब्द मी वापरणार नाही कारण प्रत्येक लेख, पुस्तक, चित्रपट त्या अर्थाने 'दिशाभूल करणारे साहित्य' या सदरात मोडेल.

स्पंदना 02/04/2014 - 02:48
पिरा सिनेमा परिक्षणाच्या क्षितिजावर नवा तार उगवला असे म्हणेन. पिक्चरच धावतं फ्रेम बाय फ्रेम समालोचन आवडल. लिहायची स्टाइल सुद्धा आवडली.

पिशी अबोली 02/04/2014 - 15:28
पिराताई, खूपच सुंदर गं... बाकी टिंगलटवाळी करता येण्यासारखं या चित्रपटात काही सापडलं नसल्याने एरवी स्त्रीस्वातंत्र्य या विषयावर अखंड जळणारे आत्मे यातून खुस्पटं काढायला तळमळतील, तेव्हा मजा येईल. असो... पुन्हा बघणार आहे, नक्की... :)

दिव्यश्री 02/04/2014 - 15:55
भारतात "लग्न" ही तशीही फार्फार डेंजर गोष्ट आहे.. मुलींसाठी तर फारचं.. , एक तर ते झालंच पाहिजे.. >>>++++++++++++++++++++ ११११ ११११ ११११ ११११ १११ १११ अजुण पहिला णाही . पाहिल्यावर परत पर्तिक्रिया देण्याचा प्रयत्न असेल . :)

मितान 01/04/2014 - 17:11
मस्त चुरचुरीत लिहिलंयस पिरा ! आता बघावाच काय क्वीन ?

पैसा 01/04/2014 - 17:16
सिनेमा आणि त्या निमित्ताने आणखी जे लिहिलंस ते सगळंच आवडलंय. सीडी आणलीय. कधी मुहूर्त मिळतो बघू!

सूड 01/04/2014 - 17:24
>>मी कानात प्राण आणुन आता एका मोठ्या डायलॉगची वाट पहात होते.. पण नाही.. "थँक्यु" व्यतिरिक्त चकार शब्द नाही.. अगदी हेच आलं होतं शेवट्चा सीन बघताना डोक्यात. एका थँक्युवर कसं काय संपू शकतं सगळं!! पण त्याचं उत्तरही इथेच मिळालं आणि त्या उत्तराबरोबर बरेच प्रश्न सुटले...माझेही !! :)

(दु:ख उगाळत बसणे हा बायकांचा आवडता छंद आहे).. आणि आता नवरा "झाली म्हणलो ना चुक..प्रत्येकाच्या आयुष्यात होते.. आता काय पाया पडु का तुझ्या?" अशी मोठ्या मनानी माफी मागतो तर ही त्याला नाकारते.. तेरी ये जुर्रत?? >>>>> ,थोर भारतीय संस्कृती आणि बॉलीवुडका वास्ता है तुम्हे रानी.. असं मुलींना "अलाऊड" नसतं ग.. स्वतःचे विचार नसतात बाळगायचे, निर्णय असे नसतात घ्यायचे मुलींनी.. >>>> +++१११११११११११११ मस्त लिहिलयं, आवडलं..

In reply to by स्मिता चौगुले

>>>(दु:ख उगाळत बसणे हा बायकांचा आवडता छंद आहे).. आणि आता नवरा "झाली म्हणलो ना चुक..प्रत्येकाच्या आयुष्यात होते.. आता काय पाया पडु का तुझ्या?" अशी मोठ्या मनानी माफी मागतो तर ही त्याला नाकारते.. तेरी ये जुर्रत?? >>>>थोर भारतीय संस्कृती आणि बॉलीवुडका वास्ता है तुम्हे रानी.. असं मुलींना "अलाऊड" नसतं ग.. स्वतःचे विचार नसतात बाळगायचे, निर्णय असे नसतात घ्यायचे मुलींनी..

प्यारे१ 01/04/2014 - 17:47
आधी चेपुवर बघितला. खरंच सांगतो, कुणाचा शेअर वगैरे केलाय का ते पाहिलं. :) (लेख जमल्याचं लक्षण आहे हे. उगाच दंगा करु नये.) पुन्हा लेख वाचला. आवडलाच्च. कंगना आवडत नसल्यानं क्वीन बघेन की नाही ठाऊक नाही. महिन्या भरात येईल कुठंतरी. चाळेन तेव्हा.

In reply to by बॅटमॅन

किसन शिंदे 01/04/2014 - 18:13
अर्धा सिनेमा बघेतो लईच्च बोर व्हायला लागलं, मग बंद केला आणि तुकड्या-तुकड्यात पाह्यला. सलग तीन तास बसून बघावं असा नाय वाटला. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.

In reply to by किसन शिंदे

आत्मशून्य 02/04/2014 - 00:35
अर्धा सिनेमा बघेतो लईच्च बोर व्हायला लागलं, मग बंद केला आणि तुकड्या-तुकड्यात पाह्यला. सलग तीन तास बसून बघावं असा नाय वाटला. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.
की एप्रिल फुल वगैरे करतोयस ? काहीही असो. प्रतिसाद पटला.... म्हणजेच आवडलाही. बरं वाटत लोकांना अभिव्यक्त होताना जेंव्हा मनातलंच बोलतात आणी स्वतःसाठी बोलतात तेंव्हा.

चिगो 01/04/2014 - 18:23
सुंदर परीक्षण.. 'क्विन' मलापण अत्यंत आवडला तो त्याच्या सटल टचेस (मराठी प्रतिशब्द?) मुळेच.. रानी स्वतंत्र, मुक्त होत जाते, पण सैरभैर होत नाही. "हंगामा हो गया" गाण्यावर नाचतांना अंगातला स्वेटर काढते, मात्र गरागरा फिरवून झाल्यावर फेकत नाही तर हँडबॅगेत कोंबते, ते लैच भावलं.. कसलेही लंबेचौडे डायलॉग,अभिनिवेष आणि "ओव्हर द बोर्ड" असे स्वभावपरीवर्तन न दाखवता, अत्यंत संयमित रित्या "स्व"ची रानीला झालेली जाणिव दाखवली आहे..
इथेही हिरोईन बदलते आणि हिरोला उपरती होते.. फक्त मधल्या स्टेप्स घडत नाहीत.. म्हणजे कंगना अजुनही तिला कंफरटेबल वाटेल अशाच नॉर्मल कपड्यात असते.. सतत घट्ट उराशी बाळगलेला स्वेटर तेवढा काढते.. पण ते कदाचित तिची भीती ओसरत जाते तसं ती जात मोकळी होते हे दाखवण्या इतपतच.. ती कूणालाही स्तब्ध करत नाही.. अवाक करत नाही.. कुण्णा कुण्णाला तिच्या शब्दबंबाळ डायलॉगमुळे उपरती होते नाही.. कुणाचही आयुष्य एक पल मध्ये बदलत नाही..
हे आणि हेच मला क्विन जाम आवडण्याचे कारण आहे.. कंगणाचा अभिनय तर सुंदर आहेच, पण दिग्दर्शनाचे प्रचंड कौतूक वाटले.. आणि हो, बरेच दिवसांनी प्रसंग आठवून आठवून हसण्यासारखा आणि गप्पा मारण्याजोगा पिक्चर दिल्याबद्दल्ही "क्विन"चे आभार.. पिराताई, लेख आणि त्यातले पंचेस जाम आवडलेत, हेवेसांनल.. :-)

रेवती 01/04/2014 - 18:27
वाहव्वा! ष्टोरी तरी आवडलीये हे वाचून! छान लिहिलयस. मेरेकूभी ये शिनेमा देखना हय. कब टैम मिलता अल्ला को मालूम! भारतात "लग्न" ही तशीही फार्फार डेंजर गोष्ट आहे.. मुलींसाठी तर फारचं.. हे वाक्य व यासंदर्भातील सगळी वाक्यं आवडली. भयंकर सहमत. ;)

पिरा..मस्स्स्त लिहिलयस! आधी फॅन्ड्री पाहिला आणि पाठोपाठ क्विन. दोन्हिकडे तीच घुसमट...मुक्त मोकळा श्वास घ्यायची तीच चिरंतन धडपड. पण फॅन्ड्री चा शेवट 'पुढे काय झाल असेल..?' ची फार भीषण उत्तरं देतो... तर क्विन चा शेवट म्हणजे पुढे काहितरी नक्की सुखद घडले असणार याची खात्री देतो.

In reply to by स्वप्नांची राणी

खरं तर विजय नाही तर अजय शी लग्न केलं हे उत्तर नसावं म्हणजे मिळवलं..! पण मुळात अशा बॅकग्राउंडच्या मुलीनं लग्न खानदान की इज्जत च्या नावाखाली मान्य केलं नाही हिच मोठी गोष्ट आहे..!

नगरीनिरंजन 01/04/2014 - 18:52
वा वा, पर्फेक्ट लिहिलं आहे. पिच्चर पाहताना असंच काहीसं वाटलं. शिवाय भारतीय ते भारी समजायच्या आणि सगळ्याचं भारतीयीकरण करायच्या प्रवृत्तीवर मारलेले शालजोडीतले तर अप्रतिमच आहेत. पण एक बात खटकली, क्वीन साहेबांना "भारी" व्हायला युरोपात जावं लागतं. वास्तवात भारतात राहूनच जगण्याची लढाई लढणार्‍या कित्येक अनग्लॅमरस क्वीन्स असतात. ही क्वीन मात्र (उच्च)मध्यमवर्गीयांना भावेल इतपतच गोडगोडुलं वास्तव अनुभवते आणि भेटलेल्या मदतशील लोकांच्या कृपेने कोणतेही मोठे संकट न येता "सुखरुप" परत येते. थोडक्यात बॉलिवूडच्या अनेक बावळट प्रथा मोडणारा चित्रपट महत्त्वाची गोष्टमात्र व्यावसायिक सोयीने जपून चालतो.

In reply to by नगरीनिरंजन

बॅटमॅन 01/04/2014 - 19:00
ही क्वीन मात्र (उच्च)मध्यमवर्गीयांना भावेल इतपतच गोडगोडुलं वास्तव अनुभवते आणि भेटलेल्या मदतशील लोकांच्या कृपेने कोणतेही मोठे संकट न येता "सुखरुप" परत येते. थोडक्यात बॉलिवूडच्या अनेक बावळट प्रथा मोडणारा चित्रपट महत्त्वाची गोष्टमात्र व्यावसायिक सोयीने जपून चालतो.
लोकं शाणी नैत हो आपल्याकडची. मूर्खांसाठी पिच्चर काढायचे तर ते टोन डौन केलेले असावेत तरच झेपतात, नैतर घंटा कै होत नै. किमान यात बेशिक गोष्ट तरी बरोबर दाखवलीय हेच लै आहे म्हंटो मी तर. तुमचा आक्षेप मान्यच आहे, पण लोकं मूर्खागमनी आहेत त्याला इलाज नै.

In reply to by बॅटमॅन

नगरीनिरंजन 01/04/2014 - 20:40
बरोबर आहे; पण मूर्खागमनी लोकांना तसेही अशा विषयांवरचे चित्रपट फारसे आवडत नाहीत आणि त्यांच्यामुळे ना कलाकाराला समाधान ना प्रेक्षकांना अत्युत्तम पाहिल्याचे समाधान. अर्थात चित्रपट चांगलाच आहे; पण अजून चांगला नक्कीच होऊ शकला असता एवढेच.

In reply to by नगरीनिरंजन

धन्या 04/04/2014 - 14:17
पण एक बात खटकली, क्वीन साहेबांना "भारी" व्हायला युरोपात जावं लागतं. वास्तवात भारतात राहूनच जगण्याची लढाई लढणार्‍या कित्येक अनग्लॅमरस क्वीन्स असतात. ही क्वीन मात्र (उच्च)मध्यमवर्गीयांना भावेल इतपतच गोडगोडुलं वास्तव अनुभवते आणि भेटलेल्या मदतशील लोकांच्या कृपेने कोणतेही मोठे संकट न येता "सुखरुप" परत येते. थोडक्यात बॉलिवूडच्या अनेक बावळट प्रथा मोडणारा चित्रपट महत्त्वाची गोष्टमात्र व्यावसायिक सोयीने जपून चालतो.
अगदी नेमकं मांडलंत.

In reply to by नगरीनिरंजन

क्वीन साहेबांना "भारी" व्हायला युरोपात जावं लागतं.
रानीसारखी स्वतःचा शोध घेणारी व्यक्ती उच्चमध्यमवर्गातली असेल याबद्दल मला फार शंका वाटत नाही. हे असे प्रश्न बूर्ज्वा वर्गालाच पडतात, परवडतात. या वर्गातले लोक जेव्हा रोमँटिक विचार करतात तेव्हा 'सरसों का खेत'चा किंवा मामाच्या गावाचा विचार करत नाहीत, ट्युलिप गार्डन किंवा फॅशन, सौंदर्यदृष्टी असणाऱ्या फ्रांस, पारी (पॅरीस)चा विचार करतात यातही मला काही विचित्र वाटत नाही. 'डोर'मधली, बऱ्या राजस्थानी घरातली तरुण विधवा स्वातंत्र्याचा विचार नवऱ्याशिवाय करू शकत नाही हे जितपत खटकत नाही तितपत मला हे ही खटकत नाही. आता चित्रपट सेट करतानाच गरीब-बिचाऱ्या, दुःखी-कष्टी बाईचा केला नाही, याला 'व्यावसायिक सोय' म्हणायचं असेल तर त्याबद्दल काही चर्चा संभवत नाही.
(उच्च)मध्यमवर्गीयांना भावेल इतपतच गोडगोडुलं वास्तव अनुभवते आणि भेटलेल्या मदतशील लोकांच्या कृपेने कोणतेही मोठे संकट न येता "सुखरुप" परत येते.
यातल्या छद्मामागचं कारणही समजलं नाही. एकटी परदेशात जाऊन भटकण्याचा अनुभव फक्त रानीला नाही, मलाही आहे. आणि अशा अनेक मुली माझ्या ओळखीच्या आहेत ज्या कामानिमित्त किंवा उगाच भटकायला परदेशात जातात. त्यांना काही वाईट अनुभव येत नाहीत, चांगले लोक भेटतात त्यांच्या ओळखीमुळे प्रवासात आणखी रंगत येते. पुढे हे संबंध टिकतात किंवा टिकत नाहीत. 'क्वीन' हा चित्रपट आहे, बातमीपत्रक नाही. काहीतरी वेगळं झालं, कोणावर अन्याय झाला तर बातमी येते. दारू प्यायलेल्या मुलीवर बलात्कार झाला (मुलावर दरोडा पडला) तर बातमी येते. दारू पिऊन, गांजा ओढून झिंगलेल्या मुलीची मित्रांनी काळजी घेतली, तिला कॉफी पाजली तर बातमी होत नाही. पण त्या प्रसंगामुळे त्या मुलीचं आयुष्य किंचित अधिक समृद्ध होऊ शकतं. या अशा तऱ्हतऱ्हेच्या अनुभवांमुळे मला उलट 'क्वीन' वास्तववादी असेलसा वाटतो. माझ्या दृष्टीने, उच्चमध्यमवर्गीय मुलींसाठी वास्तव जग हे असंच असतं. पण स्वतःचा शोध वगैरे चैन हवी कशाला, असं काही म्हणायचं असेल तर मग 'व्यावसायिक सोय' म्हणणं (पटलं नाही तरी) समजू शकतं. --- 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी' रंगमंचावर आणणाऱ्या वंदना खरे म्हणतात - एकूणातच ‘दु:खाचा’ अनुभव पोचवणं ही अडचण नव्हतीच. स्त्रियांवर अत्याचार होतात आणि ते होऊ नयेत इतपत समजूत समाजात तयार झालेली आहे. खरी अडचण दिसली ती स्त्रियांनी स्वत:ला "सुख होत आहे" हे जाहीरपणे म्हटलेले पचवण्याची. अगदी जेन्डरविषयी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेदेखील येऊन सांगत असत की "बलात्काराबद्दल सांगणारे गंभीर भाग छान आहेत पण बाकी विनोदी भाग जरा कमी करा ना!"

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्मशून्य 05/04/2014 - 04:11
दारू प्यायलेल्या मुलीवर बलात्कार झाला (मुलावर दरोडा पडला) तर बातमी येते. दारू पिऊन, गांजा ओढून झिंगलेल्या मुलीची मित्रांनी काळजी घेतली, तिला कॉफी पाजली तर बातमी होत नाही. पण त्या प्रसंगामुळे त्या मुलीचं आयुष्य किंचित अधिक समृद्ध होऊ शकतं.
फ्रेम करावा असा प्रतिसाद. अतिशय आवडला.
स्त्रियांवर अत्याचार होतात आणि ते होऊ नयेत इतपत समजूत समाजात तयार झालेली आहे
नक्किच.खरी
अडचण दिसली ती स्त्रियांनी स्वत:ला "सुख होत आहे" हे जाहीरपणे म्हटलेले पचवण्याची.
व्यवस्थीत कळला नाही पण कोणीही व्यक्ती तो सुखी आहे म्हणु लागला की जग जळु लागते हे वास्तव आहे. त्यात स्त्रि पुरुष भेद कितपत धरावा ?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नगरीनिरंजन 08/04/2014 - 05:37
मुळात जगात चांगले लोक आहेत यात दुमत नाहीच. रानी युरोपमध्ये फिरायला जाते वगैरेही ठीक. पण मुळात रस्ता चुकणे किंवा बॅग चोरीला जाण्याचा प्रसंग उद्भवणे किंवा झिंगलेल्या मुलीला कॉफी पाजणे हे फक्त युरोपातभारतात? इथे भारतात यासगळ्याबरोबर शारीरिक अंगलटीला वगैरे तोंड देत गावातून तालुक्याला कॉलेजसाठी जाणार्‍या मुलींची कमतरता नाही. अतिसुरक्षित वातावरणात वाढलेल्या आपल्याला बॅग चोरीचा प्रयत्न व झिंगल्यावर कोणीतरी कॉफी पाजली हेच प्रसंग लै भारी वाटतात म्हणून आपल्या मुक्तीच्या आणि वास्तवाच्या कल्पना फारच बाळबोध आहेत असे वाटते. घरून पैशाचं मजबूत पाठबळ असेल तर प्यारिसला एकट्याने जाणे म्हणजे स्वत्वाचा शोध असं असेल तर स्वतःभोवतीचा सुरक्षित कोश मोडायचा फार मोठा पल्ला गाठायचा आहे असेच मी म्हणेन. स्त्रियांना सुख होत आहे ही गोष्ट बोचणारे लोक असतीलच, म्हणूनच दुसर्‍याच्या जीवावर सुख मिळवू नये. विजयालक्ष्मीचं व त्या पाकिस्तानी मुलीचं पात्र मला आवडलं. त्यांच्या तुलनेत रानीचे स्वातंत्र्याकडे फक्त एक पाऊल आहे आणि त्याचंच इतकं कौतुक असेल तर अवघड आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे उत्तरेपेक्षा बरी स्थिती आहे तरीही इथल्या स्त्रियांना ती एकटी पॅरिसला जाते आणि तिला असे "अग्गंबाई" अनुभव येतात याचंच अप्रूप वाटावं हे अनाकलनीय आहे.

In reply to by नगरीनिरंजन

मला तिच्या पेरिसला जाण्याच कौतुक नाहिये.. कौतुक वाटतं ते जनरली अशा वेळेस महाराष्ट्र काय किंवा उत्तर भारत काय.. मुली दु:खाला कवटाळुन, स्वतःच्या नशिबाला बोल लावत..घरातच दडुन बसतात.. त्यात ती पॅरिसला जाण्याचा निर्णय घेते.. आता इथे ती आई वडीलांना "मला फार फार दु:ख झालय, जरा २-३ लाख काढा बरं..पॅरिसला जाऊन दु:ख हलकं करुन येते जरा.." असं म्हणत नाही.. तिचं स्वप्न असतं पॅरिसला हनिमुन ला जाणं. त्यासाठी तिने पैसे गोळा केलेले असतात.. इथेही "ज्या हनिमुनची स्वप्न आपल्या प्रियकरासोबत पाहिली, तिथे एक्ट्यानी जायचं म्हणजे कित्ती सॅड..." असं ही जनरली घडलं असतं.. पण तिचं स्वप्न तिला तिच्या दु:खा पेक्षा महत्वाचं वाटतं.. हे मला जास्त भावलं.. इथे मुद्दा "पॅरिस" चा नाहीचे.. स्वतःच्या स्वप्नाला पुर्ण करण्यासाठी दु:खाला मागे सारण्याचा आहे..ज्यानी आयुष्यात काहिही फरक पडणार नाहीये अशा रडारडी पेक्षा हातात असलेलं पॅरिसचं तिकिट वापरणे हा प्रॅक्टिकल विचार ती करते हे जास्त कौतुकास्पद आहे.. आता नेमकी तिचं स्वप्न हे "पॅरिसला हनिमुनला जाणे" हे असल्याने लोकांना आता पॅरिसच का? हनिमुनच का? असे प्रश्न पडत आहेत.. तिला तिथे सगळेच अनुभव चांगले येतात.. चांगलीच माणसे भेटतात.. आता हा कथेचा भाग झाला.. दरवेळी खुप अन्याय होऊन मग त्यातुन उभी राहिलेलीच स्त्री स्वतंत्र होते का? आणि आधीच भेदरलेल्या रानीसाठी लोकांनी चांगलं वागणं सुद्धा वेगळा अनुभव असु शकतो ना.. पारंपारिक घरातल्या रानीसाठी बाइनी तिर्‍हाईतासोबत झोपणे, लग्नाशिवाय झालेले मुल आनंदाने न अभिमानाने सांभाळणे, घरातल्यांचे पोट भरण्यासाठी स्ट्रिप क्लब मध्ये काम करणे हे अनुभवच धक्कादायी आहेत.. तिच्या साठी पब मध्ये दारु पिऊन, केस मो़कळे सोडुन नाचणं सुद्धा मोठी गोष्ट आहे.. कारण तिला घरात नातेवाईकांसमोर नाचणं सुद्धा "अलाऊड" नाही.. तिच्या दृष्टीने हे सगळच खुप लिबरेटींग आहे.. इथे तिची तुलना विजयालक्ष्मी किंवा इतर कुणाशी करुन कसं चालेल.. तिची परिस्थिती वेगळी होती.. म्हणुन तिच्यासाठी "स्वतंत्र" होण्याचा मार्गही वेगळा होता.. मोडलेलं लग्न परत जोडण्याची संधी मिळणं ही भारतीय मुलीसाठी निश्चित मोठी गोष्ट आहे.. स्वत: रानी सुद्धा विजयला म्हणतेच ना "आप जो कहेंगे मै वैसेही करुंगी.. ये शादी मत तोडीये..".. आयुष्यभर तुझ्या तालावर नाचायला मी तयार आहे इतकी ती अगतिक होते.. फक्त एक लग्न व्हावं म्हणुन.. अशावेळी जेव्हा विजय परत येतो तेव्हा त्याला नाकारणं ही मला मोठी गोष्ट वाटते.. मी जर रानीच्या जागी असते तर तसही विजयला समोर उभा केला नसता.. आणि तरीही ती स्वाभाविकच गोष्ट असती.. नो बिग डील.. रादर अपेक्षितच असतं अशा मुलाला नाकारणं.. पण भारतात (जिथे लग्न हा खानदानाच्या इज्जतचा सवाल असतो..)अशा अनेक रानी आहेत ज्यांच्यासाठी विजयला नाकारणं ही मुक्त होण्याची पहिली पायरी आहे..

In reply to by पिलीयन रायडर

चिगो 08/04/2014 - 16:39
प्रतिसाद आवडला, पिराताई.. "क्विन" हा चित्रपट रानीने स्वत:ला जाणण्याचा, एन्जॉय करण्याचा प्रवास आहे. त्याला ह्या किंवा त्या स्त्रीमुक्तीच्या कल्पना लावत "कंपॅरेटीव स्टेटमेंट" सारखं बघण्यात काय हशील?

In reply to by नगरीनिरंजन

आत्मशून्य 08/04/2014 - 17:33
त्यांच्या तुलनेत रानीचे स्वातंत्र्याकडे फक्त एक पाऊल आहे आणि त्याचंच इतकं कौतुक असेल तर अवघड आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे उत्तरेपेक्षा बरी स्थिती आहे तरीही इथल्या स्त्रियांना ती एकटी पॅरिसला जाते आणि तिला असे "अग्गंबाई" अनुभव येतात याचंच अप्रूप वाटावं हे अनाकलनीय आहे.
क्या. बात. मला हेच म्हणायचय. क्विन बघुन त्याणूभवात असलेल्या व्यक्तीचा अभिनीवेश, आणी अशा व्यक्तींसाठीच्या सहानुभुतीच्या कृत्रीम अभिनीवेशात लेखीकेने लिखाण करताना मोठी गल्लत करुन क्विन चित्रपटावर या धाग्यात अन्याय केला आहेच, पण त्यामुळे तिला नक्कि काय म्हणायचे आहे, बॉलीवुडला काय सांगायचे आहे, प्रत्यक्ष अशा स्थितीत गेलेल्या व्यक्तीरेखेची काय भावना असते आणी स्त्रिमुक्ती म्हणजे काय या डिमेनशनचा अचुक माग घेण्याचा बट्याबोळ या धाग्यात व्हायला वेळ लागलेला नाही. क्विन पात्र मस्त आहे. चकदे मधे नाही काय हॉकी-चंडीका क्रिकेटरला जिंकुन परत आल्यावर लग्नास नकार देते हे विसरुन की ती हारुन जरी परत आली असती तरी त्याने प्रपोज केलेच असते.

In reply to by आत्मशून्य

क्विन बघुन त्याणूभवात असलेल्या व्यक्तीचा अभिनीवेश, आणी अशा व्यक्तींसाठीच्या सहानुभुतीच्या कृत्रीम अभिनीवेशात
लेखीकेने लिखाण करताना मोठी गल्लत करुन क्विन चित्रपटावर या धाग्यात अन्याय केला आहेच, पण त्यामुळे तिला नक्कि काय म्हणायचे आहे, बॉलीवुडला काय सांगायचे आहे, प्रत्यक्ष अशा स्थितीत गेलेल्या व्यक्तीरेखेची काय भावना असते आणी स्त्रिमुक्ती म्हणजे काय या डिमेनशनचा अचुक माग घेण्याचा बट्याबोळ या धाग्यात व्हायला वेळ लागलेला नाही
मी काय म्हणते, तुम्हाला एवढं कळलय ना मग तुम्हीच का लिहीत नाही? कसं असतं ना शुन्य भाउ.. दुसर्‍याच्या लेखाची पीसं काढायला खरच काही अक्कल लागत नाही.. पण स्वतः विचार करुन १० ओळी लिहायला बरंच काही असावं लागतं माणसात.. हे जे काही तुमचं ओथंबुन वहात आहे ना, ते जरा नीट व्यक्त होऊ द्या की.. उगाच "बट्ट्याबोळ केलाय.. समजलच नाहीये.. अभिनिवेश आहे.." वगैरे पेक्षा मला तुम्ही स्वतःच एक परीक्षण लिहुन दाखवाच..

Dhananjay Borgaonkar 01/04/2014 - 19:09
झकास परी़क्षण. एकच नंबर आहे क्वीन. सगळ्यांनी भारी काम केलय. डायरेक्टरला १०० गुण. ताका,इटालियन शेफ,चित्रकार,कंगनाचा धाकटा भाऊ, आणि ऑफकोर्स विजे..भारी कॅरेक्टर्स आहेत. लेख वाचुन परत एकदा बघावासा वाट्टोय.

In reply to by Dhananjay Borgaonkar

सोत्रि 06/04/2014 - 22:31
लेख वाचुन परत एकदा बघावासा वाट्टोय.
चित्रपटाबरोबरच हे ह्या लेखाचीही यश! - (चित्रपट आणी लेख दोन्ही अतिशय आवडलेला) सोकाजी

सव्यसाची 01/04/2014 - 19:10
पिरा ताई, अगदी योग्य शब्दात मांडले आहे तुम्ही.. क्वीन पाहून आल्यावर खरेतर कितीतरी दिवस 'हंगामा हो गया' आणि 'रांझा' हि दोन गाणी मनात गुणगुणत होतो.. 'हंगामा हो गया' हे गाणे तर अगदीच आवडले.. राणी जेव्हा म्हणते कि 'हिंदी गाना लगा है' तेव्हा मी विचार केला कि अश्या प्रसंगात कोणते गाणे वापरले असेल दिग्दर्शकाने ?(कारण गाण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता), पण जेव्हा हे गाणे ऐकले तेव्हा त्यातील शब्दनिशब्द अगदी समर्पक वाटला. इथे दिग्दर्शकाचे कौतुक करावे लागेल. चिगो सरांनी सांगितल्याप्रमाणे खूप सटल (मराठी?) गोष्टी चित्रपटात आहेत.. उदा: ती फ्रांस मध्ये तिच्या नातेवाइकांना भेटायला जाते तो प्रसंग तर समाजात दांभिकपणा किती कुटून कुटून भरला आहे हे समजण्यास पुरेसा आहे, ती जेव्हा लीप कीस करते तेव्हा फक्त इम्रान हाश्मी किस करतो म्हणून सगळे भारतीय चांगले लीप किस करू शकतात हे तिचे गृहीतक, आयफेल टावर* पासून दूर पळतानाचा सीन, ती अ‍ॅमस्टरडॅममध्ये असताना जो टीशर्ट घालते तो पण तितकाच सूचक आहे (Alice In Wonderland with white rabbit), जेव्हा ताका आपल्या आईवडिलांचा फोटो होस्टेल मध्ये सोडतो तेव्हाच राणी पण आपली लग्नपत्रिका तिथे सोडते असो.. असे कितीतरी सुंदर, सूचक आणि समर्पक प्रसंग आहेत.. तिचे थँक्यु म्हणणे तर खूपच भावते.. सगळ्यात शेवटी टायटल येतात तिथे तरी ती Married असेल कि काय असे वाटत राहते पण टायटल संपले तरी ती सिंगलच राहते (Queen Foerver). हे अतिशय सुखद होते.. *- हे Tower मराठीत कसे लिहायचे ते कुणी सांगेल का?

जेपी 01/04/2014 - 20:40
मी पयला मनणार होतो पण पाच अनाहिताचा प्रतिसाद येऊ द्या मनल आणी गप राहिलो . परीक्षण आवडल पण पैसे मोजुन म . इं . हिं चित्रपट बगत नाय त्यामुळे टिवीवर आल्यावर बगेन

Prajakta२१ 01/04/2014 - 23:11
परीक्षण छान लिहले आहे मी हा picture youtube वर पहिला त्यामुळे असेल कदाचित पण जास्त भावला नाही इंग्लिश विन्ग्लीश चीच सुधारित आवृत्ती उत्तर भारतीय पंजाबी संस्कृती/समाज जीवनाचे चित्रण हाच फरक आणि शेवट चांगला घेतला आहे पूर्वी दूरदर्शन वर telefilms यायच्या १-२ तासांच्या तसा वाटला

चित्रपट खूपच चांगला आहे पण या निमित्ताने आपणच इतरांपेक्षा पुढारलेल्या विचारांचे कसे आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केविलवाणा आहे. परिस्थिती खूप अंशी बदललेली आहे. लग्न मोडणे, घटस्फोट, स्त्रियांनी तोकडे कपडे वापरणे, अविवाहीत राहणे या गोष्टींना शहरांमधे सर्रास आणि गावांमधे थोडीफार मान्यता मिळत आहे. उठल्या सुटल्या हौ एक्सायटिंग, यम्मी, सेक्सी असे करत किंचाळत राहण्यालासुद्धा दांभिक्पणाच म्हणतात. त्यापेक्षा समोरच्याची चौकशी, विचारपूस करणारा भारतीय भोचकपणा कितीतरी चांगला.

In reply to by अप्पा जोगळेकर

आपणच इतरांपेक्षा पुढारलेल्या विचारांचे कसे आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केविलवाणा आहे कोण "आपण" नक्की? समजले नाही..
उठल्या सुटल्या हौ एक्सायटिंग, यम्मी, सेक्सी असे करत किंचाळत राहण्यालासुद्धा दांभिक्पणाच म्हणतात
हो.. बरं मग? प्ययोजन काय ह्या वाक्याचे नक्की? मी कुठे म्हणलयं का असं?
त्यापेक्षा समोरच्याची चौकशी, विचारपूस करणारा भारतीय भोचकपणा कितीतरी चांगला.
अगत्य आणि भोचकपणा मधला फरक मी तुम्हाला सांगायला हवा का आता?!!

चित्रपट बरा आहे. या धाग्याबद्दल तसं म्हणता येणार नाही. चित्रपटात जे जाणीवपूर्वक टाळलं आहे (डायलॉगबाजी,सरसकटीकरण) ते धागाकर्तीला मात्र टाळता आलं नाही. माझ्या मते आता समाज देखिल बदलतो आहे आणि बॉलिवुडदेखिल. अवांतर- 'क्विन'ला सुद्धा गल्लाभरूपणा करण्याचा मोह पुरेपूर टाळता आला नाही. एरवी रानीला अ‍ॅमस्टरडॅमलाच न्यायचं कारण काय? रस्त्याच्या कडेला शोकेसमध्ये स्ट्रिप-टिझ करणार्‍या बायका दाखवता याव्यात, हे एक कारण असेल का?

In reply to by चिन्मय खंडागळे

समीरसूर 04/04/2014 - 17:31
गल्लाभरू असणं वाईट कसं? चांगलंच आहे गल्लाभरू असणं. त्याशिवाय इकॉनॉमी कशी चालणार? व्यवसाय आहे तो; सत्यनारायणाची पूजा नाही! आणि आपण किती खोटं बोलणार आहोत स्वतःशी? स्ट्रीप करणार्‍या बायकांची दृष्ये चवीने बघितली गेली नसतील? 'दोस्ताना'मधला चड्डी सरकवणारा जॉन अब्राहम चवीने बघितला गेला नव्हता? अहो, नैसर्गिक आहे ते. त्यात कसला आलाय गल्लाभरूपणा? आपण आपला ढोंगीपणा सोडू तो खरा सुदिन बाकी दसरे, दिवाळ्या, आणि गुढी पाडवे काय, येतच राहतील आणि ठराविक 'चैतन्याची गुढी', 'प्रकाशमान दीपावली' सारख्या छापील शब्दात गुडूप सुद्धा होतील. लेख खूपच छान आहे. विशेष म्हणजे धागाकर्तीचे स्वतःचे मत असल्याने बाकी सगळे पृथ्थकरणाचे मुद्दे आपोआपच गैरलागू होतात. पढने में मजा आया...और क्या चाहिये, भई? :-)

In reply to by समीरसूर

@अहो, नैसर्गिक आहे ते. त्यात कसला आलाय गल्लाभरूपणा? आपण आपला ढोंगीपणा सोडू तो खरा सुदिन>>> +++१११ आणि जोरद्दार टाळ्या!!! जे नैसर्गिक आहे,ते दिसलं आणि असलं तरी अमान्य करायचं आणि जे अनैसर्गिक आहे,त्याचं वैयक्तिक नितिमत्तेच्या(?) अंगानी समर्थन करत राहायच! हा या लोकांचा लाडका खेळ असतो.

In reply to by चित्रगुप्त

@सत्यनारायणाची पूजा हा सुद्धा भोळसट लोकांना गंडवण्याचा धूर्त व्यवसायच.>>> नुस्ता सत्य नारायण नाही हो..आमची सगळी धर्मव्यवस्थाच तशी आहे. आणि ती तशीच लोकांना हवी आहे. जर मी नारायणातलं सत्य सांगितलं,किंवा धर्माधिष्ठित सत्यातला "खरा" नारायण सांगितला तर माझा समाज "मला" स्विकारेल काय??? हाच खरा प्रश्न आहे. :)

In reply to by चिन्मय खंडागळे

एरवी रानीला अ‍ॅमस्टरडॅमलाच न्यायचं कारण काय?
अ‍ॅमस्टरडॅमच का? अंबेजोगाई का नाही.. ह्याला उत्तर नाही.. पण अगदी विचार केलाच की का अ‍ॅमस्टरडॅम.. तर मला असं वाटतं की आपण जितके स्वतःच्या कंफर्ट झोन मधुन बाहेर निघु तेवढे आपण स्वतःच्या जास्त जवळ जातो.. तेवढे आपण स्वतंत्र होतो.. कम्फर्ट झोन सुटल्याने आधी आपण धडपडतो.. सावरायला पाहातो.... पण आजुबाजुला हात देणारं कुणीच नाही हे जाणवलं की स्वतः तोल सावरायला शिकतो.. एकदा का आपल्याला ही जाणीव झाली की आपण स्वतःला सांभाळु शकतो, की माणुस मुक्त... एका दिल्ली कडच्या पारंपारिक वातावरणात वाढलेल्या मुलीसाठी अ‍ॅमस्टरडॅम हा फार मोठा कल्चरल शॉक आहे.. जो तिच्या साठी आवश्यक होता..

In reply to by पिलीयन रायडर

सव्यसाची 04/04/2014 - 22:35
चित्रपटामध्येच सांगितल्याप्रमाणे क्वीन चे आवडते शहर पॅरिस आणि त्याचे अ‍ॅमस्टरडॅम.. त्यामुळे हनिमूनसाठी दोघेजण हि शहरे निवडतात. चित्रपटात सांगितल्याप्रमाणे ते अंतर १०० किमी (किंवा मैल ) असावे. कित्येक लोकांची इच्छा असते परदेशात फिरायला जाण्याची.. तसेच चित्रपटात दाखवले तर त्यात गैर काय आहे ते कळले नाही..

In reply to by सव्यसाची

आत्मशून्य 06/04/2014 - 17:23
कित्येक लोकांची इच्छा असते परदेशात फिरायला जाण्याची.. तसेच चित्रपटात दाखवले तर त्यात गैर काय आहे ते कळले नाही..
प्वाइंटायम ट्राइंग टु मेक इज... हनिमुनला प्रवास करणे वेगळे आणी परेदेशात फिरायला आवडते म्हणून ते फिरताना दाखवणे वेगळी. जरुर फिरावे. पण त्यामागे हनिमुन चुकला म्हणुन हे कारण का बरे असावे ? लग्न मोडल्यावरच हे का दाखवावे ? म्हणजे लग्न संस्थेपेक्षा स्त्रि स्वातंत्र्य मोठ्ठी गोष्ट आहे हे अप्रत्यक्ष बिंब्वले जात नाहीये का ? जसे केजोच्या दोस्ताना नामक चुत्या चित्रपटात समलिंगी पध्दत मॉक करणारे लोक अतिशय स्मार्ट (अभ्या अन अब्र्या) अन स्ट्रेट आकर्षण राखणारे लोक अनकुल पर्सनॅलिटी (बॉबी देओल) दाखवुन गेइसम इज कुल हे अप्रत्यक्षपणे बिंबवायचा प्रयत्न केला न्हवता काय ? तिथे बॉबी देओलच्या ऐवजी सलमान नाही भेटला गेस्ट कलाकार म्हणून त्या रद्दड बॉबी देओलला का घेतले? असो, लग्न संस्थेपेक्षा (स्त्री)स्वैराचार ही मोठ्ठी गोष्ट आहे हे अप्रत्यक्ष बिंब्वले जात नाहीये का.. मला इतकेच म्हणायचे आहे भारतीय स्त्रीची मानसिकता प्रश्न वेगळे आहेत तिच्या आनंदाला भारताची पार्श्वभुमी हवी परदेशाची नको.. असेल आवड-गरज परदेश फिरायची, रहायची, नोकरी करायची पण अमेरीकी स्त्रियांचा हॅपिनेस इंडेक्स कमी होतोय...हे मी नाही, शास्त्रज्ञ बोलतात. गुगल करा, नाहीच मिळाला विदा तर मी अधिकृत लिंक देइन. म्हणजे पुर्वी स्त्रियांवर जेंव्हा बंधने होती तेव्हांचा इंडेक्स आणी आता अत्यल्प बंधने असतानाच्या हॅपिनेस इंडेक्स दोन्ही पडताळुन बघितल्यावर हे चकितजन्य सत्य सामोरे आले आहे. म्हणून क्विन हा निरागस स्त्रियांची भ्रामक दिशाभुल करणारा व चित्रपट ज्का गणू नये असा विचार येतो.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 06/04/2014 - 18:30
लग्नसंस्थेपेक्षा स्वैराचार महत्त्वाचा असे त्या पिच्चरमधून बिंबवले जात आहे असे मला वाटत नै. लग्नव्यवस्थेतही कैक गोष्टींचे अवडंबर फुका माजवलेय ते झुगारले तर आभाळ कोसळत नै असा ओव्हरऑल टोन आहे पिच्चरचा. आणि तो मला पटतो. बाकी हॅपिनेस इंडेक्सबद्दल म्हणाल तर..स्वातंत्र्य म्ह. स्वैराचार असे समीकरण करणार्‍यांनी दु:ख ओढवून घेतलेले आहे. काही झाले तरी शेवटी पुरुष काही प्रसूत होणार नाहीत. एका मर्यादेपलीकडे स्त्रीपुरुषांत भेद हे राहणारच. पण त्यामुळे संसारात एकावरच जास्त बंधने असावीत हे पटत नाही. शेवटी स्वातंत्र्य म्ह. देखील दुधारी तलवार आहे, तिचा वापर करायला अक्कल लागते. पण ते न देणे म्ह. बेसिक हक्क नाकारणे असल्याने ते दिलेच पाहिजे. बाकी मग ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे जो तो आनंदी वा निराश होईल.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 06/04/2014 - 18:35
लग्नसंस्थेपेक्षा स्वैराचार महत्त्वाचा असे त्या पिच्चरमधून बिंबवले जात आहे असे मला वाटत नै. लग्नव्यवस्थेतही कैक गोष्टींचे अवडंबर फुका माजवलेय ते झुगारले तर आभाळ कोसळत नै असा ओव्हरऑल टोन आहे पिच्चरचा. आणि तो मला पटतो.
मग स्वैराचाराचे (स्वछ्चंदीपणा म्हणा पण तो हळु हळु स्वैराचारच बनतो) अनुभवच नायिकेचे जिवनानुभुवविश्व समृध्द करताना का दाखवले आहे ? ते सुधा नेमके लग्न तुटल्यावर ? फिरायला तर कोणीही केंव्हाही परदेशात जाउ शकते, पण तुटलेल्या लग्नाच्या हनीमुनच्या तिकीटाचे कारण काय मानसिकता दर्शवते ?

In reply to by आत्मशून्य

=)) Before Sunrise मधे स्त्रीमुक्ती घुसडलेली नाही, असं म्हणणं हेच मुळात स्त्रीमुक्ती आणि Before Sunrise दोन्ही गोष्टी न समजल्याचं लक्षण आहे. Before Sunrise च्या विनोदाची जातकुळीसुद्धा फार नर्मविनोदी आहे. "(Before Sunrise मध्ये) स्त्रिमुक्ती वगैरे मसाला न घुसडता" हे वाक्य एपिक आहे, फेसबुकावर वापरण्याची परवानगी द्या प्लीज. इतरांनाही थोडं हसायला येईल. Before Sunrise मधली सेलिन मुक्त स्त्री आहे, ती काल भेटलेल्या माणसाबरोबर झोपते ते चालतं, पण भारतीय रानीने मात्र लग्न मोडल्यावर आनंद शोधावा, स्वतःचा शोध घ्यावा, मुक्तता पहिल्यांदा अनुभवावी तर ते नाही चालणार. आमच्या देशातल्या स्त्रिया बुरख्यात आणि स्वयंपाकघरातच पाहिजेत. का तर आम्ही कालच शोध लावला ना, 'सिंहासना'वर असताना, "भारतीय स्त्रीची मानसिकता प्रश्न वेगळे आहेत..."

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्मशून्य 07/04/2014 - 19:45
मला या चित्रपटातिल आपल्या आवडीचा एक प्रसंग सांगावा. तुम्हाला तुमच्या घोड्चुका समजायला सुरुवात करता येइल.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 06/04/2014 - 19:13
तो एक प्रसंग दाखवला म्हणून तेवढ्यावरून मानसिकतेचा आरोप करणे मला पटत नाही. असे तर कुठलाही प्रसंग दाखवला तरी त्याबद्दल विचारता येईल, नै का?

In reply to by आत्मशून्य

सव्यसाची 06/04/2014 - 19:09
आत्मशुन्यजी, हनिमूनला जायला तिने फ्रांस निवडले आहे. आता लग्न तर नाही झाले. मग त्या तिकिटाचे काय करायचे हा एक व्यावहारिक विचार. शिवाय आपल्या आवडत्या शहरात जाण्याची अशी दुसरी संधी परत कधी मिळणार हा दुसरा विचार. आता ते तसेच का? किंवा कथा अशीच का लिहिली याला काही कारण नाही देता येणार. लग्न संस्था महत्वाची नाही असा जर कथेचा संदेश असेल तर कथा अशी झाली असती: लग्न राणीने मोडले असते. तिकीट तयार आहेच असे म्हणून ती हुंदडून आली असती. आता परत कधी आली असतीं, कशी आली असती याची कल्पना मी तरी काही करत नाही. पण जी कथा आपल्याला समोर दिसते ती अशी नक्कीच नाहीये. माझ्या मते कुठलाही स्वैराचार बिंबवला गेला नाहीये. निरागस स्त्रियांची दिशाभूल वगैरे असे शब्द मी वापरणार नाही कारण प्रत्येक लेख, पुस्तक, चित्रपट त्या अर्थाने 'दिशाभूल करणारे साहित्य' या सदरात मोडेल.

स्पंदना 02/04/2014 - 02:48
पिरा सिनेमा परिक्षणाच्या क्षितिजावर नवा तार उगवला असे म्हणेन. पिक्चरच धावतं फ्रेम बाय फ्रेम समालोचन आवडल. लिहायची स्टाइल सुद्धा आवडली.

पिशी अबोली 02/04/2014 - 15:28
पिराताई, खूपच सुंदर गं... बाकी टिंगलटवाळी करता येण्यासारखं या चित्रपटात काही सापडलं नसल्याने एरवी स्त्रीस्वातंत्र्य या विषयावर अखंड जळणारे आत्मे यातून खुस्पटं काढायला तळमळतील, तेव्हा मजा येईल. असो... पुन्हा बघणार आहे, नक्की... :)

दिव्यश्री 02/04/2014 - 15:55
भारतात "लग्न" ही तशीही फार्फार डेंजर गोष्ट आहे.. मुलींसाठी तर फारचं.. , एक तर ते झालंच पाहिजे.. >>>++++++++++++++++++++ ११११ ११११ ११११ ११११ १११ १११ अजुण पहिला णाही . पाहिल्यावर परत पर्तिक्रिया देण्याचा प्रयत्न असेल . :)
लेखनविषय:
परवा खुप दिवसांनी थेटर मध्ये जाऊन पिक्चर पाहिला.. पॉपकॉर्न खात.. क्विन! आवडला.. जाम आवडला.. क्विन मध्ये कंगनाचा अभिनय.. कथानक.. संवाद.. गाणी वगैरे सगळच आवडण्या सारखं असलं तरी मला तो वेगळ्याच कारणांसाठी आवडलाय.. भारत वर्षातली.. दिल्लीकडची.. अत्यंत पारंपारिक वातावरणात वाढलेली एक मुलगी.. अगदी लहान सहान गोष्टी पण आई वडीलांना विचारुन करणार.. बाहेर जाताना भावाला घेऊन जाणार.. पुढे जॉब करायचा की नाही हे होणार्‍या नवर्‍याला विचारणार.. तिच्याच शब्दात सांगायचं तर .."तुम सिर्फ नाम लो.. मैने उन सबकी बात सुनी है.." कॅटेगरी.. तिचं लग्न मोडतं.. भारतात "लग्न" ही तशीही फार्फार डेंजर गोष्ट आहे..

< मराठी संस्थळं: एक डोकेदुखी ? >

प्यारे१ ·

जेपी 01/04/2014 - 15:07
मराठी संस्थळ . ऐक डोकेदुखी ? खरच आहे . पण संस्थळ पैक्षा एखादा सदस्य डोकेदुखी ठरतो . वरुन तो सदस्यच सांगतो माझ्याकडे लक्ष देत जाऊ नका .

In reply to by बॅटमॅन

सूड 01/04/2014 - 16:16
सहमत !! आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने आपली ऊर्जा वायफळ काथ्याकूटात दवडलेली बघून अंमळ हळहळ झाली. कसं होणार आता !!

In reply to by सूड

>>>आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने....>>> आँ...काय सखोल? अवांतरः गुढी पाडवा आणि नीट बोल गाढवा... असं का म्हणत असावेत? *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: *give_rose* @}->-- @}-:-- @>}--,-`--- (F) (f) @}->--

In reply to by पैसा

किसन शिंदे 01/04/2014 - 17:18
ज्या गोष्टींपासुन डोकेदुखी होईल अशा गोष्टींच्या नादी लागायची सवय सोडणार नाहीत आवले !!!!
हौ ना पैताय. निग्रह करून करून मोडतात प्यारेकाका. :-)

जोशी 'ले' 01/04/2014 - 17:14
सद्यस्थितीत मराठी संस्थळं हे 80% चांगले म्हणता येईल व 20% त्रासदायक म्हणता येईल. चांगल्या आणि वाईट या दोन्हीसाठीची कारणे तुम्ही आधीच वर दिलेली आहेत. कंपुमधुन बाहेर पडणं म्हणजे तिथल्या लोकांवर/कंपुंवर निषेध व्यक्त करणं हा एक नविन प्रकार सध्या फार वाढीस लागला आहे. काही मोजके कंपु वगळता मी ही बरेचश्या कंपुंमधून बाहेर पडलोय. :-)

In reply to by रेवती

प्यारे१ 01/04/2014 - 20:14
साडेसात मिन्टात केलंय विडंबन. आहात कुठं? व्हेअर यु आर? बोअर झालेलं. डोक्याला खुराक हवा होता. मिपा उघडून बघितलं तर प्रा. डॉंं. चा लेख आत. म्हटलं त्याचाच कच्चा माल करावा. चविष्ट नाहीये फार पण पोट भरल्याशी कारण! (वेळेला केळी खाणारा) प्यारोजीराव एकलोकेकर

जेपी 01/04/2014 - 15:07
मराठी संस्थळ . ऐक डोकेदुखी ? खरच आहे . पण संस्थळ पैक्षा एखादा सदस्य डोकेदुखी ठरतो . वरुन तो सदस्यच सांगतो माझ्याकडे लक्ष देत जाऊ नका .

In reply to by बॅटमॅन

सूड 01/04/2014 - 16:16
सहमत !! आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने आपली ऊर्जा वायफळ काथ्याकूटात दवडलेली बघून अंमळ हळहळ झाली. कसं होणार आता !!

In reply to by सूड

>>>आध्यात्माचा सखोल असलेल्या व्यक्तीने....>>> आँ...काय सखोल? अवांतरः गुढी पाडवा आणि नीट बोल गाढवा... असं का म्हणत असावेत? *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: *give_rose* @}->-- @}-:-- @>}--,-`--- (F) (f) @}->--

In reply to by पैसा

किसन शिंदे 01/04/2014 - 17:18
ज्या गोष्टींपासुन डोकेदुखी होईल अशा गोष्टींच्या नादी लागायची सवय सोडणार नाहीत आवले !!!!
हौ ना पैताय. निग्रह करून करून मोडतात प्यारेकाका. :-)

जोशी 'ले' 01/04/2014 - 17:14
सद्यस्थितीत मराठी संस्थळं हे 80% चांगले म्हणता येईल व 20% त्रासदायक म्हणता येईल. चांगल्या आणि वाईट या दोन्हीसाठीची कारणे तुम्ही आधीच वर दिलेली आहेत. कंपुमधुन बाहेर पडणं म्हणजे तिथल्या लोकांवर/कंपुंवर निषेध व्यक्त करणं हा एक नविन प्रकार सध्या फार वाढीस लागला आहे. काही मोजके कंपु वगळता मी ही बरेचश्या कंपुंमधून बाहेर पडलोय. :-)

In reply to by रेवती

प्यारे१ 01/04/2014 - 20:14
साडेसात मिन्टात केलंय विडंबन. आहात कुठं? व्हेअर यु आर? बोअर झालेलं. डोक्याला खुराक हवा होता. मिपा उघडून बघितलं तर प्रा. डॉंं. चा लेख आत. म्हटलं त्याचाच कच्चा माल करावा. चविष्ट नाहीये फार पण पोट भरल्याशी कारण! (वेळेला केळी खाणारा) प्यारोजीराव एकलोकेकर
राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम '१ एप्रिल'च्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. वगैरे वगैरे....... मंडळी, ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअ‍ॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अ‍ॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. मग ते राजकारण,समाजकारण आणि मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या तिथे तिथे संवादाच्या माध्यमाने अनेकांना जखडून टाकलं आहे. मराठी संस्थळं हे आंतरजालावरचं लोकप्रिय साधन.

मी तुझ्या ऐन्यात होतो नेहमी

drsunilahirrao ·
लेखनविषय:
भर्जरी दुःखात होतो नेहमी मी तुझ्या कर्जात होतो नेहमी शोधिसी आता मला दुनियेत या मी तुझ्या ऐन्यात होतो नेहमी तू जरी केले न दिसल्यासारखे मी तुझ्या लक्षात होतो नेहमी आसवे उबदार तू मजला दिली मी असा श्रीमंत होतो नेहमी ! तू जरी रस्ताच माझा सोडला मी तुझ्या रस्त्यात होतो नेहमी ! मी जरी पापी न होतो फारसा पण तिथे स्वर्गात होतो नेहमी मी तुझ्या हास्यामधे होतो कुठे पण तुझ्या अश्रूंत होतो नेहमी मी तुझ्या भाग्यामधे नसलो तरी हातच्या रेषांत होतो नेहमी ! डॉ.सुनील अहिरराव

' दे टाळी ' - ' घे टाळी '

अमोल केळकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
च्यायला, च्यामारी ( घाटी शब्द ) लहानपणी तुम्ही मित्राला कधी टाळी दिली नाहीत का? आम्ही तर टाळीवरुन एक खेळ ही खेळायचो ' दे टाळी ' म्हणले की ' घे टाळी ' मग पुढे घे पोळी मग दुसरा म्हणायचा ' घे , गोळी' दे विडा आणि शेवटी खा . ' किडा ' असे म्हणायचे आणि खो खो हसायचे, गंमतीचे दिवस होते ( आमच्यात किडेगिरी करायची बी ही अशी लहानपणीच रुजली होती , असो ) मुंबईतली मुले असा खेळ खेळायची नाहीत का? बहुतेक नाहीच नाही तर एका समवयस्क भावाने ' घे टाळी ' म्हणले असताना दुसरा भाऊ , फोन नाही आला म्हणून रागावून बसला नसता.

वेरूळ : भाग ६ - नवी सफर (दशावतार लेणे)

प्रचेतस ·

पैसा 31/03/2014 - 23:43
लिखाण संक्षिप्त पण मस्त आहे. गुगलवर हे फोटो पाहिले तेव्हा एक क्षणभर काळजाचा ठोका चुकला होता, की सगळी शिल्पे अशी का दिसत आहेत! चुना कोणी आणि कशाला लावलाय? आपल्या लोकांचा काही नेम नाही!

In reply to by पैसा

प्रचेतस 01/04/2014 - 09:45
धन्यवाद. हे चुन्याचे काम बहुधा अहिल्याबाई होळकरांच्या कारकिर्दीत झालेले असावे. पुरातत्व खात्याने हे सगळे चुन्याचे अवशेष काळजीपूर्वक काढून मूळ शिल्पे पूर्ववत केली पाहिजेत.

In reply to by आत्मशून्य

प्यारे१ 01/04/2014 - 22:10
मत्स्य (जलचर), कूर्म (उभयचर), वराह (भूचर), नरसिंह (अर्धमानव, अर्धपशु), वामन (मानव शरीर असलेला पहिला), परशुराम, दाशरथी राम, कृष्ण, बुद्ध (ज्ञानावतार असं काहींचं म्हणणं आहे) आणि कलंकी

In reply to by अनुप ढेरे

प्रचेतस 15/04/2014 - 22:44
तसे विष्णूचे बरेच अवतार आहेत. मोहिनी, हयग्रीव, शेष, संकर्षण, धन्वंतरी इत्यादी. पण हे प्रमुख १० अवतार जे सरसकटपणे आढळतात.

In reply to by धन्या

चौकटराजा 15/04/2014 - 07:43
आजच तुझ्याबरोबर हे लेणे पाहण्याचा योग आला. दगडातही किती सौंदर्य असते ते मला आज कळाले. धन्याभाउंच्या नजरेत पाषाण सौंदर्य अवतरले 'अगा अघटित घडले ! " म्हणताना ते अश्म गहिवरले !

In reply to by धन्या

प्रशांत 14/04/2014 - 11:34
तुझ्याबरोबर हे लेणे पाहण्याचा योग आला
मस्त मज्जा आलि. या लेण्याला दशावतार का म्हणतात? असो.... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

In reply to by धन्या

कैलास लेणीत वल्लीबरोबर पुन्हा थोडा वेळ भटकंती करता आली. या सुंदर लेखमालिकांचे पुस्तक करावे, असं म्हणतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रशांत 14/04/2014 - 11:55
या सुंदर लेखमालिकांचे पुस्तक करावे, असं म्हणतो.

In reply to by प्रशांत

प्रचेतस 14/04/2014 - 13:03
धन्यवाद.
या लेण्याला दशावतार का म्हणतात?
वास्तविक इथे विष्णूचे दहा अवतार नाहीत. वराह, नरसिंह, वामन, कृष्ण हे चारच अवतार आणि पाचवी अनंतशयनी विष्णूची प्रतिमा येथे आहे. ह्या वैष्णव शिल्पांमुळेच ह्यास दशावतार लेणी समजले गेले. अर्थात ही नावे तुलनेने बरीच अलीकडची आहेत.

In reply to by प्रचेतस

सूड 14/04/2014 - 13:55
ही लेणी वल्ली सोबत पाहून लेण्यासंबंधी माहिती तर मिळालीच पण अंगात हाडे असतात आणि ती दुखतात असा वेगळा साक्षात्कारही झाला. ;)

शशिकांत ओक 24/01/2015 - 00:16
कैलास लेण्यातील अदभूतता लिंक एलियन हा विषय चेष्टेचा मानला जातो.वरील क्लिप मधील विचारातून परग्रहावरील लोकांना माना अथवा ना माना तो आपापल्या विचारधारेचा प्रश्न आहे... पण पहा तर काय म्हणतायत ते विचारक...
Let us do a simple math and see if historians could be right. I am going to assume that people worked every day for 18 years and for 12 hours straight with no breaks at all. I am going to ignore rainy days, festivals, war time and assume that people worked like robots ceaselessly. I am also going to ignore the time taken to create intricate carvings and complex engineering design and planning and just focus on the removal of rock. If 400,000 tons of rock were removed in 18 years, 22,222 tons of rock had to be removed every year. This means that 60 tons of rock was removed every day, which gives us 5 tons of rock removed every hour. I think we can all agree, that is not even possible today to remove 5 tons of rock from a mountain, every hour. Not even with all the so called advanced machines that we have. So, if it is not humanly possible, was it done by humans at all? Was this created with the help of extraterrestrial intelligence? Now, forget about creating such an extraordinary structure. Can human beings at least destroy this temple? In fact, Aurangzeb a Muslim king employed a thousand workers to completely demolish this temple. In 1682, he ordered that that the temple be destroyed, so that there would be no trace of it. Records show that a 1000 people worked for 3 years, and they could only do a very minimal damage. They could break and disfigure a few statues here and there, but they realized it is just not possible to completely destroy this temple. Aurangzeb finally gave up on this impossible task.

In reply to by शशिकांत ओक

वल्लीच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत ! वल्ली अद्भुत आणि अचाट काम करणा-या लोकांचं काम की सामान्य मजुरांचं काम आहे हे ? कोणी तरी एक प्रमुख अभियंता असावा त्याने सांगितले आणि इतरांनी केले ? काही संदर्भ ??? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 24/01/2015 - 08:51
ह्याबद्दल राष्ट्रकूट राजा कर्क दुसरा ह्याच्या शके ७३४ च्या बडोदे ताम्रपटात स्पष्ट उल्लेख आहे. एलापुराचलगताद्भूतसन्निवेशं यदीक्ष्य विस्मित्विमानचरामरेन्द्रा: | एतद्स्वयंभुशिवधाम न कृत्रिमे श्री- र्दुष्टे दृश्यन्ति सततं बहु चर्चयन्ति | भूयस्तथाविधकृतौ व्यवसायहाने- रेतन्मया कथमहो कृतमित्यकस्मात् | कर्तापि यस्य खलु विस्मयमाप शिल्पी तन्नाम कीर्त्नमकार्यत येन राज्ञा | विमानातून जाताना एलापुर येथील पर्वतावर बांधलेले अद्भूत देवालय पाहून देव विस्मित झाले ते आपल्याशीच म्हणू लागले, की हे देवालय स्वयंभू असावे कारण इतके सुंदर देवालय कृत्रिम असणे शक्यच नाही. ज्या शिल्पीने हे देवालय बांधले तो तर विस्मयाने याहीपेक्षा जास्त थक्क झाला, तो म्हणाला हे परम अद्भूत आहे, हे माझ्याने कसे बांधवले हेच माझे मला कळत नाही बाकी लेणे कोरायला १८ नाही तर १०० वर्षांपेक्षाही अधिक काळ लागला. राष्ट्रकूटांच्या किमान ३/४ पिढ्या तरी ह्या कामात खर्ची पडल्या.

In reply to by प्रचेतस

गणेशा 24/01/2015 - 15:37
बरोबर .. आता दुवा आठवत नाही, परंतु कैलास लेणे बनवण्यास २०० वर्ष लागलेली आहेत आणि १० पिढ्या ते बनवित होती असे नमुद होते बाकी माणवाने तयार केलेल्या गोष्टींवर आपण देवनिर्मित असे न म्ह्णता देवप्रेरीत असे म्हंटल्याने जास्त योग्य वाटते.

In reply to by प्रचेतस

शशिकांत ओक 26/01/2015 - 18:51
मित्रांनो,
देव (विमानातून जाताना) विस्मित झाले ते आपल्याशीच म्हणू लागले, की हे देवालय स्वयंभू असावे कारण इतके सुंदर देवालय कृत्रिम असणे शक्यच नाही. ज्या (त्याच विमानातून प्रवास करणाऱ्या देव)शिल्पीने हे देवालय बांधले तो तर विस्मयाने याहीपेक्षा जास्त थक्क झाला, तो म्हणाला हे परम अद्भूत आहे, हे माझ्याने कसे बांधवले हेच माझे मला कळत नाही
म्हणजे हे मानवेतर योनीचे काम आहे असे श्लोककर्त्याला सुचवायचे आहे काय... आता या आणखी एका फितीत शोधकर्ता काय म्हणतो...
Here is another one that is hiding in plain sight. You can see a channel on the ground and there is a small rectangular opening at the end of this passage that would drain the water to the other side of the temple. But, I went to the other side of this rock but guess what? It is a solid stone!! So, there is no other way, except that this rectangular opening leads to the underground. Notice that the rectangular opening is only large enough for a 10 year old to go in? Since adult human beings can't access it, was it designed for human beings at all? This is another hidden passage in Ellora caves that I tried to get through, but after 10 feet, it becomes so narrow that I can't go any further. Where do these mysterious tunnels lead? Who could have used such narrow passages? The other important question is: how can you carve such narrow passages if human beings cannot even get through them? Was it carved by humans at all? Were these carved for extraterrestrials that are smaller than human beings?
ती विवरे,खळगे,अद्याप कोणी भारतीयांनी कशी आत जाऊन पाहिली नाहीत वगैरे प्रश्न उठतात... याबाबत आपल्या ऑर्किलॉजिकल खात्याला काय सांगायचे आहे ते समजले तर बरे वाटेल.... ही फीत जुलै २०१४ मधील आहे...

In reply to by कंजूस

प्रचेतस 24/01/2015 - 15:51
देगलुरकर सर म्हणजे भारावून टाकणारे व्यक्तिमत्व. सुदैवाने त्यांचे भाषण ऐकण्याचा योग डेक्कन कॉलेजने आयोजित केलेल्या 'इतिहास आणि पुरातत्व' ह्या कार्यशाळेत आला होता.

पैसा 31/03/2014 - 23:43
लिखाण संक्षिप्त पण मस्त आहे. गुगलवर हे फोटो पाहिले तेव्हा एक क्षणभर काळजाचा ठोका चुकला होता, की सगळी शिल्पे अशी का दिसत आहेत! चुना कोणी आणि कशाला लावलाय? आपल्या लोकांचा काही नेम नाही!

In reply to by पैसा

प्रचेतस 01/04/2014 - 09:45
धन्यवाद. हे चुन्याचे काम बहुधा अहिल्याबाई होळकरांच्या कारकिर्दीत झालेले असावे. पुरातत्व खात्याने हे सगळे चुन्याचे अवशेष काळजीपूर्वक काढून मूळ शिल्पे पूर्ववत केली पाहिजेत.

In reply to by आत्मशून्य

प्यारे१ 01/04/2014 - 22:10
मत्स्य (जलचर), कूर्म (उभयचर), वराह (भूचर), नरसिंह (अर्धमानव, अर्धपशु), वामन (मानव शरीर असलेला पहिला), परशुराम, दाशरथी राम, कृष्ण, बुद्ध (ज्ञानावतार असं काहींचं म्हणणं आहे) आणि कलंकी

In reply to by अनुप ढेरे

प्रचेतस 15/04/2014 - 22:44
तसे विष्णूचे बरेच अवतार आहेत. मोहिनी, हयग्रीव, शेष, संकर्षण, धन्वंतरी इत्यादी. पण हे प्रमुख १० अवतार जे सरसकटपणे आढळतात.

In reply to by धन्या

चौकटराजा 15/04/2014 - 07:43
आजच तुझ्याबरोबर हे लेणे पाहण्याचा योग आला. दगडातही किती सौंदर्य असते ते मला आज कळाले. धन्याभाउंच्या नजरेत पाषाण सौंदर्य अवतरले 'अगा अघटित घडले ! " म्हणताना ते अश्म गहिवरले !

In reply to by धन्या

प्रशांत 14/04/2014 - 11:34
तुझ्याबरोबर हे लेणे पाहण्याचा योग आला
मस्त मज्जा आलि. या लेण्याला दशावतार का म्हणतात? असो.... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

In reply to by धन्या

कैलास लेणीत वल्लीबरोबर पुन्हा थोडा वेळ भटकंती करता आली. या सुंदर लेखमालिकांचे पुस्तक करावे, असं म्हणतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रशांत 14/04/2014 - 11:55
या सुंदर लेखमालिकांचे पुस्तक करावे, असं म्हणतो.

In reply to by प्रशांत

प्रचेतस 14/04/2014 - 13:03
धन्यवाद.
या लेण्याला दशावतार का म्हणतात?
वास्तविक इथे विष्णूचे दहा अवतार नाहीत. वराह, नरसिंह, वामन, कृष्ण हे चारच अवतार आणि पाचवी अनंतशयनी विष्णूची प्रतिमा येथे आहे. ह्या वैष्णव शिल्पांमुळेच ह्यास दशावतार लेणी समजले गेले. अर्थात ही नावे तुलनेने बरीच अलीकडची आहेत.

In reply to by प्रचेतस

सूड 14/04/2014 - 13:55
ही लेणी वल्ली सोबत पाहून लेण्यासंबंधी माहिती तर मिळालीच पण अंगात हाडे असतात आणि ती दुखतात असा वेगळा साक्षात्कारही झाला. ;)

शशिकांत ओक 24/01/2015 - 00:16
कैलास लेण्यातील अदभूतता लिंक एलियन हा विषय चेष्टेचा मानला जातो.वरील क्लिप मधील विचारातून परग्रहावरील लोकांना माना अथवा ना माना तो आपापल्या विचारधारेचा प्रश्न आहे... पण पहा तर काय म्हणतायत ते विचारक...
Let us do a simple math and see if historians could be right. I am going to assume that people worked every day for 18 years and for 12 hours straight with no breaks at all. I am going to ignore rainy days, festivals, war time and assume that people worked like robots ceaselessly. I am also going to ignore the time taken to create intricate carvings and complex engineering design and planning and just focus on the removal of rock. If 400,000 tons of rock were removed in 18 years, 22,222 tons of rock had to be removed every year. This means that 60 tons of rock was removed every day, which gives us 5 tons of rock removed every hour. I think we can all agree, that is not even possible today to remove 5 tons of rock from a mountain, every hour. Not even with all the so called advanced machines that we have. So, if it is not humanly possible, was it done by humans at all? Was this created with the help of extraterrestrial intelligence? Now, forget about creating such an extraordinary structure. Can human beings at least destroy this temple? In fact, Aurangzeb a Muslim king employed a thousand workers to completely demolish this temple. In 1682, he ordered that that the temple be destroyed, so that there would be no trace of it. Records show that a 1000 people worked for 3 years, and they could only do a very minimal damage. They could break and disfigure a few statues here and there, but they realized it is just not possible to completely destroy this temple. Aurangzeb finally gave up on this impossible task.

In reply to by शशिकांत ओक

वल्लीच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत ! वल्ली अद्भुत आणि अचाट काम करणा-या लोकांचं काम की सामान्य मजुरांचं काम आहे हे ? कोणी तरी एक प्रमुख अभियंता असावा त्याने सांगितले आणि इतरांनी केले ? काही संदर्भ ??? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 24/01/2015 - 08:51
ह्याबद्दल राष्ट्रकूट राजा कर्क दुसरा ह्याच्या शके ७३४ च्या बडोदे ताम्रपटात स्पष्ट उल्लेख आहे. एलापुराचलगताद्भूतसन्निवेशं यदीक्ष्य विस्मित्विमानचरामरेन्द्रा: | एतद्स्वयंभुशिवधाम न कृत्रिमे श्री- र्दुष्टे दृश्यन्ति सततं बहु चर्चयन्ति | भूयस्तथाविधकृतौ व्यवसायहाने- रेतन्मया कथमहो कृतमित्यकस्मात् | कर्तापि यस्य खलु विस्मयमाप शिल्पी तन्नाम कीर्त्नमकार्यत येन राज्ञा | विमानातून जाताना एलापुर येथील पर्वतावर बांधलेले अद्भूत देवालय पाहून देव विस्मित झाले ते आपल्याशीच म्हणू लागले, की हे देवालय स्वयंभू असावे कारण इतके सुंदर देवालय कृत्रिम असणे शक्यच नाही. ज्या शिल्पीने हे देवालय बांधले तो तर विस्मयाने याहीपेक्षा जास्त थक्क झाला, तो म्हणाला हे परम अद्भूत आहे, हे माझ्याने कसे बांधवले हेच माझे मला कळत नाही बाकी लेणे कोरायला १८ नाही तर १०० वर्षांपेक्षाही अधिक काळ लागला. राष्ट्रकूटांच्या किमान ३/४ पिढ्या तरी ह्या कामात खर्ची पडल्या.

In reply to by प्रचेतस

गणेशा 24/01/2015 - 15:37
बरोबर .. आता दुवा आठवत नाही, परंतु कैलास लेणे बनवण्यास २०० वर्ष लागलेली आहेत आणि १० पिढ्या ते बनवित होती असे नमुद होते बाकी माणवाने तयार केलेल्या गोष्टींवर आपण देवनिर्मित असे न म्ह्णता देवप्रेरीत असे म्हंटल्याने जास्त योग्य वाटते.

In reply to by प्रचेतस

शशिकांत ओक 26/01/2015 - 18:51
मित्रांनो,
देव (विमानातून जाताना) विस्मित झाले ते आपल्याशीच म्हणू लागले, की हे देवालय स्वयंभू असावे कारण इतके सुंदर देवालय कृत्रिम असणे शक्यच नाही. ज्या (त्याच विमानातून प्रवास करणाऱ्या देव)शिल्पीने हे देवालय बांधले तो तर विस्मयाने याहीपेक्षा जास्त थक्क झाला, तो म्हणाला हे परम अद्भूत आहे, हे माझ्याने कसे बांधवले हेच माझे मला कळत नाही
म्हणजे हे मानवेतर योनीचे काम आहे असे श्लोककर्त्याला सुचवायचे आहे काय... आता या आणखी एका फितीत शोधकर्ता काय म्हणतो...
Here is another one that is hiding in plain sight. You can see a channel on the ground and there is a small rectangular opening at the end of this passage that would drain the water to the other side of the temple. But, I went to the other side of this rock but guess what? It is a solid stone!! So, there is no other way, except that this rectangular opening leads to the underground. Notice that the rectangular opening is only large enough for a 10 year old to go in? Since adult human beings can't access it, was it designed for human beings at all? This is another hidden passage in Ellora caves that I tried to get through, but after 10 feet, it becomes so narrow that I can't go any further. Where do these mysterious tunnels lead? Who could have used such narrow passages? The other important question is: how can you carve such narrow passages if human beings cannot even get through them? Was it carved by humans at all? Were these carved for extraterrestrials that are smaller than human beings?
ती विवरे,खळगे,अद्याप कोणी भारतीयांनी कशी आत जाऊन पाहिली नाहीत वगैरे प्रश्न उठतात... याबाबत आपल्या ऑर्किलॉजिकल खात्याला काय सांगायचे आहे ते समजले तर बरे वाटेल.... ही फीत जुलै २०१४ मधील आहे...

In reply to by कंजूस

प्रचेतस 24/01/2015 - 15:51
देगलुरकर सर म्हणजे भारावून टाकणारे व्यक्तिमत्व. सुदैवाने त्यांचे भाषण ऐकण्याचा योग डेक्कन कॉलेजने आयोजित केलेल्या 'इतिहास आणि पुरातत्व' ह्या कार्यशाळेत आला होता.
वेरूळः भाग ५ (कैलास लेणी ३) अंतिम
अर्थात वेरूळ वरील लिखाण येथेच संपत नाही. पण तूर्तास तिथली उरलेली लेणी पाहिली नसल्याने नाईलाजाने येथे अर्धविराम घ्यावा लागत आहे. परत वेरूळला गेल्यावर तिथल्या उरल्या लेणी बघून मगच वेरूळ लिखाणाची खर्‍या अर्थाने इतिश्री होईल.
होळीच्या तीन दिवस आधी मित्राबरोबर गप्पा टप्पा चालू असता अचानक वेरूळच्या सहलीची योजना आखली गेली आणि होळीच्या आदल्या दिवशी पहाटे आम्ही पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने प्रस्थान केले.