मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डावे-उजवे

विकास ·
सध्या मेधा पाटकर यांनी राजकारणप्रवेश केल्याने त्यांना जरा माध्यमांकडून आदरयुक्त वेळ मिळत आहे असे वाटते. त्यात त्या आपकडून निवडणूक लढवत असल्याने तर काय दुधात साखर! अर्थात, त्यांच्या काही मुद्यांवर माझा जरी आक्षेप असला तरी त्यांच्याबद्दल आदर आहे. काल त्यांची एनडीटीव्ही वर बरखा दत्त यांनी तरूण स्त्री-पुरूषांच्या समोर घेतलेली मुलाखत पाहीली. काहीवेळेस स्वतःच्या डाव्या विचारसरणीस प्रामाणिक तर काही वेळेस आप ची बाजू घेत राजकारणी वृत्ती दाखवणे असे दोन्ही चालले होते.

अर्धवटराव 25/03/2014 - 04:11
प्रथम प्रश्न हा येतो कि भारताला डावी विचारसरणी, साम्यवाद, समाजवाद वगैरे टाळता येणं शक्य होतं काय? तर अजीबात नाहि. धर्माच्या बाबतीत सुधारणा झाल्या, सामाजीक सुधारणा झाल्या, राजेरजवाडे जाऊन राजकीय सुधारणा झाल्या... या सगळ्यात कॉमन काय होतं तर एक मक्तेदारी मोडुन दुसरा पसारा मांडायच्या आधिचा संधीकाल. माणसाचा लढुन दमलेला, थकलेला, पण स्वतंत्र मोकळा उष्ण श्वास. आर्थीक सुधारणेच्याबाबतीत देखील हेच होत होतं व हि परिस्थिती डाव्याविचारसरणीला सर्वाधीक पोषक असते...एस्पेशिअली गरीब व विपुल लोकसंखेच्या समाजात/देशात. त्यामुळे भारताचा लंबक डाविकडे झुकणे अगदी अपरिहार्य होते. नेहरुंनी जे काहि आर्थीक आणि राजकीय धोरण अवलंबीलं ते बेस्ट नसलं तरी बेस्ट पॉसीबल होतं त्याकाळात. त्यापलिकडे काहि करण्याच्या परिस्थितीत भारत नव्हताच. नेहरुंना डाव्या विचारसरणीचा भविष्यात पराभव होणार आहे हे कळलं नसेल कदाचीत... आणि त्याकाळात ते कोणालाहि उमगणं शक्य नव्हतं. पण तरिही त्यांनी साम्यवाद असफल झाल्यास बॅकअप प्लॅनचे बिजारोपण करुन ठेवले होते कि काय शंका येते. स्वतः नेहरु चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले होते व श्रीमंतांना देखील देशाची तेव्हढीच काळजी असते जेव्हढी सर्वसामान्य जनतेला, हे ते स्वानुभवाने जाणुन होते. टाटा, बिर्ला, बजाज आदि मंडळींचं एका नव-साम्यवादि राष्ट्रात अदरवाईज जे पतन झालं असतं ते नेहरुंनी होऊ दिलं नाहि. त्यामुळे पुढे मागे जर एखादी विचारसरणी फेल झाली तरी देशाचा कारभार थांबणार नाहि याची तरतूद आपल्या सरकारने (अनावधानाने ??) करुन ठेवली होती कि कसं हा प्रश्न पडतोच. राहिला प्रश्न आज भारताने कुठलं मॉडेल स्विकारावं (हे बघा कुत्सीक मिपाकर... लागले नमो नमो ओरडायला ;) ) साम्यवाद तर अशक्य आहे. तेव्हढं सशक्त केंद्र सरकार बनणार आहे काय येत्या काहि दशकात तरी ?( आता हे बघा आणखी काहि कुत्सीक मिपाकर... लागले केजरीवाल केजरीवाल ओरडायला ;) ) नरसींहराव सरकारने धरणाचे दरवाजे उघडले. ते अफाट पाणि कोण भगिरथ रोखेल आज? गंगेला जटेत बांधुन जनकल्याणाअसाठी तिचा प्रवाह चेनलाईझ करणार्‍या शिवाची आवष्यकता आहे... व जनताजनार्दन हा अवतार घेईलच पुढेमागे. भारताला भारतीय मॉडेलच विकसीत करावं लागेल हे निश्चित. अजुन बरच काहि आहे टंकण्याजोगं. ब्रेक के बाद मिलेंगे :)

आतिवास 25/03/2014 - 08:01
मेधाताईंची ही मुलाखत मी अजून ऐकली/पाहिली नाही त्यामुळे त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते बघावं लागेल. राहता राहिला प्रश्न डाव्या-उजव्याचा. वास्तविक १९६०-७० या काळात डावे आणि उजवे जितके स्पष्ट होते, तितके ते आता राहिले नाहीत जगभरातही. डाव्यांतले उजवे आणि उजव्यांतले डावे; डाव्यांतले मध्यममार्गी आणि उजव्यांतले मध्यममार्गी; कडवे डावे आणि कडवे उजवे आणि कडवे मध्यममार्गी हे विविध विचारप्रवाह नेहमी दिसत आले आहेत राजकारणातही. मला वाटतं साध्य आणि साधन यातल्या कशाला महत्त्व द्यायचं हा केवळ वैचारिक नाही तर नैतिकही मुद्दा आहे. हा 'मध्यममार्ग' फार सापेक्ष असतो अनेकदा म्हणून त्याची व्याख्या करता येत नाही - मला तरी येत नाही. भारतात सत्तेवर कुणीही येवो, त्यांना कडवेपणाची भूमिका घेऊन चालत नाही हे वेळोवेळी दिसलं आहे. त्यामुळे सर्वसमावेशकता अपरिहार्य आहे - पण तसं केलं की 'भूमिका' नाहीशी होण्याचा धोका असतो. मेधाताईंसारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा सक्रिय राजकारणातला प्रवेश मला अत्यंत रोचक वाटतो तो या दृष्टिकोनातून. मूळ तत्त्वे न सोडता थोडी लवचीक भूमिका घेण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे - त्यातून व्यवस्थेत, रचनेत आणि वातावरणात चांगला बदल होईल अशी अपेक्षा मला आहे - ती फार भाबडी आहे याची जाणीव मला आहे, तरीही :-)

In reply to by आतिवास

विकास 25/03/2014 - 08:37
मेधाताईंची ही मुलाखत मी अजून ऐकली/पाहिली नाही त्यामुळे त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते बघावं लागेल. मी तूनळीवर ऐकली आहे. पण तुम्ही त्यावर लेख लिहीणार असल्याने येथे लिहायचे टाळत आहे. मेधाताईंसारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा सक्रिय राजकारणातला प्रवेश मला अत्यंत रोचक वाटतो तो या दृष्टिकोनातून. मूळ तत्त्वे न सोडता थोडी लवचीक भूमिका घेण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे सहमत. किंबहूना त्यांनी हे आधीच करायला हवे होते असे वाटते. आपल्याकडे राजकारणत न जाणे म्हणजे आदर्श असला काहीसा प्रकार आहे. पण त्यातून त्या बाहेर येत असल्या तर उत्तमच आहे आणि स्वागतार्ह आहे. उद्या त्या जर जिंकल्या तर त्यांना सांसदीय राजकारण, त्यात सक्रीय असतानाच्या मर्यादा आणि तडजोडी समजतील आणि आशा आहे की त्यातून त्यांना तुम्ही म्हणता ती लवचिकता येईल. मला वाटतं साध्य आणि साधन यातल्या कशाला महत्त्व द्यायचं हा केवळ वैचारिक नाही तर नैतिकही मुद्दा आहे. बरोबर आहे. फक्त गंमत अशी असते की नैतिकतेची व्याख्या देखील तुम्ही सत्ताकारणात असलात तर ज्या स्तरावर असाल तेथे बदलू शकते. स्वार्थी तडजोड म्हणून नाही तर देशासाठीची priority म्हणून. त्यावर अधिक इथे लिहीत बसत नाही.

नितिन थत्ते 25/03/2014 - 16:43
स्वातंत्र्यानंतर राबवलेल्या धोरणांबाबत एक दुवा. A key principle of the Bombay Plan was that the economy could not grow without government intervention and regulation. Under the assumption that the fledgling Indian industries would not be able to compete in a free-market economy, the Plan proposed that the future government protect indigenous industries against foreign competition in local markets. त्यातील एक इंटरेस्टिंग वाक्य Although Jawaharlal Nehru, the first Prime Minister of India, did not officially accept the plan, "the Nehruvian era witnessed [what was effectively] the implementation of the Bombay Plan; a substantially interventionist state and an economy with a sizeable public sector." स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांना समाजवादाचे आकर्षण होते म्हणून भारत डावीकडे गेला हे सत्य नाही. तत्कालीन उद्योगपतींना (भांडवलदारांना) जे हवे होते तेही लायसन्स-परमिट राजच होते. नेहरूंवर निदान त्या काळात तरी ते पुरेसे डावे नाहीत अशीच टीका होत असे. डाव्या विचारसरणीचे गारुड देशावर इतके होते की तत्कालीन भाजप सुद्धा आपले अधिकृत धोरण म्हणून गांधीवादी समाजवाद असे सांगे.

नगरीनिरंजन 25/03/2014 - 17:22
डाव्या-उजव्यात फार फरक राहिलेला नाही या आतिवास यांच्या मताशी थोडासा सहमत आहे. थोडासाच यासाठी की डाव्या-उजव्यात त्यांचे जाहीरामे सोडल्यास फार फरक कधी नव्हताच असे मला वाटते. डावे-उजवे असे विचारांचे पिजनहोलिंग करता करता या दोन्हीत सामायिक असणारी प्रचंड उतरंडीची औद्योगिक नागरसंस्कृती तीच असताना दोन्हीचा वेगळा परिणाम पाहायला मिळेल ही अपेक्षाच भाबडी होती हे आता लक्षात येत आहे. भारतात तर मिक्सिझम आणला गेला ज्यात गरिबांच्या कल्याणासाठी सरकारने निवडलेले भांडवलदार झटणार होते आणि सरकारी वितरण व्यवस्थेतून बाबू लोक गरिबांना घास भरवणार होते. प्रत्यक्षात भांडवलदारांसाठी समाजवाद व समाजासाठी भांडवलवाद आला आणि रेशनकार्डावर कुपोषण वाटलं गेलं. नेहरु, गांधींना बँकरोल करणार्‍या टाटा-बिर्लांसाठी टेलरमेड अशीच ही व्यवस्था होती. तिकडे भांडवलशाहीच्या मंदिरात म्हणजे अमेरिकेत तमाम समाजाच्या भल्यासाठी टू बिग टू फेल बँकांना आणि कार कंपन्यांना सर्कारी सलाईन लावले गेले आणि भारतीय समाजवादाचा भयंकर द्वेष करणारांनी आपल्या बोक्यांना त्याच समाजवादाचे लोणी खाऊ घातले. थोडा विचार केला तर कळतं की संस्कृतीच्या जन्मापासून डावे-उजवे हा फरक नव्हताच; फरक असेल तर फक्त वरचे आणि खालचे एवढाच होता आणि आहे.

क्लिंटन 25/03/2014 - 23:44
चोप्य-पस्ते मिपावर पूर्वी या संदर्भात लिहिलेले प्रतिसाद चोप्य-पस्ते करतो: १. नेहरूंच्या काळात लायसेन्स/कोटा/परमीट राज होते.आता याचे कारण काय होते?एक उदाहरण देऊन सांगतो.मी लहान असताना काही कारणांनी आमच्या कुटुंबाला काही काळ आर्थिक संकटातून जावे लागले होते.अशी वेळ अनेकांवर येते.त्या काळात जेवायला बाहेर जाणे तर सोडाच घरचे साधे खाणे सोडून इतर काही विशेष नसायचे. त्यावेळी महिन्यातून एक क्रिमच्या बिस्किटांचा पुडा आणला जात असे.त्यातील ८ बिस्किटांपैकी ४ बिस्किटे माझी तर ४ माझ्या बहिणीची असे "रेशनिंग" असे.आता या रेशनिंगचे कारण अगदी उघड होते--रिसोर्सेसची टंचाई. नेमकी अशीच टंचाई नेहरूंच्या काळात सुरवातीला होती आणि म्हणूनच लायसेन्स/कोटा/परमीट राज ठेऊन उपलब्ध रिसोर्सची कोणी व्यर्थ उधळपट्टी करत नाही हे बघणे आणि आहेत ते रिसोर्सेस विविध उद्योगांना पुरवून वापरावे लागत होते.आज मी दिवसाला बिस्कीटांचे १० पुडे विकत घेऊ शकत असेन पण म्हणून ४ बिस्कीटांचे तेव्हाचे रेशनिंग चुकीचे होते असे मला वाटत असेल तर ते अयोग्य आहे.आता भारतीय अर्थव्यवस्थेत हे रेशनिंग किती वर्षे चालू ठेवायला हवे होते? ५/१०/१५/२० की लागली तेवढी ४४ याविषयीची माहिती माझ्याकडे नाही.त्यामुळे त्यावर काहीही भाष्य करत नाही. २. सुरवातीच्या काळात लायसेन्स राज असणे ही पण एक गरज होती. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतात नैसर्गिक साधन-सामुग्री भरपूर होती पण त्यातील tapped resources खूपच कमी होते. तेव्हा परमिट-कोटा-लायसेन्स ठेऊन "रेशनिंग" करणे ओघाने आलेच. आणि हे resource tap करायची क्षमता खूपच कमी खाजगी उद्योगांमध्ये होती तेव्हा सरकारने पुढाकार घेऊन ते काम करायचा प्रयत्न केला हे एका प्रतिसादात म्हटलेच आहे. आता हे लायसेन्स राज कधीतरी काढून टाकणे गरजेचे होतेच. पण ते नक्की कधी करणे योग्य झाले असते (५/१०/२०/३० की प्रत्यक्षात लागली तेवढी ४४ वर्षे) यावर भाष्य करायला माझ्याकडे पुरेशी माहिती नाही तेव्हा त्यावर काहीही लिहित नाही. ३. बहुतेक सर्वच उद्योगांना उत्पादनाचा कोटा ठरवून दिलेला होता. याचे कारण परत तेच-- उपयुक्त Resources ची टंचाई. समजा देशात १०० एकक स्टील, १०० एकक वीज आणि १०० एकक इतर Resources आहेत आणि सगळ्या उद्योगांना आहेत त्याच Resources मध्ये भागवून घ्यायचे आहे. या परिस्थितीत जर बजाजने त्यांना ठरवून दिलेल्या १० पेक्षा जास्त एकक स्टील/वीज वापरली तर त्याचा अर्थ इतर उद्योगांना तेवढे Resources कमी आणि त्या उद्योगांवर परिणाम होणार! कोटा पध्दतीचे मागचे rationale हे होते. आता प्रत्यक्ष बजाजविरूध्दचा खटला नक्की कधी भरला, त्यावेळी कितपत टंचाई होती याची माहिती मला नाही. पण १९४७ नंतरची टंचाई लक्षात घेता कोटा पध्दत आणणे आता वाटते तितके वाईट नव्हते एवढाच माझा मुद्दा आहे. आता तीच धोरणे किती वर्षे राबवायला हवी होती? १९९१ पूर्वीच ती मोडीत काढता आली असती का किंवा मोडीत काढायला हवी होती का या प्रश्नांची उत्तरे द्यायला लागणारी माहिती माझ्याकडे नाही म्हणून त्यावर भाष्य करत नाही. ४. मी स्वतः समाजवादी /साम्यवादी आर्थिक विचारांचा अजिबात पुरस्कर्ता नाही. ज्या शिक्षणसंस्थेला epitome of capitalism असे म्हणता येईल अशा एका शिक्षणसंस्थेत माझे शिक्षण झाले आहे आणि बहुतांशी तेच विचार माझेही आहेत. माझ्या प्रतिसादाचा उद्देश हा की सध्या नेहरूंच्या आर्थिक धोरणांवर टिका करणारे बरेच लोक असतात. माझ्या मते ती टिका १००% समर्थनीय नाही कारण त्या परिस्थितीत उपयुक्त Resources ची टंचाई असताना नेहरूंच्या सरकारने त्या परिस्थितीतून मार्ग काढायला योग्य तेच केले. चर्चा रंगल्यास आणखी लिहिनच.

In reply to by क्लिंटन

नितिन थत्ते 26/03/2014 - 11:59
मार्मिक प्रतिसाद आहे. नेहरूंच्या नंतर किंवा त्यांच्याच शेवटच्या काळात उदारीकरण करावे अशी परिस्थिती आली होती की नाही हे ठाऊक नाही. पण लायसन्स परमिट राजने उद्योगांना सुरक्षितता मिळवून दिली त्याचा उपयोग करून उद्योगांनी आपली केपेबिलिटी आणि कपॅसिटी वाढवायला हवी. पण कपॅसिटी वाढवायला पुन्हा हे लायसन्स परमिट राज आडवे येणार. किंवा सरकारी क्षेत्रातील मूलभूत उद्योगांनी रिसोर्सेसची खनिजे- पोलाद- वीज वगैरे उपलब्धता वाढवायला हवी होती ती वेगाने वाढली नाही असे दिसते. त्यामुळे टंचाईचे चक्र चालूच राहिले. ८० च्या दशकात खर्‍या अर्थाने टंचाईची स्थिती बर्‍यापैकी नियंत्रणात आली होती. त्याच्या अनुषंगाने व्हीपीसिंग-राजीव गांधी यांनी थोडेसे उदारीकरण सुरू केले होते असे दिसेल. पण त्यांनी ड्रास्टिक काही केले नाही. त्या अर्थी उदारीकरणाला पाच ते दहा वर्षे उशीर झाला असू शकेल. धोरण ठरवणे हे देशातील राजकीय परिस्थितीवर सुद्धा अवलंबून असते. १९७५ च्या आधीपासून व्हीपी सिंग पंतप्रधान असेपर्यंतच्या काळात देशातील राजकारणावर डाव्या पक्षांचा खूपच पगडा होता. बंगाल-केरळ येथे ते सत्तेत होते आणि तेव्हाच्या राजकारणात राजकारणात त्यांनी बराच वरचष्मा गाजवला. इंदिरा गांधींचे सरकार ६८ ते ७१ , ७४-७५ मध्ये, मोरारजींचे सरकार, व्हीपीसिंग यांचे सरकार डाव्यांच्या पाठिंब्यावर उभे होते. ही बाब लक्षात घ्यायला हवी. इंदिरागांधींचे पुनरागमन ते राजीव गांधींचे पतन या काळात डाव्यांचा वरचष्मा केंद्रसरकारवर नव्हता. त्या काळात काही सुधारणा झाल्या त्या अर्थातच अपुर्‍या होत्या. नरसिंहरावांच्या काळापर्यंत रशियाची स्थिती उघड झालेली असल्याने तोही फायदा त्यांना झाला. डाव्या विचारसरणीला सोडचिठ्ठी देणे बर्‍यापैकी सोपे झाले. तसेच त्या काळातला प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप उदारीकरणाचा समर्थक होता आणि मशीद पाडणे वगैरे उद्योगात मग्न होता.

In reply to by नितिन थत्ते

मारकुटे 30/03/2014 - 11:16
>>>त्या काळातला प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप उदारीकरणाचा समर्थक होता आणि मशीद पाडणे वगैरे उद्योगात मग्न होता. आणि या शब्दाच्या ठिकाणी म्हणूनच हा शब्द योग्य झाला असता. ९० च्या दशकात भाजपाने लोकांना भुलवून धर्माची आणि राममंदीराची गोळी खाऊ घातली. त्याला व्यवस्थित पद्धतीने कॉग्रेसने वरकरणी विरोध करत साथ दिली. आणि पश्चिमेच्या सत्तांना हवे तसे रान मोकळे दिले. पन्नास वर्षांनंतर व्यवस्थित कळेल की उदारीकरणाने खरोखर भारताला फायदा झाला की असियन टायगर प्रमाणे भुसा भरलेला वाघ हाती आला. जनतेचे लक्ष वेधले जाऊ नये म्हणुन मंदीर मशिद पाडापाडी चालू ठेवले. हवे तसे करार झाल्यावर मुद्दा बासनात गुंडाळला. असो.

In reply to by क्लिंटन

नगरीनिरंजन 03/04/2014 - 05:23
अरुंधती रॉय यांच्या "द डॉक्टर अ‍ॅन्ड द सेंट" या नव्या पुस्तकात गांधी-नेहरुंना पाठबळ देणार्‍या उद्योगपतींना इंग्रजी "ग्लास सीलिंग" आडवे आल्याने स्वातंत्र्याचा जाहीरनामा केला गेला आणि नंतरची मिश्र अर्थव्यवस्था निर्माण करतानाही त्यांचाच विचार घेण्यात आणि करण्यात आला अशा अर्थाचा दावा आहे म्हणे. पुस्तक मी अजून वाचलेलं नाही त्यामुळे खरं-खोटं अरुंधती रॉयना किंवा ज्यांनी पुस्तक वाचलंय त्यांना ठाऊक. तसंही अरुंधती रॉय या काही "तज्ज्ञ" नाहीत बहुतेक.

विटेकर 26/03/2014 - 11:20
श्री. क्लींट्न यांचा प्रतिसाद संतुलीत आणि अभ्यासपूर्ण ! मला व्यक्तिशः साम्यवाद /समाजवाद कधीच पटला नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे तो एत्तदेशीय नाही आणि नैसर्गिक ही नाही. समाज ही व्यवस्था क्रूत्रिम नसून पूर्णपणे नैसर्गिक आहे, जशी व्यक्ती इवॉल्व ( संक्रमित ?) तसाच समाज ही इवोल्व होत असतो, ती एक सहज प्रक्रिया आहे. ती सरकारने निर्माण करु सरकारने नियमघालून द्यायची बाबच नव्हे. व्यक्तिप्रमाणे समाजालाही मन आणि आत्मा असते,अस्मिता असते. व्यक्ति आणि समाज परस्परावर पूर्ण्पणे अवलंबून असतात. समाज व्यक्तिचे पोषण करतो आणि व्यक्ति समाजाला अर्थ प्राप्त करुन देते. समाज जग्व्याळ यंत्र असून व्यक्ती त्याचा एक पूर्जा आहे असा निर्जीव स्म्बंध नसून समाज - व्यक्तिचे अवयव - अवयवी असे संब्ंध असतात. हाताच संबंध डोक्याशी कसा असावा हे बाहेरील व्यक्ती ठरवू शकत नाही तद्वत समाज आणि व्यक्ति याम्चे संबंध हे सरकार थरवू शकत नाही. समाज सरकार च्या मालकीचा नाही. सरकार येतील आणि जातील. समाज युगानुयुगे अक्षुण्ण्पणे चालत राहिल. समाजाचे / व्यक्तिचे आणि पर्यायाने साधनसंपत्तीचे सरकारीकरण केले की व्यक्तिची सृजनशीलता हरवते, कर्तृत्व गोठते आणि आयुष्य बेचव आणि साचे- बंद होत जाते.पर्यायाने समाजाची सृजन्शीलता लयाला जाते आणि संक्रमण थांबते , रोडावते. नेहरुंची "साम्यवादाचे प्रचंड आकर्षण आणि गांधीजींची स्वयंपूर्ण खेडी" यामध्ये मोठी गोची झाली. मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयकरण केल्याने छोटी छोटी स्वंयंपूर्ण देशी व्यवसाय / स्त्रोत हळू हळू नष्ट झाले . पारंपारिक कौशल्य असणारा फार मोठा समाज नव्या जगात एकदम संदर्भहीन झाला. या मोठ्या उद्योगांमुळे तस्ल्याच बेगडी विकासाची भुरळ पडली,भरीला सबसिडीची भूल होतीच ! त्यामुळे आपला विकास झाला असे जे वाटत होते ते वस्तुतः ते तसे नव्हतेच , आणि त्या भौतिक विकासाची फार मोठी किंमत आपण मोजली , खेड्यांचे शहरीकरण झाले आणि शहरांचे बकालीकरण झाले. "मुख्य अर्थ" ( साधन संपत्तीची निर्मिती जसे की शेती, उद्योग )कमी / नाहीसा होऊन "गौण" अर्थाला ( सपोर्ट सर्विसेस, नोकरी , दलाली ) महत्व प्राप्त झाले,श्रमाची प्रतिष्ठा कमी झाली , पैशाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आणि भौतिक समृद्धी वाढली पण जीवनाची गुणवत्ता/कस खालावला. मला असे वाट्ते की महात्माजींचा स्वयंपूर्ण खेडी आणि खेड्याकडे चला ही अर्थव्यवस्थाच खरिखुरी अर्थ व्यवस्था भारतीय होती ! त्याद्वारेच आपला खराखुरा विकास ( संदर्भ - विकासाची भारतीय संकल्पनाhttp://www.misalpav.com/node/25462 हा माझाच लेख - तेवढीच झैरात .. त्याला लै कमी टीआर्पी मिळाला !) झाला असता ! बाकी आता डावे काय किंवा उजवे काय सगळेच "स्वपुत्रपौत्रीअष्ट्पिढीअखंड्धन्वर्षाव -तहहयातछ्त्रचामंडीतसिंहासन" या एकाच विचारसरणीने काम करतात .. विचार केव्हाच सरणावर गेले.

In reply to by विटेकर

नितिन थत्ते 26/03/2014 - 12:04
>>नेहरुंची "साम्यवादाचे प्रचंड आकर्षण आणि गांधीजींची स्वयंपूर्ण खेडी" यामध्ये मोठी गोची झाली. नेहरूंनी स्वयंपूर्ण खेड्यांच्या कल्पनेला कसलेही उत्तेजन दिल्याचे ऐकिवात नाही.

विकास 26/03/2014 - 17:54
चर्चेत माहितीपूर्ण प्रतिसाद येत असल्याने प्रथम सर्वांचे आभार. नेहरूंकाळापासून जो काही समाजवाद चालत आला त्याबद्दल बर्‍याचदा बोलले गेले आहे. नेहरूंच्या राजकारणापेक्षा एकंदरीत राजकारण हाताळण्याच्या क्षमतेसंदर्भामुळे मला त्यांच्याबद्दल काही आक्षेप असले तरी त्यावेळेस सुवर्णमध्य ठेवण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न हा त्याकाळासाठी योग्य होता हेच मी देखील म्हणेन. जर तत्कालीन उद्योगपतींना परमिटराज हवे म्हणून नेहरू सरकार तसे वागले असे म्हणायचे असले तर त्यात त्यांनी समाजवादी असणे जर चूक असे वादापुरते म्हणले, तर त्याहून ही अधिक चूक होती असे म्हणावे लागेल... पण विषय खरेच तो नाही अथवा प्रामाणिकपणे मोदी-केजरीवाल-राहूलगांधी (पक्षी: सध्याची काँग्रेस) हा देखील नाही. म्हणून जाणीवपूर्वक हे सर्व शब्द मी प्रस्तावात टाळले होते अथवा अनुल्लेखाने मारले होते. काळाच्या ओघात एखादी व्यक्ती पंतप्रधान होईल, पक्ष/आघाडी सत्तेवर येईल आणि नंतर राहील अथवा जाईल... त्याचे इतके खरेच विशेष नंतर वाटेनासे होते, पण देश आणि जनतेसाठी पुढे जाण्याच्या ट्रेंड मधे आपण नक्की कसे जात आहोत हा कायम स्वरूपी बघण्याचा प्रश्न रहातो. त्यासाठी कधी कधी डावीकडे झुकणार्‍या (डाव्या नाही) तर कधी कधी उजवीकडे झुकणार्‍या धोरणांचा अवलंब केला जातो. मात्र ते सवय लागल्यानंतरच्या काळात बदलणे अवघड जाते. काही उदाहरणे:
  1. सोव्हीएट रशियात सर्वांना नॅचरल गॅस फुकट मिळायचा! अर्थात अ‍ॅट व्हॉट कॉस्ट हा एका वेगळ्य चर्चेचा मुद्दा आहे. पण जनतेला महीन्याला बिलं भरावी लागत नसत हे वास्तव होते. पुढे सोव्हीएट रशिया पडला, विभागला गेला. युक्रेन सरकारला ते शक्य होईना. मग करायचे काय? एका अर्थी तेच प्रश्न ऑलमोस्ट २५ वर्षांनी आजही अप्रत्यक्षपणे सतावत आहेत.
  2. भांडवलशाही अमेरीकेत: बेरोजगार व्यक्तींना हप्ता मिळणे आणि रोजच्या खाण्यासाठी फुडस्टँप मिळणे चालते. परीणामी अनेक बेरोजगार व्यक्ती आपली बुडं हलवत नाहीत अशी रीपब्लीकन्स ची तक्रार असते. त्यात काही अंशी तथ्य देखील असते. पण त्याच बरोबर हे देखील वास्तव आहे की ह्या श्रीमंत देशातील अनेक ठिकाणी शाळेत जाणार्‍या मुलांना ( ज्यांच्या आईवडीलांना रोजगार मिळतो) एकावेळचे खाणे हे शाळेत मिळणार्‍या सबसिडाईझ्ड रेट वर खावे लागते आणि तेव्हढ्याच खाण्यावर वाढत्या वयात दिवसरात्र रहावे लागते. (यात अतिशयोक्ती दुर्दैवाने अजिबात नाही).
ही दोन टोके आहेत. साम्यवादाने/समाजवादाने गरीबी गेलेली नाही. भांडवलवादाने नक्कीच संपत्ती वाटली गेली पण त्याचबरोबर विषमता पण वाढू लागली आहे. भारतात दिसणारी विषमता ही भयावह होत चालली आहे असे कधी कधी वाटते. पण त्याचे उत्तर हे नक्षलवादी अथवा अगदी बंगाली निष्क्रीय साम्यवाद असू शकत नाही, असे मला वाटते. या सर्व मनातल्या खळबळीतून विचारलेले प्रश्न होते - going forward.. भारत आज तरूण आहे. जर तरूणांनी आउट ऑफ बॉक्स विचार केला नाही तर खरे नाही असे वाटते. भारतापुरते... आज जर मध्यममार्गी समाजवाद हवा असला तर तो नक्की आजच्या काळासाठी कसा हवा? आणि मध्यममार्गी भांडवलवाद हवा असला तर तो कस हवा हा प्रश्न आहे. का अजून कुठला मार्ग आहे जो आपण चोखाळलेलाच नाही?

विकास 26/03/2014 - 21:07
सरकारवर अवलंबून आणि स्वतःवर अवलंबून (अर्थात उद्योजकता) यातला फरक समजण्यासाठी खालील चित्रफित पाहीली नसल्यास अवश्य पहावीत:

पैसा 30/03/2014 - 01:25
सगळेच प्रतिसाद वाचनीय आहेत. राजकारण्यांमधे आज डावे उजवे असा फार फरक राहिला नाही. मात्र गरीब-श्रीमंत यातली दरी सतत वाढतच आहे. आपली प्रचंड लोकसंख्या, संपत्तीची अतिविषम वाटणी, भ्रष्टाचार इ गोष्टी पाहता अमेरिकन स्टाईलची पूर्ण खुली अर्थव्यवस्था आपल्याकडे यशस्वीपणे चालणार नाही. सत्तेत डावे येवोत किंवा उजवे, काही प्रमाणात सबसिडी ही चालू रहाणार, ठेवावी लागणार. एकेकाळी भारतीय बनावटीच्या वस्तू कमी दर्जाच्या असल्याने उद्योगांना सरकारी संरक्षण पुरवावे लागत होते. आता तशी परिस्थिती राहिली नाही. भारतीय लोकांनी अनेक मोठमोठ्या परदेशी कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. तरीही औषधे, पेट्रोलियम अशा काही क्षेत्रात किंमतीवर सरकारचे नियंत्रण राहणे आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे असा एक मोठा वर्ग आहे की जो केवळ अशा नियंत्रित किंमती आणि सबसिड्या यांच्या मदतीने तग धरून आहे. आपल्या देशात अफाट साधनसंपत्ती आहे, पण तिचा नियोजनपूर्वक व्यवस्थित उपयोग होत नाही. सरकारी योजना कागदोपत्री अतिशय उत्तम असतात पण त्या योग्य त्या गरजू लोकांपर्यंत पोचत नाहीत. भ्रष्टाचार आणि काळा पैसा कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना झाली पाहिजे. शेजारी देशांच्या कृपेने आपला संरक्षण खर्च हा नेहमी मोठाच रहाणार. त्यासाठीही पैसा नेहमी उपलब्ध करावा लागेलच. लायसन्स राज आता शिल्लक राहिले तर आंतर्राष्ट्रीय स्पर्धेत मागे पडावे लागेल. जागतिकीकरणाच्या रेट्यात आता सर्वच देश सापडले आहेत. त्यात चीनला काही प्रमाणात बाजारीकरण करावे लागले आहे तर अमेरिकेला आर्थिक शिस्त आणावी लागत आहे. पूर्ण उजवी अमेरिका आणि पूर्ण डावा चीन हे दोघेही एका विचित्र परिस्थितीत सापडून आर्थिकदृष्ट्या एकमेकांवर अवलंबून झाले आहेत. हे सगळे पाहता भारताला मधला मार्ग पकडण्याशिवाय गत्यंतर नाही. भारतात रस्ते, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, ऊर्जा, बँका, अन्नधान्य, वितरण या सर्व क्षेत्रात सरकारचे नियंत्रण आवश्यक आहे. दुर्दैवाने त्याचे अंशतः सुद्धा खाजगीकरण केले तर दर्जाचा विचार न करता फक्त नफेखोरीचाच विचार केला जातो. आपले उद्योगधंदे आणि उद्योगपती अजून स्वतःच्या आर्थिक हितापलिकडे काहीही पहायला तयार नसतात. जबरदस्तीने असे खाजगीकरण झालेच तर नाहीरे वाला वर्ग आणखी चेपला जाऊन मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी आणि नक्षलवादाकडे वळू शकतो. हे सगळे टाळण्यासाठी डाव्यांना जरासे उजवे आणि उजव्यांना जरासे डावे व्हावेच लागेल!

In reply to by पैसा

क्लिंटन 30/03/2014 - 10:09
आपले उद्योगधंदे आणि उद्योगपती अजून स्वतःच्या आर्थिक हितापलिकडे काहीही पहायला तयार नसतात.
That's the point. हा मानवी स्वभाव झाला.कोणतीही गोष्ट करताना त्यातून स्वत:ला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात फायदा झाला पाहिजे ही अपेक्षा ९९.९९% लोकांची असते.समाजाचे भले व्हावे म्हणून कोणतीही अपेक्षा न बाळगता काम करणारे लोक फार थोडे असतात हे समोर दिसतेच.अशी निस्वार्थी भावना हृदयातून आली तरच त्याचा उपयोग आहे.ही गोष्ट मारून मुटकून करायची नाही.तेव्हा नुसत्या तोंडदेखल्या समतेला काही अर्थ नाही.ती भावना हृदयापासून यायला हवी.आणि अशी भावना हृदयापासून येणारे लोक फार थोडे असतात. एक उदाहरण म्हणून मागे फेसबुकवर साम्यवाद का यशस्वी होऊ शकत नाही याचे एक अत्यंत चपखल उदाहरण वाचले होते ते इथे देतो.एका वर्गात ४० विद्यार्थी असतात.पहिल्या परिक्षेत विद्यार्थ्यांना ४० पासून १०० पर्यंत मार्क मिळतात आणि सरासरी मार्क असतात ७०.तेव्हा सगळे विद्यार्थी आपल्याला सारखे म्हणून शिक्षक सगळ्यांना सरासरीइतके म्हणजे ७० मार्क देतात.यातून मुळात ७० पेक्षा जास्त मार्क मिळालेले विद्यार्थी नाखूष होतात तर ७० पेक्षा कमी मार्क मिळालेले विद्यार्थी खूष होतात.दुसऱ्या परिक्षेत विद्यार्थ्यांना मार्क मिळतात ३० ते ८० आणि सरासरी असते ५०. हे का होते? पूर्वी जास्त मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना वाटते की आपण जास्त अभ्यास का करावा?नाहीतरी शिक्षक आपले मार्क कमी करून ते इतरांनाच देणार आहेत.तर कमी मार्क मिळालेल्यांना वाटते की आपण तरी अभ्यास का करावा?नाहीतरी शिक्षक आपले मार्क वाढविणार आहेतच.परत शिक्षक सगळ्यांना सरासरीइतके ५० मार्क देतात.तिसऱ्या परिक्षेत सरासरी आणखी कमी होते आणि सगळेच विद्यार्थी नापास होतात. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की आपल्याला काहीतरी मिळावे, आपल्याकडे इतरांपेक्षा वेगळे काहीतरी असावे असे वाटणे हा मानवी स्वभाव झाला.साम्यवादात या मानवी स्वभावाला अनुसरून नसलेली वर्तणूक अपेक्षित असते. वर दिलेल्या उदाहरणात आपण अभ्यास करूनही मार्क इतरांना मिळणार हे माहित असूनही तितकाच अभ्यास करावासा वाटणारे किती विद्यार्थी असतील? अगदी कट्टर डाव्या विचारांमध्ये खाजगी मालमत्तेलाही विरोध असतो.सर्व काही समाजाच्याच मालकीचे असावे असे अजब तर्कट या विचारांमध्ये असते.आज माझ्या नावाने मुंबईत घर नाही म्हणून मला स्वत:ला (आणि माझ्यासारख्या अनेकांना) ते मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा करावासा वाटतो.का? कारण इतरांकडे जी गोष्ट आहे ती माझ्याकडे नाही ही बोचरी जाणीव कुठेतरी असते.रेसमध्ये मागे पडलेले मला आवडणार नाही.पण साम्यवादी व्यवस्थेत कुठेतरी ही बोचरी जाणीव होणे (हा मानवी स्वभाव आहे) या प्रकारालाच कृत्रिमपणे अटकाव केलेला असतो.आणि अशी कृत्रिम पध्दत यशस्वी होऊ शकत नाही.म्हणून ही व्यवस्था लष्कर आणि हुकुमशाहीच्या बळाचा वापर करूनच टिकवावी लागते.ते बळही जिथे अपुरे पडते तिथे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ही व्यवस्था कोसळते हे रशिया आणि पूर्व युरोपमध्ये आपण बघितले आहेच.
भारतात रस्ते, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, ऊर्जा, बँका, अन्नधान्य, वितरण या सर्व क्षेत्रात सरकारचे नियंत्रण आवश्यक आहे.
आता मानवी स्वभावाची दुसरी बाजूही लिहितो.जर unbriddled freedom मिळाले तर सशक्त वर्गाकडून अशक्त वर्गावर अन्याय होणे आणि सशक्त वर्गाला तसा तो करावासा वाटणे हा पण मानवी स्वभावच झाला.तेव्हा मी उजव्या गटातला असलो तरी सरकार या यंत्रणेची गरज मला नक्कीच मान्य आहे.तरीही सरकारने कुठे आपले अस्तित्व दाखवावे? १. ज्या industries मध्ये खाजगीकरण करणे एक तर अयोग्य आहे (संरक्षण,पोलिस) २. ज्या industries मध्ये खाजगीकरण करण्यासाठी लागणारे बिझनेस मॉडेल बनू शकत नाही अशा industries मध्ये.उदाहरणार्थ प्राथमिक शिक्षण.यात फायदा मिळवायचा तर फी वाढविणे आले.तसे झाल्यास फी परवडत नाही म्हणून अनेकांना शिक्षणापासून वंचित ठेवणे आले.तेव्हा समाजाचे व्यापक हित म्हणून प्राथमिक शिक्षणात पूर्णपणे खाजगीकरण करणे योग्य नाही. ३. काही industries मध्ये त्या संस्थांना फायदा होतो त्यापेक्षा जास्त फायदा समाजाला होतो.याला अर्थशास्त्रात Positive externality म्हणतात.उदाहरणार्थ एखाद्या खाजगी कंपनीकडून रस्ता बांधून घेतला तर त्या कंपनीला त्या रस्त्यावरून मिळणाऱ्या टोलमधून उत्पन्न मिळेल.पण रस्ता बांधला म्हणून आजूबाजूच्या गावांचा तिथे जीवनावश्यक गोष्टी वेळेत पोहोचणे इत्यादी फायदा होईल.अशा परिस्थितीत अनेकदा संबंधित रस्त्याकडून मिळणारे उत्पन्न पाहिजे तितके (Return on equity: १६% किंवा अन्य काही) नसेल तर कंपन्या रस्ता बांधायला पुढे येणार नाहीत.तरीही समाजाला मिळणाऱ्या Positive Externalities चा फायदा लक्षात घेऊन सरकार त्या कंपन्यांना Viability Gap Funding करते आणि तसे करणे योग्यही आहे. ४. बॅंकिंग किंवा इतर अनेक उद्योगांमध्ये सरकार असावे असे मला तरी वाटत नाही.तरीही या सगळ्या उद्योगांमध्ये मानवी स्वभावातून कोणाची पिळवणूक होत नाही हे बघण्यासाठी सरकारी regulators असलेच पाहिजेत.उदाहरणार्थ टेलिकॉममध्ये Telecom Regulatory Authority of India आहे किंवा स्टॉक मार्केटमध्ये Securities and Exchange Board of India आहे (सहाराला सेबीने कसा चाप लावला आहे हे आपण बघतच आहोत) किंवा बॅंकिंगमध्ये RBI आहे. याचा अर्थ सरकारने सगळे उद्योग चालवावेत असे नक्कीच नाही.शक्य तिथे खाजगीकरण जरूर झालेच पाहिजे.पण लोकांची लुबाडणुक नको म्हणून असे सरकारी पण स्वायत्त regulators असलेच पाहिजेत. शक्य तिथे खाजगीकरण झाले पाहिजे असे मी का म्हणतो? १. एखादा उद्योग "समाजाच्या" मालकीचा आहे असे आपण म्हणतो तेव्हा "समाज" म्हणजे नक्की कोण? जर एखादा बिझनेस माझ्या मालकीचा आहे तर त्या उद्योगाच्या यशासाठी मी जीव तोडून काम करेन आणि इतरांकडून करवून घेईन.पण "समाजाच्या" मालकीच्या उद्योगात असे कोण करणार? अर्थात सरकारी कंपन्यांमध्ये कोणी कामे करत नाही असे मी नक्कीच म्हणत नाही.पण शेवटी ज्यावेळी "extra mile" जायची गोष्ट येते तेव्हा खाजगी कंपन्यांमध्ये "माझी कंपनी" म्हणून जीव तोडून काम करणारे लोक असतातच.पण आपली नोकरी सुरक्षित आहे आणि जास्त काम केले तरी तितक्या प्रमाणावर परतावा आपल्याला मिळणार नाही या दोन गोष्टी कुठेतरी सरकारी कंपन्यांना अडसर ठरतात असे माझे मत आहे.ते कितपत बरोबर आहे हे माहित नाही. याचे वर्णन करणारे एक चपखल वाक्य आहे--Everybody's business degenerates into nobody's business. २. वर म्हटल्याप्रमाणे कुठल्याही परिस्थितीत लोकांची लुबाडणुक होऊ नये हे ठरवायची जबाबदारी कोणाची?तर ती सरकारची.कारण पोलिस सरकारच्या नियंत्रणात असतात.कायद्याची अंमलबजावणी करायचे mandate पण सरकारलाच असते.तेव्हा सरकारच उद्योग चालवणार (उदाहरणार्थ बॅंका), त्यात काही वरखाली झाले तर त्याचा सरकारच तपास करणार (सरकारी बॅंकांमध्ये गैरप्रकार करून कर्जे दिली जातातच) आणि परत सरकारच पुढील कारवाई करणार यात कुठेतरी conflict of interest आहे असे मला वाटते.समजा भविष्यात कुठल्या तरी सरकारी बॅंकेत मोठा घोटाळा झाला (तसे होतच असतात. अन्यथा सरकारला वरचेवर सरकारी बॅंकांमध्ये equity का टाकावी लागते? पण काही कारणाने त्यावर जास्त चर्चा होत नाही) तर त्याची जबाबदारी कोणाची? अर्थमंत्रालयाची म्हणजेच सरकारचीच.अशा परिस्थितीत सरकार त्या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी करेल का हा प्रश्न विचारायला नक्कीच स्कोप आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे बिझनेस करणारे, नियंत्रण ठेवणारे, तपास करणारे आणि अंमलबजावणी करणारे लोक एकच नकोत.त्यात conflict of interest आहे. तेव्हा मला वाटते की जिथे शक्य होईल तिथे खाजगीकरण आणि सरकारी regulators चे अस्तित्व आणि आर्थिक मंदी आल्यास किनेशिअन इकॉनॉमिक्स प्रमाणे तेवढ्यापुरता हस्तक्षेप अशा स्वरूपाचे सरकारचे अस्तित्व उद्योगांमध्ये असावे. शेवटी It is not government's business to be in business. अगदी कट्टर डावे (किंवा थोडेही डावे) नकोतच पण त्याचबरोबर सरकारी हस्तक्षेप अजिबात नको असे म्हणणारे कट्टर उजवे (ऑस्ट्रियन इकॉनॉमिक्सवाले) पण नकोत.

In reply to by क्लिंटन

पैसा 30/03/2014 - 10:30
साम्यवादाबद्दलचे मार्कांच्या सरासरीचे उदाहरण अतिशय चपखल आहे.
Everybody's business degenerates into nobody's business. It is not government's business to be in business.
हेही खूप आवडले. बँकांमधील conflict of interest बद्दल काही अंशी सहमत आहे. पण पुन्हा खाजगीकरणाबद्दल भीती वाटते ती अपरिपक्व अर्थव्यवस्थेचीच. म्हणजे असं की आज सरकारी बॅंकामधे सरकारला पैसे घालावे लागतात. पण उद्या समजा अशा स्केलची खाजगी बँक खाजगी उद्योगाच्या नाकर्तेपणामुळे बुडाली तर छोट्या ठेवीदारांचे हाल कुत्रे खाणार नाहीत. आणि दुर्दैवाने आपल्याकडे ती शक्यता भरपूर आहे. टाटा बिर्ला यांच्या बँका कार्यक्षमरीत्या चालवल्या जातील खर्‍या पण मल्ल्याने बँक काढली तर? सरकारी बँकांचं दुखणं एन पी ए हे आहे. त्याचं नीट व्यवस्थापन केलं तर सरकारला पैसे गुंतवावे लागणार नाहीत. पण पुन्हा गाडी भ्रष्टाचारापाशीच येते. नवीन कर्जं देताना काय काय प्रकार होतात आणि रिस्क अ‍ॅनालिसिसची कशी काशी केली जाते हे खूप जवळून पाहिले आहे. :( तेच वरिष्ठ दर्जाच्या अधिकार्‍यांच्या नेमणुकी आणि बढत्यांबाबत. सिस्टीम वाईट नाही. पण ती वापरणारी माणसे हा मोठा प्रॉब्लेम आहे.

In reply to by पैसा

क्लिंटन 30/03/2014 - 10:43
पण उद्या समजा अशा स्केलची खाजगी बँक खाजगी उद्योगाच्या नाकर्तेपणामुळे बुडाली तर छोट्या ठेवीदारांचे हाल कुत्रे खाणार नाहीत.
जोपर्यंत रिझर्व्ह बँक हा कडक पर्यवेक्षक आहे तोपर्यंत या गोष्टीची फार भिती बाळगायला नको.आणि रिझर्व्ह बँकेने आपली भूमिका आतापर्यंत तरी उत्तमपणे वठवली आहे.
टाटा बिर्ला यांच्या बँका कार्यक्षमरीत्या चालवल्या जातील खर्‍या पण मल्ल्याने बँक काढली तर?
अर्थातच त्यामुळे रिझर्व्ह बँक मल्ल्याला बँकिंग लायसेन्स देणार नाही :)
सरकारी बँकांचं दुखणं एन पी ए हे आहे. त्याचं नीट व्यवस्थापन केलं तर सरकारला पैसे गुंतवावे लागणार नाहीत.
मागे लोकसत्तामध्ये गिरीश कुबेर यांच्या लेखात म्हटले होते की मोठ्या उद्योगांना कर्ज द्यावे म्हणून सरकारी बँकांच्या डायरेक्टर्सना थेट दिल्लीतून फोन जातात.यातील खरेखोटे काय ते माहित नाही पण अशी कर्जे बुडाली तर ती जबाबदारी सरकारचीच नाही का?मी म्हणतो की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट यातूनच येतो.आपल्याच चुकीची चौकशी सरकार कितपत नि:पक्षपातीपणे करेल?तसे करणारच नाही असे म्हणत नाही पण करेलच याची खात्री नक्कीच नाही.

In reply to by क्लिंटन

मारकुटे 30/03/2014 - 11:20
>>> रिझर्व्ह बँक हा कडक पर्यवेक्षक आहे तोपर्यंत या गोष्टीची फार भिती बाळगायला नको.आणि रिझर्व्ह बँकेने आपली भूमिका आतापर्यंत तरी उत्तमपणे वठवली आहे. अजिबात नाही. रिझर्व बँकेचे धोरण सहकारी बँकांना संपवणे आहे, जेणेकरुन मध्यमवर्गीय आणि गरीबांना केवळ खाजगी बँकांमधे काम करणार्‍या लोकांचे पगार पुरवावे किंवा सावकाराच्या तगाद्यापायी आत्महत्या करावी लागावी.

In reply to by क्लिंटन

पैसा 30/03/2014 - 12:15
रिझर्व्ह बँकेबद्दल शंका आहे. त्यांनी योग्यप्रकारे नियंत्रण केले असते तर सरकारी बँका इतक्या वारंवार संकटात सापडल्या नसत्या. आणि प्रचंड महागाई, चलनवाढ यावर त्यांचे उपाय अजिबात निरुपयोगी ठरले आहेत असंच दिसतं आहे. मल्ल्याला बँकिंग लायसन्स मिळालं तरीही मला आश्चर्य वाटणार नाही!

In reply to by पैसा

क्लिंटन 30/03/2014 - 14:54
रिझर्व्ह बँकेबद्दल शंका आहे. त्यांनी योग्यप्रकारे नियंत्रण केले असते तर सरकारी बँका इतक्या वारंवार संकटात सापडल्या नसत्या.
रिझर्व्ह बँकेचे मॅन्डेट आहे की देशातील बँकिंग सिस्टिम स्थिर राहावी हे.रिझर्व्ह बँक प्रत्येक कर्जाचे प्रपोजल तपासायला जात नाही तर बँकेच्या कर्ज पोर्टफोलिओमध्ये काही कमीजास्त आढळल्यास रिझर्व्ह बँक कारवाई करू शकते. ही कारवाई कोणत्या स्वरूपाची असते?तर दंड लावणे, एकूण किती रक्कम कर्जाऊ द्यावी यावर नियंत्रण ठेवणे (हा आकडा एकूण इक्विटीच्या किती पट रक्कम कर्जाऊ द्यावी यावर मर्यादा असणे असा असतो म्हणजेच जर बँकेने आणखी इक्विटी उभी केली तर बँक किती रक्कम कर्जाऊ देऊ शकेल हा आकडाही वाढेल) आणि अगदीच परिस्थिती हाताबाहेर गेली तर बँकेचे संचालक मंडळाच्या प्रत्येक निर्णयावर अंकुश ठेवणे किंवा बँकिंग लायसेन्स रद्द करणे (हा प्रकार माझ्या माहितीप्रमाणे रिझर्व्ह बँकेला अजून तरी करावा लागलेला नाही.चू.भू.दे.घे) अशा स्वरूपाची कारवाई रिझर्व्ह बँक करू शकते.पण जर एखादी बँक पाहिजे तितकी इक्विटी उभी करत असेल तर अशा बँकेवर किती प्रमाणावर कारवाई रिझर्व्ह बँक करू शकेल याविषयी मी साशंक आहे.कारण जेवढी जास्त इक्विटी बँक उभी करेल तितक्या प्रमाणात ठेवीदार आणि एकूणच बँकिंग सिस्टीम जास्त स्थिर होईल. सरकारी बँकांच्या बाबतीत नेमके हेच घडत आहे.सरकारने बँकिंग सिस्टीममध्ये एकूण किती इक्विटी टाकली आहे याचे आकडे नंतर सविस्तर लिहिनच.पण हे पैसे सरकारचे म्हणजेच तुमच्याआमच्यासारख्या सामान्यांचे असतात.
प्रचंड महागाई, चलनवाढ यावर त्यांचे उपाय अजिबात निरुपयोगी ठरले आहेत असंच दिसतं आहे.
याचे कारण आहे. रिझर्व्ह बँक केवळ मोनेटरी पॉलिसी बघते.केवळ तेवढेच पुरेसे नाही.फिस्कल पॉलिसी सरकारच्या नियंत्रणात असतात.देशात अधिकाधिक पायाभूत सुविधांचा विकास व्हावा, अधिकाधिक गुंतवणुक व्हावी यासाठीचे निर्णय घ्यायचा अधिकार सरकारचा असतो. रिझर्व्ह बँक व्याजाचे दर वाढविण्याशिवाय काही करू शकत नाही पण इतर गोष्टी सरकारच्या नियंत्रणात आहेत ना. सुब्बारावांनी २०१० ते २०१३ या काळात १२-१४ वेळा व्याजाचे दर वाढविले.त्याबद्दल अनेक लोक त्यांच्यावर टिका करतात.अगदी अर्थमंत्री चिदंबरम यांनीही त्यांच्यावर टिका केली आहे.पण सुब्बारावांच्या दृष्टीने विचार केला तर ते दुसरे काय करू शकणार होते? शेवटी रथाचे एकच चाक ते सांभाळत होते.दुसरे सरकारच्या नियंत्रणात होते :(
मल्ल्याला बँकिंग लायसन्स मिळालं तरीही मला आश्चर्य वाटणार नाही!
राजनसाहेब रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत तोपर्यंत तरी असे व्हायची शक्यता नाही :) आणि तसेही ज्या २६ उद्योगांनी मुळात बँकिंग लायसेन्ससाठी अर्ज केला होता त्यापैकी सगळे उद्योग कुठच्या ना कुठच्या स्वरूपात फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्येच आहेत. आणि त्यात आय.डी.एफ.सी, आय.एफ.सी.आय, रेलिगेअर, टाटा, रिलायन्स कॅपिटल इत्यादींचा समावेश आहे. मल्ल्यासारखे शॉडी नाव त्यात नाही :)

In reply to by पैसा

क्लिंटन 03/04/2014 - 10:36
मल्ल्याला बँकिंग लायसन्स मिळालं तरीही मला आश्चर्य वाटणार नाही!
कालच रिझर्व्ह बँकेने आय.डी.एफ.सी आणि बंधन फायनान्स यांना बँकिंग लायसेन्स दिले आहे. आय.डी.एफ.सी ही पायाभूत सुविधांसाठी फायनान्स करणारी संस्था त्या क्षेत्रात अनेक वर्षांपासून आहे. बंधन फायनान्सविषयी मला तरी काहीही माहित नाही. निदान पहिल्या राऊंडमध्ये राजन साहेबांनी रिलायन्स कॅपिटल, आदित्य बिर्ला फायनान्स यांना लायसेन्स दिलेले नाही. (टाटांनी आपला अर्ज आधीच मागे घेतला होता).मला स्वतःला वाटले होते की निदान आदित्य बिर्ला ग्रुप आणि रिलायन्स कॅपिटल यांना तरी फायनान्समधील प्रदिर्घ ट्रॅक रेकॉर्ड आणि ग्रुपचे नाव यावरून नक्कीच लायसेन्स मिळेल. तसे अजून तरी झालेले नाही. नवी लायसेन्स देताना राजन साहेब ताक सुध्दा फुंकून पित आहेत असे आताचे चित्र दिसत आहे हे एका अर्थी चांगलेच आहे. आय.सी.आय.सी.आय लिमिटेड या पायाभूत सुविधांसाठी फायनान्स करणार्‍या संस्थेला आणि एच.डी.एफ.सी लिमिटेड या गृहकर्जे देणार्‍या संस्थेला १९९३-९४ मध्ये बॅंकिंग लायसेन्स मिळाली. त्यातूनच आय.सी.आय.सी.आय आणि एच.डी.एफ.सी या देशातील सर्वात मोठ्या खाजगी बॅंका उदयाला आल्या. अजून १५-२० वर्षांनी आय.डी.एफ.सी बँक तितकी पुढे जाईल का हे काळच सांगेल. :)

In reply to by क्लिंटन

पैसा 03/04/2014 - 11:48
माहितीसाठी धन्यवाद! आय डी एफ सी बद्दल काळ ठरवील! बंधनबद्दल पुढीलप्रमाणे माहिती मिळाली. बांगला देशातील ग्रामीण बँकेच्या मायक्रो फायनान्स मॉडेलवरून ते काम करत आहेत असे दिसते. http://www.business-standard.com/article/finance/bandhan-financial-services-profitable-growth-wide-reach-are-strong-pillars-114040300064_1.html

विजुभाऊ 03/04/2014 - 16:56
मुक्तार्थव्यवस्थेने अर्थव्यवस्थेची फळे ही चार मेट्रोशहरे सोडल्यास इतरत्र पण पसरू लागली. तमाम प्रोफेशनल्स स्वतःची गावे, राज्ये सोडून इतर राज्यांमधे जाऊ लागले. हळूहळू परप्रांतियांना जवळ करणे (कॉस्मोपॉलीटन) हे सर्वत्र वाढू लागले आहे. (अर्थात ही नुसती सुरवात आहे). कुठेतरी नॅशनल ईंटीग्रेशनला ह्या खाजगीकरणामुळे अप्रत्यक्ष फायदा झाला
. हे म्हणणे हे मात्र मला दिवास्वप्न वाटते. बीहार उ.प्र. मधली मंडळी नेहमीच कुठेही जायला तयार असतात. कारण त्यांच्या राज्यात त्यांचे हाल कुत्रे देखील खात नाही. ज्यादिवशी लखनौ पटना विधानसभांत एखादा वीर द्राविडी भाषेत शपथ घेईल तो दिन खरा नॅशनल इंटीग्रेशन दिन असेल. "नॅशनल इंटीग्रेशन" म्हणजे फक्त हिंदीकरण अशाच अर्थाने वापरला जाणारा एक शुगर कोटेड शब्द आहे.

अर्धवटराव 25/03/2014 - 04:11
प्रथम प्रश्न हा येतो कि भारताला डावी विचारसरणी, साम्यवाद, समाजवाद वगैरे टाळता येणं शक्य होतं काय? तर अजीबात नाहि. धर्माच्या बाबतीत सुधारणा झाल्या, सामाजीक सुधारणा झाल्या, राजेरजवाडे जाऊन राजकीय सुधारणा झाल्या... या सगळ्यात कॉमन काय होतं तर एक मक्तेदारी मोडुन दुसरा पसारा मांडायच्या आधिचा संधीकाल. माणसाचा लढुन दमलेला, थकलेला, पण स्वतंत्र मोकळा उष्ण श्वास. आर्थीक सुधारणेच्याबाबतीत देखील हेच होत होतं व हि परिस्थिती डाव्याविचारसरणीला सर्वाधीक पोषक असते...एस्पेशिअली गरीब व विपुल लोकसंखेच्या समाजात/देशात. त्यामुळे भारताचा लंबक डाविकडे झुकणे अगदी अपरिहार्य होते. नेहरुंनी जे काहि आर्थीक आणि राजकीय धोरण अवलंबीलं ते बेस्ट नसलं तरी बेस्ट पॉसीबल होतं त्याकाळात. त्यापलिकडे काहि करण्याच्या परिस्थितीत भारत नव्हताच. नेहरुंना डाव्या विचारसरणीचा भविष्यात पराभव होणार आहे हे कळलं नसेल कदाचीत... आणि त्याकाळात ते कोणालाहि उमगणं शक्य नव्हतं. पण तरिही त्यांनी साम्यवाद असफल झाल्यास बॅकअप प्लॅनचे बिजारोपण करुन ठेवले होते कि काय शंका येते. स्वतः नेहरु चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले होते व श्रीमंतांना देखील देशाची तेव्हढीच काळजी असते जेव्हढी सर्वसामान्य जनतेला, हे ते स्वानुभवाने जाणुन होते. टाटा, बिर्ला, बजाज आदि मंडळींचं एका नव-साम्यवादि राष्ट्रात अदरवाईज जे पतन झालं असतं ते नेहरुंनी होऊ दिलं नाहि. त्यामुळे पुढे मागे जर एखादी विचारसरणी फेल झाली तरी देशाचा कारभार थांबणार नाहि याची तरतूद आपल्या सरकारने (अनावधानाने ??) करुन ठेवली होती कि कसं हा प्रश्न पडतोच. राहिला प्रश्न आज भारताने कुठलं मॉडेल स्विकारावं (हे बघा कुत्सीक मिपाकर... लागले नमो नमो ओरडायला ;) ) साम्यवाद तर अशक्य आहे. तेव्हढं सशक्त केंद्र सरकार बनणार आहे काय येत्या काहि दशकात तरी ?( आता हे बघा आणखी काहि कुत्सीक मिपाकर... लागले केजरीवाल केजरीवाल ओरडायला ;) ) नरसींहराव सरकारने धरणाचे दरवाजे उघडले. ते अफाट पाणि कोण भगिरथ रोखेल आज? गंगेला जटेत बांधुन जनकल्याणाअसाठी तिचा प्रवाह चेनलाईझ करणार्‍या शिवाची आवष्यकता आहे... व जनताजनार्दन हा अवतार घेईलच पुढेमागे. भारताला भारतीय मॉडेलच विकसीत करावं लागेल हे निश्चित. अजुन बरच काहि आहे टंकण्याजोगं. ब्रेक के बाद मिलेंगे :)

आतिवास 25/03/2014 - 08:01
मेधाताईंची ही मुलाखत मी अजून ऐकली/पाहिली नाही त्यामुळे त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते बघावं लागेल. राहता राहिला प्रश्न डाव्या-उजव्याचा. वास्तविक १९६०-७० या काळात डावे आणि उजवे जितके स्पष्ट होते, तितके ते आता राहिले नाहीत जगभरातही. डाव्यांतले उजवे आणि उजव्यांतले डावे; डाव्यांतले मध्यममार्गी आणि उजव्यांतले मध्यममार्गी; कडवे डावे आणि कडवे उजवे आणि कडवे मध्यममार्गी हे विविध विचारप्रवाह नेहमी दिसत आले आहेत राजकारणातही. मला वाटतं साध्य आणि साधन यातल्या कशाला महत्त्व द्यायचं हा केवळ वैचारिक नाही तर नैतिकही मुद्दा आहे. हा 'मध्यममार्ग' फार सापेक्ष असतो अनेकदा म्हणून त्याची व्याख्या करता येत नाही - मला तरी येत नाही. भारतात सत्तेवर कुणीही येवो, त्यांना कडवेपणाची भूमिका घेऊन चालत नाही हे वेळोवेळी दिसलं आहे. त्यामुळे सर्वसमावेशकता अपरिहार्य आहे - पण तसं केलं की 'भूमिका' नाहीशी होण्याचा धोका असतो. मेधाताईंसारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा सक्रिय राजकारणातला प्रवेश मला अत्यंत रोचक वाटतो तो या दृष्टिकोनातून. मूळ तत्त्वे न सोडता थोडी लवचीक भूमिका घेण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे - त्यातून व्यवस्थेत, रचनेत आणि वातावरणात चांगला बदल होईल अशी अपेक्षा मला आहे - ती फार भाबडी आहे याची जाणीव मला आहे, तरीही :-)

In reply to by आतिवास

विकास 25/03/2014 - 08:37
मेधाताईंची ही मुलाखत मी अजून ऐकली/पाहिली नाही त्यामुळे त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते बघावं लागेल. मी तूनळीवर ऐकली आहे. पण तुम्ही त्यावर लेख लिहीणार असल्याने येथे लिहायचे टाळत आहे. मेधाताईंसारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा सक्रिय राजकारणातला प्रवेश मला अत्यंत रोचक वाटतो तो या दृष्टिकोनातून. मूळ तत्त्वे न सोडता थोडी लवचीक भूमिका घेण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे सहमत. किंबहूना त्यांनी हे आधीच करायला हवे होते असे वाटते. आपल्याकडे राजकारणत न जाणे म्हणजे आदर्श असला काहीसा प्रकार आहे. पण त्यातून त्या बाहेर येत असल्या तर उत्तमच आहे आणि स्वागतार्ह आहे. उद्या त्या जर जिंकल्या तर त्यांना सांसदीय राजकारण, त्यात सक्रीय असतानाच्या मर्यादा आणि तडजोडी समजतील आणि आशा आहे की त्यातून त्यांना तुम्ही म्हणता ती लवचिकता येईल. मला वाटतं साध्य आणि साधन यातल्या कशाला महत्त्व द्यायचं हा केवळ वैचारिक नाही तर नैतिकही मुद्दा आहे. बरोबर आहे. फक्त गंमत अशी असते की नैतिकतेची व्याख्या देखील तुम्ही सत्ताकारणात असलात तर ज्या स्तरावर असाल तेथे बदलू शकते. स्वार्थी तडजोड म्हणून नाही तर देशासाठीची priority म्हणून. त्यावर अधिक इथे लिहीत बसत नाही.

नितिन थत्ते 25/03/2014 - 16:43
स्वातंत्र्यानंतर राबवलेल्या धोरणांबाबत एक दुवा. A key principle of the Bombay Plan was that the economy could not grow without government intervention and regulation. Under the assumption that the fledgling Indian industries would not be able to compete in a free-market economy, the Plan proposed that the future government protect indigenous industries against foreign competition in local markets. त्यातील एक इंटरेस्टिंग वाक्य Although Jawaharlal Nehru, the first Prime Minister of India, did not officially accept the plan, "the Nehruvian era witnessed [what was effectively] the implementation of the Bombay Plan; a substantially interventionist state and an economy with a sizeable public sector." स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांना समाजवादाचे आकर्षण होते म्हणून भारत डावीकडे गेला हे सत्य नाही. तत्कालीन उद्योगपतींना (भांडवलदारांना) जे हवे होते तेही लायसन्स-परमिट राजच होते. नेहरूंवर निदान त्या काळात तरी ते पुरेसे डावे नाहीत अशीच टीका होत असे. डाव्या विचारसरणीचे गारुड देशावर इतके होते की तत्कालीन भाजप सुद्धा आपले अधिकृत धोरण म्हणून गांधीवादी समाजवाद असे सांगे.

नगरीनिरंजन 25/03/2014 - 17:22
डाव्या-उजव्यात फार फरक राहिलेला नाही या आतिवास यांच्या मताशी थोडासा सहमत आहे. थोडासाच यासाठी की डाव्या-उजव्यात त्यांचे जाहीरामे सोडल्यास फार फरक कधी नव्हताच असे मला वाटते. डावे-उजवे असे विचारांचे पिजनहोलिंग करता करता या दोन्हीत सामायिक असणारी प्रचंड उतरंडीची औद्योगिक नागरसंस्कृती तीच असताना दोन्हीचा वेगळा परिणाम पाहायला मिळेल ही अपेक्षाच भाबडी होती हे आता लक्षात येत आहे. भारतात तर मिक्सिझम आणला गेला ज्यात गरिबांच्या कल्याणासाठी सरकारने निवडलेले भांडवलदार झटणार होते आणि सरकारी वितरण व्यवस्थेतून बाबू लोक गरिबांना घास भरवणार होते. प्रत्यक्षात भांडवलदारांसाठी समाजवाद व समाजासाठी भांडवलवाद आला आणि रेशनकार्डावर कुपोषण वाटलं गेलं. नेहरु, गांधींना बँकरोल करणार्‍या टाटा-बिर्लांसाठी टेलरमेड अशीच ही व्यवस्था होती. तिकडे भांडवलशाहीच्या मंदिरात म्हणजे अमेरिकेत तमाम समाजाच्या भल्यासाठी टू बिग टू फेल बँकांना आणि कार कंपन्यांना सर्कारी सलाईन लावले गेले आणि भारतीय समाजवादाचा भयंकर द्वेष करणारांनी आपल्या बोक्यांना त्याच समाजवादाचे लोणी खाऊ घातले. थोडा विचार केला तर कळतं की संस्कृतीच्या जन्मापासून डावे-उजवे हा फरक नव्हताच; फरक असेल तर फक्त वरचे आणि खालचे एवढाच होता आणि आहे.

क्लिंटन 25/03/2014 - 23:44
चोप्य-पस्ते मिपावर पूर्वी या संदर्भात लिहिलेले प्रतिसाद चोप्य-पस्ते करतो: १. नेहरूंच्या काळात लायसेन्स/कोटा/परमीट राज होते.आता याचे कारण काय होते?एक उदाहरण देऊन सांगतो.मी लहान असताना काही कारणांनी आमच्या कुटुंबाला काही काळ आर्थिक संकटातून जावे लागले होते.अशी वेळ अनेकांवर येते.त्या काळात जेवायला बाहेर जाणे तर सोडाच घरचे साधे खाणे सोडून इतर काही विशेष नसायचे. त्यावेळी महिन्यातून एक क्रिमच्या बिस्किटांचा पुडा आणला जात असे.त्यातील ८ बिस्किटांपैकी ४ बिस्किटे माझी तर ४ माझ्या बहिणीची असे "रेशनिंग" असे.आता या रेशनिंगचे कारण अगदी उघड होते--रिसोर्सेसची टंचाई. नेमकी अशीच टंचाई नेहरूंच्या काळात सुरवातीला होती आणि म्हणूनच लायसेन्स/कोटा/परमीट राज ठेऊन उपलब्ध रिसोर्सची कोणी व्यर्थ उधळपट्टी करत नाही हे बघणे आणि आहेत ते रिसोर्सेस विविध उद्योगांना पुरवून वापरावे लागत होते.आज मी दिवसाला बिस्कीटांचे १० पुडे विकत घेऊ शकत असेन पण म्हणून ४ बिस्कीटांचे तेव्हाचे रेशनिंग चुकीचे होते असे मला वाटत असेल तर ते अयोग्य आहे.आता भारतीय अर्थव्यवस्थेत हे रेशनिंग किती वर्षे चालू ठेवायला हवे होते? ५/१०/१५/२० की लागली तेवढी ४४ याविषयीची माहिती माझ्याकडे नाही.त्यामुळे त्यावर काहीही भाष्य करत नाही. २. सुरवातीच्या काळात लायसेन्स राज असणे ही पण एक गरज होती. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतात नैसर्गिक साधन-सामुग्री भरपूर होती पण त्यातील tapped resources खूपच कमी होते. तेव्हा परमिट-कोटा-लायसेन्स ठेऊन "रेशनिंग" करणे ओघाने आलेच. आणि हे resource tap करायची क्षमता खूपच कमी खाजगी उद्योगांमध्ये होती तेव्हा सरकारने पुढाकार घेऊन ते काम करायचा प्रयत्न केला हे एका प्रतिसादात म्हटलेच आहे. आता हे लायसेन्स राज कधीतरी काढून टाकणे गरजेचे होतेच. पण ते नक्की कधी करणे योग्य झाले असते (५/१०/२०/३० की प्रत्यक्षात लागली तेवढी ४४ वर्षे) यावर भाष्य करायला माझ्याकडे पुरेशी माहिती नाही तेव्हा त्यावर काहीही लिहित नाही. ३. बहुतेक सर्वच उद्योगांना उत्पादनाचा कोटा ठरवून दिलेला होता. याचे कारण परत तेच-- उपयुक्त Resources ची टंचाई. समजा देशात १०० एकक स्टील, १०० एकक वीज आणि १०० एकक इतर Resources आहेत आणि सगळ्या उद्योगांना आहेत त्याच Resources मध्ये भागवून घ्यायचे आहे. या परिस्थितीत जर बजाजने त्यांना ठरवून दिलेल्या १० पेक्षा जास्त एकक स्टील/वीज वापरली तर त्याचा अर्थ इतर उद्योगांना तेवढे Resources कमी आणि त्या उद्योगांवर परिणाम होणार! कोटा पध्दतीचे मागचे rationale हे होते. आता प्रत्यक्ष बजाजविरूध्दचा खटला नक्की कधी भरला, त्यावेळी कितपत टंचाई होती याची माहिती मला नाही. पण १९४७ नंतरची टंचाई लक्षात घेता कोटा पध्दत आणणे आता वाटते तितके वाईट नव्हते एवढाच माझा मुद्दा आहे. आता तीच धोरणे किती वर्षे राबवायला हवी होती? १९९१ पूर्वीच ती मोडीत काढता आली असती का किंवा मोडीत काढायला हवी होती का या प्रश्नांची उत्तरे द्यायला लागणारी माहिती माझ्याकडे नाही म्हणून त्यावर भाष्य करत नाही. ४. मी स्वतः समाजवादी /साम्यवादी आर्थिक विचारांचा अजिबात पुरस्कर्ता नाही. ज्या शिक्षणसंस्थेला epitome of capitalism असे म्हणता येईल अशा एका शिक्षणसंस्थेत माझे शिक्षण झाले आहे आणि बहुतांशी तेच विचार माझेही आहेत. माझ्या प्रतिसादाचा उद्देश हा की सध्या नेहरूंच्या आर्थिक धोरणांवर टिका करणारे बरेच लोक असतात. माझ्या मते ती टिका १००% समर्थनीय नाही कारण त्या परिस्थितीत उपयुक्त Resources ची टंचाई असताना नेहरूंच्या सरकारने त्या परिस्थितीतून मार्ग काढायला योग्य तेच केले. चर्चा रंगल्यास आणखी लिहिनच.

In reply to by क्लिंटन

नितिन थत्ते 26/03/2014 - 11:59
मार्मिक प्रतिसाद आहे. नेहरूंच्या नंतर किंवा त्यांच्याच शेवटच्या काळात उदारीकरण करावे अशी परिस्थिती आली होती की नाही हे ठाऊक नाही. पण लायसन्स परमिट राजने उद्योगांना सुरक्षितता मिळवून दिली त्याचा उपयोग करून उद्योगांनी आपली केपेबिलिटी आणि कपॅसिटी वाढवायला हवी. पण कपॅसिटी वाढवायला पुन्हा हे लायसन्स परमिट राज आडवे येणार. किंवा सरकारी क्षेत्रातील मूलभूत उद्योगांनी रिसोर्सेसची खनिजे- पोलाद- वीज वगैरे उपलब्धता वाढवायला हवी होती ती वेगाने वाढली नाही असे दिसते. त्यामुळे टंचाईचे चक्र चालूच राहिले. ८० च्या दशकात खर्‍या अर्थाने टंचाईची स्थिती बर्‍यापैकी नियंत्रणात आली होती. त्याच्या अनुषंगाने व्हीपीसिंग-राजीव गांधी यांनी थोडेसे उदारीकरण सुरू केले होते असे दिसेल. पण त्यांनी ड्रास्टिक काही केले नाही. त्या अर्थी उदारीकरणाला पाच ते दहा वर्षे उशीर झाला असू शकेल. धोरण ठरवणे हे देशातील राजकीय परिस्थितीवर सुद्धा अवलंबून असते. १९७५ च्या आधीपासून व्हीपी सिंग पंतप्रधान असेपर्यंतच्या काळात देशातील राजकारणावर डाव्या पक्षांचा खूपच पगडा होता. बंगाल-केरळ येथे ते सत्तेत होते आणि तेव्हाच्या राजकारणात राजकारणात त्यांनी बराच वरचष्मा गाजवला. इंदिरा गांधींचे सरकार ६८ ते ७१ , ७४-७५ मध्ये, मोरारजींचे सरकार, व्हीपीसिंग यांचे सरकार डाव्यांच्या पाठिंब्यावर उभे होते. ही बाब लक्षात घ्यायला हवी. इंदिरागांधींचे पुनरागमन ते राजीव गांधींचे पतन या काळात डाव्यांचा वरचष्मा केंद्रसरकारवर नव्हता. त्या काळात काही सुधारणा झाल्या त्या अर्थातच अपुर्‍या होत्या. नरसिंहरावांच्या काळापर्यंत रशियाची स्थिती उघड झालेली असल्याने तोही फायदा त्यांना झाला. डाव्या विचारसरणीला सोडचिठ्ठी देणे बर्‍यापैकी सोपे झाले. तसेच त्या काळातला प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप उदारीकरणाचा समर्थक होता आणि मशीद पाडणे वगैरे उद्योगात मग्न होता.

In reply to by नितिन थत्ते

मारकुटे 30/03/2014 - 11:16
>>>त्या काळातला प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप उदारीकरणाचा समर्थक होता आणि मशीद पाडणे वगैरे उद्योगात मग्न होता. आणि या शब्दाच्या ठिकाणी म्हणूनच हा शब्द योग्य झाला असता. ९० च्या दशकात भाजपाने लोकांना भुलवून धर्माची आणि राममंदीराची गोळी खाऊ घातली. त्याला व्यवस्थित पद्धतीने कॉग्रेसने वरकरणी विरोध करत साथ दिली. आणि पश्चिमेच्या सत्तांना हवे तसे रान मोकळे दिले. पन्नास वर्षांनंतर व्यवस्थित कळेल की उदारीकरणाने खरोखर भारताला फायदा झाला की असियन टायगर प्रमाणे भुसा भरलेला वाघ हाती आला. जनतेचे लक्ष वेधले जाऊ नये म्हणुन मंदीर मशिद पाडापाडी चालू ठेवले. हवे तसे करार झाल्यावर मुद्दा बासनात गुंडाळला. असो.

In reply to by क्लिंटन

नगरीनिरंजन 03/04/2014 - 05:23
अरुंधती रॉय यांच्या "द डॉक्टर अ‍ॅन्ड द सेंट" या नव्या पुस्तकात गांधी-नेहरुंना पाठबळ देणार्‍या उद्योगपतींना इंग्रजी "ग्लास सीलिंग" आडवे आल्याने स्वातंत्र्याचा जाहीरनामा केला गेला आणि नंतरची मिश्र अर्थव्यवस्था निर्माण करतानाही त्यांचाच विचार घेण्यात आणि करण्यात आला अशा अर्थाचा दावा आहे म्हणे. पुस्तक मी अजून वाचलेलं नाही त्यामुळे खरं-खोटं अरुंधती रॉयना किंवा ज्यांनी पुस्तक वाचलंय त्यांना ठाऊक. तसंही अरुंधती रॉय या काही "तज्ज्ञ" नाहीत बहुतेक.

विटेकर 26/03/2014 - 11:20
श्री. क्लींट्न यांचा प्रतिसाद संतुलीत आणि अभ्यासपूर्ण ! मला व्यक्तिशः साम्यवाद /समाजवाद कधीच पटला नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे तो एत्तदेशीय नाही आणि नैसर्गिक ही नाही. समाज ही व्यवस्था क्रूत्रिम नसून पूर्णपणे नैसर्गिक आहे, जशी व्यक्ती इवॉल्व ( संक्रमित ?) तसाच समाज ही इवोल्व होत असतो, ती एक सहज प्रक्रिया आहे. ती सरकारने निर्माण करु सरकारने नियमघालून द्यायची बाबच नव्हे. व्यक्तिप्रमाणे समाजालाही मन आणि आत्मा असते,अस्मिता असते. व्यक्ति आणि समाज परस्परावर पूर्ण्पणे अवलंबून असतात. समाज व्यक्तिचे पोषण करतो आणि व्यक्ति समाजाला अर्थ प्राप्त करुन देते. समाज जग्व्याळ यंत्र असून व्यक्ती त्याचा एक पूर्जा आहे असा निर्जीव स्म्बंध नसून समाज - व्यक्तिचे अवयव - अवयवी असे संब्ंध असतात. हाताच संबंध डोक्याशी कसा असावा हे बाहेरील व्यक्ती ठरवू शकत नाही तद्वत समाज आणि व्यक्ति याम्चे संबंध हे सरकार थरवू शकत नाही. समाज सरकार च्या मालकीचा नाही. सरकार येतील आणि जातील. समाज युगानुयुगे अक्षुण्ण्पणे चालत राहिल. समाजाचे / व्यक्तिचे आणि पर्यायाने साधनसंपत्तीचे सरकारीकरण केले की व्यक्तिची सृजनशीलता हरवते, कर्तृत्व गोठते आणि आयुष्य बेचव आणि साचे- बंद होत जाते.पर्यायाने समाजाची सृजन्शीलता लयाला जाते आणि संक्रमण थांबते , रोडावते. नेहरुंची "साम्यवादाचे प्रचंड आकर्षण आणि गांधीजींची स्वयंपूर्ण खेडी" यामध्ये मोठी गोची झाली. मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयकरण केल्याने छोटी छोटी स्वंयंपूर्ण देशी व्यवसाय / स्त्रोत हळू हळू नष्ट झाले . पारंपारिक कौशल्य असणारा फार मोठा समाज नव्या जगात एकदम संदर्भहीन झाला. या मोठ्या उद्योगांमुळे तस्ल्याच बेगडी विकासाची भुरळ पडली,भरीला सबसिडीची भूल होतीच ! त्यामुळे आपला विकास झाला असे जे वाटत होते ते वस्तुतः ते तसे नव्हतेच , आणि त्या भौतिक विकासाची फार मोठी किंमत आपण मोजली , खेड्यांचे शहरीकरण झाले आणि शहरांचे बकालीकरण झाले. "मुख्य अर्थ" ( साधन संपत्तीची निर्मिती जसे की शेती, उद्योग )कमी / नाहीसा होऊन "गौण" अर्थाला ( सपोर्ट सर्विसेस, नोकरी , दलाली ) महत्व प्राप्त झाले,श्रमाची प्रतिष्ठा कमी झाली , पैशाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आणि भौतिक समृद्धी वाढली पण जीवनाची गुणवत्ता/कस खालावला. मला असे वाट्ते की महात्माजींचा स्वयंपूर्ण खेडी आणि खेड्याकडे चला ही अर्थव्यवस्थाच खरिखुरी अर्थ व्यवस्था भारतीय होती ! त्याद्वारेच आपला खराखुरा विकास ( संदर्भ - विकासाची भारतीय संकल्पनाhttp://www.misalpav.com/node/25462 हा माझाच लेख - तेवढीच झैरात .. त्याला लै कमी टीआर्पी मिळाला !) झाला असता ! बाकी आता डावे काय किंवा उजवे काय सगळेच "स्वपुत्रपौत्रीअष्ट्पिढीअखंड्धन्वर्षाव -तहहयातछ्त्रचामंडीतसिंहासन" या एकाच विचारसरणीने काम करतात .. विचार केव्हाच सरणावर गेले.

In reply to by विटेकर

नितिन थत्ते 26/03/2014 - 12:04
>>नेहरुंची "साम्यवादाचे प्रचंड आकर्षण आणि गांधीजींची स्वयंपूर्ण खेडी" यामध्ये मोठी गोची झाली. नेहरूंनी स्वयंपूर्ण खेड्यांच्या कल्पनेला कसलेही उत्तेजन दिल्याचे ऐकिवात नाही.

विकास 26/03/2014 - 17:54
चर्चेत माहितीपूर्ण प्रतिसाद येत असल्याने प्रथम सर्वांचे आभार. नेहरूंकाळापासून जो काही समाजवाद चालत आला त्याबद्दल बर्‍याचदा बोलले गेले आहे. नेहरूंच्या राजकारणापेक्षा एकंदरीत राजकारण हाताळण्याच्या क्षमतेसंदर्भामुळे मला त्यांच्याबद्दल काही आक्षेप असले तरी त्यावेळेस सुवर्णमध्य ठेवण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न हा त्याकाळासाठी योग्य होता हेच मी देखील म्हणेन. जर तत्कालीन उद्योगपतींना परमिटराज हवे म्हणून नेहरू सरकार तसे वागले असे म्हणायचे असले तर त्यात त्यांनी समाजवादी असणे जर चूक असे वादापुरते म्हणले, तर त्याहून ही अधिक चूक होती असे म्हणावे लागेल... पण विषय खरेच तो नाही अथवा प्रामाणिकपणे मोदी-केजरीवाल-राहूलगांधी (पक्षी: सध्याची काँग्रेस) हा देखील नाही. म्हणून जाणीवपूर्वक हे सर्व शब्द मी प्रस्तावात टाळले होते अथवा अनुल्लेखाने मारले होते. काळाच्या ओघात एखादी व्यक्ती पंतप्रधान होईल, पक्ष/आघाडी सत्तेवर येईल आणि नंतर राहील अथवा जाईल... त्याचे इतके खरेच विशेष नंतर वाटेनासे होते, पण देश आणि जनतेसाठी पुढे जाण्याच्या ट्रेंड मधे आपण नक्की कसे जात आहोत हा कायम स्वरूपी बघण्याचा प्रश्न रहातो. त्यासाठी कधी कधी डावीकडे झुकणार्‍या (डाव्या नाही) तर कधी कधी उजवीकडे झुकणार्‍या धोरणांचा अवलंब केला जातो. मात्र ते सवय लागल्यानंतरच्या काळात बदलणे अवघड जाते. काही उदाहरणे:
  1. सोव्हीएट रशियात सर्वांना नॅचरल गॅस फुकट मिळायचा! अर्थात अ‍ॅट व्हॉट कॉस्ट हा एका वेगळ्य चर्चेचा मुद्दा आहे. पण जनतेला महीन्याला बिलं भरावी लागत नसत हे वास्तव होते. पुढे सोव्हीएट रशिया पडला, विभागला गेला. युक्रेन सरकारला ते शक्य होईना. मग करायचे काय? एका अर्थी तेच प्रश्न ऑलमोस्ट २५ वर्षांनी आजही अप्रत्यक्षपणे सतावत आहेत.
  2. भांडवलशाही अमेरीकेत: बेरोजगार व्यक्तींना हप्ता मिळणे आणि रोजच्या खाण्यासाठी फुडस्टँप मिळणे चालते. परीणामी अनेक बेरोजगार व्यक्ती आपली बुडं हलवत नाहीत अशी रीपब्लीकन्स ची तक्रार असते. त्यात काही अंशी तथ्य देखील असते. पण त्याच बरोबर हे देखील वास्तव आहे की ह्या श्रीमंत देशातील अनेक ठिकाणी शाळेत जाणार्‍या मुलांना ( ज्यांच्या आईवडीलांना रोजगार मिळतो) एकावेळचे खाणे हे शाळेत मिळणार्‍या सबसिडाईझ्ड रेट वर खावे लागते आणि तेव्हढ्याच खाण्यावर वाढत्या वयात दिवसरात्र रहावे लागते. (यात अतिशयोक्ती दुर्दैवाने अजिबात नाही).
ही दोन टोके आहेत. साम्यवादाने/समाजवादाने गरीबी गेलेली नाही. भांडवलवादाने नक्कीच संपत्ती वाटली गेली पण त्याचबरोबर विषमता पण वाढू लागली आहे. भारतात दिसणारी विषमता ही भयावह होत चालली आहे असे कधी कधी वाटते. पण त्याचे उत्तर हे नक्षलवादी अथवा अगदी बंगाली निष्क्रीय साम्यवाद असू शकत नाही, असे मला वाटते. या सर्व मनातल्या खळबळीतून विचारलेले प्रश्न होते - going forward.. भारत आज तरूण आहे. जर तरूणांनी आउट ऑफ बॉक्स विचार केला नाही तर खरे नाही असे वाटते. भारतापुरते... आज जर मध्यममार्गी समाजवाद हवा असला तर तो नक्की आजच्या काळासाठी कसा हवा? आणि मध्यममार्गी भांडवलवाद हवा असला तर तो कस हवा हा प्रश्न आहे. का अजून कुठला मार्ग आहे जो आपण चोखाळलेलाच नाही?

विकास 26/03/2014 - 21:07
सरकारवर अवलंबून आणि स्वतःवर अवलंबून (अर्थात उद्योजकता) यातला फरक समजण्यासाठी खालील चित्रफित पाहीली नसल्यास अवश्य पहावीत:

पैसा 30/03/2014 - 01:25
सगळेच प्रतिसाद वाचनीय आहेत. राजकारण्यांमधे आज डावे उजवे असा फार फरक राहिला नाही. मात्र गरीब-श्रीमंत यातली दरी सतत वाढतच आहे. आपली प्रचंड लोकसंख्या, संपत्तीची अतिविषम वाटणी, भ्रष्टाचार इ गोष्टी पाहता अमेरिकन स्टाईलची पूर्ण खुली अर्थव्यवस्था आपल्याकडे यशस्वीपणे चालणार नाही. सत्तेत डावे येवोत किंवा उजवे, काही प्रमाणात सबसिडी ही चालू रहाणार, ठेवावी लागणार. एकेकाळी भारतीय बनावटीच्या वस्तू कमी दर्जाच्या असल्याने उद्योगांना सरकारी संरक्षण पुरवावे लागत होते. आता तशी परिस्थिती राहिली नाही. भारतीय लोकांनी अनेक मोठमोठ्या परदेशी कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. तरीही औषधे, पेट्रोलियम अशा काही क्षेत्रात किंमतीवर सरकारचे नियंत्रण राहणे आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे असा एक मोठा वर्ग आहे की जो केवळ अशा नियंत्रित किंमती आणि सबसिड्या यांच्या मदतीने तग धरून आहे. आपल्या देशात अफाट साधनसंपत्ती आहे, पण तिचा नियोजनपूर्वक व्यवस्थित उपयोग होत नाही. सरकारी योजना कागदोपत्री अतिशय उत्तम असतात पण त्या योग्य त्या गरजू लोकांपर्यंत पोचत नाहीत. भ्रष्टाचार आणि काळा पैसा कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना झाली पाहिजे. शेजारी देशांच्या कृपेने आपला संरक्षण खर्च हा नेहमी मोठाच रहाणार. त्यासाठीही पैसा नेहमी उपलब्ध करावा लागेलच. लायसन्स राज आता शिल्लक राहिले तर आंतर्राष्ट्रीय स्पर्धेत मागे पडावे लागेल. जागतिकीकरणाच्या रेट्यात आता सर्वच देश सापडले आहेत. त्यात चीनला काही प्रमाणात बाजारीकरण करावे लागले आहे तर अमेरिकेला आर्थिक शिस्त आणावी लागत आहे. पूर्ण उजवी अमेरिका आणि पूर्ण डावा चीन हे दोघेही एका विचित्र परिस्थितीत सापडून आर्थिकदृष्ट्या एकमेकांवर अवलंबून झाले आहेत. हे सगळे पाहता भारताला मधला मार्ग पकडण्याशिवाय गत्यंतर नाही. भारतात रस्ते, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, ऊर्जा, बँका, अन्नधान्य, वितरण या सर्व क्षेत्रात सरकारचे नियंत्रण आवश्यक आहे. दुर्दैवाने त्याचे अंशतः सुद्धा खाजगीकरण केले तर दर्जाचा विचार न करता फक्त नफेखोरीचाच विचार केला जातो. आपले उद्योगधंदे आणि उद्योगपती अजून स्वतःच्या आर्थिक हितापलिकडे काहीही पहायला तयार नसतात. जबरदस्तीने असे खाजगीकरण झालेच तर नाहीरे वाला वर्ग आणखी चेपला जाऊन मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी आणि नक्षलवादाकडे वळू शकतो. हे सगळे टाळण्यासाठी डाव्यांना जरासे उजवे आणि उजव्यांना जरासे डावे व्हावेच लागेल!

In reply to by पैसा

क्लिंटन 30/03/2014 - 10:09
आपले उद्योगधंदे आणि उद्योगपती अजून स्वतःच्या आर्थिक हितापलिकडे काहीही पहायला तयार नसतात.
That's the point. हा मानवी स्वभाव झाला.कोणतीही गोष्ट करताना त्यातून स्वत:ला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात फायदा झाला पाहिजे ही अपेक्षा ९९.९९% लोकांची असते.समाजाचे भले व्हावे म्हणून कोणतीही अपेक्षा न बाळगता काम करणारे लोक फार थोडे असतात हे समोर दिसतेच.अशी निस्वार्थी भावना हृदयातून आली तरच त्याचा उपयोग आहे.ही गोष्ट मारून मुटकून करायची नाही.तेव्हा नुसत्या तोंडदेखल्या समतेला काही अर्थ नाही.ती भावना हृदयापासून यायला हवी.आणि अशी भावना हृदयापासून येणारे लोक फार थोडे असतात. एक उदाहरण म्हणून मागे फेसबुकवर साम्यवाद का यशस्वी होऊ शकत नाही याचे एक अत्यंत चपखल उदाहरण वाचले होते ते इथे देतो.एका वर्गात ४० विद्यार्थी असतात.पहिल्या परिक्षेत विद्यार्थ्यांना ४० पासून १०० पर्यंत मार्क मिळतात आणि सरासरी मार्क असतात ७०.तेव्हा सगळे विद्यार्थी आपल्याला सारखे म्हणून शिक्षक सगळ्यांना सरासरीइतके म्हणजे ७० मार्क देतात.यातून मुळात ७० पेक्षा जास्त मार्क मिळालेले विद्यार्थी नाखूष होतात तर ७० पेक्षा कमी मार्क मिळालेले विद्यार्थी खूष होतात.दुसऱ्या परिक्षेत विद्यार्थ्यांना मार्क मिळतात ३० ते ८० आणि सरासरी असते ५०. हे का होते? पूर्वी जास्त मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना वाटते की आपण जास्त अभ्यास का करावा?नाहीतरी शिक्षक आपले मार्क कमी करून ते इतरांनाच देणार आहेत.तर कमी मार्क मिळालेल्यांना वाटते की आपण तरी अभ्यास का करावा?नाहीतरी शिक्षक आपले मार्क वाढविणार आहेतच.परत शिक्षक सगळ्यांना सरासरीइतके ५० मार्क देतात.तिसऱ्या परिक्षेत सरासरी आणखी कमी होते आणि सगळेच विद्यार्थी नापास होतात. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की आपल्याला काहीतरी मिळावे, आपल्याकडे इतरांपेक्षा वेगळे काहीतरी असावे असे वाटणे हा मानवी स्वभाव झाला.साम्यवादात या मानवी स्वभावाला अनुसरून नसलेली वर्तणूक अपेक्षित असते. वर दिलेल्या उदाहरणात आपण अभ्यास करूनही मार्क इतरांना मिळणार हे माहित असूनही तितकाच अभ्यास करावासा वाटणारे किती विद्यार्थी असतील? अगदी कट्टर डाव्या विचारांमध्ये खाजगी मालमत्तेलाही विरोध असतो.सर्व काही समाजाच्याच मालकीचे असावे असे अजब तर्कट या विचारांमध्ये असते.आज माझ्या नावाने मुंबईत घर नाही म्हणून मला स्वत:ला (आणि माझ्यासारख्या अनेकांना) ते मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा करावासा वाटतो.का? कारण इतरांकडे जी गोष्ट आहे ती माझ्याकडे नाही ही बोचरी जाणीव कुठेतरी असते.रेसमध्ये मागे पडलेले मला आवडणार नाही.पण साम्यवादी व्यवस्थेत कुठेतरी ही बोचरी जाणीव होणे (हा मानवी स्वभाव आहे) या प्रकारालाच कृत्रिमपणे अटकाव केलेला असतो.आणि अशी कृत्रिम पध्दत यशस्वी होऊ शकत नाही.म्हणून ही व्यवस्था लष्कर आणि हुकुमशाहीच्या बळाचा वापर करूनच टिकवावी लागते.ते बळही जिथे अपुरे पडते तिथे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ही व्यवस्था कोसळते हे रशिया आणि पूर्व युरोपमध्ये आपण बघितले आहेच.
भारतात रस्ते, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, ऊर्जा, बँका, अन्नधान्य, वितरण या सर्व क्षेत्रात सरकारचे नियंत्रण आवश्यक आहे.
आता मानवी स्वभावाची दुसरी बाजूही लिहितो.जर unbriddled freedom मिळाले तर सशक्त वर्गाकडून अशक्त वर्गावर अन्याय होणे आणि सशक्त वर्गाला तसा तो करावासा वाटणे हा पण मानवी स्वभावच झाला.तेव्हा मी उजव्या गटातला असलो तरी सरकार या यंत्रणेची गरज मला नक्कीच मान्य आहे.तरीही सरकारने कुठे आपले अस्तित्व दाखवावे? १. ज्या industries मध्ये खाजगीकरण करणे एक तर अयोग्य आहे (संरक्षण,पोलिस) २. ज्या industries मध्ये खाजगीकरण करण्यासाठी लागणारे बिझनेस मॉडेल बनू शकत नाही अशा industries मध्ये.उदाहरणार्थ प्राथमिक शिक्षण.यात फायदा मिळवायचा तर फी वाढविणे आले.तसे झाल्यास फी परवडत नाही म्हणून अनेकांना शिक्षणापासून वंचित ठेवणे आले.तेव्हा समाजाचे व्यापक हित म्हणून प्राथमिक शिक्षणात पूर्णपणे खाजगीकरण करणे योग्य नाही. ३. काही industries मध्ये त्या संस्थांना फायदा होतो त्यापेक्षा जास्त फायदा समाजाला होतो.याला अर्थशास्त्रात Positive externality म्हणतात.उदाहरणार्थ एखाद्या खाजगी कंपनीकडून रस्ता बांधून घेतला तर त्या कंपनीला त्या रस्त्यावरून मिळणाऱ्या टोलमधून उत्पन्न मिळेल.पण रस्ता बांधला म्हणून आजूबाजूच्या गावांचा तिथे जीवनावश्यक गोष्टी वेळेत पोहोचणे इत्यादी फायदा होईल.अशा परिस्थितीत अनेकदा संबंधित रस्त्याकडून मिळणारे उत्पन्न पाहिजे तितके (Return on equity: १६% किंवा अन्य काही) नसेल तर कंपन्या रस्ता बांधायला पुढे येणार नाहीत.तरीही समाजाला मिळणाऱ्या Positive Externalities चा फायदा लक्षात घेऊन सरकार त्या कंपन्यांना Viability Gap Funding करते आणि तसे करणे योग्यही आहे. ४. बॅंकिंग किंवा इतर अनेक उद्योगांमध्ये सरकार असावे असे मला तरी वाटत नाही.तरीही या सगळ्या उद्योगांमध्ये मानवी स्वभावातून कोणाची पिळवणूक होत नाही हे बघण्यासाठी सरकारी regulators असलेच पाहिजेत.उदाहरणार्थ टेलिकॉममध्ये Telecom Regulatory Authority of India आहे किंवा स्टॉक मार्केटमध्ये Securities and Exchange Board of India आहे (सहाराला सेबीने कसा चाप लावला आहे हे आपण बघतच आहोत) किंवा बॅंकिंगमध्ये RBI आहे. याचा अर्थ सरकारने सगळे उद्योग चालवावेत असे नक्कीच नाही.शक्य तिथे खाजगीकरण जरूर झालेच पाहिजे.पण लोकांची लुबाडणुक नको म्हणून असे सरकारी पण स्वायत्त regulators असलेच पाहिजेत. शक्य तिथे खाजगीकरण झाले पाहिजे असे मी का म्हणतो? १. एखादा उद्योग "समाजाच्या" मालकीचा आहे असे आपण म्हणतो तेव्हा "समाज" म्हणजे नक्की कोण? जर एखादा बिझनेस माझ्या मालकीचा आहे तर त्या उद्योगाच्या यशासाठी मी जीव तोडून काम करेन आणि इतरांकडून करवून घेईन.पण "समाजाच्या" मालकीच्या उद्योगात असे कोण करणार? अर्थात सरकारी कंपन्यांमध्ये कोणी कामे करत नाही असे मी नक्कीच म्हणत नाही.पण शेवटी ज्यावेळी "extra mile" जायची गोष्ट येते तेव्हा खाजगी कंपन्यांमध्ये "माझी कंपनी" म्हणून जीव तोडून काम करणारे लोक असतातच.पण आपली नोकरी सुरक्षित आहे आणि जास्त काम केले तरी तितक्या प्रमाणावर परतावा आपल्याला मिळणार नाही या दोन गोष्टी कुठेतरी सरकारी कंपन्यांना अडसर ठरतात असे माझे मत आहे.ते कितपत बरोबर आहे हे माहित नाही. याचे वर्णन करणारे एक चपखल वाक्य आहे--Everybody's business degenerates into nobody's business. २. वर म्हटल्याप्रमाणे कुठल्याही परिस्थितीत लोकांची लुबाडणुक होऊ नये हे ठरवायची जबाबदारी कोणाची?तर ती सरकारची.कारण पोलिस सरकारच्या नियंत्रणात असतात.कायद्याची अंमलबजावणी करायचे mandate पण सरकारलाच असते.तेव्हा सरकारच उद्योग चालवणार (उदाहरणार्थ बॅंका), त्यात काही वरखाली झाले तर त्याचा सरकारच तपास करणार (सरकारी बॅंकांमध्ये गैरप्रकार करून कर्जे दिली जातातच) आणि परत सरकारच पुढील कारवाई करणार यात कुठेतरी conflict of interest आहे असे मला वाटते.समजा भविष्यात कुठल्या तरी सरकारी बॅंकेत मोठा घोटाळा झाला (तसे होतच असतात. अन्यथा सरकारला वरचेवर सरकारी बॅंकांमध्ये equity का टाकावी लागते? पण काही कारणाने त्यावर जास्त चर्चा होत नाही) तर त्याची जबाबदारी कोणाची? अर्थमंत्रालयाची म्हणजेच सरकारचीच.अशा परिस्थितीत सरकार त्या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी करेल का हा प्रश्न विचारायला नक्कीच स्कोप आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे बिझनेस करणारे, नियंत्रण ठेवणारे, तपास करणारे आणि अंमलबजावणी करणारे लोक एकच नकोत.त्यात conflict of interest आहे. तेव्हा मला वाटते की जिथे शक्य होईल तिथे खाजगीकरण आणि सरकारी regulators चे अस्तित्व आणि आर्थिक मंदी आल्यास किनेशिअन इकॉनॉमिक्स प्रमाणे तेवढ्यापुरता हस्तक्षेप अशा स्वरूपाचे सरकारचे अस्तित्व उद्योगांमध्ये असावे. शेवटी It is not government's business to be in business. अगदी कट्टर डावे (किंवा थोडेही डावे) नकोतच पण त्याचबरोबर सरकारी हस्तक्षेप अजिबात नको असे म्हणणारे कट्टर उजवे (ऑस्ट्रियन इकॉनॉमिक्सवाले) पण नकोत.

In reply to by क्लिंटन

पैसा 30/03/2014 - 10:30
साम्यवादाबद्दलचे मार्कांच्या सरासरीचे उदाहरण अतिशय चपखल आहे.
Everybody's business degenerates into nobody's business. It is not government's business to be in business.
हेही खूप आवडले. बँकांमधील conflict of interest बद्दल काही अंशी सहमत आहे. पण पुन्हा खाजगीकरणाबद्दल भीती वाटते ती अपरिपक्व अर्थव्यवस्थेचीच. म्हणजे असं की आज सरकारी बॅंकामधे सरकारला पैसे घालावे लागतात. पण उद्या समजा अशा स्केलची खाजगी बँक खाजगी उद्योगाच्या नाकर्तेपणामुळे बुडाली तर छोट्या ठेवीदारांचे हाल कुत्रे खाणार नाहीत. आणि दुर्दैवाने आपल्याकडे ती शक्यता भरपूर आहे. टाटा बिर्ला यांच्या बँका कार्यक्षमरीत्या चालवल्या जातील खर्‍या पण मल्ल्याने बँक काढली तर? सरकारी बँकांचं दुखणं एन पी ए हे आहे. त्याचं नीट व्यवस्थापन केलं तर सरकारला पैसे गुंतवावे लागणार नाहीत. पण पुन्हा गाडी भ्रष्टाचारापाशीच येते. नवीन कर्जं देताना काय काय प्रकार होतात आणि रिस्क अ‍ॅनालिसिसची कशी काशी केली जाते हे खूप जवळून पाहिले आहे. :( तेच वरिष्ठ दर्जाच्या अधिकार्‍यांच्या नेमणुकी आणि बढत्यांबाबत. सिस्टीम वाईट नाही. पण ती वापरणारी माणसे हा मोठा प्रॉब्लेम आहे.

In reply to by पैसा

क्लिंटन 30/03/2014 - 10:43
पण उद्या समजा अशा स्केलची खाजगी बँक खाजगी उद्योगाच्या नाकर्तेपणामुळे बुडाली तर छोट्या ठेवीदारांचे हाल कुत्रे खाणार नाहीत.
जोपर्यंत रिझर्व्ह बँक हा कडक पर्यवेक्षक आहे तोपर्यंत या गोष्टीची फार भिती बाळगायला नको.आणि रिझर्व्ह बँकेने आपली भूमिका आतापर्यंत तरी उत्तमपणे वठवली आहे.
टाटा बिर्ला यांच्या बँका कार्यक्षमरीत्या चालवल्या जातील खर्‍या पण मल्ल्याने बँक काढली तर?
अर्थातच त्यामुळे रिझर्व्ह बँक मल्ल्याला बँकिंग लायसेन्स देणार नाही :)
सरकारी बँकांचं दुखणं एन पी ए हे आहे. त्याचं नीट व्यवस्थापन केलं तर सरकारला पैसे गुंतवावे लागणार नाहीत.
मागे लोकसत्तामध्ये गिरीश कुबेर यांच्या लेखात म्हटले होते की मोठ्या उद्योगांना कर्ज द्यावे म्हणून सरकारी बँकांच्या डायरेक्टर्सना थेट दिल्लीतून फोन जातात.यातील खरेखोटे काय ते माहित नाही पण अशी कर्जे बुडाली तर ती जबाबदारी सरकारचीच नाही का?मी म्हणतो की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट यातूनच येतो.आपल्याच चुकीची चौकशी सरकार कितपत नि:पक्षपातीपणे करेल?तसे करणारच नाही असे म्हणत नाही पण करेलच याची खात्री नक्कीच नाही.

In reply to by क्लिंटन

मारकुटे 30/03/2014 - 11:20
>>> रिझर्व्ह बँक हा कडक पर्यवेक्षक आहे तोपर्यंत या गोष्टीची फार भिती बाळगायला नको.आणि रिझर्व्ह बँकेने आपली भूमिका आतापर्यंत तरी उत्तमपणे वठवली आहे. अजिबात नाही. रिझर्व बँकेचे धोरण सहकारी बँकांना संपवणे आहे, जेणेकरुन मध्यमवर्गीय आणि गरीबांना केवळ खाजगी बँकांमधे काम करणार्‍या लोकांचे पगार पुरवावे किंवा सावकाराच्या तगाद्यापायी आत्महत्या करावी लागावी.

In reply to by क्लिंटन

पैसा 30/03/2014 - 12:15
रिझर्व्ह बँकेबद्दल शंका आहे. त्यांनी योग्यप्रकारे नियंत्रण केले असते तर सरकारी बँका इतक्या वारंवार संकटात सापडल्या नसत्या. आणि प्रचंड महागाई, चलनवाढ यावर त्यांचे उपाय अजिबात निरुपयोगी ठरले आहेत असंच दिसतं आहे. मल्ल्याला बँकिंग लायसन्स मिळालं तरीही मला आश्चर्य वाटणार नाही!

In reply to by पैसा

क्लिंटन 30/03/2014 - 14:54
रिझर्व्ह बँकेबद्दल शंका आहे. त्यांनी योग्यप्रकारे नियंत्रण केले असते तर सरकारी बँका इतक्या वारंवार संकटात सापडल्या नसत्या.
रिझर्व्ह बँकेचे मॅन्डेट आहे की देशातील बँकिंग सिस्टिम स्थिर राहावी हे.रिझर्व्ह बँक प्रत्येक कर्जाचे प्रपोजल तपासायला जात नाही तर बँकेच्या कर्ज पोर्टफोलिओमध्ये काही कमीजास्त आढळल्यास रिझर्व्ह बँक कारवाई करू शकते. ही कारवाई कोणत्या स्वरूपाची असते?तर दंड लावणे, एकूण किती रक्कम कर्जाऊ द्यावी यावर नियंत्रण ठेवणे (हा आकडा एकूण इक्विटीच्या किती पट रक्कम कर्जाऊ द्यावी यावर मर्यादा असणे असा असतो म्हणजेच जर बँकेने आणखी इक्विटी उभी केली तर बँक किती रक्कम कर्जाऊ देऊ शकेल हा आकडाही वाढेल) आणि अगदीच परिस्थिती हाताबाहेर गेली तर बँकेचे संचालक मंडळाच्या प्रत्येक निर्णयावर अंकुश ठेवणे किंवा बँकिंग लायसेन्स रद्द करणे (हा प्रकार माझ्या माहितीप्रमाणे रिझर्व्ह बँकेला अजून तरी करावा लागलेला नाही.चू.भू.दे.घे) अशा स्वरूपाची कारवाई रिझर्व्ह बँक करू शकते.पण जर एखादी बँक पाहिजे तितकी इक्विटी उभी करत असेल तर अशा बँकेवर किती प्रमाणावर कारवाई रिझर्व्ह बँक करू शकेल याविषयी मी साशंक आहे.कारण जेवढी जास्त इक्विटी बँक उभी करेल तितक्या प्रमाणात ठेवीदार आणि एकूणच बँकिंग सिस्टीम जास्त स्थिर होईल. सरकारी बँकांच्या बाबतीत नेमके हेच घडत आहे.सरकारने बँकिंग सिस्टीममध्ये एकूण किती इक्विटी टाकली आहे याचे आकडे नंतर सविस्तर लिहिनच.पण हे पैसे सरकारचे म्हणजेच तुमच्याआमच्यासारख्या सामान्यांचे असतात.
प्रचंड महागाई, चलनवाढ यावर त्यांचे उपाय अजिबात निरुपयोगी ठरले आहेत असंच दिसतं आहे.
याचे कारण आहे. रिझर्व्ह बँक केवळ मोनेटरी पॉलिसी बघते.केवळ तेवढेच पुरेसे नाही.फिस्कल पॉलिसी सरकारच्या नियंत्रणात असतात.देशात अधिकाधिक पायाभूत सुविधांचा विकास व्हावा, अधिकाधिक गुंतवणुक व्हावी यासाठीचे निर्णय घ्यायचा अधिकार सरकारचा असतो. रिझर्व्ह बँक व्याजाचे दर वाढविण्याशिवाय काही करू शकत नाही पण इतर गोष्टी सरकारच्या नियंत्रणात आहेत ना. सुब्बारावांनी २०१० ते २०१३ या काळात १२-१४ वेळा व्याजाचे दर वाढविले.त्याबद्दल अनेक लोक त्यांच्यावर टिका करतात.अगदी अर्थमंत्री चिदंबरम यांनीही त्यांच्यावर टिका केली आहे.पण सुब्बारावांच्या दृष्टीने विचार केला तर ते दुसरे काय करू शकणार होते? शेवटी रथाचे एकच चाक ते सांभाळत होते.दुसरे सरकारच्या नियंत्रणात होते :(
मल्ल्याला बँकिंग लायसन्स मिळालं तरीही मला आश्चर्य वाटणार नाही!
राजनसाहेब रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत तोपर्यंत तरी असे व्हायची शक्यता नाही :) आणि तसेही ज्या २६ उद्योगांनी मुळात बँकिंग लायसेन्ससाठी अर्ज केला होता त्यापैकी सगळे उद्योग कुठच्या ना कुठच्या स्वरूपात फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्येच आहेत. आणि त्यात आय.डी.एफ.सी, आय.एफ.सी.आय, रेलिगेअर, टाटा, रिलायन्स कॅपिटल इत्यादींचा समावेश आहे. मल्ल्यासारखे शॉडी नाव त्यात नाही :)

In reply to by पैसा

क्लिंटन 03/04/2014 - 10:36
मल्ल्याला बँकिंग लायसन्स मिळालं तरीही मला आश्चर्य वाटणार नाही!
कालच रिझर्व्ह बँकेने आय.डी.एफ.सी आणि बंधन फायनान्स यांना बँकिंग लायसेन्स दिले आहे. आय.डी.एफ.सी ही पायाभूत सुविधांसाठी फायनान्स करणारी संस्था त्या क्षेत्रात अनेक वर्षांपासून आहे. बंधन फायनान्सविषयी मला तरी काहीही माहित नाही. निदान पहिल्या राऊंडमध्ये राजन साहेबांनी रिलायन्स कॅपिटल, आदित्य बिर्ला फायनान्स यांना लायसेन्स दिलेले नाही. (टाटांनी आपला अर्ज आधीच मागे घेतला होता).मला स्वतःला वाटले होते की निदान आदित्य बिर्ला ग्रुप आणि रिलायन्स कॅपिटल यांना तरी फायनान्समधील प्रदिर्घ ट्रॅक रेकॉर्ड आणि ग्रुपचे नाव यावरून नक्कीच लायसेन्स मिळेल. तसे अजून तरी झालेले नाही. नवी लायसेन्स देताना राजन साहेब ताक सुध्दा फुंकून पित आहेत असे आताचे चित्र दिसत आहे हे एका अर्थी चांगलेच आहे. आय.सी.आय.सी.आय लिमिटेड या पायाभूत सुविधांसाठी फायनान्स करणार्‍या संस्थेला आणि एच.डी.एफ.सी लिमिटेड या गृहकर्जे देणार्‍या संस्थेला १९९३-९४ मध्ये बॅंकिंग लायसेन्स मिळाली. त्यातूनच आय.सी.आय.सी.आय आणि एच.डी.एफ.सी या देशातील सर्वात मोठ्या खाजगी बॅंका उदयाला आल्या. अजून १५-२० वर्षांनी आय.डी.एफ.सी बँक तितकी पुढे जाईल का हे काळच सांगेल. :)

In reply to by क्लिंटन

पैसा 03/04/2014 - 11:48
माहितीसाठी धन्यवाद! आय डी एफ सी बद्दल काळ ठरवील! बंधनबद्दल पुढीलप्रमाणे माहिती मिळाली. बांगला देशातील ग्रामीण बँकेच्या मायक्रो फायनान्स मॉडेलवरून ते काम करत आहेत असे दिसते. http://www.business-standard.com/article/finance/bandhan-financial-services-profitable-growth-wide-reach-are-strong-pillars-114040300064_1.html

विजुभाऊ 03/04/2014 - 16:56
मुक्तार्थव्यवस्थेने अर्थव्यवस्थेची फळे ही चार मेट्रोशहरे सोडल्यास इतरत्र पण पसरू लागली. तमाम प्रोफेशनल्स स्वतःची गावे, राज्ये सोडून इतर राज्यांमधे जाऊ लागले. हळूहळू परप्रांतियांना जवळ करणे (कॉस्मोपॉलीटन) हे सर्वत्र वाढू लागले आहे. (अर्थात ही नुसती सुरवात आहे). कुठेतरी नॅशनल ईंटीग्रेशनला ह्या खाजगीकरणामुळे अप्रत्यक्ष फायदा झाला
. हे म्हणणे हे मात्र मला दिवास्वप्न वाटते. बीहार उ.प्र. मधली मंडळी नेहमीच कुठेही जायला तयार असतात. कारण त्यांच्या राज्यात त्यांचे हाल कुत्रे देखील खात नाही. ज्यादिवशी लखनौ पटना विधानसभांत एखादा वीर द्राविडी भाषेत शपथ घेईल तो दिन खरा नॅशनल इंटीग्रेशन दिन असेल. "नॅशनल इंटीग्रेशन" म्हणजे फक्त हिंदीकरण अशाच अर्थाने वापरला जाणारा एक शुगर कोटेड शब्द आहे.

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ९

स्पार्टाकस ·

In reply to by खटपट्या

स्पार्टाकस 25/03/2014 - 02:55
एव्हरेस्टवर अनेक मृतदेह कित्येक वर्षांपासून पडून आहेत. बारा महिने तेरा त्रिकाळ बर्फ असल्यामुळे हे सर्व देह अनेकदा उत्तम स्थितीतती आढळून येतात. १९२४ साली नाहीशा झालेल्या जॉर्ज मॅलरीचा मृतदेह कॉनरॅड अ‍ॅन्करला १९९९ मध्ये दिसून आला होता.

In reply to by खटपट्या

आत्मशून्य 25/03/2014 - 13:19
इतकी सुरेख, अभ्यासपुर्ण लेखमाला नक्किच मिपाचे भुषण आहे असे वाटते. संपादकांनी याची दखल घ्यायलाच हवी.

In reply to by खटपट्या

स्पार्टाकस 25/03/2014 - 02:55
एव्हरेस्टवर अनेक मृतदेह कित्येक वर्षांपासून पडून आहेत. बारा महिने तेरा त्रिकाळ बर्फ असल्यामुळे हे सर्व देह अनेकदा उत्तम स्थितीतती आढळून येतात. १९२४ साली नाहीशा झालेल्या जॉर्ज मॅलरीचा मृतदेह कॉनरॅड अ‍ॅन्करला १९९९ मध्ये दिसून आला होता.

In reply to by खटपट्या

आत्मशून्य 25/03/2014 - 13:19
इतकी सुरेख, अभ्यासपुर्ण लेखमाला नक्किच मिपाचे भुषण आहे असे वाटते. संपादकांनी याची दखल घ्यायलाच हवी.
एव्हरेस्टच्या वायव्य धारेवर तिबेटच्या बाजूने चढाई करण्यासाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस आणि जपानी फुकोका मोहीमेव्यतिरिक्त इतरही अनेक मोहीमा शिखरावरील चढाईसाठी तळ ठोकून होत्या. मात्रं यापैकी कोणीही १०-११ मे रोजी चढाईचा प्रयत्न केला नव्हता ! इंग्लंडच्या चॅनल ४ - हिमालयन किंगडमची मोहीम एव्हरेस्टच्या पायथ्याला होती. सायमन लोवेच्या नेतृत्वाखालील या मोहीमेचं प्रमुख उद्दीष्ट ब्रिटीश अभिनेता ब्रायन ब्लेस्डच्या एव्हरेस्टवरच्या चढाईचं चित्रीकरण हे होतं. गाजलेला ब्रिटीश गिर्यारोहक अ‍ॅलन हिंक्स या मोहीमेचा भाग होता.

शिद्दत

वेल्लाभट ·

नगरीनिरंजन 24/03/2014 - 20:46
आज आपण बहुतांश माणसं यंत्रवत झालो आहोत. आपण केवळ करायच्या म्हणून गोष्टी करतो. शिकायचं म्हणून शिकतो, राबायचं म्हणून राबतो, पैशाशिवाय चालत नाही म्हणून पैसे कमवतो, लोकांशी बोलायचं म्हणून बोलतो, खायचं म्हणून खातो, हात जोडायचे म्हणून जोडतो, नाव घ्यायचं म्हणून घेतो. आपल्या बोलण्यात गोडवा नाही, नात्यांत ओलावा नाही, डोळ्यासमोर ध्येय नाहीत, कृतीमागे विचार नाही, विचारांना उंची नाही, भावनांना पाया नाही, तत्वांना महत्व नाही, आहारात सत्व नाही, दुस-याप्रत सद्भावना नाही, स्वत:चा असा चेहरा नाही, एकूणच कशालाच काहीच अर्थ नाही.
त्याकाळी लोकांचं बरं होतं, इंग्रजांसारखा दृश्य शत्रू आणि स्वराज्यासारखं उदात्त ध्येय होतं. आताचा शत्रू आपणच आहोत आणि पुढच्या पिढीसाठी चांगलं जग निर्माण करणे वा राखणे हे ध्येय आहे. पण स्वतःविरुद्ध कोण लढणार? मंकी ट्रॅपमध्ये अडकलेल्या माकडासारखे आपण फक्त किंचाळत असतो झालं.

नगरीनिरंजन 24/03/2014 - 20:46
आज आपण बहुतांश माणसं यंत्रवत झालो आहोत. आपण केवळ करायच्या म्हणून गोष्टी करतो. शिकायचं म्हणून शिकतो, राबायचं म्हणून राबतो, पैशाशिवाय चालत नाही म्हणून पैसे कमवतो, लोकांशी बोलायचं म्हणून बोलतो, खायचं म्हणून खातो, हात जोडायचे म्हणून जोडतो, नाव घ्यायचं म्हणून घेतो. आपल्या बोलण्यात गोडवा नाही, नात्यांत ओलावा नाही, डोळ्यासमोर ध्येय नाहीत, कृतीमागे विचार नाही, विचारांना उंची नाही, भावनांना पाया नाही, तत्वांना महत्व नाही, आहारात सत्व नाही, दुस-याप्रत सद्भावना नाही, स्वत:चा असा चेहरा नाही, एकूणच कशालाच काहीच अर्थ नाही.
त्याकाळी लोकांचं बरं होतं, इंग्रजांसारखा दृश्य शत्रू आणि स्वराज्यासारखं उदात्त ध्येय होतं. आताचा शत्रू आपणच आहोत आणि पुढच्या पिढीसाठी चांगलं जग निर्माण करणे वा राखणे हे ध्येय आहे. पण स्वतःविरुद्ध कोण लढणार? मंकी ट्रॅपमध्ये अडकलेल्या माकडासारखे आपण फक्त किंचाळत असतो झालं.
लेखनप्रकार
गेल्या महिन्यात सावरकर जयंती होऊन गेली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपलं आयुष्य समर्पित केलेल्या असंख्य सेनांनीपैकी हा एक सेनानी, विनायक दामोदर सावरकर. एक युगपुरुषच म्हणावा लागेल; एक देवाचा अवतार. असीम देशभक्ती आणि ध्येयाचा पुतळा. अंदमान मधील तुरुंगात असताना त्यांनी जे हाल सोसले, ते वाचतानाही अंगावर काटा येतो. त्यांनी ते प्रत्यक्ष कसे सोसले असतील त्यांनाच ठाऊक. असेच आतोनात हाल भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या प्रत्येक क्रांतिकारकाने कमी अधिक प्रमाणात सोसले होते.

विकासक्रम भाषा आणि लिपीचा!

माहितगार ·

मारकुटे 28/03/2014 - 07:28

मनोहर भिडें

अनुस्वार देण्याची पद्धत बंद झाली आहे. जुनं ते सोनं अशा पद्धतीने अजूनही आडनावानंतर अनुस्वार देण्याची आणि तसे बोलतांना अनुस्वारासह उच्चार करण्याची पेठेतील नगांची पद्धत केवळ डोक्यात जाते. १८ व्या शतकात जगणारी माणसे अजुनही पाचहजारवर्षांपुर्वी मरुन बेपत्ता झालेल्या भाषेचा अभिमान बाळगत जगतात कशी हा मला पडलेला प्रश्न आहे.

In reply to by मारकुटे

सुनील 28/03/2014 - 08:53
लोकसत्ताच्या जालीय आवृत्तीत पाहिले असता भिडे असाच शब्द दिसला, भिडें असा नव्हे. तेव्हा हा अनुस्वार माहितगार यांच्याकडून (अनवधानाने) पडला आहे काय? छापील आवृत्ती अद्याप पाहिलेली नाही.

In reply to by सुनील

माहितगार 28/03/2014 - 09:40
टायपो बद्दल क्षमस्व ! (बाकी भिडेंनी त्यांच्या लेखनात जुन्या पद्धतीच्या अनुस्वार लेखनाचा अवलंबही केला असावा असे वाटते पण तो वेगळा मुद्दा आहे.)

मारकुटे 28/03/2014 - 07:28

मनोहर भिडें

अनुस्वार देण्याची पद्धत बंद झाली आहे. जुनं ते सोनं अशा पद्धतीने अजूनही आडनावानंतर अनुस्वार देण्याची आणि तसे बोलतांना अनुस्वारासह उच्चार करण्याची पेठेतील नगांची पद्धत केवळ डोक्यात जाते. १८ व्या शतकात जगणारी माणसे अजुनही पाचहजारवर्षांपुर्वी मरुन बेपत्ता झालेल्या भाषेचा अभिमान बाळगत जगतात कशी हा मला पडलेला प्रश्न आहे.

In reply to by मारकुटे

सुनील 28/03/2014 - 08:53
लोकसत्ताच्या जालीय आवृत्तीत पाहिले असता भिडे असाच शब्द दिसला, भिडें असा नव्हे. तेव्हा हा अनुस्वार माहितगार यांच्याकडून (अनवधानाने) पडला आहे काय? छापील आवृत्ती अद्याप पाहिलेली नाही.

In reply to by सुनील

माहितगार 28/03/2014 - 09:40
टायपो बद्दल क्षमस्व ! (बाकी भिडेंनी त्यांच्या लेखनात जुन्या पद्धतीच्या अनुस्वार लेखनाचा अवलंबही केला असावा असे वाटते पण तो वेगळा मुद्दा आहे.)
लोकप्रभा मासिकाच्या २८ मार्च करताच्या अंकात विकासक्रम भाषा आणि लिपीचा! हा मनोहर भिडेंचा माहितीपूर्ण लेख आला आहे. यात प्राच्य विद्येच्या अंगाने भाषा आणि लिपींच्या विकास क्रमाचा विचार केला आहे. यातील सातव्या मुद्द्यात ऋग्वेद पुर्व कालीन संस्कृत भाषेचा प्रमाण भाषा म्हणून विकास कसा केला गेला असावा याचे ससंदर्भ रोचक विवेचन आले आहे.

निमंत्रण --- आई आणि मी.. मस्त टीम!

इनिगोय ·

कोकण. मस्त जागा निवडलीत. बजेट सुद्धा ओके आहे. कोणी उत्सुक दिसले तर कळवेन नक्की. सर्वांसाठी म्हणून एक शंका या वयोगटात एखाद्या आईला दोन मुले असल्यास?

In reply to by तुमचा अभिषेक

इनिगोय 24/03/2014 - 12:54
आई आणि दोन मुलं असं असेल तर ९००० इतका खर्च येईल. अशा स्थितीत किमान वयाची अट थोडी शिथिल करणंही शक्य आहे.

आत्मशून्य 24/03/2014 - 20:00
हां प्रकार माझ्या आईने माझ्याबाबत केला आहे. ती आणी तिच्या निवडक मैत्रिणी त्यांच्या पोराबाळान्ना घेउन ट्रिपा आखत असत. अर्थातच कुणालाच पोराङ्क्डे फार लक्ष द्यावे वाटत नसे व आमची ओळ्ख करुण दिल्यावर एकत्र खेळा यला लाउन महिला बर्ग त्यांच्या हसने खिदळ्ने गप्पा टप्पा करत आख्खा दिवस घालवत असे. आम्हीमुले उगाच आम्हालाही विनोद कळ्तो हे भास्वायाचा क्षीण यत्न करत त्यांच्या विराट विकट विनोदान्ना सर्व समजले आशा पध्दतीने मान डोल्वत हसत असू. फार्मज्या यायची. नवे सवंगडी भेटले

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 24/03/2014 - 23:57
तसंच ही सहल नसून शिबीर आहे, याची स्पष्ट कल्पना असू द्यावी.
याची कल्पना होतीच म्हणुनच वरिल प्रतिसाद लिहला आहे... लहान पोराला काय कळते सहल आणि शिबीरातील फरक ? का त्यानीही ही सहल नसुन शिबीर आहे याची दखल घेऊन विशीष्ट वर्तन करणे अपेक्षीत आहे ? जाता जाता.. वॉल्ट डिस्ने थिम पार्क बांधत होता, जेंव्हा बांध्काम चालु असे तेंव्हा तो वरचेवर तेथील ठिकाणांना भेट देत असे... तेव्हां भले इन्जिनीअर्स, तंत्रज्ञ, मोठ मोठ मोठ्या व्यक्ती सोबत असुनही तो बोलता बोलता मधेच गुढग्यावर रांगायला लागत असे.... त्याचे असे वर्तन पाहुन न राहुन एकाने शेवटी विचारलेच काय हो महाशय आपण मधेच का गुढग्यावर रांगता... त्याने फक्त एव्हडेच सांगितले मी थिमपार्क लहान मुलांसाठी बांधतोय... तेंव्हा त्यांच्या नजरेतुन तो कसा दिसतो हे बघायचे असेल तर मला गुढघ्यावर रांगतच फेरि मारायला नको काय ?

michmadhura 25/03/2014 - 13:45
माझ्या मते गुढघ्यावर रांगतच फेरि मारण्यापेक्षा त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या मनात जे एक लहान मूल असतं, त्याच्या नजरेने बघायला हवं होतं. आणि फार जुन्या मानसिकता आजही लागू असतीलच असं नाही. पोरांना टाकून सहली करणार्‍या आया आजकाल केसरीच्या ' माय फेअर लेडी' सारख्या सहली करतात की. संकल्पना कळली नसेल तर निदान तिच्या विरोधी मत तरी जाहीर करू नये. इनि, मला यायला खूप आवड्ले असते, पण माझी पिल्लू लहान आहे अजून.

In reply to by michmadhura

आत्मशून्य 25/03/2014 - 13:58
माझ्या मते गुढघ्यावर रांगतच फेरि मारण्यापेक्षा त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या मनात जे एक लहान मूल असतं, त्याच्या नजरेने बघायला हवं होतं.
ओह! आय सी... वाल्ट डिस्नेका तो चुक्याच म्ह्ट्लं पाहिजे. तरिही उसगावात असाल तर डिस्नेवर्ल्ड ला भेट द्याय्ला विसरु नका.
संकल्पना कळली नसेल तर निदान तिच्या विरोधी मत तरी जाहीर करू नये.
मी कोणतेही विरोधी मत प्रकट केलेले नाही हे समजुन घेतले तर बरे होइल अन्यथा मी जे व्यक्त केलय ते आपणास क्ळाले नसल्यास त्याचे जाहिर प्रदर्शन करु नये ही विनंती.

इनिगोय 25/03/2014 - 21:59
काल आणि आज दिवसभरात या शिबिरासाठी नाव नोंदवू इच्छिणार्या बर्याच जणांनी/जणींनी संपर्क साधला.. इतक्या जणांपर्यंत हा उपक्रम पोचवता आला, त्याबद्दल मिपाचे आभार! ज्यांना अजूनही यात सहभागी व्हायचंय त्यांनी लवकर संपर्क साधावा, ही विनंती. पंधरापेक्षा अधिक नावं नोंदवली गेली (तसे होण्याची शक्यता दिसतेय) तर दोन शिबीरं घेता येतील.

लीलाधर 27/03/2014 - 23:39
माझ्या गावाला शिबिर घेतेय्स फारच छान आनंद झाला. जयगड नांदिवडे कर्र्हाटेश्वर फिरून आण हो त्या दरम्यान तेथे असेन तर मीही सहपरिवार हजेरी लावेन हो संकल्पना आवडल्या गेली आहे.

लीलाधर 27/03/2014 - 23:40
माझ्या गावाला शिबिर घेतेय्स फारच छान आनंद झाला. जयगड नांदिवडे कर्र्हाटेश्वर फिरून आण हो त्या दरम्यान तेथे असेन तर मीही सहपरिवार हजेरी लावेन हो संकल्पना आवडल्या गेली आहे.

मनिष 28/03/2014 - 00:00
बापाने काय घोडे मारले आहे? वडिलांबरोबरही असे एखादे शिबीर आयोजित करता नाही का येणार? खरं तर आईपेक्षाही बापाची वेगळी ओळख होण्ञाची आणि त्याचा पुरेसा वेळ मिळण्याची जास्त गरजा आहे असे मला वाटते. असो! किंवा मग आई-वडील दोघांनाही येऊ द्या की!

In reply to by बॅटमॅन

अहो आयोजन करणार्‍या बहुदा सगळ्या स्वतः आया असतील.. त्यांना बायकांना मॅनेज करणं सोप्प आणि कंफर्टेबल वाटत असेल.. जनरली परगावी १०-१५ पुरुषांना नेण्यापेक्षा बायकांना नेणं त्यांना सेफ वाटत असेल.. किंवा इमोशनली त्यांना आई-मुल हे बाँडिंग जास्त रिलेट करता येत असल्याने त्या दृष्टीने शिबीरात काय उपक्रम घ्यायचे हे ठरवणं त्यांना सोपं जाईल पण बाप्-मुल ह्या नात्याच्या दृष्टीने घ्यायचे उपक्रम त्यांना कदाचित तेवढे रिलेट करता येणार नसतील.. अशी काहीही १०० कारणं असु शकतात.. शिवाय "आमचं शिबीर..आमची मर्जी" हे मुख्य कारण असुच शकतं ना! मुद्दाम काही घडत नाहीये ना, मग कशाला असले प्रश्न काढायचे..?

In reply to by पिलीयन रायडर

आत्मशून्य 28/03/2014 - 15:21
हेच बोलतो म्हणतो. अभिनव कल्पनेचे कवतुक करायचे सोडून उलट लोक पण काहीही कमेंट टाकत असतात शिंचे... अशाने का राम राज्य येणार आहे की ब्रेन ड्रेन थांबणार आहे कि जनतेचे भले होणार आहे की मिपा प्रगल्भ बनणार आहे .... लोकांना पण ना कळतच नै धागा कोणाचा आपण कशाचा अन आपण कमेन्ट काय लिहतोय.... बर गप वाचुन पोसिटिव बोलता येत नसेल तर शांत रहावे ना आले मोटे मत व्यक्त करायला... उचलले बोट लावले कळफ्ल्काला बाप काय रोजच पोरगं सान्भाल्तो हवं नको ते बघतो कधी आईला ती संधी दया की राव.. ..

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 29/03/2014 - 15:06
मुद्दाम काही घडत नाहीये ना, मग कशाला असले प्रश्न काढायचे..?
म्हणजे पडलेला प्रश्नही बोलून दाखवायचा नसेल तर तसं सांगा हो. नै म्हणजे डिस्क्लेमर लावलेला बरा की पुरुषांनी प्रतिक्रिया देणे वर्ज्य आहे इ.इ.इ.? मुद्दाम काही घडो न घडो, प्रश्न विचारला की आभाळ कोसळल्यागत करण्याचे कारण समजले नाही. प्रतिक्षिप्त क्रियेगत वाक्य पाहून चिकार करमणूक मात्र झाली.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन 29/03/2014 - 15:20
शिवाय धागा कुणाचा आणि पुढेपुढे कोण करतंय ते पाहून तर अजूनच करमणूक झाली. स्वयंघोषित प्रवक्तेपद सगळीकडे मिरवू लागले की त्याचं हसं होतं.

सुनील 28/03/2014 - 14:15
हेतू स्तुत्य परंतु आई-मूल टीम असे घडण्याची शक्यता कमी! १५ आया आणि त्यांची पोरे असे दोन प्रमुख गट पडतील. खेरीज, १५ असल्यामुळे प्रत्येक गटात किमान ३ उपगटदेखिल पडतील!! आयांचा गट आपल्या गप्पाटप्पांत (सांसदीय शब्द!) मग्न तर पोरे-टोरे खेळण्यात गुंग!!! सहल शिबिर संपल्यावर जर कुणी प्रांजळपणे वृत्तांत लिहिलाच तर याचा प्रत्यय येईलच!!!! टीप - असे दोन गट पडण्यात चूक काहीच नाही किंबहुना असे होणे हेच नैसर्गिक आहे. असो, शुभेच्छा!

कोकण. मस्त जागा निवडलीत. बजेट सुद्धा ओके आहे. कोणी उत्सुक दिसले तर कळवेन नक्की. सर्वांसाठी म्हणून एक शंका या वयोगटात एखाद्या आईला दोन मुले असल्यास?

In reply to by तुमचा अभिषेक

इनिगोय 24/03/2014 - 12:54
आई आणि दोन मुलं असं असेल तर ९००० इतका खर्च येईल. अशा स्थितीत किमान वयाची अट थोडी शिथिल करणंही शक्य आहे.

आत्मशून्य 24/03/2014 - 20:00
हां प्रकार माझ्या आईने माझ्याबाबत केला आहे. ती आणी तिच्या निवडक मैत्रिणी त्यांच्या पोराबाळान्ना घेउन ट्रिपा आखत असत. अर्थातच कुणालाच पोराङ्क्डे फार लक्ष द्यावे वाटत नसे व आमची ओळ्ख करुण दिल्यावर एकत्र खेळा यला लाउन महिला बर्ग त्यांच्या हसने खिदळ्ने गप्पा टप्पा करत आख्खा दिवस घालवत असे. आम्हीमुले उगाच आम्हालाही विनोद कळ्तो हे भास्वायाचा क्षीण यत्न करत त्यांच्या विराट विकट विनोदान्ना सर्व समजले आशा पध्दतीने मान डोल्वत हसत असू. फार्मज्या यायची. नवे सवंगडी भेटले

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 24/03/2014 - 23:57
तसंच ही सहल नसून शिबीर आहे, याची स्पष्ट कल्पना असू द्यावी.
याची कल्पना होतीच म्हणुनच वरिल प्रतिसाद लिहला आहे... लहान पोराला काय कळते सहल आणि शिबीरातील फरक ? का त्यानीही ही सहल नसुन शिबीर आहे याची दखल घेऊन विशीष्ट वर्तन करणे अपेक्षीत आहे ? जाता जाता.. वॉल्ट डिस्ने थिम पार्क बांधत होता, जेंव्हा बांध्काम चालु असे तेंव्हा तो वरचेवर तेथील ठिकाणांना भेट देत असे... तेव्हां भले इन्जिनीअर्स, तंत्रज्ञ, मोठ मोठ मोठ्या व्यक्ती सोबत असुनही तो बोलता बोलता मधेच गुढग्यावर रांगायला लागत असे.... त्याचे असे वर्तन पाहुन न राहुन एकाने शेवटी विचारलेच काय हो महाशय आपण मधेच का गुढग्यावर रांगता... त्याने फक्त एव्हडेच सांगितले मी थिमपार्क लहान मुलांसाठी बांधतोय... तेंव्हा त्यांच्या नजरेतुन तो कसा दिसतो हे बघायचे असेल तर मला गुढघ्यावर रांगतच फेरि मारायला नको काय ?

michmadhura 25/03/2014 - 13:45
माझ्या मते गुढघ्यावर रांगतच फेरि मारण्यापेक्षा त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या मनात जे एक लहान मूल असतं, त्याच्या नजरेने बघायला हवं होतं. आणि फार जुन्या मानसिकता आजही लागू असतीलच असं नाही. पोरांना टाकून सहली करणार्‍या आया आजकाल केसरीच्या ' माय फेअर लेडी' सारख्या सहली करतात की. संकल्पना कळली नसेल तर निदान तिच्या विरोधी मत तरी जाहीर करू नये. इनि, मला यायला खूप आवड्ले असते, पण माझी पिल्लू लहान आहे अजून.

In reply to by michmadhura

आत्मशून्य 25/03/2014 - 13:58
माझ्या मते गुढघ्यावर रांगतच फेरि मारण्यापेक्षा त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या मनात जे एक लहान मूल असतं, त्याच्या नजरेने बघायला हवं होतं.
ओह! आय सी... वाल्ट डिस्नेका तो चुक्याच म्ह्ट्लं पाहिजे. तरिही उसगावात असाल तर डिस्नेवर्ल्ड ला भेट द्याय्ला विसरु नका.
संकल्पना कळली नसेल तर निदान तिच्या विरोधी मत तरी जाहीर करू नये.
मी कोणतेही विरोधी मत प्रकट केलेले नाही हे समजुन घेतले तर बरे होइल अन्यथा मी जे व्यक्त केलय ते आपणास क्ळाले नसल्यास त्याचे जाहिर प्रदर्शन करु नये ही विनंती.

इनिगोय 25/03/2014 - 21:59
काल आणि आज दिवसभरात या शिबिरासाठी नाव नोंदवू इच्छिणार्या बर्याच जणांनी/जणींनी संपर्क साधला.. इतक्या जणांपर्यंत हा उपक्रम पोचवता आला, त्याबद्दल मिपाचे आभार! ज्यांना अजूनही यात सहभागी व्हायचंय त्यांनी लवकर संपर्क साधावा, ही विनंती. पंधरापेक्षा अधिक नावं नोंदवली गेली (तसे होण्याची शक्यता दिसतेय) तर दोन शिबीरं घेता येतील.

लीलाधर 27/03/2014 - 23:39
माझ्या गावाला शिबिर घेतेय्स फारच छान आनंद झाला. जयगड नांदिवडे कर्र्हाटेश्वर फिरून आण हो त्या दरम्यान तेथे असेन तर मीही सहपरिवार हजेरी लावेन हो संकल्पना आवडल्या गेली आहे.

लीलाधर 27/03/2014 - 23:40
माझ्या गावाला शिबिर घेतेय्स फारच छान आनंद झाला. जयगड नांदिवडे कर्र्हाटेश्वर फिरून आण हो त्या दरम्यान तेथे असेन तर मीही सहपरिवार हजेरी लावेन हो संकल्पना आवडल्या गेली आहे.

मनिष 28/03/2014 - 00:00
बापाने काय घोडे मारले आहे? वडिलांबरोबरही असे एखादे शिबीर आयोजित करता नाही का येणार? खरं तर आईपेक्षाही बापाची वेगळी ओळख होण्ञाची आणि त्याचा पुरेसा वेळ मिळण्याची जास्त गरजा आहे असे मला वाटते. असो! किंवा मग आई-वडील दोघांनाही येऊ द्या की!

In reply to by बॅटमॅन

अहो आयोजन करणार्‍या बहुदा सगळ्या स्वतः आया असतील.. त्यांना बायकांना मॅनेज करणं सोप्प आणि कंफर्टेबल वाटत असेल.. जनरली परगावी १०-१५ पुरुषांना नेण्यापेक्षा बायकांना नेणं त्यांना सेफ वाटत असेल.. किंवा इमोशनली त्यांना आई-मुल हे बाँडिंग जास्त रिलेट करता येत असल्याने त्या दृष्टीने शिबीरात काय उपक्रम घ्यायचे हे ठरवणं त्यांना सोपं जाईल पण बाप्-मुल ह्या नात्याच्या दृष्टीने घ्यायचे उपक्रम त्यांना कदाचित तेवढे रिलेट करता येणार नसतील.. अशी काहीही १०० कारणं असु शकतात.. शिवाय "आमचं शिबीर..आमची मर्जी" हे मुख्य कारण असुच शकतं ना! मुद्दाम काही घडत नाहीये ना, मग कशाला असले प्रश्न काढायचे..?

In reply to by पिलीयन रायडर

आत्मशून्य 28/03/2014 - 15:21
हेच बोलतो म्हणतो. अभिनव कल्पनेचे कवतुक करायचे सोडून उलट लोक पण काहीही कमेंट टाकत असतात शिंचे... अशाने का राम राज्य येणार आहे की ब्रेन ड्रेन थांबणार आहे कि जनतेचे भले होणार आहे की मिपा प्रगल्भ बनणार आहे .... लोकांना पण ना कळतच नै धागा कोणाचा आपण कशाचा अन आपण कमेन्ट काय लिहतोय.... बर गप वाचुन पोसिटिव बोलता येत नसेल तर शांत रहावे ना आले मोटे मत व्यक्त करायला... उचलले बोट लावले कळफ्ल्काला बाप काय रोजच पोरगं सान्भाल्तो हवं नको ते बघतो कधी आईला ती संधी दया की राव.. ..

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 29/03/2014 - 15:06
मुद्दाम काही घडत नाहीये ना, मग कशाला असले प्रश्न काढायचे..?
म्हणजे पडलेला प्रश्नही बोलून दाखवायचा नसेल तर तसं सांगा हो. नै म्हणजे डिस्क्लेमर लावलेला बरा की पुरुषांनी प्रतिक्रिया देणे वर्ज्य आहे इ.इ.इ.? मुद्दाम काही घडो न घडो, प्रश्न विचारला की आभाळ कोसळल्यागत करण्याचे कारण समजले नाही. प्रतिक्षिप्त क्रियेगत वाक्य पाहून चिकार करमणूक मात्र झाली.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन 29/03/2014 - 15:20
शिवाय धागा कुणाचा आणि पुढेपुढे कोण करतंय ते पाहून तर अजूनच करमणूक झाली. स्वयंघोषित प्रवक्तेपद सगळीकडे मिरवू लागले की त्याचं हसं होतं.

सुनील 28/03/2014 - 14:15
हेतू स्तुत्य परंतु आई-मूल टीम असे घडण्याची शक्यता कमी! १५ आया आणि त्यांची पोरे असे दोन प्रमुख गट पडतील. खेरीज, १५ असल्यामुळे प्रत्येक गटात किमान ३ उपगटदेखिल पडतील!! आयांचा गट आपल्या गप्पाटप्पांत (सांसदीय शब्द!) मग्न तर पोरे-टोरे खेळण्यात गुंग!!! सहल शिबिर संपल्यावर जर कुणी प्रांजळपणे वृत्तांत लिहिलाच तर याचा प्रत्यय येईलच!!!! टीप - असे दोन गट पडण्यात चूक काहीच नाही किंबहुना असे होणे हेच नैसर्गिक आहे. असो, शुभेच्छा!
उन्हाळी सुट्टी म्हणजे कैर्‍या, आंबे, कॅरम, पत्ते, भटकंती आणि अर्थातच उन्हाळी शिबीरही! त्यातून हे शिबीर जर आई आणि मूल या दोघांसाठीही असेल तर? ६ ते १४ वर्षे वयाच्या मुलांना आपल्या आईची वेगळी ओळखही यातून घडेल आणि एरवी आईचा पुरेसा न मिळणारा वेळही मनसोक्त मिळेल.

नरेन्द्र (मोदी) वर्सीस नरेन्द्र (रावत)

संतोषएकांडे ·

रमेश आठवले 24/03/2014 - 11:44
मोदी हे वाराणसी आणि बडोदे या दोन ठिकाणावरून निवडून आले आणि पन्तप्रधान झाले तर ते बडोदा न निवडता वाराणसी चे प्रतिनिधित्व स्वीकारतील असा माझा तर्क आहे.मोदी अहमेदाबाद पूर्व च्या जागेवरून ही लढू शकले असते. ते सध्या विधानसभेत ज्या भागाचे प्रतिनिधी आहेत तो मणीनगर भाग या लोकसभेच्या जागेत समाविष्ट आहे. परंतु अडवाणींना खेटून उभे रहावयास लागू नये म्हणून त्यांनी बडोदा निवडले असावे. ते लवकरच बडोद्याची जागा सोडतील आणि बडोद्याला फक्त त्याच्या हितास जपणारा लोक प्रतिनिधी आणखी सहा एक महिन्यात मिळेल असे वाटते.

सुनील 24/03/2014 - 12:08
मोदी हे वाराणसी आणि बडोदे या दोन ठिकाणावरून निवडून आले आणि पन्तप्रधान झाले तर ते बडोदा न निवडता वाराणसी चे प्रतिनिधित्व स्वीकारतील असा माझा तर्क आहे
आणि पंतप्रधान न झाले तर वाराणसी न निवडता बडोद्याचे प्रतिनिधित्व करतील असाही तर्क आहे काय?

रमेश आठवले 25/03/2014 - 22:55
नुकत्याच आलेल्या बातमीनुसार नरेंद्र रावत यांनी मोदींविरुद्ध लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस चे जनरल सेक्रेटरी आणि राज्यसभेवर गुजरातच्या कोन्ग्रेस कोट्या मधून निवडून आलेले आणि म्हणून सेफ असलेले मधुसूदन मिस्त्री हे बडोद्यात निवडणूक लढणार आहेत.

रमेश आठवले 24/03/2014 - 11:44
मोदी हे वाराणसी आणि बडोदे या दोन ठिकाणावरून निवडून आले आणि पन्तप्रधान झाले तर ते बडोदा न निवडता वाराणसी चे प्रतिनिधित्व स्वीकारतील असा माझा तर्क आहे.मोदी अहमेदाबाद पूर्व च्या जागेवरून ही लढू शकले असते. ते सध्या विधानसभेत ज्या भागाचे प्रतिनिधी आहेत तो मणीनगर भाग या लोकसभेच्या जागेत समाविष्ट आहे. परंतु अडवाणींना खेटून उभे रहावयास लागू नये म्हणून त्यांनी बडोदा निवडले असावे. ते लवकरच बडोद्याची जागा सोडतील आणि बडोद्याला फक्त त्याच्या हितास जपणारा लोक प्रतिनिधी आणखी सहा एक महिन्यात मिळेल असे वाटते.

सुनील 24/03/2014 - 12:08
मोदी हे वाराणसी आणि बडोदे या दोन ठिकाणावरून निवडून आले आणि पन्तप्रधान झाले तर ते बडोदा न निवडता वाराणसी चे प्रतिनिधित्व स्वीकारतील असा माझा तर्क आहे
आणि पंतप्रधान न झाले तर वाराणसी न निवडता बडोद्याचे प्रतिनिधित्व करतील असाही तर्क आहे काय?

रमेश आठवले 25/03/2014 - 22:55
नुकत्याच आलेल्या बातमीनुसार नरेंद्र रावत यांनी मोदींविरुद्ध लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस चे जनरल सेक्रेटरी आणि राज्यसभेवर गुजरातच्या कोन्ग्रेस कोट्या मधून निवडून आलेले आणि म्हणून सेफ असलेले मधुसूदन मिस्त्री हे बडोद्यात निवडणूक लढणार आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाजपाच्या तीसर्या यादीत नरेन्द्रमोदी वडोदराहून नीवडणूक लढणार हे निश्चित झाल्यावर वडोदरा शहर-जिल्ल्याची लोकं खूपच एक्साइट आहेत. अमदावाद, वडोदरा, राजकोट, सुरत आणी गांधीनगर अशा पाच जागे वरचे भाजपा कार्यकर मोदींची मागणी करुन त्यांना प्रचंड बहुमतांने विजयी करुन देण्याची खात्री पटवून देत होते. पण शेवट फाइनल शिक्का वडोदरावर लागला. कदांचीत मोदींच्या डाव्या हाताच्या पहिल्या दोन बोटांचा तो प्रताप असावा. स्वतःच्या प्रत्येक रेलीत मोदी डाव्या हाताचे दोन बोटं वी च्या शप मधे उचलून वी फॉर वीकटरी असं म्हणत उजव्या हाताने लोकांचं अभिवादन करत असतात.

सुखाची चाहूल... आगमन ... अवर्णनीय !

तुमचा अभिषेक ·

किसन शिंदे 24/03/2014 - 00:48
आत्तापर्यंत आयुष्यात बरीच वेगवेगळी नाती निभावली असशील, पण हे नातं खूप वेगळं आणि स्पेशल आहे!! :)
कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ...
जबराट वाक्य!

अर्धवटराव 24/03/2014 - 02:51
अभिनंदन रे मित्रा... तुम्हा दोघांचे हार्दीक अभिनंदन. मुलगीच हवि होती आणि मुलगीच झाली म्हणुन त्रिवार स्पेशल अभिनंदन :) आयला...सर्व बाप लोकांची स्टोरी जवळपास सारखीच असते काय... मलाहि "तो" दिव्य दिवस अजुनही आठवतोय. एरवी कितीही मोठा आवाज अंमळ उशीरा ऐकु येणारी मी त्यादिवशी मात्र कसा काय एलर्ट होतो कोण जाणे. चिरंजीवांचा ट्यांहा मी ऐकला आणि "झालं" म्हणुन सर्वांकडे आनंदाने पाहिलं. बाकि सगळ्यांना काहिच ऐकु आलं नव्हतं...पण दोन सेकंदात नर्स बाईंनी बाहेर येऊन गुडन्युज सांगितली... च्यायला...माझं पुराण काय लाऊन बसलोय. अभ्या... लेका. बाप झालास. एंजोय माडी :)

In reply to by अर्धवटराव

बरखा 24/03/2014 - 15:09
अभिषेक जी प्रथम तुम्हा दोघांचे हार्दीक अभिनंदन.. अर्धवटराव , तुमच्या या वाक्यात आमचे हे फिट बसत नाहीत. "आयला...सर्व बाप लोकांची स्टोरी जवळपास सारखीच असते काय... मलाहि "तो" दिव्य दिवस अजुनही आठवतोय". कारण या दिव्य दिवसाच्या दिवशी त्या॑ना आम्हि ऑफिसात पाठवले होते. घर्च्या॑च्या म्हणन्यानुसार प्रसुतिच्या वेळेला आई आणी नव-याने जवळ असु नये, त्या मुळे बाईला मोकळ व्हायला त्रास होतो अस काही सा॑गितल्या मुळे प्रसुति होइ पर्यन्त त्या॑ना कही सा॑गितले नाही. त्या दिवशी दवाखान्यत प्रसुति खोली बाहेर येर- झा-या घालायला मिळ्यल्या नाहीत म्हणुन अजुन बोलणी खावी लगतात.

In reply to by बरखा

अर्धवटराव 25/03/2014 - 03:37
होतं असं कधि कधि(च) :) मी पण त्यादिवशी ओटी मेधे का गेलो नाहि याचा पश्चात्ताप होतो कधि कधि. पण त्या डॉक्टरबाईंनी आत येऊ दिलं असतं काय हा हि प्रश्न होताच. शिवाय सी-सेक्शन प्रोसेसमधे चिरंजीवांना थोडी दुखापत झाली. त्याला डोक्याला दोनचार टाके घातले जन्मल्याबरोबर... छातीवरपण भलामोठा ओरखंडा. मी ते सहन केलं असतं काय माहित नाहि.

हार्दिक 'अभि'नंदन. ती प्रतिक्षा, ती काळजी, ते अवघडलेपण सर्व..सर्व शब्दांत उतरलं आहे. नशिबवान आहात. बाप झालात तो क्षण ऑपरेशन थिएटराबाहेरच अनुभवला. मी तर दूर देशी अनुभवला. मोजून ८ दिवस, किती? ८ दिवस तणावात काढले होते. बाळ जन्मल्यानंतर ८ दिवसांनी पत्राद्वारे मला बातमी मिळाली होती. असो. तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन.

रेवती 24/03/2014 - 04:18
अरे वा! अभिनंदन! छान बातमी.लेखनही आवडले. अनेकांना आपापल्या मुलांच्या जन्मकथा आठवणार हे नक्की!

आई बाबा आणि तुमच्या नव्या गर्ल फ्रेंड चे होणारे मूल दोघांचे असताना त्रास हा फक्त आईलाच होतोय या विचाराने दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेवर हा नक्कीच अक्सर इलाज ठरला असता. कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ... जबरदस्त

होणारे मूल दोघांचे असताना त्रास हा फक्त आईलाच होतोय या विचाराने दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेवर हा नक्कीच अक्सर इलाज ठरला असता. कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ...
अतिशय नेमके.... पुढचे ६ महिने, आयुष्यातील सगळ्यात सोनेरी ६ महिने....एक एक क्षण आसुसून घालवा...बाकी सगळे म्हणजे सगळे दुय्यम .. तुम्हा दोघांना शुभेच्छा आणि त्या चिमुकलीचे मन:पूर्वक स्वागत !!

अजया 24/03/2014 - 09:05
आवडलच! माझ्या याच क्षणांच्या वेळी आलेली अस्वस्थता घालवण्यासाठी अथर्वशिर्ष म्हणत बसलेला नवरा आठवला. नर्सने बाळ हातात दिल्यावर एकदम थरथरायला लागलेला !!

इनिगोय 24/03/2014 - 09:21
आवड्या! मस्त जमलाय लेख. शादी के साईड इफेक्टस् मधली विद्या बालन म्हणते 'वुई आर प्रेग्नंट..!' त्याची आठवण झाली. :D तुम्हा दोघांनाही हॅप्पी पेरेंटिंग :)

राही 24/03/2014 - 10:16
अतिशय मनमोकळे आणि हृद्य लिखाण. तुमच्या राजकन्येला तिच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. मुलगी चालती, बोलती, धावती होईपर्यंतचा प्रत्येक क्षण रसरसून अनुभवा. जमतील तितके वाढीच्या तिच्या प्रत्येक टप्प्याचे क्षण नैसर्गिकरीत्या (मुद्दाम पोझ द्यायला न लावता) कॅमेराबद्ध करा. तिच्या सोळाव्या वर्षापर्यंत पुरेल असा एक भक्कम अल्बम आणून त्यात तिच्या प्रत्येक वाढदिवसाचे काही फोटो डकवत रहा. मुले मोठी होऊन दूर गेली की असे फोटो हा मोठा विरंगुळा असतो आपला अन त्यांचाही, एक दस्त-ऐवज म्हणून.

In reply to by राही

सुबोध खरे 24/03/2014 - 10:30
+१ दर महिन्याच्या वाढदिवसाला एक छोटासा व्हिडीओ काढून ठेवा आणि दर वर्हाची सीडी तयार करून ठेवा. मुलगी मोठी झाली कि तिचे लहानपण फार आठवत राहते. हे दिवस परत येत नाहीत. दर महिन्याच्या वाढदिवसाला एक छोटासा व्हिडीओ काढून ठेवा आणि दर वर्हाची सीडी तयार करून ठेवा. मुलगी मोठी झाली कि तिचे लहानपण फार आठवत राहते. हे दिवस परत येत नाहीत. बायकोकडे पुढील काही दिवस जरा जास्त लक्ष द्या. तिला आपली आता जास्त गरज आहे. पोस्टपारटम डिप्रेशन(post partum depression)कडे लक्ष ठेवा. बाळंत पणामुळे मनस्थिती फार नाजूक झालेली असते. शिवाय आत्तापर्यंत डोहाळे आणि कोडकौतुक झाले असते आणि एकदम सर्व जण तिच्याकडे दुर्लक्ष करतात. (आकर्षणाचा केंद्रबिंदू आता दुसरा असतो).बाळाच्या कोडकौतुकात बाळन्तिणीकडे दुर्लक्ष होते कोणत्याही वैद्यकीय सल्यासाठी व्यनी केलात तरी चालेल.

विज्ञानाने वा वैद्यकीय शास्त्राने कितीही प्रगती केली तरी कोणाचे शारीरीक दुखणे वाटून घेण्याचा शोध लागेल तेव्हा ती खरी क्रांती.
हे विशेष आवडले...

आमचे दिवस भरत आलेत, अन् तुम्ही टेन्शन दिलं राव... वाचता वाचता डोळे अलगद पाणावले, हे सुद्धा लक्षात नाही आलं. -(अलिकडे थोडा संवेदनशील झालेला) पैलवान

सूड 24/03/2014 - 10:28
तुमच्या आजपर्यंतच्या लेखातील सर्वोत्तम लेख. अभिनंदन !! मनापासून लिहीलंय हे वाक्यावाक्याला जाणवतंय. >>कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ... सबंध लेखात हे एक वाक्य भाव खाऊन गेलंय. :)

दिव्यश्री 24/03/2014 - 11:13
अभिनंदन हो तुमच्या सगळ्या कुटुंबाचे . . आधी सुरवातीला मलाच धडधडले , अक्षरशः हात थरथरले म्हणून शेवटचा परिच्छेद (भाग ?) आधी वाचला . तरी थोडा वेळ ...असो . बाकी लेख नेहमीप्रमाणे मस्तच . खूप छान लिहिता तुम्ही . कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ...>>>याचा थोडासा वाईट अनुभव घेतलाय . :(

मी_आहे_ना 24/03/2014 - 12:00
अभिनंदन रे! अगदी आमच्या बाळाच्या जन्मावेळचे ६ वर्षांपूर्वीचे स्वगत वाचतोय असंच वाटत होतं आणि तो क्षण अन् क्षण अनुभवला. पुन्हा अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा!

michmadhura 24/03/2014 - 12:17
खूप छान लिहिलय. माझी मुलगी ३१ जानेवारीला झाली पण मी २६ जानेवारी पासून फेर्‍या मारत होते, सगळं अगदी तेच, आज परत आठवलं. ऑपरेशन थेटरमधून बाहेर येताना हसतही होते नी रडतही होते, तेव्हाचा नवर्‍याचा चेहरा आजही आठवतो.

बाबा पाटील 24/03/2014 - 12:20
नशिबवान आहेस लेका,पहिली कन्या झाली.लेकीची माया कार्ट्यांना येत नाही.माझ्या दोन्ही कन्यांच्या जन्माच्या वेळेस मी ओ.टी.मध्येच होतो.ते कापसाचे गोळे माझ्याच हातात पहिल्यांदा आले होते.बायकोकडे लक्ष देण्याएवजी मी वेड्यासारखे पिल्लाकडे पाहात होतो.बायको शुद्धीवर येण्यासाठी दोन्ही वेळेस ४ ते ६ तासांचा वेळ लागला होता.तो पर्यंत सिरींजने लॅक्टोजनचे फिड मिच माझ्या लेकींना दिले होते.आणी पोरींनीही बापाचा स्पर्श बहुतेक बरोबर ओळखला होता.त्या ही न रडता निवांत सिरंजने दुध ओढत होत्या.हे क्षण मी आयुष्यात कधीच विसरु श़कणार नाही.

In reply to by बाबा पाटील

बाकी प्रतिसाद आवडला पण लेकीची माया कार्ट्यांना येत नाही. ह्या वाक्यासाठी निषेध. मुलंही भरपूर माया करतात आई-वडिलांच्या आजारपणात, शेवटच्या क्षणांमध्ये ढसाढसा रडतात. माझा मुलगाही भरपूर माया करतो. ती ओळखणं आपल्याला जमायला हवं.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे 25/03/2014 - 10:37
एकदम सहमत. मला एक मुलगा आणी मुलगी आहे( परमेश्वरकृपेने). मुलगी आपल्या भावनांचे प्रदर्शन करू शकते मुलगे कदाचित करू शकत नाहीत. माझा मुलगा लोणावळ्याला सहलीला गेला होता. मला चिक्की आवडते म्हणून त्याला पिकनिकला दिलेल्या सगळ्या पैशाच्या तो चिक्क्या घेऊन आला. स्वतः साठी एकही पैसा खर्च न करता. माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

In reply to by प्रभाकर पेठकर

बाबा पाटील 25/03/2014 - 11:59
कारण मला दोन्ही लेकीच आहेत आणी त्यांच्यासाठी मी आनी माझ्यासाठी त्या सर्वस्व आहेत.जर कधी एखादी मिटींग लेट नाइट चालली आणी मला घरी यायला रात्रीचे १-२ वाजले तरी माझी सहा वर्षाची लेक जागीच असते,पपल्या का आला नाही,आजपर्यंत असंख्य वेळा समाजावुन झाले बाळा झोपत जा पण नाही जोपर्यंत मी पोहचत नाही तो पर्यंत ती आणी तीचे आजोबा वाट पहात असतात ,मग आता मिच रात्रीच्या मिटींग्ज पुर्णपणे बंद करुन टाकल्या,दहाच्या आत घरात.कदाचित सुपुत्र असता तर त्याने इतकी काळजी घेतली असती की नाही कुनास ठाउक्,की माझ्यासारखाच नग झाला असता.....!

In reply to by बाबा पाटील

सुबोध खरे 25/03/2014 - 12:52
बाबासाहेब आपल्याला व्यक्तिगत नाही परंतु जर आपण "मुलगा" असल्याने आपल्या आई वडिलांची काळजी घेत नसाल तर वरील म्हणणे मान्य होईल. आमच्या घरी जेंव्हा असा वाद होतो तेंव्हा आम्ही आमच्या बायकांना हेच सांगतो कि आम्ही दोघे भाऊ आमच्या आईवडिलांची काळजी व्यवस्थित घेतो आहोत तर मुलगी असल्याने काय मोठी क्रांती झाली असती? जर मुलगा सुनेच्या ताटाखालचे मांजर असून आईवडिलांकडे दुर्लक्ष करत असेल आणि सून सासू सासर्यांकडे बघत नसेल तर सुनेच्या आईवडिलांनी तिच्या वर केलेल्या संस्कारांचा दोष आहे असेच मी म्हणेन. माझ्या अतिशय जवळच्या माहितीतील एक भाभा अणुकेंद्रातील शास्त्रज्ञ चार मुली असूनही वृद्धाश्रमात मरण पावले आणि मृत्युसमयी त्यांच्याकडे तीन कोटीची(वडिलोपार्जित आणि स्वकष्टार्जित) संपत्ती होती. पस्तीस लाख रुपयांची एक मुदत ठेव होती. हे गृहस्थ आपल्या सर्वात धाकट्या मुलीला विनवीत होते कि तुझ्या घरात एका कोपर्यात पडून राहीन काही मागणार नाही पण मला वृद्धाश्रमातून घरी घेऊन चल. त्यांच्या वैद्यकीय खर्च सुद्धा सरकारच करीत होते तरीही हि परिस्थिती आहे.चारही मुलींकडे तीन तीन महिने काढत असताना पुण्याच्या मुलीने घरी कटकट नको म्हणून पुण्यातच कोणत्यातरी वृद्धाश्रमात ठेवले होते. आता त्यांच्या संपत्तीवरून चारही जावयात /मुलीत वाद चालू आहेत. याचे तात्पर्य एकच- मुलगा काय मुलगी काय म्हातारपणी कोण विचारेल हे सांगता येत नाही. मला केवळ मुली आहेत म्हणून माझे म्हातारपण मजेत जाईल हा आशावाद फोल आहे.

In reply to by सुबोध खरे

बाबा पाटील 25/03/2014 - 13:23
मुला मुलीत फरक करायचाच नसतो,आणी आमच्यात तो कधीच झाला नाही.मी माझ्या कुटुंबात १२-१३ माणसे एकत्रच राहतो. आईवडील माझ्या घरात नव्हे तरे मी त्यांच्यात राहतो.त्यामुळे तुम्ही म्हणता तसे बाकीचे विषयच उद्भवत नाहीत्,असो. प्रत्येक व्यक्तीपरत्वे फरक पडतो,वडिलोपार्जित मालमत्तेविषयी बोलाल तर मागच्या वर्षी आमच्या पुर्ण खानदानाची साधारण १५० एकराची खातेफोड झाली तेंव्हा माझ्या सख्या ४ आत्या व एक बहिण आणी चुलत १४ आत्या व २० चुलत बहिणी यातील एकीनेही हक्कसोड करताना एका शब्दाने देखिल विचारले नाही.की कुठे सही करायची,ज्या दुय्यम उपनिबंधकाच्या ऑफिसमध्ये हा व्यवाहार झाला तो देखिल वेडा झाला म्हटला माझ्या आजपर्यंतच्या कार्यकिर्दीत हा पहिले खातेफोड आहे की जे एका दिवसात संपले.बाकी काय सांगु....मग समानता याच्यापेक्षा आणखी काय असते.

In reply to by बाबा पाटील

यशोधरा 25/03/2014 - 20:02
शास्त्रज्ञ आणि त्यांच्या म्हातारपणात त्यांना जे भोगायला लागले त्याबद्दल. माझा प्रतिसाद डॉ खरे ह्यांच्या पोस्टला आहे. पहा बरं एकदा :)

In reply to by बाबा पाटील

दिव्यश्री 26/03/2014 - 19:07
Son is ur son till he finds wife , Daughter is ur daughter for life :) मी काही प्रमाणात सहमत आहे . पण माझे वडील , प्यांटवालं आणि नात्यातले भाऊ ( सख्खा नाही म्हणून) हे अपवाद मी याची देही याची डोळा पहिले आहेत . जोडी तुझी माझी - सतीश शहा आणि त्यांच्या सौ.यांचा कार्यक्रम सगळ्यांनी बघा . तीन मुली असताना एक जावई कसा मुलगा बनला ते कळेल . समाजात चांगल्या-वायीट गोष्टी असतात , असणारच आहेत . एकंच बाजू कधीही बरोबर किंवा चुकीची असू शकतच नाही . मुलांवर काय , कसे संस्कार आहेत हे अशा वेळी दिसून येते . :) बाकी हल्ली मुल काय मुली काय कसे पलटतील याचा नेम नाही . मुली त्यातल्या बर्या . मुल बायको आली कि बदलतात असे सर्रास बोलले जाते . पण मुलीचे लग्न झाली कि जावई मुलाची जागा घेतो असेही चित्र आहे . मायेच्या बाबतीत मुलींचा नंबर वरचा लागेल लग्नाला कितीही वर्ष झाली तर आपल्या बाबांना काय आवडत , आईला काय आवडत हे कुठलीही मुलगी पटकन सांगू शकते . त्यातही बाप- मुलीचं नात शब्दबद्ध करणं कठीण काम आहे . ज्यांना मुलगी आहे ते जास्त चांगल्याप्रकारे हे समजू शकतात . वादविवाद जिंकण आणि प्रत्यक्ष आयुष्यात जगण , अनुभूती घेण यात बराच फरक आहे .

In reply to by दिव्यश्री

बॅटमॅन 26/03/2014 - 19:32
बाप अन मुलाचे नातेही युनिक असते. सुरुवातीला हीरोवर्शिप, नंतर तिरस्कार-द्वेष अन नंतर नंतर त्याआडच्या प्रेमाची जाणीव असा त्या नात्याचा प्रवास आहे. आपल्याकडे आई काय अन मुलगी काय, या नात्यांचा लैच उदोउदो झालाय. बाप अन मुलगा ही नाती त्यात लैच मागे पडलीत. त्यांबद्दल बोलणे तितकेसे फ्याशनेबल मानले जात नै. त्यात परत मुलींचा संघर्ष वेगळा, मुलांचा वेगळा. आईवडिलांच्या प्रभावापलीकडे जाऊन स्वतःची वेगळी ओळख बनवण्याचे प्रेशर एका मर्यादेनंतर मुलांवर ज्या तीव्रतेने येते त्याला तोड नाही. अशावेळी मग बाप काय आहे ते कळते. पण त्याला वयाची किमान वीसेक वर्षे तरी पूर्ण व्हावी लागतात. अन आईपेक्षा बापाचे प्रेम जास्त अव्यक्त असते, लगेच कळेलसे नाही. सोसायटल कंडिशनिंगमुळे बापही ते जास्ती दाखवू शकत नाही, पण "पुत्रे मित्रवदाचरेत्" वाली भावना बापाकडून आली की जे गारगार वाटतं त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. ही भावना पुरुषांनाच समजू शकेल. इट इज़ दि अल्टिमेट व्हॅलिडेशन दॅट वन कॅन हॅव. बाप-मुलाचे नाते हे तितकेसे mushy नसते, जरा वेगळ्या प्रकारचे असते. त्याचे मला आवडलेले प्रकटीकरण रारंग ढांग या जब्री कादंबरीत हीरोचे वडील त्याला पत्र पाठवतात त्यात अतिशय हृद्यपणे आलेले आहे. भावनांचे प्रकटीकरण म्हणावे तितके होत नाही, अंमळ स्पार्टन असते. पण जितके वय होईल तितके वडील मवाळ होत जातात हेही अर्थात पाहिले आहेच. इनफ्याक्ट कैक पुरुष म्हातारपणी बायकांपेक्षा जास्त हळवे होतात. त्याला अपवादही तितकेच पाहिलेत म्हणा. पण इन जण्रल हे निरीक्षण आहे. मायेची व्याख्या तिच्या प्रकटीकरणाच्या प्रमाणावर अवलंबून केली की बापमुलाचे नाते त्यात मार खाणार हे ठरलेले आहे. असो.

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 26/03/2014 - 19:48
find Prince someday , but YOU will always be MY KING :) पण जितके वय होईल तितके वडील मवाळ होत जातात हेही अर्थात पाहिले आहेच. >>>++++++++++++++++++++++ १ १११११११११११ माझ लग्न ठरल्यावर रोज सकाळी न चुकता माझी झोप मोड करायचे . मुद्दाम डोक्याजवळ येउन बसायचे , बर्याच खोड्या काढायचे . पण आई पेक्षा जास्त प्रत्येकवेळेस तेच रडले होते . अगदी मी माझ्या माहेराहून निघाले तरी किंवा मला भेटायला ते आले आणि निघाले तरीही . *cray2* आमच्या कडे आई-बाबांचे वाद झाले कि आम्ही बाबांची बाजू घेतली कि मातोश्री अजून चिडायच्या कि या कार्ट्याणा कधीही आईची बाजू बरोबर वाटत नाही . :D ई. प्यांटवालं अजूनही आईची बाजू घेऊन त्यांच्या बाबांशी भांडतात . आहे कि नै गम्मत . :)

.... की हे मातृत्वाचे तेज होते, वा निव्वळ सुटकेची भावना. ते जे काही होते ते हळूहळू माझ्याही चेहर्‍यावर पसरत असल्याचे मला जाणवत होते
आता खरी सहजीवनाला सुरुवात झाली. एंजॉय..... आणि अभिनंदन!

नशिबवान आहे अभिषेक तुमची लेक.. तुमचा तिच्या जन्मावेळीचा हा लेख तिला भविष्यात वाचता येईल असा जपून ठेवा,धन्य होईल ती हे वाचून. मस्त लिहिलय, अगदि वाक्यनवाक्य तुमच्या व्याकुळतेची साक्ष आहे.

प्यारे१ 24/03/2014 - 14:39
हार्दिक अभिनंदन! आता स्वाक्षरी बदला, मिपा नि इतर उद्योग कमी करा आणि अभि अभि आलेल्या अभि कन्येचं कौतुक करा.

अभ्या , लेका तुझा प्रत्येक लेख आवडायचाच ... हा तर लईच भारी आहे... शिवाय मीही नुकताच हा अनुभव घेतला असल्याने आय कॅन रीलेट टू इट !
सुखाची चाहूल अनुभवण्यातही एक सुख असते
सह्हीच !! लयच भारी लिहिले आहेस लेका !! जियो !

मनिष 24/03/2014 - 15:01
आमचाही अनुभव आठवला....तेंव्हा शब्दबद्ध करायचा होता, पण राहून गेला. तुमच्या ह्या लेखाच्या निमित्ताने त्या आठवणी ताज्या झाल्या!

जेपी 24/03/2014 - 17:38
अभिनंदन अभि . पहिली बेटी , धनाची पेटी . अशी म्हण आहे आमच्या गावात . भावना खुपच छान मांडल्यात . आता ती , मी , आणी ही सुख मंजे काय असते आशी लेखमाला होऊद्या

शिद 24/03/2014 - 17:54
कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ...
अगदी अगदी...एकदम चपलख वाक्य. माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी मी देखील बाहेर असाच येराझार्‍या मारत होतो. सगळे व्यवस्थित होईल की नाही ही चिंता सतावत होती पण देवाच्या व डॉक्टरांच्या कृपेमुळे सगळे सुखरुप पार पडले. पहिल्यांदा मुलाला छातीशी कवटाळताना कोण आनंद झाला...शब्दांत वर्णन करणे अशक्य! एका क्षणात मी नवर्‍याचा बाप झालो होतो... :) तुम्हा दोघा दांपत्याना लेकीच्या आगमनाबद्दल हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी पॅरेंटीग...!!!

सखी 24/03/2014 - 18:48
अभिनंदन तुमचे आणि तुमच्या पत्नीचेही. भावना छान उतरल्यात. पुढचे वर्ष जितका जमेल तितका वेळ द्या दोघींसाठी आणि पुरेपुर आनंद घ्या, फार पटकन मोठी होतात ही मुलं. अनेक शुभेच्छा!

चिगो 24/03/2014 - 19:23
अभिनंदन, अभिषेक.. अत्यंत सुंदर भावपुर्ण लेख.. आमच्या लेकीच्या जन्माच्या वेळची हाल(त) आठवली. आणि तो तिचा 'टँह्या' ऎकताक्षणी दाटलेला गहीवर आणि आनंदाश्रू.. पुनश्च अभिनंदन..

काय बोलावे फारसे सुचत नाहीये, एवढे सारे आणि भारी प्रतिसाद, माझ्या लेकीने मला स्टार बनवल्यासारखे वाटतेय. प्रत्येक प्रतिसाद लाखमोलाचा आहे कारण प्रत्येकात शुभेच्छा आणि माझ्या लेकीसाठी आशिर्वादच आहेत, वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे जर हा लेख तिच्यासाठी पुढे जाऊन छानसे गिफ्ट बनत असेल तर येथील प्रतिसाद देखील त्याच गिफ्टसेट मध्ये येतील. खरे तर माझी बायको बरेचदा मला बोलायची की आपली मुलगी आल्यावर (गर्भलिंगनिदान नाही केले हा, आम्हाला दोघांनाही मुलगीच हवी आणि होणार हि स्ट्रॉंग फीलींग होती) तर आपल्या बाबूवर तू वरचेवर काही ना काही लिहायचे. तिच्या आयुष्यातले स्पेशल दिवस लिहून काढ, तिचा एखादा फोटो काढला तर त्या मागे त्यासंबंधित आठवणी लिहून काढ, हवे तर दर विकांताला तिने आठवड्याभरात काय गोंधळ घातला याची डायरी लिहून काढ. जे ती मोठी झाल्यावर तिला वाचायला द्यायचे आणि आपण तिच्या चेहर्‍यावरचा आनंद बघत बसायचे. तो आनंद नशीबात असेल तेव्हा असेल, पण आज आताही मला हे सारे परत परत वाचताना कसला आनंद होतोय. याबद्दल कितीही धन्यवाद बोललो तरी तोकडेच. जेव्हा केव्हा माझी लेक इथे हे वाचायला येईल, ते देखील तिच्या स्वताच्या अकाऊंटमधून तेव्हा तिलाच तुम्हाला धन्यवाद बोलायला लावतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे प्रेम असेच राहू द्या. :) बाकी वर काही सूचना सल्ले सजेशन आलेत त्या प्रत्येकांना वैयक्तिकरीत्या उत्तर आता देत नसलो तरी ते सारे टिपून घेतले आहेत. आणि हो, हा माझ्या ब्लॉगवर प्रकाशित होणारा पन्नासावा लेख. हा निव्वळ योगायोग, पण लेकीने इथेही मुहुर्तच साधला म्हणायचे :)

उपास 25/03/2014 - 00:01
मुलीस अनेक उत्तम आशीर्वाद, तिचं नाव काय ठेवलं हे नक्की सांगा इथे! पुढचे सहा ते आठ महिने बायकोबरोबरीने उपभोगा मुलीसमवेत, रात्रीची जागरणं, दुपटी, पालथं पडणं/ रांगणं/ बोबडं बोलणं ह्या स्टेजेस, खुप मज्जा.. बेबीसेंटर सारखी एखादी वेबसाईट सबस्र्काईब केलीत तर उत्तम माहिती मिळेल, दर आठवड्याला वगैरे! सुदैवाने मी मुलाच्या जन्मावेळी बायकोबरोबरच होतो ऑपरेशन थिएटर मध्ये, पहिल्यांदा बाळाला मी घेतलं हातात मग थोड्यावेळाने तिने.. त्या सुखाची (आणि सुटकेची) तुलना कशाचीच होऊ शकत नाही हे खरंच!

इन्दुसुता 25/03/2014 - 05:50
हार्दिक अभिनंदन !! लेखन आवडले.
माझ्या लेकीने मला स्टार बनवल्यासारखे वाटतेय.
तुमच्या लेकीच्या मनात तुम्ही फॉरेव्हर स्टार असणार... ( बाहेर तुम्ही स्टार असेनात/ नसेनात). तिच्यासाठी नेहमीच " माय डॅडी इज द बिग्गेस्ट, स्ट्रॉन्गेस्ट, स्मार्टेस्ट मॅन इन द हो..ल वर्ल्ड" हेच कायम राहणार. तुमच्या तुलनेत तिच्यासाठी इतर कुणीही नेहमीच तुच्छ राहील.. :) एन्जॉय हिरो वर्शिप :) इथे अनेक जणांना स्वतःच्या मुलांच्या ( अपत्यांच्या ) आगमनाच्या वेळेची आठवण झालीय हे स्पष्ट्च आहे. मला मात्र राहून राहून ( माझ्या ) बाबांची आणि अर्थातच आईचीही खूप आठवण आली. थोडे अवांतर : लेख आवडला हे वर लिहिलेच आहे फक्तं
ती रात्र ती तिच्या घरी होती आणि मी इथे माझ्या
हे वाक्य मात्रं फारच खटकले ( तुम्हाला तुमची पत्नी तिच्या माहेरी होती हे सांगायचे होते हे लक्षात आले ). सुखाच्या क्षणी थोडी गड्बड व्हायचीच म्ह्णून इथे नोंद केली येव्हढेच!!! :)

अभिनंदन, वेलकम टु फादर्स क्लब या मोरपंखी दिवसांनंतर संयमाची, शांतपणाची आणि कधिकधि धिराची सुध्दा कसोटी लागण्याचे दिवस येतिल त्या वेळीही असेच संवेदनाशील आणि सजग रहावे लागेल. त्या काळासाठी मनापासून शुभेच्छा.

लौंगी मिरची 25/03/2014 - 09:54
अभिनंदन ! लेख अप्रतिम . मला माझ्या वडिलांची आठवण आली .माझा जन्म आईच्या माहेरी , गावी झाला . त्यावेळी बाबा मुंबईत होते .एकत्र कुटुंब असल्यामुळे आणि आज्जी स्वभावाने थोडी स्ट्रिक्ट असल्या कारणाने बाबा घरातुन पिकनिक , ऑफीसच्या लोकांची मिळुन २ दिवसांसाठी ट्रीप चालली आहे असे कारण सांगुन ते आईच्या गावी मला पहायला आले होते . आई सांगते , बाबांना त्या दिवसाइतके आनंदी कधीच पाहिले नाही . नंतर खुप वेळा हा किस्सा आईकडुन ऐकला , जेवढ्या वेळा ऐकते बाबांवरचे प्रेम द्विगुनित होत रहाते . धन्यवाद अभिषेक . तुमच्यामुळे आज पून्हा जुन्या आठवणीना उजाळे मिळाले .

सुरेख वर्णन ! प्रसंग डोळ्यासमोर येत होते.. "जरा कळ काढ, या वाक्यप्रचाराचा उगम मी आज माझ्या डोळ्यासमोर अनुभवत होतो. तिची अवस्था आता मलाही बघवत नव्हती. तिच्यासाठी मी काय करू शकत होतो तर ते फक्त तिचा हात हातात पकडून बसू शकत होतो. जितके असह्य व्हायचे तितक्या जोरात ती माझा हात घट्ट आवळायची, याने मी तिच्या वेदना मापू शकत होतो पण त्यांना कमी करू शकत नव्हतो. त्या कमी व्हायचे इंजेक्शन दिले होते मात्र ते निकामी ठरत होते. विज्ञानाने वा वैद्यकीय शास्त्राने कितीही प्रगती केली तरी कोणाचे शारीरीक दुखणे वाटून घेण्याचा शोध लागेल तेव्हा ती खरी क्रांती. होणारे मूल दोघांचे असताना त्रास हा फक्त आईलाच होतोय या विचाराने दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेवर हा नक्कीच अक्सर इलाज ठरला असता."-१००% खरे अभिनंदन,रे मित्रा वेलकम टु फादर्स क्लब

विटेकर 25/03/2014 - 12:12
सुरेख लेख ! वपुंचे एक वाक्य आठवले.. As you write more & more personal ,it becomes more & more universal. आणि म्हणूनच प्रतिक्रियांचा धो - धो पाऊस पडला!
होणारे मूल दोघांचे असताना त्रास हा फक्त आईलाच होतोय या विचाराने दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेवर
या एका गोष्टीमुळे आपण बायकोचे जन्मभर ऋणाईत होतो.. काही पर्यायच नाही हो ! सर्वत्र समान दृष्टी असणार्‍या बाप्पाने या बाबतीत असे का केले असावे कोणास ठाऊक !

सुबोध खरे 25/03/2014 - 12:40
होणारे मूल दोघांचे असताना त्रास हा फक्त आईलाच होतोय या विचाराने दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेवर""या एका गोष्टीमुळे आपण बायकोचे जन्मभर ऋणाईत होतो." या गोष्टीशी मी सहमत नाही. माझी दोन्ही मुले लष्कराच्या रुग्णालयात एपिड्यूरल अनाल्गेसिया(epidural analgesia) म्हणजे कमरेत दुख् निवारक औषधे देऊन मुळीच न दुखता जन्माला आली. आतासुद्धा ज्यांना शक्य आहे त्यांनी या पर्यायाचा जरूर वापर करावा असे माझे मत आहे. माझी बायको सुद्धा डॉक्टर आहे आणि ती माझ्या मित्रांबरोबर( स्त्रीरोग तज्ञ) कळा देत असताना गप्पा मारत होती. तिला वेदना झाल्या नाहीत म्हणजे मी बायकोचा ऋणी असू नये असे नाही. शिवाय गरोदरपणाचे स्त्रियांना होणारे फायदे कितीतरी आहेत. भूक लागते पाहिजे ते खाता येते वजन वाढले तरी कोणी विचारत नाही उलट वजन का वाढले नाही अशी विचारणा होते. डोहाळे आणि कोडकौतुक पुरवले जाते. सासू आणि नवर्याकडून पाहिजे तितके लाड करून घेत येतात. त्वचेचा पोत सुधारतो, (माझी बायको तिच्या गर्भारपणा सर्वात जास्त सुंदर दिसत असे) केस गळणे थांबते इ इ. (दुर्दैवाने मला लेबर रूम मध्ये आत जाऊ दिले नाही कारण त्यावेळी तशी पद्धत नव्हती)पण माझी दोन्ही मुले दहा बारा डॉक्टरांच्या उपस्थितीत(जे स्वतःहून कोलवर नसताना आले) राजेशाही पद्धतीने जन्माला आली.(हा डॉक्टर असण्याचा फायदा आहे).

In reply to by सुबोध खरे

विटेकर 25/03/2014 - 15:05
" या एका गोष्टिमुळे " च्या ऐवजी " या किमान एका गोष्टीमुळे तरी " असा वाक्यप्रयोग करायला हवा होता. दुसरे असे की हे वेदनाशामक इन्जेक्श्न मग प्रचलित का नाही ? की फक्त लष्करी इस्पितळातच उपलब्ध असते?

In reply to by विटेकर

सुबोध खरे 25/03/2014 - 19:59
हे औषध कोणतेही खास औषध नाही आणि ते सहज सर्वत्र उपलब्ध आहे. यासाठी निष्णात भूलशास्त्र तज्ञ लागतो शिवाय तो भूल तज्ञ पूर्ण वेळ (सात ते आठ तास) तेथे हजर असावा लागतो. अशा साठी तेवढे जास्त पैसे द्यायला लागतात आणि त्याची तयारी बर्याच लोकांची नसते. (हिरानंदानी रुग्णालयात हा अनुभव घेतला आहे. शिवाय बायकांनी कळा काढल्या तर काय बिघडले अशा मनोवृत्तीची माणसे आहेतच). छोट्या खाजगी रुग्णालयात असे भूल तज्ञ सहज उपलब्ध नसतात हेही तितकेच खरे. कळा दिल्या नाहीत तर तुम्हाला मुलाबद्दल कमी प्रेम वाटते किंवा तुमचे आईपण परिपूर्ण नाही /कमी आहे असे वेडगळ टोमणे आम्ही बरेच ऐकले आहेत. सिझेरियन झाले त्या बायका काय कमी दर्जाच्या आया असतात हा साधा प्रश्न विचारल्यावर त्या बायका निरुत्तर झाल्या हे अलाहिदा. पण भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे ? हे वाक्य त्रिकाल अबाधीत सत्य आहे. असो. या बद्दल माहिती कमी आहे आणि गैरसमज जास्त आहेत हि वस्तुस्थिती.

In reply to by सुबोध खरे

शिल्पा नाईक 27/03/2014 - 11:01
डो. खरे साहेब. अगदी बरोबर. मला injection देउन पण एकही कळ आली नाही अन मग सी-सेक्शन कराव लागल्यावर सासुने असेच टोमणे मारले होते. अस्सा राग आला होता नं.... :D

In reply to by शिल्पा नाईक

सुबोध खरे 29/03/2014 - 20:53
पण भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे ? हे वाक्य त्रिकाल अबाधीत सत्य आहे. मी एवढ्या कळा काढल्या आणी हि आताची मुलगी हसत खेळत प्रसूत होते असं कसं चालेल. म्हणून मग हे टोमणे येणारच. हसून साजरे करावे

In reply to by सुबोध खरे

सखी 25/03/2014 - 18:25
(epidural analgesia) म्हणजे कमरेत दुख् निवारक औषधे देऊन मुळीच न दुखता जन्माला आली. --- ह्याने काही प्रमाणात त्रास कमी होत असला तरी पूर्णपणे न दुखता यावर (तुम्ही डॉक्टर आहात तरीसुद्धा) आक्षेप आहे. सरसकट सगळ्याच आयांची सुटका पटकन वा विनात्रासाची होत नाही हेही सत्य आहे. आणि कोडकौतुक वगैरे असले तरी ९ महीनेसुद्दा जसे आनंदी जाऊ शकतात तसेच उलट्या, पाठदुखी, नीट झोप न येणं, पायात गोळे येणं ह्या फक्त कॉमन गोष्टी) याने जिकीरीचेही जाऊ शकतात. इथे कोणालाही घाबरवायचा अजिबात उद्देश नाही, सगळ्या ताण, वेदना आणि त्रासातुन जाऊनसुद्दा माझ्या मुलांचा जन्माचे दिवस माझ्या आयुष्यातले सगळ्यात आनंदी दिवस आहेत :)

In reply to by सखी

सुबोध खरे 25/03/2014 - 20:16
ह्याने काही प्रमाणात त्रास कमी होत असला तरी पूर्णपणे न दुखता यावर आक्षेप आहे. यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? माझ्या बायकोने दोनही वेळा पूर्ण वेदनारहित प्रसूती केली आहे आणि ते १००% वेदनारहित असते हे सत्य आहे.शिवाय त्याच नलिकेतून वेदना शामक दिल्याने पुढचे २४ तास प्रसुतीच्या थकव्यातून बाहेर पडेपर्यंत वेदनारहित असल्याने माझी बायको आनंदात होती. (किंबहुना जर सिझेरियन करायला लागले तर त्याच वेदनारहित (epidural analgesia) अवस्थेत ते करता येते हा त्याचा आणखी एक फायदा आहे). आणि ज्यांना परवडते त्यांनी जरूर वेदनारहित प्रसूती करावी. उगाच कष्ट काढल्याने काही क्रांती होत नाही. आणि कोठेही कापल्याची जखम नसल्याने सिझेरियन सारखी नंतर कटकट होत नाही. माझे म्हणणे एवढेच होते कि बायकोने कळा दिल्या तर तुम्ही तिचे ऋणाईत होता हे मान्य नाही. बायकोने मुलाला जन्म दिला म्हणुन तिचे तुमच्यावर उपकार झाले हे मला मान्य नाही. नवरा बायकोच्या नात्यात उपकार किंवा ऋण या शब्दाला माझा आक्षेप आहे. मग बाप मुलासाठी जे काही कष्ट काढतो त्याला न्यूनतेच्या पातळीवर आणले जाते. याचा अर्थ ज्या दुर्दैवी स्त्रीला मुल होत नाही तिच्या नवर्याने काय तिच्यावर उपकार केले आहेत काय?अशा अनेक स्त्रिया मी रोज पाहत आलो आहे. गरोदरपणात वेगवेगळे त्रास होतात त्याला कमी लेखणे हा हेतू नाही पण त्यात मिळणाऱ्या आनंदापुढे ते काहीच नव्हे.

In reply to by सुबोध खरे

सखी 25/03/2014 - 21:03
मला फक्त म्हणायचे होते की पूर्ण वेदनारहित प्रसुती होणे, तुमची पत्नी कळा देत असताना गप्पा मारत असणे सत्य असेलच, काही संशय नाही. पण हे सरसकट सगळ्यांना लागु होऊ शकत नाही (तुमचा तसा उद्देश नसेलही). तुम्हाला तुमचा अनुभव सांगायचा होता, तीच गत माझीही होती फक्त epidural घेतल्यावर मदत झाली पण सगळं काही कोप-यावरच्या दुकानातुन गोळ्या-बिस्कीटं आणण्याइतकं सोपही नाही इतकचं म्हणण आहे. आणि थोडेसेच वेगवेगळे त्रास मांडले कारण कोडकौतुकाचा उल्लेख होता अर्थात यातुन नव-याने कायम बायकोच्या उपकाराखाली रहावे हा अजिबात उद्देश नाही, हेवेसांनल.

किसन शिंदे 24/03/2014 - 00:48
आत्तापर्यंत आयुष्यात बरीच वेगवेगळी नाती निभावली असशील, पण हे नातं खूप वेगळं आणि स्पेशल आहे!! :)
कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ...
जबराट वाक्य!

अर्धवटराव 24/03/2014 - 02:51
अभिनंदन रे मित्रा... तुम्हा दोघांचे हार्दीक अभिनंदन. मुलगीच हवि होती आणि मुलगीच झाली म्हणुन त्रिवार स्पेशल अभिनंदन :) आयला...सर्व बाप लोकांची स्टोरी जवळपास सारखीच असते काय... मलाहि "तो" दिव्य दिवस अजुनही आठवतोय. एरवी कितीही मोठा आवाज अंमळ उशीरा ऐकु येणारी मी त्यादिवशी मात्र कसा काय एलर्ट होतो कोण जाणे. चिरंजीवांचा ट्यांहा मी ऐकला आणि "झालं" म्हणुन सर्वांकडे आनंदाने पाहिलं. बाकि सगळ्यांना काहिच ऐकु आलं नव्हतं...पण दोन सेकंदात नर्स बाईंनी बाहेर येऊन गुडन्युज सांगितली... च्यायला...माझं पुराण काय लाऊन बसलोय. अभ्या... लेका. बाप झालास. एंजोय माडी :)

In reply to by अर्धवटराव

बरखा 24/03/2014 - 15:09
अभिषेक जी प्रथम तुम्हा दोघांचे हार्दीक अभिनंदन.. अर्धवटराव , तुमच्या या वाक्यात आमचे हे फिट बसत नाहीत. "आयला...सर्व बाप लोकांची स्टोरी जवळपास सारखीच असते काय... मलाहि "तो" दिव्य दिवस अजुनही आठवतोय". कारण या दिव्य दिवसाच्या दिवशी त्या॑ना आम्हि ऑफिसात पाठवले होते. घर्च्या॑च्या म्हणन्यानुसार प्रसुतिच्या वेळेला आई आणी नव-याने जवळ असु नये, त्या मुळे बाईला मोकळ व्हायला त्रास होतो अस काही सा॑गितल्या मुळे प्रसुति होइ पर्यन्त त्या॑ना कही सा॑गितले नाही. त्या दिवशी दवाखान्यत प्रसुति खोली बाहेर येर- झा-या घालायला मिळ्यल्या नाहीत म्हणुन अजुन बोलणी खावी लगतात.

In reply to by बरखा

अर्धवटराव 25/03/2014 - 03:37
होतं असं कधि कधि(च) :) मी पण त्यादिवशी ओटी मेधे का गेलो नाहि याचा पश्चात्ताप होतो कधि कधि. पण त्या डॉक्टरबाईंनी आत येऊ दिलं असतं काय हा हि प्रश्न होताच. शिवाय सी-सेक्शन प्रोसेसमधे चिरंजीवांना थोडी दुखापत झाली. त्याला डोक्याला दोनचार टाके घातले जन्मल्याबरोबर... छातीवरपण भलामोठा ओरखंडा. मी ते सहन केलं असतं काय माहित नाहि.

हार्दिक 'अभि'नंदन. ती प्रतिक्षा, ती काळजी, ते अवघडलेपण सर्व..सर्व शब्दांत उतरलं आहे. नशिबवान आहात. बाप झालात तो क्षण ऑपरेशन थिएटराबाहेरच अनुभवला. मी तर दूर देशी अनुभवला. मोजून ८ दिवस, किती? ८ दिवस तणावात काढले होते. बाळ जन्मल्यानंतर ८ दिवसांनी पत्राद्वारे मला बातमी मिळाली होती. असो. तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन.

रेवती 24/03/2014 - 04:18
अरे वा! अभिनंदन! छान बातमी.लेखनही आवडले. अनेकांना आपापल्या मुलांच्या जन्मकथा आठवणार हे नक्की!

आई बाबा आणि तुमच्या नव्या गर्ल फ्रेंड चे होणारे मूल दोघांचे असताना त्रास हा फक्त आईलाच होतोय या विचाराने दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेवर हा नक्कीच अक्सर इलाज ठरला असता. कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ... जबरदस्त

होणारे मूल दोघांचे असताना त्रास हा फक्त आईलाच होतोय या विचाराने दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेवर हा नक्कीच अक्सर इलाज ठरला असता. कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ...
अतिशय नेमके.... पुढचे ६ महिने, आयुष्यातील सगळ्यात सोनेरी ६ महिने....एक एक क्षण आसुसून घालवा...बाकी सगळे म्हणजे सगळे दुय्यम .. तुम्हा दोघांना शुभेच्छा आणि त्या चिमुकलीचे मन:पूर्वक स्वागत !!

अजया 24/03/2014 - 09:05
आवडलच! माझ्या याच क्षणांच्या वेळी आलेली अस्वस्थता घालवण्यासाठी अथर्वशिर्ष म्हणत बसलेला नवरा आठवला. नर्सने बाळ हातात दिल्यावर एकदम थरथरायला लागलेला !!

इनिगोय 24/03/2014 - 09:21
आवड्या! मस्त जमलाय लेख. शादी के साईड इफेक्टस् मधली विद्या बालन म्हणते 'वुई आर प्रेग्नंट..!' त्याची आठवण झाली. :D तुम्हा दोघांनाही हॅप्पी पेरेंटिंग :)

राही 24/03/2014 - 10:16
अतिशय मनमोकळे आणि हृद्य लिखाण. तुमच्या राजकन्येला तिच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. मुलगी चालती, बोलती, धावती होईपर्यंतचा प्रत्येक क्षण रसरसून अनुभवा. जमतील तितके वाढीच्या तिच्या प्रत्येक टप्प्याचे क्षण नैसर्गिकरीत्या (मुद्दाम पोझ द्यायला न लावता) कॅमेराबद्ध करा. तिच्या सोळाव्या वर्षापर्यंत पुरेल असा एक भक्कम अल्बम आणून त्यात तिच्या प्रत्येक वाढदिवसाचे काही फोटो डकवत रहा. मुले मोठी होऊन दूर गेली की असे फोटो हा मोठा विरंगुळा असतो आपला अन त्यांचाही, एक दस्त-ऐवज म्हणून.

In reply to by राही

सुबोध खरे 24/03/2014 - 10:30
+१ दर महिन्याच्या वाढदिवसाला एक छोटासा व्हिडीओ काढून ठेवा आणि दर वर्हाची सीडी तयार करून ठेवा. मुलगी मोठी झाली कि तिचे लहानपण फार आठवत राहते. हे दिवस परत येत नाहीत. दर महिन्याच्या वाढदिवसाला एक छोटासा व्हिडीओ काढून ठेवा आणि दर वर्हाची सीडी तयार करून ठेवा. मुलगी मोठी झाली कि तिचे लहानपण फार आठवत राहते. हे दिवस परत येत नाहीत. बायकोकडे पुढील काही दिवस जरा जास्त लक्ष द्या. तिला आपली आता जास्त गरज आहे. पोस्टपारटम डिप्रेशन(post partum depression)कडे लक्ष ठेवा. बाळंत पणामुळे मनस्थिती फार नाजूक झालेली असते. शिवाय आत्तापर्यंत डोहाळे आणि कोडकौतुक झाले असते आणि एकदम सर्व जण तिच्याकडे दुर्लक्ष करतात. (आकर्षणाचा केंद्रबिंदू आता दुसरा असतो).बाळाच्या कोडकौतुकात बाळन्तिणीकडे दुर्लक्ष होते कोणत्याही वैद्यकीय सल्यासाठी व्यनी केलात तरी चालेल.

विज्ञानाने वा वैद्यकीय शास्त्राने कितीही प्रगती केली तरी कोणाचे शारीरीक दुखणे वाटून घेण्याचा शोध लागेल तेव्हा ती खरी क्रांती.
हे विशेष आवडले...

आमचे दिवस भरत आलेत, अन् तुम्ही टेन्शन दिलं राव... वाचता वाचता डोळे अलगद पाणावले, हे सुद्धा लक्षात नाही आलं. -(अलिकडे थोडा संवेदनशील झालेला) पैलवान

सूड 24/03/2014 - 10:28
तुमच्या आजपर्यंतच्या लेखातील सर्वोत्तम लेख. अभिनंदन !! मनापासून लिहीलंय हे वाक्यावाक्याला जाणवतंय. >>कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ... सबंध लेखात हे एक वाक्य भाव खाऊन गेलंय. :)

दिव्यश्री 24/03/2014 - 11:13
अभिनंदन हो तुमच्या सगळ्या कुटुंबाचे . . आधी सुरवातीला मलाच धडधडले , अक्षरशः हात थरथरले म्हणून शेवटचा परिच्छेद (भाग ?) आधी वाचला . तरी थोडा वेळ ...असो . बाकी लेख नेहमीप्रमाणे मस्तच . खूप छान लिहिता तुम्ही . कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ...>>>याचा थोडासा वाईट अनुभव घेतलाय . :(

मी_आहे_ना 24/03/2014 - 12:00
अभिनंदन रे! अगदी आमच्या बाळाच्या जन्मावेळचे ६ वर्षांपूर्वीचे स्वगत वाचतोय असंच वाटत होतं आणि तो क्षण अन् क्षण अनुभवला. पुन्हा अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा!

michmadhura 24/03/2014 - 12:17
खूप छान लिहिलय. माझी मुलगी ३१ जानेवारीला झाली पण मी २६ जानेवारी पासून फेर्‍या मारत होते, सगळं अगदी तेच, आज परत आठवलं. ऑपरेशन थेटरमधून बाहेर येताना हसतही होते नी रडतही होते, तेव्हाचा नवर्‍याचा चेहरा आजही आठवतो.

बाबा पाटील 24/03/2014 - 12:20
नशिबवान आहेस लेका,पहिली कन्या झाली.लेकीची माया कार्ट्यांना येत नाही.माझ्या दोन्ही कन्यांच्या जन्माच्या वेळेस मी ओ.टी.मध्येच होतो.ते कापसाचे गोळे माझ्याच हातात पहिल्यांदा आले होते.बायकोकडे लक्ष देण्याएवजी मी वेड्यासारखे पिल्लाकडे पाहात होतो.बायको शुद्धीवर येण्यासाठी दोन्ही वेळेस ४ ते ६ तासांचा वेळ लागला होता.तो पर्यंत सिरींजने लॅक्टोजनचे फिड मिच माझ्या लेकींना दिले होते.आणी पोरींनीही बापाचा स्पर्श बहुतेक बरोबर ओळखला होता.त्या ही न रडता निवांत सिरंजने दुध ओढत होत्या.हे क्षण मी आयुष्यात कधीच विसरु श़कणार नाही.

In reply to by बाबा पाटील

बाकी प्रतिसाद आवडला पण लेकीची माया कार्ट्यांना येत नाही. ह्या वाक्यासाठी निषेध. मुलंही भरपूर माया करतात आई-वडिलांच्या आजारपणात, शेवटच्या क्षणांमध्ये ढसाढसा रडतात. माझा मुलगाही भरपूर माया करतो. ती ओळखणं आपल्याला जमायला हवं.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुबोध खरे 25/03/2014 - 10:37
एकदम सहमत. मला एक मुलगा आणी मुलगी आहे( परमेश्वरकृपेने). मुलगी आपल्या भावनांचे प्रदर्शन करू शकते मुलगे कदाचित करू शकत नाहीत. माझा मुलगा लोणावळ्याला सहलीला गेला होता. मला चिक्की आवडते म्हणून त्याला पिकनिकला दिलेल्या सगळ्या पैशाच्या तो चिक्क्या घेऊन आला. स्वतः साठी एकही पैसा खर्च न करता. माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

In reply to by प्रभाकर पेठकर

बाबा पाटील 25/03/2014 - 11:59
कारण मला दोन्ही लेकीच आहेत आणी त्यांच्यासाठी मी आनी माझ्यासाठी त्या सर्वस्व आहेत.जर कधी एखादी मिटींग लेट नाइट चालली आणी मला घरी यायला रात्रीचे १-२ वाजले तरी माझी सहा वर्षाची लेक जागीच असते,पपल्या का आला नाही,आजपर्यंत असंख्य वेळा समाजावुन झाले बाळा झोपत जा पण नाही जोपर्यंत मी पोहचत नाही तो पर्यंत ती आणी तीचे आजोबा वाट पहात असतात ,मग आता मिच रात्रीच्या मिटींग्ज पुर्णपणे बंद करुन टाकल्या,दहाच्या आत घरात.कदाचित सुपुत्र असता तर त्याने इतकी काळजी घेतली असती की नाही कुनास ठाउक्,की माझ्यासारखाच नग झाला असता.....!

In reply to by बाबा पाटील

सुबोध खरे 25/03/2014 - 12:52
बाबासाहेब आपल्याला व्यक्तिगत नाही परंतु जर आपण "मुलगा" असल्याने आपल्या आई वडिलांची काळजी घेत नसाल तर वरील म्हणणे मान्य होईल. आमच्या घरी जेंव्हा असा वाद होतो तेंव्हा आम्ही आमच्या बायकांना हेच सांगतो कि आम्ही दोघे भाऊ आमच्या आईवडिलांची काळजी व्यवस्थित घेतो आहोत तर मुलगी असल्याने काय मोठी क्रांती झाली असती? जर मुलगा सुनेच्या ताटाखालचे मांजर असून आईवडिलांकडे दुर्लक्ष करत असेल आणि सून सासू सासर्यांकडे बघत नसेल तर सुनेच्या आईवडिलांनी तिच्या वर केलेल्या संस्कारांचा दोष आहे असेच मी म्हणेन. माझ्या अतिशय जवळच्या माहितीतील एक भाभा अणुकेंद्रातील शास्त्रज्ञ चार मुली असूनही वृद्धाश्रमात मरण पावले आणि मृत्युसमयी त्यांच्याकडे तीन कोटीची(वडिलोपार्जित आणि स्वकष्टार्जित) संपत्ती होती. पस्तीस लाख रुपयांची एक मुदत ठेव होती. हे गृहस्थ आपल्या सर्वात धाकट्या मुलीला विनवीत होते कि तुझ्या घरात एका कोपर्यात पडून राहीन काही मागणार नाही पण मला वृद्धाश्रमातून घरी घेऊन चल. त्यांच्या वैद्यकीय खर्च सुद्धा सरकारच करीत होते तरीही हि परिस्थिती आहे.चारही मुलींकडे तीन तीन महिने काढत असताना पुण्याच्या मुलीने घरी कटकट नको म्हणून पुण्यातच कोणत्यातरी वृद्धाश्रमात ठेवले होते. आता त्यांच्या संपत्तीवरून चारही जावयात /मुलीत वाद चालू आहेत. याचे तात्पर्य एकच- मुलगा काय मुलगी काय म्हातारपणी कोण विचारेल हे सांगता येत नाही. मला केवळ मुली आहेत म्हणून माझे म्हातारपण मजेत जाईल हा आशावाद फोल आहे.

In reply to by सुबोध खरे

बाबा पाटील 25/03/2014 - 13:23
मुला मुलीत फरक करायचाच नसतो,आणी आमच्यात तो कधीच झाला नाही.मी माझ्या कुटुंबात १२-१३ माणसे एकत्रच राहतो. आईवडील माझ्या घरात नव्हे तरे मी त्यांच्यात राहतो.त्यामुळे तुम्ही म्हणता तसे बाकीचे विषयच उद्भवत नाहीत्,असो. प्रत्येक व्यक्तीपरत्वे फरक पडतो,वडिलोपार्जित मालमत्तेविषयी बोलाल तर मागच्या वर्षी आमच्या पुर्ण खानदानाची साधारण १५० एकराची खातेफोड झाली तेंव्हा माझ्या सख्या ४ आत्या व एक बहिण आणी चुलत १४ आत्या व २० चुलत बहिणी यातील एकीनेही हक्कसोड करताना एका शब्दाने देखिल विचारले नाही.की कुठे सही करायची,ज्या दुय्यम उपनिबंधकाच्या ऑफिसमध्ये हा व्यवाहार झाला तो देखिल वेडा झाला म्हटला माझ्या आजपर्यंतच्या कार्यकिर्दीत हा पहिले खातेफोड आहे की जे एका दिवसात संपले.बाकी काय सांगु....मग समानता याच्यापेक्षा आणखी काय असते.

In reply to by बाबा पाटील

यशोधरा 25/03/2014 - 20:02
शास्त्रज्ञ आणि त्यांच्या म्हातारपणात त्यांना जे भोगायला लागले त्याबद्दल. माझा प्रतिसाद डॉ खरे ह्यांच्या पोस्टला आहे. पहा बरं एकदा :)

In reply to by बाबा पाटील

दिव्यश्री 26/03/2014 - 19:07
Son is ur son till he finds wife , Daughter is ur daughter for life :) मी काही प्रमाणात सहमत आहे . पण माझे वडील , प्यांटवालं आणि नात्यातले भाऊ ( सख्खा नाही म्हणून) हे अपवाद मी याची देही याची डोळा पहिले आहेत . जोडी तुझी माझी - सतीश शहा आणि त्यांच्या सौ.यांचा कार्यक्रम सगळ्यांनी बघा . तीन मुली असताना एक जावई कसा मुलगा बनला ते कळेल . समाजात चांगल्या-वायीट गोष्टी असतात , असणारच आहेत . एकंच बाजू कधीही बरोबर किंवा चुकीची असू शकतच नाही . मुलांवर काय , कसे संस्कार आहेत हे अशा वेळी दिसून येते . :) बाकी हल्ली मुल काय मुली काय कसे पलटतील याचा नेम नाही . मुली त्यातल्या बर्या . मुल बायको आली कि बदलतात असे सर्रास बोलले जाते . पण मुलीचे लग्न झाली कि जावई मुलाची जागा घेतो असेही चित्र आहे . मायेच्या बाबतीत मुलींचा नंबर वरचा लागेल लग्नाला कितीही वर्ष झाली तर आपल्या बाबांना काय आवडत , आईला काय आवडत हे कुठलीही मुलगी पटकन सांगू शकते . त्यातही बाप- मुलीचं नात शब्दबद्ध करणं कठीण काम आहे . ज्यांना मुलगी आहे ते जास्त चांगल्याप्रकारे हे समजू शकतात . वादविवाद जिंकण आणि प्रत्यक्ष आयुष्यात जगण , अनुभूती घेण यात बराच फरक आहे .

In reply to by दिव्यश्री

बॅटमॅन 26/03/2014 - 19:32
बाप अन मुलाचे नातेही युनिक असते. सुरुवातीला हीरोवर्शिप, नंतर तिरस्कार-द्वेष अन नंतर नंतर त्याआडच्या प्रेमाची जाणीव असा त्या नात्याचा प्रवास आहे. आपल्याकडे आई काय अन मुलगी काय, या नात्यांचा लैच उदोउदो झालाय. बाप अन मुलगा ही नाती त्यात लैच मागे पडलीत. त्यांबद्दल बोलणे तितकेसे फ्याशनेबल मानले जात नै. त्यात परत मुलींचा संघर्ष वेगळा, मुलांचा वेगळा. आईवडिलांच्या प्रभावापलीकडे जाऊन स्वतःची वेगळी ओळख बनवण्याचे प्रेशर एका मर्यादेनंतर मुलांवर ज्या तीव्रतेने येते त्याला तोड नाही. अशावेळी मग बाप काय आहे ते कळते. पण त्याला वयाची किमान वीसेक वर्षे तरी पूर्ण व्हावी लागतात. अन आईपेक्षा बापाचे प्रेम जास्त अव्यक्त असते, लगेच कळेलसे नाही. सोसायटल कंडिशनिंगमुळे बापही ते जास्ती दाखवू शकत नाही, पण "पुत्रे मित्रवदाचरेत्" वाली भावना बापाकडून आली की जे गारगार वाटतं त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. ही भावना पुरुषांनाच समजू शकेल. इट इज़ दि अल्टिमेट व्हॅलिडेशन दॅट वन कॅन हॅव. बाप-मुलाचे नाते हे तितकेसे mushy नसते, जरा वेगळ्या प्रकारचे असते. त्याचे मला आवडलेले प्रकटीकरण रारंग ढांग या जब्री कादंबरीत हीरोचे वडील त्याला पत्र पाठवतात त्यात अतिशय हृद्यपणे आलेले आहे. भावनांचे प्रकटीकरण म्हणावे तितके होत नाही, अंमळ स्पार्टन असते. पण जितके वय होईल तितके वडील मवाळ होत जातात हेही अर्थात पाहिले आहेच. इनफ्याक्ट कैक पुरुष म्हातारपणी बायकांपेक्षा जास्त हळवे होतात. त्याला अपवादही तितकेच पाहिलेत म्हणा. पण इन जण्रल हे निरीक्षण आहे. मायेची व्याख्या तिच्या प्रकटीकरणाच्या प्रमाणावर अवलंबून केली की बापमुलाचे नाते त्यात मार खाणार हे ठरलेले आहे. असो.

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 26/03/2014 - 19:48
find Prince someday , but YOU will always be MY KING :) पण जितके वय होईल तितके वडील मवाळ होत जातात हेही अर्थात पाहिले आहेच. >>>++++++++++++++++++++++ १ १११११११११११ माझ लग्न ठरल्यावर रोज सकाळी न चुकता माझी झोप मोड करायचे . मुद्दाम डोक्याजवळ येउन बसायचे , बर्याच खोड्या काढायचे . पण आई पेक्षा जास्त प्रत्येकवेळेस तेच रडले होते . अगदी मी माझ्या माहेराहून निघाले तरी किंवा मला भेटायला ते आले आणि निघाले तरीही . *cray2* आमच्या कडे आई-बाबांचे वाद झाले कि आम्ही बाबांची बाजू घेतली कि मातोश्री अजून चिडायच्या कि या कार्ट्याणा कधीही आईची बाजू बरोबर वाटत नाही . :D ई. प्यांटवालं अजूनही आईची बाजू घेऊन त्यांच्या बाबांशी भांडतात . आहे कि नै गम्मत . :)

.... की हे मातृत्वाचे तेज होते, वा निव्वळ सुटकेची भावना. ते जे काही होते ते हळूहळू माझ्याही चेहर्‍यावर पसरत असल्याचे मला जाणवत होते
आता खरी सहजीवनाला सुरुवात झाली. एंजॉय..... आणि अभिनंदन!

नशिबवान आहे अभिषेक तुमची लेक.. तुमचा तिच्या जन्मावेळीचा हा लेख तिला भविष्यात वाचता येईल असा जपून ठेवा,धन्य होईल ती हे वाचून. मस्त लिहिलय, अगदि वाक्यनवाक्य तुमच्या व्याकुळतेची साक्ष आहे.

प्यारे१ 24/03/2014 - 14:39
हार्दिक अभिनंदन! आता स्वाक्षरी बदला, मिपा नि इतर उद्योग कमी करा आणि अभि अभि आलेल्या अभि कन्येचं कौतुक करा.

अभ्या , लेका तुझा प्रत्येक लेख आवडायचाच ... हा तर लईच भारी आहे... शिवाय मीही नुकताच हा अनुभव घेतला असल्याने आय कॅन रीलेट टू इट !
सुखाची चाहूल अनुभवण्यातही एक सुख असते
सह्हीच !! लयच भारी लिहिले आहेस लेका !! जियो !

मनिष 24/03/2014 - 15:01
आमचाही अनुभव आठवला....तेंव्हा शब्दबद्ध करायचा होता, पण राहून गेला. तुमच्या ह्या लेखाच्या निमित्ताने त्या आठवणी ताज्या झाल्या!

जेपी 24/03/2014 - 17:38
अभिनंदन अभि . पहिली बेटी , धनाची पेटी . अशी म्हण आहे आमच्या गावात . भावना खुपच छान मांडल्यात . आता ती , मी , आणी ही सुख मंजे काय असते आशी लेखमाला होऊद्या

शिद 24/03/2014 - 17:54
कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ...
अगदी अगदी...एकदम चपलख वाक्य. माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी मी देखील बाहेर असाच येराझार्‍या मारत होतो. सगळे व्यवस्थित होईल की नाही ही चिंता सतावत होती पण देवाच्या व डॉक्टरांच्या कृपेमुळे सगळे सुखरुप पार पडले. पहिल्यांदा मुलाला छातीशी कवटाळताना कोण आनंद झाला...शब्दांत वर्णन करणे अशक्य! एका क्षणात मी नवर्‍याचा बाप झालो होतो... :) तुम्हा दोघा दांपत्याना लेकीच्या आगमनाबद्दल हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी पॅरेंटीग...!!!

सखी 24/03/2014 - 18:48
अभिनंदन तुमचे आणि तुमच्या पत्नीचेही. भावना छान उतरल्यात. पुढचे वर्ष जितका जमेल तितका वेळ द्या दोघींसाठी आणि पुरेपुर आनंद घ्या, फार पटकन मोठी होतात ही मुलं. अनेक शुभेच्छा!

चिगो 24/03/2014 - 19:23
अभिनंदन, अभिषेक.. अत्यंत सुंदर भावपुर्ण लेख.. आमच्या लेकीच्या जन्माच्या वेळची हाल(त) आठवली. आणि तो तिचा 'टँह्या' ऎकताक्षणी दाटलेला गहीवर आणि आनंदाश्रू.. पुनश्च अभिनंदन..

काय बोलावे फारसे सुचत नाहीये, एवढे सारे आणि भारी प्रतिसाद, माझ्या लेकीने मला स्टार बनवल्यासारखे वाटतेय. प्रत्येक प्रतिसाद लाखमोलाचा आहे कारण प्रत्येकात शुभेच्छा आणि माझ्या लेकीसाठी आशिर्वादच आहेत, वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे जर हा लेख तिच्यासाठी पुढे जाऊन छानसे गिफ्ट बनत असेल तर येथील प्रतिसाद देखील त्याच गिफ्टसेट मध्ये येतील. खरे तर माझी बायको बरेचदा मला बोलायची की आपली मुलगी आल्यावर (गर्भलिंगनिदान नाही केले हा, आम्हाला दोघांनाही मुलगीच हवी आणि होणार हि स्ट्रॉंग फीलींग होती) तर आपल्या बाबूवर तू वरचेवर काही ना काही लिहायचे. तिच्या आयुष्यातले स्पेशल दिवस लिहून काढ, तिचा एखादा फोटो काढला तर त्या मागे त्यासंबंधित आठवणी लिहून काढ, हवे तर दर विकांताला तिने आठवड्याभरात काय गोंधळ घातला याची डायरी लिहून काढ. जे ती मोठी झाल्यावर तिला वाचायला द्यायचे आणि आपण तिच्या चेहर्‍यावरचा आनंद बघत बसायचे. तो आनंद नशीबात असेल तेव्हा असेल, पण आज आताही मला हे सारे परत परत वाचताना कसला आनंद होतोय. याबद्दल कितीही धन्यवाद बोललो तरी तोकडेच. जेव्हा केव्हा माझी लेक इथे हे वाचायला येईल, ते देखील तिच्या स्वताच्या अकाऊंटमधून तेव्हा तिलाच तुम्हाला धन्यवाद बोलायला लावतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे प्रेम असेच राहू द्या. :) बाकी वर काही सूचना सल्ले सजेशन आलेत त्या प्रत्येकांना वैयक्तिकरीत्या उत्तर आता देत नसलो तरी ते सारे टिपून घेतले आहेत. आणि हो, हा माझ्या ब्लॉगवर प्रकाशित होणारा पन्नासावा लेख. हा निव्वळ योगायोग, पण लेकीने इथेही मुहुर्तच साधला म्हणायचे :)

उपास 25/03/2014 - 00:01
मुलीस अनेक उत्तम आशीर्वाद, तिचं नाव काय ठेवलं हे नक्की सांगा इथे! पुढचे सहा ते आठ महिने बायकोबरोबरीने उपभोगा मुलीसमवेत, रात्रीची जागरणं, दुपटी, पालथं पडणं/ रांगणं/ बोबडं बोलणं ह्या स्टेजेस, खुप मज्जा.. बेबीसेंटर सारखी एखादी वेबसाईट सबस्र्काईब केलीत तर उत्तम माहिती मिळेल, दर आठवड्याला वगैरे! सुदैवाने मी मुलाच्या जन्मावेळी बायकोबरोबरच होतो ऑपरेशन थिएटर मध्ये, पहिल्यांदा बाळाला मी घेतलं हातात मग थोड्यावेळाने तिने.. त्या सुखाची (आणि सुटकेची) तुलना कशाचीच होऊ शकत नाही हे खरंच!

इन्दुसुता 25/03/2014 - 05:50
हार्दिक अभिनंदन !! लेखन आवडले.
माझ्या लेकीने मला स्टार बनवल्यासारखे वाटतेय.
तुमच्या लेकीच्या मनात तुम्ही फॉरेव्हर स्टार असणार... ( बाहेर तुम्ही स्टार असेनात/ नसेनात). तिच्यासाठी नेहमीच " माय डॅडी इज द बिग्गेस्ट, स्ट्रॉन्गेस्ट, स्मार्टेस्ट मॅन इन द हो..ल वर्ल्ड" हेच कायम राहणार. तुमच्या तुलनेत तिच्यासाठी इतर कुणीही नेहमीच तुच्छ राहील.. :) एन्जॉय हिरो वर्शिप :) इथे अनेक जणांना स्वतःच्या मुलांच्या ( अपत्यांच्या ) आगमनाच्या वेळेची आठवण झालीय हे स्पष्ट्च आहे. मला मात्र राहून राहून ( माझ्या ) बाबांची आणि अर्थातच आईचीही खूप आठवण आली. थोडे अवांतर : लेख आवडला हे वर लिहिलेच आहे फक्तं
ती रात्र ती तिच्या घरी होती आणि मी इथे माझ्या
हे वाक्य मात्रं फारच खटकले ( तुम्हाला तुमची पत्नी तिच्या माहेरी होती हे सांगायचे होते हे लक्षात आले ). सुखाच्या क्षणी थोडी गड्बड व्हायचीच म्ह्णून इथे नोंद केली येव्हढेच!!! :)

अभिनंदन, वेलकम टु फादर्स क्लब या मोरपंखी दिवसांनंतर संयमाची, शांतपणाची आणि कधिकधि धिराची सुध्दा कसोटी लागण्याचे दिवस येतिल त्या वेळीही असेच संवेदनाशील आणि सजग रहावे लागेल. त्या काळासाठी मनापासून शुभेच्छा.

लौंगी मिरची 25/03/2014 - 09:54
अभिनंदन ! लेख अप्रतिम . मला माझ्या वडिलांची आठवण आली .माझा जन्म आईच्या माहेरी , गावी झाला . त्यावेळी बाबा मुंबईत होते .एकत्र कुटुंब असल्यामुळे आणि आज्जी स्वभावाने थोडी स्ट्रिक्ट असल्या कारणाने बाबा घरातुन पिकनिक , ऑफीसच्या लोकांची मिळुन २ दिवसांसाठी ट्रीप चालली आहे असे कारण सांगुन ते आईच्या गावी मला पहायला आले होते . आई सांगते , बाबांना त्या दिवसाइतके आनंदी कधीच पाहिले नाही . नंतर खुप वेळा हा किस्सा आईकडुन ऐकला , जेवढ्या वेळा ऐकते बाबांवरचे प्रेम द्विगुनित होत रहाते . धन्यवाद अभिषेक . तुमच्यामुळे आज पून्हा जुन्या आठवणीना उजाळे मिळाले .

सुरेख वर्णन ! प्रसंग डोळ्यासमोर येत होते.. "जरा कळ काढ, या वाक्यप्रचाराचा उगम मी आज माझ्या डोळ्यासमोर अनुभवत होतो. तिची अवस्था आता मलाही बघवत नव्हती. तिच्यासाठी मी काय करू शकत होतो तर ते फक्त तिचा हात हातात पकडून बसू शकत होतो. जितके असह्य व्हायचे तितक्या जोरात ती माझा हात घट्ट आवळायची, याने मी तिच्या वेदना मापू शकत होतो पण त्यांना कमी करू शकत नव्हतो. त्या कमी व्हायचे इंजेक्शन दिले होते मात्र ते निकामी ठरत होते. विज्ञानाने वा वैद्यकीय शास्त्राने कितीही प्रगती केली तरी कोणाचे शारीरीक दुखणे वाटून घेण्याचा शोध लागेल तेव्हा ती खरी क्रांती. होणारे मूल दोघांचे असताना त्रास हा फक्त आईलाच होतोय या विचाराने दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेवर हा नक्कीच अक्सर इलाज ठरला असता."-१००% खरे अभिनंदन,रे मित्रा वेलकम टु फादर्स क्लब

विटेकर 25/03/2014 - 12:12
सुरेख लेख ! वपुंचे एक वाक्य आठवले.. As you write more & more personal ,it becomes more & more universal. आणि म्हणूनच प्रतिक्रियांचा धो - धो पाऊस पडला!
होणारे मूल दोघांचे असताना त्रास हा फक्त आईलाच होतोय या विचाराने दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेवर
या एका गोष्टीमुळे आपण बायकोचे जन्मभर ऋणाईत होतो.. काही पर्यायच नाही हो ! सर्वत्र समान दृष्टी असणार्‍या बाप्पाने या बाबतीत असे का केले असावे कोणास ठाऊक !

सुबोध खरे 25/03/2014 - 12:40
होणारे मूल दोघांचे असताना त्रास हा फक्त आईलाच होतोय या विचाराने दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेवर""या एका गोष्टीमुळे आपण बायकोचे जन्मभर ऋणाईत होतो." या गोष्टीशी मी सहमत नाही. माझी दोन्ही मुले लष्कराच्या रुग्णालयात एपिड्यूरल अनाल्गेसिया(epidural analgesia) म्हणजे कमरेत दुख् निवारक औषधे देऊन मुळीच न दुखता जन्माला आली. आतासुद्धा ज्यांना शक्य आहे त्यांनी या पर्यायाचा जरूर वापर करावा असे माझे मत आहे. माझी बायको सुद्धा डॉक्टर आहे आणि ती माझ्या मित्रांबरोबर( स्त्रीरोग तज्ञ) कळा देत असताना गप्पा मारत होती. तिला वेदना झाल्या नाहीत म्हणजे मी बायकोचा ऋणी असू नये असे नाही. शिवाय गरोदरपणाचे स्त्रियांना होणारे फायदे कितीतरी आहेत. भूक लागते पाहिजे ते खाता येते वजन वाढले तरी कोणी विचारत नाही उलट वजन का वाढले नाही अशी विचारणा होते. डोहाळे आणि कोडकौतुक पुरवले जाते. सासू आणि नवर्याकडून पाहिजे तितके लाड करून घेत येतात. त्वचेचा पोत सुधारतो, (माझी बायको तिच्या गर्भारपणा सर्वात जास्त सुंदर दिसत असे) केस गळणे थांबते इ इ. (दुर्दैवाने मला लेबर रूम मध्ये आत जाऊ दिले नाही कारण त्यावेळी तशी पद्धत नव्हती)पण माझी दोन्ही मुले दहा बारा डॉक्टरांच्या उपस्थितीत(जे स्वतःहून कोलवर नसताना आले) राजेशाही पद्धतीने जन्माला आली.(हा डॉक्टर असण्याचा फायदा आहे).

In reply to by सुबोध खरे

विटेकर 25/03/2014 - 15:05
" या एका गोष्टिमुळे " च्या ऐवजी " या किमान एका गोष्टीमुळे तरी " असा वाक्यप्रयोग करायला हवा होता. दुसरे असे की हे वेदनाशामक इन्जेक्श्न मग प्रचलित का नाही ? की फक्त लष्करी इस्पितळातच उपलब्ध असते?

In reply to by विटेकर

सुबोध खरे 25/03/2014 - 19:59
हे औषध कोणतेही खास औषध नाही आणि ते सहज सर्वत्र उपलब्ध आहे. यासाठी निष्णात भूलशास्त्र तज्ञ लागतो शिवाय तो भूल तज्ञ पूर्ण वेळ (सात ते आठ तास) तेथे हजर असावा लागतो. अशा साठी तेवढे जास्त पैसे द्यायला लागतात आणि त्याची तयारी बर्याच लोकांची नसते. (हिरानंदानी रुग्णालयात हा अनुभव घेतला आहे. शिवाय बायकांनी कळा काढल्या तर काय बिघडले अशा मनोवृत्तीची माणसे आहेतच). छोट्या खाजगी रुग्णालयात असे भूल तज्ञ सहज उपलब्ध नसतात हेही तितकेच खरे. कळा दिल्या नाहीत तर तुम्हाला मुलाबद्दल कमी प्रेम वाटते किंवा तुमचे आईपण परिपूर्ण नाही /कमी आहे असे वेडगळ टोमणे आम्ही बरेच ऐकले आहेत. सिझेरियन झाले त्या बायका काय कमी दर्जाच्या आया असतात हा साधा प्रश्न विचारल्यावर त्या बायका निरुत्तर झाल्या हे अलाहिदा. पण भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे ? हे वाक्य त्रिकाल अबाधीत सत्य आहे. असो. या बद्दल माहिती कमी आहे आणि गैरसमज जास्त आहेत हि वस्तुस्थिती.

In reply to by सुबोध खरे

शिल्पा नाईक 27/03/2014 - 11:01
डो. खरे साहेब. अगदी बरोबर. मला injection देउन पण एकही कळ आली नाही अन मग सी-सेक्शन कराव लागल्यावर सासुने असेच टोमणे मारले होते. अस्सा राग आला होता नं.... :D

In reply to by शिल्पा नाईक

सुबोध खरे 29/03/2014 - 20:53
पण भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे ? हे वाक्य त्रिकाल अबाधीत सत्य आहे. मी एवढ्या कळा काढल्या आणी हि आताची मुलगी हसत खेळत प्रसूत होते असं कसं चालेल. म्हणून मग हे टोमणे येणारच. हसून साजरे करावे

In reply to by सुबोध खरे

सखी 25/03/2014 - 18:25
(epidural analgesia) म्हणजे कमरेत दुख् निवारक औषधे देऊन मुळीच न दुखता जन्माला आली. --- ह्याने काही प्रमाणात त्रास कमी होत असला तरी पूर्णपणे न दुखता यावर (तुम्ही डॉक्टर आहात तरीसुद्धा) आक्षेप आहे. सरसकट सगळ्याच आयांची सुटका पटकन वा विनात्रासाची होत नाही हेही सत्य आहे. आणि कोडकौतुक वगैरे असले तरी ९ महीनेसुद्दा जसे आनंदी जाऊ शकतात तसेच उलट्या, पाठदुखी, नीट झोप न येणं, पायात गोळे येणं ह्या फक्त कॉमन गोष्टी) याने जिकीरीचेही जाऊ शकतात. इथे कोणालाही घाबरवायचा अजिबात उद्देश नाही, सगळ्या ताण, वेदना आणि त्रासातुन जाऊनसुद्दा माझ्या मुलांचा जन्माचे दिवस माझ्या आयुष्यातले सगळ्यात आनंदी दिवस आहेत :)

In reply to by सखी

सुबोध खरे 25/03/2014 - 20:16
ह्याने काही प्रमाणात त्रास कमी होत असला तरी पूर्णपणे न दुखता यावर आक्षेप आहे. यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? माझ्या बायकोने दोनही वेळा पूर्ण वेदनारहित प्रसूती केली आहे आणि ते १००% वेदनारहित असते हे सत्य आहे.शिवाय त्याच नलिकेतून वेदना शामक दिल्याने पुढचे २४ तास प्रसुतीच्या थकव्यातून बाहेर पडेपर्यंत वेदनारहित असल्याने माझी बायको आनंदात होती. (किंबहुना जर सिझेरियन करायला लागले तर त्याच वेदनारहित (epidural analgesia) अवस्थेत ते करता येते हा त्याचा आणखी एक फायदा आहे). आणि ज्यांना परवडते त्यांनी जरूर वेदनारहित प्रसूती करावी. उगाच कष्ट काढल्याने काही क्रांती होत नाही. आणि कोठेही कापल्याची जखम नसल्याने सिझेरियन सारखी नंतर कटकट होत नाही. माझे म्हणणे एवढेच होते कि बायकोने कळा दिल्या तर तुम्ही तिचे ऋणाईत होता हे मान्य नाही. बायकोने मुलाला जन्म दिला म्हणुन तिचे तुमच्यावर उपकार झाले हे मला मान्य नाही. नवरा बायकोच्या नात्यात उपकार किंवा ऋण या शब्दाला माझा आक्षेप आहे. मग बाप मुलासाठी जे काही कष्ट काढतो त्याला न्यूनतेच्या पातळीवर आणले जाते. याचा अर्थ ज्या दुर्दैवी स्त्रीला मुल होत नाही तिच्या नवर्याने काय तिच्यावर उपकार केले आहेत काय?अशा अनेक स्त्रिया मी रोज पाहत आलो आहे. गरोदरपणात वेगवेगळे त्रास होतात त्याला कमी लेखणे हा हेतू नाही पण त्यात मिळणाऱ्या आनंदापुढे ते काहीच नव्हे.

In reply to by सुबोध खरे

सखी 25/03/2014 - 21:03
मला फक्त म्हणायचे होते की पूर्ण वेदनारहित प्रसुती होणे, तुमची पत्नी कळा देत असताना गप्पा मारत असणे सत्य असेलच, काही संशय नाही. पण हे सरसकट सगळ्यांना लागु होऊ शकत नाही (तुमचा तसा उद्देश नसेलही). तुम्हाला तुमचा अनुभव सांगायचा होता, तीच गत माझीही होती फक्त epidural घेतल्यावर मदत झाली पण सगळं काही कोप-यावरच्या दुकानातुन गोळ्या-बिस्कीटं आणण्याइतकं सोपही नाही इतकचं म्हणण आहे. आणि थोडेसेच वेगवेगळे त्रास मांडले कारण कोडकौतुकाचा उल्लेख होता अर्थात यातुन नव-याने कायम बायकोच्या उपकाराखाली रहावे हा अजिबात उद्देश नाही, हेवेसांनल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
शेवटच्या सोनोग्राफीला एक एप्रिल तारीख दिली गेली तेव्हा आमच्याकडचे सारेच त्या तारखेला न झाले तरच बरे असे म्हणत होते. कारण काय, तर एप्रिल फूलच्या दिवशीच झाले तर नशिबी आयुष्यभराची चिडवाचिडवी. मी मात्र या उलट मताचा. एखाद्या स्पेशल दिवशी होतेय तर चांगलेच की, चिडवाचिडवी एंजॉय करायची की झाले. पण होणारे मूल मात्र नशीबात याही पेक्षा स्पेशल दिवस घेऊन येणार आहे याची कल्पना मात्र तेव्हा आम्हा कोणालाच नव्हती. तब्बल दोनेक आठवडे आधी म्हणजे अठरा मार्चलाच दुपारी बाराच्या सुमारास फोन खणखणला. पाणी कमी झालेय, बाळाची हालचाल मंदावली आहे, आज संध्याकाळीच अ‍ॅडमिट व्हायला सांगितले आहे.

लग्न पाहावे करून

Prajakta२१ ·

रेवती 24/03/2014 - 04:35
तेजश्री प्रधान कोण ते काय आठवत नाही हो. पण कालच हसी तो फसी पाह्यला. माझे त्याबाबतचे मत अनाहितामध्ये सव्वादोन ओळीत लिहिले आहे. कथा वरचेवर गुंडाळलेली वाटली. अगदी सहमत. तरी मनोरंजन झाले. मला गाणी आवडली. जरा वेगळ्या चाली होत्या म्हणून असेल कदाचित! पंजाबी वेडींग गाणे म्हणावे तसे चांगले झाले नाहीये, म्हंजे नाच! ती परिणीती चोप्रा मला आवडते म्हणून पाहिला. आता क्वीनबद्दल बरेच ऐकून आहे.

In reply to by प्यारे१

रेवती 24/03/2014 - 18:36
या धाग्याला एकही प्रतिक्रिया आली नव्हती म्हणून वर काढला हो. आता ती तेजश्री नाही म्हायती त्याला काय कर्णार? जे माहितीये ते ल्ह्यायचं झालं! तुम्ही बरे अगदी पाळतीवर आहात ते?

In reply to by रेवती

आत्मशून्य 25/03/2014 - 00:16
आणी अनुरागकश्य(चा डार्कनेस... खोलीत कोंडले गेले असल्याने अस्थीर मनाच्या व्यक्तीचे साडीतच मुतणे) वगैरेंचे स्टोरी टेलींग फॅक्टर्स कोठेही कथेचा ट्रॅक न घसरवता मिक्स केल्या गेल्याने दोन ध्रुव एकमेका भेटताही अनपेक्षिप पण अपेक्षीत तोल साधला गेला. परिणीता मात्र फारच आवडते. लै बोलके ड्वॉळे हायत तीचे, अभिनय करते मॉडेलींग नाही, हीच जमेची बाजु आहे. लॉट्स ऑफ सोफ्ट किसेस टु हर.

दिव्यश्री 24/03/2014 - 11:25
तेजश्री प्रधान कोण ते काय आठवत नाही हो>>>> *beee* :( अहो काय ओ रेवाक्का ...तुम्हाले ती सुप्रशिद्ध मालिका म्हायती नाय ? :P होणार सून(फूलं) *fool* मी त्या घरची *dash1* ...त्यातली सूनबाय हाय तेजश्री ...झेंडा मधली जुवेकरची भहीण. वेळ असल्यास लिंक बघा ... बाकी ह्यो पिच्चर कुड बघाया मिळल ? https://www.google.co.in/search?newwindow=1&site=&source=hp&q=tejashri+pradhan&oq=tejashri+&gs_l=hp.3.0.0l10.1477.4755.0.6055.9.7.0.2.2.0.232.1389.0j2j5.7.0....0...1c.1.37.hp..0.9.1416.htztYO310sU

In reply to by बॅटमॅन

++१११ काय तर म्हणे ६-७ सासवा.. त्यांचे बिंडोक वागणे-बोलणे, उगिचच त्या मधूराच्या नवर्‍याला अगदि कुक्कुल बाळ समजून त्याचे लाड करत राहणे आणि त्यावर कहर म्हणजे या मधूराचे उगिचच चेहर्‍यावर हसू दाखवणे (जे तद्दन खोटे वाटते..)

In reply to by स्मिता चौगुले

बॅटमॅन 25/03/2014 - 12:46
आणि भरीस भर म्ह. अशा कैक सीर्यल्समध्ये 'चांगली' स्त्री पात्रे कधीही जीन प्यांट इ. घालत नाहीत, कायम साडी तरी नैतर पंजाबी तरी. तेच एखादी व्हँप इ. असेल तर मात्र जीन्समध्ये दाखवणार, या दीडदमडीच्या लोकांच्या मेंदूची कीव येते राव.

In reply to by बॅटमॅन

मलातर अशा सीरीयल्स मधील व्हॅम्पच आवडतात ... गुळुमुळु नायिकेपेक्षा त्याच भारी वाटतात.... शिवाय There is nothing more sexier than a women with secrets असं कुणीतरी म्हणुन ठेवलय :)

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 25/03/2014 - 12:58
हे बाकी खरं हो पूर्णपणे! कैतरी जान पायजे, उगा नैतर ताटाखालची मांजरी झालेल्या गुड गर्ल अन इमोशनली डायबेटिक गोग्गोड नायिकेकडे बघवतही नै.

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 25/03/2014 - 14:53
अरे सहीच काय एक एक शब्द आहेत ...माण गयेले हय उस्ताद आपुण तेरेकु . :D बाकी काहीही असो मिपामुळे माझ्या शब्दसंपदेमध्ये आणि जनरलच कणोलेजमध्ये भर पडत चालली आहे . :P *wink* *good*

In reply to by बॅटमॅन

रेवती 25/03/2014 - 17:27
ब्याटम्यान व प्रसादकाकांशी सहमत. उंच माझा झोका ही एक सिरियल सोडल्यास मी एकही मराठी किंवा हिंदी सिरियल पाह्यलेली नाही ती याच कारणाने. घरातल्या घरात नटून बसणार्‍या नायिका व कपाळावर नागिणीच्या आकाराचे कुंकू/ टिकली लावणार्‍या दुष्टांगना पाहण्यात विंटरेष्ट नाही. एकदा काहीतरी पाहिले तर त्यात एक वाक्य तीनवेळा ढ्यांटढ्यां (हेही ३दा) वेगवेगळ्या कोनांमधून दाखवले होते. जौ दे ना राव!

In reply to by रेवती

विटेकर 28/03/2014 - 16:03
उंच माझा झोका ही एक सिरियल सोडल्यास मी एकही मराठी किंवा हिंदी सिरियल पाह्यलेली नाही ती याच कारणाने. रेवतीताई कित्ती कित्ती सुखी आहात तुम्ही ! जिच्या हाती पाळण्याची दोरी असायची ,हल्ली तिच्या हाती हल्ली रिमोट अस्तोय. सगळा इमोशनल अत्याचार सहन करावा लागतो..

In reply to by दिव्यश्री

रेवती 27/03/2014 - 00:27
अगो दिव्यश्री एक सांगायचे र्‍हायले. तेजश्री प्रधान कोण? हे एक मैत्रिण विचारत होती आणि मग मला ती कोण हे फाईंडौट्ट करायची भयंकर गरज वाटू लागली. शेवटी तिचा फोटू बघितलाच! चांगलीये दिसायला वगैरे.

In reply to by रेवती

दिव्यश्री 31/03/2014 - 20:52
ती कोण हे फाईंडौट्ट करायची भयंकर गरज वाटू लागली.>>> :D शेवटी तिचा फोटू बघितलाच! चांगलीये दिसायला वगैरे.>>>गोरी नाय ...सावळी हाय . *beee*

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 01/04/2014 - 14:28
सौंदर्याच्या रेसिस्ट कल्पनांनी चांगलेच मनोरंजन झाले बरंका!>>>आपल्या सगळ्यांच्याच मणोरंजणासाठीच तर मिपा आहे नै का ? मला जरा रेसिस्ट या शब्दाची मराठीत व्याख्या सांगाल का ? तुमची स्वतः तयार केलेली नको . सौंदर्याच्या कल्पना या व्यक्तिसापेक्ष आहेत असे मला तरी वाटते . एकच गोष्ट , व्यक्ती , ठिकाण एकाच वेळेस सगळ्याच लोकांना आवडू शकेल अस मला नाही वाटत *NO* . प्रत्येक रंगामध्ये निरनिराळ्या छटा असतात . कोणाला कुठली छटा आवडावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे . :) मलातरी ती सावळीच वाटते . ती काही गोरी अथवा गहुवर्णीय नाही हे माझ स्पष्ट मत आहे . अगदी वैयक्तिक . बाकी ती तुम्हाला विश्वसुंदरी वाटली तरी मला काही समस्या नाही . :)

In reply to by दिव्यश्री

बॅटमॅन 01/04/2014 - 14:32
मलातरी ती सावळीच वाटते . ती काही गोरी अथवा गहुवर्णीय नाही हे माझ स्पष्ट मत आहे
आणि
बाकी ती तुम्हाला विश्वसुंदरी वाटली तरी मला काही समस्या नाही .
यात गोरे असणे=सुंदर असं अ‍ॅझम्प्शन जाणवतंय. शिवाय 'तुम्हांला विश्वसुंदरी वाटली तरी हर्कत नै' इ.इ. अनावश्यक शेर्‍यांवरूनही अ‍ॅटिट्यूड कळून येतो. हाच रेसिझम आहे. उदाहरण पुरवल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by Prajakta२१

रेवती 27/03/2014 - 00:23
कोणत्या चित्रपटांच्या? फक्त सांगा, आम्हाला चित्रपटाची चिरफाड (मत वगैरे नाही हां) करायला भयंकर मजा येते. ;) तुम्ही जर समीरसूर साहेबांना सांगितलत तर ते काम भन्नाट होते याची खात्री कोणीही मिपाकर देतील. ;)

पैसा 27/03/2014 - 08:41
आजकाल बरेच मराठी शिणेमे लग्न या विषयावर येतात वाट्टे आणि त्यात काम करणारी ही मराठी शीरियल्समधली मंडळी असतात काय? (मराठी शिरियल्स आणि सिनेम्यांबाबत घोर अज्ञानी)

In reply to by पैसा

दिव्यश्री 27/03/2014 - 10:00
दुर्दैवाणे हो असेच उत्तर आहे . हे दुष्टचक्र आहे . जे शिरेलीत त्येच पिच्चर मंदी (आर्थिक नव्ह ) आणि ज्ये पिच्चर मंदी तेच शिरेलीत . त्यांनी तरी णवीण , तडफदार , शिरेली आणि पिच्चारला शोभणारे थोबडे *shok* आणि नाजूक हिर्वनी कुडून आणायच्या ;) :D ? परतेग वेळेस नवीन क्ष्टुरी , सगळ चांगल त्येबी नवं कुढून आणाचे ?? *NO* येक तर बख्खळ पैका घालून हे बणवयाचं मग लोकांच्या श्या खायच्या *dash1* , मिपावाले तर टपूनच असतात कंदी बकरा मिळतोय म्हून . *beee*

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 31/03/2014 - 21:14
कस्ल कस्ल ...हे कस्च कस्च च्या ष्टायलीत वाचावे . :D बाकी साक्षात गुर्जीं बरोबर तुलणा केली गेल्याणे अजुण हवेतच आहे . *shok* योग्य वेळी योग्य उत्तर देणेत येयील . *stop*

In reply to by दिव्यश्री

सूड 27/03/2014 - 14:36
>>कंदी बकरा हल्ली बकरे पण 'कंदी' मिळायला लागले? आमच्यावेळी असं नव्हतं. फक्त पेढेच कंदी मिळत असत, तेही सातार्‍याचे!!

In reply to by सूड

बॅटमॅन 27/03/2014 - 14:38
ठ्ठो =)) वशाडी येवो या सुडक्यावर =)) अन बकरा जर कंदी मिळाला तर खाणारेस काय रे, इतका हरखून विचारायलास ते =))

In reply to by दिव्यश्री

रेवती 27/03/2014 - 18:31
त्यांणा णवीण ष्टुरी हवी असल्यास आपन देऊ शक्तो की! पन खोलात जाऊण विचार वैग्रे करावा लागल त्याचं काय? दर्वेळी काय नवे चेहरे आनायची चिंता कराया नगं, हितं मिपावरची दोनचार मंडली पाठवूण दिली तर काम होईल. पैतै तर कायमस्वरुपी मिपासासू आणि मी कायमसोरुपी मिपाआज्जी हायेच! तू हिरवीन होते का? त्यामुळे आपन कुनाचं नुस्कान करत णाही. शिरेस विषयावर्ची शिरेल केली आनि विणोदी म्हणून गाजली तरी पैसा वसूल! माझ्याकडे फँड्रीसारखी एक ष्टुरी तयार है. नाव हाई 'लाँड्री'!

In reply to by रेवती

दिव्यश्री 27/03/2014 - 18:52
नाव हाई 'लाँड्री'!>>> *LOL* तू हिरवीन होते का?>>> व्हय जी... पण मी हिर्वीणी सारखी दिसत नाय ओ त्येच काय करणार ? :( ...आंन हिरू कोण *beee* ??? प्यांटवाल्यांना चानस द्येणार का हिरूचा ;) *blush* ? नायतर मी लेडी व्हिलन . हाय काय नाय काय . शिरेस विषयावर्ची शिरेल केली आनि विणोदी म्हणून गाजली तरी पैसा वसूल! >>> हाहाहाहा हीहीहीही सौ सुनार कि एक रेव्वाक्का कि ... :P :D

In reply to by रेवती

स्पंदना 28/03/2014 - 02:39
रेवाक्का रॉक्स!! चला हलवुन सोडु छोटा आनी मोठा बॉक्स!! काय न्हाय! काय न्हाय!! डायलॉग रायटर म्हुन वर्णी लावायचा प्रेयत्न. मलापण कायतरी साईड काम देवा हां. तुमी दोघी सासवा अन आज्ज्या झाल्यावर मला कायतरी शिल्लक ठेवा. >>>>लाँड्री>>>> अशक्य हायेस रेवाक्का!!

In reply to by स्पंदना

रेवती 28/03/2014 - 20:49
ओक्के, अपर्नातायी, तुमी मेक अपची जबाबदारी सांबाळता काय? तसं आसन तर लई झ्याक काम व्हील! ते नगं आसन तर मग आता तुमीच सांगा कोन्तं काम कराया आवडन!

In reply to by सस्नेह

पैसा 28/03/2014 - 15:11
चालेल काय, धावेल की! @इरसाल भौ, अजून आम्ही मिपा व्हिलण कोण त्याचं नाव नाय घेतलं. सांगू का, सांगू??

In reply to by पैसा

दिव्यश्री 30/03/2014 - 09:43
हल्ली ६ सास्वांची फ्याशन आहे.>>> :D पैतै...अहो काय हो हे ...खरतर तुम्ही एकट्याच भारी (वजणाणे नव्हे ;) ) व्हायला पाहिजे ... *beee*

In reply to by सस्नेह

रेवती 28/03/2014 - 20:47
स्णेहांकिता, बाळा, तुला शेतात फिरनार्‍या मुलीचा रोल पक्का! खरंतर आमाला सोळा वर्षाची पायजे हुती पन आता पंध्रा चालवून घ्यु! इरविण आनि हिरो आदीच ठर्लेत. दिव्यश्री आनि त्यांचं प्यांटवालं हैत की!

In reply to by रेवती

साती 28/03/2014 - 21:27
'एक गुड न्यूज आहे, तुमची मुलगी आई होणार आहे' हे १६ वर्षाच्या मुख्य हिरवीनीचे फक्तं तोंड पाहून सांगणार्या डॉक्टरणीचा रोल असल्यास मला द्या. ;)

In reply to by साती

स्पंदना 01/04/2014 - 03:53
आन ती आई व्हणार असते तिला भुताने झपाटल्याने. जमतय जमतय अपर्णा रेवाक्का मेपक म्हणत असली तरी तु ष्टुरी रायटर व्हायची सपन नको थांबवु.

In reply to by पैसा

इरसाल 29/03/2014 - 14:03
आजकाल बरेच मराठी शिणेमे लग्न या विषयावर येतात वाट्टे आणि त्यात काम करणारी ही मराठी शीरियल्समधली मंडळी असतात काय? तरी लोकं लग्न पुढे पुढे ढकलतात......कारण एवढे थोराड नायक नायिका बघुन जर कोणाला वाटले की अशीच जर नवरा / बायको मिळाली तर.........

सूड 27/03/2014 - 14:40
ते तेजश्री प्रधान, तो शशांक केतकर आणि त्याच्या त्या सहा आया डोक्याला वात आणतात. कधी नव्हे ते झी मराठीला चेपुवर लाईक केलं तर तिथेही यांचे प्रश्न!! आता जान्हवीच्या आयुष्यात काय होणार, श्री घरी परत येईल का? मी सरळ प्रतिसाद टाकला "अच्छा, म्हणजे श्री घर सोडून गेलाय का? नै त्याचं काये हल्ली एका लग्नाची तिसरी गोष्ट ही एकच मालिका बघतो आम्ही झी वर. त्यामुळे श्रीचं काय चाल्लंय ते माहीत नाही". ;)

In reply to by सूड

बॅटमॅन 27/03/2014 - 14:44
त्या कथालेखकांना उलटे टांगून, चाबकाचे चार फटकारे मारून मिर्ची-मिरी-लसूण-अजून जे कै झोंबेल-त्याची धुरी देऊन असं कैकदा विचारावं वाटतं, भो*** दिमाग वापरायला बंदी केलीय का आँ?????????????????????????????

In reply to by बॅटमॅन

सूड 27/03/2014 - 14:51
>>त्या कथालेखकांना उलटे टांगून, चाबकाचे चार फटकारे मारून मिर्ची-मिरी-लसूण-अजून जे कै झोंबेल-त्याची धुरी देऊन असं कैकदा विचारावं वाटतं येवढं कशाला करायला हवं. या धाग्यावरचे मिपाकरांचे प्रतिसाद ते वाचतील अशी सोय करा फक्त!! चाळणीत पाणी घेऊन जीव देतील ते !! ;)

In reply to by सूड

बॅटमॅन 27/03/2014 - 14:53
तेही आहेच म्हणा. पण गेंड्याची कातडी झाली असेल एव्हाना त्यांची, त्यामुळे कार्यवाही कधी तरी केलीच पाहिजे ;)

In reply to by सूड

इथे अजून कुणी जीव दिल्याचे ऐकलेले नही म्हणजे इथे त्यांच्या पैकी कुणी नही असा तर्क करावा काय ???

In reply to by अत्रन्गि पाउस

सूड 27/03/2014 - 18:29
>>इथे अजून कुणी जीव दिल्याचे ऐकलेले नही म्हणजे इथे त्यांच्या पैकी कुणी नही असा तर्क करावा काय ??? यापैकी काहीतरी एक सापडत नसेल जीव द्यायला. कुणी नसेलची अशी अपेक्षा करणे चूक आहे. आता तुम्हीच प्रश्न विचारलात म्हणून संशयाचं पहिलं लक्ष्य तुम्हीही असू शकता. ;)

In reply to by सूड

रेवती 27/03/2014 - 18:34
माझ्याकडे सपिटाच्या चाळणीपासून ज्वारी चळायच्या चाळणीपर्यंत सर्व प्रकार आहेत. हवी असल्यास कळवणे. तुमच्यासाठी कायपन!

In reply to by दिव्यश्री

बॅटमॅन 27/03/2014 - 19:44
चेष्टा कसली त्यात? सरळ विचारतोय, याआधी कधी ऐकला नव्हता म्हणून. अन पृच्छा शब्दाबद्दलच होती. तुमच्याबद्दल अस्ती तर तसे सरळ लिहिले असते, कांयं संमंजंलेंतं?

In reply to by बॅटमॅन

सूड 27/03/2014 - 21:40
>>पण अख्ख्या पुण्यात मैदा तिकडेच मिळतो असं थोडंच आहे? विचारुन बघायला हवं. मात्र तिथेच मैद्याचा शोध लागला असं उत्तर मिळाल्यास नवल वाटू नये. ;)

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 27/03/2014 - 20:37
णयी हु मय म्हटलं णा इतके येळेला ...कोणी कधी कस कुठ काय बोलेल याचा णेम णाय . सो खात्री केली . सरळ सांगते मातोश्री , नासिकच्या तरी त्यांच्या आणि पुणेकरांच्या तोंडी मी कायम सपीठ हा शब्द ऐकला आहे . मातोश्री सांगायच्या की मी लहानपणी सपिठासारखी (गोरी/ पांढरी) होते . म्हणून हा शब्द माहिती आहे . *beee* ( याच्यात जाहिरात /झैरात करण्याचा हटू /उद्देश नाही याची नोंद घेण्यात यावी कृपयाच .)

In reply to by दिव्यश्री

बॅटमॅन 27/03/2014 - 21:29
सरळ सांगते मातोश्री , नासिकच्या तरी त्यांच्या आणि पुणेकरांच्या तोंडी मी कायम सपीठ हा शब्द ऐकला आहे .
असेल ओ, आम्हांला काय माहिती? आम्ही मिरजेचे, तिकडे हा शब्द कधी ऐकला नै. पुढे पुण्यास आलो तिकडेही कधी ऐकला नै-यद्यपि कैक नाशिककर मित्र असले तरी. प्रामाणिक शंका इच्यारली, इतकं उचकतांव कशाला उगाच वय इच्यारल्यासारख्या ;) शेवटी तुम्ही अकेल्याच सब पे भारी आहात ना, मग टेण्षण कसलं? :)

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 28/03/2014 - 14:58
प्रामाणिक शंका इच्यारली >>>ओके . इतकं उचकतांव कशाला उगाच वय इच्यारल्यासारख्या Wink>>>म्या कुड उचकले ? :( कितीही क्रिमी फासल्या , सर्जर्या केल्या तरी निसर्गाला थोडीच फसवू शकणार आहे कोणी ? माझ्या बाबतीत असल्या फालतू गोष्टी(वैयक्तिक प्रश्न विचारणे, वय/पगार विचारणे, लपवणे ,खोटे सांगणे , विचाराण्यार्याची अक्कल काढणे ई. ई .) करण्यात विन्त्रेष्ट नाय आणि मला तेवढा वेळही नाही . कोणाच्या बोलण्याला ,लिहिण्याला ,प्रशण विचारण्याला किती महत्व द्यायचे हे मला मिपाने शिकवले आहे , शिकवीत राहील पुढेही . सो चिल . :D त्याबद्दल मी मिपाची सदैव ऋणी राहिण . :) जगात पुष्कळ चांगल्या गोष्टी आहेत करण्यासारखा आणि जिथे काहीही लपवाछपवी करावी लागतच नाही . :) शेवटी तुम्ही अकेल्याच सब पे भारी आहात ना, मग टेण्षण कसलं? स्मिले>>> मला कसलंच टेण्षण नाही तुम्हा सगळ्यांच्या(मिपाकरांच्या) आशीर्वादाणे... :)

In reply to by दिव्यश्री

मनीषा 28/03/2014 - 20:58
भोंडला कधी केला असेल ना तुम्ही? किंवा कुणाच्या भोंडल्याला गेला असाल.. त्यात गाणं आहे की ... "अश्शी सपीटी सुरेख बाई करंज्या कराव्यात ..."

रेवती 24/03/2014 - 04:35
तेजश्री प्रधान कोण ते काय आठवत नाही हो. पण कालच हसी तो फसी पाह्यला. माझे त्याबाबतचे मत अनाहितामध्ये सव्वादोन ओळीत लिहिले आहे. कथा वरचेवर गुंडाळलेली वाटली. अगदी सहमत. तरी मनोरंजन झाले. मला गाणी आवडली. जरा वेगळ्या चाली होत्या म्हणून असेल कदाचित! पंजाबी वेडींग गाणे म्हणावे तसे चांगले झाले नाहीये, म्हंजे नाच! ती परिणीती चोप्रा मला आवडते म्हणून पाहिला. आता क्वीनबद्दल बरेच ऐकून आहे.

In reply to by प्यारे१

रेवती 24/03/2014 - 18:36
या धाग्याला एकही प्रतिक्रिया आली नव्हती म्हणून वर काढला हो. आता ती तेजश्री नाही म्हायती त्याला काय कर्णार? जे माहितीये ते ल्ह्यायचं झालं! तुम्ही बरे अगदी पाळतीवर आहात ते?

In reply to by रेवती

आत्मशून्य 25/03/2014 - 00:16
आणी अनुरागकश्य(चा डार्कनेस... खोलीत कोंडले गेले असल्याने अस्थीर मनाच्या व्यक्तीचे साडीतच मुतणे) वगैरेंचे स्टोरी टेलींग फॅक्टर्स कोठेही कथेचा ट्रॅक न घसरवता मिक्स केल्या गेल्याने दोन ध्रुव एकमेका भेटताही अनपेक्षिप पण अपेक्षीत तोल साधला गेला. परिणीता मात्र फारच आवडते. लै बोलके ड्वॉळे हायत तीचे, अभिनय करते मॉडेलींग नाही, हीच जमेची बाजु आहे. लॉट्स ऑफ सोफ्ट किसेस टु हर.

दिव्यश्री 24/03/2014 - 11:25
तेजश्री प्रधान कोण ते काय आठवत नाही हो>>>> *beee* :( अहो काय ओ रेवाक्का ...तुम्हाले ती सुप्रशिद्ध मालिका म्हायती नाय ? :P होणार सून(फूलं) *fool* मी त्या घरची *dash1* ...त्यातली सूनबाय हाय तेजश्री ...झेंडा मधली जुवेकरची भहीण. वेळ असल्यास लिंक बघा ... बाकी ह्यो पिच्चर कुड बघाया मिळल ? https://www.google.co.in/search?newwindow=1&site=&source=hp&q=tejashri+pradhan&oq=tejashri+&gs_l=hp.3.0.0l10.1477.4755.0.6055.9.7.0.2.2.0.232.1389.0j2j5.7.0....0...1c.1.37.hp..0.9.1416.htztYO310sU

In reply to by बॅटमॅन

++१११ काय तर म्हणे ६-७ सासवा.. त्यांचे बिंडोक वागणे-बोलणे, उगिचच त्या मधूराच्या नवर्‍याला अगदि कुक्कुल बाळ समजून त्याचे लाड करत राहणे आणि त्यावर कहर म्हणजे या मधूराचे उगिचच चेहर्‍यावर हसू दाखवणे (जे तद्दन खोटे वाटते..)

In reply to by स्मिता चौगुले

बॅटमॅन 25/03/2014 - 12:46
आणि भरीस भर म्ह. अशा कैक सीर्यल्समध्ये 'चांगली' स्त्री पात्रे कधीही जीन प्यांट इ. घालत नाहीत, कायम साडी तरी नैतर पंजाबी तरी. तेच एखादी व्हँप इ. असेल तर मात्र जीन्समध्ये दाखवणार, या दीडदमडीच्या लोकांच्या मेंदूची कीव येते राव.

In reply to by बॅटमॅन

मलातर अशा सीरीयल्स मधील व्हॅम्पच आवडतात ... गुळुमुळु नायिकेपेक्षा त्याच भारी वाटतात.... शिवाय There is nothing more sexier than a women with secrets असं कुणीतरी म्हणुन ठेवलय :)

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 25/03/2014 - 12:58
हे बाकी खरं हो पूर्णपणे! कैतरी जान पायजे, उगा नैतर ताटाखालची मांजरी झालेल्या गुड गर्ल अन इमोशनली डायबेटिक गोग्गोड नायिकेकडे बघवतही नै.

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 25/03/2014 - 14:53
अरे सहीच काय एक एक शब्द आहेत ...माण गयेले हय उस्ताद आपुण तेरेकु . :D बाकी काहीही असो मिपामुळे माझ्या शब्दसंपदेमध्ये आणि जनरलच कणोलेजमध्ये भर पडत चालली आहे . :P *wink* *good*

In reply to by बॅटमॅन

रेवती 25/03/2014 - 17:27
ब्याटम्यान व प्रसादकाकांशी सहमत. उंच माझा झोका ही एक सिरियल सोडल्यास मी एकही मराठी किंवा हिंदी सिरियल पाह्यलेली नाही ती याच कारणाने. घरातल्या घरात नटून बसणार्‍या नायिका व कपाळावर नागिणीच्या आकाराचे कुंकू/ टिकली लावणार्‍या दुष्टांगना पाहण्यात विंटरेष्ट नाही. एकदा काहीतरी पाहिले तर त्यात एक वाक्य तीनवेळा ढ्यांटढ्यां (हेही ३दा) वेगवेगळ्या कोनांमधून दाखवले होते. जौ दे ना राव!

In reply to by रेवती

विटेकर 28/03/2014 - 16:03
उंच माझा झोका ही एक सिरियल सोडल्यास मी एकही मराठी किंवा हिंदी सिरियल पाह्यलेली नाही ती याच कारणाने. रेवतीताई कित्ती कित्ती सुखी आहात तुम्ही ! जिच्या हाती पाळण्याची दोरी असायची ,हल्ली तिच्या हाती हल्ली रिमोट अस्तोय. सगळा इमोशनल अत्याचार सहन करावा लागतो..

In reply to by दिव्यश्री

रेवती 27/03/2014 - 00:27
अगो दिव्यश्री एक सांगायचे र्‍हायले. तेजश्री प्रधान कोण? हे एक मैत्रिण विचारत होती आणि मग मला ती कोण हे फाईंडौट्ट करायची भयंकर गरज वाटू लागली. शेवटी तिचा फोटू बघितलाच! चांगलीये दिसायला वगैरे.

In reply to by रेवती

दिव्यश्री 31/03/2014 - 20:52
ती कोण हे फाईंडौट्ट करायची भयंकर गरज वाटू लागली.>>> :D शेवटी तिचा फोटू बघितलाच! चांगलीये दिसायला वगैरे.>>>गोरी नाय ...सावळी हाय . *beee*

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 01/04/2014 - 14:28
सौंदर्याच्या रेसिस्ट कल्पनांनी चांगलेच मनोरंजन झाले बरंका!>>>आपल्या सगळ्यांच्याच मणोरंजणासाठीच तर मिपा आहे नै का ? मला जरा रेसिस्ट या शब्दाची मराठीत व्याख्या सांगाल का ? तुमची स्वतः तयार केलेली नको . सौंदर्याच्या कल्पना या व्यक्तिसापेक्ष आहेत असे मला तरी वाटते . एकच गोष्ट , व्यक्ती , ठिकाण एकाच वेळेस सगळ्याच लोकांना आवडू शकेल अस मला नाही वाटत *NO* . प्रत्येक रंगामध्ये निरनिराळ्या छटा असतात . कोणाला कुठली छटा आवडावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे . :) मलातरी ती सावळीच वाटते . ती काही गोरी अथवा गहुवर्णीय नाही हे माझ स्पष्ट मत आहे . अगदी वैयक्तिक . बाकी ती तुम्हाला विश्वसुंदरी वाटली तरी मला काही समस्या नाही . :)

In reply to by दिव्यश्री

बॅटमॅन 01/04/2014 - 14:32
मलातरी ती सावळीच वाटते . ती काही गोरी अथवा गहुवर्णीय नाही हे माझ स्पष्ट मत आहे
आणि
बाकी ती तुम्हाला विश्वसुंदरी वाटली तरी मला काही समस्या नाही .
यात गोरे असणे=सुंदर असं अ‍ॅझम्प्शन जाणवतंय. शिवाय 'तुम्हांला विश्वसुंदरी वाटली तरी हर्कत नै' इ.इ. अनावश्यक शेर्‍यांवरूनही अ‍ॅटिट्यूड कळून येतो. हाच रेसिझम आहे. उदाहरण पुरवल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by Prajakta२१

रेवती 27/03/2014 - 00:23
कोणत्या चित्रपटांच्या? फक्त सांगा, आम्हाला चित्रपटाची चिरफाड (मत वगैरे नाही हां) करायला भयंकर मजा येते. ;) तुम्ही जर समीरसूर साहेबांना सांगितलत तर ते काम भन्नाट होते याची खात्री कोणीही मिपाकर देतील. ;)

पैसा 27/03/2014 - 08:41
आजकाल बरेच मराठी शिणेमे लग्न या विषयावर येतात वाट्टे आणि त्यात काम करणारी ही मराठी शीरियल्समधली मंडळी असतात काय? (मराठी शिरियल्स आणि सिनेम्यांबाबत घोर अज्ञानी)

In reply to by पैसा

दिव्यश्री 27/03/2014 - 10:00
दुर्दैवाणे हो असेच उत्तर आहे . हे दुष्टचक्र आहे . जे शिरेलीत त्येच पिच्चर मंदी (आर्थिक नव्ह ) आणि ज्ये पिच्चर मंदी तेच शिरेलीत . त्यांनी तरी णवीण , तडफदार , शिरेली आणि पिच्चारला शोभणारे थोबडे *shok* आणि नाजूक हिर्वनी कुडून आणायच्या ;) :D ? परतेग वेळेस नवीन क्ष्टुरी , सगळ चांगल त्येबी नवं कुढून आणाचे ?? *NO* येक तर बख्खळ पैका घालून हे बणवयाचं मग लोकांच्या श्या खायच्या *dash1* , मिपावाले तर टपूनच असतात कंदी बकरा मिळतोय म्हून . *beee*

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 31/03/2014 - 21:14
कस्ल कस्ल ...हे कस्च कस्च च्या ष्टायलीत वाचावे . :D बाकी साक्षात गुर्जीं बरोबर तुलणा केली गेल्याणे अजुण हवेतच आहे . *shok* योग्य वेळी योग्य उत्तर देणेत येयील . *stop*

In reply to by दिव्यश्री

सूड 27/03/2014 - 14:36
>>कंदी बकरा हल्ली बकरे पण 'कंदी' मिळायला लागले? आमच्यावेळी असं नव्हतं. फक्त पेढेच कंदी मिळत असत, तेही सातार्‍याचे!!

In reply to by सूड

बॅटमॅन 27/03/2014 - 14:38
ठ्ठो =)) वशाडी येवो या सुडक्यावर =)) अन बकरा जर कंदी मिळाला तर खाणारेस काय रे, इतका हरखून विचारायलास ते =))

In reply to by दिव्यश्री

रेवती 27/03/2014 - 18:31
त्यांणा णवीण ष्टुरी हवी असल्यास आपन देऊ शक्तो की! पन खोलात जाऊण विचार वैग्रे करावा लागल त्याचं काय? दर्वेळी काय नवे चेहरे आनायची चिंता कराया नगं, हितं मिपावरची दोनचार मंडली पाठवूण दिली तर काम होईल. पैतै तर कायमस्वरुपी मिपासासू आणि मी कायमसोरुपी मिपाआज्जी हायेच! तू हिरवीन होते का? त्यामुळे आपन कुनाचं नुस्कान करत णाही. शिरेस विषयावर्ची शिरेल केली आनि विणोदी म्हणून गाजली तरी पैसा वसूल! माझ्याकडे फँड्रीसारखी एक ष्टुरी तयार है. नाव हाई 'लाँड्री'!

In reply to by रेवती

दिव्यश्री 27/03/2014 - 18:52
नाव हाई 'लाँड्री'!>>> *LOL* तू हिरवीन होते का?>>> व्हय जी... पण मी हिर्वीणी सारखी दिसत नाय ओ त्येच काय करणार ? :( ...आंन हिरू कोण *beee* ??? प्यांटवाल्यांना चानस द्येणार का हिरूचा ;) *blush* ? नायतर मी लेडी व्हिलन . हाय काय नाय काय . शिरेस विषयावर्ची शिरेल केली आनि विणोदी म्हणून गाजली तरी पैसा वसूल! >>> हाहाहाहा हीहीहीही सौ सुनार कि एक रेव्वाक्का कि ... :P :D

In reply to by रेवती

स्पंदना 28/03/2014 - 02:39
रेवाक्का रॉक्स!! चला हलवुन सोडु छोटा आनी मोठा बॉक्स!! काय न्हाय! काय न्हाय!! डायलॉग रायटर म्हुन वर्णी लावायचा प्रेयत्न. मलापण कायतरी साईड काम देवा हां. तुमी दोघी सासवा अन आज्ज्या झाल्यावर मला कायतरी शिल्लक ठेवा. >>>>लाँड्री>>>> अशक्य हायेस रेवाक्का!!

In reply to by स्पंदना

रेवती 28/03/2014 - 20:49
ओक्के, अपर्नातायी, तुमी मेक अपची जबाबदारी सांबाळता काय? तसं आसन तर लई झ्याक काम व्हील! ते नगं आसन तर मग आता तुमीच सांगा कोन्तं काम कराया आवडन!

In reply to by सस्नेह

पैसा 28/03/2014 - 15:11
चालेल काय, धावेल की! @इरसाल भौ, अजून आम्ही मिपा व्हिलण कोण त्याचं नाव नाय घेतलं. सांगू का, सांगू??

In reply to by पैसा

दिव्यश्री 30/03/2014 - 09:43
हल्ली ६ सास्वांची फ्याशन आहे.>>> :D पैतै...अहो काय हो हे ...खरतर तुम्ही एकट्याच भारी (वजणाणे नव्हे ;) ) व्हायला पाहिजे ... *beee*

In reply to by सस्नेह

रेवती 28/03/2014 - 20:47
स्णेहांकिता, बाळा, तुला शेतात फिरनार्‍या मुलीचा रोल पक्का! खरंतर आमाला सोळा वर्षाची पायजे हुती पन आता पंध्रा चालवून घ्यु! इरविण आनि हिरो आदीच ठर्लेत. दिव्यश्री आनि त्यांचं प्यांटवालं हैत की!

In reply to by रेवती

साती 28/03/2014 - 21:27
'एक गुड न्यूज आहे, तुमची मुलगी आई होणार आहे' हे १६ वर्षाच्या मुख्य हिरवीनीचे फक्तं तोंड पाहून सांगणार्या डॉक्टरणीचा रोल असल्यास मला द्या. ;)

In reply to by साती

स्पंदना 01/04/2014 - 03:53
आन ती आई व्हणार असते तिला भुताने झपाटल्याने. जमतय जमतय अपर्णा रेवाक्का मेपक म्हणत असली तरी तु ष्टुरी रायटर व्हायची सपन नको थांबवु.

In reply to by पैसा

इरसाल 29/03/2014 - 14:03
आजकाल बरेच मराठी शिणेमे लग्न या विषयावर येतात वाट्टे आणि त्यात काम करणारी ही मराठी शीरियल्समधली मंडळी असतात काय? तरी लोकं लग्न पुढे पुढे ढकलतात......कारण एवढे थोराड नायक नायिका बघुन जर कोणाला वाटले की अशीच जर नवरा / बायको मिळाली तर.........

सूड 27/03/2014 - 14:40
ते तेजश्री प्रधान, तो शशांक केतकर आणि त्याच्या त्या सहा आया डोक्याला वात आणतात. कधी नव्हे ते झी मराठीला चेपुवर लाईक केलं तर तिथेही यांचे प्रश्न!! आता जान्हवीच्या आयुष्यात काय होणार, श्री घरी परत येईल का? मी सरळ प्रतिसाद टाकला "अच्छा, म्हणजे श्री घर सोडून गेलाय का? नै त्याचं काये हल्ली एका लग्नाची तिसरी गोष्ट ही एकच मालिका बघतो आम्ही झी वर. त्यामुळे श्रीचं काय चाल्लंय ते माहीत नाही". ;)

In reply to by सूड

बॅटमॅन 27/03/2014 - 14:44
त्या कथालेखकांना उलटे टांगून, चाबकाचे चार फटकारे मारून मिर्ची-मिरी-लसूण-अजून जे कै झोंबेल-त्याची धुरी देऊन असं कैकदा विचारावं वाटतं, भो*** दिमाग वापरायला बंदी केलीय का आँ?????????????????????????????

In reply to by बॅटमॅन

सूड 27/03/2014 - 14:51
>>त्या कथालेखकांना उलटे टांगून, चाबकाचे चार फटकारे मारून मिर्ची-मिरी-लसूण-अजून जे कै झोंबेल-त्याची धुरी देऊन असं कैकदा विचारावं वाटतं येवढं कशाला करायला हवं. या धाग्यावरचे मिपाकरांचे प्रतिसाद ते वाचतील अशी सोय करा फक्त!! चाळणीत पाणी घेऊन जीव देतील ते !! ;)

In reply to by सूड

बॅटमॅन 27/03/2014 - 14:53
तेही आहेच म्हणा. पण गेंड्याची कातडी झाली असेल एव्हाना त्यांची, त्यामुळे कार्यवाही कधी तरी केलीच पाहिजे ;)

In reply to by सूड

इथे अजून कुणी जीव दिल्याचे ऐकलेले नही म्हणजे इथे त्यांच्या पैकी कुणी नही असा तर्क करावा काय ???

In reply to by अत्रन्गि पाउस

सूड 27/03/2014 - 18:29
>>इथे अजून कुणी जीव दिल्याचे ऐकलेले नही म्हणजे इथे त्यांच्या पैकी कुणी नही असा तर्क करावा काय ??? यापैकी काहीतरी एक सापडत नसेल जीव द्यायला. कुणी नसेलची अशी अपेक्षा करणे चूक आहे. आता तुम्हीच प्रश्न विचारलात म्हणून संशयाचं पहिलं लक्ष्य तुम्हीही असू शकता. ;)

In reply to by सूड

रेवती 27/03/2014 - 18:34
माझ्याकडे सपिटाच्या चाळणीपासून ज्वारी चळायच्या चाळणीपर्यंत सर्व प्रकार आहेत. हवी असल्यास कळवणे. तुमच्यासाठी कायपन!

In reply to by दिव्यश्री

बॅटमॅन 27/03/2014 - 19:44
चेष्टा कसली त्यात? सरळ विचारतोय, याआधी कधी ऐकला नव्हता म्हणून. अन पृच्छा शब्दाबद्दलच होती. तुमच्याबद्दल अस्ती तर तसे सरळ लिहिले असते, कांयं संमंजंलेंतं?

In reply to by बॅटमॅन

सूड 27/03/2014 - 21:40
>>पण अख्ख्या पुण्यात मैदा तिकडेच मिळतो असं थोडंच आहे? विचारुन बघायला हवं. मात्र तिथेच मैद्याचा शोध लागला असं उत्तर मिळाल्यास नवल वाटू नये. ;)

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 27/03/2014 - 20:37
णयी हु मय म्हटलं णा इतके येळेला ...कोणी कधी कस कुठ काय बोलेल याचा णेम णाय . सो खात्री केली . सरळ सांगते मातोश्री , नासिकच्या तरी त्यांच्या आणि पुणेकरांच्या तोंडी मी कायम सपीठ हा शब्द ऐकला आहे . मातोश्री सांगायच्या की मी लहानपणी सपिठासारखी (गोरी/ पांढरी) होते . म्हणून हा शब्द माहिती आहे . *beee* ( याच्यात जाहिरात /झैरात करण्याचा हटू /उद्देश नाही याची नोंद घेण्यात यावी कृपयाच .)

In reply to by दिव्यश्री

बॅटमॅन 27/03/2014 - 21:29
सरळ सांगते मातोश्री , नासिकच्या तरी त्यांच्या आणि पुणेकरांच्या तोंडी मी कायम सपीठ हा शब्द ऐकला आहे .
असेल ओ, आम्हांला काय माहिती? आम्ही मिरजेचे, तिकडे हा शब्द कधी ऐकला नै. पुढे पुण्यास आलो तिकडेही कधी ऐकला नै-यद्यपि कैक नाशिककर मित्र असले तरी. प्रामाणिक शंका इच्यारली, इतकं उचकतांव कशाला उगाच वय इच्यारल्यासारख्या ;) शेवटी तुम्ही अकेल्याच सब पे भारी आहात ना, मग टेण्षण कसलं? :)

In reply to by बॅटमॅन

दिव्यश्री 28/03/2014 - 14:58
प्रामाणिक शंका इच्यारली >>>ओके . इतकं उचकतांव कशाला उगाच वय इच्यारल्यासारख्या Wink>>>म्या कुड उचकले ? :( कितीही क्रिमी फासल्या , सर्जर्या केल्या तरी निसर्गाला थोडीच फसवू शकणार आहे कोणी ? माझ्या बाबतीत असल्या फालतू गोष्टी(वैयक्तिक प्रश्न विचारणे, वय/पगार विचारणे, लपवणे ,खोटे सांगणे , विचाराण्यार्याची अक्कल काढणे ई. ई .) करण्यात विन्त्रेष्ट नाय आणि मला तेवढा वेळही नाही . कोणाच्या बोलण्याला ,लिहिण्याला ,प्रशण विचारण्याला किती महत्व द्यायचे हे मला मिपाने शिकवले आहे , शिकवीत राहील पुढेही . सो चिल . :D त्याबद्दल मी मिपाची सदैव ऋणी राहिण . :) जगात पुष्कळ चांगल्या गोष्टी आहेत करण्यासारखा आणि जिथे काहीही लपवाछपवी करावी लागतच नाही . :) शेवटी तुम्ही अकेल्याच सब पे भारी आहात ना, मग टेण्षण कसलं? स्मिले>>> मला कसलंच टेण्षण नाही तुम्हा सगळ्यांच्या(मिपाकरांच्या) आशीर्वादाणे... :)

In reply to by दिव्यश्री

मनीषा 28/03/2014 - 20:58
भोंडला कधी केला असेल ना तुम्ही? किंवा कुणाच्या भोंडल्याला गेला असाल.. त्यात गाणं आहे की ... "अश्शी सपीटी सुरेख बाई करंज्या कराव्यात ..."
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजच स्टार प्रवाह वर ' लग्न पहावे करून ' हा चित्रपट पहिला तसा बरा वाटला चित्रपटात तरुण शहरी उच्चमध्यम वर्गाची सद्यस्थिती दाखवली आहे (लग्नाबाबतची) शेवट काहीसा गुंडाळलेला आणि तद्दन फिल्मी वाटला ( हल्लीचे चित्रपट असेच असतात हा भाग वेगळा ते जास्त खोलात न जाता वरवरच गुंडाळतात उदा . हंसी तो fansi ) तेजश्री प्रधान हिची व्यक्तिरेखा( आनंदी ) तसेच ' मधुरा ' हि व्यक्तीरेखा ह्या दोन्ही एकांगी वाटल्या आपल्यापैकी कोणी पहिला आहे का ?

पवारांची विचार"पूस"

हुप्प्या ·

शशिकांत ओक 23/03/2014 - 23:33
पुढच्या काळात या बुजुर्ग पुढारी लोकांना पुन्हा एकदा पदावर बसायची सुरसरी येणार व भारतीय लोकतंत्र मजबूत होणार यात शंका नाही.

काळा पहाड 23/03/2014 - 23:37
कुठलं स्पष्टीकरण देतंय ते!! युतीला जातीयवादी वगेरे शिव्या देऊन विषय बदलायचा प्रयत्न करेल मग. बाकी सकाळ स्वतःला निष्पक्ष वगैरे म्हणवतो तर मथळे बघा.. "मोदी पंतप्रधान म्हणजे ऐक्‍याला सुरुंग" "फॅसिस्ट प्रवृत्तींना पराभूत करा - पवार" "लतादीदींनी मोदींचे ब्रॅंड ऍम्बेसिडर होणे अयोग्य" "मुंडेंना मानसोपचारतज्ज्ञांची गरज" थोडक्यात काय, तर पवार म्हणजे "दाल में काला".. मग ते जाणत्या राजाचा बुरखा पांघरलेले असोत की पत्रकाराचा बुरखा पांघरलेले.

कंजूस 24/03/2014 - 06:36
यावरून एक मुद्दा समोर येतो . ओळखपत्र म्हणून पैन कार्ड ,ड्रायविंग लायसन दोन वेगळी (एकच नाव पण दोन वेगळे पत्ते ) बनवता येते . आता नवीन आधार कार्डचा डाटाबेस जो एकशेवीस कोटिंचा होईल त्यातून फोटो आणि ठसे यावरून ही एकच व्यक्ती आहे हे शोधण्याइतका त्यांचा संगणक सक्षम आहे का ?

In reply to by कंजूस

माहितगार 24/03/2014 - 08:06
छायाचित्रावरून छायाचित्र ओळखण्याच तंत्रज्ञान पुढे जात आहे पण ते परफेक्शनला येण्यास अजून अवधी असावा असे वाटते पण बोटांच्या ठशांच्या बाबतीत शक्य असावे असे वाटते. मुंबई ते सातारा अंतर खुप आहे, दोन-चार उत्साही लोकांपलीकडे एवढ्या दूर केवळ मतदाना करता लोक प्रवास करणार नाहीत. लोकसभा मतदारसंघ मोठे असतात दोन-चार लोकांच्या अशा मतदानाने एकुण परिणाम होण्याची शक्यता कमी. पण जवळच्या दोन गावात जाऊन मतदान करण्याच प्रमाण बर्‍या पैकी असावं. असे करणारे मतदार उपकृततेच्या ओझ्याखाली इतपत दबलेले असतात की अशा गोष्टींची सहसा वाच्यता होत नाही. हितसंबंधांच्या राजकारणातून सुधारणांना विरोध केला जातो पण हे विरोध मोडून अशा तांत्रिक सुविधा वापरून सुधारणा करण्याची गरज आहे हे खरे.

In reply to by कंजूस

खबो जाप 24/03/2014 - 08:07
आता नवीन आधार कार्डचा डाटाबेस जो एकशेवीस कोटिंचा होईल त्यातून फोटो आणि ठसे यावरून ही एकच व्यक्ती आहे हे शोधण्याइतका त्यांचा संगणक सक्षम आहे का ?
अर्थातच… माझ्या एका नातेवायीकाचे आधार कार्ड लग्नापूर्वीचे होते, आधार कार्ड केंद्रात कळाले कि नाव बदलण्याची सोय अजून उपलब्ध नाही. तिथल्याच अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार नवीन फॉर्म भरला. पण तो रीजेक्त झाला कारण हाताचे ठसे पूर्वीच्या रेकॉर्ड मध्ये म्याच होत आहेत.

मा. शरदचंद्ररावजी पवार साहेब ह्यांच्या वरील वक्तव्यात काही एक चुक नाहीये . विरोधी पक्ष उगाचच पराचा कावळा करताहेत . त्यांचा निषेध ! जातीयवादी पक्षांना हरवण्यासाठी दोनदा मतदान केले तर ते पाप ठरत नाही .... दोनदा काय जमलं तर दहादा मतदान करा आणि जातीयवादी धर्मांध शक्तींना हाणुन पाडा !!

मदनबाण 24/03/2014 - 21:49
निवडणुक आयोग काय म्हणतो बघुया ! बाकी जिंतेंद्र आव्हाड "मुंब्रा" प्रकरणा सुद्धा वाचनीय आहे बरं का ! त्याची काही माहिती देता आली तर द्या हो. बाकी साहेबांचा म्हणणच आहे ना... :- मुंब्र्याला सुधारण्याची संधी द्या शिवाय हे सुद्धा नक्की वाचा :- आव्हाडांचा मुंब्राविकास वादात कोटय़वधी रुपयांची कामे संशयाच्या फेऱ्यात शिवसेनेचे सुपारीबाज.. हप्तेखोर

आशु जोग 16/07/2014 - 08:17
http://www.loksatta.com/mumbai-news/clear-ink-on-hand-to-vote-twice-sharad-pawar-409213/ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/Sharad-Pawar-asks-workers-to-vote-twice/articleshow/32553305.cms दोन्हीही लिन्क बद्दल शतशः आभारी आहे

धरणात आपला कार्‍याक्रम करणार्‍या पुतण्यास लोकांनी यंदाच्या विधानसभेत घरी बसवायला हवे. काका-पुतण्याच्या बेताल वर्तनाला तेच योग्य उत्तर होईल.

मदनबाण 22/07/2014 - 10:14
पवार साहेब काय करताय हे बारामतीत? अवांतर :--- बाकी सध्या श्री.नारायण राणे फारच चर्चेत आहेत. अनेक वॄत्तपत्र / वेबसाईट यांच्या बातम्यांनी भरुन गेलेले आहे. नारायण राणे कॉग्रेस नाराज,वेंगुर्ल्यात नारायण राणेंचं पोस्टर फाडलं, 'उद्धव ठाकरेंची सरपंचही होण्याची लायकी नाही'-राणे इं आणि अनेक बातम्या या श्री.नारायण राणेंनी व्याप्त करुन टाकल्या आहेत. काल जरा उसंत मिळाली होती तेव्हा तू-नळीवर श्री.नारायण राणे यांच्यावर अजुन काही मिळतयं का ते पाहत होतो... आणि काय सांगावे... कै.बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणेंवर "ठाकरी" भाषेत जी काही तोफ डागली होती त्या भाषणाचा व्हिडीयो मिळाला ! बाब्बो... मी या आधी कै. बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे ऐकली आणि पाहिली होती,पण हे तर अगदी "ठाकरी" शैली म्हणजे काय हे खर्‍या अर्थाने मला समजावणारे ठरले ! विशेष सुचना :- तुम्हाला जर "ठाकरी" भाषा झेपत असेल आणि ऐकण्याची इच्छा असेल तरच हा व्हिडीयो पहा. मदनबाण...... आजची स्वाक्षरी:- बडबडोबा !

शशिकांत ओक 23/03/2014 - 23:33
पुढच्या काळात या बुजुर्ग पुढारी लोकांना पुन्हा एकदा पदावर बसायची सुरसरी येणार व भारतीय लोकतंत्र मजबूत होणार यात शंका नाही.

काळा पहाड 23/03/2014 - 23:37
कुठलं स्पष्टीकरण देतंय ते!! युतीला जातीयवादी वगेरे शिव्या देऊन विषय बदलायचा प्रयत्न करेल मग. बाकी सकाळ स्वतःला निष्पक्ष वगैरे म्हणवतो तर मथळे बघा.. "मोदी पंतप्रधान म्हणजे ऐक्‍याला सुरुंग" "फॅसिस्ट प्रवृत्तींना पराभूत करा - पवार" "लतादीदींनी मोदींचे ब्रॅंड ऍम्बेसिडर होणे अयोग्य" "मुंडेंना मानसोपचारतज्ज्ञांची गरज" थोडक्यात काय, तर पवार म्हणजे "दाल में काला".. मग ते जाणत्या राजाचा बुरखा पांघरलेले असोत की पत्रकाराचा बुरखा पांघरलेले.

कंजूस 24/03/2014 - 06:36
यावरून एक मुद्दा समोर येतो . ओळखपत्र म्हणून पैन कार्ड ,ड्रायविंग लायसन दोन वेगळी (एकच नाव पण दोन वेगळे पत्ते ) बनवता येते . आता नवीन आधार कार्डचा डाटाबेस जो एकशेवीस कोटिंचा होईल त्यातून फोटो आणि ठसे यावरून ही एकच व्यक्ती आहे हे शोधण्याइतका त्यांचा संगणक सक्षम आहे का ?

In reply to by कंजूस

माहितगार 24/03/2014 - 08:06
छायाचित्रावरून छायाचित्र ओळखण्याच तंत्रज्ञान पुढे जात आहे पण ते परफेक्शनला येण्यास अजून अवधी असावा असे वाटते पण बोटांच्या ठशांच्या बाबतीत शक्य असावे असे वाटते. मुंबई ते सातारा अंतर खुप आहे, दोन-चार उत्साही लोकांपलीकडे एवढ्या दूर केवळ मतदाना करता लोक प्रवास करणार नाहीत. लोकसभा मतदारसंघ मोठे असतात दोन-चार लोकांच्या अशा मतदानाने एकुण परिणाम होण्याची शक्यता कमी. पण जवळच्या दोन गावात जाऊन मतदान करण्याच प्रमाण बर्‍या पैकी असावं. असे करणारे मतदार उपकृततेच्या ओझ्याखाली इतपत दबलेले असतात की अशा गोष्टींची सहसा वाच्यता होत नाही. हितसंबंधांच्या राजकारणातून सुधारणांना विरोध केला जातो पण हे विरोध मोडून अशा तांत्रिक सुविधा वापरून सुधारणा करण्याची गरज आहे हे खरे.

In reply to by कंजूस

खबो जाप 24/03/2014 - 08:07
आता नवीन आधार कार्डचा डाटाबेस जो एकशेवीस कोटिंचा होईल त्यातून फोटो आणि ठसे यावरून ही एकच व्यक्ती आहे हे शोधण्याइतका त्यांचा संगणक सक्षम आहे का ?
अर्थातच… माझ्या एका नातेवायीकाचे आधार कार्ड लग्नापूर्वीचे होते, आधार कार्ड केंद्रात कळाले कि नाव बदलण्याची सोय अजून उपलब्ध नाही. तिथल्याच अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार नवीन फॉर्म भरला. पण तो रीजेक्त झाला कारण हाताचे ठसे पूर्वीच्या रेकॉर्ड मध्ये म्याच होत आहेत.

मा. शरदचंद्ररावजी पवार साहेब ह्यांच्या वरील वक्तव्यात काही एक चुक नाहीये . विरोधी पक्ष उगाचच पराचा कावळा करताहेत . त्यांचा निषेध ! जातीयवादी पक्षांना हरवण्यासाठी दोनदा मतदान केले तर ते पाप ठरत नाही .... दोनदा काय जमलं तर दहादा मतदान करा आणि जातीयवादी धर्मांध शक्तींना हाणुन पाडा !!

मदनबाण 24/03/2014 - 21:49
निवडणुक आयोग काय म्हणतो बघुया ! बाकी जिंतेंद्र आव्हाड "मुंब्रा" प्रकरणा सुद्धा वाचनीय आहे बरं का ! त्याची काही माहिती देता आली तर द्या हो. बाकी साहेबांचा म्हणणच आहे ना... :- मुंब्र्याला सुधारण्याची संधी द्या शिवाय हे सुद्धा नक्की वाचा :- आव्हाडांचा मुंब्राविकास वादात कोटय़वधी रुपयांची कामे संशयाच्या फेऱ्यात शिवसेनेचे सुपारीबाज.. हप्तेखोर

आशु जोग 16/07/2014 - 08:17
http://www.loksatta.com/mumbai-news/clear-ink-on-hand-to-vote-twice-sharad-pawar-409213/ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/Sharad-Pawar-asks-workers-to-vote-twice/articleshow/32553305.cms दोन्हीही लिन्क बद्दल शतशः आभारी आहे

धरणात आपला कार्‍याक्रम करणार्‍या पुतण्यास लोकांनी यंदाच्या विधानसभेत घरी बसवायला हवे. काका-पुतण्याच्या बेताल वर्तनाला तेच योग्य उत्तर होईल.

मदनबाण 22/07/2014 - 10:14
पवार साहेब काय करताय हे बारामतीत? अवांतर :--- बाकी सध्या श्री.नारायण राणे फारच चर्चेत आहेत. अनेक वॄत्तपत्र / वेबसाईट यांच्या बातम्यांनी भरुन गेलेले आहे. नारायण राणे कॉग्रेस नाराज,वेंगुर्ल्यात नारायण राणेंचं पोस्टर फाडलं, 'उद्धव ठाकरेंची सरपंचही होण्याची लायकी नाही'-राणे इं आणि अनेक बातम्या या श्री.नारायण राणेंनी व्याप्त करुन टाकल्या आहेत. काल जरा उसंत मिळाली होती तेव्हा तू-नळीवर श्री.नारायण राणे यांच्यावर अजुन काही मिळतयं का ते पाहत होतो... आणि काय सांगावे... कै.बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणेंवर "ठाकरी" भाषेत जी काही तोफ डागली होती त्या भाषणाचा व्हिडीयो मिळाला ! बाब्बो... मी या आधी कै. बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे ऐकली आणि पाहिली होती,पण हे तर अगदी "ठाकरी" शैली म्हणजे काय हे खर्‍या अर्थाने मला समजावणारे ठरले ! विशेष सुचना :- तुम्हाला जर "ठाकरी" भाषा झेपत असेल आणि ऐकण्याची इच्छा असेल तरच हा व्हिडीयो पहा. मदनबाण...... आजची स्वाक्षरी:- बडबडोबा !
जाणता राजा ह्या पदवीवर शिवरायांच्या नंतर आपला हक्क सांगणारे, भारतीय लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते श्री शरच्चंद्ररावजीदादासाहेब पवार असे म्हणाले की १७ तारखेला सातार्‍यात राष्ट्रवादीला मतदान करा आणि ती शाई पुसून २४ तारखेला मुंबईत येऊन पुन्हा एकदा मतदान करा! एक व्यक्ती एक मत अशी लोकशाहीची मांडणी होती ती राष्ट्रवादीच्या मतदारांकरता बदलली असावी. जाणत्या साहेबांना काहीही करणे शक्य आहे! अशा प्रकारे एका तथाकथित जबाबदार व अनुभवी नेत्याने असे बिनडोक आणि बेजबाबदार विधान करणे योग्य आहे का? अगदी विनोद म्हटला तरी हा जरा अतीच वाटतो आहे. निवडणूक आयोगाने पवारांची कानउघडणी करणे आवश्यक आहे.

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १० : बांतीय साम्रे, प्रे रुप, प्रसात क्रावन आणि कंबोज नृत्य-संगीत-रजनी

डॉ सुहास म्हात्रे ·

सुहास झेले 23/03/2014 - 23:42
सुरेख... निव्वळ भान हरपून ते फोटो बघत राहिलो. बांतीय साम्रे तर अप्रतिम. तुमच्यामुळेच आमची ही सफर घरबसल्या होतेय. त्यासाठी मनापासून आभार आणि आता पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत :)

In reply to by सूड

बहुसंख्येने बौद्ध असलेल्या दक्षिणपूर्वेच्या सर्वच देशांत रामायणावर आधारीत संगीत, नृत्य, नाटके, इ खूप लोकप्रिय आहेत. पारंपारिक (क्लासीक) कला तर रामायणाशिवाय सुरु होउ शकत नाहीत. यात काही विरोधाभास आहे असे तेथिल लोकांना वाटल्याचे वाटत नाही. बौद्ध धर्म स्विकारताना त्यांनी पूर्वीच्या हिंदू धर्माचा वारसा आत्मियतेने जपलेला आहे हे वारंवार जाणवते. अर्थात त्या रामायणावर स्थानिक पेहराव, प्रथा, इ चे संस्कार होणे सहाजिकच होते.

खबो जाप 24/03/2014 - 11:43
जेव्हा जेव्हा इस्पिकचा एक्का यांचा भटकंती लेख येतो तेव्हा पहिला आधाशासारखे सगळे फोटो बघून घेतो, मग हळू हळू एक एक बघतो मग प्रवास वर्णन वाचत वाचत बघतो तोपर्यंत काही लिहायला राहतच नाही…. प्रत्येक वेळी फक्त अप्रतिम एवढेच लिहू शकतो ( बहुतेक वेळी ते पण लिहिले जात नाही फक्त लेखाचा आस्वाद घेणे एवढेच होते)

विवेकपटाईत 24/03/2014 - 19:18
अप्रतिम आणि सुंदर अप्सरांचे सुंदर फोटो. कम्बोडिया सारखा देश आपली कला, परंपरा अतिशय सुरेख रीतीने विकू शकतो. पण आपल्या देशात आलेल्या पर्यटकांना आपण इतिहास आणि परंपरा दाखवतो का? सर्व दक्षिण पूर्व देशांत मग तो मलेशिया किंवा इंडोनेशिया का 'रामायण' सारख्या महाकाव्याचे मार्केटिंग करते. आपण का करत नाही?

In reply to by विवेकपटाईत

आत्मशून्य 24/03/2014 - 19:45
टोनी ज्या च्या एका देमार चित्रपटात एका स्ट्रीट फाईट कोम्पीटीशन मधे त्याचा पराक्रम बघून समालोचक त्याला हनुमान लंकेत घुस्ल्याची उपमा देतो हे ऐकूनच आनंददायी धक्का बसला होता.

सुहास झेले 23/03/2014 - 23:42
सुरेख... निव्वळ भान हरपून ते फोटो बघत राहिलो. बांतीय साम्रे तर अप्रतिम. तुमच्यामुळेच आमची ही सफर घरबसल्या होतेय. त्यासाठी मनापासून आभार आणि आता पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत :)

In reply to by सूड

बहुसंख्येने बौद्ध असलेल्या दक्षिणपूर्वेच्या सर्वच देशांत रामायणावर आधारीत संगीत, नृत्य, नाटके, इ खूप लोकप्रिय आहेत. पारंपारिक (क्लासीक) कला तर रामायणाशिवाय सुरु होउ शकत नाहीत. यात काही विरोधाभास आहे असे तेथिल लोकांना वाटल्याचे वाटत नाही. बौद्ध धर्म स्विकारताना त्यांनी पूर्वीच्या हिंदू धर्माचा वारसा आत्मियतेने जपलेला आहे हे वारंवार जाणवते. अर्थात त्या रामायणावर स्थानिक पेहराव, प्रथा, इ चे संस्कार होणे सहाजिकच होते.

खबो जाप 24/03/2014 - 11:43
जेव्हा जेव्हा इस्पिकचा एक्का यांचा भटकंती लेख येतो तेव्हा पहिला आधाशासारखे सगळे फोटो बघून घेतो, मग हळू हळू एक एक बघतो मग प्रवास वर्णन वाचत वाचत बघतो तोपर्यंत काही लिहायला राहतच नाही…. प्रत्येक वेळी फक्त अप्रतिम एवढेच लिहू शकतो ( बहुतेक वेळी ते पण लिहिले जात नाही फक्त लेखाचा आस्वाद घेणे एवढेच होते)

विवेकपटाईत 24/03/2014 - 19:18
अप्रतिम आणि सुंदर अप्सरांचे सुंदर फोटो. कम्बोडिया सारखा देश आपली कला, परंपरा अतिशय सुरेख रीतीने विकू शकतो. पण आपल्या देशात आलेल्या पर्यटकांना आपण इतिहास आणि परंपरा दाखवतो का? सर्व दक्षिण पूर्व देशांत मग तो मलेशिया किंवा इंडोनेशिया का 'रामायण' सारख्या महाकाव्याचे मार्केटिंग करते. आपण का करत नाही?

In reply to by विवेकपटाईत

आत्मशून्य 24/03/2014 - 19:45
टोनी ज्या च्या एका देमार चित्रपटात एका स्ट्रीट फाईट कोम्पीटीशन मधे त्याचा पराक्रम बघून समालोचक त्याला हनुमान लंकेत घुस्ल्याची उपमा देतो हे ऐकूनच आनंददायी धक्का बसला होता.
================================================================== जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६...