मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वेरूळ : भाग ६ - नवी सफर (दशावतार लेणे)

प्रचेतस ·
वेरूळः भाग ५ (कैलास लेणी ३) अंतिम
अर्थात वेरूळ वरील लिखाण येथेच संपत नाही. पण तूर्तास तिथली उरलेली लेणी पाहिली नसल्याने नाईलाजाने येथे अर्धविराम घ्यावा लागत आहे. परत वेरूळला गेल्यावर तिथल्या उरल्या लेणी बघून मगच वेरूळ लिखाणाची खर्‍या अर्थाने इतिश्री होईल.
होळीच्या तीन दिवस आधी मित्राबरोबर गप्पा टप्पा चालू असता अचानक वेरूळच्या सहलीची योजना आखली गेली आणि होळीच्या आदल्या दिवशी पहाटे आम्ही पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने प्रस्थान केले.

अशीच एक फँटसी..(२)

सस्नेह ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अशीच एक फँटसी..(१) सोमवारी सकाळी अर्णवला भलतेच फ्रेश अन उत्साही वाटत होते. उर्मि अन तो आपापल्या किल्ल्या घेऊन एकमेकांना टाटा करून आपापल्या दुचाक्यांवरून बाहेर पडले तेव्हा, आपण आज एकही वस्तू विसरलो नाही, ही गोष्ट मात्र अर्णव विसरून गेला. इतकेच नव्हे, ऑफिसात पीसीसमोर बसल्यावर त्याच्या हातांनी न चुकता सराईतपणे पासवर्ड टाईप केलेलंही त्याच्या लक्षात आलं नाही. आणि बॉसच्या केबिनमध्ये जाताना आपण त्याने मागितलेली फाईलच हातात घेतली आहे हेही त्याच्या बऱ्याच उशिरा लक्षात आले.

वाट्सअ‍ॅप एक डोकेदुखी ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. आंतरजाल (इंटरनेट) युगात आपण सतत नाविन्याच्या शोधात असतो आणि आज त्याला प्रचंड महत्त्व आलं आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वेग इतका अफाट वाढलाय की आपण काही काळ जर यापासुन दूर राहीलो तर आपल्याला बरीच माहिती कळणार नाही, आपण अज्ञानी राहू की काय म्हणन्यापेक्षा दैनिकातील बातम्यांवर आपल्याला विसंबून राहावे लागेल.

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - ४

स्पार्टाकस ·
३ ऑगस्ट कोरीयन मोहीमेतील तीन गिर्यारोहक किम चँग सून, जँग बाँग वान आणि जँग ब्याँग हो भल्या पहाटे कँप ४ वरून निघून शिखराच्या मार्गाला लागले होते ! के २ वरील लहरी हवामान आता बिघडत चाललं होतं ! पहाटेपासूनच वा-याचा जोर वाढत होता. शिखराच्या आसपास असलेल्या ढगांमुळे ते मधूनच दिसत होतं तर मध्येच ढगांत गडप होत होतं ! नैऋत्येच्या दिशेने ढगांचा पुंजका के २ च्या दिशेने झेपावत होता ! याचा अर्थ सरळ होता.

माझं कोकणातलं गांव :- भाग-५ (मामाचा गांव माझं आजोळ)

प्रमोद देर्देकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझं कोकणातलं गांव :- भाग-४ मागील भागात>> मग गाडी बदलुन आजोळी जाण्यासाठी त्याच्याबरोबर पुढचा प्रवासाला आरंभ होत असे..... तिथुन पुढे >>> दापोलीच्या ए.स्टी. स्टँडवर उतरलं की दुपारच्या जेवणाला मावशीकडे ( आईची सख्खी मोठी बहीण जी खुद्द दापोलीलाच राहते) जायचं कारण संध्याकाळी ४.०० वाजे पर्यंत गावात जायला ए.स्टी खेरीज दुसरे साधनच त्याकाळी नव्हते. मग जरुरी पुरते सामान घेवुन बाकीचे इथे ठेवुन आम्ही सगळेजण पुन्हा ३.३० वा. परत स्टॅन्ड वर येत असु.

FoodieMagic.com चा शुभारंभ

मनिष ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्व खवैयांसाठी आज ३१ मार्च २०१४ रोजी, गुढीपाडव्याच्या दिवशी FoodieMagic.com हे केवळ खाण्या-पिण्याला समर्पित असे संस्थळ आम्ही सहर्ष सादर करत आहोत. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधे ह्या फोरमवर लिहिता येईल.

सदिच्छा : शुद्धी, वृद्धी, शुद्धी !!

निमिष सोनार ·
लेखनविषय:
हा गुढी पाडवा तुमचे - भाग्य वृद्धी, संकल्प सिद्धी, मन शुद्धी, धन वृद्धी, कर्म शुद्धी, कर्म वृद्धी, कर्म सिद्धी - करणारा ठरो हीच सदिच्छा !!

पडघम २०१४- भाग २: क्रिटिकल मास

क्लिंटन ·
या भागात आपण दुरंगी, तिरंगी किंवा चतुरंगी लढती होत असलेल्या राज्यांमध्ये बऱ्यापैकी (किमान २०%) जागा मिळविण्यासाठी किती टक्के मते लागतात हे बघू. कोणत्या परिस्थितीत एखाद्या राज्यात दुरंगी/तिरंगी किंवा चतुरंगी लढत आहे असे मी म्हणतो हे लेखामध्ये स्पष्ट होईलच. दुरंगी लढतीमध्ये मी खालील दोन परिस्थितींचा अंतर्भाव करत आहे. एखाद्या राज्यात दोन मुख्य पक्ष/आघाडी यांना एकूण ९०% च्या आसपास मते मिळत असतील तर त्या राज्यांमध्ये मी ’थेट दुरंगी’ लढत आहे असे म्हणतो (उदा. १९८९,१९९१,१९९६ आणि २००९ मध्ये केरळ,१९८९ आणि १९९६ मध्ये पश्चिम बंगाल, १९९८ चा अपवाद वगळता गुजरात).

आठवणी शिक्षेच्या

अत्रन्गि पाउस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शालेय जीवनातील काही शिक्षा आठवल्या ....इयत्ता ६ वी ... (शिकवलेला धडा)-अस्मादिकांची जाहीर शंका ?? ....नतीजा १. (गांधीजी देशाला वडिलांसारखे त्यामुळे त्यांना 'राष्ट्रपिता')-मग राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राचा नवरा ?? ...बाकावर उभा दिवसभर २. (सर्व मुलींना बहिणीचा मान द्या..त्या तुमच्या बहिणी आहेत) - मग मोठेपणी आम्ही लग्न कुणाशी करायचे ?? ... २ दिवस वर्गाबाहेर उभा ३.

विपश्यना साधकवीर परतले

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ५ विपश्यना साधकवीर परतले दुपारची वेळ. ‘मी गाडीत आहे. साधारण 4ला घरी पोहोचेन’ म्हणून पत्नीच्या सेल फोनवर साहेबांचा निरोप आला आणि घरच्यांची लगबग सुरु झाली. गेले 12 दिवस घरी मरगळून पडलेला सेल फोन आता मालक कामाला लावणार असे वाटून चार्जिंगला चढला. कारण ही तसे जबरदस्त होते. बरेच दिवस गाजत असलेले विपश्यना केंद्राचे काम पेंडिंग होते, ते करून साहेब परतणार होते. मुले मुद्दाम सुट्टी काढून घरी वाट पहायला आली होती. मुलगी ‘डॅड कसा दिसतोय? हाडकला कि काय?