मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

यासुकुनी श्राईन

सहज ·
गेली काही वर्ष यासुकुनी श्राईन[समाधी/स्मारक??] हे नाव बातम्यात अधुनमधुन कानावर यायचे, की चीन सरकारने [द. कोरीया, उ. कोरीया देखील] जपानी पंतप्रधान यांनी यासुकुनी श्राईनला भेट दिली म्हणुन कडकडीत निषेध नोंदवला. तेव्हापासुन मला हा यासुकुनी स्मारक नक्की काय प्रकार आहे हे जाणुन घ्यायचे होते. काही मित्रांकडून तसेच आंतरजालावर माहीती मिळाली. त्यात हा दुवा विशेष उल्लेखनीय.

लाल बहाद्दुर शास्त्री जयंती

आगाऊ कार्टा ·
आज २ ऑक्टोबर.... आज लाल बहाद्दुर शास्त्री यांची सुद्धा जयंती आहे. त्यानिमित्त सर्व मि.पा.सदस्यांतर्फे आपले माजी पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री यांना श्रध्दांजलि व सादर प्रणाम. जय जवान !!! जय किसान !!!

महात्मा गांधी जयंती

छोटुली ·
आज दोन ऑक्टोबर .महात्मा गांधी जयंती.त्यानिमित्त सर्व मि.पा.सदस्यांतर्फे राष्ट्रपिता मा.महात्मा गांधी यांना श्रध्दांजलि व सादर प्रणाम . रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम ईश्वर अल्ला तेरे नाम सबको सन्मति दे भगवान ! वैष्णवजन तो तेणे कहिये जो पीडपराई जाने रे !

पिंडी ते ब्रह्मांडी उर्फ भुदरगड ते लेहमन

शेखस्पिअर ·
आमच्या घरामागे कोणे एके काळी एक 'भुदरगड' नावाची पतसंस्था होती... आमच्या शहरातील काही बडी प्रस्थं आणि मान्यवर त्या 'पतसंस्था' नावाच्या 'दुकानाशी' बांधून होते. त्या सगळ्यांच्या 'पुण्याई'मुळे बरेच छोटे छोटे गरजू गुंतवणूकदार गोळा झाले. आणि पतसंस्थेला प्रचंड बरकत आली. मग काय धडाधड कर्ज वाटप सुरु झाले..सगळीकडे कसा आणंदी आणंद झाला. पण एके दिवशी एकाएकी बातमी आली की पतसंस्था बुडाली. मग काय ..लोकांचे थवेच्या थवे ,झुंडीच्या झुंडी,जथ्थेच्या जथ्थे 'दुकानासमोर' आल्या.. पुरुषांच्या शिव्या,, बायकांचे करवादणे,,याचा एकच हलकल्लॉळ झाला.. आमच्या ओळखीतले किमान १००-१५० जण असे होते की त्यांचे सुमारे रु.१०,००० - २,०

सरफरोशी की तमन्ना

अनिरुद्धशेटे ·
सरफरोशी की तमन्ना, अब हमारे दिल मे है, देखना है जोर कितना, बाजुए कातिल मे है ! करता नही दुसरा, कुच बातचीत, देखता हु मै जिसे वो तेरी मेहफिल मे है ! ए शहिदे मुल्के-मिल्लत मै तेरे उपर निसार, अब तेरी हिम्मत का चर्चा, गैर की मेहफिल मे है ! वक्त आने पे बता देन्गे, तुझे ए आसमा, हम अभीसे क्या बताए, क्या हमारे दिल मे है ! खीन्चकर लाइ है सबको, कत्ल होने की उम्मीद, आशिको का दम, घुटते हुए कातिल मे है ! देखना है जोर कितना, बाजुए कातिल मे है सरफरोशी की तमन्ना, अब हमारे दिल मे है, देखना है जोर कितना, बाजुए कातिल मे है !

ब्रिटिश वृत्तपत्रांच्या आधारे शिवचरित्रावर प्रकाश टाकण्याचा अनोखा उपक्रम.

llपुण्याचे पेशवेll ·
काल घरी गेल्यावर चॅनेल सर्फिंग करताना स्टार माझावर अत्यंत महत्वाची बातमी दाखवत होते. त्यात सायली दातार व श्री. मेहेंदळे यानी लंडन मधील जुन्या वृत्तपत्रांच्या अर्काईव्ह मधील शिवाजीमहाराजांच्या काळात प्रकाशीत झालेल्या प्रतींमधून शिवाजीराजांविषयी प्रसिध्द झालेल्या बातम्यांचा मागोवा घेण्याच्या उपक्रमाबद्दल माहीती दाखवित होते. हा उपक्रम अत्यंत अभिनंदनीय असून त्यामुळे शिवरायांबद्दल त्यावेळच्या इंग्लंडमधील लोकांचे (त्रयस्थ देशातील)काय मत होते ते कळेल. सर्वप्रथम या उपक्रमाबद्दल दोन्ही संशोधकांचे अभिनंदन. यात दोन्ही संशोधकांनी प्रकर्षाने व्यक्त केलेल्या गोष्टी खालीलप्रमाणे. १.

डाम्बीसपणा

विजुभाऊ ·
मिपावरच्या ब-याच तज्ञांकडुन गझल या विषयावर बरीच काही माहिती मिळाली आहे. गझलेच्या दोन कडव्यांमधे काही संबन्ध असलाच पाहिजे असे नाही हे एक म्हणणे आहे प्रत्येक कडवे /शेर हा स्वतन्त्र लिहिले जाते दोन कडव्यांत / शेरांत एकमेकाना जोडणारा अर्थाचा प्रवाह एकसंध वाहिलाच पाहिजे असा आग्रह नसावा. हा अर्थात मी त्या चर्चेतुन माझ्या मगदुरानुसार काढलेला अर्थ. थोडा प्रयत्न केला आहे तसेच काहिबाही लिहिण्याचा.

गणपतीचा उत्सव - टिळकांचा अग्रलेख

लिखाळ ·
नमस्कार मंडळी, आताच लोकसत्ताची इ-आवृत्ती चाळत असताना मला टिळकांनी १८ सप्टेंबर १८९४ रोजी केसरीमध्ये लिहिलेला अग्रलेख वाचायला मिळाला. आपण सर्वांनी तो वाचावा असे वाटल्याने त्याचा इथे दुवा देत आहे. http://www.loksatta.com/daily/20080903/vishesh.htm या लेखात त्यांनी पुण्यातल्या गणपती उत्सवाचे वर्णन केले आहे. तसेच शेवटच्या दिवशीच्या मिरवणूकीचे सुद्धा वर्णन दिसेल. त्यात भक्तीरसाने म्हटलेली पदे वगैरे उल्लेख बघुन गहिवरून आले. भक्तीरस, प्रेमानंद वगैरे शब्द ते वापरतात. ते वर्णन वाचण्यासारखे आहे.

सप्तर्षि

सौरभ वैशंपायन ·
सरनौबत प्रतापराव गुजरांनी शरण आलेल्या बहलोलखान पठाणाला धर्मवाट दिली. महाराजांना ही बातमी समजताच. त्यांनी टाकोटाक सरनौबतांना पत्र लिहीले - "स्वत:ला सरनौबत म्हणवता? तुम्ही तो केवळ शिपाईगिरीच केली! बहलोल इतुका बहुत वळवळ करीत आहे, त्यांस मारुनी फ़त्ते करणे अन्यथा आम्हांस तोंड न दाखविणे!". तीच चिड मस्तकात घेउन सरनौबत प्रतापराव गुजरांनी नेसरी येथे अवघ्या सहा अंगरक्षकांसहीत बहलोलखान पठाणाच्या फ़ौजेवर हल्ला चढवला आणि अजुन एक खिंड पावन झाली --------------------------------------------------- काय घडविले? कसे म्हणावे सेनापती सुजाण? कुणा विचरुनी दिला सोडुनि, खासा बहलोल पठाण?

कर्णपर्व!

सौरभ वैशंपायन ·
कर्णानं अलगद मान वळवण्याचा प्रतत्न केला, पण वेदनेची एक असह्य कळ शरीरात उठली. अर्जुनानं सोडलेल्या बाणनं आपलं काम चोख बजावलं होतं. रथाच रुतलेलं चाक वर काढण्यात गुंतलेल्या कर्णाच्या डाव्या खांद्यातुन घुसुन तो बाण मानेतुन बाहेर आला होता. अर्जुनाला थांबायला सांगितल्या नंतर सुध्दा श्रीकृष्णाच्या सांगण्यावरुन त्याने बाण मारला होता. "तेंव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?" हा एकच प्रश्न कर्णाला त्याही अवस्थेत सतावत होता. "धर्म?मी खरच चुकलो धर्म?" पुन्हा कर्णानं मान हलवली मात्र संपूर्ण शरीरच वेदनांच मोहोळ बनल. कर्णाच्या मांडी पासुन ते कानच्या पाळी पर्यंत कर्णाला अनेक जखमा झाल्या होत्या.