हा लेख कोणत्या अंगाने वाटतो? ही तर कथा झाली चंद्रगुप्ताची. तीही सांगोवांगीची. ती सत्य आहे हे कोणत्या पुराव्याने सांगता येईल?
कथा वाचनीय आहे. पुढचा भाग लवकर टाका.
तेज,
तुमचे म्हणणे बरोबर आहे... खरे तर मी कथा म्हणूनच लिहिली होती...
पण अधे मधे माझी मतेही दिली आहेत तेव्हा ही कथा न वाटता लेख वाटेल अशी अटकळ होती....
म्हणून लेख या स्वरुपात लिहिले... असो... लवकरच पूर्ण करेन...
पुराव्यासकट कथा लिहिणे हा हेतू लेखनाचा नव्हता... या कथेला मूळ आधार आहे तो दंतकथांचा आणि त्यांतून जे सत्य मनास पटले याचा... पुराव्यांसकट लेखन हा खूप संशोधनाचा विषय आहे...
प्रतिसादाबद्दल धन्यवाद, असेच सांगत रहा...
सागर
छान आहे. मला लहानपणी अमर चित्रकथा मुळे चंद्रगुप्ताचा आणि चाणक्याचा परिचय झाला होता. नंतर दूरदर्शन वर 'चाणक्य' मालिका आली, ती सुद्धा न चुकवता पाहिली होती. पुढच्या भागांची उत्कंठा लागली आहे... लवकर लिहा.
बिपिन.
सिकंदराची भारता वर स्वारी चंद्रगुप्त मगध सम्राट झाल्यावर झाली असे वाटते. बहुतेक इतिहासात असेच वाचले आहे आणि 'चाणक्य' मालिकेतही तसेच दाखवले आहे. कृपया कोणी अधिक माहिती देऊ शकेल का? सागर...?
बिपिन.
बिपीन (प्रश्न उपस्थित केल्याबद्दल) आणि प्रियाली (प्रश्नाचे नेमक्या शब्दांत उत्तर दिल्याबद्दल) दोघांनाही धन्यवाद
प्रियाली तुमच्याकडच्या माहितीच्या साठ्याचे खरोखरच कौतुक वाटते.
अगदी नेमकी माहिती तुमच्याकडे उपलब्ध असते... :)
धन्यवाद
सागर
आर्य चाणक्यांचे नाव कौटल्य आहे. कौटिल्य नव्हे. असे बाळशास्त्रींचे म्हणणे आहे. सिकंदराने आक्रमण केले ते धनानंदाच्या करकीर्दीत. त्याच्या सामर्थ्यामुळे व इतर काही कारणामुळे सिकंदराने तेव्हा आक्रमण केले नाही. नंतर दोन स्वा-यांत सेल्यूकस़कडून चंद्रगुप्त मौर्याचा पराभव झाला. त्या पराभवांची मीमांसा करून दोष काढून टाकून तिस-या स्वारीत चंद्रगुप्ताचा विजय झाला. इतिहास हा माझा विषय नव्हे. म्हणून मी टिपणे काढलेली नाहीत. तरी माझ्या आठवणीप्रमाणे इसपू ३२३ मध्ये चंद्रगुप्त राजा झाला असावा. इअसपू ३२५ मध्ये चंद्रगुप्ताने विजय मिळविला. इसपू ३२६ मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला. तरी स्मरणशक्ती ५५ व्या वर्षी त्रास देत असल्यामुळे चू भू द्या घ्या. परंतु बाळशास्त्री यांनी बरेच संदर्भ दिलेले आहेत व ते इतिहासकाराला साजेसे व विश्वासार्ह वाटले. या पुस्तकांतील सुची अंतर्गत (बिब्लीओग्राफी)ग्रंथ मी वाचलेले नाहीत.
>> इसपू ३२६ मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला. तरी स्मरणशक्ती ५५ व्या वर्षी त्रास देत असल्यामुळे चू भू द्या घ्या.
अवश्य! सनावळ्या लक्षात ठेवणे तशी कठिण गोष्ट.
अलेक्झांडरचा मृत्यू इ. स्.पूर्व ११ जून ३२३ च्या दुपारी झाला. चंद्रगुप्त राजा झाला इ.स्.पू. ३२२ मध्ये. इ.स.पू. ३१६मध्ये त्याने पंजाब जिंकला.
प्रियाली,
नेमकी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
खरे तर इतिहास म्हटले की सनावळ्यांमध्ये घोळ हा होतोच. त्यातून अनेक इतिहाससंशोधकांमध्येही त्याच्या खरे-खोटेपणाबद्दल वाद असतात.
असो... येथे मी एक स्पष्ट करु इच्छितो की , मी अनेक संदर्भग्रंथांचा आधार हा लेख लिहिताना घेतला होता.
पण सनावळ्या आणि मुख्यपात्रे सोडून इतर पात्रांचा (जसे पर्वतक, अंभीराज, शकटदास, इ...) नामोल्लेख हेतुतः टाळला होता.
कारण चंद्रगुप्त मौर्याचे कथानक याच विषयावर मला रोख ठेवायचा होता..
धन्यवाद
सागर
आर्य चाणक्यांचे नाव कौटल्य आहे. कौटिल्य नव्हे. असे बाळशास्त्रींचे म्हणणे आहे.
धन्यवाद सुधीरराव...
बाळशास्त्री हरदास यांचे हे मत मी वाचले आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते विशद करुन सांगितले आहे ते पाहता हा तर्क पटावा असा आहेच. पण कौटल्य चे काळाच्या ओघात कौटिल्य हे नामकरण झाले असावे असे मला वाटते. कालौघात शब्दांत बदल होणे हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे असे मी मानतो....
या माहीतीबद्दल पुनश्च धन्यवाद
सागर
अतिशय माहितीपूर्ण लेख. लहानपणी चंद्रगुप्त मौर्याची कथा वाचली होती. आणि आर्य चाणक्य सिरियलहि पहात होते. इतिहासाच्या पुस्तकातूनही थोडी माहिती मिळाली होती. पण आज आपल्या लेखाने पुन्हा सगळी उजळणी झाली. खूप आवडला लेख. पुढचे भाग लवकरच येऊदेत.
- प्राजु.
धन्यवाद प्राजु.. पण तुम्हाला पुढचे लेख असे म्हणायचे होते का? कारण चंद्रगुप्त मौर्याची कथा एवढाच या लेखाचा उद्देश होता. आणि हे कथानक पूर्ण झालेले आहे. तेव्हा याचे पुढील भाग नसतील.
- सागर
प्रतिक्रिया
येऊ दे !!!
आजच दुसरा भाग किंवा संपूर्ण कथा पूर्ण करण्याचा मानस आहे...
कसं म्हणायचं?
लवकरच पूर्ण करेन...
छान...
धन्यवाद बिपिन,लवकरात लवकर पूर्ण करेन ...
आज मी ही संपूर्ण कथा देऊ शकलो आहे
सिकंदराची
नाही
धन्यवाद !!!
बिपीन , प्रियाली दोघांनाही धन्यवाद
पाहा कौटलीय अर्थशास्त्र बाळशास्त्री हरदास १९६५ भाग १ व २
सनावळ्यांत गफलत
धन्यवाद प्रियाली
धन्यवाद.
धन्यवाद सुधीर...
वा वा....
धन्यवाद प्राजु
सम्राट 'चंद्रगुप्त मौर्या'ची शौर्यगाथा आवडली.
गोष्ट छान आहे.