मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

महात्म्याला आदरांजली.

नीलकांत ·
Jyotiba Fule
आज भारतीय सामाजिक क्रांतीचे प्रणेते आणि आद्य महाराष्ट्रातील पहिल्या फळीचे समाजसुधारक श्री ज्योतीबा फुले यांची जयंती. त्यांना शतशः नमन. महाराष्ट्रात जेव्हा वाईट रूढींचा बोलबाला होता आणि सामाजिक कुरितींनी कळस गाठला होता तेव्हा त्या अंधारातून ज्योतीबांनीच महाराष्ट्राला व त्यायोगे संपूर्ण देशाला नवी दिशा दिली. त्याकाळात त्यांनी सुरू केलेल्या अनेक कार्यांपैकी एकेक कार्य करीत पुढे लोक मोठे बनत गेले.

भक्ति-शक्ति

झकासराव ·
लेखनप्रकार
भक्ति शक्ति- निगडि येथील हे शिल्प. अर्थात हे पुर्ण शिल्प नाही. ह्याची कल्पना छान आहे. शिवाजी महाराजांच्या मागे मावळे आहेत आणि तुकाराम महाराजांच्या मागे वारकरी आहेत. आणि त्यांची भेट अस शिल्प आहे. हे पुर्ण शिल्प मला एकत्रीत कॅमेर्‍यात बंदिस्त नाही करता आल. त्याला कसलेला आणि अनुभवी छायाचित्रकार हवा :) ध्यास घेवुन आभाळाएवढी कामगिरि करणार्‍या ह्या दोन महामानवाना वंदन करतो.

ही पण "श्रीं" ची च इच्छा !

उदय सप्रे ·
लेखनविषय:
रसिक वाचक, "सप्रे"म नमस्कार ! आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३२८ वी पुण्यतिथी ! या निमित्ताने , माझ्या आगामी "झंझावात" या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग इथे प्रस्तुत करत आहे. "माणसात पण देवत्वाचा अंश असतो" हे ग.दि.मांंई आपल्या एका चारोळीत म्हणून ठेवले आहे : ज्ञानियांचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे ! आजच्या या रसातळाला चाललेल्या "आरक्षण" रूपी आमिषांनी आपली तुंबडी भरणार्‍या राजकारणी जमान्यात , शिवराय तुमची खूप कमतरता भासते ! तुमच्या पवित्र स्मृतीला त्रिवार वंदन !

इप्रसारण.कॉम येथे कादंबरी वाचन- प्राजक्ता पटवर्धन

सुवर्णमयी ·
उद्या गुरुवार दिनांक ३ एप्रिल पासून दर गुरुवारी अर्धा तास इप्रसारण. कॉम येथे प्राजक्ता पटवर्धन 'आवली' या तुकारामांची पत्नी आवली हिच्यावर लिहिलेल्या कादंबरीचे वाचन करणार आहेत. याविषयी अधिक माहिती http://www.manogat.com/node/12713 येथे वाचता येईल. (तुकयाची आवली- लेखक- सौ मंजुश्री गोखले मेहता प्रकाशन, पुणे ) त्या कार्यक्रमावर, त्या कादंबरीवर आणि आवलीविषयी मिसळपावकरांना असणार्‍या माहितीची देवाण घेवाण करता येथे यावी म्हणून ही चर्चा सुरु केली आहे. प्राजुला आम्हा सर्वांच्या शुभेच्छा.

एक वर्तुळ पूर्ण झालं

भोचक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नाशिकजवळ सिन्नरच्या कुशीत बिलगलेलं डुबेरे नावाचं गाव आहे. अगदी छोटसं गाव. हे दोन गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. एक इथं भोपळ्याचा वेल आहे म्हणून आणि मराठी साम्राज्याचा उत्तर दिग्विजय घडवून आणणारा महापराक्रमी पहिला बाजीराव पेशवा इथे जन्माला आला म्हणून. या गावातच साठेंचं घर आहे. एके दिवशी गाडी काढली आणि बायकोला मागे टाकून थेट डुबेरे गाठलं. साठेंचं घर शोधून काढलं आणि 'त्या' खोलीत प्रवेश केला. जिथे मराठी साम्राज्याचा पराक्रमी सूर्य जन्माला आला होता. अगदी थरारून गेलो होतो आम्ही. या छोट्याशा खोलीत बाजीरावाचा फोटो होता. एक तलवार होती. फार काही नव्हतं.

मराठी भाषा दिन(हुतात्म्यांना अभिवादन व गार्‍हाणे)

इनोबा म्हणे ·
"डोक्यावर सोनेरी मुकूट मात्र अंगावर फाटकी वस्त्रे" अशी दयनीय अवस्था झालेल्या मराठीच्या समृद्धीसाठी झटणारे कविवर्य कुसूमाग्रज यांचा जन्मदिन मराठी दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा होतो. मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था गेली अनेक वर्षे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे.या संस्थेच्या वतीने मराठी दिनाचे दिवशी - बुधवार दि. २७ फेब्रूवारी रोजी दूपारी १ वा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करुन मराठी भाषेच्या विकासाकरीता गार्‍हाणे घालण्यात येणार आहे.

माझी मायभू

वडापाव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्राचीन काळापासूनची आपली संस्कृती बहुतांशी टिकवून ठेवणारा, विविध परकियांचे आकर्षणस्थान झाल्याने व त्यांच्या आक्रमणांमुळे या संस्कृतीत किंवा संस्कृतीतून जरी काही घटक समाविष्ट अथवा नाहीसे झालेे असले, तरी न ढळता अभिमानाने जगात मान उंचावणारा, जीवसृष्टी व लोकसृष्टीत अमाप प्रमाणात विविधता असलेला, विकासाच्या दिशेने रोज पाऊले पुढे टाकत जगावर छाप पाडणारा, असा हा भारत देश. ह्या देशावर सर्वप्रथम आर्य, त्यानंतर शक, मग मौर्य, मग ग्रीक, इत्यादी प्रबळ राजवटींनी देशाचा कायापालट करून त्याचे जणू सुवर्ण संास्कृतिक भूमीत रूपांतर केले. भारताने 1 ते 9 हे अंक अस्तित्वात आणले. शून्याचा शोध भारतीयांनी लावला.

ही बातमी वाचून मन विषण्ण झाले.

चतुरंग ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ज्या स्वातंत्र्यवीरांनी देशापायी आपल्या घर-संसाराची राख केली, त्यांच्या नशिबी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावरही बंदिवास यावा हे त्यांचं दुर्दैव नसून आपला करंटेपणा आहे! ह्याला माफी नाही!! काँग्रेसचा बुळेपणा आणि 'निधर्मी' असणे म्हणजे नेमके काय ह्याबद्दलचा गोंधळ ६० वर्षांनंतरही कायम आहे असेच अजून दिसते. www.esakal.com/esakal/02072008/National467F25B420.htm

ठाण्यात 'क्रांतिचा झंझावात'

सर्वसाक्षी ·
लेखनप्रकार
दिनांक एक, दोन व तीन फेबृवारी असे तीन दिवस ठाण्यातील ऍड. माधवी नाईक यांच्या ’अर्थ फाउंडेशन’ या संस्थेतर्फे एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला गेला. ठाणेकर नागरिकांसाठी व विशेषत: नवीन पिढीला १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षांच्या कालखंडात देशासाठी सर्वस्वाचा होम करणार्‍या क्रांतिकारकांचे सचित्र चरित्र दाखविणे हा या उपक्रमाचा हेतू होता. दुर्दैवाने आज स्वातंत्र्याला साठ वर्षे होऊन गेल्यानंतरही बहुसंख्य जनतेला अनेक क्रांतिकारकांची नावे सुद्धा माहित नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

पुरंदर आणि मी

झकासराव ·
लेखनप्रकार
चालत्या गाडीतुन फोटो काढलाय शिवाय झूम वापरल होतच त्यामुळे तेवढा छान नाही आलेला. तरिही मनातल लिहाव म्हणून टाकलाय.... कोल्हापुरला जाणं सारखच होतं. अगदि ठरवुन महिन्यातुन एकदा जायचच असही जवळजवळ वर्षभर केल होतं. जाताना नेहमी रात्रीच जायचो. येताना दिवसा येत असे. असच पुण्याला येताना जर झोपलो नाही तर आजुबाजुला बघत बसे खिडकीतुन बाहेर काय दिसत ते.