मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

शिवराज्याभिषेक-३३४ वा वर्धापन दिन !

उदय सप्रे ·
"आज सकाळपासूनच आपला "बा" लंय जोमांत हाय !" असं मनांत येताच बजाबा आपल्या बापाला म्हणजे श्रीपतीला म्हणाला,"आंज लगीन घाई लागलिया जनू बा तुंज्या मांगं?काई इशेस?" श्रीपती आपल्या कल्ल्यापर्यंत पोचलेल्या आकडेबाज मिशीवर पालथा हात फिरवंत म्हणाला,"आरं , काल बाजारला ग्येलो व्हतो तवाधरंनंच मांजा जीव आबाळायेवढा जांलाय बग !आरं , आपला धनी 'शिवाजी राजा आता दोन रोजांतच आबिषेक करुन घ्येत परत्यक्षात राजा हुनार हाय' अशी खबंर दिली बग सवता हंबीरमामा मोहित्यानं मला ! आन् त्ये आईकल्यापासनं मांजं काळीज सुपायेवढं जांलया बग !

भोजशाळा ते भोजपूर - एक विषण्ण प्रवास

भोचक ·
'कहॉं राज भोज और कहॉं गंगू तेली' या म्हणीतून राजा भोज भेटला होता. तसाच तो 'राजा भोजच्या गोष्टी'तूनही लहानपणीच भेटला होता. पण त्याचा महिमा पाहण्याची संधी मिळाली नव्हती. इंदूरला आल्याच्या निमित्ताने ती मिळाली. आमचे घरमालक ज्या क्षत्रिय समाजाचे आहेत. त्याच समाजाचा राजा भोज होता. त्यांच्याकडून एक पुस्तक मिळालं. त्यात त्याचा सगळा इतिहास दिला होता. दहाव्या शतकापर्यंत भोजाचे साम्राज्य मध्यभारतात पसरले होते. भोज नावाचे अनेक राजे होते. एका राजाचा तर लढाईत मृत्यू झाला होता. त्याच्याविषयीची अशी वेगवेगळी माहिती असली तरी राजा भोज म्हणून जो उल्लेखला जातो, तो कमालीचा कलासक्त होता. विविध विद्यात पारंगत होता.

बीबी का मकबरा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
नमस्कार, आम्हाला आमच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं फार कौतुक. प्रत्येकाला प्रत्येकाच्या शहरात अभिमान वाटावा अशा काही कलाकृती सतत आनंद देत असतात. ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा त्या पैकी एक.

बीवी का मकबरा

रायगडा कडे (१)...

मयुरयेलपले ·

उन्हाळ्याच्या सुट्टि निमित्त आज बर्याच वर्षानी आम्हि मित्रमंडळि एकत्र जमलो होतो... गप्पांचे भरपुर फड रंगुन झाल्यावर सगळेजण आता हळुहळु बोअर व्हायला लागले होते... आणि आता ऊन लागतय म्हणुन घरात बसणं आमच्यानि बा शक्य नव्हत... दुसर्या दिवशी सकाळी ५ जणांनि रायगडला जायच ठरवलं मी, ओम्या, निल्या, चेतन, आणि आषिश... तसा रायगड काहि फारसा आमच्या घरापासुन लांब नाहि... चालत गेल्यास १० कि.मी (डोंगर चढुन) आणि रस्त्याने ४० कि.मी (वाहनाने), म्हणुन चालत जायच ठरवलं (घरी न सांगता) आदल्या दिवशि तयारि म्हणुन ४ ग्लुकॉन-डि चे पुडे घेतले.

अनादि मी अनंत मी...

विकास ·
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला, मारील रिपू जगती असा कवण जन्मला... असे म्हणणार्‍या आणि लहानपणीच शिवाजीच्या थाटात "देशाच्या स्वातंत्र्याकरता मारीता मारीता मरेतो झुंझेन" अशी शपथ घेणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज म्हणजे २८ मे ला, १२५ वी जयंती आहे. आज म.टा. मधे त्यांच्यावर विशेष ऑनलाईन पुरवणी काढण्यात आली आहे. त्यातील श्री. भारतकुमार राउत यांचा "तात्यांच्या सहवासात" हा लेख वेगळ्याच अनुभवावर आधारीत असल्याने वाचनीय वाटला.

साडेतीन शहाणे

llपुण्याचे पेशवेll ·
आपण नेहमी साडेतीन शहाण्यांबद्दल ऐकतो. कोण होते हे साडेतीन शहाणे? माझ्या कुवतीनुसार याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला. हे साडेतीन शहाणे म्हणजे पेशवाईच्या काळातील जिवा, सखा, विठा, नाना. १. सखा : सखारामबापू बोकील - पेशव्यांचे कारभारी - थोरल्या माधवरावांचे प्रथम कारभारी पण राघोबादादांचे खास २. जिवा: जिवाजीपंत चोरघडे - नागपूरकर भोसल्यांचे कारभारी ३. विठा: विठ्ठल सुंदर - हैद्राबादच्या निजामाचा वजीर ४. नाना: नाना फडणवीस/फडणीस - पेशव्यांचा कारभारी यातील नाना फडणवीस प्रकृतीने अगदीच क्षीण असल्याने प्रत्यक्ष युध्दात भाग घेत नसत. त्याने कधीही तलवार गाजवली नाही.