माझी झोप उडालीय, मन:शांती लयाला गेलीय;
कशातच आनंद नाही; काही सुचत नाहीये.
स्वप्न आहे हे? का खरोखर घडतंय?
त्यांचा सतत आरडाओरडा चालू आहे, अगदी क्षणभरही खंड नाही.
प्रत्येकाला विजयी व्हायचंय, इतरांपेक्षा जास्त जगायचंय, जास्त चमकायचंय.
प्रत्येकाला हवं आहे यश, प्रेम, सुरक्षितता, पैसा आणि प्रसिद्धी.
प्रत्येकाला हवी आहे महत्त्वाची भूमिका.
इतरांना झाकोळून टाकण्याची त्यांची किती लगबग.
मार्ग काढला असता मी; पण त्यांची संख्या खूप जास्त आहे.
भीती वाटतेय मला.; जो तो धमकी देतोय.
असं किती काळ चालेल?
कधीतरी हे पान उलटेल.
मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन.
आवडली !!!
:)
छान
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेब,
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
माई साहेब,