मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हरिहर - एक ट्रेक कथा

विअर्ड विक्स ·

कंजूस 26/07/2014 - 09:47
छान आहे . १)नाशिककडचा प्रवास यावर एक लेख होऊ शकतो इतक्या अडचणी येतात .पटले .खास नाशिकला सकाळी जाणारी रेल्वे नाही .इतर उप्रच्या गाड्यांबद्दल न लिहिलेच बरे .येतानाचे हाल विचारू नका . २)शहापूर एसटी डेपो हे एक वेगळेच प्रकरण आहे .प्रत्येकवेळी एकतरी झटका असतोच .एसटी बसला सहा टायरस ,एक डिजेल इंजेन आणि पासिंजरना फक्त टेकण्यासाठी शिटा असतात हा शोध इथेच लागला .

हरीहर मस्तच...बाकी कावनईपण छान आहे बरं का.मागच्या बाजुने चढाई करताना एक छोटी दिंडी/चिमणी लागते तिकडे फाटते जरा. कपिलधारातीर्थसुद्धा एकदा भेट द्यायला छान आहे(ती तळ्यातली घाण जाउदे)

धन्यवाद चूक दाखवल्याबद्दल.... com नाही org आहे ते... माझ्या बुकमार्क मध्ये असल्यामुळे com का org हे लक्षात नव्हते. किसन भाऊंनी माझ्या आधीच लेख लिहिला होता.. पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भरपूर गोष्टी लिहिण्याच्या टाळल्या.....

कंजूस 26/07/2014 - 09:47
छान आहे . १)नाशिककडचा प्रवास यावर एक लेख होऊ शकतो इतक्या अडचणी येतात .पटले .खास नाशिकला सकाळी जाणारी रेल्वे नाही .इतर उप्रच्या गाड्यांबद्दल न लिहिलेच बरे .येतानाचे हाल विचारू नका . २)शहापूर एसटी डेपो हे एक वेगळेच प्रकरण आहे .प्रत्येकवेळी एकतरी झटका असतोच .एसटी बसला सहा टायरस ,एक डिजेल इंजेन आणि पासिंजरना फक्त टेकण्यासाठी शिटा असतात हा शोध इथेच लागला .

हरीहर मस्तच...बाकी कावनईपण छान आहे बरं का.मागच्या बाजुने चढाई करताना एक छोटी दिंडी/चिमणी लागते तिकडे फाटते जरा. कपिलधारातीर्थसुद्धा एकदा भेट द्यायला छान आहे(ती तळ्यातली घाण जाउदे)

धन्यवाद चूक दाखवल्याबद्दल.... com नाही org आहे ते... माझ्या बुकमार्क मध्ये असल्यामुळे com का org हे लक्षात नव्हते. किसन भाऊंनी माझ्या आधीच लेख लिहिला होता.. पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भरपूर गोष्टी लिहिण्याच्या टाळल्या.....
गेल्या एक-दिड वर्षात वेळेअभावी दुर्ग भ्रमंती जवळपास धूमकेतूसारखी झाली होती . या वर्षी मात्र त्या सर्वाची भरपाई करायची असे मनात होते. जूनपासून कचकून जवळपास प्रत्येक शनिवार-रविवार दुर्गभ्रमंती करायचीच असा संकल्प सोडला नि तो बऱ्यापैकी पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.चला….आत्मस्तुती पुरे झाली. मुद्द्यावर येऊ या ... तसे आम्ही मुंबईकर मुद्द्यावर येण्यास जास्त वेळ लावत नाहीच म्हणा ... असो... दुर्गभ्रमंती करायची हौस तर फार भारी पण ती एकट्याने करण्याइतकी माझी इच्छाशक्ती माझ्या काही मित्रांइतकी दांडगी नाही. (थोडक्यात एकटे जायला ….. समजून घ्या).

काही अनवट खाद्यमिश्रणे

अत्रन्गि पाउस ·

रेवती 25/07/2014 - 22:26
तूप मेतकूट भात + मोठा चमचा हेवी क्रीम+ लिंबाचे गोडे लोणचे. (डाएटची ऐशी की तैशी) क्र. ६ व ७ कसे लागतील हे समजत नाहीये व श्रीखंडावर तुपाचे आकर्षण वाटले नाही. गार गार श्रीखंड किंवा बासुंदी व गरम पुर्‍या, बटाटा भाजी हे डोक्यात फिट्ट बसलेय. आता एक ओळखीचे श्रीखंड व ग्लुकोजची बिस्किटे खातात ते वेगळे! एका मैत्रिणीने सांगितलेली पाव भाजण्याची वेगळी कृती अशी की बटरात पाभा मसाला, बारीक वाटलेला किंचित लसूण, कांदा बारीक चिरून असे लावून भाजणे. मी कधी करून बघितले नाही व खाऊनही बघितले नाहीये. ताक पिताना त्यात कुस्करलेले बाखरवडीचे कण घशाला लागले तर ठसका लागायचा.

In reply to by रेवती

त्याला 'मसाला पाव' असे म्हणतात. पावभाजी करायचा सर्व 'मसाला' मस्त फ्राय करून त्यावर ते पाव दाबून परतायचे. उरलेला मसाला पावाच्या आत आणि वरुन लावायचा. सजावटीसाठी कोथिंबीर.

In reply to by प्रभाकर पेठकर

पण "मसाला पावाचा" जो मसाला आहे त्यात कांदा, लसणाबरोबर टोमॅटो आणि ढब्बू मिरची ही बारीक चिरून पाभा मसाला घालून फ्राय करतात ना? कॉलेजला असताना अनेकवेळा मसालापाव आवडीने खाल्ला होता.

मीसुद्धा बटरात पाभा मसाला भुरभुरून पाव भाजते ( हे माझ्या मैत्रीणीने सांगितले होते) पण लसूण, कांदा घालून भाजला नाही कधी. बाकी श्रीखंडावर तुप!! नको नको.. कल्पना पण करवत नाही. काहीजणं आमरसाबरोबर पुपो ही खातात तर काही पुपोबरोबर आंब्याचे लोणचं (ते मस्तं) माझ्या साबांना शिर्‍याबरोबर आंब्याचे लोणचं खायला आवडतं. गुरगुरट्या भातात लसणीची चटणी + तूप कालवून घ्यायचे व तोंडीलावायला लिंबाचे गोड लोणचे , मला हे काँबि खूप आवडतं. चिकनचा रस्सा उरला असल्यास त्यात कुस्करलेली पोळी किंवा भाकरी, त्यावार बारीक चिरलेला कांदा.

१. बटाट्याचे वेफर्स, बियर मध्ये बुडवत-बुडवत खाणे. २. उकडलेला बटाटा + तिखट+ तेल व थोडेसे मीठ, पोळी बरोबर खाणे. ३. वांग्याच्या भाजी वर तेल + लसूण चटणी घालणे. ४. पुरण-पोळी + आमरस (तो पण फक्त केशर आंबा असेल तरच) + चांदीच्या वाटीत साजूक पातळ तूप. ५. सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की बरोबर खारे काजू किंवा खारे पिस्ते किंवा खारे दाणे. ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की असेल तर चिकन तंगडी कबाब. भारतीय व्हिस्की असेल तर तळलेली कोलंबी आणि भरलेले पापलेट. ६. थालीपीठ असेल तर, ताक्+मीठ्+तिखट. (थालीपीठ आणि लोणी एकदाच खावून बघीतले.थालीपीठाच्या खमंग पणाला लोणी किंवा दही मारक ठरते, असे माझ्या जीभेला जाणवले, तेंव्हापासून ते खाद्य-मिश्रण बाद...) ७. गवारीची भाजी असेल तर, आंब्याचे लोणचे आणि दाण्याची चटणी (आमची सौ. गवारीची भाजी करतांना दाण्याच्या कुटात हयगय करत नाही पण मला अज्जून दाण्याचा कुट हवाच असतो.) बादवे, हे "माणिक पैंजण" काय आहे?

In reply to by प्रभाकर पेठकर

बहुगुणी 26/07/2014 - 02:22
Manik painjan असा गूगल वर शोध घेतला याच पाककृतीच्या अनेक व्हेरिएशन्स दिसतायेत. पण मीही 'माणिक पैंजण म्हणजे फोडणीच्या पोळीचं रसिक नाव आहे' असं ऐकलेलं आठवतं आहे....

In reply to by बहुगुणी

हे फोडणीच्या पोळीचं रसिक नाव आहे अशा अर्थीच मी मानतो...बाकीची व्हेरीयेश्न्स बघतोच :)

In reply to by मुक्त विहारि

चौकटराजा 26/07/2014 - 10:00
पुरणाची पोळी ही दुधाबरोबर व तुपाची धार न लावता व्हिस्कीत बुडवून खाणे. ( सिम्बोयसिस चे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड मिळणार ! )

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा 26/07/2014 - 10:19
ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की असेल तर चिकन तंगडी कबाब. भारतीय व्हिस्की असेल तर तळलेली कोलंबी आणि भरलेले पापलेट.
:)

एक ठरलेला मेन्यु..कुठल्याही ताज्या अथवा उर्वरीत मटकी, मुग किंवा मसुर्‍याच्या उसळींची मिसळ, मस्त बारिक कांदा, थोडं अधिक तिखट, घालुन एक झणझणित मिस़ळ चापावी. चिकन किंवा मटणाच्या उरलेल्या रश्यात उकडलेली अंडी टाकुन एक उकळी आणावि..अंडाकरी तय्यार. कोबीच्या भाजीत भाजणीचे पीठ घालुन, त्याची थालिपीठे किंवा छोटे पॅटीस...झक्कास. कानवले करुन झाल्यानंतर उरलेल्या काताच्या खरपुस शंकरपाळ्या... चिवड्या वर कांदा व लिंबु.. --मयुरा.

चव ही व्यक्तीगणीक बदलत असते. त्यामुळे प्रत्येकाची अनंत खाद्य मिश्रणे असु शकतात. त्यामुळे ह्या धाग्याला प्रतिसादांची वानवा भासणार नाही.

चित्रगुप्त 26/07/2014 - 07:00
साधे वरण + भात् + तूप + लिंबू ... आणि त्यावर दाट लच्छेदार (मिक्सितून काढलेला नव्हे) आमरस.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सखी 28/07/2014 - 20:34
पण तो दाट लच्छेदार नसतो ना? मिक्सीमधुनच काढलेला असतो ना म्हणुन ते थांबायला लागते म्हणाले असावेत. बाकी तुमच्या दु:खावर याने फुंकर बसेल :) ३,५,७ वर्षे हापुससाठी थांबलेली सखी

खटपट्या 26/07/2014 - 08:07
भडंग + अवाकाडो दुपारी केलेली भाजी रात्री तेलावर परतून पोळीबरोबर खाणे. मटन दुसऱ्या दिवशीच छान लागते (वयक्तिक मत )

अर्धवटराव 26/07/2014 - 10:15
१) सणासुदीला पातळभाजी (सहसा पालक किंवा धोपा + चणा डाळ+ शेंगदाणे), सुकी भाजी (सहसा कोबी + बटाटा), कोहळ्याची रस्सा भाजी, कढी, पंचामृत, कोरडी डाळीची चटणी, कोशिंबीर, भजे, वडे आणि बरच काहि बनतं. हे सगळं + साधं वरण + भात..वर भरपूर तूप. अगदी सेमीलिक्वीड लगदा झाला पाहिजे. असं हे पूर्णब्रह्म ताटभर झालं पाहिजे. आणि मग महाराज पुढील अर्धा तास मस्त भुरके मारत गट्टम करायचं. आहाहा. त्यानंतर पैजेचे लाडु किंवा करंजी, जे काहि गोड असेल ते हाणायचं. मग हात धुवुन फस्क्लास विडापान जमवायचं...कात, चुना, शोप, कतरा सुपारी, विलायची, थोडं गुलकंद किंवा सहद...आणि पान लवंग लावुन बंद करायचं. कसलं भन्नाट. २) गोपाल काला + हिरवी मिर्ची ३) कच्चा चिवडा + हिरवी मिर्ची + कडक चहा... मिर्चीच्या तिखटपणावर चहाचा घोट घ्यायचा. ४) पुरणपोळी + भरपूर तुप एक घास, कढी + भजे दुसरा घास. पण त्याअगोदर कमीतकमी २ पुरणपोळ्या भरपूर तूप लावुन मटकवायच्या. ५) झुणका/उसळ + भाकरी, दर तीन घासानंतर एखादी गाजर किंवा बिट चकती, लिंबूरसात मुरवलेल्या मिर्च्या ६) आपल्या अत्यंत खात्रीच्या समोसेवाल्याकडुन ३ गरमागरम समोसे, त्यानंतर १० गरम जिलब्या+मसाला दूध ७) औदुंबराच्या पारावर दत्तगुरुंचं चरणतीर्थ आणि प्रसादाचा चौतकर केशरी पेढा. आणखी अनेक काँबी आहेत राजा... नुसत्या आठवणीने बेजार होतोय.

In reply to by अर्धवटराव

कवितानागेश 28/07/2014 - 23:13
यातले 'भाजी, उसळ वगरै जे असेल ते सगळं + साधं वरण + भात' आणि दही असं होस्टेलवर असताना रोज जेवलेय. तेपण एक मैत्रिण कालवून द्यायची. आपोआप जेवण उतरायचं घशाखाली. :)

अंडे भरपुर फेटुन त्यात थोडेसे तिखट, मीठ,हिरवी मिरची व हळद घालुन मग या मिश्रणात शिळी इडली बुडवुन तव्यावर तेल घालुन फ्राय करावी किंवा इडली कुस्करुन या मिश्रणात घालुन ऑमलेट बनवुन घ्यावे. लोणी आणि सॉस सम प्रमाणात एकत्र करुन त्या बरोबर खावी. मस्त लागते. उरलेल्या दोनतीन भाज्या (तयार भाजी) एकत्र करुन त्यांचा वाटीने दाबुन चांगला लगदा करायचा झेपत असेल तर आणि झेपत असेल तेवढा हिरव्या मिरचीचा ठेचा त्यात घालायचा (दुसर्‍या दिवशी सकाळचा विचार अजिबात करायचा नाही) व हा लगदा कणकेच्या गोळ्यात भरुन जाडसर पोळी करायची. हि पोळी तव्यावर न भाजता गॅसवर ग्रील टाकुन खरपुस भाजायची व गरम असतानाच खाउन टाकायची. पावाच्या कडा कडक / चिवट असतील तर त्या काढुन त्याचे लहान तुकडे करायचे. ते तव्यावर थोडेसे बटर टाकुन लालसर भाजुन घ्यायचे. तव्यावर ते भाजलेले तुकडे जरा लांब लांब पसरुन मग त्यावर ऑमलेट चे मिश्रण (फेटलेली अंडी, कांदा, कोथींबीर, मिठ हिरवी मिरची इत्यादी) घालायचे व खरपुस भाजुन खायचे. लैभारी लागते. पैजारबुवा,

तिमा 26/07/2014 - 10:58
पाव भाजीचा अतिबटर लावून भाजलेला पाव + चहा यांत चहाच्या ऐवजी साखर घातलेले दूध + भाजी न लावलेला अतिबटर पाव खाऊन पहा. पावभाजी खाल्यावर माझी शेवटची राऊंड यासाठी राखीव असते.

In reply to by तिमा

कल्याणला दूधनाक्यावर पहाटे २.३० वाजल्यापासुन ५ वाजेपर्यंत मलईपाव नावाचा प्रकार मिळतो (५ ला तो संपतो :) ) एक बशीभर दाट साय+बचकाभर साखर हे पावाबरोबर खायचे...कस्ली जबरी टेस्ट लागते

१.पावभाजी मला पावापेक्षा ताकभात कालवुन त्याबरोबरच खायला जास्त आवडते...कालची शिळी/मुरलेली पावभाजी असल्यास अजुनच उत्तम २.कालवलेल्या वरणभातात प्रत्येक घासाला चिवडा किंवा फरसाण मिक्स करुन खाणे. ३.बरेच सौदिंडीयन मित्र बिर्याणी किंवा भाताबरोबर ऑम्लेट खाताना बघितलेत. ४.उकडीच्या मोदकांचे नाक फोडुन त्यात तूपाची धार सोडुन खाणे..मोदक गरम असणे मस्ट्..सोबतीला गोडं वरण भात आणि बटाटा भाजी (आहा...एकच महीना राहीला ना गणपतीला?)

कंजूस 28/07/2014 - 16:03
१)पुरणपोळी ताटात ठेवून त्यावर दुध ओतायचे आणि सावकाश चमच्याने तोडून खायची . २)शेंगदाणे चटणी ,दही आणि गरम पोळी . ३)पाव आणि टेंढल्याची परतून भाजी . ४)ज्वारीची भाकरी आणि भाजलेलं वांगं . ५)शिळी ज्वारीची भाकरी आणि दूध . ६)चीज सैनविज बशीत ठेवून गरम चहा वर ओतायचा ,सुरी चमच्याने खायचे .

अनन्न्या 28/07/2014 - 17:13
बरके गरे आंब्याचे लोणचे लावून खातात, मी कधी खाऊन पाहिले नाही. पूर्वी देवळात उत्सवाला गावजेवण असे. त्यावेळी खवय्ये मंडळी जिलबीचे ताट आणि त्याबरोबर चहा घेत असत. पूर्ण भरलेले जिलबीचे ताट आणि शेजारी चहाची किटली! रव्याचे लाडू कुस्करून त्यावर साजूक तूप घालून, वीस पंचवीस लाडू सहज संपत. हे सर्व मी प्रत्यक्ष पाहिलय, पण खाण्याची हिंमत नाही झाली कधी! आता मात्र असे जेवणारे आणि ते पचवणारे लोक शिल्लक नाहिइत. बरक्या गय्रांच्या रसात भाकरीचे पीठ भिजवून भाकरी करतात, ती मलापण आवडते. उकडीचे मोदक, सांदण, खांडवी, पुरण पोळी, सांज्याची पोळी याबरोबर नारळाचे दूध मस्त लागते.

शिद 28/07/2014 - 18:18
१. कुठल्याही चिवडा/फरसाण मध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व एखादी हिरवी मिरची. २. घरी बनवलेलं साजूक तुप लावलेली पुरणपोळी कोमट दुधाबरोबर. ३. मस्त मस्का लावलेल्या स्लाईस ब्रेड मध्ये फरसाण भरुन टोस्ट करायचा. मस्का नसेल तर मग एखादी चिजची स्लाईस व फरसाण. ४. रात्रभर भिजत घातलेले काळे/हिरवे चणे सकाळी तव्यावर फक्त मीठ लावून भाजून खाणे. ५. फोडणीचा भात, लोणचे व भरपुर फरसाण. ६. पारले-जी बिस्किट फक्त पाण्याबरोबर. ७. मटण/चिकनच्या रश्श्यात १५-२० मि. ठेवलेली भाकरी. दोन्ही आदल्या दिवसाचं असेल तर उत्तम. ८. साबूदाणा खिचडीत भरपूर दुध घालून ५ मि. मायक्रोवेव मध्ये गरम करुन खाणं. ९. थंडगार बिअर भरलेल्या पाणीपुरीच्या पुर्‍या. १०. क्रमशः

बेक्ड अ‍ॅप्पल + मध + ड्रायफ्रूट्स असे एक विचित्र वाटणारे कॉम्बिनेशन खाल्ले होते ते फारच आवडले होते :) पण माझे सर्वात आवडची काँबीनेशन म्हणजे सिंगल माल्ट प्रीमीयम स्कॉच / व्हिस्की 'नीट' आणि एकांत आणि आपल्या आवडीचे संगीत :)

सखी 28/07/2014 - 20:55
वरती काहींसारखेच चिवडा फरसाण मध्ये
  1. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो - आणि कोथिंबीर हवीच.
  2. शिळी पोळी बारीक कुस्करुन त्यात तिखट, मीठ, गोडा मसाला, थोडं कच्चं तेल घालुन. हे असचं फक्त यातलं पोळी सोडुन माझी आई चुरमुरे+बा.कांदा+दाणे घालुन एकत्र करायची, तशी चव परत काही या मिश्रणाला येत नाही :(
  3. शिळी ज्वारीची भाकरी बारीक करुन त्यात दुध आणि लसुण+दाण्याची चटणी
  4. माझ्या नव-याला लक्ष्मी नारायण चिवड्यात बुंदीचा लाडु मिक्स करुन आवडतो. ते तिखट+गोड मिश्रण चांगलं लागतं.

भिंगरी 28/07/2014 - 23:20
मटणाचा रस्सा आणि भात कालवून त्यात आमरस खाणारा मी पाहिलाय. म्यांगोलात हिमक्रिम खूप छान लागतं. मऊ भात + तळलेलं कारलं

दिपक.कुवेत 29/07/2014 - 11:28
आणि ईथे आलेले प्रतिसाद तर त्याहुन!!! कधी काळि मी फरसाण चहात घालुन खायचो ह्याची आठवण झाली. फर्साण संपलं कि तो तिखट झालेला चहाहि प्यायला मजा यायची.

Mrunalini 29/07/2014 - 12:41
माझे आवडते प्रकार. १. चहा आणि साधे पोहे २. सुक्या भेळीमधे मटकीची उसळ, कांदा, टोमॅटो आणि कैरीचे तुकडे टाकुन खायचे. मस्त लागते. ३. डाळ-तांदुळाच्या खिचडीवर शेंगदाण्याचे कच्चे तेल टाकुन. ४. चहा आणि शंकरपाळे ५. चिकन मसला किंवा मटण फ्राय केल्यावर, कढई संपल्यावर त्यातच थोडा भात टाकुन, मस्त मिक्स करायचा आणि खायचे. अप्रतिम लागते. ६. मेथीची पाने खुडुन त्यात बारीक चिरलेला कांदा, कच्चे तेल, तिखट, मिठ हे मिक्स करायचे आणि त्या सोबत ज्वारीची भाकरी. (इथे मला मेथीच मिळत नाही :( )

In reply to by Mrunalini

उदय के'सागर 29/07/2014 - 14:00
मेथीची पाने खुडुन त्यात बारीक चिरलेला कांदा, कच्चे तेल, तिखट, मिठ
अगदी!!! माझा आवडता प्रकार. ह्यात आम्ही दाण्याचा कूट पण घालतो - फारच चव येते जेवणाला :)

In reply to by Mrunalini

सूड 29/07/2014 - 14:03
>>६. मेथीची पाने खुडुन त्यात बारीक चिरलेला कांदा, कच्चे तेल, तिखट, मिठ हे मिक्स करायचे हे आजोळी गेलं की खायला मिळतं, तेही आजीच्या हातचं!!

सुहास झेले 29/07/2014 - 13:49
१. चहा / कॉफी + फरसाण / शेव २. मोनॅको टोपिंग्स (ह्यात चीझ पासून शिळी भाजी/फोडणीचा भात काहीही) ३. नाणेघाट ट्रेकला पाव आणि श्रीखंड खाल्ले होते. अप्रतिम लागले होते. ४. घराचा चिवडा त्यात मस्त कढी किंवा कुठल्याही भाजीजी ग्रेवी (चिकन/मटणसुद्धा) ;-)

उदय के'सागर 29/07/2014 - 13:58
१. मॅगी टॉपड विथ शेंगदाणा चटणी - अप्रतिम लागतं. मसाला मॅगी (प्लेन) असेल तर उत्तमच :) २. साबुदाणा खिचडी किंवा फोडणीच्या भातावर (लाल तिखट घालून केलेला फोडणीचा भात) साय (आणि सायीला लागून आलेलं थोडं दुध) मस्तं लागतं. ३. दही भातावर थोडा फोडणीच्या वरणाचा शिडकावा ४. माझे बाबा साधं वरण (वरणाचा घट्ट गोळा) आणि कढी असं कॉम्बीनेशन करतात, गरम-वाफाळत्या भातावर ते फार छान लागतं चवीला.

निश 29/07/2014 - 14:40
नं १ मध्ये बासमती तांदुळाऐवजी आंबे मोहर तांदुळाचा भात...ऐव्हढाच बदल बाकी मेनु तोच. अजुन आंबे मोहर तांदुळाचा भात+ शेवग्याच्या शेंगा घालुन केलल पिठल+ हिरवी मिरची + मडक्यातल घट्ट दही व शेंगदाण्याची चटणी.

पाणीपुरी 29/07/2014 - 14:49
तोंडाला पाणी सुटले वाचुन ! या मधले काही options try केले आहेत . आजुन एक झटपट पाककला सांगते . झटपट पोहे - (कांदा न घालता ) १. फोडनि करायची,त्यात मोहरी,जिरे ,कडीपत्ता मिरच्या,दाणे टाकायचे हवा असल्यास बारीक फोडी करून बटाटा . २.एकिकडे पोहे भिजवुन त्यात लिंबू पिळायचे,मिठ आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मेतकुट घालायचे आपल्या चवी नुसार ,थोडा दाण्याचा कूट . ३.हे मिश्रण नीट हलवून फोडनित घालायचे . ४.निट हलवून एक वाफ आणायची थोडी चवीपुरती साखर घालायची . ५.मग कोथिंबीर आणि असल्यास ओले खोबरे भुरभुरून गट्टम करायचे

बाळ सप्रे 29/07/2014 - 15:06
थंडगार निरशा दुधात बुडवून राजगिर्‍याचा लाडू चहात चकलीचे तुकडे बुडवुन थोडे मौ झाले की मस्त लागतात आणि मग गरम चहा तिखट लागतो. :-) चकली भरपूर लोण्या बरोबरही छान लागते किंवा ताज्या ओल्या खोबर्‍याबरोबरही मस्त लागते. चिवडा थोडासा मौ झाला तर त्यात कांदा, टॉमेटो, ओलं खोबरं घालून मस्त लागतो . किंवा कालच्या उरलेल्या उसळीत (कुठलिही उसळ) घालूनही मस्त. क्रॅकजॅकसारख्या खारट बिस्कीट्सबरोबर चीजडिप . दहीभाताला साजूक तुपाची जिर्‍याची लाल मिरचीची फोडणी त्यात खूपसारे काजू. ऑम्लेटवर ब्लॅक ऑलिव्ह्ज, मशरूम्स, अ‍ॅलॅपिनोज ओरीगानो ( डॉमिनोजच्या ऑर्डरच्याबरोबर खूप एक्स्ट्रॉ घेउन ठेवावित) आणि खूप चीज.. झकास.. गुलाबजामुन किंवा गाजर हलवा विथ व्हॅनिला आईस्क्रीम..

In reply to by बाळ सप्रे

सूड 29/07/2014 - 15:58
>>चहात चकलीचे तुकडे बुडवुन थोडे मौ झाले की मस्त लागतात आणि मग गरम चहा तिखट लागतो. पावसाळ्यात चहा करत असताना मी कधीकधी आल्यासोबत अगदी चिमूटभर लाल तिखट घालतो. मस्त तिखट झणका तर येतोच, पण बाहेर पाऊस पडत असल्यासमुळे तो झणका अगदी सही वाटतो.

रात्रीची पावभाजी पावात भरुन कच्छी दाबेली सारखी भाजुन... पुदिना चटणी + गरम मऊ भात + भरपुर तुप.. गरम मॅगी वर चीज टाकुन.. चुरमुरे + तेल+ तुखट + मीठ + असल्यास कैरीच्या बारिक फोडी कोणतीही उसळ + फरसाण + कांदा तळलेली पोळी , तिखट - मीठ भुरभुरून.. असंच जाता जाता साय साखर / लोणी साखर... खारवड्या / पापड्या , शेंगदाणे ,कांदा (बुक्कीने फोडलेला) भुरका + पोळी

बोका-ए-आझम 22/09/2015 - 18:16
घट्ट वरण, भात, गवारीच्या भाजीचा रस्सा, कैरीचं तिखट लोणचं आणि जिरं सावजी मटणाचा रस्सा (पीसेस नाहीत) + भात + लसणीची चटणी पोप टेट्स मध्ये मिळणारा चिकन+प्राॅन जम्बालया (एक त-हेचा तिखट भात) + भरपूर टाबॅस्को साॅस + थोड्या फ्रेंच फ्राईज + हल्दीराम आलू भुजिया. पुणेरी स्टाईल मसालेभात + कटाची आमटी.( स्वर्ग.)

_मनश्री_ 24/09/2015 - 11:58
लसूण शेंगदाण्याची चटणी कणकेत भरून त्याचा पराठा आणि जोडीला दही आणि कैरीच लोणचं मारी बिस्किटांवर मिक्स फ्रुट जॅम लावायचं आणि वर घट्ट साय शिळी भाकरी कुस्करून ताकात घालायची त्यात तिखट ,चवीपुरत मीठ टाकायचं आणि वरून तेलात हिंग, हळद ,कढीपत्ता व शेंगदाणे घालून फोडणी शेवटी थोडी कोथिंबीर जोडीला लोणच , अफाट लागत

रेवती 25/07/2014 - 22:26
तूप मेतकूट भात + मोठा चमचा हेवी क्रीम+ लिंबाचे गोडे लोणचे. (डाएटची ऐशी की तैशी) क्र. ६ व ७ कसे लागतील हे समजत नाहीये व श्रीखंडावर तुपाचे आकर्षण वाटले नाही. गार गार श्रीखंड किंवा बासुंदी व गरम पुर्‍या, बटाटा भाजी हे डोक्यात फिट्ट बसलेय. आता एक ओळखीचे श्रीखंड व ग्लुकोजची बिस्किटे खातात ते वेगळे! एका मैत्रिणीने सांगितलेली पाव भाजण्याची वेगळी कृती अशी की बटरात पाभा मसाला, बारीक वाटलेला किंचित लसूण, कांदा बारीक चिरून असे लावून भाजणे. मी कधी करून बघितले नाही व खाऊनही बघितले नाहीये. ताक पिताना त्यात कुस्करलेले बाखरवडीचे कण घशाला लागले तर ठसका लागायचा.

In reply to by रेवती

त्याला 'मसाला पाव' असे म्हणतात. पावभाजी करायचा सर्व 'मसाला' मस्त फ्राय करून त्यावर ते पाव दाबून परतायचे. उरलेला मसाला पावाच्या आत आणि वरुन लावायचा. सजावटीसाठी कोथिंबीर.

In reply to by प्रभाकर पेठकर

पण "मसाला पावाचा" जो मसाला आहे त्यात कांदा, लसणाबरोबर टोमॅटो आणि ढब्बू मिरची ही बारीक चिरून पाभा मसाला घालून फ्राय करतात ना? कॉलेजला असताना अनेकवेळा मसालापाव आवडीने खाल्ला होता.

मीसुद्धा बटरात पाभा मसाला भुरभुरून पाव भाजते ( हे माझ्या मैत्रीणीने सांगितले होते) पण लसूण, कांदा घालून भाजला नाही कधी. बाकी श्रीखंडावर तुप!! नको नको.. कल्पना पण करवत नाही. काहीजणं आमरसाबरोबर पुपो ही खातात तर काही पुपोबरोबर आंब्याचे लोणचं (ते मस्तं) माझ्या साबांना शिर्‍याबरोबर आंब्याचे लोणचं खायला आवडतं. गुरगुरट्या भातात लसणीची चटणी + तूप कालवून घ्यायचे व तोंडीलावायला लिंबाचे गोड लोणचे , मला हे काँबि खूप आवडतं. चिकनचा रस्सा उरला असल्यास त्यात कुस्करलेली पोळी किंवा भाकरी, त्यावार बारीक चिरलेला कांदा.

१. बटाट्याचे वेफर्स, बियर मध्ये बुडवत-बुडवत खाणे. २. उकडलेला बटाटा + तिखट+ तेल व थोडेसे मीठ, पोळी बरोबर खाणे. ३. वांग्याच्या भाजी वर तेल + लसूण चटणी घालणे. ४. पुरण-पोळी + आमरस (तो पण फक्त केशर आंबा असेल तरच) + चांदीच्या वाटीत साजूक पातळ तूप. ५. सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की बरोबर खारे काजू किंवा खारे पिस्ते किंवा खारे दाणे. ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की असेल तर चिकन तंगडी कबाब. भारतीय व्हिस्की असेल तर तळलेली कोलंबी आणि भरलेले पापलेट. ६. थालीपीठ असेल तर, ताक्+मीठ्+तिखट. (थालीपीठ आणि लोणी एकदाच खावून बघीतले.थालीपीठाच्या खमंग पणाला लोणी किंवा दही मारक ठरते, असे माझ्या जीभेला जाणवले, तेंव्हापासून ते खाद्य-मिश्रण बाद...) ७. गवारीची भाजी असेल तर, आंब्याचे लोणचे आणि दाण्याची चटणी (आमची सौ. गवारीची भाजी करतांना दाण्याच्या कुटात हयगय करत नाही पण मला अज्जून दाण्याचा कुट हवाच असतो.) बादवे, हे "माणिक पैंजण" काय आहे?

In reply to by प्रभाकर पेठकर

बहुगुणी 26/07/2014 - 02:22
Manik painjan असा गूगल वर शोध घेतला याच पाककृतीच्या अनेक व्हेरिएशन्स दिसतायेत. पण मीही 'माणिक पैंजण म्हणजे फोडणीच्या पोळीचं रसिक नाव आहे' असं ऐकलेलं आठवतं आहे....

In reply to by बहुगुणी

हे फोडणीच्या पोळीचं रसिक नाव आहे अशा अर्थीच मी मानतो...बाकीची व्हेरीयेश्न्स बघतोच :)

In reply to by मुक्त विहारि

चौकटराजा 26/07/2014 - 10:00
पुरणाची पोळी ही दुधाबरोबर व तुपाची धार न लावता व्हिस्कीत बुडवून खाणे. ( सिम्बोयसिस चे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड मिळणार ! )

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा 26/07/2014 - 10:19
ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की असेल तर चिकन तंगडी कबाब. भारतीय व्हिस्की असेल तर तळलेली कोलंबी आणि भरलेले पापलेट.
:)

एक ठरलेला मेन्यु..कुठल्याही ताज्या अथवा उर्वरीत मटकी, मुग किंवा मसुर्‍याच्या उसळींची मिसळ, मस्त बारिक कांदा, थोडं अधिक तिखट, घालुन एक झणझणित मिस़ळ चापावी. चिकन किंवा मटणाच्या उरलेल्या रश्यात उकडलेली अंडी टाकुन एक उकळी आणावि..अंडाकरी तय्यार. कोबीच्या भाजीत भाजणीचे पीठ घालुन, त्याची थालिपीठे किंवा छोटे पॅटीस...झक्कास. कानवले करुन झाल्यानंतर उरलेल्या काताच्या खरपुस शंकरपाळ्या... चिवड्या वर कांदा व लिंबु.. --मयुरा.

चव ही व्यक्तीगणीक बदलत असते. त्यामुळे प्रत्येकाची अनंत खाद्य मिश्रणे असु शकतात. त्यामुळे ह्या धाग्याला प्रतिसादांची वानवा भासणार नाही.

चित्रगुप्त 26/07/2014 - 07:00
साधे वरण + भात् + तूप + लिंबू ... आणि त्यावर दाट लच्छेदार (मिक्सितून काढलेला नव्हे) आमरस.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सखी 28/07/2014 - 20:34
पण तो दाट लच्छेदार नसतो ना? मिक्सीमधुनच काढलेला असतो ना म्हणुन ते थांबायला लागते म्हणाले असावेत. बाकी तुमच्या दु:खावर याने फुंकर बसेल :) ३,५,७ वर्षे हापुससाठी थांबलेली सखी

खटपट्या 26/07/2014 - 08:07
भडंग + अवाकाडो दुपारी केलेली भाजी रात्री तेलावर परतून पोळीबरोबर खाणे. मटन दुसऱ्या दिवशीच छान लागते (वयक्तिक मत )

अर्धवटराव 26/07/2014 - 10:15
१) सणासुदीला पातळभाजी (सहसा पालक किंवा धोपा + चणा डाळ+ शेंगदाणे), सुकी भाजी (सहसा कोबी + बटाटा), कोहळ्याची रस्सा भाजी, कढी, पंचामृत, कोरडी डाळीची चटणी, कोशिंबीर, भजे, वडे आणि बरच काहि बनतं. हे सगळं + साधं वरण + भात..वर भरपूर तूप. अगदी सेमीलिक्वीड लगदा झाला पाहिजे. असं हे पूर्णब्रह्म ताटभर झालं पाहिजे. आणि मग महाराज पुढील अर्धा तास मस्त भुरके मारत गट्टम करायचं. आहाहा. त्यानंतर पैजेचे लाडु किंवा करंजी, जे काहि गोड असेल ते हाणायचं. मग हात धुवुन फस्क्लास विडापान जमवायचं...कात, चुना, शोप, कतरा सुपारी, विलायची, थोडं गुलकंद किंवा सहद...आणि पान लवंग लावुन बंद करायचं. कसलं भन्नाट. २) गोपाल काला + हिरवी मिर्ची ३) कच्चा चिवडा + हिरवी मिर्ची + कडक चहा... मिर्चीच्या तिखटपणावर चहाचा घोट घ्यायचा. ४) पुरणपोळी + भरपूर तुप एक घास, कढी + भजे दुसरा घास. पण त्याअगोदर कमीतकमी २ पुरणपोळ्या भरपूर तूप लावुन मटकवायच्या. ५) झुणका/उसळ + भाकरी, दर तीन घासानंतर एखादी गाजर किंवा बिट चकती, लिंबूरसात मुरवलेल्या मिर्च्या ६) आपल्या अत्यंत खात्रीच्या समोसेवाल्याकडुन ३ गरमागरम समोसे, त्यानंतर १० गरम जिलब्या+मसाला दूध ७) औदुंबराच्या पारावर दत्तगुरुंचं चरणतीर्थ आणि प्रसादाचा चौतकर केशरी पेढा. आणखी अनेक काँबी आहेत राजा... नुसत्या आठवणीने बेजार होतोय.

In reply to by अर्धवटराव

कवितानागेश 28/07/2014 - 23:13
यातले 'भाजी, उसळ वगरै जे असेल ते सगळं + साधं वरण + भात' आणि दही असं होस्टेलवर असताना रोज जेवलेय. तेपण एक मैत्रिण कालवून द्यायची. आपोआप जेवण उतरायचं घशाखाली. :)

अंडे भरपुर फेटुन त्यात थोडेसे तिखट, मीठ,हिरवी मिरची व हळद घालुन मग या मिश्रणात शिळी इडली बुडवुन तव्यावर तेल घालुन फ्राय करावी किंवा इडली कुस्करुन या मिश्रणात घालुन ऑमलेट बनवुन घ्यावे. लोणी आणि सॉस सम प्रमाणात एकत्र करुन त्या बरोबर खावी. मस्त लागते. उरलेल्या दोनतीन भाज्या (तयार भाजी) एकत्र करुन त्यांचा वाटीने दाबुन चांगला लगदा करायचा झेपत असेल तर आणि झेपत असेल तेवढा हिरव्या मिरचीचा ठेचा त्यात घालायचा (दुसर्‍या दिवशी सकाळचा विचार अजिबात करायचा नाही) व हा लगदा कणकेच्या गोळ्यात भरुन जाडसर पोळी करायची. हि पोळी तव्यावर न भाजता गॅसवर ग्रील टाकुन खरपुस भाजायची व गरम असतानाच खाउन टाकायची. पावाच्या कडा कडक / चिवट असतील तर त्या काढुन त्याचे लहान तुकडे करायचे. ते तव्यावर थोडेसे बटर टाकुन लालसर भाजुन घ्यायचे. तव्यावर ते भाजलेले तुकडे जरा लांब लांब पसरुन मग त्यावर ऑमलेट चे मिश्रण (फेटलेली अंडी, कांदा, कोथींबीर, मिठ हिरवी मिरची इत्यादी) घालायचे व खरपुस भाजुन खायचे. लैभारी लागते. पैजारबुवा,

तिमा 26/07/2014 - 10:58
पाव भाजीचा अतिबटर लावून भाजलेला पाव + चहा यांत चहाच्या ऐवजी साखर घातलेले दूध + भाजी न लावलेला अतिबटर पाव खाऊन पहा. पावभाजी खाल्यावर माझी शेवटची राऊंड यासाठी राखीव असते.

In reply to by तिमा

कल्याणला दूधनाक्यावर पहाटे २.३० वाजल्यापासुन ५ वाजेपर्यंत मलईपाव नावाचा प्रकार मिळतो (५ ला तो संपतो :) ) एक बशीभर दाट साय+बचकाभर साखर हे पावाबरोबर खायचे...कस्ली जबरी टेस्ट लागते

१.पावभाजी मला पावापेक्षा ताकभात कालवुन त्याबरोबरच खायला जास्त आवडते...कालची शिळी/मुरलेली पावभाजी असल्यास अजुनच उत्तम २.कालवलेल्या वरणभातात प्रत्येक घासाला चिवडा किंवा फरसाण मिक्स करुन खाणे. ३.बरेच सौदिंडीयन मित्र बिर्याणी किंवा भाताबरोबर ऑम्लेट खाताना बघितलेत. ४.उकडीच्या मोदकांचे नाक फोडुन त्यात तूपाची धार सोडुन खाणे..मोदक गरम असणे मस्ट्..सोबतीला गोडं वरण भात आणि बटाटा भाजी (आहा...एकच महीना राहीला ना गणपतीला?)

कंजूस 28/07/2014 - 16:03
१)पुरणपोळी ताटात ठेवून त्यावर दुध ओतायचे आणि सावकाश चमच्याने तोडून खायची . २)शेंगदाणे चटणी ,दही आणि गरम पोळी . ३)पाव आणि टेंढल्याची परतून भाजी . ४)ज्वारीची भाकरी आणि भाजलेलं वांगं . ५)शिळी ज्वारीची भाकरी आणि दूध . ६)चीज सैनविज बशीत ठेवून गरम चहा वर ओतायचा ,सुरी चमच्याने खायचे .

अनन्न्या 28/07/2014 - 17:13
बरके गरे आंब्याचे लोणचे लावून खातात, मी कधी खाऊन पाहिले नाही. पूर्वी देवळात उत्सवाला गावजेवण असे. त्यावेळी खवय्ये मंडळी जिलबीचे ताट आणि त्याबरोबर चहा घेत असत. पूर्ण भरलेले जिलबीचे ताट आणि शेजारी चहाची किटली! रव्याचे लाडू कुस्करून त्यावर साजूक तूप घालून, वीस पंचवीस लाडू सहज संपत. हे सर्व मी प्रत्यक्ष पाहिलय, पण खाण्याची हिंमत नाही झाली कधी! आता मात्र असे जेवणारे आणि ते पचवणारे लोक शिल्लक नाहिइत. बरक्या गय्रांच्या रसात भाकरीचे पीठ भिजवून भाकरी करतात, ती मलापण आवडते. उकडीचे मोदक, सांदण, खांडवी, पुरण पोळी, सांज्याची पोळी याबरोबर नारळाचे दूध मस्त लागते.

शिद 28/07/2014 - 18:18
१. कुठल्याही चिवडा/फरसाण मध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व एखादी हिरवी मिरची. २. घरी बनवलेलं साजूक तुप लावलेली पुरणपोळी कोमट दुधाबरोबर. ३. मस्त मस्का लावलेल्या स्लाईस ब्रेड मध्ये फरसाण भरुन टोस्ट करायचा. मस्का नसेल तर मग एखादी चिजची स्लाईस व फरसाण. ४. रात्रभर भिजत घातलेले काळे/हिरवे चणे सकाळी तव्यावर फक्त मीठ लावून भाजून खाणे. ५. फोडणीचा भात, लोणचे व भरपुर फरसाण. ६. पारले-जी बिस्किट फक्त पाण्याबरोबर. ७. मटण/चिकनच्या रश्श्यात १५-२० मि. ठेवलेली भाकरी. दोन्ही आदल्या दिवसाचं असेल तर उत्तम. ८. साबूदाणा खिचडीत भरपूर दुध घालून ५ मि. मायक्रोवेव मध्ये गरम करुन खाणं. ९. थंडगार बिअर भरलेल्या पाणीपुरीच्या पुर्‍या. १०. क्रमशः

बेक्ड अ‍ॅप्पल + मध + ड्रायफ्रूट्स असे एक विचित्र वाटणारे कॉम्बिनेशन खाल्ले होते ते फारच आवडले होते :) पण माझे सर्वात आवडची काँबीनेशन म्हणजे सिंगल माल्ट प्रीमीयम स्कॉच / व्हिस्की 'नीट' आणि एकांत आणि आपल्या आवडीचे संगीत :)

सखी 28/07/2014 - 20:55
वरती काहींसारखेच चिवडा फरसाण मध्ये
  1. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो - आणि कोथिंबीर हवीच.
  2. शिळी पोळी बारीक कुस्करुन त्यात तिखट, मीठ, गोडा मसाला, थोडं कच्चं तेल घालुन. हे असचं फक्त यातलं पोळी सोडुन माझी आई चुरमुरे+बा.कांदा+दाणे घालुन एकत्र करायची, तशी चव परत काही या मिश्रणाला येत नाही :(
  3. शिळी ज्वारीची भाकरी बारीक करुन त्यात दुध आणि लसुण+दाण्याची चटणी
  4. माझ्या नव-याला लक्ष्मी नारायण चिवड्यात बुंदीचा लाडु मिक्स करुन आवडतो. ते तिखट+गोड मिश्रण चांगलं लागतं.

भिंगरी 28/07/2014 - 23:20
मटणाचा रस्सा आणि भात कालवून त्यात आमरस खाणारा मी पाहिलाय. म्यांगोलात हिमक्रिम खूप छान लागतं. मऊ भात + तळलेलं कारलं

दिपक.कुवेत 29/07/2014 - 11:28
आणि ईथे आलेले प्रतिसाद तर त्याहुन!!! कधी काळि मी फरसाण चहात घालुन खायचो ह्याची आठवण झाली. फर्साण संपलं कि तो तिखट झालेला चहाहि प्यायला मजा यायची.

Mrunalini 29/07/2014 - 12:41
माझे आवडते प्रकार. १. चहा आणि साधे पोहे २. सुक्या भेळीमधे मटकीची उसळ, कांदा, टोमॅटो आणि कैरीचे तुकडे टाकुन खायचे. मस्त लागते. ३. डाळ-तांदुळाच्या खिचडीवर शेंगदाण्याचे कच्चे तेल टाकुन. ४. चहा आणि शंकरपाळे ५. चिकन मसला किंवा मटण फ्राय केल्यावर, कढई संपल्यावर त्यातच थोडा भात टाकुन, मस्त मिक्स करायचा आणि खायचे. अप्रतिम लागते. ६. मेथीची पाने खुडुन त्यात बारीक चिरलेला कांदा, कच्चे तेल, तिखट, मिठ हे मिक्स करायचे आणि त्या सोबत ज्वारीची भाकरी. (इथे मला मेथीच मिळत नाही :( )

In reply to by Mrunalini

उदय के'सागर 29/07/2014 - 14:00
मेथीची पाने खुडुन त्यात बारीक चिरलेला कांदा, कच्चे तेल, तिखट, मिठ
अगदी!!! माझा आवडता प्रकार. ह्यात आम्ही दाण्याचा कूट पण घालतो - फारच चव येते जेवणाला :)

In reply to by Mrunalini

सूड 29/07/2014 - 14:03
>>६. मेथीची पाने खुडुन त्यात बारीक चिरलेला कांदा, कच्चे तेल, तिखट, मिठ हे मिक्स करायचे हे आजोळी गेलं की खायला मिळतं, तेही आजीच्या हातचं!!

सुहास झेले 29/07/2014 - 13:49
१. चहा / कॉफी + फरसाण / शेव २. मोनॅको टोपिंग्स (ह्यात चीझ पासून शिळी भाजी/फोडणीचा भात काहीही) ३. नाणेघाट ट्रेकला पाव आणि श्रीखंड खाल्ले होते. अप्रतिम लागले होते. ४. घराचा चिवडा त्यात मस्त कढी किंवा कुठल्याही भाजीजी ग्रेवी (चिकन/मटणसुद्धा) ;-)

उदय के'सागर 29/07/2014 - 13:58
१. मॅगी टॉपड विथ शेंगदाणा चटणी - अप्रतिम लागतं. मसाला मॅगी (प्लेन) असेल तर उत्तमच :) २. साबुदाणा खिचडी किंवा फोडणीच्या भातावर (लाल तिखट घालून केलेला फोडणीचा भात) साय (आणि सायीला लागून आलेलं थोडं दुध) मस्तं लागतं. ३. दही भातावर थोडा फोडणीच्या वरणाचा शिडकावा ४. माझे बाबा साधं वरण (वरणाचा घट्ट गोळा) आणि कढी असं कॉम्बीनेशन करतात, गरम-वाफाळत्या भातावर ते फार छान लागतं चवीला.

निश 29/07/2014 - 14:40
नं १ मध्ये बासमती तांदुळाऐवजी आंबे मोहर तांदुळाचा भात...ऐव्हढाच बदल बाकी मेनु तोच. अजुन आंबे मोहर तांदुळाचा भात+ शेवग्याच्या शेंगा घालुन केलल पिठल+ हिरवी मिरची + मडक्यातल घट्ट दही व शेंगदाण्याची चटणी.

पाणीपुरी 29/07/2014 - 14:49
तोंडाला पाणी सुटले वाचुन ! या मधले काही options try केले आहेत . आजुन एक झटपट पाककला सांगते . झटपट पोहे - (कांदा न घालता ) १. फोडनि करायची,त्यात मोहरी,जिरे ,कडीपत्ता मिरच्या,दाणे टाकायचे हवा असल्यास बारीक फोडी करून बटाटा . २.एकिकडे पोहे भिजवुन त्यात लिंबू पिळायचे,मिठ आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मेतकुट घालायचे आपल्या चवी नुसार ,थोडा दाण्याचा कूट . ३.हे मिश्रण नीट हलवून फोडनित घालायचे . ४.निट हलवून एक वाफ आणायची थोडी चवीपुरती साखर घालायची . ५.मग कोथिंबीर आणि असल्यास ओले खोबरे भुरभुरून गट्टम करायचे

बाळ सप्रे 29/07/2014 - 15:06
थंडगार निरशा दुधात बुडवून राजगिर्‍याचा लाडू चहात चकलीचे तुकडे बुडवुन थोडे मौ झाले की मस्त लागतात आणि मग गरम चहा तिखट लागतो. :-) चकली भरपूर लोण्या बरोबरही छान लागते किंवा ताज्या ओल्या खोबर्‍याबरोबरही मस्त लागते. चिवडा थोडासा मौ झाला तर त्यात कांदा, टॉमेटो, ओलं खोबरं घालून मस्त लागतो . किंवा कालच्या उरलेल्या उसळीत (कुठलिही उसळ) घालूनही मस्त. क्रॅकजॅकसारख्या खारट बिस्कीट्सबरोबर चीजडिप . दहीभाताला साजूक तुपाची जिर्‍याची लाल मिरचीची फोडणी त्यात खूपसारे काजू. ऑम्लेटवर ब्लॅक ऑलिव्ह्ज, मशरूम्स, अ‍ॅलॅपिनोज ओरीगानो ( डॉमिनोजच्या ऑर्डरच्याबरोबर खूप एक्स्ट्रॉ घेउन ठेवावित) आणि खूप चीज.. झकास.. गुलाबजामुन किंवा गाजर हलवा विथ व्हॅनिला आईस्क्रीम..

In reply to by बाळ सप्रे

सूड 29/07/2014 - 15:58
>>चहात चकलीचे तुकडे बुडवुन थोडे मौ झाले की मस्त लागतात आणि मग गरम चहा तिखट लागतो. पावसाळ्यात चहा करत असताना मी कधीकधी आल्यासोबत अगदी चिमूटभर लाल तिखट घालतो. मस्त तिखट झणका तर येतोच, पण बाहेर पाऊस पडत असल्यासमुळे तो झणका अगदी सही वाटतो.

रात्रीची पावभाजी पावात भरुन कच्छी दाबेली सारखी भाजुन... पुदिना चटणी + गरम मऊ भात + भरपुर तुप.. गरम मॅगी वर चीज टाकुन.. चुरमुरे + तेल+ तुखट + मीठ + असल्यास कैरीच्या बारिक फोडी कोणतीही उसळ + फरसाण + कांदा तळलेली पोळी , तिखट - मीठ भुरभुरून.. असंच जाता जाता साय साखर / लोणी साखर... खारवड्या / पापड्या , शेंगदाणे ,कांदा (बुक्कीने फोडलेला) भुरका + पोळी

बोका-ए-आझम 22/09/2015 - 18:16
घट्ट वरण, भात, गवारीच्या भाजीचा रस्सा, कैरीचं तिखट लोणचं आणि जिरं सावजी मटणाचा रस्सा (पीसेस नाहीत) + भात + लसणीची चटणी पोप टेट्स मध्ये मिळणारा चिकन+प्राॅन जम्बालया (एक त-हेचा तिखट भात) + भरपूर टाबॅस्को साॅस + थोड्या फ्रेंच फ्राईज + हल्दीराम आलू भुजिया. पुणेरी स्टाईल मसालेभात + कटाची आमटी.( स्वर्ग.)

_मनश्री_ 24/09/2015 - 11:58
लसूण शेंगदाण्याची चटणी कणकेत भरून त्याचा पराठा आणि जोडीला दही आणि कैरीच लोणचं मारी बिस्किटांवर मिक्स फ्रुट जॅम लावायचं आणि वर घट्ट साय शिळी भाकरी कुस्करून ताकात घालायची त्यात तिखट ,चवीपुरत मीठ टाकायचं आणि वरून तेलात हिंग, हळद ,कढीपत्ता व शेंगदाणे घालून फोडणी शेवटी थोडी कोथिंबीर जोडीला लोणच , अफाट लागत
तसे आपण अनेक नवीन जुने पदार्थ करून खातोच पण मला काही पदार्थ एकाबरोबर एक आवडतात... त्यांना विशिष्ट काही नावे नाहीत ....कदाचित तुम्ही हे करून खात असाल...तसे असेल तर फारच उत्तम ....पण नसाल तर खाऊन बघा आवडतात का आणि तुम्ही पण असे काही करत असाल तर सांगा... १. उत्तम बासमती तांदुळाचा भात + मेतकुट + तूप +साय+ दुध ...त्यावर दह्याची मोठी खाप + एक उकडलेला बटाटा +किंचित मीठ २. दही, दुध भाताला उत्तमपैकी तूप जिर्याची आणि लाल तिखटाची फोडणी बरोबर पाव भाजीची भाजी ३. पाव भाजीचा अतिबटर लावून भाजलेला पाव + चहा ४. माणिक पैंजण + गोड ताक + ताज्या कैरीच्या लोणच्याचा खार ५.

इंग्रजी शब्दांचा मराठीत होणारा चुकीचा वापर

मराठी कथालेखक ·

In reply to by कविता१९७८

Xerox ला इंग्रजीत पण Xerox नाही म्हणत हो !! Photocopy म्हणतात. आपण मात्र Ricoh/Canon ई कोणत्याही मशिनवर Xerox काढत असतो. पुढे कधी काळी ती Xerox कंपनी बंद पडली तरी भारतात मात्र तिचे अस्तित्व कायमच टिकून राहील !!

In reply to by आदूबाळ

शशिकांत ओक 02/08/2014 - 15:46
भेटणे हे क्रियापद अनेक जण वापरताना तारतम्य बाळगत नाहीत. मला पेन किंवा असे वस्तु सुचक शब्द भेटत नाही. सापडते किंवा मिळते. जीवंत मानव एकमेकांशी भेटतो. निर्जीव वस्तूंसाठी हे क्रियापद वापरू नये असे वाटते.

In reply to by आदूबाळ

>>>>तर ती मिळाली, सापडली का भेटली? म्हैस बेवारशी असेल आणि तुम्ही तिला पाळण्यासाठी आपल्या घरी नेलीत तर ती 'रस्त्यात मिळाली'. जर आधीपासून तुमचीच असेल आणि हरवली असेल तर जेंव्हा ती दिसली तेंव्हा ती 'सापडली' म्हणता येईल. 'भेटली' म्हणण्यासाठी तुम्ही आधीपासून एकमेकांना ओळखणे अपेक्षित आहे. तसेच, दोघांनी थांबून एकमेकांशी कांही संभाषण करणे, भावनिक आदानप्रदान होणे आवश्यक आहे. तसे असेल तर ती 'भेट' म्हणता येईल. जसे, 'गेल्यावर्षी मी माझी गाय एका शेतकर्‍याला विकली. तीची आणि माझी काल रस्त्यात भेट झाली. तिने मला आणि मी तीला ओळखलं. मी तिच्या गळ्याखाली कुरुवाळलं, तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिने माझ्याकडे पाहून तिचं डोकं माझ्या अंगावर घासलं. आणि ओळख दर्शविली.' असे झाल्यावर तो माणूस घरी येऊन आपल्या घरच्यांना म्हणू शकतो 'अरे! आज मला रस्त्यात आपली 'आनंदी' किंवा 'कपिला' (जे नांव असेल ते) भेटली होती. तिने मला लगेच ओळखलं. खुप वाईट वाटलं रे आम्हा दोघांनाही.' वगैरे वगैरे. अन्यथा एक गाय अथवा म्हैस 'दिसली' हेच योग्य होईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

हुप्प्या 12/08/2014 - 00:15
आपण सापडणे, भेटणे व मिळणे ह्यातील फरक उत्तमरित्या अधोरेखित केला आहे. परंतु मराठी भाषेच्या शुद्ध असण्याबद्दल लोकांमधे कमालीचे औदासिन्य आहे. पेन भेटले, बसचे तिकिट भेटले हे हिंदीत मिलना हे क्रियापद आहे त्याचे मराठीत केलेले कलम आहे. " कल मुझे अपना पुराना दोस्त मिला था. " "कल मेरा फोन खो गया था, आज मिला." ह्यातील मिलना हे क्रियापद सजीव निर्जीव सगळ्यांकरता वापरले जाते म्हणून त्याचे मराठी रुप भेटणे हेही असेच सजीव वा निर्जीवांकरता वापरावे असा सोयिस्कर समज काही शॉर्टकट बहाद्दरांनी करुन घेतला आहे. कदाचित नागपूरसारख्या हिंदाळलेल्या मराठीतून हा शब्दप्रयोग मराठीत आला असेल. मलाही सगळ्याला भेटणे म्हणणे चूक वाटते. तोच प्रकार बोलणे व म्हणणे ह्यात होतो. "काल रमेश बोलला की सगळ्या लोकल लेट आहेत." ह्यात बोलला पेक्षा म्हणाला हे जास्त समर्पक आहे. पण इथेही बोलणे हेच क्रियापद सर्रास वापरले जाते.

In reply to by आदूबाळ

प्यारे१ 11/08/2014 - 17:15
पाचगणीतल्या बर्‍याच विन्ग्रजी शाळेत जाणार्‍या पोरांच्या तोंडी 'रिमूव्ह प्रिंट/पेज' असं ऐकलंय. प्रिन्ट निकाल, पेज निकाल वगैरे साठी. बाकी तिथंही बर्‍याच जणांना मार्क भेटतात.

In reply to by प्यारे१

नाव आडनाव 11/08/2014 - 17:37
उस्मानाबादच्या एका कॉलेजातल्या मास्तर आणि विद्यार्थी यांचा संवाद: what my father's go - म्हणजे माय मराठीत माझ्या बापाचं काय जातंय नगर कॉलेजच्या मास्तर आणि विद्यार्थ्यांचा संवाद: you people are drinking cigarette under tree - तुम्ही लोक झाडाखाली उभे राहून सिगरेट पिताय :)

In reply to by प्यारे१

यसवायजी 11/08/2014 - 21:24
शाळेतल्या पोरांचं सोडा. आमचा रिजनल हेड म्हणतो, "अरेSS रिमूव्ह सम टाईSSम, लेट्स डू इट ना.." :))

In reply to by यसवायजी

मराठे 11/08/2014 - 21:28
एका टायवाल्याचा दुसर्‍या टायवाल्याशी बसमधे ऐकलेला संवाद.. "हे, आय हॅव रिमूव्हड युवर टिकीट अल्सो हा!"

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नाव आडनाव 26/07/2014 - 10:26
टुथ्पेस्ट म्हणजे कोल्गेट :) आयटी / सोफ़्टवेयर म्हणजे इन्फोसिस :) माझ्या ओलखीचे एक काका आहेत त्यांनी मी फ्रेशर असताना विचारलं "काय रे कुठे नोकरी लागली तुला". मी सांगितलं "पर्सिस्टनट मध्ये". काका म्हणाले काय करते हे कंपनी. मी सांगितलं सोफ़्टवेयर बनवते. काका म्हणाले "अच्छा म्हणजे इन्फोसिस मध्ये नोकरी लागली तुला :) "

In reply to by धन्या

आदूबाळ 29/07/2014 - 19:58
हे मी पण दोनतीन लोकांकडून ऐकलं आहे. बहुदा लोकांना "इन्फोटेक" म्हणजे "इन्फोसिस" वाटत असावं! माझे एक दूरचे काका आहेत. त्यांनी मी दहावी पास झाल्यानंतर इन्फोसिस(?) हेच कसं बेष्ट करियर आहे हे परोपरीने पटवून द्यायचा प्रयत्न केला. चंद्रमोहन नावाच्या त्यांच्या मित्राची मुलगी तेव्हा टाटा इन्फोसिस मध्ये नुकतीच लागली होती. तिचं उदाहरण सारखं देत असत. मी "जाणार नाही" हे निक्षून सांगितल्यावर "थू: तुझ्या जिंदगानीवर" असा चेहेरा करून बोलायला लागले. अजूनही बोलतात. टाटा इन्फोसिस मधली चंद्रमोहनची मुलगी आता मोठ्या पदावर आहे.

In reply to by आदूबाळ

रेवती 29/07/2014 - 20:31
हे वाचून माझ्या आजोबांची आठवण आली. आईचे वडील हे अल्फाबेटस वाचनापुरते इंग्रजी शिकले होते. माझी आई बी ए झाल्यावर त्यांना भयंकर अभिमान वगैरे वाटला होता. (ज्या काळी मुलींची १८ व्या वर्षी लग्ने होत त्याकाळी मुलीला बी ए होईतो शिकवणे आणि त्यावर टायपिंगच्या क्लासला घालणे हे म्हणजे अतिच समजत असत) ;) पुढे अनेक वर्षांनी माझी मामेबहिण पेढे देऊन नमस्कार करून म्हणाली की "आजोबा मी बीई इलेक्ट्रॉनिक्स झाले" त्यावर ते (वय ९५) म्हणाले "अरेरे! जुन्या काळी मी मुलीला बी ए केले आणि आज तू फक्त बीई झालीस, जरा ई पासून ए पर्यंत येण्यासारखा अभ्यास का नाही केलास?" आम्ही हसून लोळलो होतो. त्यावर "अचरट कार्टी" असा शेरा त्यांनी मारला. ;)

In reply to by रेवती

जेव्हा साखर कारखानदारांनी आपल्या गावांत नवीन नवीन महाविद्यालये उघडणे सुरू केले त्यावेळेची गोष्ट आठवली. एका कारखान्याच्या चेअरमनने मोठ्या अभिमानाने प्राध्यापकांच्या मुलाखतीत भाग घेतला होता. एका उमेदवाराने आपले शिक्षण एम एस सी असे सांगितल्यावर चेर्मन सायबांनी, "पन मंग तुमी मॅट्रीक झाला का नाय ते सांगा अदुगर." असे म्हणून उमेदवारालाच नव्हे तर इतर मुलाखत घेणार्‍यांनाही गारद केले होते ! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

काहीही खोटं सांगू नका ,आमच्या प महाराष्ट्रतल्या साखर कारखानदारानी पार युके जर्मनी युएसतल्या कंपन्यांशी करार करुन रिफाईन्ड शुगर, अल्कोहोल, कोजनरेशन प्रोजेक्ट उभारलेत ,ते इतका दूधखुळा प्रश्न विचारतील असे वाटत नाही...

In reply to by नानासाहेब नेफळे

त्या वाक्याची सुरुवात वाचा हो पहिली, मग समजेल तो कोणता काळ होता ते... मग उचलली जीभ लावली टाळ्याला असे करून बेजबाबदार आरोप करण्याची प्रवृत्ती जरा तरी काबूत येईल असे वाटते (अर्थात हा आपला माझा आशावाद आहे). मी सांगीतलेल्या काळात त्या विभागात मी स्वतः रुरल इंटर्नशीपसाठी ६ महिने राहिलो आहे. उस शेतकर्‍यांपासून ते अनेक स्तराच्या साखर कारखानदारांशी प्रत्यक्ष संबंध आणि बोलणे झालेले आहे... तीच गोष्ट महाविद्यालयात काम करणार्‍या प्रिंसिपल-प्राध्यापक वगैरेंबद्दल. हा किस्सा तेथे फार प्रसिद्ध झाला होता. तो तुम्हाला माहित नाही म्हणजे तुमचा पश्चिम महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीच्या इतिहासाचा अभ्यास कमी पडतोय असे दिसते ! खरा अभिमान असायला आधी अभ्यास जरूर आहे हे नमूद करावेसे वाटते. मी पण पश्चिम महाराष्ट्राबद्दल अभिमान बाळगून आहे. पण फुक्या अभिमानाच्या लागणीने अस्मितेची गळवे होऊ नयेत इतके मानसिक स्वास्थ्य कमावून आहे. तुम्हालाही स्वास्थ्यासाठी अनेक शुभेच्छा ! :) (तुमच्या आयडीचा एकंदर स्वभाव पाहता ही नुसती फुसकी काडी असण्याचा संभवही नाकारता येत नाही... तसे असले तर मग आम्ही खो...खो...खो असे हसलो आहे असे समजा. {हल्ली स्मायल्या गायब आहेत तेव्हा शब्दांवरच समाधान मानून घ्या :) ;) }

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माझे आजोबा एका कारखान्याचे डायरेक्टर होते व मी त्याच कारखान्याचा सभासद आहे

In reply to by नानासाहेब नेफळे

नानासायेब, आवो ही दंतकथा नाही तेथे प्रत्यक्ष हजर असलेल्या अनेक जणांकडून ऐकलेली आहे. तुमच्या आजोबांचे माहिती नाही. पण एकापेक्षा जास्त कारखानदारांशी वैद्यकीय व्यवसायिक म्हणून वैयक्तीक स्तरावरही संबंध आलेला आहे. त्यावेळेस त्यांचे सर्वसामान्य ज्ञान आणि अचानक आलेल्या सधनतेचा असर असलेली वागणूक हे दोन्ही जवळून पाहिलेले आहे. तेव्हा याबाबत जास्त चर्चा न वाढवणे तुमच्याच फायद्याचे राहील असे वाटते ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजून काही... ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला त्या एकाच तालुक्यात त्या काळी पाच साखर कारखाने होते.

In reply to by मराठी कथालेखक

अनुप ढेरे 25/07/2014 - 18:27
झेरॉक्स हे जेनेरिक टर्म होण्याच्या मार्गावर आहे. To xerox हे क्रियापद वेब्स्टरमध्येही आलेलं आहे. http://www.merriam-webster.com/dictionary/xerox अधिक माहितीसाठी हे वाचा. http://en.wikipedia.org/wiki/Genericized_trademark झेरॉक्स सध्या to xerox हे क्रियापद लोकांनी वापरू नये म्हणून प्रयत्न करत आहे. असे चालू राहिल्यास xerox हा शब्द त्या कंपनीच्या मालकीचा राहणार नाही. http://en.wikipedia.org/wiki/Xerox#Trademark

In reply to by संचित

अनुप ढेरे 30/07/2014 - 10:46
गूगलही प्रचार करत आहे लोकांना 'टू गूगल' असं क्रियापद वापरण्यापासून प्रवृत्त करण्यासाठी. जालावर अजून शोधले असता बँड-एड हेही जनेरीक झालेलं ब्रँड नेम आहे असं दिसलं. फोटोशॉपही त्याच मार्गावर आहे.

In reply to by अनुप ढेरे

झेरॉक्स हे जेनेरिक टर्म होण्याच्या मार्गावर आहे. To xerox हे क्रियापद वेब्स्टरमध्येही आलेलं आहे.
असंही काही चालू आहे हे माहित नव्हतं. पण हे म्हणजे जनरेट्यामुळे अतिक्रमणे नियमित करण्यासारखं आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन 25/07/2014 - 18:46
आपला बंगला आणि कशाला मोडतोय ओ? ज्याला झोपडी म्हटले जाते त्यांनाच अधिकृत करून बंगल्याचा पार्ट म्हणून आत घ्यायचे अन जरा रिनोव्हेषण केले की जंक्षाण कामच झालं की ओ ;)

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश 25/07/2014 - 19:30
बाकीचे युरोपियन्स लावतात की वाट. आपल्यापेक्षा जास्त. इतालियन किंवा स्पॅनिश लोकाम्शी इन्ग्लिश बोलताना खूप धमाल येते.

In reply to by बॅटमॅन

आपल्या भाषांची वाट लावणार्‍या त्या इंग्रजीची आपणही शक्य तितकी वाट लावलीच पाहिजे
हरकत नाही , पण सध्या आपण नेमकी कशाची वाट लावत आहोत ? इंग्रजीची की मराठीचीच ? कारण इंग्रजीत लिहताना आपण 1) She is my wife 2) There was a huge queue at Cinema 3) The movie was damn good असं बरोबरच लिहतो.

In reply to by बॅटमॅन

इंग्रजी ही मुळातच अशुद्ध भाषा आहे. त्यात खुप्श खुपशे फ्रेंच, दॉईच आणि इतर बरेच शब्द आहेत. आपण एक एका अर्थाने ती भाषा अजुन समृद्धच करत आहोत. लै लिहिण्यासारखे आहे ह्या विषयावर.

In reply to by केदार-मिसळपाव

बॅटमॅन 30/07/2014 - 14:19
अर्थातच सहमत आहे. मला इंग्रजीच्या तथाकथित शुद्धतेबद्दल आग्रही अन मातृभाषेबद्दल अनाग्रही लोक पाहिले की मजा वाटते त्यामुळे मजेने म्हटलो इतकेच.

In reply to by बॅटमॅन

इंग्रज नविन शब्दांबद्दल किंवा एक/अनेक जुने शब्द वापरून बनवलेल्या शब्दांकडे "भाषा बिघडवली" या दृष्टीने बघतात असे वाटत नाही... ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी मोठ्या अभिमानाने दर वर्षी "न्यू वर्ड लिस्ट वर्ष>" जाहीर करते / छापते... ही आहे २०१२ ची नविन शब्दसूची अती सोवळेपणा न करता चपखल अर्थांचे नविन शब्द आत्मसात करणे हे इंग्लिश भाषा संपन्न बनण्याचे एक महत्वाचे कारण आहे असे वाटते. मुख्य म्हणजे असे करताना जगातल्या कोणत्याही भाषेतली आवक त्यांना निषिद्ध नाही असे दिसते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

रेवती 30/07/2014 - 19:02
अती सोवळेपणा न करता चपखल अर्थांचे नविन शब्द आत्मसात करणे हे इंग्लिश भाषा संपन्न बनण्याचे एक महत्वाचे कारण आहे असे वाटते. सहमत. पूर्वीही अशाच विषयाच्या धाग्यावर शांताबाई शेळके यांनी सांगितलेले विचार टंकले होते. जी भाषा काळाप्रमाणे बदलत जाते तीच टिकते अशा अर्थाने त्या म्हणाल्या होत्या.

In reply to by रेवती

भाषाशुद्धी हाच दूधखुळा प्रकार आहे, एखाद्या नदीला जसे ओढे ओहोळ येऊन येऊन त्या नदीला समृद्ध करतात ,जर ओढे बंद केले तर नदीचे प्रवाहीपण बंद पडेल व डबके होऊन ती वास मारायला लागेल.तसेच भाषेचे आहे ,उदा- संस्कृत व पाली भाषा या असल्या खुळचटगिरीमुळे मरणासन्न झाल्या.

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन 30/07/2014 - 19:33
आयला, म्हणजे गेल्या अडीच हजार वर्षांपासून संस्कृत मरणासन्न आहे होय? नवीनच शोध लागला, धन्यवाद बरं का नेफळेसाहेब.

In reply to by बॅटमॅन

मागच्या अडीचहजार वर्षात कोणत्या कालखंडात लोक संस्कृतातून सर्रास बोलत होते, केव्हा ती बोलीभाषा होती ? एखाद्या भाषेचे डॉक्युमेंटेशन आहे म्हणजे ती प्रचलीत भाषा आहे असा गैरसमज झाला आहे काय? (माझा हा प्रतिसाद संस्कृतातून खरडून दावल्यास संस्कृतात अजूनही धुगधुगी आहे हे मान्य करु)

In reply to by नानासाहेब नेफळे

पिशी अबोली 01/08/2014 - 19:09
गत द्विसहस्रवर्षेषु कस्मिन् काले जना: सर्वथा संस्कृतेन वार्तां कुर्वन्ति स्म, अपि च कदा सा लोकभाषा आसीत्? कस्याश्चित् भाषाया: केवलम् आलेखनं उपलब्धम्, अतः सा प्रचलिता भाषा, इत्येषा मिथ्यामति: किम्? (ममेतद् प्रत्युत्तरं संस्कृतेन लिख्यते चेत् 'संस्कृतम् अद्यापि ऊर्जयते' इति अंगीकुर्मः|)

In reply to by पिशी अबोली

पिशी आनी बॅटमॅन असताना (माइंड इट - बॅट्मॅन - काव्य वगैरे करतो तो संस्कृत मध्ये...) त्यांना असले भुक्कड चॅलेंजेस देणे म्हणजे... जौ दे... अजुन बॅटमॅनाचे एखादे काव्य कसे आले नाही इथे..???

In reply to by नानासाहेब नेफळे

पिशी अबोली 01/08/2014 - 19:31
ऑ?? तुम्ही बॅटमॅनला सांगताय क्रॉसचेक करायला म्हणजे त्याला संस्कृत नक्की चांगलं येतं हे तुम्हीच मान्य करताय की.. म्हणजे संस्कृत उत्तम जाणणारी एक व्यक्ती इथे नक्कीच आहे हे तुम्हाला मान्यच आहे. आता माझा अनुवाद अगदी शून्य मार्क मिळवण्याजोगा असला, तरीही ते क्रॉसचेक करु शकणारा बॅटमॅन उत्तम संस्कृत जाणणारा आहे हे तुम्हाला मान्य असल्यामुळे संस्कृतमधे धुगधुगी आहे हेही तुम्हाला मान्य करावंच लागेल, हो ना नेफळेसाहेब?

In reply to by पिशी अबोली

ब्याटम्यानभाऊ फारच विश्लेषण करतात भाषेचं, लँग्वेज सिम्यानटीक्स ,फोनेटीक्स ,मॉर्फोलॉजी वगैरे वगैरे! खरे तर त्यांनाच आव्हान केले होते पण त्यांनी सोईस्कर पळ का काढला ते समजले नाही, आता क्रॉस चेक करुन खरे खोटं सांगा, बघू जमते का त्यांना!!

In reply to by नानासाहेब नेफळे

यसवायजी 01/08/2014 - 20:47
सोईस्कर पळ का काढला ते समजले नाही
हा हा हा :D ब्याट्या, पळ का काढला का च्यालेंज फाट्यावर मारलं बे ??

In reply to by नानासाहेब नेफळे

नाव आडनाव 01/08/2014 - 21:05
नेफळे, तुम्ही बॅटमॅन साहेबांना परत आव्हान द्या आणि यावेळी तुम्ही हरले तर काय करणार हे पण लिहा - जसं हरलो तर नेफळे पुन्हा मिसळपाव वर दिसणार नाही :) आणि अजून एक, फक्त "नानासाहेब" नाही सगळेच "साहेब". इथे बाकीचे पण काही "साहेब" आहेत आणि ते सगळे नेफळेच आहेत हि आतली खबर माहित आहे सगळ्यांना.

In reply to by नाव आडनाव

ब्याटोबाला आव्हान दिले तेव्हा ते बर्याच वेळ ऑनलाईन होते,दुसर्या दिवशीही याच धाग्यावर होते, परंतु फिरकले नाहीत ,बहुधा बराच खटाटोप करुनही जमले नसावे ,मग अबोलीताईंना धाडले असावे. असो ,चार भुक्कड ओळीच्या संस्कृत भाषांतराला मिपासारख्या अग्रेसर संस्थळावर तीन दिवस लागतात यावरुन आम्ही काय समजायचे ते समजलो. (तरीही उपरोक्त भाषांतर ग्राह्य मानतो व संस्कृतात धुगधुगी आहे हे मान्य करतो )

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 02/08/2014 - 11:17
बॅट्ञा आंजावर असताना सतत काकदृष्टीने तुमचे प्रतिसाद शोधत असतो आणि त्यामुळे तुम्ही प्रतिसाद टाकल्यावर त्याने लगेच उत्तर द्यावे असा गैरसमज झाला की काय तुमचा? चार भुक्कड ओळीच्या संस्कृत भाषांतराला तुम्ही भुक्कड लिहिले होते हे तुम्ही मान्य केले हे एक बरे झाले.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दिव्य लॉजीक ऐकायची तयारी ठेवा म्हणजे मी लॉजीकने बोलतो हे तरी तुम्हास मान्य आहे, हे ही नसे थोडके.

In reply to by नानासाहेब नेफळे

वा, वा ! तुमचे मराठीपण कच्चे असल्याचा पुरावा किती सहजपणे दिलात ! *lol* *lol* *lol* असेच तुमच्या "दिव्य" प्रतिभेचे दर्शन देत आमचे मणोरंजण क्रत र्‍हा *dance4* *biggrin*

In reply to by पिशी अबोली

बॅटमॅन 03/08/2014 - 00:35
साधु साधु पिशीमहोदये, गद्योत्तरं खलु सम्यक् एव वर्तते!! अनवान्तरम् - किन्तु विषयेऽस्मिन् जनै: यत्किञ्चिदपि लिखितं तत्तु महिषपृष्ठे प्रावृडिव व्यर्थमिति मन्ये |

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन 03/08/2014 - 01:01
पाणिनिकाले तु जना: संस्कृते वदन्ति स्म, गालिप्रदानमपि कुर्वन्ति स्म | अर्थात् पाणिनिकाळात कैक ठिकाणी त्याने व्याकरण रचलेली संस्कृत भाषा प्रचलित होती हे अष्टाध्यायी न वाचता त्या ग्रंथाबद्दलचे इतरांचे जुजबी विकीस्टाईल लेख वाचूनही समजते. ते एक असोच. अन पिशी अबोली यांचे भाषांतर अगदी अचूक अन नेमके आहे. अन बाकी प्रतिसाद खालीलप्रमाणे. पिशीमहोदया तु बहु सम्यक् उत्तरं दत्तवती, किन्तु नेफलेमहोदयस्तु ( पाणिनिप्रणीते संस्कृते 'ळ' कारो नास्ति चेत् ल-कारो एव प्रयुक्तोऽत्र |) केवलं संस्कृतद्वेषात् एव विगतबुद्धि: हतविवेकः इव प्रजल्पते | तस्मादेषः पद्योपहारः स्वीकरोतु भवान् | संस्कृतं नाम वै किञ्चित् नास्ति, नासीत् कदाप्यहो | नैषा नैसर्गिकी भाषा, यन्त्रवद् रचिता खलु ||१|| अधुना त्वेति जल्पन्ति येऽपि सर्वे मुहुर्मुहु: | संस्कृतं ते न जानन्ति, न चापि प्राकृतादयः ||२|| यस्य कस्यापि जल्पोऽयं, येन केनापि मण्डितः| यस्मै कस्मै कथित्वा तु, यद्वा तद्वा भवेत् खलु ||३|| एते सर्वे जनाश्चात्र वर्तन्ते ज्ञानिनो इव | परं मनसि तेषां वै, सदैवात्र स्थितं खलु ||४|| " व्याकरणं न जानामि , नैव जानाम्यहं ध्वनीन् | छन्दःशास्त्रं न जानामि, तथापि शृणुयु: जना: ||५|| ज्ञानहीनं द्वेषपूर्णं जल्पाम्यहमहो सदा | मिथ्या वक्तुं सदा ह्यत्र तत्परोऽस्मि शुको इव ||६||" कठोरोऽयं वाक्प्रहारो जनान् हि खलु बाधति | इत्युक्ते "वाक्प्रहारो न, यथा बाधति बाधते" ||७|| एते संस्कृतद्वेष्टारः दयनीया: हि सर्वथा | व्यासोक्तिस्तु दशां तेषां सम्यक्दर्शयते अहो!! (ऊर्ध्वबाहुर्विरोम्येष न कश्चिच्छृणोति माम् ;) ) ||८||

In reply to by नानासाहेब नेफळे

सुबोध खरे 30/07/2014 - 19:45
संस्कृत व पाली भाषा या असल्या खुळचटगिरीमुळे मरणासन्न झाल्या. मग ल्याटिन कशामुळे मरण पावली?

In reply to by नानासाहेब नेफळे

संस्कृत मरणासन्न झाली याच्याशी असहमत. संस्कृत ही लॅब मधल्या प्रमाणित उपकरणे/मानकांप्रमाणे आहे. लॅब मधली प्रमाणित उपकरणे रोज वापरली जात नाहीत पण त्यांच्या मदतीने रोजच्या वापरातील उपकरणे तपासली /सुधारली जातात. संस्कृतच्या संदर्भाने मराठीचे(व कदाचित हिंदी आणि इतर मराठी भाषादेखील) शुध्दीकरण /प्रमाणीकरण सोपे होत असावे असे मला वाटते. (अर्थात मी या विषयातला तज्ञ नाही. )

कविता१९७८ 25/07/2014 - 17:10
मी तर इथे लोकांना चुकीची मराठी इंग्रजी वाक्ये बोलताना पाहते; शेजारणीला विचारलं मुलगी काय करते तर म्हणे ती स्लीप झाली. मी विचारलं कशी, लागलं नाही ना तर म्हणे स्लीप झाली म्हणजे झोपली, ह्या बाई एका झोपडपटटीत इंग्रजी शाळेत शिकवतात , त्या बिचार्‍या मुलांची दया आली हे ऐकुन.

सूड 25/07/2014 - 17:11
>>सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी. न पेक्षा एजमान म्हणावें, कसें? बाकी आम्हीही फॉर अ चेंज लायनी, मेंबरं असं म्हणत असतो.

बॅटमॅन 25/07/2014 - 17:18
शुद्ध मराठी बोला म्हटलं तर लोक अंगावर येतात, तेच शुद्ध इंग्लिश बोला म्हटलं तर कशी हांजी हांजी करतात ते पाहणं रोचक आहे. बरं हे फक्त रोजीरोटीमुळंच होतं असंही नाही. इंग्लिश=हुच्चभ्रू हे समीकरण तूर्तास असल्याने लोक हुच्चभ्रू दिसण्यासाठी कायपण म्हणून इंग्रजी बोलायचा प्रयत्न करतात. याच लोकांना मराठीच्या मुद्यावर हाड थू करताना पाहून बाकी चिकार करमणूक होते मात्र.

In reply to by बॅटमॅन

धमाल मुलगा 25/07/2014 - 18:53
>>शुद्ध मराठी बोला म्हटलं तर लोक अंगावर येतात लै वाईट अनुभव येतात राव. आणि अनास्था पाहून तर आणखी वाईट वाटतं. अवांतरः ह्यावरुन आठवलं, पुर्वी एकदा बाबासाहेब पुरंदर्‍यांसोबत फोटू काढला होता तो हापिसातल्या मित्रांना दाखवत होतो, त्यातलीच एक अतिशहाणी बया चित्कारली.."आयल्ला! एम.एफ.हुसेन? कुठे भेटले होते?" मी जागेवर फ्लॅट! कोण, काय वगैरे सविस्तर इस्काटून सांगितल्यावर म्हणे, "आमच्याकडं मराठीचं फार काही नसतं. त्यामुळं मला ठाऊक नाही बॉ!" हेच इंग्रजीबाबत नेमकं उलटं. थोडक्यात केवळ बोलणंच नव्हे, एकुणातच इंग्रजी=हुच्चभ्रू हे समीकरण भयंकर रुजलेलं आहे. धाग्यासंदर्भात: माझी कवटी सरकवणारा असाच एक प्रकार म्हणजे - "अमुक अमुक एक्सपायर झाला." का? वारला/ देवाघरी गेला/मेला/मृत झाला/ निवर्तला/चचला/खपला/खेळ आटोपला असे सभ्य ते टवाळ सगळ्या मापात बसणारे इतके प्रतिशब्द आहेत मराठीत, ते वापरले तर हा वापरणारा काय खपतो का?

In reply to by धमाल मुलगा

बॅटमॅन 25/07/2014 - 19:00
बाबासाहेब पुरंदर्‍यांना एमेफ हुसेन समजणारी बया मराठी असेल तर तिला असांसदीय भाषेत सुनावायची आणि शेलक्या शब्दांत आहेर द्यायची इच्छा अनावर होतेय हे वाचून!!!!!!!!!!!!!!!!!!!! बाकी एक्सपायरशी सहमत. जाणीवपूर्वक मराठीत काही बोललो तर अंगावर पाल पडल्यागत, काहीतरी अन्यदेशीय किंवा अन्यग्रहीय ऐकल्यागत चेहरा करतात ***चे. यांच्या ***ला *** करून *** *** ***********************!!!!!!!! बरं हे प्रमाणभाषेबद्दलच असं, बोलीभाषा तर याहूनच जास्ती पाण्यात पाहिल्या जातात. आता मी मिरजेचा आहे, थोडा तिकडचा अ‍ॅक्सेंट येणारच की बोलण्यालिहिण्यात. तीच गोष्ट इतरांचीही त्यांच्या त्यांच्या बोलीभाषेबद्दल. पण बोलीभाषा म्हणजे काय एखादा आफ्रिकेतील जिराफ पहावा तसे पाहिल्यागत करतात-जणू आयुष्यात पैल्यांदा ऐकल्यागत. खरेच ऐकली नसेल तर ठीके ओ, पण असं काय नसतं. बोलीभाषा=गावंढळ आणि तो ट्याग त्यागायची अहमहमिका लागलेले हे रूटलेस***चे लोक, यांच्या ****************!!!!

In reply to by बॅटमॅन

धमाल मुलगा 25/07/2014 - 19:52
बाई भागवत हे आडनाव धारण करीत असत.
बरं हे प्रमाणभाषेबद्दलच असं, बोलीभाषा तर याहूनच जास्ती पाण्यात पाहिल्या जातात. आता मी मिरजेचा आहे, थोडा तिकडचा अ‍ॅक्सेंट येणारच की बोलण्यालिहिण्यात.
अगदी अगदी! दूर कशाला? मिपावरच 'दिल्या जाईल', 'केल्या जाईल' वगैरे वैदर्भीय बोलीबद्दल कितीतरी तोंडसुख घेतलं गेलंच की. >>बोलीभाषा=गावंढळ आणि तो ट्याग त्यागायची अहमहमिका लागलेले हे रूटलेस***चे लोक क्या बात! क्या बात! तोडलंस भावा. जन्तेला चढत्या भाजणीत लाज वाटते; आपल्या गावाची, आपल्या प्रदेशातल्या बोलीची, मग महाराष्ट्राच्या मराठीची, मग भारताची.... मज्जाय सगळी. :)

In reply to by बॅटमॅन

नगरीनिरंजन 30/04/2015 - 03:01
इंग्रजीच्या ॲक्सेंट्सचं मात्र फार कौतुक. दोन-चार वर्षं ऑस्ट्रेलियात काढली की माइट (मेट), डाय (डे) असं बोलायला लागतात लगेच. अशा लोकांच्या बौद्धिक पांगळेपणाचं मला आश्चर्य वाटतं.

In reply to by लंबूटांग

धमाल मुलगा 25/07/2014 - 19:48
=)) =)) लंब्या... हालकटैस. ह्या छिद्रान्वेषीपणाचे आभार मानतो आणि फ्लॅट हा उधारीचा शब्द मागे घेऊन उताणा हा शब्द वाचावा अशी नम्र इनंती करतो.

In reply to by धमाल मुलगा

यशोधरा 25/07/2014 - 19:48
कठीण आहे. परवा ऑफिसमध्येही एक जण म्हणे "वैसे तो कुछ लॅंग्वेजेस ऑड होती हैं, पर ये मराठी तो एकदम ही ऑड हैं, मुझे बोलना भी अच्छा नहीं लगता, यू नो!" आता हे ऐकल्यावर तिला शांतपणे विचारलं की तुला मराठी येते का बायो, कामचलाऊ तरी? समजते का? थोडीतरी? तर अर्थातच नाही असं उत्तर आलं. मग तिला सांगितलं की आधी भाषा शिक, मग त्यात प्रावीण्य मिळव आणि मग भाषेला ऑड वगैरे नावं ठेव. भाषाच येत नाही तर भाषा "ऑड" आहे हे क्सं काय ठरवलंस? त्यानंतर काही काळ भयाण शांतता पसरली!

In reply to by यशोधरा

नाव आडनाव 26/07/2014 - 10:16
एकदा माझा म्यानेजर, जो कानपूर चा आहे, म्हणाला "मेरी बेटी भी मराठी बोल लेती है लेकिन मै नही सिखता हुं मराठी ". मला माहित होतं तरिही मी त्याला विचारलं - "आपकी बेटीकी उम्र क्या है." तो म्हणाला "६ महिने" तेंव्हा माझ्या मोठ्या मुलीचं वय होतं १० महिने आणि तिची मातृभाषा मराठी असूनही तिला ती बोलता येत नव्हती. खरंतर १ वर्ष पर्यंत बर्याच मुलांना कोणतीच भाषा येत नही. मग जर साहेबांच्या घरी मराठी बोलली जातंच नसेल तर साहेब कन्येला मराठी येते कशी आणि तेही ६ महिन्यनची असताना? असा प्रश्न विचारल्यानंतर साहेब दुसरा विषय घेऊन बोलू लागले. हीच फेकायची सवय बर्याच लोकांना असते, माझ्या म्यानेजर सारखी - आणि त्यांना तिथेच प्रश्न विचारून उताण पाडता येतं आणि मला तर असं करायला लई मज्जा वाटते :)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मी तर पुण्यात 'येथे पँटची चेन लावून मिळेल' असा फलक पाहिला आहे. तेंव्हा सकाळ सकाळ कचेरीत निघालेले अनेक पुरुष तिथे, पँटची चेन लावून घ्यायला, रांगेत उभे असतील असे विनोदी चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. कदाचित त्या शिंप्याला 'पँटला चेन लावून मिळेल' असे म्हणायचे असेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रमाणाचा अट्टाहास धरला कि असेच होणार... बायदवे, तेलाची बाटली, आंब्याची टोपली , पाण्याचे भांडे, तुपाची वाटी यावरही आपले ज्ञानकिरण पाडावेत...

असंका 25/07/2014 - 17:43
आपण पाव हा मराठीत लिहून ब्रेड इंग्रजीत bread लिहिला आहेत. पाव हा शब्द मराठी आहे असे सुचवायचे आहे का? तुम्हाला एक कोडे घालू का?- ब्रेडला पोर्तुगीज भाषेत काय म्हणतात?

In reply to by असंका

पाव हा शब्द मराठी आहे असे सुचवायचे आहे का?
हो. म्हणजे मी तरी तसेच समजतो ? चुकलाय का शब्द ? बाकी पोर्तुगीज शब्द माहित नाही. खालील लिंक प्रमाणे "पांव" असा मराठी शब्द आहे. http://www.khapre.org/portal/url/dictionary/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5/word

In reply to by मराठी कथालेखक

बॅटमॅन 25/07/2014 - 18:12
पाव/पांव या शब्दाचा पूर्वज पोर्तुगीज़ मधला पाव हा शब्द आहे. पोर्तुगीज भाषेतून आलेले पण बहुतेकांच्या तसे गावीही नसलेले अजून काही शब्द खालीलप्रमाणे: पगार, चावी, मेज, कमरा, बटाटा, इ.इ.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 25/07/2014 - 18:24
अरबी भाषा बोलणारे अल्जिरियावाले लोक १३२ वर्षांच्या फ्रेंच राजवटीनंतरही वरील पोर्तुगिज शब्द वापरतात तर...! मला हे फ्रेंच अथवा अरेबिक शब्द असावेत असं वाटत होतं. दुकान, कानून, कायदा, ज्यादा, पेटी हे अरेबिक असावेत असा अंदाज आहे.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 25/07/2014 - 18:34
हे शब्द पोर्तुगीज भाषेत आहेत एवढं नक्की- यद्यपि पोर्तुगीजनं उसनवारी केलेली असण्याची शक्यता दुर्लक्षून चालणार नाही, तूर्तास ते माहिती नाही त्यामुळे पोर्तुगीज असे म्हणतो.
दुकान, कानून, कायदा, ज्यादा, पेटी हे अरेबिक असावेत असा अंदाज आहे.
सहमत, फक्त (हाही बादवे अरेबिकच शब्द आहे), अरबी की फारसी हे ठाऊक नाही, जाणकारांना (उदा. बिका, प्रपे, इ.) विचारलं पाहिजे. त्या दोन भाषांची आपसांत देवाणघेवाण बरीच झालेली असल्याने थोडे ट्रेनिंग मिळाल्याखेरीज एखादा शब्द मूळचा अरबी, फारसी की तुर्की हे कळणार नाही. इंड्यन माणसाला 'तिकडनं' आलेला शब्द इतकं पक्कं ठौक असतं, पण त्यापलीकडे नै. आणि असणार तरी कसं म्हणा.

In reply to by बॅटमॅन

यावरुन आठवले,सावरकरांना मराठी भाषेवरचा फारसी प्रभाव नष्ट करायचा होता ,कारण अर्थात फारसी मुस्लिमांची भाषा होती व सावरकर हिंदुत्ववादी होते. त्यांच्याभाषेत 'भाषाशुद्धी'साठी त्यांनी मराठीचे' संस्कृतकरण 'करण्याचा घाट घातला होता. खास संस्कृत शब्द मराठीत दिले त्यांनी. उदा- तारिख- दिनांक तहसीलदार- प्रांताधिकारी मैदान- क्रिडांगण पगार- वेतन,ईत्यादी. भाषेलाही धार्मिक अस्मिता चिकटतात ....

In reply to by नानासाहेब नेफळे

भाषेलाही धार्मिक अस्मिता चिकटतात
असं कसं असं कसं ? तसं असतं तर नानासाहेब ह्या शब्दाला नानासाहेब पेशवे जे की तुमच्यालेखी जातीयवादी किंव्वा नानासाहेब फडणवीस जे की तुमच्या लेखी लंपट ह्यांच्या अस्मिता चिकटल्या नसत्या काय ? तरीही तुम्ही नानासाहेब हा आयडी घेता ह्यावरुन अस्मिता चिकटणे वगैरे घडत नसावे असे वाटते *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

नानासाहेबच्या उल्लेखावरुन आठवले ,'साहेब' या फारसी शब्दाला 'महोदय, असा कुणीही सध्या वापरत नसलेला शब्द सावरकरांनी शोधला होता,... आणि पेशवा हा ही फारसी शब्दच आहे ,त्याला काय म्हणायचे मग.... पुण्यस्वराज्य?????

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन 25/07/2014 - 19:02
भाषेलाही धार्मिक अस्मिता चिकटतात ....
या बाबतीत सावरकर एकटेच अद्वितीय इ. नाहीत. सगळ्या जगभर असेच झालेले आहे. मराठीवरचा फारसी प्रभाव कमी करायला म्हणून तर शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारकोश बनवायला सांगितला ढुंढिराज व्यासांना. त्यातही पोलिटिकल-रिलिजियस अजेंडा होताच. पण बाकी काही असो, सावरकरांचे प्रतिशब्द अतिशय चपखल आहेत. विनासायास रुळले- मराठीतच नव्हे, तर हिंदीतही.

In reply to by बॅटमॅन

कुठे रुळलेत!!!! आज तारिख कीती? असेच लोक विचारतात, आज कोणता दिनांक आहे? असे कुणीही विचारत नाही!!! एखादा मोठा माणुस भेटल्यास ,नमस्कार साहेब' असे म्हणणारे कितीजण आहेत आणि नमस्कार महोदय, म्हणाणारे किती ???? पोस्टाला' डाक, असा शब्द सावरकरांनी शोधला, कितीजण डाक कार्यालयात जाउन येतात? आणि डाक कार्यालयातल्या अधिकार्याला काय म्हणायचे ,डाकाधिकारी????

In reply to by बॅटमॅन

शिवाजींचा प्रयत्न जरी फारसीचा प्रभाव नष्ट करण्याचा असला तरीही संस्कृतकरण करण्याचा त्यांचा कोणताच अजेंडा नव्हता,याउलट संस्कृतकरणामागचे कारण उघड धार्मिक आहे आणि ते संस्कृतकरण बहुजनांच्या अंगवळणी पडत नाही....

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन 25/07/2014 - 19:29
आयला हे बरंय. एकच गोष्ट केली, ती शिवाजीमहाराजांनी केली तर अजेंडा नाही अन सावरकरांनी केली तर मात्र अजेंडा? मज्जाच आहे की.

In reply to by बॅटमॅन

हो ते तसंच आहे ! ह्याचं अजुन एक उदाहरण म्हणजे , आजारी पडल्याचं नाटक करुन , औरंगजेबाला मिनत्या विनंत्याकरुन महाराज आग्रातुन सुटतात तो मुत्सद्दीपणा आणी सावरकर माफीनामा देवुन अंदमानच्या सेल्युलर जेल मधुन सुटतात तो पळपुटेपणा !!

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 25/07/2014 - 19:48
आणि सावरकरांचा 'सा' उच्चारायची लायकी नसलेले नेभळट जालकेसरी जेव्हा माफीवीर इ.इ. मुक्ताफळे उधळू पाहतात तेव्हा तर चिक्क्कार मणोरञ्जण होते राव.

In reply to by प्रसाद गोडबोले

हो ते तसंच आहे! आग्रातुन बुद्धीचातुर्याने निसटणे आणि नंतर स्वराज्याची रितसर निर्मिती करुन छत्रपती होणे व शेवटापर्यंत लढत राहणे.. याउलट.. प्रचंड 'मुत्सद्दीपणा' दाखवुन १९२१ नंतर घरी बसणे... हो ते तसेच आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

१९२१ नंतर घरी बसणे
ह्यावरुन आपल्या अभ्यासाची पातळी कळाली ... आत्ता लक्षात येते की महाराष्ट्र शासनाने आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय का घेतला असावा ते )

In reply to by बॅटमॅन

राजव्यवहारकोष म्हणजे राजकारभारातले त्यांचे ठराविक मायन्यातील शब्द लिहुन घेतले, त्यातही संस्कृतकरण केल्याचे दिसत नाही. याउलट थेट सामन्यांच्या तोंडी असलेल्या भाषेत संस्कृत घुसडण्याचा प्रयत्न वेगळ्या वाटेने जाणारा होता, सामान्यांचे ज्या भाषेशी वावडे आहे तिचा पगडा बसवणे व राज्यव्हवहारकोष तयार करणे यातला फरक समजून घ्या! स्वतः शिवाजींची पत्रे बरीच फारसीप्रभावाखाली आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन 25/07/2014 - 19:54
नेफळेबुवा, राज्यव्यवहारकोष कधी वाचलात काय? की उचलली जीभ लावली टाळ्याला असंच करायचंय? माझ्याकडे आहे आणि वाचलाय म्हणून सांगतो. लेखनपद्धती पूर्णपणे संस्कृत धाटणीची करावी असा स्पष्ट उद्देश दिसतो- नव्हे, ग्रंथकारही तेच म्हणतो. घरी गेलो की ते श्लोक टंकतो. अन महाराजांची पत्रे फारसीत आहेत ती राज्याभिषेकाअगोदरची, नंतरची सगळी पत्रे संस्कृत शब्दवालीच आहेत. बाकी सामान्यांच्या तोंडी संस्कृत घुसडू पाहत होते असं जरी मानलं तरी सामान्यांना अक्कल नको काय? की त्यामुळेच ते सामान्य ठरतात- कुणीही या आणि काहीही शिकवा, जसे शिकवेल तसे ओरडू?

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे राव तुम्ही अगदी मॅकोले चे आदर्ष सुपुत्र दिसता ! कारकुनी सिस्टीम मधुन तयार केलेले अन स्वकीयांपेक्षा परकीयांचाच अभिमान बाळगणारे !! बाकी सामान्यांचे एकेकाळी इंग्रजीशीही वावडे होते आणि बाबासाहेब म्हणाले की इंग्रजी हे वाघीणीचे दुध आहे ...पण बाबासाहेबांबद्दल
सामान्यांचे ज्या भाषेशी वावडे आहे तिचा पगडा बसवणे
असे काही तुम्ही बोलु धजावणार नाही !

In reply to by प्रसाद गोडबोले

बाबासाहेबांनी इंग्रजीचा प्रभाव बसवण्याचा प्रयत्न केला असल्यास तो स्त्युत्यच मानावा लागेल, इंग्रजी ही ख्रिस्तांची भाषा ,'अब्रह्म' वगैरे खुळचटगिरी त्यापाठी निश्चितच नव्हती... वैश्विक भाषेतुन भारतीयांना ज्ञानाची कवाडे खुली व्हावीत हाच उदात्त उद्देश त्यामागे होता.... याऊलट चार पाच पोथ्या व स्त्रोत्रांच्या चवलिपावलीत येणार्या पुस्तकातली अगम्य व मरणासन्न संस्कृत भाषा स्वतःच्या धार्मिक मुलतत्ववादासाठी इतरांवर थोपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे यातला फरक लक्षात घ्या ,लक्षात कसा येईल? ,चष्मा काढा आधी.

In reply to by नानासाहेब नेफळे

धमाल मुलगा 25/07/2014 - 20:15
पोथ्या, स्तोत्रं, धार्मिक मूलतत्ववाद आणि सावरकर हे एकत्र बांधलेलं पाहून हसावं की रडावं तेच कळेना! शंका: सदरहू सदस्य ब्रिगेडच्या ब्रेनवॉशिंग सेशन्सला न चुकता हजेरी लावत असावेत की काय अशी शंका आल्यावाचून राहिली नाही.

In reply to by धमाल मुलगा

बॅटमॅन 25/07/2014 - 20:17
या शंकेत ब्रेनचे अस्तित्व गृहीत धरल्या गेले आहे असे वाटते. तस्मात गृहीतक तपासून पहावे अशी इणंती ;)

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय 30/07/2014 - 13:55
भें** बा***. साल्या तु १०० नंबरी पुणेकर आहेस (नसलास तरीही). किमान शब्दात कमाल अपमान करण्याची लय भारी कुवत आहे तुझ्यात.

In reply to by धमाल मुलगा

यशोधरा 25/07/2014 - 20:21
सावरकरांचं नाव घेतलं की कसं जबरदस्त वाटत आसंल राव, मी सावरकरांच्या चुका काढतो/ ते वगैरे. तुमास्नी इतकं कळंना! छ्या! ;)

In reply to by नानासाहेब नेफळे

हुप्प्या 01/08/2014 - 10:11
जबरदस्त हा फारसी नव्हे. जबर हा जब्बार ह्या अरबी शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ सर्वशक्तीमान असा आहे. दस्त म्हणजे हात. तो मात्र फारसी आहे. पण तो संस्कृत हस्तचा भाऊ आहे. जबरदस्त हा सरमिसळ केलेला शब्द आहे.

In reply to by हुप्प्या

इतके सिरियस स्पष्टीकरण श्रीमती नानासाहेबांच्या डोक्यावरून गेले असणार ;) त्यांना विचार न करता काहीपण शेरे मारायची सवय आहे ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाळ सप्रे 01/08/2014 - 11:26
शेरे मारायची सवय आहे खरी त्यांना.. पण गेल्या काही दिवसात काही प्रतिसाद नोंद घेण्यालायक आहेत. आणि तसंपण शेरे मारण्याची सवय बर्‍याच मिपाकरांना आहे.. सो डोन्ट राइट हिम ऑफ!!

In reply to by बाळ सप्रे

खूपदा बेजबाबदार शेरे मारले ही विश्वासार्हता आपोआप कमी होते आणि आयडी वाचकांच्या मनातून आपोआप राईट ऑफ होते !

In reply to by नानासाहेब नेफळे

हा एक नवाच पैलु आमच्या अल्पमतीला आज कळाला... आजवर सावरकर ते पु.लंचा तिरस्कार केवळ जातीमुळे करताना पुष्कळ लोकांना पाहिल्यामुळे त्याबद्दल काही विशेष वाटले नाही.. ज्ञानेश्वरपण सुटले नाहीत ह्यांच्या तडाख्यातुन... (बोलणार्‍याची लायकी सुद्धा विचारात घ्यावी लागते म्हणा..).. शिवाय शिवाजी महाराज ह्यांच्यावरही मक्तेदारी दाखवायचा सोस लोकांना सुटत नाही.. (पुन्हा एकदा.. कीव येते.. असो..) पण आता हा माज इतका वाढलाय की संस्कृतपेक्षा परकीय भाषा जवळच्या वाटु लागल्या.. नुसतं तेवढंच नाही तर स्वभाषांशी "वावडं"च होऊ लागलं..?? मोठ्या संख्येने समाज असा निर्बुद्ध विचार करु लागला तर भारतीय भाषा मृतवत होणार नाहीत तर काय? बाबासाहेबांचा दाखला देणार्‍या लोकांना बाबासाहेब काडीभर तरी कळले असतील का हा प्रश्नच आहे.. शाळेत असताना एक धडा होता.. "महापुरुषांचा पराभव".. राहुन राहुन त्या धड्याची आज फार आठवण आली.. बॅट्या आणि प्रगो.. तुमच्या सगळ्या पोस्टसाठी +१११११

In reply to by पिलीयन रायडर

नाव आडनाव 28/07/2014 - 15:20
"महापुरुषांचा पराभव" हे एकदम बरोबर उदाहरण दिलंय. मला पण हेच लिहायचं होतं पण शनिवारी आणि रविवारी मिसळपाव बंद होतं. मला लहान असताना हा धडा जास्त कळला नव्हता पण मोठा होताना आजू बाजूला जे काही चाल्लय ते बघून बर्याच वेळेला या धड्याची आठवण आली आणि हळूहळू कळला / अजूनही कळतोय. कुणाला सावरकरांची बदनामी करायची आहे, तर कुणाला संभाजी महाराजांची. कुणाला आंबेडकरांवर चिखल उडवयचाय तर कुणाला गांधींवर. नेत्यांच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना पटतील असं नाही, पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्या घ्यायला काय हरकत आहे? तुम्ही आम्ही हे सगळं होत असताना तिथे नव्हतो आणि इतिहास लिहिताना बर्याचदा दोन बाजूनी वेगवेगळा लिहिला जातो. त्यातला जो चांगला आहे तेवढाच ठेवू, बाकीच्या गोष्टींची (ज्याने कुणाचीही बदनामी होत असेल) चर्चा जाहीर रित्या तरी टाळली पाहिजे.

In reply to by पिलीयन रायडर

चिगो 31/07/2014 - 17:30
बाबासाहेबांचा दाखला देणार्‍या लोकांना बाबासाहेब काडीभर तरी कळले असतील का हा प्रश्नच आहे..
क्या बात है, पिराताई.. १००% सहमत .. त्यातल्यात्यात आजकाल स्वतःला बाबासाहेबांचे किंवा आणखीही कुणाकुणा महापुरुषांचे समर्थक म्हणवणार्‍यांचा चेपुवर जो प्रचंड वैचारीक सावळागोंधळ आणि वायझेडपणा सुरु असतो ना, तो प्रचंड डोक्यात जातो..

In reply to by बॅटमॅन

दूकान, मैदान, ज्यादा, फत्ते (विजय), मालूम, हे शब्द अरेबिक भाषेत (मस्कतच्या) ऐकले आहेत. 'पेटी'ला संदूक म्हणतात. अरबी भाषेतही प्रदेशनिहाय बदल दिसून येतात. आपल्याकडे जसे मुंबई-पुण्याची मराठी, कोकणातील मराठी, नागपूरची मराठी वगैरे वगैरे कांही प्रमाणात वेगवेगळ्या असतात. तसेच, मस्कत, दुबई, सौदी, बाहरेन वगैरे देशांमध्ये अरेबीक थोडी थोडी बदलत जाते. तेही शब्द मुळ अरेबिक आहेत की बाहेरुन आयात केले आहेत सांगणे अभ्यासकाचेच काम असेल.

In reply to by प्यारे१

फ्रेंचमध्ये पावाला pain असा शब्द आहे, उच्चार पां किंवा पॉं, कोकणी उच्चाराशी बरंच जास्त साधर्म्य असणारा. अल्जिरीयन-फ्रेंच उच्चार मला माहित नाही. फ्रेंच, इतालियन, स्पॅनिश, पोर्तुगीज या भाषा लॅटिनोद्भव आहेत आणि बरेच शब्द सारखे आहेत. काही शब्दांची स्पेलिंग्ज कदाचित समानही असतील, पण उच्चार निरनिराळे असतात. अवांतर - नोबेलविजेता फ्रेंच कथालेखक आल्बेर कामू अल्जिरीयात जन्माला आला. --- मूळ धागालेखक - आमच्यात लोकांवर येताजाता लैन मारतात, १४ फेब्रुवारीला "लौ यू" म्हणतात. मूळ शब्द काय आहेत हे समजून त्यांचे विचित्र उच्चार, गंमतीखातर करणं निराळं असतं. आणि माहित नसताना भलते काहीतरी शब्द वापरणं निराळं. अस्मितांची गळवं टरारलेली असणं सगळ्यात जास्त विनोदी. पण तरीही जेव्हा भलते शब्द भलत्या अर्थाने बऱ्याच प्रमाणावर लोकांकडून वापरले जातात तेव्हा भाषा बदलते. वर अनुप ढेरेंनी झेरॉक्सचं उदाहरण दिलेलं आहेच. आता याच धाग्यात अशा अर्थाचा प्रतिसाद वाचला, स्लीप म्हणजे झोपणं नाही. उच्चार आणि स्पेलिंग पाहिलं तर sleep या शब्दाचा उच्चार-लेखन स्लीप आणि slip चा उच्चार-लेखन स्लिप असंच पाहिजे. pen, pane, pain या तीन इंग्लिश शब्दांचे उच्चारही निरनिराळे आहेत, पेन्, पेन आणि पेऽन. पण लक्षात कोण घेतं!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी म्हणतो नेहमी आपणच लक्ष का द्यायच? इथे आपली मराठी सांभाळायची/वाढवायची सोडुन इतर भाषांच्या शुद्धतेची काळजी आपणच का घ्यावी. त्यांनी योग चे योगा केले, आपणही योगा असेच म्हणतोय. तुम्ही त्यांना सांगा ना ते की ते योग आहे. त्यांना ही करु द्या ना चुकांची दुरुस्ती. महत्वाचा मुद्दा असा की आधी आपले घर व्यवस्थित आवुया लावुया आणि मग इतरत्र बघुया. इथे मला युरोपातले उदाहरण द्यावेसे वाटते. हे लोक स्पष्ट सांगतात की इंग्रजी परकीय भाषा आहे. ती आम्ही फक्त अत्यावश्यक वेळीच वापरु. मला त्यात काही चुकिचे वाटत नाही. बहुतेक भारतिय इंग्रजीबहुल देशात वास्तव्यास असल्याने त्यांना इतर भाषिय देशातला अनुभव नसतो. माझा अनुभव असा आहे की युरोपातले लोकही शक्यतो त्यांच्या भाषेतिल वाक्ये कामचलाउ इंग्रजीत रुपांतरित करतात आणि ती खपतातही. मी सुद्धा बरिच मराठी वाक्ये दॉईच भाषेत रुपांतरीत करतो. तुर्तास इतकेच.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्यारे१ 30/07/2014 - 18:52
आभार्स. फ्रेन्च फुटबॉल पटू झिनेदाईन झिदान जन्मानं अल्जिरियाचाच. (डूक्करमुसंडी वाला) 'पां' च आहे. 'लेऐ (lait) एत पां' :) बाकी फ्रेंच लोक्स नि फ्रेंच भाषेला टेम्पोत बसवायलाच हवंय. लिहीतात काय नि बोलतात काय. बोबडी वळते राव. आधी शिकलो असतो तर कदाचित जमलं असतं.

In reply to by प्यारे१

लिहीतात काय नि बोलतात काय. बोबडी वळते राव.
फ्रेंचचे उच्चाराचे नियम इंग्लिशपेक्षा निराळे आहेत. ते एकदा समजले की बरंच फ्रेंच सहज वाचता येतं ... अगदी अर्थ समजला नाही तरीही. (पण उच्चार समजला म्हणून फ्रेंच स्पेलिंग लिहीता येईल का हे मला माहित नाही; जे इंग्लिशबद्दल मला म्हणता येतं.) फ्रेंचमधल्या 'र'चा उच्चार किती मराठी लोकांना जमेल याबद्दल मला बरंच कुतूहल आहे. मला तरी तो जमत नाही. --- केदार-मिसळपाव -
इथे आपली मराठी सांभाळायची/वाढवायची सोडुन इतर भाषांच्या शुद्धतेची काळजी आपणच का घ्यावी. त्यांनी योग चे योगा केले, आपणही योगा असेच म्हणतोय.
माझ्या कागदोपत्री नावाची आणि टोपणनावांची उच्चार आणि लेखन दोन्हींमध्ये वाट लावणारे उच्चशिक्षित मराठी लोक मला लहानपणापासून माहित आहेत. लोकांचे उच्चार आणि शुद्धलेखन सुधारण्यात घालवण्याइतपत वेळ माझ्याकडे नाही याची जाणीव मला लहानपणापासूनच झाली. त्यामुळे परदेशी लोकांनासुद्धा मी त्यांना झेपेल तोच उच्चार सांगते. ज्यांना करायचंय त्यांनी करावं. फक्त दुसरा कोणी अमक्या पद्धतीने वागतो म्हणून मी ते करत नाही. किंवा दुसरा कोणी आवडीने मला नावडणारी गोष्ट खात असेल तर मी त्यांना अडवायलाही जात नाही. माझं मराठी (हिंदी, इंग्लिश, फ्रेंच) फार चांगलं आहे अशातला भाग नाही; निदान आहे त्यापेक्षा सुधारण्याचा प्रयत्न करते हे माझ्यापुरतं मला पुरेसं आहे.

In reply to by बॅटमॅन

'पगार' हा शब्द पोर्तुगिज आहे? माझ्या ऐकिव माहिती नुसार हा उर्दूतून आला आहे. पूर्वी श्रीमंतांच्या पदरी 'आश्रीत' असायचे त्यांना 'हातखर्चा'साठी जे पैसे दिले जायचे त्याला 'पगार' म्हणत.

In reply to by कविता१९७८

Xerox ला इंग्रजीत पण Xerox नाही म्हणत हो !! Photocopy म्हणतात. आपण मात्र Ricoh/Canon ई कोणत्याही मशिनवर Xerox काढत असतो. पुढे कधी काळी ती Xerox कंपनी बंद पडली तरी भारतात मात्र तिचे अस्तित्व कायमच टिकून राहील !!

In reply to by आदूबाळ

शशिकांत ओक 02/08/2014 - 15:46
भेटणे हे क्रियापद अनेक जण वापरताना तारतम्य बाळगत नाहीत. मला पेन किंवा असे वस्तु सुचक शब्द भेटत नाही. सापडते किंवा मिळते. जीवंत मानव एकमेकांशी भेटतो. निर्जीव वस्तूंसाठी हे क्रियापद वापरू नये असे वाटते.

In reply to by आदूबाळ

>>>>तर ती मिळाली, सापडली का भेटली? म्हैस बेवारशी असेल आणि तुम्ही तिला पाळण्यासाठी आपल्या घरी नेलीत तर ती 'रस्त्यात मिळाली'. जर आधीपासून तुमचीच असेल आणि हरवली असेल तर जेंव्हा ती दिसली तेंव्हा ती 'सापडली' म्हणता येईल. 'भेटली' म्हणण्यासाठी तुम्ही आधीपासून एकमेकांना ओळखणे अपेक्षित आहे. तसेच, दोघांनी थांबून एकमेकांशी कांही संभाषण करणे, भावनिक आदानप्रदान होणे आवश्यक आहे. तसे असेल तर ती 'भेट' म्हणता येईल. जसे, 'गेल्यावर्षी मी माझी गाय एका शेतकर्‍याला विकली. तीची आणि माझी काल रस्त्यात भेट झाली. तिने मला आणि मी तीला ओळखलं. मी तिच्या गळ्याखाली कुरुवाळलं, तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिने माझ्याकडे पाहून तिचं डोकं माझ्या अंगावर घासलं. आणि ओळख दर्शविली.' असे झाल्यावर तो माणूस घरी येऊन आपल्या घरच्यांना म्हणू शकतो 'अरे! आज मला रस्त्यात आपली 'आनंदी' किंवा 'कपिला' (जे नांव असेल ते) भेटली होती. तिने मला लगेच ओळखलं. खुप वाईट वाटलं रे आम्हा दोघांनाही.' वगैरे वगैरे. अन्यथा एक गाय अथवा म्हैस 'दिसली' हेच योग्य होईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

हुप्प्या 12/08/2014 - 00:15
आपण सापडणे, भेटणे व मिळणे ह्यातील फरक उत्तमरित्या अधोरेखित केला आहे. परंतु मराठी भाषेच्या शुद्ध असण्याबद्दल लोकांमधे कमालीचे औदासिन्य आहे. पेन भेटले, बसचे तिकिट भेटले हे हिंदीत मिलना हे क्रियापद आहे त्याचे मराठीत केलेले कलम आहे. " कल मुझे अपना पुराना दोस्त मिला था. " "कल मेरा फोन खो गया था, आज मिला." ह्यातील मिलना हे क्रियापद सजीव निर्जीव सगळ्यांकरता वापरले जाते म्हणून त्याचे मराठी रुप भेटणे हेही असेच सजीव वा निर्जीवांकरता वापरावे असा सोयिस्कर समज काही शॉर्टकट बहाद्दरांनी करुन घेतला आहे. कदाचित नागपूरसारख्या हिंदाळलेल्या मराठीतून हा शब्दप्रयोग मराठीत आला असेल. मलाही सगळ्याला भेटणे म्हणणे चूक वाटते. तोच प्रकार बोलणे व म्हणणे ह्यात होतो. "काल रमेश बोलला की सगळ्या लोकल लेट आहेत." ह्यात बोलला पेक्षा म्हणाला हे जास्त समर्पक आहे. पण इथेही बोलणे हेच क्रियापद सर्रास वापरले जाते.

In reply to by आदूबाळ

प्यारे१ 11/08/2014 - 17:15
पाचगणीतल्या बर्‍याच विन्ग्रजी शाळेत जाणार्‍या पोरांच्या तोंडी 'रिमूव्ह प्रिंट/पेज' असं ऐकलंय. प्रिन्ट निकाल, पेज निकाल वगैरे साठी. बाकी तिथंही बर्‍याच जणांना मार्क भेटतात.

In reply to by प्यारे१

नाव आडनाव 11/08/2014 - 17:37
उस्मानाबादच्या एका कॉलेजातल्या मास्तर आणि विद्यार्थी यांचा संवाद: what my father's go - म्हणजे माय मराठीत माझ्या बापाचं काय जातंय नगर कॉलेजच्या मास्तर आणि विद्यार्थ्यांचा संवाद: you people are drinking cigarette under tree - तुम्ही लोक झाडाखाली उभे राहून सिगरेट पिताय :)

In reply to by प्यारे१

यसवायजी 11/08/2014 - 21:24
शाळेतल्या पोरांचं सोडा. आमचा रिजनल हेड म्हणतो, "अरेSS रिमूव्ह सम टाईSSम, लेट्स डू इट ना.." :))

In reply to by यसवायजी

मराठे 11/08/2014 - 21:28
एका टायवाल्याचा दुसर्‍या टायवाल्याशी बसमधे ऐकलेला संवाद.. "हे, आय हॅव रिमूव्हड युवर टिकीट अल्सो हा!"

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नाव आडनाव 26/07/2014 - 10:26
टुथ्पेस्ट म्हणजे कोल्गेट :) आयटी / सोफ़्टवेयर म्हणजे इन्फोसिस :) माझ्या ओलखीचे एक काका आहेत त्यांनी मी फ्रेशर असताना विचारलं "काय रे कुठे नोकरी लागली तुला". मी सांगितलं "पर्सिस्टनट मध्ये". काका म्हणाले काय करते हे कंपनी. मी सांगितलं सोफ़्टवेयर बनवते. काका म्हणाले "अच्छा म्हणजे इन्फोसिस मध्ये नोकरी लागली तुला :) "

In reply to by धन्या

आदूबाळ 29/07/2014 - 19:58
हे मी पण दोनतीन लोकांकडून ऐकलं आहे. बहुदा लोकांना "इन्फोटेक" म्हणजे "इन्फोसिस" वाटत असावं! माझे एक दूरचे काका आहेत. त्यांनी मी दहावी पास झाल्यानंतर इन्फोसिस(?) हेच कसं बेष्ट करियर आहे हे परोपरीने पटवून द्यायचा प्रयत्न केला. चंद्रमोहन नावाच्या त्यांच्या मित्राची मुलगी तेव्हा टाटा इन्फोसिस मध्ये नुकतीच लागली होती. तिचं उदाहरण सारखं देत असत. मी "जाणार नाही" हे निक्षून सांगितल्यावर "थू: तुझ्या जिंदगानीवर" असा चेहेरा करून बोलायला लागले. अजूनही बोलतात. टाटा इन्फोसिस मधली चंद्रमोहनची मुलगी आता मोठ्या पदावर आहे.

In reply to by आदूबाळ

रेवती 29/07/2014 - 20:31
हे वाचून माझ्या आजोबांची आठवण आली. आईचे वडील हे अल्फाबेटस वाचनापुरते इंग्रजी शिकले होते. माझी आई बी ए झाल्यावर त्यांना भयंकर अभिमान वगैरे वाटला होता. (ज्या काळी मुलींची १८ व्या वर्षी लग्ने होत त्याकाळी मुलीला बी ए होईतो शिकवणे आणि त्यावर टायपिंगच्या क्लासला घालणे हे म्हणजे अतिच समजत असत) ;) पुढे अनेक वर्षांनी माझी मामेबहिण पेढे देऊन नमस्कार करून म्हणाली की "आजोबा मी बीई इलेक्ट्रॉनिक्स झाले" त्यावर ते (वय ९५) म्हणाले "अरेरे! जुन्या काळी मी मुलीला बी ए केले आणि आज तू फक्त बीई झालीस, जरा ई पासून ए पर्यंत येण्यासारखा अभ्यास का नाही केलास?" आम्ही हसून लोळलो होतो. त्यावर "अचरट कार्टी" असा शेरा त्यांनी मारला. ;)

In reply to by रेवती

जेव्हा साखर कारखानदारांनी आपल्या गावांत नवीन नवीन महाविद्यालये उघडणे सुरू केले त्यावेळेची गोष्ट आठवली. एका कारखान्याच्या चेअरमनने मोठ्या अभिमानाने प्राध्यापकांच्या मुलाखतीत भाग घेतला होता. एका उमेदवाराने आपले शिक्षण एम एस सी असे सांगितल्यावर चेर्मन सायबांनी, "पन मंग तुमी मॅट्रीक झाला का नाय ते सांगा अदुगर." असे म्हणून उमेदवारालाच नव्हे तर इतर मुलाखत घेणार्‍यांनाही गारद केले होते ! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

काहीही खोटं सांगू नका ,आमच्या प महाराष्ट्रतल्या साखर कारखानदारानी पार युके जर्मनी युएसतल्या कंपन्यांशी करार करुन रिफाईन्ड शुगर, अल्कोहोल, कोजनरेशन प्रोजेक्ट उभारलेत ,ते इतका दूधखुळा प्रश्न विचारतील असे वाटत नाही...

In reply to by नानासाहेब नेफळे

त्या वाक्याची सुरुवात वाचा हो पहिली, मग समजेल तो कोणता काळ होता ते... मग उचलली जीभ लावली टाळ्याला असे करून बेजबाबदार आरोप करण्याची प्रवृत्ती जरा तरी काबूत येईल असे वाटते (अर्थात हा आपला माझा आशावाद आहे). मी सांगीतलेल्या काळात त्या विभागात मी स्वतः रुरल इंटर्नशीपसाठी ६ महिने राहिलो आहे. उस शेतकर्‍यांपासून ते अनेक स्तराच्या साखर कारखानदारांशी प्रत्यक्ष संबंध आणि बोलणे झालेले आहे... तीच गोष्ट महाविद्यालयात काम करणार्‍या प्रिंसिपल-प्राध्यापक वगैरेंबद्दल. हा किस्सा तेथे फार प्रसिद्ध झाला होता. तो तुम्हाला माहित नाही म्हणजे तुमचा पश्चिम महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीच्या इतिहासाचा अभ्यास कमी पडतोय असे दिसते ! खरा अभिमान असायला आधी अभ्यास जरूर आहे हे नमूद करावेसे वाटते. मी पण पश्चिम महाराष्ट्राबद्दल अभिमान बाळगून आहे. पण फुक्या अभिमानाच्या लागणीने अस्मितेची गळवे होऊ नयेत इतके मानसिक स्वास्थ्य कमावून आहे. तुम्हालाही स्वास्थ्यासाठी अनेक शुभेच्छा ! :) (तुमच्या आयडीचा एकंदर स्वभाव पाहता ही नुसती फुसकी काडी असण्याचा संभवही नाकारता येत नाही... तसे असले तर मग आम्ही खो...खो...खो असे हसलो आहे असे समजा. {हल्ली स्मायल्या गायब आहेत तेव्हा शब्दांवरच समाधान मानून घ्या :) ;) }

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माझे आजोबा एका कारखान्याचे डायरेक्टर होते व मी त्याच कारखान्याचा सभासद आहे

In reply to by नानासाहेब नेफळे

नानासायेब, आवो ही दंतकथा नाही तेथे प्रत्यक्ष हजर असलेल्या अनेक जणांकडून ऐकलेली आहे. तुमच्या आजोबांचे माहिती नाही. पण एकापेक्षा जास्त कारखानदारांशी वैद्यकीय व्यवसायिक म्हणून वैयक्तीक स्तरावरही संबंध आलेला आहे. त्यावेळेस त्यांचे सर्वसामान्य ज्ञान आणि अचानक आलेल्या सधनतेचा असर असलेली वागणूक हे दोन्ही जवळून पाहिलेले आहे. तेव्हा याबाबत जास्त चर्चा न वाढवणे तुमच्याच फायद्याचे राहील असे वाटते ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजून काही... ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला त्या एकाच तालुक्यात त्या काळी पाच साखर कारखाने होते.

In reply to by मराठी कथालेखक

अनुप ढेरे 25/07/2014 - 18:27
झेरॉक्स हे जेनेरिक टर्म होण्याच्या मार्गावर आहे. To xerox हे क्रियापद वेब्स्टरमध्येही आलेलं आहे. http://www.merriam-webster.com/dictionary/xerox अधिक माहितीसाठी हे वाचा. http://en.wikipedia.org/wiki/Genericized_trademark झेरॉक्स सध्या to xerox हे क्रियापद लोकांनी वापरू नये म्हणून प्रयत्न करत आहे. असे चालू राहिल्यास xerox हा शब्द त्या कंपनीच्या मालकीचा राहणार नाही. http://en.wikipedia.org/wiki/Xerox#Trademark

In reply to by संचित

अनुप ढेरे 30/07/2014 - 10:46
गूगलही प्रचार करत आहे लोकांना 'टू गूगल' असं क्रियापद वापरण्यापासून प्रवृत्त करण्यासाठी. जालावर अजून शोधले असता बँड-एड हेही जनेरीक झालेलं ब्रँड नेम आहे असं दिसलं. फोटोशॉपही त्याच मार्गावर आहे.

In reply to by अनुप ढेरे

झेरॉक्स हे जेनेरिक टर्म होण्याच्या मार्गावर आहे. To xerox हे क्रियापद वेब्स्टरमध्येही आलेलं आहे.
असंही काही चालू आहे हे माहित नव्हतं. पण हे म्हणजे जनरेट्यामुळे अतिक्रमणे नियमित करण्यासारखं आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन 25/07/2014 - 18:46
आपला बंगला आणि कशाला मोडतोय ओ? ज्याला झोपडी म्हटले जाते त्यांनाच अधिकृत करून बंगल्याचा पार्ट म्हणून आत घ्यायचे अन जरा रिनोव्हेषण केले की जंक्षाण कामच झालं की ओ ;)

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश 25/07/2014 - 19:30
बाकीचे युरोपियन्स लावतात की वाट. आपल्यापेक्षा जास्त. इतालियन किंवा स्पॅनिश लोकाम्शी इन्ग्लिश बोलताना खूप धमाल येते.

In reply to by बॅटमॅन

आपल्या भाषांची वाट लावणार्‍या त्या इंग्रजीची आपणही शक्य तितकी वाट लावलीच पाहिजे
हरकत नाही , पण सध्या आपण नेमकी कशाची वाट लावत आहोत ? इंग्रजीची की मराठीचीच ? कारण इंग्रजीत लिहताना आपण 1) She is my wife 2) There was a huge queue at Cinema 3) The movie was damn good असं बरोबरच लिहतो.

In reply to by बॅटमॅन

इंग्रजी ही मुळातच अशुद्ध भाषा आहे. त्यात खुप्श खुपशे फ्रेंच, दॉईच आणि इतर बरेच शब्द आहेत. आपण एक एका अर्थाने ती भाषा अजुन समृद्धच करत आहोत. लै लिहिण्यासारखे आहे ह्या विषयावर.

In reply to by केदार-मिसळपाव

बॅटमॅन 30/07/2014 - 14:19
अर्थातच सहमत आहे. मला इंग्रजीच्या तथाकथित शुद्धतेबद्दल आग्रही अन मातृभाषेबद्दल अनाग्रही लोक पाहिले की मजा वाटते त्यामुळे मजेने म्हटलो इतकेच.

In reply to by बॅटमॅन

इंग्रज नविन शब्दांबद्दल किंवा एक/अनेक जुने शब्द वापरून बनवलेल्या शब्दांकडे "भाषा बिघडवली" या दृष्टीने बघतात असे वाटत नाही... ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी मोठ्या अभिमानाने दर वर्षी "न्यू वर्ड लिस्ट वर्ष>" जाहीर करते / छापते... ही आहे २०१२ ची नविन शब्दसूची अती सोवळेपणा न करता चपखल अर्थांचे नविन शब्द आत्मसात करणे हे इंग्लिश भाषा संपन्न बनण्याचे एक महत्वाचे कारण आहे असे वाटते. मुख्य म्हणजे असे करताना जगातल्या कोणत्याही भाषेतली आवक त्यांना निषिद्ध नाही असे दिसते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

रेवती 30/07/2014 - 19:02
अती सोवळेपणा न करता चपखल अर्थांचे नविन शब्द आत्मसात करणे हे इंग्लिश भाषा संपन्न बनण्याचे एक महत्वाचे कारण आहे असे वाटते. सहमत. पूर्वीही अशाच विषयाच्या धाग्यावर शांताबाई शेळके यांनी सांगितलेले विचार टंकले होते. जी भाषा काळाप्रमाणे बदलत जाते तीच टिकते अशा अर्थाने त्या म्हणाल्या होत्या.

In reply to by रेवती

भाषाशुद्धी हाच दूधखुळा प्रकार आहे, एखाद्या नदीला जसे ओढे ओहोळ येऊन येऊन त्या नदीला समृद्ध करतात ,जर ओढे बंद केले तर नदीचे प्रवाहीपण बंद पडेल व डबके होऊन ती वास मारायला लागेल.तसेच भाषेचे आहे ,उदा- संस्कृत व पाली भाषा या असल्या खुळचटगिरीमुळे मरणासन्न झाल्या.

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन 30/07/2014 - 19:33
आयला, म्हणजे गेल्या अडीच हजार वर्षांपासून संस्कृत मरणासन्न आहे होय? नवीनच शोध लागला, धन्यवाद बरं का नेफळेसाहेब.

In reply to by बॅटमॅन

मागच्या अडीचहजार वर्षात कोणत्या कालखंडात लोक संस्कृतातून सर्रास बोलत होते, केव्हा ती बोलीभाषा होती ? एखाद्या भाषेचे डॉक्युमेंटेशन आहे म्हणजे ती प्रचलीत भाषा आहे असा गैरसमज झाला आहे काय? (माझा हा प्रतिसाद संस्कृतातून खरडून दावल्यास संस्कृतात अजूनही धुगधुगी आहे हे मान्य करु)

In reply to by नानासाहेब नेफळे

पिशी अबोली 01/08/2014 - 19:09
गत द्विसहस्रवर्षेषु कस्मिन् काले जना: सर्वथा संस्कृतेन वार्तां कुर्वन्ति स्म, अपि च कदा सा लोकभाषा आसीत्? कस्याश्चित् भाषाया: केवलम् आलेखनं उपलब्धम्, अतः सा प्रचलिता भाषा, इत्येषा मिथ्यामति: किम्? (ममेतद् प्रत्युत्तरं संस्कृतेन लिख्यते चेत् 'संस्कृतम् अद्यापि ऊर्जयते' इति अंगीकुर्मः|)

In reply to by पिशी अबोली

पिशी आनी बॅटमॅन असताना (माइंड इट - बॅट्मॅन - काव्य वगैरे करतो तो संस्कृत मध्ये...) त्यांना असले भुक्कड चॅलेंजेस देणे म्हणजे... जौ दे... अजुन बॅटमॅनाचे एखादे काव्य कसे आले नाही इथे..???

In reply to by नानासाहेब नेफळे

पिशी अबोली 01/08/2014 - 19:31
ऑ?? तुम्ही बॅटमॅनला सांगताय क्रॉसचेक करायला म्हणजे त्याला संस्कृत नक्की चांगलं येतं हे तुम्हीच मान्य करताय की.. म्हणजे संस्कृत उत्तम जाणणारी एक व्यक्ती इथे नक्कीच आहे हे तुम्हाला मान्यच आहे. आता माझा अनुवाद अगदी शून्य मार्क मिळवण्याजोगा असला, तरीही ते क्रॉसचेक करु शकणारा बॅटमॅन उत्तम संस्कृत जाणणारा आहे हे तुम्हाला मान्य असल्यामुळे संस्कृतमधे धुगधुगी आहे हेही तुम्हाला मान्य करावंच लागेल, हो ना नेफळेसाहेब?

In reply to by पिशी अबोली

ब्याटम्यानभाऊ फारच विश्लेषण करतात भाषेचं, लँग्वेज सिम्यानटीक्स ,फोनेटीक्स ,मॉर्फोलॉजी वगैरे वगैरे! खरे तर त्यांनाच आव्हान केले होते पण त्यांनी सोईस्कर पळ का काढला ते समजले नाही, आता क्रॉस चेक करुन खरे खोटं सांगा, बघू जमते का त्यांना!!

In reply to by नानासाहेब नेफळे

यसवायजी 01/08/2014 - 20:47
सोईस्कर पळ का काढला ते समजले नाही
हा हा हा :D ब्याट्या, पळ का काढला का च्यालेंज फाट्यावर मारलं बे ??

In reply to by नानासाहेब नेफळे

नाव आडनाव 01/08/2014 - 21:05
नेफळे, तुम्ही बॅटमॅन साहेबांना परत आव्हान द्या आणि यावेळी तुम्ही हरले तर काय करणार हे पण लिहा - जसं हरलो तर नेफळे पुन्हा मिसळपाव वर दिसणार नाही :) आणि अजून एक, फक्त "नानासाहेब" नाही सगळेच "साहेब". इथे बाकीचे पण काही "साहेब" आहेत आणि ते सगळे नेफळेच आहेत हि आतली खबर माहित आहे सगळ्यांना.

In reply to by नाव आडनाव

ब्याटोबाला आव्हान दिले तेव्हा ते बर्याच वेळ ऑनलाईन होते,दुसर्या दिवशीही याच धाग्यावर होते, परंतु फिरकले नाहीत ,बहुधा बराच खटाटोप करुनही जमले नसावे ,मग अबोलीताईंना धाडले असावे. असो ,चार भुक्कड ओळीच्या संस्कृत भाषांतराला मिपासारख्या अग्रेसर संस्थळावर तीन दिवस लागतात यावरुन आम्ही काय समजायचे ते समजलो. (तरीही उपरोक्त भाषांतर ग्राह्य मानतो व संस्कृतात धुगधुगी आहे हे मान्य करतो )

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 02/08/2014 - 11:17
बॅट्ञा आंजावर असताना सतत काकदृष्टीने तुमचे प्रतिसाद शोधत असतो आणि त्यामुळे तुम्ही प्रतिसाद टाकल्यावर त्याने लगेच उत्तर द्यावे असा गैरसमज झाला की काय तुमचा? चार भुक्कड ओळीच्या संस्कृत भाषांतराला तुम्ही भुक्कड लिहिले होते हे तुम्ही मान्य केले हे एक बरे झाले.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दिव्य लॉजीक ऐकायची तयारी ठेवा म्हणजे मी लॉजीकने बोलतो हे तरी तुम्हास मान्य आहे, हे ही नसे थोडके.

In reply to by नानासाहेब नेफळे

वा, वा ! तुमचे मराठीपण कच्चे असल्याचा पुरावा किती सहजपणे दिलात ! *lol* *lol* *lol* असेच तुमच्या "दिव्य" प्रतिभेचे दर्शन देत आमचे मणोरंजण क्रत र्‍हा *dance4* *biggrin*

In reply to by पिशी अबोली

बॅटमॅन 03/08/2014 - 00:35
साधु साधु पिशीमहोदये, गद्योत्तरं खलु सम्यक् एव वर्तते!! अनवान्तरम् - किन्तु विषयेऽस्मिन् जनै: यत्किञ्चिदपि लिखितं तत्तु महिषपृष्ठे प्रावृडिव व्यर्थमिति मन्ये |

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन 03/08/2014 - 01:01
पाणिनिकाले तु जना: संस्कृते वदन्ति स्म, गालिप्रदानमपि कुर्वन्ति स्म | अर्थात् पाणिनिकाळात कैक ठिकाणी त्याने व्याकरण रचलेली संस्कृत भाषा प्रचलित होती हे अष्टाध्यायी न वाचता त्या ग्रंथाबद्दलचे इतरांचे जुजबी विकीस्टाईल लेख वाचूनही समजते. ते एक असोच. अन पिशी अबोली यांचे भाषांतर अगदी अचूक अन नेमके आहे. अन बाकी प्रतिसाद खालीलप्रमाणे. पिशीमहोदया तु बहु सम्यक् उत्तरं दत्तवती, किन्तु नेफलेमहोदयस्तु ( पाणिनिप्रणीते संस्कृते 'ळ' कारो नास्ति चेत् ल-कारो एव प्रयुक्तोऽत्र |) केवलं संस्कृतद्वेषात् एव विगतबुद्धि: हतविवेकः इव प्रजल्पते | तस्मादेषः पद्योपहारः स्वीकरोतु भवान् | संस्कृतं नाम वै किञ्चित् नास्ति, नासीत् कदाप्यहो | नैषा नैसर्गिकी भाषा, यन्त्रवद् रचिता खलु ||१|| अधुना त्वेति जल्पन्ति येऽपि सर्वे मुहुर्मुहु: | संस्कृतं ते न जानन्ति, न चापि प्राकृतादयः ||२|| यस्य कस्यापि जल्पोऽयं, येन केनापि मण्डितः| यस्मै कस्मै कथित्वा तु, यद्वा तद्वा भवेत् खलु ||३|| एते सर्वे जनाश्चात्र वर्तन्ते ज्ञानिनो इव | परं मनसि तेषां वै, सदैवात्र स्थितं खलु ||४|| " व्याकरणं न जानामि , नैव जानाम्यहं ध्वनीन् | छन्दःशास्त्रं न जानामि, तथापि शृणुयु: जना: ||५|| ज्ञानहीनं द्वेषपूर्णं जल्पाम्यहमहो सदा | मिथ्या वक्तुं सदा ह्यत्र तत्परोऽस्मि शुको इव ||६||" कठोरोऽयं वाक्प्रहारो जनान् हि खलु बाधति | इत्युक्ते "वाक्प्रहारो न, यथा बाधति बाधते" ||७|| एते संस्कृतद्वेष्टारः दयनीया: हि सर्वथा | व्यासोक्तिस्तु दशां तेषां सम्यक्दर्शयते अहो!! (ऊर्ध्वबाहुर्विरोम्येष न कश्चिच्छृणोति माम् ;) ) ||८||

In reply to by नानासाहेब नेफळे

सुबोध खरे 30/07/2014 - 19:45
संस्कृत व पाली भाषा या असल्या खुळचटगिरीमुळे मरणासन्न झाल्या. मग ल्याटिन कशामुळे मरण पावली?

In reply to by नानासाहेब नेफळे

संस्कृत मरणासन्न झाली याच्याशी असहमत. संस्कृत ही लॅब मधल्या प्रमाणित उपकरणे/मानकांप्रमाणे आहे. लॅब मधली प्रमाणित उपकरणे रोज वापरली जात नाहीत पण त्यांच्या मदतीने रोजच्या वापरातील उपकरणे तपासली /सुधारली जातात. संस्कृतच्या संदर्भाने मराठीचे(व कदाचित हिंदी आणि इतर मराठी भाषादेखील) शुध्दीकरण /प्रमाणीकरण सोपे होत असावे असे मला वाटते. (अर्थात मी या विषयातला तज्ञ नाही. )

कविता१९७८ 25/07/2014 - 17:10
मी तर इथे लोकांना चुकीची मराठी इंग्रजी वाक्ये बोलताना पाहते; शेजारणीला विचारलं मुलगी काय करते तर म्हणे ती स्लीप झाली. मी विचारलं कशी, लागलं नाही ना तर म्हणे स्लीप झाली म्हणजे झोपली, ह्या बाई एका झोपडपटटीत इंग्रजी शाळेत शिकवतात , त्या बिचार्‍या मुलांची दया आली हे ऐकुन.

सूड 25/07/2014 - 17:11
>>सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी. न पेक्षा एजमान म्हणावें, कसें? बाकी आम्हीही फॉर अ चेंज लायनी, मेंबरं असं म्हणत असतो.

बॅटमॅन 25/07/2014 - 17:18
शुद्ध मराठी बोला म्हटलं तर लोक अंगावर येतात, तेच शुद्ध इंग्लिश बोला म्हटलं तर कशी हांजी हांजी करतात ते पाहणं रोचक आहे. बरं हे फक्त रोजीरोटीमुळंच होतं असंही नाही. इंग्लिश=हुच्चभ्रू हे समीकरण तूर्तास असल्याने लोक हुच्चभ्रू दिसण्यासाठी कायपण म्हणून इंग्रजी बोलायचा प्रयत्न करतात. याच लोकांना मराठीच्या मुद्यावर हाड थू करताना पाहून बाकी चिकार करमणूक होते मात्र.

In reply to by बॅटमॅन

धमाल मुलगा 25/07/2014 - 18:53
>>शुद्ध मराठी बोला म्हटलं तर लोक अंगावर येतात लै वाईट अनुभव येतात राव. आणि अनास्था पाहून तर आणखी वाईट वाटतं. अवांतरः ह्यावरुन आठवलं, पुर्वी एकदा बाबासाहेब पुरंदर्‍यांसोबत फोटू काढला होता तो हापिसातल्या मित्रांना दाखवत होतो, त्यातलीच एक अतिशहाणी बया चित्कारली.."आयल्ला! एम.एफ.हुसेन? कुठे भेटले होते?" मी जागेवर फ्लॅट! कोण, काय वगैरे सविस्तर इस्काटून सांगितल्यावर म्हणे, "आमच्याकडं मराठीचं फार काही नसतं. त्यामुळं मला ठाऊक नाही बॉ!" हेच इंग्रजीबाबत नेमकं उलटं. थोडक्यात केवळ बोलणंच नव्हे, एकुणातच इंग्रजी=हुच्चभ्रू हे समीकरण भयंकर रुजलेलं आहे. धाग्यासंदर्भात: माझी कवटी सरकवणारा असाच एक प्रकार म्हणजे - "अमुक अमुक एक्सपायर झाला." का? वारला/ देवाघरी गेला/मेला/मृत झाला/ निवर्तला/चचला/खपला/खेळ आटोपला असे सभ्य ते टवाळ सगळ्या मापात बसणारे इतके प्रतिशब्द आहेत मराठीत, ते वापरले तर हा वापरणारा काय खपतो का?

In reply to by धमाल मुलगा

बॅटमॅन 25/07/2014 - 19:00
बाबासाहेब पुरंदर्‍यांना एमेफ हुसेन समजणारी बया मराठी असेल तर तिला असांसदीय भाषेत सुनावायची आणि शेलक्या शब्दांत आहेर द्यायची इच्छा अनावर होतेय हे वाचून!!!!!!!!!!!!!!!!!!!! बाकी एक्सपायरशी सहमत. जाणीवपूर्वक मराठीत काही बोललो तर अंगावर पाल पडल्यागत, काहीतरी अन्यदेशीय किंवा अन्यग्रहीय ऐकल्यागत चेहरा करतात ***चे. यांच्या ***ला *** करून *** *** ***********************!!!!!!!! बरं हे प्रमाणभाषेबद्दलच असं, बोलीभाषा तर याहूनच जास्ती पाण्यात पाहिल्या जातात. आता मी मिरजेचा आहे, थोडा तिकडचा अ‍ॅक्सेंट येणारच की बोलण्यालिहिण्यात. तीच गोष्ट इतरांचीही त्यांच्या त्यांच्या बोलीभाषेबद्दल. पण बोलीभाषा म्हणजे काय एखादा आफ्रिकेतील जिराफ पहावा तसे पाहिल्यागत करतात-जणू आयुष्यात पैल्यांदा ऐकल्यागत. खरेच ऐकली नसेल तर ठीके ओ, पण असं काय नसतं. बोलीभाषा=गावंढळ आणि तो ट्याग त्यागायची अहमहमिका लागलेले हे रूटलेस***चे लोक, यांच्या ****************!!!!

In reply to by बॅटमॅन

धमाल मुलगा 25/07/2014 - 19:52
बाई भागवत हे आडनाव धारण करीत असत.
बरं हे प्रमाणभाषेबद्दलच असं, बोलीभाषा तर याहूनच जास्ती पाण्यात पाहिल्या जातात. आता मी मिरजेचा आहे, थोडा तिकडचा अ‍ॅक्सेंट येणारच की बोलण्यालिहिण्यात.
अगदी अगदी! दूर कशाला? मिपावरच 'दिल्या जाईल', 'केल्या जाईल' वगैरे वैदर्भीय बोलीबद्दल कितीतरी तोंडसुख घेतलं गेलंच की. >>बोलीभाषा=गावंढळ आणि तो ट्याग त्यागायची अहमहमिका लागलेले हे रूटलेस***चे लोक क्या बात! क्या बात! तोडलंस भावा. जन्तेला चढत्या भाजणीत लाज वाटते; आपल्या गावाची, आपल्या प्रदेशातल्या बोलीची, मग महाराष्ट्राच्या मराठीची, मग भारताची.... मज्जाय सगळी. :)

In reply to by बॅटमॅन

नगरीनिरंजन 30/04/2015 - 03:01
इंग्रजीच्या ॲक्सेंट्सचं मात्र फार कौतुक. दोन-चार वर्षं ऑस्ट्रेलियात काढली की माइट (मेट), डाय (डे) असं बोलायला लागतात लगेच. अशा लोकांच्या बौद्धिक पांगळेपणाचं मला आश्चर्य वाटतं.

In reply to by लंबूटांग

धमाल मुलगा 25/07/2014 - 19:48
=)) =)) लंब्या... हालकटैस. ह्या छिद्रान्वेषीपणाचे आभार मानतो आणि फ्लॅट हा उधारीचा शब्द मागे घेऊन उताणा हा शब्द वाचावा अशी नम्र इनंती करतो.

In reply to by धमाल मुलगा

यशोधरा 25/07/2014 - 19:48
कठीण आहे. परवा ऑफिसमध्येही एक जण म्हणे "वैसे तो कुछ लॅंग्वेजेस ऑड होती हैं, पर ये मराठी तो एकदम ही ऑड हैं, मुझे बोलना भी अच्छा नहीं लगता, यू नो!" आता हे ऐकल्यावर तिला शांतपणे विचारलं की तुला मराठी येते का बायो, कामचलाऊ तरी? समजते का? थोडीतरी? तर अर्थातच नाही असं उत्तर आलं. मग तिला सांगितलं की आधी भाषा शिक, मग त्यात प्रावीण्य मिळव आणि मग भाषेला ऑड वगैरे नावं ठेव. भाषाच येत नाही तर भाषा "ऑड" आहे हे क्सं काय ठरवलंस? त्यानंतर काही काळ भयाण शांतता पसरली!

In reply to by यशोधरा

नाव आडनाव 26/07/2014 - 10:16
एकदा माझा म्यानेजर, जो कानपूर चा आहे, म्हणाला "मेरी बेटी भी मराठी बोल लेती है लेकिन मै नही सिखता हुं मराठी ". मला माहित होतं तरिही मी त्याला विचारलं - "आपकी बेटीकी उम्र क्या है." तो म्हणाला "६ महिने" तेंव्हा माझ्या मोठ्या मुलीचं वय होतं १० महिने आणि तिची मातृभाषा मराठी असूनही तिला ती बोलता येत नव्हती. खरंतर १ वर्ष पर्यंत बर्याच मुलांना कोणतीच भाषा येत नही. मग जर साहेबांच्या घरी मराठी बोलली जातंच नसेल तर साहेब कन्येला मराठी येते कशी आणि तेही ६ महिन्यनची असताना? असा प्रश्न विचारल्यानंतर साहेब दुसरा विषय घेऊन बोलू लागले. हीच फेकायची सवय बर्याच लोकांना असते, माझ्या म्यानेजर सारखी - आणि त्यांना तिथेच प्रश्न विचारून उताण पाडता येतं आणि मला तर असं करायला लई मज्जा वाटते :)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मी तर पुण्यात 'येथे पँटची चेन लावून मिळेल' असा फलक पाहिला आहे. तेंव्हा सकाळ सकाळ कचेरीत निघालेले अनेक पुरुष तिथे, पँटची चेन लावून घ्यायला, रांगेत उभे असतील असे विनोदी चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. कदाचित त्या शिंप्याला 'पँटला चेन लावून मिळेल' असे म्हणायचे असेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रमाणाचा अट्टाहास धरला कि असेच होणार... बायदवे, तेलाची बाटली, आंब्याची टोपली , पाण्याचे भांडे, तुपाची वाटी यावरही आपले ज्ञानकिरण पाडावेत...

असंका 25/07/2014 - 17:43
आपण पाव हा मराठीत लिहून ब्रेड इंग्रजीत bread लिहिला आहेत. पाव हा शब्द मराठी आहे असे सुचवायचे आहे का? तुम्हाला एक कोडे घालू का?- ब्रेडला पोर्तुगीज भाषेत काय म्हणतात?

In reply to by असंका

पाव हा शब्द मराठी आहे असे सुचवायचे आहे का?
हो. म्हणजे मी तरी तसेच समजतो ? चुकलाय का शब्द ? बाकी पोर्तुगीज शब्द माहित नाही. खालील लिंक प्रमाणे "पांव" असा मराठी शब्द आहे. http://www.khapre.org/portal/url/dictionary/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5/word

In reply to by मराठी कथालेखक

बॅटमॅन 25/07/2014 - 18:12
पाव/पांव या शब्दाचा पूर्वज पोर्तुगीज़ मधला पाव हा शब्द आहे. पोर्तुगीज भाषेतून आलेले पण बहुतेकांच्या तसे गावीही नसलेले अजून काही शब्द खालीलप्रमाणे: पगार, चावी, मेज, कमरा, बटाटा, इ.इ.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 25/07/2014 - 18:24
अरबी भाषा बोलणारे अल्जिरियावाले लोक १३२ वर्षांच्या फ्रेंच राजवटीनंतरही वरील पोर्तुगिज शब्द वापरतात तर...! मला हे फ्रेंच अथवा अरेबिक शब्द असावेत असं वाटत होतं. दुकान, कानून, कायदा, ज्यादा, पेटी हे अरेबिक असावेत असा अंदाज आहे.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 25/07/2014 - 18:34
हे शब्द पोर्तुगीज भाषेत आहेत एवढं नक्की- यद्यपि पोर्तुगीजनं उसनवारी केलेली असण्याची शक्यता दुर्लक्षून चालणार नाही, तूर्तास ते माहिती नाही त्यामुळे पोर्तुगीज असे म्हणतो.
दुकान, कानून, कायदा, ज्यादा, पेटी हे अरेबिक असावेत असा अंदाज आहे.
सहमत, फक्त (हाही बादवे अरेबिकच शब्द आहे), अरबी की फारसी हे ठाऊक नाही, जाणकारांना (उदा. बिका, प्रपे, इ.) विचारलं पाहिजे. त्या दोन भाषांची आपसांत देवाणघेवाण बरीच झालेली असल्याने थोडे ट्रेनिंग मिळाल्याखेरीज एखादा शब्द मूळचा अरबी, फारसी की तुर्की हे कळणार नाही. इंड्यन माणसाला 'तिकडनं' आलेला शब्द इतकं पक्कं ठौक असतं, पण त्यापलीकडे नै. आणि असणार तरी कसं म्हणा.

In reply to by बॅटमॅन

यावरुन आठवले,सावरकरांना मराठी भाषेवरचा फारसी प्रभाव नष्ट करायचा होता ,कारण अर्थात फारसी मुस्लिमांची भाषा होती व सावरकर हिंदुत्ववादी होते. त्यांच्याभाषेत 'भाषाशुद्धी'साठी त्यांनी मराठीचे' संस्कृतकरण 'करण्याचा घाट घातला होता. खास संस्कृत शब्द मराठीत दिले त्यांनी. उदा- तारिख- दिनांक तहसीलदार- प्रांताधिकारी मैदान- क्रिडांगण पगार- वेतन,ईत्यादी. भाषेलाही धार्मिक अस्मिता चिकटतात ....

In reply to by नानासाहेब नेफळे

भाषेलाही धार्मिक अस्मिता चिकटतात
असं कसं असं कसं ? तसं असतं तर नानासाहेब ह्या शब्दाला नानासाहेब पेशवे जे की तुमच्यालेखी जातीयवादी किंव्वा नानासाहेब फडणवीस जे की तुमच्या लेखी लंपट ह्यांच्या अस्मिता चिकटल्या नसत्या काय ? तरीही तुम्ही नानासाहेब हा आयडी घेता ह्यावरुन अस्मिता चिकटणे वगैरे घडत नसावे असे वाटते *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

नानासाहेबच्या उल्लेखावरुन आठवले ,'साहेब' या फारसी शब्दाला 'महोदय, असा कुणीही सध्या वापरत नसलेला शब्द सावरकरांनी शोधला होता,... आणि पेशवा हा ही फारसी शब्दच आहे ,त्याला काय म्हणायचे मग.... पुण्यस्वराज्य?????

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन 25/07/2014 - 19:02
भाषेलाही धार्मिक अस्मिता चिकटतात ....
या बाबतीत सावरकर एकटेच अद्वितीय इ. नाहीत. सगळ्या जगभर असेच झालेले आहे. मराठीवरचा फारसी प्रभाव कमी करायला म्हणून तर शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारकोश बनवायला सांगितला ढुंढिराज व्यासांना. त्यातही पोलिटिकल-रिलिजियस अजेंडा होताच. पण बाकी काही असो, सावरकरांचे प्रतिशब्द अतिशय चपखल आहेत. विनासायास रुळले- मराठीतच नव्हे, तर हिंदीतही.

In reply to by बॅटमॅन

कुठे रुळलेत!!!! आज तारिख कीती? असेच लोक विचारतात, आज कोणता दिनांक आहे? असे कुणीही विचारत नाही!!! एखादा मोठा माणुस भेटल्यास ,नमस्कार साहेब' असे म्हणणारे कितीजण आहेत आणि नमस्कार महोदय, म्हणाणारे किती ???? पोस्टाला' डाक, असा शब्द सावरकरांनी शोधला, कितीजण डाक कार्यालयात जाउन येतात? आणि डाक कार्यालयातल्या अधिकार्याला काय म्हणायचे ,डाकाधिकारी????

In reply to by बॅटमॅन

शिवाजींचा प्रयत्न जरी फारसीचा प्रभाव नष्ट करण्याचा असला तरीही संस्कृतकरण करण्याचा त्यांचा कोणताच अजेंडा नव्हता,याउलट संस्कृतकरणामागचे कारण उघड धार्मिक आहे आणि ते संस्कृतकरण बहुजनांच्या अंगवळणी पडत नाही....

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन 25/07/2014 - 19:29
आयला हे बरंय. एकच गोष्ट केली, ती शिवाजीमहाराजांनी केली तर अजेंडा नाही अन सावरकरांनी केली तर मात्र अजेंडा? मज्जाच आहे की.

In reply to by बॅटमॅन

हो ते तसंच आहे ! ह्याचं अजुन एक उदाहरण म्हणजे , आजारी पडल्याचं नाटक करुन , औरंगजेबाला मिनत्या विनंत्याकरुन महाराज आग्रातुन सुटतात तो मुत्सद्दीपणा आणी सावरकर माफीनामा देवुन अंदमानच्या सेल्युलर जेल मधुन सुटतात तो पळपुटेपणा !!

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 25/07/2014 - 19:48
आणि सावरकरांचा 'सा' उच्चारायची लायकी नसलेले नेभळट जालकेसरी जेव्हा माफीवीर इ.इ. मुक्ताफळे उधळू पाहतात तेव्हा तर चिक्क्कार मणोरञ्जण होते राव.

In reply to by प्रसाद गोडबोले

हो ते तसंच आहे! आग्रातुन बुद्धीचातुर्याने निसटणे आणि नंतर स्वराज्याची रितसर निर्मिती करुन छत्रपती होणे व शेवटापर्यंत लढत राहणे.. याउलट.. प्रचंड 'मुत्सद्दीपणा' दाखवुन १९२१ नंतर घरी बसणे... हो ते तसेच आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

१९२१ नंतर घरी बसणे
ह्यावरुन आपल्या अभ्यासाची पातळी कळाली ... आत्ता लक्षात येते की महाराष्ट्र शासनाने आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय का घेतला असावा ते )

In reply to by बॅटमॅन

राजव्यवहारकोष म्हणजे राजकारभारातले त्यांचे ठराविक मायन्यातील शब्द लिहुन घेतले, त्यातही संस्कृतकरण केल्याचे दिसत नाही. याउलट थेट सामन्यांच्या तोंडी असलेल्या भाषेत संस्कृत घुसडण्याचा प्रयत्न वेगळ्या वाटेने जाणारा होता, सामान्यांचे ज्या भाषेशी वावडे आहे तिचा पगडा बसवणे व राज्यव्हवहारकोष तयार करणे यातला फरक समजून घ्या! स्वतः शिवाजींची पत्रे बरीच फारसीप्रभावाखाली आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन 25/07/2014 - 19:54
नेफळेबुवा, राज्यव्यवहारकोष कधी वाचलात काय? की उचलली जीभ लावली टाळ्याला असंच करायचंय? माझ्याकडे आहे आणि वाचलाय म्हणून सांगतो. लेखनपद्धती पूर्णपणे संस्कृत धाटणीची करावी असा स्पष्ट उद्देश दिसतो- नव्हे, ग्रंथकारही तेच म्हणतो. घरी गेलो की ते श्लोक टंकतो. अन महाराजांची पत्रे फारसीत आहेत ती राज्याभिषेकाअगोदरची, नंतरची सगळी पत्रे संस्कृत शब्दवालीच आहेत. बाकी सामान्यांच्या तोंडी संस्कृत घुसडू पाहत होते असं जरी मानलं तरी सामान्यांना अक्कल नको काय? की त्यामुळेच ते सामान्य ठरतात- कुणीही या आणि काहीही शिकवा, जसे शिकवेल तसे ओरडू?

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे राव तुम्ही अगदी मॅकोले चे आदर्ष सुपुत्र दिसता ! कारकुनी सिस्टीम मधुन तयार केलेले अन स्वकीयांपेक्षा परकीयांचाच अभिमान बाळगणारे !! बाकी सामान्यांचे एकेकाळी इंग्रजीशीही वावडे होते आणि बाबासाहेब म्हणाले की इंग्रजी हे वाघीणीचे दुध आहे ...पण बाबासाहेबांबद्दल
सामान्यांचे ज्या भाषेशी वावडे आहे तिचा पगडा बसवणे
असे काही तुम्ही बोलु धजावणार नाही !

In reply to by प्रसाद गोडबोले

बाबासाहेबांनी इंग्रजीचा प्रभाव बसवण्याचा प्रयत्न केला असल्यास तो स्त्युत्यच मानावा लागेल, इंग्रजी ही ख्रिस्तांची भाषा ,'अब्रह्म' वगैरे खुळचटगिरी त्यापाठी निश्चितच नव्हती... वैश्विक भाषेतुन भारतीयांना ज्ञानाची कवाडे खुली व्हावीत हाच उदात्त उद्देश त्यामागे होता.... याऊलट चार पाच पोथ्या व स्त्रोत्रांच्या चवलिपावलीत येणार्या पुस्तकातली अगम्य व मरणासन्न संस्कृत भाषा स्वतःच्या धार्मिक मुलतत्ववादासाठी इतरांवर थोपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे यातला फरक लक्षात घ्या ,लक्षात कसा येईल? ,चष्मा काढा आधी.

In reply to by नानासाहेब नेफळे

धमाल मुलगा 25/07/2014 - 20:15
पोथ्या, स्तोत्रं, धार्मिक मूलतत्ववाद आणि सावरकर हे एकत्र बांधलेलं पाहून हसावं की रडावं तेच कळेना! शंका: सदरहू सदस्य ब्रिगेडच्या ब्रेनवॉशिंग सेशन्सला न चुकता हजेरी लावत असावेत की काय अशी शंका आल्यावाचून राहिली नाही.

In reply to by धमाल मुलगा

बॅटमॅन 25/07/2014 - 20:17
या शंकेत ब्रेनचे अस्तित्व गृहीत धरल्या गेले आहे असे वाटते. तस्मात गृहीतक तपासून पहावे अशी इणंती ;)

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय 30/07/2014 - 13:55
भें** बा***. साल्या तु १०० नंबरी पुणेकर आहेस (नसलास तरीही). किमान शब्दात कमाल अपमान करण्याची लय भारी कुवत आहे तुझ्यात.

In reply to by धमाल मुलगा

यशोधरा 25/07/2014 - 20:21
सावरकरांचं नाव घेतलं की कसं जबरदस्त वाटत आसंल राव, मी सावरकरांच्या चुका काढतो/ ते वगैरे. तुमास्नी इतकं कळंना! छ्या! ;)

In reply to by नानासाहेब नेफळे

हुप्प्या 01/08/2014 - 10:11
जबरदस्त हा फारसी नव्हे. जबर हा जब्बार ह्या अरबी शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ सर्वशक्तीमान असा आहे. दस्त म्हणजे हात. तो मात्र फारसी आहे. पण तो संस्कृत हस्तचा भाऊ आहे. जबरदस्त हा सरमिसळ केलेला शब्द आहे.

In reply to by हुप्प्या

इतके सिरियस स्पष्टीकरण श्रीमती नानासाहेबांच्या डोक्यावरून गेले असणार ;) त्यांना विचार न करता काहीपण शेरे मारायची सवय आहे ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाळ सप्रे 01/08/2014 - 11:26
शेरे मारायची सवय आहे खरी त्यांना.. पण गेल्या काही दिवसात काही प्रतिसाद नोंद घेण्यालायक आहेत. आणि तसंपण शेरे मारण्याची सवय बर्‍याच मिपाकरांना आहे.. सो डोन्ट राइट हिम ऑफ!!

In reply to by बाळ सप्रे

खूपदा बेजबाबदार शेरे मारले ही विश्वासार्हता आपोआप कमी होते आणि आयडी वाचकांच्या मनातून आपोआप राईट ऑफ होते !

In reply to by नानासाहेब नेफळे

हा एक नवाच पैलु आमच्या अल्पमतीला आज कळाला... आजवर सावरकर ते पु.लंचा तिरस्कार केवळ जातीमुळे करताना पुष्कळ लोकांना पाहिल्यामुळे त्याबद्दल काही विशेष वाटले नाही.. ज्ञानेश्वरपण सुटले नाहीत ह्यांच्या तडाख्यातुन... (बोलणार्‍याची लायकी सुद्धा विचारात घ्यावी लागते म्हणा..).. शिवाय शिवाजी महाराज ह्यांच्यावरही मक्तेदारी दाखवायचा सोस लोकांना सुटत नाही.. (पुन्हा एकदा.. कीव येते.. असो..) पण आता हा माज इतका वाढलाय की संस्कृतपेक्षा परकीय भाषा जवळच्या वाटु लागल्या.. नुसतं तेवढंच नाही तर स्वभाषांशी "वावडं"च होऊ लागलं..?? मोठ्या संख्येने समाज असा निर्बुद्ध विचार करु लागला तर भारतीय भाषा मृतवत होणार नाहीत तर काय? बाबासाहेबांचा दाखला देणार्‍या लोकांना बाबासाहेब काडीभर तरी कळले असतील का हा प्रश्नच आहे.. शाळेत असताना एक धडा होता.. "महापुरुषांचा पराभव".. राहुन राहुन त्या धड्याची आज फार आठवण आली.. बॅट्या आणि प्रगो.. तुमच्या सगळ्या पोस्टसाठी +१११११

In reply to by पिलीयन रायडर

नाव आडनाव 28/07/2014 - 15:20
"महापुरुषांचा पराभव" हे एकदम बरोबर उदाहरण दिलंय. मला पण हेच लिहायचं होतं पण शनिवारी आणि रविवारी मिसळपाव बंद होतं. मला लहान असताना हा धडा जास्त कळला नव्हता पण मोठा होताना आजू बाजूला जे काही चाल्लय ते बघून बर्याच वेळेला या धड्याची आठवण आली आणि हळूहळू कळला / अजूनही कळतोय. कुणाला सावरकरांची बदनामी करायची आहे, तर कुणाला संभाजी महाराजांची. कुणाला आंबेडकरांवर चिखल उडवयचाय तर कुणाला गांधींवर. नेत्यांच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना पटतील असं नाही, पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्या घ्यायला काय हरकत आहे? तुम्ही आम्ही हे सगळं होत असताना तिथे नव्हतो आणि इतिहास लिहिताना बर्याचदा दोन बाजूनी वेगवेगळा लिहिला जातो. त्यातला जो चांगला आहे तेवढाच ठेवू, बाकीच्या गोष्टींची (ज्याने कुणाचीही बदनामी होत असेल) चर्चा जाहीर रित्या तरी टाळली पाहिजे.

In reply to by पिलीयन रायडर

चिगो 31/07/2014 - 17:30
बाबासाहेबांचा दाखला देणार्‍या लोकांना बाबासाहेब काडीभर तरी कळले असतील का हा प्रश्नच आहे..
क्या बात है, पिराताई.. १००% सहमत .. त्यातल्यात्यात आजकाल स्वतःला बाबासाहेबांचे किंवा आणखीही कुणाकुणा महापुरुषांचे समर्थक म्हणवणार्‍यांचा चेपुवर जो प्रचंड वैचारीक सावळागोंधळ आणि वायझेडपणा सुरु असतो ना, तो प्रचंड डोक्यात जातो..

In reply to by बॅटमॅन

दूकान, मैदान, ज्यादा, फत्ते (विजय), मालूम, हे शब्द अरेबिक भाषेत (मस्कतच्या) ऐकले आहेत. 'पेटी'ला संदूक म्हणतात. अरबी भाषेतही प्रदेशनिहाय बदल दिसून येतात. आपल्याकडे जसे मुंबई-पुण्याची मराठी, कोकणातील मराठी, नागपूरची मराठी वगैरे वगैरे कांही प्रमाणात वेगवेगळ्या असतात. तसेच, मस्कत, दुबई, सौदी, बाहरेन वगैरे देशांमध्ये अरेबीक थोडी थोडी बदलत जाते. तेही शब्द मुळ अरेबिक आहेत की बाहेरुन आयात केले आहेत सांगणे अभ्यासकाचेच काम असेल.

In reply to by प्यारे१

फ्रेंचमध्ये पावाला pain असा शब्द आहे, उच्चार पां किंवा पॉं, कोकणी उच्चाराशी बरंच जास्त साधर्म्य असणारा. अल्जिरीयन-फ्रेंच उच्चार मला माहित नाही. फ्रेंच, इतालियन, स्पॅनिश, पोर्तुगीज या भाषा लॅटिनोद्भव आहेत आणि बरेच शब्द सारखे आहेत. काही शब्दांची स्पेलिंग्ज कदाचित समानही असतील, पण उच्चार निरनिराळे असतात. अवांतर - नोबेलविजेता फ्रेंच कथालेखक आल्बेर कामू अल्जिरीयात जन्माला आला. --- मूळ धागालेखक - आमच्यात लोकांवर येताजाता लैन मारतात, १४ फेब्रुवारीला "लौ यू" म्हणतात. मूळ शब्द काय आहेत हे समजून त्यांचे विचित्र उच्चार, गंमतीखातर करणं निराळं असतं. आणि माहित नसताना भलते काहीतरी शब्द वापरणं निराळं. अस्मितांची गळवं टरारलेली असणं सगळ्यात जास्त विनोदी. पण तरीही जेव्हा भलते शब्द भलत्या अर्थाने बऱ्याच प्रमाणावर लोकांकडून वापरले जातात तेव्हा भाषा बदलते. वर अनुप ढेरेंनी झेरॉक्सचं उदाहरण दिलेलं आहेच. आता याच धाग्यात अशा अर्थाचा प्रतिसाद वाचला, स्लीप म्हणजे झोपणं नाही. उच्चार आणि स्पेलिंग पाहिलं तर sleep या शब्दाचा उच्चार-लेखन स्लीप आणि slip चा उच्चार-लेखन स्लिप असंच पाहिजे. pen, pane, pain या तीन इंग्लिश शब्दांचे उच्चारही निरनिराळे आहेत, पेन्, पेन आणि पेऽन. पण लक्षात कोण घेतं!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी म्हणतो नेहमी आपणच लक्ष का द्यायच? इथे आपली मराठी सांभाळायची/वाढवायची सोडुन इतर भाषांच्या शुद्धतेची काळजी आपणच का घ्यावी. त्यांनी योग चे योगा केले, आपणही योगा असेच म्हणतोय. तुम्ही त्यांना सांगा ना ते की ते योग आहे. त्यांना ही करु द्या ना चुकांची दुरुस्ती. महत्वाचा मुद्दा असा की आधी आपले घर व्यवस्थित आवुया लावुया आणि मग इतरत्र बघुया. इथे मला युरोपातले उदाहरण द्यावेसे वाटते. हे लोक स्पष्ट सांगतात की इंग्रजी परकीय भाषा आहे. ती आम्ही फक्त अत्यावश्यक वेळीच वापरु. मला त्यात काही चुकिचे वाटत नाही. बहुतेक भारतिय इंग्रजीबहुल देशात वास्तव्यास असल्याने त्यांना इतर भाषिय देशातला अनुभव नसतो. माझा अनुभव असा आहे की युरोपातले लोकही शक्यतो त्यांच्या भाषेतिल वाक्ये कामचलाउ इंग्रजीत रुपांतरित करतात आणि ती खपतातही. मी सुद्धा बरिच मराठी वाक्ये दॉईच भाषेत रुपांतरीत करतो. तुर्तास इतकेच.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्यारे१ 30/07/2014 - 18:52
आभार्स. फ्रेन्च फुटबॉल पटू झिनेदाईन झिदान जन्मानं अल्जिरियाचाच. (डूक्करमुसंडी वाला) 'पां' च आहे. 'लेऐ (lait) एत पां' :) बाकी फ्रेंच लोक्स नि फ्रेंच भाषेला टेम्पोत बसवायलाच हवंय. लिहीतात काय नि बोलतात काय. बोबडी वळते राव. आधी शिकलो असतो तर कदाचित जमलं असतं.

In reply to by प्यारे१

लिहीतात काय नि बोलतात काय. बोबडी वळते राव.
फ्रेंचचे उच्चाराचे नियम इंग्लिशपेक्षा निराळे आहेत. ते एकदा समजले की बरंच फ्रेंच सहज वाचता येतं ... अगदी अर्थ समजला नाही तरीही. (पण उच्चार समजला म्हणून फ्रेंच स्पेलिंग लिहीता येईल का हे मला माहित नाही; जे इंग्लिशबद्दल मला म्हणता येतं.) फ्रेंचमधल्या 'र'चा उच्चार किती मराठी लोकांना जमेल याबद्दल मला बरंच कुतूहल आहे. मला तरी तो जमत नाही. --- केदार-मिसळपाव -
इथे आपली मराठी सांभाळायची/वाढवायची सोडुन इतर भाषांच्या शुद्धतेची काळजी आपणच का घ्यावी. त्यांनी योग चे योगा केले, आपणही योगा असेच म्हणतोय.
माझ्या कागदोपत्री नावाची आणि टोपणनावांची उच्चार आणि लेखन दोन्हींमध्ये वाट लावणारे उच्चशिक्षित मराठी लोक मला लहानपणापासून माहित आहेत. लोकांचे उच्चार आणि शुद्धलेखन सुधारण्यात घालवण्याइतपत वेळ माझ्याकडे नाही याची जाणीव मला लहानपणापासूनच झाली. त्यामुळे परदेशी लोकांनासुद्धा मी त्यांना झेपेल तोच उच्चार सांगते. ज्यांना करायचंय त्यांनी करावं. फक्त दुसरा कोणी अमक्या पद्धतीने वागतो म्हणून मी ते करत नाही. किंवा दुसरा कोणी आवडीने मला नावडणारी गोष्ट खात असेल तर मी त्यांना अडवायलाही जात नाही. माझं मराठी (हिंदी, इंग्लिश, फ्रेंच) फार चांगलं आहे अशातला भाग नाही; निदान आहे त्यापेक्षा सुधारण्याचा प्रयत्न करते हे माझ्यापुरतं मला पुरेसं आहे.

In reply to by बॅटमॅन

'पगार' हा शब्द पोर्तुगिज आहे? माझ्या ऐकिव माहिती नुसार हा उर्दूतून आला आहे. पूर्वी श्रीमंतांच्या पदरी 'आश्रीत' असायचे त्यांना 'हातखर्चा'साठी जे पैसे दिले जायचे त्याला 'पगार' म्हणत.
मराठीत (वा हिंदीत) बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर होणे नित्याचेच आहे. पण त्यातही चुकीच्या शब्दांचा वापर पाहिला की हसावे की रडावे ते कळत नाही. आणि हा वापर इतका भक्तिभावे होतो की वाटावे हे जणू मराठीच शब्द आहेत. काही उदाहरणे देत आहे. १) Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्‍याची 'कीव' कराविशी वाटते. २) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट' ३) Bicycle करिता 'सायकल' ४) पती/पत्नी करीता अनुक्रमे मिस्टर/मिसेस.

जीवन विमा/आरोग्य विमा माहिती हवी

तुषार काळभोर ·

चौकटराजा 25/07/2014 - 16:16
आपण माणसे आयुर्विमा काढतो. तो आपल्यासाठी नाही हे प्रथम लक्षांत घ्या. आपण जन्माला येतो ते त्यागासाठी की भोगासाठी याचा विचार पक्का करा. आपण मेल्यानंतर आपण फक्त वर्ष श्राद्धाचे धनी असतो हे कटू सत्य ध्यानात घ्या. तेंव्हा आपल्या बायकोवरचे प्रेम , मुलांवरचे वात्सल्य असे विषय घेऊन तुम्हाला इमोशनली विकत घेणार्‍या विमा कंपन्यांच्या जाहिरातीच्या प्रभावाखाली मुळीच येऊ नका. पण याचा अर्थ आपले आयुष्याला एक आणखी मिती प्राप्त करून देणार्‍या बायकामुलांच्या भवितव्याचा, कदाचित आपल्या मागे आपले आईवडील जिवंत राहिले तर त्यांच्या बायकोवर पडणार्‍या जबाबदारीचा विचार हा हवाच.सुरूवातीस जास्त विमा घेऊन पुढे पुढे कमी कमी रक्क्म करा. कारण तुम्ही त्याना पोसण्याची तुमची कर्तव्यता बर्‍यापैकी पाळलेली असते. आयुर्विमा एक गुंतवणूक म्हणून कुचकामी आहे.

वामन देशमुख 25/07/2014 - 16:30
२. टर्म विमा क्लेम नाकारला जाणं हे, मृत्युनंतर घरच्यांसाठी एक दु:स्वप्न होऊ शकते. नाकारण्याची कारणे काय असू शकतात? आपल्या विम्याचा क्लेम नाकारला जाऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी. यावरील चर्चेच्या प्रतीक्षेत.

In reply to by वामन देशमुख

धन्या 25/07/2014 - 17:10
टर्म इन्शुरन्सचे क्लेम काही लाखाच्या (बरेच वेळा पंचवीस लाखांपासून पुढे) घरात असतात. आपल्या खिशातून पैसे काढून दुसर्‍याला देणं कुणालाही जडच जाते, मग ती विमा कंपनी का असेना. विमा हा धोका वाटून घेणे अर्थात रिस्क शेअरींग असते. उदा. एका कंपनीने दहा जणांकडून विम्याचे हप्त्यांच्या स्वरुपात पैसे घ्यायचे आणि त्याच पैशातून त्या दहा जणांपैकी जे मृत होतील त्यांच्या वारसदारांना विमानिधी (सम अ‍ॅश्युअर्ड) दयायचा, म्हनजेच क्लेम सेटल करायचे असा प्रकार असतो. त्यामुळे जितके क्लेम कमी तितका विमाधारकांना दयावा लागणारा पैसा कमी. पर्यायाने तितका जास्त विमा कंपनीचा नफा. एखादा पन्नास लाखाच्या पॉलीसीचा क्लेम विमा कंपनीने नाकारणे म्हणजे पन्नास लाख कंपनीला विमाधारकाच्या वारसास देणे नाकारणे असा साधा हिशोब असतो. या सार्‍या गणितांमुळे विमा कंपन्या क्लेम नाकारण्याचे प्रयत्न करतात. त्यासाठी विमा कराराच्या अटींमधील पळवाटा शोधल्या जातात. आपण सामान्य माणसे विमा एजंटांकडून विमा पॉलीसी घेतो. ते कागदपत्रांवर "साहेब इथे सही करा, तिथे सही करा" असे म्हणतील तिथे आपण सह्या करतो. विमा पॉलीसीच्या अटी वाचतच नाही. अशीच आपल्याकडून पुर्तता न होणारी अट विमा कंपनी क्लेम नाकाराण्यासाठी वापरते. बरेच वेळा टर्म पॉलीसी घेताना ग्राहकाकडून धुम्रपान, धुम्रपान तसेच गंभीर आजार यांचा उल्लेख टाळला जातो. पुढे जेव्हा क्लेम येतो आणि विमा कंपनीच्या लक्षात येते की विमा ग्राहकाने विमा घेताना माहिती दडवली होती. अर्थातच कंपनी या मुद्दयाचा वापर करुन क्लेम नाकारु शकते. आपण विमा ग्राहक म्हणून काय करावे: १. आपणास धुम्रपान, मदयपान अशा सवयी असल्यास विमा अर्जात त्याचा स्पष्ट उल्लेख करावा. २. आपणासं काही गंभीर आजार असल्यास विमा अर्जात त्याचा स्पष्ट उल्लेख करावा. ३. काही गंभीर आजार असल्या तो विमा पॉलीसीमध्ये कव्हर होतो का त्याची विमा कंपनीकडून खात्री करुन घ्यावी. ४. विमा पॉलीसी स्विकारण्यापूर्वी त्या पॉलीसीचे पॉलीसी डॉक्युमेंट बारकाईने वाचावे. ज्या बाबी आपल्याला कळलेल्या नसतील त्या विमा कंपनीच्या प्रतिनीधीकडून समजून घ्याव्यात. ५. पॉलीसी मंजूर झाल्यानंतर विमा कंपनी ग्राहकास विशीष्ट दिवसांचा अवधी देते. या कालावधीत ग्राहकास पॉलीसी कॅन्सल करण्याची संधी असते. या कालावधीस "कुलींग ऑफ" पिरियड म्हणतात. हा कालावधी साधारणपणे १४ दिवसांचा असतो. या कालावधीत पॉलीसी कॅन्सल केल्या विमा कंपनी पॉलीसी मंजूर करण्यासाठीचा मोबदला म्हणून काही रक्कम कापून घेउन उरलेल्या आपण भरलेले आपले पहिल्या हप्त्याचे पैसे परत करते.

In reply to by धन्या

धमाल मुलगा 25/07/2014 - 18:41
लै भारी धन्या. बहुतांश क्लेम्स हे आजार/व्यसनं विमा कंपनीपासून लपवणं आणि ड्रिंक & ड्राईव्ह केसेस ह्या बाबतीत नाकारलेले ठाऊक आहेत. आरोग्यविम्यासंदर्भात : माझ्या ऐकिवात कॉर्पोरेट पॉलिसी असतील तर विशेष त्रास नाही, मात्र वैयक्तिक विमा असेल तर विमा कंपन्या छळतात, कुठे ६०%च दे, ७०% दे असं करतात असं पाहण्यात आहे. त्यासंदर्भात काय काळजी घ्यावी हे मात्र अजून नीट कळालेलं नाही.

In reply to by धमाल मुलगा

धन्या 25/07/2014 - 19:08
माझ्या ऐकिवात कॉर्पोरेट पॉलिसी असतील तर विशेष त्रास नाही
कॉर्पोरेट पॉलिसीमध्ये ग्राहकाच्या पॉलीसीच्या हप्त्याची काही रक्कम ग्रहकाची कंपनी भरत असते. कंपनी एकाच वेळी आपल्या हजारो कर्मचार्‍यांचा आयुर्विमा उतरवत असते. त्यामुळे अशा कॉर्पोरेट आयुर्विमा ग्राहकाच्या क्लेम सेटलमेंटला नाटकं करणे विमा कंपनीला परवडणारे नसते. कंपनीच्या कर्मचार्‍यांनी कंपनीकडे तक्रार केल्यास ती कंपनी पुढच्या वेळी दुसर्‍या विमा कंपनीकडे जाऊ शकते.
मात्र वैयक्तिक विमा असेल तर विमा कंपन्या छळतात, कुठे ६०%च दे, ७०% दे असं करतात असं पाहण्यात आहे. त्यासंदर्भात काय काळजी घ्यावी हे मात्र अजून नीट कळालेलं नाही.
शक्यतो वैयक्तिक विमा हा आपल्या ओळखीतल्या विमा एजंटकडून घ्यावा. क्लेम करायची वेळ आली तर त्या विमा एजंटला हाताशी धरुन त्याचे विमा कंपनीतील कॉन्टॅक्ट वापरुन क्लेम सेटल करुन घेता येतो. :)

In reply to by धन्या

धमाल मुलगा 25/07/2014 - 20:06
एक मित्र स्वतः एजंट आहे, त्याच्या घरातला मेडिक्लेम असाच कमी करुन मंजूर केला गेला. तो स्वत: त्या हापिसात जाऊन तासभर भांडला तेव्हा गाडं पुढं सरकलं. आता बोला!

कपिलमुनी 25/07/2014 - 17:44
बरयाच जणांना कंपनीकडून आरोग्य विमा दिला जातो. सध्या काहीजणांचे वय ५०-५५ असेल आणि आरोग्य विमा नसेल तर फार अवघड होते कारण विमा कंपन्याचा ३ लाखांचा हप्ता १५,००० च्या आसपास जातो. आणि तो दर ५ वर्षांनी वाढत जातो . एंट्री ऐज जास्त असेल तर विमा कंपन्यांचा जास्त हप्ता सोसावा लगतो. यावर उपाय म्हणजे राष्ट्रीयीकृत बँकामध्ये बचत खात्याशी संलग्न विमा घेणे. या विम्यामधे प्री मेडिकल चेक अप नसते आणि ५ लाखांसाठी साधारण ६५००-७३०० एवढा वार्षिक हप्ता असतो . जो ( हा आरोग्य विमा वय ७९ वर्षे पर्यंत असतो)७९ वर्षे तेवढाच राहातो. महाराष्ट्र बँक मधे एंट्री ऐज ६५ वर्षे आणि पंजाब नॅशनल बँक मधे एंट्री ऐज ७९ वर्षे आहे. महाराष्ट्र बँक स्वास्थ योजना पंजाब नॅशनल बँक या दुव्यांवर माहिती पत्रके आणि अर्ज आहेत . त्यामध्ये संपूर्ण माहिती आहे.

In reply to by कपिलमुनी

आई वडिलांसाठी कोणता विमा घ्यावा या विवंचनेत होतो. floater policy त हफ्ता फारच मोठा होतो. जवळपास ४० हजार. याउलट PNB त खाते उघडलेले बरे. १२ हजारांत दोघांनाही ३ लाखाचे कवर मिळते. सल्ल्याबद्दल धन्यवाद..

In reply to by कपिलमुनी

दोन्ही बँकांच्या योजना किफायतशीर आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असणार्‍या कुटुंबांसाठी. यांच्या क्लेम प्रोसेस चा /क्लेम मान्यतेचा/क्लेम धुडकावण्याचा कोणास अनुभव आहे का?

In reply to by तुषार काळभोर

एस 25/08/2014 - 05:39
उपयुक्त माहिती.
यांच्या क्लेम प्रोसेस चा /क्लेम मान्यतेचा/क्लेम धुडकावण्याचा कोणास अनुभव आहे का?
असाच प्रश्न मलाही पडलाय.

आयुर्हित 25/07/2014 - 22:05
सर्वात महत्वाचे: १)प्रत्येक विमा योजनेत काहि मुद्दे हे वगळलेले(exclusions)असतात. विमा योजना घेण्याआधि ते काळजीपुर्वक पहावे लागतात. नाहितर विमा घेवुन सुद्धा त्याचा पूर्ण फायदा होवु शकत नाही. २)जेवढे मुद्दे हे वगळलेले(exclusions)असतील तेवढा हफ्ता(premium)कमी होत असतो. त्यामूळे जेवढी स्वस्त पॉलिसी तेवढिच आपण घेत असलेली जोखिम(risk)जास्त असते.जर अशा वेळी वगळलेल्या मूद्दयावरुन दावा(claim)आला तर ते पैसे आपल्याला आपल्या खिशातुनच भरावे लागते.मग ओळखीतल्या विमा एजंट अथवा विमा कंपनीचा व्यवस्थापक असला तरी त्याचा उपयोग होत नसतो. ३)प्रत्येक कंपनिच्या योजनेत अनेक फरक, फायदे व तोटे सुद्दा असतात. सफरचंद व नारींगी यात गुणात्मक व दराबाबत फरक हा नेहमीच असतो, दोघांची तुलना होवु शकत नाहिच. तेव्हा एक जाणकार व अनुभवी पॉलिसी एजंट कडुनच विमा पॉलिसी घेतली पाहीजे. असा जाणकार हा प्रत्येक ग्राहकाची गरज समजूनच विमा सुचवित असतो. कारण प्रत्येक ग्राहकाची गरज ही भिन्न भिन्न असते कारण त्याचे व कुटुंबियांचे वय, आर्थिक परिस्थिती,जोखिम घेण्याची वॄत्ती, आजारांबाबत कुटुंबाचा इतिहास आणि भविष्यातील होवू शकणारे आजार, व्यवसाय व व्यवसायामूळे होणारे आजार/त्रास (occupational hazards) यात जमीन आसमानाचा फरक असतो. आरोग्य हा माझा आवडता प्रांत आहे. मला आपल्या गरजा कळवल्या तर यावर अधिक सखोल मार्गदर्शन मी नक्किच करु शकेल, याची खात्री आहे. धन्यवाद.

In reply to by आयुर्हित

धन्या 25/07/2014 - 23:07
तेव्हा एक जाणकार व अनुभवी पॉलिसी एजंट कडुनच विमा पॉलिसी घेतली पाहीजे.
जोक ऑफ दी ईयर. :) आजू-बाजूला नजर टाकली तर चिकाटीने लोकांचा पिच्छा पुरवून अनावश्यक पॉलिसी लोकांच्या गळ्यात मारणारे विमा एजंटच दिसतात.
असा जाणकार हा प्रत्येक ग्राहकाची गरज समजूनच विमा सुचवित असतो. कारण प्रत्येक ग्राहकाची गरज ही भिन्न भिन्न असते कारण त्याचे व कुटुंबियांचे वय, आर्थिक परिस्थिती,जोखिम घेण्याची वॄत्ती, आजारांबाबत कुटुंबाचा इतिहास आणि भविष्यातील होवू शकणारे आजार, व्यवसाय व व्यवसायामूळे होणारे आजार/त्रास (occupational hazards) यात जमीन आसमानाचा फरक असतो.
असा विमा एजंट मला भेटला तर मी त्याला दुर्वांकूरला जेऊ घालेन. :)
आरोग्य हा माझा आवडता प्रांत आहे. मला आपल्या गरजा कळवल्या तर यावर अधिक सखोल मार्गदर्शन मी नक्किच करु शकेल, याची खात्री आहे.
यात काही गर्भित अर्थ नाही असं गृहीत धरतो. :)

In reply to by धन्या

नाखु 28/07/2014 - 16:14
खरी बाब. विमा एजंटाची गोम अशी कि जे त्यांना (किंवा विमा कंपनीला) विकायचेय तेच आणि तेव्हढच कसं तुमच्या फायद्याचं आहे हे वारंवार पटवून देतात्.तुम्हाला काय आवश्यक आणि उपयुक्त आहे त्याच्याशी यांना काही घेणे/देणे नसते.टर्म ईंश्य्रन्स सुचविणारा एजंट माझ्या पाह्ण्यात नाही उलट मनीबॅक्चा घोशा लावणारेच जास्ती पाहिलेत.(लोकसत्ता मध्ये याचे "चिरफाड विश्लेषण" वाचले कि खरी बाब समजते.) टीपःजवळचे ३-४ मित्र २.५ ते ३.५ नातेवाईक विमा एजंट अस्लेला तरी अजून गळाला न लागलेला एक भावी "विमेकरी"

In reply to by आयुर्हित

तेव्हा एक जाणकार व अनुभवी पॉलिसी एजंट कडुनच विमा पॉलिसी घेतली पाहीजे.
हं आता समजलं...!! मला "व्यनीच" करा अशा आग्रहा मागचं कारण...!!

पाषाणभेद 26/07/2014 - 01:31
ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस बाबत काय म्हणणे आहे? ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस मध्ये एजंट येत नाही. त्यामुळे खरोखर हप्त्यात बचत होते काय? तसेच क्लेम सेटलमेंटला काही अडचणी येतात काय?

In reply to by पाषाणभेद

पाषाणभेद 26/07/2014 - 01:35
ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस एका खाजगी कंपनीकडून काढला असता खुप चांगली सर्व्हीस मिळाली. विमादेखील लगोलग दिला गेला. परंतू भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीने नुकताच ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस चालू केल्याने त्यांच्याकडे याबाबत चौकशी करणारा ईमेल पाठवला असता अजून उत्तरदेखील आलेले नाही. ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस विकतांना कमीतकमी ऑनलाईन चौकशी होईल असे त्यांना वाटत नाही काय? असलीच परिस्थीती असेल तर "भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीकडून" ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस काढावा काय? "भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" आणि "खाजगी विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" यात क्लेम सेटलमेंटबाबत काय अनुभव आहे?

In reply to by पाषाणभेद

धन्या 26/07/2014 - 10:39
ती सर्वात मोठी भारतातील विमा कंपनी सरकारी कंपनी आहे. त्यामुळे तुम्हाला जो अनुभव आला त्यात नवल असे काही नाही.
"भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" आणि "खाजगी विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" यात क्लेम सेटलमेंटबाबत काय अनुभव आहे?
या प्रश्नाचे उत्तर इतक्यात मिळणार नाही. मुळात टर्म इंन्श्यूरंस ही गोष्ट विमा बाजारात आता आता रुजू लागली आहे. काल परवापर्यंत विमा पॉलीसी एन्डॉवमेंट आणि मनी बॅक प्रकारातील असायच्या. त्यातही "खाजगी विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" हा प्रकार तर नुकताच सुरु झाला आहे. त्यामुळे क्लेम सेटलमेंटचा विदा इतक्या लवकर उपलब्ध होणार नाही.

In reply to by पाषाणभेद

धन्या 26/07/2014 - 10:51
भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या ग्राहक सेवा केंद्रात मी एक प्रश्न विचारला: तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स काढला तर भरावा लागणारा हप्ता हा त्याच त्याच अटींवर काढलेल्या खाजगी कंपनीच्या ऑनलाईन टर्म इन्शुरन्सच्या हप्त्यापेक्षा खुपच जास्त आहे. मी स्वतः टर्म इन्शुरन्स घेताना हा फरक वार्षिक हप्त्यासाठी सात हजार इतका होता. असे का? त्यांचे उत्तरः क्लेम सेटल करायचेच नसतील तर विमा हप्ता अगदी वर्षाला दोन हजार असला तरी कंपनीचा फायदाच असतो. माझा प्रतिप्रशनः तुम्ही हे ईतक्या ठामपणे कसे म्हणू शकता? त्यांचे उत्तरः मी या क्षेत्रात वीस वर्षांपेक्षा अधिक काम केलंय, त्या अनुभवाच्या जोरावर. संभाषण संपले. :) याच प्रश्नाचे उत्तर मी इतरत्र शोधले असता मिळालेले उत्तरः ऑनलाईन टर्म इन्श्युरन्स घेणारा ग्राहकवर्ग सुशिक्षित असून आरोग्याच्या बाबतीत जागरुक असतो. वेळोवेळी विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या आणि उपचार करुन घेत असतो. त्यामुळे जोखीम कमी असते. जोखीम कमी तर विम्याचा हप्ता कमी.

In reply to by धन्या

(१) धनाजीरावांनी दिलेल्या सुचना महत्वाच्या आहेत, त्यात सर्वकाही आलेच आहे एक मुद्दा जोडतो...मोठ्या रकमेचा विमा उतरवताना कंपनी प्रतिनिधीकडे स्खोल आणि सर्वंकष वैद्यकीय चाचण्या करुन घेण्याचा आग्रह धरा ( याचा खर्च विमा कंपनीच करीत असते) वय वा अन्य मुद्द्यांमुळॅ देत असलेली नॉन मेडिकल पॉलिसी शक्यतो टाळा, कोण्त्याही स्थितीत 'decleration of good health' वा तत्सम परिशिष्टावर स्वाक्षरी करुन पॉलिसी घेउ नका. (२) सेटल करायचेच नसतील तर विमा हप्ता अगदी वर्षाला दोन हजार असला तरी कंपनीचा फायदाच असतो....... या विषयी भारतातल्या प्रमुख विमा कंपन्यांचे 'क्लेम सेटलेमेंट रेशो' प्रसिद्ध होत असतातच. तेथे पडताळणी करा... दुघ का दुघ होवुन जाईल http://www.mintwise.com/claims-settlement-ratio-2012-2013/ (३) कोणत्याही व्यक्तीला युनिट लिन्क्ड, एंडॉन्मेंट पोलिसी न विकता व वैयक्तीक पातळीवर टर्म वगळता अन्य कोणत्याही प्रकारच्या पॉलिसीज् घेण्यापासुन पराव्रुत्त करुनही मी MDRT आणि सर्वोच्च वर्गातील क्लब मेंबर झालो आहे..... धनाजीराव, चला , दुर्वाकुरला भेटुयात. .

In reply to by प्रसाद भागवत

धन्या 28/07/2014 - 19:04
(३) कोणत्याही व्यक्तीला युनिट लिन्क्ड, एंडॉन्मेंट पोलिसी न विकता व वैयक्तीक पातळीवर टर्म वगळता अन्य कोणत्याही प्रकारच्या पॉलिसीज् घेण्यापासुन पराव्रुत्त करुनही मी MDRT आणि सर्वोच्च वर्गातील क्लब मेंबर झालो आहे..... धनाजीराव, चला , दुर्वाकुरला भेटुयात. .
एक नंबर सर. तुमच्यासारख्या वित्त सल्लागारांची देशाला गरज आहे. :) आपण भेटूयात आणि दुर्वांकुरला जेवणही घेऊया. (मी मुळचा पुणेकर नसल्यामुळे जेवणाच्या आमंत्रणाच्या बाबतीत निश्चिंत राहावे.)

In reply to by पाषाणभेद

आयुर्हित 26/07/2014 - 11:02
कालच रिलायंस लाइफ च्या वेब साईटवरुन ऑनलाईन इंन्श्यूरंस घेण्यासाठी माझी माहिती भरली. नंतर त्यांचे सर्व टर्म्स आणि कंडिशन्स मान्य असल्याबद्दल एका बॉक्स मध्ये टि़क करुनच पूढे दुसर्‍या पानावर जाता येत होते. टर्म्स आणि कंडिशन्स मध्ये The policy document issued to you may contain certain specific terms, conditions and rates. You are advised to go through the document carefully. असे वाक्य आहे. हे सर्व वाचून १००% अर्थ समजुन घेणे आवश्यक आहे. तरच ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस चा फायदा होईल. (महत्वाचे वगळलेले मुद्दे(exclusions) समजुन घेणे अती आवश्यक आहे.) हप्त्यात बचत नक्किच होते परंतु क्लेम सेटलमेंटला मदत कोणाची घेणार? त्या कंपनिचे स्थानिक कार्यालयही त्यात रस घेत नाहि. कारण ते केंद्रिय कार्यालयातुनच (रिलायंस लाइफच्या केस मध्ये चेन्नईला आहे)होणार असते. मग अशा वेळी जाणकार त्याला काहीही फायदा नसतांना कसा मदत करेल? हा विचार करुनच विमा घ्यावा.

धन्या 26/07/2014 - 10:31
विमा एजंटांना विमा पॉलीसीवर किती कमिशन मिळते या प्रश्नाचे उत्तर मी खुप पूर्वी शोधले असता जागो इन्व्हेस्टर या प्रख्यात संकेतस्थळावर उत्तर मिळाले: The commissions are 25% in first year ,7.5% in 2nd and 3rd year and 5% their after.

सुबोध खरे 26/07/2014 - 10:58
एल आय सी या सरकारी कंपनी कडे तुम्ही सरळ गेलात तर तुम्हाला ते भिक घालत नाहीत. एजंट तुम्हाला त्यांना(स्वतःला) सर्वात फायदेशीर अशी पॉलिसी च विकण्याचा प्रयत्न करताना दिसेल. (तुमच्या फायद्याची पॉलिसी जर विकेल तर त्याच्या खाण्याचे वांधे होतील). आयुर्विमा महामंडळाची ऑन लाईन पॉलिसी येण्याला त्यांच्या प्रचंड पसरलेल्या एजंटांच्या जाळ्याचा जोरदार विरोध आहे म्हणून ते प्रकरण आस्ते कदम चालू आहे. खाजगी कंपन्यांचा ऑन लाईन विम्याला पाठींबा असण्याचे साधे कारण एकाच आहे त्याला लागणारा पायाभूत सुविधांचा खर्च फार कमी आहे. एकाधिकार शाही इतकी वर्षे गाजविल्यावर "आपले योगक्षेम" उत्तम चालवल्यावर आयुर्विमा महामंडळाची या क्षेत्रात असलेली आगेकूच आता बरीच कमी झाली असल्याने क्लेम सेटल मेंटचे एक तुणतुणे ते वाजवीत आहेत(त्यात थोडेफार तथ्य आहे). बाकी ग्राहक न्यायालयात सर्वात जास्त खटले सरकारी आरोग्य विमा कंपन्यांविरुद्ध आहेत हि गोष्ट आपण लक्षात घेत्लीत तर वस्तुस्थिती आपल्या लक्षात येइल. क्रमशः

In reply to by सुबोध खरे

धन्या 26/07/2014 - 11:10
तुमच्या फायद्याची पॉलिसी जर विकेल तर त्याच्या खाण्याचे वांधे होतील
काही नगण्य अपवाद सोडले तर विमा एजंट टर्म पॉलीसीचे नावसुद्धा घेत नाहीत ते याच कारणासाठी. टर्म पॉलीसीवर विमा एजंटांना सर्वात कमी कमिशन मिळते. त्यामुळे टर्म पॉलीसी ही ग्राहकासाठी सर्वोत्तम पॉलीसी असली तरी ते ग्राहकाच्या गळयात मात्र एन्डोवमेंट आणि मनी बॅक पॉलीसीच मारतात.

सुजल 24/08/2014 - 21:34
राष्ट्रीयीकृत बँकामध्ये बचत खात्याशी संलग्न "आरोग्य विमा" विमा एजंट कडुन मिळतो का ?

दादा कोंडके 24/08/2014 - 22:52
परवा ऑफिसमध्ये याच विषयावर सहकार्‍यांशी चर्चा करताना लक्षात आलं की जवळ जवळ सगळ्यांचंच एलायसी मध्ये एन्डोवमेंट किंवा तत्सम गळ्यात मारलेल्या पॉलिसीज आहेत. आंतरजालामुळे आत्तात्ता थोडिशी जागरुकता वाढली आहे त्यामुळे लोकं मनीकंट्रोल, वॅल्युरिसर्चऑनलाईन वगैरे वाचत आहेत. प्रत्येकांच्या वडिलांच्या मित्राने किंवा नातेवाईकांनी पोलिसी विकली होती आणि नकळून आणि आवडलेली नसून सुद्धा बहुतेकवेळा सोशल प्रेशरमुळे ती घेतली गेली होती. (अवांतरः सहज उत्सुकता म्हणून या एजंटांची अगदी दहा-बारा लोकांना नावं विचारल्यावर ही सगळीच एका विशिष्ठ जातीतली लोकं निघाली. ;) ). या पोलिसीजचे रिटर्न्स ५-६% पेक्षाही कमी असतात आणि सरेंडरकेल्यामुळे तेव्ह्डच नुकसान होतं. त्यामुळे हे अवघड जागेचं दुखणं होउन बसतं. मी सुद्धा सहावर्षापुर्वी एका युलिप पोलीसीमध्ये एका एजंटच्या ससेमिर्‍याला कंटाळून पैसे गुंतवले होते. साधारण आता त्याची किंमत साधारण ७% दराने मिळते आहे आणि त्यामुळे सरेंडर करण्याचा दोनदा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी, इतके दिवस थांबलाच आहात तर अजुन एक-दोन महिन्यानंतर मार्केट वर गेल्यावर काढा असा सल्ला देण्यात आला. जास्त नॅव्ह आलेकी आम्हीच तुम्हाला फोन करू असंही आश्वासन देण्यात आलं. दुसर्‍यावेळी तर अजून दुसरीच एक पॉलिसी गळ्यात मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एक चांगलाच धडा घेतला आहे. एजंटांचा सल्ला कधिही घ्यायचा नाही. त्यापेक्षा दोनेक हजार खर्च करून व्यावसायीक प्लॅनरचा सल्ला घ्यावा.

In reply to by दादा कोंडके

हवालदार 25/08/2014 - 01:57
तुमचे मित्रही त्याच विशिष्ठ जातीतले आहेत काय ??? प्रत्येकांच्या वडिलांच्या मित्राने किंवा नातेवाईकांनी पोलिसी विकली होती म्हणून म्हण्टले विचारावे. क्रु.ह.घे.

मॄत्यूनंतर जीवनवीम्याचे (विशेषतः टर्म इन्श्युरन्स) क्लेम मंजूर/नामंजूर होण्याचे, तसेच आरोग्यविम्याच्या क्लेम सेटलमेंटचे बरे-वाईट अनुभव कोणाला आहेत का (विशेषतः स्वतः घेतलेल्या आरोग्यविम्याच्या बाबतीत. कारण एम्प्लॉयर तर्फे मिळणार्‍या आरोग्यविम्याचे सेटलमेंटच्या बाबतीत बहुतेक काही समस्या येत नाहीत)? माझ्या कुटुंबात अजून पर्यंत जीवनविमा/आरोग्यविमा क्लेम करायची आवश्यकता पडलेली नाही, त्यामुळे मला वैयक्तिक अनुभव नाहीये.

चौकटराजा 25/07/2014 - 16:16
आपण माणसे आयुर्विमा काढतो. तो आपल्यासाठी नाही हे प्रथम लक्षांत घ्या. आपण जन्माला येतो ते त्यागासाठी की भोगासाठी याचा विचार पक्का करा. आपण मेल्यानंतर आपण फक्त वर्ष श्राद्धाचे धनी असतो हे कटू सत्य ध्यानात घ्या. तेंव्हा आपल्या बायकोवरचे प्रेम , मुलांवरचे वात्सल्य असे विषय घेऊन तुम्हाला इमोशनली विकत घेणार्‍या विमा कंपन्यांच्या जाहिरातीच्या प्रभावाखाली मुळीच येऊ नका. पण याचा अर्थ आपले आयुष्याला एक आणखी मिती प्राप्त करून देणार्‍या बायकामुलांच्या भवितव्याचा, कदाचित आपल्या मागे आपले आईवडील जिवंत राहिले तर त्यांच्या बायकोवर पडणार्‍या जबाबदारीचा विचार हा हवाच.सुरूवातीस जास्त विमा घेऊन पुढे पुढे कमी कमी रक्क्म करा. कारण तुम्ही त्याना पोसण्याची तुमची कर्तव्यता बर्‍यापैकी पाळलेली असते. आयुर्विमा एक गुंतवणूक म्हणून कुचकामी आहे.

वामन देशमुख 25/07/2014 - 16:30
२. टर्म विमा क्लेम नाकारला जाणं हे, मृत्युनंतर घरच्यांसाठी एक दु:स्वप्न होऊ शकते. नाकारण्याची कारणे काय असू शकतात? आपल्या विम्याचा क्लेम नाकारला जाऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी. यावरील चर्चेच्या प्रतीक्षेत.

In reply to by वामन देशमुख

धन्या 25/07/2014 - 17:10
टर्म इन्शुरन्सचे क्लेम काही लाखाच्या (बरेच वेळा पंचवीस लाखांपासून पुढे) घरात असतात. आपल्या खिशातून पैसे काढून दुसर्‍याला देणं कुणालाही जडच जाते, मग ती विमा कंपनी का असेना. विमा हा धोका वाटून घेणे अर्थात रिस्क शेअरींग असते. उदा. एका कंपनीने दहा जणांकडून विम्याचे हप्त्यांच्या स्वरुपात पैसे घ्यायचे आणि त्याच पैशातून त्या दहा जणांपैकी जे मृत होतील त्यांच्या वारसदारांना विमानिधी (सम अ‍ॅश्युअर्ड) दयायचा, म्हनजेच क्लेम सेटल करायचे असा प्रकार असतो. त्यामुळे जितके क्लेम कमी तितका विमाधारकांना दयावा लागणारा पैसा कमी. पर्यायाने तितका जास्त विमा कंपनीचा नफा. एखादा पन्नास लाखाच्या पॉलीसीचा क्लेम विमा कंपनीने नाकारणे म्हणजे पन्नास लाख कंपनीला विमाधारकाच्या वारसास देणे नाकारणे असा साधा हिशोब असतो. या सार्‍या गणितांमुळे विमा कंपन्या क्लेम नाकारण्याचे प्रयत्न करतात. त्यासाठी विमा कराराच्या अटींमधील पळवाटा शोधल्या जातात. आपण सामान्य माणसे विमा एजंटांकडून विमा पॉलीसी घेतो. ते कागदपत्रांवर "साहेब इथे सही करा, तिथे सही करा" असे म्हणतील तिथे आपण सह्या करतो. विमा पॉलीसीच्या अटी वाचतच नाही. अशीच आपल्याकडून पुर्तता न होणारी अट विमा कंपनी क्लेम नाकाराण्यासाठी वापरते. बरेच वेळा टर्म पॉलीसी घेताना ग्राहकाकडून धुम्रपान, धुम्रपान तसेच गंभीर आजार यांचा उल्लेख टाळला जातो. पुढे जेव्हा क्लेम येतो आणि विमा कंपनीच्या लक्षात येते की विमा ग्राहकाने विमा घेताना माहिती दडवली होती. अर्थातच कंपनी या मुद्दयाचा वापर करुन क्लेम नाकारु शकते. आपण विमा ग्राहक म्हणून काय करावे: १. आपणास धुम्रपान, मदयपान अशा सवयी असल्यास विमा अर्जात त्याचा स्पष्ट उल्लेख करावा. २. आपणासं काही गंभीर आजार असल्यास विमा अर्जात त्याचा स्पष्ट उल्लेख करावा. ३. काही गंभीर आजार असल्या तो विमा पॉलीसीमध्ये कव्हर होतो का त्याची विमा कंपनीकडून खात्री करुन घ्यावी. ४. विमा पॉलीसी स्विकारण्यापूर्वी त्या पॉलीसीचे पॉलीसी डॉक्युमेंट बारकाईने वाचावे. ज्या बाबी आपल्याला कळलेल्या नसतील त्या विमा कंपनीच्या प्रतिनीधीकडून समजून घ्याव्यात. ५. पॉलीसी मंजूर झाल्यानंतर विमा कंपनी ग्राहकास विशीष्ट दिवसांचा अवधी देते. या कालावधीत ग्राहकास पॉलीसी कॅन्सल करण्याची संधी असते. या कालावधीस "कुलींग ऑफ" पिरियड म्हणतात. हा कालावधी साधारणपणे १४ दिवसांचा असतो. या कालावधीत पॉलीसी कॅन्सल केल्या विमा कंपनी पॉलीसी मंजूर करण्यासाठीचा मोबदला म्हणून काही रक्कम कापून घेउन उरलेल्या आपण भरलेले आपले पहिल्या हप्त्याचे पैसे परत करते.

In reply to by धन्या

धमाल मुलगा 25/07/2014 - 18:41
लै भारी धन्या. बहुतांश क्लेम्स हे आजार/व्यसनं विमा कंपनीपासून लपवणं आणि ड्रिंक & ड्राईव्ह केसेस ह्या बाबतीत नाकारलेले ठाऊक आहेत. आरोग्यविम्यासंदर्भात : माझ्या ऐकिवात कॉर्पोरेट पॉलिसी असतील तर विशेष त्रास नाही, मात्र वैयक्तिक विमा असेल तर विमा कंपन्या छळतात, कुठे ६०%च दे, ७०% दे असं करतात असं पाहण्यात आहे. त्यासंदर्भात काय काळजी घ्यावी हे मात्र अजून नीट कळालेलं नाही.

In reply to by धमाल मुलगा

धन्या 25/07/2014 - 19:08
माझ्या ऐकिवात कॉर्पोरेट पॉलिसी असतील तर विशेष त्रास नाही
कॉर्पोरेट पॉलिसीमध्ये ग्राहकाच्या पॉलीसीच्या हप्त्याची काही रक्कम ग्रहकाची कंपनी भरत असते. कंपनी एकाच वेळी आपल्या हजारो कर्मचार्‍यांचा आयुर्विमा उतरवत असते. त्यामुळे अशा कॉर्पोरेट आयुर्विमा ग्राहकाच्या क्लेम सेटलमेंटला नाटकं करणे विमा कंपनीला परवडणारे नसते. कंपनीच्या कर्मचार्‍यांनी कंपनीकडे तक्रार केल्यास ती कंपनी पुढच्या वेळी दुसर्‍या विमा कंपनीकडे जाऊ शकते.
मात्र वैयक्तिक विमा असेल तर विमा कंपन्या छळतात, कुठे ६०%च दे, ७०% दे असं करतात असं पाहण्यात आहे. त्यासंदर्भात काय काळजी घ्यावी हे मात्र अजून नीट कळालेलं नाही.
शक्यतो वैयक्तिक विमा हा आपल्या ओळखीतल्या विमा एजंटकडून घ्यावा. क्लेम करायची वेळ आली तर त्या विमा एजंटला हाताशी धरुन त्याचे विमा कंपनीतील कॉन्टॅक्ट वापरुन क्लेम सेटल करुन घेता येतो. :)

In reply to by धन्या

धमाल मुलगा 25/07/2014 - 20:06
एक मित्र स्वतः एजंट आहे, त्याच्या घरातला मेडिक्लेम असाच कमी करुन मंजूर केला गेला. तो स्वत: त्या हापिसात जाऊन तासभर भांडला तेव्हा गाडं पुढं सरकलं. आता बोला!

कपिलमुनी 25/07/2014 - 17:44
बरयाच जणांना कंपनीकडून आरोग्य विमा दिला जातो. सध्या काहीजणांचे वय ५०-५५ असेल आणि आरोग्य विमा नसेल तर फार अवघड होते कारण विमा कंपन्याचा ३ लाखांचा हप्ता १५,००० च्या आसपास जातो. आणि तो दर ५ वर्षांनी वाढत जातो . एंट्री ऐज जास्त असेल तर विमा कंपन्यांचा जास्त हप्ता सोसावा लगतो. यावर उपाय म्हणजे राष्ट्रीयीकृत बँकामध्ये बचत खात्याशी संलग्न विमा घेणे. या विम्यामधे प्री मेडिकल चेक अप नसते आणि ५ लाखांसाठी साधारण ६५००-७३०० एवढा वार्षिक हप्ता असतो . जो ( हा आरोग्य विमा वय ७९ वर्षे पर्यंत असतो)७९ वर्षे तेवढाच राहातो. महाराष्ट्र बँक मधे एंट्री ऐज ६५ वर्षे आणि पंजाब नॅशनल बँक मधे एंट्री ऐज ७९ वर्षे आहे. महाराष्ट्र बँक स्वास्थ योजना पंजाब नॅशनल बँक या दुव्यांवर माहिती पत्रके आणि अर्ज आहेत . त्यामध्ये संपूर्ण माहिती आहे.

In reply to by कपिलमुनी

आई वडिलांसाठी कोणता विमा घ्यावा या विवंचनेत होतो. floater policy त हफ्ता फारच मोठा होतो. जवळपास ४० हजार. याउलट PNB त खाते उघडलेले बरे. १२ हजारांत दोघांनाही ३ लाखाचे कवर मिळते. सल्ल्याबद्दल धन्यवाद..

In reply to by कपिलमुनी

दोन्ही बँकांच्या योजना किफायतशीर आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असणार्‍या कुटुंबांसाठी. यांच्या क्लेम प्रोसेस चा /क्लेम मान्यतेचा/क्लेम धुडकावण्याचा कोणास अनुभव आहे का?

In reply to by तुषार काळभोर

एस 25/08/2014 - 05:39
उपयुक्त माहिती.
यांच्या क्लेम प्रोसेस चा /क्लेम मान्यतेचा/क्लेम धुडकावण्याचा कोणास अनुभव आहे का?
असाच प्रश्न मलाही पडलाय.

आयुर्हित 25/07/2014 - 22:05
सर्वात महत्वाचे: १)प्रत्येक विमा योजनेत काहि मुद्दे हे वगळलेले(exclusions)असतात. विमा योजना घेण्याआधि ते काळजीपुर्वक पहावे लागतात. नाहितर विमा घेवुन सुद्धा त्याचा पूर्ण फायदा होवु शकत नाही. २)जेवढे मुद्दे हे वगळलेले(exclusions)असतील तेवढा हफ्ता(premium)कमी होत असतो. त्यामूळे जेवढी स्वस्त पॉलिसी तेवढिच आपण घेत असलेली जोखिम(risk)जास्त असते.जर अशा वेळी वगळलेल्या मूद्दयावरुन दावा(claim)आला तर ते पैसे आपल्याला आपल्या खिशातुनच भरावे लागते.मग ओळखीतल्या विमा एजंट अथवा विमा कंपनीचा व्यवस्थापक असला तरी त्याचा उपयोग होत नसतो. ३)प्रत्येक कंपनिच्या योजनेत अनेक फरक, फायदे व तोटे सुद्दा असतात. सफरचंद व नारींगी यात गुणात्मक व दराबाबत फरक हा नेहमीच असतो, दोघांची तुलना होवु शकत नाहिच. तेव्हा एक जाणकार व अनुभवी पॉलिसी एजंट कडुनच विमा पॉलिसी घेतली पाहीजे. असा जाणकार हा प्रत्येक ग्राहकाची गरज समजूनच विमा सुचवित असतो. कारण प्रत्येक ग्राहकाची गरज ही भिन्न भिन्न असते कारण त्याचे व कुटुंबियांचे वय, आर्थिक परिस्थिती,जोखिम घेण्याची वॄत्ती, आजारांबाबत कुटुंबाचा इतिहास आणि भविष्यातील होवू शकणारे आजार, व्यवसाय व व्यवसायामूळे होणारे आजार/त्रास (occupational hazards) यात जमीन आसमानाचा फरक असतो. आरोग्य हा माझा आवडता प्रांत आहे. मला आपल्या गरजा कळवल्या तर यावर अधिक सखोल मार्गदर्शन मी नक्किच करु शकेल, याची खात्री आहे. धन्यवाद.

In reply to by आयुर्हित

धन्या 25/07/2014 - 23:07
तेव्हा एक जाणकार व अनुभवी पॉलिसी एजंट कडुनच विमा पॉलिसी घेतली पाहीजे.
जोक ऑफ दी ईयर. :) आजू-बाजूला नजर टाकली तर चिकाटीने लोकांचा पिच्छा पुरवून अनावश्यक पॉलिसी लोकांच्या गळ्यात मारणारे विमा एजंटच दिसतात.
असा जाणकार हा प्रत्येक ग्राहकाची गरज समजूनच विमा सुचवित असतो. कारण प्रत्येक ग्राहकाची गरज ही भिन्न भिन्न असते कारण त्याचे व कुटुंबियांचे वय, आर्थिक परिस्थिती,जोखिम घेण्याची वॄत्ती, आजारांबाबत कुटुंबाचा इतिहास आणि भविष्यातील होवू शकणारे आजार, व्यवसाय व व्यवसायामूळे होणारे आजार/त्रास (occupational hazards) यात जमीन आसमानाचा फरक असतो.
असा विमा एजंट मला भेटला तर मी त्याला दुर्वांकूरला जेऊ घालेन. :)
आरोग्य हा माझा आवडता प्रांत आहे. मला आपल्या गरजा कळवल्या तर यावर अधिक सखोल मार्गदर्शन मी नक्किच करु शकेल, याची खात्री आहे.
यात काही गर्भित अर्थ नाही असं गृहीत धरतो. :)

In reply to by धन्या

नाखु 28/07/2014 - 16:14
खरी बाब. विमा एजंटाची गोम अशी कि जे त्यांना (किंवा विमा कंपनीला) विकायचेय तेच आणि तेव्हढच कसं तुमच्या फायद्याचं आहे हे वारंवार पटवून देतात्.तुम्हाला काय आवश्यक आणि उपयुक्त आहे त्याच्याशी यांना काही घेणे/देणे नसते.टर्म ईंश्य्रन्स सुचविणारा एजंट माझ्या पाह्ण्यात नाही उलट मनीबॅक्चा घोशा लावणारेच जास्ती पाहिलेत.(लोकसत्ता मध्ये याचे "चिरफाड विश्लेषण" वाचले कि खरी बाब समजते.) टीपःजवळचे ३-४ मित्र २.५ ते ३.५ नातेवाईक विमा एजंट अस्लेला तरी अजून गळाला न लागलेला एक भावी "विमेकरी"

In reply to by आयुर्हित

तेव्हा एक जाणकार व अनुभवी पॉलिसी एजंट कडुनच विमा पॉलिसी घेतली पाहीजे.
हं आता समजलं...!! मला "व्यनीच" करा अशा आग्रहा मागचं कारण...!!

पाषाणभेद 26/07/2014 - 01:31
ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस बाबत काय म्हणणे आहे? ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस मध्ये एजंट येत नाही. त्यामुळे खरोखर हप्त्यात बचत होते काय? तसेच क्लेम सेटलमेंटला काही अडचणी येतात काय?

In reply to by पाषाणभेद

पाषाणभेद 26/07/2014 - 01:35
ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस एका खाजगी कंपनीकडून काढला असता खुप चांगली सर्व्हीस मिळाली. विमादेखील लगोलग दिला गेला. परंतू भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीने नुकताच ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस चालू केल्याने त्यांच्याकडे याबाबत चौकशी करणारा ईमेल पाठवला असता अजून उत्तरदेखील आलेले नाही. ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस विकतांना कमीतकमी ऑनलाईन चौकशी होईल असे त्यांना वाटत नाही काय? असलीच परिस्थीती असेल तर "भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीकडून" ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस काढावा काय? "भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" आणि "खाजगी विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" यात क्लेम सेटलमेंटबाबत काय अनुभव आहे?

In reply to by पाषाणभेद

धन्या 26/07/2014 - 10:39
ती सर्वात मोठी भारतातील विमा कंपनी सरकारी कंपनी आहे. त्यामुळे तुम्हाला जो अनुभव आला त्यात नवल असे काही नाही.
"भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" आणि "खाजगी विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" यात क्लेम सेटलमेंटबाबत काय अनुभव आहे?
या प्रश्नाचे उत्तर इतक्यात मिळणार नाही. मुळात टर्म इंन्श्यूरंस ही गोष्ट विमा बाजारात आता आता रुजू लागली आहे. काल परवापर्यंत विमा पॉलीसी एन्डॉवमेंट आणि मनी बॅक प्रकारातील असायच्या. त्यातही "खाजगी विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" हा प्रकार तर नुकताच सुरु झाला आहे. त्यामुळे क्लेम सेटलमेंटचा विदा इतक्या लवकर उपलब्ध होणार नाही.

In reply to by पाषाणभेद

धन्या 26/07/2014 - 10:51
भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या ग्राहक सेवा केंद्रात मी एक प्रश्न विचारला: तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स काढला तर भरावा लागणारा हप्ता हा त्याच त्याच अटींवर काढलेल्या खाजगी कंपनीच्या ऑनलाईन टर्म इन्शुरन्सच्या हप्त्यापेक्षा खुपच जास्त आहे. मी स्वतः टर्म इन्शुरन्स घेताना हा फरक वार्षिक हप्त्यासाठी सात हजार इतका होता. असे का? त्यांचे उत्तरः क्लेम सेटल करायचेच नसतील तर विमा हप्ता अगदी वर्षाला दोन हजार असला तरी कंपनीचा फायदाच असतो. माझा प्रतिप्रशनः तुम्ही हे ईतक्या ठामपणे कसे म्हणू शकता? त्यांचे उत्तरः मी या क्षेत्रात वीस वर्षांपेक्षा अधिक काम केलंय, त्या अनुभवाच्या जोरावर. संभाषण संपले. :) याच प्रश्नाचे उत्तर मी इतरत्र शोधले असता मिळालेले उत्तरः ऑनलाईन टर्म इन्श्युरन्स घेणारा ग्राहकवर्ग सुशिक्षित असून आरोग्याच्या बाबतीत जागरुक असतो. वेळोवेळी विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या आणि उपचार करुन घेत असतो. त्यामुळे जोखीम कमी असते. जोखीम कमी तर विम्याचा हप्ता कमी.

In reply to by धन्या

(१) धनाजीरावांनी दिलेल्या सुचना महत्वाच्या आहेत, त्यात सर्वकाही आलेच आहे एक मुद्दा जोडतो...मोठ्या रकमेचा विमा उतरवताना कंपनी प्रतिनिधीकडे स्खोल आणि सर्वंकष वैद्यकीय चाचण्या करुन घेण्याचा आग्रह धरा ( याचा खर्च विमा कंपनीच करीत असते) वय वा अन्य मुद्द्यांमुळॅ देत असलेली नॉन मेडिकल पॉलिसी शक्यतो टाळा, कोण्त्याही स्थितीत 'decleration of good health' वा तत्सम परिशिष्टावर स्वाक्षरी करुन पॉलिसी घेउ नका. (२) सेटल करायचेच नसतील तर विमा हप्ता अगदी वर्षाला दोन हजार असला तरी कंपनीचा फायदाच असतो....... या विषयी भारतातल्या प्रमुख विमा कंपन्यांचे 'क्लेम सेटलेमेंट रेशो' प्रसिद्ध होत असतातच. तेथे पडताळणी करा... दुघ का दुघ होवुन जाईल http://www.mintwise.com/claims-settlement-ratio-2012-2013/ (३) कोणत्याही व्यक्तीला युनिट लिन्क्ड, एंडॉन्मेंट पोलिसी न विकता व वैयक्तीक पातळीवर टर्म वगळता अन्य कोणत्याही प्रकारच्या पॉलिसीज् घेण्यापासुन पराव्रुत्त करुनही मी MDRT आणि सर्वोच्च वर्गातील क्लब मेंबर झालो आहे..... धनाजीराव, चला , दुर्वाकुरला भेटुयात. .

In reply to by प्रसाद भागवत

धन्या 28/07/2014 - 19:04
(३) कोणत्याही व्यक्तीला युनिट लिन्क्ड, एंडॉन्मेंट पोलिसी न विकता व वैयक्तीक पातळीवर टर्म वगळता अन्य कोणत्याही प्रकारच्या पॉलिसीज् घेण्यापासुन पराव्रुत्त करुनही मी MDRT आणि सर्वोच्च वर्गातील क्लब मेंबर झालो आहे..... धनाजीराव, चला , दुर्वाकुरला भेटुयात. .
एक नंबर सर. तुमच्यासारख्या वित्त सल्लागारांची देशाला गरज आहे. :) आपण भेटूयात आणि दुर्वांकुरला जेवणही घेऊया. (मी मुळचा पुणेकर नसल्यामुळे जेवणाच्या आमंत्रणाच्या बाबतीत निश्चिंत राहावे.)

In reply to by पाषाणभेद

आयुर्हित 26/07/2014 - 11:02
कालच रिलायंस लाइफ च्या वेब साईटवरुन ऑनलाईन इंन्श्यूरंस घेण्यासाठी माझी माहिती भरली. नंतर त्यांचे सर्व टर्म्स आणि कंडिशन्स मान्य असल्याबद्दल एका बॉक्स मध्ये टि़क करुनच पूढे दुसर्‍या पानावर जाता येत होते. टर्म्स आणि कंडिशन्स मध्ये The policy document issued to you may contain certain specific terms, conditions and rates. You are advised to go through the document carefully. असे वाक्य आहे. हे सर्व वाचून १००% अर्थ समजुन घेणे आवश्यक आहे. तरच ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस चा फायदा होईल. (महत्वाचे वगळलेले मुद्दे(exclusions) समजुन घेणे अती आवश्यक आहे.) हप्त्यात बचत नक्किच होते परंतु क्लेम सेटलमेंटला मदत कोणाची घेणार? त्या कंपनिचे स्थानिक कार्यालयही त्यात रस घेत नाहि. कारण ते केंद्रिय कार्यालयातुनच (रिलायंस लाइफच्या केस मध्ये चेन्नईला आहे)होणार असते. मग अशा वेळी जाणकार त्याला काहीही फायदा नसतांना कसा मदत करेल? हा विचार करुनच विमा घ्यावा.

धन्या 26/07/2014 - 10:31
विमा एजंटांना विमा पॉलीसीवर किती कमिशन मिळते या प्रश्नाचे उत्तर मी खुप पूर्वी शोधले असता जागो इन्व्हेस्टर या प्रख्यात संकेतस्थळावर उत्तर मिळाले: The commissions are 25% in first year ,7.5% in 2nd and 3rd year and 5% their after.

सुबोध खरे 26/07/2014 - 10:58
एल आय सी या सरकारी कंपनी कडे तुम्ही सरळ गेलात तर तुम्हाला ते भिक घालत नाहीत. एजंट तुम्हाला त्यांना(स्वतःला) सर्वात फायदेशीर अशी पॉलिसी च विकण्याचा प्रयत्न करताना दिसेल. (तुमच्या फायद्याची पॉलिसी जर विकेल तर त्याच्या खाण्याचे वांधे होतील). आयुर्विमा महामंडळाची ऑन लाईन पॉलिसी येण्याला त्यांच्या प्रचंड पसरलेल्या एजंटांच्या जाळ्याचा जोरदार विरोध आहे म्हणून ते प्रकरण आस्ते कदम चालू आहे. खाजगी कंपन्यांचा ऑन लाईन विम्याला पाठींबा असण्याचे साधे कारण एकाच आहे त्याला लागणारा पायाभूत सुविधांचा खर्च फार कमी आहे. एकाधिकार शाही इतकी वर्षे गाजविल्यावर "आपले योगक्षेम" उत्तम चालवल्यावर आयुर्विमा महामंडळाची या क्षेत्रात असलेली आगेकूच आता बरीच कमी झाली असल्याने क्लेम सेटल मेंटचे एक तुणतुणे ते वाजवीत आहेत(त्यात थोडेफार तथ्य आहे). बाकी ग्राहक न्यायालयात सर्वात जास्त खटले सरकारी आरोग्य विमा कंपन्यांविरुद्ध आहेत हि गोष्ट आपण लक्षात घेत्लीत तर वस्तुस्थिती आपल्या लक्षात येइल. क्रमशः

In reply to by सुबोध खरे

धन्या 26/07/2014 - 11:10
तुमच्या फायद्याची पॉलिसी जर विकेल तर त्याच्या खाण्याचे वांधे होतील
काही नगण्य अपवाद सोडले तर विमा एजंट टर्म पॉलीसीचे नावसुद्धा घेत नाहीत ते याच कारणासाठी. टर्म पॉलीसीवर विमा एजंटांना सर्वात कमी कमिशन मिळते. त्यामुळे टर्म पॉलीसी ही ग्राहकासाठी सर्वोत्तम पॉलीसी असली तरी ते ग्राहकाच्या गळयात मात्र एन्डोवमेंट आणि मनी बॅक पॉलीसीच मारतात.

सुजल 24/08/2014 - 21:34
राष्ट्रीयीकृत बँकामध्ये बचत खात्याशी संलग्न "आरोग्य विमा" विमा एजंट कडुन मिळतो का ?

दादा कोंडके 24/08/2014 - 22:52
परवा ऑफिसमध्ये याच विषयावर सहकार्‍यांशी चर्चा करताना लक्षात आलं की जवळ जवळ सगळ्यांचंच एलायसी मध्ये एन्डोवमेंट किंवा तत्सम गळ्यात मारलेल्या पॉलिसीज आहेत. आंतरजालामुळे आत्तात्ता थोडिशी जागरुकता वाढली आहे त्यामुळे लोकं मनीकंट्रोल, वॅल्युरिसर्चऑनलाईन वगैरे वाचत आहेत. प्रत्येकांच्या वडिलांच्या मित्राने किंवा नातेवाईकांनी पोलिसी विकली होती आणि नकळून आणि आवडलेली नसून सुद्धा बहुतेकवेळा सोशल प्रेशरमुळे ती घेतली गेली होती. (अवांतरः सहज उत्सुकता म्हणून या एजंटांची अगदी दहा-बारा लोकांना नावं विचारल्यावर ही सगळीच एका विशिष्ठ जातीतली लोकं निघाली. ;) ). या पोलिसीजचे रिटर्न्स ५-६% पेक्षाही कमी असतात आणि सरेंडरकेल्यामुळे तेव्ह्डच नुकसान होतं. त्यामुळे हे अवघड जागेचं दुखणं होउन बसतं. मी सुद्धा सहावर्षापुर्वी एका युलिप पोलीसीमध्ये एका एजंटच्या ससेमिर्‍याला कंटाळून पैसे गुंतवले होते. साधारण आता त्याची किंमत साधारण ७% दराने मिळते आहे आणि त्यामुळे सरेंडर करण्याचा दोनदा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी, इतके दिवस थांबलाच आहात तर अजुन एक-दोन महिन्यानंतर मार्केट वर गेल्यावर काढा असा सल्ला देण्यात आला. जास्त नॅव्ह आलेकी आम्हीच तुम्हाला फोन करू असंही आश्वासन देण्यात आलं. दुसर्‍यावेळी तर अजून दुसरीच एक पॉलिसी गळ्यात मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एक चांगलाच धडा घेतला आहे. एजंटांचा सल्ला कधिही घ्यायचा नाही. त्यापेक्षा दोनेक हजार खर्च करून व्यावसायीक प्लॅनरचा सल्ला घ्यावा.

In reply to by दादा कोंडके

हवालदार 25/08/2014 - 01:57
तुमचे मित्रही त्याच विशिष्ठ जातीतले आहेत काय ??? प्रत्येकांच्या वडिलांच्या मित्राने किंवा नातेवाईकांनी पोलिसी विकली होती म्हणून म्हण्टले विचारावे. क्रु.ह.घे.

मॄत्यूनंतर जीवनवीम्याचे (विशेषतः टर्म इन्श्युरन्स) क्लेम मंजूर/नामंजूर होण्याचे, तसेच आरोग्यविम्याच्या क्लेम सेटलमेंटचे बरे-वाईट अनुभव कोणाला आहेत का (विशेषतः स्वतः घेतलेल्या आरोग्यविम्याच्या बाबतीत. कारण एम्प्लॉयर तर्फे मिळणार्‍या आरोग्यविम्याचे सेटलमेंटच्या बाबतीत बहुतेक काही समस्या येत नाहीत)? माझ्या कुटुंबात अजून पर्यंत जीवनविमा/आरोग्यविमा क्लेम करायची आवश्यकता पडलेली नाही, त्यामुळे मला वैयक्तिक अनुभव नाहीये.
येथे सध्या विम्यामध्ये होणार्‍या फसवणुकीविषयी चर्चा चालली आहे. पण विमा म्हणजे केवळ कंपनीचा फायदा/एजंटचा फायदा, असं नाही. तर विचारपुर्वक गरजेनुसार घेतलेला विमा नक्कीच 'आपल्या' फायद्याचा ठरू शकतो. मला थोडी माहिती: योग्य/अयोग्यः आहे, आणि थोड्या शंकाही आहेत, त्यावर चर्चा व्हावी असे वाटते. सर्वांच्या अनुभवातून (व वादविवादातून ...... ऊप्स! चर्चेतून!! ;) ) हा धागा नक्कीच माहितीपुर्ण होईल. १. जीवन-विमा व गुंतवणुक या वेगळ्या गोष्टी आहेत. टर्म इन्श्युरन्स सोडून इतर सर्व पॉलिसीज या फक्त आणि फक्त विमा कंपनी व एजंट यांच्या आर्थिक फायद्यासाठी असतात.

तमाशा : महाराष्ट्रातील एक रांगडा कलाप्रकार

psajid ·

बॅटमॅन 25/07/2014 - 18:04
साजिद साहेबांचं लेखन खास आपल्या सांगलीकडचं असतं, ते वाचायला लय मज्जा येते. अशेस लिहीत रहा साहेब, आवर्जून वाचणारं लै लोक हैती इत्कं ध्यानात ठिवा मंजी झालं! (मिरजकर) बॅटमॅन.

बॅटमॅन 25/07/2014 - 18:04
साजिद साहेबांचं लेखन खास आपल्या सांगलीकडचं असतं, ते वाचायला लय मज्जा येते. अशेस लिहीत रहा साहेब, आवर्जून वाचणारं लै लोक हैती इत्कं ध्यानात ठिवा मंजी झालं! (मिरजकर) बॅटमॅन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकतेच जेष्ठ तमाशा कलावंत बाळू उर्फ अंकुश संभा खाडे यांचे वृद्धापकाळाने सांगलीच्या सरकारी रुग्णालयात निधन झाले. यापूर्वी २0११ मध्ये त्यांचे बंधू काळू ऊर्फ लहू संभाजी खाडे यांचे निधन झाले. दोघांच्या रूपाने गेल्या सुमारे ६0 वर्षांतील तमाशात इतिहास घडविणारे व या इतिहासाचे साक्षीदार असणारे हरपले आहेत. एवढा प्रदीर्घ काळ काळू-बाळू या जोडगोळीने तमाशा गाजवला. मराठी मनावर राज्य केले. अखेरच्या श्वासापर्यंत ही जोडी एक होती. त्यांचे प्रपंच वेगळे झाले, मात्र दोघांत मतभेद कधी झाले नाहीत. सारखे दिसण्याचा, जुळेपणाचा आनंद त्यांनी सार्यांना दिला.

<इंचा-इंचाने आपण बेळगाव यळ्ळुर मध्ये माघार घेत आहोत>

प्रसाद गोडबोले ·

धमाल मुलगा 25/07/2014 - 15:04
यळ्ळूरकरांच्या लढ्याला चिरडण्याचं कारस्थान जोरदार चालू आहे तर. पुर्वी अपर्णाताईनं मिपावर यळ्ळूरच्या लढ्याबद्दल लिहिलं होतं त्याची आठवण झाली - http://www.misalpav.com/node/17029

प्रसाद१९७१ 25/07/2014 - 15:32
नक्की काय प्रोब्लेम आहे तुमचा? बेळगाव पाकीस्तानात चाललय की काय? इथे महारष्ट्रात काय चांगले होतय की कोणाला महारष्ट्रात यावे असे वाटावे. गुंड आणि टग्यांचे राज्य इथे. आतातर खुल्या वर्गातल्या जागा पण कमी झाल्या. सारी-सारी पुण्याई व हजारो मराठी भाषिकांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल>>> कसली पुण्याई?

In reply to by प्रसाद१९७१

अरे ते सॅर्कॅस्टिक का म्हणतात तसे आहे असे वाटतय. कानडावू विठ्ठलू कर्नाटकू ऐवजी कानडावू विठ्ठ्लू महाराष्ट्र्रू असे म्ह्णायचे ह्यापुढे.

दुसर्‍या राज्यात जावून ही असली पाट्या,ध्वज लावायची टगेगिरी करावीच का म्हणते मी?त्यांच्या लोकांनीही येथे कोल्हापूरात्,सोलापूरात असले प्रकार केले तर चालवून घ्यायचे का? ईतक्या वर्षानंतरही असल्या पेटवापेटवीच्या प्रकारांना महत्व दिले जाते हे मराठी माणसाचे दुर्दैव.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बॅटमॅन 25/07/2014 - 15:42
मराठी जतन करण्याचे अन्यही बरेच मार्ग आहेत. उगी राडेबाजी का करावी ते समजत नाही.

In reply to by मृत्युन्जय

धमाल मुलगा 25/07/2014 - 16:44
सीमाप्रश्न सुटला? कधी? यळ्ळूरकर गेली कित्येक वर्षं कर्नाटक सरकारशी लढत आहेत. अधिक माहितीसाठी : कॉलिंग: अपर्णा अक्षय!

नितिन थत्ते 25/07/2014 - 16:00
>>जय बेन्च ! बेन्चवर आहात वाट्टं.... (पण तरीही बेंचला कधीच जय म्हणू नये.... बेंचवरच्यांना कंपणी केव्हाही जय महाराष्ट्र करू शकते).

In reply to by नितिन थत्ते

(पण तरीही बेंचला कधीच जय म्हणू नये.... बेंचवरच्यांना कंपणी केव्हाही जय महाराष्ट्र करू शकते). >>> आपली हरकत नाही त्यालाही :) ! तिकडे कन्नडिग्गांच्या राज्यात बंगळुरुला गोल्द्मन सच्स ची मस्त ऑफर सोडुन इथे पुन्यात येवुन बसलोय ... अल्मोस्त १००% रेज द्यायला तयार झाले होते ते सोडुन आमचं पुणं आमचा सातारा म्हणुन इथे येवुन बसलोय :( !

In reply to by यशोधरा

म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त होतेय की काय >>> चिडचिड ? तुकाराम बुवांनी तर म्हणुन ठेवलय "ठेविले अनंते तैसेची रहावे | बेन्चवरी असु द्यावे समाधान || " त्यामुळे काही चिडचिड नाही ... मोकळा वेळ काढायला जरा टाईमपास ... कधी इथं का ड्या सार तर कधी तिथं *pardon* ... खरंच राव अत्ता गिरीजा आयडी असता अन इतरांना माहीत नसते तर मजा आली असती *biggrin* बाकी पुढील चर्चा व्यनितुन !!

In reply to by प्रसाद गोडबोले

सूड 25/07/2014 - 18:25
>>खरंच राव अत्ता गिरीजा आयडी असता अन इतरांना माहीत नसते तर मजा आली असती अजूनही वेळ गेली नाही गिर्जाकाका, एखादा स्त्रीआयडी घ्यायचा विचार करु शकतोस. ;) ह. घे. हो. ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

यशोधरा 25/07/2014 - 18:25
मोकळा वेळ काढायला जरा टाईमपास ... कधी इथं का ड्या सार तर कधी तिथं >> कधीतरी वा मेबी तुमच्या बाबतीत सहसा टाईमपास म्हणून काड्या वा टिंगल वगैरे ठीके, पण कधीतरी चेंज म्हणून मिपावर काही उत्तम असंही लिहून पहा. काही वेगळं गवसेलही, कोणी सांगावं? :) प्रयत्न तर करा, जमत असल्यास. खरंच राव अत्ता गिरीजा आयडी असता अन इतरांना माहीत नसते>> नाही, माहित होते, तिकडेही झालेय की हे आयडी प्रकरण आणि कधी ना अक्धी कळतेच की लोकांना.

In reply to by यशोधरा

पण कधीतरी चेंज म्हणून मिपावर काही उत्तम असंही लिहून पहा. काही वेगळं गवसेलही, कोणी सांगावं? प्रयत्न तर करा, जमत असल्यास.
नको . आपलं अंतर्जालीय वास्तव्य नवीन मित्र बनवणे , नवीन काही वाचायला शिकायला मिळणळ, बाकी टिंगलटवाळी चेष्टामस्करी कॉलेजच्या कट्ट्यावर करायचो ना दंगा तसं काहीसें मर्यादित राहुदे ... अंतर्जालावर कविता कथा टाकली अन ५-५० लाईक्स / कमेन्ट्स आले की हवेत जाणारी अन खरं पोटेन्शीयल असुनही ह्या भ्रामक वर्चुअल रीयालीटीत हरवुन जाणारी बरीच माणसे पाहिली आहेत (आणि कोणी अंतर्जालावर लिहुन खुप मोठा कादंबरीकार कथाकार कवी झालयाचे पाहण्यात नाही ) त्यापेक्षा आपलं बरं ... वेळ आहे तोवर गप्पा मारा ...एकदा कामाला लागलं की मिपा बंद !!

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या 25/07/2014 - 18:52
आपलं अंतर्जालीय वास्तव्य नवीन मित्र बनवणे , नवीन काही वाचायला शिकायला मिळणळ, बाकी टिंगलटवाळी चेष्टामस्करी कॉलेजच्या कट्ट्यावर करायचो ना दंगा तसं काहीसें मर्यादित राहुदे ...
आमचंही असंच आहे. :)
अंतर्जालावर कविता कथा टाकली अन ५-५० लाईक्स / कमेन्ट्स आले की हवेत जाणारी अन खरं पोटेन्शीयल असुनही ह्या भ्रामक वर्चुअल रीयालीटीत हरवुन जाणारी बरीच माणसे पाहिली आहेत
एक मिपाप्रसिद्ध उदाहरण आमच्या पाहण्यात आहे.
वेळ आहे तोवर गप्पा मारा ...एकदा कामाला लागलं की मिपा बंद !!
आमचं तर कामच असं आहे की मिपा बंद करण्याची आवश्यकताच भासत नाही. क्रोमच्या इतर सतराशे साठ टॅबमध्ये एक टॅब मिपाचीही. तुमच्या धाग्याला बेळगांवच्या वाटेला लावण्याबद्दल क्षमस्व. ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

यशोधरा 25/07/2014 - 18:57
ते हवेत जाणं, न जाणं स्वतःवर अवलंबून असतं. तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे, पण जशी ही एक प्रकारची नशा असते ना, तशीच कोणत्याही आणि जवळपास प्रत्येक धाग्यावर टिंगलटवाळी करायचीही नशाच असते. त्याची उदाहरणं मिपावर आजवर कमी नाहीत. ( तुम्हांला उद्देशून वगैरे हे नाही, गेल्या ५ वर्षांत जे पाहिलं आहे ते सांगतेय) इथे वा कोणत्याही संस्थळावर कादंबरीकार, कथाकार वगैरे व्हायला कोणी येत नाही, येऊ नये. ५- ५० लाईक्स ने फुगून जाऊ नये, असं होत असेल, कोणी ह्यासाठी येत असेल तर त्यांनी आपापले इगो तपासून पहायची गरज आहे हे नक्की. इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त व्हायला आणि इतरांच्या व्यक्त होण्याला दाद द्यायला, जमलं तर निखळ करायला यायचं. थट्टा, विनोद, मस्करी ह्याचं वावडं नाहीच, फक्त मस्करीची कुस्करी होऊ नये इतकी काळजी घेतली तरी पुरे. असो. शुभेच्छा तुम्हांला. :)

In reply to by यशोधरा

इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त व्हायला आणि इतरांच्या व्यक्त होण्याला दाद द्यायला, जमलं तर निखळ करायला यायचं.
स्वांतसुखाय >>> मी आनंदासाठी काहीच करत नसतो .... अनंदाने करीत असतो *i-m_so_happy*
फक्त मस्करीची कुस्करी होऊ नये इतकी काळजी घेतली तरी पुरे.
कुस्करी झाली तरी ती अंतर्जालीयच राहील ह्याची आजवर काळजी घेतली आहे , कित्येक मतांवर कचकचीत विरोध असणारेही जेव्हा रियल लाईफ मधे भेटतात तेव्हा आम्ही मित्रांसारखेच वागतो ... आंतर्जालीय वास्तव्य आणि खरे अस्तित्व ह्या मध्ये डिस्टिन्क्शन करायला शिकले पाहिजे आपण ( माझ्यामते मला आजवर तरी ते जमले आहे :) ) ! कारण माणुस जसा खराखुरा असतो तसा तो कधी अंतर्जालावर वावरत नाही तो त्याला स्वतःला जसं पोर्ट्रे करायचय तसं वावरतो ( हे माझं मत नाही , सोशल नेटवर्किंग आणि त्याचे ह्युमन सायकी वरील परिनाम ह्यावरचा कोणतव्हीअभ्यासक हेच सांगेल ) आणि ह्याच कारणासाठी मल्टीपल आणि अन ट्रॅकेबल आयडी अलाऊड असले पाट्रॅकेबलसं माझं प्रांजळ मत आहे :) तुमच्या शुभेच्छांचा आदराने स्विकार करत आहे . मनःपुर्वक धन्यवाद :) त.टी : पुढे मागे कधी कट्ट्याला भेटायचा योग आलातर तुमच्या लक्षात येईल अंतर्जालावरचा प्रगो अन खर्‍या आयुष्यातला पश्या ही दोन खुप वेगळी व्यक्तिमत्वे आहेत :)

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या 25/07/2014 - 19:13
कित्येक मतांवर कचकचीत विरोध असणारेही जेव्हा रियल लाईफ मधे भेटतात तेव्हा आम्ही मित्रांसारखेच वागतो ...
हे बाकी खरं आहे. :)

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 25/07/2014 - 19:13
कारण माणुस जसा खराखुरा असतो तसा तो कधी अंतर्जालावर वावरत नाही तो त्याला स्वतःला जसं पोर्ट्रे करायचय तसं वावरतो
हाण तेजायला! या वाक्यासाठी तुला पार्टी लागू.

In reply to by बॅटमॅन

सूड 25/07/2014 - 19:57
कारण माणुस जसा खराखुरा असतो तसा तो कधी अंतर्जालावर वावरत नाही तो त्याला स्वतःला जसं पोर्ट्रे करायचय तसं वावरतो
जे ब्बात!! आता ब्याट्या पार्टी देतोय म्हणताना मी वेगळे कष्ट घेत नाही. ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

यशोधरा 25/07/2014 - 19:17
ओके. हरकत नाही :) पुढे मागे कधी कट्ट्याला भेटायचा योग आला तर तुमच्या लक्षात येईल आंतर्जालावरची यशो अन खर्‍या आयुष्यातली यशो ही दोन वेगळी व्यक्तिमत्वे नाहीत. :)

कंजूस 25/07/2014 - 16:40
मला वाटतं आता इतिहासाची पानं मागे पलटत बसण्यापेक्षा राज्याराज्यांतून शेजारच्या राज्यांची भाषा शिकवण्याचे वर्ग काढा .महाराष्ट्रात कानडी आणि गुजराथी वगैरे .महानगरपालिकांच्या शाळांत संध्याकाळी शिकवा .आज आम्हाला शेजारच्या राज्यात पर्यटन करायला गेल्यावर इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो हे दुर्दैव आहे .विनोबा भावेंचं उदाहरण घ्या .आठ देशी आणि सहा परदेशी भाषा येत होत्या . पुढे जाण्याचे विचार नवीन पिढीसमोर मांडा हो.

In reply to by कंजूस

प्रसाद१९७१ 25/07/2014 - 17:09
मी बेळगावात जन्माला आलो असतो तर मला मराठी बरोबर कन्नड पण आली असती. मी पुण्यात / बंगलोर ला दोन्हीकडे लोकल भाषेत बोलू शकलो असतो. कन्नड ग्रुप मधे कन्नड म्हणुन आणि मराठी लोकांच्यात मराठी म्हणुन खपुन गेलो असतो.

In reply to by कंजूस

बॅटमॅन 25/07/2014 - 17:16
कन्नड शाळा सांगली-मिरजेत अजूनही आहेत- किमान २००३ सालापर्यंत तरी पाहिल्याचे आठवते. अन्य सीमावर्ती भागांतही असाव्यात बहुधा.

In reply to by कंजूस

यसवायजी 28/07/2014 - 20:05
कन्नड शाळा सोलापुरातही आहेत. निपाणीत कन्नडपेक्षा मराठी शाळा जास्त आहेत. सरकारकडून तेवढं आधीच केलं गेलंय. पण सरकारी कागदपत्रे, कोर्टकचेर्‍या, वगैरे कन्नडमध्ये. याचा त्रास होतो लोकांना.

आपलं झालं थोडं व्याह्यानी धाडलं घोडं असा प्रकार आहे हा सगळा. कायदेशिर पणे महाराष्ट्राचा भाग असणार्‍या प्रदेशात काय सोयीसुविधा देतयं सरकार? अजुन वाढीव भाग समाविष्ट करुन काय साधणार आहे? हाच प्रश्ण महानगरपालिकेच्या हद्दीत नव्यानी समाविष्ट होणार्‍या गावांबद्दलही विचारता येईल.

बहुगुणी 26/07/2014 - 02:56
मूळ स्रोत आणि त्याचं नंतर एकदा आलेलं विडंबन हेही नजरेखालून घालायला हरकत नाही ;-) बाकी मटा मधली बेळगावची बातमी वाचली तेंव्हाच मिपावर धागा निघणार याची खात्री होती, तो विडंबनात्मक निघाला हे फार बरं!

काळा पहाड 29/07/2014 - 17:02
महाराष्ट्रात येवून बेळगावचं भले काही भलं नाही होवो (खरं म्हणजे हेच खरं असावं). पण कन्नड्यांना हाणायला काय हरकत आहे? शिवसेना नेहमी तर या मुद्द्यावरून शंख करत असते. आता कर्नाटकाच्या एसट्या महाराष्ट्रात का फोडल्या जात नाहियेत? नॅशनल हायवे कोल्हापूरला बंद करून त्यांच्याकडे जाणारे ट्रक्स अडवता येवू शकतात. कृष्णेचं पाणी ब्लॉक करता येवू शकतं. शेट्ट्यांना हाकलून देता येवू शकतं. नाशिकचा कांदा अडवता येवू शकतो.

प्यारे१ 29/07/2014 - 17:47
महाराष्ट्र विधानसभा निवडणूका जवळ आलेल्या आहेत. ह्या घटनेचं निमित्त करुन मराठी मुद्द्यावर 'मनसे'ला पुढं आणण्याचं कार्य काँग्रेसकडून होत असण्याची शक्यता वाटते आहे.

पोटे 29/07/2014 - 20:49
सीमावाल्यांची अवस्था संत मीराबाईगत झालेली आहे. मीराबाईला अन्न वस्त्र निवारा तिचा नवरा द्यायचा. पण ती लबाड बाई त्याला सुख न देता देवाच्या लाकडी पुतळ्याला नवरा मानत होती. सीमावाल्याना सोयी कर्नाटक देते ( अर्थात रेव्हेन्युही घेते.) पण याना कुंकु मात्र म्हाराश्ट्राचे हवे आहे

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 30/07/2014 - 17:29
उपमा जर बाजूला ठेवली तर मूळ मुद्दा बरोबरच आहे असं मला वाटतं. उपमेबद्दल चर्चा तूर्त करीत नाही. अर्थात याचा अर्थ कर्नाटक पोलिसांची गुंडगिरी समर्थनीय आहे असा आजिबात नाही. पण यांनी विचार करावा, मराठी जपण्याचे अनेक मार्ग आहेत. नाकावर टिच्चून फलक लावण्यात प्वाइंट काय ते मला अजूनही समजत नाही, त्यातही मराठी नेत्यांकडून *ट काही होणार नाही हे ढळढळीत दिसत असतानाही! हे ***** नेते 'आपल्याच' विदर्भ आणि मराठवाड्याला धड जोडू शकले नाहीत, बेळगाव काय *ट घेणारेत? गफ्फा हो, नुसत्या गफ्फा! बेळगाव इ. आपल्याकडे हवा असं लाख वाटतं हो मलाही, पण यांच्या **त दम नाही त्याचं काय? मुंबैत बसून गफ्फा मारणारे केंद्रात मात्र उघडे पडतात! दक्षिणेतले लोक एरवी आपसांत किती का भांडेनात, राज्यहिताचा प्रश्न आला की केंद्रात सर्वपक्षीय दबावगट तयार करतात. महाराष्ट्रातल्या नेत्यांना ती अक्कल नाही आणि ती औकातही नाही. राडे करणे, चमत्काराने धरणे भरणे, यातच एनर्जी घालवताहेत झालं.

In reply to by बॅटमॅन

पोटे 30/07/2014 - 17:36
नाकावर टिच्चून फलक लावण्यात प्वाइंट काय ते मला अजूनही समजत नाही, ........ म्हणुनच तर म्या त्याना मीराबै म्हटलं . ती लाकडी पुतळा बाळगुन होती, हे लाकडी फलक लावुन बसलेत.

In reply to by बॅटमॅन

यसवायजी 30/07/2014 - 22:03
परिणाम भोगायची तयारी असणार्‍यांनीच असले उद्योग करावेत हे बरोबर. पण अगदिच शांतपणे बघत बसले, तर मग गर्व, अभिमान तर सोडाच, स्वतःच्याच 'गल्लीत' लाज वाटायला लागेल की. मराठी जपण्याचे अनेक मार्ग आहेत ते कोणते सांगावे. म्हणजे जर उद्या दुकानावरच्या मराठी पाट्या काढण्यात आल्या तर प्रतिक्रीया काय असेल? (असे किरकोळ प्रकार झाले आहेत.) त्याच्या पुढे जाऊन दारावरची पाटी कन्नडमध्ये लावण्याची सक्ती केली तर? - पासपोर्ट व्हेरिफिकेशनवेळी निपाणी पोलिस स्टेशनमध्ये माझा वाद झाला होता. *** साले मराठीत बोलायलाच तयार नव्हते. "कन्नडा माताड इल्लादरे पासपोर्ट सिगल्ला" (कन्नड बोल नाहीतर पासपोर्ट मिळणार नाही) असे जरी तो पोलिस हसत (?) म्हणाला असला तरी आता मस्ती नक्कीच आलीय त्यांना. माझ्या जवळच्या नातेवाईकाने, निपाणीत फक्त मराठी बोलल्याने लाठीचा मार खाल्ला आहे. -(मुळचा KA23/ सध्या MH12) SYG

In reply to by यसवायजी

बॅटमॅन 31/07/2014 - 12:57
कन्नडिगांची मस्ती माहितेय बे यसवायजी. पण माझा मुद्दा असा आहे की या लोकांना- द्याटिज़ निप्पाणी, बेळगाव, इ. गावांतल्यांना महाराष्ट्रात येऊन कायच मिळणार नाही. हे कटु सत्य आहे. कर्नाटकवाले माज सोडत नाहीत आणि महाराष्ट्रातल्यांच्या अंगी तो दमही नाही, अशा परिस्थितीत काय करावे? मला असं वाटतं खरं. असो. जर यांच्याइतक्याच जोराने काही केलं तर ठीक, नपेक्षा दिल्या घरी सुखी रहा असेच खेदाने म्हणावे वाटते. :( :( असो...भावना समजून घेतल्या, पण मार्ग काय ते कळत नाही. मराठी नेतृत्व नेभळट दिसत असल्याने मी जे म्हणालो ते म्हणालो इतकेच.

In reply to by बॅटमॅन

सहमत रे. काही नातेवाईक आहेत तिकडे.कधीच भाषेची अडचण आली नाहि त्यांना.सीमाभागातही गुजराती,मारवाडी बांधब बर्यापैकी व्यापार करून आहेत असे ऐकले आहे.विशेषकरून मिठाईचा.त्यांना नाही का अडचण येत भाषा शिकायला? कसे शिकतात ते चटकन? ईकडे महाराष्ट्रात आसाम्,राजस्थानचे लोक येतात्,भाषा आतम्सात करतात व धंदा करून पैसेही मिळवतात. तीन पिढ्या राहूनही स्थानिक भाषा शिकणार नाही ह्याला अडेलतट्टूपणा म्हणेन खेदाने.खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे.अशानाच आपले नेते वापरून घेतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तीन पिढ्या राहूनही स्थानिक भाषा शिकणार नाही ह्याला अडेलतट्टूपणा म्हणेन खेदाने.खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे.अशानाच आपले नेते वापरून घेतात.
मग ? तुमचा मनसेला पाठींबा आहे का हो नेफळे ?

In reply to by प्रसाद गोडबोले

बाळ सप्रे 31/07/2014 - 14:11
स्थानिक भाषा शिकण्याचा आग्रह म्हणजे मनसे नव्हे. मनसे म्हणजे असे इतर मुद्दे आणि खळ्ळ खट्याक यांचं काँबिनेशन आहे.

In reply to by बाळ सप्रे

अगदी योग्य बोललास बाळ.मनसेचे 'टार्गेट' का काय म्हणतात ते म्हणजे रोजगारी करणारे अमराठी लोक.मराठीच्या नावाने राजकारण करणार्यांनी राज्यात २/४ मराठी ग्रंथालये बांधली तरी पुरे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

धन्या 01/08/2014 - 13:14
आज एका फोरमवर एका मुंबईच्या बावीस तेवीस वर्षांच्या बाब्याशी ओळख झाली. बोलणं अर्थातच हिंदीत चालू होतं. म्हटलं तू मुळचा कुठला त म्हणे "देल्हीका. नॉर्थ इंडीयन" मुंबईत केव्हापासून आहेस तर म्हणे "बॉर्न अँड ब्रॉटप इन बॉम्बे". बॉम्बे बरं का. मुंबई नाही. म्हटलं तू नॉर्थ इंडीयन किंवा दिल्लीचा कसं म्हणू शकतोस? तू तर महाराष्ट्रीय आहेस. तुझे आई वडील कामानिमित्त मुंबईत आले असतील तर ते फार तर म्हणू शकतात की आम्ही नॉर्थ इंडीयन किंवा दिल्लीचे आहोत म्हणून. अशा काही मिरच्या झोंबल्या त्याला.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

यसवायजी 31/07/2014 - 14:30
तीन पिढ्या राहूनही स्थानिक भाषा शिकणार नाही ह्याला अडेलतट्टूपणा म्हणेन खेदाने.
थोडी सुधारणा- स्थानिक भाषा मराठीच आहे. कन्नड लादली गेली आहे. असो. खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे. कुठल्या सीमाभागाबद्दल बोलताय आपण? निपाणीत मराठी ८०% हून जास्त असतील.

In reply to by यसवायजी

सीमाभागात जे कोणी मराठी असतील त्यातील बहुतांशी लोकांना कन्नड येते असे म्हणतात.स्थानिक भाषा शिकायचीच नाही असा आग्रह धरणार्‍यांची संख्या खूप कमी असेल. होय ना? कन्न्ड लादली गेलीय म्हणजे काय? अरे राज्ये होवून ५० वर्षे उलटून गेली.मुंबईच्या गुजराती बांधवांनी किंवा नागपूरकरांनी 'आमच्यावर मराठी लादली' असे म्हणण्यासारखे आहे. .

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पैसा 01/08/2014 - 10:10
गुजराती लोक मुंबैत गुजरातमधून स्थलांतर करून आलेत. बेळगाव भागातल्यांचे तेच मूळ स्थान आहे. इवलूसा फरक आहे.

In reply to by पैसा

बाळ सप्रे 01/08/2014 - 10:23
मुंबैत सगळेच तसे स्थलांतर करुन आलेत.. मराठी माणसं कोकणातून, प. महाराष्ट्रातून.. गुजराती, गुजरातमधून..इ.. मुंबै पहिल्यांदा फक्त इंग्रज, पारशी लोक आणि काही कोळी एवढेच होते.. स्थलांतर करुन आलेल्या गुजरात्यांच्या आता ४-५ पिढ्या मुंबैत राहिल्यात.. किती वर्ष स्थलांतरीत म्हणणार ?? बेळगावात बर्‍याच जुन्या लोकांना मराठी, कन्नड दोन्ही भाषा येतात.. अस्मितेचा प्रश्न करुन लढा देत रहायच की परिस्थितीचा स्वीकार करुन पुढे जायच हे महत्वाचं.. राज्यस्थापनेनंतर इतक्या वर्षांत पुढच्या पिढ्यांनी कामकाजापुरतं कन्नड शिकण नक्की शक्य आहे.. आणि इतर जीवनात मराठी वापरा ना तिथे कोण येत नाहिच आहे अडवायला..

In reply to by बाळ सप्रे

पैसा 01/08/2014 - 11:31
ते बिचारे कन्नड शिकतातच ना! तसे गुजराती लोकसुद्धा बर्‍यापैकी मराठी बोलतात. आता गुजराती/मराठी असा काही वाद आहे असं वाटत नाही. पण तिथल्या कानडी सरकारने सीमाभागात सगळे ऑफिसर्स कानडीच नेमायचे, सगळे बोर्ड कानडीत लावायचे असली दंडेली करू नये ना! बेळगावातले दुकानदार सांगतात की मराठी दुकानदारांना हे कानडी ऑफिसर्स भयंकर त्रास देतात. सगळे सरकारी बोर्ड त्रैभाषिक असले पाहिजेत असा नियम असताना सीमाभागात सगळे रस्त्यांचे बोर्ड्स कानडीच आहेत. अगदी राष्ट्रीय हमरस्त्यावरसुद्धा. पोलिसांना मराठी/हिंदीत विचारलं तर कानडीत बोलतात आणि दुर्लक्ष करतात. स्वतःची गाडी घेऊन खानापूर हाळशीकडे जाऊन या एकदा. रस्ता विचारायला प्रत्येक वळणावर कोणतरी मावशी/मामा भेटतात का बघत रहावं लागतं. आणि ही कानडी दंडेली सर्वपक्षीय आहे. म्हादेईच्या उपनद्यांवर धरणे बांधू नका कारण गोवा सीमेवरचे दूधसागर जंगल आणि धबधबा ओसाड पडेल, शिवाय गोव्याचे पाणी कमी होईल असा लवादाचा निर्णय आहे, तरी भाजपा आणि कॉंग्रेस दोन्ही कन्नडिग सरकारांनी धरणांचे काम चालूच ठेवले आहे. गोवा सरकार निषेध करण्यापलीकडे काहीही करू शकलेले नाही.

In reply to by पैसा

बाळ सप्रे 01/08/2014 - 11:57
कानडी दंडेली निषेधार्हच आहे. पण जितक्या दोन्ही बाजू हट्टाला पेटतील तेवढी दंडेली वाढतच जाणार. आणि इथे सामंजस्याने प्रश्न सुटण्यासारखा आहे. कामापुरतं कानडी वापरुन सोडुन द्यावं. जर खरच मराठी माणसं जास्त आहेत तर बाकी व्यवहार मराठीत चालतीलच की. दोन दुकानदार एकमेकांशी मराठी बोलतात म्हणून पोलिस येणार नाहियेत अडवायला. पोलिस मराठीत पत्ता विचारल्यास उत्तर देत नसतील तर जवळच्या दुकानदाराला मराठीत विचारावा (मराठी बहुसंख्य आहेत असं ऐकलय. त्यामुळे मराठी दुकानदारच नाहित असे होणार नाही) .. पोलिसाशिवाय पर्याय नसल्यास हिंदी/ इंग्लिशमध्ये विचारावा.. पत्ता शोधताना पत्ता मिळण्याला प्राधान्य द्यावे. भाषिक अस्म्तेला नव्हे. अस्मिताही असावी पण डेडलॉक होतयं म्हटल्यावर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काहितरी विचार करायला हवा. लोकशाही मार्गाने केंद्रात मागण्या चालू ठेवाव्या भाषिक सक्तिविरुद्ध.

In reply to by बाळ सप्रे

पैसा 01/08/2014 - 12:24
>>जर खरच मराठी माणसं जास्त आहेत तर बाकी व्यवहार मराठीत चालतीलच की. दोन दुकानदार एकमेकांशी मराठी बोलतात म्हणून पोलिस येणार नाहियेत अडवायला.>> मला वाटते तिथले लोक तसेच वागतात. तरी परवा पोलिसांकडून येळ्ळूरला लोकांना घरात घुसून मारहाण झाली असं ऐकलं. पण एवढी दंडेली अस्ताना आणि महाराष्ट्र सरकारची कोणतीही भरीव मदत नसतानाही ते एवढा लढा देत आहेत, म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असणारच. निव्वळ पुढार्‍यांची सोय/मतलब म्हणून असे लढे इतकी वर्षे चालत नाहीत. नाहीतर महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबई गुजरातला जोडायची मागणी हळूहळू थंड झाली, तशी ही चळवळसुद्धा बंद झाली असती. तुम्ही खानापूरच्या जंगलात आहात. जवळपास माणूस नावाचा प्राणी ५ एक किमि मधे नसावा. समोर सारख्याच रुंदीचे दोन रस्ते दिसताहेत. गोव्याकडे जाणारा कुठचा रस्ता ते तुम्हाला माहिती नाही. जो बोर्ड आहे तो फक्त आणि फक्त कानडीत. इंग्लिशसुद्धा नाही. अशावेळी काय कराल? त्या सरकारला शिव्या देण्यापलिकडे? हे जास्तच जाणवतं कारण कोल्हापूरकडून किंवा लोंढ्याकडून कर्नाटकात शिरताच फक्त एकाच कानडी भाषेतले बोर्ड दिसायला लागतात आणि गोव्यात तर ३ काय चार भाषांतले बोर्ड्स आहेत सगळीकडे! कर्नाटक सरकारला मराठीची चळवळ दडपून टाकायची आहे ना, मग त्याचा त्रास प्रवासी लोकांना का? आणि पोलिसांना हिंदी/इंग्लिशमधे विचारलं तर सरळ दुर्लक्ष करतात. मराठी तर सोडूनच द्या! टुरिस्टांना कसली आलीय अस्मिता!

In reply to by पैसा

बाळ सप्रे 01/08/2014 - 13:39
येळ्ळूरला घरात घुसून मारहाण हे अतिच झालं पोलिसांचं पण "येळ्ळूर महाराष्ट" बोर्डाचा हट्ट धरणं हेदेखिल अतिच झालं.. बाकी फक्त कन्नड बोर्ड लावणं हे देखिल या हट्टाचा परीणाम.. बेंगळूरला इंग्लिश बोर्ड लावतील पण सीमाभागात नाही!!

In reply to by बाळ सप्रे

दोन्ही राज्यांनी प्रश्न सुटावा म्हणून महाजन आयोग नेमला.बहुतेक १९६५-६६ च्या सुमारास.आयोगाने निकाल कर्नाटकच्या बाजुने दिला.शहरात/जिल्ह्यात मराठी भाषिक अधिक असले मूळ संस्कृती कन्नड होय असा आयोगाने निर्वाळा दिला होता.त्याच सुमारास शिवसेनेची स्थापना झाली. काहीतरी करून मराठी प्रश्न,अन्याय जिवंत ठेवणे ही मराठी राजकिय नेत्यांची गरज बनली. मग कधी मनोहर जोशी तर कधी शरद पवार तर कधी आणखी कुणी जनता पार्टीचा कुणी नेता.'अन्यायाला वाचा फोडून' स्वतःच्या राजकारणाला सीमाभागाची फोडणी देण्याचे काम त्यांनी केले. सध्या येळ्ळूरकरांमागचा बोलवता धनी कोण हे सांगणे कठीण पण सेना व कॉन्ग्रेस असण्याची शक्यता वाटते.

In reply to by बॅटमॅन

सीमा भागात बिगरमराठा 'मराठी' लोक आहेत, लिंगायत वाणी जैन वगैरे जास्त आहेत. त्यामुळे इथल्या 'मराठा 'नेतृत्वाला त्यांच्याशी घेणेदेणे नाही, एक बाळासाहेबांनंतर या मुद्दावर कोणीही आक्रमक नाही. टग्या आणि टग्याचा काका पक्के जातियवादी असल्याने तिकडे फिरकतही नाहीत, विदर्भातही मराठा पाँप्युलेशन कमी असल्याने तिकडे फारसे लक्ष देत नाहीत.सीमा प्रश्नी मराठी लोक संघटीत नाहीत याचे कारण' जात' आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

नाव आडनाव 31/07/2014 - 14:20
आली, सरकारांची चर्चा जातीवर आली एकदाची. ही माहिती सरकार कुठून आणतात देवाला माहित. मागे बारामती च्या एका बातमीतील "गाव धनगर" आहे असं सांगितलं होतं सरकारांनी, आता सीमा भागात बिगरमराठा लोक राहतात हि एक नवी माहिती. नेफळे अहो झोप तरी लागते का, कि झोपेत सुद्धा जात-जातच चालू असतं. सुधरा राव.

In reply to by बॅटमॅन

यसवायजी 31/07/2014 - 14:18
बरोबर आहे. महाराष्ट्रात येऊन काहीच फायदा नाहीए आता. ६०-७० ला जन्मलेल्यांची निम्मी लाकडं मसणात गेली. शाळेत कन्नड सक्तीचे असल्याने पुढच्या पिढीला कन्नड येतंच. उलट माझ्यासारख्यांना पुणे-मुंबै ते बेंगलुरु-मैसुरु पर्यंतचे सगळे पर्याय सोयीचे वाटतात. फलकाबद्दल- तो फलक बर्‍याच वर्षांपासून होता तिथे. आता न्यायलयाचा निर्णयाविरुद्द पुन्हा फलक लावणे चुकीचेच. पण त्यांच्या दॄष्टीने तो फक्त फलक नव्हता. जाउदे.. फक्त त्या मस्तीचे काय करायचे हाच खरा अनुत्तरीत प्रश्न आहे. आपण आपलं जिकडं(KA-MH) खोबरं मिळंल तिकडं चांगभलं म्हण्तो. ;)

In reply to by यसवायजी

बॅटमॅन 31/07/2014 - 14:20
सहमत आहे. खोबरं तिकडं चांगभलं हेच उत्तम!!!! बाकी मराठी नेतृत्वाने मनावर घेतल्याखेरीज त्या मस्तीचं काय होत नसतंय.

In reply to by नितिन थत्ते

बॅटमॅन 03/08/2014 - 01:14
ही म्हण कुठेशीक वाचल्याचे आठवते. म्हणींचे स्कॉलरशिपवाले कळेक्षन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by यसवायजी

६०-७० ला जन्मलेल्यांची निम्मी लाकडं मसणात गेली.
बापरे माझी पण निम्मी लाकडं मसणात गेली हे ऐकून उगीचच म्हातारं झाल्याचे वाटायला लागलं :(

In reply to by प्रभाकर पेठकर

बाळ सप्रे 01/08/2014 - 15:14
अरे!!! स्वर्गातून मजा काय बघताय राव?? इकडे देव असण्या नसण्यावर इतका वाद चालू आहे.. धावतं समालोचन करा की देवभेटीच!!

In reply to by बाळ सप्रे

मी काय धावतं समालोचन-बिमालोचन वगैरे करणार? मराठीत म्हण आहे नं 'आप मेल्याशिवाय स्वर्ग (पर्यायाने देव) दिसत नाही.' मग कायssss मरा.....!

In reply to by बॅटमॅन

मदनबाण 30/07/2014 - 22:08
दक्षिणेतले लोक एरवी आपसांत किती का भांडेनात, राज्यहिताचा प्रश्न आला की केंद्रात सर्वपक्षीय दबावगट तयार करतात. महाराष्ट्रातल्या नेत्यांना ती अक्कल नाही आणि ती औकातही नाही. राडे करणे, चमत्काराने धरणे भरणे, यातच एनर्जी घालवताहेत झालं. पूर्णपणे सहमत ! महाराष्ट्राचे वाटोळे कोणी केले ? कन्नडिगांनी का ? बेळगाव आणि समस्त इतर शहरे आणि गावं जी महाराष्ट्रात येण्यास आसुसली आहेत, त्यांना महाराष्ट्रात काय मिळणार आहे ? इथे फक्त आमच्या माजलेल्या सांड नेत्यांच्या वाढदिवसांच्या फ्लेक्स शिवाय काही नाही ! बरं महाराष्ट्रातली जनता यांच्या {बेळगाव आणि समस्त इतर शहरे आणि गावं} यांच्यासाठी पेटुन उठेल का ? तर खेदाने सांगावे लागेल नाही ! अहो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पाण्यासाठी उपोषणाला बसणार्‍यांची टिंगल करतात आणि गलिच्छ भाषा वापरतात... त्या महाराष्ट्रात येउन काय मिळणार ? इथे विजही नाही ! बरं वीज नाही त्यामुळे जास्त मुल जन्माला येतात असा जगावेगळा शोध लावणारेच हेच टग्या ! इथे फक्त टगेगिरी चालते... विकास आणि सुव्यवस्थेच्या नावाने पुरती बोंब आहे. जास्त कशाला वेगळ बोलु ? माझ्या लहानपणा पासुन आणि जेव्हा पासुन पेपर वाचत आलो आहे तेव्हा पासुन पावसाळ्याच्या आधी नाले सफाई झाली नाही, नाले सफाईत भ्रष्टाचार, सगळीकडे पाणी तुंबले, मुंबइच्या लोकलवर पावसाचा परिणाम, हार्बरलाइन बंद पडली, खड्डे आणि त्याच्या बातम्या आणि फोटो... हे इतके वर्ष सातत्याने घडताना पाहत आहे,वाचत आहे. कालच लोकसत्तेचा अग्रलेख {राज्य रुतले खड्डय़ांत..!} वाचला होता... फार अस्वस्थ व्हायला होत मला... आपल्या महाराष्ट्रातले राज्यकर्त्ये नक्की काय करतात ? मुंबइच शांघ्याय झाल ? सिंगापुर झाल? कोकणाचा कॅलिफोर्रनिया झाला ? वाटोळ मात्र नक्कीच झालं ! नुसता भ्रष्टाचार...अव्याहतपणे चालणारा ! महाराष्ट्र शेतकर्‍यांच्या आत्महत्येत पहिला, विद्यार्थींच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला,पोलिसांच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला,सर्व प्रकारच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला. काय ठेवलय या महाराष्ट्रात भ्रष्टाचारा शिवाय ? जाता जाता :--- कालच ऑफिसमधुन घरी जाताना जवळपास गुडघाभर पाण्यातुन बाइक काढुन घरी जिवंत पोहचलो ! हेच आमचे जगणे ? नाहीतर खालच्या तरुणासारखा कुठेतरी वाहुन गेलो असतो... आजची स्वाक्षरी :- 'काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं' :(

In reply to by मदनबाण

बॅटमॅन 31/07/2014 - 13:02
परम खेदाने मदनबाणाशी सहमत व्हावे लागत आहे. :( एकसे एक माजलेले गुंठामंत्री, किलो किलो सोने घालून फिरणारे हत्ती यांची मोकाट चराई सुरू आहे. माजुरडे नेते अन त्यांचे दीडदमडीचे चेले यांची गुंडगिरी वगळता महाराष्ट्रात काही उरलेलं नाही. सगळे साले मूर्खागमनी :(

In reply to by मदनबाण

अगदी मान्य. बेळगाव- संयुक्त महाराष्ट्र याविषयी मिपावरच २०१० मधील पंगांचा हा आणि हा प्रतिसाद आठवला. पंगांसारखे मिपाकर हल्ली इथे का येत नाहीत काय माहित?

In reply to by मदनबाण

बाळ सप्रे 31/07/2014 - 14:51
तुलना अस्थानी आहे.. महाराष्ट्रात त्यांना केवळ कन्नड सक्ती टाळण्यासाठी यायचयं.. आणि ते नक्की साध्य होईल महाराष्ट्रात आल्यास. बाकी राहिला प्रश्न महाराष्ट्रातील राजकारण्यांचा आणि राज्यकारभाराचा.. कर्नाटकात काय एवढं रामराज्य आहे?? इथे टग्या तिथे येडंयुरप्पा.. गुंठामंत्री तिकडेही आहेतच.. खाणवाले रेड्डीबंधु वगैरे या गुंठामंत्र्यांचेही बाप निघतील.. इकडे मनसे,सेना, ब्रिगेड .. तिकडे रक्षण वेदिके, श्रीरामसेना सगळे एका माळेचे मणी..

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश 01/08/2014 - 11:31
नाकावर टिच्चून फलक लावण्यात प्वाइंट काय ते मला अजूनही समजत नाही
जर काही पॉइंट नाहि तर तसाच का नाही ठेऊ दिला तो फलक? कशाला उखडला? तेव्हा कैतरी पॉइंट असणारच ना तो फलक लावण्यात? :P

वर प्रशांतने म्हंटल्याप्रमाणे सेना-भाजपाची कोंडी करण्यासाठी मनसेला पुढे आणण्याचा कॉन्ग्रेसवाल्यांचा डाव दिसतोय.तिकडे कर्नाटकातही कॉन्ग्रेसचे सरकार आहे त्यामुळे नाटक जास्त वेळ चालवण्याची परवानगी कॉन्ग्रेसश्रेश्ठि देणार नाहीत्.असो. दिल्ली असो वा येळ्ळूर आपल्या मराठी पुढार्‍यांना कुठलाही मुद्दा चालतो, मराठीच्या नावाने गळा काढायला.

हा प्रश्न उकरून काढण्यामागे मती गुंग करणारे बारामतीकरच असणार असे हे परवा म्हणाले होते. ते खरे ठरले. http://www.loksatta.com/maharashtra-news/rally-of-ncp-in-yellur-736564/

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 20/11/2014 - 03:14
नायतर काय. वेगळा विदर्भ (हागणदारीमुक्त) केला नाही हेच नशीब म्हणायचे! अन नै आलं ते त्यांच्यासाठी बरंच आहे. पुन्हा नायतर दादागिरीसाठी अजूनेक फ्रंट मिळणार, दुसरे काय?

In reply to by हाडक्या

प्यारे१ 19/11/2014 - 22:27
हे बघा मी टीआरपीसाठी एकही प्रतिसाद देणार नाही आधीच सांगून ठेवतोय. समजलं का??? समजलं नसलं तर पुन्हा सांगेनच असं नाही असं नाही असंही नाही.

धमाल मुलगा 25/07/2014 - 15:04
यळ्ळूरकरांच्या लढ्याला चिरडण्याचं कारस्थान जोरदार चालू आहे तर. पुर्वी अपर्णाताईनं मिपावर यळ्ळूरच्या लढ्याबद्दल लिहिलं होतं त्याची आठवण झाली - http://www.misalpav.com/node/17029

प्रसाद१९७१ 25/07/2014 - 15:32
नक्की काय प्रोब्लेम आहे तुमचा? बेळगाव पाकीस्तानात चाललय की काय? इथे महारष्ट्रात काय चांगले होतय की कोणाला महारष्ट्रात यावे असे वाटावे. गुंड आणि टग्यांचे राज्य इथे. आतातर खुल्या वर्गातल्या जागा पण कमी झाल्या. सारी-सारी पुण्याई व हजारो मराठी भाषिकांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल>>> कसली पुण्याई?

In reply to by प्रसाद१९७१

अरे ते सॅर्कॅस्टिक का म्हणतात तसे आहे असे वाटतय. कानडावू विठ्ठलू कर्नाटकू ऐवजी कानडावू विठ्ठ्लू महाराष्ट्र्रू असे म्ह्णायचे ह्यापुढे.

दुसर्‍या राज्यात जावून ही असली पाट्या,ध्वज लावायची टगेगिरी करावीच का म्हणते मी?त्यांच्या लोकांनीही येथे कोल्हापूरात्,सोलापूरात असले प्रकार केले तर चालवून घ्यायचे का? ईतक्या वर्षानंतरही असल्या पेटवापेटवीच्या प्रकारांना महत्व दिले जाते हे मराठी माणसाचे दुर्दैव.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बॅटमॅन 25/07/2014 - 15:42
मराठी जतन करण्याचे अन्यही बरेच मार्ग आहेत. उगी राडेबाजी का करावी ते समजत नाही.

In reply to by मृत्युन्जय

धमाल मुलगा 25/07/2014 - 16:44
सीमाप्रश्न सुटला? कधी? यळ्ळूरकर गेली कित्येक वर्षं कर्नाटक सरकारशी लढत आहेत. अधिक माहितीसाठी : कॉलिंग: अपर्णा अक्षय!

नितिन थत्ते 25/07/2014 - 16:00
>>जय बेन्च ! बेन्चवर आहात वाट्टं.... (पण तरीही बेंचला कधीच जय म्हणू नये.... बेंचवरच्यांना कंपणी केव्हाही जय महाराष्ट्र करू शकते).

In reply to by नितिन थत्ते

(पण तरीही बेंचला कधीच जय म्हणू नये.... बेंचवरच्यांना कंपणी केव्हाही जय महाराष्ट्र करू शकते). >>> आपली हरकत नाही त्यालाही :) ! तिकडे कन्नडिग्गांच्या राज्यात बंगळुरुला गोल्द्मन सच्स ची मस्त ऑफर सोडुन इथे पुन्यात येवुन बसलोय ... अल्मोस्त १००% रेज द्यायला तयार झाले होते ते सोडुन आमचं पुणं आमचा सातारा म्हणुन इथे येवुन बसलोय :( !

In reply to by यशोधरा

म्हणून इथे ती चिडचिड व्यक्त होतेय की काय >>> चिडचिड ? तुकाराम बुवांनी तर म्हणुन ठेवलय "ठेविले अनंते तैसेची रहावे | बेन्चवरी असु द्यावे समाधान || " त्यामुळे काही चिडचिड नाही ... मोकळा वेळ काढायला जरा टाईमपास ... कधी इथं का ड्या सार तर कधी तिथं *pardon* ... खरंच राव अत्ता गिरीजा आयडी असता अन इतरांना माहीत नसते तर मजा आली असती *biggrin* बाकी पुढील चर्चा व्यनितुन !!

In reply to by प्रसाद गोडबोले

सूड 25/07/2014 - 18:25
>>खरंच राव अत्ता गिरीजा आयडी असता अन इतरांना माहीत नसते तर मजा आली असती अजूनही वेळ गेली नाही गिर्जाकाका, एखादा स्त्रीआयडी घ्यायचा विचार करु शकतोस. ;) ह. घे. हो. ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

यशोधरा 25/07/2014 - 18:25
मोकळा वेळ काढायला जरा टाईमपास ... कधी इथं का ड्या सार तर कधी तिथं >> कधीतरी वा मेबी तुमच्या बाबतीत सहसा टाईमपास म्हणून काड्या वा टिंगल वगैरे ठीके, पण कधीतरी चेंज म्हणून मिपावर काही उत्तम असंही लिहून पहा. काही वेगळं गवसेलही, कोणी सांगावं? :) प्रयत्न तर करा, जमत असल्यास. खरंच राव अत्ता गिरीजा आयडी असता अन इतरांना माहीत नसते>> नाही, माहित होते, तिकडेही झालेय की हे आयडी प्रकरण आणि कधी ना अक्धी कळतेच की लोकांना.

In reply to by यशोधरा

पण कधीतरी चेंज म्हणून मिपावर काही उत्तम असंही लिहून पहा. काही वेगळं गवसेलही, कोणी सांगावं? प्रयत्न तर करा, जमत असल्यास.
नको . आपलं अंतर्जालीय वास्तव्य नवीन मित्र बनवणे , नवीन काही वाचायला शिकायला मिळणळ, बाकी टिंगलटवाळी चेष्टामस्करी कॉलेजच्या कट्ट्यावर करायचो ना दंगा तसं काहीसें मर्यादित राहुदे ... अंतर्जालावर कविता कथा टाकली अन ५-५० लाईक्स / कमेन्ट्स आले की हवेत जाणारी अन खरं पोटेन्शीयल असुनही ह्या भ्रामक वर्चुअल रीयालीटीत हरवुन जाणारी बरीच माणसे पाहिली आहेत (आणि कोणी अंतर्जालावर लिहुन खुप मोठा कादंबरीकार कथाकार कवी झालयाचे पाहण्यात नाही ) त्यापेक्षा आपलं बरं ... वेळ आहे तोवर गप्पा मारा ...एकदा कामाला लागलं की मिपा बंद !!

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या 25/07/2014 - 18:52
आपलं अंतर्जालीय वास्तव्य नवीन मित्र बनवणे , नवीन काही वाचायला शिकायला मिळणळ, बाकी टिंगलटवाळी चेष्टामस्करी कॉलेजच्या कट्ट्यावर करायचो ना दंगा तसं काहीसें मर्यादित राहुदे ...
आमचंही असंच आहे. :)
अंतर्जालावर कविता कथा टाकली अन ५-५० लाईक्स / कमेन्ट्स आले की हवेत जाणारी अन खरं पोटेन्शीयल असुनही ह्या भ्रामक वर्चुअल रीयालीटीत हरवुन जाणारी बरीच माणसे पाहिली आहेत
एक मिपाप्रसिद्ध उदाहरण आमच्या पाहण्यात आहे.
वेळ आहे तोवर गप्पा मारा ...एकदा कामाला लागलं की मिपा बंद !!
आमचं तर कामच असं आहे की मिपा बंद करण्याची आवश्यकताच भासत नाही. क्रोमच्या इतर सतराशे साठ टॅबमध्ये एक टॅब मिपाचीही. तुमच्या धाग्याला बेळगांवच्या वाटेला लावण्याबद्दल क्षमस्व. ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

यशोधरा 25/07/2014 - 18:57
ते हवेत जाणं, न जाणं स्वतःवर अवलंबून असतं. तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे, पण जशी ही एक प्रकारची नशा असते ना, तशीच कोणत्याही आणि जवळपास प्रत्येक धाग्यावर टिंगलटवाळी करायचीही नशाच असते. त्याची उदाहरणं मिपावर आजवर कमी नाहीत. ( तुम्हांला उद्देशून वगैरे हे नाही, गेल्या ५ वर्षांत जे पाहिलं आहे ते सांगतेय) इथे वा कोणत्याही संस्थळावर कादंबरीकार, कथाकार वगैरे व्हायला कोणी येत नाही, येऊ नये. ५- ५० लाईक्स ने फुगून जाऊ नये, असं होत असेल, कोणी ह्यासाठी येत असेल तर त्यांनी आपापले इगो तपासून पहायची गरज आहे हे नक्की. इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त व्हायला आणि इतरांच्या व्यक्त होण्याला दाद द्यायला, जमलं तर निखळ करायला यायचं. थट्टा, विनोद, मस्करी ह्याचं वावडं नाहीच, फक्त मस्करीची कुस्करी होऊ नये इतकी काळजी घेतली तरी पुरे. असो. शुभेच्छा तुम्हांला. :)

In reply to by यशोधरा

इथे फक्त स्वांतसुखाय व्यक्त व्हायला आणि इतरांच्या व्यक्त होण्याला दाद द्यायला, जमलं तर निखळ करायला यायचं.
स्वांतसुखाय >>> मी आनंदासाठी काहीच करत नसतो .... अनंदाने करीत असतो *i-m_so_happy*
फक्त मस्करीची कुस्करी होऊ नये इतकी काळजी घेतली तरी पुरे.
कुस्करी झाली तरी ती अंतर्जालीयच राहील ह्याची आजवर काळजी घेतली आहे , कित्येक मतांवर कचकचीत विरोध असणारेही जेव्हा रियल लाईफ मधे भेटतात तेव्हा आम्ही मित्रांसारखेच वागतो ... आंतर्जालीय वास्तव्य आणि खरे अस्तित्व ह्या मध्ये डिस्टिन्क्शन करायला शिकले पाहिजे आपण ( माझ्यामते मला आजवर तरी ते जमले आहे :) ) ! कारण माणुस जसा खराखुरा असतो तसा तो कधी अंतर्जालावर वावरत नाही तो त्याला स्वतःला जसं पोर्ट्रे करायचय तसं वावरतो ( हे माझं मत नाही , सोशल नेटवर्किंग आणि त्याचे ह्युमन सायकी वरील परिनाम ह्यावरचा कोणतव्हीअभ्यासक हेच सांगेल ) आणि ह्याच कारणासाठी मल्टीपल आणि अन ट्रॅकेबल आयडी अलाऊड असले पाट्रॅकेबलसं माझं प्रांजळ मत आहे :) तुमच्या शुभेच्छांचा आदराने स्विकार करत आहे . मनःपुर्वक धन्यवाद :) त.टी : पुढे मागे कधी कट्ट्याला भेटायचा योग आलातर तुमच्या लक्षात येईल अंतर्जालावरचा प्रगो अन खर्‍या आयुष्यातला पश्या ही दोन खुप वेगळी व्यक्तिमत्वे आहेत :)

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या 25/07/2014 - 19:13
कित्येक मतांवर कचकचीत विरोध असणारेही जेव्हा रियल लाईफ मधे भेटतात तेव्हा आम्ही मित्रांसारखेच वागतो ...
हे बाकी खरं आहे. :)

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 25/07/2014 - 19:13
कारण माणुस जसा खराखुरा असतो तसा तो कधी अंतर्जालावर वावरत नाही तो त्याला स्वतःला जसं पोर्ट्रे करायचय तसं वावरतो
हाण तेजायला! या वाक्यासाठी तुला पार्टी लागू.

In reply to by बॅटमॅन

सूड 25/07/2014 - 19:57
कारण माणुस जसा खराखुरा असतो तसा तो कधी अंतर्जालावर वावरत नाही तो त्याला स्वतःला जसं पोर्ट्रे करायचय तसं वावरतो
जे ब्बात!! आता ब्याट्या पार्टी देतोय म्हणताना मी वेगळे कष्ट घेत नाही. ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

यशोधरा 25/07/2014 - 19:17
ओके. हरकत नाही :) पुढे मागे कधी कट्ट्याला भेटायचा योग आला तर तुमच्या लक्षात येईल आंतर्जालावरची यशो अन खर्‍या आयुष्यातली यशो ही दोन वेगळी व्यक्तिमत्वे नाहीत. :)

कंजूस 25/07/2014 - 16:40
मला वाटतं आता इतिहासाची पानं मागे पलटत बसण्यापेक्षा राज्याराज्यांतून शेजारच्या राज्यांची भाषा शिकवण्याचे वर्ग काढा .महाराष्ट्रात कानडी आणि गुजराथी वगैरे .महानगरपालिकांच्या शाळांत संध्याकाळी शिकवा .आज आम्हाला शेजारच्या राज्यात पर्यटन करायला गेल्यावर इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो हे दुर्दैव आहे .विनोबा भावेंचं उदाहरण घ्या .आठ देशी आणि सहा परदेशी भाषा येत होत्या . पुढे जाण्याचे विचार नवीन पिढीसमोर मांडा हो.

In reply to by कंजूस

प्रसाद१९७१ 25/07/2014 - 17:09
मी बेळगावात जन्माला आलो असतो तर मला मराठी बरोबर कन्नड पण आली असती. मी पुण्यात / बंगलोर ला दोन्हीकडे लोकल भाषेत बोलू शकलो असतो. कन्नड ग्रुप मधे कन्नड म्हणुन आणि मराठी लोकांच्यात मराठी म्हणुन खपुन गेलो असतो.

In reply to by कंजूस

बॅटमॅन 25/07/2014 - 17:16
कन्नड शाळा सांगली-मिरजेत अजूनही आहेत- किमान २००३ सालापर्यंत तरी पाहिल्याचे आठवते. अन्य सीमावर्ती भागांतही असाव्यात बहुधा.

In reply to by कंजूस

यसवायजी 28/07/2014 - 20:05
कन्नड शाळा सोलापुरातही आहेत. निपाणीत कन्नडपेक्षा मराठी शाळा जास्त आहेत. सरकारकडून तेवढं आधीच केलं गेलंय. पण सरकारी कागदपत्रे, कोर्टकचेर्‍या, वगैरे कन्नडमध्ये. याचा त्रास होतो लोकांना.

आपलं झालं थोडं व्याह्यानी धाडलं घोडं असा प्रकार आहे हा सगळा. कायदेशिर पणे महाराष्ट्राचा भाग असणार्‍या प्रदेशात काय सोयीसुविधा देतयं सरकार? अजुन वाढीव भाग समाविष्ट करुन काय साधणार आहे? हाच प्रश्ण महानगरपालिकेच्या हद्दीत नव्यानी समाविष्ट होणार्‍या गावांबद्दलही विचारता येईल.

बहुगुणी 26/07/2014 - 02:56
मूळ स्रोत आणि त्याचं नंतर एकदा आलेलं विडंबन हेही नजरेखालून घालायला हरकत नाही ;-) बाकी मटा मधली बेळगावची बातमी वाचली तेंव्हाच मिपावर धागा निघणार याची खात्री होती, तो विडंबनात्मक निघाला हे फार बरं!

काळा पहाड 29/07/2014 - 17:02
महाराष्ट्रात येवून बेळगावचं भले काही भलं नाही होवो (खरं म्हणजे हेच खरं असावं). पण कन्नड्यांना हाणायला काय हरकत आहे? शिवसेना नेहमी तर या मुद्द्यावरून शंख करत असते. आता कर्नाटकाच्या एसट्या महाराष्ट्रात का फोडल्या जात नाहियेत? नॅशनल हायवे कोल्हापूरला बंद करून त्यांच्याकडे जाणारे ट्रक्स अडवता येवू शकतात. कृष्णेचं पाणी ब्लॉक करता येवू शकतं. शेट्ट्यांना हाकलून देता येवू शकतं. नाशिकचा कांदा अडवता येवू शकतो.

प्यारे१ 29/07/2014 - 17:47
महाराष्ट्र विधानसभा निवडणूका जवळ आलेल्या आहेत. ह्या घटनेचं निमित्त करुन मराठी मुद्द्यावर 'मनसे'ला पुढं आणण्याचं कार्य काँग्रेसकडून होत असण्याची शक्यता वाटते आहे.

पोटे 29/07/2014 - 20:49
सीमावाल्यांची अवस्था संत मीराबाईगत झालेली आहे. मीराबाईला अन्न वस्त्र निवारा तिचा नवरा द्यायचा. पण ती लबाड बाई त्याला सुख न देता देवाच्या लाकडी पुतळ्याला नवरा मानत होती. सीमावाल्याना सोयी कर्नाटक देते ( अर्थात रेव्हेन्युही घेते.) पण याना कुंकु मात्र म्हाराश्ट्राचे हवे आहे

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 30/07/2014 - 17:29
उपमा जर बाजूला ठेवली तर मूळ मुद्दा बरोबरच आहे असं मला वाटतं. उपमेबद्दल चर्चा तूर्त करीत नाही. अर्थात याचा अर्थ कर्नाटक पोलिसांची गुंडगिरी समर्थनीय आहे असा आजिबात नाही. पण यांनी विचार करावा, मराठी जपण्याचे अनेक मार्ग आहेत. नाकावर टिच्चून फलक लावण्यात प्वाइंट काय ते मला अजूनही समजत नाही, त्यातही मराठी नेत्यांकडून *ट काही होणार नाही हे ढळढळीत दिसत असतानाही! हे ***** नेते 'आपल्याच' विदर्भ आणि मराठवाड्याला धड जोडू शकले नाहीत, बेळगाव काय *ट घेणारेत? गफ्फा हो, नुसत्या गफ्फा! बेळगाव इ. आपल्याकडे हवा असं लाख वाटतं हो मलाही, पण यांच्या **त दम नाही त्याचं काय? मुंबैत बसून गफ्फा मारणारे केंद्रात मात्र उघडे पडतात! दक्षिणेतले लोक एरवी आपसांत किती का भांडेनात, राज्यहिताचा प्रश्न आला की केंद्रात सर्वपक्षीय दबावगट तयार करतात. महाराष्ट्रातल्या नेत्यांना ती अक्कल नाही आणि ती औकातही नाही. राडे करणे, चमत्काराने धरणे भरणे, यातच एनर्जी घालवताहेत झालं.

In reply to by बॅटमॅन

पोटे 30/07/2014 - 17:36
नाकावर टिच्चून फलक लावण्यात प्वाइंट काय ते मला अजूनही समजत नाही, ........ म्हणुनच तर म्या त्याना मीराबै म्हटलं . ती लाकडी पुतळा बाळगुन होती, हे लाकडी फलक लावुन बसलेत.

In reply to by बॅटमॅन

यसवायजी 30/07/2014 - 22:03
परिणाम भोगायची तयारी असणार्‍यांनीच असले उद्योग करावेत हे बरोबर. पण अगदिच शांतपणे बघत बसले, तर मग गर्व, अभिमान तर सोडाच, स्वतःच्याच 'गल्लीत' लाज वाटायला लागेल की. मराठी जपण्याचे अनेक मार्ग आहेत ते कोणते सांगावे. म्हणजे जर उद्या दुकानावरच्या मराठी पाट्या काढण्यात आल्या तर प्रतिक्रीया काय असेल? (असे किरकोळ प्रकार झाले आहेत.) त्याच्या पुढे जाऊन दारावरची पाटी कन्नडमध्ये लावण्याची सक्ती केली तर? - पासपोर्ट व्हेरिफिकेशनवेळी निपाणी पोलिस स्टेशनमध्ये माझा वाद झाला होता. *** साले मराठीत बोलायलाच तयार नव्हते. "कन्नडा माताड इल्लादरे पासपोर्ट सिगल्ला" (कन्नड बोल नाहीतर पासपोर्ट मिळणार नाही) असे जरी तो पोलिस हसत (?) म्हणाला असला तरी आता मस्ती नक्कीच आलीय त्यांना. माझ्या जवळच्या नातेवाईकाने, निपाणीत फक्त मराठी बोलल्याने लाठीचा मार खाल्ला आहे. -(मुळचा KA23/ सध्या MH12) SYG

In reply to by यसवायजी

बॅटमॅन 31/07/2014 - 12:57
कन्नडिगांची मस्ती माहितेय बे यसवायजी. पण माझा मुद्दा असा आहे की या लोकांना- द्याटिज़ निप्पाणी, बेळगाव, इ. गावांतल्यांना महाराष्ट्रात येऊन कायच मिळणार नाही. हे कटु सत्य आहे. कर्नाटकवाले माज सोडत नाहीत आणि महाराष्ट्रातल्यांच्या अंगी तो दमही नाही, अशा परिस्थितीत काय करावे? मला असं वाटतं खरं. असो. जर यांच्याइतक्याच जोराने काही केलं तर ठीक, नपेक्षा दिल्या घरी सुखी रहा असेच खेदाने म्हणावे वाटते. :( :( असो...भावना समजून घेतल्या, पण मार्ग काय ते कळत नाही. मराठी नेतृत्व नेभळट दिसत असल्याने मी जे म्हणालो ते म्हणालो इतकेच.

In reply to by बॅटमॅन

सहमत रे. काही नातेवाईक आहेत तिकडे.कधीच भाषेची अडचण आली नाहि त्यांना.सीमाभागातही गुजराती,मारवाडी बांधब बर्यापैकी व्यापार करून आहेत असे ऐकले आहे.विशेषकरून मिठाईचा.त्यांना नाही का अडचण येत भाषा शिकायला? कसे शिकतात ते चटकन? ईकडे महाराष्ट्रात आसाम्,राजस्थानचे लोक येतात्,भाषा आतम्सात करतात व धंदा करून पैसेही मिळवतात. तीन पिढ्या राहूनही स्थानिक भाषा शिकणार नाही ह्याला अडेलतट्टूपणा म्हणेन खेदाने.खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे.अशानाच आपले नेते वापरून घेतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तीन पिढ्या राहूनही स्थानिक भाषा शिकणार नाही ह्याला अडेलतट्टूपणा म्हणेन खेदाने.खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे.अशानाच आपले नेते वापरून घेतात.
मग ? तुमचा मनसेला पाठींबा आहे का हो नेफळे ?

In reply to by प्रसाद गोडबोले

बाळ सप्रे 31/07/2014 - 14:11
स्थानिक भाषा शिकण्याचा आग्रह म्हणजे मनसे नव्हे. मनसे म्हणजे असे इतर मुद्दे आणि खळ्ळ खट्याक यांचं काँबिनेशन आहे.

In reply to by बाळ सप्रे

अगदी योग्य बोललास बाळ.मनसेचे 'टार्गेट' का काय म्हणतात ते म्हणजे रोजगारी करणारे अमराठी लोक.मराठीच्या नावाने राजकारण करणार्यांनी राज्यात २/४ मराठी ग्रंथालये बांधली तरी पुरे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

धन्या 01/08/2014 - 13:14
आज एका फोरमवर एका मुंबईच्या बावीस तेवीस वर्षांच्या बाब्याशी ओळख झाली. बोलणं अर्थातच हिंदीत चालू होतं. म्हटलं तू मुळचा कुठला त म्हणे "देल्हीका. नॉर्थ इंडीयन" मुंबईत केव्हापासून आहेस तर म्हणे "बॉर्न अँड ब्रॉटप इन बॉम्बे". बॉम्बे बरं का. मुंबई नाही. म्हटलं तू नॉर्थ इंडीयन किंवा दिल्लीचा कसं म्हणू शकतोस? तू तर महाराष्ट्रीय आहेस. तुझे आई वडील कामानिमित्त मुंबईत आले असतील तर ते फार तर म्हणू शकतात की आम्ही नॉर्थ इंडीयन किंवा दिल्लीचे आहोत म्हणून. अशा काही मिरच्या झोंबल्या त्याला.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

यसवायजी 31/07/2014 - 14:30
तीन पिढ्या राहूनही स्थानिक भाषा शिकणार नाही ह्याला अडेलतट्टूपणा म्हणेन खेदाने.
थोडी सुधारणा- स्थानिक भाषा मराठीच आहे. कन्नड लादली गेली आहे. असो. खरे सांगायचे तर अशा लोकांची संख्या खूप कमी आहे. कुठल्या सीमाभागाबद्दल बोलताय आपण? निपाणीत मराठी ८०% हून जास्त असतील.

In reply to by यसवायजी

सीमाभागात जे कोणी मराठी असतील त्यातील बहुतांशी लोकांना कन्नड येते असे म्हणतात.स्थानिक भाषा शिकायचीच नाही असा आग्रह धरणार्‍यांची संख्या खूप कमी असेल. होय ना? कन्न्ड लादली गेलीय म्हणजे काय? अरे राज्ये होवून ५० वर्षे उलटून गेली.मुंबईच्या गुजराती बांधवांनी किंवा नागपूरकरांनी 'आमच्यावर मराठी लादली' असे म्हणण्यासारखे आहे. .

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पैसा 01/08/2014 - 10:10
गुजराती लोक मुंबैत गुजरातमधून स्थलांतर करून आलेत. बेळगाव भागातल्यांचे तेच मूळ स्थान आहे. इवलूसा फरक आहे.

In reply to by पैसा

बाळ सप्रे 01/08/2014 - 10:23
मुंबैत सगळेच तसे स्थलांतर करुन आलेत.. मराठी माणसं कोकणातून, प. महाराष्ट्रातून.. गुजराती, गुजरातमधून..इ.. मुंबै पहिल्यांदा फक्त इंग्रज, पारशी लोक आणि काही कोळी एवढेच होते.. स्थलांतर करुन आलेल्या गुजरात्यांच्या आता ४-५ पिढ्या मुंबैत राहिल्यात.. किती वर्ष स्थलांतरीत म्हणणार ?? बेळगावात बर्‍याच जुन्या लोकांना मराठी, कन्नड दोन्ही भाषा येतात.. अस्मितेचा प्रश्न करुन लढा देत रहायच की परिस्थितीचा स्वीकार करुन पुढे जायच हे महत्वाचं.. राज्यस्थापनेनंतर इतक्या वर्षांत पुढच्या पिढ्यांनी कामकाजापुरतं कन्नड शिकण नक्की शक्य आहे.. आणि इतर जीवनात मराठी वापरा ना तिथे कोण येत नाहिच आहे अडवायला..

In reply to by बाळ सप्रे

पैसा 01/08/2014 - 11:31
ते बिचारे कन्नड शिकतातच ना! तसे गुजराती लोकसुद्धा बर्‍यापैकी मराठी बोलतात. आता गुजराती/मराठी असा काही वाद आहे असं वाटत नाही. पण तिथल्या कानडी सरकारने सीमाभागात सगळे ऑफिसर्स कानडीच नेमायचे, सगळे बोर्ड कानडीत लावायचे असली दंडेली करू नये ना! बेळगावातले दुकानदार सांगतात की मराठी दुकानदारांना हे कानडी ऑफिसर्स भयंकर त्रास देतात. सगळे सरकारी बोर्ड त्रैभाषिक असले पाहिजेत असा नियम असताना सीमाभागात सगळे रस्त्यांचे बोर्ड्स कानडीच आहेत. अगदी राष्ट्रीय हमरस्त्यावरसुद्धा. पोलिसांना मराठी/हिंदीत विचारलं तर कानडीत बोलतात आणि दुर्लक्ष करतात. स्वतःची गाडी घेऊन खानापूर हाळशीकडे जाऊन या एकदा. रस्ता विचारायला प्रत्येक वळणावर कोणतरी मावशी/मामा भेटतात का बघत रहावं लागतं. आणि ही कानडी दंडेली सर्वपक्षीय आहे. म्हादेईच्या उपनद्यांवर धरणे बांधू नका कारण गोवा सीमेवरचे दूधसागर जंगल आणि धबधबा ओसाड पडेल, शिवाय गोव्याचे पाणी कमी होईल असा लवादाचा निर्णय आहे, तरी भाजपा आणि कॉंग्रेस दोन्ही कन्नडिग सरकारांनी धरणांचे काम चालूच ठेवले आहे. गोवा सरकार निषेध करण्यापलीकडे काहीही करू शकलेले नाही.

In reply to by पैसा

बाळ सप्रे 01/08/2014 - 11:57
कानडी दंडेली निषेधार्हच आहे. पण जितक्या दोन्ही बाजू हट्टाला पेटतील तेवढी दंडेली वाढतच जाणार. आणि इथे सामंजस्याने प्रश्न सुटण्यासारखा आहे. कामापुरतं कानडी वापरुन सोडुन द्यावं. जर खरच मराठी माणसं जास्त आहेत तर बाकी व्यवहार मराठीत चालतीलच की. दोन दुकानदार एकमेकांशी मराठी बोलतात म्हणून पोलिस येणार नाहियेत अडवायला. पोलिस मराठीत पत्ता विचारल्यास उत्तर देत नसतील तर जवळच्या दुकानदाराला मराठीत विचारावा (मराठी बहुसंख्य आहेत असं ऐकलय. त्यामुळे मराठी दुकानदारच नाहित असे होणार नाही) .. पोलिसाशिवाय पर्याय नसल्यास हिंदी/ इंग्लिशमध्ये विचारावा.. पत्ता शोधताना पत्ता मिळण्याला प्राधान्य द्यावे. भाषिक अस्म्तेला नव्हे. अस्मिताही असावी पण डेडलॉक होतयं म्हटल्यावर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काहितरी विचार करायला हवा. लोकशाही मार्गाने केंद्रात मागण्या चालू ठेवाव्या भाषिक सक्तिविरुद्ध.

In reply to by बाळ सप्रे

पैसा 01/08/2014 - 12:24
>>जर खरच मराठी माणसं जास्त आहेत तर बाकी व्यवहार मराठीत चालतीलच की. दोन दुकानदार एकमेकांशी मराठी बोलतात म्हणून पोलिस येणार नाहियेत अडवायला.>> मला वाटते तिथले लोक तसेच वागतात. तरी परवा पोलिसांकडून येळ्ळूरला लोकांना घरात घुसून मारहाण झाली असं ऐकलं. पण एवढी दंडेली अस्ताना आणि महाराष्ट्र सरकारची कोणतीही भरीव मदत नसतानाही ते एवढा लढा देत आहेत, म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असणारच. निव्वळ पुढार्‍यांची सोय/मतलब म्हणून असे लढे इतकी वर्षे चालत नाहीत. नाहीतर महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबई गुजरातला जोडायची मागणी हळूहळू थंड झाली, तशी ही चळवळसुद्धा बंद झाली असती. तुम्ही खानापूरच्या जंगलात आहात. जवळपास माणूस नावाचा प्राणी ५ एक किमि मधे नसावा. समोर सारख्याच रुंदीचे दोन रस्ते दिसताहेत. गोव्याकडे जाणारा कुठचा रस्ता ते तुम्हाला माहिती नाही. जो बोर्ड आहे तो फक्त आणि फक्त कानडीत. इंग्लिशसुद्धा नाही. अशावेळी काय कराल? त्या सरकारला शिव्या देण्यापलिकडे? हे जास्तच जाणवतं कारण कोल्हापूरकडून किंवा लोंढ्याकडून कर्नाटकात शिरताच फक्त एकाच कानडी भाषेतले बोर्ड दिसायला लागतात आणि गोव्यात तर ३ काय चार भाषांतले बोर्ड्स आहेत सगळीकडे! कर्नाटक सरकारला मराठीची चळवळ दडपून टाकायची आहे ना, मग त्याचा त्रास प्रवासी लोकांना का? आणि पोलिसांना हिंदी/इंग्लिशमधे विचारलं तर सरळ दुर्लक्ष करतात. मराठी तर सोडूनच द्या! टुरिस्टांना कसली आलीय अस्मिता!

In reply to by पैसा

बाळ सप्रे 01/08/2014 - 13:39
येळ्ळूरला घरात घुसून मारहाण हे अतिच झालं पोलिसांचं पण "येळ्ळूर महाराष्ट" बोर्डाचा हट्ट धरणं हेदेखिल अतिच झालं.. बाकी फक्त कन्नड बोर्ड लावणं हे देखिल या हट्टाचा परीणाम.. बेंगळूरला इंग्लिश बोर्ड लावतील पण सीमाभागात नाही!!

In reply to by बाळ सप्रे

दोन्ही राज्यांनी प्रश्न सुटावा म्हणून महाजन आयोग नेमला.बहुतेक १९६५-६६ च्या सुमारास.आयोगाने निकाल कर्नाटकच्या बाजुने दिला.शहरात/जिल्ह्यात मराठी भाषिक अधिक असले मूळ संस्कृती कन्नड होय असा आयोगाने निर्वाळा दिला होता.त्याच सुमारास शिवसेनेची स्थापना झाली. काहीतरी करून मराठी प्रश्न,अन्याय जिवंत ठेवणे ही मराठी राजकिय नेत्यांची गरज बनली. मग कधी मनोहर जोशी तर कधी शरद पवार तर कधी आणखी कुणी जनता पार्टीचा कुणी नेता.'अन्यायाला वाचा फोडून' स्वतःच्या राजकारणाला सीमाभागाची फोडणी देण्याचे काम त्यांनी केले. सध्या येळ्ळूरकरांमागचा बोलवता धनी कोण हे सांगणे कठीण पण सेना व कॉन्ग्रेस असण्याची शक्यता वाटते.

In reply to by बॅटमॅन

सीमा भागात बिगरमराठा 'मराठी' लोक आहेत, लिंगायत वाणी जैन वगैरे जास्त आहेत. त्यामुळे इथल्या 'मराठा 'नेतृत्वाला त्यांच्याशी घेणेदेणे नाही, एक बाळासाहेबांनंतर या मुद्दावर कोणीही आक्रमक नाही. टग्या आणि टग्याचा काका पक्के जातियवादी असल्याने तिकडे फिरकतही नाहीत, विदर्भातही मराठा पाँप्युलेशन कमी असल्याने तिकडे फारसे लक्ष देत नाहीत.सीमा प्रश्नी मराठी लोक संघटीत नाहीत याचे कारण' जात' आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

नाव आडनाव 31/07/2014 - 14:20
आली, सरकारांची चर्चा जातीवर आली एकदाची. ही माहिती सरकार कुठून आणतात देवाला माहित. मागे बारामती च्या एका बातमीतील "गाव धनगर" आहे असं सांगितलं होतं सरकारांनी, आता सीमा भागात बिगरमराठा लोक राहतात हि एक नवी माहिती. नेफळे अहो झोप तरी लागते का, कि झोपेत सुद्धा जात-जातच चालू असतं. सुधरा राव.

In reply to by बॅटमॅन

यसवायजी 31/07/2014 - 14:18
बरोबर आहे. महाराष्ट्रात येऊन काहीच फायदा नाहीए आता. ६०-७० ला जन्मलेल्यांची निम्मी लाकडं मसणात गेली. शाळेत कन्नड सक्तीचे असल्याने पुढच्या पिढीला कन्नड येतंच. उलट माझ्यासारख्यांना पुणे-मुंबै ते बेंगलुरु-मैसुरु पर्यंतचे सगळे पर्याय सोयीचे वाटतात. फलकाबद्दल- तो फलक बर्‍याच वर्षांपासून होता तिथे. आता न्यायलयाचा निर्णयाविरुद्द पुन्हा फलक लावणे चुकीचेच. पण त्यांच्या दॄष्टीने तो फक्त फलक नव्हता. जाउदे.. फक्त त्या मस्तीचे काय करायचे हाच खरा अनुत्तरीत प्रश्न आहे. आपण आपलं जिकडं(KA-MH) खोबरं मिळंल तिकडं चांगभलं म्हण्तो. ;)

In reply to by यसवायजी

बॅटमॅन 31/07/2014 - 14:20
सहमत आहे. खोबरं तिकडं चांगभलं हेच उत्तम!!!! बाकी मराठी नेतृत्वाने मनावर घेतल्याखेरीज त्या मस्तीचं काय होत नसतंय.

In reply to by नितिन थत्ते

बॅटमॅन 03/08/2014 - 01:14
ही म्हण कुठेशीक वाचल्याचे आठवते. म्हणींचे स्कॉलरशिपवाले कळेक्षन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by यसवायजी

६०-७० ला जन्मलेल्यांची निम्मी लाकडं मसणात गेली.
बापरे माझी पण निम्मी लाकडं मसणात गेली हे ऐकून उगीचच म्हातारं झाल्याचे वाटायला लागलं :(

In reply to by प्रभाकर पेठकर

बाळ सप्रे 01/08/2014 - 15:14
अरे!!! स्वर्गातून मजा काय बघताय राव?? इकडे देव असण्या नसण्यावर इतका वाद चालू आहे.. धावतं समालोचन करा की देवभेटीच!!

In reply to by बाळ सप्रे

मी काय धावतं समालोचन-बिमालोचन वगैरे करणार? मराठीत म्हण आहे नं 'आप मेल्याशिवाय स्वर्ग (पर्यायाने देव) दिसत नाही.' मग कायssss मरा.....!

In reply to by बॅटमॅन

मदनबाण 30/07/2014 - 22:08
दक्षिणेतले लोक एरवी आपसांत किती का भांडेनात, राज्यहिताचा प्रश्न आला की केंद्रात सर्वपक्षीय दबावगट तयार करतात. महाराष्ट्रातल्या नेत्यांना ती अक्कल नाही आणि ती औकातही नाही. राडे करणे, चमत्काराने धरणे भरणे, यातच एनर्जी घालवताहेत झालं. पूर्णपणे सहमत ! महाराष्ट्राचे वाटोळे कोणी केले ? कन्नडिगांनी का ? बेळगाव आणि समस्त इतर शहरे आणि गावं जी महाराष्ट्रात येण्यास आसुसली आहेत, त्यांना महाराष्ट्रात काय मिळणार आहे ? इथे फक्त आमच्या माजलेल्या सांड नेत्यांच्या वाढदिवसांच्या फ्लेक्स शिवाय काही नाही ! बरं महाराष्ट्रातली जनता यांच्या {बेळगाव आणि समस्त इतर शहरे आणि गावं} यांच्यासाठी पेटुन उठेल का ? तर खेदाने सांगावे लागेल नाही ! अहो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पाण्यासाठी उपोषणाला बसणार्‍यांची टिंगल करतात आणि गलिच्छ भाषा वापरतात... त्या महाराष्ट्रात येउन काय मिळणार ? इथे विजही नाही ! बरं वीज नाही त्यामुळे जास्त मुल जन्माला येतात असा जगावेगळा शोध लावणारेच हेच टग्या ! इथे फक्त टगेगिरी चालते... विकास आणि सुव्यवस्थेच्या नावाने पुरती बोंब आहे. जास्त कशाला वेगळ बोलु ? माझ्या लहानपणा पासुन आणि जेव्हा पासुन पेपर वाचत आलो आहे तेव्हा पासुन पावसाळ्याच्या आधी नाले सफाई झाली नाही, नाले सफाईत भ्रष्टाचार, सगळीकडे पाणी तुंबले, मुंबइच्या लोकलवर पावसाचा परिणाम, हार्बरलाइन बंद पडली, खड्डे आणि त्याच्या बातम्या आणि फोटो... हे इतके वर्ष सातत्याने घडताना पाहत आहे,वाचत आहे. कालच लोकसत्तेचा अग्रलेख {राज्य रुतले खड्डय़ांत..!} वाचला होता... फार अस्वस्थ व्हायला होत मला... आपल्या महाराष्ट्रातले राज्यकर्त्ये नक्की काय करतात ? मुंबइच शांघ्याय झाल ? सिंगापुर झाल? कोकणाचा कॅलिफोर्रनिया झाला ? वाटोळ मात्र नक्कीच झालं ! नुसता भ्रष्टाचार...अव्याहतपणे चालणारा ! महाराष्ट्र शेतकर्‍यांच्या आत्महत्येत पहिला, विद्यार्थींच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला,पोलिसांच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला,सर्व प्रकारच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला. काय ठेवलय या महाराष्ट्रात भ्रष्टाचारा शिवाय ? जाता जाता :--- कालच ऑफिसमधुन घरी जाताना जवळपास गुडघाभर पाण्यातुन बाइक काढुन घरी जिवंत पोहचलो ! हेच आमचे जगणे ? नाहीतर खालच्या तरुणासारखा कुठेतरी वाहुन गेलो असतो... आजची स्वाक्षरी :- 'काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं' :(

In reply to by मदनबाण

बॅटमॅन 31/07/2014 - 13:02
परम खेदाने मदनबाणाशी सहमत व्हावे लागत आहे. :( एकसे एक माजलेले गुंठामंत्री, किलो किलो सोने घालून फिरणारे हत्ती यांची मोकाट चराई सुरू आहे. माजुरडे नेते अन त्यांचे दीडदमडीचे चेले यांची गुंडगिरी वगळता महाराष्ट्रात काही उरलेलं नाही. सगळे साले मूर्खागमनी :(

In reply to by मदनबाण

अगदी मान्य. बेळगाव- संयुक्त महाराष्ट्र याविषयी मिपावरच २०१० मधील पंगांचा हा आणि हा प्रतिसाद आठवला. पंगांसारखे मिपाकर हल्ली इथे का येत नाहीत काय माहित?

In reply to by मदनबाण

बाळ सप्रे 31/07/2014 - 14:51
तुलना अस्थानी आहे.. महाराष्ट्रात त्यांना केवळ कन्नड सक्ती टाळण्यासाठी यायचयं.. आणि ते नक्की साध्य होईल महाराष्ट्रात आल्यास. बाकी राहिला प्रश्न महाराष्ट्रातील राजकारण्यांचा आणि राज्यकारभाराचा.. कर्नाटकात काय एवढं रामराज्य आहे?? इथे टग्या तिथे येडंयुरप्पा.. गुंठामंत्री तिकडेही आहेतच.. खाणवाले रेड्डीबंधु वगैरे या गुंठामंत्र्यांचेही बाप निघतील.. इकडे मनसे,सेना, ब्रिगेड .. तिकडे रक्षण वेदिके, श्रीरामसेना सगळे एका माळेचे मणी..

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश 01/08/2014 - 11:31
नाकावर टिच्चून फलक लावण्यात प्वाइंट काय ते मला अजूनही समजत नाही
जर काही पॉइंट नाहि तर तसाच का नाही ठेऊ दिला तो फलक? कशाला उखडला? तेव्हा कैतरी पॉइंट असणारच ना तो फलक लावण्यात? :P

वर प्रशांतने म्हंटल्याप्रमाणे सेना-भाजपाची कोंडी करण्यासाठी मनसेला पुढे आणण्याचा कॉन्ग्रेसवाल्यांचा डाव दिसतोय.तिकडे कर्नाटकातही कॉन्ग्रेसचे सरकार आहे त्यामुळे नाटक जास्त वेळ चालवण्याची परवानगी कॉन्ग्रेसश्रेश्ठि देणार नाहीत्.असो. दिल्ली असो वा येळ्ळूर आपल्या मराठी पुढार्‍यांना कुठलाही मुद्दा चालतो, मराठीच्या नावाने गळा काढायला.

हा प्रश्न उकरून काढण्यामागे मती गुंग करणारे बारामतीकरच असणार असे हे परवा म्हणाले होते. ते खरे ठरले. http://www.loksatta.com/maharashtra-news/rally-of-ncp-in-yellur-736564/

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 20/11/2014 - 03:14
नायतर काय. वेगळा विदर्भ (हागणदारीमुक्त) केला नाही हेच नशीब म्हणायचे! अन नै आलं ते त्यांच्यासाठी बरंच आहे. पुन्हा नायतर दादागिरीसाठी अजूनेक फ्रंट मिळणार, दुसरे काय?

In reply to by हाडक्या

प्यारे१ 19/11/2014 - 22:27
हे बघा मी टीआरपीसाठी एकही प्रतिसाद देणार नाही आधीच सांगून ठेवतोय. समजलं का??? समजलं नसलं तर पुन्हा सांगेनच असं नाही असं नाही असंही नाही.
महाराष्ट्र टाईम्स मधील ही बातमी वाचून महाराष्ट्रदेशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा. मुख्य लेख वाचण्यासाठी "माऊस ची लेफ्ट क्लीक " आणि "डोळे" वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी ही डोळेच वापरावे लागतील. (आतापर्यंत ७ प्रतिसाद आले आहेत व एकही वाचण्यासारखा नाहीये .) http://maharashtratimes.indiatimes.com/nation/maharashtra-karnataka-border/articleshow/38989352.cms अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण बेळगाव यळ्ळुर मध्ये माघार घेत आहोत!

प्रबंध

वेल्लाभट ·

आयुर्हित 01/08/2014 - 22:06
एकी अशी असावी, निश्चय असा असावा हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा झिरपावी या मनात एकेक गोष्ट ऐसी प्रत्येक भावनेचा न्यारा सुगंध व्हावा जबरदस्त आशावाद प्रकट झाला आहे! आपले मनातले स्वप्न पुरे होवो. फक्त विश्वास या मनीचा, कदापि न मंद व्हावा आतून हाक यावी, अन तो बुलंद व्हावा हे जास्त योग्य होइल असे वाटते.

आयुर्हित 01/08/2014 - 22:06
एकी अशी असावी, निश्चय असा असावा हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा झिरपावी या मनात एकेक गोष्ट ऐसी प्रत्येक भावनेचा न्यारा सुगंध व्हावा जबरदस्त आशावाद प्रकट झाला आहे! आपले मनातले स्वप्न पुरे होवो. फक्त विश्वास या मनीचा, कदापि न मंद व्हावा आतून हाक यावी, अन तो बुलंद व्हावा हे जास्त योग्य होइल असे वाटते.
लेखनविषय:
काव्यरस
चिरदाह वेदनेचा मजला अखंड व्हावा मन त्यातही रुळावे, अन दाह थंड व्हावा येऊनिया न यावा माझा प्रयास कामी नशिबासही कसा हा माझाच छंद व्हावा ते शब्द आठविता, जणु काळही थिजावा एका क्षणाक्षणाचा बघता निबंध व्हावा एकी अशी असावी, निश्चय असा असावा हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा झिरपावी या मनात एकेक गोष्ट ऐसी प्रत्येक भावनेचा न्यारा सुगंध व्हावा विश्वास या मनीचा, एकाकी मंद व्हावा आतून हाक यावी, अन तो बुलंद व्हावा माझेच मी पुसावे अश्रू असे हसूनी कसलातरी मनाचा माझ्या प्रबंध व्हावा - अपूर्व ओक

नसलेल्या बाईचं असणं.

इनिगोय ·

अजया 25/07/2014 - 14:26
वाट असते,आहे, तिला दिसत नाहिये फक्त.जरासा स्वत:वर विश्वास ठेवेल तर नक्की दिसेल.

In reply to by अजया

प्यारे१ 25/07/2014 - 14:48
ती जिथं जशी उभी आहे तिथून नसेल दिसत कदाचित. स्वतःवर विश्वास तरी कसा असायचा? जिथं कशावरच विसंबू /विश्वास ठेवू शकत नाही ती तिथं? अर्थात तुम्ही म्हणता तसा सकारात्मक दृष्टीकोन हवाच. कविता की मुक्तक आवडली/लं हो!

In reply to by ऋतुराज चित्रे

सूड 25/07/2014 - 14:36
>>वाट नाही वाट नाही असं आपण समजतो तोपर्यंत ती नसते. शोधायला लागते फक्त, आपसूक सापडते. फक्त शोधायला वेळ आणि थोडे प्रयत्न खर्च करावे लागतात. येवढं करुनही नाहीच सापडली, तर आपण हातावर हात ठेवून न बसता शोधण्याचे निदान प्रयत्न तरी केले याचं समाधान असतं.

In reply to by सूड

स्पा 25/07/2014 - 15:05
तर आपण हातावर हात ठेवून न बसता शोधण्याचे निदान प्रयत्न तरी केले याचं समाधान असतं.
येस, आपल्याकडून प्रयत्न केलेच नाहीत असं व्हायला नको, बाकी सुख मिळेल नाही मिले, आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळतील नाही मिळणार, पण प्रयत्न केल्याचे सुख आणि समाधान मात्र कोणीच हिरावू शकणार नाही हे नक्की बाकी कविता म्हणणार नाही, पण मुक्तक खूप आवडलं

In reply to by स्पा

आपलं पण एक गाव आहे या जाणिवेने मनाला एक दिलासा मिळत रहातो. पण कदाचीत प्रत्यक्ष गाव सापडल्यावर अपेक्षा भंगाचे दु:ख पदरात पडायचे आणि आहे तेवढा आधार पण जायचा. म्हणुन कदाचीत ती वाट शोधायची टाळाटाळ सुरु असेल. कविता आवडली हेवेसांन. पैजारबुवा,

मुक्तक आवडलं.. पण तिचे हे प्रश्न नक्की ति "ती"* आहे म्हणुनच आहेत का? आणि नक्की ते कुणी निर्माण केलेत? तिनेच की दुसर्‍या कुणी? विचारायचं कारण असं की अनेकदा स्त्रिया स्वतःहुन परंपरांचे.. पुरुषप्रधान मानसिकतेचे जोखड वागवताना दिसतात.. "मला हे शक्यच नाही..माझ्यावाचुन हे घर कसं चालणार.. हे माझ्या हातुन झालं तरच नीट होतं.. ह्यांना जमतच नाही गार पोळ्या.. तव्यावरुन ताटात हवी.."...."बायकांचा जन्मच हा असा.. चुल न मुलासाठी झालेला.."....."स्त्री जन्मा... तुझी कहाणी.." म्हणत सुस्कारे सोडणार्‍या बायका अनेक आहेत.. असं नाही की त्या परंपरांमध्ये अडकलेल्या / अडकवलेल्या नाहीत.. पण त्यातुन मुक्त होणं वाटतं तितकं अवघडही नाहीये आणि आजकाल तर "पाथब्रेकिंग" म्हणावं असंही नाहीये.. शिवाय तुम्हाला तुमचं आयुष्य एक सजा वाटत असेल.. कुणाला तुमची कदर नाही असं वाटत असेल.. गृहिणी होणं लादल्या सारखं वाटत असेल तर त्यातुन बाहेर पडायचा प्रयत्नही तुम्हालाच करायला हवा.. दुसर्‍यांच्या कष्टाची जाणिव असणारे फार थोडे असतात.. अनेक वर्ष (म्हणजे जोवर दुनियेचे लत्ताप्रहार बसत नाहीत तोवर) आपणही आपल्या सख्ख्या आईलासुद्धा गृहीतच धरत असतो.. जाणिव ही करुन देण्याची सुद्धा गोष्ट असते.. कुणाला तरी कधीतरी माझी आठवण होईल आणि मग मी "नसलेल्या" स्त्री कडुन "असलेल्या" स्त्री कडे वाटचाल करेन ही अपेक्षाच फोल आहे.. आपण ज्या घरात राबतो.. ते आपलं मालकीचं.. हक्काचं.. न वाटणं ह्यात चुक नक्की कुणाची? माझ्यामते फार मोठ्या प्रमाणात स्वतःचीच.. स्वतःला दुय्यम समजत आपण स्वतःवर सर्वप्रथम अन्याय सुरु करतो.. दुसरे फक्त त्याचा फायदा घेत रहातात.. शेवटी सगळी दुनिया स्वार्थी आहे.. स्त्रीनेच परोपकाराचा मक्ता का घ्यावा? गुलामगिरी लादणं गुन्हा आहे.. लादुन घेणं त्याहुन मोठा गुन्हा... तुमच्या मैत्रिणीची मला काहीच माहिती नाही.. तिला हे लागु पडेलच असंही नाही.. पण कदाचित शक्यता अशीही असु शकेल की केवळ मानसिकता बदलण्याची गरज आहे.. स्वतःला प्राधान्य देण्याची.. किंमत देण्याची गरज आहे.. परिस्थिती आपोआप बदलुन जाईल... * - हे अशासाठी विचारलं की अनेकदा स्वतःला दोष देण्याची.. "मीच कमनशिबी.. कुण्णा कुण्णाचं माझ्यावर प्रेम नाही" असा सतत निराशावादी विचार करण्याची प्रवृत्ती अनेकांमध्ये असते.. तिचा स्त्री / पुरुष असण्याशी संबंध नाही.. अर्थात मुक्तक वाचुन मला ही शक्यता कमी वाटते.. आणि टिपीकल घरांमध्ये स्त्रीयांना जी वागणुक मिळते त्यातुन आलेलं नैराश्य असावं असं वाटतं... चु.भु.द्या.घ्या...

In reply to by पिलीयन रायडर

कवितानागेश 25/07/2014 - 16:48
मला वाटतं की हे मुक्तक 'बाई'च्या दृष्टीतून लिहिल्यानी 'बाईचं नसणं-असणं' आहे. सगळीच माणसं कुठेतरी 'नसतात'... आणि कुठेतरी हरवलेल्या ठिकाणी 'असतात'!

In reply to by कवितानागेश

हो.. बरोबर आहे.. पण सगळीच माणसं एका क्षणी अशी निराश होतात.. हरवुन जातात.. हे स्पेसिफिकली बाई म्हणुन होणार्‍या घुसमटीबद्दल लिहीलं आहे.. आणि बायकांना अनेकदा चटकन "मला किंमत नाही" मोड मध्ये जायची सवय असते.. म्हणुन मग त्यांना हे घर आपलं नाही.. वेळ आपला नाही.. असं वाटायला लागतं (अनेकदा तशीच परिस्थिती असतेही)... मला इतकंच म्हणायचं आहे की.. मानसिक चक्रात अडकु नका.. हक्क गाजवा.. जाणिवा करुन द्या...! अर्थात.. मी खुप जनरल लिहीलय.. तिला ह्या सर्वातुन बाहेर पडण्यासाठी.. आणि आनंदी जीवन जगण्यासाठी शुभेच्छा!

तुमच्या मैत्रिणीला ती वाट लवकरच दिसु दे अशी शुभेच्छा...मात्र ती अशी वाट नक्की शोधतेय ना?कारण ते सर्वात जास्त महत्वाचे आहे. मला जॉर्ज वॉशिग्टन कार्वरचे एक वाक्य फार आवडते(तोच "एक होता कार्व्हर" वाला "स्टार्ट व्हेअर यु आर,विथ व्हॉट यु हॅव्,मेक समथिंग ऑफ ईट,नेव्हर बी सॅटीस्फाईड" बाकी वर सूड,स्पा,अजया शी सहमत

तु चेपुवर वाचायला दिली होतीस तेव्हा इथे सकाळचे ८ वाजले होते... आता दिवस मस्त जाणार.. काहीतरी छान वाचल्याचा आनंद मिळाला नियमित लिहीत जा गं...

आयुर्हित 25/07/2014 - 16:00
तीला म्हणावे, आपल्याला हवी तीच वाट बंद होत असेल तर त्याच वेळी अगणित वाटा, आपली वाट पहात असतात. पण आपले सर्व लक्ष त्या बंद होणार्‍या वाटेकडेच लागुन रहाते, हे ही तेव्हढेच खरे. अश्याच एका उदाहरणात, वाट बंद झाल्यावर देखिल आपल्या शत्रूच्या म्हणजे औरंगजेब बादशाहाच्या तावडीतून आपले "छ्त्रपती शिवाजी महाराज" बरोबर नेलेल्या सर्व मावळ्यांसकट सहीसलामत स्वराज्यात परतले होतेच ना! अगदी आजकालचेच उदाहरण द्यायचे झाल्यास "सिंधूताई सपकाळ" यांची ग्रेट भेट घ्या म्हणावे.

तिमा 25/07/2014 - 17:33
कविता आवडली. हे स्वप्नातील गांव जर, प्रत्येक नसलेल्या स्त्रीला, मिळायला हवं असेल तर सर्वप्रथम पुरुषी दृष्टीकोन बदलला पाहिजे. तरच तिला आस्तित्व येईल. नेहमी लिहित जा.

In reply to by तिमा

इनिगोय 25/07/2014 - 18:15
पुरुषी दृष्टीकोन बदलायला हवा हे खरं आहेच. पण दरवेळी ते बाईच्या हातात असेलच असं नाही. पण निदान स्वतःचा आदर स्वतः करणं एवढंतरी करता यायला हवंच. नाहीतर तुम्हीच स्वतःला कमी लेखणं ही इतरांना तसंच वागण्याची मुभा वाटायला लागते.

इनिगोय 25/07/2014 - 18:10
या कवितेसोबत आता या सगळ्या प्रतिक्रियाही देते मैत्रिणीला वाचायला..   अशा नसलेल्या बाईला सहसा आपण यात नाहीच आहोत हे समजण्याइतकीही उसंत मिळत नाही. हे नको तर नेमकं काय हवं याचा विचार स्वत:हून होणं कठीणच असतं. तेच तिचंही झालं आहे. त्यामुळे त्या मैत्रिणीला तिच्या वाटेच्या दिशेने न्यायचे आमचे प्रयत्न सुरु आहेतच.   निदान परिस्थिती बदलायला हवीय एवढं तरी तिला जाणवतंय हेही आत्ता खूप आहे..

नकारात्मक दृष्टीकोन दुर्दैवाच्या गर्तेत खोल खोल नेतो. त्यातून बाहेर पडणं दुरापास्त होतं. कित्येकांच्या संसासात स्त्रीला दुय्यम दर्जा आणि गृहीत धरण्याची वृत्ती दिसून येते. ह्या विरुद्ध स्त्रीलाच लढा द्यावा लागतो. आत्मविश्वास, धाडस आणि अंगीभूत गुण असतील तर आपली असलेली वाट शोधणं कठीण नसतं. निकराचा लढा आवश्यक असतो.

अंतरा आनंद 26/07/2014 - 09:34
खुप छान कविता आहे. खरं तर आपल्या नसलेल्या या गोष्टींनाच आपली ओळख बनवून आपण त्याचा एक कोष बनवलेला असतो. तो कोष म्हणजेच आपण आहोत असं वाटून घेण्याची सवय असते. या कोषातून "स्वत:" बाहेर पडताना त्रास होणारच तो गृहीत धरायचा. बाजूच्यांचंही चुकत नसतं. त्यांच्या लॉजिकप्रमाणे तेही बरोबर असतात. ते समजून घ्यायचं फक्त. वाटा असतात पण आपल्याला त्यांच्यावरून चालताना सुरक्षितपणाची हमी हवी असते त्यामुळे हसू हरवतं. गौरी देशपांडेंची एक नायिका म्हणते " कुठलीही गोष्ट विचारपूर्वकच कर. सगळा विचार केलास आणि वाटलं की हे पाऊल टाकावं तरीसुद्धा कळत नकळत कोणाच्या पायावर पाय देत नाहीयेस ना, कोणाच्या तोंडचा घास काढून घेत नाहीयेस ना याची खातरजमा कर आणि जरूर पाऊल टाक. एवढं सगळं केलस तरी लोकं तुला नावं ठेवतीलच तेव्हा म्हणायला शिक की जग गेलं खड्ड्यात."

एस 28/07/2014 - 19:34
वाट कुणी दाखवली, वा सापडली तरी त्या वाटेवर पाऊल टाकायचं तिचं धाडस होईल काय याबाबत साशंक. (वाटा दाखवणे थांबवलेला)...

अजया 25/07/2014 - 14:26
वाट असते,आहे, तिला दिसत नाहिये फक्त.जरासा स्वत:वर विश्वास ठेवेल तर नक्की दिसेल.

In reply to by अजया

प्यारे१ 25/07/2014 - 14:48
ती जिथं जशी उभी आहे तिथून नसेल दिसत कदाचित. स्वतःवर विश्वास तरी कसा असायचा? जिथं कशावरच विसंबू /विश्वास ठेवू शकत नाही ती तिथं? अर्थात तुम्ही म्हणता तसा सकारात्मक दृष्टीकोन हवाच. कविता की मुक्तक आवडली/लं हो!

In reply to by ऋतुराज चित्रे

सूड 25/07/2014 - 14:36
>>वाट नाही वाट नाही असं आपण समजतो तोपर्यंत ती नसते. शोधायला लागते फक्त, आपसूक सापडते. फक्त शोधायला वेळ आणि थोडे प्रयत्न खर्च करावे लागतात. येवढं करुनही नाहीच सापडली, तर आपण हातावर हात ठेवून न बसता शोधण्याचे निदान प्रयत्न तरी केले याचं समाधान असतं.

In reply to by सूड

स्पा 25/07/2014 - 15:05
तर आपण हातावर हात ठेवून न बसता शोधण्याचे निदान प्रयत्न तरी केले याचं समाधान असतं.
येस, आपल्याकडून प्रयत्न केलेच नाहीत असं व्हायला नको, बाकी सुख मिळेल नाही मिले, आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळतील नाही मिळणार, पण प्रयत्न केल्याचे सुख आणि समाधान मात्र कोणीच हिरावू शकणार नाही हे नक्की बाकी कविता म्हणणार नाही, पण मुक्तक खूप आवडलं

In reply to by स्पा

आपलं पण एक गाव आहे या जाणिवेने मनाला एक दिलासा मिळत रहातो. पण कदाचीत प्रत्यक्ष गाव सापडल्यावर अपेक्षा भंगाचे दु:ख पदरात पडायचे आणि आहे तेवढा आधार पण जायचा. म्हणुन कदाचीत ती वाट शोधायची टाळाटाळ सुरु असेल. कविता आवडली हेवेसांन. पैजारबुवा,

मुक्तक आवडलं.. पण तिचे हे प्रश्न नक्की ति "ती"* आहे म्हणुनच आहेत का? आणि नक्की ते कुणी निर्माण केलेत? तिनेच की दुसर्‍या कुणी? विचारायचं कारण असं की अनेकदा स्त्रिया स्वतःहुन परंपरांचे.. पुरुषप्रधान मानसिकतेचे जोखड वागवताना दिसतात.. "मला हे शक्यच नाही..माझ्यावाचुन हे घर कसं चालणार.. हे माझ्या हातुन झालं तरच नीट होतं.. ह्यांना जमतच नाही गार पोळ्या.. तव्यावरुन ताटात हवी.."...."बायकांचा जन्मच हा असा.. चुल न मुलासाठी झालेला.."....."स्त्री जन्मा... तुझी कहाणी.." म्हणत सुस्कारे सोडणार्‍या बायका अनेक आहेत.. असं नाही की त्या परंपरांमध्ये अडकलेल्या / अडकवलेल्या नाहीत.. पण त्यातुन मुक्त होणं वाटतं तितकं अवघडही नाहीये आणि आजकाल तर "पाथब्रेकिंग" म्हणावं असंही नाहीये.. शिवाय तुम्हाला तुमचं आयुष्य एक सजा वाटत असेल.. कुणाला तुमची कदर नाही असं वाटत असेल.. गृहिणी होणं लादल्या सारखं वाटत असेल तर त्यातुन बाहेर पडायचा प्रयत्नही तुम्हालाच करायला हवा.. दुसर्‍यांच्या कष्टाची जाणिव असणारे फार थोडे असतात.. अनेक वर्ष (म्हणजे जोवर दुनियेचे लत्ताप्रहार बसत नाहीत तोवर) आपणही आपल्या सख्ख्या आईलासुद्धा गृहीतच धरत असतो.. जाणिव ही करुन देण्याची सुद्धा गोष्ट असते.. कुणाला तरी कधीतरी माझी आठवण होईल आणि मग मी "नसलेल्या" स्त्री कडुन "असलेल्या" स्त्री कडे वाटचाल करेन ही अपेक्षाच फोल आहे.. आपण ज्या घरात राबतो.. ते आपलं मालकीचं.. हक्काचं.. न वाटणं ह्यात चुक नक्की कुणाची? माझ्यामते फार मोठ्या प्रमाणात स्वतःचीच.. स्वतःला दुय्यम समजत आपण स्वतःवर सर्वप्रथम अन्याय सुरु करतो.. दुसरे फक्त त्याचा फायदा घेत रहातात.. शेवटी सगळी दुनिया स्वार्थी आहे.. स्त्रीनेच परोपकाराचा मक्ता का घ्यावा? गुलामगिरी लादणं गुन्हा आहे.. लादुन घेणं त्याहुन मोठा गुन्हा... तुमच्या मैत्रिणीची मला काहीच माहिती नाही.. तिला हे लागु पडेलच असंही नाही.. पण कदाचित शक्यता अशीही असु शकेल की केवळ मानसिकता बदलण्याची गरज आहे.. स्वतःला प्राधान्य देण्याची.. किंमत देण्याची गरज आहे.. परिस्थिती आपोआप बदलुन जाईल... * - हे अशासाठी विचारलं की अनेकदा स्वतःला दोष देण्याची.. "मीच कमनशिबी.. कुण्णा कुण्णाचं माझ्यावर प्रेम नाही" असा सतत निराशावादी विचार करण्याची प्रवृत्ती अनेकांमध्ये असते.. तिचा स्त्री / पुरुष असण्याशी संबंध नाही.. अर्थात मुक्तक वाचुन मला ही शक्यता कमी वाटते.. आणि टिपीकल घरांमध्ये स्त्रीयांना जी वागणुक मिळते त्यातुन आलेलं नैराश्य असावं असं वाटतं... चु.भु.द्या.घ्या...

In reply to by पिलीयन रायडर

कवितानागेश 25/07/2014 - 16:48
मला वाटतं की हे मुक्तक 'बाई'च्या दृष्टीतून लिहिल्यानी 'बाईचं नसणं-असणं' आहे. सगळीच माणसं कुठेतरी 'नसतात'... आणि कुठेतरी हरवलेल्या ठिकाणी 'असतात'!

In reply to by कवितानागेश

हो.. बरोबर आहे.. पण सगळीच माणसं एका क्षणी अशी निराश होतात.. हरवुन जातात.. हे स्पेसिफिकली बाई म्हणुन होणार्‍या घुसमटीबद्दल लिहीलं आहे.. आणि बायकांना अनेकदा चटकन "मला किंमत नाही" मोड मध्ये जायची सवय असते.. म्हणुन मग त्यांना हे घर आपलं नाही.. वेळ आपला नाही.. असं वाटायला लागतं (अनेकदा तशीच परिस्थिती असतेही)... मला इतकंच म्हणायचं आहे की.. मानसिक चक्रात अडकु नका.. हक्क गाजवा.. जाणिवा करुन द्या...! अर्थात.. मी खुप जनरल लिहीलय.. तिला ह्या सर्वातुन बाहेर पडण्यासाठी.. आणि आनंदी जीवन जगण्यासाठी शुभेच्छा!

तुमच्या मैत्रिणीला ती वाट लवकरच दिसु दे अशी शुभेच्छा...मात्र ती अशी वाट नक्की शोधतेय ना?कारण ते सर्वात जास्त महत्वाचे आहे. मला जॉर्ज वॉशिग्टन कार्वरचे एक वाक्य फार आवडते(तोच "एक होता कार्व्हर" वाला "स्टार्ट व्हेअर यु आर,विथ व्हॉट यु हॅव्,मेक समथिंग ऑफ ईट,नेव्हर बी सॅटीस्फाईड" बाकी वर सूड,स्पा,अजया शी सहमत

तु चेपुवर वाचायला दिली होतीस तेव्हा इथे सकाळचे ८ वाजले होते... आता दिवस मस्त जाणार.. काहीतरी छान वाचल्याचा आनंद मिळाला नियमित लिहीत जा गं...

आयुर्हित 25/07/2014 - 16:00
तीला म्हणावे, आपल्याला हवी तीच वाट बंद होत असेल तर त्याच वेळी अगणित वाटा, आपली वाट पहात असतात. पण आपले सर्व लक्ष त्या बंद होणार्‍या वाटेकडेच लागुन रहाते, हे ही तेव्हढेच खरे. अश्याच एका उदाहरणात, वाट बंद झाल्यावर देखिल आपल्या शत्रूच्या म्हणजे औरंगजेब बादशाहाच्या तावडीतून आपले "छ्त्रपती शिवाजी महाराज" बरोबर नेलेल्या सर्व मावळ्यांसकट सहीसलामत स्वराज्यात परतले होतेच ना! अगदी आजकालचेच उदाहरण द्यायचे झाल्यास "सिंधूताई सपकाळ" यांची ग्रेट भेट घ्या म्हणावे.

तिमा 25/07/2014 - 17:33
कविता आवडली. हे स्वप्नातील गांव जर, प्रत्येक नसलेल्या स्त्रीला, मिळायला हवं असेल तर सर्वप्रथम पुरुषी दृष्टीकोन बदलला पाहिजे. तरच तिला आस्तित्व येईल. नेहमी लिहित जा.

In reply to by तिमा

इनिगोय 25/07/2014 - 18:15
पुरुषी दृष्टीकोन बदलायला हवा हे खरं आहेच. पण दरवेळी ते बाईच्या हातात असेलच असं नाही. पण निदान स्वतःचा आदर स्वतः करणं एवढंतरी करता यायला हवंच. नाहीतर तुम्हीच स्वतःला कमी लेखणं ही इतरांना तसंच वागण्याची मुभा वाटायला लागते.

इनिगोय 25/07/2014 - 18:10
या कवितेसोबत आता या सगळ्या प्रतिक्रियाही देते मैत्रिणीला वाचायला..   अशा नसलेल्या बाईला सहसा आपण यात नाहीच आहोत हे समजण्याइतकीही उसंत मिळत नाही. हे नको तर नेमकं काय हवं याचा विचार स्वत:हून होणं कठीणच असतं. तेच तिचंही झालं आहे. त्यामुळे त्या मैत्रिणीला तिच्या वाटेच्या दिशेने न्यायचे आमचे प्रयत्न सुरु आहेतच.   निदान परिस्थिती बदलायला हवीय एवढं तरी तिला जाणवतंय हेही आत्ता खूप आहे..

नकारात्मक दृष्टीकोन दुर्दैवाच्या गर्तेत खोल खोल नेतो. त्यातून बाहेर पडणं दुरापास्त होतं. कित्येकांच्या संसासात स्त्रीला दुय्यम दर्जा आणि गृहीत धरण्याची वृत्ती दिसून येते. ह्या विरुद्ध स्त्रीलाच लढा द्यावा लागतो. आत्मविश्वास, धाडस आणि अंगीभूत गुण असतील तर आपली असलेली वाट शोधणं कठीण नसतं. निकराचा लढा आवश्यक असतो.

अंतरा आनंद 26/07/2014 - 09:34
खुप छान कविता आहे. खरं तर आपल्या नसलेल्या या गोष्टींनाच आपली ओळख बनवून आपण त्याचा एक कोष बनवलेला असतो. तो कोष म्हणजेच आपण आहोत असं वाटून घेण्याची सवय असते. या कोषातून "स्वत:" बाहेर पडताना त्रास होणारच तो गृहीत धरायचा. बाजूच्यांचंही चुकत नसतं. त्यांच्या लॉजिकप्रमाणे तेही बरोबर असतात. ते समजून घ्यायचं फक्त. वाटा असतात पण आपल्याला त्यांच्यावरून चालताना सुरक्षितपणाची हमी हवी असते त्यामुळे हसू हरवतं. गौरी देशपांडेंची एक नायिका म्हणते " कुठलीही गोष्ट विचारपूर्वकच कर. सगळा विचार केलास आणि वाटलं की हे पाऊल टाकावं तरीसुद्धा कळत नकळत कोणाच्या पायावर पाय देत नाहीयेस ना, कोणाच्या तोंडचा घास काढून घेत नाहीयेस ना याची खातरजमा कर आणि जरूर पाऊल टाक. एवढं सगळं केलस तरी लोकं तुला नावं ठेवतीलच तेव्हा म्हणायला शिक की जग गेलं खड्ड्यात."

एस 28/07/2014 - 19:34
वाट कुणी दाखवली, वा सापडली तरी त्या वाटेवर पाऊल टाकायचं तिचं धाडस होईल काय याबाबत साशंक. (वाटा दाखवणे थांबवलेला)...
लेखनविषय:
आटपाटनगरात नसते एक बाई. तिला नसतं तिचं नाव. तिचं नसतं एक घर. तिचं नसतं एक कुटुंब. नसतो तिचा एक नवरा. तिची मुलं तर नसतातच तिची. नसतात तिची भांडीकुंडी. कपडेलत्ते. फर्निचर वगैरेही. तिचा नसतो तिचा वेळ. तिचा दिवस. तिचे श्रम तिचे नसतात. इतकंच कशाला.. तिची विश्रांतीही तिची नसते. तिचं शरीर. तिचं मन. तिची ओळख. तिचं जगणं. अहेवपणी नाहीच आलं तर म्हणे मरणही.. ...नसतं काहीसुद्धा तिचं. पण नाही म्हणायला तिचा असतो एक गाव. नदीकाठी असतं एक... अगदी ऎसपैस चिमुकलं घर! तिथे असतो तिचा एक मोकळा स्वच्छ श्वास. असतात सुंदर संध्याकाळी तिच्या. आणि पहाटेची निवांत वेळ? तीही असतेच. एखादा झोका..

डांबरी रस्त्यावर

मिसळलेला काव्यप्रेमी ·

एस 25/07/2014 - 11:57
तशी ती नाव खुप भक्कम आहे पण पाणी एकाजागी थांबत नसतं आणि नावेला कुठेतरी किनार्‍याला लागणं गरजेचं असतं
तुमची कविता भेटली. तूर्तास इतकेच.

कविता आवडली. संदीपच्या या दिलकष ओळी पाहा: पडेना पापणी पाहून ओलेती तुला, कसा होता नि नव्हता व्हायचा, पाऊसही तुझ्यामाझ्या सवे कधी गायचा, पाऊस ही.

psajid 25/07/2014 - 14:29
एकदम आवडली ! "तुला ते पाणी भेटल्यावर मी सोडलेली कागदाची नाव तुला सापडली असेलच त्यावर त्या नावेत तुझ्यासाठी माझी स्वप्नं पाठवली आहेत एखाद्या तरी स्वप्नाने तुला घायाळ केले असेलचं..." या ओळी तर खूपच छान

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हिच कविता दुसर्‍या कोणीही लिहीली असती तर कदाचीत "आवडली" असा प्रतिसाद दिला असता. हा आमचा मि.का. नाही. पैजारबुवा,

In reply to by प्यारे१

कदाचित तुम्ही म्हणता ते बरोबर असेल. खास फर्माईशवर हि कविता अत्यंत सोपी करण्यात आली आहे. काही काही वेळेस काही इलाज चालत नाही. :)

नेहमी प्रमाणेच सुंदर....! त्या नावे पाठोपाठ नारळाच्या करवंटीत चार चाफ्याची फुलं पाठवली आहेत सकाळी घराच्या मागच्या आंगणात सापडली तेव्हा तुझ्या स्मिताचा सुगंध आठवला इथे मी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क टाकलेत. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसन शिंदे 31/07/2014 - 09:12
सरांच्या म्हणण्याला दुजोरा. हे कडवं खासच! बाकी मला हे विचारायचंय की, तुला हे सगळं सुचतं केव्हा आणि कुठे?

एस 25/07/2014 - 11:57
तशी ती नाव खुप भक्कम आहे पण पाणी एकाजागी थांबत नसतं आणि नावेला कुठेतरी किनार्‍याला लागणं गरजेचं असतं
तुमची कविता भेटली. तूर्तास इतकेच.

कविता आवडली. संदीपच्या या दिलकष ओळी पाहा: पडेना पापणी पाहून ओलेती तुला, कसा होता नि नव्हता व्हायचा, पाऊसही तुझ्यामाझ्या सवे कधी गायचा, पाऊस ही.

psajid 25/07/2014 - 14:29
एकदम आवडली ! "तुला ते पाणी भेटल्यावर मी सोडलेली कागदाची नाव तुला सापडली असेलच त्यावर त्या नावेत तुझ्यासाठी माझी स्वप्नं पाठवली आहेत एखाद्या तरी स्वप्नाने तुला घायाळ केले असेलचं..." या ओळी तर खूपच छान

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हिच कविता दुसर्‍या कोणीही लिहीली असती तर कदाचीत "आवडली" असा प्रतिसाद दिला असता. हा आमचा मि.का. नाही. पैजारबुवा,

In reply to by प्यारे१

कदाचित तुम्ही म्हणता ते बरोबर असेल. खास फर्माईशवर हि कविता अत्यंत सोपी करण्यात आली आहे. काही काही वेळेस काही इलाज चालत नाही. :)

नेहमी प्रमाणेच सुंदर....! त्या नावे पाठोपाठ नारळाच्या करवंटीत चार चाफ्याची फुलं पाठवली आहेत सकाळी घराच्या मागच्या आंगणात सापडली तेव्हा तुझ्या स्मिताचा सुगंध आठवला इथे मी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क टाकलेत. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसन शिंदे 31/07/2014 - 09:12
सरांच्या म्हणण्याला दुजोरा. हे कडवं खासच! बाकी मला हे विचारायचंय की, तुला हे सगळं सुचतं केव्हा आणि कुठे?
लांबच लांब डांबरी रस्त्यावर घरंगळत जाणारे पावसाचे पाणी कुठेतरी जाऊन थांबत असेलच कदाचित, तिथेच तू भेटशील.. -- तुला ते पाणी भेटल्यावर मी सोडलेली कागदाची नाव तुला सापडली असेलच त्यावर त्या नावेत तुझ्यासाठी माझी स्वप्नं पाठवली आहेत एखाद्या तरी स्वप्नाने तुला घायाळ केले असेलचं... -- त्या नावे पाठोपाठ नारळाच्या करवंटीत चार चाफ्याची फुलं पाठवली आहेत सकाळी घराच्या मागच्या आंगणात सापडली तेव्हा तुझ्या स्मिताचा सुगंध आठवला -- तुझ्यापर्यंत पोहचतांना किती चिमुकले भवरे पार केले असतील त्या नावेने कुणास ठाऊक पण तुला सापडली कि जप तिला तशी ती नाव खुप भक्कम आहे पण पाणी एकाजागी थांबत नसतं आणि नावेला कुठेतरी किनार्

रोझे और रोटी!

हुप्प्या ·

समीरसूर 25/07/2014 - 10:25
खरे आहे. अरेरावी आणि दादागिरीची नशा वाईटच. बातमीमध्ये येण्यासाठी असे सनसनीखेज कृत्य केले जाते. सध्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकारण्यांनी सभ्यता सोडलेलीच आहे. गुंडगिरी हाच महाराष्ट्रातल्या राजकारणाचा स्थायीभाव झाला आहे. राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, मनसे असो, किंवा अजून कुठलाही पक्ष असो; 'राडा', 'खळ्ळखटॅक', 'नाद नाय करायचा', 'बघतोस काय, मुजरा कर', 'होऊ दे खर्च', 'बघतोस काय रागानं?' छाप गुंडगिरीसदृष्य राजकारण चालू आहे. अर्थात सगळीकडेच थोड्या-फार प्रमाणात अशीच दडपशाही चालू आहे. सामान्य माणूस गपगुमान लांबच राहतो; निमूटपणे सगळे सहन करतो. आता अर्थातच शिवसेनेच्या मागे नसतं झेंगट लागलं आहे हे खरं. मला वाटते उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे माफी मागून विचारेंना जरा झापलं असतं तर प्रकरण थोडं शमलं असतं पण यांचे इगो हिमालयाएवढे असतात. चूक प्रांजळपणे कबूल करून जाहीर झापाझापी (निदान तोंडदेखली) केली की प्रकरणं लवकर थंड होतात.

कशाला असल्या रटाळ विषयावर इकडे चर्वितचर्वण करुन उगा मि.पा. चे वातावरण खराब करायचे. सालं त्या प्रसिध्दि माध्यामांना काय कमी उद्योग आहेत. नेते ते प्रसारमाध्यमे सगळे एक जात आपली पोळी भाजुन घेणारे भाडखाव आहेत.

In reply to by प्रमोद देर्देकर

खटपट्या 25/07/2014 - 10:53
दर्दुकाका, विषय रटाळ नाही वाटत मला. महाराष्ट्र सदन मध्ये महाराष्ट्रातल्या खासदारांना दिली जाणारी अपमानजनक वागणूक हा मुद्दा चपाती प्रकरणामुळे झाकोळला गेलाय.

नाव आडनाव 25/07/2014 - 11:39
जिथे तिथे "शिवसेना स्टाईल" असं म्हणून तोडफोड करायची आणि त्यालाच आंदोलन म्हणायचं ही एकंच गोष्ट राहिलीये यांना करायला. मी स्वतः शिवसेनेचा कार्यकर्ता नसलो तरी समर्थक होतो, पण या लोकांनी सचिन तेंडूलकर ला दम दिला आणि वर त्याचा समर्थन सुद्धा केलं तेंव्हापासून यांची "स्टाईल" पटेनाशी झाली. आणि "आम्ही (? नवे साहेब स्वतः ची मतं मांडताना सामनाच्या संपादकीय मध्ये "आम्ही..." म्हणतात :) ) मुस्लिमांच्या विरोधात नाहीत, फक्त गद्दारांच्या विरोधात आहोत" असं जेंव्हा म्हणतात (सामानाच्या भाषेत साहेब डरकाळी फोडतात, ठनकावतात , खडसावतात, सुनावतात, ऐकवतात :)) तेंव्हा ते खरंच हास्यास्पद वाटतं. मतांसाठी कायपण.

दिल्लीत मराठी माणसे राडा करतात/ करु शकतात हे बघुन आनंद वाटला, रोझेचा मुद्दा बळच उकरुन काढला आहे,त्यात तथ्य नसावे व फार स्पष्टीकरण द्यायची गरज नाही .अनेक पक्षाचे खासदार त्यात होते वा टेलिव्हिजनवर दिसले ,फक्त नेतेगिरी करण्याच्या नादात सेना अडकली.

In reply to by प्रसाद गोडबोले

मृत्युन्जय 25/07/2014 - 12:04
आंदोलन करण्यात काहिच चूक नाही. पण एखाद्या माणसाच्या तोंडात बळजबरीने अन्न कोंबण्याचा प्रयत्न करणे मुर्खपणा आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना दिली जाणारी वाईट वागणूक हा मुख्य मुद्दा होता. तसे असेल तर त्याचा योग्य मार्गाने निचरा करणे योग्य होते. पत्रकारांना बरोबर घेउन जाउन कसे कदान्न वाढले जाते हे सिद्ध केले असते आणि योग्य ते नमुने घेउन अन्न आणि औषध खात्याकडे तक्रार केली असती तर काम झाले असते. पण यांना हिरोगिरी करायची होती आणि माजही आला होता. नसते पालथे धंदे करायला गेले. या सगळ्यात आयआरसीटीसी ची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली. निकृष्ट अन्नपदार्थ पुरवल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हायची बाजुलाच राहिली. वर त्यांनी चोर तो चोर वर शिरजोर या न्यायाने धार्मिक भावना दुखावल्याचा कांगावा केला आणी साळसूदपणाचा आव आणुन स्वतःच सेवा बंद केली. बिपिन मलिक तर या सर्वांचा सवाई निघाला. त्याच्यावरच्या मराठी खासदारांचा रोष भलतीकडेच राहिला. आयआरसीटीसी ला पुढे करुन परत तो नामानिराळाच. बळजबरीने त्या सुपरव्हायजरला घास भरवायचा प्रयत्न करुन शिवसेनेच्या खासदारांनी मातीच खाल्ली. अन्नाचा दर्जा राखणे हे त्याचे काम असेलही. जर तो त्याच्यात चुकत असेल तर त्याची चुक सिद्ध करुन त्याच्यावर कारवाई करायला भाग पडणे एवढ्या मोठ्या खासदारांना अवघड नसावे. पण सत्ता आणि अधिकार यांच्या माजातुन आलेली मुजोरी आणि सुसंस्कृतपणाचा मुळचा अभाव यातुन हे असले प्रकार घडतात. सत्ता आली तशी शालीनता आली पाहिजे. नपेक्षा हे सरकार आधीच्या सरकारपेक्षा काही वेगळे नसेल. भीक नको पण कुत्रा आवर म्हणायची वेळ येउ नये म्हणजे झाले. अपरिपक्व राजकारण ते हेच.

In reply to by मृत्युन्जय

मनिष 25/07/2014 - 12:08
बळजबरीने त्या सुपरव्हायजरला घास भरवायचा प्रयत्न करुन शिवसेनेच्या खासदारांनी मातीच खाल्ली. अन्नाचा दर्जा राखणे हे त्याचे काम असेलही. जर तो त्याच्यात चुकत असेल तर त्याची चुक सिद्ध करुन त्याच्यावर कारवाई करायला भाग पडणे एवढ्या मोठ्या खासदारांना अवघड नसावे. पण सत्ता आणि अधिकार यांच्या माजातुन आलेली मुजोरी आणि सुसंस्कृतपणाचा मुळचा अभाव यातुन हे असले प्रकार घडतात.
अगदी. अगदी!

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन 25/07/2014 - 13:09
अगदी नेमकेपणे हेच म्हणतो. मूळ मुद्दा राहिला एकीकडे आणि आता त्यांना सहानुभूती मिळतेय. पूर्वी मराठे युद्धात जिंकून तहात कसे काय हरत असतील असा प्रश्न कधीकाळी पडत असे त्याचे उत्तर हे असे किस्से पाहून मिळतं एकदम.

In reply to by बॅटमॅन

पूर्वी मराठे युद्धात जिंकून तहात कसे काय हरत असतील असा प्रश्न कधीकाळी पडत असे त्याचे उत्तर हे असे किस्से पाहून मिळतं एकदम.
एकदम सो टके की बात !!

In reply to by मृत्युन्जय

+१. आणि >>>"अपरिपक्व राजकारण ते हेच." या वाक्याशी--- "अपरिपक्व" हा फारच कोमल मनाने वापरलेला शब्द आहे अश्या नोंदीसह--- १००% सहमत.

In reply to by मृत्युन्जय

मैत्र 25/07/2014 - 17:01
सगळं प्रकरण इतकं नेमकेपणे मांडलं आहे एका प्रतिसादात.. कुठेतरी एका संस्थळावर - (शिवसेनेला गोत्यात कसं आणता येईल हे बघणार्‍या माध्यम स्थळावर) त्या जेवणाच्या थाळीचा फोटो पाहिला. तो खरा असेल आणि हेच अन्न तिथे उद्धटपणे दिलं जात असेल तर संताप कोणालाही येईल. हॉटेल मध्ये जर १५० रु. ला जर हे पुण्या मुंबईत कोणी दिलं तर भांडणे होतील आणि बातमी होईल. पण खासदार असणे -- ज्याला Law makers म्हणतात त्यांनी त्यावर कसं वागावं आणि कायदा वापरून या मलिकसारख्या सगळ्यांना सरळ कसं करावं हे या अननुभवी खासदारांना समजत नाही हे स्पष्ट आहे. पण महाराष्ट्र सदनात भाजपचेही खासदार असतीलच की पुण्याच्या शिरोळेंसारखे नवखे आणि अहीर / गांधी / दानवे असे जुने जाणते. ते कुठे नाहीत या गदारोळात? का साळसूद होत आहेत? दुसरं हे की इंग्रजी माध्यमांचा खोटेपणा आणि कांगावा तिडीक आणणारा आहे. मी मराठी आणि इतर काही प्रतिनिधींना बरोबर घेऊन हे लोक दंगा करायला गेले होते. तरी एन डी टी व्ही म्हणते की या खासदारांना हे माहीत नव्हते की त्यांच्या वागण्याचा व्हिडीओ उपलब्ध आहे. काही फोटोंमध्ये तर शेजारी उभा असलेला कॅमेरामन दिसतो आहे. हा दुवा काय घडलं याचा. http://t.co/UtthstlD80 जर सत्ता असताना आणि तथाकथित दबाव असताना इतकं खोटं दडपून छापलं जातं (उदा. मुद्दाम केलं वगैरे) तर आधी काय करत होते आणि माध्यमे काय लोकांपर्यंत नेत होती हे कल्पनेच्या पलिकडचं आहे.

In reply to by मैत्र

प्यारे१ 25/07/2014 - 18:27
बळंच काँस्पिरसी (थोडं तथ्य असावं) ;) सेनेला गोत्यात आणण्याचा हा भाजपाचा डाव नसेल कशावरुन? असंही भाजपावाले जरा चंगळ करत आहेत सध्या. सेना नकोच आहे त्यांना लोकसभा विजयामुळं.

In reply to by प्यारे१

थोडेफार सहमत. भाजपाचे खासदार अजूनतरी गप्प्गुमान आहेत. सध्याचे वातावरण पाहता ते गुजरात भवनमध्ये ढोकळा खाण्यात मग्न असावेत. समाजात्,विशेष करून महाराष्ट्राबाहेर कसे वागायचे ह्याचे ट्रेनिंग किंवा तुमचा तो क्रॅश कोर्स करणे महाराष्ट्रातील राजकारण्यांवर सक्तीचे करावे ही एक माफक अपेक्षा.

पोटे 25/07/2014 - 13:44
जनतेला रिजल्ट हवे असतात. रीझन्स नाही. दिल्लीत गेल्यावर पोट कसे भरावे ही अक्कल ज्या खासदाराना नाही ते म्हाराश्ट्राचं पोट कसे भरणार? नेते दिल्लीला गेले.. आणि हे नेते जन्तेला काय ऐकवतात ? किचनमध्ये जेअण नव्हतं , संडासात साबण नव्हता !

नसानसात मस्ती व माज भरलेल्यांना निवडून दिले की काय होते ते महाराष्ट्र सदनात दिसले रे हुप्प्या.
त्यांच्या न्याय्य आणि उचित मागण्या मागे पडल्या
काय मागण्या होत्या? प्रकरण अंगाशी आले की मराठीच्या नावाने गळा काढायचा,अगदी यशवंतरावांपासून हे चालत आलय. मोदीजींनी राजन विचारेंना उद्या पोळी ऐवजी उंधियो भरवला तर विचारे तोच उंधियो मोदींच्या तोंडात कोंबण्याची धमक दाखवतील?
पण आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणून मूग गिळून बसण्यापलीकडे ते काही करु शकत नाहीत.
ते गेले २५वर्षे हेच करत आले आहेत रे.हेच वर्तन कॉन्ग्रेस वा ईतर पक्षाच्या खासदारांनी केले असते तर स्वराज्,जेटली एव्हाना उपोषणाला बसले असते.

vikramaditya 25/07/2014 - 16:35
आणि सर्व प्रतिक्रिया अगदी अचूक. अती तेथे माती.

मराठी_माणूस 28/07/2014 - 20:36
लोकसत्तेच्या आजच्या अंकात एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. तो म्हणजे आपले राष्ट्र जर धर्मनिरपेक्ष आहे तर कार्यालयीन कामकाजात धर्म हा वादाचा मुद्दा कसा काय होउ शकतो सदर->लोकमानस शिर्षक :"आयुक्तांचा पळपुटेपणा" http://epaper.loksatta.com/311850/indian-express/28-07-2014#page/8/2

In reply to by हुप्प्या

शिद 29/07/2014 - 21:52
सामान्य माणसाला २ वेळच्या जेवणाची भ्रांत आणि ह्या खासदारांना असे प्रश्न विधायक वाटतात...फालतूगिरी सगळी.

In reply to by शिद

शिद 29/07/2014 - 21:54
वा वा...चान चान.
प्रभा रावत यांच्या देखरेखीखाली बचत गटाचे १७ कर्मचारी महाराष्ट्र सदनात खमंग, चमचमीत, चटपटीत जेवण बनवण्याचं काम चोख करत आहेत.

In reply to by हुप्प्या

सहिये ! केला तो तसा मुर्खपणाच पण राडा कामात आला. बाकी बदनामी वगैरे तर आपल्या देशात सहज विसरले जातात.

आशु जोग 30/07/2014 - 11:58
हुप्प्याराव हे न चुकता नेमाने नियमाने व्रतस्थपणे अविरत न थकता न थांबता अविश्रांतपणे सतत संतत चालू बातम्या इथे टाकत असल्याने रोजचे वर्तमानपत्र बंद करण्याचा विचार आहे. काय वाटते आपल्याला

तिकडे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत-५० हजार कर्ज तर कधी १ लाख्कर्ज. आणि दिल्लीत त्यांचे प्रतिनिधी कोल्हापूरी चिकन्,पुरणपोळ्या झोडण्यात आता मग्न आहेत. वा रे शिवसेना.

प्रतापराव 30/07/2014 - 15:40
खासदारांना कोल्हापुरी चिकन, पुरणपोळ्या चापायला मिळणार अभिनंदन. राडा कामी आला. मुंबई पालिकेतील शाळात विध्यार्थ्यांना जो आहार दिला जातो त्याची क्वालिटी पाहता प्रश्न पडतो कि हा आहार कोणाच्या तोंडात कोंबायचा. जेवणाचे कंत्राटदार तर सेनाच ठरवते ना.

आशु जोग 01/08/2014 - 21:56
हुप्प्यारावसाहेब यांनी माळीणची बातमी इथे न चिकटवल्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो... आपल्यावर विसंबून आम्ही सर्व पेपर बंद करून टाकले आहेत...

समीरसूर 25/07/2014 - 10:25
खरे आहे. अरेरावी आणि दादागिरीची नशा वाईटच. बातमीमध्ये येण्यासाठी असे सनसनीखेज कृत्य केले जाते. सध्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकारण्यांनी सभ्यता सोडलेलीच आहे. गुंडगिरी हाच महाराष्ट्रातल्या राजकारणाचा स्थायीभाव झाला आहे. राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, मनसे असो, किंवा अजून कुठलाही पक्ष असो; 'राडा', 'खळ्ळखटॅक', 'नाद नाय करायचा', 'बघतोस काय, मुजरा कर', 'होऊ दे खर्च', 'बघतोस काय रागानं?' छाप गुंडगिरीसदृष्य राजकारण चालू आहे. अर्थात सगळीकडेच थोड्या-फार प्रमाणात अशीच दडपशाही चालू आहे. सामान्य माणूस गपगुमान लांबच राहतो; निमूटपणे सगळे सहन करतो. आता अर्थातच शिवसेनेच्या मागे नसतं झेंगट लागलं आहे हे खरं. मला वाटते उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे माफी मागून विचारेंना जरा झापलं असतं तर प्रकरण थोडं शमलं असतं पण यांचे इगो हिमालयाएवढे असतात. चूक प्रांजळपणे कबूल करून जाहीर झापाझापी (निदान तोंडदेखली) केली की प्रकरणं लवकर थंड होतात.

कशाला असल्या रटाळ विषयावर इकडे चर्वितचर्वण करुन उगा मि.पा. चे वातावरण खराब करायचे. सालं त्या प्रसिध्दि माध्यामांना काय कमी उद्योग आहेत. नेते ते प्रसारमाध्यमे सगळे एक जात आपली पोळी भाजुन घेणारे भाडखाव आहेत.

In reply to by प्रमोद देर्देकर

खटपट्या 25/07/2014 - 10:53
दर्दुकाका, विषय रटाळ नाही वाटत मला. महाराष्ट्र सदन मध्ये महाराष्ट्रातल्या खासदारांना दिली जाणारी अपमानजनक वागणूक हा मुद्दा चपाती प्रकरणामुळे झाकोळला गेलाय.

नाव आडनाव 25/07/2014 - 11:39
जिथे तिथे "शिवसेना स्टाईल" असं म्हणून तोडफोड करायची आणि त्यालाच आंदोलन म्हणायचं ही एकंच गोष्ट राहिलीये यांना करायला. मी स्वतः शिवसेनेचा कार्यकर्ता नसलो तरी समर्थक होतो, पण या लोकांनी सचिन तेंडूलकर ला दम दिला आणि वर त्याचा समर्थन सुद्धा केलं तेंव्हापासून यांची "स्टाईल" पटेनाशी झाली. आणि "आम्ही (? नवे साहेब स्वतः ची मतं मांडताना सामनाच्या संपादकीय मध्ये "आम्ही..." म्हणतात :) ) मुस्लिमांच्या विरोधात नाहीत, फक्त गद्दारांच्या विरोधात आहोत" असं जेंव्हा म्हणतात (सामानाच्या भाषेत साहेब डरकाळी फोडतात, ठनकावतात , खडसावतात, सुनावतात, ऐकवतात :)) तेंव्हा ते खरंच हास्यास्पद वाटतं. मतांसाठी कायपण.

दिल्लीत मराठी माणसे राडा करतात/ करु शकतात हे बघुन आनंद वाटला, रोझेचा मुद्दा बळच उकरुन काढला आहे,त्यात तथ्य नसावे व फार स्पष्टीकरण द्यायची गरज नाही .अनेक पक्षाचे खासदार त्यात होते वा टेलिव्हिजनवर दिसले ,फक्त नेतेगिरी करण्याच्या नादात सेना अडकली.

In reply to by प्रसाद गोडबोले

मृत्युन्जय 25/07/2014 - 12:04
आंदोलन करण्यात काहिच चूक नाही. पण एखाद्या माणसाच्या तोंडात बळजबरीने अन्न कोंबण्याचा प्रयत्न करणे मुर्खपणा आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना दिली जाणारी वाईट वागणूक हा मुख्य मुद्दा होता. तसे असेल तर त्याचा योग्य मार्गाने निचरा करणे योग्य होते. पत्रकारांना बरोबर घेउन जाउन कसे कदान्न वाढले जाते हे सिद्ध केले असते आणि योग्य ते नमुने घेउन अन्न आणि औषध खात्याकडे तक्रार केली असती तर काम झाले असते. पण यांना हिरोगिरी करायची होती आणि माजही आला होता. नसते पालथे धंदे करायला गेले. या सगळ्यात आयआरसीटीसी ची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली. निकृष्ट अन्नपदार्थ पुरवल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हायची बाजुलाच राहिली. वर त्यांनी चोर तो चोर वर शिरजोर या न्यायाने धार्मिक भावना दुखावल्याचा कांगावा केला आणी साळसूदपणाचा आव आणुन स्वतःच सेवा बंद केली. बिपिन मलिक तर या सर्वांचा सवाई निघाला. त्याच्यावरच्या मराठी खासदारांचा रोष भलतीकडेच राहिला. आयआरसीटीसी ला पुढे करुन परत तो नामानिराळाच. बळजबरीने त्या सुपरव्हायजरला घास भरवायचा प्रयत्न करुन शिवसेनेच्या खासदारांनी मातीच खाल्ली. अन्नाचा दर्जा राखणे हे त्याचे काम असेलही. जर तो त्याच्यात चुकत असेल तर त्याची चुक सिद्ध करुन त्याच्यावर कारवाई करायला भाग पडणे एवढ्या मोठ्या खासदारांना अवघड नसावे. पण सत्ता आणि अधिकार यांच्या माजातुन आलेली मुजोरी आणि सुसंस्कृतपणाचा मुळचा अभाव यातुन हे असले प्रकार घडतात. सत्ता आली तशी शालीनता आली पाहिजे. नपेक्षा हे सरकार आधीच्या सरकारपेक्षा काही वेगळे नसेल. भीक नको पण कुत्रा आवर म्हणायची वेळ येउ नये म्हणजे झाले. अपरिपक्व राजकारण ते हेच.

In reply to by मृत्युन्जय

मनिष 25/07/2014 - 12:08
बळजबरीने त्या सुपरव्हायजरला घास भरवायचा प्रयत्न करुन शिवसेनेच्या खासदारांनी मातीच खाल्ली. अन्नाचा दर्जा राखणे हे त्याचे काम असेलही. जर तो त्याच्यात चुकत असेल तर त्याची चुक सिद्ध करुन त्याच्यावर कारवाई करायला भाग पडणे एवढ्या मोठ्या खासदारांना अवघड नसावे. पण सत्ता आणि अधिकार यांच्या माजातुन आलेली मुजोरी आणि सुसंस्कृतपणाचा मुळचा अभाव यातुन हे असले प्रकार घडतात.
अगदी. अगदी!

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन 25/07/2014 - 13:09
अगदी नेमकेपणे हेच म्हणतो. मूळ मुद्दा राहिला एकीकडे आणि आता त्यांना सहानुभूती मिळतेय. पूर्वी मराठे युद्धात जिंकून तहात कसे काय हरत असतील असा प्रश्न कधीकाळी पडत असे त्याचे उत्तर हे असे किस्से पाहून मिळतं एकदम.

In reply to by बॅटमॅन

पूर्वी मराठे युद्धात जिंकून तहात कसे काय हरत असतील असा प्रश्न कधीकाळी पडत असे त्याचे उत्तर हे असे किस्से पाहून मिळतं एकदम.
एकदम सो टके की बात !!

In reply to by मृत्युन्जय

+१. आणि >>>"अपरिपक्व राजकारण ते हेच." या वाक्याशी--- "अपरिपक्व" हा फारच कोमल मनाने वापरलेला शब्द आहे अश्या नोंदीसह--- १००% सहमत.

In reply to by मृत्युन्जय

मैत्र 25/07/2014 - 17:01
सगळं प्रकरण इतकं नेमकेपणे मांडलं आहे एका प्रतिसादात.. कुठेतरी एका संस्थळावर - (शिवसेनेला गोत्यात कसं आणता येईल हे बघणार्‍या माध्यम स्थळावर) त्या जेवणाच्या थाळीचा फोटो पाहिला. तो खरा असेल आणि हेच अन्न तिथे उद्धटपणे दिलं जात असेल तर संताप कोणालाही येईल. हॉटेल मध्ये जर १५० रु. ला जर हे पुण्या मुंबईत कोणी दिलं तर भांडणे होतील आणि बातमी होईल. पण खासदार असणे -- ज्याला Law makers म्हणतात त्यांनी त्यावर कसं वागावं आणि कायदा वापरून या मलिकसारख्या सगळ्यांना सरळ कसं करावं हे या अननुभवी खासदारांना समजत नाही हे स्पष्ट आहे. पण महाराष्ट्र सदनात भाजपचेही खासदार असतीलच की पुण्याच्या शिरोळेंसारखे नवखे आणि अहीर / गांधी / दानवे असे जुने जाणते. ते कुठे नाहीत या गदारोळात? का साळसूद होत आहेत? दुसरं हे की इंग्रजी माध्यमांचा खोटेपणा आणि कांगावा तिडीक आणणारा आहे. मी मराठी आणि इतर काही प्रतिनिधींना बरोबर घेऊन हे लोक दंगा करायला गेले होते. तरी एन डी टी व्ही म्हणते की या खासदारांना हे माहीत नव्हते की त्यांच्या वागण्याचा व्हिडीओ उपलब्ध आहे. काही फोटोंमध्ये तर शेजारी उभा असलेला कॅमेरामन दिसतो आहे. हा दुवा काय घडलं याचा. http://t.co/UtthstlD80 जर सत्ता असताना आणि तथाकथित दबाव असताना इतकं खोटं दडपून छापलं जातं (उदा. मुद्दाम केलं वगैरे) तर आधी काय करत होते आणि माध्यमे काय लोकांपर्यंत नेत होती हे कल्पनेच्या पलिकडचं आहे.

In reply to by मैत्र

प्यारे१ 25/07/2014 - 18:27
बळंच काँस्पिरसी (थोडं तथ्य असावं) ;) सेनेला गोत्यात आणण्याचा हा भाजपाचा डाव नसेल कशावरुन? असंही भाजपावाले जरा चंगळ करत आहेत सध्या. सेना नकोच आहे त्यांना लोकसभा विजयामुळं.

In reply to by प्यारे१

थोडेफार सहमत. भाजपाचे खासदार अजूनतरी गप्प्गुमान आहेत. सध्याचे वातावरण पाहता ते गुजरात भवनमध्ये ढोकळा खाण्यात मग्न असावेत. समाजात्,विशेष करून महाराष्ट्राबाहेर कसे वागायचे ह्याचे ट्रेनिंग किंवा तुमचा तो क्रॅश कोर्स करणे महाराष्ट्रातील राजकारण्यांवर सक्तीचे करावे ही एक माफक अपेक्षा.

पोटे 25/07/2014 - 13:44
जनतेला रिजल्ट हवे असतात. रीझन्स नाही. दिल्लीत गेल्यावर पोट कसे भरावे ही अक्कल ज्या खासदाराना नाही ते म्हाराश्ट्राचं पोट कसे भरणार? नेते दिल्लीला गेले.. आणि हे नेते जन्तेला काय ऐकवतात ? किचनमध्ये जेअण नव्हतं , संडासात साबण नव्हता !

नसानसात मस्ती व माज भरलेल्यांना निवडून दिले की काय होते ते महाराष्ट्र सदनात दिसले रे हुप्प्या.
त्यांच्या न्याय्य आणि उचित मागण्या मागे पडल्या
काय मागण्या होत्या? प्रकरण अंगाशी आले की मराठीच्या नावाने गळा काढायचा,अगदी यशवंतरावांपासून हे चालत आलय. मोदीजींनी राजन विचारेंना उद्या पोळी ऐवजी उंधियो भरवला तर विचारे तोच उंधियो मोदींच्या तोंडात कोंबण्याची धमक दाखवतील?
पण आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणून मूग गिळून बसण्यापलीकडे ते काही करु शकत नाहीत.
ते गेले २५वर्षे हेच करत आले आहेत रे.हेच वर्तन कॉन्ग्रेस वा ईतर पक्षाच्या खासदारांनी केले असते तर स्वराज्,जेटली एव्हाना उपोषणाला बसले असते.

vikramaditya 25/07/2014 - 16:35
आणि सर्व प्रतिक्रिया अगदी अचूक. अती तेथे माती.

मराठी_माणूस 28/07/2014 - 20:36
लोकसत्तेच्या आजच्या अंकात एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. तो म्हणजे आपले राष्ट्र जर धर्मनिरपेक्ष आहे तर कार्यालयीन कामकाजात धर्म हा वादाचा मुद्दा कसा काय होउ शकतो सदर->लोकमानस शिर्षक :"आयुक्तांचा पळपुटेपणा" http://epaper.loksatta.com/311850/indian-express/28-07-2014#page/8/2

In reply to by हुप्प्या

शिद 29/07/2014 - 21:52
सामान्य माणसाला २ वेळच्या जेवणाची भ्रांत आणि ह्या खासदारांना असे प्रश्न विधायक वाटतात...फालतूगिरी सगळी.

In reply to by शिद

शिद 29/07/2014 - 21:54
वा वा...चान चान.
प्रभा रावत यांच्या देखरेखीखाली बचत गटाचे १७ कर्मचारी महाराष्ट्र सदनात खमंग, चमचमीत, चटपटीत जेवण बनवण्याचं काम चोख करत आहेत.

In reply to by हुप्प्या

सहिये ! केला तो तसा मुर्खपणाच पण राडा कामात आला. बाकी बदनामी वगैरे तर आपल्या देशात सहज विसरले जातात.

आशु जोग 30/07/2014 - 11:58
हुप्प्याराव हे न चुकता नेमाने नियमाने व्रतस्थपणे अविरत न थकता न थांबता अविश्रांतपणे सतत संतत चालू बातम्या इथे टाकत असल्याने रोजचे वर्तमानपत्र बंद करण्याचा विचार आहे. काय वाटते आपल्याला

तिकडे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत-५० हजार कर्ज तर कधी १ लाख्कर्ज. आणि दिल्लीत त्यांचे प्रतिनिधी कोल्हापूरी चिकन्,पुरणपोळ्या झोडण्यात आता मग्न आहेत. वा रे शिवसेना.

प्रतापराव 30/07/2014 - 15:40
खासदारांना कोल्हापुरी चिकन, पुरणपोळ्या चापायला मिळणार अभिनंदन. राडा कामी आला. मुंबई पालिकेतील शाळात विध्यार्थ्यांना जो आहार दिला जातो त्याची क्वालिटी पाहता प्रश्न पडतो कि हा आहार कोणाच्या तोंडात कोंबायचा. जेवणाचे कंत्राटदार तर सेनाच ठरवते ना.

आशु जोग 01/08/2014 - 21:56
हुप्प्यारावसाहेब यांनी माळीणची बातमी इथे न चिकटवल्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो... आपल्यावर विसंबून आम्ही सर्व पेपर बंद करून टाकले आहेत...
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील अनागोंदी कारभाराला कावलेल्या शिवसेना खासदारांनी राडा केला आणि त्यांच्या न्याय्य आणि उचित मागण्या मागे पडल्या आणि एका सच्चा रोझेदार मुस्लिमाला त्याचा रोजा भंग करायला लावण्याचे महामहामहापाप त्यांच्या डोक्यावर बसले. मूळ समस्या साफ मागे पडली आणि नसते लचांड गळ्यात पडले. आता दादापुता करुन आपण मुस्लिमांचे तारणहार कसे आहोत. सर्व धर्मांचा आपण कसा आदर करतो वगैरे फालतू आणि खोटारडी बडबड शिवसेनेच्या विविध नेत्यांच्या तोंडून ऐकावी लागत आहे.