गाज१ http://www.misalpav.com/node/41462
विश्वा आता हाताशी आला हाय. आता त्याच लगीन करून दिल पाहिजे. म्हणजी तो वाया जाणार नाय, आजकाल काही चांगल्या लोकांशी संगत नाय हाय. तो आजकाल अण्णा मलबऱ्याशी संग करतु. विश्वला फकस्त त्याच्या अंगावरच दागिनं आणि त्याचा पैका दिसतु. त्यो अण्णा कुठं कुठं फिरत असतोय. कधी तालुका, कधी मुंबई, कधी मद्रास भिंगरीचं अस्तेय त्याच्या पायाला. एक दोन वेळा पोलीस पण आल्ती होती त्यांचा घरला.
गंणप्याची विचारांची लडी तात्यांच्या हाळीने तुटली
"काय र ! कधी पासून हाका देतुया पण, लक्ष कुठं हाय तुज"
"आर ! मी वाडीच्या ह्या टोकास्नी .